नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून नागपूर येथे सुरू झाले. या अधिवेशनाची सुरुवात देशाचे राष्ट्रीय गीत असलेल्या वंद मातरमने झाले. विधान परिषदेत संपूर्ण वंदे मातरम गीत सामूहिकपणे गायले गेले.वंदे मातरम्!सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्,शस्यश्यामलाम्, मातरम्!वंदे मातरम्!महाराष्ट्र विधिमंडळाच्या 'हिवाळी अधिवेशन 2025'ची सुरुवात...#Maharashtra #Nagpur #WinterSession2025 pic.twitter.com/qBCdTbOi0h— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 8, 2025नियोजनानुसार विधान परिषदेत कामकाज दुपारी बारा वाजता सुरू झाले. कामकाजाची सुरुवात वंदे मातरम आणि राज्यगीताने झाली.या वर्षी, वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त, सभागृहात संपूर्ण गीत सामूहिकपणे गायले गेले. सदस्यांनी उभे राहून आदरपूर्वक गीत गायले, ज्यामुळे सभागृहात एक विशेष वातावरण निर्माण झाले.वंदे मातरम आणि राज्यगीतानंतर, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विभागीय मंत्र्यांनी त्यांच्या संबंधित मंत्रालयांशी संबंधित विविध अध्यादेश मांडले. यामध्ये महसूल, पणन, ग्रामीण विकास आणि कामगार विभागांशी संबंधित अध्यादेशांचा समावेश होता.जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या 'हिवाळी अधिवेशन 2025'चा प्रारंभ...#Maharashtra #Nagpur #WinterSession2025 pic.twitter.com/VZSroPitKJ— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 8, 2025
भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर
नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची (प्रत्यार्पणाची) मागणी करत आहे. याबाबत आता भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे. भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्या निर्णयामागे बांगलादेशातील परिस्थिती कारणीभूत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा परराष्ट्रमंत्र्यांना विचारण्यात आले की, शेख हसीना जितका काळ इच्छितात तितका काळ भारतात राहू शकतात का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “हा वेगळा प्रश्न होता. त्या काही खास परिस्थितींमध्ये येथे आल्या, पण निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल.” परराष्ट्र मंत्र्यांनी हेही स्पष्ट केले की भारत हा बांगलादेशचा शुभचिंतक आहे.भारत-बांगलादेश संबंधांबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले की, बांगलादेशच्या विद्यमान नेतृत्वाने मागील निवडणुकीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी सांगितले की, जर मुद्दा निवडणुकीचा असेल, तर सर्वप्रथम निष्पक्ष निवडणुका होणे अत्यावश्यक आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी यावर जोर दिला की,भारताला बांगलादेशात स्थिरता आणि लोकशाहीची वैधता टिकून राहावी असे वाटते. पुढे त्यांनी सांगितले त्यांना विश्वास आहे की बांगलादेशातील लोकशाही प्रक्रियेतून जेही नेतृत्व पुढे येईल, ते भारताशी असलेल्या संबंधांविषयी संतुलित आणि परिपक्व दृष्टिकोन ठेवेल, ज्यामुळे परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर भारत–बांगलादेश संबंधांमध्ये किंचित तणाव निर्माण झाला आहे, हेही त्यांनी मान्य केले. गेल्या महिन्यातच बांगलादेशात मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बांगलादेश सरकारच्या मागणीवर भारत सरकारने अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ७५ हजार २८६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी एकूण ७५ हजार २८६ कोटी ३८ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या मागण्यांमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कृषिपंप व वस्त्रोद्योग ग्राहकांना विद्युत सवलत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आदी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. यापैकी अनिवार्य खर्चासाठी २७ हजार १६७ कोटी ४९ लाख, कार्यक्रमांतर्गत ३८ हजार ५९ कोटी २६ लाख आणि केंद्र पुरस्कृत योजनांसाठी १० हजार ५९ कोटी ६३ लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. मात्र, या स्थूल रकमेचा निव्वळ भार ६४ हजार ६०५ कोटी ४७ लाख इतका असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.राज्यातील विविध विभागांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या या पुरवणी मागण्या मुख्यत्वे आपत्ती व्यवस्थापन, कृषी व ऊर्जा क्षेत्रातील सवलती, महिला सशक्तीकरण, ग्रामीण रोजगार, आरोग्य व नगर विकास यांसारख्या प्राधान्य क्षेत्रांना भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी आणि आपत्ती प्रतिसाद निधीसाठी सर्वाधिक १५ हजार ६४८ कोटी रुपयांची तरतूद आहे. यानंतर कृषिपंप, यंत्रमाग व वस्त्रोद्योग ग्राहकांना विद्युत शुल्क सवलत आणि प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी ९ हजार २५० कोटी रुपयांची व्यवस्था प्रस्तावित आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ६ हजार १०३ कोटी २० लाख, तर केंद्राकडून भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत ५० वर्ष बिनव्याजी कर्ज म्हणून ४ हजार ४३१ कोटी ७४ लाख रुपयांचा समावेश आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या केंद्र व राज्य हिस्स्यासाठी ३ हजार ५०० कोटी, महानगरपालिका व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना मूलभूत सुविधा विकासासाठी विशेष अनुदान म्हणून २ हजार २०० कोटी, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी ३ हजार कोटी, परिवहन विभागाच्या विविध खर्च व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला विशेष अर्थसहाय्यासाठी २ हजार ८ कोटी १६ लाख अशा प्रमुख तरतुदी आहेत. याशिवाय अमृत २.० आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० साठी २ हजार ५०० कोटी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानासाठी ५२७ कोटी ६६ लाख, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानासाठी ९ हजार ७७८ कोटी ७८ लाख, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत अभियानासाठी ३ हजार २८१ कोटी ७१ लाख यांचा उल्लेख आहे.मुद्रांक शुल्क अधिभार परतफेडसाठी २ हजार ५०० कोटी, संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी ३०० कोटी, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी ४०० कोटी, घरकुल योजनांसाठी (प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना) ६४५ कोटी, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसाठी १ हजार ६१५ कोटी ३५ लाख, सारथी, बार्टी, महान्योती व वनार्टी संस्थांना विविध योजनांसाठी ४६५ कोटी आणि विविध पाटबंधारे विकास महामंडळांना नाबार्डकडून दीर्घ मुदतीचे कर्ज म्हणून २६१ कोटी ६४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.कोणत्या विभागाला किती निधी ?- महसूल व वन विभाग : १५,७२४.०८- उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग : ९,२०५.१०- नगर विकास विभाग : ९,१९५.७६- सार्वजनिक बांधकाम विभाग : ६,३४७.४१- महिला व बाल विकास विभाग : ५,०२४.४८- नियोजन विभाग : ४,८५३.९९- गृह विभाग : ३,८६१.१२- सार्वजनिक आरोग्य विभाग : ३,६०२.८०- जलसंपदा विभाग : ३,२२३.३९- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग : २,३१५.४४- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : २,३४४.५०- इतर मागास बहुजन कल्याण विभाग : १,७०३.९२- सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग : १,४७४.३५- आदिवासी विकास विभाग : १,४६१.५६- वैद्यकीय शिक्षण व औषधि द्रव्य विभाग : १,१८१.६२- ग्रामविकास विभाग : ७१८.८५- कृषी व पशु विभाग : ६१६.२१- कोशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग : ६०१.७०
पुणे: देशभरातील मुस्लीम महिलांच्या जीवनात अस्थिरता निर्माण करणाऱ्या बहुपत्नीत्व प्रथेला तातडीने कायदेशीर बंदी घालावी, अशी मागणी भारतीय मुस्लीम महिला आंदोलन (बीएमएमए)या संघटनेने केंद्र सरकारकडे केली आहे. सात राज्यांमध्ये घेतलेल्या विस्तृत सर्वेक्षण अहवालाच्या निष्कर्षांवर आधारलेल्या या मागणीला देशभरातील ३०० हून अधिक प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला आहे. या सर्वेक्षणातून मिळालेल्या आकडेवारीतून मुस्लीम महिलांची स्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट झाल्याचे नमूद केले आहे. बहुपत्नीकत्वामुळे ६९ टक्के महिला प्रचंड मानसिक तणावाखाली, ७९ टक्के महिलांना पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती वेळेवर मिळाली नाही, ४८ टक्के महिलांना शिक्षणाचा अभाव असल्याचे आढळले आहे.
मुंबई: ग्राहकांच्या सुरक्षेसाठी व पारदर्शकतेची निश्चिती करण्यासाठी आधार कार्ड नोंदणीत नवे मोठे बदल होणार आहेत. नव्या बदलानुसार आगामी दिवसात व्यापारी, हॉटेलमालक, कार्यक्रमाचे आयोजक यांनी घेतलेल्या आधार कार्डची छायाकिंत प्रत घेण्यापासून व आपल्या डिव्हाईस अथवा सिस्टिम मध्ये स्टोर करण्यापासून प्रतिबंध करण्यात येणार आहे. तसेच नवीन पडताळणीमुळे केंद्रीय आधार डेटाबेसशी कनेक्टेड असलेल्या मध्यवर्ती डेटाबेसवरचा ताणही कमी होऊ शकतो असे युडीआयडीएआय (UIDAI) संस्थेने स्पष्ट केले आहे. थेट छायांकित प्रत स्मार्टफोनवर स्टोअर करणे हे आधार कार्ड कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे या नियमात परिवर्तन करण्यासाठी आधार कार्ड नियमात बदल होऊ शकतात.याशिवाय ऑफलाईन पडताळणी करण्याची इच्छा असलेल्या संस्थांना (API Appliancation Programming Interface) मध्ये प्रवेश मिळू शकेल. या माध्यमातून ते थेट आधार पडताळणीसाठी आपली सिस्टिम अपडेट करु शकणार आहेत. याविषयी बोलताना भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) चे सीईओ भुवनेश कुमार यांनी सांगितले आहे की, 'प्राधिकरणाने हॉटेल्स, कार्यक्रम आयोजक इत्यादी संस्थांना आधार-आधारित पडताळणी करणाऱ्या संस्थांची नोंदणी अनिवार्य करणारा एक नवीन नियम मंजूर केला आहे, जेणेकरून त्यांना नवीन तंत्रज्ञानाची सुविधा मिळेल ज्यामुळे ते QR कोड स्कॅन करून किंवा नवीन आधार अँपशी कनेक्ट करून एखाद्या व्यक्तीची पडताळणी करू शकतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.नवीन नियम प्राधिकरणाने मंजूर केला आहे आणि लवकरच तो अधिसूचित केला जाईल हॉटेल्स, कार्यक्रम आयोजकांसारख्या ऑफलाइन पडताळणी करणाऱ्या संस्थांची नोंदणी अनिवार्य करेल. कागदावर आधारित आधार पडताळणीला निरुत्साहित करणे हे उद्दिष्ट आहे' असे ते पुढे म्हणाले आहेत.उपलब्ध माहितीनुसार, युडीआयडीआय (UIDAI) एका नवीन अँपची बीटा-चाचणी करत आहे जे प्रत्येक पडताळणीसाठी केंद्रीय आधार डेटाबेस सर्व्हरशी कनेक्ट न होता अँप-टू-अॅप पडताळणी सक्षम ठरणार आहे. नवीन अँप विमानतळ, वयानुसार उत्पादने विकण्याची आवश्यकता असलेल्या दुकाने इत्यादी ठिकाणी देखील वापरता येईल.'पडताळणीची सोय कागदपत्रांचा वापर न करता ऑफलाइन पडताळणी वाढवेल, तसेच वापरकर्त्यांची गोपनीयता राखेल किंवा त्यांचा आधार डेटा गैरवापरासाठी लीक होण्याचा धोका असेल' असेही कुमार म्हणाले आहेत.नवीन अँप डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्यानुसार आधार प्रमाणीकरण सेवा सुधारेल अशी अपेक्षा आहे.१८ महिन्याच्या आत ही प्रकिया पूर्णपणे कार्यान्वित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अँप युजरन नवीन अँपवर त्यांचे पत्ता पुरावा कागदपत्रे अद्यतनित (Update) करण्यास आणि त्याच अँपवर इतर कुटुंबातील सदस्यांना जोडण्यास सक्षम करेल ज्यांच्याकडे कोणताही मोबाइल फोन नाही. त्यामुळे हा नवा नियम आधार कार्ड सुरक्षिततेसाठी महत्वाचा ठरणार आहे.
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी
वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहितीमुंबई : महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेमबर्ग राज्यादरम्यान नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण संयुक्त करार करण्यात आला आहे, यामुळे महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थ्यांनी जर्मनीत प्रशिक्षण घेऊन करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असल्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि बाडेन-वुटेमबर्ग राज्याचे मंत्री मॅनफ्रेड लुखा यांनी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. अनिल भंडारी, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, तसेच बाडेन-वुटेमबर्ग राज्य येथील सामाजिक व्यवहार, आरोग्य आणि एकात्मता मंत्रालयाचे उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ तसेच वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या करारानुसार भाषा प्रशिक्षण, प्रगत कौशल्य विकास, प्रमाणपत्र मान्यतेची प्रक्रिया सुलभ करणे, तसेच जर्मनीत नोकरी स्वीकारणाऱ्या नर्सेसच्या सन्मान व संरक्षणासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उच्च दर्जाच्या आरोग्यसेवेच्या दृष्टीने प्रशिक्षित नर्सिंग मनुष्यबळाची निर्मिती हा या कराराचा केंद्रबिंदू असणार आहे. दोन्ही राज्यांतील नर्सिंग शिक्षण संस्था, विद्यापीठे व प्रशिक्षण केंद्रांदरम्यान विद्यार्थी–प्राध्यापक आदानप्रदान, संयुक्त प्रशिक्षण, अभ्यासदौरे आणि संशोधन उपक्रम राबवून शिक्षणाची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा उद्देश असल्याचे मंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. मंत्री मॅनफ्रेड लुखा म्हणाले, दोन्ही राज्यादरम्यान नर्सिंग व आरोग्यसेवा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. कौशल्याधारित आरोग्यसेवेचा विस्तार करणे, संशोधनाला चालना देणे तसेच परदेशी रोजगार संधी उपलब्ध करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. या सहकार्यामुळे तरुणांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ अधिक प्रशिक्षित व सक्षम होईल. बाडेन-वुटेमबर्ग राज्याच्या प्रतिनिधी मंडळाने महाराष्ट्र राज्याचा दौरा केला होता. नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य वाढवणे, प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे व कौशल्य विकासासाठी नवीन मार्ग उभारणे हा या भेटीचा प्रमुख उद्देश होता. यामुळे नर्सिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय भागीदारी बळकट होईल.
एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !
फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकलाउत्तर प्रदेश : बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा फुगा फुगवताना मृत्यू झाला. अचानक फुग्यातील रबरचा तुकडा तिच्या तोंडात शिरला आणि श्वास नलिकेत अडकला, ज्यामुळे तिचा गुदमरून मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.बुलंदशहरच्या पहासू भागातील दिघी गावात ही धक्कादायक घटना घडली. आठवीत शिकणारी १३ वर्षांची कुमकुम हिने गावातील एका दुकानातून एक फुगा विकत घेतला आणि तिच्या धाकट्या भावाला फुगा फुगवून देण्यासाठी घरी आली. फुगा फुगवताना तो अचानक तिच्या तोंडात फुगा फुटला आणि फुग्यातील रबराचा तुकडा तिच्या श्वास नलिकेत अडकला. यानंतर कुटुंबीयांनी कुमकुमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. घटनेची माहिती देताना पाहसू पोलीस ठाण्याचे प्रमुख अशोक कुमार म्हणाले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात जाऊन माहिती गोळा केली. मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, तिच्या श्वास नलिकेमध्ये फुग्याचा रबराचा तुकडा अडकल्याने तिचा गुदमरून मृत्यू झाला. या प्रकरणात कोणतीही लेखी तक्रार आलेली नाही.
अजित पवार गटाच्या महिला नेत्याचा अपघाती मृत्यू; भीषण दुर्घटनेत दोघे जण जखमी
Gadchiroli Accident | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा आणि आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा गीता सुशील हिंगे (५३) यांचा रविवारी मध्यरात्री भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात त्यांचे पती सुशील हिंगे (५७) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरू आहेत. गडचिरोली-नागपूर महामार्गावरील उमरेड तालुक्यातील पाचगावजवळ हा अपघात घडला आहे. हिंगे दाम्पत्य नागपूर […] The post अजित पवार गटाच्या महिला नेत्याचा अपघाती मृत्यू; भीषण दुर्घटनेत दोघे जण जखमी appeared first on Dainik Prabhat .
सात दिवसांच्या संकटात इंडिगोच्या शेअर्समध्ये झपाट्याने घट ; खरेदीची एक उत्तम संधी
Indigo Shares। देशातील सुमारे ६० टक्के देशांतर्गत उड्डाणे नियंत्रित करणारी विमान कंपनी इंडिगो सध्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली की सरकारला हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर डीजीसीएने कंपनीला नोटीस बजावली. सोमवारी लोकसभेत काँग्रेस पक्षानेही हाच मुद्दा उपस्थित केला. गेल्या आठवड्यात वारंवार उड्डाणे रद्द होणे, विलंब होणे आणि प्रवाशांच्या तक्रारींमुळे इंडिगोबद्दल बाजारात नकारात्मक […] The post सात दिवसांच्या संकटात इंडिगोच्या शेअर्समध्ये झपाट्याने घट ; खरेदीची एक उत्तम संधी appeared first on Dainik Prabhat .
सलग सातव्यांदा इंडिगो शेअर कोसळला मात्र स्पर्धक स्पाईस जेट शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
मोहित सोमण: सकाळच्या सत्रात इंडिगो (IndiGo) कंपनीचा शेअर सलग सातव्या सत्रात घसरल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत एअर लाईन्स कंपनी इंडिगो (Interglobe Aviation Limited) कंपनीचा शेअर ७.६३% उसळत ४९६०.५० रुपयांवर व्यवहार करत आहे. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीचा शेअर गेल्या सात सत्रात १५.२७% घसरला असून यापूर्वी कंपनीचा शेअर आज ४९४१.०० रूपये नीचांकी पातळीवर पोहोचला होता. इंडिगो विमाने सातत्याने रद्द होत असताना मोठ्या प्रमाणात विमान व्यवस्थेतील खेळाखंडोबा उद्धृत झालेला दिसला. असे असताना विशेषतः कंपनीच्या कामकाजावर टिका करण्यात आली. कंपनीने लवकरच व्यवस्था पूर्ववत होईल असे आश्वासन दिले असले तरी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार कंपनीच्या सीईओपदी असलेल्या व्यक्तीला नारळ द्यावा लागू शकतो या सगळ्या घडामोडींमुळे कंपनीचा शेअर मोठ्या प्रमाणात घसरला आहेकंपनीच्या व्यवस्थापनात बदल होण्याच्या प्रक्रियेला वेग आल्याने तसेच कारणे दाखवा नोटीशीसाठी एक दिवस मुदतवाढ दिली असताना नव्या माहितीनुसार आज पुन्हा एकदा इंडिगोची २०० विमाने आज रद्द झाली. या सगळ्या घडामोडींमुळे कंपनीच्या शेअरवर सत्र सुरूवातीलाच दबाव निर्माण झाला. गुंतवणूकदार एअरलाइनच्या नजीकच्या भविष्यातील भविष्याबाबत वाढत्या अनिश्चिततेशी झुंजत आहेत. डीजीसीएने बदललेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यास विमान कंपनी अपयशी ठरल्याने गुंतवणूकदारांकडूनही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या नव्या नियमानुसार, सुधारित पायलट ड्युटी-टाइम नियमांनुसार रोस्टर संबंधित अपयश आणि क्रू-व्यवस्थापनातील त्रुटी स्पष्ट करण्यासाठी इंडिगोच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये ब्रोकरेजकडू नजीकच्या काळातील चिंता व्यक्त केली गेली. काही कंपन्यांनी आधीच किंमत लक्ष्य (Target Price TP) कमी केले आहेत. यासह रद्दीकरण (Cancellation) आणि नियामक परिणाम (Regulatory Impact) कायम राहिल्यास आणखी घसरण होण्याची चेतावणी दिली आहे. ते संभाव्य भरपाई देयके, परतफेड दायित्वे आणि वाढत्या क्रू-भरती खर्चामुळे कमी होत असलेल्या मार्जिनकडे विश्लेषकही निर्देश करत आहेत. तथापि, इतर विश्लेषकांचा असा युक्तिवाद आहे की इंडिगोचा प्रमुख देशांतर्गत बाजार हिस्सा, मोठा फ्लीट आकार आणि मजबूत ब्रँड अजूनही दीर्घकालीन खेळासाठी एक व्यवहार्य असला तरी जर ऑपरेशन्स लवकर सामान्य होऊन प्रवाशांची मागणी लवचिक राहू शकते. इंडिगो किती लवकर ऑपरेशन्स स्थिर करू कंपनीला पुन्हा उभारी देईल यावर शेअरचे भवितव्य दिसू शकते. गेल्या ५ दिवसात कंपनीचा शेअर १४.२२%, महिनाभरात ११.०३%, ६ महिन्यात १२.७०% घसरण झाली असून गेल्या वर्षभरात शेअरमध्ये १०.७५% वाढ झाली आहे.स्पाईस जेट शेअर्समध्ये मोठी वाढ -इंटरग्लोब एव्हिऐशनचा प्रतिस्पर्धी स्पाईस जेट शेअर्समध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे. दुपारी १२.२१ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये १०.२५% वाढ झाल्याने शेअर ३४.१० रूपये पातळीवर पोहोचला आहे. गेल्या दोन सत्रात शेअर १७% उसळला होता. स्पर्धक असलेल्या इंडिगो कामगिरीत उतरती कळा लागल्याने स्पाईस जेट आपल्या विमानसेवेत वाढ केली ज्याचा फायदा अनेक प्रवाशांना झाल इंडिगोची कंपनी मोठ्या प्रमाणात विमानसेवा रद्द करत असताना, या स्पाईस जेट कंपनीच्या विस्तारित कामकाजाबाबत आशावाद वाढला आहे. आठवड्याच्या शेवटी, इंडिगोची पालक कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनने शुक्रवारी केवळ ७०० हून अधिक उड्डाणे चालविल्याची पुष्टी केली नेटवर्क व्यत्यय येत असल्याने त्यापैकी बरीच उड्डाणे रद्द करण्यात आली असे कंपनीने स्पष्ट केले होते याउलट, स्पाइसजेटने आपली क्षमता वाढवली आहे. स्पाईस जेट कडून अडकलेल्या प्रवाशांची वाहतूक कमी करण्यासाठी एअरलाइनने शुक्रवारी दिल्ली आणि मुंबईहून अनेक मार्गांवर नवीन उड्डाणे सुरू केली. कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी वाढ झाली असताना गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये ५.२६% वाढ झाली असून गेल्या महिनाभरात ०.५८% वाढ नोंदवली आहे. तर सहा महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये २०.७१% घसरण झाली आहे. वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ४३.१२% घसरण झाली. कंपनीच्या पोर्टफोलिओत आणखी १९ विमाने वाढणार असल्याने गुंतवणूकदारांनी शेअरला मोठा प्रतिसाद दिला.
नाताळनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर तीन विशेष गाड्या
कणकवली : हिवाळा आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर तीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाड्यांना सिंधुदुर्गातील काही स्थानकांवर थांबे आहेत.सीएसएमटी - करमळी (०११५१/०११५२) ही गाडी १९ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२६ या काळात दररोज धावणार आहे. ०११५१ सीएसएमटीहून रात्री १२.२० वाजता सुटेल आणि करमाळीला त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. ०११५२ करमळीहून दुपारी २.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकांवर थांबणार आहे.लोकमान्य टिळक (टी) थिरुवनंतपुरम उत्तर विशेष (०११७१/०११७२) ही साप्ताहिक गाडी १८ डिसेंबर २०२५ ते ८ जानेवारी २०२६ दरम्यान धावणार आहे. ०११७१ लोकमान्य टिळक (टी) येथून दर गुरुवारी दुपारी ४ वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम उत्तर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.३० वा पोहचेल. ०११७२ दर शनिवारी थिरुवनंतपुरम उत्तर येथून दुपारी ४.२० वाजता सुटेल. ही ट्रेन मध्यरात्री १ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल. या गाडीचे थांबे ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी, मडगाव जं., कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकुंडुराबी रोड, सुरथकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शौरानूर जं., त्रिसूर, अलुवा, अलु एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, चौगनासेरी, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम, करुणागपल्ली, सस्थानकोडा कोल्लम आणि वर्कला शिवगिरी स्टेशन्सवर असतील.लोकमान्य टिळक (टी)- मंगळुरू जंक्शन विशेष (०११८५/०११८६) ही साप्ताहिक गाडी १६ डिसेंबर २०२५ ते ६ जानेवारी २०२६ दरम्यान दर धावेल. ०११८५ ही गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून मंगळवारी दुपारी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५ वा. मंगळुरू जं. येथे पोहचेल. ०११८६ मंगळुरू जंक्शन येथून बुधवारी दुपारी १ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.५० वा. लोकमान्य टिळक (टी) येथे पोहचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकल, मुकांबीका रोड, कुंडापूर, उडुपी आणि सुरथकाल येथे थांबणार आहे.
लोकसभेत ‘वंदे मातरम’वर १० तास विशेष चर्चा ; पंतप्रधान म्हणाले,”वंदे मातरममुळे नवी ऊर्जा…“
Parliament Winter Session। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. लोकसभेत वंदे मातरमवर प्रदीर्घ चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची सुरुवात केली. त्यांनी चर्चेची सुरूवात करताना लोकसभेत, “देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला ऊर्जा देणारा आणि प्रेरणा देणारा तसेच त्याग आणि तपश्चर्येचा मार्ग दाखवणारा मंत्र, ‘वंदे मातरम’, या घोषणेचे स्मरण करणे हे आपल्यासाठी भाग्य आहे.” असे म्हटले. […] The post लोकसभेत ‘वंदे मातरम’वर १० तास विशेष चर्चा ; पंतप्रधान म्हणाले,”वंदे मातरममुळे नवी ऊर्जा… “ appeared first on Dainik Prabhat .
Bigg Boss 19: विजेतेपदावर वाद…“गौरव खन्ना ट्रॉफी जिंकण्याच्या लायकीचे नाहीत” फरहाना भटचे वक्तव्य
Bigg Boss 19: बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले 7 डिसेंबरला पार पडला आणि गौरव खन्ना यांनी या सीझनची ट्रॉफी जिंकली. परंतु त्यांच्या विजेतेपदावर आता वाद निर्माण झाला आहे. फर्स्ट रनर-अप फरहाना भट यांनी मोठं विधान करत गौरव खन्ना विजेतेपदाच्या लायकीचे नाहीत, असा आरोप केला आहे. “जिंकणं माझं ध्येय नव्हतं… मी मन जिंकले” फरहाना भट […] The post Bigg Boss 19: विजेतेपदावर वाद… “गौरव खन्ना ट्रॉफी जिंकण्याच्या लायकीचे नाहीत” फरहाना भटचे वक्तव्य appeared first on Dainik Prabhat .
सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; “कुंभमेळा झाला पाहिजे त्याबाबत आदरच, पण…”
Sayaji Shinde | नाशिकमध्ये २०२७ला कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी तपोवनमध्ये ‘साधुग्राम’ उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी तब्बल १८०० झाडे तोडण्यात येणार आहेत. या वृक्षतोडीला प्रचंड विरोध होत असून नाशिककर आणि पर्यावरणप्रेमींनी याविरोधात जोरदार आवाज उठवला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह राज ठाकरे यांनीही वृक्षतोडीला विरोध करत सरकारवर गंभीर आरोप केला आहे. अभिनेते सयाजी शिंदे […] The post सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; “कुंभमेळा झाला पाहिजे त्याबाबत आदरच, पण…” appeared first on Dainik Prabhat .
Immunity Boosting Foods: हिवाळ्यात बाळांची तब्येत पटकन बिघडण्याची शक्यता जास्त असते. कारण लहान मुलांची इम्युनिटी पूर्ण विकसित नसते. त्यामुळे त्यांच्या आहारात काही खास पदार्थ रोजच्या डाएटमध्ये समाविष्ट केले, तर त्यांचे शरीर आजारांपासून वाचू शकते. पेडियाट्रिशियनच्या मते बाळांची इम्युनिटी वाढवण्यासाठी काही उत्तम खाद्यपदार्थ आहेत. लहान मुलांच्या डाएटमध्ये नक्की समाविष्ट करावेत हे सुपरफूड्स १) बाजरी आणि रागी […] The post Immunity Boosting Foods: लहान मुलांची इम्युनिटी कशी वाढवावी? पेडियाट्रिशियनचा सल्ला… जाणून घ्या काय खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती जास्त वाढते? appeared first on Dainik Prabhat .
Ramdher Majji। नक्षलवादाच्या विरोधातल्या लढाईत सुरक्षा दलांना आज ऐतिहासिक यश मिळाले आहे. कुख्यात नक्षलवादी कमांडर आणि केंद्रीय समिती सदस्य (सीसीएम) “रामधेर मज्जी” ने आज सकाळी छत्तीसगडमधील बकरकट्टा याठिकाणी त्याच्या ११ सहकाऱ्यांसह पोलिसांना आत्मसमर्पण केले आहे. कुख्यात नक्षलवादी नेता हिडमाचा समकक्ष मानल्या जाणाऱ्या रामधेर मज्जीवर ₹१ कोटीचे बक्षीस होते. या मोठ्या आत्मसमर्पणानंतर, एमएमसी झोन (महाराष्ट्र, मध्य […] The post महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड झोन नक्षलमुक्त ; १ कोटींचं बक्षीस असलेल्या नक्षलवादी ‘मज्जी’चे टोळीसह आत्मसमर्पण appeared first on Dainik Prabhat .
Belgaum News | कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यादरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठी भाषिकांच्या दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नांची दखल घेण्याची मागणी जोरदारपणे केली जात आहे. याप्रकरणी बेळगावातील सीमाभागात पुन्हा एकदा वातावरण तापले असून खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे. कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाविरोधात महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच परवानगी […] The post बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड; मराठी भाषिकांच्या दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नांवरून आक्रमक भूमिका appeared first on Dainik Prabhat .
तुकडा बंदी कायद्यातील सुधारणेसाठी विधेयक विधानसभेत सादर
नागपूर: आजपासून सुरू झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडा बंदी कायद्यातील सुधारणेसाठी विधेयक विधानसभेत सादर केले. या विधेयकामुळे तुकडा बंदी कायद्यात महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत. आज सभागृहात विधेयक मांडले असले तरी, त्यावर लगेच चर्चा झाली नाही. या विधेयकावर उद्यापासून (मंगळवार) विधानमंडळात चर्चा सुरू होणार आहे.
१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुलानवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर बांधलेला श्योक बोगदा रविवारी लष्करासाठी खुला करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्याचे उद्घाटन केले, ज्यामुळे भारतीय सैन्याला पूर्व लडाखमधील डेपसांग-डीबीओ सेक्टरमध्ये जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवेश मिळाला. जोरदार हिमवृष्टी दरम्यानही सैन्य, शस्त्रे आणि रसद यांच्या हालचालीचा वेग लक्षणीयरीत्या वाढेल, ज्यामुळे संवेदनशील एलएसी भागात ऑपरेशनल तयारी आणखी मजबूत होईल.पूर्व लडाखमधील श्योक नदीजवळ बांधलेला श्योक बोगदा हा एक मोक्याचा बोगदा आहे जो दर्बुक-श्योक-दौलत बेग ओल्डी रस्त्याला सर्व हवामानात जोडण्यासाठी डिझाइन केलेला आहे. हा ३२२ किलोमीटर लांबीच्या दर्बुक-श्योक-दौलत बेग ओल्डी रोडचा एक भाग आहे, जो भारतीय सैन्याच्या सर्वात मोक्याच्या पुरवठा मार्गांपैकी एक आहे. हा रस्ता चीन सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) अगदी जवळून जातो, ज्यामुळे हा बोगदा लष्करासाठी महत्त्वाचा बनतो.
नागपूर: नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारला अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. पटोले म्हणाले, सरकारला एवढी घाई काय आहे? हे अधिवेशन कृपया वाढवावे आणि किमान दोन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे. या मागणीला उत्तर देताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांना आठवण करून दिली की, आपण कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला काही कारणास्तव उपस्थित नव्हता. यानंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी, आम्ही सभागृहामध्ये ८ ते १९ डिसेंबरपर्यंत अधिवेशन घ्यावे, असे बोललो होतो, असे स्पष्ट केले.या चर्चेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उडी घेतली. त्यांनी पटोले यांच्या मागणीवर आक्षेप घेत म्हटले की, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपण पुरवणी मागण्या दाखवतो. गेल्या २५ वर्षांत मी एकमेव मुख्यमंत्री आहे, ज्याने नागपूरमध्ये सर्वाधिक कालावधीचे अधिवेशन घेतले. पटोले यांच्यावर टीका करताना फडणवीसांनी पुढे सांगितले की, नाना पटोले यांच्या काळात मुंबईतही तीन आणि चार दिवसच अधिवेशन चालले होते. अखेरीस, नाना पटोले यांनी पुन्हा एकदा अधिवेशन वाढवण्याची मागणी केली असता, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गरज पडल्यास यावर विचार करू, असे आश्वासन दिले.
नोव्हेंबरमध्ये एकूण रिटेल विक्रीत २.१४% वाढ - FADA, 'ही'ऑटोमोबाईल क्षेत्रातील महत्वाची माहिती समोर
मोहित सोमण: फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन (FADA) संस्थेने नोव्हेंबर महिन्यातील रिटेल गाड्यांच्या विक्रीतील आकडेवारी जाहीर केली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर रिटेल गाड्यांच्या विक्रीत सणासुदीच्या काळानंतर पूर्ववत झालेल्या परिस्थितीतही २.१४% वाढ झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र दुचाकी गाड्यांच्या विक्रीत ३.१% घट झाल्याचे स्पष्ट झाले. यातील वर्गीकरण पाहता प्रवासी वाहनात १९.७% वाढ झाली असून व्यवसायिक वाहनात १९.९४% वाढ नोंदवली गेली तर तीनचाकीत २३.६७% वाढ नोंदवली गेली. ट्रॅक्टर विक्रीतही ५६.५५% इतकी लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. मागील महिन्यात गाड्यांमध्ये विक्रमी वाढ झाल्यानंतर सणांच्यानंतर या विक्रीच्या नोंंदण्या झाल्या आहेत. वाढत्या स्पर्धेमुळे असूनसुद्धा गेल्या महिन्यातील तुलनेत झालेली वाढ ही समाधानाकारक झाल्याचे अहवालात दिसून येते.अहवालाने आपले मत व्यक्त केल्याप्रमाणे जीएसटी दरकपातीचा ओघ अद्याप कायम असल्यामुळे ग्राहक गाड्यांच्या खरेदीसाठी आकर्षित होत आहेत. याशिवाय वाढलेल्या चौकशी, सेवेत सुधारणा, वॉक इन चौकश्या या अशा विविध कारणांमुळे ही वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.अहवालात आणखी काय म्हटले गेले?दुचाकीतील घसरण - दुचाकी विक्रीतील घसरण ही प्रामुख्याने ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वाढीच्या तुलनेत रिटेल शिफ्ट झाल्याने ही घसरण अधोरेखित होते. तसेच वाढत्या मागणीसह पुरवठ्यात आलेल्या मर्यादेमुळे विक्रीत घसरण झाल्याचे अहवालाने म्हटले. तरीही जीएसटी कपात, ईव्हीसाठी वाढती खपत, ग्रामीण भागातील वाढती मागणी ही कारणे मागण्या वाढवण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत.आगामी काळात काय?आगामी दिवसात रबी मोसम सुरू होणार असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकी उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढू शकते. उत्पन्नाची वाढलेली पातळी पाहता ट्रॅक्टर मागणीतही वाढ होऊ शकते याशिवाय जीएसटी दरकपात, विक्रीसाठी असलेल्या आकर्षक योजना, उपक्रम यामुळे वाढ अपेक्षित असली तरी अहवालाच्या मते ही वाढ होतानाच सावध सकारात्मकता (Cautious Optimism) दृष्टीकोन कायम राहू शकतो.पुढील ३ महिन्यात काय? (3 Months Outlook) -अहवालातील निष्कर्षानुसार ७४% ऑटोमोबाईल डीलर वाढ अपेक्षित करतात. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये अहवालातील निरीक्षणानुसार, वाढत्या लग्न समारंभ, पीक पेरणी कालावधी, वाढती तरलता यामुळे गाड्यांच्या विक्रीत अथवा मागणीत वाढ अपेक्षित आहे.'एक देश एक कर' या संकल्पनेमुळे क्लिष्टता संपून सरलपणे व परवडणाऱ्या दरात ऑटोमोबाईलची खरेदी शक्य होणार आहे.आगामी काळात सावधता बाळगली तरी भविष्यातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आधुनिकीकरणानंतर वाढीची शक्यता आहे.अर्थात काही नवी ट्रिगर नसल्यास या विक्रीत मर्यादित वाढ राहू शकते.संबंधित वर्षातील बदलाच्या भावनेमुळे आणि जानेवारी-फेब्रुवारीमध्ये उत्सवाच्या 'ट्रिगर्सच्या'अनुपस्थितीमुळे नैसर्गिक मंदी येऊ शकते परंतु स्थिर मॅक्रो फंडामेंटल्स, शेती उत्पन्नाची दृश्यमानता (Income Visibility) सुधारणा अपेक्षित आहे तसेच ओईएम(Original Equipment Manufacturers OEMs) आणि डीलर्स दोघांकडून विश्वास यामुळे या क्षेत्राचा मार्ग मध्यम मार्ग कायम राहू शकेल असे अहवालात म्हटले गेले आहे.आर्थिक वर्ष २०२६ मध्ये प्रवेश करत असताना, भारताची ऑटो रिटेल इकोसिस्टीम सावध परंतु मजबूत आशावादाच्या पायावर उभी आहे असे अहवालात म्हटले गेले आहे.याविषयी आपली प्रतिक्रिया देताना व नोव्हेंबर विक्रीतीव एकूणच कामगिरीवर भाष्य करताना FADA चे अध्यक्ष सी. एस. विघ्नेश्वर म्हणाले आहेत की,'नोव्हेंबर २५ ने पारंपारिक उत्सवोत्तर मंदीला झुगारून दिले, तुलनात्मक आधार असामान्यपणे उच्च असूनही लवचिक कामगिरी केली. पारंपारिकपणे, उत्सव चक्रानंतरच्या (Festiv Cycle) महिन्यात ऑटो रिटेलमध्ये घट होते. तथापि यंदा बहुतेक उत्सव नोंदणी ऑक्टोबर २०२५ मध्येच पूर्ण झाल्या होत्या.नोव्हेंबर २०२४ च्या विपरीत, जेव्हा दिवाळी आणि धनतेरस ऑक्टोबर २०२४ च्या अखेरीस आले होते आणि वाहन नोंदणी नोव्हेंबर २०२४ मध्ये झाली ज्यामुळे व्हॉल्यूममध्ये लक्षणीय वाढ झाली. या बदलासह, उद्योग नोव्हेंबर २०२५ मध्ये वार्षिक २.१४% वाढीसह बंद झाला, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास आणि भारताच्या ऑटो रिटेल बाजाराची संरचनात्मक ताकद पुन्हा दिसून आली. सीएसटी दरात कपात आणि OEM-डीलर रिटेल ऑफरमुळे ग्राहकांना शोरूमकडे आकर्षित करणे सुरू राहिले, ज्यामुळे उत्सवाच्या कालावधीनंतरही ग्राहकांची गर्दी कायम राहिली. ऑक्टोबरमध्ये जोरदार खरेदीला चालना देणाऱ्या विविध श्रेणींच्या किमतींमध्ये घट झाल्याने नोव्हेंबरमध्येही रूपांतरणांना पाठिंबा मिळत राहिला.दुचाकी वाहनांनी, वार्षिक ३.१% च्या माफक वाढीचा अहवाल दिला. घट, संदर्भात पाहिली पाहिजे. ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या खरेदीमुळे, पिकांच्या देयकांना विलंब आणि पसंतीच्या मॉडेल्सच्या असमान पुरवठ्यामुळे किरकोळ विक्रीत लक्षणीय बदल झाला. जीएसटी भावना आणि लग्नाच्या हंगामातील निरोगी मागणीशी संबंधित मजबूत वॉकइन डीलर्स नोंदवत आहेत हे उत्साहवर्धक आहे.जीएसटी फायदे, लग्नाच्या हंगामातील मागणी, उच्च-प्रतीक्षा मॉडेल्सचा चांगला पुरवठा आणि कॉम्पॅक्ट एसयूव्हीकडून सतत वाढ यामुळे प्रवासी वाहनांमध्ये १९.७% वार्षिक वाढ नोंदवली गेली. अशा प्रकारे इन्व्हेंटरी ५३-५५ दिवसांवरून ४४-४६ दिवसांपर्यंत कमी झाली, ज्यामुळे मागणी-पुरवठा शिस्त चांगली झाली.निवडक पायाभूत सुविधा उपक्रम, मालवाहतूक, पर्यटन गतिशीलता, सरकारी निविदा चक्र आणि जीएसटी सुधारणांमुळे व्यावसायिक वाहनांमध्ये १९.९४% वार्षिक वाढ झाली, जरी निवडक बाजारपेठांमध्ये फ्लीट वापर असमान राहिला आहे.' असे म्हटले.जवळच्या काळातील अंदाज-रब्बी हंगामाची सुरुवात चांगली झाली आहे आणि ग्रामीण भागातील पेरण्या ३९.३ दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त झाल्या आहेत, ज्यामुळे जमिनीतील ओलावा, बियाण्याची चांगली उपलब्धता आणि आधारभूत किमान आधारभूत किंमत संकेत यामुळे जवळच्या काळातील अंदाजाला पाठिंबा आहे. गहू, डाळी आणि तेलबियांनी क्षेत्रफळात तीव्र वाढ नोंदवली आहे, ज्यामुळे शेती उत्पन्नात सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, उत्तर आणि मध्य मैदानी भागात सामान्यपेक्षा जास्त थंडीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, ज्यामुळे गतिशीलता गरजा आणि लॉजिस्टिक्स क्रियाकलापांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. एफएमसीजी, ट्रॅक्टर आणि ग्रामीण दुचाकी बाजारपेठांमध्ये व्हॉल्यूम रिकव्हरीची चांगली चिन्हे आहेत. जीएसटी २.० दर कपात आणि सतत ओईएम-डीलर ऑफरसह या घडामोडी डिसेंबरमध्ये मागणी सातत्य राखण्यास मदत करतील अशी अपेक्षा आहे.सुधारित चौकशी पाइपलाइन, लग्नाच्या हंगामातील खरेदी, चांगली स्टॉक उपलब्धता, ग्रामीण पीक प्राप्ती-संबंधित तरलता आणि अपेक्षित वर्षअखेरच्या ग्राहक योजनांमुळे डीलर्स आत्मविश्वासावर प्रकाश टाकतात. काही डीलर्सना शहरी प्रीमियम सेगमेंटमध्ये किरकोळ घसरण अपेक्षित असली तरी, बाजाराचा व्यापक रंग अजूनही मोजला जात असला तरी आशावादी आहे, वर्षअखेरीस योजना, जानेवारीच्या किमतीत अपेक्षित सुधारणा आणि स्टॉक लिक्विडेशन उद्दिष्टांमुळे किरकोळ विक्रीला पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे.एकंदरीत, डिसेंबरसाठी उद्योगाची भावना 'सावध आशावाद' म्हणून ओळखली जाऊ शकते. एक टप्पा जिथे क्षेत्र जीएसटी-नेतृत्वाखालील परवडणाऱ्या बदलातून आणि दोन मजबूत महिन्यांच्या किरकोळ कामगिरीतून मिळालेल्या नफ्याचे एकत्रीकरण करते, तर कॅलेंडर-वर्ष गतिमानता आणि पुरवठा संरेखन यावर लक्ष ठेवते. ग्रामीण मूलभूत गोष्टींमध्ये सुधारणा, सहाय्यक तरलता आणि मजबूत चौकशी प्रवाह यामुळे, उद्योग स्थिर ते सकारात्मक गतीसह वर्ष संपवण्याच्या स्थितीत आहे.ऑनलाइन सदस्यांच्या सर्वेक्षणातील महत्त्वाचे निष्कर्षतरलतातटस्थ ४७.१४%चांगले ४४.२९%वाईट ०८.५७%भावनाचांगले ५४.२९%तटस्थ ३९.२९%वाईट ०६.४३%डिसेंबर'२५ पासून अपेक्षावाढ ६३.९३%फ्लॅट ३०.३६%घट वाढ ०५.७१%पुढील ३ महिन्यांत अपेक्षावाढ ७४.२९%घट २१.७९%घट वाढ ०३.९३%आर्थिक वर्ष २०२६ YTD (एप्रिल २५ ते नोव्हेंबर २५) साठीअखिल भारतीय वाहन किरकोळ विक्री डेटावाढीनुसार आकडेवारी -२ व्हीलर - आर्थिक वर्ष २६ १४५५४५९२ आर्थिक वर्ष २५ - १३२७६९२० (इयर ऑन इयर वाढ ९.६२%),३ व्हीलर - आर्थिक वर्ष २६- ८८१६९५, आर्थिक वर्ष २५ ८२६४४४ (इयर ऑन इयर वाढ ६.६९%)कमर्शियल व्हेईकल - आर्थिक वर्ष २६- ६८२९७७, आर्थिक वर्ष २५- ६३८५८४ (इयर ऑन इयर वाढ ६.९५%)सीई व्हेईकल - आर्थिक वर्ष २६- ४४४२४, आर्थिक वर्ष २५- ४९७७०( इयर ऑन इयर घसरण १०.७४%)पॅसेंजर व्हेईकल - आर्थिक वर्ष २६- २९१०९४५, आर्थिक २५- २६९२६१४ (इयर ऑन इयर बेसिसवर ८.११%)ट्रॅक्टर - आर्थिक वर्ष २६-६४८६२२, आर्थिक वर्ष २५- ५५०५५८ ( इयर ऑन इयर बेसिसवर ९.३६%)नोव्हेंबरमधील एकूण वाढ - इयर ऑन इयर बेसिसवर ९.३६%याखेरीज फाडाने केलेल्या रिसर्चुनुसार सर्वाधिक बाजारातील हिस्सा (Market Share) दुचाकीत हिरो मोटोकॉर्पचा असून तीनचाकीत सर्वाधिक हिस्सा ३३.०८% सह बजाज ऑटोचा आहे.
“ज्याच्याकडे ५०० कोटी असतील तो मुख्यमंत्री बनतो ” ; नवज्योत कौर सिद्धू यांचा मोठा दावा
Navjot Kaur Sidhu। काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनीकेलेल्या एक विधानाने पंजाबच्या राजकारणात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यांच्या या विधानाने पंजाबमधील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. ज्याच्याकडे ५०० कोटी रु .ची बॅग असेल तोच मुख्यमंत्री होतो असा मोठा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, कोणत्याही पक्षाने त्यांच्याकडून पैसे मागितले नसले […] The post “ज्याच्याकडे ५०० कोटी असतील तो मुख्यमंत्री बनतो ” ; नवज्योत कौर सिद्धू यांचा मोठा दावा appeared first on Dainik Prabhat .
वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चा
नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत एक विशेष चर्चा आयोजित केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्यसभेत वंदे मातरम या विषयावरील चर्चेला सुरुवात करतील. यानंतर सत्ताधारी आणि विरोध गटातील निवडक सदस्यांना चर्चेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे.केंद्र सरकारचा हेतू वंदे मातरमचा इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील त्याची भूमिका आणि त्याची सांस्कृतिक आणि राष्ट्रीय प्रासंगिकता यावर चर्चा करणे हा आहे. शिवाय, १९३७ मध्ये काँग्रेस पक्षाने काढून टाकलेल्या काही ओळींवरून मुख्य विरोधी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.पंतप्रधान मोदी मागील काही दिवसांपासून वंदे मातरमवरून काँग्रेस पक्षावर सतत टीका करत आहेत. वंदे मातरम संदर्भातल्या एका कार्यक्रमात मोदी म्हणाले की, १९३७ मध्ये काँग्रेसने वंदे मातरम मोडून देशाच्या फाळणीचे बीज पेरले. पंतप्रधानांनी याला काँग्रेसचे तुष्टीकरणाचे धोरण म्हटले. म्हणूनच, आज जेव्हा या मुद्द्यावर चर्चा होईल तेव्हा दोन्ही बाजू एकमेकांवर तीव्र राजकीय हल्ले करताना दिसण्याची शक्यता आहे. याआधी १ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक भूमिकेला लक्षात घेऊन 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात उत्सव साजरे करण्यास मंजुरी दिली.
Uddhav Thackeray | महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे. मात्र विधामंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गेल्या वर्षभरापासून विरोधी पक्षनेते पद कोणाकडेही नाही. या मुद्यावरुन अधिवेशनात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. परंतु अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षनेता पदाबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. मागील काही दिवसांनपासून महाविकास आघाडीकडून भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा होती. […] The post भास्कर जाधव यांच्याजागी ‘या’ बड्या नेत्याचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत; उद्धव ठाकरे घेणार फडणविसांची भेट? appeared first on Dainik Prabhat .
रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याविषयी ट्रम्पचे मोठे विधान ; म्हणाले,”मला वाटलं होतं सोपं असेल पण..”
Trump on Russia-Ukraine War। मागील ३ वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच या मुद्द्यावर एक मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांनी आतापर्यंत आठ युद्धे आपण थांबवली असल्याचा दावा केला आहे. तसेच रशिया-युक्रेन संघर्ष थांबवणे ही सोपी गोष्ट असेल असं वाटलं होतं पण उलट झालंय. हे युद्ध थांबवणे सोपे […] The post रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याविषयी ट्रम्पचे मोठे विधान ; म्हणाले,”मला वाटलं होतं सोपं असेल पण..” appeared first on Dainik Prabhat .
Sharmila Tagore Birthday: बॉलिवूडची सदाबहार, देखणी आणि रॉयल व्यक्तिमत्त्वाची नायिका शर्मिला टागोर आज आपला 81 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 1946 मध्ये हैदराबाद येथे जन्मलेल्या शर्मिलांनी आपल्या सौंदर्याने, अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने 60-70 च्या दशकात चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. शशी कपूर, राजेश खन्ना, देव आनंद, धर्मेंद्र अशा त्या काळातील सर्व मोठ्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले आणि स्वतःची […] The post Sharmila Tagore Birthday: शशी कपूरवर क्रश, राजेश खन्नासोबतची सुपरहिट जोडी आणि आज आहेत तब्बल 2700 कोटींच्या संपत्तीच्या मालकीण! appeared first on Dainik Prabhat .
भारताच्या राष्ट्रगीतावर, वंदे मातरम् यावर, आज लोकसभेत 10 तासांची चर्चा होईल. सुरुवात पंतप्रधान मोदी करतील. गेल्या महिन्यात मोदींनी म्हटले होते की, 1937 मध्ये काँग्रेसने वंदे मातरम्चे तुकडे केले होते, याच गोष्टीने भारत-पाक फाळणीची बीजे पेरली. मात्र, वंदे मातरम्च्या इतिहासात बरेच काही दडलेले आहे. ते कसे लिहिले गेले, स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे गीत कसे बनले, मुस्लिमांच्या विरोधाचे कारण, एक भाग कसा वगळण्यात आला आणि 150 वर्षांनंतर याच्या राजकारणामागील संपूर्ण कथा; जाणून घेऊया मंडे मेगा स्टोरीमध्ये... **** ग्राफिक्स: अजित सिंग, द्रगचंद्र भुर्जी आणि अंकुर बन्सल ------
भारतात २६५ दशलक्ष सायबर हल्ल्यांची नोंद
मुंबई: क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडची उद्योग शाखा सेक्यूराइटने इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट २०२६ प्रकाशित केला असून अहवालानुसार भारतात तब्बल २६५.५२ दशलक्ष सायबर हल्ल्यांची नोंद झाली आहे. ऑक्टोबर २०२४ व सप्टेंबर २०२५ दरम्यान सेक्यूराइट लॅब्सने ८ दशलक्षहून अधिक एंडपॉइण्ट्सचे विश्लेषण केले. यामध्ये वाढत्या सायबर गुन्हेगारीत वाढ झाल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. अहवालातील प्राथमिक आकडेवारीनुसार २६५.५२ दशलक्ष डिटेक्शन्सची म्हणजेच गुन्ह्यांची नोंद केली गेली आहे. तसेच माहितीनुसार, हे प्रमाण दररोज ७२७००० हून अधिक डिटेक्शन्स आणि दर मिनिटाला ५०५ डिटेक्शन्स इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या परिसंस्थेमध्ये (Ecosystem) मध्ये ट्रोजन्स व फाइल इन्फेक्टर्सचे प्रमाण सर्वाधिक आहे जेथे ८.४ दशलक्ष ट्रोजन डिटेक्शन्स आणि ७१.१ दशलक्ष फाइल इन्फेक्टर डिटेक्शन्सची नोंद करण्यात आली. भारतातील कंपन्यांवर झालेल्या एकूण हल्ल्यांपैकी एकत्रित त्यांचे ७०% प्रमाण असल्याचे सांगितले जात आहे.नेक्स्ट जनेरशन अँण्टीव्हायरस (एनजीएव्ही) आणि अँण्टी रॅन्समवेअर (ARW) इंजिन्सनी ३४ दशलक्षहून अधिक असामान्य संशयी क्रियांना (Activity) ओळखले आहे असे कंनपीकडून प्रकाशित झालेला अहवाल सांगतो. जानेवारी २०२५ मध्ये १८५ घटना आणि ११३,००० डिटेक्शन्ससह रॅन्समवेअर घटना सर्वोच्च होत्या तर क्रिप्टोजॅकिंग डिटेक्शन्स ६.५ दशलक्षपर्यंत पोहोचले. नेटवर्कशी आधारित घटना ९.२ दशलक्षपर्यंत पोहोचल्या आहेत. जेथे वर्डप्रेस प्लगइन्स, अपाचे टॉमकॅट आणि सिसएड सिस्टम्समध्ये तडजोड करण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.सर्वाधिक हल्ले महाराष्ट्र (३६.१ दशलक्ष डिटेक्शन्स), गुजरात (२४.१ दशलक्ष) आणि दिल्ली (१५.४ दशलक्ष) राज्यात झाले आहे. त्यापैकीही सर्वाधिक सायबर सिक्युरिटी सुरूक्षेला हरताळ फासले जाण्यात मुंबई, नवी दिल्ली आणि कोलकाता या शहरांचा समावेश होता. उद्योगासंदर्भात शिक्षण, आरोग्यसेवा आणि उत्पादन क्षेत्रांचे एकत्रितपणे सर्व डिटेक्शन्समध्ये ४७% प्रमाण होते. अहवालाच्या म्हणण्यानुसार, यावर अद्याप तातडीने उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असलेली त्यामधील संसाधने मर्यादित आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात अद्याप या विषयावर गांभीर्याने घेतले जात नाही. याचा फटका युजरला बसतो आहे आणि ते मोठ्या प्रमाणात हल्ल्यांना बळी पडतात.आजची सायबर जोखीम क्षेत्राची गंभीर स्थिती आणि कार्यसंचालनामध्ये अडथळा आल्यामुळे प्रत्येक वेळी व्यवसायांना होणारे मोठे आर्थिक नुकसान पाहता सेक्यूराइटने दोन अत्याधुनिक एंटरप्राइज-ग्रेड उपाय लॉन्च केले असून डिजिटल रिस्क प्रोटेक्शन सर्विसेस हे एआय–एमएल आधारित ब्रँड सुरक्षा, डार्क वेब मॉनिटरिंग आणि डिजिटल जोखीम व्यवस्थापन सक्षम करते तर रॅन्समवेअर रिकव्हरी अॅज सर्विस हे हे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलेल्या फॉरेन्सिक-ग्रेड पद्धतीचे उत्पादन असून सायबर सुरक्षेचे उल्लंघन आणि सुरक्षितता पुनर्स्थापनादरम्यानची दरी हे उत्पादन प्रभावीपणे भरून काढते असे अहवालाने म्हटले.याविषयावर भाष्य करताना क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय काटकर म्हणाले आहेत की,'आज भारतातील सायबर सुरक्षा क्षेत्र महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे, जेथे अनपेक्षित जोखीमांचा सामना करत आहे. इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट २०२६ चा धोरणकर्ते, उद्योग व नागरिकांना इंटेलिजन्स देण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे ते सर्वसमावेशक जोखीम ओळखू शकतील आणि सक्रिय सायबर सुरक्षा पद्धतींचा अवलंब करू शकतील.ते पुढे म्हणाले लाँच करण्यात आलेले सेक्यूराइट डीआरपीएस कंपन्या फायरवॉल्स व पांरपारिक सुरक्षिततेच्या पलीकडे त्यांची सुरक्षितता अधिक वाढवण्यास सक्षम करेल, जेथे ब्रँड प्रतिष्ठा, डेटा प्रामाणिकपणा व ग्राहक विश्वासाची सतत परीक्षा होत आहे. आम्ही सेक्यूराइट आरआरएएएस देखील लाँच करत आहोत, जे रॅन्समवेअर रिकव्हरीला समस्यांच्या व्यवस्थापनावरून संरचित (Structured) तज्ञ-नेतृत्वित (Expert Directed) ऑपरेशन्समध्ये बदलते, ज्यामुळे रॅन्समवर अवलंबून राहावे लागत नाही. हे उपक्रम कंपन्यांना अत्याधुनिक टूल्स व माहितीसह सुसज्ज करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेला प्रबळ करतात, ज्यामुळे कंपन्या आपल्या डिजिटल मालमत्तांचे संरक्षण करू शकतात, विश्वास कायम ठेवू शकतात आणि झपाट्याने वाढत असलेल्या जोखीम वातावरणामध्ये ऑपरेशनल स्थिरता राखू शकतात.'या अहवालात भारताचे डिजिटल विस्तारीकरण, क्लाऊड अवलंबन आणि मोठ्या वापरकर्तावर्गामुळे रॅन्समवेअर सिंडीकेट्स, सरकारशी संलग्न असल्याचे खोटे दावे करणारे हल्लेखोर आणि सायबरगुन्हेगार समूहांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळते. ऑपरेशन सिंदूर सारख्या सायबर अटॅक मोहिममांमधून आर्थिक, राजकीय व विचाराशी संबंधित उद्देशांनी केल्या जाणाऱ्या हायब्रिड हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येते.
यावर्षीचा शेवटचा पोको C85 5G उद्या भारतात लाँच होणार
मुंबई: लोकप्रिय ब्रँड पोकोने पोको सी८५ ५जी च्या लाँचची घोषणा केली असून उद्यापासून हा स्मार्टफोन बाजारात दाखल होत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५ मधील हा प्रोडक्टलाईन मधील शेवटचा फोन असणार आहे. तरूणांसाठी डिझाइन करण्यात आलेला पोको सी८५ मध्ये विश्वासार्ह पॉवर, विश्वसनीयता आणि दिवसभर कार्यरत राहण्याची क्षमता आहे. फ्लॉण्ट युअर पॉवरसाठी या डिवाईसमध्ये सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत असा दावा कंपनीने केला आहे. केव्ही अनावरणाचा भाग म्हणून पोको इंडियाच्या सोशल मीडिया चॅनेल्सवर पोको सी८५ ५जीचा पहिला लुक लाइव्ह प्रसारित करण्यात आला आहे. स्मार्टफोन अधिकृतरित्या भारतात मंगळवार उद्या ९ डिसेंबर २०२५ रोजी लाँच करण्यात येईल.यावेळीही आपली खासियत कंपनीने सुरू ठेवली असून जबरदस्त बॅटरीसह हा फोन देखील टेक युजर्ससाठी बाजारात आवतरेल. यासह जलद चार्जिंग सुविधा असून हा फोन पातळ असणार आहे. यंदा एफ७, एक्स७ सिरीज आणि एम७ प्लस अशा लाँचेससह ब्रँडने बॅटरी कार्यक्षमता वाढवण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. त्यातील अपडेटेट आवृत्ती म्हणून स्वाभाविकच या फोनचा विचार ग्राहक करू शकतात.कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटल्याप्रमाणे, या स्मार्टफोनचे मुख्य लक्ष्य हे तरूण वयोगटातील असतील. पोको सी८५ (Poco C85) ५जी तरूण स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे जेथे विश्वसनीयता, दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणा आणि स्टाइलवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.आकर्षक ड्युअल-टोन फिनिश आणि स्लीक, स्लिम प्रोफाइलसह पोको सी८५ ५जी भारतीयांच्या व्यस्त जीवनशैलीशी जुळण्याकरिता डिझाइन करण्यात आला आहे असे कंपनीने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.फिचर्स पाहता या डिवाईसमध्ये ६००० एमएएच बॅटरी, तसेच ३३ वॅट फास्ट चार्जिंग आणि १० वॅट रिव्हर्स चार्जिंग डिवाईस यांचा भरणा आहे. कंपनीच्या दाव्यानुसार दोन दिवस सहज ही बॅटरी सामान्य वापर करत असलेल्या युजरला पुरणार आहे.POCO C85 5G मध्ये 6000mAh ची बॅटरी असेल जी 33W फास्ट-चार्जिंगला सपोर्ट करेल. ब्रँडने असा दावा केला आहे की हे डिव्हाइस एका चार्जमध्ये दोन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकू शकते. 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट असेल. फोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक देखील असल्याचे दिसते. फ्रंट कॅमेरा सेन्सर ठेवण्यासाठी, एक टियरड्रॉप नॉच आहे. मागील कॅमेरा कटआउटमध्ये फ्लॅशसह दोन कॅमेरे असल्याचे दिसते.
Milind Sathe | राज्याचे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांची निवड करण्यात आली आहे. बिरेंद्र सराफ यांनी काही महिन्यांपूर्वी महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. बिरेंद्र सराफ यांच्या राजीनाम्यानंतर नवे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांच्या नावावर राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात […] The post राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांची निवड; बिरेंद्र सराफ यांच्या राजीनाम्यानंतर महत्त्वाचा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात किरकोळ घसरण होताना दिसत आहे. प्रामुख्याने शेअर बाजारातील ही घसरण जगभरातल्या शेअर बाजारातील प्राईज करेक्शन चिन्हांकित करत आहे. युएस बाजारातील बॅक टू बॅक वाढीनंतर घसरणीकडे कौल सुरु झाल्यानं आशियाई बाजारासह भारतीय शेअर बाजारात आज सपाट अथवा किरकोळ घसरणीकडे कल दिसत आहे. सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्स सेन्सेक्स ८४ व निफ्टी २९.३० अंकांने घसरला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकातही बाजार घसरणीकडेच लोटला गेल्याने बाजाराला आधारपातळी मिळू शकली नाही. सुरूवातीच्या कलात आयटी (०.३३%), मिडिया (०.३५%) वगळता इतर निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली असून सर्वाधिक घसरण रिअल्टी (०.७२%), पीएसयु बँक (०.६१%),ऑटो (०.३२%), मिड स्मॉल हेल्थकेअर (०.४८%) निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली आहे. निफ्टी व्यापक निर्देशांकात स्मॉलकॅप ५० (०.४४%),स्मॉलकॅप २५० (०.४४%), मायक्रोकॅप २५० (०.५१%) निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली आहे. आज विशेष उल्लेख म्हणजे अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा ४.०२% उसळला.अनपेक्षितपणे घसरलेल्या पीसीई (Personal Consumption Expenditure) आकडेवारीमुळे शुक्रवारी युएस बाजारात रॅली झाली ज्यामुळे दरकपातीची आशा लागली होती. त्यानंतर मात्र या आठवड्यात येणाऱ्या फेडरल बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागल्याने या आठवड्यात निकालापर्यंत अस्थिरता कायम राहू शकते. सुरूवातीच्या कलात आशियाई बाजारात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. आज ब्लू चिप्स शेअर्ससह मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये घसरण कायम राहिल्याने घसरणीकडे भारतीय बाजाराला कल दिसतो. किंबहुना आयटी शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे थोडा दिलासा गुंतवणूकदारांना मिळत आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी वाढवलेल्या रोख विक्रीचा परिणाम आज बाजारात कायम राहतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एल अँड टी टेक्नॉलॉजी (३.९१%), सेंच्युरी फ्लायबोर्ड (२.८१%),असाही इंडियन ग्लास (२.१३%), एआयए इंजिनिअरिंग (२.१२%), आवास फायनांशियल (२.००%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण रिलायन्स पॉवर (४.३३%), इंटरग्लोब एव्हिऐशन (३.७२%), होनसा कंज्यूमर (३.१२%), एबी रिअल इस्टेट (२.८५%), डेटा पँटर्न (२.७४%), गोदरेज प्रोपर्टी (१.८२%), हिरो मोटोकॉर्प (१.८०%), सम्मान कॅपिटल (१.७७%) समभागात झाली आहे.बाजारपूर्व परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,' येत्या काळात बाजारात अस्थिरता येण्याची शक्यता आहे. मजबूत आर्थिक वाढ आणि उत्पन्न वाढीचे संकेत बाजारपेठेला आधार देत आहेत. या वर्षी अर्थव्यवस्थेला मिळालेल्या मोठ्या प्रमाणात राजकोषीय आणि आर्थिक प्रोत्साहनामुळे जीडीपी वाढीमध्ये तीव्र पुनरुज्जीवन झाले आहे, जे दुसऱ्या तिमाहीतील ८.२% जीडीपी वाढीच्या छाप्यातून दिसून येते आणि आरबीआयने आर्थिक वर्ष २६ च्या जीडीपी वाढीचा ७.३% पर्यंतचा आढावा घेतल्याने बाजारासाठी चांगले संकेत मिळतात. कमी चलनवाढीमुळे कमी जीडीपी डिफ्लेटरने नाममात्र जीडीपी वाढ आणि कॉर्पोरेट उत्पन्न वाढीवर परिणाम केला आहे. परंतु प्रमुख निर्देशकांवरून हे स्पष्ट होते की आर्थिक वर्ष २७ मध्ये सुमारे १५% उत्पन्न वाढ साध्य करता येईल. हे बाजारासाठी सकारात्मक आहे. तथापि, काही मजबूत नकारात्मक बाबी देखील आहेत ज्यांचा बाजारावर परिणाम होऊ शकतो. रुपयाचे सततचे अवमूल्यन एफआयआयना बाजारात सतत विक्री करण्यास भाग पाडत आहे. आणखी एक प्रमुख घटक म्हणजे जपानी बाँड उत्पन्नातील वाढ, ज्यामुळे येन कॅरी ट्रेडमध्ये पुन्हा एकदा उलटफेर होऊ शकतो. थोडक्यात, उच्च अस्थिरतेची शक्यता आहे.'
गोवा पब आग दुर्घटना; २५ जणांची ओळख पटली
पणजी : गोव्याच्या अर्पोरा परिसरातील Birch by Romeo Lane या पबमध्ये रविवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून मोठा अनर्थ घडला. या दुर्घटनेत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात ५ पर्यटक असल्याची माहिती समोर आली आहे. यातील मृतांची ओळख पटली असून यामध्ये २० जण पबमधील कर्मचारी आणि ५ पर्यटक आहेत.मृतांची नावे :१) मोहित: झारखंड : स्टाफ२) प्रदीप महतो: झारखंड : स्टाफ३) बिनोद महतो: झारखंड : स्टाफ४) राहुल तंटी: आसाम : स्टाफ५) सतीश सिंग: उत्तराखंड : स्टाफ६) मनजोत मल : आसाम : स्टाफ७) चूर्ण बहादूर पुन: नेपाळ : स्टाफ८) सुरेंद्र सिंग: उत्तराखंड : स्टाफ९) सुभाष चेत्री: दार्जिलिंग पश्चिम बंगाल : स्टाफ१०) जितेंद्र सिंग: उत्तराखंड : स्टाफ११) सुमित नेगी: उत्तराखंड : स्टाफ१२) मनीष सिंग: उत्तराखंड : स्टाफ१३) विवेक कटवाल : नेपाळ : स्टाफ१४) साबिन: नेपाळ : स्टाफ१५) सुनीलकुमार: उत्तर प्रदेश : स्टाफ१६) दिगंबर पाटीर : आसाम : स्टाफ१७) रोहन सिंग: उत्तर प्रदेश : स्टाफ१८) डॉमिनिक: महाराष्ट्र : स्टाफ१९) मनोज जोरा : महाराष्ट्र : स्टाफ२०) सुदीप: नेपाळ : स्टाफ२१) इशाक: कर्नाटक : पर्यटक२२) सरोज जोशी: दिल्ली : पर्यटक२३) विनोद कुमार: दिल्ली : पर्यटक२४) अनिता जोशी: दिल्ली : पर्यटक२५) कमला जोशी: दिल्ली : पर्यटकगोव्यात नाईटक्लबमध्ये अग्नितांडव, २५ जणांचा मृत्यू; चौघांविरोधात FIR, मॅनेजरला अटकउत्तर गोव्यातील अर्पोरा येथील 'बिर्च बाय रोमियो लेन' या नाईटक्लबमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत किमान २५ लोक ठार झाले, तर अन्य नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर परिसरात शोक आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी संबंधित नाइट क्लबला सील, तर क्लबच्या मालकांसह ४ जणांवर गुन्हा दाखल झाला असून मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. तसेच, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.https://prahaar.in/2025/12/07/fire-at-nightclub-in-goa-25-people-dead-fir-against-four-manager-arrested/पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीरपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याशी संपर्क साधून घटनेची संपूर्ण माहिती घेतली आणि जखमींबाबत विचारपूस केली. पीएमओने जाहीर केलेल्या अनुदानानुसार, मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये दिले जातील.
हिट अँड रन प्रकरणातील फरार आरोपीला पाच महिन्यानंतर अटक; मदत करण्याऐवजी काढला होता पळ
पुणे – बाणेर रस्त्यावरील हिट अँड रन प्रकरणात तब्बल पाच महिने माग काढत बाणेर पोलिसांनी फरार ऑटोरिक्षा चालकाला उत्तर प्रदेशातील गर मुकेश्वर (मेरठ जवळ) येथून अटक केली. ऑटोरिक्षा चालकाने एका ज्येष्ठ नागरिकास धडक दिली होती. गंभीर जखमी झालेल्या नागरिकास रुग्णालयात दाखल करण्याचा बहाणा त्याने केला. यानंतर नागरिकास रस्त्याच्या कडेला सोडून पळ काढला. वेळेवर उपचार न […] The post हिट अँड रन प्रकरणातील फरार आरोपीला पाच महिन्यानंतर अटक; मदत करण्याऐवजी काढला होता पळ appeared first on Dainik Prabhat .
मोदी सरकारमधील एक आणि नितीश सरकारमधील एक मंत्री सरकारकडून वेतनही घेत आहेत आणि पेन्शनही. हा खुलासा आरटीआयद्वारे झाला आहे. आरटीआयद्वारे समोर आलेल्या या माहितीत बिहारमधील अनेक अशा नेत्यांची नावे आहेत जे संसदेचे सदस्य आहेत आणि आता माजी सदस्य म्हणून बिहार सरकारकडून पेन्शन घेत आहेत. सर्वात धक्कादायक नावे बिहार सरकारचे मंत्री बिजेंद्र प्रसाद यादव आणि मोदी सरकारमधील मंत्री सतीश चंद्र दुबे यांची आहेत. 2 डिसेंबर 2025 रोजी आरटीआयद्वारे समोर आलेल्या यादीत 8 लोकांची नावे आहेत. नियमांविरुद्ध पेन्शन घेणाऱ्यांची नावे क्रमाने जाणून घ्या... 1. उपेंद्र कुशवाहा: राज्यसभा खासदार आहेत, पेन्शन घेत आहेत उपेंद्र कुशवाहा आधी आपले नाव उपेंद्र प्रसाद सिंह असे लिहित होते, नंतर ते बदलले. त्यांना 2005 पासून पेन्शन मिळत आहे. सध्या ही रक्कम 47 हजार रुपये आहे. कुशवाहा यासोबतच राज्यसभा खासदाराचे वेतनही घेत आहेत. कुशवाहा सध्या एनडीए सोबत आहेत. त्यांच्या पक्षाचे नाव राष्ट्रीय लोक मोर्चा आहे. त्यांनी रालोसपा नावाचा पक्ष स्थापन केला होता. नंतर त्याचे जेडीयूमध्ये विलीनीकरण केले, त्यानंतर जेडीयूपासून वेगळे होऊन त्यांनी आपला पक्ष स्थापन केला. 2025 च्या विधानसभा निवडणुकीत कुशवाहा यांच्या पक्षाला 4 जागा मिळाल्या आहेत. त्यांच्या पत्नी स्नेहलता कुशवाहा सासाराममधून निवडणूक जिंकल्या आहेत. कुशवाहा यांनी आपला मुलगा दीपक प्रकाश याला पंचायती राज मंत्री बनवले आहे. दीपक सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. उपेंद्र कुशवाहा केंद्रीय मंत्री आणि चारही सभागृहे (राज्यसभा, लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषद) चे सदस्य राहिले आहेत. 2. सतीश चंद्र दुबे: केंद्रीय मंत्री आहेत, 59,000 रुपये पेन्शन घेत आहेत पश्चिम चंपारणमधून आलेले सतीश चंद्र दुबे राज्यसभेचे सदस्य आहेत. सध्या ते भारत सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री आहेत. सतीश चंद्र यांना 2019 पासून पेन्शन मिळत आहे. यावेळी ही रक्कम 59,000 रुपये आहे. सतीश चंद्र आमदार आणि वाल्मीकिनगर मतदारसंघातून लोकसभा खासदार होते. 2019 मध्ये ते राज्यसभेसाठी निवडून आले. 3. बिजेंद्र प्रसाद यादव: मंत्री आहेत, 10 हजार रुपये पेन्शन घेत आहेत जदयूचे ज्येष्ठ नेते बिजेंद्र प्रसाद यादव सध्या बिहार सरकारमध्ये अर्थमंत्री आहेत. ऊर्जा विभागही त्यांच्याकडे आहे. त्यांना 2005 पासून 10 हजार रुपये पेन्शन मिळत आहे. सुपौलचे आमदार बिजेंद्र यादव 1990 पासून सलग विधानसभा निवडणुका जिंकत आहेत. 2025 मध्ये त्यांनी पाचव्यांदा शपथ घेतली. दीर्घकाळापासून ते ऊर्जा विभागाचे मंत्री आहेत. प्रामाणिक नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे. 4. देवेश चंद्र ठाकूर: लोकसभा खासदार आहेत, 86 हजार रुपये पेन्शन घेत आहेत जेडीयू नेते देवेश चंद्र ठाकूर लोकसभा खासदार आहेत. 2020 पासून 86,000 रुपये पेन्शन घेत आहेत. विधान परिषदेत सभापतींसारख्या मोठ्या संवैधानिक पदावर ते राहिले आहेत. तिरहुत पदवीधर मतदारसंघातून ते दीर्घकाळ एमएलसी होते. देवेश 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकून खासदार झाले आहेत. त्यांच्या एका वक्तव्यामुळे ते चर्चेत आले होते. ते म्हणाले होते, ‘जर मुस्लिम आणि यादव समुदायाने मतदान केले नाही, तर त्यांना वैयक्तिक मदत करणार नाही. फक्त चहा-नाश्ता देऊन निरोप देईन.’ 5. ललन सराफ: विधान परिषदेत असूनही 50 हजार पेन्शन घेत आहेत मधेपुराचे ललन सराफ बिहार विधान परिषदेचे सदस्य असल्याने वेतन घेत आहेत. यासोबतच 2020 पासून त्यांना 50 हजार रुपये पेन्शनही मिळत आहे. जदयू नेते ललन यांची गणना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जवळच्या नेत्यांमध्ये होते. 2024 मध्ये त्यांची विधान परिषदेत जदयूचे उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 6. नितीश मिश्रा: आमदार आहेत, 43 हजार रुपये पेन्शन घेत आहेत 2025 च्या निवडणुकीत झंझारपूर मतदारसंघातून निवडून आमदार झालेले नितीश मिश्रा 2015 पासून पेन्शन घेत आहेत. सध्या त्यांना 43 हजार रुपये मिळत आहेत. आधी ते जदयूमध्ये होते. सध्या ते भाजपचे आमदार आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे पुत्र नितीश मिश्रा यांची गणना सुशिक्षित नेत्यांमध्ये होते. ते बिहार सरकारच्या अनेक विभागांमध्ये मंत्री राहिले आहेत. यावेळी त्यांना मंत्रीपद मिळालेले नाही. 7. संजय सिंह: विधान परिषदेच्या वेतनासोबत पेन्शन घेत आहेत जदयू नेते संजय सिंह विधान परिषद सदस्य आहेत. त्यांना 2018 पासून पेन्शन मिळत आहे. सध्या ते 68 हजार रुपये पेन्शन घेत आहेत. 8. भोला यादव निवडणूक हरले वेतन आणि पेन्शन एकाच वेळी घेणाऱ्यांच्या यादीत भोला यादव यांचेही नाव आहे. तथापि, त्यांना सध्या मिळत असलेली पेन्शन नियमांच्या विरोधात नाही. ते निवडणूक हरले आहेत. भोला यांना पेन्शन म्हणून 65 हजार रुपये मिळत आहेत. वेतन आणि पेन्शन नियम काय सांगतो? भास्करने पेन्शनशी संबंधित नियमांची पडताळणी केली असता असे आढळून आले की, नियम असा आहे की, सन्माननीय असोत किंवा सामान्य नोकरी करणारे लोक. सर्वांना दरवर्षी जिवंत असल्याचा दाखला द्यावा लागतो. यावरून हे स्पष्ट होते की, दरवर्षी सन्माननीय सांगत आहेत की, ते जिवंत आहेत आणि पेन्शनसाठी पात्र आहेत. नियमानुसार वेतनासोबत पेन्शन घेता येत नाही. कोणत्याही सभागृहाचे वेतन मिळाल्यास आधीपासून मिळत असलेले पेन्शन बंद झाले पाहिजे. पेन्शन मिळवण्यासाठी लेखी द्यावे लागते की, राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये कुठेही सेवा देत नाही आहोत. हे तर आर्थिक गुन्हेगारीसारखे प्रकरण आहे: ज्येष्ठ वकील वेतन आणि पेन्शन एकाच वेळी घेतल्याबद्दल पटना उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सर्वदेव सिंह म्हणाले, 'हे तर आर्थिक गुन्हेगारीचे प्रकरण आहे. निवृत्त झाल्यानंतरच माननीय पेन्शन घेऊ शकतात. जर पदावर असताना पेन्शन घेतली तर ते चुकीचे आणि नियमांच्या विरोधात आहे.' बिहारचे आरटीआय कार्यकर्ते शिव प्रकाश राय यांच्या अर्जावर दिलेल्या माहितीबाबत भास्करने सर्व नेत्यांशी संपर्क साधला. पण कोणत्याही नेत्याने फोन उचलला नाही. त्यांचे उत्तर आल्यावर ते समाविष्ट केले जाईल.
हिवाळी अधिवेशनापासून ते बिग बॉस-19 च्या विजेत्यापर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु होतंय. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवादी संघटना भारतात घातपात घडवू शकतात असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानं शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय, रेशीमबागेसह सर्वच महत्त्वाची धार्मिक स्थळं आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आलीय. शहरात राज्य राखीव पोलिस दलाच्या पाच तुकड्या, होमगार्डसह दहा हजार पोलिस तैनात करण्यात आलेत.याशिवाय एआयच्या मदतीने […] The post हिवाळी अधिवेशनापासून ते बिग बॉस-19 च्या विजेत्यापर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .
Bigg Boss 19 Winner: बिग बॉस 19 चा अत्यंत प्रतिक्षित ग्रँड फिनाले रविवारी रात्री मोठ्या दिमाखात पार पडला. संपूर्ण सीझनभर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे स्पर्धक, सलमान खानचे होस्टिंग, नाट्यपूर्ण वाद, भावनिक प्रसंग, मैत्री-भांडणे यांचा अखेरचा टप्पा अतिशय रोमांचक झाला. या सगळ्यांवर मात करत अखेर गौरव खन्ना यांनी बिग बॉस 19 ची विजेतेपदाची ट्रॉफी आपल्या नावावर […] The post Bigg Boss 19 Winner: गौरव खन्ना ठरले या सीझनचे विजेते; ग्रँड फिनालेत स्टार्सची उपस्थिती, भावुक क्षण आणि भव्य परफॉर्मन्सची मेजवानी appeared first on Dainik Prabhat .
तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी; अधिवेशनात भाजपकडून होणार मागणी, काय आहे कारण?
Tukaram Mundhe | आजपासून नागपूरमध्ये सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे या अधिवेशनात भाजप आमदाराकडून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तुकाराम मुंढे नागपुर महापालिकेचे आयुक्त होते, त्यावेळी त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक […] The post तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी; अधिवेशनात भाजपकडून होणार मागणी, काय आहे कारण? appeared first on Dainik Prabhat .
Esha Deol: ‘तुमची आठवण येते पप्पा’…धर्मेंद्र यांच्या वाढदिवशी ईशा देओल भावुक
Esha Deol: बॉलिवूडचे महान अभिनेते धर्मेंद्र यांचा आज वाढदिवस. 24 नोव्हेंबरला त्यांचं निधन झाल्यानंतर कुटुंबासह चाहत्यांमध्ये मोठा शोक होता. आज ते 90 वर्षांचे झाले असते. या दिवशी त्यांच्या मुलीने, ईशा देओलने, त्यांना आठवत काही फोटो आणि मनाला भिडणारा संदेश लिहिला आहे. ईशाचा भावनिक संदेश धर्मेंद्र यांच्या जुन्या फोटोंसोबत ईशा लिहिते, “माझे पप्पा… आपलं नातं खूप […] The post Esha Deol: ‘तुमची आठवण येते पप्पा’… धर्मेंद्र यांच्या वाढदिवशी ईशा देओल भावुक appeared first on Dainik Prabhat .
शहरात थंडीचा जोर वाढला! किमान तापमानात मोठी घट; पारा पुन्हा १० अंशाच्या खाली येणार
प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह जिल्ह्यात गेल्य २४ तासांत किमान तापमानात घट झाल्यामुळे थंडीचा जोर वाढू लागला आहे. विशेषत: माळीण, पाषाण, शिवाजीनगर परिसरातील किमान तापमानात एक ते दोन अंशाने घट झाली तर अन्य भागात दोन-तीन अंशाने घट झाली. पुढील दोन दिवसात शहरातील किमान तापमानात आणखीन घट होईल आणि थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने […] The post शहरात थंडीचा जोर वाढला! किमान तापमानात मोठी घट; पारा पुन्हा १० अंशाच्या खाली येणार appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – बाणेर रस्त्यावरील हिट अँड रन प्रकरणाचा तब्बल पाच महिने तपास करून बाणेर पोलिसांनी फरार ऑटोरिक्षा चालकाला उत्तर प्रदेशातील गर मुकेश्वर ( मेरठ जवळ ) येथे अटक केली. या रिक्षा चालकाने एका ज्येष्ठास धडक दिल्यावर जखमीला रुग्णालयात दाखल करण्याचा बहाणा केला. यानंतर जखमीला रस्त्यावर सोडून पळ काढला.वेळेवर उपचार मिळाले नसल्याने ज्येष्ठाचा मृत्यू […] The post Baner Hit and Run: वडिलांना केलेला ‘तो’ एक फोन नडला! ५ महिने पोलिसांना चकवा देणारा रिक्षाचालक अखेर जाळ्यात appeared first on Dainik Prabhat .
‘पश्चिम बंगालमध्ये जेव्हा डाव्यांचे सरकार होती आणि बुद्धदेव भट्टाचार्य मुख्यमंत्री होते, तेव्हा त्या घराला ग्रंथालय बनवण्यात आले होते. तेव्हा त्याची दुरुस्तीही करण्यात आली होती आणि ग्रंथालयही नियमितपणे सुरू होते. ममता सरकार आल्यापासून परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. ग्रंथालय बंद पडले आहे. आम्ही आजपर्यंत जेव्हाही तिथे गेलो, तेव्हा ते बंदच आढळले. या सरकारमध्ये आम्हाला कोणी विचारणारे नाही आणि आमच्या वारशालाही कोणी नाही.‘ राष्ट्रगीत ‘वंदे मातरम‘ लिहिणारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या पाचव्या पिढीतील सजल चट्टोपाध्याय सरकारच्या उदासीनतेमुळे नाराज आहेत. ते कोलकाता येथील बंकिमचंद्र यांच्या घराच्या दयनीय अवस्थेसाठी राज्य सरकारला जबाबदार धरतात. त्यांचे म्हणणे आहे की, ज्या घराला वारसा मानून घेतले, त्यालाच त्याच्या अवस्थेवर सोडून देण्यात आले आहे. 7 नोव्हेंबर रोजी वंदे मातरम् गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने देशभरात कार्यक्रम आयोजित केले होते. याच दरम्यान, कोलकाता येथील बंकिमचंद्र यांच्या ग्रंथालय बनलेल्या घराच्या देखभालीच्या प्रकरणानेही जोर पकडला. आता 8 डिसेंबर म्हणजे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वंदे मातरम् वर विशेष चर्चा होणार आहे. यापूर्वी दिव्य मराठीने कोलकात्यातील ५-प्रताप चटर्जी स्ट्रीटवरील बंकिमचंद्र यांच्या घरी भेट दिली. आम्ही घराची स्थिती पाहिली. तसेच, त्यांच्या वंशजांशी आणि आसपासच्या रहिवाशांशी बोलून संपूर्ण प्रकरण समजून घेतले. ग्राउंड रिपोर्ट वाचा… घराला वारसा बनवले, पण दुरुस्ती आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलेसर्वात आधी आम्ही कोलकात्यातील बंकिमचंद्र यांच्या घरी पोहोचलो, ज्याच्या देखभालीवरून संपूर्ण वाद सुरू आहे. रस्त्याच्या एका बाजूला मेडिकल कॉलेज आणि दुसऱ्या बाजूला गल्ली आहे. पश्चिम बंगालमधील डाव्या सरकारने घराचे अधिग्रहण केले होते. याचे ग्रंथालयात रूपांतर करून 2006 मध्ये उद्घाटनही करण्यात आले होते. याच्या बाहेर लावलेल्या फलकावर लिहिले आहे- ‘साहित्य सम्राट स्मृती ग्रंथालय’ पश्चिम बंगाल सरकारद्वारे संचालित. रविवार असल्यामुळे आम्हाला ग्रंथालय बंद आढळले. स्वच्छताही दिसली नाही. गेटच्या बाहेर कचऱ्याचा ढिगारा लागला होता. गेटवरच आमची भेट जवळ राहणाऱ्या धर्मेंद्र यादव यांच्याशी झाली. ते सांगतात की या गल्लीत बंगाली आणि बिहारी दोन्ही राहतात. ग्रंथालयासोबतच आजूबाजूच्या इमारती खूप जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. ग्रंथालयाच्या स्थितीबद्दल विचारले असता धर्मेंद्र म्हणतात, ‘येथील स्वच्छतेची स्थिती तुम्ही स्वतःच बघा. सोमवार ते शनिवारपर्यंत एक व्यक्ती येऊन ग्रंथालय उघडतो. मात्र, जास्त कोणी येत-जात नाही. बाहेरची परिस्थिती पाहूनच आत काय स्थिती असेल हे समजते. सरकारकडून तर कोणी येत नाही, पण आजूबाजूचे लोक वेळ पडल्यास ते स्वच्छ करतात.‘ यावरून सुरू असलेल्या राजकारणाबद्दल विचारले असता धर्मेंद्र म्हणतात, ‘होय, ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काही दिवसांपूर्वी भाजपने येथे कार्यक्रम ठेवला होता. त्यात विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी आले होते. त्या दिवशी त्यांना ग्रंथालयाचे गेट उघडू दिले नव्हते.’ आम्ही पुढे गेलो, गल्लीत आम्हाला कार्यक्रमासाठी लावलेले भाजपचे झेंडे अजूनही लागलेले दिसले. घरावरून सुरू असलेल्या राजकारणावर एका स्थानिक व्यक्तीने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, ‘येथे आजूबाजूला बहुतेक टीएमसी समर्थक राहतात. हे बहुतेक बंगाली आहेत. ज्या दिवशी शुभेंदु अधिकारी येणार होते, त्याच्या आदल्या रात्री जाणूनबुजून हा रस्ता तोडण्यात आला. त्यानंतर हा रस्ता आता आदल्या रात्रीच बनवला आहे.‘ भाजपला निवडणुकीच्या वेळी बंकिम बाबू आठवलेयाच गल्लीत नरेंद्र बारिक दुकान चालवतात. बंकिमचंद्रांच्या घरावरून सुरू असलेल्या राजकारणावर ते म्हणतात, ‘बंकिम बाबूंचे वडिलोपार्जित घर नैहाटीमध्ये होते. येथे प्रताप चटर्जी रोडवर ते शिकायला येत असत. मी येथे बऱ्याच काळापासून राहत आहे. 2005 मध्ये डाव्यांच्या सरकारच्या काळात त्याचे नूतनीकरण करण्यात आले.‘ ‘तेव्हा मोहम्मद सलीम खासदार होते. त्यांनी खासदार निधीतून खर्च करून त्याची दुरुस्ती केली होती. मला आजही आठवतंय, तेव्हाचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य इथे बांधलेल्या ग्रंथालयाचं उद्घाटन करायला आले होते. त्यानंतर या इमारतीत कोणतंही काम झालं नाही. इमारतीची अवस्था पाहून तुम्हीही याचा अंदाज लावू शकता. आसपासचे लोकच थोडीफार साफसफाई करतात. या ग्रंथालयातही कोणी येत-जात नाही.’ नरेंद्र पुढे सांगतात, ‘डाव्या सरकारच्या काळात इथे दोन ग्रंथपाल येत होते. तेव्हा काही लोक वाचायलाही येत होते. काही परदेशी लोकही येत होते, पण आता असं काही नाही. नावाला ग्रंथालय आहे आणि सोमवार ते शुक्रवारपर्यंत उघडंही असतं पण कोणीही ये-जा करताना दिसत नाही. एक ग्रंथपाल आहे तोही मनमानी करतो.’ बंकिम यांचे वंशज म्हणाले- जेव्हाही घर पाहायला गेलो, तेव्हा कुलूप लावलेले आढळलेआम्ही या प्रकरणात बंकिमचंद्र यांच्या पाचव्या पिढीतील सजल चट्टोपाध्याय यांचीही भेट घेतली. त्यांचे वंशज कोलकाता येथील शोभा बाजारमध्ये राहतात. ते गेल्या अनेक वर्षांपासून बंकिमचंद्र यांच्या वारशाच्या देखभालीबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत. सजल सांगतात, ‘बंकिम बाबूंची बहुतेक मालमत्ता स्वातंत्र्यानंतर देशाच्या वारशात समाविष्ट करण्यात आली. पण आज अशी परिस्थिती आहे की त्यांच्या वंशजांना कोणी विचारणारे नाही.‘ ‘आम्ही ज्या राज्यात राहतो, तिथल्या सरकारला आमची ओळख नाही आणि आम्हाला कधी आठवलेही जात नाही. बंकिमचंद्रांच्या कुटुंबातील कोणी जिवंत असेल तर ते कोण आहेत, कुठे राहतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्नही या सरकारने कधी केला नाही. ममता बॅनर्जींनीही आम्हाला कधी आठवले नाही. या गोष्टीचे आम्हाला खूप दुःख आहे.‘ घराच्या देखभालीबद्दल बोलताना ते म्हणतात, ‘डाव्या पक्षाचे सरकार असताना आणि बुद्धदेव भट्टाचार्य मुख्यमंत्री असताना, ग्रंथालय नियमितपणे चालत असे आणि दुरुस्तीही होत असे. ममता सरकार आल्यापासून परिस्थिती बिघडली आहे. ग्रंथालय बंद पडले आहे. जेव्हा जा, तेव्हा ते बंदच मिळते. स्वच्छताही होत नाही. आम्ही अनेकदा याच्या देखभालीसाठी सरकारी विभागांमध्ये चकरा मारल्या, पण काहीही साध्य झाले नाही.‘ आसपासच्या लोकांनी आम्हाला सांगितले की आठवड्यातून काही दिवस ग्रंथालय उघडते. यावर सजल म्हणतात, ‘गेल्या महिन्यात विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी तिथे गेले होते आणि ग्रंथालय उघडण्यास सांगितले होते, मग तेव्हा ते का उघडले नाही? बंकिमचंद्र हे देशाचा वारसा आहेत, तरीही ते उघडले नाही. कदाचित या वादामुळे ते आता उघडले जात असेल.‘ संसदेत वंदे मातरम् गायले जावे, बंकिम दादांच्या नावाने विद्यापीठ उघडावे आपल्या मागण्यांबाबत सजल म्हणतात, ‘भाजप अनेक वर्षांपासून वंदे मातरम् चा मुद्दा उपस्थित करत आहे, पण आता तो चर्चेत आला आहे. या गीताचा वापर प्रत्येकजण करत आहे. तथापि, कदाचित येणारी पिढी बंकिम बाबू यांना ओळखणार नाही. म्हणून यावर आजच चर्चा व्हायला हवी.‘ ‘आमची मागणी आहे की, ज्याप्रमाणे देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रवींद्र भवन बांधले गेले आहेत, त्याचप्रमाणे बंकिम भवन बांधले जावेत. देशात जसे विद्यासागर यांच्या नावावर विद्यापीठ आहे, तसेच बंकिमचंद्र यांच्या नावावर विद्यापीठ का नाही, कारण ते देशाचे पहिले पदवीधर होते. म्हणून आता माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, त्यांच्या नावावर एक विद्यापीठ नक्कीच बनवले जावे.‘ आता या वादावर राजकीय पक्षांचे मत जाणून घ्यायेथे मजूर झोपतात आणि आजूबाजूचे लोक कपडे वाळवतातभाजपचे प्रदेशाध्यक्ष सौमित्र भट्टाचार्य या मुद्द्यावर म्हणतात, 'सध्या हे घर कोलकाता कॉर्पोरेशनच्या देखरेखीखाली आहे. जिथे एक ग्रंथालय आहे पण तिथे कोणीही येत नाही. होय, बाहेर काही मजूर झोपलेले दिसतात आणि आजूबाजूचे लोक कपडे वाळवतात. घर खूपच वाईट स्थितीत आहे. वंदे मातरम्वरून सुरू असलेल्या वादावर ते म्हणतात, ‘भाजप वंदे मातरम्च्या १५० व्या जयंतीनिमित्त राज्याच्या वेगवेगळ्या भागांत गेली. बंकिम बाबू जिथे राहिले होते, त्या भागांतही गेले. विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी त्यांच्या घरी जाऊ लागले, तेव्हा आधी रस्ते तोडण्यात आले. नंतर तिथे पोहोचल्यावर गेटला कुलूप लावलेले आढळले. या सगळ्यावरून स्पष्ट दिसते की, टीएमसी बांगलाच्या इतक्या मोठ्या कादंबरीकाराशी कसे वागत आहे. या आरोपांबाबत आम्ही टीएमसी नेत्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण अधिकृतपणे कोणीही समोर आले नाही. एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, भाजप वंदे मातरम्वर केवळ राजकारण करत आहे. घराचा विचार केला तर, ते आमचा वारसा आहे आणि त्याची देखभाल केली जात आहे. तर, पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री ब्रत्य बसू यांनी माध्यमांना सांगितले, ‘भाजप विभाजनाचे राजकारण करते. हिंदू आणि मुस्लिम, ब्राह्मण आणि दलित यांच्यात फूट पाडते. आता ते दोन महान बंगाली रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.’ बंकिमचंद्र यांनी 1870 च्या दशकात वंदे मातरम् लिहिले होते'वंदे मातरम्' हे 1950 मध्ये भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले गेले. ते 1870च्या दशकात बंकिमचंद्र यांनी संस्कृतप्रचुर बंगाली भाषेत लिहिले होते. हे त्यांच्या आनंदमठ या बंगाली कादंबरीचाच भाग आहे, जी पहिल्यांदा 1882 मध्ये प्रकाशित झाली होती. याला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारने विशेष स्मारक नाणे आणि टपाल तिकीटही जारी केले होते.
प्रभात वृत्तसेवा पुणे – आमची मागणी महायुतीतूनच लढण्याची; परंतु प्रदेशातील पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, हे माहीत नाही, असा संभ्रमाचा सूर भाजपच्या रविवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीतून मांडण्यात आला.आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपची कोअर कमिटीची बैठक रविवारी पुण्यात झाली. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी […] The post PMC Election: भाजपची ‘महायुती’तून लढण्याची इच्छा, पण निर्णय कोणाच्या हाती? मोहोळांनी व्यक्त केला संभ्रम appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – वाळूच्या लिलावाकरिता पर्यावरण समितीकडून सर्व मंजुरी घेण्याची कार्यवाही पूर्ण करून राज्यातील वाळू घाटांचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करा तसेच वाळू धोरणात घरकुल बांधणीसाठी देण्यात येणारी कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. मंत्रालयात वाळू धोरणासंदर्भात बैठकआयोजित करण्यात आली होती. यावेळी या बैठकीत दूरदृश्यप्रणालीद्वारे महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. […] The post Pune News: राज्यातील वाळूंचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सूचना appeared first on Dainik Prabhat .
Pune Railway: प्रवाशांना मोठा दिलासा; पुणे-नागपूर आणि पुणे-सांगानेर मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा
प्रभात वृत्तसेवा पुणे – ख्रिसमस आणि हिवाळी हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेकडून पुणे – सांगानेर आणि पुणे – नागपूर दरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गाडी क्रमांक ०१४०५/०१४०६ पुणे – सांगानेर – पुणे साप्ताहिक विशेष गाडीच्या सहा फेऱ्या, तर गाडी क्रमांक ०१४०१ / ०१४०२ पुणे […] The post Pune Railway: प्रवाशांना मोठा दिलासा; पुणे-नागपूर आणि पुणे-सांगानेर मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा appeared first on Dainik Prabhat .
इंडिगोला दणका! ‘प्रवाशांचे पैसे तातडीने परत करा’; मुरलीधर मोहोळ यांचे कंपनीला कडक निर्देश
प्रभात वृत्तसेवा पुणे – विमान उड्डाणांच्या नियोजनातील गोंधळाचा फटका प्रवाशांना बसला असून, त्यांना मनस्तापही सहन करावा लागला. त्यामुळे या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांच्या तिकिटाचे पैसे तातडीने परत करा. तसेच, प्रवाशांचे राहिलेले सर्व साहित्य (बॅगेज) ४८ तासांच्या आत परत करा, असे निर्देश ‘इंडिगो’ कंपनीला देण्यात आल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री […] The post इंडिगोला दणका! ‘प्रवाशांचे पैसे तातडीने परत करा’; मुरलीधर मोहोळ यांचे कंपनीला कडक निर्देश appeared first on Dainik Prabhat .
गेल्या साडेतीन वर्षांत रुपयाचे मूल्य 10 रुपयांनी घसरून प्रति डॉलर 80 ते 90 रुपये झाले आहे. ही आतापर्यंतची विक्रमी घसरण आहे. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, RBI ने कोणताही हस्तक्षेप केला नाही, त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत गेला. यामुळे परदेशातून येणारी फळे, भाज्या, धान्य ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत सर्व काही महाग होणार आहे. खरंच RBIच्या चुकीमुळे डॉलर 90 रुपयांच्या पुढे गेला की त्यामागे काही दुसरे कारण आहे, सामान्य लोकांवर त्याचा काय परिणाम होईल, हे आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया... प्रश्न-1: गेल्या काही वर्षांत रुपया किती वेगाने घसरला?उत्तर: वर्ष 2000 मध्ये एका डॉलरची किंमत 44.76 रुपये होती. 2013 पर्यंत रुपयाचे मूल्य आणखी 10 रुपयांनी घसरले आणि एक डॉलर सुमारे 54 रुपयांचा झाला. पुढील 12 वर्षांत म्हणजेच 2025च्या अखेरपर्यंत रुपयाचे मूल्य 36 रुपयांनी घसरले आहे. ही आतापर्यंतची सर्वात वेगवान घसरण आहे. गेल्या पाच वर्षांची आकडेवारी पाहिली तर, जानेवारी 2021 मध्ये डॉलर 73 रुपयांचा होता. जुलै 2022 मध्ये हा आकडा पहिल्यांदा 80 रुपयांच्या पुढे गेला. त्यानंतर आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजेच 8 डिसेंबर 2024 पर्यंत एक डॉलर 84.67 रुपयांचा झाला. तेव्हापासून एका वर्षात रुपयाचे मूल्य सुमारे 5% अधिक घसरले आहे. 3 डिसेंबर रोजी रुपया 90.13 रुपये प्रति डॉलरपर्यंत पोहोचला आहे. प्रश्न-2: डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य कसे कमी होते?उत्तर: डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य कमी होण्याचा अर्थ असा आहे की डॉलरचे मूल्य वाढत आहे. हे सोप्या भाषेत समजून घ्या... जर डॉलरची किंमत रुपयाच्या संदर्भात पाहिली, तर जेव्हा डॉलर महाग होईल, तेव्हा रुपया स्वस्त होईल आणि जेव्हा डॉलर स्वस्त होईल, तेव्हा रुपयाची किंमत वाढेल. यालाच डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होणे किंवा मजबूत होणे असे म्हणतात. प्रश्न-3: या वर्षी असे काय घडले, ज्यामुळे रुपया घसरत गेला?उत्तर: रुपया 90 रुपये प्रति डॉलरपर्यंत घसरण्यामागे आपले व्यापार आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित 4 मोठी कारणे आहेत... 1. विक्रमी व्यापार तुटीमुळे डॉलरची कमतरता झाली 2. परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून डॉलर परत काढले 3. ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारतीय वस्तूंची विक्री घटली 4. सुस्त अर्थव्यवस्थेमुळे भारतात परदेशी गुंतवणूक घटली डॉलरची किंमत झपाट्याने वाढण्यापासून किंवा घटण्यापासून रोखण्यासाठी RBI डॉलरची खरेदी आणि विक्री सुरू करते, परंतु यावर्षी RBI ने त्यात जास्त हस्तक्षेप केला नाही. प्रश्न-4: तर मग RBI ने जाणूनबुजून रुपयाचे मूल्य घटू दिले का?उत्तर: बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ मदन सबनवीस यांच्या मते, ‘RBI कोणताही हस्तक्षेप करत नाहीये. यामुळे नकारात्मक भावना वाढत आहेत आणि रुपया खाली जात आहे.’ खरं तर, एक वर्षापूर्वीपर्यंत RBI डॉलर विकून रुपयाची घसरण थांबवण्याचा प्रयत्न करत होती. 2024-25 मध्ये RBI ने सुमारे 400 अब्ज डॉलर विकले होते, जेणेकरून रुपया स्थिर ठेवता येईल. यावर्षी RBI ने आपली रणनीती बदलली आहे. 2025-26 च्या पहिल्या 6 महिन्यांत RBI ने फक्त 44 अब्ज डॉलर विकले. RBI ला डॉलरच्या व्यापारात हस्तक्षेप कमी करायचा आहे, जेणेकरून रुपया स्वतः स्थिर होऊ शकेल. आरबीआय गव्हर्नर संजीव मल्होत्रा म्हणाले, 'आम्ही बाजाराला त्याच्या पद्धतीने काम करू देत आहोत. बाजारात खोली आहे, त्यामुळे रुपया वर-खाली होऊ शकतो, परंतु आरबीआय तोपर्यंत हस्तक्षेप करणार नाही, जोपर्यंत बाजार गरजेपेक्षा जास्त अस्थिर होत नाही.' अर्थशास्त्रज्ञ डॉ. प्रणव सेन यांच्या मते, 'ही आरबीआयची एक विचारपूर्वक तयार केलेली रणनीती आहे. आरबीआयला वाटते की कमकुवत रुपया भारताच्या निर्यातदारांना मदत करू शकतो, कारण रुपयाचे मूल्य कमी झाल्यामुळे परदेशी खरेदीदारांना भारतीय वस्तू स्वस्त मिळतील, यामुळे भारतीय वस्तूंची विक्री वाढेल आणि अमेरिकेच्या शुल्काचा (टॅरिफ) परिणाम कमी होईल.' त्याचबरोबर मदन म्हणतात की, आरबीआयच्या धोरणामुळे निर्यातदारांना फायदा होईल, परंतु परदेशी वस्तू महाग होतील आणि आयातदारांना नुकसान होईल. प्रश्न-5: रुपयाचे मूल्य घटल्याने सामान्य माणसावर काय परिणाम होईल?उत्तर: रुपयाचे मूल्य घटणे म्हणजे देशात महागाई वाढणे. विशेषतः त्या वस्तूंचे भाव वाढतात, जो परदेशी बाजारातून आयात होऊन भारतात येतात. सोप्या भाषेत समजून घेतल्यास, जर 2010 मध्ये 1 डॉलर खरेदी करण्यासाठी तुम्हाला 45 रुपये द्यावे लागत होते, तर आज 90 रुपये खर्च करावे लागतील. जर एखाद्या परदेशी विद्यापीठाची वार्षिक फी 1 लाख डॉलर असेल, तर 2024 मध्ये त्या भारतीय विद्यार्थ्याला सुमारे 85 लाख रुपये द्यावे लागले होते, तर आता त्याला 90 लाख रुपये द्यावे लागतील. याशिवाय, रुपयाचे मूल्य घटल्याने सामान्य माणसाशी संबंधित या वस्तू महाग होऊ शकतात… फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्ही यांसारख्या ग्राहक वस्तू पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी फळे, भाज्या आणि किराणा सामान परदेशात शिक्षण आणि सुट्ट्या घालवणे स्मार्टफोन, लॅपटॉप आणि लस लक्झरी कार मेकअप आणि ब्युटी उत्पादने प्रश्न-6: रुपयाची स्थिती पुन्हा कधीपर्यंत सुधारेल?उत्तर: आयडीएफसी फर्स्ट बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ गौरा सेन गुप्ता यांचे म्हणणे आहे की, सप्टेंबर 2026 पर्यंत 1 डॉलरची किंमत 91 रुपयांपर्यंत पोहोचेल. गौरा सेन गुप्ता यांच्या मते, भारत आणि अमेरिका यांच्यात मार्च 2026 पर्यंत व्यापार करार झाला तरी डॉलरची किंमत कमी होणार नाही. तथापि, काही तज्ज्ञांचे मत आहे की, जर हा व्यापार करार झाला आणि शुल्क 15-25% पर्यंत कमी झाले, तर रुपया 86 ते 88 रुपयांपर्यंत येऊ शकतो. त्याच वेळी अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करत आहे. यामुळे डॉलरची किंमत कमी होऊ शकते आणि त्या तुलनेत रुपयाही मजबूत होऊ शकतो. तथापि, यासाठी सोने आणि कच्च्या तेलाच्या किमतींवर नियंत्रण, परदेशी गुंतवणूक वाढणे आणि भारतीय शेअर बाजाराची चांगली कामगिरी करणेदेखील आवश्यक आहे.
Pune Traffic: हिंजवडी, वाघोलीच्या ट्रॅफिक जॅममधून सुटका होणार? पीएमआरडीएने आखला ‘हा’मोठा प्लॅन
प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे – हिंजवडी, वाघोली, शिक्रापूर येथील वाहतूककोंडी रोखण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून आता गतीने पावले उचलली जात आहे. पुणे-मुंबई बाह्यवळण मार्गावर विविध ठिकाणी अंडरपास करणे तसेच राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्ते बांधणे, शिक्रापूर व वाघोली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्ते बांधण्याचे नियोजनदेखील प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे. प्राधिकरणाच्या कार्यालयात […] The post Pune Traffic: हिंजवडी, वाघोलीच्या ट्रॅफिक जॅममधून सुटका होणार? पीएमआरडीएने आखला ‘हा’ मोठा प्लॅन appeared first on Dainik Prabhat .
PMC Election: ठाकरेंच्या शिवसेनेकडून इच्छुकांची गर्दी; ३ दिवसांत नेले तब्बल ७५ अर्ज
प्रभात वृत्तसेवा पुणे – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रणशिंग फुंकत पुणे शहरातील इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटपाला सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांत ७५ इच्छुकांनी अर्ज नेल्याची माहिती शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेने पुणेकरांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा दिला आहे. भ्रष्टाचार, अनियमित कारभार, सत्ताधाऱ्यांची जनविरोधी […] The post PMC Election: ठाकरेंच्या शिवसेनेकडून इच्छुकांची गर्दी; ३ दिवसांत नेले तब्बल ७५ अर्ज appeared first on Dainik Prabhat .
PMC Election: महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी; ९ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज वाटप सुरू
प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील सगळ्या पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून, त्याची सुरुवात इच्छुकांच्या अर्जांनी केली आहे. कॉंग्रेसनेही महापालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांकडून अर्ज मागवले आहेत.पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ९ ते १३ डिसेंबरपर्यंत अर्ज मिळणार आहेत. मात्र, अर्ज १३ डिसेंबरलाच सायंकाळी […] The post PMC Election: महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी; ९ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज वाटप सुरू appeared first on Dainik Prabhat .
मुंढवा जमीन व्यवहारात शासनाला कोट्यवधींचा चुना! भोरमधून बडा अधिकारी अटकेत…वाचा सविस्तर
प्रभात वृत्तसेवा पुणे – जमीन व्यवहार प्रकरणामध्ये मुद्रांक शुल्कात सवलत देऊन शासनाची सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सह दुय्यम निबंधक रवींद्र बाळकृष्ण तारू याला अटक करण्यात आली आहे. भोर येथील त्याच्या निवासस्थानावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया इंटरप्रायजेस एलएलपी कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी पुण्यातील मौजे मुंढवा येथील जमिनीच्या […] The post मुंढवा जमीन व्यवहारात शासनाला कोट्यवधींचा चुना! भोरमधून बडा अधिकारी अटकेत…वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .
धक्कादायक घटना! ५ वर्षांच्या जाचाला कंटाळून ६० वर्षीय शेतकऱ्याने संपवलं जीवन
प्रभात वृत्तसेवा लोणंद – पाडेगाव फार्म, ताम्हाणे वस्ती (ता. फलटण) येथे शेतजमिनीवरील सततच्या वादामुळे मानसिक त्रस्त झाल्याने 60 वर्षीय काशिनाथ साधू ताम्हाणे यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमनाथ ज्ञानदेव ताम्हाणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमनाथ ताम्हाणे यांनी यांनी गेले पाच-सहा वर्षे त्यांच्या वडिलांच्या शेतातील बांध […] The post धक्कादायक घटना! ५ वर्षांच्या जाचाला कंटाळून ६० वर्षीय शेतकऱ्याने संपवलं जीवन appeared first on Dainik Prabhat .
Satara News: आता अंगणवाडीतच मिळणार डिजिटल शिक्षण; साताऱ्यात ‘स्मार्ट अंगणवाडी’योजना जोरात
प्रभात वृत्तसेवा सातारा – राज्य शासनाने अंगणवाड्यांचे रुपांतर आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील 4 हजार 928 अंगणवाड्या पैकी 1 हजार 482 अंगणवाड्यांना हे किट मिळाले असल्याने अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत या माध्यमातून अंगणवाड्यांचा दर्जा वाढवून त्यांना स्मार्ट अंगणवाडी कीट देण्यात आले आहे. अंगणवाडी केंद्राचे रुपांतर आता […] The post Satara News: आता अंगणवाडीतच मिळणार डिजिटल शिक्षण; साताऱ्यात ‘स्मार्ट अंगणवाडी’ योजना जोरात appeared first on Dainik Prabhat .
Railway Accident: रेल्वेखाली सापडून कर्नाटकच्या युवकाचा मृत्यू; वाठार पोलिसांकडून तपास सुरू
प्रभात वृत्तसेवा वाठार स्टेशन – तडवळे (ता. कोरेगाव) हद्दीत पहाटेच्या सुमारास रेल्वे खाली सापडून कर्नाटकातील परप्रांतीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली. गिरीशकुमार वराप्पा सोलापुरे (वय अंदाजे ३२, रा. वराप्पा कबर माळ, बेळगाव, कर्नाटक) असे मृताचे नाव आहे. वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे साधारण २.१५ वाजण्यापूर्वी वाठार […] The post Railway Accident: रेल्वेखाली सापडून कर्नाटकच्या युवकाचा मृत्यू; वाठार पोलिसांकडून तपास सुरू appeared first on Dainik Prabhat .
लज्जास्पद! पैशासाठी पतीनेच पत्नीला लावले वेश्याव्यवसायाला; वढू बुद्रुकमधील धक्कादायक प्रकार उघड
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील एका खोलीत वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकल्यानंतर पतीच आपल्या पत्नीकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या दोघा पती-पत्नीला अटक केली आहे. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला. यावेळी एक […] The post लज्जास्पद! पैशासाठी पतीनेच पत्नीला लावले वेश्याव्यवसायाला; वढू बुद्रुकमधील धक्कादायक प्रकार उघड appeared first on Dainik Prabhat .
धक्कादायक! विनयभंगाचा आरोपी जामिनावर सुटला अन् पीडितेच्या घरी जाऊन..
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – शिरूर तालुक्यातील वाडा पुनर्वसन येथील एका महाविद्यालयीन युवतीने पोलिसांत दिलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरून जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने पिडीत युवती आणि तिच्या आईला तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसात संतोष मारुती लांडगे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडा पुनर्वसन येथील महाविद्यालयीन युवती घरात एकटी असताना संतोष […] The post धक्कादायक! विनयभंगाचा आरोपी जामिनावर सुटला अन् पीडितेच्या घरी जाऊन.. appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – पुणे- दौंड लोहमार्गावर भरधाव चाललेल्या रेल्वेने एका ज्येष्ठ नागरिकाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिक जागीच मृत्यूमुखी पडले. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शेल पेट्रोलपंपाच्या पाठीमागील लोहमार्गावर रविवारी (दि.७) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बाळासाहेब भिकोबा महानवर (वय. ७२, रा. बोरकर वस्ती, लोणी काळभोर, ता. […] The post पुणे-दौंड रेल्वे ट्रॅकवर अपघात! रेल्वे रूळ ओलांडणे जीवावर बेतले; लोणी काळभोरच्या ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा चाकण – राज्यातील सरकार आणि काही अधिकारी ‘नोंदी असूनही जाणूनबुजून अडथळे निर्माण करत आहेत,’ असा गंभीर आरोप मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा केला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक मनोहर वाडेकर यांच्या सांत्वनासाठी जरांगे पाटील हे पुणे जिल्ह्यातील चाकण येथे आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी कुणबी दाखला पडताळणी […] The post Manoj Jarange Patil: न्याय न मिळाल्यास परिणाम वाईट असतील! जरांगे पाटील पुन्हा आक्रमक; सरकारवर गंभीर आरोप appeared first on Dainik Prabhat .
बारामती निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात निवडणूक आयोग हायकोर्टात
प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने बारामती नगरपरिषद निवडणुकीमध्ये तीन उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले होते. आता निवडणूक आयोगाने या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलेले असून बारामतीतील न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी उच्च न्यायालयात केली आहे. याबाबत त्यांनी अपील दाखल […] The post बारामती निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात निवडणूक आयोग हायकोर्टात appeared first on Dainik Prabhat .
पोलीस दलात खळबळ! ‘आत्महत्ये’चा स्टेटस ठेवून कर्मचारी गायब;अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळल्याचा आरोप
प्रभात वृत्तसेवा पुणे – दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे स्टेटस ठेऊन मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशीचे गायब झाले आहेत. रणदिवे हे गायब झाल्यामुळे संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, दोन दिवस उलटून गेले तरी देखील यवत पोलीस आणि उपविभागीय पोलीस […] The post पोलीस दलात खळबळ! ‘आत्महत्ये’चा स्टेटस ठेवून कर्मचारी गायब;अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळल्याचा आरोप appeared first on Dainik Prabhat .
Shikrapur News: शिक्रापुरात सरकारी बांधकामाला विरोध; नागरिकांचा थेट उपोषणाचा इशारा
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – येथील मोती चौक परिसरात असलेल्या पुरातन गोविंद महाराज मंदिरच्या इमारतीच्या जागेवर नव्याने सुरू असलेले बांधकाम तातडीने थांबवावे, अशी मागणी नागरिकांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. या बांधकामात गंजलेले स्टील वापरले जात असल्याचा आणि भविष्यात पार्किंग व लिफ्टची सोय नसल्यामुळे अडचणी निर्माण होणार असल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतला आहे. गोविंद महाराज यांनी […] The post Shikrapur News: शिक्रापुरात सरकारी बांधकामाला विरोध; नागरिकांचा थेट उपोषणाचा इशारा appeared first on Dainik Prabhat .
हद्दच झाली! एका वर्षात ३३ वेळा फुटली पाईपलाईन; भोर-कापूरहोळ रस्त्यावर पाण्याचे तळे
प्रभात वृत्तसेवा भोर – भोर- कापूरहोळ रस्त्याचे रखडलेले काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागल्याने भोर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी तुटल्याने रस्त्यावरून पाणी वाहत आहे. वर्षभरात भोर- कापूरहोळ- वाई रस्त्याचे काम सुरू असताना यापूर्वी ३२ वेळा पाइपलाइन फुटली होती. पाइपलाइन फुटण्याची ही ३३ वी वेळ आहे. पाइपलाइन तुटल्याने रस्त्यावर पाणी साचले असून काही ठिकाणी पाणी रस्त्यावरून […] The post हद्दच झाली! एका वर्षात ३३ वेळा फुटली पाईपलाईन; भोर-कापूरहोळ रस्त्यावर पाण्याचे तळे appeared first on Dainik Prabhat .
मृतदेह पायऱ्यावर आणि अधिकारी गायब! इंदापूर रुग्णालयातील ‘हा’संतापजनक प्रकार वाचाच
प्रभात वृत्तसेवा इंदापूर( नीलकंठ मोहिते ) – इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाला राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विशेष लक्ष देऊन रुग्णांसाठी आवश्यक यंत्रणा, तपासण्या आणि उपचार यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांसह अनेक अधिकाऱ्यांची रुग्णांप्रती निष्काळजी आणि निर्दयी मानसिकता संपूर्ण […] The post मृतदेह पायऱ्यावर आणि अधिकारी गायब! इंदापूर रुग्णालयातील ‘हा’ संतापजनक प्रकार वाचाच appeared first on Dainik Prabhat .
Nasrapur Accident: पुणे-सातारा हायवेवर भीषण अपघात! अज्ञात वाहनाच्या धडकेत ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू
प्रभात वृत्तसेवा नसरापूर – मौजे कामथडी येथील खुटवड वस्ती परिसरात (दि.6) संध्याकाळी घडलेल्या भीषण अपघातात विमल नथु चव्हाण (वय 64, रा. उंबरे) यांचा जागीच मृत्यू झाला. सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल दख्खन पठारसमोर हा अपघात झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक पसार झाला असून राजगड पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादी गणेश नधु चव्हाण (रा. उंबरे) यांनी […] The post Nasrapur Accident: पुणे-सातारा हायवेवर भीषण अपघात! अज्ञात वाहनाच्या धडकेत ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
डिजिटल सातबारा, ८-अ आणि फेरफार उताऱ्यांना कायदेशीर मान्यता
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागानं डिजिटल सातबारा, ८-अ आणि फेरफार उताऱ्यांना कायदेशीर मान्यता दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं सातबारा उतारा, ८-अ उतारा आणि फेरफार यासाठी तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जावं लागणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वेबसाईटवरून डिजिटल सातबारा डाऊनलोड करता येईल जो सर्व सरकारी, निमसरकारी आणि बँकिंग आणि न्यायालयीन कामासाठी पूर्णपणे वैध असेल. डिजिटल ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासाठी फक्त १५ रुपये मध्ये शुल्क भरावं लागेल.
कोरेगाव पार्कनंतर आता शिरूर रडारवर; एमआयडीसी परिसरात जमिनींच्या व्यवहारात मोठा घोटाळा?
प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील जमिनीच्या कथित गैरव्यवहारानंतर जिल्ह्यात जमीन खरेदी-विक्रीचे वातावरण तापले असून, शिरूर तालुक्यातील महार वतन जमीन गैरव्यवहार पुन्हा केंद्रस्थानी आला आहे. एमआयडीसीचा परिस स्पर्श झाल्याने जमिनींच्या किमती वधारल्या असून, याच पार्श्वभूमीवर अनेक बेकायदेशीर व्यवहार झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे शिक्रापूर, रांजणगाव, कोंढापुरी, शिंगाडवाडी, टाकळी हाजी या गावांमध्ये महार […] The post कोरेगाव पार्कनंतर आता शिरूर रडारवर; एमआयडीसी परिसरात जमिनींच्या व्यवहारात मोठा घोटाळा? appeared first on Dainik Prabhat .
क्रेडिट पॉलिसीनंतर निर्देशांकात तेजी...
डॉ. सर्वेश सुहास सोमणरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची म्हणजेच पाव टक्क्यांची कपात करत तो ५.२५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर नवा रेपो रेट जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे रेपो रेट ५.५० टक्क्यांवरून ५.२५ टक्क्यांवर आला आहे. जो गेल्या काही वर्षांतील सर्वात कमी आहे.रेपो रेट म्हणजे काय?जेव्हा जेव्हा आरबीआय रेपो रेट कमी करते, तेव्हा कर्जाचे हप्ते घटतात. रेपो रेट म्हणजे असा व्याजदर ज्यावर बँका आरबीआयकडून कर्ज घेतात. स्वतःसाठी कर्ज स्वस्त झाल्यास बँका हा लाभ ग्राहकांपर्यंतही पोहोचवतात. आता रेपो रेटमध्ये कपात झाल्याने, गृहनिर्माण आणि वाहन कर्जांसह किरकोळ कर्जांवरील व्याजदर कमी होण्याचीशक्यता आहे.रिव्हर्स रेपो दर (Reverse Repo Rate)जेव्हा व्यावसायिक बँकांकडे अतिरिक्त निधी (surplus funds) असतो आणि त्यांना तो सुरक्षितपणे गुंतवायचा असतो, तेव्हा त्या हा निधी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. रिझर्व्ह बँक या निधीवर बँकांना जे व्याज देते, त्या दराला 'रिव्हर्स रेपो दर' म्हणतात.आरबीआय ने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा महागाईचा अंदाज २.६ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.पुढील आठवड्याचा विचार करता निर्देशांक निफ्टीची गती आणि दिशा दोन्ही तेजीची असून निफ्टीची २६००० ही महत्त्वाची पातळी आहे. जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर आहे तोपर्यंत निर्देशांकातील तेजी टिकून राहील.मागील आठवड्यात झालेल्या तेजीनंतर पुढील आठवड्यात निफ्टीमध्ये आणखी २०० ते २५० अंकांची तेजी होणे अपेक्षित आहे.शेअर्सचा विचार करता वोखार्ट फार्मा, नारायण हृदयालय, हिरोमोटो कॉर्प यासह अनेक शेअर्सची दिशा तेजीची आहे.(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)samrajyainvestments@gmail.com
उदय पिंगळेगुंतवणूक केल्याने काही कालावधीनंतर तुमच्या पैशांत वाढ होते. त्यामुळे तुमचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करता येतं. गुंतवणुकीची सुरुवात लवकरात लवकर करणे कधीही चांगलंच. पहिली कमाई जेव्हा तुमच्या हातात पडेल त्याच दिवसापासून गुंतवणूक करणे योग्य होईल. अनेक कारणांसाठी गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.गुंतवणूक केल्याने पैशांमध्ये वाढ होते.महागाईवर मात करण्यास गुंतवणूक उपयोगी पडते.गुंतवणूक केल्याने विविध आर्थिक उद्दीष्टे पूर्ण होण्यास मदत होते.आधीपासूनच आणि नियमितपणे गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी मोठी रक्कम जमा होण्यास मदत होते.गुंतवणुकीची सुरुवात करण्याआधी तुमचे जरुरीचे खर्च भागतील एवढे नियमित उत्पन्न असणे गरजेचं आहे.आणीबाणीच्या प्रसंगी - नोकरी जाणे अशा प्रसंगी तुमचे खर्च भागतील एवढा राखीव निधी तुमच्याकडे असायला हवा.वैद्यकीय आणीबाणी उद्भवल्यास पुरेसे विमाछत्र तुमच्याकडे असले पाहिजे.तुमचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी दीर्घकाळात संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणूक लवकरच सुरू करणे फायदेशीर ठरते. नियमितपणे आणि सातत्याते छोटीशी योग्य गुंतवणूक करत राहिलात तर संपत्ती निर्माण होईल आणि तुमची आर्थिक उद्दिष्टं पूर्ण होण्यास मदत होईल.लवकरच केलेल्या गुंतवणुकीच्या वाढीस चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो.लवकर सुरुवात केलेल्या गुंतवणुकीवर बाजारातील अल्पकालीन चढ उताराचा फारसा फरक न पडता दीर्घकाळात भरघोस वाढ होते.जेव्हा तुम्ही विचारपूर्वक गुंतवणूक करता तेव्हा त्यामध्ये बचत खात्यात पैसे ठेवून मिळणाऱ्या परताव्याहून अधिक वाढ होण्याची शक्यता असते. गुंतवणूक करण्यात जोखीम आहे कारण त्यातून निश्चित किती परतावा मिळेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे यातून मिळणारा परतावा निश्चित नाही हे स्वीकारण्याची तुमची मानसिक तयारी असणे गरजेचे आहे. ती होण्यासाठी गुंतवणूक संदर्भातील काही प्राथमिक गोष्टी माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.सुजाण गुंतवणूकदार होण्यासाठी तुम्हाला हे माहिती असायलाच हवंउद्दिष्ट- कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी निश्चित आर्थिक उद्दिष्ट असायलाच हवं जसे की घर खरेदी, मुलांचे उच्चशिक्षित, निवृत्ती नियोजन इ.गुंतवणूक मर्यादा - तुमच्या गुंतवणुकीची निश्चित अशी कालमर्यादा असू द्या. या काळात चक्रवाढ गतीचा लाभ गुंतवणूकीस मिळेल.जोखीम घेण्याची क्षमता - तुम्ही किती नुकसान सहन करू शकता यावर तुमची जोखीम क्षमता ठरते. जितका अधिक परतावा गुंतवणुकीतून मिळू शकतो त्या प्रमाणात गुंतवणूक जोखीम वाढत रहाते.गुंतवणूक ज्ञान - गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी त्याची प्राथमिक माहिती करून घ्यावी. जर तुम्ही नव-गुंतवणूकदार असाल तर ऑप्शनसारख्या कठीण गुंतवणुकीचा विचार करण्याऐवजी तुम्हाला समजेल अशा सोप्या गुंतवणुकीपासून सुरुवात करावी आणि योग्य ज्ञान मिळवूनच कठीण गुंतवणुकीचा विचार करावा.गुंतवणुकीचे तीन आधारस्तंभ - सुरक्षितता, परतावा आणि रोकड सुलभता हे कोणत्याही गुंतवणुकीचे आधारस्तंभ आहेत. गुंतवणूक करताना आपले भांडवल सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. त्यातून बाजारात उपलब्ध असलेल्या दराहून अधिक परतावा मिळायला हवा त्याचप्रमाणे त्याचे पैशांत सहज रूपांतर करता आले पाहिजे.गुंतवणूक इतिहास आणि भविष्यवेधाची शक्यता - मूलभूत दृष्टिकोनातून गुंतवणूक आणि त्यातील वृद्धीकडे पाहावे.विविध मालमत्तांमध्ये विभागणी - गुंतवणूक विविध मालमत्ता प्रकारात विभागली गेली असता त्यातील एखादा मालमत्ता प्रकार न चालल्याने त्यातून होणाऱ्या नुकसानीची तीव्रता कमी होते.मालमत्ता प्रकारांतील सहभाग - मालमत्ता प्रकारातील सहभाग हा आर्थिक उद्दिष्ट, कालावधी, जोखीम क्षमता आणि बाजाराचा कल यावर अवलंबून असतो. विविध प्रकारातून मिळणाऱ्या परताव्याची गणना करणारे गणक उपलब्ध असून त्याचा वापर केल्यास आपल्याला निष्कर्ष काढण्यात त्यांचाउपयोग होतो.करपरिणाम - विविध मालमत्तामधून मिळणाऱ्या परताव्यावर कमी अधिक प्रमाणात कर आकारला जात असल्याने त्याचा गुंतवणूक परताव्यावर होणारा परिणाम पडताळणे आवश्यक असते.गुंतवणुकीचे पुनरावलोकन - विविध गुंतवणूक त्यातून मिळणाऱ्या परातव्यासह पाहून गुंतवणूक उद्दीष्ट पूर्ण करण्यास आवश्यक असल्यास त्यात बदल करावेत. असे बदल उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी करावेत.गुंतवणूक योग्य विविध मालमत्ता प्रकारशेअर्स - शेअर्स म्हणजे कंपनीच्या मालकीतील म्हणजे भाग भांडवलातील एक हिस्सा. जेव्हा तुम्ही शेअर्स घेता तेव्हा तुम्ही कंपनीचे भागधारक बनता. त्यातून मिळणारा परतावा मुख्यतः कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून असतो. शेअर्सचा बाजारभाव वाढल्यास भरघोस फायदा होऊ शकतो. त्यासोबत असलेले धोके म्हणजे त्याच्या बाजारभावात सातत्याने होणारे चढ उतार आणि कंपनीच्या आर्थिक स्थितीत होणारे बदल. कर्ज रोखे- कर्जरोखे म्हणजे कंपनीने घेतलेले कर्ज. असे कर्ज रोखे कंपन्या त्याच्या व्यवसाय वृद्धीसाठी तर स्थानिक स्वराज संस्था सरकार काही विशिष्ट हेतूने काढू शकते. कर्ज घेणारा म्हणजेच ऋणको हा गुंतवणूकदार म्हणून धनको कडून कर्ज घेतो त्याबद्दल व्याज नियमित अंतराने आणि मुद्दल मुदतपूर्ती च्या वेळी परत करण्याची हमी देतो. कर्करोख्यासोबत येणारी जोखीम म्हणजे व्याज नियमितपणे न मिळण्याची आणि मुदतपूर्तीच्या वेळी मुद्दल वेळेवर न मिळण्याची शक्यता या आहेत.म्युच्युअल फंड - म्युच्युअल फंड विविध गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्रित करून वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारात उदाहरणार्थ शेअर्स, बॉण्ड आणि इतर मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंड गुंतवणूक दारांना विविध मालमत्ता प्रकारात फारसा अभ्यास न करता शेअरबाजारात गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देतात. म्युच्युअल फंडांकडे व्यावसायिक फंड मॅनेजर असतात गुंतवणूकदारांकडून फंडास अल्पसा मोबदला मिळतो.एक्स्चेंज ट्रेडेड फंड (इटीएफ) - हा म्युच्युअल फंडासारखा शेअरबाजारात अप्रत्यक्ष गुंतवणूक करण्याचा प्रकार असून तो गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडाच्या पेक्षा कमी व्यवस्थापन फी मध्ये अधिक तरल वेगळा प्रकार आहे.स्थावर मालमत्ता - यातील गुंतवणुकीमुळे भाडे आणि भांडवल वृद्धी होऊ शकते. ती गुंतवणूकदारांच्या अप्रत्यक्ष उत्पन्नात मिळते. यातील मिळणाऱ्या लाभामध्ये ती मालमत्ता नेमकी कुठे आहे त्यानुसार फरक पडतो. स्थावर मालमत्तेतील आणखी जोखीम म्हणजे मालमत्ता हा प्रकार कमी तरल आहे.मौल्यवान धातू - मौल्यवान धातू म्हणजे सोने चांदी इ यामुळे बरेचदा अडीअडचणीत पैसे उभे करण्यासाठी महागाईवर मात करण्यासाठी यात गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक प्रत्यक्ष धातुरुपात अथवा अप्रत्यक्षपणे इटीएफ स्वरूपात करता येते. या धातूंच्या भावावर आर्थिक परिस्थिती, भू राजकीय स्थिती आणि मागणी पुरवठा प्रभाव पडतो.mgpshikshan@gmail.com
मल्ल्या, नीरव मोदीसह १५ फरार आरोपींवर ५८ हजार कोटींचे कर्ज
मुंबई : केंद्र सरकारने मद्यसम्राट विजय मल्ल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्यासह १५ जणांना फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी नुकतेच लोकसभेत माहिती दिली की, ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत या गुन्हेगारांवर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एकूण ५८,०८२ कोटी रुपये थकीत आहेत.या थकबाकीच्या रकमेत ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंतचे मूळ २६,६४५ कोटी रुपये आणि एनपीए जाहीर झाल्यापासून ते ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंतचे व्याज ३१,४३७ कोटी रुपये समाविष्ट आहेत. सरकारच्या उत्तरानुसार, ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत या फरार गुन्हेगारांकडून १९,१८७ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दौसा येथील काँग्रेस खासदार मुरारी लाल मीणा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली.मंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की या १५ फरार आर्थिक गुन्हेगारांपैकी नऊ जण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांविरुद्ध मोठ्या आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणांमध्ये सहभागी आहेत. या यादीत विजय मल्ल्या आणि नीरव मोदी सारख्या हाय-प्रोफाइल नावांचाही समावेश आहे. मंत्र्यांचे उत्तर लोकसभेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.विजय मल्ल्या यांच्यावर त्यांच्या आता बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्ससाठी भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संघाकडून ९,००० कोटींहून अधिक कर्ज फसवणूक करून मिळवल्याचा आरोप आहे. दरम्यान, नीरव मोदी आणि त्यांचे काका मेहुल चोक्सी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेविरुद्ध १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यांपैकी एक आहे. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने स्टर्लिंग बायोटेक बँक फसवणूक प्रकरणात संदेसरा बंधूंविरुद्धच्या सर्व फौजदारी कारवाई रद्द करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यांना कर्ज देणाऱ्या बँकांकडे पूर्ण आणि अंतिम सेटलमेंट म्हणून ५,१०० कोटी रुपये जमा करण्याची अट घालण्यात आली होती.
सुट्टीच्या दिवशी संकष्टीचा योग! रांजणगाव मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; देवस्थानकडून विशेष सोयी
प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – संकष्ट चतुर्थीनिमित्त रविवारी (दि. ७) श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती येथे श्रीमहागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक संपन्न झाल्यावर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सुट्टीचा दिवस आणि संकष्टी चतुर्थीचा योग आल्याने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. देवस्थानतर्फे भाविकांसाठी जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी आदी […] The post सुट्टीच्या दिवशी संकष्टीचा योग! रांजणगाव मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; देवस्थानकडून विशेष सोयी appeared first on Dainik Prabhat .
वरातीत नवरदेवाचा घोडा नाचवतेय ‘ती’! भवानीनगरमधील हे चित्र पाहून तुम्हीही कराल सलाम
प्रभात वृत्तसेवा भवानीनगर – लग्न समारंभात नवरी मुलीची वरात घोड्यावरून काढली जाते हे आजवर आपण पाहिले आहे. परंतु, आता लग्नात नवरदेवासाठी घोडा आणून नाचवण्याचे काम देखील मुली करू लागल्या आहेत. हे सध्याच्या मुली कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत, याचेच उत्तम उदाहरण आहे. भारत देश २१ व्या शतकाकडे वाटचाल करत असताना, प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने सक्षम […] The post वरातीत नवरदेवाचा घोडा नाचवतेय ‘ती’! भवानीनगरमधील हे चित्र पाहून तुम्हीही कराल सलाम appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा इंदापूर – हिवाळ्याची चाहूल लागताच इंदापूर शहर, निमगाव केतकी आणि भिगवण येथील आठवडे बाजारांसह दैनंदिन बाजारांमध्ये आंबट आणि तुरट चवीच्या रानमेव्याची आवक वाढली आहे. बोरे, आवळे आणि बोंडे अशा हंगामी रानफळांची आवक वाढताच शहरी ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. थंडी वाढताच ग्रामीण भागातील बोरझाडांवर रसरशीत बोरे लगडली आहेत. टपोऱ्या बोरांचा आस्वाद […] The post Winter Fruits: थंडीची चाहूल लागताच इंदापूरच्या बाजारात ‘या’ रानमेव्याची धूम! खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड appeared first on Dainik Prabhat .
Lenyadri Ganpati: लेण्याद्रीत ‘मोरया’चा जयघोष! संकष्टी चतुर्थीला हजारो भाविकांची मांदियाळी
प्रभात वृत्तसेवा लेण्याद्री – येथील अष्टविनायक तिर्थक्षेत्रावर रविवारी (दि. ७) संकष्ट चतुर्थीनिमित्त ‘श्रीगिरीजात्मज’ गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली. दिवसभर भाविकांच्या गर्दीने लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.यानिमित्ताने श्रीक्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे श्रीगिरिजात्मजाच्या मूर्तीस व संपूर्ण मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवस्थानच्या वतीने पहाटे ५.३० वाजता विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते […] The post Lenyadri Ganpati: लेण्याद्रीत ‘मोरया’चा जयघोष! संकष्टी चतुर्थीला हजारो भाविकांची मांदियाळी appeared first on Dainik Prabhat .
वार्तापत्र : कोकणपूर्वी वर्षभरात कृषीची एक दैनंदीनी होती. आता तसे काही उरले नाही. धुक्यात रस्ते हरवतात. साहजिकच या वातावरणाचा परिणाम फळबागायतींवर दिसतो. यावर्षी आंबा, काजू पीक चांगले येईल अशी अपेक्षा कोकणातील बागायतदार शेतकरी बाळगून आहेत. आंबा, काजूंवर होणारी फवारणी, कीटकनाशक, खत, बागायतींची बेनावळ यावर हजारो रुपये खर्च होतात. कधी-कधी बागायतींवर होणाऱ्या खर्चाचे पैसेही मिळणाऱ्या उत्पन्नांतून होत नाहीत. कोकणात आंबा, काजू बागायतींमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. यामुळे कोकणामध्ये वातावरणातील होणाऱ्या बदलाचे फार मोठे परिणाम होऊ शकतात. थंडी नाही, उन्हाळाही नाही असं आकाशात मळभ असलेल्या वातावरणाने सध्या कोकण ग्रासून गेले आहे.कोकणात नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस होता. थंडी कधी सुरू होणार या प्रतीक्षेत अवघं कोकण होतं. नोव्हेंबरमध्ये पाऊस असल्याने भातपिकाचं काय होणार याच चिंतेत कोकणातील शेतकरी होता; परंतु एकदाचा पाऊस थांबला तशी भातशेतीची कापणी आणि आणखी काही शेतींची कामे शेतकऱ्यांनी आटोपली, भातकापणी आणि भात भरून ठेवण्याचं शेतकऱ्याचं काम आटोपल असलं तरीही कोकणातील आंबा, काजू, जांभूळ, रतांबा बागायतदार शेतकरी चिंतेत आहेत. ऋतुचक्र बदललं आहे. वातावरणातील सतत घडणारे बदल. फळ उत्पादनावर संकट बनून आहेत. पहाटे थंडी, दुपारी कडक उन्हाळा असे विचित्र वातावरण आहे. एकीकडे ऋतुचक्रातील बदल वातावरण सतत बदलत राहिल्याने त्याचा विपरित परिणाम कोकणातील विविध फळपिकांवर होत आहेत. केवळ या वातावरण बदलाचा परिणाम फळपिकांवरच होतो असे नाही, तर कोकणातील मासेमारी व्यवसायावरही त्याचा विपरित परिणाम जाणवत आहे. एकीकडे थंडी आहे असं म्हणता येत नाही किंवा थंडी झालीच नाही असेही म्हणता येणार नाही. या महिन्यात आंबा, काजू, रतांबा याला उत्तम मोहोर येतो. या आलेल्या मोहोरावर पूर्वी आंबा बागायतदार शेतकरी आणि आंबा कलम बाग कराराने घेतली जायची.आंब्याच्या मोहोरावर आंबा बागेची बोली लागायची; परंतु गेल्या काही वर्षातील या हवामानाच्या बदलांमुळे आंबा बागायतदार आणि आंबा व्यावसायिक यांनी मोहोरावर आंबा किती येईल त्याचे किती पैसे होतील म्हणजे किती पेटी आंबे होतील असे सर्वच व्यवहार या बेभरवशामुळे आता होत नाहीत. याचे कारण मोहोर पाहून आंब्यांच्या झाडांची बोली करायची आणि मधल्या कालावधीत कोणत्यातरी रोगाने पीकच आले नाही तर सगळच बिघडायचं यामुळे पूर्वी सऱ्हास आंबा बागायतदार मोहोरावर आंब्याची बोली व्हायची ती आता फार कमी झाली. मोहोरावर बाग करायला घेण्यामध्ये बऱ्याचवेळा आंबा बागायतदार शेतकऱ्याचे नुकसान व्हायचे; परंतु हा सर्व मोहोरावरचा व्यवहार बोलीवर विश्वासावर चालायचा. काही व्यावसायिक आंब्याच्या झाडावरील मोहोर पाहून त्या आंब्याच्या झाडावर किती पेट्या आंबे मिळतील याचा अचूक अंदाज बांधणारे आंबा व्यवसायात मुरलेले व्यावसायिक होते. आजही आहेत. आजही मोहोरावर बाग देण्याचा आणि बाग घेण्याचा व्यावसायिक व्यवहार होत असतो; परंतु वातावरणातील सतत होणाऱ्या बदलांमुळे कोणालाच काही अंदाज वर्तवणे अवघड झाले आहे. एकीकडे थंडी येतेच म्हणेपर्यंत चार-दोन दिवसांतच थंडी गायब झाली आहे, तर दुसरीकडे मध्येच येणारी उष्णता यामुळे आंबा, काजू बागायतीचे पुढे काय होणार? याची चिंता आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांना सतावत आहे.कोकणातल अर्थकारण आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम या सर्व फळपिकांवर अवलंबून आहे. याबरोबरच मासेमारीचा व्यवसायदेखील अनियमित झाला आहे. या सर्वांचा परिणाम हा होतच असतो. अलीकडे काही दिवस दिवसभर ढगाळ वातावरण आहे. वातावरणातील हे बदल नेमके कसे आहेत त्याचा परिणाम कशा-कशावरती संभवतो हे सगळ ठरवणं, सांगणं कठीण आहे. काही वर्षांत वातावरणातील बदल सारच अनिश्चित करत आहे. पूर्वी वर्षभराच कृषीच शेड्युल होतं आता तस काही उरलं नाही. खूप बदललं. मध्येच दाट धूकं येतं; परंतु आता तर कोकणात पहाटेच्यावेळी अनेक मार्गांवर धूकं दिसतं. धुक्यात रस्ते हरवतात. साहजिकच या वातावरणाचा परिणाम फळबागायतींवर झालेला दिसतो. सध्याच्या या कोकणातील हिवाळ्यातल्या मळभ असणाऱ्या वातावरणाचाही मोठा परिणाम संभवतो. यावर्षी तरी आंबा, काजू पीक चांगलं येईल अशी अपेक्षा बाळगून कोकणातील बागायतदार शेतकरी आहे. आंबा, काजूंवर होणारी फवारणी, कीटकनाशक, खत, बागायतींची बेनावळ यावर हजारो रुपये खर्च होतात. कधी-कधी बागायतींवर होणार खर्चाचे पैसेही मिळणाऱ्या उत्पन्नांतून होत नाहीत; परंतु यावर्षी आंबा बागायतीमधून आंबा पीक कमी आलं, तर पुढच्यावर्षी जादाच पीक येईल अशी अपेक्षा ठेवून आंबा बागायतदार राबत असतो. कोकणात आंबा, काजू बागायतींमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. यामुळे कोकणामध्ये वातावरणातील होणाऱ्या बदलाचे फार मोठे परिणाम होऊ शकतात. थंडी नाही, उन्हाळाही नाही असं आकाशात मळभ असलेलं वातावरण कोकणात आहे. हापूस आंबा म्हटल्यावर कोणालाही फक्त कोकणच आठवतं. गुजरात, कर्नाटक या राज्यातूनही आंबा पीक होतं. कोकणातील हापूस आंब्याशी स्पर्धा करण्यासाठी गुजरात, कर्नाटक राज्यातून आंबा आणला जातो. ‘हापूस आंबा’ म्हणून विक्री करण्याचा प्रयत्नही केला जातोय. एकीकडे निसर्गाचा बेभरवसा, त्याचं संकट त्यातच कमी म्हणून की काय कोकणातील आंबा आणि काजू व्यवसायातही परराज्यातून मोठ्या प्रमाणावर आंबा, काजू आणून बाजारात विक्रीला आणण्याचा प्रयत्न होताना दिसतो. कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांनी सावध असण्याची आवश्यकता आहे.कोकणात सर्वच बाजूने स्पर्धा आहे. आजकाल कोकणातील हापूस आंबा बाजारात येण्यापूर्वी कर्नाटकातील आंबा कोकणातील हमरस्त्यावर येत असतो. कोकणात येणाऱ्या पर्यटकांना कर्नाटकचा हा बाजारात येणारा आंबा हा कोकणचा हापूस म्हणून विक्री करणारेही अनेक आहेत. या कर्नाटक आंबा विक्रीमध्ये आंबा पॅक करताना कोकणातील मराठी दैनिकांचा कागद आंबा पेटी पॅकिंगमध्ये वापरला जातो. जेणेकरून कर्नाटकचा तो आंबा कोकणातलाच आंबा आहे असे वाटण्यासाठी आंबा पेटी पॅकिंगमध्ये कोकणातील स्थानिक वृत्तपत्रांचा रद्दी कागद वापरला जातो. मार्केटमध्ये फसवणुकीचा कसा फंडा वापरला जातो त्याचे हे एक-एक नमुनेदार उदाहरण आहेत.मुंबईच्या बाजारातही गुजरात, कर्नाटकचे आंबे कोकणचा हापूस म्हणून विकण्याचा प्रयत्न होतो. आता तर वलसाडच्या हापूसने आपल्या मानांकनासाठी स्पर्धा सुरू केली आहे. पण ज्यांनी कोकणच्या हापूसचा स्वादिष्टपणा चाखलेला आहे त्याला कोकणातील हापूस आंब्याच्या वासावरूनही आंबा कोकणचा आहे की बनवेगीरी आहे हे समजून येते. कोकणच्या हापूसची बरोबरी इतर कोणत्या राज्यातील आंब्याला करता येणारी नाही. कोकणातील हापूस त्यांचा रंग, त्याचे देखणेपण, त्याचा स्वाद आणि सगळंच कुठेच सापडणार नाही; परंतु ऋतुचक्र आणि हवामानातील बदलाच्या परिणामांच्या कचाट्यात मात्र कोकणचा हापूस, काजू सारेच सापडलेय यामुळेच कोकणातील बागायतदार चिंतातूर आहेत.- संतोष वायंगणकर
आंतरराष्ट्रीय राजकारणात ऑप्टिक्सला प्रचंड महत्त्व असते. भारत आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यात भारताने हाच संदेश जगाला देण्याचा प्रयत्त्न केला आहे. पुतिन यांची भारत भेट ही समारंभपूर्वक दिखाऊपणाच्या अगदी पार पलीकडे जाणारी आणि दोन्ही देशांत असलेल्या अनेक वर्षांपासूनच्या संबंधांना आणखी बळकट करणारी आहे. अमेरिका आणि त्यांच्या मांडलिक देशांनी पुतिन यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतरही मोदी यांनी पुतिन यांचे स्वागत केले आणि त्यातून हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला, की ध्रुवीकृत जागतिक वातावरणात भारताची भूमिका बदललेली नाही. अलिप्तता चळवळ ही आपली अगोदर प्रमुख होती, पण तिसऱ्या देशाची ताकद जशी क्षीण होत गेली तशी त्या चळवळीचे महत्त्व ओसरू लागले. हे ओळखून भारताने अलिप्तता चळवळीकडे पूर्ण दुर्लक्ष न करताही भारताचे कोणत्याही राष्ट्राच्या आहारी न जाण्याचे आणि कुणालाही फारसे जवळ येऊ न देण्याचे धोरण कायम ठेवले. पुतिन यांच्या या भारत भेटीत दोन्ही देशांनी १६ सामंजस्य करार केले आणि त्यात संरक्षण, शिक्षण आणि ऊर्जा विषयक करारांचा समावेश होता. त्याचबरोबर २०३० पर्यंतचा रोडमॅप तयार करण्यात आला.ही भेट महत्त्वाची होती. कारण लाक्षणिक अर्थाने हे निश्चित करण्यात आले, की जागतिक अस्थिरता आणि अशांतता असतांनाही भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री ही विश्वास आणि परस्परविषयक आदराची जपणूक करणारी आहे. या भेटीनंतर उभय देशांनी जाहीर केले, की पुतीन आणि मोदी यांच्यातील भेटीतून द्विपक्षीय सहकार्य केवळ मजबूत झाले आहे. भारताच्या मित्रत्वाच्या बाजूने रशिया प्रथमपासूनच होता आणि अमेरिकेच्या दादागिरीला भारताचे नेतृत्व झुकले नाही, तेव्हाही रशियाच भारताच्या मदतीला धावून आला होता. आता बंगालच्या उपसागरात अमेरिकेने कशा आपल्या युद्धनौका आणल्या होत्या आणि रशियानेच भारताला त्यावेळी वाचवले होते. हा सारा इतिहास झाला. पण तेव्हापासून भारताचा खंदा मित्र म्हणून रशिया उभा आहे. पुतीन यांच्या भारत भेटीचे सर्वात महत्त्वाचे फलित म्हणजे भारतीय फार्मा कंपन्यांना रशियाने उत्पादन करण्यास परवानगी दिली आहे हाच आहे. रशियासाठी भारताची औषधे ही विश्वासार्हता प्रदान करतात आणि भारतासाठी यामुळे भारतीय औषधांची नागरिकांच्या जीवितासाठी महत्त्वपूर्ण बाब म्हणून ओळख मजबूत करते. भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्याच्या करारामुळे दोन्ही देशांच्या संयुक्त युरिया उत्पादन सुविधांच्या भारतात प्रस्थापित होण्याला चालना मिळणार आहे. त्यामुळे भारताची शेती क्षेत्रात प्रगती होणार आहे. यामुळे अपरिहार्यपणे भारताला होणारा फायदा म्हणजे भारताची आयातीवरील अवलंबितता कमी होईल. अगोदरच भारताची आयात जास्त आहे आणि निर्यात कमी आहे. त्यामुळे आयात-निर्यात समतोल ढासळतो. तो या निर्णयामुळे बराचसा कमी होईल. पुतीन यांनी भारत आणि रशिया यांच्यातील संस्कृतिक संबंधांची आठवण काढताना अभिनेते राज कपूर यांची आठवण काढली आणि त्यामुळे दोन्ही देशांत सांस्कृतिक आदान-प्रदान किती महत्त्वाची चालली होती आणि किती प्रदीर्घ काळापासून चालत आली आहे याचे स्मरण झाले. ही भागीदारी बहुध्रुवीय जगात नुसती महत्त्वाची नाही, तर चेन्नई व्लादिवोस्तोक मॅरिटाईम कॉरिडोरद्वारे सर्वात भू-राजकीय परिणाम दिसून आला आहे. याचा संबंध तामिळनाडूनतील कोडाईकुलम आणि रशियातील व्लादिवोस्तोक कॉरिडोरमुळे उभय देशांतील प्रवासाचा काळ महत्त्वपूर्ण कमी होणार असून नव्या पुरवठा लाईन्स सुरू होतील. चीनविरोधात भारत एकीकडे इंडो पॅसिफिक सागरात झुंज देत असताना या नव्या कॉरिडोरमुळे भारताला रशियाच्या अति पूर्वेतील प्रयत्नांना साथ देता येऊ शकेल. हा केवळ आर्थिक प्रकल्प नाही, तर भारताची सागरी आणि युरेशियन कनेक्टिव्हिटी वाढवणारा प्रकल्प आहे.मोदी-पुतीन यांची भेट ही केवळ स्वतंत्र राजनैतिक भेट नव्हती, तर निश्चित करणारा माईलस्टोन होता. ज्याचे जागतिक परिणाम मजबुती, स्थैर्य आणि नागरी व्यवस्थेत होतील. शीतयुद्धकालीन परिस्थिती झपाट्याने बदलत आहे आणि त्या परिप्रेक्ष्यात या भेटीकडे पाहिले पाहिजे. जग आज मल्टीपोलर होताना भारताला अमेरिकेवरच आपले ध्यान लावून बसणे शक्य नव्हते. पुतीन ही कितीही पाश्चात्य राष्ट्रांनी आव आणला तरीही दुर्लक्षणीय शक्ती नाही. हे ओळखून नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांची भारत भेट आयोजित केली आणि त्यातून अमेरिकेला संदेश दिला, की ट्रम्प यांच्यापासून वेगळे मार्ग शोधावे लागतील. भारत आणि रशिया यांच्या एकत्र येण्यामुळे अमेरिका अस्वस्थ होणे साहजिक आहे. अगोदर जी-२० परिषदेत मोदी यांनी जाऊन दक्षिण आफ्रिकेला ट्रम्प नसले तरीही जी-२० यशस्वी होऊ शकते असा संदेश दिला आणि आता पुतीन यांच्या भारत भेटीमुळे दुसरा दणका दिला आहे. कारण ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धोरणामुळे भारतात अस्वस्थता आहे. त्यावर उत्तर भारताला शोधावेच लागणार आहे आणि त्यात रशियाची मदत घेतली, तर कुठेच बिघडले नाही. भारत रशिया संबंधांना नवी दिशा मिळाली आहे हे निश्चित आहे. परराष्ट्र संबंधांना बिटवीन लाईन्सला महत्त्व असते. जे सांगितले त्यापेक्षा जे नाही ते सांगितले ते जास्त महत्त्वाचे असते. मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे याच परिप्रेक्ष्यातून पाहावे लागेल. रशिया-युक्रेन युद्धामुळे रशिया एकटे पडल्याची भावना निर्माण झाली होती. ती मोदी-पुतीन यांच्या भेटीमुळे बऱ्याच प्रमाणात दूर होण्यास मदत होईल. अर्थातच पुतीन यांचे भव्य स्वागत केल्यामुळे अमेरिका आणि पाश्चात्य जग अस्वस्थ झाले आहे. पण मोदी यांनी पुतीन यांचे स्वागत करून पाश्चात्य देशांच्या दबावाला बळी पडणारे आपण नाही हे सिद्ध केले. त्यात भारताचा लाभ झाला आहे. त्यामुळे अमेरिकेचा थयथयाट समजण्यासारखा आहे. पुतीन यांच्या भारत भेटीचा निष्कर्ष असा काढता येईल, की त्यामुळे भारत-रशिया संबंधांची दृढता, सामरिक भागीदारीचे नूतनीकरण आणि संरक्षण याचे जागतिक भू-राजकीय मुद्यांवर सहकार्याची पुष्टी देण्यात आली. पुतीन यांची भारत भेट ट्रम्प यांच्यासाठी निश्चितच आश्वासक नाही.
Khopoli Election: नगरपालिकेचा निकाल लांबणीवर! आता २१ डिसेंबरला होणार फैसला; शहरात राजकीय अस्वस्थता
प्रभात वृत्तसेवा खालापूर – खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीचे मतदान २ डिसेंबर रोजी शांततेत पार पडले. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे ३ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल, अशी निवडणूक आयोगाची अधिकृत घोषणा केली होती. पण मतदान प्रक्रियेदरम्यानच अचानक न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे खोपोलीसह अनेक नगरपालिकांचे निकाल थेट २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले. या अनपेक्षित निर्णयामुळे उमेदवार, कार्यकर्ते आणि […] The post Khopoli Election: नगरपालिकेचा निकाल लांबणीवर! आता २१ डिसेंबरला होणार फैसला; शहरात राजकीय अस्वस्थता appeared first on Dainik Prabhat .
Talegaon Dabhade: तळेगावात होणार अद्ययावत हॉस्पिटल; सुनील शेळकेंकडून १० कोटींची घोषणा
प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार व आधुनिक उपचार सहज उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने रुबी हॉल क्लिनिक आणि तळेगाव जनरल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथे नवे वैद्यकीय उपचार केंद्र उभारण्यात येणार असल्याचे मनोगत रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉ. परवेश ग्रँड यांनी व्यक्त केले. तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात […] The post Talegaon Dabhade: तळेगावात होणार अद्ययावत हॉस्पिटल; सुनील शेळकेंकडून १० कोटींची घोषणा appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – हिंदू समाजाने दाखवलेला विश्वास हेच आपल्या कार्याचे बळ आहे. धार्मिक स्थळांचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असून अतिक्रमणासारख्या गंभीर मुद्द्यांवर प्रशासनाने त्वरेने कार्यवाही करणे अत्यावश्यक आहे. धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हे पावित्र्यावर आघात असून दोन समाजांत तणाव निर्माण करण्याचे धोकादायक कारण ठरू शकते. हिंदू मंदिरांच्या जागांवर तसेच परिसरात झालेले अतिक्रमण कोणत्याही […] The post Nitesh Rane: हिंदू मंदिरांच्या जागेवरील अतिक्रमण खपवून घेणार नाही; नितेश राणेंचा प्रशासनाला कडक इशारा appeared first on Dainik Prabhat .
पिंपरीत क्रिकेट सट्ट्याचा ‘खेळ’उघड! १ लाखाचा मोबाईल अन् पोलिसांची रेड; आरोपी जाळ्यात
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – क्रिकेट सामन्यावर मोबाइलद्वारे बेटिंग चालत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीला अटक केली. तसेच तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. ही कारवाई शनिवारी (दि. ६) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास बाळगोपाळ शाळेजवळील वाघेरे पार्क सोसायटीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली. भावेश प्रदीप लखवानी (वय २५, रा. विजय अपार्टमेंट, फ्लॅट नं. […] The post पिंपरीत क्रिकेट सट्ट्याचा ‘खेळ’ उघड! १ लाखाचा मोबाईल अन् पोलिसांची रेड; आरोपी जाळ्यात appeared first on Dainik Prabhat .
धक्कादायक! शाळेत जाण्याच्या वयात कमरेला पिस्तूल; अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या जाळ्यात
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – एका १६ वर्षीय बालकाकडे देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतूस आढळून आले. ही कारवाई शनिवारी (दि. ६) सकाळी ११.१५ वा. गावडे नगर, चिंचवड येथे करण्यात आली.गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकमधील पोलीस अंमलदार लक्ष्मीकांत उध्दवराव पतंगे यांनी शनिवारी (दि. ६) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी १६ वर्षे १० महिने वयाच्या […] The post धक्कादायक! शाळेत जाण्याच्या वयात कमरेला पिस्तूल; अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या जाळ्यात appeared first on Dainik Prabhat .
पतीचे निर्दयी कृत्य! पत्नीवर चाकू हल्ला करून स्वतःलाही केले जखमी; कारण वाचून व्हाल थक्क
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – किरकोळ कारणावरून पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. तसेच आरोपी पतीने स्वतःवरही वार करून घेतले. ही घटना ही घटना शनिवारी (दि. ६) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास शांताबाई कॉलनी, शिवाजीवाडी, मोशी येथे घडली. राम सोपान सुर्यवंशी (वय २२, रा. शिवाजीवाडी, मूळ रा. वाघदरी, ता. उदगीर, जि. लातूर) असे गुन्हा दाखल […] The post पतीचे निर्दयी कृत्य! पत्नीवर चाकू हल्ला करून स्वतःलाही केले जखमी; कारण वाचून व्हाल थक्क appeared first on Dainik Prabhat .
दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ८ डिसेंबर २०२५
पंचांगआज मिती मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र पुष्य. योग ब्रह्म.चंद्र राशी कर्क.भारतीय सौर १७ मार्गशीर्ष शके १९४७. सोमवार दिनांक ८ डिसेंबर २०२५ .मुंबईचा सूर्योदय ०६.५९ , मुंबईचा सूर्यास्त ०६.०० मुंबईचा चंद्रोदय ०९.४१, मुंबईचा चंद्रास्त १०.१८ , राहू काळ ०८.२२ ते ०९.४४ शुभ दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : कौटुंबिक सौख्य लाभेल. वृषभ : समाधान कारक परिस्थिती अनुभवाल.मिथुन : कामाचे स्वरूप बदलेल.कर्क : महत्त्वाच्या कामांना वेळ लागू शकतो.सिंह : नातेवाईक आप्तेष्ट भावंडांच्या भेटी होतील.कन्या : एका वेळेस एकच काम करा.तूळ : आवडती खरेदी कराल. वृश्चिक : खर्चावर नियंत्रण आवश्यक.धनू : इतरांचे सहकार्य मिळेल.मकर : नोकरी व्यवसायात अनुकूल घटना घडतील.कुंभ : आर्थिक आवक चांगली राहील.मीन : जोडीदाराबरोबर वाद-विवाद टाळा.
Pimpri Crime: २ कोटींचा ‘नफा’पाहिला अन् ५९ लाख गमावले! वाकडच्या इंजिनिअरची मोठी फसवणूक
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – एका संगणक अभियंत्याला विविध शेअर आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५९ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना शनि मंदिर रोड, वाकड येथे घडली.ओलीवीया (विविध व्हॉट्सअॅप नंबर), विकास प्रसाद व अनेक बँक खातेदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. याबाबत शनि मंदिर रोड, वाकड येथील ४३ वर्षीय संगणक अभियंत्याने शनिवारी (दि. ६) […] The post Pimpri Crime: २ कोटींचा ‘नफा’ पाहिला अन् ५९ लाख गमावले! वाकडच्या इंजिनिअरची मोठी फसवणूक appeared first on Dainik Prabhat .
धक्कादायक! १०० टक्के नफ्याच्या आमिषाने महिलेला ५५ लाखांचा गंडा; चिखलीतील घटना
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – ऑनलाईन ओटीसी ट्रेडिंगमध्ये शंभर टक्के नफा मिळण्याचे आमिष दाखवत एका महिलेची ५५ लाख २२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना चिखली येथे ऑनलाइन पद्धतीने घडली. याप्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनुप्रिता डागा (मो. ८४६०५९०८२९), तसेच smcace अॅप व smcace.top वेबसाईटचे धारक यांच्यासह सारस्वत बँकेचे खाते ६१००००००००५३६६३ […] The post धक्कादायक! १०० टक्के नफ्याच्या आमिषाने महिलेला ५५ लाखांचा गंडा; चिखलीतील घटना appeared first on Dainik Prabhat .
Pune News: सेनापती बापट रोडवर उभे राहणार सुसज्ज ‘प्रेस क्लब’; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
प्रभात वृत्तसेवा नागपूर – पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या प्रेस क्लबसाठी सेनापती बापट रस्त्यावरील सुमारे साडेआठ हजार चौरस फूट जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आला.पुणे येथील पत्रकारांची याबाबतीची मागणी आज पूर्ण झाली. या जागेवर सुसज्ज अशी अतिशय प्रशस्त इमारत बांधली […] The post Pune News: सेनापती बापट रोडवर उभे राहणार सुसज्ज ‘प्रेस क्लब’; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
Pune Press Club : पुणे प्रेस क्लबसाठी सेनापती बापट मार्गावर प्रशस्त जागा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय!
* महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार* आठ हजार चौ.फुटावर सुसज्ज इमारत उभारणारनागपूर : पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या प्रेस क्लबसाठी सेनापती बापट रस्त्यावरील सुमारे साडेआठ हजार चौरस फूट जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आला. पुणे येथील पत्रकारांची याबाबतीची मागणी आज पूर्ण झाली. या जागेवर सुसज्ज अशी अतिशय प्रशस्त इमारत बांधली जाणार आहे.https://prahaar.in/2025/12/07/milind-sathe-is-the-new-advocate-general-of-the-state-decision-taken-in-the-cabinet-meeting/सुमारे ८०१५.०७ चौरस फूट (७४४.६२ चौ.मी.) असलेली ही जमीन पुणे शहरातील (मौजे भांबुर्डा, टी.पी.१ अंतिम भूखंड क्र.८८१/ए ) आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम ४०, तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट लावणे) नियम, १९७१ मधील नियम ५० व ५१ मधील तरतूदीनुसार जमिनीची प्रचलित शिघ्रसिद्धगणकानुसार येणारी किंमत वसूल करून वाणिज्यिक या प्रयोजनाकरिता भोगवटदार वर्ग-२ या धारणाधिकाराने कब्जाहक्काने अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रदान करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णयानंतर सांगितले की, पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या माध्यमातून पत्रकारांचे कौशल्य विकसनासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण, उपक्रम, पत्रकार व त्यांच्या कुटूंबियांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन, अभ्यास दौरा, वैद्यकीय तपासणी, पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप, महिला सभासदांसाठी क्षमता विकसन, व्याख्याने, वार्तालाप आदी कल्याणकारी कार्यक्रम वर्षभर राबविले जातात. मागील काही वर्षामध्ये संस्थेच्या कामाचा व्याप वाढला आहे. माध्यमांच्या विस्तारामुळे सभासद संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी व क्षमता विकसन उपक्रम, हेल्थ क्लब राबविण्यासाठी सध्याची संस्थेची जागा अपुरी पडत आहे. प्रतिष्ठानतर्फे आयोजित विविरस्त्यावरील व्याख्यानांसाठी केंद्र व राज्य स्तरावरील मंत्री, न्यायाधीश, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, जेष्ठ संपादक-पत्रकार आदी मान्यवर संस्थेत येतात. त्यामुळे संस्थेला नवीन जागेची नितांत आवश्यकता असल्याने ही जागा त्यांना देण्यात आली आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सप्तश्रृंगी गडावरून एक वाहन दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर लगेच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यात सप्तश्रृंगी गडावरून एक वाहन कोसळून झालेल्या अपघातात ६ भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे त्यांनी म्हटले.नाशिक जिल्ह्यात सप्तश्रृंगी गडावरून एक वाहन कोसळून झालेल्या अपघातात 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असून संपूर्ण यंत्रणा तेथे…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2025https://prahaar.in/2025/12/07/state-cabinet-decides-to-provide-spacious-space-on-senapati-bapat-marg-for-pune-press-club/या अपघातानंतर तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली की, मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असून संपूर्ण शासकीय यंत्रणा घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीने आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. या भाविकांच्या वारसांना ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारच्या वतीने देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. सप्तश्रृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत झालेला हा अपघात गंभीर असून, या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
मोठी बातमी ..! मुंढवा जमीन प्रकरणात मुख्य आरोपींमधील आणखी एकाला अटक
पुणे : पुण्यातील मुंढवा येथील शासकीय जमिनीच्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी आणखी एका मुख्य आरोपीला अटक केली आहे. बावधन पोलिसांनी सह-दुय्यम निबंधक अधिकारी रवींद्र तारू यांना अटक केली असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीचा ताबा लवकरच पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे सोपवला जाणार आहे. हा घोटाळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी […] The post मोठी बातमी ..! मुंढवा जमीन प्रकरणात मुख्य आरोपींमधील आणखी एकाला अटक appeared first on Dainik Prabhat .
Pakistan : एस. जयशंकर यांच्या ‘त्या’टिप्पणीवर पाकिस्तानचा थयथयाट
इस्लामाबाद – भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानच्या लष्कराबाबत केलेल्या टिप्पणीवरून पाकिस्तानने थयथयाट केला आहे. पाकिस्तानचे सशस्त्र दलासह इतर संस्था देशाच्या सुरक्षेचे स्तंभ असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाक लष्कर आणि लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. भारताच्या समस्यांचे मूळ पाक लष्करातूनच उगम पावले आहे, […] The post Pakistan : एस. जयशंकर यांच्या ‘त्या’ टिप्पणीवर पाकिस्तानचा थयथयाट appeared first on Dainik Prabhat .
दोहा : आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत (आयएसएसएफ) भारताने दोन पदकांची कमाई केली. युवा नेमबाज सिमरनप्रीत कौर ब्रार हिने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले, तर पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३-पोजिशन स्पर्धेत ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने रौप्यपदकाची कमाई केली.सिमरनप्रीतने अंतिम फेरीत कारकीर्दीतील सर्वात मोठे यश मिळवत चीनची अव्वल नेमबाज आणि १० मीटर एअर पिस्तूलची सध्याची […] The post International Shooting World Cup : आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सिमरनप्रीत कौरला सुवर्ण तर ऐश्वर्य तोमरला रौप्य पदक appeared first on Dainik Prabhat .
सप्तशृंगी गडाच्या मार्गावर अपघात, दरीत कोसळून सहा जणांचा मृत्यू
नाशिक : सप्तशृंगी गडावरील गणपती घाटात इनोव्हा कार खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. सुमारे १००० ते १२०० फूट खोल दरीत वाहन पडल्याने दोन महिलांसह सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. कारमध्ये एकूण सात जण होते, त्यापैकी एक गंभीर जखमी आहेत.नाशिक जिल्ह्यात सप्तश्रृंगी गडावरून एक वाहन कोसळून झालेल्या अपघातात 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असून संपूर्ण यंत्रणा तेथे…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2025मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १५ बीएन ०५५ ही इनोव्हा कार दुपारच्या सुमारास सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात असताना नियंत्रण सुटून दरीत कोसळली. मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. स्थानिकांच्या मदतीने आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सहाय्याने दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. घाटातील संरक्षक भिंतींची कामे अपूर्ण असल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, भाविकांच्या वारसांना पाच लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारच्या वतीने देण्यात येईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.

31 C