Gujrat News : रात्री डोसा खाल्ला अन् होत्याच नव्हतं झालं...हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त!
अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने रात्रीच्या जेवणात आवडीने डोसा खाल्ला, मात्र हाच आनंद काही वेळातच मृत्यूचा सापळा ठरला. जेवण झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच कुटुंबातील दोन चिमुकल्या मुलींची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार, अन्नातून झालेल्या तीव्र विषबाधेमुळे ही दुर्घटना घडली असल्याचे प्राथमिक रित्या समोर येत आहे. दोन्ही मुलींचा मृत्यू झाला असून, त्यांचे आई-वडील सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. एका हसत्याखेळत्या कुटुंबावर काळाने अचानक झडप घातल्याने संपूर्ण चांदखेडा परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आणि आरोग्य विभाग या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.नेमकं काय घडलं ?चांदखेडा येथील प्रजापती कुटुंबावर ओढवलेल्या या भीषण दुर्घटनेमागील धक्कादायक कारण आता समोर आले आहे. १ एप्रिल रोजी विमल प्रजापती यांनी आयओसी रोडवरील एका स्थानिक डेअरीतून डोशाचे तयार पीठ (Batter) विकत आणले होते. त्या रात्री सर्वांनी मिळून आनंदाने डोसे खाल्ले, मात्र खरी आपत्ती दुसऱ्या दिवशी ओढवली. आदल्या दिवशी उरलेल्या त्याच पिठाचे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा डोसे बनवून खाण्यात आले. हे शिळे किंवा दूषित झालेले पीठ खाल्ल्यानंतर काही वेळातच विमल प्रजापती, त्यांची पत्नी आणि दोन मुलींची प्रकृती वेगाने खालावली. विषबाधेची लक्षणे इतकी तीव्र होती की, दोन्ही चिमुकल्यांचा त्यात अंत झाला. एका साध्या वाटणाऱ्या खाद्यपदार्थाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.https://prahaar.in/2026/04/08/there-will-be-no-extension-for-road-cementation-works/दोन निष्पाप कळ्या कोमेजल्याडोसा खाल्ल्यानंतर काही वेळातच विमल, त्यांची पत्नी भावना आणि दोन्ही मुलींना उलट्या व मळमळीचा तीव्र त्रास सुरू झाला. प्रकृती वेगाने बिघडल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना, ४ एप्रिल रोजी अवघ्या ३ महिन्यांच्या लहान मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही तोच, दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ एप्रिलला त्यांच्या ४ वर्षांच्या थोरल्या मुलीनेही जगाचा निरोप घेतला. अवघ्या २४ तासांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सध्या दोन्ही मुलींच्या आई-वडिलांची प्रकृती अद्याप गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. एका रात्रीच्या जेवणाने काही तासांतच या कुटुंबाचे हसतेखेळते विश्व उद्ध्वस्त केले आहे.पोलीस तपास सुरु ज्या डेअरीतून डोशाचे पीठ विकत घेण्यात आले होते, तिथे पोलिसांनी तातडीने धाड टाकली आहे. पोलिसांनी संबंधित डेअरीतील पिठाचे नमुने अधिकृतपणे ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (FSL) पाठवले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला वेग दिला आहे. मृत दोन्ही मुलींच्या मृतदेहांचे शवविच्छेदन (Post-mortem) करण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अन्नातून झालेली ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली आणि पिठामध्ये काही घातक घटक होते का, याचा उलगडा प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच होणार आहे.डेअरी मालकाने फेटाळले आरोपज्या डेअरीतून डोशाचे पीठ खरेदी करण्यात आले होते, त्या डेअरीचे मालक केतन भाई यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या दाव्यामुळे या प्रकरणाचा गुंता आता अधिक वाढला असून पोलीस इतर शक्यतांचीही पडताळणी करत आहेत. केतन भाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी त्यांच्या डेअरीतून १०० किलोपेक्षा जास्त पिठाची विक्री झाली होती. आम्ही इतर ग्राहकांशी संपर्क साधला, परंतु कोणाकडूनही अन्नातून विषबाधा झाल्याची एकही तक्रार आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे हा त्रास नेमका डेअरीतून आणलेल्या पिठामुळे झाला की डोसा बनवताना घरात वापरलेल्या पाणी, तेल किंवा इतर एखाद्या पदार्थामुळे झाला, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस आता डेअरीच्या नमुन्यांसोबतच घरातील इतर खाद्यपदार्थांचीही सखोल चौकशी करत आहेत.
Healthy Breakfast: दररोज उपमा-पोहे-इडली खाताय? फायदे की तोटे…एक्सपर्टने दिला महत्त्वाचा सल्ला
Healthy Breakfast डायटिशियन यांच्या मते, उपमा, पोहे आणि इडली हे पदार्थ मुख्यतः कार्बोहायड्रेट्सने भरलेले असतात. त्यामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण तुलनेने कमी असते.
Iran-US War: अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई : बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi ) सीझन ६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले असून अनेक टास्क आणि आव्हानं पार करुन घरातील ७ सदस्य फिनालेच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. यामध्ये गेल्याच आठवड्यात सागर कारंडे (Sagar Karande) घराबाहेर पडला. त्यामुळे आता घरात ७ सदस्य उरले असूनराकेश बापट, विशाल कोटीयान, दिपाली सय्यद, तन्वी कोलते, अनुश्री माने, रेवा कौरासे, राखी सावंत यांचा समावेश आहे. त्यामुळे घरात आता फिनालेसाठी चांगलीच चुरस पाहायला मिळतेय.बिग बॉसनं 'तिकीट टू फिनाले'साठी कोण पात्र, कोण अपात्र हे ठरवण्यासाठी एक भन्नाट टास्क आखला आणि घरातल्यांनाच 'तिकीट टू फिनाले' टास्क कोण खेळणार? याचा निर्णय घ्यायला लावला. त्यानुसार, मंगळवारी घरात 'तिकीट टू फिनाले'चा धमाकेदार टास्क पार पडला. या टास्कमध्ये घरातल्या एका सदस्यानं थेट 'तिकीट टू फिनाले' पटकावलं असून 'बिग बॉस मराठी सीझन ६'च्या महाअंतिम फेरीत आपलं स्थान पक्कं केलं आहे.'बिग बॉस मराठी' आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय, खेळाचा थरार आता इतका वाढलाय की, आता टॉप ७ स्पर्धकांमध्ये करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झालीय. 'तिकीट टू फिनाले'साठी कोण पात्र, कोण अपात्र ठरवण्यासाठी बिग बॉसनी एक टास्क घेतलेला. त्या टास्कमध्ये राकेश बापट, तन्वी कोलते आणि अनुश्री माने 'तिकीट टू फिनाले'चा टास्क खेळण्यासाठी पात्र ठरल्या. त्यानंतर घरात या 'तिकीट टू फिनाले'साठीचा टास्क पार पडला. हा टास्क तसा फार सोपा नव्हता. पण, तरीसुद्धा तिनही स्पर्धकांनी हा टास्क पूर्ण केला.बुद्धीचा कस आणि कोळ्याचं जाळं अन् त्या पलिकडे 'तिकीट टू फिनाले' ग्रँड फिनालेमध्ये सर्वात आधी आपलं स्थान पक्क करण्याची संधी म्हणजे, 'तिकीट टू फिनाले'साठी स्पर्धकांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. पण, अखेर एका स्पर्धकानं अंतिम फेरीत आपलं स्थान पक्कं केलं. बिग बॉसचा टास्क अत्यंत कठीण होता. या टास्कमध्ये वेळ आणि बुद्धी यांचा अचूक मेळ स्पर्धकांना साधावा लागणार होता. या टास्कमध्ये राकेश बापट, तन्वी कोल्ते आणि अनुश्री माने यांच्यात लढत पाहायला मिळाली. स्पर्धकांसमोर 'कोळ्याचं महाकाय जाळं' उभं करण्यात आलं होतं. तर, जाळ्याच्या एका बाजूला ७ प्रश्न आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला त्या ७ प्रश्नांची उत्तरं ठेवलेली, कोळ्याचं जाळं भेदून स्पर्धकांना अचूक उत्तरं शोधून ती त्या प्रश्नांसमोर लावायची होती.
Samarjit Ghatge : भाजपमध्ये घरवापसी केल्यानंतर समरजीत घाटगेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
America Israel War: इराणमधील अचानक झालेल्या युद्धविरामाबाबत आता एक मोठा खुलासा झाला आहे.
Priya Berde : प्रिया बेर्डेंचे रंगभूमीवर कमबॅक; ‘भुल भुलैय्या’ नाटकाबाबत व्यक्त केला आनंद
Priya Berde, Bhool Bhulaiya, Sahil Desai, Parinita Pawaskar, Aarti Solanki, Amir Tadwalkar, Ashutosh Ghorpade, Vijay Suryavanshi
Zareen Khan : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; आई परवीन खान यांचं निधन
Zareen Khan : बॅालिवूड अभिनेत्री झरीन खान हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तिच्या आईचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.
मणिपूर येथे पुन्हा एकदा आंदोलन झालं आहे. सोमवारी मध्यरात्री विष्णुपूर जिल्ह्यात एका घरावर झालेल्या बॉम्बहल्ल्यात एका ५ वर्षांचा मुलाचा आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला असून त्यांची आई या हल्ल्यात जखमी झाली आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी निदर्शनं केली. तणाव वाढल्यामुळे ४ जिल्ह्यांत संचारबंदी आणि ५ जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.परिसरातील पेट्रोल पंपाजवळील २ ते ३ टँकर आणि ट्रकला आग लावण्यात आली. मोइरांग पोलिस ठाण्यासमोर टायर जाळण्यात आले. तात्पुरत्या स्वरूपात उभी केलेली पोलिस चौकी उद्ध्वस्त करण्यात आली. तसेच, संतप्त नागरिकांनी वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यासाठी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील पांगेई आणि खुराईमध्ये आणि इम्फाळ पश्चिममधील लंगथाबलमध्ये वाहनांची वाहतूक थांबवली. रस्त्यांमध्ये टायर जाळले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांना तैनात करण्यात आलं आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली.मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांनी हल्ल्याचा निषेध केला. ‘हे क्रूर कृत्य आहे. यास जबाबदार असलेल्यांची ओळख पटवून त्यांच्याविरोधात कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल,’ असं ते म्हणाले. ‘हा मानवतेवरील हल्ला असून मणिपूरमध्ये कष्टानं मिळवलेली शांतता बिघडवण्याचा थेट प्रयत्न आहे. कोणत्याही परिस्थिती हे दहशतवादी कृत्य सहन केले जाणार नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या २ मुलांच्या जखमी आईची खासगी रुग्णालयात भेट घेतली. मोइरांग ट्रोंग्लाओबी चुराचंदपूरच्या डोंगराळ भागाजवळ आहे. २०२३ आणि २०२४मध्ये मैतेई आणि कुकी-झो गटांमधील वांशिक संघर्षादरम्यान येथे सातत्याने गोळीबार झाला होता.मंगळवारी ट्रोंगलाओबीच्या जवळच्या परिसरातून एक स्फोटक उपकरणही जप्त करण्यात आले, असे आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. दरम्यान, ‘ सीआरपीएफ तळावर आंदोलकांनी प्रवेश करू नये. बॉम्बहल्ल्यात सामील असलेल्या आरोपींना पकडण्यासाठीच्या मोहिमेवर सुरक्षा दलांना लक्ष केंद्रीत करू द्यावे, अशी विनंती मी केली होती, परंतु आंदोलकांनी या आवाहनाकडे दुर्लक्ष केले आणि त्यांनी तळावर हल्ला करत नासधूस केली. परिणामी सुरक्षा दलांनी गोळीबार केला,’ असे गृहमंत्री कांथौजम म्हणाले.या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असं खेमचंद यांनी सांगितलं. राज्याचे गृहमंत्री आणि इतर आमदारांशी विस्तृत चर्चा केल्यावर हा निर्णय घेण्यात आला, असे ते म्हणाले. हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. व्यापक प्रमाणात धरपकड सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं मणिपूरमधील इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, थौबल, काकचिंग, विष्णूपूर या पाच जिल्ह्यांत ब्रॉडबँड, व्हीसॅट, व्हीपीएनसह इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश मणिपूर सरकारनं मंगळवारी प्रसृत केले.बॉम्बस्फोटात २ मुलांचा मृत्यू झाल्यानंतर उसळलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मणिपूर सरकारनं मंगळवारी इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम, विष्णूपूर आणि काकचिंग जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. '७ एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही व्यक्तीच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात येत आहे,' असं आदेशात म्हटलं आहे.
Iran-US Ceasefire: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्धविरामाची घोषणा केली. ४० दिवसांच्या युद्धानंतर दोन्ही देशांनी युद्धविरामावर सहमती दर्शवली.
Induction Stove इंडक्शन चुलीवर दिसणारे गोल वर्तुळ म्हणजे कुकिंग झोनची मर्यादा असते. या वर्तुळाखाली तांब्याची किंवा अॅल्युमिनियमची गोलाकार कॉइल बसवलेली असते. ही कॉइलच इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार करते, ज्यामुळे भांडे गरम होते. त्यामुळे भांडे नेमकं या वर्तुळाच्या मध्यभागी ठेवलं, तर उष्णता थेट भांड्यात जाते आणि ऊर्जा वाया जात नाही.
BMC News : मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डयांच्या दुरुस्ती खर्चात ७५ टक्के घट
तब्बल २०२ कोटींवरुन खर्च आता अंदाजे ४४ कोटींवरमुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या दृष्टीकोनातून सन २०२२- २३पासून हाती घेण्यात आलेल्या रस्ते सिमेंटीकरणाच्या कामांमुळे खड्डे दुरुस्तीचा खर्च तब्बल ७५ टक्क्यांनी कमी झाला आहे. सन २०२३–२४ मध्ये हा खर्च २०२ कोटी रुपये एवढा होता, तो खर्च आता सन २०२६-२७ या आर्थिक वर्षांत ४४ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे रस्ते सिमेंटीकरणाची कामे घेतल्यानंतर यावर होणारा शेकडो कोटी रुपयांचा खड्डे दुरुस्तीवर होणारा खर्च आता कमी होत असल्यामुळे महायुती सरकारच्या दूरदृष्टी धोरणामुळे आजवर कंत्राटदारांच्या खिशात जाणारा पैसा तिजोरीकडे वळता करतानाच पर्यायाने महापालिकेची होणारी बदनामीही टाळण्याचा प्रयत्न केला आहे.मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या दालनात मुंबई रस्ते कामांसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत सभागृहनेते गणेश खणकर, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह महापालिका रस्ते विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबईतील एकूण रस्त्यांचे जाळे सुमारे २,०५० किमी आहे. त्यापैकी २०२२ पूर्वीच सुमारे १,२०० किमी रस्ते सिमेंट काँक्रिट मध्ये रूपांतरित करण्यात आले होते. २०२२ नंतर आणखी ६७७ किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेण्यात आले असून त्यापैकी सुमारे ७१ टक्के म्हणजेच ४८१ किमी काम पूर्ण झाले आहे, असे आमदार अमीत साटम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबविला जात आहे. पहिला टप्पा ३०७ किमीचा असून तो ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू झाला, तर दुसरा टप्पा ३७० किमीचा असून तो ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झाला. उर्वरित कामांपैकी १०–१५ टक्के काम मे २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, तर आणखी १०टक्के काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण प्रकल्प मे २०२७ पर्यंत पूर्ण होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यावर सुमारे १,९०० किमी रस्ते पूर्णपणे काँक्रिटीकरण करण्यात आलेले असतील, असे त्यांनी नमूद केलेआर्थिक परिणामांबाबत बोलताना साटम यांनी खड्डे दुरुस्तीवरील खर्चात सातत्याने घट होत असल्याचे सांगितले. सन २०२३–२४ मध्ये हा खर्च २०२ कोटी रुपये होता. तो २०२४–२५ मध्ये १५६ कोटी रुपयांपर्यंत खाली आला. म्हणजे त्यात २३ टक्के घट झाली. २०२५–२६ मध्ये हा खर्च आणखी कमी होऊन ८९ कोटी रुपये झाला, म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत ४३ टक्के घट झाली. चालू वर्षासाठी खड्डे दुरुस्तीचा निविदा खर्च सुमारे ४४ कोटी रुपये अपेक्षित आहे, म्हणजेच आणखी ५० टक्के घट होईल, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले. म्हणजे सन २०२३ पासून आतापर्यंत खड्डे दुरुस्तीवर तब्बल १५८ पेक्षा अधिक निधीची बचत झाली आहे.भाजप नेेतृत्वाखालील महायुती सरकारकडून राबविण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प नियोजनानुसार सुरू असून मे २०२७ पर्यंत मुंबईतील मुंबईतील सीसी रस्त्यांचे काम मे २०२७ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी दिली.रस्ते कामांची आयआयटीमार्फत थर्ड पार्टी ऑडीटकामांची गुणवत्ता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आयआयटी ची थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या आयआयटी दुसऱ्या टप्प्याचे ऑडिट करत असून आता पहिल्या टप्प्याचेही ऑडिट करणार असल्याचे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.
Ashwini Bhide : रस्ते सिमेंटीकरण कामांना कोणतीही मुदतवाढ नाही
महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देशमुंबई (विशेष प्रतिनिधी)महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाचा टप्पा १ दिनांक १२ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावा. टप्पा २ हा मे २०२७ पर्यंत पूर्ण करावा. यामध्ये कोणत्याही स्वरुपाची मुदतवाढ दिली जाणार नाही. रस्ते गुणवत्तेबाबत अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे. सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची कामे ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी. पावसाळादरम्यान कोणतेही काम सुरू केले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. जेणेकरून नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागणार नाही. सिमेंट रस्ता प्रकल्पात पारदर्शकता राहावी, यासाठी महानगरपालिकेने ‘डॅश बोर्ड’ सुरू केला आहे, असे भिडे यांनी सांगितले.मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत २,११८ रस्त्यांचे (लांबी ६९१.०८ किलोमीटर) सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. यापैकी १,१७० रस्त्यांचे (लांबी ३१६.८४ किलोमीटर) संपूर्ण लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. तर ५५९ रस्त्यांचे संगमस्थान ते संगमस्थान (१७१.४० किलोमीटर) सिमेंट काँक्रिटीकरण आहे. अशाप्रकारे एकूण ६९१.०८ किलोमीटर पैकी ४८८.२४ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण म्हणजेच ७१ टक्के काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित ३८९ रस्त्यांचे (१०२.०४ किलोमीटर) सिमेंट काँक्रिटीकरण लवकरच सुरू करण्यात येणार आहे.मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई महानगरातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी व्यापक स्वरुपात नियोजन केले जात आहे. मुंबईतील नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये हाती घेतला आहे. त्यामुळे रस्ते प्रवास अधिक सुकर होणार आहे. एकिकडे महानगरपालिका रस्त्यांची कामे करत असताना, दुसरीकडे मुंबईकरांनाही आपल्या परिसरातील माहिती व्हावी यासाठी महानगरपालिकेने रस्त्यांची इत्यंभूत माहिती दर्शविणारी संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील https://roads.mcgm.gov.in/publicdashboard या लिंकवर हा माहितीपूर्ण ‘डॅश बोर्ड’ सर्वांसाठी खुला आहे. विशेष म्हणजे हा ‘डॅश बोर्ड’ प्रत्येक दिवशी अपडेट करण्यात येणार आहे. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी रस्ते कामांचा सविस्तर आढावा घेतला. रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे विहित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने करण्यात यावीत, असे निर्देश अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत त्यांनी दिले.महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या दालनात ही आढावा बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, उप आयुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, प्रमुख अभियंता (रस्ते) मंतय्या स्वामी आदींसह अभियंते उपस्थित होते. मुंबईतील सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी त्यात पारदर्शकता असणे गरजेचे आहे. त्यामुळे महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष दिले आहे.
Bigg Boss Marathi 6 : ‘या’सदस्याने पटकावले ‘बिग बॉस मराठी ६’चे ‘तिकीट टू फिनाले’
Bigg Boss Marathi 6
Iran US War Ceasefire: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्धविरामाची घोषणा केली.
Shehnaaz Gill शहनाज ‘इंडिया २०३० लीडरशिप कॉन्क्लेव २०२६’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या वेळी तिने आयव्हरी रंगाचा स्कर्ट-टॉप सेट परिधान केला होता. हा ड्रेस खास तिच्यासाठी डिझाइन करण्यात आला होता.
Sharad Pawar : शरद पवारांची बड्या नेत्याने सोडली साथ; आज भाजपमध्ये करणार पक्षप्रवेश
Sharad Pawar : समरजीत घाडगे अवघ्या काही महिन्यातच भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत.
Pune District : अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा; पिरंगुट-लवळे परिसरातील शेतकरी संकटात : पंचनामे सुरू
Pune District : कृषी अधिकारी अश्विनी चिकनकर यांनी नुकसानग्रस्त शेतांमध्ये प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला व पंचनामे केले.
Pune District : पुणे-दौंड-बारामती रेल्वे प्रवासाला गती देण्यासाठी हालचाली
Pune District : सध्या सुरू असलेल्या डिझेल बहुउद्देशीय स्थानिक गाड्या वेळेवर धावाव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. नोकरी व व्यवसायासाठी रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचावा, यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले.
Pune District : पाईटमध्ये गॅस टंचाईचा भडका; नागरिक संतप्त, कठोर कारवाईची मागणी
Pune District : काही नागरिकांनी ‘ब्लॅक’ने पैसे घेऊनही दोन ते तीन महिने सिलेंडर न दिल्याचा आरोप केला आहे. आमच्या गॅस कार्डची चौकशी केल्यास वर्षभरात किती सिलेंडर मिळाले हे स्पष्ट होईल, असे नागरिकांनी सांगितले.
Top 10 News : उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचं पक्षाकडून सांगण्यात येतंय.
Pune District : सुरकुंडीतील जलजीवन योजनेचा बोजवारा; अपूर्ण कामांमुळे ग्रामस्थ त्रस्त
Pune District : काही जीआय पाईप जमिनीत गाडले न जाता उघड्यावरच ठेवण्यात आले असून शेतकर्यांना शेतीकामात अडथळे निर्माण होत आहेत. मोठ्या प्रमाणात झालेल्या खोदकामामुळे शेतकर्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे.
Pune District : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात सुरू असलेल्या विकासकामांबाबत ग्रामपंचायती व ग्रामसभेला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Dehugaon: देहूगावातील जलशुद्धीकरण केंद्राचे आधुनिकीकरण वेगात
Dehugaon: देहूगावातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर
Allu Arjun Birthday Special अल्लू अर्जुन यांनी खूप लहान वयातच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. ते अवघे तीन वर्षांचे असताना १९८५ साली आलेल्या ‘विजेता’ या चित्रपटात दिसले होते. त्यानंतर त्यांनी ‘स्वाती मुथ्यम’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं. मात्र मुख्य अभिनेता म्हणून त्यांचा प्रवास २००३ साली ‘गंगोत्री’ या चित्रपटातून सुरू झाला.
Pune District : रेल्वे मार्गालगत असलेल्या अशा आगीच्या घटनांमुळे संपर्क यंत्रणेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. रेल्वेच्या सिग्नलिंग आणि कम्युनिकेशनसाठी असलेल्या अनेक केबल्स जमिनीखाली असतात.
Pune District : विशेषतः महाळुंगे येथून तळेगाव औद्योगिक वसाहतीकडे तसेच तळवडे येथील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडे जाणार्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
Voter List : …तर मतदार यादीतून नाव वगळणार; विशेष मतदार यादी सखोल पुनरिक्षण प्रक्रिया
Voter List : केवळ नाव असून चालणार नाही, तर वयोगटानुसार पुराव्यांची वर्गवारी करण्यात आली आहे.
Construction projects: शहरातील गृहप्रकल्पांभोवती डीपीचा फेरा
Construction projects: ३१८ गृहप्रकल्पांवर टांगती तलवार कायम - महापालिकेच्या चुकीने नागरिक बेघर होणार
Sangvi Phata : सांगवी फाटा येथे पदपथ मोकळा, भिंत नव्याने उभारली
Sangvi Phata: प्रभातमधील वृत्ताची दखल घेत प्रशासनाची तातडीने कारवाई
वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न राहता, हजारो मैल दूर असलेल्या भारताच्या 'इंडस्ट्रियल हब'ला, म्हणजेच वापीलाही आपल्या विळख्यात घेऊ लागल्या आहेत. वलसाड जिल्ह्यातील वापी ही आशियातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतींपैकी एक मानली जाते, जिथे जवळपास ३००० लघू आणि सूक्ष्म (MSME) कारखाने कार्यरत आहेत. हे कारखाने प्रामुख्याने रसायने, प्लास्टिक, कापड आणि अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित आहेत. मात्र, या युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी (Supply Chain) पूर्णपणे विस्कळीत झाली असून, त्याचा मोठा तडाखा इथल्या व्यापाराला बसला आहे. या उद्योगांसाठी लागणारा बहुतांश कच्चा माल हा पेट्रोकेमिकलवर आधारित असतो, ज्याचे दर थेट आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून असतात. युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झाल्याने कच्च्या मालाच्या किमतीत अनपेक्षित आणि भरमसाठ वाढ झाली आहे. दरवाढीसोबतच मालाची प्रचंड टंचाई निर्माण झाल्याने उत्पादकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कच्चा माल परवडणारा नसल्याने आणि भविष्यातील अनिश्चिततेमुळे वापीमधील उद्योजकांनी सावध पवित्रा घेतला आहे. अनेक कारखानदारांनी आपले उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत घटवले आहे, तर काही युनिट्स पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. उत्पादनात झालेली ही मोठी कपात केवळ उद्योजकांच्या नफ्यावरच परिणाम करत नाही, तर त्याशी निगडित हजारो कुटुंबांच्या रोजगारावरही टांगती तलवार निर्माण करत आहे.https://prahaar.in/2026/04/08/iran-us-war-ceasefire-ceasefire-between-the-us-and-iran-for-two-weeks-donald-trump-mojtaba-khamenei-america-iran-war/होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी आणि औद्योगिक क्षेत्रावरील त्याचे दूरगामी परिणामइराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा केंद्रबिंदू ठरलेल्या 'होर्मुझ सामुद्रधुनी'च्या (Strait of Hormuz) नाकेबंदीमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा सागरी मार्ग बाधित झाल्याने, कच्च्या तेलाच्या (Crude Oil) पुरवठ्यात मोठी घट झाली आहे. या टंचाईचा थेट परिणाम पेट्रोकेमिकल उत्पादनांवर झाला असून त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. याचा सर्वात मोठा फटका प्लास्टिक, टेक्सटाईल आणि इंजिनिअरिंग यांसारख्या उद्योगांना बसला आहे, कारण या क्षेत्रांसाठी लागणारा बहुतांश कच्चा माल हा खनिज तेलावर आधारित असतो. कच्चा माल महागल्यामुळे कारखान्यांचा उत्पादन खर्च (Production Cost) अनपेक्षितपणे वाढला आहे. विशेषतः गारमेंट उद्योगामध्ये साखळी स्वरूपात याचे परिणाम दिसून येत आहेत. केवळ कापड निर्मितीच नव्हे, तर प्रक्रियेच्या टप्प्यावरही दरवाढीची झळ बसत आहे. उदाहरणार्थ, कापडाच्या धुलाईचा (Washing) खर्च प्रति नग ७ ते ८ रुपयांनी वाढला आहे, तर बटणांच्या रंगाकामाचा (Button Dyeing) खर्च २ ते ३ रुपयांनी महागला आहे. वरवर पाहता ही वाढ छोटी वाटत असली, तरी मोठ्या प्रमाणावर उत्पादन करताना यामुळे लाखो रुपयांचा आर्थिक भार कारखानदारांवर पडत आहे. परिणामी, बाजारात तयार कपड्यांच्या किमती वाढण्याची दाट शक्यता असून, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशालाही कात्री लागणार आहे. ही नाकेबंदी जितकी जास्त काळ टिकेल, तितके देशांतर्गत सूक्ष्म आणि लघू उद्योगांचे आर्थिक चक्र धोक्यात येण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.कच्च्या मालाचे दर भडकलेटेक्सटाईल उद्योगासाठी लागणारे PTA आणि MEG हे महत्त्वाचे घटक सौदी अरेबिया आणि कुवेतवरून येतात. मात्र, युद्धामुळे पुरवठा साखळी तुटल्याने 'मेल्ट'चे दर ८४ रुपये प्रतिकिलोवरून ११८ रुपयांवर पोहोचले आहेत. प्लास्टिक उत्पादकांसाठी कच्च्या मालाच्या किमती ६० ते ७० टक्क्यांनी वाढल्या आहेत. वाढलेल्या खर्चामुळे कंपन्यांनी उत्पादनांच्या किमती २५ टक्क्यांनी वाढवल्या असल्या, तरी ग्राहकांकडून मागणी घटण्याची भीती व्यापाऱ्यांना सतावत आहे.कामगारांमध्ये भीती आणि गॅस टंचाईवापी औद्योगिक वसाहतीतील संकट केवळ कारखान्यांच्या नफ्या-तोट्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्याचा थेट परिणाम तिथे काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या उदरनिर्वाहावर झाला आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे व्यावसायिक एलपीजी गॅसच्या पुरवठ्यात मोठी कपात करण्यात आली आहे. या टंचाईचा साखळी परिणाम घरगुती गॅस पुरवठ्यावरही झाला असून, सर्वसामान्य कामगारांना रोजच्या जेवणासाठी गॅस मिळवणे कठीण झाले आहे. वापीमध्ये काम करणाऱ्या एकूण कामगारांपैकी ६० ते ७० टक्के मजूर हे उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिसा यांसारख्या राज्यांतून आलेले स्थलांतरित आहेत. यातील बहुतांश कामगारांकडे स्थानिक रेशन कार्ड किंवा अधिकृत 'गॅस बुक' नसल्याने त्यांना सरकारी सवलतीच्या दरात गॅस मिळत नाही. अधिकृत कागदपत्रांच्या अभावामुळे या कामगारांना स्थानिक वितरक किंवा काळ्या बाजारातून (ब्लॅक मार्केट) महागड्या दराने सिलिंडर खरेदी करावे लागतात. मात्र, सध्याच्या तुटवड्यामुळे काळ्या बाजारातील दरही कामगारांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. या आर्थिक ओझ्यासोबतच कामगारांच्या मनात सहा वर्षांपूर्वीच्या कोविड-१९ टाळेबंदीच्या (Lockdown) भीषण आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. 'जर गॅस आणि अन्नधान्य मिळाले नाही, तर आपले काय होईल?' या अनामिक भीतीपोटी मजुरांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अनेक कामगारांना वाटते की, परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच आपल्या गावी सुरक्षित पोहोचलेले बरे. या भीतीमुळे अनेक मजुरांनी आतापासूनच काम सोडून परतीच्या प्रवासाची तयारी सुरू केली आहे, ज्यामुळे उद्योजकांसमोर आता 'कामगारांच्या टंचाईचे' (Labour Shortage) एक नवे आणि मोठे संकट उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत.आर्थिक चक्र अडकलेटेक्सटाईल उद्योगात अनेक ऑर्डर्स आधीच ठराविक दराने निश्चित झाल्या होत्या. आता उत्पादन खर्च वाढल्याने जुन्या दरात माल पुरवणे उत्पादकांना परवडत नाहीये. परिणामी, अनेक ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत आणि व्यापाऱ्यांचे पैसे बाजारात अडकले आहेत (Blocked Cash Flows). जर हे युद्ध एप्रिलच्या मध्यापर्यंत खेचले गेले, तर वापीमधील अनेक युनिट्स कायमची बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या अमेरिका आणि इराणमध्ये (Iran US War Ceasefire) अखेर दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी (Ceasefire) झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या निर्णयाची घोषणा केली असून, दोन्ही देशांनी पुढील १४ दिवस कोणत्याही लष्करी कारवाया न करण्याचे मान्य केले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आज भारतीय वेळेनुसार पहाटे ५ वाजेपर्यंत इराणला कडक इशारा दिला होता. इराणने सैन्य माघारी न घेतल्यास त्यांच्या वीज प्रकल्पांवर भीषण हल्ले करून देश उद्ध्वस्त करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली होती. मात्र, हा दिलेला 'अल्टिमेटम' संपण्यापूर्वीच दोन्ही देशांच्या मुत्सद्यांमध्ये यशस्वी चर्चा झाली आणि सशर्त शस्त्रसंधीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे जागतिक बाजारातील तेलाचे संकट आणि महायुद्धाची भीती काही काळासाठी कमी झाली असून, आता सर्व लक्ष पुढील दोन आठवड्यांत होणाऱ्या राजनैतिक हालचालींकडे लागले आहे.अमेरिका-इराण संघर्षात चीन आणि पाकिस्तानची एन्ट्रीWith the greatest humility, I am pleased to announce that the Islamic Republic of Iran and the United States of America, along with their allies, have agreed to an immediate ceasefire everywhere including Lebanon and elsewhere, EFFECTIVE IMMEDIATELY.I warmly welcome the…— Shehbaz Sharif (@CMShehbaz) April 7, 2026अमेरिका आणि इराणमधील विनाशकारी युद्ध थांबवण्यासाठी आशियाई सत्तांनी घेतलेला पुढाकार यशस्वी ठरताना दिसत आहे. या दोन्ही देशांमधील संघर्ष तूर्त शांत करण्यामागे चीन आणि पाकिस्तानची मध्यस्थी महत्त्वपूर्ण ठरल्याचे बोलले जात आहे. इराणने पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेकडे एक सविस्तर 'शांती प्रस्ताव' पाठवला असून, अमेरिकन प्रशासनाने हा मसुदा वाटाघाटीसाठी सकारात्मक आधार म्हणून स्वीकारला आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये दोन आठवड्यांची शस्त्रसंधी (Ceasefire) लागू झाली असून, प्रत्यक्ष चर्चेची फेरी १० एप्रिल रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे पार पडणार आहे. या बैठकीत इराण आणि अमेरिकेचे उच्चपदस्थ प्रतिनिधी आमनेसामने बसून प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. पाकिस्तानमार्फत पाठवण्यात आलेल्या या प्रस्तावामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जगावर ओढवलेले युद्धाचे सावट आता काहीसे दूर झाले आहे.https://prahaar.in/2026/04/08/at-vapis-chemical-units-order-books-hit-cash-flows-blocked/इराणने कोणत्या 10 अटी घातल्या? १. अहिंसेची शपथ: दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध बळाचा वापर न करता अहिंसेचे पालन करण्याचे मान्य करावे.२. होर्मुजवर इराणची सत्ता: जागतिक तेल व्यापारासाठी महत्त्वाच्या असलेल्या होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचेच नियंत्रण कायम राहील.३. युरेनियम संवर्धन: इराणला स्वतःच्या अणूप्रकल्पांसाठी युरेनियम संवर्धन सुरू ठेवण्याची अधिकृत परवानगी मिळावी.४. प्राथमिक निर्बंधांचा अंत: अमेरिकेने इराणवर थेट लादलेले सर्व प्राथमिक आर्थिक निर्बंध तात्काळ हटवावेत.५. दुय्यम निर्बंधांची समाप्ती: इराणशी व्यापार करणाऱ्या इतर देशांवर अमेरिकेने लावलेले सर्व दुय्यम निर्बंध रद्द करावेत.६. UN ठरावांना स्थगिती: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने इराणविरुद्ध पास केलेले सर्व जुने ठराव अंमलात आणणे थांबवावे.७. गव्हर्नर्स बोर्डाचे ठराव रद्द: आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (IAEA) गव्हर्र्नर्स बोर्डाने इराणवर घेतलेल्या सर्व निर्णयांना स्थगिती द्यावी.८. आर्थिक नुकसानभरपाई: निर्बंध आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेचे जे नुकसान झाले, त्याची भरपाई अमेरिकेने द्यावी.९. अमेरिकन सैन्याची माघार: मध्य-पूर्वेतील (Middle East) देशांमधून अमेरिकेने आपले सर्व सैन्य तुकड्या आणि तळ कायमचे काढून घ्यावेत.१०. हिझबुल्लाह युद्धविराम: लेबनॉनमधील हिझबुल्लाह विरुद्ध सुरू असलेल्या संघर्षासह मध्य-पूर्वेतील इतर सर्व युद्ध आघाड्यांवर पूर्णपणे युद्धविराम व्हावा.पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ काय म्हणाले?पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोशल मीडियाद्वारे जाहीर केले की, दोन्ही देश आणि त्यांचे मित्रराष्ट्र लेबनॉनसह सर्वच आघाड्यांवर तातडीने युद्धविराम (Ceasefire) करण्यास तयार झाले आहेत. हा निर्णय आजपासूनच अंमलात येणार असून यामुळे मोठा रक्तपात थांबला आहे. पंतप्रधान शरीफ यांनी दोन्ही देशांच्या नेतृत्वाने दाखवलेल्या समंजसपणाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. केवळ युद्ध थांबवणे हेच उद्दिष्ट नसून, सर्व वाद कायमस्वरूपी मिटवण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला आहे. यासाठी शाहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि इराणच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळांना शुक्रवार, १० एप्रिल २०२६ रोजी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या विशेष बैठकीचे निमंत्रण दिले आहे. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये एका निश्चित आणि दीर्घकालीन शांतता करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?जगावर घोंगावणारे महायुद्धाचे संकट काही काळासाठी टळले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील सर्व संभाव्य बॉम्बहल्ले आणि लष्करी कारवाया दोन आठवड्यांसाठी स्थगित केल्याचे जाहीर केले आहे. ट्रम्प यांनी ही घोषणा करताना अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले की, हा एक 'द्विपक्षीय युद्धविराम' (Bilateral Ceasefire) असून दोन्ही देशांनी शांततेसाठी पाऊल उचलले आहे. आपल्या निर्णयाचा उलगडा करताना ट्रम्प यांनी सांगितले की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी त्यांची सविस्तर चर्चा झाली. त्यांच्या विनंतीचा मान राखून आज रात्री इराणच्या दिशेने झेपावणारी विनाशकारी लष्करी शक्ती त्यांनी थांबवली आहे. मात्र, यासाठी ट्रम्प यांनी 'होर्मुझची सामुद्रधुनी' तात्काळ आणि सुरक्षितपणे व्यापारी वाहतुकीसाठी खुली करण्याची कडक अट इराणसमोर ठेवली आहे. ट्रम्प यांच्या मते, अमेरिकेने आपली सर्व लष्करी उद्दिष्टे आधीच यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. आता केवळ युद्ध नको, तर दीर्घकालीन शांतता हवी आहे. त्यांना इराणकडून एक '१०-कलमी प्रस्ताव' प्राप्त झाला असून, हा प्रस्ताव पुढील वाटाघाटींसाठी एक भक्कम आधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि इराणमधील बहुतेक जुन्या विवादांवर एकमत झाले असून, राहिलेल्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी आणि कराराला अंतिम रूप देण्यासाठी हे दोन आठवडे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मध्य-पूर्वेतील राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करत असताना या दशकांनुुवर्षे चाललेल्या संघर्षावर तोडगा काढण्याची संधी मिळणे, हा माझा सन्मान आहे, अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपली भावना व्यक्त केली. या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेतील तणाव कमी झाला असून, आता संपूर्ण जगाचे लक्ष १० एप्रिलला होणाऱ्या इस्लामाबादमधील बैठकीकडे लागले आहे.
Protein supplements : ‘प्रोटीन सप्लिमेंट’ची क्रेझ वाढली; तरुणांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह
Protein supplements : जिम संस्कृतीसोबत पावडरचा वाढता वापर; तज्ज्ञांचा इशारा - सल्ल्याशिवाय सेवन धोकादायक
Pimpri News : ‘बीएच’ वाहनधारकांना इशारा; कर न भरल्यास रोज १०० रुपये दंड
Pimpri News : परिवहन विभागाची कडक कारवाई सुरू; शहरात १९ हजारांहून अधिक ‘बीएच’ वाहने
हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या २ वर्षे ११ महिने वयाच्या चिमुरड्याने असा काही पराक्रम केला आहे की, अवघ्या जगाचे डोळे विस्फारले आहेत. कोंडा श्रेयांश मुरली कृष्णा पटेल असे या बालकाचे नाव असून, त्याने बुद्धीबळाच्या खेळात चक्क दोन विश्वविक्रम (World Records) आपल्या नावावर केले आहेत.विक्रमी कामगिरीचा थरार'रे चेस अकॅडमी'तर्फे (Ray Chess Academy) आयोजित एका विशेष कार्यक्रमात श्रेयांशने आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली. त्याने केवळ १५ मिनिटे ५२ सेकंदात ९३ 'बॅक-रँक चेकमेट्स' सोडवले. इतक्या कमी वेळात अचूक चाली रचणे ही एक दुर्मिळ कामगिरी मानली जात आहे. एवढ्यावरच न थांबता, श्रेयांशने अवघ्या १ तास ९ मिनिटे ९ सेकंदात तब्बल २१ चेस बोर्ड व्यवस्थित मांडून दुसरा विश्वविक्रम प्रस्थापित केला.https://prahaar.in/2026/04/08/gautam-birhade-appointed-as-director-at-mmrcl/आजीच्या डोळ्यांत आनंदाश्रूज्युबली हिल्स येथील आमदारांच्या कॉलनीतील सांस्कृतिक केंद्रात हा सोहळा पार पडला. यावेळी तेलंगणाचे उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्क, मंत्री कोंडा सुरेखा आणि वाकीती श्रीहरी यांसारखे दिग्गज उपस्थित होते. श्रेयांश हा मंत्री कोंडा सुरेखा यांचा नातू आहे. आपल्या नातवाचा हा ऐतिहासिक क्षण पाहून कोंडा सुरेखा यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. एका चिमुरड्याने इतक्या लहान वयात देशाचे नाव जागतिक स्तरावर नेल्याचे पाहून त्या भावूक झाल्या होत्या.ब्रिटिश पार्लमेंटमध्ये होणार सन्मानश्रेयांशची आई, कोंडा सुस्मिता पटेल यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, श्रेयांशला लहानपणापासूनच बुद्धीबळाची आवड आहे आणि परिवार त्याच्या या आवडीला पूर्ण पाठिंबा देईल. श्रेयांशला या कार्यक्रमात चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, आगामी काळात ब्रिटिश पार्लमेंटमध्ये (लंडन) 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स' तर्फे त्याला अधिकृत प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
RR vs MI : राजस्थानचा 'रॉयल'धमाका! मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप!
गुवाहाटी : आयपीएलच्या १९ व्या मोसमात राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) आपला दबदबा कायम राखला आहे. मंगळवारी झालेल्या अटीतटीच्या लढतीत राजस्थानने बलाढ्य मुंबई इंडियन्सला २७ धावांनी धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने मुंबईसमोर १५१ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. मात्र, मुंबईची फलंदाजी या आव्हानासमोर पूर्णपणे कोलमडली. रियान परागच्या चाणाक्ष नेतृत्वाखाली राजस्थानच्या गोलंदाजांनी मुंबईला अवघ्या १२३ धावांत रोखले. मुंबईचे ९ फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने त्यांचा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव झाला आहे. राजस्थानने या विजयासह विजयाची हॅट्रिक साजरी केली असून, मुंबईला आता पुनरागमनासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे.https://prahaar.in/2026/04/08/maharashtra-delivery-boy-police-verification-rule/राजस्थानचे मुंबईसमोर १५१ धावांचे लक्ष्यगुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर पावसाने बराच काळ खेळ रोखून धरला खरा, पण जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात झाली, तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. पावसाच्या व्यत्ययामुळे तब्बल १६० मिनिटांचा वेळ वाया गेल्याने हा सामना प्रत्येकी ११ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री १० वाजून १० मिनिटांनी सुरु झालेल्या या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सलामीवीर यशस्वी जैस्वालने मैदानाच्या चहूकडे फटकेबाजी करत मुंबईच्या गोलंदाजांना निष्प्रभ केले. त्याने नाबाद ७७ धावांची स्फोटक खेळी साकारली. त्याला तरुण फलंदाज वैभव सूर्यवंशीची उत्तम साथ मिळाली. वैभवने आक्रमक ३९ धावांचे योगदान देत राजस्थानला भक्कम स्थितीत नेऊन ठेवले. कर्णधार रियान परागने आपल्या घरच्या मैदानावर फटकेबाजीचा सराव सुरू ठेवत २० धावा जोडल्या. ध्रुव जुरेल अवघ्या २ धावांवर बाद झाल्याने काही काळ मुंबईला संधी मिळाली असे वाटले, पण जैस्वाल आणि शिमरॉन हेटमायरने (नाबाद ६) अधिक नुकसान होऊ न देता राजस्थानची धावसंख्या ११ षटकांत ३ बाद १५० पर्यंत पोहोचवली. मुंबई इंडियन्ससाठी अल्लाह गजनफरने २ गडी बाद करत थोडा प्रतिकार केला, तर अनुभवी शार्दूल ठाकूरने वैभव सूर्यवंशीची महत्त्वाची विकेट मिळवली. मात्र, पावसामुळे ओल्या झालेल्या चेंडूवर नियंत्रण मिळवणे मुंबईच्या गोलंदाजांना कठीण गेले. आता मुंबईसमोर विजयासाठी ११ षटकांत १३.७२ च्या सरासरीने १५१ धावांचे डोंगराएवढे आव्हान आहे.मुंबईची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली१५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या दिग्गज फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. सलामीवीर रोहित शर्मा (५), सूर्यकुमार यादव (६) आणि रायन रिकेल्टन (८) हे स्वस्तात माघारी परतले, तर कर्णधार हार्दिक पंड्यालाही केवळ ९ धावाच करता आल्या. मुंबईच्या टॉप ऑर्डरमधील एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही, ज्यामुळे मुंबईचा डाव सुरुवातीलाच गडगडला. मध्यफळीत नमन धीर आणि शेरफेन रुदरफोर्ड यांनी प्रत्येकी २५ धावांची खेळी करून थोडा प्रतिकार केला, मात्र इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने मुंबईला ११ षटकांत ९ विकेट्स गमावून केवळ १२३ धावांपर्यंतच मजल मारता आली. राजस्थानसाठी रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी २ बळी घेत मुंबईचे कंबरडे मोडले, तर जोफ्रा आर्चर आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी १ विकेट घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.पंजाबला पछाडत राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत अग्रस्थानी!आयपीएल २०२६ च्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचा अश्वमेध सुरूच असून, मुंबईविरुद्धच्या विजयाने त्यांना थेट गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचवले आहे. सलग तिसऱ्या विजयाची नोंद करत राजस्थानने पंजाब किंग्सला खालच्या क्रमांकावर ढकलून पहिले स्थान पटकावले. केवळ गुणच नव्हे, तर नेट रनरेटच्या बाबतीतही राजस्थानने मोठी आघाडी घेतली असून, सध्या त्यांचा रनरेट +2.403 इतका जबरदस्त झाला आहे. या कामगिरीमुळे राजस्थान रॉयल्स स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघ म्हणून समोर येत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणावॉशिंग्टन : गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराणमध्ये धुमसणारा संघर्ष अखेर शांत झाला असून दोन्ही देशांनी दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी (Ceasefire) करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर आणि जागतिक दबावानंतर हा महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळाला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आज भारतीय वेळेनुसार पहाटे ५ वाजेपर्यंत इराणला अल्टिमेटम दिला होता. जर इराणने लष्करी कारवाया थांबवल्या नाहीत, तर त्यांच्या वीज प्रकल्पांवर (Power Plants) भीषण हल्ले करून देशाला उद्ध्वस्त करू, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. मात्र, ही मुदत संपण्यापूर्वीच दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि लष्करी कारवाया दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या 'सशर्त' शस्त्रसंधीमुळे आखाती देशांमधील युद्धाचे सावट काहीसे कमी झाले असून, पुढील १४ दिवस दोन्ही देश राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. ट्रम्प यांनी स्वतः या शस्त्रसंधीची घोषणा केली असून, इराणने देखील आपल्या सैन्य हालचाली थांबवण्याचे मान्य केले आहे.गेल्या काही तासांपासून युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या अमेरिका आणि इराणमध्ये अखेर दोन आठवड्यांचा युद्धविराम (Ceasefire) जाहीर झाला आहे. इराणने दिलेला १० अटींचा प्रस्ताव मान्य करण्यासारखा असल्याचे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीवर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, इराणवर भीषण हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर काही वेळातच ट्रम्प यांनी ही नरमाईची भूमिका घेतल्याने जागतिक स्तरावर आश्चर्य व्यक्त होत आहे. या करारात अमेरिकेने इराणसमोर 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) पूर्णपणे खुली करण्याची महत्त्वाची अट ठेवली होती. जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत संवेदनशील असलेल्या या मार्गाबाबत इराणने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, हा मार्ग तातडीने खुला करण्यास संमती दिली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की, जर अमेरिकेने हल्ले थांबवले तर इराणही युद्ध मागे घेण्यास तयार आहे. या मोठ्या तणावात पाकिस्तानने महत्त्वाची मध्यस्थी केल्याचे समोर आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पाकिस्तानच्या भूमिकेचा उल्लेख केला. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देखील पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल मुनीर यांचे आभार मानले आहेत. या मध्यस्थीमुळेच दोन्ही देश चर्चेच्या टेबलावर येणे शक्य झाले. पुढील दोन आठवडे दोन्ही देशांचे सैन्य कोणत्याही आक्रमक कारवाया करणार नाहीत. या काळात राजनैतिक चर्चा करून हा वाद कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.https://prahaar.in/2026/04/08/ipl-2026-rr-vs-mi-rajasthan-royals-won-3rd-consecutive-match-beat-mumbai-indians-by-27-runs-at-guwahati/काय काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प ?इराणसोबतच्या युद्धाच्या उंबरठ्यावर असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा करत जगाला दिलासा दिला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्ट केले की, ते इराणवरील संभाव्य बॉम्बहल्ले आणि लष्करी कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबवण्यास सहमत झाले आहेत. हा एक द्विपक्षीय युद्धविराम असून, यामुळे मध्य-पूर्वेतील तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या निर्णयामागील कारण सांगताना ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ दिला. पाकिस्तानच्या नेत्यांच्या विनंतीनुसार मी आज रात्री इराणकडे झेपावणारी विनाशकारी लष्करी शक्ती थांबवत आहे, असे ट्रम्प यांनी नमूद केले. मात्र, यासाठी त्यांनी 'होर्मुझची सामुद्रधुनी' तातडीने, पूर्णपणे आणि सुरक्षितपणे उघडण्याची कडक अट इराणसमोर ठेवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, अमेरिकेने आपली सर्व लष्करी उद्दिष्टे आधीच साध्य केली आहेत. आता दीर्घकालीन शांततेसाठी दोन्ही देश एका ठोस कराराच्या उंबरठ्यावर आहेत. इराणकडून मला १० कलमी प्रस्ताव मिळाला असून, तो चर्चेसाठी एक योग्य आधार आहे. अमेरिका आणि इराणमधील जुन्या विवादांवर जवळजवळ सहमती झाली आहे, परंतु कराराला अंतिम रूप देण्यासाठी आम्हाला या दोन आठवड्यांच्या कालावधीची आवश्यकता आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प सज्जमध्य-पूर्वेतील राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करत असताना या जुन्या आणि जटिल समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे हा माझा मोठा सन्मान आहे, अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपली भावना व्यक्त केली. जागतिक तणाव कमी करण्यासाठी त्यांनी दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर केला असून, या कालावधीत दोन्ही देशांमधील वादावर राजनैतिक चर्चा केली जाणार आहे. या निर्णयामुळे केवळ अमेरिका आणि इराणमधील संघर्षच थांबणार नाही, तर संपूर्ण मध्य-पूर्वेत शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना मोठी गती मिळणार आहे.इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी काय म्हणाले?अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम लागू झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी आपली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. या शस्त्रसंधीला त्यांनी इराणचा मोठा 'नैतिक आणि लष्करी विजय' म्हणून संबोधित केले आहे. अमेरिकेला इराणच्या १० अटी मान्य करण्यास भाग पाडणे, हा इराणच्या कणखर भूमिकेचा विजय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोजतबा खामेनी यांनीच इराणच्या सर्वोच्च सुरक्षा परिषदेने तयार केलेल्या शस्त्रसंधी प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता पुढील दोन आठवडे दोन्ही देशांमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे, या अंतिम करारासाठी होणारी महत्त्वाची चर्चा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे पार पडणार असल्याचेही खामेनी यांनी नमूद केले. इराणच्या मते, हा युद्धविराम केवळ तात्पुरता नसून, अमेरिकेला त्यांच्या विनाशकारी धोरणांपासून मागे हटवण्यास लावलेला हा एक यशस्वी प्रयत्न आहे. आम्ही आमच्या अटींवर शांततेसाठी तयार आहोत, असा स्पष्ट संदेश मोजतबा खामेनी यांनी या निमित्ताने जागतिक समुदायाला दिला आहे.
केरळमध्ये 9 एप्रिल रोजी 140 जागांसाठी मतदान आहे. येथे LDF आणि UDF यांच्यात अटीतटीची लढत आहे. UDF ला 70 ते 80 आणि LDF ला 60 ते 70 जागा मिळू शकतात. भाजपला 3 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मतदानापूर्वी दैनिक भास्करने लोक, तज्ज्ञ आणि राजकीय पक्षांशी बोलून जनमताचा कौल जाणून घेतला. या 4 गोष्टी समजल्या…1. पिनराई विजयन 10 वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या विरोधात सत्ताविरोधी लाट आहे. 2. CPM मध्ये मुख्यमंत्री विजयन यांच्यानंतर दुसऱ्या फळीतील नेतृत्वाची कमतरता आहे. अनेक नेते भाजप-काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. कार्यकर्ते नाराज आहेत. पक्षाच्या नेत्यांचे मत आहे की, जर माजी मंत्री केके शैलजा यांना सूत्रे मिळाली असती, तर सत्तेत परत येणे शक्य झाले असते.3. काँग्रेस मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून सुरू असलेल्या ओढाताणीत अडकली आहे. पक्ष राहुल गांधींच्या नावावर निवडणूक लढवत आहे आणि ख्रिश्चन-मुस्लिम मतांवर अवलंबून आहे. शबरीमाला मुद्द्यावरूनही सरकारला घेरून हिंदू मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. 4. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय मिळवूनही भाजप केवळ 20 ते 25 जागांवरच लढत देत आहे. मतदानाचा वाटा वाढला तरी, जागांची संख्या एकेरी अंकातच राहण्याची शक्यता असल्याने त्याहून अधिकची अपेक्षा नाही. तिरुवनंतपुरम, पलक्कड, कासरगोड आणि त्रिशूरमध्ये पक्ष जिंकू शकतो. लोक म्हणाले- मुख्यमंत्र्यांवर खूश नाहीत, त्यांनी फक्त केंद्र सरकारच्या योजनांची नावे बदललीकोचीमध्ये एका चर्चबाहेर भेटलेले जेकब म्हणतात, ‘लोक विजयन सरकारवर खूश नाहीत, पण काँग्रेसला याचा फारसा फायदा घेता आला नाही. ते आपापसात भांडत राहिले.’ एर्नाकुलमचे श्रीजेत म्हणतात, ‘विजयन यांनी फक्त मोदींच्या योजनांची नावे बदलली आहेत आणि दुसरे काहीही केले नाही. येथील महामार्गही केंद्र सरकारनेच बांधले आहेत.‘ 46 लाख कुडुंबश्री LDF ची सर्वात मोठी ताकद50 वर्षांच्या सुनिता तिरुवनंतपुरममध्ये कॅन्टीन चालवतात. त्या सरकारच्या कुडुंबश्री योजनेशी जोडलेल्या आहेत. या योजनेत राज्यातील 46 लाख महिला सहभागी आहेत आणि त्या विजयन सरकारच्या सर्वात मोठ्या ताकद आहेत. सुनिता म्हणतात, ‘यावेळी भाजप चांगली लढत देत आहे. तिरुवनंतपुरममध्ये तीन जागांवर मजबूत आहे. तरीही, कुडुंबश्रीच्या महिला LDF लाच मतदान करतील.‘ तिरुवनंतपुरमचे ज्येष्ठ पत्रकार अजय कुमार सांगतात की, कुडुंबश्रीच्या सुरुवातीनंतर बहुतेक वेळा LDF चे सरकार राहिले आहे. त्यांनी वेळोवेळी निधीही वाढवला आहे. अशा परिस्थितीत कुडुंबश्रीचा मोठा वर्ग LDF आणि विजयन सरकारलाच मतदान करेल. हे त्यांच्यासाठी फायद्याचे अभियान आहे. तज्ज्ञ म्हणाले- भाजपचा मतांचा वाटा वाढला, यामुळे सीपीएमला नुकसान ज्येष्ठ पत्रकार बृजेश कुमार म्हणतात, ‘केरळमध्ये कोणाला किती जागा मिळतील, हे आता सांगणे कठीण आहे. येथे मतदार शेवटच्या क्षणी निर्णय घेतात. यूडीएफ आणि एलडीएफ यांच्यात चुरशीची लढत आहे. एलडीएफ तिसऱ्यांदा सत्तेत परत येऊ शकते. वायनाडच्या ज्येष्ठ पत्रकार नीनू मोहन यांचे म्हणणे आहे, ‘केरळमधील राजकारण खूप वेगळे आहे. शेवटच्या २४ तासांत चित्र बदलते. २०२१ मध्ये असेच घडले होते. तेव्हाही यूडीएफचे सरकार बनत होते, यावेळीही परिस्थिती काहीशी तशीच आहे.’ तिरुवनंतपुरममधील केरळ विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. जय प्रसाद म्हणतात, ‘भाजपसाठी ही निवडणूक एक चाचणी असेल. प्रत्येक जागेवर 25 ते 35% मुस्लिम मते त्यांच्यासाठी आव्हान आहेत. यावेळी भाजपला 22 ते 25% मतांचा वाटा मिळण्याची अपेक्षा आहे. सीपीएमचे 90 ते 95% कार्यकर्ते हिंदू आहेत. त्यांना वाटते की आरएसएस आणि भाजप त्यांची मते हिसकावून घेत आहेत. ख्रिश्चन समुदाय सुमारे 18 ते 20% आहे. यामध्ये भाजपचा पाठिंबा वाढला आहे.’ ज्येष्ठ पत्रकार कैलाश सांगतात, ‘भाजपचा मतांचा वाटा नैसर्गिकरित्या वाढत आहे. सध्या तो 20% आहे. पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी किमान आणखी 10 वर्षे लागतील, पण ख्रिश्चन मतांशिवाय हे शक्य नाही.’ UDF ला सत्ताविरोधी लाटेचा फायदा, पण बहुमत नाही सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी रिसर्चचे संचालक डॉ. धनुराज सांगतात, ‘अनेक सर्वेक्षणांनुसार, यावेळी अल्पसंख्याक एकत्र येऊन UDF ला मतदान करणार आहेत. मागील निवडणुकीत हे मत LDF ला मिळाले होते. UDF पहिल्यांदाच सलग 10 वर्षे विरोधी पक्षात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली त्यांना विजय मिळाला. ज्या 5 ते 7 जिल्ह्यांमध्ये मोठा विजय मिळाला, तिथे अल्पसंख्याक मते जास्त आहेत. 7 जिल्हे हिंदू बहुल आहेत, तिथे LDF आणि BJP जिंकली. जातीय राजकारणामुळे UDF ला बहुमत मिळवणे सोपे नाही.‘ भाजप म्हणाली- LDF-UDF लोकांना मूर्ख बनवत आहेतभाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर म्हणतात, ‘राज्यात LDF आणि UDF दोन्ही एकत्र आहेत. 27 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये दोन्ही एकत्र राजकारण करतात. येथे लोकांना भडकवण्याचे आणि मूर्ख बनवण्याचे नाटक करतात, त्यामुळे येथे भाजपच पर्याय आहे.‘ CPM म्हणाली- विजयन पुन्हा मुख्यमंत्री बनतीलCPM चे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते सेबिस्टियन पॉल म्हणतात, ‘पिनराई विजयन तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. कामगिरी हेच एक कारण आहे. दुसऱ्या फळीतील नेतृत्वात माजी आरोग्य मंत्री केके शैलजा मोठे नाव आहेत. UDF चा दावा- 100 पेक्षा जास्त जागा जिंकणार केरळमधील विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन यांच्या मते, विजयन सरकारमधील 12 हून अधिक मंत्री पराभूत होणार आहेत. ते दावा करतात की UDF ला 100 पेक्षा जास्त जागा मिळतील.
कामगार मंत्र्यांचे गृह विभागाला सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देशमुंबई : ऑनलाईन प्लॅटफॉर्म, गिग आणि डिलिव्हरी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांमुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर, झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट यांसारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी पार्टनर्सची कसून पोलीस पडताळणी करणे आता अनिवार्य होणार आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि निर्दोष सेवा मिळावी, यासाठी कामगार आणि गृह विभागाने संयुक्तपणे सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, असे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी मंगळवारी दिले.https://prahaar.in/2026/04/08/gautam-birhade-appointed-as-director-at-mmrcl/मंत्रालयात आयोजित कामगार आणि गृह विभागाच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सुमित वानखेडे, दादाराव केचे, माजी खासदार किरीट सोमय्या आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. सध्या बहुतांश कंपन्या 'फेसलेस' पद्धतीने कामगारांची नोंदणी करतात आणि त्यांच्या माहितीची पडताळणी करण्यासाठी खासगी (थर्ड पार्टी) संस्थांची मदत घेतात. मात्र, या संस्थांना पडताळणीचे अधिकार कोणी दिले आणि त्यांच्या प्रक्रियेचा कायदेशीर आधार काय, असा कळीचा मुद्दा मंत्री फुंडकर यांनी उपस्थित केला. गिग वर्कर्सची नोंदणी करणाऱ्या कंपन्यांनीच त्यांच्या पार्श्वभूमी तपासाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.क्यू-आर कोड सक्तीचाऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्या थेट कर्मचारी भरती न करता तृतीय पक्ष संस्थांमार्फत कामगार नेमतात. यामुळे मालक-कामगार संबंधांमध्ये कायदेशीर अस्पष्टता राहते. ही त्रुटी दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार, सर्व गिग कामगारांची सायबर विभागाकडे नोंदणी अनिवार्य करणे. प्रत्येक डिलिव्हरी पार्टनरकडे क्यू-आर कोड असलेले ओळखपत्र असणे आणि ग्राहकाने मागणी केल्यास ते दाखवणे सक्तीचे असेल. डिलिव्हरीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचे व्यावसायिक रजिस्ट्रेशन आणि चालकाचा वैध परवाना याची नियमित तपासणी होईल, याबाबत चर्चा झाली.'महिला चालक' निवडण्याचा पर्याय उपलब्ध होणारमहिला प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून ओला, उबर सारख्या अॅप्समध्ये महिला प्रवाशांना 'महिला चालक' निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. तसेच, प्रत्येक कंपनीला त्यांच्या कामगारांचे नियमित ऑडिट करून संशयास्पद बाबी आढळल्यास त्याचा तिमाही अहवाल पोलिसांना सादर करावा लागणार आहे. राज्यातील वाढत्या डिजिटल वितरण व्यवस्थेत नागरिकांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे. गृह विभागाच्या समन्वयातून यासाठी लवकरच स्वतंत्र आणि स्पष्ट धोरणात्मक चौकट तयार केली जाईल, अशी माहिती कामगारमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली.
पश्चिम आशियातील युद्धाचे सावट दूर होण्याऐवजी परिस्थिती दिवसेंदिवस (Editorial) आणखीनच बिकट होत चालली असल्याची लक्षणे दिसत आहेत.
लक्षवेधी : मेलोनी विरोधात जनमत
इटलीत पुढच्या वर्षी संसदेच्या निवडणुका आहेत. त्याअगोदर नुकतेच इटलीत जनमत घेण्यात आले. त्यात पंतप्रधान मेलोनी (Giorgia Meloni) यांच्या कारभारावर जनता फारशी खूश नाही असे दिसते.
आज महाराष्ट्र अशोक खरात (Ashok Kharat) या स्वयंघोषित भोंदूबाबाच्या घोटाळ्यांमुळे हादरलेला आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करणार्या या व्यक्तीची फसवणुकीची कुरूप आणि दुष्ट कहाणी आता उघड झाली आहे.
दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६
पंचांगआज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र शके १९४८. बुधवार दिनांक ०८ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२७ मुंबईचा चंद्रोदय ०९.००, मुंबईचा सूर्यास्त ०६.५४ मुंबईचा चंद्रास्त ०७.४३. राहू काळ ०९.३३ ते ११.०७ . १९ पर्यन्त चांगलादैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
Baramati Byelection 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसला आपला उमेदवार आकाश मोरे यांचा अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
Shirpur Merchants Co-operative Bank: डीआयसीजीसीने संबंधित ठेवीदारांच्या संमतीनुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत एकूण विमा संरक्षित ठेवींपैकी 48.95 कोटी रुपयांचे वितरण आधीच केले आहे.
Uday Kotak: जागतिक संघर्षातून वसाहतवादाच्या पुनरागमनाची शक्यता; उदय कोटक यांचा इशारा
Uday Kotak: फिक्की या उद्योजकाच्या संघटनेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना कोटक यांनी सध्याच्या युद्ध परिस्थितीचे आणि त्या अनुषंगाने विविध घटना क्रमाचे विश्लेषण केले.
IDBI Bank: बरीच प्रक्रिया करून आयडीबीआय बँकेची भांडवल विक्री करण्याचा प्रयत्न सरकारने केला होता. मात्र ऐनवेळी सरकारच्या राखीव किमतीपेक्षा जास्त बोली कोणाकडूनही आल्या नाहीत.
Pune Crime News : पुण्यातील वारजे भागात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या संजोग माने याने धुमाकूळ घातला.
Cosmos Bank: कॉसमॉस बँकेची दमदार कामगिरी; व्यवसाय 44 हजार कोटींवर, शाखा विस्ताराला वेग
Cosmos Bank: बँकेच्या व्यवसायामध्ये रु. 5,366 कोटींनी वाढ होऊन एकूण व्यवसाय रु. 44 हजार कोटींहून अधिक झाला.
घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी
मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याकडून पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे, १० एप्रिल २०२६ पासून या दोन्ही कप्प्यांमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दुरुस्ती दरम्यानच्या काळात पाणीपुरवठ्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात वेळा निश्चित करण्यात आल्या होत्या. तरीही, दुरुस्तीपूर्वी असलेल्या वेळाप्रमाणेच १० एप्रिलपासून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पुढील ५ दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे. तसेच, काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.पाणीपुरवठा क्षेत्र नारायणनगर आणि झोन क्रमांक एनएक्स ०३ शी संबंधित चिरागनगर, आझाद नगर, गणेश मैदान, पारशीवाडी, न्यू माणिकलाल इस्टेट मार्ग, एनएसएस मार्ग, महिंद्रा पार्क, डी. एस. मार्ग, खालाई गाव, किरोळ गाव, विद्याविहार (पश्चिम), हंसोटी गल्ली, खोत गल्ली, महात्मा गांधी मार्ग, नवरोजी गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद मार्ग, जे. व्ही. मार्ग, ध्रुवराजसिंह गल्ली, गोपाळ गल्ली, जीवदया गल्ली, गीगावाडी या परिसरामध्ये दुरुस्तीदरम्यान पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० वाजता आणि रात्री १०.४५ ते ११.३० वाजता होती. दुरुस्तीनंतर या परिसरात सुधारित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी ३.१५ ते सायंकाळी ७.१५ वाजेदरम्यान राहील.पाणीपुरवठा क्षेत्र पंतनगर आऊटलेट आणि झोन क्रमांक एनएक्स ०६ शी संबंधित भीमनगर, पवार चाळ, लोअर भीमनगर, क्राईम ब्रांच परिसर, वैतागवाडी, नित्यानंद नगर, सी. जी. एस. वसाहत, गंगावाडी, ध्रुवराजसिंह गल्ली, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एम. टी. एन. एल.) गल्लीत, ए. जी. एल. आर. मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्गालगत घाटकोपर (पश्चिम) ते श्रेयस सिग्नलपर्यंतचा परिसर आदी भागात दुरुस्तीदरम्यान पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ६.१५ ते रात्री १०.३० वाजता होती. दुरुस्तीनंतर या परिसरात सुधारित पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ६.४५ ते रात्री ११.०० वाजेदरम्यान राहील.पाणीपुरवठा क्षेत्र सर्वोदय बुस्टींग आणि झोन क्रमांक एनएक्स ०६ शी संबंधित सॅनिटोरियम गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद मार्ग, जे. व्ही. मार्ग, गोपाळ गल्ली, लाल बहादूर शास्त्री (एल. बी. एस.) मार्गालगत घाटकोपर (पश्चिम), गांधीनगर या परिसरात दुरुस्तीदरम्यान पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.१५ वाजेदरम्यान होती. दुरुस्तीनंतर या परिसरात सुधारित पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.१५ वाजेदरम्यान राहील, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.
मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार
मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी खाटांची माहिती ही डॅशबोर्ड स्वरूपात महानगरपालिकेच्या पोर्टल वर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनास निर्देश देण्यात आले असून सद्यस्थितीत या डॅश बोर्डची तपासणी सुरू असून लवकरात लवकर नागरिकांना ही सेवा उपलब्ध होणार आहे ,यामुळे आता नागरिकांना एका क्लिक वर एकूण रुग्णशय्या आणि रुग्ण भरतीसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णशया इत्यादीची माहिती मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना रुग्णाला दाखल करताना ही माहिती मिळणार असल्याने त्यांचा रुग्णालयातील हेलफाटे आणि वेळ वाचला जाईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी दिली आहेमहापौर रितू तावडे यांच्या दालनात भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य खात्याचा आढावा घेण्यात आला. यावेळीमहानगरपालिकेच्या आरोग्य सेवा सुविधा रुग्णालय इत्यादी बाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, संचालक (आरोग्य ), तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.यावेळी झालेल्या चर्चेत, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत तसेच रुग्णालयामार्फत खरेदी करावयाची साधने, संसाधने, औषधे इत्यादी सर्व प्रकारची खरेदी ही यापुढे भारत सरकार पुरस्कृत जेम पोर्टल मार्फत करावी असा निर्णय घेण्यात आला आहे, यामुळे महानगरपालिकेचा आरोग्य विभागातील कारभारामध्ये पारदर्शकता व सुसूत्रता येईल. या निर्णयामुळे सर्व वस्तूंची उपलब्धता लवकरात लवकर होऊन नागरिकांना याचा लाभ होईल असा विश्वास भांदिर्गे यांनी व्यक्त केला.तसेच महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयामध्ये २००० पेक्षा जास्त रुग्णशयाची वाढ ही विविध पुनर्विकास प्रकल्प व नव्याने येणारे रुग्णालय यामध्ये होणार आहे. ही रुग्णालये टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करून नागरिकांना आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यामध्ये सर्व प्रकारच्या सर्वसाधारण, विशेष व अतिविशेष स्वरूपाच्या सेवेचा समावेश आहे. भारत सरकारच्या डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड अंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवून ही उपनगरीय रुग्णालय दर्जेदार सेवा देण्यास सक्षम होणार आहेत , याशिवाय कार्डिओलॉजी नेफ्रॉलॉजी इत्यादी अतिविशेष स्वरूपाच्या सेवा उपनगरीय रुग्णालयात अंतिम टप्प्यात सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती भांदिर्गे यांनी दिली. अशाप्रकारे महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेमध्ये दर्जोन्नती होणार आहेयाशिवाय औषधांची उपलब्धता, सार्वजनिक खाजगी सहभाग धोरणाअंतर्गत येणाऱ्या सेवा सुविधा, इत्यादी बाबत आढावा घेऊन प्रशासनास निविदेतील अटी व शर्तीचे कठोर पालन करण्याबाबत योग्य ती कारवाई करावी व नागरिकांना सेवा या महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या दरातच उपलब्ध व्हाव्यात अशाही सूचना करण्यात आल्याचे भांदिर्गे यांनी सांगितले.
मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या मनातील सुख-दु:ख, आनंद कागदावर चितारता येतो. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार होते. शाब्दीक फटकाऱ्यांसह कुंचल्यातूनही त्यांचे फटकारे उमटत असे. त्यामुळे कोणतेही चित्र साकारत असताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा, असा सल्लाही शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने १ मार्च २०२६ रोजी बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी माननीय महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ५१ ठिकाणी आयोजित या स्पर्धेमध्ये पाच गटांत एकूण ८६ हजार ३५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी २४ मार्च २०२६ रोजी घोषित केला होता. यंदाचे हे स्पर्धेचे १७ वे वर्षे होते.भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात या स्पर्धेतील विजेत्या ६५ विद्यार्थ्यांना मंगळवारी ७ एप्रिल २०२६ रोजी पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी शिरवडकर बोलत होत्या. समाजवादी पक्षाच्या गटनेत्या अमरीन अब्रहानी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किर्तीवर्धन किरतकुडवे, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, कला अकादमीचे प्राचार्य दिनकर पवार, संबंधित कला शिक्षक यावेळी उपस्थित होते.महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा म्हणजे प्रेरणादायी आणि कलासंस्कार घडविणारा स्तुत्य उपक्रम आहे. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. त्यामुळे अशा स्पर्धा आयोजित करून मुंबई महानगरपालिका विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देते, असे मत शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी व्यक्त केले.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किर्तीवर्धन किरतकुडवे यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेविषयी माहिती दिली. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन पेंग्विन सभागृहाबाहेर भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनालाही शिरवडकर आणि मान्यवरांनी भेट दिली. आरती खेर यांनी आभार मानले. कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांची नावे वाचून दाखविणारी महानगरपालिकेच्या विक्रोळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेतील इयत्ता नववीची विद्यार्थीनी मृणाल काळे हिच्या सूत्रसंचालन कौशल्याचे कौतुक करीत मान्यवरांनी तिचाही यावेळी सत्कार केला.प्रत्येक गटातील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रत्येकी २० हजार रुपये आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांस १५ हजार रुपये तसेच पदक आणि प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. प्रत्येक गटातील प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये आणि पदक तसेच प्रशस्तिपत्र देण्यात आले. तसेच विभाग स्तरावर प्रत्येक गटात ५ याप्रमाणे २५ अशी एकूण २५ प्रशासकीय विभागांमध्ये ६२५ उत्तम चित्रांना प्रत्येकी ५०० रुपयांचे रोख पारितोषिके आणि पदक देण्यात आले.
OnePlus Nord 6 : 9000mAh बॅटरी असलेला वनप्लसचा जबरदस्त मोबाईल भारतात लाॅंच; किंमत तुमच्या बजेटमध्ये
OnePlus Nord 6 : ८GB RAM व २५६GB स्टोरेज असलेला बेस व्हेरिएंट ₹३८,९९९ पासून सुरू होतो, तर १२GB RAM व २५६GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट ₹४१,९९९ किंमतीत उपलब्ध असेल.
US Iran War: वेंस यांच्या या विधानानंतर अमेरिका इराणवर परमाणु हल्ला करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला. यावर स्पष्टीकरण देताना व्हाईट हाऊसने सांगितले की उपराष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यात कुठेही परमाणु हल्ल्याचा संकेत नाही.
Maharashtra Rain News : स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने २०२६ च्या मान्सूनसाठी ९४ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Iran-Israel USA War: इराणमधील भारतीयांसाठी दूतावासाची तातडीची सूचना; काही तास घरातच राहण्याचा सल्ला
Iran-Israel USA War: भारतीय दूतावासाने इराणमधील सर्व भारतीयांना जिथे आहेत तिथेच सुरक्षित राहण्याचे निर्देश दिले आहेत. अनावश्यक प्रवास पूर्णपणे टाळावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Pawan Khera : खेडांच्या निवासस्थानाची तपासणी; कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली
कॉंग्रेसचे नेते पवन खेडा (Pawan Khera) यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची आसाम पोलिसांनी तपासणी केल्यावरून राजकीय वादळ उठले आहे.
नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय परिषदेच्या (संयुक्त सल्लागार यंत्रणा) मसुदा समितीची बैठक १३ एप्रिल २०२६ रोजी होणार असून, त्यात आठव्या वेतन आयोगाला सादर करायच्या अंतिम प्रस्तावावर चर्चा केली जाईल.मोठ्या संख्येने कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक वेतनवाढीच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. त्यामुळे या बैठकीच्या निकालाविषयी मोठी उत्सुकता आहे. मसुदा समिती पगार, निवृत्तीवेतन आणि नोकरीशी संबंधित बाबींसह प्रमुख कर्मचारी-संबंधित मुद्द्यांवर चर्चा करत असून, आठव्या वेतन आयोगाला सादर करण्यासाठी एक संयुक्त ज्ञापन तयार करत आहे. १२ मार्च २०२६ रोजी समितीची एक महत्त्वाची बैठक झाली, ज्यामध्ये विविध कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक संघटनांच्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. या सर्व बाबींचा समावेश करून एक प्रस्ताव तयार करण्याच्या योजनेवर आयोग काम करत आहे.आठव्या वेतन आयोगाला वेळ आणि जबाबदारीसरकारने फेब्रुवारी २०२६ मध्ये संसदेला कळवले की आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना आधीच अधिसूचित करण्यात आली आहे. ३ नोव्हेंबर २०२५ च्या ठरावानुसार, आयोगाला आपल्या शिफारशी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, निवृत्तीवेतन आणि इतर लाभांबाबत शिफारसी करण्याचे कामही आयोगाला सोपवण्यात आले आहे. कालमर्यादेच्या बाबतीत, आठवा वेतन आयोग २०२७ पर्यंत लागू केला जाईल अशी अपेक्षा आहे.फिटमेंट फॅक्टरनुसार पगारवाढ निश्चित होईलसरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर आधारित आहे, जो आठव्या वेतन आयोगाद्वारे निश्चित केला जाईल. महागाईतील सततची वाढ पाहता, कर्मचारी संघटनांना हा आकडा ३.२५ किंवा त्याहून अधिक असावा असे वाटते. मात्र, प्रत्यक्ष पगारवाढ किती होईल हे अद्याप अस्पष्ट आहे.
मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील चौथे वर्ष (ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्च) सुरू करण्यास राज्य शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता पदवीस्तरावरच संशोधनाची संधी मिळणार आहे. त्यासाठीचे सविस्तर मार्गदर्शक नियम उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंगळवारी जारी केले.चौथ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी शासनाने दोन स्वतंत्र मार्ग निश्चित केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना 'ऑनर्स विथ रिसर्च' ही पदवी हवी आहे, त्यांच्यासाठी कठोर शैक्षणिक निकष लावण्यात आले आहेत. त्यानुसार 'ऑनर्स विथ रिसर्च'साठी विद्यार्थ्याला पहिल्या तीन वर्षांत किमान ७.५ ‘सीजीपीए’ (संचयी ग्रेड पॉइंट सरासरी) मिळवणे आवश्यक आहे. शिवाय विद्यार्थ्यांनी पहिल्या तीन वर्षांत साधारण १२० ते १३२ क्रेडिट्स पूर्ण केलेले असावेत. या विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षात १२ क्रेडिट्सचा विशेष संशोधन प्रकल्प किंवा प्रबंध पूर्ण करावा लागेल.सर्वच महाविद्यालयांना चौथ्या वर्षाचे वर्ग थेट सुरू करता येणार नाहीत. ज्या महाविद्यालयांकडे आधीपासूनच पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रम आणि संबंधित विषयात पीएचडी (पीचडी) केंद्र उपलब्ध आहे, त्यांनाच 'ऑनर्स विथ रिसर्च' सुरू करण्याची स्वयंचलित परवानगी असेल. मात्र, ज्या महाविद्यालयांकडे फक्त तीन वर्षांची पदवी आहे, त्यांना चौथ्या वर्षासाठी शासनाची आणि विद्यापीठाची नव्याने परवानगी घ्यावी लागेल.प्रवेशासाठी 'लॅटरल एन्ट्री'ची सोयजर एखाद्या विद्यार्थ्याच्या महाविद्यालयात चौथ्या वर्षाची सोय नसेल, तर त्याला दुसऱ्या महाविद्यालय किंवा विद्यापीठ विभागात 'लॅटरल एन्ट्री'द्वारे प्रवेश घेता येईल. यासाठी 'अॅकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स' पोर्टलवर नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे क्रेडिट्स सहज हस्तांतरित होऊ शकतील.अभ्यासक्रम कसा असेल?१) ४ वर्षांची ऑनर्स पदवी - एकूण १६० ते १७६ क्रेडिट्स आणि चौथ्या वर्षात ४ क्रेडिट्सची इंटर्नशिप.२) ४ वर्षांची ऑनर्स विथ रिसर्च पदवी - १२ क्रेडिट्सचा विशेष संशोधन प्रकल्प अनिवार्य.३) ऑनलाईन कोर्सेस - विद्यार्थ्यांना 'स्वयम' प्लॅटफॉर्मवरून ४० टक्क्यांपर्यंत अभ्यासक्रम ऑनलाईन पूर्ण करण्याची मुभा असेल.
इस्लामाबाद : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेजारील देश असलेल्या पाकिस्तानची झोप उडाली आहे. या आंतरराष्ट्रीय तणावाचा मोठा फटका पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बसला असून देशात इंधनाच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, सरकारला संपूर्ण देशात 'एनर्जी लॉकडाऊन' लागू करावा लागला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे पाकिस्तानी जनतेचा संयम सुटला असून, कराचीपासून पेशावरपर्यंत जनक्षोभ पाहायला मिळत आहे. 'डॉन' वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कराची, हैदराबाद आणि सुक्कुर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये नागरिक आणि राजकीय नेत्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली आहेत. जैकोबाबादसह अनेक ठिकाणी महागाईविरोधात संताप व्यक्त केला जात असून, वाढत्या किमतींमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे जागतिक युद्धाची भीती आणि दुसरीकडे देशांतर्गत पेटलेले आंदोलन यामुळे पाकिस्तान सरकार पूर्णपणे बॅकफूटवर आले आहे.https://prahaar.in/2026/04/07/iran-israel-war-west-asia-us-donald-trump-strait-of-hormuz-live-updates-on-april-7-2026/अंगावर 'कफन' ओढून सरकारचा निषेधपाकिस्तानातील वाढत्या महागाईने आता टोक गाठले असून, सुक्कुरमध्ये 'सिंध युनायटेड पार्टी'ने (SUP) सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी एक आगळेवेगळे आंदोलन केले. महागाई आणि इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी चक्क अंगावर 'कफन' परिधान करून प्रेस क्लबसमोर प्रतीकात्मक उपोषण केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना SUP चे नेते ऐदान जागीरानी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने पेट्रोलच्या दरात ८० रुपयांची कपात केल्याचा दावा केला होता, मात्र हा दावा पूर्णपणे फसवा आणि जनतेची दिशाभूल करणारा असल्याचे जागीरानी यांनी म्हटले. गेल्या काही आठवड्यांत पेट्रोलच्या दरात तब्बल १३७ रुपये प्रति लिटर इतकी प्रचंड वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. केवळ इंधनच नाही, तर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही गगनाला भिडल्याने सामान्य माणसाच्या खिशाला मोठी झळ सोसावी लागत असल्याचे आंदोलकांनी नमूद केले.PTI सह कामगार संघटना रस्त्यावरसुक्कुरमध्ये 'पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ'च्या (PTI) कार्यकर्त्यांनी गोहर खान खोसो यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने केली. यावेळी बोलताना खोसो यांनी सरकारला इशारा दिला की, पेट्रोलचा दर ३७८ रुपये प्रति लिटर झाल्यामुळे जनतेचे कंबरडे मोडले आहे. सरकारने तात्काळ कर कपात न केल्यास हे आंदोलन संपूर्ण पाकिस्तानात पसरेल. तीर चौक ते घंटा घर दरम्यान नूर अहमद कटियार आणि सरवन जतोई यांच्या मार्गदर्शनाखाली अवामी तहरीकने विशाल रॅली काढत धरणे आंदोलन केले. सरकारची धोरणे सर्वसामान्यांच्या मुळावर उठल्याची टीका यावेळी करण्यात आली. कराचीमध्ये 'नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन' आणि 'होम-बेस्ड विमेन वर्कर्स फेडरेशन'सह अनेक कामगार संघटनांनी एकत्र येत इंधन दरवाढीचा निषेध केला. आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांच्या दबावाखाली सरकार घेत असलेल्या निर्णयांचा त्यांनी निषेध केला.
Farmers News : संतापजनक..! पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; कुठे घडला प्रकार?
Farmers news : जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे ज्वारी खरेदीच्या टोकनसाठी जमलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
America: अमेरिका एफ-१५ पायलटला किती पगार देते? ही रक्कम ऐकून तुम्हाला बसेल धक्का
मुंबई: अमेरिकेने इराणमध्ये अडकलेल्या आपल्या एफ-१५ पायलट्सला वाचवण्यासाठी एक मोहीम सुरू केली. ही मोहीम यशस्वी झाली. दरम्यान, लोकांना प्रश्न पडला आहे की एफ-१५ पायलट किती कमावतो. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा पगार किती असतो.पगार पद आणि अनुभवावर अवलंबूनअमेरिकी हवाई दलातील लढाऊ वैमानिक वार्षिक ७५,००० ते २००,००० डॉलर्सपर्यंत कमावू शकतो. हा पगार त्यांच्या पदावर, अनुभवावर आणि प्रोत्साहनांवर अवलंबून असतो. अमेरिकी हवाई दलातील लढाऊ वैमानिक हे कमिशन प्राप्त अधिकारी असतात. त्यांचा मूळ पगार त्यांच्या पदावर अवलंबून असतो. बहुतेक कार्यरत वैमानिक कॅप्टन पदापेक्षा खालच्या दर्जाचे असतात. त्यांचा वार्षिक पगार ६६,००० ते ९३,००० डॉलर्सच्या दरम्यान असतो. जसजसा त्यांना अनुभव मिळतो आणि ते मेजर पदावर पोहोचतात, तसतशी त्यांची कमाई ७५,००० ते १००,००० डॉलर्सपर्यंत वाढते. लेफ्टनंट कर्नल आणि कर्नल यांसारखे वरिष्ठ अधिकारी यापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त कमावतात, जे वार्षिक १०४,००० ते १५०,००० डॉलर्सच्या दरम्यान असते.बोनस आणि प्रोत्साहन भत्त्यातून मिळणारी कमाईमूळ पगार हा त्यांच्या कमाईचा केवळ एक पैलू आहे. अमेरिकन लढाऊ वैमानिकांना अनेक अतिरिक्त फायदे देखील मिळतात. याचा मुख्य घटक म्हणजे 'एव्हिएशन करिअर इन्सेंटिव्ह पे', जो उड्डाणाच्या अनुभवासाठी दिला जातो आणि त्यातून दरमहा १ हजार डॉलर्सपर्यंत अतिरिक्त कमाई होऊ शकते. कुशल वैमानिकांना टिकवून ठेवण्यासाठी 'रिटेन्शन बोनस' देखील दिले जातात. हे बोनस ६००,००० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात.करमुक्त भत्त्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढवैमानिकांना निवास आणि भोजनासाठी करमुक्त भत्ते देखील मिळतात. त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणानुसार, या लाभांमुळे त्यांच्या हातात येणाऱ्या पगारात लक्षणीय वाढ होऊ शकते. अधिक महागड्या भागांमध्ये, केवळ या प्रलोभनांचीच रक्कम मोठी होऊ शकते.सरासरी वार्षिक उत्पन्नसर्व गोष्टींचा विचार करता, अमेरिकी हवाई दलातील वैमानिकाचे सरासरी वार्षिक उत्पन्न अंदाजे १,३०,००० डॉलर्स आहे. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे १ कोटी ९९ लाख रुपये आहे. वरिष्ठ अधिकारी वर्षाला १ कोटी ७० लाख रुपयांपेक्षा जास्त कमावू शकतात. एफ-१५ सारखे प्रगत लढाऊ जेट उडवणे सोपे नाही. त्यासाठी अनेक वर्षांचे कठोर प्रशिक्षण, प्रत्येक लहानसहान गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणे आणि अत्यंत दबावाखाली काम करण्याची क्षमता आवश्यक असते.
Donald Trump : आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल...;डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा
वॉशिंग्टन : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मिडिया 'एक्स'वर एक अतिशय भयानक पोस्ट शेअर करून जगाला हादरवून सोडले आहे. आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल, जी पुन्हा कधीही परत येणार नाही. मला हे घडावे असे वाटत नाही, पण बहुधा ते घडेल, असे विधान ट्रम्प यांनी केले आहे.१. ट्रम्प यांचा 'अल्टिमेटम' आणि विनाशाची धमकीPresident Donald J. Trump posted to Truth Social just minutes ago, stating, A whole civilization will die tonight, never to be brought back again. I don’t want that to happen, but it probably will. pic.twitter.com/Z36aL7ytyL— OSINTdefender (@sentdefender) April 7, 2026ट्रम्प यांनी इराणला ७ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंतची (GMT) मुदत दिली आहे. इराणने 'होरमुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) जी व्यापारासाठी बंद केली आहे, ती तात्काळ खुली करावी, अशी अमेरिकेची मागणी आहे. जर इराणने हे मान्य केले नाही, तर अमेरिकन सैन्य इराणचे पूल, वीज प्रकल्प आणि पायाभूत सुविधांवर बॉम्बफेक करून त्यांना थेट पाषाण युगात (Stone Age) पाठवेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.२. इराणचे 'ह्युमन चेन' आणि बलिदानाचे आवाहनट्रम्प यांच्या या धमकीनंतर इराणमध्ये संतापाची लाट आहे. इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केले आहे की, त्यांच्यासह सुमारे १ कोटी ४० लाख इराणी नागरिकांनी देशासाठी बलिदान देण्याची तयारी दर्शवली आहे. इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड्स'ने (IRGC) शेजारील देशांनाही इशारा दिला आहे की, जर अमेरिकेने मर्यादा ओलांडली तर आमचा प्रतिसाद केवळ या प्रदेशापुरता मर्यादित नसेल. तसेच, इराणी तरुणांना वीज प्रकल्पांभोवती 'मानवी साखळी' (Human Chain) बनवून त्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.३. शांततेचे प्रयत्न आणि युएन (UN) ची भूमिकाएकीकडे युद्धाचे ढग गडद होत असताना, पाकिस्तानचे राजदूत रझा अमिरी मोघदाम यांनी सांगितले की, युद्ध थांबवण्यासाठी इस्लामाबादकडून सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत आणि हे प्रयत्न आता एका संवेदनशील टप्प्यावर आहेत. दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UN Security Council) आज या विषयावर मतदान करण्याची शक्यता आहे.४. भारतीयांसाठी धोकाया भीषण परिस्थितीमुळेच भारत सरकारने इराणमधील आपल्या नागरिकांना पुढचे ४८ तास अत्यंत सतर्क राहण्यास आणि जिथे आहात तिथेच थांबण्यास सांगितले आहे.
- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थितीमुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते.सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभियानाविषयी मंत्रिमंडळाला माहिती दिली. अभियानाविषयी माहिती देण्यात येणाऱ्या व्हिडिओ आणि पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. लोकसहभागातून ही मोहीम व्यापक आरोग्य चळवळ म्हणून उभी राहावी, हा शासनाचा मानस असून, गावपातळीपासून राज्यस्तरापर्यंत आरोग्य सेवांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' या अभियानाचा शुभारंभ केला आणि अभियानाच्या मार्गदर्शिकेचे प्रकाशन केले.यावेळी… pic.twitter.com/N4KdyzvXn9— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 7, 2026या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देणे. स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण, तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण यासारख्या मूलभूत घटकांवर लक्ष केंद्रित करून ग्रामीण नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. माता-बाल आरोग्य, मानसिक आरोग्य आणि बदलत्या जीवनशैलीशी निगडित आजारांनाही या मोहिमेत विशेष स्थान देण्यात आले आहे.या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग, जिल्हा आणि ग्रामपंचायत स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली असून, ठरावीक निकषांनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना “आरोग्यसंपन्न गाव” म्हणून गौरविण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच आरोग्य संस्थांना ६५.२५ कोटी रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” हे अभियान केवळ योजना नसून एक लोकचळवळ आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्याचा स्तर उंचावून निरोगी, सशक्त आणि समृद्ध समाज घडविण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा विश्वास यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.
War Updates: ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत म्हटले की, “आज रात्री एक संपूर्ण सभ्यता नष्ट होईल, जी पुन्हा कधीही उभी राहणार नाही. मला ते घडू नये असे वाटते, पण तसे होण्याची शक्यता आहे.”
Bangladesh : बांगलादेशात गोवरमुळे १०० बालकांचा मृत्यू; देशभरात लसीकरणाची धडक मोहिम सुरू
देशभरात लसीकरणाचे अत्यल्प प्रमाण आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे मुलांमध्ये गोवरची साथ पसरली असल्याचे युनिसेफने म्हटले आहे.
Artemis II : आर्टिमिस-2 ने ओलांडला लांबच्या अवकाश प्रवासाचा टप्पा
नासाच्या आर्टिमिस-2 (Artemis II) या अवकाश यानाने अवकाशात आतापर्यंत सर्वात लांबच्या प्रवासाचा टप्पा ओलांडला असून या अवकाश यानातील अंतराळवीरांनी यानाच्या खिडकीतून दिसणाऱ्या चंद्राचे फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत.
Rabi Season: पारोळ्यात रब्बी भरडधान्य नोंदणीसाठी शेतकऱ्यांची झुंबड; नियोजनाअभावी गैरसोय
Rabi Season: प्रशासनाने ३० एप्रिलपूर्वी नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले असले, तरी प्रत्यक्षात नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Crime : इन्स्टाग्रामवरील फोटोमुळे उघड झाला थरकाप उडवणारा गुन्हा; 11 महिन्याच्या मुलाचा आईकडून खून
Crime : या घटनेमुळे ‘आई’ या नात्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, आरोपी महिलेने २०२० मध्ये पहिले, २०२४ मध्ये दुसरे आणि २०२६ मध्ये तिसरे लग्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Ashok Kharat Case : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन तपासाचा तपशील दिला.
केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. संकटाच्या काळात अंदाज/अनुमान आणि सनसनाटी बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. इस्रायल-इराण संघर्षादरम्यान खोट्या आणि काल्पनिक बातम्यांच्या प्रसारणानंतर, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलला (बीएआरसी) हा निर्देश जारी केला आहे.माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, काही वृत्तवाहिन्या युद्धाच्या परिस्थितीचे अनावश्यकपणे खळबळजनक/सनसनाटीकरण करत आहेत. अशा प्रकारच्या मजकुरामुळे सामान्य जनतेमध्ये, विशेषतः बाधित भागातील कुटुंबांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण होऊ शकते.हे लक्षात घेऊन, सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांच्या टीआरपी अहवालावर चार आठवड्यांसाठी बंदी घातली आहे. या कालावधीत, वाहिन्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन सामान्य प्रक्रियेनुसार केले जाणार नाही. हे उल्लेखनीय आहे की, ६ मार्च रोजी पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने वृत्तवाहिन्यांचे टीआरपी चार आठवड्यांसाठी स्थगित करण्याचे आदेश दिले होते.
Ajit Pawar : अजित पवारांचा घातपात कि अपघात? शरद पवारांचा मोठा खुलासा
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमानाचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला.
Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण
मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्यांना अचानक आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.एसी कोचमध्ये लागली अचानक आग :मिळालेल्या माहितीनुसार, हे वर्कशॉप मध्य रेल्वे अंतर्गत असून येथे ट्रेनच्या डब्यांची दुरुस्ती आणि देखभाल केली जाते. वर्कशॉपच्या आवारात उभ्या असलेल्या एसी कोचमध्ये अचानक आग लागली. उपकरणांमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले आणि धुराचे मोठे लोट परिसरात पसरले.अनेक अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल :घटनास्थळी उपस्थित कर्मचारी आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. आग लागल्याची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही मिनिटांतच अनेक अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आग इतर डब्यांपर्यंत पसरू नये म्हणून परिसर रिकामा करण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले होते.
आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावामुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून राबविण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प नियोजनानुसार सुरू असून मे २०२७ पर्यंत मुंबईतील मुंबईतील सीसी रस्त्यांचे काम मे २०२७ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी दिली.महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीनंतर आमदार अमीत साटम यांनी मुंबईत सुरू असलेल्या रस्ते कामांविषयी माहिती दिली.मुंबईतील एकूण रस्त्यांचे जाळे सुमारे २,०५० किमी आहे. त्यापैकी २०२२ पूर्वीच सुमारे १,२०० किमी रस्ते सिमेंट काँक्रिट (CC) मध्ये रूपांतरित करण्यात आले होते. २०२२ नंतर आणखी ६७७ किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेण्यात आले असून त्यापैकी सुमारे ७१% म्हणजेच ४८१ किमी काम पूर्ण झाले आहे, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.आमदार अमीत साटम यांनी पुढे सांगितले की हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबविला जात आहे. पहिला टप्पा ३०७ किमीचा असून तो ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू झाला, तर दुसरा टप्पा ३७० किमीचा असून तो ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झाला.उर्वरित कामांपैकी १०–१५% काम मे २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, तर आणखी १०% काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण प्रकल्प मे २०२७ पर्यंत पूर्ण होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यावर सुमारे १,९०० किमी रस्ते पूर्णपणे काँक्रिटीकरण करण्यात आलेले असतील, असे त्यांनी नमूद केले.कामांची गुणवत्ता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आयआयटी ची थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या IIT दुसऱ्या टप्प्याचे ऑडिट करत असून आता पहिल्या टप्प्याचेही ऑडिट करणार असल्याचे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.आर्थिक परिणामांबाबत बोलताना त्यांनी खड्डे दुरुस्तीवरील खर्चात सातत्याने घट होत असल्याचे सांगितले. २०२३–२४ मध्ये हा खर्च २०२ कोटी रुपये होता. तो २०२४–२५ मध्ये १५६ कोटी रुपयांपर्यंत खाली आला. म्हणजे त्यात २३% घट झाली. २०२५–२६ मध्ये हा खर्च आणखी कमी होऊन ८९ कोटी रुपये झाला, म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत ४३% घट झाली. चालू वर्षासाठी खड्डे दुरुस्तीचा निविदा खर्च सुमारे ४४ कोटी रुपये अपेक्षित आहे, म्हणजेच आणखी ५०% घट होईल, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.
Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक स्थळांना - राजराजेश्वरम मंदिर आणि गुरुवायूर मंदिराला भेट दिली. त्यांनी एकूण ६ कोटी रुपयांची (प्रत्येकी ३ कोटी रुपये) देणगी जाहीर केली. त्यांनी ऐतिहासिक पूर्व गोपुरमच्या जीर्णोद्धारासह राजराजेश्वरम मंदिराच्या व्यापक नूतनीकरणासाठी १२ कोटी रुपयांचे वचनही दिले. तालिपरंबा येथील राजराजेश्वरम मंदिराच्या भेटीदरम्यान, अंबानी यांनी पोनुमकुडम, पट्टम, थाली आणि नेय्यमृत्टू निक्की व अश्वमेध यांसारखे पारंपरिक विधी केले. त्यांनी मंदिराच्या सुरू असलेल्या कामांसाठी ३ कोटी रुपयांचा धनादेशही सादर केला.गोपुरमच्या जीर्णोद्धारासाठी १२ कोटी रुपयांची मोठी मदत जाहीरअनंत अंबानी यांनी मंदिराच्या ऐतिहासिक पूर्व गोपुरमच्या जीर्णोद्धारासाठी १२ कोटी रुपयांची मोठी मदत जाहीर केली. हे गोपुरम सौंदर्यदृष्ट्या आणि वास्तुकलेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जाते आणि ते जवळपास दोन शतकांपासून जीर्ण अवस्थेत होते. या प्रकल्पामुळे दुकाने आणि इतर आकर्षणांमध्ये सुधारणा होऊन मंदिराच्या वास्तुकलेचे सौंदर्यही वाढेल. या प्रसंगी त्यांच्यासोबत त्यांचे जवळचे सहकारी उपस्थित होते. मंदिर प्रशासनाने पारंपरिक सन्मानाने त्यांचे स्वागत केले. यावेळी टिकेके देवस्वमचे अध्यक्ष टी.पी. विनोद कुमार, कार्यकारी अधिकारी के.पी. विनीन, मुख्य पुजारी ई.पी. कुबेरन नंबुथिरी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.गुरुवायूर मंदिराला अधिक समृद्ध बनवण्याचा उपक्रमअनंत अंबानी यांनी गुरुवायूर मंदिराला भेट दिली, जिथे त्यांनी भगवान गुरुवायूरप्पन यांची प्रार्थना केली आणि मंदिर ट्रस्टला ३ कोटी रुपयांची देणगी दिली. प्राणी संवर्धनाप्रती आपली वचनबद्धता कायम ठेवत, त्यांनी गुरुवायूर मंदिराच्या कल्याणासाठी इच्छा व्यक्त केली. यामध्ये हत्तींसाठी एक समर्पित रुग्णालय, साखळीमुक्त निवारा आणि हत्तींची काळजी, शास्त्रीय व्यवस्थापन व भरती पद्धती यांसारख्या आधुनिक सुविधांच्या विकासाचा समावेश आहे. गुरुवायूर येथे देवस्वम मराठा ए. व्ही. गोपीनाथ आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.'पवित्र मंदिरांचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी'या प्रसंगी बोलताना अनंत अंबानी म्हणाले की, भारताची आध्यात्मिक परंपरा केवळ प्रार्थनास्थळे नाहीत, तर त्या अशा जिवंत संस्था आहेत, ज्या श्रद्धा, समाज, करुणा आणि निसर्ग यांच्याशी असलेले आपले सखोल नाते अधिक दृढ करतात. पवित्र मंदिरांचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. भारताचा समृद्ध आध्यात्मिक वारसा जतन करण्यासाठी, मंदिरांमधील अवशेषांना बळकट करण्यासाठी, बौद्ध अनुभवाला समृद्ध करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित मंदिरांच्या कल्याणाला चालना देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.
मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवावीत, असे त्यांनी सांगितले.सह्याद्री अतिथीगृह येथे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत कृषी पणन मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ.अमोल यादव, व्यवस्थापक सतीश वराडे, शैलेंद्र जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.बैठकीत कृषी पणन मंडळाची निर्यात सुविधा केंद्रे, आस्थापना विषयक बाबी तसेच ई-नाम संदर्भातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यभर उपलब्ध असलेल्या सुविधा केंद्रांचा अधिक प्रभावी वापर करून कृषीमालाची प्रक्रिया वाढविणे, त्याची निर्यात आणि स्थानिक बाजारपेठेत विक्री सुलभ करणे यावर भर देण्यात आला. यामुळे काढणीनंतरच्या हाताळणीतील नुकसान कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल. विविध देशांच्या मागणीनुसार कृषीमालाची गुणवत्ता, ट्रेसिबिलिटी आणि पॅकेजिंग यावर विशेष लक्ष केंद्रित केल्यास निर्यात वाढीस चालना मिळू शकते, असे मंत्री जयकुमार रावल यांनी नमूद केले.आंबा हंगाम २०२६ सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या विकीरण (irradiation) प्रक्रियेच्या सुविधा केंद्रांच्या नियोजनाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आंबा निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यासाठी अतिरिक्त अमेरिकन निरीक्षक उपलब्ध करून देण्याबाबत अपेडाकडे पाठपुरावा करावा. महाराष्ट्रातील कृषीमालाला इतर राज्यांमध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पणन मंडळातील अधिकाऱ्यांनी विविध राज्यांमध्ये अभ्यास दौरे करावेत, असे आदेश मंत्री रावल यांनी यावेळी दिले.
Pune: मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्ट्स तर्फे सकाळ माध्यम समूहाच्या सहकार्याने आयोजित केला जाणारा हा कार्यक्रम देशातील एक अत्यंत प्रतिष्ठित सांस्कृतिक उपक्रम मानला जातो.
Pune: मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्ट्स तर्फे सकाळ माध्यम समूहाच्या सहकार्याने आयोजित केला जाणारा हा कार्यक्रम देशातील एक अत्यंत प्रतिष्ठित सांस्कृतिक उपक्रम मानला जातो.
मी स्वतः काँग्रेसच्या पाठिंब्याने आणि मार्गदर्शनाखाली निवडणुका लढवल्या आहेत. आम्ही काँग्रेसच्या विचारधारेतच वाढलो आहोत, असे सुळे यांनी सांगितले.
IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?
गुवाहाटीत आज पुन्हा एकदा आयपीएलचा थरार रंगणार असला, तरी आकाशात दाटलेले काळे ढग चाहत्यांची चिंता वाढवत आहेत. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आजचा सामना पावसाच्या सावटाखाली होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा सामना गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियम येथे रंगणार आहे.रियान पराग यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकत दमदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने एक विजय मिळवला असला तरी मागील सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.दरम्यान, यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे गुवाहाटीतील हवामान आज निर्णायक भूमिका बजावू शकते.कसा असेल हवामानाचा अंदाज?आज गुवाहाटीत सुमारे १० टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असल्याने खेळपट्टीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. दमट हवामानामुळे फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, तर वेगवान गोलंदाजांना सीम मूव्हमेंटचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.हेड-टू-हेड आकडेवारीमुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत ३१ सामने खेळले गेले आहेत. यापैकी मुंबईने १६ सामने जिंकले, तर राजस्थानने १४ वेळा विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे.हार्दिक खेळणार का?मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या मागील सामन्यात आजारपणामुळे खेळू शकला नव्हता. त्या सामन्यात सूर्यकुमार यादव यांनी नेतृत्व केले होते, पण संघाला पराभव पत्करावा लागला. मात्र, हार्दिक पांड्या संघासोबत गुवाहाटीत दाखल झाल्याने आज तो खेळण्याची शक्यता जास्त आहे.सामना कुठे पाहाल?राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना आज संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक ७ वाजता होणार आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येईल. तसेच JioHotstar ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
Shirin Sharmin Chaudhury : बांगलादेशच्या माजी सभापती शरीन शर्मिन चौधरी यांना अटक
शरीन शर्मिन चौधरी (Shirin Sharmin Chaudhury) असे या माजी सभापती महिलेचे नाव असून त्यांना ढाका मेट्रोपोलिटन पोलिसांच्या डिटेक्टिव्ह ब्रॅंचने अटक केली आहे.
Devendra Fadnavis : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 128 कोटींची मदत जाहीर; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर-डिसेंबर २०२५ मधील पीक नुकसानीसाठी १२८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.
सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचनामुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.पालकमंत्री राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून मुंबईसाठी लवकर सेवा सुरू करण्यासाठी मंत्रालयातील आपल्या दालनात बैठक घेतली. बैठकीस विमानचालनचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (दूरदृश्य प्रणालीद्वारे) चिपी विमानतळाचे संचालक कुलदीप सिंह, महाराष्ट्र विमानतळ कंपनीच्या व्यवस्थापक प्रांजली खवळे, कार्यकारी अभियंता मिस्बाह अन्वार आदी उपस्थित होते.मंत्री राणे म्हणाले, चिपी मुंबई हवाई वाहतूक करिता शासनाकडून Viability Gap Funding VGF मंजूर आहे. मात्र विमानसेवा सुरू होण्यास विलंब होत आहे. यासाठी संबंधित कंपनीने विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. मुंबईसाठी सकाळी व सायंकाळी अशी दिवसातून दोन वेळा विमान सेवा सुरू करण्याबाबतही कंपनीने विचार करावा असेही ते म्हणाले.चिपी मुंबई विमान सेवा सूरू करण्यासाठी आवश्यक सुरक्षा परवानग्यासह अन्य परवाने घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने अखेर पडदा टाकला आहे. ६ एप्रिल २०२६ रोजी एका विशेष गॅझेट नोटिफिकेशनद्वारे अमरावती (Amravati) शहराला राज्याची अधिकृत आणि कायमस्वरूपी राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे. संसदेने 'आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन) विधेयक २०२६' मंजूर केल्यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी या ऐतिहासिक निर्णयावर स्वाक्षरी केली. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारने तत्काळ ही अधिसूचना लागू केली आहे. या निर्णयामुळे आता आंध्र प्रदेशच्या राजधानीबाबतचा सर्व तांत्रिक आणि राजकीय संभ्रम कायमचा संपुष्टात आला असून, अमरावतीच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.https://prahaar.in/2026/04/07/attack-on-the-israeli-consulate-in-istanbul/'तीन राजधानी'च्या चर्चांना पूर्णविराम२ एप्रिल रोजी लोकसभेनंतर राज्यसभेतही या विधेयकाला आवाजी मतदानाने संमती देण्यात आली. या ऐतिहासिक मंजुरीमुळे आता राज्यात यापुढे 'तीन राजधानी'चे मॉडेल राबवण्याचे किंवा राजधानी बदलण्याचे सर्व कायदेशीर पर्याय संपुष्टात आले आहेत. कायदा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, जरी हे विधेयक आता मंजूर झाले असले तरी, हा सुधारित कायदा २ जून २०२४ पासून लागू झाल्याचे मानले जाईल. २०१४ च्या मूळ आंध्र प्रदेश पुनर्गठन कायद्यात दुरुस्ती करून हा मोठा बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या पाऊलामुळे आता अमरावतीच्या राजधानी पदावर कोणतीही कायदेशीर टांगती तलवार उरलेली नाही.YSRCP चा केंद्राच्या निर्णयाला कडाडून विरोधकेंद्र सरकारने अमरावतीला कायमस्वरूपी राजधानीचा दर्जा दिल्यानंतर आता आंध्र प्रदेशात राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाने (YSRCP) या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत आपला विरोध दर्शवला आहे. या निर्णयामुळे राजधानीसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष झाले आहे, असा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. अमरावतीच्या विकासाची मुहूर्तमेढ २०१५ मध्ये तत्कालीन तेलगू देसम पक्षाच्या (TDP) कार्यकाळात रोवण्यात आली होती. मात्र, २०१९ मध्ये सत्तांतर होऊन वायएसआर काँग्रेस सत्तेत आल्यानंतर त्यांनी 'तीन राजधानी'चे मॉडेल मांडले होते. यामुळे अमरावतीचा मुख्य प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून अधांतरी होता. आता केंद्राच्या नव्या कायद्यामुळे जगनमोहन रेड्डी यांच्या 'तीन राजधानी'च्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला मोठा धक्का बसला असून, राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.NDA सरकारच्या निर्णयामुळे विकासकामांना वेग२०२४ मध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतर, सरकारने 'एकच राजधानी' म्हणून अमरावतीवर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे गेल्या काही काळापासून रखडलेले सर्व प्रलंबित प्रकल्प आता युद्धपातळीवर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. एकाच मजबूत राजधानीमुळे राज्याच्या प्रशासनात अधिक सुसूत्रता आणि स्थैर्य येईल, अशी आशा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. राजधानीच्या निश्चितीमुळे केवळ पायाभूत सुविधांचे कामच मार्गी लागणार नाही, तर राज्याच्या एकूणच प्रशासकीय कारभाराला मोठी चालना मिळणार आहे. गुंतवणुकीचे आणि विकासाचे केंद्र म्हणून अमरावतीला पुन्हा उभारी देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे झालेल्या एका रॉकेटसदृश हल्ल्यात झोपेत असलेल्या दोन निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात अन्य दोन नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून सरकारने पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा तीन दिवसांसाठी बंद केली आहे.https://prahaar.in/2026/04/07/start-chipi-mumbai-flight-service-as-soon-as-possible-instructions-from-sindhudurg-guardian-minister-minister-nitesh-rane/झोपेतच काळाचा घालाबिष्णुपूर जिल्ह्यातील ट्रोंग्लाओबी अवांग लेकाई या गावात मंगळवारी पहाटे १ च्या सुमारास हा हल्ला झाला. डोंगराळ भागातून डागलेले एक रॉकेट थेट ओनाम मंगलसाणा यांच्या घरावर येऊन पडले. यावेळी घरात गाढ झोपेत असलेल्या त्यांच्या चार वर्षांच्या मुलाचा आणि अवघ्या काही दिवसांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. मुलांची आई ओनाम बिनिता या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, बिनिता या गुवाहाटीमध्ये परिचारिका असून बाळंतपणासाठी सुगावे गावी आल्या होत्या, तर त्यांचे पती सीमा सुरक्षा दलात (BSF) बिहारमध्ये कार्यरत आहेत. या घटनेचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवण्यात आला आहे.जमावाचा उद्रेक आणि गोळीबारदोन निष्पाप बालकांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बिष्णुपूर आणि इंफाळमध्ये जनक्षोभ उसळला. संतप्त जमावाने रस्त्यावर टायर जाळून रस्ते अडवले. आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांना आणि तेलाच्या टँकरला आग लावली. परिस्थिती हाताबाहेर जात असताना जमावाला पांगवण्यासाठी सीआरपीएफने (CRPF) केलेल्या गोळीबारात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे तणाव अधिकच वाढला आहे.
David Warner: दारू पिऊन गाडी चालवणे पडले महागात; डेव्हिड वॉर्नरला अटक
नवी दिल्ली: पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर एका कायदेशीर वादात अडकला आहे. वृत्तानुसार, वॉर्नरवर मद्यपान करून गाडी चालवल्याचा आरोप आहे आणि पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, नंतर त्याची सुटका करण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा हा माजी सलामीवीर सध्या पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ मध्ये कराची किंग्सचे कर्णधारपद भूषवत आहे. पीएसएलमधील त्याच्या फ्रँचायझीच्या सामन्यांमध्ये काही दिवसांचे अंतर होते, त्यामुळे तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता. news.com.au च्या वृत्तानुसार, डेव्हिड वॉर्नरवर मद्यपान करून गाडी चालवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ५ एप्रिलच्या रात्री सिडनीच्या मारुब्रा परिसरात पोलिसांनी केलेल्या श्वास चाचणीत त्याच्या शरीरातील अल्कोहोलची पातळी कायदेशीर मर्यादेपेक्षा जवळपास दुप्पट आढळली.श्वास चाचणी पॉझिटिव्हन्यू साउथ वेल्स पोलिसांच्या निवेदनानुसार, वॉर्नर चाचणी स्थळी पोहोचण्यापूर्वीच आपले वाहन थांबवून पार्क केले होते. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून घटनास्थळीच श्वास चाचणी घेतली, ज्याचा निकाल सकारात्मक आला. त्यानंतर वॉर्नरला अटक करून मारुब्रा पोलीस ठाण्यात नेण्यात आले, जिथे दुसऱ्या चाचणीत त्याच्या शरीरातील अल्कोहोलची पातळी ०.१०४ असल्याचे उघड झाले. हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले असून, तो पुढील महिन्यात न्यायालयात हजर होईल.पोलिसांकडून निवेदन जारीपोलिसांच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ५ एप्रिल रोजी, सायंकाळी अंदाजे ५:३० वाजता, पोलीस मारुब्रा येथील मलबार रोडवर यादृच्छिक श्वास तपासणी करत होते. तपासणी स्थळापूर्वी एक वाहन पार्क केलेले दिसले. अधिकाऱ्यांनी चालकाची तपासणी केली, ज्यात तो पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर त्याला अटक करून पोलीस ठाण्यात नेण्यात आले, जिथे दुसऱ्या चाचणीत त्याचे प्रमाण ०.१०४ आढळले. त्या व्यक्तीला ७ मे, २०२६ रोजी डाउनिंग सेंटर स्थानिक न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.डेव्हिड वॉर्नरने २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि तेव्हापासून तो मीडिया आणि फ्रँचायझी क्रिकेटकडे वळला आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत १०० हून अधिक कसोटी सामने खेळले आणि ऑस्ट्रेलियाला अनेक महत्त्वाचे विजय मिळवून दिले आहेत.
अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत
जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरूमुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत देण्यात आल्य़ाची माहिती मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने राज्यात शेतीचे सुमारे १ लाख १४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यामुळे १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्य़ांच्या शेती आणि शेतीमालाचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना १२८.८६ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. हे नुकसान प्रामुख्याने चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात नुकसान झाले होते.जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण १ लाख ४५ हजार ६०६ हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले असून २ लाख ३३ हजार ८९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पावसामुळे केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदूरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा, आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या अवकाळी पावसामुळे पाच लोकांचा मृत्यु आणि नऊ लोक जखमी झाले. अवकाळी पावसामुळे ३६ जनावरांचाही मृत्यु झाला आहे.एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या पावसानेही १ लाख ९४ हजार ३२९ शेतकऱ्यांच्या १ लाख २२ हजार ९९३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार स्पष्ट झाले आहे. जानेवारीपासून झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे.१०५ टीएमसी पाणीसाठा तयारदरम्यान, जुलै २०२२ पासून जलसंपदा विभागाचे ४१ प्रकल्प पूर्ण झाले असून सुमारे १०५ टीएमसी पाणीसाठा तयार झाला असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकल्पांमुळे अतिरिक्त २.९५ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जुलै २०२२ पासून आजपर्यंत २२५ प्रकल्पांना सुधारित तसेच प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या मान्यता ४.३५ लाख कोटी रुपयांच्या असून हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ३३.४५ लाख हेक्टर सिंचन क्षमता तयार होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाने सादरीकरणाद्वारे दिली.
Lalit Modi : आयपीएलमध्ये प्रत्येक हंगामात 2,400 कोटींचे नुकसान; ललित मोदींचा बीसीसीआयवर आरोप
आयपीएलचे माजी माजी आयुक्त ललित मोदी (Lalit Modi) यांनी बीसीसीआयवर थेट आरोप केला आहे.
Rajpal Yadav : कर्जावरून थट्टा अन् सलमान खानचा पाठिंबा.! राजपाल यादव VIDEO पोस्ट करत म्हणाला…
या घटनेनंतर अनेक चाहत्यांनी राजपाल यादव ( Rajpal Yadav )यांच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी विनोद करताना कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याची खिल्ली उडवू नये, अशी मागणी केली.
Amaravati Capital : अखेर अमरावती झाली ‘या’राज्याची अधिकृत राजधानी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Amaravati Capital : आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा २०२६ नुसार अमरावती ही आता राज्याची अधिकृत राजधानी आहे. ६ एप्रिल रोजी केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना काढली आहे.

28 C