मोहित सोमण: देशातील बड्या खाजगी बँकेपैकी एक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. बँकेच्या एकूण निव्वळ अँडव्हान्स/कर्ज (End of Period EOP) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १६% वाढ झाल्याचे बँकेने एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले. त्यामुळे डिसेंबर २०२४ मधील ४६२६८८ कोटींच्या तुलनेत या डिसेंबरमध्ये ४८०२२९ कोटींवर वाढ झाल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे जी १६% वाढ होती. यासह बँकेच्या आकडेवारीनुसार, बँकेच्या एकूण सरासरी अँडव्हान्स/ठेवीत इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ३.०१% वाढ नोंदवली गेल्याचे बँकेने म्हटले. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ४५८६१४ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ५२६०२५ कोटींवर वाढ नोंदवली आहे.यासह बँकेच्या सरासरी कासा ठेवीत (Average CASA Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर ४.०९% किरकोळ वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या १९०८७१ कोटी रुपये तुलनेत या डिसेंबरमध्ये २०७९५५ कोटीवर वाढ नोंदवली आहे. यासह बँकेच्या एकूण मुदतोत्तर (Total Deposits End of Period) इयर ऑन इयर बेसिसवर ०.२% किरकोळ वाढ झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या २००४१२ कोटी रुपये तुलनेत या डिसेंबरमध्ये २०७९५५ कोटीवर वाढ नोंदवली आहे.आज बँकेच्या शेअर्समध्ये ०.१३% घसरण झाल्याने शेअर २१९२.३० रूपयांवर व्यवहार करत होता. गेल्या ५ दिवसात बँकेच्या शेअर्समध्ये २.०८% वाढ झाली असून गेल्या महिनाभरात बँकेच्या शेअर्समध्ये १.७४% घसरण झाली आहे. संपूर्ण वर्षभरात बँकेच्या २३.१९% वाढ झाली असून इयर टू डेट (YTD) मात्र ०.२४% घसरण नोंदवली आहे.
महावितरणकडून वीज क्षेत्राचे खासगीकरण; 13 मंडळांत फ्रेंचायझी, मुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप महावितरणच्या १३ मंडळांतील वीज वितरणाची जबाबदारी खासगी कंपन्यांना फ्रेंचायझी तत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. या निर्णयामुळे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगार संघटनांना दिलेल्या “खासगीकरण न करण्याच्या” आश्वासनाचा भंग केल्याचा आरोप ‘महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन’ने केलाय. महावितरणने फ्रेंचायझी दिलेल्या मंडळांमध्ये जालना, छत्रपती […] The post Today TOP 10 News: महावितरणकडून वीज क्षेत्राचे खासगीकरण, बिनविरोध निवडीविरोधात हायकोर्टात याचिका, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर.. वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या… appeared first on Dainik Prabhat .
Shivraj Singh Chouhan : जी-राम-जी बाबत काँग्रेसकडून दिशाभूल; शिवराज सिंह चौहान यांचे वक्तव्य
नवी दिल्ली : मनरेगा योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला होता. त्यामुळेच काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचा व्हीबी-जी-राम-जी या नवीन योजनेला विरोध होता. अर्थातच हा विरोध हा राजकारणाने प्रेरित आहे, असे प्रतिपादन ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले. ही योजना भारतीय गरिबांना फायदा होईल, अशा वैशिष्ट्यांसह अद्ययावत करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. १० […] The post Shivraj Singh Chouhan : जी-राम-जी बाबत काँग्रेसकडून दिशाभूल; शिवराज सिंह चौहान यांचे वक्तव्य appeared first on Dainik Prabhat .
आता भाजपात बंड होणार? मुख्यमंत्र्यांविरुद्ध एक गट सक्रीय, बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, भाजपने निवडणुकांपूर्वीच मोठी आघाडी घेतल्याचा दावा केला आहे. कल्याण-डोंबिवलीसह काही महापालिकांमध्ये महायुतीचे सुमारे ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. मनसेने न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली असतानाच काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री […] The post आता भाजपात बंड होणार? मुख्यमंत्र्यांविरुद्ध एक गट सक्रीय, बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ appeared first on Dainik Prabhat .
Election 2026 : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुतीच्या तब्बल ७० जागा बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मात्र, हा विजय लोकशाही मार्गाने नसून धमक्या आणि पैशांच्या जोरावर मिळवल्याचा आरोप करत मनसे आणि काँग्रेसने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेमुळे आता बिनविरोध निवडणुकांच्या निकालावर टांगती तलवार […] The post Election 2026 : महापालिका निवडणुकांत ‘बिनविरोध’वरून नवा राडा.! मनसेची हायकोर्टात धाव, असीम सरोदेंनी स्पष्टच सांगितलं…. appeared first on Dainik Prabhat .
Hingoli News : पानकनेरगाव येथील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यासाठी ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे गायरान जमिनीवर प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात गावकऱ्यांनी आज (५ जानेवारी २०२६) सकाळी १० वाजता सेनगाव-रिसोड महामार्गावरील पानकनेरगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलन एवढे तीव्र होते की, आंदोलकांनी “आम्हाला गोळ्या घाला, पण मागे हटणार नाही” अशी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. नायब तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरते […] The post Hingoli News : पानकनेरगाव येथील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यासाठी ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळखली जाणारी एचडीएफसी बँक (HDFC Bank) आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर बँकेच्या व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेतील अँडव्हान्स अथवा कर्जात ९% वाढ झाल्याचे बँकेने जाहीर केले आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये बँकेने दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँकेच्या गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या २६२७६ अब्जावरून या डिसेंबर महिन्यात २८६३९ अब्जावर वाढ झाली आहे. तसेच बँकेच्या एकूण सरासरी ठेवीत (Average Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या २४५२८ अब्जावरून या डिसेंबरपर्यंत १२.२% वाढ झाली असून ते २७५२४ अब्जावर पोहोचल्याचे बँकेने आकडेवारीत स्पष्ट केले आहे.उपलब्ध माहितीनुसार, बँकेच्या मुदतठेवीत (Term Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या डिसेंबरमधील १६३५२ अब्ज रूपयांवरून या डिसेंबरपर्यंत १३.४ वाढ झाली असल्याने ते १८५३९ अब्जावर पोहोचले. बँकेच्या कासा ठेवीत (CASA Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर ९.९% वाढ झाली. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या ८१७६ अब्जाच्या तुलनेत या डिसेंबरमध्ये ८९८४ अब्जावर वाढ झाली. तर बँकेच्या एकूत मुदत ठेवीत (Term Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या डिसेंबरमधील १६३५२ अब्ज रूपयावरून १३.४% वाढ नोंदवल्याने या डिसेंबरमध्ये ठेवी १८५३९ अब्जावर पोहोचल्या आहेत.बँकेच्या कालावधी कासा ठेवीत (Period End CASA Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर १०.१% वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या ८७२७ कोटींच्या तुलनेत या डिसेंबरमध्ये ९६१० अब्जावर पोहोचल्या आहेत. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत बँकेच्या मुदत ठेवी अंदाजे १८९८५ अब्ज होत्या, ज्या ३१ डिसेंबर २०२४ रोजीच्या १६९११ अब्जच्या तुलनेत सुमारे १२.३% वाढ नोंदवत आहेत. बँकेच्या मजबूत निकालानंतरही शेअर्समध्ये आज २.३१% घसरण झाल्याने प्रति शेअर अखेरच्या सत्रात ९७८.५० रूपयाला स्थिरावला आहे. ब्रोकरेजने बँकेच्या आर्थिक फंडांमेटलमध्ये काही प्रश्न उपस्थित केल्याने शेअरला गुंतवणूकदारांनी नकारात्मक कौल दिला. उत्कृष्ट कामगिरी असून विश्लेषकांनी शेअरच्या घसरणीमागील मुख्य कारण म्हणून कर्ज-ठेव गुणोत्तर (LDR) आहे. या तिमाहीत LDR मध्ये ५० बेसिस पॉइंट्सची वाढ होऊन ते जवळपास ९९.००% झाले आहे. गेल्या ५ दिवसात बँकेच्या शेअर्समध्ये १% तर १ वर्षात बँकेच्या शेअर्समध्ये २.४७% घसरण झाली आहे. तर संपूर्ण वर्षभरात बँकेच्या शेअर्समध्ये मात्र १४.४१% वाढ झाली असून इयर टू डेट (YTD) बेसिसवर बँकेच्या शेअर्समध्ये १.७२% घसरण झाली आहे.
Supreme Court : सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण आणि गुणवत्तेवर सुरू असलेल्या दीर्घकालीन वादाला सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत पूर्णविराम दिला आहे. आरक्षित प्रवर्गातील (SC/ST/OBC) उमेदवारांनी ओपन कॅटेगरीसाठी ठरवलेले कटऑफ गुण मिळवले असतील, तर त्यांना ओपन कॅटेगरीतील जागांवर नियुक्तीचा पूर्ण अधिकार आहे, असा स्पष्ट निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने […] The post Supreme Court : सरकारी नोकरीत मेरिटला प्राधान्य! ओपन कॅटेगरीच्या जागांवर SC/ST/OBC चाही हक्क; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
Election 2026 : बिनविरोध निवडणुकीचे निकाल राखून ठेवा.! मनसेची राज्य निवडणूक आयोगाला विनंती
Raj Thackeray । Election 2026 – ठाणे आणि राज्यात इतर महानगरपालिकांमध्ये निवडणुकांपूर्वी बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्याची विनंती मनसेने राज्य निवडणूक आयोगाला केली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. राज्यभरात १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांपुर्वी भाजप आणि महायुतीच्या मित्रपक्षांनी ६८ जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. तथापि, विरोधी पक्षांनी आरोप […] The post Election 2026 : बिनविरोध निवडणुकीचे निकाल राखून ठेवा.! मनसेची राज्य निवडणूक आयोगाला विनंती appeared first on Dainik Prabhat .
BJP News : पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल ‘या’जिल्ह्यात भाजपच्या 22 कार्यकर्त्यांची हकालपट्टी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे महानगरपालिका निवडणुकांपूर्वी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल भाजपच्या 22 कार्यकर्त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. भाजप या ठिकाणी महानगरपालिकेत ९३ जागांवर निवडणूक लढवत आहे. येथील काही कार्यकर्ते उमेदवारी जाहीर झाल्यामुळे नाराज होते. पक्षाने एक बैठक घेऊन २२ कार्यकर्त्यांचे सदस्यत्व निलंबित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या […] The post BJP News : पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल ‘या’ जिल्ह्यात भाजपच्या 22 कार्यकर्त्यांची हकालपट्टी appeared first on Dainik Prabhat .
जामखेड : जामखेड तालुक्यातील जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्गावरील खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे काम गेल्या काही काळापासून अत्यंत संथ गतीने सुरू असून अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. या रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी, विद्यार्थी तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ठिकठिकाणी […] The post Jamkhed News : जामखेड–सौतडा राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता तातडीने पूर्ण करा; अन्यथा… नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा appeared first on Dainik Prabhat .
Navi Mumbai Crime : मुलगीच्या प्रेमात पडला अन् झाल अपहरण,२० लाखोची खंडणीचा असा थरारक प्रकार..
Navi Mumbai Crime : सोशल मिडीयावरुन मैत्री करत प्रेमाच्या जाळ्यात फसवलं अन् मुलाचा अपहरण करत लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी असा थरारक प्रकार नवी मुंबईत उघडकीस आला आहे.इन्स्टाग्राम वरुन युवकाला फॅालो रिक्वेस्ट पाठवत व त्याच्याशी मैत्री करत मुलगी असल्याचे भासवून चार लोकांच्या टोळीने त्याच्याशी चॅटींग करत त्याला कल्याण पुर्व येथे भेटीस बोलवुन त्याच अपहरण केलं.व त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना व्हॉट्सॲप व्हॉइस मेसेजद्वारे तब्बल 20 लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली.पण मात्र, नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांमध्ये चौघांना अटक करत मुलाची सुखरूप सुटका केली.घाबरलेल्या पालकांनी तातडीने रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हे शाखा कक्ष-१ च्या पथकाने तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ज्या कारने मुलगा गेला होता, त्या कार चालकाला शोधून काढलं. चालकाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी नांदिवली येथील ठिकाणावर छापा टाकला आणि मुलाची सुटका केली.या प्रकरणात पोलिसांनी प्रदीपकुमार जयस्वाल , विशाल पासी , चंदन मौर्या आणि सत्यम यादव या चौघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बँक ऑफ अमेरिकेकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे 'कौतुक'भारताचे जीडीपी भाकीत ७% वरून ७.६% पातळीवर बदलले
प्रतिनिधी: बँक ऑफ अमेरिका (Bank of America BoFA) या बँकेकडून भारतीय अर्थव्यवस्थेची प्रशंसा करण्यात आली आहे. सरकारने अर्थव्यवस्था मजबूत,वेगवान धोरणात्मक निर्णयामुळे अर्थव्यवस्था सुस्थितीत असल्याचे बोफाने आपल्या अहवालात नमूद केले. त्यामुळे मागच्या अहवालातील ७% जीडीपी भाकीत (GDP Forecast) बदलून ते ७.६% पातळीवर बदलण्यात आल्याचे अहवालाने म्हटले आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्ष २०२७ मध्ये ६.५% वरून ६.८% पातळीवर वाढवण्यात आले आहे. जीएसटी कपातीनंतर मोठ्या प्रमाणात भारतीय वित्तीय बाजारात क्रेडिट ग्रोथ मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढलेल्या सायकलचा लाभ बाजारात होत असताना मोठ्या प्रमाणात जीडीपीत सातत्याने सुधारणा होताना गेल्या तीन तिमाहीत आकडेवारीतून स्पष्ट झाले होते. याच पार्श्वभूमीवर बोफाने सरकारच्या परिवर्तनशील निर्णयासह वाढलेले इंधन वापर, वाढलेली ऑटोमोबाईल विक्री तसेच क्रेडिट ग्रोथ या आधारे भारतातील अर्थव्यवस्था तेजीने वाढत असल्याचे म्हटले.यापूर्वीच भारत सरकारच्या आकडेवारीप्रमाणे सप्टेंबर तिमाहीत भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product GDP) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ८.२% इतकी अनपेक्षित वाढ झाली होती. बोफाच्या मते वित्तीय पतधोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केलेल्या वारंवार दरकपातीचा फायदा बाजारातील वाढीत झाल्याचे अहवालात म्हटले. अहवालाच्या आधारे, भारताने वित्तीय तूटी (Fiscal Deficit) मधील शिस्तबद्धता व बाजारातील अस्थिरतेत सुरू ठेवलेली निर्यात यांचाही फायदा भारतातील अर्थव्यवस्थेला झाला.भारत सरकार फेब्रुवारी महिन्यात जीडीपीची नवी सिरीज सुरु करणार आहे. ज्यामध्ये २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५ या तिन्हीची आकडेवारी जाहीर करण्यात येईल असे सांगितले जात आहे. अहवालाच्या मते,हे अपग्रेड लवचिक उपभोग (Flexibile Consumption, वाढती गुंतवणूक आणि विवेकपूर्ण धोरण व्यवस्थापनामुळे प्रेरित झालेल्या मजबूत मूलभूत आर्थिक सुधारणेचे प्रतिबिंब आहे.सरकारकडून देण्यात आलेले सततची चलनविषयक सुलभता आणि राजकोषीय प्रोत्साहन या सकारात्मक वाटचालीस कायम ठेवतील अशी अपेक्षा बोफाला वाटते ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या उदयोन्मुख बाजारपेठेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी भारतीय इक्विटी आकर्षक ठरू शकतात असे मतही बोफाने आपल्या अहवालात नोंदवले.दरम्यान अहवालातील माहितीनुसार, संभाव्य जागतिक व्यापार संघर्ष, भूराजकीय धोके आणि देशांतर्गत महागाईचा दबाव वाढीच्या गतीला खीळ घालू शकतात. धोरणातील कोणताही बदल किंवा जागतिक मागणीतील लक्षणीय मंदी गुंतवणूकदारांच्या भावनांना धक्का देऊ शकते आणि निर्यात केंद्रित क्षेत्रांवर परिणाम करू शकते. शिवाय युएस -भारत यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करार ही एक चिंतेची बाब अर्थव्यवस्थेसाठी असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.संरचनात्मक (Structural) अडथळे आणि वाढती भूराजकीय बाह्य अनिश्चितता पाहता ही वाढ सातत्याने ७% पेक्षा जास्त राखणे आव्हानात्मक अहवालानुसार ठरू शकते. धोरणात्मक समर्थनाच्या दीर्घकालीन परिणामकारकतेसाठी आणि संभाव्य महागाईच्या परिणामांसाठी त्याच्या प्रभावावर काळजीपूर्वक लक्ष ठेवणे आवश्यक आहे असेही मत अहवालात नोंदवण्यात आले आहे. यासह प्रामुख्याने बोफा अहवालातील माहितीनुसार, वाढीसोबतच तरलता (Liquidity) आणि महागाई व्यवस्थापन करण्यासाठी आरबीआयची भूमिका महत्वाची ठरेल.
माणगावात मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन
२०० दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय मोफत.आयोजकांची माणगाव मध्ये पत्रकार परिषदेतून माहिती.माणगाव : रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो यांच्या निधीतून आयोजित भारत विकास परिषद कोथरूड व दिव्यांग केंद्र, पुणे तर्फे २०० दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय मोफत बसविण्यासाठी मोजमाप शिबिर माणगाव येथे रविवार दि. ०१ फेब्रुवारी रोजी वनवासी आश्रम शाळा, उतेखोल येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.भारत विकास परिषद ही सेवा व संस्कार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारी राष्ट्रव्यापी संघटना आहे. प्रेरणास्थान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे.दिव्यांगाना कृत्रिम अवयव बसविणे हा प्रमुख राष्ट्रव्यापी सेवा प्रकल्प आहे. आणि भारत विकास परिषद आणि संलग्न संघटना कार्यरत आहेत.भारतातील १३ दिव्यांग केंद्रांपैकी महाराष्ट्रातील कायमस्वरूपी पुणे येथील दिव्यांग केंद्र गेल्या २५ वर्षापासून अखंड कार्यरत आहे. भारत विकास परिषदेच्या महाराष्ट्र स्तरावर मोफत दिव्यांग शिबीर घेणाऱ्या दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे तर्फे दरवर्षी सुमारे ५ हजार दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय, हात व कॅलिपर बसविण्यात येतात. तसेच सदर दिव्यांग केंद्रातर्फे एपिल २०२५ मध्ये एकाच शिबिरात ८९२ दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवून जागतिक विक्रम केला आहे त्याची नोद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली. यांच्या निधीतून हे मोफत दिव्यांग शिबिर आयोजित केले आहे. रोटरी क्लब ही अनेक सामाजिक कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संस्था असून रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो यांच्या निधीतून हे मोफत दिव्यांग शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माणगाव तालुका कार्यवाह अजित शेडगे, यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विश्वस्त व दिव्यांग केंद्रप्रमुख विनय खटावकर यांनी शिबिराच्या संपूर्ण नियोजनाची आणि आधुनिक मॉडयूलर पायाविषयी माहिती दिली. माहिती देताना ते म्हणाले आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायाची कमर्शियल किमंत रु. ५० हजारापेक्षा जास्त असून असे कृत्रिम पाय ह्या शिबिरात २०० दिव्यांगांना मोफत देणार आहोत. परंपरागत जयपूर फूट पेक्षा हे आधुनिक मॉड्यूलर कृत्रिम पाय ऑटोफोल्ड असून वजनाने हलके आहेत. आधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय बसविल्यानंतर दिव्यांन व्यक्ती चालणे, पळणे, पोहणे, उडी मारणे, वाहन चालविणे व शेती कामे इ. प्रकारच्या दैनंदिन क्रिया करू शकतात तसेच मधुमेही रुग्णांना देखील या पायाचे खूप फायदे आहेत.त्याबाबत तज्ञांमार्फत त्यांना मार्गदर्शनही केले जाते.हे शिबीर रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो यांच्या निधीतून आयोजित भारत विकास परिषद कोथरूड व दिव्यांग केंद्र पुणे तर्फे १ फेब्रुवारी २०२६ सकाळी ९ ते १२ या वेळेत वनवासी कल्याण आश्रम दत्तनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.माणगाव परिसरातील आणि रायगड जिल्हा व जवळपासच्या जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना विनंती आहे की त्यांनी शिबिरासाठी फोन द्वारे पूर्व नोंदणी करावी. यासाठी विनोद ९८८११३८०५२ चंद्रशेखर ९८२३०२४२३२ यांना नोंदणी साठी संपर्क करावयाचा आहे. दिव्यांग व सोबती यांचेसाठी मोफत भोजन चहा इ. सोय करण्यात आली आहे. तसेच दिव्यांगासाठी वाहन व्यवस्था (पिक अप) माणगाव रेल्वे स्टेशन व माणगाव एस टी स्टँड येथून करण्यात आली आहे.रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोचे प्रोजेक्ट कन्व्हेनर आर्या पळसुले यांनी शेवटी या पत्रकार परिषदेत उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
आंध्र प्रदेशात ONGC च्या तेलविहिरीतून गॅस गळती; परिसरात हाय अलर्ट, गावकऱ्यांचे स्थलांतर
नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातील कोनासीमा जिल्ह्यात ओएनजीसीच्या (ONGC) एका तेलविहिरीतून मोठ्या प्रमाणावर गॅस गळती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गळतीमुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली असून, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. दुरुस्ती दरम्यान झाला स्फोट मिळालेल्या माहितीनुसार, कोनासीमा जिल्ह्यातील राजोल भागातील इरुसुमंडा गावात ओएनजीसीची एक तेलविहीर आहे. या विहिरीतून काही काळ […] The post आंध्र प्रदेशात ONGC च्या तेलविहिरीतून गॅस गळती; परिसरात हाय अलर्ट, गावकऱ्यांचे स्थलांतर appeared first on Dainik Prabhat .
BMC Election : मुंबईकरांसाठी काँग्रेसचा स्वतंत्र जाहीरनामा; बेस्टसाठी मांडली ठोस योजना
BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबईकरांसाठी मोठी राजकीय खेळी करत ‘बेस्ट’साठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मुंबईची दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टचा कायापालट करण्यासाठी काँग्रेसने ठोस आणि व्यापक ‘ब्लू प्रिंट’ मांडली आहे. ‘बेस्ट ही नफा कमावणारी संस्था नसून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी असलेली सार्वजनिक सेवा आहे,’ असे ठामपणे सांगत काँग्रेसने बेस्टच्या खासगीकरणाला पूर्णविराम […] The post BMC Election : मुंबईकरांसाठी काँग्रेसचा स्वतंत्र जाहीरनामा; बेस्टसाठी मांडली ठोस योजना appeared first on Dainik Prabhat .
Shreyas Iyer Appointed Mumbai Team Captain : भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून निवड झालेल्या श्रेयस अय्यरला मोठी जबाबदारी मिळाली आहे. श्रेयसला आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये उर्वरित साखळी सामन्यांसाठी मुंबईची धुरा सांभाळेल. श्रेयस […] The post Shreyas Iyer Captain : मोठी बातमी! अचानक बदलला कर्णधार; श्रेयस अय्यरला मिळाली मोठी जबाबदारी, ‘हा’ खेळाडू बाहेर appeared first on Dainik Prabhat .
ठाणे : या वर्षाच्या अखेरपर्यंत एमएसआरटीसीच्या ताफ्यात ८,००० नवीन बसेस समाविष्ट केल्या जातील यासाठी सुरू असलेली निविदा प्रक्रिया वेगवान करावी, असे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. सरनाईक यांनी कोणत्याही विलंबाच्या बाबतीत कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला. त्यांनी परीवहनच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय तरतुदींच्या वापराबाबत एका उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. […] The post Pratap Sarnaik : नविन बसेससाठी निविदा प्रक्रिया वेगवान करा; परिवहन मंत्री सरनाईक यांचे अधिकाऱ्यांना निर्देश appeared first on Dainik Prabhat .
BMC Election 2026 – महायुतीचे राजकारण मुंबई प्रथम यावर आधारित आहे. मुंबईचा महापौर हा ‘मराठी माणूस’ असेल आणि तो ‘वंदे मातरम’ म्हणणारा असेल, असे शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांनी म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना शायना एनसी म्हणाल्या, मुंबईचा महापौर तोच असेल जो ‘वंदे मातरम’ म्हणेल. महायुतीचा महापौर तोच असेल ज्याला शहरावर प्रेम आहे आणि विकासाची इच्छा […] The post BMC Election 2026 : “मुंबईचा महापौर ‘वंदे मातरम’ म्हणणारा ‘मराठी माणूस’ असेल”; शिवसेना नेत्याचं विधान चर्चेत.! appeared first on Dainik Prabhat .
Share Market: सेन्सेक्स 322 अंकांनी आणि निफ्टी 78 अंकांनी घसरला, ‘या’शेअर्सना झाले मोठे नुकसान
Share Market: २०२५ सालाचा निरोप उत्साहात घेणाऱ्या भारतीय शेअर बाजारासाठी नव्या वर्षातील सोमवारचा पहिला व्यवहार दिवस निराशाजनक ठरला. अत्यंत चढ-उताराच्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले. व्यवहारादरम्यान निफ्टीने आपल्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता, मात्र त्यानंतर आलेल्या नफावसुलीच्या लाटेमुळे बाजाराला सावरता आले नाही. […] The post Share Market: सेन्सेक्स 322 अंकांनी आणि निफ्टी 78 अंकांनी घसरला, ‘या’ शेअर्सना झाले मोठे नुकसान appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: अखेर आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अपेक्षित घसरण झाली आहे. सेन्सेक्स ३२२.३९ अंकाने घसरला असून ८५४३९.६२ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी ७८.२५ अंकाने घसरत २६२५०.३० पातळीवर स्थिरावला आहे. आज बँक निफ्टीतील घसरण अधिक प्रमाणात वाढल्याने आज बँकेच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात प्राईज करेक्शन झाले. प्रामुख्याने आज युएस व्हेनेझुएला यांच्यातील हाराकिरीचा दबाव कायम असताना भूराजकीय घडामोडीचा फटका आशियाई बाजारासह भारतीय बाजारात बसला असताना मोठ्या प्रमाणात तेल व गॅस यासह आयटी शेअर्समध्ये सेल ऑफ झाल्यानेही बाजारात गुंतवणूकदारांना फटका बसला. दरम्यान बँक व मिड कॅप निर्देशांकातही ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाल्याने आज गुंतवणूकदारांनी सावधगिरीची भूमिका बाळगल्याचे स्पष्ट झाले आहे.व्यापक निर्देशांकातील निफ्टी २०० (०.२७%), मिडकॅप ५० (०.२३%), मिडकॅप १०० (०.२५%), निफ्टी १०० (०.२८%) निर्देशांकात घसरण कायम राहिली असून स्मॉलकॅपमध्ये वाढलेला गुंतवणूकदारांचा कल बघता स्मॉलकॅप २५० (०.२५%), निफ्टी स्मॉलकॅप २५० (०.२५%), स्मॉलकॅप ५० (०.४२%) निर्देशांकात आज वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात आज सर्वाधिक वाढ रिअल्टी (२.०५%), कंज्यूमर ड्युरेबल्स (१.०४%), मेटल (०.६१%), पीएसयु बँक (०.३९%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण आयटी (१.५०%), तेल व गॅस (१.०५%), फार्मा (०.३५%), हेल्थकेअर (०.४३%) निर्देशांकात झाली आहे.आशियाई बाजारात अखेरच्या सत्रात आज गिफ्ट निफ्टी (०.५४%) वगळता सर्वच निर्देशांकात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ निकेयी २२५ (३.२२%), स्ट्रेट टाईम्स (०.५२%), कोसपी (३.३२%), सेट कंपोझिट (१.५९%), शांघाई कंपोझिट (१.३६%) बाजारात झाली आहे. सकाळी संमिश्र प्रतिसाद देत असताना मोठ्या प्रमाणात आयटी, क्रूड तेलाच्या निर्देशांकात सुधारणा झाल्याने आशियाई बाजारात अधिक सुधारणा झाली आहे. दरम्यान युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात आज तीनपैकी दोन निर्देशांकात तेजी दिसत आहे. डाऊ जोन्स (०.१३%), एस अँड पी ५०० (०.१९%) बाजारात किरकोळ वाढ कायम राहिली असून नासडाक कंपोझिट निर्देशांकात किरकोळ घसरण झाली आहे.आज कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही मोठ्या प्रमाणात चढउतार सुरू झाली असताना मात्र युएसकडून व्हेनेझुएलातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात वाढ होण्याची शाश्वती निर्माण झाल्यावर तेलाच्या फ्युचर निर्देशांकात मोठी घसरण झाली होती. कमोडिटीतील दबाव वाढल्याने डॉलरच्या निर्देशांकात स्थैर्य आले होते. परिणामी डॉलरच्या तुलनेत रूपयातही आज घसरण झाली. आगामी काळात कच्च्या तेलाच्या बाबतीत मी कच्च्या तेलावरून नाराज आहे हे माझ्या मित्राला (पीएम मोदी) यांना माहिती आहे असा गर्भित इशारा दिल्याने घरगुती गुंतवणूकदारांकडून आगामी टॅरिफचा साशंकतेमुळे बाजारात नकारात्मक कौल दिला आहे. आधीच एच १ बी व्हिसा निर्णयामुळे होरपळून निघालेल्या आयटी तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज मोठे सेल ऑफ झाले. दरम्यान आज संरक्षण क्षेत्राच्या (Defence Stocks) शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याने घसरण एका मर्यादेत राहिली आहे. दुसरीकडे कमोडिटीतील दबाव वाढला असताना मोठ्या प्रमाणात सोन्याचांदीच्या किंमतीत वाढ झाली. अंतिमतः परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात सेल ऑफ केल्याची शक्यता आजही निर्माण झाल्याने बाजारात गुंतवणूकदारांना नुकसान झाले.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ नेटवेब टेक्नॉलॉजी (८.२८%), ओला इलेक्ट्रिक (७.४३%), मेट्रोपॉलिस हेल्थ (६.०६%), सोभा (७.७९%), एसव्हीजेन (५.५५%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (४.६३%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण एथर एनर्जी (७.६५%), सफायर फूडस (७.१०%), प्रिमियर एनर्जीज (६.८७%), कमिन्स इंडिया (३.८३%), आयडीबीआय (३.२८%), चालेट हॉटेल (३.०९%), वारी एनर्जीज (५.३०%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' भारतीय १० वर्षांच्या बाँड उत्पन्नात सरकारी कर्ज घेण्याची अपेक्षा दिसून येत असल्याने २०२६ च्या पहिल्या पूर्ण आठवड्याची सुरुवात सावधगिरीने झाली. सकारात्मक बाब म्हणजे, नोव्हेंबरच्या घसरणीनंतर डिसेंबरच्या जीएसटी संकलनात सुधारणा दिसून आली, तर उत्पादन पीएमआय मध्यम झाला परंतु विस्ताराच्या क्षेत्रात स्थिर राहिला. बँक क्रेडिट/प्रगतीतील सुरुवातीच्या तिमाहीतील ट्रेंड मजबूत गती दर्शवितात, जे एकूण आशावादाला पाठिंबा देतात. जागतिक स्तरावर, गुंतवणूकदार अमेरिकेच्या प्रमुख आर्थिक डेटा आणि फेड मार्गदर्शनाची वाट पाहत आहेत, तर बीओजेने त्यांच्या कडक भूमिकेची पुष्टी केली आहे. पुढे पाहता, तिमाहीतील कमाई लक्ष केंद्रित करेल आणि जवळच्या काळातील बाजार ट्रेंडचे मार्गदर्शन करेल, भावना मध्यम सकारात्मक राहतील.'आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'भारतीय शेअर बाजारांनी नवीन विक्रमी उच्चांक गाठला, परंतु गुंतवणूकदार सावध झाल्यामुळे उच्च स्तरांवरून विक्रीचा दबाव दिसून आला. बेंचमार्क निफ्टी निर्देशांकाने सत्रादरम्यान २६३७३ पातळीचा नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला; तथापि, उच्चांकाजवळ नफावसुली झाल्यामुळे निर्देशांक खाली घसरला आणि सत्राच्या अखेरीस २६२०० पातळीच्या महत्त्वाच्या आधार पातळीची चाचणी घेतली. क्षेत्रीय आघाडीवर, रिअल्टी, कंझ्युमर ड्युरेबल्स, एफएमसीजी, मेटल्स आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्सनी चांगली कामगिरी केली, तर आयटी, तेल आणि वायू, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये कमजोरी दिसून आली. आठवड्याच्या शेवटी अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर वाढलेल्या भू-राजकीय तणावामुळे बाजारातील सहभागी मोठ्या प्रमाणावर तटस्थ राहिल्याने बाजारातील भावना सावध राहिली.डेरिव्हेटिव्ह्ज सेगमेंटमध्ये, बाजाराची स्थिती मंदीवाल्यांच्या बाजूने झुकलेली होती, ज्यात ७४ शेअर्स वाढले तर १३९ शेअर्स घसरले. प्रीमियर एनर्जीज, वारी एनर्जीज, पीजीईएल, ३६० वन आणि ओएनजीसीमध्ये सर्वाधिक ओपन इंटरेस्टची वाढ नोंदवली गेली. निफ्टी ऑप्शन्समध्ये, २६३०० आणि २६४०० स्ट्राइक किमतींवर महत्त्वपूर्ण कॉल ओपन इंटरेस्ट दिसून आला, तर पुट बाजूला, सर्वाधिक ओपन इंटरेस्ट २६२०० आणि २६००० स्ट्राइकवर केंद्रित होता. निफ्टी पुट-कॉल रेशो (PCR) ०.८९ होता.'आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'सोमवारच्या सत्रात बँक निफ्टी निर्देशांकामध्ये उच्च स्तरांवरून नफावसुली दिसून आली, ज्यामुळे दैनंदिन चार्टवर एक मंदीची कँडलस्टिक तयार झाली. तथापि, निर्देशांकाने घसरत्या ट्रेंडलाइनचा ब्रेकआउट दिला असून तो त्याच्या अल्पमुदतीच्या १०- दिवसांच्या आणि २०- दिवसांच्या ईएमएच्यावर टिकून राहिला असल्याने, व्यापक चार्ट रचना सकारात्मक राहिली आहे. याव्यतिरिक्त, आरएसआय बुलिश क्रॉसओवरमध्ये आहे, जे गतीमधील अंतर्गत ताकद दर्शवते. त्यामुळे, जोपर्यंत बँक निफ्टी २०-दिवसांच्या ईएमएच्या (Exponential Moving Average EMA) पातळीवर टिकून राहतो, तोपर्यंत सकारात्मक दृष्टिकोनासह 'घसरणीवर खरेदी करा' (बाय-ऑन-डिप्स) ही रणनीती अवलंबली जाऊ शकते. तात्काळ आधार (Immediate Support) ५९७०० पातळीवर आहे, तर प्रतिकार (Resistance) ६०५०० पातळीवर आहे आणि पोझिशनल आधार (Positional Support) ५९३०० पातळीजवळ दिसत आहे'आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'भूराजकीय तणावामुळे परकीय गुंतवणुकीचा ओघ कमी झाल्याने आणि सोन्या-चांदीच्या किमती वाढल्याने, रुपया डॉलरच्या तुलनेत ९ पैशांनी घसरून ९०.२७ वर व्यवहार करत होता, ज्यामुळे चलनावर दबाव वाढला. अमेरिकेत एडीपी रोजगार, बिगर-शेती वेतनपट, बेरोजगारी आणि सुरुवातीच्या बेरोजगारीच्या दाव्यांसह महत्त्वाच्या आर्थिक आकडेवारीचा आठवडा असल्याने, डॉलरमध्ये आणि पर्यायाने रुपयामध्ये अस्थिरता येण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात चलन ८९.७५–९०.६५ रूपयांच्या विस्तृत मर्यादेत दबावाखाली राहण्याची शक्यता आहे.'उद्याची गुंतवणूकदारांसाठी काय नवी स्ट्रॅटेजी?एलकेपी सिक्युरिटीज वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे - नवीन सर्वकालीन उच्चांक नोंदवल्यानंतर निर्देशांकात नफावसुली दिसून आली. नजीकच्या काळातील कल मजबूत राहिला आहे, कारण निफ्टी अलीकडील ब्रेकआउट पातळीच्यावर बंद झाला. आरएसआय (Relative strength)आणि मूव्हिंग एव्हरेजसारखे मोमेंटम इंडिकेटर्स सकारात्मक स्थिती कायम ठेवत आहेत. खालच्या बाजूला (Down Side) २६१७०–२६२०० पातळीच्या पातळीवर आधार आहे. २६१७० पातळीच्या खाली निर्णायक घसरण झाल्यास २६००० पातळीच्या दिशेने करेक्शनची शक्यता आहे. वरच्या बाजूला (Up Side) २६३७०–२६४०० पातळीच्या पातळीवर प्रतिरोध (Resistance) आहे.
शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाऊ शकणार नाहीत? ओवेसींच्या वक्तव्याने खळबळ
मुंबई: महाराष्ट्रातील राजकारण सध्या महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीने तापलेले असतानाच, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी एका नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत असून, त्यांच्याकडे पुन्हा निवडून येण्यासाठी आवश्यक आमदारांचे संख्याबळ नाही, असा दावा ओवेसी यांनी केला आहे. “पुन्हा राज्यसभेवर जाण्यासाठी पवारांना मोठी कसरत करावी […] The post शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाऊ शकणार नाहीत? ओवेसींच्या वक्तव्याने खळबळ appeared first on Dainik Prabhat .
Telangana । Eyebrow Coding – कधीकधी, भुवया उंचावण्यासारखी अगदी लहानशी हालचालही खूप काही सांगून जाते. तेलंगणातील जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील झेडपीएचएस महादेवपूर येथील मधू नावाच्या एका शिक्षकाने हेच सिद्ध केले आहे. मधू यांनी एक संवाद तंत्र विकसित केले आहे, ज्याद्वारे ते एकही शब्द न उच्चारता किंवा सांकेतिक भाषेचा वापर न करता, केवळ भुवयांच्या हालचालींद्वारे संदेश देऊ […] The post Eyebrow Coding : शिक्षक असावे तर असे.! गरजू लोकांसाठी विकसित केले ‘आयब्रो कोडिंग’; एकही शब्द न उच्चारता संदेश देता येणार appeared first on Dainik Prabhat .
Joe Root 41st Test Century : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या ‘ॲशेस’ (Ashes) कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना सिडनीत खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने आपल्या कसोटी कारकीर्दीतील ४१ वे शतक झळकावले आहे. या शतकाच्या जोरावर त्याने ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पॉन्टिंगचा मोठा विक्रम मोडला आहे. जो रुटने […] The post Joe Root Century : जो रुटचा सिडनीत शतकी धमाका! पॉन्टिंगचा मोडला विक्रम; आता सचिनचाही ‘हा’ रेकॉर्ड धोक्यात? appeared first on Dainik Prabhat .
कोयनानगर – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 5 जानेवारी 2010 रोजी झाली. व्याघ्र संरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पात बाहेरून वाघिणी आणल्या गेल्या आहेत. मात्र, वाघांसाठी कॉरिडॉर नाही, पुरेशा भक्ष्य प्रजाती नाहीत, मानव व वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनाच्या नियोजनाचा अभाव आणि इतर समस्या असल्याने, या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबा प्रकल्पातून आणलेल्या दोन […] The post सह्याद्री व्याघ्र प्रकल्पावर प्रश्नचिन्ह ! वाघ दत्तक, कॉरिडॉरचा पत्ताच नाही.. भक्ष्य प्रजाती सुद्धा अपुर्या appeared first on Dainik Prabhat .
अमेरिकेत भारतीय तरुणीची निर्घृण हत्या; आरोपी भारतात पळाल्याचा संशय, वडिलांची सरकारकडे मदतीसाठी साद
Indian Woman Killed In US: अमेरिकेतील मॅरीलँड राज्यामध्ये एका २७ वर्षीय भारतीय तरुणीची तिच्या राहत्या अपार्टमेंटमध्ये चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. निकिता गोडिशाला असे मृत तरुणीचे नाव असून ती मूळची तेलंगणाची रहिवासी होती. या प्रकरणी तिचा माजी रूममेट अर्जुन शर्मा (२६) याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. काय […] The post अमेरिकेत भारतीय तरुणीची निर्घृण हत्या; आरोपी भारतात पळाल्याचा संशय, वडिलांची सरकारकडे मदतीसाठी साद appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : सन २०२६ अखेर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ८ हजार नवीन बसेस दाखल होतील अशा पद्धतीने सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीने गतिमान करण्यात यावी. यामध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष मा. प्रताप सरनाईक यांनी दिला.ते एसटी महामंडळाच्या सन २०२५–२६ च्या अर्थसंकल्पीय निधीच्या वापराबाबत बोलावलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, आर्थिक सल्लागार गिरीश देशमुख तसेच संबंधित खातेप्रमुख उपस्थित होते.यावेळी मंत्री सरनाईक यांनी एसटीच्या विविध विभागांकडून सुरू असलेल्या संथ व कूर्मगती कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सन २०२५–२६ च्या अर्थसंकल्पात एसटीसाठी शासनाने २४६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र आर्थिक वर्ष संपण्यास अवघे तीन महिने शिल्लक असताना त्यापैकी सुमारे १६०० कोटी रुपये खर्चाविना परत जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.हा निधी सर्वसामान्य जनतेच्या करातून आलेला असून तो प्रवाशांच्या मूलभूत सुविधा — नवीन बसेस खरेदी, बसस्थानकांची उभारणी, दुरुस्ती व नूतनीकरण यासाठी वापरणे अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु बसेस खरेदी व बसस्थानकांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया गेल्या नऊ महिन्यांपासून रेंगाळल्यामुळे निधी खर्च होऊ शकलेला नाही, याला संबंधित विभागांचे अकार्यक्षम अधिकारी जबाबदार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.उर्वरित तीन महिन्यांत जास्तीत जास्त निधी खर्च करून प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा — नवीन बसेस, बसस्थानके, प्रसाधनगृहे आदींच्या निर्मितीसाठी आवश्यक निविदा व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रकल्पांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. प्रवाशांच्या सोयी-सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत एसटीचे आधुनिकीकरण वेगाने केले जाणार असून त्यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
मुंबई : राज्यातील १० महानगरपालिकांमध्ये तब्बल ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने, या प्रक्रियेला आक्षेप घेत मनसेच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ठाणे आणि कल्याणमधील बिनविरोध निवडीचा अहवाल तातडीने मागवून घेतला असून, ‘बिनविरोध’ निवडीप्रकरणी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात तीन याचिका दाखल केल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली.राज्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही निवडणूक आयुक्तांना ठाणे आणि कल्याणमधील स्थिती सांगितली. निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) ज्यापद्धतीने वागले, पैशांच्या लालसापोटी उमेदवार गायब करण्यात आले, उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर उमेदवार जातानाचे व्हिडिओ निवडणूक आयुक्तांना दाखवले. आमच्याकडे असणाऱ्या काही खासगी गोष्टीही त्यांना दाखवल्या. त्यानंतर त्यांनी तत्काळ ठाण्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलणे केले असून, या संपूर्ण गोष्टींचा अहवाल आजच्या आज मागवला आहे. त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी कशी पुढे जाईल? याबाबत आम्हाला पुन्हा बोलावून सांगणार आहेत, असे त्यांनी सांगितले.आयुक्तांनी किती बिनविरोध आलेत, याबाबत विचारले. मी त्यांना कल्याण-डोंबिवलीतील २१ आकडा सांगितला, तेव्हा त्यांचेही डोळे मोठे झाले. एका महत्त्वाच्या महानगरपालिकेत २१ जण बिनविरोध निवडून येणे, हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही घडले नाही. राज्य निवडणूक आयुक्तांनाही या सर्व प्रकाराचे गांभीर्य कळाले आहे, असे मला वाटते, असे अविनाश जाधव म्हणाले.मनसेची मागणी काय? संबंधित ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासावेत. उमेदवारांना केंद्राच्या बाहेर कोण घेऊन येत होते, ते कुठल्या पक्षाचे होते, याचीही तपासणी करावी. जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत निवडणुकीचे निकाल राखून ठेवावेत, अशा दोन मागण्यांसाठी आम्ही राज्य निवडणूक आयुक्तांकडे केल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. तसेच बिनविरोध प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात तीन याचिका दाखल केल्या आहेत. निवडून आलेल्या ७० उमेदवारांना विजय घोषित करण्याच्या प्रक्रियेला चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगिती द्यावी आणि निवृत्त अधिकारी किंवा उच्च न्यायालयाच्या निगराणीत या सगळ्या प्रकरणाची पुढील चौकशी व्हावी, अशी मागणी त्यात केली आहे, असे जाधव यांनी सांगितले.
मुंबई : “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना आता गर्दी होत नसल्याने ते शाखांना भेटी देत फिरत आहेत”, अशी बोचरी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केली. मुंबईकर त्यांच्या प्रलोभनांना बळी पडणार नसून, मुंबईसह राज्यातील जनता विकासाच्या मागे असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.राज्यातील १० महापालिकांमध्ये सत्ताधारी पक्षाचे ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याप्रकरणी मनसेच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगात तक्रार आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याविषयी माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, “नगरसेवक बिनविरोध निवडून आले म्हणून मनसेने न्यायालयात जाण्याची गरज नव्हती. निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे? जनतेला विकास होईल, असे वाटले म्हणून तर नगरसेवक बिनविरोध निवडून आले”, असा युक्तिवाद बावनकुळे यांनी केला.“नगरसेवक बिनविरोध निवडून येणे, हा चांगला पायंडा आहे. यापूर्वी राज्यात बिनविरोध सरपंच निवडून यायचे, तेव्हा आम्ही विरोध केला नाही. यामध्ये नियमांचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे”, असा प्रतिसवाल बावनकुळे यांनी केला. प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेविषयी बावनकुळे यांनी भाष्य केले. “प्रणिती शिंदे या कधीही भाजपच्या भेटीला आल्या नाहीत. त्या आमच्या संपर्कातही नाहीत. उगाच एखाद्याचे करिअर कशाला उद्ध्वस्त करता”, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
महानगरपालिका निवडणूक; आरटीओ मुंबई (मध्य) कार्यालय १४ आणि १५ जानेवारीला बंद
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) हे कार्यालय बुधवार, १४ जानेवारी २०२६ आणि गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांचे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कोणतेही नियमित कामकाज होणार नाही, अशी माहिती परिवहन विभागामार्फत देण्यात आली आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पंचायत व नगरपालिका निवडणुकीसाठी आवश्यक त्या कर्मचाऱ्यांचे, वास्तूंचे व वाहनांचे अधिग्रहण करण्याचे अधिकार संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार उप निवडणूक अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथील इमारत व परिसर दोन दिवसांसाठी अधिग्रहित केला आहे.त्यामुळे १४ व १५ जानेवारी २०२६ रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथील सर्व सेवा व कामकाज पूर्णतः बंद राहणार असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि संबंधित सेवांच्या पर्यायी तारखांना आपली कामे पुनर्नियोजित करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
मतदानाआधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात ३ हजार येणार? सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : सध्या राज्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा वेग आला आहे. १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यापूर्वीच सरकारने मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हफ्ते म्हणजे तीन हजार रुपये मतदानाच्याआधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. विधानसभा निवडणुकांप्रमाणे महापालिकेचा निकालातही ‘लाडकी बहीण’ योजना गेमचेंजर ठरणार की काय अशी चर्चा सुरू आहे. […] The post मतदानाआधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात ३ हजार येणार? सरकारचा मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
Narayan Rane : ‘मी एका उपशाखाप्रमुखाचा मर्डर करणार होतो, पण…’, नारायण राणेंचा धक्कादायक खुलासा
सिंधुदुर्ग : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठे शक्तिप्रदर्शन करताना भाजप नेते नारायण राणे यांनी कणकवली येथील कार्यक्रमात विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिले, तसेच एक जुना धक्कादायक किस्सा उघड केला. राणे म्हणाले, “या कार्यक्रमाचे आयोजन का केले याचा उद्देश मला सुरुवातीला समजलाच नव्हता. सर्वत्र ‘नारा […] The post Narayan Rane : ‘मी एका उपशाखाप्रमुखाचा मर्डर करणार होतो, पण…’, नारायण राणेंचा धक्कादायक खुलासा appeared first on Dainik Prabhat .
haven-1 space station – व्हॅस्ट ही एरोस्पेस कंपनी ‘हेवन-१’ नावाचे जगातील पहिले व्यावसायिक अंतराळ स्थानक तयार करत आहे. सध्या, कंपनीने मे २०२६ मध्ये प्रक्षेपण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे स्थानक अमेरिकेत तयार केले जात आहे आणि लोकांना पृथ्वीच्या निम्न कक्षेत राहण्यासाठी व काम करण्यासाठी जागा देणे हा त्याचा उद्देश आहे. ‘हेवन-१’ हे एक खाजगी अंतराळ […] The post haven-1 space station : मे २०२६ मध्ये झेपावणार जगातील पहिले प्रायव्हेट स्पेस स्टेशन; ‘हेवन-१’ अंतराळात कसे काम करणार? पाहा…. appeared first on Dainik Prabhat .
अमेरिकेतील सरकारी मदतीच्या यादीतून भारत बाहेर; भारतीय समुदाय ठरला सर्वात श्रीमंत!
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच १२१ देशांची एक महत्त्वाची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये अमेरिकेत स्थायिक झालेल्या विविध देशांतील नागरिकांना तिथल्या सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा (Welfare Support) तपशील दिला आहे. विशेष म्हणजे, या यादीत पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश यांसारख्या शेजारील देशांचा समावेश आहे, मात्र भारताचे नाव या यादीत कुठेही नाही. भारतीय […] The post अमेरिकेतील सरकारी मदतीच्या यादीतून भारत बाहेर; भारतीय समुदाय ठरला सर्वात श्रीमंत! appeared first on Dainik Prabhat .
Atharva Sudame : Ai चा वापर करून माझ्या नावानं…; PMPL वादानंतर अथर्व सुदामेची पहिली प्रतिक्रिया
Atharva Sudame : गणेशत्सवाच्यावेळी प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे एका रीलमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. रील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टोर्लसकडून टीका करण्यात आली होती.आता पुन्हा एकदा एका रीलमुळे अथर्व सुदामे अडचणीत सापडला आहे. यावेळी त्याला पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये व्हिडीओबाबत अथर्व सुदामेने […] The post Atharva Sudame : Ai चा वापर करून माझ्या नावानं…; PMPL वादानंतर अथर्व सुदामेची पहिली प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .
वेनेझुएलात युद्धजन्य परिस्थिती, पण भारताचा शेअर बाजार का पडला नाही? सोप्या भाषेत समजून घ्या…
मुंबई: सहसा जगात कुठेही युद्ध सुरू झाले की त्याचे चटके शेअर बाजाराला बसतात. पण वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केल्यानंतरही भारतीय शेअर बाजार (सेन्सेक्स-निफ्टी) सोमवारी ५ जानेवारी रोजी अगदी शांत होता. गुंतवणूकदारांमध्ये कोणतीही मोठी घबराट दिसली नाही. याची काही कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या नाहीत जेव्हा युद्ध होते, तेव्हा सर्वात आधी कच्च्या तेलाचे (Crude […] The post वेनेझुएलात युद्धजन्य परिस्थिती, पण भारताचा शेअर बाजार का पडला नाही? सोप्या भाषेत समजून घ्या… appeared first on Dainik Prabhat .
“तुम्हाला कुणी रोखले, मी सहा मुलांचा बाप..”; नवनीत राणांच्या विधानावर ओवैसी यांचा पललटवार
Navneet Rana | Asaduddin Owaisi – हिंदूंनीही कुटुंब नियोजनाचा विचार न करता तीन-चार मुले जन्माला घालायला हवीत असे भाजप नेत्या नवनीत राणा सांगतात. हे खरे आहे. त्यासाठी तुम्हाला कुणी रोखले आहे? मी स्वत: सहा मुलांचा बाप आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. महाराष्ट्रात दोनपेक्षा […] The post “तुम्हाला कुणी रोखले, मी सहा मुलांचा बाप..”; नवनीत राणांच्या विधानावर ओवैसी यांचा पललटवार appeared first on Dainik Prabhat .
Pune Gramin : बेट भागात सांस्कृतिक कार्यक्रम राजकीय समीकरणे बदलणार का?
शिरूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील बेट भाग सध्या राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू ठरला आहे. इच्छुक उमेदवारांकडून प्रचाराच्या पारंपरिक सभा, भित्तीपत्रके व घोषणांच्या पलिकडे जात सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला, मनोरंजन व जेवणावळींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा वेगळा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे बेट भागात सध्या राजकारणापेक्षा कार्यक्रमांचीच अधिक चर्चा रंगताना दिसत आहे. जिल्हा परिषद सदस्य पदासाठी […] The post Pune Gramin : बेट भागात सांस्कृतिक कार्यक्रम राजकीय समीकरणे बदलणार का? appeared first on Dainik Prabhat .
धर्मेंद्र यांच्या घरात खरंच पडली का फूट ? अखेर हेमा मालिनी स्पष्टच बोलल्या
Hema Malini On Dharmendra Separate Prayer Meet : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना गेल्या वर्षी देवाज्ञा झाली.९०व्या वाढदिवसाच्या अगदी १५ दिवस आधीच,२४ नोव्हेंबर २०२५ रोजी धर्मेंद्र यांचे मुंबईत राहत्या घरी निधन झालं. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.मात्र प्रकृती थोडी सुधारल्यावर त्यांना घरी हलवण्यात आले. अखेर काही दिवसांनी २४ तारखेला त्यांनी अखेरचा श्वास घेतला . त्यांच्या निधनानंतर दोन वेगवेगळ्या शोकसभा झाल्या. एक ताज लँड्समध्ये देओल कुटुंबाकडून शोकसभेचं आयोजन करण्यात आल होतं, तर त्याच दिवशी हेमा मालिनी यांच्या घरी पूजा आणि शोकसभा होती. या दोन शोकसभांवरून बरीच चर्चा झाली, तर्क-वितर्क व्यक्त करण्यात आले. ११ डिसेंबर रोजी हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी दिल्लीत आणखी एक शोकसभा ठेवली होती. वेगवेगळ्या शोकसभांनंतर धर्मेंद्र यांच्या दोन कुटुंबातील नातं, तणाव यासंदर्भातील अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. अखेर आता हेमा मालिनी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या सर्वांवर भाष्य केलं आहे.धर्मेंद्र यांच्या निधनानंतर वेगवेगळ्या शोकसभा का?मुलाखतीत हेमा मालिनी या २ वेगवेगळ्या शोकसभांबद्दल बोलल्या. ” हा आमच्या घरातील वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही आपापसांत बोललो. माझे सहकारी वेगळे लोक असल्याने मी माझ्या घरी प्रार्थना सभा आयोजित केली. मी राजकारणात असल्याने मग दिल्लीत प्रार्थना सभा घेतली आणि राजकीय क्षेत्रातील माझ्या मित्रांसाठी तिथे प्रार्थना सभा घेणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. मथुरा हा माझा मतदारसंघ आहे आणि तिथले लोक धर्मेंद्र यांचे चाहते आहेत. म्हणून मी तिथेही प्रार्थना सभा आयोजित केली. मी जे केले त्याबद्दल मी आनंदी आहे” असं हेमा मालिनी यांनी नमूद केलं.Dharmendra : मृत्यूपूर्वी धर्मेंद्र यांचा मोठा निर्णय! ना सनी, बॉबी, ना ईशा, अहाना… धर्मेंद्र यांनी गावची जमीन कुणाला दिली? असं का केलं?२७ तारखेला झालेल्या देओल कुटुंबाच्या प्रार्थना सभेला सलमान खान, रेखा, विद्या बालन, ऐश्वर्या राय बच्चन आणि इतर अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. तर दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, जनपथ, दिल्ली येथे झालेल्या शोकसभेला अमित शहा, निर्मला सीतारामन, किरेन रिजिजू, ओम बिर्ला, कंगना रणौत, रणजीत, अनिल शर्मा आणि इतर राजकारणी आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी हजेरी लावली होती.प्रकाश कौर आणि सनी-बॉबीशी कोणतेही वाद नाहीतधर्मेंद्र यांचे लोणावळा येथील फार्महाऊस त्यांच्या चाहत्यांसाठी संग्रहालयात रूपांतरित केले जाऊ शकते का? असा प्रश्न याच मुलाखतीमध्ये, हेमा मालिनी यांना विचारण्यात आला. सनी देओलही हा असेच काहीतरी प्लॅन करत आहे, असं त्यावर हेमा मालिनी यांनी सांगितलं. धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि त्यांची मुलं सनी-बॉबी यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत असं सांगत त्यांनी फुटीच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या. “सगळं काही व्यवस्थित चाललं आहे. त्यामुळे ही दोन वेगवेगळी कुटुंबं आहेत, काय होईल ? ही काळजी करण्याची गरज नाही. आम्ही सगळे ठीक आहेत, कोणालाही काहीच चिंता करण्याची गरज नाही” असंही त्यांनी नमूद केलं.
मोहित सोमण: गेल्या आठवड्याच्या तुलनेत भूराजकीय घटनांना वेग आल्याने त्याचा फटका कमोडिटी बाजारातही बसला आहे. त्यामुळे दोन दिवस घसरणीकडे असलेले सोने आज पुन्हा एकदा जोरदार रिबाऊंड करत उसळले आहे. युएसकडून झालेला व्हेनेझुएलावरील कब्जा, तसेच युएस भारत यांच्यातील डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या वक्तव्यानंतर वाढलेली अस्थिरता, इराण इस्त्राईल यांच्यातील संघर्ष, व युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात झालेली कपात यामुळे सोन्यात मोठी वाढ झाली आहे. गुड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १५८ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १४५ रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११८ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १३७४० रूपये, २२ कॅरेटसाठी १२५९५ रूपये, १८ कॅरेटसाठी १०३०५ रुपयांवर पोहोचले आहेत.प्रति तोळा किंमतीचा विचार केल्यास, २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दरात १५८० रूपये, २२ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा किंमतीत १४५० रूपये, तर १८ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा किंमतीत ११८० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १२७४०० रूपयांवर २२ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर १२५९५० रुपयांवर, व १८ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर १०३०५० रूपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे सरासरी प्रति ग्रॅम दर १३७४० रूपये, २२ कॅरेट प्रति ग्रॅम दर १२५९५ रूपये, १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १०३०५ रूपयांवर पोहोचले आहेत.भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात १.४९% वाढ झाल्याने दरपातळी १३७७८८ रूपयांवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावर आज सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात २.६४% वाढ झाली असून दुपारपर्यंत युएस गोल्ड स्पॉट दरात २.३८% वाढ झाली असून प्रति डॉलर दरपातळी ४४३२.५० प्रति औंसवर पोहोचली आहे. सोन्याच्या बाबतीत, डिसेंबरच्या अखेरीस सोन्याने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, गेल्या आठवड्यात सोन्याच्या वायद्यात ४११२ रुपयांनी म्हणजेच २.९४% घसरण झाली होती.चांदीच्या दरातही आज तुफान वाढचांदीच्या दरातही आज तुफान वाढ झाली आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ६ रूपयाने, प्रति किलो दर थेट ६००० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४७ प्रति किलो दर २४७००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात दुपारपर्यंत ३.०२% वाढ झाल्याने दरपातळी २४३४५० रूपयांवर पोहोचली. भारतीय बाजारात प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम दर २४७० रूपयांवर पोहोचले असून प्रति किलो दर २४७००० रूपयांवर पोहोचले आहेत. एकूणच आठवड्यातील चांदीचे मूल्यांकन पाहता गेल्या आठवड्यात त्यात ३४७१ रुपयांची, म्हणजेच १.४५ टक्क्यांची घसरण झाली होती. काल चांदीच्या दरात स्थिरता राहिली असली तरी १ जानेवारीपासून संपूर्ण आठवड्यात मोठी चढउतार दरात सुरु आहे. एकूणच मूल्यांकन पाहता चांदीच्या प्रति किलो दरात ८००० रुपयांनी वाढ झाली आहे.चांदीच्या दरात चढउतार पाहिल्यास मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारी डिलिव्हरीसाठीच्या सोन्याच्या वायदा (Gold Futures) भावात १५२२६ लॉट्सच्या उलाढाल झाली त्यामुळे वायद्याच्या दरपातळीत १५०९ रुपयांची म्हणजेच १.११% वाढ होऊन तो प्रति १० ग्रॅम १३७२७० रुपयांवर पोहोचली होती. याचप्रमाणे, कमोडिटी बाजारातील चांदीच्या वायदा भावातही मोठी वाढ दिसून आली. मार्च करारासाठीच्या चांदीच्या भावात १३११२ लॉट्समध्ये ६४३४ रुपयांची, म्हणजेच २.७२% वाढ झाली असून होऊन प्रति किलो दरपातळी २४२७५० रुपयांवर पोहोचली.
मोठी बातमी…! काल राजकीय निवृत्तीचे संकेत, आज नारायण राणेंना भर स्टेजवर भोवळ
Narayan Rane : भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कालच राजकीय संन्यास घेण्याचे संकेत दिल्यानंतर आज चिपळूणमधील कार्यक्रमात त्यांची प्रकृती बिघडल्याची घटना घडली आहे. कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान भाषण करत असताना नारायण राणेंना चक्कर आल्याने कार्यक्रमस्थळी एकच धावपळ उडाली. भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात राणेंचा आवाज बसल्याचं दिसून आलं. चक्कर येत असल्याची भावना झाल्यानंतर […] The post मोठी बातमी…! काल राजकीय निवृत्तीचे संकेत, आज नारायण राणेंना भर स्टेजवर भोवळ appeared first on Dainik Prabhat .
जगभरात कच्च्या तेलाच्या दरात सकारात्मकता तरी भारतीय तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण
मोहित सोमण: मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाच्या सकारात्मक पुरवठ्यामुळे जगभरात कच्चे तेल घसरत आहे. मात्र तरीही भारतीय तेल उत्पादन व विपणन (Marketing) कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज घसरण दिसून आली. उपलब्ध माहितीनुसार, दुपारी २.२२ वाजेपर्यंत ओएनजीसी (१.५६%), ऑईल इंडिया (२.२५%), डीप इंडस्ट्रीज (४.०४%), जिंदाल ड्रिलिंग (५.८०%), एचओईसी (१.४८%) समभागात मोठी घसरण झाली आहे.अपवाद म्हणजे जीएनआरएल (८.७२%), डोल्फिन एंटरप्राईजेस (०.९७%), ड्यूक ऑफशोअर (०.६८%) समभागात वाढ झाली आहे. पण प्रामुख्याने मुख्य फळीतील सगळ्याच शेअर्समध्ये आज गुंतवणूकदारांना फटका बसला. सुरूवातीला वाढत असलेले शेअर्स मात्र दुसऱ्या सत्रात कोसळताना पहायला मिळाले आहेत.विश्लेषकांची युएस व्हेनेझुएला यांच्यातील संघर्षानंंतर युएसने व्हेनेझुएला देशावरील कब्जा केल्यानंतर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात आणखी वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. युएस ऑईल रिफायनरीला देशातील प्रवेश सोपा झाल्याने युएसकडून तेलाच्या पुरवण्यात वाढ होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे सकाळी १% पेक्षा अधिक स्तरावर तेल स्वस्त झाले होते. प्रत्यक्षात भारतीय बाजारात तेलाच्या शेअर्समध्येही घसरण झाली आहे.जगभरातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार म्हणून व्हेनेझुएलाकडे पाहिले जाते. प्रत्यक्षात अमेरिकेतील नेतृत्वाने देशावर कब्जा केल्यानंतर मोठी आर्थिक स्थित्यंतरे अपेक्षित असून व्हेनेझुएलाकडून केल्या जाणाऱ्या निर्यातीतही यांचा परिणाम होऊ शकतो असे सांगितले जाते असे असताना कच्च्या तेलाच्या शेअर्समध्ये आज दबाव वाढला असून तज्ञांच्या मते व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था घसरल्यास दीर्घकालीन परिणाम म्हणून मध्यपूर्वेतील, रशिया यांच्यातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी दबाव निर्माण ह़ोऊ शकतो व अंतिमतः तेल किंमत महाग होऊ शकते. सध्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, व्हेनेझुएलाची २०% अर्थव्यवस्था कच्च्या तेलाच्या व्यापार व उत्पादनावर अवलंबून आहे. याच कारणामुळे ओपेककडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात स्थिरता दिसत असली तरी कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात कपात करण्याची मागणी काही व्यापारी करत आहेत. दरम्यान ५०% कच्चे तेल रशियाकडून भारतात येत असताना भारतालाही युएस व मध्यपूर्वेतील तेलासाठी पर्याय उपलब्ध असतील. एकूणच ही भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा फटका बाजारात बसल्याने तेल कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती.भारतीय बाजाराबाबत भाष्य करताना ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, कच्च्या तेलाच्या किमतींवर नजीकच्या काळात होणारा परिणाम कमी असण्याची शक्यता आहे. तथापि, दर युएसकडून निर्बंध शिथिल झाल्यानंतर अमेरिकेच्या प्रमुख तेल कंपन्यांनी व्हेनेझुएलामधील उत्पादन पुन्हा सुरू केल्यास मध्यम मुदतीत कच्च्या तेलाच्या किमतींवर दबाव येऊ शकतो. विश्लेषकांनी सांगितले की, जोपर्यंत ओपेक बाजारात संतुलन राखण्यासाठी हस्तक्षेप करत नाही, तोपर्यंत २०२७-२८ मध्ये अतिरिक्त पुरवठ्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवर दबाव येऊ शकतो.याविषयी गुंतवणूक तज्ञ कंपनी जेफरीजने म्हटले आहे की, जर निर्बंध हटवले गेले, तर रिलायन्स इंडस्ट्रीजला फायदा होऊ शकतो, कारण कंपनी पूर्वी तिच्या दैनंदिन कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे २० टक्के तेल व्हेनेझुएलाच्या सरकारी तेल कंपनी पीडीव्हीएसए (PDVSA) कडून खरेदी करत होती. रिलायन्सला ब्रेंटच्या तुलनेत प्रति बॅरल ५-८ डॉलरच्या सवलतीत व्हेनेझुएलाचे कच्चे तेल मिळू शकते, ज्यामुळे तिच्या एकूण रिफायनिंग मार्जिनला आधार (Margin Supports) मिळेल. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजची जामनगर येथे देशातील सर्वात मोठी तेल रिफायनरी कंपनी आहे.
चला हवा येऊ द्याचा कॅामेडी किंग आणि प्रसिध्द नृत्यांगना येणार..Bigg Boss च्या घरात
bigg boss marathi season ६ :प्रेक्षकांचा मनपसंद रिअॅलिटी शो बिग बॅास मराठी ६ पुन्हा येतयं प्रेक्षकांच्या भेटीला 11 जानेवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या बिग बॉस मराठी सीझन 6 चं होस्टिंग यंदाही अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. शोची तारीख जवळ येत असतानाच, घरात नेमकं कोण बंद होणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.आणि यामुळे प्रेक्षकांमध्ये वेगळाच उत्साह पहायला मिळाला आहे...गेल्या काही आठवड्यांपासून सोशल मीडिया आणि मनोरंजन विश्वात अनेक नावं फिरत आहेत. अभिनेता, सोशल मीडिया स्टार्स, लावणी नृत्यांगना आणि राजकारणाशी निगडित काही सेलिब्रिटी यंदा घरात दिसू शकतात,पण कोण आहेत. ते स्पर्धक अशी जोरदार चर्चा सुरु आहे डॅनी पंडित, अथर्व रुखे, गौतमी पाटील, गुणरत्न सदावर्ते, विनायक माळी, गौरव मोरे, सोनाली राऊत, धनश्री कडगावकर ते थेट गिरिजा ओकपर्यंत अनेक नावं चर्चेत आली. मात्र, या यादीतील कोणत्याही नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं नाही..बिग बॉस मराठी 6 साठी काही स्पर्धकांची नावे जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.‘चला हवा येऊ द्या’मुळे घराघरात पोहोचलेले अभिनेता-कॉमेडियन सागर कारंडे, मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता संकेत पाठक, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर अनुश्री माने, मराठी सिनेइंडस्ट्रीतील ओळखीचा चेहरा आणि राजकारणात सक्रीय असणारी दिपाली सय्यद, तसेच लावणी नृत्यांगना राधा मुंबईकर आणि अभिनेत्री रसिका जामसुदकर — या सर्व नावांवर (Bigg Boss Marathi 6 ) साठी शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जात आहे.दरम्यान या खेळाच्या आधीच्या पर्वाबद्दल सांगायचे झाल्यास, Bigg Boss Marathi ५ चे विजेतेपद कंटेट क्रिएटर-अभिनेता सूरज चव्हाणने जिंकले होते.तर अभिजीत सावंत या स्पर्धेचा उपविजेता ठरला. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये सूरज चव्हाण विजयी झाला होता. बिग बॉस मराठी ५ जसा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून गाजला, तसाच बिग बॉस मराठी ६ सुद्धा तितकाच धमाका करणार का, याची उत्सुकता आणि चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे.
Prasad Lad : नारायण राणे कधीच निवृत्त होऊ शकत नाहीत, ते आमची ऊर्जा!प्रसाद लाड यांनी स्पष्टच सांगितलं
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर त्यांचे निकटवर्तीय आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी पूर्णविराम दिला आहे. नारायण राणे हे आमची शक्ती आणि ऊर्जा आहेत, ते कधीही राजकारणातून निवृत्त होऊ शकत नाहीत, अशा शब्दांत लाड यांनी राणेंचे महत्त्व अधोरेखित केले. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय विषयांवर आपली मते परखडपणे मांडली.https://prahaar.in/2026/01/05/a-threat-was-received-to-blow-up-tata-hospital-in-parel-with-a-bomb-the-hospital-premises-were-evacuated/'संविधानासाठी गुन्हे अंगावर घ्यायला तयार'उद्धव ठाकरे सरकारच्या काळात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी निघालेल्या अटक वॉरंटवर बोलताना लाड म्हणाले, आम्ही संविधानाच्या सन्मानासाठी लढा दिला होता. त्या रॅलीच्या विरोधात तत्कालीन ठाकरे सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल केले. आज आमचे वॉरंट रद्द झाले असून जामीन मिळाला आहे. संविधानाचा लढा आमचा कायम राहील, असे अनेक गुन्हे अंगावर घ्यायला आम्ही तयार आहोत.राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण वादावर स्पष्टीकरणनारायण राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात काही वाद असल्याच्या चर्चेचा लाड यांनी इन्कार केला. रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राणे साहेब देशाचे मोठे नेते आहेत. राणे साहेब इतके ज्येष्ठ आहेत की ते आमच्या सारख्यांचे कान पकडून आम्हाला मार्गदर्शन करू शकतात. त्यांच्या शब्दाचा विपर्यास केला गेला आहे, चव्हाण त्यांचा प्रचंड आदर करतात, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.महापालिकेत १५० पार; ठाकरेंना लगावला टोलामुंबई महानगरपालिका निवडणुकांबाबत भाष्य करताना लाड यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. महायुती १५० हून अधिक जागा जिंकेल. उद्धव ठाकरेंनी सध्या जी 'हिरवी चादर' पांघरली आहे, ती हिंदुत्वाच्या भगव्या लाटेत वाहून जाईल. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना त्यांची जागा कळेल आणि पुन्हा एकदा महायुतीचाच झेंडा फडकेल, असे ते म्हणाले.
“मादुरोपेक्षाही तुमचे जास्त वाईट हाल …” ; ट्रम्पकडून व्हेनेझुएलाच्या उपाध्यक्षांना थेट धमकी
Trump Threat Delcy Rodrguez। अमेरिकेच्या कारवाईनंतर, व्हेनेझुएलामध्ये सत्ता परिवर्तन झाले आहे आणि डेल्सी रॉड्रिग्ज यांना देशाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. देशाच्या पूर्वीच्या उपाध्यक्ष रॉड्रिग्ज यांनी पदभार स्वीकारल्यानंतर देशाच्या राजकीय दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचे संकेत दिले. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना,”जर त्यांनी व्हेनेझुएलासाठी योग्य पावले उचलली नाहीत तर त्यांना मोठी किंमत […] The post “मादुरोपेक्षाही तुमचे जास्त वाईट हाल …” ; ट्रम्पकडून व्हेनेझुएलाच्या उपाध्यक्षांना थेट धमकी appeared first on Dainik Prabhat .
“तुमचे मादुरोपेक्षाही जास्त वाईट हाल …” ; ट्रम्पकडून व्हेनेझुएलाच्या उपाध्यक्षांना थेट धमकी
Trump Threat Delcy Rodrguez। अमेरिकेच्या कारवाईनंतर, व्हेनेझुएलामध्ये सत्ता परिवर्तन झाले आहे आणि डेल्सी रॉड्रिग्ज यांना देशाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. देशाच्या पूर्वीच्या उपाध्यक्ष रॉड्रिग्ज यांनी पदभार स्वीकारल्यानंतर देशाच्या राजकीय दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचे संकेत दिले. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना,”जर त्यांनी व्हेनेझुएलासाठी योग्य पावले उचलली नाहीत तर त्यांना मोठी किंमत […] The post “तुमचे मादुरोपेक्षाही जास्त वाईट हाल …” ; ट्रम्पकडून व्हेनेझुएलाच्या उपाध्यक्षांना थेट धमकी appeared first on Dainik Prabhat .
Health Tips: हिवाळ्यात जास्त थंडी का वाजते? या पोषक घटकांची कमतरता कारणीभूत; जाणून घ्या उपाय
Health Tips: हिवाळ्यात थंडी वाजणं स्वाभाविक आहे. मात्र एकाच खोलीत बसलेले काही लोक जास्त गारठतात, तर काहींना फारसा फरक जाणवत नाही. जर पुरेसे गरम कपडे घालूनही तुम्हाला आतून थंडी वाजत असेल, तर हे केवळ वातावरणामुळे नाही, तर शरीरातील काही पोषक घटकांच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. आपलं शरीर अंतर्गत तापमान संतुलित ठेवण्यासाठी ‘थर्मोरेग्युलेशन’ ही प्रक्रिया वापरतं. […] The post Health Tips: हिवाळ्यात जास्त थंडी का वाजते? या पोषक घटकांची कमतरता कारणीभूत; जाणून घ्या उपाय appeared first on Dainik Prabhat .
Pune : राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त गुडलक चौकात जनजागृती अभियान
पुणे – राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने डेक्कन वाहतूक विभागातर्फे आणि एमएमसीसी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या सहकार्याने गुडलक चौक येथे जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा उद्देश वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. या अभियानादरम्यान NSS च्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच वाहतुकीचे नियम, सिग्नल व्यवस्था, […] The post Pune : राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त गुडलक चौकात जनजागृती अभियान appeared first on Dainik Prabhat .
Yogi Meeting With PM Modi। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या रणनीतींवर सखोल चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांच्यातील ही भेट सुमारे एक तास सुरु होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. […] The post मोदी-योगींच्या भेटीने उत्तरप्रदेशात राजकीय वातावरण तापले ; मंत्रिमंडळ विस्तारापासून ते ‘मिशन-२७’ पर्यंतची झाली चर्चा appeared first on Dainik Prabhat .
जानेवारीत परदेशी गुंतवणूकदारांकडून 'सेल ऑफ'सुरुच २ दिवसात ७६०८ कोटी स्वाहा!
मोहित सोमण: गेल्या आठवड्यात अहवालाप्रमाणे संपूर्ण वर्षभरात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Foreign Institutional Investors FIIs) यांनी शेअर बाजारातून सर्वाधिक १ लाख कोटीहून अधिक निधी काढण्याचे आपल्याला दिसले होते. याच धर्तीवर नव्या प्रोविजनल आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २०२६ ची सुरुवात सावधपणे करत त्यांनी जानेवारी २०२६ मध्येही विक्रीचाच कित्ता गिरवला आहे. उपलब्ध माहितीनुसार, जानेवारीच्या पहिल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये भारतीय इक्विटीमधून ७६०८ कोटी रुपये (८४६ दशलक्ष डॉलर्स) काढून घेतले आहेत. ही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काढलेली रोख गुंतवणूक ही बाजारातील अस्थिरतेचे प्रतिक आहे असे समजले जाते. त्यातून इराण इस्त्राईल यांच्यातील संघर्ष आता युएस व्हेनेझुएला यांच्यातील हाराकिरी या कारणामुळे बाजारातील गुंतवणूकदारांना शाश्वत मूल्य दिसत नाही. याच कारणामुळे विक्रीत वाढ होत असताना विशेष घसरण आयटी, एफएमसीजी क्षेत्रीय निर्देशांकात दिसून येत आहे.आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०२५ मध्ये नोंदवलेल्या १.६६ लाख कोटी रुपये म्हणजेच १८.९ अब्ज डॉलर्सची जावक (Outflow) बाजारात झाला. या मोठ्या विक्री पार्श्वभूमीवर रूपयांतील मूल्यात मोठी चढउतार झाली आहे. अस्थिर चलनाच्या हालचालीसह जागतिक व्यापारी तणाव, युएस भारत यांच्यातील द्विपक्षीय करारावर असलेली अनिश्चितता, सातत्याने डॉलरच्या तुलनेत घसरणाऱ्या रूपयांसह संभाव्य तिमाही निकालासाठी गुंतवणूकदारांनी बाळगलेली सावधगिरी या कारणांमुळे बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रीच सुरूच ठेवली होती.परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या (FPIs) या सततच्या विक्रीच्या दबावामुळे २०२५ मध्ये बाजारातील अहवालानुसार रुपयाचे डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन (Devaluation) ५% अवमूल्यन होण्यास आणखी कारणीभूत ठरला आहे. मात्र विश्लेषकांच्या मते बाजारातील तज्ञांचा विश्वास आहे की २०२६ मध्ये परिस्थिती बदलू शकते. २०२६ वर्ष सकारात्मक परिवर्तनासह स्थिर बाजारात बदलू शकेल असा तज्ञांचा विश्वास आहे.या सकारात्मक अपेक्षा असूनही, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FPIs) ने २०२६ ची सुरुवात सावधपणे केली आहे आणि एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार, त्यांनी केवळ २ दिवसात १ ते २ जानेवारी दरम्यान भारतीय इक्विटीमधून जवळपास ७६०८ कोटी रुपये काढून घेतले आहेत.यावर प्रतिक्रिया देताना जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक रणनीतिकार व्ही.के. विजयकुमार म्हणाले की, 'या वर्षी एफपीआय (FPI) च्या धोरणात बदल होण्याची शक्यता आहे, कारण सुधारणारी देशांतर्गत मूलभूत तत्त्वे निव्वळ परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करू शकतात. मजबूत जीडीपी वाढ आणि कॉर्पोरेट कमाईतील पुनर्प्राप्तीची शक्यता येत्या काही महिन्यांत सकारात्मक FPI प्रवाहासाठी शुभसंकेत आहेत'प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना एंजल वनचे वरिष्ठ मूलभूत विश्लेषक वकार जावेद खान म्हणाले आहेत की,'भारत-अमेरिका व्यापार संबंधांमधील सामान्यीकरण अनुकूल जागतिक व्याजदर वातावरण आणि USD-INR जोडीतील स्थिरता परदेशी गुंतवणूकदारांसाठी अनुकूल पार्श्वभूमी तयार करू शकते.' पुढे त्यांच्या मते, गेल्या वर्षाच्या तुलनेत इक्विटी मूल्यांकन तुलनेने अधिक समाधानकारक झाले आहे, ज्यामुळे गुंतवणुकीच्या पुनरुज्जीवनाला आणखी पाठिंबा मिळू शकतो.खान म्हणाले की, हा कल असामान्य नाही, कारण परदेशी गुंतवणूकदार ऐतिहासिकदृष्ट्या जानेवारीमध्ये सावध राहिले आहेत आणि गेल्या दहापैकी आठ वर्षांत त्यांनी निधी काढून घेतला आहे.परिणामी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार प्रवाह जागतिक संकेत आणि मॅक्रोइकॉनॉमिक घडामोडीं प्रति अत्यंत संवेदनशील राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात उच्च मूल्यांकन ही एक प्रमुख चिंता होती, परंतु तो दबाव सध्या कमी झाल्याचे दिसत आहे, ज्यामुळे भविष्यासाठी काही आशावाद निर्माण झाला आहे असेही ते पुढे म्हणाले आहेत.मात्र विशेष उल्लेख म्हणजे २ जानेवारीला शेअर बाजारातील व कॅपिटल मार्केटमध्ये घरगुती गुंतवणूकदारांनी (Domestic Institutional Investors DIIs) यांनी आपली रोख गुंतवणूक परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांपेक्षाही एनएसईतून काढून घेतली होती. प्रोविजनल आकडेवारीनुसार २ जानेवारीला घरगुती गुंतवणूकदारांकडून १३७८३.०२ कोटींची गुंतवणूक विक्री झाली होती तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ६८७९.९८ कोटीची विक्री झाली होती. हाच किस्सा बीएसई, एसएमईवर कायम राहत सगळ्या बाजारातील एकूण विक्रीतही घरगुती गुंतवणूकदारांनी १४६७२.१८ कोटींची अधिक गुंतवणूक विक्री परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या ७६६०.६५ कोटी तुलनेत केली होती.
ऑफर पडली महागात! पाच हजाराची साडी ५९९ रुपयांत; महिलांची एकच झुंबड, चेंगराचेंगरीत तिघी बेशुद्ध
Chhatrapati Sambhajinagar | ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेकदा स्वस्तात मस्त ऑफर दिले जातात. खासकरून हिच ऑफर जर साड्यांच्या बाबतीत असेल, तर महिलांची एकच गर्दी जमते. असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला आहे. साड्या खरेदी करण्याचा नादात येथे वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. ५ हजाराची साडी ५९९ रुपयांत मिळणार या ऑफर्समुळे महिलांच्या झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची घटना […] The post ऑफर पडली महागात! पाच हजाराची साडी ५९९ रुपयांत; महिलांची एकच झुंबड, चेंगराचेंगरीत तिघी बेशुद्ध appeared first on Dainik Prabhat .
“भारताला माहिती आहे की तो…” ; सिंधू करारावरून ४ दिवसांत पाकिस्तानची तिसरी धमकी
Indus Waters Treaty। भारताने अलिकडच्या काळात दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेत पाकिस्तानला दोन मोठे धक्के दिले आहेत. ऑपरेशन सिंदूरने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर लक्ष केंद्रित केले, तर सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये पाणीसंकट वाढत आहे. भारतातून वाहणाऱ्या नद्यांमधील पाण्याच्या कमतरतेमुळे पाकिस्तानच्या अनेक भागात पाणीटंचाई वाढली आहे. पाकिस्तान वारंवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न […] The post “भारताला माहिती आहे की तो…” ; सिंधू करारावरून ४ दिवसांत पाकिस्तानची तिसरी धमकी appeared first on Dainik Prabhat .
Drinking tea in Winter: हिवाळा सुरू झाला की अनेकांची चहा पिण्याची सवय वाढते. सर्वसाधारणपणे चहा शरीर गरम ठेवतो, असा समज आहे. काही जण तर दिवसातून ४–५ कप चहा पितात. मात्र खरंच चहा शरीराला उब देतो का? आणि जास्त चहा पिल्याने शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते का? याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या मते, दुधाचा […] The post Drinking tea in Winter: हिवाळ्यात जास्त चहा पिल्याने शरीर गरम राहतं की पाणी कमी होतं? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत appeared first on Dainik Prabhat .
बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखलमुंबई : मुंबईतील परळ भागात असलेल्या जगप्रसिद्ध टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची निनावी धमकी मिळाल्याने आज मोठी खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर पोलीस प्रशासन आणि रुग्णालय व्यवस्थापन तातडीने सतर्क झाले असून खबरदारीचे उपाय म्हणून रुग्णालय परिसर रिकामा करण्यात आला आहे.पोलीस आणि श्वानपथकाकडून तपासणी सुरूधमकीचा फोन किंवा संदेश मिळताच मुंबई पोलिसांनी तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. सध्या घटनास्थळी बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) दाखल झाले असून, श्वानपथकाच्या मदतीने रुग्णालयाच्या प्रत्येक मजल्याची आणि कोनाकोपऱ्याची कसून तपासणी केली जात आहे. पोलीस उपायुक्तांसह वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.https://prahaar.in/2026/01/05/chandigarh-aap-sarpanch-jharmal-singh-murder-case-armed-men-shot-and-disappeared-in-13-seconds-ex-cm-sukhbir-singh-badal-share-footage/रुग्ण आणि नातेवाईकांची धावपळटाटा रुग्णालय हे कर्करोगाच्या उपचारासाठी देशातील सर्वात मोठे केंद्र असल्याने तिथे दररोज हजारो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित असतात. बॉम्बची बातमी पसरताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली असून, बाह्यरुग्ण विभाग (OPD) आणि इतर गर्दीच्या जागा रिकाम्या करण्यात आल्या आहेत.धमकीचा शोध सुरूहा निव्वळ अफवेचा प्रकार आहे की घातपाताचा प्रयत्न, याचा तपास पोलीस करत आहेत. ज्या क्रमांकावरून किंवा माध्यमातून ही धमकी आली, त्याचा तांत्रिक शोध घेतला जात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पोलीस सर्वतोपरी तपास करत आहेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
साडीच्या ऑफरमुळे महिलांची चेंगराचेंगरी , ३ महिला बेशुद्ध
छत्रपती संभजीनगर : सध्या छत्रपती संभजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक रीलस्टार ची रील पाहून महिलांनी साडी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. साडीवर असलेल्या सवलतीमुळे महिलांची प्रचंड गर्दी झाली आहे.५ हजारांची साडी फक्त ५९९ मध्ये मिळत असल्याच समजल्यावर एकाच वेळी हजारो महिलांनी दुकानात गर्दी केली. या चेंगराचेंगरीत ३ महिला बेशुद्ध पडल्या. तर अनेक चिमूकल्यांची आईपासून ताटातुट झाली.संभाजीनगर रोड ते त्रिमूर्ति चौकाच्या दरम्यान एक नवीन साड्यांच दुकान सुरू झालं आहे. साडीच्या दुकानदारानी ३ महिन्यापासून साडीच्या रील बनून सोशल मीडिया वर टाकल्या होत्या आणि ,त्या रीलला भुलून शहरातील वेगवेगळ्या भागातील महिला साडी खरेदीसाठी इथे आल्या होत्या. जवळपास हजारपेक्षा अनेक महिला ह्या आपल्या कुटुंबासोंबत तर कोणी आपल्या लहान मुलांना घेऊन आल्या होत्या. एवढ्या सगळ्या महिला एकत्र आल्यावर दुकानसमोर प्रचंड अशी गर्दी झाली. ५००० ची सदी केवळ ५९९ ला मिळते कळताच अनेक महिलानी दुकानात गर्दी केली. यामध्ये एका चिमूकलीची आईपासून ताटातुट झाली . परिस्थितीच गांभीर्य घेता पोलिस घटनास्थळी पोहचले . परीस्थिती हाताबाहेर जाते याचा अंदाज येताच पोलिसांनी तबडतोप दुकान बंद केल. पोलिस वेळेवर पोहचल्यामुळे मोठा अनर्थ टळला .
“संगीत सोमला लवकरच नरकात पाठवणार” ; भाजप नेत्याला बांगलादेशातून धमकी
Sangeet Som Death Threat। भाजपचे फायरब्रँड नेते आणि माजी आमदार संगीत सोम हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात, ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी, हे प्रकरण त्यांच्या सुरक्षेशी संबंधित आहे. संगीत सोम यांना अज्ञात क्रमांकावरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तक्रार दाखल करून चौकशी सुरू केली आहे. सोम यांनी […] The post “संगीत सोमला लवकरच नरकात पाठवणार” ; भाजप नेत्याला बांगलादेशातून धमकी appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: कच्च्या तेलाच्या निर्देशांकात पहाटे प्रचंड अस्थिरता निर्माण झाल्याने कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत मोठी हालचाल झाली परंतु टेक्निकल व भूराजकीय पातळीवर कच्च्या तेलाच्या निर्देशांकात सुरूवातीच्या ट्रेडिंगमध्ये घसरण होत आहे. सकाळच्या सत्रात दुपारी १ वाजेपर्यंत तेलाच्या किंमतीत ०.८५% घसरण झाली आहे. सकाळी तेलाच्या निर्देशांकात १% पेक्षा अधिक पातळीवर घसरण झाल्याने कच्च्या तेलावर दबाव निर्माण झाला आहे. युएस व्हेनेझुएला यांच्यातील वादानंतर अमेरिकेने व्हेनेझुएलावर कब्जाच घेतल्याने युएस रिफायनरीला व्हेनेझुएलाचा प्रवेश सुकर झाला आहे. व्हेनेझुएला जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा देश असल्याने युएस तेलाच्या पुरवठ्यात मोठी वाढ झाल्याने किंमतील घसरण होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.आज सोमवारी अस्थिर आशियाई व्यापारात तेलाच्या किमतींमध्ये मोठी चढउतार झाली होती कारण अमेरिकेने आठवड्याच्या शेवटी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्यानंतर त्या लॅटिन अमेरिकन देशावर नियंत्रण मिळवत असल्याचे युएसने जाहीर केले.यासह भूराजकीय कारणासह येमेनमधील संघर्षामुळे सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यातील वाढलेल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या व्यापाऱ्यांनी ओपेकच्या तेल उत्पादन अपरिवर्तित ठेवण्याच्या निर्णयावरही विचार केला होता. ज्यामुळे सुरळीत पुरवठा असण्याची शाश्वती निर्माण झाल्याने बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीवर दबाव निर्माण झाला. उपलब्ध माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने आठवड्याच्या शेवटी केलेल्या कारवाईत मादुरो यांना पकडले असून त्यांना आता व्हेनेझुएलाच्या या नेत्यावर न्यूयॉर्कमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीचे आरोप ठेवून खटला चालवला जाणार आहे.प्रसारमाध्यमांना उत्तर देताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, नवीन नेता निवडला जाईपर्यंत वॉशिंग्टन व्हेनेझुएलाचा कारभार पाहणारे आहे आणि तसेच प्रमुख अमेरिकन तेल कंपन्यांना देशात प्रवेश करून तेथील तेल उत्पादनावर नियंत्रण ठेवण्याची परवानगी दिली जाईल ज्याचाही फायदा आज क्रूडवर झाला. व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात मोठा तेलसाठा असला तरी देश इन्फ्रास्ट्रक्चर अथवा जुन्या पायाभूत सुविधांमुळे बलदंड नाही. देशातील उत्पादन मंदावले असताना अमेरिकेच्या कठोर निर्बंधांमुळे देशाच्या निर्यातीवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे आर्थिक संकटातून व्हेनेझुएला जाण्याची दाट शक्यता आहे. दिवसाच्या सुरुवातीला किमती ०.५% पर्यंत वाढल्या होत्या परंतु नंतर किंमती घसरू लागल्या.तज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये तेलाच्या किमती १८% पेक्षा जास्त घसरल्या आहेत ज्या गेल्या पाच वर्षांतील सर्वात मोठ्या प्रमाणात घसरल्या होत्या. मुबलक पुरवठ्याच्या भाकीतामुळे आणि मागणीतील घसरणीमुळे कच्च्या तेलाच्या बाजाराला मोठा फटका बसला होता.याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना विश्लेषकांनी सांगितले की, व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेचे नियंत्रण आल्यास जागतिक पुरवठा वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवर आणखी दबाव येऊ शकतो, तथापि, अशा परिस्थितीला प्रत्यक्षात येण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. ओपेक सदस्य देशांमधील भूराजकीय धोक्यांपेक्षा जागतिक पुरवठ्याच्या सातत्यपूर्ण अतिरिक्ततेच्या अपेक्षा अधिक प्रभावी ठरल्याने कच्च्या तेलाच्या किमती १.३% नी घसरून ५१५५ वर स्थिरावल्या.अमेरिकेच्या आंशिक नाकेबंदीमुळे व्हेनेझुएलामध्ये पुरवठ्यात व्यत्यय तीव्र झाला आणि विहिरी बंद कराव्या लागल्या असल्या तरी, वाढते उत्पादन आणि मुबलक साठ्यामुळे व्यापक बाजारावर दबाव कायम राहिला. नजीकच्या काळात पुरवठा उपलब्धता वाढेल. ओपेक आपल्या आगामी बैठकीत उत्पादन वाढीला विराम देण्याच्या निर्णयाची पुष्टी करेल अशी व्यापक व्यापारांची अपेक्षा आहे. दुपारी १ वाजेपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Futures मध्य ०.८९% घसरण झाल्याने दरपातळी प्रति डॉलर ५६.८१ बॅरलवर पोहोचले आहे. Brent Futures निर्देशांकात दुपारी १ वाजेपर्यंत ०.८१% घसरण झाल्याने डॉलरची दरपातळी ६०.२६ प्रति बॅरलवर पोहोचली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्येही (Multi Commodity Exchange MCX) कच्च्या तेलाच्या निर्देशांकात ०.१९% घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति बॅरेल दरपातळी ५१४५ रुपयांवर पोहोचली आहे.
‘ओएमजी’च्या तिसऱ्या भागात पाहायला मिळणार मोठा बदल; लोकप्रिय अभिनेत्री दिसणार मुख्यभूमिकेत
Oh My God 3 Film | अभिनेता अक्षय कुमारच्या ‘ओएमजी’ या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र या नव्या भागात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. गेल्या दोन भागांमध्ये देवाच्या भूमिकेत दिसलेला अक्षय कुमार यावेळी मुख्य भूमिकेत नसून तो केमिओ करणार आहे. अक्षय कुमार या […] The post ‘ओएमजी’च्या तिसऱ्या भागात पाहायला मिळणार मोठा बदल; लोकप्रिय अभिनेत्री दिसणार मुख्यभूमिकेत appeared first on Dainik Prabhat .
Kamala Harris on Donald Trump। व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या कारवाईने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. अत्यंत गुप्त आणि जलद कारवाईत अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले. या घटनेने जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, माजी उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर तीव्र टीका केली […] The post अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला पण देशातूनच विरोध ; कमला हॅरिस यांनी सांगितला ट्रम्पचा प्लॅन, म्हणाल्या,”ड्रग्स-डेमोक्रेसी अन्…” appeared first on Dainik Prabhat .
अभिनेत्री, निर्माती आणि मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या दीपिका पादुकोण यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नव्या आणि तरुण क्रिएटिव टॅलेंटला पुढे आणण्यासाठी एक नवी पहल सुरू केली आहे. खऱ्या कथा आणि नव्या टॅलेंटला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या विचाराला पुढे नेत, दीपिकाने आज ‘द ऑनसेट प्रोग्राम’च्या सुरुवातीची घोषणा केली. हा त्यांच्या Create With Me प्लॅटफॉर्मचा पुढील टप्पा असून, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन आणि जाहिरात क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नव्या क्रिएटिव कलाकारांना संधी देणे हा यामागचा उद्देश आहे. त्यांची प्रतिभा पाहिली जावी, ऐकली जावी आणि योग्य प्रकारे समोर यावी, यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.https://www.instagram.com/reel/DTHWjwdkuMR/?igsh=MXR4OWs2aHMzcGUzOQ==हा प्रोग्राम जिथे गुणवंत आणि होतकरू लोकांना शिकण्याच्या संधी देईल, तिथेच ज्यांच्याकडे स्वतःचे प्रोजेक्ट हाताळण्याचा अनुभव आणि कौशल्य आहे, अशा लोकांसाठीही पुढे जाण्याचे व्यासपीठ ठरेल. पहिल्या टप्प्यात लेखन, दिग्दर्शन, कॅमेरा, लाईट, एडिटिंग, साउंड, आर्ट, कॉस्च्युम डिझाइन, हेअर स्टायलिंग, मेकअप आणि प्रोडक्शन अशा विभागांचा समावेश असेल.आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत दीपिकाने म्हटले, “गेल्या एक वर्षापासून देशात आणि देशाबाहेर असलेल्या उत्कृष्ट क्रिएटिव टॅलेंटला ओळखणे आणि त्यांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी व अनुभवण्यासाठी एक मंच देण्याची भावना माझ्या मनात खोलवर आहे. ‘द ऑनसेट प्रोग्राम’च्या लाँचची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे आणि पुढील पिढीतील क्रिएटिव टॅलेंटशी तुम्हा सर्वांची ओळख करून देण्याची मला उत्सुकता आहे.”देश आणि परदेशातील क्रिएटिव टॅलेंटला ओळखण्याच्या आपल्या व्हिजनला पुढे नेत, दीपिका पादुकोण यांचा द ऑनसेट प्रोग्राम आता https://onsetprogram.in/ येथे पाहता येईल, जिथे इच्छुक लोक आपले काम पाठवू शकतात आणि इंडस्ट्रीतील सर्वोत्तम लोकांसोबत काम करण्याची संधी मिळवू शकतात.
मोहित सोमण: बंधक बँकेने समाधानकारक कामगिरी नोंदवल्यानंतर बँकेच्या शेअर्समध्ये ४% वाढ सुरुवातीच्या सत्रात झाली आहे. बँकेने आपल्या एकूण ठेवीत ११% वाढ नोंदवल्यानंतर बँकेच्या शेअरने आच चांगली कामगिरी नोंदवली आहे. दुपारी १२.२० वाजेपर्यंत बँकेच्या शेअर्समध्ये २.०१% वाढ झाल्याने शेअर १४७.३६ रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. सकाळी सुरुवातीच्या कलात शेअर १५०.०५ रूपये प्रति शेअर इतक्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला होता. बँकेच्या एकूण तिमाहीतील आकडेवारीनुसार, बँकेच्या एकूण कर्ज व अँडव्हान्सेसमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १०% वाढ नोंदवल्याचे बँकेने स्पष्ट केले. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या १३२०१९ कोटींच्या तुलनेत या डिसेंबरमध्ये १४५२२७ कोटींवर वाढ झाल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. सप्टेंबर महिन्यात ते १५८०७५ कोटी रुपये होते. तिमाही बेसिसवर (Quarter on Quater QoQ) मात्र ते घसरण डिसेंबर २०२५ पर्यंत १५५७२३ कोटींवर म्हणजेच ०.९०% घसरले आहे.बँकेच्या आकडेवारीनुसार, बँकेच्या कासा ठेवीत (Current Account Saving Account CASA) ठेवीत इयर ऑन इयर बेसिसवर मात्र -३.३% घसरण झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ४४७३५ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ४२७३० कोटीवर घसरण झाली. बँकेच्या रिटेल ठेवीत (Retail Term Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर ४.१% वाढ झाल्याचे बँकेने नोंदवले होते. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ५२०६३ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ७०६९० कोटींवर वाढ झाली आहे. एलसीआर गुणोत्तर (Liquidity Coverage Ratio LCR) १४९.१४% असल्याचे बँकेने निकालाद्वारे स्पष्ट केले होते. तर कासा गुणोत्तर डिसेंबर महिन्यात २७.२६% व सप्टेंबर महिन्यात २७.९७% होते.या निकालामुळे बँकेच्या ठेवीत व तरलतेत (Liquidity) चांगली सुधारणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तत्पूर्वी मागच्या महिन्यात बँकेने आपल्या (अनुत्पादक मालमत्ता Non Performing Assets) ६९.३१ अब्ज रूपयांचे एनपीए बिडींग प्रक्रियेद्वारे घोषित केले होते. सप्टेंबर २०२४ पर्यंत बँकेच्या तरलतेवर परिणाम झाल्याने व असेट क्वालिटीत नकारात्मक परिणाम झाल्याने एनपीए विकण्याचा मोठा निर्णय बँकेने गेल्या महिन्यात घेतला. यंदा बँकेच्या कामगिरीत सुधारणा झाल्याने मोठ्या प्रमाणात फंडामेंटल सुधारल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. गेल्या ५ दिवसात बँकेच्या शेअर्समध्ये १.२३% वाढ झाली असून गेल्या १ महिन्यात शेअर्समध्ये ५.१८% वाढ झाली तर संपूर्ण वर्षभरात मात्र शेअर्समध्ये २.८२% घसरण झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) ०.९५% वाढ झाली आहे.
चंदीगड : पंजाबमध्ये गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना अमृतसरमध्ये घडली आहे. आम आदमी पार्टीचे सरपंच झरमल सिंग यांची एका लग्न समारंभात घुसून हत्या करण्यात आली. आता या घटनेचे अत्यंत भयानक सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या खळबळजनक हत्येची जबाबदारी कुख्यात गँगस्टर डोनी बल, प्रभ दासुवाल आणि देवेंद्र बंबीहा ग्रुपने घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी या कृत्याची कबुली दिल्याचे समजते. गँगस्टर राजवटीमुळे पंजाबमधील सामान्य जनता आणि लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.नेमकं काय घडलं?
Shashank Ketkar: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एका पोस्टद्वारे त्याने निर्मात्याकडून मानधन न मिळाल्यामुळे आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. शशांकने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, अनेक वर्षांपासून त्याचे पैसे अडकले असून आता संयम सुटण्याची वेळ आली आहे. शशांक केतकर सध्या ‘मुरंबा’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. […] The post Shashank Ketkar: “निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा कंटाळा आला”… शशांक केतकरने सोशल मीडियावर व्यक्त केला संताप appeared first on Dainik Prabhat .
उमर खालिद, शरजील इमाम यांना झटका ! जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ; अन्य ५ आरोपींना दिलासा
Delhi Riots। २०२० च्या दिल्ली दंगली कट रचण्याच्या प्रकरणात विद्यार्थी कार्यकर्ते उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या जामीन अर्जांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावले. खटल्यापूर्वी आरोपींच्या दीर्घ कारावासापेक्षा राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेचे विचार जास्त आहेत यावर सर्वोच्च न्यायालयाने भर दिला. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. बचाव पक्षाने […] The post उमर खालिद, शरजील इमाम यांना झटका ! जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ; अन्य ५ आरोपींना दिलासा appeared first on Dainik Prabhat .
लाडक्या बहिणींना महापालिका निवडणूकीपूर्वी मिळणार खुशखबर; खटाखट जमा होणार ३ हजार रुपये
CM Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात ३१ डिसेंबर २०२५ रोजी नोव्हेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हफ्ता जमा झाला. डिसेंबरअखेर असल्याने थकीत तीन महिन्यांचे एकत्रित ४५०० रुपये मिळतील, अशी आशा महिलांना होती; मात्र प्रत्यक्षात केवळ एकच हफ्ता आल्याने अनेकींचा अपेक्षाभंग झाला. मात्र लाडकी बहीण योजनेच्या पुढील हफ्ताबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली […] The post लाडक्या बहिणींना महापालिका निवडणूकीपूर्वी मिळणार खुशखबर; खटाखट जमा होणार ३ हजार रुपये appeared first on Dainik Prabhat .
CSB Bank Share: तिमाही निकालानंतर सीएसबी बँकेचा शेअर ५% उसळत अप्पर सर्किटवर पोहोचला
मोहित सोमण:सीएसबी (Catholic Syrian Bank Limited) बँकेच्या शेअर्समध्ये आज जवळपास ५% वाढ झाली आहे. त्यामुळे आज तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर शेअर इंट्राडे उच्चांकावर (All time High) पोहोचला असून याशिवाय अप्पर सर्किटवरही पोहोचला. दुपारी १२ वाजेपर्यंत बँकेच्या शेअर्समध्ये ५.०५% वाढ झाल्याने प्रति शेअर ५०७.५५ रूपयांवर व्यवहार करत आहे. बँकेच्या एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या तिमाहीतील आकडेवारीनुसार, बँकेच्या एकूण ठेवीत (Total Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) डिसेंबरपर्यंत २१% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये ३३४०७ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ४०४६० कोटींवर वाढ नोंदवली गेली. कासा ठेवीत (CASA Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर ३% वाढ नोंदवल्याचे स्पष्ट झाले. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ८०४२ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ८३१६ कोटीवर वाढ नोंदवली.आकडेवारीनुसार, बँकेच्या एकूण मुदत ठेवीत (Term Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर २७% वाढ नोंदवली गेली. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या २५४३६५ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ३२१४४ कोटींवर बँकेने वाढ नोंदवली आहे. सोने अथवा संबंधित वस्तू तारण कर्जात इयर ऑन इयर बेसिसवर ४६% वाढ झाल्याचे बँकेने स्पष्ट केले. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या १३०१८ कोटींच्या तुलनेत या डिसेंबरमध्ये १९०२३ कोटींवर वाढ नोंदवली गेली आहे. बँकेच्या स्थूल आगाऊ ठेवीत (Gross Advances) इयर ऑन इयर बेसिसवर २९% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या २८९१५ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ३७२०८ कोटीवर वाढ नोंदवली आहे.गेल्या पाच दिवसांत बँकेच्या शेअर्समध्ये १८.४१% वाढ झाली असून गेल्या १ महिन्यात बँकेच्या शेअर्समध्ये ३१.४७% वाढ झाली आहे तर संपूर्ण वर्षभरात ६२.९५% व इयर टू डेट बेसिसवर (YTD) ११.६२% वाढ झाली. तत्पूर्वी २ जानेवारीला निकालानंतर बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याने शेअर अप्पर सर्किटवर (52 Week High) पातळीवर पोहोचला होता. त्यादिवशी सीएसबी बँक लिमिटेडने ५-दिवस २०-दिवस, ५०-दिवस, १००-दिवस आणि २००-दिवसांचा अंकासह दैनंदिन एमवीए (Daily Moving Average DMA) मूव्हिंग सरासरीपेक्षा चार्टवर व्यापार करत असल्याचे स्पष्ट झाले होते. ही तांत्रिक स्थिती गेल्या वर्षभरात स्टॉकच्या मार्गावर एक मजबूत वरचा कल (Upside) आणि गुंतवणूकदारांचा विश्वास दर्शवते. त्या दिवशी त्याच्या क्षेत्राने ०.७४% ने कमी कामगिरी केली असली तरी शेअरची बुलिग कामगिरी व एकूण गती मजबूत राहिली होती.
केवळ ७ कोटींचा दाक्षिणात्य सिनेमा, पण थरार हॉलीवूडला टक्कर देणारा वाचा सविस्तर
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने गेल्या काही वर्षांत दर्जेदार कथानक, जबरदस्त सस्पेन्स आणि हादरवून सोडणाऱ्या क्लायमॅक्समुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विजय सेतुपतीचा 'महाराजा' असो किंवा मोहनलाल यांचा 'दृश्यम', या सिनेमांनी प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवलं. त्यामुळेच हल्ली प्रेक्षक वेगळ्या कथांच्या, विचार करायला लावणाऱ्या गोष्टींच्या आणि शेवटपर्यंत थरार टिकवून ठेवणाऱ्या सिनेमांच्या शोधात असतात.असाच एक तमिळ थ्रिलर २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याने सस्पेन्सच्या बाबतीत या सगळ्या सिनेमांना जोरदार टक्कर दिली. चित्रपटगृहात रिलीज होताच प्रेक्षकांचे श्वास रोखून धरणारा हा सिनेमा आजही ‘बेस्ट क्राईम थ्रिलर’ म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे, आता हा चित्रपट ओटीटीवरही प्रचंड लोकप्रिय ठरत आहे.या सिनेमाची कथा अरुण नावाच्या तरुणाभोवती फिरते. अरुणला चित्रपट दिग्दर्शक बनायचं असतं आणि त्यासाठी तो सायको किलर्सवर सखोल अभ्यास करत असतो. मात्र कालांतराने त्याला पोलीस अधिकारी म्हणून नोकरी स्वीकारावी लागते. इथूनच कथेला खरा वेग येतो. कारण असाच एक सायको किलर अमानुष खुनी प्रत्यक्षात शहरात धुमाकूळ घालत असतो. अशी काहीशी ही कथा आहेया मास्टरपीस चित्रपटाचं नाव आहे रतसासन. राम कुमार दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता विष्णु विशालने मुख्य मुख्य भूमिका साकारली आहे. अमला पॉल आणि सरवनन यांनीही दमदार अभिनय केला आहे.या चित्रपटाला IMDb वर ८.३ इतकं दमदार रेटिंग मिळालं असल्यामुळे त्यामुळे थ्रिलरप्रेमींसाठी हा सिनेमा पाहणं जवळपास अनिवार्यच आहे. विशेष म्हणजे, रतसासन हा कोणताही मोठ्या बजेटचा सिनेमा नव्हता. केवळ ७ कोटी रुपयांत तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २३ कोटींहून अधिक कमाई केली. मात्र कमाईपेक्षा जास्त या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं.कुठे पाहाल?हा थरार अनुभवायचा असेल, तर रतसासन सध्या जिओ सिनेमा आणि अमेझॉन प्राईम व्हिडिओ या दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. विकेंडला घरबसल्या जबरदस्त थ्रिलर पाहायचा असेल, तर हा सिनेमा नक्कीच तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायला हवा.
मोहित सोमण: विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड (Vibhor Steel Tubes Limited), धनलक्ष्मी बँक, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक या तीनही संस्थेचे तिमाही निकाल जाहीर करण्यात आले आहेत.१) Vibhor Steel Tubes Limited- कंपनीने आज तिमाही निकाल जाहीर केलेला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, विभोरला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) ५९.५५% वाढ झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२६ मधील दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात ०.८९ कोटीवरुन १.४२ कोटीवर वाढ झाली आहे. कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर १९.३४% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीतील २६६.०९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत २८१.७६ कोटींवर वाढ झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले. कंपनीच्या ईबीटातही इयर ऑन इयर बेसिसवर सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ७.१० कोटी तुलनेत या तिमाहीत ९.४१ कोटीवर वाढ झाली आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या ईबीटा (EBITDA) मार्जिनमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ३.०१% तुलनेत ३.३४% वाढ झाली आहे. तर पीएटी (PAT Margin) इयर ऑन इयर ०.३८% वरून ०.५०% वाढले आहेकंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या स्टील ट्युब उत्पादन झालेल्या वाढीमुळे महसूलातही वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले. यासह प्रति टन वाढलेल्या महसूलासह कंपनीच्या उत्पादन खर्चात (Manufacturing Cost Control) मुळे मार्जिनमध्ये वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले. हरियाणा स्थित विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड ही पहिल्या पिढीतील प्रवर्तकांच्या नेतृत्वाखालील कंपनी असून स्टील पाईप्स व ट्यूब्सची एक मोठी उत्पादक, निर्यातदार आणि वितरक आहे. कंपनीचे कार्यक्षेत्र प्रामुख्यानेअभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील उत्पादनात आहे. कंपनीच्या उत्पादन व सेवा पोर्टफोलिओत ईआरडब्ल्यू पाईप्स, हॉट-डिप गॅल्वनाइज्ड पाईप्स, हॉलो सेक्शन्स, प्रायमर-पेंटेड पाईप्स, क्रॅश बॅरियर्स, षटकोनी खांब आणि ट्रान्समिशन लाईन टॉवर्ससह विविध प्रकारच्या उत्पादनाचा समावेश आहे. सकाळच्या सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये २% वाढ झाली असून सकाळी ११.२१ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये १.२७% वाढ झाल्याने शेअर १३८.३७ रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे.२) Dhanlaxmi Bank- धनलक्ष्मी बँकेने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. बँकेने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या एकूण व्यवसायात (Total Business) इयर ऑन इयर बेसिसवर २०.७६% वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार पाहिल्यास एकूण व्यवसायात गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या २६४४३ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ३१९३३ कोटींवर वाढ झाली आहे.बँकेच्या ठेवीत (Deposits) गेल्या वर्षीच्या डिसेंबरमधील १५०६७ कोटी तुलनेत या डिसेंबर महिन्यात १८.३९% वाढीसह १७८३९ कोटींवर वाढ नोंदवली आहे. बँकेच्या कासा ठेवीत (Current Account Saving Account CASA Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर ९.०४% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमधील ४६०२ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ५०१८ कोटीवर वाढ झाली. बँकेच्या सोने तारण कर्ज पुरवठ्यातही तब्बल इयर ऑन इयर बेसिसवर ५०.८९% वाढ झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या ३५५३ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ५३६१ कोटीवर वाढ झाली आहे. बँकेच्या अँडव्हान्समध्येही इयर ऑन इयर बेसिसवर २३.९०% वाढ नोंदवली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये ११३७५ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये १४०९४ कोटींवर वाढ नोंदवली आहे. एमएसएमई कर्जातही वाढ झाल्याचे बँकेने म्हटले. आकडेवारीनुसार, ही वाढ गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या १६१६ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये २०६४ कोटींवर वाढ झाली आहे जी २७.७२% नोंदवली गेली आहे. निकालानंतर बँकेच्या शेअर्समध्ये ४.६९% जवळपास ५% वाढ झाल्याने शेअर सकाळी ११.३३ वाजेपर्यंत २६.१३ रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे.३) Capital Small Finance Bank- कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक (Capital Small Finance Bank) तिमाही निकाल जाहीर केला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये प्रोविजनल दिलेल्या माहितीनुसार, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेच्या एकूण ठेवीत (Total Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमधील ८३८४ कोटी तुलनेत या डिसेंबर महिन्यात १८% वाढ झाल्याने ठेवी ९९३१ कोटींवर पोहोचल्या. बँकेच्या स्थूल एनपीएत (Gross Non Performing Assets NPA) कुठलाही बदल झालेला नाही. गेल्या सप्टेंबरमध्ये असलेल्या २.७% वरून डिसेंबर महिन्यात २.७% एनपीए कायम आहे. दरम्यान बँकेच्या एकूण अँडव्हान्समध्ये (Gross Advances) इयर ऑन इयर बेसिसवर १९.८% वाढ झाल्याचे बँकेने म्हटले. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ७१८४ कोटीवरुन या डिसेंबरमध्ये ८१६४ कोटींवर वाढ झाली असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.बँकेच्या मते, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत बँकेची एकूण कर्जे ८१६४ कोटी रूपये होती. इयर ऑन इयर बेसिसवर कर्जात वार्षिक १९.८% वाढ नोंदवली गेल्याचे बँकेच्या व्यवस्थापनाने आकडेवारी स्पष्ट केले. आणि तिमाही बेसिसवर (QoQ) ३.३% वाढ नोंदवली गेली.बँकेच्या आकडेवारी तिमाहीतील वितरित कर्जे वाढून ९१९ कोटी झाली, जी तिसऱ्या तिमाहीतील (Q3FY25) मधील ७३७ कोटींच्या तुलनेत २४.७% वाढ दर्शवते. बँकेच्या रिटेल कर्ज देण्याच्या दृष्टिकोनानुसार, कर्ज पोर्टफोलिओ विविध आहे, ज्यात ९८.७% कर्जे सुरक्षित आहेत.विशेषतः बँकेच्या असेट क्वालिटीत कुठलाही बदल झालेला नाही. बँकेच्या मते वर्षभर अथवा तिमाहीत मालमत्तेची गुणवत्ता स्थिर राहिली असून ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंत एकूण एनपीए २.७% होते, जे दुसऱ्या तिमाहीत (Q2FY26) आणि तिसऱ्या तिमाहीतील (Q3FY25) मधील २.७% च्या तुलनेत समान आहे. याविषयी बोलताना बँकेने,' हे बँकेच्या विवेकपूर्ण अंडररायटिंग, मजबूत वसुली यंत्रणा आणि ससुरक्षित, विविध व लहान-लहान कर्जांच्या पोर्टफोलिओमधील सातत्यपूर्ण भर दर्शवत आहे.एकूण आकडेवारी पाहिल्यास, बँकेच्या एकूण ठेवी ९९३१ कोटींवर पोहोचल्या आहेत. इयर ऑन इयर बेसिसवर १८.५% आणि तिमाही बेसिसवर ६.६% वाढल्या आहेत. कासा ठेवीत (CASA) प्रमाण सुधारले आणि डिसेंबर २०२५ पर्यंत ३५.९% च्या चांगल्या पातळीवर पोहोचले जे सप्टेंबरमध्ये ३३.९% होते. हे स्थिर आणि किफायतशीर ठेव प्रणाली तयार करण्यावर बँकेचे सातत्यपूर्ण लक्ष दर्शवते.लोन टू डिपोझिट रेशो (Loan to Deposit Ratio) बाबत बँकेने आकडेवारी देताना, ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी बँकेचे सरासरी सीडी गुणोत्तर प्रमाण ८०.४% नोंदवले असून सप्टेंबर तिमाहीत ८१.६% आणि डिसेंबर तिमाहीत रोजी संपलेल्या तिमाहीसाठी ८१.१% होते. ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी बँकेचे एलसीआर (Liquidity Coverage Ratio LCR)२१५.८२% होते. त्यामुळे बँकेच्या मते बँकेचे आर्थिक फंडामेंटल मजबूत स्थितीत आहे. आज सकाळी बँकेच्या शेअर्समध्ये १% घसरण झाली आहे. सकाळी ११.३३ वाजेपर्यंत बँकेच्या ०.१३% घसरण झाली असून शेअर २७०.३५ रूपये प्रति शेअरवर सुरु आहे.
Pune : शिवसेना उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत; प्रभाग क्रमांक १५ मध्ये लाडक्या बहिणींकडून औक्षण
मांजरी– प्रभाग क्रमांक १५ मांजरी- केशवनगर- साडेसतरानळी- शेवाळेवाडी परिसरात शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सुरुवात झाली. ठिकठिकाणी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे व माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपअण्णा घुले यांच्या नेतृत्वाखाली मांजरी येथील मांजराई देवी व केशवनगर येथील रेणुका माता मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी […] The post Pune : शिवसेना उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत; प्रभाग क्रमांक १५ मध्ये लाडक्या बहिणींकडून औक्षण appeared first on Dainik Prabhat .
Assam Earthquake।आसामला आज पहाटे जोरदार भूकंपाचा धक्का बसला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाचे केंद्र आसाममधील मोरीगाव जिल्ह्यात होते आणि त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.१ इतकी होती. आसाम आणि इतर अनेक ईशान्येकडील राज्यांमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यामुळे लोक घाबरून घराबाहेर पडले. पहाटे ४:१७ वाजता भूकंप झाला, त्यावेळी बहुतेक लोक अजूनही झोपेत होते. आसाम व्यतिरिक्त, मेघालय, […] The post आसाम हादरले ! झोपेत आलेल्या भूकंपाच्या धक्क्याने घाबरून लोक घराबाहेर पळाले ; ५.१ तीव्रतेचे भूकंपाचे बसले धक्के appeared first on Dainik Prabhat .
Sesame Seeds Benefits: वाढतं वय, चुकीची जीवनशैली आणि अनियमित आहार यामुळे आजकाल सांधेदुखी आणि हाडं कमजोर होण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. अशा वेळी तिळाचा आहारात समावेश केल्यास हाडांसाठी मोठा फायदा होऊ शकतो. तिळं ही हाडांसाठी विश्वासार्ह आणि नैसर्गिक ताकद देणारी गोष्ट मानली जाते. हिवाळा सुरू होताच तिळाचा वापर वाढतो आणि त्यामागे शास्त्रीय कारणही आहे. […] The post Sesame Seeds Benefits: तिळामध्ये आहे कॅल्शियमचा खजिना; हाडांची कमजोरी दूर करण्यासाठी हिवाळ्यात असा करा तिळाचा वापर appeared first on Dainik Prabhat .
12 वर्षांपूर्वी 239 प्रवाशांसह गायब झालेल्या MH370 विमानाचे रहस्य उलगडू शकते. 31 डिसेंबर 2025 पासून जगातील सर्वात महागडे शोधकार्य पुन्हा सुरू झाले आहे. मलेशियाच्या वाहतूक मंत्रालयाच्या मते, नवीन पद्धतीने विमानाचे स्थान निश्चित करण्याचा अंदाज लावण्यात आला आहे. अमेरिकन खाजगी कंपनी ओशन इन्फिनिटीने सांगितले आहे की, विमान शोधल्यानंतरच ती 630 कोटी रुपये शुल्क घेईल, त्याआधी नाही. मंडे मेगा स्टोरीमध्ये MH-370 विमानाचे रहस्य आणि त्याच्या शोधकार्याशी संबंधित संपूर्ण कथा… शेवटी MH-370 विमानासोबत काय झाले, याचे अचूक उत्तर कोणालाही माहीत नाही. 6 मोठ्या थिअरीज प्रचलित आहेत… **** ग्राफिक्स: द्रगचंद्र भुर्जी आणि अजित सिंग
काँग्रेसच्या संगीता तिवारी यांचा राजीनामा; ‘या’पक्षात प्रवेश करण्याची शक्यता
Sangeeta Tiwari | राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र यादरम्यान पुण्यातकाँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या माजी महिला उपाध्यक्ष संगीता तिवारी यांनी आपल्या सदस्यत्वाचा अधिकृत राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या विधानसभा निवडणुकीपासून संगीता तिवारी पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय […] The post काँग्रेसच्या संगीता तिवारी यांचा राजीनामा; ‘या’ पक्षात प्रवेश करण्याची शक्यता appeared first on Dainik Prabhat .
अमेरिका-व्हेनेझुएला तणावाचा सोन्याच्या किमतींवर परिणाम ; आज सोन्याच्या किंमतीत भरघोस वाढ, वाचा
Gold Silver Rate। आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्या सुरु असलेल्या तणावाचा परिणाम जगातील सर्वच जगावर होत आहे.दरम्यान, आता या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत वायदा बाजारात आज सोन्याच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ फेब्रुवारी २०२६ रोजी एक्सपायरी असलेले सोन्याचे वायदा १,३६,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. मागील ट्रेडिंग दिवशी सोने […] The post अमेरिका-व्हेनेझुएला तणावाचा सोन्याच्या किमतींवर परिणाम ; आज सोन्याच्या किंमतीत भरघोस वाढ, वाचा appeared first on Dainik Prabhat .
भारत–न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघात श्रेयस अय्यरला स्थान देण्यात आलं आहे. मात्र, त्याचं अंतिम कमबॅक बीसीसीआयच्या मेडिकल टीमकडून मिळणाऱ्या फिटनेस क्लिअरन्सवर अवलंबून असणार आहे.न्यूझीलंडविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी श्रेयस अय्यर सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीत खेळताना दिसणार आहे. ६ जानेवारी रोजी जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर मुंबईकडून तो हिमाचल प्रदेशविरुद्ध मैदानात उतरेल, त्यानंतर ८ जानेवारीला तो पुन्हा खेळताना दिसू शकतो.आणि यामुळे क्रिकेट चाहंत्यानमध्ये भरपूर उत्साह सुद्धा पहायला मिळत आहे.पण बंगळुरु येथील BCCI च्या (Center of Excellence) खेळाडु श्रेयस अय्यरला काही अटीसह खेळण्याची परवाणगी देण्यात आली आहे. ३१ वर्षीय अय्यरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना फिल्डींग करता वेळी दुखापत झाली होती....या दुखापतीमुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर अय्यरने आपल्या पुनर्वसनासाठी बंगळुरूतील बीसीसीआय सेंटरमध्ये जवळपास १० दिवसांचा रिहॅबिलिटेशन कालावधी पूर्ण केला.‘रिटर्न-टू-प्ले’ प्रोटोकॉलनुसार, २ जानेवारी रोजी अय्यरने एक सराव सामना खेळला. विशेष म्हणजे, या सामन्यादरम्यान त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा वेदना जाणवल्या नाहीत. याच आधारे बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला पुढील सामन्यांसाठी सशर्त परवानगी दिली आहे. श्रेयस अय्यरला बीसीसीआयने थेट संघात स्थानच दिले नाही, तर त्याला उप कर्णधारही बनवले आहे. पण त्याला उप कर्णधारपद भूषवण्यासाठी बीसीसीआयच्या एका अटीचे पालन करावे लागणारर आहे. यामुळे पुढो काय होणार हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे
Ayesha Khan: ‘धुरंधर’मधील ‘शरारत’ गाण्याने १०० मिलियन व्ह्यूजचा टप्पा ओलांडला; आयशा खान भावूक
Ayesha Khan: अभिनेत्री आयशा खान सध्या यशाच्या शिखरावर आहे. ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटातील ‘शरारत’ या गाण्याने यूट्यूबवर १०० मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. चित्रपटासोबतच त्यातील गाणीही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली असून ‘शरारत’ हे गाणे सोशल मीडियावर तसेच चित्रपटगृहांमध्येही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या मोठ्या यशानंतर आयशा खानचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने इन्स्टाग्रामवर एक […] The post Ayesha Khan: ‘धुरंधर’मधील ‘शरारत’ गाण्याने १०० मिलियन व्ह्यूजचा टप्पा ओलांडला; आयशा खान भावूक appeared first on Dainik Prabhat .
पुणे : अखिल भारतीय व्याघ्र अंदाज २०२६ अंतर्गत पुणे वनविभागात सुरू असलेल्या वन्यजीव सर्वेक्षणादरम्यान महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू (Indian Giant Squirrel) दिसल्याची नोंद झाली आहे. वाघ, बिबट्या व इतर वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणांचा अभ्यास करून त्यांच्या अंदाजित संख्येचा आढावा घेण्यासाठी हे सर्वेक्षण १ जानेवारी २०२६ पासून पुणे वनविभागातील सर्व वनपरिक्षेत्रांत राबवले जात आहे. दिनांक ५ […] The post Pune : वन्यजीव सर्वेक्षणादरम्यान पुणे वनविभागात ‘शेकरू’चे दर्शन; जंगलाच्या समृद्धीचा महत्त्वपूर्ण संकेत appeared first on Dainik Prabhat .
Stock Market Today। भारतीय शेअर बाजाराने आज आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराची सुरुवात नकारात्मकतेने केली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स, लाल रंगात उघडला आणि एनएसई निफ्टी ५० हिरव्या रंगात उघडला. मात्र व्यवहाराच्या दिवसाच्या सुरुवातीला निफ्टी देखील लाल रंगात दिसला. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स १२१.९६ अंकांनी किंवा ०.१४ टक्क्यांनी घसरून ८५,६४०.०५ वर पोहोचला, तर एनएसई निफ्टी ५० ५.१५ […] The post आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजाराची खराब सुरुवात ! सेन्सेक्स १२८ अंकांनी घसरला ; निफ्टीचीही लाल रंगात ओपनींग appeared first on Dainik Prabhat .
पाटण : गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले आणि कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सोमनाथ मंदिरावर झालेल्या पहिल्या भीषण आक्रमणाला आता एक हजार वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक आणि भावनिक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून एक विशेष लेख प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी सोमनाथ मंदिराचे वैभव, भारताची सांस्कृतिक जिद्द आणि परकीय आक्रमकांच्या क्रूरतेचा आढावा घेतला आहे. पंतप्रधानांनी आपल्या लेखात सोमनाथ मंदिराचे वर्णन 'भारताच्या आत्म्याचा शाश्वत अवतार' असे केले आहे. प्रभास पाटण येथे वसलेले हे मंदिर केवळ एक वास्तू नसून भारताच्या अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे. द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रममध्ये सोमनाथचे स्थान अग्रक्रमी असून, भारतातील १२ पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी हे पहिले आहे, असेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी यांनी इतिहासातील त्या काळ्या कालखंडाचा उल्लेख केला, जेव्हा जानेवारी १०२६ मध्ये गझनीच्या महमूदने सोमनाथवर भीषण हल्ला केला होता. या क्रूर आणि हिंसक हल्ल्याचा एकमेव उद्देश श्रद्धा आणि सभ्यतेचे महान प्रतीक नष्ट करणे हा होता. आक्रमकांनी हे धार्मिक स्थळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले होते, असे पंतप्रधानांनी आपल्या लेखात लिहिले आहे. २०२६ हे वर्ष सोमनाथ मंदिरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण १०२६ मधील त्या पहिल्या आक्रमणाला आता १००० वर्षे पूर्ण होत आहेत. मंदिर कितीही वेळा पाडले गेले तरी भारतीयांची श्रद्धा डगमगली नाही आणि प्रत्येक वेळी मंदिर अधिक वैभवाने उभे राहिले, हे भारताच्या अजेय शक्तीचे दर्शन घडवते, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.१००० वर्षांच्या संघर्षानंतरही मंदिर वैभवात उभेJai Somnath!2026 marks 1000 years since the first attack on Somnath took place. Despite repeated attacks subsequently, Somnath stands tall! This is because Somnath’s story is about the unbreakable courage of countless children of Bharat Mata who protected our culture and…— Narendra Modi (@narendramodi) January 5, 2026सोमनाथ मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून ते भारताच्या जिद्दीचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताज्या लेखात केले आहे. १०२६ मध्ये झालेल्या भीषण आक्रमणाने हे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला असला, तरी गेल्या एक हजार वर्षांत भारतीय जनतेने हे मंदिर वेळोवेळी अधिक वैभवशाली पद्धतीने उभे केले, असे पंतप्रधानांनी नमूद केले. पंतप्रधानांनी आपल्या लेखात एक महत्त्वाचा योगायोग अधोरेखित केला आहे. २०२६ हे वर्ष सोमनाथ मंदिरासाठी दुहेरी ऐतिहासिक महत्त्व घेऊन येत आहे. एका बाजूला मंदिरावरील पहिल्या आक्रमणाला १००० वर्षे पूर्ण होत असतानाच, दुसऱ्या बाजूला स्वतंत्र भारतातील मंदिराच्या पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यानंतर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेण्यात आले होते. मंदिराचे सध्याचे भव्य स्वरूप ११ मे १९५१ रोजी पूर्णत्वास आले. या ऐतिहासिक सोहळ्याला भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी पुन्हा एकदा उघडण्यात आले, अशी आठवण पंतप्रधानांनी करून दिली. पंतप्रधानांच्या मते, सोमनाथ मंदिरावर झालेला हल्ला ही मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक होती. मात्र, मंदिराची वारंवार होणारी पुनर्बांधणी ही भारताच्या सांस्कृतिक विजयाची साक्ष देते. आक्रमकांनी वास्तू पाडली, पण ते इथल्या लोकांची श्रद्धा चिरडू शकले नाहीत. आज १ हजार वर्षांनंतरही सोमनाथ मंदिर आपल्या पूर्ण वैभवात उभे राहून जगाला शांतता आणि शक्तीचा संदेश देत आहे, असे मोदींनी आपल्या लेखात म्हटले आहे.https://prahaar.in/2026/01/05/thackerays-manifesto-is-nothing-but-a-shower-of-empty-promises-minister-uday-samants-taunt/सोमनाथची कहाणी विनाशाची नाही, तर कोटींच्या स्वाभिमानाची!सोमनाथची कहाणी ही केवळ विनाशाची कथा नसून ती भारतमातेच्या कोट्यवधी पुत्रांच्या अस्मितेची आणि अढळ श्रद्धेची यशोगाथा आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधानांनी आपल्या लेखात एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. ज्या काळात सोमनाथवर आक्रमण झाले, त्या क्रूरतेचा भारतीय जनतेच्या आणि देशाच्या मनोबलावर किती खोलवर परिणाम झाला असेल, याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले. सोमनाथ हे केवळ मंदिर नव्हते, तर ते त्या काळातील मजबूत आर्थिक आणि आध्यात्मिक शक्तीचे केंद्र होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्राचीन काळी सोमनाथ मंदिराचे वैभव इतके अफाट होते की, भारताचे सागरी व्यापारी आणि खलाशी या मंदिराच्या कथा दूरवरच्या देशांत घेऊन जात असत. हे मंदिर समाजासाठी एक मोठी प्रेरणा होती. परकीय आक्रमकांनी हेच वैभव आणि भारतीयांची प्रेरणा नष्ट करण्यासाठी सोमनाथला लक्ष्य केले होते, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. दीर्घकाळ सोसलेली गुलामगिरी आणि मंदिरावर झालेले वार असूनही, आज मी अभिमानाने सांगू इच्छितो की सोमनाथ आजही दिमाखात उभे आहे, असे मोदींनी लिहिले. त्यांच्या मते, गेल्या १००० वर्षांपासून सुरू असलेला हा प्रवास विनाशाचा नसून तो भारतीय मूल्यांच्या जपणुकीचा आहे. आक्रमक आले आणि गेले, पण भारताची श्रद्धा आजही तितकीच पवित्र आणि मजबूत आहे, हाच संदेश सोमनाथच्या अस्तित्वातून जगाला मिळतो.मंदिरे म्हणजे केवळ दगडी वास्तू नव्हे, तर 'राष्ट्रीय जीवनशक्ती'भारताची प्राचीन मंदिरे ही केवळ उपासनेची ठिकाणे नसून ती ज्ञानाचे महासागर आहेत. कोणत्याही पुस्तकापेक्षा ही मंदिरे तुम्हाला आपल्या महान संस्कृतीची सखोल समज देतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वारशाचा गौरव केला आहे. पंतप्रधानांनी नमूद केले की, दक्षिण भारतातील प्राचीन मंदिरे आणि सोमनाथसारखी ज्योतिर्लिंगे ही ज्ञानाचे असंख्य धडे शिकवणारी विद्यापीठेच आहेत. सोमनाथसह अनेक मंदिरांवर परकीय आक्रमणांच्या शेकडो जखमा आहेत. ही मंदिरे वारंवार उद्ध्वस्त करण्यात आली, पण प्रत्येक वेळी ती आपल्याच भग्न अवशेषांमधून अधिक वैभवशाली आणि मजबूत होऊन पुन्हा उभी राहिली. हे केवळ मंदिरांचे पुनरुज्जीवन नाही, तर हीच खरी 'राष्ट्रीय जीवनशक्ती' आणि 'राष्ट्रीय भावना' आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. मंदिरांच्या या वारंवार होणाऱ्या जीर्णोद्धारातून भारतीयांची कधीही न हरण्याची वृत्ती दिसून येते. आक्रमकांनी वास्तू पाडली तरी संस्कृतीचे मूळ उपटता आले नाही, हाच विचार आपल्याला राष्ट्रीय अभिमान देतो. या वारशाचे जतन करणे आणि त्याचे अनुसरण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे आवाहनही पंतप्रधानांनी या निमित्ताने केले आहे.
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर ताबा, जगात टेन्शन पण भारताला लागली लॉटरी ; ९००० कोटींचा होणार फायदा ?
US Strike Venezuela। अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलावर हल्ला केला आणि नंतर लष्करी कारवाई दरम्यान राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली. अमेरिकेने पुन्हा एकदा अशी कारवाई केली आहे ज्यामुळे जागतिक तणाव वाढला आहे. दरम्यान, निकोलस मादुरो यांना न्यू यॉर्कमधील एका तुरुंगवास केंद्रात नेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रावरील अमेरिकेचे नियंत्रण आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या धाडसी […] The post अमेरिकेचा व्हेनेझुएलावर ताबा, जगात टेन्शन पण भारताला लागली लॉटरी ; ९००० कोटींचा होणार फायदा ? appeared first on Dainik Prabhat .
महापालिका निवडणुकांनंतर काँग्रेसच्या ‘या’महिला खासदार भाजपमध्ये जाणार; सुजात आंबेडकरांचा मोठा दावा
Sujat Ambedkar | काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे महापालिका निवडणुकांनंतर भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे. प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये डील झाल्याचेही सुजात आंबेडकर म्हणाले. त्याच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारासाठी सुजात आंबेडकर सोलापुरात आले होते. यावेळी केलेल्या भाषणात […] The post महापालिका निवडणुकांनंतर काँग्रेसच्या ‘या’ महिला खासदार भाजपमध्ये जाणार; सुजात आंबेडकरांचा मोठा दावा appeared first on Dainik Prabhat .
प्रसिध्द मालिका होणार सुन मी या घरची व 'मुरांबा' या सारख्या अनेक मालिकेन मध्ये काम करणारा अभिनेता शशांक केतकर याने आपली निर्मात्यावर भडास काढली आहे.अलीकडेच शशांक केतकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्याच्यासोबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.एका मालिकेच्या निर्मात्याकडून आपलं मानधन अद्याप थकवलं गेल्याचा गंभीर आरोप त्याने या व्हिडीओत केला आहे. काम पूर्ण करूनही मेहनतीचं योग्य मानधन मिळत नसेल, तर कलाकारांनी गप्प बसायचं का? असा थेट सवालही शशांकने उपस्थित केला आहे.५ वर्ष होऊन गेलीत पण पेमेंट हातात नाही मागची ५ वर्ष आणि ८ ऑक्टोबर २०२५ पासून पुन्हा संपर्क निर्माण झाल्यानंतर दिलेली एकही तारीख त्या निर्मात्याने पाळलेली नाही थोडक्यात काय निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा आता कंटाळा आला आहे... अजून एक म्हणजेच 5 जानेवारी 2026 ही तारीख त्याने दिली आहे. पूर्ण पेमेंट जमा झाले नाही तर सगळ्या कुंडलीसकट एक डिटेल व्हिडिओ करेन आणि पेमेंट झाले तर तसाही ते झाल्याचा एक व्हिडिओ पण पोस्ट करेन...या वरुन चाहत्यानमध्ये वेगळीच चर्चा सुरु झाली आहेत.चाहत्यांच्या कॅामेंट मधुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अभिनत्याने कोणत्याही निर्मात्याच नाव न घेता निर्मात्याला ईशारा दिला आहे.यावरुन नेटकरी वेगवेगळे अदांज लावत आहेत. या सर्व प्रकरणावरुन त्याच्या चाहत्यांसह मराठी टेलिव्हिजन विश्वातही चर्चा पाहायला मिळतेय.
Top Stocks to Buy:अस्थिरतेचा फायदा नफा बुकिंगसाठी? कमाईसाठी ब्रोकरेजकडून १० शेअरची यादी जाहीर
प्रतिनिधी: मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस व जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज लिमिटेड या दोन कंपन्यांनी फंडामेंटल व टेक्निकल आधारे काही नवे शेअर गुंतवणूकदारांसाठी सुचवले आहेत. कुठले आहेत पाहुयात -१) Adani Power: कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून त्यांनी लक्ष्य किंमत (Target Price TP) १७८ रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.२) Marico:कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ८७५ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत ब्रोकरेजने निश्चित केली आहे.३) Nykaa:कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ३२५ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.४) Avenue Supermarts: कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ३७२१ रूपये प्रति शेअर सामान्य खरेदी किंमत (CMP) निश्चित करण्यात आली आहे.५) Punjab National Bank: कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १२६ रुपये प्रति शेअर सीएमपी निश्चित करण्यात आली आहे.६) AU Small Finance Bak: बँकेच्या शेअरला मोतीलाल ओसवालने बाय कॉल दिला असून सीएमपी १००० रूपये प्रति शेअर सीएमपी निश्चित करण्यात आली आहे.७) Mahindra Finance: कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून सीएमपी ४०३ रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.८) RBL Bank: बँकेच्या शेअरला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ३२० रूपये प्रति शेअर सीएमपी निश्चित करण्यात आली आहे.९) Equity Small Finance: इक्विटी स्मॉल फायनान्स कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ६५ रूपये प्रति शेअर सीएमपी निश्चित करण्यात आली आहे.१०) V Mart Retail: कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून सीएमपी ७०६ रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
Gauri Sawant on Sushmita Sen: बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनने नेहमीच वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांबरोबरच वेब सीरिजमधील तिच्या भूमिका देखील प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. तिची ‘ताली’ ही वेब सीरिज विशेष चर्चेत राहिली होती. ही वेब सीरिज सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित होती. आता श्रीगौरी सावंत यांनी ‘आरपार’ […] The post Gauri Sawant on Sushmita Sen: “विश्वसुंदरीने माझ्या समाजाला मान दिला”… सुश्मिता सेनसोबतच्या भेटीची आठवण सांगताना भावूक झाल्या श्रीगौरी सावंत appeared first on Dainik Prabhat .
१५ ते २५ जानेवारीदरम्यान पुणे रेल्वे प्रवासात बदल, कोणत्या गाड्या रद्द? जाणून घ्या
पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे विभागाकडून दौंड–मनमाड रेल्वे मार्गावरील दौंड ते काष्टी स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी १५ ते २५ जानेवारी दरम्यान विशेष मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला असून, या कालावधीत पुण्यातून धावणाऱ्या अनेक वर्दळीच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून, काही गाड्यांचा प्रवास अर्धवट थांबवण्यात येणार आहे.रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, १५ जानेवारीपासून प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. याचा थेट परिणाम पुणे–सोलापूर आणि पुणे–अमरावती या महत्त्वाच्या मार्गांवरील प्रवाशांवर होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासासाठी निघण्यापूर्वी रेल्वेचे अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.या कालावधीत प्रामुख्याने पुणे आणि सोलापूर दरम्यान धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे–सोलापूर एक्स्प्रेस आणि सोलापूर–पुणे एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या या काळात धावणार नाहीत. तसेच सोलापूर–पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, पुणे–सोलापूर डीईएमयू, सोलापूर–पुणे डीईएमयू आणि पुणे–दौंड डीईएमयू या गाड्यांचाही समावेश रद्द यादीत आहे.२३ ते २६ जानेवारी दरम्यान पुणे–अमरावती आणि अमरावती–पुणे एक्स्प्रेस रद्द राहणार आहेत. याशिवाय अजनी–पुणे एक्स्प्रेस, निजामाबाद–पुणे एक्स्प्रेस, पुणे–नागपूर गरीब रथ तसेच पुणे–नांदेड एक्स्प्रेस या गाड्याही या कालावधीत धावणार नाहीत. मेगा ब्लॉकमुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यशवंतपूर–चंदीगड एक्स्प्रेस, जम्मूतवी–पुणे एक्स्प्रेस आणि हजरत निजामुद्दीन–वास्को-द-गामा एक्स्प्रेस या गाड्या मनमाड–इगतपुरी–कल्याण–पनवेल–लोणावळा मार्गे पुण्यात दाखल होतील. तसेच सातारा–दादर एक्स्प्रेस जेजुरी मार्गे, तर तिरुवनंतपुरम–सीएसएमटी एक्स्प्रेस कुर्डुवाडी–मिरज मार्गे धावेल.काही गाड्यांचा प्रवास दौंडपर्यंत न जाता मधल्या स्थानकावरच थांबवण्यात येणार आहे. इंदूर–दौंड आणि ग्वाल्हेर–दौंड एक्स्प्रेस या गाड्या खडकी स्थानकापर्यंतच धावतील. परतीच्या प्रवासात २४ आणि २५ जानेवारी रोजी दौंड–इंदूर एक्स्प्रेस दौंडऐवजी पुणे स्थानकावरून दुपारी १५:३३ वाजता सुटेल. तर २५ जानेवारी रोजी दौंड–ग्वाल्हेर एक्स्प्रेस खडकी स्थानकावरून रात्री ००:२५ वाजता प्रस्थान करेल.
उमेदवारी दाखल करणाऱ्यांमध्ये बविआ मोठा पक्ष
काँग्रेसचे केवळ १० जागांवर उमेदवारविरार : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत तब्बल ११३ जागांवर बहुजन विकास आघाडीने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे उमेदवारी दाखल करणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये वसई-विरार येथे बहुजन विकास आघाडी सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.वसई - विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि मनसे या राजकीय पक्षांनी एकत्रित आघाडी करण्यासाठी प्रयत्न केले. जागांचा तिढा न सुटल्याने शिवसेना (उबाठा) आघाडीच्या चर्चेतून सर्वप्रथम बाहेर पडली आणि स्वबळावर ८९ उमेदवार या निवडणुकीत उभे केले. तिसरा क्रमांक भारतीय जनता पक्षाचा लागत आहे. भाजपने ९३ उमेदवार निवडणुकीत उभे केले असून, यातील ४ जागांवर शिवसेना (शिंदे गट) यांच्याशी एकमत न झाल्याने चार जागांवर भाजप शिवसेना यांची मैत्रीपूर्ण लढत होत आहे, तर ८९ उमेदवार हे भाजपने कमळ निशाणीवर निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. श्रमजीवी संघटना आणि आगरी सेनेला सुद्धा भाजपने उमेदवारी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाने महायुतीचा घटक पक्ष म्हणून २७ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस यांच्यामध्ये आघाडी झाली किंवा नाही याबाबत काँग्रेसचा कोणताही नेता स्पष्ट सांगू शकत नाही. असे असले तरी काँग्रेसने सात जागांवर माघार घेतली असून १० जागांवर उमेदवार कायम ठेवले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने १७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.केवळ दोन जागांवर शिट्टी चिन्ह नाहीप्रभाग क्रमांक १५ ‘अ’ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेवर बहुजन विकास आघाडीच्या शिट्टी या चिन्हावर कोणताही उमेदवार नाही. विशेष म्हणजे या जागेसाठी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील या निवडणूक रिंगणात आहेत. तसेच प्रभाग क्रमांक १३ ‘ब’ या जागेसाठी शिट्टी या चिन्हावर उमेदवार नाही. या ठिकाणी भाजप वसई पश्चिम ग्रामीणचे मंडळ अध्यक्ष आशिष जोशी यांच्या पत्नी मनीषा जोशी या भाजपकडून निवडणूक लढवीत आहेत. या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला बहुजन विकास आघाडीने समर्थन दिल्याची चर्चा आहे.चर्चा पैशांची, शिट्टीची अन् मिळाली अंगठीवसई-विरारच्या भाजप जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील ह्या प्रभाग क्रमांक १५ मधून अविरोध निवडून येतील याबाबतचे तर्कवितर्क दोन दिवसापूर्वी संपुष्टात आले. पाटील यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवार हर्षदा मटकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजप समर्थकांकडून तर अर्ज मागे घेऊ नये म्हणून बहुजन विकास आघाडीच्या समर्थकांकडून पैशाचे आमिष दाखविण्यात आल्याच्या चर्चाही झाल्या. मात्र मटकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यानंतर चर्चा सुरू झाली निवडणूक चिन्हाची. मटकर ह्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र चिन्ह वाटपाच्या दिवशी मटकर यांना अंगठी हे निवडणूक चिन्ह अपक्ष उमेदवार म्हणून मिळाले आहे. त्यामुळे पैसे, शिट्टी येथून सुरू झालेली चर्चा आता अपक्ष आणि अंगठीवर येऊन थांबली आहे.दोन महिला विधिज्ञ आमने-सामनेप्रभाग क्रमांक ५ ‘क’ या जागेसाठी दोन महिला वकिलांमध्ये लढत होत आहे. या जागेसाठी भाजपकडून ॲड. दर्शना त्रिपाठी कोटक, तर बहुजन विकास आघाडीकडून ॲॅड. अर्चना जैन या निवडणूक लढत आहेत. या दोन महिला वकिलांच्या लढतीमध्ये मशाल या चिन्हावर संगीता नाईक या आपले नशीब आजमावित आहेत. प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वच जागांवरील लढती चर्चेतल्याउमेदवारांमध्ये आहेत.
महापालिकेच्या आखाड्यात रंगणार राजकीय कुस्त्या!
प्रभाग चारमधील लढतीकडे शहराचे लक्षगणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेची निवडणूक एकूण ११५ जागांसाठी होत आहे. मात्र महापालिकेच्या या आखाड्यात २० ते २५ ठिकाणी होणाऱ्या राजकीय कुस्त्या चांगल्याच रंगणार आहेत. संपूर्ण शहराचे लक्ष लागून असलेली सर्वाधिक तुल्यबळ लढत ही प्रभाग क्रमांक चार ‘ड’ मध्ये पाहायला मिळणार आहे. बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव यशवंत पाटील आणि बहुजन विकास आघाडीला राम राम करीत भाजपसोबत घरोबा केलेले माजी नगरसेवक महेश हरी पाटील या दोन तगड्या उमेदवारांमध्ये या ठिकाणी थेट लढत होणार आहे.वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्या आनुषंगाने निवडणुकीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शनिवारी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले असून, आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. वसई-विरारमध्ये मुख्य लढती ह्या महायुती आणि बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये होणार आहेत. शिवसेना, उबाठा आणि काँग्रेसने उमेदवार दिलेल्या काही प्रभागात तिरंगी लढतीचे चित्र आहे. सतत १० वर्ष महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या बहुजन विकास आघाडीने सर्वाधिक ११३ जागांवर आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत.भाजपकडून ९३ उमेदवार निवडणूक लढवीत असून यापैकी ४ जागांसाठी शिवसेना (शिंदे गट) याच्या उमेदवारांमध्ये भाजपची मैत्रीपूर्ण लढत होत आहे, तर ८९ जागेवर भाजपने आपले उमेदवार दिले आहेत. दरम्यान, निवडणूक म्हटली की, मोठ्या लढतीची चर्चा होणारच आहे. वसई- विरारमध्ये सुद्धा अशा २० ते २५ लढतींची चर्चा सर्वत्र होत आहे. मात्र सर्वाधिक चर्चा ही प्रभाग ४ ‘ड’ येथील लढतीबाबत होत आहे.बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव माजी नगरसेवक अजिव यशवंत पाटील हे सर्वाधिक चर्चेतील उमेदवार आहेत. कारणही तसेच आहे. एकेकाळी बहुजन विकास आघाडीच्या मुख्य फळीतील चेहरा असलेले माजी नगरसेवक महेश हरी पाटील यावेळी शिट्टीची साथ सोडून कमळावर लढत आहेत आणि त्यांच्या विरोधात बहुजन विकास आघाडीने अजिव पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. अनेक वर्ष ठाकूर कुटुंबीयांशी आणि बहुजन विकास आघाडीसोबत सलोख्याचे संबंध असणाऱ्या महेश पाटील यांनी नुकतेच कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीने तगडा उमेदवार म्हणून अजीव पाटील यांना या प्रभागात संधी दिली आहे.अशा होणार इतर तुल्यबळ लढतीसुदेश चौधरी (शिवसेना) प्रशांत राऊत (बविआ)मनोज पाटील (भाजप) हरिओम श्रीवास्तव (बविआ)पंकज ठाकूर (बविआ) मेहुल शहा (भाजप)रिना वाघ (भाजप) सुरेखा कुरकुरे (बविआ)माया चौधरी (भाजप) अमृता चोरघे (बविआ)नारायण मांजरेकर (भाजप) विनोद पाटील (बविआ)हार्दिक राऊत (बविआ) गौरव राऊत (भाजप)हितेंद्र जाधव (भाजप) स्वप्नील पाटील (बविआ)विश्वास सावंत (भाजप) निलेश देशमुख (बविआ)अतुल पाटील (शिवसेना) कल्पेश मानकर (बविआ)अशोक शेळके (भाजप) किरण भोईर (अपक्ष)किरण ठाकूर (बविआ) रवी पुरोहित (भाजप)धनंजय गावडे (बविआ) जयप्रकाश सिंह (भाजप)महेश सरवणकर (भाजप) वृंदेश पाटील (बविआ)विजय घरत (भाजप) सदानंद पाटील (बविआ)कल्पक पाटील (भाजप) निषाद चोरघे (बविआ)पंकज देशमुख (भाजप) अमित वैध (बविआ)मनीष वैध (भाजप) प्रफुल साने (बविआ)नितीन ठाकूर (भाजप) आशिष वर्तक (बविआ)मॅथ्यू कोलासो (भाजप) प्रकाश रॉड्रिग्ज (बविआ)प्रदीप पवार (भाजप) प्रवीण नलावडे (बविआ)मनिषा जोशी (भाजप) स्यारल डाबरे (काँगेस)विशाल जाधव (भाजप) रुपेश जाधव (बविआ)
आश्रमशाळेतील शिक्षकांनाही टीईटी बंधनकारक
आदिवासी विभागाकडून शासन निर्णय जारीदोन वर्षांत उत्तीर्ण न झाल्यास सेवासमाप्तीमुंबई : राज्यातील शाळांतील शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्यानंतर आता आश्रमशाळेतील शिक्षकांनाही टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. निर्धारित वेळेत टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास संबंधित शिक्षकांची सेवा समाप्त केली जाणार असून, याबाबतचा शासन निर्णय आदिवासी विभागाने जारी केला आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ आणि राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांकरिता किमान शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे.२०१३ पासून याची अंमलबजावणी केली जात आहे. २०१३ पासूनच राज्यातील आश्रमशाळांना टीईटी लागू करणे आवश्यक होते; परंतु, टीईटी आश्रमशाळांतील शिक्षकांना लागू करण्यात आली नव्हती. आता मात्र राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या प्राथमिक आश्रमशाळा व माध्यमिक आश्रमशाळांना परीक्षा लागू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निकालात स्पष्ट निर्देश देत, आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेले आणि सेवानिवृत्तीस पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक असलेले शिक्षक हे दोन वर्षांच्या आत टीईटी उत्तीर्ण करण्यास अनिवार्य असल्याचे नमूद केले. अन्यथा त्यांना सेवेत राहता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.या निकालाच्या आनुषंगाने शासनाने आता आदेश जारी केले असून अनुदानित आश्रमशाळांतील अशा शिक्षकांनी १ सप्टेंबर २०२७ पूर्वी टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. निर्धारित वेळेत टीईटी उत्तीर्ण न झाल्यास संबंधित शिक्षकांची सेवा समाप्त करण्यात येईल. यापुढे आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील अनुदानित आश्रमशाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करताना फक्त टीईटी उत्तीर्ण उमेदवारांचीच निवड केली जाणार आहे. टीईटी पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास, शैक्षणिक सत्र संपेपर्यंत कंत्राटी पद्धतीने शिक्षक नियुक्त करता येणार आहेत. मात्र, अशा कंत्राटी शिक्षकांना कोणतेही शासकीय आर्थिक अथवा सेवाविषयक लाभ मिळणार नाहीत आणि त्यांचा वेतनखर्च संबंधित संस्थांना स्वतःच्या निधीतून करावा लागणार आहे.या शासन आदेशाची तातडीने आणि काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश आदिवासी विकास विभागाने दिले आहेत. सर्व प्रकल्प अधिकारी, सहायक आयुक्त, अपर आयुक्तांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, कोणतीही दिरंगाई किंवा दुर्लक्ष सहन केले जाणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.
एक लाख 'ड्रोन वॉरियर्स'सह 'भैरव स्पेशल फोर्स'सज्ज
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; भारतीय लष्कराची झेपनवी दिल्ली : आधुनिक युद्धशास्त्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवत भारतीय लष्कराने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. शत्रूच्या घरात शिरून ड्रोनच्या सहाय्याने अचूक मारा करण्यासाठी लष्कराने अधिकृतपणे 'भैरव स्पेशल फोर्स' या नवीन युनिटची घोषणा केली आहे. या विशेष दलात तब्बल १ लाखाहून अधिक ड्रोन ऑपरेटरचा समावेश असून, आधुनिक युद्धाचे स्वरूप बदलण्याची क्षमता या दलात आहे.पारंपरिक पायदळ आणि निमलष्करी दलांच्या पलीकडे जाऊन तंत्रज्ञानावर आधारित युद्ध लढण्यासाठी या दलाची निर्मिती करण्यात आली आहे. या दलातील १ लाख सैनिक हे केवळ लष्करी प्रशिक्षणातच नाही, तर 'ड्रोन पायलटिंग', 'प्रिसिजन टार्गेटिंग' आणि 'डिजिटल सर्व्हिलन्स'मध्ये निष्णात आहेत. सध्या १५ 'भैरव बटालियन' कार्यान्वित झाल्या असून, लवकरच ही संख्या २५ पर्यंत नेली जाणार आहे. हे दल 'पॅरा स्पेशल फोर्सेस'च्या तोडीचे काम करेल, मात्र त्यांचा मुख्य भर मानवरहित यंत्रणा आणि हाय-स्पीड स्ट्राइकवर असेल.नुकत्याच पार पडलेल्या 'अखंड प्रहार' या मोठ्या युद्धसरावात भैरव स्पेशल फोर्सने आपली ताकद सिद्ध केली आहे. दक्षिण लष्करी कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली या दलाने वाळवंटी आणि दुर्गम भागात ड्रोनच्या सहाय्याने यशस्वी मोहिमा राबवल्या.येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी जयपूर येथे होणाऱ्या लष्करी दिनाच्या संचलनात 'भैरव स्पेशल फोर्स' जगासमोर आपले पहिले अधिकृत दर्शन घडवणार आहे. विशेषतः नसीराबाद येथील '२ भैरव' (डेझर्ट फाल्कन्स) ही तुकडी या संचलनाचे मुख्य आकर्षण असेल.केवळ ड्रोनच नाही, तर भारतीय लष्कराने 'रुद्र ब्रिगेड' (एकात्मिक लढाऊ तुकड्या) आणि 'शक्तिबाण' (प्रगत तोफखाना रेजिमेंट) यांसारखी नवीन युनिट्सही तैनात केली आहेत. सीमावर्ती भागात चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या हालचालींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची ही 'सायबर-फिजिकल' युद्धनीती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
गरजू रुग्णांना उपचार नाकारल्यास कारवाई
मुंबई :राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे हा त्यांचा हक्क आहे. यामध्ये कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. तसेच रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिल्यास कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' आणि 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने'शी संबंधित कोणत्याही खाजगी किंवा सरकारी रुग्णालयाने कोणत्याही तांत्रिक कारणास्तव रुग्णाला उपचार नाकारू नयेत, असे आदेश त्यांनी दिले.आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे आयोजित एका विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अण्णासाहेब चव्हाण, ठाणे जिल्हा परिमंडळाचे उपसंचालक डॉ. अशोक नंदापूरकर आणि विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.मंत्री आबिटकर यांनी बैठकीत स्पष्ट केले की, अनेकदा मूळ रेशन कार्ड नसल्यामुळे किंवा इतर किरकोळ कागदपत्रांच्या अभावामुळे रुग्णालये रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात. मूळ रेशन कार्ड नसेल तर डिजिटल रेशन कार्ड पडताळणीचा वापर करा, पण रुग्णाला उपचारांपासून वंचित ठेवू नका, असे त्यांनी ठणकावून सांगितले.या निर्णयामुळे राज्यातील लाखो गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

30 C