PMC Election: प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपा उमेदवारांच्या पदयात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद
PMC Election: विकसित पुणे शहराचा रोड मॅप असलेलं संकल्पपत्र गुरुवारी (दि.८) सकाळी प्रकाशित झाले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला अन् त्याचे पडसाद बिबवेवाडी शंकर महाराज मठ प्रभाग क्रमांक २० मध्ये उमटले. पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र यशवंत शिळीमकर, तन्वी प्रशांत दिवेकर, मानसी मनोज देशपांडे, महेंद्र माणिकचंद (मुथ्था) सुंदेचा यांच्या वतीने बिबवेवाडी परिसरात दिपक उर्फ बाबा […] The post PMC Election: प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपा उमेदवारांच्या पदयात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद appeared first on Dainik Prabhat .
Election Commission : निवडणूक आयोगाचा कारनामा ! ओळख सिद्ध करण्यासाठी चक्क खासदारालाच बजावली नोटीस
पणजी : मतदार यादीत नाव कायम राखण्यासाठी (Election Commission) आपली ओळख सिद्ध करा आणि कागदपत्रे घेऊन उपस्थित राहा, असे निर्देश दक्षिण गोव्याचे काँग्रेस खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना निवडणूक आयोगाकडुन नोटीसद्वारे देण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी राहिलेल्या फर्नांडिस यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत, हा सामान्य मतदारांना मतदानापासून रोखण्याचा […] The post Election Commission : निवडणूक आयोगाचा कारनामा ! ओळख सिद्ध करण्यासाठी चक्क खासदारालाच बजावली नोटीस appeared first on Dainik Prabhat .
मोठी बातमी! 15 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; अधिसूचना प्रसिद्ध
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदान क्षेत्रात १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी […] The post मोठी बातमी! 15 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; अधिसूचना प्रसिद्ध appeared first on Dainik Prabhat .
फडणवीसांमुळे राजकीय संस्कृतीचा ऱ्हास –सुषमा अंधारे
पिंपरी, दि. ८ (प्रतिनिधी) – २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि राज्याच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास हाेण्यास सुरूवात झाली. फडणवीस हे मानसिकदृष्ट्या असुरक्षित असलेली व्यक्ती आहे. त्यामुळे ते जास्त आक्रमक हाेतात, भ्रष्टाचारावर टीका करून इतर पक्षातील सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्ये घेऊन त्यांच्याच मांडीला माडी लावून बसायचे, हा फडणवीस यांचा ढाेंगीपणा आहे. भाजपमध्ये हाेणारे पक्ष […] The post फडणवीसांमुळे राजकीय संस्कृतीचा ऱ्हास – सुषमा अंधारे appeared first on Dainik Prabhat .
WPL 2026 kicks off with MI vs RCB match : क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. ‘वूमेंस प्रीमियर लीग’च्या (WPL) चौथ्या हंगामाचा दिमाखदार सोहळा ९ जानेवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या हंगामातील पहिलाच सामना गतविजेत्या आणि दिग्गज संघामध्ये रंगणार असून, क्रिकेट प्रेमींना पुन्हा एकदा महिला क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे. मुंबई विरुद्ध आरसीबी: ‘हाय […] The post WPL 2026 बिगुल वाजलं! पहिल्याच सामन्यात मुंबई आणि आरसीबी आमनेसामने; फ्रीमध्ये कुठे पाहता येणार? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली / न्यूयॉर्क : वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचे पुत्र अग्निवेश अग्रवाल (वय ४९) यांचे न्यूयॉर्क येथे निधन झाले. स्कीइंगदरम्यान झालेल्या अपघातात ते जखमी झाले होते. त्यांच्यावर न्यूयॉर्कमधील माउंट सायनाय रुग्णालयात उपचार सुरू असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने (कार्डियाक अरेस्ट) त्यांचे निधन झाले. या दु:खद घटनेमुळे उद्योगविश्वात शोककळा पसरली आहे. अनिल अग्रवाल यांनी सोशल […] The post Agnivesh Agrawal: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या पुत्राचे निधन; 75 टक्के संपत्ती समाजकार्यासाठी देण्याचा पुनरुच्चार appeared first on Dainik Prabhat .
बिबवेवाडी : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचाराला वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रचारासोबतच विविध सोसायट्यांमधील रहिवाशांच्या समस्या जाणून घेताना दिसत आहेत. शंकर महाराज मठ-बिबवेवाडी, प्रभाग क्रमांक २० मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गौरव घुले, प्रितम नागापुरे, अस्मिता शिंदे आणि रश्मी अमराळे यांनी विविध सोसायट्यांमध्ये प्रचार मोहीम राबवली. या उपक्रमात भाग्यश्री सोसायटी, अनिकेत सोसायटी, पारिजात […] The post PMC Election : राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा स्थानिक सोसायट्यांकडे मोर्चा, प्रचारासोबत जाणून घेतल्या समस्या appeared first on Dainik Prabhat .
मौजमजेसाठी चोरी करणारी सराईत टोळी पारगाव पोलिसांच्या जाळ्यात; 27 दुचाकी जप्त, 16 गुन्ह्यांची उकल
पारगाव (ता. आंबेगाव) : मौजमजा करण्यासाठी मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत टोळीला पारगाव पोलिसांनी जेरबंद करत मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २७ मोटरसायकली हस्तगत केल्या असून एकूण १६ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पारगाव पोलीस ठाण्याच्या या यशस्वी कारवाईचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. पारगाव पोलिसांनी सापळा रचून रितेश फकीरा रोकडे (वय १८, […] The post मौजमजेसाठी चोरी करणारी सराईत टोळी पारगाव पोलिसांच्या जाळ्यात; 27 दुचाकी जप्त, 16 गुन्ह्यांची उकल appeared first on Dainik Prabhat .
पिंपरी, दि. ८ (प्रतिनिधी) – काही दिवसांपूर्वी केजीएफ हा चित्रपट आला होता. त्यामध्ये एक गरुडा होता. त्याच्या खाणीमध्ये फक्त त्याचीच माणसं कामे करायची. या शहरात दोन गरूडा आहेत. एक दाढीवाला आणि एक बिना दाढीवाला आहे. त्यांनी या शहराला लुटून मलिदा खाल्ला असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या आमदारांवर केला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी […] The post पिंपरी चिंचवडमध्ये नवा केजीएफ appeared first on Dainik Prabhat .
ईव्हीएम सुसज्ज करण्याच्या कामाची राज्य निवडणूक आयुक्तांकडून पाहणी
मुंबई : राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज विल्सन महाविद्यालयास भेट देऊन बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) सुसज्ज करण्याच्या कामाची पाहणी केली आणि उपस्थिती अधिकारी- कर्मचारी व उमेदवारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.बृहन्मंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी प्रभाग क्र. २०१४ ते २२२ चे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाघचौरे असून त्यांचे कार्यालय विल्सन महाविद्यालयात आहे. श्रीमती शीतल देसाई, श्रीमती यू. टी. मुल्ला, श्री. अमोल मेश्राम, श्री. प्रशांत पाठक आणि श्री. सचिन शिंदे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. या सर्व अधिकाऱ्यांसह विविध उमेदवारांचे प्रतिनिधीदेखील यावेळी उपस्थित होते. या सर्वांशी श्री. वाघमारे यांनी यावेळी चर्चा केली. प्रभाग क्र. २०१४ ते २२२ साठी एकूम ४६७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी एकूण ६१० ईव्हीएम सूसज्ज करण्यात येत आहेत.
Election 2026 – आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल केलेल्या संपत्तीच्या आकड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार, २०१७ च्या तुलनेत अनेक प्रमुख उमेदवारांच्या मालमत्तेत प्रचंड वाढ झाली असल्याचे दिसुन येत आहे. प्रस्थापित नेत्यांपासून ते नव्या दमाच्या उमेदवारांपर्यंत अनेकांची श्रीमंती कित्येक पटीने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना (उबाठा) नेत्या […] The post Election 2026 : उमेदवारांच्या संपत्तीचा आलेख उंचावला.! कोणत्या पक्षाचा नेता आहे सर्वाधिक श्रीमंत, एकदा पाहाच… appeared first on Dainik Prabhat .
अर्ज बाद झालेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार? मुंबई उच्च न्यायालयात उद्या महत्त्वाची सुनावणी
मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच, उमेदवारी अर्ज बाद झालेल्या इच्छुकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अर्ज फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांच्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेत सुनावणी निश्चित केली असून ही सुनावणी उद्या, शुक्रवारी होणार आहे. त्यामुळे अर्ज बाद झालेल्या उमेदवारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. कोरोनानंतर प्रथमच होणाऱ्या […] The post अर्ज बाद झालेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार? मुंबई उच्च न्यायालयात उद्या महत्त्वाची सुनावणी appeared first on Dainik Prabhat .
Ritika Sajdeh buy Luxury Apartment in Prabhadevi : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितीका सजदेह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी मैदानावरील कामगिरीमुळे नाही, तर त्यांनी मुंबईतील अतिशय पॉश समजल्या जाणाऱ्या प्रभादेवी परिसरात केलेल्या एका मोठ्या गुंतवणुकीमुळे ही चर्चा रंगली आहे. रितीकाने प्रभादेवी येथे २६.३० कोटी रुपयांचे एक भव्य अपार्टमेंट […] The post Ritika Sajdeh Apartment : मुंबईत ‘हिटमॅन’चा नवा पत्ता! पत्नी रितीकाने सर्वात महागड्या टॉवरमध्ये घेतलं नवीन अपार्टमेंट, किंमत किती? appeared first on Dainik Prabhat .
12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; सपकाळांनी घेतला ‘हा’मोठा निर्णय, नगरसेवकांची धडधड वाढली
अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथ नगरपालिकेतील सत्तास्थापनेदरम्यान भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये झालेल्या युतीमुळे काँग्रेस पक्षात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भाजपसोबत हातमिळवणी करणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांवर कारवाईचा इशारा देण्यात आल्यानंतर, संबंधित १२ नगरसेवकांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या घटनेमुळे काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून पक्षाने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे. […] The post 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; सपकाळांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, नगरसेवकांची धडधड वाढली appeared first on Dainik Prabhat .
ईडी–आयपॅक संघर्ष चिघळला! छाप्यांनंतर तक्रारी, ममता बॅनर्जी आक्रमक; बंगालच्या राजकारणात खळबळ
कोलकाता : प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) गुरुवारी कोलकाता आणि दिल्ली येथे निवडणूक व्यवस्थापन कंपनी ‘आय-पॅक’शी संबंधित दहा ठिकाणी छापे टाकले. ही कंपनी प्रशांत किशोर यांनी सुरू केली असून सध्या ती तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक मोहिमेचे व्यवस्थापन करत आहे. याच वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने या कारवाईवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. वृत्तांनुसार, कोलकात्यात सहा […] The post ईडी–आयपॅक संघर्ष चिघळला! छाप्यांनंतर तक्रारी, ममता बॅनर्जी आक्रमक; बंगालच्या राजकारणात खळबळ appeared first on Dainik Prabhat .
संजय राऊत-एकनाथ शिंदे यांची खास भेट.! एकमेकांच्या तब्येतीची केली विचारपूस
Sanjay Raut | Eknath Shinde – राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सध्या शिंदेसेना विरुद्ध ठाकरेसेना असा टोकाचा संघर्ष सुरू असतानाच, राजकारणाच्या या रणधुमाळीत एक अत्यंत अनपेक्षित घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत हे एकमेकांसमोर आले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची यावेळी भेट घेतली. या दोन्ही कट्टर राजकीय शत्रूंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण […] The post संजय राऊत-एकनाथ शिंदे यांची खास भेट.! एकमेकांच्या तब्येतीची केली विचारपूस appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच प्रमुख आरोपींना आज न्यायालयातून कोणताही दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने या पाचही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १३ दिवसांची वाढ केली असून, त्यांच्या जामीन अर्जावर उद्या (शुक्रवारी) सुनावणी होणार आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार आणि बुधवारच्या दरम्यान तुर्कमान गेट […] The post दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात नेमकं काय घडलं? 5 आरोपींच्या कोठडीत वाढ; अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर appeared first on Dainik Prabhat .
पाणंद रस्ते समितीत सह अध्यक्षांसह परिषद सदस्य अन पाच प्रगतशील शेतकरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णययोजना प्रभावी करण्याचे चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रयत्नमुंबई : 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेचे संचालन जलदगतीने होण्यासाठी आता विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये 'सहअध्यक्ष' आणि 'पाच प्रगतशील शेतकऱ्यांचा' समावेश करण्यात येणार आहे. तसेच, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमध्ये आता जिल्ह्यातील सर्व 'विधानपरिषद सदस्यांना' देखील सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेऊन यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीवर नियुक्त केल्या जाणाऱ्या सहअध्यक्षाची निवड करण्याचे अधिकार थेट महसूल मंत्र्यांना देण्यात आले आहेत. तसेच, समितीमध्ये सहभागी होणाऱ्या पाच प्रगतशील शेतकऱ्यांची निवड करताना पारदर्शकता राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून नावांची यादी मागवतील आणि त्यानंतर जिल्हाधिकारी या निवडीला अंतिम मंजुरी देतील. एका विधानसभा क्षेत्रात एकापेक्षा जास्त उपविभागीय अधिकारी असल्यास सदस्य सचिवाच्या नियुक्तीचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार असून, समिती गठीत करण्याचे संपूर्ण अधिकारही त्यांनाच प्रदान करण्यात आले आहेत.सुधारणा खालीलप्रमाणे :विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या कामकाजात मदतीसाठी एका सहअध्यक्षाची निवड महसूल मंत्री करतील.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या नावांतून समिती ५ प्रगतशील शेतकऱ्यांची निवड करेल व त्याला जिल्हाधिकारी मंजुरी देतील.जिल्हास्तरीय समितीमध्ये आता जिल्ह्यातील सर्व विधानपरिषद सदस्यांचा सदस्य म्हणून समावेश असेल.विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती गठीत करण्याचे आणि सदस्य सचिवांची नियुक्ती करण्याचे अंतिम अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.या योजनेमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे मजबूत होऊन शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळणे सुलभ होईल.जोपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर रस्ता पाणी आणि वीज जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा विकास होणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नवीन सहभागामुळे योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात यश येईल. चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री.
चलन निर्मितीत मोठा बदल; चलन कागदनिर्मिसाठी अत्याधुनिक तंत्र कार्यन्वयित
मुंबई : भारताच्या चलनात नाण्यांप्रमाणे कागदी नोटांनाही तितकेच महत्व आहे. पाचशे, दोन हजार यांसारख्या अनेक नोटा आज चलनात आहेत. याच नोटांच्या कागदांना भारत सरकार आता खास सुरक्षा आणि योजना पुरवणार आहे. भारताच्या पायाभूत सुविधंद्यांना बळकटी देण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी चाळणी नोटा छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या उच्च सुरक्षा कागदाचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने १,८०० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मध्य प्रदेशातील नर्मदापूरम येथील सिक्युरिटी पेपर मिलमध्ये हा कागद तयार केला जाणार आहे.देशातील चलन कागदनिर्मिती व्यवस्थेत मोठा बदल होणार असून, सिक्युरिटी पेपर मिलमध्ये नवीन अत्याधुनिक उत्पादन लाईन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही लाईन केवळ चलनी नोटांसाठीच नव्हे, तर नॉन-ज्युडिशिअल स्टॅम्प पेपर्स आणि पासपोर्टसाठी आवश्यक असलेल्या उच्च-सुरक्षा कागदाच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे.नवीन प्रस्तावित लाईन १९७० पासून कार्यरत असलेल्या तीन जुन्या उत्पादन युनिटपैकी दोनची जागा घेणार आहे. हा निर्णय सुविधेच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून, उत्पादन कार्यक्षमता आणि सुरक्षिततेत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.सिक्युरिटी पेपर मिल ही सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) अंतर्गत कार्यरत आहे. देशात चलन कागदाच्या निर्मितीची संपूर्ण जबाबदारी सध्या या संस्थेकडे असून, भारतातील या क्षेत्रातील मक्तेदारी कायम आहे. डिजिटल व्यवहारांचा वापर वाढत असतानाही देशात चलनाचे परिसंचरण सातत्याने वाढत असल्याने नोटांची मागणी अद्याप कमी झालेली नाही.तज्ज्ञांच्या मते, उच्च-सुरक्षा कागदामध्ये वॉटरमार्क, सुरक्षा धागे आणि विशेष तंतूंसारखी प्रगत वैशिष्ट्ये असतात, जी बनावट नोटा रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. नोटाबंदीनंतर चलनाच्या मागणीत झालेली वाढ पाहता, देशांतर्गत उत्पादन वाढवणे अपरिहार्य ठरले होते.या प्रकल्पामुळे परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या साहित्यावरील अवलंबित्व कमी होणार असून, मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे. हा उपक्रम केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ धोरणाशी सुसंगत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
BMC Election : शिंदेंचा उमेदवार प्रचारासाठी थेट मातोश्रीवर; नेमकं काय घडलं?
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या (BMC Election) प्रचाराला जोरदार रंग चढलेला असताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने एक धाडसी पाऊल उचलले आहे. प्रभाग क्रमांक ९३ चे शिंदे सेनेचे उमेदवार सुमित वजाळे यांनी गुरुवारी थेट मातोश्रीच्या बाहेर जाऊन प्रचार केला. “ठाकरे कुटुंब आमचे मतदार आहेत, आम्हाला त्यांना भेटायचे आहे आणि आमचे मुद्दे त्यांच्यासमोर मांडायचे आहेत,” […] The post BMC Election : शिंदेंचा उमेदवार प्रचारासाठी थेट मातोश्रीवर; नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .
Auqib Nabi Century : औकिब नबी ठरला ‘गेम चेंजर’! ९० धावांत ७ विकेट्स पडल्यानंतरही ठोकलं ऐतिहासिक शतक
Auqib Nabi Century in Vijay Hazare Trophy 2026 : विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या हंगामात जम्मू-काश्मीरच्या औकिब नबीने क्रिकेट विश्वाला थक्क करणारी कामगिरी केली आहे. राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, औकिबने केवळ चेंडूनेच नव्हे तर बॅटनेही चमत्कार केला. पराभवाच्या छायेत असलेल्या जम्मू-काश्मीरला त्याने एकहाती विजय मिळवून देत इतिहास रचला आहे. आधी गोलंदाजीत […] The post Auqib Nabi Century : औकिब नबी ठरला ‘गेम चेंजर’! ९० धावांत ७ विकेट्स पडल्यानंतरही ठोकलं ऐतिहासिक शतक appeared first on Dainik Prabhat .
जुन्या नगरसेवकांच्या संपत्तीत मोठी वाढ; उमेदवारांच्या संपत्तीचा मुद्दा चांगलाच गाजतोय आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांच्या संपत्तीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार, अनेक माजी नगरसेवक आणि महापौरांच्या संपत्तीत गेल्या काही वर्षांत पाच पटीने वाढ झाली असून, लखपती असलेले नेते आता करोडपतींच्या यादीत आलेत. २२७ प्रभागांतील १७०० उमेदवारांपैकी जुन्या नगरसेवकांच्या मालमत्तेत मोठी वाढ […] The post Today TOP 10 News: ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी, नगरसेवकांच्या संपत्तीत वाढ, ‘लाडकी बहीण’, SBIचा इशारा ते EPFO पेन्शन वाढ… वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या appeared first on Dainik Prabhat .
Onion Rate : कांद्याचे दर पुन्हा गडगडले; शेतकऱ्यांना मोठा फटका
लासलगाव : आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणा-या लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून, कांदा उत्पादक शेतक-यांचे सुमारे २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात सुमारे ६०० रुपयांची घसरण झाली असून, मागील पंधरा दिवसांत तब्बल १ हजार रुपयांनी बाजारभाव खाली आले आहेत. त्यामुळे कांदा […] The post Onion Rate : कांद्याचे दर पुन्हा गडगडले; शेतकऱ्यांना मोठा फटका appeared first on Dainik Prabhat .
रोहित पवार करणार घड्याळाचा प्रचार; काका-पुतण्या एकाच मंचावरून विरोधकांवर साधणार निशाणा
Rohit Pawar | Ajit pawar : राज्यातील महापालिका निवडणुकांचा धुरळा उडू लागला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट आणि शरद पवार गट) वाढती जवळीक राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. “राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो,” असे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले असून, आजपासून रोहित पवार त्यांच्यासोबत प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. दोन्ही […] The post रोहित पवार करणार घड्याळाचा प्रचार; काका-पुतण्या एकाच मंचावरून विरोधकांवर साधणार निशाणा appeared first on Dainik Prabhat .
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी (Sandeep Deshpande) एक असलेले संतोष धुरी यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मनसेकडून मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या धुरी यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले. संतोष धुरी हे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) […] The post Sandeep Deshpande : …तेव्हा मी वेगळा निर्णय घेईन; पक्षांतराच्या चर्चेवर संदीप देशपांडेंचं मोठं वक्तव्य appeared first on Dainik Prabhat .
Test Cricket Record in AUS vs ENG Ashes : प्रतिष्ठित ‘ॲशेस‘ (Ashes) कसोटी मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने आपले वर्चस्व सिद्ध करत इंग्लंडचा ४-१ अशा फरकाने पराभव केला. सिडनी येथे झालेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवत कांगारूंनी मालिका खिशात घातली. विशेष म्हणजे, या मालिकेत दोन्ही संघांनी मिळून फलंदाजीचा असा काही वेग राखला की, कसोटी क्रिकेटच्या […] The post Test Cricket Record : ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! इंग्लंडचा धुव्वा उडवत कसोटीत रचला सर्वात मोठा विक्रम appeared first on Dainik Prabhat .
अंबरनाथ मध्ये काँग्रेसला धक्का १२ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेतील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी आज नवी मुंबई येथे भाजप मध्ये प्रवेश केला. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, संजीव नाईक ,दीपेश म्हात्रे आदी मान्यवरांच्या उपस्तीथत हा प्रवेश झाला. एकाच वेळी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी पक्षांतर केल्यामुळे अंबरनाथमध्ये भाजपाची राजकीय स्थिती अतिशय मजबूत झाली आहे.काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांची यादी१)प्रदीप नाना पाटील२) दर्शना उमेश पाटील३) अर्चना चरण पाटील४) हर्षदा पंकज पाटील५) तेजस्विनी मिलिंद पाटील६) विपुल प्रदीप पाटील७) मनीष म्हात्रे८) धनलक्ष्मी जयशंकर९) संजवणी राहुल देवडे१०) दिनेश गायकवाड११) किरण बद्रीनाथ राठोड१२) कबीर नरेश गायकवाडकाँग्रेसच्या या १२ नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे अंबरनाथमधील राजकारणाची दिशा बदलणार आहे. ज्या नगरसेवकांनी विरोधात निवडणूक लढवली, तेच आता भाजपच्या झेंड्याखाली येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर आता स्थानिक पातळीवर काँग्रेसची ताकद किती उरणार आणि भाजपला या नगरसेवकांच्या प्रवेशाने किती फायदा होणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
चांदीची 'घसरगुंडी'थेट ४% इंट्राडे कोसळले 'या'कारणामुळे वाचा आजचे दर
मोहित सोमण: या आर्थिक वर्षातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) या निर्देशांकातील नव्या पुनर्संतुलन (Rebalancing) प्रकियेसह आगामी भूराजकीय स्थितीतील अस्थिरता व आगामी युएस पेरोल रोजगार आकडेवारी पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावधगिरीची भूमिका बाळगल्याने चांदी सलग दुसऱ्यांदा कोसळली आहे. चांदी दिवसभरात थेट ४% कोसळली असल्याने कमोडिटीतील गुंतवणूकदारांना यांचा मोठा फटका बसला आहे. गुड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ५ रूपयांवर घसरण झाली असून प्रति किलो दरात ५००० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २५२ प्रति किलो दर २५२००० रूपयावर पोहोचले आहेत. काल १०००० रूपयांनी चांदी घसरल्यानंतर आज पुन्हा एकदा चांदी ५००० रुपयांनी घसरली आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर २५२० रूपये तर प्रति किलो दर २५२००० रुपयांवर पोहोचले आहेत.संकेतस्थळावरील माहितीनुसार, गेल्या ४ दिवसात चांदी १३००० रुपयांनी वाढली आहे. संपूर्ण वर्षभरात चांदीच्या दरात १४०% वाढ झाल्याने भौतिक व ईटीएफ (Exchange Traded Fund ETF) गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणात प्राधान्य मिळत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. युएससह जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेमुळे चांदी मोठ्या प्रमाणात अस्थिरत आहे. दरम्यान आगामी युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील अनिश्चितता, युएस पेरोल आकडेवारी यामुळे गुंतवणूकदारांनी नवी गुंतवणूक टाळली असून इंडेक्स पुर्व संतुलित केल्याने एकत्रित परिणाम म्हणून चांदी आणखी घसरली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) बाजारात चांदी ३ ते ४% दिवसभरात कोसळली. संध्याकाळपर्यंत चांदीच्या निर्देशांकात ३.३०% घसरण झाल्याने प्रति किलो दरपातळी २४२३२७ रुपयांवर व्यवहार करत आहे. जागतिक स्तरावरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.७४% घसरण झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ७५.४८ औंसवर पोहोचली आहे. जी परवा ७९.८९ या सर्वोच्च इंट्राडे उच्चांकावर पोहोचली होती.मागील सत्रात चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने आणि ते ३.१७% ने घसरून २५०६०५ पातळीवर स्थिरावले होते . आता गुंतवणूकदारांनी अस्थिरतेत मजबूत तेजीनंतर नफा बुक सुरु केले आहे. ईटीएफ होल्डिंगमध्ये सलग तिसऱ्या दिवशी ३.२ दशलक्ष औंसपेक्षा जास्त घट झाली असून अमेरिकेतील मिश्र आर्थिक संकेतांमुळे ही घसरण आणखी वाढली. एडीपी डेटानुसार डिसेंबरमध्ये खाजगी वेतनात केवळ ४१००० ने वाढ झाली, जी अपेक्षेपेक्षा कमी होती, तर अमेरिकेतील उत्पादित वस्तूंच्या ऑर्डरमध्ये महिन्या-दर-महिना (MoM) १.३% घट झाली, ज्यामुळे औद्योगिक दृष्टिकोनातील मृदूपणा दिसून आला आहे.
पोलिसांना चवकण्यासाठी चोरांनी लढवली अजब शक्कल...
नवी मुंबई : चोरी केल्यानंतर पोलिसांचा तपास चुकवण्यासाठी गुन्हेगार कोणत्या थराला जाऊ शकतात, याचे धक्कादायक उदाहरण सानपाडा येथील सोन्याच्या चोरी प्रकरणातून समोर आले आहे. घरफोडीनंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद होऊ नये म्हणून चोरट्यांनी तब्बल अडीच तास थेट रेल्वे रुळांवर थांबण्याची अफलातून युक्ती वापरली. मात्र पोलिसांनी केलेल्या तांत्रिक आणि गुप्त तपासामुळे अखेर या चोरीचा छडा लागला आहे.चोरीनंतर अफलातून युक्तीसानपाडा परिसरातील एका बंद घरात मागील महिन्यात घरफोडी झाली होती. या चोरीत चोरट्यांनी घरातील सुमारे २१ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. चोरीनंतर आपला मागमूस लागू नये यासाठी आरोपींनी स्वतःकडे मोबाइल फोन न ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने त्यात कैद होऊ नये म्हणून त्यांनी वेगळीच शक्कल लढवली. मध्यरात्री तीन वाजल्यापासून पहाटे साडेपाच वाजेपर्यंत ते थेट रेल्वे रुळांवर बसून राहिले.सराईत गुन्हेगारांची ओळख पटलीया प्रकरणी आरिफ अन्सारी (वय ३४) आणि इस्तियाख अन्सारी (वय ५८) या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही टिटवाळा परिसरातील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चोरी करण्यापूर्वी त्यांनी संबंधित घराची सखोल रेकी केली होती. चोरीनंतर पोलिसांचा तपास भरकटावा, यासाठीच त्यांनी ही अनोखी युक्ती अवलंबल्याचे तपासात निष्पन्न झाले.पोलिसांच्या तपासाने केला पर्दाफाशतपासात सुरुवातीला आरोपी स्टेशनपर्यंत आले असल्याचे स्पष्ट झाले होते, मात्र त्यानंतर त्यांच्या हालचालींचा कोणताही ठोस मागमूस मिळत नव्हता. गुन्हे शाखा कक्ष १ च्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि संशयास्पद हालचालींचा बारकाईने अभ्यास केला. पहाटे पहिली लोकल पकडण्यासाठी रुळांवरून बाहेर येणाऱ्या संशयित व्यक्तींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. अखेर तपास टिटवाळा परिसरापर्यंत पोहोचला आणि नियोजनबद्ध सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने महत्त्वाची कामगिरी बजावली.
Kishori Pednekar : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रलंबित गुन्ह्यांची माहिती लपवून पेडणेकर यांनी निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल करत कठोर कारवाईची मागणी केली […] The post Breaking News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर किशोरी पेडणेकर सापडणार अडचणीत? ‘ती’ माहिती लपवल्याचा मोठा आरोप, गुन्हा दाखल होणार? appeared first on Dainik Prabhat .
Ajit Pawar : ‘हा’बडा नेता महायुतीमधून बाहेर; अजित पवारांसाठी सर्वात मोठा धक्का!
पुणे : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मोठा झटका बसला आहे. दलित मतदारांना (Ajit Pawar)आकर्षित करण्याच्या उद्देशाने आरपीआय (खरात गट) सोबत केलेली युती आता धोक्यात आली आहे. आरपीआय (खरात गट)चे प्रमुख सचिन खरात यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतून तडकाफडकी माघार घेतली आहे. त्याचबरोबर […] The post Ajit Pawar : ‘हा’ बडा नेता महायुतीमधून बाहेर; अजित पवारांसाठी सर्वात मोठा धक्का! appeared first on Dainik Prabhat .
न्याय मिळवून द्यावा.! ‘धुरंधर’प्रकरणी निर्मात्यांचं थेट PM मोदींना पत्र, नेमकं प्रकरण काय?
PM Modi | Dhurandhar : आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ या सिनेमावरून सध्या चित्रपटसृष्टीत मोठे वादंग निर्माण झाले आहे. मध्य पूर्वेतील (Middle East) अनेक देशांनी या चित्रपटावर बंदी घातल्यामुळे, चित्रपट निर्मात्यांची संघटना असलेल्या ‘इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन’ने (IMPPA) आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धाव घेतली आहे. या प्रकरणात […] The post न्याय मिळवून द्यावा.! ‘धुरंधर’प्रकरणी निर्मात्यांचं थेट PM मोदींना पत्र, नेमकं प्रकरण काय? appeared first on Dainik Prabhat .
Tata Harrier And Safari Petrol Variants Prices: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सने एसयूव्ही प्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. टाटाने आपल्या अत्यंत लोकप्रिय आणि शक्तिशाली एसयूव्ही, हॅरियर (Harrier) आणि सफारी (Safari) चे बहुप्रतिक्षित ‘हायपेरियन’ (Hyperion) टर्बो पेट्रोल व्हेरिएंट्स भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच केले आहेत. विशेष म्हणजे, टाटाने या गाड्यांची सुरुवातीची किंमत इतकी प्रभावी […] The post Tata Harrier And Safari Petrol: टाटा सफारी आणि हॅरियर पेट्रोल मॉडेल्स लाँच, किंमत ₹12.89 लाखांपासून सुरू appeared first on Dainik Prabhat .
धक्कादायक! बापाचं संतापजनक कृत्य, चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलाला दिले....
मुंबई : मुंबईच्या गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगाव येथे वडिलांनी आपल्याच मुलाना अमानुषपणे गरम सूरीने हातांना आणि पायांना चटके दिल्याची बातमी समोर आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.नेमकं काय घडलं?१० ते १५ डिसेंबर दरम्यान ही घटना घडली असून , मुलांच्या शाळेतून शिक्षकांचे पैसे चोरल्याचे तक्रारी येत होत्या तसेच, घरातीलही पैसे गायब होत होते. पैसे आपलीच मुलं चोरत आहेत. असा संशय मुलांच्या वडिलांना आला, म्हणून मुलांना शिक्षा देत. आरोपींने मुलांना गरम सुरीने हाताना आणि पायांना चटके दिल्याची अमानुष घटना समोर आली आहे.पोलीस तपासात आरोपीने हे कृत्य संतापाच्या भारत केल्याचे समोर आले आहे. मुलांच्या तक्रारींनंतर तसेच माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दाखल घेत आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. जखमी मुलांवर उपचार करण्यात येत असून पुढील तपास गोरेगाव पोलीस करत आहेत
मोहित सोमण: मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (MOFSL) ने आपला नवा इक्विटी बाजाराशी संबंधित 'Full Strategy 3QFY26 Preview'नावाचा अहवाल, 'मजबूत पाया, पण कळस नाही' या मथळ्याखाली प्रसिद्ध केला आहे. एकूणच इक्विटी बाजारातील सुधारलेली कमाईची गती, धोरणात्मक प्रोत्साहन आणि लवचिक देशांतर्गत तरलतेच्या पाठिंब्याने, आर्थिक वर्ष २०२६ कॅलेंडर वर्षात भारतीय इक्विटी बाजारासाठी सकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित करण्यात आला आहे.२०२५ मध्ये जागतिक बाजारांच्या तुलनेत कमी कामगिरी करूनही, भारतीय इक्विटी बाजाराची २०२६ मध्ये मजबूत देशांतर्गत पाठबळासह सुरुवात होत आहे. गेल्या वर्षी प्रमुख निर्देशांकांनी एक ते सुरुवातीची दोन अंकी वाढ नोंदवली. निफ्टी ११%, निफ्टी मिडकॅप ६% आणि निफ्टी५०० ७% वाढला असला तरी अहवालातील अभ्यासाच्यमाणे वाढती भूराजकीय अनिश्चितता आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या जावकीमुळे (FIIs Outflow) ते निर्देशांक जागतिक बाजारांपेक्षा मागे राहिले आहेत. २०२५ मध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FIIs) जवळपास १९ अब्ज डॉलर्सचा झाला झाली आहे ज्याचे मुख्य कारण अमेरिकेच्या असमान व्यापारी उपाययोजना (Tariff) होत्या, तरीही त्याला उत्तर म्हणून देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदार (DIIs) एक मजबूत प्रतिसंतुलन म्हणून पुढे आले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.कमाईतील सुधारणा, मूल्यांकन आणि प्रवाहMOFSL ने अधोरेखित केले आहे की कमाईतील घसरणीचे चक्र लक्षणीयरीत्या कमी झाले आहे, २QFY२६ मध्ये २% वाढ नोंदवली गेली आणि त्यानंतर निफ्टी ईपीएसमध्ये केवळ किरकोळ कपात झाली. FY२६ आणि FY२७ साठी निफ्टी ईपीएस अनुक्रमे १०८४ आणि १२६७ रूपये राहण्याचा अंदाज आहे. मूल्यांकन वाजवी पातळीवर आहे, निफ्टी २१.२ पट पीईवर व्यवहार करत आहे, जो त्याच्या दीर्घकालीन सरासरीच्या जवळ आहे आणि सातत्यपूर्ण कमाईच्या वाढीमुळे विस्ताराला वाव मिळत आहे.देशांतर्गत प्रवाह बाजारांना मजबूत आधार देत आहेत. DIIs ने CY२५ मध्ये अंदाजे ९० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली, ज्याला स्थिर एसआयपी (Systematic Investment Plan SIP) प्रवाहांचा पाठिंबा होता, ज्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs) विक्री आणि प्राथमिक बाजारातील मजबूत इश्यू दोन्ही पचवण्यास मदत झाली. अहवालाने पुढे म्हटले आहे की ऐतिहासिकदृष्ट्या, अगदी माफक परदेशी गुंतवणूक प्रवाहामुळेही बाजारात मोठी तेजी आली आहे तर देशांतर्गत सहभाग बाजारातील घसरणीचा धोका मर्यादित ठेवेल अशी अपेक्षा आहे.यासह MOFSL नमूद करते की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि सरकारने केलेल्या धोरणात्मक कृती महत्वाची होती. ज्यामध्ये एकत्रित व्याजदर कपात, तरलतेचे इंजेक्शन (Liquidity Inject) जीएसटी २.० मधील कपात आणि वैयक्तिक आयकर सवलती यांचा समावेश आहे. अर्थात आर्थिक वर्ष २०२६ पासून देशांतर्गत वाढीच्या प्रेरणांमध्ये पूर्णपणे प्रतिबिंबित होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर, ही फर्म भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराला (Billateral Trade Agreement BTA) एक महत्त्वाचा उत्प्रेरक (Catalyst) मानते जो FII सहभाग पुन्हा सुरू करू शकतो आणि बाजाराचे पुनर्मूल्यांकन घडवून आणू शकतो.कमाईचा दृष्टिकोन: आठ तिमाहीतील सर्वात मजबूत (Earning Outlook)अहवालानुसार, ३QFY२६ मधील कमाई आठ तिमाहीतील सर्वात मजबूत कामगिरी दर्शवेल, ज्यात MOFSL च्या विश्वातील कंपन्यांकडून वार्षिक १६% करोत्तर नफा (Profit after tax PAT) वाढ अपेक्षित आहे. अहवालानुसार, ते मार्केटिंग (विपणन) कंपन्यांना वगळल्यास, बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढ मंदावली असूनही, कमाईची वाढ वार्षिक १३% च्या निरोगी दराने अपेक्षित आहे असे निरिक्षण अहवालाने नोंदवले आहे. एकूण कमाईतील सुधारणा व्यापक झाली आहे. त्यातील एकूण २० क्षेत्रे दोनअंकी वाढ नोंदवण्याची शक्यता आहे, जे FY२५ मध्ये सुरू झालेल्या कमाईच्या मंदीच्या चक्राच्या समाप्तीचे संकेत देते. जीएसटी २.० कपात, सणासुदीची मागणी, सुलभ व्याजदर आणि वाढलेल्या खर्चयोग्य उत्पन्नामुळे विवेकाधीन उपभोगात लक्षणीय पुनरुज्जीवन दिसून आले आहे.प्रमुख क्षेत्रीय चालक घटक (Main Sectoral Growth Driver)तिमाही ३FY२६ मधील कमाईची वाढ तेल आणि वायू (+२५%), एनबीएफसी कर्जपुरवठा (+२६%), ऑटोमोबाईल्स (+२५%), धातू (+१५%), दूरसंचार (मागील वर्षाच्या तुलनेत २.६ पट नफा वाढ), स्थावर मालमत्ता (+६४%), भांडवली वस्तू (+२४%) आणि सिमेंट (+६६%) या क्षेत्रांमुळे होईल अशी अपेक्षा आहे. या क्षेत्रांचा इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) कमाईमध्ये जवळपास ७७% वाटा असेल असा अंदाज आहे, तर पायाभूत सुविधा (Infrastructure) आणि मिडिया क्षेत्र कमकुवत राहण्याची शक्यता आहे.CY२६ साठी भारताची रणनीती (Next Strategy)मोतीलाल ओसवाल (MOFSL) चा विश्वास आहे की मजबूत मॅक्रो मूलभूत घटकांच्या आधारावर, भारतीय इक्विटीज २०२६ मध्ये जागतिक स्तरावरील कमी कामगिरीची काही प्रमाणात भरपाई करण्यासाठी चांगल्या स्थितीत आहेत. जीडीपी वाढ मजबूत आहे, महागाई नियंत्रणात आहे, आणि FY२५-२७ दरम्यान MOFSL च्या विश्वासाठी कमाईचा सीएजीआर (Compound Annual Growth Rate CAGR) १५% आणि निफ्टीसाठी १२% राहण्याचा अंदाज आहे.फर्मच्या पसंतीच्या गुंतवणूक क्षेत्रांमध्ये ऑटो, विविध वित्तीय सेवा, औद्योगिक आणि ईएमएस, ग्राहक विवेकाधीन वस्तू आणि तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. टॉप निफ्टी-५० कल्पनांमध्ये SBI, Titan, M&M, Infosys आणि Eternal यांचा समावेश आहे. पसंतीच्या नॉन-निफ्टी स्टॉक्समध्ये Dixon Technologies, Indian Hotels, Groww, TVS Motors आणि Radico Khaitan यांचा समावेश आहे. 'देशांतर्गत विकासाचे घटक दृढपणे स्थापित झाल्यामुळे आणि कमाईची गती वाढत असल्याने, भारत २०२६ कॅलेंडर वर्षात अधिक मजबूत स्थितीत प्रवेश करेल. जागतिक अनिश्चितता कायम असली तरी, बाह्य भावनांमध्ये कोणतीही सुधारणा विशेषतः भारत-अमेरिका व्यापार कराराद्वारे बाजाराच्या महत्त्वपूर्ण पुनर्मूल्यांकनासाठी एक महत्त्वाचा पूरक घटक ठरू शकते' असेही अहवालात यावेळी नमूद करण्यात आले आहे.
Election : निवडणुकीच्या तोंडावर भाजपची सर्वात मोठी कारवाई; ‘एवढ्या’जणांचे केले निलंबन
सोलापूर : महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे (Election) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या थेट इशाऱ्यानंतरही उमेदवारी मागे न घेणाऱ्या 28 कार्यकर्त्यांवर (Election) पक्षाने निलंबनाची कठोर कारवाई केली आहे. यामध्ये एक माजी उपमहापौर आणि सहा माजी नगरसेवकांचा समावेश आहे. हे सर्वजण सोलापूर महानगरपालिकेच्या १०२ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत स्वतंत्रपणे रिंगणात उतरले आहेत, ज्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना धोका निर्माण […] The post Election : निवडणुकीच्या तोंडावर भाजपची सर्वात मोठी कारवाई; ‘एवढ्या’ जणांचे केले निलंबन appeared first on Dainik Prabhat .
Stray dogs : किती भटकी कुत्री पहायची आहेत रुग्णालयात? सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा प्रश्न
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर पुन्हा सुनावणी सुरू केली. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या प्राण्यांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर आणि त्यांना नियंत्रित करण्यात नागरी अधिकाऱ्यांच्या कथित कमतरतांवर प्रकाश टाकणाऱ्या याचिकांवर लक्ष केंद्रित केले. सुनावणीदरम्यान, वरिष्ठ वकील सीयू सिंह यांनी युक्तिवाद केला की, दिल्लीलाही उंदीर आणि माकडांचा धोका आहे. जर कुत्रे अचानक नाहिसे केले तर […] The post Stray dogs : किती भटकी कुत्री पहायची आहेत रुग्णालयात? सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा प्रश्न appeared first on Dainik Prabhat .
EPFO ची भव्य योजना, कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 5 पट वाढ होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती
नवी दिल्ली : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ लवकरच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या किमान मासिक पेन्शनवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. वाढती महागाई आणि जीवनमानाचा वाढलेला खर्च लक्षात घेता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अधिक चांगली आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी सध्याची १,००० रुपयांची किमान पेन्शन वाढवून […] The post EPFO ची भव्य योजना, कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 5 पट वाढ होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: आजचे शेअर बाजार सत्र हे गुंतवणूकदारांसाठी धीरगंभीर राहिले आहे. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ७८०.१८ अंकांने घसरला असून ८४१८०.९६ पातळीवर स्थिरावला आहे तर निफ्टी २६३.९० अंकांने घसरत २५८७६.८५ पातळीवर स्थिरावला आहे. त्यामुळे सेन्सेक्स ८४२०० व निफ्टी २५९२० पातळीही गाठण्यास अयशस्वी ठरला आहे. जागतिक दबावाचा फटका आज शेअर बाजारात प्रभावीपणे बसल्याने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली. त्यामुळे सलग आठव्या सत्रात शेअर बाजार घसरले आहे. युएस कडून संभावित ५००% टॅरिफ, जागतिक भूराजकीय दबाव, कमोडिटीतील डॉलर रूपये अस्थिरता, युएस बाजारातील कमकुवत आकडेवारी, निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील सेल ऑफ दबाव, आणि मिड स्मॉल कॅप शेअर्समध्येही झालेली पडझड अशा विविध कारणांमुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग झाले आहे. बँक निर्देशांकानेही आपला कल घसरणीकडेच असल्याचे स्पष्ट केले.आयटी, मेटल, पीएसयु बँक, तेल व गॅस, ऑटो, कंज्यूमर ड्युरेबल्स या शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे बाजार लाल रंगातच बंद झाला आहे. खासकरून आज अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) ६.५८% उसळला असल्याने बाजारातील घसरणीचा अंडकरंट स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान बाजारातील घरगुती गुंतवणूकदारांनी आपली खरेदी वाढल्याची शक्यता असल्याने सलग तिसऱ्या दिवशी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतलेल्या धक्क्याला ही गुंतवणूक पचवेल असा कयास आहे. ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही आज मोठी घसरण झाली आहे ज्यामध्ये टीसीएस, हिंदाल्को, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स सारखे शेअर घसरले आहेत. दरम्यान आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक अशा शेअर्समध्ये किरकोळ वाढ झाल्याचा बाजारात आधार मिळाला.निफ्टी व्यापक निर्देशांकातील (Nifty Broader Indices) निफ्टी १००, निफ्टी २००,स्मॉलकॅप १००, स्मॉलकॅप २५० निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली आहे. त्यामुळे आज बाजारात 'व्हाईट वॉश' झाल्याचे अधिक स्पष्ट होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी आज सोशल मिडियावर पोस्ट करत ५००% अतिरिक्त शुल्क बीलाला ट्रम्प हे मान्य करु शकतात म्हटल्यावर मोठ्या प्रमाणात या घडामोडींचा दबाव निर्माण झाला. विशेषतः मेटल, आयटी, कंज्यूमर ड्युरेबल्स या शेअर्समध्ये तणाव वाढला. दुसरीकडे युएस व्हेनेझुएला यांच्यातील युद्ध सदृश्य परिस्थिती असताना गुंतवणूकदारांनी कमोडिटी बाजारातही संमिश्रित प्रतिसाद दिला आहे.डॉलरच्या तुलनेत रुपयाची आज किरकोळ घसरण झाली आहे. तर युएसने व्हेनेझुएलावर ताबा घेतलेला असताना कच्च्या तेलाच्या वाढत्या पुरवठ्याच्या संभाव्यतेमुळे कच्च्या तेलात घसरण सुरू होती. मात्र युएसकडून रशियावरील तेलाबाबत सुरु केलेल्या निर्बंधासह इतर भूराजकीय अस्थिरतेत किंमतीत १% वाढ झाली आहे. सोनेचांदीतही अस्थिरतेसह आगामी पेरोल डेटातील आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याने कमोडिटीतील किंमती तुरळक घसरल्या आहेत. या घडामोडीचा बाजारात परिणाम होत असताना गिफ्ट निफ्टी सह आशियाई बाजारातही मोठी घसरण झाली आहे. कोसपी वगळता इतर सगळ्या निर्देशांकात घसरण झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स, एस अँड पी ५०० बाजारात घसरण झाली असून नासडाक कंपोझिट निर्देशांकात किरकोळ वाढ झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ अल्काईल (४.५०%), इंडिया सिमेंट (४.३८%), निवा बुपा हेल्थ (४.१७%), ट्रायडंट (३.२२%), सोभा (२.६८%), आयडीएफसी फर्स्ट बँक (१.३८%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण भेल (१०.४८%), सिग्नेचर ग्लोबल (१०.२९%), टीआरआयएल (९.२५%), शिंडलर इलेक्ट्रॉनिक्स (७.४१%), हिन्दुस्तान झिंक (६.२३%), हिंदुस्थान कॉपर (५.३३%) समभागात झाली आहे.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याच दरम्यान ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत प्रसारित झाली. या मुलाखतीआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्ष पण थेट शब्दांत निशाणा साधला आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात एकच ब्रँड होता आणि तो म्हणजे हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यानंतर महाराष्ट्रात कोणीही ब्रँड नाही.” तसेच, स्वतःला ब्रँड म्हणवणाऱ्यांचा आम्ही निवडणुकीत “बँड वाजवू”, असा इशाराही त्यांनी दिला. महायुतीमध्ये कोणीही स्वतःला ब्रँड समजून जनतेसमोर येत असेल, तर त्याचा राजकीय बँड वाजवल्याशिवाय थांबणार नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.दरम्यान, भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले. “अजित पवार हे महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे आका आहेत,” असा आरोप करत,“भ्रष्टाचार लपवण्यासाठीच ते भाजपसोबत आले का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, “१५ तारखेनंतर जनता ठरवेल कोण काय आहे.”आगामी काळात शिवतीर्थावर ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ऐतिहासिक सभा होणार असल्याचं चित्र आहे. तसेच, “उल्हासनगरमध्ये गुंडाराज चालणार नाही,” असा ठाम इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला
Ruturaj Gaikwad Record List A Cricket : भारताचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडने क्रिकेट जगतात असा पराक्रम केला आहे, जो आतापर्यंत जगातील कोणत्याही फलंदाजाला जमलेला नाही. त्याने ‘लिस्ट-ए’ (List A) क्रिकेटमध्ये सर्वाधिक फलंदाजी सरासरीचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू माइकल बेवनला मागे टाकले आहे. त्याने गोव्याविरुद्ध शतक झळकावत २२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याचा पराक्रम […] The post Ruturaj Gaikwad Record : ऋतुराजचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात २२ वर्ष कोणाला जमलं नाही, ते मराठमोळ्या गड्याने करून दाखवलं appeared first on Dainik Prabhat .
Stock Market: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका आक्रमक भूमिकेमुळे भारतीय शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी मोठी पडझड पाहायला मिळाली. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ५०० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ लावण्याच्या विधेयकाला ट्रम्प यांनी पाठिंबा दर्शवला आहे. या बातमीने बाजारात भीतीचे वातावरण पसरले आणि सत्राच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स […] The post Stock Market: ट्रम्प यांच्या 500% टॅरिफच्या इशाऱ्याने शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स 780 अंकांनी कोसळला appeared first on Dainik Prabhat .
बालेवाडी : येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा पारंपरिक पॅटर्न बदलताना दिसत असून, “निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे. मी मतदारांच्या भेटीला जातोच, पण आता अनेक ठिकाणी मतदार स्वतःहून माझ्या भेटीसाठी पुढे येत आहेत. ही निवडणूक केवळ प्रचाराची नाही; हा विश्वासाचा जनआंदोलनासारखा प्रवास आहे,” अशी भावना उमेदवार अमोल बालवडकर यांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांत […] The post PMC Election : निवडणूक जनतेने हातात घेतली आहे, लोकांच्या प्रेमाने भारावून गेलो; अमोल बालवडकरांनी व्यक्त केल्या भावना appeared first on Dainik Prabhat .
अंबरनाथमध्ये भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’यशस्वी; काँग्रेसच्या 12 निलंबित नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. स्थानिक पातळीवर भाजपशी हातमिळवणी केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने ज्या १२ नवनिर्वाचित नगरसेवकांना निलंबित केले होते, त्यांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत हा सोहळा पार पडला. यामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेसला […] The post अंबरनाथमध्ये भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी; काँग्रेसच्या 12 निलंबित नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश appeared first on Dainik Prabhat .
Russia-Ukraine war : ट्रम्प यांचा निर्बंध विधेयकाला हिरवा कंदील; युक्रेन युद्धावर निर्णायक वळण
Donald Trump | Russia-Ukraine war – युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या धोरणात महत्त्वाचा बदल दिसून येत आहे. रिपब्लिकन सेनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी स्पष्ट केले आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर कडक आर्थिक निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला आता हिरवा कंदील दिला आहे. या निर्बंधांचा उद्देश मॉस्कोला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणे असून, त्याच वेळी ट्रम्प प्रशासन युद्ध संपवण्यासाठी शांतता […] The post Russia-Ukraine war : ट्रम्प यांचा निर्बंध विधेयकाला हिरवा कंदील; युक्रेन युद्धावर निर्णायक वळण appeared first on Dainik Prabhat .
वाहनचालकांनो लक्ष द्या! पुणे आणि सासवडला जोडणारा बोपदेव घाट 7 दिवस वाहतुकीसाठी बंद
Bopdev Ghat : पुणे आणि सासवडला जोडणाऱ्या बोपदेव घाटातील रस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणाच्या कामामुळे हा मार्ग गुरुवार, ८ जानेवारी ते १४ जानेवारी या सात दिवसांच्या कालावधीसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहितीनुसार, बोपदेव घाटात सध्या रस्त्याचे विस्तारीकरण आणि खडीकरणाचे काम सुरू आहे. कामाचा दर्जा आणि प्रवाशांची सुरक्षा […] The post वाहनचालकांनो लक्ष द्या! पुणे आणि सासवडला जोडणारा बोपदेव घाट 7 दिवस वाहतुकीसाठी बंद appeared first on Dainik Prabhat .
भेल कंपनीकडून गुड न्यूज तरीही थेट १०% शेअर कोसळला
मोहित सोमण: काही ब्रोकरेज कंपन्यांनी सरकारी मालकीची भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL) कंपनीच्या शेअर्समध्ये मार्चपर्यंत टेक्निकली बुलिश ट्रेंड अधोरेखित केला होता. तरीही भेल कंपनीच्या शेअर्समध्ये आज दिवसभरात १०% इंट्राडे उच्चांकावर घसरला आहे. दुपारी २.५२ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ९.२१% घसरण झाल्याने प्रति शेअर दर २७५.६० रूपये सुरू आहे. खर तर कंपनीने आज नव्या पुरवठ्याबाबत एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. भेलने वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रकल्पासाठी सेमी-हाय-स्पीड अंडरस्लंग ट्रॅक्शन कन्व्हर्टर्सचा पुरवठा सुरू केला असल्याचे कंपनीने आज स्पष्ट केले.भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) ने रेल्वे वाहतूक क्षेत्रासाठीच्या आपल्या 'मेक इन इंडिया' उपक्रमांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला असल्याचे कंपनीने आज म्हटले. आपल्या निवेदनात,' भेलच्या नेतृत्वाखालील टीआरएसएल (TRSL) सोबतच्या कन्सोर्टियमद्वारे राबवल्या जात असलेल्या प्रतिष्ठित वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रकल्पासाठी अंडरस्लंग ट्रॅक्शन कन्व्हर्टर्सचा पुरवठा सुरू केला आहे.' असे म्हटले. या निमित्ताने, आज भेलच्या बंगळूर येथील प्लांटमध्ये ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. भेलच्या संचालक (आयएस अँड पी), सुश्री बानी वर्मा यांनी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत,वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी खास डिझाइन केलेल्या सेमी-हाय-स्पीड अंडरस्लंग ट्रॅक्शन कन्व्हर्टर्सच्या पहिल्या संचाला हिरवा झेंडा दाखवला आहे असे कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनात स्पष्ट केले आहे. भेलचे संचालक (आर अँड डी), एस एम रामनाथन आणि टीआरएसएलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उमेश चौधरी या समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, यामुळे भेलने सेमी-हाय-स्पीड प्रोपल्शन सेगमेंटमध्ये धोरणात्मक प्रवेश केला आहे. हे ट्रॅक्शन कन्व्हर्टर्स वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या अंतिम असेंब्लीसाठी कोलकाता येथे पाठवले जात आहेत. याव्यतिरिक्त, या गाड्यांसाठी ट्रॅक्शन मोटर्स आणि ट्रान्सफॉर्मर्ससारखी इतर प्रमुख प्रोपल्शन उपकरणे भेलच्या भोपाळ आणि झांसी युनिट्सद्वारे विकसित आणि उत्पादित केली गेली आहेत.अत्याधुनिक आयजीबीटी आधारित ट्रॅक्शन कन्व्हर्टर्सने सुसज्ज असलेल्या या अंडरस्लंग डिझाइनमुळे प्रोपल्शन उपकरणे ट्रेनच्या डब्याखाली बसवली जातात, ज्यामुळे प्रवाशांच्या सुविधांसाठी डब्यात बरीच जागा मोकळी होते आणि ट्रेनची एकूण पेलोड क्षमता वाढते असेही कंपनीने म्हटले.या प्रोपल्शन प्रणालीच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये १७६ किमी प्रतितास डिझाइन गतीसह १६० किमी प्रतितास पर्यंतची गती आणि लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासादरम्यान विश्वसनीयता सुनिश्चित करण्यासाठी प्रगत थर्मल व्यवस्थापनाचा वापर करून उच्च दर्जाची कार्यक्षम ऊर्जा रूपांतरण यांचा समावेश आहे असेही कंपनीने म्हटले.ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील देशातील अग्रगण्य उत्पादन पीएसयु कंपनी भेल ऊर्जा,वाहतूक, संरक्षण आणि उद्योग क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम स्वदेशी उपाय ग्राहकांना प्रदान करते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लोकोमोटिव्ह आणि डिस्ट्रिब्युटेड पॉवर ट्रेन्ससाठी जटिल तंत्रज्ञानाचे यशस्वीपणे स्वदेशीकरण करून, भेल वाहतूक आणि रोलिंग स्टॉक क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने प्रवास करत आहे. ही मोठी अपडेट असतानाही कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली. शेअर बाजारातील अस्थिरतेचा व मागणीपेक्षा पुरवठा अधिक राहिल्याचा फटका शेअरला बसला होता.सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत, कंपनीचा निव्वळ नफा इयर ऑन इयर बेसिसवर ३०२.७% वाढून ३६०५ दशलक्ष रुपये झाला, जो मागील वर्षी याच तिमाहीत ८९५ दशलक्ष रुपये होता. या कालावधीत निव्वळ विक्री १४.१% वाढून ७५११८ दशलक्ष रुपये झाली, तर जुलै-सप्टेंबर २०२४ मध्ये ती ६५८४१ दशलक्ष रुपये होती.मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी, BHEL ने निव्वळ नफ्यात ८९.२% वाढ नोंदवली असून तो ५,३३९ दशलक्ष रुपये झाला आहे, तर आर्थिक वर्ष २४ मध्ये निव्वळ नफा २,८२२ दशलक्ष रुपये होता. वास्तविकता शेअर गेल्या ४ महिन्यात ४४% घसरले आहेत. काल कंपनीच्या शेअर्समध्ये ३% वाढ बीएसईत (Bombay Stock Exchange NSE) वाढ झाल्याने शेअर १७ आठवड्यातील सर्वाधिक पातळीवर म्हणजेच ३०५.८५ रूपये प्रति शेअरवर पोहोचले होते. तत्पूर्वी नोव्हेंबर २००७ मध्ये शेअर ३९० रुपये प्रति शेअर या नव्या उच्चांकावर पोहोचले होते. गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये ६.५२% घसरण व एक महिन्यात १.३०% वाढ झाली आहे. गेल्या १ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये २३.४१% वाढ झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) ६.२८% घसरण झाली आहे.
सुशांत शेलार घेऊन येत आहेत एस.एस.सी.बी.सी.एल दुबईत रंगणार मराठी कलाकारांची क्रिकेट लीग
कलाकार आणि क्रिकेट यांचं एक खास नातं आहे हे वारंवार दिसून आलं आहे. कधी क्रिकेटपटू मैदान सोडून अभिनय क्षेत्रात तर कधी कलाकार क्रिकेटच्या मैदानात आपली आवड जोपासताना दिसून येतात. क्रिकेट म्हटलं की, सगळ्यांमध्ये उत्साह संचारतो. मग आपले मराठी सिनेसृष्टीतील कलाकार कसे मागे राहतील. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार क्रिकेटचे शौकीन आहेत. पण शुटिंग, वेळेची कमतरता यामुळे त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी वेळ मिळत नाही हेच कारण लक्षात घेऊन अभिनेता सुशांत शेलार यांनी ‘एस एस सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीग’ चे (SSCBCL) आयोजन यंदा थेट दुबईत केले आहे. ज्योती एन्टरटेन्मेन्टचे हार्दिक जोशी आणि रंजन जोशी यांचे विशेष सहकार्य यासाठी लाभले आहे.मनोरंजन क्षेत्रासह राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रात देखील सक्रिय असणारे अभिनेता सुशांत शेलार कायमच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतात. कोविड काळ अथवा पूरपरिस्थिती गरज असेल त्याला आपल्यापरीने मदतीचा हात त्यांनी दिलाआहे. 'शेलार मामा फाउंडेशन' द्वारे ते विविध सामाजिक उपक्रम राबवतात, ज्यात सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजासाठी गरजूंना मदत करत आपलं सामाजिक भान जपलं आहे.एसएससीबीसीएल(SSCBCL) मध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील कलाकारांचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. यात काही संघ असतील. या संघामध्ये पुरुष कलाकारांसोबत महिला कलाकार, माध्यमकर्मी आणि इन्फ्लुएन्सर देखील सहभागी होणार आहेत. लवकरच हे संघ जाहीर होणार असून पर्यावरण, संस्कृती, गडकिल्ले यांचे स्मरण रहावे यासाठी टीमची नावे त्या अनुषंगाने दिली आहेत. रत्नदुर्ग-रत्नागिरी, सिंधुदुर्ग-मालवण, ताडोबा-नागपूर, अजिंक्यतारा- सातारा, शिवनेरी -पुणे, पन्हाळा-कोल्हापूर, गोदावरी-नाशिक अशा काही टीमचा समावेश असणार आहे. एसएससीबीसीएल (SSCBCL) तसेच संघाच्या टीम मधील कलाकारांची घोषणा, लोगोचे अनावरण मा.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरच करण्यात येणार असल्याचे या लीगचे सर्वेसर्वा अभिनेता सुशांत शेलार यांनी सांगितले.अभिनेता सुशांत शेलार वेगवेगळ्या मनोरंजनात्मक उपक्रमाच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना मांडल्या व यशस्वी केल्या. हीच उमेद व जोश घेऊन आता सातासमुद्रापार ‘एसएससीबीसीएल’(SSCBCL) चे आयोजन करत पुन्हा एकदा मनोरंजनाच्या नव्या आरंभासाठी मराठी चित्रपटसृष्टी सज्ज होत आहे.
‘देसी गर्ल’प्रियंकाचा ‘द ब्लफ’चित्रपटातील अॅक्शन अवतार
Priyanka Chopra | बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात प्रियंका चोप्राने हॉलिवूडमध्ये मोठे यश मिळवले आहे. लवकरच ती ‘द ब्लफ’ या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. यात ती समुद्री डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटातील दमदार लुक शेअर करण्यात आला आहे. या चित्रपटातील लुकमध्ये प्रियंका रक्ताने माखलेली असून, हातात बंदूक धरलेली दिसते. तर दुसऱ्या एका फोटोतील तिचा […] The post ‘देसी गर्ल’ प्रियंकाचा ‘द ब्लफ’ चित्रपटातील अॅक्शन अवतार appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी विरोधकांच्या तथाकथित मुलाखतीवर जोरदार टीका करत, ती “करप्ट लोकांची स्क्रिप्टेड मुलाखत” असल्याचा आरोप केला आहे. या टीकेदरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी थेट शब्दांत सांगितले की, एकनाथ शिंदे यांच्या राजकीय धसक्यानेच आज हे सगळे नाट्य रचले जात आहे. ठाकरे बंधूंच्या नावांचा थेट उल्लेख न करता डॉ. वाघमारे म्हणाल्या, “ज्या दोन भावांनी वर्षानुवर्षे एकमेकांचे चेहरेही पाहिले नाहीत, ते आज एकाच सोफ्यावर बसले आहेत. ही एकता नाही, तर एकनाथ शिंदे नावाच्या वादळाने उडवलेली झोप आहे.” त्यांच्या मते, जनतेला हे स्पष्ट दिसत आहे की सत्ता गेल्यावर अचानक आलेली ‘एकजूट’ ही केवळ राजकीय मजबुरी आहे.विरोधकांवर खोचक टीका करत त्या म्हणाल्या, “ही ‘टॉम अँड जेरी’ची जोडी कितीही प्रयत्न केले, तरी वाघाला म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांना आव्हान देऊ शकणार नाही.” जनतेचा कौल आणि वास्तवातलं प्रशासन यामध्ये जमीनअस्मानाचं अंतर असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.डॉ. वाघमारे यांनी थेट सवाल केला, “मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे घराबाहेर न पडणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आज अचानक जनतेच्या दुःखाची आठवण कशी झाली? तेव्हा प्रशासन कुठे होतं? शेतकरी, कामगार, सामान्य जनता त्रस्त असताना हे लोक काय करत होते?”ही संपूर्ण मुलाखत म्हणजे राजकारण नव्हे तर सिनेमाचा सेट असल्याची टीका करत त्या म्हणाल्या, “राजकारणाला सिनेमा समजून कितीही मोठे सेट उभे केले, मुलाखतींचे खेळ खेळले, तरी ‘बडे मियाँ-छोटे मियाँ’ची ही जोडी आता पूर्णपणे आऊटडेटेड झाली आहे.” शेवटी त्यांनी ठामपणे सांगितले की, “स्क्रिप्टेड मुलाखती, बनावटी एकजूट आणि खोटा कळवळा महाराष्ट्राची जनता ओळखते. खरी स्क्रिप्ट आता जनता लिहिणार आहे आणि त्यात एकनाथ शिंदे यांचे काम बोलणार आहे.”
मोहित सोमण: एएमएफआय (Association of Mutual Fund of India AMFI) संस्थेने त्यांच्या वार्षिक अहवालात व्यवस्थापना अंतर्गत मालमत्ता (Asset Under Management AUM) मार्च महिन्यात इयर ऑन इयर बेसिसवर २३.११% वाढल्याचे स्पष्ट केले आहे. मार्च २०२४ मधील ५३.४० लाख कोटी रुपये तुलनेत मार्च २०२५ मध्ये ६५.७४ लाख कोटीवर वाढ झाली आहे. त्यामध्ये इक्विटी व डेट या दोन्ही बाजारात वाढ झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गुंतवणूकदारांची गुंतवणूकीमधील वाढलेला रस पाहता ही वाढ झाल्याचे अहवालात अधोरेखित करण्यात आले. मार्च २०२० मधील २२.२६ लाख कोटी तुलनेत ही वाढ ५ वर्षात ६५.७४ लाख कोटीवर झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. विशेषतः अहवालात म्हटल्याप्रमाणे, निफ्टी ५० टीआरआय (Nifty 50 TRI) व सेन्सेक्स टीआरआय (Sensex TRI) यामध्ये अनुक्रमे गुंतवणूकदारांना ६% व ५.९% परतावा मिळाले असे अहवालाने आपल्या अभ्यासात म्हटले आहे. मार्च २०२५ पर्यंत पोर्टफोलिओतही विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. आकडेवारीनुसार, एकूण पोर्टफोलिओ संख्या इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३२% वाढली आहे. मार्च २०२४ मध्ये ती १७७८५६७६० होती ती मार्च २०२५ मध्ये २३४५०८०७१ झाली आहे.अहवालानुसार, केवळ आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ८.१५ लाख कोटींची व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेत गुंतवणूक झाली आहे. मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील प्राधान्य व जनजागृती वाढल्याने ही वाढ झाली आहे. इक्विटी योजनेत ४.१७ लाख कोटींची आवक बाजारात झाली.तर इतर हायब्रीड, इन्कम, डेट, पॅसिव्ह अशा इतर प्रकारच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओत वाढ झाली आहे. निरिक्षणानुसार फेब्रुवारी २०२५ मधील ६.२५% पातळीवर दरकपात झाल्यानंतर आणखी आवक गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड एयुएम (Mutual Fund Asset Under Management AUM) व सकल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product GDP) यांच्यातील गुणोत्तर मार्च २०२५ पर्यंत उच्चांकी १९.९% पातळीवर पोहोचले.क्रिसील इंटेलिजन्स व एएमएफआय यांच्या एकत्रित स्त्रोत आकडेवारीनुसार, सर्वाधिक वाढ इक्विटी/ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेत झाली आहे. मार्च २०२० मधील ६२६.९३ लाख तुलनेत मार्च २०२५ पर्यंत ही वाढ १६३८.२५ लाखावर गेली आहे. मात्र क्लोज एंडेड व इंटर्वल योजनेत मार्च २०२० मधील २७.४८ लाखावरून ५.२१ लाखावर घसरण मार्च २०२५ पर्यंत झाली आहे. इतर योजनेतही मार्च २०२० मधील ३१.६० लाखावरून पोर्टफोलिओत मार्च २०२५ पर्यंत ४१४.७२ लाखावर वाढ झाली आहे. हायब्रीड म्युच्युअल फंड योजनेत मार्च २०२० मधील ९५.७३ लाखावरून मार्च २०२५ मधील १५६.६७ लाखावर पोर्टफोलिओत वाढ झाली आहे.एसआयपीतही वाढएसआयपी (Systematic Investment Plan SIP) गुंतवणूकीतही आकडेवारीनुसार वाढ झाली आहे. संपूर्ण २०२५ मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ही वाढ २.८९ लाख कोटीवर झाली आहे. विशेषतः मार्कट टू मार्केट (MTM) बाजारात याचा लाभ झाला असून इयर ऑन इयर बेसिसवर नव्या एसआयपी खात्यात २४.५९% वाढ झाली. एकूण म्युच्युअल फंड उद्योगातील गुंतवणूकीपैकी ही २०.३१% गुंतवणूक आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये एकूण नवी एसआयपी खाती ४.२८ कोटी होती ती आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ६.८० कोटीवर गेली आहेत.गुंतवणूकदार शिस्तबद्ध, दीर्घकालीन गुंतवणुकीचा स्वीकार करत आहेत.अधिक संयमी होत आहेत आणि बाजारातील चढउतारांवर आधारित आवेगपूर्ण निर्णयांना कमी बळी पडत आहेत. म्युच्युअल फंड उद्योग जसजसा विकसित होत आहे असे म्युच्युअल फंड अहवालात मत नोंदवले गेले आहे. तसतसा हा कल सुरू राहण्याची शक्यता आहे ज्यात गुंतवणूकदार अल्प-मुदतीच्या फायद्यांपेक्षा दीर्घ मुदतीच्या परताव्याला प्राधान्य देतील असेही पुढे एसआयपी गुंतवणूकतील वाढीवर संस्थेने म्हटले.दीर्घकालीन दृष्टिकोन स्वीकारून, गुंतवणूकदार बाजारातील अस्थिरतेवर मात करू शकतात आणि त्यांच्या गुंतवणुकीची पूर्ण क्षमता वापरू शकतात, ज्यामुळे अधिक स्थिर आणि शाश्वत संपत्ती निर्मिती होते. यातील आणखी एक महत्वाचे निरीक्षण म्हणजे या दोन्ही शहरांमध्ये असाच कल दिसून येतो, कारण मार्च २०२५ च्या तुलनेत मार्च २०२० पर्यंत पाच वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवलेल्या SIP मालमत्तेचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे, तर एका वर्षापेक्षा कमी काळ ठेवलेल्या एसआयपी (SIP) मालमत्तेचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे, जे दीर्घकालीन संपत्ती निर्मिती धोरणांकडे बदलाचे संकेत देते.अस्वीकरण: म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते. योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.
Tamil Nadu Election। निवडणुकीच्या वर्षात, तामिळनाडूतील द्रमुक सरकारने पोंगल सणापूर्वी राज्यातील जनतेला एक महत्त्वाची भेट दिली आहे. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी गुरुवारी चेन्नईतील नजरथपेट्टई याठिकाणी अलंदूर परिसरातील एका रेशन दुकानातून पोंगल गिफ्ट हॅम्पर वितरण योजनेची औपचारिक सुरुवात केली. या योजनेअंतर्गत, राज्यातील २.२ कोटी रेशनकार्डधारक कुटुंबांना ३,००० रुपयांच्या रोख मदतीसह पोंगल गिफ्ट पॅक मिळेल. संपूर्ण योजनेचा […] The post द्रमुकचा निवडणूक स्ट्रोक ! तब्बल २.२२ कोटी कुटुंबांना देणार ३ हजार रोख ; साखर, ऊस अन् तांदूळही मिळणार appeared first on Dainik Prabhat .
‘बिग बॉस मराठी सिझन 6’मध्ये श्रेयस तळपदेची एन्ट्री? अभिनेत्याने स्वत: केला खुलासा
Shreyas Talpade | मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठी सिझन 6 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मागील सीझनप्रमाणे यंदाही अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करणार आहे. मात्र यंदाच्या शोमध्ये कोणते कलाकार पाहायला मिळणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. यातच आता मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही अभिनयाचा डंका गाजवणारा अभिनेता बिग बॉस मराठी सिझन 6मध्ये दिसणार असल्याची चर्चा […] The post ‘बिग बॉस मराठी सिझन 6’मध्ये श्रेयस तळपदेची एन्ट्री? अभिनेत्याने स्वत: केला खुलासा appeared first on Dainik Prabhat .
Atharva Sudame : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये परवानगीशिवाय चित्रीकरण केल्याप्रकरणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे याच्यावर पीएमपीने कडक कारवाई केली आहे. पहिल्या नोटीसला कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे आता दुसरी नोटीस बजावून ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम तात्काळ भरली नाही, तर भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल […] The post Atharva Sudame: अथर्व सुदामेला पीएमपीचा आणखी मोठा दणका; ‘इतक्या’ हजारांचा दंड, रक्कम न भरल्यास गुन्हा दाखल होणार appeared first on Dainik Prabhat .
IPAC कंपनीवर ED चा छापा! IPAC प्रमुख प्रतीक जैन नेमके कोण आहेत? ; कंपनीत ममता बॅनर्जींचाही सहभाग
IPAC Company ।अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देशभरातील अनेक राज्यांमध्ये दररोज छापे टाकत असताना, आज पश्चिम बंगालमधील इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (आयपीएसी) कंपनीवर छापा टाकला. ईडीच्या कारवाईदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली होती, त्यामुळे हा छापा महत्त्वपूर्ण होता. कंपनीचे सह-संस्थापक प्रतीक जैन आहेत. आय-पीएसी ही साल्ट लेकमधील एक राजकीय सल्लागार फर्म आहे. प्रशांत किशोर […] The post IPAC कंपनीवर ED चा छापा! IPAC प्रमुख प्रतीक जैन नेमके कोण आहेत? ; कंपनीत ममता बॅनर्जींचाही सहभाग appeared first on Dainik Prabhat .
बुलढाण्यात लाडकी बहीण योजेनचा लाभ घेणाऱ्या महिलांना झटका; सरकारची कडक कारवाई
बुलढाणा : राज्यातील गोरगरीब महिलांना आर्थिक पाठबळ मिळाव यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली. या योजनेचा असंख्य बहिणींनी लाभही घेतला आणि सरकारला अनेक शुभाशीर्वादही दिले.या योजनेचा लाभ फक्त आर्थिक दृष्ट्या कमकुवत महिलांनी घ्यावा असे सरकारचे धोरण होते, परंतु काही ठिकाणी प्रचंड पैसे असलेल्या, अगदी आर्थिक स्थिती उत्तम असलेल्या महिलांनीही पैसे फुकट पैसे मिळत आहेत. म्हणून या योजनेचा लाभ घेतला आणि यामुळे राजुत सर्वत्र खळबळ माजली.ही बाब सरकारच्या लक्षात येताच अर्ज मागे घेण्यासाठी अनेक आवाहने ही करण्यात आली मात्र कोणीही अर्ज मागे घेतला नाही. शेवटी सरकाराने कठोर कारवाई करत संबंधित महिलांकडून रक्कम वसुली करत कायदेशीर कारवाई हि केली आहे.बुलढाणा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शासनाकडून महिला व बालकल्याण विभागाला विविध विभागांत कार्यरत असलेल्या १९६ कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली होती. या सर्व कर्मचाऱ्यांच्या पात्रतेची सखोल चौकशी करण्यात आली.चौकशीत १९० कर्मचारी अर्धवेळ स्वरूपात कार्यरत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हे कर्मचारी योजनेसाठी पात्र ठरले. मात्र उर्वरित ६ शासकीय कर्मचारी अपात्र असतानाही त्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले.या सहा कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी १६ हजार ५०० रुपये याप्रमाणे एकूण ९९ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच या प्रकरणात पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.शासनाची फसवणूक करून ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणे संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद येंडोले यांनी या संपूर्ण कारवाईची अधिकृत माहिती दिली आहे.
प्रतिनिधी: आज गुंतवणूकदारांना कुठले शेअर लघू व मध्यम कालीन फायदेशीर ठरतील यावर मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस व जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज लिमिटेड (JMFL) या ब्रोकरेज कंपन्यानी काही शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घ्या कुठल्या कंपन्यांचे शेअर गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरतील?जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज -१)Teneco Clean Air India- ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून ६१० रूपये लक्ष्य किंमत (Target Price TP) निश्चित केली आहे.२) Titan Company- कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ४७३० रुपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.३) Info Edge- कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १४३० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस -४) Kalyan Jewellers - कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ५२१ रुपये सामान्य खरेदी किंमत (Common Market Price CMP) सह २५% अपसाईड वाढीसह ६५० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.
धाडसाचे अमाप कौतुक! ११ वर्षांच्या भावाने बिबट्याच्या तावडीतून वाचवला बहिणीचा जीव
सांगली : सध्या महाराष्ट्रात बिबट्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. अनेक आई बाबानी आपली चिमुकली मुले आणि कुटुंबीयांनी म्हातारी माणसे गमावली आहेत. त्यामुळे गावांमध्ये बिबट्यांविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अशीच काहीशी घटना सांगली जिल्ह्यातील उपवळे गावात बुधवारी ७ जानेवारी रोजी रात्री घडली. घराबाहेर दबा धरून बसलेल्या बिबट्याने ९ वर्षीय चिमुकलीवर झडप घालत तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखून तिच्या ११ वर्षांच्या भावाने धाडस दाखवत बहिणीचा जीव वाचवला. या प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, मुलाच्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.नेमकं काय घडलं?उपवळे गावातील हनुमान मंदिराजवळ संग्राम पाटील यांचे घर आहे. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर शिवम आणि स्वरांजली पाटील हे भाऊ-बहीण एका घरातून दुसऱ्या घराकडे जात होते. त्याच वेळी घरांच्या मधील मोकळ्या जागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक स्वरांजलीवर हल्ला चढवत तिची मान पकडली.क्षणाचाही विलंब न करता शिवमने प्रसंगावधान राखत बहिणीचा पाय पकडला आणि तिला बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढण्याचा प्रयत्न सुरू केला. बिबट्याने दोघांना काही अंतर फरफटत नेले, मात्र शिवमने बहिणीचा पाय सोडला नाही. याच दरम्यान मुलांच्या आईने जोरात आरडाओरडा केला. आवाज आणि लोकांची गर्दी वाढताच बिबट्याने अखेर मुलीला सोडून पळ काढला.स्वेटर आणि टोपी ठरली संरक्षणाची ढालस्वरांजलीने स्वेटर व डोक्यावर टोपी घातलेली असल्याने बिबट्याचे दात थेट मानेत रुतले नाहीत. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र तिच्या मान, हात आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. दोन्ही मुलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.अवघ्या ११ वर्षांच्या शिवम पाटीलने दाखवलेल्या धैर्यामुळे मोठा अनर्थ टळला. जीव धोक्यात घालून बहिणीला वाचवणाऱ्या या चिमुकल्या वीराचे गावासह संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
Nashik Accident : शिर्डीला साई बाबांच दर्शन घेतल अन् घरी परताना रस्त्यामध्येच...चौघे जागेवरच ठार!
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील आंबेगन शिवाराजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी दोन वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा ते सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.अशी माहिती पोलीसांकडुन समोर आली आहे. अपघातात नाशिकहून पेठकडे जात असलेली कार आणि विरुद्ध दिशेने येणारी दुसरी कार धडकली. धडक इतकी जोराची होती की दोन्ही वाहनांचे अवशेष चक्काचूर झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहेत.जखमींवर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये चार महिलांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टर्सनी सांगितले आहे. माहिती नुसार, प्रवासी शिर्डी येथे साईंचे दर्शन घेऊन नाशिकमार्गे गुजरातमधील वापीकडे जात असताना चाचडगाव टोलनाका पार केल्यानंतर अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.हे अपघात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या भीषण अपघातासारखेच आहे. राहुरी ते शनिशिंगणापूर रस्त्यावर उंबेरे गावाजवळ रिक्षा आणि मिनीबसची समोरासमोर धडक झाली होती, ज्यात इगतपुरीजवळील गिरणारे येथील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आणि दोन गंभीर जखमी झाले.विशेष म्हणजे या अपघातात मृतकांमध्ये दीपक जगन डावखर (वय २२), आकाश मनोहर डावखर (वय २२), दीपक विजय जाधव (वय २२) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये रुपेश गणेश भगत (वय १९) आणि रोशन गंगाधर डावखर यांचा समावेश आहे.प्रशासनाने अपघाताच्या कारणाची चौकशी सुरू केली असून, महामार्गावर वाहनांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अधिक सतर्कता घेण्याचे आवाहन केले आहे.
Visa Service Suspend। बीसीसीआयने आयपीएलमधून खेळाडूंना वगळण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ बांगलादेशने भारताला मोठा धक्का दिला आहे. बांगलादेशने भारतीयांसाठी सर्व व्हिसा सेवा स्थगित केल्या आहेत, परंतु विद्यार्थी आणि व्यवसाय व्हिसा सेवा सुरू राहतील. बांगलादेश सरकारने दिल्ली, आगरतळा, मुंबई, गुवाहाटी आणि चेन्नई येथील त्यांच्या दूतावासांना आणि वाणिज्य दूतावासांना सामान्य व्हिसा सेवा स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय […] The post बांगलादेशचा भारताला झटका ! भारतीयांसाठीच्या व्हिसा सेवा केल्या स्थगित ; दोन प्रकरणांमध्ये दिला दिलासा appeared first on Dainik Prabhat .
विरोधक समोरासमोर येताचं काय घडलं? संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीने चर्चांना उधाण
Sanjay Raut and Eknath Shinde | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. दोघेही गुरुवारी मुंबईत एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी एकनाथ शिंदे हे त्यांची मुलाखत आटोपून बाहेर पडत होते. यानंतर लगेचच संजय राऊत यांची मुलाखत होती. त्यासाठी ते स्टुडिओच्या दिशेने जात होते. त्यावेळी समोरुन एकनाथ शिंदे […] The post विरोधक समोरासमोर येताचं काय घडलं? संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीने चर्चांना उधाण appeared first on Dainik Prabhat .
‘अशी’करते तापसी पन्नू चित्रपटांची निवड; अभिनेत्रीने सांगितलं कारण, म्हणाली “आता मी फक्त…”
Actress Taapsee Pannu : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या करिअरविषयी भाष्य करताना मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तापसीने इंडस्ट्रीमध्ये येण्यामागचे तिचे कारण आणि ती चित्रपटाची निवड करताना कोणती काळजी घेते याविषयी सांगितले आहे. अभिनेत्री तापसी पन्नूचा चाहतावर्ग मोठा असून, ती तिच्या अभिनय आणि वेगवेगळ्या लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. याशिवाय तिची बेधडक […] The post ‘अशी’ करते तापसी पन्नू चित्रपटांची निवड; अभिनेत्रीने सांगितलं कारण, म्हणाली “आता मी फक्त…” appeared first on Dainik Prabhat .
ट्रायडंट कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान वाढ
मोहित सोमण: ट्रायडंट समुहाने त्यांचीच असूचीबद्ध उपकंपनी (Subsidiary) असलेल्या मायट्रायंडटकंपनी.डॉटकॉम (Mytirdent.com) कंपनीचे अधिग्रहण जाहीर केल्यानंतर कंपनीचा शेअरमध्ये तुफान वाढ झाली आहे. १ लाख रूपयांचे शेअर कंपनीने १० रुपये दर्शनी मूल्य (Face Value) प्रमाणे हे अधिग्रहण केल्याचे एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. संपूर्ण रोखीत हा व्यवहार झाल्याचेही कंपनीने स्पष्ट केल्याने संपूर्ण १००% अधिग्रहण कंपनीने केल्याचे म्हटले. त्यामुळे आता ही कंपनी ट्रायडंट समुहाच्या संपूर्ण मालकीची झाली आहे. एकूण १०००० शेअर कंपनीने खरेदी केल्याचे म्हणत ब्रँडची उपस्थिती वाढवण्यासाठी, ब्रँड बिल्डिंग उपक्रमांसाठी 'आणि परदेशी बाजारपेठांमध्ये, विशेषतः अमेरिकेच्या बाजारपेठेत, ट्रायडेंट उत्पादनांची विक्री व विपणन करण्यासाठी, कंपनीची एक देशांतर्गत पूर्ण मालकीची उपकंपनी (DWOS) स्थापन करण्याच्या उद्देशाने Mytrident.com लिमिटेडचे अधिग्रहण करणे आहे.या देशांतर्गत पूर्ण मालकीच्या उपकंपनीचे (DWOS) अधिग्रहण ही बदलत्या व्यापार वातावरणाला प्रतिसाद देण्यासाठी, जोखीम कमी करण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठेतील नवीन संधींचा फायदा घेण्यासाठी उचललेले एक सक्रिय पाऊल आहे.' असे कंपनीने यावेळी स्पष्ट केले. याशिवाय कंपनीच्या आपल्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्याने कंपनीच्या कापड उद्योगात ७.८८% म्हणजेच जवळपास ८% वाढ झाल्याचे दिसून आले.तांत्रिकदृष्ट्या शेअर 'बुलिश' असताना अस्थिरतेत शेअर्समध्ये मागणी वाढल्याने कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आज ८% इंट्राडे उच्चांकावर शेअर पोहोचला आहे. दुपारी १२.५९ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ४.६६ रूपये प्रति शेअरवर वाढ झाली होती. कंपनीने आज शेअर्समध्ये २८.५० रूपये इंट्राडे उच्चांकावर वाढ नोंदवली आहे. तिमाही निकालात कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ४.३३% वाढ झाली कंपनीच्या निव्वळ उत्पन्नात (Net Income) ९.३% वाढ झाली आहे. काल कंपनीच्या शेअर्समध्यही उच्चांक वाढ झाली होती. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात कंपनीनं ट्रायडंट ग्लोबल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीत २५० कोटीची गुंतवणूक करून ३०.४२% भागभांडवल (Stake) खरेदी केला होता त्यानंतर शेअर ३० रूपये प्रति शेअर या उच्चांकावर पोहोचला होता.MyTrident.com लिमिटेड २०२१ मध्ये स्थापन झाली होती.ही एक भारतीय असूचीबद्ध कंपनी असून जिची स्थापना प्रामुख्याने सर्व प्रकारच्या वस्तूंच्या भारतातील आणि भारताबाहेरील ऑनलाइन व्यापारासह, कोणत्याही प्रकारे व्यापार, आयात, निर्यात, विपणन (Marketing) इत्यादी व्यवसाय करण्यासाठी करण्यात आली आहे. याशिवाय मुख्य ट्रायडंट कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या ५ दिवसात २.७३% वाढ झाली असून गेल्या १ महिन्यात १.४०% वाढ झाली आहे तर संपूर्ण वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये १५.४९% घसरण झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) २.६५% वाढ झाली आहे. तांत्रिकदृष्ट्या व्यापक बाजाराच्या (Broader Market) संदर्भात, सेन्सेक्स कमी पातळीवर उघडला असला तरी आज शेअर त्याच्या ५०-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या खाली व्यवहार करत होता पण ५०-डीएमए (Daily Moving Average DMA) २००-डीएमएच्या वर राहिला जे संमिश्रित तांत्रिक कल आहे. या परिस्थितीत ट्रायडेंट लिमिटेडची उत्कृष्ट कामगिरी एकूण बाजाराच्या तुलनेत त्याचे वेगळे वैशिष्ट्य अधोरेखित करते.
ED raids IPAC। पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीशी संबंधित राजकारण चांगलेच तापले आहे. गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने आयपीएसी प्रमुख प्रतीक जैन यांच्या घरावर छापा टाकला. गुरुवारी सकाळपासून आयपीएसी कार्यालय आणि जैन यांच्या घरी शोध मोहीम सुरू आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास, शोध सुरू असताना, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अचानक जैन यांच्या घरी आल्या आणि त्यांनी भाजपवर टीएमसी कागदपत्रे जप्त […] The post कोलकात्यात गोंधळ ! निवडणूक धोरण कंपनी आयपॅकच्या कार्यालयांवर ईडीचे छापे ; ममता बॅनर्जी जाऊन म्हणाल्या, ‘गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार…’ appeared first on Dainik Prabhat .
ते केवळ शास्त्रज्ञ नव्हते, तर 'जनतेचे वैज्ञानिक' होते; मुख्यमंत्र्यांनी जागवल्या डॉ. गाडगीळांच्या आठवणीमुंबई : पर्यावरण संवर्धन आणि संतुलनासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाने विज्ञान आणि पर्यावरण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. एका व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ञाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. गाडगीळ यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.'जनतेचा वैज्ञानिक' हरपलाज्येष्ठ पर्यावरणतज्ञ पद्मश्री, पद्मभूषण डॉ. माधवराव गाडगीळ यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे.भारताच्या विचारप्रवाहात पर्यावरण जनजागृती, संरक्षण आणि त्यासाठी धोरणांचा आग्रह करण्यात माधवराव अग्रणी नाव. केवळ लेखन आणि प्रबोधन यातच ते अडकून राहिले नाही तर नैसर्गिक संसाधनांचा अचूक… pic.twitter.com/lqQ4sm4Iq3— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 8, 2026मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात डॉ. गाडगीळ यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, डॉ. गाडगीळ यांनी सहा दशकांहून अधिक काळ वैज्ञानिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांनी अनेक मोठी पदे भूषविली असली, तरी ते स्वतःला नेहमी 'जनतेचा वैज्ञानिक' मानत असत. सामान्य माणसांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव जागृती करण्यासाठी त्यांनी दिलेला लढा ऐतिहासिक आहे.पश्चिम घाटाचा 'रक्षणकर्ता'पश्चिम घाटातील जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी डॉ. गाडगीळ यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. त्यांनी या भागातील संवेदना जिवंत ठेवण्यासाठी आणि प्रगल्भ करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगदानाची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने (UN) त्यांना २०२४ मध्ये ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले होते. हा सन्मान मिळवणारे ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते, याचा सार्थ अभिमान मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.मार्गदर्शकाची उणीव भासेलडॉ. गाडगीळ यांच्या निधनामुळे आपण एका ऋषीतुल्य मार्गदर्शकाला मुकलो आहोत. पर्यावरण जतन आणि संवर्धन क्षेत्राला त्यांची उणीव कायम भासत राहील, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी गाडगीळ कुटुंबीय, त्यांचे संशोधक विद्यार्थी आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी होत, ईश्वराने त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थनाही केली.कोण आहेत डॉ. माधव गाडगीळ?१९४२ मध्ये पश्चिम घाटाच्या कुशीत जन्मलेल्या डॉ. गाडगीळ यांना बालपणापासूनच निसर्ग आणि संस्कृतीचे आकर्षण होते. शालेय जीवनातच त्यांनी निसर्ग शास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे आणि मुंबईत झाले, त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठातून 'मॅथेमॅटिकल इकोलॉजी' (गणिती पर्यावरणशास्त्र) या विषयात १९६९ मध्ये पीएच.डी. पूर्ण केली. हार्वर्डमध्ये त्यांनी लेक्चरर म्हणूनही काम केले. भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू येथे तीन दशकांहून अधिक काळ अध्यापन केले आणि तिथे 'सेंटर फॉर इकॉलॉजिकल स्टडीज'ची स्थापना केली. डॉ. माधव गाडगीळ यांचे नाव सर्वात जास्त चर्चेत आले ते त्यांनी भूषविलेल्या 'पश्चिम घाट पारिस्थितिकी तज्ज्ञ समिती'च्या (WGEEP) अध्यक्षपदामुळे. पश्चिम घाटावर पडणारा वाढत्या लोकसंख्येचा ताण आणि हवामान बदलाचा परिणाम यांचा अभ्यास करून त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या होत्या. जरी त्यांच्या शिफारसींवर वाद झाले असले, तरी आजही पर्यावरण धोरणांच्या चर्चेत त्यांचा अहवाल दिशादर्शक मानला जातो. भारताचा 'जैवविविधता कायदा' (Biological Diversity Act) तयार करण्यातही त्यांची भूमिका मोलाची होती. डॉ. गाडगीळ यांनी केवळ प्रयोगशाळेत संशोधन केले नाही, तर ते शेवटपर्यंत निसर्गाशी आणि लोकांशी जोडलेले राहिले. २०२३ मध्ये त्यांनी 'A Walk Up The Hill: Living With People and Nature' हे आपले आत्मचरित्र प्रसिद्ध केले होते. स्टॅनफोर्ड आणि कॅलिफोर्निया (बरकले) सारख्या जागतिक विद्यापीठांमध्ये अतिथी प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या या शास्त्रज्ञाला त्यांच्या कार्यासाठी २०२४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
Ambarnath News : अंबरनाथचे काँग्रेसचे १२ नगरसेवक भाजपच्या वाटेवर; मोठी खळबळ
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या १२ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत ही अधिकृत माहिती दिली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत हा भव्य प्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.https://prahaar.in/2026/01/08/madhav-gadgil-dies-at-83-in-pune-who-was-he-all-you-need-to-know-about-his-achievements-legacy-and-awards/विकासासाठी भाजपचा पर्याय!अंबरनाथ शहराच्या रखडलेल्या विकासाला गती देण्यासाठी आणि मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आम्ही भाजपमध्ये जात आहोत, अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे. विशेष म्हणजे, या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे निलंबित ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. नगरसेवकांसोबतच काँग्रेसचे अनेक आजी-माजी पदाधिकारीही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने अंबरनाथमध्ये काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे.प्रदेशाध्यक्षांची दिशाभूल झाली - प्रदीप पाटीलनगरसेवकांची बाजू मांडताना प्रदीप पाटील म्हणाले की, आम्ही केवळ शहराच्या हितासाठी 'अंबरनाथ विकास आघाडी' स्थापन केली होती. मात्र, काही घटकांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची दिशाभूल केली. पक्षाने आम्हाला विश्वासात न घेता थेट कारवाई केल्यामुळे आम्ही आता भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. या राजकीय भूकंपामुळे अंबरनाथ नगरपालिकेत भाजपचे पारडे जड झाले असून आगामी काळात शहराच्या सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.
पुणेकरांचा बोपदेव घाट वाहतुकीसाठी ७ दिवस बंद; वाहतुकीत होणार 'हे'बदल
पुणे : पुण्यातील वाहतुकीत सध्या मोठा बदल करण्यात आला आहे. याच कारण म्हणजे पुण्यातील पुणे - सासवड ला जोडणारा बोपदेव घाट पुढील काही दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासासाठी पुणेकरांची प्रचंड धांदल उडणार आहे. बोपदेव हा घाट फक्त सासवड - कोंढवा या ठिकाणच्या प्रवाश्यांसाठीच नाही तर पुरंदरसह अनेक तालुक्यांसाठी महत्वाचा दुवा आहे. बोपदेव घाट हा आजपासून ते पुढील ७ दिवसांपर्यत बंद करण्यात आला आहे. त्यामुळे घाटातून नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे.बोपदेव घाट बंद करण्याचं कारण म्हणजे बोपदेव घाटात सुरु असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचं आणि विस्तारीकरणाच्या कामामुळे हा मार्ग आजपासून बुधवार पर्यंत म्हणजेच १४ जानेवारी पर्यंत बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने हे काम हाती घेतले असून कामाचा दर्जा आणि सुरक्षितता राखण्यासाठी घाट बंद ठेवण्यात येणार आहे.पर्यायी मार्ग घाट बंद ठेवण्यात येणार असलयाने प्रवाश्यांनी दिवे घाट, नारायणपूर मार्गे चिव्हेवाडी घाटाचा वापर करावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केले आहे.बोपदेव घाटामध्ये दुरुस्तीचे काम सुरु राहणार असलयाने या कालावधीत एकेरी वाहतूकही सुरु राहणार नसल्याने वाहनचालकांनी या घाटाच्या दिशेने जाऊच नये. त्याऐवजी नेमून दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा. दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी आणि हे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बिग बॉस सीझन ६ मध्ये 'या'मराठी कलाकाराची एंट्री;ज्याने अल्लू अर्जुनला दिलाय आवा
Shreyas Talpade : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात बहुचर्चित रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सिझन ६ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सीझनचं सूत्रसंचालन रितेश देशमुख हा करणार आहे. या शोमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांची यादी समोर आली आहे. मागच्या वेळी म्हणजेच बिग बॉस सीझन ५ ची ट्रॉफी रिल स्टार सूरज चव्हाण यांनी जिंकली. मात्र या वेळी स्पर्धा अजून कठीण आणि टास्कने भरलेली असणारे, जो टिकणार तो जिंकणार. परंतु बिग बॉस ६ मध्ये कोणता कलाकार, इन्फ्लुएंसर किंवा राजकीय मंडळी या शोमध्ये सहभाग घेणार, हे अजूनही अस्पष्ट आहे. मात्र एका नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. ज्या अभिनेत्याने माराठीपासून, हिंदी हिंदी सिनेमासृष्टी तसेच साऊथ कलाकारांना देखील आपला आवाज देणारा, श्रेयश तळपदे बिग बॉस मध्ये एंट्री घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता श्रेयस तळपदे लवकरच बिग बॉस सिझन ६ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र, अद्याप श्रेयस तळपदेच्या टीमकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही.प्रेक्षवर्गाला श्रेयश तळपदे बिग बॉस सिझन ६ या शोमध्ये दिसणार की नाही? हे लवकरच कळेल. दरम्यान, श्रेयस तळपदेची एक पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटवर तुफान व्हायरसल होत आहे. यामुळे नेटकऱ्यांनी कमेंट करून आनंद व्यक्त केला. तसेच हा सिझन पाहण्यासाठी त्यांची उत्सुकता वाढली आहे. तर, काहींनी कमेंट करून, श्रेयस तळपदे बिग बॉसमध्ये जाऊ शकत नाही, अशी कमेंट केली आहे. दरम्यान, श्रेयस तळपदे बिग बॉस सिझन ६ मध्ये दिसणार की नाही? तो स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार की नाही? हे ११ जानेवारीलाच उघड होईल.श्रेयसने केवळ मराठीतच नाही तर, हिंदी सिनेसृष्टीतही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नवीन वर्षात तो अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. २०२६ मध्ये तो आझाद भारत, द गेम ऑफ गिरगिट, वेलकम टू द जंगल या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Beed Crime News :बीडमध्ये भररस्त्यात गोळीबार;अनैतिक संबंधांचा भयंकर कट उघड!
बीड: बीडमध्ये मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास अंकुश नगर येथे जोरदार गोळ्याचा आवाज आला.. तेव्हा एका तरुणाची भररस्त्यात गोळ्या झाडुन व धारधार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली.या घटनेमुळे बिड जिल्ह्यात जोरदार गोंधळ उडाला आहे.पोलासांच्या तपासात ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचा पोलीसांचा अंदाज आहे..नक्की घडलं तरी काय?घटनेची सविस्तर माहिती अशी की, हर्षद उर्फ दादा शिंदे या मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अंकुश नगर भागातील एका नाल्याच्या कामाच्या ठिकाणी उपस्थित होते. या वेळी आरोपी विशाल सूर्यवंशी तिथे आला आणि हर्षद यांच्यावर बंदुकीतून दोन राऊंड फायर केले. जीव वाचवण्यासाठी हर्षद पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्यांचा पाठलाग करून धारदार शस्त्राने त्यांच्यावर सपासप वार केले. ह्या हल्ल्यामुळे हर्षद शिंदे जागीच मृत्यु झाला.या घटनेमुळे तेथील नागरिंकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे..घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी पूजा पवार आणि पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मुख्य आरोपी विशाल सूर्यवंशी सध्या फरार असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथकं रवाना केली आहेत. प्राथमिक चौकशीत पोलिसांनी या हत्येमागे अनैतिक संबंधांचे कारण असण्याचा अंदाज वर्तवला आहे, परंतु नेमकं कारण आरोपी पकडल्यानंतरच स्पष्ट होईल.भररस्त्यात आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्याकांडामुळे अंकुश नगर परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिक नागरिकांनी गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा प्रभाव उरला आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. पोलिस सध्या या प्रकरणातील सर्व दुवे शोधून काढत असून, या हत्येमागील इतर सहभागींचा शोध घेत आहेत.
एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ‘या’महापालिका निवडणुकीत मोठी घडामोड; काही दिवस शिल्लक असतानाच…
लातूर : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे तसतशा अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. लातूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी राजकीय खेळी करत मास्टरस्ट्रोक टाकला आहे. एक नव्हे तर तब्बल ३८ अपक्ष उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. […] The post एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ‘या’ महापालिका निवडणुकीत मोठी घडामोड; काही दिवस शिल्लक असतानाच… appeared first on Dainik Prabhat .
अमेरिकेच्या धमकीवर इराणचे लष्करप्रमुख हतामी संतप्त ; इशारा देत म्हणाले,”मी तुमचे हात कापून…”
America Attack On Iran। “कोणतीही परदेशी शक्ती इराणला धमकावू शकत नाही आणि जर कोणी हल्ला केला तर त्यांचा “हात कापले जातील “, असा थेट इशारा इराणचे लष्करप्रमुख मेजर जनरल अमीर हतामी यांनी अमेरिकेला दिला आहे. ट्रम्पच्या धमकीमुळे इराण संतप्त America Attack On Iran। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला उत्तर म्हणून इराणचे हे विधान आले […] The post अमेरिकेच्या धमकीवर इराणचे लष्करप्रमुख हतामी संतप्त ; इशारा देत म्हणाले,”मी तुमचे हात कापून…” appeared first on Dainik Prabhat .
अजित पवार VS भाजप, संघर्षाचं कारण काय? जयंत पाटलांनी वर्तवलं भाकित म्हणाले “दोन मोठे पक्ष आणि..”
Jayant Patil : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले आहे. महायुतीमधील पक्ष एकमेकांविरोधात आरोपांची राळ उठवताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि भाजप यांच्यात महापालिका निवडणुकीत मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपवर टीका करताना दिसत आहेत. भाजपच्या नेत्यांकडून टीकेला जशात तसे प्रत्युत्तर दिले […] The post अजित पवार VS भाजप, संघर्षाचं कारण काय? जयंत पाटलांनी वर्तवलं भाकित म्हणाले “दोन मोठे पक्ष आणि..” appeared first on Dainik Prabhat .
गुजरात : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे ११ जानेवारीला वडोदरा येथे खेळवला जाणारा आहे. या सामन्यापूर्वीच विराट कोहली वडोदऱ्यात दाखल झालं असून, विमानतळावरून चाहत्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. आणि स्वागतवेळी एअरपोर्टवर विराटला बघण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली.या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहलीने काळया रंगाचा टी -शर्ट आणि काळा चष्मा घातला होता. चाहत्यांचा उत्साह इतका होता की प्रत्येकजण विराटला भेटण्यासाठी, त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी आतुर झाला होता. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.विजय हजारे ट्रॉफीमध्ये रंगणार मोठा सामनाभारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२५–२६ स्पर्धेत तो दिल्ली संघाकडून खेळताना दिसला. अवघ्या दोन सामन्यांत विराटने २०८ धावा करत आपली छाप पाडली आहे. आंध्र प्रदेशविरुद्ध त्याने दमदार १३१ धावांची खेळी साकारली, तर गुजरातविरुद्ध ७७ धावा ठोकल्या.या कामगिरीदरम्यान विराट कोहलीने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये १६ हजार धावांचा ऐतिहासिक टप्पा पार केला. विशेष म्हणजे, सर्वात जलद १६ हजार धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे.
बॅायप्रेंडकडे घर-भाडं भरायला पैसे नाहीतम्हणून गर्लफेंडने बनवला जबरदस्त प्लॅन, मारला काकाच्या...
पुणे : हल्ली चोरीचे प्रकरण वाढत आहे त्यातच नवीन प्रकरण असं की बॅायफ्रेंडकडे घर भाड ३० हजार भरण्यासाठी पैसे नव्हते म्हणुन प्रेयसीनेच आपल्या स्वताच्या काकाच्या घरावर चोरी करायचा प्लॅन केला..पण पोलीसांनी प्रियकरासह व दोन साथीदार तरुणांना अटक केली आहे.. यश मोहन कुऱ्हाडे, (वय २०), ऋषभ प्रदीप सिंह (वय २१) आणि राज विवेक भैरामडगीकर (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत ३५ वर्षीय महिलेने तक्रार दिली.घटना कल्याणीनगरमधील तक्रारदाराच्या बंगल्यात सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. दोन अनोळखी व्यक्ती चाकू आणि दोरी घेऊन बंगल्यात शिरल्याने घरातील महिला घाबरल्या; मात्र, त्यांनी जोरात आरडाओरडा केल्याने दरोड्याचा प्रयत्न फसला आणि आरोपी पळून गेले.पोलिसांच्या चौकशीत समोर आले की, कुऱ्हाडे आणि त्याचा मित्र या प्रेयसीच्या कटानुसार दरोडा टाकण्यासाठी बंगल्यात आले होते. आरोपीकडे घराचे दार उघडे ठेवलेले होते, त्यामुळे आरोपी सहज घरात शिरू शकले. कुऱ्हाडे बारावी नापास असून, ऋषभ मेकॅनिकल इंजिनिअर आहे आणि भैरामडगीकर हा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकतो, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली.चौकशीत समोर आले की, कुऱ्हाडे आणि प्रेयसी यांच्यात प्रेमसंबंध असून घरभाड्याच्या तंगीमुळे प्रेयसीनेच हा कट रचला. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत आणि आवश्यक ती कारवाई करण्यास सज्ज आहेत.
Health Tips: आपण अनेकदा असा विचार करतो की पौष्टिक असलेली कोणतीही गोष्ट सकाळी उपाशीपोटी घेतली तर जास्त फायदा होईल. मात्र वैद्यकीय विज्ञान आणि आयुर्वेदानुसार सकाळच्या वेळी शरीराची पचनक्रिया खूप नाजूक असते. रात्रीच्या उपवासानंतर पोटात आम्ल (ॲसिड) जास्त प्रमाणात असते. अशा वेळी चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यास पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. काही गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या असल्या, […] The post Health Tips: हेल्दी समजून सकाळी उपाशीपोटी या चार गोष्टी अजिबात घेऊ नका, अन्यथा आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात appeared first on Dainik Prabhat .
Census in India। भारताच्या पुढील जनगणनेची प्रतीक्षा संपणार आहे. केंद्र सरकारने औपचारिकपणे तारखा जाहीर केल्या आहेत. ही जनगणना अनेक प्रकारे ऐतिहासिक असेल, कारण ती केवळ पूर्णपणे डिजिटलच नसेल, तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जातीय डेटा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देखील नोंदवला जाणार आहे. दर १० वर्षांनी ही जनगणना केली जाते. २०२१ ची जनगणना कोविड-१९ साथीच्या आजारामुळे पुढे ढकलण्यात आली […] The post जनगणनेची तारीख जाहीर ! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होणार जातगणना ; पहिल्या टप्प्यात कुटुंब तर दुसऱ्या टप्प्यात नागरिकांची गणना होणार appeared first on Dainik Prabhat .
अभिनेत्री तेजस्विनी लोणारेनी लग्नानंतर सोशल मीडियावर शेअर केले 'हे'खास फोटो
समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारे यांच घर हे खूप सुंदर आहे. घरातील भडकपणा टाळून साधेपणा जपण्यात आलेला आहे, हे या फोटोमधून दिसून येते. एकदम साध पण तेवढच आकर्षक अशा थीमने संगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. घरातील रंगाच्या थीममध्ये व्हाइट थीम ही दिसून येते, अगदी स्वच्छ, शांत आणि सुंदर असं घर या फोटोमध्ये पाहायला मिळतंय. पांढऱ्या रंगामुळे घरात प्रकाश अधिक परिवर्तीत होतो आणि त्या प्रकाशमुळे संपूर्ण घर उजळून निघते. या फोटोमध्ये घरात जास्त सामानाची गर्दीही निदर्शनास येत नाहीये. आवश्यक तेवढ्याच वस्तु आणि मोजक्या फर्निचरमुळे घर अजून उठून दिसते.तेजस्विनीच्या लिव्हिंग रूममध्ये राखाडी रंगाचा टीव्हीचा पॅनल हा व्हाइट थीमला छानसा शोभतोय . घरात ठिकठिकाणी ठेवलेली हिरवी झाडे घरच्या सौंदर्यात भर घालतात. या झाडांमुळे मन शांत आणि घरातील वातावरण प्रसन्न राहते. घरतील व्हाइट थीमला राखाडी रंगाचे पडदे सुंदरपणे पूरक ठरतात. हे पडदे घरात येणार प्रकाश नियंत्रित करतात आणि खोलीत सौम्य उजेड पसरवतात . भडक किंवा जड डेकोर न करता ही साध्या , सोप्या आणि उपयोगी वस्तूंची निवड त्यांनी घरच्या सजावटीसाठी वापरली आहे. यामुळे घरात मोकळी ढाकळी जागा ही राहते , जिथे आपण सहजरित्या वावरू शकतो. अशाच फर्निचरचा वापर करून अभिनेत्रीने घर सजविले आहे.
भाजप नेत्या नवनीत राणांना मोठा दिलासा; ‘त्या’प्रकरणात न्यायालयाने ठरवलं दोषमुक्त
Navneet Rana | भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत राणा यांना बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणातून माझगाव न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. माझगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांनी राणा यांचा दोषमुक्तीचा अर्ज मंजूर केला. तर नवनीत राणा यांचे वडील हरभजनसिंग कुंडलेस यांच्याविरुद्धचे प्रकरण सुरू असून, त्यांच्या विरोधात […] The post भाजप नेत्या नवनीत राणांना मोठा दिलासा; ‘त्या’ प्रकरणात न्यायालयाने ठरवलं दोषमुक्त appeared first on Dainik Prabhat .
पुण्यात शिंदेसेनेच्या शहरप्रमुखाच्या कारवर दगडफेक; महिला उमेदवार जखमी, नेमकं काय घडलं?
पुणे : छत्रपती संभाजीनगर येथे AIMIM पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातही अशाच प्रकारची घटना घडल्याचे समोर आले आहे. पुण्यात महापालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विविध पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा, रॅली, रोड शोचे आयोजन केले जात आहे. पुण्यातील हडपसर परिसरातील काळेपडळ येथे प्रचार मोहिमत उपमुख्यमंत्री एकनाथ […] The post पुण्यात शिंदेसेनेच्या शहरप्रमुखाच्या कारवर दगडफेक; महिला उमेदवार जखमी, नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘या’दिवशी होणार अर्थसंकल्प सादर ; केंद्र सरकारकडून तारीख जाहीर
Union Budget 2026। संसदीय कामकाजावरील मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा प्रस्तावित करण्यात आल्या. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला भाग २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी पर्यंत चालेल, तर दुसरा भाग ९ मार्च ते २ एप्रिल पर्यंत चालेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची […] The post देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘या’ दिवशी होणार अर्थसंकल्प सादर ; केंद्र सरकारकडून तारीख जाहीर appeared first on Dainik Prabhat .
मनसेचे मुख्यमंत्री फडणविसांना पत्र; ‘या’तीन मागण्या करत म्हणाले, “सत्ता मिळवण्यासाठी…”
Devendra Fadnavis | उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाल्यानंतर सोलापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यादरम्यान, मनसे नते अमित ठाकरे यांनी सरवदे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचारसभांमधून वेळ काढत सरवदे कुटुंबियांची भेट घेण्याचे आवाहन केले होते. यानंतर आता अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री […] The post मनसेचे मुख्यमंत्री फडणविसांना पत्र; ‘या’ तीन मागण्या करत म्हणाले, “सत्ता मिळवण्यासाठी…” appeared first on Dainik Prabhat .
Neena Gupta: ‘पंचायत’ आणि ‘बधाई दो’सारख्या चित्रपट-वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता ने आपल्या आयुष्यातील एक फारसा कुणाला माहीत नसलेला प्रसंग उघड केला आहे. एकदा त्या लग्नासाठी पूर्णपणे तयार होत्या, सगळी तयारीही झाली होती. मात्र, अखेरच्या क्षणी होणाऱ्या नवऱ्याने त्यांना धोका दिला, असे त्यांनी सांगितले. लग्न ठरले होते, तयारीही पूर्ण अलीकडेच ह्युमन्स ऑफ […] The post Neena Gupta: ‘मग मी त्याला हाकलून दिलं…’; सगळी तयारी झाली होती, पण ऐनवेळी होणाऱ्या नवऱ्याकडून नीना गुप्ता यांना धोका appeared first on Dainik Prabhat .
‘Action ला Rection ने उत्तर येणारच…’ ; दिल्ली हिंसाचारावर सपा नेते एसटी हसन यांचे प्रक्षोभक विधान
ST Hasan on Turkman Gate। समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी खासदार एस.टी. हसन यांनी दिल्लीतील तुर्कमान गेट याठिकाणी फैज-ए-इलाही मशिदीजवळ महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. धार्मिक स्थळांवरील कारवाईमध्ये लोकांच्या भावना आणि श्रद्धेचा समावेश आहे. लोक किती काळ निषेध करणार नाहीत? असा सवाल करत त्यांनी या हिंसेचे समर्थन केले आहे. सपा नेते […] The post ‘Action ला Rection ने उत्तर येणारच…’ ; दिल्ली हिंसाचारावर सपा नेते एसटी हसन यांचे प्रक्षोभक विधान appeared first on Dainik Prabhat .
CM फडणवीसांची टीका, राऊतांचं खणखणीत प्रत्युत्तर; शरद पवार NDA सोबत जाण्याच्या चर्चांवर म्हणाले…
Sanjay Raut : अखेर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बहुप्रतिक्षित संयुक्त मुलाखतीचा पहिला भाग समोर आला आहे. सकाळपासूनच या मुलाखतीची जोरदार चर्चा असून, दैनिक ‘सामना’ला ही मुलाखत देण्यात आली आहे. या मुलाखतीत मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने विविध गोष्टींवर ठाकरे बंधूंनी प्ररखड शब्दांत भाष्य केले आहे. ही स्फोटक मुलाखत उबाठा गटाचे नेते खासदार संजय […] The post CM फडणवीसांची टीका, राऊतांचं खणखणीत प्रत्युत्तर; शरद पवार NDA सोबत जाण्याच्या चर्चांवर म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .
पालघरमध्ये पोलिसांनी गुन्हेगारीचे कंबरडे मोडले
पालघर: गेल्या दोन वर्षांत पालघर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांनी डोके वर काढले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सन २०२४ आणि २०२५ या कालावधीत जिल्ह्यात ७८६ गंभीर गुन्हे दाखल झाले असून, खुनासारख्या घटनांनी जिल्हा हादरला आहे. मात्र, या वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पालघर पोलिसांनी कंबर कसली असून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करत गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले आहे. २०२४ मध्ये ३५ खून झाले होते, तर २०२५ मध्ये ही संख्या ३१ वर राहिली. दोन वर्षांत एकूण ४४ खुनाचे प्रयत्न झाले आहेत. जिल्ह्यात घरफोडीचे १८६ आणि वाहन चोरीचे १७८ गुन्हे नोंदवले गेले आहेत. याशिवाय ७ दरोडे आणि ३८ जबरी चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगारी वाढत असली तरी पालघर पोलिसांनी अवैध धंदे आणि अमली पदार्थांविरुद्ध युद्धपातळीवर मोहीम उघडली आहे. दोन वर्षांत पोलिसांनी एकूण १०३३ कारवाया करून १३८४ आरोपींना गजाआड केले आहे. या मोहिमेत एकूण २४ कोटी ५७ हजार २३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय ई. सी. कायद्यानुसार ३० गुन्हे दाखल करून ४० व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून, १ कोटी ५० लाख ८३ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकूण पाहता दोन वर्षांत १०३३ कारवाया, १३८४ अटका करण्यात आल्या असून, २४ कोटी ५७ हजार २३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हेगारीचा वाढता आलेख चिंतेचा विषय ठरत असला, तरी पोलिसांच्या कठोर कारवायांमुळे अवैध धंदे आणि गुन्हेगारांवर मोठा दबाव निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन; निसर्गसंवर्धनासाठी लढणारा आवाज हरपला
Madhav Gadgil Passes Away | ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटल येथे 7 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंकर करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव ‘पंचवटीतील पाषाण येथील ए-१८, स्प्रिंग फ्लॉवर अपार्टमेंट’ या त्यांच्या […] The post ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन; निसर्गसंवर्धनासाठी लढणारा आवाज हरपला appeared first on Dainik Prabhat .
Priyanka Chopra: बॉलिवूडनंतर आता हॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा आगामी हॉलीवूड चित्रपट ‘द ब्लफ’ मधील पहिला लूक समोर आला असून, यात प्रियंका एका धाडसी समुद्री डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रियंकाने शेअर केले फोटो प्रियंका चोप्राने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘द ब्लफ’मधील काही फोटो शेअर केले आहेत. […] The post Priyanka Chopra: रक्ताने माखलेला चेहरा, हातात बंदूक; हॉलीवूड चित्रपट ‘द ब्लफ’मधील प्रियंका चोप्राचा दमदार लूक समोर appeared first on Dainik Prabhat .
'जय श्री राम'चा घोष करणाराच महापौर असणार
विरार: हिंदुत्ववादी विचार असणारे खासदार आणि दोन्ही आमदार वसई-विरारमध्ये निवडून आणले आहेत. महापौर सुद्धा येथे हिंदुत्ववादी विचाराचाच बसवायचा आहे. त्यामुळे जय श्री रामचा नारा देणारा महापौर वसई-विरार महापालिकेच्या सभागृहात असेल असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. वसई-विरार महापालिकेमध्ये महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी भाजप सर्व प्रकारे व्युहरचना करीत आहे. आमदार राजन नाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्याकडे निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींची जबाबदारी दिल्यानंतर, त्यात आणखी भर म्हणून राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि भाजप नेत्या पूनम महाजन यांच्याकडेही महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मंत्री नितेश राणे हे मंगळवारी वसई विरारमध्ये आले होते. यावेळी त्यांनी नालासोपारा येथील गालानगर, विरारमधील कारगीलनगर, फुलपाडा आणि कोकण नगर अशा विविध ठिकाणी रोड शो आणि चौक सभा घेतल्या. तसेच निवडणुकीबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वसई-विरार शहरात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. तर गेल्या काही काळात येथील लोकवस्तीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यांना सुविधा देण्यासाठी आमचे आमदार आणि खासदार सक्षम आहेत. असे राणे यांनी सांगितले. महापालिकेत जर आमची सत्ता आली. तर, ज्या अठरा प्रकारच्या नागरी सुविधा येथील महापालिकेने रहिवाशांना पुरवायला हव्यात त्या येथे अवैध पद्धतीने राहणाऱ्या बांगलादेशींना न देता, येथील हिंदू समाजातील स्थानिकांना देण्याची आमची भूमिका असेल, असे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री, प्रधानमंत्री आमचे आहेत. त्यामुळे विकासाचा अजेंडा आणि निधी आमच्याकडे आहे. इतरांकडे फक्त खाली डब्बा आहे. निधीची ताकद आमच्याकडे असल्यामुळे विकासकामे आम्हीच करू शकतो. त्यामुळे भाजपला मतदान म्हणजे विकासाला मतदान. महायुतीला मतदान म्हणजे सुरक्षेला मतदान, असे मतही राणे यांनी व्यक्त केले आहे.पाकचा जयघोष करणाऱ्याला पोलिसांनी हिसका दाखविलावसईत एका केशकर्तनालयात पाकिस्तानी जयघोषाचे गाणे वाजविल्याचा प्रकार घडला होता. त्यावर बोलताना मंत्री राणे यांनी सांगितले की, त्या नालायकास पोलिसांनी हिसका दाखविला आहे. काश्मीर बनेगा पाकिस्तान अशी गाणी वाजवून जर यांना वाटत असेल की, हे आमच्या हिंदू राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवू शकतात. तर त्यांना विसर पडला आहे की, राज्यात देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे. हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे आणि जर कुणी अशी गाणी वाजवण्याचा प्रयत्न केला तर पोलीस त्यांच्यावर कठोर कारवाई करतील, असा इशारा सुद्धा राणे यांनी दिला आहे. शहरातील वाढत्या बांगलादेशींवर आमची करडी नजर आहे. त्यांना शहरातून हद्दपार करण्यासाठी महापालिकेत आमची सत्ता येणे गरजेचे आहे, असे मत सुद्धा मंत्री राणे यांनी यावेळी व्यक्त केले. तर महाराष्ट्रातील वाढत्या लव जिहाद प्रकरणांना आळा घालण्यासाठी गुलव जिहाद कायदाही महाराष्ट्रात लागू करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट
बांगलादेशच्या मागणीला आयसीसीचा नकार
टी-२० विश्वचषकासाठी भारतात यावेच लागेल!दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतात होणारे बांगलादेशचे सामने सुरक्षा कारणास्तव दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची बांगलादेश क्रिकेट बोर्डाची विनंती स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्यांदरम्यान आपल्या खेळाडूंच्या आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी हे सामने युएई किंवा श्रीलंकेसारख्या तटस्थ ठिकाणी हलवण्याची आयसीसीकडे मागणी केली होती.मात्र, आयसीसीने बांगलादेशची ही विनंती अमान्य केली असून, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच सामने भारतात होतील, असे स्पष्ट केले आहे. हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वीच बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने सुरक्षा किंवा इतर काही कारणांमुळे इंडियन प्रीमियर लीगमधून अचानक माघार घेतली होती. या पार्श्वभूमीवर आयसीसीच्या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. यामुळे बांगलादेशचे सामने नियोजित वेळापत्रकानुसार कोलकाता येथील ईडन गार्डन्स आणि मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत.मात्र या सर्व परिस्थितीमुळे टी-२० विश्वचषकाच्या आयोजनात अनिश्चितता निर्माण झाली आहे. विश्वचषक सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना (स्पर्धा १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे), आयसीसीच्या या भूमिकेमुळे बांगलादेशचा संघ भारतात खेळण्यास तयार होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.हे आहे कारण : या वादाची मुळे आयपीएलशी जोडलेली आहेत. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान यांना बीसीसीआयच्या सूचनेनुसार संघातून मुक्त केले होते. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या कथित अत्याचारांच्या निषेधार्थ भारतात मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ निर्माण झाला होता. यामुळे रहमानला आयपीएलमध्ये खेळवण्यास विरोध झाला आणि अखेर त्याला रिलीज करण्यात आले.आयसीसीची भूमिका : रहमानच्या प्रकरणानंतर बांगलादेश सरकारनेही आक्रमक भूमिका घेत भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या बहिष्काराची धमकी दिली. बीसीबीने आयसीसीला पत्र लिहून भारतात सामने न खेळण्याची भूमिका मांडत ते श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली. खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत बांगलादेशने आयपीएलचे आपल्या देशातील प्रसारणही थांबवले होते. मात्र आयसीसीने सर्व बाबींचा विचार करून ठाम भूमिका घेत बांगलादेशला भारतातच येऊन सामने खेळावे लागतील, असे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे बांगलादेशवर दबाव वाढला असून, विश्वचषकात सहभाग कायम ठेवण्यासाठी भारतात येण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
SIR Update। विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) च्या दुसऱ्या टप्प्यामुळे मतदार यादीत महत्त्वपूर्ण बदल झालेत. नऊ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांच्या प्रारूप मतदार यादीतून अंदाजे 65 दशलक्ष मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. SIR सुरू होण्यापूर्वी, या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण मतदारांची संख्या 509 दशलक्ष होती, जी आता कमी होऊन 444 दशलक्ष झाली आहे. निवडणूक आयोगाच्या […] The post SIR च्या दुसऱ्या टप्प्यात मोठे बदल ! ९ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांच्या प्रारूप मतदार यादीतून सुमारे ६.५ कोटी नावे वगळली appeared first on Dainik Prabhat .

27 C