Mouni roy :मौनी तिच्या सादरीकरणादरम्यान रागाने स्टेजवरून निघून जात असल्याचा व्हिडिओ रेडिटवर समोर आला असून, हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
Private Jet Crash : मोठी दुर्घटना..! खासगी विमान कोसळलं; ८ प्रवाशी करत होते प्रवास
Private Jet Crash :
Abhishek Sharma Bat Check : सध्या सोशल मीडियावर न्यूझीलंडचे खेळाडू अभिषेक शर्माची बॅट चेक करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Statement on Sharad Pawar) यांच्यावर टीका करताना भिडे यांनी ते महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड असल्याचे म्हटले
Chandrapur Politics : चंद्रपूरच्या राजकारणात होणार मोठा उलटफेर? भाजप मोठी चाल खेळणार
चंद्रपूर महानगरपालिकेच्या (Chandrapur Politics) निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, भाजपकडून काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
Dhurandhar : ‘धुरंधर’ चित्रपटातील अभिनेता अटक; घरकाम करणाऱ्या महिलेवर 10 वर्ष केला अत्याचार
Dhurandhar : ‘धुरंधर’ चित्रपटात झळकलेला अभिनेता नदीम खान याला घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली
Boat Accident : सागरी किनाऱ्यावर हाहाकार; ३५० प्रवाशांची बोट समुद्रात बुडाली; अनेक जण ठार
Boat Accident : फिलिपाईन्समध्ये ३५९ प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात बुडाली. आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून ३०१ प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे.
फिलिपाईन्समध्ये बोट बुडून अनेकांचा मृत्यू
झांबोआंगा : फिलिपाईन्समध्ये झांबोआंगा येथून सुलू प्रांतातील जोलो बेटाच्या दिशेने निघालेली बोट समुद्रात बुडाली. बुडालेल्या बोटीत ३५० पेक्षा जास्त नागरिक होते. यातील अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. बचाव पथकाने १५ मृतदेह समुद्रातून बाहेर काढले आहेत. अद्याप २८ जण बेपत्ता आहेत. बचाव पथकाने ३१६ जणांना वाचवले आहे.बुडालेली बोट ही इंटर-आयलंड कार्गो आणि पॅसेंजर सेवा होता. बोटीत ३३२ प्रवासी आणि २७ क्रू मेंबर्स (कर्मचारी) होते. समुद्रातून प्रवास करत असताना बोटीत तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे सोमवारी पहाटे बोट समुद्रात बुडाली.समुद्रात असताना सोमवारी २६ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री एक वाजून ५० मिनिटांनी बोटीकडून एक संकटात सापडल्याचा संदेश पाठवण्यात आला. हा संदेश मिळताच बचाव पथक घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले. पण पथक पोहोचण्याआधीच बालुक द्वीप गावापासून साधारण २ किलोमीटर अंतरावर बोट बुडाली. वाचलेल्या प्रवाशांना तटरक्षक दलाने तातडीने बालुक द्वीप गावात नेले, तिथेच त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात आले.तटरक्षक दलाची टीम तसेच तटरक्षक दलाचे एक विमान, हवाई दलाची आणि नौदलाची टीम हे सर्वजण संयुक्तपणे मदतकार्य करत आहेत. बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे. बोट बुडण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणी चौकशी होणार आहे.फिलिपाईन्समध्ये बोट बुडण्याच्या घटना अनेकदा घडतात. फिलिपाईन्सच्या बेटांच्या दरम्यान लहान - मोठी चक्रीवादळे वारंवार येत असतात. या चक्रीवादळांमुळे तसेच जहाजांची योग्य निगा न राखणे, गर्दी आणि सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी न होणे या कारणांमुळेही फिलिपाईन्समध्ये अनेकदा बोटी बुडाल्या आहेत. ताज्या दुर्घटनेचे कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू आहे.
IAS Tina Dabi: प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान झालेल्या एका ‘मानवीय चुकी’मुळे त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Principal Died : देशभरात २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना महाराष्ट्रात दोन दुर्दैवी घटना (Principal Died) घडल्या ज्यामुळे उत्साहावर शोककळा पसरली
Shreyas Iyer Opportunity : तिलक वर्मा उर्वरित दोन टी-२० सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे श्रेयस अय्यरला संधी मिळाली.
बियाणे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'Flipkart' वरही उपलब्ध करण्यात आली आहेत. याबाबतची माहिती NSC ने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Uddhav Thackeray : लातूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. औशाचे माजी आमदार दिनकरराव माने यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Budget 2026: विमा क्षेत्राला कर सवलतींची अपेक्षा; पॉलिसीधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता
Budget 2026: विमा क्षेत्राला अधिक स्वस्त आणि सुलभ करण्यासाठी आयकर सवलतीत वाढ करण्याची आग्रही मागणी उद्योगाकडून केली जात आहे.
Ramesh Tikhe Death : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी रमेश तिखे (Ramesh Tikhe Death) यांचा हृदयविकाराने निधन झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली
Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Badrinath-Kedarnath : चार धाम तीर्थक्षेत्रांवर गैर-हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या दिशेनेबद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, प्रजासत्ताक दिनी दिसले देशाचे सामर्थ्य
नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात परेडचे आयोजन करण्यात आले होते. या संचलनात महाराष्ट्रासह एकूण १७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे तसेच १३ केंद्रीय विभागांचे चित्ररथ सहभागी झाले. या व्यतिरिक्त भूदल, नौदल, हवाई दल, देशातील केंद्रीय निमलष्करी दले यांचाही संचलनात सहभाग होता. स्वदेशी धनुष तोफ तसेच टी ९० भीष्म रणगाडा, अर्जुन एम के १ मेन बॅटल टँक, नाग मिसाइल, मार्क २ चीही झलक दिसली. संचलनाचा समारोप हवाई दलाच्या विमानांच्या ताफ्याने दिल्लीच्या आकाशात चित्तथरारक कसरती करत केला.https://www.youtube.com/shorts/FlW1Gp7-EBkपरेड अर्थात संचलनाच्या माध्यमातून देशाचे सामर्थ्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा, प्रगती, लष्करी पराक्रम यांचे प्रतिबिंब दिसले. भारताच्या वाढत्या लष्करी सामर्थ्याची झलक दिसली.https://www.youtube.com/shorts/-rk5aAD-1xE'स्वातंत्र्याचा मंत्र : वंदे मातरम् आणि समृद्धीचा मंत्र : आत्मनिर्भर भारत ' या संकल्पनेअंतर्गत कर्तव्य पथावर ३० चित्ररथ आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. बंकिमचंद्र चटर्जींची रचना असलेले भारताचे राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्' ला दिडशे वर्ष झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय विशेष चित्ररथ घेऊन परेडमध्ये सहभागी झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कार्यक्रमाची पाहणी केली.चित्ररथांच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे, सांस्कृतिक विविधतेचे आणि विविध क्षेत्रांमधील स्वावलंबनाकडे होणाऱ्या प्रगतीचे दृश्य वर्णन सादर करण्यात आले. ज्यामध्ये हस्तकला आणि लोक परंपरांपासून ते स्वावलंबन, नवोन्मेष, संरक्षण तयारी आणि राष्ट्र उभारणी उपक्रमांपर्यंतच्या विषयांचा समावेश होता. परेडमध्ये सैनिकांच्या तुकड्या सहभागी झाली. लष्करी बँड पथके आकर्षक धून वाजवत परेडमध्ये सहभागी झाली.https://www.youtube.com/shorts/gJSzMY5qw3oमहाराष्ट्राच्या चित्ररथाची गणेशोत्सव ही संकल्पना होती. या निमित्ताने दिल्लीत गणपती बाप्पा मोरया हा गजर घुमला. महाराष्ट्राचा चित्ररथ येताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल यांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं.युरोपियन कौन्सिलचे प्रेसिडेंट अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन युनियनच्या प्रेसिडेंट उर्सुला वॉन डेर लेयन हे २०२६ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परंपरेनुसार, राष्ट्रध्वज फडकवण्यात आला, त्यानंतर राष्ट्रगीत आणि स्वदेशी १०५-मिमी लाईट फील्ड गन वापरून २१ तोफांची सलामी देण्यात आली. दरवर्षीप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन लाल किल्ल्यावर आले. राष्ट्रपती, विशेष अतिथी आणि पंतप्रधान आणि इतर मान्यवर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत परेड झाली.जागतिक अॅथलेटिक पॅरा चॅम्पियनशिपचे विजेते, नैसर्गिक शेती करणारे शेतकरी, पीएम स्माइल योजनेअंतर्गत पुनर्वसन केलेले ट्रान्सजेंडर आणि भिकारी, गगनयान, चांद्रयान इत्यादी अलीकडील इस्रो मोहिमांमध्ये सहभागी असलेले सर्वोत्तम कामगिरी करणारे शास्त्रज्ञ/तांत्रिक व्यक्ती, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनमध्ये SIGHT (स्ट्रॅटेजिक इंटरव्हेंशन फॉर ग्रीन हायड्रोजन ट्रान्झिशन) कार्यक्रमांतर्गत हायड्रोजन उत्पादन आणि इलेक्ट्रोलायझर उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळालेल्या कंपन्यांचे प्रमुख/सीईओ आणि प्रमुख प्रकल्पांमध्ये काम करणारे डीआरडीओचे सर्वोत्तम कामगिरी करणारे शास्त्रज्ञ/तांत्रिक व्यक्ती आदी दहा हजार मान्यवर विशेष आमंत्रणाचा मान राखत परेड बघण्यासाठी उपस्थित होते.
Inderjit Singh Bindra : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आय. एस. बिंद्रा यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी दिल्लीत निधन झाले.
Girish Mahajan : महिला कर्मचाऱ्याच्या संतापानंतर मंत्री गिरीश महाजनांची दिलगिरी; काय म्हणाले पहा..
Girish Mahajan : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव भाषणात राहून गेल्याने वाद
Republic Day: देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी दिल्लीतील कर्तव्यपथावर भारतीय लष्कराच्या बदलत्या आणि आधुनिक स्वरूपाचे दर्शन घडले.
IAF Officer Akshita Dhankhar: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ध्वजारोहणात सहकार्य करण्याचा ऐतिहासिक बहुमान भारतीय हवाई दलाच्या (IAF) फ्लाइट लेफ्टनंट अक्षिता धनखर यांना मिळाला.
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात आपली परंपरा कायम ठेवली.
Social Media Influencer : प्रसिद्ध मराठी इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार प्रथमेश कदमने आजारपणामुळे प्राण गमावल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
Simran Bala :जम्मू आणि काश्मीरमधील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) २६ वर्षीय सहाय्यक कमांडंट सिमरन बाला आज दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये त्यांच्या दलाच्या सर्व-पुरुष तुकडीचे नेतृत्व केले.
शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील या जिल्ह्यांतून जाणार
मुंबई : एमएसआरडीसीने ८५६ किमीच्या महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार असलेल्या शक्तिपीठ महामार्गाचा सुधारित प्लॅन मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला आहे. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाप्रमाणेच राज्याच्या विकासाला गती देणारा शक्तिपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा असा असेल.स्थानिकांशी संवाद साधल्यानंतर जनतेच्या मागण्या आणि त्यांचे प्रश्न यांचा सर्वांगीण विचार करून एमएसआरडीसीने शक्तिपीठ महामार्गाचा सुधारित प्लॅन तयार केला आहे. आधीचा ८४० किमीचा महामार्ग आता ८५६ किमीचा झाला आहे. आधी १२ जिल्ह्यांतील ३५० गावांतून जाणार असलेला हा मार्ग आता १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार आहे. या महामार्गामुळे प्रवास वेगाने होईल. मालवाहतूक करणे सोपे होईल.शक्तिपीठ महामार्गात आता सातारा या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशीव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १३ जिल्ह्यांतून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे.आधी जुन्या प्लॅननुसार १४६ गावांतील मोजणी झाली होती. यातील आवश्यक ती माहिती वापरली जाईल आणि जिथे गरज असेल तिथे पुन्हा मोजणी घेतली जाईल तसेच उर्वरित गावांतही जमीन मोजणीची कामं वेगाने केली जातील, अशी माहिती एमएसआरडीसीने दिली. जमीन मोजणी पूर्ण केल्यानंतर कायद्यानुसार योग्य तो मोबदला देऊनच भूसंपादन केले जाईल, असे राज्य शासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
Mexico Soccer Field Firing : फुटबॉल सामन्यादरम्यान गोळीबार ; ११ जणांचा मृत्यू तर १२ जण जखमी
Mexico Soccer Field Firing : मेक्सिकन शहर ग्वानाजुआटो, सॅलामांका याठिकाणी फुटबॉलचा सामना सुरु असताना मैदानावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे.
Girish Mahajan : गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याने वाद
Mahhi Vij New Car: घटस्फोटानंतर माही विजचा मोठा निर्णय; लेक तारासाठी ५० लाखांची मिनी कूपर भेट
Mahhi Vij New Car: टीव्ही अभिनेत्री माही विज सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेता जय भानुशालीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यानंतर माही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत बातम्यांमध्ये आहे.
मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा
नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्रातून ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला मंजुरी दिली आहे. या खरेदीसाठी केंद्राने २६९६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. तूर खरेदी ही मूल्य समर्थन योजनेंतर्गत किमान आधारभूत किमतीनुसार होणार आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल आणि थेट खरेदीमुळे दलालांचा त्रासही संपणार आहे. पारदर्शक खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवण्याचे आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतलेल्या बैठकीला महाराष्ट्राचे विपणन अर्थात मार्केटिंग विभागाचे मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. त्यांनी राज्यातील तूर उत्पादनाची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली. तसेच बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांशी खरेदी प्रक्रियेच्या नियोजनाबाबत चर्चा केली.केंद्राच्या निर्णयानुसार तूर खरेदी ही नाफेड आणि एनसीसीएफ या दोन केंद्रीय संस्था महाराष्ट्र शासनाशी समन्वय राखून करतील. गरज पडल्यास खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे निर्देशही केंद्रीय कृषीमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे निधन
मुंबई : लोकप्रिय मराठी रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं आहे. प्रथमेशच्या निधनाचे कारण अद्याप समजलेले नाही. पण तो काही दिवसांपासून आजारी होता आणि या आजारपणातच त्याने अखेरचा श्वास घेतला. प्रथमेशच्या मित्रांनी सोशल मीडिया पोस्ट करुन त्याच्या निधनाची बातमी दिली.काही वर्षांपूर्वी प्रथमेशच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर प्रथमेशवर कुटुंबाची जबाबदारी आली. प्रथमेशने घराची जबाबदारी सांभाळलीच. याशिवाय या दुःखावर मात करत त्याच्या आईलाही धीर दिला होता. गेल्या अनेक वर्षांपासून प्रथमेश आणि त्याची आई प्रज्ञा कदम हे दोघे एकत्र रील करत होते. ही रील सोशल मीडियात व्हायरल होत होती. प्रथमेशचे कौतुक होत होते. अचानक त्याच्या निधनाची बातमी आल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.
77th Republic Day :
Health & Fitness: बाजरी का मानली जाते सुपरफूड? ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितले फायदे
Health & Fitness: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२६ मधील पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधताना मिलेट्सच महत्त्व अधोरेखित केलं.
Eknath Shinde : “सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही, पण…”; एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात झेंडावंदन करत जनतेशी साधला संवाद
Shubhanshu Shukla : देशाच्या प्रजासत्ताक दिनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले.
वॉशिंग्टन डीसी : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सतत बदलत्या धोरणामुळे आणि अव्यावहारिक अशा निर्णयांमुळे अमेरिका - भारत मुक्त व्यापार करारात अडथळे निर्माण झाले आहेत. हा करार अद्याप न होण्याचे मुख्य कारण ट्रम्प आणि प्रशासनातील त्यांचे निवडक सहकारी हेच आहेत, असा आरोप अमेरिकन सिनेटर टेड क्रुझ यांनी केला आहे.टॅरिफ लादल्यामुळे अमेरिकेच्या उत्पन्नात वाढ झालेली नाही पण महागाई वाढली आहे. आधी परदेशातून मोठ्या प्रमाणात येणारी आणि वाजवी दरात उपलब्ध असलेली अनेक उत्पादने आणि सेवा आता अनुपलब्ध आहे किंवा त्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. शिवाय या उत्पदनांचा अथवा सेवांचा लाभ घेण्यासाठी आधीच्या तुलनेत जास्त रक्कम मोजण्याची वेळ अमेरिकेत राहणाऱ्यांवरच आली आहे. टॅरिफ अर्थात आयातशुल्क या संदर्भातले ट्रम्प यांचे धोरण इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेसाठीच जास्त त्रासाचे ठरल्याचा आरोप विरोधकांकडून ट्रम्पवर सुरू आहे. आता अमेरिकन सिनेटर टेड क्रुझ यांनी केलेल्या नव्या आरोपांची त्यात भर पडली आहे.'अमेरिका प्रथम' हे धोरण राबवताना व्यवस्थित विचार केला नाही, चुकीचे निर्णय घेतले आणि राबवले. यामुळे अमेरिकेचे भले होण्याऐवजी अमेरिकाच अडचणींमध्ये सापडली आहे. अमेरिकेसाठी महत्त्वाचा असलेला भारतासोबतचा मुक्त व्यापार करार अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाच्या चुकांमुळेच रखडला आहे, असा आरोप अमेरिकन सिनेटर टेड क्रुझ यांनी केला आहे.अमेरिका - भारत मुक्त व्यापार करार रखडण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जेडी व्हान्स आणि पीटर नव्हारो हे सर्वाधिक जबाबदार आहेत, असा आरोप अमेरिकन सिनेटर टेड क्रुझ यांनी केला आहे.सिनेटर क्रुझ त्यांच्या निवडक बड्या निधी पुरवठादारांशी फोनवर खासगी संभाषण करत होते. या संभाषणात क्रुझ यांनी अमेरिका - भारत मुक्त व्यापार करार रखडण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जेडी व्हान्स आणि पीटर नव्हारो हे सर्वाधिक जबाबदार असल्याचा आरोप केला. हा खासगी संवाद रेकॉर्डेड स्वरुपात लीक झाला आहे. लीक झालेल्या ऑडिओ क्लीपमुळे अमेरिकेत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ज्या माध्यमांनी सिनेटर क्रुझ यांच्या ऑडिओ क्लिप लीक झाल्याचे वृत्त दिले त्यांनी आवाजाची सत्यता पडताळणी अद्याप झालेली नाही असे सांगितले. पण क्लिप ऐकल्यावर अनेकांनी आवाज ओळखला, असेही वृत्त संबंधित माध्यमांनी दिले आहे.ट्रम्प यांच्या चुकांमुळे मिडटर्म इलेक्शन अर्थात मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा पराभव होण्याची शक्यता वाढली आहे, अशी भीती सिनेटर क्रुझ यांनी बड्या निधी पुरवठादारांशी बोलताना व्यक्त केली आहे.
Amitabh Bachchan: चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान स्टंट किंवा अॅक्शन सीन करताना कलाकारांना दुखापत होण्याचे प्रकार अनेकदा घडतात. असाच एक धक्कादायक प्रसंग २००३ साली अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत घडला होता.
Plane Crash : अमेरिकेत टेकऑफनंतर खाजगी जेट विमान कोसळले ; अपघातात विमानाला भीषण आग
Plane Crash :अमेरिकेच्या मेन राज्यात एका खाजगी जेट विमान टेकऑफ दरम्यान कोसळल्याची घटना घडली आहे.
बर्न : सेंटर फॉर मिलिटरी हिस्ट्री अँड पर्स्पेक्टिव्ह स्टडीज (CHPM) या स्विस मिलिटरी थिंक टँकने ४७ पानांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवला होता. भारताच्या कारवाईपुढे पाकिस्तानचे हवाई संरक्षण निकामी झाले. भारताने सात ते दहा मे २०२५ दरम्यान पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. या हल्ल्यांना थोपवण्यात पाकिस्तान अपयशी ठरला. भारताच्या हवाई दलाने राफेल आणि मिराज-२००० विमानांचा वापर करून बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाला आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाला लक्ष्य केले. पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा हे हल्ले थोपवण्यात पुरती अपयशी ठरली. प्रत्युत्तर देण्याची क्षमता गमावल्यानंतर, पाकिस्तानने १० मे रोजी दुपारपर्यंत युद्धबंदीची विनंती केली, जी भारताने मान्य केली.पाकिस्तानने भारतावर सात मे रोजी ९०० ड्रोन वापरुन हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारताच्या आकाशतीर नेटवर्क आणि इलेक्ट्रॉनिक जामिंगमुळे पाकिस्तानचा हल्ला अयशस्वी झाला. भारताने हे ड्रोन सीमेच्या आसपासच्या भागात सहज पाडले. भारताच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला, असे सेंटर फॉर मिलिटरी हिस्ट्री अँड पर्स्पेक्टिव्ह स्टडीज (CHPM) या स्विस मिलिटरी थिंक टँकने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.भारताने दहा मे रोजी पहाटे दोन ते पाच दरम्यान ब्राह्मोस आणि स्कॅल्प-ईजी सारख्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करून पाकिस्तानी हवाई तळांवर आणि रडार सुविधांवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानची अनेक लढाऊ विमाने, रडार आणि कमांड सेंटर नष्ट झाली. धावपट्टी नष्ट झाल्यामुळे पाकिस्तानी हवाई दल घाबरले आणि दुपारपर्यंत इस्लामाबादला हार मानावी लागली. यानंतर पाकिस्तानने युद्धबंदीची मागणी केल्याचे सेंटर फॉर मिलिटरी हिस्ट्री अँड पर्स्पेक्टिव्ह स्टडीज (CHPM) या स्विस मिलिटरी थिंक टँकने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.लष्करी इतिहासकार एड्रियन फोंटानेलाझ यांनी तयार केलेल्या आणि स्विस हवाई दलाच्या निवृत्त मेजर जनरलसह तज्ज्ञांच्या पॅनेलने पुनरावलोकन केलेल्या या अहवालात भारताचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याचा आणि पाकिस्तानचा पुरता पराभव झाल्यामुळेच त्यांनी युद्धबंदीची विनंती केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. भारताने राजकीय आणि लष्करी उद्दीष्टे साध्य केली असाही या अहवालाचा निष्कर्ष आहे.
India-US Trade Deal : अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमक्या अजूनही सुरूच आहेत.भारत-अमेरिका व्यापार करार त्यामुळे रखडलेला आहे.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत ध्वजवंदन
Devendra Fadnavis : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनाचा अर्थ, परंपरा आणि यंदाचे खास पाहुणे
Republic Day 2026: दरवर्षी २६ जानेवारी रोजी भारतभर प्रजासत्ताक दिन मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो. हा दिवस केवळ राष्ट्रीय सुट्टी नसून, भारतीय संविधान लागू झाल्याचा ऐतिहासिक क्षण आठवण करून देणारा आहे.
Republic Day : स्वानंद विद्यालयातील कवायत, व्यक्तिरेखा सादरीकरणाने जिंकली मने
Republic Day : धायरी येथील स्वानंद प्राथमिक विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
Inderjit Singh Bindra passes away : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष इंद्रजित सिंह बिंद्रा यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन
Top 10 news : महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी चांगले यश मिळवले त्यानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये काही ठिकाणी ठिणग्या उडताना दिसतायेत.
Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.
Republic Day 2026 |
Pune Vegetable Prices : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत परराज्यातून १०० ट्रक फळभाज्यांची आवक; मागणीपेक्षा पुरवठा वाढल्याने दरांमध्ये चढ-उतार.
Pune Weather Update : पुण्यातून थंडीची एक्झिट? पारा वाढला, उकाडा वाढला; पाहा तुमच्या भागातील तापमान
Pune Weather Update : पुण्यातील किमान तापमानात १.५ अंशाने वाढ; पहाटेचे धुके आणि दुपारचा चटका पुणेकरांना सोसावा लागणार.
President's Medal : प्रशासकीय प्रतिमेला नवी झळाळी; केंद्र सरकारकडून जाहीर झालेल्या पदक तालिकेत महाराष्ट्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान.
Masap Election 2026 : परिषदेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी योगेश सोमण अध्यक्षपदाच्या रिंगणात; सातारा संमेलनाच्या व्यवहारांची चौकशी करण्याचे संकेत.
Indian Weapons Exhibition : स्वदेशी शस्त्रास्त्रांचा डंका! 'मेक इन इंडिया' शस्त्रांनी सजली बुधवार पेठ; प्रजासत्ताक दिनानिमित्त खास आयोजन
पंजाबमधील अजनाला येथे एक विहीर आहे. या विहिरीच्या उत्खननातून २८२ सैनिकांचे सांगाडे बाहेर आले. हे सांगाडे अजूनही विहिरीशेजारी एका लोखंडी पेटीत बंद आहेत. हे १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या हुतात्म्यांचे आहेत. केंद्र, राज्य सरकार आणि एएसआय (ASI) यापैकी कोणीही त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वेळ काढू शकले नाहीत, ना त्यांना कोणत्याही संग्रहालयात ठेवता आले आहे. भाग-१ मध्ये तुम्ही वाचले की, सुरेंद्र कोछर नावाच्या व्यक्तीने या नरसंहाराला इतिहासाच्या पानांमधून कसे शोधून काढले आणि नंतर विहिरीचे उत्खनन करून ते कसे सिद्ध केले. इतर हुतात्म्यांप्रमाणे त्यांची ओळख पटवून, त्यांना सन्मान देऊन अंत्यसंस्कार व्हायला हवे होते, पण १६८ वर्षे उलटूनही सरकारे केवळ पत्रव्यवहार करून औपचारिकता पूर्ण करत आहेत. या सांगाड्यांची वैज्ञानिक तपासणी आणि डीएनए नमुने घेण्याचे प्रयत्नही झाले आहेत. तपासणीतून हे सिद्ध होत आहे की सैनिक पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंडचे रहिवासी होते. दोन ते तीन कुटुंबेही पुढे आली, पण अवशेष लोखंडी पेटीत बंद आहेत. दिव्य मराठीने सांगाड्यांची तपासणी करणाऱ्या आणि सैनिकांच्या संभाव्य कुटुंबीयांशी संवाद साधला. कॅनडाहून ईमेल आला, कदाचित सांगाडा माझ्या आजोबांचा आहेया सांगाड्यांच्या आणि अवशेषांच्या वैज्ञानिक तपासणीत सहभागी असलेले बीएचयूचे प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे सांगतात, '२०२३ मध्ये हिवाळ्याची रात्र होती. मी एका संशोधन कार्यात व्यस्त होतो. तेव्हा एक ईमेल आला. हा ईमेल कॅनडाहून कोणीतरी पाठवला होता. यात लिहिले होते की माझे आजोबा ब्रिटिश राजवटीत सैनिक होते आणि 1857 च्या सुमारास अचानक गायब झाले होते. ते कधीच सापडले नाहीत, परतही आले नाहीत. इंग्रज सरकारने आमच्या कुटुंबाविरुद्ध वॉरंटही काढले होते. आम्ही आधी यूपीमध्ये राहत होतो, नंतर पळून तामिळनाडूला गेलो होतो. फक्त आम्हीच नाही, तर तामिळनाडूच्या संथूरमध्ये अशी अनेक कुटुंबे आहेत, जी 1857 मध्ये यूपीमधून स्थलांतरित होऊन आली होती.' ज्ञानेश्वर चौबे सांगतात, 'पहिल्यांदा हा ईमेल वाचून मी भावूक झालो. एक नवी आशा दिसली की कदाचित या सांगाड्यांची ओळख पटू शकेल. आम्हाला इतके माहीत झाले होते की अजनालाच्या कोरड्या विहिरीत ज्या सैनिकांना दफन केले होते, ते उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, झारखंडसह गंगा खोऱ्याच्या आसपासचे रहिवासी आहेत. कदाचित त्यांचे कुटुंबीय सापडले, तर अंत्यसंस्कार आणि सन्मान दोन्ही मिळू शकेल.' इंग्रजांनी सैनिकांच्या मृतदेहांवर चुना-कोळसा टाकला, नंतर विहीर बंद केलीसुरेंद्र कोछर यांच्या प्रयत्नांनंतर 2014 मध्ये उत्खनन झाले आणि अवशेष समोर आले. या सांगाड्यांच्या तपासणीसाठी पंजाब विद्यापीठाच्या मानववंशशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. जेएस सहरावत यांच्या नेतृत्वाखाली एक संघ तयार करण्यात आला. या संघात बीएचयूचे प्राध्यापक बीरबल साहनी, प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे आणि द सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) हैदराबादचे तज्ञ यांचा समावेश आहे. दिव्य मराठीने प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे यांच्याशी वैज्ञानिक निष्कर्षांवर चर्चा केली. ते सांगतात, 'मला जालियनवाला बाग हत्याकांडाची माहिती होती, पण अजनाला प्रकरण कधीच ऐकले नव्हते. अजनाला येथे सांगाडे सापडले, तेव्हा तपासाची जबाबदारी वेगवेगळ्या संघांना देण्यात आली. आम्ही हैदराबादसोबत मिळून काम करू लागलो.' 'विहिरीचे उत्खनन योग्य प्रकारे न झाल्यामुळे बहुतेक नमुने खराब झाले होते. सांगाड्यातून डीएनए काढण्यात अडचण आली कारण इंग्रजांनी सैनिकांना विहिरीत टाकल्यानंतर जाणूनबुजून त्यात चुना आणि कोळसा टाकला होता. त्यासोबत माती भरली होती. यामुळे प्रत्येक मृतदेहापर्यंत कोळसा आणि चुना पोहोचला होता. या दोन्ही गोष्टी डीएनए खराब करतात.' 'सुरुवातीला आम्हाला 244 नमुने मिळाले होते. सुमारे 100 नमुने हैदराबाद प्रयोगशाळेत पाठवले होते. फक्त 50 नमुन्यांमधूनच आम्ही डीएनए वेगळा काढू शकलो. याची तपासणी पुढे वाढत गेली आणि निकाल येऊ लागले. तेव्हा कळले की अजनाला विहिरीत मरण पावलेले सैनिक तर गंगा खोऱ्यातीलच लोक होते. म्हणजेच आपल्या वाराणसीच्या आसपासच्या यूपी-बिहारचेच सैनिक होते.' दातांची रचना आणि गंगेच्या पाण्यामुळे झाली ओळखप्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे यांच्या मते, ‘आम्हाला सांगाड्यांमधून काढलेल्या दातांच्या नमुन्यांमधून निकाल मिळाले. हे दात खूप मजबूत होते. नमुन्यांच्या तपासणीतून असे दिसून आले की मरण पावलेले सैनिक बहुतेक 21 ते 42 वर्षांचे होते. त्यांची उंची खूप चांगली होती. ते दातांची खूप काळजी घेत होते. म्हणून दात चांगल्या स्थितीत मिळाले होते.’ ‘दातांच्या तपासणीतून हे देखील कळते की माणूस कोणत्या भागातील पाणी पीत होता. प्रत्येक पाण्यात कार्बन आणि ऑक्सिजनचे प्रमाण वेगवेगळे असते. सांगाड्यांमधून वेगवेगळे डीएनए नमुने घेऊन तपासणी करणारी टीम देखील वेगवेगळे काम करत होती. सर्व टीमचे निकाल सारखेच आले.’ प्रोफेसर ज्ञानेश्वर चौबे पुढे सांगतात, ‘आम्हाला आधी शंका होती की हे सैनिक पंजाब किंवा पाकिस्तानच्या भागातील रहिवासी असू शकतात. एक शंका अशीही होती की हे सांगाडे 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी घडलेल्या एखाद्या घटनेशी संबंधित तर नाहीत ना. तथापि, तपासणीतून हे स्पष्ट झाले की हे 1857 चे आहेत आणि गंगा खोऱ्याच्या आसपास राहणारे लोक होते.’ ‘तरीही मरणारे एकाच राज्याचे नव्हते. आमच्या तपासणीत हे देखील समोर आले की 26व्या नेटिव्ह इन्फंट्री बटालियनचे सैनिक पूर्व यूपी, बिहार, बंगाल आणि झारखंडच्या आसपासचे होते. हा संपूर्ण गंगा खोऱ्याचाच परिसर आहे. त्यात ब्राह्मण, क्षत्रिय, मुस्लिम आणि दलित लोकही होते.’ ‘न्यूक्लियर डीएनए तपासणीने तर आम्ही सैनिकांचे जिल्हेही सांगू’सांगाड्यांच्या तपासणीवर प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे यांनी सांगितले, ‘आतापर्यंतच्या तपासणीत सैनिकांना त्यांच्या आईकडून मिळालेल्या माइटोकॉन्ड्रियल डीएनएच्या मदतीने माहिती मिळाली आहे. हा डीएनए आईकडून मुलांमध्ये हस्तांतरित होतो. 168 वर्षांपूर्वी जो माइटोकॉन्ड्रियल डीएनए होता, तोच आजही त्या भागातील महिलांच्या डीएनएत अस्तित्वात आहे.’ अनेक कुटुंबांनी फोन-मेल केले, ब्रिटनने मदत केल्यास सोपे होईलया हुतात्म्यांच्या कुटुंबांना शोधण्याच्या प्रश्नावर प्रोफेसर ज्ञानेश्वर चौबे सांगतात, ‘आम्ही कुटुंबांना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला हे माहीत आहे की ब्रिटिश प्रत्येक गोष्टीचा हिशोब लेखी स्वरूपात ठेवत असत. त्यांच्या अभिलेखागारात या सैनिकांची नावे नक्कीच असतील, पण ब्रिटिश सरकारने आजपर्यंत गृह मंत्रालय आणि PMO ला उत्तरच दिले नाही.’ ‘आव्हानात्मक बाब ही आहे की ही आतापासून 6-7 पिढ्यांपूर्वीची गोष्ट आहे. आम्हाला आनंद आहे की 2022 मध्ये संशोधन अहवाल माध्यमांमध्ये समोर आल्यानंतर आतापर्यंत अनेक लोकांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. या लोकांचे आजोबा किंवा पणजोबा ब्रिटिश सैन्यात होते. अचानक गायब झाले.’ या कुटुंबांविरुद्ध वॉरंटही निघाले होते आणि काहीजण देशाच्या वेगवेगळ्या भागांत पळून गेले होते. कॅनडामधील समीर पांडे यांचेही असेच एक प्रकरण आहे. त्यांना वाटते की शहीद सैनिकांमध्ये त्यांचे सहाव्या पिढीतील आजोबा प्रकाश पांडे असू शकतात. प्रकाश पांडे यांनी लाहोरच्या मिया मीर छावणीत बंड सुरू केलेकॅनडातून दावा करणाऱ्या समीर पांडे यांचा अंदाज आहे की त्यांचे पणजोबा प्रकाश पांडे यांचे अवशेषही या शहीदांमध्ये समाविष्ट असू शकतात. प्रकाश पांडे यांनीच लाहोरच्या मिया मीर छावणीत इंग्रज अधिकारी स्पेन्सरला तलवारीने मारून बंड सुरू केले होते. नंतर याच भारतीय सैनिकांना रावी नदीजवळून अटक करून इंग्रजांनी अजनाला येथील विहिरीत दफन केले होते. प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे यांच्या मते, ‘प्रकाश पांडे यांचा शोध आपण समीरकडून मिळालेल्या डीएनए तपासणीतून लावू शकतो. समीरने सांगितले आहे की, त्याचे कुटुंब उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील आहे. तेथून ४ सैनिक होते, जे २६व्या बटालियनमध्ये होते. १८५७ नंतर हे सैनिक गायब झाले, तेव्हा कुटुंबाविरुद्ध वॉरंट निघाले आणि चारही कुटुंबे चेन्नईजवळील संथूर गावात निघून गेली. आम्ही या गावात जाऊनही तपास करण्याची योजना आखत आहोत.’ ‘आजोबांना इंग्रजांनी मारले, नंतर आम्हाला पळून जाण्यास भाग पाडले’दैनिक भास्करने कॅनडामध्ये असलेल्या समीर पांडे यांच्याशीही संवाद साधला. समीर तिथे नोकरी करतात, पण पुढील एका वर्षात निवृत्त झाल्यानंतर भारतात परत येणार आहेत. समीर पांडे सांगतात, ‘आम्हाला बातम्यांद्वारे कळले होते की अजनाला येथे १८५७ च्या क्रांतीतील सैनिकांचे सांगाडे सापडले आहेत. याच बातमीत ज्ञानेश्वर चौबे यांचे नाव होते आणि मी त्यांना ईमेलद्वारे संपर्क साधला. माझे पूर्वजही याच बटालियनमध्ये होते. आमच्या कुटुंबातील सैनिक होते, ज्यांना १८५७ च्या विद्रोहानंतर इंग्रजांनी फाशी दिली होती.’ ‘इंग्रजांनी आमच्या कुटुंबातील लोकांना खूप त्रास दिला होता. माझ्या आजोबांच्या आधीची पिढी यामुळे त्रस्त होऊन दक्षिण भारतात स्थलांतरित झाली. माझ्या आजोबांचा जन्मही चेन्नईजवळ झाला होता. माझे अनेक नातेवाईक चेन्नई आणि आसपास राहत आहेत. ब्रिटिश सरकारने 26व्या बटालियनमधील सर्व सैनिकांची नावे दिली, तर नावे आणि घराची माहिती मिळू शकते.’ समीर पांडे यांच्या व्यतिरिक्त, दिव्य मराठीने संथूर गावात राहणाऱ्या उदय कुमार यांच्याशी फोनवर बोलले. त्यांनी सांगितले की, आमची पिढी यूपीच्या कन्नौजची रहिवासी होती. 1857 मध्ये इंग्रजांनी वॉरंट काढले, तेव्हा ते संथूरला आले. तेव्हापासून आमच्या पुढील पिढ्या इथेच राहत आहेत.’ ‘दोन वर्षांपासून आम्ही अजनाला विहिरीत सापडलेल्या सांगाड्यांची तपासणी करणाऱ्या टीमच्या संपर्कात आहोत. अद्याप आमचे डीएनए नमुने घेण्यात आलेले नाहीत. आमची इच्छा आहे की 1857 च्या क्रांतीतील जे सैनिक होते, त्या सर्वांची ओळख पटवली जावी. त्या सर्व कुटुंबांना न्याय मिळावा. त्या हुतात्म्यांची ओळख पटवून त्यांना सन्मान मिळावा. किमान त्यांचे अंत्यसंस्कार तरी योग्य प्रकारे केले जावेत.’
PMC 23 Villages : गाव पालिकेत, पण अधिकार ‘पीएमआरडीए’कडे! २३ गावांच्या अधिकारांचा पेच अजूनही कायम
PMC 23 Villages : विकसन शुल्काचा महसूल प्राधिकरणाकडे, मात्र मूलभूत सुविधांची जबाबदारी पालिकेकडे; अशा विषम कारभारामुळे २३ गावांच्या विकासाला 'ब्रेक'.
Pune ZP Election 2026 : जिल्हा परिषद निवडणुकीत मतविभाजनाचा धोका टाळण्यासाठी सत्ताधारी पक्षांची रणनीती; नाराज मातब्बर कार्यकर्त्यांना 'प्रतिष्ठेच्या' पदाचे आश्वासन.
Pune Railway News : हडपसर स्थानकावर पीएमपी बसची कमतरता; रिक्षाचालकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट होण्याची शक्यता, प्रवासी संघटना आक्रमक.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांचे सर्वात जवळचे मित्र आणि चीनचे सर्वात शक्तिशाली जनरल झांग युक्सिया यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले आहे. झांग हे चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशन (CMC) चे उपाध्यक्ष होते. चार CMC जनरलना आधीच त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले आहेत. असे म्हटले जात आहे की झांग, इतर जनरलसह, शी जिनपिंग यांच्याविरुद्ध उठाव करण्याचा कट रचत होते. यापैकी काही जनरल मारले गेले आहेत. शी जिनपिंग यांनी ज्या झांग युक्सियांना त्यांच्या पदावरून काढून टाकले ते कोण आहेत? शी जिनपिंग यांना उलथवून टाकण्याचा खरोखरच कट आहे का? चीनचा पुढचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्यानंतर कोण येणार? आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घ्या… प्रश्न १: चिनी सैन्यातील सर्वोच्च पदावरून काढून टाकण्यात आलेले जनरल झांग युक्सिया कोण आहेत? उत्तर: चीनमध्ये एक-पक्षीय व्यवस्था आहे. सामान्यतः, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) सरचिटणीस हे चिनी सैन्य नियंत्रित करणाऱ्या केंद्रीय लष्करी आयोगाचे (सीएमसी) अध्यक्ष देखील असतात. शी जिनपिंग सध्या तिन्ही पदे भूषवतात. त्यांच्यानंतर, झांग सीएमसीचे उपाध्यक्ष होते. याचा अर्थ असा की शी जिनपिंग नंतर, झांग पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) चे सर्वोच्च नेते होते. झांग हे शी जिनपिंग यांचे दीर्घकाळचे जवळचे मित्र आहेत. झांग यांचे वडील झांग झोंगक्सुन आणि शी जिनपिंग यांचे वडील साही झोंगक्सुन हे दोघेही शांक्सी प्रांतातील वेइनान भागातील होते. दोघेही १९४९ मध्ये माओ झेडोंग यांच्या नेतृत्वाखालील चीनी क्रांतीदरम्यान सैन्यात जनरल होते, ज्यामुळे चीनच्या पीपल्स रिपब्लिकची स्थापना झाली. चिनी क्रांतीदरम्यान उच्चभ्रू नेत्यांच्या आणि उच्च लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलांना प्रिन्सलिंग्ज म्हटले जात असे, ज्याचा अर्थ लहान राजपुत्र असा होतो. झांग हे अशाच एका उच्चभ्रू वर्गातील राजपुत्र होते. झांग १९६८ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी चिनी सैन्यात सामील झाले. १९७९ च्या चीन-व्हिएतनाम युद्धादरम्यान त्यांना आघाडीवर पाठवण्यात आले आणि त्यांचा उदय झपाट्याने सुरू झाला. ऑगस्ट २००० मध्ये, झांग १३ व्या गटाच्या सैन्याचे कमांडर बनले आणि २०११ मध्ये ते जनरल पदावर पोहोचले. २०१२ मध्ये शी जिनपिंग अध्यक्ष झाल्यावर त्यांनी झांग यांना जनरल आर्मामेंट विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले. ऑक्टोबर २०१७ मध्ये, ते पक्षाच्या सर्वात शक्तिशाली केंद्रीय समिती, पॉलिटब्युरोचे सदस्य आणि सीएमसीचे उपाध्यक्ष बनले. २०२० मध्ये, झांग ७० वर्षांचे झाले, जे चीनमधील लष्करी अधिकाऱ्यांसाठी निवृत्तीचे वय आहे, परंतु शी जिनपिंग यांनी त्यांना पदावर कायम ठेवले. जनरल झांग यांनी २०२३ मध्ये शी जिनपिंग यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती होण्यास मदत केली, परंतु शी जिनपिंग यांच्याशी त्यांचे मतभेद वाढले. तोपर्यंत, झांग पीएलएमध्ये मोठे निर्णय घेत होते. जनरल झांग आणि सीएमसीचे दुसरे जनरल लिऊ यांनी अनेक महिन्यांपासून कम्युनिस्ट पक्षाच्या बैठका चुकवण्यास सुरुवात केली. झांग यापूर्वीही अनेक वेळा गायब झाले होते. चीनमध्ये जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याला काढून टाकले जाणार असते किंवा शी जिनपिंग यांच्यावरील निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते तेव्हा असे घडते. २४ जानेवारी २०२६ रोजी झांग यांच्यावर पक्ष कायदा आणि शिस्तीचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली. चीनमध्ये, भ्रष्टाचार आणि सर्वोच्च नेतृत्वाशी निष्ठा नसल्याच्या आरोपाखाली अशाच प्रकारच्या आरोपांवर चौकशी सुरू केली जाते. या चौकशीपूर्वी अनेक अधिकारी गायब होतात किंवा त्यांना त्यांच्या पदांवरून काढून टाकण्यात येते. चीनमध्ये भ्रष्टाचारासाठी चौकशी होणे आणि नंतर निर्दोष ठरवले जाणे दुर्मिळ आहे. झांग यांच्यापूर्वी अनेक अधिकाऱ्यांना अशाच प्रकारे काढून टाकण्यात आले आहे. प्रश्न २: याआधी चिनी सैन्यातून किती अधिकाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे? उत्तर: २०१२ मध्ये सत्तेत आल्यापासून, शी जिनपिंग शुद्धीकरण मोहीम राबवत आहेत. ही एक प्रकारची भ्रष्टाचारविरोधी मोहीम आहे ज्यामध्ये लष्करातील भ्रष्ट किंवा शी यांच्याशी निष्ठा नसलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या पदांवरून काढून टाकले जाते. सीएनएनच्या एका अहवालानुसार, २०१२ पासून या मोहिमेअंतर्गत २००,००० हून अधिक लष्करी कर्मचाऱ्यांना शिक्षा करण्यात आली आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलातील सुमारे १२० अधिकारी किंवा कमांडरना त्यांच्या पदांवरून काढून टाकण्यात आले आहे. २०२३ नंतर, ही 'शुद्धीकरण मोहीम' तीव्र झाली. काढून टाकण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या अशी होती जे उच्च कमांडर होते किंवा चीनच्या सरकारी मालकीच्या शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांशी संबंधित होते. पहिले लक्ष्य चीनच्या रॉकेट फोर्सवर होते, जे चीनच्या अणु आणि पारंपारिक क्षेपणास्त्रांवर नियंत्रण ठेवते. आशिया सोसायटीच्या अहवालानुसार, २०२२ मध्ये, चीनच्या केंद्रीय समिती किंवा पॉलिटब्युरोमध्ये ४४ गणवेशधारी लष्करी अधिकारी होते. यापैकी २९ जणांना काढून टाकण्यात आले आहे किंवा ते बेपत्ता आहेत.याव्यतिरिक्त, ऑक्टोबर २०२५ पासून, पीएलएच्या सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी नऊ जणांना काढून टाकण्यात आले आहे. यामध्ये सीएमसीचे सदस्य आणि अनेक उच्च लष्करी कमांडर समाविष्ट आहेत. कम्युनिस्ट पक्षाने स्थापन केलेले सीएमसी हे पीएलएचे सर्वोच्च नियंत्रण मंडळ आहे. शी जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली, सहा उच्चस्तरीय अधिकारी आहेत. शी जिनपिंग यांच्यानंतर, झांग आणि हे वेइडोंग यांनी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. उर्वरित चार वरिष्ठ अधिकारी - मियाओ हुआ, लिऊ झेनली, ली शांगफू आणि झांग शेंगमिन - हे होते. आता, फक्त झांग शेंगमिन उरले आहेत. इतर सर्वांना काढून टाकण्यात आले आहे. शेंगमिन या स्वच्छता मोहिमेत शी जिनपिंग यांना पाठिंबा देत होते. प्रश्न ३: तर, चिनी सैन्यात भ्रष्टाचार खरोखरच प्रचलित आहे का? उत्तर: चिनी सैन्यातील उच्च लष्करी अधिकारी भ्रष्टाचार, लाचखोरी आणि सत्तेचा गैरवापर करण्यात गुंतले आहेत. चीनचे माजी संरक्षण मंत्री ली शांगफू यांच्यावर शस्त्रास्त्र खरेदी आणि कराराच्या किंमतींमध्ये फेरफार केल्याचा आरोप होता. द डिप्लोमॅटमधील एका वृत्तानुसार, चिनी सैन्यात लाचखोरी सामान्य आहे आणि अधिकाऱ्यांना पैसे देऊन पदोन्नती देखील दिली जाते. अमेरिकन गुप्तचर अहवालांनुसार, चीनचे क्षेपणास्त्र उत्पादन सर्वात जास्त धाडसी होते. काही क्षेपणास्त्रे इंधनाऐवजी पाण्याने भरलेली आढळली. पश्चिम चीनमधील अनेक क्षेपणास्त्रांमध्ये दोषपूर्ण उपकरणे बसवण्यात आली होती, ज्यामुळे ते प्रक्षेपित होऊ शकले नाहीत. सीएमसीचे माजी उपाध्यक्ष हे वेइडोंग यांनी मार्च २०२४ मध्ये लष्कराला पुरवल्या जाणाऱ्या शस्त्रांच्या निकृष्ट दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित केले. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालानुसार, २०२४ मध्ये चीनच्या टॉप ८ संरक्षण कंपन्यांच्या महसुलात १०% घट झाली. २०२४ पासून, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अनेक प्रमुख चिनी शस्त्रास्त्र करार रद्द करण्यात आले आहेत. झांगसह अनेक उच्च लष्करी नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. झांग यांच्या कुटुंबातील सदस्य लष्करी भ्रष्टाचारात सहभागी होते. तथापि, झांगसारख्या उच्च नेत्यांना काढून टाकण्यामागे भ्रष्टाचार हे एकमेव कारण नव्हते. शी जिनपिंग यांनी या व्यक्तींना त्यांच्या सत्तेसाठी संभाव्य धोका म्हणून पाहिले. जून २०२५ मध्ये, शी जिनपिंग दोन आठवड्यांसाठी गायब झाले, ज्यामुळे असा अंदाज लावला जात होता की झांग आणि इतर अनेक उच्च अधिकारी शी जिनपिंग यांना उलथवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रश्न ४: झांग खरोखरच शी जिनपिंग यांच्याविरुद्ध बंडाचा कट रचत होते का? उत्तर: शी जिनपिंग गायब झाले तेव्हा असे म्हटले जात होते की ते आजारी होते. जरी अशा अटकळांना यापूर्वीही व्यापक स्वरूप देण्यात आले होते, तरी कोणतेही पुरावे सापडले नाहीत. दुसरे कारण म्हणजे चीनमधील चालू राजकीय गोंधळ... चीनमध्ये, नेता बेपत्ता झाल्यानंतर नेत्याला काढून टाकण्याची प्रवृत्ती आहे. माजी चीनी परराष्ट्र मंत्री किन गँग डिसेंबर २०२२ ते जुलै २०२३ पर्यंत अनुपस्थित होते. त्यांना २५ जुलै २०२३ रोजी त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले. संरक्षण मंत्री ली शांगफू २९ ऑगस्ट २०२३ नंतर गायब झाले. शांगफू ऑक्टोबर २०२३ मध्ये पुन्हा दिसले आणि त्यांनी संरक्षण मंत्रीपद गमावले. शी जिनपिंग यांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती उद्भवू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. आंतरराष्ट्रीय प्रेस असोसिएशनच्या सदस्या जेनिफर झांग यांच्या मते, दोन वर्षांपूर्वी शी जिनपिंग यांनी स्वतः पदोन्नती दिलेल्या जनरलना आता काढून टाकण्यास सुरुवात झाली आहे. काहींना तर फाशीही देण्यात आली आहे. स्पष्टपणे, सीसीपीमध्ये सत्ता संघर्ष सुरू आहे. शी त्यांचे पद टिकवून ठेवण्यासाठी लढत आहेत. काही अहवालांमध्ये असेही सुचवण्यात आले आहे की २०२७ मध्ये शी जिनपिंग स्वतःहून राजीनामा देऊ शकतात. प्रश्न ५: चीनमध्ये सत्तापालट झाल्यास पुढील राष्ट्रपती कसे निवडले जातात? उत्तर: चीनमधील अध्यक्षीय प्रक्रियेचे दोन मुख्य टप्पे आहेत: चीनच्या संविधानानुसार, एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन टर्म किंवा १० वर्षे सेवा देऊ शकते. तथापि, २०१८ मध्ये, शी जिनपिंग यांच्या सरकारने संविधानात सुधारणा केली आणि ही तरतूद काढून टाकली. चीनमध्ये अध्यक्षपद हे औपचारिक आहे. खरी सत्ता पक्षाच्या सरचिटणीस आणि केंद्रीय लष्करी आयोगाकडे असते. सध्या, शी जिनपिंग हे तिन्ही पदांवर आहेत. शी यांची नोव्हेंबर २०१२ मध्ये सीसीपीचे सरचिटणीस आणि लष्करी आयोगाचे प्रमुख म्हणून निवड झाली. मार्च २०१३ मध्ये, चिनी संसदेने त्यांना औपचारिकपणे अध्यक्ष म्हणून निवडले. ऑक्टोबर २०२२ मध्ये, शी जिनपिंग यांची पक्षाच्या सरचिटणीस म्हणून पुन्हा निवड झाली आणि २०२३ मध्ये, शी जिनपिंग तिसऱ्यांदा अध्यक्ष झाले. प्रश्न ६: शी जिनपिंगनंतर चीनमध्ये सत्तेचा पुढचा दावेदार कोण असू शकतो? उत्तर: झांग हे माजी चीनी राष्ट्राध्यक्ष आणि वरिष्ठ पक्ष नेते हू जिंताओ यांच्या जवळचे आहेत. पक्षातील हू-जिंताओ गट शी जिनपिंग यांच्या विरोधी मानला जातो. ऑक्टोबर २०२२ मध्ये, शी जिनपिंग यांनी हू जिंताओ यांना पक्षाच्या बैठकीतून सार्वजनिकरित्या बाहेर काढले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शी जिनपिंग विरोधी गट आणि जनरल झांग यांनी वांग यांग यांना नवीन पक्ष नेते म्हणून नियुक्त केले. जूनमध्ये शी जिनपिंग यांच्या अनुपस्थितीत कम्युनिस्ट पक्षातील सुधारणावादी नेते वांग यांग हे चर्चेत आले. वांग यांग यांनी कोणतेही सार्वजनिक भाषण किंवा मुलाखती दिल्या नाहीत, परंतु शी जिनपिंग यांच्या कठोर धोरणांचे समर्थक झेंग यांक्सिओंग यांना काढून टाकणे हे त्यांच्या पुनरागमनाशी जोडले गेले होते. त्यांच्या काढून टाकण्यामुळे वांग सारख्या सुधारणावादी नेत्याचा प्रभाव वाढला. ३० जून रोजी, गुप्तचर सूत्रांचा हवाला देऊन अनेक माध्यमांनी असे म्हटले होते की वांग यांग यांना पुढील नेता म्हणून तयार केले जात आहे. वांग यांनी २०२३ पर्यंत चीनच्या पीपल्स पॉलिटिकल कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. २०१७ मध्ये ते पॉलिटब्युरोचे कायमचे सदस्यही झाले. २०१३ ते २०१८ पर्यंत त्यांनी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्या सरकारमध्ये उपप्रधानमंत्री म्हणूनही काम केले. वांग यांग यांची शांत नेता म्हणून प्रतिष्ठा आहे. चीनमधील कोणत्याही राजकीय गटाशी त्यांचा संघर्ष झालेला नाही. शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील युवा संघटना, कम्युनिस्ट युथ लीग, सुधारणावादी विचारसरणीवर भर देते. वांग यांग त्याच्याशी संबंधित आहेत आणि हू जिंताओ आणि त्यांच्या गटातील इतर वरिष्ठ नेत्यांशी, जसे की हू चुनहुआ यांच्या जवळचे आहेत. अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनएनच्या वृत्तानुसार, वांग यांना सुधारणावादी, तंत्रज्ञानाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असलेला तंत्रज्ञ आणि भविष्यातील नेता म्हणून तयार केले जात आहे. अमेरिकन प्राध्यापक आणि राजनयिक ग्रेगरी विन्स्टन स्लेटन यांच्या मते, असे दिसते की झांग युक्सिया आणि वरिष्ठ सीसीपी नेत्यांनी शी जिनपिंग यांची जागा घेण्यासाठी वांग यांगची निवड केली. शी जिनपिंग हे कट्टरपंथी आणि एकल नेतृत्वाचे मॉडेल मानले जातात. तर हू-जिंताओ गटाने सामूहिक नेतृत्वावर भर दिला आहे. म्हणूनच, वांग यांग अध्यक्ष झाल्यावर उपराष्ट्रपती जनरल झांग हू लष्करी आयोगाची कमान स्वीकारू शकतात अशी अटकळ होती. प्रश्न ७: चिनी सैन्यात सुरू असलेल्या अशांततेचा भारतावर काय परिणाम होईल? उत्तर: अमेरिकन राजनयिक ग्रेगरी स्लेटन म्हणतात की चीनवर अंदाजे $५० ट्रिलियनचे कर्ज आहे. दंगली, कारखान्यांना आग आणि सरकारविरोधी निदर्शने सुरू झाली आहेत. जेव्हा जेव्हा देशांतर्गत समस्या उद्भवतात तेव्हा चीन बाहेरून पाहतो. जून २०२० मध्ये, चिनी सैन्याने गलवान व्हॅली परिसरात भारतीय सैन्याशी झालेल्या संघर्षानंतर हल्ला केला. या काळात, कोविड-१९ साथीचा रोग संपूर्ण चीनमध्ये पसरला होता. असे म्हटले जाते की शी जिनपिंग यांना कोविड-१९ साथीच्या आजाराच्या गैरव्यवस्थापनावरून जगाचे लक्ष वळवायचे होते आणि त्यामुळे भारताशी वाद निर्माण केला. राजनयिक तज्ञ सुशांत सरीन म्हणतात की जर शी जिनपिंग यांनी सत्तापालट करण्याचा प्रयत्न केला तर ते अमेरिकेच्या दबावामुळे तैवान आणि जपानविरुद्ध कोणतीही कारवाई करू शकणार नाहीत, परंतु सीमेवर भारताविरुद्ध मर्यादित कारवाई करू शकतील. तथापि, भारताविरुद्ध कोणत्याही लष्करी कारवाईसाठी परिस्थिती विकसित होत आहे असे गृहीत धरणे योग्य ठरणार नाही. ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमधील स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामचे उपसंचालक विवेक मिश्रा म्हणतात की चीनचे १२ देशांशी सीमा विवाद आहेत. ते कधी आणि काय कारवाई करेल हे कोणालाही माहिती नाही. तथापि, चीन सध्या भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे, ते भारताविरुद्ध कोणतीही कारवाई करेल अशी शक्यता फारच कमी आहे.
Wagholi Murder Case : गुन्हे शाखा युनिट ६ च्या कार्यालयासमोरच धाडसी हत्या; वाघोली पोलिसांनी काही तासांतच आरोपींना लातूर येथून घेतले ताब्यात.
Pune ZP Election 2026 : प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांच्या पुढाकाराने वाघमोडेंची उमेदवारी निश्चित; काटी-लाखेवाडी गटातील १५-१६ गावांत भाजपचे वर्चस्व वाढणार?
ZP Election 2026 : सणसर-लासुर्णे गट अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित; राष्ट्रवादी आणि भाजपने उतरवले तगडे उमेदवार.
Shivneri Hapus Mango : मीना आणि कुकडी खोऱ्यातील काले, येणेरे, वडजसह अनेक गावांतील आंबा उत्पादक शेतकरी संकटात; उत्पादन खर्च दुपटीने वाढला.
Junnar ZP Election : नारायणगाव ते राजुरीपर्यंत उमेदवारीचा पेच कायम; जुन्या वैऱ्यांनी एकत्र यावं की नाही, या संभ्रमात सामान्य कार्यकर्ता अडकला.
Davos 2026 : सणसवाडीतील हर्षवोगल प्रकल्पातून आता इलेक्ट्रिक वाहनांचे (EV) पार्ट्स तयार होणार; पर्यावरणपूरक वाहतुकीला बळ मिळणार.
Leopard Catch : जुन्नरचा ‘तो’नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद! डीएनए (DNA) अहवालातून झाला मोठा खुलासा
Leopard Catch : नागपूरच्या वन्यजीव संशोधन केंद्रातून आला डीएनए अहवाल; जेरबंद केलेल्या नर बिबट्याचे नमुने घटनास्थळावरील स्वॅबशी तंतोतंत जुळले.
Kite Thread Accident : अचानक गळ्याला दोरा लागला अन्…उपसरपंचांच्या ‘त्या’एका कृतीने टळला मोठा अनर्थ
Kite Thread Accident ;
Purandar News : ग्रामपंचायत इमारत, शाळा, अंगणवाडी आणि व्यायामशाळेची पाहणी; निधीचा योग्य वापर आणि नियोजनाचे राज्यातील अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण.
Ambegaon Crime : सोन्याचे दर गगनाला भिडल्याने स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने महिला आणि व्यापाऱ्यांना लुटणारी टोळी आंबेगाव तालुक्यात सक्रिय.
Pune ZP Election 2026 : उमेदवारी वाटपात निष्ठावंत कार्यकर्ते बाजूला फेकले गेल्याची भावना; अंतर्गत नाराजीमुळे दिग्गज नेत्यांच्या गोटात धाकधूक वाढली.
Dowry Harassment : माहेरून चारचाकी गाडी घेण्यासाठी होत होती पैशांची मागणी; सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी संपवले जीवन.
Borghat Traffic Update : खंडाळा घाटात अनेक गाड्या पडल्या बंद; सात ते आठ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
Borghat Traffic Update ; सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा ओघ वाढला; अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिटपर्यंत वाहनांची मोठी रांग, महामार्ग पोलिसांची दमछाक.
Indrayani River Pollution ; पुणे-मुंबई महामार्गावरील हॉटेल व्यावसायिकांकडून विनाप्रक्रिया सांडपाणी ओढ्यात; नायगाव परिसरात दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला.
PCMC Police : राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडून पिंपरी-चिंचवडच्या एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पाला हिरवा कंदील; तांत्रिक सुरक्षिततेत मोठी झेप.
Lonavala Tourism : भुशी धरण आणि टायगर पॉईंटवर पर्यटकांचा राबता; सेल्फीच्या नादात नियमांचे उल्लंघन करू नका, पोलिसांचे पर्यटकांना आवाहन.
Bhosari Accident : भरधाव पल्सरने पादचाऱ्याला उडवले; ४४ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
Bhosari Accident ; आकुर्डीतील २२ वर्षीय दुचाकीस्वाराविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; वेगाने वाहन चालवणे बेतले जीवावर.
Online Banking Fraud : बँक ऑफ महाराष्ट्रचे 'महा मोबाईल प्लस' ॲप वापरताना पासवर्ड अपडेटची सूचना आली आणि काही मिनिटांतच बँक खाते रिकामे झाले.
Pimpri Chinchwad Crime : मोशीच्या गायकवाड वस्तीतील ६५ वर्षीय वृद्धाला दानधर्माच्या जाळ्यात ओढून दोन दुचाकीस्वार भामट्यांनी लुटले.
Republic Day 2026 : शाहू स्टेडियमवर रंगणार चित्तथरारक परेड; काय आहे यंदाचं खास आकर्षण?
Republic Day 2026 : छत्रपती शाहू स्टेडियमवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण; पोलीस दलाच्या संचलनासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज.
Khatav News : मातंग वस्तीतील उघड्या गटारांमुळे रहिवाशांचे जगणे झाले असह्य; दुर्गंधीमुळे श्वास घेणेही कठीण झाल्याची स्थानिकांची तक्रार.
Satara ZP Election - ओबीसी महिला आरक्षणाने दिग्गज नेत्यांची समीकरणं बदलली; नऊ निवडणूक गटांत नेत्यांच्या सोयीनुसार मोर्चेबांधणीला वेग.
Shambhuraj Desai : महायुतीसाठी दोनदा पुढाकार घेतला, पण प्रतिसाद नाही : पालकमंत्री शंभूराज देसाई
Shambhuraj Desai : पाटण तालुक्यातील येराड येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीबाबत मोठे विधान केले आहे.
Pune Murder Case : वाघोलीतील बायफ रोडवरील आरपीएस हेरिटेज सोसायटीमध्ये एका २१ वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्रांनी गळा चिरून हत्या केली.
तामिळनाडूमध्ये हिंदीवर बंदीच राहणार, मुख्यमंत्री स्टॅलिनचा केंद्राला स्पष्ट इशारा
चेन्नई : तामिळनाडूमध्ये हिंदी लादण्यास कुठलेही स्थान नाही आणि कधीही होणार नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी रविवारी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. ‘भाषा शहीद दिना’च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात स्टॅलिन यांनी १९६० च्या हिंदी-विरोधी चळवळीतील शहीदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर बोलताना ते म्हणाले की, तामिळनाडू नेहमीच आपल्या भाषिक ओळखीचे रक्षण करेल. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटले आहे की, “भाषा शहीद दिनानिमित्त मी स्पष्ट करतो की, तेव्हाही हिंदीसाठी कोणतेही स्थान नव्हते, आताही नाही आणि कधीही राहणार नाही.” या पोस्टसोबत त्यांनी १९६५ च्या ऐतिहासिक हिंदी-विरोधी चळवळीचा व्हिडीओही शेअर केला, ज्यात द्रमुकचे दिग्गज नेते सी.एन.अन्नादुरई आणि एम.करुणानिधी यांचे योगदान अधोरेखित केले आहे. स्टॅलिन यांनी चेन्नईतील “भाषा शहीद” थलामुथु आणि नटरासन यांच्या स्मारकाला भेट देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. या कार्यक्रमाच्या भाग म्हणून त्यांनी चेन्नई महानगर विकास प्राधिकरणाच्या इमारतीत या शहीदांच्या पुतळ्यांचे अनावरण केले. १९६४-६५ दरम्यान हिंदीला अधिकृत भाषा बनवण्याच्या विरोधात केलेल्या चळवळीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपले प्राण गमावले होते; त्यांना ‘भाषा शहीद’ असे संबोधले जाते. त्या काळात अनेक तरुणांनी विरोधार्थ आत्मदहन केले. त्यानंतर तामिळनाडूमध्ये ‘द्विभाषिक सूत्र’ स्वीकारण्यात आले, ज्यामध्ये फक्त तमिळ आणि इंग्रजीला प्राधान्य दिले जाते. स्टॅलिन आणि द्रमुक सरकार सतत केंद्राच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणचा विरोध करत आहेत.
चीनसोबत करार केल्यास कॅनडावर १०० टक्के टॅरिफ लावणार: ट्रम्प
वॉशिंग्टन :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला कडक इशारा देत सांगितले आहे की, कॅनडाने जर चीनसोबत कोणताही व्यापार करार केला, तर त्यावर १०० टक्के शुल्क (टॅरिफ) लावले जाईल. ट्रम्प यांचे म्हणणे आहे की कॅनडा स्वतःला चीनसाठी असा मार्ग बनू देत आहे, ज्याद्वारे चीनी माल अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश करू शकतो. ट्रम्प यांनी उघडपणे इशारा दिला की, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी जर कॅनडाला चीनसाठी ‘ड्रॉप-ऑफ पोर्ट’ बनवले, तर ती त्यांची फार मोठी चूक ठरेल. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले की, अशा कोणत्याही कराराच्या परिस्थितीत अमेरिकेत येणाऱ्या कॅनडाच्या सर्व उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाईल.ट्रम्प आणि कॅनडामधील तणाव सुरक्षेच्या मुद्द्यावरूनही कमाल पातळीवर पोहोचला आहे. ट्रम्प यांनी ग्रीनलँडमध्ये प्रस्तावित ‘गोल्डन डोम’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रकल्प नाकारल्याबद्दल कॅनडावर तीव्र टीका केली आहे. ट्रम्प यांचे म्हणणे आहे की हा प्रकल्प कॅनडाच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरला असता; मात्र कॅनडा अमेरिकेच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याऐवजी चीनसोबत संबंध अधिक दृढ करण्यात व्यस्त आहे. दरम्यान, दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अमेरिकेच्या वर्चस्वाखालील जागतिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, ज्यामुळे ट्रम्प संतप्त झाले आहेत. कार्नी यांनी सांगितले की जग आता अशा टप्प्यावर पोहोचले आहे, जिथे दशकानुदशके चालत आलेली नियमाधारित जागतिक व्यवस्था अस्पष्ट होत चालली आहे. त्यांनी अमेरिकेने आपली इच्छा इतर देशांवर लादण्याच्या धोरणावर टीका करत म्हटले की, मध्यम शक्तीच्या देशांनी आता एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीमुळे कॅनडाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा वाजली आहे, कारण अमेरिका हा कॅनडाचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. जर १०० टक्के शुल्क लागू झाले, तर कॅनडाचा निर्यात व्यापार मोठ्या प्रमाणात ठप्प होऊ शकतो आणि तेथील कंपन्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ते त्यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाशी कोणतीही तडजोड करणार नाहीत.
पंचम'डिजिटल चॅटबॉट लाँच, घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे मार्गी लागणार
नवी दिल्ली : गावांमधील प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने ‘पंचम’ हा विशेष व्हॉट्सअॅप चॅटबॉट लाँच केला आहे. आता घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे आणि योजनांची माहिती मिळवणे शक्य होणार आहे.केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने ग्रामपंचायतींना सक्षम करण्याच्या उद्देशाने 'पंचम' हा चॅटबॉट आज लाँच केला आहे. ग्रामपंचायतींसाठी एक 'डिजिटल सोबती' म्हणून याची रचना करण्यात आली आहे. हा चॅटबॉट दैनंदिन प्रशासकीय कामात मदत करण्यासोबतच मार्गदर्शन आणि महत्त्वाची माहिती सुलभपणे पोहोचवण्याचे काम करेल. 'पंचम' केंद्र सरकार आणि देशभरातील ३० लाखांहून अधिक निवडून आलेले प्रतिनिधी व पंचायत पदाधिकारी यांच्यात थेट डिजिटल संपर्क साधणार आहे.ग्रामीण भागात व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, ही बाब लक्षात घेऊनच ही सेवा व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी कोणतेही नवीन अॅप डाऊनलोड करण्याची किंवा शिकण्याची गरज नाही. एखाद्या व्यक्तीशी चॅटिंग करावे, इतक्या सोप्या पद्धतीने नागरिकांना माहिती मिळेल.'पंचम' ई-ग्राम स्वराजशी संबंधित लाइव्ह डेटा, पंचायत अधिकारी आणि निवडून आलेल्या सदस्यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करतो. हा चॅटबॉट ई-ग्राम स्वराज, एलजीडी, जीपीडीपी आणि मंत्रालयाच्या प्रमुख योजना व उपक्रमांशी संबंधित माहिती देईल. सध्या हा चॅटबॉट एआय आधारित चॅटबॉट्ससारखा काम न करता, आधीच फीड केलेल्या निश्चित माहितीच्या आधारे उत्तरे देईल. ही माहिती सतत अपडेट केली जाईल. सामान्य नागरिक विविध दाखले, प्रमाणपत्रे, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या सरकारी कामांची माहिती मिळवण्यासाठी पंचमचा वापर करू शकतील. ग्रामपंचायत सदस्यांना आणि अधिकाऱ्यांना योजना, सर्वेक्षणे, प्रशिक्षण साहित्य आणि अधिकृत मंत्रालयाच्या सूचना थेट उपलब्ध होतील.
संजीवनी सैनिकी स्कूल राष्ट्रीय ब्रास बॅण्ड स्पर्धेत देशात प्रथम
कोपरगाव : ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथील नॅशनल बाल भवन येथे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय ब्रास बॅण्ड महाअंतिम फेरीत संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ब्रास बॅण्ड पथकाने देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण इतिहास रचला. पश्चिम भारत विभागाचे प्रतिनिधित्व करत मैदानात उतरलेल्या संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन, तालबद्ध वादन, अचूकता आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकत ५१ हजार रूपये रोख पारितोषिक, मानाचा चषक व सन्मानपत्र प्राप्त केले. या गौरवपूर्ण सोहळ्यात संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या हस्ते विजेत्या संघाचा सन्मान करण्यात आला. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे, संगीत शिक्षक महेश गुरव, ब्रास बॅण्ड पथकाचे टीम लिडर कॅडेट विपुल वाघ यांच्यासह संपूर्ण संघाने सन्मान स्वीकारला.पुरस्कार वितरणप्रसंगी बोलताना सेठ यांनी सांगितले की,“२०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्यात युवकांची भूमिका निर्णायक ठरणार असून, शालेय बँड पथके विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना आणि देशभक्तीची जाणीव दृढ करतात.” या ऐतिहासिक यशामागे संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांचे दूरदृष्टी पूर्ण मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण पाठबळ मोलाचे ठरले. तसेच प्राचार्य कैलास दरेकर, संगीत शिक्षक महेश गुरव, कॅम्पस अॅडमिन विजय भास्कर, नॉन अकॅडमिक डायरेक्टर डी. एन. सांगळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बॅण्ड प्रशिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमांमुळेच हे यश साकार झाले आहे. हे यश म्हणजे शिस्त, सातत्य, संघभावना आणि देशभक्तीच्या संस्कारांची फलश्रुती असून, स्व. शंकरराव कोल्हे यांनी पाहिलेले “ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर गुणवत्तापूर्ण व शिस्तबद्ध पिढी घडवण्याचे स्वप्न” प्रत्यक्षात साकार झाल्याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे. संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या या विजयामुळे कोपरगाव तालुका, अहिल्यानगर जिल्हा व महाराष्ट्राचा देशपातळीवर मान उंचावला असून, “शिस्त आणि सातत्याच्या बळावर स्वप्नांची उंची गाठता येते” हा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे.
अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात
गुवाहाटी : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय नोंदवला आहे. सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर भारताने केवळ १० षटकांत विजयाचे लक्ष्य गाठून मालिका आपल्या नावावर केली. भारताने या सामन्यात पॉवरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडत ऑस्ट्रेलियाचा ८ वर्ष जुना जागतिक विक्रमही मोडीत काढला.नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. जसप्रीत बुमराहच्या (३ विकेट्स) भेदक माऱ्यासमोर किवी फलंदाजांनी गुडघे टेकले. ग्लेन फिलिप्स (४८) आणि मार्क चॅपमन (३२) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण हार्दिक पांड्या आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २ बळी घेत न्यूझीलंडला ९ बाद १५३ धावांवर रोखले. १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात धक्कादायक झाली. संजू सॅमसन पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मात्र, त्यानंतर इशान किशन (२८ धावा, १३ चेंडू) आणि अभिषेक शर्मा यांनी १९ चेंडूंत ५३ धावांची वेगवान भागीदारी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. इशान बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्माच्या साथीने केवळ ४० चेंडूंत १०२ धावांची नाबाद भागीदारी केली.भारताने पहिल्या ६ षटकांत २ बाद ९४ धावा कुटल्या. ही भारताची पॉवरप्लेमधील दुसरी सर्वोत्तम आणि न्यूझीलंडविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या ठरली. भारताने २०१८ मधील ऑकलंड येथे ऑस्ट्रेलियाने केलेल्या ९१ धावांचा विक्रम मोडला. अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी आपली वादळी अर्धशतके पूर्ण करत १० व्या षटकांतच भारताला विजय मिळवून दिला. भारताच्या या 'विराट' विजयामुळे न्यूझीलंडचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला असून भारतीय युवा संघाच्या या आक्रमक शैलीचे जगभर कौतुक होत आहे.रोहित शर्माचा मोडला विक्रमअभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तिसरा षटकार मारताच रोहित शर्माचा मोठा विक्रमही मोडीत काढला. याआधी न्यूझीलंड विरुद्धच्या द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक १० षटकारांचा विक्रम हा रोहित शर्माच्या नावे होता. अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात ८ षटकार मारले होते. तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने रोहित शर्माला मागे टाकत न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत सिक्सर किंग होण्याचा नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
Maharashtra Politics : राजकारणात मोठा भूकंप! अखेर दोन्ही शिवसेना एकत्र, भाजपला मोठा धक्का
Maharashtra Politics : शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र
IND vs NZ 3rd T20 : भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला.
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास घराघरात पोहचविणार
नांदेड : 'हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते. त्यांचे बलिदान आपल्याला सत्य,धर्म आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी निर्भीडपणे उभे राहण्याची प्रेरणा देते. त्यामुळेच त्यांचे विचार राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित 'हिंद दी चादर' श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यावेळी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, गुरू तेग बहादुर साहिब जी यांनी दिलेले बलिदान हे केवळ शीख धर्मासाठी नव्हते, तर या देशाची संस्कृती, सभ्यता, विचारधारा आणि धर्म यांच्या रक्षणासाठी होते. त्यांचा पराक्रम, वीरता, शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने समाज नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत एकत्र आला आहे. गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानामुळे संपूर्ण देशात धर्म, स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानासाठी लढण्याची नवी चेतना निर्माण झाली. त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहचावा, यासाठी शहीदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून प्रत्येक गावात, वाड्या-वस्त्यांवर जावून श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शीख गुरूंचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे, असे त्यांनी सांगितले.श्री गुरु नानक देवजींना मानणारा, त्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारा सर्व समाज एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. देशाच्या विपरीत परिस्थितीत श्री गुरु नानक देवजींनी एकत्र बांधणारा, भेदाभेद नष्ट करणारा महान विचार दिला आहे. त्या विचारांनी संपूर्ण देशात विविध समाजांना जोडण्याचे काम केले. हा विचार घेवून सर्व समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे. संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील महान संत होते. त्यांची समाधी पंजाबमधील घुमान येथे आहे. संत नामदेवांनी मांडलेले विचार, त्यांचे अभंग आणि पंक्ती यांना श्री गुरु ग्रंथ साहिबमध्ये स्थान मिळाले आहे. त्यांचे विचार गुरुबाणीचा अविभाज्य भाग बनले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील वारकरी परंपरा आणि शीख समाज यांच्यातील अनोखे, अतूट नाते अधिक दृढ झाले आहे. श्री गुरु गोविंद सिंघ महाराजांच्या दीर्घकाळ वास्तव्याने नांदेडची भूमी पावन झाली आहे. या भूमीने सामाजिक सलोखा अधिक मजबूत करण्याचे काम केले असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचे बलिदान हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवी सांस्कृतिक वारशाच्या रक्षणासाठी होते.जुलमी शासकांच्या दमनकारी धोरणांविरुद्ध विचार स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी दिलेले गुरु तेग बहादुर जी यांचे बलिदान हे अभूतपूर्व ऐतिहासिक उदाहरण असून,त्यांच्या निर्भय आचरणातून धार्मिक व नैतिक दृढतेचा आदर्श मिळतो,असे त्यांनी सांगितले.प्रास्ताविक अखिल भारतीय धर्म जागरण समितीचे प्रमुख शरदराव ढोले यांनी केले. शहीदी समागम कार्यक्रमाचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यांनी आभार मानले.
महाराष्ट्र 'पद्म'मय, 'पद्मविभूषण'सह १५ पुरस्कारांवर राज्याची मोहोर
धर्मेंद्र यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण , अलका याज्ञिक यांना 'पद्मभूषण'तर रोहित शर्माला 'पद्मश्री'तारपा सम्राट' भिकल्या धिंडा, रघुवीर खेडकर, डॉ.अर्मिडा फर्नांडिस, श्रीरंग लाड यांच्यासह महाराष्ट्रातील ११ जणांना पद्मश्रीमहाराष्ट्राच्या खात्यात १ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्रीनवी दिल्ली : केंद्र सरकारने रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२६ या वर्षासाठी १३१ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यात महाराष्ट्रातील एकूण १५ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहे. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह पाच जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत.महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, झारखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते शिबू सोरेन आणि गायिका अलका याज्ञिक यांच्यासह १३ व्यक्तींची पद्मभूषणसाठी निवड करण्यात आली आहे. क्रिकेटपटू रोहित शर्मा,अभिनेता आर. माधवन, पॅरा-अॅथलीट प्रवीण कुमार, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आणि हॉकीपटू सविता पुनिया यांच्यासह ११३ व्यक्तींना पद्मश्री पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी १९ महिला आहेत. त्यापैकी सहा परदेशी/एनआरआय/पीआयओ/ओसीआय श्रेणीतील आहेत. सोळा व्यक्तींना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. Padma Awards 2026_India by prahaarseo महाराष्ट्रातील एकूण १५ जणांना पद्म पुरस्कारमहाराष्ट्रातून दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना पद्मविभूषण, तर अलका याज्ञिक, दिवंगत पीयूष पांडे(मरणोत्तर), उदय कोटक यांना पद्मभूषण तर क्रिकेटपटू रोहित शर्मा, अभिनेता आर माधवन, लोकनाट्य कलावंत रघुवीर खेडकर, डॉ.अर्मिडा फर्नांडिस, तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा व श्रीरंग लाड यांच्यासह ११ जणांना पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाली.महाराष्ट्रातील पद्म विजेतेपद्मविभूषणधर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर) (कला)पद्मभूषणअलका याज्ञिक (कला)पीयूष पांडे (मरणोत्तर) (कला)उदय कोटक (उद्योग)पद्मश्रीअर्मिडा फर्नांडिस (मेडिसिन)अशोक खाडे (उद्योग)भिकल्या लाडक्या धिंडा (कला)जनार्धन बापुराव बोठे (सामाजिक कार्य)जुझेर वासी (विज्ञान व अभियांत्रिकी)माधवन रंगनाथन (कला)रघुवीर खेडकर (कला)रोहित शर्मा (क्रीडा)सतीश शाह(मरणोत्तर) (कला)सत्यनारायण नवल (उद्योग)श्रीरंग लाड (कृषी)पालघरचे 'तारपा सम्राट' भिकल्या लाडक्या धिंडाआदिवासी वारली संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या 'तारपा' वाद्याला जागतिक ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ कलाकार भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे. पालघरच्या वाळवंडे गावच्या या ९० वर्षीय कलाकाराने गेल्या १५० वर्षांची कौटुंबिक वादन परंपरा जिवंत ठेवली आहे.लोककलेचा सन्मान: रघुवीर खेडकरनगर जिल्ह्यातील तमाशा परंपरेचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 'रघुवीर खेडकर आणि कांताबाई सातारकर' या तमाशा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी लोककलेची सेवा केली. तमाशासारख्या ग्रामीण कलेला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा असून, त्यांच्या या गौरवामुळे संपूर्ण लोककला विश्वात आनंदाचे वातावरण आहे.वैद्यकीय क्षेत्रात क्रांती: डॉ. अर्मिडा फर्नांडिसमुंबईतील सायन रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आणि 'स्नेहा' संस्थेच्या संस्थापिका डॉ.अर्मिडा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यासाठी पद्मश्री जाहीर झाला आहे. आशियातील पहिली 'ह्युमन मिल्क बँक' (मानवी दुग्धपेढी) स्थापन करण्याचे श्रेय त्यांना जाते. नवजात बालकांचा मृत्यूदर रोखण्यासाठी आणि झोपडपट्टी भागातील माता-बालकांच्या आरोग्यासाठी त्यांनी केलेले कार्य जागतिक स्तरावर नावाजले गेले आहे.कृषी ऋषी: श्रीरंग लाडपरभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील शेतकरी श्रीरंग लाड यांना कापूस संशोधनातील त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कोणत्याही मोठ्या पदव्या नसताना, केवळ अनुभवाच्या जोरावर त्यांनी कापसाच्या अशा वाणांचा शोध लावला, ज्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या या कार्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी उभारी मिळाली असून, एका सामान्य शेतकऱ्याचा हा गौरव कृषी क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला आहे.महाराष्ट्रातील ८९अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीरभारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण ९८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील एकूण ८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये ३१ पोलीस कर्मचाऱ्यांना 'वीरता पदक', उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेसाठी दिले जाणारे 'राष्ट्रपती पदक' पोलीस दलातील ४ अधिकारी आणि सुधारात्मक सेवा विभागातील २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उल्लेखनीय सेवेसाठी महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील ४०,अग्निशमन सेवेसाठी ४, नागरी संरक्षण व होमगार्ड सेवेतील ३, सुधारात्मक सेवेतील ५ या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले.प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत दरवर्षी पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील कार्यासाठी शौर्य आणि सेवा पदके दिली जातात.

28 C