Violent clash at Gurudwara in Germany : जर्मनीतील गुरुद्वारात दोन गटांमध्ये हिंसक झटापट, ११ जण जखमी
जर्मनीतील मोर्स शहरातील ड्यूसबर्ग भागात असलेल्या एका गुरुद्वारात दोन गटांमध्ये अचानक हिंसक झटापट झाली. या घटनेत किमान ११ जण जखमी झाले आहेत. माहितीनुसार, हा वाद इतका वाढला की या वादात चाकू, कृपाण, पेपर स्प्रे आणि अगदी पिस्तुलाचाही वापर करण्यात आला. या भांडणात सुमारे ४० जण सहभागी होते, असे सांगितले जात आहे.गुरुद्वारात धार्मिक कार्यक्रम सुरू होण्याच्या तयारीत असतानाच दोन्ही गटांमध्ये वाद वाढला आणि हातघाईतून तो हिंसाचारात बदलला. सोशल मीडियावर काही व्हिडिओही समोर आले असून त्यामध्ये लोक एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत.प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, काही लोकांनी अचानक पेपर स्प्रेचा वापर केला. त्यानंतर एका व्यक्तीने पिस्तुलातून गोळीबार केला, तर अनेकांकडे चाकू आणि कृपाणसारखी धारदार शस्त्रे होती. मात्र, पोलिसांना अद्याप खरे पिस्तूल सापडलेले नाही. प्राथमिक तपासात हे ब्लँक-फायरिंग पिस्तूल असू शकते, असे समोर आले आहे. अशा प्रकारच्या पिस्तुलातून खरी गोळी झाडली जात नाही, मात्र आवाज आणि स्फोटासारखा धक्का निर्माण होतो.https://prahaar.in/2026/04/21/manipur-earthquake-5-2-magnitude-earthquake-hits-manipur-panic-among-citizens/पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा वाद गुरुद्वारा समितीच्या निवडणुका आणि निधी (पैसे) यावरून झाल्याचे समोर आले आहे. जुन्या आणि नव्या व्यवस्थापनामध्ये बऱ्याच काळापासून तणाव होता. गुरुद्वारावरील नियंत्रण आणि निर्णय घेण्याच्या अधिकारावरून दोन्ही गट आमनेसामने आले होते.एका मध्यमवयीन प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, हा हल्ला आधीपासून नियोजित वाटत होता.या घटनेची माहिती मिळताच मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. विशेष टॅक्टिकल युनिटलाही तैनात करण्यात आले. सर्व जखमींवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले. दरम्यान, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून नेमका कोणी कोणावर हल्ला केला, याचा तपास पोलिस करत आहेत.
पुणे : लग्न जमत नाही म्हणून अनेक तरुण सध्या नैराश्यात दिसत आहे. मुलीच्या तसेच वडिलांच्या एकंदरीतच कुटुंबियांच्या मुलाकडून वाढलेल्या अपेक्षा या कारणामुळे आज अनेक मुलांना लग्न जमण्यास अडचण येत आहे. यापूर्वी तर मुलांनी लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून मोर्चे देखील काढलेले आहेत. आता याच सर्व गोष्टी विचारात घेता पुण्यातील एका उत्साही तरुणाने लग्नासाठी मुलगी मिळावी म्हणून अजबच पर्याय शोधला. अर्थात जेव्हा सत्य समोर आले तेव्हा त्याचा प्लॅन चांगलाच फसला.नेमकं प्रकरण काय ?लग्नासाठी उत्साही असलेला २६ वर्षीय तरुण ऋषिकेश राजू जाधव ( rushikesh jadhav ) याने लग्न जमवण्यासाठी आणि इम्प्रेशन” मारण्यासाठी भलताच प्रयोग केला. या तरुणाने स्वतःला पुणे शहर पोलीसमध्ये निवड झाल्याचे भासवण्यासाठी शहरभर फ्लेक्स लावले. लग्न जमत नसल्यामुळे आणि मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी हा सगळा खटाटोप केल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेशचे ( rushikesh jadhav ) लग्न जमत नव्हते. मुलींच्या घरी प्रभाव पाडण्यासाठी आणि आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्याने आपली पुणे शहर पोलीस दलात निवड झाल्याचे खोटे सांगितले. तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने थेट पोलीस वर्दीतील फोटो काढून ते आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर (Whatsapp Status) ठेवले आणि मी पोलीस झालो असा प्रचार सुरू केला.अखेर ऋषिकेशचे बिंग फुटले...विशेष म्हणजे त्याने स्वतःच्या अभिनंदनाचे मोठे फ्लेक्स नऱ्हे परिसरात लावले. या फ्लेक्सवर तो पोलीस वर्दीत (Fake Police) रुबाबदार दिसत होता. मात्र, परिसरातील खऱ्या पोलिसांच्या नजरेत हे फ्लेक्स पडले आणि त्यांना संशय आला. जेव्हा पोलिसांनी अधिकृतपणे या नावाच्या उमेदवाराची चौकशी केली, तेव्हा पुणे पोलीस दलात या नावाची कोणतीही व्यक्ती भरती झाली नसल्याचे (Fake Police) उघड झाले आणि ऋषिकेशचे बिंग फुटले.एवढा खोटा गाजावाजा कशासाठी ?हा सर्व प्रकार आणि खोटा गाजावाजा केवळ मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी आणि लग्नाची 'लाईन' लावण्यासाठी ऋषिकेशने केल्याचे तपासात निष्पन्न झाले. नऱ्हे पोलीस ठाण्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेत ऋषिकेश जाधव विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 204 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सोशल मीडियावर या घटनेची चर्चा चांगलीच रंगली आहे. दरम्यान एकाबाजूला वाढणाऱ्या अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगारीचा मुद्दा यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Tariff Refund : अमेरिकेचा मोठा निर्णय : भारताला मिळू शकतो तब्बल ₹1 लाख कोटींचा टॅरिफ रिफंड!
अमेरिकेत सुरू असलेल्या व्यापार चर्चांदरम्यान भारतासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांच्या काळात लादण्यात आलेल्या मनमानी टॅरिफबाबत अमेरिकन न्यायालयाने आक्षेप घेतल्यानंतर आता भारतीय वस्तूंवर आकारलेल्या शुल्काच्या परताव्याचा मार्ग मोकळा झाला आहे.त्या काळात भारतीय वस्तूंवर लावण्यात आलेल्या मोठ्या टॅरिफपैकी सुमारे १० ते १२ अब्ज डॉलर्स इतका भाग बेकायदेशीर ठरू शकतो. भारतीय रुपयांत याची किंमत अंदाजे ₹८३,००० ते ₹१,००,००० कोटी इतकी आहे. या रकमेच्या परताव्यासाठी अमेरिकेच्या कस्टम्स विभागाने २० एप्रिल २०२६ पासून CAPE प्लॅटफॉर्मचा पहिला टप्पा सुरू केला आहे.‘रिफंड विंडो’ उघडली कशी?हा संपूर्ण वाद आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायदा International Emergency Economic Powers Act (IEEPA) अंतर्गत लावलेल्या दंडात्मक शुल्कांशी संबंधित आहे. ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणांतर्गत अनेक देशांवरील आयातीवर मोठे टॅरिफ लादण्यात आले होते. मात्र, अमेरिकेच्या न्यायालयांनी या निर्णयातील त्रुटी दाखवत हे शुल्क कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असल्याचे नमूद केले.या निर्णयानंतर अमेरिकेने जागतिक स्तरावर सुमारे १६६ अब्ज डॉलर्सच्या टॅरिफ रिफंडसाठी दार उघडले असून, त्यासाठी नवीन ऑनलाइन पोर्टलही सुरू करण्यात आले आहे.https://prahaar.in/2026/04/21/us-india-trade-deal-indian-delegation-to-visit-washington-this-week-for-us-india-trade-deal/भारतीय निर्यातदारांना कसा फायदा?ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह Global Trade Research Initiative (GTRI) च्या माहितीनुसार, या रिफंडपैकी मोठा हिस्सा भारतात तयार झालेल्या वस्तूंशी संबंधित आहे.तथापि, हा रिफंड थेट भारतीय निर्यातदारांना मिळणार नाही, कारण दावा करण्याचा अधिकार फक्त अमेरिकन आयातदारांकडे (US importers) आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना त्यांच्या अमेरिकन खरेदीदारांशी समन्वय साधावा लागेल.भविष्यातील ऑर्डर्समध्ये सवलत, रिफंड शेअरिंग किंवा किंमतीत बदल करून भारतीय कंपन्या या रकमेचा फायदा घेऊ शकतात. विशेषतः टेक्सटाइल, इंजिनिअरिंग वस्तू आणि केमिकल्स क्षेत्रांना यामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Mumbai local : मोठा अपघात टळला.! एकाच ट्रॅकवर समोरासमोर दोन लोकल, नेमकं काय घडलं?
ऐन गर्दीच्या वेळी जलद मार्गावरील सेवा विस्कळीत झाल्याने CSMTसह इतर स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
Rule For Gas Cylinder : ‘हा’नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; सरकारकडून नवा नियम लागू
Rule For Gas Cylinder : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवर मोठे ऊर्जा संकट (Rule For Gas Cylinder) निर्माण झाले आहे. याचा थेट फटका भारतालाही बसत आहे.
Chhagan Bhujbal : बारामती पोटनिवडणूक सांगता सभेत छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे आवाहन केले.
Ayush Mhatre Injury : CSK ला मोठा धक्का ! आयुष म्हात्रे दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर
Ayush Mhatre Injury : चेन्नई सुपर किंग्स साठी आयपीएल २०२६ चा हंगाम अत्यंत निराशाजनक (Ayush Mhatre Injury) सुरु आहे. या दिग्गज संघाला १९व्या मोसमात अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
- भाजयुमोच्या ‘युवाशक्ती जागर यात्रे’चा प्रारंभमुंबई : राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि 'अर्बन नक्षलवादा'च्या माध्यमातून तरुणांच्या मनात संविधानाविरुद्ध विष पेरणाऱ्या शक्तींना रोखण्याचे काम 'युवाशक्ती जागर यात्रा' करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित या राजव्यापी यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा अधिकृत प्रारंभ केला. मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात ३५ वर्षांखालील तरुणांची लोकसंख्या ६५ टक्के आहे. ही मोठी शक्ती जर संघटित होऊन एका दिशेने चालली, तर राज्यात मोठे परिवर्तन घडून येईल. मात्र, सध्या काही शक्ती युवकांमध्ये संविधानाविरुद्ध कलुषित मते पसरवत आहेत. या तरुणांना संविधानाने दिलेल्या व्यवस्थेप्रती जागृत करण्याची जबाबदारी युवा मोर्चा पार पाडेल.https://prahaar.in/2026/04/21/navi-mumbai-panvel-unseasonal-rains-arrive-relief-from-the-heat-but-citizens-scramble/महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर कठोर शब्दांत टीका केली. संसदेत विरोधकांनी महिला आरक्षणाची जणू 'भ्रूणहत्या'च केली. जनगणना आणि पुनर्रचनेच्या (डिलिमिटेशन) नावाखाली विरोधक खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत. मुळात त्यांना आरक्षण द्यायचेच नाही, ही त्यांची बुरसटलेली मानसिकता आहे. या यात्रेच्या माध्यमातून नारीशक्तीला जागृत करून विरोधकांना या विधेयकाला पाठिंबा देण्यास भाग पाडले जाईल, असेही फडणवीस यांनी नमूद केले.यात्रेचे स्वरूप आणि उद्दिष्टे : भाजयुमोची ‘युवाशक्ती जागर यात्रा' संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असून शेतकरी, कामगार आणि आयटी क्षेत्रातील तरुणांपर्यंत पोहोचणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात गेल्यामुळे युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राजकीय व सामाजिक प्रगल्भता येईल. कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाला राज्यातील पहिल्या क्रमांकाची संघटना बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारच्या योजना गावखेड्यातील शेवटच्या तरुणापर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. कृष्णराज महाडिक यांनी यात्रेच्या नियोजनाबाबत माहिती देताना सांगितले की, केवळ राज्यातीलच नव्हे तर केंद्रातील नेत्यांचे आणि विद्यार्थी चळवळीतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन या यात्रेसाठी घेण्यात आले असून, राज्यातील संपूर्ण युवावर्ग या मोहिमेत जोडला जाईल.
Marathi Rapper RocKsun : मराठमोळा रॅपर रॉक्सनच्या गाण्यांची हिप-हॉपमध्ये क्रेझ
मुंबई: महाराष्ट्राच्या हिप-हॉप क्षेत्रात उदयास आलेला तरुण आणि दमदार आवाज म्हणजे रॉकसन. आपल्या प्रभावी गीतलेखन आणि वास्तववादी मांडणीमुळे रॉक्सनने अल्पावधीतच संगीतप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. रॉक्सनला ६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये नवरदेव बी एस सी ॲग्री या चित्रपटातील “लाल चिखल” या गीतासाठी उत्कृष्ट गीत म्हणून नामांकन मिळालं आहे. त्याने केलेल्या लेटेस्ट फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.२०१७ पासून संगीत आणि रॅपिंग क्षेत्रात सक्रिय असलेल्या रॉक्सनला २०२१ साली प्रदर्शित झालेल्या “गुलाबाच्या फुला” या गाण्यामुळे मोठी ओळख मिळाली. या गाण्याने त्याला महाराष्ट्रात मराठी रॅपर म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली. रॉक्सनची दिग्गज, रक्कम, महान, सल्तनत अशी अनेक मराठी रॅप गाणी प्रसिद्ध आहेत.रॉक्सनच्या संगीताची खासियत म्हणजे सामाजिक विषयांवर आधारित आशयपूर्ण मांडणी. युवकांचे प्रश्न, संघर्ष, आणि वास्तव जीवनातील अनुभव यांना तो आपल्या गाण्यांमधून प्रभावीपणे व्यक्त करतो. पारंपरिक मराठी संस्कृती आणि आधुनिक हिप-हॉप शैली यांचा संगम त्याच्या कामामध्ये स्पष्टपणे दिसून येतो.https://prahaar.in/2026/04/21/operation-sindoor-dont-cross-the-line-india-doesnt-forget-indian-army-suggestive-tweet-on-the-anniversary-of-the-pahalgam-attack/रॅपर रॉक्सन त्याच्या रॅपिंग करिअरविषयी सांगतो, “मी २०१७ पासून संगीत आणि रॅपिंग क्षेत्रात सक्रिय आहे. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या “गुलाबाच्या फुला” या गाण्यामुळे मोठी ओळख मिळाली. मला ६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये “लाल चिखल” या गीतासाठी उत्कृष्ट गीत म्हणून नामांकन मिळालं आहे. “लाल चिखल” हे केवळ एक गाणं नसून, समाजाची एक काळी बाजू आहे. काही चुकीच्या प्रथा, यंत्रणा, समाज शेतकऱ्यांची कशी पिळवणूक करतो हे त्या गाण्यात मांडल आहे. शेतकऱ्यांचं खर आयुष्य मी या गाण्यात दर्शवलं आहे. या गाण्याला नामांकन मिळालं यात मला आनंदच आहे परंतु या समाजाला आणि यंत्रणांना विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांची बाजू लक्षात घेवून जमेल तशी मदत करावी.”आजच्या डिजिटल युगात रॉक्सनने विविध म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर आपली उपस्थिती मजबूत केली आहे. त्याच्या गाण्यांना तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, मराठी हिप-हॉपला नवी उंची देण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा आहे.आगामी काळात रॉक्सनकडून अधिक नाविन्यपूर्ण आणि प्रभावी प्रोजेक्ट्सची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मराठी संगीत क्षेत्रात त्याचा प्रवास प्रेरणादायी ठरत असून, तो नव्या पिढीसाठी एक महत्त्वाचा आवाज म्हणून उदयास येत आहे.
राहुल गांधींना परदेशात जास्त रस वाटू लागला असेल. त्यांना भारताचा कंटाळा आला आहे. ताजी हवा घेण्यासाठी ते परदेशात जातात.
Maharashtra Politics : संजय राऊत यांनी भाजपमध्ये मोठी फूट पडल्याचा दावा केला असून महिला आरक्षण विधेयकाच्या आडून ८५० खासदार करण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे.
Tamil Nadu Election : तमिळनाडूतील प्रचार थंडावला; बहुपक्षीय लढतीत लक्ष मतदान यंत्रांकडे
Tamil Nadu Election : यावेळची निवडणूक लढत प्रामुख्याने दोन प्रमुख आघाड्यांमधील थेट सामना म्हणून पाहिली जात आहे.
नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक, अंधश्रद्धेला खतपाणी घालणे असे गंभीर आरोप खरातवर आहे. सध्या भोंदू खरात कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. खरात याच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाईचा वेग वाढवला असून, त्याच्या बेनामी संपत्तीवर टाच आणण्यासाठी कठोर पाऊल उचलली जात आहेत. त्यामुळे आता अशोक खरातसह त्याच्या कुटुंबीयांचीही अडचण वाढणार आहे.भोंदू खरातकडे कोट्यवधींची मालमत्ता खरातची किमान १५ ते १७ हजार कोटींची संपत्ती असल्याचा अंदाज आहे. यात कोट्यवधीची बेनामी मालमत्ता आहे. प्राथमिक तपासात बेकायदेशीर मार्गाने मिळवलेली मालमत्ता तात्पुरती जप्त (प्रोव्हिजनल अटॅचमेंट) करण्याची प्रक्रिया 'ईडी'कडून राबवली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पुढील टप्प्यात खरातला समन्स बजावून चौकशी, बैंक खात्यांची तपासणी, आर्थिक देवाणघेवाणीचे विश्लेषण आणि आवश्यकता असल्यास अटकेची कारवाईही केली जाऊ शकते. त्यामुळे एसआयटीकडून ईडीकडे खरातचा (Ashok Kharat) ताबा काही दिवसांपुरता जाऊ शकतो. त्यासाठी ईडी न्यायालयाची परवानगी मागणार आहे. सध्या खरात पाचव्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहे.ईडीकडून एक स्वतंत्र गुन्हा खरातवर अगोदरच दाखल झालेला आहे. त्यानंतर त्याच्या घरासह कार्यालयावर ईडीने धाड टाकली होती. या चौकशीत खरातचे प्रॉपर्टी रॅकेट समोर आले होते. त्यात आता खरातशी संबंधित शासनातील काही अधिकारी, खासगी ब्रोकर, पुणे व नाशिकमधील काही विकासक रडारवर आहेत. नाशिक-अहिल्यानगर-पुणे (Nashik-Ahilyanagar-Pune) यादरम्यानचे खरातचे प्रॉपर्टी रॅकेट उघड झाल्यानंतर सोलापूरमध्ये देखील खरातने जमीन लाटल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर ईडीकडून अत्यंत सावध पावले उचलली जात असून पहिल्या टप्प्यात खरातचे बँक खाते तात्पुरते सील करण्यात आले.कुटुंबियांचीही होणार अडचणअशोक खरात आधीच अडचणीत असताना ईडीने जर खरातच्या एखाद्या मालमत्तेवर तात्पुरती टाच (प्रोव्हिजनल अटॅचमेंट) आणली तर त्याचे कुटुंबीय देखील अडचणीत येतील. कारण असे झालयास खरातच्या मालमत्तेबाबत आणि व्यवहारांवर अनेक निर्बंध येतील. महत्त्वाचे म्हणजे संबंधित मालमत्ता खरात जरी तुरुंगात असला तरी त्याच्या कुटुंबातील वारसदारास अन्य कोणालाही विकता येणार नाही तसेच दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरण, गिफ्ट किंवा वसीयतद्वारे बदल करणेही बंद होणार आहे. बँकेत कर्जासाठी खरात व त्याच्या पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता गहाण ठेवता येणार नाही. याशिवाय कागदपत्रांमध्ये फेरफार करणे किंवा मालमत्ता लपवण्याचे प्रयत्न केल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरू शकतो.
नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील नागरिकांना आज सकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने मोठा दिलासा मिळाला. दमट हवामानामुळे पावसाची शक्यता वर्तवली जात असतानाच सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास पनवेलसह नवी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे कामासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रेल्वे स्थानके, मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि चौकांमध्ये अचानक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.दुचाकीस्वारांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून अनेकांनी झाडांच्या आडोशाला किंवा बसथांब्यांवर आसरा घेतला. काही ठिकाणी वाहतुकीवरही तात्पुरता परिणाम झाला. तरीही या सरींसोबत आलेल्या गार वाऱ्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी या पावसाचा मनमुराद आनंद घेतला. लहान मुलांनी तर पावसात भिजत खेळण्याचा आनंद लुटला. मात्र कार्यालयात जाणारे कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी आणि प्रवासी वर्ग यांना पावसामुळे भिजतच प्रवास करावा लागला.https://prahaar.in/2026/04/21/manipur-earthquake-5-2-magnitude-earthquake-hits-manipur-panic-among-citizens/दरम्यान, हवामान खात्याने आधीच उकाड्यासोबतच काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली होती. बदलत्या हवामानामुळे पुढील दोन ते तीन दिवस अशाच हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजचा पाऊस हा केवळ हवामानातील बदल नसून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक ठरला आहे.https://prahaar.in/2026/04/21/ipl-2026-tilak-varma-mumbai-indians-triumph-on-the-back-of-tilak-varmas-magnificent-century/दरम्यान, बदलापूर परिसरातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक त्रस्त झाले होते. अशातच सकाळी ढग दाटून आले आणि गडगडाटासह पावसाने शहराला झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाची विशेष गैरसोय झाली. अनेकांना भिजतच रेल्वे स्थानक गाठावे लागले, तर ग्रामीण भागातही या पावसाचा परिणाम जाणवला. एकूणच, या अवकाळी पावसाने उकाड्यापासून दिलासा दिला असला तरी दैनंदिन जीवनात काही प्रमाणात विस्कळीतपणा निर्माण केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आशय : वीणा सानेकर डहाणू जवळ ऐने नावाचे छोटेसे गाव आहे. या गावात वसलेल्या स्नेहनगरीत जाण्याचा योग नुकताच आला. एका बाजूला क्रीडांगण, नवीनच वसलेले कला कुटिर, सर्वत्र हिरवीगार झाडे, सहअध्ययन केंद्र, मध्यभागी बैठक जमवण्यासाठी मस्त जागा…, दुसरीकडे बैठी शाळा, छोटीशी बाग आणि खेळ…! ही स्नेहनगरी वसवणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ आणि भाषातज्ज्ञ रमेश पानसे यांची भेट म्हणजे समृद्ध करणारा अनुभव! बालशिक्षणात रमलेले पानसे सर शिक्षणाबद्दल तासन् तास बोलू शकतात...’ त्यादिवशी मात्र कवितांच्याच मैफलीचा बेत सरांनी उत्स्फूर्तपणे ठरवला.सगळे नव्याने उभ्या राहिलेल्या पर्णकुटीत जमले. बैठकीची गोल रचना. दिवे लागल्याने प्रकाशाची पखरण वातावरण सुंदर करत होती. सगळे सुचेल तशा कविता म्हणत होते. किती वेगवेगळ्या कवितांचा आनंद सगळे लुटत होते. सोबत अनिताताईंनी केलेली गरमगरम भजी शामदादा समोर ठेवत होते आणि मैफलीला अधिकच रंग चढत होता.यानिमित्ताने आपल्या आवडत्या कविता सगळेच आठवत - शोधत होते.युगामागुनी चालली रे युगे ही कितीदा करावी भास्करा वंचनाकितीकाळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रितीची याचनाही कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत कविता, कुब्जा ही इंदिरा संतांची कविता, बा.भ . बोरकरांची कविता, पु. शि.रेगे, सदानंद रेगे, वसंत आबाजी डहाके, गदिमा, शांता शेळके यांची कविता अशा वेगवेगळ्या कविता उपस्थित जयेश, ज्योती, सुषमाताई, स्नेहल, ईशा, पानसे सर अशा सर्वांनीच सादर केल्या. अधूनमधून कुणी स्वतःच्या जपून ठेवलेल्या कविताही सादर करीत होते.या रंगलेल्या मैफलीत मोजकेच छोटे प्रेक्षक होते. त्यांच्यासाठी विंदा करंदीकरांच्या ‘एटु लोकांचा देश,’ ‘अबबब अबबब केवढा फणस आई’ या बालकविताही सादर झाल्या. मनमोहन नातू, पद्मा गोळे यांच्या कविता ऐकायला मिळणे हा दुर्मिळ आनंद होता. सेल्युलर तुरुंगाची भिंत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यातील संवाद मनमोहन नातू यांच्या कवितेतून साकारला तर ‘मी एक पक्षीण आकाश वेडी दुज्याचे मला भान मुळी नसे’ ही कविता समर्थ स्त्रीचा आत्मस्वर टिपत होती.शब्दांमध्ये जगणे पुन्हा, शब्दांमध्ये मरणे पुन्हा हे अंतहीन समुद्रसे माझा परि दुबळा पसा अशी अवस्था कविता ऐकताना होत होती.‘सई माया सजनीले, सैनच पडेना हे व्हराडी लोकगीत’ ऐकणे आणि ताल धरणे हा अत्यंत वेगळाच आनंद होता. लघुअनियतकालिकांच्या चळवळीचे पानसे सर म्हणजे महत्वाचे साक्षीदार. त्या सगळ्या काळातील वाड्मयीन घडामोडीं विषयी पानसे सर मोकळेपणाने बोलत राहिले. सतीश काळसेकर, मनोहर ओक, गुरुनाथ धुरी यांच्यावर सर भरभरुन बोलत. तसेच मराठीच्या विविध प्राध्यापक व लेखक - कवींच्या आठवणी निघत होत्या. शंकर वैद्य सरांचे अध्यापन आणि त्यांची कविता हा सरांचा आवडता विषय. सरांचा ‘दर्शन’ हा कवितासंग्रह या गप्पांमध्ये पुन्हा पुन्हा आठवत राहिला. एम ए च्या वर्गात असताना सरोजिनी बाई वैदय, शंकर वैद्य सर, डहाके सर, गणोरकर बाई, पुष्पा भावेबाई यांचे वर्ग स्मरत होते. अनपेक्षितपणे जमलेली ही मैफिल कवितांची होती, शब्दांची होती, गीतांची आणि गीतकारांची होती, तितकीच ती माणसांच्या अविस्मरणीय आठवणींची होती.
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले आहे. मस्साजोग गावच्या सरपंच पदाची पोटनिवडणुक ही बिनविरोध होईल अशी चर्चा होती कारण या जागेसाठी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख या उभ्या होत्या मात्र आता ही निवडणूक बिनविरोध होणार नसून अश्विनी संतोष देशमुख आणि स्वरूपानंद विश्वनाथराव देशमुख यांच्यात आता थेट लढत होणार आहे. आणखी ३ उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५ पैकी ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने ही चुरस अधिकच स्पष्ट झाली आहे.'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव' - स्वरूपानंद देशमुखदिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेली जागा ही त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख ( Ashwini Santosh Deshmukh )यांना मिळावी यासाठी अनेक जण आग्रही होते मात्र तसे काही घडले नाही. दरम्यान अश्विनी देशमुख यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, अश्विनी देशमुख या स्वतः हून निवडणूक लढवत नसून त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचा, विशेषतः त्यांच्या दिराचा मोठा दबाव आहे. काहींची राजकीय महत्त्वाकांक्षा आडवी येत असल्याने अश्विनी देशमुख यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला....तर गावासमोर नाक घासेनसरपंच पदाची पोटनिवडणूक २८ एप्रिल रोजी होणार असून २९ एप्रिल रोजी मतमोजणी होईल. दरम्यान स्वरूपानंद देशमुख हे पोटनिवडणुकीत उभे राहिल्याने त्यांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा 'डमी' उमेदवार म्हणून स्वरूपानंद देशमुख उभे राहिले आहेत, असा आरोप त्यांच्यावर केला जात होता. या आरोपाला त्यांनी प्रत्युत्तर देत खुले आव्हान देत म्हटले आहे की जर मी कोणाच्या सांगण्यावरून उभा राहिलो आहे हे सिद्ध झाले, तर सर्व गावासमोर नाक घासून त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे.हीच त्यांना खरी श्रद्धांजलीयापूर्वी मला ग्रामस्थांनी साडेतीन वर्षे काम करण्याची संधी दिली होती. आता पुढील १८ महिन्यांच्या कार्यकाळात संतोष देशमुख यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, असेही स्वरूपानंद देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान एकीकडे सहानभूतीची लाट आणि दुसरीकडे अनुभवाचा दावा यापैकी ग्रामस्थ कोणाला कौल देतील हे निवडणूक निकालात दिसून येईल. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.
Manipur Earthquake : मणिपुरमध्ये ५.२ रिश्टर तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट
मणिपुरच्या अनेक भागांमध्ये आज म्हणजेच मंगळवार २१ एप्रिल रोजी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.२ इतकी नोंदवण्यात आली असून, त्याचे केंद्र कामजोंग जिल्ह्यात होते.नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार, हा भूकंप सकाळी ५.५९ वाजता झाला. धक्के जाणवताच कामजोंग आणि आसपासच्या भागातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि अनेकजण घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाचे केंद्र अक्षांश २४.७०३ उत्तर आणि रेखांश ९४.४१५ पूर्व येथे, सुमारे ६२ किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगण्यात आले. या धक्क्यांचा परिणाम शेजारच्या नागालँड आणि आसाम राज्यांमध्येही जाणवला.https://prahaar.in/2026/04/20/india-south-korea-relations-from-chips-to-ships-india-korea-will-create-new-opportunities-together-prime-minister-narendra-modi/सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. यापूर्वी सोमवारी उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे रात्री ८.३२ वाजता रिश्टर स्केलवर ३ तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याचे केंद्र सुमारे १० किलोमीटर खोलीवर होते. तसेच सोमवारी सकाळी जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे समुद्रात सुमारे ८० सेंटीमीटर उंच लाटा उसळल्या आणि किनाऱ्यावर आदळल्या. त्यानंतर जपानमध्ये सुनामीचा इशाराही देण्यात आला होता.
सौंदर्य आणि प्रतिभेसाठी भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यासपीठ असलेल्या 'मिस इंडिया'च्या ६१ व्या पर्वाचा नुकतेच ऐतिहासिक समारोप झाला. १८ एप्रिल २०२६ रोजी ओडिशाच्या भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीमध्ये झालेल्या अंतिम सोहळ्यात एका नवीन नावाची सुवर्ण अक्षरात नोंद झाली.गोव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साध्वी सतीश सैल हिला 'मिस इंडिया २०२६' चा मुकुट प्रदान करण्यात आला. तिला 'मिस इंडिया २०२४' निकिता पोरवाल हिच्या हस्ते मुकुट प्रदान करण्यात आला. आता ती 'मिस वर्ल्ड २०२७' मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाली आहे.गोव्याची रहिवासी असलेली साध्वी सतीश सेल ही केवळ एक मॉडेलच नाही, तर एक उद्योजिकासुद्धा आहे. तिने अनेक मोठ्या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला आहे आणि अनेक नामांकित ब्रँड्सच्या जाहिरातींचा ती चेहरा राहिली आहे. तिची ओळख केवळ ग्लॅमरच्या जगापुरती मर्यादित नाही; ती बांधकाम आणि विकास क्षेत्रातील एका कंपनीची सह-संस्थापकसुद्धा आहे. तिने अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदवी मिळवली आहे. तिला सात भाषाही येतात. मिस इंडिया बनून तिने सिद्ध केले आहे की ती केवळ सुंदरच नाही, तर खूप हुशारही आहे.आपल्या विजयानंतर, साध्वीने एक अत्यंत भावनिक संदेश शेअर केला. ती म्हणाली की, हा अनुभव तिच्यासाठी केवळ एक स्पर्धा नव्हती, तर मैत्री आणि एकत्र प्रगती करण्याचा एक प्रवास होता. आपल्या सर्व सह-स्पर्धकांना विजेते संबोधत ती म्हणाली की, त्या सर्वांचे ध्येय एकच आहे : जागतिक स्तरावर भारताला गौरव मिळवून देणे.ग्रँड फिनालेच्या रात्री, साध्वी सतीश सेलने आपल्या पोशाख आणि शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या भव्य रात्रीसाठी, साध्वीने सिल्व्हर आणि ब्लॅक रंगाच्या मोनोक्रोमॅटिक गाऊनमध्ये एक धाडसी विधान केले. तिचा गाऊन वास्तुशिल्पीय आणि थोडासा हटके होता. गडद रंगाच्या बेस लेयरवर चांदीच्या रंगाच्या धातूच्या मण्यांचे काम होते, ज्यामुळे एक आकर्षक इल्युजन इफेक्ट तयार झाला होता. गाऊनवरील नक्षीकाम ठळक आणि भौमितिक होते, ज्यामुळे ती गर्दीत उठून दिसत होती. हाय-नेक आणि स्लीव्हलेस कटमुळे तिचे खांदे आणि मोहक देहयष्टी अधिकच खुलून दिसत होती. साध्वीने तिच्या केसांसाठी एक आकर्षक आणि नीटनेटका अंबाडा निवडला होता. या हेअरस्टाईलमुळे तिच्या हाय-नेक गाऊनचे तपशील आणि डिझाइन अधिकच उठून दिसत होते.मिस इंडिया २०२६ च्या अंतिम फेरीच्या परीक्षक मंडळात प्रसिद्ध नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस आणि अभिनेत्री-नर्तिका लॉरेन गॉटलिब यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता. या संध्याकाळने पुन्हा एकदा सिद्ध केले की मिस इंडिया केवळ बाह्य सौंदर्याचे मोजमाप नाही, तर बुद्धिमत्ता आणि नेतृत्वाचा एक उत्सव आहे, ज्याचे प्रतिनिधित्व आता गोव्याची साध्वी सतीश सैल करणार आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भातील प्रयत्न आता अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचले आहे. या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी भारतीय प्रतिनिधीमंडळ या आठवड्यात वॉशिंग्टनला पोहोचत आहे. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती दिली आहे.सर्जिओ गोर यांनी एका ट्विटद्वारे अधिकृत पुष्टी करत सांगितले की, भारतीय व्यापार प्रतिनिधीमंडळ या आठवड्यात वॉशिंग्टनला पोहोचत आहे. या महत्त्वाच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम स्वरूप देणे हा आहे. भारत- अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराशी संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यासाठी विशेष भारतीय व्यापार प्रतिनिधीमंडळ याच आठवड्यात वॉशिंग्टन दौऱ्यावर जाणार आहे.https://prahaar.in/2026/04/21/share-market-stock-market-rises-in-early-trade-sensex-nifty-gains/अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी या दौऱ्याचे स्वागत करत, व्यापार कराराला अंतिम रूप देण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे. या कराराच्या आर्थिक परिणामांवर भाष्य करताना अमेरिकन राजदूत म्हणाले की, हा आगामी करार भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांसाठी ‘विन-विन’ म्हणजेच फायदेशीर ठरणार आहे.अमेरिकन राजदूतांच्या विधानामुळे ट्रम्प प्रशासन हा द्विपक्षीय करार दोन्ही देशांसाठी परस्पर लाभदायक मानत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता उद्योगजगताचे लक्ष या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या बैठका आणि करारावर अंतिम शिक्का कधी बसतो याकडे लागले आहे.
महाराष्ट्रीय साड्या या राज्याच्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासाचा जिवंत पुरावा आहेत. नाजूक जरीकामासाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध पैठणी साडी असो किंवा पारंपरिक महाराष्ट्रीय शैलीत नेसली जाणारी प्रतिष्ठित नऊवारी साडी असो, या साड्या संपूर्ण भारतातील आणि भारताबाहेरील महिलांना आजही मोहित करत आहेत. त्यांच्यातील अभिजातता आणि परंपरेच्या संगमामुळे, कोणत्याही साडीप्रेमीच्या वॉर्डरोबमध्ये त्या असायलाच हव्यात. या लेखात आपण महाराष्ट्रीय साड्यांचे विविध प्रकार, त्यांचे सांस्कृतिक महत्त्व आणि पारंपरिक तसेच आधुनिक अशा दोन्ही लूक्ससाठी तुम्ही त्या कशा स्टाईल करू शकता, याबद्दल जाणून घेऊ या.महाराष्ट्रातील साड्यांचे प्रकारमहाराष्ट्रातील साड्या अत्यंत वैविध्यपूर्ण आहेत, प्रत्येक साडी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून उगम पावते आणि सांस्कृतिक जडणघडणीत तिचे एक खास स्थान आहे. येथे काही सर्वात प्रतिष्ठित प्रकार दिले आहेत :१. पैठणी साडीपैठणी ही महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध साडी आहे. ‘रेशीमची राणी’ म्हणून ओळखली जाणारी ही साडी तिच्या आकर्षक रंगांसाठी, नाजूक हाताने विणलेल्या जरीच्या काठांसाठी आणि मोराची नक्षी असलेल्या पदरासाठी प्रसिद्ध आहे. पारंपरिकरीत्या शुद्ध रेशमापासून बनवलेल्या पैठणी साड्या शतकानुशतके ऐश्वर्य आणि परंपरेचे प्रतीक राहिल्या आहेत.२. नऊवारी साडीनऊवारी साडी, जिला ‘कास्ता’ साडी असेही म्हणतात, तिच्या नेसण्याच्या पद्धतीमुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे. सर्वसाधारण सहा-वारी साडीच्या विपरीत, नऊवारी साडी नऊ-वारी लांब असते आणि तिची नेसण्याची पद्धत पायजम्यासारखी असते, ज्यामुळे महिलांना सहजपणे वावरता येते. ही साडी महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे आणि अनेकदा सण-उत्सव व लग्नसमारंभांमध्ये परिधान केली जाते.३. कोल्हापुरी साडीकोल्हापुरी साड्या साध्या, वजनाने हलक्या असून रोजच्या वापरासाठी किंवा लहान-सहान सणासुदीच्या प्रसंगांसाठी उत्तम आहेत. त्यांचे सुज्ञतापूर्ण लालित्य आणि आरामदायीपणा यामुळे, परंपरा आणि व्यावहारिकता यांचा मेळ घालू इच्छिणाऱ्या महिलांमध्ये त्या लोकप्रिय आहेत.४. नारायण पेठ साडीनारायण पेठ या गावातून उगम पावलेल्या या साड्या, त्यांच्या आकर्षक काठांसाठी ओळखल्या जातात; हे काठ सामान्यतः लाल किंवा काळ्या रंगाचे असून त्यावर बारीक सोनेरी जरीकाम केलेले असते. त्या त्यांच्या मजबूत पोत आणि तेजस्वी रंगांसाठी ओळखल्या जातात, ज्यामुळे धार्मिक विधी आणि सणांसाठी त्या एक लोकप्रिय निवड ठरतात.महाराष्ट्रीय साड्यांचे सांस्कृतिक महत्त्वमहाराष्ट्रातील प्रत्येक प्रकारच्या साडीला एक गहन सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्त्व आहे. या साड्या केवळ वस्त्र नाहीत; त्या राज्याच्या समृद्ध इतिहासाचे आणि कलाकुसरीचे प्रतिबिंब आहेत.हातमागाचा वारसा : पैठणीसारख्या महाराष्ट्रीय साड्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्राचीन तंत्रांचा वापर करून विणल्या जातात. प्रत्येक साडी ही प्रेमाचे प्रतीक असते आणि तिच्या गुंतागुंतीच्या नक्षीकामामुळे व हाताने विणलेल्या स्वरूपामुळे ती पूर्ण होण्यास अनेकदा महिने लागतात.परंपरेचे प्रतीक : लग्न असो, धार्मिक उत्सव असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो, महाराष्ट्रीय साडी नेसणे हे परंपरेप्रती आदराचे प्रतीक मानले जाते. नऊवारीसारख्या साड्यांना महाराष्ट्रीय विवाहसोहळे आणि विधींमध्ये विशेष महत्त्व असून, त्या शालीनता, सामर्थ्य आणि वारसा यांचे प्रतीक मानल्या जातात.महाराष्ट्रीय साड्या कशा स्टाईल कराव्यातमहाराष्ट्रीयन) साड्या बहुगुणी असून वेगवेगळ्या प्रसंगांनुसार त्या विविध प्रकारे नेसता येतात. तुम्हाला पारंपरिक लूक हवा असो किंवा आधुनिकतेचा स्पर्श, या साड्यांमध्ये असंख्य पर्याय उपलब्ध आहेत.पारंपारिक देखावापारंपरिक महाराष्ट्रीयन लूकसाठी, नऊवारी साडी नेसून त्यासोबत नथ, हिरव्या बांगड्या आणि 'चिंचपेटी' नावाचा पारंपरिक मोत्यांचा हार यांसारखे पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने घाला. सांस्कृतिक सौंदर्याचा पुरेपूर अनुभव घेण्यासाठी हा लूक टिकली आणि कोल्हापुरी चपला घालून पूर्ण करा.समकालीन फ्यूजनजर तुम्हाला तुमच्या पैठणी साडीला आधुनिक टच द्यायचा असेल, तर ती एका समकालीन ब्लाउजसोबत परिधान करा -उदाहरणार्थ, कोल्ड शोल्डर किंवा हाय-नेक डिझाइन. लग्नसमारंभ किंवा सणासुदीच्या कार्यक्रमांसाठी योग्य असलेल्या फ्यूजन लूकसाठी तुम्ही कमरेला बेल्ट लावून साडीला आवळू शकता. साडीला अधिक महत्त्व देण्यासाठीकमीत कमी दागिने घाला.सणासुदीचे प्रसंगकोल्हापुरी आणि नारायण पेठ साड्या लहान सणांच्या प्रसंगांसाठी उत्तम आहेत. एक मोहक पण तरीही साधा लूक मिळवण्यासाठी तुम्ही हलका नेकलेस, कानातले आणि साधी टिकली लावू शकता.- प्रतिनिधी
Water Safety: पाणी दिसायला स्वच्छ म्हणजे सुरक्षित असेलच असं नाही!
Water Safety आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहार जितका महत्त्वाचा आहे, तितकेच स्वच्छ पाणी, मोकळी हवा आणि स्वच्छ परिसरही गरजेचे आहेत. पाणी स्वच्छ असेल तर आरोग्य चांगले राहते आणि आरोग्य चांगले असेल तर जीवनात प्रगती होते. म्हणूनच प्रत्येकाने पाण्याच्या स्वच्छतेकडे गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे.
Kalki Koechlin : कल्की कोचलिनने ‘त्या’घटनेनंतर झालेल्या मानसिक आरोग्याबाबत केला खुलासा
Kalki Koechlin : कल्कीचा घटस्फोट झाला तेव्हा तिला भरपूर मानसिक वेदना सहन कराव्या लागल्या.
Pune Water Supply : पुण्याच्या पाणीकपातीवर प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय
पुणे : सूर्याचा प्रकोप हा वाढत जातोय, तापमानाचा पारा इतका वाढलाय की थेट तापमान ४०- ४५ अंशापर्यत जाऊन पोहोचलाय, त्यामुळे पाण्याची वाफ देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे धरणामंधील पाणीसाठा हा कमी होण्याची चिन्हे आहेत. पुण्यात पाणीकपातीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असून प्रशासनाने याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.पुण्यात मुबलक पाणीसाठा पाणीकपाती बाबत महत्वाचा निर्णय घेताना पुणे प्रशासनाने धरणांमधील सध्या पाणीसाठ्याची आधारे घेत आकडेवारीनुसार सध्याचा साठा ११.५ टीएमसी ( ३९ % ) असून गेल्या वर्षी हा साथ १०.४ टीएमसी ( ३६ %) होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १ टीएमसी पाणीसाठा अधिक असल्याने पालिकेचा पाणी कपातीला विरोध आहे. तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांची स्थिती सध्या समाधानकारक आहे.https://prahaar.in/2026/04/16/heatwave-sop-mandates-12-4pm-break-for-informal-workers/अल निनो च्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता असल्याने जलसंपदा विभागाने पुणे पालिकेला १५ % कपात करण्याचे आवाहन केले होते. समाधानकारक पाऊस पडेपर्यंत पाणीकपात चालू ठेवण्याचा प्रस्ताव त्या पत्रात मांडण्यात आला होता. मात्र पालिकेने प्रस्ताप तूर्तास बाजूला ठेवला आहे.https://prahaar.in/2026/04/21/share-market-stock-market-rises-in-early-trade-sensex-nifty-gains/पालिकेच्या म्हणण्यानुसार शहरातील अनेक भागात कमीदाबाने पाणीपुरवठा होत आहे, यावरून नागरिक प्रचंड तक्रार करत आहेत. पाणीकपात हा उपाय नसून वितरण पद्धत सुधारली पाहिजे हे नागरिकांचे मत आहे. पुण्याच्या पाणीकपातीचा निर्णय सध्या बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही बैठक सध्या लांबणीवर आहे. कालवा समितीची बैठक पूर्ण झाल्यानंतरच पुण्यात पाणीकपात करायची की नाही हा प्रश्न मार्गी लागणार आहे.
ट्रम्पकडून ती आनंदवार्ता आली अन् शेअर बाजाराने मोठी उसळी मारली ; नेमकं काय घडलं ?
अमेरिका इराण युद्धामुळे शेअर बाजारात ( Share Market )मोठ्या घडामोडी घडत होत्या. गुंतवणूकदार यामुळे चांगलेच धास्तावाले होते. त्यामुळे शेअर बाजारात देखील मोठी पडझड पहायला मिळत होती. हे युद्ध लवकरात लवकर थांबावे अशी आशा सर्वानाच होती पण कधी अमेरिकेतून तर कधी इराणमधून निराशा समोर येत होती. असे असले तरी सध्या युद्ध काही दिवसांसाठी बंद आहे. अशातच अमेरिकेतून अशी काही गुडन्यूज समोर आली आहे आहे की शेअर बाजारात ( Share Market ) मोठी उसळी दिसून आली. विशेष म्हणजे आखाती देशातील युद्धाची (war )धग कायम असतानाही शेअर बाजाराने मोठी उसळी मारली आहे.आज सकाळी बाजार उघडताच घडले असे काही...आज सकाळी बाजार उघडताच सकाळी 9:20 वाजता, सेन्सेक्स 430 अंकांच्या तेजीसह 78,950 अंकावर व्यापार करत होता. तर निफ्टी 50 हा 117 अंकांच्या उसळीसह 24,480 च्या स्तरावर ट्रेड करत होता. भारत आणि अमेरिका व्यापार कराराविषयी ( India US Trade Deal) मोठी अपडेट समोर आल्यानंतर आखाती युद्धाची भीती झटक्यात बाजूला झाली आणि गुंतवणूकदारांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. आणि गुंतवणुकीस पुन्हा समोर आले. जणू आज मंगळवारी शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे मंगलच मंगल झाले. बीएसई बास्केटमध्ये अदानी पोर्ट (Adani Port) , आयसीआयसीआय बँक (ICICI ), एल अँड टी, बजाज फायनान्स हे टॉप गेनर ठरले.आज सेन्सेक्स आणि निफ्टी सुसाट आज बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी रॉकेटसारखा उडाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्सने 500 अंकाहून अधिक उसळी आली. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज, NSE Nifty ने तेजीचा घोडा दौडवला. 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 96.86 अंक वा 0.12 टक्क्यांच्या तेजीसह उघडला होता. पहिल्या सत्रात सेन्सेक्सने 78,617.16 अंकाची सुरुवात केली. एनएसई निफ्टी 50 ने दिवसाची सुरुवात चांगली झाली. आज निफ्टी 50 हा 9.70 अंक वा 0.04 टक्क्यांच्या उसळीसह 24,374.55 च्या स्तरावर उघडला.अमेरिकेतून आलेल्या वृत्तानुसार, भारत आणि अमेरिकेत व्यापारी करारात ( India US Trade Deal) मोठा बदल पहायला मिळू शकतो. 20 एप्रिलपासूनच याविषयीच्या चर्चा सुरु असून त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे. अमेरिकेन न्यायालयाने टॅरिफ हे बेकायदेशीर म्हटले होते. टॅरिफ (tariff ) रद्द करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान दर्पण जैन यांच्या नेतृत्वात एक डझन भारतीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ अमेरिकन दौऱ्यावर असल्याचे आणि ते अनेक विषयावर चर्चा करणार असल्याचे समोर येत आहे.
संसदेत मांडण्यात आलेले 'नारी शक्ती वंदन' विधेयक पराभूत झाले आणि एका ऐतिहासिक बदलाची संधी हुकली. ८५० जागांपर्यंत संसदेचा विस्तार आणि महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारी ही घटनादुरुस्ती केवळ तांत्रिक कारणास्तव नव्हे, तर राजकीय श्रेयवाद आणि जुन्या पुरुषी मानसिकतेच्या पेचप्रसंगात अडकली.१७एप्रिल २०२६ हा दिवस भारतीय इतिहासातील आणि विशेषतः महिलांच्या अधिकारांच्या संदर्भात एक 'काळा दिवस' म्हणून गणला जाईल. संसदेच्या जागांची संख्या ८५० करणारी आणि वैधानिक संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारी महत्त्वपूर्ण घटनादुरुस्ती संसदेत पराभूत झाली. महिलांप्रती देशात सन्मानाची भावना निर्माण करू शकणारे हे विधेयक संसदेने हाणून पाडले. या दुर्दैवी घटनेला जबाबदार कोण? तर तीच जुनी पुरुषी मानसिकता आणि भाजपला विरोध करण्याच्या नावाखाली एकत्र आलेली काँग्रेस व तिचे साथीदार पक्ष. विरोधकांनी स्वतःच्या क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी एक ऐतिहासिक संधी गमावली आहे. आज जरी विरोधक मोदींना पराभूत केले म्हणून आनंदात असले तरीही त्यांना याचा जाब द्यावा लागेल. महिलांना मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी झगडावे लागले आहे आणि ब्रिटनमध्येही महिलांना आधी मतदानाचा हक्क नव्हता. त्यांच्याकडे मोठ्या चळवळी झाल्या आणि महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. भारतीय महिलांच्या बाबतीत हाच पुरुषी मानसिकतेचा अनुभव येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारतीय महिलांना मतदानाचा हक्क मिळाला; मात्र पुरुषी मानसिकता आड आली आणि महिलांना प्रतिनिधित्व देण्याच्या बाबतीत तीच मानसिकता कारण ठरली. ती आजही ठरत आहे. ६० कोटी भारतीय महिलांचे हक्क आणि स्वप्ने विधेयक पराभूत झाल्यामुळे चिरडली गेली आहेत.मोदी यांनी या विधेयकाची काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी भ्रूणहत्या केली असे म्हटले. त्यात असत्य काहीच नाही. कारण काँग्रेस प्रथमपासूनच महिलांविरोधी होती आणि आजही आहे. हेच राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून दाखवून दिले. त्यांनी दक्षिणेतील राज्यांना कमी प्रतिनिधित्व देण्याचा भाजपचा डाव आहे हे सांगण्यासाठी या विधेयकाची हत्या केली. पण राहुल यांची आजी इंदिरा गांधी या पंतप्रधान झाल्या, त्या महिलांना प्रतिनिधित्व देण्यात आल्यामुळे हे राहुल विसरले. वास्तविक 'नारी शक्ती वंदन' अधिनियमामुळे भारताच्या नारीशक्तीला तिचा उचित सन्मान आणि योग्य हक्क दिले जाणार होते. कारण हा कायदा महिलांची सामाजिक जबाबदारी निश्चित करण्याबरोबरच सामाजिक चेतनाही आणणार होता. मोदी सरकारची धोरणे महिलांप्रती अत्यंत अनुकूल आहेत. पण विरोधकांना हे सहन होणारे नाही. त्यामुळे त्यांनी दक्षिणेतील राज्यांचा आधार घेत हे विधेयक हाणून पाडले. जेव्हा मुलींची भ्रूणहत्या करण्यात येते तेव्हा ती मानसिकता अशा बदलांनी पराभूत होते. मोदी सरकारला हेच हवे होते; मात्र काँग्रेस आणि विरोधी मानसिकतेला ते नको होते. आता भारत विकसित देश होण्याच्या दिशेने निघाला आहे आणि या परिस्थितीत महिलांना त्यांचे उचित आणि योग्य हक्क दिले असते, तर ते जास्त योग्य दिसले असते. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता असे एक संस्कृत वचन आहे. म्हणजे जेथे नारीचे पूजन केले जाते तेथे देवताही रमतात. पण अर्थात काँग्रेस आणि त्यांच्या नतद्रष्ट साथीदारांना इतके उच्च विचार कसे सुचतील. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भात्यातील एकमेव बाण काढला आणि एकी करून विधेयक हाणून पाडले.महिला आरक्षण विधेयक नवा विचार नव्हता, पण मोदी यांच्या नेतृत्वाची खरी परीक्षा होती. आता हे विधेयक जरी हाणून पाडण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाले असले तरीही त्यांना महिला मतदार क्षमा करणार नाहीत. त्या पुढील निवडणुकीत जरूर धडा शिकवतील. कारण या विरोधी पक्षांनी महिलांचा अक्षम्य अपराध केला आहे. सामाजिक मानसिकता बदलण्याची ताकद या विधेयकात होती. महिला आरक्षण विधेयक प्रथम १९९० पासून मांडले होते पण कधी पक्षीय राजकारणाच्या भिंतींना ते धडकून पुढे सरकले नाही. पंचायत समित्यांमध्ये ते लागू करण्यात आले आणि महिलांना काही प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले. पण तेथेही पुरुषच महिलांवर अधिराज्य गाजवत. महिलांना आरक्षण देण्याची तरतूद या विधेयकात होती; मात्र २९८ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने, तर २३० सदस्यांनी प्रतिकूल मत दिल्याने विधेयक पराभूत झाले. पण हा पराभव मोदींचा नाही तर तो विरोधकांचा आहे. या विधेयकाच्या बरोबरीने २०२६-२७ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचनेचा प्रश्न होता आणि याचाच आधार घेत विरोधकांनी विधेयकाच्या विरोधी मतदान केले. कोटामुळे राजकीय प्रतिनिधित्व कमी होईल अशी भीती दक्षिणेतील राज्ये आणि तृणमूल काँग्रेस यांनी घेतली. भाजपचा हा निवडणुकीचे प्रतिनिधित्वाची पुनर्रचना करण्याचा डाव आहे असा आरोप या पक्षांनी केला. पण भाजपचा प्रत्यारोप असा होता की, विरोधी पक्ष महिला विरोधी आणि दुर्बल घटक विरोधी आहेत. तसेच महिलांना योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी हा प्रयोग आवश्यक आहे.गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहाला असे आश्वासन दिले होते, की ८१६ सदस्यांच्या सभागृहात दक्षिणेतील राज्यांचे प्रतिनिधित्व आता आहे तितकेच राहील. पण विरोधक हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यांनी विधेयक पराभूत केले. विरोधक आणि सत्ताधारी पक्ष या परिसीमन विधेयकावरून संघर्ष करत आहेत. त्यात विरोधक विधेयक पराभूत करण्यात यशस्वी झाले आहेत. पण महिला आरक्षण आणि परिसीमन हे एकमेकांशी निगडित आहेत आणि हे विरोकांच्या ध्यानी आलेले नाही. मोदी सरकारचा हा संसदेत पहिलाच पराभव आहे. महिलांना जेव्हा आपले खरे द्रोही कोण आहेत हे लक्षात येईल तेव्हा त्या काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. विरोधकांनी प्रगतीपेक्षा राजकारणाचा पर्याय निवडला आहे. त्याची शिक्षा त्यांना महिला मतदार देतीलच. पण या विधेयकाने काँग्रेस आणि पुरुषी मानसिकतेची शिकार असलेल्यांचे खरे कारनामे उघड झाले आहेत.
सौर ऊर्जेने उजळतोय दक्षिण महाराष्ट्र
वार्तापत्र : दक्षिण महाराष्ट्रजागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग आता शाश्वत ऊर्जेकडे वळत आहे. भारतानेही अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, यामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रगण्य भूमिका बजावत आहे.महाराष्ट्रात स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने मोठी झेप घेतली जात असून सौर ऊर्जेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात मोठी ऊर्जा क्रांती घडत आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प, सौर कृषी वाहिनी योजना, तसेच महावितरणच्या विविध उपक्रमांमुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर या दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय प्रगती दिसून येत आहे.राज्यात सौर ऊर्जेची एकूण क्षमता ८,४५० मेगावॅटपर्यंत पोहोचली असून सातारा हा जिल्हा या क्षेत्रात आघाडीवर असल्याचे दिसत. यामुळे केवळ ऊर्जा उत्पादन वाढले नाही, तर पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्वही कमी झाले आहे. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत महावितरण या राज्याच्या प्रमुख वितरण कंपनीची महत्त्वाची भूमिका आहे. ही कंपनी राज्यातील हजारो गावांपर्यंत वीज पुरवठा करते. सौर प्रकल्पांना जोडून ऊर्जा वितरण अधिक सक्षम बनवत आहे.सातारा जिल्हा सौरग्राम संकल्पनेत विशेष अग्रेसर आहे. साताऱ्यातील मान्याचीवाडी हे राज्यातील पहिले सौरग्राम ठरले आहे. येथे संपूर्ण गावाची विजेची गरज सौर ऊर्जेद्वारे पूर्ण केली जाते. या संकल्पनेमुळे ग्रामीण भागात २४ तास वीजपुरवठा शक्य झाला असून शाळा, अंगणवाडी, शेती सिंचन आणि घरगुती वापरासाठी हक्काची वीज उपलब्ध झाली आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही सौर कृषी वाहिनी योजना आणि रूफटॉप सोलर प्रकल्पांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)मार्फत शेतकऱ्यांना सौर पंप आणि सिंचनासाठी सौर प्रणाली उपलब्ध करून दिली जात आहे. सौर पंपांमुळे शेतकऱ्यांचा वीज खर्च शून्यावर आला असून, विजेसाठी पावसावर किंवा रात्रीच्या वीज पुरवठ्यावर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही.सौर ऊर्जेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कार्बन उत्सर्जनात होणारी घट आणि पर्यावरण संरक्षण. ग्रामीण भागातील वीज खंडित होण्याचे प्रकार कमी होऊन सातत्यपूर्ण पुरवठा मिळत आहे. तसेच, 'प्रधानमंत्री सूर्यघर योजना' आणि राज्य शासनाच्या अनुदानामुळे घरांवर सौर पॅनल बसवणे सर्वसामान्यांना परवडणारे झाले आहे. ३ किलोवॅटपर्यंतच्या सोलर प्रणालीवर ४०% पर्यंत अनुदान मिळत असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा मोठा आर्थिक लाभ होत आहे.दक्षिण महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे स्थानिक रोजगारनिर्मितीलाही चालना मिळाली आहे. सोलर पॅनल बसवणे, देखभाल आणि तांत्रिक सेवा या क्षेत्रांत नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. उद्योग आणि शेती क्षेत्राला स्वस्त वीज उपलब्ध झाल्याने त्यांची उत्पादनक्षमता वाढली आहे. एकूणच, मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प आणि संबंधित योजनांमुळे दक्षिण महाराष्ट्रात सकारात्मक परिवर्तन होत आहे. येत्या काळात या प्रकल्पांचा विस्तार अधिक वेगाने झाल्यास ऊर्जेत आत्मनिर्भर दक्षिण महाराष्ट्र ही संकल्पना लवकरच वास्तवात येईल.
- भारतीय लष्कराकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवणमुंबई : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ हिंदू पर्यटकांचे टार्गेट किलींग केले होते. या भ्याड हल्ल्याची उद्या म्हणजेच बुधवार २२ एप्रिल रोजी वर्षपूर्ती असून त्याच्या पूर्वसंध्येला भारतीय लष्कराने ट्विटरव (एक्स) पोस्ट करत “मर्यादा ओलांडू नका, भारत विसरत नाही” असे सांगत ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवण करवून दिली आहे.यासंदर्भातील पोस्टमध्ये भारतीय सेनेने नमूद केले की, “जेव्हा मानवतेच्या मर्यादा ओलांडल्या जातात, तेव्हा उत्तरही ठाम आणि निर्णायक असते. न्याय मिळाला आहे. भारत एकजूट आहे.” यासोबतच एका ग्राफिकमध्ये “काही मर्यादा कधीही ओलांडल्या जाऊ नयेत. भारत विसरत नाही,” असा संदेश देण्यात आला.https://prahaar.in/2026/04/21/pune-water-supply-administration-takes-this-important-decision-regarding-water-cuts-in-pune/पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली होती. भारतीय सेनेने पाकिस्तान तसेच पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले चढवले. या कारवाईदरम्यान ९ प्रमुख दहशतवादी लॉन्चपॅड उद्ध्वस्त करण्यात आले आणि लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद व हिज्बुल मुजाहिदीन यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आले. या लष्करी कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये ४ दिवस तणावपूर्ण संघर्ष सुरू राहिला. मोठे नुकसान सहन केल्यानंतर पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधत युद्धविरामाची विनंती केली. पाकिस्तानच्या विनवणीनंतर अखेर १० मे रोजी दोन्ही बाजूंमध्ये युद्धविरामावर सहमती झाली.When boundaries of humanity are crossed, the response is decisive.Justice is Served.India Stands United.#SindoorAnniversary #JusticeEndures #NationFirst pic.twitter.com/rtgYu9Hg11— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) April 21, 2026https://prahaar.in/2026/04/21/iran-us-conflict-will-jd-vance-visit-pakistan-uncertainty-persists-ahead-of-iran-us-talks/सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक करत ते स्पष्ट राजकीय निर्देशांखाली तिन्ही सैन्यदलांमधील उत्कृष्ट समन्वयाचे उदाहरण असल्याचे म्हटले होते. तसेच, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन सुदर्शन चक्र’ची घोषणा केली होती. या मोहिमेचा उद्देश शत्रूच्या घुसखोरीला आळा घालणे आणि भारताच्या आक्रमक क्षमतांमध्ये वाढ करणे हा आहे.
आखाती युद्ध केवळ भूराजकीय संघर्ष नसून जागतिक अर्थव्यवस्थेच्या मुळावर घाव घालणारे संकट ठरते. तेलाच्या किमतींपासून रोजगारापर्यंत प्रत्येक स्तरावर त्याचे परिणाम दिसून येतात. अशा वेळी दीर्घकालीन उपाययोजना, पर्यायी ऊर्जा स्रोतांचा विकास, आर्थिक स्वावलंबन आणि स्थिर धोरणे यांची गरज अधिक तीव्रतेने जाणवते. अन्यथा, प्रत्येक जागतिक संघर्षासोबत अर्थव्यवस्थेची हीच घसरण पुन्हा पुन्हा अनुभवावी लागेल.आखाती प्रदेशातील युद्ध हे केवळ दोन-तीन देशांपुरते मर्यादित राहात नाही, तर त्याचे पडसाद संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर उमटतात. तेलसंपन्न आखाती देश जागतिक ऊर्जा पुरवठ्याचे केंद्र असल्यामुळे तेथील अस्थिरता ही थेट आर्थिक अस्थिरतेत रूपांतरित होते. अशा युद्धपरिस्थितीत सर्वप्रथम फटका बसतो तो कच्च्या तेलाच्या किमतींना. तेलाच्या किमती झपाट्याने वाढू लागल्या की वाहतूक, उत्पादन, वीजनिर्मिती अशा सर्वच क्षेत्रांवर परिणाम होतो आणि महागाईचा भडका उडतो. भारतासारख्या तेलआयात-निर्भर देशासाठी ही परिस्थिती अधिकच गंभीर ठरते. आयातीवरील खर्च वाढल्याने चालू खाते तुटीवर ताण आता येतो, रुपयाचे अवमूल्यन होते आणि सरकारसमोर आर्थिक संतुलन राखण्याचे मोठे आव्हान उभे राहते. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होतो, तर उद्योगक्षेत्रासाठी उत्पादनखर्च वाढतो. परिणामी, बाजारातील मागणी घटते आणि आर्थिक वाढीचा वेग मंदावतो. या पार्श्वभूमीवर कॉर्पोरेट कंपन्यांच्या नफ्यावर मोठा परिणाम दिसून येतो. उत्पादनखर्च वाढणे, कच्च्या मालाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होणे आणि जागतिक मागणीत घट होणे या कारणांमुळे कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण कमी होते. अनेक कंपन्यांना खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात. त्यात नवीन प्रकल्पांना स्थगिती देणे, विस्तार योजनांना ब्रेक लावणे किंवा कर्मचाऱ्यांची कपात करणे यांचा समावेश असतो. अशा परिस्थितीत कॉर्पोरेट क्षेत्राची जोखीम घेण्याची क्षमता कमी होते आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे निर्णय पुढे ढकलले जातात. असे गंभीर परिणाम होत असल्याने परिस्थितीचा वेध घ्यायला हवा.युद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता ही गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा अडथळा असते. देशांतर्गत तसेच परदेशी गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळतात. शेअर बाजारात चढ-उतार वाढतात. भांडवली बाजारातील विश्वास कमी होतो आणि नवीन गुंतवणुकीचा ओघ मंदावतो. परकीय गुंतवणूक घटल्यास तंत्रज्ञान हस्तांतरण, रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक वाढ यांवरही नकारात्मक परिणाम होतो. या सर्व प्रक्रियेचा फटका बसतो तो रोजगार क्षेत्राला. उद्योगांमध्ये उत्पादन कमी झाले, गुंतवणूक थांबली आणि नफा घटला की कंपन्या सर्वप्रथम मनुष्यबळावर गदा आणतात. नवीन भरती थांबते, कंत्राटी कर्मचाऱ्यांची कपात होते आणि काही वेळा कायमस्वरूपी नोकरकपातही केली जाते. सेवाक्षेत्रातही याचा परिणाम जाणवतो, कारण ग्राहकांचा खर्च कमी झाल्याने व्यवसायांवर ताण वाढतो. परिणामी मध्यमवर्गीय तसेच निम्नवर्गीय कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटते. युद्धाचा परिणाम केवळ थेट आर्थिक आकड्यांपुरता मर्यादित राहत नाही, तर समाजाच्या मानसिकतेवरही परिणाम करतो. अनिश्चिततेमुळे लोक खर्च करण्यापेक्षा बचतीकडे वळतात. त्यामुळे बाजारातील मागणी आणखी घटते. हीच साखळी अर्थव्यवस्थेच्या मंदीला अधिक गती देते. जागतिक स्तरावर व्यापारमार्गांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास निर्यात-आयात व्यवहारांवरही परिणाम होतो आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेलाच धक्का बसतो. अशा परिस्थितीत सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहते. महागाई नियंत्रणात ठेवणे, आर्थिक वाढ टिकवून ठेवणे आणि रोजगारनिर्मितीला चालना देणे या तिन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य करणे कठीण होते.यातून वित्तीय तूट वाढण्याचा धोका निर्माण होतो, तर सामाजिक कल्याण योजनांवरील खर्च वाढवण्याची गरजही भासते. त्यामुळे आर्थिक धोरणे आखताना संतुलन साधणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. पश्चिम आशियातील इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यातील भीषण संकटाच्या छाया आता भारतीय अर्थव्यवस्थेवर पडू लागल्या आहेत. या युद्धाचा फारसा परिणाम होणार नाही आणि आम्ही विशेष काळजी घेतली आहे, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात येत असले, तरी इतर देशांप्रमाणे भारतावरही विपरीत परिणाम होणार आहे, हे स्पष्ट आहे. ‘मूडीज’ या जागतिक पतमानांकन संस्थेने २०२६-२७ साठी भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या, म्हणजेच जीडीपीच्या वाढीचा अंदाज ६.८ टक्क्यांवरून ६ टक्के इतका खाली आणला आहे. याचे कारण या युद्धामुळे होर्मुझ खाडीमधील वाहतूक अनेक देशांसाठी बंद झाली आणि अन्यत्रही क्षेपणास्त्र हल्ले सुरू असल्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली. भारताला लागणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी ५५ आणि एलपीजीपैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त पुरवठा याच युद्धग्रस्त भागातून होतो. खतांच्या आयातीवर परिणाम झाल्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२४-२५ मध्ये २.४ टक्के असलेली सरासरी महागाई आता ४.८ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. यापूर्वी, म्हणजे १९७३ मध्ये तेल निर्यातदार राष्ट्रांनी अचानकपणे इंधनाचे दर वाढवल्यामुळे भारतावर महासंकट कोसळले होते. त्यावेळी याच्या परिणामी, तसेच सातत्याच्या दुष्काळामुळे भाववाढीचे संकट कोसळले होते.आजघडीला भारताची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूपच चांगली आहे. अन्नधान्याची टंचाई केव्हाच दूर झाली आहे. परंतु तरीही आताचा काळ जागतिकीकरणाचा असल्यामुळे पूर्वीपेक्षा आता युद्धजन्य स्थितीचे फटकेही जास्त बसण्याची शक्यता असते. याचे कारण परदेशांतून भारतात येणाऱ्या पैशांपैकी ४० टक्के वाटा हा आखाती देशातून येतो. त्याचप्रमाणे उदारीकरणानंतर जागतिक व्यापारातील भारताचा हिस्सा हळूहळू वाढत आहे आणि वेगवेगळ्या वस्तूंची व सेवांची निर्यात भारत करू लागला आहे. युद्धाच्या वणव्यामुळे अमेरिकेतील इंधनदराने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. युद्धापूर्वी तीन डॉलर प्रति गॅलनच्या खाली असलेले पेट्रोल दर चार डॉलरच्या पार गेले. तर मालवाहतुकीसाठी कणा मानल्या जाणाऱ्या डिझेलच्या किमतीत युद्ध सुरू झाल्यापासून ४७ टक्क्यांची वाढ झाली आणि त्याचे दर ५.५०डॉलर प्रति गॅलनपर्यंत पोहोचले. युरिया आणि खतांच्या किमती वाढल्याने अमेरिकन शेतकऱ्यांवर सुमारे ५० हजार डॉलर्सचा अतिरिक्त बोजा पडला आहे. त्याचप्रमाणे कम्प्युटर चिप्स बनवण्यासाठी लागणाऱ्या हेलियम वायूचा ३५ टक्के पुरवठा कतारमधून होतो. हा पुरवठा थांबल्याने सिलिकॉन व्हॅलीतील टेक कंपन्यांवर मोठे संकट कोसळले आहे. रुग्णालयातील एमआरआय उपकरणासाठी हेलियम अनिवार्य असतो, ज्याची टंचाई आता दूर व्हायला हवी. होर्मुझची नाकेबंदी अधिक काळ सुरू राहिल्यास अमेरिकेमध्ये मंदी येणे अटळ आहे. अमेरिकेचा २०२६ मधील विकासदर २.६ टक्क्यांवरून थेट एक टक्क्यावर येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याचा अर्थ अमेरिका पुन्हा एकदा १९७०च्या दशकातील ‘स्टॅगफ्लेशन’सारख्या परिस्थितीत पोहोचू शकते. अशा परिस्थितीत विकासदर कमी आणि महागाई जास्त असते. शिवाय युद्ध थांबले तरी बंद झालेल्या तेलविहिरी पुन्हा सुरू होण्यासाठी अनेक महिने लागतात. तसेच युद्धात उद्ध्वस्त झालेल्या पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीला काही वर्षे लागू शकतात. त्यामुळे इंधन दर पूर्वीच्या स्तरावर येथे येण्याची शक्यता कमीच आहे. अमेरिकेची स्थिती अशी राहिल्यास भारतासारख्या मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांनाही चटके बसणार, हे स्पष्ट आहे. वास्तविक, यापूर्वी देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये पैशांचा ओघ वाढला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सर्वसामान्य नागरिक असो वा मोठे उद्योग समूह, आपल्या गरजा आणि विस्तारासाठी बँकांकडे कर्ज मागणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. देशातील ९५ टक्के बाजारपेठ व्यापणाऱ्या ४१ प्रमुख बँकांकडून गोळा केलेल्या माहितीनुसार, उद्योगांना देण्यात येणाऱ्या कर्जामध्ये मोठी झेप पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षी उद्योगांची कर्जवृद्धी केवळ साडेसाते टक्के होती. ती आता वाढून १३.५ टक्के झाली आहे. पायाभूत सुविधा अभियांत्रिकी, रसायने, पेट्रोलियम आणि कापड उद्योगांतून कर्जाची सर्वाधिक मागणी दिसून आली आहे. या क्षेत्रात १६.१६ टक्के वाढ झाली असून, प्रामुख्याने एनबीएफसी आणि कमर्शियल रियल इस्टेट क्षेत्राकडून मोठी मागणी आली आहे. वैयक्तिक कर्ज विभागात १५ टक्क्यांची वाढ झाली आहे गृहकर्जामध्ये स्थिरता दिसत असली, तरी वाहनकर्ज आणि गोल्ड लोन घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.अर्थात ही आकडेवारी युद्धापूर्वीची, फेब्रुवारी महिन्यातील आहे. त्यानंतरच्या परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक पडला आहे. त्यामुळे बदलत्या स्थितीत कॉर्पोरेट क्षेत्राचे नफे १५ टक्क्यांनी तरी कमी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कंपन्यांचे नफे पावणेतीन लाख कोटी रुपयांनी, म्हणजेच जीडीपीच्या ०.८ टक्क्यांनी घटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेने व्यक्त केला आहे.
Sharad Pawar : शरद पवार पुन्हा रुग्णालयात; सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत महत्वाची माहिती
Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृतीच्या कारणास्तव मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Vidya Balan : चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.
Share Market : सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ
मुंबई : देशांतर्गत शेअर बाजारात आज (मंगळवार, २१ एप्रिल) सुरुवातीच्या व्यवहारात तेजीचा कल दिसून येत आहे. व्यवहारांची सुरुवात किंचित वाढीने झाली. बाजार उघडल्यानंतर लगेचच खरेदीदारांनी खरेदीचा सपाटा सुरू केला, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी वाढ झाली. सकाळी १०:०० वाजेपर्यंत, सेन्सेक्स ०.६३ टक्क्यांनी आणि निफ्टी ०.५६ टक्क्यांनी वधारला होता.शेअर बाजारातील दिग्गज कंपन्यांमध्ये, नेस्ले इंडिया, ॲक्सिस बँक, एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स यांचे शेअर्स १.६८ टक्के ते ०.७२ टक्क्यांपर्यंतच्या वाढीसह व्यवहार करत होते. दुसरीकडे, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी लाइफ, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, इन्फोसिस आणि जिओ फायनान्शिअल यांचे शेअर्स ३.१९ टक्के ते ०.५० टक्क्यांपर्यंतच्या घसरणीसह व्यवहार करत होते.आजच्या व्यवहारानुसार, शेअर बाजारात २,७१७ शेअर्समध्ये सक्रिय व्यवहार सुरू होते. यापैकी २,१६९ शेअर्समध्ये वाढ झाली, तर ५४८ शेअर्समध्ये घट झाली. त्याचप्रमाणे, सेन्सेक्समधील ३० पैकी २७ शेअर्स खरेदीच्या पाठिंब्यामुळे तेजीत राहिले. दुसरीकडे, विक्रीच्या दबावामुळे तीन शेअर्समध्ये घट झाली. निफ्टीमधील ५० पैकी ४२ शेअर्समध्ये वाढ झाली, तर आठ शेअर्समध्ये घट झाली.बीएसई सेन्सेक्स आज ९६.८६ अंकांच्या वाढीसह ७८,६१७.१६ अंकांवर उघडला. व्यवहार सुरू झाल्यानंतर लगेचच खरेदीदारांनी खरेदी सुरू केली, ज्यामुळे निर्देशांकाच्या हालचालीला चालना मिळाली. तथापि, नफावसुलीच्या उद्देशाने अधूनमधून विक्रीचे सत्रही सुरू होते. असे असूनही, निर्देशांकाच्या हालचालीवर लक्षणीय परिणाम झाला नाही. बाजारात सुरू असलेल्या खरेदी-विक्रीच्या पार्श्वभूमीवर, सकाळी १० वाजेपर्यंत सेन्सेक्स ४९२.२७ अंकांनी वाढून ७९,०१२.५७ अंकांवर व्यवहार करत होता.https://prahaar.in/2026/04/21/mumbai-local-update-central-railway-services-disrupted-for-the-second-consecutive-day-massive-crowds-at-diva-station/सेन्सेक्सप्रमाणेच, एनएसई निफ्टीनेही आज ९.७० अंकांच्या किंचित वाढीसह २४,३७४.५५ अंकांवर व्यवहाराला सुरुवात केली. बाजार उघडताच, निर्देशांक घसरून २४,३५४.९० अंकांवर पोहोचला. त्यानंतर, खरेदीदारांनी आपली खरेदी तीव्र करून निफ्टीच्या हालचालीला चालना दिली. खरेदीच्या पाठिंब्याने, निर्देशांक २४,५१२.३५ अंकांपर्यंत उसळी घेऊन पोहोचला. यानंतर, नफावसुलीच्या विक्रीमुळे त्याच्या हालचालीतही किंचित घट झाली. बाजारात सुरू असलेल्या खरेदी-विक्रीच्या पार्श्वभूमीवर, सकाळी १० वाजेपर्यंतच्या व्यवहारानंतर, निफ्टी १३६.३० अंकांच्या वाढीसह २४,५०१.१५ अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.तत्पूर्वी, आदल्या दिवशी, सोमवारी, सेन्सेक्स २६.२७ अंकांच्या म्हणजेच ०.०३ टक्क्यांच्या वाढीसह ७८,५२०.३० अंकांच्या पातळीवर बंद झाला होता. तर निफ्टी सोमवारी ११.३० अंकांच्या म्हणजेच ०.०५ टक्क्यांच्या वाढीसह २४,३६४.८५ अंकांच्या पातळीवर बंद झाला होता.
Airtel Recharge: एअरटेलचा 84 दिवसांचा प्लान महाग; ग्राहकांना पुन्हा बसला झटका
Airtel Recharge नव्या 899 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना पूर्वीसारखेच फायदे मिळणार आहेत. या प्लानमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते. तसेच अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि नॅशनल रोमिंग कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय दररोज 100 एसएमएसही मिळतात.
Yusuf Pathan : भायखळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत खालिद खान, उमरशाद खान आणि शोएब खान यांना अटक केली.
Donald Trump: युद्ध थांबणार की भडकणार? ट्रम्प यांच्या वक्तव्याने वाढली चिंता
Donald Trump ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढला तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो. विशेषतः तेलाच्या किमती, व्यापार आणि जागतिक स्थैर्यावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Hungary PM Peter Magyar : ICC ने बेंजामिन नेतन्याहू आणि इस्रायलचे माजी संरक्षण मंत्री योव गॅलँट यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते.
Mumbai Local Update : दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वे विस्कळीत; दिवा स्थानकात प्रचंड गर्दी
ठाणे : मध्य रेल्वेमार्गावरील डोंबिवली रेल्वे स्थानक येथे सोमवारी लोकल ट्रेनचा डबा रुळावरून घसरून झालेल्या अपघाताचा परिणाम दुसऱ्या दिवशीही कायम असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.विशेषतः दिवा रेल्वे स्थानक येथे सकाळपासूनच प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. स्थानकाच्या दोन्ही फलाटांवर टोकापर्यंत खच्चून भरलेली गर्दी दिसून येत होती. महिला प्रवाशांची संख्याही लक्षणीय होती. या गर्दीचे छायाचित्रे सध्या सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असून परिस्थितीची गंभीरता अधोरेखित करत आहेत.https://prahaar.in/2026/04/20/mumbai-local-empty-local-coach-derails-in-dombivli-train-schedule-disrupted/दरम्यान, सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल ट्रेन सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी झालेल्या अपघातानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच खर्डी स्थानकाजवळ रात्री आवश्यक दुरुस्ती कामांसाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. हा ब्लॉक पहाटे तीन वाजता संपून सेवा पूर्ववत होणे अपेक्षित होते, मात्र तो सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहिल्यामुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक ठप्प झाली.https://prahaar.in/2026/04/21/mumbai-against-drugs-mumbai-against-drugs-campaign-to-launch-in-mumbai-starting-may-1-2026-decision-reached-today-during-a-meeting-chaired-by-guardian-minister/या सर्व घडामोडींमुळे मंगळवारीही मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला असून प्रवाशांना उशिरा धावणाऱ्या गाड्यांचा फटका बसत आहे. रेल्वे प्रशासनाने परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले असले तरी सध्या तरी प्रवाशांना गर्दी आणि विलंबाचा सामना करावा लागत आहे.
Iran - America War : जेडी वॅन्स पाकिस्तानला जाणार का? इराण- अमेरिका चर्चेपूर्वी अनिश्चितता कायम
वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला असून, कूटनीती आणि संघर्ष यांच्या दरम्यान थेट युद्धाची शक्यता निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानमध्ये प्रस्तावित दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी आपले विशेष दूत स्टीव विटकॉफ आणि जॅरेड कुशनर यांना इस्लामाबादला पाठवले आहे. मात्र, या चर्चेबाबतचे चित्र अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. कारण या बैठकीत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स सहभागी होणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.एका बाजूला ट्रम्प यांनी स्टीव विटकॉफ आणि जॅरेड कुशनर यांना इस्लामाबादला पाठवून निर्णायक लढाई आता चर्चेच्या टेबलावर लढली जाईल, असा स्पष्ट संदेश दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यावरचे अनिश्चिततेचे सावट या चर्चेची गंभीरता आणि रणनीती यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.https://prahaar.in/2026/04/20/iran-america-war-did-america-seize-an-iranian-cargo-ship/माहितीनुसार, उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स अद्याप अमेरिकेतून रवाना झालेले नाहीत. वॅन्स सध्या अमेरिकेतच आहेत आणि त्यांच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत कोणतीही स्पष्ट पुष्टी झालेली नाही. यावरून चर्चेची तयारी अद्याप पूर्णपणे अंतिम झालेली नसल्याचे संकेत मिळतात. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, जेडी वॅन्स मंगळवारी पाकिस्तान दौऱ्यावर जाऊ शकतात. तेथे इराणशी संबंधित मुद्द्यांवर नव्या फेरीची चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, इराणने अद्याप या चर्चेत सहभागी होण्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. त्यामुळे अनिश्चितता कायम आहे.दरम्यान चर्चेबाबत केवळ अमेरिकेकडूनच नव्हे, तर इराणकडूनही स्पष्टता नाही. इराणी अधिकाऱ्यांनी चर्चेत सहभागी होण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत दिले आहेत, मात्र अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. यापूर्वी इराणने अमेरिकेवर गैरप्रामाणिकपणाचा आरोप करत चर्चेत अनुत्सुकता दाखवली होती.https://prahaar.in/2026/04/20/iran-america-war-irgcs-dominance-in-irans-decision-making-process-possibility-of-talks-with-america-low/दुसरीकडे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे या संभाव्य चर्चांसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर हे संपूर्ण प्रक्रियेत मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. यापूर्वी ११ ते १२ एप्रिलदरम्यान दोन्ही बाजूंमध्ये सुमारे २१ तास चर्चा झाली होती, मात्र ती कोणताही निष्कर्ष निघाल्याशिवाय संपली होती. आता युद्धविरामाची मुदत जवळ येत असताना ही दुसरी फेरी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. एकूणच, जेडी वॅन्स यांच्या दौऱ्याबाबतचा संभ्रम आणि इराणची अनिश्चित भूमिका यामुळे ही चर्चा यशस्वी होईल की नाही, हे सांगणे कठीण आहे. येत्या काही दिवसांतच हे ठरणार आहे की हा कूटनीतिक प्रयत्न शांततेकडे नेईल की परिस्थिती आणखी गंभीर बनेल.
Swanandi Sardesai: स्वानंदी सरदेसाई झाली नवरी; पारंपरिक लूकने जिंकली चाहत्यांची मनं
Swanandi Sardesai स्वानंदीने १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर लग्न केलं. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत “श्री. व सौ.” अस कॅप्शन दिल आहे. या पोस्टमधून तिच्या लग्नाची माहिती समोर आली. स्वानंदीच्या पतीचं नाव विक्रांत रामदास असं आहे.
Revenue department : महसूल विभागाचा बेमुदत संप; राज्यभर कामकाजावर मोठा परिणाम
Revenue department : या संपाचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.
Dr. Gopalrao Patil : भाजपचे माजी खासदार काळाच्या पडद्याआड! लातूरमध्ये शोककळा
Dr. Gopalrao Patil : भाजपचे माजी खासदार डॉ. गोपाळराव विठ्ठलराव पाटील यांचे निधन झाले असून, लातूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
मुंबई : राज्यात अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी महिला व बालविकास विभागाने व्यापक आणि प्रभावी उपाययोजना राबविल्याने राज्यभरात १३ बालविवाह रोखण्यात यश आले याचे महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले.राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन मार्गदर्शनाने यंत्रणा सज्जअक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असल्याने या दिवशी सामूहिक विवाहांसोबत बालविवाहांचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागाने आधीच सतर्कता बाळगली होती. यासाठी राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बालविकास विभागाचे सचिव, आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या आणि बालविवाह रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.राज्यात जनजागृतीचे व्यापक अभियानराज्यात जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर जनजागृतीचे व्यापक अभियान राबविण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन १०९८, अंगणवाडी सेविका, ग्राम बाल संरक्षण समित्या आणि बालकल्याण क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या माध्यमातून कीर्तन, भागवत, पथनाट्य, पदयात्रा, पोस्टर्स, स्टीकर्स आदी विविध उपक्रमांतून नागरिकांना बालविवाहाचे दुष्परिणाम पटवून देण्यात आले. तसेच, बालविवाह प्रतिबंधक शपथ घेण्याचे कार्यक्रम आयोजित करून प्रत्येक घरापर्यंत जनजागृती पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याची माहितीमुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी किंवा मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्यास अशा विवाहांना आळा घालण्यासाठी मंगल कार्यालय मालक, वाजंत्री पथक, पुजारी तसेच संबंधित नातेवाईकांवर २४ तासांत गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याची माहितीही नागरिकांना देण्यात आली.रायगड १, अहिल्यानगर ५, बुलढाणा १, यवतमाळ २, छत्रपती संभाजीनगर १,धाराशिव २, परभणी १ असे एकूण १३ बालविवाह रोखण्यात यश मिळाले.महिला व बालविकास विभागाच्या या प्रभावी आणि समन्वयित कारवाईया सर्व प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून अक्षय तृतीयेच्या दिवशी राज्यातील विविध ठिकाणी होणारे १३ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश मिळाले. यापैकी यवतमाळ जिल्ह्यात एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाच्या या प्रभावी आणि समन्वयित कारवाईमुळे बालविवाहासारख्या कुप्रथेविरुद्ध ठोस संदेश समाजात पोहोचला असून भविष्यातही अशा प्रकारच्या मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.
IPL 2026 Tilak Varma : तिलक वर्माच्या शानदार शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा विजय
अहमदाबाद : तिलक वर्माची स्फोटक फलंदाजी आणि अश्विनी कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर ९९ धावांनी विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, तिलकच्या नाबाद १०१ धावांच्या जोरावर मुंबईने २० षटकांत पाच विकेट्स गमावून १९९ धावा केल्या. गुजरातचा संघ १५.५ षटकांत केवळ १०० धावाच करू शकला आणि सर्वबाद झाला. धावांच्या फरकाने मिळवलेला हा मुंबईचा आयपीएलमधील चौथा सर्वात मोठा विजय आहे. तसेच, गुजरातचा संघ आपल्या सर्वात कमी धावसंख्येवर सर्वबाद होण्याची ही दुसरी वेळ होती..सलग चार पराभवांनंतर मुंबईचा हा पहिला विजय आहे. या हंगामातील दुसऱ्या विजयासह, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाने चार गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यांचा नेट रन रेट देखील सुधारून +०.०६७ झाला आहे. गुजरात सध्या सहा गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.https://prahaar.in/2026/04/17/ipl-2026-mi-vs-pbks-some-tough-decisions-have-to-be-made-hardik-pandya-will-mumbais-internal-dispute-affect-the-game/गुजरातची सामन्याची सुरुवात खराब झाली होती. डावाच्या पहिल्याच चेंडूवर संघाने साई सुदर्शनला (०) गमावले. पुढच्याच षटकात, जोस बटलरच्या (५) रूपाने त्यांना दुसरा धक्का बसला. त्यानंतर, वॉशिंग्टन सुंदर आणि शुभमन गिल यांनी २० चेंडूंमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ३५ धावा जोडल्या, पण ही जोडी तुटल्यानंतर संघ पुन्हा गडबडला. वॉशिंग्टन १७ चेंडूंमध्ये २६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर शाहरुख खानने १७ धावांचे योगदान दिले. कर्णधार शुभमन गिलने १४ धावांची खेळी केली. मुंबईसाठी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणाऱ्या अश्विनी कुमारने २४ धावांत चार बळी घेतले, तर गझनफर आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.https://prahaar.in/2026/04/16/mumbai-indians-suffer-fourth-consecutive-defeat-punjab-wins-kings-become-ipl-toppers/यापूर्वी, गुजरातविरुद्ध मुंबईची सुरुवात खराब झाली होती, रबाडाने पॉवरप्लेमध्येच मुंबईला तीन बळी मिळवून दिले होते. रबाडाने क्विंटन डी कॉक (१३), दानिश मालेवार (२) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (१५) यांना बाद करून मुंबईचा डाव सावरला होता. त्यानंतर तिलकने नमन धीरसोबत मिळून मुंबईचा डाव सावरला. या दोन फलंदाजांनी ४० चेंडूंमध्ये चौथ्या विकेटसाठी ५२ धावा जोडल्या. नमन धीर बाद झाल्यानंतर, तिलक आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांनी मुंबईसाठी एक मोठी भागीदारी रचली. त्यांनी ३८ चेंडूंमध्ये पाचव्या विकेटसाठी ८१ धावा जोडल्या, ज्यात तिलकचे योगदान सर्वाधिक होते. हार्दिक बाद झाला, पण तिलकने आपली विकेट टिकवून ठेवली.सामन्यादरम्यान तिलकला दुखापत झाली आणि त्याची तपासणी करण्यासाठी फिजिओला मैदानावर यावे लागले. तिलकने फलंदाजी सुरू ठेवली. जरी त्याने सावकाश सुरुवात केली आणि पहिल्या २२ चेंडूंमध्ये केवळ १९ धावा केल्या, तरी त्यानंतर टिळकने वेग वाढवला आणि पुढच्या २३ चेंडूंमध्ये ८२ धावा केल्या. तिलकने ४५ चेंडूंमध्ये आपले पहिले आयपीएल शतक पूर्ण केले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाने केलेले हे संयुक्त-सर्वात जलद शतक आहे. यापूर्वी, २००८ मध्ये सनथ जयसूर्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मुंबईसाठी तितक्याच चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. तिलकने कॅमेरॉन ग्रीनचा विक्रम मोडला, ज्याने २०२३ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ४७ चेंडूंमध्ये शतक केले होते. गुजरातकडून रबाडाने तीन बळी घेतले, तर सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
Tea Side Effects: उन्हाळ्यात जास्त चहा पिताय? हे साइड इफेक्ट्स जाणून घेतले तर आजच कमी कराल!
Tea Side Effects चहामध्ये कॅफीन आणि टॅनिनसारखे घटक असतात. हे घटक मर्यादित प्रमाणात घेतले तर फारसा त्रास होत नाही, पण जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. विशेषतः रिकाम्या पोटी चहा पिणे किंवा दिवसभरात अनेक वेळा चहा घेणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
BMC News : नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक नामंजूर, महापालिका सभागृहात तीव्र पडसाद
विरोधी पक्षांचा तीव्र शब्दांत केला निषेधमुंबई :महिलांना योग्य प्रमाणात सर्व विधी मंडळात, विधानसभा, लोकसभा या ठिकाणी प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी नारी शक्ती वंदन अधिनियम या विधेयकाला बहुमताने नामंजूर करण्यात आल्याने याचा निषेध करण्यात आले. काँग्रेस आणि उबाठासह इतर विरोधी पक्षांचा समाचार घेत भाजपने तीव्र निषेध करत महिलांच्या सक्षमीकरणा प्रवाह आम्ही रोखू शकत नाही. आम्ही महिलांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा सभागृहात देण्यात आला.मुंबई महापालिका सभागृहात सभागृहनेते गणेश खणकर यांनी संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम या विधेयकाला बहुमताने नामंजूर करण्यात आल्याने तसेच तसेच विधेयकाला विविध कारणे पुढे कयन विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा निषेधाचे निवेदन सभागृहात केले. यावर काँग्रसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी विधेयक का नामंजूर करण्यात आले याची कारण देत पक्षाने महिलांना प्राधान्य दिले.म्हणून काँग्रेसचे नेतृत्व आले होते,असे सांगण्याचा प्रयत्न केला. यावर भाजपच्या राजेश्री शिरवडकर यांनी देश महासत्तेच्या दिशेने जात असल्याने हा विरोध असल्याचे सांगितले. तर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी नारी वंदनीय आहे, नंदनीय करू नका असे सांगत हे आरक्षण आले तरी वरळीत आरक्षण झाले तर मलाच उमेदवारी मिळेल असाही विश्वास व्यक्त केला.राखी जाधव यांनी महिलेला संधी मिळाली तर ती नेतृत्व करते असे सांगितले, तर बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी उबाठाला कांग्रेसच्या मांडीवर बसल्याचा आरोप केला. तर प्रिती सातम यांनी हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे पुढील महिला शिक्षा भोगणार असल्याचे सांगत मुस्लिम महिलांची तलाकमधून सुटका देशाच्या पंतप्रधानांनी केली असे सांगत ज्या पक्षाला घराणेशाहीच्या गाद्या उबवायच्या आहेत, म्हणून त्यांनी विरेाध केल्याचे सांगितले. शीतल गंभीर यांनी २७ वर्षांपूर्वी जर काँग्रेसने यावर निर्णय घेतला असता तर आज ही चर्चा करावी लागली नसती,असे सांगितले.https://prahaar.in/2026/04/20/bmc-news-massive-enforcement-drive-in-the-bandra-to-santacruz-east-area-water-pipeline-encroachments-cleared-in-bandra/विशाखा राऊत यांनी उबाठाच्या महिला आघाडीचे स्वर्गीय सुषमा स्वराज यांनी कौतुक केल्याचे सांगितले. तर श्रध्दा जाधव यांनी महिला सक्षम असून हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे पंतप्रधानांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन महिलेला पंतप्रधान करावे अशी सूचना केली. तर तेजस्वी घोसाळकर यांनी विधेयक मंजूर न होणे हा काळा दिवस असल्याचे सांगितले. तर स्वप्ना म्हात्रे यांनी महिलेसारखी ताकद कुणाकडेच नसल्याचे सांगितले.यावर महापौर रितू तावडे यांनी आपण महापौर किंवा पिठासीन अधिकारी म्हणून बोलत नसून एक महिला म्हणून बोलत असल्याचे सांगत हा राजकीय नैतिक दिवाळखोरीचा हा ठसठसीत पुरावा असल्याचे सांगितले. हीच का विरोधी पक्षाची महिला सक्षमीकरणाची व्याख्या का असा सवाल करत रितू तावडे यांनी विरोधकांना याची किंमत मोजावीच लागेल असा इशाराही दिला. हे विधेयक मंजूर झाले नसले तरी महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रवाह रोखला जावू शकत नाही,असे सांगत त्यांनी तीव्र शब्दांत याचा निषेध केला.यावेळी चर्चत संध्या दोशी, विजय उबाळे,मेहेर हैदर,दिक्षा कारकर, विशाखा राऊत, तुलिफ मिरांडा, अंकित प्रभू, नवनाथ बन, मिनल तुर्डे, प्रकाश दरेकर,संगिता शर्मा, प्रमोद सावंत, राणी दि्वेदी, आशा मराठे, साईनाथ दुर्गे,हेतल गाला, सिध्दार्थ शर्मा, तेजिंदर तिवाना, विजेंद्र शिंदे, सचिन पडवळ आदींनी चर्चेत भाग घेतला होता.https://prahaar.in/2026/04/20/bmc-all-assistant-commissioners-must-prioritize-cleanliness-in-their-respective-zones-additional-commissioners-directive/
BMC News : मुंबई महापालिकेच्या १५३ वर्षांत सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण
महापालिका अधिनियमांमध्ये तरतूद नाही तरीही सत्ताधारी पक्षाने उचलले पाऊलमुंबई : मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे. महापालिकेचे सोमवारी पार पडलेले अर्थसंकल्पीय चर्चेचे यू ट्युब लाईव्ह करण्यात आले. अशाप्रकारे महापालिकेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने नगरसेवकांसह त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हे थेट प्रक्षेपण करताना महापालिकेच्या अधिनियमांचे उल्लंघन झाले असून अधिनियमांमध्ये स्पष्ट तरतूद नसतानाही या सभागृहाचे कामकाज लाईव्ह करण्यात आल्याने सर्व माजी नगरसेवकांसह निवृत्त सचिवांकडूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.https://prahaar.in/2026/04/20/bmc-all-assistant-commissioners-must-prioritize-cleanliness-in-their-respective-zones-additional-commissioners-directive/मुंबई महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर महापालिका सभागृहाचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी झाली होती. त्यानंतर महापौर आणि सभागृहनेत्यांनी सभागृहाचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सोमवारपासून महापालिकेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे.https://prahaar.in/2026/04/20/bmc-news-massive-enforcement-drive-in-the-bandra-to-santacruz-east-area-water-pipeline-encroachments-cleared-in-bandra/महापालिकेचे पहिले सभागृह ४ सप्टेंबर १८७३मध्ये भरले होते. त्यानंतर मागील १५ वर्षांपासून महापालिकेचे कामकाज लाईव्ह करण्यात यावे अशी मागणी सातत्याने नगरसेवकांकडून केले जात आहे. परंतु आजवर केवळ आणि केवळ अधिनियमांमध्ये तरतूद नसल्याची कारणे देत अशाप्रकारची सुविधा महापालिका सभागृहात देण्यास येत नव्हती.अशाप्रकारे सभागृहाचे कामकाज लाईव्ह करण्यासाठी धोरणात्मक निर्णय नसल्यामुळे मागील महिन्यात माजी महापौर व नगरसेविका श्रध्दा जाधव आणि नगरसेवक अंकित प्रभू यांनी सभागृहाचे कामकाज लाईव्ह करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वार केली. परंतु याबाबतचेही ठरावही सभागृहात मंजूर झालेले नाही. मात्र, महापालिकेच्या इतिहासात सभागृहाचे कामकाज लाईव्ह होताना ते नियमांचे उल्लंघन करून सुुरु करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. महापौर आणि सभागृह नेत्यांनी केवळ प्रायोगिक तत्वावर सभागृहाचे कामकाज लाईव्ह करताना अधिनियमातील तरतुदींचा विचार केलेला दिसून येत नाही. त्यामुळे जोवर अधिनियमांमध्ये तरतूद होत नाही तोवर प्रायोगिक तत्वावरही याचे थेट प्रक्षेपण करता येत नाही. तरीही हा प्रकार घडल्यामुळे प्रत्यक्षात नियमांचे उल्लंघन झाल्याची चर्चा सर्वच स्तरावर सुरु आहे.
Nitesh Rane : प्रशासकीय गतिमानतेत मंत्री नितेश राणेंच्या खात्याचा पहिला क्रमांक
मत्स्यव्यवसाय विभागाच्या उपक्रमांना राज्यस्तरीय ‘प्रगती’ पुरस्कार; ‘ड्रोन’ गस्त आणि कृत्रिम भित्तिका प्रकल्प ठरले अव्वलमुंबई : राज्याच्या सागरी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि कृत्रिम भित्तिकांच्या माध्यमातून मत्स्यसंपदेचे संवर्धन करणाऱ्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या दोन महत्त्वाकांक्षी उपक्रमांनी राज्य सरकारचा मानाचा ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान २०२५-२६’ पुरस्कार पटकावला आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभागांतून राबविण्यात आलेल्या ‘ड्रोन आधारित देखरेख’ यंत्रणेला प्रथम, तर क्षेत्रीय कार्यालयांच्या श्रेणीत ‘शाश्वत मत्स्यव्यवसाय विकास’ उपक्रमाला अव्वल स्थान मिळाले आहे.https://prahaar.in/2026/04/21/nitesh-rane-joint-coastal-management-makes-its-mark-in-the-state-through-the-pragati-campaign-minister-nitesh-rane-praises-the-initiative/राज्यातील किनारपट्टीवर होणारी अवैध मासेमारी आणि घुसखोरी रोखण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने जानेवारी २०२५ पासून ड्रोन गस्त सुरू करण्यात आली होती. या प्रणालीमुळे अरबी समुद्रातील हालचालींवर नियंत्रण मिळवणे सुलभ झाले आहे. विशेषतः एलईडी दिव्यांचा वापर करून केली जाणारी बेकायदेशीर पर्ससीन मासेमारी आणि परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी रोखण्यात या तंत्रज्ञानाने मोठी भूमिका बजावली आहे. या यशामुळे मत्स्यव्यवसाय विभागाची प्रशासकीय गतिमानता सिद्ध झाली असून, त्याला राज्यस्तरीय प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे.https://prahaar.in/2026/04/21/nitesh-rane-a-major-leap-in-marine-fisheries-management-under-the-pragati-initiative-minister-nitesh-rane-lauded-with-a-%e2%82%b910-lakh-award/‘शाश्वत मत्स्यव्यवसाय विकास व मत्स्यसंपदेचे संरक्षण’ या उपक्रमांतर्गत अरबी समुद्र किनारपट्टीवरील १८२ गावांमध्ये कृत्रिम भित्तिका उभारण्यात आल्या आहेत. या भित्तिकांमुळे माशांसाठी सुरक्षित प्रजनन अधिवास निर्माण झाला असून, ५० मीटरचे संरक्षण क्षेत्र विकसित झाले आहे. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम मत्स्योत्पादनावर झाला असून, उत्पादनात तब्बल २९ हजार किलोची वाढ नोंदवली गेली आहे.पारंपरिक मच्छीमारांच्या आर्थिक उत्पन्नात वाढया कृत्रिम भित्तिकांच्या देखभालीसाठी स्थानिक मच्छीमार सहकारी संस्थांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय, समुद्रातील प्लास्टिक कचरा आणि ‘घोस्ट नेट’ संकलनावरही भर देण्यात आला आहे. यामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली असून सागरी पर्यावरणाचे रक्षण झाले आहे.मत्स्यव्यवसाय विभागाने ड्रोन तंत्रज्ञान आणि डिजिटल डेटा मेंटनन्समध्ये केलेले काम कौतुकास्पद आहे. या यशामुळे मच्छीमार बांधवांची आर्थिक उन्नती आणि सागरी सुरक्षेला बळ मिळाले आहे. या यशाचे श्रेय विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि मच्छीमार बांधवांचे आहे. - नितेश राणे, मंत्री, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास
Sunetra Pawar : आज सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ बारामतीत सांगता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला शरद पवार उपस्थित राहणार का याविषयी सगळ्यानांच उत्सुकता आहे.
Strike: राज्यातील १७ लाख शासकीय कर्मचारी, शिक्षक बेमुदत संपावर; नेमक्या काय आहेत मागण्या?
Strike : राज्य सरकारने संप बेकायदेशीर ठरवत संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
Gut Health: तुमचं पोट खरंच हेल्दी आहे का? हे टेस्ट सांगतील आतड्यांची खरी स्थिती
Gut Health आपल्या आतड्यांमध्ये लाखो-कोट्यवधी “गुड” आणि “बॅड” बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया अन्न पचवण्यास, शरीराला आवश्यक पोषक घटक शोषून घेण्यास, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे गट हेल्थ व्यवस्थित असेल तर शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.
Mohit Suri : ‘सैयारा’फेम जोडी पुन्हा एकत्र दिसणार! दिग्दर्शकाने केली आगामी चित्रपटाची घोषणा
Mohit Suri : दिग्दर्शक मोहित सूरींनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली असून, यामध्ये सैयाराफेम जोडी पुन्हा एकादा मोठ्या स्क्रिनवर दिसणार आहे
Aneet Padda: आजोबांच्या आठवणींनी भावूक झाली अनीत पड्डा; पोस्ट वाचून चाहत्यांचे डोळे पाणावले
Aneet Padda पोस्टच्या शेवटी तिने अतिशय भावूक शब्द लिहिले, “आज मी आकाशात सर्वात तेजस्वी तारा पाहिला आणि मला समजलं की तुम्ही तिथे आहात. आजोबा, मी तुम्हाला कायम प्रेम करत राहीन.” या ओळींनी अनेक चाहत्यांना भावूक केले आहे.
TOP 10 News : राज्य, देश, विदेश, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोड... !
मुंबई : महाराष्ट्र अनेक पावसाच्या सारी कोसळत आहेत, कुठे गारपीठ तर कुठे सोसाट्याचा वारा आणि वीज, शिवाय भारतीय हवामान विभागाने आणि महाराष्ट्र हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार २० ते २४ एप्रिल या याकाळात मुंबईसह इतर शहरात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी मेघगर्जना आणि वीजा पडण्याच्या शक्यता वर्तवण्यात आली आहे.या शहरात पावसाची हजेरीहवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईला मंत्रालयाकडूनही सतर्कतेचा इशारा हा देण्यात आला आहे. पुढील ३ तासांत मुंबईसह, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे या शहरात पावसाची शक्यता आहे.बदलापूरमध्ये पावसाची हजेरीआज सकाळच्या सुमारास बदलापूरमध्ये पावसाने हजेरी लावली. अचानक आलेय पावसाने चाकरमान्यांची धांदल उडाली. दोन दिवसापासून बदलापूर आणि ग्रामीण भागात पारा ४० अंशापर्यंत गेला आणि आज पावसाने हजेरी लावली.नागरिकांची तारांबळवातावरणात होणाऱ्या हा बदलामुळे कडक उन्हाळ्यात नागरिकांना काही काळ थंडावा मिळणार असून ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या या पावसामुळे नागरिकांनी तारांबळ उडणार आहे हे निश्चित त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेत सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पुढील ४ दिवस या भागात जोरदार पावसाची शक्यताभारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार २० ते २४ एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि कोकण विभागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.प्रशासनाच्या उपाययोजनाग्रामपंचायत, पोलीस आणि आरोग्य विभागांनी तातडीने जनजागृती करावीरुग्णवाहिका, अग्निशमन दल, आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवावीतशाळा, सभागृह व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवाव्यातहवामान खात्याचे अद्ययावत इशारे गावतळीपर्यंत त्वरित पोहोचवावे
Weather update : पुन्हा अवकाळीचे संकट! पुढील चार दिवस महत्वाचे; या जिल्ह्यांना अलर्ट जारी
Weather update : पुढील पाच दिवस हवामान विभागाने विविध जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून, गारपीटसह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
Vijay Deverakonda And Shouryuv हा चित्रपट ‘हाय नन्ना’ फेम दिग्दर्शक शौर्युव यांचा दुसरा चित्रपट आहे. त्यामुळे त्यांच्या या नव्या प्रोजेक्टकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. मुहूर्ताच्या वेळी नानी आणि विजय देवरकोंडा एकमेकांना भेटले आणि त्यांनी एकमेकांना मिठी मारत आनंद व्यक्त केला. हा क्षण चाहत्यांसाठी खास ठरला.
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील राज्यस्तरीय निकाल जाहीर.मुंबई : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२५-२६ अंतर्गत राज्यातील विविध विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना राज्य शासनाने गौरविले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयाद्वारे राज्यस्तरीय पारितोषिक विजेत्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यस्तरावर थेट प्राप्त प्रस्तावांमध्ये संयुक्त सागरी मत्स्यव्यवस्थापन या शाश्वत मत्स्यव्यवसाय प्रकल्पाला १० लाखांचे पारितोषिक मिळाले. याबद्दल राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे कौतुक होत आहे.या स्पर्धेत मंत्रालयीन विभागापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत विविध स्तरांवरून आलेल्या प्रस्तावांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट उपक्रमांची निवड करण्यात आली. ड्रोन आधारित देखरेख व डिजिटल डेटा मेंटेनन्स प्रणाली या उपक्रमाला प्रथम क्रमांक मिळत सुमारे १० लाखापर्यंत पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. तर कार्यालयीन कामकाजातील सुधारणा उपक्रमालाही उच्च स्थान मिळाले आहे.https://prahaar.in/2026/04/21/nitesh-rane-joint-coastal-management-makes-its-mark-in-the-state-through-the-pragati-campaign-minister-nitesh-rane-praises-the-initiative/राज्यस्तरावर थेट प्राप्त प्रस्तावांमध्ये संयुक्त सागरी मत्स्यव्यवस्थापन या शाश्वत मत्स्यव्यवसाय प्रकल्पाला १० लाखांचे पारितोषिक मिळाले. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या तंत्रज्ञानाधारित संवाद उपक्रमालाही सन्मानित करण्यात आले.
Bachu Kadu : शेतकरी नेते आणि प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांना शिवसेना शिंदे गटाकडून विधानपरिषदेची अॅाफर मिळाल्याची चर्चा आहे.
राजस्थानमधील बाडमेरजवळच्या बालोतरा (पचपदरा) येथील हिंदुस्तान पेट्रोलियम लिमिटेड (HPCL) च्या रिफायनरीमध्ये 20 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता आग लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (आज) रिफायनरीचे उद्घाटन करणार होते. या घटनेनंतर त्यांचा दौरा स्थगित करण्यात आला. आग त्याच क्रूड डिस्टिलेशन युनिट (CDU) मध्ये लागली, ज्याचे ट्रायल रन पूर्ण झाल्याचे सांगितले जात होते. या अपघातामुळे केवळ सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले नाही, तर राजस्थानच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा धक्का बसला आहे. 2013 पासून आतापर्यंत 13 वर्षांत रिफायनरीचा खर्च आधीच 37 हजार 230 कोटींवरून 79 हजार 459 कोटींपर्यंत पोहोचला आहे. भास्करने तज्ज्ञांशी बोलून जाणून घेतले की, भूमिपूजनापासून उद्घाटनापर्यंत कोणत्या अडचणी आल्या, ज्यामुळे रिफायनरीचे काम वारंवार थांबले. तसेच, आता या अपघातामुळे किती मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा प्रकारे रिफायनरीचे स्वप्न साकार झाले बालोतरा येथील पचपदरा येथे रिफायनरीच्या स्वप्नामागची खरी कहाणी 2004 मध्ये बाडमेरमधील मंगला तेल क्षेत्राच्या शोधाने सुरू झाली. 2009 मध्ये येथून उत्पादन सुरू झाले. यासोबतच राजस्थानमध्ये स्थानिक रिफायनिंगची गरज भासू लागली. 22 सप्टेंबर 2013 रोजी तत्कालीन यूपीए सरकारच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पचपदरा येथे रिफायनरीचे भूमिपूजन केले. त्यावेळी अशोक गेहलोत मुख्यमंत्री होते. रिफायनरी प्रकल्पाच्या मॉडेलमध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला ७४ टक्के आणि राजस्थान सरकारला २६ टक्के भागीदार बनवून संयुक्त उपक्रमात ठेवण्यात आले होते. तेव्हा त्याची अंदाजित किंमत सुमारे ३७,२३० कोटी रुपये होती. २०१७-१८ पर्यंत रिफायनरी सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. भूमिपूजन आणि घोषणेची वेळ निवडणुकीच्या अगदी आधीची होती. अशा परिस्थितीत भूमिपूजनासोबतच राजकारणही सुरू झाले. प्रकल्पात ठोस निविदा प्रक्रिया आणि बांधकाम सुरू होण्यापूर्वीच राजस्थानमध्ये आचारसंहिता लागू झाली. निवडणुकीनंतर सरकार बदलले आणि रिफायनरी प्रकल्प पुनर्मूल्यांकन, खर्च वाढ आणि नवीन अटींमध्ये अडकत गेला. प्रकल्पाला पुन्हा वाटाघाटी आणि पुनरावलोकनासाठी टाकले वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर, प्रकल्पाला दिली जाणारी जास्त सबसिडी, कर लाभ आणि कमी परताव्याच्या शक्यतेमुळे तो पुन्हा वाटाघाटी आणि पुनरावलोकनासाठी ठेवण्यात आला. त्यानंतर पुढील पाच वर्षे हा प्रकल्प थंड बस्त्यात पडला. काँग्रेसचा आरोप होता की भाजपने तो जाणूनबुजून थांबवला. भाजपचे म्हणणे होते की पुनरावलोकनाशिवाय हा प्रकल्प तोट्याचा व्यवहार होता. सुमारे 5 वर्षांच्या विलंबाने आणि वादांच्या दरम्यान, अखेरीस पचपदरा रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पाबाबत पुन्हा आशा निर्माण झाली. रिफायनरीच्या अटींमध्ये बदल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी 2018 रोजी पुन्हा या कामाचे उद्घाटन केले. यावेळी याची किंमत वाढून 43 हजार 129 कोटी रुपये झाली होती. याचे काम 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण केले जाणार होते. कोविडच्या काळात काम ठप्प झाले त्यानंतर पुन्हा राजस्थानमध्ये सत्तापरिवर्तन झाले. अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकार स्थापन झाले. तरीही, त्यानंतरही पचपदरा रिफायनरीचा प्रकल्प सुरूच राहिला, परंतु भूसंपादन, पर्यावरण मंजुरी, रीडिझाइन, तांत्रिक बदल आणि खर्च वाढल्यामुळे गती मंदच राहिली. कोविडच्या काळात 2020 आणि 2021 मध्ये तर काम पूर्णपणे थांबले होते. 2023 मध्ये पुन्हा राजस्थानमध्ये भजनलाल सरकार स्थापन झाले. रिफायनरीच्या अंदाजित खर्चात दुसरा सुधारित प्रस्ताव सरकारला सादर केल्यानंतर, त्याचा खर्च वाढून 79 हजार 459 कोटी रुपये झाला होता. याला 8 एप्रिल 2026 रोजी मंजुरी देण्यात आली आणि 1 जुलै 2026 पासून व्यावसायिक कार्यान्वयनाचे (कॉमर्शियल ऑपरेशन) लक्ष्य निश्चित करण्यात आले. आता 20 एप्रिल रोजी झालेल्या आगीच्या घटनेनंतर केवळ रिफायनरीचे उद्घाटनच नाही, तर तिच्या व्यावसायिक कामकाजाचे लक्ष्यही पुढे ढकलले जाणे निश्चित झाले आहे. एक दिवसापूर्वीच्या स्थिती अहवालानुसार, रिफायनरीचे 92 टक्के काम पूर्ण झाले होते. अशा परिस्थितीत, जिथे तेल शुद्धीकरणाचे (ऑइल रिफायनिंग) मोठे काम होणार होते, त्याच युनिटमध्ये आग लागल्याने राजस्थानमधील रिफायनरीच्या स्वप्नांना धक्का बसला आहे. आता ही जखम कधीपर्यंत भरेल, याचा सध्या अंदाज लावणे कठीण आहे. दुरुस्ती आणि नुकसानीच्या मूल्यांकनाला वेळ लागू शकतो रिफायनरी प्रकरणांची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की, या रिफायनरीमध्ये जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान, सर्वोत्तम उपकरणे आणि सर्वोत्तम अभियंते वापरले जात असल्याचा दावा केला जात होता. अशा परिस्थितीत उद्घाटनापूर्वी झालेला हा अपघात मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करतो. तज्ज्ञांनी सांगितले की, सध्या इतक्या मोठ्या घटनेवर कोणतीही टिप्पणी करणे घाईचे ठरेल. यासाठी सर्वात आधी हे पाहावे लागेल की, हे युनिट कोणत्या कंपनीचे होते? पुरवठा कोणी केला होता? ही कंपनी अभियंत्यांच्या ताब्यात होती की रिफायनरीच्या अभियंत्यांनी ती ताब्यात घेतली होती? तांत्रिक लेखापरीक्षण (ऑडिट) कोणी केले होते? आणि त्या तज्ज्ञांचा अहवाल काय होता. या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतरच या अपघाताबाबत काही ठोस बोलता येईल. तज्ज्ञांचे मत आहे की, रिफायनरीच्या मुख्य भागातच आग लागली असल्याने नुकसान मोठेच झाले आहे. रिफायनरीचा खर्च सातत्याने वाढत आहे, तसेच व्यावसायिक उत्पादन वेळेवर सुरू न झाल्याने वेगळे नुकसान होत आहे. जरी इतक्या मोठ्या रिफायनरीमध्ये सर्व युनिट्स आणि उपकरणे दुप्पट विमा उतरवलेली असतात. ती जागतिक पुरवठादार कंपन्यांच्या हमीमध्येही असतात, परंतु बदलण्यासाठी आणि पुन्हा फॅब्रिकेशन व इन्स्टॉलेशनसाठी लागणारा वेळ उत्पादनाला मोठे आर्थिक नुकसान देतो. CDU-VDU युनिटमधून क्रूड ऑइलचे डिस्टिलेशन सुरू होते. सोप्या भाषेत सांगायचे तर, येथूनच क्रूडमधून पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थ बाहेर पडतात. या आगीनंतर, त्याची दुरुस्ती आणि नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी 1 ते 6 महिने लागू शकतात. जर जुलै 2026 पासून व्यावसायिक उत्पादन सुरू झाले असते, तर 9 MMTPA क्षमतेनुसार मासिक महसूल 50 हजार ते 80 हजार कोटींच्या आसपास असणार होता. आता प्रत्येक महिन्याच्या विलंबाने हे संभाव्य महसूल नुकसान निश्चित आहे.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स आणि त्यांची टीम 17 तासांच्या उड्डाणानंतर आणि सुमारे 11,500 किलोमीटरच्या प्रवासानंतर इस्लामाबादला पोहोचत आहेत. मात्र, इराण शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीत भाग घेण्यास नकार देत आहे. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदी केली आहे आणि इराणी जहाज तुस्काला जप्त केले आहे, त्यामुळे इराण संतप्त झाला आहे. इराण खरंच पाकिस्तानात चर्चेसाठी जाणार नाही का, अमेरिका-इराण करार कुठे अडकला आहे आणि या युद्धात पुढे काय होईल? आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया... प्रश्न-1 : पाकिस्तानात दुसऱ्या टप्प्यातील शांतता चर्चेसाठी कोण कोण पोहोचत आहे?उत्तर : अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर सोमवारी संध्याकाळी शांतता चर्चेसाठी इस्लामाबादला पोहोचणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी सांगितले होते की, उपाध्यक्ष जे.डी. व्हेन्स सुरक्षा चिंतेमुळे पाकिस्तानला जाणार नाहीत. मात्र, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी नंतर पुष्टी केली की व्हेन्स यात सहभागी होतील. अल जझीराने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, वाटाघाटींबाबतच्या अनिश्चिततेमुळे विटकॉफ आणि कुशनर आधी इस्लामाबादला पोहोचतील. जर वाटाघाटी पुढे सरकल्या, तर व्हेन्स देखील नंतर पाकिस्तानला जातील. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यापूर्वी सांगितले होते की, जर कोणताही करार निश्चित झाला, तर ते स्वतः पाकिस्तानला जातील, परंतु त्यांच्या आगमनाची अद्याप पुष्टी झालेली नाही. अमेरिकन शिष्टमंडळाच्या आगमनापूर्वी इस्लामाबादला पोहोचण्याची अपेक्षा असलेले एक अग्रीम पथक रविवारी दोन C-17 मालवाहू विमानांनी इस्लामाबादला पोहोचले होते, ज्यात अमेरिकन शिष्टमंडळाचे सुरक्षा उपकरणे आणि ताफ्याची वाहने होती. दुसरीकडे, इराणने अद्याप इस्लामाबाद भेटीची पुष्टी केलेली नाही. सरकारी माध्यम IRNA नुसार, इराणने वाटाघाटींमध्ये भाग घेण्यास नकार दिला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बागाई यांनी सांगितले की, शांतता चर्चेत जायचे की नाही याबद्दल आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. वाटाघाटींमध्ये जाण्याची आमची कोणतीही योजना नाही. प्रश्न-2 : खरंच इराण चर्चेत सहभागी होणार नाही का?उत्तर : 15 एप्रिल रोजी, पाकिस्तानी फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी तेहरानला भेट दिली होती. त्यांच्या तीन दिवसांच्या भेटीदरम्यान, त्यांनी इराणच्या सर्वोच्च नेतृत्वासोबत भेट घेतली होती. पहिल्या फेरीची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्याशी 45 मिनिटे चर्चा केली होती. असे मानले जात होते की इराण अमेरिकेसोबतच्या कराराबाबत सकारात्मक होता. मात्र, इराणचे सरकारी माध्यम IRNA आता म्हणते की इराणी शिष्टमंडळ चर्चेसाठी इस्लामाबादला जाणार नाही. वाटाघाटींच्या आसपासच्या संकटात, ट्रम्प आणि असीम मुनीर यांनी फोनवर बोलणे केले. पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांनुसार, असीम मुनीर यांनी ट्रम्प यांना सांगितले होते की, जर होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नाकेबंदी सुरू राहिली, तर इराणसोबतच्या वाटाघाटी पुढे सरकणार नाहीत. ट्रम्प यांनी उत्तर दिले की ते यावर विचार करतील. सध्या पाकिस्तानात वाटाघाटींसाठी इस्लामाबादमधील दोन 5-स्टार हॉटेल्स रिकामी करण्यात आली आहेत. त्यांच्याकडे जाणारे रस्ते सील करण्यात आले आहेत. सरकारी कार्यालये आणि दूतावासांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इराणची राजधानी तेहरानहून अडीच तासांत इस्लामाबादला पोहोचता येते. त्यामुळे, अमेरिकेच्या शिष्टमंडळाच्या आगमनानंतरही इराणची भूमिका बदलू शकते. अल जझीराने सूत्रांच्या हवाल्याने असेही वृत्त दिले आहे की, इराणी शिष्टमंडळ मंगळवारी सकाळपर्यंत इस्लामाबादला पोहोचेल. यामध्ये स्पीकर मोहम्मद बाघर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तेहरानमधील आंतरराष्ट्रीय संबंधांचे तज्ज्ञ सय्यद मोजतबा जलालझादेह यांच्या मते, इराण देशांतर्गत कठोर भूमिका घेत आहे. परंतु, चर्चेसाठी आपले पथक पाठवून ते हे देखील दाखवून देईल की इराण राजनैतिक कारवाईपासून मागे हटले नाही. प्रश्न-3 : अमेरिका-इराणच्या करारात अडचण कुठे आहे?उत्तर : अमेरिका आणि इराण यांच्यातील करारात 3 मुद्द्यांवर अडचण आहे... अमेरिकेला इराणचा अणुकार्यक्रम 20 वर्षांसाठी बंद करायचा आहे इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अमेरिकेला हटवायचे आहे इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले थांबवावेत प्रश्न-4 : चर्चेपूर्वी इराणी जहाजावर हल्ला करून अमेरिकेने चूक केली का? उत्तर : रविवारी रात्री सुमारे 2:30 वाजता यूएस सेंट्रल कमांड (CENTCOM) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले की यूएस नेव्हीने ओमानच्या आखातात इराणी ध्वज असलेल्या मालवाहू जहाजाला ताब्यात घेतले आहे... या घटनेनंतर ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले की, इराणी जहाज टूस्का पूर्ण नियंत्रणात आहे आणि त्यातील मालाची तपासणी केली जात आहे. ट्रम्प यांनी असेही म्हटले की, यूएस ट्रेझरी डिपार्टमेंटने त्याच्या बेकायदेशीर कारवायांमुळे टूस्कावर आधीच अनेक निर्बंध लादले आहेत. दरम्यान, इराणच्या हजरत खातम अल-अंबिया लष्करी मुख्यालयाने एक निवेदन जारी करून म्हटले की, अमेरिकेने युद्धविरामाचे उल्लंघन केले आहे. ही चाचेगिरी आहे आणि इराण लवकरच प्रत्युत्तर देईल. किंग्स कॉलेज लंडनचे प्राध्यापक अँड्रेस क्रिग सांगतात की, शांतता चर्चेपूर्वी इराणी जहाजावर हल्ला करून अमेरिकेने IRGC ला असा दावा करण्याची संधी दिली आहे की, अमेरिकेवर विश्वास ठेवता येत नाही. मिडल ईस्ट इन्स्टिट्यूटमधील इराणी कार्यक्रमाचे संचालक ॲलेक्स वाटांका म्हणतात की, जहाजावरील गोळीबारामुळे इराणमधील त्या संघटनेला प्रोत्साहन मिळाले आहे, जी इराणने 90% पर्यंत युरेनियम समृद्ध करावे आणि अणुबॉम्ब बनवण्याच्या दिशेने पुढे जावे अशी इच्छा बाळगते. प्रश्न-5 : 22 एप्रिलला युद्धविराम संपेल, त्यानंतर युद्धात काय परिस्थिती निर्माण होत आहे?उत्तर : इराण आणि अमेरिका यांच्यातील दोन आठवड्यांचा तात्पुरता युद्धविराम 22 एप्रिल रोजी संपेल. अमेरिकेने इराणी जहाज जप्त केल्याने आणि शांतता चर्चेत भाग घेण्यास नकार दिल्याने पुढील परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. आता तीन युद्धाचे 3 सिनेरिओ उदयास येत असल्याचे दिसते... सिनेरिओ-1 : युद्धविराम कायम राहील सिनेरिओ-2 : मर्यादित लष्करी कारवाई सिनेरिओ-3 : पूर्ण युद्धाची पुनरावृत्ती
रात्री 8 वाजताची वेळ. गावातील एक घर रंगीबेरंगी बल्ब आणि हॅलोजन दिव्यांनी उजळून निघाले आहे. ढोल वाजत आहेत. अंगणात महिला एका रांगेत जमिनीवर बसल्या आहेत. सर्वांसमोर पानांपासून बनवलेले द्रोण ठेवले आहेत. येथे कोणताही पुरुष नाही. डोक्यावर माठ घेऊन एक महिला येते. या माठात दारू आहे. ज्याला ‘लंदा’ आणि ‘इड्डिकुल’ म्हणतात. लंदा शिळ्या भातापासून आणि इड्डिकुल महुव्यापासून बनवली जाते. महिला डोक्यावरून माठ खाली ठेवते आणि द्रोणात सर्व महिलांना दारू वाढते. दुसरी महिला सर्वांच्या द्रोणात भाजलेली सोयाबीन वाढते. गाणी गात येथे वृद्ध-तरुण, सर्व वयोगटातील महिला दारू पीत आहेत. येथे महिला पाहुण्या आहेत आणि यजमानही. दिव्य मराठीच्या ‘आम्ही लोक’ या मालिकेत मी मनीषा भल्ला यावेळी कोया समुदायाची कथा घेऊन आले आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये त्यांची एकूण लोकसंख्या 9 लाख आहे. यापैकी दीड लाख ओडिशाच्या मलकानगिरीमध्ये स्थायिक झाले आहेत… वर मी ज्या मेजवानीचा उल्लेख केला आहे, ती एका लग्नाची आहे. चमकदार पिवळी साडी, ओठांवर हलकी गुलाबी लिपस्टिक, गळ्यात चांदीच्या नाण्यांची माळ घातलेल्या वधूची पाऊले हळूहळू पुढे पडत आहेत. दुसरीकडे, पांढऱ्या पोशाखातील वर तिची वाट पाहत आहे. तेव्हा पुरोहित पुढे येऊन दोघांना जवळजवळ उभे करतो. वराच्या मनगटावर गवताची एक गाठ बांधतो. मंत्र म्हणतो, मग वधूचा हात वराच्या हातात देतो. तेव्हा तिथे उपस्थित महिला वधूच्या स्वागतासाठी कोया गाणी गाऊ लागतात. हे लग्न ओडिशातील नक्षलग्रस्त जिल्हा मलकानगिरीपासून सुमारे 35 किलोमीटर दूर असलेल्या राखेलगुडा गावात होत आहे. येथील आदिवासी नेते अडमा राखा यांचा मुलगा निरंजन आणि नवीन सून बासंती यांच्या लग्नाचा उत्सव साजरा केला जात आहे. लग्न होताच महिला पुन्हा दारू पिऊ लागतात. थोड्या वेळाने त्या एकमेकींच्या कमरेत हात घालून नाचायला सुरुवात करतात. सुमारे 15 मिनिटांनंतर त्या थकून बसतात. यानंतर, पुरोहित नवरदेव-नवरीला बेडरूममध्ये सोडून येतात आणि बाहेरून दरवाजाला कडी लावतात. बाहेर बसलेल्या महिला पुन्हा गाणी गाऊ लागतात. आत्याच्या मुलीशी लग्न न केल्यास शिक्षा मिळते याच दरम्यान, अडमा राखा येतात, ज्यांच्या मुलाचे लग्न आहे. मी त्यांना म्हणालो- ‘वधू खूप सुंदर आहे.’ ते म्हणू लागले की माझी सून बासंती तर घरचीच मुलगी आहे. जवळजवळ संपूर्ण बालपण आमच्यासमोर गेले आहे. मी आश्चर्यचकित होऊन विचारले- ‘घरची मुलगी म्हणजे काय?’ ते म्हणाले- ‘माझ्या मुलगा निरंजनचे लग्न, माझ्या बहिणीच्या मुलीशी म्हणजे त्याच्या सख्ख्या आत्याच्या मुलीशी झाले आहे. हीच आमची प्रथा आहे.’ सख्ख्या आत्याची मुलगी नसेल तर? ‘तर वडिलांच्या दूरच्या बहिणीच्या मुलीशीही लग्न होते.’ मी विचारले- ‘काही खास कारण?’ अडमा सांगतात- ‘ती घरची मुलगी आहे. तिला आमच्या कुटुंबाच्या चालीरीतींची समज आहे. ती आम्हाला कधीही नुकसान पोहोचवणार नाही, म्हणूनच ही परंपरा चालत आली आहे.’ ‘जर कोणी असे केले नाही तर मग काय करतात?’ ‘समाजातून बहिष्कृत केले जाते. जिवंत असतानाही पिंडदान करतात. कोया लोकांमध्ये बाहेरील समुदायात विवाह कोणत्याही परिस्थितीत स्वीकार्य नाही.’ आता अडमा मला इरमा पवासी नावाच्या महिलेशी भेट घालून देतात. त्या सांगतात की, ‘आमच्या लोकांमध्ये जेव्हाही लग्न किंवा कोणत्याही विधीमध्ये मोठी मेजवानी असते, तेव्हा जेवणाची जबाबदारी संपूर्ण गावाची असते. गावातील लोक लग्न असलेल्या घरी महुआची दारू, कोंबडी, बकरी आणि मासे पोहोचवतात. जसे आज तुम्ही ज्या लग्नात आला आहात, त्यासाठीही महिला अनेक दिवसांपासून जंगलातून महुआ गोळा करून दारू बनवण्यात गुंतल्या होत्या.’ इरमा मला आणि माझ्या साथीदार मुन्नाला जेवण करण्यासाठी सांगतात. पत्रावळीत माशाचे डोके, मटण, चिकन, भात, रायता आणि पनीर वाढले जाते. काही वेळाने गावातील सर्व लोक जेवण करून आपल्या घरी परत येऊ लागतात, पण महिलांची मैफिल तशीच चालू राहते. कच्चे घर, पण स्वच्छता अशी की प्रत्येक कोपरा चमकतो दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा माझा साथीदार मुन्नासोबत गावाकडे निघाले. येथे प्रत्येक घर मातीचे बनलेले आहे, पण ते व्यवस्थित सजवले आहेत. पुढे बांबूचे कुंपण आणि लहान गेट्स आहेत. घरांची छप्परं ताडाच्या पानांनी झाकलेली आहेत. हवेत महुव्याचा सुगंध मिसळलेला आहे. जवळपास प्रत्येक घरासमोर महुआ वाळत आहे. मुन्ना सांगतो की- ‘आमच्याकडे महुव्याच्या दारूशिवाय कोणताही विधी पूर्ण होत नाही.’ मुन्ना मला सर्वात आधी त्याच्या घरी घेऊन गेला. बाहेर कडक ऊन होते, पण घरात थंडी जाणवत होती. स्वच्छताही अशी होती की जमिनीवर पडलेली वस्तू न संकोचता उचलून खाता येईल. आंगणाच्या एका कोपऱ्यात, उघड्यावर जेवण बनत होते. हीच त्यांची स्वयंपाकघर आहे. स्वयंपाकघरात भांडीही तेवढीच आहेत, जेवढी जेवण बनवण्यासाठी आवश्यक आहेत. आतमध्ये फक्त एकच खोली आहे. समोर ठेवलेल्या खुर्चीवर मला बसायला सांगितले. खाटेवर धान्य ठेवले आहे. जेवण शिजण्याचा सुगंध येत आहे. मुन्ना सांगतो की, ‘आमच्या घरांमध्ये एकच खोली असते. इथेच खातो, इथेच झोपतो. आज जेवणात भात, डाळ आणि माशांच्या अंड्यांची भुर्जी बनत आहे.’ काही वेळ इथे थांबल्यानंतर आम्ही अडमा राखाच्या घराकडे निघालो. इथे अडमा राखा आमची वाट पाहत होते. मी त्यांच्याकडे प्रत्येक घराबाहेर सुकत असलेल्या महुव्याचा उल्लेख केला. ते म्हणाले - ‘नाते घेऊन जायचे असो, लग्नाचा प्रसंग असो किंवा कोणाचा मृत्यू, प्रत्येक विधीमध्ये आमच्याकडे दारू आवश्यक आहे. याच कारणामुळे महुआ मोठ्या प्रमाणात वापरला जातो. जेव्हा मुलाकडचे लोक मुलीच्या घरी स्थळ घेऊन जातात, तेव्हा दारू म्हणजे लंदा आणि इड्डिकुल नक्की घेऊन जातात. याशिवाय बोलणी पुढे सरकत नाही. समजा, स्थळ निश्चित करण्यासाठी मुलाकडच्या लोकांना मुलीच्या घरी पाच वेळा जावे लागले, तर प्रत्येक वेळी दारूचे प्रमाण वाढवले जाते. पहिल्यांदा एक बाटली, दुसऱ्यांदा दोन, तिसऱ्यांदा तीन. लग्न निश्चित झाल्यावर मुलाकडचे लोक आपल्या ऐपतीनुसार मुलीच्या कुटुंबाला रोख रक्कम, तांदूळ आणि दारू भेट देतात.’ दुसरी कोणतीही दारू प्यायल्यास 10 हजार रुपयांचा दंड अडमा सांगतात- ‘आमच्या लोकांमध्ये जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दारूला महत्त्व आहे. बाळाचा जन्म झाल्यावर सर्वात आधी दारू चाखायला दिली जाते. मृत्यूच्या वेळीही तोंडात दारू टाकली जाते. तरीही, आमचे काही नियम खूप कडक आहेत. समुदायाबाहेर लग्न केल्यास आणि पारंपरिक दारू सोडून दुसरी दारू प्यायल्यास 10 हजार रुपये दंड भरावा लागतो. महिलांच्या दारू पिण्याबद्दल विचारले असता, ते हसू लागले. ते म्हणाले- ‘ही आमची परंपरा आहे. आमच्या समाजात स्त्रिया आणि पुरुष समान आहेत, सर्वांचा आनंद सारखाच आहे.’ दिवसानुसार मुलांचे नाव ठेवले जाते अडमाच्या घरात उपस्थित गौरी कवासी सांगतात- ‘येथे मुलांच्या नामकरणाची पद्धतही अनोखी आहे. येथे नावे, दिवसाच्या आधारावर ठेवली जातात- जसे, शुक्रवारी जन्मलेल्या मुलाला ‘शुक्री’ आणि गुरुवारी जन्मलेल्याला ‘गुरु’ म्हटले जाते.’ वादावर पोलीस ठाण्यात जात नाहीत, स्वतःच निर्णय घेतात मुन्ना सांगतात- कोया लोक, आपले घरगुती आणि सार्वजनिक वाद कधीही पोलीस ठाण्यात घेऊन जात नाहीत. समाजाच्या बाबतीत कोणत्याही बाहेरील व्यक्तीला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. ते तारखांच्या व्यवस्थेला मानत नाहीत. निर्णय घेण्यासाठी आमच्याच समाजातील एका वृद्ध व्यक्तीची निवड केली जाते, ज्यावर कधीही कोणताही आरोप लागलेला नसावा. यांना आम्ही पेद्दा म्हणतो. पेद्दाच दंडाचा निर्णय घेतात. या मालिकेत पुढील आठवड्यात वाचा अशाच अनोख्या गालो लोकांची कहाणी….
भारतात उन्हाळ्याचा अर्थ आता फक्त दुपारच्या भाजणाऱ्या उन्हापुरता मर्यादित राहिलेला नाही. आता सूर्य मावळल्यानंतरही दिलासा मिळत नाही. रात्री 11 वाजताही भिंती गरम राहतात, पंखे गरम हवा फेकतात आणि कूलर-एसीदेखील अनेकदा निरुपयोगी वाटतात. वैज्ञानिक याला ‘वॉर्म नाईट्स’ (गरम रात्री) म्हणतात. या गरम रात्रींचा थेट परिणाम हृदय, किडनी आणि झोपेवर होत आहे. देशातील 734 जिल्ह्यांपैकी 57% जिल्हे आता उच्च किंवा खूप उच्च उष्णता धोका क्षेत्रात आले आहेत, जिथे सुमारे 76% लोकसंख्या राहते. तर, या 'वॉर्म नाईट्स' म्हणजे काय, त्या का वाढत आहेत आणि त्यापासून वाचण्याचा मार्ग काय आहे; दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये 6 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे… प्रश्न-1: ‘वॉर्म नाइट’ म्हणजे काय आणि ती पूर्वीपेक्षा वेगळी का आहे? उत्तर: भारतीय हवामान विभाग, म्हणजेच IMD नुसार, जेव्हा रात्रीचे किमान तापमान सामान्यपेक्षा 4.5 ते 6.4 अंश सेल्सिअसने जास्त होते, तेव्हा त्याला 'वॉर्म नाईट' म्हणतात. जर हे अंतर यापेक्षाही जास्त असेल, तर प्रकरण 'अत्यंत गंभीर' श्रेणीत येते. पूर्वी उष्णतेच्या लाटेचा अर्थ होता- दिवसा 40C पेक्षा जास्त तापमान असलेली उष्ण हवा. त्यापासून वाचण्याचे उपाय होते - सावली, पाणी, घरात राहा. पण उष्ण रात्रीत घरही शत्रू बनते. दिवसभर सिमेंटच्या भिंती आणि सिमेंटचे छत सूर्यप्रकाश स्वतःमध्ये शोषून घेतात. जेव्हा सूर्य मावळतो, तेव्हा तीच उष्णता हळूहळू बाहेर पडू लागते. अगदी त्याच वेळी जेव्हा तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करत असता. परिणाम? रात्री 11 वाजताही भिंतीला हात लावला, तर ती गरम लागते आणि पंखे आग ओकतात. गेल्या काही वर्षांत उष्ण रात्री वेगाने वाढल्या आहेत… प्रश्न-2: वाढत्या 'वॉर्म नाइट्स'मागे (उष्ण रात्रींमागे) खरी कारणे काय आहेत?उत्तरः रात्रीची वाढती उष्णता यासाठी 3 मोठी कारणे जबाबदार आहेत… 60% जबाबदारी काँक्रीटच्या इमारती आणि रस्त्यांची हवेतील वाढती आर्द्रता आणि दमटपणा जागतिक तापमानवाढ आणि झाडांची कमतरता प्रश्न-3: रात्री उष्ण झाल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो? उत्तर: CEEW म्हणजेच कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटरनुसार, रात्रीची उष्णता 'सायलेंट किलर'प्रमाणे काम करते… शरीराची शीतकरण प्रणाली ठप्प होते: मानवी शरीराचे तापमान 37C असते. रात्री बाहेर थंडी असते, तेव्हा शरीराला पूर्ववत होण्यासाठी वेळ मिळतो. पण जर रात्रीचे तापमान 25C च्या खाली आले नाही, तर शरीर स्वतःला पूर्ववत करू शकत नाही. याला 'हीट स्ट्रेस' म्हणतात. शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की 2100 पर्यंत, जास्त उष्ण रात्रींमुळे मृत्यूचा धोका जवळपास सहा पटीने वाढेल. हृदयावर थेट हल्ला: जेव्हा शरीर रात्री थंड होत नाही, तेव्हा हृदयाला शरीराचे तापमान कमी करण्यासाठी सतत अतिरिक्त मेहनत करावी लागते. यामुळे रक्तदाब वाढतो आणि झोपेदरम्यान 'सायलेंट हार्ट अटॅक' किंवा हृदय निकामी होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. झोपेची नासाडी: जेव्हा रात्रीचे तापमान 27C च्या वर जाते, तेव्हा झोपेचे सर्वात महत्त्वाचे भाग - REM स्लीप आणि डीप स्लीप - खराब होऊ लागतात. दिवसाच्या तीव्र उष्णतेनंतर, उष्ण रात्री झोपेच्या शरीरविज्ञानाला थेट बाधा पोहोचवतात, ज्यामुळे आरोग्यासाठी गंभीर धोके निर्माण होतात. स्मरणशक्ती कमी होणे, चिडचिडेपणा, नैराश्य… हे सर्व उष्ण रात्रींचे दीर्घकालीन परिणाम आहेत. प्रश्न-४: उष्ण रात्रींमुळे आर्थिक परिणाम काय होतील? उत्तर: उष्ण रात्री आरोग्यासोबतच आपल्या आणि देशाच्या आर्थिक विकासात अडचणी निर्माण करू शकतात… प्रश्न-5: उष्ण रात्रींपासून कूलर-एसी आपल्याला वाचवतील का? उत्तर: नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेच्या आकडेवारीनुसार, भारतात फक्त 24% घरांमध्ये एसी किंवा कूलर आहेत. शहरांमध्ये हे प्रमाण 40% आहे, तर गावांमध्ये केवळ 15%. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये तर फक्त 5% घरांमध्ये एसी आहेत. ही तीच राज्ये आहेत जिथे उष्णता सर्वाधिक कहर करते. पण एसी काही जादूची काठी नाही. एसी खोलीला थंड करतो, पण बाहेरची हवा आणखी गरम करतो. म्हणजेच, एसी चालवल्याने आपण स्वतः तर वाचतो, पण संपूर्ण शहराची उष्णता वाढत जाते. प्रश्न-6: उष्ण रात्रींचा सामना करण्यासाठी काय करावे? उत्तर: CEEW ने आपल्या अहवालात भारत सरकारला शिफारस केली आहे की काही महत्त्वाच्या सूचना त्यांच्या उष्णता कृती आराखड्यात समाविष्ट कराव्यात… 1. बहुतेक योजना फक्त दिवसाच्या उष्णतेवर लक्ष केंद्रित करतात. तर आता उष्ण रात्री, जास्त आर्द्रता देखील योजनेत समाविष्ट करावी लागेल. राज्यांनी हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणि आकडेवारीचा वापर करून विजेची मागणी आणि रोगांशी लढण्याची तयारी केली पाहिजे. 2. 2024 पासून, उष्णतेच्या लाटेला राज्य आपत्ती निवारण निधी (SDMF) अंतर्गत निधीसाठी समाविष्ट करण्यात आले आहे. राज्ये या पैशाचा वापर करून शीतकरण निवारा आणि अलर्ट प्रणाली तयार करू शकतात. याव्यतिरिक्त, शहरांमध्ये झाडे आणि हिरवळ वाढवण्यावर भर देऊ शकतात. 3. ज्या राज्यांचे अर्ध्याहून अधिक जिल्हे उष्णतेमुळे उच्च-जोखीम असलेल्या श्रेणीत आहेत, त्या भागांना 'राज्य-विशिष्ट आपत्ती' म्हणून घोषित केले पाहिजे. असे केल्याने SDRF चा अतिरिक्त 10% निधी उपलब्ध होतो, ज्याचा वापर उष्णतेमुळे होणारे मृत्यू, शेतीचे नुकसान आणि आपत्कालीन प्रशिक्षणासाठी केला जाऊ शकतो. 4. तापमान एका निश्चित मर्यादेपलीकडे जाताच, मजुरांच्या खात्यात त्वरित पैसे जमा केले जावेत जेणेकरून त्यांना तीव्र उष्णतेत काम करावे लागणार नाही. नागालँड आणि अहमदाबाद (SEWA) येथे हा प्रयोग यशस्वी झाला आहे. 5. जर भारताने पुढील 10 वर्षांत AC ची ऊर्जा कार्यक्षमता दुप्पट केली, तर ग्राहकांचे 2.2 लाख कोटी रुपये वाचू शकतात. यामुळे केवळ लोकांची वीज बिले कमी होणार नाहीत, तर पॉवर ग्रिडवरील दाबही कमी होईल आणि गंभीर वीज कपातीची परिस्थिती टाळता येईल. उष्ण रात्रींमध्ये तुम्हाला ओआरएस (ORS), लिंबू पाणी आणि ताक यांसारखी पेये पित राहायला पाहिजे, जेणेकरून शरीराच्या शीतकरण प्रणालीला मदत मिळेल. रात्री झोपण्यापूर्वी छत आणि भिंतींवर पाणी शिंपडा, यामुळे काँक्रीटमधील साठलेली उष्णता लवकर बाहेर पडते. सुती आणि हलके कपडे घाला. वृद्ध आणि मुलांवर विशेष लक्ष द्या. ही बातमी दैनिक भास्करमध्ये फेलोशिप करत असलेल्या आकाश कुमार यांनी लिहिली आहे.
Fake Police Verification : बनावट पोलीस व्हेरिफिकेशन प्रकरणी पुण्यात एकाला अटक, पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.
Land Division Fees : मोठी बातमी! शेतजमीन वाटणीपत्रासाठी नोंदणी शुल्क माफ; सरकारकडून परिपत्रक जारी
Land Division Fees : जमिनीचे वाटप करताना आकारले जाणारे नोंदणी शुल्क आता पूर्णपणे माफ; महसूल विभागाने जारी केले सुधारित परिपत्रक.
PMC News : पालिकेच्या ४ हजार २३ जागांवर जाहिरात फलक लावण्याच्या प्रस्तावावरून आयुक्त आणि श्रीनाथ भिमाले यांच्यात थेट शाब्दिक युद्ध.
Chandrakant Patil : मुलींसाठी उच्च शिक्षण आता पूर्णपणे मोफत होणार; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा
Chandrakant Patil : विद्यार्थिनींना आता शिक्षण आणि परीक्षा शुल्कासोबतच 'इतर शुल्कात' मिळणार १०० टक्के सवलत; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे संकेत.
PMC News : ४० कोटींच्या मालमत्तेचा करार ५०० च्या नोटरीवर? महापौरांनी दिले चौकशीचे आदेश
PMC News : बाणेर येथील महापालिकेची ४० कोटींची इमारत एका खासगी संस्थेला विनाभाडे दिल्याने खळबळ; नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सभेत मांडला विषय.
अग्रलेख : मुद्दा एकच, भूमिका दोन
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या प्रश्नावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने चौकशी करण्याचा जो आदेश दिला होता, तो आदेश उच्च न्यायालयाने स्वतःच रोखून धरण्याचा प्रकार घडला आहे.
PMC News : ‘निवासी घरांवर हातोडा, मग पब-हॉटेल्सवर मेहेरबानी का?’नगरसेवकांचा प्रशासनाला सवाल
PMC News : केवळ निवासी घरांवर अतिक्रमण विरोधी पथकाचा हातोडा, मोठ्या पब आणि हॉटेल्सकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; नगरसेवकांचा संताप.
दिल्ली वार्ता : राजकीय फायदा महत्त्वाचा!
महिला आरक्षणाचा (Women’s Reservation) मुद्दा बारगळला असला तरी आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप याचा वापर करणार यात किंचितही शंका उरली नाही.
Ayush Komkar Case : जामीन दिला तर पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध भडकेल; सरकारी वकिलांचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज.
Water Cut Pune : गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद; ‘या’भागांवर होणार मोठा परिणाम
Water Cut Pune : शहरातील जलशुद्धीकरण केंद्रे आणि पंपिंग स्टेशनमध्ये तातडीच्या दुरुस्तीचे काम; गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार.
Knife Attack : गोळेवस्तीत पती-पत्नीचा राडा! शेजाऱ्यांवर चाकूने जीवघेणा हल्ला, परिसरात खळबळ
Knife Attack : उरुळी कांचनच्या गोळेवस्तीत शिवीगाळीच्या वादातून चाकू हल्ला; तरुणाच्या कपाळावर वार करून दांपत्याने दिली जीवे मारण्याची धमकी.
माता मृत्यूदरात (Maternal Mortality) 86 टक्क्यांची घट झाल्याचे सकारात्मक चित्र आहे. मात्र गरीब, दुर्गम, ग्रामीण भागातील मातांसाठी हेच चित्र नकारात्मक आहे.
Child Abuse Case : १६ वर्षीय मुलाला अष्टापूरच्या ग्राफिक डिझायनरने गाठले; भांडगाव परिसरात चारचाकी नेऊन केलं अश्लील कृत्य, 'पॉक्सो' नुसार गुन्हा दाखल.
Shikrapur Accident : शिक्रापूरात तीन वाहनांचा भीषण अपघात! कंटेनरची दोन कारला धडक, दोघे जखमी
Shikrapur Accident : दुभाजक तोडून समोरून आलेल्या कंटेनरने दिला मोठा तडाखा; संभाजीनगरच्या प्रवाशांची कार अपघातात उद्ध्वस्त, आरोपी चालकावर गुन्हा दाखल.
Neera River Ghat : पालखी सोहळ्यातील महत्त्वाच्या 'नीरा स्नाना'साठी भाविकांची मोठी गर्दी होते, मात्र घाटाअभावी वारकऱ्यांची सुरक्षितता धोक्यात.
Akluj Animal Market : आता आठवड्यातून दोनदा भरणार जनावरांचा बाजार! अकलूज बाजार समितीचा मोठा निर्णय
Akluj Animal Market : माळशिरस तालुक्यातील जनावरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना मिळणार बळ; व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर बाजार समितीने उचलले महत्त्वपूर्ण पाऊल.
Dowry Harassment : वाघोली हादरली! एकाच दिवशी दोन विवाहितांच्या आत्महत्या; आरोपी पती जेरबंद
Dowry Harassment : माहेरून सोन्याची अंगठी आणि रोख १० लाखांसाठी छळ; दोन विवाहितांच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल.
Anganwadi Accident : धक्कादयक! अंगणवाडीच्या छताचं प्लास्टर कोसळलं; चिमुकले थोडक्यात वाचले
Anganwadi Accident : अवघ्या चार वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीची दुरवस्था; संतापलेल्या पालकांनी प्रशासनाला धरले धारेवर, दुरुस्तीची केली मागणी.
BJP Protest In PCMC : महिला आरक्षणावरील आघाताचा निषेध करण्यासाठी एप्रिल महिन्याची सभा ५ मे पर्यंत तहकूब; योगिता नागरगोजे यांनी मांडला निषेधाचा ठराव.
Temple Theft : पांडवकालीन सिद्धेश्वर मंदिरात चोरी! यात्रेचा उत्साह संपताच चोरट्यांचा डल्ला
Temple Theft : भोपाळबुवा आणि सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनंतर अवघ्या काही तासांतच चोरी; अज्ञात चोरट्यांनी दोन दानपेट्या फोडून रोकड केली लंपास.
PCMC Nominated Member : भाजपला नक्की कोणाची भीती? ‘या’फायरब्रँड महिलेला रोखण्यासाठी भाजपचा मोठा गेम
PCMC Nominated Member : राष्ट्रवादीचं एक नाव बदलण्याच्या नादात भाजपच्या सात स्वीकृत सदस्यांची नावेही रखडली; कालावधी कमी होत असल्याने भाजपमध्येच धुसफूस.
Red Cliff School : चोविसावाडी येथील रेड क्लिप शाळेच्या शुल्कवाढी विरोधात संताप; आरटीई विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची मागणी.
Attack On Farmer : हप्ते भरले नसल्याच्या रागातून चाकूने वार करून शेतकऱ्याला केले जखमी; एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तीन एजंटना केली अटक.
PCMC BJP Slogan : “अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय..”भाजप नगरसेवकांची जीभ घसरली
PCMC BJP Slogan : महापालिका प्रवेशद्वारावर रंगलेल्या आंदोलनात प्रशांत शितोळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा गोंधळ; चूक लक्षात येताच बदलली घोषणा.
Pimpri Chinchwad : काटे वस्ती परिसरातील मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण; एका लेनच्या कामामुळे धूळ आणि चिखलाचे साम्राज्य.
Khalapur News : बाजारपेठेत माकडांचा थरार! घरात घुसून वस्तूंची फेकाफेक; नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण
Khalapur News : चौक बाजारपेठ परिसरात माकडांच्या टोळ्यांचा घरांमध्ये शिरकाव; अन्नधान्य पळवणे आणि भांडी फोडण्याच्या प्रकारांमुळे गृहिणींमध्ये संतापाची लाट.
Eknath Shinde : साताऱ्यात बालकांसाठी हृदय शस्त्रक्रिया शिबिर; चिमुकल्यांसाठी एकनाथ शिंदेंची मोठी भेट
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे मोफत हृदय तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.
Pangolin Smuggling : खवले मांजराच्या तस्करीचं ‘डोंबिवली कनेक्शन’! एकाला अटक, मोठं रॅकेट उघड होणार
Pangolin Smuggling : चिपळूणहून आलेल्या बसमध्ये दबा धरून बसलेला डोंबिवलीचा तस्कर वन विभागाच्या जाळ्यात; ५.९८० किलो खवले जप्त.
Jaykumar Gore : राजकारणात नवी खेळी! स्वीकृत सदस्यांचा मार्ग मोकळा; आठ दिवसांत होणार मोठा निर्णय
Jaykumar Gore : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार; विधानसभेच्या मंजुरीनंतर आता शासन निर्णयाची प्रतीक्षा.

30 C