SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

27    C
...

Satara News : सोनगाव कचरा डेपोची आग की ठेक्याचं ‘राजकारण’? साताऱ्यात धुरापेक्षा चर्चेचाच गुंता जास्त

Satara News : सोनगाव कचरा डेपोतील आग विझवण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी; कचऱ्यातून निघणारा विषारी वायू आणि जोरदार वाऱ्यामुळे सातारकर अस्वस्थ.

दैनिक प्रभात 20 Mar 2026 1:00 am

Makrand Patil : कोयना प्रकल्पग्रस्तांना दिलासा; मंत्रालयात झाला मोठा निर्णय..नेमकं काय ठरलं?

Makrand Patil : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वाची बैठक; जमीन वाटपाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे प्रशासनाला आदेश.

दैनिक प्रभात 20 Mar 2026 12:45 am

Mahabaleshwar Rain : महाबळेश्वर-पाचगणीला अवकाळीने झोडपले; ढीपाडव्यालाच पावसाची एन्ट्री; पाहा काय घडलं?

Mahabaleshwar Rain : रणरणत्या उन्हात महाबळेश्वर, पाचगणी आणि भिलार परिसराला पावसाने झोडपले; आठवडाभरापासून पेटलेले वनवे पूर्णपणे शमले.

दैनिक प्रभात 20 Mar 2026 12:30 am

Gudi Padwa 2026 : उंच गुढी आणि साखरेची गाठ; साताऱ्यात पारंपारिक जल्लोष, पण यंदा खास काय होतं?

Gudi Padwa 2026 : साताऱ्यात पारंपारिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा; सोन्या-चांदीच्या वाढत्या किमती असूनही बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी.

दैनिक प्रभात 20 Mar 2026 12:15 am

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर बसतानाच उबाठाने चार वेळा नगरसेविका बनलेल्या आणि महापौर पद भूषवलेल्या किशोरी पेडणेकर यांच्यावर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सोपवली. परंतु महापौर पद भूषवलेल्या किशोरी पेडणेकर या मात्र सभा शास्त्रात नापास ठरल्याचे दिसून येवू लागले आहे. महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेत्याला निवेदन करण्याचा अधिकार आहे. मात्र, या निवेदनाची प्रत न देता तोंडीच निवेदन मांडण्याच्या प्रयत्नात किशोरी पेडणेकर यांचे सभा शास्त्राचे अज्ञानपण उघड झाले आणि भर सभागृहात चिडीचूप खाली बसण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरला नाही. त्यामुळे उबाठाची मोठी नाचक्की यामुळे सभागृहात झालेली पहायला मिळत आहे.मुंबई महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या या महिन्याच्या पहिल्या सभेमध्ये विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौरांकडे निवेदन करण्याची परवानगी मागितली. निवेदन करण्याचा विरोधी पक्षाचा अधिकार असल्यामुळे महापौरांनी त्यांना परवानगी दिली. मात्र, ज्या विषयावर ते निवेदन करणार होते, त्याची कोणतीही प्रत महापौरांसह उपस्थित सदस्यांना त्यांनी दिली नाही. आजवरच्या प्रथा आणि परंपरेनुसार, विरोधी पक्षनेत्यांना ज्या विषयावर निवेदन करायचे असते, त्या निवेदनाच्या प्रती सभागृहात वाटणे आवश्यक आहे. त्यामुळे महापौरांनी, त्यांच्याकडे लेखी निवेदनाची मागणी केली. परंतु त्यांनी लेखी निवेदन देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे सभागृहनेते गणेश खणकर यांनी त्यांना हरकत घेतली. परंतु त्यानंतरही त्या आपल्या मतांवर ठाम राहिल्या. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे हे ज्येष्ठ सदस्य असल्यामुळे उभे राहिले आणि त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना निवेदन करण्यापासून आम्ही रोखू शकत नाही. तो त्यांचा अधिकार आहे. पण ज्या विषयावर निवेदन केले जाणार आहे, त्या निवेदनाची प्रत त्यांनी सभागृहातील सर्व सदस्यांना देणे आवश्यक आहे. आणि हीच मागणी आमची आहे. पण अशाप्रकारे तोंडी निवेदन केले जात नाही. त्यामुळे ते स्वीकारता येत नाही,असे सांगितले. त्यामुळे यावर गोंधळ घालून काहीही उपयोग नाही. असा कारभार अपेक्षित नाही. आपल्याकडे चार माजी महापौर आहेत, दोन उपमहापोर आहेत. त्यांनी सांगावे अशाप्रकारचे तोंडी निवेदन विरोधी पक्षाला आपण कधी करू दिले होते का? त्यामुळे निवेदनाची प्रत सर्व सदस्यांना द्यावी आणि आपले म्हणणे मांडावे.मात्र, निवेदनाची प्रत विरोधी पक्षनेत्यांनी द्यायला नकार दिल्यामुळे अखेर महापौर रितू तावडे यांनी सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेते यांना निवेदन करण्याचा अधिकार आहे, हे नाकारता येत नाही. पण निवेदनाची प्रत सभागृहाती सदस्यांना न देता आपण मुद्दा उपस्थित करणे योग्य नाही असे सांगत विरोधी पक्षनेत्यांना निवेदन मांडण्यापासून परावृत्त केले. एवढेच नाही नाही विरोधी पक्षनेत्या ज्या मुद्यावर निवेदन करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच मुद्दयावर ६६ ब अन्वये नगरसेविकेने मांडलेल्या मुद्दयावर चर्चा होणार आहे. त्यामुळे आपण निवेदन करताना किमान कोणत्या मुद्दयावर निवेदन करतो याची तरी माहिती घ्यावी,असे बोल महापौरांनी सुनावले. मात्र, महापौर एवढ्यावरच थांबल्या नाही तर त्यांनी विरोधी पक्षनेत्यांसह त्यांच्या नगरसेवकांना या सभागृहात शिस्त पाळलीच गेली पाहिजे. या सभागृहात या बाईंची शिस्त चालते. त्यामुळे आपण बसला कि माईक बंद होईल अणि उठलात तरच माईक चालू होईल अशीही कोपरखळी मारत त्यांना आपल्याला अजुन खूप सभाशास्त्र शिकायचे आहे,असाच संदेश दिला.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 11:10 pm

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेचे नियमित लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे, अशी ठाम मागणी आता जोर धरु लागली आहे. जेणेकरून परदेशी नागरिकांचे अवैध वास्तव्य रोखण्यासही मदत होईल, आणि पर्यायाने देशाच्या सुरक्षाही अबाधित राखली जाईल असे बोलले जात आहे.भाजपचे नगरसेवक नील सोमय्या यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली आहे. महापालिका सभागृहात याप्रकारचा ठराव मांडताना सोमय्या यांनी मुंबईतील काही भागांमध्ये परदेशी नागरिकांचे अवैधरित्या वास्तव्याचे प्रमाण वाढत आहे. महापालिकेच्या काही कार्यालयांमधून अशा व्यक्तींना बोगस जन्म दाखले देण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले. त्यामुळे मुंबईच्या सुरक्षेच्या आणि प्रशासकीय विश्वासार्हतेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर व चिंताजनक ही बाब असल्याचे सांगितले. त्यामुळे या पार्श्वभूमीवर, जन्म नोंदणी, प्रमाणपत्रांचे वितरण, अभिलेख व्यवस्थापन आणि संबंधित नियमांचे काटेकोर पालन होत आहे का, याची खात्री करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी यामध्ये मांडले आहे.तपासणीदरम्यान प्रक्रियेत असलेल्या त्रुटी, अनियमितता, विलंब आणि नियमभंग झालेल्या प्रकरणांचा शोध घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असून या संपूर्ण प्रक्रियेचे नियमित लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे, अशी ठाम भूमिका मांडली आहे. यामुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढेल आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होईल,असेही नमुद केले आहे. यामाध्यमातून अशाप्रकारच्या उपाययोजना राबवल्यास परदेशी नागरिकांचे अवैध वास्तव्य रोखण्यासही मदत होईल, असेही नमुद केले आहे.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 11:10 pm

महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कंटेंट क्रिएटर्ससोबत संवाद

मुंबई: महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी, शिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन सक्षम वातावरण निर्माण करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही कंटेंट क्रिएटर्सने विचारलेल्या प्रश्नांना त्यांच्या खास शैलीत उत्तरे दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईच्या एमएमआरडीए ग्राऊंड, बीकेसी येथे जेन ओ : पिक्सल ॲण्ड प्ले ॲण्ड ग्लोबल इस्पोर्ट गेम्स या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे, जेन ओचे संस्थापक श्रीपाद अष्टेकर आणि ग्लोबल ई-स्पोर्टस् फेडरेशनचे अध्यक्ष पॉल फॉस्टर उपस्थित होते.गेमिंग क्षेत्रातील करिअरविषयी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, माझ्या मुलींने गेमिंगमध्ये करिअर करायचे ठरवले, तर त्यांना १०० टक्के परवानगी आणि पूर्ण पाठिंबा असेल. कोणतेही क्षेत्र निवडले तरी मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री कार्यालयाचे २४x७ लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याबाबत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी सांगितले केले की, मुख्यमंत्री ऑफिसद्वारे मोठे प्रकल्प आणि महत्त्वाचे निर्णय लोकांसमोर लाईव्ह प्लॅटफॉर्मवर मांडण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी नमूद केले.कंटेंट क्रिएटर्सना भेडसावणाऱ्या ‘व्ह्यूज टू व्हॅल्यू’ या समस्येबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्य शासन क्रिएटर्स आणि ब्रँड्स यांच्यातील दरी कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अलीकडेच यूट्यूबचे सीईओ नील मोहन यांच्यासोबत चर्चा झाली असून, क्रिएटर्ससाठी मजबूत इकोसिस्टम तयार करण्यावर भर दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच एव्हीजीसी (AVGC) धोरणाद्वारे क्रिएटर इकॉनॉमीला चालना दिली जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.विद्यार्थ्यांसाठी कंटेंट क्रिएटिव्ह क्षेत्रात औपचारिक शिक्षणाच्या संधी वाढवण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) स्थापन करण्यात आले असून, हब-अँड-स्पोक मॉडेलद्वारे प्रशिक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना गेमिंग, अ‍ॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये करिअरची स्पष्ट दिशा मिळणार आहे.ग्रामीण भागातील इंटरनेट सुविधांबाबत त्यांनी सांगितले की, राज्यातील ४० हजार गावांपैकी सुमारे ७० टक्के गावांमध्ये फायबर नेटवर्क पोहोचले आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत प्रत्येक गावात उच्चगती इंटरनेट उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे गेमर्सना ‘लॅग-फ्री’ अनुभव मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.आंतरराष्ट्रीय दर्जाचे गेम्स तयार करण्याबाबतही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात १२ एव्हीजीसी हब्स विकसित केले जात असून, त्याद्वारे जागतिक दर्जाचे गेम्स तयार करण्यासाठी आवश्यक इकोसिस्टम उभी केली जाणार आहे. याशिवाय, नवी मुंबई विमानतळाजवळ ५० एकर जागेवर कंटेंट क्रिएटर्ससाठी अत्याधुनिक कॉम्प्लेक्स उभारण्याची योजना असल्याचेही त्यांनी जाहीर केले. येथे ई-स्पोर्ट्स, कंटेंट क्रिएशन आणि संबंधित सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असतील.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 10:30 pm

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा होता. इराणकडून भारताला रुपयांमध्ये तेल मिळते, जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरही त्या देशाने भारताला पाठिंबा दिला होता; मात्र अडचणीच्या काळात भारताने स्पष्ट भूमिका घेतली नाही, याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी व्यक्त केले.दादर येथील शिवाजी पार्क मैदानात आयोजित मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. राज ठाकरे म्हणाले, देशात नेमके काय सुरू आहे याचीच लोकांना जाणीव राहिलेली नाही. समाज माध्यमांमध्ये आणि करमणुकीत लोकांना गुंतवून ठेवले जात आहे. 'मी काय बोलतो यापेक्षा तुम्ही त्यातून काय घेतात हे महत्त्वाचे आहे,' असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या प्रभावातून बाहेर पडण्याचे आवाहन केले.निवडणुका येत-जात राहतात. मात्र आपण महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी उभे आहोत, असे स्पष्ट करत ठाकरे यांनी 'महाराष्ट्राचे हरवलेले वैभव परत मिळवण्यासाठी सत्ता आपल्या हाती घेणारच,' असा निर्धार यावेळी व्यक्त केला. राज्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रावर सध्या सुमारे ११ लाख कोटींचे कर्ज आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना हे कर्ज सुमारे २ लाख कोटी होते; त्यानंतर सत्तांतर झाले आणि आजची स्थिती समोर आहे. शहरांतील वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि नागरी सुविधांची ढासळलेली अवस्था कधी सुधारणार सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू नयेत म्हणून समाजाला मोबाइल आणि करमणुकीत गुंतवले जाते. माध्यमांनाही दबावाखाली ठेवले जाते,” असा आरोप देखील राज ठाकरे यांनी केला.‘महाराष्ट्र नेक्स्ट’ वेबसाइटचे लोकार्पणमहाराष्ट्राच्या विकासासाठी नागरिकांच्या कल्पना आणि सूचनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ ही नवी वेबसाइट सुरू करत असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी यावेळी केली. सरकारवर पूर्णपणे अवलंबून राहून चालणार नाही; महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रत्येकाने पुढे यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.एकेकाळी संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे असायचे. मात्र आज महाराष्ट्र काय देतोय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. क्रिकेटसारख्या क्षेत्रातही मुंबईचे प्रतिनिधित्व कमी होत आहे. आपण कुठे कमी पडतोय, याचा विचारच होत नाही. महाराष्ट्र कसा घडवायचा याचा विचार आपणच करायला हवा. सरकार आपल्या डोक्यावर बसले आहे आणि आपल्याला काही देणे-घेणे उरलेले नाही, अशी स्थिती झाली आहे.२००६ साली जाहीर केलेल्या ‘ब्लूप्रिंट’च्या संदर्भाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, काळानुसार राज्यात मोठे बदल झाले आहेत. वर्तमानपत्रांत अनेक चांगले लेख आणि कल्पना येतात; मात्र त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. अनेकांकडे योजना आहेत, पण ऐकणारे कोणी नाही।. याच पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ हा मंच उभारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेबसाइटवर नागरिकांनी आपले विचार मांडावेत. ‘जय महाराष्ट्र’सारख्या घोषणांना नव्हे, तर ठोस कल्पनांना येथे स्थान असेल, असे त्यांनी नमूद केले.ही वेबसाइट नागरिक आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करेल, असे सांगत ठाकरे म्हणाले, “तुम्ही सुचवलेली योग्य कामे सरकारकडून करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तसेच, सूचना देणाऱ्या नागरिकांची गोपनीयता राखली जाईल आणि त्यांच्या नाव-नंबरची माहिती उघड केली जाणार नाही, अशी हमीही त्यांनी दिली.कर्जमाफी करूनही शेतकरी आत्महत्या थांबत नाहीतराज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सांगितले की, तीन वेळा कर्जमाफी होऊनही परिस्थितीत बदल झालेला नाही. ग्रामीण भागातील तरुण शेती सोडून शहरांकडे वळत आहेत; मात्र शहरांचीही अवस्था बिकट असल्याचे त्यांनी नमूद केले. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार दरवर्षी ४ हजार ५०० ते ५ हजार मुले बेपत्ता होतात. तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे, ड्रग्सचा प्रसार वाढत आहे, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 10:30 pm

Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरीचा थरार; सिकंदर शेख, महेंद्र गायकवाडची विजयी घोडदौड कायम! माऊली जमदाडेला धोबीपछाड

Maharashtra Kesari 2026 : कुस्ती शौकीनांच्या नजरा लागलेल्या माती विभागात सोलापूरच्या मल्लांचे वर्चस्व पाहायला मिळाले, मात्र एका अनपेक्षित निकालाने सर्वांनाच चकित केले.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 10:24 pm

Elvish Yadav : युट्युबर ‘एल्विश यादव’ला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; सापाच्या विष प्रकरणातील ‘तो’खटला केला रद्द !

या पार्ट्यांमध्ये विदेशी महिलांना आमंत्रित केले जात असे आणि मनोरंजनासाठी सापाच्या विषाचा नशेसाठी वापर केला जात असे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 10:15 pm

HDFC Bank : एचडीएफसी बँकेची स्थिती बळकट; अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेकडून स्पष्टीकरण जारी

एचडीएफसी बँक (HDFC Bank) ही भारतातील महत्त्वाची बँक आहे. या बँकेचे प्रशासन उत्तम आहे. तसेच बँकेची आर्थिक परिस्थिती कमालीची बळकट आहे असे स्पष्टीकरण अर्थ मंत्रालय आणि रिझर्व बँकेकडून करण्यात आले आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 10:14 pm

फिलिपाईन्समधील भारतीय समाजाचे सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान; मनिला येथे मंत्री जयकुमार रावल यांचा मराठी बांधवांशी संवाद

मुंबई: मराठी समाज जगभर पसरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने मर्यादित असला तरी व्यापार, उद्योग, सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मनिला येथे केले.मंत्री जयकुमार रावल यांनी मनिला येथे आयोजित विशेष कार्यक्रमात भारतीय तसेच मराठी बांधवांशी संवाद साधला. या कार्यक्रमात प्रवासी मराठी समाजाशी संबंध अधिक दृढ करण्यावर भर देत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून प्रवासी मराठी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या १२ कलमी उपक्रमांची घोषणा केली. त्यामध्ये जागतिक महाराष्ट्र मंडळांचा डेटाबेस तयार करणे, अधिकृत ई-मेल प्रणालीद्वारे संपर्क, डिजिटल माध्यमातून जागतिक महाराष्ट्र दिन साजरा करणे, जागतिक प्रवासी महाराष्ट्र मंडळ स्थापन करणे, स्वतंत्र लोगो व संकेतस्थळ विकसित करणे, डिजिटल नोंदणी पोर्टल सुरू करणे, आभासी संवाद सत्रे आयोजित करणे, गुंतवणूक, विद्यार्थी व सांस्कृतिक विषयांसाठी सिंगल विंडो प्रणाली, एमआयडीसी समन्वय यंत्रणा, तक्रार निवारण यंत्रणा, परराष्ट्र मंत्रालय व भारतीय दूतावासांच्या सहकार्याने विद्यार्थी उपक्रम आणि प्रभावी घोषवाक्य तयार करणे यांचा समावेश आहे.यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र आणि जागतिक मराठी समाज यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याची गरज व्यक्त केली. मंत्री रावल म्हणाले की, मनिला, सेबू आणि दावाओ या शहरांमध्ये भारतीय वंशाचे नागरिक आयटी, बीपीओ, आरोग्य व वित्तीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. महाराष्ट्रीय समाजानेही आयटी, औषधनिर्मिती, सल्लागार सेवा आणि उद्योजकता क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, असे त्यांनी नमूद केले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत-फिलिपाईन्स संबंध अधिक बळकट होत असून माहिती तंत्रज्ञान, डिजिटल अर्थव्यवस्था, अक्षय ऊर्जा, संरक्षण सहकार्य आणि प्रक्रिया उद्योग या क्षेत्रांत मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. महाराष्ट्र हे औद्योगिक व वित्तीयदृष्ट्या अग्रगण्य राज्य असून फिलिपाईन्सला आसियान प्रदेशाचे प्रवेशद्वार मानून सहकार्य वाढविण्याची आवश्यकता असल्याचेही मंत्री रावल यांनी स्पष्ट केले.नागपूरचे मूळ रहिवासी नरेंद्र सिंगरू व रमोलाआईक सिंगरू यांनी त्यांच्या निवासस्थानी मंत्री जयकुमार रावल यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. त्याचबरोबर मनिलातील मराठी बांधवांनाही आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी भारताचे मनिलातील राजदूत हर्ष कुमार जैन, प्रथम सचिव निलेश कुमार राय उपस्थित होते. आशियाई विकास बँकेचे अधिकारी एल. सत्यश्रीनिवास, अर्जुन सिंह, क्रिशन रोतेला तसेच राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले. कार्यक्रमास मनिलातील मराठी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाराष्ट्र शासन प्रवासी मराठी समाजाला राज्याच्या विकासातील महत्त्वाचा भागीदार मानत असून व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री रावल यांनी केले. तसेच त्यांनी उपस्थितांना आणि मनिलातील सर्व मराठी बांधवांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 10:10 pm

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता मंडळाच्या देवीचे सहकुटुंब विधिवत पूजन करून देवीची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली.ठाणे पूर्व येथील संत तुकाराम महाराज मैदानात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त या देवीची स्थापना करण्यात आली असून पुढील नऊ दिवस इथे वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.यावेळी शिंदे कुटुंबियांनी विधीप्रमाणे देवीचे पाद्यपूजन करून तिच्यावर पुष्प आणि कुमकुम वाहून तिची प्रथेप्रमाणे पूजा करून आरती केली. देवीच्या आशीर्वादाने सर्वांना सुख,शांती, भरभराट, आनंद मिळावा तसेच सर्वांच्या दुःखाचे हरण व्हावे अशी मनोकामना देवीच्या चरणी लीन होताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.यावेळी शिंदे यांचा मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे, सून सौ. वृषाली श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 10:10 pm

Share Market : आखाती युद्ध चिघळल्यामुळे शेअर बाजारात हाहाकार; निर्देशांक 3 टक्क्यांनी कोसळले

आखातात इराणने विविध देशांच्या तेल आणि नैसर्गिक वायू प्रकल्पाच्या पायाभूत सुविधा (Share Market) उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जागतिक ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 10:03 pm

Sam Curran Ruled Out : राजस्थान रॉयल्सला सर्वात मोठा झटका! १८.५ कोटींचा स्टार अष्टपैलू खेळाडू IPL 2026 मधून बाहेर?

Sam Curran Ruled Out : आयपीएल २०२६ चा थरार सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला मोठा हादरा बसला आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 9:46 pm

Pune News : सोन्याच्या पत्र्यापासून केआरए ज्वेलर्सने घडविली संत ज्ञानेश्वर माऊली यांची फोटो फ्रेम

पुण्यातील (Pune News) प्रसिद्ध ज्वेलर्स म्हणून नावलौकिक मिळविलेल्या कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स अर्थात केआरए ज्वेलर्सच्या वतीने सोन्याच्या पत्र्यापासून संत ज्ञानेश्वर माऊली यांची फोटो फ्रेम घडविण्यात आली आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 9:43 pm

Mangal Prabhat Lodha : आयटीआयमध्ये 25 ते 35 टक्के जागा रिक्त; मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली माहिती

राज्यातील खासगी व शासकीय आयटीआयमधील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी (Mangal Prabhat Lodha) तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी खासगी आयटीआय सुधारणा व कौशल्य विकासासाठी समिती करण्यात येईल.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 9:29 pm

Raj thackeray : आधी इन्स्टाग्राममधून बाहेर पडा.! गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

पूर्वी लोक रस्त्यावर यायचे, पण आता मोबाईलवर निषेध व्यक्त केला जात आहे. माध्यमांची वाट लावून टाकली आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 9:22 pm

Sanju Samson : ‘संजूला धोनी व्हायची गरज नाही, तो स्वतःमध्ये खास…!’गंभीरने थरूर यांना कसं रोखलं? सॅमसनबद्दलचा जुना किस्सा व्हायरल

Sanju Samson : संजू केवळ १४ वर्षांचा असल्यापासून थरूर त्याला ओळखतात.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 9:17 pm

Randhir Jaiswal : देशातील ऊर्जा पुरवठा अखंडीत राहणार; रणधीर जयस्वाल यांनी केले स्पष्ट

पश्चिम आशियातील तणाव वाढत असताना (Randhir Jaiswal) देशाच्या सागरी वाहतूक आणि ऊर्जा सुरक्षेच्या गरजा पूर्ण केल्या जातील.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 9:13 pm

Raj thackeray : देश नेमका कुठे चाललाय? शिवतीर्थावर राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.!

Raj thackeray : मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवतीर्थावर आयोजित सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार भाषण करत राज्य सरकारसह केंद्र सरकारवर टीका केली. राज्यातील विकास, बेरोजगारी, वाढती वाहतूक कोंडी आणि बिघडलेले शहर नियोजन या मुद्द्यांवर त्यांनी सरकारला धारेवर धरले. शहरांची सध्याची अवस्था चिंताजनक असल्याचे सांगताना ठाकरे म्हणाले की, शहरांचा नियोजनबद्ध विकास थांबला असून […]

दैनिक प्रभात 19 Mar 2026 9:10 pm

Team India Schedule : नेदरलँड्समध्ये घुमणार टीम इंडियाचा डंका! ‘या’दिवशी येणार भारत-पाक आमनेसामने; पाहा वेळापत्रक

Team India Schedule : भारतीय पुरुष आणि महिला संघांच्या मोहिमेची घोषणा करण्यात आली असून, भारत-पाकिस्तानमधील हाय-व्होल्टेज लढतीची तारीखही निश्चित झाली आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 8:11 pm

Beed Crime : बीडमध्ये शेतात गांजाची लागवड; २२ किलो गांज्यासह महिला अटकेत

ही महिला गेल्या किती दिवसांपासून हा व्यवसाय करत होती आणि यामागे कोणते मोठे रॅकेट सक्रिय आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 7:51 pm

Vaibhav Suryavanshi : IPL 2026 पूर्वीच वैभव सूर्यवंशीचा जलवा! रवींद्र जडेजाची धुलाई करत प्रतिस्पर्धी संघांना दिला इशारा, पाहा VIDEO

Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी दिग्गज फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी करताना दिसत आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 7:40 pm

West Bengal election : या संघर्षात आम्ही त्यांच्या साथीला आहोत.! अरविंद केजरीवाल यांचा ममतांना पाठिंबा

आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी राजकीय रणसंग्रामाला सामोऱ्या जात असलेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शवला.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 7:37 pm

Eid Namaaz : ईदच्या दिवशी सार्वजनिक नमाज पठण करण्यावर बंदी; ‘या’देशाने घेतला मोठा निर्णय

यंदा ईदची नमाज (Eid Namaaz) मोकळ्या मैदानात किंवा रस्त्यावर अदा करण्यास मनाई करण्यात आली असून, सर्व मुस्लिम बांधवांनी फक्त मशिदींमध्ये जाऊन नमाज अदा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 7:33 pm

Nathan Ellis Ruled Out : आयपीएल २०२६ पूर्वी CSK ला मोठा धक्का! स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून पडला बाहेर; धोनीच्या ताफ्यात खळबळ

Nathan Ellis Ruled Out : न्नई सुपर किंग्सचे सीईओ के. एस. विश्वनाथन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 7:11 pm

Ashok Kharat : अशोक खरातच्या फार्महाऊसवर क्राईम ब्रँचचा छापा; मोठी माहिती समोर येणार….

खरात याला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा सपोर्ट मिळत असल्यामुळेच त्याच्यावर कारवाई झाली नाही, असा आरोप विरोधकांकडून होत आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 6:56 pm

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी जागतिक नेत्यांशी साधला संवाद; केले ‘हे’मोठे आवाहन

पंतप्रधानांनी (Narendra Modi) हिंसाचार थांबवून संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गाने शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 6:46 pm

Riyan Parag statement : ‘संजू भाईंना रिप्लेस करणं अशक्य…!’सॅमसनबद्दल बोलताना रियान भावूक; ‘रो-को’चा उल्लेख करत जिंकली मनं

Riyan Parag statement : रियानला 'संजू सॅमसनची जागा कशी भरून काढणार?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रियानने दिलेले उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 6:37 pm

Atanu Chakraborty : एचडीएफसी बँकेचे अध्‍यक्ष अतनु चक्रवर्ती यांचा तडकाफडकी राजीनामा

देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक असलेल्‍या एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष आणि संचालक अतनु चक्रवर्ती (Atanu Chakraborty) यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 6:20 pm

Rashtriya Swayamsevak Sangh : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा परीघ सातत्याने विस्तारत आहे…”–डॉ. मोहन भागवत

Rashtriya Swayamsevak Sangh : हे बदल केवळ प्रशासकीय असून मैत्री करणे आणि स्वतःच्या उदाहरणातून समाज परिवर्तन घडवणे, ही संघाची मूळ कार्यपद्धती कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 6:11 pm

राज्यसभा हुकलेल्या राहुल शेवाळेंवर लवकरच मोठी जबाबदारी?

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना संधी देऊन ‘धक्कातंत्र’ वापरल्याने नाराज झालेले माजी खासदार राहुल शेवाळे यांची मनधरणी करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यसभेची संधी हुकलेल्या शेवाळे यांच्यावर लवकरच केंद्रात पक्षाची मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत मिळत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात याबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याचे समजते.राज्यसभेसाठी माजी खासदार गजानन कीर्तिकर, आनंद अडसूळ आणि राहुल शेवाळे यांसारखे दिग्गज नेते इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी अनपेक्षित उमेदवार दिला गेल्याने हे नेते, विशेषतः राहुल शेवाळे तीव्र नाराज होते. गेल्या आठवडाभरापासून ही नाराजी दूर करण्याचे प्रयत्न मंत्री उदय सामंत यांच्याकडून सुरू होते. अखेर मंगळवारी रात्री सामंत हे शेवाळेंना घेऊन दिल्लीला रवाना झाले. तिथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत झालेल्या प्रदीर्घ चर्चेत शेवाळेंना केंद्रातील महत्त्वाच्या जबाबदारीचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही, याचा फटका शेवाळेंना बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महापालिका निवडणुकीची सर्व धुरा शेवाळे यांच्यावर होती. उबाठा गटातील अनेक माजी नगरसेवक सोबत आल्याने ५० ते ६० नगरसेवक निवडून येतील असा कयास बांधला जात होता. मात्र, अपेक्षित निकाल न लागल्यानेच शेवाळे यांची राज्यसभेची उमेदवारी कापण्यात आल्याचे बोलले जात आहे.कोणती जबाबदारी मिळणार?दरम्यान, दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, पक्षात काम करणाऱ्या प्रत्येकाचा योग्य सन्मान केला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या शेवाळे यांच्याकडे आता दिल्लीतील कोणती संघटनात्मक जबाबदारी सोपवली जाते आणि त्यानंतर त्यांची नाराजी खरोखर दूर होते का, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 6:10 pm

Ashok Kharat Case : महिला, पॉर्न व्हिडिओ, पेन ड्राईव्हनंतर ज्योतिषी खरातचा ‘हा’कारनामा समोर

स्वतःला स्वयंघोषित कॅप्टन म्हणवणारा ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात (Ashok Kharat Case) याला महिलेवर लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने अटक केली आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 5:58 pm

Maharashtra Kesari 2026 : वाघोलीत ६८वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला दमदार सुरुवात; सेमी फायनलमध्ये ‘या’मल्लांचा राहिला जलवा

Maharashtra Kesari 2026 : गुरुवारी पार पडलेल्या ५७ आणि ८६ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीच्या लढतींनी कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 5:57 pm

Pakistan-Afghanistan War : सणासाठी थांबले युद्धाचे रणांगण.! ईदनिमित्ताने तीन दिवसांच्या युद्धविरामाची केली घोषणा

पवित्र 'ईद-उल-फित्र' सणाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आशियातील तणावपूर्ण सीमाभागात शांततेची चिन्हे दिसत आहेत.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 5:52 pm

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि जुलैपर्यंत या फॉरमॅटमध्ये एकही सामना होणार नाही. पण वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने एकही सामना न खेळता आयसीसी टी२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल ५ मध्ये स्थान मिळवले आहे.विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात काही टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले, ज्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा कॉर्बिन बॉश रेटिंग गुण गमावून सहाव्या स्थानावर घसरला, ज्यामुळे बुमराहला आयसीसी टी२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या क्रमवारीत एक स्थान वर येण्याची संधी मिळाली आणि तो ७०२ रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.बांगलादेशचा कर्णधार मेहिदी हसन मिराजला पाकिस्तानविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या घरच्या एकदिवसीय मालिकेतील त्याच्या प्रभावी कामगिरीबद्दल पुरस्कृत करण्यात आले आहे. बांगलादेशने ही मालिका २-१ ने जिंकली, ज्यात मिराजने तीन सामन्यांमध्ये पाच विकेट्स घेतल्या.या कामगिरीमुळे मिराजने आयसीसी पुरुष एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत नऊ स्थानांची झेप घेत सातवे स्थान पटकावले आहे. त्याने एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही दोन स्थानांची सुधारणा करत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अष्टपैलू क्रिकेटपटू बनला आहे. केवळ मिराजच नाही, तर तन्झिद हसन (३१ स्थानांची झेप), लिटन दास, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान यांच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे.पाकिस्तानचा सलमान अली आघा आयसीसी पुरुष एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत नवव्या आणि अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे, तर कर्णधार शाहीन आफ्रिदी अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत पंचविसाव्या स्थानावर पोहोचला आहे.न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांमधील त्याच्या प्रभावी कामगिरीचा त्याला मोठा फायदा झाला आहे. सँटनरने टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत ११ स्थानांची झेप घेत १३ वे स्थान पटकावले आहे. तसेच, त्याने अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम ७ वे स्थानही मिळवले आहे.भारतीय चाहत्यांसाठी अभिमानाची बाब म्हणजे, भारताचा अभिषेक शर्मा टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. न्यूझीलंडचे लॉकी फर्ग्युसन आणि डेव्हन कॉनवे यांनीही आपल्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा जॉर्ज लिंडे अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत २३ व्या स्थानावर पोहोचला आहे, तर ऑटनील बार्टमनने गोलंदाजांच्या क्रमवारीत २३ स्थानांची झेप घेतली आहे.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 5:30 pm

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ उपसामुंबई : राज्यातील जलस्त्रोत पुनरुज्जीवित करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.०’ अभियानाला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेमुळे आतापर्यंत राज्यातील ३ हजार २६८ जलसाठ्यांमधून ७.७३ कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला असून, यामुळे तब्बल ७७ लाख पाण्याचे टँकर भरतील इतकी जलसाठवण क्षमता पुनर्स्थापित करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे ११ हजार ५८३ गावांतील सुमारे १ कोटी ३९ लाख नागरिकांना त्याचा लाभ झाला आहे.या योजनेचा सर्वाधिक लाभ राज्यातील शेतीला होत आहे. उपसा केलेला सुपीक गाळ सुमारे ६९ हजार शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नेला आहे. विशेष म्हणजे, लाभार्थ्यांपैकी ९१ टक्के शेतकरी हे वंचित घटकांतील आहेत. सुपीक गाळामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होत असून रासायनिक खतांवरील खर्चही कमी होत असल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत.२०२५-२६ या आर्थिक वर्षात या मोहिमेने विशेष गती घेतली आहे. चालू वर्षात १,३९८ जलसाठ्यांमधून २.६९ कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला. भंडारा आणि जळगाव जिल्ह्यांत गेल्या वर्षाच्या तुलनेत कामात ३०० टक्क्यांची वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यात ३२ लाख, तर जळगावमध्ये १६ लाख घनमीटर गाळ काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भच नव्हे, तर गोंदिया आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम आदिवासी जिल्ह्यांतही या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे.लोकसहभागातून जलक्रांती :राज्यातील ४०० पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हे अभियान यशस्वी ठरत आहे. राज्यातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून असल्याने भूजल पातळी वाढवण्यासाठी हा उपक्रम कणा ठरत आहे. संभाव्य ‘एल-निनो’चे संकट आणि भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, जलसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी शासन हा उपक्रम यापुढेही जोमाने राबविणार आहे, असे जलसंधारण विभागाकडून सांगण्यात आले.योजनेचा लेखाजोखा :- एकूण जलसाठे : ३,२६८- गाळ उपसा : ७.७३ कोटी घनमीटर- लाभार्थी गावे : ११,५८३- फायदा झालेले नागरिक : १.३९ कोटी- संबंधित जिल्हे : ३४

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 5:30 pm

चाहत्यांची प्रतीक्षा संपली, लवकरच रितेशचा 'हा'आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार

अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी सिनेमाची चाहते अनेक दिवसांपासून वाटत पाहत आहेत. मात्र, आता त्यांच्यासाठी खुशबर आहे. लवकरच रितेशचा 'राजा शिवाजी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून रितेशच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. या सिनेमाचा फर्स्ट लुक टीझर रिलीज झाला असून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील हा सिनेमा येत्या १ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.लवकरच प्रेक्षकांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनप्रवास एका भव्य सिनेमॅटिक अनुभवाच्या रूपात पाहता येणार आहे. रितेश देशमुख यांचे दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका साकारलेल्या 'राजा शिवाजी' या सिनेमाचा फर्स्ट लुक टीझरला सध्या चित्रपटगृहात प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.या सिनेमासाठी निर्मात्यांनी फार वेगळा निर्णय घेतला असून या चित्रपटाची भव्यता प्रेक्षकांना केवळ मोठ्या पडद्यावरच अनुभवता यावी म्हणून हा टीझर डिजिटल प्लॅटफॉर्मऐवजी थेट 'धुरंधर: द रिव्हेंज' या सिनेमाबरोबर थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.अभिनेता रितेश देशमुखने या सिनेमासाठी विशेष मेहनत घेतली असून, तो स्वतः महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच, या कथेला अजय-अतुल यांचं संगीत अधिक प्रभावी बनवणार आहे.प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन यांनी हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात कैद केला असून ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती केली आहे.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 5:30 pm

Guardian Minister of Nandurbar : 3 महिन्यांनंतर नंदुरबारला मिळाला पालकमंत्री; ‘या’मंत्र्यावर सोपवली जबाबदारी

राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोडी घडली आहे. तब्बल तीन महिन्यांनंतर नंदुरबार जिल्ह्याला नवीन पालकमंत्री (Guardian Minister of Nandurbar) मिळाला आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 5:27 pm

Donald Trump : ट्रम्प यांच्यासमोर सर्वात कठीण पेच.! अणुसाठा जप्त करण्यासाठी अमेरिकन सैन्य मैदानात?

ट्रम्प आता इराणमधील या 'अणुखजिन्याला' नष्ट करण्यासाठी मोठी लष्करी जोखीम पत्करणार की नाही, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 5:27 pm

Gautam Gambhir Lawsuit : टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरची दिल्ली उच्च न्यायालयात धाव! नेमकं काय आहे प्रकरण? घ्या जाणून

Gautam Gambhir Lawsuit : गौतम गंभीरने दिल्ली उच्च न्यायालयाच्या कमर्शियल डिव्हिजनमध्ये १६ इंस्टाग्राम अकाउंट्स आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 5:15 pm

बादशाहनंतर आता 'या'प्रसिद्ध गायकाला जीवे मारण्याची धमकी

नुकताच काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक बादशाहला बिष्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी एका प्रसिद्ध गायकला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंजाबी गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवालला परत एकदा अशी धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या सोशल मीडियावर एक कथित ऑडिओ कॉल व्हायरल होत आहे. त्यामध्ये स्वतःला गँगस्टर गोल्डी बराड असल्याचं सांगणारा व्यक्ती गिप्पी ग्रेवालला थेट धमकी देत आहे. या घटनेनंतर चाहते आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये मोहालीचा उल्लेख करत पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी थेट धमकी देण्यात आली आहे. मात्र, अद्याप या व्हायरल ऑडिओ क्लिपची अधिकृत पुष्टी पंजाब पोलिसांनी केलेली नाही. तसेच या प्रकरणात पोलिसांकडे कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाली नाही.याआधीही गायक गिप्पी ग्रेवालला अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या असून तो सध्या कॅनडातील व्हॅन्कुव्हर शहरामध्ये असलेल्या व्हाईट रॉक या ठिकाणी राहतो. गायक गिप्पी ग्रेवालच्या घरावर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही गोळीबार झाला.तसेच, या व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर पुन्हा एकदा गिप्पी ग्रेवालच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असून पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 5:10 pm

Raja Shivaji Movie Teaser : धमन्यांमधून रक्त खवळणार..! ‘धुरंधर 2’च्या सुरुवातीलाच झाली ‘राजा शिवाजी’ची एंट्री; घुमला ‘हर हर महादेव’चा नारा

रितेश देशमुखांचा महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 4:59 pm

Rahul Gandhi : दिल्लीकरांनी चिथावणीला बळी पडू नये; राहुल गांधी यांचे आवाहन

दिल्लीतील उत्तम नगर भागात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जनतेला शांतता राखण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 4:58 pm

Anil Ambani : अनिल अंबानीं सीबीआय मुख्यालयात हजर; बँक फसवणूक प्रकरणात होणार चौकशी

स्टेट बँक ऑफ इंडियाने रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड विरुद्ध दाखल केलेल्या २,९२९ कोटी रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणात, सीबीआयने गुरुवारी उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांची चौकशी केली.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 4:37 pm

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभवमुंबई : नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर पार पडलेल्या भव्य संचलनात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचे गिरगाव, मुंबई येथे नागरिकांसाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन सर्वसामान्यांना घडत असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.महाराष्ट्राच्या लोकसंस्कृती, संत परंपरा, कला आणि परंपरागत वैभवाचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या या चित्ररथाने राष्ट्रीय पातळीवर विशेष छाप पाडत देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली होती. विविध सांस्कृतिक घटकांचे सजीव आणि आकर्षक सादरीकरण या चित्ररथातून करण्यात आले असून, राज्याच्या वैभवशाली वारशाचे दर्शन घडविणारा हा उपक्रम ठरला आहे.या चित्ररथाच्या साकार प्रक्रियेत विविध कलाकार, तंत्रज्ञ आणि सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकारांनी योगदान दिले असून त्यांच्या सर्जनशीलतेचा उत्कृष्ट आविष्कार या माध्यमातून पाहायला मिळतो. प्रजासत्ताक दिन संचलनात मिळालेल्या यशामुळे राज्याच्या सांस्कृतिक ओळखीला राष्ट्रीय स्तरावर नवे अधोरेखन प्राप्त झाले आहे.सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.गिरगाव परिसरातील या प्रदर्शनाला नागरिक, विद्यार्थी, सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासक आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई श्रीराम पांडे यांनी केले आहे.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 4:30 pm

Gudi Padwa 2026 : सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार आणि अजिंक्य रहाणेने यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, नुकताच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंह, बीसीसीआयचे 'क्रिकेट ऑफ एक्सलन्स'चे प्रमुख आणि माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण, माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे आणि अजिंक्य रहाणे यांनी सोशल मीडियाद्वारे देशवासियांना गुढीपाडवा आणि उगादीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.सचिन तेंडुलकरने आपल्या एक्स अकाउंटवर लिहिले, तुम्हाला व कुटूंबीयांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच प्रार्थना करतो. सूर्यकुमार यादवने लिहिले, नव्या स्वप्नांसह एका नव्या सुरुवातीचे स्वागत करा. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.तुम्हाला व कुटूंबियांना,गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्याहार्दिक शुभेच्छा…हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच प्रार्थना करतो. pic.twitter.com/skOSQMuFRl— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 19, 2026अजिंक्य रहाणेने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद आणि यश घेऊन येवो. अनिल कुंबळे यांनी लिहिले, उगादीच्या या शुभप्रसंगी, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.हरभजन सिंहने एक्स अकाउंटवर लिहिले, नवीन वर्ष, नवी ऊर्जा, एक नाते. आपण आरोग्याने, परंपरेने, तुमच्यामुळे जोडलेले आहोत. उगादी आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.One New Year. Many traditions.Happy Ugadi, Gudi Padwa, Cheti Chand, Navreh, Sajibu Nongma Panba. A celebration of unity in diversity. Wishing all new beginnings & endless possibilities pic.twitter.com/MEWuaOouGk— VVS Laxman (@VVSLaxman281) March 19, 2026तर व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी लिहिले, नवीन वर्ष. अनेक परंपरा. उगादी, गुढी पाडवा, चेटी चांद, नवरेह, साजिबू नोंगमा पानबा यांच्या हार्दिक शुभेच्छा. विविधतेतील एकतेचा उत्सव. सर्वांना नवीन सुरुवात आणि अमर्याद संधींच्या शुभेच्छा.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 4:30 pm

Pakistan : “दहशतवादासाठी अफगाण भूमीचा वापर खपवून घेणार नाही..”–पाक लष्करप्रमुख मुनीर

लष्करप्रमुख मुनीर यांनी देशात हिंसाचार भडकवण्यासाठी धार्मिक भावनांचा गैरवापर होऊ नये आणि अतिरेकी प्रवृत्तींचा सामना करण्यासाठी उलेमांनी महत्त्वाची भूमिका बजावावी

दैनिक प्रभात 19 Mar 2026 4:25 pm

SRH IPL 2026 : ईशान किशन आणि अभिषेक शर्मावर हैदराबाद संघाने टाकली मोठी जबाबदारी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या आधी, सनरायझर्स हैदराबादने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा युवा फलंदाज ईशान किशनची संघाने कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे पॅट कमिन्सच्या जागी ईशान किशन संघाचं नेतृत्त्व करणार आहे. तर अभिषेख शर्मा यांची उपकर्णधार पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.दुखापतीमुळे पॅट कमिन्स हंगामातील सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. तो परत येईपर्यंत ईशान किशन संघाचं नेतृत्व करणार आहे.सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले, पॅट कमिन्स दुखापतीतून सावरत आहे आणि हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. तो बरा होईपर्यंत, ईशान किशन संघाचे नेतृत्व करेल आणि अभिषेक शर्मा उपकर्णधार असेल. ईशानने या हंगामात झारखंडला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून दिली. त्याने संपूर्ण हंगामात दमदार खेळ केला आणि याच कामगिरीमुळे त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले. ईशान गेल्या वर्षीच हैदराबाद संघात सामील झाला आणि त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा त्याच्यावर असणार आहेत.हैदराबाद संघाने २०१६ मध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली आपले पहिले विजेतेपद पटकावले होते. २०२४ मध्ये, पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. पण कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत झाला. कमिन्सच्या नेतृत्वाखाली हैदराबादने अपवादात्मक कामगिरी केली आहे. हा संघ अत्यंत आक्रमक असून आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो, ज्यामध्ये अभिषेक शर्मा, ईशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी यांसारखे स्फोटक फलंदाज आहेत.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 4:10 pm

Karachi Natural Disaster : काराचीवर नैसर्गिक संकट; वादळामुळे १९ जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराची शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी-वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे किमान १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर डझनभर लोक जखमी झाले आहेत. पाऊस आणि वादळामुळे झालेल्या मृत्यूंनंतर शहर प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.बुधवारी (१८ मार्च) रात्री कराचीमध्ये जोरदार वाऱ्यांमुळे अनेक घरांची छपरे उडाली आणि भिंती कोसळल्या. अनेक ठिकाणी झाडे आणि साइनबोर्ड पडले. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. अशातच पाकिस्तान हवामान विभागाने गुरुवारी आणखी पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा इशारा दिला आहे.काराचीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संघार मलिक यांनी सांगितले की, वादळादरम्यान छत आणि भिंत कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी ही घटना घडली, तेथे लोक चहा पित बसले होते. त्यांनी सांगितले, “वादळ, जोरदार वारे आणि पावसामुळे सईदाबाद परिसरातील मोचको गोठ येथेही एक इमारत कोसळली आहे.”पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बचाव पथक अद्याप ढिगारा हटवण्याचे काम करत असून मलब्याखाली आणखी लोक अडकले असण्याची शक्यता आहे.कराचीचे महापौर मुर्तजा वहाब यांनी खराब हवामान लक्षात घेऊन नागरिकांनी घरातच राहावे आणि विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.अहवालानुसार, मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. हवामान विभागाने सिंध प्रांतातील इतर भागांमध्येही पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 3:30 pm

Gold Silver Price : आनंदवार्ता! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

- गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बातमीमुंबई : आठवड्याच्या चौथ्या व्यापारी दिवशी म्हणजेच गुरुवार १९ मार्च रोजी, इराणशी संबंधित तणावामुळे शेअर बाजारात घसरण झाली आणि सेन्सेक्स सुमारे १८०० अंकांनी कोसळला. मात्र, सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी गुरुवारीची बाजार परिस्थिती दिलासादायक ठरली आहे.सोन्याच्या दरात ४ हजार, चांदीत १४ हजारांची घसरण :त्यामुळे गुढीपाडव्यानिमित्त सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. मुंबईत सोन्याचे दर आज १,५६,१८६ रुपये प्रति तोळा, जे काल १,६०,१९० रुपये होते. म्हणजेच, सोन्याच्या दरात ४ हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर, चांदीच्या दरात जवळपास १४ हजार रुपयांची घसरण दिसली आहे. आज मुंबईत चांदीचा दर २,४३,९१३ रुपये प्रति किलो, तर काल तो २,५७,६६७ रुपये होता.आंतरराष्ट्रीय बाजारातही घसरण :'यूएस स्पॉट गोल्ड' १.२२% नी घसरून ४,८३६ डॉलर प्रति औंस'स्पॉट सिल्वर' २.२५% नी घसरून ७५.७५ डॉलर प्रति औंसदेशांतर्गत वायदा बाजारात (MCX) सोन्याचा दर सुमारे १.५५ लाख रुपये प्रति १० ग्रॅम, आणि चांदीचा दर २.५० लाख रुपये प्रति किलो झाला आहे.सोने-चांदीचे दर कसे ठरतात?आंतरराष्ट्रीय बाजार आणि डॉलर : जागतिक बाजारात सोने-चांदीचे दर डॉलरमध्ये ठरतात. डॉलर मजबूत किंवा रुपया कमकुवत झाला, तर भारतात किमती वाढतात.कर आणि आयात शुल्क : आयात कर, जीएसटी आणि स्थानिक शुल्क देखील किमतींवर परिणाम करतात.जागतिक अनिश्चितता : युद्ध, आर्थिक मंदी, व्याजदरातील बदल यांचा थेट परिणाम. अनिश्चिततेत गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणजे सोने पसंती करतात.सांस्कृतिक महत्त्व : भारतात सोने परंपरांशी जोडलेले आहे; सण, लग्नकार्य यांमुळे मागणी वाढते.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 3:10 pm

Amarjit Singh Daulat: ‘इराण युद्ध जिंकेल, भारत…’रॉच्या माजी प्रमुखांचा खळबळजनक दावा ; दोन्ही देशांमधील संबंधांवर टाकला प्रकाश

Amarjit Singh Daulat: मध्य पूर्वेतील सुरू असलेले युद्ध जागतिक ऊर्जा संकट अधिक गंभीर करत आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 3:04 pm

Pregnancy: नॉर्मल की सिझेरियन डिलिव्हरी? दोन्हींचे फायदे-तोटे जाणून घ्या आणि घ्या योग्य निर्णय

Pregnancy डॉक्टरांच्या मते, कोणती डिलिव्हरी सुरक्षित आहे हे प्रत्येक महिलेच्या आरोग्यावर आणि गर्भावस्थेतील परिस्थितीवर अवलंबून असते.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 2:57 pm

Realme P4 Lite 5G: ७०००mAh बॅटरीसह 5GRealme P4 Lite 5G लॉन्च; बजेटमध्ये दमदार फीचर्स

Realme P4 Lite 5G या फोनची सुरुवातीची किंमत सुमारे १२,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे, जी बजेट सेगमेंटमध्ये आकर्षक मानली जाते. सेलदरम्यान ग्राहकांना १,००० रुपयांचा डिस्काउंट, ५०० रुपयांचा बँक ऑफर आणि जुन्या रियलमी वापरकर्त्यांसाठी ५०० रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळू शकतो. त्यामुळे या फोनची किंमत आणखी कमी होऊ शकते.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 2:33 pm

Raj Thackeray : ‘महाराष्ट्र-पुढचा’राज ठाकरेंचे व्हिजन; व्हिडिओद्वारे मांडला संकल्प

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढच्या महाराष्ट्राचे व्हिजन मांडणार असल्याचे जाहीर केले आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 2:33 pm

Assam Assembly Election 2026 : आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

- मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा जलुकबारी मतदारसंघातून निवडणूक लढवणार-प्रद्युत बोरदोलोई यांना दिसपूरमधून उमेदवारीभाजपने आसाम विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ८८ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. भाजपच्या यादीनुसार, प्रद्युत बोरदोलोई यांना दिसपूर जागेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. बोरदोलोई हे नागाव लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार होते आणि त्यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. बुधवारी बोरदोलोई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता त्यांच्या नावाचा भाजपच्या पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा राज्यातील जलुकबारी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.भाजपने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बुधवारी (१८ मार्च) झाली, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय निवडणूक समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. १२६ विधानसभा जागा असलेल्या आसाममध्ये ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी ४ मे रोजी होईल.हिमंत बिस्वा सरमा यांनी जालुकबारी जागा सलग पाच वेळा जिंकली आहे. भाजपच्या यादीत सहा महिला उमेदवारांचा समावेश आहे. बिहपुरिया जागेसाठी आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत रणजित कुमार दास, अशोक सिंघल, अजंता निओग, चंद्र मोही पटवारी, रणोज पेगू, संजय किशन, पीयूष हजारिका आणि बिमल बोरा यांचाही समावेश आहे.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 2:30 pm

kerala assembly elections: भाजपने केरळ निवडणुकीसाठी ३९ उमेदवारांची यादी जाहीर ; माजी राज्यपाल राजशेखरन, रॉबिन आरव्ही यांच्यावर पक्षाचा विश्वास

kerala assembly elections: भारतीय जनता पक्षाने २०२६ च्या केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत ३९ उमेदवारांची नावे असून,

दैनिक प्रभात 19 Mar 2026 1:57 pm

Dhurandhar 2: रिलीजच्या दिवशीही पहाटेपर्यंत काम; आदित्य धर यांच्या मेहनतीवर मुकेश छाबडांचा विश्वास

Dhurandhar 2 प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांनी सोशल मीडियावर आदित्य धर यांच्याबद्दल खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की, चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशीही आदित्य धर पहाटे २:३० वाजेपर्यंत काम करत होते. म्हणजेच, चित्रपट पूर्णपणे तयार होईपर्यंत त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मेहनत घेतली.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 1:47 pm

होर्मुझवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींची कुवेतच्या युवराजांशी चर्चा; प्रादेशिक शांततेवर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे युवराज शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून महत्त्वपूर्ण चर्चा केली. या संवादात पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थिती, प्रादेशिक तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील सुरक्षेवर सविस्तर विचारविनिमय झाला.या वेळी पंतप्रधानांनी ईदच्या निमित्ताने आगाऊ शुभेच्छा देत दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याची भावना व्यक्त केली. दोन्ही नेत्यांनी अलीकडील घडामोडींवर चिंता व्यक्त करत प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी सातत्यपूर्ण राजनैतिक संवादाची गरज अधोरेखित केली.पंतप्रधान मोदी म्हणाले की, कुवेतच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेवरील हल्ल्यांचा भारत तीव्र निषेध करतो. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित आणि अखंड जहाजवाहतूक सुनिश्चित करणे ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कुवेतमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी युवराजांचे आभार मानले. मोठ्या संख्येने भारतीय नागरिक कुवेतमध्ये वास्तव्यास असल्याने त्यांचे रक्षण करणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल-नहयान यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा केली होती. त्यांनी यूएईवरील हल्ल्यांचा निषेध नोंदवत निरपराध नागरिकांच्या मृत्यूबद्दल आणि नागरी पायाभूत सुविधांच्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 1:30 pm

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला आणखी दोन मंत्रिपदे ?

- खासदार श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे यांच्या नावाची चर्चा; ‘ऑपरेशन टायगर’द्वारे खासदारांचे बळ वाढवण्याचा प्रयत्नमुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत असून, आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आणखी दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांची नावे चर्चेत असून, या संभाव्य विस्तारामुळे दिल्लीतील शिवसेनेचे वजन वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांचे वारे वाहू लागले आहेत. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेकडून प्रतापराव जाधव हे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून कार्यरत आहेत. मात्र, आगामी राजकीय समीकरणे पाहता, शिंदेंच्या पदरात आणखी दोन मंत्रिपदे पडण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.दरम्यान, केंद्रात जास्तीत जास्त मंत्रिपदे पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेनेकडून खासदारांचा आकडा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून उबाठा गटातील काही खासदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दिल्लीत खलबते :नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारासह उबाठा गटातील किती खासदार संपर्कात आहेत आणि आगामी राजकीय रणनीती काय असावी, यावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. शिवसेनेने या संदर्भात अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, विस्ताराच्या या हालचालींमुळे महायुतीमधील अंतर्गत समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 1:30 pm

Sunetra Pawar’s Post : ‘आई…आज…,’; सुनेत्रा पवारांची हृदयस्पर्शी पोस्ट, ‘तो’खास फोटो शेअर करत काय म्हणाल्या?

Sunetra Pawar's Post : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी इंन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 1:17 pm

Nimisha Nair Incident: मुंबईत अभिनेत्री निमिषा नायरसोबत रस्त्यावर छेडछाड; व्हिडिओ व्हायरल, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Nimisha Nair Incident ही घटना मंगळवारी पहाटे सुमारे ४:५० वाजता घडली. निमिषा नायर या बांद्रा पूर्व येथील खेरवाडी फ्लायओव्हरवरून कॅबने प्रवास करत होत्या. त्याचवेळी दोन युवक त्यांच्या गाडीसमोर आले आणि त्यांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. हे दोघेही नशेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 12:59 pm

Israel Kills Iranian Intelligence Minister: इस्रायलने इराणची सुरक्षा यंत्रणा केली खिळखिळी ; आता गुप्तचर प्रमुख इस्माईल खातिबचाही खात्मा

Israel Kills Iranian Intelligence Minister: इस्रायल आणि अमेरिकेसोबत गेल्या १९ दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धात इराणला अनेक मोठ्या धक्क्यांचा सामना करावा लागत आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 12:42 pm

Dhurandhar 2 dialogue : अब पाकिस्तान का मुस्तकबिल हिंदुस्तान तय करेगा….वाचा अंगावर शहारे आणणारे 10 डायलॅाग

Dhurandhar 2 dialogue : धुरंधर 2 रिलीज झाला असून, चित्रपटातील हे दहा डायलॅाग धूमाकुळ घालत आहेत.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 12:41 pm

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे अमरावती, नागपूरमधील पेपर फुटीचे प्रकरण चर्चेत असतानाच सांगोल्यामध्ये प्रश्नपत्रिका चोरल्याची घटना घडली होती. सांगोला विद्यामंदिर येथील स्ट्रॉंग रूमचे कुलूप तोडून ५० प्रश्नपत्रिका पळवल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी आता सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली असून विद्यार्थ्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली आहे.विद्यार्थ्यानेच प्रश्नपत्रिका पळवलीयाबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगोला येथून दहावी बोर्डाची भूगोलाची प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याची घटना घडली. यानंतर या संपूर्ण प्रकाराची पोलिसांनी सखोल चौकशी करत तपास केला. यामध्ये भूगोलाचा पेपर झाल्यानंतर एका इलेक्ट्रिक बाइकवरून आलेल्या दहावीत शिकणाऱ्याच मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यानंतर या मुलाने आपणच पेपर चोरला असल्याची कबुली दिली आहे.महत्त्वाचे म्हणजे सगळे पेपर सोपे गेले भूगोलाचा अभ्यास झाला नाही. म्हणून चोरीची घटना घडली असल्याचा अनुमान सांगोल्यात लावला जात आहे. या चोरी प्रकरणात अल्पवयीन मुलाने वापरलेली इलेक्ट्रिक दुचाकी तसेच चोरलेली प्रश्नपत्रिका पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या धक्कादायक प्रकाराने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसत आहे.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 12:30 pm

खेळाडूंची ‘A+’ श्रेणीच रद्द? BCCIचा मोठा निर्णय; बुमराह- जडेजाच्या मानधनात होणार घट

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय २०२५-२६ हंगामासाठी क्रिकेटपटूंच्या वार्षिक करार आणि मानधन रचनेत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, बीसीसीआयकडून ‘A+’ ही सर्वोच्च श्रेणीच रद्द करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.२०२४-२५ हंगामात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या चार खेळाडूंचा ‘A+’ श्रेणीत समावेश होता. या श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक ७ कोटी रुपये मानधन दिले जात होते.या ‘A+’ श्रेणीसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने खेळणे आणि किमान एका फॉरमॅटमध्ये अव्वल १० मध्ये स्थान मिळवणे आवश्यक होते. मात्र, रोहित शर्मा आणि विराट कोहली आता मर्यादित फॉरमॅटमध्येच खेळत आहेत, तर रवींद्र जडेजाने देखील टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे या निकषांनुसार आता जसप्रीत बुमराह हा एकमेव पात्र खेळाडू उरला होता. यामुळेच BCCIने ‘A+’ ही श्रेणीच पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.या निर्णयामुळे बुमराह आणि जडेजा यांना ‘A+’ वरून ‘A’ श्रेणीत घसरवण्यात आले असून, आता त्यांना ७ कोटींऐवजी ५ कोटी रुपये मानधन मिळणार आहे. मात्र, बुमराहच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा विचार करून BCCI त्याचे मानधन अचानक कमी होऊ नये, यासाठी पर्याय शोधत असल्याचे सांगितले जात आहे.याशिवाय, इतर काही खेळाडूंच्या करारमूल्यातही बदल होण्याची शक्यता आहे. भारताचा टी-२० उपकर्णधार अक्षर पटेल याच्या मानधनात वाढ होऊ शकते. तो व्हाईट-बॉल संघाचा महत्त्वाचा भाग असूनही सध्या ‘C’ श्रेणीत आहे, जिथे त्याला १ कोटी रुपये मिळतात.एकूणच, कामगिरीनुसार न्याय्य मानधन देण्याच्या उद्देशाने BCCI करार व्यवस्थेत मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 12:30 pm

Siddharth Chandekar-Mitali Mayekar : ‘नवं वर्ष, नवं घर, नवी सुरुवात!’; सिद्धार्थ आणि मितालीचा नवं गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर गृहप्रवेश

Siddharth Chandekar-Mitali Mayekar : सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर यांनी नवीन घरात केलेला गृहप्रवेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 12:28 pm

mojtaba khamenei threat: लारीजानी यांच्या मृत्यूमुळे इराणमध्ये उद्रेक ; मोजतबा खामेनी यांची अमेरिका-इस्रायलला आतापर्यंतची सर्वात मोठी धमकी

mojtaba khamenei threat: एका प्राणघातक लष्करी हल्ल्यात इराणचे सर्वोच्च सुरक्षा अधिकारी, अली लारीजानी यांच्या मृत्यूमुळे देशभरात शोक आणि संतापाची लाट पसरली आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 12:17 pm

Cabinet expansion : केंद्रात शिंदेसेनेला दोन मंत्रीपदं मिळणार? ‘या’नावांची चर्चा

Cabinet expansion : केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, शिवसेनेच्या दोन खासदारांना मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 12:13 pm

आर्थिक संकटातही पाकिस्तान तयार करतोय अण्वस्त्र ; पहिल्यांदाच अमेरिकेने केले पाकिस्तानवर थेट आरोप

- पाकिस्तानकडून अमेरिकेला थेट धोका निर्माण होणार ?इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र होत असतानाच आता पाकिस्तानाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान अण्वस्त्र वाहून नेणारी क्षेपणास्त्रे विकसित करण्याच्या तयारीत असल्याचा थेट आरोप अमेरिकेकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेने पाकिस्तानवर अशा प्रकारचा थेट आरोप केला आहे.अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांनी संसदीय समितीसमोर दिलेल्या जबाबात हा मोठा खुलासा करण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानसह रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि इराण हे देश अण्वस्त्र तसेच पारंपरिक स्फोटके वाहून नेण्यास सक्षम प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करत आहेत, ज्यामुळे अमेरिकेला थेट धोका निर्माण होऊ शकतो.गबार्ड यांनी पुढे सांगितले की, सध्याच्या ३,००० हून अधिक क्षेपणास्त्रांची संख्या २०३५ पर्यंत वाढून तब्बल १६,००० पेक्षा जास्त होऊ शकते. या वाढत्या शस्त्रसाठ्यामुळे जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.पाकिस्तानच्या दीर्घ पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमात आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा (ICBM) समावेश असू शकतो, जे थेट अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता ठेवतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर इराणकडे आधीच अंतराळ प्रक्षेपणाशी संबंधित तंत्रज्ञान उपलब्ध असून, ते भविष्यात ICBM विकसित करण्याच्या दिशेने वापरले जाऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.#WATCH | US Director of National Intelligence Tulsi Gabbard says, The intelligence community assesses that Russia, China, North Korea, Iran, and Pakistan have been researching and developing an array of novel, advanced, or traditional missile delivery systems with nuclear and… pic.twitter.com/t2D93XTKOZ— ANI (@ANI) March 18, 2026सिनेट समितीसमोर बोलताना गबार्ड यांनी सांगितले की, अमेरिकेवर हल्ला करण्यास सक्षम असलेल्या क्षेपणास्त्रांची संख्या वेगाने वाढत आहे. तसेच अलीकडील अमेरिकन लष्करी कारवायांमुळे इराणची स्थिती कमकुवत झाली असली तरी, त्यांची क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमता पुन्हा उभी करण्यासाठी काही वर्षे लागू शकतात.दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणविरोधातील लष्करी कारवाईच्या निर्णयाला गबार्ड यांनी पाठिंबा दर्शवला. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या दहशतवादविरोधी केंद्राचे प्रमुख जो केंट यांनी राजीनामा दिला होता, जो या संघर्षाशी संबंधित पहिला उच्चस्तरीय राजीनामा मानला जात आहे.एकूणच, वाढती अण्वस्त्र स्पर्धा आणि क्षेपणास्त्र विकासामुळे जागतिक सुरक्षेसमोर गंभीर आव्हान उभे राहिले असल्याचे या घडामोडींमधून स्पष्ट होत आहे.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 12:10 pm

Harshvardhan Sapkal : “निवडणुका आणि सहानुभूती हे दोन वेगळे मुद्दे”; बारामती आणि राहुरीमध्ये लढण्याची काँग्रेसची भूमिका?

Harshvardhan Sapkal :निवडणुका आणि सहानुभूती हे दोन वेगळे मुद्दे आहेत. अजित पवार यांचे अकाली व अपघाती निधन ही दुख:द घटना आहे - हर्षवर्धन सपकाळ

दैनिक प्रभात 19 Mar 2026 11:53 am

Share Market Today: भारतीय शेअर बाजारात खळबळ! सेन्सेक्स सुरुवातीलाच १९५३ अंकांनी घसरला ; निफ्टीही ५२५ अंकांनी खाली

Share Market Today: भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. बाजार उघडताच, सेन्सेक्स १,९५३ अंकांनी घसरून ७४,७५१ अंकांवर उघडला.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 11:50 am

Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या; 10 वर्षापूर्वीच्या प्रकरणातील दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

Ritu Tawde: दहा वर्षांपूर्वीच्या प्रकरणात दाखल केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 11:35 am

बिहारमधील हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये स्मशानभूमीतील कोळसा:तंदूरी रोटी-चिकनमध्ये सर्वाधिक वापर, रिपोर्टरसमोर चितेतून काढले

'चितेची आग लवकर विझवली जाते, मग कोळशातून हाडे निवडून काढली जातात. छोटी-मोठी हाडे राहिली तरी ती जळून जातात. जळाल्यावर थोडा वास येईल, पण चिकनच्या तंदूरमध्ये तर कळणारच नाही. हॉटेल-रेस्टॉरंटच्या तंदूरमध्ये आणि लिट्टी स्टॉलमध्ये सर्व खपून जाते. गॅस मिळत नाहीये, त्यामुळे मागणी खूप वाढली आहे. पाटण्याच्या ५ घाटांवरून एका दिवसात कमीतकमी ४०० किलो कोळसा निघतो, सर्व पुरवला जातो. सर्वाधिक लग्नसोहळ्यांमध्ये याचा पुरवठा होत आहे. तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा मिळेल, फक्त जपून घेऊन जा नाहीतर धंदा बसेल. जिथेही जातो, खूप सुरक्षिततेने जपून पाठवला जातो.' हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये चितेचा कोळसा पुरवणारे एजंट हे दावे करत आहेत. भास्कर इन्वेस्टिगेशन टीमने हॉटेल व्यावसायिक बनून बिहारमधील १२ पेक्षा जास्त स्मशानभूमींमध्ये चितेच्या कोळशाचा व्यवहार केला. चितेच्या कोळशातून तयार होत असलेल्या धोकादायक अन्नावर भास्कर इन्वेस्टिगेशन वाचा आणि बघा… कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद झाल्याने मागणी वाढली देशात स्वयंपाकाच्या गॅसचे संकट वाढले तेव्हा सरकारने कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला. अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील चुली विझल्या. या दरम्यान हॉटेल रेस्टॉरंटमध्ये चितेतील लाकडी कोळशाचा पुरवठा सुरू झाला. भास्करच्या तपास पथकाला ही माहिती मिळाली. आम्ही संपूर्ण नेटवर्क उघड करण्याचा आराखडा तयार केला. तपासणी पाटणाच्या बास घाटातून सुरू झाली, जिथे सर्वाधिक मृतदेह जाळले जातात. येथे एजंट मागणीनुसार स्मशानभूमीतील कोळसा देण्यास तयार झाले. भास्कर रिपोर्टर हॉटेल संचालक बनून पाटणाच्या बास घाटावर पोहोचले. येथे आमची भेट एजंट बिट्टूशी झाली. बोलता बोलता बिट्टूला समजले की आम्ही कोळशासाठी आलो आहोत. धंद्याची कुणालाही खबर लागू नये, असे बोलून बिट्टू रोज 30 पोती कोळसा हॉटेलमध्ये पाठवायला तयार झाला. रिपोर्टर - वाटतंय आता हॉटेल बंद करावं लागेल. बिट्टू - का, काय झालं? तुमचं हॉटेल कुठे आहे. रिपोर्टर - पाटणामध्ये हॉटेल आहे, 4 दिवसांपासून गॅससाठी भटकत आहोत. बिट्टू - गॅस तर कुठेच मिळत नाहीये. रिपोर्टर - कोळसा मिळेल का? बिट्टू - इथून तर हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जातोच. रिपोर्टर - इथे तर चितेतील कोळसा मिळत असेल. बिट्टू - हो, सध्या याच कोळशाने हॉटेलमध्ये जेवण बनवले जात आहे. रिपोर्टर - मिळेल का? बिट्टू - तुम्हाला किती पाहिजे? जेवढा पाहिजे तेवढा मिळेल. रिपोर्टर - किंमत किती आहे, हॉटेलपर्यंत कसा पोहोचेल? बिट्टू - 600 रुपये पोते आहे, ऑर्डर करा, डिलिव्हरी करून देऊ. गॅस संकटात कोळसा कमी पडला बिट्टूने सांगितले, बोला कोणाकडून कोळसा उतरवायचा आहे. ऑटोपासून गाडीपर्यंतची व्यवस्था होईल. बास घाटात सध्या कोळसा संपला आहे. गॅस मिळत नाहीये, त्यामुळे मागणी वाढली आहे. इथला सगळा कोळसा विकला गेला आहे, पण अजून गुलबी घाटावर खूप कोळसा आहे. तिथे होलसेलमध्ये काम होते. तिथे तुम्ही जेवढे सांगाल, तेवढे मिळेल. तंदूरमध्ये वापरण्यासाठी आणि खाण्यापिण्याचे सामान बनवण्यासाठी 1 हजार रुपये बोरावाला जास्त चांगला राहील. यात हाडे वेगळी केली जातात. हाडे काढून वेगळी करतात बिट्टूने खुलासा केला की स्मशानभूमीत दोन प्रकारचे कोळसे बाजारात जातात. एक मिक्स कोळसा असतो, ज्याचा दर 600 रुपये प्रति पोते आहे. यात लहान-मोठी हाडे मिसळलेली असतात. दुसरा खाण्यापिण्याचे पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा कोळसा आहे, जो निवडून त्यातून हाडे काढली जातात. हा हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जास्त जातो. म्हणून त्याची किंमत 1000 रुपये प्रति पोते होते. स्मशानभूमीतील कोळशाचे कागदपत्र नसतात बिट्टूने सांगितले, कोळसा जेवढा हवा तेवढा मिळेल. तुम्ही तो कुठेही घेऊन जाऊ शकता, पण त्याचे कोणतेही कागदपत्र मिळणार नाहीत. हा मृतदेहातून निघालेला कोळसा असतो, तो चोरीने विकला जातो. हमी आहे की कोळसा खूप चांगला आहे, जर अडचण असती तर हॉटेलवाले घेऊन गेले नसते. पूर्ण मृतदेह जळण्यापूर्वी कोळसा काढला जातो बिट्टूने चितेतून कोळसा काढण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगितली. तो म्हणाला की, चितेची लाकडे मृतदेह जळण्यापूर्वीच विझवली जातात, त्यानंतर कोळसा काढला जातो. रिपोर्टर - कोळसा कसा काढतात? बिट्टू - चितेच्या लाकडापासून काढतात, योग्य वेळी लाकडे विझवली जातात. रिपोर्टर - मृतदेह पूर्णपणे जळण्यापूर्वी? बिट्टू - मृतदेह तर गंगेत उलटवला जातो, लाकडे विझवून कोळसा काढला जातो. रिपोर्टर - लोक विरोध करत नाहीत का? बिट्टू - कोण करणार, सगळ्यांना घाई असते, आम्ही पण वेळेवर काम करतो. रिपोर्टर - चितेतील कोळसा कसा असतो? बिट्टू - कशात वापराल? तंदूरमध्ये ना? खूप चांगल्या दर्जाचा मिळेल. रिपोर्टर - ठीक आहे, काम होईल, कळणार नाही ना. बिट्टू - तुम्ही काळजी करू नका, लोक इथून 40-40 पोती घेऊन जातात. रिपोर्टर - कधी, आता की आधी? बिट्टू - आता तर 100-100 पोतीपर्यंत गेले आहे. रिपोर्टर - कोळशात हाड तर मिळणार नाही ना? बिट्टू - काहीही मिळणार नाही, सगळं स्वच्छ असतं. आम्ही आधीच स्वच्छ करतो. रिपोर्टर - खाताना किंवा पाहताना कळणार नाही ना? बिट्टू - ओळखू शकणार नाही, लहान लहान हाडे पण काढून टाकतो. रिपोर्टर - भीती वाटते, हॉटेलची खूप बदनामी होईल. बिट्‌टू - तुम्ही निश्चिंतपणे घेऊन जा. पोते उघडूनही दाखवू, हाडे निवडून भरले आहे. रिपोर्टर - यावर काय-काय बनवता येईल? बिट्टू - सर्व काही बनवता येईल, भाजण्याचे जेवढे सामान आहे, ते सर्व बनवता येईल. रिपोर्टर - इथूनच जाते ना? बिट्टू - हो, जाते, जो कोळसा जातो त्याच कोळशावर लिट्टी, जेवण सर्व काही बनवले जाते. बिट्‌टूने रिपोर्टरकडून मोठी मागणी ऐकून दुसऱ्या एजंट रोहितला भेटायला लावले. म्हणाला- मोठ्या प्रमाणावर कोळसा हवा असेल तर रोहितला भेटा. रोहितने तर बोलता बोलता अनेक मोठे खुलासे केले. त्याने संपूर्ण ट्रेंड सांगितला की कसे हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये तंदूर आणि लिट्टीसाठी स्मशानभूमीतील कोळसा जात आहे. रोहितने एका गाडी कोळशाचा व्यवहार केला. रोहितने सांगितले, 600 रुपये प्रति पोते दराने तुम्हाला जेवढा कोळसा हवा असेल, तो मिळेल. सध्या मी एक गाडी कोळसा देऊ शकेन. इथे बसल्या बसल्या गाडीची व्यवस्था करून देईन. तुम्ही फक्त ॲडव्हान्स द्या, मी कोळसा पॅक करून देतो. फक्त भाडे द्या, जिथे सांगाल तिथे उतरवून दिला जाईल. कोळसा गुलबी घाटातून भरला जाईल. तिथे माझ्या आत्याचे पतींचा घाट आहे. सध्या चाचणीसाठी 10 पोती घेऊन जा. आवडल्यास, तुम्ही जेवढे सांगाल तेवढे सर्व देईन. कोळसा लहान-मोठा सर्व मिश्रित मिळेल, पण त्यात एकही हाड मिळणार नाही. तुम्हाला जसे काम असेल, तसा घेऊन जा. सांगाल तर पोते फाडून दाखवू. दोन दिवसांपूर्वीच एका हॉटेलमध्ये 10 पोती कोळसा पाठवला आहे. तिथून कोणतीही तक्रार आली नाही. जेवढी पोती सांगाल, तेवढा माल उतरवला जाईल. पण आधी अर्धे पेमेंट करावे लागेल आणि अर्धे पेमेंट माल उतरवल्यानंतर करावे लागेल. या कोळशावर नान, रोटी, मका आणि लिट्टी सर्व काही बनते. असा कोळसा देऊ की तो कुठला आहे हे कळणारही नाही. रिपोर्टरने जेव्हा प्रश्न विचारला की तंदूरमध्ये तर दगडी कोळसा पडत असेल? तेव्हा रोहित म्हणाला- नाही, तंदूरमध्ये दगडी कोळसा पडला तर पोळी जळून जाईल, त्यात हाच कोळसा पडतो, म्हणूनच लोक हाच घेऊन जातात. हा आतून पूर्णपणे पोकळ असतो, म्हणूनच तो चांगला जळतो. सध्या गॅस मिळत नाहीये, म्हणूनच एक हॉटेलवाला 10-10 पोती घेऊन जात आहे. तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा येऊ शकता, आम्ही लोक 24 तास इथेच असतो. सध्या नवा घाट 20 किंवा 25 तारखेला सुरू होणार आहे. यानंतर मृतदेहांची संख्या वाढेल आणि कोळसाही जास्त निघू लागेल. मग तुम्हाला जेवढा पाहिजे मी इथूनच देत जाईन. तुम्ही फक्त माझ्याशी बोलत राहा. रोहितनेच आमची भेट एजंट राजाशी घालून दिली. राजाही हॉटेल्समध्ये स्मशानातील कोळसा पुरवतो. त्याने दावा केला की तुम्ही हॉटेलच्या तंदूरमध्ये जाळा, कोणीही पकडू शकणार नाही. रिपोर्टर - कोळसा पकडला जाणार नाही ना? राजा - इतके हॉटेलवाले जाळत आहेत, पकडला गेला आहे का? रिपोर्टर - प्रेताचे रक्त पाणी लागत असेल तर जळताना वास येईल का? राजा - चिकनचा वास जसा येतो, तसाच वास येईल. रिपोर्टर - तुम्ही सांगाल तर घेऊन जाऊन प्रयत्न करू का? राजा - बिनधास्तपणे हा कोळसा घेऊन जा. रिपोर्टर - पाटण्यात यातून काय-काय बनवले जात आहे? राजा - मका आणि नान-रोटी, चिकन तंदूर किंवा भाजलेले जे काही पदार्थ आहेत ते सर्व बनत आहेत. रिपोर्टर - यासाठी लहान लाकडी कोळसा लागतो का? राजा - होय, दगडी कोळशावर जळतो, हाच कोळसा सर्वात चांगला असतो. रिपोर्टर - आणि कोळसा कुठून आणणार? राजा - दियारा आणि गंडकच्या पलीकडे जे काही मृतदेह जळतात, त्याचाही कोळसा गाडीतून घेऊन येतात. राजाने आम्हाला गुलबी घाटाचा पत्ता देत सांगितले की तिथे त्याचे काका रायजी आहेत. ते अनेक हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणावर कोळसा पुरवतात. राजाकडून पत्ता घेऊन रिपोर्टर गुलबी घाटात रायजींना भेटायला पोहोचला. स्मशानात एका बाजूला चिता जळत होती, दुसऱ्या बाजूला रायजी चितेची आग विझवून त्यातून कोळसा काढत होता. रायजीने कोळशाचा पूर्ण व्यवहार केला. रिपोर्टर - तुमच्या नातेवाईक राजाने पाठवले आहे का? रायजी - मोठा कोळसा 2 हजार रुपये पोत्याला मिळेल, लहान पोत्याला 600 लागतील. रिपोर्टर - कोळसा कसा आहे? रायजी - तुम्ही बघून घ्या, माल अगदी उत्तम आहे. रिपोर्टर - जळताना वास तर येणार नाही ना? रायजी - जळताना थोडा वास येईल, हे मी आधीच सांगून ठेवतोय. रिपोर्टर - कळले तर खूप अडचण होईल. रायजी - तुम्ही कोळसा कशासाठी घेऊन जाऊ इच्छिता? इथे अनेक प्रकारचे लोक येतात. रिपोर्टर - शेगडीत हेच वापरतात ना? रायजी - बिस्किटच्या भट्टीसाठी घेऊन जायचे आहे का? रिपोर्टर - हो. रायजी - घेऊन जा, पण थोडा वास येईल. रिपोर्टर - जाळल्यावर वास येईल की खाण्यात? रायजी - खाण्यात अजिबात वास येणार नाही, कोळसा जळेल तेव्हा थोडा वास येईल. रिपोर्टर - तुम्ही रोज किती काढता? रायजी - रोज 4 ते 5 पोती निघतात. रिपोर्टर - एकदम ताजे आणि स्वच्छ कोळसे पाहिजेत. रायजी - अगदी ताजे देऊ, हाड मिळणार नाही. रिपोर्टर - तुमच्याकडून कोळसा कोण-कोण घेऊन जातात? रायजी - आमच्याकडे दूरदूरहून लोक येतात. इथून गया, जमुनापूर, रुस्तमपूरपर्यंत जातो. रिपोर्टर - पाटण्यातले कोणते हॉटेलवाले घेऊन जातात? रायजी - बरेच लोक इथून घेऊन जातात, मी 20 वर्षांपासून हेच काम करत आहे. लाकडी कोळसा इतरत्र कुठेही मिळणार नाही रायजींनी दावा केला की, मी 20 वर्षांपासून हॉटेल रेस्टॉरंटमध्ये स्मशानभूमीतील कोळसा पुरवत आहे. यावर लिट्टी वगैरे सर्व बनवले जाते. कोणतीही अडचण येत नाही. आरामात घेऊन जा. एकही हाड मिळणार नाही. थोडासा कोळसा जळाल्यावर वास येईल, बाकी काही वाईट वाटणार नाही. फतुहा, कुम्हरार, बास घाट, खाजेकला घाट, दानापूर, दीघा या सर्व ठिकाणांहून कोळसा उचलून विकतो. या सर्व ठिकाणी लोक मला ओळखतात. याच कामातून पाटण्यातील अनेक ठिकाणी एक-दोन कट्ठा आणि बिघा जमीन खरेदी केली आहे. तुम्हाला हव्या त्या भागात माझी जमीन आहे. माझ्यासाठी 10-20 हजार रुपयांचा माल काहीच नाही. ज्याच्यावर विश्वास असतो, त्यालाच माल देतो, नाहीतर कोणालाच देत नाही. जेव्हा रिपोर्टरने प्रश्न विचारला की, तंदूर आणि लिट्टीमध्ये वास येणार नाही का? तेव्हा रायजींनी खात्रीने सांगितले- अजिबात नाही, तुम्हाला विश्वास नसेल तर एकदा घेऊन जाऊन बघा. आवडले तर पुन्हा येऊन आमच्यासोबत काम करा. मी रोज सकाळी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 3 वाजेपर्यंत काम करतो. गॅस संकटात स्मशानभूमीतील कोळशातून कमाईचे गणित स्वयंपाकाच्या गॅसच्या संकटात हॉटेल रेस्टॉरंट बंद होण्याच्या मार्गावर पोहोचले होते. अशा परिस्थितीत कोळशाने खूप दिलासा दिला आहे. स्मशानभूमीतील कोळसा खूप स्वस्त पडतो. यामुळे गॅसच्या संकटात कमाईसाठी हा पर्याय चांगला आहे. बाजारात तंदूर, हॉटेल, कबाबमध्ये वापरला जाणारा लाकडी कोळसा, त्याचा मूळ कोळसा सुमारे 25 रुपये प्रति किलो मिळतो, तर मृतदेहातून काढलेला कोळसा एजंटला 6 ते 9 रुपये प्रति किलो मिळतो. स्मशानभूमीतील कोळशाने कर्करोगाचा धोका डॉक्टरांच्या मते, स्मशानभूमीतील कोळसा किंवा इतर कोणत्याही अशुद्ध ठिकाणी तयार केलेल्या कोळशावर शिजवलेले अन्न हानिकारक असू शकते. यामुळे कर्करोग (PAHs), हृदयविकार, फुफ्फुसांचे आजार आणि विषबाधेचा धोका वाढू शकतो. त्यात असलेले आर्सेनिक, शिसे आणि पारा यांसारखे हानिकारक घटक किडनी, यकृत आणि आतड्यांना गंभीर नुकसान पोहोचवू शकतात. यामुळे थेट कर्करोग निर्माण करणाऱ्या रसायनांचे सेवन होऊ शकते. टीप - ऑपरेशन कोळसा भाग - 2 मध्ये उद्या बघा, कमाईच्या नादात देवालाही सोडले नाही, स्मशानातील कोळशापासून कसे बनवत आहेत अगरबत्ती; सांगणार आहोत स्मशानातील कोळशाची संपूर्ण पुरवठा साखळी..

दिव्यमराठी भास्कर 19 Mar 2026 11:28 am

Trump To Iran: “मला याची कल्पना नव्हती…” ; कतारच्या गॅस पायाभूत सुविधांवरील इराणच्या हल्ल्यानंतर ट्रम्प नरमले

Trump To Iran: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे. त्यांनी याविषयी बोलताना, जर तेहरानने कतारच्या द्रवीकृत नैसर्गिक वायू (LNG) पायाभूत सुविधांवर आणखी हल्ले केले,

दैनिक प्रभात 19 Mar 2026 11:27 am

Tan Removal Face Mask: उन्हामुळे काळवंडलेली त्वचा? घरच्या घरी तयार करा ५ फेस मास्क, काही दिवसांत दिसेल फरक

Tan Removal Face Mask सर्वात लोकप्रिय उपाय म्हणजे बेसन आणि दूध यांचा फेसपॅक. बेसन त्वचेवरील घाण आणि मृत पेशी काढून टाकते, तर दूध त्वचेला मऊ बनवते. दोन चमचे बेसन, दोन चमचे दूध आणि थोडी हळद मिसळून तयार केलेला पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास त्वचा स्वच्छ आणि उजळ दिसते.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 11:13 am

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू चेइराओबा यांसारख्या विविध प्रादेशिक नववर्ष सणांच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी आणि कोंकणी भाषेत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी नवरात्रीच्या देखील शुभेच्छा दिल्या आहेत.चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा देत सर्वांच्या आयुष्यात शिस्त, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा नांदो, अशी पंतप्रधान मोदींनी प्रार्थना केली आहे.गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! pic.twitter.com/yCgdAuXKgp— Narendra Modi (@narendramodi) March 19, 2026सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी देवी दुर्गेची प्रार्थना करत तिचे आशीर्वाद सर्वांवर राहोत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद व करुणा वाढो, अशी भावना व्यक्त केली. “या पवित्र नवरात्री उत्सवानिमित्त मातेला प्रार्थना करतो की ती सर्वांवर आपले प्रेम आणि कृपा ठेवो,” असे त्यांनी म्हटले.नवरात्रि के पहले दिन मां दुर्गा के प्रथम स्वरूप देवी शैलपुत्री की पूजा का विधान है। उनके आशीर्वाद से हर किसी के जीवन में संयम, शांति और सकारात्मक ऊर्जा का संचार हो, यही कामना है।वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्॥ pic.twitter.com/jhjMB7SPY9— Narendra Modi (@narendramodi) March 19, 2026वेगवेगळ्या समुदायांसाठी स्वतंत्र संदेशांद्वारे पंतप्रधानांनी नववर्षाच्या शुभेच्छा देत सर्वांच्या आयुष्यात समृद्धी आणि यश लाभो, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच त्यांनी एक व्हिडिओ संदेशही शेअर करत सणासुदीच्या काळासाठी आपल्या शुभेच्छा आणि प्रार्थना व्यक्त केल्या.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 11:10 am

Dhananjay Sawant : माजी मंत्र्याच्या पुतण्याचा बारामतीजवळ अपघात; भाजपमध्ये पक्ष प्रवेश करुन परतताना घडली घटना

Dhananjay Sawant : शिवेसेनेच्या एका माजी मंत्र्याच्या पुतण्याच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. बारामती जवळ अपघाताची घटना घडली आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 10:56 am

CDSCO: सीडीएससीओचा मोठा निर्णय; देशभर औषधांसाठी एकसमान परवाना नियम लागू

CDSCO या डोजियरमध्ये औषधाची गुणवत्ता, सुरक्षितता, प्रभाव, चाचणी अहवाल आणि उत्पादन प्रक्रियेची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. ही सर्व कागदपत्रे तपासल्यानंतरच स्थानिक औषध नियंत्रण विभाग संबंधित कंपनीला परवाना देण्याचा निर्णय घेईल.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 10:32 am

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या पापाचा घडा आता भरला आहे. नाशिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या अफाट संपत्तीचे एकामागून एक धक्कादायक तपशील समोर येत आहेत. विशेष म्हणजे, शिर्डीतील अत्यंत 'प्राईम लोकेशन'ला खरात आणि त्याच्या पत्नीच्या नावे कोट्यवधींचा भूखंड असल्याचे उघड झाले असून या मालमत्तेची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे.बुधवारी रात्री नाशिक गुन्हे शाखेने खरातला बेड्या ठोकल्या. धक्कादायक बाब म्हणजे बुधवारी दुपारीच शिर्डीतील त्याच्या मालकीच्या भूखंडावर असलेली गव्हाची काढणी अत्यंत घाईघाईने उरकण्यात आली. शेतातील गहू कापून तो तातडीने तेथून हलवण्यात आला. पोलिसांची कारवाई होणार याची कुणकुण खरातला आधीच लागली होती का? आणि अटकेपूर्वी मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा किंवा तिथून काही संशयास्पद वस्तू हलवण्याचा हा प्रयत्न होता का? या दृष्टीने पोलीस आता तपास करत आहेत.कुठं कुठं खरातची संपत्ती?केवळ नाशिकच नव्हे, तर सिन्नर, शिर्डी आणि कोपरगाव या परिसरात खरातने मोठी मालमत्ता जमवल्याची चर्चा आहे. शिर्डीतील ज्या भूखंडावर हा प्रकार घडला, तो जमिनीचा तुकडा अतिशय महागड्या ठिकाणी आहे. एका सामान्य ज्योतिषाकडे एवढी प्रचंड संपत्ती आली कुठून? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. महिलांच्या शोषणातून आणि फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून ही संपत्ती जमवली गेली असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.खरातचे पाय अधिकच खोलातअशोक खरातच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी आहे. त्याच्या मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ आणि आता समोर आलेली ही बेनामी संपत्ती, यामुळे खरातचे पाय अधिकच खोलात गेले आहेत. नाशिक गुन्हे शाखा आता त्याच्या सर्व बँक खात्यांची आणि मालमत्तेच्या कागदपत्रांची पडताळणी करणार आहे.बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याला नाशिक क्राइम ब्रांचने अटक केली आहे. संबंधित आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल ५८ व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला व सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंची सखोल तपासणी सुरू असून, त्यामधून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नाशिक क्राइम ब्रांच करत आहे.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 10:30 am

Dhurandhar 2 Paid Preview Box Office Collection : पेड प्रीव्ह्यूमधून मोडले बॉलिवूडच्या सर्वच चित्रपटांचे रेकॅार्ड; धुरंधर 2 ची ‘इतक्या’कोटींची कमाई

Dhurandhar 2 Paid Preview Box Office Collection : धुरंधर 2 ने रिलीज होण्याअगोदरच एक मोठा इतिहास रचत प्री पेड व्ह्यूज शोमधून कोटींची कमाई केली आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 10:29 am

संजनाच्या पोस्टमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का, लग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात सूरज चव्हाणच्या घरी गुड न्यूज?

मुंबई: बिग बॉस मराठीचा पाचव्या पर्वाचा विजेता ठरलेला सूरज चव्हाण कायमच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. सुरजच्या प्रत्येक गोष्टींची प्रेक्षकांना उत्सुकता असते. अलीकडेच त्याच्या लग्नामुळे तो प्रसिद्धीझोतात आला होता. त्याच्या लग्नाची ,लग्नातील प्रत्येक विधीची एकच चर्चा झाली. लग्नानंतर तीन महिन्यांमध्येच आता सुरज बाबा होणार असल्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या आहेत. याला कारणही आहे ते सुरजच्या बायकोने शेअर केलेल्या एका पोस्टचं. संजनाने पोस्ट केलेल्या या फोटोच्या मागे लावलेल्या ऑडिओ क्लिपमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजनाच्या पोस्टखाली अनेकांनी तिचं अभिनंदन केलंय. अनेकांनी संजनाचा बेबी बम्प दिसतोय असं म्हटलंय.संजनाची पोस्ट व्हायरलसुरज चव्हाणची बायको संजनाने अलीकडेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास फोटोशूट केलेलं. या फोटोशूट मधील एक फोटो तिने पोस्ट केला आहे. त्यामागे एक ऑडिओ वाजतोय. त्यात अजून तू माझ्या पोटात आहेस, पण मी तुझ्या प्रत्येक हालचालीला ओळखते. तू हललास की वाटतं आयुष्य हलकं झालं. आता फक्त तुझी वाट बघते. तुझ्या त्या पहिल्या श्वासासाठी, आणि त्या छोट्याशा हसण्यासाठी. माझं संपूर्ण जग तुझ्यात बसलेलं आहे. ' असा आवाज लावण्यात आलेला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी तिला अभिनंदन अशा कमेंट्स केल्या आहेत. लग्नानंतर तीन महिन्यातच सुरज चव्हाण बाबा होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. शिवाय राजश्री मराठीच्या सोशल मीडिया पेजवरूनही या संदर्भात एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे त्यामुळे चर्चांना आणखी दुजोरा मिळाल्याचे दिसतय. मात्र सुरज चव्हाण आणि संजना चव्हाण यांच्याकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आता ही केवळ अफवा आहे की खरंच सुरज चव्हाणच्या घरी गुड न्यूज आहे, हे त्याने अधिकृत स्पष्ट केल्यानंतरच कळेल.

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 10:10 am

इंदूर EV अपघात, शेजाऱ्याला आवाज दिला- वाचवा-वाचवा:जो ज्या अवस्थेत होता, जळून खाक झाला; 30 वर्षांपूर्वी राजस्थानहून इंदूरला आले होते मनोज पुगलिया

इंदूरच्या टिळक नगर परिसरातील ग्रेटर बृजेश्वरी कॉलनीत झालेल्या भीषण आगीने एका कुटुंबाचे सर्व सुख हिरावून घेतले. रबर व्यावसायिक मनोज पुगलिया यांच्या घरात लागलेल्या आगीत 8 लोकांचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी सर्वांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वात हृदयद्रावक दृश्य तेव्हा समोर आले, जेव्हा या दुर्घटनेत जीव गमावलेल्या विजय सेठिया यांच्या लहान मुलीने आपल्याच नातेवाईकाला मुखाग्नी दिला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आले. दुर्घटनेतून वाचलेले मनोज पुगलिया यांचे पुत्र सौमिल आजही तो भयानक प्रसंग आठवून घाबरतात. त्यांनी सांगितले की, आग लागताच संपूर्ण घरात वेगाने धूर पसरला होता. चारही बाजूंनी अंधार आणि गुदमरल्यासारखे झाले होते, काहीही दिसत नव्हते. अशा परिस्थितीत मोठा भाऊ सौरभने हिंमत दाखवत सर्वांना आवाज देऊन जागे केले. कसेबसे सौरभ, आई सुनीता, धाकटा भाऊ हर्षित आणि सौमिल बाल्कनीपर्यंत पोहोचले. तिथून त्यांनी शेजाऱ्यांना मदतीसाठी 'वाचवा-वाचवा' अशा हाका मारल्या. शेजाऱ्यांनी जाळ्या तोडून शिडी लावली, ज्याच्या मदतीने चौघे कसेबसे बाहेर पडू शकले. पण बाहेर आल्यानंतरही त्यांचा संघर्ष संपला नाही. त्यांनी आत अडकलेल्या आपल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आगीच्या ज्वाळा आणि दाट धुरामुळे त्यांना पुन्हा आत जाता आले नाही. एका क्षणात सर्व काही बदलले…आणि मागे राहिल्या फक्त आठवणी आणि आप्तस्वकीयांना गमावण्याचे दुःख. जेव्हा वाचवण्याचा प्रयत्नही अयशस्वी ठरला… मनोजचा मोठा मुलगा सौरभने तो भयानक प्रसंग आठवत सांगितले की, इलेक्ट्रिक कारला आग लागताच काही क्षणातच मुख्य गेट आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. बाहेर पडण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. अशा परिस्थितीत सौरभने हिंमत दाखवली आणि कशातरी आपल्या आईला आणि दोन्ही भावांना बाहेर काढले. पण आत बाकीचे लोक अडकले होते… आणि त्यांना वाचवण्याची आशा अजूनही होती. सौरभ पुन्हा घराच्या आत गेला, पण तोपर्यंत संपूर्ण घर दाट धुराने भरले होते. श्वास घेणे कठीण होत होते, काहीही दिसत नव्हते. परिस्थिती इतकी वाईट होती की आत अडकलेले लोक आवाजही देऊ शकत नव्हते. पत्नी सिमरन, मामा, त्यांची मुले आणि वडील—सर्वजण आतच अडकले. कोणी पळू शकले नाही, कोणी मदतीसाठी हाक मारू शकले नाही. जो जिथे होता, तिथेच थांबला. सर्वात हृदयद्रावक चित्र सिमरनचे होते…ती बसलेल्या अवस्थेतच राहिली, जणू शेवटच्या क्षणापर्यंत कोणीतरी तिला वाचवेल याची वाट पाहत होती. एका मुलाच्या आणि पतीच्या डोळ्यासमोर त्याचे संपूर्ण कुटुंब हिरावले गेले… आणि तो काहीही करू शकला नाही. हीच असहायता या दुर्घटनेची सर्वात मोठी शोकांतिका ठरली. रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान जिन्यावर तीन लोकांचे मृतदेह आढळले अपघाताची माहिती मिळताच पोलीस, एफएसएल आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले. बचावकार्यादरम्यान, दुसऱ्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्यावर तीन लोकांचे मृतदेह आढळले. यावरून असा अंदाज लावण्यात आला की हे लोक जीव वाचवण्यासाठी छताकडे धावत होते. पण वाटेत लावलेले चॅनल गेट बंद होते, त्यामुळे ते बाहेर पडू शकले नाहीत. याच दरम्यान, संपूर्ण घरात धूर भरला आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. हे दृश्य पाहून बचाव पथकही भावूक झाले, कारण हे स्पष्ट होते की हे लोक शेवटच्या क्षणापर्यंत वाचण्याचा प्रयत्न करत होते, पण एका बंद दाराने त्यांचा जीव घेतला. प्लायवुडमुळे आग घरात वेगाने पसरली पोलिसांच्या तपासणीत समोर आले आहे की मनोज पुगलिया यांचे घर पूर्णपणे सुसज्ज होते. विशेषतः पहिल्या मजल्यावर प्लायवुड आणि लाकडी फर्निचरने अंतर्गत सजावट केली होती. जेव्हा पहिल्या मजल्यावर आग लागली, तेव्हा या ज्वलनशील वस्तूंमुळे आग खूप वेगाने पसरली आणि बघता बघता संपूर्ण घराला आपल्या कवेत घेतले. तपासणीत पोर्चमध्ये शॉर्ट सर्किटचे निशाणही आढळले आहेत. येथेच घरात उभी असलेली बुलेट, सुमारे 17 लाख रुपयांची हायाबुसा बाईक आणि एक स्कूटर जळून खाक झाली. घरात काही रसायनेही ठेवलेली होती, ज्यामुळे आग आणखी भडकली. या सर्व कारणांमुळे आग अत्यंत धोकादायक बनली, ज्यामुळे बचावाची संधीही खूप कमी मिळाली. कष्टाने उभे केले होते सर्व काही… एका क्षणात सर्व संपले मनोज पुगलिया मूळचे राजस्थानचे रहिवासी होते. सुमारे 30 वर्षांपूर्वी ते चांगल्या आयुष्यासाठी आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी इंदूरला आले होते. सुरुवात सोपी नव्हती…। सियागंजमधील एका छोट्या दुकानातून त्यांनी औद्योगिक पुरवठ्याचे काम सुरू केले. दिवस-रात्र मेहनत करून त्यांनी हळूहळू आपला व्यवसाय वाढवला आणि एक मजबूत ओळख निर्माण केली. वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीतून त्यांनी केवळ व्यवसायच उभा केला नाही, तर आपल्या कुटुंबासाठी एक चांगले भविष्यही तयार केले. त्यांच्या कंपनीचे एक कार्यालय सियागंजमध्ये होते, जे मोठा मुलगा सौरभ सांभाळत होता. तर पीथमपूरमध्ये दुसरे कार्यालय होते, जिथे मधला मुलगा सौमिल आणि धाकटा मुलगा हर्षित काम पाहत होते. संपूर्ण कुटुंब मिळून हा व्यवसाय पुढे नेत होते, पण नशिबाला काहीतरी वेगळेच मंजूर होते. मनोज यांनी आपले संपूर्ण आयुष्य लावून जे घर आणि व्यवसाय उभा केला होता, तो एकाच अपघातात विखुरला गेला. आज मागे राहिल्या आहेत त्या फक्त त्यांच्या मेहनतीच्या कथा… आणि आप्तस्वकीयांना गमावल्याचे खोल दुःख. या दुर्घटनेत विजयच्या कुटुंबाला सर्वाधिक नुकसान झाले या दुर्घटनेत मनोज पुगलिया आणि त्यांची सून सिमरन यांच्यासोबतच मनोजचे मेहुणे विजय सेठिया आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही जीव गेला. घरात नुकतेच आनंदाचे वातावरण होते. 23 जानेवारी रोजी मनोजचा मुलगा सौमिलचे लग्न झाले होते. लग्नानंतर घरात छोटे-मोठे कार्यक्रम सुरू होते, याच कारणामुळे नातेवाईकांची ये-जा सुरू होती. याच आनंदाच्या वातावरणात विजय सेठियाही आपल्या कुटुंबासोबत इंदूरला आले होते. त्यांना जबड्याचा कर्करोग होता आणि उपचारासाठी ते येथे थांबले होते. लग्नाच्या वेळेपासूनच त्यांचे संपूर्ण कुटुंब मनोजच्या घरी राहत होते. पण आनंदाने भरलेले हे घर अचानक शोकात बदलेल असे कुणीही विचार केला नव्हता. एका परंपरेमुळे धाकट्या सुनेचे आयुष्य वाचले या अपघातात मनोज पुगलिया यांची मोठी सून सिमरन हिचा जीव गेला, पण धाकट्या सुनेचे आयुष्य एका परंपरेमुळे वाचले. कुटुंबातील एका जवळच्या नातेवाईकाने सांगितले की, त्यांच्याकडे अशी मान्यता आहे की नवीन सुनेला मंगळवारी सासरी आणले जात नाही. याच परंपरेमुळे सौमिलची पत्नी त्या दिवशी तिच्या माहेरी पेटलावद येथेच थांबली होती. बुधवारी तिला घरी आणण्याची तयारी होती. कुटुंबात एक छोटासा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता, ज्यात तिच्या माहेरचे लोकही सहभागी होणार होते. सर्वात निष्पाप जीव… सर्वात दुःखद निरोप या संपूर्ण अपघातात सर्वात हृदयद्रावक मृत्यू 6 वर्षांच्या निष्पाप तन्मयचा होता. अपघातानंतर जेव्हा बचाव पथक घरात पोहोचले, तेव्हा तन्मयचा कुठेही पत्ता लागत नव्हता. एसडीआरएफच्या पथकाने बराच वेळ शोध घेतला, तेव्हा मोठ्या प्रयत्नाने मुलाचा मृतदेह मिळाला. आग इतकी भीषण होती की तन्मय पूर्णपणे भाजला होता. परिस्थिती अशी होती की डॉक्टरांच्या पथकाला त्याच्या लहानशा शरीराला पोटलीत गुंडाळून एमवाय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी घेऊन जावे लागले. शवविच्छेदनानंतर तन्मयच्या मृतदेहाला एका बॉक्समध्ये ठेवून स्मशानभूमीत पाठवण्यात आले, जिथे त्याला अंतिम निरोप देण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 19 Mar 2026 10:10 am

Iran War: कतारच्या गॅस प्रकल्पावरील हल्ल्यानंतर भारताच्या मनात धाकधूक ; याच प्रकल्पातून होतो देशाचा ४७% गॅसचा पुरवठा

Iran War: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता संपूर्ण जगावर होत आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा परिणाम भारतावरही होत आहे

दैनिक प्रभात 19 Mar 2026 9:36 am

Coconut water vs lemon drink: उन्हाळ्यात काय पिणे अधिक फायदेशीर? नारळ पाणी की लिंबू पाणी…जाणून घ्या योग्य पर्याय

Coconut water vs lemon drink आहारतज्ज्ञ सांगतात की, दोन्ही पेयांचे फायदे वेगवेगळे असून ते शरीरासाठी उपयुक्त आहेत. मात्र, परिस्थितीनुसार योग्य पेय निवडणे महत्त्वाचे आहे.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 9:33 am

Devendra Fadnavis : रोहित शेट्टी घरावरील गोळीबार प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत दिली महत्वाची माहिती

Devendra Fadnavis : प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या मुंबईतील घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद महत्वाची माहिती दिली.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 9:17 am

Gudipadwa 2026: नागपुरात गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत रामरक्षा स्तोत्र पठण

Gudipadwa 2026: नागपूरमधील शोभा यात्रेनिमित्त सामूहिक राम रक्षा पठण करण्यात आले.

दैनिक प्रभात 19 Mar 2026 9:11 am

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी राज्यसभेत दिलेली माहिती वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यांनी सहकार मंत्रालयाच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या 'भारत टॅक्सी' या कॅब एग्रीगेटर प्लॅटफॉर्मबद्दल सविस्तर माहिती दिली. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू झालेल्या या प्लॅटफॉर्मच्या महसुलाच्या स्रोताबद्दलही त्यांनी स्पष्टीकरण दिले. यात आश्चर्य नाही की, ही कहाणी ३०० कोटींच्या भागभांडवलासह आठ सहकारी संस्थांनी साकारली आहे.या कथेची सुरुवात ५ कोटी रुपयांच्या माफक गुंतवणुकीने झालीसरकारने बुधवारी राज्यसभेला माहिती दिली की, भारत टॅक्सी प्लॅटफॉर्मने सुमारे ५ कोटी रुपयांच्या माफक गुंतवणुकीतून चालकांसाठी आतापर्यंत ३५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले आहे. या उपक्रमाने आतापर्यंत सुमारे २०,००० चालक आणि २०० सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या आहेत. ३०० कोटी रुपयांचे अधिकृत भागभांडवल असलेला हा उपक्रम आठ राष्ट्रीय स्तरावरील सहकारी संस्थांनी विकसित केला आहे.भारत टॅक्सीची स्थापना ६ जून २०२५ रोजी झाली, परंतु तिचे अधिकृत उद्घाटन ५ फेब्रुवारी २०२६ रोजी झाले.सेवा कुठे उपलब्ध आहे: सध्या, ही सेवा दिल्ली-एनसीआर (दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, फरिदाबाद, गाझियाबाद) आणि गुजरातमधील अहमदाबाद, राजकोट, सोमनाथ आणि द्वारका यांसारख्या शहरांमध्ये उपलब्ध आहे.पुढील योजना: सरकारने म्हटले आहे की, याचा विस्तार टप्प्याटप्प्याने इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केला जाईल.चालकांचे स्वतःचे व्यासपीठकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सांगितले की, भारत टॅक्सी हे देशातील पहिले सहकारी तत्त्वावर आधारित राईड-हेलिंग प्लॅटफॉर्म आहे. चालकांना सक्षम करण्याच्या आणि वाहतूक क्षेत्रात सर्वसमावेशक वाढीला चालना देण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. या मॉडेलमध्ये चालकांना 'सारथी' म्हटले जाते आणि त्यांना मालकी व निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी ठेवले जाते.भारत टॅक्सी उगाच खास नाही

फीड फीडबर्नर 19 Mar 2026 9:10 am