“मुंब्रा को हरा बना देंगे” म्हणणाऱ्या सहर शेखचा माफीनामा
ठाणे : ‘कैसा हराया’ म्हणत मुंब्रा येथील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर युनूस शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला.तसेच शेख यांनी केलेले “हम मुंब्रा को हरा बना देंगे” हे विधान चांगलेच चर्चेत राहिले. या विधानाच्या निषेधार्थ भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आता सहर शेख यांनी माफी मागितली आहे. पोलिसांनी सहर शेख यांना पोलीस ठाण्यात बोलावून लेखी माफीनामा घेतला. ‘कुणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता’, असे सहर शेख यांनी माफीनाम्यात नमूद केले आहे.भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. मुंब्रा पोलिसांनी माझ्या तक्रारीनंतर सहर शेखला नोटीस पाठवली होती. मी आज पाठपुराव्यासाठी मुंब्रा पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळी ही माहिती मला लिखित स्वरूपात दिली” असे सोमय्या यांनी म्हटले आहे.सहर शेख यांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी माफीनामा लिहून दिला आहे. यामध्ये त्यांनी मुंब्रा येथे झालेल्या सभेत “हम मुंब्रा को हरा बना देंगे” असे भाषण केले होते. पण हे वाक्य पक्षाचा झेंडा आणि निशाणी संदर्भात बोलल्याचे सांगितले.“कोणाचंही मन दुखावण्याचा किंवा वातावरण खराब करण्याचा हेतू नव्हता. आम्ही तिरंग्यासाठी जगू आणि तिरंग्यासाठीच मरू. वक्तव्यामुळे कोणाचंही मन दुखावलं असेल तर मी जाहीरपणे माफी मागते” असे सहर शेख यांनी आपल्या लेखी जबाबात लिहून दिले आहे.
पंजाबमध्ये प्रजासत्ताक दिनापूर्वी रेल्वे रुळावर स्फोट
अमृतसर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर स्फोट झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. इंजिन जात असताना स्टेशनच्या आउटर लाईनवर हा स्फोट झाला. या घटनेत एका लोको पायलटला किरकोळ दुखापत झाली. जीआरपीने अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल)च्या पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. हा स्फोट दहशतवादी कटाचा भाग होता की तांत्रिक बिघाडामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. रोपड रेंजचे डीआयजी नानक सिंग यांनीही घटनास्थळी भेट दिली.पोलीस प्रशासनाच्या मते, इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळेही हा स्फोट झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वेचे तांत्रिक तज्ज्ञ याची स्वतंत्र चौकशी करत आहेत. स्फोटामुळे इंजिनच्या काचा फुटल्या असून रेल्वे रुळांचेही थोडे नुकसान झाले आहे. प्रजासत्ताक दिन जवळ असल्याने सुरक्षा यंत्रणा पूर्ण सतर्क आहेत.पोलिसांनी स्पष्ट केले आहे की,मालगाडीवरील सुरक्षा अधिकारी अनिल शर्मा (सेफ्टी ऑफिसर, डीएफसीसी) यांना अत्यंत किरकोळ दुखापत झाली असून ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. संबंधित रेल्वे मार्गावर केवळ मालगाड्यांचीच वाहतूक होते, त्यामुळे प्रवासी गाड्या किंवा सामान्य नागरिकांना कोणताही धोका नसल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.या घटनेनंतर राज्याच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग यांनी रेल्वे ट्रॅकजवळील स्फोट ही सामान्य घटना नसून, पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. तर शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत, राज्यातील ढासळती कायदा व सुव्यवस्था यासाठी सरकारला जबाबदार धरले आहे.
Shreyas Iyer : माजी वेगवान गोलंदाज वरुण अॅरॉनने तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरच्या नावाला पसंती दिली आहे
Shiv Sena UBT : उद्धव ठाकरेंना धक्का; माजी आमदाराने सोडली साथ
Shiv Sena UBT : औसा मतदारसंघाचे माजी आमदार दिनकर माने हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत
Donald Trump: ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यावर निशाणा साधला.
Sanjay Raut : संजय राऊतांना ‘या’गंभीर आजाराचं निदान; स्वतःच केला खुलासा
Sanjay Raut : संजय राऊत यांनी एका मराठी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आजाराबाबत स्पष्ट खुलासा केला आहे.
काँग्रेसला मोठा हादरा..! माजी मंत्र्यांनं पक्ष फोडला, एकाचवेळी २४ माजी आमदार अन् ७२ नेते फुटले
Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून, त्यांच्यासोबत २४ माजी आमदारांनी पक्ष सोडला आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसेला जोरदार धक्का
वैभववाडी : वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ओम गणेश बंगला या ठिकाणी हा प्रवेश पार पडला. कदम यांच्या प्रवेशाने वैभववाडीतील मनसे पूर्णता खिळखिळी बनली आहे. मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनसे कार्यकर्ते संजय चव्हाण, गणेश गुरव, चंदन पाटणे, बबन डकरे, राजेंद्र गुरव, संतोष गुरव, बबन शिंगरे, सुरेश कदम, शांताराम कोलते, अशोक कदम, अरुणा कोलते, अरुण कोलते अवनी कदम, राजन कदम, अमोल कोलते, वनिता लाड, सुगंधा पोवार, मनीषा मनवे आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.महेश उर्फ भैय्या कदम हे करुळ गावचे आहेत. त्यांनी उपसरपंच म्हणून काम केले आहे. गावच्या सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. शिवशभो संघटनेत कार्याध्यक्ष, वैभववाडी टेम्पो सघटनेत उपाध्यक्ष पदावर त्यांनी काम केले आहे. यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक माजी संचालक दिगंबर पाटील, शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश सावंत, सरपंच नरेंद्र कोलते, बूथ अध्यक्ष दीपक लाड व पदाधिकारी उपस्थित होते.
सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी; दृतगती मार्गासह, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांचा खोळंबा
मुंबई : सलग सुट्ट्यामुळे रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर शनिवारी दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मुंबई पुणे दृतगती महामार्गासह, मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पेण खोपोली आणि वडखळ अलिबाग मार्गावरील वाहतुकही द्रुतगतीने सुरू होती. तसेच,लोणावळा आणि खंडाळा घाट परिसरात वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे. लोणावळा, माथेरान आणि महाबळेश्वरकडे जाणाऱ्या गाडयांना या कोंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागला.मुंबईकर मौजमजा करण्यास बाहेर पडले त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच मुंबई पुणे दुतगती महामार्गावर वाहनांची संख्या वाढली होती. घाट परिसरात पुणे मार्गिकेवर वाहतुक अतिशय धिम्या गतीने सुरू होती. घाट परिसरात वाहनांच्या सात ते आठ किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या, घाटात वाहने बंद पडण्याच्या घटनाही घडत होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट झाली होती. वाहतुक पोलिसांकडून महामार्गावरील वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू होते. मात्र वाहनांची संख्या प्रचंड असल्याने वाहतुक नियमन करणे अवघड झाले होते. मुंबई मार्गावर छोटे ब्लॉक घेऊन पुणे मार्गावरील वाहतूक मंबई मार्गावर वळवून पुढे पाठवली जात होती.मुंबई गोवा महामार्गावरही वाहतुकीचा खोळंबा…मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. महामार्गावर इंदापूर माणगाव येथे प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. वाहन चालका लेनची शिस्त पाळत नसल्याने, वाहतुक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला होता. या परिसरात वाहनांच्या आठ ते नऊ किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. वाहतुक नियमन करतांना पोलीसांना कसरत करावी लागत होती. अलिबाग वडखळ महामार्गावरही सकाळपासून वाहनांची संख्या वाढली होती. वडखळ ते पोयनाड, पेझारी ते तिनवीरा आणि वाडगाव ते अलिबाग दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे अर्धा तासात जे अंतर पार करणे अपेक्षित होते दीड तास ते पावणे दोन तास लागत होते.मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात वाहतुक कोंडी होती. बोरघाट पोलीस आणि महामार्ग पोलीस यांना वाहतूक नियमनासाठी बरेच प्रयत्न करावे लागले होते. दुपारनंतर वाहनांची संख्या कमी होईन परिस्थिती नियंत्रणात येईल अशी आशा पोलीसांना होती. मात्र संध्याकाळी उशीरापर्यंत वाहतूक कोडी कायम होती.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंगळवारी सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली : संसदेत आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारने राजकीय एकमत साधण्यासाठी तयारी सुरू केली आहे. बजेट सत्रापूर्वी, मंगळवारी २७ जानेवारीला सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे.या बैठकीत विधायी कार्यसूची आणि सत्रादरम्यान उभ्या राहणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल.अधिवेशनाची सुरुवात २८ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होणार आहे. केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वदलीय बैठक सकाळी ११ वाजता संसद भवन एनेक्सीतील मुख्य समिती कक्षात होईल. या बैठकीत सरकार आणि विरोधक सत्राच्या अजेंड्यावर आपापल्या सूचना मांडतील. केंद्रीय बजेट १ फेब्रुवारीला सादर होणार असून त्यादिवशी रविवार आहे, आणि हा संसदेत अत्यंत दुर्मिळ प्रसंग मानला जातो. वित्त मंत्री निर्मला सीतारमण सातव्या बजेटची मालिका सातत्याने सादर करत आहेत. बजेट सत्र २ एप्रिलपर्यंत चालणार आहे, ज्यामध्ये पहिला टप्पा १३ फेब्रुवारीला संपेल आणि दुसरा टप्पा ९ मार्चपासून सुरू होईल. सत्राच्या पार्श्वभूमीवर, विरोधी पक्ष काँग्रेस 'विकसित भारत-गारंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन (ग्रामीण) अधिनियम'च्या विरोधात देशव्यापी मोहिम राबवत आहे. काँग्रेसचा दावा आहे की हा कानून यूपीए काळातील मनरेगा व्यवस्थेची जागा घेतो, तर भाजपाही या नव्या कायद्यास सुधारात्मक मानत जुना कायदा सुधारण्यावर भर देत आहे. यामुळे सत्रात या विषयावर तीव्र चर्चा होण्याची शक्यता आहे.सध्या लोकसभेत ९ विधेयक मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहेत, ज्यात विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक २०२५, सिक्योरिटीज मार्केट्स कोड २०२५ आणि संविधानातील १२९ वा सुधारणा विधेयक २०२४ यांचा समावेश आहे. या विधेयकांवर संसदीय समितींच्या विचारणेत आहेत. सत्राच्या वेळापत्रकानुसार, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान चर्चा होईल, तर २८जानेवारी आणि १ फेब्रुवारीला शून्यकाल नसेल.
Stock Market: अदानी समूहाचे संकट आणि जागतिक घडामोडींचा बाजाराला फटका; 16 लाख कोटींचे नुकसान
Stock Market: सरलेल्या आठवड्यात शेअर निर्देशांकात अडीच टक्क्यांची घट
Mohammed Shami : मोहम्मद शमीचा रणजी ट्रॉफीत कहर! ५ विकेट्स घेत सर्व्हिसेसचं मोडलं कंबरडं
Mohammed Shami : मोहम्मद शमीने सर्व्हिसेसविरुद्धच्या सामन्यात ५ विकेट्स घेत टीम इंडियात पुनरागमनासाठी पुन्हा दावा ठोकला आहे.
WEF: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठा करार; महाराष्ट्रात ‘स्मार्ट शेती’चे युग अवतरणार
WEF: या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रात आधुनिक, हवामान-संवेदनशील आणि तंत्रज्ञानाधारित स्मार्ट शेतीला चालना मिळणार आहे.
Pune Peoples Bank: पुणे पीपल्स बँकेच्या अमृतमहोत्सवानिमित्त बोधचिन्ह अनावरण आणि पुणे पीपल्स पुरस्कार प्रदान सोहळा
Bank locker key: बँक लॉकरची किल्ली हरवलीय? घाबरू नका, जाणून घ्या RBI चे नियम
Bank locker key: लॉकर उघडण्याची नेमकी प्रक्रिया काय आणि त्यासाठी किती पैसे मोजावे लागतात?
IND U19 vs NZ U19 : भारताच्या अंडर-१९ संघाने न्यूझीलंडलाही धूळ चारत स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला आहे.
Imtiaz Jaleel: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'रंगांचे युद्ध' पेटले असून, एमआयएम (AIMIM) आणि सत्ताधारी महायुतीमध्ये कलगीतुरा रंगला आहे.
Flight Cancellations : जगभरातील विमान वाहतूक विस्कळीत, काय आहे कारण?
Flight Cancellations : हिमवादळाच्या शक्यतेने तब्बल ८ हजार विमानांची उड्डाणे रद्द
कोकणात भाजप फॉर्मात, जाणून घ्या बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांची यादी
सिंधुदुर्ग : काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष असल्याचे दाखवून दिले. आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भारतीय जनता पार्टीच फॉर्मात असल्याचे चित्र आहे. राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि या जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी सात फेब्रुवारी रोजी होणार आहे. पण मतदान होण्याआधीच महायुतीचे ११ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यात भाजपच्या दहा आणि शिवसेनेच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजप - शिवसेना महायुती निवडणूक लढवत आहे. तसेच सिंधुदुर्ग अंतर्गत कणकवली तालुका पंचायत समिती, देवगड तालुका पंचायत आणि वैभववाडी तालुका पंचायत समिती येथे महायुती निवडणूक लढवत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या निवडणुकांमध्ये मतदान होण्याआधीच महायुतीचे ११ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा परिषद खारेपाटण जि.प.उमेदवार; प्राची इस्वलकर(भाजप) जाणवली जिल्हा प.रुहिता राजेश तांबे (शिवसेना) पडेल जिल्हा प.(देवगड)सुयोगी रवींद्र घाडी (भाजप) बापर्डे जिल्हा प. (देवगड)अवनी अमोल तेली (भाजप) बांदा जिल्हा प. उमेदवार प्रमोद कामत (भाजप)कणकवली तालुका पंचायत समिती बिडवाडी - संजना संतोष राणे (भाजप ) वरवडे - सोनू सावंत (भाजपा)देवगड तालुका पंचायत समिती पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप) नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप) बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)वैभववाडी तालुका पंचायत समिती कोकिसरे - साधना सुधीर नकाशे (भाजप)
बांगलादेश टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्याच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे म्हणणे आहे की आम्ही आता सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, जर त्यांनी नकार दिला तर आम्ही देखील स्पर्धेत खेळणार नाही. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली होणारा T20 विश्वचषक सुरू होण्यासाठी फक्त 2 आठवडे बाकी आहेत. अशा परिस्थितीत बांगलादेशला विश्वचषक न खेळल्याने काय नुकसान होईल, पाकिस्तान देखील सामना खेळणार नाही का आणि भारतावर काय परिणाम होईल…. प्रश्न-1: बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार का दिला? उत्तर: बांगलादेश क्रिकेट बोर्ड म्हणजेच BCB ने सुरक्षेचे कारण देत भारतात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. BCB ला त्याचे T20 विश्वचषक सामने श्रीलंकेत व्हावेत असे वाटत होते, परंतु ICC ने यास नकार दिला. बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नझरुल म्हणाले, ‘आम्हाला वर्ल्ड कप खेळायचा आहे, पण भारतात आमच्या खेळाडूंच्या आणि सपोर्ट स्टाफच्या सुरक्षेबाबत चिंता आहे.’ सुरक्षेशी संबंधित या कारणाव्यतिरिक्त, बांगलादेशी संघ भारतात न येण्याची आणखी 2 छुपी कारणे आहेत… 1. मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढणे आयपीएल संघ केकेआरने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला 9.2 कोटी रुपयांना विकत घेतले, पण भारतात याला विरोध होऊ लागला. बीसीसीआयने केकेआरला त्याला रिलीज करण्यास सांगितले. 3 जानेवारी रोजी केकेआरने तसे केले. बीसीबीने याला अपमान मानले आणि आयपीएलचे प्रक्षेपण (टेलिकास्ट) बंद केले. येथूनच हा वाद सुरू झाला. 2. भारत-बांगलादेशमधील बिघडलेली परिस्थिती आणि संबंध गेल्या काही महिन्यांत भारत आणि बांगलादेशचे राजनैतिक संबंध (डिप्लोमेटिक रिलेशंस) खूपच बिघडले आहेत. बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात हिंसाचार आणि हत्या झाल्यानंतर भारतात बांगलादेशी खेळाडू आणि कलाकारांच्या विरोधाची चर्चा सुरू झाली. बिघडलेल्या परिस्थितीचा हवाला देत बांगलादेश सरकारने संघ पाठवण्यास नकार दिला. तरीही, BCB चे अध्यक्ष अमीनुल इस्लाम बुलबुल यांनी सांगितले की, आम्ही आयसीसीशी पुन्हा एकदा बोलू आणि त्यांना आमच्या चिंतांकडे लक्ष देण्यास सांगू. बांगलादेश या मुद्द्यावर आपला संघर्ष सुरूच ठेवेल. बांगलादेशच्या बहिष्कार टाकण्याच्या निर्णयानंतर, आता त्याच्या जागी स्कॉटलंडचा संघ T20 विश्वचषकात खेळू शकतो. प्रश्न-2: विश्वचषक न खेळल्याने बांगलादेशला काय-काय नुकसान होईल? उत्तर: विश्वचषक न खेळल्याने बांगलादेश क्रिकेट बोर्डापासून ते बांगलादेशातील व्यवसायाला मोठे नुकसान होऊ शकते… सहभागिता शुल्क मिळणार नाही, बोर्डाचे नुकसान सामना जिंकल्यावरही शुल्क मिळते, याचे नुकसान प्रायोजक आणि व्यावसायिक नुकसान रँकिंगवर परिणाम दैनिक भास्कर डिजिटलचे स्पोर्ट्स एडिटर बिक्रम प्रताप सिंह यांच्या मते, बांगलादेशने पाकिस्तानच्या प्रभावाखाली येऊन वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, पण ICC मध्ये पाकिस्तानचे अजूनही वर्चस्व आहे. भारत-पाकिस्तान सामन्यातून संपूर्ण वर्ल्ड कपच्या 25% पर्यंत महसूल मिळतो, पण बांगलादेशच्या बाबतीत असे नाही. त्यांनी वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकून स्वतःचेच नुकसान केले आहे. मात्र, BCB च्या वित्त समितीचे प्रमुख आणि अंतरिम सरकारचे क्रीडा सल्लागार नजमुल हुसेन यांनी अलीकडेच म्हटले होते की, बांगलादेशने वर्ल्ड कप न खेळल्याने बोर्डाचे कोणतेही नुकसान होणार नाही. जे नुकसान होईल ते खेळाडूंचे होईल. प्रश्न-३: वर्ल्ड कप न खेळल्याने बांगलादेशच्या खेळाडूंचे काय नुकसान होईल? उत्तर: वर्ल्ड कप न खेळल्याने बांगलादेशी खेळाडूंच्या करिअर आणि आर्थिक स्थितीचे नुकसान होईल… प्रत्येक खेळाडूला साडेसात लाखांचे नुकसान रँकिंगवर परिणाम प्रायोजकांचे माघार घेणे प्रश्न-4: ICC बांगलादेश संघाविरुद्ध कोणती कारवाई करू शकते का? उत्तर: ICC ला कारवाई करण्याचा अधिकार आहे. ICC च्या नियमांनुसार, विश्वचषकावर बहिष्कार टाकणे हे सदस्य सहभाग कराराच्या विरोधात आहे. अशा प्रकरणांमध्ये, ICC आर्थिक दंडापासून ते सदस्यत्व निलंबनापर्यंतचा निर्णय घेऊ शकते. यापूर्वीही आयसीसीने कठोर पाऊले उचलली आहेत. 2019 मध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे झिम्बाब्वे क्रिकेटला निलंबित करण्यात आले होते, ज्यामुळे ते 2020 मध्ये कोणताही आयसीसी टूर्नामेंट खेळू शकले नाहीत. जर आयसीसीला असे वाटले की बांगलादेश क्रिकेट बोर्डाने राजकारण्यांच्या दबावाखाली निर्णय घेतला आहे, तर आयसीसी सदस्य म्हणून त्याच्या निलंबनाचा विचार केला जाऊ शकतो. जर बांगलादेश संघ स्पर्धेतून बाहेर पडला, तर आयसीसी त्याला गट टप्प्यात सहभागासाठी मिळणारे सुमारे 3 लाख डॉलर देखील देणार नाही. याव्यतिरिक्त, बोर्डाला आयसीसीकडून मिळणारा 30–40 दशलक्ष डॉलरचा वार्षिक वाटा देखील रोखला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, आयसीसी भविष्यात बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून मोठ्या स्पर्धांच्या यजमानपदाचा अधिकार देखील काढून घेऊ शकते. यामुळे आंतरराष्ट्रीय प्रायोजकत्वावर परिणाम होईल. प्रश्न-5: पाकिस्तानही विश्वचषकावर बहिष्कार टाकू शकतो का? उत्तर: पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची शक्यता कमी आहे, कारण त्याचे सामने भारतात होणार नाहीत हे आधीच निश्चित झाले आहे. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत नियोजित आहेत. मात्र, पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी म्हटले आहे की बांगलादेशसोबत चुकीचे झाले आहे. जर आमच्या सरकारने विश्वचषक खेळण्यास नकार दिला, तर आम्हीही संघ पाठवणार नाही. पण नकवी वारंवार आपली विधाने बदलत आहेत. काही दिवसांपूर्वी टेलिकॉम एशिया स्पोर्ट्सने पीसीबीच्या सूत्रांच्या हवाल्याने लिहिले होते की पाकिस्तान विश्वचषक न खेळण्यासारखे पाऊल उचलणार नाही. प्रश्न-6: बांगलादेशने बहिष्कार टाकल्यास भारतालाही काही नुकसान होऊ शकते का? उत्तर: बांगलादेशने वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकल्यास भारतापेक्षा बांगलादेशचेच जास्त नुकसान होईल. यामुळे भविष्यात आता भारतही बांगलादेशसोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यास नकार देऊ शकतो. जेव्हा भारत-बांगलादेशचे सामने होतात, तेव्हा बांगलादेशचे ब्रॉडकास्टर आणि स्पॉन्सर सर्वाधिक कमाई करतात. आयपीएलमधूनही ते कमाई करतात. भारतासोबतचे संबंध बिघडवून बीसीबी स्वतःचेच नुकसान करत आहे. तरीही सामन्याच्या तिकिटांमुळे आणि पर्यटन उद्योगातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे नुकसान भारताला सोसावे लागेल…
यूट्युब बघून वजन कमी करण्यासाठी परस्पर औषधे घेतली अन्...
मदुराई : तामिळनाडूतील मदुराईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मदुराईत राहणाऱ्या एका तरुणीने यूट्युब बघून वजन कमी करण्यासाठी परस्पर औषधे घेतली. हा निर्णय तरुणीसाठी धोकादायक ठरलाय. डॉक्टरांच्या सल्ल्याविना केलेला औषधोपचार तरुणीसाठी जीवघेणा ठरला. चुकीची औषधे घेतल्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला.तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील सेलूर भागातील मीनांबलापूरम येथे राहणारी कलैयर्सी एका खासगी कॉलेजमध्ये पदवीच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. या तरुणीने वजन घटविण्यासाठी यूट्युब व्हिडीओ बघितले. या व्हिडीओंचा कलैयर्सीवर प्रचंड प्रभाव पडला. तिनं एका यूट्युब व्हिडीओवर विश्वास ठेवून स्थानिक मेडिकलमधून बोरॅक्स खरेदी केलं आणि त्याचं सेवन केलं.बोरॅक्स म्हणजेच सोडियम बोरेट. हे एक प्रकारचे किटकनाशक रसायन आहे. पांढऱ्या शिसाचा वापर करुन हे विषारी रसायन तयार केले जाते. बोरॅक्स मानवी शरीराला अपायकारक आहे. पण या वास्तवाची माहिती नसल्यामुळे यूट्युब व्हिडीओ बघून कलैयर्सीने बोरॅक्स खरेदी केले. खरेदी केलेल्या बोरॅक्सचे कलैयर्सीने घरी येताच सेवन केले. बोरॅक्स शरीरात जाताच कलैयर्सीला उलट्यांचा त्रास सुरू झाला. थोड्याच वेळात ती बेशुद्ध पडली. घरातल्यांनी कलैयर्सीला तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी उपचार करुन कलैयर्सीला घरी पाठवले. रात्री कलैयर्सीची प्रकृती पुन्हा बिघडली. यावेळी कलैयर्सीला राजाजी सरकारी रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सेलूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासात तरुणीने स्थानिक मेडिकलमधून बोरॅक्स खरेदी केल्याची माहिती मिळाली.डॉक्टरांच्या सल्ल्याविना कोणतेही औषध घेऊ नको असे वडिलांनी बजावले असूनही वजन कमी करण्याच्या मोहापोटी कलैयर्सीने चूक केल्याचे लक्षात आले.तोंडातील अल्सर कमी करण्यासाठी बाह्य औषध म्हणून मर्यादीत प्रमाणात बोरॅक्स वापरले जाते. पण बोरॅक्स वजन कमी करण्यासाठी वापरत नाहीत. वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायाम आणि योग्य आहार हा सुरक्षित आणि योग्य मार्ग आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कलैयर्सीने व्यवस्थित माहितीच घेतली नाही. कुठल्यातरी व्हिडीओवर आंधळा विश्वास ठेवून मोठी चूक केली.शिक्षण आणि संशोधन न करता काही जण तज्ज्ञ असल्याचा दावा करत यूट्यूबवर कुठलीही गोष्ट औषध किंवा आहार म्हणून सुचवत आहेत. या व्हिडीओंना आळा घालण्याची आवश्यकता या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.
बिग बॉस मराठी ६ मधील लोकप्रिय स्पर्धक आणि सोशल मिडीयावर प्रसिध्द असणारी ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतीच तिची पहिली संक्रांत साजरी झाली असून, त्या सोहळ्यातून लवकरच गुड न्यूज मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या पार्श्वभूमीवर अंकिताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत सर्व चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.अंकिताच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं असून, ‘आज आमच्या आयुष्यात एक नवीन पाऊल पडलं’ असं म्हणत अंकिता आणि तिचा पती कुणाल यांनी नव्या कारचा फोटो शेअर केला आहे. या गुड न्यूजमागे कोणतं गुपित आहे, अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. मात्र ही नवी पाहुणी म्हणजे अंकिता आणि कुणाल यांनी खरेदी केलेली नवी कार आहे. अंकिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “आज आमच्या आयुष्यात एक नवीन पाऊल पडलं. दुसरी कार घेतली. या दोन्ही कार म्हणजे आमच्या मेहनतीचं आणि प्रगतीचं प्रतीक आहेत. माझ्या आणि कुणालच्या बिझनेस ग्रोथमध्ये या आमच्या लक्ष्मी म्हणून कायम सोबत राहतील. कृतज्ञता, मेहनत आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा प्रवास अजून पुढे जाऊ दे.”अंकिता आणि कुणाल यांनी सुझुकी कंपनीची नवी कार खरेदी केली आहे. या आनंदाच्या क्षणी अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून अंकिताचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.उल्लेखनीय बाब म्हणजे, अंकिताने लग्नाच्या काही दिवस आधीच एक नवी ऑडी कार खरेदी केली होती. ती कार लग्नासाठी गावी नेत असताना अपघातग्रस्त झाली होती. त्या घटनेचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांशी अनुभव सांगितला होता. काही वर्षांनंतर आता अंकिता आणि कुणाल यांनी पुन्हा एकदा नवी कार खरेदी करत आपल्या यशाच्या प्रवासात आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.
Credit society scam: व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट सोने तारण कर्जाद्वारे फसवणूक
MS Dhoni Practice : ‘थाला’इज बॅक! IPL 2026 साठी सज्ज; रांचीच्या मैदानात सुरू केला सराव, पाहा VIDEO
MS Dhoni Practice : सीएसकेचा दिग्गज खेळाडू एमएस धोनीने आयपीएल २०२६ ची तयारी सुरु केली आहे.
नाशिक : नाशिकमध्ये २००० रुपयांच्या नोटांनी भरलेला ट्रक लुटल्याच्या कथित घटनेने राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले असून, नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात संदीप पाटील नावाच्या व्यक्तीने याबाबत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिरादार आणि कमकेरी हे आपल्या पथकासह नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. कर्नाटक पोलिसांनी थेट नाशिकमध्ये येऊन तपास सुरू केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.या कथित लुटीप्रकरणी सध्या पाच संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ही लूट नेमकी कशी झाली, ट्रक कुठून निघाला आणि त्यामागे कोणती टोळी सक्रिय आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. नाशिक आणि बेळगाव पोलिसांमधील समन्वयातून सुरू असलेल्या तपासामुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे. संशयितांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मात्र, या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. बेळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. व्ही. हिरेमठ यांनी ४०० कोटी रुपयांच्या कंटेनर लुटीचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. चोर्ला घाट परिसरात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून यासंदर्भात एक पत्र प्राप्त झाले असून, त्याला अधिकृत उत्तर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे या प्रकरणातील गूढ अधिकच गडद झाले आहे.दरम्यान, या कथित लुटीमागे राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. ४०० कोटी रुपयांच्या नोटांमागे राजकीय क्षेत्रातील एका बड्या ‘साहेबांचा’ हात असल्याची कुजबूज सुरू आहे. या प्रकरणाची दखल मुंबई पोलीस मुख्यालयात वरिष्ठ स्तरावर घेण्यात आली असून, प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी अस्वस्थता पसरली आहे.
Shashi Tharoor: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकींमध्ये शशी थरूर यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.
Sharad Pawar : शरद पवारांना मोठा धक्का; ‘या’माजी आमदाराने सोडली साथ, शिवसेनेत केला प्रवेश
Sharad Pawar : शरद पवार गटाच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंचा आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश
Newasa Traffic: नेवासा फाट्यावर वाहतूक कोंडी; वाहनांच्या दोन किलोमीटर लांब रांगा
Newasa Traffic: रस्ता दुरुस्ती आणि दुभाजक काढल्याने कोंडीत भर; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर संताप
Border 2 Collection Day 1: सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’चा बॉक्स ऑफिसवर पहील्याच दिवशी धुमाकुळ
बॉर्डर २: सनी देवलच्या बॅार्डर २ या चित्रपटाने बॅाक्स ऑफिसवर आपली वेगळीच धमाल केली आहे.देशभक्ती, ॲक्शन आणि भावनिक कथानकाच्या जोरावर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवला आहे. भारतातील बॉक्स ऑफिसवर ‘बॉर्डर 2’ ने छप्परफाड ओपनिंग करत पहिल्या दिवशी तब्बल ३० कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे.देशांतर्गत बाजारपेठेत या चित्रपटाने आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ला मागे टाकले असले, तरी जागतिक स्तरावर मात्र ‘धुरंधर’चा पहिल्या दिवसाचा विक्रम मोडण्यात ‘बॉर्डर 2’ थोडक्यात अपयशी ठरला आहे. ‘धुरंधर’ने पहिल्या दिवशी जागतिक बॉक्स ऑफिसवर ४१.५ कोटींची कमाई केली होती, तर ‘बॉर्डर 2’चा जागतिक कलेक्शनचा आकडा ४१ कोटींवर स्थिरावला आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे ओव्हरसीज मार्केटमध्ये ‘बॉर्डर 2’ची मर्यादित कमाई. परदेशात या चित्रपटाने सुमारे ५ कोटींची कमाई केली, तर ‘धुरंधर’ने ७.७० कोटी रुपये कमावले होते.उत्तर भारतात आणि सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये सनी देओलच्या लोकप्रियतेचा मोठा फायदा ‘बॉर्डर 2’ला मिळताना दिसत आहे. २६ जानेवारीचा मोठा विकेंड समोर असल्याने, येत्या काही दिवसांत हा चित्रपट ‘धुरंधर’चा जागतिक विक्रम मोडेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.‘बॉर्डर 2’ची कथा १९७१ च्या भारत-पाक युद्धावर आधारित असून भारतीय भूदल, नौदल आणि वायुदलाच्या शौर्याची गाथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात सैनिकांच्या कुटुंबातील भावना दाखवण्यात आल्या आहेत, तर उत्तरार्धात थरारक युद्धदृश्ये पाहायला मिळतात. सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या अभिनयामुळे चित्रपट अधिक प्रभावी ठरतो. दिग्दर्शक अनुराग सिंग यांनी युद्धपटाला मानवी संवेदनांची जोड देत एक दमदार अनुभव प्रेक्षकांसमोर ठेवला आहे.
Pakistan Participation : मोहसिन नक्वी यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तान टी-२० विश्वचषकात खेळणार की नाही सरकार ठरवेल.
Jamkhed: जामखेड शहरात ‘धूमस्टाईल’ चोरीचे सत्र; महिलांमध्ये भीतीचे वातावरण
Jamkhed: एकाच दिवसात तीन महिलांना लक्ष्य करत ३ तोळ्यांचे दागिने लंपास; पोलीस प्रशासनासमोर गुन्हेगारांचे आव्हान
ZP elections : मोठी बातमी..! जिल्हा परिषद निवडणुकांतही भाजपचा बिनविरोध ट्रेंड; ‘हे’तीन उमेदवार विजयी
ZP elections : जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत बिनविरोध पॅटर्न सुरू
Russia-Ukraine war: अबू धाबीत शांतता वाटाघाटी सुरू असतानाच पुतिन यांचे 'मिसाईल' राजकारण; हजारो कुटुंबे विस्थापित.
Suryakumar Yadav Angry : सूर्यकुमार यादवने विजयानंतर खुलासा केला की त्याला इशानचा राग आला होता.
Today TOP 10 News: राज्य, देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या वाचा
प्रतिनिधी:आता सर्वसामान्य व वेतनधारकांसाठी मोठी बातमी आहे. ईपीएफओ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना Employees' Provident Fund Organisation) संस्था आपल्या कार्यशैलीत मोठ्या प्रमाणात बदल करू शकते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. आता ईपीएफओ सदस्यांना बँकिग सुविधेप्रमाणेच भविष्य निर्वाह निधीचे पैसै थेट युपीआय (Unified Payments Interface) माध्यमातून काढता येऊ शकतात. यूपीआयद्वारे पैसे काढणे, सोप्या श्रेणी (Category) आणि जलद पैसे प्रदान करण्यासाठी या सुविधेचा फायदा होईल. या सुविधेमुळे सदस्यांना निधी जलद गतीने मिळण्याची शक्यता आहे आणि एटीएम प्रक्रियेद्वारे पैसे काढणे देखील शक्य होऊ शकते. आधीच्या ईपीएफओ २.० पेक्षा यावेळी मोठे तांत्रिक बदल करण्याच्या संस्था तयारीत असून तांत्रिकच नव्हे तर संकल्पनात्मक अनेक मोठे बदल केले जाणार आहे. कमीतकमी कागदी नियमांची पूर्तता, जास्तीत जास्त पारदर्शकता अवलंबून ही प्रकिया अधिक सोपी करण्याचा निर्णय प्रस्तावित केला जात आहे. अद्याप याला अंतिम मोहोर मिळाली नसली तरी हे संकेत दिले गेले आहेत. ईपीएफओ ३.० अंतर्गत, सदस्यांना आता समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्या 'जोडलेल्या' प्रादेशिक ईपीएफओ कार्यालयापुरते मर्यादित राहावे लागणार नाही.ते कुठल्याही नजीकच्या कार्यालयातून समस्यांचे निराकरण करु शकणार आहेत. तसेच नव्या बदलानुसार,नवीन वेबसाइटमध्ये एआय आधारित भाषांतरांचा समावेश करणे अपेक्षित आहे, ज्यामुळे युजर्सना त्यांच्या भाषेत इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, मराठी, तमिळ आणि इतर अनेक भारतीय भाषांमध्ये माहिती मिळू शकेल.सुधारणा कागदपत्रांची प्रक्रिया कमी करण्यासाठी, चुका कमी करण्यासाठी आणि ईपीएफओचे कामकाज बँकिग प्रमाणेच करून नव्या फिचर्ससाठी तयार करण्यात आले आहेत. विशेष यूपीआय वापरून पीएफ काढण्याची प्रस्तावित सुविधा असून आता भीम (BHIM) ॲपचाही त्यात समावेश आहे असा प्रस्ताव सादर केला गेला आहे. एप्रिल २०२६ पर्यंत सुरू होण्याची या नियमाची अंमलबजावणी सुरू होईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे देशभरातील कुठल्याही कार्यालयात ही नवीन प्रणाली सेवा मिळवणे अधिक सोपी होणार आहे.तसेच एकदा अंमलबजावणी झाल्यावर, कर्मचारी देशातील कोणत्याही ईपीएफओ कार्यालयातून पीएफ-संबंधित कामे करू शकणार आहेत, ज्यामुळे फिरतीची नोकरी असलेल्यांना या सुविधेचा लाभ होणार आहे.ईपीएफओ पोर्टलला अधिक सोपे आणि कार्यक्षम बनवण्यासाठी त्यांचेही अपडेट केले जाणार आहे.ईपीएफओने पैसे काढण्याचे नियमही सोपे केले आहेत. पूर्वी, पीएफ काढणे १३ वेगवेगळ्या कारणांद्वारे नियंत्रित केले जात होते, ज्यामुळे सदस्यांमध्ये गोंधळ निर्माण होत असे. आता, पैसे काढण्याचे फक्त तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. ज्यात आवश्यक गरजा (गंभीर आजार, शिक्षण, विवाह) घराच्या गरजा (घर खरेदी, बांधकाम, गृहकर्ज परतफेड), विशेष परिस्थिती (बेरोजगारी) यांचा समावेश असेल. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे सर्व श्रेणींमध्ये १२ महिन्यांच्या सेवेची एकसमान अट. सुधारित रचनेनुसार, शिक्षणासाठी पैसे काढण्याची परवानगी १० वेळा आणि विवाहासाठी ५ वेळा दिली जाऊ शकते. या सुधारणांमध्ये असाही प्रस्ताव आहे की सदस्य ७५% निधी त्वरित काढू शकतात, तर उर्वरित २५% रक्कम खात्यात राहील जेणेकरून व्याजाचे फायदे आणि सेवानिवृत्तीची सुरक्षा अबाधित राहील. जर एखादा सदस्य वर्षभर बेरोजगार राहिला, तर त्याला पीएफमधील १००% रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकते. याव्यतिरिक्त, ईपीएफओने सदस्यांना नाव, जन्मतारीख, पालकांची नावे आणि नोकरीच्या तारखांसारख्या सामान्य प्रोफाइलमधील चुका ऑनलाइन दुरुस्त करण्याची सुविधा दिली आहे, ज्यासाठी आता नियोक्ता किंवा ईपीएफओच्या मंजुरीची आवश्यकता नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा
हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरामुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वन-डे, टी-२० आणि कसोटी सामने खेळणार आहे. २०२५ वनडे वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय संघाचा हा पहिला परदेशी दौरा आहे. या दौऱ्यातील वन-डे आणि टी-२० मालिकेसाठी यापूर्वीच संघांची घोषणा करण्यात आली आहे. पण या संघात एक बदल झाला आहे. तसेच एकमेव कसोटी सामन्यासाठीही भारतीय महिला संघाची घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. या कसोटी संघाव्यतिरिक्त, बीसीसीआयने एसीसी राइजिंग स्टार्स आशिया कपसाठी इंडिया 'ए' संघाची देखील घोषणा केली आहे. १५ फेब्रुवारीपासून टी-२० मालिकेने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर ६ ते ९ मार्च रोजी पर्थमध्ये होणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्याने या दौऱ्याचा शेवट होईल. भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर सांभाळणार असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. याशिवाय कसोटी संघात शफाली वर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, दीप्ती शर्मा या अनुभवी खेळाडूंचाही समावेश आहे.याशिवाय २०२५ वर्ल्ड कपदरम्यान दुखापतग्रस्त झालेली प्रतिका रावलचाही कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ती या दौऱ्यातून भारतीय संघात पुनरागमन करू शकते.वनडे टी-२० संघात बदल :ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय महिला संघाची वनडे आणि टी२० मालिकांसाठी आधीच निवड झाली आहे. मात्र, यष्टीरक्षक फलंदाज गुनालन कमालिनी ही वूमन्स प्रीमयर लीग दरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने या संपूर्ण दौऱ्यातूनच बाहेर झाली आहे. त्यामुळे भारताच्या वनडे आणि टी२० संघात तिच्या जागेवर उमा छेत्रीला संधी देण्यात आली आहे.एलिसा हेलीचा शेवटचा सामना :पर्थमध्ये होणारा दिवस-रात्र कसोटी सामना एलिसा हिली हिच्यासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. ती या सामन्यानंतर क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.कसोटी संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, अमनजोत कौर, ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा चेत्री (यष्टीरक्षक), प्रतिका रावल, हर्लिन देओल, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग ठाकूर, स्नेह राणा, क्रांती गौड, वैष्णवी शर्मा, सायली सातघरे.वनडे संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), काशवी गौतम, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रीक्स, हर्लिन देओल.टी २० संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधा), शफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिक्स, भारती फुलमाली, श्रेयंका पाटील.इंडिया 'ए' (एसीसी राइजिंग स्टार्स आशिया कप) संघ: हुमैरा काझी, वृंदा दिनेश, अनुष्का शर्मा, दिया यादव, तेजल हसाब्नीस, नंदिनी कश्यप (यष्टिरक्षक), ममता एम (यष्टिरक्षक), सोनिया मेंढिया, मिन्नू मणी, तनुजा कंवर, प्रेमा रावत, सायमा ठाकर, जिंतिमणी कलिता, नंदिनी शर्मा.भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२६टी-२० मालिका१५ फेब्रुवारी - पहिला टी२० सामना, सिडनी (दु. १.३० वाजता)१९ फेब्रुवारी - दुसरा टी२० सामना, कॅनबरा (दु. १.३० वाजता)२१ फेब्रुवारी - तिसरा टी२० सामना, ऍडलेड, (दु. २.०० वाजता)वन-डे मालिका२४ फेब्रुवारी - पहिला वनडे सामना, ब्रिस्बेन (स. ९.०० वाजता)२७ फेब्रुवारी - दुसरा वनडे सामना, होबार्ट (स. ९.०० वाजता)१ मार्च - तिसरा वनडे सामना, होबार्ट (स. ९.०० वाजता)कसोटी सामना६ ते ९ मार्च - दिवस-रात्र कसोटी सामना (स. ११ वाजता)
आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली आहे. भारतात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये खेळण्यास सुरक्षेचे कारण देत नकार देणाऱ्या बांगलादेश संघाला आयसीसीने स्पर्धेतून अधिकृतरित्या बाहेर काढले आहे. बांगलादेशच्या जागी आता स्कॉटलंडचा संघ स्पर्धेत सहभागी होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतातील सुरक्षेचे कारण देत विश्वचषकाचे सामने दुसऱ्या देशात हलवण्याची मागणी केली होती. ही मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने फेटाळून लावली. आयसीसीने एक स्वतंत्र सुरक्षा समिती नेमली होती ज्याने भारतातील सुरक्षेचा आढावा घेतला आणि धोके नसल्याचे स्पष्ट केले होते. असे असूनही बांगलादेशने आपल्या भूमिकेवर ठाम राहत सहभाग निश्चित केला नाही.बांगलादेशच्या सहभागाबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने, आयसीसीने त्यांना स्पर्धेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची माहिती आयसीसीने बीसीबीला पत्राद्वारे दिली. स्पर्धेचे स्वरूप आणि वेळापत्रक कायम ठेवण्यासाठी तातडीने स्कॉटलंड संघाचा विश्वचषकात समावेश करण्यात आला आहे. स्कॉटलंडला 'ग्रुप सी' मध्ये स्थान मिळाले असून, त्यांचे सामने आता इंग्लंड, वेस्ट इंडीज, नेपाळ आणि इटली या संघांशी होणार आहेत. आयसीसीच्या या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात चर्चा सुरू झाली आहे. सुरक्षेचे कारण देत स्पर्धेतून माघार घेण्याच्या बांगलादेशच्या भूमिकेवर अनेक क्रिकेट चाहते आणि तज्ज्ञांकडून टीका होत आहे. आयसीसीने घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे भविष्यात अशा परिस्थितीला कसे सामोरे जावे यासाठी एक उदाहरण समोर आले आहे.का मिळाली स्कॉटलंडला संधी?स्कॉटलंड सध्या टी-२० क्रिकेट क्रमवारीत १४ व्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यावर असलेले तेराही संघांनी टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी पात्रता मिळवली आहे. त्यामुळे बाकी संघांच्या उत्तम क्रमवारीमुळे त्यांना पसंती देण्यात आली आहे. पण त्यासोबतच त्यांची गेल्या काही वर्षातील आयसीसी स्पर्धेतील कामगिरीही लक्षात घेण्यात आली आहे. त्यांनी २०२४ टी-२० वर्ल्डकपमध्ये ग्रुप बीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांचे आणि इंग्लंडचे गुण सारखे होते, पण इंग्लंडचा नेट रन रेट चांगला असल्याने त्यांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला होता. २०२२ टी२० वर्ल्ड कप स्पर्धेतही त्यांनी वेस्ट इंडिजला पराभूत केले होते. २०२१ टी२० वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलंडने बांगलादेशला पराभूत केले होते. दरम्यान, स्कॉटलंड टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी झालेल्या युरोपियन क्वालिफायर्समध्ये चौथ्या क्रमांकावर राहिल्याने त्यांना आधी पात्रता मिळाली नव्हती. मात्र आता ते बांगलादेशच्या जागेवर खेळू शकतात.
राज्यात खळबळ..! 400 कोटींची रोकड असलेला कंटेनर चोरीला? घनदाट जंगलात घडलं तरी काय?
Nashik Crime News : कर्नाटकातील चोरली घाट परिसरात 400 कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा संशय
Scotland Replaces Bangladesh : आयसीसीने बांगलादेश टी-२० विश्वचषकातून बाहेर केलं असून त्याच्या स्कॉटलंडला संधी दिली आहे.
Viral Video : जोरदार सामना झाला अन् वाघ झुकला!
सवाई माधोपूर : राजस्थानमधील जगप्रसिद्ध रणथंभोर टायगर रिझर्व्हमध्ये शुक्रवारी संध्याकाळी निसर्गाचा एक अत्यंत दुर्मीळ आणि थक्क करणारा आविष्कार पाहायला मिळाला. जंगलाचा राजा समजला जाणारा वाघ आणि रागीट स्वभावाचे अस्वल जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकले, तेव्हा पर्यटकांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, या लढाईचा शेवट ज्या पद्धतीने झाला, ते पाहून निसर्गप्रेमी अवाक झाले आहेत.रणथंभोरमधील व्हायरल व्हिडिओमधली घटना
T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी
गुवाहाटी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी गुवाहाटी येथील एसीसी बरसापारा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात दिमाखदार विजय मिळवून भारताने मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली असून, आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी सूर्यकुमार यादवचा संघ सज्ज झाला आहे.भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इशान किशनचे स्फोटक पुनरागमन आणि सूर्यकुमार यादवची फटकेबाजी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इशान किशनने केलेल्या धमाकेदार पुनरागमनामुळे संघातील सलामीवीराच्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. एकीकडे इशानने आपली दावेदारी मजबूत केली आहे, तर दुसरीकडे संजू सॅमसनचा खराब फॉर्म कायम आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारत दोन सामने शिल्लक असतानाच मालिका खिशात घालेल, ज्यामुळे आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी संघाचा आत्मविश्वास द्विगुणित होईल.दुसरीकडे, पाहुण्या न्यूझीलंड संघासाठी हा सामना अस्तित्वाची लढाई आहे. मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावाच लागेल. किवी फलंदाजांना भारताच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजीचा सामना करण्यासाठी विशेष रणनीती आखावी लागणार आहे.गुवाहाटीचे बरसापारा मैदान हे फलंदाजांसाठी नंदनवन मानले जाते. येथील खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडण्याची शक्यता असून, २०० हून अधिक धावांचे लक्ष्य गाठले जाऊ शकते. रात्रीच्या वेळी पडणारे दव महत्त्वाचे ठरणार असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याची शक्यता अधिक आहे.भारतीय संघाचे नियोजन सलामीची जोडी: संजू सॅमसनच्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर टांगती तलवार आहे. तरीही, मालिका अद्याप जिंकलेली नसल्याने संघ व्यवस्थापन त्याला शेवटची संधी देऊ शकते किंवा इशान किशनला सलामीला बढती देऊन मधल्या फळीत बदल करू शकते. आक्रमक पवित्रा: इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांचा फॉर्म पाहता भारत सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करून न्यूझीलंडला बॅकफूटवर ठेवण्याचे नियोजन करेल. गोलंदाजी: अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांच्यावर मधल्या षटकांत विकेट घेण्याची जबाबदारी असेल.न्यूझीलंड संघाचे नियोजन अस्तित्वाची लढाई: मालिका जिवंत ठेवण्यासाठी न्यूझीलंडला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. फिन ॲलनवर मदार: सलामीवीर फिन ॲलनला मोठी खेळी करावी लागेल. तसेच, मिचेल सँटनरला भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी फिरकीचे जाळे विणावे लागेल.
Ekta Sawant : डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाला प्रश्न आणि मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर
भाजप नगरसेविका मृणाल कांबळेंच्या भावावर हल्ला, १५ जणांवर गुन्हा दाखल
पुणे : भवानी पेठ परिसरात बॅनर लावण्यावरून झालेला वाद हाणामारीत रूपांतरित झाला. या घटनेत भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका मृणाल कांबळे यांचा भाऊ शंतनू उर्फ बापू यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. खडक पोलिसांनी १४ ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. शंतनू यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. गुरुवारी (२२ जाने.) दुपारी सुमारे ३.३० वाजता काशेवाडी परिसरात निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर कांबळे समर्थकांकडून मतदारांचे आभार मानण्यासाठी बॅनर लावण्याचे काम सुरू होते. त्यावेळी प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेविका अर्चना पाटील यांचे पती तुषार यांचे समर्थक घटनास्थळी आले व त्यांनी बॅनर लावू नये असे सांगितले. यावरून वाद वाढला आणि जमावाने शंतनू यांच्यावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, अशी तक्रार आहे. पुन्हा त्या भागात बॅनर लावल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कदम करत आहेत. संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाही नोंदवण्यात येत आहेत.
भारत पेट्रोलियमचा दमदार तिमाही निकाल नफ्यात ८९% वाढ 'इतका'लाभांशही जाहीर
मोहित सोमण: देशातील मोठी पीएसयु भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेडने आपला तिमाही निकाल जाहीर केला. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर करोत्तर नफा (Profit after tax PAT) गेल्या वर्षीच्या ४६४९ कोटी तुलनेत यंदा ७५४५ कोटींवर प्राप्त केला. म्हणजेच कंपनीच्या निव्वळ नफ्यात ८९% वाढ झाली असल्याचे सांगितले गेले. तसेच कंपनीच्या करपूर्व नफ्यात (Profit before tax PBT) इयर ऑन इयर बेसिसवर ६१७६ कोटींवरून १००९४ कोटींवर वाढ झाली. विशेष म्हणजे कंपनीच्या व्याजातील खर्चात (Interest Expense) इयर ऑन इयर बेसिसवर ४२९ कोटीवरून ३६१ कोटींवर घसरण झाली. तर व्याज उत्पन्न (Interest Income) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ३६९ कोटीवरून ३२२ कोटीवर घसरण झाली आहे.विशेष म्हणजे जागतिक स्तरावरील परदेशी चलन विनिमय (Foreign Exchange) मुळे कंपनीच्या नफ्यात परिणाम झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. कंपनीच्या आकडेवारीनुसार तो फरक २७३ कोटीवरून १६७ कोटींवर गेल्याचे म्हटले गेले. कंपनीच्या थकबाकीतही इयर ऑन इयर बेसिसवर १९६२२ वरून ५२९३ कोटीत घसरण झाली. जीआरएम (Gross Refining Margin) मध्ये मुंबईत ४.५० युएस अब्ज डॉलरवरून ११.४० इतकी मोठी वाढ झाली आहे तर कोची रिफायनरीत ५.४७ युएस अब्ज डॉलरवरून १२.७० अब्ज डॉलर व बिना रिफायनरीतून ७.७८ वरून १८.१७ अब्ज डॉलरवर ही वाढ गेली. तसेच निकालासह कंपनीने थेट १० रूपये लाभांश जाहीर केला आहे.संचालक मंडळाने शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १००% म्हणजेच १० रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरचा दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला. याविषयी बोलताना एक्सचेंज फायलिंगमध्ये कंपनीने,प्रति इक्विटी शेअरचा दुसरा इक्विटी शेअर १० रुपये इतका अंतरिम लाभांश रेकॉर्ड डेट बंद होताना म्हणजेच सोमवार, २ फेब्रुवारी २०२६ रोजी कंपनीचे इक्विटी शेअर्स असलेल्या भागधारकांना दिला जाईल असे स्पष्ट केले. काल बाजार बंद होताना कंपनीचा शेअर १.२६% कोसळला असून गेल्या ५ दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये ३.६८% घसरण झाली. गेल्या १ महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ४.४३% घसरण झाली असून वर्षभरात शेअर्समध्ये ३२.५६% वाढ झाली आहे तर इयर टू डेट बेसिसवर (YTD) ८.३४% वाढ झाली आहे.
Hardik Pandya Argument : हार्दिक पंड्या आणि माजी खेळाडू मुरली कार्तिक यांच्या वादाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Navi Mumbai: महापे MIDC मध्ये अग्नितांडव, उंचच्या उंच उडाल्या आगीच्या ज्वाळा
नवी मुंबई : नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्र असलेल्या महापे एमआयडीसीमध्ये भीषण आगीची घटना घडली. येथील 'बिटाकेम'या केमिकल कंपनीला अचानक आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की आगाच्या ज्वाळा बहुमजली इमारतीपेक्षा मोठ्या दिसत होत्या. धुराचे लोळ लांबूनच दिसत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये बहीची वातावरण निर्माण झाले.मिळालेल्या माहितीनुसार, महापे एमआयडीसीमधील W-177 क्रमांकाच्या बिटाकेम या केमिकल कंपनीत ही आग लागली. कंपनीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक साठा असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरूघटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. केमिकल कंपनी असल्याने आग विझवताना विशेष खबरदारी घेतली जात आहे. अग्निशमन दलाच्या किमान ४ ते ५ गाड्या घटनास्थळी कार्यरत असून, पाण्याचा मारा सुरू आहे. सुदैवाने, या भीषण घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे . शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्यानंतर आणि पंचनामा केल्यानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील लोकांना बाहेर काढलं जात आहे. आजूबाजूच्या कंपन्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित युद्धावर आधारित चित्रपट 'बॉर्डर'चा वारसा २९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अवतरला आहे. १९९७ मध्ये जे.पी. दत्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या 'बॉर्डर'ने प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना जागृत केली होती. त्याच लोंगेवाला युद्धाची शौर्यगाथा आता ‘बॉर्डर २’ च्या रूपाने २३ जानेवारी २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाली आहे. या चित्रपटातून सनी देओल पुन्हा एकदा आपल्या करारी आवाजात शत्रूला आव्हान देताना दिसत असून, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, जे.पी. दत्ता आणि निधी दत्ता यांनी केली असून, दिग्दर्शनाची धुरा अनुराग सिंह यांनी सांभाळली आहे. पहिल्या 'बॉर्डर'ने ऑरिजिनलिटी आणि भावनेचा जो डोंगर उभा केला होता, तिथेच 'बॉर्डर २' कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा हिमालयाइतक्या उंचावल्या आहेत. तब्बल पाव शतकानंतर सनी देओलची तीच जादू पुन्हा अनुभवण्यासाठी चाहते थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. चित्रपटाचा भव्य कॅनव्हास आणि युद्धाचे प्रसंग जुन्या आठवणींना उजाळा देणारे ठरत आहेत.तांत्रिकदृष्ट्या भव्य असूनही प्रेक्षकांमध्ये संमिश्र सूरhttps://prahaar.in/2026/01/24/parle-g-factory-in-vile-parle-to-be-demolished-for-high-rise-commercial-complex-what-is-the-real-reason/चित्रपटात आजही तो जुना 'बॉर्डर'वाला खास फ्लेवर जपण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, अनेक हृदयस्पर्शी दृश्यांमध्ये प्रेक्षकांचे डोळे पाणावताना दिसत आहेत. मात्र, १९९७ च्या मूळ चित्रपटानं जे मातीचं सत्व आणि अस्सलता (Originality) जपली होती, त्या तुलनेत 'बॉर्डर २' चा प्रभाव थोडा कमी पडत असल्याची भावना चित्रपट रसिकांकडून व्यक्त केली जात आहे. चित्रपट तांत्रिकदृष्ट्या अत्यंत भव्य आणि आधुनिक आहे. युद्धाचे प्रसंग आणि सिनेमॅटोग्राफी प्रेक्षकांना थक्क करणारी आहे. तरीही, समीक्षकांच्या मते, पहिल्या भागात जो 'मातीचा सुगंध' आणि नैसर्गिक संवाद होते, त्यांची जागा आता तंत्रज्ञानाने घेतल्याचे जाणवते. भावनांच्या बाबतीत चित्रपट यशस्वी ठरला असला तरी, मूळ 'बॉर्डर'शी तुलना करताना हा चित्रपट काहीसा मागे पडताना दिसतो.५०० कोटींचा आकडा पार करण्याची शक्यता...एखाद्या ऐतिहासिक चित्रपटाचा सिक्वेल बनवणे ही निर्मात्यांसाठी 'अग्निपरीक्षा'च असते आणि 'बॉर्डर २'च्या बाबतीत निर्माते या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले आहेत. चित्रपटातील देशभक्तीचा जोश आणि मनाला भिडणारे संगीत पाहता, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ४०० ते ५०० कोटींची कमाई करून नवीन विक्रम प्रस्थापित करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून हा चित्रपट सुपरहिट ठरला असला तरी, १९९७ च्या मूळ 'बॉर्डर'ची जागा घेणे या चित्रपटाला शक्य नसल्याचे मत समीक्षकांनी व्यक्त केले आहे. निर्माते भूषण कुमार आणि जे.पी. दत्ता यांनी चित्रपटाच्या प्रत्येक विभागात घेतलेली मेहनत पडद्यावर स्पष्टपणे दिसते. मात्र, एक कटू सत्य असे की, सर्व तांत्रिक कुशलता असूनही पहिल्या चित्रपटातील ती नैसर्गिक 'जादू' आणि प्रेक्षकांशी असलेली आत्मिक जोडणी (Emotional Connection) यावेळी काहीशी फिकी पडल्याचे जाणवते. तरीही, सनी देओलचा स्क्रीन प्रेझेन्स आणि राष्ट्रभक्तीचा ज्वर यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरत आहे.चित्रपटाची कहाणी काय?'बॉर्डर २' बाबतची सर्वात महत्त्वाची आणि उत्सुकता वाढवणारी गोष्ट म्हणजे हा चित्रपट जुन्या भागाचा रिमेक नसून एक पूर्णपणे स्वतंत्र आणि खऱ्या घटनेवर आधारित शौर्यगाथा आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय लष्कर, वायूसेना आणि नौदलाने मिळून राबवलेल्या एका ऐतिहासिक 'संयुक्त मोहिमेचा' थरार या चित्रपटात मांडण्यात आला आहे. तिन्ही दलांच्या समन्वयातून शत्रूचा पराभव कसा केला जातो, याचे जिवंत चित्रण मोठ्या पडद्यावर करण्यात आले आहे. सनी देओल पुन्हा एकदा लेफ्टनंट कर्नल फतेह सिंह कलेर या करारी भूमिकेत असून, ते केवळ एक सैनिक नसून तिन्ही दलांच्या जवानांचे मार्गदर्शक (मेंटॉर) आहेत. मोहिमेच्या केंद्रस्थानी मेजर होशियार सिंह (वरुण धवन), एअरफोर्स ऑफिसर निर्मल जीत सिंह (दिलजीत दोसांझ) आणि नेव्ही कमांडर एम.एस. रावत (अहान शेट्टी) यांची जबरदस्त तुकडी आहे. केवळ युद्धच नाही, तर या चारही योद्ध्यांचा वैयक्तिक जीवनप्रवास, त्यांच्या कुटुंबांचे त्याग आणि सीमेवरील त्यांचा सामूहिक संघर्ष हा या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे.वरुण धवनने अभिनयाने दिली टीकाकारांना चपराक'बॉर्डर २' च्या कास्टिंगवरून सोशल मीडियावर अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या, मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. विशेषतः वरुण धवनच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना त्याने आपल्या दमदार अभिनयाने चकित केले आहे. दुसरीकडे, सनी देओलने २९ वर्षांनंतरही आपला तोच दरारा आणि करारीपणा कायम राखला असून, त्याचा वावर प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा थरारक अनुभव ठरला आहे. वरुण धवनने एका शिस्तबद्ध सैनिकाची भूमिका साकारताना कोठेही अतिरंजितपणा (Overacting) न करता संयमित अभिनय केला आहे. सैनिकाच्या अंतर्मनातील द्वंद्व त्याने ज्या पद्धतीने जिवंत केले, ते पाहून त्याने आपल्या टीकाकारांची बोलती बंद केली आहे. जेव्हा मोठ्या पडद्यावर 'गरजण्याची' वेळ येते, तेव्हा सनी देओलला आजही तोड नाही. चित्रपटात सनीचा स्क्रीन प्रेझेन्स इतका जबरदस्त आहे की, प्रत्येक वेळी तो पडद्यावर येताच प्रेक्षकांच्या अंगावर काटे येतात. २९ वर्षांपूर्वीच्या मूळ 'बॉर्डर'मधील तोच उत्साह सनीने आजही टिकवून ठेवल्याचे जाणवते.कुठे कमी पडला चित्रपट?'बॉर्डर २' हा तांत्रिकदृष्ट्या एक अत्यंत सक्षम चित्रपट असला तरी, १९९७ च्या मूळ 'बॉर्डर'शी तुलना करताना तो काहीसा फिका पडत असल्याचे जाणवत आहे. प्रांजळपणे विश्लेषण केल्यास, नवीन चित्रपट भव्य वाटतो, मात्र जुन्या 'बॉर्डर'मध्ये असलेली 'अस्सलता' आणि 'मातीचा सुगंध' यात कुठेेतरी हरवला आहे. जुन्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या काळजाला जो स्पर्श केला होता, तो अनुभव यावेळी तितक्या प्रभावीपणे घेता येत नसल्याचे मत सिने-समीक्षकांनी व्यक्त केले आहे. १९९७ च्या चित्रपटात मथुरा दास किंवा धर्मवीर यांसारखी छोटी पात्रेही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. त्या पात्रांमध्ये एक वेगळा 'आत्मा' होता. त्या तुलनेत 'बॉर्डर २' मधील पात्रे तांत्रिकदृष्ट्या मजबूत असूनही काही ठिकाणी कृत्रिम किंवा 'बनावट' वाटतात. जुन्या चित्रपटातील युद्धाचे प्रसंग नैसर्गिक वाटायचे, तर आजच्या काळात आधुनिक कॅमेरे आणि व्हीएफएक्स (VFX) असूनही त्यातील मूळ उत्साह आणि भावनांची खोली कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये कोरबा शहरात एक विचीत्र चोरीची घटना समोर आली आहे. छत्तीसगड येथे हसदेव लेफ्ट कॅनालवर बांधलेला,सुमारे ४० वर्षे जुना आणि अंदाजे १० टन वजनाचा स्टील पूल रातोरात लंपास केला. हा पूल ढोडीपारा परिसरा मध्ये असून, तो प्रामुख्याने पादचाऱ्यांसाठी वापर केला जात होता.१८ जानेवारी रोजी तिथे राहत असलेल्या नागरिकांच्या लक्षात आले की पूल अचानक गायब झाला आहे. या घटने नंतर तेथील भागाचे नगरसेवक लक्ष्मण श्रीवास यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना आढळले की चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने पुलाचे लोखंडी रेलिंग आणि संपूर्ण रचना कापून वेगवेगळ्या भागांत विभागली आणि भंगार म्हणून विक्री करण्याच्या उद्देशाने चोरी केली. कोरबाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक लखन पाटले यांनी सांगितले की, तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. तांत्रिक तपास, गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि कसून चौकशीनंतर या गुन्ह्यात सुमारे १५ जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत लोचन केवट, जयसिंह राजपूत, मोती प्रजापती, सुमित साहू आणि केशवपुरी गोस्वामी उर्फ ‘पिक्चर’ या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.चौकशीत आरोपींनी पुलातील लोखंड स्क्रॅपमध्ये विकण्याचा कबुलीजबाब दिला आहे. मुख्य आरोपी मुकेश साहू आणि असलम खान यांच्यासह इतर १० आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी चोरीतील सुमारे सात टन स्टील नहरातून जप्त केले असून, चोरीसाठी वापरलेले वाहनही ताब्यात घेतले आहे. उर्वरित स्टील कुठे विकले गेले, याचा तपास सुरू आहे. पूल चोरी झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना नहर ओलांडण्यासाठी जवळील काँक्रीट पुलाचा वापर करावा लागत आहे.
Tamil Nadu: राज्यपालांचे सरकारच्या विरोधात काम सुरु –मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन
Tamil Nadu: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी विधानसभेत बोलताना राज्यपाल आर.एन. रवी यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
कमल आर खानला २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी; मुंबईतील एका निवासी इमारतीवर झाडल्या गोळ्या
प्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खान याला ओशिवरा गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. १८ जानेवारी रोजी, अभिनेता-सोशल मीडिया सेलिब्रिटी कमाल रशीद खान यांना मुंबईतील अंधेरी येथील ओशिवरा येथील एका निवासी इमारतीत चार राउंड गोळीबार केल्याबद्दल अटक करण्यात आली.लेखक-दिग्दर्शक नीरज कुमार मिश्रा (४५) हे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात, तर मॉडेल प्रतीक बैद (२९) चौथ्या मजल्यावर राहतात.सुरुवातीला गोळीबार कोणी केला हे स्पष्ट झाले नव्हते. तथापि, आता तपासात असे समोर आले आहे की केआरकेनेच गोळीबार केला होता. त्यामुळे आता अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे.मुंबई पोलिसांच्या पथकाने चौकशी करताना कमाल आर खानने स्वतःच्या परवानाधारक बंदुकीने गोळीबार केल्याची कबुली दिली.बंदुकीचा परवाना कधी मिळाला?केआरकेने २००५ मध्ये उत्तर प्रदेश राज्यातून बंदुकीचा परवाना मिळवला. उत्तर प्रदेशातून बंदूक मिळाल्यानंतर त्याने तो मुंबईत आणला. गेल्या वीस वर्षांपासून त्याने ती बंदूक मुंबईतील त्याच्या घरी ठेवली होती. काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली, त्यानंतर त्याने त्याची परवाना असलेली बंदूक वर्सोवा पोलिस ठाण्यात जमा केली.आचारसंहिता संपल्यानंतर, कमाल खानने वर्सोवा पोलिस स्टेशनमधून बंदूक परत आणली. चार-पाच दिवसांनी, घरी बंदूक साफ करताना, त्याने त्याची कार्यक्षमता तपासण्यासाठी दोन गोळ्या झाडल्या. यावेळी, त्याने लोखंडवाला बॅकसाइड रोडवरील एका झाडावर गोळीबार केला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने, गोळी जवळच्या नालंदा इमारतीला लागली.यानंतर,ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांनी प्रकरणाचा तपास केला आणि अभिनेता कमाल आर खानला चौकशी केल्यानंतर अटक केली. केआरकेचा असा दावा आहे की त्याचा कोणालाही इजा करण्याचा हेतू नव्हता.
Ankita Walawalkar | “आमच्या आयुष्यात एक नवीन पाऊल पडलं”; अंकिता वालावलकरने खरेदी केली नवी कार
Ankita Walawalkar | अंकिता वालावलकरने दाखवली नव्या कारची झलक; दोन्ही कार म्हणजे आमच्या मेहनतीचं आणि प्रगतीचं प्रतीक असल्याचे म्हणत शेअर केली पोस्ट
Border 2 Box Office : बॅार्डर २ चित्रपट प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने धुरंधरच्या ओपनिंग डे चे रेकॅार्ड मोडले आहे.
Right Way to Drinking Water: पाणी पिणं जीवनासाठी अत्यंत आवश्यक असलं तरी ते कशा पद्धतीने पितो, याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. घाईगडबडीच्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेक जण उभं राहून पाणी पितात.
Kareena Kapoor : बेबोचा कॅज्युअल लूक! मुंबई एअरपोर्टवर झाली स्पॅाट; व्हिडिओ व्हायरल
Kareena Kapoor ; अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या आगामी दायरा चित्रपटामुळे चर्चेत असून, या दरम्यान ती मुंबई विमानतळावर स्पॅाट झाली.
भाजपच्या खारेपाटण जि.प.उमेदवार प्राची इस्वालकर बिनविरोध
ठाकरे सेनेला आणखी धक्काउबाठा सेनेच्या खारेपाटण जि. प. च्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी घेतली माघारकणकवली : तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे सेनेला सलग धक्के दिले जात आहेत. सलग दुसऱ्या दिवशी खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील ठाकरे सेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे या मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार प्राची इस्वलकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत.या घडामोडींमुळे कणकवली तालुक्यात भाजपाकडून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या ३ झाली असून, कणकवली विधानसभा मतदारसंघात ही संख्या एकूण ४ पोहोचली आहे.पालकमंत्री . नितेश राणे यांचे ‘दे धक्का तंत्र’ सध्या केवळ मतदार संघातच नव्हे, तर राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. मीनल तळगावकर यांच्या माघारीच्या निर्णयामुळे ठाकरे सेनेला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.विशेष म्हणजे शनिवार असूनही निवडणूक प्रक्रियेमुळे निवडणूक कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत आणखी कोण उमेदवार माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कालच या मतदार संघातील अपक्ष उमेदवार उज्ज्वला चिके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर आज ठाकरे शिवसेनेच्या एकमेव विरोधी उमेदवार मीनल तळगावकर यांनीही माघार घेतल्याने प्राची इस्वलकर या या मतदार संघातील एकमेव उमेदवार राहिल्या. दरम्यान, ‘दे धक्का’ तंत्राचा मोठा फटका २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी बसण्याची शक्यता आहे.
जिओ फायनांशियल सर्विसेसकडून आपली उपकंपनी जिओ अल्टरनेटिव इन्व्हेसमेंट मॅनेजर लिमिटेडची नोंदणी
मोहित सोमण: जिओ फायनान्स लिमिटेड (Jio Finance Limited) कंपनीने आज आपली संपूर्ण मालकीची असलेली जिओ अल्टरनेटिव इन्व्हेसमेंट मॅनेजर (Jio Alternative Investment Manager) लिमिटेड कंपनी नोंदणीकृत करण्यात आली असल्याचे कंपनीने आज एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीत कंंपनी १० रूपये दर्शनी मूल्य (Face Value) प्रमाणे १० लाख शेअर माध्यमातून १ कोटींची प्रारंभिक गुंतवणूक करणार आहे. याविषयी एक्सचेंज फायलिंगमध्ये माहिती देताना,कंपनी जेएआयएमएलच्या प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याच्या १०००००० इक्विटी शेअर्सच्या प्रारंभिक वर्गणीसाठी १ कोटी रुपयांची गुंतवणूक करेल असे कंपनीने म्हटले. तसेच हा व्यवहार संबंधित पक्षांच्या व्यवहारांच्या कक्षेत येत नाही आणि कंपनीचे प्रवर्तक (Promoter) प्रवर्तक गट आणि समूह कंपन्यांपैकी कोणाचाही उपरोक्त व्यवहारात कोणताही हितसंबंध नाही. कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून, ईमेलद्वारे, २३ जानेवारी २०२६ रोजी प्राप्त झाले असे कंपनीने सांगितले.एआयएफ इन्व्हेसमेंट (Alternative Investment Fund AIF Investment) हा गुंतवणूकीचा एक आधुनिक प्रकार आहे. या माध्यमातून उच्च उत्पन्न, अथवा अति उच्च उत्पन्न असलेल्या गुंतवणूकदारांना इक्विटी, डेट, व म्युच्युअल फंड या पर्यायांव्यतिरिक्त एक वेगळा पर्यायी गुंतवणूकीचा मार्ग विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूकीसाठी खुला होता. हा पर्याय मोठ्या प्रमाणात परतावा देत असला तरी तुलनेने तो कमी सेबी नियंत्रित आहे आणि हा पर्याय गुंतवणूकदारांसाठी जोखमेचा पर्याय म्हणून ओळखला जातो. किमान १ कोटींची गुंतवणूक या उत्पादनात करणे आवश्यक असते.जिओ फायनांशियल सर्विसेस कंपनीने नुकताच आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीने मजबूत आर्थिक निकाल नोंदवला होता. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या उत्पन्नात इयर ऑन इयर बेसिसवर थेट १०१% वाढ झाली होती ज्यात उत्पन्न डिसेंबर पर्यंत ९०१ कोटीवरून वाढत १९०४९ कोटींवर पोहोचले होते. जिओ फायनांशियल सर्विसेह ही एक वित्तीय सेवा देणारी कंपनी असून कंपनीचा शेअर काल ३.५८% घसरत २५३.२९ रुपयांवर बंद झाला होता. गेल्या ५ दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये ९.३४% घसरण झाली आहे तर गेल्या महिन्यात शेअर्समध्ये १५.२९% घसरण झाली होती.तर वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये मात्र ३.५८% वाढ झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) शेअर्समध्ये १४.३७% घसरण झाली आहे.
Pune Mayor : मोठी बातमी! पुण्याचा कारभारी ‘या’दिवशी ठरणार; भाजप धक्कातंत्र देणार की…
Pune Mayor : पुणे महापालिकेच्या महापौर पदावरून मोठी रस्सीखेच होत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजप पुन्हा धक्कातंत्र देणार की चर्चेतल्याच नावाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
Ashok Chaudhary on Bihar Bhawan |राज ठाकरे हे महाराष्ट्रातले राजा आहेत का? कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात बिहार भवन बांधू,बिहार सरकारमधील मंत्र्याचा थेट इशारा
Iron Deficiency : महिलांच्या या रोजच्या चुकांमुळे वाढतोय एनीमियाचा धोका, वेळीच सावध व्हा
Iron Deficiency : महिलांमध्ये एनीमिया म्हणजेच रक्ताची कमतरता ही समस्या खूप सामान्य आहे. मात्र अनेक वेळा ही समस्या एखाद्या मोठ्या आजारामुळे नव्हे, तर रोजच्या जीवनातील छोट्या-छोट्या चुकीच्या सवयींमुळे वाढताना दिसते.
भिवंडी : कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात उपचार सुरू असताना एका महिलेवर हुंड्याच्या हव्यासापोटी अमानुष छळ केल्याचा गंभीर प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. पीडितेच्या थेट तक्रारीनंतर पती आणि सासरच्या सदस्यांविरोधात महाराष्ट्रातील अंधश्रद्धा व अमानवी प्रथा प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.३६ वर्षीय पीडित महिला सध्या भिवंडीमध्ये वास्तव्यास असून ती जीवघेण्या आजाराशी लढा देत आहे. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, विवाहानंतर अनेक वर्षे हुंड्याच्या मागणीसाठी तिला शारीरिक तसेच मानसिक त्रास दिला जात होता. आजारपणालाच कारणीभूत धरत तिला अपशकुनी ठरवून अघोरी कृत केल्याचा आरोप तिने केला आहे.तक्रारीप्रमाणे, गंभीर आजाराचे निदान झाल्यानंतर उपचारासाठी मदत करण्याऐवजी छळ अधिक तीव्र करण्यात आला. डिसेंबर २०२५ मध्ये पतीने तिला अल्पवयीन मुलासह घराबाहेर काढले. यावेळी तिच्या बहिणी आणि मुलावर मारहाण झाल्याचेही समोर आले आहे.यानंतर जानेवारी २०२६ मध्ये पीडित महिला राहत असलेल्या घराबाहेर जादूटोणाशी संबंधित साहित्य ठेवण्यात आल्याची घटना घडली. हा प्रकार केवळ मानसिक दहशत निर्माण करण्यासाठी नव्हे, तर गंभीर धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने केल्याचा संशय पोलिसांनी नोंदवला आहे.या प्रकरणात पती योगेशकुमार केशरवानी याच्यासह त्याचे आई-वडील आणि इतर नातेवाइकांविरोधात भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमे तसेच महाराष्ट्र नरबळी व अमानुष, अनिष्ट प्रथा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निजामपूरा पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींच्या भूमिकेबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
मोहित सोमण: पुढील ४८ तासांत भारत व ईयु (युरोपियन युनियन) यांच्यातील द्विपक्षीय करार म्हणजेच फ्री ट्रेड अँग्रीमेंट मार्गी लागण्याची लक्षणे दिसत आहेत. कारणही तसेच आहे. भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल व ईयु युरोपियन अध्यक्ष अँटोनियो लुईस सँटोस दा कोस्टा यांनी 'मदर ऑफ ऑल ट्रेड' असे वर्णन या आगामी कराराचे केले असून महत्वाची बातमी म्हणजे २६ जानेवारीला नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो लुईस सँटोस दा कोस्टा आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. भारत व युएस यांच्यातील संदिग्धता कायम असताना भारताने आपला ईयुला आमंत्रित करुन युएसला स्पष्ट संदेश दिला आहे. भारत आता युएसवर अवलंबून नसून जगभरात भारताचा व्यापार वाढवण्यासाठी सज्ज असल्याचे भारताने या निमित्ताने परखडपणे स्पष्ट केले आहे.काही अहवालानुसार,दोन्ही बाजूंचे नेते उच्चस्तरीय शिखर परिषदेसाठी भेटतील तेव्हा २७ जानेवारी रोजी या कराराची घोषणा केली जाऊ शकते असे सांगितले जात आहे. म्हणजेच पुढील ४८ तासांत यावर निर्णय होऊ शकतो.आशियातील तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेसोबत मुक्त व्यापार वाटाघाटींना पुढे नेणे हा युरोपियन युनियनसाठी एक धोरणात्मक निर्णय असेल कारण युएस व युरोपीय देशातील संबंध ग्रीनलँड मुद्यावर ताणले गेले असल्याने दोन्ही देशांनी मोर्चेबांधणी करत व्यापारासाठी एकत्र येण्याचे ठरवले आहे. आता जवळपास करार पूर्ण झाला असून अंतिम मोहोर बाकी आहे. त्यामुळे येत्या दिवसांत हा करार पूर्णत्वास येणार आहे असे समजते.तज्ञांच्या मते, युरोपसाठी हा एक विशेषतः आव्हानात्मक भूराजकीय क्षण आहे, कारण अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथम ग्रीनलँडवर अमेरिकेच्या ताब्याला विरोध केल्याबद्दल युरोपीय मित्र राष्ट्रांसोबतचे व्यापार युद्ध वाढवण्याची धमकी दिली आणि नंतर ते मागे हटले. वॉशिंग्टननेही भारतावर लादलेल्या ५०% शुल्कावरील कोंडी नवीन वर्षातही कायम राहिल्याने, दिल्ली जगातील इतर देशांसोबत धोरणात्मक आणि व्यापारी संबंध भारतही अधिक दृढ करत आहे.फॉन डेर लेयन आणि भारताचे व्यापार मंत्री पीयूष गोयल या दोघांनीही याला सर्व करारांची जननी तसेच (Mother of All of Trade) म्हटले आहे असल्याने याची चर्चा युएसमधील अधिकारी वर्गापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी जवळपास दोन दशकांच्या कठोर वाटाघाटीनंतर अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या या वाटाघाटी पूर्ण करण्याला त्यांनी किती महत्त्व दिले आहे, हे यातून अधोरेखित होते.हा करार चार वर्षांतील भारताचा नववा मुक्त व्यापार करार (FTA) असेल यूके, ओमान, न्यूझीलंड आणि इतर देशांसोबतच्या करारांच्या मालिकेनंतर आता संपूर्ण युरोपियन युनियनसाठी हा करार होत आहे.आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिटच्या वरिष्ठ विश्लेषक सुमेधा दासगुप्ता म्हणतात,आता दोन्ही बाजूंना विश्वसनीय व्यापारी भागीदार हवे आहेत, कारण भूराजकारणामुळे निर्माण झालेल्या धोक्यांमुळे व्यापारासाठी एक अशांत वातावरण निर्माण झाले आहे. ही गरज दोन्ही बाजूंना सारखीच तीव्र आहे.भारताला अमेरिकेच्या शुल्काची समस्या भरून काढायची आहे, आणि युरोपियन युनियनला चीनवरील व्यापारी अवलंबित्व कमी करायचे आहे.दासगुप्ता पुढे म्हणतात की, हा करार भारताच्या कुप्रसिद्ध संरक्षणवादी धोरणाचे कवच दूर करण्यासाठी एक सतत आणि महत्त्वपूर्ण प्रयत्न देखील दर्शवेल. या राजनैतिक संकेतांव्यतिरिक्त, दोन्ही बाजूंसाठी यात काय फायदा आहे? युरोपियन युनियनसाठी (EU) भारतासोबतचे घनिष्ठ व्यापारी संबंध महत्त्वाचे आहेत, कारण भारताची आर्थिक ताकद वाढत आहे. भारत जगातील चौथी सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे आणि या वर्षी जपानला मागे टाकून ४ ट्रिलियन डॉलर्स (२.९७ ट्रिलियन पाउंड) सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (GDP) टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे.वॉन डेर लेयन यांनी दावोस येथील जागतिक आर्थिक मंचामध्ये दिलेल्या भाषणात म्हटल्याप्रमाणे, युरोपियन युनियन आणि भारत एकत्र आल्यास दोन अब्ज लोकांची एक मुक्त बाजारपेठ तयार होणार आहे. जी जागतिक सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या एक चतुर्थांश इतकी असेल.तज्ञांच्या मते या करारामुळे 'जनरलाइज्ड सिस्टीम ऑफ प्रेफरन्सेस' (GSP) पुनर्संचयित होईल. जी विकसनशील देशांमधून युरोपियन युनियनच्या बाजारपेठेत येणाऱ्या उत्पादनांवरील आयात शुल्क काढून टाकते.भारताने युरोपियन युनियनला सुमारे ७६ अब्ज डॉलर्सच्या वस्तू निर्यात केल्या, तर ६१ अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या, ज्यामुळे भारताला व्यापार अधिशेष (Surplus) मिळाला. परंतु २०२३ मध्ये युरोपियन युनियनचे GSP फायदे मागे घेतल्यामुळे अनेक भारतीय उत्पादनांची स्पर्धात्मकता कमी झाली.मुक्त व्यापार करारामुळे गमावलेला बाजारपेठेतील प्रवेश पुन्हा मिळेल.वस्त्रोद्योग,औषधे, पोलाद, पेट्रोलियम उत्पादने आणि यंत्रसामग्री यांसारख्या प्रमुख निर्यातीवरील शुल्क कमी होणार असू़न भारतीय कंपन्यांना अमेरिकेच्या वाढलेल्या शुल्कामुळे बसणारे धक्के अधिक चांगल्या प्रकारे पचवण्यास मदत होईल.सकारात्मक बाब म्हणजे भारत या करारातून कृषी आणि दुग्धव्यवसायासारखे राजकीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र सुरक्षित ठेवणार आहे. तर तज्ञांच्या मते कार, वाइन आणि स्पिरिट्स यांसारख्या क्षेत्रांवरील शुल्क टप्प्याटप्प्याने कमी होण्याची शक्यता आहे, जे भारताने यूकेसारख्या पूर्वीच्या करारांमध्ये अवलंबलेल्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.
Terrorists Arrested : प्रजासत्ताक दिनापूर्वी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; ४ दहशतवाद्यांना अटक
Terrorists Arrested : प्रजासत्ताक दिनापूर्वी मोठा दहशतवादी कट उधळण्यास पंजाब पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत चार दहशतवाद्यांना अटक केली असून २.५ किलो आरडीएक्सने भरलेले आयईडी देखील जप्त करण्यात आले आहे.
Keerthy Suresh: कीर्ती सुरेशचा ‘डबिंग मॅरेथॉन’; सलग ९ तास काम, फोटो शेअर करत सांगितला अनुभव
Keerthy Suresh: दक्षिण चित्रपटसृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कीर्ती सुरेश आपल्या मेहनतीसाठी आणि प्रोफेशनल वृत्तीसाठी ओळखली जाते.
Georgia :जॉर्जियातील लॉरेन्सव्हिल येथे गोळीबाराची घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून एका भारतीय नागरिकासह चार जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
दावोस: जागतिक अर्थकारणात महत्वाचे स्थान ग्रहण करणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथील परिषदेची अखेर सांगता झाली आहे. या परिषदेत जगभरातील अर्थकारणातील मान्यवर उपस्थित राहून विविध विषयांवर चर्चा करतात व आर्थिक करारही मंजूर करतात. या अत्यंत महत्वाच्या परिषदेची अखेर सांगता झाली असताना या ५६ व्या वार्षिक बैठकीने निर्णयकर्त्यांना (Decision Makers) व धोरणकर्त्यांना (Policymakers) एकत्र आणण्यासाठी एक महत्त्वाचे आणि अग्रगण्य व्यासपीठ म्हणून काम केले. या बैठकीत झालेल्या महत्त्वपूर्ण संवादाने आज जगासमोर असलेल्या सर्वात आव्हानात्मक समस्यांवर प्रगती साधण्यास मदत झाली. संस्थेनेच दिलेल्या माहितीनुसार १३० देशांमधील विविध प्रदेश, क्षेत्र आणि पिढ्यांमधील जवळपास ३००० औद्योगिक नेते एकत्र आले असून ज्यामध्ये विक्रमी ४०० सर्वोच्च राजकीय नेते, जवळपास ६५ राष्ट्राध्यक्ष आणि सरकार प्रमुख, जी७ देशांमधील बहुसंख्य नेते, जगातील जवळपास ८३० सर्वोच्च सीईओ आणि अध्यक्ष, आणि जवळपास ८० आघाडीच्या युनिकॉर्न कंपन्यांचे प्रतिनिधी व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्तींचा समावेश होता.यामध्ये आर्थिक व भूराजकीय अशा विविध विषयांवर विस्तृत चर्चा झाली आहे. तज्ञांनी नोव्हेंबरमधील व्यापार करारानंतर अमेरिका-चीन संबंधांच्या दिशेचे मूल्यांकन केले आणि एकूणच जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील जागतिक आर्थिक स्थिरता व भूराजकीय स्पर्धेवर होणाऱ्या परिणामांचा विचार केला गेला असे सांगण्यात येत आहे.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (WEF) माहितीनुसार, अर्थशास्त्रातील पाच नोबेल पारितोषिक विजेत्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेवरील त्यांचे नवीनतम संशोधन आणि अंतर्दृष्टीही यावेळी सादर केली.माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत हा अनिश्चिततेचा, पण संधींचाही क्षण आहे माघार घेण्याचा नाही, तर सहभागी होण्याचा क्षण आहे असे आणि सीईओ बोर्गे ब्रेंडे म्हणाले आहेत.जागतिक आर्थिक मंच सध्याच्या घटनांवर प्रतिक्रिया देण्यासाठी नाही, तर पुढे जाण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्याबद्दल आहे असे ब्रेंडे यांनी पुढे सांगितले.अस्थिरतेच्या काळातही अर्थव्यवस्थेची सापेक्ष लवचिकता अधोरेखित या परिषदेत अधोरेखित करण्यात आली आहेत. मालमत्ता मूल्यांकनातील अनिश्चितता, सार्वभौम कर्जाचे संकट आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेतील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) अंमलबजावणीच्या बाबत या परिषदेत चर्चा करण्यात आली. विशेषतः या परिषदेतील अधोरेखित मुद्दा म्हणजे एआय होती. या विषयावर बोलताना,' एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) ही श्रम बाजारावर आदळणारी त्सुनामी आहे आणि अगदी सर्वोत्तम तयारी असलेल्या देशांमध्येही मला वाटत नाही की आपण पुरेसे तयार आहोत' असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या.मी विकसनशील देशांना हा सल्ला देईन की, तुम्ही तुमची पायाभूत सुविधा विकसित करा, कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये (AI) सहभागी व्हा आणि हे ओळखा की एआय (AI) मुळे तंत्रज्ञानातील दरी कमी होण्याची शक्यता आहे असे एनव्हिडियाचे संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग म्हणाले आहेत. विविध उद्योगपती व्यवसायिक नेत्यांनी जागतिक व्यापारातील विशेषतः जगातील काही सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील वाढत्या फुटीबद्दल सावध केले असून आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या परस्पर फायदेशीर संबंधावर आपला कल असल्याचे या निमित्ताने स्पष्ट केले आहे.
सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी उद्या बोलावली तातडीची बैठक
प्रतिनिधी: एकीकडे आठव्या वेतन आयोगाची चर्चा जोरात असताना वेतन आयोगाच्या अहवालातील शिफारशी आयोग अध्यक्षा रंजना देसाई यांना सुपूर्द करण्यात आल्या होत्या. लवकरच सरकार यावर अंतिम निर्णय घेणार आहे. दरम्यान उपलब्ध माहितीनुसार, सरकार अंतिम चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या व निवृत्तीधारक कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळ प्रतिनिधींशी बैठक उद्या २५ जानेवारी रोजी घेणार आहे.कर्मचाऱ्यांच्या मागण्या व सूचनांची दखल घेण्यासाठी ही बैठक होणार असल्याचे समजते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, रेल्वे, संरक्षण, टपाल, आयकर आणि इतर केंद्र सरकारी सेवांमधील कर्मचारी आणि पेन्शनर संघटनांसह अनेक प्रमुख विभागांच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. नॅशनल काऊन्सिल (कर्मचारी) व संयुक्त सल्लागार मशिनरी (Joint Consultative Machinery NC JCM) यांच्या संयुक्त बैठकीतून सरकार वेतन आयोगात संबंधित ठोस निर्णय घेण्यासाठी विचार विनिमय करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता १३-सी, फिरोजशाह रोड, नवी दिल्ली येथे होणार आहे.एनसी-जेसीएमचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी मसुदा समितीच्या सदस्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वेतन आयोगाचे कार्यालय पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर, परिषदेला सेवा-संबंधित मुद्द्यांवर आपले निवेदन सादर करण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे. तसेच विविध मुद्द्यांवरील प्रस्तावांना अंतिम रूप देण्यासाठी सविस्तर चर्चा अपेक्षित असल्याने, सदस्यांना सुमारे एक आठवडा दिल्लीत थांबावे लागू शकते असेही पत्रात त्यांनी नमूद केले आहे.
Bollywood's Richest Actress Daughter : बॉलीवूडमध्ये स्टारकिड्सची नेहमीच चर्चा असते. अनेक सेलिब्रिटींची मुलं आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण करतात.
Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन प्रकरणात आज न्यायालयाने आम्हाला दोषमुक्त केले आहे. सत्याचा आणि न्यायाचा विजय झाला आहे. अशी पहिली प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
Rahul Gandhi On PM Modi | डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादलेलं आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिका आणि भारतामधील व्यापार संबंधात तणाव निर्माण झाला आहे. यावरूनच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ठरलं! भारतावरील २५% टॅरिफ युएस काढण्यात तयारीत 'ही'आहे माहिती
दावोस: रशियन रिफायनरीतून तेल खरेदी लक्षणीय कमी पातळीवर कमी केल्याने भारतावरील अतिरिक्त २५% टॅरिफ काढण्याचा निर्णय घेण्यासाठी युएस विचार करत आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी येत्या काही दिवसांत भारतासाठी एक मोठी चांगली बातमी मिळण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत. दावोस २०२६ परिषदेत बोलताना रशियन तेल खरेदीमुळे भारताला सध्या सामोरे जाव्या लागत असलेल्या अतिरिक्त २५% शुल्कात डोनाल्ड ट्रम्प सरकार कपात करू शकते असे विधान केले. युएस व भारत यांच्यातील द्विपक्षीय करार जवळ पोहोचला असल्याचे सातत्याने दोन्ही बाजूने सांगण्यात येत असल्याने गुंतवणूकदार न निर्यातदारांसाठी ही मोठी बातमी ठरू शकते.विविध देशांच्या शिष्टमंडळाने दावोस येथील परिषदेला भेट दिलीत्यावेळी आम्ही रशियन तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर २५% शुल्क लावले होते, आणि त्यांच्या रिफायनरींनी केलेली भारतीय खरेदी पूर्णपणे थांबली आहे असे विधान युएसचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी स्वित्झर्लंडमधील यूएसए हाऊस, दावोस येथे केले आहे.युक्रेनमधील युद्ध असूनही रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांविरुद्ध ट्रम्प प्रशासनाने केलेल्या दंडात्मक उपायांमुळे भारताला अजूनही एकूण ५०% शुल्काचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दावोस २०२५ शिखर परिषदेत बेसेंट यांनी केलेले सूचक वक्तव्य भारतासह इतर दक्षिण आशियाई देशातील देशांच्या निर्यातदारांसाठी दिलासादायक ठरू शकतात.आणखी यावर बोलताना, हे एक यश आहे. २५% रशियन तेल शुल्क अजूनही लागू आहे. मला वाटते की आता ते शुल्क काढून टाकण्याचा मार्ग आहे. त्यामुळे ही एक निश्चित गोष्ट आणि मोठे यश आहे असे ते पुढे म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या विधानाचीच आता पुनरावृत्ती झाली आहे. यापूर्वी त्यांनी ट्रम्प यांनी लादलेल्या मोठ्या शुल्कामुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले असल्याचे नमूद केले होते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला बेसेंट म्हणाले होते की, युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर भारताने रशियन तेल खरेदी करण्यास सुरुवात केली होती, परंतु राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्यावर २५% शुल्क लावले आणि भारताने खरेदी कमी केली असून रशियन तेल खरेदी करणे थांबवले आहे.'परिणामी, त्यांनी सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी सादर केलेल्या विधेयकावरही भाष्य केले, ज्यात रशियन तेलाच्या दुय्यम खरेदी आणि पुनर्विक्रीवर ५००% शुल्क लावण्याचा प्रस्ताव होता. त्यावर त्यांनी ते विधेयक मंजूर होते की नाही हे आपण पाहू असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
Maharashtra Election News : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
जहाँ आरा बेगमची भूमिका आव्हानात्मक
टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमललावण्यवती, सहजसुंदर अभिनयाची देणगी लाभलेली अभिनेत्री म्हणजे स्मिता शेवाळे. 'रणपती शिवराय स्वारी आग्रा' या आगामी चित्रपटात तिची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.स्मिताचे शालेय शिक्षण पुण्यातील लक्ष्मी रोडवरील हुजूरपागा शाळेत झाले. तिने शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता. तिला नाटकात काम करण्याची इच्छा असायची; परंतु तिला नृत्याच्या कार्यक्रमांमध्ये घेतले जायचे. ती शाळेबाहेरील गणेशोत्सवामध्ये नाटकात भाग घ्यायची. नृत्य बसवायची, सोलो परफॉर्मन्स करायची. ती भरतनाट्यम शिकली. एस. पी. कॉलेजमध्ये तिचे शिक्षण झाले. बारावी झाल्यानंतर यंदा कर्तव्य आहे हा तिला पहिला चित्रपट मिळाला. एकदा ती नाटक पाहायला गेली होती, तिथे शुभांगी गोखले नावाच्या कास्टिंग डायरेक्टर आल्या होत्या. त्यांनी स्मिताला सांगितले की रसिका जोशीने कथा लिहिली आहे आणि दिग्दर्शक केदार शिंदेना नवीन चेहरा हवा आहे. तू चित्रपटात काम करणार का? त्यानंतर स्मिताचे फोटो सेशन झाले. तिला यंदा कर्तव्य आहे हा चित्रपट मिळाला. जवळपास चार महिन्यांत चित्रपटाचे शूटिंग झाले. स्वाती नावाची व्यक्तिरेखा तिने साकारली होती. ‘आभास हा’ हे त्यातील गाणे गाजले होते. हा चित्रपट तिच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला.तिने १९ वर्षांमध्ये २६ चित्रपट केले आणि नऊ लीड मालिका केल्या. जवळपास दरवर्षी ती दोन मालिका करीत होती. या गोजिरवाण्या घरात, माहेरची साडी, सावित्री, चारचौघी, सप्तपदी, मांडला दोन घडीचा डाव, श्रीमंत पेशवा बाजीराव, तू माझा सांगाती या मालिका तिने केल्या. लाडी गोडी, आलटून पालटून, या गोल गोल डब्यातला, वन रूम किचन, यंदा कर्तव्य आहे, सुभेदार, संत ज्ञानेश्वराची मुक्ताई, अभंग तुकाराम हे चित्रपट तिने केले. अभंग तुकाराम चित्रपटामध्ये आवलीची भूमिका करताना तिला तिचे वजन वाढवावे लागले. आवलीसारखे दिसण्यासाठी तसा थोडा मेकअप करावा लागला. त्यानंतर तिने अभिनयातून आवली साकारली.दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटात या वेळी स्मिताला मुघलांच्या ग्रुपमध्ये घेण्यात आले आहे. जहाँ आरा या औरंगजेबाच्या बहिणीची भूमिका ती साकारीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, त्यामुळे जहाँ आरा खूप संतप्त झालेली असते आणि तिला या अपमानाचा सूड घ्यायचा असतो. ती आग्र्यामध्ये येऊन बसलेली असते. या भूमिकेसाठी तिला उर्दू भाषा बोलावी लागली होती. मुघलांच्या स्त्रियांचा पेहराव तिला करावा लागला होता. संपूर्णपणे निगेटिव्ह भूमिका तिला साकारावी लागली. प्रा. श्यामराव जोशी यांच्याकडून तिने उर्दू भाषा शिकून घेतली. कलाकार म्हणून ही भूमिका साकारणे तिला आव्हानात्मक वाटते.या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता असे विचारले असता ती म्हणाली की, दिगपाल अत्यंत अभ्यासू, मेहनती आणि उत्साहवर्धक आहे. तो आम्हाला इतके आव्हान देतो की त्याची आता आम्हाला सवय झाली आहे. आमच्या भूमिकेबद्दल डिटेल माहिती देतो. त्या भूमिकेशी संबंधित पुस्तकांची नावे सांगतो. त्यामुळे भूमिका साकारण्यास मदत होते.'मुक्ताई' नावाचे एकपात्री प्रयोग तिचे सुरू आहेत. त्यामध्ये यशोदा गोष्ट सांगते, ती श्लोक, ओव्या म्हणते. प्रेक्षकांना हा एकपात्री प्रयोग आवडेल अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. 'रणपती शिवराय स्वारी आग्रा' या चित्रपटासाठी व 'मुक्ताई' या एकपात्री प्रयोगासाठी हार्दिक शुभेच्छा !
मुंबई : २६ जानेवारी हा दिवस भारताच्या लोकशाही प्रवासातील निर्णायक टप्पा मानला जातो. १९५० साली याच दिवशी भारतीय संविधान अंमलात आले आणि देशाने प्रजासत्ताक म्हणून नव्या युगात प्रवेश केला. दरवर्षी हा दिवस राष्ट्रध्वज वंदन, संचलन आणि समारंभांपुरता मर्यादित राहतो. मात्र, संविधानाने सामान्य नागरिकांना दिलेले अधिकार आजही अनेकांना पूर्णपणे माहीत नसल्याचे वास्तव आहे. हेच अधिकार रोजच्या आयुष्यात नागरिकांचे संरक्षण करतात आणि त्यांना बळ देतात.संविधानातील मूलभूत अधिकार हे केवळ कायदेशीर शब्द नाहीत, तर सामान्य माणसाच्या दैनंदिन जगण्याचा आधार आहेत. रस्त्यावर चालण्यापासून ते मत मांडण्यापर्यंत, नोकरीच्या संधींपासून ते सुरक्षिततेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर हे अधिकार प्रभावी ठरतात.कायद्यापुढे सर्व समान असल्याचा सिद्धांत संविधानात स्पष्टपणे मांडण्यात आला आहे. सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय स्थिती काहीही असली तरी कायद्याच्या दृष्टीने प्रत्येक नागरिक समान असल्याची हमी या तरतुदीतून दिली जाते. त्यामुळे अन्याय, पक्षपात किंवा सत्तेचा गैरवापर यावर मर्यादा येतात.तसेच कोणत्याही नागरिकाशी धर्म, जात, लिंग, रंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका संविधान घेतो. सार्वजनिक ठिकाणी वावर, सेवा-सुविधा किंवा संधी मिळवताना समानतेचा हा अधिकार महत्त्वाची भूमिका बजावतो.सरकारी नोकऱ्यांबाबतही संविधानाने स्पष्ट धोरण आखले आहे. पात्रतेच्या आधारावर प्रत्येकाला समान संधी देणे ही राज्याची जबाबदारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे रोजगार प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय राखला जातो.स्वातंत्र्याशी संबंधित अधिकार नागरिकांना मुक्तपणे विचार मांडण्याची, देशभर फिरण्याची, व्यवसाय निवडण्याची आणि संघटना स्थापन करण्याची मुभा देतात. शांततेच्या मार्गाने एकत्र येण्याचा हक्कही याच चौकटीत येतो. लोकशाही व्यवस्थेचा हा कणा मानला जातो.जीवन आणि वैयक्तिक सुरक्षिततेचा अधिकार हा संविधानातील सर्वात व्यापक अधिकारांपैकी एक आहे. सन्मानाने जगणे, वैयक्तिक गोपनीयता जपली जाणे तसेच स्वच्छ पर्यावरणाचा लाभ मिळणे, या सर्व बाबींचा त्यात समावेश होतो. राज्य यंत्रणेवर नागरिकांच्या जीवनाचे संरक्षण करण्याची जबाबदारी या अधिकारातून निश्चित केली जाते.शिक्षणाबाबतही संविधानाने ठोस भूमिका घेतली आहे. ठरावीक वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे हे राज्याचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षणाला मूलभूत हक्काचा दर्जा दिल्याने सामाजिक प्रगतीला चालना मिळाली आहे.धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार भारताच्या विविधतेचे प्रतिबिंब आहे. प्रत्येक नागरिकाला आपली श्रद्धा जपण्याचा आणि आचरणात आणण्याचा हक्क संविधान संरक्षणाखाली देते. यामुळे देशाची धर्मनिरपेक्ष ओळख मजबूत होते.कोणताही मूलभूत अधिकार धोक्यात आला तर थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा संविधान देते. हा अधिकार नागरिकांना त्यांच्या हक्कांची अंमलबजावणी करून घेण्यासाठी महत्त्वाचे साधन ठरतो.२६ जानेवारीच्या निमित्ताने संविधानाकडे केवळ ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून न पाहता, रोजच्या जीवनात मार्गदर्शन करणारी शक्ती म्हणून पाहण्याची गरज आहे. हे अधिकार ओळखणे, समजून घेणे आणि गरज पडल्यास वापरणे, हीच खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक नागरिकाची ओळख आहे.
ठाण्यात ‘वर्क फ्रॉम होम’च्या जाळ्यात अडकवून तब्बल इतक्या लाखांची फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल
ठाणे : ऑनलाईन गुंतवणूक आणि घरबसल्या कामाच्या आमिषातून फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून ठाणे शहरात असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरील जाहिरातीद्वारे संपर्क साधत एका गृहिणीकडून सुमारे आठ लाख रुपयांची रक्कम उकळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गृहिणीला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सोशल मीडियावर घरून काम करण्यासंबंधी जाहिरात दिसली. त्यावर प्रतिसाद दिल्यानंतर एका अनोळखी महिलेकडून व्हॉट्सॲपवर संपर्क साधण्यात आला. पुढे तिला टेलिग्राम ॲपवरील वेगवेगळ्या खात्यांशी जोडण्यात आले, जिथे ऑनलाईन काम आणि शेअर मार्केटसदृश गुंतवणुकीचे प्रस्ताव देण्यात आले.विश्वास बसावा यासाठी सुरुवातीला कमी रकमेवर नफा मिळाल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर हळूहळू अधिक रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त करत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले. काही दिवसांतच तक्रारदाराने जवळपास ७.९५ लाख रुपये ट्रान्सफर केले.ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोठा नफा झाल्याचे आकडे दाखवले गेले, मात्र प्रत्यक्षात ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता वेगवेगळ्या कारणांचा पाढा वाचवण्यात आला. उलट, आणखी गुंतवणूक करण्याचा दबाव टाकण्यात आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात संबंधित तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून वापरण्यात आलेली बँक खाती, मोबाईल क्रमांक आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मची माहिती गोळा केली जात आहे.दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडिया किंवा मेसेजिंग ॲपवरून येणाऱ्या गुंतवणूक व ‘वर्क फ्रॉम होम’ ऑफरबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अल्प कालावधीत मोठा नफा देण्याचे दावे करणाऱ्या ऑफरवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले (पूर्व) परिसरातील ज्या कारखान्यामुळे या उपनगराला एक वेगळी ओळख मिळाली, तो पार्ले प्रॉडक्ट्सचा मूळ कारखाना आता कायमचा बंद होणार आहे. गेली ८७ वर्षे या परिसरात दरवळणारा पार्ले-जी बिस्किटांचा तो खास सुगंध आता लवकरच थांबणार असून, या जागेचा वापर आता नव्या स्वरूपात केला जाणार आहे. कंपनीने या मोक्याच्या जागेवर एक भव्य व्यावसायिक संकुल (Commercial Complex) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. १९३९ पासून सुरू झालेल्या या कारखान्याने अनेक पिढ्यांचे बालपण समृद्ध केले. मात्र, काळानुसार बदलताना कंपनीने आता या ऐतिहासिक जागेवर व्यावसायिक प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. विलेपार्ले रेल्वे स्थानकाजवळ असलेला हा कारखाना केवळ उत्पादनाचे केंद्र नसून मुंबईच्या औद्योगिक इतिहासाचा एक महत्त्वाचा वारसा होता. या निर्णयामुळे जुन्या मुंबईकरांमध्ये हळहळ व्यक्त होत असली, तरी या जागेवर आता आधुनिक काचेच्या इमारतींचे साम्राज्य पाहायला मिळणार आहे.https://prahaar.in/2026/01/24/in-thane-a-fraud-of-lakhs-of-rupees-was-committed-by-trapping-people-in-a-work-from-home-scam-a-case-has-been-registered-against-three-people/२१ जुन्या इमारतींच्या पाडकामाला सुरुवातविलेपार्ले (पूर्व) येथील पार्ले-जी बिस्किट कारखान्याच्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेला आता वेग आला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाने (SEIAA) ७ जानेवारी रोजी हिरवा कंदील दाखवला आहे. या मंजुरीनुसार, कारखान्याच्या परिसरातील २१ जुन्या वास्तू जमीनदोस्त करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सुमारे ३,९६१.३९ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारा हा प्रकल्प मुंबईतील सर्वात महागड्या व्यावसायिक प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प सुमारे १३.४५ एकर (५४,४३८.८० चौरस मीटर) इतक्या मोठ्या आणि मोक्याच्या भूखंडावर उभा राहत आहे. या जागेवर एकूण १,९०,३६०.५२ चौरस मीटर इतके अवाढव्य बांधकाम क्षेत्र विकसित करण्याचा मानस कंपनीने व्यक्त केला आहे. या प्रकल्पाच्या एफएसआय (FSI) गणिताचा विचार केल्यास, प्रस्तावित बांधकामापैकी १.२१ लाख चौरस मीटर क्षेत्र एफएसआयअंतर्गत असेल, तर ६८ हजार चौरस मीटर क्षेत्र नॉन-एफएसआय अंतर्गत विकसित केले जाणार आहे. या प्रकल्पाची प्रक्रिया २०२५ च्या मध्यावधीत सुरू झाली असून, कंपनीने मुंबई महापालिकेकडे सादर केलेल्या प्रस्तावाला आता पर्यावरण मंत्रालयाकडून अंशतः मंजुरी मिळाली आहे.विलेपार्लेत आकाराला येणारं चार इमारती, अत्याधुनिक पार्किंग टॉवर्स अन्...विलेपार्ले येथील पार्ले-जी कारखान्याच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या पुनर्विकास प्रकल्पाची रूपरेषा आता स्पष्ट झाली आहे. या भव्य संकुलात एकूण चार इमारती बांधण्यात येणार असून, यामध्ये व्यावसायिक कार्यालयांसह दोन स्वतंत्र पार्किंग टॉवर्सचा समावेश असेल. विमानतळाच्या जवळ असलेल्या या मोक्याच्या जागेवर बांधकामासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) उंचीचे नियम पाळून परवानगी दिली आहे. या नवीन प्रकल्पामुळे विलेपार्ले पूर्व परिसराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. वाढत्या गाड्यांची संख्या लक्षात घेता, प्रकल्पात तीन आणि सहा मजली असे दोन स्वतंत्र पार्किंग टॉवर्स असतील. तसेच प्रस्तावित चारही इमारतींना दोन स्तरांचे तळमजले (Basement) दिले जाणार आहेत. पहिल्या इमारतीच्या 'बी-विंग'मध्ये तळमजला, सातवा आणि आठवा मजला हा खास रिटेल दुकाने आणि कॉर्पोरेट कार्यालयांसाठी राखीव असेल. विमानतळाच्या 'एअर फनेल झोन'मध्ये हा भूखंड येत असल्याने, विमानतळ प्राधिकरणाने इमारतींची कमाल उंची ३०.४० मीटरपर्यंत मर्यादित ठेवली आहे. केवळ ऑफिसच नाही, तर नागरिकांच्या मनोरंजनासाठी या संकुलात मोठी किरकोळ दुकाने (Retail Shops), अलिशान रेस्टॉरंट्स आणि एक भव्य फूड कोर्ट देखील असणार आहे.'मियावाकी' पद्धतीने १,२०३ नवीन झाडे लावून वृक्षसंपदा वाढवण्यावर भरविलेपार्ले येथील पार्ले-जी कारखान्याचा पुनर्विकास केवळ सिमेंट-काँक्रीटपुरता मर्यादित नसून, तिथे हिरवाईचा मोठा पट्टा निर्माण केला जाणार आहे. राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाने (SEIAA) दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पात पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी जपानच्या प्रसिद्ध 'मियावाकी' तंत्रज्ञानाचा वापर करून १,२०३ नवीन झाडांची लागवड केली जाणार आहे. यामुळे कारखान्याचा परिसर भविष्यात अधिक प्रदूषणमुक्त आणि निसर्गरम्य होणार आहे. या परिसरात सध्या एकूण ५०८ झाडे आहेत. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी त्यापैकी ३११ झाडे मूळ जागेवरच जतन केली जातील, तर ६८ झाडांचे योग्य पद्धतीने स्थलांतर केले जाणार आहे. अपरिहार्य कारणास्तव १२९ झाडे तोडली जातील. 'मियावाकी' पद्धतीने १,२०३ नवीन झाडे लावून वृक्षसंपदा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील झाडांची एकूण संख्या ५०८ वरून थेट २,२३० वर पोहोचेल, ज्यामुळे हा भाग विलेपार्लेचे 'ऑक्सिजन हब' ठरू शकेल.
Hasan Mushrif : जिल्हा परिषदेमध्ये बंडखोरी करून आम्हाला जे सोडून गेलेत त्यांची आणि आमची भेट आता स्वर्गातच असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी बंडखोरी करणाऱ्यांना दिला आहे.
भालचंद्र कुबल : पाचवा वेदया आठवड्यात पार पडलेल्या ४९ व्या बोधी नाट्यलेखन कार्यशाळेबद्दल आज लिहिणार आहे. या कार्यशाळेची पद्धत थोडी वेगळी आहे. इथे लेखन तंत्र शिकवले जात नाही. इथे शिकवण्याची पद्धत पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा एम. बी. ए.च्या वर्गात ज्या पद्धतीने एखादी ‘केस स्टडी’ अभ्यासली जाते, त्याच पद्धतीने एखादी संहिता तज्ज्ञ मंडळी लेखकाकडून वाचून घेतात आणि मग त्यावर यथोचित चर्चा केली जाते, ज्यामुळे ती संहिता परिपक्व तर बनतेच शिवाय प्रयोगक्षमही बनते. हा आजवरच्या बोधी नाट्यलेखन कार्यशाळेचा रोचक आणि रंजक अनुभव आहे.प्रेमानंद गज्वी, डाॅ. सुरेश मेश्राम, अशोक हंडोरे यांनी बोधी नाट्य परिषद स्थापन करून त्यामार्फत अखिल महाराष्ट्रात मराठी साहित्य व कलेशी निगडीत असलेले विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. त्यापैकीच नाट्यलेखन कार्यशाळा हा एक बहुचर्चित उपक्रम ठरला. ४९ वी बोधी नाट्यलेखन कार्यशाळा गाजली ती स्त्री लेखिकांच्या वाचन झालेल्या नव्या कोऱ्या संहितांमुळे. कनक रंगवाचा या त्रैमासिकाचा दीर्घांक विशेषांक हल्लीच कणकवलीहून संपादक वामन पंडित यांनी प्रकाशित केला आहे. त्याची दखल घेत बोधी नाट्य परिषदेने त्यातील चार स्त्री लेखिकांच्या दीर्घांकावर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व बोधी नाट्य परिषदेच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मराठी नाटक अधिक समृद्ध व्हावे या हेतूने गेली तेवीस वर्षे सातत्याने महाराष्ट्रभर बोधी नाट्य परिषद, मुंबई ‘नाट्य लेखन कार्यशाळा’ घेत आलेली आहे. या नाट्यलेखन कार्यशाळेत केवळ स्त्री नाटककारांनीच आपली नाटके वाचली. 'ही वाट दूर जाते', (डॉ. अनघा राजपूत, लातूर), 'आस्था', (ऋतुजा आरती बडवे, कोल्हापूर); ‘झुळूक', (मेधा देशमुख, पुणे), 'रेड डाॅट' (उर्मी, कल्याण) ही ती चार नाटके.स्त्री लेखिकांच्या सामाजिक लेखनामागे मुख्यतः स्वतःच्या अनुभवांमधील वेदना, अस्वस्थता आणि समाजातील अन्याय व्यक्त करण्याची इच्छा असते. मराठी नाट्यलेखनासंदर्भात, हिराबाई पेडणेकर, काशिबाई कानिटकर, शिरीष पै, सई परांजपे, ज्योती म्हापसेकर, सरीता पद्की यांसारख्या लेखिकांनी स्त्रीशिक्षण, लिंगभेद आणि कौटुंबिक मूल्ये यांसारख्या समस्या अधोरेखित करून सामाजिक जागरूकता निर्माण केली. या नाटककारांनी सामाजिक परंपरा, कौटुंबिक संघर्ष आणि स्त्रीस्वातंत्र्य यांसारख्या विषयांना केंद्रस्थानी ठेवून मराठी भाषेला नवे आयाम मिळवून दिले. त्यांच्या नाटकांमधून भारतीय संस्कृती, एकपात्री शैली आणि मुक्त नाट्यप्रयोग यांसारखे नवे तंत्र रूढ झाले, ज्यामुळे मराठी नाटक अधिक वैविध्यपूर्ण झाले. सोनाबाई केरकर ('छत्रपती संभाजी')सारख्या सुरुवातीच्या लेखिकांनी संगीत नाटकांना प्रेरणा दिली. स्त्री नाटककारांच्या अल्प संख्येनेही मराठी रंगभूमीला स्त्री-भावविश्वाची खोली मिळाली, जी पूर्वी पुरुषप्रधान होती. त्यांच्या कार्याने प्रायोगिक रंगभूमीला चालना मिळाली आणि आजच्या पिढीला, उदा. मनस्विनी लता रवींद्र, स्वरा मोकाशी, कल्याणी पाठारे, कविता मोरवणकर, वर्षा दांदळे, आदीना प्रेरणा मिळत आहे.कार्यशाळेत प्रथम वाचली गेलेली संहिता होती ‘ही वाट दूर जाते.’ यात माधवी या व्यक्तिरेखेची दोन रूपं पाहायला मिळतात. काहीशा फँटॅसीच्या सहाय्याने जाणारे कथाबीज हवी असलेली गोष्ट न मिळाल्याने नैराश्याच्या गर्तेत अडकू शकते आणि त्यावर उपायही आपणच असतो अशा वनलायनरची ही दीर्घांकिका. मुळात पुरुष पात्रांमुळे जीवनात आलेले अस्ताव्यस्त जगणे एखाद्या स्त्रीला, जो रुचेल तो निर्णय घ्यायला भाग पाडते असा एकंदर आशय या नाट्याकृतीतून सादर झाला. अनघा राजपूत या तशा उदयोन्मुख लेखिका; परंतु संवादावर असलेली त्यांची पकड नाट्यवाचन खुलवून गेली. नाटकातील माधवी हे पात्र भूतकाळातल्या माधवीशी संवाद करते तेव्हा वर्तमानातल्या माधवीला त्या घटना माहीत असणारच, या तांत्रिक मुद्यांवर चर्चकांमध्ये चर्चा घडून आली. नोंदवल्या गेलेल्या निरीक्षणांची लेखिकेने दखल घेऊन त्यात सुधारणा करू, अशी ग्वाही दिली.दुसरी संहिता ऋतुजा आरती बडवे या आताच्या पिढीची ‘आस्था’ या नावाची होती. एका नटीला कॅन्सर पिडीत रुग्णाची भूमिका वाट्याला येते. एका ठरावीक ऊंचीवर ती नेऊन ठेवावी ज्यामुळे प्रेक्षकांकडून वाहवा मिळावी या प्रयत्नात तो कॅन्सर तिच्या घरातच सापडतो. एका कलाकाराच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी अधोरेखित करणारे कथाबीज ऋतुजाने चांगले खुलवले, मुळातच ती कोल्हापूर विद्यापीठात नाट्यशास्त्राची विद्यार्थिनी असल्याने वाचिक अभिनयाची जोड तिच्या वाचनास मिळाली.तिसरी संहिता उर्मी. (अॅड. शिल्पा सावंत) या लेखिकेची ‘रेड डाॅट’ या नावाची स्त्रीयांच्या मासिकधर्माचे विवेचन करणारी होती. एखाद्या स्त्रीला मासिकधर्म सुरू न झाल्यास मनाची होणारी घालमेल, कुचंबणा, न्युनगंड अशा सर्व विवंचनेने ग्रासलेल्या नायिकेची कथा उर्मीने धाडसाने मांडली आहे. या निमित्ताने चर्चक म्हणून लाभलेले डाॅ. अनिल बांदिवडेकर, डाॅ. स्मिता दातार व डाॅ. अनघा राजपूत हे तिघेही व्यवसायाने मेडिकल प्रॅक्टीशिनर असल्याने या विषयावर सखोल चर्चा घडवून आणली गेली.चौथी संहिता ‘झुळूक’. पुण्याच्या मेधा देशमुखांची होती. संहिता ऐकल्यावर लेखकांवर असलेला पारंपरिकतेचा दिवाणखानी पगडा केव्हा दूर होणार? याबाबत प्रश्नचिन्हच निर्माण होते. पुरुष सत्ताक प्रवृत्तीचा नायक स्वतःच्या मनमानीने घरातल्या इतर घटकांवर करिअरच्या अानुषंगाने केलेली बळजबरी आणि त्याचा पश्चाताप म्हणजे झुळूक हा दीर्घांक. फारसा संघर्ष नसलेली, जुनाट लेखन संस्कारात मोडणारी ही संहिता बिल्कूल पकड घेऊ शकली नाही.स्त्री लेखिका, विशेषतः मराठी नाटककार आणि कवयित्री, पुरुष सत्ताक समाजव्यवस्था, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि रंगभूमी व्यवहाराच्या अडचणींमुळे गुरफटतात. नाटक हा परावलंबी प्रकार असल्याने प्रयोग उभा करण्यासाठी पुरुषप्रधान नेटवर्कची गरज भासते, ज्यात सामाजिक पूर्वग्रह आणि कमी संधी येतात. स्त्री-मुक्ती चळवळीनंतरही पुरुष सत्ताक मूल्ये त्यांच्या विचारांवर, भावनांवर नियंत्रण ठेवतात, ज्यामुळे व्यक्तिगत वेदना सार्वत्रिक संघर्षात रूपांतरित होते. या वेदनेचा निचरा व्हावा यासाठीच अशा कार्यशाळा, प्रयोगशाळा म्हणून अमलात आणल्यास स्त्री लेखिकांमधे एक वेगळीच क्रांती घडून येऊ शकेल, या बाबतीत दुमत नाही.
युनेस्को दर्जाप्राप्त गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम
पर्यटन वाढीमुळे निर्माण झालेल्या कचऱ्यावर आळा मुंबई : युनेस्कोचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) विशेष स्वच्छता मोहीम हाती घेणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानुसार ही मोहीम लवकरच राबवली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.युनेस्कोने महाराष्ट्रातील रायगड, प्रतापगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, राजगड, पन्हाळा, साल्हेर, लोहगड, सुवर्णदुर्ग, शिवनेरी आणि खंदेरी या ११ किल्ल्यांना ऐतिहासिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. हा दर्जा कायम राखण्यासाठी स्वच्छता व पर्यावरण संवर्धन अत्यंत आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन ही विशेष मोहीम आखण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ला स्वच्छता व संवर्धन मोहीम’ राबवण्यात येणार असून, या मोहिमेचे ब्रीदवाक्य ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ असे असणार आहे. गडकिल्ल्यांच्या परिसरात कार्यरत सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जाणार आहे.
चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणारमुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच मैदानात आमनेसामने येणार असून, हा थरारक महासंग्राम ‘कुस्ती महादंगल २०२६’ च्या रूपाने साजरा होणार आहे.अर्जुन पुरस्कार विजेते, ऑलिम्पियन आणि सध्या मुंबई पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत असलेले नरसिंह यादव यांच्या संकल्पनेतून, नरसिंह फाऊंडेशन आणि नागरिक संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य एकदिवसीय कुस्ती स्पर्धा २६ जानेवारीला दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत विलासराव देशमुख मैदान, लोखंडवाला, कांदिवली (पूर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब ही देशातील कुस्तीची बलाढ्य राज्ये सहभागी होत असून प्रत्येक संघातून ५ पुरुष आणि २ महिला असे एकूण ७ पैलवान आपले कसब पणाला लावणार आहेत. विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.या ऐतिहासिक स्पर्धेला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार अतुल भातखळकर, आशिष शेलार आणि संजय उपाध्याय यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे. यावेळी हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी तसेच जागतिक स्तरावर चमकलेल्या कुस्तीपटूंचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.चार राज्यांची संघ पुढीलप्रमाणे :मराठा वॉरियर्स (महाराष्ट्र) :पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र केसरी, वर्ल्ड मेडलिस्ट),रविराज चव्हाण, आदर्श पाटील, सोनबा गोंगाणे, अक्षय ढेरे.महिला : अमृता पुजारी, सोनाली महाडिकशेर-ए-पंजाब (पंजाब):करणदीप (पंजाब केसरी), संदीप माने, रोहित प्रजापत, उदय शर्मा, अभिषेक यादव.महिला : प्रियंका सिकरवार, शिवानीहरियाणा शूर (हरियाणा):अंकुश, अमित, निवान, आकाश, सागर.महिला : कुसुम दहिया, मोनी गुर्जर.यूपी योद्धा (उत्तर प्रदेश):अभिनायक सिंह (यूपी केसरी), मुलायम यादव, तेजवीर यादव, आयुष चौधरी, विशाल सहानी.महिला : प्रियंका सिकरवार, फ्रीडम यादव.
Ladki Bahin Yojana |लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती; शंकांचे होणार निरासन
Ladki Bahin Yojana | राज्य सरकारने साधारण दीड वर्षांपूर्वी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.
Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या जागतिक राजकारणात केंद्रस्थानी आहेत. एकीकडे टॅरिफ धोरणांमुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली असताना, दुसरीकडे त्यांच्या वैयक्तिक संपत्तीबाबत मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Zilla Parishad Elections : नुकत्याच राज्यातील महापालिका निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीनंतर आता राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे.
Zilla Parishad Elections : नुकत्याच राज्यातील महापालिका निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीनंतर आता राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे.
सुधागडमध्ये २ गट, ४ गणांसाठी ३४ उमेदवार
सुधागड : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात आगामी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, तालुक्याचे राजकीय चित्र आता स्पष्ट झाले आहे. एकूण ३४ उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्यासाठी मैदानात उडी घेतली असून, राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांसह अपक्षांची मोठी संख्या असल्याने यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.जिल्हा परिषद गटनिहाय उमेदवार:१. जांभूळपाडा गट क्र. १९ (सर्वसाधारण महिला):या गटात एकूण ५ महिला उमेदवार आमनेसामने आहेत. यामध्ये नीलिमा धैर्यशील पाटील (भाजप), शर्मिला शरद बोडके (शिवसेना), भारती भास्कर शेळके (शेकाप), दिपाली भोईर (शिवसेना) आणि अपूर्वा गणेश कानडे (अपक्ष) यांचा समावेश आहे.२. राबगाव गट क्र. २० (अनुसूचित जमाती): येथे सर्वाधिक ७ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. मंगेश गोविंद निरगुडे (भाजप), काशिनाथ ताया हंबीर (शेकाप), किशोर भिकू डोके (भारतीय कामगार पक्ष), किसन नारायण उमटे (अपक्ष), चंद्रकांत कृष्णा वारगुडा (भाजप), दीपाली दिलीप भोईर (शिवसेना) आणि विश्वास अनंत भोय (अपक्ष) रिंगणात आहेत.पंचायत समिती गणनिहाय उमेदवार :परळी गण क्र. ३७ (ना.मा.प्र. महिला): ३ उमेदवार - प्रणिता राजेश परदेशी ( उबाठा), सुनंदा विठ्ठल सिनकर (भाजप) आणि स्वप्ना प्रवीण कुंभार (शेकाप).जांभूळपाडा गण (सर्वसाधारण): ५ उमेदवार - जागृती राजेश मानकर (भाजप), अतिश गोविंद सांगळे (शेकाप), हर्षदा मारुती शिंदे (मनसे), स्वप्निल अनंत गायकवाड (वंचित बहुजन आघाडी) आणि रमेश रामभाऊ सुतार ( उबाठा).राबगाव गण क्र. ३९ (अ.ज. महिला): ५ उमेदवार - मनीषा भरत डोके (शेकाप), शशिकला शरद दापसे (शेकाप), सुनीता किसन लेंडी (भाजप), पूजा नितीन हंबीर (भाजप) आणि चित्रा चंद्रकांत वाघमारे (अपक्ष).अडुळसे गण क्र. ४० (सर्वसाधारण) : या गणात सर्वाधिक ९ उमेदवारांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. यामध्ये शिवसेना उबाठा, शेकाप, मनसे, राष्ट्रवादी यांसह ४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.निवडणुकीची धामधूमअर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता प्रचाराला वेग येणार आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि शेकाप-मनसे यांसारख्या पक्षांनी आपल्या ताकदीनिशी उमेदवार उतरवणार आहेत. यामुळे अपक्ष उमेदवार कोणाची मते खाणार आणि कोणाचे वर्चस्व राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
जिल्हा परिषदेसाठी ४१, तर पंचायत समितीसाठी ८३ अर्ज
पनवेल : रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पनवेल तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या ८ गटांसाठी ४१, तर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी एकूण ८३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पनवेलमध्ये यंदाही मुख्य लढत भाजप आणि शेकाप यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१७ च्या निवडणुकीनंतर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पक्षांतरे झाली आहेत, त्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. सत्तेची समीकरणे कोणाच्या बाजूने झुकतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तसेच ५ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. तालुक्यात एकूण ३४६ केंद्रांवर नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील. तसेच ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन विजयाचे गुलाल उधळले जातील. गेल्या काही वर्षांत अनेक मातब्बर नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपली निष्ठा बदलल्याने जुन्या गणितांना छेद मिळण्याची शक्यता आहे. भाजप आपली सत्ता राखणार की शेकाप पुन्हा एकदा वर्चस्व मिळवणार, याचा फैसला ७ फेब्रुवारीला होईल. सध्या तरी सर्वच उमेदवारांनी प्रचाराच्या मैदानात उडी घेतली असून गावपातळीवरील बैठका आणि रणनीतीला वेग आला आहे.
फणसाड अभयारण्यात ३० जानेवारीपासून पक्षी गणना
सिटीझन सायन्स उपक्रमाद्वारे वैज्ञानिक निरीक्षणे नोंदवण्याची संधीअलिबाग : रायगड जिल्ह्यातील निसर्गसंपन्न फणसाड वन्यजीव अभयारण्यात पुन्हा एकदा पक्षांचा किलबिलाट मोजला जाणार आहे. 'ग्रीन वर्क्स ट्रस्ट' आणि 'महाराष्ट्र वन विभाग' (ठाणे वन्यजीव विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'फणसाड पक्षी गणना' आयोजित करण्यात आली आहे.या उपक्रमात नागरिक, पक्षीमित्र आणि निसर्ग अभ्यासक सहभागी होऊन शास्त्रीय पद्धतीने पक्षी निरीक्षण आणि दस्तऐवजीकरण करतील. हा उपक्रम एसबीआय फाऊंडेशनच्या 'CONSERW' कार्यक्रमांतर्गत राबवला जात आहे. ही केवळ एक सहल नसून, एक महत्त्वाचा 'सिटीझन सायन्स' उपक्रम आहे. यामध्ये सामान्य नागरिक वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून पक्ष्यांची निरीक्षण नोंदवतील, ज्यामुळे या भागातील जैवविविधतेचा अधिकृत दस्तऐवज तयार होण्यास मदत होणार आहे.जेव्हा सामान्य माणूस विज्ञानाशी जोडला जातो, तेव्हा संवर्धनाचे कार्य अधिक वेगाने होते. फणसाड पक्षी गणना' हा केवळ एक छंद म्हणून राबवला जाणारा उपक्रम नसून, तो एक 'सिटिझन सायन्स' प्रकल्प आहे. यामध्ये नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागातून पक्ष्यांच्या प्रजातींची शास्त्रोक्त नोंद करणे. पद्धतशीर निरीक्षण आणि दस्तऐवजीकरण तंत्रांचा वापर करणे. फणसाड मधील जैवविविधतेचा वैज्ञानिक डेटा तयार करणे. या महत्त्वाची बाबी होणार आहेत.कोकणातील मुरुड-रोहा पट्ट्यात असलेले हे अभयारण्य रातवा, बेडुकमुखी, गिधाडे, मलबारी धनेश यासाठी प्रसिद्ध आहे. फणसाड अभयारण्य महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू याच्या संवर्धनासाठी चालू झाले आहे. तेथे २५० हून अधिक प्रकारचे पक्षी सापडतात. अनेक स्थलांतरित पक्षी इथे येतात.फणसाड वन्यजीव अभयारण्य हे जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध क्षेत्र आहे. 'सिटीझन सायन्स' या संकल्पनेचा मूळ उद्देशच हा आहे की, सामान्य नागरिकांना सहभागी करून घेणे. या पक्षी गणनेच्या माध्यमातून संकलित होणारा डेटा हा केवळ आकडा नसून, तो भविष्यातील संवर्धन आराखडा तयार करण्यासाठी एक महत्त्वाचा वैज्ञानिक दस्तऐवज ठरेल. निसर्गप्रेमींनी केवळ पक्षी पाहण्यापुरते मर्यादित न राहता, या वैज्ञानिक प्रक्रियेचा भाग होऊन फणसाडच्या या अनमोल ठेव्याचे दस्तऐवजीकरण करण्यास पुढे यावे.- डॉ. निखिल भोपळे, (व्यवस्थापकीय विश्वस्त, ग्रीन वर्क्स ट्रस्ट)
टोकियो : जपानच्या राजकारणात एक अनपेक्षित आणि ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकाची यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संसदेचे कनिष्ठ सभागृह बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जपानमध्ये ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यावधी सार्वत्रिक निवडणुका होणार असून, संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.ऑक्टोबर २०२५ मध्ये सत्तेवर आलेल्या ताकाची यांनी आपल्या वैयक्तिक लोकप्रियतेवर विश्वास ठेवत थेट जनतेकडे जाण्याचा मार्ग निवडला आहे. विविध जनमत सर्वेक्षणांमध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून, विशेषतः तरुण मतदार आणि राष्ट्रवादी विचारसरणीच्या समर्थकांमध्ये त्यांची प्रतिमा मजबूत झाली आहे. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीवर सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांपासून लक्ष हटवून नव्या जनादेशाच्या माध्यमातून पक्षाची स्थिती बळकट करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.ताकाची यांच्या राजकीय भूमिकेची ओळख त्यांच्या कठोर आणि स्पष्ट अजेंड्यामुळे झाली आहे. संरक्षण क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीचा निर्णय, स्थलांतर धोरणांवर निर्बंध, तसेच वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी कररचनेत बदल ही त्यांच्या प्रचाराची मुख्य सूत्रे असणार आहेत. विशेषतः अन्नधान्यावरचा विक्रीकर तात्पुरता हटवण्याचा प्रस्ताव जनतेत चर्चेचा विषय ठरत आहे.दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवरही जपानसमोर आव्हाने वाढली आहेत. तैवानच्या मुद्द्यावर चीनविरोधात घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे बीजिंग नाराजी व्यक्त करत आहे. दुसरीकडे, अमेरिकेकडून जपानवर संरक्षण खर्च वाढवण्यासाठी दबाव वाढत आहे. या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाला स्थिर आणि ठोस नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत ताकाची यांनी निवडणुकीचा मार्ग निवडल्याचे स्पष्ट केले आहे.मात्र हा निर्णय वादविवादांपासून दूर राहिलेला नाही. संसद बरखास्त झाल्याने २०२६ चा अर्थसंकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरोधकांनी ताकाची यांच्यावर राजकीय फायद्यासाठी देशाच्या आर्थिक स्थैर्याशी खेळ केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय, सत्ताधारी पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नव्या उजव्या पक्षांचा वाढता प्रभाव हीही मोठी आव्हाने ठरू शकतात.तरीही, अंतिम निर्णय जनतेचाच असेल, असे स्पष्ट करत साने ताकाची यांनी आपली राजकीय कारकीर्द थेट मतदारांच्या कौलावर सोपवली आहे. आता ८ फेब्रुवारीला जपानची जनता कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Today TOP 10 News: लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा ते अर्थसंकल्पात करदात्यांना मिळणार दिलासा
Today TOP 10 News | लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा ते अर्थसंकल्पात करदात्यांना मिळणार दिलासा
विनयभंग प्रकरणाने बदलापूर गुरुवारी पुन्हा एकदा हादरलं. बेकायदेशीर शाळेच्या महिला सहाय्यक नसलेल्या व्हॅनमध्ये एका चिमुकलीचा विनयभंग झाला. साधारण दीड वर्षांत घडलेल्या दुसऱ्या विनयभंग प्रकरणाने बदलापूर गुरुवारी पुन्हा एकदा हादरलं. या प्रकराची माहिती बातम्यांमध्ये काल आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात अस्वस्थता पसरली. बदलापूरमध्ये साधारण वर्ष - सव्वा वर्षापूर्वी शाळकरी मुलीच्या विनयभंगाचा दुर्दैवी प्रकार घडला होता. शाळेतल्या शिपायाकडूनच विनयभंगाचा प्रकार झाल्याने आणि शाळा प्रतिष्ठित, ख्यातनाम असल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास हयगय चालवली, तेव्हां बदलापूरकरांनी मोठ्या संख्येने रेल्वे रुळावर उतरून आपल्या भावनांना वाट करून दिली होती. त्या उद्रेकाने सगळ्या यंत्रणा वठणीवर आल्या होत्या. त्या विनयभंग प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेनंतर पोलिसांच्या गाडीत झालेल्या चकमकीत मारला गेला. त्या संपूर्ण प्रकरणाची आठवण महाराष्ट्राला काल पुन्हा एकदा झाली. गेल्या प्रकरणात शाळकरी मुलगी होती. यावेळी पूर्वप्राथमिक शाळेत, म्हणजे बालवाडीत जाणारी अवघी चार वर्षांची चिमुकली आहे. गेल्यावेळी शाळेतला शिपाई होता; यावेळी मुलांची शाळेत ने-आण करणाऱ्या खासगी व्हॅनचा चालक आहे. म्हणजे, ज्यांची व्यवस्था मुलांच्या सहाय्यासाठी आणि संरक्षणासाठी केली आहे, तेच दोन्ही प्रकरणात आरोपी आहेत! अशावेळी विश्वास कोणावर ठेवायचा, असा प्रश्न हतबल पालकांसमोर उभा ठाकल्याशिवाय राहात नाही. दोन्ही घटना बदलापुरात घडल्याने हा प्रश्न केवळ बदलापूरपुरता सीमित आहे, असा गैरसमज करून घेण्याचं कारण नाही. याची व्याप्ती पूर्ण देशभर आहे. महाराष्ट्राने; निदान महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी आणि पोलीस महासंचालकांनी तरी याची गंभीर दखल घेतली पाहिजे. अशा घटना घडू नयेत यासाठी कडक प्रतिबंधात्मक व्यवस्था केली पाहिजे. महाराष्ट्रातल्या महानगरी, शहरी, निमशहरी, ग्रामीण-अशा सर्व ठिकाणी समान पद्धतीने लागू करता येईल, अशीच ही उपाययोजना असायला हवी. बदलापूरला आता महिला नगराध्यक्ष असल्याने त्यांनी स्थानिक पातळीवर या प्रश्नाच्या खोलात जाऊन संबंधित यंत्रणांना उपाययोजनांसाठी मदतही केली पाहिजे. कारण, या शहराची इभ्रत राखण्याची सगळ्यात पहिली जबाबदारी त्यांची आहे!बदलापुरात अगदी कमी अंतराने दोन घटना घडल्या आणि पहिल्या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला गहाळपणा केला, अन्यथा बदलापूरचं नांव एवढं चर्चेत येण्याचं काही कारण नव्हतं. अशाच घटना यापूर्वी मुंबईत, उच्चभ्रूंच्या मानल्या जाणाऱ्या शाळेतही घडल्या आहेत. त्या प्रकारानंतर शाळेच्या बस आणि शाळेने नेमलेल्या खासगी कंत्राटदारांच्या बस याबाबत बरीच चर्चा झाली होती. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या अशा बसमध्ये एक महिला सहाय्यक असावी, मुलांना बसमध्ये घेण्याची आणि शाळा सुटल्यानंतर त्यांना बसमधून पुन्हा पालकांच्या स्वाधीन करण्याची जबाबदारी या महिला सहाय्यकावर सोपवावी, असा तोडगा निघाला होता. त्याची अंमलबजावणीही झाली होती. मुंबईत घडलेल्या त्या घटनेचे पडसाद इतके तीव्र होते, की बसच काय; मुलांची शाळेसाठी वाहतूक करणाऱ्या व्हॅनमध्येही महिला सहाय्यकांची नेमणूक करण्यात आली होती. पण, नंतर आपल्याकडे जे घडतं, तेच झालं. काळ लोटला. प्रकरणाचं गांभीर्य कमी झालं. नवं शालेय वर्ष सुरू झालं. व्हॅनमधल्या महिला सहाय्यक गायब झाल्या आणि परवाचा प्रकार घडला! या बालिकांच्याबाबतच नाही, जगात कुठेही महिलांच्या विनयभंगाचे प्रकार घडले, अत्याचाराच्या घटना घडल्या, तर त्यातल्या बहुतांश घटनांमध्ये पुरुष नातेवाईक किंवा परिचितांपैकीच कोणीतरी आरोपी असतात, अशी सिद्ध झालेली आकडेवारी आहे. बदलापूरच्या पूर्वीच्या घटनेतला आरोपी शाळेचा शिपाई होता. परवा घडलेल्या आणि मुंबईतल्याही अलीकडच्या घटनेतले आरोपी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या गाड्यांचे चालक होते. परवाच्या घटनेच्या तपशिलात पाहिलं, तर व्हॅन नेहमी बालिकेला घेऊन ज्या वेळेला येते, त्यापेक्षा बराच उशीर झाल्याने पालकांनी चौकशी केली, तेव्हा त्यानंतर पाऊण तासाने व्हॅन पोहोचली. परतलेल्या बालिकेचं वर्तन पालकांना खटकल्याने त्यांनी जेव्हा खोदून खोदून चौकशी केली, तेव्हा आक्षेपार्ह प्रकार उघडकीस आला. चालकाला शाळेत बोलावलं, तेव्हा बालिका घाबरून पालकांमागे लपली. झाल्या प्रकाराला त्यातून दुजोरा मिळाला, असं समजतं. हा संपूर्ण प्रकारच अत्यंत किळसवाणा आहे.इतक्या छोट्या मुलींचा विनयभंग होईल, असं दुष्कृत्य करावंसं संबंधित पुरुषांना का वाटत असेल? त्यांच्या मनात असं अभद्र कशातून उगवत असेल? शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ या प्रकारांसाठी पहिले दोषी ठरवतात, ते मोबाईलमधून २४ तास स्त्रवत असलेल्या हिंसक, लैंगिक, भावना उद्दीपित करणाऱ्या 'मनोरंजना'च्या तथाकथित कार्यक्रमांना. या कार्यक्रमांतून; छोट्या छोट्या रीलमधूनही जे पोहोचतं, त्यातून अशा आक्षेपार्ह बाबींबाबतचं गांभीर्य, धाक संपून जातो. नैतिकतेचे सारे संस्कार गळून पडतात. असा एखादा कार्यक्रम किंवा रील पाहिल्या, तरी तुमच्या मोबाईलवर त्याच प्रकारचे कार्यक्रम, रील किंवा मनोरंजनाच्या तत्सम प्रकारांची रांग लागते. पाहणारा एकामागून एकात गुंतत जातो. त्यातून सगळं जग अशा विकृत प्रकारांनीच भरलं असल्याचा भास त्याला होतो. जे 'खासकरून' बनवलेलं असतं, तेच त्याला 'सर्वसाधारण' वाटू लागतं. त्यातून हे प्रकार वाढीस लागतात. साहजिकच प्रौढांपेक्षा तरुणांमध्ये, कुटुंबापासून लांब असलेल्या किंवा निवासाच्या अपुऱ्या सोयी असलेल्यांमध्ये हे प्रकार अधिक आहेत.बदलापूरमध्ये घडलेल्या दुर्घटना उघडकीस आल्या, त्याची दखल पालकांनी घेतली, प्रकरण पोलिसांपर्यंत नेण्याचा आग्रह धरला म्हणून; अन्यथा मुंबई आणि मुंबईलगत पसरलेल्या अक्राळविक्राळ वस्त्यांचा नुसता अंदाज घेतला, तरी त्यात असे असंख्य प्रकार आढळतील. अगदी लहान मुलांमध्ये (केवळ मुलींनानव्हे!), शाळेच्या शिक्षकवृंदासह सर्व कर्मचाऱ्यांमध्ये, सहाय्यक ज्या स्तरातून येतात, त्या स्तरांमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे, पोलिसांमध्ये मुली-महिलांवरील अशा विनयभंग, जोर-जबरदस्तीच्या प्रकरणांबाबतची संवेदनशीलता वाढवली पाहिजे. अशी संवेदनशीलता वाढवणं, ही जागृतीनंतरची पुढची पायरी आहे. समाजमाध्यमांतून वाहत असलेल्या, अतिरंजित, विकृत 'मनोरंजना'चं काय करायचं, हा जगातल्या सगळ्याच सरकार आणि समाजधुरिणांसमोरचा प्रश्न आहे. हा 'जागतिक प्रश्न' जेवढ्या लवकर सुटेल, तेवढे पुनःपुन्हा 'बदलापूर' होण्यापासून वाचेल!

24 C