SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

25    C
... ...View News by News Source

Kharadi Accident : दुर्दैवी! पिकअपच्या चाकाखाली सापडून दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू; पोलिसांनी चालकाला घेतलं ताब्यात.

Kharadi Accident : सायंकाळच्या वेळी घरासमोर खेळत असताना घडली घटना; वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी केली घटनास्थळाची पाहणी.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 6:15 am

Pune Congress : सतेज पाटलांच्या उपस्थितीत काँग्रेसचा मोठा निर्णय! ‘या’नगरसेवकाची गटनेतेपदी एकमताने निवड

Pune Congress : सतेज पाटील आणि अरविंद शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक; सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा 'कदम' यांच्या नावासाठी एकमुखी पाठिंबा.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 6:00 am

अग्रलेख : आशावाद

संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 मध्ये जागतिक आव्हानांचा सामना करताना भारतीय अर्थव्यवस्थेला अधिक लवचिक आणि गतिशील बनवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. हा अहवाल अशा अनेक आव्हानांकडे निर्देश करतो ज्यासाठी भविष्यात अत्यंत सावधगिरीने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक ठरणार आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा नावलौकिक कायम असून चालू आर्थिक वर्षात […]

दैनिक प्रभात 31 Jan 2026 6:00 am

Ganesh Bidkar : महापौरपद हुकलं तरी ‘किंगमेकर’कायम; गणेश बिडकर यांची गटनेतेपदी पुन्हा निवड

Ganesh Bidkar : स्थायी समिती अध्यक्ष ते सभागृहनेता; अनुभवी गणेश बिडकर यांच्याकडे पुणे महापालिकेतील ११९ शिलेदारांची जबाबदारी.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 5:45 am

Pune ZP Election 2026 : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ३,६९३ EVM मशिन सज्ज; पाहा तुमच्या भागात किती मशिनवर होणार मतदान?

Pune ZP Election 2026 : जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांसाठी उमेदवारांची निश्चिती झाल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने मतदान यंत्र आणि कंट्रोल युनिटची संख्या अंतिम केली आहे.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 5:30 am

Pune Bar Association : पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीत ऐनवेळी मोठा बदल! मतदानाची तारीख बदलली; काय आहे नेमकं कारण?

Pune Bar Association : महिला आरक्षणासह यंदाची निवडणूक ऐतिहासिक; कार्यकारिणी सदस्यांची बिनविरोध निवड, पण मुख्य पदांसाठी चुरस वाढली.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 5:15 am

Ajit Pawar : शब्दाचा पक्का अन् कामात वाघ’असलेला नेता गेला; अजितदादांच्या शोकसभेत राजगडवासियांचे अश्रू अनावर

Ajit Pawar : कोंढवळे येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात सर्वपक्षीय शोकसभा; राष्ट्रगीताने सुरुवात करत दादांच्या 'शिस्तीला' दिला अखेरचा सलाम.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 4:30 am

Ranjangaon Crime : दोन गटातील भांडण सोडवायला गेला अन् जीवावर बेतलं; १८ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार

Ranjangaon Crime : तरुणाच्या हाताच्या महत्त्वाच्या नसा तुटल्या, अंगठ्याचे हाडही मोडले; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 4:15 am

Praful Patel : प्रफुल पटेलांचा वळसे पाटलांना तातडीचा फोन; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणावर होणार चर्चा?

Praful Patel : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत मुंबईत महत्त्वाची बैठक; वळसे पाटलांकडून आंबेगावचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 4:00 am

Agriculture News : आंबा मोहरावर निसर्गाचा घाला! हिरडस मावळात आंब्याचं पीक धोक्यात; शेतकरी हवालदिल

Agriculture News : गेल्या १५ दिवसांपासून बदललेल्या हवामानाचा आंबा पिकाला मोठा फटका; महागड्या औषधांची फवारणी करूनही मोहोर वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 3:30 am

Pune ZP Election 2026 : झेडपीच्या निवडणुकांचे गणित बदलणार; अजित पवार यांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट? वाचा सविस्तर

Pune ZP Election 2026 : अजितदादांच्या निधनामुळे पूर्व हवेलीत भावनिक वातावरण; मतदारांची सहानुभूती राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पथ्यावर पडणार?

दैनिक प्रभात 31 Jan 2026 3:15 am

Agriculture News : आंब्याचा मोहर गळतोय? ‘या’खताची आणि औषधाची करा फवारणी; कृषी तज्ज्ञांनी सुचवल्या उपाययोजना

Agriculture News : आंबा फळे काढणीपूर्वी एक महिना आधी पाणी देणे बंद करा; कृषी विभागाकडून पाणी व्यवस्थापनाचे नवे वेळापत्रक जाहीर.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 3:00 am

Pune Crime : उरुळी कांचन हादरलं! ५५ लाखांच्या मुद्दलावर ६० लाखांचं व्याज, तरीही बंदुकीच्या धाकावर बळकावली जमीन

Pune Crime : हडपसर आणि उरुळी कांचनमधील सावकारांची दहशत; १० टक्के व्याजासाठी व्यावसायिकाचे १२ जुन्या चारचाकी गाड्यांसह ३ गुंठे जमीन बळकावली.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 2:45 am

PCMC Mayor Election : महापौर निवडीच्या घडामोडीला वेग! स्थायी समितीच्या जागांचं गणित ठरलं; ‘या’पक्षाला बसणार मोठा फटका

PCMC Mayor Election : विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणीसाठी पक्षांची धाव; सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्याच्या नावांची उत्सुकता शिगेला.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 2:15 am

Lawrence Bishnoi Gang : ५ कोटी द्या, नाहीतर ‘बाबा सिद्दीकी’करू; पिंपरीच्या ‘गोल्डमॅन’ला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी?

Lawrence Bishnoi Gang : सनी नाना वाघचौरे यांना ५ कोटींची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी; बिश्नोई गँगच्या नावाने आंतरराष्ट्रीय कॉल आल्याचा दावा.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 1:45 am

PMPML Bus Vs Rickshaw : पिंपरी-चिंचवडमध्ये अजब प्रकार! रिक्षाचालकाने PMPML बसची ‘चावी ‘काढली अन् पसार झाला

PMPML Bus Vs Rickshaw : निगडीच्या यमुना नगरमध्ये बस आणि रिक्षामध्ये जोरदार वादावादी; नुकसानभरपाईसाठी रिक्षाचालकाचा 'अजब' पवित्रा.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 1:30 am

Pavana River Road : चिंचवडकरांना मोठा दिलासा! पवना नदीकाठच्या १८ मीटर रस्त्याचा अडथळा अखेर दूर

Pavana River Road : बाजारभावापेक्षा कमी मोबदला असूनही लोकहितासाठी जमीन देण्याचा गावडे कुटुंबाचा निर्णय; टीडीआरच्या माध्यमातून होणार तडजोड.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 1:15 am

Maval News : मावळात पहिल्यांदाच असा प्रचार! ना घोषणा, ना रॅली; अजितदादांच्या निधनानंतर निवडणुकीचं चित्रच पालटलं

Maval News : राजकीय पक्षांनी पाळला संयम: झेंडे खाली, लाऊडस्पीकर बंद; शांततेत सुरू असलेल्या प्रचाराने मावळवासीयांचे लक्ष वेधले.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 1:00 am

Satara Municipal Budget : ९ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडणार ‘असं’काही; सातारा पालिकेच्या बजेटबाबत मोठी अपडेट

Satara Municipal Budget : खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या चर्चेनंतरच सभापतींची नावे होणार फायनल; इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 12:45 am

Ajit Pawar : अजितदादांच्या निधनाने राजकारणात मोठी पोकळी; खटावमध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली

Ajit Pawar : शिस्तबद्ध आणि स्पष्टवक्ता नेता हरपला; खटावच्या विकासकामातील अजितदादांचे योगदान आठवून कार्यकर्त्यांना अश्रू अनावर.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 12:30 am

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार,३१ जानेवारी २०२६.

पंचांगआज मिती माघ शुद्ध त्रयोदशी ०८.२८ पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग विषकंभ चंद्र राशी मिथुन ०८.०२ नंतर कर्क. भारतीय सौर११ माघ शके १९४७. शनिवार दिनांक ३१ जानेवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.१३ मुंबईचा चंद्रोदय ०४.५७ , मुंबईचा सूर्यास्त ०६.३० मुंबईचा चंद्रास्त ०६.४१ उद्याची राहू काळ १०.०२ ते ११.२७.क्षय तिथीदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : आजचा दिवस आपल्याला अनेक दृष्टीने अनुकूल ठरेल.वृषभ : आरोग्य चांगले राहून आर्थिक लाभ संभवतो.मिथुन : परिवारातून आनंददायक वार्ता मिळतील.कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल.सिंह : रोजची दैनंदिन कामे सुरळीत होतील.कन्या : कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.तूळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील.वृश्चिक : कार्यात गतिशीलता असेल.धनू : कार्यात गतिशीलता असेल.मकर : जुन्या आठवणीत रमून जाल.कुंभ : खर्चावर नियंत्रण आवश्यक.मीन : प्रिय जनांचा सहवास लाभेल.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 12:10 am

मराठी शाळांबाबतच्या धोरणाविषयी काय म्हणाली मुंबई महापालिका ?

मराठी शाळांबाबत चुकीची माहिती; महापालिका प्रशासनाने मराठी अभ्यास केंद्राच्या शिष्टमंडळासमोर मांडली भूमिकामुंबई (विशेष प्रतिनिधी) :बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मराठी अभ्यास केंद्राच्या शिष्टमंडळाशी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेची भूमिका शिष्टमंडळासमोर मांडण्यात आली. शिष्टमंडळाने सादर केलेल्या मुद्देनिहाय तसेच ऐनवेळी चर्चेला गेलेल्या विषयांवर सविस्तर आणि सांगोपांग अशी चर्चा केली गेली. दरम्यान,मुंबई महानगरपालिका मराठी शाळांबाबत चुकीचे धोरण राबवित असल्याचे जे आभासी चित्र निर्माण केले जात आहे, ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.मुंबईतील मराठी माध्यमांच्या शाळांच्या मुद्द्यांवर मुंबई महानगरपालिका प्रशासन संवेदनशील आहे.मुंबईतील मराठीसह इतरही माध्यमांच्या शाळा आणि विद्यार्थी संख्या वाढावी, शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी महानगरपालिका प्रशासन साततत्याने विविध उपक्रम, योजना राबवित असते. महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत असते. एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये हेच आमचं ध्येय आहे. यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून पालकांचेही समुपदेशन करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मार्च २०२५ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत महानगरपालिकेच्या मराठी शाळांचा ९५ टक्के इतका निकाल लागला. महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीत ९७ टक्के इतके गुण पटकावले आहेत. यासोबतच गुणवत्ता वाढ, सराव परीक्षा असे उपक्रम राबविण्यात येतात. महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही स्वरूपाचे फी घेतली जात नाही. विद्यार्थ्यांना २७ प्रकारच्या शैक्षणिक वस्तूंचे मोफत वाटप केले जाते. महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांमध्ये शालेय गुणवत्तेसोबत क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविण्यासाठी उपलब्ध जागेमध्ये क्रीडाची प्रशिक्षण दिले जाते.खान अकॅडमीच्या माध्यमातून गणित व विज्ञान विषयाचा अतिरिक्त सराव विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क उपलब्ध करुन दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीत उत्तम परिणाम दिसून येत आहे. महानगरपालिका विद्यार्थी खासगी शाळेपेक्षाही अधिक गुणसंपन्न आणि त्याच्याकडे विविध शैक्षणिक सुविधा असाव्यात, यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत असते. महानगरपालिकेने फाऊंडेशनल लिटरसी व न्यूमरसी (एफएलएन) निपूण भारत अंतर्गत महानगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळे तिसऱ्या इयत्तेतील प्रत्येक माध्यमाचा विद्यार्थी उत्तमप्रकारे वाचू शकतो. तसेच, त्या-त्या स्तरावरील गणिताचे ज्ञानही त्याला उत्तमरित्या अवगत होत आहे. यासाठी महानगरपालिकेने विशेष प्रयत्न केले असून याच चांगले परिणाम दिसून येत आहे.मुंबईतील मराठी शाळा आणि शिक्षण हा सामजिक आणि शैक्षणिक मुद्दा आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून कोणत्याही माध्यमांच्या शाळांचे खासगीकरण करण्यात आलेले नाही.मुंबई महानगरपालिकेच्यावतीने संचालित मराठी माध्यमांच्या सर्व शाळा प्रभावीपणे चालविण्यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्वीपासूनच गांभीर्याने नियोजन व कार्यवाही करीत आहे. महानगरपालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होऊ नये, किंबहुना ही संख्या वाढावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मागील १० ते १५ वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. एवढेच नव्हे तर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अभिनव उपक्रमही राबवले जात असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने मराठी अभ्यास केंद्राच्या शिष्टमंडळाला बैठकीत दिली.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 11:10 pm

USA Squad Announce : अमेरिकेच्या संघात ‘मुंबईकर’खेळाडूची एन्ट्री! ७ फेब्रुवारीला भारताशी भिडणार; पाहा अमेरिकेचा १५ सदस्यीय संघ

USA Squad Announce : या संघात मुंबईकडून घरगुती क्रिकेट खेळलेल्या शुभम रांजणेला संधी देऊन अमेरिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 11:06 pm

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना; उद्या सायंकाळी उपमुख्यमंत्री शपथविधीची शक्यता

Sunetra Pawar : जित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 10:52 pm

India -Chile trade agreement : भारत आणि चिलीमध्ये लवकरच मोठा व्यापार करार! मिळणार दुर्मिळ खनिजांचा खजिना

India -Chile trade agreement : भारत आणि चिलीदरम्यान मुक्त व्यापार कराराची बोलणी लवकरच संपणार आहेत.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 10:35 pm

Mohammad Shayan Injury : भारत-पाक सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! स्टार खेळाडू नाकाला दुखापत झाल्याने वर्ल्ड कपमधून बाहेर

Mohammad Shayan Injury : पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शायान हा दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 10:35 pm

RSS च्या शताब्दीनिमित्त ‘शतक : संघाचे 100 वर्ष’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेच्या शंभर वर्षांच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या ‘शतक : संघाचे १०० वर्ष’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. संघाची शंभर वर्षांची वाटचाल, त्यांची विचारधारा आणि सामाजिक योगदान असलेला हा चित्रपट आहे.२०२५ मध्ये RSS ने आपल्या स्थापनेची शताब्दी पूर्ण केली. या ऐतिहासिक टप्प्याच्या पार्श्वभूमीवर ‘शतक’ हा चित्रपट साकारण्यात आला आहे. देशाच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर खोलवर प्रभाव टाकणाऱ्या संघाच्या दीर्घ प्रवासाची कथा हा चित्रपट मांडत आहे. अलीकडेच दिल्लीतील RSSच्या केशव कुंज कार्यालयात या चित्रपटातील ‘भगवा है अपनी पहचान’ या गीताचे लोकार्पण सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. हे गीत प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह यांनी गायले आहे. देशभक्तीने ओतप्रोत भरलेले हे गीत चित्रपटाची भावना आणि मूलभूत विचार प्रभावीपणे व्यक्त करते.https://www.youtube.com/watch?v=AWn1uw0gSoAटीझरमधून पहायला मिळते की, हा चित्रपट संघाबाबत अनेक वर्षांपासून असलेल्या गैरसमजांवर आणि भ्रमांवरही प्रकाश टाकतो. केवळ चर्चा किंवा वादांपुरते मर्यादित न राहता, इतिहास, विचारधारा आणि संघटनात्मक विकास योग्य संदर्भासह मांडणे हा चित्रपटाचा उद्देश आहे. स्वातंत्र्यलढ्यातील RSSचे योगदान, विविध काळात लादलेली बंदी आणि आणीबाणी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांची झलकही यात पाहायला मिळते.चित्रपटाचे दिग्दर्शक आशीष मल्ल म्हणाले, “हा चित्रपट माझ्यासाठी एका वैयक्तिक प्रवासासारखा आहे. संशोधनादरम्यान संघाशी संबंधित असे अनेक पैलू समोर आले, ज्यांवर सहसा चर्चा होत नाही. समाजात पसरलेल्या गैरसमजांना प्रामाणिकपणे समोर आणणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट होते.”चित्रपटाचे निर्माते वीर कपूर यांनी सांगितले, “हा चित्रपट पुस्तके, आणि उपलब्ध साहित्याच्या आधारे तयार करण्यात आला आहे. संघाच्या वैचारिक परंपरेला एकत्र गुंफून ती सिनेमाई भाषेत मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. १८७५ ते १९५० या काळात सुरू झालेल्या अनेक चळवळींपैकी संघ ही एकमेव संघटना आहे जी अखंडपणे पुढे जात राहिली. हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. ‘ना रुके, ना थके, ना झुके’ ही चित्रपटाची टॅगलाईन याच भावनेचे प्रतीक आहे.”या चित्रपटाचे सह-निर्माते आशीष तिवारी असून, तो ADA 360 डिग्री एलएलपी सादर करत आहे. अनिल डी. अग्रवाल यांच्या संकल्पनेवर आधारित आणि आशीष मॉल दिग्दर्शित हा चित्रपट 19 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 10:30 pm

Cosmos Bank: कॉसमॉस बँकेचा स्तुत्य उपक्रम; पहिल्यांदाच 4 अंध व्यक्तींची बँकेत नियुक्ती!

Cosmos Bank: अंध व्यक्तींना नियुक्तीची पत्रं बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रल्हाद कोकरे यांच्या हस्ते तसेच समारंभाचे प्रमुख पाहुणे सीए दिलीप सातभाई यांच्या उपस्थितीत देण्यात आली.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 10:29 pm

Pakistan : पाकमध्ये २४ तासात ५२ दहशतवादी मारले; सुरक्षा दलाची मोठी कारवाई

पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत तीन प्रांतांमध्ये केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत ५२ दहशतवाद्यांना ठार मारले.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 10:26 pm

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवर पुन्हा मोठी जबाबदारी?; अवघ्या 24 तासांत लॉटरी

Dhananjay Munde : अजित पवार यांच्या निधनानंतर धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात परतण्याची शक्यता आहे

दैनिक प्रभात 30 Jan 2026 10:21 pm

शीव उड्डाणपूल येत्या पावसाळ्यात होणार वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शीव (सायन) उड्डाणपुलाच्या कामांना अपेक्षित गती प्राप्त होत आहे. पादचा-यांना पूर्व - पश्चिम आवागमनासाठी पादचारी पूल कार्यान्वित करण्‍यात आला आहे. दोन भूयारी पादचारी मार्गांपैकी एक भूयारी पादचारी मार्ग पूर्ण झाला आहे. येत्‍या पंधरवड्यात तो कार्यान्वित करण्‍यात येईल. याच पद्धतीने महानगरपालिका आणि रेल्‍वे प्रशासनामार्फत केली जाणारी कामे अधिकाधिक समांतरपद्धतीने करावीत. प्रकल्‍पाच्‍या कालमर्यादेचे पालन करावे. यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रेल्वे प्रशासनासमवेत उच्‍च प्रतीचा समन्वय साधावा. कामाचे सुयोग्य व सुक्ष्‍म नियोजन करावे, अभियंत्यांनी दररोज कार्यस्थळी उपस्थित राहावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले आहेत. १५ जुलै २०२६ पर्यंत शीव उड्डाणपुलाची सर्व कामे पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असेही बांगर यांनी स्पष्‍ट केले.शीव पूर्व - पश्चिम भागांना जोडणा-या शीव (सायन) रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणी प्रकल्‍प स्‍थळाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी २९ जानेवारी २०२६ रोजी पाहणी केली. त्यावेळी बांगर यांनी हे निर्देश दिले. या पाहणी दौऱ्यात प्रकल्प कामाची सद्यस्थिती, उर्वरित कामाचे टप्पे आणि त्यांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (शहर) राजेश मुळ्ये तसेच मध्य रेल्वेचे उप मुख्य अभियंता (निर्माण) रोहित मेहला यांच्यासह संबंधित अभियंते उपस्थित होतेशीव पुलाचे रेल्वे हद्दीतील काम रेल्वे विभाग आणि पोहोच मार्ग , दोन पादचारी भुयारी मार्ग आदींचे काम बृहन्मुंबई महानगरपालिका करत आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. हा भुयारी पादचारी मार्ग कार्यान्वित झाल्‍यानंतर रेल्‍वे पुलाच्‍या पश्चिमेकडील पादचारी वाहतुकीची फेरआखणी करावी. पश्चिमेकडील अधिकाधिक भाग कामासाठी उपलब्‍ध व्‍हावा, असे नियोजन करावे. पश्चिमेकडील कामाचे ४ टप्‍पे असून या चारही टप्‍प्‍यांच्‍या पूर्णत्‍वाचे सूक्ष्‍म नियोजन करण्‍यात आले. तसेच, त्‍यांची कालमर्यादा निश्चित करण्‍यात आली. एकंदरीतच, पश्चिम बाजूची सर्व कामे ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील. रेल्‍वे प्रशासनाकडून ३१ मे २०२६ पर्यंत पूर्व बाजूचा पोहोच रस्‍त्‍याचा ताबा महानगरपालिकेला मिळणे अपेक्षित असल्‍याने उर्वरित कामे पूर्ण करण्‍यासाठी त्‍यानंतर आणखी काही कालावधी आवश्‍यक आहे. त्‍याचा विचार करता या पुलाची सर्व कामे १५ जुलै २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील व पूल वाहतुकीस खुला केला जाईल, असेही बांगर यांनी नमूद केले.धारावी बाजूकडील दुस-या भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. रेल्वे रूळावरील जुन्‍या पुलाच्‍या उत्‍तरेकडील भागाचे निष्‍कासन करण्‍यात आले आहे. आता दक्षिणेकडील भागाचे पाडकाम सुरू आहे. उत्तर दिशेच्या अर्ध्या बाजूवर तुळया स्थापित केल्यावर पूर्व बाजूचा अर्धा पोहोच रस्ता महानगरपालिकेच्या ताब्यात येईल. रेल्वे प्रशासनामार्फत शेवटची तुळई स्थापित करण्याची कार्यवाही ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल. तोपर्यंत महानगरपालिकेमार्फत पश्चिम बाजूची सर्व कामे केली जातील. मात्र, पूर्व बाजूची कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे ३० ते ४५ दिवसांचा कालावधी लागेल. म्हणजेच १५ जुलै २०२६ पूर्वी या उड्डाणपुलाची सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. अभियंते, अधिकारी यांनी दररोज कार्यस्थळी उपस्थित राहावे. उद्भवणाऱ्या अडीअडचणींचा त्याच वेळी, त्याच ठिकाणी निपटारा करावा, असे निर्देश बांगर यांनी यावेळी दिले.या संपूर्ण कार्यवाहीमध्ये ठरविलेल्या कालमर्यादेत तुळया कार्यस्थळी उपलब्ध होणे महत्वाचे आहे. एकंदरीत, मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने परस्पर समन्वय साधून प्रामाणिकपणे काम करावे, जेणेकरून नागरिकांची असुविधा लवकरात लवकर दूर होईल, असेही बांगर यांनी नमूद केले.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 10:10 pm

काय सांगता ? सोन्याचांदीच्या दरात झाली घसरण ?

मुंबई : मागील काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात वाढ होत आहे. पण आज म्हणजेच शुक्रवार ३० जानेवारी २०२६ रोजी सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे. घसरण झाली तरी सोन्याचांदीचे सध्याचे दर हे मध्यमवर्गीयांच्या खिशावर ताण निर्माण करणारे असेच आहे. यामुळे गुंतवणुकीसाठी सोन्याचांदीची खरेदी करायची असल्यास हाती मोठी रक्कम बाळगण्याशिवाय पर्याय नाही.ट्रम्पचे सतत बदलणारे धोरण, डॉलरच्या मूल्यात वेगाने होत असलेले बदल यामुळे मागील काही दिवसांत जगाचा सोन्याचांदीकडे असलेला ओढा वाढू लागला आहे. यामुळेच मुंबईत गुरुवार २९ जानेवारी २०२६ रोजी २४ कॅरेट शुद्ध असलेल्या एक तोळा अर्थात दहा ग्रॅम सोन्याचा दर हा एक लाख ७८ हजार ८५० रुपये होता. पण आज म्हणजेच शुक्रवार ३० जानेवारी २०२६ रोजी दरात घसरण झाली आणि २४ कॅरेट शुद्ध असलेल्या एक तोळा अर्थात दहा ग्रॅम सोन्याचा दर हा एक लाख ६९ हजार २०० रुपये झाला. सोन्याच्या दरात नऊ हजार ६५० रुपयांची घसरण झाली.सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठा चढउतार दिसून आला. मुंबईत गुरुवार २९ जानेवारी २०२६ रोजी एक किलो चांदीचा दर चार लाख दहा हजार रुपये होता. पण आज म्हणजेच शुक्रवार ३० जानेवारी २०२६ रोजी दरात घसरण झाली आणि एक किलो चांदीचा दर तीन लाख ९५ हजार रुपये झाला. चांदीच्या दरात पंधरा हजार रुपयांची घसरण झाली.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 10:10 pm

Novak DJokovic : मेलबर्नमध्ये अनुभवाचा विजय! ४ तासांच्या थरारात जोकोविच सिनरवर मात करत फायनलमध्ये दाखल

Novak DJokovic : टेनिस जगताचा सम्राट नोव्हाक जोकोविच याने यानिक सिनरचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 9:56 pm

Devendra Fadnavis : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली ‘ही’प्रतिक्रिया

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीत झालेल्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात(Devendra Fadnavis) मोठी उलथापालथ सुरू झाली आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 9:48 pm

Budget 2026: शेअर बाजारात येणार मोठी तेजी? गेल्या 15 वर्षांचा इतिहास देतोय ‘हे’संकेत!

Union Budget 2026: बजेटपूर्वी बाजार जरी घसरला असला, तरी बजेटनंतर शेअर बाजाराने नेहमीच जोरदार 'कमबॅक' केल्याचे दिसून आले आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 9:46 pm

Breaking news : वर्षा बंगल्‍यावर मोठी खलबते.! फडणवीस यांच्‍यासोबत ‘या’नेत्यांची रंगली चर्चा

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणांना वेग आला असून वर्षा बंगल्‍यावर खलबते सुरू आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 9:33 pm

Income Tax Slab: 20 लाखांचा पगार अन् टॅक्स ‘झिरो’! अर्थसंकल्पात ‘या’ 5 सवलती मिळाल्यास मध्यमवर्गीयांची चांदी

Income Tax Slab: तज्ज्ञांच्या मते, जर सरकारने 'न्यू टॅक्स रिजीम'मध्ये जुन्या व्यवस्थेतील काही निवडक वजावटींचा (Deductions) समावेश केला, तर वर्षाला २० लाख रुपये कमवणारा व्यक्तीही 'टॅक्स फ्री' होऊ शकतो.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 9:24 pm

Manipur Violence : मणिपूरमधील सरकार स्थापनेविषयी अदयाप अस्पष्टता; राष्ट्रपती राजवटीला पुढील महिन्यात वर्षपूर्ती

मणिपूरमधील (Manipur Violence) राष्ट्रपती राजवटीला पुढील महिन्यात एक वर्षाचा कालावधी पूर्ण होईल. मात्र, अद्याप त्या राज्यात पुन्हा सरकार स्थापन होण्याविषयी अस्पष्टता आहे. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये १३ फेब्रुवारी २०२५ यादिवशी राष्ट्रपती राजवट लागू झाली.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 9:15 pm

सुनेत्रा पवार शनिवारी सायंकाळी ५ वाजता घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ, सूत्रांची माहिती

मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली जाणार असल्याचे समजते. उद्या, शनिवारी सायंकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी होणार असून, त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.https://www.youtube.com/watch?v=VhSiYjD1NZ8राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या काही तासांपासून घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे वृत्त आहे. शनिवारी विधिमंडळ गटनेता निवडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार असल्याचे समजते. या बैठकीनंतर सायंकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी शुक्रवारी सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री या पदासाठी होकार दिल्याचे कळते.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 9:10 pm

तब्बल ४६ वर्षांनंतर भांडुप संकुला २००० दलशक्ष लिटर क्षमतेचा जलशुध्दीकरण प्रकल्प येत्या एप्रिल २०२९ पर्यंत होणार प्रकल्प पूर्ण

मुंबई : भांडुप संकुल येथे मुंबई महानगरपालिकेमार्फत २,००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. एप्रिल २०२९ पर्यंत जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगर व शहर विभागमध्ये पाणीपुरवठा करणाऱया भांडुप संकुलाची क्षमता वाढवण्यासाठी हा जलशुद्धीकरण प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्‍या जलशुद्धीकरण प्रकल्‍पाचे बांधकाम सुमारे ४६ वर्षांपूर्वी करण्‍यात आले आहे. त्यानंतर आता जलशुध्दीकरण प्रकल्प साकारला जात आहे.भांडुप संकुल येथे मुंबई महानगरपालिकेमार्फत २,००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. एप्रिल २०२९ पर्यंत जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी ३० जानेवारी २०२६ या जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यस्‍थळास भेट देऊन पाहणी केली. तसेच प्रगतिचा आढावा घेतला. उप आयुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) पुरूषोत्‍तम माळवदे, प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्‍प) महेंद्र उबाळे यांच्‍यासह संबंधित अभियंते, अधिकारी यावेळी उपस्थित होते.दररोज सुमारे २६०० दशलक्ष लीटर पाणी ...मुंबईला होणा-या पाणीपुरवठ्याच्‍या मुख्‍यत: दोन प्रणाली आहेत. त्‍यापैकी एका प्रणालीतून तानसा - वैतरणा प्रणालीद्वारे तानसा, मोडक सागर, मध्‍य वैतरणा आणि अप्‍पर वैतरणा या जलाशयांमधील पाणी जलवाहिन्‍यांच्‍या माध्‍यमातून गुरूत्‍वाकर्षणाद्वारे भांडुप संकुलात आणले जाते. भांडुप संकुलातील जुन्या व नवीन जलशुद्धीकरण केंद्रामध्‍ये या पाण्‍यावर शुद्धीकरण प्रक्रिया करण्‍यात येते. दररोज सुमारे २६०० दशलक्ष लीटर पाणी विविध ठिकाणी असलेल्‍या सेवा जलाशयांमार्फत मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्‍यात येते.आशियातील सर्वात मोठ्या विद्यमान प्रकल्पाला पुनर्स्थितभांडुप संकुलातील ७.४ हेक्‍टर जागेवरील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या विद्यमान प्रकल्पाला पुनर्स्थित करेल. ज्यामुळे मुंबईला अधिक क्षमतेने पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. पाण्याची वाढती गरज भागवणे आणि आयुर्मान संपलेल्‍या जुन्या प्रकल्पाची जागा घेणे, हे प्रमुख उद्दिष्‍ट आहे. सद्यस्थितीत माती परीक्षण, खोदकाम, प्रकल्‍पस्‍थळास बॅरिकेडींग, वीजवाहक तारांच्‍या मनो-यांचे स्‍थलांतरण, वृक्षारोपण आदी कामांना वेग मिळाला आहे. स्‍थापत्‍य कामांसह यांत्रिकी, विद्युत व उपकरणीय कामे ही समांतरपणे सुरू करण्‍यात आली आहेत. पावसाळ्यापूर्वी अधिकाधिक कामे करण्‍यावर भर देण्‍यात येत आहे.मुंबईकरांच्या पाण्याच्या मागणी व पुरवठ्यातील तफावतमुंबईकर नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वच्छ पाण्याची उपलब्धता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. स्वच्छ पाणीपुरवठा केवळ सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणापुरता मर्यादित नसून, तो आर्थिक विकास तसेच पर्यावरणीय स्थिरता यांना चालना देणारा आहे. मुंबई महानगराचा होणारा विकास, वाढती लोकसंख्या व नागरीकरणाचा विचार करता पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन, बळकटीकरण व दीर्घकालीन शाश्वत व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब व सक्षम पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करून, मुंबईकरांच्या पाण्याच्या मागणी व पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे, असेही गगराणी यांनी नमूद केले.जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणीच्या कामांना गतीभांडुप संकुल येथे उभारण्यात येत असलेल्या २,००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्णतेनंतर मुंबई महानगरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. मुंबईकर नागरिकांना अधिक दर्जेदार व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे . भविष्यातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक गरजा तसेच नागरीकरणामुळे वाढणारी पाण्याची मागणी लक्षात घेता हा जलशुद्धीकरण प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणीच्या कामांना गती देण्यात यावी. तसेच, प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कार्यक्षम, पर्यावरणपूरक व दीर्घकालीन शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात यावा, असेही निर्देश डॉ भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 9:10 pm

रेल्वे मार्गावर धुराचे लोट येताच उडाला गोंधळ, पसरले भीतीचे वातावरण; नेमका कसला होता 'तो'धूर जाणून घ्या

ठाणे : शुक्रवारी संध्याकाळी गर्दीच्या वेळी पसरलेल्या धुरामुळे नागरिकांची घाबरगुंडी उडाली होती. मध्य रेल्वेवर भीतीचे वातावरणही निर्माण झाले. मोठ्या प्रमाणात पसलेल्या धुरामुळे काही काळ समोरचे दिसेनासे झाले होते, त्यामुळे रेल्वे वाहतूक ही मंद गतीने सुरू होती.नेमकं घडलं काय?आज संध्याकाळी मध्य रेल्वेवर ऐन गर्दीच्या वेळी अचानक धुराचे लोट पसरले आणि नागरिकांची तारांबळ उडाली. लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले कि हा धूर नेमका आहे कसला? तर हा धूर होता एका नाल्यात साचलेल्या कचऱ्याचा.कायम गजबजाट असलेल्या ठिकाणी म्हणजेच कळवा आणि ठाणे या स्थानकांदरम्यान रुळावरील एका नाल्यातील कचऱ्याने पेट घेतला. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. काही वेळातच संपूर्ण परिसर धुराने भरून गेला.प्रवाशांची तारांबळसंध्याकाळची वेळ असल्याने ट्रेनला प्रचंड गर्दी होती, अश्या वेळी हा प्रकार घडल्याने प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. रुळावर पसरलेला धूर इतका दाट होता की समोरचे काहीच दिसेनासे झाले, आग लागली आहे का ? किंवा काही अपघात झाला आहे याची कोणतीच कल्पना प्रवाश्यांना नव्हती. त्यामुळे अनेकांनी लोकलमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला.घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत.तातडीने आग आटोक्यात आणली त्यामुळे कोणतीही भयंकर घटना टळली. आग भडकली असता प्रवाश्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता त्यामुळे आग कश्यामुळे लागली? याचा तपास रेल्वे प्रशासन करत आहे.लोकल गाड्या खोळंबल्याया आगीमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. कळव्याकडून ठाण्याकडे जाणाऱ्या आणि ठाण्याहून कल्याण- डोंबिवलीकडे जाणाऱ्या लोकल गाड्या सुमारे १५ ते २० मिनिटे उशिरा धावल्या. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला शिवाय मनस्तापही सहन करावा लागला

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 9:10 pm

Union Budget 2026: अर्थसंकल्पातून ट्रम्प टॅरिफला उत्तर? पायाभूत सुविधांवर खर्चाचा जोर, कर प्रणाली होणार सोपी

Union Budget 2026: 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवरील (Infrastructure) खर्चात वाढ आणि कर प्रणाली सुलभ करण्यावर सरकारचा मुख्य भर असेल, असे संकेत मिळत आहेत.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 9:08 pm

Nagthane ZP Election :अजिंक्यतारा कारखान्याचे चेअरमन मैदानात; भाजप संपर्क कार्यालयाचे उद्धाटन

Nagthane ZP Election : नागठाणे गटात भाजपची 'सुत्रबद्ध' रणनीती; संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधणार.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 8:31 pm

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अनधिकृतपणे जाहिरात फलक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात अनधिकृतपणे लोखंडी संरचना उभारुन जाहिरात फलक (होर्डिंग) लावल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ प्रशासकीय विभागाकडून याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली. तसेच, संबंधित लोखंडी संरचना आणि फलक हटवून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच अनधिकृत फलक लावल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात येत आहे.छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील प्रवेशद्वार क्रमांक-५ च्या दोन्ही बाजूस महानगरपालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे जाहिरात फलक (होर्डिंग) लावण्यात आले होते. सुमारे २० बाय २० फूट आकाराच्या या फलकासाठी दोन्ही ठिकाणी लोखंडी संरचना अर्थात स्टँड उभारण्यात आले होते. यासंदर्भात, ‘जी उत्तर’ प्रशासकीय विभागाकडून संबंधित जाहिरातदार अभिषेक चव्हाण यांना २९ जानेवारी २०२६ लेखी नोटीस बजावून अनधिकृत जाहिरात फलक आणि लोखंडी संरचना तत्काळ हटवण्याची सूचना देण्यात आली होती. तरीही , त्यांनी हा फलक आणि लोखंडी संरचना न हटवल्यामुळे त्यांच्याविरोधात ३० जानेवारी २०२६ रोजी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा, मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३ व ४ आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, सह कलम ३२८, ४७१ अन्वये ही कारवाई करण्यात आली. तसेच, ‘जी उत्तर’ प्रशासकीय विभागातील परवाना विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हटवण्याची कारवाई करत या फलक आणि लोखंडी संरचनेचे साहित्य जप्त केले.संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करणारजाहिरातदार तसेच संबंधितांनी सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे जाहिरात फलक (होर्डिंग) लावून विद्रुपीकरण करु नयेत. अन्यथा, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कोणतीही हयगय केली जाणार नाही. तसेच, अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात कारवाई नियमितपणे सुरूच राहील. - विनायक विसपुते सहायक आयुक्त (जी उत्तर)

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 8:10 pm

Paul Stirling World Record : पॉल स्टर्लिंगने मोडला रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! ‘हा’पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू

Paul Stirling World Record : आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एक नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे

दैनिक प्रभात 30 Jan 2026 8:06 pm

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार होणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री? जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर एक नवे पर्व सुरू होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री पदावर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे नाव प्रमुखपणे चर्चेत आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 7:52 pm

lifestyle News : महिलांनो कॉर्पोरेट लूकला द्या नवी ओळख.! ऑफिससाठी स्टायलिश आणि आरामदायी कुर्ती लूक

नीटस पोशाख केवळ दिसणं बदलत नाही, तर आत्मविश्वासही वाढवतो. विशेषतः ऑफिसमध्ये, आरामदायी आणि सुसंस्कृत लूक असणं अधिक महत्त्वाचं बनलं आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 7:51 pm

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्रिपदावर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया, होकार की नकार?

Sunetra Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी होकार दिला आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 7:49 pm

Todays TOP 10 News: उद्याच उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची शक्यता ते 2500 रुपयांत 25 वर्ष मोफत वीज.. वाचा टाॅप बातम्या

Todays TOP 10 News: भारतातील तरुणांमध्ये मानसिक विकारांचे प्रमाण चिंताजनक रित्या वाढत असून, एकूण रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण ३५ वर्षांखालील असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलेय.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 7:39 pm

मोठी बातमी..! ऐन निवडणुकीत बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पहा कोणाची कुठे बदली

Ias Transferred : राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर पाटणकर यांची अपर मुख्य सचिव (गृह) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 7:37 pm

चौपदरीकरणामुळे चर्चेत आलेल्या मीरा भाईंदर उड्डाणपुलाची वाहतूक पोलिसांनी केली पाहणी, सुचवले बदल

मीरा रोड : दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेमुळे मीवर भाईंदर येथे उभारण्यात आलेल्या तिसरा दुमजली उड्डाणपूल रचनेमुळे वादात अडकला होता.अखेर वाहतूक पोलिस आणि एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी या पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. चार मार्गिकेचा पूल पुढे थेट दोन मार्गिकेचा करण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडी तर होईलच शिवाय भीषण अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मीरा-भाईंदर परिसरात मेट्रो-९ चे खांब उभारल्यानंतर रस्त्यांची रुंदी कमी झाली असून, वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने परिसरात तीन दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी दोन पूल आधीच वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. तर जुना पेट्रोल पंप ते फाटक मार्गावरील आझाद मैदानदरम्यानचा सुमारे १८०० मीटर लांबीचा तिसरा पूल बांधकामाच्या अंतिम टप्प्यात आहे.मात्र, या पुलाची रचना चार मार्गिकांवरून अचानक दोन मार्गिकांमध्ये येत असल्याने सोशल मीडियावरून तीव्र टीका सुरू झाली. वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत, अपघातांची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी गुरुवारी पुलाची सखोल पाहणी केली. यावेळी एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.पाहणीनंतर वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुभाजकांची रचना, दिशादर्शक व सूचना फलक, वेग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना आणि मार्ग स्पष्ट दिसण्यासाठी चिन्हांकन यांचा त्यात समावेश आहे. या सूचनांची अंमलबजावणी केल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.एमएमआरडीएने पुलाच्या रचनेत कोणताही धोका नसल्याचा दावा केला असून, भविष्यात भाईंदर पूर्व-पश्चिम जोडणीसाठी विस्तार करण्याच्या दृष्टीने ही रचना करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, नागरिकांकडून होणाऱ्या टीकेनंतर आता अतिरिक्त सुरक्षात्मक उपायांवर भर दिला जात आहे.सर्व अंतर्गत कामे आणि वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या उपाययोजना पूर्ण झाल्यानंतर हा दुमजली उड्डाणपूल फेब्रुवारी अखेरीस वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 7:30 pm

Jacob Martin Arrest : माजी भारतीय क्रिकेटपटूला अटक! मध्यरात्री दारूच्या नशेत कार चालवून वाहनांना उडवलं

Jacob Martin Arrest : भारताचा माजी क्रिकेटपटू जेकब मार्टिनला मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवून अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुजरातच्या वडोदरा पोलिसांनी अटक केली आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 7:29 pm

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार - राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवड उद्या; तातडीने शपथविधी घेण्यास मुख्यमंत्र्यांचा होकार

मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली जाणार आहे. त्यासाठी उद्या, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत गटनेत्याची निवड केली जाणार आहे. एकमत झाल्यास सुनेत्रा पवार यांचा शपथविधी तातडीने पार पडण्याची शक्यता असून, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार दिल्याची माहिती आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षातील घडामोडींवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, अजित पवार ज्या पद्धतीने अचानक गेले, त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मात्र, ‘शो मस्ट गो ऑन’ या उक्तीनुसार पक्ष आणि सरकारचा कारभार सुरू ठेवण्यासाठी जबाबदारी कुणावर तरी सोपवणे आवश्यक आहे. अजित पवार यांच्याकडे असलेले विधिमंडळ पक्षनेतेपद रिक्त झाले असून, ते पद सुनेत्रा पवार यांच्याकडे द्यावे, अशी अनेक आमदारांची भावना आहे. या मागणीत काहीही गैर नाही, मात्र अंतिम निर्णय विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतच होईल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.भुजबळ यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्रीपद सध्या रिक्त असून ते पद सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून भरता येईल का, यावर पक्षाचे लक्ष केंद्रित आहे. आज होणाऱ्या बैठकीत जर सर्वांचे एकमत झाले, तर उद्या किंवा परवा शपथविधी होऊ शकतो. या बैठकीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ उपस्थित होते आणि विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यावर चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेटदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी गुरुवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत पक्षाकडून विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. शनिवारी दुपारी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून, त्यानंतर निवडीचे पत्र मुख्यमंत्र्यांकडे दिले जाणार आहे. राज्यपालांच्या कार्यक्रमानुसार शपथविधीचा वेळ निश्चित केला जाईल, असे समजते.निर्णय आमदारांशी चर्चा करूनच - प्रफुल्ल पटेल- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, आज केवळ प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली असून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. उपमुख्यमंत्रीपदावर कोणाची निवड करायची, याबाबत पक्षातील आमदारांशी चर्चा करून आणि सर्वांच्या भावना समजून घेतल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.- सुनेत्रा पवार यांच्या नावाबाबत कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसल्याचे पटेल यांनी नमूद केले. सध्या ही बाब अंतर्गत चर्चेपुरतीच मर्यादित असून जनभावना, आमदारांचे मत आणि पक्षाची भूमिका लक्षात घेऊनच योग्य निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या शोकाची परिस्थिती असून घरगुती धार्मिक विधी सुरू आहेत. हे विधी पूर्ण झाल्यानंतर रात्री किंवा उद्या सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.- अजित पवार हे अनुभवी नेते होते आणि राज्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते. त्यामुळे त्यांच्या खात्यांबाबत लवकर निर्णय होणे हे केवळ पक्षासाठीच नव्हे, तर राज्याच्या प्रशासनासाठीही महत्त्वाचे असल्याचे पटेल यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही स्पष्ट भूमिका ठरवली जावी, जेणेकरून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम राहणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.शोकातून सावरलो नाही, धार्मिक विधीनंतर निर्णय - सुनील तटकरेराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रदेश कार्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, अजित पवार यांच्या अकाली जाण्याच्या धक्क्यातून पक्षातील कोणीही अद्याप सावरलेले नाही. अजित पवार आजही आपल्यातच आहेत, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. अजित पवार यांच्या अनुपस्थितीत कार्यालयात येणेही क्लेशकारक होते. याच कार्यालयातून त्यांनी पक्षाचे संघटन उभे केले आणि त्यांच्या आठवणींना अभिवादन करण्यासाठी आपण येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सुनेत्रा पवार आणि कुटुंबीय धार्मिक विधींमध्ये सहभागी असून, हे विधी पूर्ण झाल्यानंतरच पुढील राजकीय चर्चा केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट प्राथमिक स्वरूपाची होती. धार्मिक विधी झाल्यानंतर सर्व नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या तसेच आमदारांच्या भावनांनुसार निर्णय घेतला जाईल. सध्या संपूर्ण राज्य शोकसागरात असून, त्या भावनिक वातावरणातच पक्ष निर्णयप्रक्रियेतून जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 7:10 pm

जारो इन्स्टिट्यूटची तिसऱ्या तिमाहीत दमदार आर्थिक कामगिरी

मुंबई :जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च लिमिटेडने आर्थिक वर्ष २६ च्‍या तिसऱ्या तिमाहीत समाप्‍त झालेल्‍या तिमाहीसाठी दमदार आर्थिक कामगिरीची नोंद केली, जेथे महसूलामध्‍ये मोठी वाढ, कार्यसंचालनामधून फायदा आणि खर्चाचे शिस्‍तबद्ध व्‍यवस्‍थापन याद्वारे वार्षिक उलाढालीमध्‍ये उत्तम वाढीची नोंद केली. सप्‍टेंबर २०२५ मध्‍ये इनिशिएल पब्लिक ऑफरिंग पूर्ण केल्‍यानंतर इन्स्टिट्यूटने या तिमाहीत दुसरे सर्वात उत्तम आर्थिक निकाल संपादित केले आहेत.कार्यसंचालनांमधून महसूल ६,०००.९६ लाख रूपये राहिला, ज्‍यामध्‍ये आर्थिक वर्ष २५ च्‍या तिसऱ्या तिमाहीमधील ४,३२९.१८ लाख रूपयांच्‍या तुलनेत वार्षिक ३८.६ टक्‍के वाढ झाली. इतर उत्‍पन्‍न गेल्‍या वर्षीच्‍या संबंधित तिमाहीमधील १९.५२ लाख रूपयांच्‍या तुलनेत १७९.५१ लाख रूपयांपर्यंत पोहोचले. परिणामत: एकूण उत्‍पन्‍न वार्षिक ४२.१२ टक्‍क्‍यांनी वाढून ६,१८०.४७ लाख रूपयांपर्यंत पोहोचले.या तिमाहीसाठी एकूण खर्च ५,२४६.९८ लाख रूपये होते, ज्‍यामध्‍ये वार्षिक ७.५३ टक्‍के वाढ झाली. उत्‍पन्‍नामध्‍ये झालेल्‍या ४२.१२ टक्‍के वाढीच्‍या तुलनेत ही वाढ मोठ्या प्रमाणात कमी आहे. कर्मचाऱ्यांसाठी खर्च १,९४६.९२ लाख रूपयांवर स्थिर राहिला, तर वाढलेल्‍या कार्यसंचालनानुसार इतर खर्चांमध्‍ये वाढ झाली.या तिमाहीदरम्‍यान कार्यसंचालन कामगिरी काहीशा प्रमाणात सुधारली. ईबीआयटीडीए आर्थिक वर्ष २५ च्‍या तिसऱ्या तिमाहीमधील १०२.१८ लाख रूपयांच्‍या नुकसानाच्‍या तुलनेत १,२२९.३६ लाख रूपये राहिले. ईबीआयटीडीए गेल्‍या वर्षीच्‍या याच तिमाहीच्‍या तुलनेत -२.३५ टक्‍क्‍यांवरून १९.८९ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले, ज्‍यामधून कार्यसंचालनामधून अधिक फायदा आणि ऑपरेशनल कार्यक्षमता दिसून येते.कंपनीच्‍या नफ्यामध्‍ये सर्व स्‍तरावर मोठी वाढ झाली. करपूर्व नफा (पीबीटी) आर्थिक वर्ष २५ च्‍या तिसऱ्या तिमाहीमधील ५३०.७६ लाख रूपये नुकसानाच्‍या तुलनेत ९३३.४९ लाख रूपये राहिला. इन्स्टिट्यूटने गेल्‍या वर्षीच्‍या याच तिमाहीमधील ३८८.८७ लाख रूपये नुकसानाच्‍या तुलनेत ७०३.०६ लाख रूपये करोत्तर नफ्याची (पीएटी) नोंद केली. पीएटी मार्जिन गेल्‍या वर्षीच्‍या -८.९४ टक्‍क्‍यांवरून ११.३८ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले.सप्‍टेंबरमध्‍ये जारो आयपीओ म्‍हणजेच आर्थिक वर्ष २६ च्‍या तिसऱ्या तिमाहीत उत्तम वार्षिक कामगिरीमधून कंपनीचा लाभदायी विकास, शिस्‍तबद्ध खर्च आणि भांडवल कार्यक्षमतेवरील भर दिसून येतो. खर्चांपेक्षा महसूलामध्‍ये वाढ आणि मार्जिन्‍समध्‍ये अर्थपूर्णरित्‍या विस्‍तारासह जारो आगामी तिमाहींमध्‍ये आपली वाढ व नफ्याबाबत गती कायम राखण्‍यासाठी उत्तमरित्‍या सज्‍ज आहे.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 7:10 pm

विपुल अमृतलाल शाह यांची ‘द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्ड’चा टीझर रिलीज़; यावेळी कथा अधिक गडद आणि हादरवून टाकणारी*

विपुल अमृतलाल शाह यांच्या प्रोडक्शन हाऊसकडून येणारा द केरला स्टोरी 2 हा चित्रपट आहे. आँखें, नमस्ते लंडन, सिंह इज़ किंग, फोर्स, कमांडो: ए वन मॅन आर्मी, हॉलिडे: ए सोल्जर इज़ नेवर ऑफ ड्यूटी अशा अनेक प्रभावी चित्रपटांची त्यांची फिल्मोग्राफी आहे. भारतीय सिनेमावर ठसा उमटवणाऱ्या दिग्दर्शकांपैकी ते एक मानले जातात. द केरला स्टोरीच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा आपण निर्भीड फिल्ममेकर आहोत, हे सिद्ध केलं होतं आणि हाच बेधडक दृष्टिकोन त्यांच्या संपूर्ण कामात सातत्याने दिसतो.भीती, राग आणि सत्याने भरलेल्या प्रत्येक फ्रेमसह द केरला स्टोरी 2: गोज़ बियॉन्डचा टीझर पहिल्या भागापेक्षा अधिक तीव्र आणि गंभीर संकेत देतो. राष्ट्रीय पुरस्कार विजेते कमाख्या नारायण सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात तीन हिंदू मुलींची वेदनादायक कहाणी मांडण्यात आली आहे. या भूमिका उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया यांनी साकारल्या आहेत. तीन मुस्लिम तरुणांवर प्रेम केल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कसा भयावह वळण मिळतो आणि हळूहळू धार्मिक धर्मांतरणाच्या एका सुनियोजित अजेंड्याचा उलगडा कसा होतो, हे चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.विश्वास, आपुलकी आणि भावनिक नात्यांपासून सुरू झालेली ही गोष्ट लवकरच फसवणूक, नियंत्रण आणि अडकवून टाकण्याच्या भीषण कथेत बदलते. टीझरमध्ये स्पष्टपणे दिसतं की कसं प्रेमाला शस्त्र बनवलं जातं, ओळख हिरावून घेतली जाते आणि श्रद्धेला संघर्षाचं मैदान बनवलं जातं. संपूर्ण वातावरण तणावपूर्ण आणि अस्वस्थ करणारं असून, प्रत्येक दृश्य भीती आणि दडपलेल्या संतापाने भरलेलं आहे.हा टीझर या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो की या मुली आता फक्त परिणाम भोगणाऱ्या राहणार नाहीत, तर त्याला उत्तरही देतील. द केरला स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड यावेळी केवळ वेदना आणि यातनांची कथा राहात नाही.यावेळी या महिला परिस्थितीच्या मूक बळी ठरत नाहीत. फसवणुकीचे परिणाम गप्प बसून सहन करण्याऐवजी त्या उभ्या राहतात, आवाज उठवतात आणि पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देतात.टीझरसोबत घुमणारा हा नारा चित्रपटाची आत्मा आणि जिद्द स्पष्टपणे व्यक्त करतो—“आता सहन करणार नाही… लढणार!”पहिल्या द केरला स्टोरीने आपल्या थेट आणि निर्भीड कथेमुळे देशभरातील प्रेक्षकांना हादरवून टाकलं होतं.त्यानंतर येणारा हा सिक्वेल आणखी पुढे जाण्याचं आश्वासन देतो—कम्फर्टच्या पलीकडे, शांततेच्या पलीकडे आणि नकाराच्या पलीकडे. कमाख्या नारायण सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या द केरला स्टोरी 2: गोज़ बियॉन्डचे निर्माते विपुल अमृतलाल शाह असून, सनशाइन पिक्चर्सच्या बॅनरखाली आशीष ए. शाह हे सह-निर्माते आहेत. हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 7:10 pm

Donald Trump : क्युबाला तेल पुरवठा करणाऱ्या देशांवर टेरिफ लावणार; ट्रम्प यांनी केली कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी

क्युबाला तेल पुरवणाऱ्या देशांमधील उत्पादनांवर अतिरिक्त आयात शुल्क लावण्याचे आदेश अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिले आहेत. या संदर्भातल्या कार्यकारी आदेशांवर ट्रम्प यांनी आज स्वाक्षरी केली

दैनिक प्रभात 30 Jan 2026 7:06 pm

NCP Merger : अजित दादांची शेवटची इच्छा पूर्ण होणार? दोन्ही ‘राष्ट्रवादी’पुन्हा एकत्र येणार?

NCP Merger : अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे एकत्रीकरण होण्याची दाट शक्यता आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 7:02 pm

Mallikarjun Kharge : “मनरेगा नंतर आता माहिती अधिकारा संपवण्याची सरकारची तयारी”; केंद्र सरकारवर मल्लिकार्जुन खर्गेची टिका

मनरेगा योजनेला खिळखिळे केल्यानंतर आता माहिती अधिकाराचा संपुष्टात आणण्याची तयारी सरकार करत आहे का?

दैनिक प्रभात 30 Jan 2026 6:55 pm

IND vs PAK : भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी ICC कडून मोठी घोषणा! ‘या’२ दिग्गजांवर सोपवली विशेष जबाबदारी

IND vs PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यासाठी आयसीसीने अंपायर्स आणि मॅच ऑफिशियल्सची घोषणा केली आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 6:46 pm

Vijay Wadettiwar : राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे; विजय वडेट्टीवार यांची राज्य सरकारवर टीका

राज्य दिवाळखोरीत निघाले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी रेवडी वाटल्या जात आहेत. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती न बघता केवळ सत्ता मिळवण्यासाठी राज्याचे वाटोळे करण्याचा अधिकार यांना दिला कोणी?

दैनिक प्रभात 30 Jan 2026 6:42 pm

मुंबईकरांसाठी बीडीडी घरांची मोठी सोडत; वरळी आणि नायगाव मध्ये सर्वाधिक घरांचे वितरण

मुंबई : मुंबईकरांसाठी बीडीडीने घरांची सोडत जाहीर केली आहे. वरळी, ना. म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासांतर्गत पुनर्वसित इमारतींची कामे वेगात सुरु आहेत. वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग परिसरातील पुनर्वसित इमारतींमधील घरांचे वाटप टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, २०२६ च्या एप्रिलपर्यंत मोठ्या प्रमाणावर घरांचा ताबा दिला जाणार आहे.मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाच्या माध्यमातून या तीन ठिकाणी पुनर्विकासाचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ३,६६६ सदनिका उभारण्याचे नियोजन असून, त्यापैकी सुमारे १,४०० हून अधिक घरे जवळपास पूर्ण झाली आहेत. यातील काही कुटुंबांना फेब्रुवारी अखेरीस घरांच्या चाव्या दिल्या जाणार आहेत.अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव परिसरातील ८६४ घरे आणि वरळीतील ५७४ घरे बांधकामाच्या दृष्टीने तयार असून, त्यांना आवश्यक निवासी प्रमाणपत्रेही प्राप्त झाली आहेत. पूर्वी काही तांत्रिक अडचणी आणि निवडणूक आचारसंहितेमुळे वितरण प्रक्रियेला विलंब झाला होता. मात्र, आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून घरांचा ताबा देण्याची तयारी पूर्ण झाली आहे.वाटपाच्या वेळापत्रकानुसार, फेब्रुवारीमध्ये वरळी आणि नायगावमधील घरे वितरित केली जातील. त्यानंतर मार्चमध्ये वरळीतील आणखी घरे आणि एप्रिलमध्ये ना. म. जोशी मार्ग परिसरातील सदनिका रहिवाशांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. या प्रक्रियेमुळे पहिल्या टप्प्यातील सर्व ३,६६६ कुटुंबांचे पुनर्वसन एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे.वरळीफेब्रुवारी ५७४मार्च २८०एकूण १७०८नायगावफेब्रुवारी ८६४मार्च २३७ना. म. जोशी मार्गएप्रिल ५७७एकूण घरे - ३६६६बीडीडी चाळ पुनर्विकासांतर्गत पात्र रहिवाशांना सुमारे ५०० चौरस फुटांचे आधुनिक सदनिका देण्यात येत आहेत. आधीच वरळीतील काही रहिवाशांना या नव्या इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यात आले असून, उर्वरित कुटुंबे आता आपल्या हक्काच्या घरांची वाट बघत आहेत.मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण बीडीडी पुनर्विकास प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. पुढील टप्प्यांतील इमारतींची कामे जसजशी पूर्ण होतील, तसतसे उर्वरित रहिवाशांनाही नव्या घरांचा ताबा देण्यात येणार आहे.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 6:30 pm

‘भूत बंगला’चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने उधळली कॉमेडीची धमाल, शेअर केला मजेशीर व्हिडिओ

प्रियदर्शन हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या दिग्दर्शकांपैकी एक असून त्यांच्या चित्रपटांनी प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटली तरीही प्रेक्षकांच्या मनात आजही खास स्थान टिकवून ठेवले आहे. दमदार कथा आणि भरपूर मनोरंजनासाठी ओळखले जाणारे प्रियदर्शन सध्या त्यांच्या आगामी चित्रपट ‘भूत बंगला’मुळे चर्चेत आहेत. हा हॉरर-कॉमेडी चित्रपट यंदाच्या मोठ्या आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल १४ वर्षांनंतर प्रियदर्शन आणि अक्षय कुमार ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र येत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांची जोडी भारतीय सिनेमातील सर्वात आयकॉनिक दिग्दर्शक-अभिनेता जोड्यांपैकी एक मानली जाते. फिर हेरा फेरी, भूल भुलैया, भागम भाग यांसारख्या अनेक कल्ट चित्रपटांद्वारे या दोघांनी प्रेक्षकांना अविस्मरणीय मनोरंजन दिले आहे. आजही हे चित्रपट प्रेक्षकांमध्ये तितकेच लोकप्रिय आहेत. त्यामुळे भूत बंगला मधील त्यांची ही पुनर्भेट चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढवत आहे. या चित्रपटातून त्यांच्या वर्षानुवर्षांच्या घट्ट नात्याचीही झलक पाहायला मिळणार आहे.आज प्रियदर्शन आपला वाढदिवस साजरा करत असून, या खास दिवशी अक्षय कुमारने हा क्षण आणखी संस्मरणीय केला आहे. अक्षयने एक मजेशीर व्हिडिओ शेअर करत प्रियदर्शन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये भूल भुलैया मधील सहकलाकार विद्या बालनही दिसत आहे. पूर्णपणे प्रियदर्शन-स्टाइल कॉमेडीने रंगलेला हा व्हिडिओ अक्षयपासून सुरू होतो, जो दिग्दर्शकाला त्यांच्या ६९व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि ही एक ‘ग्रेट एज’ असल्याचे म्हणतो. त्यानंतर विद्या बालन तिच्या आयकॉनिक मंजुलिका अंदाजात एंट्री घेते आणि प्रियदर्शन यांना शुभेच्छा देतानाच त्यांच्या आगामी भूत बंगला चित्रपटासाठीही शुभेच्छा व्यक्त करते. हा व्हिडिओ प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 6:30 pm

BJP Candidate : भाजप उमेदवाराला कोर्टाचा दणका.! तब्बल १ लाखांचा दंड ठोठावला, काय घडलं पाहा?

उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव घेणाऱ्या भाजपच्या उमेदवाराला मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 6:24 pm

Sunetra Pawar : मी सुनेत्रा अजित पवार...उद्या राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री ?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी प्रशासकीय आणि राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्याकडे असलेले महत्त्वाचे अर्थमंत्रालय आणि उपमुख्यमंत्रिपद आता कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. छगन भुजबळ यांनी यासंदर्भात मोठा दावा केला असून, उद्याच राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईत निर्णायक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधिमंडळ नेत्याची निवड झाल्यानंतर तातडीने राजभवनावर शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. पक्षातील आमदारांचा कल हा सुनेत्रा पवार यांच्याच बाजूने असून, अजितदादांचा राजकीय वारसा समर्थपणे चालवण्यासाठी त्यांच्या नावावर एकमत होण्याची चिन्हे आहेत. उद्याचा दिवस राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि सत्तेच्या समीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.https://prahaar.in/2026/01/30/sunil-tatkare-reaction-on-sunetra-pawar-dcm-ncp-president-ajit-pawar-plane-crash-pune-maharashtr/शो मस्ट गो ऑन!...अजितदादांच्या जाण्याने पक्षात आणि सरकारमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे, हे सत्य आहे. पण 'शो मस्ट गो ऑन' या उक्तीप्रमाणे आपल्याला पुढे जावेच लागेल. कोणाला तरी ही जबाबदारी स्वीकारावी लागेल, असे म्हणत भुजबळांनी पक्षाचे आणि सरकारचे कामकाज थांबणार नसल्याचे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांच्या भावनांबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले की, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळावी, अशी पक्षात मोठी लाट आहे आणि ही मागणी मुळीच चुकीची नाही. अजितदादांच्या अनुपस्थितीत सुनेत्रा पवारांच्या रूपाने हे महत्त्वाचे पद भरता येईल, याकडे सध्या पक्षाचे लक्ष केंद्रित आहे. पक्षाचे अध्यक्षपद आणि विधिमंडळ नेतेपद कोणाकडे द्यायचे, याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी उद्या मुंबईत सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत जे ठरेल, त्यानुसार सत्तेचा पुढील गाडा हाकला जाईल, असे संकेत भुजबळांनी दिले आहेत.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 6:10 pm

गृहविभागाच्या अपर मुख्य सचिव पदी मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची नियुक्ती

मुंबई : राज्याच्या गृहविभागात महत्त्वाचा प्रशासकीय बदल करण्यात आला असून सनदी अधिकारी मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची गृहविभागाच्या अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल यांच्या सेवानिवृत्तीमुळे हे पद रिक्त आहे.इक्बाल सिंह चहल यांच्या निवृत्तीनंतर गृहविभागाच्या अपर मुख्य सचिवपदाचा कार्यभार मनिषा पाटणकर-म्हैसकर या स्वीकारणार आहेत. सध्या त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवपदावर कार्यरत असून, त्यांच्या जागी मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहेत.सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, मनिषा पाटणकर-म्हैसकर यांनी आपला सध्याचा कार्यभार मिलिंद म्हैसकर यांच्याकडे सोपवून ३१ जानेवारी रोजी गृहविभागाच्या अपर मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 6:10 pm

किया इंडियाने पुन्‍हा लाँच केला किया इन्‍स्‍पायरिंग ड्राइव्‍ह प्रोग्राम

सुरक्षित व स्‍मार्ट ड्रायव्हिंगला चालना देणारमुंबई : किया इंडिया या आघाडीच्‍या प्रीमियम कारमेकर कंपनीने आज नवीन किया सेल्‍टोससह आपल्‍या किया सेल्‍टोससह इन्‍स्‍पायरिंग ड्राइव्‍ह (के.आय.डी) प्रोग्रामच्‍या रि-लाँचची घोषणा केली, ज्‍यासह रस्‍ता सुरक्षा, जबाबदार ड्रायव्हिंग वर्तणूक आणि सुधारित ग्राहक सहभागाप्रती ब्रँडची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. के.आय.डी. प्रोग्राम ग्राहकांसाठी कियाच्‍या कनेक्‍टेड उत्‍पादन पोर्टफोलिओमध्‍ये टप्‍प्‍याटप्‍प्‍याने उपलब्‍ध असेल आणि किया कनेक्‍ट अॅपच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध होऊ शकतो.किया इन्‍स्‍पायरिंग प्रोग्राम हा ड्रायव्हिंग स्‍कोअर उपक्रम आहे, जो रिअल-टाइम ड्रायव्हिंग वर्तणूकीचे विश्‍लेषण करतो आणि ग्राहकांना त्‍यांच्‍या ड्रायव्हिंग सवयींबाबत कृतीशील माहिती देतो. अचूकता व पारदर्शकतेच्‍या खात्रीसाठी के.आय.डी स्‍कोअरचे वेईकलच्‍या भारित मूल्‍यानुसार गणन केले जाते, जेथे रॅपिड अॅक्‍सेलरेशन, रॅपिड डिक्‍सेलरेशन आणि सडन स्‍टार्ट्स अशा प्रमुख घटकांमध्‍ये सरासरी तीन महिन्‍यांचे रोलिंग घेतले जाते. या पद्धतीमधून खात्री मिळते की, स्‍कोअरमधून तात्‍पुरत्‍या घटनांऐवजी सतत व वास्‍तविक दीर्घकालीन ड्रायव्हिंग पद्धत दिसून येते.हा उपक्रम रस्‍ता सुरक्षिततेला चालना देतो, तसेच प्रगतीवर देखेरख, मान्‍यता आणि समुदाय-आधारित लीडरबोर्ड्सच्‍या माध्‍यमातून ग्राहकांचा सहभाग देखील वाढवतो, ज्‍यामुळे ड्रायव्‍हर्सना सुरक्षिततेसंदर्भात अव्‍वल स्‍थान मिळवता येते.सुरक्षिततेप्रती समुदाय-केंद्रित दृष्टिकोन - वैयक्तिक डेटाव्‍यतिरिक्‍त किया रस्‍ता सुरक्षिततेला एकत्रित जबाबदारपूर्ण कृतीमध्‍ये बदलत आहे. के.आय.डी. प्रोग्राम समुदाय वाढवणारा उपक्रम आहे, जेथे ग्राहक उत्‍साहवर्धक स्‍पर्धेमध्‍ये सहभाग घेऊ शकतात. किया कारमालक इतर मालकांसह स्‍कोअरची तुलना करू शकतात, समुदायामधील त्‍यांच्‍या स्‍थानावर देखरेख ठेवू शकतात, तसेच त्‍यांना त्‍यांच्‍या ड्रायव्हिंग वर्तणूकीमध्‍ये सुधारणा करत सहकाऱ्यांना मागे टाकण्‍यास प्रेरित केले जाते, ज्‍यासह त्‍यांचा सुरक्षिततेप्रती प्रवास परस्‍पदसंवादात्‍मक व लाभदायी होतो.या रि-लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत किया इंडियाच्‍या मार्केटिंग अँड सेल्‍सचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष अतुल सूद म्‍हणाले, ''कियाच्‍या तत्त्वामध्‍ये सुरक्षिततेला कायम प्राधान्‍य देण्‍यात येते आणि नवीन सेल्‍टोससह किया इन्‍स्‍पायरिंग ड्राइव्‍ह प्रोग्राम पुन्‍हा लाँच करत आम्‍ही जबाबदार ड्रायव्हिंग वर्तणूकीला प्रेरित करण्‍याच्‍या दिशेने आणखी एक अर्थपूर्ण पाऊल उचलत आहोत. ग्राहकांना त्‍यांच्‍या ड्रायव्हिंग पद्धतींबाबत स्‍पष्‍ट, डेटा-केंद्रित माहिती देत केआयडी प्रोग्राम त्‍यांना रस्‍त्‍यावर सुरक्षित पर्यायांची निवड करण्‍यास सक्षम करतो, तसेच त्‍यांचा एकूण मालकीहक्‍क अनुभव अधिक उत्‍साहित देखील करतो.''के.आय.डी. प्रोग्राम रिअल-टाइम ड्रायव्हिंग डेटाच्‍या माध्‍यमातून अंदाजांवर नाही तर वास्‍तविक ड्रायव्हिंग वर्तणूकीच्‍या आधारावर अचूक व पारदर्शक स्‍कोअर्स देतो. यामधील वर्तणूक-आधारित स्‍कोअरिंग सिस्‍टम सुरक्षित व जबाबदार ड्रायव्हिंगला प्रशंसित करण्‍यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्‍यासह कियाचा सुरक्षितता-केंद्रित दृष्टिकोन प्रबळ होत आहे, तसेच ग्राहकांना एकूण रस्‍ता सुरक्षिततेवर त्‍यांच्‍या ड्रायव्हिंग सवयींचा होणारा परिणाम उत्तमरित्‍या समजण्‍यास मदत होत आहे.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 6:10 pm

Devendra Fadnavis : अजित पवारांच्या निधनानंतर अर्थमंत्रीपदाची जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांकडे?

Devendra Fadnavis : अजित पवार यांच्या निधनानंतर आगामी २०२६-२७ चा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत

दैनिक प्रभात 30 Jan 2026 6:05 pm

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘या’खंद्या कार्यकर्त्याने घेतला मोठा निर्णय; Video व्हायरल

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 6:02 pm

Indian Cricketers : मैदानात उतरण्यापूर्वी टीम इंडिया ‘देवाच्या’चरणी! पद्मनाभस्वामी मंदिरात खेळाडूंनी घेतलं दर्शन, पाहा VIDEO

Indian Cricketers : कर्णधार सूर्यकुमार यादवसह सात खेळाडूंनी जगप्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट देऊन पूजा-अर्चना केली.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 5:38 pm

Sanjay Raut : अजित दादांच्या खुर्चीसाठी इतकी घाई? राऊतांनी उत्तराधिकाऱ्यांच्या चर्चेवरून नेत्यांना सुनावलं

Sanjay Raut : अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू झालेल्या सत्तेच्या चर्चांवर संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 5:33 pm

Sunil Tatkare : सुनेत्रा पवार आणि मुलांशी चर्चा करूनच उपमुख्यमंत्रिपदावर होणार शिक्कामोर्तब; सुनील तटकरेंनी दिले स्पष्ट संकेत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर 'अजितदादांचा उत्तराधिकारी कोण?' आणि 'उपमुख्यमंत्रिपद कोणाकडे जाणार?' या चर्चांना उधाण आले असतानाच सुनील तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.सुनील तटकरे म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असली, तरी त्यांच्याशी उपमुख्यमंत्रिपद किंवा इतर कोणत्याही राजकीय विषयावर अद्याप चर्चा झालेली नाही. अजितदादांच्या जाण्याने आम्हाला मोठा धक्का बसला आहे आणि आम्ही अद्याप त्या दु:खातून सावरलेलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत आणि भविष्यातील राजकीय निर्णयांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सुनेत्रा पवार आणि पवार परिवाराला विश्वासात घेतले जाईल. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच पक्ष आपला अंतिम निर्णय जाहीर करेल. दादांच्या अपघाती एक्झिटने पक्षात सध्या शोकाकुल वातावरण असून, सत्तेच्या समीकरणांपेक्षा परिवाराच्या भावनांना प्राधान्य दिले जात असल्याचे तटकरेंच्या प्रतिक्रियेतून दिसून आले.https://prahaar.in/2026/01/30/no-beef-tallow-lard-tirupati-laddu-cbi-reveals-synthetic-material-used-mimic-ghee/सुनेत्रा पवारांशी चर्चा करणार...सुनील तटकरे यांनी आज भावूक होत आपली भूमिका मांडली. दादांच्या जाण्याच्या धक्क्यातून आम्ही अद्याप सावरलेलो नाही. सुनेत्रा वहिनी आणि त्यांचा परिवार सध्या धार्मिक विधींमध्ये व्यस्त आहे. हे विधी पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा करू. आमचे आमदार आणि जनतेच्या मनात काय आहे, हे जाणून घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. दादांच्या अनुपस्थितीत पक्षाच्या कार्यालयात पाऊल ठेवणे अत्यंत क्लेषकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले. दुसरीकडे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मात्र राजकीय घडामोडींवर थेट भाष्य केले आहे. अजितदादांच्या जाण्याने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी आता सुनेत्रा पवार यांच्या नावाची आग्रही मागणी होत आहे. भुजबळ यांनी माहिती दिली की, उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली असून, त्यामध्ये पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाईल. जर या बैठकीत एकमत झाले, तर उद्याच नव्या नेत्याचा शपथविधी होण्याची दाट शक्यता आहे. या विधानामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे संकेत मिळत असून, उद्याचा दिवस राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.पार्थ पवारांचा प्रस्तावसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत पार्थ पवार यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडल्याचे समजते. सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या राजकारणात सक्रिय होऊन उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी आणि त्याचवेळी आपल्याला राज्यसभेवर पाठवून दिल्लीत काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी पार्थ पवार यांनी पक्षाकडे केल्याची माहिती समोर येत आहे. अजितदादांच्या अकाली जाण्याने रिक्त झालेली पदे आणि राजकीय वारसा जपण्यासाठी पार्थ पवारांनी सुचवलेला हा 'फॉर्म्युला' सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.दरम्यान, रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथीविधीसाठी आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बारामतीला जाणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सर्व आमदारांची बैठक बोलवण्यात येणार आहे. आमदारांच्या बैठकीत गटनेता निवड आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. यानंतर आमदारांच्या संमतीचं पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार तसेच प्रस्ताव राज्यपाल याना देण्यात येणार असल्याची माहिती आहे. राज्यपालांच्या समंतीनंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 5:30 pm

Devkhel Web Series : ‘देवखेळ’ वेबसीरीज वादाच्या भोवऱ्यात ! नागरिकांकडून ट्रेलर- टीझर हटवण्याची मागणी

झी 5 या प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३० जानेवारी २०२६ रोजी रिलीज झालेली मराठी वेबसीरीज 'देवखेळ' (Devkhel Web Series) रिलीज होताच मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही मनोवैज्ञानिक क्राइम थ्रिलर वेबसीरीज

दैनिक प्रभात 30 Jan 2026 5:30 pm

Sunetra Pawar : मोठी बातमी..! सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री; शपथविधी उद्याच?

Sunetra Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या नव्या उपमुख्यमंत्री होणार?

दैनिक प्रभात 30 Jan 2026 5:06 pm

Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघाताची होणार CID चौकशी, अधिकारी अपघातस्थळी दाखल

महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) वतीने बारामती येथे झालेल्या विमान अपघाताची चौकशी सुरु केली आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 5:00 pm

Share Market: अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार घसरला; टाटा स्टीलला सर्वात जास्त फटका

Share Market: जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि नफावसुलीमुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता दिसून आली.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 4:55 pm

Suryakumar Yadav Gesture : ‘चेता को डिस्टर्ब मत करु…!’तिरुवनंतपुरममध्ये सूर्याने संजूला दिला खास सन्मान, पाहा VIDEO

Suryakumar Yadav Gesture : तिरुवनंतपुरममध्ये सूर्याने संजू सॅमसनला खास सन्मान दिल्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल

दैनिक प्रभात 30 Jan 2026 4:54 pm

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार

विविध माध्यमांतून सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका करणारे अभिनेते शैलेश दातार आता एका महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत पहायला मिळणार आहेत. ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार्‍या ‘केस नं. ७३’ या चित्रपटात एसपी संजय देशमुख ही जिगरबाज आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची भूमिका अभिनेते शैलेश दातार साकारणार आहेत.एसपी म्हणून संजय देशमुख यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. त्याच्या पूर्ण सेवाकाळात एकही गुन्हा आजवर अनसॉल्व्ह राहिलेला नाही. प्रामाणिकपणा, कर्तृत्व आणि सरळ स्वभावामुळे संजय गावात लोकप्रिय आहे. मात्र, ऐन निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांच्याकडे एक अत्यंत गुंतागुंतीचा खटला येतो. ही केस सोडवण्याचे प्रचंड दडपण त्यांच्यावर आहे. धागेदोरे मिळत नाहीत आणि प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी कसोटीचा ठरतो. धाडस, शिस्त आणि प्रामाणिकपणाचा प्रत्यय देणारी ही भूमिका कथानकाला वेगळी कलाटणी देणारी असणार आहे.लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज निर्मित ‘केस नं. ७३’ हा मराठी चित्रपट ६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती शर्वरी सतीश वटक, डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केली आहे. सहनिर्माते प्रविण अरुण खंगार आहेत.जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नक्कीच आव्हानात्मक होतं. एकामागोमाग होणाऱ्या खूनाचा आणि त्यामागच्या गुन्हेगाराचा मागोवा घेताना निर्माण होणारं गूढ ‘केस नं. ७३’ चित्रपटात पहाता येणार आहे. स्टोरीमधील सस्पेन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.शैलेश दातार यांच्यासोबत अशोक शिंदे, राजसी भावे, नंदिता पाटकर, पियुष आपटे अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात दिसणार आहे.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 4:30 pm

ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी भाजप–महायुतीच्या उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

ठाणे शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भाजप–महायुतीच्या भरघोस यशाच्या पार्श्वभूमीवर, ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका सौ. शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड आणि उपमहापौरपदासाठी भाजपचे कृष्णा पाटील यांनी आज ठाणे महापालिका सचिव मनीष जोशी यांच्याकडे आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले.या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाणे शहर खासदार नरेश म्हस्के, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे, माजी आमदार रविंद्र फाटक, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, भाजप गटनेते मुकेश मोकाशी, शिवसेना गटनेते पवन कदम यांच्यासह भाजप व शिवसेनेचे नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना शुभेच्छा देताना त्यांनी ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेत मजबूत, स्थिर आणि लोकाभिमुख नेतृत्वाची आवश्यकता अधोरेखित केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात महायुतीच्या माध्यमातून ठाण्यात पारदर्शक, विकासाभिमुख आणि जबाबदार प्रशासन अधिक सक्षमपणे कार्यरत राहील, असा ठाम विश्वास व्यक्त केला.लोकशाही प्रक्रियेचा सन्मान राखत महायुतीच्या नेतृत्वाखाली ठाणे शहराच्या प्रगतीचा वेग अधिक वाढवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सर्व नेत्यांनी व्यक्त केला.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 4:30 pm

Eknath Shinde : भाजपची मोठी खेळी ! बालेकिल्ल्यातच एकनाथ शिंदेंना धक्का देत केला मोठा गेम

Eknath Shinde : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये (Eknath Shinde) भाजपला राज्यात सर्वाधिक यश मिळाले असून, तो एकटाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) लाही चांगली कामगिरी करता आली असून, राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 4:23 pm

Sharad Pawar NCP |उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा अजित पवार? साहेबांवर ‘मोठ्या’निर्णयाची जबाबदारी?

अजित पवार यांच्या मृत्यूमुळे पक्षासमोर देखील मोठा पेचप्रसंग निर्माण झाला असून दादांच्या जागी कोण? हा प्रश्न सोडवावा लागणार आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 4:22 pm

Free Sanitary Pads : मोठा निर्णय..! आता शाळांमध्ये सॅनिटरी पॅड्स मोफत मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र आणि राज्यांना आदेश

Free Sanitary Pads : सर्वोच्च न्यायालयाने शाळांमध्ये मोफत सॅनिटरी पॅड्स देण्याचे ऐतिहासिक आदेश दिले आहेत.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 4:17 pm

Gold Silver Rates : मोठी घसरण! चांदी एका झटक्यात 60,000 रुपयांनी स्वस्त, तर सोने 10,000 रुपयांनी कोसळले

Gold Silver Rates: दुपारी 3:55 च्या दरम्यान चांदीचे दर 60 हजार रुपयांनी कमी होऊन 3 लाख 39 हजार रुपयांवर व्यवहार करत होती. तर सोने 10 हजार रुपयांनी घसरून 1 लाख 59 हजार रुपयांवर व्यवहार करत होते.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 4:10 pm

राज्यातील 'आयटीआय'होणार 'स्किल डेव्हलमपेंट हब'

मंत्री मंगल प्रभात लोढा; पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्याचा समावेशमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शाश्वत विकासाच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या ‘पीएम-सेतू’ योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आधुनिक ‘स्किल डेव्हलमपेंट हब’ म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. उद्योगांची संख्या कमी असलेल्या भागांत सेवा क्षेत्र, बहुकौशल्य अभ्यासक्रम आणि उपजीविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, यामुळे राज्यातील तरुणांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाच्या दर्जेदार संधी उपलब्ध होतील, अशी माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेच्या पहिल्या टप्प्यास मान्यता देण्यात आली. या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून, पुढील टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांचाही समावेश केला जाणार आहे. कुशल मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा यांतील तफावत दूर करण्यासाठी आयटीआयचे आधुनिकीकरण करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.केंद्र आणि राज्य सरकार करणार २४२ कोटींचा खर्चपीएम-सेतू योजनेंतर्गत आयटीआयचे आधुनिकीकरण ‘हब अँड स्पोक’ प्रारूपात करण्यात येणार आहे. या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकार मिळून सुमारे २४२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये केंद्र सरकारचा ५० टक्के, राज्य सरकारचा ३३ टक्के आणि उद्योग क्षेत्राचा १७ टक्के असा निधी वाटा असेल. एका क्लस्टरसाठी (एक हब आयटीआय व चार स्पोक आयटीआय) पाच वर्षांसाठी अंदाजे २४१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यापैकी केंद्र सरकारचा ११२ कोटी, राज्य शासनाचा ९८ कोटी आणि उद्योग क्षेत्राचा ३१ कोटी रुपयांचा सहभाग असेल. राज्य शासनाकडून पाच वर्षांसाठी करावयाच्या ९८ कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली आहे.असा असेल पहिला टप्पापहिल्या टप्प्यात नागपूर येथील शासकीय आयटीआयचे हब म्हणून आधुनिकीकरण केले जाणार आहे. यामध्ये नागपूर येथील मुलींचे आयटीआय तसेच कामठी, हिंगणा आणि बुटीबोरी येथील आयटीआयचा समावेश असेल. छत्रपती संभाजीनगर येथे आयटीआय हब विकसित करण्यात येणार असून, पैठण, खुलताबाद, गंगापूर आणि फुलंब्री येथील आयटीआयचेही आधुनिकीकरण केले जाईल. पुणे जिल्ह्यात औंध येथील आयटीआय हब म्हणून विकसित करण्यात येणार असून, औंध येथील मुलींचे आयटीआय, खेड-राजगुरुनगर आणि मुळशी येथील आयटीआयचा त्यात समावेश असेल.नवीन अभ्यासक्रम सुरू करणारएका हब आयटीआयमध्ये सरासरी चार नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, दहा विद्यमान अभ्यासक्रमांची श्रेणीसुधारणा केली जाईल. स्पोक आयटीआयमध्ये दोन नवीन अभ्यासक्रम सुरू केले जातील आणि आठ विद्यमान अभ्यासक्रमांची श्रेणी सुधारणा करण्यात येणार आहे. उद्योगांची संख्या कमी असलेल्या भागांत सेवा क्षेत्र, बहुकौशल्य आणि उपजीविका आधारित अभ्यासक्रमांवर विशेष भर देण्यात येणार आहे.भारताची गुरुकुल परंपरा, नालंदासारखी विद्यापीठे आणि आर्यभट्टांसारखे विद्वान यांमुळे देश ज्ञानार्जनाचे जागतिक केंद्र ठरला होता. त्याच ज्ञानपरंपरेला आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची जोड देत आयटीआयच्या माध्यमातून ‘नवा भारत’ घडवण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करत आहेत, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 4:10 pm

Virat Kohli Instagram : विराट कोहलीचं इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक झालं होतं गायब! नेमकं काय होतं कारण? जाणून घ्या

Virat Kohli Instagram : स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचे इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब झाल्याने गोंधळ उडाला होता.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 4:07 pm

Surrender of Naxalites : सुकमामध्ये 4 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणाने झाले प्रभावित

आठ लाख रुपयांचे एकत्रित बक्षीस असलेल्या, दोन महिलांसह चार नक्षलवाद्यांनी शुक्रवारी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात शस्त्रे आणि दारूगोळ्यासह आत्मसमर्पण (Surrender of Naxalites) केले.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 3:55 pm

Menopause Clinic: देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू; महिला आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल

Menopause Clinic: सदर क्लिनिकच्या माध्यमातून, तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला, मानसिक आरोग्य समुपदेशन, हाडे, हृदय व हॉर्मोन तपासणी, औषधोपचार व मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 3:46 pm

Jitendra Awhad : सहर शेखच्या ‘कैसा हराया’ विधानावर जितेंद्र आव्हाडांचे शांत पण टोकदार उत्तर

Jitendra Awhad : मुंब्र्यात सहर शेख यांच्या ‘कैसा हराया’ विधानावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर सभेत प्रतिक्रिया दिली.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 3:43 pm

केरळ स्टोरी २ चा टिझर यावेळी अधिक गडद; हिंदू मुलींवर निशाणा....

मुंबई : आजपर्यंत विपुल अमृतलाल शाह यांचे अनेक देशभक्तीपर सिनेमे किंवा सामाजिक प्रश्नांना हात घालणारे सिनेमे आपण पाहत आलोय. द केरळ स्टोरी हा त्यांच्या कारकिर्दीमधला सर्वात जास्त कमाई केलेला लोकप्रिय चित्रपट ठरलाआता त्याच सिनेमाचा दुसरा भाग आपल्या भेटीला येतोय, तोही अधिक भीतीदायक आणि अनेक कथा उलघडणारा असणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित या चित्रपटात उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि आदिती भाटिया यांनी तीन हिंदू मुलींच्या महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.टिझर विषयीतीन मुस्लिम मुलांच्या प्रेमात पाडल्यानंतर त्यांचे जीवन कसे भयानक वळण घेते आणि हळूहळू धार्मिक धर्मांतराचा मुद्दा कसा उलघडत जातो हे या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कस प्रेमाला शस्त्र बनवलं जात, ओळख हिरावून घेतली जाते, स्त्री म्हणून मर्यादा लादल्या जातात, श्रद्धेला संघर्षाचं मैदान कसं बनवलं जात. याचे भयानक आणि गडद वर्णन या टिझर मध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे.केरळ स्टोरी केव्हा प्रदर्शित होणारकेरळ स्टोरी च्या जबरदस्त कथेनंतर देशभरातील प्रेक्षकानं हलवून टाकले. कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित ' द केरळ स्टोरी २ ची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे, तर आशिष ए.शाह. सनशाईन पिकचर्सच्या सोबत सह निर्मिती करत आहेत. हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 3:30 pm