Kamgar Hospital : अंधेरीतील 'कामगार रुग्णालय'पूर्ण क्षमतेने सुरू करा
- घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे तसेच रुग्णालय लवकरच सुरु करण्याचे केंद्रीय मंत्री यांचे आश्वासनमुंबई : अंधेरी (पूर्व) येथील ईएसआयसी (ESIC) कामगार रुग्णालय गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. या रुग्णालयाचे गेल्या अनेक वर्षापासून कोट्यावधी रुपये खर्च करूनही अद्याप अपूर्ण अवस्थेत असलेल्या नूतनीकरणाचे काम तातडीने पूर्ण करून ते पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी आग्रही मागणी मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवियांची भेट घेऊन पत्राद्वारे केली आहे. केंद्रीय मंत्री यांनी देखील याची गंभीर दाखल घेऊन या संपूर्ण कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे तसेच रुग्णालयाचे अपूर्ण असलेले काम लवकरच पूर्ण करून ते पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे आश्वासन दिले.https://prahaar.in/2026/04/19/ashok-kharat-case-sit-investigation-increases-bhondubaba-kharats-problems-police-custody-extended-again/खासदार वायकर यांनी ९ एप्रिल २०२६ रोजी या रुग्णालयाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी १९८५ मध्ये राज्य सरकारने सुरू केलेले हे रुग्णालय २००८ मध्ये केंद्राच्या अखत्यारीत आले. मात्र, गेल्या १५ वर्षांपासून याचे नूतनीकरण प्रलंबित आहे. ८ वेळा निविदा प्रक्रिया बदलूनही काम पूर्ण झालेले नाही. विलंबामुळे या प्रकल्पाचा खर्च आता मूळ २५४ कोटी रुपयांवर टेंडर पेक्षा जास्त वाढत गेल्याची माहिती, रुग्णालय प्रशासन यांनी खासदार यांना दिली. नियमानुसार केवळ २ मजल्यांची परवानगी असताना तिथे ८ मजल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. या तांत्रिक त्रुटीमुळे रुग्णालयाला अद्याप ताबा प्रमाणपत्र' (OC) मिळालेले नाही, असे हि चर्चे दरम्यान खासदारांच्या निदर्शनास आले. १८ डिसेंबर २०१८ रोजी या रुग्णालयात लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू झाला होता. इतकी मोठी दुर्घटना होऊनही प्रशासनाने सुरक्षेच्या बाबतीत आणि नूतनीकरणात कमालीची उदासीनता दाखवली असल्याने हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी लवकरच केंद्रीय कामगार मंत्री यांची भेट घेण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले होते. त्यानुसार खासदार वायकर यांनी शुक्रवारी केंद्रीय कामगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची दिल्ली येथे लोकसभेत भेट घेत याप्रश्नी निवेदन दिले.खासदारांनी केलेल्या प्रमुख मागण्या :१. रुग्णालयातील 'अंत:रुग्ण सेवा' (IPD) युद्धपातळीवर सुरू करावी.२. ९०% काम पूर्ण झालेला ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स तातडीने कार्यान्वित करावा.३. मुख्य इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर प्रशासकीय कार्यालयांऐवजी स्त्री-पुरुष रुग्ण कक्ष (Wards) सुरू करावेत.४. किमान एक आपत्कालीन ऑपरेशन थिएटर आणि ५ आयसीयू बेड्स त्वरित सुरू करावेत.५. जुन्या कर्मचारी वसाहतीची दुरुस्ती करून नवीन कर्मचाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था करावी.https://prahaar.in/2026/04/19/ayan-ahmed-and-uzer-there-was-a-financial-dispute-between-ayan-ahmed-and-uzer/अशा मागण्याचा हि या निवेदनात समावेश करण्यात आला आहे. करोडो रुपये खर्च होऊनही केवळ नियोजनाच्या अभावामुळे कामगारांना उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे. याप्रकरणी तातडीने बैठक बोलावून दोषींवर कारवाई करावी आणि रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी मागणी खासदार रवींद्र वायकर यांनी केली. त्यानुसार हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने लवकरच सुरु करण्याचे तसेच नुतनीकरणाच्या कामात झालेल्या दिरंगाई तसेचघोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन हि केंदीय मंत्री खासदार यांना दिले.
Nashik Dwarka Chawk : नाशिकमधील हे चौक ३ महिने राहणार बंद; प्रवासाचे वेळेत करा नियोजन
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात आणि TCS कंपनी नंतर नाशिक आणखी एक कारणाने चर्चेत आहे ते म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा या कुंभमेळ्यासाठी गोदावरीच्या काठावर १२ नवीन घाट, ४०० एकर जागा आरक्षित करणे आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे आजपासून पुढील तीन महिने शहरातील द्वारका सर्कल बंद राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.https://prahaar.in/2026/04/19/ashok-kharat-case-sit-investigation-increases-bhondubaba-kharats-problems-police-custody-extended-again/द्वारका चौक ३ महिने बंदनाशिकमध्ये लवकरच सिंहस्थ कुंभमेळा सुरु होणार आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांनी वेग धरला आहे. कुंभमेळा सुरु होण्याच्या आधी सगळी कामे पूर्ण व्हावीत असा हेतू आहे. त्यामुळे नाशिकचे प्रवेशद्वार समजला जाणारा 'द्वारका सर्कल' आजपासून पुढील तीन महिन्यांसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. १८ जुलै पर्यंत हा परिसर निर्बंधाखाली राहणार असून, यामुळे नाशिकरांसह महामार्गावरील प्रवाशांची अडचणीत वाढ होणार आहे.https://prahaar.in/2026/04/19/ayan-ahmed-and-uzer-there-was-a-financial-dispute-between-ayan-ahmed-and-uzer/द्वारका सर्कल वरील कायमस्वरूपी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अंडरपासचे काम संथगतीने सुरु होते. मात्र कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनसमोर असल्याने आता या कामाला युद्धपातळीवर गती दिली जात आहे.दरम्यान मुंबई - आग्रा महामार्ग आणि पुणे महामार्गावरून येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असून नागरिकांनी त्याचा वापर करावा असे प्रशासनसह आवाहन करण्यात आले आहे.
Ajit Agarkar Contract : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्याबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Yamaha Fascino : भारतात लॉन्च झाली नवी २०२६ यामाहा फॅसिनो १२५
मुंबई : दुचाकी वाहन निर्माता कंपनी यामाहा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने आपल्या लोकप्रिय स्कूटर यामाहा फॅसिनो १२५ ला २०२६ साठी अपडेट करत बाजारात सादर केले आहे. या नव्या मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ७५,६०० रुपये ठेवण्यात आली असून, विविध व्हेरिएंटनुसार किंमत ९५,२०० रुपयांपर्यंत जाते. यापूर्वी ऑगस्ट २०२५ मध्ये या स्कूटरमध्ये बदल करण्यात आले होते, मात्र यावेळचा अपडेट मुख्यतः कॉस्मेटिक स्वरूपाचा आहे.नवीन २०२६ फॅसिनो १२५ स्कूटर कंपनीने ड्रम, डिस्क आणि एस अशा तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध करून दिला आहे. या अपडेटनंतर सर्व व्हेरिएंट्सच्या किंमतीत साधारण ९०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ड्रम व्हेरिएंटची किंमत ७५,६०० रुपये, डिस्क व्हेरिएंटची किंमत ८८,००० रुपये, तर एस व्हेरिएंटची किंमत ९५,२०० रुपये ठेवण्यात आली आहे.https://prahaar.in/2026/04/18/ultra-electric-scooter-simple-energy-launches-the-ultra-electric-scooter/या अपडेटमधील सर्वात मोठा बदल स्कूटरच्या मागील भागात म्हणजेच टेल सेक्शनमध्ये करण्यात आला आहे. आता टेल लॅम्प आणि टर्न इंडिकेटर्स स्वतंत्र युनिटमध्ये देण्यात आले असून, यापूर्वी ते इंटिग्रेटेड हाऊसिंगमध्ये होते. या बदलामुळे स्कूटरची एकूण लांबी कमी झाली असून, नवीन मॉडेलची लांबी १,७८० मिमी इतकी झाली आहे, जी आधी १,९२० मिमी होती. मात्र, एकूण डिझाइनमध्ये मोठा बदल करण्यात आलेला नाही.फीचर्सच्या बाबतीत पाहता, या स्कूटरमध्ये आधीप्रमाणेच कलर टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे, जो टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनला सपोर्ट करतो. याशिवाय टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ, सीटखाली २१ लिटर स्टोरेज आणि स्मार्ट मोटर जनरेटर (एसएमजी)सह हायब्रिड सेटअप यांसारखी फीचर्स कायम ठेवण्यात आली आहेत. तसेच सायलेंट स्टार्ट, स्टॉप अँड स्टार्ट सिस्टम आणि आन्सर बॅक फंक्शनसारख्या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत.https://prahaar.in/2026/04/18/salberdi-movie-manorama-ulgadnar-salberdibottom-mystery/इंजिनच्या बाबतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या स्कूटरमध्ये १२५ सीसीचे एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे ८ बीएचपी पॉवर आणि १०.३ एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन सीव्हीटी गिअरबॉक्सशी जोडलेले असून, एसएमजी हायब्रिड सिस्टममुळे सुरुवातीच्या एक्सेलरेशनवेळी हलका इलेक्ट्रिक असिस्ट मिळतो. एकूणच, २०२६ यामाहा फॅसिनो १२५ मध्ये डिझाइनमध्ये छोटे बदल करत कंपनीने त्याला अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
El Nino : अल निनोच्या पार्श्वभूमीवर यंदाचा खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा
मुंबई :“खरीप हंगाम २०२६ शेतकऱ्यांसाठी यशस्वी आणि उत्पादनक्षम ठरावा, तसेच सन २०२६-२७ मध्ये सुमारे १४५.२० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, भात, मका, तूर, उडीद, कापूस व ऊस या प्रमुख पिकांच्या पेरणीचा लक्षांक निश्चित करण्यात आला असून त्यादृष्टीने कृषी विभागाने पूर्वतयारी सुरू केली आहे. खते व बियाण्यांच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात येत आहे. यंदा एल निनोच्या पार्श्वभूमीवर हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्याचा शेती क्षेत्रावर होणारा संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीक पद्धती यावर चर्चा करण्यासाठी खरीप हंगाम २०२६ च्या नियोजनासाठी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे,” अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.कार्यशाळा सोमवारी सकाळी साडेदहा वाजता शिवाजीनगर, बालचित्रवाणी शेजारील नव्याने बांधण्यात आलेल्या सारथीच्या सभागृहात सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे,फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांच्यासह नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक, स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक, कृषी विभागाचे सर्व उपसचिव, सर्व कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक, हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्थेचे संचालक, सर्व कृषी संचालक, सर्व विभागीय कृषी संचालक, सर्व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, आत्माचे सर्व प्रकल्प संचालक, सर्व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, सोलापुर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी आयुक्तालयातील सर्व सह संचालक, कृषी उप संचालक, काही शेतकरी उपस्थित राहणार आहेत.कृषी विभागाने तयारीला सुरुवात केली असून या अनुषंगाने राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत खरीप हंगामासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावेत, यासाठी आवश्यक नियोजनाबाबत चर्चा होणार आहे. तसेच जिल्हानिहाय खते व बियाण्यांचा साठा, वितरण व्यवस्था आणि संभाव्य मागणी याचाही आढावा घेतला जाणार आहे. यंदा एल निनोच्या पार्श्वभूमीवर हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्याचा शेती क्षेत्रावर होणारा संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीक नियोजनाबाबतही कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.बियाण्यांची गरज २०.१७ लाख क्विंटल असून २८.०५ लाख क्विंटल (१३९%) बियाणे उपलब्ध आहे. खरीप हंगाम २०२६ करिता राज्यास ४८.८० लाख मे.टन खतांचे आवंटन मंजूर असून आतापर्यंत २५.१७ लाख मे.टन खते उपलब्ध आहेत.भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा देशातील पर्जन्यमान हे दीर्घकालीन सरासरीच्या ९२% इतके राहण्याची शक्यता असून ‘एल निनो’ स्थितीमुळे पावसात अनियमितता व दुष्काळ परिस्थिती उद्भवू शकते. या पार्श्वभूमीवर राज्यात हवामान प्रतिरोधक बियाण्यांचा वापर, उताराला आडवी पेरणी, बीबीएफ तंत्राचा अवलंब, शेततळ्यांची निर्मिती, मल्चिंग व सेंद्रिय खतांचा वापर तसेच पाणी बचत करणाऱ्या सिंचन पद्धतींवर विशेष भर दिला जाणार आहे. याकरिता महाकृषि अॅपच्या माध्यमातून हवामानास अनुकूल कृषि तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके कृषि विभागामार्फत घेणे सुरु आहे. तसेच महाविस्तार अॅप, कृषि विभागाचे यु ट्यूब, फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम, व्हाट्सअॅप चॅनेल या सोशल मिडियाच्या माध्यमातूनही हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे सुरू आहे.खरीप हंगामपूर्व तयारी करिता क्षेत्रीय पातळीवरील अधिकारी/कर्मचारी यांच्या विभागस्तरीय व उपविभागस्तरीय कार्यशाळा राज्यात सुरू आहे. विभागीय व उपविभागीय कार्यशाळांद्वारे कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ, केव्हीके शास्त्रज्ञ व प्रगतशील शेतकऱ्यांच्या सहभागातून Hands on Training दिली जात आहे. या सर्व उपाययोजनांच्या माध्यमातून कृषि विभाग खरीप हंगाम २०२६ मध्ये हवामानातील अनिश्चिततेशी सामना करण्यास शेतक-यांमध्ये जागरुकता निर्माण करीत आहे.
Ashok Kharat Case : SIT च्या तपासामुळे भोंदूबाबा खरातच्या अडचणीत वाढ! पोलीस कोठडीत झाली पुन्हा वाढ
नाशिकमधील भोंदूबाबा Ashok Kharat अशोक खरात याच्याविरोधात एकामागून एक गुन्हे दाखल होत असून, प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महिला अत्याचार, फसवणूक, अमली पदार्थांचा वापर आणि धार्मिक भावना दुखावण्यासारखे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत.अशातच आता नाशिकमधील भोंदूबाबा Ashok Kharat याच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाने (SIT) ताबा घेतल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी अशोक खरातला २३ एप्रिलपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.https://prahaar.in/2026/04/19/this-years-kharif-season-is-extremely-crucial-due-to-el-nino/विशेष म्हणजे ही सुनावणी ऑनलाईन माध्यमातून झाली. यावेळी सरकारी वकिलाकडून खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. पुढे सरकारी वकिलाने आपली बाजू मांडताना सांगितले की, खरातची गुन्हा करण्याची पद्धत जरी एकसारखी असली तरीही पीडित महिला प्रत्येकवेळी वेगवेगळी होती. मात्र महिलांना गुंगीचे पदार्थ देऊन आणि फसवणूक करून अत्याचार करण्यात आले असल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील द्रव्यांचा वापर आणि संपूर्ण कटाचा तपास करण्यासाठी कोठडी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.https://prahaar.in/2026/04/19/dagdusheth-temple-grand-offering-of-11000-mangoes-to-shrimant-dagdusheth-halwai-ganpati/महिनाभरातील घटनाक्रम :या प्रकरणात गेल्या महिनाभरात अनेक घडामोडी घडल्या असून त्या खालील प्रमाणे आहेत.१७ मार्च - रात्री उशिरा अशोक खरातला अटक१८ मार्च - न्यायालयात हजर, ७ दिवसांची पोलीस कोठडी२० मार्च - प्रकरण SIT कडे वर्ग२२ मार्च - तीन महिलांच्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल२५ मार्च - अमली पदार्थांचा वापर आणि धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप वाढले२६ मार्च - ५ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा नोंद३० मार्च - तिसऱ्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडी८ एप्रिल - आठ महिलांच्या तक्रारी, महत्त्वाचे पुरावे हाती१३ एप्रिल - नाशिक, पुणे, शिर्डी येथे ED चे छापे१५ एप्रिल - चौथ्या गुन्ह्यात पोलीस कोठडी१८ एप्रिल - न्यायालयीन कोठडी१९ एप्रिल - पाचव्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडीसध्या अशोक खरात पोलीस कोठडीत असून, २३ एप्रिल रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Matheesha Pathirana : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना अखेर केकेआरच्या संघात सामील
मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये कठीण परिस्थितीतून जात असलेल्या कोलकाता नाईट रायडर्ससाठी एक दिलासादायक बातमी आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना अखेर संघात सामील झाला आहे. फ्रँचायझीने याला दुजोरा दिला असून, या कठीण काळात संघाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.https://prahaar.in/2026/04/19/ayush-mhatre-major-blow-to-chennai-super-kings-ayush-mhatre-suffers-severe-hamstring-injury/टी-२० विश्वचषकादरम्यान झालेल्या पोटरीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पाथिराना संघात सामील झाला आहे. त्याने श्रीलंका क्रिकेटची अनिवार्य फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे आणि त्याला ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे, ज्यामुळे त्याला केकेआर संघात सामील होण्याची परवानगी मिळाली आहे.पाथिरानाला लगेचच अंतिम ११ क्रिकेटपटूंमध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. संघ व्यवस्थापनाला प्रथम त्याच्या सामन्यासाठीच्या तंदुरुस्तीचे मूल्यांकन करायचे आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्याला काही सराव सत्रे दिली जातील.https://prahaar.in/2026/04/19/ajit-agarkar-will-chief-selector-ajit-agarkar-receive-an-extension-until-june-2027/केकेआरने गेल्या आयपीएल लिलावात पाथिरानाला १८ कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याची अनोखी स्लिंग ॲक्शन आणि अखेरच्या षटकांमध्ये अचूक यॉर्कर टाकण्याची क्षमता त्याला एक विशेष क्रिकेटपटू बनवते. अशा परिस्थितीत, संघाला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत, विशेषतः जेव्हा गोलंदाजी विभाग दबावाखाली असल्याचे दिसते
Ayan Ahmed and Uzer : अयान अहमद व उजेरमध्ये होता पैशाचा वाद
अमरावती : परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरू झाल्यानंतर आता तपासात नवनवीन तथ्ये पुढे येत आहेत. कटातील मुख्य सूत्रधार अयान अहमद व उजेर खान इक्बाल खान या दोघांमध्ये पैशाचा वाद सुरू होता. त्यातून उजेरने अयानच्या मोबाईलमधील डेटा स्वत:कडे घेतला, अशी कबुली सूत्रधार अयानने एसआयटीच्या तपास पथकापुढे दिली. लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ व फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत:हून परतवाडा ठाण्यात पोक्सो, सार्वजनिक बदनामी केल्याप्रकरणी अयान व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास ४२ सदस्यीय एसआयटीकडे वर्ग करण्यात आला. सुरवातीला पाच दिवस कोणतिही पीडित पोलिसांकडे जबाब नोंदविणे किंवा तक्रार देण्याकरिता आलेली नव्हती. अखेर नजीकच्याच जिल्ह्यातील एक अल्पवयीन पीडित पोलिसांपर्यंत पोहोचली. पीडित ही अल्पवयीन असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तिच्या जबाबातून जी फॅक्ट पुढे येईल, त्यानुसार पुढील कारवाई केल्या जाईल, असेही त्यांनी सांगितले. अयानचे पैसे उजेरने घेतले होते. त्यानंतर उजेरनेच अयानच्या मोबाईलमधील डेटा स्वत:कडे घेऊन तो इतरांना फॉरवर्ड केला. त्या साखळीत सहा जण केवळ फॉरवर्ड करणारे निघाले. त्या टोळीचा दुसरा उद्देश अद्याप सर्वांची प्राथमिक चौकशी केली असता पुढे आलेला नाही, असेही विशाल आनंद यांनी स्पष्ट केले.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता प्रत्येक मुद्दा बारकाईने तपासल्या जात आहे. चौकशीच्या अधीन राहून ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्पुरते निलंबित केले, ते चौकशी अहवालात दोषी आढळले नाही तर त्यांचे निलंबन मागे घेतल्या जाईल.फ्लॅट मालक व अयानच्या पालकांची चौकशीयाप्रकरणात ज्या अल्पवयीन पीडित मुलींसोबत अयान अहमद याने अमरावतीच्या फ्लॅटवर शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे व्हिडिओ तयार केले, त्या फ्लॅट मालकाला वेळ पडेल तेव्हा चौकशीसाठी बोलविल्या जात आहे. शिवाय संशयित अयान याच्या पालकांची देखील पोलिसांकडून टप्प्याटप्याने चौकशी सुरू असल्याचे एसपी यांनी सांगितले.९० टक्के मुली सोशल मीडिया फ्रेंडअयान अहमद हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होता. अनेकांना रील तयार करून देणे व मोबाईल विक्रीतून तो पैसे कमवित होता. अयानच्या संपर्कात आतापर्यंत जेवढ्या मुली आल्या त्यापैकी ९० टक्के मुलींची त्याच्यासोबत सोशल मीडियावरून ओळख झाली होती, अशी कबुली अयानने बयानात दिली.सोशल मीडिया फॉलोअर्स वाढलेअयान काही वर्षांपासून सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होता. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत जवळपास सतरा ते साडेसतरा हजार फॉलोअर्स होते. आता गुन्हा दाखल होऊन एसआयटी चौकशी सुरू झाल्यावर अयान अहमदचे फॉलोअर्ससुद्धा वाढल्याचे दिसून येते.
BJP Leader Death : भाजपचे माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार बलबीर पुंज यांचे १८ एप्रिल २०२६ रोजी निधन झाले.
Women’s Reservation Bill : पंतप्रधानांचे राष्ट्रसंबोधन वादात.! कम्युनिस्ट खासदारांची आयोगाकडे तक्रार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार पी. संतोष कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पत्र लिहून आरोप केला आहे.
Dagdudsheth Mandir : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य
पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला रविवारी ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे गणपती मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गणरायाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. आंब्यांचे प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवालेचे संचालक मंदार देसाई कुटुंबियांच्यावतीने हा नैवेद्य देण्यात आला.मंदिरात रविवारी पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक झाला. त्यानंतर प्रसिद्ध गायिका मंजूषा पाटील यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. सकाळी आठ वाजता गणेशयाग झाला. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना तसेच वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व मंदिरात भाविकांना देण्यात येणार आहे.
Israel vs Arab Country : इस्त्रायल मोठ्या संकटात; १६ मुसलमान देशांची एकजूट
इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्त्रायलला मोठा राजनैतिक धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. अनेक देशांनी इस्त्रायलच्या भूमिकेविरोधात उघडपणे भूमिका घेतली असून तब्बल १६ देश एकत्र येत कडवा विरोध नोंदवला आहे. शनिवार १८ एप्रिल २०२६ रोजी दोहा येथे इस्लामिक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्त निवेदन जारी करत इस्त्रायलच्या निर्णयांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.इस्रायलच्या विरोधात १६ अरब देश :इस्रायलच्या विरोधात १६ अरब देशांनी एक संयुक्त निवेदन काढून इस्रायलने सोमालीलँडला सार्वभौम राष्ट्र म्हणून दिलेल्या मान्यतेचा निषेध केला आहे. ही राजनैतिक कारवाई एप्रिल २०२६ मध्ये झाली असून, या देशांनी इस्रायलच्या या कृतीला सोमालियाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन म्हटले आहे.https://prahaar.in/2026/04/19/lenskart-clarifies-on-tikli-and-tila-controversy-its-an-old-training-file-not-an-official-policy/या १६ मुसलमान देशांची एकजूट :अल्जेरिया , कोमोरोस , जिबूती , इजिप्त , जॉर्डन , कुवेत , लेबनॉन , लिबिया , मॉरिटानिया , ओमान , पॅलेस्टाईन , कतार , सौदी अरेबिया , सोमालिया , सुदान आणि येमेन.सोमालियामध्ये इस्त्रायलच्या राजदूत नियुक्तीला अवैध ठरवत, ही एकतर्फी कारवाई असल्याचे मुस्लिम देशांनी म्हटले. आंतरराष्ट्रीय समुदायाने सोमालियाच्या सार्वभौमत्वाचा आदर करावा, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक तणाव वाढला असून या पार्श्वभूमीवर इस्त्रायलची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
Navneet Rana : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला माजी खासदार नवनीत राणांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
Supreme Court : कलम १४२ अंतर्गत असलेल्या आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून न्यायालयाने हा आदेश जारी केला आहे.
Ajit Aagarkar : मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना जून 2027 पर्यंत मुदतवाढ मिळणार ?
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांचा करार या वर्षी जूनमध्ये संपल्यावर त्यांना मुदतवाढ मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या कार्यकाळात भारताने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. या कामगिरीमुळे आगरकर यांचा करार जून २०२७ पर्यंत एका वर्षासाठी वाढवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.अगारकर यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, भारतीय पुरुष संघाने २०२४ आणि २०२६ मध्ये सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकले आणि गेल्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली. भारताने मायदेशात झालेल्या २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला होता. पुढील वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक होणार असल्याने, बीसीसीआयला आगरकर यांना दीर्घकाळासाठी कायम ठेवायचे आहे.https://prahaar.in/2026/04/19/farmers-to-receive-%e2%82%b93000-per-month-from-the-modi-government-in-pmkmy-here-is-how-to-apply/आगरकर यांच्या कार्यकाळात संघातील स्थित्यंतराचा काळ सुरळीत होता आणि संघाने निर्भयपणे मोठे निर्णय घेतले. त्यांनी आपले काम पुढेही चालू ठेवावे, असे मंडळाला वाटले. पुढील माहिती देण्यासाठी बीसीसीआयचे अधिकारी आयपीएल सामन्यांदरम्यान त्यांची भेट घेतील. बीसीसीआयला सातत्य आणि अनुभव हवा होता, विशेषतः कारण दोन निवडकर्ते, आरपी सिंग आणि प्रज्ञान ओझा, यांनी त्यांच्या पदावर एक वर्षही पूर्ण केले नव्हते.https://prahaar.in/2026/04/19/shots-fired-at-indian-oil-tankers-in-the-strait-of-hormuz-rift-between-iranian-military-and-irgc-officials/भारतीय क्रिकेट बदलाच्या काळातून गेले. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन या तीन प्रमुख क्रिकेटपटूंनी कसोटी संघ सोडला. नवीन कर्णधाराचीही नियुक्ती करण्यात आली. शुभमन गिलकडे कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची जबाबदारी देण्यात आली, तर सूर्यकुमार यादवने टी-२० संघाचे नेतृत्व केले. आगरकर यांच्या नेतृत्वाखाली, निवड समितीने या वर्षाच्या सुरुवातीला मायदेशात झालेल्या टी-२० विश्वचषकासाठी ईशान किशनला संघात परत बोलावण्याचा आणि गिलला वगळण्याचा धाडसी निर्णय घेतला होता.
BMC News : बांधकामांमधील पाणी गटारात, सुकलेल्या चिखलाने भरले गटार
- विकासकांच्या बांधकामांचा भुर्दंड महापालिकेलामुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या नालेसफाईच्या अनुषंगाने रस्त्यालगतच्या नाल्यांमधील गाळ काढण्यात येत असून या रस्त्यालगतच्या नाल्यांमधून गाळ,कचरा ऐवजी चक्क चिखल माती मिश्रीत गाळाचे प्रमाण अधिक आहे. रस्त्यालगतच्या सर्व पर्जन्य जलवाहिनी या बांधकामांमधील चिखलाने भरुन गेल्या असून हा सुकलेला गाळच सध्या काढण्यात येत आहे. त्यामुळे बांधकामांमधील चिखलमाती मिश्रित पाणी गटारांमध्ये सोडले जात असल्याने त्यातील चिखल सुकून ही गटारे मातीने व्यापून गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बांधकामांमधील चिखलमिश्रित मातीचे पाणी सोडण्यात आले नसते तर या पर्जन्य जलवाहिन्यांमधील गाळ काढण्याचीही गरज नव्हती. त्यामुळे बांधकांमामधील चिखलमिश्रित पाण्याचा महापालिकेला भुर्दंड अधिक दिसून येत आहे.मुंबई महापालिकेच्यावतीने छोट्या आणि मोठया नाल्यांसह रस्त्यांलगतच्या पेटीका नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. रस्त्यांलगतच्या पेटीका नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी विभाग स्तरावर कंत्राटदार किंवा संस्थांची नेमणूक करून त्यांच्या माध्यमातून गाळाची सफाई केली जात आहे. त्यानुसार सध्या रस्त्यांलगतच्या पेटीका नाल्यांमधील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, अनेक ठिकाणी वाहून येणारा गाळ काढल्यानंतर ४८ तास सुकल्यानंतर त्या गाळाची विल्हेवाट नेमून दिलेल्या डम्पिंग ग्राऊंडवर लावली जाते.https://prahaar.in/2026/04/19/lenskart-clarifies-on-tikli-and-tila-controversy-its-an-old-training-file-not-an-official-policy/मात्र, या गाळांमध्ये यंदा चिखलमिश्रित मातीचे प्रमाण अधिक दिसून आले असून सुकलेल्या चिकट मातीचे कालेच गाळ म्हणून काढले जात आहेत. गाळ काढणाऱ्या मजूरांच्या म्हणण्यानुसार हा नाल्यातील निव्वळ गाळ नसून बांधकामांचे चिखल माती मिश्रित पाणी सोडले जाते,त्यामुळे नाले गाळाने पूर्ण भरलेले आहेत. आणि ते चिकट मातीनेच भरुन गेलेले आहेत. एकेका पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये पाऊण ते एक फुटापर्यंत या चिकट मातीचे थर जमा झालेले आहेत. त्यामुळे सध्या या मातीचे काले बाहेर काढण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे.मुंबईत अनेक विकासक बांधकामांच्या खोदकामांमधील पाणी हे महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सोडतात आणि ते चिखल मिश्रित पाणी या पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सोडल्याने ही वाहिनी कोरडी झाल्यानंतर हा चिखल सुकून जातो. परिणामी पर्जन्य जलवाहिन्या या चिखल मिश्रित मातीनेच अधिक भरलेल्या आहेत. त्यामुळे विकासक कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बांधकामांमधील पाणी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सोडतात आणि त्यातील चिखलामुळे आपल्या पर्जन्य जलवाहिन्यांत ती माती जमा होवून ती माती बाहेर काढण्यासाठी महापालिकेला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात.ऊस तोड कामगार उपसतात गाळ :सध्या पेटीका नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी सध्या ऊस तोड कामगारांची मदत घेतली जात आहे. लातुर जिल्ह्यातील अनेक गावांमधील ऊस तोड कामगार मोठ्याप्रमाणात मुंबईत दाखल होऊन ते पेटीका नाल्यांमधील गाळ काढत आहेत. या कामगारांना जोडी ८०० रुपये एवढे मानधन दिले जात असल्याची माहिती कामगारांकडून प्राप्त झाली आहे.
Iran-US Peace Talks : इराण-अमेरिका शांतता चर्चेत प्रगती, पण अंतिम करार अजून दूर- मोहम्मद गालिबाफ
तेहरान : इराण आणि अमेरिका यांच्यात दुसऱ्या टप्प्यातील शांतता चर्चेची लवकरच शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, इराणने सांगितले की अमेरिकेसोबतच्या शांतता चर्चेत काही प्रगती झाली आहे, मात्र अंतिम करार अद्याप खूप दूर आहे. कारण दोन आठवड्यांचा युद्धविराम बुधवारी संपणार आहे.इराणी संसदेचे सभापती मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी शनिवारी दूरदर्शनवरील संबोधनात सांगितले की, अजूनही अनेक उणिवा आहेत आणि काही मूलभूत मुद्दे प्रलंबित आहेत. गालिबाफ म्हणाले, “आपण अजूनही अंतिम चर्चेपासून खूप दूर आहोत.” गत शनिवारी पाकिस्तानमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातील चर्चेत इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्वही गालिबाफ यांनीच केले होते. त्यांनी असेही सांगितले की, अनेक आठवडे चाललेल्या युद्धात इराण रणांगणावर विजयी राहिला आणि वॉशिंग्टनसोबत केवळ आपल्या मागण्या मान्य झाल्यामुळेच तात्पुरत्या युद्धविरामास सहमती दिली.https://prahaar.in/2026/04/14/iran-us-israel-war-us-destroy-158-iranian-naval-ships-donald-trumps-big-claim/अमेरिकेचा उल्लेख करताना ते म्हणाले की, “आम्ही युद्धविराम स्वीकारला, कारण त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या होत्या.” गालिबाफ यांनी दावा केला की अमेरिका आपले उद्दिष्ट साध्य करू शकली नाही आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण कायम आहे.ते पुढे म्हणाले की, शत्रूचा प्रत्येक प्रयत्न आमच्यावर त्याच्या मागण्या लादण्याचा होता. त्यामुळे आपल्या हक्कांची नोंद करून देणे आवश्यक आहे आणि म्हणूनच येथे चर्चा हा संघर्षाचाच एक मार्ग आहे. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, इराणमध्ये सत्तांतर घडवून आणणे आणि त्याची लष्करी क्षमता संपवणे हे ट्रम्प यांचे उद्दिष्ट पूर्णपणे अपयशी ठरले. गालिबाफ यांनी असेही म्हटले की, “इराण हा व्हेनेझुएला नाही,” म्हणजेच बाहेरील दबावामुळे येथे सरकार बदलता येणार नाही.इराणी संसदेच्या अध्यक्षांनी मान्य केले की लष्करी ताकदीच्या बाबतीत अमेरिका इराणपेक्षा अधिक बलवान आहे. मात्र त्यांनी ठामपणे सांगितले की, केवळ शस्त्रे, पैसा आणि संसाधने यावर विजय ठरत नाही. त्यांच्या मते, इराणने ‘असिमेट्रिक वॉरफेअर’ म्हणजेच वेगळी रणनीती अवलंबून शक्तिशाली शत्रूला मागे हटवले. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेबाबत त्यांनी सांगितले की, काही मुद्द्यांवर सहमती झाली आहे, पण अजूनही अनेक मोठे मतभेद कायम आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, इराण आपल्या राष्ट्रीय हितांशी कोणतीही तडजोड करणार नाही आणि कूटनीतीत झुकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.https://prahaar.in/2026/04/10/big-shock-to-iran-former-foreign-minister-kamal-kharrazi-passes-away-he-died-after-us-airstrikes/मोहम्मद गालिबाफ यांनी असा आरोपही केला की, अमेरिका ‘अमेरिका फर्स्ट’ची भाषा करते, पण प्रत्यक्षात ती इस्रायलच्या हितांना प्राधान्य देते आणि त्याच आधारावर निर्णय घेते. तथापि, प्रत्यक्ष परिस्थिती अजूनही तणावपूर्णच आहे. अलीकडील घडामोडींमध्ये होर्मुज सामुद्रधुनीबाबत वारंवार भूमिका बदलताना दिसत आहे. कधी ती खुली करण्याची घोषणा केली जाते, तर कधी पुन्हा बंद करण्याची चर्चा समोर येत आहे.गालिबाफ आणि त्यांच्या शिष्टमंडळाने ११ एप्रिल रोजी इस्लामाबाद येथे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली होती. १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर इराण आणि अमेरिका यांच्यात झालेला हा आतापर्यंतचा सर्वात उच्चस्तरीय संपर्क मानला जात आहे. मात्र, या चर्चेत कोणताही अंतिम करार होऊ शकला नाही. इराणचे उपपरराष्ट्र मंत्री सईद खतीबजादेह यांनी सांगितले की, अमेरिकेसोबतच्या पुढील चर्चेच्या फेरीसाठी अद्याप कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.
Darshan Kumar : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर आठवड्याभरात संगीत इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
- पीयूष बन्सल यांनी मागितली माफीमुंबई : लेंस्कार्टचे (Lenskart) संस्थापक आणि सीईओ पीयूष बंसल यांनी सोशल मीडियावर सुरु असलेल्या वादावर महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हा दस्तावेज कंपनीची अधिकृत एचआर पॉलिसी नसून एक जुनी अंतर्गत ट्रेनिंग फाइल होती, जी चुकीच्या संदर्भात शेअर करण्यात आली आहे.बंसल यांनी मान्य केले की त्या फाइलमध्ये बिंदी आणि तिलक संदर्भात एक अयोग्य ओळ समाविष्ट होती. मात्र, ही चूक १७ फेब्रुवारीलाच लक्षात येऊन ती दुरुस्त करण्यात आली होती. संबंधित मजकूर हटवण्यात आला होता, म्हणजेच हा मुद्दा सार्वजनिक होण्याच्या काही आठवडे आधीच कंपनीने आवश्यक कारवाई केली होती.https://prahaar.in/2026/04/19/underground-railway-lines-to-be-constructed-from-csmt-to-kalyan-and-churchgate-to-virar/या प्रकरणात ही त्रुटी आधी लक्षात न आल्याची जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारली. “ही चूक आमच्या लक्षात यायला हवी होती,” असे सांगत त्यांनी पारदर्शक भूमिका मांडली.We have heard you. Clearly and openly. Over the past few days, our community and customers have spoken - and we have listened.Today, we are standardizing our In-Store Style Guide and sharing it publicly and transparently: https://t.co/lC8KlLLUZmThese guidelines explicitly and…— lenskart (@Lenskart_com) April 18, 2026तसेच, लेंस्कार्टमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक प्रतीकांचा आदर केला जातो, असेही त्यांनी अधोरेखित केले. कंपनीच्या संस्कृतीत विविधतेला महत्त्व असून प्रत्येक कर्मचाऱ्याची ओळख जपणे हीच लेंस्कार्टची भूमिका असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
gold-silver price today: सोने -चांदी महाग झाले की स्वस्त? ; जाणून घ्या नवीन किमती काय?
gold-silver price today:
Vijay Wadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माजी खासदार नवनीत राणांवर जोरदार शाब्दिक हल्ला केला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Ashok Kharat : अशोक खरातचे पाय खोलात; पाचव्या गुन्ह्यात २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Ashok Kharat nashik, court : अशोक खरातला 23 एप्रिलपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
इराणने भारतीय जहाजांना रोखल्याचा इशारा ; संतप्त ट्रम्प यांनी ‘शत्रूला’दिली धमकी
trump on strait-of-hormuz : मध्यपूर्वेतील एक महत्त्वाचा सागरी मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे.
Ranveer and Deepika : रणवीर- दीपिका दुसऱ्यांदा होणार आई बाबा, गुड न्यूजचा फोटो पाहाच
मुंबई : दीपिकाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, धुरंधरबाबत नाही, कोणत्या नवीन सिनेमाची नाही तर, दीपिका पुन्हा आई होणार असून सिंग परिवारात पून्हा एका आनंदाचे क्षण येणार आहेत.अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात काही न बोलता एका फोटोनेच समजलं आहे, की दुआ मोठी ताई होणार आहे. दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वाना दिली. पोस्ट मधील फोटो मध्ये दुआ दिसते आहे आणि दुआच्या हातात प्रेग्नेंसी टेस्ट किट आहे, जे पॉजिटीव्ह आहे. या पोस्ट वर कौतुकाचा वर्षाव होत असून अनेकांनी या जोडीचे अभिनंदन केले आहे. फॅन्स आणि अनेक सेलिब्रिटींनी मिळून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
Akshay Kumar : बॅालिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार त्याच्या भूत बंगला चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने मोठा खुलासा केला आहे.
Railway : CSMT ते कल्याण आणि चर्चगेट ते विरार भुयारी रेल्वे करणार
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे ही मुंबई महानगर क्षेत्राची जीवनवाहिनी आहे. वाजवी दरात वेगाने प्रवास करण्याचा पर्याय म्हणून लाखो मुंबईकर रेल्वेची निवड करतात. दररोज पश्चिम रेल्वेद्वारे सुमारे ३० लाख तर मध्य रेल्वेद्वारे सुमारे ६२ लाख प्रवासी प्रवास करतात. पश्चिम रेल्वे चर्चगेट ते डहाणू आणि मध्य रेल्वे ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, कर्जत, खोपोली, गोरेगाव, पनवेल आणि उरण अशी आडवीतिडवी पसरली आहे. कार्यालयीन वेळांमध्ये गाड्यांच्या दारांवर लटकत शेकडो प्रवासी जीव धोक्यात टाकून प्रवास करतात पण रेल्वेचाच पर्याय निवडतात. रेल्वेच्या सर्व गाड्या १२ डब्यांच्या आहेत. मोजक्या गाड्या १५ डब्यांच्या आहेत. पण ही व्यवस्था अपुरी पडत आहे. गर्दी हाताळणे आजही रेल्वेसाठी आव्हान आहे. यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि चर्चगेट ते विरार या दोन मार्गांसाठी भुयारी रेल्वेबाबत विचार सुरू आहे. सध्याची व्यवस्था सुरू ठेवून ही अतिरिक्त व्यवस्था सुरू करता येईल का याचीही चाचपणी सुरू आहे.मुंबईत जागेची टंचाई आहे. रेल्वेचा विस्तार करायचा तर भूसंपादनासाठीच अब्जावधींचा खर्च होईल अशी स्थिती आहे. शिवाय अतिक्रमण हटवणे, नागरिकांचे पुनर्वसन करणे हे सर्व खर्चिक काम आहे. या खर्चात बचत करण्यासाठीच भुयारी मार्गांचा विचार सुरू आहे. या प्रकारात सामान्य रेल्वे विस्तार योजनेच्या तुलनेत कमी भूसंपादन करुनही रेल्वेचा विस्तार शक्य होईल. यामुळेच भुयारी मार्गाच्या व्यावहारिकतेची चाचपणी सुरू आहे.सध्या पश्चिम रेल्वेद्वारे सुमारे ३० लाख तर मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, कर्जत पर्यंत सुमारे ३८ लाख प्रवासी प्रवास करतात. या गर्दीला सुयोग्य पद्धतीने हाताळण्यासाठी तसेच प्रवास अधिक सुरळीत करण्यासाठी भुयारी रेल्वे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. भुयारी रेल्वेमुळे रुळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासही मदत होणार आहे. भुयारी मार्ग तयार झाल्यास प्रवाशांना सुरक्षित प्रवेश किंवा बाहेर पडण्याची व्यवस्था करता येईल आणि लोकल, मेल-एक्सप्रेस, मालगाड्यांसाठीही स्वतंत्र मार्ग करण्यास मदत होईल. या सर्व बाबींचा विचार करून मुंबई रेल्वे विकास महामंडळाने चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या पहिल्या टप्प्याच्या भुयारी रेल्वेच्या तांत्रिक तसेच आर्थिक गोष्टींचाही अभ्यास सुरू केला आहे. अंतिम निर्णय केंद्र आणि राज्य सरकार रेल्वेशी समन्वय राखून घेणार आहेत.
Women Reservation : अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना महिला-विरोधी ठरवल्याबद्दल तीव्र टीका केली. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण पक्षपाती असल्याचे म्हटले.
Deepika Padukone Good news : गुड न्यूज ! रणवीर सिंग आणि दीपिका दुसऱ्यांदा होणार आई-बाबा
Deepika Padukone Good news :
Anjali Damania : मंत्रिमंडळात महिला किती? अंजली दमानियांनी आकडेवारीसह केली सरकारची कानउघडणी
Anjali Damania : महाराष्ट्रात ३९ मंत्र्यांमध्ये केवळ ४ महिला मंत्री
Tabu : बॅालिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूने मुंबईतील वर्साेवा भागात आलिशान अपार्टमेंटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी होण्याची शक्यता वाढल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली असल्याचे जाहीर केले होते. पण काही दिवसांतच पुन्हा एकदा इराणने होर्मुझ सामुद्रधुनी केली आहे. इराणकडून भारताच्या दोन तेलवाहक जहाजांच्या दिशेने गोळीबारही करण्यात आला. सुदैवाने इराणच्या गोळीबारात जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही. गोळीबाराच्या घटनेची भारत सरकारने गंभीर दखल घेतली. परराष्ट्र मंत्रालयाने इराणचे राजदूत मोहम्मद फथाली यांना बोलावून आपली चिंता व्यक्त केली. इराणच्या राजदूताने भारताचे म्हणणे आपल्या सरकारच्या कानी घालण्याचे आश्वासन दिले आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा इराणचेच होर्मुझ सामुद्रधुनीवर पूर्ण नियंत्रण असल्याचे तसेच होर्मुझमार्गे होणारी जलवाहतूक ही इराणच्या परवानगी आणि सहकार्याविना अशक्य असल्याचे सिद्ध झाले आहे.इराण होर्मुझ सामुद्रधुनी खुली करणार नसेल तर अमेरिका बाहेरून कोंडी करून इराणमधून येणाऱ्या जहाजांना अडवेल असे अमेरिकेने जाहीर केले होते. प्रत्यक्षात अमेरिका त्यांच्या या प्रयत्नात अयशस्वी झाली आहे आणि इराण होर्मुझ सामुद्रनीवर नियंत्रण ठेवण्यात सातत्याने यशस्वी होताना दिसत आहे.इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यात आली असून सर्व जहाजांची वाहतूक होईल असे जाहीर केले होते. तरी भारताच्या तेलवाहक जहाजांच्या दिशेने गोळीबार झाला. यामुळे इराणी सैन्य आणि IRGC च्या अधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.अमेरिका आणि इस्रायलने इराणवर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी हवाई हल्ले सुरू केले आणि पश्चिम आशियात युद्धाची ठिणगी पडली. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी शत्रू देश आणि त्यांना युद्धात थेट मदत करणाऱ्यांना बंद केली. यानंतर ८ एप्रिल रोजी होर्मुझ सामुद्रधुनी फक्त दहा मिनिटांसाठी खुली करण्यात आली, नंतर पुन्हा बद करण्यात आली. यानंतर थेट १७ एप्रिल रोजी इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी झाल्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सर्वांसाठी खुली करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. पण इराणचे परराष्ट्र मंत्री, अब्बास अराघची यांनी एक्स (X) वर पोस्ट केले की लेबनॉनमध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा उघडली जात आहे. नेमक्या याच पोस्टमुळे गोंधळ झाला.सरकारी निर्णयाची माहिती IRGC च्या अधिकाऱ्यांना मिळाली नाही अथवा त्यांची या निर्णयाला सहमती नव्हती. यामुळेच इराणचे परराष्ट्र मंत्री, अब्बास अराघची यांनी जाहीर करूनही IRGC च्या अधिकाऱ्यांनी होर्मुझ सामुद्रधुनी व्यावसायिक जलवाहतुकीसाठी खुली केलेली नाही. शिवाय होर्मुझमार्गे प्रवास करणाऱ्या जहाजांच्या दिशेने गोळीबार केला.धक्कादायक म्हणजे भारताच्या दोन तेलवाहक जहाजांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही. पण ज्या जहाजांवर गोळीबार झाला त्यातील एकात सुमारे २० दशलक्ष आणि दुसऱ्या जहाजात पाच दशलक्ष बॅरल कच्चे तेल आहे.
DA HIKE : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 'अच्छे दिन', डीएमध्ये २ टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली : महागाईच्या काळात सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळाला. केंद्र करकारने त्यांना अक्षय्य तृतीयानिमित्त मोठे गिफ्ट दिले. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात म्हणजे डीएमध्ये २ टक्क्यांनी वाढ केली. त्यामुळे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्तीवेतनात मोठी वाढ होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना फक्त आर्थिक दिलासा मिळाला नाही तर वाढत्या महागाईच्या काळात त्यांचे बजेट कोलमडणार नाही. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे एक कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनर्सना फायदा होणार आहे. देशात सध्या ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६४ लाख पेन्शनर्स आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात २ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. कर्मचारी संघटना ८व्या वेतन आयोगाअंतर्गत सॅलरी स्ट्रक्चर बदलण्याची मागणी करत असतानाच सरकारने महागाई भत्त्यात वाढीचा निर्णय घेतला आहे.केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढीच्या घोषणेला पहिल्यांदाच इतका उशीर झाला आहे. सर्वसामान्यपणे सरकारकडून जानेवारी ते जूनच्या सहामाहीसाठी होळीच्या दरम्यान, म्हणजेच मार्च महिन्यात निर्णय घेते. पण यंदा यासाठी उशीर झाला आहे. १० वर्षात पहिल्यांदाच सरकारने महागाई भत्त्याची घोषणा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात केली आहे. महागाई भत्त्यात वाढीची घोषणा ही जानेवारी महिन्यापासून लागू असणार आहे. एप्रिल महिन्याच्या वेतनासोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा महागाई भत्ता मिळणार आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यात २०२५च्या दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्त्याची घोषणा केली होती.कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता त्यांच्या बेसिक सॅलरीनुसार ठरवला जातो. जर एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी ६०,००० रुपये असेल तर त्याला पूर्वी ५८ टक्के महागाई भत्त्यानुसार ३४८०० रुपये महागाई भत्ता मिळत होता. आता त्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ झाली आहे म्हणजे त्यांना ६० टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. त्यानुसार महागाई भत्ता ३६,००० रुपये असेल. म्हणजेच कर्मचाऱ्याच्या पगारात दरमहा १२०० रुपयांची वाढ झाली.
Pan card new rules 2026: गाडी ते घर खरेदीपर्यंत…; पॅन कार्ड नसेल तर अडकतील तुमची महत्त्वाची कामे
Pan card new rules 2026 : पॅन कार्ड तुमच्या प्रत्येक आर्थिक पावलाचा रेकॉर्ड ठेवते, ज्यामुळे सरकारला उत्पन्नाचे योग्य आकलन करण्यास मदत होते.
IPL 2026 : हैदराबादची चेन्नईवर १० धावांनी मात
हैदराबाद : अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांच्या स्फोटक फलंदाजी आणि इशान मलिंगाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सचा १० धावांनी पराभव केला. उप्पल येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, चेन्नईला केवळ १८४ धावाच करता आल्या आणि त्यांना सामना गमवावा लागला.या विजयामुळे हैदराबाद आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. सहा सामन्यांमधील संघाचा हा तिसरा विजय आहे. दुसरीकडे, चेन्नईने या हंगामातील आपला चौथा सामना गमावला आहे. सध्या हा संघ सातव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्स अव्वल स्थानावर आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.https://prahaar.in/2026/04/18/smriti-mandhana-the-indian-cricketer-with-the-most-runs-in-t20-cricket/१९५ धावांचे लक्ष्य गाठताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला नाही आणि त्याने तीन चेंडूंमध्ये केवळ सात धावा केल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडने त्यानंतर आयुष म्हात्रेसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. ऋतुराज १३ चेंडूंमध्ये १९ धावा करून बाद झाला. दरम्यान, म्हात्रेने पाच चौकार आणि एका षटकारासह १३ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या. मॅथ्यू शॉर्टने ३४ धावांचे योगदान दिले. सरफराज खानला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही आणि तो १९ चेंडूंमध्ये २५ धावा करून इशान मलिंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला.देवाल्ड ब्रेविस खाते न उघडताच शिवांग कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. दरम्यान, शिवम दुबे २१ धावांवर शकिब हुसेनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. जेमी ओव्हरटन १५ चेंडूंमध्ये १६ धावा करून प्रफुल्ल हिंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. अंशुल कंबोज ८ चेंडूंमध्ये १३ धावा करून नाबाद राहिला. SRH ची गोलंदाजी प्रभावी ठरली, ज्यात इशान मलिंगाने २९ धावांत तीन बळी घेतले, तर नितीश कुमार रेड्डीने दोन विकेट्स घेतल्या. शिवांग कुमार आणि शकिब हुसेन यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.https://prahaar.in/2026/04/18/ipl-2026-gujarat-defeats-kolkata-by-five-wickets/तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर हैदराबादने दमदार सुरुवात केली. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या सलामीच्या जोडीने अवघ्या ५.५ षटकांत पहिल्या विकेटसाठी ७५ धावा जोडल्या. अभिषेकने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या १५ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. अभिषेकने २२ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि चार षटकारांसह ५९ धावा केल्या. मात्र, हेड लयीत नसल्याचे दिसत होते आणि त्याला क्रीजवर टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्याने २० चेंडूंचा सामना करून केवळ २३ धावा केल्या. कर्णधार इशान किशन शून्यावर बाद झाला.अनिकेत वर्मालाही फलंदाजीत फारसा प्रभाव पाडता आला नाही, त्याने केवळ दोन धावा केल्या. दरम्यान, नितीश कुमार रेड्डी १२ धावांवर जेमी ओव्हरटनच्या गोलंदाजीवर मॅथ्यू शॉर्टकरवी झेलबाद झाला. मात्र, हेनरिक क्लासेनने या सामन्यातही आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत ३२ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. क्लासेनने एक बाजू सांभाळत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३९ चेंडूंमध्ये ५९ धावा केल्या.सलील अरोराने १३ धावा केल्या, तर शिवांग कुमारने १२ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत, अंशुल कंबोजने सीएसकेसाठी शानदार गोलंदाजी करत २२ धावांत तीन विकेट्स घेतल्या. जेमी ओव्हरटननेही एसआरएचच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. मुकेश चौधरीने दोन बळी आणि गुर्जपनीत सिंगने एक विकेट घेतली.
Salman Khan's New Movie : बॅालिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी मातृभूमी चित्रपटामुळे चर्चेत असून, यानंतर येणाऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असल्याची माहिती समोर आली आहे.
Urmila Nimbalkar : 'ब्रँड किंवा प्रॉडक्ट बनवण्याचे साधारण दोन मार्ग असतात'
Top 10 News : वर्षभरातील पीकस्थिती, पावसाचे प्रमाण, तसेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घडामोडींसह देशाची संरक्षण स्थितीचा अंदाज वर्तविणारी बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध व ऐतिहासिक भेंडवडची घटमांडणी यावर्षी आज अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणार आहे.
Samruddhi Highway accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे.
Weather update : सध्या महाराष्ट्रावर दुहेरी संकट घोंगावत असून, उन्हामुळे जीवाची काहिली होत असतानाच आता अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Weather alert : महाराष्ट्रात रविवारी अवकाळी मुसळधार; या जिल्ह्यांना अलर्ट जारी
मुंबई : देशाच्या हवामानातं अनपेक्षित बदल पाहायला मिळत आहेत. काही राज्यात पाऊस, गारपीठ तर काही ठिकाणी कडाक्याचं ऊन पडलेलं आहे, वातावरणचा समतोल बिघडत असल्याने याचा थेट परिणाम जीवसृष्टी वर होताना पाहायला मिळत आहे. कडकी उन्हात उष्माघाताने बळी जात आहेत. तर कुठे अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होताना पाहायला मिळत आहे.अशातच १९ एप्रिल रोजी महाराष्टात दुहेरीस संकट उध्दभवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांसाठी अलर्ट देखील जरी करण्यात आले आहेत.https://prahaar.in/2026/04/19/crime-news-youth-murdered-with-a-machete-over-a-past-dispute-two-suspects-detained/पश्चिम महाराष्ट्रावर संकटपश्चिम महाराष्ट्राच्या वेशीवर पुन्हा एकदा अबकाली पावसाचं संकट घोंगावत आहे. पुणे, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पून्हा एकदा अवकाळी पावसाच्या सराई कोसळणार आहेत. त्यामुळे या भागाला यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम प्रकारचा पाऊस असण्याची शक्यता आहे. शिवाय नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. मराठवाड्यात देखील अवकाळी आपली हजेरी लावणार आहे. बीड हिंगोली, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांनाही पावसाचा यल्लो अलर्ट जारी केला असून टायचा परिणाम शेतीवर होणार आहे.https://prahaar.in/2026/04/16/maharashtra-weather-heatwave-to-intensify-in-maharashtra-while-showers-are-set-to-lash-these-states/विदर्भात उन्हाचा तडाखा आणखी वाढणारअकोला अमरावती, वर्ष या भागात येत्या काही दिवसात वातावरणात उष्णता पतचंद वाढणार असून नागरिकांनी नियोजन करूनच घराबाहेर पडावे, दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घ्यावी. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी योग्य य्त्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.शिवाय कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट नसला तरी हलका ते मध्यम पाऊस आणि वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
आधी आई-वडिलांशी बोलणं मी अनेकदा टाळायचो, पण आता ते बोलण्यासाठी या जगात नाहीत. माझी सर्वांना विनंती आहे की, जर तुम्हीही तुमच्या आई-वडिलांशी बोलणं टाळत असाल, तर असं करू नका. मी मोहित गुलाटी, लुधियानाचा रहिवासी आहे. जालंधरमधून आयटीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्याच्या एका कंपनीत मी अभियंता आहे. आयुष्य पूर्ण वेगाने धावत होतं - तेच रोजचं काम, जबाबदाऱ्या. पण या धावपळीत आई-वडिलांशी बोलणं होत राहायचं. अनेकदा कामाच्या दबावामुळे त्यांचा फोन उचलू शकलो नाही, तेव्हा कल्पना नव्हती की हे 'टाळणं' एक दिवस आयुष्यभराची खंत बनेल. वृंदावनमधील त्या बोट अपघाताने माझं सर्व काही हिरावून घेतलं. माझे आई-वडीलही त्याच बोटीत होते आणि त्या अपघातात त्यांचा जीव गेला. 10 एप्रिलला मी ऑफिसमध्ये होतो… माझ्या एका शेजाऱ्याने फोन करून सांगितलं की - तुमचे आई-वडील राहिले नाहीत. बोट अपघातात त्यांचाही जीव गेला आहे. एक क्षणभर तर वाटलं की हे सगळं खोटं आहे. याच दरम्यान, माझी बहीण दामिनीने मला फोन केला. तिने रडत रडत सांगितलं - आई-वडील राहिले नाहीत. मी लगेच फोन कट केला आणि माझ्या मेहुण्यांना फोन लावला. म्हटलं- नीट चौकशी करा, काही गैरसमज तर नाही ना? ते म्हणाले- मृतांच्या यादीत आई-वडिलांचेही नाव आहे. एवढं ऐकताच, माझ्या पायाखालची जमीन सरकली. खरं तर, त्या अपघातात एक काकू वाचल्या होत्या, त्यांनी आपल्या मुलांना फोन करून सांगितलं. त्यानंतर अपघातात मृत पावलेल्या कुटुंबांना कळलं. मी गोंधळलेल्या अवस्थेत ऑफिसमधून थेट पुणे विमानतळावर पोहोचलो. डोळ्यासमोर वारंवार आई-वडिलांचा चेहरा येत होता. शरीरात जीवच नाही असं वाटलं, अचानक विमानतळाच्या आत कोसळलो. विमानतळाच्या कर्मचाऱ्यांनी मला सावरलं आणि पाणी पाजलं. तिथून कसाबसा दिल्लीला पोहोचलो. वृंदावनला जायचं होतं, पण कळलं की सर्व मृतदेह दिल्लीला आणले जात आहेत. वृंदावनच्या स्थानिक आमदारांनी मृतदेह पाठवण्यात खूप मदत केली होती. जेव्हा आई-वडिलांचे मृतदेह दिल्लीला आले तेव्हा खूप रडलो. त्यांना घेऊन लुधियानाला निघालो. वाटेत आईच्या गप्पा, तिचा आवाज, तिचं हसणं आठवत होतं. खरं सांगायचं तर, आज जेव्हा मी तुमच्यासोबत आई-वडिलांच्या आठवणी शेअर करायला तयार होत होतो, तेव्हा शब्द घशात अडकत होते. तुमच्याशी बोलण्याची माझ्यात हिंमत नव्हती. मी माझी बहीण दामिनीला स्पष्ट सांगितलं की, मी एकटा मुलाखत देऊ शकणार नाही. ‘बहीण दामिनीने जेव्हा सांगितलं की पत्रकार खूप लांबून आल्या आहेत, तेव्हा मी स्वतःला सावरलं. आम्हाला वाटलं की आमच्या अनुभवातून त्या मुलांपर्यंत एक संदेश पोहोचायला हवा, जे करिअरच्या शर्यतीत इतके व्यस्त झाले आहेत की ते आपल्या आई-वडिलांचे कॉलही उचलू शकत नाहीत. माझी सर्वांना एकच विनंती आहे - काहीही करा, आपल्या आई-वडिलांशी रोज नक्की बोला.’ माझी आई मला दररोज अनेक व्हॉइस नोट्स म्हणजे संदेश रेकॉर्ड करून पाठवत असे. आता मी त्या वारंवार ऐकत आहे. आता त्यांचा आवाज ऐकण्याचा हाच एकमेव मार्ग उरला आहे. खरं तर, मी माझ्या कंपनीत संध्याकाळपासून उशिरा रात्रीपर्यंत क्लायंट्सच्या कॉल्समध्ये व्यस्त असायचो. आईला ही गोष्ट चांगलीच माहीत होती, त्यामुळे त्यांनी एक मार्ग काढला होता. त्यांना मला कॉल करून त्रास द्यायचा नव्हता, त्या व्हॉइस नोट्स पाठवत असत. व्यस्त मुलाशी जोडलेले राहण्याचा त्यांनी हा आपला एक मार्ग बनवला होता. त्या व्हॉइस नोट्समध्ये आईची माया घुमत असे. ती मोठ्या प्रेमाने म्हणत असत- 'बाळा, जेव्हा कामातून वेळ मिळेल तेव्हा एकदा फोन कर.' ती नेहमी विचारायची की मी कुठे आहे? काय करत आहे? जेवण वेळेवर खाल्ले की नाही? आणि शेवटी नेहमीप्रमाणे खूप आशीर्वाद द्यायला विसरत नसत. काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, मी एका कामाच्या गडबडीत अडकलो होतो. त्यावेळी आईचा फोन आला. मी उचलू शकलो नाही. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांचा एक व्हॉइस नोट आला, ज्यात त्यांनी मोठ्या प्रेमाने म्हटले होते- ‘जेव्हा मी नसेन ना, तेव्हा माझ्या आवाजाला ऐकण्यासाठी तू आसुसशील.’ आईचा तो व्हॉइस मेसेज ऐकून माझा कंठ दाटून आला आणि मी रडू लागलो. जेव्हा मी त्यांना परत फोन केला, तेव्हा त्या हसल्या. दिवसभरात त्यांचा तीन वेळा फोन यायचा… पण आता आईचा फोन कधीच येणार नाही. एका क्षणात माझं सर्व काही उद्ध्वस्त झालं. माझी धाकटी बहीण दामिनी बेंगळुरूला सीए आहे, आमच्या दोघांमध्ये फक्त दोन वर्षांचा फरक आहे. घरात मी मोठा आहे. आमच्याकडे आई-वडील आळीपाळीने येऊन राहायचे. आई जेव्हाही आमच्याकडे यायची तेव्हा आम्ही आनंदी व्हायचो की आता वेगवेगळ्या प्रकारचे पराठे खायला मिळतील. त्या आमच्याकडे कधीच लोणचं संपू देत नव्हत्या. इतकंच काय, लोणचं कुरिअरने पाठवून देत असत. माझी मुलं म्हणायची नानी हाऊसमधून लोणचं आलंय. खरं तर, बहिणीची मुलं नानी हाऊस म्हणायची, त्यामुळे माझी मुलंही तेच शिकली होती आणि तीही नानी हाऊस म्हणायची. माझी मुलं आईला आजी न म्हणता नानी म्हणायची. यावेळी सोबत आमची मुलंही आलेली आहेत. इथे त्यांना आईशिवाय अजिबात बरं वाटत नाहीये. ती वारंवार म्हणत आहेत की नानी हाऊसमधून परत चला. इथे नानी नाहीये. मी फक्त हेच वारंवार विचार करत आहे की जर देवाच्या दारात जाऊनही असं होऊ शकतं, तर त्यांच्याकडे कोण जाईल? देव अशा प्रकारे राधे-राधे जपणारे आपल्या भक्ताला कसे मारू शकतात? आई-वडील पहिल्यांदा बांके बिहारीच्या दर्शनासाठी गेले होते. बहिणीने तर ठरवून टाकलं होतं की ती कधीही वृंदावनला जाणार नाही. या काळात आमच्या घरी लोक आले की बहीण तीच गोष्ट पुन्हा सांगायची, तेव्हा ते म्हणायचे की- काळजी करू नकोस. तुझ्या आई-वडिलांना किती चांगल्या ठिकाणी मृत्यू आला आहे. ते राधे-राधे म्हणत या जगातून गेले आहेत, पण आम्ही त्यांच्या बोलण्याशी सहमत होऊ शकत नाही. शेवटी, देव जर आपल्या भक्ताचे रक्षण करू शकत नाही, तर कसला देव? पण आता हळूहळू मन शांत होत आहे. मी दामिनीशी बोललो आणि ठरवले आहे की, कमीतकमी एकदा त्या घाटावर जाऊ, जिथे आई-वडील शेवटचे एकत्र होते. तिथे जाऊन एकांतात बसू आणि त्यांना अनुभवू. बाबा वृंदावनला जात नव्हते. आई त्यांना जबरदस्तीने घेऊन गेली होती. ती बाबांना म्हणत होती की मी सोबत यासाठी चालले आहे, जेणेकरून तिथे मी तुम्हाला रोटी-पाणी देऊ शकेन. खरं तर, आई बाबांवर खूप प्रेम करत होती. तिला नेहमी वाटायचे की बाबा तिच्याशिवाय एकटे कसे राहतील? कसे जेवण करतील? म्हणून बाबा जिथेही जायचे, आई सोबत जायची. त्या दिवशी जेव्हा ते जात होते, तेव्हा आईने आम्हाला सांगितले होते की, वस्तीतील लोकांसोबत बसने बाबांना घेऊन वृंदावनला जात आहे. वृंदावनला पोहोचल्यावर आईने बाबांचा एक व्हिडिओ पाठवला होता की- बघा, बोटीत बसून तुमचे बाबा कसे राधे-राधे करत आहेत. बाबांना पाण्याची खूप भीती वाटत होती. त्यामुळे ते कधी नदी वगैरेमध्ये जात नव्हते, ना बोटीत बसत होते. त्यामुळे आई व्हिडिओ दाखवून सांगू इच्छित होती की- बघा, तुमचे बाबा बोटीत बसून कसे मजेत गात आहेत. त्यानंतर बोट उलटली होती. आता आयुष्यात फक्त दोन गोष्टी राहिल्या आहेत. एक खेद आणि दुसरे बाबांसारखे बनण्याची इच्छा. खेद या गोष्टीचा आहे की, त्या दिवशी आई-वडिलांनी लाइफ जॅकेट घातले असते तर. काश, जे चार लोक दुसऱ्या बोटीत हलवले होते, त्यात माझे आई-वडीलही असते. काश, बोट पुलाला धडकण्यापूर्वी वळली असती, ज्यामुळे अपघात टळला असता. काश, आई-वडील माझ्याकडे पुण्यात आले असते, कारण त्यांना पुण्यात यायचे होते. आम्ही योजना बनवली होती की पुण्यातून एकत्र उज्जैन आणि इंदूर फिरायला जाऊ. आता त्या सर्व गोष्टी मनात फिरत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे - मला बाबांसारखं व्हायचं आहे. बाबा दिवसभर लोकांची मदत करत होते. त्यांची कामं करून देण्यात ते मग्न असत. ज्या पार्कमध्ये बसून आपण बोलत आहोत, तेही बाबांनीच बांधले होते. त्याची देखरेखही तेच करत होते. लोकांसाठी वर्षातून एकदा जगराता करत होते. मोहल्ल्यात हजारो स्त्रिया आहेत, ज्यांची पेन्शन बाबांनी लावून दिली होती. खरं तर, आमच्या सोसायटीचं नाव अर्बन स्टेट 2 आहे, ज्याचे प्रमुख म्हणून बाबांना निवडण्यात आले होते. मला आठवतं की गेल्या वर्षी जेव्हा मी आई-वडिलांकडे आलो होतो, तेव्हा मी माझा डबा विसरलो होतो. मी त्यांना फोन केला तेव्हा त्यांचा फोन सतत व्यस्त येत होता. जेव्हा बोलणं झालं तेव्हा कळलं की ते कोणाचं तरी आधार कार्ड बनवण्यासाठी सोबत गेले होते. अशा प्रकारे वडील लोकांची मदत करण्यात मग्न असत. आई-वडील कधी पैशांच्या मागे धावत नव्हते. आम्ही सुरुवातीपासून खूप श्रीमंत नव्हतो. मला इंजिनिअरिंग करवण्यासाठी आणि दामिनीला सीए बनवण्यासाठी आईने आपले दागिनेही विकले होते. आई-वडिलांनी कसेही करून आम्हाला भावंडांना चांगल्या शाळेत शिकवले. वडिलांचा व्यवसाय खूप चांगला चालत नव्हता, म्हणून आमची फी भरण्यासाठी आईने घरात बुटीकचे काम सुरू केले होते. घरीच कपडे शिवत आणि विकत असत. माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे. एकदा आईने एक सूट शिवला होता. तो बनवण्यासाठी 275 रुपये लागले होते, पण त्यांनी तो 300 रुपयांना विकला, कारण त्यांना आमची फी भरायची होती. अशा प्रकारे आईने आमच्यासाठी खूप मेहनत केली होती. शेवटी मला सरकारबद्दल खूप तक्रार आहे. मला सांगायचे आहे की वृंदावनसारख्या धार्मिक ठिकाणी आपल्या सर्वांचे आई-वडील जातात. त्यापैकी बहुतेक वृद्ध असतात. अनेकदा ते संकटात घाबरून जातात. सरकारने अशा धार्मिक ठिकाणी कठोर नियम बनवावेत. कमीत कमी तिथे तरी नक्कीच, जिथे जास्त लोक जातात. आज जर आमच्या आई-वडिलांनी लाईफ जॅकेट घातले असते तर ते वाचले असते किंवा बोटीतील मुलांची काळजी घेतली असती तर कमीतकमी ते जिवंत असते. (मोहित गुलाटी यांनी आपल्या या भावना भास्कर रिपोर्टर मनीषा भल्ला यांच्यासोबत शेअर केल्या)
Pune News : पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत आज बदल करण्यात आले आहेत.
Crime News : मागील वादातून युवकाचा कोयत्याने खून; दोघे संशयित ताब्यात
नाशिक : अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या महालक्ष्मी नगर परिसरात मागील वादाची कुरापत काढत एका युवकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाल हिरवाळे असे मृत युवकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोन जणांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून विशाल हिरवाळे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी नेण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच अंबड एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.या हत्येमागील नेमके कारण आणि इतर कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे महालक्ष्मी नगर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Nana Patole : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना काँग्रेसला जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. यानंतर काँग्रेसने मोदींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आता महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे.
Pune Water Cut : पुणेकरांची धाकधूक वाढली! पाणी कपातीचे ३ पर्याय आयुक्तांच्या टेबलावर; पाहा काय होणार
Pune Water Cut : हवामान खात्याच्या अंदाजानंतर पाटबंधारे विभाग सतर्क; शहराचा १५% पाणी कोटा वाचवण्यासाठी पालिकेची कसरत.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील बेलडांगा. येथेच बाबरी मशीद बांधली जात आहे. सध्या चार भिंतींचा पाया भरला जात आहे. 50 हून अधिक मजूर कामात गुंतले आहेत. जवळच असगरुलचे चहाचे दुकान आहे. मशिदीकडे जाताना मुख्य रस्त्यावर सर्वात आधी हेच दुकान लागते, त्यामुळे गर्दीही असते. असगरुलच्या भांड्यात चहा उकळत आहे, असाच उकळ बंगालच्या हिंदू-मुस्लिम राजकारणात आहे. बाबरी मशीद त्याचाच एक भाग आहे. मशिदीमुळे असगरुलचा धंदा नक्कीच तेजीत आला, पण ते चिंतेत आहेत. ते म्हणतात, ‘मंदिर-मशीद दोन्ही आवश्यक आहेत. मी धर्माला मानतो. मशीद हवी आहे, पण मुलासाठी शाळाही तर असावी. तो सहावीत शिकतो, पण त्याला 50 पर्यंत आकडेमोड येत नाही. फक्त थाळी वाजवण्यासाठी आणि खाण्यासाठी मुलाला शाळेत का पाठवू?’ पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर 24 परगणा, दक्षिण 24 परगणा, नदिया आणि उत्तर दिनाजपूर या 6 मुस्लिम बहुल जिल्ह्यांमध्ये सुमारे 124 जागा आहेत. टीएमसी सोडून नवीन पक्ष स्थापन करणाऱ्या हुमायूं कबीर यांनी बाबरी मशीद बांधण्याची घोषणा केली, तेव्हा त्यांच्या या प्रयत्नाला मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न मानले गेले. हुमायूं सध्या भाजपसोबत 1000 कोटींच्या डीलच्या व्हिडिओवर स्पष्टीकरण देत आहेत. इकडे बाबरी मशिदीचे काम सुरू आहे. या मशिदीचे महत्त्व, अर्थ आणि निवडणुकीतील परिणाम समजून घेण्यासाठी आम्ही 5 पात्रे निवडली. 1. असगरूल शेख, ज्यांना मशिदीसोबत मुलासाठी चांगली शाळा हवी आहे.2. बदरुद्दीन, जे मुंबई सोडून घरी आले आणि मशिदीजवळ ज्यूसचे दुकान उघडले.3. रफीकुल अंसारी, जे झारखंडमधून 200 किमी दूर बाबरी मशीद पाहण्यासाठी आले होते.4. हुमायूं शेख, ज्यांना वाटते की हुमायूं कबीर आपल्या राजकारणासाठी मशीद बांधत आहेत.5. हुमायूं कबीर, जे म्हणतात की भाजप किंवा टीएमसीने कितीही रोखले तरी, मशीद बांधली जाईल. प्रत्येक पात्राची कथा वाचा…असगरुलसाठी बंगालमध्ये काहीही बदलले नाही असगरूल शेख यांच्या दुकानात चहा पिताना गप्पा सुरू झाल्या. तेव्हा त्यांचा मुलगा आला. मी विचारले - शाळेत जातोस का? उत्तर असगरूल यांनी दिले. जवळच सरकारी शाळा आहे, तिथेच शिकतो. ते चहा बनवताना सांगतात, ‘मी सहावीपर्यंत शिकलो आहे. मुलगाही आता शिक्षण सोडून देईल. दोघे बाप-लेक सहावीपर्यंतच शिकले. 40-50 वर्षांत बंगालमध्ये काहीच बदलले नाही. मी दुकान चालवतो, हा तर हिशोबही करू शकत नाही. मजुरीच करेल. हेच आमचे सत्य आहे. शाळेत 10 शिक्षक असायला पाहिजेत, फक्त 2-3 आहेत. सरकार आपले खिसे भरत आहे. आमदार आपला फायदा बघत आहेत. गरिबांचे कोण ऐकतो?’ असगरुलच्या या प्रश्नाचे उत्तर नव्हते. आम्ही येथून पुढे निघालो. थोड्या अंतरावर बाबरी मशिदीचे कार्यालय आहे. त्याच्या छतावर तिरंगा फडकत आहे. बाहेर देणगीसाठी क्यूआर कोड लावलेले आहेत. एका बोर्डवर 'द होली बाबरी मस्जिद' असे लिहिले आहे. यावर अयोध्येतील बाबरी मशिदीचा फोटो आहे. आम्ही फोटो काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एका व्यक्तीने आम्हाला थांबवले. तो म्हणाला की, येथे फोटो-व्हिडिओ काढू शकत नाही. लोक व्हिडिओ बनवतात आणि नंतर त्याचा गैरवापर करतात. कार्यालय रिकामे होते, म्हणून आम्ही मशीद परिसराजवळच्या बाजाराकडे निघालो. वाटेत अनेक छोटी-छोटी दुकाने आहेत. आजूबाजूला जत्रेसारखे वातावरण आहे. बदरुद्दीनने मशिदीबाहेर दुकान उघडले, म्हणाले- मशीद आणि मत दोन्ही वेगळे बदरुद्दीन आधी मुंबईत काम करत होते. बेलडांगामध्ये बाबरी मशीद बांधली जाणार आहे हे कळल्यावर ते घरी परतले. ताडपत्री आणि बांबूच्या खांबांनी दुकान बनवले आणि ज्यूस विकू लागले. आम्ही विचारले की मशिदीमुळे काय फायदा होत आहे, याच्या नावावर मतदानही कराल का? बदरुद्दीन लगेच उत्तर देतात, ‘मशीद वेगळी आहे, निवडणूक वेगळी. मशिदीत लोक नमाज पढण्यासाठी येत आहेत. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही दान देत आहेत. ती बांधल्याने हजारो लोकांना रोजगार मिळेल. मी स्वतः मुंबई सोडून गावी परतलो आहे. एक महिन्यापूर्वीच हे दुकान उघडले आहे.’ यूपी, बिहार, आसाममधून मशीद पाहण्यासाठी येत आहेत लोक, रफीकुल 200 किमी बाईकने आले मशिदीकडे जात असताना, बाईकवर बसलेले रफीकुल अन्सारी भेटले. ते झारखंडमधील दुमका येथील रहिवासी आहेत. रफीकुल सांगतात, ‘मी 200 किमी बाईक चालवून आलो आहे. ऐकले होते की बाबरी मशीद बांधली जात आहे. ती बांधली जाणे आवश्यकही आहे.’ इथेच आसाममधून आलेले काही तरुणही होते. उसाचा रस विकणाऱ्या एका दुकानदाराने सांगितले की, यूपी, बिहार, झारखंड, आसाम आणि इतर राज्यांमधून लोक मशीद पाहण्यासाठी येत आहेत. व्यवसाय वाढत आहे. हेच फायदेशीर आहे, बाकी मते तर मर्जीनेच देतील. हुमायूं कबीर यांच्यावर नाराजी, हुमायूं शेख म्हणाले - स्वतःच्या फायद्यासाठी मशीद बांधत आहेत 4 एकरमध्ये बांधल्या जाणाऱ्या बाबरी मशिदीवर 69 कोटी रुपये खर्च होतील. ही वेस्ट बंगाल इस्लामिक फाउंडेशन ऑफ इंडिया कमिटी बांधत आहे. हुमायूं कबीर याच ट्रस्टचे संस्थापक होते. निवडणूक लढवल्यामुळे त्यांनी ट्रस्ट सोडला. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात ते भाजपसोबत 1 हजार कोटींची डील करताना दिसत आहेत. बेलडांगामध्ये ढाबा चालवणारे अब्दुल मन्नफ मलिक म्हणतात, मशिदीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. ती बनवण्यासाठी हिंदू बांधव सहकार्य करत आहेत. हुमायूं कबीर तर ती बांधतच आहेत. व्हिडिओमधील सर्व गोष्टी खोट्या आहेत. ते म्हणतात की हुमायूं कबीर यांनी मशिदीची पायाभरणी केली आहे, तेव्हापासून ममता बॅनर्जी त्यांच्या मागे लागल्या आहेत. टीएमसी आता हरत आहे, त्यामुळे अशा गोष्टी पसरवत आहेत. बेलडांगापासून सुमारे १०० किमी दूर असलेल्या शमशेरगंजमधील लोकांचे विचार वेगळे आहेत. फोटोकॉपीचे दुकान चालवणारे हुमायूं शेख म्हणतात, ‘मी हुमायूं कबीर यांना मुस्लिमांचा नेता मानत नाही. त्यांनी भले बाबरी मशिदीची पायाभरणी केली असेल, पण हे सर्व राजकीय फायद्यासाठी करत आहेत. ते व्हिडिओमध्ये व्यवहार करताना स्पष्ट दिसत आहेत. भलेही याला एआय व्हिडिओ म्हटले जात असले तरी, असे काहीही नाही.’ तर, मोहम्मद साबिर म्हणतात की हुमायूं कबीर तर भाजपचा माणूस आहे. मुस्लिमांना ही गोष्ट थोड्या उशिराने समजली. मला आधीपासूनच त्यांच्या हालचालींवर संशय होता. आधी मुस्लिमांमध्ये त्यांच्याबद्दल थोडे प्रेम होते. व्हिडिओ आल्यानंतर तेही संपले. हुमायूं कबीर म्हणाले- मुसलमानांशी गद्दारी करणार नाही, बाबरी (मशीद) बनूनच राहील हुमायूं कबीर यांनी मान्य केले आहे की व्हायरल व्हिडिओ त्यांचाच आहे, पण आवाज AI ने बदलला आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की मी मुसलमानांशी कधीही गद्दारी करणार नाही. माझ्यासाठी आधी समाज (कौम) आहे. बाबरी (मशीद) तर बनेलच, याला ना भाजप रोखू शकेल ना टीएमसी. मुर्शिदाबादमध्ये 66% मुस्लिम लोकसंख्या आहे, म्हणून येथे मशीद बांधत आहे. अबीरुलसाठी बाबरीपेक्षा मोठा मुद्दा मतदार यादीतून नाव वगळणे मुर्शिदाबादच्या शमशेरगंजमध्ये बाबरी मशिदीपेक्षा मोठा मुद्दा मतदार यादीतून नावे वगळणे हा आहे. येथे राहणाऱ्या अबीरूलच्या कुटुंबात 8 मतदार होते, त्यापैकी 6 जणांची नावे वगळण्यात आली. यात अबीरूलचाही समावेश आहे. तो म्हणतो, ‘आम्हाला असे वाटते की जर आम्ही बंगालबाहेर कामासाठी गेलो, तर आम्हाला बांगलादेशी समजले जाऊ नये. म्हणून आम्ही कामासाठी बाहेर जात नाही आहोत. आमच्या लोकांसाठी टीएमसी चांगले काम करत आहे.’ तर रफीक म्हणतो की माझेही नाव वगळण्यात आले आहे. येथे टीएमसी जिंकू शकते, म्हणूनच भाजपच्या लोकांनी जाणूनबुजून असे केले आहे. तरीही भाजप जिंकू शकणार नाही.’ 24 परगणाचे असमताली मुल्ला भाजपच्या समर्थनात आहेत. ते म्हणतात की आधी आम्ही टीएमसीला मतदान करत होतो. आता ममता दीदी सर्वात जास्त घोटाळे करत आहेत. टीएमसीवाले म्हणतात की भाजप सरकार बनवेल, तर मुस्लिमांना हाकलून देईल. आम्हीच भाजपमध्ये आलो, तर मग कोण हाकलून देईल. तज्ज्ञ म्हणाले: बाबरी मशिदीचा परिणाम फक्त हुमायू कबीर यांच्या जागेपुरता हुमायू कबीर यांना मशीद बांधण्याचा फायदा संपूर्ण बंगालमध्ये मिळेल का? यावर राजकीय तज्ज्ञ सुमन भट्टाचार्य म्हणतात, 'नाही. हुमायू कबीर यांचा प्रभाव फक्त बेलडांगामध्ये आहे. मुसलमानांना हे समजले आहे की अयोध्येतील बाबरी मशिदीला दुसरा पर्याय असू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की मुस्लिम मतदार टीएमसीवर जास्त खूश आहेत. फक्त ते त्यापासून वेगळे होऊ शकत नाहीत. टीएमसीनंतर त्यांची पसंती काँग्रेस आहे, पण ती जास्त सक्रिय नाही.' शेवटी आम्ही बेलडांगापासून सुमारे 20 किमी दूर असलेल्या बहरामपूरला पोहोचलो. हुमायूं कबीर यांनी ज्या दिवशी बाबरी मशीद बांधण्याची घोषणा केली होती, त्याच दिवशी येथे राम मंदिर बांधण्याबद्दल बोलले गेले होते. बहरामपूरचे भाजप नेते शंकवाह सरकार यांनी हा दावा केला होता. आम्ही त्यांना विचारले की मंदिराचे काम कुठपर्यंत पोहोचले आहे. त्यांनी उत्तर दिले, अजून सुरूच झाले नाही. ================इनपुट: पूनम मसीह================
PMC News : भाजपचा ‘गेम’अन् राष्ट्रवादीची बोळवण! सुनेत्रा पवारांच्या तक्रारीनंतरही दिली केवळ एक जागा
PMC News : मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर भाजपने घेतली माघार; नामुष्की टाळण्यासाठी राष्ट्रवादीला एक अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय.
Lek Ladki Yojana : पुण्यात ९ हजार ‘लेकी’झाल्या लाडक्या! सरकारी तिजोरीतून ४ कोटी ७४ लाख थेट खात्यात
Lek Ladki Yojana : १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या ९,४८२ मुलींना आतापर्यंत ४ कोटी ७४ लाखांचा लाभ वितरित; जिल्हा परिषदेची माहिती.
Pune Airport : इंडिगो, एअर इंडियासह अनेक कंपन्यांची ७० हून अधिक उड्डाणे रद्द; पहाटे ५:४५ ला विमान हटवण्यात यश.
Pune Market Yard : पावत्यांवरील जीएसटी नंबर चुकीचा असल्याने बनावटगिरीचा संशय; अखिल भारतीय किसान काँग्रेस आक्रमक, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा.
मानवी मन... एक गूढ, अदृश्य व अथांग विश्व आहे. त्याचा कुणालाही थांग लागत नाही. काहीजण 'मनकवडे' असतात, पण ती एक चलाखी असते. त्याला कोणताही शास्त्रीय आधार नसतो. मनातील विचार, भावना, स्वप्ने व कल्पनांचा प्रवाह प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नाही. पण त्याचा परिणाम मात्र आपल्या प्रत्येक कृतीतून उमटत असतो. या अदृश्य मनाचा मागोवा घेण्याचे धाडस जेव्हा विज्ञानाने केले, तेव्हा मानसशास्त्राला एक नवी दिशा मिळाली. आणि याच धाडसी प्रवासाची सुरुवात केली, विल्हेल्म वुंड्ट यांनी... वुंड्ट यांनी मानवी मनाला केवळ तत्त्वज्ञानाचा विषय ठेवले नाही. त्यांनी मनाला थेट प्रयोगशाळेत आणले. त्याचा अभ्यास करण्याचा पहिला वैज्ञानिक प्रयत्न केला. मनाची अत्यंत गूढ कवाडे उघडण्याचा हा प्रवास मानवी जिज्ञासेचा व शोधभावनेचा अद्भुत इतिहास आहे. चला तर मग आज 'धुरंधर'मध्ये जाणून घेऊया आधुनिक मानसशास्त्राचे जनक विल्हेल्म वुंड्ट यांचा जीवनप्रवास... सर्वप्रथम कौटुंबिक पार्श्वभूमी व परिचय विल्हेल्म वुंड्ट हे आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. पण त्यांची गोष्ट केवळ एका शास्त्रज्ञाची नव्हे, तर एका अशा विचारवंताची आहे, ज्याने मन या अदृश्य गोष्टीला थेट प्रयोगशाळेत आणण्याचे धाडस दाखवले. 19 व्या शतकात मानसशास्त्र हा विषय केवळ तत्त्वज्ञानाचा एक भाग मानला जात होता. पण वुंड्ट यांनी त्याला स्वतंत्र, प्रयोगाधारित व वैज्ञानिक स्वरुप मिळवून दिले. त्यांच्या कार्यामुळेच आज मानसशास्त्राला एक वेगळी ओळख मिळाली. तसेच मानवी अनुभवांचा अभ्यासही मोजता येऊ शकतो ही संकल्पना प्रथमच गंभीरपणे पुढे आली. विल्हेल्म वुंड्ट यांचा जन्म 16 ऑगस्ट 1832 रोजी जर्मनीच्या नेकराउ या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील मॅक्सिमिलियन वुंड्ट हे ल्युथरन धर्मगुरू होते. त्यांना इतर 3 भावंडे होती. पण त्यापैकी 2 भावंडे लहानपणीच वारली. वडिलांच्या सहाय्यक फ्रेडरिक मुलर यांनी त्यांना त्यांच्या घरीच शिक्षण दिले. बालपणी ते फारसे इतरांत रमत नव्हते. ते एकाकी व चिंतनशील होते. त्यांच्या बालपणाविषयी एक रंजक किस्सा असा सांगितला जातो की, ते तासनतास स्वतःच्या विचारांत हरवून जात. अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक घटनांकडे एखाद्या निरीक्षकाच्या नजरेने पाहत. हीच सवय पुढे त्यांच्या संशोधनपद्धतीचा पाया ठरली. वुंड्ट शाळेत एक सरासरी विद्यार्थी होते. 1851 मध्ये त्यांनी ट्यूबिंगेन विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण सुरू केले. नंतर हायडेलबर्ग विद्यापीठात गेले. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी वैद्यकीय नियतकालिकांत विविध लेख लिहिले. त्यांनी हरमन व्होन हेल्महोल्ट्झ यांच्यासोबत संशोधनकार्य सुरू केले. हेल्महोल्ट्झ यांच्या प्रयोगशाळेत काम करतानाच त्यांना जाणवले की, शरीराच्या प्रक्रियांसारखीच मानसिक प्रक्रियाही अभ्यासता येते, पण फरक एवढाच की त्यासाठी नवी पद्धत शोधावी लागेल. शरीराच्या प्रक्रियेसारखीच मनाची प्रक्रिया अभ्यासता येते वुंड्ट यांची डॉक्टर होण्याची इच्छा नव्हती. तरीही ते शरीरक्रियाविज्ञान कडे वळले. एकदा त्यांनी स्वतःच्या घरातच एक छोटीशी प्रयोगशाळा उभी केली. त्यात त्यांच्या आईने त्यांना मदत केली. या प्रयोगशाळेत शरीरक्रियेवर प्रयोग होत, पण वुंड्ट याचे मन शरीराच्या नव्हे तर मनाच्या प्रक्रियेकडे वळत. 1862 साली त्यांनी जगातील पहिला वैज्ञानिक मानसशास्त्राचा अभ्यासक्रम शिकवला. त्यांनी 1863 मध्ये 'मानव व प्राण्यांच्या मनावरील व्याख्याने' हे पुस्तक प्रकाशित केले. त्यात त्यांनी प्राण्यांच्या वर्तनातून मानवी मन समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रायोगिक मानसशास्त्राची सुरुवात वुंड्ट 1874 मध्ये हायडेलबर्ग येथून ज्यूरिक व नंतर लेपझिग विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. लेपझिगमध्ये त्यांना एक जुनी खोली मिळाली. त्यात त्यांनी आपली उपकरणे ठेवली. सुरुवातीला ही जागा केवळ विद्यार्थ्याना प्रात्यक्षिके दाखवण्याची होती. पण 1879 साली त्यांनी त्या ठिकाणी जगातील पहिली प्रायोगिक मानसशास्त्र प्रयोगशाळा थाटली. ही घटना मानसशास्त्राच्या इतिहासातील टर्निंग पॉइंट ठरली. ही प्रयोगशाळा म्हणजे एक छोटीशी खोली होती. त्यात हिप्सस क्रोनोस्कोप सारखी उपकरणे होती. ही उपकरणे 1/1000 सेकंद अचूकतेने प्रतिक्रिया वेळ (रिअॅक्शन टाईम) मोजत. या प्रयोगांत विद्यार्थी प्रशिक्षित निरीक्षक म्हणून काम करायचे. त्यांना नियंत्रित उत्तेजन (प्रकाश, ध्वनी किंवा मेट्रोनोमचा टिकटिक आवाज) दिला जायचा. त्यानंतर ते आपल्या चेतनेच्या अनुभवाचे वर्णन करायचे. हे प्रायोगिक आत्मपरीक्षण (experimental introspection) होते. एखाद्या प्रयोगात विद्यार्थ्यांना मेट्रोनोमचा आवाज ऐकवला जायचा. तो बटण दाबून सांगायचा की, मी आवाज ऐकला. तो तीव्र वाटला. माझ्या मनात एक प्रतिमा उमटली. वुंड्ट याद्वारे सदर विद्यार्थ्याला विचार करण्यासाठी किती वेळ लागतो हे मोजायचे. लेपझिगची प्रयोगशाळा अत्यंत महत्त्वाची विल्हेल्म वुंड्ट यांची मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन करण्याची घटना एवढी महत्त्वाची होती की, आजही मानसशास्त्राचे जन्मवर्ष म्हणून 1879 चाच दाखला दिला जातो. या प्रयोगशाळेत अनेक रंजक किस्से घडले. वुंड्ट याच्या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना फक्त सिद्धांत शिकवले जात नसत. त्यांना स्वतःवर प्रयोगही करावे लागत. उदाहरणार्थ, एखाद्या प्रयोगात विद्यार्थ्यांना घंटा वाजल्यानंतर किती वेळात प्रतिक्रिया देता येते हे मोजले जात असे. सुरुवातीला अनेक विद्यार्थी या प्रकरणी गोंधळून जात. कारण, स्वतःच्या मनाचा अभ्यास करणे हे त्यांच्यासाठी अगदीच नवीन गोष्ट होती. वुंड्ट मात्र अत्यंत शिस्तप्रिय होते. ते म्हणत की, निरीक्षण म्हणजे केवळ अनुभव सांगणे नाही, तर तो नियंत्रित परिस्थितीत अचूकपणे नोंदवणे आहे. 'अंतःप्रेक्षणा'च्या मदतीने चेतनेच्या अनुभवांचा शोध वुंड्ट आपल्या 'शरीर मानसशास्त्राची तत्त्वे' (Principles of Physiological Psychology) या ग्रंथात म्हणतात, मानसशास्त्राचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे चेतनेच्या तात्कालिक अनुभवांचा शोध घेणे. त्यांच्या या विधानातून 'मानसशास्त्राने चेतनेचा थेट अनुभव अभ्यासला पाहिजे' हा त्यांचा विचार स्पष्ट होतो. यासाठी त्यांनी 'अंतःप्रेक्षण' (introspection) ही पद्धत विकसित केली. पण ही पद्धत साधी आत्मपरीक्षणाची नव्हती. ती अत्यंत शिस्तबद्ध व प्रयोगात्मक होती. त्यात एखाद्या व्यक्तीला विशिष्ट प्रकाश दाखवला जाईल. त्यानंतर सदर व्यक्तीने त्याच्या अनुभवाचे अचूक वर्णन करायचे असे. या प्रक्रियेत वेळ, परिस्थिती व प्रतिसाद यांची काटेकोर नोंद केली जात असे. संरचनावादाचा उदय वुंड्ट यांच्या विचारांमधून संरचनावाद (Structuralism) ही विचारसरणी उदयास आली. ती पुढे एडवर्ड टिचनर यांनी अधिक विकसित केली. या विचारसरणीनुसार, मानवी चेतना ही संवेदना, प्रतिमा व भावना या मुलभूत घटकांनी बनलेली असते. वुंड्ट यांना वाटत होते की, जसे रसायनशास्त्रात संयुगांचे घटक शोधले जातात, तसेच मानसशास्त्रात मनाचे घटक शोधता येतील. हा विचार त्या काळाच्या तुलनेत अत्यंत क्रांतिकारक होता. प्रयोगशाळेत वक्तशीरपणाला प्राधान्य विल्हेल्म वुंड्ट आलल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जात. असे सांगितले जाते की, ते दररोज ठराविक वेळी उठत, ठराविक वेळी लेखन करत व अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने संशोधन करत. त्यांच्या विद्यार्थ्यांनी लिहून ठेवले आहे की, वुंड्ट यांच्यासोबत काम करताना वक्तशीरपणा ही पहिली अट होती. त्यांच्या काटेकोरपणाविषयी एक किस्सा सांगितला जातो. लेपझिग येथील त्यांच्या प्रयोगशाळेत प्रत्येक प्रयोग एका निश्चित वेळेत सुरू होत आणि संपत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रयोगासाठी वेळेवर उपस्थित राहणे अनिवार्य होते. असे सांगतात की, एकदा एक विद्यार्थी अवघे काही सेकंद उशिरा पोहोचला, तर वुंड्ट यांनी त्याला प्रयोगात सहभागी होऊ दिले नाही. त्यांचे म्हणणे होते की, तुम्हाला तुमच्या वेळेचे भान नसेल, तर तुमच्या निरीक्षणांवर कुणालाही विश्वास बसणार नाही. या घटनेमुळे त्यांच्या प्रयोगशाळेत शिस्त ही विज्ञानाएवढीच महत्त्वाची मानली जाऊ लागली. आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे, वुंड्ट यांना प्रयोगांतील लहानसहान तपशील नोंदवण्यावर मोठा भर असायचा. उदाहरणार्थ, एखादा प्रयोग करताना वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची स्थिती, प्रकाशाचा कोन, आवाजाची तीव्रता आदी प्रत्येक गोष्टींवर ते लक्ष ठेवत असत. एकदा एका सहाय्यकाने उपकरण थोडे हलवले, तर वुंड्ट यांनी त्याला संपूर्ण प्रयोग पुन्हा करण्याची सूचना केली. लहान चूकही मोठ्या निष्कर्षाला चुकीचे बनवू शकते, असे त्यांचे या प्रकरणी ठाम मत होते. लोकमानसशास्त्राचाही अभ्यास वुंड्ट यांनी केवळ प्रयोगात्मक मानसशास्त्रावर भर दिला नाही, तर त्यांनी लोकमानसशास्त्र या संकल्पनेद्वारे संस्कृती, भाषा व समाज यांचाही अभ्यास केला. त्यांच्या मते, मानवी मनाच्या उच्च प्रक्रियांचा अभ्यास केवळ प्रयोगशाळेत करता येत नाही. त्यासाठी सांस्कृतिक घटकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यांच्या लोकमानसशास्त्र या ग्रंथात ते म्हणतात, उच्च मानसिक प्रक्रियांचा अभ्यास प्रायोगिक पद्धतीने करता येत नाही. त्याऐवजी, सांस्कृतिक उत्पादनांच्या माध्यमातूनच त्यांचा वेध घेतला पाहिजे. वुंड्ट यांच्या या भूमिकेतून त्यांच्या विचारांची व्यापकता लक्षात येते. त्यामुळे ते केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित राहिले नाही, त्यांनी मानवी समाज व संस्कृतीला मानसशास्त्राच्या अभ्यासाचा भाग बनवले. अंतःप्रेक्षण पद्धतीच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह वुंड्ट यांच्या कार्यावर तत्कालीन जगतातील अनेक लोकांनी टीका केली. विशेषतः अंतःप्रेक्षण पद्धत व्यक्तिनिष्ठ असल्यामुळे तिच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. पुढे जॉन बी. वॅटसन यांच्यासारख्या वर्तनवाद्यांनी (Behaviorists) ही पद्धत जोरकसपणे नाकारली. त्यांनी केवळ निरीक्षणीय वर्तनाचा अभ्यास करण्यावर भर दिला. त्यानंतरही वुंड्ट यांनी घातलेला पाया एवढा मजबूत होता की, त्यांच्याशिवाय मानसशास्त्राचा इतिहास अपूर्णच राहतो. वुंड्ट यांच्या अंतःप्रेक्षण पद्धतीविषयी एक रंजक किस्सा सांगितला जातो. सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनुभवांचे अचूक वर्णन करणे खूप अवघड जात असे. एकदा एका विद्यार्थ्याने प्रकाश पाहिल्यावर 'मला सुंदर वाटले' असे उत्तर दिले. वुंड्ट यांनी लगेच त्याला थांबवले आणि सांगितले - 'सुंदर हा निर्णय आहे, अनुभव नाही.' त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले की निरीक्षण करताना निर्णय (judgment) टाळून फक्त तात्काळ अनुभव नोंदवायचा. या छोट्याशा प्रसंगातून वुंड्ट यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची स्पष्ट झलक दिसते. लेखनाचा प्रचंड वेग वुंड्ट यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक रोचक पैलू म्हणजे त्यांची लेखनक्षमता. त्यांनी आपल्या जीवनात हजारो पानांचे लिखान केले. या लेखनाद्वारे त्यांनी मानसशास्त्राच्या संवेदना, भावना, भाषा, संस्कृती व समाज आदी सर्वच पैलूंवर विचार मांडले. त्यांनी समाजाला एक नवा दृष्टिकोन प्रदान केला. मानवी मनाचा अभ्यास हा केवळ तत्त्वज्ञानाचा विषय नाही, तर तो प्रयोगशाळेत करता येणारे विज्ञान आहे हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. आज आधुनिक मानसशास्त्रात न्यूरोसायन्स, संज्ञानात्मक मानसशास्त्र व कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या प्रगत शाखा विकसित झाल्या आहेत. पण या सर्वांचा पाया वुंड्ट यांच्या प्रयोगात्मक दृष्टिकोनातच आढळतो. त्यामुळेच विल्हेल्म वुंड्ट यांना केवळ आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हणूनच नव्हे तर मानवी मनाला विज्ञानाच्या चौकटीत बसवणारे पहिले धाडसी विचारवंत म्हणूनही ओळखले जाते. जर्मनीच्या ग्रॉसबोथेन शहरात अखेरचा श्वास विल्हेल्म वुंड्ट यांचे निधन 31 ऑगस्ट 1920 रोजी जर्मनीच्या ग्रॉसबोथेन शहरात झाले. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आयुष्याच्या शेवटच्या दिवसात ते सार्वजनिक जीवनापासून दूर जात एक शांत, निवांत जीवन जगत होते. त्यानी आपले संपूर्ण आयुष्य संशोधन, लेखन व अध्यापनाला अर्पण केले होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कार्याचा प्रभाव कमी झाला नाही. प्रयोगशाळेच्या माध्यमातून मानसशास्त्राला वैज्ञानिक आधार देणारे ते पहिले व्यक्ती होते. त्यांच्या विचारांनी पुढील अनेक मानसशास्त्रज्ञांना प्रेरणा दिली. त्यातून आधुनिक मानसशास्त्राचा प्रवास अधिक दृढ व व्यापक झाला.
Yellow Alert : राज्यावर पुन्हा अवकाळीचे सावट! ‘या’जिल्ह्यांना यलो अलर्ट; गारपिटीचाही इशारा
Yellow Alert : विदर्भात उष्णतेची लाट असतानाच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी.
Container Crash : मद्यधुंद कंटेनरचालकाचा थरार! झाड अडकलं तरी ट्रक पळवला; पाहा नेमकं काय घडलं?
Container Crash : पोलीस आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी अडवला कंटेनर; जेसीबीच्या साहाय्याने झाड बाजूला करून रस्ता केला मोकळा.
प्रासंगिक : शैला हळबेसाजिऱ्या गोजिऱ्या चैत्र-पालवीचं स्वागत करता करता मोहून जायला होतं. नुकती हळद लागलेलं ऊन गोरंपान सतेज! आणि पाहता पाहता त्याच्या अंगावर बागडणारी झाडावेलींची इवलाली बाळं! नुकतीच अंकुरलेली! कोंबा कोंबातून उमललेली! भुईतून वर येतात आणि दिसागणिक समजूतदार होतात. शिरीषाची नाजूक कोमलता फुलांच्या पाकळ्या पाकळ्यांतून पापण्यांवर थरारू लागते. इबर्नमचे पिवळे जर्द सडे अनवाणी पावलांनी रस्त्यावरून चालण्याचा आग्रह धरू लागतात. ‘मोगरा फुलला... मोगरा फुलला’चा घोष पावलागणिक मोह घालतो. पावलं थबकतात. गंधभरे गेरे रमणींच्या केशकलापात विराजमान होतात. देव्हाऱ्यातले देवही रंगा-गंधात न्हाऊन निघतात. घरासमोरची जागा चैत्रगौरीनं रेखली जाते. चैत्रगौरीची चंद्रगौर पावलं अंगणात पडायची असतात. कल्याणाची सत्ता आणि मांगल्याचे अस्तित्व सूचित करणारे स्वस्तिक चैत्रगौरीच्या स्वागतासाठी रेखले जाते. घराघरातून चैत्रगौरीची आरास मांडली जाते. पायऱ्या पायऱ्यांच्या मंचावर सारी सजावट! फळाफुलांनी, प्रसन्न सुशोभित मंचासमोर आमंत्रित सुवासिनींचा गराडा. हळद-कुंकू, अषर, फुलं यांची देवघेव. गुलाबपाण्याचा अलगद शिडकावा. आंबट-तिखट, चमचमीत आंबेडाळ आणि केशर-वेलचीयुक्त थंडगार पन्हे... याचा आस्वाद! बांगड्यांचे किणकिणाट, हास्याचे खळखळाट! सारं वातावरणच मुळी नादभरं... गंधभरं...! रंगाचं, गंधाचं वेडं वारं अंगात शिरलेला चैत्र धावत्या पावलांनी केव्हा सरतो समजतसुद्धा नाही. वैशाखाची काहिली सहन करण्याचा पुरेपूर जोष तो अंगांगात भरून जातो. तृप्त मनाने आपण वैशाखाचं तप्त आव्हान स्वीकारायला तयार होतो!आयुष्याचंसुद्धा असंच आहे. सहज फुलवता येईल तसं ते फुलवायचं. आनंदाचे क्षण, सुखाचे बहर, हळुवार झेलायचे. त्याची तृप्ती आत आत अंतर्मनाच्या तळाशी साठवून ठेवायची. तळाशी साठवलेला हा गारवा कोणत्या क्षणी उपयोगाला येईल सांगता येत नाही. कधी बहर, कधी शिशिर हा निसर्गनियम आपल्यालाही तंतोतंत लागू पडणारा आहे. केवळ वयोमानाच्या संदर्भात नाही, तर आयुष्यात झेलाव्या लागणाऱ्या सुख-दु:खाच्या उन्हाळ्या-पावसाळ्यासाठी तो अधिक महत्त्वाचा आहे. आपण नेहमी तयारीत असलो पाहिजे. म्हणूनच ऐन सुखाच्या क्षणीसुद्धा ते सुख नासवणारी माणसं पाहिली की हळहळ वाटते. वाटतं, यांना कसं समजवावं? छोट्या छोट्या कुरबुरींनी हे सुंदर क्षण हातचे निसटू देऊ नका. याच क्षणांची सुगंधी फुलं होतील... बकुळीची! कोमेजली तरी ऐन रखरखीत क्षणांनासुद्धा सुगंधित करून सोडतील. प्रश्न आहे ती फुलं झाडावरून टपटपतील तेव्हा वेचण्याचा! हळुवार हातांनी ती एखाद्या कुपीमध्ये भरून ठेवण्याचा... पाहिजे तेव्हा आपल्या अवतीभवती सुगंध पसरवण्याचं त्याचं गंधभारलेपण आपण हेरलं पाहिजे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केशरिया रंगाचे झेंडू आंब्याच्या हिरव्यागार पानांशी सलगी करत घराचं प्रवेशद्वार सजवतात. अक्षय्य तृतीया हादेखील साडेतीन मुहूर्तांमधला एक मुहूर्त मानला जातो. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शुभकार्याचे बेत आखले जातात. साखरपुडा, विवाह, भूमिपूजन, गृहप्रवेश... कोणत्याही शुभकार्याप्रसंगी अक्षय्य तृतीयेची शुभघडी केव्हाही पवित्र!एक आठवण या अक्षय्य तृतीयेच्या दिवसाशी जोडलेली आहे. जवळच राहणारे आबा आणि माई. चार खोल्यांचं सुबक देखणं घर आहे त्यांचं. घराच्या अंगणात तुळशीचं वृंदावन आहे. घराच्या बागेत झुलणारा झोपाळा आहे. झोपाळ्याच्या वरच्या बाजूला मांडवावर मोगऱ्याचा वेल चढवला आहे. या दिवसात तो असा फुलतो, असा फुलतो की अगदी ‘फुले वेचिता बहरू कळियांसी आला’ अशी स्थिती होते. आबांच्या घरावरून गेलं तरी मोगऱ्याचा घमघमता गंध मन प्रसन्न करतो. बागेत आजूबाजूला नारळीची पाच-सहा झाडं आहेत. भरभरून फुलणारा अनंत आहे. आबा आणि माई अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हमखास झोपाळ्यावर बसलेले दिसतात. पाच-साडेपाचला उन्हं कलली की, माई जरीकाठी नऊवारी साडी नेसून झोपाळ्यापाशी येतात. छायानं झोका देत झोपाळ्यावर बसतात. आबा मधूनच फाटकापाशी येऊन-जाणाऱ्या येणाऱ्या आमच्यासारख्या परिचितांना साद घालून बोलावतात. जवळच मोगरीच्या गेऱ्यांनी ओथंबलेलं तबक असतं. माई प्रत्येकीला गेरा देतात. नारळ देतात. आलेल्यांना स्वत:जवळ बसवून घेतात. आबादेखील खुशीत असतात तेव्हा. गेल्या वर्षीची अक्षय्य तृतीया! आम्ही नवीनच होतो त्या परिसरात! आबांनी हाक मारली म्हणून शिरले त्यांच्या फाटकात! माई हसऱ्या मुद्रेने पुढे आल्या. फुलं दिली. नारळ दिला. ऐसपैस गप्पा सुरू झाल्या. सहजच मी बोलून गेले, ‘किती छान मोकळी जागा आहे’! मुलांना खेळायला अगदी मस्त आहे माई, तुमच्या नातवंडांची मजा आहे.शब्द ऐकताच माईंच्या डोळ्यांतून टपटप अश्रू झरू लागले. काय झालं समजेचना. आबा एकदम पुढे झाले. म्हणाले, ‘अगं, उद्यापासून तुझ्या मुलांना पाठवून दे खेळायला! तीसुद्धा आमची नातवंडच की! आणि हे बघ, आंब्याला कैऱ्या लागल्यात. कैऱ्या असतील तर पाठवून देतो. माई पटकन सावरून म्हणाल्या, ‘कैरीचं लोणचं घातलंस तर मात्र पाठव गं!’ माईंच्या बदलत्या भावमुद्रेकडे पाहातच राहिले. नंतर हकीगत कळली ती अशी - माई आणि आबा एवढ्या मोठ्या घरात दोघेच राहतात. त्यांना दोन मुलगे आहेत. पण दोघेही परदेशी आहेत. त्यामुळे नातवंडांचे पाय या घराला कधीही लागत नाहीत. माईंच्या घरा-अंगणातली लगबग त्यामुळे तशी थबकलीच आहे. माई-आबा एरव्ही फारसे दिसत नाहीत, पण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मात्र माईंचा नियम चुकत नाही. आबांनी या घराचं भूमिपूजन केलं ते याच शुभदिवशी. अवतीभोवती नारळीची झाडं लावली ती याच दिवशी. मोगरीचा वेल सजवला तोही याच दिवशी. झाडं फुलली, फळली. वेळू गगनावरी गेला. बहरला. त्यापूर्वीच लावलेला घरातला पिढ्यानपिढ्यांचा वेल मात्र खरोखरच गगनावरी सात समंदर पार करून त्या पल्ल्याड गेला. तरीही जवळ कोणीही नसण्याच्या एकलकोंड्या वास्तवातून माई-आबा त्या दिवशी बाहेर येतात. २५ वर्षांपूर्वीची ती अक्षय्य तृतीया पुन्हा जगतात. तेव्हाचा तो आनंद पुन्हा फुलवू पाहतात. कारण त्यांनीसुद्धा बकुळीच्या फुलांची कुपी जपून ठेवलीय. ऐन शिशिरात मन सुगंधित करणारी! माई-आबांची ही आठवणींची सुगंधी कुपी जपून ठेवण्याची वृत्ती प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे.निसर्ग कधी कधी आपल्याला विरोधाभासातील सौंदर्य ठायी ठायी उकलून दाखवतो. तसाच विरोधातील समन्वयाचं जाणतं सौंदर्य अनेकदा महापुरुषांच्या तत्त्वातूनही प्रतीत होतं. वैशाख शुद्ध पंचमीला आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला. ज्ञान आणि भाव यांचा समन्वय साधलेला महापुरुष म्हणजे आद्य शंकराचार्य! ज्ञानाचा हिमालय आणि भावनेचा सागर! अद्वैताची गर्जना करणाऱ्या या महापुरुषाने भावमधुर स्तोत्रे रचली. 'अहं ब्रह्मास्मि' म्हणणारे शंकराचार्यच 'मम भवतु कृष्णोक्षिविषय:' असेही म्हणतात. जीवा-शिवाचे अद्वैत तर साधले पाहिजेच. पण हेच अद्वैत मी आणि समाज यात साधता आले तर? तर मग सामाजिक स्तरावरही सुंदर अद्वैत निर्माण होईल. शंकराचार्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या सुंदर विचारधारेतील काही थेंब आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला हवा. सण येतात आणि जातात. जयंत्या येतात आणि जातात. ऋतू येतात आणि जातात. त्यातून काय टिपायचं ते आपलं आपणच ठरवायचं. आपापल्या अंतर्मनात कायम सुगंध देणारी बकुळ फुलं जपून ठेवायची. ऐन वैशाखाच्या काहिलीत सुखद गारवा आणि ताजवा देण्यासाठी!
Dimbhe Dam : पाणी देता का कुणी पाणी?’…आंबेगाव तालुक्याचा टाहो; धरणातील साठा घटल्याने गावकरी हतबल
Dimbhe Dam : डिंभे धरणाच्या पाणी पातळीत मोठी घट झाल्याने आंबेगाव तालुक्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; कूपनलिकाही पडल्या कोरड्या.
नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरेकाळच वेगळा होता. घरात मूल नसणे हे कमीपणाचे मानले जाई. हल्लीसारखे शहरी समाजातसुद्धा ‘चंगळ हवी, मूल नको’ हे धोरण तेव्हा आलेले नव्हते. भारतीय जीवनमूल्यांवर लोकांचा दृढ विश्वास होता. अपत्य नसेल, तर आई-वडिलांना मृत्यूनंतर मोक्ष मिळणार नाही अशी श्रद्धा होती. घरात कुणीतरी आपल्यापेक्षा लहान असावे, घरभर दुडुदुडू धावणारे, आपल्या जगात नुसते येण्यानेच वेगवेगळी नाती निर्माण करणारे बाळ असावे, कुणावर तरी हेतूशिवाय, स्वार्थाशिवाय, निरपेक्ष प्रेम करण्याचा आणि त्याच्याकडून ते मिळण्याचा अनुभव घ्यावा ही भावना नैसर्गिक होती. त्या लहानग्याचे पालनपोषण करावे, त्याला मोठे होताना पाहावे, त्याच्यावर संस्कार करून एक चांगली व्यक्ती घडवण्याचा अनुभव घ्यावा असे सर्व विवाहितांना वाटायचे. मूल नसेल, तर विवाहित स्त्री दु:खी असायची, सतत झुरायची. मग तिचा पती तिचे मन सांभाळण्यासाठी काहीही करायला तयार असायचा. त्याच भावनेवर १९६८ला कुंदन कुमार यांनी निर्माण केलेला ‘कुंदन फिल्म्स’चा सिनेमा आला होता ‘औलाद’. दिग्दर्शनही त्यांचेच होते. सर्व गाणी मजरूह सलतानपुरी यांची आणि त्यांना संगीत दिले चित्रगुप्त श्रीवास्तव यांनी. जितेंद्र (सिनेमात सोहन आणि सुरज) आणि बबिता (भारती) या जोडीबरोबर होते - सुजितकुमार (डॉ. मोहन), मनमोहन कृष्ण (जमीनदार), नझीर हुसैन (दिनू), हरी शिवदासानी (मेजर गुप्ता), मेहमूद (चार्ली), जीवन (मुनीम रामलाल), अचला सचदेव (शारदा), अरुणा इराणी (शोभा) आणि हेलन. चित्रगुप्त यांचे संगीत कर्णमधुर होते. ‘अरमा था हमे जिनका वो प्यारके दिन आये’ या गाण्यात गडद निळ्या साडीतली बबिता मोहक आणि पांढऱ्याशुभ्र शर्ट-पॅण्टमध्ये जितेंद्र देखणा दिसला होता. ‘कबतक हुजूर रूठ रहोगे, लेके गुस्सेमे प्यार अब तो हंसो.’ हे गाणे बिनाकाच्या १९६९च्या सर्वाधिक लोकप्रिय गाण्याच्या नामांकनात २७ क्रमांकावर आले. ‘अबके बहार आयी हैं, तुम्हारे नामसे, मस्ती फिजामे हैं इन्ही लबोके जामसे’च्या वेळी बबिता गुलाबी पंजाबी ड्रेसमध्ये फार गोड दिसली.पूर्वी कथानकाचा ताण अधूनमधून हलका करण्यासाठी मूळ कथेसोबत एखाद्या विनोदी जोडीचीही कथा गुंफलेली असायची तशी ‘औलाद’मध्ये ती होती मेहमूद आणि अरुणा इराणीच्या प्रेमाची. मेहमूद हा सिंगापूरला राहिलेला चिमणलाल ऊर्फ ‘चार्ली’ असतो आणि स्वत:ला इंग्रजी समजत असतो. जितेंद्रकडे मॅनेजर म्हणून नोकरी करायला आल्यावर तो अरुणा इराणीच्या प्रेमात पडतो. त्याच्या विनोदी स्वभावामुळे त्याने बोलण्यात सहजच ‘ये हरियाली और रास्ता’, ‘तू जहा जहा चलेगा, मेरा साया’ अशा हिंदी सिनेगीतांचे संदर्भ आणून आपल्या चतुरपणाचा परिचय दिला होता. एका गंमतीदार दृश्यात मेहमूद अरुणाला मेकओव्हर करून इंग्रजी वेशभूषा करायचा आग्रह करतो. ती उलट त्याला भारतीय जीवनशैली स्वीकारून खरा भारतीय होण्याचा आग्रह करते. हा काळ होता १९६८चा, म्हणजे तब्बल ५८ वर्षांपूर्वीचा! त्याकाळी अनेक परदेशी गोष्टींबद्दल सर्वच लोकांना एक आकर्षण होते. मजरुहजींनी मेहमूद आणि अरुणा इराणीसाठी एक गाणे लिहिले. ते एकेकाळी लोकप्रियही झाले होते. मन्ना डे आणि आशा भोसलेंनी मजेदारपणे गायलेल्या त्या गाण्याचे शब्द होते - “जोड़ी हमारी जमेंगा कैसे जानी, हम तो है अंग्रेज़ी, तुम लड़की हिंदुस्तानी” असे जेव्हा मेहमूद म्हणतो तेव्हा अरुणा म्हणते - “तुमको भी मुश्कील मुझे भी परेशानी, बात मानो सैयां, बन जाओ हिंदुस्तानी.” त्याकाळी पाश्चिमात्य देशातील स्वच्छंदीपणामुळे, मुक्ततेमुळे त्या चंगळवादाकडे आकृष्ट झालेला मोठा वर्ग होता. अशा भारतीय तरुणांचे प्रतिनिधित्व करणारे पात्र म्हणून लेखकाने मेहमूदला उभे केले होते. तो म्हणतो - “अंग्रेज़ी मुल्कमें कितना रोमांस है,बाहरका छोकरी कितना अॅडवांस है.” त्याला अरुणा इराणीने त्याच्याशी केवळ प्रेमच नाही, तर बिनधास्त रोमान्स करावा अशी अपेक्षा आहे. म्हणून तो इंग्रजी समाजाचे उदाहरण देऊन म्हणतो तिकडच्या मुली किती पुढारलेल्या आहेत तुही तशी हो.’ अरुणा इराणीचे मजरूहजींनी लिहून दिलेले उत्तर मात्र ठाम आहे. ती म्हणते, “भारतीय मुलीच्या तोंडावर एक लाजेचा पडदा असतो रे! ती कधी इतक्या प्रेमाने तुझ्याकडे पाहणारसुद्धा नाही. अरे इथे तर आमच्या घुंगटमध्येच यौवन फुलत असते. हे समजून घे.’ “देखेगी ना कभी वो इतने प्यारसे, मुखड़ेपे लाजका अंचरवा डारके, खिलती है सजना घूंघटमें जवानी, जोड़ी हमारी जमेगा कैसे जानी...” रोमांटिक मूडमध्ये गेलेला बिचारा मेहमूद मग तोंडीच कल्पना करून आनंद घेताना म्हणतो, ‘मी तुला रोज प्रेम कसे करायचे ते दोन तास प्रेमाने मिठीत घेऊन शिकवीन.’ यावर अरुणातील संकोची भारतीय युवती गोंधळते आणि त्याला विनंती करू लागते. ‘अरे बाबा, तशी काही लगटबिगट करू नकोस हं! नाही तर माझे काजल विस्कटून जाईल. कानातले डूल तुटतील. मग मला तर रडूच येईल! “बाहोमे थामके दो घंटा रोज मैं, तुमको सिखलायेंगा, उल्फटका पोज मैं, दइया रे नैनका कजरा ना छूट जाए, झकझोरोना पिया झुमका ना टूट जाए. रो देगी देखो तुम्हारे दिलकी रानी, तुमको भी मुश्कील मुझे भी परेशानी...” मजरूहजींचे लक्ष आजूबाजूच्या परिस्थितीकडे किती बारीक होते तेही पुढच्या ओळीतून दिसते. तेव्हा फक्त खूप मोठ्या शहरात आणि अतिश्रीमंत घरातच मुलींनी केस कापायची फॅशन सुरू होत होती. त्यामुळे चार्ली शोभाला म्हणतो, ‘प्रिये इकडे ये, मी तुझे लांबचलांब केस कापून टाकतो कारण तुला आता ‘हीर रांझा’मधल्या ‘हीर’पासून ‘रोमियो ज्युलीयट’मधली ‘ज्युलीयट’ बनायचे आहे! ‘लाओ मैं काट दू लंबी लंबी ये लट, तुमको तो हीरसे बनना ज्युलीयट. यु ना पागल बनो देखो रे बालमा, चिल्लाके शोर मैं कर दुंगी जालमा, जुल्फे कटाके लगुंगी मैं दिवानी.’मग तर शोभा त्याला भीतीच दाखवताना म्हणते, तू माझ्या केसांना हात जरी लावलास तरी मी आरडाओरडा करेन हं! अरे वेड्या, केस कापल्यावर मी लोकांना वेडीच नाहीका वाटणार?’ अशी अनेक गंमतीशीर गाणी आपल्या सिद्धहस्त गीतकरांनी लिहून ठेवली आहेत. ‘औलाद’च्या बरोबर १० वर्षे आधीच येऊन गेलेल्या रागिणी(१९५८) मध्ये असेच एक गाणे खुद्द किशोरदांवर आणि दाक्षिणात्य सौंदर्यवती पद्मिनीवर चित्रित झाले होते. शब्द होते, “मैं बांगाली छोकरा करू प्यारको नोमोस्कारम” आणि त्याच्या प्रेमात पडलेली पद्मिनी म्हणते, “मैं मद्रासी छोकरी, मुझे तुझसे प्यारम.” पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी!
प्रशांत िडंगणकर यांच्या ‘मनबाधा’ या ललितलेख संग्रहाचं प्रकाशन नुकतंच माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झालं. त्यावेळी शेलार यांनी केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश...मनबाधा पुस्तक वाचताना लक्षात येतं की, हा लेखक काहीतरी शोधतो आहे. ती राधा आहे. बरं ती राधा काय? तोही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने समजायचा विषय आहे. त्यांनी तो मांडला. त्यांनी कुठेही हा दावा केला नाही की, हीच राधा. मी सांगतो, तशीच आहे, त्याच पद्धतीने विचार करा, तुम्हाला सापडेलच. मला सापडली आहे की नाही अनुत्तरित आहे. म्हणून एखाद्याला वाटेल की हा शोध ग्रंथ आहे, तर तो केवळ शोध ग्रंथ नाही, हे ललित लेखन आहे, ललित गंध आहे. पण म्हणून केवळ ललित लेखनाचा हा प्रकार आहे इतकं मी मानायला तयार नाही. हे पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर त्यात एक कविता आहे. माझ्या मते त्यात काही गझला पण दडलेल्या आहेत. पण मनबाधा हे पुस्तक इथपर्यंत सीमित नाही. मी जे मांडतोय कदाचित ते लेखकाचे मत असेल किंवा नसेल ही. मनबाधा हे पुस्तक एका साधना करणाऱ्या साधकाचा आध्यात्मिक प्रवास आहे. लेखक साधक आहे याच्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. तो साधना अनुग्रहाच्या रूपाने काय करतो? हे त्याने जाहीर करण्याची गरज नाही. पण हे पुस्तक मात्र नक्की ती राधा शोधताना त्याच्या अाध्यात्मिक प्रवासातल्या टप्प्यांचं प्रवास वर्णन आहे. हा लेखकाचा प्रवाह आहे की, प्रवास आहे? आणि मग उत्तर मला चटकन सापडलं की हा प्रवास आहे. म्हणूनच त्याचा उल्लेख मी अाध्यात्मिक प्रवास केला. लेखक लिहितोय की, राधा एक शक्ती आहे. राधा ही व्यक्ती नसून ती एक शक्ती असल्यामुळेच तिच्या शोधात तो निघालाय. म्हणून याला मी आध्यात्मिक प्रवास म्हणतो. याचं कारण आपल्याला संतांनी हेच तर सांगितलं आहे की, जे निर्गुण निराकार आहे, ते सगुण साकार होणे म्हणजेच तर देव. इतकं व्यापून टाकलेलं निर्गुण निराकार रूपी ते सगुण साकारामध्ये मूर्तीरूप होणं, त्यात तर देवत्व आम्ही पाहतोय. हे लेखन म्हणजे निर्गुण निराकार ते सगुण साकार शक्तीचा त्या शक्तिरूपी राधेचा शोधण्याचा प्रवास आहे. मला याही गोष्टीचा उल्लेख करायला लागेल तो म्हणजे या पुस्तकाच नाव “मनबाधा” असे ठेवले आहे. “मनदोष” असे ठेवलेलं नाही, बाधा आणि दोष दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. बाधा ही आपल्या देहाशी संबंधित अंतर्गत व्यवस्था आहे. दोष हा पिढ्यान् पिढ्या जन्म जन्मांतर आणि जन्म कर्माने माझ्या आत्म्या बरोबर आलेला असतो. म्हणून “मनबाधा” म्हणताना सुद्धा हा लेखक आजच्या देहिक आणि ऐहिक आयुष्यामध्ये आपल्या आध्यात्मिक प्रवासात काय काय गोष्टी वाढून ठेवल्या आहेत हे प्रश्न मांडणार आहे.लेखकाने ज्या महत्त्वाच्या गोष्टींना स्पर्श केला त्यामध्ये पंचमहाभूत या तत्त्वांना स्पर्श केला आहे. समुद्र म्हटलं पण पृथ्वी आप, तेज, वायू, प्रकाश या पंचमहाभूत तत्त्वांनी निसर्ग बनलेला आणि म्हणून निर्गुण निराकार कुठे आहे? तर तो शब्दांकित नाही, तो दिसणारा नाही, तो निसर्गात पाहतोय. या पंचमहाभुतांच्या सर्व रस्त्यांना तो शोधतो आहे. तो भाष्य करतोय पृथ्वीवर, आपवर, प्रकाशावर, समुद्रावर, कारण हा सगळा त्या निर्गुण निराकाराचा शोध आहे. ते शोधताना लेखकाला आजच्या देहीहिक अवस्थेत एक साधक म्हणून तर त्याला मर्यादा घालणाऱ्या गोष्टी काय आहेत? तर त्या षडरिपू आहेत. म्हणून त्या षडरिपू असलेल्या लोभ, वासना, माया क्रोध, मोह, मत्सर ज्या गोष्टींवर तो भाष्य करतो. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल पुस्तक वाचल्यावर तो राधारूपी शक्तीला मानवरूपी भक्तीशी संबंध जोडतानाही तो म्हणतो. “पंचमहाभूत तत्त्वातल्या निसर्गातल्या समुद्राप्रमाणे तू अथांग आहेस.”मी मानवरूपी असलेला भक्त माझ्या भक्तीला त्याचा शब्द किनारा आहे. म्हणजे मला मर्यादा आहे आणि या प्रवासातल्या स्पष्ट गोष्टींवर उल्लेख करताना तो देहिक बरोबरीने पारलौकिक दोन्ही स्तरावर दोन तत्त्व म्हणून त्यातली उत्तर शोधायचा प्रयत्न करतो आहे. हे पुस्तक वाचल्यावर “वाह मजा आली !” काय आनंद आहे! इथपर्यंतची प्रतिक्रिया कदाचित येणार नाही. ती न येणंच हेच या पुस्तकाचे यश आहे. लेखकाने उंची कुठपर्यंत गाठली, तर या आध्यात्मिक प्रवासात मृत्यूनंतरच जीवन यालाही तो स्पर्श करतो. बरं त्याच जीवनाला स्पर्श करताना त्याने स्वतःला मर्यादा घातल्या नाहीत. वाचकांनाही म्हणतो तुम्ही मर्यादित होऊच नका. पण हे करत असताना मृत्यूनंतरच्या जीवनात आत्मारूपी जाण्याआधी करणाऱ्या षोडोपचार किंवा कर्मकांडातल्या गोष्टींवर मात्र तो बोलतोय. म्हणून पुस्तक लिहिताना त्याला असंख्य रात्री झोप आली नसेल. या पुस्तकाचा विचार मनात घोळताना तो असंख्य वेळा जेवला नसेल किंवा पुस्तक प्रत्यक्ष कागदावर उतरवताना शब्दांशी केलेला व्यवहार...(व्यवहार हा शब्दही त्याच्या पुस्तकात आहे) हा एका वेगळ्या उंचीचा असेल याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. तो देहाबरोबर आलेल्या वलयांची चर्चा करतोय. माझ्यासारखा माणूस मानतो की आपल्या देहात आत्मारूपी जीवनात येणारी वलये ही जन्म, कर्म, जन्म जन्मांतराची असतात. काही ऋणानुबंध असतात. त्या ऋणानुबंधातन मुक्ती मिळण्याचा मार्ग विमोचनाचा असेल, तर त्या आधी वलयं आहेत. ती कळलीच पाहिजे आणि त्या वलयांचा सुद्धा उल्लेख या पुस्तकामध्ये लेखक त्या ठिकाणी करतो आहे. हा ललित लेखांचा संग्रह असला तरी लेखक जी विधाने करतोय, ती एका तत्त्वज्ञानाचा अभ्यासक किंवा तार्किक किंवा तात्त्विक उपदेश असावे इतकी गंभीर विधानं त्यातली करतो. तो मांडतोय... स्वतः स्वतःच्या ‘मनबाधा’त लिहिताना तो म्हणतो की, “मनाच्या गोफाची गुंतता मोकळी करताना जर गुंत्याचे भान नसेल तर सगळं गणित कोलमडतं.” आपल्या मनात असलेल्या गोफ उघडायचंच असेल तर त्याच्यात गुंता काय? याचे भान नसले तर सगळं गणित कोलमडतं. हा लेखक विधान करतोय की, “आपलं जीवन जे आहे ते सर्व भौतिक सुखांनी फेसाळलेले पण तो फेस जेव्हा खाली बसतो तेव्हा जी जाणीव होते ती खऱ्या सुखाची जाणीव!” प्रेताला जेव्हा अग्नी दिला आहे त्यावेळेला चितेच्या भोवती उभा राहणाऱ्या सर्व व्यक्ती संदर्भात हा लेखक म्हणतो की, “भडभडणाऱ्या अग्नी समोर उभी असतात ती माणसे आहेत की नाती आहेत? “प्रश्न चिंता आणि चौकटीमध्ये अडकलेल्यांना जगण्याचा मोकळा श्वास घेता येत नाही !” अशी असंख्य विधाने यात आहेत. या सगळ्या गोष्टीची, तात्त्विक विधानांची मीमांसा सुद्धा तो करतो आहे.एका अर्थाने पाहिलं तर हा असा लेखक मला वाटतो की जो आपल्याच पुस्तकाच्या माध्यमातून अक्षरांची मांडणी करताना, स्वतःच नवीन व्याख्या निर्माण करतोय. मग त्यामध्ये या पुस्तकात तो सुख, प्रेम, माणूस आणि मत्सर याची अशी चपखल व्याख्या करतोय की ती अन्यथा आपल्या जीवनात डोकावून बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी दिसते.मला तर तो काही ठिकाणी प्राणीमित्र सुद्धा दिसतो. त्याचं कारण या पुस्तकामध्ये मधमाशाच्या पंखांना सुद्धा आवाज असतो. नसेल तुम्हाला आणि मला जाणे तो त्याबद्दल बोलतोय. तो पिंड ते ब्रह्मांड यांची चर्चा करताना कावळ्याचं महत्त्व सांगतोच आहे. पण बरोबर चिमणी काय घेऊन जाते? आणि तिची गरज काय असते? बगळा समुद्र किनाऱ्यावरून त्या पिंडाच्या लावलेल्या तीन गोळ्यांकडे बघून काय म्हणतो? याचा उल्लेख सुद्धा तो करतो. आणि म्हणून हे पुस्तक केवळ ललितबंधाचं असं मला वाटत नाही. याची व्याप्ती त्या ठिकाणी मोठी झालेली दिसते आणि म्हणून या पुस्तकात अद्भुत अशा पद्धतीचा वाङ्यीन व आध्यात्मिक प्रवास सुद्धा आपल्याला दिसतो.निसर्गाचं वर्णन करताना निसर्ग म्हणजे स्त्रीच आहे असं करतो. तो पुरुष आहे की स्त्री हा वादाचा मुद्दा नाहीये. पण मला असं वाटलं की त्याने केलेलं वर्णन त्याच्या शब्दात सांगायचं झालं तर अमावस्येच्या रात्रीला ज्यावेळी अंधार दाटून येतो त्यावेळेस आकाश साध्या डोळ्यांनी दिसत नाही आणि मग तिचं रूपक करतो तो स्त्रीच्या एका विशिष्ट अवस्थेची आठवण करून देतो. ज्यावेळी ग्रहण लागते चंद्राला त्यावेळेचे आकाश हे गर्भवतीच्या उजळणाऱ्या चेहऱ्याप्रमाणे भासू लागते. निसर्गातल्या सर्व गोष्टींना स्त्रीची उपमा देतोय अशी असंख्य उदाहरणे आहेत. तशाच प्रकारे यात गझलेचा दर्द ही ठासून भरलेला आहे. हा लेखक लिहितोय की, “प्रेम कधी केलं होतंस तिच्यावर? व्यवहार दळला होतास जात्यावर!” पुढे तो म्हणतोय... “मला पिंडदान करतानाही तू हसत होतीस मला आज तू जास्त आनंदी दिसत होतीस!” त्यामुळे या पद्धतीचा लेखन करणारा हा लेखक आणि त्याचा हा आध्यात्मिक प्रवास आणि तो देहिक माध्यमातून पंचमहाभूतत्वाच्या धांडोळ्यातून असला तरी, हे लेखन म्हणजे केवळ राधा शोधण्याचा धांडोळा नाही, त्या शक्ती शोधण्याचा धांडोळा नाही, काहीतरी मिळावं म्हणून केलेली धावपळ पण नाही, ती धावही नाही, पण तो जे शोधतोय ते रूप दिसण्यासाठीचा त्याचा “धावा” असे माझं मत आहे. तो धावा परमपूज्य पंत महाराज बाळेकुंद्री यांनी त्यांच्या पदात “दत्त प्रेमलहरीमध्ये म्हटलंय त्यातल्या ओळींमध्ये मला दिसतो. धाव पाव रे अवधुता माय बाप तू बंधू सोयरा... या संपूर्ण पदाचे निरूपण केले तर या शोधाचे सगळे धागेदोरे आपल्याला सापडतात. अशा या अति गर्भित आणि मराठी साहित्यातल्या वेगळ्या छटा निर्माण करणाऱ्या पुस्तकाला आणि त्या लेखकाला माझ्यामनापासून शुभेच्छा!
Alephata Market : आळेफाटा बाजारात शेतकरी हतबल! चारा-पाण्याअभावी जनावरे विकण्याची वेळ..पाहा वास्तव
Alephata Market : पुणे, अहिल्यानगर आणि नाशिकमधून गायींची मोठी आवक, मात्र खरेदीदार फिरकत नसल्याने व्यवहार मंदावले.
Lakhewadi Theft : इंदापुरात अट्टल चोरट्यांचा धुमाकूळ! लाखेवाडीत दुकान फोडून ४ लाखांचा माल लंपास
Lakhewadi Theft : सीसीटीव्ही डीव्हीआर आणि हार्डडिस्क चोरून नेल्याने ही चोरी पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांचा संशय.
स्मृतीगंध : लता गुठेएप्रिल महिना सुरू झाला की कधी एकदाची सुट्टी लागते याचे वेध लागायचे आणि परीक्षा संपली की कधी आजोबा घ्यायला येतात असं व्हायचं. आजोळी जायचं म्हटलं की, अंगात उत्साह संचारायचा. मामा किंवा आजोबा बैलगाडी घेऊन घ्यायला यायचे आणि आम्हा सर्व नातवंडांना घेऊन आजोळी जायचे. माझं अजोळ अतिशय निसर्गरम्य ठिकाणी होतं. चहुबाजूंनी डोंगर आणि मध्ये नदीच्या काठावर वसलेलं ते छोटसं गाव आणि त्या गावांमध्ये माझ्या मामाचा चौकाचा वाडा. मामाचं घर म्हणजे चिरेबंदी वाडा-भक्कम दगडी बांधकाम, लाकडी कोरीव दरवाजा आणि मोठं अंगण. त्या वाड्याची एक वेगळीच शान होती. बाहेर चिऱ्यांनी बांधलेले ओटे होते. संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर, बायकांची मैफल जमायची आणि आमचा झिम्मा फुगडीचा खेळ रंगायचा.वाड्याला लागूनच खाली दुकान आणि वरती माडी होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळायला जागाच जागा. आजूबाजूची सर्व मुलं जमायची आणि लपाछपीचा खेळ सुरू व्हायचा. दुपारच्या वेळेतसुद्धा वाड्यात जराही गरम व्हायचं नाही. संध्याकाळी उन्ह खाली उतरली की, गावात फेरफटका मारायचा. सर्व आजोळची माणसं भेटायची, आपुलकीने चौकशी करायची. आजोबांना गावात सर्वजण मास्तर म्हणायचे. मास्तरची नातवंड आली की इतरांनाही आनंद होईल. गावातली सर्व मानलेली नाती मामा-मामी, आजोबा-आजी याच नावाने आम्ही सर्वांना बोलायचो. मावशीची, मामांची मुलं आणि आम्ही सर्व मिळून सात मुलं असायचो. घराबाहेर पडलो की, आधी मंदिरात जाऊन तेथील वडाच्या पाराखाली पारंब्याला झोके खेळायचे. कंटाळा आला की, गावाबाहेर असलेल्या टेकडीवर जाऊन बसायचो. तिथून संध्याकाळी सूर्यास्त पाहायला मौज यायची. संध्याकाळी छान गार वारा सुटायचा. रेडिओवरची गाणी ऐकण्यात तेव्हा जो आनंद मिळायचा तो आता कशानेच मिळत नाही. आजोबांच्या सूचनेप्रमाणे संध्याकाळी अंधार पडायच्या आत घरी जावे लागायचे. वाटेत गुरं घेऊन घरी जाणारे गुराखी भेटायचे. एखाद्या गुराख्याचे दूरवरून बासरीचे सुमधुर स्वर कानावर पडायचे. असं हे सर्व नयन मनोहर दृश्य मनात साठवून रमत गमत घरी पोहोचायचो, तोवर आजी आम्हाला आवडणारे वेगवेगळे पदार्थ बनवायची. आमची अंगत पंगत बसली की, सगळे जिन्नस फस्त करायचो आणि आपापले अंथराचे पांघरायचे कपडे घेऊन माळवदावर झोपायला जायचो. वरती चांदण्यांनी बहरलेलं आकाश आणि आजीच्या, मामीच्या छान छान गोष्टी ऐकत कधी निद्रा देवीच्या स्वाधीन व्हायचो ते कळायचंही नाही.दुसऱ्या दिवशी सकाळी जाग यायची. आंब्याच्या आमराईत जाण्याची घाई व्हायची. कारण सकाळी आंब्याखाली पाड पडलेले असायचे. ते गोळा करायचे आणि घरी येऊन एका मोठ्या पातेल्यात पाण्यात भिजवायचे. ते व्यवस्थित कापून एक ताट भरून मामी समोर आणून मांडायची. गावरान आंब्याचे आंबट-गोड पाड खाताना स्वर्गीय आनंद मिळायचा. छोटी मामी आमच्या एवढी लहान होऊन आमच्यातच खेळायची. दुपारच्या वेळी आजोबांचा पत्त्याचा डाव माडीवर रंगायचा. गावातले बरीच रिकामटेकडी माणसं पत्ते खेळायला यायची. पत्त्याबरोबर त्यांच्या गावातल्या गप्पाही रंगायच्या. डोंगरात गाव असल्यामुळे रानमेवा भरपूर असायचा. उन्हाळ्यामध्ये शिंदोळ्या, करवंद, जांभळं दुपारच्या वेळी गावातल्या बायका डोंगरात जाऊन वेचून आणायच्या आणि वाड्यात येऊन “बाई, वाईस घ्या नातवंडांना. लय गोड हायीत.” त्या लाल भडक शिंदोळ्या, पिकलेली करवंद आणि जांभळं पाहून तोंडाला पाणी सुटायचे. आजी त्यांना धान्य देऊन ते सर्व विकत घ्यायची. हा रानमेवा दुपारच्या वेळी यायला उपयोगी यायचा. त्यावेळी नद्यांना बारमाही पाणी असायचे. मामी कपडे घेऊन धुवायला चालली की तिच्या पाठोपाठ जायचो. नदीत मनसोक्त डुंबून पाण्यात खेळण्याचा आनंद लुटायचो. मामा बीडवरून येताना खाऊ, फळं, खेळणी, कपडे घेऊन यायचे. त्याकाळी सुट्टीत साधेपणा होता, पण समाधान खूप होतं. खेळण्यात महागड्या वस्तू नव्हत्या, पण आनंद भरपूर होता. चिरेबंदी वाड्याच्या त्या भिंतींनी आमच्या हसण्याचे, खेळण्याचे, आणि निरागसतेचे असंख्य क्षण जपले होते. आज काळ बदलला, जीवनशैली बदलली, पण त्या आठवणी मात्र अजूनही मनात ताज्या आहेत. १९८० च्या त्या उन्हाळी सुट्ट्या म्हणजे केवळ सुट्टी नव्हती-तो होता बालपणाच्या आठवणींचा अविस्मरणीय खजिना. अशा प्रकारे उन्हाळ्याची सुट्टी कधी संपायची कळायचे नाही. शाळा सुरू झाल्या की आजोबा पुन्हा गावी नेऊन सोडायचे.सुरुवातीचे काही दिवस सुट्टीतले दिवसच आठवायचे. शाळेत मन रमायचंच नाही. मग पुन्हा दिवाळीच्या सुट्टीचे वेध लागायचे... आज हे सगळं हरवलं आहे. मुलांचे बालपण बालपण राहिलंच नाही. पुस्तकांच्या ओझ्याने व शाळेतल्या अभ्यासाने मुलं दबली आहेत. ना खेळायला अंगण नाही, ना मित्र-मैत्रिणी. ती मुलं एकलकोंडे होतात. चिडचिडे होतात. आई-वडील मुलांना सुट्टीत वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीजमध्ये बिझी करतात. चित्रकलेचा क्लास संपला की डान्सच्या क्लासला जायचं अशा प्रकारे त्यांचं बालपण कधी संपतं ते त्यांनाही कळत नाही.
मनस्विनी : पूर्णिमा शिंदेवैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया. हा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त असणारा सण. मुळात अक्षय्य या शब्दाचा अर्थच आहे क्षय न पावणारे. खंडन न होणारे, नाश न पावणारे. या दिवशी पितृ पूजन देखील केली जाते. अत्यंत पूजनीय धार्मिक उत्सव आणि जल्लोषाचा हा दिवस चैत्रात बसवलेल्या चैत्रागौरीचे विसर्जन या दिवशी केले जाते उन्हापासून रक्षण करणाऱ्या छत्री, जोडा, दान करावा किंवा स्त्रिया हळदीकुंकूमध्ये हळदीकुंकू आणि काही वाण दान करण्याची प्रथा पूर्वापार आहे. अक्षय्य तृतीयेला विशेष अशी खरेदी केली जाते. सोनं-नाणं, मोहरा, सिक्के चांदी किंवा घर खरेदी आणि वाहन खरेदीसुद्धा आवर्जून याच दिवशी केली जाते. शुभशकून मानला जातो. नव्या घराची वास्तुशांती असेल गृहप्रवेश असेल याच दिवशी शुभ मानला जातो. कोणताही मुहूर्त न काढता साडेतीन मुहूर्तांपैकी अखंड मुहूर्त म्हणून या दिवशी पूजा होते.या दिवशी मातीचे माठ रांजण गोरगरिबांना दान करावे. त्याने पुण्याचं संचय वाढतो. त्या दिवशी गोरगरिबांना आंबे दान करावेत. कारण आंबे खाण्याची सुरुवात ही या दिवसापासून होऊन आरोग्य उत्तम राहतं. मिठाई, गोड पदार्थ व स्त्री कापड, झाडांची रोपे त्याचप्रमाणे मानव उपयोगी धनधान्य या दिवशी दिल्याने उत्तरोत्तर भाग्य सुधारते. प्रगती होते. आपल्या धान्यात वाढ होते असे या दानामागील खरे पुण्य आहे. या सणानिमित्त मंत्र पठण, हवन पूजा, जप, अनुष्ठान, नामस्मरण इत्यादी देखील करणे अत्यंत महत्त्वाचे असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पितृ पूर्वजांचे स्मरण करणे. पितृश्राद्ध घालावे. त्यानंतर यथाशक्ती ब्राह्मण भोजन घालावे आणि पितृ तर्पण करावे. या दिवशी आपण पूर्वजांचे पूजन करावे. नैवेद्य दाखवावा. यथोपचार त्यांची पूजा करावी. शुभाशीर्वाद घ्यावेत असाही नेम आहे. थोडक्यात काय तर कोणतेही शुभकार्य या दिवशी सुरू केल्यास कायमस्वरूपी ते टिकून राहते. त्यात खंड पडत नाही हेच ते अक्षय्य. या दिवशी शस्त्रांची पूजा देखील केली जाते. दागदागिने, नवीन वस्त्र, वस्तू यांची पूजा करून त्या परिधान केल्या जातात. मंडळ, कार्यालय, घरे, गाड्या, मोठमोठ्या वास्तू यांचे उद्घाटनही या दिवशी खरेदीसह केले जाते. नवीन व्यवसायाची सुरुवात केली जाते. कारण शुभमुहूर्तावर केल्यास आपल्याला आयुष्यभर काहीच कमी पडत नाही. सुदाम्याने श्रीकृष्णाला मूठभर पोह्याची परचुंडी दिली. मित्रप्रेम, मित्र धर्म यांना जागणारे. मित्र प्रेमासाठी अनन्यसाधारण हा दिवस. श्रीकृष्णांनी सुद्धा सुदाम्याला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली. देवीअन्नपूर्णेचा जन्म ही अक्षय्य तृतीयेचाच. अक्षय्य तृतीयेला श्रीकृष्णाला अक्षय पात्र दिले होते. द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी श्रीकृष्णाने अक्षय्य वस्त्र, वस्त्रदान केले होते अशी आख्यायिका आहे. खरे तर अक्षय्य म्हणजे अविनाशी.कधीच विनाश न पावणारे आणि म्हणून इथे पुण्य करावं. त्या पुण्याचा विनाश होत नाही. या दिवशी मातीचं भरलेले माठ गरिबांना दान केले पाहिजे. ते पाण्याने भरलेले असेल तर त्या माठातील थंड पाणी पिण्यास सुरुवात केल्याने आरोग्य सुधारते. कारण हे उन्हाळ्याचे दिवस असतात. या ऋतूत आंबे खाल्लेले आरोग्यास चांगले. या दिवशी आंब्याचे दान द्या. या दिवशी पहाटे स्नान करून नरनारायणासाठी भाजलेले जव, अगर गव्हाचे पीठ परशुरामासाठी कोवळी वाळके आणि हयग्रीवासाठी भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालून नैवेद अर्पण करावा. शक्य असल्यास उपवास करावा. गंगास्नान करावे. त्याचप्रमाणे सातू, दहीभात, उसाचा रस, खवा, मिठाई, जलपूर्ण माठ, धान्य, सर्व प्रकारचे रस, फळे यांचेही दान करावे.बद्रीनारायण मंदिराचे दरवाजे या दिवशीच उघडले जातात. अक्षय्य तृतीया ही अक्षय्य सुखाची कारक आहे. या दिवशी केलेले जप, तप, दान, पुण्य यांचा कधीही क्षय किंवा नाश होत नाही. श्री विष्णूच्या २४ अवतारांपैकी भगवान परशुराम, नरनारायण व हयग्रीव हे अवतार पृथ्वीतलावर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी प्रकट झाले. याच दिवशी श्री वेद व्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला. म्हणूनच अक्षय्य तृतीयेचा हा दिवस अत्यंत धार्मिक आणि महत्त्वाचा उत्सव मानला जातो. हा अक्षय्य तृतीयेचा सण आपल्या जीवनात सुख-समृद्धी, यश, आरोग्य, स्वास्थ्य घेऊन येवो, आपल्या आयुष्यात अक्षय्य सुख, धनसंपदा, मैत्री लाभण्यासाठी सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!
Farmers Protest : साकळाई उपसा सिंचन योजनेला शेतकऱ्यांचा विरोध! इनामगावच्या सभेत मोठा निर्णय
Farmers Protest : साकळाई उपसा सिंचन योजनेमुळे घोडनदी काठच्या ४२ गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती; शेतकऱ्यांनी स्थापन केली 'घोडधरण बचाव कृती समिती.
जीवनगंध : पूनम राणेशाळा सुटण्याची वेळ झाली होती. रियाचे आजोबा शाळेच्या दरवाजावर तिची वाट पाहत उभे होते. शाळा सुटण्याची बेल झाली. रिया दरवाजावर आली. रोजच्या प्रमाणे ती आजोबांच्या गळ्यात पडली नाही. आज ती निराश दिसत होती.आजोबांनी तिला विचारले, “बाळा, आज तू बोलत का नाहीस ? उदास का दिसतेस? बोल बाळा, काय झालंय! शाळेत तुला कोणी बोललं का? बाई रागावल्यात का?”रिया काहीच बोलत नव्हती. आजोबांनी रिक्षा थांबवली. रिक्षात बसले; परंतु रिया रिक्षातही काही आजोबांशी बोलेना. घरी आल्यावरही रिया शांतच होती. आजोबा आजीला म्हणाले, “आज रियाचं काय झालं कळत नाही.” ती खूपच शांत आहे. निराश आहे. तू तिला विचारून घे.” प्रियाने दप्तर बाजूला ठेवले. हात-पाय धुतले. शांतपणे कोचवर येऊन बसली. आजीने तिला जेवण वाढले; परंतु तिचे जेवणाकडे लक्षच नव्हते. ती जेवायलाही तयार होईना. जेवणाच्या ताटासमोर बसून ती रडायला लागली. आजी म्हणाली, “बेटा, अगं काय झालं! सांगशील का नाही?” तेव्हा रिया म्हणाली,“आजी,अगं, माझी मैत्रीण दिव्या गेले चार दिवस शाळेत येत नाही. मार्च महिना सुरू झाला आहे. तिने सुरुवातीपासून फी भरली नाही. आता परीक्षा चालू होणार. ज्या विद्यार्थ्यांची फी बाकी आहे त्यांना परीक्षेला बसू देणार नाही, असे बाईंनी सांगितले आहे. बाई तिला रोज विचारतात; परंतु तिची आई तिला फी देऊ शकत नाही. तिचे वडील देवाघरी गेले आहेत. आई भांडी-कपडे करण्याचे काम करते. दुसऱ्यांचा स्वयंपाक बनवायला जाते. तिचा मोठा भाऊ आजारी आहे. त्यामुळे बराच खर्च त्यांच्या घरी झाला आहे. त्यामुळे ती फी भरू शकत नाही. वर्गामध्ये रोज तिला फी नाही आणली म्हणून उभे राहावे लागते. तिने मला बोलूनही दाखवले; परंतु गेले दोन दिवस ती शाळेत येत नाही. आजी म्हणाली, “अगं पण तू अशी निराश होऊन प्रश्न सुटणार आहे का? तू प्रथम जेवण करून घे. रात्री तुझे आई-बाबा आल्यानंतर आपण सर्वांनी मिळून ठरवू.”आजीने समजूत काढल्यानंतर रियाने जेवण करून घेतले व थोडा वेळ आराम करून ती क्लासला गेली. संध्याकाळी आई-बाबा कामावरून आल्यानंतर जेवण वगैरे आटोपल्यानंतर आजीने विषय काढला. म्हणाली,“प्रिया आज शाळेतून आली तीच मुळात निराश होती. तिची मैत्रीण दिव्या फी भरू शकत नसल्याने शाळेत गैरहजर राहत होती. याचे आपल्या रियाला खूप वाईट वाटत आहे.”रिया क्लासला गेल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून ही एक मदतपेटी तयार केली आहे. मला वाटतं,“रिया उद्या ही मदत पेटी घेऊन शाळेत जाईल. आपल्या वर्ग शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना सांगेल. खरं म्हणजे आज अक्षय्य तृतीया आहे. या दिवशी दानाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. त्यानिमित्ताने आपणापासूनच सुरुवात करू.” असे म्हणून आजीने स्वतः त्या मदत पेटीमध्ये हजार रुपये ठेवले व त्यानंतर लगेच आई-बाबांनी एक हजार रुपये मदतपेटीमध्ये ठेवले. ते पाहून रियाने ही आपले खाऊचे साठवलेले पाचशे रुपये मदत पेटीत ठेवले. आजीची संकल्पना रियाला फारच आवडली. ती आनंदाने उड्या मारायला लागली. सकाळ केव्हा होते आणि आपण ती मदत पेटी घेऊन केव्हा शाळेत जातो, असे रियाला झाले होते. पहिल्याच तासाला तिने वर्ग शिक्षकांना आपल्या आजीची संकल्पना सांगून ती मदत पेटी दाखवली. रियाच्या बाईंना रियाची संकल्पना फारच आवडली. त्यांनी ती संकल्पना मुख्याध्यापकांना बोलून दाखवली.मुख्याध्यापक म्हणाले,“दोन दिवसात आपण पालक सभा आयोजित करणार आहोत. तेव्हा आपण हा विषय पालक सभेपर्यंत पुढे मांडू.” ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनंतर पालक सभा आयोजित करण्यात आली. पालक सभेतील मुद्दे झाल्यानंतर शेवटी मदत पेटीची संकल्पना मांडली. ज्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस असतील त्या वाढदिवसाला त्या विद्यार्थ्यांनी चॉकलेट, गोळ्या न आणता यात मदत पेटीमध्ये काही रक्कम टाकावी. जेणेकरून आपण अशा परिस्थिती नसलेल्या मुलांची फी भरू शकतो. सर्व पालकांनी या कल्पनेला आनंदाने मान्यता दिली. त्याच दिवशी प्रत्येकाने त्या मदत पेटीमध्ये काही रक्कम टाकली. जमा झालेल्या रकमेतून जे विद्यार्थी परिस्थितीअभावी फी भरू शकत नव्हते अशा विद्यार्थ्यांची फी भरली.अशाप्रकारे आजी-आजोबांच्या संकल्पनेतून उपस्थित पालकांना सामाजिक भान झाले. दिव्याची फी भरली गेल्याने दिव्याच्या ही चेहऱ्यावर आज आनंद ओसंडूत वाहत होता. तिने तिची मैत्रीण रियाला घट्ट मिठी मारली. मी उद्यापासून नियमित शाळेत येईन, असे तिने रियाला वचन दिले आणि ती मनापासून अभ्यास करू लागली.तात्पर्य : प्रत्येकाने सामाजिकभान राखलेच पाहिजे.
Thermax Chowk Accident : निष्काळजीपणे दुचाकी चालवून डिव्हायडरला दिली धडक; थरमॅक्स चौकातील अपघातात एका तरुणाचा बळी, निगडी पोलिसांकडून तपासाला वेग.
कथा : रमेश तांबेएक होता राजा. तो खूपच लहरी होता. मनाला वाटेल तसे आदेश द्यायचा आणि सैनिकांच्या बळावर जनतेला ते करायला भाग पाडायचा. एके दिवशी त्यांनी विचित्र आदेश काढला. आपल्या राज्यातल्या जनतेने दिवसा झोपायचे आणि रात्री काम करायचे. अगदी लहान मुलांच्या शाळादेखील रात्री सुरू राहतील. या नव्या आदेशाने सगळे लोक अगदी घाबरून गेले. कारण त्यांचं रोजचं वेळापत्रकच कोलमडून पडलं. कारण दिवसा उजेडी कोणाला झोप येईना आणि रात्री कुणाला झोप आवरेना.पंधरा दिवसांतच राज्यात गोंधळ माजला. जो तो राजाच्या नावाने खडे फोडू लागला. पण राजाला सांगण्याची हिंमत कोण करणार! जो राजा विरुद्ध बोलेल तो लगेच तुरुंगात जाणार ही प्रत्येकालाच खात्री होती. त्यामुळे सर्वजण राजाचा रात्रभर काम करण्याचा आदेश निमूटपणे पाळत होता. खरी गंमत मुलांची यायची. मुलं दिवसभर उनाडक्या करायची आणि शाळेत जाऊन रात्रभर झोपा काढायची. झोपणाऱ्या पोरांना उठवता उठवता शिक्षक मंडळी अगदी त्रासून गेली होती. शेतकरी, कामगार, उद्योजक या सर्वांना चांगलाच मनस्ताप झाला. काम न करावे, तर शिक्षेला तयार व्हावे. त्यामुळे मोठी माणसे झोप कशीबशी आवरत आपापली कामे करत होती.राजाने आदेश काढला. दिवसा झोप आणि रात्री काम! हा आदेश फक्त राज्यातल्या जनतेसाठीच होता. पण राज्यामधले प्राणी, पक्षी यांचे काय! सूर्योदयाबरोबर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू व्हायचा. कुत्री, मांजरी, भटकी जनावरे रस्त्यावर येऊन धिंगाणा घालायची. त्यामुळे लोकांच्या झोपेत अडचणी यायला लागल्या. सगळी जनता हवालदील झाली. पण राजाला सांगणार कोण? हाच प्रश्न प्रत्येकाच्या पुढे होता. शेवटी हा प्रश्न एका शाळकरी मुलाने सोडवला.तो मुलगा प्रधानांच्या घरी गेला आणि म्हणाला, “प्रधानजी या नव्या नियमाचा मुलांना खूप त्रास होतो. दिवसभर झोप येत नाही आणि रात्री झोप आवरत नाही. तेव्हा राजाला सांगून हा नियम रद्द करा.” प्रधानजी म्हणाले, “बाळा मला सारे कळते आहे, पण राजापुढे कोणाचेच काही चालत नाही.” मग मुलाने थोडा वेळ विचार केला अन् पुढे म्हणाला, “महाराजांचे पुरोहित हे काम करू शकतील.” मग प्रधानांनी राजाच्या पुरोहितांना बोलावले. तेव्हा मुलगा त्यांना म्हणाला, “पुरोहित काका नव्या नियमांचा आम्हा मुलांना खूप त्रास होतो. जरा महाराजांना सांगून नवा नियम बदलायला सांगा.” तशी पुरोहित काकांनी मान खाली घातली.तो मुलगा म्हणाला, “काका मी सांगतो तसं करा” आणि मग मुलाने पुरोहित काकांना सारे समजावले. तेव्हा काकांच्या चेहऱ्यावर हसूच फुटले. दुसऱ्या दिवशी पुरोहित महाराजांपुढे उभे राहिले. अगदी शांत, चिंताग्रस्त! त्यांना पाहून राजा म्हणाला, “बोला पुरोहित, खूप चिंतेत दिसता! पुरोहित म्हणाले, “महाराज आपल्या राज्यावर एक मोठं संकट येणार आहे. दैवाचा कोप होणार आहे.” हे सांगताच महाराज सावध झाले. त्यांनी पुरोहितांना घाबरतच विचारले की, “काय झाले पुरोहित!” पुरोहित म्हणाले, “काही नाही महाराज, आपल्या नव्या नियमामुळे देवांची पूजा यथासांग होत नाही. देवाला रोज शिळं पाणी आणि शिळी फुलं आपण वाहतो आहोत. त्यामुळे देव आपल्यावर रागावू शकतात. त्यांचा आपल्यावर कोप होऊ शकतो.” पुढे पुरोहित म्हणाले, “महाराज फुले सकाळीच फुलतात आणि अशी पहाटेची फुललेली फुलेच देवाला जास्त आवडतात. हे ऐकून राजा भानावर आला. आपण आदेश देऊन हवं तसं वागायला लोकांना भाग पाडू शकतो, पण निसर्गाला नाही. हे समजताच राजाने आपला निर्णय मोठ्या मनाने मागे घेतला.मग तो मुलगा पुरोहित काकांकडे गेला आणि म्हणाला, “बघितलंत काका, अशा लहरी माणसांना असंच सांगावं लागतं तरच त्यांना कळतं. तुम्हालाही आणि मलाही ठाऊक आहे की पाणी कधी शिळं होत नाही आणि फुले झाडावर असेपर्यंत ताजीच असतात. शिवाय देव कधी कुणावर रागावत नसतो. हे तुम्हाला अन् मला माहीत आहे. पण या लहरी राजाला काय आणि कसं कळणार म्हणा! पुरोहितांना त्या शाळकरी मुलाचे खूपच कौतुक वाटले.
प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफसकाळी उठतो आणि आपण मोबाईल हातात देतो. सवयीप्रमाणे फेसबुक उघडतो आणि पहिलीच बातमी दृष्टीस पडते. परीक्षा संपल्या म्हणून चार मुली नदीकिनारी श्रमपरिहारासाठी गेलेल्या असतात. अलीकडच्या मुलांचा श्रमपरिहारात आणखी एक आनंददायी पर्याय म्हणजे सेल्फी काढणे आणि रील बनवणे हेही आहे. त्यानुसार यांची एक मैत्रीण पाण्यात उतरून स्वतःचा तोल सांभाळत व्यवस्थित व्हिडीओ शूट करत असते आणि इतर तिघी पाण्यामध्ये स्टंट करत असतात. अचानक एक मुलगी वाहून जाऊ लागते. स्वाभाविकपणे दुसऱ्या दोघी तिला वाचवायला जातात आणि त्याही तिच्यासोबत वाहून जातात. हे सर्व दृश्य त्यांच्या मैत्रिणीच्या मोबाईल कॅमेरात बंदिस्त होते आणि तिघांचे आयुष्य क्षणार्धात संपून जाते हे जसेच्या तसे त्या क्षणी चित्रित झालेले व्हिडीओ आपण सोशल मीडियावरून पाहतो. अस्वस्थ होतो. खरं तर लाखो-करोडो लोक हे पाहात असतात आणि तरीही याच घटना परत परत घडत राहतात. इथे या चौघीनाही पोहता येत नसते तरी त्या खोल पाण्याकडे केवळ रील बनवण्यासाठी गेलेल्या असतात, असे त्या बातमीत लिहिलेले होते.दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर दुसरी घटना वाचायला मिळते. परीक्षा संपल्यावर चार मित्र श्रमपरिवारासाठी नदीकिनारी जातात. पाण्यात उतरतात. त्यातल्या चौघांनाही व्यवस्थित पोहता येत असते तरीही त्यांचा एक मित्र बुडतो आणि इतर तिघे तो बुडल्याचे सांगत बाहेर येतात. आसपास फारशी माणसे नसतात, त्यामुळे ते जे सांगतात ते इतर ऐकतात. चोवीस तासांनंतर त्या बुडलेल्या मुलाचे प्रेत बाहेर काढले जाते. तेव्हा त्या मुलाची आई आरडाओरडा करते की माझ्या मुलाला उत्तम पोहता येत असताना, तो बुडलाच कसा? या त्याच्या जवळच्या तीन मित्रांची चौकशी करा.आता पुढे आणखी काय? तिसऱ्या दिवशी तिसरी नवी बातमी आणि कोणीतरी वाहून गेल्याची घटना वाचायला मिळते. अस्वस्थ होण्यापलीकडे समाजाचा एक घटक म्हणून आपण काय करू शकतो असा मी विचार केला. तरुण मुलांनी श्रमपरिहार म्हणून नेमके काय केले पाहिजे? कारण तेही फार आवश्यक आहे. मुलांना पाण्याकडे जायची बंदी घालायची की डोंगर चढायची बंदी घालायची? डोंगरावरून आठवले ती अगदी अलीकडची घटना. दहा मुलींना घेऊन एक प्रशिक्षक ट्रेकिंगसाठी गेला. त्यातली एक मुलगी अचानक गायब झाली आणि अठ्ठेचाळीस तास उलटून गेले तरी अजूनही सापडलेली नाही. याचा अर्थ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काही चांगल्या गोष्टी करताना अशाही गोष्टींना कधीकधी तोंड द्यावे लागते. एक संवेदनशील माणूस म्हणून मी त्या कुटुंबाचा, मित्रपरिवाराचा विचार करते तेव्हा त्यातून काही मार्ग मला सापडत नाही, याचे वाईट वाटते. म्हणजे आपण आपल्या मुलांना घरात डांबून ठेवून ‘कॅरम बोर्ड घरातच खेळ’ असे सांगून कधी घराबाहेर पडतो आणि कॅरम बोर्डवर खेळताना अचानक गरगरणारा पंखा या चारी मुलांच्या डोक्यावर पडतो आणि त्यांचे जग होत्याचे नव्हते होऊन जाते, तर आता मुलांनी करायचे तर काय करायचे?‘काळजी घ्या’ हा शब्द आपण सातत्याने आपल्या मुलांसाठी वापरत असतो. मुले कशाची आणि कशी काळजी घेणार, असाही प्रश्न त्यावेळेस आपल्या मनात असतो.शारीरिक-मानसिक-भावनिकदृष्ट्या स्वतःला सुदृढ ठेवण्यासाठी कधी पाण्यात पोहायला जाणे, ट्रेकिंग करणे, जिममध्ये जाणे, योगासने करणे, बैठे खेळ खेळणे आणि तेही समूहाने आवश्यक असते. या समूहात वेगवेगळ्या विचारांची आणि प्रवृत्तींची माणसे एकत्र असतात. या पलीकडे जाऊन निसर्ग आणि नियतीमुळे आपात्कालीन परिस्थितीला तोंड द्यावे लागते. याला काही पर्याय नाही. तरीही ‘काळजी घ्या’ हे सांगणे हा एवढाच पर्याय आजच्या काळात आपल्याहातात आहे!शेवटी एवढेच की, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एखादे मूल सापडते तेव्हा त्याला आपल्याला करता येईल ती मदत करणे किंवा काही कारणास्तव ते मूल मृत्युमुखी पडलेच तर त्याच्या कुटुंबाला मानसिक आधार देणे. अशा दुःखातून बाहेर पडण्यासाठी फार मोठा काळ द्यावा लागतो तेव्हा आपला मौलिक वेळ जर देता आला तर मला वाटते की तेही फार मोठे सामाजिक कार्य आहे!pratibha.saraph@ gmail.com
भारताची स्वनिर्मित शस्त्रे आणि संरक्षण सज्जता
तंत्रज्ञान : प्रा. प्रवीण पांडेराष्ट्र निर्मितीच्या युगाची सुरुवातकाही वर्षांपूर्वी भारताला विदेशांकडून शस्त्रे आयात करावी लागत होती, तोच भारत आता शंभर पेक्षाही अधिक राष्ट्रांना शस्त्राची निर्यात करीत आहे. आधुनिक शस्त्राची निर्मिती आणि निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारत सध्या २३ व्या क्रमांकावर आहे, ही भारतीयांकरिता अत्यंत अभिमानाची बाब आहे.आधुनिक भारताची शस्त्र सज्जता ही भारताची प्राचीन शस्त्र परंपरा आणि आत्मनिर्भर भारत अभियान या नव्या-जुन्या शस्त्र संपन्नतेचा संगम आहे. ही शस्त्र सजगता आणि संपन्नता स्वसंरक्षण आणि जागतिक शांततेकरिता असणाऱ्या शक्तीचे प्रतीक आहे.साधारणपणे ६०-६५ वर्षांपूर्वी चीनने केलेल्या युद्धाने शस्त्र सज्जतेची आवश्यकता अधोरेखित केली होती. त्यामुळे भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू झाली. काही वर्षांपूर्वी भारताला विदेशांकडून शस्त्रे आयात करावी लागत होती, तोच भारत आता शंभर पेक्षाही अधिक राष्ट्रांना शस्त्राची निर्यात करीत आहे. आधुनिक शस्त्राची निर्मिती आणि निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारत सध्या २३ व्या क्रमांकावर आहे, ही भारतीयांकरिता अत्यंत अभिमानाची बाब आहे. २०२१-२२ या वर्षांत भारताकडून जवळपास २३६२२ कोटींची निर्यात करण्यात आली. याचाच स्पष्ट अर्थ असा, की भारतीय शस्त्र-अस्त्रावर इतर देश देखील संपूर्ण विश्वास ठेवून त्यांची आयात करीत आहेत. याचे खरे कारण असे की या बाबतीत भारतीय शास्त्रज्ञ, तिन्ही सैन्यदले, सैनिक आणि एकूणच संरक्षण यंत्रणा पराकाष्टेने अथक परिश्रम करीत आहेत, त्याचेच फलित म्हणजे भारताची आधुनिक संरक्षण प्रणाली होय.भारतामध्ये सर्वच सैन्य दलाकरिता जसे भूदल, नौदल तसेच वायुदल याकारिता लागणाऱ्या आधुनिक शस्त्रत्रांची निर्मिती प्रगतिपथावर असून अनेक शस्त्रे पूर्णत्वास पोहोचली आहेत. मुख्यत्वेकरून हवाईदल हे अत्यंत प्रगत झाले आहे. याची चुणूक आपल्याला ऑपरेशन सिंदूरमध्ये बघायला मिळाली. भारताने विकसित केलेल्या आधुनिक शस्त्र-अस्त्र यांची माहिती :भारताने संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) माध्यमातून स्वदेशी बनावटीची अत्यंत आधुनिक आणि घातक शस्त्रे विकसित केली आहेत. यामध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र, अग्नि-V आंतरखंडीय क्षेपणास्त्र, तेजस फायटर जेट, विक्रांत यांसारख्या विमानवाहू युद्धनौका आणि नाग अँटी-टँक मिसाईल यांसारख्या शस्त्रास्त्रांचा समावेश आहे, ज्यामुळे लष्कर, नौदल आणि हवाई दल अधिक सक्षम झाले आहे.भारताची प्रमुख आधुनिक शस्त्रे आणि त्यांची वैशिष्ट्ये : क्षेपणास्त्र प्रणाली (Missiles):ब्रह्मोस (BrahMos): हे जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे, जे जमिनीवरून, समुद्रातून आणि हवेतून (सुखोई-३०) शत्रूच्या लक्ष्यावर मारा करू शकते. अग्नी-V (Agni-V): ५,००० ते ८,००० किमीपेक्षा जास्त पल्ल्याचे हे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) जे जवळच्या शत्रू राष्ट्रापर्यंत मारा करण्यास सक्षम आहे.आकाश (Akash): स्वदेशी विकसित हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली, जी एकाच वेळी अनेक विमाने किंवा ड्रोन नष्ट करू शकते. हेलिना (Helina): नाग क्षेपणास्त्राची हेलिकॉप्टर-लाँच आवृत्ती, जी टँकविरोधी युद्धात अत्यंत अचूक आहे. अस्त्र (Astra): हवेतून हवेत मारा करणारे (BVR) क्षेपणास्त्र, जे तेजस विमानाला जोडले गेले आहे. युद्धनौका आणि पाणबुड्या (Navy):INS विक्रांत (INS Vikrant): भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका. कलवरी-क्लास पाणबुड्या: स्कॉर्पीन श्रेणीतील या पाणबुड्या शत्रूच्या प्रदेशात गुप्तपणे हालचाल करण्यास सक्षम आहेत. लढाऊ विमाने आणि तोफा (Air & Artillery): तेजस (LCA Tejas): हलके, स्वदेशी लढाऊ विमान, जे आधुनिक रडार आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेर सुटसह सुसज्ज आहे. एटीएजीएस (ATAGS): ४८ किमीपेक्षा जास्त पल्ल्याची अत्याधुनिक स्वदेशी तोफ (Howitzer). पिनाका (Pinaka) रॉकेट सिस्टम : शत्रूच्या तळांवर झटपट आणि भीषण मारा करणारी रॉकेट यंत्रणा. इतर तंत्रज्ञान : MPATGM : तिसऱ्या पिढीचे मॅन-पोर्टेबल अँटी-टँक गाईडेड मिसाईल. दिव्यास्त्र : एकाच क्षेपणास्त्रातून अनेक ठिकाणी अणुहल्ला करण्याची क्षमता. भारताची ही शस्त्रे मेक इन इंडिया अंतर्गत विकसित केली जात असून, भारताला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनवत आहेत. ही सर्व सज्जता करणे याचा अर्थ लगेच युद्ध करणे असा नाही कारण आपले अनादी काळापासून असणारे ब्रीद म्हणजे वसुधैव कुटुंबकम पण याचा चुकीचा अर्थ जर कोणी घेत असेल तर एक सुभाषित असे सांगते की :चिन्तनीया ही विपदां आदावेव प्रतिक्रिया ।न कूपखननं युक्तं प्रदीप्त वन्हिना गृहे ॥अर्थ : विपत्तीच्या सुरुवातीपासूनच त्यावर उपाय विचारणे योग्य आहे; घर जळून खाक झाले असताना विहीर खोदणे निरर्थक असते.त्याचप्रमाणे संतांनी सांगून ठेवले आहे की :भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥म्हणूनच ही सज्जता आणि सिद्धता.या अभंगाच्या पहिल्या ओळीचे प्रत्यंतर अखिल विश्वाने कोरोना काळात पहिले आहे. (भारताने अनेक राष्ट्रांना कोरोना विरोधी लस अक्षरशः वाटली) याच प्रकारची रणनीती आणि धोरणे कायम राहिली, तर भारत येत्या काही वर्षांत विश्वगुरू होण्यास कोणताच प्रत्यवाय नाही. या आधुनिक भारतवर्षाला आणि महान नेतृत्वाला कोटी कोटी प्रणाम.
Air Pollution : अग्निशमन दलाने आग विझवली, पण प्रशासकीय नियोजनाचा धूर निघाला; भाजप युवा मोर्चाकडून चौकशी आणि कारवाईची मागणी.
Talegaon Dabhade : आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश; महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत तळेगावच्या पाणीपुरवठ्याला मोठे स्थैर्य.
Social Activist Attack : सांगवी बोपोडी पुलाच्या भ्रष्टाचारावरून सत्ताधारी पक्षाला घेरणाऱ्या दिलीप तनपुरेंवर पाच जणांचा प्राणघातक हल्ला; थेरगावमधील रुग्णालयात उपचार सुरू.
विज्ञानकथा : प्रा. देवबा पाटीलशिवम आणि त्याच्या मित्रांचे सहलीला गेले असताना ज्ञान ग्रहण सुरू होते. “पण आपली पृथ्वी आजच्यासारखी कशी काय झाली मित्रा?” विपुलने प्रश्न केला. “ज्याप्रमाणे वाफ थंड झाल्यावर तिचे पाण्यात रूपांतर होते व तापमान आणखी कमी झाल्यावर पाण्यास घनरूप प्राप्त होते म्हणजेच बर्फ तयार होतो त्याप्रमाणे निर्मितीच्या वेळी पृथ्वी वायुरूप अवस्थेत होती. नंतर ती द्रवरूपात रूपांतरित झाली. कालांतराने ती थंड होतांंना तिच्यामध्ये बदल होत जाऊन तिला आजची घनावस्था प्राप्त झाली. द्रव अवस्थेतून घन अवस्थेत जाण्यासाठी तिला लाखो वर्षे लागलीत. या कालावधीमध्ये तिचा थंड होण्याच्या प्रक्रियेचा वेग हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होता. त्यामुळे ती गोठताना वेगवेगळ्या खडकांची निर्मिती झाली.” शिवमने सांगितले.“पण पृथ्वीचे तर तीन भाग आहेत म्हणतात. मग ते कोणकोणते आहेत?” अमोलने प्रश्न केला. “खडकांच्या कमी जास्त घनतेनुसार पृथ्वीचे तीन भाग बनलेत. कवच-१६ ते ४० कि.मी.पर्यंत पृथ्वीचे जाड कवच बनले. प्रावरण-हा देखील घनरूपातच २८९५ कि.मी आहे. गाभा-पृथ्वीच्या केंद्रापर्यंत ६३७० कि.मी. पृथ्वीचा गाभा आहे.” शिवमने उत्तर दिले. “मग आपली पृथ्वी आता कशी आहे गड्या?” कौशलने विचारले. शिवम् म्हणाला, “आपली लाडकी पृथ्वी ही गोठून आता पूर्णपणे घन झालेली आहे. अर्थात तिच्या गाभ्यात अजूनही खनिज पदार्थांचा व वितळलेल्या खडकांचा अतिउष्ण असा द्रवरस आहेच; परंतु वरून मात्र ती आता पूर्णपणे घनरूपी व कडक झाली आहे. ती खडक-दगडांसारख्या कठीण पदार्थांची बनलेली आहे व ध्रुवाजवळ थोडीशी चपटी झालेली आहे. आपल्या पृथ्वीवर खडक-माती, डोंगर-दया, पर्वत-पठारे, नद्या-नाले, सागर-सरोवरे, हिमपर्वत, ज्वालामुखीचे डोंगर, बर्फाळ ध्रुव, रेताड वाळवंटे आहेत. ती सूर्यापासून अंतरावर तिसया क्रमांकाचा व आकारमानाने पाचव्या नंबराचा गोलाकार ग्रह आहे. आपल्या पृथ्वीचा परिघ २५००० मैल आहे. पृथ्वीचे क्षेत्रफळ ५१ कोटी चौरस कि.मी. आहे. पृथ्वीमध्ये गॅस, कोळसा, पेट्रोल आदी कार्बनी पदार्थ तसेच विविध खनिजे मिळतात.”“आपल्या पृथ्वीमध्ये कोणकोणती मूलद्रव्ये आहेत?” विपुलने प्रश्न केला. “तशी तर आपल्या पृथ्वीमध्ये १०० पेक्षाही जास्त मूलद्रव्ये आहेत; परंतु त्यांपैकी ऑक्सिजन (प्राणवायू), सिलिकॉन, अॅल्युमिनियम, आयर्न (लोह), कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सल्फर (गंधक) आणि निकेल ही महत्त्वाची मूलद्रव्ये आहेत.” शिवमने उत्तर दिले.“ती गोलाकारच का झाली मित्रा?” अमोलने मध्येच शंका काढली. शिवम् म्हणाला, “सूर्यस्फोटाच्या वेळी ती अतिशय जोराने व वेगाने खूप दूरवर फेकली गेली. त्यामुळे तिला खूप गती मिळाली. त्याच गतीमुळे ती स्वत:भोवती व सूर्याभोवती सतत फिरत असते. अशी ती स्वत:भोवती व सूर्याभोवती सतत फिरून फिरून गोलाकार झाली आहे.”“पृथ्वीच्या ध्रुवांना तू भौगोलिक ध्रुव का म्हटले?” कपिलने प्रश्न केला.शिवम पुढे सांगू लागला, “कारण पृथ्वीच्या गोलाला भूगोल म्हणतात. त्या भूगोलाची दोन टोके म्हणजे भौगोलिक ध्रुव. या ध्रुवांवर सहा महिने रात्र व सहा महिने दिवस असतो. उत्तर ध्रुवातून जाणारी पृथ्वीच्या अक्षाची रेषा सरळ आकाशात वाढवली, तर त्या रेषेच्या जवळपास असणारा तारा हा आकाशातील ध्रुव तारा असतो.”“मग पृथ्वीचे आणखी दुसरे काही ध्रुव आहेत का?” विपुलने प्रश्न केला.शिवम म्हणाला, “पृथ्वीच्या पोटात मध्यभागी लोखंड व निकेल असल्याने नि पृथ्वी स्वतःभोवती सतत फिरत असल्याने ती स्वत: चुंबक झाली आणि तिचे स्वतःभोवती चुंबकीय क्षेत्र तयार झाले आहे. तिचे चुंबकीय ध्रुव हे तिच्या भौगोलिक ध्रुवांपेक्षा वेगळे आहेत, पण ते त्या भौगोलिक ध्रुवांजवळच किंचितसे त्यांच्या बाजूला आहेत. याचुंबकीय क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या धृवीय क्षेत्राकडे वळतात.”
Satara Civil Hospital : प्रशासकीय समन्वयाचा अभाव आणि 'प्रभारी' कारभारामुळे दलालांचे फावले; सामान्यांच्या लूटमारीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?
Satara Civil Hospital : कोटींच्या निधीच्या घोषणा हवेतच? अर्भक मृत्यू आणि एसीबीच्या कारवाईने जिल्हा रुग्णालयाचे काळेबेरे उघड; प्रशासनावर मंत्र्यांची पकड नसल्याची चर्चा.
Chilli Price Hike : तिखट झाली मिरची! अवकाळीचा फटका अन् गृहिणींचे बजेट कोलमडले; पाहा काय आहे दर
Chilli Price Hike : लवंगी आणि बेडगी मिरचीच्या दरात मोठी तेजी; मिरची कुटून देणाऱ्या डंकाबाहेर गृहिणींच्या सकाळपासूनच रांगा
साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६
साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ आत्मविश्वासात वृद्धिमेष : आठवडा आपल्याला अनुकूल स्वरूपाचा जाईल आपल्या प्रयत्नांना यश आल्यामुळे आत्मविश्वासात वृद्धि करणारा ठरेल. आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल नवीन कामे हातात घ्याल. व्यवसाय धंद्यामध्ये नवीन योजना तसेच नव्या संकल्पना राबवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल त्याचा आपला व्यवसायावर पोषक परिणाम होईल. भागीदारीच्या व्यवसायात वादविवाद टाळा समज गैरसमज नको व्यवसायाचे हित लक्षात घ्या. नोकरीच्या ठिकाणी काही क्लिष्ट समस्या आपण सोडवू शकाल . वरिष्ठांच्या बरोबर असलेले संबंध सुधारतील आपल्या कामाची दखल घेतली जाईल त्याचा भविष्यात आपल्याला नक्कीच फायदा होईल प्रवासाचे योग आहेत काही कारणानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवासाचे नियोजन होईलकार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी उपलब्ध होतीलवृषभ : या सप्ताहात आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी उपलब्ध होतील त्याचे सोने करणे आपल्याच हातात आहे हे लक्षात ठेवा इतरत्र वेळ वाया न घालवता कार्यमग्न राहणे महत्त्वाचे ठरेल. आलेल्या नवीन संधीमुळे आपले रोजचे जीवन बदलू शकते प्रगती उन्नती करू शकाल. आर्थिक बाजू भक्कम राहिल्याने आपल्या मनातील नियोजन आपण प्रत्यक्षात आणू शकाल. व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील. नवीन करारमदार करू शकाल व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून योग्य कालावधी आहे नवीन संकल्पनांचा वापर फायदेशीर ठरेल भागीदारी व्यवसायात भागीदाराचे मत व्यावहारिक दृष्ट्या महत्त्वाचे करू शकते. नोकरी मधील वातावरण सर्वसामान्य राहिल वरिष्ठांचे सहकार्य मिळत राहील. रोबरील सहकार्यांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल मतभेदाचे किंवा वादविवादाचे प्रसंग युक्तीने हाताळा त्यात यश येईल जुन्या गुंतवणुका फायदा देतीलमहत्त्वाची कामे हातावेगळी करालमिथुन : हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल कामानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील प्रवास कार्यसिद्ध ठरतील. काही महत्त्वाच्या कामांमध्ये अचानक उद्भवलेल्या समस्या शांतपणे व प्रयत्न द्वारे सोडवू शकाल इतरांची मदत मिळेल. मात्र इतरांशी सौजन्याने व विनयशीलतेने वागण्याची गरज आहे.व्यवसाय धंद्यात काही वेळेस आर्थिक गरज निर्माण होऊ शकते तसेच कामगारांचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पहा. राजकारणात सक्रिय असलेल्या जातकांनी थोडे सतर्क राहणे आवश्यक आहे विरोधकांचा विरोध प्रबळ होण्याची शक्यता आहे तसेच शत्रू व हितशत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवून रहा. आपल्या ध्येयाच्या पाठ पुराव्यावर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरेल. सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे नियोजन करू शकालआर्थिक लाभ संभवतोकर्क : दीर्घकाळ रखडलेली अथवा प्रलंबित राहिलेले जमिनीचे तसेच स्थायी मालमत्तेचे व्यवहार गतिशील होऊन त्याचा पूर्णत्वाकडे प्रवास होईल समाजातील काही मान्यवर व सन्माननीय व्यक्तींकडून आपल्याला मदत मिळू शकते. महत्त्वाच्या व्यक्तींकडून मार्गदर्शन लाभेल मित्रमंडळींच्या परिवारातून मदत मिळेल कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील मात्र प्रामाणिकपणे आपल्याला प्रयत्न करायला हवेत. मन शांत ठेवून दृढ निश्चयाने लहान मोठे निर्णय घ्या. आर्थिक लाभ संभवतो विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळेल उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल परिवारातून मदत मिळेल. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती मनासारखी राहील. व्यवसायाची जागा बदलण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील कुटुंबात व आपल्या कार्यक्षेत्रात थोडी प्रतिकूलता जाणवण्याची शक्यता आहे. व्यवसायांमध्ये स्पर्धक बलवान होतील तसेच नोकरीमध्ये राजकारण व गटबाजी जाणवू शकतेकार्याचा ठसा उमटविण्यात यश मिळेलसिंह : आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविण्यात यश मिळेल. कुटुंब परिवार तसेच आपल्या व्यवसाय-धंद्यात अथवा नोकरीत इतरांचे अपेक्षित सहकार्य मिळाल्यामुळे आपल्या समोरील कामे सहजी होतील जोडीदाराशी मधुर संबंध राहतील सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे योग आहेत प्रवास सुखकर होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये पदोन्नती अथवा वेतन वृद्धि चे योग आहेत.नोकरीमध्ये एखादी नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल परंतु अधिकारांमध्ये वृद्धी होईल वरिष्ठांचे संबंध चांगले राहतील त्यांचे मार्गदर्शन मिळू शकते. कुटुंब परिवारातील वातावरण चांगले राहील कुटुंबातील मुला मुलींकडून काही चांगल्या वार्ता मिळाल्यामुळे आनंद साजरा कराल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. काहींचे कॉलेज कॅम्पस मधून नोकरी साठी सिलेक्शन होण्याची शक्यताकर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळतीलकन्या : सध्याचा कालावधी अनुकूल असला तरी काही बाबतीत आपल्याला सतर्क राहणे आवश्यक ठरणार आहे. विशेषतः आर्थिक दृष्ट्या नियोजन करावे लागण्याची शक्यता आहे. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील उलाढाल वाढेल परंतु जबाबदाऱ्या व खर्चही त्याच प्रमाणात वाढल्याने गोंधळून जाण्याची शक्यता. व्यवसायिक समस्या शांतपणे विचार करून मार्गी लागतील भागीदारी व्यवसायात भागीदाराच्या मुळे प्रश्न संपुष्टात येथील चिंता नको आर्थिक मदत मिळू शकते. येणाऱ्या कालावधीमध्ये यशाचे प्रमाण वाढणार आहे त्यासाठी आपल्याला नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल कोणतेही लहान-मोठे निर्णय शांतपणे विचार करून घेतल्यास ते अचूक ठरून त्याचा फायदा होईल कलाकार खेळाडूंना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळतील प्रसिद्धी मिळू शकेल. सामाजिक कार्यात रस घ्यावासा वाटेल सामाजिक मानसन्मान वाढेलआर्थिक मदत मिळेलतूळ : भाग्याची साथ मिळाल्यामुळे रखडलेली किंवा अर्धवट अवस्थेतील असलेली कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. व्यवसाय-धंद्यात अपुरे राहिलेले प्रोजेक्ट आता पूर्ण होतील. पण प्रयत्न मात्र त्यादृष्टीने केल्यास त्यात यश मिळेल. आर्थिक मदत मिळेल. नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील प्रयत्नांमध्ये सातत्य राहिल्यास आपली कामे आपण पूर्ण करू शकाल . वेळेचा अपव्यय व आळस टाळणे हितकारक ठरेल महत्त्वाच्या कामांना गती मिळेल दूरचा प्रवास घडू शकतो आर्थिक आवक चांगली राहील. मात्र आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुटुंब परिवार अथवा आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या जोडीदाराशी अथवा भागीदाराची मतभेद टाळणे गरजेचे राहील. सामाजिक अथवा सार्वजनिक कार्यामध्ये पुढाकार घेऊन कार्यरत रहाल अपेक्षित कामे मार्गी लावू शकाल समाजातील मान्यवरांच्या सहवासात राहता येईलनवे नियोजन करालवृश्चिक : आपण घेतलेले निर्णय अचूक ठरल्याने पुढील कामे करण्यात उत्साह राहील. आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल. नवीन कामे हाती घ्यावीशी वाटेल तसेच त्या दृष्टिकोनातून नवे नियोजनही कराल. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून काही नवीन बदल करण्याचे ठरवाल. हे नवीन प्रकारचे बदल आपल्या व्यवसाया साठी पोषक ठरतील. बदलत्या परिस्थितीनुसार बदल करावे लागतील. व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल होतील. व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून विचार कराल. आत्मविश्वासाने जरी निर्णय घेतले तरी वस्तुस्थितीची जाण ठेवणे हितकारक ठरेल कुटुंब परिवारातून आपल्याला पाठिंबा मिळेल इतरांचे सहकार्य मिळेल. बँकांची कामे होतील काही वेळेस महत्त्वाचे काम प्रलंबित पडल्यासारखे वाटेल परंतु आपले प्रयत्न अविरत ठेवल्यास त्याचा नक्कीच फायदा होईलशुभवार्ता मिळतीलधनु : नोकरीमध्ये आपण केलेल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटेल वरिष्ठांकडून कौतुकास पात्र ठरला एखादी महत्त्वाची नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल परदेशगमनाचे योग आहेत त्याचा फायदा पण होईल आर्थिक परिस्थिती उंचावेल जे जातक नोकरीच्या शोधात होते अशा जातकांचा नोकरीविषयक शोध संपुष्टात येऊन नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते पूर्वी दिलेल्या नोकरी विषयक मुलाखतींमधून यश मिळेल बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न मिटतील. विवाहयोग्य मुलामुलींचे विवाह ठरून त्यांना आपला मनासारखा जोडीदार जीवन साथी म्हणून निवडता येऊ शकतो. प्रेमात यश संभवते. भावनांवर नियंत्रण आवश्यक राहील. चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल जीवनसाथीची नात्यात गोडवा राहील . गृह सौख्यात वृद्धि होईल कुटुंबा मध्ये शुभवार्ता मिळतील
Shivendrasinhraje Bhosale : लातूरच्या शासकीय विश्रामगृहात महत्त्वाची बैठक संपन्न; अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत कामाचा आढावा घेतला.
दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १९ एप्रिल २०२६
पंचांगआज मिती वैशाख शुद्ध द्वितीया १०.५२ पर्यंत नंतर तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र भरणी ७.१० नंतर कृतिका. योग आयुष्यमान. चंद्र राशी मेष. भारतीय सौर २९ चैत्र शके १९४८. रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६. सूर्योदय ६.१८, चंद्रोदय ७.२६, सूर्यास्त ६.५६, चंद्रास्त ९.०८ , राहू काळ ५.२२ ते ६.५६. अक्षय तृतीया, श्री बसवेश्वर जयंती, श्री परशुराम जयंती, शुभ दिवस.दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
SRH vs CSK : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत चेन्नईच्या फलंदाजांना रोखून धरले
Latur : लातूरसाठी ‘देवाभाऊ’ आरोग्यदूत, १०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन
लातूर : लातूर जिल्ह्याच्या आरोग्य संवर्धनासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या १०० खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले. हा प्रकल्प लातूर शहरातील नांदेड रोड परिसरात उभारण्यात येणार आहे.लातूरसाठी ‘देवाभाऊ’ ठरले आरोग्यदूत; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश — १०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन संपन्नलातूर, दि. १८ एप्रिल २०२६ :लातूर जिल्ह्याच्या आरोग्य संवर्धनासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या १०० खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा रुग्णालयाच्या… pic.twitter.com/Ef98sjXN4N— Shivendrasinh A Bhonsle (@Shivendraraje11) April 18, 2026मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळाला असून, सुमारे पंचवीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या महत्त्वाच्या प्रकल्पाची प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पूर्वी जागेअभावी आणि तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प रखडला होता. मात्र पालकमंत्री भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा करत प्रशासकीय अडथळे दूर केले आणि या कामाला गती दिली.रुग्णालयासाठी सुमारे १० एकर जागेवर बांधकाम होणार असून, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अपघात विभाग, एक्स-रे, सीटी स्कॅनसह विविध अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध होणार आहेत. भविष्यात या रुग्णालयाचा विस्तार करून ५०० खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचा मानसही यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री भोसले यांनी सांगितले की, “लातूर जिल्ह्यातील नागरिकांची दीर्घकालीन आरोग्याची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा केवळ १०० खाटांचा प्रकल्प नसून भविष्यातील मोठ्या आरोग्य सुविधेची ही सुरुवात आहे. शासनाच्या विविध योजनांमधून आवश्यक निधी उपलब्ध करून देत हे काम गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यात येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन लाभले असून, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्यामुळे या कामाला गती मिळाली आहे.
Eknath Shinde : निवडणुका संपल्या, आता संघटन बांधणीसाठी रणांगणात उतरा
मुंबई :निवडणुका संपल्या, आता संघटना उभारणीच्या रणांगणात उतरा असा आक्रमक इशारा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा सेनेवर मोठी जबाबदारी टाकली. “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” हे अभियान राबवत संघटना भक्कम करा आणि तरुणांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे, असा ठणकावून संदेश त्यांनी वरळीतील राज्यव्यापी मेळावा( महायुवोत्सवात) दिला. “आम्ही चालतो ती वाट, आम्ही रचतो तो इतिहास; भगवा आमच्या रक्तात आणि श्वासात आहे,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या शिस्तीचा ठसा प्रत्येकाच्या वागण्या-बोलण्यात दिसलाच पाहिजे, असे ठणकावून सांगितले.LIVEयुवासेनेचा राज्यव्यापी मेळावा (महायुवोत्सव) - लाईव्ह वरळी, मुंबई https://t.co/e7sLgS4GNv— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 18, 2026सकाळी सहा वाजल्यापासून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत त्यांनी “माझ्यासमोर युवा सेनेचे वाघ आणि युवती सेनेच्या वाघिणी बसल्या आहेत,” असे म्हणत अभिमान व्यक्त केला. युवा सेना ही केवळ संघटना नसून एक विचार आहे, असे सांगत त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या युवा सेनेने मराठी माणसाच्या हक्क, न्याय आणि रोजगारासाठी काम करावे, असे ते म्हणाले.तरुणांमध्ये क्रांती घडवण्याची ताकद असते, असे सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, सचिन तेंडुलकर आणि भगतसिंग यांच्या उदाहरणांचा उल्लेख केला. “जोपर्यंत लक्ष्य गाठत नाही तोपर्यंत थांबू नका; मेहनत आणि संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही,” असा संदेश त्यांनी दिला.आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास सांगितला. अनेक संकटे, वादळे आणि दुःखांचा सामना करूनही ते खचले नाहीत. २०२२ मधील उठावानंतर शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे उभी राहिली आणि जनतेनेच खरी शिवसेना कोणाची हे सिद्ध केले, असे त्यांनी ठामपणे सांगितले. “चाळीसपैकी एक जरी आमदार निवडून आला नसता तर शेती करायला गेलो असतो; पण साठ उमेदवार हे आमदार निवडून आले,” असेही त्यांनी नमूद केले.राज्यातील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याची जबाबदारी युवा सेनेवर असल्याचे सांगत त्यांनी हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचे आवाहन केले. देशातील ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील असल्यामुळे भारत हा तरुणांचा देश असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आर्थिक महासत्तेकडे नेत असून तरुणांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री असताना “पायाला भिंगरी लावून” संपूर्ण महाराष्ट्र फिरलो, असे सांगत त्यांनी विविध योजना राबवल्याचा उल्लेख केला. “लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ” ही ओळख माझ्यासाठी मोठी असल्याचे सांगत त्यांनी संपत्तीपेक्षा माणसे कमावणे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. कार्यकर्त्यांना “तहान-भूक विसरून काम करा” असा संदेश देत त्यांनी लोकांमध्ये जा, त्यांच्या समस्या समजून घ्या, शेतकऱ्यांच्या बांधावर जा आणि त्यांच्या अश्रूंना हात द्या, असे आवाहन केले.अतिवृष्टीच्या काळात दसरा मेळावा न करता शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला. “जिथे आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे शिवसेना” हे ब्रीदवाक्य त्यांनी अधोरेखित केले. “मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता होतो आणि आजही कार्यकर्ता आहे आणि उद्या देखील कार्यकर्ताच राहणार आहे ,” असे सांगत त्यांनी शिवसेना ही कार्यकर्त्यांचीच संघटना असून येथे कोणी मालक नाही, सर्व समान आहेत, असे स्पष्ट केले. कोणतेही पद किंवा आडनाव महत्त्वाचे नसून कुवत महत्त्वाची आहे. काम करणाऱ्यालाच संधी मिळते, असे त्यांनी अधोरेखित केले.सामान्य कुटुंबातील डॉ. ज्योती वाघमारे राज्यसभेवर पोहोचल्याचे उदाहरण देत त्यांनी शिवसेनेतून कोणालाही मोठी संधी मिळू शकते, असे सांगितले. मंत्री योगेश कदम यांसह अनेक कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांपासून संसदपर्यंत पोहोचल्याचा उल्लेख त्यांनी केला.तरुणांना रोजगाराबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हा, असे स्पष्ट आवाहन केले. प्रशिक्षण (ट्रेनिंग) देणे आवश्यक असून उद्योगशीलता वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून तीन हजार बसस्टॉपवर स्टॉल उभारून कार्यकर्त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट, नाटक, वेब सिरीजसारख्या क्षेत्रांतही मराठी तरुणांनी पुढे यावे, त्यांना संरक्षण देण्याचे काम युवा सेनेने करावे असे ते म्हणाले.महिलांच्या सक्षमीकरणावर बोलताना त्यांनी महिलांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. महिला आरक्षण विधेयकाबाबत विरोधकांवर टीका करत काश्मीर खोऱ्यातही शिवसेनेने आंदोलन केल्याचा उल्लेख त्यांनी केला. वंचित, दुर्बल घटक, शेतकरी, महिला यांचा आवाज बना, असे आवाहन त्यांनी युवकांना केले.शिक्षण व्यवस्थेतील बदलांबाबत युवकांनी सूचना द्याव्यात, असे सांगत त्यांनी संघटनात्मक कामांवर भर दिला. मतदार यादी अचूक ठेवणे, बीएलए-१ आणि बीएलए-२ प्रक्रियेत सहभाग घेणे, सदस्य नोंदणी वाढवणे आणि “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” हे अभियान राबवण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री सहायता निधीतून साडेचारशे कोटी रुपयांहून अधिक मदत देऊन हजारो लोकांचे प्राण वाचवल्याचा उल्लेख त्यांनी केला. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा मोठ्या प्रमाणात दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टीम परदेशात पाठवण्यात आली तसेच इंडोनेशियाशी संबंध दृढ करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.“खऱ्या सोन्याची झळाळी लपत नाही, तसेच खऱ्या विचारांची चमक लपत नाही,” असे सांगत त्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याचा संदेश दिला. शेवटी “मेहनत करने से हर काम सफल हो जाता है… संघर्ष के बिना जीत नहीं मिलती,” असा संदेश देत त्यांनी भाषणाची सांगता केली.या कार्यक्रमात बीच प्लीज इंडिया संस्थेचे अध्यक्ष मल्हार कळंबे आणि हॉटेल शौर्य वाडाचे मालक विकास हांडे यांना ‘शिवगौरव’ पुरस्कार देण्यात आला. युवा सेनेच्या नवीन संकेतस्थळाचे, ‘युवा स्क्वॉड’ उपक्रमाचे आणि नव्या युवागीताचे उद्घाटन करण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
Abhishek Sharma Records : चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात ५९ धावांची झंझावाती खेळी करत अभिषेक शर्माने अनेक विक्रमांची रांग लावली
Potato Procurement : उत्तर प्रदेशात 6,500 रुपये दराने बटाटा खरेदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, उत्तर प्रदेशमध्ये २० लाख टन बटाटा खरेदीला (Potato Procurement) मंजुरी दिली आहे.
Nitesh Rane : महाराष्ट्रातील ‘या’बड्या भाजप मंत्र्याविरोधात न्यायालयाकडून वॉरंट जारी
Nitesh Rane : संजय राऊत मानहानी प्रकरणात भाजप मंत्री नितेश राणे यांच्याविरुद्ध माझगाव न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट काढले आहे.
PM Modi:
David Miller Record : डेव्हिड मिलरने आयपीएलच्या इतिहासात एका मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली.
JNPT Port Blast : जेएनपीटी बंदरात भीषण स्फोट; आकाशात पसरले धुराचे प्रचंड लोट
उरण नजीकच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) क्षेत्रातील जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक पार्कमध्ये आज दुपारी एक अत्यंत थरारक आणि भीषण दुर्घटना (JNPT Port Blast) घडली.
ICICI Bank: आयसीआयसीआय बँकेचा धमाका; चौथ्या तिमाहीत १४,७५५ कोटींचा नफा!
ICICI Bank: सरलेल्या पूर्ण वर्षात बँकेचा करोत्तर नफा 6.2 टक्क्यांनी वाढून 50,147 कोटी रुपये झाला आहे.
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून विधानपरिषदेची उमेदवारी मागितली आहे.
Central Railway : मध्य रेल्वेने साजरा केला जागतिक वारसा दिन
मुंबई : मध्य रेल्वेने जागतिक वारसा दिन-२०२६ उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ व मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि भारतीय रेल्वेचा अभिमान असलेल्या तसेच गेल्या १३८ वर्षांपासून दिमाखाने उभे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे साजरा झाला. सांस्कृतिक वारशाचे महत्त्व आणि त्याच्या जतनाची गरज याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी इंटरनॅशनल कौन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स (ICOMOS) ने दरवर्षी १८ एप्रिल रोजी जागतिक वारसा दिनाची सुरुवात केली. ICOMOS ने प्रस्तावित केल्यानुसार, २०२६ ची संकल्पना “संघर्ष आणि आपत्तींच्या संदर्भात अस्तित्वातील वारशासाठी आपत्कालीन प्रतिसाद” ही आहे.कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांनी, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता सुबोध कुमार सागर आणि मुख्यालय, मुंबई विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ‘हेरिटेज वॉक’चे नेतृत्व केले. या पदयात्रेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या स्थापत्यकलेतील भव्यतेवर प्रकाश टाकण्यात आला आणि भारतीय रेल्वेच्या समृद्ध वारशाचा गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रांतील लोक, नागरी संरक्षण दलाचे सदस्य, स्काऊट्स अँड गाईड्स आणि मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचारी यांनीही या पदयात्रेत सक्रियपणे सहभाग घेतला.‘हेरिटेज वॉक’ची सुरुवात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १४ आणि १५ च्या दरम्यान असलेल्या हेरिटेज सहयोगी मधील प्रदर्शनाला भेट देऊन झाली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीची स्थापत्यकलेतील अद्भुतता दर्शवणारे डिस्प्ले बोर्ड, रेल्वे स्थानके, रेल्वे पूल आणि नेरळ-माथेरान रेल्वेवरील लघुपट, तसेच जुन्या रेल्वे इंजिन आणि डब्यांच्या प्रतिकृतींसह विविध प्रदर्शने होती. हेरिटेज गॅलरीच्या भिंती महाराष्ट्रातील रेल्वे, ऐतिहासिक इमारती आणि पर्यटन स्थळांच्या छायाचित्रांनी सजवल्या होत्या. या प्रदर्शनात पूर्णपणे रेल्वेच्या निरुपयोगी टाकाऊ सामानापासून बनवलेला महात्मा गांधींचा पुतळाही होता. ‘हेरिटेज वॉक’मध्ये हेरिटेज संग्रहालय आणि स्टार चेंबरलाही भेट देण्याचा समावेश होता.अतिरिक्त महाव्यवस्थापकांनी अधिकारी, रेल्वे कर्मचारी आणि उपस्थित असलेल्या सर्वांना वारसा रेल्वे स्थानके, लोकोमोटिव्ह यांचे संरक्षण करण्याची, रेल्वे वारशाबद्दल जागरूकता वाढवण्याची आणि वारसा संवर्धनाची भावना जपण्याची शपथ दिली. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जागतिक वारसा दिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या वारसा इमारतीला रोषणाई करण्यात आली.मध्य रेल्वेचा समृद्ध वारसा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे, ही एक स्थापत्यशास्त्रीय अद्भुत वास्तू आहे. ब्रिटिश अभियंता फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी डिझाइन केलेली ही इमारत इंडो-गॉथिक स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. याचे बांधकाम १८७८ मध्ये सुरू झाले आणि १८८८ मध्ये ₹१६,१३,८६३ च्या खर्चाने पूर्ण झाले. ही इमारत व्हिक्टोरियन गॉथिक रिवाइव्हल शैलीला मुघल आणि पारंपरिक भारतीय स्थापत्यकलेच्या घटकांसह जोडते, जे भारताच्या समृद्ध आणि विविध वारशाचे प्रतीक आहे. भारतातील सर्वात जुन्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेले भायखळा स्टेशन, १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे या पहिल्या ऐतिहासिक रेल्वे प्रवासाचा एक भाग होते. आता १७३ वर्षे जुने असलेले हे स्टेशन, त्याच्या मूळ गॉथिक वास्तुकलेच्या वैभवात अत्यंत काळजीपूर्वक पुनर्संचयित करण्यात आले आहे आणि त्याचे मोठ्या काळजीने जतन केले जात आहे. ११९ वर्षे जुनी वारसा रेल्वे लाईन, नेरळ-माथेरान लाईट रेल्वे, १९०७ मध्ये सुरू झाली. ही निसर्गरम्य नॅरो-गेज रेल्वे प्रौढ, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंददायी अनुभव आहे. ही रेल्वे प्रवाशांना घनदाट जंगले आणि डोंगराळ प्रदेशातून एक अनोखा प्रवास घडवते, तसेच जुन्या रेल्वे प्रवासाचे आकर्षण जपते.
Akshaya Tritiya: अक्षय तृतीयेला खरेदी वाढण्याची शक्यता –डॉ. सौरभ गाडगीळ
Akshaya Tritiya:

30 C