बजरंग दलाबाबत विजय वडेट्टीवारांची मुक्ताफळे; भाजप-शिवसेनेचे आमदार आक्रमक
नागपूर : राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे शेतकर्यांकडील भाकड जनावरांची संख्या वाढली आहे. शेतकरी अशी जनावरे विकू शकत नाही. राज्यात गोरक्षकाच्या नावाखाली बजरंग दलासारख्या संघटनेच्या टोळ्या सिद्ध झाल्या आहेत. ते शेतकर्यांकडून पैसे वसूल करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी विधानसभेत प्रश्नोत्तरात केला. त्याला भाजप-शिवसेनेच्या आमदारांनी हरकत घेऊन आक्रमकपणे विरोध केला.बजरंग दलाचा यामध्ये कोणताही सहभाग नसल्याने या संघटनेचे नाव घेतल्याविषयी विजय वडेट्टीवार यांनी क्षमा मागावी, अशी जोरदार मागणी भाजप-शिवसेनेच्या आमदारांनी केली. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बजरंग दल संघटनेचे नाव कामकाजातून काढून टाकले आहे, असे सांगितले. भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा तारांकित प्रश्न मांडला होता.विजय वडेट्टीवार म्हणाले की, जेव्हा शेतकरी जनावरांची वाहतूक करतात, तेव्हा त्यांना थांबवले जाते, धमकी दिली जाते. ऐकले नाही, तर मारहाण केली जाते. एका १७ वर्षाच्या शेतकर्याला इतकी मारहाण केली की, त्याने आत्महत्या केली. भाकड जनावर विकून शेतकर्यांना काही पैसे तरी मिळतात; पण आता या बनावट टोळ्या शेतकर्यांच्या गाड्या थांबवून त्यांच्याकडून पैसे वसुली करतात. याविरोधात सरकारने कारवाई केली पाहिजे. ही वसुली थांबवली पाहिजे.मिळते ५० रुपये पशु अनुदान - पंकजा मुंडेयाला उत्तर देतांना पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोवंशाची ने-आण करणारी वाहने अडवल्यास तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जाते. कुणाला पाठीशी घालण्यात येणार नाही. अहिल्यानगर येथे बनावट गोरक्षक बनवून लुटमार करणार्या व्यक्तीविद्ध २ पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत; मात्र जप्त केलेले पशुधन परत आणण्यास गेलेल्या एका लोकप्रतिनिधीवर हल्ला करण्यात आल्याचे निदर्शनास आलेले नाही. शेतकर्यांकडील भाकड गायी संगोपनासाठी गोशाळेत ठेवण्यात येतात. या देशी गायींना प्रतिदिन ५० रुपये पशु अनुदान दिले जाते. भाकड जनावर प्रकरणी ज्या टोळ्या गैरलाभ घेतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याविषयी शेतकरी संघटनेकडून तक्रारीही आल्या आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उत्तराला आमदार संजय कुटे याची हरकतउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात १ कोटी शेतकरी आहेत. एका शेतकर्याकडे १० भाकड जनावरे असतील, तर प्रत्येकी ५० रुपये प्रमाणे प्रतिदिन ५०० रुपये गायींसाठी द्यावे लागतील. असे पैसे देण्यासाठी राज्याची तिजोरी ओसंडून वहात नाही. गोशाळा असतील, तर त्याचे रेकॉर्ड ठेवता येते. चुकीचे केले, तर त्याचे लेखापरीक्षण करता येईल. बनावट गोरक्षक लुटमार करत असतील, तर त्यावर बंधने आणली पाहिजे. अजित पवार यांच्या विधानाला हरकत घेतांना भाजपचे आमदार संजय कुटे म्हणाले की, शेतकरी गायींची पूजा करतो, त्यामुळे वाहनांतून गायींची वाहतूक करतांना शेतकरी गायींना त्रास होईल, असे अजिबात वागत नाही. शेतकरी इतरांप्रमाणे वाहनात गायींची कोंबून त्यांची वाहतूक करत नाहीत. गायींची कत्तल करणारे हे शेतकर्यांच्या नावे पावती फाडतात, हे खपवून घेतले जाणार नाही. प्रतिदिन १० गायी, भाकड जनावरांसाठी ५० रुपये देण्यास काहीच हरकत नाही. यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांचे प्रावधान करू शकतो, तसेच देशी गायींचा संवेदनशीलपणे आणि शेतकर्यांच्या भावनेचा विचार करून राज्यात गोशाळांची संख्या वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली.
Sharad Pawar : “सामान्य कुटुंबांतील व्यक्तींना पाठिंबा देण्याची गरज”–शरद पवार
मुंबई – प्रतिभा आणि नेतृत्व हे केवळ विशेषाधिकार असलेल्या पार्श्वभूमीच्या व्यक्तींपुरते मर्यादित नसते. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सामान्य कुटुंबांतील सक्षम व्यक्तींना ओळखून त्यांना पाठिंबा देण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अधोरेखित केले. यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित शरद पवार इन्स्पायर फेलोशिप पुरस्कार वितरण समारंभात पवार बोलत होते. पवार म्हणाले, महाराष्ट्राचे […] The post Sharad Pawar : “सामान्य कुटुंबांतील व्यक्तींना पाठिंबा देण्याची गरज” – शरद पवार appeared first on Dainik Prabhat .
हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत
नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी विधान भवन मुंबई येथे होणार आहे.https://prahaar.in/2025/12/14/cm-fadnavis-assures-that-no-scheme-will-be-closed-for-five-years/हिवाळी अधिवेशनात ७२ तास ३५ मिनिटे कामकाज झाले. अन्य कारणांमुळे १० मिनिटे वाया गेली. प्रतिदिन सरासरी कामकाज १० तास २२ मिनिटे होते. या अधिवेशनात एकूण ७ हजार २८६ तारांकित प्रश्न प्राप्त झाले, त्यापैकी २१५ प्रश्न स्वीकारण्यात आले, उत्तरीत झालेले प्रश्न २७ होते. विधानसभेत एकूण १८ शासकीय विधेयक मांडण्यात आली, त्यातील १६ विधेयक संमत करण्यात आली.https://prahaar.in/2025/12/14/who-is-the-rehman-dakait-who-robbed-mumbais-treasury/विधान परिषदेत ४ विधेयक संमत करण्यात आली. अधिवेशनात १ हजार ८६७ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या, त्यातील २९९ लक्षवेधी स्वीकारण्यात आल्या, तर ७० सूचनांवर चर्चा झाली. अधिवेशनात आमदारांची अधिकाअधिक ९०.९८ टक्के उपस्थिती होती, अल्प उपस्थिती ४३.८५ टक्के होती. एकूण सरासरी उपस्थिती ७५.९४ टक्के होती, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.https://prahaar.in/2025/12/14/mumbaikars-deserve-a-home-and-vidarbha-enjoys-the-glory-of-development/
आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, तिजोरी कधीही धुतली नाही; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला
मुंबई : आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, तिजोरी कधीही धुतली नाही, अशी टिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, कोविड असो किंवा मिठी नदी, प्रत्येक ठिकाणी यांनी दरोडा घातला आहे. ते मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकैत आहेत, तर आम्ही त्यांना […] The post आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, तिजोरी कधीही धुतली नाही; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला appeared first on Dainik Prabhat .
Tilak Varma Girlfriend Indu Barma : टीम इंडियाचा युवा फलंदाज तिलक वर्मा आणि नेपाळची महिला क्रिकेटपटू इंदु बर्मा यांच्या अफेअरच्या चर्चांनी सध्या सोशल मीडियावर चांगलाच जोर धरला आहे. दोघांच्या प्रेमसंबंधाबद्दल अनेक पोस्ट्स व्हायरल होत आहेत, ज्यात नेपाळी क्रिकेटरसोबत तिलक वर्माचे फोटो देखील दिसत आहेत. मात्र, या व्हायरल पोस्ट्स आणि फोटोंची सत्यता काय आहे? जाणून घेऊया. […] The post Tilak Varma Girlfriend : ‘ही’ सुंदर महिला क्रिकेटपटू आहे तिलक वर्माची गर्लफ्रेंड? व्हायरल फोटोंमुळे चर्चेला उधाण appeared first on Dainik Prabhat .
देशातील अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार; संसदेत उद्या सादर होईल विधेयक
नवी दिल्ली – भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकार सोमवारी संसदेत अणुऊर्जा सुधारणा विधेयक मांडत आहे. या ऐतिहासिक पावलामुळे देशातील अणुऊर्जा क्षेत्र पहिल्यांदाच खासगी कंपन्यांसाठी खुले होईल. आतापर्यंत हे क्षेत्र पूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली होते. मंत्रिमंडळाने या विधेयकाला आधीच मंजुरी दिली आहे आणि सोमवारी संसदेत त्यावर चर्चा केली […] The post देशातील अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार; संसदेत उद्या सादर होईल विधेयक appeared first on Dainik Prabhat .
मुंबईकरांना हक्काचं घर आणि विदर्भाला विकासाचं वैभव!
अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाहीमुंबई फास्ट, महाराष्ट्र सुपरफास्ट! बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुंबईकरांना घरांची अनोखी भेटनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सर्वांसाठी घरे' या संकल्पनेला मूर्त रूप देत असतानाच, आम्ही मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. येत्या २३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईच्या विकासाची ही 'योजनापुष्पे' आम्ही त्यांच्या चरणी अर्पण करत आहोत, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत व्यक्त केली. 'मुंबई फास्ट झाली तरच महाराष्ट्र सुपरफास्ट होईल', असे सांगत त्यांनी मुंबईसह विदर्भाच्या विकासाचा रोडमॅप सभागृहात मांडला. विधान परिषदेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी महायुती सरकारच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला.मुंबईकरांसाठी दिलासादायक निर्णय:◻️LIVE विधान भवन, नागपूर ️ 14-12-2025 राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन - विधानपरिषदेतून लाईव्हhttps://t.co/zMuA3ckq2T— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 14, 2025मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी सरकारने मोठी पावले उचलली आहेत. २० हजार इमारतींना दिलासा: मुंबईतील ओसी (OC) नसलेल्या सुमारे २० हजार इमारतींचा प्रश्न मार्गी लावला असून, याचा फायदा १० लाखांहून अधिक रहिवाशांना होणार आहे. सिडकोच्या घरांमध्ये सूट: नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सिडकोच्या घरांच्या किमतीत थेट १० टक्के कपात करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्विकास वेगवान: एसआरए (SRA) योजनांच्या मंजुरीचा कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणला असून, ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर 'क्लस्टर पुनर्विकास' राबवला जाईल. रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनर्वसनाचे कामही युद्धपातळीवर सुरू झाले आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचे जाळे: मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून बीकेसीसह संपूर्ण एमएमआर रीजनमध्ये 'पॉड टॅक्सी' सुरू करण्यात येणार आहे. वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडला हायकोर्टाची मंजुरी मिळाली असून, महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर ३०० एकरचे भव्य 'सेंट्रल पार्क' उभारले जाणार आहे. तसेच संजय गांधी नॅशनल पार्कमधील रहिवाशांचे ५ किमीच्या परिसरात पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.https://www.youtube.com/watch?v=pnZhzW_7U9Aविदर्भाला काय दिलं ? विदर्भ: देशाचे ग्रोथ इंजिन : विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. गडचिरोली 'स्टील हब': नक्षलग्रस्त गडचिरोलीची ओळख पुसून तिथे जिंदाल ग्रुपसारखे मोठे उद्योग येत आहेत. गडचिरोलीला देशाचे 'स्टील हब' बनवण्याचा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्धारानुसार मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याचा सरकारचा संकल्प आहे. अमरावतीत 'फ्लाइंग अकादमी': चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी 'फ्लाइंग अकादमी' अमरावतीत साकारणार आहे. एअर इंडियासोबतच्या करारामुळे येथे २५ हजार वैमानिकांना प्रशिक्षण मिळेल. तसेच पीएम मित्रा पार्कमधून २ लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर : शेतकरी प्रश्नांवरून विरोधकांनी राजकारण करू नये, असे आवाहन करत शिंदे यांनी आकडेवारी मांडली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ९१ लाख १० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने थेट १५ हजार कोटींची मदत जमा केली आहे. तसेच वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पामुळे विदर्भातील १० लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या चर्चेत सतेज पाटील, अनिल परब, प्रसाद लाड, शशिकांत शिंदे, चित्रा वाघ यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेतला.
The ball hit Aaron George’s helmet : अंडर-१९ एशिया कप २०२५ मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना सध्या दुबई येथे सुरू आहे. या महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताचा सुपरस्टार वैभव सूर्यवंशीला मोठी खेळी साकारण्यात अपयश आले असले तरी, आरोन जॉर्जने मात्र आपल्या बॅटने […] The post IND U19 vs PAK U19 : हेल्मेटवर चेंडू लागला, तरी डगमगला नाही! जॉर्जने झुंजार खेळी साकारत सावरला भारताचा डाव appeared first on Dainik Prabhat .
Justice Surya Kant : सर्वांना समजेल असे न्यायदान असावे.! सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे प्रतिपादन
Justice Surya Kant : न्यायालयाचे निर्णय म्हणजे शैक्षणिक विश्लेषण नसावेत, तर अधिकार आणि दायित्वे निश्चित करणारे अधिकृत विधान असावेत. निकालांमध्ये जास्त कायदेशीर शब्द असतील तर ते जनतेला न्यायापासून दूर करते. म्हणून, आदेश स्पष्ट भाषेत आणि समजण्यायोग्य लिहिले पाहिजेत. कधीकधी लोकांना निकाल समजतही नाही. कायदा निष्पक्षपणे लागू केला आणि निकाल नागरी हक्कांचे रक्षण करतात तेव्हाच न्यायव्यवस्थेवर […] The post Justice Surya Kant : सर्वांना समजेल असे न्यायदान असावे.! सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे प्रतिपादन appeared first on Dainik Prabhat .
धाड धाड गोळ्या झाडल्या, पंजाबमध्ये कबड्डीपटूची हत्या
फिरोजपूर – पंजाबमध्ये एका कबड्डी खेळाडूवर हल्ला झाला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीसाठी आज मतदान सुरू असताना, फिरोजपूर विधानसभा मतदारसंघातील जिरा मतदारसंघातील जोगाईवाला गावात एका कबड्डी खेळाडूवर गोळीबार झाला. कबड्डी खेळाडू निर्वेल सिंग याला एका व्यक्तीने गोळी मारली. गोळी निर्वेलच्या मांडीला लागली. त्याला जिरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीने जखमी झालेल्या कबड्डी […] The post धाड धाड गोळ्या झाडल्या, पंजाबमध्ये कबड्डीपटूची हत्या appeared first on Dainik Prabhat .
बिबट्याच्या हल्ल्यांपासून शालेय मुलांचे संरक्षण; पिंपरखेडमध्ये ५७.५० लाख रुपयांच्या निधीस मंजुरी
जांबुत : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून पिंपरखेड (ता. शिरूर ) येथे बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या आणि त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या गंभीर बनलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ५७. ५० लक्ष रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. हा संपूर्ण निधी पिंपरखेड येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांच्या संरक्षणासाठी देण्यात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. या निधीतून गावठाण शाळा, […] The post बिबट्याच्या हल्ल्यांपासून शालेय मुलांचे संरक्षण; पिंपरखेडमध्ये ५७.५० लाख रुपयांच्या निधीस मंजुरी appeared first on Dainik Prabhat .
प्रार्थना बेहेरे वडिलांच्या आठवणीत भावुक; व्हिडिओ शेअर करत म्हणाली “आता बाबा नाही, पण…”
Prarthana Behere | अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने वडिलांच्या आठवणीत एक व्हिडीओ शेअर केला आहे. 14 ऑक्टोबर 2025 रोजी एका रस्ते अपघातात प्रार्थनाच्या वडिलांचे निधन झाले होते, तेव्हा तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या होत्या. आता प्रार्थनाने शेअर केलेल्या या व्हिडीओत ती वडिलांची आठवण सांगत एक खास माहिती देते. यावेळी तिला अश्रु अनावर होतात. “आज […] The post प्रार्थना बेहेरे वडिलांच्या आठवणीत भावुक; व्हिडिओ शेअर करत म्हणाली “आता बाबा नाही, पण…” appeared first on Dainik Prabhat .
Maharashtra Winter session 2025 | राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस आहे. यावेळी विदर्भाच्या मुद्द्यावरुन गदारोळ करण्याचा प्रयत्न केला त्यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी संताप व्यक्त केला. याशिवाय फडणवीस यांनी महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावल्याचे सर्व आरोप फेटाळत लावत राज्याची अर्थव्यवस्था सुदृढ असल्याचा दावा केला. “महाराष्ट्र हे शक्तिशाली राज्य आहे. 2029 ते 2030 दरम्यान महाराष्ट्र […] The post “तिजोरीत खूप पैसे नसले तरी…”; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या टीकेवरही दिले सडेतोड उत्तर appeared first on Dainik Prabhat .
“देश प्रगती करतो तेव्हा धूळ उडणारच” ; वाढत्या प्रदूषणावर बाबा रामदेव काय बोलून गेले?
Baba Ramdev। योगगुरू बाबा रामदेव हे त्यांच्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहतात. यावेळी त्यांनी दिल्लीच्या प्रदूषणाबद्दल विधान केले ज्यामुळे सोशल मीडियावर नवीन वाद निर्माण झाला. बाबा रामदेव यांनी एअर प्युरिफायर्सना “श्रीमंतांचे लाड” म्हटले. रामदेव यांनी विकास आणि प्रदूषण यांचा संबंध जोडला Baba Ramdev। एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी दिल्लीच्या प्रदूषणाबद्दल विस्तृतपणे सांगितले. यावेळी त्यांनी […] The post “देश प्रगती करतो तेव्हा धूळ उडणारच” ; वाढत्या प्रदूषणावर बाबा रामदेव काय बोलून गेले? appeared first on Dainik Prabhat .
साधे कपडे, डोक्यावर टोपी आणि पायात स्लीपर…; कॉमेडियन सुनील पालचा व्हिडिओ पाहून चाहते हैराण
Sunil Pal Video | प्रसिद्ध भारतीय कॉमेडियन सुनील पालचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सुनील पालने ‘किस किसको प्यार करूं 2’ या कॅमेडी चित्रपटाच्या प्रिमिअरला हजेरी लावली होती. त्यावेळीचा सुनील पालचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने चर्चेत आला आहे. मात्र त्याची अवस्था पाहून अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या व्हिडीओमध्ये […] The post साधे कपडे, डोक्यावर टोपी आणि पायात स्लीपर…; कॉमेडियन सुनील पालचा व्हिडिओ पाहून चाहते हैराण appeared first on Dainik Prabhat .
५०% टॅरिफ…५२००० कोटी रुपयांची निर्यात धोक्यात ; आता भारताकडून मेक्सिकोशी चर्चा सुरू
India Export To Mexico। मेक्सिकोने भारत आणि चीनसह अनेक आशियाई देशांवर ५०% कर वाढ जाहीर केली आहे. यामुळे भारत सरकार आणि भारतीय निर्यातदारांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, भारताने मेक्सिकोच्या या उच्च कर लादण्याच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे आणि चर्चा सुरू केली आहे. विविध वस्तूंवरील हे कर जानेवारीपासून लागू केले जातील. […] The post ५०% टॅरिफ…५२००० कोटी रुपयांची निर्यात धोक्यात ; आता भारताकडून मेक्सिकोशी चर्चा सुरू appeared first on Dainik Prabhat .
अभिनेत्री गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री; लवकरच अडकणार विवाहबंधनात
Gayatri Datar | मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी सध्या लग्नबंधनात अडकत आहेत. अलीकडेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, अभिनेते आदेश बांदेकर यांचे सुपुत्र सोहम बांदेकर आणि पुजा बिरारी, अभिनेत्री तेजस्वी लोणारी यांनी लग्नगाठ बांधली. यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा यात समावेश होणार आहे. ‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्री गायत्री दातार लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. […] The post अभिनेत्री गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री; लवकरच अडकणार विवाहबंधनात appeared first on Dainik Prabhat .
राज्यात १ जानेवारीपासून प्रशिक्षणाची दुसरी बॅच; १ लाख १० हजार तरुणांचे प्रशिक्षण पूर्णनागपूर : राज्यात सुरू असलेल्या 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने'तून प्रशिक्षण घेतलेल्या लाखो तरुणांच्या भविष्याची चिंता मिटवण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना नोकरी आणि व्यवसायाच्या संधी मिळाव्यात यासाठी कौशल्य विकास विभागाने 'सहासूत्री कार्यक्रम' तयार केला असून, यात आयटीआयमध्ये मोफत प्रवेश आणि स्वरोजगार योजनेत आरक्षणासारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत ही माहिती दिली.विधानसभेत आमदार डॉ. राहुल पाटील, अमित साटम आणि विधानपरिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री लोढा यांनी ही घोषणा केली.काय आहे सरकारचा 'सहासूत्री' कार्यक्रम ?मंत्री लोढा यांनी प्रशिक्षणार्थींच्या रोजगारासाठी खालील ६ प्रमुख टप्पे जाहीर केले आहेत१.आयटीआयमध्ये १०% आरक्षण व मोफत प्रवेश: शासकीय आयटीआयमधील अल्पकालीन अभ्यासक्रमांमध्ये (Short Term Courses) या योजनेतील विद्यार्थ्यांना १० टक्के प्राधान्य आरक्षण दिले जाईल. विशेष म्हणजे, एका अभ्यासक्रमासाठी त्यांना मोफत प्रवेश दिला जाईल.२.कर्ज योजनेत आरक्षण: मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेच्या नोंदणी प्रक्रियेत या लाभार्थ्यांसाठी १० टक्के प्राधान्य आरक्षण ठेवण्यात येईल, ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करणे सोपे होईल.३.उद्योगांना थेट यादी: प्रशिक्षण पूर्ण झालेल्या युवकांची अद्ययावत यादी उद्योग विभागाला नियमितपणे दिली जाईल, जेणेकरून महामंडळांच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध होईल.४.मॅच मेकिंग पोर्टल (Match Making Portal): 'महास्वयं' पोर्टलमध्ये एमएसएमई (MSME) विभागाच्या सहकार्याने एक विशेष 'मॅच मेकिंग ॲप्लिकेशन' सुरू केले जाईल. याद्वारे उद्योग आणि लाभार्थी यांच्यात थेट संपर्क होऊन रोजगार संधी मिळतील.५.रोजगार मेळाव्यात प्राधान्य: विभागातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या रोजगार मेळाव्यांमध्ये या विद्यार्थ्यांसाठी विशेष कक्ष आणि प्राधान्य दिले जाईल.६.खाजगी कंपन्यांमध्ये संधी: खाजगी कंपन्यांना लागणाऱ्या तात्पुरत्या मनुष्यबळासाठी आयटीआयमार्फत विशेष प्रशिक्षण देऊन या योजनेतील तरुणांना तिथेही प्राधान्याने सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील.योजनेची सद्यस्थिती आणि विस्तारराज्य सरकारने ९ जुलै २०२४ पासून ही योजना सुरू केली आहे. यामध्ये १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ६ हजार, पदविका धारकांना ८ हजार, तर पदवीधरांना १० हजार रुपये दरमहा विद्यावेतन दिले जाते. आतापर्यंत या योजनेतून ८१०.२७ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला असून, हिवाळी अधिवेशनात आणखी ४०८ कोटींच्या पुरवणी मागणीस मंजुरी मिळाली आहे. सध्या राज्यात १ लाख १६ हजार ३८४ प्रशिक्षणार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत, तर १ लाख १० हजार ११२ युवकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. या योजनेची दुसरी बॅच येत्या १ जानेवारी २०२७ पासून सुरू होणार असल्याचेही मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.
तिरुवनंतपुरममध्ये एनडीएने इतिहास रचला, केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यूडीएफचा विजय
तिरुवनंतपुरम : भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने शनिवारी तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये इतिहास रचला, जिथे त्यांनी एलडीएफच्या ४० वर्षांच्या राजवटीचा अंत करून महापालिकेवर नियंत्रण मिळवले.तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील १०१ वॉर्डापैकी एनडीएने ५०, एलडीएफने २९, यूडीएफने १९ आणि दोन अपक्ष उमेदवारांनी जिंकले. भाजपने केरळमध्ये २६ ग्रामपंचायती तसेच दोन महापालिकांव विजय मिळवला. पण चर्चा आहे ती तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत भाजपने मिळवलेल्या विजयाची. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भाजपच्या केरळमधील कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे जाहीर अभिनंदन केले. मागील अेक पिढ्यांपासून केरळमध्ये बलिदान देणाऱ्या शेकडो भाजप कार्यकर्त्यांना हा विजय म्हणजे आदरांजली आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. पक्षासाठी कार्यकर्ते ही खरी ताकद असल्याचे पंतप्रधान मोदींनी आवर्जून नमूद केले.केरळमधील तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील विजय हा भाजपच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे फळ आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. केरळमधील राजकीय वातावरण बदलत असल्याचे हे ताजे उदाहरण आहे, असेही ते म्हणाले. तो काळ दूर नाही जेव्हा मतदार काँग्रेस, त्यांचे समर्थक, डावे यांना सोडून भाजपला भरघोस मतदान करू लागतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘मतचोरीच्या’विरोधात काँग्रेस शक्तीप्रदर्शन करणार ; दिल्लीच्या रामलीला मैदानावर भव्य रॅली
congress on SIR। काँग्रेस कथित निवडणूक हेराफेरी आणि मतचोरीच्या विरोधात मोहीम तीव्र करत आहे. आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर पक्ष एक मोठी रॅली काढणार आहे. या रॅलीद्वारे काँग्रेस सरकार आणि निवडणूक आयोगावर संगनमताचा आरोप करेल. राहुल गांधी आणि खर्गे या रॅलीला संबोधित करतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी या रॅलीला संबोधित करतील […] The post ‘मतचोरीच्या’ विरोधात काँग्रेस शक्तीप्रदर्शन करणार ; दिल्लीच्या रामलीला मैदानावर भव्य रॅली appeared first on Dainik Prabhat .
कथित निवडणूक धमकीप्रकरणी अजित पवारांना दिलासा; बारामती सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
बारामती : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांवर कथित दबाव टाकल्याच्या आरोपावरून दाखल खाजगी तक्रारीत प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी (JMFC) यांनी दिलेला प्रक्रिया जारी करण्याचा आदेश बारामती येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने रद्द केला आहे. व्हिडिओ-ऑडिओ क्लिप अस्पष्ट असून, त्याचा कालावधी, ठिकाण व कायदेशीर प्रमाणिकता सिद्ध न झाल्याचे न्यायालयाने नमूद केले. “मतदान न केल्यास गावाचा पाणीपुरवठा बंद केला […] The post कथित निवडणूक धमकीप्रकरणी अजित पवारांना दिलासा; बारामती सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
मी राहुल सरकार, बंगालच्या शांतिनिकेतनचा रहिवासी. मी न्यूड पेंटिंग्ज म्हणजे नग्न चित्रे काढतो. प्रत्येक चित्रात मी स्वतःला एका नग्न स्त्रीच्या रूपात साकारतो, तिच्या शरीरावर दागिने घालतो - ते दागिने, जे मला कधीच घालण्याची परवानगी मिळाली नाही. पण प्रत्येक चित्रात माझा चेहरा फिरवलेला असतो. माझ्या नजरा जगापासून लपलेल्या असतात. कारण सत्य हे आहे की मी कॅनव्हासवर नग्न होऊ शकतो, पण जगासमोर नाही. तिथे माझी हिंमत तुटते. ही चित्रे माझी इच्छा, माझी भीती, माझे सत्य आहेत. रंगांमध्ये मी तेच बनतो, जे मला आयुष्यात बनण्यापासून रोखले गेले - म्हणजे एक स्त्री. प्रत्येक पेंटिंगमध्ये मी तोंड फिरवतो, हीच माझी कला आहे आणि माझी विवशता आहे. मी असा पुरुष आहे, ज्याच्या इच्छा, संवेदना आणि भावना स्त्रियांच्या जगातून येतात. हेच माझे सत्य आहे - आणि याच सत्यासोबत मी जगत आहे, जरी जगाने माझ्याकडे पाठ फिरवली तरी. या मार्गावर चालताना माझ्यासमोर कुटुंबाचे प्रश्न होते, समाजाचे टोमणे होते आणि टीकेच्या भिंती होत्या. प्रत्येक वळणावर मला थांबवले गेले, घाबरवले गेले, लाजवले गेले. तरीही मी हाच मार्ग निवडला- आणि आता मागे वळून पाहण्याचा कोणताही विचार नाही. खरं तर, मी त्या बंगाली मातीतून आलो आहे, जिथे आजही हवेत रवींद्रनाथ टागोर यांच्या कविता वाहतात. जिथे बाहेरील जग शांत आणि सुंदर होते- पण माझ्या आत सतत एक युद्ध सुरू होते. जेव्हा भान आले, तेव्हा स्वतःला इतरांपेक्षा वेगळे पाहिले. मला स्त्रियांचे दागिने आणि साड्या स्वतःकडे आकर्षित करत होत्या. कदाचित कारण माझ्या घरात मुली जास्त होत्या, किंवा कदाचित कारण मला मुलांचे जग नेहमीच फिके आणि उदास वाटत होते. मुलांच्या कपड्यांमध्ये मला काहीही सुंदर दिसत नव्हते - तर मुलींचे कपडे, त्यांचे रंग आणि त्यांची रचना मला खूप आकर्षित करत होती. जेव्हा लहान होतो. चोरून आईचे दागिने काढायचो आणि आरशासमोर उभा राहायचो. ते दागिने माझ्या लहान हातांसाठी खूप मोठे होते, नीट घालताही येत नव्हते - पण त्यांना स्पर्श करताच आत एक वेगळाच आनंद जागृत होत असे. या दागिन्यांमध्ये कमरपट्टा, बांगड्या, कंगन, पैंजण, मांगटिका - अशी कोणतीही एक यादी नव्हती. जे काही स्त्रियांशी संबंधित होते, तेच मला आकर्षित करत होते. साडी घालणेही तितकेच स्वाभाविक वाटत होते. आईच्या नजरेतून वाचवून त्यांची साडी नेसायचो. कधी पकडलो गेलो तर खोटे बोलून जायचो - 'मी तुमची नक्कल करत आहे.' सत्य हे होते की, जर माझे चालले असते, तर मी याच दागिन्यांमध्ये आणि साडीत मोकळेपणाने फिरलो असतो. पण आईने पाहिले असते तर ओरडा पडला असता - कडक, घाबरवणारा. ती म्हणायची - 'मुलं असं करत नाहीत. तू का समजत नाहीस की तू मुलगा आहेस?' तरीही, संधी मिळताच आईपासून नजर चोरून मी तेच करायचो. हळूहळू घरात सगळ्यांना कळले. ते माझ्यावर शिव्यांची लाखोली वाहू लागले. पण प्रत्येक वेळी पकडले गेल्यावर ओरडा इतका तीव्र असायचा की भीती शरीरात भिनून जायची. मी खूप लहान होतो - त्यामुळे घाबरून जायचो. त्या वयातही एक प्रश्न माझा पिच्छा सोडत नव्हता - जर मी मुलगा आहे, तर मुलींचे दागिने घालणे चुकीचे का आहे? हा प्रश्न आजही माझ्या मनात घुमतो. मी दुहेरी आयुष्य जगत होतो, ज्यात शरीर पुरुषाचे होते, पण मन त्याच्याशी जुळत नव्हते. मी विचार करायचो की जर निसर्गाने मला असे बनवले आहे, तर कुटुंब आणि समाज माझ्याशी का भांडत होते - याचे उत्तर कधीच मिळाले नाही. आईचा एकच युक्तिवाद होता - 'मुलगा आहेस, मुलांसारखा रहा.' त्या आदेशात ना समज होती, ना दुसरा कोणताही मार्ग. शेवटी, मी भीतीपुढे हार मानली. दागिने काढून टाकले, साडी घालणे सोडून दिले. स्वतःला लपवायला शिकलो. जेव्हा मी शाळेत जायला सुरुवात केली, तेव्हा हे स्पष्ट होऊ लागले की मी इतर मुलांपेक्षा वेगळा आहे. फरक इतका होता की काहीही लपवून लपत नव्हते. हळूहळू मित्र दूर होऊ लागले. काहींनी स्पष्टपणे सांगितले- 'तू वेगळ्या प्रकारचा आहेस, आपली मैत्री तुझ्यासोबत टिकणार नाही.' त्यांचे माझ्यापासून दूर होणे मला आतून तोडू लागले. यानंतर मी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला. माझ्यासोबतच्या मुलांना मी बारकाईने पाहू लागलो- ते कसे चालतात, कसे बसतात, कसे बोलतात, हात कसे हलवतात. त्यांच्याशी तुलना केल्यावर माझा प्रत्येक हावभाव मला गुन्ह्यासारखा वाटू लागला. माझे वर्तन ‘जास्त स्त्रियांसारखे’ मानले जात होते. काही मित्रांनी मला व्यवस्थित शिकवले की मुले कशी असतात- त्यांनी माझी चाल बदलली, आवाजातील चढ-उतार सुधारले, मुलांसारखे हावभाव शिकवले. ही शिकवण नव्हती, हे स्वतःपासून दूर राहण्याचं प्रशिक्षण होतं. रोज वाटायचं की कदाचित मी माझ्या आतल्या त्या भागातून बाहेर पडू शकेन, ज्याला समाजाने चुकीचं ठरवलं आहे, पण जितकं त्याला दाबण्याचा प्रयत्न करायचो, तितकाच आतून तुटत जायचो. स्वतःला सांभाळण्यातच गुंतून राहिलो- असं करायचं नाही, तसं करायचं नाही. जेव्हा वाटायचं की माझं एखादं वर्तन जास्त स्त्रियांसारखं झालं आहे, तेव्हा ते थांबवण्याचा प्रयत्न करायचो. खरं तर, माझी देहबोली स्त्रियांसारखी झाली की भीती वाटायची. विचार करायचो, लोक काय म्हणतील. ते बदलणं किंवा नियंत्रित करणं माझ्यासाठी खूप वेदनादायक होतं. एका अर्थाने मी स्वतंत्र नव्हतो- मी आतून जसा होतो, तसं स्वतःला व्यक्त करू शकत नव्हतो. त्यावेळी मी स्वतःला नीट शोधू शकलो नाही. स्वतःला बदलण्याचा हा प्रयत्न मला आतून तोडून टाकणारा होता. रोज असं वाटायचं, जणू मी स्वतःविरुद्धच खटला लढत आहे- माझ्या हावभावांविरुद्ध, माझ्या इच्छांविरुद्ध, माझ्या भावनांविरुद्ध. जो मी नव्हतो, ते बनण्याच्या हट्टाने मला सतत पोखरून टाकलं. या रितेपणाची वेदना दिसत नव्हती, पण ती सतत जाणवत होती. हे शब्दांत सांगणे कठीण आहे, कारण ही एका घटनेची नव्हे, तर रोज स्वतःला नाकारण्याची परिणती होती. अशा प्रकारे मी मोठा होत गेलो, दरवर्षी माझी स्वतःची ओळख थोडी थोडी दाबून टाकत. बाहेरून सामान्य दिसण्याचा प्रयत्न करत होतो, पण आतून घुसमट वाढत गेली. शेवटी मला हेच जाणवत होते की, माझे मित्र आणि कुटुंब माझ्याकडून जशी अपेक्षा करत होते, तसा मी बनू शकत नव्हतो. मी जेवढा प्रयत्न केला, तेवढे हे स्पष्ट होत गेले की ही लढाई माझ्या क्षमतेची नव्हती, तर माझ्या ओळखीची होती. तेव्हा मी एक निर्णय घेतला - आतापासून मी जसा आहे, तसाच जगेन. मग तो टप्पा आला, जेव्हा मी शिक्षणासाठी घराबाहेर पडलो आणि वसतिगृहात पोहोचलो. हे फक्त जागा बदलणे नव्हते; ही पहिलीच वेळ होती जेव्हा लोकांची माझ्यावरील नजर सुटली. माझ्या आयुष्यात स्वातंत्र्य आले - असे वाटले जणू खूप काळानंतर पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने श्वास घेत आहे. वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण करता-करता हे स्पष्ट झाले की आता मागे फिरणे शक्य नाही. तिथेच मी चित्रकला शिकलो आणि पहिल्यांदाच माझ्या आत दडलेल्या प्रश्नांना कॅनव्हासवर उतरवायला सुरुवात केली. जे बनायचे होते, जसे राहायचे होते - त्या ओळखीला रंगांमध्ये उतरवू लागलो. इथूनच न्यूड आर्ट पेंटिंगची सुरुवात झाली. नग्न देहासह मी स्वतःला स्त्रियांच्या दागिन्यांसह बनवू लागलो, जे घालण्याचा हक्क मला लहानपणी कधीच मिळाला नाही. ही केवळ कला नव्हती, तर स्वतःला पुन्हा घडवण्याची प्रक्रिया होती. बालपणीची भीती, दमन आणि अपूर्ण इच्छा रंगांमध्ये बदलत गेल्या. मी माझे अरमान आणि वेदना - दोन्ही कॅनव्हासवर नग्नपणे उतरवायला सुरुवात केली. न्यूड आर्ट ही काही नवीन सनक नाही. ही कला आपल्याच देशात हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. भारतीय मंदिरांच्या भिंतींवर आणि शिल्पांमध्ये पुरुष-पुरुषांना लैंगिक संबंध ठेवताना दाखवले आहे - ज्याला आज आपण ‘गे’ म्हणतो, ते कधीतरी कला आणि संस्कृतीचा भाग होते, पण वेळेनुसार हा वारसा बनला नाही, तर भीती बनला. आज तेच शरीर, तीच इच्छा, तीच अभिव्यक्ती अचानक 'अश्लीलता' आणि 'टॅबू' मध्ये बदलली गेली आहे. खरं तर, कलेपूर्वी समाजाने आपली अस्वस्थता जपली. शरीराकडे पाहण्याची दृष्टी बदलली नाही - फक्त ते लपवण्याची जिद्द वाढली. माझी चित्रे याच संघर्षातून जन्माला येतात - अशा समाजात जो आपल्या इतिहासाची पूजा करतो, पण त्याच्या सत्यांकडे दुर्लक्ष करतो. माझ्या चित्रांमध्ये नग्नता, उत्तेजना नाही, तर एक प्रश्न आहे; ती परंपरा मोडत नाही, तर आठवण करून देते की ज्याला आज हव्वा बनवले गेले आहे, ते कधीकाळी आपल्या संस्कृतीचा भाग होते. मी माझ्या कामात, चित्रकलेत, अँड्रोजिनस दाखवतो. अँड्रोजिनस म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती, जिला विरुद्ध लिंगाच्या गोष्टी आणि वर्तन आवडते. ही कोणीही असू शकते - स्त्री किंवा पुरुष. यात मी जे दागिने कधी घालू शकलो नाही, ते माझ्या चित्रांमध्ये स्वतःची कल्पना करून घालतो. माझ्यासाठी दागिन्यांना कोणतेही लिंग नसते. समाजाचा खेळ विचित्र आहे - आमच्यासारख्या लोकांना कधी महान बनवले जाते - आमच्या सन्मानार्थ घोषणा दिल्या जातात, तर अनेकदा आम्हाला विनाकारण द्वेषाच्या नजरेने घेरले जाते. माझे एक चित्र याच द्वंद्वाची कहाणी सांगते. यात एक पुरुष आहे, स्त्रियांचे दागिने घातलेला, उंच स्टूलवर बसलेला - पण त्या स्टूलला पाय नाहीत. उंच दिसतो, पण टेकायला कोणताही आधार नाही. हा त्या तुटलेल्या सन्मानासारखा आहे, जो थोडे लोक देतात - इतका उंच की बाकीच्या जगापासून तुटून जा, पण प्रत्यक्षात नेहमी पडण्याच्या धोक्यात राहा. मी विचारतो - आम्हाला सन्मान तरी कशाला हवा? आम्हाला फक्त सामान्य का समजू नये? टाळ्या मिळतील, पण साथ नाही; इज्जत मिळेल, पण दुर्लक्षही केले जाईल. उंची देतात जेणेकरून पडणे निश्चित आहे- हे चित्र तेच दुःख, तोच एकाकीपणा, तोच संघर्ष व्यक्त करते. हे पहा आणि विचार करा, हीच समाजाची दया आहे की फक्त आणखी एका प्रकारची शिक्षा? स्वातंत्र्याचा अर्थ फक्त फ्री सेक्स नाही, तर स्वतःला निवडण्याची ताकद आहे- जे तुम्ही आहात, तेच जगण्याचे स्वातंत्र्य. बालपणी आई-वडील योग्य-अयोग्य शिकवतात, पण त्यांचे शिक्षण लिंगभेदाच्या भिंतींच्या वर असायला हवे. मला आठवतंय, जेव्हा मी छतावर उभा राहायचो, तेव्हा सांगितलं जायचं- ‘तिथे जाऊ नकोस, पडशील’. ही सुरक्षेची गोष्ट होती, ती समजत होती, पण जेव्हा सांगितलं जायचं- ‘अमुक काम मुलांनी करत नाहीत’. तेव्हा त्या गोष्टी माझ्या मनात दुरावा निर्माण करत. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की मुलं रडत नाहीत. विचार करा, जर मुलं रडली नसती, तर जग आज काहीतरी वेगळं असतं. मी रडलोही, पण कधी कोणासमोर नाही. हे छोटे-छोटे बंधनं, हे खोटे नियम, हळूहळू मनाला तोडतात. मुलं आणि मुलींमधील फरक केवळ बायोलॉजिकल म्हणजे जैविक आहे, बाकी सर्व समाजाने बनवलं आहे. आणि त्या खोट्याने मला वर्षानुवर्षे आतून घेरून ठेवलं, माझा आवाज दाबून टाकला. ही फक्त लहानपणाची गोष्ट नाही, तर त्या रोजच्या संघर्षाची गोष्ट आहे, जो मी प्रत्येक श्वासात जगत राहिलो. आज मी समाजाच्या हिशोबाने ‘राहण्यायोग्य’ माणूस बनलो आहे. बाहेरून ठीक दिसतो, सभ्य आहे, लोक स्वीकार करतात, पण आतून- पूर्णपणे एकटा आहे. माझ्या मागे टांगलेलं हे न्यूड पेंटिंग बघा. 'हे मी आहे'. यात शरीराच्या मध्यभागी एक मोठे छिद्र आहे - कारण आत काहीच उरले नाही. वर्षानुवर्षे स्वतःला कापून-छाटून मी ते रूप घडवले, जे समाजाला पाहायचे होते. त्याच प्रक्रियेत मी स्वतःपासून रिकामा होत गेलो. हा रितेपणा अचानक आला नाही. तो हळूहळू तयार झाला - प्रत्येक वेळी, जेव्हा मी माझी खरी इच्छा दाबून टाकली, प्रत्येक क्षणी, जेव्हा ‘सामान्य’ दिसण्यासाठी स्वतःला शांत केले. आता मी आहे, पण पूर्ण नाही. एका अर्थाने मी, मी राहिलो नाही. आनंदी नाही. पण चला, काही हरकत नाही, समाज तर आनंदी आहे! आता मी दागिन्यांवर संशोधन करत आहे - विविध प्रकारच्या दागिन्यांवर, जेणेकरून मी त्यांना माझ्या चित्रांमध्ये दाखवू शकेन. मला दाखवायचे आहे की देशाच्या कोणत्या कोपऱ्यात स्त्रिया कोणते दागिने घालत असत. मी हे काम सुरूच ठेवीन. समाजाची मर्जी आहे की त्याने ते पसंत करावे किंवा न करावे. त्यांना माझे काम नापसंत करण्याचा हक्क आहे. मी त्यांना समजावू शकणार नाही. नग्नता ही एक निवड आहे, जी तुमच्या कलाकृतीला पुढे घेऊन जाते. हे एक प्रकारचे कला स्वरूप आहे, म्हणजेच कलेचेच एक रूप आहे. (राहुल सरकार यांनी आपल्या या भावना भास्कर रिपोर्टर मनीषा भल्ला यांच्याशी शेअर केल्या आहेत.)
“राष्ट्रप्रेम, सेवा आणि संघटनशक्तीचा संगम म्हणजे रेशीमबाग”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी दिली नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयाला भेटनागपूर : रेशीमबागेत आल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याला राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची वेगळी अनुभूती मिळते. येथून समाजसेवा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा घेऊन कार्यकर्ते कार्यरत होतात. देशभरच नव्हे तर जगभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा कार्यरत असून, हे संघटनात्मक सामर्थ्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय असलेल्या नागपूरच्या रेशीमबाग येथे भेट दिली. याप्रसंगी त्यांनी डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर येथे अभिवादन केले. यावेळी शिवसेनेचे मंत्री आणि पदाधिकारीही उपस्थित होते. भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकी कार्याचा गौरव केला.डॉ. मोहन भागवत यांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना सातत्याने प्रेरणा देणारे असून, समाजसेवा आणि राष्ट्रसेवेचे बळ त्यातून मिळते, असे शिंदे यांनी सांगितले. शंभर वर्षांपूर्वी परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यामुळे नागपूर ही केवळ उपराजधानी नसून संघाची जन्मभूमी आहे, असे त्यांनी नमूद केले.शंभर वर्षे निरपेक्ष भावनेने का ?- इथे येणारा प्रत्येक स्वयंसेवक जात, भाषा आणि प्रांताच्या पलीकडे जाऊन राष्ट्रप्रेमाची शिकवण घेऊन देशसेवेत सहभागी होतो. कुठलीही प्रसिद्धी किंवा अपेक्षा न ठेवता शंभर वर्षे निरपेक्ष भावनेने कार्य करणारी संघटना असणे ही ऐतिहासिक बाब आहे, असेही शिंदे म्हणाले.- आपत्ती आणि संकटाच्या काळात शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्तेही निरपेक्ष भावनेने मदतीसाठी पुढे येतात. समाजाभिमुखता, राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती ही मूल्ये संघाच्या कार्यातून सातत्याने दिसून येतात, याचा आम्हाला अभिमान आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुबईत आज भारत-पाक हाय व्होल्टेज सामना
शतकवीर वैभव सूर्यवंशीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष दुबई : १९ वर्षांखालील आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत भारतीय युवा संघाने त्यांच्या मोहिमेची सुरुवात धडाकेबाज शैलीत केली आहे. सलामीच्या सामन्यात यजमान यूएईचा मोठ्या फरकाने पराभव केल्यानंतर, रविवारी (आज) भारतीय संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे.स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय युवा ब्रिगेडने यूएईचा तब्बल २३४ धावांनी एकतर्फी पराभव केला. भारताच्या या मोठ्या विजयाचा शिल्पकार ठरला युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी. त्याने अवघ्या काही दिवसांपूर्वी आयपीएलमध्ये केलेल्या वेगवान शतकाची आठवण करून देत, युएईविरुद्ध १७१ धावांची धमाकेदार शतकी खेळी केली आणि संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या सामन्याकडे लागले असून, मैदानात पुन्हा एकदा चुरशीची लढत पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.सामन्याची वेळभारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना आज दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक बरोबर १० वाजता होईल.भारतीय १९ वर्षांखालील संघ :आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश पनगालिया, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन, उद्धव मोहन, नमन पुष्पक, वेदांत त्रिवेदी, किशन कुमार सिंह, आरोन जॉर्ज, युवराज गोहिल.पाकिस्तानी १९ वर्षांखालील संघ : फरहान युसूफ (कर्णधार), उस्मान खान, हुजैफा अहसान, हमजा जहूर (यष्टीरक्षक), मोहम्मद सय्यम, अली हसन बलोच, दानियाल अली खान, समीर मिन्हास, अली रझा, मोमीन कमर, अब्दुल सुभान, मोहम्मद हुजैफा, मोहम्मद शायन, नकाब शफीक, अहमद हुसैन.
मुंबईत रोहिंग्यांविरोधात 'कोम्बिंग ऑपरेशन'; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत घोषणा
नागपूर : मुंबईतील जमिनींवर भूमाफियांच्या मदतीने रोहिंग्या मुसलमानांचे बेकायदेशीर वास्तव्य आणि बांधकामे वाढत असल्याचा गंभीर मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. यावर राज्य सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईत आता रोहिंग्यांविरोधात 'कोम्बिंग ऑपरेशन' (Combing Operation) राबवण्यात येईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत केली.आमदार प्रसाद लाड यांनी वेधले लक्षविधान परिषदेचे कामकाज सुरू असताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे रोहिंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. लाड यांनी सभागृहात धक्कादायक माहिती देताना सांगितले की, मुंबईतील मोक्याच्या जमिनींवर काही भूमाफिया सक्रिय झाले आहेत. हे माफिया बेकायदेशीरपणे जमिनी बळकावून तिथे रोहिंग्यांचे पुनर्वसन करत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून, ही बाब मुंबईच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत.सरकारची तत्काळ दखल, ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षणप्रसाद लाड यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, हा विषय अत्यंत संवेदनशील असून सरकार याकडे गांभीर्याने पाहत आहे.मंत्री योगेश कदम यांनी केल्या चार महत्त्वाच्या घोषणा१. कोम्बिंग ऑपरेशन: मुंबईतील ज्या भागांमध्ये रोहिंग्यांचे वास्तव्य असल्याचा संशय आहे, तिथे पोलिसांमार्फत तातडीने 'कोम्बिंग ऑपरेशन' राबवले जाईल.२. संयुक्त कारवाई: ही कारवाई केवळ एका विभागाची नसून, 'गृह विभाग' आणि 'वन विभाग' (Forest Department) संयुक्तपणे मोहीम राबवतील.३. ड्रोन सर्व्हे: दाट वस्तीच्या किंवा दुर्गम भागात लपलेल्या अनधिकृत झोपड्या शोधण्यासाठी आधुनिक ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्वेक्षण केले जाईल.४. अतिक्रमण हटाव: सर्वेक्षणानंतर आढळलेली सर्व बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात येतील.विधान परिषदेत मिळालेल्या या आश्वासनामुळे मुंबईतील अवैध घुसखोरीवर लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन २०२५ | दिवस सातवा | विधान परिषदेतून लाईव्ह---- LIVE विधान भवन, नागपूर ️ १४ डिसेंबर २०२५लक्षवेधीवडाळा येथील कांदळवनाच्या जमिनीवर काही भूमाफिया भरणी करून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे घरे बांधून रोहिंग्यांना विकत आहेत. तसेच राज्यातील…— Yogesh Ramdas Kadam (@iYogeshRKadam) December 14, 2025
नक्षलवाद्यांच्या कारवाया थंडावणार, तीन मोठ्या नक्षलवाद्यांची शरणागती
गोंदिया : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना शरण या नाही तर मरा असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद्यांचा पुरता बीमोड करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना निर्देश दिले आहे. गृहमंत्र्यांकडून परवानगी मिळाल्यापासून सुरक्षा यंत्रणांनी आक्रमक होत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारी यंत्रणेचा हा आक्रमक पवित्रा बघून घाबरलेल्या नक्षलवाद्यांनी शरणागती स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यात तीन मोठ्या नक्षलवाद्यांची शरणागती स्वीकारली आहे. यामुळे राज्यातल्या नक्षलवाद्यांच्या कारवाया थंडावण्याची शक्यता वाढली आहे. शरण आलेले तिन्ही नक्षलवादी दरेकसा एरिया कमिटीचे सदस्य होते. विदर्भात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडला लागून असलेल्या राज्याच्या सीमा भागातील नक्षलवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. सरकारच्या नक्षलवाद विरोधी मोहिमेला यश मिळू लागल्याचे चित्र आहे.दरेकसा एरिया कमिटी कमांडर रोशन बेडजा (३५) याच्यासह सुभाष रव्वा (२६) आणि रतन पोयाम (२५) गोंदिया पोलिसांसमोर शरण आले आहेत. मागील काही महिन्यांपासून नक्षलवादी हातातील शस्त्र खाली टाकून आणि हातात भारतीय संविधानाची प्रत घेऊन शरण येऊ लागले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अलिकडेच नक्षलवादी भूपती, तारक्का यांनी आत्मसमर्पण केले. याआधी ११ नक्षलवादी शरण आले होते.
मुंबईत फुटबॉल स्टार मेस्सी येणार, वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल
मुंबई : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आला आहे. शनिवारी मेस्सी कोलकाता येथे होता. पण आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे कोलकाता येथील कार्यक्रमाचा पुरता बोजवारा उडाला. तृणमूल काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि त्यांचे नातलग यांनाच मेस्सीला जवळून भेटणे शक्य झाले. हजारो रुपयांची तिकिटं खरेदी करणारे मेस्सीचे शेकडो चाहते नाराज झाले. चाहत्यांनी त्यांची नाराजी स्टेडियममध्ये नासधूस करुन जाहीर केली. अखेर पोलीस बळाचा वापर करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पण या घटनेमुळे मुंबईतील आयोजनासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.मेस्सी आज म्हणजेच रविवार १४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईत असेल. मेस्सी मुंबईत असल्यामुळे वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.लिओनेल मेस्सी मुंबईत आल्यावर वानखेडे स्टेडियम आणि ब्रेबॉन स्टेडियमवर जाणार आहे.संध्याकाळी पाच वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहेत. त्यामुळे मुंबईत गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीचा विचार करुन वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल केले आहेत. या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी नागरिकांना केले आहे.स्टेडियमवर पार्किंगला परवानगी नाही आहे. सी,डी,ई,एफ,जी रस्ते, नरीमन रोड, दिनशॉ वाच्छा रोड, जमशेदजी टाटा रोड आणि एन.एस. रोडवर तात्पुरते निर्बंध लागूएकमार्गी वाहतूक : डी एन रोड (पश्चिम-पूर्व),ई रोड (दक्षिण दिशेने), वीर नरीमन रोडला प्रवेश मर्यादित.रस्ते बंद : किनारा मार्ग अर्थात कोस्टल रोड (मरिन ड्राईव्ह अर्थात नेताजी सुभाषचंद्र बोस रोड ते वरळी/ताडदेव आणि प्रमुख चौकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.)
पुणे महापालिकेच्या पेट स्कॅन सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे – महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या पेट स्कॅन सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे. पुण्याचे माजी खासदार दिवंगत गिरीश बापट यांचे नाव या सेंटरला देण्यात येणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून सुरू होत असलेला देशातील अशा स्वरुपाचा हा पहिलाच प्रकल्प आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे हे महापालिकेत सभागृह नेते […] The post पुणे महापालिकेच्या पेट स्कॅन सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण appeared first on Dainik Prabhat .
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या'स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
मुंबई : रेल्वे मंत्रालयाने रेल्वेअपघातांबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. मंत्रालयाने त्यांच्या डेटा रिलीजमध्ये असा दावा केला आहे की गेल्या दशकात रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट झाली आहे. एकाच दशकात रेल्वे अपघातांमध्ये ९० टक्क्यांनी घट झाली आहे. ही घट लक्षणीय आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास हे प्रवासाचे सर्वात सुरक्षित साधन बनले असल्याचाही दावा मंत्रालयाने केला आहे.रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१४-१५ मध्ये १३५ रेल्वे अपघात झाले होते, तर २०२४-२५ मध्ये ही संख्या फक्त ३१ वर आली आहे. शिवाय, २००४ ते २०१४ दरम्यान, एकूण १७११ अपघातांची नोंद झाली होती. म्हणजेच तेव्हा दरवर्षी सरासरी १७१ अपघात होत होते. त्या तुलनेत, २०२५-२६ मध्ये (नोव्हेंबर २०२५ पर्यंत) ही संख्या आणखी कमी होऊन फक्त ११ झाली आहे. भारतीय रेल्वे सुरक्षेच्या इतिहासातील ही एक मोठी कामगिरी आहे. रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, गेल्या दशकात रेल्वे सुरक्षितता सुधारण्यात लक्षणीय प्रगती झाली आहे. यामुळे रेल्वे अपघातांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. कवच या तंत्रज्ञानामुळे अपघातांमध्ये लक्षणीय घट झाली आहे असा रेल्वेचा दावा आहे. रेल्वे मंत्रालयाच्या मते, कवच तंत्रज्ञान गाड्या स्वयंचलितपणे ब्रेक लावण्यात, सिग्नल ओव्हररन रोखण्यात आणि अपघात रोखण्यात अत्यंत प्रभावी सिद्ध होत आहेत. यामुळे भविष्यात अपघात आणखी कमी होतील. आता, स्वदेशी कवच प्रणालीचा वेगाने विस्तार केला जात आहे. कवच टप्प्याटप्प्याने देशभरात लागू केला जात आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे म्हटले जाते. ते रेल्वेला हायटेक आणि सुरक्षित बनवण्यासाठी सतत काम करत आहेत. परिणामी, आज रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट नोंदवण्यात आली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
उद्यापर्यंत ब्लॉकरत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील काही दिवस हे बदल कायम राहणार आहेत. दिवा-पनवेल मार्गावरील तळोजा पाचनंद स्थानकावर दोन नवीन क्रॉसओव्हरचे काम सुरू असून ते सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने १५ डिसेंबरपर्यंत प्री-एनआय आणि एनआय ब्लॉक जाहीर केला आहे. तळोजा पाचनंद येथे सुरू असलेल्या क्रॉसओव्हर कमिशनिंगदरम्यान सिग्नल आणि मार्गरचना सुधारण्यासाठी काही गाड्या विलंबाने सोडणार आहेत.या ब्लॉकमुळे मुंबईकडे येणाऱ्या कोकण मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. १५ डिसेंबरपर्यंत हे बदल प्रभावी राहणार आहेत. काही गाड्यांच्या उशीरा निघणार आहेत. मडगाव-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (२०११२) ही गाडी ३० मिनिटे उशिरा सुटणार असून तिरुवनंतपुरम नॉर्थ–एलटीटी एक्स्प्रेस ६० मिनिटांनी, तर मंगळुरू–मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ५० मिनिटांनी उशिरा धावणार आहे. त्याचबरोबर, १४ डिसेंबरला सुटणारी मडगाव–मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (२०११२) ६० मिनिटांच्या विलंबाने धावेल, तर १५ डिसेंबर रोजी सुटणारी मुंबई सीएसएमटी-मडगाव एक्स्प्रेस (१०१०३) ३० मिनिटांच्या विलंबाने निघेल. पनवेल–कळंबोलीदरम्यान सुरु असलेल्या प्रकल्पाच्या कामासाठी मध्य रेल्वेने १६ डिसेंबरपर्यंत अतिरिक्त ब्लॉक जाहीर केला आहे. रविवार (१४ डिसेंबर) आणि मंगळवार (१६ डिसेंबर) या दिवशी मध्यरात्री १.३० ते ३ .३० दरम्यान पावर ब्लॉक असेल. या काळात लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होणार असून एकूण १२ मेल–एक्स्प्रेस गाड्या विलंबाने धावणार आहेत.
रशिया, जपानसह अनेक देश भारतीयांना नोकऱ्या देण्यास उत्सुक!
कामगारांचा तुटवडा निर्माण झाल्याने भारतीयांना पसंतीनवी दिल्ली : अमेरिका, कॅनडा आणि इतर अनेक विकसित देश शिक्षण आणि रोजगारासाठी भारतीयांची पसंतीची ठिकाणे आहेत. मात्र, या देशांनी व्हिसासंबंधी नियम अधिक कठोर केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसासंबंधीच्या नियमांत बदल केल्याने भारतीयांसाठी अमेरिकेत जाणे अवघड झाले आहे. इतर देशांमध्येही राजकीय दबाव आणि इतर कारणांमुळे व्हिसाचे नियम कठोर केले गेले आहेत. मात्र, असे असले तरी अनेक देश असे आहेत, ज्यांनी भारतीयांसाठी आपले दरवाजे उघडले आहेत. रशिया, जपान आणि इतर अनेक देशांमध्ये कामगारांचा तुटवडा निर्माण झाल्याने ते लाखो भारतीयांना नोकऱ्या देण्यास तयार आहेत.भारतातील देशांतर्गत रोजगारवाढ मजबूत असली तरी त्यायोगे देशातील सर्व कामगारांना सामावून घेतले जाऊ शकत नाही. त्यात ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रस्तावित करण्यात आलेले भारताचे ओव्हरसीज मोबिलिटी बिल महत्त्वाचे ठरते. १९८३ च्या इमिग्रेशन ॲक्टची जागा घेऊन, हे विधेयक परदेशातील भारतीय कामगारांसाठी एक सक्षम प्रणाली तयार करते. उरल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे प्रमुख अँद्रे बेसेदिनयांनी सांगितले की, ‘माझ्या माहितीनुसार वर्षाच्या अखेरपर्यंत, स्वेर्दलोव्स्क प्रदेशासह भारतातून १० लाख (१ दशलक्ष) विशेषज्ञ रशियात येतील. या समस्या हाताळण्यासाठी येकातेरिनबर्ग येथे एक नवीन कॉन्सुलेट उघडले जात आहे.’ अत्यंत कुशल कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी भारतीयांचे स्थलांतर होईल, असे बेसेदिन म्हणाले.रशियन कामगार मंत्रालयाने २०३० पर्यंत ३.१ दशलक्ष (३१ लाख) कर्मचाऱ्यांची कमतरता भासेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यांनी २०२५ मध्ये पात्र परदेशी कामगारांना आमंत्रित करण्याचा कोटा १.५ पटीने वाढवून ०.२३ दशलक्ष (दोन लाख ३० हजार) करण्याची योजना प्रस्तावित केली आहे. रशियाचे उपाध्यक्ष डेनिस मान्तुरोव्ह यांनी सांगितले की, देशाच्या उत्पादन उद्योगाला किमान आठ लाख अतिरिक्त कामगारांची आवश्यकता आहे.रशिया कुशल आणि अर्धकुशल भारतीय कामगारांसाठी एक महत्त्वाचे नवे ठिकाण म्हणून वेगाने उदयास येत आहे. तीव्र लोकसंख्याशास्त्रीय घट आणि सर्व क्षेत्रांतील कामगार तुटवड्याचा सामना करत असलेला रशिया इतर स्रोतांकडे वळला आहे. रशियन व्यवसाय माहिती तंत्रज्ञान (आयटी), बांधकाम, अभियांत्रिकी, यंत्रसामग्री व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कुशल भारतीयांचा शोध घेत आहे. रशियाची देशांतर्गत कार्यक्षम लोकसंख्या कमी होत आहे आणि त्यांच्या उद्योगांना त्वरित भरपाईची गरज आहे.जपानचा भारतीय कर्मचाऱ्यांकडे कलरशियाप्रमाणेच जपानलाही लोकसंख्याशास्त्रीय संकटाचा सामना करावा लागत आहे; पण त्यांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतराबद्दल सावध पवित्रा घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून हा पवित्रा नरमण्यास सुरुवात झाली आहे. या आराखड्यात दोन्ही राष्ट्रांनी पाच वर्षांत ५,००,००० लोकांना स्थलांतराची सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात ५०,००० कुशल आणि अर्धकुशल भारतीय कामगारांचा समावेश आहे. जपानला आरोग्य सेवा, उत्पादन, आदरातिथ्य यांसारख्या क्षेत्रांमधील तुटवडा कमी करायचा आहे. मुख्य म्हणजे या क्षेत्रांसाठी भारतीय कामगार सक्षम आहेत.
पश्चिम बंगालमध्ये ५८.८ लाख मतदारांची नावे यादीतून वगळणार
कोलकाता : २०२६ पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या शुद्धीकरणाची एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील सुमारे ५८.८ लाख (५८,०८,००२) मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची तयारी सुरू आहे.निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राज्याचे संपूर्ण राजकीय चित्र बदलण्याची शक्यता असून, तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मतदार यादीत अनेक प्रकारच्या मतदारांना चिन्हांकित करण्यात आले आहे. यामध्ये सर्वात मोठा गट मृत मतदारांचा आहे. त्यानंतर नोंदणीकृत पत्त्यावर न सापडलेले, अस्पष्ट नोंदी असलेले मतदार यांचा समावेश आहे. ही नावे आता मसुदा मतदार यादीत दिसणार नाहीत.राजकीय वर्तुळात खळबळमतदार यादीतील एवढ्या मोठ्या बदलांमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी याविरोधात धरणे आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र भाजपने (तृणमूल काँग्रेस) टीएमसीचे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रक्रियेमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असून,१६ डिसेंबर रोजी मसुदा यादी प्रसिद्ध होणार आहे.मोहिमेची कारणे आणि आकडेवारीनिवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विशेष मतदार पुनरीक्षण मोहिमे'अंतर्गत घरोघरी केलेल्या सर्वेक्षणानंतर ही नावे वगळण्यासाठी चिन्हांकित करण्यात आली आहेत. मृत मतदार : २४ लाखांहून अधिक.स्थलांतरित/अनुपस्थित : १२ लाखांहून अधिक. दुबार नोंदी : सुमारे २० लाखयांचा समावेश आहे. मतदार यादीतील त्रुटी दूर करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
डोंबिवलीत रस्ता झाला गुलाबी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
कल्याण : डोंबिवलीत प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीत चक्क गुलाबी रस्ता पाहायला मिळाला. डोंबिवली एमआयडीसीत अनेक रासायनिक कंपन्या असून यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस, ऑरेंज ऑईल मिश्रित पाऊस पडला होता. तर आता केमिकलमुळे एमआयडीसी संपूर्ण रस्ता गुलाबी रंगाचा झाला आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याचं ही दिसून आलं आहे. या केमिकलमुळे दर्प सुटला आहे, असे स्थानिकांनी सांगितले. २०२० साली हाच गुलाबी रस्त्याचा विषय लावून धरला होता, त्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली होती. आता ५ वर्षांनी पुन्हा हा विषय पुढे आला असून अधिकारी वर्गाकडून लक्ष दिलं जाणार की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारच्या बदलामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात सापडलं आहे.काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस तर ऑरेंज ऑईल मिश्रित पाऊस पडला होता. आता थेट रस्त्यावर गुलाबी रंगाचा थर पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी २०२० मध्ये रासायनिक कंपन्यांकडून सुरक्षिततेची उपाय योजना केल्या जाणार नसतील. सुरक्षइततेच्या आणि प्रदूषण नियंत्रणाचे निमया पळले जात नसतील तर त्या कंपन्यांना टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता.त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, औद्योगिक सुरक्षा विभाग, अग्नीशमन दलाने संयुक्त सर्वेक्षण करुन १०७ कंपन्यांचे सर्वेक्षण केले. त्यापैकी ३८ कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.या सर्वेक्षणापश्चात काही कंपन्या स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव आला. दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार बदलले. त्यानंतर महायुतीचे सरकार आले. महायुतीच्या सरकारने कंपन्या स्थलांतराचा विषयावर पुनर्विचार करण्याचे भाष्य केले होते. त्यानंत पुढे काही एक कार्यवाही झालेली नसल्याने प्रदूषणाचा प्रश्न काही अद्याप सुटलेला नाही. त्याची पुन्हा एकता प्रचिती रस्ता गुलाबी झाल्यानंतर आली आहे.
‘खूपच गंभीर प्रत्युत्तर…’ ; सीरियातील अमेरिकन सैन्यावरील हल्ल्यानंतर ट्रम्पचा आयसिसला कडक इशारा
Trump on ISIS। सीरियामध्ये आयसिसच्या हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिक आणि एका नागरिक दुभाष्याच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी हा हल्ला अमेरिका आणि सीरिया या दोघांवर थेट हल्ला असल्याचे वर्णन केले आहे. त्यानंतर या हल्ल्याला “खूप कडक प्रत्युत्तर” दिला जाणार असल्याचा इशारा दिला आहे. हा हल्ला अशा वेळी झाला […] The post ‘खूपच गंभीर प्रत्युत्तर…’ ; सीरियातील अमेरिकन सैन्यावरील हल्ल्यानंतर ट्रम्पचा आयसिसला कडक इशारा appeared first on Dainik Prabhat .
मध्य, पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक
देखभालीच्या कामांमुळे मार्गात बदलमुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांनी त्यांच्या सोयीनुसार प्रवासाचे नियोजन करावे आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वेच्या अधिकृत घोषणांसाठी, तुम्ही मध्य रेल्वेच्या अधिकृत किंवा पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.मध्य रेल्वेमुख्य मार्गकुठे : माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरकधी : स ११.०५ ते दु ३.४५परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल माटुंगा – मुलुंडदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. ठाण्यापुढे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकात पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल मुलुंड–माटुंगादरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.ट्रान्स हार्बर मार्गकुठे : ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप-डाऊनकधी : स.११.१० ते दु ४.१०परिणाम : ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ – ठाणे स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहतील. ठाणे–वाशी/नेरुळ/पनवेल अप-डाऊन मार्गावरील लोकल रद्द आहेत.पश्चिम रेल्वेकुठे : बोरिवली – गोरेगाव स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरकधी : स. १० ते दुपारी ३ पर्यंतपरिणाम : ब्लॉक कालावधीत गोरेगाव–बोरिवलीदरम्यान अप -डाऊन मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येतील. तर, अंधेरी आणि बोरिवलीला जाणाऱ्या काही लोकल हार्बर मार्गावरून गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील.
आसाममध्ये माजी हवाई दल अधिकारी कुलेंद्र सरमाला अटक
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाशगुवाहाटी : पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांसाठी हेरगिरी केल्याच्या आणि भारतीय हवाई दलाची गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली आसाम पोलिसांनी हवाई दलाच्या एका निवृत्त अधिकाऱ्याला अटक केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.आसामच्या सोनितपूर जिल्ह्यातील तेजपूर परिसरात राहणाऱ्या कुलेंद्र सरमा या निवृत्त अधिकाऱ्यावर गेल्या काही दिवसांपासून आसाम पोलिसांची गुप्त नजर होती. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, सरमा हा सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून पाकिस्तानस्थित व्यक्तींच्या संपर्कात होता, असा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत, सरमाने काही संवेदनशील कागदपत्रे आणि संरक्षणविषयक माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांपर्यंत पोहोचवल्याचे उघड झाले आहे.पुरावे आणि पुढील तपासशुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी सरमाच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याचा मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर काही संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या उपकरणांमधील काही डेटा न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. ही कारवाई सुरू असतानाच, आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधून आणखी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत एकूण पाच संशयित हेर पकडले गेले आहेत. या रॅकेटमध्ये आणखी किती लोक सामील आहेत.
राज्य, देश आणि विदेशातील महत्वाच्या १० बातम्या वाचा एका क्लिकवर
19 डिसेंबरला सर्वात मोठा राजकीय भूकंप! येत्या 19 डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल. भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल असं भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. पंतप्रधान होणारी व्यक्ती मराठी माणूस असून ती भाजपचीच असू शकते, असंही त्यांनी म्हटलंय. पृथ्वीराज चव्हाणांनी हा दावा करताना जगात घडणाऱ्या घडामोडींचे संदर्भ दिलेत. […] The post राज्य, देश आणि विदेशातील महत्वाच्या १० बातम्या वाचा एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .
रायगडमधील ईव्हीएम स्ट्राँग रूम उंदरांनी फोडली?
कपाटाचे दरवाजे उघडल्याने एकच खळबळअलिबाग : येत्या २१ डिसेंबरला नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे. पण त्या आधीच सुरक्षा रक्षक आणि उमेदवारांच्या पहाऱ्यात असलेली स्ट्राँग रूम फोडल्याचा प्रकार, रायगडच्या पेणमध्ये समोर आला. पण ही स्ट्राँग रूम कोणी माणसाने नाही तर चक्क उंदरांनी फोडली आहे. हा सर्व प्रकार स्ट्राँग रूममध्ये लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला. या प्रकाराने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.रायगड जिल्मह्याधील पेणच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूममध्ये उंदरांचा सुळसुळाट असल्याचे समोर आले. शनिवारी पहाटेच्या सुमारास स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशीन ज्या कपाटावर ठेवल्या आहेत, त्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडल्याने एकच गोंधळ उडाला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये उंदरांचा हा सर्व प्रताप उघडकीस आला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.राज्यातल्या बहुतांश भागात ईव्हीएम स्ट्राँग रूमबाहेर विविध पक्षांच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून कडक पहारा दिला जात असल्याचे चित्र आहे. मात्र, अकोल्यात वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. अकोल्यातल्या चार नगरपालिका आणि एका नगरपंचायत अशा पाचही ठिकाणी ईव्हीएम स्ट्राँग रूमबाहेर २४ तास कडक पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. अकोल्याच्या तापमानाचा पारा दहा अंशांच्या आसपास पोहोचला आहे, तर ग्रामीण भागातले तापमान दहा अंशांच्या खाली आहे.या कडाक्याच्या थंडीतही पोलीस डोळ्यांत तेल घालून स्ट्राँग रूमबाहेर कडक पहारा देत आहेत. अकोल्यातील अकोट, हिवरखेड, मूर्तीजापूर, बार्शी टाकळी आणि तेल्हारा या पाचही ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त आहे.नाशिकच्या मनमाडमध्ये स्ट्राँग रूम परिसरात जॅमर बसवावे अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी केली आहे. २१ डिसेंबर २०२५ ला नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे, तोपर्यंत ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ नये यासाठी जामर बसवण्याची मागणी विविध पक्षांच्या उमेदवारांनी केली. जॅमर जर बसवला नाही तर ठाकरेसेना, राष्ट्रवादी आणि विविध पक्षांचे उमेदवारांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.बुलढाण्यातील सर्व दहा स्ट्राँग रूमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. १० नगर परिषदांच्या मतदान प्रक्रियेचा टप्पा २ डिसेंबरला पार पडला आहे. त्यानंतर मशीन दहा ठिकाणच्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले आहे. प्रत्येक स्ट्राँग रूमच्या बाहेर एकावेळी २५ पोलीस कर्मचाऱ्यांचा पहारा आणि सशस्त्र एसआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.रायगड जिल्ह्यातील पेणमधील स्ट्राँग रूम उंदरांनी फोडल्याचे कळताच काही जागरूक पदाधिकाऱ्यांनी आपल्या मतपेट्या असलेल्या ठिकाणी धाव घेत स्ट्राँग रूम परिसराची पाहणी करण्याचा प्रयत्न केला. नागपूर अधिवेशनात रविवारी अखेरचा दिवस असतानाच उंदरांचा प्रताप उघड झाल्याने नागपूरच्या थंडीतही या घटनेमुळे राजकीय गप्पांमध्ये उपहासात्मक वादाचा कलगीतुरा झडल्याचे पाहावयास मिळाला.
इंडिगोचे चार विमान निरीक्षक बडतर्फ
नवी दिल्ली : भारताची हवाई वाहतूक नियामक संस्था, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने संकटात सापडलेल्या इंडिगोच्या सुरक्षा व कार्यकारी अनुपालनावर देखरेख करणाऱ्या चार विमान निरीक्षकांना बडतर्फ केले आहे. एअरलाईनच्या तपासणी व देखरेखीमध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. कडक सुरक्षा नियमांचे नियोजन करण्यात अपयशी ठरल्याने इंडिगोने या महिन्यात हजारो उड्डाणे रद्द केली., ज्यामुळे देशभरात हजारो प्रवासी अडकून पडले. ५ डिसेंबर रोजी रद्द झालेल्या उड्डाणांची संख्या सर्वाधिक होती आणि त्यानंतर ती कमी झाली आहे.
जुन्नर वनविभागात ६८ बिबटे पकडले
पुणे : जुन्नर वनविभागात बिबट्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १३ कोटी रुपये दिले आहेत. त्यातून पिंजरे खरेदी करण्यात आले आहेत. वनविभागाने या पिंजऱ्यात ६८ बिबटे पकडले आहेत. कमी काळात एवढे बिबटे वनविभागाने पकडल्यामुळे बिबटे व मनुष्य संघर्ष येत्या काळात संपविण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरत असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. जुन्नर वनविभागात बिबट्यांच्या हल्ल्यात २०२५-२६ या वर्षांत ५ नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यांना ६५ लाख रुपये मदत, तर ५ नागरिक जखमी झाले असून त्यांना २ लाख १८ हजार ९६४ रुपये व १ हजार ६५७ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
लिओनेल मेस्सी आज मुंबईत; ‘प्रोजेक्ट महादेव’चा करणार शुभारंभ
Project Mahadev | जागतिक फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी कोलकतानंतर आज मुंबईचा दौरा करणार आहेत. हा दौरा महाराष्ट्रातील युवकांसाठी एक ऐतिहासिक संधी घेऊन येत आहे, जिथे ते मेस्सीसोबत प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेऊन आपल्या कौशल्यांना नवी दिशा देऊ शकतील. लिओनेल मेस्सी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज 14 डिसेंबर रोजी ‘प्रोजेक्ट महादेव’ या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचा […] The post लिओनेल मेस्सी आज मुंबईत; ‘प्रोजेक्ट महादेव’चा करणार शुभारंभ appeared first on Dainik Prabhat .
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला राज्यातील खासदारांचा वर्ग!
राजकीय परिस्थिती, विकासकामे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा सखोल आढावानवी दिल्ली : दिल्ली येथील संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील एनडीएच्या खासदारांची विशेष बैठक घेऊन संवाद साधला. या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींनी विकासकामांचा आढावा घेण्यासह महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांची माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी त्यांनी खासदारांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.दिल्ली येथे संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात एनडीएचे सर्व खासदार सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील एनडीएच्या सर्व खासदारांना स्नेहभोजनासाठी निवासस्थानी निमंत्रित केले होते. यावेळी नरेंद्र मोदींनी बैठक घेऊन खासदारांच्या कामांचा आढावा सुद्धा घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, भारती पवार, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, खासदार मेघा कुलकर्णी आदींसह इतर खासदार उपस्थित होते.महाराष्ट्रातील एनडीएच्या सर्व खासदारांसोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींनी राज्यातील विकासकामे आणि परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील केंद्र सरकारच्या योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासह ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्रावर काम करीत पक्षाला संघटनात्मक बळकट करण्याचे निर्देश नरेंद्र मोदी यांनी दिले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची राजकीय परिस्थितीची माहिती त्यांनी घेतली.राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती, विविध योजनांचा होणारा लाभ, अतिवृष्टी आणि त्यानंतरचे मदत कार्य याची माहिती सुद्धा त्यांनी जाणून घेतली. राज्यातील उद्योग-व्यवसाय, मतदारसंघातील प्रमुख विकास कार्य, समस्या आदींची पंतप्रधानांनी खासदारांकडून माहिती घेतली.संजय धोत्रेंच्या प्रकृतीची विचारपूसपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांच्याकडे माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अकोला लोकसभा मतदारसंघातील विकास कार्य, समस्या व अडचणी आदींची माहिती सुद्धा पंतप्रधानांनी घेतली. खासदार अनुप धोत्रे यांच्या अभ्यासुवृत्ती त्यांनी कौतुक केले.मार्गदर्शनातून नवी ऊर्जापंतप्रधान मोदी यांचे मार्गदर्शन नेहमीच मोलाचे व प्रेरणादायी असते. त्यांच्या अविरत काम करण्याच्या जिद्दीतून सतत नवी ऊर्जा मिळते. मोदी यांनी महाराष्ट्रातील विकासकामे, योजनांची अंमलबजावणी, शेतकऱ्यांची स्थिती, योजनांचा लाभ, राजकीय परिस्थिती आदींची माहिती जाणून घेतली.
आमदार निधीतील भ्रष्टाचारावर भास्करने प्रथमच आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा केला आहे. यात विकासकामांची शिफारस करण्याच्या नावाखाली आमदार 40% कमिशन घेत आहेत. हे उघड करण्यासाठी भास्करच्या रिपोर्टरने एका डमी फर्मचा प्रोप्रायटर बनून आमदारांशी संपर्क साधला. त्यांना सांगितले की ही फर्म खादी ग्रामोद्योग बोर्डाशी संलग्न आहे आणि आमदार निधीतून शाळांमध्ये सतरंज्या (कारपेट) पुरवते. याची किंमत किती आहे आणि यांची शाळांमध्ये गरज आहे की नाही, हे न जाणता, आमदार शिफारस करण्यास तयार झाले. त्यांचे लक्ष फक्त एकाच प्रश्नावर होते– आम्हाला किती टक्के मिळेल?खींवसरचे भाजप आमदार रेवंतराम डांगा, हिंडौनच्या काँग्रेसच्या अनिता जाटव आणि बयाना (भरतपुर) येथील अपक्ष आमदार ऋतू बनावत यांच्याशी डील केली. भाजप आमदार डांगा म्हणाले- 40% द्या, 50 लाखांचे काम देईन. काँग्रेसच्या आमदार अनिता यांनी 50 हजार घेतले आणि 80 लाखांचे पत्र दिले. इकडे, अपक्ष आमदार ऋतू बनावत यांच्या पतीने 40 लाखांची डील फायनल केली. डांगा आणि अनिता यांनी तर जिल्हा परिषदेच्या सीईओच्या नावाने शिफारस-पत्रही दिले. राजस्थानमध्ये प्रत्येक आमदाराला विधानसभा सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना (एमएलए लेड) अंतर्गत वर्षाला 5 कोटी रुपये मिळतात. रेवंतराम डांगा यांनी 10 लाख ॲडव्हान्स घेतले, 50 लाखांचे पत्र दिले, म्हणाले- अधिकाऱ्यांना थोडे-थोडे देऊन टाका मुलगा म्हणाला- पत्र आता देऊ नका आमदार डांगा यांनी रिपोर्टरला सांगितले- नागौरला या. 50% मुलगा अशोक घेईल. अशोकने गावाचे लोकेशन पाठवले. रिपोर्टर पोहोचला.अशोक: (पत्र दिल्यानंतर) मी ऑनलाइन पाठवून देईन. सीईओला सांगेन.रिपोर्टर: नाही-नाही! तुम्ही पाठवू नका, हे तर मीच देऊन येईन, बाय हँड.अशोक: आता देऊ नका, नंतर द्या. मंत्रिमंडळाचे चालू आहे, काय माहीत होऊन जाईल? 10 आणले आहेत? आणा! ती पिशवी द्या.रिपोर्टर: बघा. 5–5 चे 2 पाकिटे आहेत.(रिपोर्टरने अशोक डांगाला 10 लाख रुपये दिले.) जाटव म्हणाल्या- आधी अधिकाऱ्यांनी कामे अडवली आहेत, त्यांचे बघून घ्या अनीता जाटव: मी आधीही काम दिलं होतं, अधिकारी करत नाहीत.रिपोर्टर: तुम्ही पत्र द्या, त्यांच्याकडून मी करून घेईन.अनीता : आता तरी बजेट नाहीये. नंतर बघू.(जाटव यांच्या जयपूर येथील निवासस्थानी डीलमध्ये जवळचे पवन शर्मा यांची एंट्री.)पवन : स्पष्ट सांगा तुम्ही कसं करता?रिपोर्टर: तसं तर आम्ही 30–35% च देतो, पण शेवटचं 40% करून देऊ.पवन : मॅडमशी मी बोलून घेईन. तुम्ही सांगून द्या पवनशी बोलणं झालं आहे.रिपोर्टर: सर (पवन शर्मा यांच्याकडे इशारा करत) यांच्याशी बोलणं झालं होतं.अनीता: हो, यांनी मला संध्याकाळी सांगितलं होतं.रिपोर्टर: हे टोकन (50 हजार रुपये) घ्या. पत्र आजच द्या.अनीता: ठीक आहे! (अनीता जाटव यांनी रुपये घेतले आणि पवनने आमदार जाटव यांच्या स्वाक्षरीचे 80 लाख रुपयांच्या शिफारशीचे पत्र दिले आणि विचारले जानेवारीपर्यंत काम आणि पेमेंट होईल ना?) बनावत यांनी सांगितले- बजेट नाही, पतीने 40 लाखांची डील केली विषय: मागच्या वेळी काम दिले होते, त्यात खूप अडचणी आल्या होत्या. जिल्हा परिषद वाले लवकर करत नाहीत. सीएम साहेबांनी आमच्याकडे तर आयएएस (अधिकारी) नेमला आहे. विचारावे लागेल. मी तयार आहे.(रिपोर्टर पती ऋषी बन्सल यांच्यासोबत वेगळ्या खोलीत गेले)रिपोर्टर: मागच्या वेळी ज्यांना दिले होते, त्यांची काय पद्धत होती?बन्सल: हे तर तुम्हालाच माहीत असते. तुमचे काय असते?रिपोर्टर: 30–35% मध्येच करतात. तुम्हाला 40% पर्यंत देऊ.(बन्सल यांनी सचिन नावाच्या व्यक्तीला बोलावून बजेटबद्दल विचारले, त्यांनी 40 लाख रुपये बाकी असल्याचे सांगितले.)बन्सल: 40 लाखांचे करून देऊ या वेळीच. सीईओचे बघून घ्या.(बन्सल यांना टोकनचे 50 हजार दिले तेव्हा त्यांनी ते परत केले. म्हणाले– आता ठीक नाही, काम होईल तेव्हा घेऊ.)
“देशात 19 डिसेंबरला राजकीय भूकंप होणार, मराठी माणूस पंतप्रधान होईल”; माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
Prithviraj Chavan | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाच्या राजकारणात १९ डिसेंबरला मोठा भूकंप होणार असल्याचे भाकीत केले आहे. भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल, पण तो काँग्रेसचा नाही तर भाजपचा असेल, असा दावा मोठा त्यांनी केला आहे. अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून […] The post “देशात 19 डिसेंबरला राजकीय भूकंप होणार, मराठी माणूस पंतप्रधान होईल”; माजी मुख्यमंत्र्यांचा दावा appeared first on Dainik Prabhat .
मुलुंडमध्ये आता देश विदेशातील पक्ष्यांचे घडणार दर्शन
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पक्षी उद्यानाचे भूमिपुजनमुंबई : मुंबईच्या उपनगरीय भागात नागरिक आणि पर्यटकांसाठी, पर्यटनाचा नवा आणि आकर्षक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मुलुंड (पश्चिम) परिसरातील नाहूर येथे अत्याधुनिक ‘विदेशी पक्षी उद्यान’ उभारण्यात येणार आहे.महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पक्षीगृह उभारण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या पक्षीगृहाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उद्या रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ऑनलाइन होणार आहे. राज इंडस्ट्रियल इस्टेटच्या मागे, डी. पी. रोड, सालपादेवी पाडा, मुलुंड (पश्चिम), मुंबई येथे हा सोहळा होईल.मुंबई महापालिकेच्या ताब्यातील सुमारे १७,१३९.६४ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यापैकी सुमारे १०,८५९ चौरस मीटर क्षेत्रावर विदेशी पक्ष्यांसाठी विशेष पक्षीगृह उभारले जाणार आहे. उर्वरित जागेत तिकीटघर, सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्मृतिप्रतीके दुकान, कॅफे तसेच भुयारी वाहनतळ (अंडरग्राउंड पार्किंग) आदी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. या पक्षी उद्यानामुळे नागरिकांमध्ये पक्षी, प्राणी आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती वाढण्यास मदत होणार असून, महानगरपालिकेच्या महसुलातही भर पडणार आहे, असे उपायुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी यांनी सांगितले.या पक्षी उद्यानाची रचना ही वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील आधुनिक पक्षीगृहाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. त्यामुळे उपनगरीय भागातील तसेच मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना हा नवा पर्यटन पर्याय उपलब्ध होणार आहे. या विदेशी पक्षी उद्यानामध्ये २४ स्वतंत्र अधिवास प्रस्तावित आहेत. जगभरातील दुर्मिळ व रंगीबेरंगी पक्ष्यांचे दर्शन येथे घडणार आहे. पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाची अनुभूती देणाऱ्या प्रशस्त आणि सुरक्षित पक्षीशाळांमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.हे पक्षी उद्यान केवळ पर्यटन केंद्र न राहता, जैवविविधता व पक्षी संवर्धनाविषयी जनजागृती करणारे शाश्वत पर्यावरण-शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. यासोबतच चित्रपट व छायाचित्रण, जाहिरात, कॉर्पोरेट प्रायोजकत्व, पक्षी व बाग दत्तक योजना, स्मृतिप्रतीके दुकान व उपाहारगृह (रेस्टॉरंट) भाड्याने देणे अशा विविध माध्यमांतून महसूल निर्मितीची योजना राबवून प्रकल्प स्वयंपूर्ण करण्याचा महानगरपालिकेचा मानस असल्याचे संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.दुर्मिळ प्रजातींचा समावेशया पक्षी उद्यानामध्ये ऑस्ट्रेलियन, आफ्रिकन, अमेरिका आणि विशेष तितर क्षेत्र अशा विषयाधारित जागतिक विभागांची संकल्पना राबवली जाणार आहे. यामध्ये गलाह कॉकॅटू, एक्लेक्टस पोपट, सन कॉनूर, गोल्डन कॉनूर, सेनेगल पोपट, जार्डिन पोपट, शहामृग, टोको टूकान, स्कार्लेट मकाऊ, गोल्डन व सिल्व्हर फीझंट आदी तेजस्वी आणि दुर्मिळ प्रजातींचा समावेश असेल.पक्ष्यांच्या नैसर्गिक वर्तनाला आणि संवर्धनाला हातभारप्रत्येक पक्ष्याच्या नैसर्गिक वातावरणाशी सुसंगत अशी स्वतंत्र संलग्नके उभारण्यात येणार आहेत. यामुळे पक्ष्यांच्या नैसर्गिक वर्तनाला चालना मिळेल आणि संवर्धनाला हातभार लागेल. तसेच पक्ष्यांसाठी स्वतंत्र रुग्णालय, विलगीकरण (क्वारंटाईन) क्षेत्र, ‘बर्ड किचन’ आणि अंतर्गत सेवा रस्त्यांसह पशुवैद्यकीय व देखभाल पायाभूत सुविधाही देण्यात येणार आहेत.
अखेर मुलुंड अगरवाल रुग्णालय लोकांसाठी होणार खुले
रविवारी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लोकार्पणमुंबई : मुंबई महानगरपालिका संचालित मनसादेवी तुलसीराम अगरवाल सर्वसाधारण रुग्णालयाच्या मुलुंड (पश्चिम) मधील नवीन इमारतीचे बांधकाम आता पूर्ण झाले असून आता याचे लोकार्पणही होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उद्या रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ऑनलाइन होणार आहे.उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार; कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, स्थानिक खासदार संजय दिना पाटील, स्थानिक आमदारमिहिर कोटेचा, आमदार सुनील शिंदे, आमदार राजहंस सिंह आणि महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्यासह विविध मान्यवरांची या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती असणार आहे.अगरवाल सर्वसाधारण रुग्णालयाचा प्रारंभ २ ऑक्टोबर १९५८ रोजी करण्यात आला होता. प्रारंभी २५ रुग्णशय्यांसह वैद्यकीय सेवा सुरु झाल्यानंतर काळानुसार रुग्णशय्यांची संख्या वाढली, वैद्यकीय सेवांचा विस्तारही झाला. पण, रुग्णालयाच्या दोन्ही इमारती मोडकळीस आल्याने सन २०१७ मध्ये या इमारती पाडण्यात आल्या होत्या. तसेच रुग्णालयातील वैद्यकीय सेवा तीन ठिकाणी विभाजित करुन स्थलांतरित करण्यात आल्या. टी विभाग कार्यालयाजवळील विस्तारित इमारत, आर मॉलमधील ऍम्युनिटी इमारत तसेच शालेय इमारत यांचा यामध्ये समावेश होता.यानंतर, रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम २०१९ मध्ये प्रत्यक्ष सुरु करण्यात आले. मुलुंड (पश्चिम) मध्ये कदमपाडा परिसरात सुमारे ९ हजार ७१२ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर तळमजला अधिक दहा मजले अशी नवीन इमारत उभारण्यात आली आहे. यामध्ये एकूण बांधकाम क्षेत्र हे सुमारे ५९ हजार ०४५ मीटर इतके करण्यात आले आहे. परिणामी रुग्णालयाची क्षमता आता ४७० रुग्णशय्या इतकी झाली आहे. यामध्ये सर्वसाधारण आरोग्य सेवेसाठी ३१० रुग्णशय्या तर अतिविशेष सेवेसाठी १६० रुग्णशय्या राहणार आहेत. या सर्व रुग्णशय्या टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केल्या जाणार आहेत.महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांच्या देखरेखीखाली ही इमारत पूर्णत्वास आली आहे. सर्वसाधारण सेवेचा विचार करता, सद्यस्थितीत उपलब्ध ११० रुग्णशय्यांसाठी सर्व आरोग्य सुविधा पुरवल्या जातील. यामध्ये वैद्यकीय, शल्यचिकित्सा, अस्थिव्यंग, कान-नाक-घसा, नेत्र, बालरोग, त्वचाविकार, दंतरोग, रक्तदाब-मधुमेह, प्रयोगशाळा इत्यादी समाविष्ट आहेत. दुसऱ्या टप्प्यात ११५ रुग्णशय्या कार्यान्वित होतील. त्यामध्ये डीएनबी स्पेशालिटी वैद्यकीय तज्ज्ञांकडून सेवा पुरवण्यात येतील. तर तिसऱ्या टप्प्यात ८५ रुग्णशय्या कार्यान्वित होतील. त्यात डीएनबी सेवेचा विस्तार करुन स्त्रीरोग व प्रसूती सेवा पुरवली जाईल. येत्या सहा महिन्यात सीटी स्कॅन, एमआरआय, रक्त पेढी, डायलिसिस, आयसीयू, एनआयसीयू या सर्व सेवा सुरु करण्यात येणार आहेत. अतिविशेष आरोग्य सेवाही टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये कार्डियोलॉजी, कार्डिओव्हॅस्कुलर सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, नेफ्रोलॉजी, यूरो सर्जरी व इतर सुपर स्पेशालिटी सेवांचा समावेश राहणार आहे.
PMC Election: शिवसेनेतच उभी फूट? भाजपसोबत युतीवरून दोन बडे नेते आमनेसामने; कार्यकर्ते गोंधळात
प्रभात वृत्तसेवा पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत युती करायची की स्वतंत्र लढत द्यायची, यावरून शिंदे शिवसेनेतच स्पष्ट दोन गट निर्माण झाले आहेत. शहराध्यक्ष नाना भानगिरे हे युतीच्या बाजूने ठाम भूमिका घेत असताना, महानगर प्रमुख रविंद्र धंगेकर यांनी अधिक जागांची मागणी करत स्वतंत्र लढतीची तयारी दर्शविली आहे. या परस्पर विरोधी भूमिकांमुळे शहर शिवसेनेत संघटनात्मक […] The post PMC Election: शिवसेनेतच उभी फूट? भाजपसोबत युतीवरून दोन बडे नेते आमनेसामने; कार्यकर्ते गोंधळात appeared first on Dainik Prabhat .
पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टी आपल्या गँगस्टर टेरर मॉड्यूलद्वारे भारताच्या विरोधात धोकादायक कट रचत आहे. हा तोच शहजाद आहे, जो एकेकाळी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा सर्वात जवळचा मित्र होता. पहलगाम हल्ल्यानंतर लॉरेन्सने हाफिज सईदला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शहजाद भट्टी लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीचा शत्रू बनला. या नोव्हेंबरमध्ये शहजादने लॉरेन्सचा भाऊ अनमोलला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने म्हटले, ‘बुलेटप्रूफ गाडीही वाचवू शकणार नाही, त्याला जे करायचे ते करू दे.’ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहजाद आता आयएसआयच्या इशाऱ्यावर निष्क्रिय झालेल्या स्लीपर सेलला सक्रिय करण्यात गुंतला आहे. लॉरेन्स टोळीसोबत काम करून शहजाद त्याच पद्धती वापरून गँगस्टर-टेरर मॉड्यूल चालवत आहे. तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI च्या सांगण्यावरून भारतीय तरुणांना लक्ष्य करत आहे. त्याच्या निशाण्यावर कमी शिकलेले आणि गरीब वर्गातील लोक आहेत. हे 30 नोव्हेंबर रोजी पकडलेल्या शहजाद भट्टीच्या तीन साथीदारांच्या आणि त्याच्या नेटवर्कच्या चौकशीतून उघड झाले आहे. आता इंटेलिजन्स ब्युरो देखील स्लीपर सेल सक्रिय करण्याच्या दृष्टिकोनातून शहजाद भट्टीची चौकशी करत आहे. शहजादचे हे मॉड्यूल कसे काम करत आहे? तो सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोईच्या धर्तीवर व्हिडिओ आणि शस्त्रे टाकून तरुणांना कसे लक्ष्य करत आहे. दैनिक भास्करने याची पडताळणी केली. सोशल मीडियावर कोडवर्ड 333 सह अनेक खाती, व्हिडिओ कॉलवर फॉलोअर्सशी संवादशहजाद भट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना लक्ष्य करत आहे. याचा खुलासा त्याच्या 3 साथीदारांनी केला आहे, ज्यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गेल्या महिन्यात अटक केली होती. हे तिघे इंस्टाग्रामच्या माध्यमातून शहजाद भट्टीच्या संपर्कात आले होते. शहजादच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बहुतेक फॉलोअर्स भारतातील तरुण आहेत. तपासादरम्यान आम्हाला शहजाद भट्टीच्या नावाने अनेक इंस्टाग्राम खाती मिळाली. त्याची काही खाती सक्रिय आहेत, पण अलीकडेच त्याने अनेक खाती बंद केली आहेत. अनेक खात्यांवर तो वेगवेगळ्या नावांनी आहे. सोशल मीडियावर बहुतेक खाती 333 या कोडवर्डने आहेत. शहजाद ऑक्टोबर 2025 पासून सक्रिय असलेल्या एका अकाउंटवर सतत तरुणांना गँगस्टर टेरर मॉड्यूलमध्ये सामील करण्यासाठी पोस्ट करत आहे. तरुणांसाठी त्याने 'ट्यूशन बदमाशी का' यांसारख्या गाण्यांवर रील बनवून पोस्ट केली आहे. याच अकाउंटवरून त्याने लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईला धमकी देणारा व्हिडिओ देखील पोस्ट केला होता. त्यानंतरच 27 ऑक्टोबर रोजी अनमोलने वकिलांमार्फत कोर्टात अर्ज दाखल केला. त्याने दावा केला होता की पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीकडून त्याच्या जीवाला धोका आहे. शस्त्रे आणि महागड्या गाड्या दाखवून युवकांना फसवत आहेशहजाद भट्टीने स्वतःला UAE चा रील क्रिएटर सांगून इंस्टाग्राम प्रोफाइल तयार केले आहे. यात दुबईच्या नंबर असलेल्या लक्झरी गाड्यांमध्ये रील बनवतानाचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. यासोबतच शस्त्रांचेही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. टिकटॉकवरही तो व्हिडिओ पोस्ट करतो. आम्हाला असे अनेक व्हिडिओही मिळाले आहेत, ज्यामध्ये शहजाद व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसत आहे. तो विशेषतः युवकांना शस्त्रे दाखवून नेटवर्कचा भाग बनवण्यासाठी जाळे टाकत आहे. युवक त्याच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्रोफाइलवर मेसेज करून संपर्क साधत आहेत. आता जाणून घ्या दिल्ली पोलिसांचे स्रोत काय म्हणत आहेत…शहजाद आणि त्याची टोळी लोकांना कसे लक्ष्य करते, हे समजून घेण्यासाठी आम्ही दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमध्ये आमच्या स्रोतांशी आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांशी बोललो. आम्ही शहजादची भारतातील तरुणांना लक्ष्य करण्याची कार्यपद्धती (मोड्स ऑपरेंडी) समजून घेतली. आम्हाला दोन मुख्य लक्ष्ये समजली. पहिले लक्ष्यगरीब, कमी शिकलेले तरुण, लहान स्फोटांद्वारे स्लीपर सेल सक्रिय करणे हा उद्देशशहजाद भट्टी भारतात गरीब आणि कमी शिकलेल्या, प्रत्येक धर्माच्या तरुणांना लक्ष्य करत आहे, जे गुन्हेगारी नेटवर्कमध्ये सामील होण्याची इच्छा दर्शवतात. त्यांना 4-5 हजार रुपये आणि शस्त्रे देऊन कुठेही हँड ग्रेनेड फेकायला लावले जाऊ शकतात. शहजाद भट्टी या तरुणांचा वापर फक्त एक किंवा दोनदाच करतो. पोलिस सूत्रांनी याचा उद्देश सांगितला आहे, ‘शहजाद भट्टीच्या दहशतवादी मॉड्यूलमध्ये उपस्थिती आणि दहशतीची चर्चा व्हावी. यानंतर, भारतात ISI चे अनेक वर्षांपासून निष्क्रिय झालेले स्लीपर सेल देखील संपर्कात यावेत, ज्यांना येत्या काळात मोठ्या लक्ष्यांसाठी सक्रिय केले जाऊ शकेल.’ दुसरे लक्ष्यलॉरेन्स-अनमोल बिश्नोईला आव्हान देऊन नवीन गँगस्टर-दहशतवादी मॉड्यूल तयार करणेसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्सपासून वेगळे झाल्यानंतर शहजाद भट्टी भारतात आपले नेटवर्क उभे करू इच्छितो. याचे एक कारण असेही आहे की, ISI आता बांगलादेशींचा वापर नेटवर्क वाढवण्यासाठी करू इच्छित नाही, कारण भारतात घुसखोर आणि बांगलादेशींविरोधात सतत मोहीम सुरू आहेत. त्यामुळे ISI देखील शहजाद भट्टीच्या माध्यमातून भारतातील तरुणांचा वापर करू इच्छिते. पाकिस्तानने भारतीय सीमेत शस्त्रे आणि अंमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी आधी शहजाद भट्टीच्या माध्यमातून लॉरेन्स टोळीचा वापर केला. आता दोघे वेगळे झाल्यानंतर शहजाद स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून हे नेटवर्क चालवत आहे. त्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांना जोडण्यासाठी सोपा मार्ग शोधला आहे. तो लॉरेन्स आणि त्याचा भाऊ अनमोल यांना थेट धमकी देतो जेणेकरून तो चर्चेत राहील. दुसरी गोष्ट म्हणजे अशा तरुणांना लॉरेन्स टोळीचा पर्यायही मिळत आहे. त्यामुळे शहजाद भट्टी सोशल मीडियावर सतत भडकाऊ व्हिडिओ पोस्ट करत आहे. 17 ते 25 वयोगटातील तरुण शहजाद भट्टीच्या निशाण्यावर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 30 नोव्हेंबर रोजी शहजाद भट्टीसाठी भारतात सक्रिय असलेल्या तीन साथीदारांना अटक केली. या तिघांचे वय 19 ते 23 वर्षांच्या दरम्यान आहे. तिघेही वेगवेगळ्या राज्यांतून होते. तिघांचे धर्मही वेगवेगळे होते, पण त्यांच्यात दोन गोष्टी समान होत्या. पहिली: त्यांची गरिबी आणि कमी शिक्षण. त्यापैकी एक मजूर आहे.दुसरी: तिघेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामद्वारे शहजादच्या संपर्कात आले. अशा लक्ष्यांना शहजाद फक्त डिस्पोजेबल फुट सोल्जर्सप्रमाणे वापरतो. म्हणजे, त्यांना एकदा वापरून सोडून देतो. त्यामुळे त्याला अशा लोकांचा शोध असतो ज्यांना तात्काळ पैशांची गरज असते. अमृतसरमध्ये हेरगिरी केली, गुरदासपूर पोलीस स्टेशनबाहेर ग्रेनेड हल्ला घडवलास्पेशल सेलचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रमोद कुशवाहा यांनी सांगितले की, विकास प्रजापती मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील एका धान्य मंडईत आधी मजुरी करत होता. त्याला रोजंदारीवर पैसे मिळत होते. तो कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या लोभाने गँगस्टर बनू इच्छित होता. त्याने आधी लॉरेन्स गँगशीही संपर्क साधला, पण गोष्ट जमली नाही. यानंतर त्याने इन्स्टाग्रामद्वारे शहजाद भट्टीशी संपर्क साधला. मग तो शहजाद भट्टीशी टेलिग्राम आणि इतर सोशल नेटवर्किंग ॲप्सवर चॅट करू लागला. शहजादने त्याला लवकर पैसे कमावण्याचे आमिष दाखवून शस्त्रपुरवठा आणि हल्ला करण्यासाठी तयार केले. यासाठी केवळ 4 ते 5 हजार रुपयांमध्ये बोलणी निश्चित झाली. त्याला सांगण्यात आले की गुरदासपूरमध्ये एक पार्सल मिळेल. तिथे एका जुन्या नेटवर्कमधून विकासला पार्सल मिळाले, ज्यात ग्रेनेड होता. यानंतर शहजाद भट्टीने त्याला स्वतः व्हिडिओ कॉलवर ग्रेनेड सक्रिय करण्याची पद्धत समजावून सांगितली. त्यानंतर त्याला सुमारे 5 हजार रुपयेही देण्यात आले. त्याच्याकडून गुरदासपूर आणि टाऊन हॉल पोलीस ठाण्यासोबत अमृतसरमध्ये हेरगिरी करवून घेण्यात आली. यानंतर दुसऱ्या साथीदार हरगुनप्रीत सिंग आणि त्याच्या साथीदाराला हँड ग्रेनेड देऊन गुरदासपूर पोलीस स्टेशनबाहेर फेकण्याची माहिती दिली. हरगुनप्रीत 12वीपर्यंत शिकलेला आहे. तो देखील सोशल मीडियाच्या माध्यमातूनच शहजादच्या संपर्कात आला होता. त्यानेच 25 नोव्हेंबर रोजी गुरदासपूर पोलीस स्टेशनबाहेर ग्रेनेड फेकला होता. अतिरिक्त पोलीस आयुक्तांनुसार, उत्तर प्रदेशातील बिजनौरचा रहिवासी आसिफ सुमारे अडीच महिन्यांपूर्वीच इंस्टाग्रामच्या माध्यमातून शहजाद भट्टीच्या संपर्कात आला होता. शहजादने विकास प्रजापतीशी त्याचा संपर्क करून दिला. त्याला आणखी काही मोठी जबाबदारी देण्याची तयारी होती, पण त्याआधीच पोलिसांनी त्याला पकडले. स्वतःला पाकिस्तानचा सैनिक सांगणारा शहजाद कोण आहे?शहजाद भट्टी स्वतःला पाकिस्तानचा सैनिक सांगतो. तो आयएसआयच्या इशाऱ्यावर भारतविरोधी कारवाया करतो. आधी लॉरेन्ससाठी काम करत होता. नंतर गँगस्टर फारूक खोखरशी जोडला गेला. लॉरेन्सशी शत्रुत्व झाल्यावर तो आयएसआयच्या संपर्कात आला. आयएसआयच्या इशाऱ्यावर शहजाद भारतात शस्त्रांची तस्करी करू लागला. 2022-23 मध्ये तो अधिक सक्रिय झाला आणि सध्या दुबईत आहे. तो ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानमधून भारताच्या सीमेत अवैध शस्त्रे, हँड ग्रेनेडपासून ते ड्रग्जच्या पुरवठ्यात सामील आहे. त्याचे भारताव्यतिरिक्त अमेरिका आणि कॅनडामध्येही नेटवर्क आहे. गेल्या वर्षीच त्याने व्हिडिओ कॉलवर लॉरेन्सला ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येमध्ये वापरलेल्या शस्त्रांचा पुरवठा केल्याचा आरोप शहजाद भट्टीवरच आहे. मुंबईतील बाबा सिद्दीकी हत्याकांडात सामील असलेल्या जीशान अख्तरला भारतातून पळून जाण्यासाठी शहजाद भट्टीने मदत केली. त्याला अझरबैजानमध्ये पोहोचवून स्थायिक केले. गेल्याच महिन्यात त्याने अनमोल बिश्नोईला धमकी दिली होती आणि म्हटले होते की, 'बुलेटप्रूफ गाडीही त्याला वाचवू शकणार नाही, तो जे काही करू शकतो.' या धमकीची सुरक्षा यंत्रणांनी गंभीर दखल घेतली. NIA आता अनमोल बिश्नोईला पटियाला कोर्टात घेऊन जात नाहीये. कॉन्फरन्सिंगद्वारेच कोर्टात त्याची सुनावणी करत आहे. अनमोल बिश्नोईच्या गँगस्टर-टेरर नेटवर्कमध्ये उच्चभ्रूंचा सहभाग असल्याचा संशयअनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले. तो सध्या NIA च्या ताब्यात आहे. त्याच्यावर खून आणि खंडणी वसुलीच्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. विशेषतः फंडिंग आणि गँगस्टर-टेरर मॉड्यूलची चौकशी केली जात आहे. यामध्ये मुंबईतील बाबा सिद्दीकी खून प्रकरण, सिद्धू मूसेवाला खून प्रकरण आणि सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याच्या घटनेचीही चौकशी समाविष्ट आहे. अनमोलवर 22 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो 2022 मध्येच बनावट पासपोर्ट वापरून भारतातून परदेशात पळून गेला होता. तेव्हापासून NIA ने त्याला 'वॉन्टेड' घोषित केले होते. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2025 रोजी त्याला अमेरिकेतून हद्दपार करून भारतात पाठवण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंतच्या तपासात NIA ला हवालामार्फत अमेरिका, कॅनडा, थायलंड आणि भारत यांच्यातील गँगस्टर-दहशतवादी फंडिंगच्या नेटवर्कबद्दल अनेक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. याच माध्यमातून त्यांच्या नेटवर्कशी संबंधित अशा लोकांची ओळख पटवली जात आहे, जे प्रतिष्ठित (सफेदपोश) आहेत. या प्रतिष्ठित लोकांशी संबंधित गोपनीय माहितीही तपास यंत्रणा गोळा करत आहेत. येत्या काही दिवसांत दिल्ली पोलीस क्राईम ब्रांच, पंजाब पोलीस आणि त्यानंतर मुंबई पोलीसही अनमोल बिश्नोईला रिमांडवर घेऊन चौकशी करू शकतात.
PMC Election: विना मुलाखत थेट तिकीट? राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; नेमकं कारण काय?
प्रभात वृत्तसेवा पुणे : आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुकांची नावे मागविली आहेत. त्यानंतर हे अर्ज जवळपास आठवडभर स्विकारले जाणार असून त्यानंतर इच्छुकांच्या प्रभागनिहाय मुलाखती घेतल्या जाणार आहेत.मात्र, येत्या तीन ते चार दिवसांतच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, अनेक राजकीय पक्षांचे अर्ज स्विकारणे आणि मुलाखतींचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुतांश पक्षांना आता अर्जांवरूनच […] The post PMC Election: विना मुलाखत थेट तिकीट? राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; नेमकं कारण काय? appeared first on Dainik Prabhat .
एकुलता एक आधार गेला, पण कायद्याचा दिलासा; पीएमपी बस अपघातातील मृताच्या पालकांना २० लाखांची मदत
प्रभात वृत्तसेवा पुणे – पीएमपीएल बसची धडक बसून झालेल्या अपघातात एकुलता एक २२ वर्षीय अपंग मुलगा गमावलेल्याकुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. लोकअदालतीमध्ये तडजोडीअंती दावा निकाली काढत २० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय झाला आहे. लोकअदालतीमध्ये न्यायाधीश सी. पी. भागवत आणि अॅड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनेलसमोर हा दावा निकाली निघाला. अर्जदाराचे वकील अॅड. विकी नवले आणि विमा […] The post एकुलता एक आधार गेला, पण कायद्याचा दिलासा; पीएमपी बस अपघातातील मृताच्या पालकांना २० लाखांची मदत appeared first on Dainik Prabhat .
14 डिसेंबर 1931 म्हणजे आजपासून बरोबर 94 वर्षांपूर्वी. बंगालमधील इंटेलिजन्स ब्युरो कार्यालयात एक गोंधळाची आणि गडबडीची परिस्थिती होती. पोलिसांसमोर 14 आणि 15 वर्षांच्या दोन मुली होत्या, ज्यांनी काही तासांपूर्वीच एका इंग्रज डीएमला घरात घुसून गोळ्या घातल्या होत्या. निर्भय मुलींनी कबूल केले- आम्ही भगतसिंगांच्या फाशीचा बदला घेण्यासाठी डीएमचा वध केला आहे. या घटनेच्या 95 व्या वर्धापनदिनानिमित्त जाणून घ्या इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली स्वातंत्र्यलढ्याची एक अनोखी गाथा... साल 1929. बंगालमधील चिटागोंग (चटगाव) येथील कोमिला तालुक्याच्या एका शाळेत 12 वर्षांची सुनीती चौधरी शिकत होती. ती आपल्या आजूबाजूला स्वातंत्र्यसैनिकांचा विरोध आणि इंग्रजांचे अत्याचार पाहत असे आणि अस्वस्थ होत असे. याच दिवसांत सुनीतीची भेट शाळेतील वरिष्ठ शांती घोष यांच्याशी झाली, ज्यांनी त्याच वर्षी 'छात्री संघ'ची स्थापना केली होती. जेणेकरून मुलीही देशाच्या लढ्यात योगदान देऊ शकतील. शांती वयाने दोन वर्षांनी मोठ्या प्रफुल्ल नंदिनी ब्रह्मा यांच्या संपर्कात होती, जुगांतर पक्षाच्या सदस्य होत्या. जुगांतर पक्ष एक गुप्त संघटना होती, जी शस्त्रांच्या बळावर इंग्रजांना भारतातून हाकलून देऊ इच्छित होती. नंदिनी ब्रह्मा यांनी छात्री संघातील मुलींना लाठी चालवणे, चाकू आणि तलवार चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. शांती आणि सुनीती आता शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यासोबतच अशी पुस्तके आणि साहित्य वाचू लागल्या, जी इतर क्रांतिकारकांचे पराक्रम सांगत होती. सरकारने असे साहित्य प्रतिबंधित केले होते, तरीही या गुप्त संस्थेत सर्व काही उपलब्ध होते. सुनीतीला सर्वाधिक प्रभावित केले होते ते बॉम्ब बनवण्यात निष्णात असलेल्या उल्लासकर दत्त यांनी. दत्त कलकत्त्याच्या प्रेसिडेंसी कॉलेजमध्ये रसायनशास्त्राचे विद्यार्थी होते, पण बंगाली लोकांची निंदा करणाऱ्या एका प्राध्यापकाला धक्का देऊन पाडल्यामुळे त्यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आले होते. सन 1908 मध्ये मुझफ्फरपूर येथील मानिकटोला बॉम्बकांडात खुदीराम बोस आणि अरविंद घोष यांच्यावर खटला चालवण्यात आला होता. या कांडासाठी दत्त यांनी बॉम्ब बनवला होता, ज्यासाठी त्यांना अंदमानच्या तुरुंगात 12 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली. दत्त यांच्याकडून प्रेरणा घेऊन सुनीतीने दारूगोळा, बॉम्ब समजून घेण्यास सुरुवात केली. युगांतर पक्षात पुरुष हल्ले करत आणि भूमिगत होत असत. छात्री संघातील ज्या सर्वात हुशार मुली होत्या, त्यांना पुरुष क्रांतिकारकांना माहिती, पैसे आणि शस्त्रे पुरवण्याची जबाबदारी मिळाली होती. पण ब्रह्मा, शांती आणि सुनीती यांनीही आघाडीवर जाण्याची मागणी केली. सुनीतीचा युक्तिवाद होता की, जर त्यांना कृती करण्याची संधीच मिळाली नाही, तर लाठी, तलवार चालवण्याचे औचित्यच काय? शेवटी, भूमिगत ज्येष्ठ नेते वीरेंद्र भट्टाचार्य यांनी या तिन्ही मुलींची गुप्त मुलाखत घेतली आणि त्यांना व्यावहारिक प्रशिक्षणाची परवानगी दिली. त्रिपुरा छात्र संघाचे अध्यक्ष अखिल चंद्र नंदी यांनी त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. रोज त्या घरातून शाळेसाठी निघायच्या, पण शाळेऐवजी शहराच्या वस्तीपासून दूर असलेल्या मैनमती टेकडीवर बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण घेऊ लागल्या. प्रशिक्षक नंदीसमोर आव्हान होते की, या मुली रिव्हॉल्व्हरचा धक्का सांभाळू शकतील का. सुनीतीच्या हातात लहान बेल्जियन रिव्हॉल्व्हर आले तेव्हा कळले की तिचे तर्जनी बोट ट्रिगरपर्यंत पोहोचत नव्हते. सुनीतीने मधल्या बोटाने बंदूक चालवण्याचा सराव केला. याच दरम्यान 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग यांना फाशी देण्यात आली. त्यांच्यावर हत्या आणि कोर्टात बॉम्ब फेकल्याचा आरोप होता. फाशीवर जाण्यापूर्वी भगतसिंग म्हणाले होते की खरी क्रांतिकारी सेना तर भारताच्या गावांमध्ये आणि कारखान्यांमध्ये आहे. याच क्रांतिकारकांमध्ये शांती आणि सुनीती देखील होत्या, ज्यांनी इंग्रजांकडून सूड घेण्याचा निश्चय केला. 6 मे 1931 रोजी त्रिपुरा जिल्हा छात्री संघाच्या वार्षिक परिषदेत नेताजी सुभाषचंद्र बोस प्रमुख पाहुणे होते. मुलींच्या संचलनाचे नेतृत्व सुनीती करत होत्या. संचलनानंतर सुनीतीला शस्त्रे चालवण्यात प्रशिक्षित मुलींची प्रमुख बनवण्यात आले आणि अग्निशस्त्रांची जबाबदारीही तिला देण्यात आली. संचलनानंतर ब्रह्माने नेताजींना विचारले की युद्धात महिलांचे कर्तव्य काय असावे. नेताजी म्हणाले, ‘तुम्हाला आघाडीवर पाहून मला खूप आनंद होईल.’ जेव्हा शांतीने नेताजींकडे स्वाक्षरी मागितली, तेव्हा त्यांनी लिहून दिले, ‘हे मातृशक्ती, तुमच्या सन्मानासाठी तुमच्या हातात शस्त्र उचला.’ 6 मार्च 1930 रोजी चार्ल्स ज्योफ्री बकलँड स्टीव्हन्स नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याला त्रिपुरा जिल्ह्याचा जिल्हा दंडाधिकारी बनवण्यात आले. याचाच एक उपविभाग कोमिला होता. याच दरम्यान 12 मार्च 1930 रोजी देशभरात गांधीजींचे मीठ सत्याग्रह सुरू झाले. 4 मे रोजी गांधीजींना अटक करण्यात आली. सरकारने देशभरात क्रांतिकारकांना अटक करण्यास सुरुवात केली. स्टीव्हन्स फक्त अटक करण्यावर थांबला नाही. त्याने निशस्त्र स्वातंत्र्यसैनिकांना छळायला सुरुवात केली. पोलिसांना स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील महिलांवर अत्याचार करण्याची मुभा दिली. महिलांवर बलात्कार केल्याचेही आरोप झाले. आपल्या सुरक्षेच्या नावाखाली त्याने ऑफिसला जाणे सोडून दिले आणि पोलिसांच्या संरक्षणात बंगल्यातूनच छळाचे फर्मान जारी करत राहिला. स्टीव्हन्सवर स्वतःही महिलांच्या शारीरिक शोषणाचे आरोप लागले होते. कोमिलामध्ये जुगांतर पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता स्टीव्हन्सला मारण्यास तयार होता, पण त्याच्या बंगल्यात प्रवेश करणे अत्यंत कठीण होते. शांती आणि सुनीतीने स्टीव्हन्सला मारण्याची जबाबदारी स्वतः घेतली. 14 डिसेंबर 1931. डीएमच्या बंगल्याबाहेर रस्त्यावर एक बैलगाडी थांबते आणि त्यातून हसतमुख शांती आणि सुनीती उतरून सुरक्षा रक्षकांपर्यंत पोहोचतात. शरीरयष्टी आणि पेहरावावरून त्या शाळेतील विद्यार्थिनीच वाटत होत्या. रक्षकाकडून त्यांनी स्टीव्हन्सला भेटण्याची परवानगी मागितली. कारण विचारल्यावर त्यांनी नम्रपणे इंग्रजीमध्ये लिहिलेले एक अर्जपत्र दाखवले. आपल्या शाळेत जलतरण स्पर्धा आयोजित करण्याची परवानगी घेण्यासाठी साहेबांना भेटणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांना शाळेतील मुलींवर कोणताही संशय आला नाही. त्यांची झडती न घेता त्यांना बंगल्यात जाऊ दिले. स्टीव्हन्स आपल्या कार्यालयात त्यांचे उपविभागीय अधिकारी नेपाळ सेन यांच्यासोबत बसले होते. बाहेर बसलेल्या शिपायाला त्यांनी एक चिठ्ठी साहेबांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली. चिठ्ठी वाचून दोघे बाहेर आले. शालच्या आत दोघांनी प्रत्येकी एक रिव्हॉल्व्हर लपवले होते हे कोणालाच माहीत नव्हते. डीएम साहेबांना त्यांनी 'योर मॅजेस्टी' असे संबोधले. अर्जावर दोघांनी नावे बदलून सह्या केल्या होत्या. गोळी मारल्यानंतर त्या वाचून पळून जातील अशी कदाचित त्यांना आशा होती. साहेबांनी जलतरण स्पर्धेला परवानगी दिली. मुलींनी हसत हसत विनंती केली की त्यांनी अर्जावर परवानगीची नोंद लिहून सही करावी. साहेब आणि सेन कार्यालयात आत गेले आणि सह्या केल्यानंतर स्टीव्हन्स एकटाच बाहेर आला. तो बाहेर आल्यावर त्याने पाहिले की मुली अत्यंत गंभीर मुद्रेत होत्या. त्यांच्या शाली उतरलेल्या होत्या आणि हातात रिव्हॉल्व्हर होते, जे त्याच्या छातीवर रोखलेले होते. डोळे न मिटता दोघींनी एकाच वेळी ट्रिगर दाबले. स्टीव्हन्स जागीच ठार झाला. गोळी चालल्याचा आवाज ऐकताच पोलिसांनी दोघींना घेरले. दोघींनी पळून जाण्याचा प्रयत्नही केला नाही. त्या मारहाण आणि छळासाठी तयार होत्या. वेदना सहन करण्यासाठी त्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून आपल्या बोटांमध्ये सुया टोचून घेत असत. त्यांना माहीत होते की त्यांच्यासोबत काय केले जाईल. त्या कोणत्याही परिस्थितीत आपल्या पक्ष आणि संघटनेचे नाव सांगणार नव्हत्या. संपूर्ण बंगालमध्ये दोघींच्या शौर्याची बातमी पत्रकांच्या माध्यमातून पसरू लागली. सुनीतिच्या मेजरच्या गणवेशातील फोटोचे लोकांनी खूप कौतुक केले. त्या फोटोवर बांगला भाषेत लिहिले होते, ‘नष्ट करण्याची ज्वाला माझ्या रक्तात धगधगत आहे.’ ही ज्वाला सरकारला नष्ट करण्याची होती. फाइल क्रमांक 223/19 तयार करण्यात आली होती. हसत, राष्ट्रगीत गात दोघी तुरुंगात गेल्या आणि कोर्टरूममध्ये 3 न्यायाधीशांना सामोरे गेल्या. आयबीच्या अहवालात नमूद आहे की, शांती आणि सुनीती हत्या केल्यानंतर शांत आणि निर्भय होत्या. कोर्टात त्यांना बसण्यासाठी खुर्ची दिली नाही, तेव्हा त्यांनी न्यायाधीशांकडे पाठ करून 9 दिवस चाललेल्या सुनावणीत उभ्या राहिल्या. त्यांना एकमेव खंत ही होती की, कोर्टाने त्यांना अल्पवयीन असल्यामुळे फाशीच्या शिक्षेऐवजी जन्मठेपेची शिक्षा दिली होती. पहिली गोळी सुनीतीने चालवली होती, त्यामुळे तिला तुरुंगातील थर्ड क्लास कोठडीत ठेवण्यात आले, जिथे चोर-उचक्क्यांना ठेवले जात असे. शांतीला सेकंड क्लास कोठडीत क्रांतिकारकांसोबत कैद करण्यात आले. सन 1939 मध्ये काँग्रेसच्या राज्य सरकारने राजकीय कैद्यांना रिहा न केल्यामुळे राजीनामा दिला. त्यामुळे 7 वर्षांच्या कैदेनंतर देशातील इतर कैद्यांसोबत दोघींनाही रिहा करण्यात आले. दोघींच्या धाडसाचा परिणाम दोघींच्या कुटुंबाला भोगावा लागला. दोघींच्या वडिलांची पेन्शन थांबवण्यात आली. सुनीतीच्या दोन्ही भावांना खटल्याशिवाय तुरुंगात ठेवण्यात आले. मोठा भाऊ तुरुंगात असतानाच धाकट्या भावाला सोडण्यात आले. घराची अवस्था दयनीय होती. धाकट्या भावाला कलकत्त्याच्या गल्ल्यांमध्ये ठेला लावण्यास भाग पाडले गेले. काही दिवसांतच त्याचा मृत्यू झाला. दोघींनी रिव्हॉल्व्हर सोडून कलम हाती घेतले होते. शांतीने बंगाली विमेन्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आणि कम्युनिस्ट पक्षाची कार्यकर्ती बनली. स्वातंत्र्यानंतर त्या काँग्रेसमध्ये आल्या आणि 1952 ते 1968 पर्यंत पश्चिम बंगालच्या विधानसभेत निवडून येत राहिल्या. सुनीती डॉक्टर बनली. त्यांनाही आमदार बनण्याचा प्रस्ताव होता, पण त्यांनी तो नाकारला. त्या आपले क्लिनिक चालवत राहिल्या आणि आपल्या लकवाग्रस्त आई-वडिलांची काळजी घेत राहिल्या. त्या आयुष्यभर लेडी माँ या नावाने ओळखल्या गेल्या. दोघींच्या जन्मात एक-एक वर्षाचे अंतर होते आणि दोघींच्या निधनातही एकाच वर्षाचे अंतर होते. 1988 मध्ये सुनीती आणि 1989 मध्ये शांती यांचे निधन झाले.
पुणे ७.१ अंश सेल्सिअस! पश्चिम पुण्यात का वाजतेय जास्त थंडी? वाचा धक्कादायक कारण
प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह जिल्ह्यात गेल्या २४ तासांत थंडीचा पारा पुन्हा अर्धा ते एक अंशाने खाली आला. त्यामुळे थंडीची लाट आणखीन तीव्र झाली आहे. शनिवारी (दि. १३) हवेली, बारामातीसह पाषाण आणि शिवाजीनगर परिसरात कडाक्याच्या थंडी आणि दाट धुके होते. या परिसरात ७ ते ८ अंशाच्या आसपास किमान तापमान होते. दौंड, तळेगाव दाभाडे आणि आंबेगाव […] The post पुणे ७.१ अंश सेल्सिअस! पश्चिम पुण्यात का वाजतेय जास्त थंडी? वाचा धक्कादायक कारण appeared first on Dainik Prabhat .
Pune Crime: ससूनमधील ‘त्या’खुनी हल्ल्याचा थरार! ३ वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात अडकला मुख्य सूत्रधार
प्रभात वृत्तसेवा पुणे – ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्यावर तलवार, कोयता आणि पिस्तुलाच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या सराईत आरोपीला बंडगार्डन पोलिसांना अटक केली. गेल्या तीन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.तम्मा उर्फ रोहीत सुरेश धोत्रे (२६, रा. वडारवाडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तुषार हनुमंत हंबीर ( ३५, रा. हडपसर) याने फिर्याद दिली […] The post Pune Crime: ससूनमधील ‘त्या’ खुनी हल्ल्याचा थरार! ३ वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात अडकला मुख्य सूत्रधार appeared first on Dainik Prabhat .
PMC Election: महाविकास आघाडी एकत्रित लढणार; महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या पहिली संयुक्त बैठक
प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेची निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी समविचारी पक्ष म्हणून महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आघाडीच्या चर्चा सुरू करण्याचे आदेश पक्षाला दिल्यानंतर पुण्यात सोमवारी (दि. १५) महाविकास आघाडीसाठी एकत्र बैठक होणार आहे. काँग्रेस भवन येथे सकाळी दहा वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती […] The post PMC Election: महाविकास आघाडी एकत्रित लढणार; महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या पहिली संयुक्त बैठक appeared first on Dainik Prabhat .
ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना फोनवर एका आठवड्यात देश सोडण्याचा अल्टिमेटम दिला होता. मादुरो यांनी याला नकार दिला, तेव्हा अमेरिकेच्या युद्धनौकांनी व्हेनेझुएलाला चारी बाजूंनी वेढा घातला. समुद्रात सुमारे 15,000 सैनिक तैनात आहेत. जमिनीवरील हल्ल्याचीही तयारी आहे. व्हेनेझुएलाच्या तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 85 लोकांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांचे म्हणणे आहे की व्हेनेझुएला या जहाजांमधून अमेरिकेत ड्रग्ज पाठवते. शेवटी ट्रम्प मादुरो यांच्या मागे का लागले आहेत? अमेरिका व्हेनेझुएलावर थेट हल्ला करेल का? आणि याच्याशी 2025 चे नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो यांचा काय संबंध आहे? जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न 1: व्हेनेझुएलाला अमेरिकेच्या युद्धनौका आणि सैनिकांनी का वेढले आहे?उत्तर: अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या किनारपट्टीवर जगातील सर्वात मोठे विमानवाहू जहाज यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड आणि त्याच्या स्ट्राइक ग्रुपला तैनात केले आहे. या ताफ्यात गाईडेड-मिसाईल डिस्ट्रॉयर युद्धनौका यूएसएस ग्रेव्हली, यूएसएस जेसन डनहॅम आणि यूएसएस सॅम्पसन यांचा समावेश आहे. ही जहाजे हवा, समुद्र आणि पाणबुडी हल्ल्यांपासून संरक्षण करण्यात माहिर आहेत. याव्यतिरिक्त पी-8ए पोसायडन विमान आणि एक हल्ला करणारी पाणबुडी देखील त्यात समाविष्ट आहे. पनामावरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर दक्षिण अमेरिकेच्या या प्रदेशात ही आतापर्यंतची सर्वात मोठी लष्करी तैनाती आहे. न्यूयॉर्क टाइम्सनुसार, सप्टेंबरपासून आतापर्यंत अमेरिकेच्या सैन्याने या भागात व्हेनेझुएलामधून येणाऱ्या जहाजांवर सुमारे 25 हल्ले केले आहेत, ज्यात किमान 85 लोकांचा मृत्यू झाला आहे. व्हेनेझुएलाला वेढण्यामागे अमेरिकेने तीन हेतू सांगितले आहेत... 1. अमेरिकेत व्हेनेझुएलामधून होणारा ड्रग्जचा पुरवठा थांबवणेट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की व्हेनेझुएलाच्या जहाजांमधून ड्रग्जची तस्करी होते आणि व्हेनेझुएलाचे ड्रग्ज तस्कर अमेरिकेत येतात. त्यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले आहे. अमेरिका त्यांच्याशी सशस्त्र संघर्ष करत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्या मते, हे हल्ले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आदेशानुसार होत आहेत. ट्रम्प त्यांना थांबवण्यासाठी प्रत्येक प्रकारच्या शक्तीचा वापर करण्यास तयार आहेत. रुबियो म्हणाले, 'जर कोणतेही जहाज ड्रग्ज घेऊन अमेरिकेकडे येत असेल, तर ट्रम्प ते उडवून देतील. राष्ट्राध्यक्ष फक्त बोलणारे नाहीत तर काम करणारे आहेत.' अमेरिकेच्या न्याय विभागाने या हल्ल्यांना योग्य ठरवत म्हटले आहे की, या ऑपरेशन्समध्ये सामील असलेल्या अमेरिकन सैनिकांना खटला चालवण्यापासून सूट मिळेल. 2. व्हेनेझुएलामधून प्रतिबंधित तेलाचा पुरवठा थांबवणे10 डिसेंबर रोजी अमेरिकेने व्हेनेझुएलाजवळच्या समुद्रात एका मोठ्या कच्च्या तेलाच्या टँकरवर कब्जा केला. त्यात भरलेल्या तेलाबद्दल जेव्हा ट्रम्पना विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले, 'हे आम्ही ठेवून घेऊ.' अमेरिकेचे ॲटर्नी जनरल बॉन्डी म्हणाले की, हे जहाज अनेक वर्षांपासून अमेरिकेच्या निर्बंधांच्या यादीत होते, कारण ते व्हेनेझुएला आणि इराणचे प्रतिबंधित तेल बेकायदेशीरपणे घेऊन जात होते. या तेलाच्या कमाईतून परदेशी दहशतवादी संघटनांना मदत केली जात होती. बॉन्डी म्हणाले की, प्रतिबंधित तेलाच्या तस्करीचे नेटवर्क संपवण्यासाठी अशी मोहीम पुढेही सुरू राहील. 3. व्हेनेझुएलाच्या बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखणेट्रम्प यांचा आरोप आहे की, व्हेनेझुएलाचे लाखो बेकायदेशीर स्थलांतरित अमेरिकेत घुसखोरी करत आहेत आणि त्यासाठी मादुरो जबाबदार आहेत. ट्रम्प म्हणाले, 'मादुरोने आपले तुरुंग आणि वेड्यांची रुग्णालये रिकामी केली आहेत, आणि कैद्यांना जबरदस्तीने अमेरिकेत पाठवले आहे.' मादुरोचे म्हणणे आहे की अमेरिका 'ड्रग्सविरुद्धचे युद्ध' हे निमित्त करून त्यांना सत्तेवरून हटवू इच्छितो आणि व्हेनेझुएलाच्या विशाल तेल साठ्यावर कब्जा करू इच्छितो. प्रश्न 2: व्हेनेझुएला खरोखरच अमेरिकेत धोकादायक ड्रग्ज तस्करांच्या संघटना पाठवत आहे का?उत्तर: सप्टेंबरमध्ये ट्रम्प म्हणाले होते की व्हेनेझुएलाच्या ज्या जहाजांवर हल्ला झाला, त्यात फेंटॅनिल, कोकेनसारख्या ड्रग्जची पांढरी पावडर होती. फेंटॅनिल हे हेरॉइनपेक्षा 50 पट अधिक शक्तिशाली सिंथेटिक ड्रग्ज आहे. हे अमेरिकेत ड्रग्जच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. ट्रम्प यांनी अलीकडेच व्हेनेझुएलाच्या दोन संघटना - ‘ट्रेन दे अरागुआ’ आणि ‘कार्टेल दे लॉस सोलेस’ यांना दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकले. ट्रम्प यांचा आरोप आहे की ड्रग्ज तस्करांच्या संघटना ‘लॉस सोलेस’चे नेते स्वतः मादुरो आहेत, तर मादुरो याचा स्पष्ट इन्कार करतात. खरं तर, 'कार्टेल दे लॉस सोलेस' ही कोणतीही संघटित टोळी नाही, परंतु हा शब्द व्हेनेझुएलामधून कोकेनच्या पुरवठ्यात मदत करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी वापरला जातो. याव्यतिरिक्त, व्हेनेझुएला जगभरातील अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये एक लहान खेळाडू आहे. तो एक संक्रमण देश म्हणून काम करतो, जिथून इतर देशांमध्ये बनवलेल्या अंमली पदार्थांची तस्करी होते. व्हेनेझुएलाचा शेजारी देश कोलंबिया हा जगातील कोकेनचा सर्वात मोठा उत्पादक आहे, परंतु ते बहुतेक कोकेन व्हेनेझुएलामधून नाही, तर इतर मार्गांनी अमेरिकेपर्यंत पाठवते. अमेरिकन ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशनच्या 2020 च्या एका अहवालानुसार, अमेरिकेत तीन-चतुर्थांश कोकेन प्रशांत महासागराच्या मार्गाने पोहोचते, तर कॅरिबियन समुद्राच्या परिसरातून एक खूप छोटा भाग अमेरिकेत पोहोचतो. असे असूनही, अमेरिकेने पॅसिफिक प्रदेशात खूप कमी हल्ले केले आहेत. जेव्हा फेंटॅनिल बहुतेक मेक्सिकोमध्ये बनते आणि जमिनीमार्गे अमेरिकेच्या दक्षिण सीमेतून आत पोहोचते. अमेरिकन ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशनच्या 2025 च्या अहवालात फेंटॅनिलच्या स्रोत देशांमध्ये व्हेनेझुएलाचा समावेश नाही. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या एका माजी वकिलाने बीबीसीला सांगितले की, अमेरिका व्हेनेझुएलाच्या नागरिकांवर पद्धतशीरपणे हल्ले करत आहे. तरीही, मादुरोवरील अंमली पदार्थांच्या तस्करीचे आरोप पूर्णपणे खोटे नाहीत. त्यांच्यावर दीर्घकाळापासून अंमली पदार्थांचे कार्टेल चालवणे, भ्रष्टाचार करणे आणि निवडणुकांमध्ये गैरव्यवहार करून सत्ता टिकवून ठेवल्याचे आरोप होत आहेत. अमेरिकेची नजर व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यांवर आहे. असा आरोप आहे की अमेरिका दीर्घकाळापासून व्हेनेझुएलामधील विरोधी पक्षाच्या सर्वात मोठ्या नेत्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो यांच्यामार्फत व्हेनेझुएलाच्या सत्तेवर नियंत्रण मिळवू इच्छित आहे. प्रश्न 3: तर काय ट्रम्प व्हेनेझुएलाच्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेत आहेत?उत्तर: तेल साठ्यांमुळे कधीकाळी 'लॅटिन अमेरिकेचे सौदी अरेबिया' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हेनेझुएलामध्ये आज गरिबी पराकोटीला पोहोचली आहे, सुमारे 80 लाख लोकांनी देश सोडला आहे. 1958 पर्यंत येथे लष्करी हुकूमशाही होती. 90 च्या दशकात तेलाच्या किमती घटल्याने व्हेनेझुएलामध्ये आर्थिक संकट आले. परिस्थिती बदलण्याच्या आश्वासनांसह 1999 मध्ये डावे नेते ह्यूगो चावेझ राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांच्या सत्तेत येताच संसदेवर नियंत्रण, मीडिया सेन्सॉरशिप आणि भ्रष्टाचाराच्या युगाचीही सुरुवात झाली. 2002 मध्ये 'सुमाते' नावाच्या एका सामाजिक संघटनेच्या बॅनरखाली मारियाने ह्यूगो चावेझच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आघाडी उघडली, ज्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लागला. असे म्हटले गेले की एलिट क्लासमधून येणारी मारिया जॉर्ज बुश म्हणजेच तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या इशाऱ्यावर काम करत होती. मे 2005 मध्ये मारिया बुश यांना भेटली आणि तिने स्वतः सांगितले की तिला एक लाख डॉलरची रक्कम मिळाली आहे. यानंतर मारिया सरकारचे लक्ष्य बनली. तेव्हापासून तिचे दोन मुलगे आणि एक मुलगी अमेरिकेतच राहतात. 2013 मध्ये चावेझच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत जिंकून त्यांचे जवळचे आणि कधीकाळी बस चालक असलेले मादुरो राष्ट्राध्यक्ष बनले. मादुरो यांच्यावरही निवडणुकांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप झाला आणि मारियाने त्यांचा विरोध केला. 2018 च्या राष्ट्रपती निवडणुकीतही मादुरोने बेकायदेशीरपणे सत्ता हस्तगत केली. तेव्हा अमेरिका आणि 50 हून अधिक देशांनी विरोधी उमेदवार जुआन गुआइडो यांना व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती म्हणून मान्यता दिली, परंतु व्हेनेझुएलावर मादुरोचेच शासन चालू राहिले. 2023 मध्ये जेव्हा मारियाला राष्ट्रपती पदासाठी अपात्र घोषित करण्यात आले, तेव्हा त्यांच्या जागी एडमंडो गोन्झालेझ राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनले. शासनाने मारियाच्या विमानांवर बंदी घातली, तेव्हा मारियाने एडमंडोसाठी संपूर्ण देशात पायी निवडणूक प्रचार केला. तरीही, 2024 च्या निवडणुकीतही मादुरो निवडणुकीत गैरव्यवहार करून राष्ट्रपती बनले, तर युरोपियन युनियन आणि इतर अनेक देशांनी एडमंडो गोन्झालेझ यांना राष्ट्रपती म्हणून मान्यता दिली आहे. निवडणूक हरल्यानंतर गोन्झालेझ यांना धमक्या मिळू लागल्या, तेव्हा ते स्पेनला निघून गेले. तर मारिया व्हेनेझुएलामध्येच राहतात. अटकेच्या भीतीने मारिया लपून राहतात. अमेरिका व्हेनेझुएलामधून तेल खरेदी करत आहे, परंतु ह्युगो चावेझच्या काळापासूनच अमेरिकेवर व्हेनेझुएलाच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. 2002 मध्ये ह्युगोला पदच्युत करण्याचा प्रयत्न झाला, ज्यात अमेरिकेचे नाव आले. मादुरोच्या काळात अमेरिका व्हेनेझुएलाबाबत अधिक कठोर बनले. 2017 मध्ये अमेरिकेने व्हेनेझुएलावर अनेक निर्बंध लादले. 2019 पासून अमेरिका मादुरोला व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती मानत नाही. याच वर्षी अमेरिकेने मादुरोला नार्को-टेररिस्ट म्हणजे बेकायदेशीर 'ड्रग्जचा व्यवसाय करणारा दहशतवादी' ठरवून त्यांच्यावर बक्षीस ठेवले होते. आता ट्रम्पने बक्षिसाची रक्कम दुप्पट केली आहे. जेव्हा मारियासह व्हेनेझुएलाच्या विरोधी नेत्यांचे अमेरिकन नेत्यांशी चांगले संबंध राहिले आहेत. त्यांच्या 'सुमाते' या संघटनेला अमेरिकन संघटना 'नॅशनल एंडोमेंट फॉर डेमोक्रसी' (NED) कडून लाखो डॉलर्सचे निधी मिळत राहिले आहे. ट्रम्प मारियाला व्हेनेझुएलाच्या विरोधाचा चेहरा मानतात. मारिया ऑगस्ट 2024 पासून लपलेल्या होत्या, परंतु जानेवारी 2025 मध्ये मादुरोच्या तिसऱ्यांदा राष्ट्रपती पदाच्या शपथविधी दरम्यान त्यांनी मादुरोविरुद्ध मोठे प्रदर्शन केले, त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावर ट्रम्प यांनी त्यांना 'फ्रीडम फायटर' म्हणत त्यांच्या सुरक्षेची मागणी केली. अमेरिकेने मारियाला राजकीय आश्रय देण्याबद्दलही सांगितले. रणनीतिकदृष्ट्या मारिया देखील अमेरिका आणि ट्रम्प यांचे कौतुक करतात. 2024 मध्ये ट्रम्प यांनी पुन्हा राष्ट्रपती निवडणूक जिंकल्यावर, मारियाने त्यांना विजयाच्या शुभेच्छा देत X वर लिहिले, 'आम्ही नेहमी तुमच्यावर विश्वास ठेवतो. अमेरिकेची लोकशाही व्हेनेझुएलासाठी प्रेरणा आहे.' अमेरिकेच्या सैन्याने व्हेनेझुएलाच्या परिसरात हल्ले केले, तेव्हा मारियाने या कारवाईचे कौतुक करत म्हटले की, व्हेनेझुएलामध्ये लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी हे आवश्यक आहे. या संघटना अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोका आहेत. न्यूज एजन्सी रॉयटर्सने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासन व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचा सत्तापालट देखील करू शकते. प्रश्न 4: तर काय अमेरिका व्हेनेझुएलावर थेट हल्ला करू शकते?उत्तर: अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, व्हेनेझुएलाविरुद्ध ऑपरेशन सुरू होऊ शकते. त्याची सुरुवात गुप्त ऑपरेशनने होऊ शकते. ट्रम्प यांनी देखील संकेत दिले आहेत की, अमेरिका व्हेनेझुएलावर जमिनीवरून हल्ला देखील करू शकते. 12 डिसेंबर रोजी ट्रम्प म्हणाले, ‘आम्ही पाण्यामार्गे येणाऱ्या 96% ड्रग्जचा नाश केला आहे, आणि आता आम्ही जमिनीमार्गे सुरुवात करणार आहोत आणि जमिनीमार्गे ते खूप सोपे आहे.’ ट्रम्प यांनी सांगितले आहे की त्यांनी 21 नोव्हेंबर रोजी मादुरो यांच्याशी फोनवर बोलणे केले होते. वृत्तानुसार, ट्रम्प यांनी मादुरो यांना एक आठवड्याचे अल्टिमेटम दिले होते की त्यांनी आपल्या कुटुंबासह व्हेनेझुएला सोडावे. मात्र, मादुरो यांनी देश सोडून सुरक्षित बाहेर पडण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. आठवडा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या आसपासची हवाई हद्द बंद करण्याचा आदेश दिला. ट्रम्प प्रशासनाने सांगितले आहे की राष्ट्रपतींकडे अनेक पर्याय आहेत, ज्यावर विचार केला जात आहे. जानकारांचे म्हणणे आहे की अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी जितक्या सैन्याची गरज आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त जवान अमेरिकेने तैनात केले आहेत. मात्र, अमेरिकेने अद्याप अधिकृतपणे हे सांगितले नाही की हल्ला कधी होईल किंवा त्याचे अंतिम लक्ष्य काय आहे. प्रश्न 5: व्हेनेझुएलावर नियंत्रण मिळवून अमेरिकेला काय फायदा होईल?उत्तर: व्हेनेझुएलाकडे सुमारे 303 अब्ज बॅरल कच्चे तेल आहे. तेथे तेल 60 पैसे प्रति लिटर म्हणजे पाण्यापेक्षाही स्वस्त विकले जाते. व्हेनेझुएलाच्या कमाईचा 90% हिस्सा इतर देशांना तेल विकूनच येतो, परंतु व्हेनेझुएला जागतिक तेलापैकी फक्त 0.8%च काढू शकते. न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, ऑक्टोबरमध्ये मादुरोने अमेरिकेला ऑफर दिली होती की व्हेनेझुएलाचे तेल आणि सोन्याचे प्रकल्प अमेरिकन कंपन्यांसाठी खुले केले जातील, परंतु ट्रम्पने ही ऑफर नाकारली होती. जूनमध्ये मारिया मचाडोनेही अमेरिकेला 1.7 लाख कोटींची ऑफर दिली होती. या ऑफरमध्ये सध्याचे 1 दशलक्ष बॅरल प्रतिदिन तेल उत्पादन वाढवून 4.7 दशलक्ष बॅरल करणे समाविष्ट आहे. शेवरॉनसारख्या अमेरिकन कंपन्या व्हेनेझुएलाच्या पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि खाणकाम प्रकल्पांचे मोठे करार मिळवू शकतात. सध्या चीन व्हेनेझुएलाच्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. त्याचा वाटा सुमारे 80% आहे. जर ट्रम्प त्यांच्या योजनेत यशस्वी झाले, तर अमेरिकेलाही स्वस्त व्हेनेझुएलाचे तेल मिळू शकते. चीनने व्हेनेझुएलाला लाखो डॉलर्सचे कर्ज देण्यासोबतच तिथे गुंतवणूकही केली आहे. रशिया व्हेनेझुएलाला शस्त्रे पुरवतो आणि सैनिकांना प्रशिक्षण देतो. इराणही व्हेनेझुएलाला तेल शुद्ध करण्यास मदत करतो. अमेरिका व्हेनेझुएलावर नियंत्रण मिळवून या देशांच्या तुलनेत या प्रदेशात आपले वर्चस्व वाढवू शकतो. प्रश्न 6: जर सत्तापालट झाला, तर व्हेनेझुएलामध्ये कोणाचे सरकार बनेल?उत्तर: सध्या मारिया मचाडो व्हेनेझुएलाच्या सर्वात मोठ्या विरोधी नेत्या आहेत. त्यांनी अनेकदा सांगितले आहे की 'व्हेनेझुएलाच्या लोकांनी त्यांना जनादेश दिला आहे आणि सत्ता परिवर्तन होऊनच राहील.' मात्र, व्हेनेझुएलामध्ये सध्या मादुरोचे सरकार आहे, ज्यांनी त्यांना फरार घोषित केले आहे. मादुरोची सत्ता गेल्यानंतर अमेरिकेच्या मदतीने मारिया स्वतः किंवा त्यांच्या समर्थनाखालील कोणत्याही नेत्याला व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती बनवू शकतात. परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ प्रोफेसर राजन कुमार म्हणतात की, मारिया सुरुवातीपासूनच व्हेनेझुएलामध्ये भ्रष्टाचारमुक्त लोकशाही सरकार स्थापन करण्याच्या बाजूने आहेत. जर मादुरो यांना पद सोडावे लागले, तर मारिया व्हेनेझुएलामध्ये निवडणुका घेतील, ज्यात त्यांच्या विजयाची पूर्ण शक्यता आहे. सध्या मारिया नॉर्वेतील ओस्लोमध्ये आहेत. गेल्या 15 महिन्यांपासून त्या निर्वासित म्हणून राहत होत्या. 10 डिसेंबर रोजी अमेरिकन स्पेशल फोर्सेस आणि खाजगी बचाव पथकाच्या मदतीने त्या रात्री उशिरा ओस्लोला पोहोचल्या होत्या.
PMC Election: काँग्रेसची महापालिका मिशन गतीमान; उमेदवारी अर्जांसाठी आणखी दोन दिवसांची मुदतवाढ
प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता पक्षाकडून येत्या मंगळवारपर्यंत (दि.१६) अर्ज स्विकारले जाणार आहेत. पक्षाकडून या पूर्वी १४ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत पक्षाकडून ७०० इच्छुकांनी अर्ज घेतले असून ५६३ अर्ज जमा करण्यात आले आहेत. […] The post PMC Election: काँग्रेसची महापालिका मिशन गतीमान; उमेदवारी अर्जांसाठी आणखी दोन दिवसांची मुदतवाढ appeared first on Dainik Prabhat .
Sawai Gandharva: सवाई गंधर्वची सुरुवात भीमपलासने; युवा सिद्धार्थ बेलमन्नूने रंगवली सुरांची सांज
प्रभात वृत्तसेवा पुणे – अब तो बडी बेर भयी, हा शांत, करुणामय असा भीमपलास आणि जा जा रे अपने मंदिरवा, या द्रुत बंदिश सादरीकरणाने सवाई गंधर्व महोत्सवाच्या सत्राला शनिवारी सुरवात झाली. बंगळूरु येथील युवा गायक सिद्धार्थ बेलमन्नू यांच्या गायनाने महोत्सवात रंगत आली. गुरू पंडीत विनायक तोरवी यांच्याकडून त्यांना किराणा, ग्वाल्हेर घराण्याचे मार्गदर्शन लाभले आहे. विलंबित […] The post Sawai Gandharva: सवाई गंधर्वची सुरुवात भीमपलासने; युवा सिद्धार्थ बेलमन्नूने रंगवली सुरांची सांज appeared first on Dainik Prabhat .
PMC Election: तीन वर्षांची तयारी, दीड मिनिटांची मुलाखत; भाजपच्या इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर
प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेची पायरी चढण्यासाठी रांगा लावून अर्ज भरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांचा शनिवारी हिरमोड झाला. ढोल-ताशा वाजवत, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शक्ती प्रदर्शन करीत फटाके फोडून मुलाखतीसाठी आलेल्या अनेकांना अवघ्या दीड ते दोन मिनिटांतच माहिती देऊन माघारी फिरावे लागले. तर, तिकीट मिळवण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून भाजपशी असलेली एकनिष्ठा, प्रभागातील कामे, जनसंपर्क, नागरिकांमधील प्रतिमा […] The post PMC Election: तीन वर्षांची तयारी, दीड मिनिटांची मुलाखत; भाजपच्या इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर appeared first on Dainik Prabhat .
PMC News: महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; निवृत्त सेवकांना मिळणार मोफत उपचार
प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महापालिकेत २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीनंतर बंद करण्यात आलेली अंशदायी वैद्यकीय सहाय योजना पुन्हा सुरू करण्यास स्थायी समितीच्या बैठकीसह मुख्यसभेतही मान्यता देण्यात आली. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत उपचारांचा मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिकेतर्फे अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसह विद्यमान व माजी नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त सेवकांसाठी अंशदायी वैद्यकीय […] The post PMC News: महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; निवृत्त सेवकांना मिळणार मोफत उपचार appeared first on Dainik Prabhat .
सांगलीच्या तासगावमध्ये हिंदकेसरी चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत पहिल्या क्रमांकाचे फॉर्च्युनरचे बक्षीस जिंकून राज्यभरात चर्चेत आलेल्या 'लखन'ची सध्या सगळीकडेच हवा आहे. लखनची सगळीकडेच चर्चा सुरू असताना त्याच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी दिव्य मराठी थेट लखनच्या गावी पोहोचले. वाचा, मराठवाड्याच्या मातीतल्या 'लखन'च्या गावातून दिव्य मराठीने केलेला हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट... बैलगाडा शर्यत प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. मराठवाड्यात बैलगाडा शर्यतीची तेवढी क्रेझ नाही. मात्र छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या करोडी गावातील मनोहर विश्वनाथ चव्हाण यांना बैलगाडा शर्यतीची चांगलीच आवड आहे. या आवडीतूनच त्यांना शर्यतीचे बैल जोपासण्याचा व त्यांना तयार करण्याचा छंद लागला. याच छंदातून मनोहर चव्हाण यांनी अडीच वर्षांपूर्वी हा चपळ लखन तब्बल साडेबारा लाख रुपयांना खरेदी केला. लखनची पैलवानासारखी बडदास्त खरेदी केल्यापासूनच त्यांनी लखनची एखाद्या पैलवानाप्रमाणे बडदास्त ठेवली. लखनला ते रोज गीर गायीचे 10 लिटर दूध व सुक्या-मेव्याचा दीड किलो खुराक देतात. याशिवाय लखनचा आराम व सरावाकडेही ते विशेष लक्ष देतात. मनोहर चव्हाणांच्या या कसदार प्रशिक्षणाखाली लखन चांगलाच तयार झाला व त्याने शर्यती जिंकण्याचा कित्ताच सुरू केला. गेल्या दोन वर्षांत त्याने अनेक शर्यती जिंकत सुमारे सव्वा कोटींची कमाई चव्हाण यांना करून दिली आहे. यात 1 फॉर्च्युनर, 16 दुचाकी व रोख रक्कम अशा बक्षीसांचा समावेश आहे. लखनने जिंकलेल्या पैशांतूनच चव्हाण यांनी पिकअप गाडी घेतली आहे. या गाडीतूनच लखन प्रवास करतो. चार वेळा हिंद केसरीचा मान डौलदार, उंच व चपळ असलेल्या लखनने 2024 मध्ये सातारा जिल्ह्यातील पेडगाव (ता.खटाव) येथील शर्यत जिंकत प्रथम हिंद केसरीचा मान मिळवला. त्या पाठोपाठ फलटणला झालेली स्पर्धा जिंकत डबल हिंद केसरीचा मान मिळवला. त्यानंतर सोलापूरच्या माळशिरस येथे 2025 मध्ये झालेल्या बैलगाडा शर्यतीत पुन्हा तिसऱ्यांदा हिंद केसरीचा मान आपल्याजवळच ठेवला. त्यानंतरपुण्यातील हवेली तालुक्यात असलेल्या वडकी इथे स्पर्धा जिंकत पुन्हा चौथ्यांदा हिंद केसरीचा मान आपल्याकडे ठेवला. तर सांगलीतील शर्यत जिंकण्यासाठी लखनला हिंगोलीच्या दांडेगावच्या साईनाथ कराळे यांच्या सर्ज्याची साथ लाभली आहे. लखनची क्रेझ, बघण्यासाठी गर्दी, रील्स होतात व्हायरल बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये लखनची वेगळीच क्रेझ आहे. लखन जिथे जातो तिथे त्याला बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी उसळते. तसेच सोशल मीडियावरही लखनच्या रील्स व्हायरल होत असतात. त्याच्या रील्सना मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळतात. सांगलीतील शर्यत जिंकल्यानंतर वेरूळ येथे शांतिगिरी महाराजांकडून आयोजित कार्यक्रमात लखनची मिरवणूक काढण्यात आली व त्याचे रॅम्प वॉकही झाले. एवढेच नाही, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जाहीर सभेतील भाषणात लखनचे तोंडभरून कौतुक केले. लखनच्या खुराकवर रोज चार हजार खर्च मनोहर चव्हाण म्हणाले की, लखनची आम्ही आमच्या घरातील सदस्य प्रमाणे काळजी घेतो त्याला सकाळी पाच व संध्याकाळी पाच असे दहा लिटर गीर गाईचे दूध देतो. यासह खारीक-खोबरे व सुका मेव्याचे लाडू बनवून त्याला देतो. त्याच्या खुराकवर रोज जवळपास चार हजार रुपये खर्च होतात असे ते म्हणाले. आज दीड कोटी इतकी किंमत लखनच्या किंमतीविषयी सांगताना मनोहर चव्हाण म्हणाले की, लखनला मागायची हिंमत कुणी करत नाही. मात्र आज जवळपास दीड कोटी रुपये इतकी लखनची मार्केट व्हॅल्यू आहे.
‘पुणे शहर लवकरच पुस्तकांची पंढरी ठरणार’- साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील
प्रभात वृत्तसेवा पुणे – ग्रंथ हे माणसाचे उत्तम मित्र असून, ते जीवनात आनंद आणि सुखाचा मार्ग दाखवतात. ग्रंथांशिवाय ज्ञानाला पर्याय नाही. पुणे शहर हे लवकरच पुस्तकांची पंढरी ठरणार असल्याचे मत सातारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी उच्च […] The post ‘पुणे शहर लवकरच पुस्तकांची पंढरी ठरणार’- साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील appeared first on Dainik Prabhat .
पुण्याच्या लोकअदालतीत गोंधळ; सामान्य नागरिकांचा संताप अनावर..नेमकं कारण काय?
प्रभात वृत्तसेवा पुणे – सेकंडहॅण्ड दुचाकी घेतली; पोलिसांच्या संकेतस्थळासह आरटीओत खातरजमा केली त्यावेळी दंड शून्य होता… पण अचानक ५ ते ७ हजारांचा जुना दंड अंगावर! लोकअदालतीत सवलतीच्या अपेक्षेने आलेल्या कुलदिप म्हस्के या तरूणाला मात्र नोटीस आली असेल तरच दंड भरता येईल असे उत्तर मिळाले. स्वतःहून दंड भरायला तयार असतानाही सवलत नाही आणि पोलीस प्रशासनासह न्यायालयाचा […] The post पुण्याच्या लोकअदालतीत गोंधळ; सामान्य नागरिकांचा संताप अनावर..नेमकं कारण काय? appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पोस्ट ऑफिसच्या फेऱ्या, लांबलचक रांगा आणि वेळखाऊ कागदोपत्री प्रक्रिया यांना आता पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय डाक विभागाने सुरू केलेल्या ‘डाकसेवा 2.0’ या अत्याधुनिक मोबाइल अॅपमुळे टपाल खात्याच्या जवळपास सर्व प्रमुख सेवा थेट स्मार्टफोनवर उपलब्ध झाल्या आहेत. याचा मोठा फायदा पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना होणार आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी विकसित करण्यात आलेले हे अॅप […] The post Post Office App: आता पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरजच नाही! मोबाईलमध्ये डाऊनलोड करा ‘हे’ ॲप..वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .
दिव्य मराठी ॲपच्या संडे पोएम मालिकेमध्ये आज चंद्रकांत देवताले यांची कविता 'वाढणारी काही देवापेक्षा कमी नव्हती'. कवितेचा अनुवाद केलाय सुप्रसिद्ध कवी प्रफुल्ल शिलेदार यांनी. आपल्या अतिशय हळव्या आणि गंभीर कवितांनी वाचकांना मंत्रमुग्ध करणारे नाव म्हणून चंद्रकांत देवताले. हिंदीतल्या 'अकविता' आंदोलनातल्या प्रमुख कवीपैंकी ते एक. चंद्रकांत देवताले यांना साहित्य अकादमीसह कविता समय सन्मान, पहल सन्मान, भवभूति सन्मान, शिखर सन्मान, माखनलाल चतुर्वेदी कविता पुरस्कार, सृजनी भारती सन्मानाने गौरवण्यात आले आहे. चंद्रकांत देवताले यांच्या ‘पत्थर फेंक रहा हूं’ कवितासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांचे 'हड्डियों में छिपा ज्वर', 'दीवारों पर ख़ून से', 'लकड़बग्घा हँस रहा है', 'रोशनी के मैदान की तरफ़', 'भूखण्ड तप रहा है', 'आग हर चीज में बताई गई थी', 'पत्थर की बैंच' हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. संबंधित वृत्त संडे पोएम:'माझ्या वर्तमानाची नोंद', 'मी सार्वकालिक सर्वत्र', 'संभ्रमाची गोष्ट' लिहिणारे सुप्रसिद्ध कवी, समीक्षक पी. विठ्ठल यांची कविता संडे पोएम:जगप्रसिद्ध स्पॅनिश कवी निकानोर पार्रा यांची ज्येष्ठ कवी-समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी अनुवाद केलेली कविता 'निरोप' संडे पोएम:सातपुड्यातल्या डोंगरवाटेचा अनुबंध शोधणारी, कवी कमलेश महाले यांची 'चांदसैली' संग्रहातली कविता...! संडे पोएम:रवी कोरडे यांच्या भुंड्या डोंगरांचे दिवस काव्यसंग्रहातली कविता... विठूच्या वाटेची भूल! संडे पोएम:अन्न शिजवायचं की घरं जाळायची, याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे...ऐकू वंसत आबाजी डहाके यांची कविता 'वास्तववाद'! संडे पोएम:सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी; ऐका विंदांची कविता! संडे पोएम:ऐका, सत्तेत जीव रमत नाही म्हणत एका ज्वालामुखीची, निर्वाणाअगोदरची पीडा सांगणारी नामदेव ढसाळ यांची कविता
भरधाव वेगाचा थरार! दुचाकीवरील ताबा सुटला आणि थेट झाडावर आदळला; तरुणाचा जागीच मृत्यू
प्रभात वृत्तसेवा खालापूर – खालापूर तालुक्यातील घोडीवली-नावंढे रस्त्यावर शुक्रवारी (दि. १२) रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पोसरी येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या झाडाला जोरदार धडक बसल्याने ही दुर्दैवी घटना घडली.अपघातात मृत तरुणाचे नाव अनिरुद्ध खानविलकर (रा. पोसरी, ता. कर्जत) असे आहे. हा तरुण खालापूरहून पोसरीकडे जात असताना घोडीवली-नावंढे गावाच्या […] The post भरधाव वेगाचा थरार! दुचाकीवरील ताबा सुटला आणि थेट झाडावर आदळला; तरुणाचा जागीच मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
Pimpri Crime: पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! २४ तासांत ८ पिस्तुले आणि ६ आरोपी जेरबंद
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश लागू असतानाही बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या आरोपींवर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने प्रभावी कारवाई करत वेगवेगळ्या तीन ठिकाणी सात पिस्तुल हस्तगत केली. तर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एक पिस्तुल हस्तगत केले. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. वाकड हद्दीतून एकास अटक वळुमाता […] The post Pimpri Crime: पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! २४ तासांत ८ पिस्तुले आणि ६ आरोपी जेरबंद appeared first on Dainik Prabhat .
Shirur News: वढू-तुळापूरचा कायापालट होणार; शासनाकडून ५३२ कोटींचा निधी मंजूर..वाचा सविस्तर
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर( शेरखान शेख ) – वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी शासनाकडून ५३२.५१ कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. या विकासामुळे वढू बुद्रुकसह आजूबाजूच्या गावांना देखील मोठा फायदा होणार असून, परिसरात आर्थिक आणि उद्योग व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. वढू बुद्रुक येथे […] The post Shirur News: वढू-तुळापूरचा कायापालट होणार; शासनाकडून ५३२ कोटींचा निधी मंजूर..वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .
Satara News: निकाल लांबल्याने धाकधूक वाढली! साताऱ्यातील पालिकांचे भवितव्य EVM मध्ये बंद; २१ ला फैसला
प्रभात वृत्तसेवा सातारा – डिसेंबर महिना सुरु झाला की, सर्वांना सरत्या वर्षाला निरोप देत नव वर्षाच्या स्वागताचे वेध लागतात. यंदा मात्र सातारा जिल्ह्यात 31 नव्हे 21 डिसेंबरला जल्लोष होणार आहे. कारण सातारा नगरपालिकेसह जिल्ह्यातील दहा पालिकांच्या निवडणुकीच्या निकालादिवशी अनेकांनी गुलाल उधळायची तयार केली आहे. त्यासाठी अवघे आठ दिवस उरले असल्यामुळे सर्व जणच दि. 21 डिसेंबरची […] The post Satara News: निकाल लांबल्याने धाकधूक वाढली! साताऱ्यातील पालिकांचे भवितव्य EVM मध्ये बंद; २१ ला फैसला appeared first on Dainik Prabhat .
स्नेहधारा : पूनम राणेइयत्ता आठवीचा वर्ग. वर्गात स्काऊट गाईडचा तास चालू होता. अनघा बाई परिसर स्वच्छता आणि पर्यावरण याविषयी माहिती देत होत्या.शाळा शहरात असूनही आजूबाजूला निसर्गरम्य परिसर होता. आजूबाजूला दाट जंगलही होते. शाळेला मोठे पटांगण होते. त्यामुळे बाईंनी उपक्रमही त्याच प्रकारचा निवडला होता. वर्गातील प्रत्येकी सहा-सहा विद्यार्थ्यांचे गट करण्यात आले होते. प्रत्येक गटाला सदाफुली, सोनचाफा, मोगरा, गुलाब, निशिगंधा अशी वेगवेगळ्या फुलझाडांची नावे दिली होती. प्रत्येक गटातील विद्यार्थी अत्यंत आवडीने आपले काम जबाबदारीने सांभाळत होते.शाळेच्या पटांगणात प्रत्येक गटाला जागा नेमून दिली होती. जागेमध्ये फुलझाडांची लागवड करायची. नावाप्रमाणे प्रत्येकाला त्या प्रकारची फुलझाडे आणून देण्यात आली होती. प्रत्येक विद्यार्थी अत्यंत जबाबदारीने आपले फुलझाड लावून त्याची काळजी घेत होते. आळीपाळीने प्रत्येक जण त्या झाडाला पाणी घालत होते. आजूबाजूला वाढलेले गवत काढून टाकत होते. असा नित्यक्रम जवळजवळ सात-आठ महिने चालला होता.एके दिवशी सदाफुली आणि गुलाब यावर अत्यंत सुंदर कळ्या आल्या होत्या. दोन दिवसांतच गुलाबी रंगाची मनमोहक आकर्षक फुले झाडांवर फुलली होती. विविध रंगांची फुलपाखरे त्या फुलांवर येऊन बसत होती. फूल कोणते आणि फुलपाखरू कोणते हे ओळखताही येणार नव्हते. खरंतर ज्या विद्यार्थ्यांचा गुलाब आणि सदाफुली हा गट होता त्यांना अत्यंत आनंद झाला होता. ते जणू आनंदाने नाचतच होते. आपण लावलेल्या झाडाला फूल आले याचा त्यांना अत्यंत आनंद झाला होता.ज्या मुलांच्या झाडाला फुले आली होती, असे विद्यार्थी शाळेतील शिक्षकांना आणून ते फूल दाखवत होते. दहा-पंधरा दिवसांतच इतर झाडानाही फुले येऊ लागली. मात्र मोगरा काही फुलला नाही. मोगरा या गटातील विद्यार्थ्यांना फार वाईट वाटले. त्यांनी बाईंना कल्पना दिली. बाई म्हणाल्या, थोडं थांबा. त्यांनाही फुले येतील. थोड्या दिवसांतच मोगऱ्याच्या हिरव्यागार झाडाला कळ्या येताना दिसू लागल्या. मोगरा गटाला अत्यंत आनंद झाला आणि एक दिवस हिरव्यागार पानातून पांढरा शुभ्र मोगरा वाऱ्यावर डोलू लागला. वाऱ्याच्या मंद झुळकेने मोगऱ्याचा सुगंध साऱ्या पटांगणात दरवळत होता.खरंतर प्रत्येकाने स्वकष्टाने लावलेल्या झाडावर फुले आली होती. मात्र काही दिवसांतच उमलून आलेली फुलं दोन-तीन दिवसांनी खाली गळून पडली. प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना फारच वाईट वाटले. मात्र बाईंनी विद्यार्थ्यांची समजूत काढली आणि म्हणाल्या, ‘‘मुलांनो प्रत्येकाचा उमलण्याचा आणि फुलून येण्याचा एक काळ ठरलेला असतो. जसा फुलांचा तसाच आपलाही.”पण त्या उमलण्याच्या काळात आपल्या कर्तृत्वाने इतरांना सुगंधित करणे हे फार महत्त्वाचे असते. आपण किती दिवस जगलो यापेक्षा कसे जगलो हे अत्यंत महत्त्वाचे असते. आपण या राष्ट्राचे नागरिक म्हणून ही गोष्ट सतत लक्षात ठेवायला हवी. सगळे विद्यार्थी बाईंचे बोलणे कान देऊन ऐकत होते. आपल्या हातून एका चांगल्या कामाची सुरुवात झाली याचे मुलांना अत्यंत समाधान वाटत होते. शाळेत येताना आणि शाळा सुटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या झाडांना पाणी घालून, नजर टाकून नंतरच शाळेतून बाहेर निघत होते.अशा प्रकारे विद्यार्थ्यांना फुलझाडांचा लळा लागला होता. पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडली होती. आपला उपक्रम यशस्वी झाला हे पाहून अनघा बाईंना फार आनंद झाला होता.तात्पर्य :- पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून मिळेल त्या ठिकाणी वृक्ष संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे.
दृढ निश्चय व दुर्दम्य इच्छाशक्ती
मनस्विनी : पूर्णिमा शिंदेदोन विषयांनी माणसाची शक्ती जागृत होते. दृढ निश्चय व दुर्दम्य इच्छाशक्तीने माणूस यशापर्यंत पोहोचतो. डोमेस्थीनिस नावाचा एक ग्रीक मुलगा होता. त्याला वक्ता होण्याची इच्छा होती. तो तोतरा होता. त्यावर मात करूनही तो रोज समुद्रावर जाऊन मोठ्या आवाजात तोंडात गारगोट्या दगड ठेवून मोठ्याने ओरडत असे. वेगवेगळे आवाज काढत असे. या सरावाने त्याने त्याच्या अडचणींवर मात केली. तो जगात सर्वश्रेष्ठ महान वक्ता होऊ शकला. असेच उदाहरण आहे एकलव्याचे. जातीव्यवस्थेमुळे एकलव्याला गुरुकुल शिक्षणासाठी प्रवेश मिळाला नाही. पण रोज गुरूकडून लपून प्रशिक्षण घेऊन एकलव्य देखील धनुर्धारी झाला.कोणी काही करो. गप्पा मारो. टीव्ही, मोबाईलवर सदानकदा असो. आपण आपले ध्येय गाठायचेच! ध्येयाने झपाटलेल्या व्यक्तीला ध्येयवेडा असल्याने तेथपर्यंत पोहोचता येते. वाट पाहू नका. सुरुवात करा. कामाला लागा. सुरुवातीसाठी हवी तशी वेळ कधीच येत नाही. मग थांबायचं कशासाठी? आहे तिथून सुरुवात करा. लक्षात ठेवा स्वतःला शक्ती आपणच देत असतो आणि स्वतःची शक्ती आपणच काढून घेतो. यशस्वी होण्यासाठी “चिकाटी” महत्त्वाची. माणूस चिकाटी सोडत नाही आणि जर चिकाटी सोडली तर तो यशस्वी होणार नाही. “सातत्य” न थकता अविरतपणे, अखंड, संपूर्ण कार्याला झोकून घ्या. शारीरिक, मानसिक शक्ती एका गोष्टीवर केंद्रित करणे ही यशासाठी लागणारी पहिली अट, असे थॉमस एडिसनने म्हटले आहे. बी पेरा, खत घाला, पाणी द्या, देखभाल करा आणि करतच राहा, देत राहा. जे द्याल तेच घ्याल. हा कर्माचा सिद्धांत आहे. ध्येय निश्चितीने पुढे चला, चालत राहा, हीच यशाची गुरुकिल्ली आहे.जगात राजा छत्रपतींचे उदाहरण घ्यायचे झाले तर त्यांच्या मेहनतीला, कष्टाला पर्याय नाही. त्यांचे ध्येय, निर्णय, शौर्य, पराक्रम, नियोजन, कृती पाहता आपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. आदर्श, मूल्य, सेवा, धर्म, राजनीती, प्रज्ञा, प्रजादक्षता, ऐक्य, आदर, अष्टप्रधान मंडळ, विकास शिस्त, संयम, एकजूट, व्यवस्थापन, सर्वसमावेशकता, समता नियोजन आणि कृती यावरून हे छत्रपती अजरामर झाले.
प्रभात वृत्तसेवा पुसेगाव – श्री सेवागिरी महाराजांच्या ७८ व्या पुण्यस्मरणानिमित्त रविवार (दि. १४) ते बुधवार (दि. २४ डिसेंबर) दरम्यान भरणाऱ्या यात्रेचा प्रारंभ आज (दि. १४) पालखी व झेंड्याच्या मिरवणुकीने होणार असल्याचे असल्याचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज व सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ यांनी सांगितले. सेवागिरी मंदिरात रविवारी सकाळी आठ वाजता श्री सेवागिरी महाराजांची समाधी व […] The post Pusegaon Yatra: पुसेगाव यात्रेसाठी जाताय? थांबा! पोलिसांनी वाहतुकीत केलेत मोठे बदल; ‘असा’ असेल पर्यायी मार्ग appeared first on Dainik Prabhat .
नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरेआपण नेहमी आपल्याला आवडलेल्या गाण्यांना ‘जगजीत सिंगची गझल’, ‘चित्रा सिंगची गझल’, ‘मेहंदी हसनची गझल’ किंवा ‘लतादीदीचे गाणे’ ‘आशाताईंची गझल’ असे म्हणतो. पण हा फार मोठा अन्याय असतो हे आपल्या लक्षात येत नाही! गझल असते असद भोपाली किंवा कैफी आझमी यांची, गाणे असते ‘शैलेद्र’चे पण आपण कवीबद्दल चकार शब्द न काढता गायकालाच सगळे श्रेय देऊन टाकतो!गाण्याचा आत्मा त्यातली शायरी असते, संगीत आणि आवाज हे त्याला मिळालेले केवळ शरीर आणि कलाकाराने दाखवलेली त्याची गायकी हे त्या कवितेला चढवलेले अलंकार असतात. चोखा महाराजांनी तर पांडुरंगालाही विचारले होते- “काय भुललासी वरलीया रंगा?”ज्यांच्या गझला भारतीय गायकांबरोबर पाकिस्तानी गायकानींही गायल्या, लोकप्रिय केल्या असे एक कवी होते ‘काजी सैयद ज़ुबैर अहमद जाफरी’. सुमारे ९९ वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेल्या या कवीबाबत महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे उर्दूतले हे नामवंत शायर १९४९ साली मुंबईत आले आणि मुंबईचेच झाले. उर्दू साहित्यात ते ‘क़ैसर-उल जाफरी’ या टोपणनावाने वावरले. त्यांच्या गझला पंकज उधास पाकिस्तानचे गुलाम अली, मुन्नी बेगम यांनी गायल्या. उपखंडातील दोन्ही-तिन्ही देशात त्या गाजल्या. त्या आजही अनेक दर्दी रसिकांना आठवतात.कैसर जाफरीसाहेब जिथे राहिले त्या ठाणे जिल्ह्यातील कौसा मुंब्र्यातल्या एका रस्त्याला शासनाने त्यांचे नावही दिलेले आहे. अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेल्या या कवीचे ‘रंग-ए-हिना’, ‘अगर दरिया मिला होता’, ‘संग-आशना’, ‘दश्त-ए-बे-तमन्ना’, ‘नबूवतके चराग’, ‘चराग-ए-हरम’ हे काव्यसंग्रह विशेष लोकप्रिय झाले.उर्दू शायरी हे एक अद्भुत विश्व आहे. अलीकडे पाश्चिमात्य संगीत, भाषा, संस्कृती, पेहराव यांचा प्रभाव नव्या पिढीवर जास्त आहे तरी जो अवर्णनीय आनंद उर्दू शायरी तुम्हाला देऊ शकते तो इतर कोणताच प्रकार देऊ शकत नाही. मानवी मनात उमटणाऱ्या ज्या भावलहरी शब्दात व्यक्त होऊच शकणार नाहीत असे वाटते त्याही उर्दू कवी दोन ओळींच्या ओंजळीतून आपल्या तळहातावर ठेवतात!आता हेच पहा ना कधी कधी माणसाला टोकाचे वैफल्य येते. मनात सतत घेर धरणारे विचार असह्य वेदना देऊ लागतात. तो छळ सहन करण्यापेक्षा मी वेडा होईन तर बरे असे वाटू लागते. ही अवस्था काव्याचा विषय होऊ शकते का? पण कैसर उल जाफरी साहेबांनी त्यावरच एक गझल लिहिली आणि ती कमालीची लोकप्रिय झाली. शब्द होते -‘दीवारोंसे मिलकर रोना अच्छा लगता है. हम भी पागल हो जाएँगे ऐसा लगता है.’ज्याला आयुष्यात सुख, शांती, प्रेम मिळालेच नाही त्याला ते क्षणभर जरी मिळाले तरी त्याची केवढी अपूर्वाई वाटते हे सांगताना कवी म्हणतो‘कितने दिनोंके प्यासे होंगे यारो सोचो तो,शबनमका कतरा भी जिनकोदरिया लगता है!’आता कवीला जिवलग व्यक्ती कायमची सोडून गेली आहे. पुनर्भेट शक्य नाही! तरीही उगाचच आशा वाटत राहते. प्रेमाच्या एका अवस्थेत तिला किंवा त्याला नुसते दुरून पाहिले तरी दिलासा वाटतो. सोडून गेलेल्या प्रेमिकेच्या आठवणीत कवी इतका दु:खी आहे की त्याला समोरून येणारी प्रत्येक व्यक्ती तिच्यासारखीच वाटू लागते. कुणाचीही आतुरतेने वाट पाहताना प्रत्येकाने आयुष्यात हा अनुभव कधी ना कधी घेतलेलाच असतो. अनेकदा तर तीच परत येत असल्याचा भास होत रहातो. ‘पारसमणी’मध्ये असद भोपालींनी रफीसाहेबांच्या आवाजातल्या ‘वो जब याद आये बहुत याद आये’मध्ये सुद्धा हीच भावना व्यक्त केली होती.‘कई बार ऐसा भीधोका हुआ हैं,चले आ रहे हैं वो नजरे झुकाये, वो जब याद आये बहुत याद आये’....आणि होतेच ना तसे! आशा अमर असते. सगळे संपले असूनही प्रेमीकाच्या मनात आशेची ज्योत तेवतच असते. असद भोपालींच्या त्याच भावनेला वेगळ्या शब्दात मांडताना कैसरसाहेब म्हणतात-‘आँखोंको भी ले डूबा ये दिलका पागलपन, आतेजाते जो मिलता है तुमसा लगता है.’ज्याचे दु:ख त्याच्यासाठी आभाळाएवढे असते. जग थोडा वेळ सहानुभूती दाखवते पण त्यालाही मर्यादा असतात. कारण या जगात संपूर्ण सुख कुणालाच मिळत नसते. आणि प्रेमाबाबत तर जवळजवळ प्रत्येकाने धोका खाल्लेला असतोच. त्याच्याही मनाच्या खोल अंधारात कुठेतरी त्याची वेदना आतून टोचत असतेच. त्यामुळे ती व्यक्ती स्वत:च दु:खात असताना कवीचे कितीसे सांत्वन करणार?‘इस बस्तीमें कौन हमारे आँसू पोंछेगा, जो मिलता है उसका दामन भीगा लगता है.’म्हणजे माझ्यासारखा प्रत्येकजण त्याच्या मनात अश्रू ढाळतोच आहे असे कवीला वाटू लागते.अशा वेळी गझलगायिका डिम्पल भूमी यांनी ऐकवलेला खुमार बाराबंकवी यांचा एक शेर हमखास आठवतो.‘मुझे भी वोही याद आने लगे हैं, जिन्हे भूलनेमेजमाने लगे हैं.’असेच दुसरे एक रोमँटिक शायर असरार उल हक मजाज आपल्या प्रेमिकेला दिलासा देताना म्हणतात, ‘शक्य असेल तर मला विसरून जा. पण तिला ही सवलत देताना ते मनातली वेदनाही सांगून टाकतात.‘तुम्हारे बसमें अगर हो तो भूल जाओ मुझे,तुम्हें भुलानेमें शायद मुझे ज़माना लगे.’इकडे एकाकीपणाच्या दु:खात बुडालेले कौसरसाहेब म्हणतात, ‘माझे घर उदास एकटेपण घेऊन उभे असते. सायंकाळ झाली की त्याच्याभोवती आठवणी फेर धरु लागतात. मनात आठवणीची जणू जत्राच भरते’.‘दुनियाभरकी यादें हमसे मिलने आती हैं. शाम ढले इस सूने घरमें मेला लगता है.’शेवटी या भावनिक कोलाहलातून आपली सुटका व्हावी म्हणून चक्क वेडे होणे सुद्धा मान्य असलेले कविवर्य म्हणतात मी वेडा झालो तरी कुणाला दगड मारू? या जगाच्या कांचमहालात तर मला सगळी माझीच प्रतिबिंबे दिसताहेत!‘किसको पत्थर मारूँ ‘कैसर’ कौन पराया है, शीश-महलमें इक इक चेहरा अपना लगता है.’ज्यांना विसरण्यासाठी अख्खे आयुष्यसुद्धा पुरले नाही त्यांच्या आठवणी जर अशा पुन्हापुन्हा सतावू लागल्या, तर आपले दु:ख मनातल्या मनात उत्कटपणे साजरे करणाऱ्याअशा उर्दू गझलांना पर्याय नसतो!
Jejuri Election: जेजुरीत लाडक्या बहिणीने कोणाला दिलं झुकतं माप? ५३९ मते ठरवणार उमेदवारांचे भवितव्य
प्रभात वृत्तसेवा जेजुरी – जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणीचा मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले. याचा नेमका फायदा कोणाला आणि तोटा कोणाला, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. मतदानाच्या टक्केवारीत लाडक्या बहिणींनी आपल्या भाऊरायासाठी मतदानरूपी दान कोणाला दिले, याची चर्चा पुरंदर तालुक्यात सुरू झाली आहे. जेजुरीमध्ये ७५८३ पुरुष, ८२१५ महिला व इतर २ (तृतीयपंथी), असे एकूण १५ […] The post Jejuri Election: जेजुरीत लाडक्या बहिणीने कोणाला दिलं झुकतं माप? ५३९ मते ठरवणार उमेदवारांचे भवितव्य appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या १०० एकर जमिनीची कृषी उत्पन्न बाजार समितीला विक्री करण्यास सहकार विभागाने दिलेल्या परवानगीतील कायदेशीर त्रुटींमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ तपासणीचे आदेश देत खरेदी विक्री प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी […] The post Devendra Fadnavis: यशवंत कारखान्याचा जमिन व्यवहार अडचणीत! मुख्यमंत्र्यांनी एका आदेशात फिरवली चक्रे..वाचा appeared first on Dainik Prabhat .
तंजावर येथील बृहदेश्वर मंदिर : दगडात कोरलेला वास्तुग्रंथ
विशेष : लता गुठेभारतात अनेक राज्यांमध्ये हजारो वर्षांपासून काही ऐतिहासिक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आजही सुस्थितीत उभ्या आहेत. यापैकी बहुतेक पूर्णपणे दगडांचा वापर करून बांधलेल्या आहेत. त्या वास्तू फक्त वास्तूच नाहीत तर त्या अध्यात्म, संस्कृती आणि शिल्पकलेचा सुरेख संगम त्यामधून आढळतो. त्या विज्ञानाच्या भक्कम पायावर उभ्या आहे. या वास्तूंची रचना वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे भारतीय उज्ज्वल इतिहासाची साक्ष देतात. त्या वस्तूची रचना, कलात्मकता, इतकी सुंदर असते की पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. आज अशाच एका वास्तूविषयी आपल्याशी सुसंवाद साधणार आहे.... या मंदिराचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झालेला आहे.अनेक आश्चर्यापैकी एक असलेले तंजावर येथील भुवनेश्वर मंदिर. या मंदिराला बृहदेश्वर असेही म्हणतात. या लेखामध्ये या मंदिराचा इतिहास, कला-संस्कृती, धार्मिक व सामाजिक महत्व याविषयी वर्णन केले आहे. तसेच शिल्पकलेच्या अंगाने शास्त्रीयपणे विचार करून मांडणी केली आहे. या मंदिराविषयी अनेक ठिकाणी ऐकले होते, वाचले होते त्यामुळे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. मिळालेल्या माहितीवर आधारित हा लेख आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.तंजावर येथील बृहदेश्वर मंदिर—ज्याला ‘राजराजेश्वर’ तसेच ‘भुवनेश्वर मंदिर’ असेही संबोधले जाते—हे एक वैश्विक वारसा आहे. इ.स. १०१० च्या दरम्यान चोल सम्राट प्रथम यांनी उभारलेले हे मंदिर केवळ धार्मिक दृष्टीनेच नव्हे तर कला, विज्ञान, स्थापत्य आणि सामाजिक संस्कृती याचा सुरेख संगम आढळतो. द्रविड वास्तुशैलीचा वापर करून बांधलेले बृहदेश्वर मंदिर आजही जगभरातील अभ्यासकांना, कलाप्रेमी व इतिहास संशोधकांना आकर्षित करत आहे.चोल साम्राज्याच्या सुवर्णकाळाची साक्ष देणारे हे मंदिर आहे. चोल वंश हा दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन व प्रभावी राजवंशांपैकी एक होता हे आपण जाणतोच आहोत. राजाराज–प्रथम (इ.स. ९८५–१०१४) यांच्या काळात चोल साम्राज्याचा विस्तार दख्खनपासून श्रीलंका व बंगालच्या किनाऱ्यापर्यंत झाला होता. या विशाल सत्तेचा पराक्रम नोंदवण्यासाठी तसेच साम्राज्याची सांस्कृतिक ओळख दृढ करण्यासाठी राजराजांनी तंजावर येथे विशाल शिवमंदिर उभारण्याचा संकल्प केला कारण शिव हे चोलांचे कुलदैवत असल्यामुळे साम्राज्याच्या सर्व प्रदेशांमध्ये धार्मिक एकात्मतानिर्माण करण्यासाठी त्यांनी गावोगावी शिवालये बांधली.बृहदेश्वर हे मंदिर अतिशय भव्य-दिव्य स्वरूपात उभे केले. त्यामागची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे चोल सैन्याच्या विजयगाथांचं स्मारक म्हणून या मंदिराचा उपयोग त्यांनी केला. दुसरे कारण म्हणजे कृषी, व्यापार व सामाजिक रचनेच्या स्थैर्यासाठी देवालय हे आर्थिक केंद्र बनवले. मंदिर हे पवित्र विचारांचे ठिकाण असल्यामुळे व तिथे सकारात्मक ऊर्जा मिळते या सर्व कारणांमुळे बृहदेश्वर मंदिर केवळ धर्मस्थळ न राहता राजकीय, आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू बनले. अनेक कारणांसाठी बनवलेले हे मंदिर दुहेरी प्राकार प्रणालीमुळे मंदिर गावाच्या संरक्षक किल्ल्यासारखे वाटते. बृहदेश्वर म्हणजे महादेव किंवा महाशिव. शिव हे आदिशक्तीचे प्रतीकही मानले जाते. सर्वसामान्य लोकांमध्ये भुवनेश्वर नावाने प्रचलित असलेले मंदिर म्हणजेच ‘भुवनांचा ईश्वर’ ही संकल्पना प्रतिबिंबित होते.मंदिराची रचना अशी आहे, मंदिर पूर्वाभिमुख असून अत्यंत सुबक रचना असल्यामुळे त्यामध्ये अतिशय कल्पकता आढळते. मंदिराच्या प्रत्येक भाग कलात्मक तर आहेच तसेच वैशिष्ट्यपूर्णही आहे. हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचा ग्रंथच म्हणावा लागेल. संपूर्ण ग्रॅनाइट दगडाचा वापर करून हे भव्य- दिव्य मंदिर बांधले आहे. अनेक किलोमीटर अंतरावर पसरलेले हे मंदिर पाहणाऱ्यांना विचार करायला लावते. मंदिराचे शिखर ६६ मीटर उंच असून भारतातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. यासाठी वापरलेला एकसंध ग्रॅनाइटचा कळस–शिखर सुमारे ८० टन वजनाचे आहे असे म्हटले जाते. या कळसाकडे पाहताना नकळत पहाणाऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे, इतक्या मोठ्या प्रचंड दगडाला इतक्या उंचीवर कसे नेले असेल? याविषयी असेही वाचायला मिळते की ६ किमी लांब उतार बनवून हत्तींंच्या साहाय्याने शिखर उचलण्यात आले असावे.प्रवेशद्वारामध्ये मुखमंडप आहे त्याला नंदीमंडप असेही म्हणतात येथे असलेली नंदीची मूर्ती सुमारे २५ टन वजनाची व एकाच दगडातून घडवलेली आहे. मंदिरात शिवलिंग असलेले गर्भगृह आहे. हे शिवलिंग ‘बृहदेश्वर’ नावाने ओळखले जाते. शिवलिंगाची उंची सुमारे ४ मीटर असून दक्षिण भारतातील मंदिरामध्ये जे शिवलिंग आहेत त्यापैकी सर्वात मोठे हे शिवलिंग आहे. संपूर्ण मंदिराची रचना ही उत्कृष्ट चोल कलाशैलीचे सर्वोच्च रूप मानले जाते. यामुळेच तेथील चोल राज्यातील कलाकार सुरेख, जिवंत कला निर्मितीसाठी जगप्रसिद्ध होते. मंदिराच्या भिंतींवर देव–देवतांचे समूह, नर्तक, संगीतकार, गण, शैव पुराणातील प्रसंग यांचे शिल्प अत्यंत सूक्ष्मतेने रेखांकित केले आहेत.शिवाचा नटराज रूप चोलकलेचे महत्त्वाचे प्रतीक. बृहदेश्वराच्या शिल्पांमध्ये नटराजाची भावविभोर मुद्रा, हाता-पायांच्या हालचाली, लयबद्धता आणि अाध्यात्मिक ऊर्जा अप्रतिमपणे साकारलेली दिसते.शिल्पांमधील अनुपात, दृष्टिमान सममिती आणि गणिती प्रमाण चोलांच्या वास्तुविद्येचे उत्कृष्ट दर्शन घडवते आहे. अनेक शिल्पांवर नृत्यांची ‘१०८ प्रकार कोरलेली आहेत, जी भरतनाट्यम व नाट्यशास्त्राच्या अभ्यासासाठी अमूल्य आहेत.मंदिराच्या अंतर्भागातील भित्तिचित्रे आजही भारतीय प्राचीन चित्रकलेचे सर्वोच्च उदाहरण मानली जातात. यामध्ये शिव–पार्वती, चोल राजांचे दैनंदिन जीवन, समारंभ, नवरात्र, अर्चनाविधी, दारूका वध, अंधकासूर मर्दन यांसारख्या पुराणकथा चित्रीत केलेल्या आहेत. ही चित्रं अतिशय सौम्य रंगांमध्ये नाजूकशा, रेषांनी अविष्कृत केलेली आहेत. इ.स. १००० च्या सुमारास रंगविलेले हे भित्तिचित्रं आजही प्रयोगशील कलांच्या दृष्टीने अद्भुत आहेत. अनेक धार्मिक सांस्कृतिक संकेत या मंदिराच्या आवारात आढळतात यापैकी शैव सिद्धांतानुसार शिव हा ‘विश्व–नियंता’, ‘अनंत’ आणि ‘नटराज’ या तीन रूपांनी प्रकट होतो. बृहदेश्वराचे स्थापत्य याच रूपसंकेतांवर प्रकाश टाकते.हे मंदिर पाहताना त्याकाळी चोल यांच्या साम्राज्यामध्ये देवपूजा, संगीत, नृत्य व वेदपठण तसेच आर्थिक व्यवहार, शेती, जलव्यवस्थापन यांचे नियमन याला किती महत्त्वाचे स्थान होते तसेच नंदी मंडपातील ध्वनी–प्रतिध्वनी आजही अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतात. हे आपल्या लक्षात येते. नृत्य कला चित्रकला शिल्पकला या कलाही त्या काळामध्ये किती प्रगत होत्या याचे हे जिवंत उदाहरण पाहायला मिळते. अशाप्रकारे अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेले हे मंदिर पर्यटकांसाठी आकर्षण बनले आहे.
संवाद : गुरुनाथ तेंडुलकरसंत एकनाथांच्या बाबतीत असं सांगतात की एकदा एकनाथ महाराज नदीवरून स्नान करून येत असताना एक मुसलमान तरुण त्यांच्या तोंडावर थुंकला. त्या तरुणाला वाटलं की एकनाथ महाराज चिडतील, भडकतील. त्यांची शांती ढळेल. पण झालं भलतंच. एकनाथ महाराज शांतपणे पुन्हा नदीवर गेले आणि स्नान करून परतले. पुन्हा तोच प्रकार घडला. तो मुसलमान तरुण एकनाथ महाराजांच्या तोंडावर पुन्हा थुंकला. एकनाथ महाराज पुन्हा नदीवर गेले आणि शांतपणे स्नान करून आले. हा प्रकार पुन्हा घडला. पुन्हा पुन्हा घडला. एकनाथ महाराजांची शांती काही ढळली नाही. पण तो मुसलमान तरुण मात्र बेचैन झाला. चिडला.त्या मुसलमान तरुणानं चिडून थुंकायचं आणि एकनाथ महाराजांनी शांतपणे मागे वळून नदीवर जाऊन पुन्हा स्नान करायचं हा प्रकार एक-दोन नव्हे, तर तब्बल एकवीस वेळा घडला आणि बाविसाव्या खेपेला मात्र त्या तरुणाला पश्चात्ताप झाला आणि त्याने एकनाथ महाराजांचे पाय धरले.ही गोष्ट तुम्हाला नक्कीच ठाऊक असेल. मी देखील ही कथा अनेकदा वाचलीय. ऐकलीये.शाळेच्या जीवनात गोष्टीच्या तासाला, कीर्तन प्रवचनातून, अगदी मॅनेजमेंटच्या अनेक सेमिनारमधून सुद्धा... प्रत्येक वेळी एकच तात्पर्य सांगितलं जायचं.‘तुम्ही इतरांशी चांगले वागा. इतर कुणीही कितीही दुष्टपणा केला तरी त्याचा राग न करता उदार अंतःकरणाने त्याला क्षमा करा.’एकनाथ महाराजांची हीच गोष्ट कुठल्याशा सुफी संताच्या बाबतीतही घडली होती असं सांगतात. ही गोष्ट कुणाच्या बाबतीत घडली याचा तपशील महत्त्वाचा नाहीये. तो थुंकणारा मुसलमान होता की, हिंदू होता हे देखील महत्त्वाचं नाहीये. कुणीतरी एक दुर्जन एका सज्जनाच्या तोंडावर थुकला आणि त्या सज्जनाने त्याचा राग न धरता त्याला क्षमा केले. आजही ही कथा पुन्हा एका मासिकात वाचली. पण आज मात्र माझ्या मनात वेगळाच विचार आला. एका दुर्जनानं सज्जनाच्या अंगावर पुन्हा पुन्हा थुंकणं आणि त्या सज्जन माणसाने मात्र त्या दुर्जनाला पुन्हा पुन्हा क्षमा करणं हा त्या सज्जनाची क्षमाशीलता की भ्याडपणा ?कथेमध्ये शेवटी एकवीस वेळा थुंकल्यानंतर त्या दुर्जनाचे हृदय परिवर्तन झाल्याचं सांगतात. पण प्रत्यक्ष व्यवहारात मात्र...?चला जरा इतिहासाची पानं चाळूया...महम्मद घोरीने पृथ्वीराज चौहानवर अठरा वेळा स्वारी केली. रजपुतांनी केलेल्या कडव्या प्रतिकारामुळे महम्मद घोरीचा सतरा वेळा पराभव झाला. प्रत्येक खेपेस हरलेल्या घोरीला महाराज पृथ्वीराज चौहानसमोर बंदी बनवून उभं करण्यात आलं. प्रत्येक खेपेस महंमद घोरीनं दयेची भीक मागितली आणि पृथ्वीराज चौहानने उदार अंतःकरणाने त्याला क्षमा करून जिवंत सोडून दिला...हा प्रकार एक दोनदा नव्हे, तर तब्बल सतरा वेळा घडला. अठराव्या वेळी मात्र महम्मद घोरीने बाजी मारली. पृथ्वीराज चौहानचा पराभव झाला. हरलेल्या पृथ्वीराज चव्हाणला बंदी म्हणून महम्मद घोरीच्या समोर उभं करण्यात आलं आणि...
Manchar News: शहीद बाबू गेनू यांच्या स्मृतीला वंदन! कळंब आणि एकलहरे गावात प्राणज्योतीचे जंगी स्वागत
प्रभात वृत्तसेवा मंचर – हुतात्मा बाबू गेनू यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई काळंबादेवी येथून आणलेल्या प्राणज्योतीचे स्वागत एकलहरे, कळंब आदी गावांमध्ये जल्लोषात आणि उत्साहात ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.एकलहरे येथे ज्योतीचे स्वागत प्रा.वसंत भालेराव, माजी सरपंच शिवसेना तालुकाप्रमुख संतोष डोके,उपसरपंच प्रदीप शिंदे, देविदास डोके,राहुल डोके,महमंदशरीफ शेख यांच्यासह एकलहरे,शिंदेवाडी ग्रामस्थांनी केले. कळंब ग्रामपंचायत चौकात ज्योत दाखल झाल्यानंतर हुतात्मा बाबू […] The post Manchar News: शहीद बाबू गेनू यांच्या स्मृतीला वंदन! कळंब आणि एकलहरे गावात प्राणज्योतीचे जंगी स्वागत appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा तळेगाव ढमढेरे – दहिवडी (ता. शिरूर) गाव आणि परिसर गेल्या काही वर्षांपासून बिबटप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जात असून, अलीकडील काळात येथे बिबट्यांचा वावर लक्षणीयरीत्या वाढला आहे. गावाच्या हद्दीत तसेच शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी अनुकूल वातावरण मिळत आहे. परिणामी गावातील नागरिक, शेतकरी, पशुपालक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले […] The post Leopard News: दहिवडी परिसरात बिबट्यांचा वाढता वावर; ग्रामस्थांची ‘बीस्ट अलर्ट सिस्टीम’ बसवण्याची मागणी appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा तळेगाव ढमढेरे – देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त श्री राहुल दादा करपे पाटील सोशल फाउंडेशन आणि ओम रक्तकेंद्र, शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने घोलपवाडी-टाकळी भीमा (ता. शिरूर) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील सर्व गावांमधील युवक आणि महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीचे […] The post Shirur News: घोलपवाडीत भव्य रक्तदान शिबिर संपन्न; राहुल करपे फाउंडेशन आणि ओम रक्तकेंद्राचा स्तुत्य उपक्रम appeared first on Dainik Prabhat .
लग्नाला जाणं पडलं महागात! मुखईतील कुटुंबासोबत घडला धक्कादायक प्रकार; घरी परतताच..
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – मुखई (ता. शिरूर) येथे एक कुटुंब लग्नासाठी बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. या घरफोडीत तब्बल वीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मुखई येथील मंगल आरळेकर […] The post लग्नाला जाणं पडलं महागात! मुखईतील कुटुंबासोबत घडला धक्कादायक प्रकार; घरी परतताच.. appeared first on Dainik Prabhat .
लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकरमाणूस हा विचार, भावना आणि कृती असलेला संवेदनशील प्राणी आहे. परिस्थिती, अनुभव, चांगले-वाईट प्रसंग यांमुळे त्याच्या स्वभावात आणि आयुष्यात बदल घडत जातात. म्हणूनच “माणूस बदलू शकतो” हे वाक्य केवळ शब्द नाहीत, तर जीवनाचा मूलभूत सत्य आहे. बदल हेच जगाचे वैशिष्ट्य आहे आणि मनुष्य त्याला अपवाद नाही.१. बदलाची सुरुवात – आत्मजाणिवेतूनमाणूस खऱ्या अर्थाने तेव्हाच बदलतो, जेव्हा त्याच्या मनात आत्मजाणिवा निर्माण होतात. जसे -“मी असे का वागतो?”“मी स्वतःला सुधारू शकतो का?”“माझ्यामुळे कोणाला त्रास होतोय का?”या प्रश्नांची उत्तरे शोधताना तो स्वतःकडे पाहायला शिकतो आणि सुधारणेची पहिली पायरी चढतो.अवगुण सोडिता जाती । उत्तम गुण अभ्यासिता येती । कुविद्या सोडून शिकती । शहाणे विद्या ॥एका संस्कृत सुभाषितकारांनी म्हटले आहे - “स्वभावो दुरति क्रमः” । याचा अर्थ मनुष्याचा स्वभाव बदलणं खूप कठीण आहे. अर्थात, वाईट सवयी आणि वागणं हे जीवाभावाचं असतं. पण, त्यांच्या वेळ, माणूस बदलू शकतो, योग्य संस्कार आणि प्रयत्नांनी, आपण आपल्या जीवनाला हवा तसा आकार देऊ शकतो. माणूस बदलू शकतो; परंतु बदलण्याची तीव्र इच्छा त्याच्या अंगी असली पाहिजे.अंगुलीमाल गुन्हेगार होता. त्याने शंभर माणसांची हत्या करून त्यांच्या करंगळीची माळ करून गळ्यात घालायचे ठरवले होते. त्याच्या कृत्यांमुळे गावकरी भयभीत होते. एके दिवशी भगवान बुद्ध त्याच्या भेटीस गेले. बुद्धांनी त्याला झाडाची फांदी तोडावयास सांगितली. त्यांनी फांदी तोडली. बुद्धांनी ती फांदी परत त्याला जोडायला सांगितली. ती फांदी झाडाला जोडता येणे शक्य नव्हते. तेव्हा बुद्धांनी त्याला समजावले - ज्याला जोडता येत नाही त्यांनी तोडू नये. ज्याला जीवन देता येत नाहीत्याला कोणाला मृत्यू देण्याचा अधिकार नाही.बुद्धांच्या उपदेशाने अंगुलीमाल पूर्ण बदलला. पुढील काळात तो बुद्धांचा लाडका संन्यासी झाला.माणसाने जर मनावर घेतले तर ५ - ६ वर्षांत तो स्वतःच्या स्वभावात हवा तसा बदल घडवू शकतो.२. बदलासाठी आवश्यक म्हणजे सकारात्मक विचार.मनुष्य सकारात्मक विचार स्वीकारतो तेव्हा त्याचे वागणे, बोलणे आणि निर्णय घेण्याची शैली बदलते.सकारात्मकतेमुळे -राग कमी होतो,सहनशीलता वाढते,नाती दृढ होतात,आत्मविश्वास वाढतोअशा विचारांमुळे माणूस आधीपेक्षा अधिक सक्षम आणि शांत बनतो.३. अनुभव माणसाला बदलून टाकतात.जीवनातील प्रसंग माणसाला घडवतात आणि घडवून बदलवतात.कधी एखादी चूक, कधी एखादा कठोर प्रसंग, कधी अपयश किंवा जिव्हाळ्याचे नाते -हे अनुभव मनाला ढवळून टाकतात आणि सुधारणा करण्यास भाग पाडतात.४. सवयी बदलल्या तर जीवन बदलते. माणसाचे वागणे त्याच्या सवयींवर अवलंबून असते.खराब सवयी सोडून चांगल्या सवयी अंगीकारल्या तर जीवनाचा मार्गच बदलतो. उदा. - वेळेचं नियोजन वाचनाची सवय शांतपणे विचार करून निर्णय आरोग्य राखण्याची शिस्त या सवयी व्यक्तिमत्त्वात सुंदर परिवर्तन घडवतात.५ . समाज व कुटुंबाचा प्रभावचांगले मित्र, सकारात्मक सहकारी, मार्गदर्शक शिक्षक किंवा एखादे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व माणसाला योग्य दिशेने बदलायला मदत करतात.समर्थन, कौतुक, प्रोत्साहन हे बदल टिकवतात.६. इच्छाशक्ती सर्वांत महत्त्वाचीमाणूस बदलतो कारण तो बदलायचे ठरवतो. इच्छाशक्ती, सातत्य आणि ध्येय यांमुळे कोणताही मनुष्य वाईटातून चांगल्याकडे प्रवास करू शकतो. “माणूस बदलू शकतो” हे केवळ विधान नाही - तो जीवनाचा शाश्वत संदेश आहे.बदल हा वेळ, परिस्थिती आणि इच्छाशक्ती यांचा सुंदर मिलाफ आहे.स्वतःच्या चुका मान्य करून, सकारात्मकता स्वीकारून आणि योग्य मार्गदर्शन घेऊन मनुष्य स्वतःचे आयुष्य अधिक सुंदर बनवू शकतो.म्हणूनच - बदलाची सुरुवात आपणच करू या. आणि इतरांनाही बदलण्याची संधी देऊ या.
प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफआज दुपारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आणि माझी मैत्रीण रजनी मुलुंडला ट्रेनने गेलो. पश्चिमेकडून मुलुंडच्या रेल्वेस्टेशन बाहेर पडत होतो. अचानक रजनीला आपल्या अमेरिकेच्या भाचीचा फोन आला आणि तिच्याकडे साधारण रात्रीचा दीड वाजलेला असताना तिने का फोन केला असेल, या विचाराने तिथेच एका रिकाम्या बाकावरती बसली आणि स्वाभाविकपणे मीही तिच्या बाजूला बसलो. ती बोलण्यात मग्न होती आणि मी आसपास पाहत होतो. समोर आपल्या जुन्या वस्तू, कपडे इत्यादी ठेवण्यासाठी तिथे काही लाकडी चौकटी तयार केलेल्या होत्या. कोणी ते ठेवले आहे, कशासाठी ठेवले आहे वगैरे सगळी माहिती त्यावर व्यवस्थित लिहिली होती. इतक्यात एक बाई तिथे आली आणि तिने दोन ते तीन कप्प्यात मावेल इतके कपडे ठेवले आणि ती निघून गेली.अमेरिकेत राहणारी माणसे घराबाहेर किंवा आपल्या अंगणात आपल्याला नको असलेले फर्निचर वा वस्तू अशा रीतीने बाहेर ठेवतात आणि त्याखाली लिहितात की, कोणीही हे उचलून घेऊन जाऊ शकतो म्हणून! त्याचा उपयोग बऱ्याच जणांना होतो. आपल्याला नको असलेले सामान अशा रीतीने ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत सहज पोहोचते आणि त्याची गरज भागवली जाते ही किती छान गोष्ट आहे, असे मला नेहमी वाटायचे. मला इतका आनंद झाला की, आपल्याकडे पण त्यांच्याकडचा असा चांगला आणि समाजोपयोगी विचार इथे राबवला जातोय! माझा हा आनंद काही क्षणांसाठीच टिकला कारण त्या बाईने कपडे आणून ठेवल्यावर दीड मिनिटांच्या आत एक रेल्वे कर्मचारी तिथे आला आणि त्याने तिथले एकूण एक कपडे उचलले आणि तो तिथून रेल्वे स्टेशनवर असलेल्या कोणत्या तरी खोलीत शिरला.या प्रसंगाने मी खूप अस्वस्थ झाले. त्याच्या एकंदरीत हालचालींवरून असे लक्षात येत होते की, तो स्वतःच्या फायद्यासाठी ते उचलत असावा!मुंबईच्या कोणत्याही भागात साधारण रेल्वेस्टेशन जवळच्या रस्त्यावर जुने कपडे विकण्यासाठी उपलब्ध असतात. हा बाजार फार मोठा आहे. कुठेतरी वाचल्याचे आठवते की नव्या कपड्याच्या बरोबरीने हेही कपडे विकले जातात. त्याचे प्रमाण नवीन कपड्यांच्या पंचवीस ते तीस टक्के इतके आहे. जर हा बाजार इतका मोठा आहे, तर गरजवंतही तितक्याच मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे; परंतु काही माणसांना हे कपडे वा वस्तू या गरजवंतांना मोफत द्याव्याशा वाटत असतील, तर कोण्या तरी मध्यस्थाने त्या असे तऱ्हेने हडप करणे बरोबर नाही. हे दृश्य माझ्या दृष्टीस पडले तसे ते आणखीही काही लोकांच्या दृष्टीस नक्कीच पडत असेल, असा विचार मनात आला. या गोष्टीमुळे दाता कदाचित पुढच्या वेळेस इथे कपडे आणून टाकणे बंद होऊ शकते. आपल्याला एखादी गोष्ट चुकीची वाटते तेव्हा नेमकेपणाने काय करायचे, हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाला. मला लहानपणीची एक गोष्ट अजूनही आठवतेय की जेव्हा कुठे ओला किंवा सुका दुष्काळ पडायचा तर त्यानंतर दोन-चार दिवसांत प्रत्येक सोसायटीच्या नोटीस बोर्डवर एक निवेदन लावलेले दिसायचे की पूरग्रस्तांसाठी, दुष्काळग्रस्तांसाठी आपल्या सोसायटीच्या दाराशी ठेवलेल्या कार्डबोर्डच्या खोक्यामध्ये आपल्या जुन्या वस्तू, कपडे इ. आणून टाकाव्यात. हे निवेदन वाचून सोसायटीतील कमीत कमी पंचवीस ते तीस टक्के रहिवासी आपले जुने कपडे आणून त्या बॉक्समध्ये टाकायचे. एक मोठा ट्रक यायचा आणि त्या बॉक्समधील वस्तू आणि सामान घेऊन जायचा. हे सामान खरंच गरजवंतांपर्यंत पोहोचते का, असा संशय काही माणसांना पडला कारण त्यांनी त्याबाबतीत काहीतरी वेगळे घडल्याचे पाहिले. ते कपडे त्याच भागात जुने कपडे विकणाऱ्या माणसांकडे सापडल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्याचे आठवतेय. हे तर वापरलेल्या जुन्या वस्तूंबद्दल आणि कपड्यांबद्दल! मग मनात विचार येतो की, जेव्हा दानशूर व्यक्ती मोठ्या रकमेच्या देणग्या देतात किंवा काहीजण आपल्याकडे असलेल्या तुटपुंजा मिळकतीतूनसुद्धा एखाद्या संस्थेला मनापासून छोट्या रकमेची का होईना देणगी देण्याचा प्रयत्न करतात अशांचे पैसे गरजवंतांसाठी वापरले जातात का किंवा अशी काही यंत्रणा आहे का, जेणेकरून आपल्याला याची माहिती मिळू शकेल? देणगी या शब्दाची व्याख्या शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा जी व्याख्या मिळाली ती मी इथे देत आहे. धर्मादाय, मानवतावादी मदत किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी दिलेली भेट, जी पैसे, वस्तू (अन्न, कपडे), सेवा किंवा वेळेच्या स्वरूपात असू शकते.देणगी गुप्तपणे द्यावी असे म्हटले जाते, पण अलीकडे देणगीच्या रकमेनुसार करामध्ये काही सवलतीही मिळतात. त्यामुळे देणगीदार पावती घेऊन देणग्या देतात आणि देणगीतून कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवू नये, असे म्हटले जाते. अन्नदान, धनदान, श्रमदान किंवा ज्ञानदान अशा देणग्यांमुळे समाजाच्या कल्याणासाठी हातभार लागतो आणि धार्मिक, शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यांना बळ मिळते!तर शेवटी काय? जेव्हा शक्य असेल तर जरूर देणगी द्यावी. अशा जगामध्ये कितीतरी संस्था आहेत ज्या केवळ देणग्यांवर चालतात. जगात चांगले-वाईट लोक असतात, चांगल्या-वाईट घटना घडत असतात त्याप्रमाणे आपण नेहमीच चांगला विचार करून, ज्या संस्थेविषयी आपल्याला खात्री आहे अशा संस्थांना तरी देणगी द्यायलाच हवी. कदाचित देणगी दिल्यामुळे आपल्या मिळकतीतला एक छोटासा हिस्सा कमी होईल, कदाचित आपला थोडासा वेळ खर्च होऊ शकेल; परंतु त्यामुळे कदाचित एखाद्या गरजवंताचे आयुष्य उभे राहील!pratibha.saraph@ gmail.com
चासकमानच्या पाण्यावरून भडका! पाचुंदकर वि. पाचुंदकर; सोशल मीडियावर श्रेयवादाचे युद्ध पेटले
प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटात चासकमान धरणाच्या पाण्यावरून सुरू असलेल्या वादाने ऐन थंडीतही परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. चासकमानचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या श्रेयावरून मानसिंग पाचुंदकर आणि शेखर पाचुंदकर यांच्यात सोशल मीडियावर उघडपणे श्रेयवाद रंगला असून, या वादाला त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनीही आक्रमक स्वरूप दिले आहे. चासकमान धरणाचे पाणी रांजणगाव-कारेगाव […] The post चासकमानच्या पाण्यावरून भडका! पाचुंदकर वि. पाचुंदकर; सोशल मीडियावर श्रेयवादाचे युद्ध पेटले appeared first on Dainik Prabhat .
पुणे-नाशिक नवीन रेल्वे मार्ग मान्य नाही! आढळराव पाटलांचा सरकारला इशारा, प्रसंगी रस्त्यावर उतरू
प्रभात वृत्तसेवा मंचर – पुणे-नाशिक नवीन रेल्वे मार्ग माझ्यासह मतदार संघातील नागरिकांना मान्य नाही. प्रसंगी जनआंदोलन उभारू, असा इशारा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला.लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथील निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, २००४ ला मी खेड लोकसभा मतदारसंघाचा प्रथम खासदार म्हणून निवडून आलो. त्यानंतर २००५ पासून चाकण एमआयडीसीमधील कामगारांची, मतदारसंघातील शेतकऱ्यांची, […] The post पुणे-नाशिक नवीन रेल्वे मार्ग मान्य नाही! आढळराव पाटलांचा सरकारला इशारा, प्रसंगी रस्त्यावर उतरू appeared first on Dainik Prabhat .
कथा : प्रा. देवबा पाटीलत्या दिवशीही सीता व निता या दोघी बहिणींनी शाळेतून घरी येताबरोबर आपला अभ्यास करून घेतला. नि त्या आपल्या मावशीसह गच्चीवर जाऊन बसल्या.“साबणाच्या नळीवाटे फुगे बाहेर पडतात, पण मग स्ट्रॉ च्या नळीद्वारेपेय तोंडात कसे ओढले जाते?”सीताने विचारले.“तुम्ही पिता गं अशी पेये?” मावशीने प्रश्न केला.“आई आम्हाला अशी पेये पिऊ देत नाही, तरी पण एखादवेळी बाबांजवळ हट्ट करून म्हणजे फार क्वचित पितो आम्ही.” सीताने उत्तर दिले.“पण उसाचा रस, लिंबू सरबत आम्ही बऱ्याचदा स्ट्रॉनेच पितो.” निता म्हणाली.“उसाचा रस, लिंबू सरबत ही आरोग्याला हितकारक असतात पण सॉफ्ट ड्रिंक्स असे गोंडस नाव दिलेली व चवही गोडस ‘गोड’(बोग)स गोडसट असलेली सगळी पेयं ही त्यामध्ये रसायने असल्याने आरोग्याला अपायकारक असतात तरीही सारेजण ते स्ट्रॉ च्या नळीने मोठ्या आवडीने पितात. स्ट्रॉ ची नळी ही प्लॅस्टिक किंवा कागदापासून बनवलेली असते. तिचे एक टोक पेयात बुडवतात व दुसरे टोक तोंडामध्ये घेतात. जेव्हा स्ट्रॉ च्या नळीने एखादे पेय पितात तेव्हा पिणारा तोंडाने स्ट्रॉच्या साहाय्याने ते पेय ओढून घेत असतो. पेय वर ओढतांना त्याच्या फुप्फुसांचे प्रसरण होते व त्याच्या तोंडातील हवेचा दाब कमी होतो. त्यामुळे पर्यायाने नळीच्या वरच्या रिकाम्या भागातील हवेचाही दाब कमी होतो; परंतु नळीच्या आजूबाजूच्या पेयाच्या वरच्या बाहेरच्या मोकळ्या भागावर मात्र जो बाहेरच्या हवेचा दाब असतो तो जास्त असतो. त्यामुळे ते पेय नळीमध्ये ओढले जाते कारण कोणतेही पेय वा द्रव हा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे प्रवाहित होत असतो.” मावशीने स्पष्ट केले.“आणि मावशी पान खाल्ल्याने तोंडाला लाल रंग कसा येतो?” नितानेसुद्धा आपली शंका विचारली.मावशी हसत हसत म्हणाली, “आपण नागवेलीच्या पानाला थोडासा चुना लावतो व त्यावर किंचितसा कात टाकतो. ज्यावेळी आपण पान चावतो त्यापेळी आपल्या तोंडातील लाळ त्या पानात मिसळते. पान, चुना, कात व लाळ या सर्वांचा परस्परांवर परिणाम होतो व पानाचा पर्यायाने जिभेचा व तोंडाचा रंग लाल होतो.”नेहमीसारखी संध्याकाळ झाली. अंधाराने आपले हातपाय पसरविणे सुरू केले. आईच्या आवाजाने त्यांना आपल्या ज्ञानदायी गोष्टी आवरत्या घ्याव्या लागल्यात. मावशीने सांगणे बंद केले नि सतरंजीवरून उठली. तशा या दोघीही उठल्या, सतरंजीची घडी केली. निताने सतरंजी आपल्या हाती घेतली व त्याही मावशीमागे जिना उतरल्या.“माझ्या लाडक्या मुलींनो, आज दिवसा आईसोबत जरा जास्त काम उरले. त्यामुळे जरा मला थोडेसे थकल्यासारखे वाटते. तरी आपण आजची चर्चा थांबवू या का?” मावशीने विचारले.“हे काय विचारावे लागते का मावशी? तू आमची मावशी व आम्ही तुझ्या मुली. तू म्हणशील व सांगशील ते आम्ही ऐकूच.” सीता बोलली.“हो मावशी. तू म्हणतेस तसे आपण उद्या संध्याकाळी पुन्हा येऊ गच्चीवर चर्चा करण्यासाठी.” निताने सांगितले.“छान. तशा तुम्ही खूप समजदार आहेत हे मला माहीतच आहे. चला आता आपण खाली जाऊ या.” मावशी बोलली. मग त्या तिघीही मायलेकी उठल्या नि घराच्या जिन्याने खाली उतरू लागल्या.
ऑनलाइन रमीचा वाढता धोका! झटपट पैशाच्या मोहापायी घर, जमीन गहाण ठेवून कर्जाचा डोंगर
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – ग्रामीण भागातील तरुणांसह अनेक नागरिक झटपट पैसा मिळवण्याच्या हेतूने मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन रमी खेळण्याच्या व्यसनात अडकले आहेत. या ऑनलाइन जुगारामुळे वेळ, पैसा आणि मानसिक स्वास्थ्य हरवून तरुण बरबाद होऊ लागले असून, त्यांच्यासोबत पूर्ण कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य बिघडत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. ऑनलाइन रमी खेळणारे लोक स्वतःच्या नावावर असलेला […] The post ऑनलाइन रमीचा वाढता धोका! झटपट पैशाच्या मोहापायी घर, जमीन गहाण ठेवून कर्जाचा डोंगर appeared first on Dainik Prabhat .
Koregaon Bhima: शौर्य दिनासाठी मोठी संधी! बार्टीतर्फे मोफत स्टॉल्स, पण अट फक्त एकच..पहा
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे १ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी पुस्तक विक्री स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे यांच्या वतीने ग्रंथ उपलब्ध करून देण्यासाठी विजयस्तंभ स्मारकाच्या मागील बाजूस १०० हून अधिक बुक स्टॉल विनामूल्य […] The post Koregaon Bhima: शौर्य दिनासाठी मोठी संधी! बार्टीतर्फे मोफत स्टॉल्स, पण अट फक्त एकच..पहा appeared first on Dainik Prabhat .
कथा : रमेश तांबेएक होती मांजर आणि तिला होतं एक बाळ! पांढऱ्याशुभ्र रंगाचं, घाऱ्या घाऱ्या डोळ्यांचं! ते खूप खेळायचं, उड्या मारायचं, खूप धमाल करायचं. बाळाच्या आईला बाळाचं केवढं कौतुक वाटायचं.पण एके दिवशी बाळाला काय झालं कुणास ठाऊक! बाळ बसलं रुसून. आता मांजरीचं बाळ बोलेना, चालेना, दुधाला तोंड लावेना. खाऊसुद्धा खाईना! मांजरीने आपल्या बाळाला प्रेमाने जवळ घेतलं आणि विचारलं, “काय रे बाळा काय झालं तुला? तू असा रुसून का बसलास माझ्यावर? तू खात नाहीस, की काही पीत नाहीस! असं नको करू बाळा. अरे तू आजारी पडशील; मला फार काळजी वाटते बघ तुझी!”मग बाळ “लाडानंच म्हणालं, “आई गं मला ना...पिझ्झा हवा, बर्गर हवाचायनीज भेळ, वडापाव हवारोज रोज आईस्क्रीम खाणार दोन मुठी कुरकुरे खाणार!”बाळाची ही विचित्र मागणी ऐकून मांजर आश्चर्यचकित झाले. ती बाळाला म्हणाली, “अरे बाळा हे काय बोलतोयस तू. मला तर काहीच कळत नाही बघ.” मग बाळ म्हणालं, “आई गं, हे तर पदार्थ आहेत खाण्याचे. आमच्या वर्गातली कितीतरी मुलं आणतात. शाळेत मधल्या सुट्टीत एकट्यानेच गुपचूप खातात. आता जोपर्यंत हे पदार्थ मला तू देत नाहीस तोपर्यंत मी शाळेतही जाणार नाही आणि तुझ्याशी बोलणार देखील नाही!” आई म्हणाली, “अरे बाळा हे पदार्थ खाणे चांगले नाही. ते कुठे बनवलेत, कसे बनवले, त्यात काय काय मिसळले आहे कुणास ठाऊक! मी तर कधीच खाल्ले नाहीत बघ! आणि त्यासाठी खूप पैसेदेखील लागतात. हे असले पदार्थ खाल्ल्यावर आजारपणदेखील येऊ शकते.” आता बाळ हट्टालाच पेटलं, मला पिझ्झा, बर्गरच हवा! मग मात्र मांजरीचा नाईलाज झाला. तिने बाळासाठी मसालेदार पिझ्झा मागवला. बाळाने तो मिटक्या मारत खाल्ला.पुढच्या दिवशी मांजरीच्या बाळाने चायनीज भेळ मागवली. कधी कुरकुरे, तर कधी वडापाव! मांजरीला चिंता वाटू लागली. पण बाळाच्या हट्टापुढे तिला काहीच करता येईना. थोड्या दिवसातच बाळाचं पोट फुगलं. वजन इतकं वाढलं की बाळाला चालता येईना. त्यानंतर एक दिवस असा उजाडला की बाळाच्या पोटात दुखू लागलं. इतकं की ते रडू लागलं. गडबडा लोळू लागलं. शेवटी मांजरीने बाळाला डॉक्टरकडे नेलं. एक दिवस दवाखान्यात ठेवलं. तेव्हा कुठे बाळाला बरं वाटलं. पूर्ण दिवसभरात डॉक्टरने बाळाला दोन वेळा सुई टोचली, तीन-चार वेळा कडू औषध प्यायला दिलं. सात-आठ कडू कडू गोळ्या खायला दिल्या. औषधाने तर बाळाच्या तोंडाची चवच गेली. शिवाय तिथलं चव नसलेलं जेवण! हे सारं पाहून बाळ मनातून हादरलं. पिझ्झा, बर्गर खाऊन असं होत असेल तर ते न खाल्लेलं बरं; असं बाळानं मनोमन ठरवलं.घरी सोडताना डॉक्टर म्हणाले, “बाळा जर असेच बाहेरचे पदार्थ खाल्ले तर पुन्हा आजारी पडशील आणि पुढच्या वेळी पोट कापावे लागेल तुझे!” ते ऐकून बाळ खूप घाबरलं. मग मांजर आपल्या बाळाला घेऊन घरी आली. पाहते तर काय बाळाचे वर्गमित्र, बालमित्र हजर! बाळाला भेटायला. प्रत्येकाने बाळासाठी भेट आणली होती. कोणी पिझ्झा, कोणी वडापाव, तर कोणी चायनीजची भेळ! पण बाळाने नम्रपणे सांगितले, “हे असेल पदार्थ रोज खाणे चांगले नाही. तुम्ही सर्व परत घेऊन जा आणि तुम्हीसुद्धा खाऊ नका.” बाळाला आलेलं शहाणपण पाहून मांजरीचे डोळे पाणावले.
वाघाळे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ! पोल्ट्री फार्मवर हल्ला करून पाळीव कुत्रा पळवला
प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – वाघाळे (ता. शिरूर) येथे वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरूवारी (दि. ११) पहाटे तीनच्या सुमारास ग्रामविकास अधिकारी दादासाहेब तुकाराम नाथ यांच्या पोल्ट्री फार्मवर बिबट्याने हल्ला करून एक पाळीव कुत्रा पळवून नेला. घटनेच्या वेळी दोन कुत्र्यांना बिबट्या आल्याचे जाणवल्याने त्यांनी भुंकायला सुरुवात केली. त्यातील एका कुत्र्यावर झडप […] The post वाघाळे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ! पोल्ट्री फार्मवर हल्ला करून पाळीव कुत्रा पळवला appeared first on Dainik Prabhat .
Bhor News: अचानक पेटला डोंगर! पुढे ग्रामस्थांनी जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम
प्रभात वृत्तसेवा भोर – पिसावरे (ता.भोर) येथील डोंगराच्या शेजारील परिसरात अज्ञात व्यक्तींनी वणवा लावला. दरम्यान या वणव्यामुळे झाडे, झुडपे व गवत जळून खाक झाले. याचा थेट परिणाम परिसरातील वन्यजीवांवर होणार असल्याने याबाबत स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त करीत काही ग्रामस्थ एकत्र येत झाडांच्या फांद्या तोडून, माती व पाण्याचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. ग्रामस्थांच्या […] The post Bhor News: अचानक पेटला डोंगर! पुढे ग्रामस्थांनी जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम appeared first on Dainik Prabhat .

31 C