भीषण अपघात! ट्रॅव्हल्स –कारच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; कारचा चुराडा
Road Accident News : जिंतूर तालुक्यातील चारठाणा जवळ कार आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला
तेलाच्या किंमती वाढत असल्यामुळे हॉर्मूझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ट्रम्प यांच्यावर आता आंतरराष्ट्रीय पातळीवरून तसेच अमेरिकेतूनही मोठा दबाव येऊ लागला आहे.
Gram Panchayat Election : बीड जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत केजमधील मस्साजोगच्या जागेकडे सर्वांचे लक्ष आहे.
लेबनॉनमध्ये सक्रिय असलेला हमासचा वरिष्ठ आर्थिक अधिकारी वालिद मुहम्मद दिब (Walid Muhammad Dib) याला ठार केल्याचा दावा इस्रायलच्या सुरक्षा दलांनी केला आहे.
Most Loyal Players : आयपीएलच्या या झगमगत्या दुनियेत आजही असे काही मल्ल आहेत ज्यांनी आपल्या फ्रँचायझीशी असलेली एकनिष्ठता कधीही सोडली नाही.
Adulterated Milk : भेसळयुक्त दुधामुळे मृत्यूचे तांडव! १६ जणांचा मृत्यू, अनेक जण व्हेंटिलेटरवर
Adulterated Milk : आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात भेसळयुक्त दूध पिल्याने १६ जणांचा मृत्यू झाला आहे.
Top 10 News : हेलिकॉप्टर समुद्रात कोसळलं ते भेसळयुक्त दुधामुळे 16 जणांचा मृत्यू..; वाचा आजच्या टॉप १० बातम्या
राज्यातील हॉटेल, ढाबे,उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन, कम्युनिटी किचन्स यांच्यासाठी२० टक्केएलपीजी पुरवठा करण्याचे केंद्राचे निर्देश असल्याची अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली माहिती.व्यापारी एलपीजीच्या (Commercial LPG) वाटपाबाबत केंद्राच्या निर्देशामुळे हॉटेल चालकांना मिळणार दिलासा-मंत्री छगन भुजबळमुंबई : राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन आणि अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २० टक्के अतिरिक्त व्यापारी एलपीजी (Commercial LPG) पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिनांक २१ मार्च २०२६ रोजी दिलेल्या सूचनांनुसार, यापूर्वी राज्याला ३० टक्के वाटप मंजूर होते. आता २३ मार्च २०२६ पासून पुढील आदेश येईपर्यंत आणखी २० टक्के वाटप वाढविण्यात आले असून एकूण गॅस पुरवठा पूर्व-संकट पातळीच्या ५० टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे.या अतिरिक्त २० टक्के वाटपात हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया व दुग्धव्यवसाय यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन, कम्युनिटी किचन्स आणि स्थलांतरित मजुरांसाठीच्या योजनांनाही लाभ मिळणार आहे.मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, या निर्णयामुळे व्यापारी एलपीजीच्या तुटवड्यामुळे अडचणीत आलेल्या हॉटेल आणि उपहारगृह व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, गॅस मिळविण्यासाठी संबंधित व्यावसायिकांना तेल विपणन कंपन्यांकडे (OMCs) नोंदणी करणे आणि पीएनजी (PNG) साठी अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे.केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यातील खाद्यव्यवसायाला मोठा दिलासा मिळणार असून पुरवठा साखळी अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दरम्यान, राज्यातील केरोसिन वितरणाबाबतही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. प्रलंबित परवाने नूतनीकरण झालेले मानण्यात येणार असून, कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच वारसांच्या नावे परवाने तात्काळ वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.ज्या गावामध्ये किरकोळ केरोसिन परवानाधारक उपलब्ध नाहीत, अशा गावांमध्ये रास्तभाव दुकानदारास किरकोळ केरोसिन परवानाधारक समजण्यात येऊन त्यास परवाना देण्यात यावा.राज्यातील किरकोळ, हॉकर्स, अर्धघाऊक व घाऊक केरोसिन परवाने मंजुरी, नुतनीकरण व वारसाच्या नावे वर्ग करण्याच्या अनुषंगानेकार्यवाही करण्याबाबतदिनांक २० मार्च २०२६ च्या शासनपत्रान्वये सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली उघड; कर्मचारीच....
मुंबई : प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात चोरीची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र मानल्या जाणाऱ्या या मंदिरातच असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.मंदिरातील पुजारी कक्षात ठेवलेल्या दानपेटीतून सुमारे १० हजार रुपयांची रक्कम गायब झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर मंदिर प्रशासनाने तातडीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता या प्रकरणामागील धक्कादायक बाब उघडकीस आली. मंदिरातीलच एका कर्मचाऱ्याने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.सदर कर्मचारी दानपेटीतून पैसे काढताना सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याने चलाखीने बोटाच्या आकाराच्या कैचीच्या मदतीने रक्कम काढल्याचे दिसून आले. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती मिळत आहे. न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी अद्याप नाव जाहीर केलेले नाही.दरम्यान, या घटनेमुळे मंदिराच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत असून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
Shabbir Ansari Pass Away : ओबीसींचा कणखर बुलंद आवाज हरपला; शब्बीर अन्सारी यांचं निधन
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि ओबीसी चळवळीतील प्रख्यात लढवय्या नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे (Shabbir Ansari Pass Away) आज दीर्घ आजाराने निधन झाले.
Ashok Kharat : खरात प्रकरणात एसआयटीच्या तपासाला वेग; मंदिराचा पुजारी आणि सुरक्षारक्षकाची कसून चौकशी
खरातवर वावी, शिर्डी आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणी, ब्लॅकमेलिंग, बलात्कार आणि जादूटोण्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
Varun Chakaravarthy Reveals : वरुण चक्रवर्ती याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात भयानक आणि वेदनादायी अनुभवाचा खुलासा केला आहे.
बिग बॉसच्या घरातून वाईल्ड कार्ड स्पर्धक घेणार एक्झिट, 'या'नावाची चर्चा
बिग बॉसच्या घरातील सदस्य उत्तम खेळ खेळत असून बिग बॉस मराठीच्या 6 व्या सिझननं प्रेक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. बिग बॉसच्या घरात अनेक दमदार स्पर्धकांची एक्झिट झालीअसून ड्रामा क्विन राखी सावंतनंतर ३ स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्रीही झाली. बिग बॉसच्या घरातील हे तिन्ही स्पर्धक घरातील इतर स्पर्धकांना तोडीस तोड उत्तर देताना दिसत आहे. तसेच, गेल्या आठवड्यात सिंगर प्राजक्ता शुक्रे ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली होती. दरम्यान, या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण एक्झिट घेणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.बिग बॉसच्या घरातील ट्विस्ट आणि टर्न्समुळे सध्या बिग बॉस ६ चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात संकेत पाठक, रेवा कौरासे आणि संस्कृती साळुंके यांची एन्ट्री होताच घरातील समीकरणं बदलली होती. या आठवड्यात एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले असल्याची माहिती असून यामध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणाऱ्या स्पर्धकांचाही समावेश आहे. रेवा कौरासे, दीपाली सय्यद, विशाल कोटियन, सागर कारंडे, प्रभू शेळके, संस्कृती साळुंके हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.दरम्यान, कोण घरातून बाहेर पडणार? हे लवकरच उघड होईल. पण,एलिमिनेशनपूर्वीच सात नावांपैकी एका नावाची जोरदार चर्चारंगली आहे.या घरातून जी व्यक्ती बाहेर पडणार आहे. तिच्याबद्दल प्रेक्षकांना दु:ख होण्याऐवजी आनंद होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियामुळे मुलांच्या एकाग्रतेत होणारी घट, सायबर बुलिंग आणि मानसिक आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम (Mobile Ban in Schools) लक्षात घेता, जगातील ५८ टक्के देशांनी शाळांमध्ये मोबाईल फोनवर बंदी घातली आहे.
वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इस्रायल यांनी २८ फेब्रुवारी २०२६ पासून इराण विरोधात युद्ध सुरू केले आहे. या युद्धात २३ दिवसांत अमेरिकेने अब्जावधी डॉलर खर्च केले आहेत. या खर्चामुळे अमेरिका सरकार देशातील विमानतळ कर्मचाऱ्यांचे पगार करू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विमानतळांवर प्रवाशांची सुरक्षा आणि हालचालींचे व्यवस्थापन करणाऱ्या टीएसए (TSA) कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. हे थकीत पगार देण्यासाठी उद्योगपती अॅलन मस्क यांनी पुढाकार घेतला आहे. विमानतळावर काम करणाऱ्या ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशनच्या (TSA) कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची तयारी मस्क यांनी दाखवली आहे.टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ अॅलन मस्क यांची संपत्ती २१ मार्च २०२६ च्या नोंदीनुसार ८१४ अब्ज डॉलर एवढी आहे. ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर लॅरी पेज आहेत. या पार्श्वभूमीवर मस्क यांनी विमानतळावर काम करणाऱ्या ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशनच्या (TSA) कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची तयारी दाखवली आहे.युद्धाच्या मुद्यावरून अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. यामुळे अनेक सरकारी निधींच्या विनियोगाचे निर्णय रखडले आहेत. विमानतळावर काम करणाऱ्या ५० हजारट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशनच्या (TSA) कर्मचाऱ्यांचे पगार पण थकले आहेत. हे पगार देऊन अमेरिका सरकारवरील थकबाकी दूर करण्याची तयारी मस्क यांनी दाखवली आहे.पगार मिळत नसल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशनचे सुमारे २० टक्के कर्मचारी मागील काही दिवसांपासून रजेवर आहेत. यामुळे विमानतळावरील कामकाजाचे व्यवस्थापन हा एक कठीण मुद्दा झाला आहे.अमेरिकेत, वाहतूक सुरक्षा प्रशासन अर्थात ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशनचे (TSA) कर्मचारी विमानतळ सुरक्षा आणि प्रवासी वाहतुकीसाठी जबाबदार असतात. त्यांचे पगार अमेरिकेचे संघीय सरकार देते. TSA ही अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाची (DHS) एक एजन्सी असल्यामुळे, तिचे बजेट आणि पगार अमेरिकन काँग्रेसने मंजूर केलेल्या कायद्यानुसार ठरवले जातात. अंशतः सरकारी कामकाज ठप्प झाल्यामुळे टीएसए कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळण्यास अडचणी येत आहेत. अत्यावश्यक सेवा असल्यामुळे, त्यांना विनावेतन काम करण्यासही भाग पाडले जात आहे.संघीय कायद्यांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी व्यावसायिकाची मदत अर्थात बाह्य मदत मिळवण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. यावर काय आणि कसा मार्ग काढणार हे अद्याप अस्पष्ट आहे. पण मस्क यांनी विमानतळ कर्मचाऱ्यांचा पगार देण्याची तयारी दाखवल्यामुळे जगाचे लक्ष अमेरिकेतल्या आर्थिक संकटाकडे वेधले गेले आहे.
वकिलांना ३ महिने काळ्या कोटापासून मिळणार सुट्टी; जाणून घ्या कारण
पुणे : वाढत्या उष्णतेमुळे वकिलांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या काळात पारंपरिक काळा कोट घालण्यापासून वकिलांना तात्पुरती सूट देण्यात आली आहे.१५ मार्च ते १५ जून या कालावधीत ही सवलत लागू राहणार असून या दरम्यान वकिलांना न्यायालयात काम करताना काळा कोट परिधान करणे बंधनकारक राहणार नाही.उन्हाळ्यात तापमानात मोठी वाढ होत असल्याने काळ्या रंगाच्या कोटामुळे उष्णता अधिक जाणवते. त्यामुळे वकिलांना दीर्घकाळ न्यायालयात काम करताना त्रास सहन करावा लागतो. विशेषतः ज्या न्यायालयांमध्ये पुरेशा थंडाव्याच्या सुविधा उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी परिस्थिती अधिक कठीण होते.ग्रामीण भागातील अनेक न्यायालयांमध्ये पंखे, कुलर किंवा एअर कंडिशनिंगची सुविधा मर्यादित असल्याने वकिलांना उकाड्यात काम करणे आव्हानात्मक ठरते. या पार्श्वभूमीवर ही सवलत उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे.काळा कोट हा वकिलांच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग मानला जातो. तरीही आरोग्य आणि कामाच्या सोयीसाठी दरवर्षी उन्हाळ्यात अशी तात्पुरती सवलत दिली जाते.या निर्णयामुळे वकिलांना काम करताना अधिक आरामदायी वातावरण मिळेल, तसेच उष्णतेमुळे होणारा त्रास काही प्रमाणात कमी होण्याची आहे.
करण जोहरच्या टॅलेंट एजन्सीमधून जान्हवी कपूरची एक्झिट, करण म्हणाला...
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं नुकताच करण जोहरच्या 'धर्मा' टॅलेंट एजन्सीमधून एक्झिट घेतली आहे. अभिनेत्री जान्हवीनं करण जोहरच्या टॅलेंट एजन्सीमधून बाहेर पडल्यानंतर कलेक्टिव आर्टिस्ट नेटवर्क जॉइन केलं आहे.जान्हवीच्या या एक्झिटनंतर करण जोहरनं एका मुलाखतीत यावर प्रतिक्रिया दिली असून यावेळी करण जोहर म्हणाला आहे की सध्याच्या कलाकारांना लवकरात लवकर प्रसिद्धी हवी असते. तसेच, जान्हवीचा हा निर्णय योग्य असून मी तिच्या भावनांना समजू शकतो. तसेच, या क्षेत्रातील अनेकजण आपल्या टीम एजन्सी सतत बदलत असतात. ही गोष्टी इंडस्ट्रीसाठी सामान्य असल्याचं यावेळी करण जोहरनं सांगितलं आहे.यावेळी मुलाखतीत करण जोहरने सांगितलं आहे की मी सिनेमांसाठी योग्य कलाकारांचीच निवड करणार मग ते कोणत्याही एजन्सीमधले असतील तरी चालेल. पण, 'धर्मा' टॅलेंट एजन्सीला प्रामुख्याने महत्व देणार असल्याचंही यावेळी करण जोहरनं सांगितलेलं आहे.
Virat Kohli Debunk : किंग कोहलीने या अफवेचा आपल्या खास शैलीत समाचार घेत खंडन केले.
Gas Cylinder Shortage : आता गॅसचा तुटवडा संपणार; राज्य सरकारने घेतला ‘हा’मोठा निर्णय
इराण-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक ऊर्जा संकटाचा फटका (Gas Cylinder Shortage) भारताला बसला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणकडून बंदी घातल्याने इंधन वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
अचानक मोबाईलचं नेटवर्क गायब झाल्यास 'या'गोष्टी करा
सध्याच्या काळात मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आजच्या काळात एकमेकांशी संपर्क साधण्याबरोबरच अनेक महत्वाच्या कामांसाठी मोबाईल फोन हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे मोबाईलला नेटवर्क असणं खुप गरजेचं झालं आहे. कॉल करणे, मेसेज पाठवणे, इंटरनेटचा वापर करणे या सर्व गोष्टी फोनवरच अवलंबून आहेत. मात्र, काहीवेळी अचानकच फोनचं नेटवर्क गायब होतं. त्यामुळे काहीवेळा ‘No Service’/ ‘Emergency Calls Only’ असं फोनवर दिसतं. ही खुप सामान्य समस्या आहे. पण लोकांना वाटतं की, कंपनीच्या चूकीमुळे ही गोष्ट घडते.याबाततची काही कारणं ही नेटवर्कशी संबंधित असतात तर काही फोन किंवा सिमशी संबंधित असतात. तसेच, आपल्या लोकेशनशीही संबंधित असतात.याबाबतच सर्वात मोठं कारण म्हणजे सिग्नल पोहोचण्यात अडचण येत असल्यानं देखील या गोष्टी घडतात.या समस्येचे सर्वात मोठे कारण म्हणजे सिग्नल कमकुवत असणे आहे हे देखील असू शकतं.काहीवेळा सण-उत्सवात, मॅच किंवा मोठ्या इव्हेंट दरम्यान अनेकजण एकाच टॉवरशी कनेक्ट होतात. यामुळे नेटवर्क ओव्हरलोड होतं आणि सिग्नल अचानक खाली येतं. तसेच, भारतात यूझर्सची संख्या जास्त प्रमाणात असल्यामुळे मोठी शहरं किंवा ऑफिसच्या परिसरात ही समस्या समान्य आहे.तुम्ही राहत असलेला परिसर टॉवरपासून खुप दूर असेल किंवा टॉवरवर मेंटेनेंस/रिपेयरचं काम सुरू असेल तर यावेळी नेटवर्क अचानक गायब होते. कधी-कधी नेटवर्क स्विचमध्ये प्रॉब्लम असल्यामुळेही ही समस्या उद्भवते. 5G एरियामध्ये 5G सिग्नल कमकुवत झालं तर फोन ऑटोमॅटिक 4G वर शिफ्ट होऊ शकत नाही आणि यामुळं नेटवर्क जातो.सिम कार्ड जुनं असणे, खराब, लूज किंवा डॅमेज असेल तरीही नेटवर्क अचानक गायब होतं. सिम काढून स्वच्छ करुन पुन्हा बसवा किंवा दुसऱ्या स्लॉटमध्ये ट्राय करा. तुम्हाला सिम स्वॅपिंग किंवा अॅक्टिव्हेशन प्रॉब्लम असेल तरीही असं होण्याची शक्यता असते.नेटवर्क अचानक गेल्यावर 'या' गोष्टी करालोकेशन बदलून पाहावं किंवा फोन रिस्टार्ट करावा. तसेच, एयरप्लेन मोड 10-15 सेकंदांसाठी ऑन-ऑफ करून पाहावं.मोबाईल डेटा आणि नेटवर्क मोडदेखील चेक करावा.तसेच, सिम काढून पुन्हा बसवा किंवा दुसऱ्या फोनमध्ये ट्राय करा.वारंवार असं होत असल्यास नेटवर्क कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा किंवा सॉफ्टवेअर अपडेट चेक करून पाहा.या समस्या घरबसल्याही दुरुस्त करता येतात. पण जर या समस्या सतत उद्भवत असतील तर कंपनीकडून टॉवर इश्यू किंवा तुमच्या परिसरात कव्हरेज कमी असल्यामुळेदेखील हे घडू शकतं. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेतल्यास हा प्रॉब्लम दूर होण्यास मदत होते.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी महत्वाची अपडेट
मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पातील मुंबईतील महत्त्वाच्या भुयारी टप्प्यासाठी आवश्यक तयारी पूर्णत्वाकडे जात असून लवकरच खोदकाम सुरू होणार आहे.या कामासाठी लागणारी अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन लवकरच मुंबईत दाखल होणार असून त्यानंतर भूमिगत बोगद्याचे काम सुरू होईल. आतापर्यंत काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे या टप्प्याला विलंब झाला होता, मात्र आता पुढील काही महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू होईल, असे संकेत मिळत आहेत.वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळफाटा या दरम्यान सुमारे २० किमीपेक्षा अधिक अंतर भुयारी मार्गाने पार केले जाणार आहे. या मार्गातील सुमारे ७ किमीचा भाग ठाणे खाडीखालून जाणार असून हा प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक टप्पा मानला जात आहे.या बोगद्यांची खोली काही ठिकाणी २५ ते ६५ मीटरपर्यंत असणार आहे. तसेच पारसिक डोंगर परिसरातही मोठ्या प्रमाणावर बोगदा तयार केला जाणार आहे. या संपूर्ण मार्गावर एकाच बोगद्यातून दोन्ही दिशेने रेल्वे मार्ग तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा देशातील पहिला हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प असून या ट्रेनचा वेग ताशी सुमारे ३२० किलोमीटरपर्यंत असेल. प्रकल्पाचा एकूण मार्ग 508 किमीचा आहे. त्यातील काही टप्पे टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.दरम्यान, या प्रकल्पामुळे मुंबई आणि गुजरातदरम्यानचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच भविष्यात देशातील इतर शहरांदरम्यानही अशाच हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पांची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांना जदयू राजकीय प्रशिक्षण देत आहे. मंत्री अशोक चौधरी यांच्या घरी त्यांना एका अनुभवी राजकारण्याप्रमाणे चालणे, बोलणे, दिसणे आणि वागणे शिकवले जात आहे. जदयूच्या वतीने निशांत यांना मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट केले जात आहे. त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी अनेक मोठे नेते एकत्र आले आहेत. बॉडी लँग्वेजपासून ते ड्रेस सेन्सपर्यंत, प्रत्येक गोष्ट बारकाईने शिकवली जात आहे. निशांत यांचे राजकीय प्रशिक्षण कसे सुरू आहे? बोलणे, पेहराव आणि सादरीकरण यावर विशेष लक्ष. प्रत्येक पैलूवर बारकाईने तयारी केली जात आहे. वाचा इनसाइड रिपोर्ट… सर्वात आधी जाणून घ्या, निशांत यांना प्रशिक्षणाची गरज का पडली निशांत कुमार ८ मार्च रोजी जदयूमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. कपड्यांपासून ते चालणे, सर्वांसमोर उभे राहणे आणि बोलण्यापर्यंत प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी तर असेही म्हटले की, ते ढिलेढाले व्यक्ती दिसत आहेत. टीम निशांतमध्ये सामील झालेल्या युवा आमदाराने सांगितले की, निशांत यांची प्रभावशाली नेता म्हणून प्रतिमा तयार करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. जेणेकरून ते लोकांशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतील. नितीश यांच्यासारखी त्यांची प्रतिमा दिसावी. यासाठी निशांत मंत्री अशोक चौधरी यांच्या घरी जात आहेत. अनेक मंत्री आणि आमदार या कामात गुंतले आहेत. निशांत यांच्या प्रशिक्षणातील 5 प्रमुख गोष्टी 1. देहबोली: व्यासपीठावर उभे राहणे, नेत्यांना भेटणे निशांत यांना शिकवले जात आहे की, सामान्य लोकांसमोर असताना, जनतेला भेटताना आणि व्यासपीठावर उपस्थित असताना देहबोली कशी असावी. लोकांसमोर स्वतःला कसे सादर करावे. यासाठी निशांत यांना सेल्फ प्रेझेंटेशन म्हणजे स्वतःला सादर करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. हे फक्त कपडे किंवा स्टाइलपुरते मर्यादित नाही. तर, त्यांची संपूर्ण प्रतिमा, वर्तन, हावभाव आणि लोकांशी जोडले जाण्याच्या पद्धतीवर काम सुरू आहे. 2- बोलण्याची कला... काय आणि कसे बोलावे राजकारणात भाषा हे सर्वात मोठे शस्त्र असते. नेते लोकांशी तेव्हाच जोडले जातील जेव्हा त्यांचे बोलणे त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचेल. प्रशिक्षणात निशांत यांना बोलण्याची ती खास कला शिकवली जात आहे. कधी, काय आणि कसे बोलावे हे सांगितले जात आहे. निशांत यांना शिकवले जात आहे की, सोप्या, स्पष्ट आणि लोकांशी संबंधित भाषेत कसे बोलावे. लांब आणि क्लिष्ट भाषणांऐवजी लहान, प्रभावी वाक्यांचा वापर कसा करावा. मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे कशी द्यावीत. वादग्रस्त प्रश्नांपासून कसे वाचावे. उत्तराला आपल्या बाजूने कसे वळवावे. आक्रमक न होता आपली बाजू ठामपणे कशी मांडावी. 3- ड्रेसिंग सेन्स: फिट कुर्त्यांचा सल्ला निशांत यांना ड्रेस सेन्सचे प्रशिक्षण दिले जात आहे. सैल कपडे नेत्याच्या प्रतिमेसाठी योग्य नाहीत, असे सांगितले जात आहे. त्यांनी शरीरावर व्यवस्थित बसणारे आणि नेत्याच्या प्रतिमेला शोभणारे कपडे निवडले पाहिजेत. निशांत यांना साधेपणा जपून स्वतःला चांगले दिसणारे कपडे निवडण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. नितीश यांचा ड्रेस सेन्स शालीन आणि पारंपरिक आहे. ते बहुतेक वेळा पांढऱ्या किंवा हलक्या रंगाच्या सुती कुर्त्या-पायजाम्यात दिसतात. यातून त्यांच्या साधेपणाची आणि जमिनीशी असलेल्या त्यांच्या जोडणीची झलक मिळते. निशांत यांनाही स्वतःसाठी असा पेहराव निवडायला शिकवले जात आहे, ज्यात ते एका अनुभवी राजकारण्यासारखे दिसतील. 4- विभागीय कामकाज आणि प्रशासकीय पकडीचे प्रशिक्षण अशोक चौधरी यांना मंत्रीपदावर काम करण्याचा दीर्घ अनुभव आहे. या आधारावर ते निशांत यांना केवळ राजकीयच नव्हे, तर प्रशासकीय प्रशिक्षणही देत आहेत. ते समजावून सांगत आहेत की, एखाद्या विभागाचे काम कसे चालते. फाईल कशी पुढे सरकते. निर्णय कसे घेतले जातात आणि अधिकाऱ्यांकडून काम कसे करून घेतले जाते. भविष्यात त्यांना एखादे खाते किंवा मोठी जबाबदारी मिळाल्यास, ते प्रणाली समजून प्रभावीपणे काम करू शकतील यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. अधिकाऱ्यांशी संतुलित व्यवहार, बैठकांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आणि जमिनीवर योजना राबवण्याची प्रक्रिया देखील त्यांना शिकवली जात आहे. 5- ज्येष्ठ नेत्यांचा आदर, साधा व्यवहार ज्येष्ठ नेत्यांशी कसे वागावे, याचे प्रशिक्षणही निशांत कुमार यांना दिले जात आहे. युतीमधील कोणत्याही मित्रपक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला भेटताना त्यांनी काय करावे. याची झलक गुरुवारी हिंदुस्तानी अवाम मोर्चाच्या इफ्तार पार्टीत दिसली. यात निशांत मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत पोहोचले. मुख्यमंत्र्यांसाठी ठेवलेल्या सोफ्यावर बसलेले दिसले. थोड्या वेळाने उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी कार्यक्रमात पोहोचले. सम्राट यांना पाहताच निशांत यांनी सोफा खाली केला. मुख्यमंत्र्यांसाठी ठेवलेल्या सोफ्यावर सम्राट बसले. निशांत जवळच्या सोफ्यावर सरकले. यापूर्वी नितीश कुमारही इफ्तार पार्टीत पोहोचले होते. थोड्या वेळ थांबून ते निघून गेले. निशांत यांना कोण प्रशिक्षण देत आहे? निशांत यांना प्रशिक्षण देण्यात केवळ मंत्री अशोक चौधरीच नाहीत, तर जेडीयूचे अनेक अनुभवी नेते, रणनीतीकार आणि त्यांच्या वयाचे आमदारही सहभागी आहेत. पक्षांतर्गत 'टीम निशांत' नावाचा एक गट सक्रिय आहे. यात 14 ते 20 आमदारांचा समावेश आहे. 8 मार्च रोजी इस्लामपूरचे आमदार रोहेल रंजन यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निशांत यांना भविष्यातील मुख्यमंत्री चेहरा म्हणून पुढे आणण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली होती. रोहेल रंजन निशांतचे मित्र आहेत. दोघांनी एकत्र अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. या संघाचे काम केवळ सल्ला देणे नाही, तर त्यांच्या राजकीय दौऱ्यांची, मुद्द्यांच्या प्राधान्याची आणि जनसंपर्काची रणनीती ठरवणे हे देखील आहे. म्हणजेच, ही संपूर्ण प्रक्रिया संघटित आणि योजनाबद्ध पद्धतीने चालवली जात आहे. निशांत यांना प्रशिक्षण दिल्याने किती फायदा होईल? जाणकारांनुसार, प्रशिक्षणाचा परिणाम निशांत हे किती वेगाने जमिनीवर लागू करू शकतात यावर अवलंबून असेल. जर ते एक शांत, सुशिक्षित आणि संतुलित नेत्याची प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी झाले, तर त्यांना शहरी आणि युवा वर्गात लवकर स्वीकार्यता मिळू शकते. मात्र, आव्हानही मोठे आहे. कारण त्यांना त्यांचे वडील नितीश कुमार यांच्या मजबूत राजकीय वारसा आणि अपेक्षांच्या दबावाखाली स्वतःला सिद्ध करावे लागेल. जर 'टीम निशांत'ची रणनीती योग्य प्रकारे लागू झाली तर ते जेडीयूसाठी भविष्यातील एक मोठे व्यक्तिमत्व बनू शकतात. तर, जर जमिनीवरील संपर्क कमकुवत राहिला, तर ही संपूर्ण कसरत केवळ प्रतिमा निर्मितीपुरती मर्यादित राहू शकते. जेडीयूमध्ये सामील झाल्यापासून निशांत सक्रिय आहेत निशांत यांनी 8 मार्च रोजी जेडीयूची सदस्यता घेतल्यानंतर आपली राजकीय सक्रियता वाढवली आहे. सदस्यता घेण्याच्या दिवशी कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी त्यांना पक्षात सामील करून घेतले, तर ललन सिंह यांनी गमछा घालून त्यांचे स्वागत केले होते. यावेळी नितीश कुमार उपस्थित नव्हते. निशांतने ललन सिंह आणि संजय झा यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला होता. सदस्यता घेतल्यानंतर निशांत म्हणाले होते, ‘मी पक्षासाठी मेहनतीने काम करेन. माझ्या वडिलांनी 20 वर्षांत जी कामे केली आहेत, ती मी पुढे नेईन. बिहारच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला आवाहन करतो की, वडिलांवर विश्वास कायम ठेवा.’ निशांत यांची सक्रियता सातत्याने वाढत आहे 10 मार्च रोजी निशांत जेडीयूचे ज्येष्ठ नेते वशिष्ठ नारायण सिंह यांना भेटायला पोहोचले. 11 मार्च रोजी ते अचानक पक्ष कार्यालयात पोहोचले. जिथे मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. महिला कार्यकर्त्यांनी त्यांची आरती केली होती. 13 मार्च रोजी निशांत त्यांच्या मूळ गावी कल्याण बिगहा येथे गेले, जिथे संपूर्ण मार्गावर लोकांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, लोकांचे प्रेम आणि विश्वास त्यांना अधिक मजबूत करत आहे आणि ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत पक्ष पोहोचवण्याच्या मोहिमेत सहभागी होतील. बैठका आणि रणनीतीवर लक्ष केंद्रित गेल्या अनेक दिवसांपासून निशांत सातत्याने आमदार आणि नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये त्यांच्या राजकीय दौऱ्यांवर, मुद्द्यांवर आणि संघटना विस्ताराच्या रणनीतीवर चर्चा होत आहे. यावरून स्पष्ट संकेत मिळत आहेत की त्यांची भूमिका आता हळूहळू वाढवली जात आहे. इफ्तारमध्ये दिसली नवी भूमिका यावेळी इफ्तार पार्ट्यांमध्येही निशांत यांचा सहभाग विशेष राहिला. अनेक ठिकाणी ते नितीश कुमार यांच्याऐवजी प्रमुख भूमिकेत दिसले. हज भवनच्या इफ्तार पार्टीत त्यांची वेगळी शैली पाहायला मिळाली. लोकांनी त्यांना टोपी घातली आणि घोषणा दिल्या. बिहारचा मुख्यमंत्री कसा असावा, निशांत कुमार यांच्यासारखा असावा. मुख्यमंत्री निवासस्थानीही ते रोजेदारांसोबत पुढे बसले होते, तर नितीश कुमार मागे दिसले.
Rohit Sharma Dance : मुंबई इंडियन्सच्या सोहळ्यात 'हिटमॅन' रोहित शर्मा याच्या एका डान्स व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
Congress President Death : उत्तर प्रदेशातील देवरियात रस्ते अपघातात काँग्रेसचे नेते जितेंद्र जयस्वाल यांचा मृत्यू झाला.
The Digital Revolution : स्क्रीनचे ‘स्मार्ट’गुलाम की वेळेचे मालक?
आजच्या २१ व्या शतकात आपण एका अशा क्रांतीचे साक्षीदार आहोत, जिने मानवी जीवन पूर्णपणे बदलून टाकले आहे. ती क्रांती म्हणजे 'डिजिटल क्रांती' (The Digital Revolution)
'जय जय स्वामी समर्थ'मालिकेत मोठा ट्विस्ट; आता 'हा'अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत
मराठी टेलिव्हिजन विश्वात अनेक मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यापैकीच एक असलेली कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'जय जय स्वामी समर्थ'. या मालिकेनं कमी वेळातचं प्रेक्षकांच्या मनात घर केलं असून ही मालिका महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आवर्जून पाहिली जाते. मात्र, आता या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे.गेल्या ५ वर्षांपासून मालिकेत स्वामींची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय मुदावडकर याने या मालिकेचा निरोप घेतला आहे. सोशल मीडियावरून त्याने याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी कोण स्वामींच्या मुख्य भूमिकेत असणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
हॅरियर.इव्हीचे नवीन फिअरलेस+ क्यूडब्ल्यूडी ७५ मॉडेल
मुंबई : टाटा.इव्ही, भारतातील सर्वात मोठी फोर-व्हीलर इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी, यांनी हॅरियर.इव्ही या संपूर्ण स्वदेशी आणि दमदार एसयूव्हीसाठी नवी ‘फिअरलेस+ क्यूडब्ल्यूडी ७५’ पर्सोना सादर केली. या लॉन्चमुळे जाणकार ग्राहकांना आता हॅरियर.इव्हीचा सुपरकारसदृश बेजोड परफॉर्मन्स अनुभवता येणार असून, ड्युअल मोटर क्वाड-व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञानामुळे उत्कृष्ट ऑफ-रोड क्षमता देखील मिळणार आहे. विशेष म्हणजे, ही प्रगत वैशिष्ट्ये असलेली पर्सोना २६.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) या किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहे.एक्टि.इव्ही+ या ईव्ही आर्किटेक्चरवर विकसित केलेली हॅरियर.इव्ही ‘फिअरलेस+ क्यूडब्ल्यूडी ७५’ प्रभावी ५०४ एनएम टॉर्क निर्माण करते आणि केवळ ६.३ सेकंदांत ० ते १०० किमी/ताशी वेग गाठण्याची क्षमता दर्शवते. त्यामुळे विविध ड्रायव्हिंग परिस्थितींमध्ये झपाट्याने गती आणि अचूक नियंत्रण यांचा उत्कृष्ट समतोल साधता येतो. या मॉडेलमध्ये सहा टेरेन मोड्ससह ऑफ-रोड असिस्ट आणि बूस्ट मोडचा समावेश असून, ड्युअल-मोटर क्वाड-व्हील ड्राइव्ह सिस्टममुळे ट्रॅक्शन आणि स्थिरता अधिक सक्षम होते. परिणामी, विविध भू-प्रदेश आणि प्रत्यक्ष रस्त्यांच्या परिस्थितींमध्ये ही एसयूव्ही आत्मविश्वासपूर्ण आणि दमदार कामगिरी करते.‘फिअरलेस+ क्यूडब्ल्यूडी ७५’ ही पर्सोना आरामदायकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा उत्कृष्ट संगम सादर करते. यात मेमरी फंक्शनसह ६-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट, ४-वे पॉवर्ड को-ड्रायव्हर सीट तसेच फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्सचा समावेश आहे. याशिवाय, ३६०-डिग्री कॅमेरा, जेबीएल ब्लॅक १०-स्पीकर ऑडिओ सिस्टम, आर१९ अलॉय व्हील्स आणि व्हॉईस-असिस्टेड ड्युअल-झोन पूर्णतः ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यांसारखी प्रगत फीचर्स देण्यात आली आहेत. अॅम्बियंट लायटिंग, रियर-रो कम्फर्ट हेडरेस्ट आणि रियर विंडो सनशेड्समुळे दैनंदिन प्रवास अधिक आरामदायी आणि संतुलित अनुभव देतो. ग्राहकांच्या संपूर्ण मनःशांतीसाठी हॅरियर.इव्ही ‘फिअरलेस+ क्यूडब्ल्यूडी ७५’ मध्ये आजीवन बॅटरी वॉरंटी देण्यात आली आहे, ज्यामुळे मालकीचा अनुभव अधिक सुलभ आणि विश्वासार्ह ठरतो. याला मिळालेले ५-स्टार भारत-एनसीएपी प्रमाणपत्र हे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत टाटा मोटर्सच्या ठाम वचनबद्धतेचे प्रतीक आहे.क्वाड-व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञान अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याबाबत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवत्स म्हणाले, “हॅरियर.इव्हीला ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. अवघ्या सहा महिन्यांत १३,००० हून अधिक गाड्यांची डिलिव्हरी करण्यात आली असून, या वाहनाने देशभरात १०० दशलक्ष किलोमीटरहून अधिक अंतर पार केले आहे. ग्राहकांनी ‘कुठेही जाण्याची’ क्षमता प्रत्यक्षात अनुभवली आहे. परफॉर्मन्स एसयूव्ही अधिक आकर्षक आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्याचा आमचा प्रयत्न या यशातून दिसून येतो. ‘फिअरलेस’ पर्सोनामध्ये ड्युअल-मोटर क्वाड-व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञान समाविष्ट करून आम्ही ही सहजप्राप्यता आणखी पुढे नेत आहोत आणि अधिकाधिक ग्राहकांना ‘डिलीट-इम्पॉसिबल’चा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करत आहोत.”हॅरियर.इव्ही आता ७ पर्सोना पर्यायांमध्ये उपलब्ध असून, त्यांच्या किंमती (सर्व किंमती एक्स-शोरूम, संपूर्ण भारतात लागू) पुढीलप्रमाणे आहेत: ऍडव्हेंचर ६५ ची किंमत २१.४९ लाख रुपये आहे, तर ऍडव्हेंचर एस ६५ २१.९९ लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फिअरलेस + ६५ ची किंमत ₹२३.९९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे आणि फिअरलेस + ७५ व्हेरिएंट २४.९९ लाख रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय आणखी एक फिअरलेस + ७५ व्हेरिएंट २६.४९ लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. टॉप लाईनमध्ये एम्पॉवर्ड ७५ ची किंमत २७.४९ लाख रुपये असून, त्याचे आणखी एक व्हेरिएंट २८.९९ लाख रुपयांमध्ये सादर करण्यात आले आहे.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मध्यपूर्वेतील देशांसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान, शेजारी देशांबरोबर राजनैतिक तणाव वाढवत इराणने आता संयुक्त अरब अमिराती (यूएई) कडून अमेरिकन हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मागितली आहे. इराणने संयुक्त राष्ट्र संघ यांच्या महासचिवांना पत्र लिहून अमेरिकन हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीसाठी यूएईकडून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.या पत्रात इराणचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत अमीर सईद इरवानी यांनी आरोप केला आहे की, अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांदरम्यान अमेरिकन सैन्याने संयुक्त अरब अमिरातीची जमीन वापरली. त्यामुळे अमेरिकेकडून झालेल्या हल्ल्यांमुळे इराणचे जे नुकसान झाले, त्याची भरपाई करण्याची जबाबदारी यूएईवर येते, असा दावा त्यांनी केला आहे.इराणचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत अमीर सईद इरवानी यांनी महासचिवांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार इराणला झालेल्या सर्व भौतिक आणि नैतिक नुकसानीची भरपाई देणे संबंधित देशांचे दायित्व आहे.संयुक्त राष्ट्रांमध्ये इराणकडून हे पत्र सात तक्रारींनंतर देण्यात आले आहे. या सात तक्रारींमध्ये इराणने आरोप केला होता की, अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणविरोधातील लष्करी कारवायांमध्ये प्रादेशिक देशांच्या हवाई क्षेत्राचा आणि जमिनीचा बेकायदेशीर वापर केला. दुसऱ्या एका पत्रात इराणने नमूद केले होते की, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकन दलांनी इराणवर हल्ला केला, जो आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करणारा होता. तसेच या हल्ल्यात जॉर्डनसह काही प्रादेशिक देशांच्या जमिनीचा वापर करून अमेरिका-इस्रायलने इराणवर कारवाई केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
मोठी दुर्घटना..! पर्शियन आखातात हेलिकॉप्टर कोसळले; ६ जणांचा मृत्यू, १ जण अद्याप बेपत्ता
Helicopter Crash :
Zeeshan Ansari Gesture : नवनियुक्त प्रभारी कर्णधार इशान किशन आणि युवा फिरकीपटू झीशान अंसारी यांच्यातील वादाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Narendra Modi Record : नरेंद्र मोदींनी भारतीय राजकारणात रचला इतिहास; नावावर केला ‘हा’अनोखा विक्रम
भारतीय राजकारणात एक नवीन इतिहास रचत, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Record) आता देशाचे सर्वाधिक काळ सरकार प्रमुख बनले आहेत.
Pune News : महिला दिनानिमित्त `गौरव तीच्या कर्तृत्वाचा` कार्यक्रम उत्साहात संपन्न
महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. दुधभाते नेत्रालय व आदित्य फाउंडेशन यांच्या तर्फे “गौरव तीच्या कर्तृत्वाचा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कुस्तीप्रेमींच्या उत्सुकतेचा कळस गाठलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना आज म्हणजेच रविवार २२ मार्च रोजी पुण्यातील वाघोली येथे रंगणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ कोण ठरणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.आज मॅट आणि माती अशा दोन गटांत हे अंतिम सामने पार पडणार आहेत. मॅट गटात हर्षवर्धन सदगीर आणि जय पाटील यांच्यात जोरदार लढत अपेक्षित आहे. तर माती गटात सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड आमनेसामने येणार आहेत.विशेष म्हणजे, सिकंदर शेख आणि हर्षवर्धन सदगीर हे दोघेही यापूर्वी ‘महाराष्ट्र केसरी’ किताब जिंकलेले आहेत. त्यामुळे यंदा त्यांच्यापैकी कोणी जिंकल्यास ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होण्याचा मान मिळणार आहे.विजेत्यावर बक्षिसांचा वर्षाव :यंदाच्या विजेत्या मल्लासाठी मोठी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. विजेत्याला मानाची गदा देण्यात येणार असून, याशिवाय आलिशान टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner) कार आणि ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात प्रचंड चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.या भव्य समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते विजेत्याला मानाची गदा प्रदान केली जाणार आहे.
भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा
- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटीभारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा उत्पादन घेण्याचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीपणे गाठला. या यशामुळे ऊर्जा क्षेत्रातील भारताची वाढती आत्मनिर्भरता आणि प्रमुख उद्योगांकरता निरंतर इंधन पुरवठा सुनिश्चित करण्याची देशाची वचनबद्धता अधोरेखित झाली आहे. कोळसा क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्न तसेच सर्व भागधारकांच्या योगदानामुळे भारताला हे यश मिळवता आले आहे.कोळसा उत्पादनाच्या या विस्तारलेल्या आणि शाश्वत स्तरामुळे देशाला ऊर्जेची वाढती मागणी परिणामकारकतेने पूर्ण करणे शक्य झाले आहे. यासोबतच कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा विक्रमी साठा राखण्याच्या दृष्टीने वीज निर्मिती क्षेत्राला पाठबळ देणेही शक्य झाले आहे. या यशातून भारताने कोळसा मूल्य साखळीअंतर्गत साध्य केलेले काटेकोर नियोजन, कार्यक्षम अंमलबजावणी आणि बळकट समन्वयाची प्रचिती आली आहे. यासोबतच देशाच्या आर्थिक विकासाच्या वाटचालीतही या यशाने मोलाचे योगदान दिले आहे.एक स्थिर, पारदर्शक आणि कामगिरीवर आधारित परिसंस्था विकसित करण्याची वचनबद्धता पार पाडण्याच्या दिशेने कोळसा मंत्रालयाची ठोस वाटचाल सुरू आहे. सक्रिय धोरणात्मक उपाययोजना, कामगिरीसंबंधी कठोर देखरेख आणि भागधारकांसोबतचा दृढ संवाद अशा उपाययोजनांच्या माध्यमातून मंत्रालय सर्व क्षेत्रांसाठी कोळशाची विश्वासार्ह उपलब्धता राहील आणि सुरळीत कामकाज होत राहील, याची खातरजमा करत आहे.विकसित भारत २०४७ चा राष्ट्रीय संकल्प प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेनेच हे प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांमधून एक लवचिक ऊर्जा आराखडा तयार करण्याचा, देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्याचा आणि शाश्वत आर्थिक विकासाला गती देण्याचा सरकारचा निर्धार अधिक दृढपणे व्यक्त झाला आहे.
काही दिवसांपूर्वी रणवीरने दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीच्या कांतारा सिनेमातील भूमिकेची नक्कल केली होती. त्यानंतर ऋषभनेही रणवीरने आपल्या देवाचा अपमान केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, आता त्याच ऋषभ शेट्टीने रणवीरचे तोंड भरून कौतुक केले आहे.ऋषभने रणवीरबद्दलचा सगळा राग विसरून त्याच्या ‘धुरंधर 2’ या सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आहे. रणवीर सिंहबद्दलचा सगळा राग विसरून ऋषभने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ‘धुरंधर 2’च्या संपूर्ण टीमसाठी खास पोस्ट लिहिली आहे.ऋषभ शेट्टीने असे केले धुरंधरचे कौतुक :‘धुरंधर: द रिव्हेंज’चा पहिला सीन तुम्हाला अशा पद्धतीने कथेत खेचतो की तुम्ही त्यातून बाहेर पडूच शकत नाही. सिनेमातील प्रत्येक फ्रेम ही जणू युद्धाच्या नगाऱ्यासारखी वाटते. हा फक्त सीक्वेल नाही, तर हे एक विधान आहे. अप्रतिम कथाकथन, आदित्य भावा.. खरंच त्यातील बारकावे खूप आवडले. आर. माधवन सर, अर्जुन रामपाल, रणवीर सिंह, राकेश बेदी, सारा अर्जुन आणि संजय सर... प्रत्येक कलाकाराने सर्वोत्कृष्ट परफॉर्म केलं आहे, मान झुकवून मी त्यांचा सन्मान करतो. विकाश नवलखा यांनी नेत्रदीपक दृश्ये टिपली आहेत आणि संगीताच्या माध्यमातून चित्रपटाला इतक्या प्रभावीपणे एका वेगळ्याच उंचीवर नेणाऱ्या तंत्रज्ञांचं विशेष कौतुक,’ अशा शब्दांत ऋषभने संपूर्ण टीमची पाठ थोपटली आहे.#DhurandharTheRevenge the very first scene pulls you in and never lets go. Every frame hits like a war drum.This isn’t just a sequel; it’s a statement. Brilliant storytelling, brother absolutely loved the detailing, @AdityaDharFilms.Top-notch performances by every single… pic.twitter.com/ugT7KkksMJ— Rishab Shetty (@shetty_rishab) March 21, 2026ऋषभच्या या पोस्टवर आदित्य धरने प्रतिक्रिया देत ‘तुझ्याकडून हे शब्द ऐकणं म्हणजे माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे भावा. कांताराचा मी खूप मोठा चाहता असून तुझे शब्द माझ्यासाठी आणखी खास ठरले आहेत. मी कृतज्ञ आहे’, असं आदित्यने लिहिलं आहे.
KC Tyagi:
Mrunal Thakur : पेड्डी चित्रपटात मृणाल ठाकूरचा कॅमिओ? नवीन अपडेट समोर
Mrunal Thakur : पेड्डी चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून, अभिनेत्री मृणाल ठाकूरचा कॅमिओ असू शकतो.
Manipur News : कुकी समुदाय प्रथमच वाटाघाटीच्या टेबलावर; मणिपूरमध्ये शांततेच्या आशा पल्लवित
Manipur News : मणिपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जवळपास तीन वर्षांपासून सुरू असलेल्या वांशिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंग यांनी शनिवारी गुवाहाटी येथे कुकी-झो कौन्सिलच्या शिष्टमंडळासोबत एक तासभर बैठक घेतली. या बंद दाराआड झालेल्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. मे २०२३ मध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर मणिपूर सरकारचे प्रमुख आणि कुकी-जावा समुदायाच्या सर्वोच्च […]
Shakira Indian concert : शकीराचा भारतातील कॉन्सर्ट रद्द; काय आहे नेमकं कारण?
Shakira Indian concert : ग्रॅमी पुरस्कार विजेती जागतिक पॉप गायिका शकीराचा भारतातील कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे. इराण व इस्रायल यांच्यातील सध्याच्या संघर्षामुळे हा कॉन्सर्ट आयोजित केला जाणार नाही, अशी माहिती आयोजकांनी सोशल मीडियावर दिली आहे. ‘फिडिंग इंडिया कॉन्सर्ट’ उपक्रमाचा एक भाग म्हणून, Zomato आणि District यांच्या संयुक्त विद्यमाने शकीराच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. […]
पंतप्रधान मोदींचा विक्रम, सर्वाधिक ८९३१* दिवस सरकार प्रमुख
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारचे नेतृत्व करत सार्वजनिक पदावर दीर्घकाळ काम करण्याचा नवा विक्रम केला आहे. त्यांनी सलग ८९३१ दिवस सार्वजनिक पदावर राहून सरकारचे नेतृत्व केले आहे आणि करत आहेत. याआधी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांनी ८९३० सार्वजनिक पदावर राहून सरकारचे नेतृत्व करण्याचा विक्रम केला होता.A milestone rooted in service, hard work and unwavering commitment.Today, PM @narendramodi Ji surpasses the 8,930-day record of former Sikkim CM Pawan Kumar Chamling, becoming the longest-serving head of a government in India.PM Modi Ji's 8,931 days in public life, first as…— Amit Shah (@AmitShah) March 22, 2026नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ७ ऑक्टोबर २००१ रोजी पहिल्यांदा पदभार हाती घेतला आणि मे २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. नंतर २६ मे २०१४ रोजी त्यांनी देशाचे १४ वे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला, तेव्हापासून ते देशाचे नेतृत्व करत आहेत. मोदींनी ७ ऑक्टोबर २००१ पासून आतापर्यंत ८९३१ दिवस सार्वजनिक पदावर राहून सरकारचे नेतृत्व केले आहे आणि करत आहेत.मागील काही वर्षांत पंतप्रधान मोदींनी अनेक राजकीय मापदंड प्रस्थापित केले आहेत. ते गुजरातचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि राज्याचे नेतृत्व करण्याचा सर्वाधिक व्यापक अनुभव असलेले पंतप्रधान आहेत. स्वातंत्र्यानंतर जन्मलेले ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.Prime Minister Shri @narendramodi is now the longest-serving head of a government in India.Pure devotion to the nation and its people defines PM Modi Ji. From his unwavering commitment as the Chief Minister of Gujarat to his dedicated leadership as the Prime Minister, his life… pic.twitter.com/llGPwziZZC— Rajnath Singh (@rajnathsingh) March 22, 2026मोदींचा कार्यकाळ सततच्या निवडणुकीतील यशाने गाजला आहे. पंतप्रधान मोदींनी भारतीय जनता पक्षाला २०१४, २०१९ आणि २०२४ च्या सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिला आणि दोन पूर्ण कार्यकाळ पूर्ण करून तिसऱ्यांदा परतणारे ते पहिले बिगर-काँग्रेसी पंतप्रधान आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यूट्यूबवर ३० दशलक्ष सबस्क्रायबर आहेत. यूट्युबवर सर्वाधिक सबस्क्रायबर असलेल्या नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी जगात अव्वलस्थानी आहे. पंतप्रधान मोदींचे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर १० कोटींपेक्षा जास्त आहेत. तसेच पंतप्रधान मोदींचे एक्स अर्थात ट्विटरवरील फॉलोअर १० कोटी सहा लाखांपेक्षा जास्त आहेत. लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असलेल्या नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी जगात अव्वलस्थानी आहेत.
Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते'दावे
भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या भूमीवरून इराणवर हल्ला करण्यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा पूर्णपणे भ्रामक आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत फॅक्ट-चेक विभागाने सांगितले की, भारत कोणत्याही देशाला आपल्या भूमीचा वापर तिसऱ्या देशावर लष्करी कारवाईसाठी करू देत नाही. अशा प्रकारच्या बातम्यांचा वास्तवाशी कोणताही संबंध नसून नागरिकांनी अशा अफवांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.हा दावा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील एका पोस्टद्वारे समोर आला होता. त्या पोस्टमध्ये अमेरिकेने पश्चिम भारतातून इराणवर बॉम्बहल्ला करण्यासाठी लष्करी संसाधनांच्या वापराची परवानगी मागितल्याचा उल्लेख करण्यात आला होता. या दाव्याला भारत-अमेरिका दरम्यान झालेल्या एलईएमओए (Logistics Exchange Memorandum of Agreement) कराराशी जोडून दाखवण्यात आले.तज्ज्ञांच्या मते, एलईएमओए हा २०१६ मध्ये भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेला एक लॉजिस्टिक सहकार्य करार आहे. या कराराचा उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये सहकार्य वाढवणे हा आहे. या अंतर्गत दोन्ही देश एकमेकांच्या लष्करी तळांचा वापर इंधन भरणे, दुरुस्ती, रसद पुरवठा, संयुक्त सराव आणि मानवीय मदत यासाठी करू शकतात.मात्र, एलईएमओए करार कोणत्याही प्रकारच्या आक्रमक लष्करी कारवाईसाठी किंवा तिसऱ्या देशावर हल्ला करण्यासाठी परवानगी देत नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. हा करार केवळ सहाय्यक स्वरूपाचा असून त्याचा वापर परस्पर संमतीने आणि आवश्यकतेनुसारच केला जातो.परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावरील अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत स्रोतांवरच अवलंबून राहावे.
आसाममध्ये पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवादी हल्ला
तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री दोन नंतर दहशतवाद्यांनी हल्ला सुरू केला. दहशतवाद्यांनी कॅम्पला लक्ष्य करून मॉर्टरद्वारे पाच आरपीजी गोळे डागले. यातील चार गोळे कॅम्पच्या आत फुटले. या हल्ल्यात कॅम्पमधील चार जवान जखमी झाले. जखमी कमांडोंवर कॅम्पमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जवान जखमी होण्याव्यतिरिक्त कॅम्पमध्ये आणखी काही नुकसान झाले आहे की नाही हे अद्याप समजलेले नाही. पोलीस कमांडो कॅम्पवरील हल्ल्याचा तपास सुरू आहे.तिनसुकियाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मयंक कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे एक पथक घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हल्ल्यानंतर तिनसुकिया जिल्हा आणि अप्पर आसामच्या इतर भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.याआधी ऑक्टोबर २०२५ मध्ये दहशतवाद्यांनी तिनसुकियातील काकोपाथर येथील भारतीय लष्कराच्या छावणीवर गोळीबार केला होता, ज्यात तीन जवान किरकोळ जखमी झाले होते. मध्यरात्रीच्या सुमारास हल्लेखोरांनी एका धावत्या वाहनातून छावणीवर गोळीबार केला होता. लष्कराने तात्काळ प्रत्युत्तर दिले होते. पण हल्लेखोर वाहनातून सुसाट वेगाने पळून गेले होते. बंदी घातलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम-इंडिपेंडंट या दहशतवादी गटाने लष्करी छावणीवर हल्ला केला होता. आता पोलिसांच्या कॅम्पवर झालेल्या हल्ल्यातही बंदी घातलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम-इंडिपेंडंट या दहशतवादी गटाचाच हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.आसामध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात ९ एप्रिल रोजी मतदान होईल आणि ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आसामच्या नागरिकांमध्ये दहशत पसवण्याच्या उद्देशानेच पोलीस कमांडो कॅम्पवर हल्ला करण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Dhurandhar 2 : धुरंधर २ खरचं ठरला धुरंधर, बॉक्सऑफिसवर ओलांडला ५०० कोटींचा टप्पा
अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर २ ने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला असून या सिनेमानं बॉक्स ऑफिसचे सगळेच रेकॉर्ड मोडित काढत ऐतिहासिक अशी विक्रमी कमाई केली आहे. नुकताच ३०० कोटीचा टप्पा पार केल्यानंतर आता धुरंधर २ सिनेमानं ५०० कोटी क्लबमध्ये जबरदस्त एन्ट्री केली आहे.रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं अवघ्या ३ दिवसातचं जगभरात ५०१.०४ कोटींची कमाई केली आहे. तर, भारतात धुरंधर सिनेमानं ३३९.३७ चं नेट कलेक्शन आणि ग्रॉस कलेक्शनमध्ये ४०४.५०४ कोटींचं कलेक्शन केलं आहे.धुरंधर २ सिनेमाचं दमदार बॉक्स ऑफिस कलेक्शनधुरंधर २ सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर पेड प्रिव्ह्यूजमध्ये ४३ कोटीचं कलेक्शन केलं असून रिलीजच्या पहिल्या दिवशी १०२.५५ कोटींची कमाई केली असून दुसऱ्या दिवशी धुरंधर २ सिनेमानं ८०.७२ कोटींची कमाई केली आहे. तर, तिसऱ्या दिवशी धुरंधर २ सिनेमानं ८०.७२ कोटींची कमाई केली आहे.धुरंधर २ सिनेमाच्या या ऐतिहासिक विक्रमी बॉक्स ऑफिस कलेक्शनमुळे धुरंदरची क्रेझ संर्पूण जगभरात असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, बॉलिवूडमध्येही अनेकजण धुरंधर २ सिनेमाचं भरभरून कौतुक करत आहेत.
Riteish Deshmukh : रितेश देशमुखकडून रणवीर सिंहच्या ‘धुरंधर २’ चित्रपटाचे कौतुक
Riteish Deshmukh : रितेश देशमुखने ‘धुरंधर २’ पाहिल्यानंतर इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली.
विमान प्रवास महागणार? देशांतर्गत भाड्यावरील मर्यादा हटवण्याचा केंद्राचा निर्णय
मुंबई : देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत विमान भाड्यांवरील तात्पुरती मर्यादा हटवण्याचा निर्णय घेतला असून, सोमवारपासून विमान कंपन्यांना तिकीट दर स्वातंत्र्याने ठरवता येणार आहेत. वाढत्या परिचालन खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.डिसेंबर २०२५ पर्यंत लागू असलेली भाड्याची मर्यादा काही महिन्यांपूर्वीच लागू करण्यात आली होती. विमानसेवेत मोठ्या प्रमाणावर व्यत्यय आल्यामुळे तिकीट दरात अचानक वाढ झाली होती, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने ही मर्यादा घातली होती.आता ही मर्यादा हटवल्यामुळे, विमान कंपन्यांवर असलेले कमाल भाड्याचे बंधन राहणार नाही. पूर्वी अंतरानुसार इकॉनॉमी क्लासच्या एकेरी तिकिटासाठी सुमारे १८,००० रुपयांची मर्यादा होती. मात्र, आता कंपन्या मागणी, हंगाम आणि बाजारातील परिस्थितीनुसार दर निश्चित करू शकतील.नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, जास्त मागणी, आपत्कालीन परिस्थिती किंवा सेवा व्यत्ययाच्या काळात अवाजवी भाडेवाढ झाल्यास त्यावर लक्ष ठेवले जाईल. गरज भासल्यास पुन्हा भाडे नियंत्रण लागू करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, विमान इंधन (एटीएफ) दरवाढ आणि जागतिक भू-राजकीय तणावामुळे विमान कंपन्यांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे उद्योगाला काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी आणि बाजारातील स्थिती पूर्ववत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.वाढत्या आर्थिक दबावामुळे विमान कंपन्यांकडून ही मर्यादा हटवण्याची मागणी सातत्याने होत होती. Federation of Indian Airlines या उद्योग संघटनेनेही भाडे मर्यादेमुळे महसुलावर परिणाम होत असल्याचे सांगत सरकारकडे ही मर्यादा हटवण्याची मागणी केली होती.
तिबेटशी व्यापार करणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी
पिथोरगड : भारतीय व्यावसायिक जून २०२६ पासून तकलाकोटमधील कायमस्वरुपी दुकानांतून तिबेटशी थेट व्यापार करू शकणार आहेत. यासाठी भारतीय व्यावसायिकांना पिथोरगड जिल्हा मुख्यालयाच्या माध्यमातून काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. नंतरच भारतीय व्यावसायिक तकलाकोटमधील कायमस्वरुपी दुकानांतून तिबेटशी थेट व्यापार करू शकणार आहेत.भारत आणि तिबेट यांच्यात अनेक वर्षांपासून व्यापार आहे. पण सुरक्षेच्या कारणांमुळे भारतीयांना तकलाकोटमध्ये कायमस्वरुपी दुकानं सुरू करून तिथून व्यापार हाताळण्यास परवानगी मिळत नव्हती. अखेर आता भारतीय व्यावसायिक तकलाकोटमधील कायमस्वरुपी दुकानांतून तिबेटशी थेट व्यापार करू शकणार आहेत.लिपुलेख खिंडीजवळ असलेले तकलाकोट हे उत्तराखंडमधील एक प्रमुख व्यापारी केंद्र आहे. येथे लोकरीचे कापड, मीठ आणि तूप यांसारख्या वस्तूंची खरेदी - विक्री मोठ्या प्रमाणावर होते. आता पिथोरगड जिल्हा प्रशासन तकलाकोट येथे भारतीय व्यावसायिकांना कायमस्वरुपी दुकानांचा पर्याय विकसित करत आहे. या दुकानांद्वारे भारत - तिबेट असा थेट व्यापार होणार आहे. यामुळे भारत - चीन दरम्यानच्या व्यापाराला चालना मिळणार आहे.
Devendra Fadnavis : ‘आम्हीच त्याचा भांडाफोड केला’, खरात प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात गाजत असलेल्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना मोठा खुलासा केला आहे.
Flight Ticket Price: १ एप्रिलपासून विमान प्रवास महागणार ; नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांचे संकेत
Flight Ticket Price: केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी इशारा दिला आहे. १ एप्रिलपासून लागू होणाऱ्या विमान इंधनाच्या (एटीएफ) दरवाढीमुळे विमान कंपन्यांवरील आर्थिक दबाव वाढू शकतो.
MHADA Lottery: मुंबईसह ठाण्यात बंपर लॉटरी, पाच हजार घरांची लॉटरी कोणत्या प्राईम लोकेशनवर?
मुंबई: मुंबई-ठाणे या शहरात हक्काचे घर घेणे सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे मात्र याच शहरात तुमचं घर होणारं. म्हाडाकडून तब्बल पाच हजार घरांसाठी काही दिवसांत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. यात नक्की मुंबई आणि ठाणे किती घरांचा समावेश असेल आणि कोणत्या प्राईम लोकेशनवर असतील याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.म्हाडा दर वेळी सर्वसामान्यांचे हक्काच्या घरांच स्वप्न पूर्ण करतो. आताही ही संधी मिळणार आहे. त्यासाठी म्हाडा मुंबईतील २८०० ते ३००० घरांच्या विक्रीसाठी मार्चच्या शेवटच्या आठड्यात किंवा एप्रिल सुरुवातीस जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या तयारीत आहे.यासाठी मुंबई मंडळाकडून सध्या घरांची जमवाजमव तसेच किंमती निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. यातील घरांच्या किंमती ठरल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.म्हाडाच्या लॉटरीमध्ये अॅडव्हान्स कॉन्ट्रिब्युशन स्कीम अंतर्गत येणाऱ्या घरांसह पवई, घाटकोप तसेच प्रतीक्षा नगरमधील विखुरलेल्या ६४ घरांचा तसेच मुंबई इमारत दुरुस्ती तसेच पुनर्रचना मंडळाकडून मिळालेल्या १४३ घरांचाही समावेश असणार आहे. ही घरं लोअर परळ, वडाळा आणि माझगाव या प्राईम लोकेशनवर असणार आहेत.मुंबई शहरापाठोपाठ आता म्हाडाच्या कोकणविभागानेही घरांसाठी लॉटरी काढण्याची तयारी सुरु केलेली आहे. यात लॉटरीसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून घरांची जमवाजमव तसेच किंमती निश्चित करण्यासाठी सुरुवात होईल. तर एप्रिलच्या शेवटापर्यंत सुमारे दोन हजार घरांची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन समोर आले आहे.यात मानपाडा, चितळसर आणि बाळकूम अशा विविध ठिकाणांवरील घरांसह २० टक्के योजनेतील घरांचा समावेशी असणार आहे, अशी सर्व माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ.विशाल राठोड यांनी सांगितली आहे.
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय राजकारणात इतिहास रचला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाच्या कार्यकाळासह, मोदींनी सरकार प्रमुख म्हणून एकूण ८,९३१ दिवस पूर्ण केले आहेत.
लंडन : हाँगकाँग ते लंडन असा प्रवास करत असलेल्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानात सर्व क्रू सदस्यांसह एकूण ३३१ जण प्रवास करत होते. या विमानाने हाँगकाँग येथून उड्डाण केल्यानंतर जेमतेम तासाभरात विमानात बसलेल्या ६० वर्षीय महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. नंतर क्रू सदस्यांनी मृतदेह कापडाने झाकून प्रवाशांच्या आसन व्यवस्थेत एकदम शेवटी ठेवून दिला. काही काळानंतर विमानात हळू हळू दुर्गंधी पसरू लागली. ही दुर्गंधी सहन करत प्रवाशांनी त्यांचा साडेतेरा तासांचा प्रवास केला आणि लंडनच्या विमानतळावर आले. लंडन येथे येताच पोलीस पथकाने विमानात प्रवेश केला. सुमारे ४५ मिनिटे पोलिसांनी विमानातच तपासाचे आणि चौकशीचे काम केले. नंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्रवाशांना विमानातून उतरण्याची परवानगी मिळाली.हाँगकाँगला का परतले नाही विमान ?विमानाने हाँगकाँग येथून उड्डाण केल्यानंतर जेमतेम तासाभरात विमानात बसलेल्या ६० वर्षीय महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती विमानातील सर्व प्रवाशांना तसेच जवळच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. पण विमानातील मृत्यू ही नियमानुसार मेडिकल इमर्जन्सी नाही. जर प्रवाशाची तब्येत बिघडली आहे असे आढळले असते तरच विमान मेडिकल इमर्जन्सी म्हणून जवळच्या विमानतळावर अथवा परत हाँगकाँगच्या विमानतळावर उतरवता आले असते. याच कारणामुळे महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्यानंतरही विमानाने प्रवास पुढे सुरू ठेवला.क्रू सदस्यांनी केली चूकक्रू सदस्यांनी मृतदेह कापडाने झाकून प्रवाशांच्या आसन व्यवस्थेत एकदम शेवटी ठेवून दिला. पण त्या भागातील काचेच्या बंद खिडक्यांना आतल्या बाजूस असलेले प्लॅस्टिकचा दार लावून घेण्यास क्रू सदस्य विसरले. यामुळे प्रवासादरम्यान मृतदेहावर उन्हाचा कवडसा पडला आणि हळू हळू मृतदेह सडून त्यातून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली.नियम काय सांगतात ?विमान प्रवासात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास क्रू सदस्यांनी मृतदेह कापडाने झाकून प्रवाशांची कमीत कमी वर्दळ असलेल्या भागात ठेवावा. अथवा बॉडी बॅगमध्ये पॅक करून मृतदेह प्रवाशांची कमीत कमी वर्दळ असलेल्या भागात ठेवावा. विमानातील सर्व आसनांवर प्रवासी असतील तर ज्याचा मृत्यू झाला त्या प्रवाशाला कापडाने झाकून अथवा बॉडी बॅगमध्ये पॅक करून त्याच्याच आसनावर ठेवावे.
Pune: हळदीतून केलेल्या नशेचा पर्दाफाश; पोलिसांकडून उच्चभ्रू परिसरातील दोघांना अटक
पुणे: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुण्यातील एका उच्चभ्रू परिसरात घडला आहे. पुणे पोलिसांनी एक मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. या हळदीच्या पाकिटातून 'नशा' विकला जात असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.पुण्यातील उच्चभ्रू बाणेर भागात पोलिसांनी एक ड्रग रॅकेटचा भांडाफोड केला आहे. येथे हळदीच्या पाकिटाच्या आड गांजा विकला जात होता. या प्रकरणात बाणे पोलिसांनी दोन आरोपी अभिषेक बोरसे आणि अक्षय बोरसे या दोघांना अटक केली आहे. यांच्याकडून १६ किलो गांजा ताब्यात घेण्यात आला आहे.पोलिसांकडून १६ किलो गांजा ताब्यातया पाकिटांच्या तपासानंतर पोलिसही हैराण झाले. कारण या पाकिटावर हळद लिहिलं होतं, मात्र प्रत्यक्षात त्या पाकिटांमध्ये गांजा होता. सुरुवातीला पोलिसांनी घटनास्थळावरील तब्बल तीन किलो गांजा जप्त केला. चौकशीदरम्यान आरोपींनी पिंपरी-चिंचवड स्थित आपल्या घरात अमली पदार्थ जमा केल्याचं मान्य केलं आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी छापेमारी करीत १३ किलो गांजा जप्त केला. अशा प्रकारे एकूण १६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.आरोपी एका खासगी कंपनीतील कर्मचारीअटक केलेले दोन्ही आरोपी एका खासगी कंपनीत नोकरी करतात, अशा माहिती समोर आली आहे. तपासानुसार, हळदीच्या पाकिटाचा वापर करीत गांज्याची विक्री करीत होते. या प्रकरणात बाणेर पोलीस पुढील तपास करत आहेत.
भारताच्या सागरी सार्वभौमत्वाच्या क्षेत्रातील निर्णायक क्षण, असे वर्णन करता येईल, अशा शानदार समारंभात, भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका, तारागिरी (एफ ४१) येत्या ३ एप्रिल २०२६ रोजी, नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशाखापट्टणम इथे हा सोहळा होणार असून, भारतीय नौदलाला, सर्व दृष्टीने आत्मनिर्भर बनवण्यासाठीच्या प्रवासातला हा एक महत्वाचा टप्पा असेल.प्रकल्प 17 A श्रेणीतील, चौथी युद्धनौका असलेली ‘तारागिरी’, केवळ एक नौका नाही, तर भारताच्या ‘मेक इन इंडिया’ या दृढनिश्चयाचे, आणि भारतीय जहाजबांधणी केंद्राच्या अद्ययावत स्वदेशी अभियांत्रिकी कौशल्याचे ६,६७०टन वजनाचे ते एक मूर्तिमंत प्रतीक आहे.मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स इथे तयार करण्यात आलेली ही युद्धनौका, या श्रेणीतल्या आधीच्या नौकांच्या संरचनेपेक्षा कितीतरी अत्याधुनिक, सरस असून, पुढच्या पिढीतले तंत्रज्ञान त्यात आहे. आकाराने छोटी, आणि लक्षणीयरित्या, छोटे रडार क्रॉस सेक्शन असलेल्या या युद्धनौकेची प्राणघातक स्टेल्थ क्षमता आहे. याच्या बांधणीत, ७५ टक्क्यांपर्यंत, स्वदेशी तंत्रज्ञान असून, देशांतर्गत औद्योगिक व्यवस्थेत झालेल्या विकासाचे चित्रही या बांधणीतून ठळकपणे अधोरेखित होते. देशभरातील २०० पेक्षा अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, सरकारच्या आत्मनिर्भर अभियानात आपले योगदान देत, अशा स्वदेशी बनावटीत हातभार लावत आहेत, ज्यातून, हजारो रोजगारही निर्माण होत आहेत.डिझेल किंवा गॅस अशा दोन्ही इंधनावर चालणाऱ्या (CODOG) प्रॉपल्शन प्लांट’ने प्रणित, तारागिरी युद्धनौका, ‘उच्च जलद गती- समुद्रात तग धरण्याची उच्च क्षमता’ असलेली आहे. तिला बहुविध आणि बहु आयामी सागरी कारवाया करण्यास सक्षम बनवण्यात आले आहे. या नौकेवर, जागतिक दर्जाची, सुपरसॉनिक जमिनीवरून-जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे, मध्यम पल्ल्याची जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि विशेष, पाणबुडी-रोधी युद्ध क्षेपणास्त्रे अशी शस्त्रे तैनात आहेत.या सर्व प्रणाली अत्याधुनिक प्रतिकार व्यवस्थापन प्रणाली (कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टिम) द्वारे एकत्रित करण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे जहाजावरील जवान, कोणतेही धोके अथवा हल्ल्यांचा तत्काळ अचूक प्रतिकार करु शकतील.समुद्रातील एक शिकारी जहाज, एवढीच तारागिरीची मर्यादित भूमिका नसेल, तर राजकीय मुत्सद्देगिरीच्या वेळी, तसेच मानवी संकटांच्या काळातही मदत करण्यास ती सुसज्ज आहे. तिची लवचिक कार्यक्षमता, तीव्र अशा युद्धासाठी सज्ज असण्यासोबतच, आपत्ती निवारण आणि इतर मानवी संकटात मदतीसाठी एक आदर्श युद्धनौका म्हणून उपयुक्त ठरणारी आहे.भारतीय नौदल एक सामरीक, सुसंघटित, विश्वासार्ह आणि आत्मनिर्भर शक्ती म्हणून सातत्याने विकसित होत आहे. विकसित आणि समृद्ध भारतासाठी स्वदेशी बनावटीच्या, भारतीयांनीच संचलित केलेल्या युद्धनौकांच्या मदतीने हे नौदल आपल्या सागरी सीमांचे संरक्षण करत आहे.भारतीय नौदलाच्या उदयास येणाऱ्या सागरी शक्तीचे प्रतीक आणि आपल्या सागरी सीमांची संरक्षक म्हणून, तारागिरी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज आहे.
Rohit Pawar : 'हा निर्णय सर्वस्वी मा. सुनेत्राकाकींना घ्यायचाय आणि त्या योग्य निर्णय घेतील, ही अपेक्षा'
Donald Trump on Robert Mueller: अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) माजी संचालक रॉबर्ट म्यूलर यांचे निधन झाले आहे, मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निधनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
माझी कहाणी एका सामान्य स्पोर्ट्स प्रशिक्षकाची नाही, तर त्या वडिलांची आहे, ज्यांनी आपली दोन्ही आंतरराष्ट्रीय खेळाडू मुले गमावली… पण खेळ आणि स्वप्नाला मरू दिले नाही. 2004 मध्ये राष्ट्रीय विजेती तिरंदाज मुलगी वोल्गा एका रस्ते अपघातात गेली. अकादमी बंद पडली. कुटुंब विस्कळीत होऊ लागले. त्यानंतर मुलगा लेनिनने MBBS सोडून धनुष्य उचलले - स्वतःसाठी नाही, तर माझ्या आणि त्याच्या बहिणीच्या अपूर्ण स्वप्नासाठी. हळूहळू तो आंतरराष्ट्रीय खेळाडू बनला, प्रशिक्षक बनला आणि अकादमीला पुन्हा उभे केले. पण 2010 मध्ये, ज्या दिवशी त्याला राज्य सन्मान मिळाला, त्याच दिवशी परत येताना वाटेत एका रस्ते अपघातात त्याचाही मृत्यू झाला. नंतर, 55 वर्षांच्या वयात मी पुन्हा वडील झालो. मुलगी शिवानी जन्माला आली. मी दोन वर्षांच्या वयातच तिच्या हातात धनुष्य दिले. आज ती देखील आंतरराष्ट्रीय खेळाडू बनली आहे. आता मी हेच सांगेन- ‘माझा मुलगा लेनिन गेला नाही… तो शिवानीच्या रूपात जिवंत आहे.’ मी सत्यनारायण चेरूकुरी आहे. 'चेरूकुरी वोल्गा आर्चरी अकादमी' चालवतो. 1959 मध्ये आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील नंदीवाडा गावात माझा जन्म झाला. आम्ही एकूण पाच भावंडं होतो - दोन भाऊ आणि तीन बहिणी. वेळेनुसार सर्वजण सोडून गेले... आणि आता मीच एकटा उरलो आहे. त्यावेळी आमचा परिसर दरवर्षी पुराशी झुंजत होता. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबासाठी परिस्थिती सोपी नव्हती - दरवर्षी काहीतरी उद्ध्वस्त होत असे. याच कारणामुळे, 1964 मध्ये माझ्या आजीच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब विजयवाडा येथे आले. येथे परिस्थिती थोडी सुधारली. आजीने वडिलांना एक बैलगाडी घेऊन दिली, ज्यामुळे त्यांनी सामान वाहून नेण्याचे काम सुरू केले. घर चालू लागले. वडील फक्त शेतकरी किंवा मजूर नव्हते, त्यांना नाचण्याचाही छंद होता. कदाचित तिथूनच माझ्यामध्ये कला आणि खेळ या दोन्हीचे बीज रुजले. वडिलांना वाटत होते की मी कुचिपुडी नर्तक व्हावे. त्यांच्या सांगण्यावरून मी रीतसर नृत्य शिकायला सुरुवातही केली. या वेळेपर्यंत आंध्रमध्ये नृत्यातही माझी एक ओळख निर्माण झाली होती. सर्व काही ठीक चालले होते, पण तेव्हाच लग्न झाले… आणि मग हळूहळू नृत्य सुटले. आयुष्याने जणू त्या वळणावर एक वेगळी दिशा घेतली. नृत्य सुटल्यानंतर माझा कल विद्यार्थी राजकारणाकडे वाढला. त्या काळात मी सीपीआयच्या विद्यार्थी संघटना एआयएसएफ म्हणजेच ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनशी जोडलो गेलो आणि संघटनेच्या कामात सतत सक्रिय राहिलो. याच संदर्भात मला दीर्घकाळ रशियात राहण्याची संधी मिळाली. रशियात विचार बदलणारा काळ होता. तिथे मी लेनिन यांना वाचले आणि हळूहळू त्यांच्या प्रभावाखाली येत गेलो. तिथे अनेकदा म्हटले जायचे की 'लेनिन' म्हणजे लिहिणारे पेन. त्याच वेळी मनात एक गोष्ट बसली – जर कधी मुलगा झाला, तर त्याचे नाव लेनिन ठेवीन. काही वर्षांनी जेव्हा मी भारतात परतलो, तेव्हा आयुष्य पुन्हा सामान्य मार्गावर आले. आधी मला मुलगी झाली. तिचे नाव मी वोल्गा ठेवले आणि तिच्या दीड वर्षानंतर मुलगा झाला. त्याचे नाव लेनिन ठेवले. इकडे, पक्षाच्या कामाच्या निमित्ताने माझे जंगलात आणि आदिवासी भागांतही येणे-जाणे असे. अनेकदा तिथे दिवसेंदिवस थांबावे लागे. तिथेच मी पहिल्यांदा तिरंदाजी जवळून पाहिली. हळूहळू मीही बाण चालवायला शिकलो. जेव्हा घरी परतलो, तेव्हा वाटले की जे शिकलो आहे, ते पुढे नेले पाहिजे. मी लेनिनलाही तिरंदाजी शिकवण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी त्याची रुची कुचिपुडी नृत्यात जास्त होती. तो त्याचमध्ये रमलेला असे. हो, अधूनमधून हौस म्हणून बाण हातात घेत असे. पण एक गोष्ट स्पष्ट होती - लेनिनच्या जन्मासोबतच मी एक स्वप्न पाहिले होते की त्याला तिरंदाजीमध्ये पुढे घेऊन जायचे आहे. फक्त खेळण्यापुरते नाही, तर एक दिवस त्याला आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून पाहायचे आहे. याच विचाराने 1997 मध्ये मी सहा मुलांसोबत ‘कृष्णा डिस्ट्रिक्ट आर्चरी अकादमी’ सुरू केली. लेनिन आणि वोल्गा - दोघेही तिथेच सराव करू लागले. तथापि, त्यावेळी लेनिनने तिरंदाजीला करिअर बनवण्याचे ठरवले नव्हते. तो नृत्यातही तितकाच गुंतलेला होता. नंतर 2000 मध्ये एक वळण आले. शालेय खेळांमध्ये लेनिनने तिरंदाजीमध्ये राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. इथूनच मी ठरवले - आता त्याला याच क्षेत्रात पुढे न्यायचे आहे. मी त्यावेळी देशातील प्रसिद्ध प्रशिक्षक लिंबा राम आणि मंगल सिंह यांना अकादमीशी जोडले. त्यांना सांगितले - लेनिनला तयार करायचे आहे. प्रशिक्षण सुरू झाले. लेनिननेही स्वतःला पूर्णपणे तिरंदाजीमध्ये झोकून दिले. 2003 पर्यंत तो विद्यापीठाचा विजेता बनला होता. नाव होऊ लागले होते. पण घरामध्ये एक वेगळीच चर्चा सुरू होती. माझी मुलगी वोल्गाला वाटत होते की तिचा भाऊ डॉक्टर व्हावा. दोघांमध्ये फक्त दीड वर्षाचे अंतर होते, पण त्यांचे नाते खूप घट्ट होते. वोल्गाला जे काही हवे असायचे ते ती मला नाही, तर थेट लेनिनला सांगायची. तिला थम्स अप प्यायला खूप आवडायचे. लेनिन तिला नकार द्यायचा, ओरडायचाही… पण नंतर तो स्वतःच जाऊन आणायचा. पॉपकॉर्न, चिकन- हे सर्व तोच तिच्यासाठी आणायचा. खरं तर, वोल्गासाठी लेनिन फक्त भाऊ नव्हता- तर तिचा सर्वात विश्वासू साथीदार होता. आणि या काळात वोल्गा स्वतःही मागे नव्हती. 2004 पर्यंत ती अंडर-14, 17 आणि 19 गटांमध्ये खेळली होती. पाच वेळा सुवर्णपदक जिंकले होते. तीरंदाजीमध्ये राष्ट्रीय विजेती होती. घरात एका बाजूला माझे स्वप्न होते- लेनिनने तीरंदाजीमध्ये पुढे जावे आणि दुसऱ्या बाजूला वोल्गाचे स्वप्न- भावाने डॉक्टर व्हावे. दोघे आपापल्या पद्धतीने एकमेकांसाठी जगत होते. लेनिन वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारीही करत होता. तो वोल्गाचे स्वप्न पूर्ण करू इच्छित होता- डॉक्टर बनण्याचे. पण 29 नोव्हेंबर 2004 रोजी अचानक सर्व काही थांबले. दुपारचे साधारण साडेबारा वाजले होते. मी आणि लेनिन स्टेडियममध्ये होतो. मुले सराव करत होती. मी त्यांना बाण पकडण्याची पद्धत समजावून सांगत होतो. सर्व काही सामान्य होते. तेव्हा फोन आला. पलीकडून माझ्या पत्नीच्या रडण्याचा आवाज येत होता. तिने फक्त इतकेच म्हटले- ‘लवकर घरी या… वोल्गा…’ आवाज स्पष्ट नव्हता, पण गोष्ट समजली- काहीतरी गंभीर घडले आहे. मी लेनिनकडे पाहिले आणि म्हटले, ‘चला, घरी जाऊया.’ आम्ही लगेच स्टेडियममधून निघालो. वाटेत मनात एकच प्रश्न होता- काय झाले असेल? घराजवळ पोहोचलो तेव्हा गर्दी दिसली. हृदय धस्स झाले. मी धावत आत गेलो. लेनिन मागे होता. आत पाहिले- वोल्गा जमिनीवर पडली होती. कोणी काही बोलत नव्हते. थोड्याच वेळात स्पष्ट झाले- ती राहिली नाही. कॉलेजमधून स्कूटीवर परत येत होती. घरापासून थोड्याच अंतरावर बसने धडक दिली. जागीच तिचा मृत्यू झाला. सकाळी जाताना फक्त इतकेच म्हटले होते- ‘बाबा, कॉलेजला जात आहे… संध्याकाळी ग्राउंडवर जाऊया.’ ती रोजच्यासारखीच गेली होती. पण त्या दिवशी… ती संध्याकाळ कधीच आली नाही. वोल्गा गेल्यानंतर काहीच समजत नव्हते. अकादमी बंद केली. घरातील वातावरण पूर्णपणे बदलले होते. माझी पत्नी वोल्गाला आठवून-आठवून रडायची. मी त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत होतो, पण मी स्वतःही आतून तुटलो होतो. लेनिन सर्वात जास्त बदललेला दिसत होता. तो जवळजवळ शांत झाला होता. कमी बोलायचा. फक्त कधीकधी विचारायचा- ‘बाबा, हे काय झाले… देवाने दीदीला का नेले?’ या सगळ्यामध्येही लेनिनने तिरंदाजी सोडली नाही. तो सरावासाठी जात राहिला. कदाचित तोच त्याचा आधार होता. काही दिवसांनी त्याचा एमबीबीएसमध्ये प्रवेश झाला. त्याने अभ्यास सुरू केला. पण घरातील शांतता कायम राहिली. जवळपास दोन वर्षे आम्ही पती-पत्नी घरातून बाहेर पडलो नाही. कोणाला भेटलो नाही, बोललो नाही. घरात आधी जे आवाज होते - हसणे, भांडणे, ते सर्व संपले. याच दरम्यान लेनिनने एके दिवशी स्पष्ट सांगितले - ‘बाबा, मी एमबीबीएस करणार नाही. मला तिरंदाजी करायची आहे. आपण पुन्हा अकादमी सुरू केली पाहिजे.’ त्या दिवशी तो आम्हाला अकादमीत घेऊन गेला. पहिल्या दिवशी अकादमीत पोहोचलो तेव्हा सर्व काही सुनसान होते. मैदान रिकामे पडले होते. काही जुने लक्ष्य धुळीत पडले होते. लेनिनने स्वतः जाऊन धनुष्यबाण उचलले. काही मुलांना बोलावले, जे आधी इथे येत होते. हळूहळू ४-५ मुले आली. तो त्यांना रांगेत उभे करत असे, बाण पकडण्याची पद्धत सांगत असे. स्वतः प्रात्यक्षिक दाखवत असे. ‘असे पकडा… लक्ष सरळ ठेवा…’ मी आणि माझी पत्नी एका बाजूला उभे राहून पाहत होतो. थोड्या दिवसांत त्या मैदानात पुन्हा आवाज ऐकू येऊ लागले - बाण लागण्याचा आवाज, मुलांची लगबग. अकादमी पुन्हा सुरू झाली. हळूहळू मुले वाढू लागली… आणि ती जागा पुन्हा जिवंत होऊ लागली. अकादमी पुन्हा सुरू झाली, तेव्हा लेनिनने आणखी एक निर्णय घेतला. तो म्हणाला- आता तिचे नाव ‘वोल्गा आर्चरी अकादमी’ असेल. त्याचा तर्क स्पष्ट होता- ‘वोल्गाला जग ओळखेल. तिचे नाव इथूनच जिवंत राहील.’ आणि त्याच नावाने अकादमी सुरू झाली. यानंतर लेनिन पूर्णपणे यात गुंतला. तो स्वतःही प्रशिक्षण घेत असे आणि लहान मुलांना शिकवत असे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मैदानात असे. हळूहळू परिणाम दिसू लागले. मुले वाढू लागली. जुने खेळाडू परतले. काही नवीन जोडले गेले. अकादमी पुन्हा राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडूंना पाठवू लागली. याच दरम्यान त्याने एक मोठा निर्णय घेतला. एमबीबीएस सोडून दिले. त्याला माहीत होते की, तिरंदाजी माझ्यासाठी फक्त खेळ नाही, तर जीवन आहे. कदाचित त्याला हेही समजले होते की, मी आता एकटा हे सांभाळू शकणार नाही. त्याने कुचिपुडी नृत्यही सोडून दिले. हळूहळू त्याने आपले सर्व मार्ग सोडून एकच दिशा निवडली - तिरंदाजीची. खरं तर, तो फक्त आपले करिअर घडवत नव्हता. तो माझे स्वप्न आणि वोल्गाची आठवण - या दोन्ही गोष्टी सोबत घेऊन चालला होता. 2005 पर्यंत परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. देशाच्या वेगवेगळ्या भागांतून मुले येथे येऊ लागली होती. इकडे, लेनिन स्वतःही पुढे जात होता. केरळमध्ये त्याने राष्ट्रीय विजेतेपद जिंकले. आंध्र प्रदेशसाठी सुवर्णपदक आणले आणि मग- त्याची भारतीय संघात निवड झाली. आता तो फक्त प्रशिक्षकाचा मुलगा नव्हता, तर स्वतः एक उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय खेळाडू बनला होता. मुलीच्या जाण्यानंतर घरात शांतता होती, पण आता पूर्ण लक्ष लेनिनवर होते. तोच आशा होता. तोच आधार. हळूहळू आम्ही तिघे- मी, माझी पत्नी आणि लेनिन वोल्गाच्या आठवणींसोबत तेच स्वप्न जगू लागलो. लेनिननेही स्वतःला पूर्णपणे तिरंदाजीमध्ये झोकून दिले. लहान वयातच त्याची ओळख निर्माण होऊ लागली. फक्त 18 वर्षांच्या वयात तो लेव्हल-3 प्रशिक्षक बनला. तिरंदाजीच्या 'कंपाउंड बो' या तंत्रात त्याची कामगिरी सातत्याने सुधारत गेली. राष्ट्रीय जिंकले, मग आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले. तो सिंगापूरला गेला, तिथे प्रशिक्षण घेतले. तिथल्याच एका प्रशिक्षकाने मला सांगितले होते- 'लेनिन खूप पुढे जाईल.' त्यावेळी ही गोष्ट प्रोत्साहन देत होती… आणि नंतर ती खरीही ठरली. 2010 येईपर्यंत लेनिन एक प्रसिद्ध खेळाडू बनला होता. त्याच वर्षी कॉमनवेल्थ गेम्समध्ये आमच्या अकादमीच्या खेळाडूंनी रौप्य पदके जिंकली. राज्य सरकारने 23 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये त्याला सन्मानित करण्यासाठी बोलावले. कार्यक्रम संपला. मुसळधार पाऊस होता. आम्ही गाडीने विजयवाड्याकडे परत येत होतो. विजयवाड्यामध्ये हजारो लोक त्याच्या स्वागताच्या प्रतीक्षेत होते. संध्याकाळचे साधारण 4:40 वाजले होते. विजयवाड्यापासून काही अंतरावर अचानक समोरून एका ऑटोने यू-टर्न घेतला. लेनिन गाडी चालवत होता. त्याने वाचवण्याचा प्रयत्न केला, ब्रेक दाबला… गाडी उसळली… आणि काही सेकंदात सर्व संपले. लेनिन दूरवर जाऊन पडला. जागीच त्याचा मृत्यू झाला. मी पण जखमी झालो होतो. डोक्याला मार लागला होता, हात मोडला होता… पण त्याहून मोठा धक्का हा होता की ज्या दिवशी त्याला सन्मान मिळाला, त्याच दिवशी तो निघून गेला. माझा 24 वर्षांचा मुलगा, जो देशासाठी खेळत होता… राहिला नाही. त्याने त्याच्या छोट्याशा कारकिर्दीत खूप काही केले होते. राष्ट्रीय विजेता राहिला, भारतीय संघाचा भाग राहिला. रेल्वेमध्ये नोकरी मिळाली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे- अकादमी उभी केली. आता जेव्हा मी अकादमीमध्ये पाहतो, तेव्हा प्रत्येक कोपरा त्याची आठवण करून देतो. तो गेल्यानंतर एका क्षणासाठी वाटले - सर्व संपले. पण मग एक प्रश्न समोर होता - जी मुले येथे शिकत आहेत, त्यांचे काय होईल? मी त्याच दिवशी ठरवले - अकादमी बंद होणार नाही. ज्या दिवशी लेनिनचा मृत्यू झाला… त्याच दिवशी मी अकादमीत गेलो. काम केले. संध्याकाळी मुले माझ्याकडे आली. म्हणाले - ‘सर, आम्ही सर्व लेनिन आहोत… तुम्ही एकटे नाही.’ त्यांचे बोलणे ऐकून वाटले - कदाचित हाच मार्ग आहे. त्या दिवसानंतर अकादमी एका दिवसासाठीही बंद झाली नाही. पण लेनिन गेल्यानंतर पुन्हा माझी पत्नीच मला धीर दिला. ती म्हणाली की आता घरात राहायचं नाहीये. आधी आम्ही अकादमीपासून थोडे दूर राहत होतो. लेनिन गेल्यानंतर मी आणि माझी पत्नी अकादमीमध्येच शिफ्ट झालो. आम्ही इथेच राहू लागलो. पत्नी म्हणाली की अकादमीची मुले आता आमची मुले आहेत. मग वोल्गा आणि लेनिन दोघांच्या नावावर असलेली मालमत्ता मी अकादमीला दिली. लेनिनला जाऊन दीड वर्षांहून अधिक काळ झाला होता. घर आणि अकादमी- दोन्हीही जणू शांत होते. त्याच दरम्यान एक दिवस माझी पत्नी म्हणाली- तिला बाळ हवं आहे. माझे वय 55 वर्षे होते. एका क्षणासाठी वाटले- ही योग्य वेळ आहे का? पण मग वाटले, कदाचित हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे. मी होकार दिला. 2012 मध्ये आमच्या घरी शिवानीचा जन्म झाला. सुरुवातीपासूनच तिच्यात काहीतरी वेगळेपण होते. मी तिला पाहिलं की... मला वारंवार लेनिनची आठवण यायची. हळूहळू ही भावना अधिक तीव्र होत गेली- तिचे हावभाव, चालण्याची पद्धत, खेळण्याची शैली... सर्व काही कुठेतरी लेनिनसारखे वाटत होते. दोन वर्षांची झाल्यावर, मी तिच्या हातात धनुष्य दिले. हा काही ठरलेला निर्णय नव्हता, सहजच. तिने ते पकडले… आणि मग सोडायचेच नाही म्हटले. ती याच अकादमीमध्ये लहानाची मोठी झाली. मैदान, लक्ष्य, बाण - हेच तिचे खेळणे होते. वेळेनुसार तिने स्वतःची ओळख निर्माण करायला सुरुवात केली आहे. आज ती अंडर-9 तिरंदाजीमध्ये देशाची चॅम्पियन आहे आणि अंडर-12 आणि अंडर-14 मध्ये विश्व चॅम्पियन तिरंदाज आहे. अमेरिका आणि जर्मनीमधून लोक तिच्यावर डॉक्युमेंटरी बनवण्यासाठीही आले होते. आता ती पुढील तयारी करत आहे. लक्ष्य आहे - ऑलिम्पिक पदक जिंकणे. मी अनेकदा म्हणतो- मला शिवानी नाही, तिच्यात लेनिन दिसतो. माझी दोन मुले गेली… पण माझ्यासाठी लेनिन कुठेही गेला नाही. तो दररोज इथेच आहे- शिवानीच्या सवयींमध्ये, तिच्या मेहनतीत, तिच्या खेळात. कदाचित म्हणूनच मी आता मागे वळून जास्त पाहत नाही. फक्त एकच गोष्ट मनात राहते- लेनिनचे नाव पुढे न्यायचे आहे. पण यावेळी माझ्यासोबत धक्कादायक गोष्ट घडली आहे. माझ्या अकादमीतून तयार झालेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना काही प्रशिक्षकांनी पैसे देऊन विकत घेतले आहे. त्या चॅम्पियन खेळाडूंनी पैसे घेऊन त्यांना आपले प्रशिक्षक सांगितले आहे, तर त्यांचा प्रशिक्षक माझा मुलगा लेनिन होता. मी या प्रकरणाला न्यायालयात आव्हान दिले आहे. गुरु-शिष्य परंपरेला तोडून काही लोक पैशांसाठी विकले गेले, तेव्हा माझे मन खूप दुखावले. जेव्हा ते मुलाखतींमध्ये लेनिनऐवजी दुसऱ्या कोणाचे नाव घेतात, तेव्हा मला दुःख होते. (सत्यनारायण चेरूकुरी यांनी आपल्या या भावना भास्कर रिपोर्टर मनीषा भल्ला यांच्याशी शेअर केल्या)
Chhota Warkari : “छोटा वारकरी” ॲनिमेशन कॅरेक्टरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
Chhota Warkari :
उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा
मुंबई : उन्हाळ्यातील सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर आणि पुणे – नागपूर या मार्गांवर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर विशेष गाडीच्या दोन फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. गाडी क्रमांक ०१०२१ ही विशेष गाडी ३ एप्रिल २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १२:५५ वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ३:४५ वाजता नागपूर येथे पोहोचेल.परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०२२ ही विशेष गाडी ३ एप्रिल २०२६ रोजी नागपूर येथून रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या विशेष गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबे देण्यात येणार आहेत.गाडीची रचना एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, सहा वातानुकूलित तृतीय श्रेणी, नऊ शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि एक सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन अशी असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.
Mumbai Metro: मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आता मेट्रोमध्ये मोबाईल पूर्णपणे बंद राहणार
मुंबई : मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी एक आश्चर्यजणक बातमी समोर आलेली आहे. आता मेट्रोतून प्रवास करताना तुमचा मोबाईल पूर्णपणे बंद राहणार आहे. सर्व प्रकार समोर येताच प्रवाशांमध्ये गोंधळाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून मेट्रोने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून भुयारी मेट्रोनेही असंख्यजण प्रवास करत आहेत. पण भुयारी मेट्रोच्या दक्षिण मुंबईतील स्थानकांत प्रवाशांना इंटरनेट सेवेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून अजूनही या स्थानकांच इंटरनेट सेवा सुरु झाली नाही. आता दुसऱ्या बाजूला आरे ते बीकेसीपर्यंत सुरु असलेली इंटरनेट सेवाही आता बंद करण्यात आलेली आहे.नेमकं कारण काय?समोर आलेल्या माहितीनुसार,जी इंटरनेटसाठी यंत्रणा उभी करणारे कंत्राटदार होते, त्यातील कंत्राटदराने कंत्राटातील अटी आणि शर्थींचे उल्लंघन केले असल्याने एमएमआरसीएलने हे कंत्राट रद्द केले आहे.मेट्रो ३ आरे ते कफ परेड ही भुयारी मार्गिका ३३.५ किमीची असून ऑक्टोबर २०२४ मध्ये आरे ते बीकेसी हा टप्पा सुरु करण्यात आलेला होता. मग यानंतर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा टप्पा २०२५ मध्ये सुरु करण्यात आला आणि त्यात सर्व भुयारी मार्गिकांमध्ये इंटरनेट सेवा देण्यात आली होती. मात्र आता काही महिन्यात सुरु करण्यात आलेल्या आचार्य आत्रे ते कफ परेड या शेवटच्या टप्प्यात इंटरनेट सेवा सुरु करण्यात आलेली नाही.यावर पर्याय म्हणून लवकरच नव्याने ही यंत्रणा उभारण्यासाठी पुन्हा एकदा निविदा काढली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असणारी संपर्क यंत्रणा भुयारी मेट्रो स्थानकांत उपलब्ध असल्याचे एसएसआरसीएलकडून सांगण्यात आलेले आहे.आरे ते वरळी या पहिल्या टप्प्यातील मेट्रो स्थानकांवर एअरटेल आणि वोडाफोन तसेच जिओचे नेटवर्क प्रवाशांसाठी उपलब्ध होते. परंतू नेटवर्कची यंत्रणा उभारणाऱ्या कंपनीकडून जास्त प्रमाणात शुक्लाची मागणी केली जात असल्याचे कारण देत या कंपन्यांनी माघार घेतल. मग परत काही कंपन्यांची सेवा पुन्हा सुरु करण्यात एमएमआरसीएलला यश आले. मात्र आता ही यंत्रणा उभारणारी कंपनी तसेच सेवा पुरवठादार कंपन्यांमधील मतभेद कायम राहिलेले आहे.
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव आता अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. होर्मुज सामुद्रधुनी जहाजांच्या वाहतुकीसाठी तात्काळ खुली न केल्यास, अमेरिकन वायूसेना इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले करून त्यांना उद्ध्वस्त करेल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, या कारवाईची सुरुवात इराणमधील सर्वात मोठ्या वीज प्रकल्पापासून केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.नेमकं प्रकरण काय?इराण-इस्रायल संघर्ष सुरू झाल्यापासून इराणने आपल्या सागरी हद्दीतील अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेली होर्मुज सामुद्रधुनी बंद ठेवली आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के वाहतूक या मार्गावरून होते. त्यामुळे या मार्गावरील अडथळ्यांमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत.या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ या सोशल प्लॅटफॉर्मवरून इराणला इशारा देत, “४८ तासांत मार्ग खुला करा, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल,” असे स्पष्ट केले आहे.तेल दरांचा भडका उडण्याची शक्यताइराणच्या भूमिकेमुळे जागतिक ऊर्जा बाजारावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेन्ट यांच्या माहितीनुसार, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकेने इराणी तेलावरील काही निर्बंध तात्पुरते शिथिल केले आहेत. यामुळे सुमारे १४ कोटी बॅरल तेल बाजारात येऊ शकते. मात्र, इराणने आपली भूमिका कायम ठेवली, तर लष्करी कारवाई अपरिहार्य ठरू शकते, असे संकेत अमेरिकेकडून देण्यात आले आहेत.इस्रायलचा दावा: संघर्ष अधिक तीव्रदरम्यान, इस्रायलने दावा केला आहे की इराणने प्रथमच लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे. यामुळे संघर्षाचा विस्तार होण्याची भीती वाढली आहे. ट्रम्प यांनीही स्पष्ट केले की, होर्मुज सामुद्रधुनीची सुरक्षा ही केवळ अमेरिकेची जबाबदारी नसून, या मार्गाचा वापर करणाऱ्या इतर देशांनीही यात सक्रिय भूमिका घ्यायला हवी.
Iran Responds Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमला इराण घाबरलेला नाही. उलट, त्याने अमेरिका आणि इस्रायलला धमकी दिली आहे.
Rupali Patil Thombre : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिले असून, या पत्रात त्यांनी रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप केले आहेत.
Jalgaon: प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाला विवस्त्र करुन काढली धिंड; जळगावमधील क्रूर घटना
जळगाव: प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाला नग्न करून बेदम मारहाण करून त्याची गावभर धिंड काढल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यात समोर आला आहे. या घटनेत पोलिसांनी दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. जखमी तरुणाला रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.भुसावळ तालुक्यातील खडका गावातील चेतन दिलीप जंगले या तरुणाने आपल्याच समाजातील धनश्री पाटील या तरुणीशी नाशिक पंचवटी येथे जाऊन प्रेम विवाह केला, मात्र हा विवाह मुलीच्या माहेरच्या लोकांना मान्य नव्हता, विवाह झाल्याच्यानंतर चेतन जंगले हा त्याच्या पत्नीसह त्याच्या नातेवाईकांच्याकडे आल्याची माहिती मुलीच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी खडका गावात जाऊन चेतन जंगले सह त्याच्या पत्नीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांनी त्याला नग्न करून गावात धिंड काढल्याचा ही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यावर गावातील काही जणांनी मध्यस्थी करून त्याची सुटका केली, त्यामुळे अनर्थ टळला असला तरी, या संपूर्ण घटनेने समाज मन सुन्न झाले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,पोलिसांनी तातडीने मारहाण करणाऱ्या दहा बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.तर मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमविवाहाच्या वादातून तरुणाला नग्न करून खांबाला बांधून मारहाण केल्याची ही खळबळजनक घटना भुसावळ तालुक्यात घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गावातील तरुण- तरुणीने १८ मार्च २०२६ रोजी नाशिक येथे प्रेमविवाह केला. विवाहानंतर १९ मार्च रोजी त्यांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात हजर राहून विवाहाची माहिती दिली आणि दोघे जण तरुणाच्या मामाच्या घरी मुक्कामी होते.२० मार्च रोजी तरुणीचे नातेवाइक व इतर १० ते १२ जणांनी तरुणाच्या मामाच्या घरी जाऊन तरुणीला मारहाण करत पळवून नेले. यानंतर संशयितांनी तरुणास खांबाला बांधून नग्न करत, लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी या तरुणाला दुचाकीने त्यांच्या गावातील घरापर्यंत आणत मारहाण केली. त्याच्या आई-वडिलांनाही घर जाळण्याची धमकी दिली. जखमी अवस्थेत तरुणाला जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचा हात फॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींनी केली इराणी राष्ट्राध्यक्षांशी फोनवर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (२१ मार्च) इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत त्यांना ईद आणि नौरोजच्या शुभेच्छा दिल्या. या चर्चेदरम्यान पश्चिम आशियात शांतता, स्थिरता आणि समृद्धी नांदावी, अशी आशा व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट लिहून माहिती दिली आहे.याप्रसंगी दूरध्वनीवर संवाद साधतांना पंतप्रधानांनी इरणमधील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर होत असलेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. असे हल्ले प्रादेशिक स्थिरतेसाठी धोकादायक ठरत असून जागतिक पुरवठा साखळीवरही त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी समुद्री मार्गांची मुक्तता कायम ठेवण्यावरही भर देण्यात आला. व्यापार सुरळीत चालण्यासाठी जलमार्ग खुले आणि सुरक्षित राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी इराण सरकारकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.दरम्यान, नौरोजच्या निमित्तानेही पंतप्रधानांनी नागरिकांना शुभेच्छा देत सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे, अशी कामना व्यक्त केली. नौरोज हा पारशी आणि इराणी समुदायाचा नववर्षाचा सण असून वसंत ऋतूच्या प्रारंभी साजरा केला जातो.
Iran Israel War: इराणचा इस्रायलमधील डिमोना शहरावर हल्ला, मराठी बहुल भागातील ४७ जण जखमी
तेल अवीव: इस्रायल आणि इराणमधील संघर्षाने शनिवारी रात्री एक अत्यंत भयावह वळण घेतले. इराणने डागलेले एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र दक्षिण इस्रायलमधील डिमोना (Dimona) शहरावर कोसळले. इस्रायलमधील हा भाग तिथल्या मोठ्या भारतीय समुदायामुळे 'लिटिल इंडिया' म्हणूनही ओळखले जाते. याच भागात मराठी भाषिकांचे प्रमाण अधिक आहे. या भीषण हल्ल्यात एका १२ वर्षीय मुलासह किमान ४७ जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. इराणने डागलेले मिसाईल इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला रोखण्यास अपयश आले. त्यामुळे आता इस्रायलची हवाई सुरक्षा यंत्रणा कमकुवत झाली का, याची चर्चा सुरू झाली आहे.डिमोना शहरात जवळपास ३० टक्के लोकसंख्या म्हणजे सुमारे ७,५०० भारतीय वंशाचे ज्यू राहतात. यातील बहुतांशी जण जे मूळचे महाराष्ट्रातील आहेत. येथे अनेक घराघरात मराठी बोलली जाते आणि गल्लीबोळात भारतीय खाद्यपदार्थ (सोनपापडी, भेळपुरी, गुलाबजाम) सहज मिळते. इराणचे क्षेपणास्त्र एका कम्युनिटी बिल्डिंगवर पडल्याने आसपासच्या जुन्या घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, सायरेन वाजताच बहुतांश नागरिक सुरक्षित निवाऱ्यात (Shelters) पोहोचल्याने मोठी जीवितहानी टळली.टार्गेटवर कोण?इस्रायलने शनिवारी, इराणच्या नतांझ या अणू प्रकल्पावर हल्ला केला. इराणचं आण्विक केंद्र उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलच्या डिमोना शहरावर हल्ला केला. डिमोना शहरात इस्रायलचा अणू प्रकल्प आहे. इराणच्या हल्ल्यात डिमोना येथील अणू संशोधन केंद्र सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.जखमींची प्रकृती कशी?'मॅगन डेव्हिड ॲडम' (MDA) या आपत्कालीन संस्थेच्या माहितीनुसार,ढिगाऱ्याखाली दबल्याने आणि छर्रे लागल्याने एक १२ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी आहे. ३१ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. १४ जणांना प्रचंड मानसिक धक्क्यामुळे (Anxiety) रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.इस्रायलची हवाई यंत्रणा अपयशी...हवाई संरक्षण यंत्रणा हे क्षेपणास्त्र हवेतच रोखण्यात अपयशी ठरली असल्याची कबुली इस्रायली संरक्षण दलाने (IDF) दिली आहे. इराणने या हल्ल्याला आपल्या 'नतांझ' अणू केंद्रावरील हल्ल्याला 'प्रत्युत्तर' असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, डिमोना येथील अणू संशोधन केंद्र सुरक्षित असून तिथे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) स्पष्ट केले आहे.
Jhimma 3 Film : हेमंत ढोमेचे चाहत्यांना सरप्राइज; नव्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
Jhimma 3 Film: पोस्टरमध्ये सिद्धार्थ चांदेकर एका समुद्रकिनारी डोक्याला हात लावून उभा असलेला पाहायला मिळत आहे.
India LPG Crisis: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे आशियाई देशांना गॅस आणि तेलाच्या तीव्र तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. भारतही एलपीजीच्या संकटाचा सामना करत आहे.
Eknath Shinde : अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी खळबळजनक विधान केले आहे.
Navi Mumbai: शिक्षिकेचं भयंकर कृत्य; दोन विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य
नवी मुंबई: नवी मुंबईतील घणसोली परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेवर तीन विद्यार्थ्यांवर मोबाईल चोरीचा खोटा आरोप करत त्यांच्या पालकांकडून पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे दोन निष्पाप विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला असून, त्यापैकी एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिकेने शाळेत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवर मोबाईल चोरीचा आरोप केला. त्यानंतर विद्यार्थ्यांना वारंवार मानसिक दबावाखाली ठेवत त्यांच्या आईकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर “पैसे दिले नाहीत तर मुलांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही,” अशी धमकीही देण्यात आल्याचे समोर आले आहे. या सततच्या दबावामुळे आणि भीतीमुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला.२ विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊलया मानसिक तणावातून दोन विद्यार्थ्यांनी अत्यंत टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर पालक, नागरिक आणि सामाजिक संघटनांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या मानसिक सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण, धमक्या आणि अन्यायकारक वागणूक यामुळे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याचे हे भीषण उदाहरण मानले जात आहे. या प्रकरणात संबंधित शिक्षिकेवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच शाळा प्रशासनाचीही सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
Nuclear Research Centre: इराणसोबतच्या अमेरिका-इस्रायल संघर्षाला तीन आठवडे उलटले आहेत. तरीही युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही.
Mulshi Water : पुणेकरांना आता मुबलक पाणी? मुळशीचे पाणी देण्यास सरकार अनुकूल
Mulshi Water: पाणी वितरणासाठी पालिकेस लागणार चार-पाच हजार कोटी
Top 10 News: महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरातवर बलात्काराचा गुन्हा दाखल असून त्याची SIT कडून चौकशी केली जात आहे.
Dilip Walse Patil : अध्यात्माच्या नावाखाली कर्मकांड करू नये : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
Dilip Walse Patil : निरगुडसर (ता.आंबेगाव) येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ ग्राम अभियान व पालखी ग्राम प्रदक्षिणा आयोजित कार्यक्रमप्रसंगी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते.
Aspire scheme : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अस्पायर या महत्त्वाकांक्षी संशोधन योजनेचा लाभ घेण्यासाठी लादण्यात आलेल्या ४० वर्षांच्या वयोमर्यादेमुळे शिक्षण वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे. या अटीमुळे केवळ तरुण प्राध्यापकांनाच संधी मिळत असून, प्रदीर्घ अनुभव असणारे ४० वर्षांवरील प्राध्यापक या योजनेपासून वंचित राहात आहेत. संशोधनासाठी वयाचा निकष लावल्याने गुणवत्तेवर मर्यादा येत असल्याची टीका होत असून, […]
Pune District : गॅस टंचाईवर देशी उपाय! गोबरगॅस प्रकल्पांची वाढ; इंधनासोबत खताचाही दुहेरी फायदा
Pune District : शहरांमध्ये गॅस सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लागत असताना, आळेफाटा परिसरातील अनेक शेतकरी घरातील शेण व सेंद्रिय कचर्यापासूनच दररोज गॅस तयार करून स्वयंपाक आणि पाणी तापवण्यासाठी वापरत आहेत.
Pune News : सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मिळकतकर
Pune News : विहित मुदतीत कर भरण्याचे पालिकेचे आवाहन; ३१ मार्चपर्यंत साप्ताहिक सुटीला कार्यालये सुरू
Pune District : चाकणमध्ये गॅस टंचाईचा ‘स्फोट’ ; पुणे-नाशिक महामार्ग रोखत नागरिकांचा संताप उसळला
Pune District : पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी हालचाली करण्यात आल्या, मात्र नागरिकांचा रोष कायम असल्याचे चित्र होते.
लेझर आणि यूव्ही लाइट्सच्या मधोमध मोठ्या आवाजातील संगीतासह दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये रेव्ह पार्ट्या होतात. यामध्ये नशा करणारे चित्रपट तारे ते उच्चभ्रू लोक सहभागी असतात. विशेषतः श्रीमंत घरातील मुले-मुली. अशा पार्ट्यांमध्ये नशेसाठी थायलंडचा गांजा (हायड्रोपोनिक वीड) वापरला जातो. गेल्या 3 वर्षांत याची मागणी खूप वाढली आहे. तस्करांची आंतरराष्ट्रीय टोळी थायलंडमधून याची तस्करी करते. ते दिल्ली, मुंबई, गोवा, पुणे आणि बेंगळुरू यांसारख्या शहरांपर्यंत बिहारमार्गे हे पोहोचवत आहेत. संडे बिग स्टोरीमध्ये वाचा, तस्कर बिहारमार्गे थायलंडच्या गांजाची तस्करी कशी करत आहेत? थायलंडच्या गांजाची मागणी जास्त का आहे? पकडले जाण्यापासून वाचण्यासाठी तस्कर कोणता मार्ग अवलंबत आहेत? सर्वात आधी समजून घ्या, गांजा तस्करीचा मार्ग 14 जानेवारी 2026 रोजी OTT प्लॅटफॉर्म NETFLIX वर अभिनेता इमरान हाश्मीची वेब सिरीज 'तस्करी: द स्मगलर वेब' प्रदर्शित झाली. यात दाखवण्यात आले की, भारतीय एजन्सींच्या कारवाईपासून वाचण्यासाठी तस्करांची टोळी मुंबईसारख्या महानगरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाऐवजी, लहान शहरांतील विमानतळांचा वापर कसा करते. वेगवेगळ्या लोकांद्वारे परदेशातून सोने आणि अंमली पदार्थ आणून रेल्वेद्वारे ठिकाणापर्यंत पोहोचवते. अगदी याच प्रकारचं प्रकरण थायलंडच्या गांजा (हायड्रोपोनिक वीड) तस्करीच्या प्रकरणात समोर आले आहे. थायलंडमधून गांजा विमानातून बिहारमधील गया विमानतळापर्यंत आणला जातो. गया येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथे, दिल्ली किंवा मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळांसारख्या कठोर तपासणीचा अभाव आहे, ज्यामुळे तस्करांना छुप्या पद्धतीने गांजा आणण्यास मदत होते. गया येथे थायलंडमधून मोठ्या प्रमाणावर गांजा मागवला जात आहे. याची पुष्टी गेल्या तीन महिन्यांत डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (DRI) च्या माहितीनुसार गयाजी विमानतळावर कस्टम विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईतून झाली आहे. विमानतळावरून आतापर्यंत दोन वेळा 35 किलो हायड्रोपोनिक वीड जप्त करण्यात आले आहे. याची किंमत 35 कोटींहून अधिक आहे. तस्करीनंतर भारतात थायलंडच्या या प्रीमियम दर्जाच्या गांजाची किंमत 80 लाख रुपयांपासून सुरू होऊन 1.2 कोटी रुपये प्रति किलोपर्यंत आहे. गया येथून ट्रेनद्वारे महानगरांपर्यंत गांजाचा पुरवठा होतो गया विमानतळावर जप्त करण्यात आलेला थाई गांजाचा साठा ट्रेनद्वारे मुंबईला पोहोचवायचा होता. थायलंडहून गयापर्यंत तो वेगवेगळ्या लोकांनी आणला होता. येथून दुसरे लोक ट्रेनने मुंबईला घेऊन जाणार होते. तस्करांच्या कामाची पद्धत दोन प्रकरणांवरून समजून घ्या… प्रकरण 1 : 25 किलो गांजासह 5 जणांना अटक 26 जानेवारी रोजी थायलंडहून आलेल्या एअर एशियाच्या FD-122 विमानाने गयाजी विमानतळावर लँडिंग केले. DRI कडे ठोस माहिती होती. यावर कस्टमच्या पथकाने दक्षता वाढवली होती. विमानातून उतरणाऱ्या 5 प्रवाशांना थांबवण्यात आले. यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिला होत्या. तपास यंत्रणेला चकमा देण्यासाठी हे सर्व वेगवेगळ्या तिकिटांवर प्रवास करत होते. प्रत्येकाकडे 5-5 किलो थाई गांजा होता. एकूण 25 किलो गांजा जप्त करण्यात आला. तो लहान-लहान पाकिटांमध्ये खेळण्यांच्या आत पॅक करून आणला होता. पकडलेल्यांमध्ये उत्तर प्रदेशातील अश्विनी कुमार द्विवेदी, गौरव विधुरी, गुलशन मीना, पंजाबमधील मनप्रीत कौर आणि दिलप्रीत कौर यांचा समावेश होता. तपास पुढे सरकल्यावर हे सर्व एकाच टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या संबंधांचा शोध घेतला जात आहे. अश्विनी टोळीचा म्होरक्या निघाला. आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळीशी त्याचे जुने संबंध असल्याची शक्यता तपास यंत्रणेला आहे. सध्या हे सर्व तुरुंगात आहेत. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 25 कोटी रुपये आहे. केस 2 : 10 किलो गांजा जप्त केस 2: 4 मार्च 2026 रोजी थाई एअरवेजमधून तस्कर येणार असल्याची माहिती मिळाल्यावर कस्टमची टीम सतर्क झाली. थायलंडमधून गांजा घेऊन येणाऱ्या लोकांनी पाहिले की विमानतळाची सुरक्षा वाढवली आहे, कडक तपासणी केली जात आहे, तेव्हा त्यांनी तो (गांजा) बेवारस स्थितीत सोडून दिला आणि पळून गेले. पॅकेटची तपासणी केली असता, त्यात 10 किलो थाई गांजा आढळला. त्याची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे. DRI शी संबंधित सूत्रांनुसार, हे घेऊन दोन लोक विमानाने आले होते. यात एक महिला होती. हे कोण लोक होते? त्यांची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे. प्रत्येक खेपेत नवीन लोकांचा वापर थायलंडमधून गांजाची प्रत्येक खेप नवीन लोक घेऊन येतात. तपास यंत्रणेनुसार, यामागे तस्करांच्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचे धूर्त मन आहे. खरं तर, त्यांचा माल सुरक्षितपणे क्लायंटच्या ठिकाणावर पोहोचावा यासाठी, सर्वप्रथम अशा लोकांचा शोध घेतला जातो ज्यांची प्रवासाची पार्श्वभूमी (ट्रॅव्हल हिस्ट्री) नाही. ज्यांनी परदेशात जास्त प्रवास केला नाही. यामुळे तपास यंत्रणांना चकमा देणे सोपे होते. अशा लोकांना त्यांचे कंसाइनमेंट पोहोचवण्यासाठी मोठी रक्कम दिली जाते. जास्त शिक्षेपासून वाचण्यासाठी लहान खेपेत गांजा आणतात जानेवारी महिन्यात ज्या प्रकारे गयाजी विमानतळावर 5 लोक पकडले गेले आणि सर्वांकडे 5-5 किलो थाई गांजाची खेप मिळाली, तेव्हा तुमच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की, शेवटी प्रमाण कमी का होते? या मौल्यवान गांजाचे प्रमाण प्रत्येक प्रवाशामागे वाढवूनही आणता आले असते. खरं तर, यामागील कारण म्हणजे कायद्यापासून आणि त्याअंतर्गत दिल्या जाणाऱ्या शिक्षेपासून वाचणे आहे. पटना उच्च न्यायालयाचे वकील प्रभात भारद्वाज यांनी सांगितले की, 'भारतात NDPS कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीकडे 20 किलो किंवा त्याहून अधिक गांजा आढळल्यास 10 वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. यापासून वाचण्यासाठी तस्कर लहान-लहान खेपेत गांजा आणतात. अशा परिस्थितीत पकडले गेल्यास त्यांना एक-दोन महिन्यांत किंवा खूप कमी वेळात कोर्टातून जामीन मिळतो. याच कारणामुळे एकाच टोळीचे सदस्य असूनही ते विमानात वेगवेगळ्या तिकिटांवर प्रवास करतात. बिहारमध्ये ईशान्येकडील राज्यांमधून येणाऱ्या गांजाची मागणी गांजा तस्करीचा अनुभव असलेल्या एका व्यक्तीनुसार, गयाजी विमानतळावर जप्त केलेल्या थायलंडमधील गांजाचा वापर बिहारमध्ये होत नाही. येथे त्रिपुरासह ईशान्येकडील भागातून येणाऱ्या देशी गांजाचा वापर होतो. देशी गांजापैकी 'मंदाकिनी'ला सर्वाधिक मागणी आहे. याची किंमत 50 ते 60 लाख रुपये प्रति किलोपर्यंत आहे. बिहारमध्येही चोरून-लपून गांजाची शेती केली जाते. याची किंमत 8 ते 10 हजार रुपये प्रति किलो आहे. थायलंडमधील गांजाबद्दल बोलायचं झालं तर तो प्रीमियम क्वालिटीचा असतो. त्याची सर्वाधिक मागणी उच्चभ्रू लोकांमध्ये आहे. एका महिला टीव्ही कलाकाराकडे हाच गांजा सापडला होता. मुंबई, गोवा, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई आणि पुणे या शहरांसह पंजाबमध्येही याची खूप मागणी आहे. रेव्ह पार्ट्यांमध्ये आणि क्लबमध्ये येणारे उच्चभ्रू लोक याचे वापरकर्ते आहेत. देशी गांज्यामध्ये नशिल्या पदार्थाचे प्रमाण 3 ते 4% असते. थायलंडच्या हायड्रोपोनिक गांज्यामध्ये हे प्रमाण सुमारे 30% पर्यंत असते. याच कारणामुळे तो श्रीमंतांसाठी 'स्टेटस सिंबॉल' बनला आहे. तस्कर ट्रेन आणि मार्ग बदलून जातात गयाजीहून मुंबईसाठी आठवड्यातून फक्त तीन ट्रेन आहेत. यापैकी हावडा ते मुंबई जाणारी सुपरफास्ट ट्रेन दररोज धावते. गयाजीहून लोकमान्य टिळक टर्मिनससाठी आठवड्यातून फक्त एक दिवस (बुधवारी) थेट ट्रेन धावते. तिसरी ट्रेन रांचीहून लोकमान्य टिळकसाठी आहे. गयाजीमध्ये ती गुरुवारी येते. त्याचबरोबर, गयाजीहून दिल्लीसाठी राजधानी एक्सप्रेससह अनेक सुपरफास्ट आणि स्पेशल ट्रेन्स मिळून सुमारे 34 ट्रेन्स धावत आहेत. यापैकी अनेक ट्रेन्स आठवड्यातून एक, दोन आणि तीन दिवस धावतात. सूत्रांनुसार, गांजा आणि सोन्याची खेप घेऊन तस्कर ट्रेन आणि मार्ग बदलूनही जातात. 2022 नंतर वाढलेली तस्करी तपास संस्थेशी संबंधित एका सूत्रानुसार, बिहारमध्ये दारूबंदीनंतर गांजा, चरस आणि ब्राऊन शुगरचा वापर वाढला आहे. यात थायलंडमधून येणाऱ्या गांजाचा समावेश नाही. विमानाने तस्करीचा ट्रेंड निश्चितच वाढला आहे. गयाजी विमानतळाप्रमाणेच, DRI च्या ठोस माहितीवर लखनऊ आणि जयपूरमध्येही आंतरराष्ट्रीय तस्करांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तेथेही थायलंडमधून आणलेल्या गांजाची खेप जप्त करण्यात आली आहे. खरं तर, थायलंडमध्ये 2022 मध्ये गांजाला कायदेशीर मान्यता मिळाली. त्यानंतर तो तिथे सहज उपलब्ध होऊ लागला. याचा पूर्ण फायदा तस्करांनी उचलला. भारतात जास्त किमतीत गांजाच्या प्रीमियम क्वालिटीची तस्करी करू लागले. थायलंडमधील गांजाची गुणवत्ता आणि तस्करीनंतर त्याची किंमत गांजा तस्करीसाठी किती शिक्षा होऊ शकते? जेव्हा एखाद्या अंमली पदार्थाची जप्ती होते, तेव्हा सर्वात आधी त्याचे प्रमाण आणि तो कसा आणला गेला आहे? हे पाहिले जाते. अधिवक्ता प्रभात भारद्वाज यांनी सांगितले की, जर एखादा परदेशी नागरिक अंमली पदार्थ घेऊन येत असेल, तर त्याच्यासाठी NDPS कायद्यांतर्गत कठोर शिक्षेची तरतूद आहे. जर एखादा भारतीय नागरिक तस्करी करून आणत असेल, तर शिक्षेची वेगळी तरतूद आहे.
मुंबईकरांच्या तोंड पाणी पळण्याची भीती, काय आहे कारण..
मुंबई: मुंबईला दरदिवशी होणाऱ्या एकूण पाणी पुरवठ्याच्या निम्म्या पाण्याचे शुध्दीकरण भांडुप संकुलातील जलशुध्दीकरण केले जात असून तिथून मुंबईकरांना याचा पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, धरणातून येणारे पाणी उचलण्यासाठी तसेच मुंबईला पुरवठा करण्यासाठी याठिकाणी असणाऱ्या पंपिंग स्टेशन्समधील चार पंप जुने झाले आहेत. २० हजार पेक्षा अधिक तास या पंपाचा वापर झाल्यामुळे हे कालबाह्य होवू लागले असून भविष्यामध्ये या पंपाची योग्यप्रकारे दुरुस्ती न झाल्यास मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळण्याची शक्यता आहे.मुंबईला दरदिवशी ४१०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत असून त्यातील १९१० दशलक्ष लिटर पाण्यासाठी भांडुप संकुलात पंपिंग स्टेशन कार्यरत आहे. १९७८ ते ८०मध्ये हे पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाले असून तेव्हापासून मुंबईला पाण्याचा पुरवठा करण्याकरता हे पंपिंग स्टेशन २४ तास सुरु आहे. या पंपिंग स्टेशनमध्ये २४६ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे ११ व ८२ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे ३ पंप कार्यरत आहेत. हे ११ हे पंप ६२० किलो वॅट क्षमतेचे आहेत, तर २२० किलो वॅट क्षमतेच्या ३ पंपांचा समावेश आहे. त्यामुळे दिवसाला ७ अधिक २ किंवा जास्तीत जास्त ८ अधिक २ अशाप्रकारे पंप चालवले जातात. तांत्रिक सल्लागारांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक २० हजार तासांनंतर पंपांची मुख्य दुरुस्ती करणे आवश्यक असते. परंतु सध्या वापरात असलेल्या २४६ प्रतिदिन क्षमतेचे २ पंप आणि ८० दशलक्ष लिटर क्षमतेचे २ पंप हे २० हजार पेक्षा अधिक तास उलटून गेलेले आहेत. तसेच यांचा कालावधी पाच वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या पंपांची मुख्य दुरुस्तीचा विचार केला जात असून प्रत्यक्षात या पंपाचा दुरुस्तीनंतर किती फायदा होणार याचाही अंदाज खुद्द महापालिकेच्या अभियंत्यांना नाही. त्यामुळे दुरुस्तीनंतर हे पंप किती चालतील हा प्रश्न असून जर हे पंप बंद पडले तर अतिरिक्त पंप महापालिकेकडे नसल्यामुळे भविष्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण होवू शकते.मुंबईत सध्या अनेक ठिकाणी पाण्याची तीव्र समस्या असून प्रत्येक नगरसेवकाला सध्या पाण्याच्या तक्रारींचा सामना करावा लागतो. त्यामुळे वाढत्या गरमीच्या काळात हे पंप बंद पडल्यास मुंबई महापालिका प्रशासन काय करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Pune District : शिरूर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा
Pune District : विशेषतः नारायणगाव बाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने दर कोसळले असून, अनेक शेतकऱ्यांना वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे. खत, बियाणे आणि मजुरीचा खर्च प्रचंड वाढलेला असताना मिळणारा भाव नगण्य असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Weather Update : अवकाळी पावसानंतर शहरात उकाड्यात वाढ
Weather Update : अवकाळी पावसानंतर शहरातील उकाडा वाढला आहे. गेल्या २४ तासांत कमाल व किमान तापमनात फारसा बदल झाला नसून, ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे दिवसभर उकाडा जाणवत होता. लोहगाव येथे ३५.४, तर अन्य परिसरात ३२ ते ३३ अंशांच्या आसपार कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात कमाल तापमानात एक ते दोन अंशाने […]
Pune District : निमगाव केतकीच्या वाड्याअंधारात; भारनियमनविरोधात ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
Pune District : परीक्षार्थी विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. अंधारामुळे परिसरात चोऱ्यांची भीती वाढली असून, आगामी निमगाव केतकी यात्रा विचारात घेता ही वेळ बदलण्याची मागणी जोर धरत आहे.
Organic Watermelon : कवडीमोल दराने व्यापाऱ्यांकडून खरेदीला शेतकऱ्यांचा नकार; “ना नफा ना तोटा” तत्त्वावर थेट ग्राहकांशी जोडणी
Pune District : अखाड्यातील प्रत्येक डाव जीवनातील संघर्ष आणि यशाचे धडे देणारा असतो. खेळाडूंनी जिंकणे-हरणे यापेक्षा सहभाग, क्रीडाभाव, सातत्य आणि प्रामाणिकपणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
भेंडीबाजारात पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांवरील कारवाई होणार तीव्र
मुंबई: मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत फेरीवाले आणि पदपथांवर करण्यात आलेल्या वाढीव बांधकामांवर कारवाई होत आहे. त्यानुसार भेंडीबाजार, डोंगरी,मस्जिद बंदर, मोहम्मद अली रोड, जे जे रुग्णालय परिसरातही मोठ्याप्रमाणात कारवाईला सुरुवात झाली होती. मात्र,मुस्लिम समाजाच्या धार्मिक सणामुळे काही प्रमाणात संथ झालेली ही कारवाई आता रमझान ईदनंतर अधिक तीव्र केली जाणार आहे. येत्या मंगळवारपासून या भागातील कारवाई पुन्हा एकदा तीव्र करून अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांना पळता भूई कमी करून सोडले जाणार आहे.मुंबईतील फेरीवाल्यांसह अनधिकृत तसेच वाढीव बांधकामांविरोधातील कारवाईचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर अनेक विभागांच्या सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली याबाबतची मोहीम तीव्र करण्यात आली. मात्र, यातील सर्वांत लक्षवेधी कारवाई ठरली ती बी विभागाची. विशेष म्हणजे या मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये मोठ्याप्रमाणात अनधिकृत तसेच वाढीव कामे झालेली आहेत.तसेच फेरीवाल्यांनीही मिळेल ते रस्ते,पदपथ अडवून नागरिकांचे चालणेही कठिण करून सोडले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बी विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी कशाचीही भिडभाड न बाळगता अत्यंत निडरपणे याठिकाणी कारवाईचा सपाटा लावला. सलग आठ ते दहा दिवस कारवाई करून इब्राहिम मोहम्मद अली रोड वरील नारायण धुरू स्ट्रीट, मांडवी, सरदार वल्लभ भाई पटेल रोड, इब्राहिम मोहम्मद मर्चंड रोड, संत तुकाराम रोड, युसूफ मेहरली रोड, लोकमान्य टिळक रस्ता आदी मार्गावरील आणि चौकांमधील रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करतानाच वाढीव बांधकामे तसेच रस्ता अडवून ठेवलेले अनधिकृत स्टॉल्स हटवले. एवढेच नाहीतर त्यानंतर परिसरही स्वच्छ केला. रमजान पूर्वी हा परिसर एकदम स्वच्छ बनवण्यात आला. पण त्यानंतर धार्मिक सणाच्या काळात या समाजाच्या नागरिकांना त्रास होवू नये म्हणून काही प्रमाणात कारवाई संथ केली होती, परंतु आता शनिवारी रमजान ईद झाल्यानंतर आता पुढील आठवड्यापासून ही कारवाई पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणात हाती घेण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांच्या धार्मिक भावना लक्षात येवू ही कारवाई तुर्तास संथ केली होती, परंतु आता सण झाल्यामुळे ही कारवाई हाती घेण्यात येणा असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत बी विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मागील काही दिवसांमध्ये ही कारवाई संथ झाल्याचे दिसून आले असले तरी पुढील आठवड्यात ही कारवाई तीव्र केली जाईल,असे म्हटले आहे.
हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायासाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासा; गॅस टंचाईवर सरकारचा तोडगा पण...
मुंबई: हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायासाठी केंद्र सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या पुरवठ्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला असून, आता राज्यांसाठीचा कोटा थेट ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी २१ मार्च २०२६ रोजी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. मात्र, ही सवलत घेताना काही महत्त्वाच्या अटींचे पालन करणे व्यावसायिकांना बंधनकारक असणार आहे.कसा वाढला गॅसचा कोटा?काही काळापूर्वी राज्यांना केवळ २० टक्के व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा मिळत होता. त्यानंतर १८ मार्च २०२६ रोजी ईज ऑफ डूइंग बिझनेस अंतर्गत यामध्ये १० टक्क्यांची भर टाकून तो ३० टक्क्यांवर नेण्यात आला होता.आता नव्या निर्देशानुसार, २३ मार्च २०२६ पासून आणखी २० टक्के अतिरिक्त कोटा वाढवण्यात आला आहे. यामुळे एकूण गॅस वाटप आता संकटपूर्व काळातील ५० टक्के स्तरावर पोहोचले आहे.कोणाला मिळणार या निर्णयाचा फायदा?या वाढीव ५० टक्के वाटपाचा लाभ देताना सरकारने काही क्षेत्रांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील घटकांचा समावेश असेल:1) शहरातील आणि महामार्गावरील छोटे-मोठे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाबे.2) औद्योगिक कंपन्यांमधील कॅन्टीन आणि फूड प्रोसेसिंग युनिट्स.3) दुग्धशाळा (डेअरी) आणि अन्न प्रक्रिया उद्योग.4) राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या अनुदानित कॅन्टीन.5) कम्युनिटी किचन आणि स्थलांतरित मजुरांसाठी दिले जाणारे 5 किलोचे एफटीएल सिलिंडर.गॅस हवा असेल तर 'ही' अट पाळावीच लागणारसरकारने हा कोटा वाढवला असला तरी त्यासाठी एक महत्त्वाची अट घातली आहे. ज्या व्यावसायिकांना हा ५० टक्के वाढीव कोटा हवा आहे, त्यांना पीएनजी म्हणजेच पाईप्ड नॅचरल गॅस कनेक्शन घेण्यासाठी तयार राहावे लागेल. ज्या भागात सिटी गॅस वितरण नेटवर्क उपलब्ध आहे, तिथे पीएनजी कनेक्शन घेण्यासाठी आवश्यक पावले उचलणाऱ्या ग्राहकांनाच या वाढीव एलपीजी कोट्याचा लाभ दिला जाईल.नोंदणी करणे झाले अनिवार्यआता सर्व व्यावसायिक आणि औद्योगिक गॅस ग्राहकांसाठी पेट्रोलियम कंपन्यांकडे नोंदणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे. ग्राहकांना आपला व्यवसाय कोणत्या क्षेत्रातील आहे, गॅसचा वापर कशासाठी केला जातो आणि वर्षाला साधारण किती गॅसची गरज भासते, याची सविस्तर माहिती कंपन्यांकडे द्यावी लागेल. या माहितीच्या आधारे कंपन्या आपला डेटाबेस तयार करणार आहेत. तसेच, गॅसचा कोणताही गैरवापर किंवा काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही राज्यांना देण्यात आल्या आहेत.परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णयमंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, सध्या हे अतिरिक्त वाटप तात्पुरत्या स्वरूपात वाढवण्यात आले आहे. पुढील काही काळ परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर नवीन अधिसूचना जारी केली जाईल. या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा आधार मिळाला असून, ऐन व्यवसायाच्या काळात गॅस टंचाईची समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
अलाहाबादमधील चकिया. पांढरा कुर्ता, डोक्यावर फेटा, चेहऱ्यावर स्मितहास्य असलेला एक माफिया. धुरंधर-2 हा चित्रपट तुम्हाला सुरुवातीच्या दृश्यांपासूनच थेट यूपीचे माफिया आणि खासदार राहिलेल्या अतिक अहमदच्या काळात घेऊन जाईल. 15 एप्रिल 2023 रोजी पोलिसांच्या सुरक्षा घेऱ्यात अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची हत्या करण्यात आली होती. धुरंधर-2 मधील आतिफ अहमद या पात्रामुळे अतिक अहमद पुन्हा चर्चेत आला आहे. आतिफ अहमदचे संबंध पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI), दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा आणि अंडरवर्ल्डशी जोडलेले दाखवले आहेत. चित्रपटात डिस्क्लेमर असला तरी, आतिफचे पात्र हुबेहूब अतिक अहमदशी जुळते आहे. आम्ही चित्रपटात दाखवलेले आतिफ अहमदशी संबंधित प्रत्येक दृश्य आणि संवाद पाहिले. चित्रपटातील दावे आणि अतिकच्या मृत्यूवरील यूपी पोलिसांच्या तपास अहवाल आणि आरोपपत्रातील तथ्यांशी तुलना केली. चित्रपटात माफिया आतिफची 3 वेळा एंट्रीधुरंधर-2 चित्रपट 3 तास 52 मिनिटांचा आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात 236 कोटी रुपयांची कमाई करून नवा विक्रम केला आहे. सीन: 1 चकियाचा ड्रग्स किंगपहिल्या सीनमध्ये अलाहाबादमध्ये त्याचा दबदबा आणि ड्रग्सचा व्यवसाय दाखवण्यात आला आहे. आतिफ कोणाला भेटायला जात नव्हता, तर लोक त्याच्याकडून चरस, अफू, हशीश आणि टॉर्च पावडरसारखे ड्रग्स विकत घेण्यासाठी अलाहाबादच्या चकियाला येत होते. सीन: २पाकिस्तानशी संबंधदुसऱ्या दृश्यात यूपीचे डीजीपी संजय कुमार यांना दाखवले आहे. हे पात्र माजी डीजीपी प्रशांत कुमार यांच्यासारखे दिसते. या दृश्यात यूपी पोलिसांना पहिल्यांदाच कळते की आतिफचा पाकिस्तानशी संबंध आहे. तो भारतात बनावट चलन आणि अंमली पदार्थांच्या पुरवठ्यात सामील आहे. यूपी पोलिसांना ही गोष्ट कळताच आतिफच्या टोळीवर कारवाई सुरू होते. आतिफ आणि त्याचा भाऊ अशरफ यांना अटक करण्यात येते. चित्रपटातील दावा: 2016 मध्ये झालेली नोटबंदी ISI आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बनावट चलन रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मास्टरप्लान होती. भारतीय सुरक्षा एजन्सीने यूपी पोलिसांना सांगितले की, पाकिस्तानशी संबंधित बनावट चलन रॅकेटमध्ये यूपीचा अतीक अहमद सामील आहे. वास्तविकता: अतीक अहमदशी संबंधित उमेश पाल हत्याकांड आणि शस्त्र तस्करी प्रकरणाची चौकशी प्रयागराज पोलीस आणि UP-STF ने केली होती. अतीकचे परदेशी संबंध असल्यामुळे चौकशीत ATS ला देखील समाविष्ट करण्यात आले होते. 13 जुलै, 2023 रोजी CJM कोर्टात तपास एजन्सीने पहिली चार्जशीट दाखल केली. चार्जशीटमध्ये अतीक अहमदच्या कबुलीजबाब आणि पुराव्यांच्या आधारे सांगण्यात आले की, अतीकच्या IS-227 टोळीचा ISI शी थेट संबंध होता. मात्र, यूपी पोलिसांच्या चार्जशीटमध्ये अतीकशी संबंधित बनावट चलन रॅकेटचा उल्लेख कुठेही केलेला नाही. त्यामुळे, चित्रपटातील अतीकशी संबंधित बनावट चलनाबाबतचा दावा खरा नाही. चित्रपटातील दावा: नोट बंदीपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी उत्तर प्रदेशच्या डीजीपीसोबत मिळून आतिफ अहमदला अटक केली.वास्तव: नोव्हेंबर 2016 मध्ये नोट बंदीच्या वेळी उत्तर प्रदेशचे डीजीपी सय्यद जावेद अहमद होते. त्यांना 1 जानेवारी 2016 रोजी डीजीपी बनवण्यात आले होते. चित्रपटात डीजीपी संजय कुमारचे पात्र उत्तर प्रदेशचे माजी डीजीपी प्रशांत कुमार यांच्यासारखे दिसते. 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी प्रशांत कुमार त्यावेळी डीजीपी नव्हते. प्रशांत कुमार फेब्रुवारी 2024 मध्ये डीजीपी बनले आणि मे 2025 मध्ये निवृत्त झाले. चित्रपटात दाखवलेली टाइमलाइन योग्य नाही. चित्रपटातील दावा: अतीक अहमदचा आयएसआय आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंध होता. तो नेपाळ आणि पंजाबमार्गे भारतात बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या तस्करीमध्ये सामील होता.वास्तव: यूपी पोलिसांनी दावा केला होता की, मृत्यूपूर्वी प्रयागराजमधील शाहगंज पोलीस ठाण्यात चौकशीदरम्यान अतीकने कबूल केले होते की, त्याचा आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाशी संपर्क होता. पोलिसांच्या दाव्यानुसार, अतीक म्हणाला होता- ‘माझ्याकडे शस्त्रांची कमतरता नाही. माझे थेट संबंध आयएसआय (ISI) आणि लष्कर-ए-तैयबाशी आहेत. पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पंजाब सीमेवर शस्त्रे टाकली जातात आणि आयएसआयशी संबंधित लोक त्या ठिकाणी जाऊन शस्त्रे उचलतात. मला आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाशी संबंधित काही लोकांची ठिकाणे माहीत आहेत. माझ्या भाऊ अशरफला इतर लोकांची संपूर्ण माहिती आहे.’ अतीकने पोलिसांना सांगितले की, मला त्या ठिकाणांची माहिती आहे, जिथे ही शस्त्रे लपवून ठेवली आहेत. तिथे कोणतेही घर क्रमांक नाहीत. जर पोलिसांनी मला आणि माझ्या भावाला सोबत नेले, तर आम्ही त्या ठिकाणांची ओळख पटवू शकतो. या कबुलीजबाबानंतर यूपी-एसटीएफ (UP-STF) अतीक आणि अशरफला चकियाच्या कसारी-मसारीच्या जंगलात घेऊन गेली होती. तिथे शस्त्रे लपवली होती. यानंतर दोघांना नियमित वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. इथेच त्यांची हत्या करण्यात आली. अतीकबद्दल यूपी पोलिसांनी केलेला हा दावा कधीही सिद्ध होऊ शकला नाही. जम्मू-काश्मीरचे माजी डीजीपी एसपी वैद्य म्हणतात, ‘अतीक अहमद खासदार असूनही कुख्यात गुंड होता. त्याच्याकडून ब्रिटिश बुलडॉग रिव्हॉल्व्हर 455 बोर आणि एक वॉल्थर पी88 सारखी परदेशी पिस्तूल जप्त करण्यात आली. ही दोन्ही उच्च-प्रोफाइल शस्त्रे आहेत, जी सहज मिळत नाहीत.’ उत्तर प्रदेश पोलिसांचे माजी डीजीपी डॉ. विक्रम सिंह म्हणतात, ‘अतीक अहमदने कबूल केले होते की उमेश पालच्या हत्येमध्ये आयएसआयने पाठवलेली शस्त्रे वापरली गेली होती. ही शस्त्रे पंजाबमधून यूपीमध्ये आणली गेली होती. अतीकच्या या वक्तव्यानंतर एसटीएफने त्याच्या घर आणि इतर ठिकाणांवर छापा टाकला असता, मोठ्या संख्येने पाकिस्तान ऑर्डिनन्स फॅक्टरीची मोहोर असलेले काडतुसे आणि शस्त्रे सापडली होती.’ सीन: 3अतीक आणि अशरफची हत्याशेवटचे दृश्य पोलीस सुरक्षा घेऱ्यात अतीक अहमदच्या हत्येचे आहे. या दृश्यात प्रत्येक कोन तसाच दाखवला आहे, जसा १५ एप्रिल २०२३ रोजी रात्री १०:३० वाजता पोलीस कोठडीत, मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर अतीक अहमदची हत्या झाली होती. हल्लेखोर पत्रकार बनून पोलीस सुरक्षेच्या आत येतात. अतीक अहमद मीडियासमोर म्हणतो- 'मुख्य गोष्ट अशी आहे की गुड्डू मुस्लिम'... तेव्हा अचानक हल्लेखोर जवळ येऊन त्याच्या डोक्यात गोळी मारतात. अतीक आणि त्याचा भाऊ अशरफ यांना मारल्यानंतर तिन्ही हल्लेखोर पोलिसांसमोर आत्मसमर्पण करतात. चित्रपटातील दावा: पाकिस्तानमध्ये बसलेला आयएसआय अधिकारी इलियास काश्मिरी उर्फ मेजर इक्बाल (अर्जुन रामपाल) अतीकच्या मृत्यूचा LIVE व्हिडिओ पाहत होता. अतीक-अशरफच्या हत्येमुळे त्याचे नियोजन फसले. वास्तविकता: 3 जून 2011 रोजी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इलियास काश्मिरी मारला गेला होता. त्यावेळी तो साथीदारांसोबत सफरचंदाच्या बागेत बसला होता. तर, अतीकची हत्या 2023 मध्ये झाली. येथेही टाइमलाइन जुळत नाही. STF आणि RAW ला अतीकच्या ISI कनेक्शनची माहिती मिळाली होती दैनिक भास्करने अतीकच्या ISI कनेक्शनवर यूपी STF च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले, ‘अतीक अहमदच्या मृत्यूपूर्वी 2021 मध्ये UP-STF आणि गुप्तचर संस्था रॉ (RAW) ने एक संयुक्त अभियान राबवले होते. सप्टेंबर 2021 मध्ये जीशान कमर नावाच्या दहशतवाद्याला पकडण्यात आले होते. जीशान त्या पाकिस्तानी कॅम्पमध्ये सामील होता, जिथे कसाबला प्रशिक्षण दिले गेले होते.’ ‘जीशानने UP-STF ला सांगितले की 2017 मध्ये तो प्रयागराजहून पाकिस्तानला गेला होता. तेव्हा अतीकचा भाऊ अशरफने पासपोर्ट अधिकाऱ्याला पत्र पाठवले होते, जेणेकरून पासपोर्ट लवकर मिळावा. अशा प्रकारे पहिल्यांदाच अतीकच्या ISI कनेक्शनची माहिती मिळाली होती.’
27 फेब्रुवारी 2026 म्हणजे इराण युद्ध सुरू होण्याच्या एक दिवस आधी, भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1.59 लाख रुपये होती. युद्धाच्या 22 व्या दिवशी म्हणजे 21 मार्च रोजी, ती अंदाजे 8% नी घसरून 1.47 लाख रुपयांपर्यंत पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने 14% नी घसरून सुमारे 4,488 डॉलर प्रति कॅरेटपर्यंत पोहोचले. सोन्याचा हा ट्रेंड मागील युद्धांदरम्यानच्या सोन्याच्या ट्रेंडशी जुळत नाही, कारण युद्धामुळे सामान्यतः सोन्याची किंमत वाढत असते. शेवटी इराण युद्धादरम्यान असे काय घडले की सोन्याची किंमत कमी होऊ लागली, यापूर्वीच्या युद्धांमध्ये सोन्याच्या किमतीवर काय परिणाम झाला होता आणि पुढे सोने स्वस्त होईल की महाग, हे आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया.... प्रश्न-1: सामान्यतः युद्धादरम्यान सोन्याचा ट्रेंड कसा असतो? उत्तर: सोने सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. युद्ध सुरू होण्याची शक्यता असली तरी, गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात, ज्यामुळे सोन्याच्या किमती वाढू लागतात. 1980 च्या दशकापासून, सामान्यतः कोणत्याही युद्धाच्या सुरुवातीच्या काळात सोन्याचे भाव वेगाने वाढण्याचा ट्रेंड राहिला आहे.... तथापि, 13 जून 2025 आणि 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर सुरू झालेल्या अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यादरम्यान सोन्यात नगण्य वाढ झाली, उलट किमतीत थोडी घटच दिसून आली. प्रश्न-2: इराण युद्धादरम्यान सोन्याचे भाव वाढण्याऐवजी कमी का होऊ लागले? उत्तर: 12 जून 2025 रोजी इराणवरील हल्ल्याच्या एक दिवस आधी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 3,381 डॉलर प्रति कॅरेट होती. 13 जून रोजी सोन्याचे दर 3,440 पर्यंत पोहोचले, परंतु पुन्हा कमी होऊ लागले. 24 जून रोजी युद्धविरामाच्या दिवशी सोन्याचे दर कमी होऊन 3,317 डॉलर प्रति कॅरेटपर्यंत आले होते. त्याचप्रमाणे 27 फेब्रुवारी 2026 रोजी, म्हणजेच इराणवरील हल्ल्याच्या एक दिवस आधी, सोन्याचा भाव अंदाजे 5,245 डॉलर प्रति कॅरेट होता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, भारतीय बाजारातही सोन्याचा भाव अंदाजे 1.6 लाख प्रति 10 ग्रॅम होता. तर 21 मार्च रोजी सोन्याचा भाव 4,488 डॉलर प्रति कॅरेटपर्यंत पोहोचला. तसेच भारतीय बाजारात सोन्याचा भाव 1.46 लाख प्रति 10 ग्रॅमपर्यंत कमी झाला. म्हणजेच सोन्याचे दर वाढण्याऐवजी थोडे कमी झाले. तज्ञांच्या मते, गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या इराण युद्धादरम्यान सोन्याचे दर वाढण्याऐवजी कमी होण्याची 4 मुख्य कारणे आहेत.... 1. डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याची खरेदी घटली 2. सोन्याच्या तुलनेत बँकांच्या व्याजातून अधिक नफ्याची आशा 3. आधीच महाग असलेले सोने विकून नफा नोंदवणे 4. सोने महाग असल्यामुळे घरगुती मागणी घटली प्रश्न-3: सोन्याचे भाव अजून कमी होतील की पुन्हा वाढू शकतात? उत्तर: सोन्याच्या किमतीबाबत सध्या बाजार विश्लेषकांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की सोन्याचे दर इराण युद्ध आणि त्यामुळे तेलाच्या किमतींवर अवलंबून आहेत. अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी जेपी मॉर्गन चेसच्या मते, 2026 च्या अखेरीस सोन्याचा भाव प्रति कॅरेट 6,300 डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. जेपी मॉर्गनमध्ये ग्लोबल कमोडिटीज स्ट्रॅटेजीच्या प्रमुख नताशा कनेवा म्हणतात की सोन्याच्या किमती वाढणे अजून थांबलेले नाही. देशांचे सोन्याचे साठे आणि मोठ्या गुंतवणूकदारांचा सोन्याच्या खरेदीचा ट्रेंड अजूनही सुरू राहील. यामुळे सोन्याच्या किमती वाढतील. तर स्विस इन्व्हेस्टमेंट बँक यूबीएस ग्रुपनुसारही सोन्याचे दर प्रति कॅरेट 5,900 डॉलरपर्यंत जाऊ शकतात. लंडनस्थित वित्तीय कंपनी ईबीसी फायनान्शियल ग्रुपच्या मते, जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति कॅरेट 6,000 डॉलरपर्यंत पोहोचला आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला नाही, तर भारतात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 2 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. प्रश्न-4: पुढील काही महिने चांदीच्या दरांचा ट्रेंड कसा राहील? उत्तर: इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच IBJA नुसार, 1 जानेवारी 2025 रोजी 1 किलो चांदीची किंमत 86,017 रुपये होती, जी भारतात सर्वकालीन उच्चांक होती. 2025 च्या अखेरपर्यंत चांदी 170% वाढली होती. त्यानंतर 30 जानेवारी 2026 रोजी चांदी 3.39 लाखांवर बंद झाली. त्यानंतर घट सुरू राहिल्याने इराण युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारी रोजी चांदी 2,66,700 रुपये प्रति किलो होती, जी 20 मार्च 2026 पर्यंत 2,32,364 प्रति किलोवर आली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात 20 मार्च रोजी चांदीची किंमत 72 डॉलर प्रति कॅरेट आहे. जेपी मॉर्गनमध्ये प्रेशियस मेटल्स स्ट्रॅटेजीचे प्रमुख ग्रेगरी शियरर म्हणतात की चांदीच्या किमती वाढणे अजून थांबलेले नाही. त्याची औद्योगिक मागणी अजूनही जास्त आहे, तर पुरवठा कमी आहे. गुंतवणूकदार चांदीच्या वाढत्या किमतींवर सट्टा लावत आहेत. भारतीय ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने फेब्रुवारी 2026 मध्ये असेही म्हटले होते की, वर्षाच्या अखेरीस चांदीची किंमत पुन्हा वाढून 3.8 लाख ते 4.6 लाख रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकते. मात्र, सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही घसरणीचे कारण सध्याची भू-राजकीय (जिओ-पॉलिटिकल) परिस्थितीच आहे. ब्रिटनच्या फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी सॅकडन फायनान्शियलनुसार, जोपर्यंत तेल सुरक्षित गुंतवणूक राहील, तोपर्यंत चांदीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता कमी आहे. भू-राजकीय परिस्थिती सुधारल्यानंतर चांदी पुन्हा रुळावर येऊ शकते. डिस्क्लेमर: ही स्टोरी केवळ शैक्षणिक उद्देशाने लिहिलेली आहे. गुंतवणूकदारांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतःच्या स्तरावर तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.
मराठी रंगभूमी आणि भारतीय संगीताच्या सुवर्णकाळाचे मानबिंदू म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस उर्फ 'बालगंधर्व'. लोकमान्य टिळकांनी बहाल केलेल्या या पदवीला सार्थ ठरवत, त्यांनी आपल्या अफाट गायकीने आणि विलोभनीय स्त्री भूमिकांनी अवघ्या जगाला भुरळ घातली. जवळपास 5000 नाटकांमधून त्यांनी स्त्री भूमिका निभावली होती. हा एक रेकॉर्डच म्हणावा लागेल. व्यावसायिक यशाचे शिखर गाठलेले हे अलौकिक व्यक्तिमत्व तत्कालीन समाजातील महिलांसाठी 'फॅशन आयकॉन' ठरले, तरीही त्यांचे वैयक्तिक आयुष्य अनेक हृदयद्रावक शोकांतिकांनी भरलेले होते. कलेप्रती असलेली त्यांची अढळ निष्ठा आणि 'द शो मस्ट गो ऑन' ही वृत्ती आजही कलाविश्वात वंदनीय मानली जाते. आजच्या 'रागदरबार'च्या भागात आपण बालगंधर्वांचे जीवन तसेच त्यांनी संगीतात दिलेल्या योगदानाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बालगंधर्व यांच्याविषयी लिहिताना त्यांचे वैयक्तिक आयुष्यच समोर आले. आयुष्य इतके खडतर तरी कलेवर असलेले प्रेम, त्यांची हीच गोष्ट मनाला भावते... वयाच्या 10 व्या वर्षीच टिळकांनी दिली 'बालगंधर्व' उपाधी नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व हे भारतीय संगीत आणि मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळातील एक अजरामर नाव आहे. अवघ्या 10 व्या वर्षी त्यांचे गाणे ऐकून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांना 'बालगंधर्व' ही पदवी बहाल केली आणि पुढे याच नावाने त्यांनी जगभरात कीर्ती मिळवली. केवळ नाट्यसंगीतच नव्हे, तर ख्याल, ठुमरी, गझल, दादरा आणि भक्तिगीते यांसारख्या विविध गायन प्रकारांवर त्यांचे अफाट प्रभुत्व होते. त्यांच्या सुमधुर आवाजातील शास्त्रीय बैठक आणि गायकीने भारतीय संगीत क्षेत्रात एक वेगळीच उंची गाठली होती. स्त्री रूपाने पुरुषांसह महिलांनाही पाडली भुरळ ज्या काळात महिलांना रंगभूमीवर काम करण्याची सामाजिक परवानगी नव्हती आणि नाटकात काम करणे प्रतिष्ठेचे मानले जात नसे, त्या काळात बालगंधर्वांनी हुबेहूब स्त्री भूमिका साकारून रंगभूमीची उणीव समर्थपणे भरून काढली. त्यांचे स्त्री रूप इतके सात्विक आणि वास्तववादी असे की, त्यांच्या रूपाची एक झलक पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक मैलोन्मैल प्रवास करून येत असत. तत्कालीन समाजातील स्त्रियांमध्ये बालगंधर्वांची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की, ते नाटकात ज्या पद्धतीच्या साड्या नेसत किंवा दागिने घालत, त्यांची हुबेहूब नक्कल करून स्त्रिया तशाच साड्या आणि दागिने बाजारातून आवर्जून विकत घेत असत. म्हणजे महिलांना बालगंधर्वांच्या स्त्री रूपाची भुरळच पडली होती, असे म्हटले तर आश्चर्य वाटू नये. 'द शो मस्ट गो ऑन' बालगंधर्वांची व्यावसायिक कारकीर्द जितकी वैभवशाली आणि आश्चर्यकारक होती, तितकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र तीव्र शोकांतिकेने भरलेले होते. कलेप्रती असलेली त्यांची निष्ठा इतकी अढळ होती की, आपल्या मुलाच्या निधनाची वार्ता कानावर आलेली असतानाही, त्यांनी धिरोदात्तपणे रंगभूमीवरील आपला प्रयोग सुरूच ठेवला. आपल्या काळजावर दगड ठेवून आणि वैयक्तिक दुःखाला बाजूला सारून प्रेक्षकांसाठी प्रयोग पूर्ण करणाऱ्या या महान कलाकाराने 'द शो मस्ट गो ऑन' या उक्तीची प्रचिती तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आणून दिली होती. घरातूनच मिळाले संगीताचे बाळकडू भारतीय संगीत आणि रंगभूमीवरील दैदीप्यमान तारा नारायण श्रीपाद राजहंस यांचा जन्म 22 जून 1888 रोजी महाराष्ट्रातील पालूस येथील एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. वडिलांच्या सितारवादनाच्या छंदामुळे त्यांना संगीताचा प्राथमिक वारसा लाभला. तसेच त्यांची आई देखील भजन गायच्या. अभ्यासात फारसा रस नसल्याने त्यांनी बालवयातच गायनाला सुरुवात केली. जळगाव येथील शास्त्रीय संगीत प्रशिक्षण शाळेत त्यांनी संगीताचे रीतसर धडे गिरवले. त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षी त्यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासमोर गाण्याची मिळालेली संधी. त्यांचे अलौकिक गायन ऐकून भारावलेल्या टिळकांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि त्यांना 'बालगंधर्व' ही अजरामर पदवी बहाल केली, ज्या नावाने ते पुढे जगभर लोकप्रिय झाले. शाहू महाराजही गायकीने झाले होते प्रभावित लहानपणापासूनच बालगंधर्व यांचा आवाज अत्यंत मधुर होता, मात्र त्यांना श्रवणदोष असल्याने कमी ऐकू यायचे. अगदी लहान वयात असतानापासूनच त्यांच्या गोड आवाजातील भजनांमुळे ते लोकप्रिय होऊ लागले होते. त्यांचे हे सुरावटींचे कौशल्य कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या नजरेस पडले. बालगंधर्वांना ऐकायला त्रास होतो हे समजताच, महाराजांनी स्वतःच्या खर्चाने त्यांच्यावर योग्य उपचार केले. या उपचारांमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आणि शाहू महाराजांच्या सहकार्यामुळेच त्यांना प्रसिद्ध 'किर्लोस्कर नाटक मंडळी'मध्ये स्थान मिळाले, जिथून त्यांच्या अभिनय कारकिर्दीचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला. वयाच्या 18 व्या वर्षी 'शाकुंतल' नाटकात त्यांनी शकुंतलेची भूमिका साकारली किर्लोस्कर नाटक मंडळी त्या काळात एका उत्तम स्त्री पात्राच्या शोधात होती आणि बालगंधर्वांच्या रूपात त्यांचा हा शोध पूर्ण झाला. 1906 मध्ये मिरज येथे वयाच्या 18 व्या वर्षी 'शाकुंतल' नाटकात त्यांनी शकुंतलेची भूमिका साकारली आणि त्यांचे ते विलोभनीय रूप पाहून प्रेक्षक अवाक् झाले. त्यानंतर सौभद्र, मानापमान, विद्याहरण आणि स्वयंवर अशा अनेक अजरामर नाटकांतून त्यांनी सुभद्रा, भामिनी, देवयानी आणि रुक्मिणी यांसारखी पात्रे जिवंत केली. आपल्या गायकीने आणि सहज अभिनयाने त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ घडवला. बालगंधर्वांनी साड्यांचा नवा ट्रेंड आणला बालगंधर्वांचे सौंदर्य इतके लोभस आणि लावण्यमय होते की ते केवळ सर्वसामान्य प्रेक्षकांनाच नव्हे, तर पुरुषांनाही भुरळ घालत असे. रंगभूमीवर त्यांनी परिधान केलेले दागिने आणि साड्या खास त्यांच्यासाठी ऑर्डर देऊन बनवून घेतल्या जात, ज्या तत्कालीन महिलांमध्ये कमालीच्या लोकप्रिय ठरत. त्यांच्या प्रत्येक नवीन नाटकाच्या प्रयोगानंतर साड्यांचा एक नवा ट्रेंड समाजात रूढ होत असे, यावरून त्यांच्या सौंदर्याचा आणि वेशभूषेचा जनमानसावर असलेला विलक्षण प्रभाव दिसून येतो. 'गंधर्व संगीत मंडळी'ची स्थापना बालगंधर्वांनी 1905 मध्ये 'किर्लोस्कर संगीत मंडळी'द्वारे आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा केला, मात्र नानासाहेब जोगळेकरांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या अंतर्गत वादामुळे त्यांनी 1913 मध्ये गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या सहकार्याने 'गंधर्व संगीत मंडळी'ची स्थापना केली. 1921 पर्यंत या संस्थेचे संपूर्ण स्वामित्व आणि त्यावरील कर्जाची जबाबदारी बालगंधर्वांकडे आली, जी त्यांनी आपल्या नाटकांच्या विलक्षण लोकप्रियतेच्या जोरावर अवघ्या सात वर्षांत पूर्णपणे फेडली. मात्र, नाटकातील नेपथ्य, वेशभूषा आणि वस्तूंच्या अस्सलपणाबाबत व उच्च दर्जाबाबत असलेल्या त्यांच्या आग्रही स्वभावामुळे संस्थेच्या आर्थिक स्थितीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळाले. कलेच्या गुणवत्तेशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. पोटच्या गोळ्याच्या निधनाची वार्ता कळल्यानंतरही प्रयोग बालगंधर्वांची व्यावसायिक कारकीर्द यशाच्या शिखरावर असली, तरी त्यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र अत्यंत क्लेशदायक संघर्षातून गेले. 1907 मध्ये लक्ष्मीबाईंशी विवाहबद्ध झालेल्या बालगंधर्वांना सात अपत्ये झाली, मात्र मार्च 1911 मध्ये त्यांनी आपल्या थोरल्या मुलाला आणि मुलीला एकापाठोपाठ एक गमावले. आपल्या पोटच्या गोळ्याच्या निधनाची वार्ता कळल्यानंतरही, कलेप्रती असलेल्या असीम निष्ठेपोटी त्यांनी रंगभूमीवरील आपला प्रयोग अर्ध्यावर सोडला नाही. त्यांचे ते ध्येयनिष्ठ सादरीकरण पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, परंतु बालगंधर्वांनी आपल्या वैयक्तिक दुःखाला अभिनयाच्या आड येऊ न देता रंगमंचावर आपला प्रयोग सुरू असताना डोळ्यातून एक अश्रूही येऊ दिले नाही. नाटक सुरू असतानाच लाडक्या मुलीच्या निधनाची वार्ता बालगंधर्वांच्या आयुष्यातील दुःखाची मालिका इथेच थांबली नाही. पहिल्या दोन मुलांच्या निधनानंतर सात वर्षांनी त्यांच्या आणखी दोन मुलांचा मृत्यू झाला. 1928 मध्ये त्यांचे नाट्यमंडळ अमरावती येथे प्रयोगासाठी गेले असताना, त्यांच्या थोरल्या मुलीचे संसर्गामुळे निधन झाल्याची हृदयद्रावक बातमी आली. या धक्क्याने सर्व कलाकार सुन्न झाले होते, तरीही बालगंधर्वांनी प्रेक्षकांचा हिरमोड होऊ नये म्हणून धैर्याने प्रयोगाचा निर्णय घेतला. आपल्या लाडक्या लेकीच्या विरहाचे दुःख उरात दाबून त्यांनी रंगमंचावर केलेले ते सादरीकरण पाहून उपस्थित प्रेक्षकांचे डोळे पुन्हा एकदा पाणावले. त्यांच्या या असीम कलानिष्ठेपुढे सर्व नतमस्तक झाले. नुकत्याच जन्मलेल्या मुलाचे दुसऱ्याच दिवशी निधन 1928 पर्यंत बालगंधर्वांच्या सात अपत्यांपैकी केवळ दोन मुली हयात होत्या, ज्यांचे विवाह त्यांनी मोठे कर्ज काढून अत्यंत थाटामाटात लावून दिले. मुलींच्या लग्नानंतर घरात आलेल्या एकलेपणामुळे पुत्रप्राप्तीच्या ओढीने त्यांनी यज्ञ देखील केला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले खरे, परंतु नियतीचा खेळ असा की तो मुलगा अवघ्या एका दिवसातच मृत्यू पावला. या मोठ्या आघाताने बालगंधर्व सावरत असतानाच, लग्नाच्या 35 वर्षांनंतर त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचेही निधन झाले. सावलीप्रमाणे सोबत करणाऱ्या पत्नीच्या जाण्याने त्यांच्या आयुष्यातील मुख्य आधारस्तंभ निखळला आणि ते पूर्णपणे कोलमडून गेले. 'धर्मात्मा' या चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण 1935 च्या सुमारास भारतीय चित्रपटसृष्टीचा विस्तार होऊ लागल्याने प्रेक्षकांची ओढ नाटकांकडून चित्रपटांकडे वळली, ज्याचा मोठा फटका नाट्यसृष्टीला बसला. याच काळात बालगंधर्वांवर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला होता. या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध 'प्रभात फिल्म कंपनी'सोबत सहा चित्रपटांचा करार केला. 1935 मध्ये व्ही. शांताराम दिग्दर्शित 'धर्मात्मा' या चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी संत एकनाथांची मुख्य भूमिका साकारली होती, मात्र ज्या लोकप्रियतेची अपेक्षा होती, ती त्यांना मोठ्या पडद्यावर मिळू शकली नाही. 50 व्या वर्षी साकारली मीराबाईची भूमिका रंगभूमीचे मोठे चाहते बाबुराव रुईकर यांच्या आग्रहामुळे बालगंधर्वांनी 1937 मध्ये 'साध्वी मीराबाई' चित्रपटात काम करण्याचे मान्य केले. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी साकारलेली मीराबाईची भूमिका तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि नवीन कलाकारांच्या वाढत्या स्पर्धेमुळे प्रेक्षकांवर अपेक्षित प्रभाव टाकू शकली नाही. अखेरीस, चित्रपटातील अपयशानंतर ते पुन्हा आपल्या मूळ कर्मभूमीकडे म्हणजेच नाट्यमंडळाकडे वळले. मात्र दुर्दैवाने तिथेही त्यांना पूर्वीसारखे वैभव आणि रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला नाही, कारण काळ आणि प्रेक्षकांची अभिरुची पूर्णपणे बदलली होती. आर्थिक परिस्थिती हालाखीची चित्रपटसृष्टीतील हे अपयश बालगंधर्वांसाठी अत्यंत निराशाजनक ठरले. 'धर्मात्मा' चित्रपट अपेक्षित कामगिरी करू न शकल्यामुळे त्यांनी प्रभात कंपनीसोबतचे उर्वरित करार अपूर्ण सोडले आणि 1936 मध्ये पुन्हा एकदा आपल्या आवडत्या रंगभूमीकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुमारे 15 महिन्यांच्या संघर्षानंतर त्यांनी आपली नाट्यमंडळी पुन्हा सुरू केली आणि पुन्हा एकदा स्त्री पात्रे साकारण्यास सुरुवात केली. परंतु, बदलत्या काळामुळे आणि प्रेक्षकांच्या आवडीनिवडी बदलल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांची एकापाठोपाठ एक नाटके अपयशी ठरू लागली, ज्यामुळे त्यांच्या समोरील आर्थिक आणि व्यावसायिक आव्हाने अधिकच गडद झाली. 6 प्रेक्षकांच्या समोर केला प्रयोग नाट्यमंडळीच्या संघर्षाच्या काळात एकदा बालगंधर्व आपल्या संचासह येवला येथे प्रयोगासाठी पोहोचले. प्रयोगाची वेळ होऊनही पडदा उघडत नसल्याने विचारणा करणाऱ्या एका व्यक्तीला प्रेक्षक फक्त 6 आहेत असे उत्तर मिळाले. हे ऐकून बालगंधर्व अत्यंत निराश झाले आणि क्षणभर एका खांबाला टेकून उभे राहिले. प्रेक्षक नसल्याने प्रयोग रद्द करावा का, असा प्रश्न उभा राहिला, पण बालगंधर्वांनी त्वरित स्वतःला सावरले आणि मोठ्या निग्रहाने पडदा उचला, प्रयोग होईलच! असा आदेश दिला. रिकाम्या थिएटरमध्ये केवळ सहा प्रेक्षकांसाठी झालेला तो प्रयोग त्यांच्या कलेप्रती असलेल्या असीम निष्ठेचे आणि व्यावसायिक शिस्तीचे मूर्तिमंत उदाहरण ठरला. गंधर्व नाटक मंडळीची सर्व धुरा गौहरबाईंकडे पुढे 1944 मध्ये, बालगंधर्वांनी आपल्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या वळणावर गंधर्व नाटक मंडळीची सर्व धुरा गौहरबाई यांच्याकडे सुपूर्द केली. वाढते वय आणि बदलती परिस्थिती लक्षात घेता, त्यांनी स्वतः रंगभूमीवर स्त्री भूमिका साकारणे थांबवण्याचा निर्णय घेतला. आपल्या जागी स्त्री पात्रांची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी आत्मविश्वासाने गौहरबाईंवर सोपवली आणि एका प्रदीर्घ, वैभवशाली अभिनय पर्वाचा निरोप घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे मराठी रंगभूमीवरील एका सुवर्णयुगाची धुरा नव्या पिढीकडे सोपवली गेली, तरीही बालगंधर्वांच्या अभिनयाची छाप जनमानसावर कायम राहिली. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर गौहरबाईंशी विवाह पहिल्या पत्नीच्या निधनानंतर सुमारे 11 वर्षांनी बालगंधर्वांनी आपल्याच नाट्यमंडळातील सुप्रसिद्ध गायिका गौहरबाई यांच्याशी विवाह केला. गौहरबाई एका छोट्या खेडेगावातून मोठी स्वप्ने उराशी बाळगून मुंबईत आल्या होत्या आणि गंधर्व संगीत मंडळीत त्यांना स्थान मिळाले होते. बालगंधर्वांच्या अलौकिक स्वरांवर आणि कलेवर त्यांचे नितांत प्रेम होते. त्या तासन्तास त्यांचे गाणे मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत. कलेप्रती असलेल्या याच ओढीमुळे दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले आणि त्यांच्यात एक अतुट नाते निर्माण झाले. दुसऱ्या लग्नाला समाजातून विरोध 1951 मध्ये जेव्हा या दोघांनी विवाह केला, तेव्हा समाजात मोठा गदारोळ झाला. त्या काळातील सामाजिक परिस्थिती आणि बालगंधर्वांची ब्राह्मण पार्श्वभूमी यामुळे या आंतरधर्मीय विवाहास दोन्ही कुटुंबांकडून तीव्र विरोध झाला. अनेक टीका आणि विरोधाचा सामना करूनही त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. या दांपत्याला स्वतःचे मूलबाळ झाले नाही, परंतु त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातूनच एकमेकांचे आयुष्य समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. 1964 मध्ये गौहरबाईंचे निधन दुर्दैवाने 1964 मध्ये गौहरबाईंचे निधन झाले आणि बालगंधर्व पुन्हा एकदा एकाकी पडले. आयुष्यात अमाप प्रसिद्धी आणि यश मिळवूनही ते शेवटपर्यंत कर्जाच्या ओझ्याखालीच राहिले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उतारवयात ना हाताला काम, ना कुटुंबाचा भक्कम आधार आणि खालावलेले आरोग्य अशा बिकट परिस्थितीत त्यांनी दिवस काढले. एकेकाळी रंगभूमीवर वैभव गाजवणाऱ्या या महान कलावंताची काळजी घेणारे जवळ कोणीही उरले नव्हते. 15 जुलै 1967 बालगंधर्वांनी घेतला शेवटचा श्वास 1960 पासून बालगंधर्वांची प्रकृती अधिकच खालावू लागली होती. त्यांची चिंताजनक अवस्था पाहून पुण्याहून त्यांचे स्नेही मदतीसाठी मुंबईला धावून आले. त्यांच्यावर प्रदीर्घ काळ उपचार सुरू होते, ज्या दरम्यान ते सुमारे तीन महिने कोमामध्ये होते. अखेर 15 जुलै 1967 रोजी या थोर गायकाने आपला शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने केवळ एका महान कलावंताचाच नव्हे, तर मराठी संगीत नाटकांच्या एका वैभवशाली सुवर्णयुगाचा अंत झाला. बालगंधर्वांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी 1968 मध्ये पुणे महानगरपालिकेने 'बालगंधर्व रंगमंदिर' या भव्य नाट्यगृहाची उभारणी केली. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी याकामी पुढाकार घेतला होता, तर त्याचे उद्घाटन आचार्य अत्रे यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे, खुद्द बालगंधर्व हयात असतानाच त्यांच्या हस्ते पुणे जिमखाना परिसरात या वास्तूचे भूमिपूजन पार पडले होते. आज हे नाट्यगृह मराठी कलाकारांसाठी आणि रसिकांसाठी एक स्मृतिमंदिरच ठरले आहे.
भारताला स्वातंत्र्य रातोरात मिळाले नाही. त्यासाठी अनेकांचे रक्त सांडले. कित्येकांनी आपले तारुण्य तुरुंगात घालवले, तर अनेकांनी हसत - हसत फासावर जाण्याचा मार्ग स्वीकारला. त्यंच्या बलिदानातूनच आजची स्वातंत्र्याची सुंदर पहाट उगवली. उद्या देशभरात शहीद दिन साजरा केला जाईल. त्यानिमित्ताने भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्यांया बलिदानाचे स्मरण केले जाईल. चला तर आपणही आज ‘धुरंधर’मध्ये पाहूया या तिघांपैकी एक असणाऱ्या शहीद सुखदेव रामलाल थापर यांची प्रेरणादायी गोष्ट… जन्म, कुटुंब आणि बालपणातील संघर्ष 19 व 20 व्या शतकात भारतात अनेक देशभक्तांचा जन्म झाला. त्यात अमर शहीद सुखदेव थापर यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांच्या जन्माविषयी माहिती देताना त्यांचे भाऊ मथुरादास थापर लिहितात की, त्यांचे वडील रामलाल थापर हे एक व्यापारी होते. ते व्यापारासाठी लायलपूर येथे राहत होते, तर आई रल्ली देवी या लुधियानातील नौघरा येथे राहत होत्या. अशा परिस्थितीत 15 मे 1907 रोजी सुखदेव यांचा जन्म झाला. सुखदेव यांचा ज्या लुधियाना शहरात त्यांचा जन्म झाला, ते शहर इतिहासाने समृद्ध आहे. 1481 मध्ये लोधी साम्राज्याच्या काळात युसूफ खान लोधी आणि निहंग खान लोधी यांनी या शहराची स्थापना केली होती. आज हे शहर ‘भारताचे मॅन्चेस्टर’ म्हणून ओळखले जाते. मध्य आशियाहून दिल्लीला जाणाऱ्या मार्गावर वसलेले हे शहर त्या काळात व्यापार आणि संस्कृतीचे एक महत्त्वाचे केंद्र होते. सुखदेव यांचा जन्म झाला तेव्हा पंजाबमध्ये 'पगडी संभाल जट्टा' आंदोलन सुरू होते. सरदार अजित सिंह (शहीद ए आझम भगतसिंग यांचे काका) व पंजाब केसरी लाला लजपतराय यांनी इंग्रजांच्या विरोधात रान पेटवले होते. या आंदोलनाचे प्रमुख केंद्र लायलपूर होते. हे आंदोलन सुरू असतानाच रामलाल थापर यांना सुखदेव यांच्या जन्माची शुभवार्ता समजली. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाला लायलपूर येथे आणण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपली पत्नी रल्लीदेवी व मुलगा सुखदेव यांना लायलपूरला आणले. सुखदेव यांच्या जन्मानंतर त्यांचे वडील आपल्या कुटुंबाला लायलपूर येथे घेऊन गेले. मात्र, नियतीने वेगळेच काही ठरवले होते. लायलपूरला आल्यानंतर अवघ्या दोन-तीन वर्षांतच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा सुखदेव केवळ तीन वर्षांचे होते. त्यानंतर 3 महिन्यांनी त्यांच्या लहान भावाचा जन्म झाला. या कठीण काळात त्यांच्या काका चिंतराम यांनी दोन्ही भावांचा पोटच्या मुलांसारखा सांभाळ केला. बालपणातील स्वभाव आणि खोडकर किस्से सुखदेव यांना खेळात फारसा रस नव्हता. त्यांना शिक्षणात जास्त आवड होती. मात्र त्यांचा स्वभाव थोडा तापट आणि खोडकर होता. त्यांचे चुलत भाऊ जयदेव यांना आपले तुटलेले बोट पाहून सुखदेव यांची मोठी आठवण येते. ते एकेठिकाणी सांगतात, एकदा ते दोघे कुठेतरी जात होते. तेव्हा सुखदेव यांना एक घोडा दिसला. त्यांच्या मनात जयदेव यांची खोड काढण्याची इच्छा निर्माण झाली. त्यानुसार घोडा जवळ येताच त्यांनी त्याला त्याच्या दिशेने ढकले. घोड्याने घाबरून उडी मारली आणि त्याचे खूर जयदेवच्या पायावर पडले. त्यामुळे त्यांचे बोट तुटले. या घटनेनंतर सुखदेव इतके घाबरले की ते रात्रभर झाडावर लपून बसले होते. भगतसिंगांशी अटूट मैत्री सुखदेव यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे भगत सिंह यांच्याशी झालेली मैत्री. सुखदेव यांचे काका चिंतराम आणि भगतसिंग यांचे आजोबा अर्जुन सिंह हे एकमेकांचे जिवलग मित्र होते. या नात्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये ये-जा होती. त्यातून सुखदेव व भगतसिंग यांची मैत्री झाली. ही मैत्री इतकी दृढ होती की, ती त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिली. क्रांतीची बीजे आणि पंजाबमधील आंदोलन पंजाबमध्ये ‘पगडी संभाल जट्टा’ आंदोलन चांगलेच पेटले होते. अजित सिंह आणि लाला लजपतराय यांनी इंग्रजांविरोधात जनजागृतीची एक मोठी मोहीम छेडली होती. या आंदोलनाचे केंद्र लायलपूर होते. अशा वातावरणात वाढलेल्या सुखदेव यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत लहानपणापासून पेटली होती. पुढे ते हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन चे सक्रिय सदस्य झाले. त्यांनी या संघटनेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. त्यांनी भगत सिंह, कॉम्रेड रामचंद्र आणि भगवतीचरण व्होरा यांच्यासोबत लाहोर येथे ‘नौजवान भारत सभा’ची स्थापना केली. या संघटनेचा उद्देश होता तरुणांना स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरित करणे, वैज्ञानिक आणि तर्कसंगत विचार रुजवणे, जातीयतेचा विरोध करणे आणि अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवणे. यावरून सुखदेव यांना सामाजिक क्रांतीही तितकीच महत्त्वाची वाटत होती हे स्पष्ट होते. बॉम्बचे प्रशिक्षण संघटनेच्या निर्णयानुसार सुखदेव बॉम्बचे कवच तयार करण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी लाहोरला गेले. त्यानंतर त्यांनी झाशी येथे बॉम्बची चाचणी घेतली. यातून त्यांची धाडसी वृत्ती आणि नियोजनशक्ती दिसून येते. 1928 मध्ये ब्रिटिश सरकारने सायमन कमीशन भारतात पाठवला. या कमीशनच्या विरोधात देशभर निदर्शने झाली. लाहोरमध्ये या आंदोलनाचे नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले. मात्र ब्रिटिश पोलिसांच्या लाठीहल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने क्रांतिकारक संतप्त झाले. त्याचा बदला घेण्यासाठी ब्रिटिश अधिकारी जे.पी. सॉंडर्स याची हत्या करण्यात आली. या कटात सुखदेव यांचा सहभाग होता. या घटनेनंतर ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली. तुरुंगातील संघर्ष आणि उपोषण सुखदेव यांना लाहोर तुरुंगात डांबण्यात आले. 1929 मध्ये त्यांनी तुरुंगातील कैद्यांवर होणाऱ्या अमानुष वागणुकीविरोधात उपोषण सुरू केले. हे उपोषण सोडण्यासाठी इंग्रजांनी त्यांना प्रचंड मारहाण केली. डॉक्टरांनी जबरदस्तीने दूध पाजण्याचा प्रयत्न केला. एकदा कोठडी उघडताच सुखदेव बाहेर पळाले. 10 दिवस उपाशी असूनही ते एवढ्या वेगाने पळाले की त्यांना पकडणे कठीण झाले. अखेर त्यांना पकडून मारहाण करण्यात आली. तरीही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कायम होते. त्यांनी पोलिसांना लाथ मारली. त्यांचा प्रतिकार करण्याचाही प्रयत्न केला. व्यक्तिमत्त्व, सवयी आणि धैर्य सुखदेव यांचे कपडे नेहमीच घाणेरडे व मळकट असायचे. त्यांचा पोशाष म्हणजे एक मळालेला अलीगडी पायजमा व त्यावर त्याहून अधिक मळकट कुर्ता. त्यांच्या कुर्त्याची सर्व बटणे उघडी असायची. बऱ्याचवेळा कुर्ता सरकून खांद्यावर यायचा. त्यांच्या डोक्यावर व्यापाऱ्यांसाठी एक गोल टोपी असायची. त्यावर तेल व धुळीचे थर दिसून येत. त्यांचे बूट मात्र महागडे होते. त्यांना त्यांच्या राहणीमानावर कुणी बोललेले आवडत नसे. त्यांना जाईच्या फुलांचे गजरे आणि भाजलेले मक्याचे कणीस आवडत होते. एम एम जुनेजा आपल्या शहीद सुखदेव की प्रामाणिक जीवनी या पुस्तकात लिहितात, सुखदेव यांच्या कपड्यावर कुणी टिप्पणी केली ते चिडत असत. ते म्हणायचे, मी इथे एखाद्या लफंग्याशी लग्न करण्यासाठी आलो नाही. तुम्हाला माझे कपडे आवडत नसतील तर तुम्ही तुमचे डोळे बंद करा. मात्र कधी-कधी ते पक्षाचे हीत लक्षात घेऊ पांढरे धोतर व कुर्ता घालत. पण त्यावर टोपी घालणे टाळत. सुखदेव यांच्या धैर्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे त्यांनी स्वतःच्या हातावर गोंदवलेले नाव नष्ट करण्यासाठी त्यावर नायट्रिक अॅसिड ओतले होते. एम एम जुनेजा याविषयी लिहितात, सुखदेव यांचा विद्यार्थी दशेत असताना क्रांतिकारकांशी कोणताही सबंध नव्हता. तेव्हा त्यांनी त्यांच्या डाव्या हातावर ओम व त्यांचे नाव गोंदवून घेतले. भूमिगत झालेले असताना या खुणेमुळे ते पकडले जाण्याची शक्यता होती. त्या दिवसांत त्यांनी आग्र्यात बॉम्ब बनवण्यासाठी नायट्रिक अॅसिट लपवून आणले होते. सुखदेव यांनी कुणालाही न सांगता, बरेच नायट्रिक अॅसिड त्यांच्या हातावरील गोंदलेल्या खुणेवर टाकले. सायंकाळपर्यंत त्या जागी फोड आले. त्यांचा हात सुजला. त्यांना तापही आला. पण त्यांनी त्याची माहिती कुणालाही दिली नाही. लाहोर कट खटला 1929 च्या लाहोर कट खटल्यात सुखदेवांसह भगतसिंग व राजगुरी हे 3 प्रमुख आरोपी होते. या खटल्याची नोंद “क्राऊन विरुद्ध सुखदेव व इतर” अशी आहे. त्यांच्यावर दिल्लीतील केंद्रीय विधानसभेतील बॉम्ब हल्ल्याच्या कट कारस्थानात हात असल्याचा आरोप ठेवण्यात आला. अखेरीस त्यांना दोषी ठरवण्यात आले आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. महात्मा गांधी यांनी या तिघांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही. सुखदेव यांनी फासावर चढण्यापूर्वी महात्मा गांधींना सशस्त्र क्रांतिकारी मार्गाचे समर्थन करणारे पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी क्रांतीकारकांविषयी घेण्यात आलेल्या निर्णयावर तीव्र नापसंती व्यक्त करून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन मुख्य विचारधारांच्या विचारप्रणालीवर प्रकाश टाकला. सुखदेव यांना हंसराज व्होरा यांच्या प्रयत्नांमुळे लाहोर खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली, पण त्यांनी ती बाणेदारपणे फेटाळून लावली. या प्रसंगातून सुखदेव यांचे अतुलनीय धैर्य, प्रखर देशभक्ती व त्यागी वृत्ती यांचा प्रत्यय येतो. सुखदेव यांच्या सन्मानार्थ लुधियानातील शाळेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. भगतसिंगांशी वाद असेंब्ली बॉम्ब हल्ला प्रकरणाची आखणी करताना सुखदेव व भगतसिंग यांच्यात वाद झाला. त्याचे झाले असे की, सुखदेव यांचे भगतसिंग यांच्यावर खूप प्रेम होते. ते दोघे भेटल्यानंतर तासंतास एकमेकांशी बोलत बसत. क्रांतिकारांच्या पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकण्याचा निर्णय झाला. त्या बैठकीला सुखदेव नव्हते. यावेळी भगतसिंग यांनी हा बॉम्ब आपण स्वतः फेकणार असा हट्टा धरला. पण केंद्रीय समितीतील इतर सदस्यांना हे मान्य नव्हते. हे काम इतर कुणीतरी करेल असे त्यांचे मत होते. सुखदेव यांनीही भगतसिंग यांना विरोध केला. यावरून त्यांच्यात मोठा वाद झाला. त्यावर सुखदेव तावातावाने भगतसिंगांना म्हणाले, तुम्ही अहंकारी झाला आहात. तु्म्हाला वाटत आहे की, पार्टी फक्त तुमच्यावरच अवलंबून आहे. तुम्हाला मरणाची भीती वाटत आहे. तुम्ही घाबरट झाले आहात. पार्टीच्या मूल्यांशी मांडणी तुमच्यापेक्षा इतर कुणीही चांगल्या पद्धतीने करू शकत नाही असे तुम्हाला वाटते नाही. असेंब्लीमध्ये इतर कुणीतरी बॉम्ब फेकेल हा निर्णय तुम्ही केंद्रीय समितीला का घेऊ दिला नाही? अखेर या वादानंतर भगतसिंग यांची बॉम्ब फेकण्यासाठी निवड झाली. शेवटचा क्षण आणि अमर बलिदान 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या तिघांना फाशी देण्यात आली. सतविंदर सिंग यांनी द एक्झिक्युशन ऑफ भगतसिंग नामक पुस्तक लिहिले. त्यात ते लिहितात, भगतसिंग, सुखदेव व राजगुरू एकमेकांचा हात घेऊन फाशीच्या दोरखंडाकडे निघाले होते. भगतसिंग मध्यभागी होते. तर सुखदेव त्यांच्या डावीकडे तर राजगुरू उजवीकडे होते. त्यांच्या पुढे तुरुंगातील कर्मचारी चालत होते. त्या तिघांनी अचानक 'दिल से निकलेगी ना मरकर भी वतन की उल्फ़त, मेरी मिट्टी से भी खुशबू-ए-वतन आएगी' हे त्यांचे आवडते गाणे गाण्यास सुरुवात केली. कुलदीप नय्यर या घटनेविषयी लिहितात, एकेक करत तिघांचेही वजन करण्यात आले. त्यानंतर त्यांना शेवटची आंघोळ करण्याची सूचना करण्यात आली. त्यानतंर त्यांना काळ्या रंगाचे कपडे घालण्यात आले. त्यांचे चेहरे मात्र उघडे होते. त्यांचे दोन्ही हात व पाय बांदले. त्यानंतर त्यांनी आपल्या गळ्यातील फाशीच्या दोरखंडाचे चुंबन घेतले. त्यावेळी फाशी देणाऱ्या जल्लादाने सर्वात अगोदर कोण फासावर जाणार? असा प्रश्न केला. त्यावर सुखदेव म्हणाले, मी जाणार. त्यानंतर एकेक करत सर्वांना फाशी देण्यात आली. डॉक्टर लेफ्टनंट कर्नल जे जे नेल्सन व डॉक्टर एन एस सोधी यांनी त्यांची तपासणी करून तिघांनाही मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचे मृतदेह कारागृहाच्या मागच्या भिंती फोडून गुप्तपणे बाहेर काढले व लाहोरपासून जवळपास 50 मैल अंतरावर असणाऱ्या हुसैनीवाला येथे सतलज नदीच्या किनाऱ्यावर फेकण्यात आले. धुरंधर मालिकेतील खालील स्टोरीज वाचा… धुरंधर-67; गोपाळबाबा वलंगकर:विटाळलेले भांडे जाळले की शुद्ध होते, मग माणूस विटाळला तर त्यालाही भाजायचे का? असा सवाल करणारा दलितांचा आधारवड धुरंधर-66; मुक्ता साळवे:वेद आपले 'धर्मपुस्तक' नाही असे ठणकावून सांगणाऱ्या गावकुसाबाहेरील दलित महिलेचा पहिला विद्रोही हुंकार धुरंधर-65; भाऊ दाजी लाड:भारताच्या प्राचीन वारशाचा शोध घेत कुष्ठरोगावर औषध शोधून पाश्चात्यांना जबर धक्का देणाऱ्या जिद्दी तरुणाची गोष्ट धुरंधर-64; दुर्गाबाई देशमुख:राष्ट्रसेवेची अखंड ज्योत असणाऱ्या फ्रॉकवाल्या छोट्या शिक्षिकेची निष्ठा अन् निडरपणाची गोष्ट धुरंधर-63; वासुदेव सीताराम बेंद्रे:शिवजयंतीची तारीख निश्चित करणारा अन् शंभूराजांचे ऐतिहासिक पुनर्वसन करणारे मराठ्यांच्या इतिहासाचे भीष्माचार्य धुरंधर-62; गुरुवर्य केळूसकर:'दादोजी कोंडदेव अन् रामदास स्वामी शिवरायांचे गुरू नाहीत' असे ठामपणे सांगणारा महाराष्ट्राचा उपेक्षित वाङ्मयमहर्षी धुरंधर-61; सी. व्ही. रामन:आकाशाचा अन् समुद्राच्या पाण्याचा रंग निळाच का? या प्रश्नाचे उत्तर प्रकाशाच्या गुणधर्मातून देणारा भौतिकशास्त्रज्ञ धुरंधर-60; अलेक्झांडर कनिंगहॅम:काशी लगत स्वर्गात जाणाऱ्या पायऱ्यांचा शोध लावणारा अन् बुद्धांचा भारत शोधणारा इंग्रजी लष्करी अधिकारी धुरंधर-59; संत बंका:देव आमचाही असेल तर मंदिर का नाही? असा प्रश्न करणारे मोठ्या ग्रंथांचे नव्हे, तर मोठ्या प्रश्नांचे संत! धुरंधर-58; अँटोनियो ग्राम्शी:तुरुंगाच्या 4 भिंतीत जग बदलण्याची शक्ती शोधणारा अन् वैचारिक क्रांती शस्त्रांपेक्षा वरचढ असल्याचे सांगणारा विचारवंत धुरंधर-57; डॉ. श्रीराम लागू:'देवाचे अस्तित्व हीच मोठी अंधश्रद्धा' असल्याचे ठणकावून सांगत समाजाला अस्वस्थ करणारा बुद्धिवादी माणूस धुरंधर-56; राणी गाइदिन्ल्यू:झाशीच्या राणीची गोष्ट माहिती असणाऱ्यांना इंग्रजांना आव्हान देणाऱ्या आदिवासी कन्येची गोष्ट माहिती आहे का? धुरंधर-55; पां. म. बापट:सशस्त्र क्रांतिकारक ते अहिंसक सत्याग्रहाचा सेनापती अन् अखेर झाडू उचलून ग्राम स्वच्छता करणारा सुधारक धुरंधर-54; नाना पाटील:म्हार, मांगांना लांब का ठेवता? ते घान कामं करत्यात म्हणून? तुमचा डावा हातही तेच करतो, असे सांगणारा क्रांतिसिंह धुरंधर-53; नेल्सन मंडेला:भारताला दुसरे घर मानणाऱ्या आफ्रिकन गांधींची कहाणी; 27 वर्षे कैद भोगूनही मनात कटूता न ठेवणारा मदिबा धुरंधर-52; शकुंतला देवी:शाळेचे तोंड न पाहता संगणकाची परीक्षा पाहणाऱ्या अन् गणिताला खेळ मानणाऱ्या कानडी महिलेची जादूई कहाणी धुरंधर-51; केशवराव जेधे:ब्राह्मणेतर चळवळीचा प्रमुख चेहरा अन् सामाजिक न्यायासाठी झगडणारा ठसकेबाज दृढनिश्चयी मराठी लढवय्या धुरंधर-50; डॉक्टर सलीम अली:पक्ष्यांच्या जगाचे रहस्य उलगडून मानवाला निसर्गाच्या दिशेने जाण्यास प्रेरित करणारा पक्ष्यांचा 'चालता फिरता विश्वकोश' धुरंधर-49; सर रोनाल्ड रॉस:'साला एक मच्छर'! मलेरिया अन् डास यांच्यातील परस्पर संबंध शोधून मानवतेची सेवा करणारा थोर वैज्ञानिक धुरंधर-48; होमी जहांगीर भाभा:दगडधोंड्यांच्या भारतात अणुज्योत पेटवून अज्ञानाचा अंधःकार दूर करणारा श्रीमंत घरातला बंडखोर तरुण धुरंधर-47; बिंदेश्वरी प्रसाद मंडल:ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या इमारतीचा सर्वात मजबूत पाया रचणाऱ्या बिहारच्या जमीनदाराची कथा धुरंधर-46; कार्ल बुशबी:ना ट्रेन ना प्लेन ना बाईक, तब्बल 27 वर्षांच्या अन् 58 हजार किलोमीटरच्या पदयात्रेची अनोखी कथा जी आजही सुरूय धुरंधर-45; जाईबाई चौधरी:स्त्री जीवन फुलवणारी अन् दलित महिलांना शैक्षणिक, सांस्कृतिक संजीवणी देणारी विदर्भातील थोर सेविका धुरंधर-44; ओशो रजनीश:पापाला पुण्याचे अन् हिंसेला अहिंसेचे कपडे घालावे लागतात असे सांगत ईश्वरापूर्वी स्वतःला शोधण्याचा सल्ला देणारा थोर दार्शनिक धुरंधर-43; अमृता प्रीतम:मैं तेनु फिर मिलांगी, कित्थे? किस तरह? पता नहीं; प्रेम, वेदना अन् स्वातंत्र्याचा सूर छेडत बाईचे जगणे मांडणारी लेखिका धुरंधर-42; दगडाबाई शेळके:स्वतःच्या नवऱ्याचे दुसरे लग्न लावून मराठवाडा मुक्तिसंग्रामात स्वतःला झोकून देणारी जालन्याची 'झाशीची राणी' धुरंधर-41; यशवंत घाडगे:दुसऱ्या महायुद्धात मर्दुमकी दाखवत ब्रिटिशांकडून इटलीच्या सैनिकांना कंठस्नान घालणारा मराठी सैनिक धुरंधर-40; शाहीर अमर शेख:धग, रग, आग, धुंदी अन् बेहोशीची जिवंत बेरीज असणारा तथा 'बर्फ पेटला हिमालयाला विझवायला चला' म्हणणारा शाहीर धुरंधर-39; टी. एन. शेषन:'नेत्यांना नाश्त्यात खाणारे' तथा EC ला अभूतपूर्व ताकद अन् प्रतिष्ठा मिळवून देणारे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त धुरंधर-38; डॉ. एम एस स्वामीनाथन:उपासमारीच्या सावटाखाली झुरणाऱ्या भारताला स्वावलंबनाचे स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवणारा शास्त्रज्ञ धुरंधर-37; मेजर शैतान सिंह:1962 च्या भारत - चीन युद्धात 120 जवानांच्या जोरावर शत्रूचा फडशा पाडणारा अन् पोट फाटले तरी मैदान न सोडणारा बहाद्दर धुरंधर-36; राणी वेलू नाचियार:महिलांची फौज तयार करून ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांना पहिल्यांदा धूळ चारणारी शिवगंगाची 'वीर मंगई' धुरंधर-35; अय्यनकाली:महिलांना छाती झाकण्याची परवानगी मिळवून देणारा अन् दलितांनी पिकवलेले धान्य चालते, मग ते का चालत नाहीत? असा प्रश्न करणारा सुधारक धुरंधर-34; जगन्नाथ शंकरशेठ:लोकांचा विश्वास जिंकणारी श्रीमंती गरिबांवर उधळणारा अन् परकियांनाही आपला वाटणारा मुंबईचा खरा शिल्पकार धुरंधर-33; अण्णाभाऊ साठे:दीड दिवस शाळेत जाऊन साहित्याचा सूर्य झालेला लोकशाहीर; जात, धन अन् धर्मदांडग्यांना आव्हान देणारा अण्णा धुरंधर-32; धीरूभाई अंबानी:गरिबीवर मात करत कोट्यवधी भारतीयांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे भारताचे एक अप्रतिम उद्योग रत्न धुरंधर-31; राजर्षी शाहू महाराज:अस्पृश्याला मानाचे पान अन् नांगरासाठी तोफा वितळवून लोखंड देणारे शाहू महाराज ग्रेट का होते? धुरंधर-30; चे गेव्हारा:अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द जागवून अवघ्या जगातील क्रांतीचा चेहरा बनलेला तुमच्या 'T शर्ट'वरील क्रांतिदूत धुरंधर-29; संत कबीर:पैशांच्या मागे पळणाऱ्यांचा देव कसा? असा परखड सवाल करत समस्त मानवतेला साधेपणाचा संदेश देणारा महानायक धुरंधर-28; राणी चेन्नम्मा:स्वकियांची फंदफितुरी जमिनीत गाडून 1857 च्या सशस्त्र उठावापूर्वी इंग्रजांना धूळ चारणारी 'कर्नाटकची लक्ष्मीबाई' धुरंधर-27; अहिल्याबाई होळकर:न्यायबुद्धीने स्वतःच्या नवऱ्याला धारेवर धरत चोराच्याही पोटाचा प्रश्न सोडवणाऱ्या दूरदृष्टीच्या शासक धुरंधर-26; डॉ. जयंत नारळीकर:ब्रह्मास्त्र होते तर रामाच्या राज्यात वीज होती का? असा झोंबणारा प्रश्न करणारा भारताचा मराठमोळा शास्त्रज्ञ धुरंधर-25; मुथुलक्ष्मी रेड्डी:महिला हक्क अन् आईचे 'देवदासी'पण पाहून त्याविरोधात लढा पुकारणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला आमदार धुरंधर-24; कुलदीपसिंग चांदपुरी:पाकच्या 2000 हून अधिक सैनिकांना 120 जवानांच्या बळावर धूळ चारणारा लढवय्या; '1971' ची अमर गाथा धुरंधर-23; चंद्रप्रभा सैकियानी:पडदा प्रथेवर लाथ घालून महिलांना आभाळ खुले करणारी आसामची हिरकणी; कुमारी माता झाली तरी डगमगली नाही धुरंधर-22; कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील:महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणाचा सूर्य पेरून उपेक्षितांच्या झोपडीत ज्ञानाचे पीक काढणारा खरा 'धुरंधर' धुरंधर-21; प्रबोधनकार ठाकरे:मराठी समाज मनात मोक्याच्या ठिकाणी पक्क्या गाठी मारून जातिभेदांच्या जखमांचा खोलवर शोध घेणारा बहुजन हिंदुत्त्ववादी धुरंधर-20; भीमराव रामजी आंबेडकर:चवदार तळ्याला ताळ्यावर आणणारा दलितोद्धारक अन् सामाजिक समरसतेचा खरा विवेकी शिल्पकार धुरंधर-19; जिगर मुरादाबादी:'शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ खुदा नहीं,' असे म्हणत मौलवींकडून टाळ्या पिटवून घेणारा सूफी शायर धुरंधर-18; आनंदीबाई जोशी:'पृथ्वीच्या पाठीवर हिंदुस्तान इतका दुसरा रानटी देश नाही', असे ठणकावून सांगणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर धुरंधर-17; भगतसिंग:'बॉम्ब अन् पिस्तुले क्रांती आणत नाहीत, क्रांती लोकांच्या मनात जन्मते', असे ठामपणे सांगणारा 'शहीद ए आझम' धुरंधर-16; शहाजीराजे भोसले:छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रेरणास्थान अन् बृहन्महाराष्ट्राची स्थापना करणारा धोरणी राजा धुरंधर-15; ई. व्ही. रामासामी:देव आहे हे सिद्ध करण्याचे आव्हान देत तर्कशुद्ध अन् निर्भय मतांद्वारे समाजात क्रांती घडवणारा भारताचा 'पेरियार' धुरंधर-14; कार्नेलिया सोराबजी:रूढी परंपरांना आव्हान देत शिक्षण, समानता अन् मानवी हक्कांसाठी अथक झगडणारी भारताची पहिली महिला बॅरिस्टर धुरंधर-13; खासेराव जाधव:बहुजन समाजाच्या खांद्यावरील निरक्षरतेचे 'जू' काढून त्यांना उच्च शिक्षणाच्या गंगेचे पाणी पाजणारा अवलिया धुरंधर-12; तंट्या भिल्ल:आदिवासींमध्ये राष्ट्रीयत्व जागवणारा 'रॉबिनहूड', थोर स्वातंत्र्यसैनिक; वाचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचे सोनेरी पान धुरंधर-11; विठ्ठल सखाराम पागे:उकिरड्याला खरकटे माहिती नसल्याच्या काळात 'भूकबळी'वर नामी उपाय शोधणारा राजकारणी धुरंधर-10; मोहन हिराबाई हिरालाल:विनोबा भावेंचे 'सर्वायतन' नक्षलग्रस्त गडचिरोलीत रुजवणारा अन् गरिबांना लक्ष्मीदर्शन घडवणारा अवलिया धुरंधर-9; फातिमा शेख:सावित्रीमाईंची मैत्रीण अन् भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका; फातिमा एक काल्पनिक पात्र होत्या का? तुम्हीच ठरवा धुरंधर-8; एकनाथ दगडू आवाड:बापाचा बुचडा कापून 'पोतराज' प्रथेवर घाव घालणारा पोरगा; कथित गुन्हेगारीने बदनाम झालेल्या बीडचा थोर माणूस धुरंधर-7; स्वामी विवेकानंद:मानवतेचा उत्कृष्ट प्रेमी, महान निधर्मी तत्ववेत्ता; नरेंद्रनाथ दत्त यांचे अखेरचे काही तास कसे होते? धुरंधर-6; कंदुकुरी वीरेशलिंगम पंथुलु:अंधश्रद्धेवर लाथ घालून विधवा पुनर्विवाह अन् ज्ञानाची वात पेटवणारा आंध्रचा 'लेखणी'सम्राट धुरंधर-5; भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड:दोन वेळा वाचवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राण धुरंधर-4; डॉ. विश्राम रामजी घोले:महिला उत्थानासाठी पेटून उठलेला सुधारक, ज्यांची 'बाहुली' ठरली स्त्री शिक्षणाची पहिली बळी धुरंधर-3; पार्वतीबाई आठवले:वैधव्य अन् परावलंबन दैवी भोग मानणारी, पण पोटच्या गोळ्याच्या काळजीने असामान्य झालेली एक निरक्षर स्त्री धुरंधर-2; बसव प्रेमानंद:अंधश्रद्धेच्या खाटेवर आजारी पडलेल्या समाजाला विज्ञानाचे औषध देऊन चमत्कारांची पुरती हवा काढणारा थोर दार्शनिक धुरंधर-1; नरहर अंबादास कुरुंदकर:विचारांची श्रीमंती वाढवणारा अन् आजच्या किर्र वैचारिक काळोखात प्रकाशवाट दाखवणारा थोर विचारवंत

32 C