SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

23    C
... ...View News by News Source

Global Krushi Mahotsav: नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राचा भव्य उपक्रम; प्रचार रथाचा दणक्यात शुभारंभ

प्रभात वृत्तसेवा नारायणगाव – ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित ग्लोबल कृषी महोत्सव २०२६ च्या प्रचार रथाचा शुभारंभ नवीन वर्षाच्या निमित्ताने उत्साहात करण्यात आला. ८ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत होणाऱ्या या भव्य कृषी महोत्सवाची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा रथ सज्ज करण्यात आला आहे.केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे यांच्या हस्ते या रथाचे […] The post Global Krushi Mahotsav: नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राचा भव्य उपक्रम; प्रचार रथाचा दणक्यात शुभारंभ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Jan 2026 3:00 am

Manchar News: शिवाजीराव आढळराव पुन्हा शिवसेनेत? आमदार शरद सोनवणेंनी स्पष्टच सांगितलं

प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगराध्यक्षा राजश्री गांजाळे यांच्या माध्यमातून मंचर गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू. विकासाची चिंता करू नका.पक्ष विरहीत मंचरच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन सुंदर मंचर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी गुरुवार, दि.१ रोजी केले. मंचर (ता.आंबेगाव) येथे नवीन वर्षाचे औचित्य साधत मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष राजश्री गांजाळे यांचा […] The post Manchar News: शिवाजीराव आढळराव पुन्हा शिवसेनेत? आमदार शरद सोनवणेंनी स्पष्टच सांगितलं appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Jan 2026 2:45 am

Alandi News: नववर्षाच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वरांच्या चरणी माथा टेकण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी

प्रभात वृत्तसेवा आळंदी – नववर्षाची सुरुवात भक्तीमय वातावरणात आणि देवदर्शनाने करण्याच्या परंपरेनुसार आज गुरुवारी (दि. 1) पहाटेपासूनच तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये भाविकांचा जनसागर उसळला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी माऊली मंदिरात हजारो भाविकांनी हजेरी लावली असून संपूर्ण आळंदी नगरी हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आळंदीत ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली […] The post Alandi News: नववर्षाच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वरांच्या चरणी माथा टेकण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Jan 2026 2:30 am

दिलीप मोहिते पाटलांची जादू कायम; राजगुरुनगरमध्ये नववर्षाच्या जल्लोषात उमटला विकासाचा सूर

प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – राजगुरुनगर शहरात नववर्ष 2026 चे स्वागत जल्लोषात करण्यात आले. बुधवारी (दि.31) मध्यरात्री लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत आनंदोत्सव साजरा करताना दिसून आले. यानिमित्ताने खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या बालजत्रा व खाऊगल्लीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गेल्या पाच वर्षांपासून राजगुरुनगर शहरात सातत्याने राबविण्यात येणार्‍या […] The post दिलीप मोहिते पाटलांची जादू कायम; राजगुरुनगरमध्ये नववर्षाच्या जल्लोषात उमटला विकासाचा सूर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Jan 2026 2:15 am

PCMC Election: राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार? अजित पवारांच्‍या वक्‍तव्‍याने राजकीय वर्तुळात खळबळ

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरीचिंचवड महापालिकेची रणधुमाळी सुरू असून शुक्रवारी( दि. २) अर्ज माघारी घेण्याच्या शेवटचा दिवस आहे. शहरामध्ये बहुरंगी लढत होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या युतीचे संकेत दिले आहेत. दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेससोबत आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील सोबत घेत नवीन युती केली जाणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणाने आणखी एक […] The post PCMC Election: राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार? अजित पवारांच्‍या वक्‍तव्‍याने राजकीय वर्तुळात खळबळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Jan 2026 2:00 am

Maval News: पुणे-मुंबई महामार्गावर अनधिकृत बोर्डांचा सुळसुळाट, कारवाई शून्य

प्रभात वृत्तसेवा कान्हे – पुणे- मुंबई महामार्गालगत साईड पट्ट्यावर काही व्यापाऱ्यांनी अनधिकृतपणे उभारलेले जाहिरात आणि व्यवसायिक फ्लेक्स वाहनचालकांसाठी अपघाताचा धोका ठरत आहेत. महामार्गावर वेगात धावणाऱ्या वाहनांचे लक्ष या फलकांमुळे विचलित होत असून, अपघातांची शक्यता वाढली आहे. महामार्गाच्या अगदी कडेला, साईड पट्ट्यावर नियम डावलून हे बोर्ड उभारण्यात आले असून कान्हे, वडगाव, तळेगाव, कामशेत, कार्ला, लोणावळा परिसरात […] The post Maval News: पुणे-मुंबई महामार्गावर अनधिकृत बोर्डांचा सुळसुळाट, कारवाई शून्य appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Jan 2026 1:45 am

Khalapur News: वावोशी फाटा ते वावोशी गाव रस्त्याची दयनीय अवस्था; अपघातांना खुले आमंत्रण

प्रभात वृत्तसेवा खालापूर – खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर असलेले खड्यांचे ग्रहण नेमके कधी सुटणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील अनेक जोडरस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, खडीमुळे वाहन घसरण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वावोशी फाटा ते वावोशी गाव हा रस्ता सध्या अपघातांना आमंत्रण देणारा ठरत आहे. गेल्या अनेक […] The post Khalapur News: वावोशी फाटा ते वावोशी गाव रस्त्याची दयनीय अवस्था; अपघातांना खुले आमंत्रण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Jan 2026 1:15 am

Khalapur News: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महड दुमदुमले; वरदविनायकाच्या दर्शनासाठी जनसागर लोटला

प्रभात वृत्तसेवा खालापूर – नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्याच्या भावनेतून अष्टविनायकापैकी महड येथील श्री वरदविनायकाच्या मंदिरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली. पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून, गणपती बाप्पा मोरया जयघोषाने संपूर्ण महड गाव दुमदुमून गेले होते. जगभरात सरत्या वर्षाला निरोप देत २०२६ या नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नव्या वर्षाची सुरुवात […] The post Khalapur News: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महड दुमदुमले; वरदविनायकाच्या दर्शनासाठी जनसागर लोटला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Jan 2026 1:00 am

Shambhuraj Desai: जिल्हा परिषदेकडील निधी तातडीने खर्च करा; शंभूराज देसाईंचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

प्रभात वृत्तसेवा सातारा – जिल्हा परिषदेकडील विविध यंत्रणांना जिल्हा वार्षिक योजनेतून 60 टक्के निधी वितरीत करण्यात आला आहे. हा निधी तातडीने खर्च करावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेकडील विविध यंत्रणांना जिल्हा वार्षिक योजनेतून विकास कामांसाठी निधी देण्यात आला आहे. खर्चाचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी […] The post Shambhuraj Desai: जिल्हा परिषदेकडील निधी तातडीने खर्च करा; शंभूराज देसाईंचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Jan 2026 12:45 am

Satara News: बिभवी येथील जळीतग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करणार –ना. शिवेंद्रसिंहराजे

प्रभात वृत्तसेवा सातारा – बिभवी, ता. जावळी येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तीन घरे जळून खाक झाली. या तीनही कुटुंबाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. त्यांचे संसार पुन्हा फुलवण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील. जळीतग्रस्तांना सर्वोतोपरी मदत केली जाणार असून शासनाच्या माध्यमातून त्यांना पक्की घरे बांधून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री […] The post Satara News: बिभवी येथील जळीतग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करणार – ना. शिवेंद्रसिंहराजे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Jan 2026 12:30 am

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २ जानेवारी २०२६

पंचांगआज मिती पौष शुद्ध चतुर्दशी शके १९४७.चंद्र नक्षत्र विशाखा. योग ऐद्र.चंद्र राशी तूळ भारतीय सौर १२ पौष १९४७. शुक्रवार दिनांक २ जानेवारी २०२६.मुंबईचा सूर्योदय ०६.१२ मुंबईचा सूर्यास्त ०६.१२, मुंबईचा चंद्रोदय ०५.०३ मुंबईचा चंद्रास्त ०७.०३ उद्याची राहू काळ ११.१९ ते १२.४२. पौर्णिमा प्रारंभ-सायंकाळी-०६;५४,१९;०० पर्यन्त चांगलादैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : जबाबदाऱ्या पूर्ण केल्याचा आनंद व समाधान मिळणार आहे. वृषभ : महत्त्वाच्या कामांमध्ये मित्रांची मदत मिळेल. मिथुन : कामांना चांगल्याप्रकारे प्राधान्य द्याल. कर्क : सार्वजनिक कामामध्ये रंगाचा बेरंग होऊ शकतो. काळजी घ्या.सिंह : व्यापार- व्यवसायामध्ये फायद्याचे प्रमाण वाढणार आहे.कन्या : मानसन्मानाचे योग आहेत.तूळ : कार्य हाती घेऊन ते पूर्ण करण्यात यश येईल.वृश्चिक : अध्यात्मिक प्रवृत्ती वाढणार आहे.धनू : भागीदाराचे सहाय्य लाभणार आहे.मकर : कार्यक्षेत्रामध्ये हाताखालील व्यक्तींकडे चांगले लक्ष ठेवणे गरजेचे. कुंभ : तरुण-तरुणींचे प्रश्न समस्या सुटतील. मीन : बरेच दिवस प्रलंबित राहिलेली कामे आज पूर्ण करून घ्या .

फीड फीडबर्नर 2 Jan 2026 12:30 am

Satara News: पोलिसांसाठी हायटेक टाऊनशिपचे आज लोकार्पण; मुख्यमंत्री फडणवीस करणार उद्घाटन

प्रभात वृत्तसेवा सातारा – सातारा येथील पोलीस मुख्यालय नजीक पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘वृंदावन पोलीस टाऊनशिप’चे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, अण्णासाहेब […] The post Satara News: पोलिसांसाठी हायटेक टाऊनशिपचे आज लोकार्पण; मुख्यमंत्री फडणवीस करणार उद्घाटन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Jan 2026 12:15 am

अर्ज भरल्यापासून उमेदवाराला दैनंदिन खर्चाची नोंद ठेवणे बंधनकारक, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांची माहिती

मुंबई (विशेष प्रतिनिधी):उमेदवारी अर्ज सादर केल्यापासून उमेदवारांनी दैनंदिन निवडणूक खर्चाची नोंद ठेवणे बंधनकारक असून, त्यासाठी प्रचलित दरसूची निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांच्या सभा, प्रचारफेरी आदी उपक्रमांवरील खर्चाचा हिशोब तपासणे, तसेच संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा निवडणूक खर्च संनियंत्रण पथकातील लेखाधिकारी यांनी विहित नमुन्यांमध्ये नोंदविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे यांनी केले.मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्चावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने प्रत्‍येक प्रभागनिहाय निवडणूक खर्च संनियंत्रण पथक गठित करण्‍यात आले आहे. या निवडणूक खर्च संनियंत्रण पथकातील लेखाधिकारी, लेखापाल यांची बैठक महानगरपालिका मुख्‍यालयात पार पडली. त्‍यावेळी बेल्‍लाळे बोलत होते. प्रमुख लेखापाल (वित्‍त) वैशाली देसाई, गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीच्‍या वित्‍तीय सल्‍लागार व प्रमुख लेखाधिकारी चारूलेखा खोत यांच्‍यासह प्रशासकीय विभागातील लेखाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे तसेच त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीनुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्च स्वतंत्र बॅंक खात्यातून करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना प्राप्त होणारा निधी, देणगी बाबतच्या तपशीलाची (स्वनिधी, पक्ष निधी, भेट, कर्ज) माहिती नमुना क्रमांक १ व उमेदवाराने केलेल्या खर्चाच्या तपशीलाची माहिती नमुना क्रमांक २ मध्ये निवडणूक निकाल लागल्यापासून ३० दिवसांच्या आत नमुना क्रमांक ३ मधील प्रतिज्ञापत्रासह सादर करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून निवडणूक प्रचाराकरीता सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या प्रचार साहित्य तथा बाबींकरीता प्रचलित स्थानिक दरांच्या अनुषंगाने दरसूची देखील तयार करण्यात आली आहे. उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केल्यानंतर उमेदवारास विहित नमुना क्रमांक ४ नुसार पोहोच देणे बंधनकारक आहे. उमेदवार आणि संबंधित कार्यालयाने ही कागदपत्रे व पोहोच व्यवस्थित जतन करणे आवश्यक आहे, असेही सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे यांनी नमूद केले.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 11:10 pm

BAR vs HYD : विजय हजारे ट्रॉफीत ऐतिहासिक विक्रम! एकाच सामन्यात ५ शतकांचा पाऊस; बडोद्याचा हैदराबादवर थरारक विजय

Baroda vs Hyderabad match five centuries : देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित ‘विजय हजारे ट्रॉफी’मध्ये बडोदा आणि हैदराबाद यांच्यात एक असा सामना खेळला गेला, ज्याने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी मिळून तब्बल पाच शतके ठोकली. लिस्ट-ए क्रिकेटच्या इतिहासात एकाच सामन्यात पाच शतके होण्याची ही पहिलीच वेळ आहे. बडोद्याचा ४१७ धावांचा डोंगर […] The post BAR vs HYD : विजय हजारे ट्रॉफीत ऐतिहासिक विक्रम! एकाच सामन्यात ५ शतकांचा पाऊस; बडोद्याचा हैदराबादवर थरारक विजय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 10:57 pm

मुंबईत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तब्बल ७०२ मतदान केंद्र

मुंबई (विशेष प्रतिनिधी):मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी एकूण १० हजार २३१ मतदान केंद्रे विविध प्रकारच्या इमारती व जागांमध्ये उभारण्यात येणार आहेत. त्‍यापैकी ४ हजार ३८६ मतदान केंद्रे शासकीय तथा निमशासकीय इमारतींमध्ये स्थापन करण्यात येत आहेत. यामध्ये २ हजार ३८७ मतदान केंद्रे बंदिस्त जागांमध्ये, ८८० मतदान केंद्रे अर्धबंदिस्त जागांमध्ये, तर १ हजार ११९ मतदान केंद्रे खुल्या जागांमध्ये राहणार आहेत. तसेच, सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये एकूण ७०२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी १८१ मतदान केंद्रे बंदिस्त जागांमध्ये, ३१२ मतदान केंद्रे अर्धबंदिस्त जागांमध्ये, तर २०९ मतदान केंद्रे खुल्या जागांमध्ये स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय खासगी इमारतींमध्ये एकूण ५ हजार १४३ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेतमुंबई महापालिका निवडणुकीत एकूण १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यांच्यासाठी विविध ठिकाणी मिळून एकूण १० हजार २३१ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये शाळा, महाविद्यालयांसह शासकीय / निमशासकीय इमारती, सहकारी गृहनिर्माण संस्‍था तसेच खासगी इमारतींचा समावेश आहे. प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या, मतदारांची संख्या आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन मतदान केंद्रांची आखणी करण्‍यात आली आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली आहे.मुंबईतील मतदारांना मतदान करण्यासाठी सात परिमंडळांतील २४ प्रशासकीय विभाग कार्यालयानुसार तसेच २३ मध्‍यवर्ती मतदान केंद्रानुसार एकूण १० हजार २३१ मतदान केंद्र निश्चित करण्‍यात आली आहेत. मतदान प्रक्रियेत कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर वीज पुरवठा, पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था, प्रसाधनगृहे, रॅम्‍प आदींची सुविधा करण्‍यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्‍याची पाहणी, पडताळणी केली आहे. मतदारांना त्‍यांची नावे शोधण्‍यासाठी मतदान केंद्रानजीक 'मतदार सहाय्य केंद्र' स्‍थापित करण्‍यात येणार आहेत. मतदान केंद्रांवर मतदारांना माहिती देणारे फलक लावण्याचे निर्देश देण्‍यात आले आहेत. एकंदरीतच, मतदान प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित व सोयीस्कर पार पडावी यासाठी विविध ठिकाणी आणि विविध स्वरूपाच्या जागांमध्ये मतदान केंद्रांची व्यापक व सुनियोजित व्यवस्था करण्यात आली आहे, असेही गगराणी यांनी नमूद केले.मतदान केंद्रांची आकडेवारी लक्षात घेता, एकूण १० हजार २३१ मतदान केंद्रे विविध प्रकारच्या इमारती व जागांमध्ये उभारण्यात येणार आहेत. त्‍यापैकी ४ हजार ३८६ मतदान केंद्रे शासकीय तथा निमशासकीय इमारतींमध्ये स्थापन करण्यात येत आहेत. यामध्ये २ हजार ३८७ मतदान केंद्रे बंदिस्त जागांमध्ये, ८८० मतदान केंद्रे अर्धबंदिस्त जागांमध्ये, तर १ हजार ११९ मतदान केंद्रे खुल्या जागांमध्ये राहणार आहेत. तसेच, सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये एकूण ७०२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी १८१ मतदान केंद्रे बंदिस्त जागांमध्ये, ३१२ मतदान केंद्रे अर्धबंदिस्त जागांमध्ये, तर २०९ मतदान केंद्रे खुल्या जागांमध्ये स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय, खासगी इमारतींमध्ये एकूण ५ हजार १४३ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये २ हजार ७१० मतदान केंद्रे बंदिस्त जागांमध्ये, १ हजार ३७८ मतदान केंद्रे अर्धबंदिस्त जागांमध्ये, तसेच १ हजार ५५ मतदान केंद्रे खुल्या जागांमध्ये असतील,असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 10:30 pm

तंबाखूवरील अतिरिक्त उत्पादन शुल्कामुळे कंपन्यांचे शेअर कोसळले

मुंबई – तंबाखूजन्य उत्पादनावर एक फेब्रुवारीपासून अतिरिक्त उत्पादन शुल्क लावण्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली. यामुळे तंबाखूजन्य उत्पादन करणार्‍या कंपन्यांच्या शेअरच्या भावात गुरुवारी मोठी घट नोंदली गेली. गॉडफ्रे फिलिप्स कंपनीचा शेअर सतरा टक्क्यांनी कोसळून 2,289 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला. त्याचबरोबर आयटीसी कंपनीचा शेअर दहा टक्क्यांनी कोसळून 363 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला […] The post तंबाखूवरील अतिरिक्त उत्पादन शुल्कामुळे कंपन्यांचे शेअर कोसळले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 10:29 pm

नागरिकांकडून कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले

मुंबई – रिझर्व बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार कौटुंबिक कर्जाचे प्रमाण वाढत आहे. सरलेल्या वर्षातील कर्ज घेण्याचे प्रमाण पाच वर्षाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. मात्र ही बाब फारशी चिंता करण्यासारखी नसल्याचे विश्लेषकानी नमूद केले आहे. अगोदर घरासाठी जास्त प्रमाणात कर्ज घेतले जात होते. आता इतर उपभोग्य वस्तूसाठीही कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत नागरिकांनी घेतलेल्या […] The post नागरिकांकडून कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 10:22 pm

Mustafizur Rahman : राजकीय तणावाच्या खेळपट्टीवर IPL चा पेच; मुस्तफिजूरच्या सहभागावरून BCCI च्या भूमिकेवर चाहते संतापले

BCCI on Mustafizur Rahman for IPL 2026 : भारत आणि बांगलादेश यांच्यातील बिघडलेल्या राजकीय संबंधांमुळे सध्या देशातील वातावरण तापलेले आहे. या वादाचे पडसाद आता आगामी ‘आयपीएल २०२६’ मध्ये उमटताना दिसत आहेत. बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळणार की नाही, यावर सध्या देशभर चर्चा रंगली आहे. केकेआरवर टीकेची झोड – आयपीएल […] The post Mustafizur Rahman : राजकीय तणावाच्या खेळपट्टीवर IPL चा पेच; मुस्तफिजूरच्या सहभागावरून BCCI च्या भूमिकेवर चाहते संतापले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 10:17 pm

नेवासा: स्वच्छतेचा संदेश भिंतीवर, प्रत्यक्षात मात्र घाणीचे साम्राज्य!

नेवासा – ‘एक कदम स्वच्छता की ओर’ असा मोठा संदेश प्रवेशद्वारावर मिरवणाऱ्या नेवासा तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीला सध्या अस्वच्छतेने ग्रासले आहे. कार्यालयाच्या आवारात पसरलेला कचरा, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती आणि शौचालयांची झालेली दुरवस्था पाहून, “स्वच्छतेचे धडे देणाऱ्या प्रशासनाला स्वतःच्या कार्यालयाचा विसर पडला आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. भिंतींवर गुटख्याचे ‘कलाकाम’ नेवासा तालुक्याचे […] The post नेवासा: स्वच्छतेचा संदेश भिंतीवर, प्रत्यक्षात मात्र घाणीचे साम्राज्य! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 10:16 pm

आश्चर्यकारक! एकदिवसीय सामन्याची तिकीटं आठ मिनिटांत फूल, विराट अन् रोहितची क्रेझ

मुंबई: भारतातील क्रिकेट विश्व सध्या चर्चेत आहे. केवळ पुरुष नाही तर भारतीय महिला संघाचेसुद्धा सर्वत्र कौतुक सुरू आहे. दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका जानेवारीपासून होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारीला बडोद्यामध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातून रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळण्यास सज्ज झाले आहेत. देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफीत दोघांनी आपला फॉर्म काय आहे तो दाखवून दिल्यानंतर चाहत्यांमध्ये त्यांची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा पुरावा म्हणजे ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी तिकीट खिडकी खुली झाली आणि अवघ्या 8 मिनिटात तिकीटं विकली गेली.तिकीट विक्रीच्या या वेगामुळे रोहीत आणि विराटची फलंदाजी पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींमधील क्रेझ दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा त्यांच्या क्रिकेट करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. तसेच त्यांच्यासाठी हे वर्ष खूपच महत्त्वाचे आहे. कारण पुढच्या वर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. त्याच्या तयारीसाठी या दोघांना या वर्षात खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण या दोघांना वनडे वर्ल्डकप २०२७ मध्ये खेळण्याची इच्छा आहे. पण त्यासाठी फॉर्मही तितकाच महत्त्वाचा आहे.विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी२० आणि कसोटी संघातून निवृत्ती घेतली आहे. पण आता ते फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळत आहे. त्यांच्या फलंदाजीची धार अजूनही कायम आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्यांनी क्रीडाप्रेमींचे चांगलेच मनोरंजन केले. आता न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही तशीच अपेक्षा आहे. विराट कोहलीने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील दोन सामन्यात शतक आणि तिसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. तर रोहित शर्माची बॅटही चांगलीच तळपली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही या दोघांच्या फलंदाजीची जादू दिसली होती.भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका ११ जानेवारीपासून होत आहे. या मालिकेतील पहिला सामना बडोद्याच्या बीसीए स्टेडियममध्ये होणार आहे. तर दुसरा सामना १४ जानेवारीला राजकोटमध्ये आणि तिसरा सामना इंदूरमध्ये होलकर मैदानात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात कोण खेळाडू असणार याची घोषणा २ किंवा ३ जानेवारी होणार आहे.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 10:10 pm

BMC News : निवडणूक कामात गैरवर्तणूक, महापालिकेने केले अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ कामकाजात गंभीर स्वरूपाचे गैरवर्तणूक करणा-या व निवडणूक प्रक्रियेत बाधा पोहोचविणा-या कनिष्ठ लेखापरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.दीपक जोहरे असे निलंबित करण्यात आलेल्या कनिष्ठ लेखापरीक्षकाचे नाव आहे. ते महानगरपालिकेच्या वित्त विभागात कनिष्ठ लेखापरीक्षक पदावर कार्यरत आहेत.जोहरे यांची नियुक्ती मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात (आर ओ) करण्यात आली होती. निवडणूक कामकाज करताना जोहरे यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन केल्याची , निवडणूक प्रक्रियेत बाधा पोहोचविल्याची तक्रार तसेच सबळ पुरावा महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला. प्रथमदर्शनी चौकशीमध्ये आढळून आलेल्या गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तणुकीच्या अनुषंगाने जोहरे यांचे तत्काळ प्रभावाने निलंबन करण्याचे आदेश अतिरिक्त‍ महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अत्यंत निष्पक्ष, पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरू आहे. या प्रक्रियेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. तरीही, कोणत्याही कर्मचाऱ्याने निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण होईल असे वर्तन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे सक्त आदेश अतिरिक्त आयुक्त (शहर) जोशी यांनी दिले आहेत.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 10:10 pm

Sanjay Raut : मराठी माणूस महापौर होऊ नये हा भाजपचा अजेंडा; संजय राऊत यांचा आरोप

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महापौर मराठी माणूस होऊ नये, हा सत्ताधारी भाजपचा अजेंडा आहे. भाजपला मराठी लोकांचे नुकसान करायचे आहे, असा दावा ठाकरेसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत पत्रकारांशी बोलत होते. भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेत हिंदी भाषिक महापौर निवडून येईल याची खात्री करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या केलेल्या विधानावर […] The post Sanjay Raut : मराठी माणूस महापौर होऊ नये हा भाजपचा अजेंडा; संजय राऊत यांचा आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 10:08 pm

‘बँक कर्मचारी संघ पुणे’साठी नवी कार्यकारिणी जाहीर; जनरल सेक्रेटरीपदी सुनील देसाई, अध्यक्षपदी गिरीश मेंगे

पुणे – पुणे जिल्ह्यातील सहकारी बँकांमध्ये कार्यरत कर्मचार्‍यांचे नेतृत्व करणारी व मान्यताप्राप्त असलेली बँक कर्मचारी संघ यांची 2025 ते 2027 या कालावधीसाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीनंतर संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सदर कार्यकारिणीची घोषणा संघटनेचे मुख्य सल्लागार दीपकभाऊ मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संघटनेच्या जनरल सेक्रेटरी पदी सुनील अरविंद देसाई, अध्यक्षपदी गिरीश […] The post ‘बँक कर्मचारी संघ पुणे’साठी नवी कार्यकारिणी जाहीर; जनरल सेक्रेटरीपदी सुनील देसाई, अध्यक्षपदी गिरीश मेंगे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 10:03 pm

निघोजेच्या सुभाषवाडीत भजन स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद

चिंबळी – महानगाव (निघोजे) येथील सुभाषवाडी येथे श्री सद्गुरु शंकर महाराज मंदिराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित भव्य भजन स्पर्धेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कुरुळी-आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटात सन्मार्ग फाउंडेशन व शीतल आशिष येळवंडे यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गटातील विविध भजनी मंडळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ताल, सूर आणि भक्तिरस […] The post निघोजेच्या सुभाषवाडीत भजन स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 9:47 pm

Election 2026 : आतापर्यंत राज्यभरात १३ नगरसेवक बिनविरोध; मतदानापूर्वीच विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात

मुंबई – राज्‍यभरात १३ नगरसेवकांनी बिनविरोध विजयी झाल्याने गुलाल उधळण केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिवसेनेच्‍या महायुतीने मतदानापूर्वीच विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे ५ आणि शिंदेसेनेचे ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे १२२ सदस्य संख्या असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप, शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याने […] The post Election 2026 : आतापर्यंत राज्यभरात १३ नगरसेवक बिनविरोध; मतदानापूर्वीच विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 9:46 pm

Sarfaraz Khan : ‘सर्फराझची उपेक्षा होणे लाजिरवाणे!’भारताचा माजी क्रिकेटपटू टीम मॅनेजमेंटवर संतापला

Dilip Vengsarkar on Sarfaraz Khan : भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी बीसीसीआयच्या (BCCI) निवड धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घरगुती क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडूनही आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या संधींचे सोने करूनही सर्फराझ खानला सतत डावलले जात असल्याबद्दल वेंगसरकर यांनी निवडकर्त्यांना धारेवर धरले आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतून वगळल्याने आश्चर्य […] The post Sarfaraz Khan : ‘सर्फराझची उपेक्षा होणे लाजिरवाणे!’ भारताचा माजी क्रिकेटपटू टीम मॅनेजमेंटवर संतापला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 9:45 pm

ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 2.14 कोटींचा 638 किलो गांजा जप्त

ठाणे: ओडिशा आणि तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाला यश आले आहे. खारेगाव टोलनाक्यावर सापळा रचून पोलिसांनी एका इन्होवा कारमधून तब्बल ६३८ किलो गांजा जप्त केला असून, या कारवाईत एकूण २ कोटी १४ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मालमत्ता कक्षाचे पोलीस […] The post ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 2.14 कोटींचा 638 किलो गांजा जप्त appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 9:28 pm

BMC Election : वंचित-काँग्रेसने ठाकरे बंधूंच काम सोप्प केलं; ‘त्या’ 32 प्रभागात गेम फिरणार?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी (वंचित) यांची युती चर्चेत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचितने इंडिया आघाडीला मोठा फटका दिल्याने यावेळी मतविभाजन टाळण्यासाठी काँग्रेसने विशेष प्रयत्न केले. त्यानुसार, २२७ प्रभागांपैकी वंचितला तब्बल ६२ जागा देण्यात आल्या. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये मोठा उलटफेर झाला. वंचितकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने त्यांच्या १६ जागा […] The post BMC Election : वंचित-काँग्रेसने ठाकरे बंधूंच काम सोप्प केलं; ‘त्या’ 32 प्रभागात गेम फिरणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 9:27 pm

भाजपच्या बड्या नेत्याने उमेदवारीसाठी 50 लाख रुपये घेतले; कट्टर समर्थकाचा खळबळजनक आरोप

नांदेड: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नांदेड भाजपमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी उमेदवारीसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप त्यांचे खंदे समर्थक व माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांनी केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून चव्हाणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण […] The post भाजपच्या बड्या नेत्याने उमेदवारीसाठी 50 लाख रुपये घेतले; कट्टर समर्थकाचा खळबळजनक आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 9:18 pm

Election 2026 : महायुतीची उद्या पहिली सभा.! देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे फोडणार प्रचाराचा नारळ

मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराचा अधिकृत मुहूर्त ठरला असून, ३ जानेवारी रोजी पहिली जाहीर सभा होणार आहे. या सभेने मुंबईतील निवडणूक रणधुमाळीला औपचारिक सुरुवात होणार आहे. विशेष बाब म्हणजे, या पहिल्याच जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ हे प्रमुख वक्ते म्हणून एकाच व्यासपीठावरून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. त्यामुळे महायुतीची ताकद, […] The post Election 2026 : महायुतीची उद्या पहिली सभा.! देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे फोडणार प्रचाराचा नारळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 9:14 pm

बिहारच्या रस्ते विकासासाठी २०२६ ठरणार महत्त्वाचे! केंद्र सरकाने दिला महामार्गाला हिरवा कंदील

बिहार: बिहारच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २०२६ हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या रस्ते सुधारण्याच्या एकत्रित प्रयत्नांमुळे बिहार पूर्णपणे बदलणार आहे. या वर्षी, राज्यात केवळ सहा पदरी, अत्याधुनिक रस्तेच नव्हे तर एक्सप्रेसवे आणि प्रवेश-नियंत्रित महामार्गांसारखे मोठे प्रकल्प देखील येणार आहेत. यामुळे सामान्य जनतेसाठी प्रवास सुलभ होईलच, शिवाय व्यवसाय आणि आर्थिक प्रकल्पांनाही एक नवीन चालना मिळणार आहे.बिहारच्या रस्ते इतिहासात पहिल्यांदाच, सहा पदरी राष्ट्रीय महामार्गाचे स्वप्न या वर्षी प्रत्यक्षात येणार आहे. वाराणसी ते औरंगाबादला जोडणारा बहुप्रतिक्षित सहा पदरी रस्ता प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तो पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या मार्गामुळे बिहारमधील लोकांचा उत्तर प्रदेशमार्गे दिल्लीपर्यंतचा प्रवास वेगवान होणार नाही तर आरामदायी देखील होईल. याबाबत औरंगाबाद ते चोरदहा हा सहा पदरी विभाग देखील पूर्णत्वाच्या जवळ आहे, जो जड वाहनांसाठी आणि झारखंड आणि पश्चिम बंगालला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा ठरेल.तसेच यावर्षी बिहारला पहिला प्रवेश-नियंत्रित महामार्ग मिळेल. हा मार्ग मूळात २०२५ चे लक्ष्य होते, मात्र आता ते २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या रस्त्यावर निश्चित प्रवेश आणि निर्गमन बिंदू असतील, ज्यामुळे वाहनांना वाहतूक अडथळा न येता उच्च वेगाने प्रवास करता येणार आहे. याव्यतिरिक्त, चकिया-बैरगानिया आणि परशर्मा-सहरसा-महिशी सारख्या महत्त्वाच्या दुपदरी रस्त्यांचे जाळे देखील या वर्षी पूर्ण केले जाईल, ज्यामुळे दुर्गम ग्रामीण भागांचा जिल्हा मुख्यालयांशी संपर्क मजबूत होईल.https://prahaar.in/2026/01/01/deepika-is-making-a-comeback-she-is-likely-to-appear-in-big-budget-films-in-2026/राजधानी पटनाभोवती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, अनेक पूल आणि रस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. कच्ची दर्गा-बिदुपूर आणि बख्तियारपूर-ताजपूर सारखे मेगा प्रकल्प या वर्षी पूर्णत्वाच्या जवळ आहेत. पटना-बेतिया रस्त्याच्या सोनपूर-बकरपूर-माणिकपूर विभागाच्या पूर्णतेमुळे जेपी गंगा पथ मार्गे एम्स पटना ते उत्तर बिहार प्रवास करणे खूप सोपे होईल. याव्यतिरिक्त, मिठापूर-महुली आणि गया-बिहारशरीफ चार-लेन रस्त्यांच्या पूर्णतेमुळे पटना लगतच्या जिल्ह्यांमधील अंतर काही मिनिटांनी कमी होईल. २०२६ मध्ये एक प्रमुख आकर्षण बिहारचा पहिला एक्सप्रेसवे असेल. पटना-पूर्णिया एक्सप्रेसवेला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. आर्थिक मंजुरी मिळाल्यानंतर या वर्षी त्याचे बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे.तर बिहारमधून जाणाऱ्या गोरखपूर-सिलिगुडी, रक्सौल-हल्दिया आणि बक्सर-भागलपूर एक्सप्रेसवे सारख्या प्रमुख प्रकल्पांवर तयारीचे काम आणि जमीन संपादन जलद केले जाईल. पाटणा-आरा-सासाराम प्रवेश नियंत्रित महामार्ग देखील या वर्षी सुरू होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे दक्षिण बिहारमधील प्रवासात बदल होईल. रस्त्यांचे हे जाळे केवळ प्रवासाचा वेळ कमी करेलच असे नाही तर त्याच्या मार्गावर औद्योगिक कॉरिडॉरच्या विकासाची क्षमता देखील वाढवेल. सुधारित कनेक्टिव्हिटी बिहारमध्ये नवीन गुंतवणूक संधी निर्माण करेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनांची मोठ्या बाजारपेठांमध्ये वाहतूक सुलभ करेल. एकूणच, २०२६ हे बिहारसाठी रस्ते क्रांती चे वर्ष ठरण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 9:10 pm

नववर्षात राज्यसभेच्या ‘एवढ्या’जागा होणार रिक्त; एनडीएसह विरोधकांची लागणार कसोटी

नवी दिल्ली : 2026 मध्ये राज्यसभेच्या तब्बल ७२ जागा रिक्त होणार आहेत. या निवडणुकांचा थेट परिणाम केंद्रातील राजकारणावर, सत्ताधारी एनडीएची ताकद आणि विरोधकांची रणनीती यावर होणार आहे. सध्या राज्यांच्या विधानसभांची स्थिती पाहता, भाजप आणि एनडीएची राज्यसभेतील संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे, तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या अडचणी वाढू शकतात. राज्यसभेतील बहुमताचे गणित बदलणार असले, तरी […] The post नववर्षात राज्यसभेच्या ‘एवढ्या’ जागा होणार रिक्त; एनडीएसह विरोधकांची लागणार कसोटी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 9:07 pm

भारतात वर्षभरात 166 वाघांचा मृत्यू; वन्यजीव संशोधकांनी सांगितलं कारण

Tigers died in 2025: भारतासाठी व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने २०२५ हे वर्ष काहीसे चिंताजनक ठरले आहे. नॅशनल टायगर कंजर्वेशन अथॉरिटीने (NTCA) जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात देशात एकूण १६६ वाघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, ‘टायगर स्टेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशात सर्वाधिक ५५ वाघांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत […] The post भारतात वर्षभरात 166 वाघांचा मृत्यू; वन्यजीव संशोधकांनी सांगितलं कारण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 8:56 pm

'इक्किस'चित्रपटात दिसलेला अगस्त्य नंदा आणि बच्चन कुटुंबियांचे नाते काय?

मुंबई: भारतीय सिनेसृष्टीत हि-मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांचा देशभक्तीपर इक्कीस हा शेवटचा चित्रपट आज नववर्षानिमित्त प्रदर्शित झालाय. या चित्रपटामुळे चाहत्यांना धर्मेंद्र यांना शेवटचे पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने सिनेगृहात पहिल्या शो पासून गर्दी झाली आहे. धर्मेंद्रप्रमाणेच या चित्रपटातील मुख्य आकर्षण म्हणजे अगस्त्य नंदा. अगस्त्य नंदा हा इक्कीस चित्रपटात मुख्य भुमिकेत आहे.१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान झालेल्या लढाईतील बलिदानासाठी मरणोत्तर परमवीर चक्र सन्मानित भारतीय सैन्यातील तरुण लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या जीवनावर आधारीत या चित्रपटात अगस्त्य नंदा अरुण हे मुख्य पात्र करत आहे. नेटफ्लिक्सवरील झोया अख्तरच्या द आर्चीज या बॉलीवूड चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेला अगस्त्यचा इक्कीस हा दुसरा चित्रपट आहे. मात्र त्याच्या पहिल्या चित्रपटापेक्षा तो यावेळी जास्त चर्चेत आला. कारण त्याने धर्मेंद्र सोबत काम केले आहे.https://prahaar.in/2026/01/01/brutally-beaten-and-then-an-attempt-to-burn-him-with-petrol-another-hindu-attacked-in-bangladesh/यागोष्टीत विशेष म्हणजे धर्मेंद्र आणि अगस्त्यच्या आजोबांची सिनेसृष्टीत आणि वैयक्तिक आयुष्यात जय-वीरू ही प्रसिद्ध जोडी आहे. अर्थात अगस्त्य हा जय म्हणजेच बिग बींचा नातू आहे. अगस्त्य हा अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन हिचा मुलगा आहे. आपल्या आजोबांसोबत नाही पण आजोबांच्या खास मित्रासोबत त्याने चित्रपटात काम केले आहे. ते ही बाप-बेट्याच्या भुमिकेत. त्यामुळे एकंदर अगस्त्य, अमिताभ आणि संपूर्णच बच्चन कुटुंबासाठी हा चित्रपट खास आहे. याबाबत कौन बनेगा करोडपती या शोमध्ये बोलताना सुद्धा बिग बींना अश्रु अनावर झाले होते.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 8:10 pm

मुंबईत महायुतीमधील बंडोबांना थंड करण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती

अर्ज मागे घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस; निष्ठावंत कार्यकर्त्यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनी केले फोनमुंबई : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई पालिका निवडणुकीत बंडखोरांनी डोकेदुखी वाढवली असताना, महायुतीने बंडोबांना थंड करण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. मुंबईतील सहा जिल्ह्यांत समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत मतफुटी रोखणे, एकमेकांच्या (भाजप-शिवसेना) उमेदवारांच्या प्रभागात मतदान वाढवणे आणि महायुतीच्या एकजुटीचे दर्शन घडवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. उद्या(२ जानेवारी) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने समन्वयकांपुढे जास्तीत जास्त बंडखोरी थोपवण्याचे आव्हान आहे.भाजपकडून मुंबईतील सहा जिल्ह्यांत (प्रत्येक जिल्ह्यासाठी एक प्रमुख समन्वयक आणि त्यांना सहाय्यक समन्वयक) या नेमणुका करण्यात आल्या आहेत. समन्वयकांचे मुख्य काम दोन्ही पक्षांतील बंडखोरांना शांत करणे, मतविभाजन टाळणे आणि महायुतीच्या उमेदवारांना पूर्ण ताकद देणे आहे. ज्या प्रभागात भाजपचा उमेदवार आहे, तेथे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मोट बांधून मतदानाची टक्केवारी वाढवणे, तसेच शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रभागात भाजपची मते वळवणे, यासाठी समन्वयक प्रयत्न करणार आहेत. याशिवाय मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधून प्रचारात त्यांना सहभागी करून घेण्याचे कामही त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.https://prahaar.in/2026/01/01/bjp-shiv-sena-will-sound-the-bugle-of-their-election-campaign-from-worli-a-grand-rally-will-be-held-on-january-3rd/मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर बंडखोरीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरले आहेत. जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी भावनिक आवाहन केले. सरकार आपले आहे, महापालिकांमध्येही आपलीच सत्ता येणार आहे. आज न्याय मिळाला नाही, पण भविष्यात नक्कीच मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. उमेदवारी डावललेल्यांना महापालिकेत स्वीकृत सदस्य, जिल्हा, विभागीय, राज्यस्तरीय शासकीय समित्यांवर काम करण्याची संधी, विविध महामंडळांवर पदे किंवा पक्षसंघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 8:10 pm

नववर्षाच्या सुरुवातीला भारतीय महिला संघाने घेतले बाबा महाकाल दर्शन

२०२५ च्या अखेरीस धमाका करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडूंनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाबा महाकालचे दर्शन घेतले आहे. उज्जैन येथील जगप्रसिद्ध महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात भारतीय महिला संघातील हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, रेणुका सिंह ठाकुर, स्नेह राणा, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांनी सकाळच्या विशेष भस्म आरतीत सहभाग घेतला. भल्या पहाटे विश्वविजेत्या महिला संघाला पाहून भाविकांनाही आनंद झाला. अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.गतवर्षात दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच धावपट्टीवर हरवून भारतीय संघ विश्वविजेता ठरला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील महिला क्रिकेट संघाला गतवर्ष विजयाचे ठरले आहे. भारताच्या वाघीणींनी वेस्टइंडीजला २-१ आणि इंग्लंडला ३-२ अशी मात दिली. तर श्रीलंकेसोबत टी२० मालिकेत ५-० कामगिरी करत उत्कृष्ट खेळी केली. तिरुअनंतपुरममध्ये खेळताना अखेरच्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर १५ धावांनी विजय मिळवला. यामुळे तिसऱ्यांदा टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत श्रीलंकेचा दारूण पराभव झाला. भारताच्या या खेळीमुळे भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या जगभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.https://prahaar.in/2026/01/01/coordinators-have-been-appointed-in-mumbai-to-pacify-the-rebels-within-the-mahayuti-alliance/भारतीय संघाने एकदिवशीय सामन्यात चांगलाच दबदबा तयार केला आहे. पण वर्ष २०२६ मध्ये महिला क्रिकेट संघासमोर टी२० विश्वचषक जिंकण्याचे मोठे आव्हान आहे. वर्ष २०२४ मधील टी२० विश्वचषकात भारतीय संघाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. विश्वचषकाच्या पहिल्याच फेरीतून महिला संघाला बाहेर पडावे लागले होते. या पराभवाला उत्तर देण्यासाठी महिला संघ तयारीला लागला आहे. या तयारी दरम्यान संघातील काही खेळाडूंनी बाबा महाकालचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला आहे.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 8:10 pm

Ravichandran Ashwin : विराट-रोहितच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेट संपुष्टात येणार? बचावासाठी अश्विनने दिला फिफा मॉडेलचा सल्ला

Ravichandran Ashwin warns about ODI cricket future : भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एकदिवसीय क्रिकेटच्या (ODI) भवितव्याबाबत धोक्याची घंटा वाजवली आहे. आपल्या ‘ऐश की बात’ (Ash ki Baat) या यूट्यूब चॅनेलवर क्रीडा पत्रकार विमल कुमार यांच्याशी संवाद साधताना, अश्विनने २०२७ च्या विश्वचषकानंतर या फॉरमॅटच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मध्यंतरीचे ओव्हर्स ठरतायत कंटाळवाणे – अश्विनच्या […] The post Ravichandran Ashwin : विराट-रोहितच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेट संपुष्टात येणार? बचावासाठी अश्विनने दिला फिफा मॉडेलचा सल्ला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 8:02 pm

Mumbai Municipal Corporation Election : पारदर्शक, जबाबदार प्रशासनाचे आश्वासन…; काँग्रेसचे मुंबईसाठी व्हीजन जाहीर !

Mumbai Municipal Corporation Election : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आपल्या पक्षाचे व्हीजन जाहीर केले आहे. यामध्ये महानगराला भ्रष्टाचारापासून मुक्त करणे आणि पारदर्शक, जबाबदार प्रशासन प्रदान करण्याचा उद्देश आहे, असा दावा त्यांनी केला आहे. प्रगतीशील मुंबईसाठी त्यांनी पक्षाच्या प्राधान्यक्रमांची रूपरेषा मांडली. ज्यामध्ये बेस्टच्या ताफ्यात ६,००० हून अधिक बसेसचा विस्तार […] The post Mumbai Municipal Corporation Election : पारदर्शक, जबाबदार प्रशासनाचे आश्वासन…; काँग्रेसचे मुंबईसाठी व्हीजन जाहीर ! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 7:57 pm

Pune news : शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे १९ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन

Pune news : शालेय शिक्षण विभागीतील अधिकाऱ्यांच्या विना चौकशी व विनापरवानगी सुरू झालेल्या अटक सत्रामुळे सर्व अधिकारी प्रचंड दबावाखाली काम करत असून या कारवायांमुळे अधिकाऱ्यांचे मनोबलाचे खच्चीकरण होत असून कार्यालयीन कामकाजावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. गृहविभागाने तात्काळ या बेलगाम सुरु असलेल्या अटक सत्रांचा फेरविचार करून, दोष सिद्ध होईपर्यंत अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याची स्पष्ट धोरणात्मक भूमिका […] The post Pune news : शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे १९ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 7:44 pm

Narendra Modi : भगवान बुद्धांच्या पिपराहवा अस्थींचे प्रदर्शन; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (३ जानेवारी) नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात भगवान बुद्धांच्या पवित्र पिपराहवा अवशेषांचे भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. द लाइट अँड द लोटस : रेलिक्स ऑफ द अवेकन्ड वन असे या प्रदर्शनाचे शीर्षक असून, यात शतकाहून अधिक कालावधीनंतर परत आणलेले पिपराहवा अवशेष प्रथमच राष्ट्रीय संग्रहालय […] The post Narendra Modi : भगवान बुद्धांच्या पिपराहवा अस्थींचे प्रदर्शन; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 7:32 pm

Pune Fire News : धुराचे लोट आणि फटाक्यांचे स्फोट! पिंपरी-चिंचवडमध्ये गजानन रुग्णालयाखाली अग्नितांडव; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

पुणे : पिंपरी-चिंचवड : औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात आज दुपारी आगीची एक मोठी घटना घडली. तापकीर चौकातील 'गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल' या खासगी रुग्णालयाच्या इमारतीत असलेल्या फटाक्यांच्या दुकानाला अचानक भीषण आग लागली. फटाक्यांनी पेट घेतल्यामुळे आगीचा भडका उडाला आणि काही क्षणांतच संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ज्या इमारतीत ही आग लागली, तिथेच वरच्या मजल्यावर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असल्याने मोठी खळबळ उडाली. आगीच्या रौद्ररूपामुळे आणि फटाक्यांच्या आवाजांमुळे रुग्णालयातील रुग्ण आणि परिसरात असलेल्या नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. धुराचे लोट परिसरात पसरल्याने श्वास घेण्यासही त्रास होत होता. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र दुकानातील मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.https://prahaar.in/2026/01/01/mumbai-ahmadabad-indias-first-bullet-train-inaugural-in-august-2027/अग्निशमन दलाचे ३ बंब घटनास्थळी

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 7:30 pm

IND vs PAK : यंदा भारत-पाकिस्तानमध्ये इतके हाय-व्होल्टेज सामने! कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या

IND vs PAK cricket clashes in 2026 : भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट सामना म्हणजे केवळ खेळ नसून ती चाहत्यांसाठी एक भावनिक लढत असते. सध्या दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे हे संघ केवळ आयसीसी आणि आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या स्पर्धांमध्येच एकमेकांशी भिडतात. अशातच, २०२६ हे वर्ष क्रिकेटप्रेमींसाठी खास ठरणार आहे. कारण या एकाच वर्षात भारत आणि पाकिस्तानचे पुरुष […] The post IND vs PAK : यंदा भारत-पाकिस्तानमध्ये इतके हाय-व्होल्टेज सामने! कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 7:30 pm

Ladki Bahin Yojana: राहिलेल्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार? लाडक्या बहिणींच्या नजरा आता शासनाच्या निर्णयाकडे

Ladki Bahin Yojana: राज्यातील अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत वर्षाच्या अखेरीस नोव्हेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला असला, तरी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांच्या प्रलंबित हप्त्यांबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. मागील तीन महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या महिलांना वर्षअखेरीस ३००० ते ४५०० रुपये एकत्रित मिळतील अशी अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात केवळ […] The post Ladki Bahin Yojana: राहिलेल्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार? लाडक्या बहिणींच्या नजरा आता शासनाच्या निर्णयाकडे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 7:13 pm

Vande Bharat Sleeper Train : कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान धावणार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन

नवी दिल्ली : कोलकाता (हावडा) आणि गुवाहाटी दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे काम पूर्ण झाले असून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या ट्रेनचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. पत्रकार परिषदेत बोलताना वैष्णव म्हणाले की, ही सेवा पुढील १५ ते २० दिवसांत सुरू होण्याची शक्यता असून १८ […] The post Vande Bharat Sleeper Train : कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान धावणार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 7:12 pm

क्रुरपणे मारहाण अन् नंतर पेट्रोलने जाळण्याचा प्रयत्न! बांगलादेशात आणखी एका हिंदूवर हल्ला

ढाका: मागील काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वी दोन हिंदू तरुणांची जमावाने हत्या केल्याचे समोर आले होते. हिंदूवरील हल्ले थांबत नाहीत. आता पुन्हा एकदाएका हिंदू व्यक्तीवर हल्ला झाल्याचे समोर आले. शरीयतपूर परिसरात खोकन चंद्रा नावाच्या एका हिंदू व्यक्तीला जमावाने घेरले. त्याला आधी क्रूरपणे मारहाण करण्यात आली, नंतर चाकूने मारले आणि नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र खोकन चंद्रा यांनी तात्काळ जवळच्या तलावात उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरच्या रात्री ९ वाजता कानेश्वर युनियनमधील तिलोई परिसरात हा क्रूर हल्ला झाला. खोकन चंद्रा हे व्यापारी आहेत. दामुड्यातील केउरभंगा बाजारात त्यांची फार्मसी आहे. रात्रीच्या वेळी खोकन चंद्रा दुकान बंद करून घरी निघाले तेव्हा तिलोई परिसरात त्यांना काही गुन्हेगारांनी अडवले. या हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि नंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. आगीतून जीव वाचवण्यासाठी खोकन चंद्रा यांनी जवळच्या तलावात उडी मारली. हा सर्व प्रकार पाहणाऱ्या लोकांनी गंभीर अवस्थेतील खोकन यांना तात्काळ शरीयतपूर येथील रुग्णालयात दाखल केले.https://prahaar.in/2026/01/01/mumbai-ahmadabad-indias-first-bullet-train-inaugural-in-august-2027/या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. या हल्ल्यामागील हेतू आणि त्यात सहभागी असलेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या काळात बांगलादेशमध्ये हिंदूंसह अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार वाढला आहे, ज्यामुळे लोकांमध्ये आणि जगभरातील अनेक मानवाधिकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.१८ डिसेंबर रोजी, मयमनसिंगच्या भालुका उपजिल्हा येथील त्याच्या कारखान्यात एका मुस्लिम सहकाऱ्याने खोट्या ईशनिंदेच्या आरोपावरून २५ वर्षीय हिंदू तरुण दिपू चंद्र दास याला जमावाने मारहाण करून निर्घृणपणे ठार मारले. जमावाने दास यांची हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवला आणि नंतर तो जाळून टाकला. यानंतर २४ डिसेंबर रोजी, बांगलादेशातील कालीमोहर युनियनमधील हुसेनडांगा भागात २९ वर्षीय अमृत मोंडल नावाच्या आणखी एका हिंदू तरुणाची जमावाने मारहाण करून हत्या केल्याचा आरोप आहे.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 7:10 pm

New Rules Alert: आजपासून तुमच्या आयुष्यावर हे आर्थिक निर्णय परिणामकारक ठरणार! वाचा एका क्लिकवर

मोहित सोमण: आजपासून ८ महत्वाचे बदल तुमच्या आयुष्यात होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर, पोर्टफोलिओवर, करावर, दैनंदिन जीवनावर व कागदपत्रांवर होणार आहे. जाणून घेऊयात कुठले हे महत्वाचे बदल आहेत.१) Pan Aadhar Link: आज नव्या आर्थिक वर्षात १ जानेवारी २०२६ पासून भारतातील प्रत्येक नागरिकांना आधार कार्ड व पॅनकार्ड लिंक करणे बंधनकारक असणार आहे. ते जर केले नसल्यास नागरिकांना अधिकचा भुर्दंड सोसावा लागेलच पण ते वेळेत अँक्टिव न केल्यास तुमचे पॅनकार्ड देखील निष्क्रीय होणार आहे. कालपर्यंत दोन्ही आधार व पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख होती. तसेच हे निष्क्रीय असल्यास अधिक कराचा भुर्दंडही नागरिकांना पडणार आहे. तरीही आता दोन्ही कार्डाचे लिंक करून अँक्टिव्ह करणे शक्य होणार आहे. त्यासाठी लेट फी भरावी लागेल असे केंद्र सरकारने सांगितले होते. दोन्ही कार्ड लिंक नसल्यास टॅक्स फायलिंग अथवा महत्वाचे आर्थिक व्यवहार करणे शक्य होणार नाही.२) वैध पॅन नसल्यास भुर्दंड: नागरिकांकडे वैध पॅन कार्ड नसल्यास ते अवैध समजले जाणार आहे. त्यामुळे या अवैध पॅन कार्डामुळे अधिकचा टीडीएस (Tax Deductions at Sources TDS) भरावा लागणार असून टीसीएस (Tax Collection at Source TCS) मध्येही अधिक भरीव रक्कम जाऊ शकते. सरकारने वैध माहितीसाठी व करबुडव्यांविरोधी खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला होता. त्यामुळे कर भलतानाही मोठ्या प्रमाणात अडचणी वाढू शकतात.३) आयकर नोंदणी प्रणालीत बदल:आज १ जानेवारी २०२६ पासून आयकर नोंदणी प्रणालीतही बदल झाले आहेत. उदाहरणार्थ नव्या नोंदणीतील बदलानुसार आवश्यक ते बदल करताना आवश्यक ती उत्पन्न, गुंतवणूक, वजावट (Deductions), आणि इतर महत्वाची माहिती योग्य भरावी लागणार आहे. ती नसल्यास वेळेतच करदात्यांनी ही माहिती तपासून पाहणे अपेक्षित आहे. अथवा करदात्यांना अडचणीला सामोरे जावे लागू शकते.४) नवी आयकर प्रणाली: नव्या आयकर प्रणालीनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना व निवृत्ती वेतनधारकांना स्टँडर्ड डिडकश्नन (Standard Deductions) नियमावलीत बदल झाले आहेत. कर भरण्यासाठी नव्या आर्थिक वर्ष २०२६ १ एप्रिलपासून ही यंत्रणा लागू होणार आहे. तत्पूर्वी याची पडताळणी करुन करदात्यांनी वेळेत माहितीची तपासणी केल्यास फायदेशीर ठरू शकते. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी जर व्यक्ती नोकरीत अथवा निवृत्ती वेतनधारक असेल तर ७५००० रूपयांची वजावट (Deductions) मिळू शकते ४ लाखांपर्यंत उच्चतम सूट मिळाल्याने वाढीव सूटीसह १२ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना हे उत्पन्न कर मुक्त असणार आहे. सेवेत असल्यास १२.७५ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त असणार आहे. जर तुमचे जुनी कर प्रणाली असेल तर त्यातील अस्तित्वात असलेली नियमावली लागू होणार आहे.५) सुधारित टीडीएस आणि टीसीएस मर्यादा - केंद्र सरकारने टीडीएस आणि टीसीएससाठी मर्यादांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे आता कर कधी कापला किंवा गोळा केला पाहिजे यावर परिणाम होणार आहे. उदाहरणार्थ या मर्यादा खालील श्रेणींना लागू होतात.पगार, व्यावसायिक तांत्रिक शुल्क, भाडे, कमिशन आणि दलाली वस्तूंची विक्री (टीसीएस) इत्यादी.. या मर्यादांमधील बदलांमुळे कर कपात करणाऱ्यांना विशिष्ट पावत्यांवर कर कपात किंवा कर गोळा करणे कधी सुरू करावे लागेल यावर परिणाम होणे अपेक्षित आहे.६) बदललेले बँकिंग नियम: वेगवान डेटा,अधिक कठोर अनुपालन (Compliance) यामुळे मोठ्या प्रमाणात आजपासून बँकिग अधिनियमात फरक पडणार आहे. सर्वात मोठ्या बदलांपैकी एक क्रेडिट रिपोर्टिंगमध्ये होणार आहे. आता क्रेडिट ब्युरो आता दर १५ दिवसांऐवजी दर आठवड्याला ग्राहकांचा डेटा म्हणजेच क्रेडिट स्कोअर अपडेट करण्यास सुरुवात करणार आहे. कर्जाची परतफेड, चुकलेले ईएमआय किंवा क्रेडिट वर्तनातील सुधारणा क्रेडिट स्कोअरमध्ये अधिक वेगाने दिसून येणार असल्याचने ग्राहकांचा बँकिंग ट्रॅक रेकॉर्डवर यांचा थेट परिणाम होइल. तसेच यासह पूर्वीपेक्षा लवकर कर्ज मंजुरी आणि व्याजदरांवर परिणाम होणे अपेक्षित आहे. कर्जदारांना व्याज खर्चातही काहीसा दिलासा मिळू शकतो. उपलब्ध माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय),एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक यांसारख्या प्रमुख बँकानी रेपो दरात कपात झाल्यानंतर व्याज दर कपात केली होती त्यामुळे त्यांनी आधीच कर्जाचे दर कमी केले आहेत, आणि सुधारित मुदत ठेव दर जानेवारीपासून लागू होण्याची शक्यता आहे. याशिवाय बहुतेक बँकिंग आणि सरकारी सेवा मिळवण्यासाठी या दोन्हींना जोडणे अनिवार्य होईल. याचे पालन न केल्यास खाती प्रतिबंधित केली जाऊ शकतात किंवा सेवा नाकारल्या जाऊ शकतात असे केंद्राने स्पष्ट केले आहे. उपलब्ध माहितीनुसार व्हिंजिलंसही मोठ्या प्रमाणात वाढेल. ज्यामुळे डिजिटल पेमेंटवरही अधिक बारकाईने लक्ष ठेवले जाईल. बँका यूपीआय व्यवहारांवरील तपासणी अधिक वाढवणार आहेत. तर फसवणूक रोखण्यासाठी व्हॉट्सॲप,टेलिग्राम आणि सिग्नल यांसारख्या मेसेजिंग व सोशल मिडिया प्लॅटफॉर्मसाठी सिम पडताळणीचे नियम अधिक कठोर केले जातील७) सातवा वेतन आयोग: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, १ जानेवारी २०२६ रोजी पासून सातवा वेतन आयोग लागू होऊ शकतो ज्यामुळे त्यांच्या बेसिकसह मूलभूत पगारात वाढ होणे अपेक्षित आहे. ७ व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपत असल्याने ८ वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. यकेंद्र आणि राज्य सेवांमध्ये वेतन रचनेत यामुळे सुधारणा होऊ शकते. दरम्यान फिंटमेट फॅक्टरवर शिक्कामोर्तब अद्याप बाकी आहे दरम्यान महागाई भत्त्यातही जानेवारीपासून वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे महागाईपासून काहीसा दिलासा मिळेल.८) इंधन आणि घरगुती खर्च: १ जानेवारीपासून सुधारित नियमावलीनुआर एलपीजी व्यावसायिक गॅस आणि एव्हिएशन टर्बाइन इंधनाच्या किमतीत १११ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे घरगुती बजेटवर तणाव पडू शकतो. अप्रत्यक्षपणे याचा भार ग्राहकांवर येणे स्वाभाविक असल्याने तुमच्य स्वयंपाकाचा खर्च आणि विमान प्रवासावर परिणाम होईल.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 7:10 pm

मुंबई-अहमदाबाद अंतर केवळ 2 तासात पूर्ण होणार: भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा मुहूर्त ठरला; केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केली तारीख

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रतीक्षा आता संपली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी एका विशेष कार्यक्रमात देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या व्यावसायिक प्रवासाची तारीख जाहीर केली. येत्या १५ ऑगस्ट २०२७ रोजी भारताची पहिली बुलेट ट्रेन रुळावरून धावेल, अशी अधिकृत घोषणा त्यांनी मीडियाशी संवाद साधताना केली. अहमदाबाद-मुंबई बुलेट […] The post मुंबई-अहमदाबाद अंतर केवळ 2 तासात पूर्ण होणार: भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा मुहूर्त ठरला; केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केली तारीख appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 7:03 pm

Virat Anushka : विराट-अनुष्काचे कुटुंबासोबत दुबईत ‘न्यू इयर सेलिब्रेशन’; हॉटेलच्या रुमचे एका दिवसाचे भाडे ऐकून व्हाल चकीत

Virat Anushka celebrating new year with Family : भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नव्या वर्षाचे स्वागत (२०२६) अत्यंत दिमाखात केले आहे. चाहत्यांना वाटले होते की हे जोडपे भारत किंवा लंडनमध्ये असेल, मात्र विराटने आपल्या कुटुंबासह दुबईमध्ये नवीन वर्षाचा जल्लोष साजरा केला आहे. नेव्ही ब्लू सूट आणि ब्लॅक ड्रेसमध्ये ‘विरुष्का’चा […] The post Virat Anushka : विराट-अनुष्काचे कुटुंबासोबत दुबईत ‘न्यू इयर सेलिब्रेशन’; हॉटेलच्या रुमचे एका दिवसाचे भाडे ऐकून व्हाल चकीत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 7:00 pm

Assam News : आसाम ठरले 8 वा वेतन आयोग स्थापणारे पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

गुवाहाटी : केंद्र सरकारनंतर कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत सुधारणा करण्यासाठी आठवा वेतन आयोग स्थापन करणारे आसाम हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी केली. राज्याचा आठवा वेतन आयोग माजी अतिरिक्त मुख्य सचिव सुभाष दास यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. केंद्र सरकारने आधीच आठवा वेतन […] The post Assam News : आसाम ठरले 8 वा वेतन आयोग स्थापणारे पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 6:53 pm

GST Collection: जीएसटी संकलनात 6.1 टक्क्यांची वाढ; डिसेंबरमध्ये 1.74 लाख कोटींचा महसूल जमा

GST Collection: देशाच्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात डिसेंबर २०२५ मध्ये ६.१ टक्क्यांची वाढ झाली असून एकूण महसूल १.७४ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०२४ मध्ये हे संकलन १.६४ लाख कोटी रुपये इतके होते. गुरुवारी, १ जानेवारी रोजी केंद्र सरकारने ही अधिकृत आकडेवारी जाहीर केली. दरम्यान, घरगुती विक्रीतून मिळणाऱ्या महसुलाची […] The post GST Collection: जीएसटी संकलनात 6.1 टक्क्यांची वाढ; डिसेंबरमध्ये 1.74 लाख कोटींचा महसूल जमा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 6:51 pm

Municipal Elections 2026: मनपा निवडणूकीत कोणत्या पक्षाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? पहा संपूर्ण यादी

Municipal Elections 2026: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत मतदानापूर्वीच महायुतीने मोठी मुसंडी मारली आहे. कल्याण-डोंबिवली, भिवंडी, पनवेल आणि धुळ्यापाठोपाठ आता जळगाव व अहिल्यानगरमध्येही भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी विजयाचे खाते उघडले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत विरोधकांनी माघार घेतल्याने अनेक जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या यशामुळे […] The post Municipal Elections 2026: मनपा निवडणूकीत कोणत्या पक्षाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? पहा संपूर्ण यादी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 6:41 pm

‘न्युक्लियर इन्स्टॉलेशन्स’ यादीची भारत-पाककडून देवाणघेवाण; तणावातही कराराचे पालन

नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तानने तीन दशकांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या परंपरेनुसार गुरुवारी दोन्ही देशांनी न्युक्लियर इन्स्टॉलेशन्सची आणि संबंधीत सुविधांच्या यादींची देवाणघेवाण केली. दोन्ही देशांमधील संबंध सध्या तणावपूर्ण असतानाही ही देवाणघेवाण करण्यात आल्याने, अणु सुरक्षेबाबतच्या द्विपक्षीय करारांचे पालन सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही देवाणघेवाण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील न्युक्लियर […] The post ‘न्युक्लियर इन्स्टॉलेशन्स’ यादीची भारत-पाककडून देवाणघेवाण; तणावातही कराराचे पालन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 6:36 pm

Bharat Taxi: 4 किमीच्या प्रवासासाठी केवळ 30 रुपये भाडे अन् ‘झिरो-कमिशन’; देशात ‘भारत टॅक्सी’सेवा कार्यान्वित, पहा सविस्तर दर

Bharat Taxi service launched: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच देशातील वाहतूक क्षेत्रात एका मोठ्या क्रांतीचा श्रीगणेशा झाला आहे. केंद्र सरकारच्या पाठबळावर आजपासून ‘भारत टॅक्सी’ ही नवीन कॅब सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली असून, यामुळे ओला आणि उबर सारख्या खाजगी कंपन्यांच्या मनमानीला मोठा लगाम बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्लॅटफॉर्मचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्णपणे ‘झिरो-कमिशन’ […] The post Bharat Taxi: 4 किमीच्या प्रवासासाठी केवळ 30 रुपये भाडे अन् ‘झिरो-कमिशन’; देशात ‘भारत टॅक्सी’ सेवा कार्यान्वित, पहा सविस्तर दर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 6:32 pm

Satara News : नवनिर्वाचित सुनील शिंदे यांनी स्वीकारला महाबळेश्वर नगराध्यक्ष पदाचा पदभार

महाबळेश्वर : महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 गेल्या महिन्यात पार पडली. या निवडणुकीत महाबळेश्वरच्या मतदारांनी भरघोस मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील लक्ष्मण शिंदे यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ घातली. त्यांच्या समवेत पक्षातील १३ नगरसेवकांना निवडून देत महाबळेश्वर नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे. नववर्षाच्या शुभमुहूर्तावर नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन […] The post Satara News : नवनिर्वाचित सुनील शिंदे यांनी स्वीकारला महाबळेश्वर नगराध्यक्ष पदाचा पदभार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 6:24 pm

Arjun bijlani : अर्जुन बिजलानीवर कोसळला दुःखाचा डोंगर; नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जवळच्या व्यक्तीचे निधन

Arjun bijlani : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी आणि त्याच्या पत्नीसाठी, ‘नेहा स्वामी’साठी २०२६ या नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत क्लेशदायक ठरली आहे. नेहाचे वडील राकेश चंद्रा स्वामी (वय ७३) यांचे आज गुरुवारी निधन झाले. अचानक उद्भवलेल्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश चंद्रा स्वामी यांची […] The post Arjun bijlani : अर्जुन बिजलानीवर कोसळला दुःखाचा डोंगर; नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जवळच्या व्यक्तीचे निधन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 6:14 pm

Cigarette Price Increase in India : चहा-सुट्टाचा प्लॅन आता 'महागात'पडणार! एका सिगरेटसाठी तब्बल ७२ रुपये? काय आहे सरकारचा नवा नियम

७ वर्षांनंतर उत्पादन शुल्कात मोठी वाढनवी दिल्ली : देशातील तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतीत १ फेब्रुवारी २०२६ पासून मोठी वाढ होणार आहे. केंद्र सरकारने उत्पादन शुल्क (Excise Duty) रचनेत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला असून, सिगारेट आणि पान मसाल्यावरील करांचे ओझे वाढवले आहे. सार्वजनिक आरोग्यावरील वाढता खर्च आणि या क्षेत्रातून मिळणाऱ्या महसुलातील घट ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. २०१७ मध्ये जीएसटी (GST) लागू झाल्यापासून सिगारेटवरील उत्पादन शुल्कात कोणतीही मोठी वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, आता वित्त मंत्रालयाने 'केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा २०२५' अंतर्गत नवीन शुल्क अधिसूचित केले आहे. जवळपास सात वर्षांनंतर सरकारने उत्पादन शुल्काची पुनर्रचना केल्यामुळे तंबाखू उद्योगात खळबळ उडाली आहे.सिगारेटच्या लांबीनुसार अतिरिक्त करनव्या कर रचनेनुसार, सिगारेटवर प्रति १,००० स्टिक्समागे २,०५० रुपये ते ८,५०० रुपयांपर्यंत अतिरिक्त उत्पादन शुल्क लागू होईल. हा कर सिगारेटची लांबी आणि ती फिल्टर आहे की नाही, यावर अवलंबून असेल. विशेष म्हणजे, हे शुल्क ४० टक्क्यांपर्यंत असलेल्या जीएसटीच्या वरती आकारले जाईल. लांब आणि फिल्टर सिगारेटच्या किमतीत सर्वाधिक वाढ होण्याची शक्यता आहे, कारण कंपन्या हा वाढीव कराचा भार थेट ग्राहकांच्या खिशावर टाकणार आहेत.नव्या 'ड्युअल-टॅक्स' रचनेचे पुनरुज्जीवनजीएसटी लागू होण्यापूर्वी सिगारेटवरील उत्पादन शुल्क हा महसुलाचा मुख्य स्रोत होता. २०१७ नंतर हे शुल्क केवळ नावापुरते (Token level) ठेवण्यात आले होते आणि 'जीएसटी नुकसान भरपाई उपकर' (Compensation Cess) माध्यमातून वसुली केली जात होती. आता हा उपकर टप्प्याटप्प्याने शून्य केला जात असल्याने, सरकारने पुन्हा एकदा उत्पादन शुल्काची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता जीएसटी आणि उत्पादन शुल्क अशा दोन स्तरांवर कर आकारला जाणार आहे.का घेतला सरकारने हा निर्णय?१ फेब्रुवारीपासून लागू होणाऱ्या या बदलांमागे सरकारने दोन मुख्य कारणे दिली आहेत:१. सार्वजनिक आरोग्य: तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आजारांवरील उपचाराचा मोठा आर्थिक भार सरकारी तिजोरीवर पडत आहे.२. महसूल वाढ: या क्षेत्रातून मिळणारा महसूल गेल्या काही वर्षांत स्थिर झाला होता, तो वाढवण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे.गुटखा आणि जर्दा उत्पादकांवर 'मशीन-आधारित' कर प्रणालीची टांगती तलवारकेंद्र सरकारने केवळ सिगारेटवरच नव्हे, तर इतर सर्व तंबाखूजन्य पदार्थांच्या कर प्रणालीमध्ये मोठे बदल केले आहेत. उत्पादन शुल्कातील (Excise Duty) बदलांसोबतच आता जीएसटी (GST) दरांचेही तर्कसंगतीकरण (Rationalization) करण्यात आले आहे. यामुळे धूर विरहित तंबाखू (Smokeless Tobacco) वापरणाऱ्यांच्या खिशालाही मोठी झळ बसणार आहे.https://prahaar.in/2026/01/01/powerful-explosion-in-himachal-pradesh-on-the-first-day-year/जीएसटी दरांमध्ये मोठा बदल : २८ टक्क्यांचा स्लॅब इतिहासजमातंबाखूजन्य पदार्थांसाठी असलेला पूर्वीचा २८ टक्क्यांचा जीएसटी स्लॅब आता पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार, तंबाखू उत्पादनांच्या श्रेणीनुसार आता एकतर १८ टक्के किंवा थेट ४० टक्क्यांच्या कमाल मर्यादेपर्यंत (Statutory Ceiling) जीएसटी आकारला जाणार आहे. या निर्णयामुळे अनेक तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतीत मोठी वाढ होणे अटळ आहे. गुटखा, जर्दा, सुगंधी तंबाखू आणि चघळण्याच्या तंबाखूवर (Chewing Tobacco) नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने 'पॅकिंग मशीन्स नियम, २०२६' (Packing Machines Rules, 2026) लागू केले आहेत. आता या उत्पादनांवरील कर हा केवळ विक्रीवर न ठरता, कारखान्यात लावलेल्या मशिनच्या क्षमतेवर ठरेल. कारखान्यात किती मशिन आहेत, त्यांचा वेग किती आहे, त्यातून किती उत्पादन बाहेर पडते आणि पाऊचची किरकोळ विक्री किंमत (MRP) काय आहे, यावरून उत्पादन शुल्क निश्चित केले जाईल. जर्दा, गुटखा आणि सुगंधित तंबाखू यांसारख्या धूर विरहित (Smokeless) उत्पादनांच्या किमतीत आता मोठी वाढ होणार आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होणारी करचोरी रोखण्यासाठी सरकारने मशीन-आधारित कर प्रणाली पुन्हा एकदा सुरू केली आहे. यामुळे छोट्या आणि मोठ्या अशा दोन्ही स्तरांवरील उत्पादकांना आता कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे.जागतिक आरोग्य मानकांनुसार भारताने उचलले मोठे पाऊलतंबाखू उद्योगातील करचोरीला पूर्णपणे लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने आता 'मशीन-आधारित' उत्पादन शुल्क (Machine-Based Levy) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने गुटखा, पान मसाला आणि तंबाखू उत्पादनात होणारे रोखीचे व्यवहार आणि उत्पादनाची लपवाछपवी थांबवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तंबाखू उद्योग हा मोठ्या प्रमाणावर यंत्रांवर आधारित आणि रोखीने व्यवहार चालणारा विभाग आहे. अनेकदा कंपन्या त्यांच्या मशिनमधून होणारे प्रत्यक्ष उत्पादन कमी दाखवून कराची चोरी करतात. जीएसटी लागू होण्यापूर्वीही अशी 'क्षमता-आधारित' (Capacity-based) कर प्रणाली अस्तित्वात होती. आता सरकारने तीच पद्धत पुन्हा आणून नियमांची अंमलबजावणी अधिक कडक केली आहे. यामुळे आता उत्पादकांना मशिनच्या क्षमतेनुसार कर भरावाच लागेल, मग उत्पादन कितीही दाखवले तरी चालेल. वित्त मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) शिफारसींनुसार हा बदल करण्यात आला आहे. लोकांचे उत्पन्न जसजसे वाढते, तसतसे तंबाखूजन्य पदार्थ त्यांच्यासाठी स्वस्त होऊ नयेत, यासाठी ठराविक काळानंतर उत्पादन शुल्कात वाढ करणे आवश्यक आहे. यामुळे तंबाखूच्या वापराला आळा बसेल आणि तरुण पिढी व्यसनापासून दूर राहील.आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करण्याचा प्रयत्नसरकारी आकडेवारीनुसार, तंबाखूच्या सेवनामुळे होणारे आजार, विशेषतः कॅन्सर, यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर मोठा आर्थिक ताण पडत आहे. या आजारांच्या उपचारासाठी सरकारला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. हा खर्च भरून काढण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांवर अधिक कर लावणे हा एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय मानला जात आहे.१ फेब्रुवारीपासून 'डेडलाईन'हे सर्व नवीन नियम १ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होणार आहेत. उत्पादक आणि वितरकांना त्यांच्या किमती बदलण्यासाठी, सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी आणि उत्पादनाचे नियोजन करण्यासाठी सरकारने १ महिन्याचा वेळ दिला आहे.सिगारेटच्या लांबीनुसार ठरणार नवीन दरमिळालेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारीपासून सिगारेटच्या किमती साधारणपणे २० ते ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ही दरवाढ सिगारेटच्या लांबीवर आधारित असेल. नवीन कर रचनेनुसार, सिगारेटची लांबी जेवढी जास्त, तेवढा कर अधिक आकारला जाणार आहे. याचे वर्गीकरण प्रामुख्याने सिगारेटच्या मिलीमीटर (mm) मधील लांबीनुसार करण्यात आले आहे:६५ मिमी पर्यंतच्या सिगारेट : या श्रेणीवर प्रति १,००० स्टिक्स मागे सुमारे २,७०० ते ३,००० रुपये शुल्क लागेल. हा सर्वात कमी कराचा टप्पा आहे, जो लहान सिगारेट्सना लागू होतो.६५ मिमी ते ७० मिमी : या लांबीच्या सिगारेटसाठी कराचा दर लहान सिगारेटपेक्षा अधिक असेल.७० मिमी ते ७५ मिमी : मध्यम लांबीच्या या सिगारेटवर आता प्रति १,००० स्टिक्स मागे थेट ७,००० रुपयांपर्यंत कर बसणार आहे. यामुळे या सिगारेटची निर्मिती आणि विक्री दोन्ही महाग होणार आहे.७५ मिमी पेक्षा जास्त (इतर श्रेणी) : या श्रेणीतील सिगारेट्सवर सर्वाधिक म्हणजेच प्रति १,००० स्टिक्स मागे ११,००० रुपये इतका मोठा कर आकारला जाईल.फिल्टर आणि विना-फिल्टर सिगारेटवरही फरककराची ही नवी रचना केवळ लांबीवरच नाही, तर सिगारेट 'फिल्टर' आहे की 'नॉन-फिल्टर', यावरही अवलंबून असणार आहे. लांब आणि प्रीमियम दर्जाच्या सिगारेट्स वापरणाऱ्या ग्राहकांना या दरवाढीचा सर्वाधिक फटका बसेल. १ फेब्रुवारीपासून सर्वच नामांकित ब्रँड्सच्या सिगारेट किमतीत वाढ होण्याची शक्यता.लांब सिगारेटवर ११,००० रुपये प्रति हजार स्टिक्स या दराने टॅक्स लागू. चहा आणि 'सुट्टा' मारणाऱ्यांचे दैनंदिन आर्थिक गणित कोलमडणार.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 6:10 pm

व्यवसायिक गॅसच्या किंमतीत १११ रुपयांनी वाढ जाहीर, घरगुती गॅसच्या किंमतीत बदल नसला तरी 'या'कारणामुळे खिशाला बसणार चाट?

मुंबई: यापूर्वीच सरकारने दिलेल्या अधिसूचनेप्रमाणे व्यवसायिक गॅस (Commercial Gas) किंमती मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. व्यवसायिक गॅस किंमती प्रति किलो थेट १११ रुपयांनी वाढणार असल्याने सामन्याच्या खिशाला चाट पडणार आहे. एलपीजी व्यवसायिक गॅस सामान्यतः हॉटेल, रेस्टॉरंट, इतर व्यवसायांच्या दैनंदिन वापरात वापरला जातो. ज्यामुळे या व्यवसायाच्या दैनंदिन खर्चात भार पडल्याने त्याचा अप्रत्यक्षपणे बोजा सामान्य ग्राहकावर पडू शकतो. १११ रूपयांनी वाढ झाल्याने प्रमुख शहरात १९ किलो एलपीजी सिलेंडर किंमती १६९१.५० रूपये प्रति युनिटवर पोहोचतील. मुंबईत हा दर प्रसारमाध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, १५३१.५० रूपयावरून १६४२.५० रुपयांवर वाढणार आहे. १ जानेवारीपासून या किंमतीची अंमलबजावणी होणार आहे. मुंबईसह कोलकाता १७९५ रुपये, चेन्नई १८४९.५० रुपयावर गॅस गेला आहे.दरम्यान घरगुती एलपीजीच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या वाढीमुळे एप्रिल २०२५ पासून झालेल्या एकूण २२३ रुपयांच्या कपातीचा मोठा भाग रद्द झाला आहे. ही वाढ जागतिक इंधनाच्या किमतींवर आधारित मासिक सुधारणांशी सुसंगत आहे असल्याचे गॅस कंपन्यांना स्पष्ट केले आहे. महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक एलपीजीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे स्वयंपाकाच्या गॅसवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यवसायांवरील खर्चाचा बोजा वाढला आहे. प्रमुख शहरांमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १११ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १६९१.५० रुपयांपर्यंत वाढली आहे. मुंबईत हा दर १५३१.५० रुपयांवरून १६४२.५० रुपयांपर्यंत वाढला आहे. कोलकातामध्ये किंमत १६८४ रुपयांवरून १७९५ रुपयांपर्यंत वाढली आहे.तथापि उद्योग व्यवसायिकांचा ऑपरेशनल घरगुती ग्राहकांना दिलासा कायम आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक एलपीजीच्या किमतींमध्ये यापूर्वीचा बदल १ डिसेंबर २०२५ रोजी झाला होता, जेव्हा दरांमध्ये प्रति सिलेंडर १० रुपयांची कपात करण्यात आली होती. आतापर्यंत संपूर्ण वर्षात ६ घरगुती वेळा गॅसच्या दरात कपात करण्यात आली होती.उपलब्ध माहितीनुसार, त्यावेळी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १५८०.५० रुपयांपर्यंत कमी करण्यात आली होती. नोव्हेंबरमधील ५ रुपयांच्या कपातीनंतर ही सलग दुसरी कपात होती. या कपातीमुळे ऑक्टोबरमध्ये लागू केलेल्या १५.५० रुपयांच्या वाढीचा काही भाग पूर्ववत झाला होता. एप्रिल २०२५ पासून व्यावसायिक एलपीजीच्या किमतींमध्ये अनेकदा कपात करण्यात आली होती.या कालावधीत एकूण सहा वेळा झालेल्या किंमत कपातीमुळे प्रति सिलेंडर २२३ रुपयांनी खर्च कमी झाला होता, परंतु ताज्या दरवाढीने त्या फायद्याचा मोठा भाग नाहीसा केला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमसारख्या तेल विपणन (Marketng) कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी आणि एव्हिएशन टर्बाइन इंधनाच्या किमतींमध्ये सुधारणा केली जाते. या सुधारणा जागतिक इंधनाच्या किमती आणि विनिमय दरातील बदलांवर आधारित असतात.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 6:10 pm

BMC Election 2026 : भाजप-शिवसेना वरळीतून फुंकणार प्रचाराचे रणशिंग! ३ जानेवारीला भव्य सभा

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात महायुतीची तोफ धडाडणारमुंबई : जागावाटप आणि बंडखोरांची मनधरणी करून झाल्यानंतर, महायुतीने आता प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. येत्या ३ जानेवारी रोजी वरळीतील एनएससीआय डोम (वरळी डोम) येथे महायुतीची पहिली भव्य जाहीर सभा होणार असून, या सभेने मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणूक प्रचाराला औपचारिक सुरुवात होईल. सायंकाळी ६ वाजता सुरू होणाऱ्या या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील. विशेष म्हणजे, ही सभा उबाठा गटाच्या बालेकिल्ल्यात आयोजित करून महायुतीने थेट ठाकरे बंधूंना आव्हान दिले आहे.https://prahaar.in/2026/01/01/cigarette-pan-masala-prices-set-to-rise-from-february-1-as-govt-hikes-excise-after-7-year-freeze/राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, निकाल १६ जानेवारीला जाहीर होतील. या पार्श्वभूमीवर महायुतीची ही सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या सभेतून महायुतीची एकजूट आणि ताकद मुंबईकरांसमोर ठळकपणे मांडली जाणार आहे. जागावाटप, उमेदवार निवड आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले असताना, या सभेतून महायुतीकडून मुंबईच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट, प्रचाराची दिशा आणि शहरासाठीचे भविष्यकाळातील व्हिजन स्पष्ट केले जाण्याची शक्यता आहे.१२ दिवसांत प्रचाराचा धडाकाभाजप आणि शिवसेनेसह महायुतीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांची या सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा संचार करणे आणि उमेदवारांना बळ देणे, हा या सभेचा मुख्य उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या १२ दिवसांत मुंबईत विभागनिहाय सभा, रोड शो आणि प्रचार फेऱ्यांचा धडाका लावला जाणार असून, ३ जानेवारीची वरळी डोममधील ही सभा त्याची नांदी ठरेल. राजकीय वर्तुळाचे या सभेकडे विशेष लक्ष लागले आहे. एकीकडे ठाकरे बंधूंच्या संयुक्त प्रचारसभा ५ जानेवारीपासून सुरू होणार असताना, दुसरीकडे महायुतीची ही पहिली सभा ठाकरेंच्याच प्रभावक्षेत्रात होत असल्याने निवडणुकीतील वातावरण अधिकच चुरशीचे होईल, असे बोलले जात आहे

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 6:10 pm

Bullet Train : बुलेट ट्रेनचा मुहूर्त ठरला! १५ ऑगस्ट... पहिली गाडी 'या'मार्गावर धावणार; मुंबईत कधी?

मुंबई : भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला मुंबईत अनपेक्षित खीळ बसली आहे. मुंबई महापालिकेने प्रदूषणाच्या मुद्द्यावरून या प्रकल्पाला नोटीस बजावली असली, तरी दुसरीकडे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या हाय-स्पीड ट्रेनच्या लोकार्पणाचा मुहूर्त जाहीर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबई महापालिकेच्या 'एच-पूर्व' (H-East) विभागाने बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम तूर्तास थांबवण्याचे आदेश दिले आहेत. प्रकल्पाच्या कामादरम्यान प्रदूषणाबाबतच्या नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. धुळीचे नियंत्रण आणि इतर पर्यावरणपूरक उपाययोजनांची अंमलबजावणी न केल्याने बीएमसीने ही कठोर कारवाई केली आहे. या 'स्टॉप वर्क' नोटीसमुळे मुंबईतील प्रकल्पाच्या कामाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एकीकडे मुंबईत कामाला स्थगिती मिळाली असतानाच, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मात्र देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या लोकार्पणाचा कालावधी स्पष्ट केला आहे.मुंबई-अहमदाबाद अंतर केवळ २ तासांतरेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणाचा मुहूर्त जाहीर केला असून, १५ ऑगस्ट रोजी पहिली बुलेट ट्रेन प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते अहमदाबाद हे ५०८ किमीचे अंतर अवघ्या २ तास ७ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मुंबईतील बीकेसी ते शिळफाटा दरम्यानचा २१ किमी लांबीचा अजस्त्र बोगदा. या बोगद्यामध्ये ठाणे खाडीच्या खालून जाणारा ७ किमीचा भाग समाविष्ट आहे, जो या प्रकल्पातील अभियांत्रिकीचा एक चमत्कार मानला जात आहे. बोगद्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी रेल्वेने दोन वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला आहे:१. NATM पद्धत : शिळफाटा आणि घणसोली दरम्यानचा ५ किमीचा भाग 'न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड' (NATM) वापरून बांधला जात आहे.२. TBM पद्धत : उर्वरित १६ किमीचा बोगदा भव्य 'टनेल बोरिंग मशीन' (TBM) द्वारे तयार केला जात आहे.https://prahaar.in/2026/01/01/bjp-shiv-sena-will-sound-the-bugle-of-their-election-campaign-from-worli-a-grand-rally-will-be-held-on-january-3rd/प्रवाशांना दर ३० मिनिटांनी सेवाप्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर प्रवाशांना ट्रेनसाठी तासनतास वाट पाहावी लागणार नाही. दर ३० मिनिटांच्या अंतराने बुलेट ट्रेन उपलब्ध असेल, ज्यामुळे व्यावसायिक आणि पर्यटकांच्या वेळेत मोठी बचत होईल. १५ ऑगस्टच्या मुहूर्तामुळे देशाला स्वातंत्र्यदिनी एक मोठी 'आधुनिक भेट' मिळणार असल्याचे बोलले जात आहे.बुलेट ट्रेनचा 'श्रीगणेशा' १५ ऑगस्ट २०२७ ला!भारताच्या पहिल्या हाय-स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, या प्रकल्पाचा पहिला टप्पा १५ ऑगस्ट २०२७ रोजी प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. हा पहिला टप्पा गुजरात मधील सुरत ते बिलिमोरा दरम्यान असेल. यानंतर वापी ते सुरत, मग वापी ते अहमदाबाद आणि सर्वात शेवटी मुंबई ते अहमदाबाद असा पूर्ण मार्ग कार्यान्वित केला जाईल. या प्रकल्पासाठी जपानचे जगप्रसिद्ध 'शिंकान्सेन' (Shinkansen) हाय-स्पीड ट्रेन तंत्रज्ञान वापरले जात आहे, जे आपल्या सुरक्षिततेसाठी आणि अचूक वेळेसाठी ओळखले जाते. या पूर्ण कॉरिडॉरवर एकूण १२ स्थानके असतील. या प्रकल्पामुळे केवळ प्रवास वेगवान होणार नाही, तर मुंबई आणि अहमदाबादमधील व्यापार, गुंतवणूक आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.मुंबईतील बीकेसी स्टेशन अभियांत्रिकीचा चमत्कारया संपूर्ण मार्गावरील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण स्थानक मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे उभारले जात आहे. हे या कॉरिडॉरवरील एकमेव भूमिगत (Underground) स्टेशन असेल. हे स्टेशन जमिनीखाली सुमारे ३२.५० मीटर (अंदाजे १०६ फूट) खोलीवर असेल. यात प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअर असे एकूण तीन मजले असतील. प्रत्येक स्थानकावर सहा प्लॅटफॉर्म असतील आणि हे स्टेशन मेट्रो तसेच रस्ते वाहतुकीशी जोडलेले असेल, जेणेकरून प्रवाशांना सहज प्रवास करता येईल.असा असेल बुलेट ट्रेनचा प्रवास (टप्प्याटप्प्याने) :१. पहिला टप्पा : सुरत ते बिलिमोरा (१५ ऑगस्ट २०२७) २. दुसरा टप्पा: वापी ते सुरत ३. तिसरा टप्पा: वापी ते अहमदाबाद ४. चौथा टप्पा: ठाणे ते अहमदाबाद ५. अंतिम टप्पा: मुंबई ते अहमदाबाद

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 6:10 pm

Tejasvee Ghosalkar : ठाकरेंची मोठी खेळी ! तेजस्वी घोसाळकरांच्या विरोधात उतरवला ‘हा’तगडा उमेदवार

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली असतानाच, दहिसर विधानसभा (Tejasvee Ghosalkar) मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २ हा विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रभागात एकेकाळी जवळच्या मैत्रिणी असलेल्या तेजस्वी घोसाळकर आणि धनश्री कोलगे यांच्यात आता थेट राजकीय सामना रंगणार आहे. भाजपने तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे […] The post Tejasvee Ghosalkar : ठाकरेंची मोठी खेळी ! तेजस्वी घोसाळकरांच्या विरोधात उतरवला ‘हा’ तगडा उमेदवार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 6:10 pm

Mitchell Marsh : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मार्शचा धमाका! कर्णधारपदाची जबाबदारी मिळताच ठोकले वादळी शतक

Mitchell Marsh century in BBL 2025-26 : क्रिकेट चाहत्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत धमाकेदार झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा टी-२० कर्णधार मिचेल मार्शने बिग बॅश लीग (BBL) २०२५-२६ मध्ये होबार्ट हरिकेन्सविरुद्ध खेळताना एक अविस्मरणीय शतक झळकावले आहे. विशेष म्हणजे, टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार म्हणून घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच मार्शने ही तुफानी खेळी […] The post Mitchell Marsh : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मार्शचा धमाका! कर्णधारपदाची जबाबदारी मिळताच ठोकले वादळी शतक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 6:08 pm

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर ईशा देओलचे न्यू ईयर सेलिब्रेशन; भाऊ बॉबीची कमेंट चर्चेत, दिली अशी रिएक्शन !

Esha deol | dharmendra | bobby deol : हिंदी चित्रपटसृष्टीचे ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला आहे. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला, मात्र त्यांचे कुटुंब अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाही. नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने ईशा देओलने आपल्या वडिलांच्या आठवणीत एक भावूक पोस्ट शेअर केली असून, त्यावर सावत्र भाऊ बॉबी देओलने […] The post धर्मेंद्र यांच्या निधनानंतर ईशा देओलचे न्यू ईयर सेलिब्रेशन; भाऊ बॉबीची कमेंट चर्चेत, दिली अशी रिएक्शन ! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 6:02 pm

स्वित्झर्लंड हादरलं.! नववर्षाच्या सेलिब्रेशनवर काळाचा घाला; भीषण आगीत १० जणांचा मृत्यू, १०० जखमी

Le Constellation । Berlin/Switzerland : स्वित्झर्लंडमधील स्विस आल्प्स डोंगररांगांमध्ये असलेल्या एका प्रसिद्ध स्की रिसॉर्टमध्ये नववर्षाच्या जल्लोषाला भीषण आगीचे ग्रहण लागले. क्रान्स-मोंटाना नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या एका बारमध्ये बुधवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. गुरुवारी स्थानिक पोलिसांनी या घटनेची अधिकृत माहिती दिली. नेमकी घटना काय? […] The post स्वित्झर्लंड हादरलं.! नववर्षाच्या सेलिब्रेशनवर काळाचा घाला; भीषण आगीत १० जणांचा मृत्यू, १०० जखमी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 5:26 pm

Ashish Kundra : आशीष कुंद्रा यांची लडाखच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

लेह/जम्मू : वरिष्ठ आयएएस अधिकारी आशीष कुंद्रा यांनी गुरुवारी लडाखच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. एजीएमयूटी कॅडरचे 1996 च्या बॅचचे अधिकारी असलेल्या कुंद्रा यांनी बुधवारी निवृत्त झालेले आयएएस अधिकारी पवन कोटवाल यांच्याकडून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर कुंद्रा यांनी प्रभावी प्रशासन, पारदर्शक कारभार आणि सर्वसमावेशक विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.संस्थात्मक यंत्रणा बळकट करणे, सेवा वितरण सुधारणे […] The post Ashish Kundra : आशीष कुंद्रा यांची लडाखच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 5:24 pm

Sports Event 2026 : टी-२० वर्ल्ड कपपासून ते फुटबॉल महाकुंभापर्यंत; क्रीडा प्रेमींसाठी ‘सुपर’ठरणार हे वर्ष!

Sports Event 2026 list : क्रीडा प्रेमींसाठी २०२५ हे वर्ष जितके रोमांचक ठरले, त्यापेक्षाही मोठे आणि उत्कंठावर्धक वर्ष २०२६ असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपचा थरार पाहायला मिळेल, तर त्यानंतर लगेचच पुरुष टी-२० वर्ल्ड कपचा बिगुल वाजणार आहे. इतकेच नाही, तर फुटबॉल चाहत्यांची प्रतीक्षा संपवून ११ जूनपासून फिफा वर्ल्ड कपलाही सुरुवात होणार आहे. […] The post Sports Event 2026 : टी-२० वर्ल्ड कपपासून ते फुटबॉल महाकुंभापर्यंत; क्रीडा प्रेमींसाठी ‘सुपर’ ठरणार हे वर्ष! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 5:24 pm

Kolhapur : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना; कोल्हापूरमध्ये कारने तिघांना चिरडले

Kolhapur – कोल्हापूरमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. भरधाव कारने तिघांना चिरडले. या अपघातामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ही अपघाताची घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या अपघाताचा पोलीस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तावडे […] The post Kolhapur : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना; कोल्हापूरमध्ये कारने तिघांना चिरडले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 5:12 pm

शेअर बाजार Closing Bell: अखेरच्या सत्रात बाजार सपाट 'या'मुळे झाला गुंतवणूकदारांचा घात?

मोहित सोमण: शेअर बाजारात आज जवळपास सपाट पातळीवर बंद झाले आहे. आज अखेरच्या सत्रात मात्र सकाळच्या सत्रातील तेजीचा अंडरकरंट घसरणीत बदलला. सेन्सेक्स ३२ अंकाने घसरला असून ८५१८८ व निफ्टी १६.९५ अंकांने वाढत २६१४६.४५ अंकाने स्थिरावला आहे. खासकरून सकाळच्या सत्रातील १% घसरलेला अस्थिरता निर्देशांक अखेरच्या सत्रात ३% पेक्षा अधिक पातळीवर घसरला असला तरीही बाजारातील इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली. क्षेत्रीय निर्देशांकातील एफएमसीजी, फार्मा, हेल्थकेअर, केमिकल्स या निर्देशांकात घसरण कायम राहिल्याने बँक निर्देशांकातील वाढीच्या आधारे सपोर्ट लेवल मिळाली असली तरी तेजीची रॅली आज रोखली गेली. दुसरीकडे बँक निर्देशांकासह ऑटो, मेटल, रियल्टी, आयटी शेअर्समध्ये वाढ झाली आहे. ज्यामुळे निर्देशांकात किरकोळ पाठबळ मिळाले असे म्हणावे लागेल.जागतिक अस्थिरतेत रुपयात मोठ्या प्रमाणात चढउतार सुरू आहे. याचा आजही फटका बसल्याने आजही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून रोख गुंतवणूक काढल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः युएस व्हेनेझुएला यांच्यातील वाद कायम असताना आशियाई बाजारात चीनच्या वाढत्या औद्योगिक उत्पादनानंतरही संमिश्रित प्रतिसाद आशियाई बाजाराने दिला होता. रूपया डॉलरच्या हालचालीसह कच्च्या तेलासह आज डॉलरच्या निर्देशांकात वाढ झाल्याने पुन्हा सोन्यात किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीच्या अस्थिरतेत भर पडताना नफा बुकिंगचा भाग म्हणून चांदीत घसरण कायम राहिली आहे. परिणामी आगामी तिमाही निकालांच्या आधारावर गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याने आज बाजारात घसरण झाली आहे. बाजार पुन्हा एकदा कंसोलिडेशनमधून सावरत असल्याने याचा आणखी काही काळ परिणाम बाजारात अपेक्षित आहे. संवेदनशील निर्देशांक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एफएमसीजी शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणात सेल ऑफ झाले ज्याचा मोठा फटका बाजारात बसला. लार्जकॅपमध्ये संमिश्र प्रतिसाद कायम असताना मिडकॅपने आज तुलनात्मकदृष्ट्या समाधानकारक कामगिरी केली आहे. तर स्मॉलकॅप शेअर्समध्ये तुलनेत आज घसरण झाली आहे. व्यापक निर्देशांकातील स्मॉलकॅप १००, स्मॉलकॅप २५० निर्देशांकात घसरण झाली असून मिडकॅप ५०, मिडकॅप १०० निर्देशांकात वाढ झाली आहे.आज अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातही अनेक निर्देशांक सपाट पातळीवर राहिले आहे. सकाळच्या संमिश्र स्तरावरून सपाट पातळीवर हे बाजार घसरत असताना युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात फेड व्याजदरातील आशावादी अस्थिरतेमुळे डाऊ जोन्स वगळता एस अँड पी ५००, नासडाक बाजारात घसरण झाली आहे.शेअर बाजारातील अखेरच्या सर्वाधिक वाढ टीआरआयएल (७.९४%), वोडाफोन आयडिया (७.८१%), अजंता फार्मा (६.१२%), फिनोलेक्स केबल्स (४.८९%), अदानी टोटल गॅस (४.८४%), आदित्य एएमसी (४.७४%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण गॉडफ्रे फिलिप्स (१७.०८%), आयटीसी (९.७१%), सीसीएल प्रोडक्ट (३.५९%), दीपक फर्टिलायझर (३.३९%), केपीआर मिल्स (३.१८%), युनायटेड स्पिरीट (२.७४%), इंटलेक्ट डिझाईन (२.३९%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक नागराज शेट्टी म्हणाले आहेत की,'बुधवारी मोठी तेजी पाहिल्यानंतर, गुरुवारी निफ्टीमध्ये मर्यादित श्रेणीत चढउतार दिसून आले आणि तो १६ अंकांनी वाढून बंद झाला. निफ्टी सकारात्मक पातळीवर उघडला, त्यानंतर तो एका विशिष्ट मर्यादेत स्थिरावला आणि हीच स्थिती संपूर्ण सत्रात कायम राहिली. दिवसाची उच्च आणि नीच पातळीमधील फरक सुमारे ८५ अंशांचा होता.दैनंदिन आलेखावर एक लहान नकारात्मक कँडल तयार झाली आहे आणि निफ्टी सध्या २६२०० पातळीच्या पातळीजवळ खाली उतरणाऱ्या ट्रेंड लाइनवर प्रतिकार दर्शवत आहे. अलीकडेच २५८७८ पातळीवर एक नवीन उच्च तळ (higher bottom) रिव्हर्सल पॅटर्न तयार झाल्यामुळे, बाजारात आणखी वाढ होण्याची आणि १-२ सत्रांच्या स्थिरीकरणानंतर २६२०० पातळीच्या पातळीचा अडथळा निर्णायकपणे भेदण्याची अपेक्षा आहे. निफ्टीचा नजीकच्या काळातील तेजीचा कल कायम आहे. अल्पावधीत २६१००-२६२०० पातळीच्या पातळीजवळ लहान स्थिरीकरणानंतर, नजीकच्या काळात निफ्टी २६३००-२६४०० पातळीच्या पातळीकडे मोठी उसळी दाखवेल अशी अपेक्षा आहे. तात्काळ आधार २६०५० पातळीवर आहे.'आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक दिलीप परमार म्हणाले आहेत की,'कोणत्याही मोठ्या प्रेरक घटकांच्या अभावामुळे बाजारात दिशाहीनता दिसून आल्याने भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाला. मर्यादित पुरवठा आणि सततच्या मागणीमुळे निर्माण झालेल्या कमी तरलतेमुळे या चलन जोडीवर वाढीचा दबाव आला, कारण आज प्रमुख परकीय चलन बाजारपेठांमध्ये नवीन वर्षाची सुट्टी होती. पुढील काळात, डॉलर रूपया (USDINR) अल्प-मुदतीच्या मर्यादेत व्यवहार करेल अशी अपेक्षा आहे, ज्यामध्ये ८९.४० पातळीवर आधार (Support) आणि ९०.२६ पातळीवर प्रतिरोध (Resistance) असेल.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 5:10 pm

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये रविंद्र चव्हाण यांची विजयी घोडदौड सुरुच; आणखी दोनजण बिनविरोध विजयी

कल्याण: महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवार ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी संपली आहे. आता अर्जांची छाननी सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपने खातं उघडून दमदार सुरुवात केली आहे. कालपर्यंत भारतीय जनता पार्टीचे अर्थात भाजपचे बिनविरोध हॅट्रीक केली होती. आज भाजपचे आणखी दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये रविंद्र चव्हाण यांच्या विजयाची घोडदौड सुरू असल्याचे बोलले जात आहे.पॅनल क्रमांक २६ (क) मधून आसावरी केदार नवरे, पॅनल क्रमांक १८ (अ) मधून रेखा चौधरी, पॅनल क्रमांक २६ बी मधून रंजना मितेश पेणकर या तीन उमेदवारांच्या विजयामुळे डोंबिवलीमध्ये काल विजयाची हॅट्रीक झाली. आजही दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचे पारडे जड झाले आहे. कल्याण डोंबिवलीच्या पॅनल २७ (अ) मधून मंदा सुभाष पाटील आणि क्रमांक २४ (ब) मधून ज्योती पवन पाटील यांचा बिनविरोध विजय झाला आहे.https://prahaar.in/2026/01/01/government-banks-dominate-in-asset-quality-surpassing-private-banks-rbi-financial-stability-report/कल्याण-डोंबिवलीत यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. मात्र समीकरणे बदलली आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण १२२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. महायुती म्हणून शिवसेना ६६ आणि भाजप ५६ जागांवर लढत आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस ४२ जागांवर स्वबळावर लढत आहे. मनसे आणि उबाठाने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे ५४ तर उबाठा ६८ जागांवर निवडणूक लढवत आहे. यासर्व जागांपैकी ५ जागांवर आतापर्यंत भाजपने बिनविरोध विजय मिळवला आहे.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 5:10 pm

Explosion In Himachal Pradesh : हिमाचलमध्ये नववर्षाची सुरुवात हादरवणारी! नालागढमध्ये शक्तिशाली स्फोट, आर्मी हॉस्पिटलच्या काचांचा पडला खच

सोलन : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नालागढ पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेल्या एका गल्लीत अचानक भीषण स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्याचा आवाज अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.आर्मी हॉस्पिटलचे नुकसान#HimachalPradeshA loud blast was reported near the wall of a police station in Nalagarh, Solan district of Himachal Pradesh. The explosion shattered windowpanes of the police station, ECHS polyclinic, and market committee building. Area sealed; probe underway. pic.twitter.com/nLlNN5YasO— Smriti Sharma (@SmritiSharma_) January 1, 2026मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ झाला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे परिसरातील अनेक इमारतींना हादरे बसले असून नजीकच्या लष्करी रुग्णालयाचे (आर्मी हॉस्पिटल) मोठे नुकसान झाले आहे. रुग्णालयाच्या आणि परिसरातील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटून रस्त्यावर पडल्या आहेत. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले.जीवितहानी टळली, पोलिसांचा वेढाया घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही सर्वात मोठी दिलासादायक बाब आहे. स्फोटाची माहिती मिळताच बद्दीचे पोलीस अधीक्षक (SP) विनोद धीमान यांच्यासह पोलिसांचे मोठे पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली असून नागरिकांना घटनास्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.स्फोटाचे गूढ कायमहा स्फोट नेमका कशामुळे झाला? हा घातपाताचा प्रयत्न होता की इतर काही तांत्रिक कारण, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. फॉरेन्सिक टीम स्फोटाच्या ठिकाणाहून नमुने गोळा करत असून घातपाताची शक्यताही तपासली जात आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेने प्रशासनाची झोप उडवली असून परिसरात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 5:10 pm

CBDT Tax Collection Update: डिसेंबर महिन्यात कर संकलनात ८% वाढ

मोहित सोमण: आयकर विभागाने (Central Board of Direct Taxes CBDT) डिसेंबर महिन्यातील आयकर संकलनाची नवी माहिती प्रसिद्ध केली आहे. नव्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात इयर ऑन इयर बेसिसवर कर संकलनात (Tax Collection) मध्ये ८% वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील १५७८४३२.५१ कोटींच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२५-२६ पर्यंत एकूण कर संकलनात १७०४७२५.२१ कोटी रुपयांवर वाढ झाल्याने स्पष्ट झाले तर एकूण अ‍ॅडव्हान्स कर संकलनात (Advance Tax Collection) इयर ऑन इयर बेसिसवर डिसेंबरपर्यंत ४.२७% वाढ झाली आहे.उपलब्ध माहितीनुसार, अ‍ॅडव्हान्स करापैकी कॉर्पोरेट करात नोव्हेंबर महिन्यातील डिसेंबरमध्ये वाढ कायम असताना विना कॉर्पोरेट (Non Corporate Tax NCT) करात घसरण झाल्याचे सरकारने म्हटले. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कॉर्पोरेट कर संकलन ५६२४२२.१८ कोटीवर होते जे आर्थिक वर्ष २०२५-२६ डिसेंबरमध्ये ६०७२९९.९९ कोटींवर वाढले. तर विना कॉर्पोरेट कर संकलन आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील १९२६५६.४० कोटींच्या तुलनेत या डिसेंबर महिन्यात १८१०८७.९३ कोटींवर घसरले आहे ज्यामध्ये आकडेवारीनुसार -६.४९% घसरण झाली आहे.आकडेवारीनुसार कर परताव्यात (Tax Refunds) मात्र डिसेंबर पर्यंत मोठी घसरण झाली आहे. कॉर्पोरेट करातील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये असलेल्या १८५४६०.५५ कोटी तुलनेत या डिसेंबर महिन्यात (२०२५-२६) १७७२६७.५३ कोटींवर घसरण झाली. विना कॉर्पोरेट क्षेत्रातील कर संकलनात इयर ऑन इयर बेसिसवर डिसेंबर २०२३-२४ मधील १५७९९३.१३ कोटी तुलनेत ११९२६७.५३ कोटींवर घसरण झाली. एकूण स्थूल कर संकलनात इयर ऑन इयर बेसिसवर डिसेंबरपर्यंत ४.१६% घसरण झाल्याचे सरकारने आकडेवारीत स्पष्ट केले आहे. ही सदर आकडेवारी १७ डिसेंबरपर्यंत असल्याचेही सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 5:10 pm

हवेत झेप घेण्यापूर्वीच पायलट ‘आऊट’; कॅनडा विमानतळावर मोठी कारवाई, मद्यधुंद पायलटला ठोकल्या बेड्या

Canada airport – कॅनडातील व्हँकूवर विमानतळावर एअर इंडियाच्या एका पायलटला दारूचा वास आल्याने ताब्यात घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना २३ डिसेंबर २०२५ रोजी घडली. पायलट हे विमान घेऊन दिल्लीला जाणार होता, परंतु उड्डाण घेण्यापूर्वीच ही घटना उघडकीस आली, ज्यामुळे उड्डाण उशिरा झाले. विमानतळाच्या ड्युटी-फ्री शॉपमधील एका कर्मचाऱ्याने पायलटला दारू खरेदी करताना किंवा वास घेताना […] The post हवेत झेप घेण्यापूर्वीच पायलट ‘आऊट’; कॅनडा विमानतळावर मोठी कारवाई, मद्यधुंद पायलटला ठोकल्या बेड्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 4:54 pm

Jasprit Bumrah : बुमराहचा ऐतिहासिक पराक्रम! सलग दोन वर्षे ‘या’बाबतीत नंबर-1 राहणारा पहिला भारतीय गोलंदाज

Jasprit Bumrah Record in Rankings : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने २०२५ सालाच्या शेवटी एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आयसीसी (ICC) कसोटी क्रमवारीत बुमराहने इतिहास रचला असून, २०११ पासून कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजाला न जमलेली कामगिरी त्याने करून दाखवली आहे. सलग दुसऱ्या वर्षी ‘नंबर-1’चा ताज – आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत जसप्रीत […] The post Jasprit Bumrah : बुमराहचा ऐतिहासिक पराक्रम! सलग दोन वर्षे ‘या’ बाबतीत नंबर-1 राहणारा पहिला भारतीय गोलंदाज appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 4:44 pm

Mamata Banerjee : अनिष्ठ शक्तींसमोर झुकणार नाही; तृणमूलच्या वर्धापनदिनी ममता बॅनर्जींचा एल्गार

कोलकाता : तृणमूल काँग्रेस हा केवळ एक राजकीय पक्ष नसून, लोकांसाठी लढणारी एक चळवळ आहे. आम्ही कोणत्याही अनिष्ठ शक्तींसमोर झुकणार नाही, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. तृणमूल काँग्रेसच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हा निर्धार व्यक्त केला. १ जानेवारी १९९८ रोजी ममता बॅनर्जी यांनी […] The post Mamata Banerjee : अनिष्ठ शक्तींसमोर झुकणार नाही; तृणमूलच्या वर्धापनदिनी ममता बॅनर्जींचा एल्गार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 4:42 pm

Stock Market: 2026च्या पहिल्या दिवशी शेअर बाजार सपाट, ITCचे शेअर्स 10% घसरले

Stock Market: नवीन वर्ष २०२६ च्या पहिल्याच व्यापारी सत्रात भारतीय शेअर बाजारात संमिश्र कल पाहायला मिळाला. जागतिक बाजारातील सुस्तीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी आज जरी सपाट पातळीवर बंद झाले असले, तरी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मात्र १ लाख कोटी रुपयांहून अधिक भर पडली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने जगातील अनेक प्रमुख बाजार बंद असल्याचा परिणाम भारतीय बाजारातील व्यवहारांवर दिसून […] The post Stock Market: 2026च्या पहिल्या दिवशी शेअर बाजार सपाट, ITCचे शेअर्स 10% घसरले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 4:42 pm

MNS Candidates : खळबळजनक ! ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ठिकाणी मनसेचे 2 उमेदवार गायब

अहिल्यानगर : महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे दोन उमेदवार (MNS Candidates) गेल्या 24 तासांपासून बेपत्ता झाले आहेत. या उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबीयांशी किंवा पक्षाशी कोणताही संपर्क झालेला नाही, त्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी ही माहिती दिली. त्यांच्या मते, निवडणुकीच्या तोंडावर […] The post MNS Candidates : खळबळजनक ! ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ ठिकाणी मनसेचे 2 उमेदवार गायब appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 4:14 pm

नववर्षाची पार्टी बेतली जीवावर! ४०० फुट दरीत कोसळलेल्या तरूणाला रेस्क्यू टीमने दिले जीवनदान

सातारा: नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण पार्टी आणि सहलीला बाहेर गेले आहेत. पार्टी म्हटल्यावर मद्य आणि मांसाहार, मत्स्याहार हे सर्व महत्त्वाचं आहे. मात्र मद्य प्यायल्यानंतर भानावर नसलेल्या तळीरामांकडून अनेक अशक्य गोष्टी घडल्याच्या बातम्या आजवर ऐकण्यात आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार साताऱ्यातून समोर आला आहे. सरत्या वर्षाच्या पार्टीसाठी कास मार्गावरील एका हॉटेलमध्ये गेलेला तरुण बुधवारी (३१ डिसेंबर) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास महादरे-यवतेश्वर येथील डोंगर कड्यावरून चारशे फूट खोल दरीत कोसळला. या घटनेनंतर शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीमने चार तास जंगलातून पायपीट करत घटनास्थळ गाठून तरुणाचा जीव वाचवला आहे.शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीमने पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तरुणाला दरीतून वर आणून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. आदित्य कांबळे (रा. माहुली, सातारा) असे दरीत कोसळलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कास मार्गावरील एका हॉटेलमध्ये सरत्या वर्षानिमित्त आदित्य कांबळे पार्टीसाठी गेला होता. पार्टीमध्ये मद्य घेतल्यानंतर लघुशंकेसाठी बाहेर गेलेल्या आदित्यचा तोल जाऊन तो महादरे-येवतेश्वर डोंगराच्या कड्यावरून चारशे फूट खोल दरीत कोसळला. या घटनेची माहिती मिळताच शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी जंगलातून पाच किलोमीटर पायपीट करत घटनास्थळ गाठले.https://prahaar.in/2026/01/01/with-the-obstacle-posed-by-the-opposition-removed-kirit-somaiyas-son-is-likely-to-get-elected/शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचताच दरीत कोसळलेला आदित्य तरूण बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. ४०० फुट उंचावरून थेट खाली कोसळल्याने त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. सध्या तो वैद्यकीय उपचाराखाली असून त्याला वेळेत मदत मिळाल्याने त्याचा जीव वाचला आहे. मात्र त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर असून डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती.कडाक्याच्या थंडीतदेखील रात्रभर बचाव मोहीम राबवत रेस्क्यू टीमने जखमी तरूणाला महादरेच्या जंगलातून बाहेर काढले. यानंतर रूग्णवाहिकेतून तरुणाला तातडीने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना उत्साहाला आवर घातला नाही तर जीवावर कसे बेतू शकते, हे या घटनेतून पाहायला मिळाले.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 4:10 pm

खाजगी बँकांना मागे टाकत असेट क्वालिटीत सरकारी बँकांचा 'बोलबाला'-RBI जाणून घ्या एका क्लिकवर!

आरबीआय फायनांशियल स्टॅबिलिटी रिपोर्ट-मोहित सोमण: बँकेच्या असेट क्वालिटीत चांगली सुधारणा झाल्याचे आरबीआयच्या नव्या फायनांशियल स्टॅबिलिटी अर्धवार्षिक रिपोर्ट २०२५ मध्ये म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील लक्षणीय सुधारणा झाली असताना घरगुती वित्तीय बाजारातील सुधारणेमुळे भूराजकीय अस्थिरतेचे धोके पचवण्यास भारतीय अर्थव्यवस्था सक्षम ठरली असल्याचेही आरबीआयच्या अहवालात म्हटले गेले आहे. वित्तीय व्यवस्था स्पष्ट करत असताना आरबीआयच्या अहवालात बँकिंग क्षेत्रातील अनेक मुद्यांवर भाष्य केले गेले आहे. त्यातील एक महत्वाची बाब म्हणजे पीवीबी (Private Sector Bank) तुलनेत पीएसयु (Public Sector Bank) बँकेत अधिक वाढ (Growth) झाल्याचे स्पष्ट झाले असून असेट क्वालिटीत पाहिल्यास खाजगी बँकेच्या तुलनेत पब्लिक सेक्टर बँक व विदेशी बँकेच्या (Foreign Bank) असेट क्वालिटीत सुधारणा झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.स्थूल एनपीए (Gross Non Performing Assets NPA) बाबत अहवालानुसार, सूचीबद्ध व्यवसायिक बँक (Schedule Commercial Bank SCB) बाबतीत काही दशकांतील सर्वाधिक घसरण २.२% झाल्याचे आरबीआयच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. निव्वळ एनपीए (Net Non Performing Assets NPA) दरही ०.५% या निचांकी पातळीवर घसरला असल्याचे आरबीआयच्या वतीने म्हटले आहे. एकूण कर्ज प्रणालीतील ५४.१% कर्ज हे सरकारी बँकेच्या पोर्टफोलिओतून दिले गेल्याचेही यातून स्पष्ट झाले. त्यामुळे पीएसयु बँकेने एकूण जीएनपीएमधील ३/५ हिस्सा योगदान दिल्याचेही आरबीआयने म्हटले आहे.असेट क्वालिटीतील बाबतीत एनपीएपासून संरक्षण म्हणून ताळेबंदीत केलेल्या प्रोव्हिजनिंगनुसार, सरकारी बँकेच्या (Provisioning Coverage Ratio PCR) मध्ये वाढ झाली असताना खाजगी बँकांमध्ये ही प्रोव्हिजनिंगनुसार (तरतुदीनुसार) या पीसीआर गुणोत्तरात घसरण झाली आहे. एकूणच राईट ऑफ (Write Off) गुणोत्तर खाजगी बँकेत व परदेशी बँकेत वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. याखेरीज, माहितीनुसार, विस्तृत आर्थिक क्षेत्रांमध्ये पत गुणवत्ता सुधारत राहिली. कृषी क्षेत्रासाठी एकूण अनुत्पादक मालमत्ता (GNPA) गुणोत्तर अलीकडच्या काळात किरकोळ प्रमाणात सुधारत असताना ते इतर क्षेत्रांच्या तुलनेत बरेच जास्त राहिले आहे असे आरबीआयने स्पष्ट केले. आरबीआयच्या अहवालातील माहितीनुसार, वैयक्तिक कर्जांच्या श्रेणीमध्ये, वाहन/ऑटो कर्जे वगळता अनुसूचित (Non Scheduled) वाणिज्य बँकांच्या (SCBs) मालमत्तेची गुणवत्ता सर्व विभागांमध्ये सुधारली आहे तसेच औद्योगिक उप-क्षेत्रांमध्ये, अन्न प्रक्रिया वगळता सर्व उपक्षेत्रांमध्ये मालमत्तेच्या गुणवत्तेत सातत्यपूर्ण सुधारणा दिसून आली.अनुसूचित वाणिज्य बँकांच्या एकूण कर्जामध्ये मोठ्या कर्जदारांचा वाटा सुमारे ४४.०% स्थिर राहिला असून परंतु एकूण एनपीएत यांचा वाटा गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या कमी होऊन सप्टेंबर २०२५ पर्यंत ३३.८% झाला असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले. एकूण बँकेच्या गटांमध्ये असेट क्वालिटीतील लक्षणीय सुधारणा दिसून आली असून एकूण जीएनपीएमधील (GNPA) गुणोत्तर मार्च २०२४ मधील ३.०% वरून सप्टेंबर २०२५ मध्ये १.६% पातळीवर घसरले आहेअनुसूचित वाणिज्य बँकांच्या (NCB) निव्वळ व्याज उत्पन्नाची ( Net Interest Margin NII) उत्पन्न पूर्वीच्या कालावधीच्या तुलनेत सप्टेंबर २०२५ मध्ये २.३% तीव्रतेने घसरले आहे. ही घसरण सगळ्याच बँकेत दिसून आल्याचे आरबीआयने सांगितले. परिणामी, सप्टेंबर २०२५ मध्ये अनुसूचित वाणिज्य बँकांच्या नफ्याच्या वाढीचा वेग आणखी मंदावला. करोत्तर नफ्याची (Profit after tax PAT) वाढ इयर ऑन इयर बेसिसवर झाली असून होती तर २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये ती दुहेरी अंकी होती असे मध्यवर्ती बँकेने (RBI) आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. चालू आर्थिक वर्षात करोत्तर नफ्यामध्ये इतर ऑपरेटिंग उत्पन्नाचे (Other Operating Income OOI) योगदान वाढले.निधीच्या खर्चापेक्षा मालमत्तेवरील उत्पन्नामध्ये तुलनेने जास्त घट झाल्यामुळे निव्वळ व्याज मार्जिनमध्ये (NIM) सप्टेंबर २०२५ मध्ये मार्च २०२५ च्या तुलनेत २० बेसिस पॉइंट्सची व्यापक घट नोंदवली गेली असे बँकेने स्पष्ट केले. आरबीआयच्या मते, गेल्या दोन सहामाहीत इक्विटीवरील परतावा (Return on Equity RoE) आणि मालमत्तेवरील परतावा (Retrun on Asset RoA) हे दोन्ही गुणोत्तर कमी झाले असून देखील ते समाधानकारक पातळीवर राहिले आहेत. अहवालानुसार सप्टेंबर २०२५ पर्यंत, बँकेच्या समुहाचे सीएजीआर (Compound Annual Growth Rate) विस्तृत आर्थिक क्षेत्रांमध्ये पत गुणवत्ता (Credit Quality) सुधारत राहिली. कृषी क्षेत्रासाठी एकूण GNPA गुणोत्तर अलीकडच्या काळात किरकोळ प्रमाणात सुधारत आहे, तथापि ते इतर क्षेत्रांच्या तुलनेत बरेच जास्त राहिले आहे. वैयक्तिक कर्जांच्या श्रेणीमध्ये, वाहन/ऑटो कर्जे वगळता, अनुसूचित वाणिज्य बँकांच्या (SCBs) मालमत्तेची गुणवत्ता सर्व विभागांमध्ये सुधारली. औद्योगिक उपक्षेत्रांमध्ये, अन्न प्रक्रिया वगळता सर्व उपक्षेत्रांमध्ये मालमत्तेच्या गुणवत्तेत सातत्यपूर्ण सुधारणा दिसून आली. अनुसूचित वाणिज्य बँकांच्या एकूण कर्जामध्ये मोठ्या कर्जदारांचा वाटा सुमारे ४४% स्थिर राहिला, परंतु एकूण अनुत्पादक मालमत्तांमध्ये त्यांचा वाटा गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या कमी होऊन सप्टेंबर २०२५ पर्यंत ३३.८% झाला. बँक गटांमध्ये मालमत्तेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा दिसून आली, एकूण GNPA गुणोत्तर मार्च २०२४ मधील ३% वरून सप्टेंबर २०२५ मध्ये १.६% पर्यंत घसरले.अनुसूचित वाणिज्य बँकांच्या निव्वळ व्याज उत्पन्नाची (NII) वाढ पूर्वीच्या कालावधीच्या तुलनेत सप्टेंबर २०२५ मध्ये २.३ टक्क्यांपर्यंत तीव्रतेने घसरली.ही घसरण सर्व बँक गटांमध्ये दिसून आली. परिणामी, सप्टेंबर २०२५ मध्ये अनुसूचित वाणिज्य बँकांच्या नफ्याच्या वाढीचा वेग आणखी मंदावला, जसे की करानंतरच्या नफ्याची (PAT) वाढ ३.८% (YoY) होती, तर २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये ती दुहेरी अंकी होती. चालू आर्थिक वर्षात PAT मध्ये इतर उत्पन्नाचे (Other Operational Income OOI) योगदान वाढले.निधीच्या खर्चापेक्षा मालमत्तेवरील उत्पन्नामध्ये तुलनेने जास्त घट झाल्यामुळे, निव्वळ व्याज मार्जिनमध्ये (NIM) सप्टेंबर २०२५ मध्ये मार्च २०२५ च्या तुलनेत २० बेसिस पॉइंट्सची व्यापक घट नोंदवली गेली. गेल्या दोन सहामाहीत इक्विटीवरील परतावा (RoE) आणि मालमत्तेवरील परतावा (RoA) हे दोन्ही गुणोत्तर कमी झाले आहेत, परंतु ते समाधानकारक पातळीवर राहिले आहेत. सप्टेंबर २०२५ पर्यंत, बँकेच्या समुहाचे एकूण सीएजीआर (Compund Annual Growth Rate CAGR) मजबूत राहिले असल्याचे बँकेने नमूद केले. आरबीआयच्या मते, पीएसयु बँकेच १६% आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचे १८.१% व सर्व बँक गटांमध्ये भांडवल गुणोत्तर देखील अधिक राहिले जे बँकांद्वारे उच्च गुणवत्तेच्या भांडवलाच्या संचयाचे संकेत देते. एकूण टियर १ लिव्हरेज गुणोत्तर ८ सप्टेंबर २०२५ मध्ये वाढले असल्याचे आरबीआयने म्हटले.आरबीआयच्या आकडेवारीत असेही म्हटले गेले आहे की, मार्च २०२५ च्या तुलनेत लिक्विडिटी कव्हरेज रेशो (LCR) आणि नेट स्टेबल फंडिंग रेशो (NSFR) या दोन्हींमध्ये झालेल्या वाढीवरून स्पष्ट होते की, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि परदेशी बँकांनी सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांची तरलता स्थिती आणखी सुधारली. एलसीआर (Liquidity Coverage Ratio LCR) आणि नएफसीआर (Net Stable Funding Ratio NSFR) दोन्ही गुणोत्तर सर्व बँक गटांमध्ये किमान पातळीपेक्षा जास्त राहिले आहेत. मॅक्रो स्ट्रेस टेस्ट (Micro Stress Test) अनुसूचित वाणिज्य बँकांची प्रतिकूल मॅक्रोइकॉनॉमिक धक्क्यांना तोंड देण्याची लवचिकता तपासते असे अहवालात म्हटले गेले.अहवालातील माहितीनुसार, ४६ अनुसूचित वाणिज्य बँकांच्या (SCBs) नमुन्यासाठी, गुंतवणुकीचे बाजार मूल्य मार्च २०२५ मधील २३.८ लाख कोटींच्या शिखरावरून सप्टेंबर २०२५ मध्ये सलग तिमाहीत घसरून २२.८ लाख कोटी झाले. प्राथमिक शहरी सहकारी बँकांनी (UCBs) दिलेल्या कर्जामध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ७.४ % वाढ नोंदवली गेल्याचेही बँकेने यावेळी अधोरेखित केली ज्यात अनुसूचित UCBs (SUCBs) आणि गैर-अनुसूचित UCBs (NSUCBs) या दोन्हींचा वाटा होता.NBFC संस्थेची असेट क्वालिटीबद्दल -एनबीएफसी म्हणजेच विना बँकिंग वित्तीय संस्था (NBFCs) च्या एकत्रित स्तरावरील (Upper and Middle Layer) कर्ज वाढ मार्च २०२५ पासून वेगवान झाली आणि सप्टेंबर २०२५ मध्ये ती इयर बेसिसवर ३१% होती, अहवालातील आकडेवारीनुसार, प्रामुख्याने मार्च २०२५ आणि जून २०२५ मध्ये दोन गृहनिर्माण वित्त कंपन्यांचे (HFCs) वरच्या स्तरावरील NBFCs मध्ये रूपांतर झाल्यामुळे,तर मध्यम स्तरावरील (ML) NBFCs च्या कर्ज वाढीत घट सुरूच राहिली आहे.कृषी क्षेत्राचा अपवाद वगळता एनबीएफसीचा (NBFCs) चा सहभाग नगण्य आहे असे आरबीआयने अहवालात म्हटले. सर्व प्रमुख आर्थिक क्षेत्रांमध्ये (म्हणजे, उद्योग, सेवा आणि किरकोळ विभाग) कर्जाची वाढ वेगवान झाली असून मालमत्तेची गुणवत्ता (Asset Quality ) सुधारली. रिटेल विभागात, सूक्ष्मवित्त (Micro Finance) /SHG (Self Help Group) कर्जांमधील वाढ गेल्या दोन सहामाहीत कमी झाली असल्याचे आरबीआयने म्हटले.अहवालानुसार, वरच्या स्तरावरील NBFCs (NBFC-UL)अप्पर लेयरची कर्जातील वाढ मजबूत राहिली आहे. NBFC-UL च्या समान संचासाठी कर्ज वाढीत काही प्रमाणात घट दिसून आली. कर्जाद्वारे मिळणाऱ्या निधीची वाढ पतवाढीपेक्षा अधिक वेगाने होत राहिली, तर एकूण जीएनपीएमधील (GNPA) गुणोत्तर आणि तरतूद व्याप्ती गुणोत्तर (PCR) मार्च २०२५ च्या पातळीवर स्थिर राहिले. नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या (NBFCs) एकूण एनपीए (Non Performing Assets NPA) मालमत्तांमध्ये मोठ्या कर्जदारांचा वाटा लक्षणीयरीत्या सुधारला तर एकूण कर्जामधील त्यांचा वाटा स्थिर राहिला. क्रेडिट वाढ (पतवाढ) वेगाने वाढत राहिल्यामुळे, त्यांच्या मालमत्तेची गुणवत्ताही सातत्याने सुधारली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे १६.०% आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचे १८.१% पातळीवर स्थिरावले. आरबीआयच्या मते, सर्व बँक गटांमध्ये भांडवल गुणोत्तर देखील उच्च राहिले, जे बँकांद्वारे उच्चगुणवत्तेच्या भांडवलाच्या संचयाचे संकेत देते. एकूण टियर १ लिव्हरेज गुणोत्तर८ सप्टेंबर २०२५ मध्ये वाढले.मार्च २०२५ च्या तुलनेत लिक्विडिटी कव्हरेज रेशो (LCR) आणि नेट स्टेबल फंडिंग रेशो (NSFR) या दोन्हींमध्ये झालेल्या वाढीवरून स्पष्ट होते की, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि परदेशी बँकांनी सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांची तरलता स्थिती आणखी सुधारली. एलसीआर (LCR) आणि एनएसएफआर (NSFR) दोन्ही गुणोत्तर सर्व बँक गटांमध्ये नियामक किमान पातळीपेक्षा जास्त राहिले आहेत. ४६ अनुसूचित वाणिज्य बँकांच्या (SCBs) नमुन्यासाठी, गुंतवणुकीचे बाजार मूल्य मार्च २०२५ मधील २३.८ लाख कोटींच्या शिखरावरून सप्टेंबर २०२५ मध्ये सलग तिमाहीत घसरून २२.८ लाख कोटी झाले. प्राथमिक शहरी सहकारी बँकांनी (UCBs) दिलेल्या कर्जामध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये वार्षिक आधारावर ७.४% वाढ नोंदवली गेली, ज्यात अनुसूचित UCBs (SUCBs) आणि गैर-अनुसूचित UCBs (NSUCBs) या दोन्हींचा वाटा होता.NBFCs च्या एकत्रित स्तरावरील (Middle and Upper Layer) कर्ज वाढ (Loan Growth) मार्च २०२५ पासून वेगवान झाली आणि सप्टेंबर २०२५ मध्ये ती इयर ऑन इयर बेसिसवर २१.३% होती. प्रामुख्याने मार्च २०२५ आणि जून २०२५ मध्ये दोन गृहनिर्माण वित्त कंपन्यांचे (HFCs) वरच्या स्तरावरील NBFCs मध्ये रूपांतर झाल्यामुळे, तर मध्यम स्तरावरील (ML) NBFCs च्या कर्ज वाढीत घट सुरूच राहिली आहे. व्यवहार आधारित वाढ लक्षात घेतल्यास आधारित वर्गीकरण NBFC-ICCs आणि NBFC-IFCs या दोन्हींसाठी कर्ज वाढ मजबूत होती जी २०% पेक्षा अधिक आहे. कृषी क्षेत्राचा अपवाद वगळता, जिथे एनबीएफसी (NBFC) चा सहभाग नगण्य आहे. इतर सर्व प्रमुख आर्थिक क्षेत्रांमध्ये (म्हणजे, उद्योग, सेवा आणि किरकोळ विभाग) कर्ज वाढ वेगवान झाली आहे आणि मालमत्तेची गुणवत्ता सुधारली रिटेल (किरकोळ) विभागात, सूक्ष्मवित्त (Small Finance Group /SHG (Self Help Group) कर्जांमधील वाढ गेल्या दोन सहामाहीत कमी झाली.वरच्या स्तरावरील NBFCs (NBFC-UL) ची कर्ज वाढ मजबूत राहिल असून एनबीएफसी (NBFC-UL) च्या समान संचासाठी, कर्ज वाढीत काही प्रमाणात घट दिसून आली आरबीआयच्या आकडेवारीत, कर्जाद्वारे मिळणाऱ्या निधीची वाढ पतवाढीपेक्षा अधिक वेगाने होत राहिली असून तर एकूण जीएनपीएमधील (Gross Non Performing Assets GNPA) गुणोत्तर आणि तरतूद व्याप्ती गुणोत्तर (Provisioning Credit Ratio PCR) मार्च २०२५ च्या पातळीवर स्थिर राहिले. विना अथवा नॉनबँकिंग वित्तीय कंपन्यांच्या (NBFCs) एकूण एनपीएत मोठ्या कर्जदारांचा वाटा लक्षणीयरीत्या सुधारला, तर एकूण कर्जामधील त्यांचा वाटा स्थिर राहिला. क्रेडिट पतवाढीत (Credit Growth) वेगाने वाढत राहिल्यामुळे, त्यांच्या मालमत्तेची गुणवत्ताही सातत्याने सुधारली असल्याचेही आरबीआयने म्हटले.अर्थव्यवस्थेबाबत आरबीआयने काय म्हटले?जून २०२५ च्या वित्तीय स्थिरता अहवालानंतर (FSR) जागतिक अर्थव्यवस्था आणि वित्तीय प्रणाली अपेक्षेपेक्षा अधिक लवचिक सिद्ध झाली आहे. हे धोरणात्मक अनिश्चितता, सततचा भूराजकीय तणाव आणि वाढत्या व्यापार अस्थिरतेंनंतरही दिसून आले आहे. एकीकडे जागतिक वित्तीय बाजारपेठा उत्साही राहिल्या आहेत. खासकरून शेअर बाजारा कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दलच्या (AI) आशावादामुळे आणि कंपन्यांच्या मजबूत कमाईमुळे नवीन उच्चांक (Al time High) गाठत आहेत.तथापि ही वरवरची लवचिकता (Flexibility) आणि जोखीम (Risk) स्वीकारण्याची वृत्ती काही प्रमुख असुरक्षितता लपवते. ज्यांचे जागतिक वित्तीय स्थिरतेवर परिणाम होतात. यामध्ये, वाढलेल्या मूल्यांकनादरम्यान बाजारात मोठी घसरण होण्याचा धोका, उच्च, वाढते सार्वजनिक कर्ज, गैरबँकिंग वित्तीय मध्यस्थांची वाढती भूमिका आणि बँकांशी त्यांचा वाढता आंतरसंबंध (Inter Connection), खाजगी कर्ज (Private Loan) बाजारातील जोखीम आणि स्टेबलकॉइन्सची वेगाने होणारी वाढ यांचा समावेश आहेअनिश्चितता आणि अस्थिरता यांच्यातील तफावतही मोठी राहिली आहे. एकूणच, जागतिक अर्थव्यवस्था लवचिकता आणि नाजूकपणा दोन्ही दर्शवत असतानाही, जागतिक वित्तीय स्थिरतेचे धोके जास्त आहेत असेही आरबीआयने यावेळी स्पष्ट केले.अहवालातील आणखी काही महत्वाचे ठळक मुद्दे -जून २०२५ च्या वित्तीय स्थिरता अहवालानंतर (FSR) जागतिक अर्थव्यवस्था आणि वित्तीय प्रणाली अपेक्षेपेक्षा अधिक लवचिक सिद्ध झाली आहे,इक्विटी बाजारपेठा कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दलच्या (AI) आशावादामुळे आणि कंपन्यांच्या मजबूत कमाईमुळे नवीन उच्चांक गाठत आहेत.तथापि ही वरवरची लवचिकता आणि जोखीम स्वीकारण्याची भावना जागतिक वित्तीय स्थिरतेवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या कमकुवतपणांना झाकून टाकते.यामध्ये, वाढलेल्या मूल्यांकनादरम्यान बाजारात मोठी घसरण होण्याचा धोका, उच्च आणि वाढते सार्वजनिक कर्ज, गैरबँकिंग वित्तीय मध्यस्थांची वाढती भूमिका आणि बँकांशी त्यांचे वाढते आंतरसंबंध, खाजगी कर्ज बाजारातील जोखीम आणि स्टेबलकॉइन्सची वेगाने होणारी वाढ यांचा समावेश आहेअनिश्चितता आणि अस्थिरता यांच्यातील तफावतही मोठी राहिली आहेएकूणच, जागतिक अर्थव्यवस्था लवचिकता आणि नाजूकपणा दोन्ही दर्शवत असतानाही, जागतिक वित्तीय स्थिरतेचे धोके वाढलेले आहेत.ठळक मुद्दे:राजकोषीय उपाययोजना (Fiscal Provisions), आगाऊ केलेला व्यापार आणि एआय संबंधित मजबूत गुंतवणुकीमुळे जागतिक अर्थव्यवस्था लवचिक राहिली आहे. तरीही अजूनही वाढलेली अनिश्चितत, अधिक प्रमाणात वाढलेले सार्वजनिक कर्ज आणि बाजारात अव्यवस्थित घसरण होण्याच्या धोक्यामुळे नकारात्मक धोके कायम आहेत.जागतिक वित्तीय बाजारपेठा वरवर पाहता मजबूत दिसतात, परंतु त्यामध्ये वाढती मूलभूत कमकुवतपणा दिसून येतो. इक्विटी आणि इतर जोखमीच्या मालमत्तांमध्ये झालेली मोठी वाढ, गैर-बँकिंग वित्तीय मध्यस्थांची वाढती भूमिका आणि बँकांशी त्यांचे वाढते आंतरसंबंध, आणि स्टेबलकॉइन्सची वाढ या सर्वांमुळे जागतिक वित्तीय प्रणालीचा नाजूकपणा वाढतो.अनिश्चित आणि आव्हानात्मक जागतिक आर्थिक पार्श्वभूमी असूनही, मजबूत देशांतर्गत मागणी, अनुकूल चलनवाढ आणि विवेकपूर्ण स्थूल आर्थिक धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूतपणे वाढत आहे.मजबूत ताळेबंद, सुलभ वित्तीय परिस्थिती आणि कमी वित्तीय बाजारातील अस्थिरतेमुळे देशांतर्गत वित्तीय प्रणाली मजबूत आणि लवचिक राहिली आहे. तथापि, बाह्य अनिश्चितता भू-राजकीय आणि व्यापार-संबंधित यामुळे नजीकच्या भविष्यात धोके आहेत.अनुसूचित व्यावसायिक बँकांची (SCBs) स्थिती मजबूत भांडवल आणि तरलतेच्या साठ्यामुळे, मालमत्तेच्या सुधारित गुणवत्तेमुळे आणि मजबूत नफ्यामुळे चांगली राहिली आहे.मॅक्रो स्ट्रेस चाचणीचे निकाल काल्पनिक प्रतिकूल परिस्थितीत नुकसान सहन करण्याची आणि नियामक किमान मर्यादेपेक्षा जास्त भांडवली साठा राखण्याची अनुसूचित व्यावसायिक बँकांची लवचिकता दर्शवतात.स्ट्रेस चाचण्या म्युच्युअल फंड आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्सची लवचिकता देखील पुष्टी करतात.मजबूत भांडवली साठा, उत्तम कमाई आणि सुधारलेल्या मालमत्ता गुणवत्तेमुळे गैरबँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) भक्कम स्थितीत आहेत.विमा क्षेत्राने ताळेबंदात लवचिकता दर्शवणे सुरू ठेवले आहे आणि एकत्रित सॉल्व्हन्सी गुणोत्तर किमान मर्यादेपेक्षा जास्त राहिले आहे असेही आरबीआयने अंतिमतः आपल्या अहवालात म्हटले.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 4:10 pm

Australia Squad : ऑस्ट्रेलियाचा टी-२० विश्वचषकासाठी संघ जाहीर! ‘या’स्टार खेळाडूला डच्चू, तर ‘या’खेळाडूचे पुनरागमन

Australia Squad Announce for T20 World Cup 2026 : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. मिचेल मार्शकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून, संघ निवडीमध्ये काही धक्कादायक निर्णय घेण्यात आले आहेत. विशेषतः २०२५ मध्ये तुफान चर्चेत राहिलेल्या एका […] The post Australia Squad : ऑस्ट्रेलियाचा टी-२० विश्वचषकासाठी संघ जाहीर! ‘या’ स्टार खेळाडूला डच्चू, तर ‘या’ खेळाडूचे पुनरागमन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 4:05 pm

Shirur News : सासवड येथील जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणेने मिळवले घवघवीत यश

शिरूर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे यांच्या अंतर्गत सासवड येथे दि. २९ व ३० डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री गुरुदेव दत्त विद्यालय, सविंदणे येथील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या स्पर्धेत १७ वर्ष वयोगट मुली कबड्डी संघाने प्रथम क्रमांक, १४ वर्ष वयोगट […] The post Shirur News : सासवड येथील जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणेने मिळवले घवघवीत यश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 3:43 pm

विरोधकांचा अडथळा दूर झाल्याने किरीट सोमय्यांचे पुत्र निवडून येण्याची शक्यता

मुंबई: राज्यात सध्या १५ जानेवारीला येऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणूकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि देशाच्या आर्थिक नाड्या हातात असणाऱ्या मुंबईसारख्या शहराचा कारभार सांभाळणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूकांबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. महानगरपालिका निवडणुकांबद्दल उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपली आहे. अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान मुलुंडमधून किरीट सौमय्यांच्या बाबतीत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या हा मुंबई महानगरपालिकेच्या मुलुंड परिसरातील प्रभाग क्रमांक १०७ मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, मतदानापूर्वीच नील सोमय्या यांचा विजय निश्चित मानला जात आहे. किरीट सोमय्या यांनी गुरुवारी सोशल मीडियावर एक पोस्ट करुन याबाबत भाष्य केले. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, नील सोमय्या प्रभाग क्रमांक १०७ मधून लढत आहे. या वॉर्डमध्ये ठाकरे गट, मनसे, काँग्रेस आणि शरद पवार यांच्यापैकी कोणीही उमेदवार रिंगणात उरलेला नाही. मुलुंडमधील अन्य पाच प्रभागांमध्ये या सगळ्या पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. देवाची लिला अपरंपार आहे, असे किरीट सोमय्या यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.BMC ElectionsNeil Somaiya ward 107 in Mulund1. Uddhav Thackeray Sena UBT2. Raj Thackeray MNS3. Sharad Pawar NCP4. Rahul Gandhi Congresshave NOT put up candidatesGod is Great @BJP4India @Dev_Fadnavis @NeilSomaiya— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 1, 2026नील सोमय्या २०१७ साली पहिल्यांदा मुलुंडच्या प्रभाग क्रमांक १०७मधून निवडून आले होते. ते दुसऱ्यांदा महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जात आहेत. मुलुंड हा भाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात गुजराती, मारवाडी समाजाची लोकसंख्या मोठ्याप्रमाणावर आहे. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही मुलुंडचा बहुतांश परिसर भाजपला साथ देताना दिसला. याच पार्श्वभूमीवर मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक १०७ मधील लढतीत नील सोमय्या यांचे पारडे जड मानले जात आहे.https://prahaar.in/2026/01/01/the-election-battle-will-unfold-in-these-five-states-in-the-new-year-all-parties-have-started-their-preparations/मुंबईत ठाकरे बंधू आणि शरद पवार गटाची युती आहे. त्यामुळे वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये नील सोमय्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हंसराज दनानी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, हंसराज दनानी यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र न जोडल्याने निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज बाद ठरवला आहे. या वॉर्डातील प्रमुख उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने आता नील सोमय्या यांच्यासमोर फारसे आव्हान उरलेले नाही. परिणामी या वॉर्डातून नील सोमय्या यांचा विजय निश्चित मानला जात आहे. परंतु, याठिकाणी वंचित बहुजन आघाडीसह ९ अपक्ष उमेदवार अजूनही रिंगणात आहेत.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 3:30 pm

Vande Bharat Sleeper Train Route : ठरलं! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन ‘या’ मार्गावर धावणार; प्रवाशांची प्रतीक्षा संपली!

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाने आता एक मोठी झेप घेतली असून, देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर' ट्रेनचा शुभारंभ जानेवारी २०२६ च्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाणारी ही अत्याधुनिक ट्रेन देशाची राजधानी दिल्ली ते कोलकाता (हावडा) या सर्वात वर्दळीच्या मार्गावर धावण्याची दाट चिन्हे आहेत. सध्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी 'राजधानी एक्सप्रेस' हे प्रवाशांचे पहिले पसंतीचे साधन आहे. मात्र, वंदे भारत स्लीपरच्या आगमनाने प्रवाशांना अधिक वेगवान आणि विमानप्रवासासारखा अनुभव देणाऱ्या सोयीसुविधा मिळणार आहेत. या ट्रेनचा अधिकृत मार्ग आणि वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसले तरी, दिल्ली-कोलकाता या महत्त्वाच्या कॉरिडॉरला या ट्रेनसाठी प्राधान्य दिले जात असल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर, दिल्ली ते कोलकाता दरम्यान वंदे भारत स्लीपर सुरू करणे, ही केंद्र सरकारची एक मोठी राजकीय खेळी मानली जात आहे. पश्चिम बंगालमधील जनतेसाठी ही एक महत्त्वाची 'विकास भेट' ठरण्याची शक्यता असून, यामुळे प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.१८० च्या वेगाने धावली देशातील सर्वात वेगवान ट्रेनVande Bharat Sleeper tested today by Commissioner Railway Safety. It ran at 180 kmph between Kota Nagda section. And our own water test demonstrated the technological features of this new generation train. pic.twitter.com/w0tE0Jcp2h— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) December 30, 2025भारतीय रेल्वे आता गतीच्या एका नव्या शिखरावर पोहोचली आहे. देशातील सर्वात वेगवान ट्रेनची नुकतीच राजस्थानमधील कोटा-नागदा रेल्वे विभागामध्ये यशस्वी हाय-स्पीड चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान ट्रेनने ताशी १८० किलोमीटर (180 kmph) या विक्रमी वेगाचा टप्पा गाठला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या चाचणीचा एक विशेष व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, तो सध्या देशभर चर्चेचा विषय ठरला आहे.https://prahaar.in/2026/01/01/massive-explosion-has-occurred-in-a-pub-in-switzerland-during-the-new-year-celebrations/काय आहे ही 'वॉटर ग्लास टेस्ट'?ट्रेन १८० च्या वेगाने धावत असताना तिची स्थिरता (Stability) तपासण्यासाठी 'कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी' (CRS) कडून एक अनोखा प्रयोग करण्यात आला. याला 'वॉटर ग्लास टेस्ट' असे म्हटले जाते. वेगाने धावणाऱ्या ट्रेनच्या टेबलावर पाण्याने काठोकाठ भरलेला ग्लास ठेवण्यात आला होता. आश्चर्य म्हणजे, ताशी १८० किमी वेगातही ट्रेनमध्ये असणाऱ्या या ग्लासमधील पाण्याचा एक थेंबही सांडला नाही. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे ट्रेनचे प्रगत सस्पेन्शन आणि हायटेक डिझाइन किती प्रभावी आहे, हे सिद्ध झाले आहे. या चाचणीमुळे भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणावर शिक्कामोर्तब झाले आहे. ट्रेनचा वेग प्रचंड असूनही प्रवाशांना आतमध्ये हादरे (Jerks) जाणवणार नाहीत, याची खात्री या 'स्टॅबिलिटी टेस्ट'मुळे पटली आहे. रेल्वेच्या या प्रगत सस्पेन्शन तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे. अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला असून, भारतीय रेल्वे आता जागतिक दर्जाच्या रेल्वे सेवांशी स्पर्धा करण्यास सज्ज झाली आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.वंदे भारत स्लीपरमध्ये गरम पाण्याचा शॉवर आणि आलिशान बर्थभारतीय रेल्वे आता केवळ प्रवासाचे साधन न राहता आरामाचे केंद्र बनली आहे. दिल्ली ते कोलकाता या १४४९ किलोमीटरच्या प्रवासासाठी सज्ज झालेल्या 'वंदे भारत स्लीपर' ट्रेनची वैशिष्ट्ये समोर आली असून, ती ऐकून प्रवासी थक्क झाले आहेत. ही ट्रेन राजधानी एक्सप्रेसच्या तुलनेत किमान २ ते ३ तास आधी आपले अंतर पार करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या ट्रेनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली 'गरम पाण्याचा शॉवर' (Hot Water Shower) ही सुविधा. लांब पल्ल्याच्या प्रवासात थकवा दूर करण्यासाठी ही सोय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय, प्रत्येक बर्थवर मोबाईल चार्जिंग पॉईंट, मऊसूत गाद्या आणि रात्रीच्या वेळी इतरांना त्रास न होता वाचण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला स्वतंत्र वाचन दिवा (Reading Light) देण्यात आला आहे.इंजिनची गरज नाही, १६ डब्यांची ट्रेनही ट्रेन पूर्णपणे 'सेल्फ-प्रोपेल्ड' (Self-propelled) म्हणजेच स्वयंचलित आहे, ज्यामुळे याला ओढण्यासाठी वेगळ्या इंजिनची आवश्यकता नाही. या तंत्रज्ञानामुळे ट्रेनला वेग पकडणे आणि थांबणे सोपे होते. एकूण १६ डब्यांच्या या ट्रेनमध्ये ११ डबे एसी ३-टायर, ४ डबे एसी २-टायर आणि १ डबा अत्यंत आलिशान अशा **'फर्स्ट क्लास एसी'**चा असणार आहे. एकाच वेळी ११२८ प्रवासी यातून प्रवास करू शकतील. दिल्ली ते कोलकाता हा मार्ग देशातील सर्वात वर्दळीचा आहे. तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेल्या या ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाचणार आहे. अत्याधुनिक सुरक्षितता आणि हायटेक डिझाइनमुळे या ट्रेनची प्रवासी आतुरतेने वाट पाहत आहेत.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 3:30 pm

Gen Z Protests : इराणमध्ये जन झेडची सरकार विरोधी निदर्शने तिव्र; महागाईविरोधातील आंदोलक झाले आक्रमक

Gen Z Protests – तेहरानमध्ये सुरू झालेली इराणी सरकारविरुद्धची निदर्शने आता इतर अनेक शहरांमध्ये पसरली आहेत. पश्चिम इराणमधील असदाबाद येथील निमलष्करी मुख्यालयाला निदर्शकांनी आग लावली. दक्षिण इराणमधील फासा शहरात इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. इराणी सरकारने या घटनेला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नसला तरी निदर्शक आक्रमक होत असल्याचे दिसत असून हमेदानमध्ये पोलिस […] The post Gen Z Protests : इराणमध्ये जन झेडची सरकार विरोधी निदर्शने तिव्र; महागाईविरोधातील आंदोलक झाले आक्रमक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 3:26 pm

मतदानापूर्वीच भाजपची विजयी सलामी! आतापर्यंत 8 उमेदवार जिंकले, महिलाराज…

BJP Municipal Corporation Election | भाजपने महापालिका निवडणुकीत विजयी सलामी देण्यास सुरूवात केली आहे. राज्यभरातून भाजपचे ८ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेतून भाजपने विजयाचा श्रीगणेशा केला. कल्याण-डोंबिविलीत भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले असून तिन्ही उमेदवार महिला आहेत. त्यामुळे, भाजपच्या विजयाचे खाते महिलांनी खोलले आहे. कल्याण-डोंबिवलीनंतर धुळे महापालिकेत 3, पनवेल महापालिकेत 1 […] The post मतदानापूर्वीच भाजपची विजयी सलामी! आतापर्यंत 8 उमेदवार जिंकले, महिलाराज… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 3:13 pm

नववर्षात 'या'पाच राज्यात होणार निवडणूकांची रणधुमाळी! सर्व पक्षांनी केली तयारीला सुरुवात

नवी दिल्ली: राजकीय घटनांबाबत गतवर्षात बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव देशाने घेतला. राज्यांनुसार म्हणायचं तर या वर्षात दिल्ली आणि बिहार या दोन राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये रणधुमाळी पाहायला मिळाली. दोन्ही राज्यांमध्ये बाजी मारत भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची भरपाई केली. तर महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने सुद्धा सत्तेतील यशाचे एक वर्ष पूर्ण केलं. आजपासून सुरू झालेल्या वर्षात गेल्यावर्षीपेक्षा जास्त प्रमाणात राजकारण गाजणार आहे. कारण २०२५ मध्ये देशातील ५ प्रमुख राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे.पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी या राज्यांत २०२६ मध्ये निवडणुका होणार आहेत. त्याशिवाय विविध राज्यांमधील राज्यसभेच्या ७५ जागांवर एप्रिल महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या निकालांमुळे केवळ नवी राजकीय समीकरणं उदयाला येणार नाहीत तर राजकीय दशा आणि दिशाही बदलेल, असा दावा केला जात आहे.पश्चिम बंगालमधील विधानसभेचा कार्यकाळ ७ मे २०२६ रोजी संपत असून एप्रिल-मे दरम्यान निवडणूक होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागा असून, तिथे तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये होणारी लढत महत्त्वाची आहे. २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसने २१३ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपाने ७७ जागांवर विजय मिळवला होता. २०११ पासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेसला यावेळी मागे सारण्यात आणि राज्यात सत्ता परिवर्तन करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.२०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील दुसरे प्रमुख राज्य आहे तामिळनाडू. तामिनाडूमध्येही एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. येथे डीएमकेचे प्रमुख आणि तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची कसोटी लागणार आहे. स्टॅलिनसमोर यावेळी डीएमके आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय याचा टीव्हीके पक्ष असे दुहेरी आव्हान असण्याची शक्यता आहे. २०२१ साली झालेल्या तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत एकूण २३४ जागांपैकी डीएमकेने १३३ जागा जिंकल्या होत्या. तर डीएमकेचा मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेसने १८ जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्षामुळे येथील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.सध्या देशात डाव्या पक्षांच्या ताब्यात असलेलं एकमेव राज्य असलेल्या केरळमध्येही एप्रिल-मे महिन्यादरम्यान निवडणुका होणार आहेत. २०२१ साली झालेल्या केरळ विधानसभेच्या निवडणुकीत एलडीएफने ९९ जागा जिंकत सत्ता आपल्या ताब्यात ठेवली होती. मात्र तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत विजय मिळवल्यानंतर भाजपसुद्धा सक्रिय झाली आहे.पूर्वोत्तर भारतातील आसाममधील विधानसभेचा कार्यकाळही संपत आला आहे. त्यामुळे येथेही एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता असून, २०१६ पासून येथे भाजपाने आपले वर्चस्व राखले आहे. तसेच हिमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत आसाममधील विधानसभेच्या १२६ जागांपैकी ७५ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. तर काँग्रेसच्या आघाडीला ५० जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे यावेळीही भाजप बाजी मारेल अशी चर्चा आहे.

फीड फीडबर्नर 1 Jan 2026 3:10 pm

Pune District : शिरोली येथील न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा स्पर्धत घवघवीत यश

ओझर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ , पुणे आयोजित जिल्हास्तरिय क्रीडा स्पर्धत न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु॥ विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे,शालेय गुणवत्तेबरोबरच विद्यार्थांमध्ये क्रीडा विषयक आवड निर्माण होऊन राज्य -राष्ट्रीय -आंतर राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी दरवर्षी या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धत विद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी केल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद […] The post Pune District : शिरोली येथील न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा स्पर्धत घवघवीत यश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 3:08 pm

Walking For Heart Health: रोज इतकी पावले चालण्याचा निर्णय घ्या, हृदयासोबत पोटाचं आरोग्यही राहील मजबूत

Walking For Heart Health: आपण सर्वांनी नवीन वर्ष्यात प्रवेश केला आहे. अशा वेळी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा न्यू इयर रिझोल्यूशन म्हणजे स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणं. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, दररोज फक्त १०,००० पावले चालणं आपल्या शरीरासाठी वरदान ठरू शकतं. चालण्याचे फायदे काय? दररोज चालल्यामुळे हृदय रक्त अधिक चांगल्या पद्धतीने पंप करतं. यामुळे रक्तवाहिन्या लवचिक राहतात आणि रक्तदाब […] The post Walking For Heart Health: रोज इतकी पावले चालण्याचा निर्णय घ्या, हृदयासोबत पोटाचं आरोग्यही राहील मजबूत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 3:03 pm

ईशाने देओलने नवीन वर्षांच्या दिल्या शुभेच्छा; सोशल मीडियावर खास पोस्ट करत धर्मेंद्र यांची काढली आठवण

Actress Esha Deol : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आले. बॅालिवूड इंडस्ट्रीतील कलाकार मंडळींनी देखील नव्या वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले आहे. खरंतर नवीन वर्षाबद्दल सगेळच खूप उत्साही असतात आणि प्रत्येकाला आपले येणारे वर्ष चांगलेच जावे असेच वाटत असते. बॅालिवूडमधील कलाकार मंडळी त्यांच्या आवडत्या ठिकाणी जाऊन नवीन वर्षाचे स्वागत करताना […] The post ईशाने देओलने नवीन वर्षांच्या दिल्या शुभेच्छा; सोशल मीडियावर खास पोस्ट करत धर्मेंद्र यांची काढली आठवण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 3:01 pm

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ; अमेरिकन नागरिकांना दोन देशांमध्ये प्रवेश बंदी

US Citizens Entry Ban। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, अमेरिका आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. दोन देशांनी अमेरिकन नागरिकांना त्यांच्या देशात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लादलेल्या निर्बंधांना प्रतिसाद म्हणून दोन्ही देशांनी हा निर्णय घेतला आहे. दोन्ही देश फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेत […] The post डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ; अमेरिकन नागरिकांना दोन देशांमध्ये प्रवेश बंदी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 3:00 pm

Kareen Kapoor : “आम्ही खूप रडलो, प्रार्थना केली…”; करीना कपूरसाठी हे वर्ष गेले खूपच ‘कठीण’, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत !

Kareen Kapoor New Year 2026 Post : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने एका भावनिक पोस्टद्वारे २०२५ या वर्षाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्रीने हे वर्ष तिच्या आणि तिच्या कुटुंबासाठी “कठीण” असल्याचे वर्णन केले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या वर्षी १६ जानेवारी रोजी एका अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने वार केले. सैफला […] The post Kareen Kapoor : “आम्ही खूप रडलो, प्रार्थना केली…”; करीना कपूरसाठी हे वर्ष गेले खूपच ‘कठीण’, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत ! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 2:53 pm

जिया शंकरने ‘मिस्ट्री मॅन’सोबतचा फोटो शेअर करत साखरपुड्याच्या चर्चांना दिला पूर्णविराम

Jiya Shankar | ‘बिग बॉस OTT २’ फेम अभिनेत्री जिया शंकर आणि लोकप्रिय युट्युबर अभिषेक मल्हान यांच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र जियाने सोशल मीडियावर ‘मिस्ट्री मॅन’ सोबतचा एक फोटो शेअर करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आणि जिया एकमेंकाना डेट करत असून लवकरच साखरपूडा करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या […] The post जिया शंकरने ‘मिस्ट्री मॅन’ सोबतचा फोटो शेअर करत साखरपुड्याच्या चर्चांना दिला पूर्णविराम appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 1 Jan 2026 2:51 pm