जानेवारीत परदेशी गुंतवणूकदारांकडून 'सेल ऑफ'सुरुच २ दिवसात ७६०८ कोटी स्वाहा!
मोहित सोमण: गेल्या आठवड्यात अहवालाप्रमाणे संपूर्ण वर्षभरात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Foreign Institutional Investors FIIs) यांनी शेअर बाजारातून सर्वाधिक १ लाख कोटीहून अधिक निधी काढण्याचे आपल्याला दिसले होते. याच धर्तीवर नव्या प्रोविजनल आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २०२६ ची सुरुवात सावधपणे करत त्यांनी जानेवारी २०२६ मध्येही विक्रीचाच कित्ता गिरवला आहे. उपलब्ध माहितीनुसार, जानेवारीच्या पहिल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये भारतीय इक्विटीमधून ७६०८ कोटी रुपये (८४६ दशलक्ष डॉलर्स) काढून घेतले आहेत. ही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काढलेली रोख गुंतवणूक ही बाजारातील अस्थिरतेचे प्रतिक आहे असे समजले जाते. त्यातून इराण इस्त्राईल यांच्यातील संघर्ष आता युएस व्हेनेझुएला यांच्यातील हाराकिरी या कारणामुळे बाजारातील गुंतवणूकदारांना शाश्वत मूल्य दिसत नाही. याच कारणामुळे विक्रीत वाढ होत असताना विशेष घसरण आयटी, एफएमसीजी क्षेत्रीय निर्देशांकात दिसून येत आहे.आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०२५ मध्ये नोंदवलेल्या १.६६ लाख कोटी रुपये म्हणजेच १८.९ अब्ज डॉलर्सची जावक (Outflow) बाजारात झाला. या मोठ्या विक्री पार्श्वभूमीवर रूपयांतील मूल्यात मोठी चढउतार झाली आहे. अस्थिर चलनाच्या हालचालीसह जागतिक व्यापारी तणाव, युएस भारत यांच्यातील द्विपक्षीय करारावर असलेली अनिश्चितता, सातत्याने डॉलरच्या तुलनेत घसरणाऱ्या रूपयांसह संभाव्य तिमाही निकालासाठी गुंतवणूकदारांनी बाळगलेली सावधगिरी या कारणांमुळे बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रीच सुरूच ठेवली होती.परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या (FPIs) या सततच्या विक्रीच्या दबावामुळे २०२५ मध्ये बाजारातील अहवालानुसार रुपयाचे डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन (Devaluation) ५% अवमूल्यन होण्यास आणखी कारणीभूत ठरला आहे. मात्र विश्लेषकांच्या मते बाजारातील तज्ञांचा विश्वास आहे की २०२६ मध्ये परिस्थिती बदलू शकते. २०२६ वर्ष सकारात्मक परिवर्तनासह स्थिर बाजारात बदलू शकेल असा तज्ञांचा विश्वास आहे.या सकारात्मक अपेक्षा असूनही, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FPIs) ने २०२६ ची सुरुवात सावधपणे केली आहे आणि एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार, त्यांनी केवळ २ दिवसात १ ते २ जानेवारी दरम्यान भारतीय इक्विटीमधून जवळपास ७६०८ कोटी रुपये काढून घेतले आहेत.यावर प्रतिक्रिया देताना जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक रणनीतिकार व्ही.के. विजयकुमार म्हणाले की, 'या वर्षी एफपीआय (FPI) च्या धोरणात बदल होण्याची शक्यता आहे, कारण सुधारणारी देशांतर्गत मूलभूत तत्त्वे निव्वळ परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करू शकतात. मजबूत जीडीपी वाढ आणि कॉर्पोरेट कमाईतील पुनर्प्राप्तीची शक्यता येत्या काही महिन्यांत सकारात्मक FPI प्रवाहासाठी शुभसंकेत आहेत'प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना एंजल वनचे वरिष्ठ मूलभूत विश्लेषक वकार जावेद खान म्हणाले आहेत की,'भारत-अमेरिका व्यापार संबंधांमधील सामान्यीकरण अनुकूल जागतिक व्याजदर वातावरण आणि USD-INR जोडीतील स्थिरता परदेशी गुंतवणूकदारांसाठी अनुकूल पार्श्वभूमी तयार करू शकते.' पुढे त्यांच्या मते, गेल्या वर्षाच्या तुलनेत इक्विटी मूल्यांकन तुलनेने अधिक समाधानकारक झाले आहे, ज्यामुळे गुंतवणुकीच्या पुनरुज्जीवनाला आणखी पाठिंबा मिळू शकतो.खान म्हणाले की, हा कल असामान्य नाही, कारण परदेशी गुंतवणूकदार ऐतिहासिकदृष्ट्या जानेवारीमध्ये सावध राहिले आहेत आणि गेल्या दहापैकी आठ वर्षांत त्यांनी निधी काढून घेतला आहे.परिणामी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार प्रवाह जागतिक संकेत आणि मॅक्रोइकॉनॉमिक घडामोडीं प्रति अत्यंत संवेदनशील राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात उच्च मूल्यांकन ही एक प्रमुख चिंता होती, परंतु तो दबाव सध्या कमी झाल्याचे दिसत आहे, ज्यामुळे भविष्यासाठी काही आशावाद निर्माण झाला आहे असेही ते पुढे म्हणाले आहेत.मात्र विशेष उल्लेख म्हणजे २ जानेवारीला शेअर बाजारातील व कॅपिटल मार्केटमध्ये घरगुती गुंतवणूकदारांनी (Domestic Institutional Investors DIIs) यांनी आपली रोख गुंतवणूक परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांपेक्षाही एनएसईतून काढून घेतली होती. प्रोविजनल आकडेवारीनुसार २ जानेवारीला घरगुती गुंतवणूकदारांकडून १३७८३.०२ कोटींची गुंतवणूक विक्री झाली होती तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ६८७९.९८ कोटीची विक्री झाली होती. हाच किस्सा बीएसई, एसएमईवर कायम राहत सगळ्या बाजारातील एकूण विक्रीतही घरगुती गुंतवणूकदारांनी १४६७२.१८ कोटींची अधिक गुंतवणूक विक्री परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या ७६६०.६५ कोटी तुलनेत केली होती.
ऑफर पडली महागात! पाच हजाराची साडी ५९९ रुपयांत; महिलांची एकच झुंबड, चेंगराचेंगरीत तिघी बेशुद्ध
Chhatrapati Sambhajinagar | ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेकदा स्वस्तात मस्त ऑफर दिले जातात. खासकरून हिच ऑफर जर साड्यांच्या बाबतीत असेल, तर महिलांची एकच गर्दी जमते. असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला आहे. साड्या खरेदी करण्याचा नादात येथे वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. ५ हजाराची साडी ५९९ रुपयांत मिळणार या ऑफर्समुळे महिलांच्या झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची घटना […] The post ऑफर पडली महागात! पाच हजाराची साडी ५९९ रुपयांत; महिलांची एकच झुंबड, चेंगराचेंगरीत तिघी बेशुद्ध appeared first on Dainik Prabhat .
“भारताला माहिती आहे की तो…” ; सिंधू करारावरून ४ दिवसांत पाकिस्तानची तिसरी धमकी
Indus Waters Treaty। भारताने अलिकडच्या काळात दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेत पाकिस्तानला दोन मोठे धक्के दिले आहेत. ऑपरेशन सिंदूरने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर लक्ष केंद्रित केले, तर सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये पाणीसंकट वाढत आहे. भारतातून वाहणाऱ्या नद्यांमधील पाण्याच्या कमतरतेमुळे पाकिस्तानच्या अनेक भागात पाणीटंचाई वाढली आहे. पाकिस्तान वारंवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न […] The post “भारताला माहिती आहे की तो…” ; सिंधू करारावरून ४ दिवसांत पाकिस्तानची तिसरी धमकी appeared first on Dainik Prabhat .
Drinking tea in Winter: हिवाळा सुरू झाला की अनेकांची चहा पिण्याची सवय वाढते. सर्वसाधारणपणे चहा शरीर गरम ठेवतो, असा समज आहे. काही जण तर दिवसातून ४–५ कप चहा पितात. मात्र खरंच चहा शरीराला उब देतो का? आणि जास्त चहा पिल्याने शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते का? याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या मते, दुधाचा […] The post Drinking tea in Winter: हिवाळ्यात जास्त चहा पिल्याने शरीर गरम राहतं की पाणी कमी होतं? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत appeared first on Dainik Prabhat .
बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखलमुंबई : मुंबईतील परळ भागात असलेल्या जगप्रसिद्ध टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची निनावी धमकी मिळाल्याने आज मोठी खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर पोलीस प्रशासन आणि रुग्णालय व्यवस्थापन तातडीने सतर्क झाले असून खबरदारीचे उपाय म्हणून रुग्णालय परिसर रिकामा करण्यात आला आहे.पोलीस आणि श्वानपथकाकडून तपासणी सुरूधमकीचा फोन किंवा संदेश मिळताच मुंबई पोलिसांनी तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. सध्या घटनास्थळी बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) दाखल झाले असून, श्वानपथकाच्या मदतीने रुग्णालयाच्या प्रत्येक मजल्याची आणि कोनाकोपऱ्याची कसून तपासणी केली जात आहे. पोलीस उपायुक्तांसह वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.https://prahaar.in/2026/01/05/chandigarh-aap-sarpanch-jharmal-singh-murder-case-armed-men-shot-and-disappeared-in-13-seconds-ex-cm-sukhbir-singh-badal-share-footage/रुग्ण आणि नातेवाईकांची धावपळटाटा रुग्णालय हे कर्करोगाच्या उपचारासाठी देशातील सर्वात मोठे केंद्र असल्याने तिथे दररोज हजारो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित असतात. बॉम्बची बातमी पसरताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली असून, बाह्यरुग्ण विभाग (OPD) आणि इतर गर्दीच्या जागा रिकाम्या करण्यात आल्या आहेत.धमकीचा शोध सुरूहा निव्वळ अफवेचा प्रकार आहे की घातपाताचा प्रयत्न, याचा तपास पोलीस करत आहेत. ज्या क्रमांकावरून किंवा माध्यमातून ही धमकी आली, त्याचा तांत्रिक शोध घेतला जात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पोलीस सर्वतोपरी तपास करत आहेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विपुल अमृतलाल शाह आणि सनशाईन पिक्चर्स लिमिटेड यांनी त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द केरळ स्टोरी 2’, ज्याचे अधिकृत शीर्षक ‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’ आहे, याच्या प्रदर्शन तारखेची अधिकृत घोषणा केली आहे. हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.ही कथा पुन्हा एकदा वास्तवातील सत्य घटनांवर आधारित असून, खऱ्या पीडितांचे आवाज, सर्वांसमोर असूनही दडपल्या गेलेल्या सत्य कथा आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर प्रकाश टाकते. या चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये नव्या कलाकारांची निवड करण्यात आली असून, त्यांचा अभिनय साधा, प्रामाणिक आणि भारताच्या जमिनीवरील वास्तवाशी जोडलेला आहे.https://youtu.be/4C07SyM9YnYhttps://www.instagram.com/reel/DTHnvB0E3gX/?igsh=MWwwaWkzZ3h1cTJyNQ==सनशाईन पिक्चर्स लिमिटेडने चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करत एक मोशन पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरवर लिहिले आहे:त्यांनी सांगितले, ही फक्त एक कथा आहे.त्यांनी तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला.तिला बदनाम करण्याचाही प्रयत्न झाला.पण सत्य थांबले नाही.कारण काही कथा कधीच संपत नाहीत.या वेळी कथा आणखी खोलवर जाते.या वेळी वेदना अधिक तीव्र आहेत.बियॉन्ड द केरळ स्टोरी२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ने संपूर्ण देशभरात मोठी चर्चा निर्माण केली होती आणि बेस्ट डायरेक्टर व बेस्ट सिनेमॅटोग्राफीसाठी राष्ट्रीय पुरस्कारही पटकावले होते. आता ‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’ पुन्हा एकदा अधिक प्रभावी, सशक्त आणि व्यापक कथानकासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.अलीकडच्या काळातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या फ्रँचायझींपैकी एक ठरलेला हा चित्रपट प्रेक्षकांकडून जबरदस्त पाठिंबा मिळवत असून, २०२६ मधील सर्वात मोठ्या थिएटर रिलीजपैकी एक मानला जात आहे. यावेळी हा चित्रपट भारताच्या विविध भागांतील सत्य घटनांवर आधारित आहे.विपुल अमृतलाल शाह यांच्या सनशाईन पिक्चर्स लिमिटेडच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते कामाख्या नारायण सिंग यांनी केले असून, आशीष ए. शाह यांनी या चित्रपटाची सह-निर्मिती केली आहे. हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
“संगीत सोमला लवकरच नरकात पाठवणार” ; भाजप नेत्याला बांगलादेशातून धमकी
Sangeet Som Death Threat। भाजपचे फायरब्रँड नेते आणि माजी आमदार संगीत सोम हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात, ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी, हे प्रकरण त्यांच्या सुरक्षेशी संबंधित आहे. संगीत सोम यांना अज्ञात क्रमांकावरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तक्रार दाखल करून चौकशी सुरू केली आहे. सोम यांनी […] The post “संगीत सोमला लवकरच नरकात पाठवणार” ; भाजप नेत्याला बांगलादेशातून धमकी appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: कच्च्या तेलाच्या निर्देशांकात पहाटे प्रचंड अस्थिरता निर्माण झाल्याने कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत मोठी हालचाल झाली परंतु टेक्निकल व भूराजकीय पातळीवर कच्च्या तेलाच्या निर्देशांकात सुरूवातीच्या ट्रेडिंगमध्ये घसरण होत आहे. सकाळच्या सत्रात दुपारी १ वाजेपर्यंत तेलाच्या किंमतीत ०.८५% घसरण झाली आहे. सकाळी तेलाच्या निर्देशांकात १% पेक्षा अधिक पातळीवर घसरण झाल्याने कच्च्या तेलावर दबाव निर्माण झाला आहे. युएस व्हेनेझुएला यांच्यातील वादानंतर अमेरिकेने व्हेनेझुएलावर कब्जाच घेतल्याने युएस रिफायनरीला व्हेनेझुएलाचा प्रवेश सुकर झाला आहे. व्हेनेझुएला जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा देश असल्याने युएस तेलाच्या पुरवठ्यात मोठी वाढ झाल्याने किंमतील घसरण होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.आज सोमवारी अस्थिर आशियाई व्यापारात तेलाच्या किमतींमध्ये मोठी चढउतार झाली होती कारण अमेरिकेने आठवड्याच्या शेवटी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्यानंतर त्या लॅटिन अमेरिकन देशावर नियंत्रण मिळवत असल्याचे युएसने जाहीर केले.यासह भूराजकीय कारणासह येमेनमधील संघर्षामुळे सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यातील वाढलेल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या व्यापाऱ्यांनी ओपेकच्या तेल उत्पादन अपरिवर्तित ठेवण्याच्या निर्णयावरही विचार केला होता. ज्यामुळे सुरळीत पुरवठा असण्याची शाश्वती निर्माण झाल्याने बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीवर दबाव निर्माण झाला. उपलब्ध माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने आठवड्याच्या शेवटी केलेल्या कारवाईत मादुरो यांना पकडले असून त्यांना आता व्हेनेझुएलाच्या या नेत्यावर न्यूयॉर्कमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीचे आरोप ठेवून खटला चालवला जाणार आहे.प्रसारमाध्यमांना उत्तर देताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, नवीन नेता निवडला जाईपर्यंत वॉशिंग्टन व्हेनेझुएलाचा कारभार पाहणारे आहे आणि तसेच प्रमुख अमेरिकन तेल कंपन्यांना देशात प्रवेश करून तेथील तेल उत्पादनावर नियंत्रण ठेवण्याची परवानगी दिली जाईल ज्याचाही फायदा आज क्रूडवर झाला. व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात मोठा तेलसाठा असला तरी देश इन्फ्रास्ट्रक्चर अथवा जुन्या पायाभूत सुविधांमुळे बलदंड नाही. देशातील उत्पादन मंदावले असताना अमेरिकेच्या कठोर निर्बंधांमुळे देशाच्या निर्यातीवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे आर्थिक संकटातून व्हेनेझुएला जाण्याची दाट शक्यता आहे. दिवसाच्या सुरुवातीला किमती ०.५% पर्यंत वाढल्या होत्या परंतु नंतर किंमती घसरू लागल्या.तज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये तेलाच्या किमती १८% पेक्षा जास्त घसरल्या आहेत ज्या गेल्या पाच वर्षांतील सर्वात मोठ्या प्रमाणात घसरल्या होत्या. मुबलक पुरवठ्याच्या भाकीतामुळे आणि मागणीतील घसरणीमुळे कच्च्या तेलाच्या बाजाराला मोठा फटका बसला होता.याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना विश्लेषकांनी सांगितले की, व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेचे नियंत्रण आल्यास जागतिक पुरवठा वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवर आणखी दबाव येऊ शकतो, तथापि, अशा परिस्थितीला प्रत्यक्षात येण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. ओपेक सदस्य देशांमधील भूराजकीय धोक्यांपेक्षा जागतिक पुरवठ्याच्या सातत्यपूर्ण अतिरिक्ततेच्या अपेक्षा अधिक प्रभावी ठरल्याने कच्च्या तेलाच्या किमती १.३% नी घसरून ५१५५ वर स्थिरावल्या.अमेरिकेच्या आंशिक नाकेबंदीमुळे व्हेनेझुएलामध्ये पुरवठ्यात व्यत्यय तीव्र झाला आणि विहिरी बंद कराव्या लागल्या असल्या तरी, वाढते उत्पादन आणि मुबलक साठ्यामुळे व्यापक बाजारावर दबाव कायम राहिला. नजीकच्या काळात पुरवठा उपलब्धता वाढेल. ओपेक आपल्या आगामी बैठकीत उत्पादन वाढीला विराम देण्याच्या निर्णयाची पुष्टी करेल अशी व्यापक व्यापारांची अपेक्षा आहे. दुपारी १ वाजेपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Futures मध्य ०.८९% घसरण झाल्याने दरपातळी प्रति डॉलर ५६.८१ बॅरलवर पोहोचले आहे. Brent Futures निर्देशांकात दुपारी १ वाजेपर्यंत ०.८१% घसरण झाल्याने डॉलरची दरपातळी ६०.२६ प्रति बॅरलवर पोहोचली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्येही (Multi Commodity Exchange MCX) कच्च्या तेलाच्या निर्देशांकात ०.१९% घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति बॅरेल दरपातळी ५१४५ रुपयांवर पोहोचली आहे.
‘ओएमजी’च्या तिसऱ्या भागात पाहायला मिळणार मोठा बदल; लोकप्रिय अभिनेत्री दिसणार मुख्यभूमिकेत
Oh My God 3 Film | अभिनेता अक्षय कुमारच्या ‘ओएमजी’ या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र या नव्या भागात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. गेल्या दोन भागांमध्ये देवाच्या भूमिकेत दिसलेला अक्षय कुमार यावेळी मुख्य भूमिकेत नसून तो केमिओ करणार आहे. अक्षय कुमार या […] The post ‘ओएमजी’च्या तिसऱ्या भागात पाहायला मिळणार मोठा बदल; लोकप्रिय अभिनेत्री दिसणार मुख्यभूमिकेत appeared first on Dainik Prabhat .
Kamala Harris on Donald Trump। व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या कारवाईने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. अत्यंत गुप्त आणि जलद कारवाईत अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले. या घटनेने जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, माजी उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर तीव्र टीका केली […] The post अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला पण देशातूनच विरोध ; कमला हॅरिस यांनी सांगितला ट्रम्पचा प्लॅन, म्हणाल्या,”ड्रग्स-डेमोक्रेसी अन्…” appeared first on Dainik Prabhat .
अभिनेत्री, निर्माती आणि मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या दीपिका पादुकोण यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नव्या आणि तरुण क्रिएटिव टॅलेंटला पुढे आणण्यासाठी एक नवी पहल सुरू केली आहे. खऱ्या कथा आणि नव्या टॅलेंटला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या विचाराला पुढे नेत, दीपिकाने आज ‘द ऑनसेट प्रोग्राम’च्या सुरुवातीची घोषणा केली. हा त्यांच्या Create With Me प्लॅटफॉर्मचा पुढील टप्पा असून, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन आणि जाहिरात क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नव्या क्रिएटिव कलाकारांना संधी देणे हा यामागचा उद्देश आहे. त्यांची प्रतिभा पाहिली जावी, ऐकली जावी आणि योग्य प्रकारे समोर यावी, यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.https://www.instagram.com/reel/DTHWjwdkuMR/?igsh=MXR4OWs2aHMzcGUzOQ==हा प्रोग्राम जिथे गुणवंत आणि होतकरू लोकांना शिकण्याच्या संधी देईल, तिथेच ज्यांच्याकडे स्वतःचे प्रोजेक्ट हाताळण्याचा अनुभव आणि कौशल्य आहे, अशा लोकांसाठीही पुढे जाण्याचे व्यासपीठ ठरेल. पहिल्या टप्प्यात लेखन, दिग्दर्शन, कॅमेरा, लाईट, एडिटिंग, साउंड, आर्ट, कॉस्च्युम डिझाइन, हेअर स्टायलिंग, मेकअप आणि प्रोडक्शन अशा विभागांचा समावेश असेल.आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत दीपिकाने म्हटले, “गेल्या एक वर्षापासून देशात आणि देशाबाहेर असलेल्या उत्कृष्ट क्रिएटिव टॅलेंटला ओळखणे आणि त्यांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी व अनुभवण्यासाठी एक मंच देण्याची भावना माझ्या मनात खोलवर आहे. ‘द ऑनसेट प्रोग्राम’च्या लाँचची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे आणि पुढील पिढीतील क्रिएटिव टॅलेंटशी तुम्हा सर्वांची ओळख करून देण्याची मला उत्सुकता आहे.”देश आणि परदेशातील क्रिएटिव टॅलेंटला ओळखण्याच्या आपल्या व्हिजनला पुढे नेत, दीपिका पादुकोण यांचा द ऑनसेट प्रोग्राम आता https://onsetprogram.in/ येथे पाहता येईल, जिथे इच्छुक लोक आपले काम पाठवू शकतात आणि इंडस्ट्रीतील सर्वोत्तम लोकांसोबत काम करण्याची संधी मिळवू शकतात.
मोहित सोमण: बंधक बँकेने समाधानकारक कामगिरी नोंदवल्यानंतर बँकेच्या शेअर्समध्ये ४% वाढ सुरुवातीच्या सत्रात झाली आहे. बँकेने आपल्या एकूण ठेवीत ११% वाढ नोंदवल्यानंतर बँकेच्या शेअरने आच चांगली कामगिरी नोंदवली आहे. दुपारी १२.२० वाजेपर्यंत बँकेच्या शेअर्समध्ये २.०१% वाढ झाल्याने शेअर १४७.३६ रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. सकाळी सुरुवातीच्या कलात शेअर १५०.०५ रूपये प्रति शेअर इतक्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला होता. बँकेच्या एकूण तिमाहीतील आकडेवारीनुसार, बँकेच्या एकूण कर्ज व अँडव्हान्सेसमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १०% वाढ नोंदवल्याचे बँकेने स्पष्ट केले. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या १३२०१९ कोटींच्या तुलनेत या डिसेंबरमध्ये १४५२२७ कोटींवर वाढ झाल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. सप्टेंबर महिन्यात ते १५८०७५ कोटी रुपये होते. तिमाही बेसिसवर (Quarter on Quater QoQ) मात्र ते घसरण डिसेंबर २०२५ पर्यंत १५५७२३ कोटींवर म्हणजेच ०.९०% घसरले आहे.बँकेच्या आकडेवारीनुसार, बँकेच्या कासा ठेवीत (Current Account Saving Account CASA) ठेवीत इयर ऑन इयर बेसिसवर मात्र -३.३% घसरण झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ४४७३५ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ४२७३० कोटीवर घसरण झाली. बँकेच्या रिटेल ठेवीत (Retail Term Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर ४.१% वाढ झाल्याचे बँकेने नोंदवले होते. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ५२०६३ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ७०६९० कोटींवर वाढ झाली आहे. एलसीआर गुणोत्तर (Liquidity Coverage Ratio LCR) १४९.१४% असल्याचे बँकेने निकालाद्वारे स्पष्ट केले होते. तर कासा गुणोत्तर डिसेंबर महिन्यात २७.२६% व सप्टेंबर महिन्यात २७.९७% होते.या निकालामुळे बँकेच्या ठेवीत व तरलतेत (Liquidity) चांगली सुधारणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तत्पूर्वी मागच्या महिन्यात बँकेने आपल्या (अनुत्पादक मालमत्ता Non Performing Assets) ६९.३१ अब्ज रूपयांचे एनपीए बिडींग प्रक्रियेद्वारे घोषित केले होते. सप्टेंबर २०२४ पर्यंत बँकेच्या तरलतेवर परिणाम झाल्याने व असेट क्वालिटीत नकारात्मक परिणाम झाल्याने एनपीए विकण्याचा मोठा निर्णय बँकेने गेल्या महिन्यात घेतला. यंदा बँकेच्या कामगिरीत सुधारणा झाल्याने मोठ्या प्रमाणात फंडामेंटल सुधारल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. गेल्या ५ दिवसात बँकेच्या शेअर्समध्ये १.२३% वाढ झाली असून गेल्या १ महिन्यात शेअर्समध्ये ५.१८% वाढ झाली तर संपूर्ण वर्षभरात मात्र शेअर्समध्ये २.८२% घसरण झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) ०.९५% वाढ झाली आहे.
चंदीगड : पंजाबमध्ये गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना अमृतसरमध्ये घडली आहे. आम आदमी पार्टीचे सरपंच झरमल सिंग यांची एका लग्न समारंभात घुसून हत्या करण्यात आली. आता या घटनेचे अत्यंत भयानक सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या खळबळजनक हत्येची जबाबदारी कुख्यात गँगस्टर डोनी बल, प्रभ दासुवाल आणि देवेंद्र बंबीहा ग्रुपने घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी या कृत्याची कबुली दिल्याचे समजते. गँगस्टर राजवटीमुळे पंजाबमधील सामान्य जनता आणि लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.नेमकं काय घडलं?
पुणे: प्रभाग क्रमांक २० (शंकर महाराज मठ–बिबवेवाडी) येथील राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. गौरव घुले, प्रितम नागपूरे, अस्मिता शिंदे व रश्मी आमराळे यांच्या प्रचार फेरीला लोअर इंदिरानगर परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बिबवेवाडीच्या विकासाचे स्पष्ट व्हिजन मांडणाऱ्या उमेदवारांचे मतदारांनी जंगी स्वागत केले. प्रचारादरम्यान ज्येष्ठ नागरिक संघ, भजनी मंडळे तसेच […] The post पुणे : बिबवेवाडीचा चेहरामोहरा बदलणार, प्रभाग २०मधील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांनी व्यक्त केला विश्वास appeared first on Dainik Prabhat .
उमर खालिद, शरजील इमाम यांना झटका ! जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ; अन्य ५ आरोपींना दिलासा
Delhi Riots। २०२० च्या दिल्ली दंगली कट रचण्याच्या प्रकरणात विद्यार्थी कार्यकर्ते उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या जामीन अर्जांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावले. खटल्यापूर्वी आरोपींच्या दीर्घ कारावासापेक्षा राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेचे विचार जास्त आहेत यावर सर्वोच्च न्यायालयाने भर दिला. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. बचाव पक्षाने […] The post उमर खालिद, शरजील इमाम यांना झटका ! जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ; अन्य ५ आरोपींना दिलासा appeared first on Dainik Prabhat .
लाडक्या बहिणींना महापालिका निवडणूकीपूर्वी मिळणार खुशखबर; खटाखट जमा होणार ३ हजार रुपये
CM Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात ३१ डिसेंबर २०२५ रोजी नोव्हेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हफ्ता जमा झाला. डिसेंबरअखेर असल्याने थकीत तीन महिन्यांचे एकत्रित ४५०० रुपये मिळतील, अशी आशा महिलांना होती; मात्र प्रत्यक्षात केवळ एकच हफ्ता आल्याने अनेकींचा अपेक्षाभंग झाला. मात्र लाडकी बहीण योजनेच्या पुढील हफ्ताबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली […] The post लाडक्या बहिणींना महापालिका निवडणूकीपूर्वी मिळणार खुशखबर; खटाखट जमा होणार ३ हजार रुपये appeared first on Dainik Prabhat .
CSB Bank Share: तिमाही निकालानंतर सीएसबी बँकेचा शेअर ५% उसळत अप्पर सर्किटवर पोहोचला
मोहित सोमण:सीएसबी (Catholic Syrian Bank Limited) बँकेच्या शेअर्समध्ये आज जवळपास ५% वाढ झाली आहे. त्यामुळे आज तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर शेअर इंट्राडे उच्चांकावर (All time High) पोहोचला असून याशिवाय अप्पर सर्किटवरही पोहोचला. दुपारी १२ वाजेपर्यंत बँकेच्या शेअर्समध्ये ५.०५% वाढ झाल्याने प्रति शेअर ५०७.५५ रूपयांवर व्यवहार करत आहे. बँकेच्या एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या तिमाहीतील आकडेवारीनुसार, बँकेच्या एकूण ठेवीत (Total Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) डिसेंबरपर्यंत २१% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये ३३४०७ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ४०४६० कोटींवर वाढ नोंदवली गेली. कासा ठेवीत (CASA Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर ३% वाढ नोंदवल्याचे स्पष्ट झाले. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ८०४२ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ८३१६ कोटीवर वाढ नोंदवली.आकडेवारीनुसार, बँकेच्या एकूण मुदत ठेवीत (Term Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर २७% वाढ नोंदवली गेली. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या २५४३६५ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ३२१४४ कोटींवर बँकेने वाढ नोंदवली आहे. सोने अथवा संबंधित वस्तू तारण कर्जात इयर ऑन इयर बेसिसवर ४६% वाढ झाल्याचे बँकेने स्पष्ट केले. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या १३०१८ कोटींच्या तुलनेत या डिसेंबरमध्ये १९०२३ कोटींवर वाढ नोंदवली गेली आहे. बँकेच्या स्थूल आगाऊ ठेवीत (Gross Advances) इयर ऑन इयर बेसिसवर २९% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या २८९१५ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ३७२०८ कोटीवर वाढ नोंदवली आहे.गेल्या पाच दिवसांत बँकेच्या शेअर्समध्ये १८.४१% वाढ झाली असून गेल्या १ महिन्यात बँकेच्या शेअर्समध्ये ३१.४७% वाढ झाली आहे तर संपूर्ण वर्षभरात ६२.९५% व इयर टू डेट बेसिसवर (YTD) ११.६२% वाढ झाली. तत्पूर्वी २ जानेवारीला निकालानंतर बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याने शेअर अप्पर सर्किटवर (52 Week High) पातळीवर पोहोचला होता. त्यादिवशी सीएसबी बँक लिमिटेडने ५-दिवस २०-दिवस, ५०-दिवस, १००-दिवस आणि २००-दिवसांचा अंकासह दैनंदिन एमवीए (Daily Moving Average DMA) मूव्हिंग सरासरीपेक्षा चार्टवर व्यापार करत असल्याचे स्पष्ट झाले होते. ही तांत्रिक स्थिती गेल्या वर्षभरात स्टॉकच्या मार्गावर एक मजबूत वरचा कल (Upside) आणि गुंतवणूकदारांचा विश्वास दर्शवते. त्या दिवशी त्याच्या क्षेत्राने ०.७४% ने कमी कामगिरी केली असली तरी शेअरची बुलिग कामगिरी व एकूण गती मजबूत राहिली होती.
केवळ ७ कोटींचा दाक्षिणात्य सिनेमा, पण थरार हॉलीवूडला टक्कर देणारा वाचा सविस्तर
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने गेल्या काही वर्षांत दर्जेदार कथानक, जबरदस्त सस्पेन्स आणि हादरवून सोडणाऱ्या क्लायमॅक्समुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विजय सेतुपतीचा 'महाराजा' असो किंवा मोहनलाल यांचा 'दृश्यम', या सिनेमांनी प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवलं. त्यामुळेच हल्ली प्रेक्षक वेगळ्या कथांच्या, विचार करायला लावणाऱ्या गोष्टींच्या आणि शेवटपर्यंत थरार टिकवून ठेवणाऱ्या सिनेमांच्या शोधात असतात.असाच एक तमिळ थ्रिलर २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याने सस्पेन्सच्या बाबतीत या सगळ्या सिनेमांना जोरदार टक्कर दिली. चित्रपटगृहात रिलीज होताच प्रेक्षकांचे श्वास रोखून धरणारा हा सिनेमा आजही ‘बेस्ट क्राईम थ्रिलर’ म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे, आता हा चित्रपट ओटीटीवरही प्रचंड लोकप्रिय ठरत आहे.या सिनेमाची कथा अरुण नावाच्या तरुणाभोवती फिरते. अरुणला चित्रपट दिग्दर्शक बनायचं असतं आणि त्यासाठी तो सायको किलर्सवर सखोल अभ्यास करत असतो. मात्र कालांतराने त्याला पोलीस अधिकारी म्हणून नोकरी स्वीकारावी लागते. इथूनच कथेला खरा वेग येतो. कारण असाच एक सायको किलर अमानुष खुनी प्रत्यक्षात शहरात धुमाकूळ घालत असतो. अशी काहीशी ही कथा आहेया मास्टरपीस चित्रपटाचं नाव आहे रतसासन. राम कुमार दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता विष्णु विशालने मुख्य मुख्य भूमिका साकारली आहे. अमला पॉल आणि सरवनन यांनीही दमदार अभिनय केला आहे.या चित्रपटाला IMDb वर ८.३ इतकं दमदार रेटिंग मिळालं असल्यामुळे त्यामुळे थ्रिलरप्रेमींसाठी हा सिनेमा पाहणं जवळपास अनिवार्यच आहे. विशेष म्हणजे, रतसासन हा कोणताही मोठ्या बजेटचा सिनेमा नव्हता. केवळ ७ कोटी रुपयांत तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २३ कोटींहून अधिक कमाई केली. मात्र कमाईपेक्षा जास्त या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं.कुठे पाहाल?हा थरार अनुभवायचा असेल, तर रतसासन सध्या जिओ सिनेमा आणि अमेझॉन प्राईम व्हिडिओ या दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. विकेंडला घरबसल्या जबरदस्त थ्रिलर पाहायचा असेल, तर हा सिनेमा नक्कीच तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायला हवा.
मोहित सोमण: विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड (Vibhor Steel Tubes Limited), धनलक्ष्मी बँक, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक या तीनही संस्थेचे तिमाही निकाल जाहीर करण्यात आले आहेत.१) Vibhor Steel Tubes Limited- कंपनीने आज तिमाही निकाल जाहीर केलेला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, विभोरला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) ५९.५५% वाढ झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२६ मधील दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात ०.८९ कोटीवरुन १.४२ कोटीवर वाढ झाली आहे. कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर १९.३४% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीतील २६६.०९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत २८१.७६ कोटींवर वाढ झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले. कंपनीच्या ईबीटातही इयर ऑन इयर बेसिसवर सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ७.१० कोटी तुलनेत या तिमाहीत ९.४१ कोटीवर वाढ झाली आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या ईबीटा (EBITDA) मार्जिनमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ३.०१% तुलनेत ३.३४% वाढ झाली आहे. तर पीएटी (PAT Margin) इयर ऑन इयर ०.३८% वरून ०.५०% वाढले आहेकंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या स्टील ट्युब उत्पादन झालेल्या वाढीमुळे महसूलातही वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले. यासह प्रति टन वाढलेल्या महसूलासह कंपनीच्या उत्पादन खर्चात (Manufacturing Cost Control) मुळे मार्जिनमध्ये वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले. हरियाणा स्थित विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड ही पहिल्या पिढीतील प्रवर्तकांच्या नेतृत्वाखालील कंपनी असून स्टील पाईप्स व ट्यूब्सची एक मोठी उत्पादक, निर्यातदार आणि वितरक आहे. कंपनीचे कार्यक्षेत्र प्रामुख्यानेअभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील उत्पादनात आहे. कंपनीच्या उत्पादन व सेवा पोर्टफोलिओत ईआरडब्ल्यू पाईप्स, हॉट-डिप गॅल्वनाइज्ड पाईप्स, हॉलो सेक्शन्स, प्रायमर-पेंटेड पाईप्स, क्रॅश बॅरियर्स, षटकोनी खांब आणि ट्रान्समिशन लाईन टॉवर्ससह विविध प्रकारच्या उत्पादनाचा समावेश आहे. सकाळच्या सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये २% वाढ झाली असून सकाळी ११.२१ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये १.२७% वाढ झाल्याने शेअर १३८.३७ रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे.२) Dhanlaxmi Bank- धनलक्ष्मी बँकेने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. बँकेने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या एकूण व्यवसायात (Total Business) इयर ऑन इयर बेसिसवर २०.७६% वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार पाहिल्यास एकूण व्यवसायात गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या २६४४३ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ३१९३३ कोटींवर वाढ झाली आहे.बँकेच्या ठेवीत (Deposits) गेल्या वर्षीच्या डिसेंबरमधील १५०६७ कोटी तुलनेत या डिसेंबर महिन्यात १८.३९% वाढीसह १७८३९ कोटींवर वाढ नोंदवली आहे. बँकेच्या कासा ठेवीत (Current Account Saving Account CASA Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर ९.०४% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमधील ४६०२ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ५०१८ कोटीवर वाढ झाली. बँकेच्या सोने तारण कर्ज पुरवठ्यातही तब्बल इयर ऑन इयर बेसिसवर ५०.८९% वाढ झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या ३५५३ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ५३६१ कोटीवर वाढ झाली आहे. बँकेच्या अँडव्हान्समध्येही इयर ऑन इयर बेसिसवर २३.९०% वाढ नोंदवली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये ११३७५ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये १४०९४ कोटींवर वाढ नोंदवली आहे. एमएसएमई कर्जातही वाढ झाल्याचे बँकेने म्हटले. आकडेवारीनुसार, ही वाढ गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या १६१६ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये २०६४ कोटींवर वाढ झाली आहे जी २७.७२% नोंदवली गेली आहे. निकालानंतर बँकेच्या शेअर्समध्ये ४.६९% जवळपास ५% वाढ झाल्याने शेअर सकाळी ११.३३ वाजेपर्यंत २६.१३ रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे.३) Capital Small Finance Bank- कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक (Capital Small Finance Bank) तिमाही निकाल जाहीर केला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये प्रोविजनल दिलेल्या माहितीनुसार, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेच्या एकूण ठेवीत (Total Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमधील ८३८४ कोटी तुलनेत या डिसेंबर महिन्यात १८% वाढ झाल्याने ठेवी ९९३१ कोटींवर पोहोचल्या. बँकेच्या स्थूल एनपीएत (Gross Non Performing Assets NPA) कुठलाही बदल झालेला नाही. गेल्या सप्टेंबरमध्ये असलेल्या २.७% वरून डिसेंबर महिन्यात २.७% एनपीए कायम आहे. दरम्यान बँकेच्या एकूण अँडव्हान्समध्ये (Gross Advances) इयर ऑन इयर बेसिसवर १९.८% वाढ झाल्याचे बँकेने म्हटले. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ७१८४ कोटीवरुन या डिसेंबरमध्ये ८१६४ कोटींवर वाढ झाली असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.बँकेच्या मते, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत बँकेची एकूण कर्जे ८१६४ कोटी रूपये होती. इयर ऑन इयर बेसिसवर कर्जात वार्षिक १९.८% वाढ नोंदवली गेल्याचे बँकेच्या व्यवस्थापनाने आकडेवारी स्पष्ट केले. आणि तिमाही बेसिसवर (QoQ) ३.३% वाढ नोंदवली गेली.बँकेच्या आकडेवारी तिमाहीतील वितरित कर्जे वाढून ९१९ कोटी झाली, जी तिसऱ्या तिमाहीतील (Q3FY25) मधील ७३७ कोटींच्या तुलनेत २४.७% वाढ दर्शवते. बँकेच्या रिटेल कर्ज देण्याच्या दृष्टिकोनानुसार, कर्ज पोर्टफोलिओ विविध आहे, ज्यात ९८.७% कर्जे सुरक्षित आहेत.विशेषतः बँकेच्या असेट क्वालिटीत कुठलाही बदल झालेला नाही. बँकेच्या मते वर्षभर अथवा तिमाहीत मालमत्तेची गुणवत्ता स्थिर राहिली असून ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंत एकूण एनपीए २.७% होते, जे दुसऱ्या तिमाहीत (Q2FY26) आणि तिसऱ्या तिमाहीतील (Q3FY25) मधील २.७% च्या तुलनेत समान आहे. याविषयी बोलताना बँकेने,' हे बँकेच्या विवेकपूर्ण अंडररायटिंग, मजबूत वसुली यंत्रणा आणि ससुरक्षित, विविध व लहान-लहान कर्जांच्या पोर्टफोलिओमधील सातत्यपूर्ण भर दर्शवत आहे.एकूण आकडेवारी पाहिल्यास, बँकेच्या एकूण ठेवी ९९३१ कोटींवर पोहोचल्या आहेत. इयर ऑन इयर बेसिसवर १८.५% आणि तिमाही बेसिसवर ६.६% वाढल्या आहेत. कासा ठेवीत (CASA) प्रमाण सुधारले आणि डिसेंबर २०२५ पर्यंत ३५.९% च्या चांगल्या पातळीवर पोहोचले जे सप्टेंबरमध्ये ३३.९% होते. हे स्थिर आणि किफायतशीर ठेव प्रणाली तयार करण्यावर बँकेचे सातत्यपूर्ण लक्ष दर्शवते.लोन टू डिपोझिट रेशो (Loan to Deposit Ratio) बाबत बँकेने आकडेवारी देताना, ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी बँकेचे सरासरी सीडी गुणोत्तर प्रमाण ८०.४% नोंदवले असून सप्टेंबर तिमाहीत ८१.६% आणि डिसेंबर तिमाहीत रोजी संपलेल्या तिमाहीसाठी ८१.१% होते. ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी बँकेचे एलसीआर (Liquidity Coverage Ratio LCR)२१५.८२% होते. त्यामुळे बँकेच्या मते बँकेचे आर्थिक फंडामेंटल मजबूत स्थितीत आहे. आज सकाळी बँकेच्या शेअर्समध्ये १% घसरण झाली आहे. सकाळी ११.३३ वाजेपर्यंत बँकेच्या ०.१३% घसरण झाली असून शेअर २७०.३५ रूपये प्रति शेअरवर सुरु आहे.
Pune : शिवसेना उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत; प्रभाग क्रमांक १५ मध्ये लाडक्या बहिणींकडून औक्षण
मांजरी– प्रभाग क्रमांक १५ मांजरी- केशवनगर- साडेसतरानळी- शेवाळेवाडी परिसरात शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सुरुवात झाली. ठिकठिकाणी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे व माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपअण्णा घुले यांच्या नेतृत्वाखाली मांजरी येथील मांजराई देवी व केशवनगर येथील रेणुका माता मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी […] The post Pune : शिवसेना उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत; प्रभाग क्रमांक १५ मध्ये लाडक्या बहिणींकडून औक्षण appeared first on Dainik Prabhat .
Assam Earthquake।आसामला आज पहाटे जोरदार भूकंपाचा धक्का बसला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाचे केंद्र आसाममधील मोरीगाव जिल्ह्यात होते आणि त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.१ इतकी होती. आसाम आणि इतर अनेक ईशान्येकडील राज्यांमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यामुळे लोक घाबरून घराबाहेर पडले. पहाटे ४:१७ वाजता भूकंप झाला, त्यावेळी बहुतेक लोक अजूनही झोपेत होते. आसाम व्यतिरिक्त, मेघालय, […] The post आसाम हादरले ! झोपेत आलेल्या भूकंपाच्या धक्क्याने घाबरून लोक घराबाहेर पळाले ; ५.१ तीव्रतेचे भूकंपाचे बसले धक्के appeared first on Dainik Prabhat .
हडपसर– महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रभाग क्रमांक १७ (रामटेकडी – माळवाडी – वैदूवाडी) येथील अधिकृत उमेदवारांनी उत्साहात निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला विजयी करण्याचे आवाहन उमेदवारांनी मतदारांना केले. प्रभाग क्रमांक १७ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार खंडू सतीश लोंढे, शुभांगी किरण होले-शिवरकर, पायल विराज तुपे आणि प्रशांत उर्फ मामा वसंतराव तुपे यांनी […] The post Pune : प्रभाग क्रमांक १७ मध्ये उमेदवारांचा जोरदार प्रचार; सर्वांगीण विकासासाठी भाजपला विजयी करण्याचे आवाहन appeared first on Dainik Prabhat .
12 वर्षांपूर्वी 239 प्रवाशांसह गायब झालेल्या MH370 विमानाचे रहस्य उलगडू शकते. 31 डिसेंबर 2025 पासून जगातील सर्वात महागडे शोधकार्य पुन्हा सुरू झाले आहे. मलेशियाच्या वाहतूक मंत्रालयाच्या मते, नवीन पद्धतीने विमानाचे स्थान निश्चित करण्याचा अंदाज लावण्यात आला आहे. अमेरिकन खाजगी कंपनी ओशन इन्फिनिटीने सांगितले आहे की, विमान शोधल्यानंतरच ती 630 कोटी रुपये शुल्क घेईल, त्याआधी नाही. मंडे मेगा स्टोरीमध्ये MH-370 विमानाचे रहस्य आणि त्याच्या शोधकार्याशी संबंधित संपूर्ण कथा… शेवटी MH-370 विमानासोबत काय झाले, याचे अचूक उत्तर कोणालाही माहीत नाही. 6 मोठ्या थिअरीज प्रचलित आहेत… **** ग्राफिक्स: द्रगचंद्र भुर्जी आणि अजित सिंग
काँग्रेसच्या संगीता तिवारी यांचा राजीनामा; ‘या’पक्षात प्रवेश करण्याची शक्यता
Sangeeta Tiwari | राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र यादरम्यान पुण्यातकाँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या माजी महिला उपाध्यक्ष संगीता तिवारी यांनी आपल्या सदस्यत्वाचा अधिकृत राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या विधानसभा निवडणुकीपासून संगीता तिवारी पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय […] The post काँग्रेसच्या संगीता तिवारी यांचा राजीनामा; ‘या’ पक्षात प्रवेश करण्याची शक्यता appeared first on Dainik Prabhat .
अमेरिका-व्हेनेझुएला तणावाचा सोन्याच्या किमतींवर परिणाम ; आज सोन्याच्या किंमतीत भरघोस वाढ, वाचा
Gold Silver Rate। आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्या सुरु असलेल्या तणावाचा परिणाम जगातील सर्वच जगावर होत आहे.दरम्यान, आता या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत वायदा बाजारात आज सोन्याच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ फेब्रुवारी २०२६ रोजी एक्सपायरी असलेले सोन्याचे वायदा १,३६,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. मागील ट्रेडिंग दिवशी सोने […] The post अमेरिका-व्हेनेझुएला तणावाचा सोन्याच्या किमतींवर परिणाम ; आज सोन्याच्या किंमतीत भरघोस वाढ, वाचा appeared first on Dainik Prabhat .
भारत–न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघात श्रेयस अय्यरला स्थान देण्यात आलं आहे. मात्र, त्याचं अंतिम कमबॅक बीसीसीआयच्या मेडिकल टीमकडून मिळणाऱ्या फिटनेस क्लिअरन्सवर अवलंबून असणार आहे.न्यूझीलंडविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी श्रेयस अय्यर सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीत खेळताना दिसणार आहे. ६ जानेवारी रोजी जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर मुंबईकडून तो हिमाचल प्रदेशविरुद्ध मैदानात उतरेल, त्यानंतर ८ जानेवारीला तो पुन्हा खेळताना दिसू शकतो.आणि यामुळे क्रिकेट चाहंत्यानमध्ये भरपूर उत्साह सुद्धा पहायला मिळत आहे.पण बंगळुरु येथील BCCI च्या (Center of Excellence) खेळाडु श्रेयस अय्यरला काही अटीसह खेळण्याची परवाणगी देण्यात आली आहे. ३१ वर्षीय अय्यरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना फिल्डींग करता वेळी दुखापत झाली होती....या दुखापतीमुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर अय्यरने आपल्या पुनर्वसनासाठी बंगळुरूतील बीसीसीआय सेंटरमध्ये जवळपास १० दिवसांचा रिहॅबिलिटेशन कालावधी पूर्ण केला.‘रिटर्न-टू-प्ले’ प्रोटोकॉलनुसार, २ जानेवारी रोजी अय्यरने एक सराव सामना खेळला. विशेष म्हणजे, या सामन्यादरम्यान त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा वेदना जाणवल्या नाहीत. याच आधारे बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला पुढील सामन्यांसाठी सशर्त परवानगी दिली आहे. श्रेयस अय्यरला बीसीसीआयने थेट संघात स्थानच दिले नाही, तर त्याला उप कर्णधारही बनवले आहे. पण त्याला उप कर्णधारपद भूषवण्यासाठी बीसीसीआयच्या एका अटीचे पालन करावे लागणारर आहे. यामुळे पुढो काय होणार हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे
Ayesha Khan: ‘धुरंधर’मधील ‘शरारत’ गाण्याने १०० मिलियन व्ह्यूजचा टप्पा ओलांडला; आयशा खान भावूक
Ayesha Khan: अभिनेत्री आयशा खान सध्या यशाच्या शिखरावर आहे. ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटातील ‘शरारत’ या गाण्याने यूट्यूबवर १०० मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. चित्रपटासोबतच त्यातील गाणीही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली असून ‘शरारत’ हे गाणे सोशल मीडियावर तसेच चित्रपटगृहांमध्येही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या मोठ्या यशानंतर आयशा खानचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने इन्स्टाग्रामवर एक […] The post Ayesha Khan: ‘धुरंधर’मधील ‘शरारत’ गाण्याने १०० मिलियन व्ह्यूजचा टप्पा ओलांडला; आयशा खान भावूक appeared first on Dainik Prabhat .
पुणे : अखिल भारतीय व्याघ्र अंदाज २०२६ अंतर्गत पुणे वनविभागात सुरू असलेल्या वन्यजीव सर्वेक्षणादरम्यान महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू (Indian Giant Squirrel) दिसल्याची नोंद झाली आहे. वाघ, बिबट्या व इतर वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणांचा अभ्यास करून त्यांच्या अंदाजित संख्येचा आढावा घेण्यासाठी हे सर्वेक्षण १ जानेवारी २०२६ पासून पुणे वनविभागातील सर्व वनपरिक्षेत्रांत राबवले जात आहे. दिनांक ५ […] The post Pune : वन्यजीव सर्वेक्षणादरम्यान पुणे वनविभागात ‘शेकरू’चे दर्शन; जंगलाच्या समृद्धीचा महत्त्वपूर्ण संकेत appeared first on Dainik Prabhat .
Stock Market Today। भारतीय शेअर बाजाराने आज आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराची सुरुवात नकारात्मकतेने केली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स, लाल रंगात उघडला आणि एनएसई निफ्टी ५० हिरव्या रंगात उघडला. मात्र व्यवहाराच्या दिवसाच्या सुरुवातीला निफ्टी देखील लाल रंगात दिसला. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स १२१.९६ अंकांनी किंवा ०.१४ टक्क्यांनी घसरून ८५,६४०.०५ वर पोहोचला, तर एनएसई निफ्टी ५० ५.१५ […] The post आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजाराची खराब सुरुवात ! सेन्सेक्स १२८ अंकांनी घसरला ; निफ्टीचीही लाल रंगात ओपनींग appeared first on Dainik Prabhat .
२७ जानेवारीला बँक कर्मचारी युनियन संपाचे हत्यार उपसणार? नागरिकांची 'या'कारणामुळे गैरसोय?
प्रतिनिधी: बँक कर्मचारी संपाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत आहे कारण युनियन फोरम ऑफ बँक युनियन (UFBU) ही कर्मचारी संघटना २७ जानेवारीला संप पुकारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना युनियनने हा इशारा दिला असून सरकारने यावर वेळेवर तोडगा काढावा ही मागणीही केली आहे. अनेक दिवस कर्मचाऱ्यांसाठी असलेले कामकाजासाठी वातावरण व वेतन भत्ते यांच्यात सुधारणा व ५ दिवसांचा आठवडा करावा या तीन प्रमुख कारणांसाठी संप पुकारण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. जर २७ जानेवारीला संप झाल्यास, २५ व २६ जानेवारीला सुट्टी असल्याने सलग ३ दिवस बँकेला सुट्ट्या लागू शकतात.या कारणामुळे बँक ग्राहकांच्या गैरसोयीत आणखी वाढ होऊ शकते दरम्यान सरकारने यावर काही तोडगा काढल्यास संप पुकारावा का नाही याचाही निर्णय युनियन करू शकते. पाच दिवसांचा आठवडा करावा ही बँकाची प्रमुख मागणी असून कामाच्या वातावरणात बदल व्हावा, कामकाजातील सुधारणेसह वेतनात भरत पडावी व बँकिंग कर्मचारी नियमावलीतही परिवर्तन व्हावे अशी मागणी बँकिंग युनियन संघटना करत आहे. या संपात मधल्या पातळीच्या कर्मचाऱ्यासह क्लर्क सहभागी होऊ शकत असल्याने कॅश व्यवहार व बँकिंग आस्थापनेतील आवश्यक व्यवहारासाठी ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. विश्लेषकांचा मते, बँकेच्या मार्जिनमध्ये घसरण होत असताना व बँक ऑपरेशनल खर्चातही भर पडत असताना वेतनात वाढ झाल्यास बँकेच्या खर्चावरही अधिकचा भार पडू शकतो.प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कर्मचारी संघटना आणि बँक व्यवस्थापन यांच्यातील वेतनवाढीवरील चर्चा अनेक महिन्यांपासून कोणत्याही तोडग्याशिवाय रखडली आहे. संघटनांच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, सध्या चर्चेसाठी मांडलेले प्रस्ताव वाढती महागाई किंवा आघाडीच्या कर्मचाऱ्यांवरील वाढता कामाचा ताण हे सध्याच्या वेतनाशीही सुसंगत नाहीत.या संघटना सगळ्याच श्रेणींतील बँक कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक वेतनवाढ, तसेच उच्च भत्ते, अधिक मजबूत नोकरीची सुरक्षा उपाययोजना आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, महामारीनंतरच्या बँकिंगमुळे कामाचे तास वाढले आहेत, ग्राहकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि कामकाजाचा दबावही वाढला आहे, परंतु त्या प्रमाणात वेतनात सुधारणा झालेली नाही.प्रसारमाध्यमांशी बोलताना एका युनियन प्रतिनिधीने सांगितले की, 'वारंवार चर्चेच्या फेऱ्या होऊनही वाटाघाटींमध्ये कोणतीही बोलणीत मोठी प्रगती झालेली नाही आणि संप नोटीस देण्याचा उद्देश तोडगा काढण्यासाठी दबाव आणणे हा होता. संघटनांच्या नेत्यांनी इशारा दिला आहे की, २७ जानेवारीच्या अंतिम मुदतीपूर्वी त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास कर्मचारी संपावर जातील' असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.युनियनने दिलेल्या माहितीनुसार, बँकेची व्यवस्थापन मंडळ आणि सरकारी अधिकाऱ्यांनी संपाच्या सूचनेची पोचपावती दिली आहे,परंतु त्यांनी अद्याप सर्व युनियन मागण्या पूर्ण करण्याची जाहीर हमी दिलेली नाही. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बँकिंग सेवा बंद पडू नयेत यासाठी अधिकारी प्रयत्न करत असल्याने येत्या काही आठवड्यांत पुढील वाटाघाटी अपेक्षित आहेत परंतु यावर अद्याप अपेक्षित तोडगा निघालेला नाही. विश्लेषकांनी प्रसारमाध्यमांना म्हटल्याप्रमाणे, विना बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) बँकेला वाढत्या स्पर्धेत टक्कर देत असताना वबँकांवर कार्यक्षमता सुधारणे, कर्जपुरवठा वाढवणे आणि सेवेची गुणवत्ता सुधारण्याचा दबाव आहे.
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर ताबा, जगात टेन्शन पण भारताला लागली लॉटरी ; ९००० कोटींचा होणार फायदा ?
US Strike Venezuela। अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलावर हल्ला केला आणि नंतर लष्करी कारवाई दरम्यान राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली. अमेरिकेने पुन्हा एकदा अशी कारवाई केली आहे ज्यामुळे जागतिक तणाव वाढला आहे. दरम्यान, निकोलस मादुरो यांना न्यू यॉर्कमधील एका तुरुंगवास केंद्रात नेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रावरील अमेरिकेचे नियंत्रण आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या धाडसी […] The post अमेरिकेचा व्हेनेझुएलावर ताबा, जगात टेन्शन पण भारताला लागली लॉटरी ; ९००० कोटींचा होणार फायदा ? appeared first on Dainik Prabhat .
महापालिका निवडणुकांनंतर काँग्रेसच्या ‘या’महिला खासदार भाजपमध्ये जाणार; सुजात आंबेडकरांचा मोठा दावा
Sujat Ambedkar | काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे महापालिका निवडणुकांनंतर भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे. प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये डील झाल्याचेही सुजात आंबेडकर म्हणाले. त्याच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारासाठी सुजात आंबेडकर सोलापुरात आले होते. यावेळी केलेल्या भाषणात […] The post महापालिका निवडणुकांनंतर काँग्रेसच्या ‘या’ महिला खासदार भाजपमध्ये जाणार; सुजात आंबेडकरांचा मोठा दावा appeared first on Dainik Prabhat .
प्रसिध्द मालिका होणार सुन मी या घरची व 'मुरांबा' या सारख्या अनेक मालिकेन मध्ये काम करणारा अभिनेता शशांक केतकर याने आपली निर्मात्यावर भडास काढली आहे.अलीकडेच शशांक केतकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्याच्यासोबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.एका मालिकेच्या निर्मात्याकडून आपलं मानधन अद्याप थकवलं गेल्याचा गंभीर आरोप त्याने या व्हिडीओत केला आहे. काम पूर्ण करूनही मेहनतीचं योग्य मानधन मिळत नसेल, तर कलाकारांनी गप्प बसायचं का? असा थेट सवालही शशांकने उपस्थित केला आहे.५ वर्ष होऊन गेलीत पण पेमेंट हातात नाही मागची ५ वर्ष आणि ८ ऑक्टोबर २०२५ पासून पुन्हा संपर्क निर्माण झाल्यानंतर दिलेली एकही तारीख त्या निर्मात्याने पाळलेली नाही थोडक्यात काय निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा आता कंटाळा आला आहे... अजून एक म्हणजेच 5 जानेवारी 2026 ही तारीख त्याने दिली आहे. पूर्ण पेमेंट जमा झाले नाही तर सगळ्या कुंडलीसकट एक डिटेल व्हिडिओ करेन आणि पेमेंट झाले तर तसाही ते झाल्याचा एक व्हिडिओ पण पोस्ट करेन...या वरुन चाहत्यानमध्ये वेगळीच चर्चा सुरु झाली आहेत.चाहत्यांच्या कॅामेंट मधुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अभिनत्याने कोणत्याही निर्मात्याच नाव न घेता निर्मात्याला ईशारा दिला आहे.यावरुन नेटकरी वेगवेगळे अदांज लावत आहेत. या सर्व प्रकरणावरुन त्याच्या चाहत्यांसह मराठी टेलिव्हिजन विश्वातही चर्चा पाहायला मिळतेय.
Top Stocks to Buy:अस्थिरतेचा फायदा नफा बुकिंगसाठी? कमाईसाठी ब्रोकरेजकडून १० शेअरची यादी जाहीर
प्रतिनिधी: मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस व जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज लिमिटेड या दोन कंपन्यांनी फंडामेंटल व टेक्निकल आधारे काही नवे शेअर गुंतवणूकदारांसाठी सुचवले आहेत. कुठले आहेत पाहुयात -१) Adani Power: कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून त्यांनी लक्ष्य किंमत (Target Price TP) १७८ रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.२) Marico:कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ८७५ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत ब्रोकरेजने निश्चित केली आहे.३) Nykaa:कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ३२५ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.४) Avenue Supermarts: कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ३७२१ रूपये प्रति शेअर सामान्य खरेदी किंमत (CMP) निश्चित करण्यात आली आहे.५) Punjab National Bank: कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १२६ रुपये प्रति शेअर सीएमपी निश्चित करण्यात आली आहे.६) AU Small Finance Bak: बँकेच्या शेअरला मोतीलाल ओसवालने बाय कॉल दिला असून सीएमपी १००० रूपये प्रति शेअर सीएमपी निश्चित करण्यात आली आहे.७) Mahindra Finance: कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून सीएमपी ४०३ रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.८) RBL Bank: बँकेच्या शेअरला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ३२० रूपये प्रति शेअर सीएमपी निश्चित करण्यात आली आहे.९) Equity Small Finance: इक्विटी स्मॉल फायनान्स कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ६५ रूपये प्रति शेअर सीएमपी निश्चित करण्यात आली आहे.१०) V Mart Retail: कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून सीएमपी ७०६ रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
Gauri Sawant on Sushmita Sen: बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनने नेहमीच वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांबरोबरच वेब सीरिजमधील तिच्या भूमिका देखील प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. तिची ‘ताली’ ही वेब सीरिज विशेष चर्चेत राहिली होती. ही वेब सीरिज सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित होती. आता श्रीगौरी सावंत यांनी ‘आरपार’ […] The post Gauri Sawant on Sushmita Sen: “विश्वसुंदरीने माझ्या समाजाला मान दिला”… सुश्मिता सेनसोबतच्या भेटीची आठवण सांगताना भावूक झाल्या श्रीगौरी सावंत appeared first on Dainik Prabhat .
१५ ते २५ जानेवारीदरम्यान पुणे रेल्वे प्रवासात बदल, कोणत्या गाड्या रद्द? जाणून घ्या
पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे विभागाकडून दौंड–मनमाड रेल्वे मार्गावरील दौंड ते काष्टी स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी १५ ते २५ जानेवारी दरम्यान विशेष मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला असून, या कालावधीत पुण्यातून धावणाऱ्या अनेक वर्दळीच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून, काही गाड्यांचा प्रवास अर्धवट थांबवण्यात येणार आहे.रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, १५ जानेवारीपासून प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. याचा थेट परिणाम पुणे–सोलापूर आणि पुणे–अमरावती या महत्त्वाच्या मार्गांवरील प्रवाशांवर होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासासाठी निघण्यापूर्वी रेल्वेचे अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.या कालावधीत प्रामुख्याने पुणे आणि सोलापूर दरम्यान धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे–सोलापूर एक्स्प्रेस आणि सोलापूर–पुणे एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या या काळात धावणार नाहीत. तसेच सोलापूर–पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, पुणे–सोलापूर डीईएमयू, सोलापूर–पुणे डीईएमयू आणि पुणे–दौंड डीईएमयू या गाड्यांचाही समावेश रद्द यादीत आहे.२३ ते २६ जानेवारी दरम्यान पुणे–अमरावती आणि अमरावती–पुणे एक्स्प्रेस रद्द राहणार आहेत. याशिवाय अजनी–पुणे एक्स्प्रेस, निजामाबाद–पुणे एक्स्प्रेस, पुणे–नागपूर गरीब रथ तसेच पुणे–नांदेड एक्स्प्रेस या गाड्याही या कालावधीत धावणार नाहीत. मेगा ब्लॉकमुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यशवंतपूर–चंदीगड एक्स्प्रेस, जम्मूतवी–पुणे एक्स्प्रेस आणि हजरत निजामुद्दीन–वास्को-द-गामा एक्स्प्रेस या गाड्या मनमाड–इगतपुरी–कल्याण–पनवेल–लोणावळा मार्गे पुण्यात दाखल होतील. तसेच सातारा–दादर एक्स्प्रेस जेजुरी मार्गे, तर तिरुवनंतपुरम–सीएसएमटी एक्स्प्रेस कुर्डुवाडी–मिरज मार्गे धावेल.काही गाड्यांचा प्रवास दौंडपर्यंत न जाता मधल्या स्थानकावरच थांबवण्यात येणार आहे. इंदूर–दौंड आणि ग्वाल्हेर–दौंड एक्स्प्रेस या गाड्या खडकी स्थानकापर्यंतच धावतील. परतीच्या प्रवासात २४ आणि २५ जानेवारी रोजी दौंड–इंदूर एक्स्प्रेस दौंडऐवजी पुणे स्थानकावरून दुपारी १५:३३ वाजता सुटेल. तर २५ जानेवारी रोजी दौंड–ग्वाल्हेर एक्स्प्रेस खडकी स्थानकावरून रात्री ००:२५ वाजता प्रस्थान करेल.
उमेदवारी दाखल करणाऱ्यांमध्ये बविआ मोठा पक्ष
काँग्रेसचे केवळ १० जागांवर उमेदवारविरार : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत तब्बल ११३ जागांवर बहुजन विकास आघाडीने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे उमेदवारी दाखल करणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये वसई-विरार येथे बहुजन विकास आघाडी सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.वसई - विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि मनसे या राजकीय पक्षांनी एकत्रित आघाडी करण्यासाठी प्रयत्न केले. जागांचा तिढा न सुटल्याने शिवसेना (उबाठा) आघाडीच्या चर्चेतून सर्वप्रथम बाहेर पडली आणि स्वबळावर ८९ उमेदवार या निवडणुकीत उभे केले. तिसरा क्रमांक भारतीय जनता पक्षाचा लागत आहे. भाजपने ९३ उमेदवार निवडणुकीत उभे केले असून, यातील ४ जागांवर शिवसेना (शिंदे गट) यांच्याशी एकमत न झाल्याने चार जागांवर भाजप शिवसेना यांची मैत्रीपूर्ण लढत होत आहे, तर ८९ उमेदवार हे भाजपने कमळ निशाणीवर निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. श्रमजीवी संघटना आणि आगरी सेनेला सुद्धा भाजपने उमेदवारी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाने महायुतीचा घटक पक्ष म्हणून २७ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस यांच्यामध्ये आघाडी झाली किंवा नाही याबाबत काँग्रेसचा कोणताही नेता स्पष्ट सांगू शकत नाही. असे असले तरी काँग्रेसने सात जागांवर माघार घेतली असून १० जागांवर उमेदवार कायम ठेवले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने १७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.केवळ दोन जागांवर शिट्टी चिन्ह नाहीप्रभाग क्रमांक १५ ‘अ’ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेवर बहुजन विकास आघाडीच्या शिट्टी या चिन्हावर कोणताही उमेदवार नाही. विशेष म्हणजे या जागेसाठी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील या निवडणूक रिंगणात आहेत. तसेच प्रभाग क्रमांक १३ ‘ब’ या जागेसाठी शिट्टी या चिन्हावर उमेदवार नाही. या ठिकाणी भाजप वसई पश्चिम ग्रामीणचे मंडळ अध्यक्ष आशिष जोशी यांच्या पत्नी मनीषा जोशी या भाजपकडून निवडणूक लढवीत आहेत. या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला बहुजन विकास आघाडीने समर्थन दिल्याची चर्चा आहे.चर्चा पैशांची, शिट्टीची अन् मिळाली अंगठीवसई-विरारच्या भाजप जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील ह्या प्रभाग क्रमांक १५ मधून अविरोध निवडून येतील याबाबतचे तर्कवितर्क दोन दिवसापूर्वी संपुष्टात आले. पाटील यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवार हर्षदा मटकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजप समर्थकांकडून तर अर्ज मागे घेऊ नये म्हणून बहुजन विकास आघाडीच्या समर्थकांकडून पैशाचे आमिष दाखविण्यात आल्याच्या चर्चाही झाल्या. मात्र मटकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यानंतर चर्चा सुरू झाली निवडणूक चिन्हाची. मटकर ह्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र चिन्ह वाटपाच्या दिवशी मटकर यांना अंगठी हे निवडणूक चिन्ह अपक्ष उमेदवार म्हणून मिळाले आहे. त्यामुळे पैसे, शिट्टी येथून सुरू झालेली चर्चा आता अपक्ष आणि अंगठीवर येऊन थांबली आहे.दोन महिला विधिज्ञ आमने-सामनेप्रभाग क्रमांक ५ ‘क’ या जागेसाठी दोन महिला वकिलांमध्ये लढत होत आहे. या जागेसाठी भाजपकडून ॲड. दर्शना त्रिपाठी कोटक, तर बहुजन विकास आघाडीकडून ॲॅड. अर्चना जैन या निवडणूक लढत आहेत. या दोन महिला वकिलांच्या लढतीमध्ये मशाल या चिन्हावर संगीता नाईक या आपले नशीब आजमावित आहेत. प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वच जागांवरील लढती चर्चेतल्याउमेदवारांमध्ये आहेत.
महापालिकेच्या आखाड्यात रंगणार राजकीय कुस्त्या!
प्रभाग चारमधील लढतीकडे शहराचे लक्षगणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेची निवडणूक एकूण ११५ जागांसाठी होत आहे. मात्र महापालिकेच्या या आखाड्यात २० ते २५ ठिकाणी होणाऱ्या राजकीय कुस्त्या चांगल्याच रंगणार आहेत. संपूर्ण शहराचे लक्ष लागून असलेली सर्वाधिक तुल्यबळ लढत ही प्रभाग क्रमांक चार ‘ड’ मध्ये पाहायला मिळणार आहे. बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव यशवंत पाटील आणि बहुजन विकास आघाडीला राम राम करीत भाजपसोबत घरोबा केलेले माजी नगरसेवक महेश हरी पाटील या दोन तगड्या उमेदवारांमध्ये या ठिकाणी थेट लढत होणार आहे.वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्या आनुषंगाने निवडणुकीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शनिवारी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले असून, आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. वसई-विरारमध्ये मुख्य लढती ह्या महायुती आणि बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये होणार आहेत. शिवसेना, उबाठा आणि काँग्रेसने उमेदवार दिलेल्या काही प्रभागात तिरंगी लढतीचे चित्र आहे. सतत १० वर्ष महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या बहुजन विकास आघाडीने सर्वाधिक ११३ जागांवर आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत.भाजपकडून ९३ उमेदवार निवडणूक लढवीत असून यापैकी ४ जागांसाठी शिवसेना (शिंदे गट) याच्या उमेदवारांमध्ये भाजपची मैत्रीपूर्ण लढत होत आहे, तर ८९ जागेवर भाजपने आपले उमेदवार दिले आहेत. दरम्यान, निवडणूक म्हटली की, मोठ्या लढतीची चर्चा होणारच आहे. वसई- विरारमध्ये सुद्धा अशा २० ते २५ लढतींची चर्चा सर्वत्र होत आहे. मात्र सर्वाधिक चर्चा ही प्रभाग ४ ‘ड’ येथील लढतीबाबत होत आहे.बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव माजी नगरसेवक अजिव यशवंत पाटील हे सर्वाधिक चर्चेतील उमेदवार आहेत. कारणही तसेच आहे. एकेकाळी बहुजन विकास आघाडीच्या मुख्य फळीतील चेहरा असलेले माजी नगरसेवक महेश हरी पाटील यावेळी शिट्टीची साथ सोडून कमळावर लढत आहेत आणि त्यांच्या विरोधात बहुजन विकास आघाडीने अजिव पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. अनेक वर्ष ठाकूर कुटुंबीयांशी आणि बहुजन विकास आघाडीसोबत सलोख्याचे संबंध असणाऱ्या महेश पाटील यांनी नुकतेच कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीने तगडा उमेदवार म्हणून अजीव पाटील यांना या प्रभागात संधी दिली आहे.अशा होणार इतर तुल्यबळ लढतीसुदेश चौधरी (शिवसेना) प्रशांत राऊत (बविआ)मनोज पाटील (भाजप) हरिओम श्रीवास्तव (बविआ)पंकज ठाकूर (बविआ) मेहुल शहा (भाजप)रिना वाघ (भाजप) सुरेखा कुरकुरे (बविआ)माया चौधरी (भाजप) अमृता चोरघे (बविआ)नारायण मांजरेकर (भाजप) विनोद पाटील (बविआ)हार्दिक राऊत (बविआ) गौरव राऊत (भाजप)हितेंद्र जाधव (भाजप) स्वप्नील पाटील (बविआ)विश्वास सावंत (भाजप) निलेश देशमुख (बविआ)अतुल पाटील (शिवसेना) कल्पेश मानकर (बविआ)अशोक शेळके (भाजप) किरण भोईर (अपक्ष)किरण ठाकूर (बविआ) रवी पुरोहित (भाजप)धनंजय गावडे (बविआ) जयप्रकाश सिंह (भाजप)महेश सरवणकर (भाजप) वृंदेश पाटील (बविआ)विजय घरत (भाजप) सदानंद पाटील (बविआ)कल्पक पाटील (भाजप) निषाद चोरघे (बविआ)पंकज देशमुख (भाजप) अमित वैध (बविआ)मनीष वैध (भाजप) प्रफुल साने (बविआ)नितीन ठाकूर (भाजप) आशिष वर्तक (बविआ)मॅथ्यू कोलासो (भाजप) प्रकाश रॉड्रिग्ज (बविआ)प्रदीप पवार (भाजप) प्रवीण नलावडे (बविआ)मनिषा जोशी (भाजप) स्यारल डाबरे (काँगेस)विशाल जाधव (भाजप) रुपेश जाधव (बविआ)
एक लाख 'ड्रोन वॉरियर्स'सह 'भैरव स्पेशल फोर्स'सज्ज
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; भारतीय लष्कराची झेपनवी दिल्ली : आधुनिक युद्धशास्त्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवत भारतीय लष्कराने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. शत्रूच्या घरात शिरून ड्रोनच्या सहाय्याने अचूक मारा करण्यासाठी लष्कराने अधिकृतपणे 'भैरव स्पेशल फोर्स' या नवीन युनिटची घोषणा केली आहे. या विशेष दलात तब्बल १ लाखाहून अधिक ड्रोन ऑपरेटरचा समावेश असून, आधुनिक युद्धाचे स्वरूप बदलण्याची क्षमता या दलात आहे.पारंपरिक पायदळ आणि निमलष्करी दलांच्या पलीकडे जाऊन तंत्रज्ञानावर आधारित युद्ध लढण्यासाठी या दलाची निर्मिती करण्यात आली आहे. या दलातील १ लाख सैनिक हे केवळ लष्करी प्रशिक्षणातच नाही, तर 'ड्रोन पायलटिंग', 'प्रिसिजन टार्गेटिंग' आणि 'डिजिटल सर्व्हिलन्स'मध्ये निष्णात आहेत. सध्या १५ 'भैरव बटालियन' कार्यान्वित झाल्या असून, लवकरच ही संख्या २५ पर्यंत नेली जाणार आहे. हे दल 'पॅरा स्पेशल फोर्सेस'च्या तोडीचे काम करेल, मात्र त्यांचा मुख्य भर मानवरहित यंत्रणा आणि हाय-स्पीड स्ट्राइकवर असेल.नुकत्याच पार पडलेल्या 'अखंड प्रहार' या मोठ्या युद्धसरावात भैरव स्पेशल फोर्सने आपली ताकद सिद्ध केली आहे. दक्षिण लष्करी कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली या दलाने वाळवंटी आणि दुर्गम भागात ड्रोनच्या सहाय्याने यशस्वी मोहिमा राबवल्या.येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी जयपूर येथे होणाऱ्या लष्करी दिनाच्या संचलनात 'भैरव स्पेशल फोर्स' जगासमोर आपले पहिले अधिकृत दर्शन घडवणार आहे. विशेषतः नसीराबाद येथील '२ भैरव' (डेझर्ट फाल्कन्स) ही तुकडी या संचलनाचे मुख्य आकर्षण असेल.केवळ ड्रोनच नाही, तर भारतीय लष्कराने 'रुद्र ब्रिगेड' (एकात्मिक लढाऊ तुकड्या) आणि 'शक्तिबाण' (प्रगत तोफखाना रेजिमेंट) यांसारखी नवीन युनिट्सही तैनात केली आहेत. सीमावर्ती भागात चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या हालचालींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची ही 'सायबर-फिजिकल' युद्धनीती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
गरजू रुग्णांना उपचार नाकारल्यास कारवाई
मुंबई :राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे हा त्यांचा हक्क आहे. यामध्ये कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. तसेच रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिल्यास कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' आणि 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने'शी संबंधित कोणत्याही खाजगी किंवा सरकारी रुग्णालयाने कोणत्याही तांत्रिक कारणास्तव रुग्णाला उपचार नाकारू नयेत, असे आदेश त्यांनी दिले.आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे आयोजित एका विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अण्णासाहेब चव्हाण, ठाणे जिल्हा परिमंडळाचे उपसंचालक डॉ. अशोक नंदापूरकर आणि विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.मंत्री आबिटकर यांनी बैठकीत स्पष्ट केले की, अनेकदा मूळ रेशन कार्ड नसल्यामुळे किंवा इतर किरकोळ कागदपत्रांच्या अभावामुळे रुग्णालये रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात. मूळ रेशन कार्ड नसेल तर डिजिटल रेशन कार्ड पडताळणीचा वापर करा, पण रुग्णाला उपचारांपासून वंचित ठेवू नका, असे त्यांनी ठणकावून सांगितले.या निर्णयामुळे राज्यातील लाखो गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
शेअर बाजारात 'युएस व्हेनेझुएला'सेन्सेक्स २०० व निफ्टी ४५ अंकांने कोसळला
मोहित सोमण: सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क घसरण झाली आहे. सेन्सेक्स २०० अंकांने व निफ्टी ४५ अंकाने घसरला असल्याने शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे स्पष्ट झाले. मुख्यतः शेअर बाजारात घसरणीचे सत्र आज दिवसभरात कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यतः रशिया-युक्रेन संघर्ष, इस्त्राईल व इराण यानंतर आता युएस व्हेनेझुएला यांच्यातील वाद मोठ्या प्रमाणात उसळल्याने जागतिक अर्थव्यवस्थेत अशांतता निर्माण झाली आहे. परिणामी बाजारात गुंतवणूकदारांना सावधतेने गुंतवणूक करावी लागेल असे दिसते. तरीही बँक निर्देशांकात किरकोळ वाढ झाल्याने बाजारात काही प्रमाणात किरकोळ स्वरूपातील सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली. आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ रिअल्टी, मेटल, मिडिया, मेटल निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण आयटी, मिड स्मॉल आयटी टेलिकॉम, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक या निर्देशांकात झाली आहे.सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एसवीजीएन (४.८५%), हिंदुस्थान कॉपर (४.६३%), एजीस लॉजिस्टिक्स (३.६१%), ज्युबिलएंट इनग्रेव्ह (३.०४%), सोभा (२.८६%), बंधन बँक (२.८५%), सारेगामा इंडिया (२.४९%) समभागात झाली आहे तर सर्वाधिक घसरण वारी एनर्जीज (३.७७%), टीआरआयएल (३.५५%), एचसीएल टेक्नॉलॉजी (२.८१%), आयडीबीआय बँक (२.७६%), एम अँड एम फिनसर्व्ह (२.५९%), जेबीएम ऑटो (२.५६%) समभागात झाली आहे.आजच्या सकाळच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की, '२०२६ या वर्षाची सुरुवात मोठ्या भूराजकीय घडामोडींनी झाली आहे, ज्यांचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. व्हेनेझुएलामधील अमेरिकेच्या कारवाईमुळे जागतिक भू-राजकारण आणखी अस्थिर होण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन संघर्ष अधिक काळ सुरू राहण्याची शक्यता आहे. इराणमधील निदर्शने अधिक तीव्र होऊ शकतात आणि ट्रम्प यांच्या हस्तक्षेपाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर इराणी राजवट त्यावर कशी प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल; आणि कदाचित चीनही या मोठ्या अनिश्चिततेच्या काळात तैवानच्या विलीनीकरणासाठी याचा फायदा घेऊ शकतो. भूराजकारणातील ही मोठी अनिश्चितता आणि अनपेक्षितता बाजारावरही परिणाम करेल. परिस्थिती कशी वळण घेते हे पाहण्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल.व्हेनेझुएलाच्या संकटातून भारतासाठी एक सकारात्मक बाब म्हणजे, त्याचा मध्यम ते दीर्घकालीन परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींसाठी नकारात्मक आहे.नजीकच्या काळात बाजार लवचिक राहण्याची शक्यता आहे, कारण सध्या बाजार सर्वकालीन उच्चांकावर आहे आणि ही गती तेजीवाल्यांना पाठिंबा देऊ शकते. बँक निफ्टी मजबूत आहे आणि त्याला प्रभावी कर्ज वाढीमुळे मूलभूत आधार मिळाला आहे. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले लागतील.'सकाळच्या सत्रातील टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,' शुक्रवारी अप्पर बोलिंगर बँडजवळ झालेली मजबूत क्लोजिंग तेजीची गती कायम राहण्याचे संकेत देत आहे. ऑसिलेटर देखील अनुकूल आहेत. तथापि, अस्थिरता निर्देशांक (VIX) विक्रमी पातळीजवळ असल्याने अस्थिरतेत वाढ होण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्यावे. आज आम्ही २६३८० किंवा २६४५०-५५० पातळीपर्यंतच्या अपेक्षांसह बाजारात प्रवेश करू, आणि सुरुवातीच्या तेजीच्या वाटचालीसाठी डाउनसाइड मार्कर २६२८८ जवळ ठेवला आहे.
Uday Samant : ठाकरेंचा वचननामा म्हणजे केवळ आश्वासनांची खैरात!मंत्री उदय सामंतांचा टोला
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी घोषणांची चढाओढ सुरू झाली आहे. मात्र, ठाकरे गटाच्या नव्या वचननाम्यावर टीका करताना उदय सामंत यांनी 'जुन्या आश्वासनांचे काय झाले?' असा परखड सवाल उपस्थित करून नव्या राजकीय वादाला तोंड फोडले आहे.https://prahaar.in/2026/01/05/changes-in-pune-train-services-between-january-15-and-25-which-trains-are-cancelled-find-out/मुंबईकरांची २५ वर्षे वाया गेली?गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर ठाकरे गटाची एकहाती सत्ता आहे. तरीही मुंबईकरांना हक्काची घरे आणि मूलभूत नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला. आता दोन्ही ठाकरे एकत्र आले असून त्यांनी नवीन वचननामा जाहीर केला आहे, मात्र हादेखील केवळ कागदावरच राहील, असा अविश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईचा कायापालट करायचा असेल, तर महायुतीचा महापौर बसवणे हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.महापौर मराठीच होणारमराठी माणसाला मुंबईत पुन्हा सन्मानाने स्थान मिळवून देण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे सामंत म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मुंबईचा महापौर मराठीच होईल या घोषणेचे त्यांनी स्वागत केले. राज ठाकरे यांनीही मराठी महापौराची मागणी केल्यास त्यांना शुभेच्छा आहेत, मात्र ही जबाबदारी केवळ महायुतीचे नगरसेवक आणि महापौरच समर्थपणे पेलू शकतात, असे मत त्यांनी मांडले.राज ठाकरेंच्या 'खंजीर' प्रकरणावर भाष्ययावेळी उदय सामंत यांनी जुन्या राजकीय घडामोडींची आठवण करून देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आम्ही पूर्वीच भविष्यवाणी केली होती की उद्धव ठाकरे हे मनसेला केवळ ५०-५५ जागा देऊन राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसतील आणि प्रत्यक्षात तसेच घडले, असे ते म्हणाले. या दगाफटक्यामुळे राज ठाकरेंच्या मनात आजही वेदना असतील, पण त्या ते उघडपणे बोलू शकत नाहीत, असे सूचक विधानही त्यांनी केले.
राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम
आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात?मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता हवामानात अचानक मोठा बदल झाला आहे. राज्याच्या अनेक भागांत थंडीचा कडाका ओसरला असून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या हवामान बदलाचा सर्वाधिक फटका कोकण आणि मध्य महाराष्ट्राला बसला असून, ऐन भरात आलेल्या आंबा आणि काजूच्या हंगामावर संकटाचे सावट निर्माण झाले आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील किमान तापमानात आज मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. जरी पावसाची शक्यता कमी असली, तरी हे ढगाळ हवामान पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. यामुळे जानेवारीतील गारवा अचानक गायब झाला असून हवेत उकाडा जाणवू लागला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवार सायंकाळपासून वातावरणात वेगाने बदल झाले आहेत. आधी दाट धुके आणि आता ढगाळ हवामानामुळे आंबा व काजू बागायतदार चिंतेत पडले आहेत. गेल्या ४-५ वर्षांनंतर यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये चांगली थंडी पडल्याने आंबा आणि काजूला विक्रमी मोहोर आला आहे. किनारपट्टी भागात तर पानांपेक्षा मोहोरच जास्त अशी स्थिती आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून वाढलेले धुके आणि आताचे ढगाळ वातावरण यामुळे 'टी मॉस्किटो' (तुडतुडे) आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहाटेच्या वेळी झाडांवरून पावसासारखे पाणी पडत असल्याने मोहोराची गळती होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.यंदा चांगल्या थंडीमुळे आंबा, काजूला उत्तम मोहोर आला असून, काही भागांत फळधारणादेखील झाली आहे. दमट वातावरणामुळे किडरोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बागांचे निरीक्षण करून विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशक, बुरशीनाशकांची फवारणी करावी. इतर व्यवस्थापनदेखील कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार करावे.- डॉ. यशवंत मुठाळ, तांत्रिक अधिकारी, संशोधन केंद्र, मुळदे
“…तर मी पुन्हा तुमच्यावरचा टॅरिफ वाढवू शकतो ” ; डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला थेट धमकी
Donald Trump on INDIA। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलावरील कारवाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दरम्यान, त्यांनी भारताबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ट्रम्प यांनी भारताला इशारा देत, देशावरील टॅरिफ आणखी वाढवता येऊ शकते असे म्हटले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचाही उल्लेख केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी ही धमकी […] The post “…तर मी पुन्हा तुमच्यावरचा टॅरिफ वाढवू शकतो ” ; डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला थेट धमकी appeared first on Dainik Prabhat .
येऊर, वारली पाड्यात दोन श्वानांवर हल्लाठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या आदिवासी पाड्यांमध्ये बिबट्यांचे दर्शन वाढले असून, शुक्रवारी (ता. २) रात्री दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बिबट्यांनी दोन श्वानांवर हल्ला करून त्यांची शिकार केल्याने येऊर आणि वागळे इस्टेट परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी रात्री येऊर परिसरातील वस्तीमध्ये बिबट्याने शिरकाव करून एका पाळीव श्वानाला उचलून नेले. याच रात्री येऊरच्या प्रवेशद्वाराजवळही बिबट्याचे दर्शन झाले असून, त्यानेही एका श्वानाला आपले भक्ष्य बनवले. या दोन्ही घटनांचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, गृहनिर्माण सोसायट्या आणि पाड्यांमधील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या आठवड्यातील बिबट्या दिसण्याची ही दुसरी घटना आहे.वनविभागाच्या माहितीनुसार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ६० हून अधिक बिबटे आहेत. जंगलात नैसर्गिक शिकार मिळण्याऐवजी मानवी वसाहतींमध्ये सहज उपलब्ध होणारे श्वान, मांजरे, कोंबड्या व बकऱ्या यांसारखे प्राणी बिबट्यांना आकर्षित करत आहेत.त्यामुळे संरक्षक भिंती असूनही बिबट्या रात्रीच्या वेळी पाड्यांमध्ये शिरकाव करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसांपूर्वी कॉसमॉस सोसायटी परिसरात बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने ड्रोनचा वापरही केला होता. ताज्या घटनांच्या पार्श्वभूमीवर येऊर परिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी रात्री एकट्याने घराबाहेर पडू नये, तसेच लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.“बिबट्यांचा हा परिसर त्यांच्या नेहमीच्या वावरण्याचा मार्ग आहे. जरी आतापर्यंत मानवावर हल्ल्याच्या घटना घडल्या नसल्या, तरी खबरदारी म्हणून पाड्यांच्या परिसरात गस्त वाढवली आहे,” अशी माहिती येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे यांनी दिली.
अपक्ष उमेदवारांना मिळाली निवडणूक चिन्हे
गॅस सिलिंडर, ऑटो रिक्षा, सूर्यफूल लोकप्रियनवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणूक २०२५-२६ साठी अपक्ष उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या वतीने चिन्हांचे वाटप करण्यात आले. या उमेदवारांसाठी एकूण १९४ चिन्हांचा पर्याय ठेवण्यात आला होता.चिन्ह वाटपात बहुतेक उमेदवारांनी गॅस सिलिंडर, ऑटो रिक्षा, सूर्यफूल, सीसीटीव्ही कॅमेरा, बॅग, सुटकेस यांना पसंती दिली. निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या अर्जातील पहिल्या पसंतीचे चिन्ह उपलब्ध नसल्यास दुसऱ्या पसंतीचे चिन्ह देऊन अंतिम वाटप पूर्ण केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आयोगाने उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आणि आज सर्व अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. रविवारपासून प्रचाराचा खऱ्या अर्थाने धुमाकूळ सुरू होणार आहे.महापालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने तीन चिन्हांचे पर्याय उमेदवारी अर्जात दिले होते. ही चिन्हे १९४ चिन्हांच्या यादीतून निवडायची होती. उमेदवारांनी सर्वाधिक पसंती नेहमीच वापरात असलेल्या वस्तूंना दिली.उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी संपली. चिन्ह वाटप करण्याचा कार्यक्रम सर्वच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पार पडला. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनाही निवडणूक चिन्हे मिळाल्यामुळे उद्यापासून प्रचाराचा खऱ्या अर्थाने धूमधडाका सुरू होणार आहे.“आमच्या भविष्यासाठी मतदान करा”:मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. यासाठी नवी मुंबईतील दोन हजार विद्यार्थ्यांनी आपल्या पालक व नातेवाईकांना पत्र लेखन करून येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी महापालिका निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे शहरातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यंदा नवी मुंबई महापालिकेची निवडणूक चार आणि तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीत पार पडणार आहे. मतदान प्रक्रियेत गोंधळ होऊ नये यासाठी महापालिकेने विविध स्वीप जनजागृती उपक्रम राबवले आहेत. याच अनुषंगाने, शाळा क्रमांक ३६ व १२२, कोपरखैरणे गाव येथे पालक व नातेवाईकांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पत्रलेखन उपक्रम राबविण्यात आला.
बँक कर्मचारी संप पुकारणार; सलग तीन दिवस कामकाज बंद राहण्याची शक्यता
Bank Employees Strike | ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’ने 27 जानेवारी 2026 रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत बँकेकडून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची मुख्य मागणी करण्यात आली आहे. हा संप यशस्वी झाल्यास सलग तीन दिवस बँकांचे कामकाज ठप्प राहण्याची शक्यता आहे. कारण जानेवारी […] The post बँक कर्मचारी संप पुकारणार; सलग तीन दिवस कामकाज बंद राहण्याची शक्यता appeared first on Dainik Prabhat .
बीसीसीआयच्या आदेशामुळे KKR ने मुस्तफिजूरला सोडल, ९.२० बसणार फटका ?
मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. बीसीसीआयच्या सूचनांनुसार केकेआरने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला रिलीज केले असून तो आता आगामी आयपीएल हंगामात खेळताना दिसणार नाही. मात्र, आयपीएल २०२६ च्या लिलावात केकेआरने मुस्तफिजूरला तब्बल ९.२० कोटी रुपयांना विकत घेतल्याने आता एकच प्रश्न चर्चेत आहे, मुस्तफिजूरला ९. २० कोटी मिळणार की नाही?लिलावात खेळाडू खरेदी केल्यानंतर फ्रँचायझीच्या एकूण बजेटमधून ती रक्कम वजा केली जाते. मात्र, मुस्तफिजूर रहमानचा हा प्रकार दुखापत किंवा वैयक्तिक कारणांमुळे नाही. त्यामुळे यावर आयपीएलचे वेगळे नियम लागू होतात.आयपीएलच्या नियमांनुसार, जर बीसीसीआयने क्रिकेटशी संबंधित नसलेल्या कारणांसाठी एखाद्या खेळाडूला रिलीज करण्याचे निर्देश दिले, तर त्या परिस्थितीत फ्रँचायझीला त्या खेळाडूवर खर्च केलेली संपूर्ण रक्कम परत मिळते. या प्रकाराला ‘फोर्स मॅज्युअर’ असे म्हटले जाते. ही अशी असाधारण परिस्थिती असते जी फ्रँचायझी किंवा खेळाडू यांच्या नियंत्रणाबाहेर असते. अशा वेळी संघाला खेळाडूसोबत केलेला करार पूर्ण करण्याची सक्ती नसते.या नियमामुळे केकेआरला मुस्तफिजूर रहमानला कोणतेही पैसे देण्याची गरज भासणार नाही. म्हणजेच, ९.२० कोटी रुपयांचा फटका केकेआरला बसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान, अलीकडच्या काळात बांगलादेशातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. या घटनांचा भारतातील धार्मिक आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये बांगलादेशी खेळाडूंना सहभागी होऊ न देण्याची मागणी जोर धरू लागली होती. यासाठी विविध स्तरांवर मोहिमाही राबवण्यात आल्या.या वाढत्या दबावाची दखल घेत बीसीसीआयने ३ जानेवारी रोजी केकेआरला मुस्तफिजूर रहमानला रिलीज करण्याचे निर्देश दिले. बीसीसीआयचा आदेश मिळताच काही तासांतच कोलकाता नाईट रायडर्सने हा निर्णय जाहीर केला.
बेस्ट सेवानिवृत्त कामगार अधिकाऱ्यांचे बुधवारी आझाद मैदानात आंदोलन
मुंबई : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मंगळवार, ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० पासून आझाद मैदान येथे चड्डी बनियान आंदोलन पुकारले आहे, अशी माहिती सेवानिवृत्त बेस्ट अधिकारी कर्मचारी संघर्ष समितीचे नेते भाई पानवडीकर यांनी दिली. ऑगस्ट २०२२ पासून कामगार अधिकाऱ्यांची हक्काची देणी ग्रॅच्युइटी व अंतिम देयके अजून दिलेली नाहीत. १०० ते १५० कामगारांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. त्यांची ही देणी अद्याप त्यांच्या वारसांना मिळालेली नाहीत. तर काही कर्मचारी भिकेला लागले आहेत. अशी बिकट अवस्था बेस्टच्या सेवा निवृत्त कामगारांची झालेली आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी या सर्वांना लेखी निवेदने आणि पत्र दिलेली आहेत परंतु सरकार अद्याप यात बिल्कूल लक्ष घालत नाही. आम्ही गेली ३० ते ३५ वर्षे या मुंबईच्या जनतेची अहोरात्र सेवा केली आहे.२००५ मधील अतिवृष्टी, २०२० मध्ये करोना काळ, मुंबईत १९९३ मध्ये झालेली दंगल अशा अनेक आपत्कालीन वेळी बेस्टचे कामगार, अधिकारी यांनी जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली आणि आज या कामगारांना आपल्या हक्काची देणी मिळण्यासाठी 'चड्डी बनियन मोर्चा आंदोलन' करावे लागत आहे, ही या सरकारला शरमेने मान खाली घालायला लावणारी बाब आहे. हे सर्वं ज्येष्ठ कामगार आहेत.लोक अदालत आणि मा. उच्च न्यायालयाने देखील कामगारांना ताबडतोब देणी देण्यासंबंधी निर्णय दिला आहे. परंतु राज्य शासन आणि मुंबई महापालिका आयुक्त, मनपा कायदा १८८८ मध्ये तरतूद असून देखील जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. आम्हाला कोणी न्याय देइल काय ? असा संतप्त सवाल हे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी करीत आहेत.
अनिल परब यांनी राडा करूनही निकटवर्तीयाची उबाठातून हकालपट्टी
मुंबई : ज्या कार्यकर्त्याला तिकीट मिळवून देण्यासाठी अनिल परब यांनी मातोश्रीत मध्यरात्री राडा घातला होता, त्याची उबाठातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ९५ मधील शेखर वायंगणकर यांना अधिकृत उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे त्यांच्यासह २६ बंडखोरांची उबाठातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या प्रकरणात अनिल परब यांनी मातोश्रीवर मध्यरात्री जोरदार राडा घातला होता. २८ डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या बैठकीत प्रभाग ९५ च्या उमेदवारीवरून वाद पेटला. अनिल परब यांनी आपला विश्वासू कार्यकर्ता शेखर वायंगणकर याला तिकीट देण्याची जोरदार मागणी केली होती.मात्र, स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांच्या शिफारशीवरून दिवंगत श्रीकांत सरमळकर यांचे जावई हरी शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आली. या निर्णयाला अनिल परब यांनी कडाडून विरोध केला. बैठकीत सरदेसाई यांनी मध्ये तोंड घालताच दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेला की, अनिल परब संतापून बैठक सोडून बाहेर पडले. शेखर वायंगणकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीतही माघार न घेतल्याने पक्षाने इतर बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला.
मीरा-भाईंदर पालिका निवडणुकीसाठी भाजपचे १३ उच्चशिक्षित युवा
डॉक्टर, यांचा समावेशभाईंदर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना संधी देण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने दिलेल्या ८६ उमेदवारात १३ उच्चशिक्षित युवकांना संधी दिली आहे.मीरा भाईंदर भाजपचे युवा जिल्हाध्यक्ष रणवीर वाजपेयी यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीसाठी युवा मोर्चाने जिल्हाध्यक्षांकडे २३ जागांची मागणी करून एक यादी दिली होती. त्यानुसार जिल्हाध्यक्षांनी १३ युवकांना उमेदवारी दिली आहे यात ८ युवती ५ युवक यांचा समावेश आहे. त्यात ७ मराठी तर ६ इतरांना संधी दिली आहे.यामध्ये तरूण शर्मा-एलएलबी, प्रियंका चरण-एम.कॉम. बी.एड., डॉ. भाव्या शहा-एमबीबीएस, किमया रकवी-मास्टर इन इंजिनिअर मॅनेजमेंट, महेश म्हात्रे-बिजनेस कन्सल्टंट, आकांक्षा विरकर- बॅचलर इन फॅशन डिझाइन आदी. उमेदवार आहेत.यात सर्व उमेदवार उच्चशिक्षित आहेत. डॉक्टर, वकील, इंजिनियर,एमबीए यांचा समावेश आहे तर एक युवती परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेली आहे. यातील अनेक युवक युवती त्यांच्या प्रभागात गेल्या काही वर्षापासून कार्यरत असून त्यांचे समाजकार्य कौतुकास्पद आहे.त्यामुळे असे युवक निवडून आल्यानंतर पक्षाला त्याचा मोठा फायदा होईल. उच्च शिक्षित असल्याने आपले मत व प्रश्न ते सभागृहात व्यवस्थितपणे मांडू शकतील त्यातून शहराचा विकास होण्यास मोठा हातभार लागणार असल्याचे रणवीर वाजपेयी यांनी सांगितले. युवती शहर अध्यक्षा श्रद्धा बने आणि अन्य उपस्थित होते.प्रभाग.क्र. उमेदवाराचे नाव शिक्षण३ तरुण शर्मा एलएलबी५ प्रियंका चरण एम.कॉम. बी.एड.७ डॉ. भाव्या शहा एमबीबीएस८ किमया रकवी मास्टर इन इंजिनिअर मॅनेजमेंट१० महेश म्हात्रे बिजनेस कन्सल्टंट१० आकांक्षा विरकर बी.कॉम, बॅचलर इन फॅशन डिझाइन११ विशाल पाटील व्यावसायिक१५ मनस्वी पाटील आय.टी. इंजीनियर१८ मयुरी म्हात्रे एल.एल.बी.१९ विवेक उपाध्याय एम.बी.ए.
अर्ज माघारी, बिनविरोध निवडीचे नाट्य संपले
ठाण्यात ६४९ उमेदवार रिंगणात, ७ बिनविरोधठाणे : अंतिम क्षणापर्यंत ताणलेले जागावाटप, ऐनवेळी मिळालेले एबी फॉर्म, उमेदवारी अर्जांचा पाऊस, अर्ज बाद होण्यापासून ते माघारीपर्यंत घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आता ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी महापालिका निवडणुकांचा खरा प्रचार रणसंग्राम सुरू होणार आहे. उद्या रविवार असल्याने आणि त्यानंतर अवघे दहा दिवस प्रचारासाठी हाती असल्याने प्रचाराला वेग येण्याची चिन्हे आहेत. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नऊ प्रभाग समित्यांमधून दाखल झालेल्या एकूण १ हजार १०७ नामनिर्देशन अर्जांपैकी छाननी आणि माघारीनंतर अखेर ६४९ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. गेल्या दोन दिवसांत तब्बल २६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.दरम्यान, सात ठिकाणी कोणताही प्रतिस्पर्धी नसल्याने शिवसेना (शिंदे गट) चे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता ठाण्यातील ३३ प्रभागांमधील १३१ जागांपैकी १२४ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. ३० डिसेंबरपर्यंत दाखल झालेल्या १ हजार १०७ अर्जांपैकी ९१८ अर्ज वैध ठरवण्यात आले होते. यामध्ये विरोधी पक्षांच्या अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याचे चित्र होते.१ आणि २ जानेवारी या कालावधीत काही प्रभागांत लढत बिनविरोध व्हावी, यासाठी राजकीय पातळीवर जोरदार हालचाली झाल्या. मात्र अखेरीस मोठ्या प्रमाणावर माघारी झाल्यानेच काही ठिकाणी समीकरणे बदलली.माघारीनंतर माजिवडा-मानपाडा, लोकमान्य सावरकरनगर आणि कळवा या प्रभाग समित्यांमध्ये सर्वाधिक उमेदवार रिंगणात असून, काही प्रभागांमध्ये तुलनेने कमी उमेदवारांमध्येच लढत होत असल्याचे चित्र आहे. बिनविरोध निवडीचे नाट्य संपल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रचाराच्या मैदानात उमेदवारांची खरी कसोटी लागणार असून, येत्या दहा दिवसांत ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.प्रभाग समितीनिहाय उमेदवारांची संख्या :माजिवडा–मानपाडा : ९२वर्तकनगर : ६५लोकमान्य सावरकरनगर : ८३वागळे : ३६नौपाडा–कोपरी : ५२उथळसर : ५०कळवा : ८२मुंब्रा (प्रभाग २६–३१) : ३९मुंब्रा (प्रभाग ३०–३२) : ५७दिवा (प्रभाग २७–२८) : ४२दिवा (प्रभाग २९–३३) : ५१
ठाणे पालिका निवडणुकीत ८६ अपक्ष उमेदवार मैदानातठाणे : ठाणे पालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरांना शांत करण्यात नेत्यांना यश आले असले, तरी ८६ अपक्ष उमेदवारांनी राजकीय पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. ३३ प्रभागांतील चुरस आता या अपक्ष उमेदवारांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे. १३१ जागांसाठी झालेल्या जागावाटपात अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. नेत्यांनी ९० टक्के बंडखोरांचे अर्ज मागे घेण्यात यश मिळवले, तरी काही ठिकाणी बंडखोर अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम आहेत.२०१७ मध्ये ठामपाची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. त्यानंतर २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपुष्टात आली, मात्र कोरोनामुळे निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.तब्बल चार-पाच वर्षांनंतर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने शिंदे सेना, भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार व अजित पवार गट), मनसे, उबाठा गट या पक्षांतून इच्छुकांची संख्या जास्त होती.मात्र महायुतीत जागा वाटपात कमी-अधिक जागा आल्यामुळे पक्षश्रेष्ठींना सर्वांना न्याय देता आला नाही. निष्ठावंतांना डावलल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. बंड थोपविण्यात ९० टक्के यश मिळाल्याचा दावा केला जात आहे. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्थानिक नाराजी किंवा व्यक्तिगत आवेशातून अपक्ष म्हणून लढणाऱ्या उमेदवारांमुळे राजकीय पक्षांना आव्हान निर्माण झाले आहे. १३१ जागांसाठी १४१ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला, त्यापैकी ५५ उमेदवारांनी माघारी घेतली, तर प्रत्यक्ष ८६ अपक्ष उमेदवार रिंगणात उभे आहेत. त्यामुळे पक्षातील बंडखोरांचे बंड शमविण्यात यश आले असले तरी अपक्ष उमेदवारांसह बंडखोरीचे आव्हान कायम राहणार आहे.उमेदवार बॅकफूटवरनिवडणूक होण्याआधीच अर्ज माघारीच्या दिवशी अपक्षांसह काही स्थानिक पक्षाचे उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा सात नगरसेवक बिनविरोध निवडून आले. माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), लोकराज्य पार्टी, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, जनता दल (सेक्युलर) आणि वंचित बहुजन आघाडी यांचा समावेश आहे.
Deepika Padukone 40th Birthday: बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आल्या, अनेक सुपरस्टार झाल्या, पण दीपिका पादुकोणचा प्रवास केवळ हिट चित्रपटांपुरता मर्यादित राहिलेला नाही. वैयक्तिक आयुष्यात घेतलेले ठाम निर्णय, सामाजिक विषयांवर निर्भीड भूमिका आणि करिअरमधील धाडसी पावले यामुळे दीपिकाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. म्हणूनच अनेकदा म्हटलं जातं हे फक्त दीपिकाच करू शकते. आज दीपिका पादुकोण आपला ४० […] The post Deepika Padukone 40th Birthday: परंपरांना छेद देत स्वतःच्या अटींवर जगलेली दीपिका पादुकोण; आज यशाची खात्री ठरलेली अभिनेत्री appeared first on Dainik Prabhat .
२०१७ च्या तुलनेत उमेदवारांच्या संख्येत २४ टक्क्यांनी घट
मुंबई : जवळपास ७ ते ८ वर्षांनी होत असलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये राज्यभरात इच्छुकांची भाऊगर्दी दिसत असताना, मुंबई पालिका निवडणुकीतील इच्छुकांच्या संख्येत मात्र २४ टक्क्यांची घट झाल्याचे समोर आले आहे. २०१७ च्या पालिका निवडणुकीत मुंबईत २ हजार २७५ उमेदवार मैदानात उतरले होते. तर, यंदा १ हजार ७०० उमेदवार नगरसेवक पदाच्या शर्यतीत आहेत. देशातील सर्वात श्रीमंत आणि आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबईत ही निवडणूक शहराच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या अंतिम यादीतून ही माहिती समोर आली आहे. मुंबईत एकूण २ हजार २३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी ४५३ उमेदवारांनी माघार घेतली, तर १६७ अर्ज तांत्रिक कारणांमुळे अवैध ठरले. अशा प्रकारे अंतिम वैध उमेदवारांची संख्या १ हजार ७०० पर्यंत खाली आली. उमेदवारसंख्या कमी झाली असली, तरी मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये सरासरी ७.४९ उमेदवार मैदानात असल्याने स्पर्धा तीव्र राहणार आहे.राज्यातील स्थिती काय?राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांमध्ये एकूण २ हजार ८६९ नगरसेवक पदांसाठी १५ हजार ९३१ उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. वैध ठरलेल्या २४ हजार ७७१ अर्जांपैकी ३५.७ टक्के (८,८४०) उमेदवारांनी माघार घेतली. मुंबईनंतर पुणे (१,१६६), नागपूर (९९३), छत्रपती संभाजीनगर (८५९) येथे उमेदवारांची संख्या जास्त आहे. नाशिकमध्ये माघारीचे प्रमाण सर्वाधिक (६६१) होते, तर पनवेलमध्ये सर्वात कमी (२५५) उमेदवार राहिले आहेत. राज्यात दीर्घकाळानंतर होत असलेल्या या महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी दिसली होती. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीने बंडखोरांना थंड करण्यात मोठे यश मिळवले.
मानवी वस्तीत जेरबंद केलेला बिबट्या वनखात्याकडून अधिवासात रवाना
कांदिवली : भाईंदर पूर्वेला पारिजात सोसायटी मध्ये, शिरून ७ नागरिकांना जखमी केलेल्या, बिबट्याला वन विभागाने मोठ्या शिताफिने जेरबंद केले होते. बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीत बिबट्या पूर्णपणे निरोगी असल्याचे निष्पन्न होताच, सॅटेलाईट कॉलर लावून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. जी.पी.एस. कॉलरच्या माध्यमातून बिबट्याच्या हालचालींचा अभ्यास करून मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यास मदत होणार आहे, असे संचालक अनिता पाटील यांनी सांगितले.भाईंदर पारिजात सोसायटीत शिरलेल्या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे वन विभागाने पकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणले. बिबट्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीत बिबट्या पूर्णपणे निरोगी असल्याचे स्पष्ट झाले. वनमंत्री गणेश नाईक यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली तसेच जखमी नागरिकांची दवाखान्यात भेट घेवून विचारपूस केली. वनमंत्री महोदयांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनानुसार बंदिस्त बिबटयाला सॅटेलाईट कॉलर लावून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य आणि मुख्य वनसंरक्षक मुंबई सर्वानुमते निर्णय घेतला. बिबटयास बोरीवली प्रशासना मार्फत सॅटेलाईट कॉलर व मायक्रोचिप बसविण्यात आली व वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यास नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे वन विभागाने संयुक्तपणे अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. बिबट्या निसर्गमुक्त केलेल्या परिसरातच असून त्याच्या नैसर्गिक अधिवासात तो स्थिरावत आहे. तसेच त्याचा वावर नैसर्गिक अधिवासात असल्याचे दिसत असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.हा बिबट्या वयाने लहान असून नुकताच आईपासून वेगळा झाल्याने, वाट चुकल्यामुळे तो शहरात आला असावा. राज्यात बिबट्यांशी संबंधित संघर्ष वाढत आहे त्याच्या हालचाली समजून घेण्यासाठी आणि भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी त्याला रेडिओ कॉलर लावून जंगलात सोडण्यात आले आहे.- गणेश नाईक, कॅबिनेट मंत्री (वने), महाराष्ट्र शासनवन विभाग सार्वजनिक सुरक्षेबाबत वन्यजीव संरक्षणासाठी कटिबद्ध आहे. जी.पी.एस. कॉलरमुळे बिबट्याच्या सुटकेनंतर त्याच्या हालचालींचे निरीक्षण करता येते आणि योग्य व्यवस्थापन निर्णय घेणे शक्य होते. अशा उपाययोजनांमुळे मानव आणि वन्यजीवांमध्ये सहअस्तित्व साधण्यास मदत होते.- अनिता पाटील, वनसंरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
असदुद्दीन ओवेसींचे ‘ते’आवाहन अन् उडाला एकच गोंधळ; अकोल्यातील सभेत नेमकं काय घडलं?
Asaduddin Owaisi | अकोल्यातील गडंकी भागातील झुल्फिकार अली मैदानावर एमआयएम नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ओवेसी उमेदवारांच्या प्रचार सभेत आले होते. परंतु सभेदरम्यान मोठा गोंधळ होऊन चेंगराचेंगरी झाल्याचे पाहायला मिळाले. असदुद्दीन ओवेसी यांनी सभेतील भाषणात बोलताना लोकांना व्यासपीठाकडे येण्याचे आवाहन केलं. त्यानंतर सभा संपत असताना […] The post असदुद्दीन ओवेसींचे ‘ते’ आवाहन अन् उडाला एकच गोंधळ; अकोल्यातील सभेत नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .
२० दिवसांच्या एसटी भाड्यात महिनाभर प्रवास !
मुंबई : दररोज लालपरीने किंवा ई-बसने प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नवी ई बसपास योजना सुरू केली आहे. प्रवाशांच्या खिशाला परवडणारी आणि पर्यावरणपूरक प्रवासाला चालना देणारी 'नवीन मासिक आणि त्रैमासिक पास योजना' जाहीर करण्यात आली आहे. २० दिवसांचे भाडे भरा आणि ३० दिवस बिनधास्त प्रवास करा, असे या योजनेचे मुख्य आकर्षण आहे. परिवहन मंत्री सरनाईक यांच्या संकल्पनेतून ही योजना साकारली आहे. खासगी वाहनांचा वापर कमी करून नागरिकांनी आरामदायी ई-बसकडे वळावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ९० दिवसांच्या प्रवासासाठी ६० दिवसांचे भाडे आकारले जाईल. येथे तब्बल एका महिन्याचे भाडे वाचणार आहे. ही सवलत महामंडळाच्या ताफ्यातील ९ मीटर आणि १२ मीटर ई-बसेस तसेच 'ई-शिवाई' बस सेवेसाठी लागू असेल. सध्या एसटीच्या ताफ्यात साधारणपणे ५०० हून अधिक ई-बसेस धावत असून, आगामी काळात ही संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे.
पंचायत समितीपेक्षा अधिक उमेदवारीसाठी रस्सीखेच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी होऊ शकेल. पंचायत समिती सदस्यासाठी स्वतंत्र निधी किंवा फार काही अधिकार नसल्याने पंचायत सदस्यत्वासाठी फार कोणी इच्छुक नसले तरी दुधावरची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार होतो. कोकणचे राजकारण काहीसे वेगळ आहे. कोकणातील चारही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत नेमकी काय स्थिती असेल याचा खरं तर अंदाज नगरपालिका निवडणुकीतून आला. अर्थात नगरपालिका निवडणुकीतील शहरी मतदार होते आता जि.प., पं.स. निवडणुकीतील, ग्रामीण मतदार आपलं मत नोंदवणार आहेत.महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा पहिला टप्पा नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका पार पडल्या. आता महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. आणखी आठवडाभरात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकाही जाहीर होतील. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती आणि राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उबाठा सेना या महाविकास आघाडीतील घटक पक्षांची आघाडी असली तरीही नगरपालिका निवडणुकीत किंवा आता होत असलेल्या महानगरपालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत सगळंच काही ठीक आहे अशातला भाग नाही. सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी आहे. एकेका जागेसाठी अनेकजण इच्छुक आहेत. खरंतर आणखी काही दिवसांनी होत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कोकणातही सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असण्याची शक्यता अधिक आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची मुदत संपून मधला बराच कालावधी गेला. त्यामुळे साहजिकच गावो-गावी गेल्या ८ ते १० वर्षांत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही वाढली. महिला आरक्षण, अशा अनेक कारणांनी यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये निश्चितच रंगत येईल. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या चारही जिल्ह्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना, उबाठा आणि राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कुठे दिसलेच नाही. त्या निवडणूक काळातही कोकणात महाविकास आघाडी अस्तित्व शोधत असताना दिसली. महाविकास आघाडीचे एकसंधत्व कधीचेच बाजूला गेले. त्यामुळे पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रभाव तर कुठे दिसलाच नाही. त्यामुळे नेत्यांमध्ये विश्वास नाही. ते कार्यकर्त्यांना विश्वास काय देणार अशी स्थिती कोकणातील चारही जिल्ह्यांमध्ये आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाच्या या निवडणुकांमध्ये प्रभाव दिसतो. प्रत्येक कार्यकर्त्याला या निवडणुकीत स्वत:ला सिद्ध करायचे असते. कार्यकर्त्यांना स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच संधी असते. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे कोकणात वारे वेगाने वाहू लागले आहेत.महायुती की महाविकास आघाडी होईल हे येणारा काळ ठरवणारा आहे. कोणत्याही निवडणुका, कुठल्याही पक्षाकडून लढवायच्या झाल्या तरी त्या किती कठीण असतात हे अलीकडच्या काळात कार्यकर्त्यांनी आणि जनतेनेही अनुभवले आहे. यामुळे साहजिकच सर्वसामान्यजण कोणीही निवडणुकीपासून चार हात दूर राहाणेच पसंत करेल. मात्र राजकीय कार्यकर्ते जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार आहेत. पंचायत समितीपेक्षा अधिक उमेदवारीसाठी रस्सीखेच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी होऊ शकेल. पंचायत समिती सदस्यासाठी स्वतंत्र निधी किंवा फार काही अधिकार नसल्याने पंचायत सदस्यत्वासाठी फार कोणी इच्छुक आणि उत्सुक नसले तरी दुधावरची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार होतो आणि दुसरी बाब म्हणजे जिल्हा परिषद मतदारसंघ राखीव झालेला असेल तर किमान पंचायत समितीची तरी निवडणूक लढवून नशीब अजमावण्याचा प्रकार आहे. पंचायत समिती सदस्य होण्यापेक्षा गावचा सरपंच झालं तर अधिक बरं असं वाटणाऱ्यांची संख्याही फार मोठी आहे. त्यामुळेच अलीकडे गावच्या सरपंचपदासाठी स्पर्धा वाढलेली दिसते. गावचं सरपंचपद चालवणं सोपं नसतं. अख्या गावाला सर्वांना सोबत घ्यावं लागतं. मनमानी करून चालत नाही. सतत समाजात वावर ठेवावा लागतो. जोडलेलं राहावं लागतं. उलट जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर कोणी फारसा पाच-दहा गावांच्या संपर्कात नसतो. याला काही जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य अपवादही असतात. ते सतत लोकांच्या त्यांच्या-त्यांच्या प्रभागात संपर्कात असतात. हे आपण आजवर पाहत आलो आहोत.रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रस आणि शिवसेना यांच फार जमण्याची शक्यता कमी आहे. अगदी काल-परवापर्यंत रायगड जिल्ह्यात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यातला संघर्ष हा अधिकच वाढत गेला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शिवसेना (शिंदेसेना गट) यांची जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत रायगडमध्ये महायुती होणं अवघड आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीतील सर्व घटकपक्ष एकत्रित निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात. अर्थात विद्यमान महाराष्ट्रातील आणि कोकणातीलही राजकारणात काय होईल हे सांगण अवघड असेल असं वाटतं. अर्थात महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय स्थितीत कोणाचेही कधीही आणि कितीही बिनसले असले तरीही ‘विकासाच्या’ मुद्द्यावर आम्ही एकत्रच आहोत असं सांगायला कोणताही राजकीय पक्ष, नेते कधीही मागे नसतात. राजकारणात जे महाराष्ट्रात घडतेय. तेच कोकणच्या राजकारणात घडल तर कोणीही त्यात नवल वाटून घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही. कोकणच राजकारण काहीस वेगळं आहे; परंतु तरीही सर्वच राजकीय पक्षांकडे इच्छुकांची संख्या किती असेल त्यावरच सारं अवलंबून असणार आहे. कोकणातील चारही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत नेमकी काय स्थिती असेल याचा खरंतर अंदाज नगरपालिका निवडणुकीतून आला आहे. अर्थात नगरपालिका निवडणुकीतील शहरी मतदार आता जि.प., पं.स. निवडणुकीतील, ग्रामीण मतदार आपलं मत नोंदवणार आहे. यामुळेच कोकणात सध्या वरवर शांतता असली तरी आतल्या आत निवडणुकांचे वारं धुमसत आहे.
कुटुंबातील घट्ट नाती ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना रोखू शकतात: मोहन भागवत
भोपाळ : एका कुटुंबात पालक आणि मुलांमधील संवाद आणि त्यांच्यातील घट्ट नाते लव्ह जिहादसारख्या घटना रोखू शकतात. जेव्हा घरात आणि कुटुंबात मुलांशी तुम्ही नियमित संवाद साधणार तेव्हा अशा घटनांवर अंकुश लागले. मुलांच्या भावना समजून घेता येतील. त्यामुळे या घटनांना आळा बसेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. एक प्रकारे लव्ह जिहादच्या समस्येवर मात करण्यासाठीचे हे एक सूत्र असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.भोपाळ येथील शिवनेरी भवन येथे आयोजित स्त्री शक्ती संवाद या कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.भागवत म्हणाले की, आपल्याला हे समजून घ्यायला हवे की अनोळखी व्यक्ती आपल्या मुलीला कसा भलवू शकतो? कुटुंबातील विसंवाद, सदस्यांमधील संवादातील कमी याचे या प्रकरणात मोठे योगदान आहे. जेव्हा कुटुंबात नियमित संवाद होईल.तुम्ही मुलांशी संवाद साधला तर त्यांना धर्म, संस्कृती आणि पंरपरांची माहिती होईल, त्यांच्याविषयीचा स्वाभाविक सन्मान समोर येईल.यावेळी त्यांनी लव्ह जिहाद थोपवण्यासाठी त्रिसूत्री सुद्धा सांगितली. जेव्हा समाज सभ्यतेचे गोडवे गातो. तेव्हा त्यात महिलांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरते. आपला धर्म, आपली संस्कृती आणि सामाजिक व्यवस्था महिलांमुळे सुरक्षित असल्याचे भागवत म्हणाले. पश्चिम समाजातील स्त्रियांची स्थिती आणि भारतीय मातृत्व केंद्रीत समाज याची तुलना करत यामुळे भारतीय संस्कृती उंच स्थानी असल्याचे भागवत म्हणाले.
गेल्या आठवड्यातच बेस्ट उपक्रमात खासगीकरण का नको यावर प्रकाश टाकत असतानाच दुर्दैवाने भांडुप बेस्टचा अपघात घडला. कुर्ला येथे झालेल्या अपघाताची आठवण झाली. योगायोगाने वर्ष संपता संपता झालेला हा अपघात आणि गेल्या वर्षी याच कालावधीत झालेला कुर्ल्यातील तो अपघात दोन्हीही बस एकाच कंपनीच्या, म्हणून यावर आता पुन्हा ऊहापोह करणे आवश्यक आहे.वर्ष संपता संपता भांडुप येथे झालेला अपघात हा दुर्दैवीच. गेल्यावर्षी कुर्ला येथे झालेला अपघातही वर्ष संपता संपता झाला. दोघांमध्ये ओलेक्ट्रा या खाजगी बस गाडीचा अपघात सारखा नसला तरी गेल्या सोमवारची बस मिडी होती तर कुर्ला येथे झालेल्या अपघातातली बस ही बारा मीटर मोठी होती. भांडुप येथे पादचाऱ्यांना बसने चिरडले व कुर्ला येथील बस अपघातातही पादचाऱ्यांनाच बसने चिरडले. दोन्ही अपघातांतील अहवालामध्ये बस चालकालाच जबाबदार ठरवले गेले आणि पुन्हा सर्वजण मोकळे झाले. वास्तविक या बसगाड्यांच्या त्रुटीकडे आजतागायत कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही. सर्वचजण निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त आहेत. मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत करून सर्वजण मोकळे झाले, मात्र बसबाबत निर्माण झालेले प्रश्न हे जशेच्या तसे राहिलेत. या अपघाताबद्दल बरेच प्रश्न निर्माण झाले. वास्तविक बस खासगी कंत्राटदाराची होती. मग यावर बेस्टचा चालक कसा? जेव्हा या कंपनीबरोबर करार झाला तेव्हा त्यांनी चालक दल पुरवणे आवश्यक होते. मात्र कंत्राटदारांकडील बस चालक टिकत नाहीत आणि मग नाईलाजाने बेस्टचे चालक वापरावे लागतात. थोडेफार चालक प्रशिक्षण देऊन त्यांना विद्युत बस गाड्यांवर पाठवण्यात येते. मागील वर्षी कुर्ला येथील जो अपघात घडला त्यातील बस चालकाला काही थोड्या दिवसांचे जुजबी प्रशिक्षण देऊन या विद्युत बसगाडीवर पाठवण्यात आले होते. बस गाडीचा अहवाल काय आला हे सारे गुलदस्त्यातच राहिले. मात्र त्या कंपनीला वाचवण्यासाठी अखेर संपूर्ण यंत्रणेलाच बस चालकाचा बळी द्यावा लागला. दहा ते वीस हजार करोड असलेली ही कंत्राटे टिकवण्यासाठी कोणाचा तरी बळी द्यावाच लागणार.भांडुप बस अपघातातील बस चालकावर सध्या यंत्रणेनेच घाव घातला आहे. यंत्रणा कशा पद्धतीने काम करते आहे याचे हे उत्तम उदाहरण. वास्तविक पाहता ही बस गेले काही दिवस दुरुस्ती कामामुळे उभी होती. जेव्हा ती रस्त्यावर आली तेव्हा त्याबाबत वारंवार तक्रारी केल्या गेल्या होत्या. तरी मात्र त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि अखेर अपघात हा घडलाच. सुरक्षित आरामदायी प्रवास म्हणून या बसेना प्रवासी प्राधान्य देतात. आशिया खंडातील सर्वात दर्जेदार सेवा देणारी म्हणून बेस्ट उपक्रमाची जगभरात ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून तोट्याच्या नावाने बेस्ट उपक्रमात कंत्राटी पद्धतीने बेस्ट उपक्रमाला पूर्णपणे वेढले आहे. कंत्राटी पद्धतीवर बसेनंतर कंत्राटी चालक व वाहक यामुळे बेस्ट उपक्रमाची खासगीकरणाकडे वाटचाल सुरु आहे. मात्र हे खासगीकरण नसल्याचे बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले असले तरी प्रत्यक्षात कंत्राटी पद्धतीवर बेस्ट उपक्रमाचा अंकुश नाही, हे वारंवार सिद्ध होत आहे. आज संपूर्ण कारभार कंत्राटी पद्धतीवर अवलंबून आहे. कंत्राटी पद्धत बेस्ट उपक्रमासाठी तापदायक ठरु लागली असून बेस्टचे कायमस्वरूपी कर्मचारी यात नाहक बदनाम होत आहेत. मुळात खासगीकरणामागे बेस्ट इतकी वाहवत गेली, की त्याच्या मूळ उद्दिष्टापासूनच भरकटत चालली आहे. काही महिन्यांपूर्वी बेस्टकडे ५०० हून जास्त मिडी बस गाड्या होत्या. मात्र त्या कालांतराने भंगारात गेल्या. मुंबईच्या उपनगरातील काही पूर्व व पश्चिम उपनगरातील काही ठिकाणी अशी आहेत, की तिथे छोटे व अरुंद गल्लीबोळातील रस्ते आहे. तेथे बेस्ट सेवा सुरू होत्या. मात्र कालांतराने त्यात घट होऊ लागली. जेथे बस सेवा सुरू होत्या, तिथे चालवण्यासाठी बेस्टकडे त्या प्रकारच्या बस गाड्या नाही, म्हणून खासगी कंत्राटदारांकडे बस गाड्या चालवण्याचा प्रयत्न केल्यास मात्र तोही निष्फळ ठरला आणि अखेर बऱ्याच ठिकाणी या बस सेवा बंद कराव्या लागल्या.कांजूर, भांडुपमधील जेथे अपघात झाला तेथे नरदास नगर, टेंभीपाडा, प्रताप नगर तसेच डोंगराळ भागात छोट्या गल्ल्या असल्याने तेथे मिडी प्रकारच्या बस गाड्या बेस्टने काही काळापूर्वी बनवून घेतल्या होत्या. मात्र नंतर बेस्टने बस खरेदी करणे बंद केले. जास्त बोंबाबोंब झाल्याने लोकप्रतिनिधींनी बेस्टवर दबाव टाकण्यास सुरुवात केली व काळा किल्ला आगारातून मिनी बस गाड्या या विक्रोळी आगारात आणून भांडुप, कांजूरमार्ग परिसरात चालवण्यात येऊ लागल्या. बऱ्याच बस चालकांनी तेथे बस चालवण्यास नकार दिला. काही ठरावीक बस गाड्या धावत होत्या. मात्र या अत्याधुनिक खासगी बस गाड्या या पटकन वेग घेतात. त्यामुळे उतारावरही या बस गाड्यांवर ताबा राहत नाही. अशा बऱ्याच तक्रारी होत्या. तरी बेस्टने त्या चालू ठेवल्या आणि भांडुप येथे ही दुर्दैवी घटना घडली. अशा बऱ्याच तांत्रिक व इतर समस्या या लोकप्रतिनिधी तसेच कामगार संघटना यांनी बेस्ट उपक्रमाच्या निदर्शनास यापूर्वी आणून दिल्या होत्या. मात्र या सर्व तक्रारांकडे बेस्ट उपक्रमाने दुर्लक्ष केले आणि त्याची परिणिती अपघातात झाली. कुर्ला व भांडुप येथे झालेला अपघात अरुंद रस्त्यांमुळे झाला. पदपथावर असलेल्या अतिक्रमणांमुळे झाला. भांडुप व कुर्ल्याचा अपघातही अशाच कारणांमुळे झाला. आता यावर उपाय म्हणून बेस्ट व्यवस्थापक यांनी सर्व बेस्ट चालकांना विद्युत बस गाड्यांचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य केले आहे. बेस्ट बस चालकांच्या प्रशिक्षणाचा प्रश्न त्यामुळे कंत्राटदाराचा आहे त्यासाठी बेस्टच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनी विद्युत बस गाडीचे प्रशिक्षण का घ्यावे? बेस्टकडे स्वमालकीच्या फक्त सहा विद्युत बस गाड्या आहेत व आगामी काळात स्वमालकीच्या बस गाड्या घेणे बेस्टला परवडण्यासारखे नाही. मग कंत्राटदारांच्या बस गाड्यांवर प्रशिक्षण घेऊन पुन्हा अपघात घडल्यास बेस्ट बस चालकाला पुन्हा जबाबदार ठरवणार? अशा व्यवस्थेचा बळी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ठरवले जाणार का? का आता तरी यात सुधारणा होणार, याचे उत्तर येणारा काळ देईल? हे पाहणे औत्सुक्याचे असेल.अल्पेश म्हात्रे
पौष पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदिराला शिखरी काठ्यांची देवभेट
जेजुरी : पौष पौर्णिमा हा खंडोबाचा लग्नसोहळा दिवस असतो. यानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरावर आज रविवारी दुपारी सुपा येथील खैरे व शिरापूर(ता.दौंड) येथील होलम काठीने शिखराला काठी टेकविण्याचा मान घेतला. यावेळी सात ते आठ प्रासादिक काठ्या सहभागी होत्या.यावेळी भाविकांनी जल्लोष करित भंडा-याची उधळण करीत गडावर काठीची मंदीर प्रदक्षिणा केली.पौष पौर्णिमेनिमित्त सुप्याच्या खैरे व दौंड तालुक्यातील शिरापूर येथील काठी परंपरेनुसार शिखराला काठी टेकविण्यासाठी येते. आज सकाळी वाजत गाजत काठी गडावर आली. काठीप्रमुख शहाजी खैरे व भाविक होते. दुपारी साडेबारा वाजता खैरे व होलम यांची काठी टेकविण्याचा मान पार पडला. त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा घेण्यात आली.भाविकांनी भंडारा उधळून जल्लोष करित प्रदक्षिणा पुर्ण केली. तांबडे-पांढरे निशान हे या काठीची ओळख आहे. तांबडे-पांढरे वस्त्रांनी काठी सजविण्यात आली होती.गावातही अनेक ठिकाणी काठीने मानाचे कार्यक्रम घेतले. पौष पौर्णिमेला काठी आणण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे. खंडोबा-म्हाळसाच्या लग्नाचा सोहळ्यानिमित्त दुस-या दिवशी काठी टेकविण्याचा मानाचा कार्यक्रम परंपरेनुसार चालत आला आहे.
संतपरंपरेमुळे भारताच्या संस्कृतीची जागतिक पातळीवर वेगळी ओळख
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुंबई : सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आणि समाजप्रबोधनाचा वारसा संतांनी वर्षानुवर्षे जपला आहे. संतपरंपरेमुळेच भारताची जगात ऐतिहासिक ओळख निर्माण झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.कांदिवली (पूर्व) येथील संतमत अनुयायी आश्रम, सिंह इस्टेट येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी माजी मंत्री कृपाशंकर सिंह, माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अमित साटम, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रवीण दरेकर, संतमत अनुयायी आश्रम ट्रस्टचे सचिव राधेश्याम यादव यांच्यासह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.समुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संतांनी आपल्या प्रबोधनातून समाजाची सर्वांगीण प्रगती साधली आहे. संतांच्या विचारांमधून सामाजिक व शैक्षणिक कार्याला दिशा मिळाली. संतमत परंपरेत मानवसेवा, समता, प्रेम व सद्भावना ही केवळ तत्त्वे नसून ती प्रत्यक्ष आचरणात आणण्याची जीवनपद्धती आहे. या मूल्यांच्या प्रसारासाठी श्री सद्गुरु शरणानंदजी महाराज परमहंस यांच्या अनुयायांच्या माध्यमातून संतमत अनुयायी आश्रमाद्वारे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य सुरू आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, संतमत अनुयायी आश्रमांचे कार्य समाजाला सेवेकडे आणि प्रेमाकडे नेणारे आहे. मानवसेवा, समता, प्रेम व सद्भावना या मूल्यांच्या जपणुकीसाठी आश्रमाचे योगदान अमूल्य असून, हेच संतमत परंपरेचे खरे स्वरूप आहे. भारतीय संस्कृती जपण्याचे महान कार्य संतपरंपरेने केले आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
अॅक्वा लाईनवर प्रवास होणार अधिक सुखकर
२७ वाढीव फेऱ्यांचा समावेशमुंबई : आरे ते कफ परेड मेट्रो-३ भुयारी मार्गिकेवर प्रवास अधिक सुखकर होणार आहे. 'अॅक्वा लाइन'वर म्हणजेच मेट्रो-३ मार्गिकेवर सोमवार, ५ जानेवारीपासून मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. पीक अवरमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असून, याचा थेट फायदा दैनंदिन प्रवाशांसह वीकेंडला प्रवास करणाऱ्यांनाही होणार आहे. यामध्ये २७ वाढीव फेऱ्यांचा समावेश असेल.आरे जेव्हीएलआर ते कफ परेड या मार्गावर धावणाऱ्या भुयारी मेट्रोला सकाळी आणि सायंकाळी खूप गर्दी असते. मेट्रो सेवा नुकतीच सुरू झाल्यामुळे सुरुवातीला मर्यादित फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. मात्र, गाड्यांमधील जास्त अंतरामुळे पीक अवरमध्ये प्रवाशांची गैरसोय होत होती. ही अडचण दूर करण्यासाठी आता फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवड्याच्या दिवशी पीक आव्हरदरम्यान फेऱ्यांमध्ये २६५ वरून वाढ करून २९२ करण्यात आली आहे. म्हणजेच २७ वाढीव फेऱ्यांचा समावेश असेल. शनिवारी या फेऱ्या २०९ वरून वाढून २३६ करण्यात आल्या आहेत. रविवारी कोणताही बदल करण्यात आलेला नसून १९८ फेऱ्या कायम राहणार आहेत.अधिकाऱ्यांनी प्रवाशांना अद्ययावत वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. या मार्गावरील सायन्स सेंटर, महालक्ष्मी, जगन्नाथ शंकर शेठ (मुंबई सेंट्रल), ग्रँट रोड, गिरगाव, कळबादेवी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड ही स्थानके अनेक प्रवेश-निर्गमन बिंदूंनी सुसज्ज आहेत. आरे जेव्हीएलआर ते कफ परेड या एकमार्गी प्रवासासाठी ७० रुपये भाडे आकारले जाते. दरम्यान, १ तेइ३१ ऑक्टोबर या कालावधीत अॅक्वा लाइनने ३८,६३,७४१ प्रवाशांची वाहतूक केली असून, उपनगर आणि दक्षिण मुंबई यांना जोडणाऱ्या या मार्गावर प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वन जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांचा पाणीप्रश्न सोडवणार
मंत्री आशीष शेलार यांच्याकडून दिलासामुंबई : प्रकाश दरेकर यांचा विजय तुमच्या झोपड्यांना, नळाला पाणी पोचविण्याच्या निर्णयाचे स्वागत करणारा असेल. या विभागात अद्ययावत रुग्णालय येण्याच्या कामाला गती देणारा असेल. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रकाश दरेकर प्रभाग क्रमांक ३ मधून मुंबई महापालिकेत पोहोचणार. निवडून आल्यावर ते पहिलाच ठराव वन जमिनीवर राहत असलेल्या नागरिकांच्या पाण्याप्रश्नी करतील, असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी व्यक्त केला. भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार प्रकाश दरेकर यांच्या दहिसर (पूर्व) येथील निवडणूक कार्यालयाचा उद्घाटन सोहळा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आमदार आशीष शेलार यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी कॅबिनेट मंत्री आ.प्रवीण दरेकर, उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, मागाठाणे विधानसभेचे शिवसेना आ. प्रकाश सुर्वे, माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, यांसह महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री आशीष शेलार म्हणाले की, मुंबई महापालिकेची निवडणूक ९ वर्षांनी होत आहे. २०१७ साली निवडणूक झाली होती. ९ वर्षांनी तुम्हाला संधी मिळाली आहे. या भागात पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन पोचवायचे असेल तर वनखात्याची परवानगी लागते. डोक्यावरचे छत राहील की नाही ही भीती मनात घेऊन येथील नागरिक राहत आहे. मी असा नेता नाही की माझे मातोश्री १ आणि मातोश्री २ बंगले आहे. घराच्या विवंचनेत असलेल्या नागरिकांना जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत तुमच्या घराला कुणीही हात लावणार नाही, असा शब्द शेलारांनी दिला. ही महापालिका निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे. प्रकाश दरेकर यांच्यासारखा नगरसेवक पदाचा उमेदवार महायुतीने विश्वासाने दिला आहे. केतकीपाड्याचा, शांती नगरचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. येथील रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याची भूमिका सरकार घेईल. विकासासाठी भाजपच्या कमळाच्या, महायुतीच्या मागे उभे राहा. प्रकाश दरेकर यांनी ज्या पद्धतीने प्रभाग क्र. ५ चा विकास केला तसाच प्रभाग क्र. ३ चा विकास करणार. विजयाचा चौकार मारण्याचे काम मतदारांनी करावे आणि प्रचंड मतांनी प्रकाश दरेकर यांना निवडून द्यावे, असे आवाहनही आमदार प्रवीण दरेकर यांनी केले.
ECINet App: आयोगाचे ४० ॲप्स आता एकाच ठिकाणी! मतदारांचे काम होणार सोपे; घरबसल्या मिळणार ‘या’सुविधा
प्रभात वृत्तसेवा पुणे – केंद्रीय निवडणूक आयोगाने ईसीआयनेट हे ॲप विकसित केले आहे. निवडणूक आयोगाच्या आधीच्या ४० हून अधिक स्वतंत्र ॲप्स आणि वेबसाइट्सना एकाच छताखाली आणून हे नवीन एकात्मिक ॲप तयार करण्यात आले आहे.या ॲपमुळे मतदार यादीत नाव नोंदविणे, नावात बदल करणे, तसेच मतदान केंद्र कोठे आहे आणि तिथे जाण्याचा मार्ग काय आहे, हे सहज […] The post ECINet App: आयोगाचे ४० ॲप्स आता एकाच ठिकाणी! मतदारांचे काम होणार सोपे; घरबसल्या मिळणार ‘या’ सुविधा appeared first on Dainik Prabhat .
पुणेकरांसाठी खुशखबर! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या ‘त्या’चाचणीचा अडथळा दूर; लवकरच धावणार मेट्रो
प्रभात वृत्तसेवा पुणे – माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. मेट्रो रेल्वेच्या सुरक्षितता व तांत्रिक मानकांची पडताळणी करणाऱ्या रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनची (आरडीएसओ)ची अनिवार्य तपासणी नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. मेट्रो सुरू करण्यापूर्वीची ही तपासणी महत्त्वाची मानली जाते.माण- हिंजवडी ते शिवाजीनगर यांना जोडणारा एक महत्त्वाचा उपक्रम असलेल्या पुणे मेट्रो लाईन […] The post पुणेकरांसाठी खुशखबर! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या ‘त्या’ चाचणीचा अडथळा दूर; लवकरच धावणार मेट्रो appeared first on Dainik Prabhat .
Pune Weather: १३ अंशांच्या पुढे गेलं तापमान; ढगाळ हवामानामुळे थंडीचा जोर कमी
प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह उपनगरातील किमान तापमानात लक्षणीय वाढ झाल्यामुळे थंडीचा जोर ओसरला आहे. ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून, हवामानातील बदलाचा परिणाम पुणेकरांना सहन करावा लागत आहे. साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. शहरातील किमान तापमान १२ ते १३ अंशाच्या पुढे गेला आहे.मागील चार ते पाच दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात […] The post Pune Weather: १३ अंशांच्या पुढे गेलं तापमान; ढगाळ हवामानामुळे थंडीचा जोर कमी appeared first on Dainik Prabhat .
Pune Crime: मालकिणीच्या धमकावणीने ३० वर्षीय तरुणाची आत्महत्या; सात जणांवर गुन्हा
प्रभात वृत्तसेवा पुणे – मालकिणबाईंच्या धमकावणीमुळे रामदास भरत पवार ( ३०) या तरुणाने सातारा जिल्ह्यातील लोणंद परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली. याप्रकरणी दोन महिलांसह सातजणांविरुद्ध येवलेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.रामदासला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शीतल काळे, अरविंद काळे, सतीश सरोदे, नितीन सरोदे, श्रृती कन्हेरे, ऋषी कन्हेरे, मोहन सोनार (सर्व रा. कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. […] The post Pune Crime: मालकिणीच्या धमकावणीने ३० वर्षीय तरुणाची आत्महत्या; सात जणांवर गुन्हा appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होत असून पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मतपेट्या वाहून नेण्यासाठी निवडणूक आयोगाने पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) १ हजार १०० बसची मागणी केली आहे. त्यानुसार पीएमपी बसचे नियोजन करत आहे.लोकसभा, विधानसभा, महापालिकेच्या मतदानासाठी पीएमपीकडून मतपेट्या वाहून नेण्यासाठी बससेवा पुरविण्यात येते. त्यासाठी निवडणूक नियोजन अधिकारी मतदार केंद्रानुसार पीएमपीकडे किती बस […] The post PMPML Buses Election Duty: मतपेट्यांची जबाबदारी आता ‘पीएमपी’वर; निवडणुकीसाठी वाहतुकीचं मेगा प्लॅनिंग तयार appeared first on Dainik Prabhat .
निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग असला, तरी गेल्या काही वर्षांपासून निवडणुकीची ही प्रक्रिया जास्तच गुंतागुंतीची आणि शंकास्पद बनत चालली असून त्यातून विविध विषय समोर येताना दिसत आहेत. मुळात गेल्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम घोटाळा असो किंवा मतचोरीचा मुद्दा असो याबाबत चर्चा सुरू असतानाच आता महाराष्ट्रात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या प्रक्रियेच्या […] The post अग्रलेख : ‘बिनविरोध’चा फंडा appeared first on Dainik Prabhat .
निवडणुकीचा ‘सुपर संडे’! अजितदादांची सभा तर सचिन अहिर यांचा रोड शो; रविवारी प्रचाराचा धडाका
प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी जंगी सुरुवात केली असून, प्रभागनिहाय चित्र स्पष्ट झाल्यानंतर आलेला पहिलाच रविवार उमेदवारांनी पदयात्रा आणि घरोघरी भेटी देऊन सत्कारणी लावला.पहिल्याच रविवारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी अधिकाधिक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. काहींनी पदयात्रा काढल्या, तर काहींनी घरोघर भेटी दिल्या. काही पक्षांनी नेत्यांचे रोड शो केले. शिवसेना (उबाठा) जिल्हा संपर्कप्रमुख […] The post निवडणुकीचा ‘सुपर संडे’! अजितदादांची सभा तर सचिन अहिर यांचा रोड शो; रविवारी प्रचाराचा धडाका appeared first on Dainik Prabhat .
PMC Election: ज्येष्ठांसाठी आरोग्य भवन उभारणार; डॉ. निवेदिता एकबोटे यांची मतदारांना ग्वाही
प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महापालिकेचा प्रभाग क्रमांक १२ हा भविष्यात शहराच्या विकासाचा मानबिंदू ठरेल. या प्रभागातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्व सोयीसुविधांनी सज्ज असे आरोग्य भवन उभारण्यास माझे प्राधान्य असेल, अशी ग्वाही भारतीय जनता पक्ष-आरपीआय (आठवले गट) व मित्रपक्षाच्या उमेदवार प्राचार्या डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांनी दिली.प्रभाग क्र. १२ ‘ड’ (छत्रपती शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी) […] The post PMC Election: ज्येष्ठांसाठी आरोग्य भवन उभारणार; डॉ. निवेदिता एकबोटे यांची मतदारांना ग्वाही appeared first on Dainik Prabhat .
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की आता व्हेनेझुएलाची सत्ता अमेरिका चालवेल आणि त्याच्या तेल साठ्यात गुंतवणूक करेल. ट्रम्प यांनी ही गोष्ट व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला पकडल्यानंतर सांगितली. ट्रम्प यांचा दावा आहे की, आता त्यांचा ताबा जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यावर आहे, ज्याची किंमत अंदाजे 1,557 लाख कोटी रुपये आहे. तर काय खरंच अमेरिका आता व्हेनेझुएलामधून तेल काढेल आणि जगात विकेल, यामुळे भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होईल का? जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न-1: ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या तेल साठ्याबद्दल काय म्हटले? उत्तर: अमेरिकेच्या डेल्टा फोर्स, नेव्ही, एअरफोर्ससह सर्व एजन्सींनी 2-3 जानेवारीच्या रात्री 'ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व्ह' चालवून व्हेनेझुएलावर हल्ला केला. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अमेरिकन जवानांनी त्यांच्या बेडरूममधून ओढून बाहेर काढले, ताब्यात घेतले आणि अमेरिकेला घेऊन आले. प्रश्न-2: व्हेनेझुएलाकडे किती आणि कोणत्या प्रकारचे तेल आहे? उत्तर: अमेरिकेच्या एनर्जी इन्फॉर्मेशन ॲडमिनिस्ट्रेशननुसार, व्हेनेझुएलाकडे 30 हजार कोटींहून अधिक बॅरलचा तेलसाठा आहे. हा जगातील एकूण तेलसाठ्याच्या सुमारे 20% आहे. म्हणजेच व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वाधिक तेल आहे. याची किंमत सुमारे 17.3 ट्रिलियन डॉलर म्हणजेच 1,557 लाख कोटी रुपये अंदाजित करण्यात आली आहे. व्हेनेझुएलाकडे जे तेल आहे, ते जड आणि कच्चे तेल आहे. त्यात सल्फरचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे त्यावर प्रक्रिया करण्यासाठी उच्च स्तरावरील तंत्रज्ञान लागते. त्यातून डिझेल, एलपीजी, गॅसोलीन, जेट इंधन बनते. त्याचबरोबर पॉवर प्लांट, सिमेंट उद्योग, जहाजे, रस्ते बांधकाम आणि वॉटरप्रूफिंगसारख्या कामांमध्ये त्याचा वापर होतो. तर अमेरिकेकडे सुमारे 5 हजार बॅरलचा तेलसाठा आहे, जे हलके आणि कच्चे तेल आहे. ते गॅसोलीन बनवण्यासाठी चांगले आहे, परंतु त्यातून इतर गोष्टी बनत नाहीत. मात्र, त्यावर प्रक्रिया करणे सोपे असते. जगातील सर्वाधिक तेलसाठा असूनही व्हेनेझुएला दररोज फक्त 10 लाख बॅरल तेल उत्पादन करतो. हे जगातील एकूण तेल उत्पादनाच्या केवळ 0.8% आहे. प्रश्न-3: जेव्हा जगातील सर्वाधिक तेल व्हेनेझुएलाकडे आहे, तर त्याची अशी अवस्था का? उत्तर: जगातील सर्वात मोठा तेल साठा असूनही, 2025 मध्ये दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत व्हेनेझुएला 127 व्या क्रमांकावर राहिले. देशातील 90% लोकसंख्या गरीब आहे. 2018 मध्ये, व्हेनेझुएलाचा महागाई दर 17 लाख टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर 50 हजार आणि 1 लाखाच्या नोटा छापाव्या लागल्या. लोकांना अंडी खरेदी करण्यासाठी 1 लाखाच्या 20 नोटा घेऊन दुकानात जावे लागत होते. या गोष्टी आश्चर्यकारक आहेत, कारण मोठ्या तेल साठ्या असलेल्या बहुतेक देशांची आर्थिक स्थिती चांगली किंवा ते श्रीमंत आहेत. तरीही व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था खराब असण्याची 4 मोठी कारणे आहेत… 1. सरकारी निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचार 2. संपूर्ण देश फक्त तेलावर अवलंबून 3. गुंतवणूक आणि देखभालीची कमतरता 4. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे तेल व्यवसायावर बंदी प्रश्न-4: तर व्हेनेझुएलाकडे तेल काढण्याचे तंत्रज्ञान नाही का? उत्तर: असे नाही की व्हेनेझुएलाकडे तेल काढण्याचे तंत्रज्ञान अजिबात नाही. देशात असलेले 'पारागुआना रिफायनरी कॉम्प्लेक्स' एकेकाळी जगातील सर्वात मोठी रिफायनरी होती. समस्या अशी आहे की व्हेनेझुएलाचे तंत्रज्ञान खूप जुने झाले आहे आणि ते अनेक वर्षांपासून अद्ययावत (अपडेट) केले गेले नाही. व्हेनेझुएलाची सरकारी तेल कंपनी PDVSA मानते की तिची पाइपलाइन आणि मशीन सुमारे 50 वर्षांपूर्वीची आहेत. उत्पादन वाढवण्यासाठी सुमारे 58 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची आवश्यकता असेल. व्हेनेझुएलाच्या जड आणि घट्ट तेलाला प्रत्येक रिफायनरी हाताळू शकत नाही. सामान्य रिफायनरी हलक्या तेलासाठी बनवलेल्या असतात. व्हेनेझुएलाचे तेल शुद्ध करण्यासाठी विशेष आणि प्रगत मशीनची आवश्यकता असते, जी मोठ्या आणि महागड्या प्लांट्समध्येच असतात. अमेरिका आणि अनेक परदेशी तेल कंपन्यांकडे या प्रकारच्या जड तेलाचे उत्खनन आणि शुद्धीकरण करण्याची आधुनिक तंत्रज्ञान आहे. राजकीय निर्णय आणि निर्बंधांमुळे या कंपन्या दीर्घकाळ व्हेनेझुएलामध्ये काम करू शकल्या नाहीत, ज्यामुळे तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीची दोन्हीची कमतरता निर्माण झाली. व्हेनेझुएलाकडे स्वतःची मोठी रिफायनरी देखील होती, परंतु अनेक वर्षांपासून गुंतवणूक न झाल्यामुळे आणि खराब देखभालीमुळे त्यांची क्षमता खूप कमी झाली आहे. याच कारणामुळे देश स्वतःचे तेल पूर्ण प्रमाणात रिफाइन करू शकत नाही. प्रश्न-5: ट्रम्प आणि अमेरिकन कंपन्या व्हेनेझुएलामध्ये खरोखरच गुंतवणूक करतील का? उत्तर: होय, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी उघडपणे सांगितले आहे की अमेरिकन तेल कंपन्या व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतील, परंतु या संदर्भात सध्या कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. प्रश्न-6: भारतासह जगभरात तेलाच्या किमतींवर काय परिणाम होईल? उत्तर: तज्ञांचे मत आहे की जर ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या तेल साठ्याबाबत कोणतेही मोठे पाऊल उचलले नाही, तर तेलाच्या किमतींवर कोणताही विशेष परिणाम होणार नाही.
Pune Crime: शिवाजीनगरमध्ये काळूबाई देवीचा चांदीचा मुकुट लंपास; भक्तांमध्ये संतापाची लाट
प्रभात वृत्तसेवा पुणे – शिवाजीनगर गावठाण परिसरात मांढरदेवी काळूबाई मंदिराचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ३० हजारांचा चांदीचा मुकुट चाेरून नेला आहे. फिर्यादीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी मंदिरातून देवीचा चांदीचा मुकुट चोरून नेला. पाेलीस उपनिरीक्षक अजित बढे तपास करत आहेत. दरम्यान, धायरीतील रायकळ मळा भागातील एका आईस्क्रीम दुकानातून चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड […] The post Pune Crime: शिवाजीनगरमध्ये काळूबाई देवीचा चांदीचा मुकुट लंपास; भक्तांमध्ये संतापाची लाट appeared first on Dainik Prabhat .
Ajit Pawar: अजित पवारांनी ठोकला पुण्यात तळ; भाजपला रोखण्यासाठी आखली ‘ही’गुप्त रणनिती
प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली असून राज्यात महायुतीत एकत्र असलेल्या भाजप – राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पुण्यात आता भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार पुण्यात तळ ठोकून असून रविवारी दिवसभरात शहरातील वेगवेगळया प्रभागातील कार्यकर्त्यांचा पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येण्यासाठी भाजप विरोधी […] The post Ajit Pawar: अजित पवारांनी ठोकला पुण्यात तळ; भाजपला रोखण्यासाठी आखली ‘ही’ गुप्त रणनिती appeared first on Dainik Prabhat .
लक्षवेधी : जागतिक व्यापारात नवे डावपेच
– विश्वास सरदेशमुख अमेरिकन प्रशासन बहुपक्षीय करारांकडे ज्या संशयी नजरेने पाहते, ते लक्षात घेता अमेरिकेने संवादाचा मार्ग निवडणे धक्कादायक मानले पाहिजे. यामागील मूळ उद्देश जागतिक व्यापाराचे लोकशाहीकरण करणे आहे की केवळ अमेरिकेच्या हितसंबंधांना सर्वोच्च स्थान देणे? डोनाल्ड ट्रम्प यांच्या गेल्या कार्यकाळाचा अनुभव पाहता, अमेरिका बहुपक्षीय मंचावरून बाहेर पडेल किंवा जागतिक प्रशासकीय संस्थांना थेट आव्हान देईल, […] The post लक्षवेधी : जागतिक व्यापारात नवे डावपेच appeared first on Dainik Prabhat .
Pune FDA Raid: ३१.६७ कोटींचा हुक्का साठा जप्त! अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई
प्रभात वृत्तसेवा पुणे – अन्न आणि औषध प्रशासन विभागाने राज्यभर प्रतिबंधित वस्तूंच्या उत्पादनाविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून, याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील टाकवे येथील मे. सोएक्स इंडिया प्रा. लि. या कंपनीवर छापा टाकून अन्न आणि औषध प्रशासनाने तब्बल ३१ कोटी ६७ लाख २१ हजार ९८७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक आणि […] The post Pune FDA Raid: ३१.६७ कोटींचा हुक्का साठा जप्त! अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – राजगुरुनगर शहरातील होलेवाडी परिसरात असलेल्या श्री अपार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी सुनियोजित पद्धतीने घरफोडी करत तब्बल 68 लाख 2 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. खेड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, मोतीलाल कांतीलाल […] The post राजगुरुनगरमध्ये ६८ लाखांची घरफोडी! सोन्याचे दागिने, चांदीची भांडी आणि रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास. appeared first on Dainik Prabhat .
मढेघाट हादरलं! विद्यार्थ्यांवर मधमाशांचा भीषण हल्ला; ५६ जण जखमी, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
प्रभात वृत्तसेवा विंझर – ऐतिहासिक मढेघाट परिसरात पर्यटनासाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर मधमाशांनी अचानक भीषण हल्ला केला. हल्ल्यात एकूण ५६ जण जखमी झाले असून त्यापैकी सहाजणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तातडीने पुण्यात खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. प्राथमिक उपचारानंतर इतर जखमींची प्रकृती स्थिर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, दीड वर्षांपूर्वी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याजवळ […] The post मढेघाट हादरलं! विद्यार्थ्यांवर मधमाशांचा भीषण हल्ला; ५६ जण जखमी, ६ जणांची प्रकृती चिंताजनक appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (वाकड–ताथवडे–पुनावळे) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार शनिवारी (दि. ३) नारळ फोडून सुरू झाला.शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सागर विजय ओव्हाळ आणि चेतन अण्णा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री नरसिद्ध मंदीर येथे माजी मंत्री, शिवसेना नेते व विधान परिषद सदस्य […] The post Shiv Sena UBT Pimpri: प्रभाग २५ मध्ये मशाल पेटली; सचिन अहीरांच्या चेतन पवार यांच्या प्रचाराचाहस्ते नारळ फुटला appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिकेच्या रणांगणात राज्य पातळीवरील वरिष्ठ नेते प्रचारात सक्रिय झाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, दोन्ही शिवसेना आदी पक्षांचे नेते विमानाने किंवा हेलिकॉप्टरने उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार असल्याचे गृहीत धरून निवडणूक आयोगाने या हवाई सफरीचेही दरपत्रक जाहीर केले आहे. त्याचसोबत शाकाहारी, मांसाहारी भोजन, झेंडे, फलकापासून ते अगदी वाद्यांपर्यंतचे दर निश्चित केले आहेत. त्या […] The post PCMC Election: टोपीपासून ते हेलिकॉप्टरपर्यंत सगळंच महागलं; निवडणूक आयोगाने जाहीर केलं खर्चाचं दरपत्रक appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीची चाहूल लागताच सोशल मीडियावर राजकीय चर्चांना अचानक वेग आला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर), व्हॉट्सअॅप सारख्या प्लॅटफॉर्मवर विविध पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्सच्या माध्यमातून समर्थक, कार्यकर्ते आणि मतदार आपापली मते नोंदवत आहेत. डिजिटल विश्वात निवडणुकीचे तापमान चांगलेच वाढले आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक सातत्याने […] The post PCMC Election: महानगरपालिका रणसंग्राम आता मोबाईलच्या स्क्रीनवर; उमेदवारांना सोशल मीडियावर घेतलं धारेवर appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: आम आदमी पार्टीचे घरोघरी जनसंपर्क अभियान; प्रभाग २६ मध्ये नागरिकांशी संवाद
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – आम आदमी पार्टी (आप) च्या वतीने प्रभाग क्रमांक २६ मध्ये शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या नेतृत्वाखाली व्यापक घर टू घर जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विशालनगर, कस्पटेवस्ती परिसरात राहणाऱ्या तसेच आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरिकांच्या घरोघरी जाऊन थेट संवाद साधण्यात आला. तसेच यावेळी आपच्या गॅरंटी कार्डचे वितरण करण्यात आले. या […] The post PCMC Election: आम आदमी पार्टीचे घरोघरी जनसंपर्क अभियान; प्रभाग २६ मध्ये नागरिकांशी संवाद appeared first on Dainik Prabhat .
मंगेश काळोखे हत्या प्रकरणाचा मोठा खुलासा; २० लाखांची सुपारी अन् ‘ती’महिला मध्यस्थ..वाचा सविस्तर
प्रभात वृत्तसेवा खालापूर – खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी मोठा आणि खळबळजनक खुलासा केला आहे. मंगेश काळोखे यांची हत्या २० लाख रुपयांच्या सुपारीतून करण्यात आली असून या कटामागे पुणे कनेक्शन असल्याचे तपासात समोर आले आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येचा […] The post मंगेश काळोखे हत्या प्रकरणाचा मोठा खुलासा; २० लाखांची सुपारी अन् ‘ती’ महिला मध्यस्थ..वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेसेना आमनेसामने; पिंपरीच्या ‘या’जागांवर होणार काटे की टक्कर
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी चित्र स्पष्ट झाले असून प्रचाराने वेग घेतला आहे. या निवडणुकीत महायुतीत असलेल्या भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेसेना यांच्यातील थेट टक्कर पाहायला मिळणार आहे. काही प्रभागांत मात्र उद्धवसेना-मनसे, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारही निर्णायक ठरणार आहेत.शहरात दुरंगी, तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी लढती होणार आहेत. दुरंगी लढतीत बहुसंख्य प्रभागांत मुख्यतः भाजप विरुद्ध […] The post PCMC Election: भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेसेना आमनेसामने; पिंपरीच्या ‘या’ जागांवर होणार काटे की टक्कर appeared first on Dainik Prabhat .
Nilesh Lanke: अजितदादा आणि साहेब एकत्र आले तर…; निलेश लंकेंनी व्यक्त केली मनातील सुप्त इच्छा
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र आल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही समाधान वाटेल, असे वक्तव्य खासदार निलेश लंके यांनी रविवारी (दि. ४) केले. वाकड येथे पत्रकारांशी बोलताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत विचारले असता त्यांनी ही भूमिका मांडली.सध्या पिंपरी चिंचवड शहरासह राज्यामध्ये महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू […] The post Nilesh Lanke: अजितदादा आणि साहेब एकत्र आले तर…; निलेश लंकेंनी व्यक्त केली मनातील सुप्त इच्छा appeared first on Dainik Prabhat .
Rajgurunagar News: शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवून विकासाची दिशा –बाबाजी काळे
प्रभात वृत्तसेवा राजगुरूनगर – राजकारणात निवडणूक जिंकण्यापेक्षा समाजासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन महत्त्वाचा असतो. शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवून जिल्हा परिषद निवडणुकीतील इच्छुक उमेदवार दीप्तीताई प्रसाद भोगाडे यांनी आयोजित केलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे. भविष्यात निवडून आल्यास त्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नक्कीच कटिबद्ध राहतील, असा विश्वास खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी व्यक्त केला. रेटवडी-वाफगाव जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक […] The post Rajgurunagar News: शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवून विकासाची दिशा – बाबाजी काळे appeared first on Dainik Prabhat .
Wagholi News: विकास हाच आमचा अजेंडा; रामभाऊ दाभाडे यांचा वाघोलीतून प्रचार प्रारंभ
प्रभात वृत्तसेवा वाघोली – आम्ही कोणावरही विनाकारण टीका करीत नाही. मात्र जाणीवपूर्वक, हेतूपुरस्सर टीका करणार्यांना सोडणार नाही, असा ठाम इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी दिला. पुणे महानगरपालिकेच्या लोहगाव, विमाननगर, सोमनाथनगर व वाघोली प्रभाग क्रमांक 3 मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या प्रचाराची सुरुवात लोहगाव येथील जगद्गुरु […] The post Wagholi News: विकास हाच आमचा अजेंडा; रामभाऊ दाभाडे यांचा वाघोलीतून प्रचार प्रारंभ appeared first on Dainik Prabhat .
Junnar News: जुन्नरमध्ये ढगाळ हवामानाचा पिकांना मोठा फटका; हातातोंडाशी आलेला घास हिरावणार?”
प्रभात वृत्तसेवा बेल्हे – गेल्या तीन-चार दिवसांपासून जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. ढगाळ वातावरण आणि धुक्याच्या प्रादुर्भावामुळे कांदा, गहू, हरभरा यांसह अन्य पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.सततच्या हवामान बदलाचा मोठा परिणाम पिकांच्या वाढीवर होत आहे. सकाळी आणि रात्री […] The post Junnar News: जुन्नरमध्ये ढगाळ हवामानाचा पिकांना मोठा फटका; हातातोंडाशी आलेला घास हिरावणार?” appeared first on Dainik Prabhat .

30 C