SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

31    C
... ...View News by News Source

Viral Video :चालत्या बाईकवर 'हायव्होल्टेज'ड्रामा!...लोक पाहत राहिलीत..!

मुंबई: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण सध्या एका अशा व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे जो पाहून अनेकांच्या हसु येईल. नवरा-बायकोच्या नात्यात भांडणं होणं ही सामान्य बाब आहे, मात्र भररस्त्यात चालत्या बाईकवर एका पत्नीने आपल्या पतीची ज्या प्रकारे 'धुलाई' केली, ते पाहून सर्वत्र चर्चा रंगली आहे.नेमकं काय घडलं?व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक पती व पत्नी बाईकवरून जाताना दिसत आहे. पती गाडी चालवत आहे आणि पत्नी मागे बसली आहे. मात्र, अचानक पत्नीचा पारा चढतो आणि ती मागे बसल्या बसल्या पतीवर थपडांचा पाऊस पाडण्यास सुरुवात करते. संतापलेल्या या पत्नीने कमीत कमी पतीला तब्बल १४ कानाखाली लगावल्या. धक्कादायक बाब म्हणजे, गाडी वेगात असतानाही पत्नीने मारणे थांबवले नाही, ज्यामुळे बाईकचा तोल जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता होती.या व्हिडीओमधील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे पतीचा प्रतिसाद आला नाही. पत्नी इतक्या जोरात आणि सलग मारत असतानाही, पतीने मागे वळून पाहिले नाही किंवा तिला प्रतिकार केला नाही. तो शांतपणे गाडी चालवत मार सहन करत राहिला. जणू काही त्याने आपल्या चुकीची कबुलीच दिली होती. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, या पतीने आपल्या पत्नीची फसवणूक केली होती किंवा तिला तो दुसऱ्या एका महिलेसोबत दिसला होता. याच संतापामुळे पत्नीने भररस्त्यात त्याचा'हिशोब' चुकता केला.सोशल मिडियावर व्हिडीओ वायरलहा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर मजेशीर आणि काहीशा गंभीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा नवरा आहे की दगड? इतका मार खाऊनही गाडी कशी काय चालवतोय? अशी विचारणा एका युजरने केली आहे. तर दुसऱ्याने हे तर खरं 'बॅलन्सिंग' आहे, अशी टर उडवली आहे.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 5:30 pm

देशातील क्रमांक दोन आयटी कंपनीचा तिमाही निकाल जाहीर इन्फोसिसच्या निव्वळ नफ्यात २% घसरण

मोहित सोमण: इन्फोसिस कंपनीने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ६८०६ कोटी तुलनेत २% घसरण झाल्याने नफा ६६५४ कोटींवर पोहोचला आहे. तर कंपनीच्या महसूलात (Revenues) इयर ऑन इयर बेसिसवर ८.९% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातील ४१७६४ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ४५४७९ कोटीवर वाढ झाली आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या एकूण ऑपरेटिंग खर्चात इयर ऑन इयर बेसिसवर ३.१% वाढ झाल्याने खर्च ३७३२ कोटीवरुन ४४७२ कोटींवर वाढला आहे. कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यातही इयर ऑन इयर बेसिसवर ६.३% घसरण झाल्याने नफा ८९१२ कोटीवरून ८३५५ कोटींवर घसरला आहे.एक्सचेंजमधील माहितीनुसार, बेसिक ईपीएस (Earning per share EPS) इयर ऑन इयर बेसिसवर ०.५७ रूपयावरून ०.५८ रूपयावर किरकोळ वाढ झाली आहे.याविषयी प्रतिक्रिया देताना,'इन्फोसिसने तिसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे, ज्यामुळे इन्फोसिस टोपाझद्वारे एंटरप्राइझ एआयमधील आमचे वेगळे मूल्य प्रस्ताव सातत्याने बाजारातील मोठा वाटा मिळवून देत आहेत हे दिसून येते. ग्राहक इन्फोसिसला त्यांच्या एआय भागीदार म्हणून पाहत आहेत, ज्यांच्याकडे सिद्ध कौशल्य, नाविन्यपूर्ण क्षमता आणि मजबूत वितरण क्षमता आहेत. यामुळे त्यांना व्यवसायाची क्षमता अनलॉक करण्यास आणि मूल्य प्राप्ती वाढविण्यात मदत झाली आहे,'असे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख म्हणाले आहेत. 'या प्रवासाच्या केंद्रस्थानी, एआय समर्थित जगात यश मिळवण्यासाठी आमच्या समर्पित मनुष्यबळाला पुन्हा प्रशिक्षित करणे, रूपांतरित करणे आणि सक्षम करणे ही आमची वचनबद्धता आहे' असेही ते पुढे म्हणाले.याविषयी प्रतिक्रिया देताना,'तिसऱ्या तिमाहीत आमची कामगिरी सर्वसमावेशक होती, ज्यात महसुलात ०.६% क्रमवार वाढ, समायोजित (Adjusted) ऑपरेटिंग मार्जिनमध्ये ०.२% वाढ, ४.८ अब्ज डॉलर्सचे मोठे करार जिंकणे आणि हंगामीदृष्ट्या कमकुवत तिमाहीत ९६५ दशलक्ष डॉलर्सची मजबूत समायोजित रोख निर्मिती यांचा समावेश आहे' असे सीएफओ जयेश संघराजका म्हणाले. पुढे म्हणाले आहेत की,'आमच्या भांडवल वाटप धोरणानुसार,आम्ही १८००० कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा बायबॅक यशस्वीरित्या पूर्ण केला आणि भागधारकांना अंतरिम लाभांश दिला'.इन्फोसिस देशातील क्रमांक दोनची आयटी कंपनी असून कंपनीचे जगभरात कर्मचारी आहेत. इन्फोसिस लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान आयटी कंपनी डिजिटल सेवा आणि सल्लागार क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रणी आहे. कंपनीचे मुख्यालय कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे आहे. आज कंपनीचा शेअर ०.६२% उसळत १६०८.९० पातळीवर बंद झाला आहे. गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये १.१८% घसरण झाली असून गेल्या महिनाभरात शेअर्समध्ये ०.१३% वाढ झाली आहे तर वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये १७.०७% घसरण झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) शेअर्समध्ये ०.८८%% घसरण झाली आहे.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 5:30 pm

घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या तरतूदीसंदर्भातील आदेश जुनाच

मुंबई : महानगरपालिका निवडणूकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कुठलाही नवीन आदेश निर्गमित केलेला नाही. त्यासंदर्भातला आदेश जुनाच असून तो राज्य निवडणूक आयोगाने १४ फेब्रुवारी २०१२ मध्येच निर्गमित केलेला आहे.जाहीर प्रचाराच्या समाप्तीनंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने नवीन नियम लागू केला असल्याचे वृत्त समाजमाध्यमांसह विविध माध्यमातून प्रसारित होत आहे; परंतु हे वस्तुस्थितीला धरुन नाही. याबाबतचा आदेश जुनाच आहे. त्या १४ फेब्रुवारी २०१२ रोजीच्या आदेशानुसार जाहीर प्रचार समाप्तीनंतर उमेदवार हे मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर मतदारांना भेटून आणि घरोघरी जाऊन प्रचार करु शकतील; परंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समुहानेदेखील फिरता येणार नाही

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 5:30 pm

Christian Clarke : रोहित-विराटला बाद करून खळबळ उडवणारा कोण आहे हा क्रिस्टियन क्लार्क? न्यूझीलंडला मिळाला नवा ‘हुकमी एक्का’

Christian Clarke vs India : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत एका नव्या दमाच्या गोलंदाजाने भारतीय फलंदाजांना चांगलंच जेरीस आणलं आहे. न्यूझीलंडचा युवा वेगवान गोलंदाज क्रिस्टियन क्लार्कने आपल्या सुरुवातीच्या दोन सामन्यांतच आपली छाप पाडली आहे. विशेषतः दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या दिग्गज फलंदाजांना बाद करून त्याने क्रिकेट विश्वात खळबळ […] The post Christian Clarke : रोहित-विराटला बाद करून खळबळ उडवणारा कोण आहे हा क्रिस्टियन क्लार्क? न्यूझीलंडला मिळाला नवा ‘हुकमी एक्का’ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 5:22 pm

आमदारकी गेली, नगराध्यक्षपदासाठीही धडपडले…; माजी आमदाराचा शरद पवारांना रामराम, ‘या’पक्षात जाणार?

रत्नागिरी : कोकणात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युतीने वर्चस्व गाजवल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. ऐन निवडणूक […] The post आमदारकी गेली, नगराध्यक्षपदासाठीही धडपडले…; माजी आमदाराचा शरद पवारांना रामराम, ‘या’ पक्षात जाणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 5:21 pm

शाळा मुख्याध्यापिकेविरुद्ध एफआयआर; निवडणूक कर्तव्यातील निष्काळजीपणा भोवला

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापिकेविरुद्ध निवडणूक कर्तव्यातील निष्काळजीपणाप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आयोजित करण्यात आलेल्या अनिवार्य प्रशिक्षण सत्रांना शाळेतील २३ कर्मचारी गैरहजर राहिल्याने ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उल्हासनगर महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख अजित रत्ना गोवारी यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली […] The post शाळा मुख्याध्यापिकेविरुद्ध एफआयआर; निवडणूक कर्तव्यातील निष्काळजीपणा भोवला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 5:11 pm

Devendra Fadnavis : परप्रांतियांना थोबाडीत मारणं म्हणजे मुंबईचा विकास नव्हे; मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर बोचरा वार

वरळीच्या बीडीडी चाळीतून भरला प्रचाराचा हुंकारमुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा गाठलेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळीतील बीडीडी चाळीला भेट देऊन राजकीय वातावरण तापवले आहे. मराठी माणसाचा विकास केला म्हणजे नक्की काय केले? गेल्या २५ वर्षांत मराठी माणसाला मुंबई सोडून बाहेर का जावे लागले? असा सवाल करत त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या कार्यशैलीवर जोरदार प्रहार केला. ठाकरे बंधूंच्या भाषिक राजकारणावर टीका करताना फडणवीस म्हणाले की, परप्रांतीयांना दोन थोबाडीत मारणे म्हणजे विकास असू शकत नाही. ठाकरे बंधूंनी मराठी विरुद्ध अमराठी असा भेदभाव करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला, मात्र मराठी माणूस संकुचित नाही. त्याला क्षेत्रीय अस्मिता आणि भाषेचा अभिमान नक्कीच आहे, पण त्याला प्रगती हवी आहे.मराठी आणि हिंदू वेगळं नाहीहिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, आमचे हिंदुत्व हे केवळ पूजा पद्धतीपुरते मर्यादित नाही. जे प्राचीन भारतीय जीवनपद्धती मानतात, ते सर्व आमच्यासाठी हिंदू आहेत. मराठी माणूस महाराष्ट्रात सुरक्षित आणि समृद्ध असावा, हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बीडीडी चाळ पुनर्विकासावरून सध्या महायुती आणि उद्धव ठाकरे यांच्यात प्रचंड श्रेयवादाची लढाई सुरू आहे. अशातच मुख्यमंत्र्यांनी थेट वरळीच्या बीडीडी चाळीत जाऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी चाळीतील रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करत त्यांचे आभार मानले. वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असल्याने मुख्यमंत्र्यांच्या या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रचाराच्या अखेरीस मुख्यमंत्र्यांनी मोठा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्राची जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी ठाम उभी आहे. राज्यातील २६ ते २७ महानगरपालिकांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचाच महापौर बसेल, असा दावा त्यांनी केला.https://prahaar.in/2026/01/14/mumbai-a-fight-broke-out-over-a-minor-dispute-a-friend-took-the-blame-in-anger-what-exactly-happened/मुंबईवर झेंडा महायुतीचाचमुंबई महानगरपालिकेवर यंदा महायुतीचाच भगवा फडकणार असून, भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. केवळ मुंबईच नव्हे, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महत्त्वाच्या शहरांतही महायुतीचीच सत्ता येईल, असा दावा त्यांनी यावेळी केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीवर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. ठाकरे बंधूंचे एकत्र येणे हा कोणताही वैचारिक 'प्रीतीसंगम' नाही, तर तो पराभवाच्या धास्तीतून निर्माण झालेला 'भीतीसंगम' आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला. सत्तेसाठी आणि अस्तित्वासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याची टीका त्यांनी केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांवर (शरद पवार आणि अजित पवार गट) टीका केली. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष केवळ आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आले आहेत. मात्र, जनता आता विकासाच्या राजकारणालाच साथ देणार असून, तिथेही महायुतीच बाजी मारेल, असे फडणवीस म्हणाले. राज्यातील २७ महापालिकांच्या निवडणुकीत भाजप आपली ताकद सिद्ध करेल, असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. मुंबईत अनेक वर्षांची एकाधिकारशाही संपवून भाजप आणि मित्रपक्ष सत्ता काबीज करतील, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. निवडणुकीच्या या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 5:10 pm

Raj Thackeray : “घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा निर्णय सरकारच्या सांगण्यावरूनच…”; राज ठाकरेंचा आयोगावर घणाघात

Raj Thackeray – महानगरपालिका निवडणुकांचा अधिकृत प्रचार कालावधी संपल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यास परवानगी दिल्याबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे. हा निर्णय सत्ताधारी महायुतीला निवडणुका जिंकण्यास मदत करत असल्याचा दावा त्यांनी केला. सार्वजनिक प्रचार संपल्यानंतर केवळ मर्यादित वैयक्तिक संपर्कास परवानगी देण्याच्या आपल्या निर्णयाचा हवाला देत, राज्य निवडणूक आयोगाने […] The post Raj Thackeray : “घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा निर्णय सरकारच्या सांगण्यावरूनच…”; राज ठाकरेंचा आयोगावर घणाघात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 5:01 pm

धक्कादायक बातमी.! काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला

Nanded – नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या एका काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवाजी भालेराव, ज्यांच्या पत्नी सारिका भालेराव या नांदेड महानगरपालिका निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवत आहेत. शिवाजी भालेराव हे प्रभाग क्रमांक १ मधील त्यांच्या घराबाहेर बसले असताना सहा सशस्त्र हल्लेखोर मोटरसायकलवरून आले आणि त्यांच्यावर हल्ला केला. स्थानिक रहिवासी त्यांच्या मदतीसाठी […] The post धक्कादायक बातमी.! काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 4:47 pm

D.K. Shivakumar : ग्रामीण विकासाला बळ देणारी ‘मनरेगा’ भाजपने संपवली; डी.के. शिवकुमार यांचा हल्लाबोल

बंगळूर : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका करत, ग्रामीण भागाला आर्थिक आधार देणारी मनरेगा योजना केंद्र सरकारने प्रत्यक्षात संपवल्याचा आरोप केला. पॅलेस ग्राऊंड्स येथे ‘मनरेगा बचाव संग्रामा’च्या तयारीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. नव्या जी-राम-जी कायद्याअंतर्गत ९०-१० ऐवजी ६०-४० असे निधीवाटपाचे प्रमाण लागू केल्यामुळे राज्यांवर मोठा आर्थिक बोजा पडेल, अशी […] The post D.K. Shivakumar : ग्रामीण विकासाला बळ देणारी ‘मनरेगा’ भाजपने संपवली; डी.के. शिवकुमार यांचा हल्लाबोल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 4:45 pm

आचार्य श्री विजय वल्लभ स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा; रेखाकला परीक्षेत 100 टक्के यशाची परंपरा कायम

पुणे: महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत प्रतीवर्षी घेतल्या जाणाऱ्या रेखाकला परिक्षेच्या एलिमेंटरी ग्रेड आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा यावर्षी सप्टेंबर 2025 मध्ये घेण्यात आल्या होत्या. त्या परीक्षांचे निकाल महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून नुकतेच जाहीर करण्यात आले. या दोन्हीही परीक्षांसाठी आचार्य श्री विजय वल्लभ स्कुल मधील प्रविष्ट झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी पुन्हा […] The post आचार्य श्री विजय वल्लभ स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा; रेखाकला परीक्षेत 100 टक्के यशाची परंपरा कायम appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 4:40 pm

शेअर बाजारात 'कंसोलिडेशन'मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूकदारांची विक्री सेन्सेक्स २४४.९८ अंकाने घसरत ८३३८२.७१ व निफ्टी ६६.७० कोसळला!

मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेच्या फटक्यामुळे आजही शेअर बाजारात घसरण झाली आहे. त्यामुळे अखेरच्या सत्रात सेन्सेक्स २४४.९८ अंकाने घसरत ८३३८२.७१ व निफ्टी ६६.७० अंकांने घसरत २५६६५.६० पातळीवर स्थिरावला आहे. मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक धाकधूकीने बाजारातून काढल्याची शक्यता निर्माण झाल्याने बाजारात नकारात्मक कौल दिला गेला आहे. युएस बाजारातील राजकीय, आर्थिक अस्थिरता आशियाई बाजारासह भारतीय बाजारात परावर्तित झाल्याचे आज दिसून आले. दरम्यान घरगुती गुंतवणूकदारांनी आज नवी गुंतवणूक न वाढवता बाजारात काही प्रमाणात नफा बुकिंग केल्याचे दिसून येत आहे. सध्या तिमाही निकाल बाजारात येत असताना गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा पवित्रा कायम ठेवल्याने आक्रमक पद्धतीने खरेदी वाढवली नाही. अशातच निफ्टी व्यापक निर्देशांकातील मिडकॅप ५० व स्मॉलकॅप ५०, मिडकॅप १००, स्मॉलकॅप १०० निर्देशांकात वाढ झाल्याने बाजारातील घसरणीची पातळी रोखली गेली. यासह मोठ्या प्रमाणात निफ्टीत कंसोलिडेशन झाल्याचे दिसून आले. २५९७८ व २५८९२ पातळीवर अनुक्रमे २० व ५० ईएमए (Exponential Moving Average EMA) दिसून आल्याने बाजारात घसरण स्पष्ट झाली असली तरीही बँक निर्देशांकातील चांगल्या कामगिरीमुळे बाजार किरकोळ आकडेवारीत सावरण्यास मदत झाली. बँक निफ्टीचे २० व ५० दिवस ईएमए अनुक्रमे ५९४९१, ५८९३१ दरम्यान प्रतिरोध दिसल्याने बाजारातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली.निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ मेटल (२.७०%), पीएसयु बँक (२.१३%), मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (१.४६%), तेल व गॅस (०.५४%), मिड स्मॉल हेल्थकेअर (०.५९%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण आयटी (१.०८%), ऑटो (०.६९%), रिअल्टी (०.९२%), एफएमसीजी (०.६१%) निर्देशांकात झाली आहे.युएस बाजारातील एकीकडे युएस फेडरल रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असताना दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प विरूद्ध फेड बँकेच्या गव्हर्नर कूक यांच्या हकालपट्टी विरोधासह जेरोमी पॉवेल यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे संकेत युएस बाजारात मिळाले होते यासह डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिरिक्त शुल्क टॅरिफ विरोधातील याचिकेची सुनावणी न्यायालय प्रविष्ट असल्याने गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता कायम होती. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणवरील नव्या विधानावरून जागतिक शेअर बाजार आणखी अस्थिर होत कमोडिटी बाजारात विक्रमी उच्चांकावर दरपातळी आज पोहोचली होती. एकूणच या अस्थिरतेचा फटका शेअर बाजारात बसत असताना रूपयाने किरकोळ सुधारणा केल्याने बाजारातील घसरण अखेरच्या सत्रात मंदावली. कच्च्या तेलाच्या निर्देशांकासह सोन्याच्या व चांदीच्या निर्देशांकात दिवसभरात मोठी वाढ झाली आहे.भारतीय बाजारात लार्जकॅप शेअर्समध्येही मोठी चढउतार दिसल्याने या ब्लू चिप्स शेअर्सने संमिश्र कामगिरी केली होती. एकूणच परिस्थिती घसरणीकडे गेली असली तरी बाजारात फंडा मेंटल सुधारत असल्याने कंसोलिडेशनची परिस्थिती निर्माण झाली असून बाजारात नफा बुकिंगही काही प्रमाणात वाढले. आशियाई बाजारातही अखेरच्या सत्रात बहुतांश तेजीचा कल दिसला असून अस्थिरतेमुळे युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात तिन्ही बाजारात घसरण झाली आहे. आज अखेरच्या सत्रात अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा १.०९% उसळला होता.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ एमएमटीसी (१२.६४%), ज्युपिटर वॅगन्स (१२.५६%), एमआरपीएल (९.०७%), युनियन बँक (७.८७%), हिंदुस्थान कॉपर (६.१८%), वेदांता (६.०५%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण टाटा इलेक्सी (४.९७%), वी गार्ड इंडस्ट्रीज (३.२६%), कल्याण ज्वेलर्स (३.०४%), हेक्सावेअर टेक्नॉलॉजी (२.९७%), प्रिमियर एनर्जीज (२.७२%), नेटवेब टेक्नॉलॉजी (२.६१%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'आज भारतीय शेअर बाजारात मर्यादित श्रेणीत व्यवहार झाले. बेंचमार्क निफ्टी २५,६४८ अंकांवर उघडला, त्यानंतर तो वाढून २५,७९१ अंकांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला, परंतु ही गती टिकवून ठेवण्यात अपयशी ठरला आणि दिवसाच्या नीचांकाकडे घसरला, ज्यामुळे खरेदीचा अभाव दिसून आला. क्षेत्रनिहाय विचार केल्यास, धातू, कमोडिटीज, सीपीएसई, ऊर्जा आणि तेल व वायू क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदीचा ओघ दिसून आला आणि त्यांनी निर्देशांकाला मर्यादित आधार दिला. तथापि, रिअल्टी, आयटी, एफएमसीजी, ऑटो आणि इंडिया कन्झम्प्शन क्षेत्रातील शेअर्समधील सततच्या कमजोरीमुळे बाजारातील तेजीला मर्यादा आल्या आणि बाजार सुस्त राहिला. जागतिक स्तरावर, गुंतवणूकदार सावध राहिले कारण ते अमेरिका-भारत व्यापार वाटाघाटींशी संबंधित घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून होते, तर वाढलेल्या भूराजकीय तणावामुळे एकूण भावनांवर दबाव कायम राहिला.डेरिव्हेटिव्ह्जच्या आघाडीवर, वाढलेल्या शेअर्सची संख्या घसरलेल्या शेअर्सपेक्षा किंचित जास्त होती, ११८ शेअर्स वाढले तर ११६ शेअर्स घसरले, जे बाजाराची तटस्थ स्थिती दर्शवते. डेरिव्हेटिव्ह्जच्या दृष्टिकोनातून, निफ्टी ऑप्शन्सच्या डेटानुसार २६००० आणि २५८०० स्ट्राइकवर सर्वाधिक कॉल ओपन इंटरेस्ट दिसून आला, जे मजबूत प्रतिरोध पातळी दर्शवते. दुसरीकडे, २५७०० आणि २५६०० स्ट्राइकवर सर्वाधिक पुट ओपन इंटरेस्ट तात्काळ आधार क्षेत्र दर्शवतो. पुट-कॉल रेशो (PCR) ०.६४ होता, जो व्यापाऱ्यांकडून सावध भूमिका घेतल्याचे सूचित करतो.एकूणच, बाजार मर्यादित श्रेणीत राहिला, आणि रात्रभराच्या जोखमीमुळे, विशेषतः उद्या बाजार बंद राहणार असल्याने, सहभागी सावध भूमिकेत राहिले. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेमुळे, सहभागी पोझिशन्स पुढे नेण्यास नाखूष दिसले, ज्यामुळे व्यवहारांमध्ये सुस्ती आणि मर्यादित दिशात्मक हालचाली दिसून आल्या.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' भारत-अमेरिका व्यापार कराराबाबतच्या अनिश्चिततेमुळे देशांतर्गत बाजार सावध राहिले आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदार जोखीम घेण्यास कचरत होते. तथापि, या आठवड्यात वाटाघाटी पुन्हा सुरू झाल्याने नवीन आशा निर्माण झाल्या आहेत. अमेरिकेतील व्याजदर कपातीच्या अपेक्षेने किमती वाढल्यामुळे धातूंच्या क्षेत्राने बाजारातील तेजीचे नेतृत्व केले, ज्याला कमी महागाईचे आकडे आणि भूराजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीचा पाठिंबा मिळाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप विभागांमध्ये निवडक खरेदीमुळे व्यापक बाजारांनी चांगली कामगिरी केली. जागतिक स्तरावर, गुंतवणूकदार अमेरिकेच्या डिसेंबरमधील पीपीआय आकडेवारी आणि प्रमुख बँकांच्या कमाईची वाट पाहत असल्याने इक्विटी बाजारात संमिश्र व्यवहार झाले. पुढे पाहता, लक्ष आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांवर केंद्रित होईल, जिथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे सुरुवातीचे निकाल अपेक्षेनुसार होते, तथापि, काही एकवेळच्या खर्चामुळे निव्वळ नफ्याच्या कामगिरीवर परिणाम झाला.'आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'हा निर्देशांक सध्या त्याच्या घसरत्या ट्रेंडलाइन ब्रेकआउट पातळीच्या वर स्थिरावत आहे आणि तो त्याच्या २०-दिवसांच्या आणि ५०-दिवसांच्या दोन्ही SMA च्या वर टिकून आहे, जे एक संरचनात्मकदृष्ट्या सकारात्मक स्थिती दर्शवते. तथापि, गती कमकुवत होत असल्याचे दिसत आहे,कारण आरएसआय (Relative Strength Index RSI) ५३ च्या जवळ आहे आणि तो किंचित खाली झुकलेला आहे, जे मजबूत खरेदीच्या गतीचा अभाव अधोरेखित करते. एकदा निर्देशांक ५९८०० पातळी निर्णायकपणे पुन्हा मिळवेल तेव्हा त्यात पुन्हा गती येण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत, निर्देशांक ५९०००–५९८०० पातळीच्या विस्तृत मर्यादेत व्यवहार करण्याची शक्यता आहे, जिथे ५०-दिवसांच्या एस एम ए (Simple Moving Average SMA) जवळ ५९२००–५९१५० हा एक महत्त्वाचा आधार क्षेत्र (Support Zone) म्हणून काम करेल, तर ५९८०० ही तात्काळ मर्यादेतील प्रतिकार पातळी (Immediate Resistance) म्हणून काम करत राहील.'आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च विश्लेषक दिलीप परमार म्हणाले की,'मध्यवर्ती बँकेने अस्थिरता रोखण्यासाठी हस्तक्षेप करूनही, भारतीय रुपया तीन आठवड्यांतील नीचांकी पातळीवर घसरला आहे. आयात केलेल्या वस्तूंच्या किमती वाढत असल्याने आणि परदेशी निधीचा सतत बहिर्वाह (Outflow) होत असल्याने देशांतर्गत शेअर बाजाराला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने रुपयावर दबाव कायम आहे.तांत्रिक दृष्टिकोनातून, USDINR मध्ये तेजीचा कल दिसून येतो ज्याचा प्रतिकार स्तर (Resistance Level) ९०.४० रूपयांवर आहे. हा अल्पमुदतीचा दृष्टिकोन बदलण्यासाठी, ८९.९० रूपयांच्या आधार पातळीच्या खाली निर्णायक बंद होण्याची आवश्यकता असेल.'

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 4:30 pm

Weather Update :महाराष्ट्रातील पुढील काही तास महत्त्वाचे,वारे आणि तुरळक पावसाचा इशारा

Weather Update : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राभर सध्या हवामानाची चंचलता पाहायला मिळत आहे. मुंबईत थंडीचा जोर काहीसा कमी झाला असला तरी हवेत गारवा वाटत आहे. सकाळी आणि रात्री थंड वातावरण, तर दुपारी अचानक तापमान वाढल्याने उष्णता जाणवायला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत हा तापमानातील तफावत नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे.उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे. काही ठिकाणी गारठ्याची परिस्थिती असून थंडीचा कडाका जाणवत आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील 72 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिण भारतातील काही भागांत जोरदार वारे आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नसली, तरी ढगाळ वातावरण, जोरदार वारे आणि काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळू शकतात, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.मकर संक्रांतीपर्यंत हवामानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज आहे. थंडीची तीव्र लाट नसली तरी गारवा कायम राहणार आहे. मात्र मकर संक्रांतीनंतर तापमानात हळूहळू वाढ होऊन थंडीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यात रविवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. कडाक्याच्या थंडीने गारठलेल्या सांगलीकरांना अचानक झालेल्या पावसाचा अनुभव घ्यावा लागला. रात्री रिमझिम पावसामुळे वातावरणात गारवा वाढला असून महापालिका निवडणुकीच्या प्रचारावरही त्याचा परिणाम झाला. याआधी मुंबई आणि पुण्यातही काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या.सतत बदलणाऱ्या हवामानामुळे राज्यभरात सर्दी, ताप यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसत असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 3:30 pm

Mumbai : किरकोळ वादातून मारामरी,रागाच्या भरात मित्रानेच घेतला...नक्की काय घडलं ?

Mumbai :मुंबईतील एका परिसरात अत्यंत संतापजनक घटना घडली असून, बोलता बोलता वाद झाल्याने एका तरुणावर त्याच्याच मित्राने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात ठेवुन आरोपीने थेट मित्रावर हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणात १९ वर्षीय तौकीर आरीफ शेख याच्यावर अतिफ शेख याने हल्ला केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८जानेवारी रोजी तौकीर आणि त्याच्या मित्रांचा मित्र अतिफ शेख यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर अतिफने तौकीरला फोन करून धमकी दिली होती, तसेच शिवीगाळ करत परिणामांची चेतावणी दिल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. १० जानेवारी रोजी रात्री सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास तौकीर आपल्या नातेवाईकाला सायन सर्कलवर सोडून लालमिट्टी किस्मतनगर परिसरात परत आला होता. तो एका मित्राला भेटण्यासाठी तेथे थांबला असताना अचानक अतिफ शेख तेथे आला. आरोपीने तौकीरला पाहताच शिवीगाळ सुरू केली. तौकीरने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र अतिफने रागाच्या भरात त्याच्यावर जोरदार हल्ला केला.या हल्ल्यात आरोपीने तौकीरच्या मान आणि कानावर जोरात चावा घेतल्याचा आरोप असून, त्यामुळे तौकीर गंभीर जखमी झाला आहे. या प्रकारामुळे घटनास्थळी उपस्थित नागरिक घाबरून गेले. तौकीरच्या मदतीला धावून आलेल्या नागरिकांनाही आरोपीने धमकावल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपी अतिफ शेख याच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 3:30 pm

सिंचन घोटाळ्याच्या फाईलबाबत २५ वर्षे चुप्पी का?

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अजित पवारांना सवालमुंबई : पुरंदरमधील सिंचन प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराच्या फाईलबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार १९९९ पासून २५ वर्षे गप्प का राहिले, असा थेट सवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच अजित पवारांकडून अशी अपेक्षा नव्हती, अशी खंतही व्यक्त केली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्कालीन शिवसेना-भाजप सरकारवर सिंचन प्रकल्पात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, १९९९ ला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तारूढ झाले तेव्हा माझ्याकडे जलसंपदा खाते आले. तेव्हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली. मी पाहिली असता त्यामध्ये या योजनेची रक्कम ३१० कोटी रुपये असल्याचे आढळून आले. मात्र मी अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी या प्रकल्पाची किंमत आधीच्या सरकारने वाढवल्याचे सांगितले. या प्रकल्पाची किंमत २०० कोटी रुपयेच असल्याचे त्या अधिकाऱ्याने कबुल केले. पुढे त्या अधिकाऱ्याने असेही सांगितलं की, १०० कोटी रुपये पार्टी फंडासाठी मागण्यात आले होते. मग आम्ही अधिकाऱ्यांनी देखील त्यामध्ये आमचे १० कोटी वाढवले आणि प्रकल्पाची किंमत ३१० कोटी झाली. ती फाईल अजुनही माझ्याकडे आहे. ती जर काढली असती तर हाहाकार माजला असता, असा दावा अजित पवारांनी केला आहे.त्यावर महसूलमंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. १९९९ ते २०२४ हा मोठा काळ आहे. १९९९ ला जेव्हा अजित पवार यांच्याकडे ही फाईल आली होती, तेव्हा आरोप केले असते तर आम्ही समजले असते. मात्र एवढ्या उशिरा असा आरोप करणे योग्य नाही. जनता यावर विश्वास करणार नाही. शिवाय अजित पवारांकडून अशी अपेक्षा नव्हती, अशी खंतही बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.......अजित पवार त्रस्त - बावनकुळेपुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीमुळे अजित पवार त्रस्त आहेत. त्यांच्यात नकारात्मकता आहे. मात्र, त्यांनी मनभेद, मतभेद होईल असे वागले नाही पाहिजे. युतीच्या समन्वय समितीमध्ये जरी मी असलो, तरी अजित पवार हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अजित पवारांना दोन्ही राष्ट्रवादी एक करायची आहे की नाही, हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. जेव्हा अधिकृत घोषणा होईल तेव्हा आम्ही त्यावर चर्चा करू, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 3:10 pm

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा गोंधळ सुरूच ; डीके शिवकुमार, सिद्धरामयांच्या राहुल गांधींशी झालेल्या संभाषणामुळे खळबळ

Karnataka politics। कर्नाटकात नेतृत्व बदल आणि मुख्यमंत्रीपदावरून राजकीय गोंधळ पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राहुल गांधी यांच्याशी झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू झाली आहे. भेटीचे व्हिडिओ आणि पोस्ट पुन्हा एकदा समोर आल्या आहेत, ज्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षावरील वाद पुन्हा सुरू झाला आहे. राहुल गांधींशी आज झालेल्या […] The post कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा गोंधळ सुरूच ; डीके शिवकुमार, सिद्धरामयांच्या राहुल गांधींशी झालेल्या संभाषणामुळे खळबळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 2:55 pm

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा एकत्र लवकरच एक रिॲलिटी शोमध्ये पाहायला मिळणार आहेत. अशा अनेक बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. व या वरुन सोशल मिडीयावर चर्चांना उधान आलं आहे..मात्र आता स्वतः युजवेंद्र चहलने या सर्व अफवांवर स्पष्ट शब्दांत विराम दिला आहे. चहलने अपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे प्रतिक्रिया देत चहलने या वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. “मी कोणत्याही रिॲलिटी शोमध्ये सहभागी होत नाही. माझा ‘द 50’ किंवा इतर कोणत्याही शोशी कोणताही संबंध नाही. यासंदर्भात माझ्याशी कोणतीही चर्चा किंवा कमिटमेंट झालेली नाही,” असे त्याने स्पष्ट केले. सोशल मीडिया आणि मीडियामधून पसरवण्यात येणाऱ्या अपुष्ट बातम्यांवर विश्वास ठेवू नये, तसेच माहिती शेअर करण्यापूर्वी ती पडताळून पाहावी, असे आवाहनही चहलने केले आहे.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर धनश्री वर्मा हिने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तिचे मौन कायम असून ती या अफवांवर काय बोलणार, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. ‘द 50’ या रिॲलिटी शोचा प्रीमिअर 1 फेब्रुवारी रोजी होणार असून प्रसिद्ध दिग्दर्शक-कोरिओग्राफर फराह खान हा शो होस्ट करणार आहे. हा शो भारतीय रिॲलिटी टीव्हीमधील पारंपरिक साच्याला छेद देईल, असा दावा फराह खानने केला आहे. धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांचे डिसेंबर 2020 मध्ये गुरुग्राम येथे लग्न झाले होते. कोविड-19 महामारीच्या काळात चहलने धनश्रीकडून नृत्य शिकण्यास सुरुवात केली आणि त्यातूनच दोघांची जवळीक वाढली. मात्र जून 2022 मध्ये ते वेगळे झाले आणि मार्च 2024 मध्ये त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला.घटस्फोटानंतर चहल दुबईमध्ये आरजे महवाशसोबत चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पाहताना दिसल्याने त्यांच्या नात्याबाबत अटकळी बांधल्या गेल्या. मात्र आरजे महवाशने ते फक्त चांगले मित्र असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, ‘राईज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमध्ये धनश्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्यावर मोकळेपणाने भाष्य केल्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली होती.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 2:30 pm

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मकमुंबई : भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन प्रकारासारखे आहे. मराठी भाषेबाबतचा आमचा दृष्टिकोन आम्ही आपले आपण असा अनेकवचनी आणि व्यापक असून त्यात मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता यांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं मराठी सकारात्मकता पसरवणारे आहे ज्यातून मराठी भाषा साहित्य संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार अपेक्षित आहे असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. विरोधकांवर कडक शब्दांत टीका करताना चव्हाण यांनी मराठी भाषेचे राजकारणच करू नका कारण हा विषामृत असा खेळ नाही. विरोधकांची मराठी बाबतची भूमिका ही नकारात्मकतेने भरलेली असून ज्ञानेश्वर माऊलींच्या विश्वात्मके देवे या वैश्विक तत्त्वाशी त्यांची बांधिलकी नसल्याचे प्रतीक आहे असे ते म्हणाले.भाजपा आणि मराठी माणूस या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीतच. वास्तविकपणे मराठी माणसाने स्थापन केलेल्या मातृसंस्थेची विचारधारा हीच भाजपाची विचारधारा असून घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या तीनही मराठी भाषिक थोर व्यक्तींच्या विचारांनी प्रेरित देश आणि समाज घडविण्याचे काम भाजपा वर्षानुवर्षे करत आहे असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 2:30 pm

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; विधवा सुनेला सासरच्यांना मालमत्तेतून द्यावी लागणार पोटगी

Supreme Court Maintenance Case। सर्वोच्च न्यायालयाने विधवा सुनेच्या पोटगीविषयी महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भट्टी यांच्या खंडपीठाने देशभरातील विधवा सुनेचा त्यांच्या सासरच्या मालमत्तेवरील हक्काचा वाद सोडवत विधवा सुनेला महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे. दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने, त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर, सासरच्यांनी त्यांच्या स्वतःच्या मालमत्तेतून विधवा सुनेचा उदरनिर्वाह करावा.” असं म्हणत […] The post सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; विधवा सुनेला सासरच्यांना मालमत्तेतून द्यावी लागणार पोटगी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 2:12 pm

BMC Election 2026 : ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, मनसेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; याचिकाकर्त्यांना सुनावले खडेबोल

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात मनसेच्या अविनाश जाधव यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. उमेदवार बिनविरोध निवडून आला असला, तरी मतदारांसाठी नोटाचा पर्याय असावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.मात्र, न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावत ही याचिका फेटाळून लावली. तुम्ही न्यायालयात सकाळी चुकीचा युक्तिवाद केला, तसेच रिट पिटिशन आणि आधीच्या याचिकेत सार्धम्य असल्याचे सांगितले, मात्र यामध्ये काहीही साम्य आढळून आलेले नाही, त्यामुळे आम्ही याचिकाकर्त्यांना दंड ठोठावत असल्याचे सुरुवातीला न्यायमूर्तींनी सांगितले.https://prahaar.in/2026/01/14/madhya-pradesh-khargone-man-legs-accidentally-touched-muslim-woman-foot-beaten-by-3-people-hindu-organizations-staged-protest-2026/बुधवारी सकाळी ही याचिका इतर प्रलंबित याचिकांसारखीच असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, सुनावणीसाठी याचिका पुकारण्यात आल्यानंतर ऑनलाईन उपस्थित असलेले असीम सरोदे यांनी सांगितले की ही याचिका तत्सम नसून निवडणुकीशी संबंधित आहे. यामुळे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. चुकीचे विधान केल्याबद्दल आम्ही तुमच्यावर दंड लावणार आहोत आणि याचिका फेटाळणार आहोत, असे हायकोर्टाकडून सांगण्यात आले. एखाद्या पक्षकारासाठी अशी चुकीची माहिती देण्यामागे तुमची घाई किंवा भीती काय होती?, असा सवालही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला. शेवटी न्यायालयाने दंड न आकारता ही याचिका फेटाळून लावली.किती नगरसेवक बिनविरोध?राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये मतदान होण्यापूर्वीच ६६ उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणुका बिनविरोध करण्यात भाजपाने आघाडी घेतली असून, भाजपचे ४४ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यापाठोपाठ निवडणुका बिनविरोध करण्यात शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिंदेंच्या शिवसेनेते तब्बल १९ नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. कल्याण-डोंबिवलीत भाजपचे सर्वाधिक १४ उमेदवार तर शिवसेनेचे ६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे २ तर मालेगावमधून इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 2:10 pm

सोन्याचांदीत 'हाहाःकार'सोने १ दिवसात प्रति तोळा १०९० रूपयांने तर चांदी १५००० उसळत २९००० प्रति किलोवर

मोहित सोमण: सलग चौथ्यांदा सोन्यातचांदीत हाहाःकार निर्माण झाला आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील कपातीवरील अनिश्चितता व इराण युएस यांच्यातील तोडगा न निघाल्याने कमोडिटीतील साशंकता कायम आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचांदीच्या स्पॉट फ्युचर बेटिंगमध्ये वाढ केल्याने मोठ्या प्रमाणात सोन्याचांदीच्या दरात आज आणखी एक उच्चांक गाठला गेला आहे. चांदीने तर प्रथमच ९० डॉलर प्रति औंसची पातळी पार केली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात चांदी गेल्या दोन दिवसात २०००० पेक्षा अधिक उसळली असून सोन्यातही प्रति ग्रॅम दरात दोन दिवसात २००० रूपयांपेक्षा तुफान वाढ कायम राहिली आहे. जागतिक अशांततेत ईपीएफ गुंतवणूकीत प्राधान्य मिळत असताना भौतिक कमोडिटीतील मागणीतही सातत्याने वाढ होत आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १०९ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १०० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८२ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १४३६२ रूपयांवर, २२ कॅरेटसाठी १३१६५ रूपये, १८ कॅरेटसाठी १०७७२ रूपयांवर पोहोचले आहेत. तर संकेतस्थळावरील माहितीत, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १०९० रूपयाने, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १००० रूपयाने, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ८२० रुपयाने वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १४३६२०, २२ कॅरेटसाठी १३१६५० रूपये, १८ कॅरेटसाठी १०७७२० रूपयांवर गेला आहे.मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १४३६२ रूपये, २२ कॅरेटसाठी १३१६५ रुपये, १८ कॅरेटसाठी १०७७२ रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) निर्देशांक दुपारी १.३० वाजेपर्यंत ०.७७% वाढ झाली आहे. त्यामुळे दरपातळी १४३३३० रूपयांवर पोहोचली. सकाळच्या सत्रातच जागतिक सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. विशेषतः युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी बैठक घेण्याचे टाळल्यानंतर बाजारात मोठी अस्थिरता वाढली. इराण बरोबर बैठक घेणे अपेक्षित असताना त्यांनी अनुपस्थिती दर्शवित मार्ग निघू शकतो इतकेच म्हटले. त्यामुळे आणखी कमोडिटीतील परिस्थिती अस्थिर राहीली. डॉलर निर्देशांकात किरकोळ घसरण झाल्याने कमोडिटीतील विशेषतः सोन्याच्या चांदीच्या दरात वाढला. एकीकडे युएस फेडरल रिझर्व्ह कुक यांना काढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रयत्न केले असताना ट्रम्प व फेडरल बँकेत खटला सुरू झाला असताना त्यावर आगामी काळात निर्णय अपेक्षित आहे. मात्र एकीकडे रोजगाराची किरकोळ आकडेवारी आल्यानंतर आता युएस अतिरिक्त टॅरिफचे प्रकरण अथवा ट्रम्प यांच्या टॅरिफ विरोधातील जनहित याचिकेवर या आठवड्यातच सुनावणी होणार आहे. त्यामुळे फेड दरात अनिश्चितता कायम राहू शकते त्यामुळे बाजारातील कमोडिटीवर आणखी विपरित परिणाम होत आहे.दुपारी गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.८६% वाढ झाली असून युएस गोल्ड स्पॉट दरात ०.९०% वाढ झाल्याने दरपातळी प्रति डॉलर ४६२५.६० औंसवर गेली आहे. सकाळी सोन्याने १% उसळत ४६४०.१३ औंसचा नवा उच्चांक गाठल्यानंतर सोने आणखी कडाडले. आगामी युएस महागाई दराचे प्रदर्शन लवकरच अपेक्षित असल्याने युएस बाजारातील अनिश्चितता आणखी वाढली.चांदीच्या दरातही नवा विक्रम!याच संबंधित कारणांमुळे व कमी पुरवठ्यामुळे चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा प्रति किलो दरात थेट १५००० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे 'गुडरिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १५ रुपये, व प्रति किलो दरात १५००० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर १९० रुपयांवर गेले असून प्रति किलो दरपातळी २९०००० रूपयांवर पोहोचली आहे. मोठ्या प्रमाणात चांदीच्या जागतिक किंमतीत वाढ होत असताना दुसरीकडे भारतीय सराफा बाजारात मोठी वाढ झाली. संकेतस्थळावरील माहितीनुसार, मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर २९०० रुपयांवर पोहोचले असून प्रति किलो दर २९००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात दुपारपर्यंत थेट ३.५४% वाढ झाली असून दरपातळी २८४९८९ रूपयांवर पोहोचली आहे. जगभरात पहिल्यांदाच चांदीने ९० डॉलर प्रति औंसची पातळी सकाळी पार केली.एकीकडे औद्योगिक क्षेत्रात चांदीच्या मागणीत वाढ झालेली असताना युएस फेडरल रिझर्व्हच्या स्वातंत्र्याबद्दल वाढलेल्या चिंता आणि वाढलेल्या भूराजकीय जोखमींमुळे मौल्यवान धातूंनी नवीन उच्चांक गाठला. फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्याविरुद्ध फौजदारी चौकशीचे अहवाल आणि फेड बँकेवरील वाढत्या राजकीय दबावानंतर सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढली आहे असे तज्ञांचे मत आहे. डिसेंबरमधील रोजगार वाढीचे आकडे अपेक्षेपेक्षा कमी आल्यानंतर अमेरिकेतील व्याजदरात आणखी कपातीची अपेक्षांनीही मौल्यवान धातूंना पाठिंबा दिला होता. प्रत्यक्षात आता नव्या महागाई आकडेवारीची प्रतिक्षा सुरू झाल्याने व वाढलेली भूराजकीय अस्थिरतेच्या कारणांमुळे विशेषतः इराणमधील अशांततेमुळे चांदीच्या दरात आणखी वाढ झाली.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 2:10 pm

बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली; अविनाश जाधवांना फटका

Avinash Jadhav | राज्यातील महापालिका निवडणुकीत उमेदवारांच्या बिनविरोध निवडीवरुन मोठा वाद निर्माण झाला. यावर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आला. याप्रकरणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी याचिका जाहीर केली होती. मात्र अविनाश जाधव यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दरम्यान, सुनावणीसाठी याचिका पुकारण्यात आल्यानंतर ऑनलाईन उपस्थित असलेले असीम सरोदे यांनी, ही याचिका तत्सम […] The post बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली; अविनाश जाधवांना फटका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 1:37 pm

पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्र्यांच्या घरी साजरा केला पोंगल सण ; म्हणाले,”तमिळ ही जगातील सर्वात जुनी संस्कृती”

PM MODI PONGAL।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्लीतील केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन यांच्या निवासस्थानी पोंगल सणात उत्साहात भाग घेतला. पंतप्रधान मोदींनी पारंपारिक पूजा, आरती केली आणि एका गायीला चारा दिला. ते याठिकाणी सुमारे एक तास राहिले. मोदी १ तास केंद्रीय मंत्र्यांच्या घरी थांबले PM MODI PONGAL। केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांच्या […] The post पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्र्यांच्या घरी साजरा केला पोंगल सण ; म्हणाले,”तमिळ ही जगातील सर्वात जुनी संस्कृती” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 1:30 pm

आर्मर सिक्युरिटी इंडिया आयपीओला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद! दुपारपर्यंत केवळ ०.०३ पटीने मिळाले सबस्क्रिप्शन

मोहित सोमण: आजपासून आर्मर सिक्युरिटी इंडिया लिमिटेड (Armour Security India Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल झाला आहे. २६.५१ कोटी मूल्यांकन असलेल्या आयपीओला पहिल्या दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत एकूण ०.०३ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. उपलब्ध माहितीनुसार, सकाळपर्यंत रिटेल गुंतवणूकदारांकडून ०.०५ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ० पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.०२ पटीने सबस्क्रिप्शन आयपीओला मिळाले आहे. माहितीनुसार, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार अथवा एक्स अँकर यांच्याकडून ४६००० शेअरपैकी अद्याप एकही शेअर सबस्क्राईब झाला नसून विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) २१९०००० शेअरसाठी केवळ ३८००० शेअर्ससाठी बिडींग लावण्यात आले आहे. रिटेल गुंतवणूकदारांकडून सर्वाधिक २१८०००० शेअरसाठी १०४००० शेअरचे बिडींग प्राप्त झाले. त्यामुळे एकूण सबस्क्रिप्शन ४४१६००० शेअर्सपैकी १४२००० शेअरचे बिडींग कंपनीला मिळाले आहे. आज १४ जानेवारी ते १९ जानेवारी २०२६ पर्यंत आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला राहणार आहे. यापूर्वी कंपनीने प्राईज बँड ५५ ते ५७ रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे.Sobhagya Capital Options Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून Skyline Financial Services Pvt Ltd कंपनी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. तर मार्केट मेकर म्हणून MMM Securities आयपीओचे काम पाहिल. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान २२८००० शेअरची गुंतवणूक आयपीओत करणे बंधनकारक करण्यात आले आहे म्हणजेच त्यांना एकूण २००० शेअर खरेदी करावे लागतील. २२ जूनला कंपनी एनएसई एसएमई (NSE SME) वर सूचीबद्ध (Listed) होणार आहे.ऑगस्ट १९९९ मध्ये स्थापन झालेल्या आर्मर सिक्युरिटी इंडिया सशस्त्र सुरक्षा रक्षक मनुष्यबळ सेवा आणि सल्लागार सेवांसह विविध प्रकारच्या सुरक्षा सेवा प्रदान करते‌. प्रामुख्याने ज्यामध्ये विविध क्षेत्रांमधील व्यावसायिक आणि निवासी सुरक्षा गरजावर कंपनी पर्याय उपलब्ध करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना सुरक्षा नियोजन आणि व्यवस्थापन सेवांसह एक सर्वसमावेशक खाजगी सुरक्षा सेवा प्रदान करते. कंपनी कॉर्पोरेट, औद्योगिक, बँकिंग, आरोग्यसेवा, सरकारी, शिक्षण आणि विद्यापीठे यांसारख्या क्षेत्रांसाठी अनुरूप अशा वैयक्तिक सुरक्षा कर्मचारी सेवा देखील पुरवते.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर खेळत्या भांडवली गरजेसाठी (Working Capital Requirments), काही थकबाकी चुकती करण्यासाठी व प्रीपेमेंट करण्यासाठी, भांडवली खर्चासाठी (Capital Expenditures) व दैनंदिन कामकाजासाठी (Corporate Purposes) करण्यात येणार असल्याचे कंपनीने यावेळी स्पष्ट केले होते. विनोद गुप्ता व अर्निमा गुप्ता हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ९६.१६ कोटी रुपये आहे.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 1:30 pm

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले आहे. या किरकोळ कारणावरून तीन तरुणांनी एका हिंदू तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे पडसाद उमटताच हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.नेमकं प्रकरण काय आहे ?खरं तर, हे संपूर्ण प्रकरण एका प्रवासी बसमधील प्रवाशांमधील वादाशी संबंधित आहे. इंदूरहून खरगोणकडे येणारी माँ शारदा ट्रॅव्हल्सची प्रवासी बस खलघाट येथील महावीर हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबली. हॉटेलमध्ये एका हिंदू तरुणाने चुकून एका विशिष्ट समुदायाच्या मुलीच्या पायावर पाऊल ठेवले. या वादात, विशिष्ट समुदायाच्या तीन तरुणांनी हिंदू मुलाला मारहाण केली. ही वार्ता पसरताच स्थानिक हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले आणि त्यांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला. संतापलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे संतप्त झालेल्या लोकांनी थेट पोलीस स्टेशनला घेराव घातला. आंदोलकांनी राज्य महामार्ग अडवून धरल्याने दोन्ही बाजूंनी अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलकांनी संबंधित पोलीस स्टेशन प्रभारींना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी लावून धरली. महामार्गावरील हा रास्तारोको रात्री उशिरापर्यंत सुरू होता. कडाक्याच्या थंडीत अनेक किलोमीटर वाहतूक कोंडी झाल्यामुळे बस आणि खाजगी वाहनांमधील प्रवाशांचे, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांचे प्रचंड हाल झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांशी चर्चा करून आणि दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर रात्री ३ च्या सुमारास महामार्ग मोकळा करण्यात आला. सध्या परिसरात शांतता असून पोलीस अधिक तपास करत आहेत.https://prahaar.in/2026/01/14/sabarimala-temple-in-kerala-millions-of-rupees-embezzled-under-the-guise-of-ghee-sales-2026/हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बस थांबवलीबसमधील इतर प्रवाशांनी कसेबसे परिस्थिती शांत केली. हॉटेलपासून बस पुढे जात असतानाच एका हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अरिहंत नगरजवळ ती थांबवली. दोन्ही बाजूंमध्ये वाद झाल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले, ज्यांनी बस कासरावड पोलिस ठाण्यात नेली. पोलिस ठाण्यात झालेल्या चर्चेनंतर, स्टेशन प्रभारी राजेंद्र बर्मन यांनी तरुणांना उतरवले आणि चालकाला बस पुढे नेण्याची परवानगी दिली. बस सोडल्यानंतर हिंदू संघटनेने निषेध केला. ते पोलिस ठाण्यातून बाहेर पडले आणि समोरील जयस्तंभ चौकात जमले. त्यांनी स्टेशन प्रभारी राजेंद्र बर्मन यांच्याविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली.पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केलाजमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. यानंतर कसरावाडमधील परिस्थिती तापली. यानंतर अतिरिक्त एसपी शकुंतला रुहल, एसडीओपी श्वेता शुक्ला यांच्यासह अनेक पोलिस ठाण्यांचे पोलिस दल कारावाड पोलिस ठाण्यात पोहोचले आणि शिष्टमंडळाशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. रात्री ३ वाजेपर्यंत पोलिस ठाण्याच्या आवारात आणि जयस्तंभ चौकात मोठी गर्दी जमली होती. अर्ज सादर केल्यानंतर चौकशी केली जाईल असे अतिरिक्त एसपी शकुंतला रुहल यांनी सांगितले. यानंतर हिंदू संघटनेने सहमती दर्शवली आणि अर्ज सादर केला, त्यानंतर संपूर्ण प्रकरण शांत झाले.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 1:30 pm

मैत्रीच्या दुनियेची पुन्हा सफर! Cocktail 2 चे पहिले मोशन पोस्टर समोर, ‘हे’कलाकार प्रमुख भूमिकेत

Cocktail 2 poster : २०१२ मध्ये कॅाकटेल नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हटक्या कथानकामुळे चित्रपटाने प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवली. गेल्या काही वर्षांपासून कॅाकटेल चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर आता कॅाकटेल चित्रपटाच्या सिक्वलचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पोस्टर पाहिल्यानंतर चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. कॅाकटेलच्या पहिल्या भागात अभिनेता सेफअली खानसोबत […] The post मैत्रीच्या दुनियेची पुन्हा सफर! Cocktail 2 चे पहिले मोशन पोस्टर समोर, ‘हे’ कलाकार प्रमुख भूमिकेत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 1:15 pm

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भगवान अय्यप्पांच्या दर्शनासाठी येणाऱ्या कोट्यवधी भाविकांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या तुपाच्या विक्रीत लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले असून, केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. न्यायालयाने राज्य दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (VACB) या प्रकरणाच्या तळाशी जाऊन एका महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. हा घोटाळा नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ च्या दरम्यान घडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मंदिराच्या दक्षता अधिकाऱ्यांनी केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षणात (Audit) पैशांची मोठी तफावत दिसून आली. या प्रकरणी त्रावणकोर देवस्वम बोर्डाचे (TDB) काउंटर इन्चार्ज सुनील पोटी यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. भाविकांना दिल्या जाणाऱ्या 'आथिया षष्ठम' प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या हिशेबात ही गडबड झाली आहे.https://prahaar.in/2026/01/14/mumbai-harbour-line-gets-ac-local-from-jan-26-travel-between-csmt-panvel-coo/असे आहे घोटाळ्याचे गणितसबरीमाला मंदिरात भाविक नारळ आणि तूप अर्पण करतात, ज्याची पुनर्विक्री बोर्डाद्वारे १०० मिलीच्या पॅकेटमध्ये केली जाते. प्रत्येक पॅकेटची किंमत १०० रुपये निश्चित आहे.विक्रीसाठी आलेली पाकिटे : १७ नोव्हेंबर ते २६ डिसेंबर २०२५ दरम्यान ३,५२,०५० पाकिटे पॅक केली गेली.विक्रीची नोंद : मराठमठ इमारतीतील काउंटरवरून ८९,३०० पाकिटांची विक्री झाल्याचे दाखवण्यात आले.रुपयांचा हिशेब : नियमानुसार ८९,१२९ पाकिटांचे पैसे जमा व्हायला हवे होते. मात्र, कर्मचाऱ्यांनी केवळ ७५,४५० पाकिटांचीच रक्कम जमा केली.अपहार : तब्बल १३,६७९ पाकिटांचे पैसे, म्हणजेच अंदाजे १३ लाख ६७ हजार ९०० रुपये तिजोरीत जमा झालेच नाहीत.न्यायालयाची कडक टिप्पणीउच्च न्यायालयाने या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले की, इतक्या कमी कालावधीत झालेली ही तफावत केवळ हिशेबातील चूक असू शकत नाही. यामागे मोठे षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंत्राटदाराला पाकीट बनवण्यासाठी मिळणारे २० पैसे आणि बोर्डाचे साहित्य असतानाही झालेला हा अपहार चिंताजनक आहे. आता या घोटाळ्याचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत आहेत, हे दक्षता विभागाच्या चौकशीनंतर स्पष्ट होईल.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 1:10 pm

रेल्वे प्रवासासाठी ६% सवलत आजपासूनच लागू! लगेच रेलवन ॲप डाऊनलोड करा

मुंबई: रेल्वे प्रवाशांसाठी आज आनंदाची बातमी आहे. आज १४ जानेवारीपासून रेलवन ॲप डाऊनलोड केल्यास तिकीटावर एकूण ६% सवलत (Discount) मिळणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत रेल्वे तिकीट खरेदी केल्यास त्यावर ३% सवलत मिळणारच आहे परंतु ते पैसे रेल वन वॉलेटमधून दिल्यास अधिकची ३% सवलत प्रवांशाना मिळणार असल्याने एकूण ६% सवलत मिळू शकते. रेल्वेने या संदर्भात महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे की ही सवलत केवळ रेल वन ग्राहकांसाठीच आहे इतर कुठल्याही ॲप अथवा संकेतस्थळावर ही ऑफर उपलब्ध नाही. ही ऑफर सहा महिन्यांसाठी उपलब्ध असून १४ जुलैपर्यंत वैध असणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. रेल्वेने या विषयी ३० डिसेंबर २०२५ रोजी या ऑफरचे सादरीकरण केले होते. आजपासून ती लागू होणार आहे.मुख्यतः रेल्वे स्थानकावरील तिकीटसाठी रांगा कमी व्हाव्यात व डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हे इंटिग्रेटेड व्यासपीठ रेल्वे प्रवाशांसाठी बनवण्यात आले आहे. या रेल वनमधून आरक्षित व विना आरक्षित तिकीटे खरेदी करण्यासाठी सुविधा असून उपनगरीय व लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी तिकिट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच व्हॅल्यु अँडेड फूड ऑर्डरसारख्या सुविधाही या व्यासपीठात उपलब्ध असतील. यापूर्वी युटीएस हे अँप सरकारने तिकिट बुकिंगसाठी काढले असले तरी ते तांत्रिक कारणामुळे बंद करण्यात येत असून रेल वन हे ३६० डिग्री इंटिग्रेटेड व्यासपीठाचा पाया रेल्वेने रोवला आहे.रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रेलवन हे एक 'वन-स्टॉप सोल्युशन' आहे. या अँप अंतर्गत एकाच छताखाली सगळ्या सुविधा प्रवाशांना मिळतील. अँड्रॉइड आणि आयओएसवर विनामूल्य प्रवासी डाउनलोड करू शकतात. तिचा इंटरफेस खूप सोपा आणि सोयीस्कर आहे. एकदा लॉग इन केल्यानंतर,mPIN किंवा बायोमेट्रिक वापरून) सगळ्या इंटिग्रेटेड सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. रेलवन ॲप ट्रेन अलर्ट, पीएनआर स्थिती अपडेट्स, बुकिंगचे कन्फर्मेशन आणि तक्रारींच्या स्थितीसाठी (Status Updates) रिअल-टाइम सूचना प्रदान करते. यामुळे प्रवाशांना सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळेवर मिळतील याची खात्री होते.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 1:10 pm

“मुलं जन्माला घालणं, स्वयंपाक करणं…”! उत्तर भारतीय मुलींबद्दल द्रमुक खासदाराच्या विधानाने गोंधळ ; भाजपचा हल्लाबोल

Dayanidhi Maran। द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी उत्तर भारतीय महिलांची तुलना तामिळनाडूच्या महिलांशी केल्याच्या विधानामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. चेन्नई सेंट्रलचे चार वेळा खासदार राहिलेल्या मारन यांनी, “तामिळनाडूमध्ये महिलांना शिक्षण घेण्यास सांगितले जाते, तर उत्तर भारतात त्यांना “स्वयंपाकघरात काम करून मुले जन्माला घालण्यास सांगितले जाते.” असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यांचे विधान काय होते? Dayanidhi […] The post “मुलं जन्माला घालणं, स्वयंपाक करणं…”! उत्तर भारतीय मुलींबद्दल द्रमुक खासदाराच्या विधानाने गोंधळ ; भाजपचा हल्लाबोल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 12:57 pm

मुंबईतील रेल्वे अपघातात 26,500 जणांचा मृत्यू, ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद, “हिच काय आमच्या जिवाची किंमत?”अमित ठाकरेंचा सवाल

Amit Thackeray on Devendra Fadnavis | राज्यातील महापालिकांच्या प्रचार सभांदरम्यान अनेक राजकीय नेतेमंडळींकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्यातील काही समस्या निदर्शनास आणून त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अमित ठाकरे यांनी आपल्या व्हिडिओमधून शेतकरी आत्महत्या, महागाई, महिला सुरक्षा, प्रदूषण आणि राजकारणामध्ये झालेला विकृतपणा यावर भाष्य […] The post मुंबईतील रेल्वे अपघातात 26,500 जणांचा मृत्यू, ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद, “हिच काय आमच्या जिवाची किंमत?” अमित ठाकरेंचा सवाल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 12:46 pm

भारतातील ८४% प्रोफेशनल्‍सना वाटते की, ते २०२६ मध्‍ये रोजगार शोधण्‍यासाठी पूर्णपणे सुसज्‍ज नाहीत: लिंक्‍डइन

प्रतिनिधी: एकूण रोजगार बाजारातील परिस्थितीत स्थित्यंतरे होत असताना, लिंक्‍डइन इंडियाने एक अनोखा अहवाल बाजारात सादर केला आहे. भारतातील ८४% रोजगार शोधत असलेल्या लोकांना अथवा प्रोफेशनल्‍सना वाटते की ते नवीन रोजगार शोधण्‍यासाठी पूर्णपणे सुसज्‍ज नाहीत तर ७२% प्रोफेशनल्‍स म्‍हणतात की ते २०२६ मध्‍ये सक्रियपणे नवीन रोजगाराचा शोध घेत आहेत. हायरिंग प्रक्रियेमध्‍ये एआयचा वाढता वापर आजच्‍या रोजगारांसाठी आवश्‍यक असलेल्‍या कौशल्‍यांमध्‍ये झपाट्याने होत असलेले बदल आणि मोठ्या प्रमाणात स्‍पर्धात्‍मक, पण निवडक रोजगार बाजारपेठेदरम्‍यान ही माहिती निदर्शनास आली आहे. जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क लिंक्‍डइन (LinkedIn) च्‍या नवीन संशोधनामधून निदर्शनास येते की,अनेक प्रोफेशनल्‍सना एआयवर अवलंबून असलेल्या हायरिंग प्रक्रियेमध्‍ये अयशस्‍वी ठरणार असे वाटते. ८७% प्रोफेशनल्‍सना कामाच्‍या ठिकाणी एआयचा वापर करणे कम्फर्ट वाटते, तर अनेकांना हायरिंगमध्‍ये एआयचा वापर करण्‍याबाबत खात्री नाही. ७७% प्रोफेशनल्‍स म्‍हणतात की प्रक्रियेमध्‍ये खूप टप्‍पे आहेत, तर ६६% प्रोफेशनल्‍सना ते मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानावर अवलंबून असल्‍यासारखे वाटते. रिक्रूटरकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा कालावधी आणि अभिप्रायाचा अभाव यामुळे उमेदवारावात अस्वस्थता वाढते व अधिक अस्‍वस्‍थ बनवते असाही निष्कर्ष अहवालाने स्पष्ट केला आहे. त्यामुळेच सर्व पिढ्यांमधील प्रोफेशनल्‍सना त्‍यांचा अर्ज इतरांपेक्षा वरचढ कसा ठरवावा याबाबत समान संघर्ष करावा लागत आहे. अहवालानुसार ४८% प्रोफेशनल्‍सनी मान्‍य केले आहे.लिंक्‍डइन संशोधनामधून निदर्शनास येते की, भारतातील प्रोफेशनल्‍सना एआय उत्‍पादकता वाढवणारे नाही तर आत्‍मविश्वास निर्माण करणारे साधन बनले आहे. ९४% प्रोफेशनल्‍स त्‍यांच्‍या रोजगार शोधामध्‍ये एआयचा वापर करण्‍याचे नियोजन करत आहेत आणि ६६% प्रोफेशनल्‍स म्हणतात की, यामुळे त्‍यांचा मुलाखतीदरम्‍यान आत्‍मविश्वास वाढला आहे. जवळपास ७६% रिक्रुटर म्हणत आहेत की, गेल्‍या वर्षभरात नवीन रोजगार शोधणे अधिक आव्‍हानात्‍मक बनले आहे.लिंक्‍डइन डेटामधून निदर्शनास येते की २०२२ च्या सुरुवातीपासून भारतात प्रत्येक उपलब्ध नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे ज्यामुळे स्पर्धा तीव्र झाली असून अनेक उमेदवारांमध्ये आपण या स्पर्धेसाठी तयार नसल्याची भावना निर्माण झाली आहे. फक्‍त रोजगार शोधणाऱ्यांवर हा दबाव आहे असे नाही. भारतातील जवळपास ७४% रिक्रूटर्स म्हणतात की, गेल्या एका वर्षात पात्र उमेदवार शोधणे अधिक आव्‍हानात्‍मक झाले आहे.या आव्‍हानामुळे करिअरचे मार्ग बदलत आहेत. जवळपास एक-तृतीयांश (३२%) जनरेशन एक्स नोकरीसाधक नवीन कार्यक्षेत्रे किंवा रोजगारांचा विचार करत आहेत, तर ३२% जनरेशन झेड तरुण त्यांच्या सध्याच्या क्षेत्राबाहेर नोकरी शोधत आहेत. तसेच अनेक व्‍यक्‍ती पारंपारिक नोकऱ्यांच्या पलीकडे जाऊन उद्योजकतेकडे वळत आहेत, ज्यामुळे लिंक्डइनवर संस्थापक हे पद वेगाने वाढताना दिसत आहे.लिंक्‍डइन करिअर तज्ञ आणि लिंक्‍डइन इंडिया न्‍यूजच्‍या वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापकीय संपादिका निरजिता बॅनर्जी म्‍हणाल्‍या आहेत की, एआय आज भारतातील रोजगार बाजारपेठेत करिअर घडवण्‍याच्‍या आणि प्रतिभावान व्‍यक्‍तीचे मूल्‍यांकन करण्‍याच्‍या पद्धतीचा पाया बनले आहे. प्रोफेशनल्‍सना त्‍यांच्‍या कौशल्‍यांमधून योग्‍य संधी कशाप्रकारे मिळेल आणि हायरिंग निर्णय कशाप्रकारे घेतले जातात हे स्‍पष्‍टपणे समजणे गरजेचे आहे. उद्देशासह वापर केल्‍यास एआय टूल्‍स तफावतीला दूर करू शकतात, तसेच व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍यासाठी योग्‍य असलेले रोजगार ओळखण्‍यास मदत करू शकतात, उद्देशासह सुसज्‍ज करू शकतात आणि सर्वात महत्त्वपूर्ण ठिकाणी त्‍यांच्‍या ज्ञानाचा वापर करण्‍यास मार्गदर्शन करू शकतात. यासंदर्भात लिंक्‍डइनवर नोकरी व नियोक्‍त्‍यांना (Employers) काळाची गरज ओळखून एकत्र येण्‍यास मदत करते.'दुसरीकडे स्‍पर्धा वाढत असताना लिंक्‍डइन जॉब्‍स ऑन द राइज कोणते रोजगार किंवा भूमिका वाढत आहेत, हे निदर्शनास आणतेरिक्रूटर्सला २०२६ मध्ये मदत करण्‍यासाठी लिंक्‍डइनचा जॉब्‍स ऑन द राइज अहवाल गेल्‍या ३ वर्षांमध्‍ये झपाट्याने विकसित झालेल्‍या पदाचे महत्व निदर्शनास आणतो. यंदाच्‍या लिस्‍टमध्‍ये प्रॉम्‍प्‍ट इंजीनिअर (#1), एआय इंजीनिअर (#2) आणि सॉफ्टवेअर इंजीनिअर (#3) ही पदे आघाडीवर आहेत असून ज्‍यामधून एआय व टेक टॅलेंटसाठी स्थिर मागणी दिसून येते. प्‍युअर टेक व्‍यतिरिक्‍त रँकिंग्‍जमधून विक्री व ब्रँड धोरण, सायबरसुरक्षा व सल्‍लागार कार्यक्षेत्रांमधील उत्तम मागणी दिसून येते. तसेच पशुवैद्य, सोलर सल्‍लागार व बीहेविरल थेरपीस्‍ट अशा पदांसाठी मागणी देखील वाढत आहे असेही पुढे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.लिंक्‍डइनचे एआय टूल्‍स रोजगार शोधण्यासाठी आणि सुयोग्‍य नोकरी मिळण्‍याच्‍या प्रक्रियेमध्‍ये सुधारणा करत आहेत असेही निरिक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे. लिंक्‍डइन एआय टूल्‍सची व्‍यापक श्रेणी देखील उपलब्धता वाढवते. एआय संबंधित जॉब सर्च जे सदस्‍यांना त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या भाषेमध्‍ये रोजगार शोधण्‍यास आणि कधीच विचार न केलेल्‍या पदांचा शोध घेण्‍यास मदत करते. तसेच हे टूल आता जागतिक स्‍तरावर इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, स्‍पॅनिश आणि पोर्तुगीज या भाषांमध्‍ये सादर करण्‍यात येत आहे.जागतिक स्‍तरावर १.३ दशलक्षहून अधिक सदस्‍य दररोज या टूलचा वापर करत आहेत आणि दर आठवड्याला २.५ दशलक्षहून अधिक सदस्‍य नवीन रोजगाराचा शोध घेत ओहत. याविषयी प्रकाश टाकताना लिंक्‍डइन अहवालात म्हटले गेले आहे की,'संबंधित पदांचा शोध घेतल्‍यानंतर तुम्‍ही लिंक्‍डइनच्‍या जॉब मॅच वैशिष्‍ट्याचा वापर करत कोणते पद तुमची कौशल्‍ये व पात्रतांनुसार आहे हे पाहू शकता ज्‍यामुळे तुम्‍ही तुमच्‍यासाठी योग्‍य असलेल्‍या पदाकरिता अर्ज करू शकता आणि त्‍या पदासाठी निवड होण्‍याची शक्‍यता अधिक असू शकते.'अहवालानुसार,व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या रोजगार शोधामध्‍ये मदत करण्‍यासाठी लिंक्‍डइन करिअर एक्‍स्‍पर्ट टिप्‍स काय आहेत? आत्‍मविश्वासाने रोजगाराचा शोध घ्‍या: कृतीशील सल्‍लाआमचे टूल्‍स वापरण्‍यासंदर्भात मार्गदर्शन, मोफत कोर्सेसची उपलब्‍धता अशा सुविधेसाठी linkedin.com/jobsearchguide येथे भेट द्या.काळाची गरज ओळखा: रोजगार बाजारपेठ झपाट्याने बदलत आहे, म्‍हणून सुसज्‍ज राहण्‍यासोबत कृती करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. तुमच्‍या क्षेत्रातील ट्रेण्‍ड्स पाहण्‍यासह सुरूवात करा आणि तुम्‍हाला पाहिजे असलेल्‍या नवीन रोजगाराबाबत विचार करा. तुम्‍हाला नवीन रोजगार मिळण्‍यास मदत करणारी कौशल्‍ये ओळखा आणि आजच धाडसी पाऊल उचलत आत्‍मविश्वासाने पुढे जा.तुमच्‍या रोजगार शोधामध्‍ये एआयचा उत्तमपणे वापर करा: एआय रोजगार शोधणे, रिक्रूटर्सकडून होणारी प्राथमिक चाचणी आणि मुलाखतीसाठी तयारी अशा रोजगार शोधाच्‍या प्रत्‍येक भागाला आकार देत आहे. लहान बाबीपासून सुरूवात करणे महत्त्वाचे आहे. योग्‍य पदासाठी तुमच्‍या शोधाला गती देण्‍यासाठी लिंक्‍डइनच्या जॉब मॅच टूलचा वापर करून पाहिला तर?तुमचे प्रोफाइल अद्ययावत ठेवा:अनेकदा नियोक्‍ते (Employers) प्रथम तुमचा प्रोफाइल पाहतात. तुमची कौशल्‍ये व अनुभव अद्ययावत असण्‍यासोबत स्‍पष्‍टपणे निदर्शनास येतील याची खात्री घ्‍या आणि कामाचे ठिकाण, नियोक्‍त्‍यांमध्‍ये विश्वास निर्माण करण्‍यासाठी ओळख अशी माहिती तपासा. हे तुम्‍हाला स्‍पर्धेमध्‍ये पुढे राहण्‍यास महत्त्वाचे ठरेल.टॉप चॉईस रोजगाराची नोंद करा: तुम्‍ही प्रीमियम सबस्‍क्रायबर असाल तर ईजी अप्‍लायच्‍या माध्‍यमातून अर्ज करताना टॉप चॉईस म्‍हणून रोजगाराची नोंद करा, ज्‍यामुळे रिक्रूटर्सना त्‍यांनी पोस्‍ट केलेल्‍या रोजगारामध्‍ये तुम्‍हाला रूची असल्‍याचे समजू शकते. टॉप चॉईस निवडल्‍याने रिक्रूटरकडून संदेश मिळण्‍याची शक्‍यता ४३% आहे.तुमच्‍या नेटवर्कचा आधार घ्‍या: तुमचे नेटवर्क शक्तिशाली साधन आहे. पोस्‍ट्स टाकणे, कमेंट करणे किंवा प्रत्‍यक्ष संपर्क साधणे यामुळे तुम्‍हाला पाठिंबा मिळू शकतो, संधी वाढू शकतात आणि तुम्‍हाला अपेक्षा नसलेले रोजगाराच्‍या संधी खुल्‍या होऊ शकतात. लिंक्‍डइनचे नवीन एआय-समर्थित पीपल सर्चचा वापर करा, सोप्‍या भाषेमध्‍ये व्‍यक्‍तींचा शोध घ्‍या आणि तुमच्‍या नेटवर्कची क्षमता वाढवा.नवीन संधी शोधा: लिंक्‍डइनच्‍या जॉब्‍स ऑन द राइजमध्‍ये झपाट्याने वाढत असलेल्‍या पदांचा शोध घ्‍या, जेथे कृतीशील माहिती प्रोफेशनल्‍सना त्‍यांचा नवीन रोजगार शोधण्‍यास, तसेच प्रमुख कौशल्‍ये, हायरिंग हॉटस्‍पॉट्स, माहितीपूर्ण संसाधने, उपलब्‍ध रोजगारांसाठी लिंक्‍स अशा सुविधांसह मदत करतात.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 12:30 pm

Harbour Line Gets AC Local : हार्बरच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! २६ जानेवारीला धावणार पहिली एसी लोकल, प्रवास होणार गारेगार

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक मोठी आणि सुखद बातमी समोर आली आहे. मुंबईत दररोज लाखो प्रवासी मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीन मुख्य मार्गांवरून प्रवास करत असतात. मात्र, आत्तापर्यंत केवळ मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनाच वातानुकूलित (AC) लोकलची सुविधा मिळत होती. हार्बर मार्गावरील प्रवासी गेल्या अनेक दिवसांपासून या सुविधेच्या प्रतीक्षेत होते, पण आता त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मुंबई आणि उपनगरातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी हार्बर रेल्वे हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या तुलनेत हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना आधुनिक सोयी-सुविधांपासून काहीसे लांब राहावे लागत होते. उन्हाळा आणि गर्दीच्या काळात उष्णतेचा सामना करणाऱ्या प्रवाशांनी सातत्याने एसी लोकलची मागणी केली होती. प्रशासनाने आता या मागणीची दखल घेतली असून, हार्बर रेल्वेवरही लवकरच वातानुकूलित लोकल धावणार असल्याची चिन्हे आहेत. एसी लोकल सुरू झाल्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुखकर होईल. कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि पर्यटकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या मार्गावर तांत्रिक चाचण्या आणि वेळापत्रकाचे नियोजन सुरू असून, लवकरच अधिकृतरीत्या ही सेवा प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल, अशी दाट शक्यता आहे. यामुळे हार्बर लाईनवरील प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.https://prahaar.in/2026/01/14/84-of-professionals-in-india-believe-they-are-not-fully-equipped-to-find-employment-in-2026-linkedin/हार्बरच्या ट्रॅकवर आता 'थंडगार' प्रवासगेल्या अनेक वर्षांपासून वातानुकूलित (AC) लोकलची वाट पाहणाऱ्या हार्बरच्या प्रवाशांचे स्वप्न अखेर पूर्ण होत असून, २६ जानेवारीपासून या मार्गावर पहिली एसी लोकल अधिकृतपणे धावणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेनंतर आता हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही रेल्वे प्रशासनाकडून हे विशेष गिफ्ट मिळाले आहे. ही नवीन एसी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल या मुख्य मार्गावर चालवली जाणार आहे. सोमवार ते शनिवार या कालावधीत ही लोकल प्रवाशांच्या सेवेत असेल. विशेष म्हणजे, दररोज या लोकलमधून एकूण १४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये अप दिशेने ७ आणि डाऊन दिशेने ७ अशा प्रत्येकी ७ फेऱ्या धावणार असल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या एसी लोकलची सुविधा केवळ पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरच उपलब्ध होती. हार्बर रेल्वेचे प्रवासी केवळ साध्या लोकलवर अवलंबून असल्याने उन्हाळ्यात आणि गर्दीच्या वेळी त्यांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत होता. मात्र, आता २६ जानेवारीपासून हार्बर मार्गाचाही चेहरामोहरा बदलणार असून प्रवाशांना 'गारेगार' प्रवासाची अनुभूती घेता येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई आणि दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या या मार्गावरील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.वेळापत्रक कसं असणार ?चेन्नईहून मुंबईत दाखल झालेली अत्याधुनिक एसी लोकल आता खास हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. मध्य रेल्वेच्या ऑपरेशन विभागाने पाठवलेला प्रस्ताव मान्य झाल्याने २६ जानेवारीपासून हार्बरच्या रुळांवर एसी लोकलचा गारवा धावणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही एसी लोकल केवळ सीएसएमटी ते पनवेल मर्यादित न राहता वाशी ते वडाळा रोड, पनवेल ते वडाळा रोड आणि पनवेल ते सीएसएमटी अशा विविध टप्प्यांवर प्रवाशांना सेवा देणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रात्रीच्या फेऱ्यांचे नियोजनही करण्यात आले आहे. अप मार्ग: पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) दिशेने शेवटची एसी लोकल संध्याकाळी ६ वाजून ३७ मिनिटांनी सुटेल. डाऊन मार्ग: सीएसएमटी येथून पनवेलच्या दिशेने जाणारी शेवटची एसी फेरी रात्री ८ वाजता रवाना होईल. ही नवीन ट्रेन प्राधान्याने हार्बर मार्गावरच चालवण्याचा आग्रह ऑपरेशन विभागाने धरला होता, ज्याला आता वरिष्ठ पातळीवरून मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे हार्बर लाईनवरील प्रवाशांचा प्रवास केवळ सुखकरच होणार नाही, तर कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना रात्रीच्या वेळीही वातानुकूलित प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. २६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या सेवेमुळे हार्बर रेल्वेच्या इतिहासात एक नवे पान जोडले जाणार आहे.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 12:30 pm

क्विक कॉमर्सवरील निर्णयानंतर स्विगीसह इतर शेअर्समध्ये घसरण मात्र झोमॅटो शेअरमध्ये वाढ का? तर 'हे'आहे कारण

मोहित सोमण: काल केंद्र सरकारने १० मिनिटात होम डिलिव्हरीला लाल सिग्नल दाखवल्यानंतर सुरुवातीला क्विक कॉमर्स कंपनीच्या शेअर्समध्ये किरकोळ घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रात स्विगी शेअर्समध्ये २% घसरण इंट्राडे झाली असताना मात्र सकाळच्या सत्रात इटर्नल (Zomato) शेअरमध्ये १% पातळीवर काही काळानंतर वाढ झाली आहे. दरम्यान एफएसएन इ कॉमर्स (FSN E Commerce) शेअरमध्येही १% पातळीवर घसरण झाली.सहाजिकच इतर महत्वाच्या शेअर्समध्ये घसरण झाली असताना इटर्नल शेअरमध्ये वाढ का झाली हा प्रश्न स्वाभाविक आहे.काल शेअर्समध्ये विश्लेषकांनी इटर्नल शेअरमध्ये बुलिश पॅटर्न दाखवल्याने आज शेअरविषयी सकारात्मकता निर्माण झाली. त्यामुळे कालच्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतरही कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. Stockedge.com कंपनीने आपल्या डेटा पँटर्नमध्ये कंपनीच्या शेअरला आरएसआय (Relative Strength Index RSI) ५० पातळीपेक्षा अधिक झाल्याचे दाखवले होते. कंपनीच्या आगामी तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर ही उत्सुकता निर्माण झाल्याने कंपनीचा बुलिश पॅटर्न कायम राहिला असला तरी युबीएस (UBS) ब्रोकरेज कंपनीने शेअरला बाय कॉल दिल्याने शेअरला आणखी मागणी निर्माण झाली.ब्रोकरेजने पुढील दोन ते तीन वर्षांसाठी इटरनलसाठी समायोजित ईबीटा (Adjusted EBITDA) अंदाजांमध्ये १०-१८% आणि स्विगीसाठी १२-२८% कपात नोंदवली आहे. तरीही कंपनीने म्हटले आहे की, शेअरच्या किमतींमधील अलीकडील घसरण असली तरीही मजबूत वाढीचा दृष्टिकोन यामुळे ते या क्षेत्राबद्दल सकारात्मक आहेत.त्यामुळे एकीकडे वाढ झालेली असताना ब्रोकरेज फर्मने क्विक कॉमर्स क्षेत्रावरील आपल्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांत स्पर्धा तीव्र झाली आहे आणि नेटवर्क विस्तार सुरू असतानाही सवलतींचे प्रमाण वाढले आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, फूड डिलिव्हरी क्षेत्राची वाढ सुधारत आहे, तर या क्षेत्रातील स्पर्धा साधारणपणे स्थिर आहे. एकंदरीतच ३३ विश्लेषकांनी इटरनलवर विश्लेषण केले आहे, त्यापैकी २९ जणांनी 'बाय' (खरेदी) रेटिंग दिले आहे, तर चौघांनी 'सेल' (विक्री) करण्याची शिफारस केली आहे.इटर्नलचा शेअर गेल्या ५ दिवसात ५.५६% उसळला असून गेल्या महिनाभरात शेअर ०.५०% कोसळला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये २७.१२% वाढ झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) कंपनीच्या शेअर्समध्ये ५.३८% वाढ नोंदवली आहे. सकाळच्या सत्रात इतर शेअर्समध्ये दुपारी १२.२० वाजेपर्यंत ब्रेनबीज सोलूशन (०.४१%), पेटाईम कम्युनिकेशन (२.८७%) समभागात वाढ झाली असून एफएसएन इ कॉमर्स शेअरमध्ये घसरण झाली आहे.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 12:30 pm

भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानी भीषण आग ; अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल

Bjp leader Ravi shankar prasad। माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या दिल्लीतील घरी आग लागली. बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांचे घर २१, मदर टेरेसा क्रेसेंट रोड, दिल्ली याठिकाणी आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे वृत्त आहे. मात्र, नुकसानीचे प्रमाण […] The post भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानी भीषण आग ; अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 12:28 pm

‘टॅाक्सिक’च्या ट्रेलरची चर्चा! यशसोबत इंटिमेट सीन देणारी नताली बायर्न कोण?

Natalie Burn : केजीएफ आणि केजीएफ दोननंतर आता रॅाकिंग स्टार यश त्याच्या बहुचर्चित ‘टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ चित्रपटासाठी सज्ज आहे. नुकताच या चित्रपटाचा अंगावर काटा आणणार ट्रेलर प्रदर्शित झाला. यू ट्यूबवर पहिल्या चौवीस तासातच ट्रेलरने धुमाकूळ घातला. या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या एका इंटीमेट सीनची सर्वाधिक चर्चा होत आहे. हा इंटिमेट सीन कारमध्ये दाखवण्यात […] The post ‘टॅाक्सिक’च्या ट्रेलरची चर्चा! यशसोबत इंटिमेट सीन देणारी नताली बायर्न कोण? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 12:14 pm

भीषण अपघात ! खालून जाणाऱ्या रेल्वेवर बांधकामाची क्रेन कोसळली ; २२ जणांचा जागीच मृत्यू

Crane Collapse on Train। थायलंडमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. थायलंडची राजधानी बँकॉकच्या ईशान्येकडे जाणाऱ्या एका रेल्वेवर एक बांधकामाची क्रेन कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. क्रेन डब्यांवर कोसळल्याने ट्रेन रुळावरून घसरली. या भीषण अपघातात किमान २२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यासोबतच या अपघातात ७९ हून अधिक जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात […] The post भीषण अपघात ! खालून जाणाऱ्या रेल्वेवर बांधकामाची क्रेन कोसळली ; २२ जणांचा जागीच मृत्यू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 12:07 pm

इराणमधील परिस्थिती अत्यंत गंभीर ! मृतांचा आकडा २५०० च्या पुढे ; सध्याच्या परिस्थिती कशी आहे? जाणून घ्या

Iran Protest। मागच्या २८ डिसेंबरपासून सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमध्ये इराणमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या मते, “आतापर्यंत २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर काही अहवालांनुसार हा आकडा २,५०० हून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी सरकारला कडक इशारा देत, निदर्शकांची हत्या सहन केली जाणार नाही […] The post इराणमधील परिस्थिती अत्यंत गंभीर ! मृतांचा आकडा २५०० च्या पुढे ; सध्याच्या परिस्थिती कशी आहे? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 11:46 am

भूमी पेडणेकरने 40 किलो वजन कसे कमी केले? सांगितला ‘तो’खडतर प्रवास

Bhumi Pednekar | बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया किंवा औषधांसारख्या शॉर्टकट्सचा वापर करतात. याबाबत आता अभिनेत्री भूमि पेडणेकरने आपल्या फिटनेसचा खरा अर्थ उघड केला आहे. तसेच औषधांच्या मदतीने वजन कमी करण्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. भूमी पेडणेकरने नुकतीच सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या फिटनेस जर्नीबाबत सांगितले. ती […] The post भूमी पेडणेकरने 40 किलो वजन कसे कमी केले? सांगितला ‘तो’ खडतर प्रवास appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 11:41 am

गोड बोलण्याचे सामर्थ्य

निशा वर्तकतीळगूळ घ्या, गोड बोला’ ही केवळ एक म्हण नाही; तो आपल्या संस्कृतीचा गाभा आहे, जीवनाला दिलेला एक प्रेमळ सल्ला आहे.गोड बोलणे ही एक कला आहे. काही जणांकडे ती जन्मजात असते, तर काहींना ती प्रयत्नाने मिळवावी लागते. पण संत सांगतात तसे “ठरविले तर साध्य होते”. मनाने ठरवले, तर गोड बोलणे अशक्य नाही. गोड बोलणे हा एक संस्कार आहे, एक संस्कृती आहे; तर कडू बोलणे ही एक विकृती आहे, जी मनालाही कुरतडते आणि नात्यांनाही पोखरते.गोड बोलण्याचे अमाप फायदे आहेत. असं म्हणतात ना “गोड बोलेल तो जग जिंकेल.” खरंच, ज्याचे बोलणे गोड, त्याचे जीवनही गोड होते. घरातसुद्धा जर आपण एकमेकांना समजून घेऊन, थोड्या खालच्या आवाजात, प्रेमाने बोललो, तर त्या घरात आपोआप शांती नांदते. लहान मुलांनाही प्रेमाने समजावून सांगितले, तर ती ऐकतात; पण ओरडून, रागावून सांगितले, तर ती बंडखोर होतात. शब्दांमध्ये जर मायेची ऊब असेल, तर मन आपोआप वाकते.गोड बोलण्याने आपली कितीतरी कामे सहज होतात. व्यवहारात तर गोड बोलण्याला फारच महत्त्व आहे. एखाद्या सेल्समनला आपली वस्तू विकायची असेल, तर त्याला गिऱ्हाईकाच्या मनाची भाषा समजून, गोडच बोलावे लागते. तेव्हाच व्यवहार जुळतो, विश्वास निर्माण होतो.याच गोड बोलण्याची ताकद मला माझ्या सासूबाईंच्या अनुभवातून प्रकर्षाने जाणवली. त्यांना जेव्हा कधी बरे वाटायचे नाही, तेव्हा त्या हमखास म्हणायच्या,“मला त्या अमुक डॉक्टरांकडे घेऊन चल, मला लगेच बरं वाटेल.”आणि खरंच, त्या डॉक्टरांकडे गेल्यावर ते त्यांचा हात धरून, हसत म्हणायचे,“आजी, काही झालेलं नाही तुम्हाला. हे एक दिवसाचं औषध घ्या, लगेच बरं वाटेल.”आणि खरंच, त्यांना बरं वाटायचं. औषधापेक्षा त्यांच्या शब्दांतली सकारात्मकता अधिक प्रभावी असायची. संत म्हणतात तसे “शब्दही औषध असतात.”गोड बोलण्याचा आणखी एक अनुभव मला रिक्षावाल्याबाबत आला. एकदा मार्केटमध्ये असताना माझा पाय मुरगळला. वेदना खूप होत होत्या. एकही रिक्षावाला थांबेना. मनात राग उसळत होता, असहाय्यपणाची जाणीव होत होती. शेवटी एक रिक्षावाला थांबला.मी त्याला म्हणाले, “बामणवाड्याला घ्या.”तो म्हणाला, “ताई, तिकडे नाही येणार, चकाल्याला सोडतो.”मनात संताप उफाळून आला, पण मी स्वतःला सावरले. संतवाणी आठवली “रागाने पेटलेले शब्द विझवतात, प्रेमाने बोललेले शब्द उजळवतात.”मी शांतपणे म्हणाले, “बरं बाबा, तिथेच सोड. तुम्ही थांबलात, हेच माझं नशीब. तिथून हळूहळू चालत जाईन.” तेवढ्यात त्याचं मन बदललं. तो माझ्याशी गप्पा मारू लागला, त्याच्या अडचणी सांगू लागला, मी कशी पडले हे विचारू लागला आणि चकाल्याला आल्यावर तो म्हणाला, “ताई, मी तुम्हाला घरापर्यंत सोडतो.”आणि खरंच, त्याने मला थेट गेटपर्यंत सोडले. गोड बोलण्याची ताकद अशी असते, समोरच्याचं मन बदलते, अंतर मिटते, माणुसकी जागी होते.पण काही लोकांना गोड बोलताच येत नाही. ते कायम वाकड्यात, टोचून बोलतात. शब्द शस्त्रासारखे वापरतात. त्यांचे शब्दबाण मनाला जखमी करतात. पण त्यांना त्याची जाणीवही नसते. अशा बोलण्याने ते दुसऱ्यांचे मन दुखवतातच, पण आपलेही नाव खराब करून घेतात. नकळत त्यांच्याच मनावर त्याचे वाईट संस्कार होत जातात.अशा माणसांपासून दूर जावेसे वाटते. ते समोरून आले, की आपल्याला रस्ता बदलावा वाटतो. अशा माणसांची नाती टिकत नाहीत, मैत्री तुटते. संत म्हणतात “शब्द जपले नाहीत, तर संबंध टिकत नाहीत.”गोड बोलण्यासाठी पैसे लागत नाहीत. त्यात आपले काहीच नुकसान होत नाही. तरीही गोड बोलणे आपल्याला का जमत नाही? आपण समोरच्याशी गोड बोललो, तर त्याच्या मनात आपल्याबद्दल आदर निर्माण होतो, चांगले विचार रुजतात. शरीरात चांगले हार्मोन्स पाझरतात, मन प्रसन्न होते, आणि सकारात्मकतेचा झरा वाहू लागतो ज्याचा फायदा आपल्यालाही होतो.दुसऱ्याचे मनापासून कौतुक करायला आपण कंजूष का होतो? कौतुक करण्यासाठीही मोठं मन लागतं. बरं, कौतुक नको; गोडही नको, गप्प राहा. पण कडू बोलू नका. कुणाचं मन दुखवू नका. कारण संत म्हणतात की “मन दुखावणं हे मोठं पाप आहे.”मकरसंक्रांतीच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा!तीळगूळ घ्या… आणि गोड गोड बोला.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 11:30 am

“भ्रष्ट माणसांच्या हातात…”; निवडणुकीच्या धामधूमीत अभिनेत्री तेजिस्विनी पंडितची पोस्ट चर्चेत

Tejashwini Pandit : राज्यातील मुंबई महापालिकेसह २९ महापालिकांसाठी उद्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकीची सुरु झालेली रणधुमाळी आता थांबणार आहे. काल प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी शेवटच्या दिवशी देखील त्याच जोशाने प्रचारमोहिम राबवित मतदारांपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न केला. खरंतर या महापालिका निवडणुका विविध कारणांमुळे सर्वाधिक चर्चेत राहिल्या. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणामुळे जनतेला […] The post “भ्रष्ट माणसांच्या हातात…”; निवडणुकीच्या धामधूमीत अभिनेत्री तेजिस्विनी पंडितची पोस्ट चर्चेत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 11:27 am

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळीनवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रित कौर हिने ४३ चेंडूमध्ये ७१धावांची नाबाद खेळी करत चौकाराने संघाचा विजय साकारला. दुसऱ्या बाजूने निकोला कॅरीने २३ चेंडूमध्ये नाबाद ३८ धावा केल्या. चौथ्या विकेटसाठी नाबाद ८४ धावांची भागिदारी करत कौर व कॅरीने संघाला विजय मिळवून दिला. सात बळी राखून मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील पहिला विजय मिळविला.मुंबईच्या अमनज्योत कौरने २६ चेंडूत ४० धावा करत संघाच्या विजयामध्ये आपले योगदान दिले. गुजरात जायंट्सने सामन्यात तीन झेल सोडत गच्चाळ क्षेत्ररक्षण करत पराभवाला हातभार लावला. महिला आयपीएल स्पर्धेत नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात जायंट्सने २० चौकार व ७ षटकारांच्या मदतीने २० षटकांअखेर ५ गडी बाद १९२ धावा केल्या आहेत. गुजरात जायंट्सने एकाही खेळाडूला अर्धशतक झळकावता आले नसले तरी सांघिक कामगिरीच्या बळावर साडे नऊच्या सरासरीने मुंबई इंडियन्ससमोर तगडे आव्हान त्यांनी निर्माण केले. मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी १९३ धावा करायच्या आहेत.गुजरात जायंट्सकडून खेळताना जॉर्जिया वारेहमने सर्वांधिक ४३धावा केल्या. त्यानंतर भारती फुलमाळीच्या ३६ धावा, कानिका आहूजा ३५ धावा, बेथ मुनी ३३ धावा. कर्णधार गॉर्डनरच्या २० धावांनी धावसंख्येलाआकार मिळाला.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 11:10 am

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोपनवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला एकामागून एक दुखापतींचे धक्के सहन करावे लागत आहेत. रिषभ पंत मालिकेआधीच दुखापतग्रस्त झाला, तर पहिल्या एकदिवसीय सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली. तरीही मुख्य प्रशिक्षक व संघ व्यवस्थापनाने त्याला फलंदाजीला पाठवले आणि त्यांच्या याच निर्णयावर माजी फलंदाज मोहम्मद कैफ संतापला आहे.सुंदरने त्या सामन्यात ७ चेंडूंत ७ धावा केल्या होत्या. सामन्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने मालिकेतून माघार घेतली. त्याच्या जागी उर्वरित दोन वन डे सामन्यांसाठी आयुष बडोनीची निवड करण्यात आली. पण, जखमी असूनही सुंदरला फलंदाजी करण्याच्या निर्णयावर राग व्यक्त करताना मोहम्मद कैफने संघ व्यवस्थापन व गौतम गंभीर यांचा दुटप्पीपणा समोर आणला. त्याने शुभमन गिलचे उदाहरण दिले. शुभमन दुखापतग्रस्त झाला तेव्हा गंभीर आणि संघ व्यवस्थापनाने कशा प्रकारने त्याला वाचवले, हे कैफने सांगितले.‘शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला ते आठवते का, कोलकाता येथे झालेल्या त्या कसोटीत तो फलंदाजीला आला नव्हता. तो मोठ्या धावसंख्येचा सामना झाला होता आणि गिलने २०-३० धावा जरी केल्या असत्या, तर भारताला विजय मिळवण्यास मदत झाली असती, असे लोकांना वाटत होते. तरीही तो फलंदाजीला आला नाही. त्याची दुखापत आणखी वाढू नये म्हणून त्याला सुरक्षित ठेवले गेले. पण, सुंदरच्या बाबातीत असे का केले नाही? त्यामुळेच सुंदरला फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे मला वाटते. केएल राहूलसोबत धाव घेताना त्याला आणखी त्रास झाला असता,’ असे कैफ म्हणाला.भारतीय संघाने तो सामना जिंकला असला तरी सुंदरला फलंदाजीला पाठवणे धोक्याचे ठरू शकले असते. तो म्हणाला, तो दुखापतग्रस्त होता आणि तुम्हाला प्रत्येक चेंडूवर फक्त धावा करायच्या होत्या, तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या खेळाडूला पाठायला हवे होते. एखादा खेळाडू जखमी असताना तुम्ही त्याला फलंदाजीला पाठवून त्याची दुखापत आणखी वाढली असती. चेंडू डीप पॉइंट किंवा स्क्वेअर लेगला गेला, तरी तो दुसरी धाव धावू शकत नव्हता. तो केवळ एकच धाव घेऊ शकत होता. म्हणून मला वाटते तो चुकीचा निर्णय होता. तुम्ही कुलदीप किंवा दुसऱ्या कोणाला पाठवू शकले असता. जेव्हा परिस्थिती टाळण्यासाऱखी नसती तर सुंदरला पाठवणे मी समजू शकत होतो, असेही कैफ म्हणाला.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 11:10 am

मित्र देश कसे झाले शत्रू?

सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे दोन्ही सुन्नी मुस्लीम देश आहेत. मध्य पूर्वेत त्यांचा बराच प्रभाव असून ते एकमेकांचे विश्वासू भागीदार मानले गेले आहेत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर हे दोन आखाती महाकाय देश एकेकाळी एकमेकांच्या दयेवर उभे होते. आखाती देश अडचणीत आला, तेव्हा ते एकमेकांची ढाल बनले; पण आज त्यांच्यात शत्रुत्व आहे. हे दोन्ही देश एकमेकांच्या रक्तासाठी तहानले आहेत.- प्रा. जयसिंग यादवआखाती प्रदेशातील स्पर्धा ही मुस्लीम देशांचे खलिफा बनण्याची शर्यत आहे. सुरक्षा असो, तेल असो, राजनय असो किंवा प्रादेशिक राजकारण; सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे दोघेही प्रत्येक आघाडीवर एकत्र काम करायचे; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये परिस्थिती बदलली आहे. त्यांच्यातील अविश्वासाची दरी इतकी रुंदावली, की आज शत्रुत्वात बदलली आहे. आता येमेन मुद्द्यावरून सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये तणाव वाढला आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये येमेनच्या भूमीवर संघर्ष सुरू झाला आहे. सौदी अरेबियाने येमेनमध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या मालकीच्या शस्त्रास्त्रांच्या मालवाहतुकीवर हवाई हल्ला केला. यामुळे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमधील संबंध ताणले गेले. सौदी सैन्याने येमेनमधील मुकाल्ला या दक्षिणेकडील बंदरावर वारंवार बॉम्बहल्ला केला. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला. परिस्थिती इतकी बिकट झाली, की येमेनमधील सौदी समर्थित सरकारने संयुक्त अरब अमिरातीच्या सैन्याला देश सोडण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला. त्यानंतर, संयुक्त अरब अमिरातीनेही घाईघाईने आपले उर्वरित सैन्य मागे घेतले. संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी केले, की ते येमेनमधील आपली उर्वरित लष्करी उपस्थिती संपवेल. इतिहासात मागे वळून पाहिले, तर लक्षात येईल, की दोन्ही देशांमधील शत्रुत्व नवीन नाही. दोघे चांगले मित्र राहिले आहेत. अनेकदा आखाती देशांमध्ये या दोन्ही देशांमधील मैत्रीचे दाखले जात होते; परंतु काही हितसंबंधांमुळे ही मैत्री आता शत्रुत्वात बदलली आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) हे आखाती प्रदेशातील दोन प्रमुख मुस्लीम देश एकेकाळी कट्टर मित्र होते. त्यांनी अरब जनांदोलनांपासून येमेन युद्धापर्यंत अनेक कारवायांप्रसंगी एकत्र काम केले; पण आता परिस्थिती बदलली आहे.आर्थिक स्पर्धा, प्रादेशिक प्रभाव आणि वेगवेगळ्या रणनीतींमुळे त्यांना शत्रू बनवले आहे. ही कहाणी शतकानुशतके जुन्या संबंधांपासून सुरू होते आणि आजच्या भू-राजकीय तणावापर्यंत पोहोचते. सौदी अरेबिया सुरुवातीपासूनच संयुक्त अरब अमिरातीचा समर्थक होता. दोन्ही देश सुन्नी मुस्लिमबहुल राजेशाही आहेत. दोघांची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून आहे. आखातातील इराणच्या वाढत्या प्रभावाबद्दलची चिंता आणि आखाती प्रदेशात स्थैर्य राखण्याचे सामायिक ध्येय यामुळे त्यांना जवळ आणले गेले होते. दोघांमधील दीर्घकालीन मैत्रीमध्ये इराण हा एक घटक आहे. दोन्ही देशांची मैत्री २०१० च्या दशकाच्या सुरुवातीला घट्ट झाली. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (एमबीएस) आणि यूएईचे शासक मोहम्मद बिन झायेद (एमबीझेड) यांनी आपले वैयक्तिक संबंध मजबूत केले. ते इस्लामिक कट्टरतावाद आणि इराणविरुद्ध एकत्र आले. तथापि, हळूहळू तेढ निर्माण झाली. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे आखाती प्रदेशात सुरक्षेचे दोन मजबूत आधारस्तंभ मानले जात. २०११ मध्ये जेव्हा अरब स्प्रिंग क्रांतीला वेग आला, तेव्हा त्यांनी येमेनमध्ये इराण समर्थित हौथींविरुद्ध युती स्थापन केली. २०११ च्या अरब स्प्रिंग क्रांतीने मध्य पूर्वेतील राजकारणाला हादरवून टाकले. इजिप्तमधील जनरल सिसी यांच्या सरकारला पाठिंबा देणे असो किंवा लिबिया आणि येमेनमध्ये हस्तक्षेप करणे; दोन्ही देशांनी एकत्र रणनीती आखली. त्यांची जोडी ‘अरब जगाचे जुळे स्तंभ’ म्हणून ओळखली जाऊ लागली.२०११ मध्ये, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाने इस्लामी चळवळींविरुद्ध संयुक्त आघाडी स्थापन केली. त्यांनी बहरीनमधील उठाव दडपण्यासाठी संयुक्त सैन्य पाठवले आणि २०१३ मध्ये इजिप्तमधील मुस्लीम ब्रदरहूड सरकारच्या लष्करी हकालपट्टीसाठी सहकार्य केले. मार्च २०१५ मध्ये दोन्ही देशांनी हुथी बंडखोरांविरुद्ध लष्करी मोहीम सुरू केली. संयुक्त अरब अमिरातीने सैन्य पुरवले, तर सौदी अरेबियाने हवाई शक्ती पुरवली. तथापि, २०१९ मध्ये संयुक्त अरब अमिरातीने आपले सैन्य मागे घेतले आणि दक्षिणी फुटीरतावाद्यांना (एसटीसी) पाठिंबा दिला, तर सौदी अरेबिया येमेनी सरकारसोबत राहिला. हा पहिला मोठा वाद होता. जून २०१७ मध्ये दोन्ही देशांनी कतारवर दहशतवादाला पाठिंबा देण्याचा आरोप करत बहिष्कार टाकला. २०२१ च्या ‘अल-उला’ शिखर परिषदेत सौदी अरेबियाने कतारशी समेट केला, तर संयुक्त अरब अमिरातीने सौम्य भूमिका घेतली.सप्टेंबर २०२० मध्ये संयुक्त अरब अमिरातीने इस्रायलशी संबंध सामान्य केले; परंतु सौदी अरेबिया पॅलेस्टिनी राज्याच्या मागणीवर ठाम राहिला. २०२२ मध्ये संयुक्त अरब अमिराती-इस्रायल व्यापार २.५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला; परंतु सौदी अरेबियाने त्यापासून स्वतःला दूर केले. असे म्हटले जाते, की सौदी अरेबियाचे इस्रायलशी असलेले शत्रुत्व आणि संयुक्त अरब अमिरातीच्या इस्रायलशी असलेली जवळीक हे शत्रुत्वाचे एक प्रमुख घटक होते. जुलै २०२१ मध्ये संयुक्त अरब अमिरातीने ‘ओपीईसी’मध्ये सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील उत्पादन कपात रोखली आणि आपल्या बेसलाइनमध्ये वाढ करण्याची मागणी केली. फेब्रुवारीमध्ये सौदी अरेबियाने परदेशी कंपन्यांना रियाधमध्ये मुख्यालय स्थापन करण्यास सांगितले आणि दुबईला आव्हान दिले. जुलैमध्ये सौदी अरेबियाने संयुक्त अरब अमिरात मुक्त क्षेत्रांमधून आयातीवरील शुल्क उठवण्यास नकार दिला. सुदानी गृहयुद्ध एप्रिल २०२३ मध्ये सुरू झाले. यावेळी संयुक्त अरब अमिरातीने ‘रॅपिड सपोर्ट फोर्सेस’ला शस्त्रे पुरवली, तर सौदी अरेबियाने सुदानी सशस्त्र दलांना पाठिंबा दिला आणि युद्धबंदी चर्चा आयोजित केली. डिसेंबर २०२४ मध्ये सीरियामध्ये असद यांना पदच्युत करण्यात आले. दोन्ही बाजूंनी नवीन नेतृत्वाशी संपर्क साधला; परंतु संयुक्त अरब अमिरातीने असद यांच्यावर टीका केली. येमेनमध्ये याच महिन्यात संयुक्त अरब अमिराती समर्थित ‘एसटीसी’ने सौदी अरेबियाची ‘लाल रेषा’ ओलांडून हद्रामौत तेलक्षेत्रे ताब्यात घेतली. सौदी जेट आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात शत्रुत्व सुरू झाले. शत्रुत्वाचा मुख्य स्रोत येमेनमधील मुकाल्ला हे दक्षिणेकडील बंदर होते. सौदीच्या नेतृत्वाखालील युतीने मुकाल्ला बंदरावर हवाई हल्ला केला. सौदी अरेबियाच्या मते त्यांनी संयुक्त अरब अमिराती समर्थित फुटीरतावाद्यांना परदेशी लष्करी मदत पोहोचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोदीला लक्ष्य केले.सौदी अरेबियाने स्पष्टपणे सांगितले, की हा हल्ला संयुक्त अरब अमिरातीच्या शस्त्रास्त्रांच्या मालवाहतुकीला लक्ष्य करत होता. तथापि, संयुक्त अरब अमिरातीने सौदी अरेबियाचे दावे फेटाळून लावले आणि म्हटले, की हल्ला केलेल्या मालवाहतुकीत शस्त्रे नव्हती, तर संयुक्त अरब अमिरातीच्या लष्करासाठी पुरवठा आणि उपकरणे होती. ही पहिली आणि नवीनतम थेट चकमक होती. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या आखाती देशांमधील तणाव सातत्याने वाढत आहे. संयुक्त अरब अमिरातीने केलेल्या घोषणेमुळे हा तणाव कमी होत असल्याची अटकळ निर्माण झाली. असे असूनही, दोन्ही देशांच्या भू-राजकीय महत्त्वाकांक्षांमधील संघर्ष अधिकाधिक स्पष्ट होत आहे.संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे, की ते येमेनमधून आपली उर्वरित लष्करी उपस्थिती मागे घेईल. आम्ही २०१५ पासून अरब युतीचा भाग आहोत आणि येमेनमधील कायदेशीर सरकारला पाठिंबा देत आहोत. संयुक्त अरब अमिरातीच्या सैन्याने २०१९ मध्ये येमेनमधील आपले मुख्य लष्करी ऑपरेशन पूर्ण केले आणि परतले; परंतु अतिरेकी शक्तींना रोखण्यासाठी काही सैन्य मागे ठेवण्यात आले होते. तथापि, अलिकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, संरक्षण मंत्रालय उर्वरित सैन्य मागे घेण्याचे आवाहन करत आहे. हा तात्पुरता शह असला, तरी गेल्या दशकभरातील शत्रुत्व पाहता या दोन देशांमधील संघर्ष संपण्याची शक्यता कमीच आहे.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 11:10 am

आभाची ‘अँट मॅस्कॉट’ यशोगाथा

दी लेडी बॉस : अर्चना सोंडेऑफीससाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीत येणाऱ्या अडचणींवरील एका साध्या चर्चेतून ‘अँट मॅस्कॉट’ या बी२बी ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मचा जन्म झाला. आपल्या पतीसह सुरू केलेला हा उपक्रम आज १६ कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचला आहे. ही गोष्ट आहे आभा गुप्ताच्या अँट मॅस्कॉटची.शिक्षणापासून उद्योजकतेपर्यंतचा प्रवासबोकारो स्टील सिटी येथील चिन्मय विद्यालयातून आभाचे शालेय शिक्षण झाले. आभाचे वडील विश्वनाथ प्रसाद हे सेलमध्ये कार्यरत होते, तर आई सुमित्रा देवी गृहिणी होत्या. अभ्यासात हुशार असलेली आभा खेळ, गायन आणि इतर उपक्रमांमध्येही सक्रिय होती.दंत प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊनही आभाने रांची येथील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्रात पदवी घेतली. मार्गदर्शकांच्या सल्ल्याने तिने पुढे बंगळूरु येथील आयबीएसमधून एचआरमध्ये एमबीए पूर्ण केले. कॅम्पस प्लेसमेंटद्वारे तिची फोर्टिस हॉस्पिटल्समध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून नियुक्ती झाली.एचआर कारकिर्दीतूनव्यवसायाकडे वळणफोर्टिसमध्ये काम करताना एचआर हे केवळ भरती आणि पगार व्यवस्थापनापुरते मर्यादित नसल्याचे आभाला जाणवले. उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची वरिष्ठ कार्यकारी एचआर पदावर बढती झाली. त्यानंतर क्लाउड नाईन हेल्थकेअरमध्ये डेप्युटी मॅनेजर एचआर म्हणून काम करून आभा पुन्हा फोर्टिसमध्ये युनिट एचआर प्रमुख म्हणून परतल्या.समस्येतून संधीचा शोधआभा बंगळूरुमध्ये फोर्टिस हॉस्पिटलच्या ग्राउंड-अप प्रोजेक्टमध्ये काम करत होत्या. ऑफिस आणि हॉस्पिटल साहित्याची निवड करताना अनेक त्रुटी आणि अडचणी जाणवत होत्या. या संबंधी त्यांनी पती प्रवीण यांच्याशी चर्चा केली. प्रवीण यांना देखील त्यांच्या नोकरीदरम्यान अशाच समस्यांचा सामना करावा लागत होता. या चर्चेतून असंघटित कॉर्पोरेट सोर्सिंग क्षेत्राला एक संघटित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित व्यासपीठ देण्याची संधी या जोडप्याला दिसली.सुरक्षित नोकरीला रामराम२०१६ मध्ये आभा यांनी फोर्टिस हॉस्पिटल्समधील युनिट एचआर प्रमुखपदाचा राजीनामा दिला. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक बचतीतील १० लाख रुपये गुंतवून घरातूनच व्यवसाय सुरू केला. त्या काळात अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट हे प्लॅटफॉर्म किरकोळ ग्राहकांसाठी कार्यरत होते. अँट मॅस्कॉटने सुरुवातीपासूनच व्यावसायिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.पतीचा व्यवसायात सहभाग२०१८ मध्ये सॅमसनाईट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले प्रवीण यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ अँट मॅस्कॉटमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या कंपनीत काम करत राहून व्यवसायावर लक्ष केंद्रित करणे योग्य नाही म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला.‘अँट मॅस्कॉट’ नावामागील अर्थसुरुवातीला कॉर्पोरेट गिफ्टिंगपासून सुरू झालेल्या व्यवसायाला ‘अँट मॅस्कॉट’ हे नाव देण्यामागे एक खास विचार होता. मुंग्या कष्टाळू असतात, संघभावनेने काम करतात आणि त्यांच्या वजनाच्या ५० पट वजन उचलू शकतात. तसेच काळ्या मुंग्या समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात. या सर्व बाबी कंपनीच्या ध्येयधोरणांशी सुसंगत असल्यामुळे पाठीवर गोण्याची पिशवी असलेली मुंगी त्यांचे बोधचिन्ह ठरले.आव्हाने, कोविड आणि टीमप्रती निष्ठाविक्रेते किंवा सेल्समन कंपनीमध्ये घेणे. कर्मचारी टिकवणे ही सुरुवातीची मोठी आव्हाने होती. तरीही अँट मॅस्कॉट आदीदास सारख्या ब्रँडचा व्यवसाय भागीदार बनला. मात्र २०२० मध्ये कोविड महामारीने व्यवसायाला मोठा धक्का दिला. मात्र मुंग्या जशा आपल्या कुटुंबातील कोणालाही मागे सोडत नाही. त्याप्रमाणे आभाच्या अँट मॅस्कॉटने कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढले नाही किंवा पगारात कपात केली नाही. आज अँट मॅस्कॉटचे ३५० हून अधिक ब्रँड्स ग्राहक आहेत.गुंतवणूकदारांपासून दूर राहण्याचा निर्णयगुंतवणूक ऑफर मिळूनही, १ दशलक्ष डॉलर्सच्या बदल्यात ३५–४०% हिस्सा देण्याचे प्रस्ताव या जोडप्याने नाकारले. बी२बी मॉडेलमध्ये नफा मर्यादित असल्याने तो व्हेंचर कॅपिटलसाठी आकर्षक नसतो असे प्रवीण गुप्ता स्पष्ट करतात.पुढील वाटचाल४० सदस्यांची टीम, नफ्यात असलेला व्यवसाय आणि १६ कोटी रुपयांची उलाढाल असलेला अँट मॅस्कॉट पुढील आर्थिक वर्षात २५ कोटींचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. असंघटित असलेल्या व्यावसायिक क्षेत्रातील बाजारात प्रचंड संधी असल्याचा विश्वास या उद्योजक जोडप्याला आहे.प्रत्येक क्षेत्रात उद्योगांची संधी असते फक्त ती हेरता आली पाहिजे. त्याचसोबत नियोजन, योजनाबद्ध कृती आणि आपल्या माणसांचा पाठिंबा असेल तर काहीही साध्य करता येते हे आभा गुप्ता यांच्या अँट मॅस्कॉटने सिद्ध केले आहे.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 11:10 am

कुंकवाचं लेणं

माेरपीस : पूजा काळेलग्नसराईत नटण्याची हळदीला कोण घाई कुंकुमतिलकाने सौभाग्य वाणाची लयलूट होई. कुमारिका, सौभाग्यवती यांना देण्यात येणारं वाण संस्कृतीचा भाग झालं. पुढे जाऊन या वाण प्रथेने साहित्य आणि संस्कृतीवर आपली मोहोर उठवली. एका वाक्यात सांगायचं झालं तर, सवाष्ण वाणं म्हणजे सहज प्राप्त होणाऱ्या उपयुक्त गोष्टींचा साधक विचार. प्रापंचिक जीवनात वापरात येणाऱ्या तसचं गृहिणींना आनंद देणाऱ्या गृहोपयोगी वस्तू वा जिन्नस यांची लयलूट जी काळ्या-पांढऱ्या तिळावर गुळरूपाचा संस्कार करते. हवेत पडलेल्या गारव्याला थोडीशी ऊब मिळावी या हेतूने संस्कारित सण साजरा करताना हळदी-कुंकवाचं महत्त्व वाढतं. वर्षभराने येत असलेल्या सणाची पाळंमुळं जनमानसात मुरलेली असल्याने उसनं वाणं देण्या-घेण्याच्या प्रथा संस्कृतीला जिवंत ठेवतात. घरोघरच्या हळदी-कुंक घाटातला पहिला सौभाग्याचा मान सुवासिनींचा. विसरता न येण्यासारखा कुंकवाचा विषय महिलांसाठी हळव्या कोपऱ्यासारखा असतो. माथ्यावरचं भलंमोठं कुंकू धन्याची साक्ष देतं, त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करतं. आपल्या धर्मात लहानपणापासून भाळी गंध लावली जात असल्याने मुलगा वा मुलगी गंध, नाम, बुक्का, कुंकू, चिरी, टिकल्या कपाळाची शोभा वाढवताना दिसतात. बाल्यावस्थेत काजळ, पावडर टिका, चंदन टिळा लावून सजवलं जातं. कुमारिका पूजल्या जातात. त्यांच्यावर संस्कार होतात. हळदी-कुंकवाची व्याख्या पसरते. मुली संस्कार विसरत नाहीत, नव्याने शिकत जातात. संस्कृतीतील महत्त्वाचा विधी आणि सामाजिक सोहळा असलेलं हळदी-कुंकू सौभाग्य-आरोग्य- समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानलं जातं. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमातही कुंकू वापरलं जातं. त्याला सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं ज्याने नकारात्मक ऊर्जा दूर सारली जाते. स्त्रियांच्या सौभाग्याचे रक्षण करता पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. दुर्गादेवी आणि लक्ष्मीमातेची कृपा प्राप्त होण्यासाठी कुंकुमतिलकाने पूजा आराधना केली जाते. कुंकवाला पिंजर असंही संबोधलं जातं. धार्मिक बाबतीत, मंगल कार्यात कुंकवाचा वापर केला जातो. बालपणीच संस्कृतीचा ठेवा घेऊन आलेलं कुंकू म्हणजे कैक अनुभवाची पुंजी असते जी सासर माहेराला जोडणारा दुवा असते. आनंदाची आनंदाला भेट घडवण्यासाठी हळदी-कुंकवाचं प्रयोजन केलं जातं. देवतांना कुंकूमार्जन प्रिय असल्याने त्यांचा आशिष पाठीशी राहतो. असे मानले जाते की, ब्रह्मांडातील सुप्तशक्त जागी होऊन स्त्रियांच्या ठिकाणी लक्ष्मीतत्त्व जागृत होतात. कुंकवाची बोट मस्तकी लागताचं शक्ती संचारते. नकारात्मक ऊर्जा शोषली जाते. एकाग्रता वाढते, ज्यामुळे घर आणि कुटुंबाचं रक्षण होतं. बाईला बाईपण येतं. संस्कार संस्कृतीच्या छायेत पिढ्या शिकून मोठ्या होतात. आनंदाला पारावार उरत नाही. पदरात पडलेलं सौभाग्याचं दान शाश्वत लेणं होऊन सुखावतं.कुंकवाचं स्थान अधोरेखित करताना बहिणाबाई म्हणतात...लपे करमाची रेखा, माझ्या कुंकवाच्या खाली... पुशीसनी गेलं कुकू,रेखा उघडी पडली...कपाल रेखा उघडी पडण्याचं दृर्भाग्य कुणालाही नको असतं. पण सत्याशी पाठ दाखवता येत नाही हेचं खरं. कुंकवाचं लेण म्हणजे सौभाग्याचं लेणं. ज्यात स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाणारे दागिने, मंगळसूत्र, बांगड्या, कुंकू, जोडवी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. यात मंगळसूत्र सर्वात श्रेष्ठ मानले जाते.याच दिवशी संस्कृती, परंपरा जोपासणारे सण चैतन्य घेऊन येतात. चैतन्याची ज्योत कायम तेवत ठेवण्याच्या वचनात इतरांना सणाचा आनंद देतो. तिळाचा गोडवा कायम राखणारे आशेचे पतंग भरारी घेण्याची स्वप्न पाहतात. मनात वृद्धिंगत होणारा दीपोत्सव कायम उजळत राहावा या हेतूने नववर्षाच्या प्रारंभी आलेला सण घरादारावरची जळमटं दूर सारतो. सूर्याचा मकर राशीतला प्रवेश म्हणजे सण दाराशी आल्याचा सांगावा. हिवाळ्यातल्या गुलाबी दिवसाची ऊबदार रजईतली झोप अनिवार होते. पित-केशरी तांबड फुटण्यापूर्वी, कोंबड्याने बांग देण्याआधी आसमंत दवात नाहतो. शीत वारे दारखिडक्यांच्या फटीतून डोकावतात. पक्षी किलबिलाटाने सभोवती निसर्गमय शाळा सुरू होते. सौर कालगणनेशी संबंधित संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. दिवस मोठा रात्र लहान होत जाते. हंगामात उष्णता वर्धक हरभरे, गहू लोंबे, ऊस, तीळ, मटार, बोरं धान्याची शेती झाल्याने गरजेनुसार आदान-प्रदान होते. माती तत्त्वाने भरलेल्या सुगडाची हरभरा, तीळगूळ, ऊस, बोराने पूजा बांधली जाते. मानाची, पानाची, दानाची परंपरा जोपासताना काळ्या रंगाचे महत्त्व अबाधित असल्याने तीळगूळ घ्या, गोड गोड बोला, आमचा तीळ सांडू नका आमच्याशी भांडू नका अशा संदेशाचा, सामाजिक सद्भावना वाढवणारा आणि सद्वविचारांचे आदान प्रदान करणारा सण भारतीय परंपरेचा आरसा दाखवतो. आजचा दिवस उत्साहाने साजरा करायचा. वायुवेगे वाहणाऱ्या वाऱ्याला पतंगाच्या साथीने उडवण्याचा, विविधांगी रंग जनमानसात पसरविण्याचा. मनरूपी पतंग आकाशात भिरभिरवण्याचा.खेळाशी मेळ साधत आलेला दिवस चांगुलपणाने जपण्याचा. शेक्सपियरच्या मते माणसाच्या हृदयात उगम पावलेला चांगुलपणा त्याच्यानंतर मागे उरतो. दिव्याचा प्रकाश लांबवर पसरतो तसे चांगुलपणाची किर्ती दूरवर पसरते. कारण तेव्हा तुम्ही इतरांशी आणि स्वत:शी उत्तम वागलेले असता. आनंदाचं दुसरं नाव उत्तम वागणं आहे, जेणेकरून जेवढं मन उत्साही आणि आनंदी तेवढा तुमचा पतंग आकाशाला गवसणी घालण्याचा संकल्प बांधणारा ठरेल. शरीराला जशी आरामाची गरज असते तशीचं मनाला चैतन्याची गरज असते. हळदी-कुंकवाच्या निमित्ताने एकत्र येऊन नाती वृद्धिंगत करता येतात. सद्भावना वाढवता येते. मैत्रैय कायम राखता येते. तीळगुळाची गोडी आधी मनात मग नात्यात पेरता आली की मन पाखरांचे थवे बनून स्वैर मोकळ्या आकाशात स्वच्छंदी विहारायला मुक्त होतं, हीच या सणांची जादू आहे.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 11:10 am

भारताचा जीडीपी ७.३ ते ७.५% दरम्यान राहणार - ग्रँट थॉर्नटन भारत

मुंबई: विख्यात आर्थिक सल्लागार संस्था ग्रँट थॉर्नटन भारतने भारताचा जीडीपी आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ७.३-७.५% वाढू शकतो असे म्हटले आहे. प्रसारमाध्यमांना आपली भूमिका स्पष्ट करताना आर्थिक सल्लागार संस्था ग्रँट थॉर्नटन भारतने बुधवारी सांगितले की, मार्च २०२६ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.३ ते ७.५% दराने वाढण्याची शक्यता आहे आणि २०२६-२७ मध्ये हा वेग किंचित मंदावून ७ टक्क्यांपर्यंत येऊ शकतो. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, ग्रँट थॉर्नटन भारतचे भागीदार आणि आर्थिक सल्लागार सेवा प्रमुख अर्थशास्त्रज्ञ, मॅक्रो इकॉनॉमिक अफेअर्स ऋषी शाह म्हणाले आहेत की,'भारतीय आयातीवरील अमेरिकेचे शुल्क आणि इतर अडथळे असूनही निर्यात चांगली टिकून आहे. मला वाटते की या आर्थिक वर्षासाठी, ७.३ ते ७.५ टक्के हा एक योग्य अंदाज आहे आणि २०२६-२७ मध्ये तो ६.७ ते ७ टक्क्यांच्या जवळ असेल'यापूर्वी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) प्रसिद्ध केलेल्या पहिल्या अँडव्हान्स अंदाजानुसार, सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील दमदार कामगिरीमुळे भारत २०२५-२६ या वर्षात ७.४% दराने वाढण्याची शक्यता आहे जी मागील आर्थिक वर्षातील ६.५% पेक्षा जास्त आहे. यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उदय झालेला आहे असे म्हटले जाते. यावेळी त्यांनी विशेषतः भूराजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, बाह्य घटकांना अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा दबाव गट म्हणून अधोरेखित केले. शाह पुढे म्हणाले आहेत की, दक्षिण अमेरिका आणि मध्य पूर्वेशी संबंधित समस्या पुरवठा साखळीसमोर आव्हाने उभी करू शकतात.आज घेतलेल्या कोणत्याही धोरणात्मक निर्णयाचा खरा आणि प्रत्यक्ष परिणाम कदाचित आतापासून काही वर्षांनीच कळेल. त्यामुळे औद्योगिकीकरणाच्या या नवीन लाटेत खूप महत्त्वाची भूमिका बजावण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुम्ही जगभरात पाहिल्यास, प्रगत अर्थव्यवस्था आता पुन्हा औद्योगिकीकरण करत आहेत'प्रसारमाध्यमांशी अर्थसंकल्पाबाबत प्रतिकिया देताना शाह म्हणाले आहेत की, हा एक दिशादर्शक दस्तऐवज असणार आहे आणि तो भविष्यासाठी सरकारची मानसिकता दर्शवेल. अर्थसंकल्पातील त्यामुळे या वर्षीचा मुख्य भर व्यवसाय सुलभतेवर (ease of doing business) असायला हवा असे शाह म्हणाले आहेत.सध्या सातत्याने जागतिक अस्थिरतेत डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली आहे. याविषयी वक्तव्य करताना रुपयाच्या अवमूल्यनाबद्दल शाह म्हणाले की, सध्याच्या एका अमेरिकन डॉलरमागे ९० रुपये या पातळीच्या आसपास स्थिर होईल. याव्यतिरिक्त ते पुढे म्हणाले, आपण किंचित कमकुवत चलनासोबत जगायला शिकले पाहिजे. आपण आपल्या बहुतेक महत्त्वाच्या वस्तू आयात करतो आणि आपल्यासारख्या देशासाठी, माझ्या मते, कमकुवत चलन असणे फायदेशीर ठरते. शहा यांच्या मते की रिझर्व्ह बँकेला अजून एकदा रेपो दर कमी करावा लागेल. आता, महागाई रिझर्व्ह बँकेच्या ४ ते ६ % या खालच्या मर्यादेपेक्षा (Lower Tolerance) कमी आहे, आणि अन्नधान्याच्या किमतींमधील अस्थिरता असूनही, ती सुमारे ४% किंवा त्याहूनही कमी आहे, हे पाहता, मला वाटते की २५ बेसिस पॉइंट्सची आणखी एक कपात करण्याची शक्यता आहे, पण त्याहून अधिक नाही'.गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आरबीआयने दर कपातीस सुरूवात केली होती त्यानंतर आतापर्यंत अल्प-मुदतीच्या कर्ज दरात (रेपो दरात) एकूण १२५ बेसिस पॉइंट्सची कपात करून तो ५.२५% वर आणला. उपलब्ध माहितीनुसार, पुढील आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक (Monetary Policy Committee MPC) ४ ते ६ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 11:10 am

मकर संक्रांतीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात भरघोस वाढ ; जाणून घ्या आजचा दर

Gold Silver Price Today। देशांतर्गत वायदा बाजारात आज सोन्याच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ फेब्रुवारी २०२६ रोजी एक्सपायर होणारा सोन्याचा वायदा १,४०,५०१ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडला. मागील व्यवहाराच्या दिवशी सोने १,४२,२४१ रुपयांवर बंद झाले होते. १४ जानेवारी रोजी सकाळी १०:१० वाजता, ५ फेब्रुवारी रोजी एक्सपायर होणारा सोन्याचा भाव […] The post मकर संक्रांतीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात भरघोस वाढ ; जाणून घ्या आजचा दर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 11:01 am

Laikey Laika First Poster: महाफ्लॉप डेब्यूनंतर राशा थडानी पुन्हा सज्ज; ‘लाइकी-लाइका’ चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित

Laikey Laika First Poster: ज्येष्ठ अभिनेत्री रवीना टंडन यांची मुलगी राशा थडानी हिने २०२५ मध्ये आलेल्या ‘आजाद’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र, ८० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आणि अपेक्षित यश मिळवू शकला नाही. या महाफ्लॉप डेब्यूनंतर आता राशा थडानी पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात आपली छाप पाडण्याच्या तयारीत […] The post Laikey Laika First Poster: महाफ्लॉप डेब्यूनंतर राशा थडानी पुन्हा सज्ज; ‘लाइकी-लाइका’ चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 10:48 am

‘काहींंची मस्ती उतरवायला हवी’; मनसे चित्रपट सेनेच्या अध्यक्षांचा थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?

Amey Khopkar : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेल्या हेमंत ढोमे दिग्दर्शित क्रांतीज्योती विद्यालय चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, परिणामी बॅाक्स अॅाफिसवर मोठी कमाई चित्रपटाने केली आहे. त्यामुळे हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी चांगले असणार अशी आशा निर्माण झाली आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ आणि ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ हे दोन […] The post ‘काहींंची मस्ती उतरवायला हवी’; मनसे चित्रपट सेनेच्या अध्यक्षांचा थेट इशारा, नेमकं प्रकरण काय? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 10:43 am

सेन्सेक्स १०७ व निफ्टी ४६ अंकाने कोसळला शेअर बाजारात गुंतवणूकदारांची निराशा जाणून घ्या नवी स्ट्रॅटेजी!

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात आजही इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. प्रामुख्याने शेअर बाजारात अस्थिरता ही जागतिक अस्थिरतेमुळे कायम राहिली असून सकाळी सेन्सेक्स १०७.६६ व निफ्टी ४६.०५ पातळीवर झाली आहे. दोन्ही बँक निर्देशांकातही घसरण कायम राहिली असून मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्येही घसरण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणशी अपेक्षित असलेल्या उच्चपदस्थ बैठकीला अखेरच्या क्षणी उपस्थित राहण्यास नकार दिला असून त्यांच्या नव्या चर्चित विधानामुळे शेअर बाजारातील अस्थिरता आणखी वाढली असून सकाळच्या सत्रात सोने नव्या उच्चांकावर पोहोचले आहे. कमोडिटी बाजारातील अस्थिरता कायम असताना आगामी तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ मेटल, तेल व गॅस, मिड स्मॉल हेल्थकेअर निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण ऑटो, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक, आयटी, रिअल्टी शेअर्समध्ये घसरण झाली आहे.सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एमएमटीसी (७.६३%), बीएलएस इंटरनॅशनल (५.३१%), एचएफसीएल (४.४७%), वेदांता (३.२३%), एचईजी (३.०६%), हिंदुस्थान झिंक (२.६७%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण औथम इन्व्हेसमेंट (३.०४%), कल्याण ज्वेलर्स (२.७१%), हेक्सावेअर टेक्नॉलॉजी (२.७०%), ब्रेनबीज सोलूशन (२.४०%), टाटा इलेक्सी (२.१०%), सुंदरम फायनान्स (१.९२%), स्विगी (१.६७%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी आपली स्ट्रेटजी कशी ठेवावी?जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार-२०२६ वर्षाच्या सुरुवातीपासून भू-राजकीय घटना जागतिक बातम्यांवर वर्चस्व गाजवत आहेत. यापैकी काही घटनांचा बाजारांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, परंतु बाजारांवर अद्याप लक्षणीय परिणाम झालेला नाही. इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर २५% शुल्क लावण्याच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आदेशाचा भारतावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही, कारण भारत-इराण व्यापार सुमारे १.६ अब्ज डॉलर्स इतका कमी आहे. चीनवर याचा मोठा परिणाम होईल. इराणी संकट कसे उलगडेल आणि इराणमधील घडामोडींवर अमेरिका कशी प्रतिक्रिया देईल हे पाहणे बाकी आहे. ट्रम्प यांनी शुल्काचा एक शस्त्र म्हणून वापर केल्यामुळे, जगाला काही काळासाठी शुल्क-ग्रस्त व्यापार प्रणालीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.शेअर बाजारातील गुंतवणूक कधीकधी निराशाजनक असू शकते; ती दीर्घकाळ निराश करू शकते. सध्याच्या अनिश्चित आणि अस्थिर काळात हुशार गुंतवणूकदारांनी काय केले पाहिजे, तर त्यांनी गुंतवणूक कायम ठेवावी आणि दीर्घकाळासाठी योग्य मूल्यांकनाच्या दर्जेदार वाढीव शेअर्समध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवावे.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 10:30 am

मकरसंक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना गोड

आचारसंहितेतून वाट काढली !मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला असून, यंदाच्या महिन्यातील १५०० रुपयांचा हफ्ता मंगळवारपासून त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होऊ लागला आहे. सकाळपासूनच अनेक महिलांच्या मोबाईलवर बँक मेसेज येऊ लागल्याने या योजनेचा लाभ प्रत्यक्षात सुरू झाल्याचे चित्र आहे. राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना आणि आदर्श आचारसंहिता लागू असताना, निवडणूक आयोगाने नियमित लाभ देण्यास परवानगी दिल्यामुळे हा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, एक रकमी तीन हजार रुपये देण्याच्या चर्चांना आयोगाने स्पष्टपणे मज्जाव केल्याने या निर्णयाला राजकीय तसेच प्रशासकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. या काळात कोणत्याही नव्या योजना, नवीन लाभार्थी किंवा मतदारांना आकर्षित करणाऱ्या घोषणा करण्यास मनाई असते. याच कारणामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट नकार दिला. मात्र, आधीपासून सुरू असलेल्या आणि नियमित स्वरूपातील लाभ देण्यास आयोगाने परवानगी दिली. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हफ्ता मंगळवारपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.आचारसंहितेच्या कात्रित अडकलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेला मर्यादित का होईना, पण मोकळा श्वास मिळाला आहे. तीन हजार रुपयांची अपेक्षा पूर्ण न झाली असली तरी, नियमित १५०० रुपयांचा हफ्ता वेळेत मिळाल्याने अनेक महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. संक्रातीच्या एक दिवस आधी सुरू झालेल्या या निधीवितरणामुळे लाडक्या बहिणी आनंदीत झाल्या आहेत.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 10:30 am

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावाटोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन डॉलर्सच्या (सुमारे १४० कोटी रुपये) सोन्याच्या चोरीप्रकरणी कॅनडा पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. या चोरीचा मुख्य सूत्रधार आणि एअर कॅनडाचा माजी कर्मचारी अजूनही भारतात लपून बसला असून, त्याच्या अटकेसाठी कॅनडाभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वॉरंट जारी करण्यात आले आहे.१७ एप्रिल २०२३ रोजी स्वित्झर्लंडहून आलेले ६,६०० सोन्याच्या विटांचे (भार ४०० किलो) कंटेनर टोरंटो विमानतळावरून लंपास करण्यात आले होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे ही चोरी करण्यात आली होती, ज्याला कॅनडाच्या इतिहासातील 'सर्वात मोठी चोरी' म्हटले जाते. एअर कॅनडाचा माजी व्यवस्थापक अर्चित ग्रोव्हर आणि सिमरन प्रीत पनेसर हे या चोरीचे मुख्य दुवे मानले जात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनेसर हा अजूनही भारतात सुरक्षित ठिकाणी लपून बसला आहे. ही चोरी इतक्या सफाईदारपणे करण्यात आली होती की, विमानतळाच्या सुरक्षा यंत्रणेतील कोणाचा तरी हात असल्याशिवाय हे शक्य नव्हते. पनेसरने एअर कॅनडाचा कर्मचारी असताना बनावट 'वे-बिल' तयार करून चोरीला मदत केल्याचा आरोप आहे. कॅनडा पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत अनेक आरोपींना अटक केली असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 10:30 am

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवारनवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर स्थलांतराला आळा घालण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, २०२५ या वर्षभरात १ लाखांहून अधिक व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये ८ हजार विद्यार्थी व्हिसांचा समावेश आहे.२०२४ मध्ये ४० हजार व्हिसा रद्द करण्यात आले होते, मात्र २०२५ मध्ये हे प्रमाण दुपटीने वाढून १ लाखावर पोहोचले आहे. स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते टॉमी पीगॉट यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, अमेरिकेला सुरक्षित करणे ही आमची प्राथमिकता आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना देशात स्थान नाही. तसेच पीगॉट यांनी स्पष्ट केले आहे की, ही प्रक्रिया इथेच थांबणार नाही. अमेरिकेला सुरक्षित करण्यासाठी व्हिसा रद्द करण्याची ही मोहीम यापुढेही सुरूच राहील, असे त्यांनी नमूद केले आहे. अमेरिकन दूतावासाने ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत भारतीय विद्यार्थ्यांना इशारा दिला होता. “अमेरिकेतील कायद्यांचे उल्लंघन केल्यास विद्यार्थी व्हिसाबाबत गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. जर तुम्ही कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले किंवा तुम्हाला अटक झाली, तर तुमचा व्हिसा रद्द होऊ शकतो, तुमची अमेरिकेतून हकालपट्टी होऊ शकते, आणि तुम्ही भविष्यात यूएस व्हिसासाठी अपात्र ठरू शकता. नियमांचे पालन करा आणि तुमचा अमेरिकेतील प्रवास धोक्यात आणू नका.कोणत्या व्हिसावर परिणाम?विद्यार्थी व्हिसा : ८,००० व्हिसा रद्द.विशेष व्हिसा : २,५०० व्हिसा रद्द.या व्यतिरिक्त पर्यटक आणि व्यावसायिक व्हिसा धारकांवरही मोठी कारवाई झाली आहे.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 10:30 am

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या अरिहा शाहला भारतात परत आणण्यासाठी तिचे आई-वडील गेल्या ४० महिन्यांपासून लढा देत आहेत. अरिहा आता केवळ जर्मन भाषा बोलत असल्याने, तिच्याशी संवाद साधता यावा म्हणून आई धारा शाह यांनी स्वतः जर्मन भाषा आत्मसात केली आहे. आता जेव्हा हे कुटुंब भेटते, तेव्हा धारा या पती भावेश आणि मुलगी अरिहा यांच्यातील 'दुभाषी' म्हणून काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारत दौऱ्यावर आलेल्या जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्याकडे अरिहाचा मुद्दा पुन्हा एकदा लावून धरला. भारताने हे प्रकरण आता केवळ कायदेशीर नसून 'मानवतावादी' असल्याचे स्पष्ट केले आहे. अरिहाच्या पालकांना सध्या महिन्यातून केवळ दोनदा तिला भेटण्याची परवानगी आहे. बर्लिनमधील केंद्रावर लेकीला १० मिनिटे पाहण्यासाठी हे दाम्पत्य तासनतास प्रवास करून पोहोचते.अरिहा अवघ्या सात महिन्यांची असताना जर्मनीच्या 'जुगेंडम' (युथ वेल्फेअर ऑफिस)ने तिला ताब्यात घेतले होते. जर्मन वातावरणात वाढल्यामुळे ती तिची मातृभाषा विसरली आहे. मात्र, लेकीशी असलेले नाते तुटू नये म्हणून धारा शाह यांनी अथक प्रयत्नांनी जर्मन भाषा शिकून तिच्याशी संवाद सुरू ठेवला आहे.अरिहाचे वडील भावेश शाह हे सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून जर्मनीला गेले होते. अरिहा जेव्हा सात महिन्यांची होती, तेव्हा तिच्या गुप्तांगाला चुकून दुखापत झाली. जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेव्हा डॉक्टरांनी पालकांवर बाल लैंगिक शोषणाचा संशय व्यक्त केला. जर्मनीच्या 'जुगेंडम' (युथ वेल्फेअर ऑफिस)ने तत्काळ अरिहाला पालकांपासून हिरावून घेतले आणि 'फोस्टर केअर'मध्ये (सरकारी संगोपन केंद्र) ठेवले. फेब्रुवारी २०२२ मध्ये जर्मनीच्या पोलिसांनी तपास पूर्ण करून सांगितले की, पालकांकडून कोणताही गैरप्रकार झालेला नाही. मात्र, तरीही अरिहाला पालकांकडे सोपवण्यात आले नाही. जर्मनीच्या कोर्टाचे म्हणणे होते की, पालकांनी निष्काळजीपणा दाखवला आहे, त्यामुळे मुलगी त्यांच्याकडे सुरक्षित नाही. अरिहा गेल्या साडेतीन वर्षांपासून जर्मन फोस्टर केअरमध्ये आहे. तिथे ती फक्त जर्मन भाषा बोलणाऱ्या लोकांसोबत वाढली. परिणामी, ती तिची मातृभाषा (गुजराती/हिंदी) विसरली आहे. यामुळेच तिची आई धारा शाह यांनी स्वतः जर्मन भाषा शिकली आहे, जेणेकरून त्या आपल्या लेकीशी संवाद साधू शकतील.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 10:30 am

मलायका अरोराने वयाने १७ वर्ष लहान असलेल्या मिस्ट्री मॅनबाबत केला खुलासा

Malaika Arora | अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर ती अर्जुन कपूरला सहा वर्षे डेट करत होती. मात्र अर्जुन आणि मलायकाचे ब्रेकअप झाल्यानंतर तिचे नाव एका मिस्ट्री मॅनसोबत जोडले जाऊ लागले. गायक ए. पी. ढिल्लोंच्या कॉन्सर्टमधील दोघांच्या व्हिडिओमुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र यावर भाष्य करत […] The post मलायका अरोराने वयाने १७ वर्ष लहान असलेल्या मिस्ट्री मॅनबाबत केला खुलासा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 10:28 am

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवलातलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली पादचारी पुलाची समस्या आता विद्यार्थिनींच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नॅशनल हायवे प्राधिकरणाने मंगळवारी कोणतीही पूर्वसूचना न देता येथील पादचारी पूल थेट काढून टाकल्याने, वरवाडा आश्रमशाळेतील ६०० विद्यार्थिनींना जीव मुठीत धरून हायवे ओलांडावा लागत आहे. प्राधिकरणाच्या या मनमानी कारभारामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.महामार्गावर बनवण्यात आलेल्या या पादचारी पुलाची उंची नियमानुसार साडेपाच मीटर आहे. मात्र, या मार्गावरून वारंवार 'ओव्हर डायमेन्शन' (अवाढव्य उंच) असलेली अवजड वाहने जात असतात. या वाहनांना रस्ता मोकळा करून देण्यासाठी महिना-दोन महिन्यातून हा पूल वारंवार काढावा लागतो. सोमवारी सकाळी गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या दोन अवाढव्य वाहनांसाठी हा पूल काढण्यात आला होता.कोणतीही पूर्वसूचना नसल्याने शाळेतील मुली आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली. यावेळी पुलाअभावी विद्यार्थिनींना हायवे ओलांडणे कठीण झाले होते, ज्यामुळे वाहतूक कोंडीही झाली. अखेर तलासरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणि मुलींना सुरक्षितपणे रस्ता ओलांडून दिला.एखाद्या वाहनाने धडक दिल्यास होणाऱ्या जीवितहानीला जबाबदार कोण? असा सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत.त्याचप्रमाणे या गंभीर घटनेबाबत डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जर हा पादचारी पूल तातडीने पुन्हा बांधून दिला नाही तर प्राधिकरणाच्या बेजबाबदार भूमिकेवर आवज उठवला जाईल. येत्या १९ तारखेला होणाऱ्या मोर्चामध्ये हा मुद्दा ठामपणे उपस्थित केला जाईल. त्याचप्रमाणे चारोटी पासून मोर्चा हालणार नाही असा इशारा आमदार विनोद निकोले यांनी दिला आहे. महामार्ग प्राधिकरणाचे मौन : या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती घेण्यासाठी आणि कायमस्वरूपी तोडग्याबाबत विचारणा करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक सुहास चिटणीस यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन उचलला नाही. प्राधिकरणाच्या या बेजबाबदार भूमिकेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.आमच्या शासकीय आश्रमशाळेत बाहेरून ये-जा करणाऱ्या ६०० मुली आहेत. येथील पादचारी पूल वारंवार काढला जात असल्याने या मुलींना आपला जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागतो. ही अत्यंत चिंतेची बाब आहे.— सुरेश इभाड, मुख्याध्यापक, आश्रमशाळा वरवाडा.कोणतीही पूर्वसूचना न देता पादचारी पूल काढण्यात आल्याने सोमवारी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कोणताही अपघात किंवा दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.— अजय गोरड, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस स्टेशन.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 10:10 am

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूचवाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा) कंपनीतील कामगारांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी पुकारलेले सत्याग्रह आंदोलन आज सहाव्या दिवशीही अधिक तीव्र झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून पगार रखडल्याने आक्रमक झालेल्या कामगारांनी, जोपर्यंत खात्यात पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत कंपनीचे गेट सोडणार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे. टेलिव्हिजन आणि एअर कंडिशनर्स बनवणाऱ्या या नामांकित कंपनीत अनेक कामगार गेल्या २८ वर्षांपासून इमानेइतबारे सेवा देत आहेत. मात्र, व्यवस्थापनाने मागील दोन महिन्यांपासून या कायमस्वरूपी कामगारांचे पगार रोखून धरले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, एकीकडे प्रत्यक्ष घाम गाळणाऱ्या कामगारांना पगार नाही, तर दुसरीकडे कार्यालयीन कर्मचारी कामावर न येताही त्यांना पगार दिला जात असल्याचा गंभीर आरोप कामगारांनी केला आहे. हा दुजाभाव का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. श्रमजीवी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. ८ जानेवारीपासून सुरू झालेल्या या सत्याग्रहाला संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विजय जाधव आणि तालुका अध्यक्ष राजू जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे कामगारांचे मनोधैर्य उंचावले असून आंदोलनाची धार अधिक वाढली आहे.कामगारांच्या मागण्या : मागील दोन महिन्यांचा थकीत पगार तत्काळ खात्यात जमा करावा. कामगार आणि कार्यालयीन कर्मचारी यांच्यातील पगाराबाबतचा दुजाभाव थांबवावा. २८ वर्षांपासून सेवा देणाऱ्या ज्येष्ठ कामगारांना सन्मानाची वागणूक द्यावी.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 10:10 am

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायमपालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या गाड्या सुरू करण्याच्या चर्चा रंगत असताना, प्रत्यक्षात मात्र सामान्य प्रवाशांचे हाल संपताना दिसत नाहीत. उपनगरीय मार्गावर मेल, एक्स्प्रेस आणि मालवाहू गाड्यांना झुकते माप दिले जात असल्याने लोकल सेवांचा मोठा बोजवारा उडाला असून, दैनंदिन प्रवाशांना कामावर जाण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी तासनतास विलंब होत आहे. १ जानेवारी २०२६ पासून रेल्वेने नवीन वेळापत्रक लागू केले. मात्र, यामध्ये पालघर, बोईसर आणि डहाणू या पट्ट्यातील प्रवाशांसाठी एकही नवीन लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. जुन्या वेळापत्रकातील गाड्यांच्या वेळा केवळ ५ ते १० मिनिटे अलीकडे-पलीकडे करण्यात आल्या आहेत. नवीन वेळापत्रकानंतर गाड्या वेळेवर धावतील अशी अपेक्षा होती, मात्र जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच लोकल विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला आहे.रेल्वे प्रशासनाने यापूर्वी दावा केला होता की, समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग सुरू झाल्यावर प्रवासी गाड्यांसाठी मार्ग मोकळा होईल. त्यासाठी अनेक ठिकाणी फाटक बंद करून उड्डाणपूल उभारले गेले. मात्र, प्रत्यक्षात मालवाहू मार्गाचा १०० टक्के वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. आजही मालगाड्या आणि स्पेशल गाड्या उपनगरीय मार्गावरूनच धावत असल्याने लोकलला 'लूप लाईन'वर ताटकळत उभे राहावे लागत आहे. एकीकडे १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना तसेच १८ डब्यांच्या वातानुकूलित गाडीची चाचणी करण्याचे पश्चिम रेल्वेने वेळापत्रक जाहीर केल्यानंतर १५ डब्यांच्या लोकल गाड्यांचा विस्तार विरार ते डहाणू रोड दरम्यान करणे अपेक्षित आहे. विरारच्या फलाट फेररचनेनंतर त्याची अंमलबजावणी होईल असे आश्वासन दिले जात असले तरी सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांमधून १५ डब्यांच्या गाड्या सुरू करणे अशक्य नव्हते असे प्रवाशांचे म्हणणे आहे. विरार ते डहाणू रोड दरम्यान झालेले औद्योगीकरण व परिणामी झालेले नागरीकरण यामुळे डहाणू रोड येथून सुटणारी उपनगरीय सेवा ही बोईसर रेल्वे स्थानकातच गच्च भरून जात असते. या पार्श्वभूमीवर बोईसर व पालघर येथून बोरिवली, अंधेरी, दादर करिता उपनगरीय सेवा सुरू करावी ही अपेक्षा देखील फोल ठरली आहे. नवीन वेळापत्रकामध्ये गर्दीच्या वेळी तसेच पहाटे लवकर व रात्री उशिरा नव्याने उपनगरीय सेवा सुरू करण्याची मागणी नवीन वेळापत्रकात दुर्लक्षित राहिली आहे. असे असताना दोन्ही दिशेला किमान चार-पाच प्रसंगी अर्ध्या पाऊणतासाच्या अंतरावर तीन-चार गाड्या धावण्याचे प्रकार घडत असून अशा प्रसंगी रिकामी धावणाऱ्या सेवांमधील अंतर वाढवून गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करणे देखील गरजेचे झाले आहे.नव्याने सेवा सुरू करताना थेट चर्चगेटपर्यंत गाडी उपलब्ध व्हावी तसेच विरार व बोरिवली इथपर्यंत असणाऱ्या सेवा पुढे अंधेरी दादरपर्यंत विस्तारित करण्याच्या मागणीचादेखील गांभीर्याने विचार व्हावा अशी अपेक्षा आहे.विशेष म्हणजे उपनगरीय सेवा विरारपलीकडे धावताना केळवे रोड, पालघर, बोईसर व वाणगाव या रेल्वे स्थानकात अनेकदा बाजूला (साईडिंग) आणून ठेवल्या जात असून अशा प्रसंगी दोन ते पाच लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देऊन पुढे काढले जाण्याचे प्रकार घडत आहेत.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 10:10 am

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणावॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांसाठी अडचणी वाढवल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की, इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिका २५ टक्के टॅरिफ लावणार आहे. ट्रम्प यांनी हा आदेश अंतिम आणि निर्णायक असल्याचे सांगितले आहे. या निर्णयामुळे इराणवर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आपल्या ट्रुथ सोशल या प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी सांगितले की, “तत्काळ प्रभावाने, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणसोबत व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही देशाला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सोबत होणाऱ्या सर्व व्यवसायावर २५ टक्के टॅरिफ भरावा लागेल. हा आदेश अंतिम आणि निर्णायक आहे.” मात्र, ही धोरणे नेमकी कशी अमलात आणली जातील, कोणत्या देशांवर त्याचा परिणाम होईल, किंवा मानवीय अथवा धोरणात्मक व्यापारासाठी काही सवलत दिली जाईल का, याबाबत ट्रम्प यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. गेल्या सुमारे १५ दिवसांपासून इराणमध्ये देशव्यापी आंदोलन सुरू आहेत. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, हे शुल्क तत्काळ लागू होतील. यापूर्वी व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनीही अप्रत्यक्षपणे इराणला इशारा दिला होता.ट्रम्प यांच्या या पावलामुळे जागतिक पातळीवर अमेरिकेचे अनेक महत्त्वाचे व्यापार संबंध बिघडण्याची शक्यता आहे. इराणच्या व्यापार भागीदारांमध्ये केवळ शेजारी देशच नव्हे, तर भारत, तुर्की, चीन आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांचाही समावेश आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की त्यांचे प्रशासन तेहरानसोबत बैठक घेण्यासाठी चर्चा करत आहे. मात्र, मृतांचा आकडा वाढत जाणे आणि इराणी सरकारकडून आंदोलकांना अटक करण्याची कारवाई सुरू राहिल्यास, त्या आधीच कारवाई करावी लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 10:10 am

कोकण रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका

वर्षभरात २० कोटींचा दंड वसूलमुंबई : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी प्रशासनाने 'विनातिकीट' प्रवाशांविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. गेल्या वर्षभरात (२०२५) राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमांमुळे कोकण रेल्वेच्या तिजोरीत दंडापोटी तब्बल २०.२७ कोटी रुपयांची भर पडली असून ३ लाख ६८ हजारांहून अधिक अनियमित प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला आहे.केवळ डिसेंबर २०२५ या एका महिन्यात रेल्वेने ९९८ मोहिमा राबवल्या. यामध्ये ४३,८९६ फुकट्या प्रवाशांकडून २.४५ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सणासुदीच्या आणि सुट्ट्यांच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली होती.कोकण रेल्वेवर पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळुर ते उडुपीदरम्यान धावली. रोहा – वीर – खेड – सावंतवाडी या मार्गाचे काम डिसेंबर १९९६ मध्ये पूर्ण झाले. उत्तर गोव्यामधील पेडणे येथील एका बोगद्याचे काम पूर्ण होण्यास एकूण ७ वर्षे ३ महिने कालावधी लागला. अखेर २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर १९९८-९९ सालापासून कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यास सुरुवात झाली. कोकण रेल्वेवरून दर आठवड्याला ४३ ते ४५ नियमित गाड्या धावतात.याशिवाय उन्हाळी सुट्ट्या आणि गणेशोत्सवाच्या काळात चालवल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या ४ ते ५ हजारांपर्यंत जाते. अशा वेळी अधिकृत तिकीटधारकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रत्येक विशेष गाडीमध्ये तपासणी पथकाद्वारे कडक चेकिंग केले जात आहे.वर्षभरातील मोहिमेचा लेखाजोखा (जानेवारी-डिसेंबर २०२५) :कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर या ७४० किमीच्या मार्गावर रेल्वे सुरक्षा दल आणि तिकीट तपासणी पथकाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली.एकूण कारवाया : ८,४८१ विशेष तिकीट तपासणी मोहिमा.पकडलेले प्रवासी : ३,६८,९०१ (अनधिकृत आणि अनियमित प्रवासी).वसूल केलेला दंड : २० कोटी २७ लाख रुपये.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 10:10 am

ऐकावे ते नवलचं! अंत्यविधीची तयारी सुरु केली अन्…; १०३ वर्षांची आजीबाई मृत्यूच्या दाढेतून परतली

नागपूर : मृत्यू हा कुणालाच चुकलेला नाही. जो जन्मला येतो त्याला एक दिवस या जगाचा अखेचा निरोप घ्यावा लागतो. हे त्रिकालबाधीत सत्य आहे. मात्र, मृत्यूला चकवा देऊन पुन्हा परतणारे अनेकजण असतात. अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यातील रामटेकमधील चारगावत घडली आहे. १०३ वर्षांच्या आजी चक्क मृत्यूच्या दारातून परतल्या आहेत. ही घटना एखाद्या चित्रपटासारखी असून जिल्ह्यात चर्चेचा […] The post ऐकावे ते नवलचं! अंत्यविधीची तयारी सुरु केली अन्…; १०३ वर्षांची आजीबाई मृत्यूच्या दाढेतून परतली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 9:38 am

भारताचे ‘बाहुबली’ यश

नुकतेच ‘इस्रो’चे प्रचंड क्षमतेचे ‘बाहुबली’ रॉकेट प्रक्षेपित करून देशाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. या प्रक्षेपणाचा लाभ अनेक क्षेत्रांना होणार असून ‘डायरेक्ट-टू-स्मार्टफोन’ ही नवी तंत्रज्ञान प्रणाली कार्यान्वित झाल्यामुळे देश प्रगतिपथावरून वेगाने वाटचाल करू शकणार आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, व्यापार आदी क्षेत्रांना विनाखंडित इंटरनेट मिळण्याचे अनेक लाभ बघायला मिळतील.डॉ. दीपक शिकारपूरभारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर कर्तृत्वाचा झेंडा फडकावला. २४ डिसेंबर २०२५ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून एलव्हीएम ३-एम ६ या भारताच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. प्रचंड क्षमतेमुळे या रॉकेटला ‘बाहुबली’ असे टोपणनाव देण्यात आले. हे केवळ एक रॉकेट प्रक्षेपण नव्हे, तर अंतराळ क्षेत्रातील भारताच्या वाढत्या व्यावसायिक ताकदीचे आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचे एक जिवंत प्रतीक आहे. या मोहिमेद्वारे अमेरिकेचा ‘ब्लू बर्ड ब्लॉक-२’ हा महाकाय उपग्रह अवकाशात स्थापित करण्यात आला असून त्याचा थेट परिणाम आगामी काळात आपल्या मोबाईल वापरावर होणार आहे. या प्रक्षेपणाचा सर्वात मोठा आणि थेट फायदा सामान्य मोबाईल वापरकर्त्यांना मिळणार आहे. सध्या मोबाईलवर इंटरनेट वापरण्यासाठी आपण जमिनीवरील टॉवर्सवर अवलंबून असतो. मात्र, ब्लू बर्ड ब्लॉक-२ उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे ‘डायरेक्ट-टू-स्मार्टफोन’ ही नवी तंत्रज्ञान प्रणाली कार्यान्वित होणार आहे. यामुळे सामान्य ४ जी आणि ५ जी स्मार्टफोन्सना कोणत्याही विशेष उपकरणाशिवाय थेट अंतराळातून कनेक्टिव्हिटी मिळेल. यामुळे दुर्गम डोंगरदऱ्या, समुद्र किंवा मोबाईल टॉवर्स लावणे अशक्य असणाऱ्या ठिकाणीही आता हाय-स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट उपलब्ध होईल. जगातील ‘डिजिटल दरी’ कमी होण्यास मदत होईल आणि ग्रामीण भागातील नागरिकही जागतिक माहिती तंत्रज्ञानाशी जोडले जातील. एलव्हीएम ३-एम ६ ने अवकाशात सोडलेला ब्लू बर्ड ब्लॉक-२ हा उपग्रह एका फिरत्या ‘मोबाईल टॉवर’सारखा काम करतो. सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा २२३ चौमीचा विशाल अँटेना. इतका मोठा असल्यामुळेच तो पृथ्वीपासून ५०० ते ६०० किलोमीटर उंचीवरून तुमच्या खिशातील लहानशा मोबाईलमधील कमकुवत सिग्नल पकडून प्रतिसाद देऊ शकतो. पारंपरिक सॅटेलाइट इंटरनेटसाठी घराच्या छतावर एक विशेष ‘डिश’ लावावी लागते; परंतु या तंत्रज्ञानात उपग्रह थेट फोनमधील एलटीई ५जी लहरींशी संवाद साधतो. या मोहिमेचा सर्वात मोठा आणि थेट फायदा व्होडाफोन आयडियाच्या वापरकर्त्यांना मिळण्याची शक्यता आहे.बीएसएनएल विशेषतः आपत्कालीन सेवा, लष्करी गरजा आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी सॅटेलाइट मेसेजग आणि कॉल सेवा सुरू करण्यावर भर देत आहे. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल सध्या ‘स्टारलक’ आणि ‘वनवेब’ यांसारख्या सेवांशी स्पर्धा किंवा सहकार्य करण्याच्या तयारीत आहेत. मात्र या सेवा सुरुवातीला ‘फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस’ यावर केंद्रित असू शकतात. भविष्यात फोनच्या ‘नेटवर्क सेटग्स’मध्ये ‘सॅटेलाइट रोमग’ असा पर्याय दिसू शकेल. तो सुरू केल्यानंतर तुम्ही टॉवरच्या कक्षेबाहेर गेल्यावरही फोन सुरू राहील. ही सेवा प्रामुख्याने समुद्रात मासेमारीसाठी जाणारे कोळी, हिमालयात जाणारे ट्रेकर्स, जंगलातील रिसॉर्टस आणि राष्ट्रीय महामार्गावरील सिग्नल नसणाऱ्या जागांवरून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी वरदान ठरेल. या तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वापरकर्त्याला काहीही नवीन खरेदी करण्याची गरज नाही. म्हणजेच सॅटेलाइट फोन किंवा ‘स्टारलक’सारख्या छतावर बसवण्याच्या अँटेनाची गरज भासणार नाही. सध्याचा ४जी/५जी एलटीई तंत्रज्ञान असणारा स्मार्टफोनच उपग्रहाशी जोडला जाईल. या तंत्रज्ञानामुळे मोबाईल टॉवरची रेंज नसणाऱ्या ठिकाणी तुमचा फोन आपोआप उपलब्ध उपग्रह सिग्नल शोधेल. हे तंत्रज्ञान ‘रोमग’प्रमाणेच काम करेल. या सेवेअंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात वापरकर्ते आपत्कालीन एसएमएस, साधे मेसेज आणि व्हॉईस कॉल करू शकतील. लवकरच टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी ‘सॅटेलाइट ऑन डिमांड’ प्लॅन्स आणू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही हिमालयात ट्रेकला जाणार असाल तर काही दिवसांसाठी सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीचा पॅक घेऊ शकाल. या प्रक्षेपणामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात हाय-स्पीड इंटरनेट पोहोचेल. शिक्षण आणि आरोग्यासाठी त्याचा फायदा होईल. चक्रीवादळ, पूर आल्यावर जमिनीवरील टॉवर्स कोसळले तरी उपग्रहाद्वारे मिळणारे नेटवर्क बचावकार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. ग्रामीण भागातील शेतकरी आणि छोटे व्यावसायिक उपग्रहाद्वारे इंटरनेटशी जोडले गेल्यामुळे थेट बाजारपेठेशी संपर्क साधू शकतील. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.दुसरी बाब म्हणजे आजही ग्रामीण भागातील दुकानांमध्ये नेटवर्क नसल्यास यूपीआय व्यवहार फेल होतात. मात्र ‘बाहुबली’ उपग्रहामुळे मिळणाऱ्या स्थिर नेटवर्कमुळे अगदी दुर्गम भागातील किराणा दुकानातही डिजिटल पेमेंट सहज शक्य होईल. फळे, भाजीपाला, औषधे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना ट्रकच्या ट्रॅकसाठी नेटवर्क आवश्यक असते. मात्र महामार्गावरील ‘ब्लॅक स्पॉट’मुळे यात अडचण येते. आता ही अडचणही सुटणार असून रिअल-टाइम ट्रॅकग शक्य होईल. सध्या खेड्यापाड्यातील बरीच मुले यूट्यूब किंवा इतर शैक्षणिक ॲप्सवरून अभ्यास करतात. पण पावसाळ्यात, खराब हवामानात फायबर तुटल्यास यात खंड पडतो. सॅटेलाइट इंटरनेटमुळेही अडचणही दूर होणार आहे. आणखी एक बाब म्हणजे छोट्या शहरांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नेहमीच कमतरता असते. असे असताना सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीमुळे ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या शहरातील डॉक्टरांशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधू शकतील.वेळीच उपचार मिळून अनेकांचे जीव वाचू शकतील. याबरोबरच सरकारी सेवांमध्येही याची मदत होईल. जसे की, सातबारा उतारा काढणे, आधार अपडेट करणे, पीक विम्याचे अर्ज भरणे अशा कामांसाठी चॉईस सेंटर, ग्रामपंचायतीत इंटरनेट लागते. आता सॅटेलाइटमुळे या सेवांचे सर्व्हर कधीही ‘डाऊन’ राहणार नाहीत. या सेवेचा लाभ होमस्टे आणि हॉटेल व्यवसायालाही होईल. आपल्याकडे कोकण, सह्याद्रीचे गडकिल्ले, गडचिरोलीसारख्या भागांमध्ये पर्यटन वाढत आहे. मात्र सध्या बऱ्याच पर्यटकांना ‘वर्क फ्रॉम होम’ची इच्छा असते. नेटवर्क नसल्यास अशांची अडचण होते. मात्र सॅटेलाइट इंटरनेटमुळे अशा ठिकाणी ‘वर्केशन’ ही संकल्पना रुजेल आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील.‘बाहुबली’ रॉकेटची ही झेप भारताच्या कानाकोपऱ्यांतील शेवटच्या माणसाला ‘डिजिटल इंडिया’चा खरा भाग बनवणार आहे. इस्रोचे हे ‘बाहुबली’ प्रक्षेपण भारताला ‘सॅटेलाइट-टू-स्मार्टफोन’ क्रांतीच्या शर्यतीत जगातील आघाडीच्या देशांच्या रांगेत उभे करत आहे.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 9:30 am

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्तीरोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे दुर्दशा होते. मात्र याकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने दरवर्षी खारापटी गावांमधील गणेश आळी मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून रस्ता दुरुस्तीची मोहीम हाती घेत,.' गड वाचवा, दुर्ग संवर्धन करा ' या भावनेतून मित्र मंडळीने रविवारी दिवसभर श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे करण्याबरोबरच झाडीझुडपे साफ केली. गडावर प्रवेश करण्याआधी दहा ते पंधरा फूट लांबीची एक फांज लागते. ही फांज खोल असल्याकारणाने गडप्रेमींना गडावरती जाण्यास अडथळा निर्माण होत असतो; परंतु ही तरुण मंडळी दरवर्षी तिथे लाकडी पूल तयार करतात. गेल्या पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे आणि पाण्याचा निचरा न झाल्यामुळे अवचित गडाकडे जाणाऱ्या पायवाटेवर आणि मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. यामुळे पर्यटकांना आणि दुर्गप्रेमींना गडावर जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा पर्यटक घसरून सुद्धा पडतात. संबंधित विभागाचे याकडे कायम दुर्लक्ष होत आहे.खारापटी गावातील गणेश आळी मित्र मंडळीतील महेश चोरगे, जागृत पाटील, चेतन पाटील, शुभम पोकळे, कल्पेश पोकळे, रोहित सानप, केतन पीटनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गडाच्या पायथ्याशी खारापटीतील इतर तरुण जमा झाले होते. कुदळ, फावडे आणि इतर साहित्यांसह त्यांनी रस्ता दुरुस्तीला सुरुवात केली.रस्त्यावरील मोठे दगड बाजूला करणे, खड्डे मुरूम टाकून बुजवणे आणि वळणावरील अडथळा ठरणारी झुडपे काढण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले. छत्रपती शिवाजीमहाराजांचा वारसा जपणे हे आमचे कर्तव्य आहे. प्रशासनाच्या निर्णयाची वाट न पाहता, दुर्गप्रेमींना त्रास होऊ नये म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे .यापुढेही गडाच्या संवर्धनासाठी आम्ही सदैव तत्पर राहू अशी भावना गणेश आळी मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी 'दैनिक प्रहार'शी बोलताना सांगितले.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 9:30 am

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ११३ गावांचा समावेश आहे. मात्र, हे अभियान राबवुनही आदिवासींची वाट आजही खडतरच आहे. रायगड जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्यांवर आजही रस्ते नाहीत. निधी मंजूर असूनही आदिवासींची वाट आजही बिकटच असल्याच चित्र आहे.आदिवासी समाज डोंगर-दऱ्यात वास्तव्य करीत असून, आजही हा समाज मुख्य प्रवाहापासून दूरच आहे. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेला आहे. डोंगर दऱ्यात राहत असल्याने खाचखळग्यातून त्यांचा रोजच प्रवास करावा लागत आहे. रात्री-अपरात्री प्रवास करताना त्यांना अडचणीचे ठरत आहे. शासनाकडून आदिवासी समाजाच्या विकासासाठी नवनवीन योजना लागू केल्या जातात. मात्र, त्यांच्यापर्यंत त्या पोहचल्याच जात नाहीत. त्यामुळे आजही हा समाज सुधारणेपासून वंचित राहिला आहे. रायगड जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्यांवर आजही रस्ते नाहीत. रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र, तरीही रस्ते बांधण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी वन जमीन, तर काही ठिकाणी खासगी जमिनीची अडचण आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आजही खाच खळग्याचे रस्ते आहेत, आदिवासी वाड्यांवर विजेचीही सुविधा अपुरी आहे. पाण्याचीही समस्या आहे. शिक्षणासाठी डोंगर-दऱ्या उतरून मुलांना शाळेत यावे लागत आहे. आरोग्यासाठीही त्यांना झगडावे लागत आहे. मात्र, गेली अनेक वर्षे आदिवासी वाड्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून, स्वातंत्र्यानंतरही आदिवासी समाज हा पारतंत्र्यात राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अभियान सुरू झालेले असले, तरी विकासाच्या गप्पा या कागदावरच राहिलेल्या दिसत आहेत. अभियान अंतर्गत किती रस्ते झाले याबाबत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विभागाच्या कार्यकारी अभियंता सारिका देसाई यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्रामअभियानआदिवासी बांधवांना पक्के घर देणे, बारमाही रस्ते, जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरामध्ये नळाची सुविधा उपलब्ध करून देणे, प्रत्येक आदिवासी वाड्या-पाड्यांपर्यंत वीज सुविधा उपलब्ध करून देणे, जेथे जेथे शक्य आहे तेथे सौर विद्युत ऊर्जेद्वारे वीजपुरवठा उपलब्ध करून देणे, प्रत्येक वाडीतील प्रत्येक घरात एलपीजी गॅस जोडणी उपलब्ध करून देणे, तसेच अंगणवाडी केंद्र उभारून पोषण अभियान राबवणे या व यासारख्या अनेक सुविधांचा यात समावेश करण्यात येणार आहे.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 9:30 am

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयारविरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी सायंकाळी प्रचाराची मुदत संपली असून, उमेदवारांनी आता खाजगी रीत्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सज्ज झाली आहे. मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र, स्ट्रॉंग रूम, कर्मचारी प्रशिक्षण, अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून संपूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.वसई विरार महानगरपालिका हद्दीत ११५ जागांसाठी उद्या ( गुरुवारी ) मतदान होणार आहे. यासाठी एकूण ५४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून ११ लाख २६ हजार ४०० मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. निवडणुकीसाठी एकूण १ हजार ३३५ मतदार केंद्र तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी एकूण ८ हजार १० कर्मचारी तैनात करण्यात आले असून या सर्वांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. तसेच ३१७ ठिकाणी दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त निवडणुकीकरिता ९ निवडणूक निर्णय अधिकारी आणि ९० केंद्र निहाय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिली. तसेच प्रशासनातर्फे सर्व तयारी पूर्ण झाली असून वसई विरार मधील मतदारांनी मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.७० टक्के मतदारांना स्लिप पोहचल्या :वसई - विरार महानगरपालिका हद्दीतील उमेद्वारांसाठी शहराबाहेर राहणाऱ्या मतदारांकडून टपाली मतदान करण्यात आले आहे. एकूण ९३२ मतदारांनी टपाली मतदान केले आहे. तसेच यासह उद्या होणाऱ्या मतदानासाठी मतदारांपर्यंत मतदान स्लिप पोचविण्याचे काम देखील सुरु असून ते ७० टक्के पूर्ण झाल्याची माहिती पालिकेने दिली. तसेच मतदारांना आपल्या मतदान केंद्राची माहिती हवी असल्यास पालिकेच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती उपलब्ध असल्याची माहिती पालिकेने दिली. यासह मतदान करताना मतदारांनी ४ मत एका वेळी देणे गरजेचे आहे. मात्र एखाद्या मतदाराने केवळ एकाच उमेदवाराला मत दिल्यानंतर इतर तिघांना मत देण्यास नकार दिल्यास उपस्थित कर्मचाऱ्यांच्या मदतीने नोटावर मत देण्यात येणार असल्याचिं माहिती पालिका आयुक्तांनी दिली.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 9:30 am

“…तर तुम्हाला परिणाम भोगावे लागतील…” ; ट्रम्पची इराण सरकारला थेट धमकी

Iran Protest । इराणमधील देशव्यापी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला कडक इशारा दिला आहे. जर इराणी सरकारने त्यांच्याच नागरिकांविरुद्ध हिंसक कारवाया सुरू ठेवल्या तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. डेट्रॉईटमधील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की अमेरिका इराणमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, विशेषतः निदर्शकांच्या […] The post “…तर तुम्हाला परिणाम भोगावे लागतील…” ; ट्रम्पची इराण सरकारला थेट धमकी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 9:30 am

Nupur Stebin: नववधू नूपुर सेननचा रॉयल अंदाज; रिसेप्शनमध्ये स्टेबिन बेनसोबतची केमिस्ट्री ठरली चर्चेचा विषय

Nupur Stebin: बॉलिवूड अभिनेत्री कृति सेननची धाकटी बहीण नूपुर सेनन आणि प्रसिद्ध गायक स्टेबिन बेन यांच्या लग्नानंतर मुंबईत पार पडलेली रिसेप्शन पार्टी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. ११ जानेवारी २०२६ रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याने १३ जानेवारीला मुंबईत भव्य रिसेप्शन आयोजित केलं होतं. या रिसेप्शनला चित्रपटसृष्टी आणि संगीतविश्वातील अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते. […] The post Nupur Stebin: नववधू नूपुर सेननचा रॉयल अंदाज; रिसेप्शनमध्ये स्टेबिन बेनसोबतची केमिस्ट्री ठरली चर्चेचा विषय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 9:26 am

बेरोजगारी लादू इच्छिणाऱ्या ठाकरे बंधूंना घरी बसवा

भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलारांचा घणाघातमुंबई : दोन्ही ठाकरे बंधू गुंतवणूक विरोधी आहेत. रोजगार निर्मितीच्या विरोधात आहेत, अशी टीका भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी केली. बुलेट ट्रेनला दोघांचाही विरोध म्हणजे ९० हजार रोजगारांना विरोध आहे. नाणार प्रकल्पाला विरोध म्हणजे जवळपास दीड लाख रोजगाराला विरोध असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली. मुंबई मेट्रो प्रकल्पाला उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिली होती. या प्रकल्पाला दोन्ही ठाकरेंचा विरोध होता. वाढवण बंदराला दोघांचाही विरोध असल्याचे शेलार म्हणाले.बेरोजगारी लादू इच्छितात त्या ठाकरेंना घरी बसवण्याची ही निवडणूक असल्याची टीका शेलारांनी केली. इथे गुंतवणूक आली तर त्याला पिटा.उद्योजक विरोधी, युवक विरोधी आणि कामगार विरोधी यांची भूमिका असल्याचे शेलार म्हणाले. पुरावा आम्हाला नका देऊ, संबंधित आयोगाला तर द्या. अयोग्य अनाठायी असं काही असेल तर तक्रार करा ना. नेपथ्यात एक्सपर्ट आहातच, सादरीकरण पण चांगलं करा ना. आम्ही अदानी कंपनीची वकिली करत नाही असे शेलार म्हणाले. आयसीआयसीआय बॅंकेचा नफा एक हजार कोटींनी वाढला मग काय सरकारचा हात आहे म्हणायचं का? मूळात सल्लागार कशी वाट लावू शकतात हे दिसते, असे शेलार म्हणाले.राज ठाकरेंनी सल्लागारांपासून सावध राहावेराज ठाकरेंनी सल्लागारांपासून सावध राहावे, असे मंत्री शेलार म्हणाले. त्या आधारे बोलले की कशी अडचण निर्माण होते. आता त्यांना स्पष्टीकरण द्यायला लागत आहे की, मी अदानी समूहाचा वकील नाही. शरद पवार यांनी अदानींना हात दिला त्यांना का नाही प्रश्न विचारत? असा सवाल शेलारांनी केला. मात्र आमच्यावर दोषारोपण करणार असाल तर मला उत्तर द्यावे लागेल, असे शेलार म्हणाले. ३७ वर्षांपासून अदानी काम करत आहेत. मग १० वर्षं आणली कुठून? असा सवाल शेलारांनी राज ठाकरेंना केला. वेठीस धरू नये, मुद्दा बरोबर पण जागा चुकीची आहे. देशात स्पर्धा आयोग आहे, त्यांचे कामच हे आहे की व्यावसायिक मोनोपॉली होऊ नये म्हणून तक्रार करता येते, त्यांनी तक्रार केली आहे का? न्यायालयासमोर जामीन अर्ज केल्यावर जामीन मिळतो असे शेलार म्हणाले. एखादा प्रकल्प प्रोजेक्ट प्रकल्प कायदेशीर प्रक्रियेत जपून होत असेल किंवा नसेल तर आयोगात तक्रार करा ना असेही ते म्हणाले.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 9:10 am

मतदान प्रक्रियेसाठी मुंबई पोलीस सज्ज

२५ हजारांहून अधिक मनुष्यबळ तैनातमुंबई : महापालिका निवडणुकीचा प्रचार थंडावल्यांनतर मतदान आणि मतमोजणीपर्यंतीची महत्त्वाची प्रक्रिया शांततेत, मोकळ्या आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवल्याचा दावा मंगळवारी मुंबई पोलिसांनी केला.मंगळवारी संध्याकाळी ५ च्या ठोक्याला निवडणूक प्रचार थांबला. प्रत्यक्षात त्यानंतरच पैसेवाटप, वस्तू वाटप सुरू होते, या अनुभवामुळे दाट लोकवस्तीचे, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या प्रभागांमध्ये पोलिसांनी मंगळवार संध्याकाळपासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत विशेष उपाययोजना आखल्या आहेत. यात गस्त वाढवणे, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबतचा समन्वय दृढ केल्याचे सांगण्यात आले. ठरावीक धर्म, समाज, भाषिक नागरिकांनी मतदानासाठी घराबाहेर पडूच नये या उद्देशाने ठरावीक राजकीय पक्ष स्वतःच्या सोयीने रणनिती आखतात. त्यामुळे त्या त्या प्रभागातील मतदानाचा टक्का घसरतो. असे प्रकार घडू नयेत, बोगस मतदान होऊ नये यासाठी सर्वत्र करडी नजर ठेवून आहोत, असे मुंबई पोलीस दलाकडून स्पष्ट करण्यात आले.ठाकरे बंधूंनी बोगस मतदान, दुबार मतदान टाळण्याच्या उद्देशाने भगवा गार्ड या नावाने कार्यकर्त्यांची फौज प्रत्येक मतदान केंद्राबाहेर तैनात ठेवू, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे निर्माण होणारा संघर्ष, राजकीय शत्रुत्वातून उद्भवणारी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी सज्ज असल्याचे पोलिसांनी सांगितले.२५ हजार पोलीस तैनात : १५ जानेवारी रोजी आयुक्त देवेन भारती यांच्या थेट देखरेखीखाली १० अतिरिक्त पोलीस आयुक्त, ३३ पोलीस उपआयुक्त, ८४ सहायक आयुक्त यांच्यासह तीन हजारांहून अधिक पोलीस अधिकारी आणि २५ हजाराहून अधिक अंमलदार असा ताफा शहराच्या कानाकोपऱ्यात तैनात असेल. संवेदनशील प्रभागांमध्ये पोलीस बंदोबस्तासह एसआरपीएफ, क्युआरटी, बीडीडीएस, आरसीपी, गृहरक्षक दल आदी विशेष तुकड्या तैनात ठेवल्या जातील, असे सांगण्यात आले.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 9:10 am

घरोघरी गाठीभेटींवर उमेदवारांचा भर!

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मागील काही दिवसांपासून धडाधडाणाऱ्या राजकीय तोफा अखेर मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. निवडणुकीसाठी प्रचारासाठी असलेला कालावधी सायंकाळी संपुष्टात आला आणि मागील काही दिवसांपासून कानावर पडणारा मतदार बंधू भगिनींनो हा आवाज शांत झाला. त्यामुळे प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून फिरणारे उमेदवार आणि कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी सुटकेचा निश्वास टाकला असून आता प्रतीक्षा आहे ती येणाऱ्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाची. या दिवशी जास्तीत जास्त मतदारांना बाहेर काढून आपल्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची रणनिती आखली आहे. उमेदवारांनी घरोघरी गाठीभेटीवर भर दिला आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्यावतीने तसेच अपक्षांसह तब्बल १७०० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर दुसऱ्याच दिवशी मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी मागील ३ जानेवारीपासून प्रचाराला सुरुवात झाली होती आणि प्रचाराची सांगता मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता झाली आहे. मागील दहा ते अकरा दिवसांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जाहीर सभांसह घरोघरी जावून प्रचार करण्यावर भर दिला. मागील अकरा दिवसांमध्ये उमेदवारांनी घरोघरी प्रचाराच्या फेऱ्या पूर्ण केल्या आणि जाहीर सभांद्वारेही मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे घरोघरी प्रचारासाठी विविध शक्कल लढवत प्रचार करतानाच आपली प्रचार पत्रके वाटली आणि याद्वारे यापूर्वी केलेली कामे तसेच पुढील पाच वर्षांतील व्हिजन मतदारांपुढे ठेवले. मुंबईतील रविवारी ठाकरे बंधूंची तर सोमवारी भाजप आणि शिवसेना महायुतीची सभा झाल्यामुळे या दोन्ही दिवशी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचा प्रचाराचा एक दिवस वाया गेला.राजकीय पक्षांचे उमेदवारभाजप :१३७शिवसेना: ९०उबाठा :१६३मनसे : ५३राष्ट्रवादी (शप): ११काँग्रेस :१३९वंचित बहुजन : ६२रासप : १०रिपाइं : ३९राष्ट्रवादी काँग्रेस : ९४समाजवादी पक्ष :९०

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 9:10 am

मतांसाठी ‘मोफत आश्वासनां’ची शर्यत

महापालिका निवडणुका जवळ येत आहेत; तसे मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या मोफत आश्वासनांची खैरात पक्षांकडून करण्यात आली. मतांच्या बेरजेसाठी मतदारांना मोफत सेवा-सुविधा पुरविणात आल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत त्या यशस्वी ठरल्या. तोच फंडा आता महापालिका निवडणुकांमध्ये राबवला जात आहे. पुण्यात सर्वच प्रमुख पक्षांनी तशी आश्वासने दिली आहेत. अशी आश्वासने दिली तरी पुणेकर याकडे कसे पाहत आहेत याची उत्सुकता आहे. ते प्रत्यक्ष मतदानाचा निकाल लागल्यावरच कळेल.वार्तापत्र मध्य महाराष्ट्र प्रतिनिधीबहुतेक सर्वच पक्षांनी शहरापुरते मर्यादित असलेले जाहीरनामे प्रसिद्ध केले. त्यामध्ये मोफत अश्वासनांची खैरातच करण्यात आली. याच माध्यमातून पुणेकरांना मोठमोठी स्वप्ने दाखविण्यात आली. पुणेकर वारंवार रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांना सर्वाधिक वैतागले आहेत. शहरातील वाहतूक कोंडी हाही एक पुणेकरांसाठी गंभीर विषय आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणाच्या विळख्यातून कधी बाहेर पडणार, याची प्रतीक्षाही पुणेकरांना आहे. पुणे शहरात सध्या होत असलेल्या प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस ढासळत आहे. यातच मोकळा श्वास घेता येईल का? याची चिंता पुणेकरांना सतावत आहे. सातत्याने होत असलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे पुणेकरांचे आरोग्य ढासळत आहे. यातील समस्या सोडविण्यासाठी राजकीय पक्षांनी जाहीर केलेल्या उपययोजना प्रत्यक्ष अमलात आणणयासाठी भूमिका घ्यायला हवी. तसे न करता निवडणुका जिंकण्यासाठी मोफत आश्वासनांचा पाऊस सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी पाडला आहे. सर्वच सुविधा मोफत द्यायच्या आश्वासनामुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर ताण येणार आहे. मोफत योजना राबवताना त्यासाठी लागणारा पैसा कुठून आणणार? याचा एकाही पक्षाने विचार केला आहे का? केवळ मतं आपल्या पदरात कशी पडतील याचा विचार करून जाहीरनामे तयार केले. या आश्वासनांची अर्थसंकल्पात तरतूद कशी करणार याचे उत्तर कुठल्याच राजकीय पक्षाकडे नाही. कारण सध्या निवडणूक जिंकणे एवढा एकच उद्देश आहे. सत्तेसाठी काहीही करण्याची मानसिकता सर्वच पक्षांची तयार केली आहे.भाजपच्या वतीने ७५ वर्षांपुढील नागरिकांना पीएमपी प्रवास मोफत, ३० वर्षांवरील नागरिकांची मोफत आरोग्य तापसणीचे आश्वासन देण्यात आले आहे; तर शिवसेनेकडून झोपडपट्टीधारकांना ५५० चौरस फुटांचे घर मोफत, ५०० चौरस फुटांपर्यंत मिळकतकर नाही. अशा आश्वासनांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवसेना-मनसेकडून ज्येष्ठांना आणि महिलांना बस प्रवास मोफत. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना मोफत औषधे असे आश्वासन देत मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसकडून महिलांना मोफत बस प्रवास, ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मिळकतकर माफ करून मिळणार आहे, अशी आश्वासने दिली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मेट्रो, पीएमपी मोफत आणि विद्यार्थ्यांना टॅब असे आश्वासन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने मेट्रो, पीएमपी मोफत मिळणार या घोषणेवर भाजप आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यासाठी मंत्रिमंडळाची परवानगी आवश्यक असल्याचा दावा केला. त्यावर स्थानिक कार्यक्षेत्रासाठी महापालिका निर्णय घेण्यास सक्षम असल्याचे प्रत्युत्तर अजित पवारांकडून देण्यात आले. मेट्रोचे उद्घाटन झाले पण, बससेवा का कमी झाली? कर वाढतात पण, सुविधा का वाढत नाहीत? असे अनेक प्रश्न समोर उभे आहेत. ‘लाडक्या बहिणीं’चा जनाधार आपल्यालाच आहे, असा दावाही पक्षांकडून करण्यात येत आहे. राजकीय पक्ष प्रचारात गुंतला असताना पुणेकरांची मात्र, रोजच्या समस्यांशी झुंज सुरू आहे. नागरिकांच्या दृष्टीने पाहिले तर, मत देताना केवळ मोफत आश्वासनांवर भुलून न जाता पक्षांची विकासाची दृष्टी, प्रशासनातील पारदर्शकता आणि दीर्घकालीन धोरणे यांचा विचार करणे गरजेचे आहे. सुजाण मतदार म्हणून प्रŽश्न विचारणे आणि जबाबदारीची जाणीव ठेवणे ही काळाची गरज आहे.एकंदरीत, पुण्यात राजकीय पक्षांकडून सुरू असलेली मोफत आश्वासनांची खैरात हा विषय केवळ निवडणुकांपुरता मर्यादित नसून तो शहराच्या भविष्यासंदर्भातील गंभीर प्रŽश्न आहे. मोफत योजनांमुळे तात्पुरता दिलासा मिळू शकतो, मात्र शाश्वत विकासासाठी ठोस नियोजन, आर्थिक शिस्त आणि पारदर्शक अंमलबजावणी आवश्यक आहे.पुणेकरांनी आणि राजकीय नेतृत्वाने मिळून ‘विकास संस्कृती’ला प्राधान्य दिले, तरच पुण्याचे उज्ज्वल भवितव्य घडू शकते. मोफत आश्वासनांचा आणखी एक गंभीर परिणाम म्हणजे काम करण्याची प्रेरणा कमी होणे. सातत्याने मोफत सुविधा मिळाल्यास काही प्रमाणात लोकांमध्ये आत्मनिर्भरतेऐवजी अवलंबित्व वाढते. रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याऐवजी थेट आर्थिक मदत दिल्यास दीर्घकाळात समाजाच्या प्रगतीला अडथळा निर्माण होऊ शकतो. लोकांना मदतीची गरज आहेच, पण ती मदत त्यांना सक्षम करणारी असावी, कायमची परावलंबी बनवणारी नसावी. राजकीय दृष्टीने पाहिले असता, मोफत आश्वासने ही निवडणूक जिंकण्याची सोपी युक्ती ठरत आहे. विकासाचे कठीण प्रŽश्न, प्रशासनातील सुधारणा, भ्रष्टाचार निर्मूलन यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी आकर्षक मोफत घोषणांवर भर दिला जातो. यामुळे लोकशाहीतील चर्चेची पातळी खालावते.मतदारही दीर्घकालीन हिताचा विचार करण्याऐवजी तत्काळ मिळणाऱ्या फायद्याकडे अधिक आकर्षित होतात, ही बाब चिंताजनक आहे. राजकीय पक्षांनी मोफत आश्वासनांचा सपाटा लावला आहे. त्याला पुणेकर हुरळून जाणार नाही. कारण जनतेने आधीच ठरवलेले असते की, कोणत्या पक्षाला मतदान करायचे. त्यात पुणेकर चिकित्सक वृत्तीचे आहेत. त्यामुळे मोफत आश्वासनांना हुरळून न जाता ते योग्य त्या पक्षाला, योग्य त्या वक्तीला निवडून देतील यात शंका नाही.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 9:10 am

पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; तीन दिवस ‘हे’प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीसाठी उद्या १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहे. शहरात १४ ते १६ जानेवारी या दिवसांसाठी हे बदल असणार आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन […] The post पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; तीन दिवस ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 8:59 am

“खिशात नाही दाणा, मला बाजीराव म्हणा”, “महेश लांडगे नासका आंबा”,आजपासून पीएमओचा पत्ता बदलणार, अशा टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर

“खिशात नाही दाणा, मला बाजीराव म्हणा” पुणे महापालिकेची निवडणूक म्हणजे गल्लीबोळातील दादागिरीची निवडणूक समजून काही लोक मनमानी आश्वासने देत आहेत.खिशात नाही दाणा, मला बाजीराव म्हणा, असा त्यांचा व्यवहार आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना मंगळवारी मारला.पुणे महापालिका निवडणुकीच्या महायुतीच्या ‘विजय संकल्प’ सभेची सांगता फडणवीस यांच्या सभेने झाली. आम्ही जे बोलतो ते करून […] The post “खिशात नाही दाणा, मला बाजीराव म्हणा”, “महेश लांडगे नासका आंबा”,आजपासून पीएमओचा पत्ता बदलणार, अशा टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 8:47 am

Hema Malini: हेमा मालिनींनी धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ का पाहिलेला नाही? कारण सांगताना म्हणाल्या…

Hema Malini: बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला दीड महिन्यांहून अधिक काळ झाला असला, तरी त्यांच्या जाण्याचं दुःख कुटुंबीय आणि चाहत्यांच्या मनातून अजूनही गेलेलं नाही. त्यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपली भावना व्यक्त केली. धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट आपण आणि […] The post Hema Malini: हेमा मालिनींनी धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ का पाहिलेला नाही? कारण सांगताना म्हणाल्या… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 8:46 am

भाजप-शिवसेना आमनेसामने! शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना पोलिसांनी रुग्णालयातूनच घेतलं ताब्यात

KDMC Election 2026 | महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर डोंबिवलीत मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. डोंबिवली भाजप- शिंदेसेना हाणामारी प्रकरणात शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना हॉस्पिटलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रभाग क्रमांक २९ मधील भाजप उमेदवाराच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांना अटक केली आहे. शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना पोलिसांनी अटक […] The post भाजप-शिवसेना आमनेसामने! शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना पोलिसांनी रुग्णालयातूनच घेतलं ताब्यात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 8:45 am

थंडी पुन्हा परतणार? पुढील पाच दिवस कसे असणार हवामान? जाणून एका क्लिकवर सविस्तर….

Weather in Maharashtra : महाराष्ट्रात यंदाची थंडी हाड गोठवणारी ठरली. सध्या स्थितीत गेल्या काही दिवसांपसासून थंडी कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र याच दिवसांत वातावरणात देखील बदल जाणवत आहेत. सकाळी काही अंशी थंडी त्यानंतर दुपारी ढगाळ वातावरण आणि सायंकाळी पावसाच्या तुरळक सरी काही भागांत कोसळत आहेत. त्यामुळे आता पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील हवामान नेमके कसे […] The post थंडी पुन्हा परतणार? पुढील पाच दिवस कसे असणार हवामान? जाणून एका क्लिकवर सविस्तर…. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 8:41 am

कुत्रा चावल्यास मोबदला राज्य सरकारने द्यावा!

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयनवी दिल्ली : कुत्र्यांनी घेतलेला चावा किंवा हल्ल्यामुळे जर कुणी जखमी झाला किंवा कुणाचा मृत्यू झाल्यास मोबदला देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.दिल्ली एनसीआरसह देशातील अनेक शहरांमध्ये कुत्र्यांचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, कुत्र्यांच्या चाव्यामुळे कोणतीही व्यक्ती जखमी झाली किंवा मृत्यू झाली, तर राज्य सरकारला मोबदला द्यावा लागेल. न्या. विक्रम नाथ यांनी श्वानप्रेमींना जबाबदार मानले आहे. तसेच कोर्टाने असा सल्ला दिला की, भटके कुत्रे भुंकून, चावा घेऊन दहशत पसरवतात. त्यामुळे ज्यांना श्वानांचे खूप प्रेम वाटते त्यांनी भटक्या कुत्र्यांना आपल्या घरी न्यावे असे न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी अॅड. मेनका गुरुस्वामी यांनी यावेळी युक्तिवाद केला की, मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा संवेदनशील विषय आहे. मात्र सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, ही संवेदनशीलता फक्त कुत्र्यांसाठी दाखवली जाते. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, सुप्रीम कोर्टाने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व शैक्षणिक संस्था, रुग्णालये, बस स्टँड, क्रीडा संकुल आणि रेल्वे स्थानकांवरून भटक्या कुत्र्यांना हटवण्याचा आदेश दिला होता. तसेच, सरकारी आणि सार्वजनिक स्थळांवर कुत्र्यांना प्रवेश न देण्याचा निर्देश दिला होता.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 8:30 am

ठाकरे बंधूंच्या तोंडी जिहादींची भाषा

राष्ट्रभक्त हिंदूंनी जागरूक राहून मतदान करण्याचे आवाहनमंत्री नितेश राणेंचा घणाघातमुंबई : ‘ठाकरे बंधूंची भाषा आणि जिहाद्यांच्या भाषेत आता काहीच फरक उरलेला नाही. ‘व्होट जिहाद’च्या माध्यमातून हिंदू समाजाला डिवचण्याचे काम सुरू असून, राष्ट्रभक्त हिंदूंनी जागरूक राहून मतदानातून या प्रवृत्तींना धडा शिकवावा’, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी केले.नितेश राणे म्हणाले की, लोकसभेपासून सुरू झालेला धर्माच्या नावावर मते मागण्याचा प्रकार आता महापालिका निवडणुकांपर्यंत पोहोचला आहे. जर चुकूनही यांच्या विचारांचा महापौर खुर्चीवर बसला, तर मुंबई-ठाण्याचे पूर्णपणे ‘हिरवेकरण’ होईल. सगळीकडे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा आणि ‘सर तन से जुदा’चे नारे ऐकू येतील. इतकेच नाही तर, सत्ता त्यांच्या हातात गेली तर उद्या मुंबई-ठाण्यात सण-उत्सव साजरे करणेही कठीण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.ठाकरे गटावर दुटप्पीपणाचा आरोप करताना मंत्री राणे म्हणाले, ‘एकीकडे संविधानाची भाषा करायची आणि दुसरीकडे बुरखेवाला महापौर करण्याची स्वप्ने पाहायची, हे अत्यंत दुर्दैवी आहे. तुम्हाला इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हवे आहे की शरिया कायदा लागू करायचा आहे?,’ असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.भेंडी बाजारात बोगस मतदार शोधाबोगस मतदारांचे पाय तोडण्याची भाषा करणाऱ्या ठाकरे बंधूंना राणे यांनी खुले आव्हान दिले. ते म्हणाले की, ‘जर हिंमत असेल तर आधी भेंडी बाजार, नळ बाजार आणि बेहराम पाडा यांसारख्या मोहल्ल्यांमध्ये जाऊन उभे राहा. तिथे एकाच व्यक्तीने बुरखा घालून १५-१५ वेळा मतदान केल्याचा इतिहास आहे. खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व मनात असेल, तर तिथे जाऊन बोगस मतदान रोखून दाखवा’, असे आव्हान नितेश राणे यांनी दिले.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 8:30 am

हुतात्म्यांवर गोळीबार करणारे काँग्रेसचेच राज्यकर्ते!

ठाकरे गटाला विसर पडलाय; रवींद्र चव्हाणांची टीकामुंबई : संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानावर गोळीबार करण्याचे पाप काँग्रेसचेच आहे, हे इतिहासात नोंदलेले सत्य असूनही ठाकरे गट जाणीवपूर्वक त्याकडे डोळेझाक करत आहे, अशी घणाघाती टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली. महापालिका निवडणूक प्रचाराच्या सांगतेवेळी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.रवींद्र चव्हाण म्हणाले की, १६ जानेवारी १९५६ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी मुंबई केंद्रशासित करण्याची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. या आंदोलनावर गोळीबार करणारे सरकार हे राज्यातही व केंद्रातही काँग्रेसचेच होते, हा सोयीस्कर विसर ठाकरेंना पडतो, असा आरोप त्यांनी केला.या घटनांतूनच प्रेरणा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी’ शिवसेनेची स्थापना केली, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मात्र आज ठाकरे गट काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून मराठीचा कैवार घेत आहे, ही मोठी विसंगती असल्याचे रवींद्र चव्हाण म्हणाले.कोकण रेल्वे आणि विकासाचा मुद्दा१९९० च्या दशकात कोकण रेल्वे सुरू झाली ती काँग्रेसमुळे नव्हे, तर मधू दंडवते व जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्यांमुळे. २०१४ नंतर मात्र भाजप सरकारच्या काळात कोकण रेल्वेवरील स्थानके सुसज्ज झाली आणि परिसराचा कायापालट झाला. काँग्रेसने कोकणासाठी काहीच केले नाही, असा आरोपही चव्हाण यांनी केला.

फीड फीडबर्नर 14 Jan 2026 8:30 am

लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:नेते मोठे झाले, पण संभाजीनगरकरांचा जगणं तिथंच थांबलंय...नळाजवळ, गटाराजवळ आणि अंधाऱ्या गल्लीत!

छत्रपती संभाजीनगर… हे शहर केवळ कागदावर स्मार्ट आहे. फलकांवर, भाषणांमध्ये, सरकारी कागदपत्रांमध्ये आणि जाहिरातीत ते झळकतं. पण जेव्हा आम्ही या शहराच्या गल्ल्यांत, वस्त्यांत, प्रभागांत पाय ठेवतो, तेव्हा प्रत्येक पावलागणिक एकच प्रश्न मनात घुमतो—हे खरंच आपलं शहर आहे का? आपण खरंच २१ व्या शतकात जगतोय का? दिव्य मराठीच्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या टॉक शोसाठी आम्ही शहरातील अनेक प्रभाग पिंजून काढले. कुठेही मुद्दाम दोष शोधायला गेलो नाही. फक्त नागरिकांमध्ये उभे राहिलो, त्यांचं ऐकलं, त्यांच्या घरात शिरलो, त्यांच्या नळातून येणारं पाणी पाहिलं, त्यांच्यासोबत रस्त्यांवरून चाललो. तेव्हा जाणवलं, या केवळ समस्या नाहीत, ही माणसांच्या जगण्यावरची थेट ओरखडे आहेत. महापालिकेच्या इमारतीपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेला प्रभाग क्रमांक ५. नावाला शहराचं हृदय. पण वास्तव मात्र अंगावर काटा आणणारं. अरुंद गल्ली, उघडे नाले, दुर्गंधी आणि नळ उघडताच आधी गटाराचं पाणी. इथे राहणाऱ्या लोकांना जिवंतपणी नरकयातना काय असतात, हे रोज अनुभवावं लागतं. आणि हा अनुभव फक्त या प्रभागापुरता मर्यादित नाही. शहरातील जवळपास प्रत्येक प्रभागात असा एखादा भाग आहे, जिथे विकास थांबलेला नाही, तर तो कधीच पोहोचलाच नाही. मराठवाडा स्वतंत्र होऊन ७७ वर्षे झाली. देश चंद्रावर पोहोचला. पण इथे निवडणूक आजही नळ, गटार, रस्ता आणि मीटर याच मुद्द्यांवर लढवली जाते. हा विकासाचा अभाव नाही, तर व्यवस्थेचा पराभव आहे. शहरात उघडे नाले, अस्वच्छता, अविकसित मैदाने, महिला असुरक्षितता, ड्रग्स, गुन्हेगारी—असं सगळं असताना राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू अजूनही पाण्यावरच अडकलेला आहे. कारण तेही लोकांना नीट मिळत नाही. आम्ही काही वस्त्यांमध्ये गेलो, जिथे रुग्णवाहिका घरापर्यंत येऊ शकत नाही. रस्ता नाही, वळण नाही, जागा नाही. “रुग्णाला झोळीत टाकून मुख्य रस्त्यापर्यंत न्यायचं,” असं नागरिक सांगत होते. काहींच्या डोळ्यांत पाणी होतं, कारण या प्रवासात काहींचे प्राण गेले होते. प्रश्न साधा होता—रस्ता नसणं ही चूक आहे की गुन्हा? काही प्रभागांत आरोग्य केंद्रच नाही. सरकारी दवाखाना नाही. सार्वजनिक शौचालय आहे, पण ते नावापुरतं. दरवाजे नाहीत, स्वच्छता नाही. आत कोणी गेलं, तर बाहेरून हात दिसतो, मी आत आहे हे सांगण्यासाठी. हे ऐकताना आपण गप्प होतो. कारण यावर बोलणंही अपमानास्पद वाटतं. पाणी ही तर शहराची सर्वात मोठी जखम बनलेला प्रश्न. काही भागांत ५ दिवसांनी पाणी, काही ठिकाणी १०–१२ दिवसांनी, तर काही ठिकाणी २० दिवसांनी. आणि तेही कसं? नळ उघडताच आधी गटाराचं पाणी. आळ्या असलेलं, वास मारणारं. महिलांनी ते पाणी पोत्यांत भरून बाजूला ठेवलंय. “हे पाणी नळाचं आहे की गटाराचं, आम्हालाच कळत नाही,” असं त्या सांगतात. त्या आवाजात राग नाही, थकवा आहे.पाण्याची 300 कोटींची योजना 3000 कोटींवर जाते, आकडे वाढतात, निधी वाढतो, पण नळ मात्र कोरडेच राहतात. काही ठिकाणी लोकांना सांगितलं जातं, पाणी हवं असेल तर 18 ड्रम एकत्र ठेवा. पाहुणे येत नाहीत, दुर्गंधीमुळे घरात बसणं नकोसं झालंय, असं नागरिक सांगतात. पाणी ही मूलभूत गरज असताना, ती इथे सौद्याची वस्तू बनल्यासारखी वाटते. शहरातील मोकळ्या जागा—ज्या खेळाच्या मैदानासाठी, उद्यानासाठी, वाचनालयासाठी वापरायला हव्या—त्या आज कचराकुंडी झाल्या आहेत. काही ठिकाणी त्या नशेखोरांचे अड्डे बनल्या आहेत. संध्याकाळ झाली की तरुणांची टोळकी, दारू, सिगारेट, ड्रग्स ओढत बसलेली असतात. महिलांना आणि मुलींना घराबाहेर पडताना भीती वाटते. पथदिवे बंद आहेत. रस्त्यावर अंधार आहे. आणि प्रशासन अंधाराकडे पाठ फिरवून बसलेलं आहे. किराडपुरा, सिल्लेखाना, खडकेश्वर, इंदिरानगर, जयभीमनगर, तक्षशिला, सिडको—नावं बदलतात, पण वेदना तशाच राहतात. कुठे कचरा गाडी तीन दिवसांनी येते. कुठे फोन केला तरच येते. कुठे येतच नाही. काही ठिकाणी कचरा उचलण्यासाठी पैसे मागितले जातात. स्मार्ट सिटीमध्ये कचरा उचलायलाही नागरिकांना विनवावं लागतं, ही शोकांतिका नाही का? दरम्यान, शहरातील अनेक राजकीय नेत्यांनी मोठा प्रवास केला आहे. नगरसेवक ते मंत्री. सायकल ते कोट्यवधींच्या गाड्या. बंगले, फार्महाऊस, सत्ता. पण जनतेचं जगणं मात्र तिथंच थांबलं आहे—नळाजवळ, गटाराजवळ, अंधाऱ्या गल्लीत. काही प्रभागांत नागरिक म्हणतात, “आम्हाला आमचा नगरसेवक कोण आहे, हेही माहीत नाही.” निवडणुकीच्या वेळी चेहरे दिसतात, नंतर वर्षानुवर्षे नाहीसे होतात. काही ठिकाणी तर नागरिकांनी थेट मतदान बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. “मतासाठी पैसे नको, गहू नको—आधी पाणी द्या,” ही त्यांची मागणी आहे. ही मागणी राजकीय नाही. ही जगण्याची हाक आहे. या सगळ्यात गुन्हेगारीचा अंधार अधिक गडद होत चालला आहे. काही प्रभागांमध्ये लोक थेट सांगतात, “आमच्या मुली सुरक्षित नाहीत.” दारू अड्डे, अवैध धंदे, ड्रग्जच्या विळख्यात अडकलेली तरुणाई, रात्री घराबाहेर पडायची भीती — हे सगळं सामान्य झाल्यासारखं वाटतं. एक नागरिक म्हणतो, “आम्ही मेलो तरी कुणाला काही फरक पडणार नाही. रस्ते आहेत, लाइट आहे, पण पाणी नाही. मग शहरात राहून काय उपयोग?” हा प्रश्न केवळ त्या नागरिकाचा नाही—तो संपूर्ण छत्रपती संभाजीनगरचा आहे.‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ ही केवळ निवडणूक मालिका नाही, ही शहराच्या जखमा उघड करणारी प्रक्रिया आहे. ही नागरिकांच्या वेदनांची नोंद आहे. या मालिकेत अनेक राजकीय डिबेट्स झाल्या. हिंदुत्व, युती, गद्दारी, नामांतर, श्रेयवाद, घराणेशाही — सगळ्यावर चर्चा झाली. शिवसेनेचे दोन्ही गट, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम सगळे आमने-सामने आले. आरोप झाले, प्रत्यारोप झाले, शब्दांचे वार झाले. पण या वादांच्या गोंगाटात रस्त्यावरचा चिखल, नळातलं दूषित पाणी, कचऱ्याचा ढीग आणि नागरिकांची भीती कुठेतरी हरवली. स्मार्ट सिटीचे फलक उभे आहेत. पण त्यांच्या सावलीत माणसं अंधारात जगत आहेत. विकासाच्या नावाखाली शहराची धूळधाण झाली आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे—हे शहर खरंच नागरिकांसाठी आहे का, की फक्त नेत्यांच्या भाषणांसाठी?आणि जोपर्यंत हा प्रश्न अनुत्तरित राहील, तोपर्यंत छत्रपती संभाजीनगर फक्त कागदावर स्मार्ट असेल. इथल्या नागरिकांच्या मनात नाही. ते फक्त दुखावलेले असतील.

दिव्यमराठी भास्कर 14 Jan 2026 8:30 am

Pune : पूनम विधाते यांनी मतदारांना दिली मागण्या पूर्णची लेखी हमी

बाणेर – पुणे महापालिका निवडणूक प्रभाग क्र. ९ मधील बाणेर-बालेवाडी परिसरात नागरिकांच्या समस्या व मागण्यांना केवळ आश्वासनांपुरते न ठेवता ठोस कृतीतून सोडवण्याचा निर्धार अपक्ष उमेदवार पूनम विशाल विधाते यांनी व्यक्त केला. बाणेर-बालेवाडी नागरी मंच तसेच बाणेर-बालेवाडी-पाषाण रेसिडेंट्स असोसिएशनच्या नागरिकांनी मांडलेल्या सर्व अडचणी, समस्या व मागण्या त्यांनी लेखी प्रतिज्ञापत्राद्वारे औपचारिकरीत्या स्वीकारल्या आहेत.या प्रतिज्ञापत्रातील प्रत्येक मुद्दा टप्प्याटप्प्याने […] The post Pune : पूनम विधाते यांनी मतदारांना दिली मागण्या पूर्णची लेखी हमी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 8:13 am

Pune District : बेट भागात मशालीच्या ज्वाळा

शिरूर : कवठे यमाई (ता. शिरूर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आणि बेट भागातील प्रभावी नेतृत्व बाळासाहेब डांगे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या मोठ्या राजकीय भूकंपामुळे बेट भागातील राष्ट्रवादीच्या गडाला मोठे खिंडार पडले असून, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. डांगे […] The post Pune District : बेट भागात मशालीच्या ज्वाळा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 8:02 am

Pune District : तळेगाव झेडपी गटात चौरंगी लढत होणार

तळेगाव ढमढेरे : पुणे जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण तापले. विविध राजकीय पक्षांकडून संभाव्य इच्छुक उमेदवारांची नावे आता उघडपणे चर्चेत येऊ लागली आहेत. तळेगाव गटात सत्तासंघर्षाची नांदी सुरू झाली आहे. त्यामुळे गटात प्रस्थापित आणि दिग्गजांमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी […] The post Pune District : तळेगाव झेडपी गटात चौरंगी लढत होणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 7:57 am

मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध, हिंदू विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले:वैष्णो देवी मेडिकल कॉलेजची मान्यता रद्द; विद्यार्थी परतले, पुढील प्रवेशाबद्दल माहिती नाही

काश्मीरमधील बडगामची रहिवासी असलेली बिलकिस 6 जानेवारीच्या संध्याकाळी कॉलेजच्या वसतिगृहात होती. बिलकिस जम्मूतील कटरा येथील श्री माता वैष्णो देवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एक्सलन्स येथून एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. तिला कळले की नॅशनल मेडिकल कमिशनने कॉलेजची मान्यताच रद्द केली आहे. बिलकिस मुस्लिम आहे आणि कॉलेजच्या 50 जागांपैकी 42 जागांवर मुस्लिम विद्यार्थ्यांच्या प्रवेशामुळे हिंदू संघटना याचा विरोध करत होत्या. बिलकिस सध्या घरी आहे. तिला माहीत नाही की पुढील शिक्षण कसे होईल. दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तरी, ती अभ्यासक्रम कसा पूर्ण करेल. हिंदू संघटनांचा युक्तिवाद होता की कॉलेज माता वैष्णो देवी तीर्थक्षेत्रात आहे आणि भक्तांच्या देणगीतून बनले आहे, त्यामुळे यात फक्त हिंदू विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळाला पाहिजे. तथापि, बिलकिस म्हणते की बाहेर काहीही घडत असले तरी, आत आम्ही सर्वजण चांगले शिक्षण घेत होतो. धर्मामुळे कोणालाही त्रास झाला नाही. श्री माता वैष्णो देवी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या या मेडिकल कॉलेजमध्ये 2025 मध्ये एमबीबीएसचे शिक्षण सुरू झाले होते. मान्यता रद्द झाल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी परतले आहेत. या वादग्रस्त प्रकरणावर दैनिक भास्करने काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हे कॉलेज खरोखरच देणग्यांच्या पैशांवर चालते का, याचीही चौकशी केली. जम्मू-काश्मीर सरकारकडून विद्यापीठाला दरवर्षी मदत मिळत असल्याचे समोर आले. 2017 ते 2025 पर्यंत सरकारने सुमारे 121 कोटी रुपयांची मदत केली आहे. प्रथम विद्यार्थ्यांचे म्हणणेनाव: बिलकिसपत्ता: बडगाम, काश्मीरएमबीबीएस, प्रथम वर्ष बिलकिसने आम्हाला प्रवेशापासून आतापर्यंतची संपूर्ण कहाणी सांगितली. त्या सांगतात, '25 ऑक्टोबर, 2025 रोजी NEET ची तिसऱ्या फेरीची समुपदेशन (काउंसलिंग) झाली होती. यातच मला प्रवेश मिळाला. NEET मध्ये मला 490 गुण मिळाले होते. जम्मू-काश्मीर विभागात 758 वी रँक होती. 29 ऑक्टोबरला प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आणि 3 नोव्हेंबरपासून वर्ग सुरू झाले.' बिलकिसच्या घरापासून हे महाविद्यालय सुमारे 250 किमी दूर आहे. तिने चॉइस फिलिंगमध्ये इतर महाविद्यालये देखील ठेवली होती, त्यापैकी श्री माता वैष्णो देवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एक्सलन्स मिळाले. बिलकिसला महाविद्यालयाबद्दल कळले की येथील प्राध्यापक (फॅकल्टी) आणि इतर सुविधा चांगल्या आहेत. म्हणून तिने प्रवेश घेतला. बिलकिस सांगतात, 'मी दोन महिने 10 दिवस अभ्यास केला. सकाळी 9 वाजता वर्ग सुरू व्हायचे. सर्व काही व्यवस्थित सुरू होते. आमचे सत्र उशिरा सुरू झाले होते. आम्ही इतर महाविद्यालयांपेक्षा दोन महिने मागे होतो. मेडिकल कॉलेजमध्ये आमची पहिलीच बॅच होती. मार्गदर्शन करण्यासाठी वरिष्ठ विद्यार्थी नव्हते, त्यामुळे प्राध्यापक (फॅकल्टी) म्हणायचे की काही अडचण आल्यास आम्हाला सांगा.' मुस्लिम विद्यार्थ्यांच्या प्रवेशामुळे झालेल्या वादामुळे बिलकिस म्हणते, ‘कॉलेजमध्ये आम्हाला धर्मामुळे कोणतीही अडचण आली नाही. आम्ही वेगळ्या धर्माचे आहोत असे कधीच वाटले नाही. बाहेर आंदोलनं सुरू असतानाही, आतमध्ये कोणतीही नकारात्मकता आली नाही.’ ‘मी कॉलेजमध्ये ४.९५ लाख रुपये ट्यूशन फी दिली आहे. वसतिगृहाचे पैसे वेगळे होते. जे काही झाले, त्यामुळे आमचेच नुकसान झाले आहे. आम्ही आता घरी बसलो आहोत. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितले आहे की लवकरच आमचा प्रवेश करून देतील. तरीही वेळ वाया जात आहे.’ अभ्यासक्रमाची मान्यता रद्द झाल्यावर बिलकिस म्हणते, ‘दोन महिन्यांपासून मनात हेच चालू आहे की आमचं काय होईल. पुढे काय करणार. विरोध करणाऱ्यांना वाटतं की त्यांनी एक कॉलेज बंद केलं, पण त्यांनी विचार करायला हवा की कॉलेज बनवायला किती मेहनत, किती वेळ लागतो.’ हे आम्ही 50 विद्यार्थ्यांचे नुकसान नाही, तर संपूर्ण पिढीचे नुकसान आहे. कॉलेजची मान्यता रद्द झाल्याचे कळताच, सर्व विद्यार्थी आपापल्या घरी परतले. आता सर्वजण यादीची वाट पाहत आहेत, जेणेकरून पुढे काय होईल हे कळेल. आम्ही बिलकिसला विचारले की कॉलेज चालवण्यात श्राइन बोर्डची काय भूमिका आहे हे तुम्हाला माहीत आहे का? ती उत्तर देते, ‘याबद्दल काही कल्पना नाही. आम्ही तर अभ्यास करत होतो, जसा इतर कॉलेजमध्ये होतो. आता आमची कोणतीही मागणी नाही, फक्त विनंती आहे की शक्य तितक्या लवकर आम्हाला दुसऱ्या कॉलेजमध्ये स्थलांतरित करावे. आम्ही खूप दबाव सहन केला आहे. ऑगस्टमध्ये आमच्या परीक्षा आहेत. आम्हाला हेच माहीत नाही की आम्हाला कधी स्थलांतरित करतील.’ नॅशनल मेडिकल कमिशनने मान्यता रद्द करण्याचे कारण सांगितले आहे की, कॉलेजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, फॅकल्टी आणि आवश्यक मानकांमध्ये गंभीर कमतरता होत्या, त्यामुळे परवानगी रद्द करण्यात आली. यावर बिलकिस म्हणते, ‘कॉलेजमध्ये कोणतीही कमतरता नव्हती. माझे मित्र इतर कॉलेजेसमध्ये आहेत, त्यांच्याशी बोलल्यावर कळायचे की आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त सुविधा मिळत होत्या. जर कमतरता असत्या तर आधीच परवानगी मिळाली नसती.’ कॉलेजची मान्यता रद्द झाल्याबद्दल मैनत श्रीवास्तव म्हणतात, ‘वाद आणि कोर्सची परवानगी रद्द होणे खूप त्रासदायक आहे. आम्हाला येथे खूप चांगल्या सुविधा मिळत होत्या. आम्हाला इतर कॉलेजेसमध्ये शिफ्ट केले जाऊ शकते, तिथे कदाचित अशा सुविधा मिळणार नाहीत.’ आम्ही बदली प्रक्रियेबद्दल विचार करून चिंतेत आहोत. आम्हाला अजूनही माहित नाही की कोणत्या वैद्यकीय महाविद्यालयात आमची बदली केली जाईल. बदली कोणत्या आधारावर होईल. काहीही स्पष्ट नाही. यामुळे ताण आणि असुरक्षितता वाढत आहे. आम्ही नुकतेच अभ्यासाच्या दिनचर्येत स्थिरावण्यास सुरुवात केली होती. आशिया म्हणते, 'आमच्या संस्थेत अशा सुविधा होत्या, ज्या अनेक नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही नाहीत. आम्ही इतर वैद्यकीय महाविद्यालयांची स्थिती पाहिली आहे. येथे खरोखरच खूप चांगल्या आणि विद्यार्थी-अनुकूल सुविधा होत्या. फक्त ॲनाटॉमीसाठी आमच्याकडे चार मृतदेह होते. इतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एकही मृतदेह नाही.' ‘ग्रंथालयात अभ्यासासाठी शांत वातावरण होते. पुस्तके, बसण्याची जागा किंवा अभ्यासाच्या संसाधनांची कमतरता नव्हती. वर्गखोल्या कधीही गर्दीच्या नसायच्या. प्राध्यापक प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देत असत. व्याख्यानादरम्यान उत्तम संवाद साधला जात असे. आमच्यासारख्या, ज्यांनी नुकतेच वैद्यकीय शिक्षण सुरू केले आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी असे वातावरण संपणे हा मोठा धक्का आहे.’ वादाचे मूळ: कॉलेज फक्त देणगीच्या पैशांवर चालते का?श्री माता वैष्णो देवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एक्सलन्सला सप्टेंबर २०२५ मध्ये ५० जागांवर प्रवेशाची परवानगी मिळाली होती. एमबीबीएसच्या पहिल्या बॅचमध्ये ४२ काश्मिरी मुस्लिम, ७ हिंदू आणि एक शीख विद्यार्थ्याने प्रवेश घेतला. वैष्णो देवी संघर्ष समितीने मुस्लिम विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला विरोध केल्यावर वाद सुरू झाला. २२ नोव्हेंबर रोजी स्थापन झालेल्या या समितीत ५० हून अधिक संघटनांचा समावेश होता, ज्यात आरएसएस आणि भाजपशी संबंधित संघटनाही होत्या. बजरंग दलाने तर कॉलेजविरोधात निदर्शनेही केली होती. संविधानाच्या कलम-30 नुसार, अल्पसंख्याकांना त्यांच्या समुदायासाठी 50% पर्यंत आरक्षणासह शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. मात्र, श्राइन बोर्डाच्या मालकीच्या 34 एकर जमिनीवर बांधलेले श्री माता वैष्णो देवी विद्यापीठ अल्पसंख्याक संस्था नाही. 8 वर्षांत विद्यापीठाला 121 कोटी रुपयांची सरकारी मदतवैष्णो देवी संघर्ष समितीने दावा केला की विद्यापीठ श्राइन बोर्डाच्या निधीतून बनले आहे, जो भक्तांच्या देणग्यांमधून जमा होतो. म्हणून येथे फक्त हिंदू विद्यार्थ्यांनाच शिकण्याची परवानगी मिळाली पाहिजे. यानंतर महाविद्यालयातून मुस्लिम विद्यार्थ्यांना हटवण्याची मागणी होऊ लागली. जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री माता वैष्णो देवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एक्सलन्समध्ये वार्षिक शुल्क रचनेत 4.95 लाख रुपये ट्यूशन फी, 50 हजार रुपये परत करण्यायोग्य सुरक्षा ठेव, सुमारे 51 हजार रुपये एकवेळ कॉलेज शुल्क आणि 20 हजार रुपये वार्षिक वसतिगृह शुल्क समाविष्ट आहे. विद्यापीठाचे आणि मेसचे शुल्क मिळून प्रत्येक विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च सुमारे 5.5 लाख रुपये होतो. हिंदू संघटना दावा करत होत्या की श्री माता वैष्णो देवी विद्यापीठ देशातील एकमेव मुस्लिम-बहुसंख्य सरकारकडून निधी न घेता चालवले जात आहे. तथापि, कागदपत्रांवरून असे दिसून येते की जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाल्यानंतरही विद्यापीठाला सरकारकडून मदत मिळत राहिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर सरकारने विद्यापीठाला 2017-18 मध्ये 10 लाख रुपयांची मदत केली. 2018-19 मध्ये ही मदत वाढून 50 लाख रुपये आणि 2019-20 मध्ये 5 कोटी रुपये झाली. 2019 नंतर JK च्या अर्थसंकल्पाला 2025 पर्यंत संसदेने मंजुरी दिली होती, जेव्हा उमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या निवडून आलेल्या सरकारने शपथ घेतली होती. अर्थसंकल्पीय दस्तऐवजांनुसार, 2020-21 मध्ये विद्यापीठाला 19.70 कोटी रुपये देण्यात आले होते. त्यानंतर हे अनुदान सातत्याने वाढले आहे. 2021-22 मध्ये 21 कोटी रुपये, 2022-23 मध्ये 23 कोटी रुपये, 2023-24 मध्ये 24 कोटी रुपये आणि 2024-25 मध्ये 28 कोटी रुपये देण्यात आले. या वर्षासाठी जम्मू-काश्मीर सरकारने विद्यापीठासाठी 28 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याविरोधात झालेल्या आंदोलनात सहभागी असलेले राष्ट्रीय बजरंग दलाचे नेते राकेश बजरंगी सांगतात, ‘हे विद्यापीठ 2004 मध्ये स्थापन झाले होते. त्यानंतर 13 वर्षे श्राइन बोर्डाने ते चालवण्यासाठी सरकारकडून कोणताही निधी घेतला नाही. विद्यापीठ श्राइन बोर्डाच्या पैशांवर चालत होते. 2017 पासून सरकारने निधी देणे सुरू केले. एकूण 121 कोटी रुपये दिले आहेत. श्राइन बोर्डाने विद्यापीठावर 600 कोटी रुपये खर्च केले आहेत.’ ‘सरकार या सत्रासाठी 28 कोटी रुपये देणार आहे, पण अजून मिळाले नाहीत. एवढ्या पैशात तर विद्यापीठ चालणार नाही. हा एक भाग असू शकतो. बाकीचे पैसे तर श्राइन बोर्डच खर्च करतो. मेडिकल कॉलेज आत्ताच सुरू झाले होते आणि या वर्षी विद्यापीठाने सरकारकडून मदतच घेतली नाही. म्हणजेच मेडिकल कॉलेजमध्ये सरकारने कोणतेही पैसे दिले नाहीत.‘ मान्यता रद्द होण्याचे कारण मानके पूर्ण न होणेनॅशनल मेडिकल कमिशनला मेडिकल कॉलेजमध्ये अपुरे इन्फ्रास्ट्रक्चर, सक्षम अध्यापन कर्मचारी आणि निवासी डॉक्टरांची कमतरता, रुग्णांची संख्या कमी असणे आणि बेड ऑक्युपन्सी खराब असल्याच्या तक्रारी मिळाल्या. मेडिकल असेसमेंट अँड रेटिंग बोर्डाची टीम 2 जानेवारी, 2026 रोजी कॉलेजमध्ये पोहोचली. असेसमेंट रिपोर्टमध्ये मोठ्या त्रुटी समोर आल्या. यादरम्यान, टीचिंग फॅकल्टीमध्ये 39% आणि ट्यूटर, डेमॉन्स्ट्रेटर व सीनियर रेसिडेंटमध्ये 65% ची कमतरता आढळली. आउटपेशंट डिपार्टमेंटमध्ये किमान आवश्यक संख्येच्या तुलनेत 50% पेक्षाही कमी रुग्ण होते. बेड ऑक्युपन्सी किमान 80% असणे आवश्यक आहे, परंतु ती केवळ 45% आढळली. आयसीयूमध्येही सरासरी बेड ऑक्युपन्सी सुमारे 50% होती. रिपोर्टमध्ये नमूद केले आहे की काही डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल आणि रिसर्च लॅब नाहीत. लायब्ररीही नियमांनुसार नाही. येथे आवश्यक संख्येच्या तुलनेत केवळ 50% पुस्तके मिळाली. येथे 15 जर्नल असणे अपेक्षित होते, परंतु केवळ दोनच आढळले. एआरटी सेंटर, एमडीआर-टीबी मॅनेजमेंट फॅसिलिटी, ऑपरेशन थिएटर आणि वेगवेगळे मेल-फिमेल वॉर्ड यांसारख्या आवश्यक सुविधाही एकतर नाहीत किंवा अपुऱ्या आहेत. यानंतर नॅशनल मेडिकल कमिशनने (राष्ट्रीय वैद्यकीय आयोग) असे आढळले की, संस्था पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण नियमांनुसार किमान गरजा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली. त्यामुळे मेडिकल असेसमेंट अँड रेटिंग बोर्डाने (वैद्यकीय मूल्यांकन आणि रेटिंग मंडळ) कमिशनच्या अध्यक्षांच्या मंजुरीने मान्यता तात्काळ रद्द करण्याचा आदेश दिला. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले ॲडव्होकेट फिरोज खान म्हणतात, ‘मेडिकल कॉलेज बंद झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आरोग्य मंत्रालय आणि नॅशनल मेडिकल कमिशनने कॉलेजला मान्यता दिली होती. ती कशी आणि का रद्द करण्यात आली? जर याला अल्पसंख्याक संस्था घोषित करायचे होते, तर श्राइन बोर्डाने हिंदू-मुस्लिम असा भेद करण्याऐवजी यासाठी अर्ज करायला हवा होता.’

दिव्यमराठी भास्कर 14 Jan 2026 7:53 am

Neelam Gorhe: “शिवसेनेच्या उमेदवारांना धमक्या आणि पैशांचे आमीष”; नीलम गोऱ्हेंचा खळबळजनक आरोप

प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीत आम्ही आरोप- प्रत्यारोपांऐवजी सकारात्मक प्रचारावर भर दिला. मात्र, काही पक्षांतील उमेदवार मतदारांना पैशांचे आमिष दाखवत आहेत. याशिवाय शिवसेनेच्या उमेदवारांना धमक्या देत दबावाचे राजकारण करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्याबाबत दोन ठिकाणी तक्रारही दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत […] The post Neelam Gorhe: “शिवसेनेच्या उमेदवारांना धमक्या आणि पैशांचे आमीष”; नीलम गोऱ्हेंचा खळबळजनक आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 7:35 am

PMC Election: आपला प्रभाग विकासाचे रोल माॅडेल असेल; हर्षवर्धन मानकर यांचा मतदारांना शब्द

प्रभात वृत्तसेवा पुणे – रामबाग काॅलनी-शिवतीर्थनगर प्रभागातील वस्ती- सोसायट्यांसह परिसरातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात करण्यात येणाऱ्या विकासकामांची माहिती देत, आपला प्रभाग पुणे शहरातील विकासाचे रोल माॅडेल असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार […] The post PMC Election: आपला प्रभाग विकासाचे रोल माॅडेल असेल; हर्षवर्धन मानकर यांचा मतदारांना शब्द appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 7:35 am

PMC Election: प्रभाग १० मध्ये भाजपचे शक्तिप्रदर्शन! उमेदवारांच्या औक्षणासाठी लाडक्या बहिणींची गर्दी

प्रभात वृत्तसेवा पुणे – फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण, ठिकठिकाणी औक्षणासाठी लाडक्या बहिणींनी केलेली गर्दी, अशा वातावरणात प्रभाग १० मधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराची सांगता दुचाकी रॅलीने झाली. या वेळी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन उमेदवारांनी केले. बावधन-भुसारी काॅलनी प्रभाग १० मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किरण दगडे पाटील, अल्पना गणेश […] The post PMC Election: प्रभाग १० मध्ये भाजपचे शक्तिप्रदर्शन! उमेदवारांच्या औक्षणासाठी लाडक्या बहिणींची गर्दी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 7:34 am

PMC Election: त्या उमेदवाराचे चिन्ह काढून घेणार का? मुरलीधर मोहोळ यांचा अजित पवार यांना खोचक सवाल

प्रभात वृत्तसेवा पुणे – आरपीआयला राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाटणीत मिळालेल्या आठ जागांपैकी चार जागांवर अजित पवार यांनी स्वत:च उमेदवार दिले आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्याबरोबर राहायचेच नाही, असे आरपीआय शहराध्यक्ष सचिन खरात यांनी ठणकावून सांगितले. असे असताना आरपीआय उमेदवाराला दिलेले घड्याळाचे चिन्ह काढून घेणार का, असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांना विचारला आहे. […] The post PMC Election: त्या उमेदवाराचे चिन्ह काढून घेणार का? मुरलीधर मोहोळ यांचा अजित पवार यांना खोचक सवाल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 7:33 am

“पुणे-पिंपरीत राष्ट्रवादीचाच महापौर!”बहुमताचा आकडा गाठणार;अजित पवारांचा मोठा दावा

प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला. सत्तास्थापनेसाठी बहुमताचा आकडा आम्ही गाठणार असून, आम्हास इतर कोणत्या पक्षाची गरजच भासणार नसल्याचा दावाही पवार यांनी केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी पुणे शहर […] The post “पुणे-पिंपरीत राष्ट्रवादीचाच महापौर!” बहुमताचा आकडा गाठणार;अजित पवारांचा मोठा दावा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 7:32 am

PMC Election: बालेकिल्ल्यात अनिल टिंगरेंच्या प्रचाराची सांगता; सर्वांगीण विकासाबाबत साधला नागरिकांशी संवाद

प्रभात वृत्तसेवा पुणे – प्रभाग क्रमांक १ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार अनिल ( बाॅबी) वसंतराव टिंगरे यांच्या प्रचाराची सांगता त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धानोरी येथील आनंद पार्क परिसरात मोठ्या उत्साहात झाली. या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी टिंगरे यांचे उत्साहात, तसेच भावनिक वातावरणात स्वागत केले. महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग, तसेच या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी […] The post PMC Election: बालेकिल्ल्यात अनिल टिंगरेंच्या प्रचाराची सांगता; सर्वांगीण विकासाबाबत साधला नागरिकांशी संवाद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 14 Jan 2026 7:31 am