SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

34    C
... ...View News by News Source

मुंबईच्या धर्तीवर 'ठाणे शहर विकास समिती'स्थापन करा; उपमहापौर कृष्णा पाटील यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

ठाणे: ठाणे शहराचा वाढता विस्तार आणि नागरी गरजा लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही 'ठाणे शहर विकास समिती' नियुक्त करण्यात यावी, अशी आग्रही मागणी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन पाठवले आहे.पारदर्शक विकासासाठी समितीची गरजपत्राद्वारे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी शासनाचे लक्ष वेधले की, ठाणे शहर सध्या झपाट्याने विस्तारत असून महानगराच्या समस्याही तितक्याच जटील होत आहेत. केवळ सिमेंट-काँक्रीटची जंगले न उभारता शहराचा विकास सर्वसामान्य ठाणेकरांना केंद्रस्थानी ठेवून होणे आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिकेत शहर विकासासाठी ज्याप्रमाणे विशेष समिती कार्यरत आहे, त्याच धर्तीवर ठाण्यातही तज्ज्ञांची समिती असणे ही काळाची गरज बनली आहे.समितीची प्रमुख उद्दिष्टेउपमहापौरांनी या प्रस्तावित समितीच्या माध्यमातून पाच प्रमुख उद्दिष्टे मांडली आहेत.विकास आराखडा (DP) नियंत्रण: शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनवर बारीक लक्ष ठेवून त्याची पारदर्शक अंमलबजावणी करणे.जनहितकारी धोरणे: बिल्डरधार्जिण्या निर्णयांना चाप लावून सर्वसामान्यांच्या हिताची गृहनिर्माण धोरणे राबवणे.भ्रष्टाचार निर्मूलन: शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराला लगाम लावून कामात पारदर्शकता आणणे.ज्वलंत प्रश्नांवर तोडगा: अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधणे.हॅपी इंडेक्समध्ये वाढ: नागरी सोयीसुविधांचा दर्जा सुधारून ठाणेकरांचे जीवनमान उंचावण्यावर भर देणे.राज्य सरकारकडे सकारात्मक निर्णयाची अपेक्षाठाणे हे सर्वांच्या जिव्हाळ्याचे शहर असून, शहर विकास विभागाकडून दर्जेदार आणि नियोजनबद्ध काम करून घेण्यासाठी अशा तज्ज्ञ समितीची भूमिका निर्णायक ठरेल, असा विश्वास उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रशासनाला निर्देश द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. या पत्राची प्रत ठाणे मनपा आयुक्तांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 2:10 pm

Kiren Rijiju: काँग्रेसच्या खासदारांकडून लोकसभा अध्यक्षांना शिवीगाळ; भाजपा नेत्याकडून व्हिडीओ शेअर

मुंबई: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी (१२ फेब्रुवारी) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या सभागृहातील एक व्हिडिओ शेअर केला. ४ फेब्रुवारी रोजी संसदेत विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यात झालेल्या संघर्षादरम्यान काँग्रेस खासदारांच्या एका मोठ्या गटाने त्यांना शिवीगाळ केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकावले असा आरोप त्यांनी केला. या व्हिडिओमध्ये लोकसभा अध्यक्षांच्या दालनात काँग्रेस पक्षाच्या महिला खासदार दिसत आहेत, जिथे त्या भाजप मंत्र्यांशी वाद घालताना दिसत आहेत.केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी १० फेब्रुवारी रोजी लोकसभेतील गोंधळाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. पंतप्रधान मोदींचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तराचे भाषण होणार होते. पण, काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधानांच्या आसनाजवळ गेल्याने गोंधळ झाला होता.व्हिडिओ क्लिप शेअर करताना, रिजिजू यांनी X वर लिहिले, ही एक बेकायदेशीर व्हिडिओ क्लिप आहे जी एका काँग्रेस खासदाराने घेतली होती जेव्हा २०-२५ काँग्रेस खासदार माननीय सभापतींच्या दालनात घुसले, त्यांना शिवीगाळ केली आणि माननीय पंतप्रधानांना धमकी दिली.This is the illegal video clip taken by a Congress MP when 20-25 Congress MPs entered the Chamber of Hon’ble Speaker, abused him and threatened Honb'le Prime Minister. Our party believes in debate & discussion and never encourage MPs to threaten physically. https://t.co/bezzALc7D3 pic.twitter.com/iM0a50Z4rg— Kiren Rijiju (@KirenRijiju) February 12, 2026आम्ही वादविवाद आणि चर्चेवर विश्वास ठेवतो:किरेन रिजिजू यांनी गुरूवारी (१२ फेब्रुवारी) नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. जेव्हा काँग्रेसचे २० ते २५ खासदार लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात गेले होते, तेव्हा बेकायदेशीरपणे काँग्रेस खासदाराने हा व्हिडीओ बनवला आहे. काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना शिवीगाळ केली. त्यांनी पंतप्रधान मोदींना धमकी दिली. आमचा पक्ष चर्चा आणि वादविवादावर विश्वास ठेवतो आणि खासदारांना धमक्या देण्यासाठी प्रोत्साहन देत नाही, असा गंभीर आरोप रिजिजू यांनी केला आहे.काँग्रेस महिला खासदारांकडून गोंधळ:मंगळवारी लोकसभेत काँग्रेस खासदारांनी आक्रमक निषेध केल्याचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर रिजिजू यांनी हा व्हिडिओ शेअर केला. लोकसभेतील आतील दृश्यांमध्ये ४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी भाषण देण्याच्या काही मिनिटांपूर्वीच त्यांच्या आसनाजवळ महिला काँग्रेस खासदार जमल्याचे नाट्य दिसून आले.काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधानांच्या आसनाजवळ जमल्या, त्यांच्या हातात एक मोठा बॅनर होता ज्यावर जो अच्छा समझो, वही करो असे लिहिले होते.विशेष म्हणजे, त्यांनी धरलेल्या बॅनरवरील मजकूर जनरल (निवृत्त) एमएम नरवणे यांच्या 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या अप्रकाशित पुस्तकावर आधारित लेखातील एका वाक्याचा संदर्भ होता.२०२० च्या भारत-चीन संघर्षावर माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्राचे वाचन करण्यास काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गेल्या आठवड्यात परवानगी नाकारण्यात आल्यानंतर ही घटना घडली.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 2:10 pm

PMO Office Shift: तब्बल ७८ वर्षांनंतर पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पंतप्रधान कार्यालयचा (पीएमओ) पत्ता बदलणार आहेत. तब्बल ७८ वर्षांनंतर पीएमओचं ऑफिस स्थलांतरित करण्यात येणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार साउथ ब्लॉकमधून 'सेवा तीर्थ' नावाच्या नवीन बांधलेल्या इमारतीत हे ऑफिस हलवण्यात येणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान मोदी साउथ ब्लॉकमध्ये झालेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. या बैठकीनंतर, केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी रायसिना हिलवरील एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेल्या नवीन संकुलात जातील.मिळालेल्या माहितीनुसार; मागील ५ दशकांपासून सरकारच्या सर्व महत्त्वाच्या निर्णयाचं केंद्र राहिलेले साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधानांचे कार्यालय आता ब्रिटीश कालीन इमारतीतून नव्या सेवा तीर्थ येथे शिफ्ट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी साऊथ ब्लॉकमध्ये होणाऱ्या कार्यालयात अखेरची कॅबिनेट बैठक घेतील. त्यानंतर नव्या प्रशासकीय भवनाचे उद्घाटन करण्यात येईल. रायसीना हिलजवळ नवी प्रशस्त इमारत साऊथ ब्लॉकपासून काहीच अंतरावर आहे.या कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान साऊथ ब्लॉकपासून सेवा तीर्थला जातील. जिथे पंतप्रधान कार्यालय, कॅबिनेट सचिवालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचे कार्यालय आणि इंडिया हाऊस आहे. इंडिया हाऊसमध्ये उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा पाहुणचार करण्यासाठी बनवलेले नवीन ठिकाण आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात पहिली कॅबिनेट बैठक साऊथ ब्लॉकमध्येच झाली होती.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 2:10 pm

Navnath Ban: काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये; नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई: वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार विसरून काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमेरिकेबरोबरचा व्यापार करार स्वाभिमानाने करण्यात आला असून त्यातून देशाचा फायदाच होणार असल्याचेही बन यांनी नमूद केले.भारत- अमेरिका व्यापार करार भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा पुरावाभारत-अमेरिका व्यापार करार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारतमाता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चरणी गुलाम ठेवली असा आरोप करणा-या राऊतांचा खरपूस समाचार घेत बन म्हणाले की, भारत-अमेरिका व्यापार करार हा ताठ मानेने, देशहिताला प्राधान्य देत करण्यात आलेला आहे. त्यात कोणतीही गुलामगिरी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा पुरावा आहे.महापालिकेमध्ये दाऊदच्या घोषणा द्यायच्या का?महापालिका सभागृहात घुमलेल्या ‘मोदी, मोदी’ आणि ‘देवाभाऊ’च्या घोषणांनी राऊतांना आणि विरोधकांना कानठळ्या बसल्या. कारण भाजपा महायुती सरकारच्या विकास, पारदर्शकता आणि ठाम निर्णयक्षम नेतृत्वावर असलेल्या विश्वासाची पोचपावती या घोषणांतून दिसली. महापालिकेमध्ये पंतप्रधान मोदी आणि देवा भाऊंच्या घोषणा द्यायच्या नाही तर काय राऊत किंवा दाऊदच्या घोषणा द्यायच्या का? असा खोचक सवालही बन यांनी केला .अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचे राजकारणअजित दादांचा विमान अपघात हा अत्यंत दुर्दैवी होता. या अपघाताची गंभीर दखल केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही स्तरांवर घेतली गेली आहे. केंद्र सरकार, एअरपोर्ट अथॉरिटी तसेच राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. शरद पवार यांनीही या अपघातात घातपाताची शक्यता फेटाळून लावली असताना अशा संवेदनशील प्रकरणात रोहित पवार जाणीवपूर्वक खोटे आणि निराधार आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत अशी टीका बन यांनी केली.संजय राऊत यांनी केलेले आरोप निराधारअजित दादांनी शेवटच्या दिवशी कोणत्या फाईलवर स्वाक्षरी केली, याची अधिकृत माहिती राज्य सरकारकडून मिळेल. भाजपाच्या भ्रष्टाचाराच्या फाइल्स स्व. अजितदादांकडे होत्या अशी आरडाओरड करत नाहक पत्रकार परिषदांमधून हवेत तीर मारण्याऐवजी राऊतांकडे या संदर्भात कोणतेही ठोस पुरावे असतील, तर ते संबंधित तपास यंत्रणांकडे सादर करावेत असे आव्हान बन यांनी दिले. योग्य तपास करून सत्य समोर आणले जाईल अशी ग्वाही बन यांनी दिली.माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल अतिशय घाणेरड्या शब्दांत राऊतांनी केलेल्या टीकेवर पलटवार करत बन म्हणाले की, कोविड काळात राऊत आणि उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रासमोर उघडे करण्याचे काम तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. कोश्यारी नसते तर कोविड काळात महाराष्ट्राचे वाटोळे तुम्ही केले असते असा हल्लाबोल बन यांनी केला.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 2:10 pm

BJP Files Notice Against Rahul Gandhi: राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व होणार रद्द? ; ‘या’भाजप खासदाराने दिली नोटीस

BJP Files Notice Against Rahul Gandhi: काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारा प्रस्ताव भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत मांडला आहे.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 1:53 pm

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास मोठे यश; ऊसतोड कामगारांच्या मुला - मुलींना दर्जेदार शिक्षणाची वाट मोकळी

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून बीड जिल्ह्यात आणखी ११ वसतिगृहे उभारणीस शासनाकडून १५९.३६ कोटी रुपये निधी उपलब्ध!दिवंगत अजित पवार यांनी बीड येथील ऊसतोड कामगार मेळाव्यात धनंजय मुंडेना दिला होता शब्द!मुंबई (प्रतिनिधी) - लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या अंतर्गत तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सुरू केलेल्या संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेला व्यापक स्वरूप प्राप्त होत असून धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री असताना २५ जून, २०२१ रोजी या योजनेची घोषणा करून प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू केली होती. त्यामुळे मुंडे जनक असलेल्या संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये शंभर क्षमतेचे मुलींसाठी एक व मुलांसाठी एक असे एकूण २२ वसतीगृह मंजूर करून भाड्याच्या जागेत सुरू करण्यात आलेले आहेत. दरम्यान त्यापैकी आतापर्यंत तीन वसतीगृहांना स्वतःची जागा व निधी मिळालेला असून त्याचे बांधकाम प्रगतीपथावर असून, उर्वरित १९ पैकी ११ वसतीगृहांसाठी जागेसह १५९ कोटी छत्तीस लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आला आहे.ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात भविष्यात कोयत्याच्या ऐवजी वही, पुस्तक आणि पेन यावेत असे स्वप्न उराशी बाळगून धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री असताना संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेची घोषणा करत सुरुवात केली होती. त्या अंतर्गत ऊसतोड कामगारांची सर्वाधिक संख्या असलेल्या राज्यातील ४१ तालुक्यांमध्ये ८२ वसतीग्रह सुरू करण्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी करून बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे २२ वसतीग्रहे भाड्याच्या जागेत सुरू केली होती.दरम्यान यापैकी तीन वसतीगृहे ही स्वतःच्या जागेमध्ये उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून आता आणखी उर्वरित १९ पैकी ११ वसतीगृहांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये परळी सह पाटोदा, गेवराई, केज, माजलगाव या तालुक्यातील प्रत्येकी दोन तर बीड तालुक्यातील एक वसतिगृह उभारले जाणार आहे. तर प्रयत्न वसतिगृह उभारणीसाठी सुमारे १४ कोटी ५५ लाख रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे.अजितदादांचा शब्द अन् मुंडेंची कृतज्ञता:काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा दौऱ्यावर असताना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांनी बीड येथे आयोजित एका ऊसतोड कामगारांच्या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांनी आजपर्यंत ऊसतोड कामगारांसाठी केलेल्या कामाचे कौतुक करतानाच संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेतून सर्व ११ तालुक्यांमध्ये बावीस वसतीगृह ही स्वतःच्या जागेत उभारून देऊ व त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असा शब्द दिला होता, तो शब्द आता पूर्णत्वाकडे जात असून धनंजय मुंडे यांनी अजितदादा पवार यांची आठवण काढत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचेही आभार व्यक्त केले आहेत.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 1:30 pm

Social Media Ban: रशियामध्ये सोशल मीडिया संप ! व्हॉट्सअॅप, इंस्टाग्रामसह अनेक प्लॅटफॉर्मचे १० कोटी वापरकर्ते ब्लॉक

Social Media Ban: रशियामध्ये सोशल मीडियावर मोठा हल्ला झाला आहे. पुतिन सरकारने व्हॉट्सअॅप, युट्यूब आणि इंस्टाग्रामसह अनेक परदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 1:24 pm

Bhumi Pednekar: “सोशल मीडिया म्हणजे दलदल… माझ्याबाबत जे झालं ते ट्रोलिंग नव्हे, सरळ बुलिंग होतं”

एका मुलाखतीत भूमीने सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल स्पष्ट मत मांडले. ती म्हणाली, “सोशल मीडिया ही एक दलदल आहे. इथे खूप निगेटिव्हिटी, फेक न्यूज आणि द्वेष आहे. माझ्याबाबत जे घडलं ते फक्त ट्रोलिंग नव्हतं, ती सरळ बुलिंग होती. आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.”

दैनिक प्रभात 12 Feb 2026 1:20 pm

Gold-Silver Rate: आनंदवार्ता! बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे भाव

मुंबई: गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात तब्बल २,५०० रुपयांनी तर सोन्याच्या दरात १००० रुपयांची घसरण झाली आहे.गुरुवारी कमोडिटी बाजारात व्यवहार सुरू झाले तेव्हा केवळ चांदीच्या किमतीतच घसरण झाली नाही तर सोन्याच्या किमतीतही घसरण झाली. चांदीप्रमाणेच, सोन्याच्या किमतीनेही २९ जानेवारी रोजी विक्रमी उच्चांक गाठला होता.गुरुवार, १२ फेब्रुवारीला मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या आहेत. ही घसरण प्रामुख्याने अमेरिकन डॉलरची मजबूती आणि आंतरराष्ट्रीय किमतीतील कमकुवतपणामुळे झाली आहे. सोन्याच्या किमती ०.४७% घसरून प्रति १० ग्रॅम १,५८,००० वर आल्या. सध्या सोने प्रति १० ग्रॅम १,५८,०७९ वर व्यवहार करत होते, म्हणजेच ०.४३% ची घसरण झाली आहे.सोने १,५७,७०१ रुपयांवर आणि चांदी २,६०,४५३ रुपयांवर घसरली आहे. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्थरावर सोने-चांदी देखील कमकुवत झाले आहे. या सोने-चांदीच्या घसरत्या दरामुळे गुंतवणूकदार सावध राहून खरेदी-विक्री करत आहेत. आणि व्यापाऱ्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये या चढ – उतारामुळे संमिश्र वातावरण आहे.तज्ञांचे म्हणणे आहे की, गुंतवणूकदार आता शुक्रवारी येणाऱ्या अमेरिकन चलनवाढीच्या आकडेवारीवर लक्ष केंद्रित करत आहेत, जे चलनविषयक धोरणाच्या दिशेचे संकेत देतील. जानेवारीतील मजबूत रोजगार आकडेवारी आणि डॉलरच्या तेजीमुळे सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 1:10 pm

WhatsApp ban in Russia: पुतिन सरकारकडून व्हॉट्सअॅपसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी

रशियामध्ये अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअॅप, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक सारखे लोकप्रिय प्लॅटफॉर्म आता रशियात वापरण्यास बंदी आहे.अहवालांनुसार, केवळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच नाही तर अनेक आंतरराष्ट्रीय मीडिया संस्थांच्या वेबसाइट्सवरही सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये बीबीसी, ड्यूश वेले, रेडिओ फ्री युरोप आणि रेडिओ लिबर्टी सारख्या साइट्सचा समावेश आहे. अनामिक ब्राउझिंगसाठी वापरला जाणारा टॉर ब्राउझर देखील ब्लॉक करण्यात आला आहे.डिजिटल क्षेत्राच्या सुरक्षिततेसाठी:रशियाने आपल्या डिजिटल क्षेत्राला सुरक्षित करण्यासाठी आणि स्थानिक प्लॅटफॉर्मना प्रोत्साहन देण्यासाठी व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) निर्बंध कडक केले आहेत. बुधवार (११ फेब्रुवारी २०२६) रोजी समोर आलेल्या माहितीनुसार, रशियन अधिकाऱ्यांनी व्हॉट्सअॅप पूर्णपणे ब्लॉक करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.स्वदेशी 'MAX' या अॅपचा वापर वाढवण्यासाठी:यामागील उद्देश सुमारे १० कोटी वापरकर्त्यांना रशियाच्या स्वदेशी 'MAX' या अॅपकडे वळवणे हा आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी स्पष्ट केले की, व्हॉट्सअॅपला रशियात कार्यरत राहायचे असल्यास देशाच्या कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की मेटा (Meta) चर्चा आणि नियमांचे पालन करण्यास तयार असेल तरच यावर काही तोडगा निघू शकतो.रशियाची संचार नियामक संस्था रोसकोमनादजोरने व्हॉट्सअॅपला आपल्या अधिकृत सेवा नोंदणी यादीतूनही काढून टाकले आहे. रशियन अधिकाऱ्यांचा आरोप आहे की परदेशी तंत्रज्ञान कंपन्या स्थानिक कायद्यांचे पालन आणि डेटा शेअरिंगबाबत सहकार्य करत नाहीत.हा निर्णय सुरक्षा आणि फसवणूक रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 1:10 pm

Uttar Pradesh: तीन बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला वडिलांचा फोन जप्त

उत्तर प्रदेशा: गाझियाबादमधील एका घराच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या तीन बहिणींच्या प्रकरणात पोलिसांना एक महत्त्वाचा धागा सापडला आहे. घटनेच्या सुमारे १५ दिवस आधी मुलींच्या वडिलांनी एका दुकानदाराला १५ हजार रुपयांना विकलेला मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला आहे. हा फोन दिल्लीच्या शालीमार गार्डन परिसरात सापडला.पोलिस उपायुक्त निमिश पाटील म्हणाले की, मोबाईल डेटा रिकव्हर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे आत्महत्येचा संबंध टास्क-आधारित ऑनलाइन कोरियन गेमशी आहे की नाही हे निश्चित होण्यास मदत होईल. कुटुंब आणि जवळच्या काही लोकांनी असा दावा केला की तिन्ही बहिणींना अशा गेमचे व्यसन होते.४ फेब्रुवारी रोजी, १६ वर्षीय निशिका, १४ वर्षीय प्राची आणि १२ वर्षीय पाखी यांनी त्यांच्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर, त्यांचे वडील चेतन कुमार म्हणाले की, त्यांच्या मुली सुमारे तीन वर्षांपासून कोरियन गेम खेळत होत्या आणि त्यातच रमल्या होत्या. त्यांनी असाही दावा केला की यामुळेच त्या शाळा चुकवत होत्या.तथापि, सुरुवातीच्या पोलीस तपासात कोणत्याही विशिष्ट कोरियन टास्क-आधारित अॅपच्या वापराचे कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत. सत्य उघड करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पोलीस आता मोबाइल डेटा तपासत आहेत.डायरीने केली अनेक गुपिते उघडतिन्ही बहिणींच्या खोलीत नऊ पानांची एक छोटी डायरी देखील सापडली. त्यात त्यांचे विचार आणि भावना होत्या. त्यातून कोरियन संस्कृतीबद्दलचे त्यांचे प्रेम दिसून येते, ज्यामध्ये 'आम्हाला कोरियन आवडते' असे शब्द वारंवार लिहिलेले आहेत.या डायरीत असाही आरोप आहे की, त्यांचे कुटुंब त्यांच्यावर कोरियन पद्धती सोडून भारतीय लग्न करण्यासाठी दबाव आणत होते. मुलींनी लिहिले की कोरियन हे त्यांचे जीवन आहे आणि ते त्या सोडू शकत नाहीत. तिच्या वडिलांनी तिचा फोन जप्त केल्यानंतर ती खूप दुःखी झाल्याचे तपासात समोर आले. ती ऑनलाइन गेम खेळू शकत नव्हती आणि तिचा कोरियन मित्रांशी संपर्क तुटला होता. डायरीमध्ये शारीरिक शिक्षेचाही उल्लेख आहे. शेवटी, ती तिच्या वडिलांची माफी मागते आणि लिहिते, तुमच्या मारहाणीपेक्षा माझ्यासाठी मृत्यू बरा... माफ करा, बाबा.पोलिस सध्या मोबाईल फोन डेटाची फॉरेन्सिक तपासणी करत आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, संपूर्ण सत्य समोर आल्यानंतरच या दुःखद कृत्यामागील खरे कारण काय होते हे स्पष्ट होईल.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 1:10 pm

Ankush Kakade : “दादा तुम्ही आज महत्त्वाचा निर्णय…”; राष्ट्रवादीच्या नेत्याची पोस्ट

Ankush Kakade : 'दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्यासाठी १२ फेब्रुवारी ही तारीख खुद्द अजित पवार यांनीच चर्चेअंती ठरवली होती.'

दैनिक प्रभात 12 Feb 2026 12:56 pm

Kiara Advani: आई झाल्यानंतर कियारा अडवाणीचा मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक; ‘या’दिग्दर्शिकासोबत करणार नवा चित्रपट!

Kiara Advani : मात्र कियारा पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी तयार असल्याची चर्चा आहे. माध्यमांतील माहितीनुसार, मुलीच्या जन्मानंतर सुमारे सात महिन्यांनी तिने नव्या स्क्रिप्ट्स ऐकायला सुरुवात केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांच्यासोबत ती नव्या चित्रपटासाठी हातमिळवणी करू शकते, अशी माहिती आहे.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 12:13 pm

Bangladesh General Elections: “ही बनावट निवडणूक…” ; बांगलादेश निवडणुकीवर संतापलेल्या शेख हसीना यांच्या पक्षाची ‘ही’मागणी

Bangladesh General Elections: बांगलादेशमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीबाबत, शेख हसीना यांचा पक्ष, अवामी लीग, यांनी बांगलादेशचे विभाजन होण्यापासून वाचवण्यासाठी, ते आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन करतात

दैनिक प्रभात 12 Feb 2026 12:12 pm

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध नामिबिया हा सामना होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली या मैदानात हा सामना खेळला जाईल. मात्र या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मा खेळू शकेल की नाही यावर शंका व्यक्त केली जात असतानाच ईशान किशन देखील जखमी झाल्याच्या बातम्या समोर येत आहे. त्यामुळे कर्णधार सूर्याच्या अडचणी वाढल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि नामिबिया या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी सराव केला. या वेळी ईशान किशनच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती आहे. जसप्रीत बुमराहनं टाकलेला यॉर्कर ईशान किशनच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर आदळला. ज्यामुळं ईशान किशनला सरावादरम्यान वेदना होत असल्याचं पाहायला मिळालं. यानंतर ईशान किशन फिजिओकडून उपचार घेत असल्याचं देखील पाहायला मिळालं.ईशान किशनला दुखापत झाली असली तरी चांगली बाब म्हणजे त्यानं पुन्हा सराव सुरु केला. मात्र, दुसऱ्यांदा सराव सुरु केल्यानंतर त्यानं लगेच पुढील ५ मिनिटांमध्ये सराव बंद केला. बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही. त्यामुळे ईशान आजची मॅच खेळू शकेल की नाही हे निश्चित सांगता येणार नाही. मात्र या घडामोडींमुळे करणार सूर्यकुमारच्या अडचणीत नक्कीच वाढ झाली आहे.Ishan kishan got injured by Bumrah's yorker in the nets. pic.twitter.com/5fDGyAz4T4— Shana⁴⁵ (@shana45__) February 12, 2026अभिषेक शर्मा आजच्या मॅच मधून बाहेर ?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक शर्मा आजारी आहे. त्याचं पोट बिघडलं आहे आणि त्याला तापही आहे. त्यामुळे तो हा सामना खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्याला संघ प्रशासनाकडून विश्रांती दिली जाईल, असं चिन्ह आहे. भारताचा पुढील सामना पाकिस्तानशी आहे. त्या सामन्यापूर्वी अभिषेकची तब्येत ठीक होणं जास्त महत्त्वाचं आहे.सामना कुठे पाहता येईल ?टी-२० विश्वचषकाचे प्रसारणाचे हक्क भारतात स्टार नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर पाहता येईल. यात इंग्रजी व हिंदीसह तामिळ, कन्नड, भोजपुरी, मराठी, बंगाली, तेलुगू अशा भाषांमध्येही हा सामना पाहता येईल. तर ऑनलाईन हा सामना जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि वेबसाईटवर पाहता येईल.भारतीय संघ :- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, रिकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदरनामिबिया संघ :- गेरार्ड इरास्मुस (कर्णधार), झेन ग्रीन, बर्नार्ड शोल्झ, रुबेन ट्रेपलमान, जेजे स्मिट, जैन फ्रिलिंक, लॉरेन स्टिनकैप, मालन कुगर, निकोल लॉफ्टी-इटन, जॅक ब्रसेल, बेन शिकाँगो, जेसी बॉल्ट, ठापतन लिशर, डब्ल्यूपी मायबर्ग आणि मॅक्स हेगो.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 12:10 pm

Niranjan Davkhare: शहापूरसाठी नव्या पाणीपुरवठा योजनेला तातडीची मंजुरी द्यावी, आमदार डावखरेंचे जलसंपदा मंत्र्यांना निवेदन

ठाणे: शहापूर नगरपंचायतीच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी ठाणे येथे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.शहापूर नगरपंचायत महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार स्थापन झाल्यानंतर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. सन १९८३ मधील जुनी पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्याने नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे कठीण झाले आहे. शहराची भावी वाढ व सन २०४४ पर्यंतची पाण्याची गरज लक्षात घेऊन भातसा नदी या स्त्रोतावर आधारित नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली असल्याचे आमदार डावखरे यांनी निवेदनात नमूद केले.नगरपंचायतीने आवश्यक ठराव करून पाणी आरक्षणाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून, काही खासगी प्रकल्पांचे पाणी आरक्षण रद्द झाल्यानंतर उपलब्ध झालेल्या सुमारे २.५७ दलघमी/वर्ष पाणी आरक्षण शहापूर नगरपंचायतीस देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला आहे.आमदार डावखरेंनी निवेदनात काय म्हटले?आमदार निरंजन डावखरे यांनी निवेदनात म्हटले की, शहापूर नगरपंचायत ही महाराष्ट्र शासनाच्या दि. ११ मार्च २०१५ च्या अधिसूचनेनुसार नव्याने स्थापन झालेली नगरपंचायत असून शहराची लोकसंख्या झपाट्‌याने वाढत आहे. सन १९८३ मध्ये अस्तित्वात आलेली जुनी पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्याने नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविणे शक्य होत नाही. शहराची भावी वाढ व सन २०१४ पर्यंतची पाण्याची गरज लक्षात घेता, भातसा नदी या खात्रीशीर उ‌द्भवावरून नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आलेली आहे. नगरपंचायतीने याबाबत आवश्यक ठराव करून पाणी आरक्षणाचा प्रस्ताव सादर केला आहे. संदर्भीय पत्रानुसार काही खासगी प्रकल्पांचे पाणी आरक्षण रद्द झालेले असून त्यापैकी २.५५ दलघमी/वर्ष पाणी आरक्षण शहापूर नगरपंचायतीस देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला आहे. सदर प्रस्ताव अत्यंत लोकहिताचा असल्याने त्यास तातडीने मंजुरी देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, ही विनंती.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 12:10 pm

Sanjay Raut : “काँग्रेस पक्षाने अधिक गंभीरपणे….;”चंद्रपुरातील भाजपयुतीवर राऊत स्पष्टचं बोलले, म्हणाले “शेवटच्या क्षणापर्यंत…”

Sanjay Raut : चंद्रपूर महापालिकेतील भाजप-उबाठा गटाच्या युतीवर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 11:47 am

Modern Wholesale Fish Market: नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; १३८ कोटींच्या आधुनिक घाऊक मासळी बाजार प्रकल्पास प्रशासकीय मान्यता

मरोळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची उभारणीमासेमारी बंद कालावधीत २,८१६ मच्छीमार लाभार्थ्यांना उपजीविका व पोषण सहाय्याचा समावेश – PMMSY अंतर्गत महत्त्वपूर्ण निर्णय

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 11:30 am

Divya Shinde On Bigg Boss Marathi 6: बिग बॉसने खरं फुटेज दाखवलं नाही; पत्रकार परिषद घेत दिव्या शिंदेचा गंभीर आरोप

मुंबई: बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सध्या जोरदार चर्चेत आहे. अशातच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिव्या शिंदेची बिग बॉसच्या घरातून हाकालपट्टी करण्यात आली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या दिव्या शिंदेनं नुकतीच एक पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. तसेच तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तसेच बिग बॉस मराठीच्या टीमवरही गंभीर आरोप केले आहेत.काय म्हणाली दिव्या शिंदे ?बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये सहभागी झालेली स्पर्धक दिव्या शिंदे बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी निवड कशी केली जाते? याबाबत बोलताना म्हणाली की, त्यांची टीम माझ्याकडे आलेली. तीन मिटिंग झालेल्या. मी काही अटी ठेवलेल्या. त्यांनी त्या मान्यसुद्धा केल्या. मी माझ्या आजारपणाबद्दलही त्यांना सांगितलेलं. मला आराम करायला वेळ मिळाला नव्हता. मी त्यांना सांगितलेलं, मी फिजिकली फिट नाहीये. त्यावर त्यांनी मला सांगितलं, 'नाही नाही ताई...आम्ही काळजी घेऊ...पुढे बोलताना, माझी काही काळजी घेतली नाही. जेव्हा मी मरणाच्या दारात होते तेव्हा दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिलं. हल्ली माझा ऑक्सिजन कमी होत होता. दोन दिवसानंतर मला इंजेक्शन देण्यात आलं. तेव्हा मी रडत होते जोर-जोरात. माझी काही काळजीच त्यांनी घेतलेली नाहीये..., असं दिव्यानं सांगितलं.'बिग बॉसनं खरं फुटेज दाखवलंच नाही'बिग बॉसनं टास्क दरम्यान दिव्या आणि इतर स्पर्धकांमध्ये झालेल्या शा‍ब्दिक बाचाबाचीचं सर्व फुटेज काही दाखवलं नाही, असा आरोप केला आहे. तसेच, स्पष्टीकरण देताना तिनं सांगितलं की, ज्यावेळेस मी कन्फेशन रूममध्ये होते, त्यावेळी मी म्हणालेली मला शो सोडायचाय. मी हा शो पुढे करू शकत नाही. माझ्या मान-सन्मानावर गोष्टी यायला लागल्या आहेत. हे कायम मला Poke करतायत. त्यामुळे मी बाहेर जाण्यासाठी इच्छुक आहे आणि मला कळून गेलेलं, या गोष्टी आपल्यासाठी नाहीयेत. तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हे त्यांनी दाखवलं नाहीये. त्याचबरोबर बाकीचे स्पर्धक माझ्याकडे आले, ही धमकी आहे धमकी आहे म्हणत, त्यामध्ये जे संभाषण आहे, तिथेही मी माझा मुद्दा मांडलेला. पण, त्यांनी ते दाखवलं नाही...\प्राजक्ता शुक्रेनं मला सांगितलं की तू म्हण 'शब्दांची तलवार' त्यावर मी तिला म्हटलं, 'अगं, तू मला हे सांगायची गरज नव्हती, कारण माझ्या डोक्यातच हे होतं. मी तेच बोलणार होते, पण थांबून बोलणार होते. हेही त्यांनी दाखवलं नाही. राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे, ओमकार राऊत, करण सोनावणे यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं, कन्फेशन रूममध्ये जाण्याअगोदर, पण त्यांनी ते फुटेजसुद्धा दाखवलं नाही. मी राकेश बापटला माझा मुद्दा स्पष्ट केला, त्यांनी बिग बॉसला समजावण्याचा प्रयत्न केला..., असं दिव्या शिंदेनं सांगितलं.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 11:30 am

New Labor Code : ‘आठवड्यात ४८ तास काम करा आणि सुट्टी घ्या’; विकसित देशातील पॅटर्न राज्यात लागू होणार

New Labor Code : इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान यांसारख्या विकसित देशांत प्रचलित असलेली पद्धत

दैनिक प्रभात 12 Feb 2026 11:28 am

NCMC Card: एनसीएमसी कार्ड असेल तरच मिळणार एसटी बस प्रवासात सवलत; जाणून घ्या एनसीएमसी कार्ड बद्दल

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांना पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्यासाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच 'एनसीएमसी' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता हे स्मार्ट कार्ड आवश्यक असेल.एनसीएमसी कार्ड अनिवार्य:हा केवळ तांत्रिक बदल नाही तर प्रवाशांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी उचलेलं एक पाऊल आहे. हे कार्ड सवलती, कॅशलेस पेमेंट आणि पारदर्शक प्रणालीचे अचूक रेकॉर्ड सुनिश्चित करेल. या प्रकल्पासाठी एसटीने एबिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि एनएसडीएल पेमेंट्स बँकेसोबत भागीदारी केली आहे.सर्व डेपोमध्ये लवकरच नोंदणी मोहीम सुरू होईल. प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनंतर, आता प्रत्येकाकडे हे कार्ड असणे आवश्यक असेल.कोणाला मिळणार एनसीएमसी कार्ड ?मिळालेल्या माहितीनुसार, या नवीन योजनेत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांचा समावेश आहे. अपंग प्रवासी, स्वातंत्र्यसैनिक, मान्यताप्राप्त पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना एनसीएमसी कार्ड दिले जातील. विद्यार्थ्यांचे कार्ड त्यांच्या शाळेच्या क्रमांकाशी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे कार्ड त्यांच्या आधार क्रमांकाशी आणि अपंग प्रवाशांचे कार्ड त्यांच्या UDID क्रमांकाशी जोडले जातील. या कार्डची किंमत ₹१९९ आहे (GST सह), परंतु जुने स्मार्ट कार्ड सादर केल्यावर ते ₹१४९ मध्ये उपलब्ध असेल.प्रवास सोपा आणि सुरक्षित होण्याकडे भर:कार्डमध्ये किमान १०० रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करू शकता. हा रिचार्ज तुम्हाला ईटीआयएम मशीन, वेबसाइट, मोबाईल अॅप किंवा अधिकृत एजंटद्वारे करता येईल. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी ३,००० हून अधिक एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागातील प्रवाशांनाही बसस्थानकावर नोंदणी करण्याच्या सुविधेचा फायदा होईल. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (एसटी) या उपक्रमामुळे प्रवास सोपा आणि सुरक्षित होईल.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 11:10 am

Crime: प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार, नात्याला काळिमा फासणारी घटना समोर

मुंबई: नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित पदावर काम करणाऱ्या महिलेला स्वत:च्याच घरात ज्या छळाचा सामना करावा लागला, ते ऐकून कोणाचेही मन विषण्ण होईल. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा भयानक प्रकार आता चव्हाट्यावर आला असून, यामुळे शिक्षण क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे. एका महिलेने तिच्याच सासर्‍यावर अत्यंत गंभीर आणि संतापजनक आरोप केले आहेत.नेमकं प्रकरण काय ?हे संतापजनक प्रकरण कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगलुरु शहरातून समोर आले आहे. येथील नॉर्थ बेंगलुरु भागात राहणाऱ्या एका खाजगी शाळेच्या महिला प्रिन्सिपलने आपल्या सासर्‍याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार नोंदवली आहे. मागील ६ वर्षांपासून आपला शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचे या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.मागील ६ वर्षांपासून छळही पीडित महिला २००७ पासून शिक्षण क्षेत्रात सक्रिय असून एका प्रसिद्ध शाळेत प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे. तिच्या तक्रारीनुसार, लग्नानंतरची सुरुवातीची काही वर्षे सुखात गेली, मात्र २०२० पासून तिच्या सासर्‍याने तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. संपूर्ण कुटुंब एकाच अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये वेगवेगळ्या घरात राहत होते. पीडित महिला घरी एकटी असायची, तेव्हा तिचा सासरा घरात घुसून तिच्याशी अश्लील चाळे आणि शारीरिक शोषण करायचा, असा गंभीर आरोप तिने केला आहे.पीडित महिला गप्प का होती?आपल्यासोबत घडणारा हा प्रकार कोणाला सांगितल्यास मुलांना इजा पोहचवू, अशी धमकी आरोपी सासरा वारंवार देत होता. आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी आणि घराची अब्रू वाचवण्यासाठी ही महिला इतके दिवस गप्प राहिली. परिस्थिती कधीतरी सुधारेल अशी तिला आशा होती, परंतु सासर्‍याचा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच गेला. अखेर सहनशक्ती संपल्यावर तिने हा सर्व प्रकार नवऱ्याला सांगितला. त्यानंतर घरातील मोठ्या व्यक्तींनी मध्यस्थी करून आरोपीला ताकीद दिली होती, ज्यामुळे काही काळ हा त्रास थांबला होता.सासर्‍याची मजल इतकी वाढली होती की, त्याने घरच नाही तर पीडित महिलेच्या कामाच्या ठिकाणी म्हणजेच शाळेत जाऊनही तिला त्रास देण्यास सुरुवात केली. शाळेच्या केबिनमध्ये आणि अपार्टमेंटच्या लिफ्टजवळ सासर्‍याने अनेकदा छळ केल्याचे महिलेने तक्रारीत स्पष्ट केले आहे. आरोपी तिला वारंवार अश्लील मजकूर असलेली हाताने लिहिलेली पत्रे द्यायचा आणि ती वाचायला लावून पुन्हा स्वतःकडे परत घ्यायचा. हा सर्व प्रकार २०२० पासून डिसेंबर २०२५ पर्यंत सातत्याने सुरू होता.या प्रकरणाने गंभीर वळण १५ डिसेंबर २०२५ रोजी घेतले. सकाळी ७.३० च्या सुमारास महिला जेव्हा कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडली, तेव्हा अपार्टमेंटच्या लिफ्टजवळ सासर्‍याने पुन्हा तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा महिलेने याला कडाडून विरोध केला, तेव्हा संतापलेल्या सासर्‍याने तिच्या पोटावर जोरात ठोसा मारला आणि तिथून पळ काढला. या शारीरिक हल्ल्यानंतर महिलेने अखेर पोलिसांत धाव घेण्याचा निर्णय घेतला.याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील गंभीर स्वरूप लक्षात घेता राज्य महिला आयोगानेही या घटनेची दखल घेतली आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या महिलेला जर घरातच अशा संकटाचा सामना करावा लागत असेल, तर सामान्य महिलांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणातील संबंधित व्यक्तींची चौकशी करत आहेत.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 11:10 am

Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्या कामगार कायद्यांविरोधात आणि काही आर्थिक धोरणांच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे.संपामध्ये देशातील १० प्रमुख केंद्रीय ट्रेड युनियनचा सहभाग असून INTUC, AITUC, HMS, CITU यांसह इतर संघटनांनी कामगारांच्या हक्कांबाबत चिंता व्यक्त केली आहे. नव्या लेबर कोडमुळे नोकरीची सुरक्षितता कमी होईल, कंपन्यांना कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे स्वातंत्र्य वाढेल आणि किमान वेतन तसेच सामाजिक सुरक्षेवर परिणाम होईल, असा आरोप संघटनांनी केला आहे.केंद्र सरकारने गेल्या वर्षी २९ कामगार कायद्यांच्या जागी लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान सभा यांसारख्या शेतकरी संघटनांनी या संपाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. तर ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनसह प्रमुख बँक संघटनांनी या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी २ वाजता देशभरात संघटनांकडून आंदोलन केलं जाणार आहे.संपामागील कारणं आणि मागण्या काय?- केंद्र सरकारने गेल्यावर्षी २९ कामगार कायद्यांच्या जागी लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांविरुद्ध कामगार संघटनांनी हा एल्गार पुकारला आहे.- नवीन संहितांमुळे कामगारांचे हक्क कमकुवत होणार असून नोकरीची सुरक्षितता धोक्यात येणार आहे.- याव्यतिरिक्त, खासगीकरण, वेतनातील तफावत, वीज दुरुस्ती विधेयक, बियाणे विधेयकाचा मसुदा आणि 'पीस' कायदा रद्द करावा.- मनरेगा योजना पुनर्संचयित करण्याची मागणीही लावून धरण्यात आली आहे.'या' सेवांवर होणार मोठा परिणाम:१) बँकिंग सेवाः प्रमुख बँक संघटना संपात सामील झाल्यामुळे बँक व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, बँका अधिकृतपणे बंद नसून ऑनलाईन व्यवहार आणि एटीएम सेवा सुरू राहतील.२) वाहतूक सेवाः बस, रिक्षा आणि ट्रक चालक संघटनांच्या सहभागामुळे प्रमुख शहरांमध्ये वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.3) बाजारपेठ आणि व्यापारः घाऊक आणि किरकोळ बाजारपेठांमधील व्यापारी संघटनांनी संपाला नैतिक पाठिंबा दिल्याने अनेक ठिकाणी दुकाने बंद राहू शकतात.४) शिक्षण संस्थाः वाहतुकीच्या समस्या आणि सुरक्षिततेचे कारण लक्षात घेता, काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली.काय सुरू राहणार?- रुग्णवाहिका आणि रुग्णालये- अग्निशमन दल- विमान सेवा- दूध आणि भाजीपाला पुरवठा

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 11:10 am

Pak on UNSC: “लाल किल्ला स्फोटात जैशचा हात” ; संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अहवालात नाव आल्याने पाकचा तिळपापड

Pak on UNSC: : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) १२६७ प्रतिबंध देखरेख समितीच्या नवीन अहवालात पाकिस्तानबद्दल महत्त्वाची माहिती उघड झाली आहे.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 11:06 am

Jamkhed News : भाग्यश्री गोरे लोकसेवा आयोग MPSC मार्फत तालुका कृषी अधिकारीपदी

Jamkhed News : भाग्यश्री चे वडील आरटीओ चे काम करत असून चुलते अशोक गोरे शेतकरी यांनीही, मोठ्या कष्टाने व त्यागाने त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी दिलेले पाठबळ निश्चितच प्रेरणादायी आहे.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 11:01 am

Ritu Tawde : मुंंबई महापालिकेचा महापौर पदाचा पदभार स्विकारल्यानंतर रितू तावडेंकडून पाच मोठ्या घोषणा

Ritu Tawde :मुंबई महापालिकेच्या महापौर पदाचा पदभार स्विकारल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी पाच मोठ्या घोषणा जाहीर केल्या आहेत.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 10:47 am

Stock Market Today: शेअर बाजारात धुमाकूळ! सेन्सेक्स ४२५ अंकांनी घसरला; निफ्टीलाही धक्का

Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराने गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी व्यापार दिवसाची सुरुवात नकारात्मकतेने केली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५०, लाल रंगात उघडले.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 10:42 am

Allergy Awareness: खाद्यपदार्थांतील रसायने आणि वाढती ऍलर्जी; सतर्क राहणं का गरजेचं?

साखर शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत काही रसायनांचा वापर केला जातो. काही संवेदनशील व्यक्तींमध्ये यामुळे त्वचेवर पुरळ, खाज, लाल चट्टे किंवा श्वसनाचा त्रास दिसू शकतो. तसेच वनस्पती तूप, हायड्रोजेनेटेड तेल (डालडा) किंवा रिफाइंड तेल तयार करताना विविध रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. या तेलांचा अतिरेक केल्यास पचनाच्या तक्रारी, घशात खवखव किंवा अॅसिडिटीसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो ताजं, घरगुती आणि कमी प्रक्रियायुक्त तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 10:30 am

Amol Mitkari: “…त्यात कुठेतरी तथ्य असल्याचं समोर आलं”; अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले?

Amol Mitkari : 'रोहित पवारांनी मागणी केल्याप्रमाणे तत्काळ एका बाह्य संस्थेकडून सदर प्रकरणाची चौकशी ही झालीच पाहिजे'

दैनिक प्रभात 12 Feb 2026 9:37 am

Bangladesh Election 2026: बांगलादेशमध्ये मतदानाला सुरुवात ; मोहम्मद युनूससह तारिक रहमान यांनी देखील बजावला मतदानाचा हक्क

Bangladesh Election 2026: बांगलादेशमध्ये अनेक महिन्यांच्या हिंसाचार, रस्त्यावरील निदर्शने आणि राजकीय गोंधळानंतर, अखेर निवडणुकांची वेळ आलीय. २०२४ च्या सत्तापालटानंतर आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारत भेटीनंतर, बांगलादेशात आज निवडणुका पार पडत आहेत.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 9:36 am

Radha Yadav : राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणामुळे अडचणीत; बॅालीवूडकर मदतीसाठी सरसावले, पत्नी राधा यादव म्हणाल्या…

Radha Yadav : चेक बाऊन्स प्रकरणामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अभिनेता राजपाल यादव याच्या पत्नी राधा यादव यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 9:20 am

Chhatrapati Sambhajinagar Crime: धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरात सहावीत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा वर्गमित्रावर अत्याचार

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरातील एका नामांकित इंग्रजी शाळेमध्ये चार मुलांनी त्यांच्याच वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे सर्व विद्यार्थी सहावीच्या वर्गात शिकत घेत आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये ही घटना घडल्याची माहिती पीडित मुलाच्या पालकांनी दिली. याप्रकरणी चार मुलांविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी सुरू केली. दुसरीकडे, शाळेने मात्र संबंधित मुलांवर कोणतीही कारवाई केली नाही. उलट पालकांवरच दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी सुरू केली. मात्र शाळेकडून संबंधित मुलांवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित मुलाच्या वडिलांनी केला. उलट पीडित मुलावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित मुलाच्या वडिलांनी केला.राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसेंनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. दादा भुसे म्हणाले की, या संदर्भात मी स्वत: माहिती घेणार आहे आणि त्यावर योग्य ती कारवाई करेन. शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत.शाळकरी मुलांमध्ये अशा प्रकारची विकृत मानसिकता येते कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर मानसोपचार तज्ज्ञ किशोर शितोळे यांनी सांगितलं की, मोबाईलचा अतिवापर, पॉर्न व्हिडीओ पाहणे, एका विशिष्ट विचारसरणीच्या मुलांचा एकत्र ग्रुप होणे, अशा कारणामुळे या घटना घडू शकतात. यावर उपाय म्हणजे पालकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे.सध्या आरोप असलेल्या चार अल्पवयीन मुलांवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेत घडणारे असे प्रकार भविष्यात थांबावेत यासाठी शाळा प्रशासन, शिक्षण विभाग काय कारवाई करणार, हे पाहावं लागेल.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 9:10 am

काँग्रेसने पहिल्याच सभागृहात उबाठाचा मीटर केला डाऊन

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठा पक्ष हा प्रमुख विरोधी पक्षनेता असला प्रत्यक्षात उबाठाला विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावण्याची संधी दिली नाही. सभागृहात बसण्यास जागा नसल्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर निवडीच्या प्रक्रियेपासूनच घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि काँग्रेसच्या या घोषणाबाजीला उबाठाला बळ देत होते. परंतु काँग्रेसला बळ देतानाच आपलाच मीटर कधी डाऊन कधी टाकला हेच उबाठाला कळले नाही.मुंबई महापालिका सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या विशेष सभेमध्ये काँग्रेसचे २४ नगरसेवक सभागृहात वंदे मातरमचे गीत संपल्यानंतर दाखल झाले. परंतु तोपर्यंत सभागृहात सर्वच पक्षांच्या नगरसेवक हे आसनांवर बसलेले होते. त्यामुळे त्यांना बसण्यास जागा शिल्लक राहिले नाही. त्यामुळे बसण्यास जागाच नसल्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक हे मधल्या रांगेत प्रथम उभे राहत त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक महापौरांच्या भाषणावेळी महापौरासमोरील जागेमध्ये जावून तिथे उभे राहून घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनीही त्यांना विरोध दर्शवल्यानंतर त्यांना मागे सरायला लागले.त्यानंतर काँग्रेसच्या मेहेरअली हैदरसह काही नगरसेवकांनी सभागृहात जमिनीवर बसण्यास सुरुवात केली. आपले सदस्य जमिनीवर बसल्याचे दाखवून काँग्रेसच्या नगरसेवकांनीही मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिण खुर्चीवर आणि लाडकी बहिण जमिनीवर अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतरही काँग्रेसचे नगरसेवक हे घोषणाबाजी देत होते आणि उपमहापौरांच्या भाषणा दरम्यान गोंधळ निर्माण करण्याचा डाव रचणाऱ्या उबाठाचा डावच काँग्रेसने उधळवून लावला. त्यामुळे उबाठाला सभागृहात विरोधक आक्रमक झाल्याचे चित्रच निर्माण करता न आल्यामुळे अखेर उपमहापौरपदाच्या भाषणादरम्यान त्यांनी सभात्याग केला. त्यानंतरही काँग्रेसचे नगरसेवक घोषणा देत राहिले.विशेष म्हणजे काँग्रेसने, शिवसेनेला प्रमुख विरोधक होवू न देता प्रमुख विरोधक आपण आहोत हे दाखवण्यासाठी ते उशिरा सभागृहात दाखल झाले आणि बसायला जागा नाही या मुद्दयावरून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुरुवातीपासूनच काँग्रेसने उबाठाला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून न स्वीकारता आपणच विरोधी पक्ष आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत विरोधी पक्षाची प्रतिमा आणि त्यांचा विरोध झाकोळण्याचा प्रयत्न केला.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 9:10 am

Priyanka Chopra: अचानक मावशी आल्या आणि सगळं उघड झालं! प्रियंकाचा शाळेतील किस्सा

त्या वेळी प्रियांका अमेरिकेत तिची मावशी किरण यांच्याकडे राहत होती. आई-वडील कामानिमित्त दूर होते. शाळेत असतानाच तिला एका मुलावर क्रश आला. पुस्तकात तिने त्याचं खरं नाव न सांगता ‘बॉब’ असं नाव दिलं आहे. तो मुलगा १०वीत शिकत होता. तो मजेदार स्वभावाचा होता आणि प्रियांकाला लहानसहान गिफ्ट देत असे. दोघं शाळेत भेटायचे, बोलायचे. मात्र मावशींनी डेटिंगला परवानगी दिली नव्हती.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 9:07 am

Top 10 news: सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा?, केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद, अशा टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर

Top 10 news: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, अशी चर्चा रंगली होती. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून अध्यक्ष निवडीचा मुहूर्तही ठरल्याची माहिती मिळालीय.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 8:59 am

Shambhuraj Desai : “अति तिथे माती, योग्य संधीची…”; शंभूराज देसाईंचा थेट भाजपवर निशाणा

Shambhuraj Desai : जिल्हा परिषदच्या निकालानुसार साताऱ्यात भाजप 27 जागेवर सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, बहुमतासाठीचा आवश्यक असलेला आकडा गाठण्यात भाजप अपयशी.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 8:38 am

आजचे एक्सप्लेनर:राष्ट्रगीतापूर्वी संपूर्ण वंदे मातरम गायले नाही तर काय शिक्षा? नवीन नियमांची संपूर्ण कहाणी आणि वादाचे कारण

आता शाळांमध्ये ‘जन गण मन’ आधी ‘वंदे मातरम्’ देखील गायले जाईल. तीदेखील पूर्ण 6 कडवी, ज्यांना गाण्यासाठी 190 सेकंद लागतील. गृह मंत्रालयाने 28 जानेवारी 2026 रोजी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, ज्यात राष्ट्रगीताशी संबंधित असे अनेक नियम बनवण्यात आले आहेत. शेवटी राष्ट्रगीताशी संबंधित नवीन नियम काय आहेत, ते कुठे लागू होतील, कोणाला सूट मिळाली, न पाळल्यास शिक्षा काय असेल आणि या गीतावरून दशकांपासून वाद का निर्माण होत आहेत; जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये… प्रश्न-1: वंदे मातरम् गाण्याचे नवीन नियम कुठे-कुठे लागू होतील, कुठे सूट देण्यात आली आहे?उत्तर: केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार… कुठे लागू होणार नाहीत हे नियम प्रश्न-2: ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम्’मध्ये आता काय फरक राहिला?उत्तर: 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, ऑल इंडिया रेडिओवर जे पहिले गाणे वाजले ते वंदे मातरमच होते. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या शेवटच्या सत्रात अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी घोषणा केली-'रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत असेल. स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या वंदे मातरम् गीतालाही तेवढाच दर्जा दिला जाईल.' यानंतर संविधान सभेच्या सर्व सदस्यांनी जन गण मन आणि वंदे मातरम् ही दोन्ही गीते गायली. अधिकृतपणे राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये, जसे की- राष्ट्रपती आणि राज्यपालांना सलामी, परेड, राष्ट्रध्वज फडकवणे इत्यादी प्रसंगी राष्ट्रगीत गाण्याचा नियम आहे. वंदे मातरम् साठी अशी कोणतीही सक्ती नव्हती. आधी फक्त राष्ट्रगानासाठी उभे राहणे अनिवार्य होते, परंतु आता राष्ट्रगीताच्या सन्मानार्थही तसे करण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मात्र, राष्ट्रगानाबाबत स्पष्ट कायदेशीर प्रोटोकॉल आहे. अपमान केल्यास 3 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. सध्या राष्ट्रगीताबाबत असे काही नाही. 2019 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने वंदे मातरमला जन गण मन इतका दर्जा देणारी याचिका फेटाळून लावली होती. प्रश्न-3: राष्ट्रगीताशी संबंधित नियम न पाळल्यास काय होईल?उत्तर: वंदे मातरमला घेऊन सरकारने सध्या फक्त मार्गदर्शक तत्त्वे (गाइडलाइन्स) जाहीर केली आहेत. सध्या यात नियम न पाळल्यास शिक्षा किंवा दंडाची तरतूद करण्यात आलेली नाही. जर सरकारने कोणताही कायदा बनवला किंवा नियम जाहीर केला, तेव्हा हे स्पष्ट होईल की राष्ट्रगीताशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे न पाळल्यास काय होईल. दुसरीकडे, राष्ट्रगानाला ‘प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट, 1971’ अंतर्गत समाविष्ट केले आहे. राष्ट्रगानाचा अपमान केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंडाची तरतूद आहे. 2017 मध्ये ‘अश्विनी कुमार उपाध्याय विरुद्ध भारत संघ’ या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, संविधानात 'राष्ट्रगीता'ची कोणतीही अनिवार्य संकल्पना नाही. त्यामुळे शाळा किंवा कार्यालयांमध्ये ते सक्तीने गाण्यासाठी कोणालाही भाग पाडले जाऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी करताना सांगितले की, अनुच्छेद 51A (मूलभूत कर्तव्ये) मध्ये केवळ राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगानाच्या सन्मानाचा उल्लेख आहे. त्यात 'राष्ट्रगीत'चा उल्लेख नाही. प्रश्न-4: ‘वंदे मातरम्’ला मुसलमानांचा काय आक्षेप आहे, त्याला मुस्लिमविरोधी का म्हटले जाते?उत्तर: प्रसिद्ध बंगाली लेखक आणि कवी बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे वंदे मातरम् गीत पहिल्यांदा 7 नोव्हेंबर 1875 रोजी 'बंगदर्शन' या साहित्य मासिकात प्रकाशित झाले होते. तथापि, त्यावेळी त्याची विशेष चर्चा झाली नव्हती. 7 वर्षांनंतर 1882 मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे गीत त्यांच्याच 'आनंदमठ' या कादंबरीत समाविष्ट केले. कादंबरीत संन्यासी वंदे मातरम्‌चा नारा देतात, ज्याचा अर्थ आहे - आईला नमन. हे संन्यासी देशाच्या भूमीलाच आपली आई मानत होते. यानंतर हे गीत खूप लोकप्रिय झाले, परंतु मुस्लिम नेत्यांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली… मुस्लिम लीगला वंदे मातरम्‌मुळे दोन समस्या होत्या...पहिली: यात हिंदू देवी-देवतांचा उल्लेख आहे आणि मूर्ती पूजेला प्रोत्साहन दिले जात आहे, जे इस्लाममध्ये अस्वीकार्य आहे आणि धर्मनिरपेक्ष नाही.दुसरी: ज्या आनंदमठ कादंबरीतून हे घेतले आहे, त्यात मुसलमानांना देशाचे शत्रू मानून मारले गेले आहे. इतिहासकार आर. सी. मजुमदार वंदे मातरम्‌ला मुस्लिमविरोधी मानत नाहीत, परंतु ते म्हणतात, 'आनंदमठमध्ये बंकिमचंद्र यांनी ज्या प्रकारे देवी कालीचे चित्रण केले आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की त्यांचा राष्ट्रवाद हिंदू होता, भारतीय नाही.' इतिहासकार राम पुनियानी सांगतात, 'मुसलमानांच्या एका गटाला वंदे मातरम्‌मुळे त्रास त्याच्या नंतरच्या 4 श्लोकांमुळे आहे, ज्यात हिंदू देवी-देवतांचा उल्लेख आहे. याशिवाय आनंदमठमध्ये मुसलमानांप्रती ज्या प्रकारचे हिंसेचे भाव लिहिले आहेत, ते त्रासदायक आहेत.' वर्ष 1998 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये वंदे मातरम्‌ गाण्याचा आदेश जारी केला. विरोध म्हणून मुसलमानांनी आपल्या मुलांना शाळेतून काढायला सुरुवात केली. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या हस्तक्षेपानंतर हा आदेश मागे घेण्यात आला. 2006 मध्ये इस्लामिक संघटना जमात उलमा-ए-हिंदने म्हटले होते की, कोणताही खरा मुसलमान वंदे मातरम कधीही गाऊ शकत नाही. उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये वंदे मातरम गाण्याविरुद्ध एक फतवा देखील जारी करण्यात आला होता. प्रश्न-5: वंदे मातरम गाण्यावर किंवा वाजवण्यावर कधी बंदी घालण्यात आली होती का?उत्तर: 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा आदेश दिला, तेव्हा हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. फाळणीच्या विरोधात उतरलेल्या लोकांनी 'वंदे मातरम'चा नारा दिला होता आणि त्याचा 'युद्धघोष' म्हणून वापर केला होता. ब्रिटिश सरकार या गाण्यामुळे इतकी घाबरली होती की, त्यांनी विशेष आदेश काढून 'वंदे मातरम' बोलण्यावर आणि गाण्यावर बंदी घातली होती. हे गाणाऱ्यांना लाठीने मारले जात असे आणि तुरुंगात टाकले जात असे. इंग्रजांच्या या दडपशाहीच्या निर्णयामुळेच हे गाणे स्वदेशी आंदोलनाचा आधार बनले आणि घरोघरी प्रचलित झाले. तथापि, यानंतर धार्मिक कारणांमुळे 1920-30 च्या दशकात वंदे मातरमचा विरोध झाला. 1937 मध्ये याच्या विरोधात एक ठराव देखील मंजूर करण्यात आला. त्यावेळी रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, अबुल कलाम आझाद आणि जवाहरलाल नेहरू यांनी एकत्र येऊन एक काँग्रेस समिती स्थापन केली. सर्वांनी असा निर्णय घेतला की राष्ट्रीय कार्यक्रमात वंदे मातरमचे पहिले दोन कडवेच गायले जातील. इतिहासकार सब्यसाची भट्टाचार्य त्यांच्या ‘वंदे मातरम: बायोग्राफी ऑफ अ सॉन्ग’ या पुस्तकात लिहितात की, शेवटचे चार श्लोक काढून टाकल्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी नेहरू यांना सल्ला दिला की, याचे सुरुवातीचे दोन श्लोक खूप प्रभावी आहेत आणि त्यामुळे कोणालाही समस्या येऊ शकत नाही. मात्र, यानंतरही त्याच्या पार्श्वभूमीमुळे वंदे मातरम नेहमीच वादात राहिले, जे आजही कायम आहे. वंदे मातरमची 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारने यासंबंधी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आणि ते गाणे अनिवार्य केले. राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. कारण वंदे मातरम्‌चे रचयिता देखील बंगाली होते, त्यामुळे त्याला बंगाल निवडणुकीपर्यंत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरे म्हणजे, या गीताची ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील भाजपला राजकीय फायदा मिळवून देऊ शकते.

दिव्यमराठी भास्कर 12 Feb 2026 8:10 am

मुंबईतील भायखळ्यात लिफ्ट कोसळून पाच जण जखमी

मुंबई: भायखळ्यातील जयकृपा टॉवरमध्ये लिफ्ट कोसळली आहे. या लिफ्ट अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ११ फेब्रुवारी रोजी रात्री भायखळ्यातील जयकृपा टॉवरमधील घोडापदेव क्रॉस लेन क्रमांक १ येथे ही दुर्घटना घडली आहे.भायखळ्यातील जयकृपा टॉवरमध्ये केबल तुटल्यामुळे लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळली. यानंतर तात्काळ मुंबई अग्निशमन दल, पोलिस, बेस्ट, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि बीएमसीचे वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.भायखळ्यातील लिफ्ट अपघातात एकूण पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमींपैकी तीन जणांना जे.जे. रुग्णालयात, एकाला बालाजी रुग्णालयात तर एकाला जसलोक रुग्णालयात हलवण्यात आले. जे. जे रुग्णालयात कल्पिता पवार, यश बालविकर आणि उषा गुप्ता यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. बालाजी रुग्णालयात जमुना प्रसाद शिवहरे तर जसलोक रुग्णालयात शिल्पा मोरे यांच्यावर उपचार केले जात असून त्यांचीही प्रकृती ठिक असल्याची माहिती मिळाली आहे.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 8:10 am

ब्लॅकबोर्ड-आईच्या मृतदेहासोबत 3 दिवस झोपलेला तरुण मुलगा:मुंग्यांनी खाल्ले हात-पाय आणि चेहरा; हिमालयातील ओसाड गावांची गोष्ट

तीन दिवस सीतादेवींचा मृतदेह अंथरुणावर पडून होता. त्यांचा 38 वर्षांचा मनोरुग्ण मुलगा शेजारी बसून ओरडत राहायचा - आई, जेवण बनव. तो आपल्या आईला हलवून पाहायचा, पण काही वेळ हालचाल न झाल्यावर त्याला वाटायचे की आई गाढ झोपेत आहे. मग तो घरातून निघून जायचा. रात्री घरी परतल्यावर तो पुन्हा आईला उठवायचा. काही वेळाने थकून तो आईच्या मृतदेहाशेजारी झोपून जायचा. सीतादेवींच्या मृतदेहावर माश्या घोंघावू लागल्या. मुंग्यांनी मृतदेहाचे हात-पाय आणि चेहरा खाल्ला. सुमारे तीन महिन्यांपूर्वी ही घटना उत्तराखंडमधील श्रीनगर येथील लोयगड नावाच्या भुताटकीच्या गावात घडली. या घटनेने आसपासच्या गावांनाही हादरवून सोडले. रिकाम्या झालेल्या लोयगड गावात सीतादेवी आपल्या मनोरुग्ण मुलासोबत राहत होत्या. सरकारी आकडेवारीनुसार, उत्तराखंडमध्ये अशा ओसाड गावांची संख्या 1700 आहे. ब्लॅकबोर्डच्या या भागात उत्तराखंडमधील अशाच रिकाम्या झालेल्या ओसाड गावांची भयाण कथा, जिथे लोकांनी आपले घर, शेती-वाडी सर्व सोडून दिले आहे… ही संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी मला लोयगड गावी जायचे होते. ज्याचा रस्ता अस्वल आणि वाघांनी भरलेल्या घनदाट जंगलातून जातो. रस्त्याचा तर काही नामोनिशाण नाही. चालण्यासाठी पायवाटही नाही. श्रीनगरहून मोठ्या मुश्किलीने एक टॅक्सी चालक मलछोडा गावी जाण्यास तयार झाला. खरं तर, महामार्गावरून खाली उतरल्यावर मलछोडा गाव आहे. हे गाव ओलांडून एक डोंगर चढावा लागतो, ज्याच्या पलीकडे लोयगड गाव आहे. महामार्गावर टॅक्सीतून उतरून एक लांबचा रस्ता पायीच कापायचा होता. काटेरी झुडपे ओलांडत मी ड्रायव्हरसोबत पायीच निघाले. पायवाटेने खाली उतरण्यास सुरुवात केली. जिथेपर्यंत नजर जाईल तिथे फक्त डोंगरच दिसत होते. चालता-चालता मी एका ठिकाणी थांबले तेव्हा ड्रायव्हर म्हणाला- येथे थांबणे धोक्याचे आहे. वाघ हल्ला करू शकतात. म्हणून आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. सुमारे अर्ध्या तासानंतर आम्ही मलछोडा गावात पोहोचलो. येथील गावकऱ्यांनी सांगितले की लोयगड गावात वाघही असू शकतात. कारण जी गावे रिकामी होतात, वाघ त्याला आपले ठिकाण बनवतात. सीतादेवीबद्दल विचारल्यावर गावकऱ्यांनी सांगितले की तिथे फक्त सीतादेवीचा मुलगा भीरू राहतो. बाकी प्रत्येक घराला कुलूप आहे. काही वेळ इथे बसल्यानंतर आम्ही लोयगडसाठी निघालो. मलछोडा पार केल्यानंतर आम्ही लोहगडाकडे डोंगर चढू लागलो. जंगल घनदाट होत चालले होते आणि चढण एकदम उभी होती. चढता चढता दम लागू लागला, पण इथे थांबता येत नव्हते. शेवटी एक छोटी सपाट जागा आली, जिथे गवत उगवले होते. ड्रायव्हरने सांगितले की ही लोहगड गावातील लोकांची शेती आहे, जी आता पडीक झाली आहे. आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. थोडे आणखी वर गेल्यावर एक पाण्याची पाईप दिसली. घनदाट झुडपे आली की ड्रायव्हर मोठ्या आवाजात बोलू लागला किंवा शिट्टी वाजवू लागला. त्याचे म्हणणे होते की अशा आवाजांनी वाघ दूर जातात. सुमारे 45 मिनिटे चढण चढल्यानंतर एक घर दिसले. हे लोहगड गावातील पहिले घर आहे. या घराच्या जवळ पोहोचल्यावर पाहिले की, पडझड झालेल्या घराशेजारी एक पांढऱ्या रंगाने रंगवलेले दोन मजली घर खूप सुंदर बनवले आहे. दगडाचे छत आणि बाहेर मोकळे अंगण आहे. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या दरवाजाला कुलूप लावले आहे. थोडे पुढे गेल्यावर एकाच वेळी दोन घरे दिसली. येथेही कुलूप लावले आहे. एका घरात डिश अँटेना देखील लावलेला आहे. काही घरे पडझड झाली आहेत. त्यांच्या छतांवर आणि भिंतींवर तर झाडे-झुडपे उगवली आहेत. काही घरे पडण्याच्या मार्गावर आहेत. हे सर्व बघत मी गावातील शेवटच्या घरात पोहोचले. जिथे चुलीत राख आहे. लाकडे ठेवली आहेत. अंगणात उखळ आहे. घराच्या भिंतीवर एक मळके जॅकेट टांगलेले आहे. घर उघडे आहे, दरवाजा उघडून मी पाहिले की तिथे काही भांडी ठेवली आहेत. अंगणात माल्ट्याचे झाड आहे. वांग्याची रोपेही लावलेली आहेत. हेच सीतादेवींचे घर आहे. त्यांचा मनोरुग्ण मुलगा भीरू इथेच राहतो. सध्या भीरू घरी नाही. याशिवाय गावात सुमारे दहा घरे आहेत. सर्वांना गंज लागलेली कुलुपे लावलेली आहेत. येथे स्थलांतराचे सर्वात मोठे कारण म्हणजे येण्या-जाण्यासाठी रस्ता नाही. कुणी आजारी पडल्यास त्याला बरे होण्यासाठी एखाद्या चमत्काराची वाट पाहावी लागते. गावात पाण्याची पाईपलाईन आहे पण पाणी नाही. ना शाळा आहे, ना दुकान, ना अंगणवाडी आणि ना प्राथमिक आरोग्य केंद्र. या संपूर्ण गावात आम्हाला एकही माणूस भेटला नाही. आम्ही परत मलछोडा गावाकडे निघालो. येथे आमची भेट स्थानिक पत्रकार गंगाशी झाली. लोयगडबद्दल विचारल्यावर गंगा सांगते, 'त्या गावात फक्त भीरू नावाचा माणूस उरला आहे. तोही लोकांना पाहून लपून बसतो. त्याची आई सीतादेवीचा मृतदेह अशा स्थितीत सापडला होता की त्यावर माश्या घोंघावत होत्या. मृतदेहाचे हात-पाय आणि चेहरा मुंग्यांनी खाल्ले होते. भीरू मनोरुग्ण आहे, त्यामुळे त्याला कळलेच नाही की आई जिवंत आहे की मेली. आईच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी तो मलछोडा येथे आला आणि येथील महिलांना म्हणाला की, माझ्या आईने तीन दिवसांपासून जेवण केले नाही. गावकऱ्यांना संशय आला. तिथे जाऊन पाहिले असता कळले की सीतादेवी मरण पावली होती. भीरूची पत्नीही त्याला सोडून आपल्या चार मुलांसोबत हरिद्वारला गेली आहे.‘ मी विचारले- ‘भीरूच्या जेवणाची व्यवस्था कशी होते?’ यावर गंगा म्हणते की, ‘जवळच एक छोटेसे डोंगराळ बाजार आहे. दिवसभर तो तिथेच असतो. त्याची पत्नी तिथे एका दुकानदाराला पैसे देऊन जाते, जेणेकरून तो भीरूला जेवण देईल.’ गंगा पुढे म्हणते की, ‘लोक आपली जमीन सोडून गेले आहेत. काही लोकांच्या जमिनीवर पाइनची झाडे उगवली आहेत. सरकारने ती जमीन वन विभागाकडे सोपवली आहे. जेव्हा ते लोक परत येऊ लागले, तेव्हा सरकारने त्यांना झाडे तोडण्याची परवानगीही दिली नाही. म्हणून आता कोणीही परत येऊ इच्छित नाही.’ गंगा नंतर माझी भेट मलछोडा गावातील गुड्डी देवी यांच्याशी झाली. त्या सांगतात की, ‘आम्ही लयोगढमध्ये गवत कापायला जात होतो. सीतादेवींना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्या आजारी होत्या, पण त्यांना ना औषध मिळाले ना अन्न. त्यांना कोणी बघायला नव्हते. सीतादेवीच्या मृत्यूची बातमी मिळाल्यावर आमच्या गावातील लोकच गेले होते. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा भीरूच्या आईच्या मृतदेहाला मुंग्या लागल्या होत्या, माश्या घोंघावत होत्या. तो आपल्या आईचा मृतदेह सोडून फिरायला निघून जात असे. पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे झुडपे अधिकच दाट झाली होती. खांद्यावर तिचा मृतदेह ठेवून स्मशानात घेऊन गेले होते. मृत्यूनंतरही त्यांची सून आली नाही.’ मलछोडा गावाचे रहिवासी सतीशचंद्र पांडे सांगतात की, 'लोयगड गावापर्यंत जाण्यासाठी ना रस्ता आहे ना गावात पाणी आहे. अशा परिस्थितीत तिथे कोण राहणार? गरजेच्या कामासाठी पाणी घेण्यासाठी डोंगर उतरून नदीजवळ जावे लागते. काही वर्षांपूर्वीपर्यंत लोक आपले घर बघायला येत असत पण आता तेही बंद झाले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर लवकरच मलछोडा गावही रिकामे होईल. मलछोडा गावाचे राकेश पांडे सांगतात की, आमच्या गावातही आता बहुतेक वृद्धच राहतात. आमचे गावही रिकामे होण्याच्या मार्गावर आहे. कोणी आजारी पडल्यास रुग्णालयात नेणे कठीण आहे. डोकेदुखीची गोळी घेण्यासाठीही चार किलोमीटर पायी जावे लागते.’

दिव्यमराठी भास्कर 12 Feb 2026 7:59 am

Non-Agricultural Tax : राज्यातील ‘NA’ची कटकट कायमची मिटली; आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही..वाचा सविस्तर

Non-Agricultural Tax : नगर रचना विभागाची परवानगी हीच आता अधिकृत 'एनए' परवानगी; ७/१२ उताऱ्यात संगणकीय प्रणालीद्वारे होणार थेट फेरफार.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 7:17 am

Illegal Hoardings Pune : अनधिकृत होर्डिंगविरोधात पुन्हा कारवाई; तपासणीसाठी पाच पथकांची नियुक्ती

Illegal Hoardings Pune : पहिल्याच दिवशी पथकाने पाडले ७ अनधिकृत होर्डिंग; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता आर्थिक कारवाईचा बडगा.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 7:15 am

Pune Traffic Police : बेशिस्तांना पोलिसांनी दिले शिस्तीचे धडे; अडीच हजार दुचाकीस्वारांंनी भरला २९ लाखांचा दंड

Pune Traffic Police : बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 7:15 am

Vijayrao Deshmukh passes away: प्रख्यात शिवकथाकार विजयराव देशमुख यांचं निधन, मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

मुंबई: धर्मभास्कर प. पू. सद्गुरूदास महाराज उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर विवेक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भक्तगण आणि अनुयायांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 7:10 am

PMC Property Tax : पुणेकरांच्या खिशाला ‘कात्री’! महापालिका प्रशासनाकडून गुपचूप करवाढ मंजूर; भाजप आता काय करणार?

PMC Property Tax : मुदत संपण्यापूर्वी करवाढ मंजूर करण्यासाठी प्रशासनाची घाई; गेल्या ३ वर्षांपासून फेटाळलेला प्रस्ताव यंदा मान्य होणार का?

दैनिक प्रभात 12 Feb 2026 7:00 am

Pune News : जिल्ह्यातील ७३१ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमता येणार नाहीत; नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय

Pune News : राज्य सरकारच्या २३ जानेवारीच्या परिपत्रकाला न्यायालयात आव्हान; ७२१ ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत अद्याप संभ्रम कायम.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 6:45 am

Pune Crime : पुण्यात ‘महाठगबाजी’! एक फोन अन् ६ कोटी ७० लाखांचा गंडा; नारायण पेठेतील ज्येष्ठाला कसं लुटलं? पाहा

Pune Crime : ड्रेनेज लाईनच्या कामापासून सुरू झालेला खेळ थेट 'न्यायाधीशांच्या' बनावट फोनपर्यंत; वर्षभर चाललेल्या या फसवणुकीने पोलीसही चक्रावले.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 6:15 am

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. 'अ' गटातील दुसऱ्या सामन्यात भारताचा सामना नामिबिया विरुद्ध गुरुवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. अमेरिकेने पहिल्या सामन्यात भारताला दिलेली कडवी झुंज पाहता, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कंपनी आता नामिबियाला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात अमेरिकेने भारताच्या तोंडचे पाणी पळवले होते. एका क्षणी भारताची अवस्था ६ बाद ७७ अशी बिकट झाली होती. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत ८४ धावांची झंझावाती खेळी करत भारताला ९ बाद १६१ धावांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर मोहम्मद सिराज (३ बळी), अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने २९ धावांनी विजय मिळवला. वानखेडेच्या खेळपट्टीवर भारताच्या फलंदाजीतील त्रुटी समोर आल्या होत्या. नामिबियाचा संघ अनपेक्षित धक्का देण्यासाठी ओळखला जातो, त्यामुळे भारतीय संघ आपली 'बॅटिंग ऑर्डर' अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नात असेल. दिल्लीची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते, त्यामुळे येथे मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे. तसेच भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून आपले 'सुपर ८' मधील स्थान अधिक भक्कम करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.अभिषेक शर्मा सामन्याला मुकणार?दरम्यान भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याला पोटाच्या तीव्र संसर्गामुळे दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आजारपणामुळे गुरुवारी होणाऱ्या नामिबीयाविरुद्धच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता धूसर आहे. अभिषेक शर्माला मंगळवारी रात्री प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात हलवण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यावेळीही त्याला ताप होता, मात्र तरीही तो मैदानात उतरला होता. त्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणासाठीही मैदानात येऊ शकला नव्हता. सध्या त्याची प्रकृती स्थिर असली तरी डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी अभिषेक पूर्णपणे तंदुरुस्त व्हावा, यासाठी संघ व्यवस्थापन त्याला नामिबीयाविरुद्ध विश्रांती देण्याच्या विचारात आहे.भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदरनामिबिया : गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), झेन ग्रीन, बर्नार्ड स्कोल्ट्झ, रुबेन ट्रम्पेलमन, जेजे स्मित, जॅन फ्रायलिंक, लॉरेन स्टीनकॅम्प, मालन क्रुगर, निकोल लॉफ्टी-ईटन, जॅक ब्रासेल, बेन शिकोंगो, जेसी बाल्ट, डिलन लीच्टर, डब्ल्यूपी मायबर्ग, मॅक्स हिंगो.नामिबियाविरुद्ध भारताचे ‘मिशन रन रेट’टी-२० विश्वचषक २०२६ मधील आपल्या दुसऱ्या लढतीसाठी भारतीय संघ सज्ज झाला असून आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारताचा सामना नामिबियाशी होणार आहे. पहिल्या सामन्यात अमेरिकेने दिलेल्या कडव्या झुंजीमुळे भारताने आता सावध पवित्रा घेतला असून, नामिबियाला ‘दुबळा’ समजण्याची चूक संघ करणार नाही. नेट रन रेट सुधारण्याचे मोठे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून भारत संघ आज मैदानात उतरेल.सलामीवीर अभिषेक शर्मा पोटाच्या विकारामुळे आजच्या सामन्याला मुकण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या सामन्यात ‘गोल्डन डक’वर बाद झाल्यामुळे त्याच्या फॉर्मवरही चर्चा होती. त्याच्या जागी अनुभवी संजू सॅमसनला संधी मिळण्याचे संकेत आहेत. जर संजू खेळला, तर तो इशान किशनसोबत डावाची सुरुवात करेल, ज्यामुळे भारताची सलामी अधिक भक्कम होईल. भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह आता पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याचे संघात पुनरागमन निश्चित मानले जात आहे. यामुळे अर्शदीप सिंग आणि बुमराह अशी जोडी नामिबियाच्या फलंदाजांवर तुटून पडेल. तसेच, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर संघात परतल्याने रिंकू सिंगला विश्रांती दिली जाऊ शकते. सुंदरच्या समावेशामुळे भारताला फलंदाजीसोबतच फिरकीचा एक अतिरिक्त आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे नामिबियाने आपला पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध गमावला असला, तरी भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध चांगली कामगिरी करून आत्मविश्वास मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, भारताला केवळ विजयच नको, तर तो मोठ्या फरकाने विजय मिळवून आपला नेट रन रेट उंचावायचा आहे, जेणेकरून ‘सुपर-८’चा रस्ता सोपा होईल. मात्र कर्णधार सूर्यकुमार यादव याही सामन्यात झंझावती खेळी कायम राहतो का ते पाहण्यासारखे असेल. फलंदाजित कर्णधार सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ईशांत किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अशी मजबूत फलंदाजी भारताकडे आहे. गोलंदाजीत अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर असे चांगले गोलंदाज भारताकडे आहेत. नामिबिया हा नवखा संघ असून त्याच्याकडे गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), झेन ग्रीन, बर्नार्ड स्कोल्ट्झ, रुबेन ट्रम्पेलमन, जेजे स्मित, जॅन फ्रायलिंक, लॉरेन स्टीनकॅम्प, मालन क्रुगर, निकोल लॉफ्टी-ईटन, जॅक ब्रासेल असे खेळाडू आहेत. भारतीय संघाला आजच्या सामन्यात विजय मिळवून नेट रनरेट वाढवावा लागेल.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 6:10 am

Ranjangaon Accident : पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कारच्या धडकेत तरुण डॉक्टरचा मृत्यू

Ranjangaon Accident : हॉटेल अमर इन जवळ दुभाजकातून वळताना पाठीमागून येणाऱ्या कारने दुचाकीला चिरडले; कार चालक विद्यानंद राऊत पोलिसांच्या ताब्यात.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 6:00 am

अग्रलेख : अविश्वास

लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली असल्याने आगामी कालावधीमध्ये या विषयावर चर्चा होणे अपेक्षित आहे

दैनिक प्रभात 12 Feb 2026 6:00 am

लक्षवेधी : बांगलादेशात लोकशाहीची कसोटी

12 फेब्रुवारी रोजी होणारी बांगलादेशची सार्वत्रिक निवडणूक ही केवळ सत्ताबदलाची प्रक्रिया नसून, ती देशाच्या राजकीय व्यवस्थेची दिशा, लोकशाहीचे भविष्य आणि सामाजिक स्थैर्य यांची कसोटी मानली जात आहे.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 5:30 am

Mulshi News : मुळशीत ‘घड्याळा’चा गजर! शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला; पौड-अंबडवेटमध्ये राष्ट्रवादीची मुसंडी

Mulshi News : भाजप, काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांची पाटी कोरीच; राष्ट्रवादी काँग्रेसने मुळशीत प्रस्थापित केले वर्चस्व.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 5:30 am

विशेष : युगद्रष्टा महर्षी दयानंद

वेदांचे खरे स्वरूप लोकांसमोर आणून अंधश्रद्धा आणि कर्मकांडावर प्रहार करणारे युगद्रष्टा समाजसुधारक म्हणजे दयानंद सरस्वती. एकेश्वरवादाचा पुरस्कार करणारे दयानंद यांची आज जयंती.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 5:00 am

Alandi News : भाविकांची सुरक्षा ‘रामभरोसे’? ५ कोटी मंजूर होऊनही सीसीटीव्ही कागदावरच; नगराध्यक्ष आक्रमक

Alandi News : मे २०२३ मध्ये मंजुरी मिळूनही आळंदीत सीसीटीव्हीचा पत्ता नाही; ५० लाखांच्या ड्रोन कॅमेऱ्यांचा खरेदीचा निर्णयही बासनात.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 5:00 am

Leopard Cubs : रांजणीत आढळली बिबट्याची तीन पिल्ले! ऊस तोडणी दरम्यान मजुरांची उडाली गाळण; वनविभाग सतर्क

Leopard Cubs : डोळे न उघडलेली पिल्ले सुखरूप; आईच्या स्वाधीन करण्यासाठी वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरे आणि शीघ्र कृती दलाची तैनाती.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 4:45 am

Jejuri News : ‘मल्हारसागर’बनतोय प्रदूषणाचा अड्डा; ५० गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात दुर्गंधीचा विळखा

Jejuri News : ७८८ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मल्हारसागर धरणात साचला कचरा; स्वच्छतागृहांच्या अभावामुळे जलाशयाकाठी प्रचंड दुर्गंधी.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 4:30 am

Bapu Pathare : “कामं करा नाहीतर कारवाईला सामोरे जा!”बापू पठारेंनी स्मशानभूमीतच अधिकाऱ्यांना झापलं; काय आहे नेमकं प्रकरण?

Bapu Pathare : स्मशानभूमीतील मातीचे ढिगारे आणि खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; आमदार बापू पठारे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना सुनावले.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 4:15 am

Mulshi Accident : लवळेफाटा येथे भीषण अपघात! भरधाव ट्रकचा पिरंगुट रस्त्यावर धुमाकूळ; रिक्षा, कारसह दुचाकीला चिरडले

Mulshi Accident : रिक्षा, हायरायडर कार आणि दुचाकीला एकापाठोपाठ धडक; लवळेफाटा चौकातील बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 4:00 am

Indapur Election Results : इंदापूर तालुक्याला ‘वजनदार’ खुर्चीची चाहूल! भरणे-पाटील एकत्र अन् राष्ट्रवादीचा ‘क्लीन स्वीप’

Indapur Election Results : दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या ऐतिहासिक एकजुटीमुळे पुणे जिल्हा परिषदेच्या सत्तेची चावी आता इंदापूरच्या हाती.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 3:30 am

Shirur News : खळबळजनक! एका मताची किंमत लाखात? निवडणुकीत ३०-३५ कोटी उडवले; जयश्री पलांडे यांचा गंभीर आरोप

Shirur News : अफाट खर्चामुळे निवडणूक स्तराबाहेर गेली; भाजप नेत्या पलांडे यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर भ्रष्टाचाराचा आरोप.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 3:00 am

Service Tax Online : पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्टीवासियांना मोठा दिलासा! आता ‘सेवाकर’भरा फक्त एका QR कोडवर..वाचा सविस्तर

Service Tax Online : सेवाकर बिलावर देण्यात आला विशेष QR कोड; महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन विभागाचा नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी पुढाकार.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 2:00 am

PCMC Crime : शाळकरी वयातच गुन्हेगारीची ‘चटक’! शिवीगाळ, अश्लील हावभाव आणि दहशत; वाचा धक्कादायक वास्तव

PCMC Crime : गुन्हे घडण्याची वाट न पाहता प्रतिबंधात्मक कारवाईची गरज; शाळा, पालक आणि पोलीस यांच्यात समन्वयाचा अभाव शहरासाठी धोक्याची घंटा.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 1:30 am

PCMC News : “इव्हेंटगिरी बंद करा, हे आपलं काम नाही!”आयुक्त श्रावण हर्डीकर कडाडले; महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट

PCMC News : महोत्सवांच्या नावाखाली इव्हेंट कंपन्यांचे खिसे भरले; आयुक्त हर्डीकर यांचा संताप, महापौर आणि पक्षनेत्यांच्या उपस्थितीत झाली बैठक.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 1:00 am

PCMC Smart City : फसलेला स्मार्ट सिटी प्रकल्प कायमचा गुंडाळला! संबंधित विभागाकडे प्रकल्प हस्तांतरित करण्याचे आदेश

PCMC Smart City : मार्च २०२६ अखेर स्मार्ट सिटी कंपनीचे अस्तित्व संपणार; 'आहे त्या स्थितीत' प्रकल्प संबंधित विभागांकडे हस्तांतरित करण्याचे आदेश.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 12:45 am

Police Transfer : कोल्हापूर परिक्षेत्रात बदल्यांचे सत्र! १५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे जिल्ह्यांतर्गत फेरबदल; वाचा

Police Transfer : विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बदल्यांवर शिक्कामोर्तब; पुणे, सांगली आणि साताऱ्याला मिळाले नवे अधिकारी.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 12:30 am

Satara Crime : शाळांच्या बाहेर नेमकं काय विकलं जातंय? रक्षक प्रतिष्ठानचा धक्कादायक खुलासा

Satara Crime : साताऱ्यातील शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात गांजा आणि एमडी गोळ्यांची राजरोस विक्री; रक्षक प्रतिष्ठानने दिला आंदोलनाचा इशारा.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 12:15 am

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६

पंचांगआज मिती माघ कृष्ण दशमी शके १९४७.चंद्र नक्षत्र ज्येष्ठा ०१.४३ पीएम पर्यंत नंतर मूळ.योग हर्षण चंद्र राशी वृश्चिक ०१.४३ पर्यंत नंतर धनु,भारतीय सौर २२ माघ शके १९४७.गुरुवार- दिनांक १२ फेब्रुवारी २०२६.मुंबईचा सूर्योदय ०७.०८, मुंबईचा सूर्यास्त ०६.३७ मुंबईचा चंद्रोदय ०३.५५ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०६.३७, राहू काळ ०२.१८ ते ०३.४४.१४ नंतर चांगलादैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 12:10 am

ENG vs WI : वानखेडेवर कॅरेबियन वादळ! रुदरफोर्डचा तडाखा अन् फिरकीपटूंची जादू; वेस्ट इंडिजने इंग्लंडला ‘चारी मुंड्या’केलं चित

ENG vs WI : टी-२० विश्वचषक २०२६ च्या हाय-व्होल्टेज सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडचा ३० धावांनी पराभव करत दिमाखदार विजय मिळवला.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 11:17 pm

'गिल्बर्ट हिल नियम उल्लंघन प्रकरणी अहवाल सादर करा'

मुंबई : गिल्बर्ट हिल हा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व महत्त्वपूर्ण आहे. हा भाग हरित क्षेत्रात मोडत असून, येथे प्रकल्प विकसित करताना नियमांचे उल्लंघन झाल्याच्या अनुषंगाने संबंधित सर्व विभागांनी समन्वय साधून वस्तुस्थितीची माहिती घेऊन कार्यवाही करावी, अहवाल सादर करावा, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीस पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका, महसूल विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल परिसरात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर हा भाग हरित क्षेत्रात मोडत असून आवश्यक परवानग्या व नियमांची पूर्तता अनिवार्य आहे. या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बृहन्मुंबई महानगरपालिका , झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि संबंधित विभागांनी एकत्रित पाहणी करुन कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे, असे निर्देश त्यांनी दिले.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 11:10 pm

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायकमुंबई : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या घरच्या मैदानावर इंग्लंडचा ३० धावांनी पराभव करत दिमाखदार विजय नोंदवला. शेरफेन रदरफोर्डचे नाबाद अर्धशतक आणि गुडाकेश मोटीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विंडिजने १९६ धावांचे रक्षण करत इंग्लंडला १६६ धावांत गुंडाळले.प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. सलामीवीर शाई होप आणि ब्रँडन किंग स्वस्तात बाद झाल्याने विंडिजची २ बाद ८ अशी अवस्था बिकट झाली होती. मात्र, शेरफेन रदरफोर्डने ४२ चेंडूंत ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावांची झंझावाती खेळी केली. त्याला जेसन होल्डरने (३३ धावा, १७ चेंडू) मोलाची साथ दिल्याने वेस्ट इंडीजने २० षटकांत ६ बाद १९६ धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडकडून आदिल रशीद आणि जेमी ओव्हरटनने २-२ बळी घेतले.१९७ धावांच्या आव्हांनाचा पाठलाग करताना इंग्लंडचे फलंदाज एकामागून एक तंबूत परतले. फिल सॉल्टने (३०) आक्रमक सुरुवात केली खरी, पण वेस्ट इंडीजच्या फिरकीपटूंनी सामन्यावर पकड मिळवली. गुडाकेश मोटीने ३३ धावांत ३ महत्त्वाचे बळी घेत इंग्लंडच्या मधल्या फळीचा कणा मोडला. रोस्टन चेसने २ बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. इंग्लंडकडून सॅम करनने सर्वाधिक नाबाद ४३ धावा केल्या, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. १९ व्या षटकात १६६ धावांवर इंग्लंडचा संपूर्ण संघ बाद झाला.सामन्याची गुणतालिका:वेस्ट इंडीज: १९६/६ (२० षटके) - रदरफोर्ड ७६, रोस्टन चेस ३४; आदिल रशीद २/१६.इंग्लंड: १६६/१० (१९ षटके) - सॅम करन ४३, जेकब बेथेल ३३; गुडाकेश मोटी ३/३३, रोस्टन चेस २/२९.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 11:10 pm

Usman Tariq Bowling Action : पाकिस्तानी फिरकीपटूच्या ‘त्या’अ‍ॅक्शनवरून वाद! आर. अश्विनने टीकाकारांना झापलं; म्हणाला, फक्त गोलंदाजांवरच निर्बंध का?

Usman Tariq Bowling Action : भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन मात्र पाकिस्तानच्या या खेळाडूच्या समर्थनार्थ धावून आला आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 10:42 pm

Pune News : पुण्यात प्रशासनाचा जीवघेणा हलगर्जीपणा! झाड तोडताना रस्त्यात बांधलेल्या दोरीमुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी

Pune News : पुण्यातील कोथरूड परिसरात झाड तोडणीचे काम सुरू असताना कंत्राटी कामगारांच्या निष्काळजीपणामुळे एका दुचाकीस्वाराच्या गळ्याला दोरी अडकून भीषण अपघात झाला.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 10:34 pm

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापौरांची निवड पाहण्यासाठी प्रथमच बसले सभागृहाच्या गॅलरीत

मुंबई विशेष प्रतिनिधी :मुंबई महापालिका सभागृहाच्या गॅलरीत मी पहिल्यांदाच बसलो आहे. अशा प्रकारे मी पहिल्यांदाच सभागृहाचे कामकाज पाहिले आहे. अशा ऐतिहासिक व वारसा असलेल्या वास्तूमध्ये महत्त्वाच्या सोहळ्याचे साक्षीदार होणे हे महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या निवडीनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रितू तावडे व उप महापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड झाली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,महापौर, उपमहापौर व सर्व पदाधिकारी या महापालिकेला दिशा देतील व सामान्य मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करतील. त्यांना पूर्ण ताकद देण्याचे काम आम्ही करू. त्यांच्या माध्यमातून नवीन मुंबई घडविण्याच्या कामाला गती देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.रितू तावडे यांच्याकडे एक अनुभवी व अस्सल मराठी चेहरा म्हणून पाहिले जाते. त्यांनी यापूर्वीही मुंबईकरांच्या प्रश्नांकरिता आक्रमक भूमिका घेतली आहे. यापुढेही त्यांच्या माध्यमातून महायुती सरकारने सुरू केलेला मुंबईच्या विकासाचा कार्यक्रम महापालिकेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने राबविला जाईल. तसेच उपमहापौर संजय घाडी यांच्या अनुभवाचा फायदा महापालिकेला मिळेल. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचे प्रशासन महापालिकेच्या माध्यमातून चालविले जाईल,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.मागील साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालनामुंबईला अतिशय कार्यक्षम महापौर व उपमहापौर मिळाले आहेत. गेल्या साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना दिली. त्या कामाची पोचपावती मुंबईकरांनी दिली. विकासाला प्राधान्य व विकासाला मुंबईकरांनी स्वीकारले असल्याचा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. मुंबई जागतिक दर्जाचे शहर करण्याची भूमिका आहे. मुंबई शहरासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करण्याचे काम आम्ही करू. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सरकार करणार आहे. त्यांचे झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. मुंबई खड्डेमुक्त रस्ते, प्रदूषणमुक्त करण्याची आमची भूमिका आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईला फिनटेक कॅपिटल करण्याचे स्वप्न पाहिले आहे, ते पूर्ण करण्याचे काम शासन करेल, असेही त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.महापालिका सभागृहात प्रथमच उपस्थित राहिले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीमहापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात महापालिका सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहिले होते. सभागृहातील प्रेक्षा गॅलरीमध्ये बसून भाजपचे ४४ वर्षांनंतरचे स्वप्न साकार होताना पाहिले. प्रेक्षा गॅलरीमध्ये भाजपच्या महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर निवडीची प्रक्रिया याचि देही याचि डोळा पाहिली. अशाप्रकारे महापौर निवडीच्यावेळी महापालिका सभागृहात उपस्थित राहणारे पहिले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असून प्रेक्षा गॅलरीमध्ये बसूनही ही निवड प्रक्रिया न्याहाळणारेही पहिले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ठरले

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 10:30 pm

मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करणार

उपमहापौर संजय घाडी यांची घोषणामुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई शहरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्यास प्लास्टिकचा बेसुमार वापर कारणीभूत आहे . पर्यावरणाची हानी करण्यात प्रमुख घटक ठरलेल्या प्लास्टिकवर राज्य सरकारने मागील मार्च २०१८ पासून बंदी लागू केली. मुंबईतील बहुतांश भागात प्लास्टिकबंदी परिणामकारक ठरली आहे. मात्र ही बंदी १०० टक्के अंमलात आली नसल्याने ठिकठिकाणी जाणवते. छुप्या पध्दतीने काही प्रमाणात प्लास्टिकचा वापर अजूनही सुरुच आहे. प्लास्टिक बंदीची परिणामकारकता वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्यातील त्रुटी शोधून दंडात्मक कारवाईची तीव्रता वाढविण्याची गरज असल्याचे सांगत नवनिर्वाचित उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलली जावीत असेही पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.मुंबई महापालिकेत उपमहापौर पदी निवड झाल्यानंतर संजय घाडी यांनी महापालिका सभागृहात भाषण करताना तसेच बृहन्मुंबई महानगर पालिका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित सत्कारानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी प्लास्टिक मुक्तीचा निर्धार व्यक्त केला.मुंबईतील करदात्या नागरीकांना सुरळीत पाणी पुरवठा करणे, मुंबईमध्ये स्वच्छता राखणे, मलनिःसारण व्यवस्था पाहणे, आरोग्य सेवा पुरविणे, रस्ते व वाहतूक ह्यांचे नियोजन करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, शैक्षणिक सुविधा देणे इत्यादी आवश्यक नागरी सुविधा सुरळीत मिळतील यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे मी नियमित पाठपुरावा करेन.,असे त्यांनी स्पष्ट केले.शाळांमधील मुलांची गळती थांबवणारशहराच्या नागरिकांना विविध नागरी सुविधा पुरवितांना वित्तव्यवस्थेवर ताण येणार नाही अशारितीने या विकास नियोजन आराखडयाची अंमलबजावणी सन २०३४ पर्यंत महापालिका प्रशासनाने काटेकोरपणे करावी. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने, शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ह्याकरिता महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याच्यादृष्टीने व पटसंख्येमध्ये वाढ होण्याच्यादृष्टीने प्रशासनाने नेटाने प्रयत्न केला जाईल,असेही स्पष्ट केले.भटक्या कुत्र्यांच्या उत्पत्तींवर मर्यादाशहरातील भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना होणारा उपद्रव टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करुन भटक्या कुत्र्यांसाठी मुंबई महानगरपालिकेने निवारा केंद्र उभारावीत. तसेच, भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून त्यांच्या वाढत्या उत्पत्तीवर मर्यादा आणण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात.,अशा सूचना करतानाच आपण यासाठी प्रयत्नशील असू असेही स्पष्ट केले.स्त्रीभ्रूण हत्येस बळी पडू नकामुलगी वाचवा, मुलगी शिकवा असा संदेश आपण सर्वत्र ऐकतो, पण तरीही समाजात स्त्रीभ्रुण हत्या है एक भीषण वास्तव आहे. गर्भजल चिकित्सा करुन जगामध्ये येऊ इच्छिणाऱ्या मुलींचा श्वास रोखू पाहणाऱ्या स्त्रीभ्रुण हत्या पूर्णपणे थांबविण्याची काळाची गरज आहे. आपल्या देशातील पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आजही कुटुंब, समाज घडवणारी स्त्रीच आहे. त्यामुळे तीचे अस्तित्व अबाधित ठेवण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे. ह्याकरिता गर्भजल चिकित्सा करुन स्त्रीभ्रूण हत्येस किंवा कोणत्याही अपप्रवृत्तीस बळी पडू नये असे असेही आवाहन त्यांनी केले.अवयव दानाचे महत्व रुजवाअवयवदान ही काळाची गरज आहे. जनजागृतीअभावी अवयवदात्यांचे प्रमाण अत्यल्प असून, अवयवदानामुळे जीवनदान मिळू शकते ही बाब जनमानसांमध्ये रुजविण्याची आवश्यकता आहे. तरी, महानगरपालिका प्रशासनाने आगामी वर्षात ही संकल्पना सर्वसामान्यांमध्ये रुजविण्यासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी. तसेच मुंबईतील दुरावस्थेतील व अपुऱ्या सोयी-सुविधा असलेल्या स्मशानभूमी / दफनभूमींची तातडीने दुरुस्ती करुन तेथे आवश्यक त्या सेवा-सुविधा पुरविण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.समुद्राचे पाणी खारे करण्याऐवजी धरण बांधाआज शहरातील फेरीवाल्यांबरोबरच पार्किंगकरिता मोठ्या प्रमाणावर जागा व्यापली जात आहे. स्वतंत्र पार्किंग झोन ही काळाची गरज आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. बेस्ट, मेट्रो, मोनो, रेल्वे लोकल अशा सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय एकमेकांशी जोडणे महत्वाचे ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याऐवजी मुंबई शहराला अधिक पाणीपुरवठा व्हावा ह्यासाठी प्रशासनाने नवीन धरणांची निर्मिती करून पाणीपुरवठ्याचे नियोजन कराये. तसेच, पाण्याची गळती आणि चोरी रोखण्याकरिता प्रशासनाने कठोर उपाययोजना करावी अशाप्रकारच्या सूचना केल्या आहेत.झाडे मारण्यांवर कारवाई करामुंबईतील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आज वृक्षसंवर्धनाची नितांत गरज आहे. शहरात अस्तित्वात असलेली झाडे व वृक्षांची निगा राखणे व त्यांचे यथोचित संवर्धन करणे गरजेचे झाले असून, त्यांची हानी टाळण्यासाठी व ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी महानगरपालिकेने स्वतः वृक्ष प्राधिकरण व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने विशेष योजना कार्यान्वित करावी व मुंबईत अधिकाधिक वृक्ष लागवड करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच काही ठिकाणी झाडे जाणीवपूर्वक मारण्याचे प्रकार घडत आहेत त्यांच्यावरही कडक कारवाई करावी अशीही विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे .

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 10:30 pm

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया विरोधात होणार आहे. हा सामना होण्याआधीच भारतीय संघ व्यवस्थापनाची चिंता वाढवणारी एक बातमी आली आहे. भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा याला तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे नामिबिया विरोधात अभिषेक खेळण्याची शक्यता धूसर झाली आहे.अभिषेक शर्मा ताप आला आहे आणि अशक्तपणा जाणवत आहे. अमेरिकेविरुद्धच्या सामन्याआधीपासूनच तो आजारी होता. पण त्यावेळी औषधं घेऊन खेळलेला अभिषेक आता तब्येत खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल झाला आहे. डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अभिषेकवर उपचार सुरू आहेत. तब्येतीला लगेच आराम पडावा यासाठी अभिषेकला सलाईनवर ठेवले आहे.आजारी असल्यामुळे डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्मा नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये संघाच्या सराव सत्राला गैरहजर होता. त्याचे पोट बिघडले आहे आणि औषधोपचार सुरू आहेत असे सुरुवातीला सांगितले जात होते. पण आता अभिषेकला रुग्णालयात दाखल केल्यामुळे तो नामिबिया विरोधात खेळण्याची शक्यता कमी झाली आहे.सध्या आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये ए ग्रुप अर्थात अ गटात पाकिस्तान पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत आणि त्यांच्याकडे चार गुण आहेत. भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना जिंकला आहे. यामुळे भारत दोन गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. नेदरलँडने त्यांचा दोन पैकी एक सामना जिंकला आहे. यामुळे ते तिसऱ्या स्थानावर आहेत. नामिबिया चौथ्या तर अमेरिका पाचव्या स्थानावर आहे.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 10:10 pm

मुलुंड स्टेशन परिसरातील एस व्ही पी मार्ग क्लिअर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुलुंड (पश्चिम) येथील सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरील ६१ अनधिकृत बांधकामे मुंबई महानगरपालिकेच्या ‘टी’ विभागाकडून बुधवारी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर सुमारे ११०० चौरस मीटर परिसर मोकळा झाला. यामुळे मुलुंडचा एस व्हि पी मार्ग क्लिअर झाला आहे.मुंबई महापालिका उपायुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे यांच्या देखरेखीत, सहायक आयुक्त (टी विभाग) योगिता कोल्हे यांच्या नेतृत्वात ‘टी’ प्रशासकीय विभाग अंतर्गत कार्यरत विविध विभागांकडून संयुक्तपणे ही कारवाई हाती घेण्यात आली होती. या मार्गावरील अनधिकृत बांधकामावरोधात महापालिकेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, तसेच लोकप्रतिनिधीही अनधिकृत बांधकामे हटवण्याबाबत आग्रही होते.या कारवाईत ०४ जेसीबी, ०७ डम्पर आणि अन्य मशीनची मदत घेण्यात आली. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे ७० अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता. दरम्यान, यापुढेही अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई सुरूच राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 10:10 pm

Earthquake News : महाराष्ट्रला मोठा हादरा; ‘या’८ गावांना भूकंपाचे जोरदार धक्के, परिसरात भीतीचं वातावरण

Earthquake News : नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात आज दुपारी ३.१५ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 10:02 pm

Ishan Kishan Injured : टीम इंडियाला मोठा धक्का! बुमराहच्या ‘यॉर्कर’वर स्टार खेळाडू जखमी; नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी वाढली चिंता

Ishan Kishan Injured : एकीकडे जसप्रीत बुमराह पुनरागमन करत असतानाच, सराव सत्रात सलामीवीर इशान किशन दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 10:00 pm

Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या अडचणींत वाढ ! ‘त्या’प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याविरोधात जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 9:54 pm

मोठी बातमी..! ‘या’आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवारांचं नाव; नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय

Ajit Pawar Cricket Stadium : कोल्हापूर जिल्ह्यातील विकासवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीने घेतला आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 9:48 pm

Jamkhed News : प्रशासनाचे दुर्लक्ष की ठेकेदाराची मनमानी? जामखेडमधील ‘ट्रॅफिक जॅम’मुळे नागरिक हैराण

Jamkhed News : जामखेड-सौताडा महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून अपूर्ण असल्याने जामखेड शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 9:34 pm

Bangladesh elections 2026: तख्तापलट, हिंसाचार आणि ‘क्रांती’नंतर बांगलादेशाचा नवा उदय? उद्या भवितव्य ठरणार!

Bangladesh elections 2026: उद्या, गुरुवारी १२ फेब्रुवारी रोजी बांगलादेशातील जनता नवीन सरकार निवडण्यासाठी मतदान करणार आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 9:34 pm

मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी; तब्बल ४४ वर्षांनी भाजपचे महापौरपदाचे स्वप्न झाले साकार

महापालिकेवर भाजपचा भगवा अखेर फडकलाचमुंबई :मुंबईच्या महापौरपदी अखेर भाजपचा महापौर विराजमान झाला. मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रतिस्पर्धी पक्षाकडून उमेदवारी अर्ज सादर न केल्याने निवडणुकीची औपचारिकता पार पडत पिठासीन अधिकारी डॉ भूषण गगराणी यांनी महापौरपदी भाजपच्या नगरसेविका रितू तावडे आणि उपमहापौर पदी संजय घाडी यांची निवड झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे तब्बल ४४ वर्षांनी भाजपचा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान होत खऱ्या अर्थाने महापालिकेवर भाजपचा भगवा डौलाने फडकला गेला. मुंबईचे ७८ वे महापौर म्हणून भाजपच्या रितू तावडे हे निवडले गेल्या असून मागील चार दशकांचे भाजपचे स्वप्न साकार झाले आहे.मुंबई महापालिका सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बुधवारी दुपारी पार पडली. या निवडणुकीत पिठासीन अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी कामकाज पाहिले. महापालिका सचिव यांनी प्रत्येक विभागाच्या संख्याबळानुसार जागा निश्चित केल्यानंतर सर्व प्रथम भाजपचे नगरसेवक हे पिठासीन अधिकाऱ्यांच्या उजव्या बाजुला जावून बसले, त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक आणि मनसे, एमआयएम, समाजवादी पक्षाचे नगरसवेक सभागृहात दाखल झाल्यानंतर उबाठाचेही नगरसेवक घोषणाबाजी देत सभागृहात दाखल झाले. त्यामुळे भाजप आणि उबाठाच्या नगरसेवकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात झाली. भाजपकडून मोदी.. मोदी... अशी घोषणा होत असतानाच उबाठाकडून ठाकरे... ठाकरे... अशाप्रकारच्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. या घोषणाबाजीतच दुपारी १२.०७ वाजता पिठाासीन अधिकारी डॉ भूषण गगराणी यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली. वंदे मातरमने सभागृहाला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात दाखल झाले.प्रतयक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात होतात उबाठा गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे पिठासीन अधिकारी म्हणून प्रधान सचिव दर्जाचा अधिकारी आणि डॉ भूषग गगराणी यांची नेमणूक करण्याचा अध्यादेश नगरविकास खात्याने जारी केल्याने या अध्यादेशाचा निषेध व्यक्त करत आजवरच्या प्रथा आणि परंपरेला छेद दिल्याचा आरोप केला. पण पिठासीन अधिकारी यांनी यावर उत्तर देत त्यांचा मुद्दा उडवून लावला. त्यानंतर पिठासीन अधिकारी यांनी निवडणुकीला सुरुवात करत, महापौर पदासाठी एकमेव अर्ज आल्याने रितू तावडे यांची निवड महापौर पदासाठी करत असल्याचे घोषित केले. त्यानंतर पिठासीन अधिकारी यांनी उपमहापौर पदासाठी एकमेव अर्ज आल्याने संजय घाडी यांची निवड उपमहापौर पदासाठी करत असल्याचे घोषित केले. या दोघांच्या निवडीनंतर सर्व सदस्यांनी बाके वाजवत त्यांचे स्वागत केले. तर भाजपच्या नगरसेवकांनी भारत माता की जय... वंदे मातरम... भारत माँ का एकही नारा, जय श्रीराम जय श्रीराम.. अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी पिठासीन अधिकारी आणि महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी पुष्पगुष्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्री,उपमुख्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहत दिल्या शुभेच्छायाचवेळी महापालिका सभागृहातील प्रेक्षागॅलरीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसून हा या निवडणुकीचा कार्यक्रम अनुभवला. त्यानंतर सभागृहामध्ये येत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी महापौरपदी निवड झाल्यामुळे रितू तावडे आणि उपमहापौरपदी निवड झाल्यामुळे संजय घाडी यांना पुष्पगुच्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या.सभागृहात उबाठाच्या नगरसेवकांनी महापौरांसह उपमहापौरांच्या भाषणाच्या प्रती फाडून फेकल्यामहापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड झाल्यानंतर महापौर आणि उपमहापौरांनी सभागृहात भाषण करत आगामी संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. या भाषणाच्या प्रती सभागृहात सदस्यांना वाटण्यात आल्या होत्या. परंतु काँग्रेसच्या गोंधळातही महापौरांनी आपले भाषण उरकून घेतले तर उपमहापौर संजय घाडी हे भाषणाला सुरुवात करताच उबाठाच्या नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर उबाठाने त्यांच्या भाषणांच्या प्रती फाडून सभागृहात फेकत सभात्याग केला. त्यामुळे पहिल्याच सभेत उबाठाच्या नगरसेवकांनी गैरवर्तन करत पुढील पाच वर्षांमधील रणनिती स्पष्ट केली.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 9:30 pm

पदपथ अतिक्रमण मुक्त, बांग्लादेशी फेरीवाल्यांना हटवणार - नवनियुक्त महापौरांचा निर्धार पक्का

मुंबई:मुंबईतील रोहिंग्या आणि बेकायदेशीर बांग्लादेशींना मुंबईतून हटवणे हेच आमचे महत्वाचे उद्दिष्ट असे. डिजिटल सिस्टीम आणि एआयचा वापर करून मुंबईत सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढवण्याकरता प्राधान्य दिले जाईल तसेच मुंबईमध्ये विविध ठिकाणी पदपथांवर अनिधकृतरित्या अतिक्रमण केलेल्या बांग्लादेशींचे जात प्रमाणपत्र व बोगस आधारकार्ड शोधून त्यावर त्वरीत कारवाई करून त्यांना पोलिसांच्य हवाली करण्यात येईल. त्यामुळे महापौर हे सभागृहात खुर्चीवर बसवणारे नसणार तर जनतेमध्ये सहभागी होवून महापौर म्हणून काम करणार असे नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी स्प्ष्ट केले. तसेच ही पदपथ अतिक्रमणमुक्तीच्या दिशेने पहिली बैठक महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्यावतीने संयुक्तपणे घेवून यावरील कारवाईला गती देणार असल्याचेही तावडे यांनी आपल्या भाषणासह पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड झाल्यानंतर त्यांनी सभागृहात भाषण केल्यानंतर प्रथेप्रमाणेच बृहन्मुंबई महानगरपालिका पत्रकार कक्षात येत आपला सत्कार स्वीकारला. याप्रसंगी माध्यमांशी बोलतांना महापौर रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महापौर हा मराठीच असेल असे जाहीर केले होते, त्यानुसार त्यांनी माझ्या रुपात मराठीच महापौर दिला आहे. सन २०१४च्या पूर्वीची मुंबई आणि आताची मुंबई आपण पाहतच आहोत. त्यामुळे स २०१४नंतर मुंबई गतिशील बनली असून पुढेही ती अधिक गतिशिल केली जाणार आहे. सभागृह हे निपक्षपातीपणे चालवले जाणार असून गोंधळ न घालता जर विरोधक कामकाजात भाग घेत असतील तर त्यांच्या चांगल्या सूचनाही विचार केला जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.मुंबईतील प्रदुषित वातावरणाबाबत सहकाऱ्यांशी चर्चा तसेच त्यांच्या सूचनांनुसार उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न केला जाईल. मी स्वत: संवेदनशील महापौर असून महिला म्हणून महिलांसाठीची कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. एवढेच नाहीतर महापौरांपर्यंत जनतेला जाण्याची गरज नसून हा महापौर जनतेपर्यंत जाणारा आहे,असेही स्पष्ट केले. मुंबईतील घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय हे एम्सच्या धर्तीवर करण्याचा प्रयत्न राहिल.मुंबईकरांवरील पाणी दरवाढ रोखणार, टँकर माफिया फ्रीदरवर्षी होणाऱ्या ८ टक्के पाणी दरवाढीला स्थगिती देवून पाण्याचा दर स्थिर ठेवण्याकरता मी प्रयत्न करेन तसेच मुंबईमध्ये टँकर माफियांचे वाढलेले प्रस्थ व त्यांची मक्तेदारी बंद करण्याकरता टँकर माफिया फ्री मुंबई हे धोरण राबवण्यात येईल. नवीन इमारतींप्रमाणे जुन्या इमारतींनाही रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरु करण्यासाठी नगरसेवक निधी किंवा विशेष अर्थसंकल्पीय तरतूद करून हे प्रकल्प राबवण्यात येतील.आरोग्याच्या प्रश्नाकडे महापौरांचा अधिक कलमहापालिका रुग्णालयांचा दर्जा एम्सच्या धर्तीव सुधारण्याकरता तसेच प्रत्येकी प्रशासकीय विभागात डायलिसीस सेंटर आणि केमोथेरेफी सेंटर उभारण्याचा तसेच ज्येष्ठ नागरिकांना माहपालिकेच्या रुग्णालयात वर्षातून एकदा पूर्ण शरीत तपासणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. याशिवाय ह्दयविकाराच्या रुग्णांसाठी समर्पित रुग्णालयांमध्ये अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी सवलतीच्या दरात उपलब्ध होईल असाही पूर्णपणे प्रयत्न केला जाईल.महापौरांनी केले व्हर्च्युअल क्लासरुमचे कौतूकमहापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रशासनाने उचलावित असे आवाहन करतच रितू तावडे यांनी महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासरुम योजना सुरु करण्यात आली आहे. ती अत्यंत प्रशासनीय आहे. ही योजना अधिकाधिक विस्तारीत करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल याकरता मी प्राधान्य देणार असल्याचे सांगत यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी राबवलेल्या योजनेचे कौतुक केले.महापौर निधी ५० हजारांपर्यंत वाढवणारमुंबई महापालिकेच्यावतीने महापौर निधी गरीब रुग्णांना उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीप्रमाणे महापौर निधी पाच हजार रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे महापौर निधीमध्ये अधिक वाढ केली जाणार असून यासाठी भविष्यात महापौरांना पुष्पगुच्छ तसेच शाल श्रीफळ न देता यासाठीचे पैसै महापौर निधीला उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून या महापौर निधीतून गरीब रुग्णांना अधिकाधिक वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिला जाईल असे त्यांनी स्पष्ट करत महापौर निधीला सढळ हस्ते मदत करावी असेही आवाहन नवनिर्वाचित महापौरांनी केली.महापौरांना दिल्या शुभेच्छामहापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, आमदार प्रविण दरेकर,माजी खासदार आणि शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे, आमदार संजय उपाध्याय, योगेश सागर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांच्यासह अनेकांनी महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय उपाध्याय यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 9:30 pm

Thailand : थायलंडच्या शाळेमध्ये बंदुकधाऱ्याचा थरार; गोळीबारात एक विद्यार्थी जखमी

शाळेमध्ये गोळीबार करणाऱ्या आणि शिक्षकांना ओलीस धरणाऱ्या एका बंदुकधाऱ्याला थायलंडमध्ये पकडण्यात आले आहे.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 9:23 pm

Rohit Pawar : मुख्य वैमानिकाच्या भूमिकेवर संशय; रोहित पवार यांच्याकडून चौकशीची मागणी

अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी मुख्य वैमानिक सुमित कपूर यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी बारामतीमधील विमान अपघाताबाबत सादरीकरण करत अनेक प्रश्न उपस्थित केले.

दैनिक प्रभात 11 Feb 2026 9:22 pm

द. आफ्रिकेचा डबल सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय, अफगाणिस्तानची झुंज अपयशी

अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी क्रिकेट इतिहासातील सर्वात नाट्यमय आणि चित्तथरारक सामना पाहायला मिळाला. टी-२० विश्वचषक २०२६ मधील या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा 'डबल सुपर ओव्हर'मध्ये पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी १८-१८ धावा केल्याने सामना पुन्हा टाय झाला. त्यानंतर दुसरी ओव्हर खेळवली गेली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मात्र अखेरच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना रहमानुल्ला गुरबाज झेलबाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात दोन वेळा सुपर ओव्हर खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरली. फॉर्मात असलेल्या एडन मार्करमनला (५) स्वस्तात माघारी पाठवल्यानंतर अफगाणिस्तानी आनंदात होती. पण, क्विंटन डी कॉक व रायन रिकेल्टनच्या ११२ धावांच्या भागीदारीने सामना आफ्रिकेच्या बाजूने फिरवला. राशिद खानने १३ व्या षटकात मॅच पुन्हा अफगाणिस्तानच्या बाजूने झुकवली. त्याने दोन्ही सेट फलंदाजांना एकाच षटकात बाद केले. क्विंटनने ४१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारासह ५९ धावांवर, तर रिकल्टन २८ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६१ धावांवर बाद झाला.डेव्हॉल्ड ब्रेव्हिस (२३), मार्को यान्सने (१६) व डेव्हिड मिलर (२०) यांच्या योगदानाच्या जोरावर आफ्रिका ६ बाद १८७धावांपर्यंत पोहोचले. अझमतुल्लाह ओमारझाईने ३, तर राशिदने दोन विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने ५२ धावांवर ३ विकेट्स गमावल्या. सलामीवीर रममनुल्लाह गुरबाझ मैदानावर उभा राहिला आणि त्याने ४२ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांसह ८४ धावांची दमदार खेळी केली. अझमतुल्लाह (२२) व राशिद (२०) यांनी चांगले योगदान दिले.शेवटच्या षटकात विजयासाठी १३ धावा हव्या असताना कागिसो रबाडाने नो बॉल व व्हाईड बॉल फेकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर नूर अहमदने षटकार खेचून सामना ४ चेंडूंत ५ धावा असा जवळ आणला. चौथ्या चेंडूवर नो बॉल पडला अन् दोन धावा मिळाल्या. २ चेंडू ३ धावा असा सामना जवळ आला. चौथ्या चेंडूवर दुसरी धाव घेताना फझलहक फारूकी रन आऊट झाला आणि १८७ धावांवर अफगाणिस्तान संघ सर्वबाद झाला.सुपर ओव्हर काय घडले?अझमतुल्ला ओमारझाईने पहिल्या दोन चेंडूवर ४ व ६ खेचला. पुढील दोन चेंडूंवर एकेक धाव आली. त्यानंतर चौकार व एक धाव घेताना अफगाणिस्तानने १७ धावा फलकावर चढवल्या. आफ्रिकेला ६ चेंडूंत १८ धावा करायच्या होत्या. डेव्हिड मिलर आणि डेव्हॉल्ड ब्रेव्हिस ही जोडी मैदानावर आली. मिलरने पहिला फुलटॉस चेंडू मिस केला आणि एक धाव मिळाली. ब्रेव्हिसने दुसरा चेंडू पुल शॉटवर सीमापार पाठवला. तिसऱ्या चेंडूवर फझलहक फारूकी स्लोव्हर बाऊन्सर फेकला अन् ब्रेव्हिस पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. तर आफ्रिकेला ३ चेंडूंत ११ धावा करायच्या होत्या. त्रिस्तान स्तब्सने चौकार खेचला, परंतु पुढचा चेंडू निर्धाव राहिला. १ चेंडू ७ धावा असा सामना आलेला असताना स्तब्सने षटकार खेचला आणि सामना दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला.दुसरी सुपर ओव्हरअझमतुल्लाह ओमारझाईचा पहिलाच चेंडू त्रिस्तान स्तब्सने षटकार खेचला, नंतर एक धाव काढून डेव्हिड मिलरला स्ट्राईक दिली. मिलरने तिसऱ्या चेंडूवर चतुराईने दोन धावा काढल्या. त्यानंतर मिलरने सलग दोन षटकार हाणले. शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत आफ्रिकने २४ धावांचे लक्ष्य ठेवले. मिरलने ४ चेंडूंत १६ धावा, तर स्तब्सने २ चेंडूंत ७ धावा केल्या. तर कर्णधार एडन मार्करमने चेंडू केशव महाराजच्या हाती दिला. हा मोठा जुगार होता, परंतु महाराजने दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद नबीला झेलबाद केले. त्याने पहिला चेंडू निर्धाव टाकला होता. ४ चेंडूं २४ धावा अफगाणिस्तानला हव्या होत्या. रहमनुल्लाह गुरबाजने सलग तीन चेंडू सीमापार पाठवून अफगाणिस्तानला सामन्यात ठेवले होते. महाराजने शेवटचा चेंडू व्हाईड टाकून आणखी एका सुपर ओव्हरची संधी निर्माण केली होती, परंतु सहाव्या चेंडूवर विकेट घेऊन अफगाणिस्तानने बाजी मारली.विश्वचषकातून अफगाणिस्तान बाहेर नाहीदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ऐतिहासिक 'डबल सुपर ओव्हर'मध्ये निसटता पराभव पत्करावा लागल्याने अफगाणिस्तानचा संघ सध्या गुणतालिकेत पिछाडीवर आहे. सलग दोन पराभवांमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले, तरी तांत्रिकदृष्ट्या अफगाणिस्तान अजूनही विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर पडलेला नाही. मात्र, त्यांचा 'सुपर ८' मधील प्रवेश आता 'दोरीवरची कसरत' ठरला आहे. अफगाणिस्तानला पुढील फेरीत मजल मारण्यासाठी आता स्वतःच्या कामगिरीसह इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. अफगाणिस्तानला यूएई आणि कॅनडा विरुद्धचे त्यांचे उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. दक्षिण आफ्रिका किंवा न्यूझीलंड यांपैकी एका संघाने त्यांचे उर्वरित दोन्ही सामने गमावणे आवश्यक आहे. अशा स्थितीत ४ गुणांवर बरोबरी होऊन 'नेट रन रेट'चा खेळ सुरू होईल. सध्या अफगाणिस्तानचा नेट रन रेट उणे (-१.१६२) आहे. तो सुधारण्यासाठी त्यांना आगामी सामन्यांत दणदणीत विजय मिळवावे लागतील. जर १४ फेब्रुवारीला होणारा न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द झाला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळाला, तर अफगाणिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. कारण अशा स्थितीत दोन्ही मोठे संघ ५ गुणांवर पोहोचतील, जिथे अफगाणिस्तान पोहोचू शकत नाही. सलग दोन पराभवानंतरही अफगाणिस्तानने ज्या प्रकारे आफ्रिकेला झुंजवले, ते पाहता हा संघ शेवटपर्यंत हार मानणार नाही हे स्पष्ट आहे. आम्ही हार मानलेली नाही, शेवटच्या सामन्यापर्यंत सर्वस्व पणाला लावू, असा विश्वास अफगाण संघातून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता १६ फेब्रुवारीला होणाऱ्या यूएई विरुद्धच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फीड फीडबर्नर 11 Feb 2026 9:10 pm