माझा आयुष्यातील पहिला ट्रेक : ‘हरिश्चंद्रगड’
संवाद,गुरुनाथ तेंडुलकरडोंबिवलीचे ट्रेकर विजय वाठारे (आनंद यात्रा पर्यटन) यांनी तीन दिवसांची हरिश्चंद्रगड पदभ्रमंती आयोजित केली आहे असं समजलं. आतापर्यंत नुसतं ऐकलं होतं, पण कधीच कुठला ट्रेक असा केला नव्हता. पण आमचे कुटुंब मित्र सागर ओक आणि त्यांचा मुलगा अभिजित जाणार असं समजलं. मन द्विधा होतं कारण वय अडूसष्ट आणि अनुभव काहीच नाही. ऑनलाइन माहिती वाचली तर जरा कठीण वाटलं. माझ्या मुलाने तर साफ विरोध केला कारण त्याने हा ट्रेक केला होता. पण मी त्यात सहभागी होण्याचं ठरवलं. सागर आणि त्यांचा मुलगा अभिजित हे छान ओळखीचे होते आणि त्यांच्याबरोबर एक डॉक्टर मित्र डॉ. कुमार ठकार येणार असं समजलं म्हणजे काही झालं तर बरोबर डॉक्टरही आहेत आणि मी जायचं नक्की केलं. विजय वाठारे हे या क्षेत्रात माहीर आहेत आणि चाळीसवेळा हरिश्चंद्रगड चढलेत असं समजलं. आणि काय होईल ते होईल जायचं असं मी ठरवलं.या ट्रेकमध्ये आम्ही एकूण दहा जण होतो. विजय यांनी हा ट्रेक खास ज्येष्ठांसाठी ठरवला होता. एकटा अभिजित हा एकमेव अपवाद होता जो खरंच तरुण होता. हाही मनाला दिलासा होता. रविवारी, १८ जानेवारीला १०.२० ची कसारा पकडली. दुपारी, आम्ही सगळे कसारा रेल्वे स्थानकावर एकत्र जमलो. बहुतेक सर्व मंडळी मुंबई परिसरातली होती, तर कुमार, अभिजित आणि सागर पुण्याहून आले होते. तिथे आमचे कॅप्टन विजय यांनी दोन जीप आमच्यासाठी तयार ठेवल्या होत्या. त्यात बसून आम्ही निघालो. भंडारदरा धरण वाटेत लागलं. जाताना नासिक जिल्ह्यातील आवंदा–पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या टाकेद गावातील पक्षीतीर्थ किंवा सर्वतीर्थ पाहिलं. त्याची कथा अशी की, रावण सीतेला पळवून नेत असताना पक्षीराज जटायूने जेव्हा रावणाला अडवायचा प्रयत्न केला तेव्हा रावणाने त्याचा पंख छाटला ते हे ठिकाण. पुढे श्रीरामाची भेट झाली. त्यांनी जमिनीत बाण मारून पाणी काढले व तडफडणाऱ्या जटायूला दिले. तेच टाकेदचे सर्वतीर्थ. तिथून निघालो आणि पुढे आम्ही भंडारदरा, राजूर मार्गे रतनगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिरात गेलो. खूप प्राचीन दगडी मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड वीतभर पाण्यात आहे असे दिसले. तिथून आम्ही परत भंडारदऱ्याला MTDC च्या रिसॉर्टमध्ये मुक्कामाला आलो. रात्री जेवण झाल्यावर कॅम्पफायर झालं. ट्रेकचा मूड तयार झाला. थंडी आम्हा मुंबईकरांना चांगलीच जाणवत होती. पण शेकोटीची ऊब होती. सगळ्यांनी आपापले असलेले गायन कौशल्य दाखवले.सोमवारी पहाटे लवकर आटपून आम्ही जीपने हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचनई गावातील सरपंच भास्कर बदड यांच्या घरी पोहोचलो. तिथे आम्हाला मस्त गरम गरम उपम्याचा नाश्ता मिळाला. आमचा ट्रेक खऱ्या अर्थाने तिथून सुरू झाला. जास्तीचं समान गावातील चार भारवाहकांकडे देऊन सगळे सकाळी ९ वाजता चढायला लागलो. माझ्या पाठीवर छोटीशी सॅक होती. संपूर्ण वाट चढणीची होती पण वाटेत बऱ्यापैकी झाडीचा रस्ता होता. सगळ्यात शेवटी मी व माझे मार्गदर्शक सागर ओक पोहोचलो. सगळे इतके भरभर चढून जायचे नि आमच्यासाठी थांबायचे. मी खूपच ढ. मला भीती वाटायला लागली की आलो खरे वर, पण उतरताना काय? सर्वजणांनी तीनेक तासांत गडाचा माथा गाठला. वर पोहोचलेली मंडळी तिथल्या एका घराबाहेर जेवणासाठी थांबली होती. मस्त गरम गरम पिठलं-भाकरी पाहून सगळा शीण निघून गेला.दुपारचे जेवण झाल्यावर आम्ही तिथेच जवळपास असलेले श्री हरिश्चंद्रेश्वराचे पुरातन मंदिर व भल्या मोठ्या दगडी गुहेत कोरलेलं केदारेश्वराचे अद्वितीय मंदिर पाहिलं. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ही मोठ्ठी पिंड कंबरभर पाण्यात आहे आणि ते पाणी बारा महिने थंडगार असतं. एक आख्यायिका या शिवलिंगाबद्दल ऐकली. शिवलिंगाच्या चार बाजूला चार दगडी खांब आहेत ज्यापैकी तीन खांब, जे तीन पूर्ण झालेली युगे आहेत असं मानतात आणि एक शिल्लक असलेला खांब हा कलियुगाचं द्योतक आहे आणि तो खांब जेव्हा झिजून जाईल तो या युगाचा अंत असेल अशी लोकांत मान्यता आहे. त्या गुहेसमोर बसलो खूप प्रसन्न वाटलं.गडावर भरपूर वर्दळ होती. मंदिराच्या जवळपास अजून काही गुहा आहेत त्या बघून आम्ही पुढे तासभर चालून प्रसिद्ध कोकणकड्यावर गेलो. कोकणकडा नामक भारतातील बहुधा सर्वात मोठ्या एककातळी उभ्या–आडव्या, बशीच्या आकाराच्या कड्याच्या वरच्या काठावर सूर्यास्त पाहायला जाऊन थांबलो. थंडीमुळे धुकं होतं. फार लांबचे डोंगर स्पष्ट दिसत नव्हते. निसर्गाचं ते अक्राळ-विक्राळ स्वरूप पाहून मला तर खूपच भारी वाटलं. सूर्योदय बघायची उत्सुकता होती. पण सूर्य अगदी क्षितिजावर जाऊन अस्तंगत न होता थोडा वरच बुडाला असं वाटलं. लांब डावीकडे नाणेघाटावरील अंगठा ओळखता आला आणि जरा अलीकडे खालच्या अंगाला माळशेज घाटाचा रखवालदार, मोरोशीचा भैरवगड दिसला. मात्र लांबचं स्पष्ट दिसत नसलं तरी आमची वैयक्तिक छायाचित्रं खूप निघाली. सूर्यास्तानंतर पटकन अंधार पडला. आमच्या घरात गरम गरम जेवण बनायला सुरुवात झाली होती. त्यात आमच्या ग्रुपमधीलअर्पिता देसाई हिने सगळ्यांसाठीच्या पोळ्या लाटून दिल्या. सगळ्यांनी मस्त जेवण केले. वर अक्षरशः चांदण्यांच्या लाह्या विखुरल्या होत्या. अस आकाश फार वर्षांनी पाहिलं. मृग नक्षत्र डोक्यावरच होतं. जेवण झाल्यावर लवकर झोपायचं ठरलं. पण तंबूत झोप येईल अस वाटतं नव्हतं. कसे काय राहतात हे रहिवासी लोक अशा वातावरणात, कौतुक वाटलं.सकाळी सगळ्यांनी खाली पाचनाईसाठी उतरायची वाट धरली. आता मात्र पोटात मोठ्ठा गोळा आला होता. उतरताना पाय घसरत होते. सगळे आपापल्या वेगाने उतरत होते. आता अर्पिता माझी गाईड होती. सागरलाही माझी काळजी आणि जबाबदारी असल्याने आम्ही तिघे माझ्या वेगाने हळूहळू उतरत होतो. इतका सुंदर निसर्ग भोवती होता. पक्षी मस्त किलबिल करत होते, पण मला मात्र फक्त दगड दिसत होते. डावा पाय टाकू की उजवा.अर्पिता मला सूचना देत होती. मी बघ कसा पाय टाकतेय तसा अडवा पाय टाक. मला डावा उजवाही हळूहळू कळेना अस झालं. शेवटच्या अर्ध्या तासात मात्र माझं अवसान गळत चाललं होत. आम्हाला शोधत विजय वाठारे वर आले आणि अक्षरशः लहान बाळासारखा हात धरून मी खाली आलो. त्यांच्या सराईत हातातली मजबूत पकड जाणवत होती. जणू देवच भेटला अस मला वाटल. वयाच्या एक्काहत्तरव्या वर्षी माणूस किती खंबीर नेतृत्व करू शकतो हे पाहून कौतुक वाटलं. सर्व नवीन मित्रांच्या बरोबर माझा पहिला वहिला ट्रेक पार पडला.
अमित शहांचा नांदेड दौरा रद्द ? नेमकं काय घडलं ?
नांदेड : शिखांचे नववे गुरु तेग बहाद्दूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त आयोजित ‘हिंद दि चादर’ कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेड येथे होणार होते. पण कार्यक्रमाच्या काही तास आधीच अमित शहांचा दौरा रद्द झाला. तांत्रिक कारणामुळे हा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण नेमके काय कारण आहे हे अद्याप समजलेले नाही.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेड दौऱ्यावर येणार असल्यामुळे प्रशासनाने आवश्यक ती तयारी केली होती. संपूर्ण नांदेडमध्ये तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त होता. भाजपच्या नांदेडमधील कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड उत्साह होता. पण कार्यक्रमाच्या काही तास आधीच अमित शहांचा दौरा रद्द झाला. अमित शहा यांचा दौरा रद्द झाला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.नांदेड महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री शहरात येत आहेत. यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.नांदेड महापालिका निवडणूक निकाल २०२६राज्यातील नांदेडसह २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाले. नांदेड महापालिकेत वीस वॉर्डातील ८१ जागांसाठी निवडणूक झाली आणि भाजपने ४५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. शिवसेनेचा चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन जागांवर विजय झाला. काँग्रेस दहा जागा जिंकू शकली. तर इतर पक्षांचा २० जागांवर विजय झाला.
माझी आणि भारुडाची ओळख अशी झाली...
स्मृतिगंध,लता गुठेमहाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो, ज्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या आहेत आणि आजही त्या जनसामान्यांमध्ये जागृत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे भारूड. जे बहुरूड आहे ते भारूड. संत परंपरेत ज्ञानेश्वरांपासून अनेक संतांनी भारूड रचना केल्या; परंतु भारूड म्हटलं की एकनाथ महाराज डोळ्यांसमोर उभे राहतात. ३०० पेक्षा अधिक भारूडं संत एकनाथांनी लिहिली, तेही विनोदी शैलीत आणि सर्वसामान्यांचे विषय त्यामधून मांडले. यातून त्यांनी दोन उद्देश साध्य केले ते असे, करमणूक आणि दुसरा उद्देश अध्यात्मिक रसपान. सर्वसामान्यांना पटेल, रुचेल अशा साध्या सोप्या भाषेमध्ये नाथांनी भारुडे रचली त्यातून त्यांनी समाजाचे अज्ञान, अंधश्रद्धा दूर केल्या. खरं तर भारुडाविषयी असं म्हणता येईल की, लोकजीवनाच्या काळजात रुजलेले संस्कृतीचे मूळ आहे.माझी आणि भारुडाची ओळख झाली ती अशी... आमच्या गावामध्ये कीर्तनकार बुवा येणार म्हणून गावातील लहान-थोर मंडळी कीर्तनाला उपस्थित होती. दिवे लागण्याची वेळ झाली. हळूहळू दिवे उजळू लागले. प्रत्येकाच्या हातात कंदील घेऊन जो तो चावडीसमोर येऊन जिथे जागा मिळेल तिथे विराजमान झाला. कीर्तनकार बुवांच्या साथीदाराने टाळ–मृदंगाचा ठेका धरला. अचानक समजले, कीर्तनकार बुवा उशिरा येणार आहेत. सज्ज व्यासपीठ वादक तयार होतेच तेवढ्यात एक जण व्यासपीठावर आला आणि त्याने सुरू केलं... विंचू चावला भारूड. अतिशय छान अभिनय, नृत्य करून सर्वांना हसवलं. त्या पाठोपाठ दादला नको गं बाई व असे एक-दोन भारूड सादर केले आणि कीर्तनकार बुवा तेवढ्यात तिथे हजर झाले. छान माहोल तयार झालेला पाहून त्यांनी भारूड सादर करणाऱ्या मुलाचा सत्कार केला आणि त्याला आशीर्वाद दिला. तेव्हापासून भारूड माझ्या मनात रुजलं आणि त्या भारुडातील खट्याळपणा मला विशेष भावला. यानंतर अनेकदा नाथांची भारूड ऐकायला मिळाली. एक दिवस शाळेतून घरी येत असताना... मंदिराच्या समोरच्या पारावर अनेक माणसे जमा झाली होती... आणि त्यातून आवाज आला...“ऐका हो ऐका… एक सांगतो गंमत!” आणि त्या सुमधुर पहाडी आवाजाने अख्खा परिसर दुमदुमला. मी मागे वळून पाहिलं, डोक्यावर मोरपिसाची उलटी टोपी घातलेला अंगात अंग होळकर अंगरखा हातात टाळ एका बाजूला झोळी अडकवलेली अशा थाटात असलेला वासुदेव भारुडाबरोबर नृत्यही सादर करू लागला. छान गोल गिरकी घेऊन त्याने सर्वांचे लक्ष वेधले आणि पाराचा क्षणात रंगमंच झाला. आजूबाजूची लोकही जमा झाली आणि जोगवा भारूड त्याने सादर केलं त्यातून नाथांनी आदिशक्तीला विनम्रपणे घातलेलं गाऱ्हानं होतं. हसत, चिमटे काढत, त्याने जनसामान्यांच्या मनाचा ताबा घेतला. तेव्हा समजलं, भारूड म्हणजे केवळ करमणूक नव्हे. ते लोकमनाचं आरसपानी प्रतिबिंब आहे. सामान्य माणसाच्या दैनंदिन जगण्यातून जन्मलेलं, त्याच्या बोलीतून व्यक्त झालेलं आणि त्याच्याच प्रश्नांवर बोट ठेवणारं हे लोकनाट्य, लोकगीत आणि लोककथन यांचं अनोखं मिश्रण आहे. भारूड पाहताना हसू येतं, पण हसता हसता एखादं सत्य टोचून जातं. हीच त्याची खरी ताकद.पुढे एकनाथांच्या भारुडावर अभ्यास करताना भारूड मनाला स्पर्श करून गेलं. आणि मी या लोकसंस्कृतीच्या भारुडाच्या प्रेमात पडले. भारुडाचं स्वरूप अगदी साधं, पण प्रभावी. कोणताही भव्य रंगमंच नाही, झगमगती नेपथ्य नाही. एक-दोन कलाकार, थोडीफार वेशभूषा, टाळ–मृदंग आणि शब्दांचा खेळ. इतक्यावर भारूड उभं राहतं. अनेकदा भारूडकार स्वतःच निवेदक, अभिनेता आणि सूत्रधार असतो. कधी तो वेशांतर करतो, कधी प्रेक्षकांशी थेट संवाद साधतो. त्यामुळे भारूड पाहणारा केवळ प्रेक्षक राहत नाही; तो त्या खेळाचा भाग होऊन जातो.भारुडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील उपरोध. थेट बोट दाखवून सांगण्याऐवजी भारूड हसत हसत सत्य सांगतं. समाजातील दांभिकपणा, अज्ञान, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, जातिभेद, स्त्री-पुरुष विषमता हे सारे विषय भारुडात येतात, पण प्रवचनाच्या स्वरात नाहीत. एखाद्या भोळ्या पात्राच्या तोंडून, एखाद्या गंमतीदार प्रसंगातून ते उलगडत जातात. त्यामुळे ऐकणाऱ्याला न दुखावता, पण अंतर्मुख करणारी ही शैली ठरते. भारुडाचं वेगळेपण त्याच्या प्रतीकात्मकतेत आहे. अनेक भारुडांत प्राणी, पक्षी, देव, भटके, व्यापारी, फकीर अशी पात्रं येतात. ही पात्रं केवळ व्यक्ती नसतात, तर प्रवृत्तींचं प्रतीक असतात. एखादा लोभी व्यापारी म्हणजे केवळ एक व्यक्ती नसून, तो लोभाचं मूर्त रूप असतो. एखादा भोळा गोंधळी म्हणजे अज्ञानाचं प्रतीक असतो. या प्रतीकांच्या माध्यमातून भारूड व्यापक अर्थ सांगून जातं. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत भारुडाचं स्थान फार महत्त्वाचं आहे. वारकरी संप्रदायाच्या कीर्तनपरंपरेत भारुडाला विशेष मान आहे. संत एकनाथ, संत तुकाराम यांसारख्या संतांनी भारुडाचा उपयोग लोकजागृतीसाठी केला.संत एकनाथांची भारूडं आजही लोकांच्या ओठांवर आहेत. त्यांनी भारुडातून जे अध्यात्म सांगितलं ते अध्यात्म माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं होतं. त्यामुळे भारूड हे केवळ लोककलेचं रूप न राहता, समाजपरिवर्तनाचं साधन बनलं.इतिहासाच्या प्रवाहात भारुडाने अनेक रूपं धारण केली. कधी ते कीर्तनाचा भाग झाले, कधी तमाशाच्या जवळ गेले, तर कधी शाहिरी परंपरेत मिसळले. ग्रामीण जीवनातील बदल, शहराकडे झुकणारी संस्कृती, आधुनिक प्रश्न हे सारे विषय भारुडात येत गेले. तरीही त्याची मुळं लोकजीवनातच राहिली. काळ बदलला, संदर्भ बदलले, पण भारुडाची आत्मा लोकमनाशी असलेली नाळ तुटली नाही. आजच्या धावपळीच्या काळात, मोठ्या रंगमंचांवर आणि पडद्यावर चमकणाऱ्या करमणुकीच्या जगात भारूड कधी-कधी दुर्लक्षित होतं. पण जेव्हा कुठे गावच्या जत्रेत, यात्रेत किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात भारूड सादर होतं.लोक अजूनही भारुड ऐकतात, हसतात आणि विचारही करतात. कारण भारुडात माणसातील माणूसपण दडलेलं आहे. भारूड म्हणजे लोकसाहित्याच्या विशाल दालनातील एक जिवंत झरा आहे असं मला वाटतं. कारण यामध्ये आनंद देण्याची क्षमता आहे, विकारावर चिमटे घेण्याची ताकद आहे, मानवी आयुष्यातील फोलपणा आहे, करुणा व्यथा वेदना आहे, स्त्रियांचे दुःख आहे आणि अंधश्रद्धेच्या विरुद्ध केलेले परखड भाष्य आहे आणि शहाणपणही आहे. सर्वसामान्यांच्या मनावर गारुड करणारे हे भारूड जतन करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. कारण यामुळेच आपली संस्कृती आपली संस्कार आपली भाषा टिकून आहे.
र्वी एकंदर समाजाच्या मानसिकतेचा विचार करून सिनेमाचे कथानक आणि गाणीही लिहिली जात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बरीच वर्षे देशाच्या नव्या उभारणीचा विचार सिनेमाच्या कथानकात, तत्कालीन लोकप्रिय गाण्यात गुंफलेला दिसून येतो.चित्रपटसृष्टीने, विशेषत: जुन्या गीतकरांनी, आधुनिक प्रगतिशील भारताची मानसिकता घडवण्याचा विचार डोळ्यांसमोर ठेवल्याचेही दिसते. आपल्या जुन्या सांस्कृतिक वैभवाचा गौरव करतानाच या चिंतनशील गीतकारांनी समाजात नवी जीवनमूल्ये रुजवण्याचाही प्रयत्न केल्याचे पुरावे अनेक गाण्यात दिसतात. राधू कर्माकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जिस देशमे गंगा बहती हैं’मध्ये शैलेन्द्रने राजकपूरसाठी लिहिलेल्या गाण्यातल्या ओळी प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान जागृत करणाऱ्या होत्या -“होठोंपे सच्चाई रहती है,जहाँ दिलमें सफ़ाई रहती है,हम उस देशके वासी हैं,जिस देशमें गंगा बहती है.”शैलेंद्रसाहेबांनी गाण्यात भारताचे नेमके वेगळेपण केवळ ४ ओळीत मांडले होते. ‘सर्व दिशांनी चांगले विचार आमच्याकडे येऊ देत’ या ऋग्वेदातील (१.८९.१) प्रार्थनेला सूचित करतानाच, भारतावर हिंसक, क्रूर आक्रमणे करणाऱ्यांनाही या सहिष्णू समाजाने कसे सामावून घेतले, चिनी किंवा रशियन क्रांतीसारखे केवळ पोट भरण्याच्या इहवादी तत्त्वज्ञानाला कसे बाजूला ठेवले इत्यादी सर्व शैलेन्द्रजी अत्यंत कलात्मकपणे सूचित करतात. एका कडव्यात ते म्हणतात -“जो जिससे मिला सिखा हमने,गैरोंको भी अपनाया हमने,मतलबके लिये अंधे होकर,रोटीको नही पूजा हमने.”असेच एक गाणे होते १९६० सालच्या ‘हम हिंदुस्तानी’मध्ये! परंतु ‘हम हिंदुस्तानी’ हा नावावरून वाटतो तसा काही देशप्रेमावरचा सिनेमा नव्हता. ज्यांनी १९५६ला ‘जागृती’ काढून फिल्मफेयरचे १९५६चे सर्वोत्कृष्ट चित्रपट पारितोषिक जिंकले होते त्या सशाधर मुखर्जीनीच ‘हम हिंदुस्तानी’ काढला होता. दिग्दर्शक होते राम मुखर्जी. सुनील दत्त, आशा पारेख, जॉय मुखर्जी प्रमुख भूमिकेत असलेल्या या सिनेमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे यात हेलन चक्क जॉय मुखर्जीच्या नायिकेच्या भूमिकेत होती. दुर्दैवाने तिला उत्तम अभिनय करूनही परत कधीच असा रोल मिळाला नाही. संजीवकुमारचा हा पहिला चित्रपट.‘हम हिंदुस्तानी’ ही एका धोकेबाज व्यक्तीने केलेल्या श्रीमंत वडिलांच्या फसगतीमुळे त्यांच्या दोन मुलांना भोगाव्या लागलेल्या अडचणीची कथा होती. बासू पोरीबर या १९५२च्या मूळ बंगाली सिनेमाचा हा रिमेक होता. सर्वांचा अभिनय उत्कृष्ट झाला व सिनेमाने धंदाही चांगला केला. गीतकार होते राजेंद्र कृष्ण, साहीर लुधियानवी आणि प्रेम धवन. संगीत होते जद्दनबाई आणि सरस्वतीदेवी यांच्यापाठोपाठ संगीत क्षेत्रात आलेल्या तिसऱ्या महिला संगीत-दिग्दर्शिका उषा खन्ना यांचे!प्रेम धवन यांचे एक गाणे आजही रसिकांच्या मनात ताजे आहे. उद्याच्या प्रजासत्ताकदिनी ते कदाचित अनेकदा ऐकायलाही मिळेल. त्या गाण्याच्या आशयाला १००% न्याय देणारा सात्त्विक, नितळ आवाज होता मुकेशचंद्र माथुर यांचा. स्वतंत्र भारताच्या सगळ्या नागरिकांना एक प्रेरणादायी आवाहन करणारे धवनसाहेबांचे शब्द होते -‘छोड़ो कलकी बातें, कलकी बात पुरानी,नए दौरमें लिखेंगे, मिलकर नई कहानी,हम हिन्दुस्तानी, हम हिन्दुस्तानी...’इंग्रजी राजवटीमधला देशाच्या गुलामीचा इतिहास विसरून नव्या दिशेने प्रगतीची घोडदौड गाठणे हेच आपले ध्येय हवे हे सांगताना कवी जगात सुरू असलेल्या तत्कालीन वैज्ञानिक प्रगतीचीही नोंद घेतात. अमेरिकेचे ‘अपोलो-११’ हे अंतराळयान चंद्रावर उतरले ते १९६९ साली. पण जगभर सुरू असलेल्या अंतराळ संशोधनाची आठवण भारतीय तरुणांना १९६० सालीच करून देताना ते म्हणतात, जग चंद्रलोकाच्या दारात पोहोचले आहे. आपण या जगाशी नाते जोडून वेगाने पुढे गेले पाहिजे. जुनी बंधने झुगारून दिली पाहिजेत.‘आज पुरानी ज़ंजीरोंको तोड़ चुके हैं,क्या देखें उस मंज़िलको जो छोड़ चुके हैं,चांदके दरपर जा पहुँचा है आज ज़माना,नए जगतसे हम भी नाता जोड़ चुके हैं.नया खून है, नई उमंगें, अब है नई जवानी,हम हिन्दुस्तानी...’आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा जपत नवी स्वप्ने साकार करायची आहेत हे सांगताना ते विन्ध्य पर्वत ओलांडणाऱ्या, एका घोटात समुद्राचे सर्व पाणी पिऊन टाकणाऱ्या अगस्ती ऋषींचा पराक्रमही सुचीत करताना म्हणतात -‘हमको कितने ताजमहल हैं और बनाने,कितनेही अजंता हमको और सजाने,अभी पलटना है रुख कितने दरियाओंका,कितने पवर्त राहोंसे हैं आज हटाने,नया खून है...’चित्रपटासाठी गीतलेखन एवढे एकच क्षेत्र निवडले असतानाही तत्कालीन कवी किती सजगपणे आजूबाजूच्या नव्या जगाकडे पाहत होते हे पुढच्या कडव्यात लक्षात येते. भारतात शारीरिक कष्टाच्या कामांना कमी लेखले जायचे. आता आधुनिक भारताने पाश्चिमात्यांकडून श्रमप्रतिष्ठेचे मूल्यही शिकावे अशी कवीची इच्छा आहे -‘आओ मेहनतको अपना ईमान बनाएँ,अपने हाथोंको अपना भगवान बनाएँ,रामकी इस धरतीको, गौतमकी भूमिको,सपनोंसे भी प्यारा हिंदुस्तान बनाएँ,नया खून है....’आपल्याला लाभलेल्या विपुल नैसर्गिक संपत्तीची आठवण कवी करून देतो. गंगा यमुनेसारख्या मोठ्या नद्यांच्या पाण्याचा योग्य वापर करून शेती वाढवली पाहिजे असेही त्याचे आवाहन आहे-‘हर ज़र्रा है मोती आँख उठाकर देखो,माटीमे सोना है हाथ बढ़ाकर देखो,सोनेकी ये गंगा है, चांदीकी यमुना,चाहो तो पत्थरसे धान उगाकर देखो,नया खून है...’सर्व जगभर पसरलेल्या इंग्रजी साम्राज्याशी लढा देऊन आपण स्वातंत्र्य मिळवले आहे तर आता पूर्वीची गुलामीची मानसिकता घालवून विजयी वृत्ती अंगीकारली पाहिजे असेही तो बजावतो.‘फिल्मीस्तान’च्या १९५४ साली आलेल्या ‘जागृती’चे गीतकार कवी प्रदीप यांच्यासारखी ‘दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल’ टाईप व्यक्ती केंद्रित, व्यक्तिपूजक मांडणी न करता प्रेम धवनजी देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या क्रांतिकारकांनाही त्यांचे श्रेय द्यायला विसरत नाहीत. ‘अनेक घरांनी त्यांचे कुलदीपक विझवून देशाच्या स्वातंत्र्याचे दीप उजळले आहेत’ याची आठवण करून देताना ते म्हणतात-‘दाग गुलामीका धोया है जान लुटाके,दीप जलाए हैं ये कितने दीप बुझाके,ली है आज़ादी तो फिर इस आज़ादीको,रखना होगा हर दुश्मनसे आज बचाके,नया खून है...’ आज तरुण पिढी देशासाठी मोठमोठी स्वप्ने पाहत असताना देशविरोधी राजकारणी मात्र भाषा, जात, प्रदेश या निकषावर देशाची एकात्मता खिळखिळी करताना दिसतात. आपण या दुष्प्रवृत्तीना“छोडो कलकी बाते, कलकी बात पुरानी”असे बजावणार आहोत की नाही? हाच महत्वाचा प्रश्न आहे.
Ahilyanagar Drugs Case : एमडी ड्रग्स प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारीच आरोपी निघाल्याने खळबळ
Shahid Afridi Statement : “आयसीसी दुटप्पी वागतंय!”बांगलादेशच्या हकालपट्टीवर शाहिद आफ्रिदीचा संताप
Shahid Afridi statement : शाहिद आफ्रिदीच्या मते आयसीसीने बांगलादेशचा समस्या समजून घ्यायला हवी होती.
शीख गुरुपरंपरेचा देदीप्यमान वारसा
शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेगबहादूर यांना संपूर्ण भारतात “हिंद द चादर” (भारताचे संरक्षक) म्हणून ओळखले जाते. त्यांचे स्थान केवळ शीख इतिहासातच नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदराचे आहे. मानवी सन्मान, श्रद्धा स्वातंत्र्याचे ते सर्वोच्च रक्षक होते. श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्ताने ‘हिंद द चादर’ अंतर्गत नांदेड येथे काल आणि आज मोठा समारोह होतो आहे. त्यानिमित्त शीख गुरुपरंपरेचा देदीप्यमान वारसा सांगणारा हा लेख -धराव्या शतकाचा काळ हा भारतवर्षासाठी अत्यंत कठीण होता. वायव्येकडून येणारी इस्लामी आक्रमणे राज्य काबीज करत होती आणि इथल्या श्रद्धा आणि संस्कृतीचाही विध्वंस करत होती. अशा धामधुमीच्या काळात, जे)व्हा सर्वसामान्य माणूस भयाखाली जगत होता, तेव्हा पंजाबच्या मातीतून गुरू नानक देवजींच्या रूपाने स्वाभिमानाचा एक नवा हुंकार उमटला. त्यांनी दिलेला विचार हा असा आध्यात्मिक मार्ग होता ज्याने परकीय सत्तेच्या कट्टरतेला एक वैचारिक आणि कृतिशील आव्हान दिले. इथूनच दहा गुरूंच्या कार्याचा तो प्रवास सुरू झाला, ज्याने मानवी संस्कृतीच्या जडणघडणीत एक ज्वलंत इतिहास निर्माण केला.गुरू नानक देव (१४६९-१५३९)शीख धर्माचे प्रवर्तक गुरू नानक देवजी यांचा काळ हा बाबराच्या आक्रमणांचा काळ होता. परकीय आक्रमक जेव्हा इथल्या मंदिरांचा आणि संस्कृतीचा विध्वंस करत होते, तेव्हा नानकजींनी त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. ईश्वराला ‘अकाल पुरख’ (काळाच्या पलीकडे असलेला) संबोधून त्यांनी स्पष्ट केले की, मानवी सत्ता ही क्षणभंगुर आहे आणि केवळ सत्यच शाश्वत आहे. त्यांनी विखुरलेल्या समाजाला ‘नाम जपो’, ‘किरत करो’ आणि ‘वंड चखो’ ही त्रिसूत्री देऊन पुन्हा संघटित केले. त्यांच्या मक्का-मदिनापासून हिमालयापर्यंतच्या यात्रा अर्थात उदासिया या केवळ धार्मिक नव्हत्या, तर त्या परकीय विचारसरणीच्या कट्टरतेला दिलेले एक प्रखर वैचारिक आव्हान होते.गुरू अंगद देव (१५०४-१५५२)परकीय आक्रमणांमुळे इथल्या स्थानिक भाषा आणि लिपींवर मोठे संकट आले होते. अशा वेळी गुरू अंगद देवजींनी ‘गुरुमुखी’ लिपीला प्रोत्साहन देऊन आपली स्वतंत्र ओळख टिकवून धरली. आक्रमकांच्या वाढत्या दहशतीला आणि जुलुमाला तोंड देण्यासाठी केवळ शांत राहून चालणार नाही, हे ओळखून त्यांनी ‘मल्ल आखाडे’ सुरू केले. तरुणांना शारीरिकदृष्ट्या सक्षम करणे, हे इस्लामी कट्टरतेच्या काळात स्वधर्माच्या रक्षणासाठी उचललेले पहिले क्रांतिकारी पाऊल होते.गुरू अमर दास (१४७९-१५७४)इस्लामी कट्टरता जेव्हा समाजात फूट पाडत होती, तेव्हा गुरू अमर दासजींनी सामाजिक एकतेचे कवच उभे केले. “पहिले पंगत, पाठी संगत” अर्थात “प्रथम सर्वांसोबत पंगतीत बसून भोजन करा आणि त्यानंतरच गुरूंची भेट घ्या” हा नियम लावून त्यांनी समाजातील सर्व भेद मोडून काढले, जेणेकरून समाज आक्रमकांविरुद्ध एकसंध राहू शकेल. त्यांनी २२ ‘मंजी’ (प्रचार केंद्रे) स्थापन करून एक भक्कम संघटनात्मक जाळे विणले.गुरू राम दास (१५३४-१५८१)चौथ्या गुरू राम दासजींनी अमृतसर शहराची आणि ‘अमृत सरोवर’ या जलाशयाची निर्मिती केली. त्यांनी अमृतसर या पवित्र शहराची निर्मिती करून शिख परंपरेला एक जागतिक ओळख मिळवून दिली. हे धार्मिक शहर एका नव्या आत्मबळाचे उगमस्थान झाले. परकीय संस्कृतीच्या प्रभावापासून अलिप्त राहून स्वतःची स्वतंत्र ओळख जपण्यासाठी त्यांनी विवाहासाठी ‘लावा’ या पवित्र फेऱ्यांची रचना केली. त्यांनी सुरू केलेली ‘मसांद’ व्यवस्था ही समाजातील गरजूंच्या मदतीसाठी आणि संघर्षासाठी लागणारी रसद उभी करण्याचे एक पारदर्शक साधन बनली.गुरू अर्जन देव (१५६३-१६०६)पाचवे गुरू अर्जन देवजी यांचा काळ हा शीख परंपरेतील संघर्षाचा सर्वोच्च बिंदू ठरला. मुघल सम्राट जहांगीरच्या धार्मिक कट्टरतेच्या धोरणामुळे शिखांचे वाढते सामर्थ्य त्याच्या डोळ्यांत खूपत होते. गुरुजींनी ‘आदी ग्रंथा’चे संकलन करून एका महान भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले, ज्यात महाराष्ट्राचे संत नामदेव, कबीर आणि रविदास यांच्या वाणीचा समावेश होता. जहांगीरने जेव्हा गुरुजींवर इस्लामी धर्मांतराचा दबाव आणला, तेव्हा त्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. परिणामी, त्यांना तप्त लोखंडी तव्यावर बसवून अमानुष छळ करून शहीद करण्यात आले. हे शीख इतिहासातील परकीय सत्तेविरुद्ध दिलेले पहिले सर्वोच्च बलिदान ठरले, ज्याने भक्तीच्या प्रवाहात शौर्याचे रक्त मिसळले. गुरू अर्जन देवजींच्या बलिदानाने भारतीय इतिहासाला एक अभूतपूर्व वळण दिले. केवळ शांतता आणि आध्यात्मिक उपदेशांनी परकीय आक्रमकांचे हृदयपरिवर्तन होणार नाही, तर आता ‘शस्त्राने शास्त्र’ वाचवण्याची वेळ आली आहे, हे शीख परंपरेने ओळखले. भक्तीच्या प्रवाहातून आता शौर्याची तलवार तळपू लागली होती.गुरू हरगोविंद सिंग (१५९५-१६४४)पाचव्या गुरूंच्या शहादतीनंतर गुरू हरगोविंद सिंगजी यांनी शीख धर्माला एक नवे सामर्थ्य दिले. त्यांनी गादीवर बसताना दोन तलवारी धारण केल्या, एक ‘मीरी’ (राजकीय व ऐहिक सत्ता) आणि दुसरी ‘पिरी’ (आध्यात्मिक अधिकार). यातून त्यांनी स्पष्ट संदेश दिला की, संत असणे म्हणजे दुबळे होणे नव्हे. त्यांनी अमृतसरमध्ये ‘अकाल तख्त’ स्थापन केले, जे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे सर्वोच्च केंद्र बनले. मुघल सत्तेच्या अत्याचारांना आव्हान देत त्यांनी शिखांचे एक शिस्तबद्ध सैन्य उभे केले आणि अनेक लढायांमध्ये परकीय आक्रमकांचा पराभव करून भारतीय शौर्याचा दबदबा निर्माण केला.गुरू हर राय (१६३०-१६६१)सहाव्या गुरूंनी निर्माण केलेली लष्करी शक्ती सातवे गुरू हर रायजी यांनी अधिक सुव्यवस्थित केली. मुघल राजपुत्र दारा शुकोह याने जेव्हा मुघल सत्तेच्या अंतर्गत संघर्षात आश्रय मागितला, तेव्हा त्यांनी त्याला मदत केली, जे मुघल कट्टरतेच्या विरोधात उभे राहण्याचे एक धाडसी पाऊल होते.गुरू हरकिशन (१६५६-१६६४)गुरू हर राय जींच्या पश्चात त्यांचे कनिष्ठ सुपुत्र गुरू हरकिशनजी गुरुपदी आले. त्यांना ‘बाल गुरू’ म्हणून ओळखले जाते कारण वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी ही जबादारी स्वीकारली. दिल्लीतील वास्तव्यादरम्यान जेव्हा शहरात देवीची (Smallpox) मोठी साथ पसरली होती, तेव्हा त्यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली आणियाच सेवाकार्यात वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी देह ठेवला.गुरू तेग बहादूर (१६२१-१६७५)मुघल सम्राट औरंगजेबाच्या सक्तीच्या धर्मांतराच्या धोरणामुळे जेव्हा काश्मिरी पंडितांवर संकट आले, तेव्हा नववे गुरू तेग बहादूरजी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. धार्मिक स्वातंत्र्य जपण्यासाठी दिलेले हे बलिदान अद्वितीय होते. दिल्लीच्या चांदीनी चौकात औरंगजेबाच्या कट्टरतेला न झुकता त्यांनी दिलेले बलिदान या मातीचा स्वाभिमान जागवणारे ठरले. म्हणूनच त्यांना अत्यंत गौरवाने ‘हिंद दी चादर’ अर्थात हिंदू धर्माचे रक्षक असे म्हटले जाते.गुरू गोविंद सिंग (१६६६-१७०८)दहावे गुरू गोविंद सिंगजी हे शौर्य आणि कतृत्वाचे शिखर होते. १६९९ च्या वैशाखीदिनी त्यांनी ‘खालसा पंथ’ स्थापन करून एका अशा सशस्त्र दलाची निर्मिती केली, ज्याने मुघलांचे अस्तित्व संपवण्याची शपथ घेतली. त्यांनी ‘पंज प्यारे’ निवडून जातिभेद मुळापासून उपटून टाकला आणि सर्वांना ‘सिंग’ व ‘कौर’ ही आडनावे देऊन एक नवी ओळख दिली. त्यांनी शिखांसाठी पाच ‘ककार’ अर्थात केश, कंगा, कडा, कचेरा आणि किरपाण अनिवार्य केले. आपल्या चारही पुत्रांचे बलिदान धर्मासाठी देऊनही खचून न जाता ते आजीवन मुघलांशी लढत राहिले. त्यांनी औरंगजेबाला ‘झफरनामा’ लिहून त्याच्या अन्यायाची आणि नैतिक पराभवाची जाणीव करून दिली.गुरू ग्रंथ साहिब : शब्दांचे चिरंतन अधिष्ठानगुरू गोविंद सिंगजींनी नांदेड येथे आपल्या आयुष्याचा अंतिम काळ व्यतीत केला. येथेच त्यांनी जाहीर केले की, यापुढे कोणताही देहधारी गुरू नसेल. त्यांनी ‘आदि ग्रंथा’ला ‘गुरू ग्रंथ साहिब’ म्हणून मान्यता दिली आणि त्यांना शिखांचे जिवंत आणि शाश्वत गुरू घोषित केले. हा ग्रंथ केवळ गुरूंची वाणी नाही, तर त्यात संत नामदेव, कबीर, रविदास अशा अनेक महान संतांच्या विचारांचा संगम आहे. हा पवित्र ग्रंथ आजही समता, सेवा आणि निर्भयतेचा मार्ग दाखवत आहे. गुरू नानक देवजींनी पेरलेले मानवतेचे बीज गुरू गोविंद सिंगजींच्या काळापर्यंत एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले होते, ज्याची सावली आजही संपूर्ण जगाला शांती आणि एकात्मतेचा संदेश देत आहे. परकीय आक्रमणे आणि कट्टरतेच्या काळात या गुरुपरंपरेने दिलेला लढा आजही भारताच्या अस्मितेचा आधारस्तंभ आहे.
Padma Awards : केंद्र सरकारकडून २०२६ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे
कशी केली ओंकारने प्राध्यापकाची हत्या ? पोलिसांना दिली माहिती
मुंबई : मालाड स्टेशनवर शनिवारी रात्री प्राध्यापक आलोक सिंह यांची हत्या झाली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी ओंकार शिंदे (२७) याला अटक केली आहे. ट्रेनमधून उतरताना धक्का लागल्यावरुन वाद झाला आणि ओंकारने प्राध्यापक आलोक सिंह यांची हत्या केली. पोलिसांनी प्राध्यापकाच्या हत्येप्रकरणी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. सध्या आरोपीची बोरिवली पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.https://www.youtube.com/shorts/tWBqh0jK-q4हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला होता. पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली. फक्त ट्रेनमधून उतरताना धक्का लागला म्हणून ओंकारने हत्या केली की या हत्येमागे वेगळे कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरं देताना आरोपी ओंकारने धक्कादायक माहिती दिली आहे. प्राध्यापकाची हत्या कशा प्रकारे केली याची सविस्तर माहितीच ओंकारने पोलिसांना दिली आहे.https://www.youtube.com/shorts/oxHYYwCYW3oओंकारने चाकूने नाही तर चिमट्याने केली हत्याप्राध्यापक आलोक सिंह आणि ओंकार शिंदे हे योगायोगाने एकाच लोकमधून प्रवास करत होते. ट्रेनमधून उतरण्याच्यावेळी चुकून धक्का लागण्याचे निमित्त झाले. ओंकार आणि आलोक सिंह यांच्यात धक्का लागण्यावरुन वाद झाला. वाद वाढला आणि ओंकारने लोकल मालाड स्टेशनजवळ असताना स्वतःकडे असलेल्या टोकदार हत्याराने आलोक यांच्यावर एकच जीवघेणा वार केला. हा वार इतका भयंकर होता की अलोक यांच्या पोटातून रक्ताची धार सुटली. हल्ला झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सावरत कसा बसा प्लॅटफॉर्म गाठला. ते तेथील बाकड्यावर जाऊन बसले. पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने अलोक यांचा जागीच मृत्यू झाला.ओंकारने आलोक यांच्या पोटात एक टोकदार वस्तू जोरात खुपसली. या जोरात झालेल्या आघातामुळे गंभीर जखमी झालेल्या आलोक यांचा प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे थोड्याच वेळात मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपी ओंकार विरोधात पोलीस कारवाई सुरू आहे. ओंकारवर पोलिसांनी प्राध्यापक आलोक सिंह यांच्या हत्येचा आरोप ठेवला आहे.https://www.youtube.com/shorts/5rf9zIVuZFYओंकारने कुठुन आणला चिमटा ?ओंकार शिंदे दक्षिण मुंबईतील खेतवाडी परिसरातील एका कारखान्यात नोकरी करतो. त्याच्याकडे हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी टोकदार चिमटा होता. या चिमट्याचा वापर करुन ओंकारने प्राध्यापक आलोक सिंह यांच्या पोटात जोरदार वार केला. चिमटा टोकदार होता आणि तो वेगाने तो पोटात खोलवर घुसला. यामुळे पोटातून भळाभळा रक्त वाहू लागले आणि थोड्याच वेळात आलोक यांचा मृत्यू झाला.कोण होते प्राध्यापक आलोक सिंह ?नरसी मोनजी कॉलेज, विलेपार्ले येथे २०२४ पासून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. स्वभावाने शांत, दयाळू आणि सभ्य होते.वाद करणे, म्हणणे पटवून देण्यासाठी युक्तिवाद करत बसणे असा आलोक यांचा स्वभाव नव्हता. ते साधे होते आणि कोणावरही कधी संतापत नव्हते; अशी माहिती त्यांना ओळखणाऱ्यांनी दिली आहे.आलोक सिंह शनिवार २४ जानेवारी २०२६ रोजी रात्री विलेपार्ले स्टेशनवरुन बोरिवलीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले. मालाड स्टेशनवर आलोक यांची हत्या झाली.आलोक यांचे काकाही प्राध्यापक होते. जेमतेम दोन वर्षांपूर्वी आलोक यांचे लग्न झाले होते. पण शनिवारी घडलेल्या घटनेमुळे आलोक यांच्या नातलगांना जबर धक्का बसला आहे.
Pakistan Squad Announce : टी-२० वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर! ‘या’स्टार खेळाडूंना दिला डच्चू
Pakistan Squad Announce : पीसीबीने आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी पाकिस्तानचा संघ जाहीर केला आहे.
Canada PM Mark Carney : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबतच्या व्यापार करारामुळे १००% कर लादण्याची धमकी कॅनडाला दिली आहे.
Hrithik Roshan Get Injured: हृतिक रोशनला दुखापत; व्हिडिओ व्हायरल
Hrithik Roshan Get Injured: अभिनेता हृतिक रोशनच्या पायाला दुखापत झाली आहे, सध्या सोशल मिडियावर त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
खेळ खेळूया शब्दांचाशब्दांवर साऱ्यांची मालकीतीन अक्षरी शब्दांची ही‘की’ची करामत बोलकीदाराची बहीण कोणतिला म्हणतात खिडकीमातीची भांडी कसली?ही तर आहेत मडकीस्वतःभोवती फिरण्यालाघेतली म्हणतात गिरकीकापसाच्या बीला येथेसारेच म्हणतात सरकीलावणीच्या ठसक्यालाघुंगरांच्या सोबत ढोलकीझोप डोळ्यांवर आली कीजो तो घेतो डुलकीढोंगी मनुष्य दिसताचआला म्हणतात नाटकीएखाद्याची परिस्थितीसुद्धाअसते बरं फाटकीनाकातला छोटा अलंकारत्याला म्हणतात चमकीछोट्याशा तालवाद्यालाम्हणतात खरं टिमकीखेळात शब्दांची अशीजेव्हा बसते अंगतपंगतशब्दांशी होते मैत्रीखेळाला चढते रंगत.
प्रतिभारंग,प्रा. प्रतिभा सराफमाझ्या घरी संध्याकाळी जेवायला पाहुणे येणार होते. आज संध्याकाळी बागेत फेरफटका मारता येणार नाही, असे वाटत असतानाच अर्ध्यापेक्षा जास्त स्वयंपाक झालेला होता. म्हणून अर्धा तास का होईना जवळच्या बागेत फिरायला जायचा निर्णय घेतला, जो चांगलाच पथ्यावर पडला. म्हणजेच झाले काय की नेहमी बागेत गेल्यावर फिरायला येणाऱ्या मैत्रिणी सोबतीने चालतात. तिथे येणाऱ्या पंधरा-सोळा मैत्रिणींपैकी कोणी ना कोणीतरी सोबत असतेच. मग काय त्याच त्याच गप्पा, खाणे-पिणे आणि मुले-बाळे. तरी अस्वस्थता होतीच की आपण तासभर लवकर आल्यामुळे या सगळ्या भेटणार नाहीत आणि शिवाय एकटीलाच फिरावे लागेल म्हणून...! पण बागेत शिरतानाच आमच्या सोसायटीतील शंकर एम. माझ्या सोबतीने बागेत शिरले. खरे तर खूप दिवसांनी भेटले होते. त्यामुळे मीही त्यांच्या चालीने (म्हणजे ते हळू चालत होते) चालू लागले. पंच्याहत्तरीच्या आसपासचे हे गृहस्थ वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारू लागले. त्यांनी मला अचानक विचारले, ‘अलीकडे कोणतं नाटक पाहिलं?होय, पण मी तुम्हाला सांगायचे विसरले की ते तमिळ भाषिक असूनही अतिउत्कृष्ट मराठी बोलायचे. मी क्षणभर विचार करू लागले आणि मला खरंच काही आठवेचना... शेवटचे नाटक मी कोणते आणि कधी पाहिले? मग मीच त्यांना प्रतिप्रश्न केला, “तुम्ही कोणतं नाटक पाहिलं?” अगदी सहजतेने ते उत्तरले,“श्श… घाबरायचं नाही.”‘श्श’चा त्यांनी केलेला उच्चार कौतुकास्पद होता. मी विचारले, “अशा नावाचं नाटक आहे?”“आहे ना आम्ही बघून आलो. त्यात डाॅ. गिरीश ओक यांनी काम केलेलं आहे.”“वाह, काय सांगताय?”“मग कसलं भन्नाट नाटक आहे. त्याचं दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे... अफलातून...!”“बापरे... तुम्ही फक्त नाटक पाहत नाही तर या पण गोष्टी पाहता का?”“होय म्हणजे काय रत्नाकर मतकरी माझे आवडते लेखक आहेत त्यांच्या गूढ कथेवरील हे नाटक!”मलाच ‘श्श’ केल्यासारखं त्यांनी जणू गप्प करून टाकले आणि ‘घाबरायचं नाही’ असं नाटकाचे नाव असले तरी मी मात्र आपल्याकडे काहीच नसलेल्या ज्ञानामुळे प्रचंड घाबरले. शंकर एम. यांच्या लक्षात काही आले नाही. ते एका वेगळ्याच विश्वात गेलेले होते. त्यांनी मला विचारले,“डॉ. वसंतराव देशपांडे यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकात भूमिका केलेली ज्याचे कमीत कमी पाच प्रयोग मी पाहिले.”“क्काय...?”मी चित्कारले.“त्यांची ‘खानसाहेब’ची भूमिका प्रचंड गाजली. सगळी लोकप्रियता मिळलेली नाटकं तर मी पाहिलीच आहेत; परंतु नवीन आलेलं नाटक मी सोडत नाही.”“म्हणजे?” माझा बावळट प्रश्न.“म्हणजे असं की महिन्याला कमीत कमी तीन नाटकं तरी मी पाहतोच.”“कुठे जाऊन पाहता?”“शिवाजी मंदिर, साहित्य संघ, विष्णुदास भावे... अगदी पार्ला- बोरिवलीपर्यंत मी जातो.”बीआरसीतून सायंटिफिक ऑफिसर होऊन निवृत्त झालेले शंकर एम. माझ्यासारख्या मराठी माणसाला, मराठी नाटकाविषयीची माहिती देत होते आणि या संभाषणाचे विशेष म्हणजे ती माहिती माझ्या ज्ञानात भर घालत होती.“वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट आलेला होता. ‘वसंतराव’ माझ्या आवडते म्हणून मी मुद्दाम जाऊन पाहिला. या चित्रपटात त्यांच्या नातवाने म्हणजे राहुल देशपांडे यांनी वसंतराव साकारला आहेत.”मी फक्त “हो का?”, “असं का?”, असे म्हणत राहिले.‘डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘रमेश भाटकर’, ‘प्रशांत दामले’, ‘दिलीप प्रभावळकर’, ‘सुलभा देशपांडे’, ‘अलका कुबल’ इत्यादींच्या गाजलेल्या भूमिका, त्यांच्या नाटकांची नावे, त्या नाटकांचे नेपथ्य, त्या नाटकांचे लेखक....इ. काही काहीही विचारा, इतके त्यांना ज्ञान!खरंतर बागेत जाऊन दोन फेऱ्या मारून मी घरी परतणार होते. त्यांच्याशी बोलता बोलता नऊ फेऱ्या मारल्या. घरी पाहुणे यायचे होते म्हणून नाईलाजाने घरी परतले. स्वयंपाकघरात शिरले ते रात्री उशिरापर्यंत कामात होते. रात्रीचा १ वाजला होता तेव्हा बिछान्यावर पडले आणि मोबाईल हातात घेऊन गुगल गुरूला विचारले- मुंबईत चालू असलेले मराठी नाटक कोणते?गुगल गुरूने काय उत्तर दिले, हे महत्त्वाचे नाही; परंतु हे महत्त्वाचे आहे की एक मराठी माणूस म्हणून मी कमीत कमी महिन्यातून एक तरी मराठी नाटक पाहिले पाहिजे, असा निश्चय करूनच त्यादिवशी झोपले!मग माझ्यासारखा निर्णय घेऊन, तुम्ही कधी आपला निर्णय अमलात आणताय? चला... आपण सोबतीनेच मराठी नाटक पाहूया!
गोष्ट लहान, अर्थ महान,शिल्पा अष्टमकर‘चांगले तेवढे घ्यावे’ ही म्हण आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आजूबाजूच्या जगात आपण अनेक लोक, घटना, विचार, अनुभव आणि परिस्थिती पाहतो. त्यापैकी सर्वच गोष्टी आपल्यासाठी योग्य किंवा उपयुक्त असतीलच असे नाही. म्हणूनच जे चांगले, योग्य आणि उपकारक आहे तेवढेच स्वीकारण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीकडे काही चांगले गुण असतात तशाच काही उणिवाही असतात. आपण इतरांच्या उणिवांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांच्या चांगल्या गुणांकडून प्रेरणा घ्यावी. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती शिस्तप्रिय असेल तर तिच्याकडून शिस्त शिकावी, तर एखादी व्यक्ती कष्टाळू असेल तर तिच्याकडून मेहनतीची सवय आत्मसात करावी. जीवनातील अनुभवही आपल्याला बरेच काही शिकवतात. काही अनुभव आनंददायी असतात तर काही कटू. आनंददायी अनुभव आपल्याला सकारात्मकता देतात, तर कटू अनुभव आपल्याला सावध राहायला, चुका टाळायला शिकवतात. दोन्ही अनुभवांतून जे चांगले शिकता येईल ते घ्यावे आणि नकारात्मक गोष्टी मागे टाकाव्यात. आजच्या डिजिटल युगात माहितीचा महापूर आहे. सोशल मीडिया, टीव्ही, इंटरनेट यांवर अनेक चांगल्या-वाईट गोष्टी दिसतात. अशावेळी योग्य-अयोग्य याची ओळख करून घेऊन सकारात्मक, ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी गोष्टींचाच स्वीकार करणे फार गरजेचे आहे. ‘चांगले तेवढे घ्यावे’ या विचारामुळे आपले व्यक्तिमत्त्व अधिक सुसंस्कृत, सकारात्मक आणि संतुलित बनते. त्यामुळे जीवनात यश, समाधान आणि आनंद प्राप्त होतो. म्हणूनच नेहमी विवेकबुद्धी वापरून चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यात आणि उर्वरित गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. बिहारमधील एका शहरातील ही कथा. त्या शहरातील एका छोट्याशा वाडीत सूरजकुमार नावाचा एक सद्गुणी तरुण राहात होता. जगातील सर्व आदर्शवत गुण त्याच्या ठायी होते. सूरजकुमारचे पालक तसे अशिक्षित व परिस्थितीने सामान्य होते. आजूबाजूचे वातावरण काही तेवढे आदर्श नव्हते; असे असताना सूरजकुमारच्या या वागण्याचे सर्वांना आश्चर्य वाटायचे.एकदा एका गृहस्थाने सूरजकुमारला विचारले,“बाबा रे, तुला एवढ्या चांगल्या रीतीभाती कोणी शिकवल्या? इतके सद्गुण तू कोणापासून घेतलेस?”त्या गृहस्थाचा हा प्रश्न ऐकून. तो तरुण नम्रपणे म्हणाला,“आपण म्हणता तेवढा मी काही गुणवान नाही. पण आज माझ्या ठिकाणी काही चांगले गुण आहेत, ज्या चांगल्या गोष्टी दिसून येतात, त्याचे श्रेय आजूबाजूच्या एका असंस्कृत, दुर्गुणी माणसाला आहे.”सूरजकुमारच्या या उत्तराने त्या गृहस्थाला खूपच आश्चर्य वाटले. तो गृहस्थसूरजकुमारला म्हणाला,“असंस्कृत व दुर्गुणी माणसाकडून तू सद्गुण कसे काय घेतलेस?”त्यावर सूरजकुमार त्याला म्हणाला,“माझ्या समोर राहणाऱ्या त्या असंस्कृत व दुर्गुणी माणसावर आजूबाजचे लोक टीका करीत. त्यामुळे वाईट काय व चांगले काय याविषयी मला विचार करणे शिकायला मिळाले. वाईट गोष्टींपासून मी अलिप्त राहिलो आणि सद्गुणांचा मी स्वीकार केला. ते सद्गुण मी आत्मसात केले. त्यामुळे आज माझ्या अंगी चांगले गुण आढळतात. या सर्वांचे श्रेय मी त्या माझ्या समोरच्या असंस्कृत माणसालाच देतो.”● तात्पर्य :समाजामध्ये चांगल्या व वाईट दोन्ही प्रवृत्तीचे लोक असतात. आपण त्यांच्याकडून सद्गुण घ्यावेत की दुर्गुण घ्यावेत हे प्रत्येक व्यक्तीने ठरवायचे असते.विचार : माणूस वाईट नसतो, तर त्याच्यातील वृत्ती वाईट असतात; म्हणून माणसाचा तिरस्कार न करता वाईट वृत्तीचा तिरस्कार करा.
कथा,रमेश तांबेराजूला गोष्टीची पुस्तकं वाचायचा खूपच नाद होता. राक्षस-परीच्या गोष्टी तर त्याला खूपच आवडायच्या. शिवाय भुताखेताच्या गोष्टी वाचतानाही तो अगदी देहभान विसरून जायचा. एके दिवशी तो एक पुस्तक वाचत बसला होता. ते पुस्तक होतं राजपुत्र आणि अगडबंब राक्षस यांचं! बराच वेळ झाला होता. राजू पुस्तक वाचता वाचता अगदी मंत्रमुग्ध झाला होता. गोष्टीतल्या राक्षसाने त्या गरीब राजपुत्राला दरडावून सांगितले, “राजपुत्रा गपगुमान माझ्या मागून चालत ये; नाही तर इथल्या इथेच तुझा निकाल लावतो. राक्षसाची धमकी ऐकून राजपुत्र खूपच घाबरला. त्याचे हातपाय थरथरू लागले. भीतीने त्याचा चेहरा पांढराफटक पडला. तो रडू लागला, मदतीसाठी हाका मारू लागला. पण कोणीच त्याच्याजवळ नव्हते, ना सैनिक ना सेनापती! त्यामुळे शेवटी राजपुत्राने विचार केला इथून पळूनही जाता येणार नाही. आता राक्षस जिथे नेईल तिथेच जावं लागेल असं म्हणत राजपुत्र राक्षसाच्या मागे निघाला. आता आपणच संकटात सापडलेल्या त्या बिचाऱ्या राजपुत्राला मदत केली पाहिजे असे राजूला वाटू लागले. मग राजूदेखील हातातले पुस्तक बंद करून मोठ्या हिमतीने घराच्या बाहेर पडला. आता पुढे राक्षस त्याच्या मागे राजपुत्र आणि त्याच्या मागे राजू! राजपुत्राचे पुढे काय होणार हे बघण्यासाठी राजू त्याच्या मागून चालत होता.चालता चालता राक्षस एका डोंगराजवळ आला. त्याने राजपुत्राला एका झाडाला बांधले आणि तो समोरच्या गुहेत गेला. राजपुत्र सुटण्याचा प्रयत्न करत होता. मोठमोठ्याने रडत होता, ओरडत होता. पण बांधलेली दोरी सोडवणं त्याला जमत नव्हतं. धावत जाऊन त्याची दोरी सोडावी अन् राजपुत्राला मोकळं करावं असं राजूच्या मनात येत होतं. पण त्याची हिंमत होत नव्हती. कारण नेमका त्याचवेळी राक्षस बाहेर आला तर या विचाराने राजू क्षणभर गप्प बसला. पण राजपुत्राची धडपड, त्याचा केविलवाणा चेहरा राजूला बघवेना. मग राजू धावतच त्या झाडाजवळ गेला त्याने दोरी सोडून झटपट राजपुत्राला मोकळे केले आणि तेथून पळून जाण्यास सांगितले. राजपुत्रदेखील लगेच गायब झाला. पण राजू मात्र तिथेच थांबला. राक्षस आपल्याला पकडेल अशी शंकादेखील राजूला आली नाही. तितक्यात राक्षस गुहेबाहेर आला. त्याने पाहिलं अरे राजपुत्र तर जागेवर नाही. याचा अर्थ याच मुलाने राजपुत्राला मदत केली असणार. मग काय आता राक्षसाने राजूलाच झाडाला बांधून ठेवले.मग गुहेतून राक्षसाची छोटी-छोटी मुले बाहेर पडली. त्यांची नजर राजूवर पडली तशी मुले ओरडली बाबा बाबा तो बघा बाहुला ! तो हवाय आम्हाला; आमच्या सोबत खेळायला. ती आडदांड राक्षस मुलं बघून राजू खूपच घाबरला. राजू ओरडत म्हणाला, मी राजपुत्र नाही, राजू आहे राजू ! पण राजू काय बोलतो हे कोणालाच ऐकू गेले नाही. कारण राजूच्या तोंडातून आवाजाच फुटत नव्हता. राक्षसाने राजूला झाडाला करकचून बांधले. अन् पोरांना म्हणाला, “पोरांनो हा घ्या बाहुला तुमच्यासाठी, अन् करा मजा त्याच्यासोबत!”मग काय राक्षसाची पोरं राजूच्या भोवती गोल गोल फिरू लागली. त्याला चापट्या, टपल्या मारू लागली. त्याच्या खोड्या काढू लागली. राजू ओरडला, रडला की राक्षसाची मुलं टाळ्या वाजवायची. राजूला वाटलं आपण त्या राजपुत्राला मदत करायला गेलो आणि आपणच फसलो. आता काय करायचं? तेवढ्यात राक्षसाचा एक मुलगा म्हणाला, “बाबा बाबा या बाहुल्याचे केस मला अजिबात आवडले नाहीत; ते काढून टाका ना!” मग काय राक्षसाने वस्तरा आणला आणि खराखरा राजूचे केस कापून टाकले. आता टकल्या राजूभोवती तर पोरांनी उच्छाद मांडला. त्यांनी त्रास देऊन देऊन राजूला हैराण केले. नशिबाला दोष देण्याव्यतिरिक्त राजू आता काही करू शकत नव्हता. तेवढ्यात एका राक्षस पोराने त्याच्या तोंडातून बाहेर आलेला दात राजूच्या पाठीवर टेकवला आणि तो जोरात दाबू लागला. जसा तो दात राजूच्या पाठीत घुसला तसा राजू कळवळत ओरडला, “आई गं, मेलो मेलो”तोच राजूची आई धावत आली आणि राजूच्या डोक्यात टपली मारून म्हणाली, “काय रे काय झालं; घाबरलास का एवढा?” तोच राजू भानावर आला आणि आपण राक्षसाच्या तावडीत नाही हे पाहून राजूचा जीव भांड्यात पडला.
सीता व नीता या दोघी जुळ्या बहिणी खूपच हुशार होत्या. त्यांच्याकडे सुट्टी असल्याने शहरातील त्याची प्राध्यापिका मावशी आलेली होती. मग या दोघीजणी त्या मावशीला रोज सायंकाळी आपली शाळा सुटल्यावर घरी आल्यानंतर वेगवेगळे प्रश्न विचारीत असायच्या. त्या दिवशीसुद्धा त्या शाळा सुटल्यावर घरी आल्या. आधी आपला गृहपाठ करून घेतला. गृहपाठ संपल्यावर त्या मावशीसोबत सतरंजी घेऊन गच्चीवर गेल्या. सतरंजी अंथरून त्यावर त्या तिघीहीजणी बसल्या. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. त्या गप्पा करीत निसर्गाचे नयनमनोहर सौंदर्य बघत असतांनाच संधिप्रकाशसुद्धा आपला गाशा गुंडाळू लागला. तेव्हा मावशीनेच विचारले, “का गं मुलींनो! आपण आता या गच्चीवर उभे आहोत. आता सूर्यास्त झाल्यानंतरही आपणास येथे हा अंधुकसा प्रकाश दिसत आहे. याला काय म्हणतात गं?” असे विचारीत मावशी सतरंजीवर खाली बसली.“संधिप्रकाश” दोघींनीही एकासुरात उत्तर दिले.“पण मावशी त्याला संधिप्रकाशच का म्हणतात?” नीताने प्रश्न केला.“संधिकाळ म्हणजे कोणता काळ? ही तुम्हाला कल्पना आहे का?” मावशीने दोघींनाही प्रतिप्रश्न केला.“नाही मावशी.” म्हणत दोघींनीही नकारात्मक मान हलवली.“ज्या काळाला दिवसही म्हणता येत नाही व रात्रही म्हणता येत नाही त्या काळाला संधिकाळ असे म्हणतात. सकाळी रात्र संपून दिवस सुरू होतो व सायंकाळी दिवस संपून रात्र सुरू होते तो काळ म्हणजे संधिकाळ असतो. त्या संधिकाळात हा प्रकाश दिसतो म्हणून त्याला संधिप्रकाश असे म्हणतात. सूर्य मावळल्यानंतरही हा प्रकाश कसा येतो हे माहीत आहे का तुम्हाला?” मावशीने माहिती सांगत विचारले.“नाही मावशी! तूच सांग ना आम्हाला,” दोघीही म्हणाल्या.“त्याचं असं आहे!” मावशी सांगू लागली, “संध्याकाळी सूर्य क्षितिजाखाली जाताना वातावरणातील धूलिकण, जलबिंदू, हवेचे रेणू व इतर अन्य पदार्थांच्या कणांमुळे सूर्यप्रकाशाचे परावर्तन, विवर्तन व विकिरण होते. त्यामुळे सूर्यप्रकाश चौफेरविखुरला जातो.”“मावशी परावर्तनाबद्दल आम्ही शिकलो आहोत. विकिरण हे तुम्ही आताच थोड्या वेळापूर्वी आम्हाला सांगितले पण विवर्तन म्हणजे काय?” सीताने विचारले.“हे विवर्तन आता मध्येच काय आणले गं तू मावशी?” नीतानेसुद्धा शंका काढलीच.“सूर्यप्रकाश हा सरळ रेषेतच जातो हे माहीत आहे ना तुम्हाला?” मावशीने विचारले.“होय मावशी.” दोघीही म्हणाल्या.“प्रकाशाच्या मार्गामध्ये एखादा अपारदर्शक पदार्थ धरला तर काय होईल?” मावशीने विचारले.“त्याची सावली पडते.” दोघींनीही उत्तर दिले.“बरोबर आहे.” मावशी म्हणाली, “अशा मोठ्या आकाराच्या अपारी म्हणजे आपरदर्शक पदार्थाच्या कडेवरून जातांना प्रकाश किरणांची दिशा बदलून ते सावलीमध्ये पसरतात. या प्रक्रियेस विवर्तन असे म्हणतात. सूर्य क्षितिजाआड असताना पृथ्वीवरील पर्वतांच्या कडांवर पडलेल्या सूर्यप्रकाशकिरणांचे विवर्तन होते. विवर्तनामुळे प्रकाशकिरण आपली दिशा बदलून डोंगरकडांवरून पुढे खाली वाकतात व पर्वताच्या सावलीत पोहोचतात. समजले का?” मावशीने विचारले.“होय मावशी!” दोघीही म्हणाल्या, “पुढे सांगा.”मावशीने सांगण्यास सुरुवात केली, “अशा या वातावरणातील विवर्तित प्रकाशाच्या विकिरणामुळे विखुरलेला प्रकाश आपणापर्यंत येऊन पोहोचतो. तसेच काही प्रकाश वातावरणात थेट वर जात असतो. वातावरणातून त्याचे परावर्तन होऊन तोही प्रकाश खाली पोहोचतो. अशा प्रकाशालाच आपण ‘संधिप्रकाश’ म्हणतो. शहरापासून दूर मोकळ्या भूमीवर संधिप्रकाश खूप चांगला दिसतो. संध्याकाळी सूर्य जसजसा अधिकाधिक खोल खोल म्हणजे जसजसा दूर दूर जातो तसतसे उंच आकाशात गेलेले त्याचे हे किरण कमी कमी होत जाऊन संधिप्रकाश हळूहळू कमी कमी होत जातो. हळूहळू काळोख सुरू होतो व शेवटी पूर्णपणे अंधार पडतो व रात्र सुरू होते.”मग त्यादिवशी थोडा उशीर झाल्याने व अंधार पडल्याने त्या साऱ्याजणी गच्चीवरून खाली आल्या.
साप्ताहिक राशिभविष्य, २५ ते ३१ जानेवारी २०२६
साप्ताहिक राशिभविष्य, २५ ते ३१ जानेवारी २०२६आरोग्य उत्तम राहीलमेष : आरोग्य उत्तम राहिल्यामुळे मानसिकता सुधारेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपल्या समोरील कामे आपण उत्साहाने आणि वेगाने पूर्ण करू शकाल. जिद्द व चिकाटी वाढेल; परंतु कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. अति धाडस टाळा. पूर्ण विचार करून हातातील काम पूर्ण करा. आत्मविश्वासात वाढ होईल. इतरत्र बहुतेक सर्व क्षेत्रात मानसन्मान मिळेल. एखाद्या समारंभास उपस्थित राहाल. सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळींसहित एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी भेट द्याल. व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. स्वतःवरील विश्वास कायम राहील. कुटुंबात किरकोळ कारणावरून वादावादी होऊ शकते.आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामधील कलागुणांना वाव मिळेल. नोकरीत अनुकूलता लाभेल. कौटुंबिक सुख लाभेल.कर्तृत्व सिद्ध करता येईलवृषभ : कुटुंबातील प्रश्न सुटतील. इतरांच्या मताला प्राधान्य द्या. शांतपणे निर्णय घ्या. कार्यक्षेत्रात परिश्रमाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. स्थावरबाबतचे प्रश्न सुटतील. जमीन- जुमला विषयीचे थंडावलेले व्यवहार गतीमान होतील; परंतु वाद-विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. व्यवसायातील परिस्थिती समाधानकारक राहील. कुटुंबातून पत्नीचे सहकार्य मिळेल. मित्रमंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक भेटल्यामुळे आनंदात भर पडेल. कोणाशीही मतभेद टाळा. कोणत्याही लहान-मोठ्या आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे हिताचे ठरेल. जुन्या गुंतवणुका आर्थिक फायदा मिळवून देतील. नवीन गुंतवणुका होतील.रागावर नियंत्रण ठेवामिथुन : कुटुंबात आपल्या कार्यस्थळी तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळात रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. इतरांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेऊन त्यावरती आपली प्रतिक्रिया सावधपणे द्या. जोडीदाराशी वाद घालू नका. आरोग्य उत्तम राहील. मुलाच्या यशाचा आनंद साजरा कराल. आर्थिक आवक समाधानकारक राहील. व्यवसायात तसेच नोकरीत स्पर्धक बलवान होऊ शकतात. आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करा, तसेच नियम व शिस्त पाळणे हितकारक ठरेल. काहींना प्रवासाचे योग. राजकीय क्षेत्रातील जातकांनी आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक ठरेल. आर्थिक आवक समाधानकारककर्क : व्यवसायात उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येईल. व्यावसायिक स्थिती समाधानकारक राहील; परंतु कामगारांचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात, त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहा. सरकारी नियम व कायदे यांचे पालन अत्यावश्यक ठरेल. नोकरीत वाद-विवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारण आणि गटबाजीपासून दूर राहा. वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. भावंडांबरोबर संबंध चांगले राहतील. वडिलोपार्जित संपत्तीबद्दलचे वाद-विवाद संपुष्टात येतील.भाग्याची साथसिंह : अनुकूल ग्रहमानामुळे भाग्याची चांगली साथ राहील. हाती घेतलेल्या कामात यश संपादित करू शकाल; परंतु कुटुंबात विशेषतः आपल्या जोडीदाराबरोबर वादविवादाचे प्रसंग उद्भवू शकतात. लहान-सहान गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. व्यवसाय-धंद्यातील वाढ समाधान देऊन जाईल. नोकरीमध्ये आपल्या कामाची प्रशंसा होऊन आपण कौतुकास पात्र ठराल. पदोन्नतीची शक्यता, मात्र कामात बदल होऊ शकतो, तसेच स्थान बदलाची शक्यता. सामाजिक अथवा धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाहाच्या संबंधातील घडामोडी वेगवान होतील.खर्चावर नियंत्रण ठेवाकन्या : आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता. राहत्या घरासाठी खर्च कराल. भौतिक सुख व सुविधांची वाढ कराल. नवीन वाहन खरेदीचे योग, तसेच स्वतःच्या घरात जाण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास ते सफल होऊ शकतात. पैशाची सोय होईल. व्यवसायात गरज असेल, तर कर्ज मंजूर होऊ शकते. महत्त्वाची कामे करा. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन नियोजन करावे. नोकरी-व्यवसाय-धंद्यानिमित्त प्रवास करावा लागेल. प्रवास कार्यसिद्धी होईल.धार्मिक व सामाजिक कार्यात सक्रिय योगदानतूळ : धार्मिक तसेच सामाजिक कार्यात रस निर्माण होऊन अध्यात्मिकतेकडे कल राहील. धार्मिक तसेच सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. कुटुंबात एखादा छोटा कार्यक्रम होऊ शकतो. मित्रमंडळी व नातेवाइकांचे आगमन घरात झाल्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. जीवनसाथीबरोबर वाद-विवाद टाळा. थोड्या नियमाने वागण्याची गरज. आर्थिक आवक समाधानकारक राहील. नोकरी तसेच व्यवसायात अस्थिर परिस्थिती निर्माण होऊ शकते. शांतपणे व पूर्ण विचारांती निर्णय घ्या. सुसंवादाने समस्या संपुष्टात येऊ शकतात.वर्चस्व प्रस्थापित होईलवृश्चिक : नोकरीत तसेच व्यवसाय-धंद्यात आपले निर्णय अचूक ठरल्यामुळे परिणामसुद्धा लाभकारक ठरतील. आपल्या मतास प्राधान्य मिळून कौतुकास पात्र ठराल. नोकरीमध्ये एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी निवड होऊन परदेशगमनाची शक्यता. आर्थिक आवक चांगली राहील. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराल, त्यासाठी मनसोक्त खर्च होऊ शकतो. चैनीच्या आणि महागड्या वस्तू खरेदीचा मोह आवडणार नाही, मात्र आरोग्याची काळजी घेणे हितकारक ठरेल. संसर्गजन्य बाधेपासून सावध राहा. शक्यतो प्रवास टाळलेले हिताचे ठरेल.अनपेक्षित घटना घडतीलधनु : सदरील कालावधीमध्ये जरी अनपेक्षित घटना घडल्या तरी त्या अनुकूल स्वरूपाच्या असतील. नोकरीत अनुकूलता वाढेल. अपेक्षेपेक्षा जास्त चांगल्या बाबी घडलेल्या निदर्शनास येतील. कुटुंबातील मुला-मुलींना चांगले यश मिळेल. प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल चालली असलेली दिसेल. आपल्या रोजच्या कामकाजात इतरांची मदत मिळू शकते. व्यवसाय-धंदा, नोकरी इत्यादींमध्ये भाग्यकारक घटना घडतील. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. कुटुंबातील वातावरण उत्साही आणि आनंदी राहील. प्रवासाचे योग. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाहाच्या संबंधातील घडामोडी वेगवान होतील.नोकरीत प्रगतीमकर : व्यवसाय-धंदा, नोकरी यामध्ये आपल्या रोजच्या कामाच्या व्यतिरिक्त नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. अर्थातच त्या एक आव्हान म्हणून स्वीकारा. सकारात्मक दृष्टिकोन फायदेशीर ठरेल. नोकरीत प्रगतीबरोबरच बदलीची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या वाढतील. कार्यक्षेत्र विस्तार होईल. सरकारी क्षेत्रात कार्य करणाऱ्यांच्या अधिकारातही वाढ होईल; परंतु आपल्या अधिकार कक्षेतच कार्य करा. व्यवसायात तसेच नोकरीत स्पर्धक बलवान होऊ शकतात. तसेच लहान-मोठ्या प्रलोभनांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. कुटुंबात किरकोळ कारणावरून वादावादी होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. या भावंडांची विचारपूस करा.आर्थिक व्यवहारात दक्षताकुंभ : व्यवसाय-धंद्यात अंदाज चुकण्याची शक्यता आहे. लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. इतरांवर जास्त भरोसा ठेवण्यात नुकसान होऊ शकते. नवीन गुंतवणूक करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला मोलाचा ठरेल. नोकरीत अनुकूलता वाढेल. जोडीदाराची साथ राहील. आर्थिक आवक समाधानकारक राहील. नोकरी अधिकारात वाढ होईल, पण राजकारण आणि गटबाजीपासून अलिप्त राहा. काहींना प्रवासाच्या योगाची शक्यता जाणवते. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करणे फायदेशीर राहील. कुसंगती टाळा. धार्मिक कार्यात पुढाकार घ्याल. नातेवाईक-आप्तेष्ट यांचे संबंध सुधारतील. महत्त्वाची कामे करा.महत्त्वाचे व्यवहार होतीलमीन : जमीनजुमला, स्थावर याविषयीचे व्यवहार जे थांबलेले होते ते गतिमान होऊन पूर्णत्वाच्या मार्गावर राहतील. वडिलोपार्जित संपत्ती, स्थावर मिळकत याबाबतचे वाद-विवाद संपुष्टात येतील. आर्थिक परिस्थिती चांगली होईल. नवीन वाहन खरेदीचे योग. कोणत्याही व्यवहाराबाबतच्या कागदपत्रांवर काळजीपूर्वक वाचून सही करा. घाईगर्दीतील निर्णय नुकसानीस आमंत्रण देऊ शकतात. काहींना प्रवासाचे योग. कुटुंबातील वातावरण चांगले राहून जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. प्रवास घडते; परंतु प्रवासात खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील.
Tejashwi Yadav :बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राजदने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Priya Bapat : प्रिया बापट आणि उमेश कामत दोघेही त्यांच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत आले आहेत. आता प्रियाने तिचा फिटनेस मंत्रा चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज २०२६ च्या पहिल्या मन की बात कार्यक्रमात देशाला संदेश दिला.
Amit Shah : अमित शहा यांचा नांदेड दौरा रद्द; नेमकं काय घडलं? चर्चांना उधाण
Amit Shah : नांदेडमध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त ‘हिंदी दी चादर’ या विशेष कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार होते.
US Immigration Agents : आणखी एका अमेरिकन नागरिकाची हत्या ; इमिग्रेशन एजंट्सनी झाडल्या गोळ्या
US Immigration Agents : अमेरिकेतील मिनियापोलिसमध्ये इमिग्रेशन एजंट्सनी ३७ वर्षीय नागरिकावर गोळीबार केला आहे.
Navneet Rana : फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा होईल, असे विधान करून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वादात भर घातली आहे. यावरून राजकारण तापले असून, भाजपच्या नवनीत राणा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Mouni Roy Harassment : अभिनेत्री मौनी रॉयने हरियाणातील एका कार्यक्रमादरम्यान तिच्यासोबत प्रेक्षकांमधील काही व्यक्तींनी अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप केला आहे.
मुंबईत दिंडोशी मनपा वसाहतीत दूषित आणि पिवळसर पाण्याचा पुरवठा
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 'पी पूर्व' (P-East) विभागांतर्गत येणाऱ्या गोरेगाव (पूर्व) येथील दिंडोशी मनपा वसाहत परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत दूषित आणि पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.पिण्याच्या पाण्यात गटाराचे पाणी ?दिंडोशी मनपा वसाहतीतील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी नळाला येणारे पाणी अत्यंत गढूळ आणि पिवळसर रंगाचे असते. पाण्याला उग्र वास येत असून, हे पाणी पिण्यासाठी तर सोडाच, पण दैनंदिन वापरासाठीही अयोग्य असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. जलवाहिनीमध्ये गटाराचे पाणी मिसळले जात असल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.नागरिकांमध्ये भीती आणि संतापदूषित पाण्यामुळे परिसरात काविळ, टायफॉइड आणि जुलाबासारखे जलजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. आम्ही नियमित पाणीपट्टी भरतो, तरीही आम्हाला विषारी पाणी का? असा संतप्त सवाल येथील गृहिणी आणि नागरिक विचारत आहेत.प्रशासनाकडे मागणी'पी पूर्व' विभाग कार्यालयाने तातडीने जलवाहिन्यांची तपासणी करावी, गळती दुरुस्त करावी आणि परिसरात शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी आग्रही मागणी दिंडोशी मनपा वसाहतीतील नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित पावले न उचलल्यास मनपा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही साद प्रतिसाद मृणाल कट्ट्याच्या वतीने दिला आहे.
Pune News : प्रभागाचा विकास करून मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू; नगरसेविका सारिका घुलेंचे आश्वासन
Pune News : मतदारांचे आभार मानत, प्रभाग क्रमांक १५ च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित नगरसेविका सारिका अमित घुले यांनी सांगितले.
Raju Patil : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या सेनेला मनसेने पाठिंबा का दर्शवला याबाबतची भूमिका माजी आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केली आहे.
मुंबईत रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकाची चाकू भोसकून हत्या
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर मालाड स्टेशनवर शनिवारी रात्री ३१ वर्षांच्या प्राध्यापक आलोक सिंह यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना मालाड स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर घडली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी ओंकार शिंदे (२७) याला अटक केली आहे.ट्रेनमधून उतरताना धक्का लागल्यावरुन वाद झाला आणि ओंकारने प्राध्यापक आलोक सिंह यांची चाकू भोसकून हत्या केली. पोलिसांनी प्राध्यापकाच्या हत्येप्रकरणी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. सध्या आरोपीची बोरिवली पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला होता. पोलिसांनी आरोपीला वसई स्टेशनवरुन अटक केली. फक्त ट्रेनमधून उतरताना धक्का लागला म्हणून ओंकारने हत्या केली की या हत्येमागे वेगळे कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत. प्राध्यापकाच्या हत्येप्रकरणी आरोपी विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.कोण होते प्राध्यापक आलोक सिंह ?नरसी मोनजी कॉलेज, विलेपार्ले येथे २०२४ पासून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. स्वभावाने शांत, दयाळू आणि सभ्य होते.वाद करणे, म्हणणे पटवून देण्यासाठी युक्तिवाद करत बसणे असा आलोक यांचा स्वभाव नव्हता. ते साधे होते आणि कोणावरही कधी संतापत नव्हते; अशी माहिती त्यांना ओळखणाऱ्यांनी दिली आहे.आलोक सिंह शनिवार २४ जानेवारी २०२६ रोजी रात्री विलेपार्ले स्टेशनवरुन बोरिवलीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले. मालाड स्टेशनवर आलोक यांची हत्या झाली.आलोक यांचे काकाही प्राध्यापक होते. जेमतेम दोन वर्षांपूर्वी आलोक यांचे लग्न झाले होते. पण शनिवारी घडलेल्या घटनेमुळे आलोक यांच्या नातलगांना जबर धक्का बसला आहे.
Imtiaz Jaleel Statement : सहर शेख यांच्या विधानाचे एमआयमचे नेते, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी समर्थन केले. तसेच 'मुंब्राच काय आम्ही सबंध महाराष्ट्र हिरवा करू,' असे विधान जलील यांनी केले.
मुलीला अंक लिहिता आले नाही म्हणून पित्याकडून बेदम मारहाण!
चार वर्षांच्या मुलीचा दु:खद अंतहरियाणा : हल्ली पालकांकडूनच मुलांवर शिक्षणाच्या बाबतीत अतिरिक्त ताण टाकला जातो. मुलांच्या खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांच्यावर शिक्षणाचा भार टाकला जातो. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये असेच एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. १ ते ५० अंक लिहिता आले नाहीत म्हणून वडिलांनी केलेल्या मारहाणीत चार वर्षीय मुलीचा दुःखद मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले आहे.फरीदाबादच्या सेक्टर ५८ मधील पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनंतर आरोपी कृष्णा जयस्वाल (३१) याला अटक करण्यात आली आहे. शहरातील न्यायालयात त्याला हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील खेरतिया गावचा रहिवासी असलेला जयस्वाल आपल्या कुटुंबासह फरीदाबादमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांनी सांगितले की, जयस्वाल आणि त्यांची पत्नी दोघेही खासगी कंपनीत नोकरी करत होते. आई दिवसा कामावर जायची. तर जयस्वाल रात्रपाळी करायचा दरम्यान दिवसा मुलांची काळजी घेणे आणि त्यांचा अभ्यास करून घेण्याचे काम जयस्वाल करत असे.सदर घटना २१ जानेवारी रोजी घडली. पोलिसांनी सांगितले की, जयस्वालने मुलीला एक ते ५० पर्यंतचे अंक लिहिण्यास सांगितले. मात्र मुलीला अंक लिहिता आले नाहीत. त्यामुळे जयस्वालने मुलीला जबर मारहाण केली. लाटण्याने मारून मुलीला भिंतीवर आपटल्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. मुलीला मारहाण केल्यानंतर आरोपी वडील तिला रुग्णालयात घेऊन गेला. त्याने त्याची पत्नी रंजिताला सांगितले की, मुलगी खेळताना पायऱ्यांवरून खाली पडली. मात्र घटनेच्या वेळी त्याचा सात वर्षांचा मुलगा घरीच होता. त्याने आईला सर्व हकीकत सांगितली आणि वडिलांच्या कृत्याची माहिती उघड झाली. मुलीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या, त्यानंतर पत्नी रंजिताने याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रुग्णालयालाही हीच बाब आरोपी वडिलांनी सांगितली होती.
शिरगाव जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार मोहिमेचा धडक्यात शुभारंभ
कार्यकर्त्यांचा एकजुटीने मोठ्या विजयाचा निर्धारशिरगांव : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, देवगड तालुक्यातील शिरगाव जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार मोहिमेचा शुभारंभ धडक्यात करण्यात आला. शिरगावची ग्रामदेवता श्री देवी पावणाई देवालयात श्रीफळ वाढवून आणि गाऱ्हाणे घालून या मोहिमेची अधिकृत सुरुवात झाली. या प्रसंगी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने मोठ्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.या निवडणुकीत शिरगाव जिल्हा परिषद गटातून देवदत्त दामोदर कदम, शिरगाव पंचायत समिती गणातून शितल सुरेश तावडे आणि तळवडे पंचायत समिती गणातून सलोनी संतोष तळवडेकर हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. आपल्या लाडक्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता कंबर कसली आहे.प्रचार शुभारंभ प्रसंगी भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मिलिंद साटम, अमित साटम, सुभाष नार्वेकर, दाजी राणे, राजू शेट्ये, मंगेश लोके, शैलेंद्र जाधव, नाना तावडे, सुनील कांडर, सुभाष थोरबोले, सत्यवान कदम, रवींद्र पवार, परशुराम पवार, देवेंद्र पवार, अरविंद पवार, अजित परब, वैभव भाटकर, रोहन तावडे, केतन धुळप, बंडू माने, महेश मेस्त्री, वसंत साटम, उल्हास परब, विश्वनाथ परब, रत्नदीप कुवळेकर, अमित घाडी, पंकज दुखडे, महेश पवार, ओमकार तावडे, गोपीनाथ तावडे, युधी राणे, प्रसाद तावडे, सचिन तळवडेकर, किशोर तळवडेकर, अपूर्वा तावडे, दीप्ती तावडे, प्रल्हाद तावडे, भिकाजी राणे, सुनील गावडे, श्वेता शिवलकर, सुनील वळंजू, सुदर्शन साळकर, ऋषिकेश कांडर यांच्यासह शिरगाव जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sindhudurg District : भाजपचा बिनविरोध पॅटर्न कायम! निवडणुकीपूर्वीच उधळला विजयाचा गुलाल
Sindhudurg District : महापालिका निवडणुकीत भाजपचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही हा पॅटर्न कायम असून, सिंधूदुर्ग जिल्ह्यात एकूण ११ उमेदवार निवडणुकीपर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.
Mumbai Crime News : मुंबईतील धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून, रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
US Winter Storm : अमेरिकेत हिमवादळामुळे कहर ; वीजपुरवठा खंडित, १३,००० उड्डाणे रद्द
US Winter Storm : अमेरिकेत हिमवादळ आले आहे. ज्यामुळे देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वीज वितरण क्षेत्राची कामगिरी राज्यभर सुधारली
राष्ट्रीय स्तरावर ऊर्जा क्षेत्र जास्त नफाक्षममुंबई : वीज वितरण कंपन्यांच्या चौदाव्या वार्षिक एकात्मिक क्रमवारी आणि मानांकन यादीमध्ये भारतातील वीज वितरण क्षेत्राच्या कामगिरीची सातत्यपूर्ण वाढ अधोरेखित केली आहे. ॲनालिटिक्स व डिजिटल तपशिलासह होत असलेले कामकाज तसेच सातत्यपूर्ण सुधारणा या सर्वांमुळे कार्यक्षमता, दर्जेदार सेवा आणि चांगली आर्थिक कामगिरी साधली गेली आहे.अखिल भारतीय स्तरावर मानांकित वीज वितरण कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२५ मध्ये अत्यंत सकारात्मक असा २,७०१ कोटी रुपये करोत्तर नफा नोंदवला आहे. अशाप्रकारे पहिल्यांदाच हे क्षेत्र लागू असलेल्या पद्धतीने (ॲक्रूवल) नफ्यात आले आहे. त्यापूर्वीच्या म्हणजे २०२४ या आर्थिक वर्षात या क्षेत्राला २७,०२२ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. या क्षेत्रात केलेल्या पायाभूत सुधारणा, सुधारलेली आर्थिक शिस्त आणि तंत्रज्ञानावर आधारित कामकाजावरील नियंत्रण या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून हा बदल झाला आहे.अदाणी इलेक्ट्रिसिटीने त्यांचे ए प्लस हे राष्ट्रीय मानांकन कायम ठेवले आहे. त्यातून त्यांची प्रत्येक वर्षीची, कामकाजातील, आर्थिक बाबींमधील आणि प्रशासकीय मापदंडामधील सातत्यपूर्ण आणि उत्तम कामगिरी दिसून येते. देशातील अग्रगण्य वीज वितरण कंपनी आणि मुंबईतील प्राथमिक वीज पुरवठ्याचा प्रमुख पर्याय, या अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या स्थानावर या अहवालामुळे शिक्कामोर्तब झाले. अदानी इलेक्ट्रिसिटीचा भर, आपल्या यंत्रणेत किरकोळ प्रासंगिक सुधारणा करण्यापेक्षा आपल्या कामकाजात संस्थात्मक कामकाजाची शिस्त आणि विश्वासार्हता आणणे तसेच देशाच्या नागरी वितरण क्षेत्रातील मापदंड स्थापन करणारी कंपनी म्हणून आपली भूमिका सिद्ध करणे, हाच असल्याचे दिसून येते.बीईएसटीने या मानांकन चक्रात चांगली सुधारणा दाखवली असून त्यांना ए प्लस मानांकन मिळाले आहे. त्यायोगे त्यांच्या कामकाजाच्या सर्व मापदंडात त्यांनी चांगलीच वाढ दाखवल्यचे दिसून येत आहे. या अहवालानुसार डिजिटल तपशिलावर आधारित तसेच ॲनालिटिक्सवर आधारित कामकाज आणि स्मार्ट मीटरिंग पद्धती, या बाबींमुळे त्यांना सांगली कामगिरी करण्यास सहाय्य मिळाले आहे. बीएसटी च्या कामकाजातून हे दिसून येते की स्मार्ट मीटर तैनात करण्यावर भर दिल्यामुळे तसेच ॲनालिटिक्सच्या सहाय्याने केलेल्या कामकाजामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीची कार्यक्षमता, बिलिंग मधील अचूकता आणि सेवा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढते.एमएसईडीसीएलने केलेल्या सुधारणा तसेच आधुनिक तंत्रज्ञान आणल्यामुळे त्यांच्या कामकाजात त्वरेने आणि दिसून येण्याजोग्या सुधारणा झाल्या व त्याचा चांगला परिणाम त्यांच्या मोठ्या ग्राहक वर्गावर झाला. आव्हाने कायम असताना स्मार्ट मीटरिंगमध्ये केलेली सातत्यपूर्ण वाढ आणि डिजिटल तपशिलाच्या साह्याने केलेल्या कामकाजामुळे सध्याचा नफा कायम ठेवण्यास आणि नंतर तो वाढवण्यास साहाय्य होईल.टाटा पॉवरने या सध्याच्या मानांकन चक्रात भाग घेतला नाही आणि त्यामुळे त्यांच्या कामगिरीचे परीक्षण झाले नाही. या अहवालातून दिसलेले राज्यातील चित्र हे एकंदर राष्ट्रीय परिस्थितीशी सुसंगतच आहे. येथे सुधारणांमधील सातत्य, कामकाजातील शिस्त आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या सर्वांमुळे वीज वितरण क्षेत्रात दीर्घकाळ टिकणारे बदल होत आहेत. वीज वितरण कंपन्यांच्या चौदाव्या राष्ट्रीय एकात्मिक मानांकनाबाबत अदानी इलेक्ट्रिसिटीची प्रतिक्रियाया वर्षात देखील आम्हाला अग्रगण्य स्थान मिळणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण त्यातून मुंबईकर तसेच देशभरातील ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास दिसतो. मुंबईकरांची सेवा करण्याचे हे आमचे शंभरावे वर्ष असताना आम्ही शहरवासीयांच्या हातात हात घालून चालत आहोत. शहरातील घरे उजळून टाकण्यासाठी, रुग्णालयांना ऊर्जा देण्यासाठी आणि हे शहर चालते बोलते ठेवण्यासाठी आम्ही शांतपणे पण ठामपणे काम करीत आहोत. ही मान्यता म्हणजे आमच्या शिरपेचातील आणखीन एक मानाचा तुरा असून त्याचे सर्व श्रेय आमच्या ग्राहकांना आणि आमच्या कर्मचाऱ्यांना जाते, जे खरेखुरे मुंबईकर आहेत.
प्रजासत्ताक दिनाला जोडून सुट्ट्यांमुळे महाराष्ट्र, गोव्यातील बस आरक्षणात वाढ
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या लाँग विकेंडमुळे महाराष्ट्र आणि गोव्यातील आंतरशहरी बस प्रवासात लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. रेडबसकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, या कालावधीत महाराष्ट्र आणि गोव्यातील बस बुकिंगमध्ये ४६ टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हे विश्लेषण २०२६ मध्ये २३ ते २६ जानेवारी या कालावधीत करण्यात आलेल्या बुकिंग्सची तुलना मागील वर्षीच्या २४ ते २७ जानेवारी २०२५ या कालावधीतील बुकिंग्सशी करून सादर करण्यात आले आहे. या आकडेवारीवरून लाँग विकेंडदरम्यान प्रवासासाठी बस हे माध्यम प्रवाशांच्या प्राधान्यक्रमात कायम असल्याचे स्पष्ट होते.प्रजासत्ताक दिनाच्या कालावधीत प्रवासाची मागणी वाढत असताना, रेडबसतर्फे ८ ते २६ जानेवारी या कालावधीत ‘डिस्कव्हर भारत सेल’ सुरू करण्यात आला आहे. या कालावधीत भारतभरातील प्रवासाचे पर्याय २९९ रुपये प्रति सीट या दरापासून उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सवलतीच्या कालावधीत बस, रेल्वे आणि हॉटेल बुकिंगवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत असून, निवडक बँका आणि पेमेंट भागीदारांमार्फत अतिरिक्त बचतीचे पर्यायही उपलब्ध आहेत.रेडबसच्या व्यासपीठावरील बुकिंगनुसार, गोवा-पुणे, पुणे-हैदराबाद, मुंबई-हैदराबाद, पुणे-नागपूर, पुणे-मुंबई, नागपूर-पुणे आणि मुंबई-पुणे हे मार्ग या कालावधीत अधिक मागणीचे ठरत असल्याचे दिसून येते. तसेच, पुण्यातील वाकड आणि स्वारगेट, गोव्यातील मापुसा आणि आशीर्वाद थिएटर, तसेच मुंबईतील बोरिवली पूर्व ही बसमध्ये चढण्यासाठी प्रमुख ठिकाणे असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. प्रवाशांच्या प्राधान्यक्रमाचा विचार करता, एकूण बुकिंगपैकी ८४ टक्के बुकिंग वातानुकूलित बसेससाठी करण्यात आली आहेत, तर उर्वरित बुकिंग नॉन-एसी बसेससाठी आहेत. यावरून आगाऊ आरक्षण करताना प्रवासी अधिक आरामदायी पर्यायांना पसंती देत असल्याचे स्पष्ट होते. याचप्रमाणे, ८९ टक्के प्रवाशांनी स्लीपर बसचा पर्याय निवडला असून, उर्वरित प्रवाशांनी सीटर सेवा स्वीकारली आहे. सुट्टीच्या काळात रात्रीच्या प्रवासाकडे प्रवाशांचा वाढता कल असल्याचे यातून दिसून येते. प्रवाशांच्या आकडेवारीनुसार, बस बुकिंगमध्ये पुरुष प्रवाशांचे प्रमाण ६८ टक्के असून महिला प्रवाशांचे प्रमाण ३२ टक्के आहे. शहरनिहाय पाहता, प्रथम श्रेणी महानगरांमधून ४८ टक्के प्रवासी प्रवास करत असल्याचे दिसून येते, तर द्वितीय श्रेणी शहरांमधून २२ टक्के आणि तृतीय श्रेणी शहरे तसेच ग्रामीण भागातून ३० टक्के प्रवासी बस प्रवास करत आहेत. यावरून प्रवासाची मागणी अधिक असल्याचे शहरांमधील बाजारपेठही हळूहळू विस्तारत असल्याचे चित्र स्पष्ट होते.
पाकिस्तानात लग्नमंडपात आत्मघाती हल्ला; ७ ठार
इस्लामाबाद : पाकिस्तानमधील डेरा इस्माइल खान जिल्ह्यात एका लग्नसमारंभात भीषण आत्मघाती हल्ला झाला. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. पाकिस्तानमधील नेते नूर मेहसूद यांच्या घरी लग्नसमारंभात ही घटना घडली. यावेळी हल्लेखोराने स्वतःला स्फोटकांनी उडवून दिले. अचानक झालेल्या हल्ल्याने सगळ्यांना धक्का बसला. यावेळी नूर मेहसूद यांच्या घराचंही नुकसान झालं. तसेच ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले. स्थानिक पोलीस प्रमुख आदनान खान यांनी या घटनेची पुष्टी केली. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
इतर एअरलाईनला संधी नवी दिल्ली : डिसेंबरच्या सुरुवातीला झालेल्या मोठ्या उड्डाण गोंधळानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) इंडिगो एअरलाईनवर कारवाई केली आहे. प्रवाशांच्या मोठ्या गैरसोयीची दखल घेत डीजीसीएने इंडिगोचे हिवाळी वेळापत्रक १० टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश दिले असून, त्यामुळे एअरलाईनला काही सेवा रद्द कराव्या लागल्या आहेत. या निर्णयानुसार इंडिगोने मंत्रालयाकडे ७१७ रिकाम्या स्लॉटची यादी सादर केली आहे.मागील वर्षी ३ ते ५ डिसेंबरदरम्यान इंडिगोची अंदाजे अडीच हजारांहून अधिक उड्डाणे रद्द झाली होती, तर जवळपास दोन हजार उड्डाणांना विलंब झाला होता. यामुळे देशभरातील लाखो प्रवाशांना विमानतळांवर तासंतास वाट पाहावी लागली आणि मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. या गंभीर व्यत्ययाच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएने ही कठोर कारवाई केली.स्लॉट म्हणजे विमानाला विमानतळावर उतरण्यासाठी आणि उड्डाणासाठी दिलेला निश्चित वेळ असतो. इंडिगोने रिकामे केलेल्या ७१७ स्लॉटपैकी ३६४ स्लॉट दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळूरु आणि हैदराबाद या सहा प्रमुख मेट्रो विमानतळांवर आहेत. यामध्ये हैदराबाद आणि बंगळूरु येथे सर्वाधिक स्लॉट उपलब्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. हे स्लॉट जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी रिकामे करण्यात आले आहेत.या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण मंत्रालयाने तात्काळ हालचाली सुरू करत इतर विमान कंपन्यांकडून या स्लॉटसाठी अर्ज मागवले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि हवाई सेवा सुरळीत ठेवण्यासाठी इतर एअरलाईन्सनी या रिकाम्या स्लॉटचा वापर करावा, अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे येत्या काळात काही मार्गांवर इतर विमान कंपन्यांच्या अतिरिक्त उड्डाणांची शक्यता निर्माण झाली आहे.
अपक्ष नगरसेवक अनिल भोसले यांचा भाजपला पाठिंबा
भाईंदर : मीरा–भाईंदर महानगरपालिकेत निवडून आलेले एकमेव अपक्ष आणि भाजपचे बंडखोर नगरसेवक अनिल भोसले स्वगृही परतले आहेत. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणीदरम्यान त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. याचवेळी भाजपच्या गटनेतेपदी माजी उपमहापौर हसमुख गेहलोत यांची निवड करण्यात आली. महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपने २२ माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली होती. त्यामध्ये काशी मिरा येथील प्रभाग क्रमांक १४ चे माजी नगरसेवक भोसले यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे, २०१७ च्या निवडणुकीतही भोसले यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नव्हती. मात्र त्यावेळी त्यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्यात आली होती.यावेळीही उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांनी भाजपाच्या अधिकृत उमेदवार मीरा देवी यादव यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. प्रचारादरम्यान पक्षाच्या नावाचा वापर केल्याचा आरोप ठेवत भाजपने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत निलंबन केले होते. निवडून आल्यानंतर मात्र त्यांनी आपण भाजपसोबतच जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार शुक्रवारी भाजपच्या नगरसेवकांसोबत त्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी करत भाजपला अधिकृत पाठिंबा दिला.“मी मूळचा भाजपचाच आहे. नागरिकांची कामे प्रभावीपणे करता यावीत, यासाठी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला,” असे अनिल त्यांनी सांगितले. भोसलेंच्या पाठिंब्यामुळे मीरा–भाईंदर महापालिकेत भाजपचे संख्याबळ ७९ वर पोहोचले असून, सत्तास्थापनेच्या दृष्टीने भाजप अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.
उल्हासनगरमध्ये नगरसेवकांचा मुक्काम रिसॉर्टमध्ये
फोडाफोडीचे राजकारण; भाजप-शिवसेनेचा बचावात्मक उपायउल्हासनगर : महापौरपदासाठी उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. यामुळे नगरसेवक फुटू नयेत यासाठी दोन्ही पक्षांनीच खबरदारी घेतली असून, ‘फोडाफोडी’च्या भीतीने काही नगरसेवकांना रिसॉर्टमध्ये हलविण्याच्या चर्चाही सुरू आहेत. महापालिकेत एकूण ७८ नगरसेवक असून त्यापैकी भाजपकडे ३७ आणि शिंदेसेनेकडे ३६ नगरसेवक आहेत. महापौरपदासाठी ४० हा ‘मॅजिक फिगर’ आवश्यक आहे.शिवसेनेने महापौरपदासाठी वंचित बहुजन आघाडी (२ जागा), साई पक्ष (१ जागा) आणि अपक्ष (१ जागा) यांचा पाठिंबा मिळवून ४० नगरसेवकांचा आधार मिळविला आहे. शिंदेसेनेच्या पॅनलमध्ये खा. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि उपजिल्हाप्रमुख अरुण अशान यांना नगरसेवकांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी महायुतीचाच महापौर विराजमान होईल, असा दावा केला आहे. मात्र, भाजपकडूनही पडद्यामागे सक्रिय हालचाली सुरू असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. येत्या काही दिवसांत महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान वाढण्याची शक्यता असून, दोन्ही पक्षांतून नगरसेवकांना स्थिर ठेवण्यासाठी तणावग्रस्त वातावरण सुरू आहे.
कडोंमपातील ४ नगरसेवकांविरुद्ध उबाठाची हरवल्याची तक्रार
सखोल चौकशीची मागणीकल्याण : उबाठाचे कल्याण पूर्वेतील नवनिर्वाचित चार नगरसेवक अद्यापही ‘नॉट रिचेबल’ असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर उबाठाने पोलीस ठाण्यात हरवल्याची अधिकृत तक्रार दाखल केली आहे. उबाठाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी या प्रकरणी थेट पोलीस ठाण्यात अर्ज देत, संबंधित नगरसेवकांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपास करण्याची मागणी केली आहे.नगरसेवकांच्या जीवाला धोका आहे का, की अपहरणाचा प्रकार घडला आहे, याबाबत सखोल चौकशीची विनंती केली आहे. “जिथे असाल तिथून माध्यमांसमोर या,” असे आवाहन करत वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतरच तक्रार करण्यात आली असे स्पष्टीकरण शरद पाटील यांनीदिले आहे.राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संशय:कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच राज ठाकरे यांच्या मनसेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणीसाठी आलेल्या नगरसेवकांच्या भेटीदरम्यान मनसेचे माजी आ. राजू पाटील, खा. श्रीकांत शिंदे आणि आ. नरेश म्हस्के यांच्यात चर्चा होऊन मनसेने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. या निर्णयामुळे भाजप आणि उबाठाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू होती. अशा स्थितीत उबाठाचे चार नगरसेवक अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याने ते कोणाच्या दबावाखाली आहेत का? किंवा अन्य कुठल्या राजकीय डावपेचाचा भाग आहेत का? अशी शंका उपस्थित होत आहे.कडोंमपा निवडणूक निकाल २०२६:एकूण जागा: १२२शिवसेना (शिंदे गट): ५३भाजप: ५०शिवसेना (उबाठा): ११मनसे: ५काँग्रेस: २राष्ट्रवादी (शरद पवार गट): १
ठाण्यात १२ दिवस टप्प्याटप्प्याने पाणीकपात
विविध भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणारठाणे : ठाणे महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील भातसा नदीवरील बंधाऱ्यावर बसवण्यात आलेल्या न्युटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार असल्याने नदीतील पाण्याची पातळी कमी करण्यात आली आहे. परिणामी पिसे येथील उदंचन केंद्रातील पाण्याची पातळी घटली असून, ठाणे महापालिकेला मिळणारा पाणीपुरवठा सुमारे २० टक्क्यांनी कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठामपाने शहरात पुढील १२ दिवस टप्प्याटप्प्याने पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला असून, विविध विभागांमध्ये २४ तासांचे पाणी शटडाऊन घेण्यात येणार आहे. काही भागांत कमी दाबाने तर काही भागांत पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.२८ जानेवारी ते ७ फेब्रुवारीपर्यंत रोज वेगवेगळ्या प्रभागांमध्ये सकाळी ९ ते पुढील दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. वागळे, वर्तकनगर, कळवा, मुंब्रा, कोपरी, राबोडी, माजीवाडा, मानपाडा, ढोकाळी, कासारवडवली आदी प्रमुख भागांचा समावेश आहे. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवावा, पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
नवी मुंबईच्या महापौरपदाचा आज निर्णय?
६६ नगरसेवक आज मुख्यमंत्र्यांना भेटणार नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ३१ जानेवारी रोजी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या (२५ जाने.)भाजपचे नवी मुंबईतील ६६ नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मुंबईला जाणार आहेत. त्यामुळे उद्याच महापौरपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या ३६ महिला नगरसेविकांची प्राथमिक चाचपणी करण्यात आली असून त्यातून ११ नगरसेविकांची निवडक यादी तयार करण्यात आली आहे. या यादीतील एका नावावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शुक्रवारी झालेल्या बैठकीत स्थानिक भाजप कमिटीने नऊ महिला नगरसेविकांची यादी तयार केली असून, त्यामध्ये आणखी दोन नावांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौरपदाच्या शर्यतीत एकूण ११महिला नगरसेविका असतील. रविवारी ही यादी मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर अंतिम निर्णय होईल, असे सांगण्यात येत आहे.महापौरपदाचे दावेदार:महापौरपदाच्या शर्यतीत रेखा म्हात्रे, सलूजा सुतार, अदिती नाईक, अंजनी भोईर, दयावती शेवाळे, नेत्रा शिर्के, वैष्णवी नाईक, शुभांगी पाटील, ॲड. भारती पाटील आणि माधुरी सुतार ही नावे आघाडीवर आहेत.महापौर सागर नाईक यांची गटनेतेपदी निवड: शुक्रवारी नवी मुंबईतील भाजपच्या ६६ नगरसेवकांनी गट स्थापन करून कोकण भवन येथे अधिकृत नोंदणी केली. यावेळी माजी महापौर सागर नाईक यांची सर्वसंमतीने गटनेतेपदी निवड करण्यात आली. उद्या भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक आणि सागर नाईक यांच्यात महापौरपदाबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत स्थानिक नेत्यांनी केलेल्या चाचपणीचा अहवाल सादर केला जाणार आहे.माधुरी सुतार यांच्या नावाची शिफारस?दरम्यान, नवी मुंबई महापौरपदासाठी माधुरी सुतार यांच्या नावाची शिफारस भाजपकडून प्रदेश कार्यालयाला पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिरवणे गावातून त्या नगरसेविका असून, यापूर्वी त्या भाजप महिला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारीही सांभाळली आहे. त्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यास महापौरपदाच्या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
अलिबाग नगर परिषद समित्यांची बिनविरोध निवड
अलिबाग : अलिबाग नगर परिषदेतील चार विषय समिती सभापती, तसेच सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र भाजपचे अंकित बंगेरा यांनी चारऐवजी ५ समित्या गठित कराव्यात, पर्यटन ही समिती जी आधी होती, ती घ्यावी अशी सुचना केली होती. मात्र ती मागणी फेटाळण्यात आली. विविध विषय समित्यांमध्ये स्थायी समितीवर नगराध्यक्षा अक्षया प्रशांत नाईक, मानसी संतोष म्हात्रे, प्रशांत मधुसुदन नाईक, अनिल रमेश चोपडा, साक्षी गौतम पाटील, प्रदीप कृष्णाजी नाईक आणि समीर मधुकर ठाकूर यांची निवड झाली.स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीवर मानसी संतोष म्हात्रे, शैला शेषनाथ भगत, ऋषिकेश रमेश माळी आणि जमालउद्दीन युसुफ सय्यद यांची निवड करण्यात आली. वीज व सार्वजनिक बांधकाम समितीवर प्रशांत नाईक, निलम हजारे आणि योजना पाटील यांची निवड झाली. पाणीपुरवठा व जलनिःसारण समितीवर अनिल चोपडा, वृषाली भगत, संतोष गुरव आणि सागर भगत यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समितीवर साक्षी पाटील, संध्या पालवणकर, निवेदिता राजेंद्र वाघमारे आणि आनंद अशोक पाटील यांची निवड करण्यात आली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्य माध्यमातून नगर परिषदेच्या कारभाराला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात येत आहे. स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, तसेच महिला व बालकल्याण क्षेत्रात नागरिकाभिमुख निर्णय घेत विकासाला चालना देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला, तसेच विविध समित्यांवर अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा पदसिद्ध सभापती, सभापती, उपसभापती आणि नामनिर्देशित सदस्य पदांवरही नियुक्त्या करण्यात आल्या असून. समित्यांची अधिकृत रचना निश्चित झाली आहे.
मुरुड-जंजिरा नगरपालिका विषय समित्या निवडी बिनविरोध
शिवसेना शिंदे गटाचे ५ समित्यांवर वर्चस्व नांदगाव मुरुड : मुरुड नगरपालिकेच्या विविध विषयांच्या विषय समित्यांच्या निवडीसाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेत सर्व समित्यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या त्यातील सर्व पाचही समित्यांवर शिवसेना शिंदे गटाने आपले वर्चस्व सिद्ध केले. शुक्रवारी झालेल्या सभेत पिठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी सदस्यांचे स्वागत केले. समित्या कीती असाव्यात यावर केलेल्या चर्चेत विरोधकांकडून शिंदे शिवसेना पक्षांचे गटनेता पांडुरंग आरेकर यांनी सांगितले, की अध्यक्ष पकडून सहा समिती असाव्यात तर सत्ताधारी यांच्याकडून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तमीम ढाकम यांनी ४ समित्या असाव्यात यावर पिठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी निवडणूक घ्यायची आहे का असे विचाले सत्ताधारी यांच्याकडे संख्या बळ नसल्याने निवडणूक न घेता विरोधकांकडून सुचविलेला प्रस्ताव मान्य करुन अध्यक्ष पकडून पाच समित्या घेण्याचे ठरविले.त्यानंतर पाच विषय समित्यांवर चार सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित अजित पवार गटाच्या नगराध्यक्षा आराधना दांडेकर ह्या स्थायी समितीच्या अध्यक्षा असणार, तर शिवसेनेचे उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत यांच्याकडे आरोग्य व शिक्षण समिती सभापती सदस्य अंकिता गुरव, ॲड. रूपेश पाटील, आदेश दांडेकर, तमिम ढाकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बांधकाम व दिवाबत्ती समिती सभापती यास्मिन कादिरी, तर सदस्य म्हणून ॲड. रूपेश पाटील, नितिन आंबुर्ले, आदेश हरिश्चंद्र दांडेकर, मनोज भगत, यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पाणीपुरवठा व मलनि:सारण समिती सभापती पांडुरंग आरेकर तर सदस्य मनिष विरकुड, विजय पाटील, रुपेश पाटील, प्रीता चौलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नियोजन व पर्यटन विकास समिती सभापती रूपेश रणदिवे, तर सदस्य वैदेही आरेकर, श्रीकांत खोत, श्रध्दा अपराध, प्रमिला माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समिती सभापती नगमाना इम्तियाज उप सभापती सुगंधा मकू, तर सदस्य अंकिता गुरव, देवायानी गुरव, प्रांजली मकू यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी जाहीर केले. या पाचही समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले.
पालघर नगर परिषदेचा भोंगळ कारभार
प्रशासकीय दिरंगाई विरोधात माजी सैनिकांचे उपोषण पालघर : नगर परिषदेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभारामुळे एका माजी सैनिकाला न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागल्याची बाब समोर आली आहे. घरपट्टी माफी, मालमत्ता नोंदीतील घोळ आणि प्रशासकीय दिरंगाई यांविरोधात माजी सैनिक डॉ. भाऊराव पुंडलिक तायडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.डॉ. तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सन २०१० ते २०२५ या १५ वर्षांच्या काळात घरपट्टी माफीसाठी नगरपरिषदेकडे अनेकदा अर्ज केले. मात्र, प्रशासनाकडून त्यांना एकदाही लेखी उत्तर देण्यात आले नाही. विशेष म्हणजे, या काळात त्यांना एकदाही प्रॉपर्टी टॅक्सचे मागणीपत्र देण्यात आले नाही, त्यामुळे कर भरायचा तरी कसा? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.डॉ. तायडे यांनी घरपट्टी माफीचा अर्ज केल्यानंतर, त्यांचा जुना प्रॉपर्टी क्रमांक (४०२९) नगरपरिषदेच्या दफ्तरातून आणि संगणक प्रणालीतून अचानक गायब झाला आहे. प्रशासकीय दप्तरातील अधिकृत नोंद गायब होणे, हा अत्यंत गंभीर प्रकार असून यामुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नगरपरिषदेच्या संगणक प्रणालीत डॉ. तायडे यांच्या नावे 'घोलविरा' परिसरात दोन मालमत्तांची चुकीची नोंद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात त्या मालमत्ता त्यांच्या ताब्यात नाहीत. अधिकृत कागदपत्रांवर नाव दाखवून त्यांना कायदेशीर अडचणीत आणले जात असल्याचा आरोप तायडे यांनी केला आहे. जर त्या मालमत्ता माझ्या नावावर आहेत, तर त्या प्रत्यक्ष माझ्या ताब्यात द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.देशासाठी सेवा बजावलेल्या माजी सैनिकाला स्वतःच्या हक्काच्या कामासाठी १५ वर्षे पायपीट करावी लागणे आणि अखेर उपोषणास बसावे लागणे, याबद्दल पालघरमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता जिल्हा प्रशासन आणि नगर परिषद यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Shakeel Ahmad : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शकील अहमद यांच्या राहुल गांधी यांच्यावरील विधानामुळे राजकीय गोंधळ उडाला आहे.
Dilip Sopal : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले आहे. यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदाराने मोठा खुलासा केला आहे.
Shah Rukh Khan King Movie : ‘डर नही दहशत हूँ’शाहरुख खानच्या ‘किंग’सिनेमाची रिलीज डेट जाहीर
Shah Rukh Khan King Movie : शाहरुख खानचा 'किंग' चित्रपट 24 डिसेंबर 2026ला रिलीज होणार आहे. म्हणजेच ख्रिसमसच्या आदल्या दिवशी किंग आपल्या भेटीला येणार आहे.
५ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
थंडी आणखी वाढणारनवी दिल्ली : देशभरात हवामानाचा लहरीपणा वाढताना दिसत असून कधी कडाक्याची थंडी तर कधी अचानक पावसाचा मारा असा अनुभव नागरिकांना येत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी आणखी एक महत्त्वाचा इशारा जारी केला असून देशातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामुळे तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता असून थंडीचा जोर अधिक वाढणार असल्याचे सांगण्यात आले.हवामान विभागाचा सतर्कतेचा इशाराहवामान विभागानुसार पुढील ४८ तासांत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू आणि पुडुचेरी या ५ राज्यांत जोरदार पावसाचा आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. २७ व २८ जानेवारी रोजी जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस व बर्फवृष्टी, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या भागांत गारपीटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच २५ जानेवारी रोजी तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि माहे येथे २६ जानेवारी रोजी विजांसह मेघगर्जनेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.उत्तर भारतात शीतलहरीचा इशारापुढील २४ तासांत उत्तर प्रदेशातील प्रयागराज, अयोध्या, कानपूर, रामपूर, बिजनौर, रायबरेली, आग्रा, मथुरा आणि अलीगड येथे सकाळच्या वेळी शीतलहर जाणवणार आहे. हरियाणातील गुरुग्राम आणि सोनीपत येथेही तीव्र थंडीचा इशारा देण्यात आला आहे. पंजाबमधील अमृतसर, जालंधर, बठिंडा, पटियाला, होशियारपूर आणि मोहाली येथे ताशी १० ते १५ किमी वेगाने वाऱ्यांसह शीतलहर राहण्याची शक्यता आहे.दिल्लीतील हवामानाचा अंदाजदिल्लीकरांसाठीही हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. २७ जानेवारी रोजी राजधानीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २५ जानेवारी रोजी सकाळी तापमानात आणखी घट होणार असून ताशी १० ते १५ किमी वेगाने थंड वारे वाहणार आहेत. दिल्लीचे कमाल तापमान सुमारे १७ अंश सेल्सियस तर किमान तापमान ४ अंश सेल्सियसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
एका महिन्यात ९०० कुत्र्यांची हत्या
तेलंगणा : तेलंगणामधील जगतियाल जिल्ह्यातील पेगाडपल्ली गावात सुमारे ३०० भटक्या कुत्र्यांना मारण्यात आले आहे. या भटक्या कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देऊन मारण्यात आले. गावाच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सचिवांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएनआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२५ (आयपीसी) तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम ३(५) आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम ११(१)(अ)(i) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तेलंगणामध्ये भटक्या कुत्र्यांना मारण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पेगाडपल्ली गावात ३०० भटक्या कुत्र्यांना मारण्यात आले. राज्यातील विविध भागात आतापर्यंत ९०० पेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांची हत्या झाली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यंत्रमानव ‘एएससी अर्जुन’ तैनात
माहितीच्या सहाय्याने प्रवाशांशी संवाद साधण्याची क्षमताविशाखापट्टणम : सध्याचे जग कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्सचे आहे. आपली बहुतांशी कामे मानव आता यंत्रमानवाकडून करून घेऊ लागला आहे. रेल्वे स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सामानाची सुरक्षा करण्यासाठी भारतीय रेल्वेनेही आपल्या कामात यंत्रमानवाचा वापर करायला सुरुवात केली आहे. विशाखापट्टणम रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मानवरूपी यंत्रमानव ‘एएससी अर्जुन’ तैनात केला आहे.भारतीय रेल्वेच्या पूर्व किनारपट्टी भागात प्रवासी सुरक्षा, संरक्षण आणि सेवा वितरण अधिक सक्षम करण्यासाठी ‘एएससी अर्जुन’ हा मानवरूपी (ह्युमनॉइड) यंत्रमानव कार्यान्वित करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) अधिपत्याखाली हा यंत्रमानव तैनात करण्यात आला आहे. आधुनिकीकरण आणि डिजिटल परिवर्तन मोहिमेचा तो एक भाग आहे. यामागील उद्देश सुरक्षा यंत्रणा बळकट करणे आणि प्रवाशांना अधिक प्रभावी सहाय्य देणे हा आहे.‘प्रवासी सुरक्षा, संरक्षण आणि सेवा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर हा मानवरूपी रोबोट तैनात करून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे,’ असे ‘आरपीएफ’चे महानिरीक्षक आलोक बोहरा यांनी सांगितले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक ललित बोहरा यांनी सांगितले की, हा यंत्रमानव प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ताने सुसज्ज आहे. त्यामुळे तो ‘आरपीएफ’ कर्मचाऱ्यांसह प्रवाशांसाठीही एक स्मार्ट सहाय्यक म्हणून काम करतो.प्रवाशांशी साधणार संवादया यंत्रमानवाच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये चेहरा ओळख प्रणालीद्वारे घुसखोरी शोधणे, एआय-आधारित गर्दी घनता विश्लेषण, इंग्रजी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये बहुभाषिक सार्वजनिक घोषणा, तसेच अडथळे टाळत अर्धस्वायत्त पद्धतीने प्लॅटफॉर्मवर गस्त घालण्याची क्षमता यांचा समावेश आहे. याशिवाय, एकात्मिक डॅशबोर्डच्या माध्यमातून रिअल-टाइम परिस्थितीची जाणीव, आग व धूर ओळखून तत्काळ इशारे देणे, तसेच मैत्रीपूर्ण हालचाली आणि माहितीच्या सहाय्याने प्रवाशांशी संवाद साधण्याची क्षमताही या यंत्रमानवात आहे.
Top 10 News : महापालिकांतील सत्तावाटपासाठी आज बैठक, अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार
मध्य प्रदेशात वाघांच्या मृत्यूत वाढ
उच्च न्यायालयाची केंद्र व राज्य सरकारांना नोटीसभोपाळ : मध्य प्रदेशात वाघांच्या मृत्यूत चिंताजनक वाढ झाल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून वन व पर्यावरण विभागांसह राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला (एनटीसीए)ही नोटीस पाठवण्यात आली आहे.वन्यजीव कार्यकर्ते अजय दुबे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती विनय सराफ यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. याचिकेनुसार, २०२५ मध्ये मध्य प्रदेशात एकूण ५४ वाघांचा मृत्यू झाला असून ‘प्रोजेक्ट टायगर’ सुरू झाल्यापासून एका वर्षातील ही सर्वाधिक संख्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. यापैकी निम्म्याहून अधिक मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.याचिकेत दिलेल्या माहितीनुसार, सध्या जगात एकूण ५,४२१ वाघ असून त्यापैकी ३,१६७ वाघ भारतात आहेत. भारतातील सुमारे २५ टक्के म्हणजेच ७८५ वाघ मध्य प्रदेशात असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘टायगर स्टेट’ म्हणून ओळख असतानाही राज्यात वाघ मृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे आकडे समोर आले आहेत. यापूर्वी २०२२ मध्ये ४३, २०२३ मध्ये ४५ आणि २०२४ मध्ये ४६ वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. याचिकेनुसार, या मृत्यूंपैकी सुमारे ५७ टक्के मृत्यू मानव-वन्यजीव संघर्ष, वीजेचा धक्का (इलेक्ट्रोक्युशन) किंवा इतर अज्ञात अनैसर्गिक कारणांमुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे वाघांच्या संरक्षणासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आदित्य सांघी आणि अलका सिंग यांनी न्यायालयात बाजू मांडली. दरम्यान, वाघांच्या शिकारीसंदर्भातील दुसऱ्या याचिकेत न्यायालयाने आदित्य सांघी यांची ‘अमिकस क्युरी’ (न्यायालय मित्र) म्हणून नियुक्ती केली आहे. दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्यात येणार असून पुढील सुनावणीमध्ये सरकारकडून सविस्तर अहवाल सादर करण्याची अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली आहे.
२४ तासांत २६ विमाने, ६ युद्धनौकांची घुसखोरीबीजिंग : जगाच्या पाठीवर आधीच रशिया–युक्रेन आणि मध्य-पूर्वेतील संघर्ष सुरू असताना, आता आशिया खंडातही युद्धाचे ढग गडद होऊ लागले आहेत. चीन आणि तैवानमधील तणाव शिगेला पोहोचला असून, चीनने तैवानभोवती लष्करी हालचाली अधिक तीव्र केल्या आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयानुसार, शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या २४ तासांत चीनच्या २६ लष्करी विमानांनी आणि ६ नौदल जहाजांनी तैवानच्या परिसरात घुसखोरी केली.१८ चिनी विमानांनी तैवान सामुद्रधुनीतील ‘मध्यरेषा’ओलांडली. ही रेषा चीन आणि तैवानमधील अनधिकृत सीमारेषा मानली जाते. या विमानांनी तैवानच्या उत्तर, मध्य आणि नैऋत्य भागातील हवाई संरक्षण ओळख क्षेत्रात प्रवेश केल्याने तैवानच्या संरक्षण यंत्रणा सतर्क झाल्या. या घुसखोरीत लढाऊ विमाने, बॉम्बर्स आणि गुप्तचर विमानांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.चीनच्या आक्रमक हालचालींना प्रत्युत्तर देत तैवानने आपली लष्करी सज्जता वाढवली आहे. तैवानच्या हवाई दलाची लढाऊ विमाने तातडीने हवेत तैनात करण्यात आली असून, किनाऱ्यावरील क्षेपणास्त्र प्रणाली ‘रेडी टू फायर’ मोडमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की, प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून कोणत्याही संभाव्य धोक्याला त्वरित उत्तर देण्याची तयारी आहे.जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम, भारतही सतर्कतैवान सामुद्रधुनीत युद्ध भडकले, तर त्याचा जागतिक व्यापार आणि सेमीकंडक्टर पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण जगातील मोठा सेमीकंडक्टर उत्पादन हिस्सा तैवानमध्ये आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स, वाहन उद्योग आणि संरक्षण क्षेत्रावरही परिणाम होऊ शकतो. भारत या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची वाढती लष्करी उपस्थिती आणि सागरी मार्गांवरील दबाव भारताच्या सागरी व्यापारासाठीही चिंतेचा विषय ठरू शकतो. एकूणच, चीन–तैवान तणाव नव्या टप्प्यावर पोहोचत असल्याचे संकेत मिळत असून, आशिया खंडात नव्या संघर्षाची शक्यता जगासाठी गंभीर इशारा ठरत आहे.
अलवारमध्ये उभारला जाणार पहिला जैविक उद्यान प्रकल्प
जयपूर : राजस्थान आपल्या वन्यजीव पर्यटनात आणखी एक महत्त्वाची भर घालणार असून, अलवार जिल्ह्यातील कटी घाटी परिसरात अत्याधुनिक जैविक उद्यान विकसित करण्यात येणार आहे. हा प्रकल्प वन्यजीव संवर्धन, पशुसेवा आणि पर्यटन या तिन्ही बाबी एकत्र आणणारा असून, पूर्ण झाल्यानंतर तो राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (NCR) पहिला असा जैविक पार्क ठरणार आहे.प्रस्तावित उद्यान कटी घाटी व जैसमंद दरम्यान सुमारे १०० हेक्टर क्षेत्रात उभारले जाईल. यापैकी सुमारे ३० टक्के भाग चिड़ियाघरासाठी, तर उर्वरित ७० टक्के भाग हरित क्षेत्र म्हणून राखला जाणार आहे, जेणेकरून नैसर्गिक अधिवास जपला जाईल. येथे ८१ प्रजातींचे ४०० हून अधिक वन्यजीव ठेवण्यात येणार असून, सिंह, वाघ, चित्ता तसेच आफ्रिकेतून आणले जाणारे जिराफ हे प्रमुख आकर्षण असतील.या उद्यानाची खासियत म्हणजे एकाच परिसरात शेर सफारी, बाघ सफारी आणि शाकाहारी प्राण्यांची सफारी उपलब्ध होणार आहे. तसेच, गुजरातमधील गिर राष्ट्रीय उद्यानाच्या धर्तीवर हाय-टेक पशु रेस्क्यू सेंटर उभारले जाईल. जखमी व आजारी प्राण्यांच्या उपचारासाठी सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय आणि तज्ज्ञ डॉक्टरांची कायमस्वरूपी व्यवस्था केली जाणार आहे. प्राण्यांसाठी देशातील २५ चिड़ियाघरांशी समन्वय साधून टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्यात येईल. प्रकल्प अहवाल तयार असून, केंद्र सरकारची मंजुरी मिळताच काम सुरू होणार आहे.
अयोध्या : अयोध्येतून एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक धार्मिक उपक्रम सुरू झाला असून, राम मंदिराच्या शिखरावर फडकवला जाणारा पवित्र धर्मध्वज आता जागतिक स्तरावर पोहोचणार आहे. सनातन संस्कृतीचा संदेश संपूर्ण विश्वात पोहोचावा, या संकल्पनेतून रामध्वज यात्रा सुरू करण्यात आली असून हा ध्वज पृथ्वीवरील सातही खंडांवर फडकवण्याची प्रतिज्ञा करण्यात आली आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी परिसरात वैदिक मंत्रोच्चार, पूजा-अर्चा आणि भक्तीमय वातावरणात या यात्रेचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात संत, साधू आणि असंख्य रामभक्त उपस्थित होते. राम मंदिराच्या शिखरावर प्रतिष्ठापित होणारा हाच पवित्र ध्वज आता केवळ अयोध्येचे प्रतीक न राहता, सनातन धर्माची जागतिक ओळख बनणार आहे. या मोहिमेमुळे ही यात्रा केवळ धार्मिक उपक्रम न राहता एक व्यापक सांस्कृतिक चळवळ ठरत आहे.
जॉर्जियात कौटुंबिक वादातून गोळीबार
भारतीय नागरिकासह चार जणांचा मृत्यू अटलांटा : अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात कथित कौटुंबिक वादातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एका भारतीय नागरिकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली असून, संशयित आरोपीने पत्नी आणि इतर तीन नातेवाइकांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. अटलांटा येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे.भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, “कौटुंबिक वादातून झालेल्या गोळीबारात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून शोकाकुल कुटुंबाला सर्व आवश्यक मदत दिली जात आहे,” असे नमूद करण्यात आले आहे. संशयित आरोपीचे नाव विजय कुमार (वय ५१) असून तो अटलांटाचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीमू डोग्रा (४३), गौरव कुमार (३३), निधी चंदर (३७) आणि हरीश चंदर (३८) अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी ब्रूक आयव्ही कोर्ट परिसरातील ब्लॉकमधून पोलिसांना फोन आला. घटनास्थळी पोहोचल्यावर घराच्या आत चार प्रौढ व्यक्तींचे मृतदेह आढळले. सर्वांचा मृत्यू गोळी लागल्यामुळे झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. गोळीबाराच्या वेळी घरात तीन मुले उपस्थित होती. गोळीबार सुरू होताच ही मुले घरातील कपाटामध्ये लपून बसली होती. यापैकी एका मुलाने ९११ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली, त्यामुळे काही मिनिटांतच पोलीस घटनास्थळी पोहोचू शकले.सुदैवाने, तिन्ही मुलांना कोणतीही दुखापत झालेली नसून त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
भारत स्वत:चे अंतराळ स्थानक उभारणार !
पहिले घटक २०२८ मध्ये अंतरिक्षातनवी दिल्ली : भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्रो) देशासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा भारतीय अंतरिक्ष स्थानकाच्या उभारणीस सुरुवात करत आहे. हे स्थानक पृथ्वीच्या खालच्या कक्षेत उभारले जाणार असून, त्यामुळे भारताला अंतरिक्षात कायमस्वरूपी वास्तव्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. येथे वैज्ञानिक आणि अंतरिक्ष प्रवासी दीर्घकाळ राहून विविध वैज्ञानिक संशोधन करू शकतील.या प्रकल्पासाठी इस्रोच्या विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राने पहिल्या मूलघटकाच्या निर्मितीसाठी देशातील वैमानिक व अंतरिक्ष उद्योगांशी औपचारिक संपर्क साधला आहे. हा संपर्क ‘रसद दाखल करण्याची इच्छा’ या प्रक्रियेद्वारे करण्यात आला असून, अंतरिक्षात स्वदेशी संशोधन केंद्र उभारण्याच्या दिशेने हे पहिले ठोस पाऊल मानले जात आहे. या पहिल्या घटकाला ‘भारतीय अंतरिक्ष स्थानक–०१’ असे नाव देण्यात आले असून, तो संपूर्ण प्रकल्पाचा कणा ठरणार आहे.इस्रोच्या नियोजनानुसार हा पहिला घटक सन २०२८ मध्ये अंतरिक्षात पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर घटक पाठवून सन २०३५ पर्यंत संपूर्ण अंतरिक्ष स्थानक उभारले जाणार आहे. पृथ्वीवरून विविध कालावधीत घटक पाठवून ते अंतरिक्षात एकत्र जोडण्यात येणार आहेत. यासाठी देशातील उद्योगांना दोन संच तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय अंतरिक्ष स्थानकाचा हा उपक्रम भारताच्या मानवीय अंतरिक्ष कार्यक्रम ‘गगनयान’नंतर तत्काळ सुरू करण्यात येणार आहे. इस्रोच्या मते, या स्थानकामुळे दीर्घकालीन वैज्ञानिक प्रयोग करणे शक्य होणार असून, भविष्यातील अंतरिक्ष मोहिमांसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यास मोठी मदत होणार आहे. भारतीय अंतरिक्ष स्थानकामुळे भारताला जागतिक पातळीवर अंतरिक्ष संशोधन क्षेत्रात स्वतंत्र व भक्कम स्थान मिळणार असून, देशाच्या वैज्ञानिक प्रगतीला नवे क्षितिज प्राप्त होणार आहे.
दीड तासांच्या उपचारांसाठी १.६५ लाख
न्यूयॉर्क : अमेरिकेतील आरोग्यसेवेचे विदारक वास्तव दाखवणारी एक घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. न्यूयॉर्कमध्ये एका व्यक्तीला अवघ्या दीड तासांच्या रुग्णालयातील उपचारांसाठी तब्बल १,८०० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे १.६५ लाख रुपयांचे बिल भरावे लागले, तेही चांगला मेडिकल इन्शुरन्स असतानाही.संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, ख्रिसमसच्या दिवशी कुटुंबासोबत आईस स्केटिंग करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. तीव्र वेदना होत असल्याने आणि फ्रॅक्चरची शंका आल्याने तो रुग्णालयात गेला. इमर्जन्सी रूममध्ये डॉक्टरांनी तपासणी करून एक्स-रे काढला आणि गुडघ्याभोवती क्रेप बँडेज बांधली. संपूर्ण प्रक्रिया सुमारे दीड तासात पूर्ण झाली.तीन आठवड्यांनंतर इन्शुरन्स कंपनीने कळवले की, एकूण वैद्यकीय बिलापैकी १,८०० डॉलर्स रुग्णाला स्वतः भरावे लागतील, तर उर्वरित ६,३५४ डॉलर्स इन्शुरन्सद्वारे भरले जातील.या घटनेनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी अमेरिकेच्या महागड्या आरोग्य व्यवस्थेवर टीका करत भारत व कॅनडातील तुलनेने परवडणाऱ्या आरोग्यसेवेशी तुलना केली. अमेरिकेत बहुतांश नागरिकांना खासगी किंवा सरकारी इन्शुरन्सच्या माध्यमातून उपचार मिळतात. मात्र तरीही किरकोळ दुखापतींसाठीही मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो, ही बाब या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.
Eknath Shinde : पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष राहणार नाही, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत केला आहे.
मी कानपूरची रहिवासी आभा शुक्ला आहे. म्हैस, जाडी, 45 वर्षांची काकू, चालता-फिरता बुलडोझर, कुणावर पडली तर तो दाबूनच मरेल… कधीकाळी ही सर्व नावे माझीच होती. लोक मला याच नावांनी हाक मारत होते. माझ्या खऱ्या नावाने 'आभा शुक्ला' ने नाही. 30 वर्षांची मुलगी आणि 92 किलो वजन. लोक खूप थट्टा करत होते. कुणाला उलटून उत्तर देण्याचा विचार केला, तर काय देणार होते. काही नाही… मान खाली घालून पुढे जात असे. पण जे लोक मला या नावांनी हाक मारत होते, तेच आता विचारतात- आभा, तुझे वजन कसे कमी केलेस? नक्कीच काहीतरी औषधी वनस्पती खाल्ली असशील. नाहीतर, 92 किलोवरून थेट 65 किलो वजन? हे तर फक्त चित्रपटांमध्येच होऊ शकते, खऱ्या आयुष्यात नाही. होऊच शकत नाही. पण जेव्हा मी त्यांना याबद्दल सांगते, तेव्हा ते चिडून म्हणतात- खोटं बोलते आहेस. मी फक्त हसते. असो… माझे जुने आणि आताचे नवीन आयुष्य कुठून सुरू होते, ते सर्व सांगते. 2007 सालची गोष्ट आहे. माझे वय त्यावेळी 15 वर्षे होते. अगदी सडपातळ मुलगी. जवळपास 35 किलोग्राम वजन होते. वडील सरकारी शिक्षक होते. मी त्यांच्या जास्त जवळ होते आणि धाकटा भाऊ आईच्या जास्त जवळ होता. 2007 मध्ये फेब्रुवारी महिना, तारीख 2. वडील मला दररोज कॉम्प्युटर क्लासला सोडायला जात होते. त्या दिवशीही ते मला सोडायला गेले. सोडून, काही कामासाठी शहराबाहेर गेले. संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या येण्याची वेळ होती, पण ते त्या दिवशी आले नाहीत. मी रागात होते. मी स्वतःच कोचिंगमधून घरी आले. मनातल्या मनात विचार करत होते - बाबांना आज येऊ दे, मग त्यांच्याशी मनसोक्त भांडेन. घड्याळात पावणे सहा वाजले होते, तेवढ्यात एक मुलगा धावत माझ्या घरी आला आणि म्हणाला - तुझ्या बाबांचा अपघात झाला आहे. ऐकताच मी जमिनीवर कोसळले. मी, आई आणि भाऊ… आम्ही सर्वजण धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. इमर्जन्सी वॉर्डमध्ये डॉक्टर बाबांना सीपीआर देत होते. त्यांचा एक पाय तुटला होता. तोंडातून रक्त येत होते. अचानक बाबांचे हात-पाय थंड पडले. डॉक्टर उठून उभे राहिले आणि विचारले - तुमचे बाबा होते…? डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मी खूप रडले. आई भिंतीवर डोके आपटून रडू लागली. तिथेच बांगड्या फोडू लागली. सर्वांसाठी फेब्रुवारी महिना वसंत घेऊन येत असे, पण माझ्यासाठी तो फक्त बाबांच्या जाण्याचे दुःख घेऊन आला. आजही जेव्हा फेब्रुवारी महिना येतो, तेव्हा मी 2 तारखेला दिवसभर स्वतःला घरात कोंडून घेते. खूप रडते. असे वाटते, सर्व काही कालचीच गोष्ट आहे. जर कोणी मला त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, तर मी आजही सर्व गोष्ट अशी सांगू शकते, जसे हे सर्व कालच घडले असेल. एक-एक गोष्ट… बाबांच्या तिरडीवर ठेवलेल्या प्रत्येक फुलापासून ते शर्टवर लागलेल्या रक्ताच्या डागांपर्यंत आठवतं. माझं चाललं असतं तर, त्यांच्या अस्थींनी भरलेला कलश गंगेत प्रवाहित केला नसता. तो मी माझ्या घरातल्या कपाटात जपून ठेवला असता. शेवटी, त्यातच तर त्यांच्या शरीराचे शेवटचे अंश उरले होते. माझे 6 फुटी बाबा एका कलशात सामावले होते! जेव्हा मी घरच्यांना सांगितलं, तेव्हा ते ओरडून म्हणाले- हे कसं शक्य आहे? कुठल्या माणसाचा अस्थिकलश घरात ठेवतात का? तो गंगेत प्रवाहित करायचा असतो. ठीक आहे, नाइलाजाने तो अस्थिकलश गंगेत प्रवाहित करावा लागला, पण मी बाबांचा सफारी सूट आजही जपून ठेवला आहे. तोच घालून ते मला शेवटचे कोचिंग क्लासला सोडायला गेले होते. त्यावर आजही रक्ताचे डाग आहेत. दरवर्षी 2 फेब्रुवारीला तो काढून मी न्याहाळते. वडिलांच्या निधनानंतर भाडेकरूंनी माझ्या घरावर कब्जा केला. भाडे देणे बंद केले. मागितल्यावर ते म्हणाले - ना पैसे देऊ, ना घर खाली करू. जास्त बोललीस तर भावावर पॉक्सो कायदा लावून बलात्काराचा गुन्हा दाखल करू. मग तुरुंगात सडत राहा. भीतीने आम्ही काही वर्षांनी ते घर पावपट किमतीत विकले. तिकडे गावातील जमिनीवर माझ्या काकांनी कब्जा केला. त्यावेळी मी १२वीत शिकत होते. असे वाटले - आता तर सर्व संपले. विचार करत होते - जेव्हा वडीलच नाहीत, तर जगण्याचा काय फायदा. स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले. गंभीर नैराश्यात जाऊ लागले. आईने स्वतःला समजावले की जर तिने घर सांभाळले नाही, तर तिची दोन्ही मुले बरबाद होतील. एकुलता एक भाऊ आहे. त्याने स्वतःला सावरले, कारण त्यालाच आता सर्व काही सांभाळायचे होते. मी इच्छा असूनही स्वतःला समजावू शकले नाही. प्रत्येक वेळी एकच विचार मनात येऊ लागला- आत्महत्या केली तर बाबांकडे जाईन. आता या पृथ्वीवर, या घरात जगण्याचा काय अर्थ आहे, जिथे मला लाड करणारा कोणीच उरला नाही. तिथे मी कशासाठी जगू? असं नाही की माझी आई, भाऊ माझ्यावर प्रेम करत नव्हते, पण बाबांची उणीव सहन होत नव्हती. इतकी तणावात होते की डॉक्टरांना दाखवावे लागले. डिप्रेशनची औषधे सुरू झाली. 24 तासांपैकी 16 तास झोपू लागले होते. झोपेतून उठल्यावरही झोप येत असे. अशी सुमारे 3-4 वर्षे गेली. डिप्रेशनच्या औषधांमुळे जास्त झोप येत असल्याने माझे वजन वाढू लागले. तपासणी केली तेव्हा कळले की 42 किलोग्राम झाले आहे, पुन्हा एका महिन्यानंतर तपासणी केली तेव्हा 60 किलोग्राम झाले…. मी विचार करत होते की, पुढे जाऊन वजन कमी होईल, पण ते वाढून 80 किलोच्या वर पोहोचले. त्यावेळी मला वाटू लागले की आता मी खूप जाड झाली आहे. बाजारात माझ्या आवडीचे कपडे मिळत नव्हते. जीन्सची साईज आता 44 नंबर झाली होती. फक्त 4XL साईजची कुर्तीच मला होत होती. अनेकदा बाजारात कपडे खरेदी करायला गेले की, दुकानदार म्हणायचा- ताई, तुमची साईज पाहिली आहे का? माझ्याकडे तुमच्या साईजचे कपडे नाहीत. जे आहेत त्यातूनच पसंत करा. नातेवाईक, शेजारीपाजारी लोक म्हणू लागले- अरे हिचं वजन तर म्हशीसारखं झालं आहे. 45 वर्षांची मावशी झाली आहे. तोपर्यंत माझं वजन 92 किलोग्राम झालं होतं. याच दरम्यान, नातेवाईक माझ्या लग्नाची बोलणी करू लागले. म्हणू लागले- जेवढं वजन आहे, तेवढा हुंडा द्यावा लागेल, तेव्हा कदाचित एखादा मुलगा लग्न करेल. ही तर चालती-फिरती बुलडोझर झाली आहे. लोकांनी म्हणायला सुरुवात केली. अरे! हिचं पोट तर बघा. 7 महिन्यांची गर्भवती वाटते आहे. छाती किती मोठी झाली आहे. चेहरा म्हशीसारखा दिसतोय. मांड्या आणि हातात काही फरकच उरला नाहीये. वजन वाढल्यामुळे मी लग्न-समारंभांना जाणे बंद केले. बाजारात माझ्या मापाचे कपडेच मिळत नव्हते. कुठेही गेले की लोक माझ्याकडेच एकटक पाहत असत. मला आठवतंय- माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं. लहानपणापासून इच्छा होती की बहिणीच्या लग्नात मी नटूनथटून जाईन. त्यासाठी जेव्हा पार्लरमध्ये गेले, तेव्हा ब्युटिशियनने माझ्यासाठी मोठा ब्लाउज तयार केला. जुनासा एक लेहंगा दिला. ती म्हणाली- तुझ्या मापाचा लेहंगा तर नाहीये. त्या दिवशी तेच घालून बहिणीच्या लग्नात गेले. इतरांचे कपडे पाहून त्या दिवशी मला खूप लाज वाटली. एका खोलीत जाऊन रडू लागले. जयमाळेच्या वेळी बहिणीने मला जबरदस्तीने बोलावले. त्यानंतर मी कधीच कोणाच्या लग्नात गेले नाही. आधी तर मी डिप्रेशनची औषधे घेत होते. आता, जेव्हा वजन वाढून 92 किलोग्राम झाले, तेव्हा एकेक करून चार-पाच डॉक्टरांना दाखवले. कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, साखर (शुगर) हे सर्व वाढू लागले होते. थोडा वेळ चालले की धाप लागायची. असे वाटायचे, जणू काही हृदयविकाराचा झटका येईल. रक्ताची तपासणी झाली, तेव्हा कळाले की किडनीमध्ये इन्फेक्शन आहे. डॉक्टरांनी सांगितले असेच राहिले तर किडनी निकामी होईल. 2023 सालची गोष्ट आहे. खात्री पटली होती की आता आयुष्य फक्त काही महिन्यांचेच राहिले आहे. मी आईला हे देखील सांगू लागले की, माझ्या निधनानंतर नेहमी भावासोबत राहा. आई, वडिलांच्या जागी सरकारी शिक्षिका झाली होती. याच दरम्यान कानपूरमधील एका डॉक्टरांना भेटले. त्यांनी माझी अवस्था पाहताच म्हटले- सर्वात आधी हिची डिप्रेशनची औषधे बंद करा. हिला कोणताही आजार नाही. त्यांनी माझी सर्व औषधे बंद केली. त्यावेळेपर्यंत मी दररोज डिप्रेशनच्या 10 पेक्षा जास्त गोळ्या खात होते. औषधे सोडल्यावर पहिले 15 दिवस झोपच आली नाही. शरीराला डिप्रेशन आणि झोपेची औषधे खाण्याची सवय झाली होती. विचार करा, 13 वर्षांपासून मी सतत डिप्रेशनची औषधे खात होते. औषधे सुटल्यावर डॉक्टरांनी पहिल्या महिन्यात कमीतकमी दोन किलोग्राम वजन कमी करण्याचा सल्ला दिला. मी सकाळी-संध्याकाळी व्यायाम करायला सुरुवात केली. 16 तासांचे उपवास (फास्टिंग) करू लागले. 10 वाजल्यानंतर फक्त एक-दोन पोळ्या, डाळ आणि भाजी खात असे. दुपारी थोडे भाजलेले काळे चणे आणि संध्याकाळी पुन्हा दोन पोळ्या, डाळ आणि भाजी. रात्री देखील रोज 6 ते 7 किलोमीटर पायी चालत असे. सुरुवातीला वजन कमी करण्याची इतकी धून लागली की मी जास्त चालायला लागले. रस्त्यात धापा टाकत असताना अनेकदा वाटले की मी पडणार. जास्त वजन असल्यामुळे माझ्या फुफ्फुसातही इन्फेक्शन झाले होते. मी इतका जास्त व्यायाम करत होते की घरी जेव्हा आईची झोप उघडायची, तेव्हा त्यांना मी ट्रेडमिलवर धावताना दिसायचे. रात्री दीड वाजता, दोन वाजताही मी ट्रेडमिलवर धावत होते. महिन्याच्या शेवटी जेव्हा मशीनवर माझे वजन तपासले, तेव्हा ते 6 किलोग्रामने कमी झाले होते. हे कसे झाले यावर मला आश्चर्य वाटले. विश्वास बसत नव्हता. मी डॉक्टरांकडे गेले. त्यांनी एका मशीनवर माझे वजन तपासले. तेव्हा मला वाटले की मशीन खराब असेल. मग दुसऱ्या मशीनवर तपासले, तेव्हा खात्री झाली की माझे वजन कमी झाले आहे. अशा प्रकारे आता वजन कमी करण्याचे वेड लागले होते. पुढच्या महिन्यात पुन्हा तपासले. 4 किलोग्राम आणखी कमी झाले होते. तिसऱ्या महिन्यात 8 किलोग्राम, मग चौथ्या महिन्यात 2 किलोग्राम. 100 दिवसांच्या आत 20 किलो वजन कमी झाले. जेव्हा वजन कमी झाल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले, तेव्हा माझे शेजारी आणि सोशल मीडियावर जे लोक मला काय काय म्हणत होते, ते माझ्याकडे वजन कमी करण्याच्या टिप्स मागू लागले. त्यांना विश्वास बसत नव्हता की मी तीच जाड आभा शुक्ला आहे. अनेक लोक माझ्या घरी आले. ते म्हणाले की, तुम्हाला बघायचे होते की तुम्ही खरंच बारीक झाला आहात की AI वापरून फोटो एडिट करून पोस्ट केले आहेत? आतापर्यंत मी हजारहून अधिक लोकांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. 2018-19 नंतर मी कानपूरमध्ये सामाजिक कार्य सुरू केले होते. मी विचार करत होते की आता आयुष्य काही महिने-वर्षांचेच उरले आहे, तर काहीतरी करून मरावे. त्यानंतरच मी मानवाधिकार कार्यकर्ती बनले होते. (आभा शुक्ला यांनी आपल्या या भावना भास्कर रिपोर्टर नीरज झा यांच्याशी शेअर केल्या आहेत)
पूर्व उपनगरातील एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार
कुर्ला पश्चिम ते घाटकोपर पश्चिमपर्यंत उड्डाणपूलसचिन धानजी मुंबई : पूर्व उपनगरातील कुर्ला पश्चिम कल्पना टॉकीजपासून घाटकोपर पश्चिम येथील पंखेशाह बाबा दर्गापर्यंत एल. बी. एस. मार्गावर मुंबई महापालिकेच्यावतीने उड्डाणपुलाचे बांधकाम केले जाणार आहे. यासाठी अडीच हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ४ लेनचे हे उड्डाणपूल असेल, ज्यामध्ये दुहेरी वाहतूक असेल ज्यामुळे या पट्टयात होणारी वाहतूक कोंडी फुटणार आहे.पूर्व उपनगरातील लाल बहादुर शास्त्री मार्ग वाहतुकीसाठीचा महत्त्वाचा मार्ग आहे. हा मार्ग कुर्ला आणि घाटकोपर या दाट वसाहत असलेल्या भागातून जातो. विद्यमान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना व्यापारी आणि निवासी बांधकामे आहेत. रस्त्याच्या बाजूला व्यावसायिक बाजारपेठा, मॉल्स, शाळा, पोलिस ठाणे, भाजी मार्केट, रुग्णालये आणि इतर सार्वजनिक इमारतीही आहेत. सध्या एल. बी. एस महामार्गावरील जंक्शनवर वाहतूक कोंडी निर्माण होते. या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढतो, इंधनाचा वापर जास्त होतो आणि वायुप्रदूषणांमध्येही वाढ होते. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि कोंडी सोडवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या उद्देशाने लाल बहादुर शास्त्री मार्गावरील कुर्ला पश्चिम कल्पना टॉकीज, येथून घाटकोपर पश्चिम पंखेशाह बाबा दर्गा पर्यंत विद्यमान एल.बी.एस. रस्त्यावर ४ मार्गिकांचे उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या पुलाच्या बांधकामासाठीच्या खर्चाचा अंदाज १६०० कोटी रुपये होता, त्या तुलनेत पात्र ठरलेल्या कंत्राटदार कंपनीने १७०० कोटी रुपयांची बोली लावली. परंतु यासाठी पालिकेने कंपनीला जागा उपलब्ध करून दिल्यास त्याचा खर्च कमी होवू शकतो. परंतु यासाठी कंत्राटदाराने जागा उपलब्ध करून दिल्यास त्यासाठी महापालिकेला पैसे मोजावे लागणार. यासाठी १० हेक्टर जमिनीची गरज आहे आणि ही जमिन महापालिकेच्या आसपास २५ किलोमीटर परिघातच उपलब्ध करुन द्यावी अशाप्रकारची अट आहे. त्यामुळे कास्टिंग यार्डचा खर्च आणि विविध खर्च पाहता याच्या बांधकामाचा खर्च विविध करांसह २५६० कोटी रुपये एवढा आहे. यासाठी आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड व जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड या संयुक्त भागीदारीतील कंपनीची निवड करण्यात आली. यासाठी सल्लागार कंपनी स्ट्रक्टकॉन डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड यांना साडेसोळा कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
राजकीय पक्षांची बॅनरबाजी, पालिकेची डोकेदुखी
वाहतुकीच्या कोंडीत भर, अपघाताची भीतीमुंबई : महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आणि कांदिवलीतील सर्व परिसर बॅनरमुक्त झाला. मार्ग, चौक, नाके, सिग्नल चौक, दुभाजक, सुशोभीकरण केलेले चौक आणि स्काय वॉक आदींनी मोकळा श्वास घेतला होता. निकाल जाहीर झाला आणि राजकीय पक्षांचे विजयाचे तसेच पराजयाचे आभार व्यक्त केल्याचे बॅनर सर्वच परिसरात, नाके चौकात झळकळे राजकीय पक्षांनी बॅनर बाजी करून परिसर विद्रुप केला. पालिकेने बॅनर बाजीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून तसेच पर्यावरण प्रेमीकडून केली जात आहे.मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाला पालिकेने करोडो रुपये खर्च करून, चौक नाके आणि सिग्नल चौकांचे सुशोभीकरण केले. मात्र राजकीय पक्ष, मंडळे, संस्था आणि स्वयंम घोषित कार्यकर्ते यांच्या बॅनरबाजीमुळे कांदिवली विभागातील उद्यान, चौक, नाके, सिग्नल, पर्जन्य वृक्ष, पालिका शाळा, दुभाजक आणि स्काय वॉक परिसर विद्रुप होतात. पालिकेचे एक वाहन घेऊन कर्मचारी दिवसाला दोन तीन विभागात कारवाई करत लावलेले बॅनर काढतात. अशा प्रकारे विभागा विभागात जाऊन बॅनरवर कारवाई करतात. दुसऱ्या दिवशी बॅनरबाजी केली जाते. थोडक्यात तक्रारी नंतर पालिका कारवाई करते आणि बहुतांशी राजकीय पक्षांचे खासदार, आमदार वा नगरसेवक पुन्हा बॅनरबाजी करतात. मार्गातील दुभाजक व विजेच्या खांबावर लावण्यात येणारे बॅनर बहुतांशी फाटतात, लटकतात, परिणामी अपघात होतात. २२ जानेवारीपासून माघी गणेशोत्सव सुरु झाला आहे. मंडळाचे देणगीदार म्हणजे विकासक आणि सोन्या-चांदीच्या वापऱ्यांकडून प्रवेशद्वार, कमान, मुख्य चौकात आणि मार्गात लावण्यात येतात, आधीच वाहतुकीची कोंडी होत असलेल्या मार्गांवर, कोंडीत भर पडते.आर/दक्षिण वरिष्ठ निरीक्षक राजेशकुमार सिंग यांच्याशी तीन चार वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. सामाजिक कार्यकर्ते यतीन भिंगार्डे न्यायालयाने पालिकेवर बॅनर बाजीच्या कारवाई संदर्भात ताशोरे ओढले असून देखील यावर योग्य, कडक आणि निर्णायक तोडगा काढला नाही. नियम अंमलात आलेले नाही. यगमुळे बॅनर बाजीचे, परिसर विदरूपीकरण चक्र असेच सुरु राहाणार.
रविवारी तिन्ही मार्गांवर मोठा ब्लॉक
मुंबई : आज आणि उद्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला असून लोकल सेवांवर त्याचा परिणाम होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी हा ब्लॉक घेतला जात असून, या कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार, तर काही सेवा उशिराने धावणार. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद स.११.०५ ते दुपारी ३.४५ या कालावधीत जलद मार्गावरील लोकल गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. परिणामी काही लोकल रद्द होणार असून काही फेऱ्या वेळापत्रकापेक्षा उशिरा येतील. हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन स. ११.४० ते दु. ४४० सीएसएमटी-वाशी, सीएसएमटी-बेलापूर, सीएसएमटी-पनवेल तसेच सीएसएमटी-वांद्रे/गोरेगाव मार्गावरील अनेक लोकल सेवा रद्द राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते गोरेगाव स.१० ते दु. ३ तसेच पश्चिम रेल्वे (हार्बर मार्ग) ब्लॉकब्लॉकचा भाग माहीम ते अंधेरी अप आणि डाउन स.११ ते दु. ४ या वेळेत चर्चगेट-गोरेगाव, सीएसएमटी-वांद्रे तसेच हार्बर मार्गावरील अनेक अप-डाउन लोकल सेवा रद्द राहणार आहेत. आज आणि उद्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला असून लोकल सेवांवर त्याचा परिणाम होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी हा ब्लॉक घेतला जात असून, या कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार, तर काही सेवा उशिराने धावणार. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद स.११.०५ ते दुपारी ३.४५ या कालावधीत जलद मार्गावरील लोकल गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. परिणामी काही लोकल रद्द होणार असून काही फेऱ्या वेळापत्रकापेक्षा उशिरा येतील. हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन स. ११.४० ते दु. ४४० सीएसएमटी-वाशी, सीएसएमटी-बेलापूर, सीएसएमटी-पनवेल तसेच सीएसएमटी-वांद्रे/गोरेगाव मार्गावरील अनेक लोकल सेवा रद्द राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते गोरेगाव स.१० ते दु. ३ तसेच पश्चिम रेल्वे (हार्बर मार्ग) ब्लॉकब्लॉकचा भाग माहीम ते अंधेरी अप आणि डाउन स.११ ते दु. ४ या वेळेत चर्चगेट-गोरेगाव, सीएसएमटी-वांद्रे तसेच हार्बर मार्गावरील अनेक अप-डाउन लोकल सेवा रद्द राहणार आहेत.
Malthan : दोन दिग्गज उमेदवार रिंगणात; खडकी गटाची लढत जिल्ह्यात लक्षवेधी
Malthan : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, दौंड तालुक्याच्या पूर्व भागात राष्ट्रवादीने भाजपपुढे कडवे आव्हान उभे केले आहे.
Pimpri : महापौर, उपमहापौर पद निवडणुकीसाठी ‘या’दिवशी विशेष सभा
Pimpri : स्थायी सह विविध विशेष समित्यांच्या सदस्यांची देखील केली जाणार नियुक्ती
बर्फाळ वादळाच्या धोक्यामुळे अमेरिकेत आणीबाणी
२० कोटी लोकांवर संकट; ७ हजारांहून अधिक विमानांची उड्डाणे रद्दन्यूयार्क : अमेरिकेत बर्फाच्या वादळाच्या इशाऱ्यानंतर १५ राज्यांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तर, दोन दिवसांत ७ हजारांहून अधिक विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. राष्ट्रीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, सुमारे दोन-तृतीयांश अमेरिकन प्रदेश हा वादळाच्या तडाख्यात येऊ शकतो.वादळाच्या भीतीने लोक किराणा दुकानांवर गर्दी करत आहेत. अनेक दुकानांमध्ये पाणी, अंडी, लोणी आणि मांसाचा तुटवडा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने इशारा दिला आहे की, वादळासोबत जोरदार बर्फवृष्टी, पाऊस आणि थंडी येईल, ज्यामुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक होऊ शकते. वाहतूक अधिकाऱ्यांनी वीकेंडला प्रवासात विलंब आणि रद्द होण्याची शक्यता वर्तवली आहे. अनेक मोठ्या शहरांमधील विमानतळांवरही याचा परिणाम झाला आहे.शनिवारी अमेरिकेत ३,२००हून अधिक उड्डाणे आणि रविवारी सुमारे ४,८०० हून अधिक उड्डाणे रद्द झाली. अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये १० ते १४ इंच बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हे वादळ अमेरिकेच्या हाय प्लेन्सपासून सुरू होऊन हळूहळू पूर्वेकडे सरकेल. याच्या प्रभावामुळे मेम्फिस, नॅशविल, वॉशिंग्टन डीसी, बाल्टिमोर, फिलाडेल्फिया आणि न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरांमध्ये बर्फवृष्टी होईल. सदर्न रॉकीज आणि प्लेन्सपासून मिड-अटलांटिकमार्गे नॉर्थ-ईस्टपर्यंत मोठ्या प्रमाणात बर्फ पडण्याचा अंदाज आहे. कोलोरॅडोपासून वेस्ट व्हर्जिनिया आणि बोस्टनपर्यंत अनेक भागांमध्ये १२ इंचांपेक्षा जास्त बर्फ पडू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
लाल किल्ल्याच्या प्रांगणात रंगणार ‘भारत पर्व २०२६’
चित्ररथाचे विशेष आकर्षण नवी दिल्ली : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाद्वारे २६ ते ३१ जानेवारी या कालावधीत लाल किल्ल्यावर 'भारत पर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी विनामूल्य प्रवेश असून, २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ आणि २७ ते ३१ जानेवारी या काळात दुपारी १२ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहील. या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) भव्य दालन असून, याद्वारे महाराष्ट्राच्या समृद्ध पर्यटनाचे आणि ऐतिहासिक वारशाची माहिती देण्यात येणार आहे.या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य संचलनात सहभागी झालेला महाराष्ट्राचा 'गणेशोत्सव: आत्मनिर्भर भारताचे प्रतीक' हा देखणा चित्ररथ. हा चित्ररथ प्रदर्शनासाठी लाल किल्ला परिसरात विशेष स्थानी ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा लाडका उत्सव असलेला 'गणेशोत्सव' हा केवळ धार्मिक सोहळा नसून तो स्थानिक कलाकारांना, मूर्तिकारांना आणि लघुउद्योगांना कशाप्रकारे बळ देतो, म्हणजेच 'आत्मनिर्भर भारताचे' एक जिवंत प्रतीक कसे आहे, याची प्रभावी मांडणी या चित्ररथातून करण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) या दालनामध्ये पर्यटकांना राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळे, अथांग कोकण किनारपट्टी, ऐतिहासिक गड-किल्ले, अध्यात्मिक वारसा आणि व्याघ्र प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. राज्यातील विविध पर्यटन केंद्रांवरील निवासाच्या सोयी आणि वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन पॅकेजेसची माहिती देण्यासाठी येथे स्वतंत्र कक्ष कार्यरत असेल. या महोत्सवात पर्यटकांना 'पॅन इंडिया फूड कोर्ट'च्या माध्यमातून विविध राज्यातील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येईल. यासोबतच हस्तशिल्प आणि हातमाग बाजारात विणकरांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू उपलब्ध असणार आहेत. सहा दिवसांच्या या उपक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, सशस्त्र दलांचे बँड वादन आणि 'डिजिटल इंडिया'चे प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल.
स्थायी समितीवर कुणाची लागणार वर्णी?
कोणत्या पक्षाच्या कोणत्या नगरसेवकांच्या नावाचा होऊ शकतो विचारमुंबई : मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना महायुतीची सत्ता स्थापन करून महापौरांसह स्थायी समिती आणि इतर समित्यांचे अध्यक्ष निवडले जाणार आहेत. मात्र, मुंबईचा महापौरपदापेक्षा मोठी समिती म्हणून ओळखली जाते ती स्थायी समिती. या समितीवर सदस्य म्हणून आपली वर्णी लागावी यासाठी अनेक विविध पक्षांच्या नगरसेवकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे महापालिकेतील या सर्वोच्च अशा स्थायी समितीवर कोणत्या पक्षाच्या कोणत्या नगरसेवकांची वर्णी लागली जाईल याचा अंदाज यामाध्यमातून घेण्यात आला आहे.स्थायी समिती ही वैधानिक समिती असून या समितीमध्ये आर्थिक बाबींचे निर्णय घेतले जातात. प्रकल्प कामांसह कंत्राट कामांना या समिती त मंजुरी दिली जाते. या समितीत २६ सदस्य असतात. यात शिक्षण समिती अध्यक्ष हे पदसिध्द सदस्य असतात. सध्या भाजप, शिवसेना, उबाठा, काँग्रेस, एमआयएम आणि मनसेचे नगरसेवक संख्याबळ गृहीत धरता या समितीत त्यांची गणसंख्या अनुक्रमे १०,०३,०८,०३,०१ आणि ०१ एवढी आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे संख्याबळ १३ आहे. तर उबाठा आणि मनसेचे संख्या बळ ०९ एवढे आहे. तर उबाठा, मनसे, काँग्रेस आणि एमआयएम हे पक्ष एकत्र आल्यास त्यांचे संख्या बळ १३ एवढे होणार आहे. परंतु शिक्षण समितीचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य असल्याने भाजपची गणसंख्या ११ होणार आहे आणि शिवसेनेची तीन गृहीत धरल्यास त्यांचे संख्याबळ १४ होणार आहे. यातच एमआयएमने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यास महायुतीचे पारडे जड होणार आहे.कोणत्या पक्षाच्या कोणत्या संभाव्य सदस्यांची लागू शकते वर्णी भाजप : प्रभाकर शिंदे, अॅड मकरंद नार्वेकर, राजेश्री शिरवडकर, हरीष भांदीर्गे, अलका केरकर, प्रकाश दरेकर, गणेश खणकर, सुषम सावंत, निल सोमय्या, नवनाथ बन, राखी जाधव, स्वप्ना म्हात्रे, तेजिंदरसिंग तिवाना, शिवसेना : तृष्णा विश्वासराव, अमेय घोले, अंजली नाईक, सगुण नाईक, विजेंद्र शिंदे उबाठा : किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, मिलिंद वैद्य, प्रमोद सावंत, रमाकांत रहाटे, काँग्रेस: अश्रफ आझमी एमआयएम : विजय उबाळे मनसे : यशवंत किल्लेदार.
मेट्रो लाईन ७ ए प्रकल्पाचा मार्ग मोकळा
अप्पर वैतरणा जलवाहिनी यशस्वीरीत्या वळवलीमुंबई : मुंबई मेट्रो लाईन ७ ए प्रकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आव्हानात्मक टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला असून, २४०० मिमी क्षमतेच्या अपर वैतरणा जलवाहिनीचे सुरक्षित व अचूक वळविणे पूर्ण करण्यात आले आहे. या टप्प्यामुळे मेट्रो मार्गिकेच्या कामातील मोठा अडथळा दूर झाला असून प्रकल्प नियोजित वेळेत पूर्णत्वाकडे नेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या कामादरम्यान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई महापालिकेसोबत सातत्यपूर्ण समन्वय राखत सूक्ष्म नियोजन आणि उच्च दर्जाच्या अभियांत्रिकी कौशल्याच्या आधारे हे गुंतागुंतीचे काम पार पाडले. महानगरपालिकेच्या नियोजन विभागासह आऊटसाईड सिटी ट्रंक मेन्स, हायड्रॉलिक इंजिनीअर कार्यालय आणि के/ईस्ट वॉर्ड अशा विविध विभागांच्या संयुक्त समन्वयातून हा महत्त्वाचा टप्पा यशस्वी करण्यात आला. निश्चित करण्यात आलेल्या अल्प कालावधीतील शटडाऊनमध्ये जलवाहिनी स्थलांतराचे काम वेळेत पूर्ण करून तत्काळ जलपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना कमीत कमी गैरसोय झाली. या यशस्वी टप्प्यामुळे मेट्रो लाईन ७ए प्रकल्पाच्या कामाला वेग मिळणार असून, मुंबईकरांना अधिक जलद, सुरक्षित आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबईकरांचे पाणी संकट दूर होणार !
२१ किमी लांब पाण्याच्या बोगद्याला हिरवा सिग्नलमुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २१ किलोमीटरच्या जल बोगद्याच्या प्रकल्पासाठी कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड) मंजुरी मिळाली. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मुंबईत पाण्याची उपलब्धता वाढेल आणि भविष्यातील मागणी पूर्ण होईल. बीएमसीने हा २१ किलोमीटरचा बोगदा प्रकल्प बॅकअप प्लॅन म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला. बीएमसीचा जल बोगदा प्रकल्प ठाण्यातील येवई आणि कशेळी यांना पूर्व उपनगरातील मुलुंडशी जोडेल. या बोगद्याच्या बांधकामासाठी अंदाजे ४५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असू्न तो दोन टप्प्यात पूर्ण केला जाईल. बीएमसीच्या या प्रकल्पामुळे मुंबईचा पाणीपुरवठा बळकट होईल, तर प्रस्तावित कशेळी-मुलुंड बोगद्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गाचा विस्तारही सुलभ होईल. बीएमसी येवई जलाशयापासून कशेळीपर्यंत एक बोगदा देखील बांधेल. येवई-कशेली बोगद्याची एकूण लांबी १४ किमी आहे, तर कशेली-मुलुंड बोगद्याची खोली ७ किमी असेल. त्याची खोली ११० मीटर असेल. हा प्रकल्प पुढील सहा महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. बीएमसीने १४ किलोमीटर लांबीच्या येवई-कशेली बोगद्या आणि ७ किलोमीटर लांबीच्या कशेली-मुलुंड बोगद्यासाठी मार्च २०२४ मध्ये निविदा काढल्या. पूर्व उपनगरांना पाणी मिळेल. या बीएमसी प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी मिळणे बाकी होते.आता, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने बीएमसीच्या कशेळी (भिवंडी) ते मुलुंड (ऑक्ट्रॉय नाका) पर्यंतच्या जलमार्ग प्रकल्पासाठी कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड) ची मंजुरी दिली आहे. हा बोगदा टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) वापरून बांधला जाईल, म्हणूनच पर्यावरणीय मंजुरी आवश्यक होती. बोगद्याचा एकूण व्यास ५.३ मीटर असेल. हा बोगदा वायएमबीआर (याई मास्टर बॅलेंसिंग रिझर्व्हॉयर) पासून भिवंडीतील कशेळीपर्यंत १५०-१८० मीटर खोलीवर जाईल आणि जुन्या पाइपलाइन बदलेल, ज्यामुळे पूर्व उपनगरांना सुधारित पाणीपुरवठा होईल.
मुंबईच्या महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात?
चर्चेतील कुठला नगरसेवक ठरणार सरस?मुंबई : मुंबईचा महापौर हा महायुतीचा होणार हे आता स्पष्ट झाल्याने मोठा पक्ष असलेला भाजप आपल्या कोणत्या नगरसेविकेला महापौरपदी विराजमान करतात याकरता माध्यमांमध्ये जोरदार स्पर्धा दिसून येत आहे. या पदासाठी भाजपच्या अनेक महिला नगरसेवकांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये भाजपमध्ये निवडणुकीपूर्वी आलेल्या काही नगरसेवकांची नावेही माध्यमांद्वारे चर्चेत आहेत. त्यामुळे या महापौर पदी मूळ भाजपचा नगरसेवक बसवला जाणार की बाहेरून आलेल्यांपैकी कुणा नगरसेविकेला या पदावर बसवणार याची उत्सुकताच मुंबईकरांना लागली आहे. मात्र, बाहेरुन आलेल्या नगरसेवकाला महापौर पदी बसवण्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरु असली तरी भाजप हे पाऊल उचललेल काय याबाबतच जनतेच्या मनात शंका कुशंका निर्माण होवू लागल्या आहेत. त्यामुळे चर्चेत असणाऱ्यांपैंकी कोणती नगरसेविका कॉम्बिनेशनमध्ये सरस ठरते आणि आपल्या गळ्यात महापौरपदाची माळ घालून घेते हे आता पहावे लागेल.मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसणार आणि यासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग आरक्षित झाल्यानंतर भाजपच्या दोनपासून ते अनेक वेळा निवडून आलेल्या नगरसेविकांची नावे माध्यमांद्वारे चर्चिला जात आहेत. यामध्ये रितू तावडे, राजेश्री शिरवडकर,अलका केरकर, शितल गंभीर, स्वप्ना म्हात्रे, प्रिती सातम, योगिता कोळी, श्रीकला पिल्ले, तेजस्वी घोसाळकर, राखी जाधव, अश्विनी मते आदींची नावे चर्चेत आहेत. भाजपच्या निवडून आलेल्या महिला नगरसेविकांमध्ये अमराठी नगरसेविकांचा समावेश आहे, परंतु मुंबईचा महापौर हा मराठी हिंदूच असेल असे स्पष्ट सांगितल्याने अमराठ नावे ही मागे पडली आहेत.परंतु, तेजस्वी घोसाळकर, राखी जाधव, अश्विनी मते यांनी विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी पक्षात आलेल्या या नगरसेविकांना महापौरपदी बसवण्याचा विचार पक्ष करणार का असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे. माध्यमांकडून या तिन्ही नावांची चर्चा सुरु आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे नवीन आलेल्या नगरसेवकाचा विचार केला जाणार नसला तरी जर त्या निवडून आलेल्या नगरसेवकामध्ये क्षमता असेल तर पक्ष त्यांचा जरुर विचार करू शकतो,असेही बोलले जात आहे. त्यामुळे जनतेसोबतच भाजपमध्येही अस्वस्थता पसरली आहे. त्यामळे इतर पक्षातून आलेल्यांचा विचार जर पक्षाने केल्यास मूळ भाजपमधील नगरसेवकांवर अन्याय ठरेल अशाप्रकारची भावना जनतेसोबतच कार्यकर्तेही खासगीत व्यक्त करताना दिसत आहेत. सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भाजपचा स्वत:च्या बळावर महापौरपदी बसणारा पहिला महापौर असल्याने यापदावर पक्ष आता विविध कंगोऱ्यांनी विचार करून पुढील अडीच वर्षांमध्ये विरोधी पक्षाला जशास तसे उत्तर देण्याऐवजी सर्वांना सोबत घेवून जाणारा अशी महापौर देईल अशाप्रकारची माहिती मिळत आहे.त्यादृष्टीकोनातून चर्चेत असलेल्या सर्व नगरसेविकांच्या कामांसह स्वभाव, वर्तन आणि कामकाज करण्याची पध्दती, सभागृहातील संसदीय कायदेप्रणालीचे ज्ञान, वक्तृत्व,आक्रमकता,तसेच मुंबईचे व्हिजन ठेवणारा आणि पक्षाला अभिप्रेत मुंबईचा विकास करणारा महापौर या पदी बसवण्याच्यादृष्टीकोनातून पक्षाची हालचाली आहे.त्यामुळे कुठल्या नगरसेविकेचे या पदासाठी कॉम्बिनेशन जुळून येईल तिच्याच गळ्यात महापौरपदाची माळ पडली जाईल असे बोलले जात आहे
Pune Mayor Election ; विभागीय आयुक्तांनी निश्चित केली ६ फेब्रुवारीची तारीख; सकाळी ११ वाजता पार पडणार महापौर व उपमहापौर निवडीची विशेष सभा.
PMC Fine : दंड भरू, पण सवय बदलणार नाही! अस्वच्छ पुणेकरांनी वर्षभरात दंड म्हणून भरले ३.७७ कोटी
PMC Fine : १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान ५३ हजार नागरिकांवर कारवाई; सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांची संख्या वाढली.
Pune Airport : पुणे विमानतळावर बॉम्बची चिठ्ठी सापडल्याने खळबळ! प्रजासत्ताक दिनापूर्वी हाय अलर्ट
Pune Airport : दिल्ली-पुणे विमानात सापडली संशयास्पद चिठ्ठी; अफवेमुळे विमानतळावर गोंधळ, कार्गो टर्मिनलसह सर्व मार्गांवर नाकाबंदी.
Pune Water Crisis : पुणेकरांना २४ तास पाणी देण्याचे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात सर्वच राजकीय पक्षांनी दिले. मात्र, महापालिकेचे नवीन सभागृह अस्तित्वात येण्यापूर्वीच
Pune Crime News : भर रस्त्यात पतीकडून १९ वर्षीय पत्नीची निर्घृण हत्या; पोलिसांकडून पतीला बेड्या
Pune Crime News : दागिन्यांच्या मागणीवरून टोकाचा वाद; वाडेबोल्हाई येथील शाळेच्या मागे गाठून पतीने पत्नीवर केले तीक्ष्ण शस्त्राने वार.
Pune Crime News : पैशांचा व्यवहार जीवावर बेतला; सिंहगड रोडच्या तरुणाची मित्रांनीच केली हत्या
Pune Crime News : पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून मित्रानेच साथीदारांच्या मदतीने मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांच्या आत
Nursing Admission : राज्यात कधीकाळी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या नर्सिंग शिक्षणाला यंदा खासगी महाविद्यालयांच्या स्तरावर मोठा फटका बसला आहे.
JICA Project Pune : नदी शुद्धीकरणासाठी २४ कोटींचा निधी प्राप्त; पण ‘या’एका जागेमुळे प्रकल्प अडकला?
JICA Project Pune : मुळा-मुठा नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून जायका प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाच्या
२०१६ मध्ये, हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला आणि २०१९ मध्ये, दलित डॉक्टरेटची विद्यार्थिनी पायल तडवी यांनी आत्महत्या केली. महाविद्यालयात जातीवरून होणाऱ्या छळामुळे दोघांनीही हे पाऊल उचलले. त्यानंतर, विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयांमध्ये जातीवरून होणाऱ्या भेदभावाला रोखण्यासाठी नवीन नियम लागू केले. १३ जानेवारी २०२६ रोजी लागू झालेल्या या नियमांना यूजीसीचा काळा कायदा म्हटले जात आहे. सोशल मीडियावर रोलबॅक यूजीसी ट्रेंड होत आहे. नवीन नियमांमुळे उच्चवर्णीय विद्यार्थ्यांना नैसर्गिक गुन्हेगार बनवले आहे असे निदर्शकांचे म्हणणे आहे. वांशिक भेदभाव रोखण्यासाठी यूजीसीचे नवीन नियम काय आहेत, सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांच्या चिंता काय आहेत आणि निषेधानंतर सरकार नियम बदलेल का? जाणून घ्या…. प्रश्न १: महाविद्यालयांमध्ये जातीभेदाबाबत यूजीसीने नवीन नियम का बनवले? उत्तर: १७ डिसेंबर २०१२ पासून, सर्व UGC-मान्यताप्राप्त महाविद्यालये आणि विद्यापीठांनी वांशिक भेदभाव रोखण्यासाठी नियम लागू केले. उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेचा प्रचार नियम असे नाव असलेले हे नियम केवळ सूचना आणि जागरूकता उद्देशाने होते. त्यांनी कोणतेही दंड किंवा आदेश लादले नाहीत. १७ जानेवारी २०१६ रोजी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याने जातीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. त्याचप्रमाणे २२ मे २०१९ रोजी दलित डॉक्टर पायल तडवी हिनेही महाराष्ट्रात आत्महत्या केली. २९ ऑगस्ट २०१९ रोजी, रोहित वेमुला आणि पायल तडवी यांच्या कुटुंबियांनी महाविद्यालयीन प्रवेशाचे नियम कडक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याच वर्षी, आयआयटीने एका अभ्यासात असे आढळून आले की ऐतिहासिकदृष्ट्या वंचित जातींमधील ७५% विद्यार्थ्यांना महाविद्यालयात भेदभावाचा सामना करावा लागतो. जानेवारी २०२५ मध्ये, न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यूजीसीला जातीय भेदभावाच्या तक्रारींवरील डेटा गोळा करण्यास सांगितले आणि नवीन नियम तयार करण्याचे निर्देशही दिले. फेब्रुवारी २०२५ मध्ये अभिप्रायासाठी या नवीन नियमांचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला. अखिल भारतीय ओबीसी विद्यार्थी संघटनेने असा युक्तिवाद केला की विद्यापीठांमध्ये जातीय भेदभावाच्या व्याख्येत ओबीसींचा समावेश मसुद्यात नाही आणि महाविद्यालयांमध्ये भेदभावाच्या प्रकरणांना हाताळण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समानता समित्यांमध्ये ओबीसी सदस्यांचा समावेश नाही. या मसुद्यात वांशिक भेदभावाच्या खोट्या तक्रारी दाखल करण्यासाठी दंड समाविष्ट होता. असा युक्तिवाद करण्यात आला की यामुळे भेदभावाचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना तक्रार करण्यापासून रोखले जाईल. या मसुद्यात वांशिक भेदभावाची स्पष्ट व्याख्या देखील नव्हती. शिक्षण, महिला, मुले आणि युवा व्यवहार संसदीय समितीने या मसुद्याचा आढावा घेतला आणि तो ८ डिसेंबर २०२५ रोजी केंद्र सरकारला सादर केला. काँग्रेसचे राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह हे समितीचे अध्यक्ष होते. समितीने यूजीसीला त्यांच्या शिफारसी सादर केल्या, ज्यामध्ये भेदभावपूर्ण नियमाची व्याख्या आणि समानता समितीमध्ये ओबीसींचा समावेश यांचा समावेश होता. त्यानंतर, यूजीसीने मसुद्यात अनेक बदल केले आणि १३ जानेवारी २०२६ रोजी नवीन नियम अधिसूचित केले. हे नियम १५ जानेवारीपासून सर्व यूजीसी-मान्यताप्राप्त महाविद्यालये आणि विद्यापीठांना लागू झाले. यूजीसी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. प्रश्न २: या नवीन नियमांतर्गत कोणते मोठे बदल झाले आहेत? उत्तर: उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेला प्रोत्साहन देण्याच्या नियमावली २०२६ मध्ये ३ मोठे बदल आहेत... वांशिक भेदभावाची स्पष्ट व्याख्या देण्यात आली या व्याख्येत म्हटले आहे की, जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान, अपंगत्व यावर आधारित कोणताही अन्याय्य किंवा भेदभावपूर्ण व्यवहार, जो शिक्षणात समानतेला अडथळा आणतो किंवा मानवी प्रतिष्ठेच्या विरुद्ध असतो, तो जातीय भेदभाव मानला जाईल. तथापि, मसुद्यात जातीभेदाची स्पष्ट व्याख्या नव्हती. व्याख्येत ओबीसींचाही समावेश करण्यात आला या व्याख्येत अनुसूचित जाती/जमाती व्यतिरिक्त इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यात असे म्हटले आहे की त्यांच्याविरुद्ध कोणताही अन्याय्य किंवा भेदभावपूर्ण वागणूक जाती-आधारित भेदभाव मानली जाईल. तथापि, मसुद्यात ओबीसींचा समावेश नव्हता. खोटी तक्रार केल्यास शिक्षेची तरतूद काढून टाकण्यात आली या मसुद्यात खोट्या तक्रारी कमी करण्यासाठी तरतूद समाविष्ट होती. त्यात असे म्हटले होते की जर तक्रार खोटी किंवा जाणूनबुजून दुर्भावनापूर्ण पद्धतीने केली गेली तर तक्रारदाराला आर्थिक दंड किंवा महाविद्यालयातून निलंबन देखील होऊ शकते. ही तरतूद आता अंतिम नियमांमधून काढून टाकण्यात आली आहे. प्रश्न ३: नवीन नियमांनुसार वांशिक भेदभावाच्या तक्रारींवर कशी कारवाई केली जाईल? उत्तर: नवीन नियमांमध्ये वांशिक भेदभावाच्या तक्रारींवर कारवाईसाठी काही तरतुदी आहेत... महाविद्यालये समान संधी केंद्रे (EOCs) स्थापन करतील. ही केंद्रे कॅम्पसमध्ये दुर्लक्षित आणि वंचित व्यक्तींना शैक्षणिक, आर्थिक आणि इतर समुपदेशन प्रदान करतील आणि भेदभावाच्या तक्रारींचे निराकरण करतील. जातीय भेदभाव रोखण्यासाठी हे महाविद्यालय समाज, माध्यमे, जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी आणि पालकांसोबत काम करेल आणि कायदेशीर मदतीसाठी जिल्हा आणि राज्य कायदेशीर अधिकाऱ्यांची म्हणजेच न्यायालयांची मदत घेईल. EOC अंतर्गत, प्रत्येक महाविद्यालयाला एक समानता समिती स्थापन करणे आवश्यक असेल. तिचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य असतील. या समितीमध्ये SC/ST, OBC, अपंग आणि महिलांचा समावेश असेल. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. विशेष निमंत्रित एक वर्ष काम करतील. महाविद्यालयात 'इक्विटी स्क्वॉड' नावाची एक छोटी संघटना देखील स्थापन केली जाईल, ज्यांचे काम महाविद्यालयात भेदभाव रोखणे आणि त्यावर लक्ष ठेवणे असेल. भेदभावाची तक्रार मिळाल्यावर, समता समितीने २४ तासांच्या आत बैठक घेऊन प्रारंभिक कारवाई करावी आणि १५ दिवसांच्या आत महाविद्यालय प्रमुखांना अहवाल द्यावा. महाविद्यालय प्रमुखांनी ७ दिवसांच्या आत पुढील कारवाई सुरू करावी. ईओसीने दर सहा महिन्यांनी महाविद्यालय प्रमुखांना त्यांच्या कामगिरीचा अहवाल सादर करावा, तर महाविद्यालयांनी वांशिक भेदभावावर यूजीसीला वार्षिक अहवाल सादर करावा. याव्यतिरिक्त, यूजीसी एक राष्ट्रीय स्तरावरील देखरेख समिती स्थापन करेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महाविद्यालयांना यूजीसी कार्यक्रमांमधून वगळले जाऊ शकते. त्यांचे पदवी कार्यक्रम, दूरस्थ शिक्षण कार्यक्रम किंवा ऑनलाइन कार्यक्रम निलंबित केले जाऊ शकतात आणि यूजीसी मान्यता रद्द देखील केली जाऊ शकते. या शिक्षेचा अर्थ असा आहे की यूजीसीचे नियम आता केवळ सल्लागार उपाय म्हणून काम करत नाहीत, तर ते अंमलबजावणी श्रेणीत येतात. प्रश्न ४: आता लागू झालेल्या नवीन नियमांना विरोध का होत आहे? उत्तर: यूजीसीच्या या नवीन नियमांच्या अंमलबजावणीनंतर, #UGCRollback आणि #ShameOnUGC सारखे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. निदर्शक नियमांमधील चार त्रुटींकडे लक्ष वेधत आहेत... १. उच्चवर्णीय विद्यार्थ्यांविरुद्ध भेदभावाची व्याख्या नवीन नियमांमध्ये भेदभावाची व्याख्या अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी, महिला आणि अपंगांना समाविष्ट करून केली आहे, तर उच्च जाती किंवा सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांना भेदभावाच्या कक्षेतून वगळले आहे. यामुळे उच्च जातीतील विद्यार्थ्यांना नैसर्गिक गुन्हेगार म्हणून पाहिले जाईल. नियमांनुसार, त्यांच्यावर भेदभावाचा आरोप केला जाऊ शकतो, परंतु बळी नाही. एका वापरकर्त्याने लिहिले की, या नियमांमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे पीडित आणि आरोपीच्या जाती पूर्वनिर्धारित असतात. पीडित नेहमीच अनुसूचित जाती/जमाती आणि इतर मागासवर्गीय समुदायातील असेल, तर गुन्हेगार नेहमीच सामान्य जातीचा असेल. गरुड प्रकाशनचे संस्थापक आणि सीईओ प्रोफेसर संक्रांत सानू लिहितात, हे शैक्षणिक नियमांच्या विरुद्ध आहे. ते जातीच्या राजकारणाला प्रोत्साहन देईल. आरटीआय कार्यकर्त्या प्रोफेसर नेहा दास यांच्या मते, या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये जन्माच्या आधारावर एखाद्या व्यक्तीला अत्याचारी किंवा पीडित म्हणून लेबल केले आहे. यामुळे कॅम्पसमध्ये संघर्ष वाढेल. तामिळनाडूमध्ये यूजीसीच्या नवीन नियमांविरुद्ध फेडरेशन ऑफ स्टुडंट्स ऑर्गनायझेशनचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी निदर्शने करत आहेत. २. खोटी तक्रार केल्यास कोणतीही शिक्षा नाही. खोट्या किंवा दुर्भावनापूर्ण तक्रारींसाठी कोणताही दंड किंवा शिस्तभंगाची कारवाई नाही. तक्रार मिळाल्यानंतर २४ तासांच्या आत प्राथमिक कारवाई करणे आवश्यक असलेला नियम आहे. यामुळे उच्चवर्णीय विद्यार्थी आणि प्राध्यापकांविरुद्ध खोट्या तक्रारी वाढू शकतात. ३. इक्विटी कमिटीमध्ये सामान्य श्रेणीचा सदस्य नाही. ईओसी आणि इक्विटी कमिटीमध्ये जनरल कमिटीच्या सदस्यांसाठी तरतूद नाही. यामुळे वांशिक भेदभाव दूर करण्याच्या प्रणालीमध्ये उच्चवर्णीय विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व कमी होईल आणि समित्या एकतर्फी काम करतील. ४. कारवाईच्या भीतीमुळे संस्था योग्य निर्णय घेऊ शकणार नाहीत. नवीन भेदभाव नियमांचे उल्लंघन केल्यास महाविद्यालयांचे अनुदान रोखणे आणि मान्यता रद्द करणे यासारख्या गंभीर दंडांचा समावेश आहे. लोक म्हणतात की या दंडांच्या भीतीमुळे महाविद्यालये गुणवत्तेवर आधारित माहितीपूर्ण निर्णय घेण्यास प्रतिबंध करतील. सोशल मीडियावरील लोक म्हणतात की हे नियम उच्च जातींना दोष देतात, कारण ते आधीच भेदभाव करणारे आहेत. शिवाय, निषेध करणाऱ्यांचा असा दावा आहे की हे नियम १९५६ च्या यूजीसी कायद्याच्या कक्षेबाहेर आहेत. खरं तर, यूजीसीने १९५६ च्या यूजीसी कायद्याच्या कलम २६ अंतर्गत नवीन नियम लागू केले आहेत. निषेध करणाऱ्यांचा असा युक्तिवाद आहे की यूजीसी कायदा सामाजिक किंवा वांशिक भेदभावावर नाही तर शैक्षणिक मानके आणि विद्यापीठ अनुदानांवर लक्ष केंद्रित करतो. कायद्यात याचा उल्लेख नाही, म्हणून नवीन नियम कायद्याच्या कक्षेबाहेर येतात. खरं तर, यूजीसी कायद्यात जात, वांशिक किंवा वांशिक भेदभाव, छळ किंवा भेदभाव प्रतिबंधित करणाऱ्या नियमांचा थेट उल्लेख नाही. कायद्याच्या कलम १२ मध्ये विशेषतः असे म्हटले आहे की उच्च शिक्षण संस्थांसाठी मानके निश्चित केली पाहिजेत. तथापि, कलम २६ च्या कलम १ अंतर्गत, यूजीसीला शैक्षणिक मानकांबाबत नियम बनवण्याचा अधिकार आहे. प्रश्न ५ : सरकार हे नियम मागे घेऊ शकते का? उत्तर: यूजीसीच्या नियमांविरुद्ध एक ईमेल मोहीम सुरू आहे. ही मोहीम यूजीसी आणि शिक्षण मंत्रालयाला मोठ्या प्रमाणात ईमेल पाठवून हे नियम मागे घेण्याचे आवाहन करेल. यूजीसीचे माजी अध्यक्ष एम जगदेश कुमार म्हणाले की, उच्च शिक्षणात समानता आणण्यासाठी आणि भेदभाव दूर करण्यासाठी हे नियम बनवण्यात आले आहेत आणि त्यांचे उद्दिष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करणे आहे. त्याच वेळी, यूजीसीचे विद्यमान अध्यक्ष विनीत जोशी यांनी यावर कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. दरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, मोदी सरकारमध्ये उच्चवर्णीय समाजाला १०% आरक्षण मिळाले आहे आणि यूजीसीचे नियम संविधानाच्या कलम १४ नुसार आहेत, त्यामुळे कोणत्याही वर्गाविरुद्ध भेदभावाचा प्रश्नच उद्भवत नाही. नवीन कायदे मागे घेण्याच्या किंवा त्यात बदल करण्याच्या प्रश्नावर, सर्वोच्च न्यायालयाचे वकील विराग गुप्ता म्हणतात... एससी/एसटी कायद्याच्या गैरवापरावर सर्वोच्च न्यायालय आणि संसदेत वारंवार चर्चा झाली आहे. त्यामुळे, नवीन यूजीसी नियमांचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारला हे नियम पूर्णपणे रद्द करण्याचा किंवा त्यात योग्य सुधारणा करण्याचा अधिकार आहे. संविधानात भेदभावाविरुद्ध तरतुदी देखील आहेत, ज्यामध्ये समान वागणूक आवश्यक आहे. तथापि, या नवीन नियमांमुळे विद्यार्थी राजकारणात खोट्या तक्रारी आणि खटल्यांमध्ये वाढ होऊ शकते. हे रोखण्यासाठी यूजीसी आणि केंद्र सरकारने प्रभावी पावले उचलली पाहिजेत. जर सरकारने असे करण्यात अपयशी ठरले, तर नवीन नियमांचा गैरवापर होईल आणि ते संविधानाच्या कलम १९ आणि २१ मध्ये दिलेल्या निर्दोष विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करू शकतात.
२०१४ मध्ये प्रजासत्ताक दिनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे प्रमुख पाहुणे होते. त्याच वर्षी भारत आणि जपानने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी करार केला. २०१५ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे होते. अमेरिकेने भारताला 'प्रमुख संरक्षण भागीदार' म्हणून घोषित केले. २०१६ मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोइस ओलांद हे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या भेटीदरम्यान भारत आणि फ्रान्सने ३६ राफेल लढाऊ विमानांसाठी करार केला होता. प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे सहसा अशा देशांमधून असतात जिथे भारताला महत्त्व द्यायचे असते. ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी भारताने युरोपियन युनियनचे दोन प्रमुख नेते - उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो लुईस सॅंटोस दा कोस्टा यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी दिली आहे. भारताने युरोपियन युनियनच्या नेत्यांना का आमंत्रित केले, प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कसे निवडले जातात आणि यातून भारताला काय फायदा होतो... प्रश्न १: भारताने युरोपियन युनियनच्या नेत्यांना प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे का बनवले?उत्तर:युरोपियन युनियन एका देशाप्रमाणे नाही तर २७ राष्ट्रांच्या गटाप्रमाणे काम करते. आपल्या दोन प्रमुख नेत्यांना आमंत्रित करून, भारताने संपूर्ण युरोपियन युनियनला एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. उर्सुला वॉन डेर लेयन या युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा आहेत, जे युरोपियन युनियनचे कार्यकारी शाखा आहे, जे व्यापार करारांवर वाटाघाटी करते आणि नियमांची अंमलबजावणी करते. दरम्यान, अँटोनियो लुईस सॅंटोस दा कोस्टा हे युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष आहेत, जे सर्व २७ देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे प्रतिनिधित्व करते आणि धोरणात्मक दिशा निश्चित करते. युरोपियन युनियनच्या नेत्यांना प्रमुख पाहुणे बनवण्यामागे भारताचे तीन हेतू असू शकतात... १. मुक्त व्यापार करार (FTA) २ अब्ज ग्राहकांची बाजारपेठ तयार करेल१८ वर्षांच्या वाटाघाटींनंतर भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करार (FTA) अंतिम टप्प्यात आहे. त्याच्या २४ पैकी २० प्रकरणांना अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. २७ जानेवारी २०२६ रोजी भारत-युरोपियन युनियन शिखर परिषदेत त्याची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. १६ जानेवारी रोजी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी याला मदर ऑफ ऑल डील्स म्हटले. भारताला आशा आहे की या करारामुळे युरोपातील ४५० दशलक्ष ग्राहक बाजारपेठ भारतीय कापड, चामडे आणि औषधनिर्माण क्षेत्रांसाठी खुली होईल. २० जानेवारी रोजी दावोस येथील जागतिक आर्थिक मंचात उर्सुलाने या कराराचे वर्णन मदर ऑफ ऑल डील्स असे केले आणि म्हटले की, या करारामुळे २ अब्ज ग्राहकांची बाजारपेठ निर्माण होईल. ही जागतिक जीडीपीच्या अंदाजे एक चतुर्थांश असेल. २. अमेरिका-चीन संघर्षात 'बफर स्ट्रॅटेजी'सध्याच्या जागतिक व्यवस्थेत, युरोपियन युनियनशी जवळीक भारतासाठी एक बफर स्ट्रॅटेजी म्हणून काम करत आहे.पुरवठा साखळीसाठी चीनवर जास्त अवलंबून राहणे धोकादायक आहे हे भारत आणि युरोपियन युनियनने फार पूर्वीपासून ओळखले आहे आणि ते ते कमी करू इच्छितात. तसेच, दक्षिण चीन समुद्रात चीनच्या कडक भूमिकेमुळे, दोघेही धोरणात्मक भागीदारीत प्रवेश करू इच्छितात.ट्रम्पच्या टॅरिफ धमक्यांच्या पार्श्वभूमीवर, भारत युरोपसोबत अधिक मजबूत व्यापार संबंध निर्माण करत आहे. यामुळे भारताला अमेरिकेकडून एक प्रकारचे आर्थिक सुरक्षितता मिळेल. कारण जर अमेरिकेने आणखी कठोर कारवाई केली तर भारतासाठी परदेशी बाजारपेठ अचानक बंद होणार नाही. युरोप हा एक पर्याय बनेल. ३ आयएमईसीला ईयूच्या पाठिंब्याची आवश्यकता आहेभारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर (IMEC), ज्याला आधुनिक सिल्क रोड असेही म्हणतात, त्याची घोषणा सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या G-२० शिखर परिषदेत करण्यात आली होती. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) ला विरोध म्हणून याकडे पाहिले जात आहे. आयएमईसीचे दोन घटक आहेत: पूर्व कॉरिडॉर, जो भारताला समुद्रमार्गे आखाती देशांशी जोडेल आणि उत्तर कॉरिडॉर, जो आखाती देशांना रेल्वे आणि रस्त्याने जोडेल. हा कॉरिडॉर भारत आणि युरोपियन युनियनसाठी महत्त्वाचा आहे, कारण त्यामुळे सुएझ कालव्याद्वारे होणारा व्यापार ४०% कमी होईल आणि खर्च ३०% कमी होईल. यामुळे आखाती देशांमधून तेल आणि वायूचा व्यापार देखील सुलभ होईल.भारताला FTA आणि IMEC ने एकत्र काम करावे अशी इच्छा आहे जेणेकरून भारतीय वस्तू कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट पॅरिस, बर्लिन आणि रोमपर्यंत पोहोचू शकतील. प्रश्न २: प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्याची परंपरा केव्हा आणि का सुरू झाली?उत्तर:पहिल्या प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारी १९५० रोजी प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्याची परंपरा सुरू झाली. त्या दिवशीची परेड दिल्लीच्या इर्विन स्टेडियममध्ये (आता मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम) आयोजित करण्यात आली होती. इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकर्णो प्रमुख पाहुणे होते. पहिल्या प्रमुख पाहुण्या म्हणून इंडोनेशियाची निवड देखील प्रतीकात्मक होती, कारण दोन्ही देशांना अलीकडेच स्वातंत्र्य मिळाले होते आणि त्यांनी वसाहतवादी राजवटीविरुद्ध लढा दिला होता. इंडोनेशियाने १७ ऑगस्ट १९४५ रोजी स्वातंत्र्य घोषित केले आणि १९४९ मध्ये त्याला मान्यता मिळाली. प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्याची परंपरा ही भारताच्या मृदू आणि धोरणात्मक राजनैतिकतेचा एक भाग आहे...आंतरराष्ट्रीय मान्यता:एक नवीन राष्ट्र म्हणून, भारताला जागतिक समुदायात त्याचे स्थान जगासमोर दाखवून द्यायचे होते. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमुळे भारताच्या लोकशाहीला जागतिक मान्यता मिळेल. मैत्रीपूर्ण वृत्ती : प्रजासत्ताक दिनाचे आमंत्रण हे एखाद्या देशासोबत रणनीतिक भागीदारी मजबूत करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. ज्या देशाला हे आमंत्रण मिळते तो त्या वर्षी भारताचा सर्वात महत्त्वाचा मित्र मानला जातो. सांस्कृतिक आणि लष्करी प्रदर्शन : प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती ही भारताला जगासमोर आपले लष्करी सामर्थ्य आणि संस्कृती दाखविण्याचा एक मार्ग आहे. हे एक प्रकारचे राजनैतिक प्रदर्शन आहे. प्रश्न ३: प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्यांची निवड कशी केली जाते, त्याची प्रक्रिया काय आहे?उत्तर:प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुण्याची निवड करणे ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये राजनैतिक, व्यापारी, सामरिक आणि लष्करी फायद्यांचे सखोल विश्लेषण केले जाते. ही प्रक्रिया सुमारे सहा महिने आधीच सुरू होते. जरी संरक्षण मंत्रालय २६ जानेवारीच्या उत्सवाची जबाबदारी घेत असले तरी, परराष्ट्र मंत्रालय प्रमुख पाहुण्यांची निवड करते. पाहुण्यांची नावे निवडण्यापासून ते त्यांच्या कर्तव्याच्या मार्गावर पोहोचण्यापर्यंतची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया... स्टेप १: परराष्ट्र मंत्रालयात सुरुवातीची चर्चापरराष्ट्र मंत्रालय अशा देशांची यादी तयार करते ज्यांच्याशी भारत आपले संबंध मजबूत करू इच्छितो. ते तीन प्रश्नांचे विश्लेषण आणि उत्तरे देते:- त्या देशासोबत संरक्षण करार किंवा धोरणात्मक भागीदारी होणार आहे का?- त्या देशासोबत व्यापार किंवा गुंतवणुकीच्या मोठ्या अपेक्षा आहेत का?- त्या नेत्याला आमंत्रित केल्याने जागतिक राजकारणात भारताचे वर्चस्व वाढेल का? स्टेप २: पंतप्रधानांची मान्यतापरराष्ट्र मंत्रालय त्यांच्या शिफारसी असलेली एक फाइल पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) पाठवते. त्यानंतर पंतप्रधान आणि त्यांचे सल्लागार सध्याच्या जागतिक वातावरणात कोणत्या नेत्यांना आमंत्रित करणे सर्वात योग्य ठरेल हे ठरवतात. स्टेप ३: नेत्याचे वेळापत्रक औपचारिक निमंत्रण पाठवण्यापूर्वी, भारत आपल्या राजदूतांद्वारे निवडलेल्या देशाच्या नेत्याची उपलब्धता तपासतो आणि अनौपचारिकपणे त्यांचे वेळापत्रक निश्चित करतो.२६ जानेवारी रोजी निवडून आलेले नेते व्यस्त नसल्याची खात्री झाल्यावर, त्यांना अधिकृत निमंत्रणे पाठवण्याची तयारी केली जाते.जर तो नेता येऊ शकला नाही, तर दुसऱ्या पर्यायावर काम सुरू केले जाते. हे यापूर्वीही घडले आहे.२०१३ मध्ये ओमानचे सुलतान काबूस बिन सईद अल सईद भारत दौऱ्यावर येणार होते, परंतु परेडच्या काही आठवड्यांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना त्यांचा दौरा रद्द करावा लागला. त्यानंतर भारताने भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांना निमंत्रण दिले आणि त्यांनी कोणताही संकोच न करता भारताला भेट दिली. २०२४ मध्ये, पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना आमंत्रित केले होते, परंतु १२ डिसेंबर रोजी अमेरिकन प्रशासनाने जाहीर केले की बायडेन २६ जानेवारीला व्यस्त आहेत. परिणामी, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना आमंत्रित करण्यात आले होते आणि ते उपस्थित राहिले. स्टेप ४: राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने निमंत्रण पाठवणेपंतप्रधान कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर आणि पाहुण्यांच्या वेळापत्रकाचा आढावा घेतल्यानंतर, औपचारिक निमंत्रण भारताच्या राष्ट्रपतींना पाठवले जाते, जे त्यावर स्वाक्षरी करतात. भारताचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे अध्यक्षस्थान करत असल्याने, आमंत्रण यजमान देशाला पाठवले जाते. स्टेप ५: सुरक्षा आणि प्रोटोकॉल व्यवस्थापाहुण्यांनी आमंत्रण स्वीकारल्यानंतर, सुरक्षा एजन्सींचे काम सुरू होते.पाहुण्यांचे सुरक्षा पथक भारतात येते आणि परेड मैदान, कर्तव्याचा मार्ग, त्यांचे निवासस्थान इत्यादींची तपासणी करते.प्रोटोकॉल विभाग संपूर्ण कार्यक्रमाची तयारी देखील करतो, ज्यामध्ये गार्ड ऑफ ऑनर, राजघाट भेट, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसोबतच्या बैठका इत्यादींचे नियोजन केले जाते. अधिकृतपणे जाहीर होईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया गोपनीय राहते. त्याचा उद्देश परराष्ट्र संबंध मजबूत करणे आणि जागतिक स्तरावर भारताचे स्थान वाढवणे आहे. १९९९ ते २००२ पर्यंत माजी आयएफएस अधिकारी आणि प्रोटोकॉल प्रमुख मनबीर सिंग यांच्या मते, प्रमुख पाहुण्यांच्या भेटीचा मुख्य उद्देश त्यांना आनंदी आणि समाधानी करणे हा असतो. त्यांची भेट आरामदायी आणि त्रासमुक्त असते. अनेक पाहुण्यांनी आणि त्यांच्या राजदूतांनी भारताच्या समारंभाचे आणि प्रोटोकॉलचे कौतुक केले आहे. प्रश्न ४: हा फक्त आदर दाखवण्याचा एक मार्ग आहे की राजनैतिक संदेश आहे?उत्तर:प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होणे हा देशाला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. राष्ट्रपती भवनात त्यांना अधिकृत गार्ड ऑफ ऑनर दिला जातो. त्यानंतर भारताचे राष्ट्रपती संध्याकाळी त्यांच्यासाठी स्वागत समारंभ आयोजित करतात. महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाहुणे राजघाटावर देखील येतात. भारताचे पंतप्रधान त्यांच्यासाठी एक स्नेहभोजनाचे आयोजन देखील करतात, ज्यामध्ये अधिकृत आणि गैर-सरकारी व्हीआयपी उपस्थित असतात. माजी आयएफएस अधिकारी मनबीर सिंग यांच्या मते, प्रमुख पाहुण्यांच्या भेटीला प्रतीकात्मक महत्त्व आहे. त्यांना भारताच्या अभिमानाचा आणि आनंदाचा एक भाग मानले जाते. हे दोन्ही देशांमधील मजबूत मैत्री आणि वाढती भागीदारी दर्शवते. केवळ सन्मानापेक्षाही ते राजनैतिक ताकदीचे प्रदर्शन आहे. हे प्रमुख पाहुण्यांच्या निवड प्रक्रियेत देखील दिसून येते. परराष्ट्र धोरण तज्ञ विनय कौर यांचा असा विश्वास आहे की अशा प्रतीकात्मक कृतींद्वारे भारत आपले राजनैतिक आणि धोरणात्मक अस्तित्व मजबूत करतो. याद्वारे भारत जगभरात आपला धोरणात्मक हेतू आणि परराष्ट्र धोरण व्यक्त करतो. तज्ञांचा असा विश्वास आहे की आदरातिथ्याद्वारे, भारत आपल्यासाठी कोण महत्त्वाचे आहे हे सांगतो, त्याची सॉफ्ट पॉवर आणि संरक्षण क्षमता प्रदर्शित करतो आणि यजमान देशासोबत करार आणि भागीदारी देखील स्थापित करतो. प्रश्न ५: पाकिस्तान आणि चीनला कधी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते का?उत्तर:हो. भारताने पाकिस्तान आणि चीनला अशा वेळी आमंत्रित केले जेव्हा ते शेजारी प्रथम आणि शांततापूर्ण सहअस्तित्व धोरण अवलंबत होते... संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानला दोनदा आमंत्रित केले१९५५ मध्ये राजपथावर (आता कार्तव्य पथ) पहिल्यांदा परेड आयोजित करण्यात आली होती. पाकिस्तानचे तत्कालीन गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मोहम्मद हे प्रमुख पाहुणे होते. त्यानंतर १९६५ मध्ये पाकिस्तानी राष्ट्रपती अयुब खान यांना निमंत्रण पाठवण्यात आले, परंतु त्यांच्याऐवजी कृषीमंत्री राणा अब्दुल हमीद भारतात आले. त्यानंतर अवघ्या सात महिन्यांनी, ऑगस्ट १९६५ मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. भारताने कधीही कोणत्याही पाकिस्तानी नेत्याला प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला आमंत्रित केले नाही. 'हिंदी-चीनी भाई-भाई'च्या जमान्यात चीनला आमंत्रण मिळालेसुरुवातीच्या काळात भारत-चीन संबंध खूप चांगले मानले जात होते. दोन्ही देशांमध्ये हिंदी-चिनी, भाई-भाई हा नारा वापरला जात असे.१९५८ मध्ये भारताने चिनी कम्युनिस्ट नेते आणि लष्करी अधिकारी मार्शल ये जियानयिंग यांना आमंत्रित केले आणि ते देखील भारतात आले.पण चार वर्षांनंतर, १९६२ चा सीमावाद आणि युद्ध झाले. त्यानंतर चीनसोबतच्या संबंधांमध्ये बिघाड झाल्याने हे संबंध कायमचे संपुष्टात आले. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंचा असा विश्वास होता की अशा आमंत्रणांमुळे आणि आदराच्या हावभावांमुळे शेजाऱ्यांसोबतचा तणाव कमी होऊ शकतो. ते आशियाई एकतेचे नेतृत्व देखील करत होते आणि चीन आणि पाकिस्तानला बरोबर ठेवणे अत्यंत महत्त्वाचे होते. प्रश्न ६: कोणत्या देशाला सर्वात जास्त आणि कोणत्या देशाला कमीत कमी आमंत्रित केले गेले होते?उत्तर:२०२५ पर्यंत, ४७ देशांमधील ७० हून अधिक नेते प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारताने नेहमीच संरक्षण, ऊर्जा आणि धोरणात्मक क्षेत्रात त्याच्या जवळच्या मित्र राष्ट्रांना प्रमुख पाहुणे म्हणून पसंती दिली आहे. हे लक्षात घेता, भारताने फ्रान्सला सर्वाधिक ६ वेळा आमंत्रित केले. १९७६, १९८०, १९९८, २००८, २०१६ आणि २०२४ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी फ्रान्सच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित करण्यात आले होते. ब्रिटनचे नेते पाच वेळा आणि भूतान, इंडोनेशिया आणि रशियाचे नेते प्रत्येकी चार वेळा प्रमुख पाहुणे होते. त्याच वेळी, असे अनेक शक्तिशाली आणि महत्त्वाचे देश आहेत ज्यांना भारताने फक्त एकदाच आमंत्रित केले आहे. यामध्ये चीन (१९५८), ऑस्ट्रेलिया (१९७९), इराण (२००३), सौदी अरेबिया (२००६), दक्षिण कोरिया (२०१०) आणि अमेरिका (२०१५) यांचा समावेश आहे. प्रश्न-७: असे कधी घडले आहे का की कोणी पाहुणे आले नाही?उत्तर:हो. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राजपथावर (आता कार्तव्य पथ) प्रमुख पाहुण्यांची खुर्ची रिकामी राहिल्याचे पाच वेळा घडले आहे. यापैकी ३ प्रसंग सुरुवातीच्या काळातले होते, तर दोन प्रसंग कोविड दरम्यानचे होते. पहिल्या ३ वर्षात प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित केले नव्हते.१९५२ आणि १९५३ मध्ये भारताने कोणत्याही परदेशी राष्ट्रप्रमुखांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले नव्हते. त्यावेळी भारत नवीन संविधान लागू करण्यात आणि अंतर्गत व्यवस्था मजबूत करण्यात व्यस्त होता. त्यानंतर, १९६६ मध्ये, पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी एका परदेशी पाहुण्याला आमंत्रित करण्यात आले होते, ज्यांचे ११ जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद येथे अचानक निधन झाले. कोरोना महामारीच्या काळात २ वर्षे प्रमुख पाहुणे नव्हते२०२१ मध्ये, ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हे आमंत्रण स्वीकारले. तथापि, शेवटच्या क्षणी ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरसचा एक नवीन प्रकार पसरला. जॉन्सन यांना ही भेट रद्द करावी लागली. मर्यादित वेळेमुळे, भारताने इतर कोणत्याही पाहुण्यांना आमंत्रित केले नाही. २०२२ मध्ये, पाच मध्य आशियाई देशांच्या नेत्यांना - कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानच्या नेत्यांना आमंत्रित करण्याचे नियोजन होते, परंतु ओमिक्रॉनच्या वाढत्या लाटेमुळे ते रद्द करण्यात आले आणि सलग दुसऱ्या वर्षी प्रमुख पाहुणे नव्हते.
Railway Update : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून मुंबई-कोल्हापूरसह अमरावती आणि नांदेडदरम्यान विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला
Pune Crime News : हॉटेलमध्ये तरुणाची आत्महत्या; कर्जबाजारीपणामुळे तणावात असल्याचा प्राथमिक अंदाज
Pune Crime News : लष्कर परिसरातील हॉटेल मुकेश येथे वाई येथील सराफ व्यापाऱ्याच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Weekly Horoscope : तुमच्या राशीसाठी जानेवारीचा शेवटचा आठवडा कसा असेल?
Weekly Horoscope : आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळल्यास फायदा होईल. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील, मात्र एखाद्या जुन्या मुद्द्यावरून मतभेद होण्याची शक्यता आहे
तानसेन नावाचा महान गायक होऊन गेला. असे म्हणतात, ते सुरांचे सम्राट होते, तर ताल त्यांच्या दासी होत्या. त्यांनी गायलेले कोणतेही रेकॉर्डिंग उपलब्ध नसल्याने आपण कोणी त्यांचे गाणे, ऐकू शकलो नाही. खरं तर ही खंतच म्हणावी लागेल. कारण तानसेनच्या गायकीचे एकाहून एक सरस किस्से आहेत. ते ऐकूनच वाटते की...वाह!! काय आवाज असेल!!! तानसेन जेव्हा मेघ मल्हार राग गायचे, म्हणे तेव्हा पाऊस पडायचा. तानसेन यांनी जेव्हा दीप राग गायला, म्हणे तेव्हा दरबारातील मालवलेले दिवेही उजळून निघाले. म्हणे, ही जादू होती त्यांच्या आवाजात.. तानसेन यांच्याविषयी सांगण्याचे कारण म्हणजे आजच्या 'रागदरबार'च्या भागात आपण अशा एका 'बड्या' गायकासंदर्भात जाणून घेणार आहोत, ज्यांची शरीरयष्टी पैलवानाला लाजवेल अशी, पिळदार मिशा, भारदस्त व्यक्तिमत्व. परंतु, त्यांची गायकी अशी की त्यांना '20 व्या शतकातील 'तानसेन'ची उपाधी मिळाली. होय, ते आहेत उस्ताद बडे गुलाम अली खान साहेब. पाकिस्तानच्या कसूर येथे 2 एप्रिल 1902 साली उस्ताद बडे गुलाम अली खान यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अली बक्ष खान. अली बक्ष खान हे सतारवादक तसेच गायकही होते. बडे गुलाम यांनी गायनाचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या वडिलांकडूनच घेतले. त्यानंतर त्यांचे काका प्रसिद्ध गायक उस्ताद काले खान यांच्याकडूनही संगीताचे धडे घेतले. काले खान यांच्या निधनानंतर बडे गुलाम यांनी वडिलांकडून सारंगी शिकले. बडे गुलाम अली खान यांनी सारंगीच्या साथसंगतसोबत छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमध्ये गाणे सुरू केले. 1927 नंतर हळूहळू बडे गुलाम अली खान यांच्या आवाजाची जादू सर्वदूर पसरण्यास सुरू झाली. पंजाबमधील तसेच कोलकाता येथील संगीत परिषदांमध्ये 1940-42 पर्यंत बडे गुलाम अली खान यांनी चांगलेच नाव कमावले होते. 1944 साली विक्रम संगीत परिषदेत बडे गुलाम अली खान यांनी त्यांच्या गायकीने मुंबईकरांना मंत्रमुग्ध करून टाकले होते. भारताच्या फाळणीनंतर गुलाम अली खान यांचे गाव कसूर, हे पाकिस्तानमध्ये गेले आणि बडे गुलाम देखील पाकिस्तानला गेले. पण काही वर्षातच बडे गुलाम अली खान भारतात परतले. त्या काळात एका गाण्याचे 25,000 मानधन! 1957 साली मोरारजी देसाई यांच्या मदतीने बडे गुलाम अली खान यांना भारताचे नागरिकत्व मिळाले आणि सरकारकडूनच मुंबईतील मलबार हिल्स येथे समुद्रकिनारी एक बंगला देखील देण्यात आला. आता मुंबई म्हटले की चित्रपटांची नगरीच. बडे गुलाम अली खान यांना चित्रपटात गाणे गाण्याच्या अनेक ऑफर्स येणे सुरू झाले. परंतु, गुलाम अली खान यांनी याला नेहमीच विरोध केला. असे म्हटले जाते, त्यांना चित्रपटांसाठी गाणे गायला आवडत नव्हते. खूप प्रयत्न करून उस्ताद बडे गुलाम अली खान यांना 'मुघल-ए-आजम' चित्रपटासाठी राग आधारित गाणे गाण्यास चित्रपटाचे निर्माता के. आसिफ यांनी पटवलेच. परंतु, लगेच तयार होतील ते गुलाम अली कसले? यासंदर्भातला एक किस्सा फार प्रसिद्ध आहे. झाले असे की, बडे गुलाम अली खान गाणे गाण्यास तयार तर झाले होते. पण एका गाण्याचे त्यांनी 25 हजार रुपये मानधन मागितले. हा तो काळ होता, जेव्हा चित्रपट गीतांमध्ये नावाजलेले नाव लता मंगेशकर आणि किशोर कुमार सारखे कलाकार देखील एका गाण्याचे 500 रुपयांपेक्षा कमी मानधन घेत होते. के. आसिफ सुद्धा जिद्दी होते. त्यांनी एका गाण्याचे बडे गुलाम अली खान यांना 25 हजार रुपये मानधन दिले आणि गाणे गाऊनच घेतले. संगीतकार नौशाद यांचे राग सोहोनी आणि रागेश्वरी या दोन रागांवर आधारित गाणे 'प्रेम जोगन बनके' उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी गायले आणि त्यांना आणखीनच प्रसिद्धी मिळाली. बडे गुलाम अली खान यांच्या गायकीत पटियाला कसूर घराण्याशिवाय जयपूर आणि ग्वाल्हेर घराण्याची देखील झलक दिसून यायची. ठुमरी गायकीत तर बडे गुलाम अली खान यांचा विशेष हातखंडा होता. सोबतच ते ध्रुपद सुद्धा तितक्याच मधुरतेने व सरलतेने गायचे. ख्याल, ठुमरी, भजन हे सर्व प्रकार अत्यंत प्रभावीपणे ते गायचे. पंजाबी ढंगाचे ठुमरी गायक म्हणून त्यांचा खास लौकिक होता. गुलाम अली खान यांनी 'सबरंग' या टोपणनावाने अनेक ख्याल आणि ठुमरी लिहिल्या आहेत. त्यांनी गायलेल्या ठुमरी आजही लोकप्रिय आहेत, जसे की- का करू सजनी आये ना बालम, याद पिया की आये, प्रेम जोगन बनके, नैना मोरे तरस रहे, कंकर मार जाये, या ठुमरी 'एव्हरग्रीन' आहेत. गांधीजींनाही खान साहेबांची वाट पाहावी लागली... भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला संबोधित करण्यासाठी महात्मा गांधी यांना प्रार्थनेचे आयोजन करायचे होते. गांधीजींच्या प्रार्थनेच्या भाषणाच्या आधी, उस्ताद बडे गुलाम अली खान यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने सुरुवात करायची होती. सगळे जमले होते. गांधीजी सुद्धा स्टेजवर येऊन बसले होते. पण, गुलाम अली खान यांचा कुठेच पत्ता नव्हता. ते अडकले होते मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये. काही वेळाने खान साहेब पोहोचले आणि लोकांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. लोकांनी टाळ्या वाजवत स्वागत जरी केले असले तरी बडे गुलाम अली खान यांना चांगलाच दम लागला होता. आधीच आपल्यामुळे उशीर झाला याचे वाईट त्यांना वाटत होते. गांधीजी खान साहेबांकडेच बघत होते आणि इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमात बडे गुलाम अली खान यांना यायला उशीर झाल्याने काहीसे नाराज सुद्धा झाले होते. पण जेव्हा गांधीजींच्या लक्षात आले की खान साहेब स्वतः परेशान आहेत, तेव्हा गांधीजी म्हणाले, 'खान साहेब तुम्ही खूप हट्टे-कट्टे आहात आणि मी खूप दुबळा. त्यामुळे तुमच्यासोबत लढू तर शकत नाही.' हे ऐकून एकच हशा पिकला आणि बडे गुलाम अली खान यांची परेशानी सुद्धा दूर झाली. स्वातंत्र्याच्या या कार्यक्रमात उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी राग पहाडीमध्ये एक बंदिश गायली, ज्याचा मुखडा होता हरी ओम तित सत जपा कर, जपा कर. खान साहेबांनी यावेळी काही भजन सुद्धा गायले. भजन ऐकून गांधीजींनी म्हटले, मानवतेच्या भलाईची शिकवण एका महान आवाजात अमर झाली. खान साहेबांच्याच सुरात अनेक गायकांनी सूर मिसळला भारतीय शास्त्रीय संगीत आणि उपशास्त्रीय संगीताचा इतिहास पाहिला तर तानसेन, अमीर खुसरो आणि उस्ताद बडे गुलाम अली खान हे तीन नाव प्रामुख्याने समोर येतात. तानसेन पूर्व संगीताचे पूर्वज म्हणून ओळखले जातात, अमीर खुसरोने रागांचा आविष्कार केला, तर उस्ताद बडे गुलाम अली खान यांना गायक आणि आविष्कारक दोन्हीमध्ये उस्ताद मानले गेले. खान साहेबांच्या नंतर जेवढ्या गायकांनी गायले, त्या सगळ्यांनी त्यांच्यासारखेच गाण्याचा प्रयत्न केला. शाम चौरासी घराण्याचे उस्ताद नजाकत सलामत असोत किंवा पटियाला घराण्याचे अमानत अली फतेह अली असोत. त्या सर्वांनी खान साहेबांच्या सुरात सूर मिसळण्याचा प्रयत्न केला. बडे गुलाम अली खान यांचे टोपणनाव 'सबरंग' होते आणि त्यांचे संगीत खरोखरच त्यांच्या नावाप्रमाणे होते. त्यांच्या संगीतात जीवनाच्या प्रत्येक पैलूचा समावेश होता. जगातील महान गायक, ज्यात उत्तम तालीम केलेले संगीतकार आणि चित्रपट गायक यांचा समावेश होता, ते सर्व प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बडे खान साहेबांचे शिष्य बनले. कम्बख्त लता कभी बेसुरी नहीं होती लता मंगेशकर यांना उस्ताद बडे गुलाम अली खान आपली मुलगी मानायचे. लता मंगेशकर यांनी याविषयीची एक आठवण एका वृत्तवाहिनीला सांगितली होती. उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीला गायले होते. लता मंगेशकर म्हणतात, मला आठवते की उस्तादजी स्टेजच्या समोर बसले होते आणि मी स्टेजवर गात होते. माझ्या कपाळावर घाम फुटला होता आणि माझे पाय थरथरत होते. मी कसेबसे माझे गाणे संपवले आणि जीवात जीव आला. गाताना मला कधीही भीती वाटली नव्हती, पण त्या दिवशी खान साहेब माझ्या समोर बसले होते म्हणून वाटली. माझ्या नंतर, उस्ताद बडे गुलाम अली यांनी गायले आणि अशा प्रकारे गायले की केवळ मानवांनीच नाही तर वारा आणि पक्ष्यांनीही त्यांचे गाणे ऐकले. खान साहेब सुरुवातीला खयाल गायनात एक राग गायले आणि नंतर, गाताना त्यांनी उत्कृष्ट लयकारी सुद्धा केली. यानंतर, खान साहेबांनी ठुमरी सादर केली. ठुमरी गायनात त्यांचे विशेष प्रभुत्व होते. पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या कार्यक्रमात उस्तादजींनी राग, ठुमरी आणि गझल गायल्या, हा एक संस्मरणीय कार्यक्रम होता, अशी आठवण लता मंगेशकर यांनी सांगितली. उस्ताद बडे गुलाम अली खान यांना खरे तर चित्रपटातील गाणे फारसे आवडत नव्हते. पण काही मोजके गाणे ते आवर्जून ऐकायचे. एकदा त्यांनी लता मंगेशकर यांचे काही फिल्मी गाणे ऐकले आणि म्हटले होते, कम्बख्त लता कभी बेसुरी नहीं होती. अर्थातच 'कम्बख्त' शब्दाचा अर्थ इथे प्रेमळ पद्धतीने घेतलेला होता. यावर लता मंगेशकर यांनी स्वतःला भाग्यवान समजले की, सूर आणि संगीताचे महान उस्तादांनी मी सुरात चुकत नाही असे म्हटले, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. उस्ताद बडे गुलाम अली खान यांच्या चित्रपटात गाजलेल्या ठुमरी उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी जरी चित्रपटासाठी गायन केले नसले तरी त्यांच्या गायकीचा प्रभाव हा फिल्मी इंडस्ट्रीवर चांगलाच पडला होता. बडे खान साहेबांनी ज्या काही ठुमरी गायल्या आहेत. त्या एक से बढकर एक आहेत. आजही त्या अनेकांना तोंडपाठ आहेत. राग जंगल भैरवीमधली 'का करूं सजनी आये न बालम' ही खान साहेबांनी गायलेली ठुमरी चित्रपटात घेण्यात आली. 'प्रेम जोगन बन केक सुंदर पिया ओर चली रे' ही राग सोहनीमधली ठुमरी जी मुघल-ए-आझमसाठी बडे गुलाम अली खान यांच्याकडून गाऊन घेतली होती. राग भैरवीमधली ठुमरी 'नैना मोरे तरस गए आजा बलम परदेसी' ही सुद्धा चित्रपटात घेण्यात आली आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील 'ठुमरी' गायन शैली उस्ताद बडे गुलाम अली खान यांचे ठुमरी गायन शैलीवर प्रभुत्व होते, हे या संपूर्ण लेखातून लक्षात आलेच असेल. आता 'ठुमरी' गायन शैली नेमकी काय आहे, त्याविषयी थोडे जाणून घेऊयात... भारतीय संगीताचा प्रवास हा अत्यंत प्रवाही राहिला आहे. सुरुवातीच्या काळात ध्रुपद गायकीचे वर्चस्व होते, परंतु काळाच्या ओघात मानवी भावना अधिक लवचिक होत गेल्या आणि ध्रुपदाची जागा ख्याल गायकीने घेतली. ख्याल गायकीतील मधुरता आणि तानांनी श्रोत्यांना भुरळ घातली. याच क्रमाने पुढे जात मानवी विचारांतील परिवर्तनामुळे टप्पा, ठुमरी, दादरा, गझल आणि चित्रपट संगीत यांसारख्या भावप्रधान शैलींचा उदय झाला. ठुमरी: शब्दाचा अर्थ आणि उत्पत्ती 'ठुमरी' हा प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील एक अत्यंत सुमधुर आणि श्रृंगारिक गायन प्रकार आहे. या शब्दाची उत्पत्ती 'ठुम' किंवा 'ठुमकणे' या शब्दावरून झाली आहे. ठुम: याचा अर्थ 'ठुमकत चालणे' किंवा एक प्रकारची लयबद्ध श्रृंगारिक चाल. री: हा शब्द एका अंतर्मनातील सखीला उद्देशून म्हटला जातो, ज्याद्वारे मनातील भावना व्यक्त केल्या जातात. ठुमरीच्या प्रसारात मध्ययुगीन राजदरबारांचा मोठा वाटा आहे. विशेषतः अवधचे नवाब वाजिद अली शाह यांच्या काळात ठुमरीला सुवर्णकाळ लाभला. लखनऊची तत्कालीन सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती या गायन प्रकारासाठी अत्यंत पूरक होती. नवाब वाजिद अली शाह स्वतः एक उत्तम कलावंत होते. त्यांनी 'अख्तरपिया' या टोपणनावाने अनेक अजरामर ठुमऱ्यांची रचना केली. ठुमरीचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात गीत, वाद्य आणि नृत्य या तिन्ही कलांचा संगम पाहायला मिळतो. सुरुवातीच्या काळात ठुमरीचे सादरीकरण प्रामुख्याने विशिष्ट वर्गातील स्त्रियांमार्फत (वेश्या किंवा तवायफ) केले जात असे. हे सादरीकरण केवळ गायनापुरते मर्यादित नसून त्यात 'भाव-अभिनय' आणि नृत्याचा समावेश असे. ठुमरीमध्ये शब्दांच्या अर्थापेक्षा त्यातील भावनेला अधिक महत्त्व आहे. तसेच कलावंत आपल्या हातांच्या हालचालीतून आणि डोळ्यांच्या अभिनयातून गाण्याचा अर्थ श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असतो. अभिनयाची जोड असल्यामुळे हा प्रकार सर्वसामान्य जनतेला समजण्यास सोपा आणि मनाला भिडणारा ठरला.
Railway Mega Block : दौंड आणि काष्टी स्थानकांदरम्यान पायाभूत सुविधांच्या कामासाठी (दुहेरीकरण) मेगा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. दि. २५ जानेवारी रोजी नॉन-
Pune ZP Election 2026 : शिरूर तालुक्यातील राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांपासून अत्यंत वेगवान घडामोडी घडत असून, वरिष्ठ पातळीवर नेत्यांचे मनोमिलन झाले असले तरी ग्रामीण भागातील कार्यकर्ते मात्र मोठ्या संभ्रमात असल्याचे चित्र आहे.

30 C