PMC Election: शक्तिप्रदर्शनाने शेट्टी यांच्या प्रचाराची सांगता; कार्यकर्त्यांचा अलोट उत्साह
प्रभात वृत्तसेवा पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक २४ (ब) मधील अधिकृत उमेदवार सुजाता सदानंद शेट्टी यांच्या प्रचाराची सांगता जोरदार शक्तिप्रदर्शन करून करण्यात आली. पॅनल प्रमुख आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या प्रचार फेरीत पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. संपूर्ण प्रभागात काढण्यात आलेल्या या फेरीस मोठा प्रतिसाद […] The post PMC Election: शक्तिप्रदर्शनाने शेट्टी यांच्या प्रचाराची सांगता; कार्यकर्त्यांचा अलोट उत्साह appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महापालिकेची निवडणूक म्हणजे गल्लीबोळातील दादागिरीची निवडणूक समजून काही लोक मनमानी आश्वासने देत आहेत.खिशात नाही दाणा, मला बाजीराव म्हणा, असा त्यांचा व्यवहार आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना मंगळवारी मारला.पुणे महापालिका निवडणुकीच्या महायुतीच्या ‘विजय संकल्प’ सभेची सांगता फडणवीस यांच्या सभेने झाली. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे […] The post Devendra Fadnavis: “खिशात नाही दाणा, अन् मला..!” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अजितदादांना खोचक टोला appeared first on Dainik Prabhat .
PMC Election: प्रभाग १० मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या रॅलीला भरघोस पाठिंबा
प्रभात वृत्तसेवा पुणे – प्रभागात २४ तास पाणी, वीजपुरवठा, स्वच्छ-सुंदर-अतिक्रमणमुक्त रस्ते, पदपथ, सोसायट्यांचा विकास, ज्येष्ठ नागरिक, मुलांसाठी उद्याने, विरंगुळा केंद्रासह प्रभाग १० च्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पदयात्रा, दुचाकी रॅलीने प्रचाराची सांगता केली. या वेळी तरुणांसह नागरिकांकडून मिळालेल्या पाठिंब्यांमुळे ही विजयी रॅली असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. बावधन-भुसारी काॅलनी प्रभाग १० मधील […] The post PMC Election: प्रभाग १० मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या रॅलीला भरघोस पाठिंबा appeared first on Dainik Prabhat .
PMC Election: शक्ती प्रदर्शन करत अविनाश बागवेंच्या प्रचाराची सांगता
प्रभात वृत्तसेवा पुणे – काँग्रेस पक्षाचा विजय असो, येऊन येऊन येणार कोण, पंजाशिवाय आहेच कोण, अशा घोषणांनी संपूर्ण मतदारसंघ मंगळवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग २२ मधील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार इंदिरा अविनाश बागवे,अविनाश बागवे, रफीक शेख व दिलशाद शेख या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज सांगता रॅली आयोजित केली होती. या रॅलीत हजारो […] The post PMC Election: शक्ती प्रदर्शन करत अविनाश बागवेंच्या प्रचाराची सांगता appeared first on Dainik Prabhat .
Raj Thackeray: “गन पॉईंटवर विमानतळे हस्तांतरित केली!”राज ठाकरेंचा अदानी समूहावर गंभीर आरोप
प्रभात वृत्तसेवा पुणे – कोणत्याही उद्योग आणि उद्योगपतींच्या विरोधात नाही, तर विशिष्ट पद्धतीच्या मक्तेदारीच्या विरोधात आहे. टाटा, अंबानी किंवा हिंदुजा समूहाला आपले स्वत:चे उद्योग उभे करण्यासाठी ५०-६० वर्षे लागली, तिथे केवळ १० वर्षांत एखादी व्यक्ती एवढी मोठी कशी होते? एकाच उद्योगपतींची ‘ग्रोथ’ (वाढ) होत आहे, यापेक्षा ती कशी होतेय, हे समजून घेणे अधिक गरजेचे आहे. […] The post Raj Thackeray: “गन पॉईंटवर विमानतळे हस्तांतरित केली!” राज ठाकरेंचा अदानी समूहावर गंभीर आरोप appeared first on Dainik Prabhat .
PMC Election: शहरात मोठ्या फरकाने विजय मिळेल; भाजपचे राघवेंद्र (बाप्पू ) मानकर यांचा दावा
प्रभात वृत्तसेवा पुणे – गेल्या दहा दिवसांत भाजपने घेतलेले परिश्रम, घरोघरी पोहोचलेला प्रचार आणि नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे प्रभाग क्रमांक २५- शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई परिसरात शहरातील सर्वात मोठ्या फरकाने विजयी होण्याचा विश्वास भाजपाचे उमेदवार राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काढलेल्या बाइक रॅलीवेळी ते बोलत होते. आमदार हेमंत रासने यांच्या […] The post PMC Election: शहरात मोठ्या फरकाने विजय मिळेल; भाजपचे राघवेंद्र (बाप्पू ) मानकर यांचा दावा appeared first on Dainik Prabhat .
PMC Election: सत्ता असूनही पुण्यासाठी पुरेसा निधी नाही; अरविंद शिंदे यांची भाजपवर टीका
प्रभात वृत्तसेवा पुणे – केंद्र व राज्यात, महापालिकेत भाजपची सत्ता असताना पुण्यासाठी पुरेसा निधी मिळालाच नाही. पुण्याचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र तसे झालेच नाही. स्मार्ट सिटी योजना, २४/७ पाणीपुरवठा योजना आणि बीआरटी योजना गुंडाळल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली. काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी […] The post PMC Election: सत्ता असूनही पुण्यासाठी पुरेसा निधी नाही; अरविंद शिंदे यांची भाजपवर टीका appeared first on Dainik Prabhat .
PMC Election: भाजपचे पेठांमध्ये शक्तिप्रदर्शन! गणेश बिडकर यांची विजय संकल्प महापदयात्रा
प्रभात वृत्तसेवा पुणे – प्रभाग क्रमांक २४ मधून भाजपाचे उमेदवार गणेश बिडकर यांच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजय संकल्प महापदयात्रा’ मोठ्या उत्साहात पार पडली. कसबा गणपती मंदिरापासून सोमवार पेठेतील गाडगे महाराज मठापर्यंत काढण्यात आलेल्या या पदयात्रेत कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रभागात आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच मोठी पदयात्रा ठरली. वाहतुकीवर परिणाम […] The post PMC Election: भाजपचे पेठांमध्ये शक्तिप्रदर्शन! गणेश बिडकर यांची विजय संकल्प महापदयात्रा appeared first on Dainik Prabhat .
जम्मू-काश्मीरच्या शक्सगाम खोऱ्यात चीन रस्ता बनवत आहे. 9 जानेवारी रोजी भारताने याला बेकायदेशीर ठरवत म्हटले की शक्सगाम खोरे भारताचा भाग आहे. आता चीनने हा दावा फेटाळून लावत म्हटले आहे की, 'चीन आणि पाकिस्तान यांच्यात 1963 मध्ये झालेल्या करारानुसार शक्सगाम खोरे चीनचे आहे. आम्ही येथे कोणतेही विकास कार्य करू शकतो.' शेवटी पाकिस्तानने शक्सगाम व्हॅलीवर बेकायदेशीर कब्जा करून चीनला भेट का दिली आणि येथील चीनी रस्ता भारतासाठी किती मोठा धोका आहे; जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये… प्रश्न-1: जेव्हा जमीन भारताची आहे, मग पाकिस्तानकडून मिळाल्याचा दावा चीन का करत आहे?उत्तर: भारत आणि चीन यांच्यातील शक्सगाम खोऱ्याचा वाद 63 वर्षांहून अधिक जुना आहे… प्रश्न-2: शक्सगाम घाटावरील चिनी कब्जाला भारत बेकायदेशीर का मानतो?उत्तर: भारत-चीन युद्ध संपल्यानंतरच पाकिस्तानने चीनसोबत सीमा विवाद सोडवण्यासाठी चर्चा सुरू केली होती. 1963 मध्ये पाकिस्तान-चीन दरम्यान सीमा करार झाला. या अंतर्गत 5 हजार चौरस किमीपेक्षा जास्त शक्सगाम घाटावर पाकिस्तानने चीनच्या अधिकाराला मान्यता दिली. पाकिस्तान आणि चीन यांच्यात शक्सगाम खोऱ्याबाबत करार त्यावेळी झाला, जेव्हा भारत-पाक यांच्यात काश्मीर वाद कायम होता. हा वाद अजूनही सुटलेला नाही. त्यावेळी पंतप्रधान असलेले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत सांगितले होते की, पाकिस्तानला शक्सगाम खोरे चीनला देण्याचा कोणताही अधिकार नाही. भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही या कराराच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. पाकिस्तान आणि चीन यांच्यात झालेल्या सीमा कराराचा एक महत्त्वाचा भाग आहे - कलम 6. या अंतर्गत दोन्ही पक्षांमध्ये करार झाला होता की, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील काश्मीर वाद मिटल्यानंतर, सीमा निश्चित करण्यासाठी चीनसोबत पुन्हा चर्चा होईल. यावेळी चीनसोबत तो देश चर्चा करेल, ज्याचा शक्सगाममध्ये अधिकार निश्चित होईल. या चर्चेत नवीन करारावर स्वाक्षरी होईल, परंतु, आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्येच सीमा वाद सुटलेला नाही. पाकिस्तानने शक्सगाम खोरे चीनला सोपवण्याचा भारताने सुरुवातीपासूनच तीव्र विरोध केला. आजही भारत चीन-पाकिस्तानच्या कराराला आणि चीनच्या शक्सगाम खोऱ्यावरच्या अधिकाराला बेकायदेशीर ठरवतो. भारताचे माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांच्या मते, '1963 मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या करारामध्ये चीनने मान्य केले होते की, शक्सगाम खोऱ्यावर पाकिस्तानची सार्वभौमता नाही. हा प्रदेश चीनला अशा व्यक्तीने दिला आहे, ज्याचा स्वतःचा यावर कोणताही अधिकार नव्हता. आता चीन याला आपला प्रदेश कसा म्हणू शकतो?' प्रश्न-3: शक्सगाम व्हॅली भारतासाठी का महत्त्वाची आहे?उत्तर: शक्सगाम व्हॅली तिच्या स्थानामुळे आणि सामरिक कारणांमुळे भारतासाठी खूप महत्त्वाची आहे… सियाचीनवर दोन बाजूंनी हल्ल्याचा धोका भारतीय सीमेजवळ चीनने चौकी उभारली चीन-पाकिस्तानची वाढती जवळीक प्रश्न-4: CPEC काय आहे, ज्या अंतर्गत चीन शक्सगाम घाटात विकास करत आहे?उत्तर: चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजेच CPEC ही चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. याची सुरुवात 2013 मध्ये झाली होती. यात चीनच्या शिनजियांग प्रांतापासून पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापर्यंत 60 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 5.4 लाख कोटी रुपयांच्या खर्चाने आर्थिक कॉरिडॉर (गलियारा) तयार केला जात आहे... यामुळे चीनची अरबी समुद्रापर्यंत पोहोच होईल. CPEC अंतर्गत चीन रस्ते, बंदर, रेल्वे आणि ऊर्जा प्रकल्पांवर काम करत आहे. या कॉरिडॉरमुळे मध्यपूर्वेतून येणाऱ्या कच्च्या तेलाची चीनपर्यंत पोहोच सोपी होईल. सध्या चीनचे 80% कच्चे तेल मलक्का सामुद्रधुनीतून येते, जो सुमारे 16 हजार किमीचा मार्ग आहे. CPEC मुळे हे अंतर 5 हजार किमीने कमी होईल. या आर्थिक कॉरिडॉरद्वारे चीन अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात आपली पकड मजबूत करू इच्छितो. CPEC पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानमधूनही जातो. भारत येथे पाकिस्तानच्या ताब्याला बेकायदेशीर मानतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच CPEC ला विरोध करत आहे. प्रश्न-5: शक्सगाम खोऱ्याव्यतिरिक्त, चीन भारताच्या इतर कोणत्या भागांना स्वतःचे मानतो?उत्तर: चीन शक्सगाम व्यतिरिक्त भारतीय सीमेवरील अनेक इतर भागांना स्वतःचे असल्याचे सांगतो… अक्साई चीन: 1962 च्या भारत-चीन युद्धादरम्यान, चीनने अक्साई चीन आपल्या ताब्यात घेतले होते. भारत याला लडाखचा भाग मानतो, परंतु चीन यावर आपला दावा करतो. 1865 च्या जॉन्सन लाईननुसार, अक्साई चीन तत्कालीन जम्मू-काश्मीर (आता लडाख) चा भाग आहे. चीन ही लाईन देखील मानत नाही. अरुणाचल प्रदेश: चीन संपूर्ण अरुणाचल प्रदेश राज्यावर दावा करतो आणि याला 'दक्षिण तिबेट' आणि 'झांगनान' म्हणतो. मे 2025 मध्येच चीनने अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची नावे बदलली आहेत. पँगोंग सरोवर: सरोवराच्या उत्तरेकडील किनाऱ्याला आठ भागांमध्ये विभागले आहे, ज्यांना 'फिंगर' म्हणतात. भारत फिंगर-8 पर्यंत आपल्या क्षेत्रावर दावा करतो, तर चीन फिंगर-4 पर्यंत भारताच्या दाव्याला आव्हान देतो. डेपसांग मैदान: हा अक्साई चीनला जोडलेला भारताचा प्रदेश आहे. चीन याला आपल्या ताब्यात असलेल्या अक्साई चीनचाच भाग असल्याचे सांगतो. अक्साई चीनला जोडलेल्या डेमचोकवरही चीन आपला दावा करतो. गलवान घाटी: गलवान घाटी देखील अक्साई चीनला जोडलेली आहे. गलवान नदी अक्साई चीनमधून वाहते. भारत याला लडाखचा भाग मानतो. या भागावरून 2020 मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्षही झाला होता.
PMC Election: भाजप- राष्ट्रवादीतच रंगणार सामना! शिवसेना ठाकरे गट, मनसेच्या नेत्यांची पाठ
प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेचा सत्तासोपान चढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची चाढाओढ अखेर मंगळवारी संध्याकाळी शांत झाली. गेल्या दहा दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी भाजप आणि राष्ट्रवादीतच झडल्या, तर काँग्रेस, मनसे आणि शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बड्या नेत्यांनी प्रचार फेरी आणि एखाद दुसरी सभा वगळता प्रचाराकडे दुर्लक्ष केल्याने […] The post PMC Election: भाजप- राष्ट्रवादीतच रंगणार सामना! शिवसेना ठाकरे गट, मनसेच्या नेत्यांची पाठ appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – विकासकामांना धर्म नसतो आणि भाजपने नेहमीच ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर काम केले आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्चना पाटील यांच्यासारख्या कार्यक्षम नेतृत्वाची आवश्यकता आहे, असे हाजी अरफात शेख यांनी स्पष्ट केले. काशेवाडी व डायसप्लॉट परिसरात झालेल्या सभेत ते बोलत होते. मुस्लिम समाजाने विकासाच्या मुख्य प्रवाहात […] The post PMC Election: विकासकामाला कोणताही धर्म नसतो! हाजी अरफात शेख यांची अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ सभा appeared first on Dainik Prabhat .
Pune Crime: “शस्त्र बाळगण्यास तुम्ही अयोग्य!”; पूजा खेडकरच्या आईचा पिस्तूल परवाना अखेर रद्द
प्रभात वृत्तसेवा पुणे – बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा आदेश पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. मुळशी तालुक्यातील धडवली गावात एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावल्याचा प्रकारणी मनोरमा यांच्यासह सात जणांविरोधात पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शिवाय मनोरमा यांच्यावर नवी मुंबईतील रबाळेआणि पुण्यातील चतुःश्रृंगी ठाण्यातही […] The post Pune Crime: “शस्त्र बाळगण्यास तुम्ही अयोग्य!”; पूजा खेडकरच्या आईचा पिस्तूल परवाना अखेर रद्द appeared first on Dainik Prabhat .
अजित पवारांचे ‘चाणक्य’अडचणीत? राजकीय सल्लागार नरेश अरोरांच्या कंपनीवर पोलिसांची धाड
प्रभात वृत्तसेवा पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्याशी संबंधित ‘डिझाइन बॉक्स कंपनी कार्यालयाची पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने झाडाझडती घेतली. मंगळवारी (दि. १३) दुपारच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक संबंधित कार्यालयात दाखल झाले. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कागदपत्रांची तपासणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. -ही कारवाई नेमकी कोणत्या प्रकरणात केली, याचा तपशील मिळू […] The post अजित पवारांचे ‘चाणक्य’ अडचणीत? राजकीय सल्लागार नरेश अरोरांच्या कंपनीवर पोलिसांची धाड appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिकेतील भ्रष्टाचार पाहिल्यानंतर मला पश्चाताप होतो. याच्याकडे काय होत पूर्वी, जकातनाक्यावर भंगाराच्या गाड्या इकडच्या तिकड करायचा आज किती प्रॉपर्टी झाली? शहराची वाट लावली. बकालपणा करून वाटोळे केले. हे करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करा. आता सत्ता बदलली, तरच बरे दिवस आहेत. अन्यथा पुढील काळात वाचविण्यासाठी कोणी येणार नाही, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित […] The post Ajit Pawar: “मी ६ वेळा मुख्यमंत्री झालो..”अजित पवारांची जीब घसरली की मनातील इच्छा? वाचा संपूर्ण किस्सा appeared first on Dainik Prabhat .
Sunil Shelke: राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी काम करा; सुनील शेळके यांचे नगरसेवकांना आवाहन
प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – राजकीय जोडे बाजूला ठेवून तळेगाव दाभाडे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांनी पूर्ण वेळ जनतेसाठी काम करावे व नागरिकांचा विश्वास संपादन करावा, असे आवाहन तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी केले. तळेगाव दाभाडे नगर परिषदेत गणेश काकडे मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित उपनगराध्यक्ष गणेश काकडे व स्वीकृत नगरसेवकांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत […] The post Sunil Shelke: राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी काम करा; सुनील शेळके यांचे नगरसेवकांना आवाहन appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: विकासाचा ठोस अजेंडा; प्रभाग क्रमांक २ मध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराची सांगता
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – प्रभाग क्रमांक २ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार वसंत बोराटे आणि विशाल आहेर यांनी प्रचाराची सांगता केली. विकासाचा ठोस अजेंडा आणि भ्रष्टाचारापासून प्रभाग क्रमांक २ ला मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करत उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला. प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत प्रश्न, रखडलेली विकासकामे, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरी […] The post PCMC Election: विकासाचा ठोस अजेंडा; प्रभाग क्रमांक २ मध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराची सांगता appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे शक्तीप्रदर्शन; रॅलीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद
प्रभात वृत्तसेवा चिंचवड – प्रचाराच्या अखेरच्या दिवशी प्रभाग क्रमांक १७ चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवारांनी रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले. नागरिकांकडून यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार मनिषा आरसूळ (अ गट), भाऊसाहेब भोईर (ब गट), शोभाताई वाल्हेकर (क गट) आणि शेखर चिंचवडे (ड गट) यांच्या या रॅलीत मोठ्या संख्येने स्थानिक मतदार सहभागी झाले. रॅलीची सुरुवात […] The post PCMC Election: चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे शक्तीप्रदर्शन; रॅलीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: प्रभाग १६ मध्ये भाजपचा शक्तिप्रदर्शन! ढोल-ताशांच्या गजरात गाजवला संपूर्ण प्रभाग
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – प्रभाग क्रमांक १६ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी भव्य व दिव्य रॅली काढून प्रचाराची सांगता केली. या रॅलीमुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार धर्मपाल तंतरपाळे, शिल्पा राऊत, संगीता भोंडवे आणि दीपक भोंडवे यांनी एकत्रितपणे रॅलीद्वारे मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचे संकल्प मांडले. ढोल-ताशे, घोषणा, […] The post PCMC Election: प्रभाग १६ मध्ये भाजपचा शक्तिप्रदर्शन! ढोल-ताशांच्या गजरात गाजवला संपूर्ण प्रभाग appeared first on Dainik Prabhat .
ZP Election: पुरंदर तालुक्यात झेडपीची रणधुमाळी! निवडणूक जाहीर होताच इच्छुकांची धावपळ
प्रभात वृत्तसेवा सासवड – पुरंदर तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. (दि.५) फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून (दि.१६) पासून उमेदवारी अर्जांची विक्री सुरू होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील इच्छुक उमेदवारांची कागदपत्रांची जुळवाजुळव, पक्षांकडून एबी फॉर्म मिळवण्याची धडपड आणि संघटन बांधणीला जोर आला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून विविध […] The post ZP Election: पुरंदर तालुक्यात झेडपीची रणधुमाळी! निवडणूक जाहीर होताच इच्छुकांची धावपळ appeared first on Dainik Prabhat .
PMC Election: “वाहतूक कोंडी आणि पाण्याचा प्रश्न सोडवणारच!”; रामभाऊ दाभाडे यांनी मांडली भूमिका
प्रभात वृत्तसेवा वाघोली – पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार दौरा जोमात सुरू असून, विविध भागांतून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशी माहिती उमेदवार रामभाऊ दाभाडे यांनी दिली. विमाननगर येथील कोणार्क कॅम्पस, रोहन मिथिला सोसायटी, लुंकड गोल्ड कॉस्ट तसेच वाघोली परिसरातील कमल बाग, जेड […] The post PMC Election: “वाहतूक कोंडी आणि पाण्याचा प्रश्न सोडवणारच!”; रामभाऊ दाभाडे यांनी मांडली भूमिका appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा मंचर – आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून पुणे जिल्हा परिषद-ग्रामीण पंचायत विभागामार्फत आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी 1 कोटी 45 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील गणपती मंदिर भक्त निवासासाठी 25 लाख रुपये, सिद्धेश्वर मंदिर भक्त निवासासाठी […] The post आंबेगाव-शिरूरमधील तीर्थक्षेत्रांचा कायापालट होणार! दिलीप वळसे पाटलांच्या प्रयत्नातून १.४५ कोटींचा निधी मंजूर appeared first on Dainik Prabhat .
ZP Election: पाटसच्या आखाड्यात कोणाचा गुलाल; जिल्हा परिषदेसाठी नेत्यांची ‘फिल्डिंग’सुरू
प्रभात वृत्तसेवा पाटस – पाटस जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली असून पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी फिल्डिंग सुरू केली आहे. निवडणुकीच्या रिंगणात आजी, माजी व नवीन उमेदवार गावातील लोकांशी संपर्क साधत आहेत, दौंड तालुक्याचे राजकारण आणि अर्थकारण असलेल्या पाटस-कुरकुंभ गटात सर्वसाधारण महिला आरक्षण आहे. पंचायत समितीसाठी पाटस आणि कुरकुंभ गण सर्वसाधारण आरक्षित आहे. आरक्षित […] The post ZP Election: पाटसच्या आखाड्यात कोणाचा गुलाल; जिल्हा परिषदेसाठी नेत्यांची ‘फिल्डिंग’ सुरू appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा आळंदी – नवीन वर्षातील पहिला सण असलेला मकर संक्रांतीचा उत्सव अलंकापुरी नगरीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या निमित्ताने पुणे जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपर्यातून हजारो महिला भाविक मंगळवारी (दि. 13) अलंकापुरीत मुक्कामी दाखल झाल्या आहेत. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अलंकापुरीत विविध पूजासाहित्य, ओवशाचे साहित्य, हळदी-कुंकू, वाण आदींची दुकाने थाटण्यात आली असून […] The post मकर संक्रांतीसाठी अलंकापुरी नटली! माऊलींच्या दरबारात पुरुषांना प्रवेशबंदी? काय आहे या परंपरेमागचे कारण? appeared first on Dainik Prabhat .
“दिलेला शब्द पाळला नाही?”; विवेक वळसे पाटलांच्या उमेदवारीवर अरुण गिरे यांचा आक्षेप
प्रभात वृत्तसेवा मंचर – पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत आंबेगाव तालुक्यातील पारगाव-जारकरवाडी गटात मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अद्याप कुठलीही कल्पना मला देण्यात आली नाही. पक्षाच्या बैठकीला कार्यक्रमाला बोलवले जात नाही. त्यामुळे आता जवळपास मला उमेदवारी मिळणार नाही. हेच चित्र दिसत असून माझ्याकडे एक तर लढावे किंवा राजकारणातून निवृत्त व्हावे. हे दोनच […] The post “दिलेला शब्द पाळला नाही?”; विवेक वळसे पाटलांच्या उमेदवारीवर अरुण गिरे यांचा आक्षेप appeared first on Dainik Prabhat .
चाकण नगरपरिषदेत महिलाराज! उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुवर्णा शाम राक्षे यांची निवड
प्रभात वृत्तसेवा चाकण – चाकण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे गट) नगरसेविका सुवर्णा शाम राक्षे यांची बहुमताने निवड झाली. नगराध्यक्षा मनिषा सुरेश गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष या दोन्ही पदांवर आता महिलांची वर्णी लागली आहे. मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व गटनेते नितीन गोरे यांच्या […] The post चाकण नगरपरिषदेत महिलाराज! उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुवर्णा शाम राक्षे यांची निवड appeared first on Dainik Prabhat .
Shikrapur Accident: उसाची कांडी गोळा करताना काळाचा घाला! ट्रॅक्टर ट्रॉलीखाली चिरडून महिलेचा अंत
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथे शेतामध्ये ऊसतोड सुरू असताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून एका ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उषा राम क्षीरसागर असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे जातेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […] The post Shikrapur Accident: उसाची कांडी गोळा करताना काळाचा घाला! ट्रॅक्टर ट्रॉलीखाली चिरडून महिलेचा अंत appeared first on Dainik Prabhat .
साखरेचा गोडवा आता ‘AI’च्या मदतीने!”; माळेगाव कारखान्याची हायटेक भरारी पाहून साखर आयुक्त थक्क
प्रभात वृत्तसेवा माळेगाव – राज्यातील अग्रगण्य असलेल्या दि. माळेगाव सहकारी साखर कारखान्यास राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी भेट दिली. यावेळी डॉ. कोलते यांनी माळेगावात एआय, नव्या प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच कारखान्यातील आधुनिक प्रणालीचे कौतुक केले.यावेळी प्रादेशिक सहसंचालक निलीमा गायकवाड, कार्यकारी अभियंता व सदस्य सचिव स्थापत्य बांधकाम समिती पुणे सविता दळवी, विशेष लेखापरीक्षक डी.एन. […] The post साखरेचा गोडवा आता ‘AI’ च्या मदतीने!”; माळेगाव कारखान्याची हायटेक भरारी पाहून साखर आयुक्त थक्क appeared first on Dainik Prabhat .
Shikrapur Crime: सोनाराचीच फसवणूक! गहाण ठेवले तीन तोळे सोने, पण प्रत्यक्षात निघाले..वाचा
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे एका सोनाराला बेन्टेक्सचे दागिने खरे असल्याचे भासवून त्यांची लाखाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी देवकर ज्वेलर्सचे संचालक रामदास देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसात अभिजित बंडू गदळे आणि राहुल अर्जुन मोरे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बनावट होलमार्क आणि बनावट पावत्यांचा वापर […] The post Shikrapur Crime: सोनाराचीच फसवणूक! गहाण ठेवले तीन तोळे सोने, पण प्रत्यक्षात निघाले..वाचा appeared first on Dainik Prabhat .
Shikrapur Crime: भर दुपारी बाजारात गेलेली मुलगी अचानक बेपत्ता; शिक्रापूर पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरूर) येथे बाजारात भाजी आणण्यासाठी गेलेली १३ वर्षीय आयशाबानो खान ही बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. दुपारी घराबाहेर पडलेली आयशाबानो सायंकाळपर्यंत घरी परतली नाही. याप्रकरणी मुलीच्या आईने शिक्रापूर पोलिसात तक्रार दिली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयशाबानो मोहम्मद खान ही दुपारी सणसवाडी गावातील बाजारात भाजी आणण्यासाठी […] The post Shikrapur Crime: भर दुपारी बाजारात गेलेली मुलगी अचानक बेपत्ता; शिक्रापूर पोलिसांकडून शोधमोहीम सुरू appeared first on Dainik Prabhat .
Leopard Trapped: वनविभागाची मोठी कारवाई; आंबळे येथे दीड वर्ष वयाची बिबट मादी जेरबंद
प्रभात वृत्तसेवा न्हावरे – आंबळे (ता. शिरूर) येथे मंगळवारी (दि. १३) पहाटेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक मादी बिबट्या यशस्वीपणे जेरबंद झाली. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. वनविभागाच्या या यशस्वी कारवाईमुळे आंबळे आणि परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून वनविभागाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंबळे […] The post Leopard Trapped: वनविभागाची मोठी कारवाई; आंबळे येथे दीड वर्ष वयाची बिबट मादी जेरबंद appeared first on Dainik Prabhat .
मकरसंक्रांतीला बोरांचा ‘भाव’वधारला! बाजारात चक्क २०० रुपये किलो; पण गावरान बोरं गेली कुठे?
प्रभात वृत्तसेवा बेल्हे – मकरसंक्रांत आणि भोगीमुळे बाजारपेठेत बोरांना मागणी असून त्यांचे दर गगनाला भिडले आहेत. आळेफाटा व परिसरातील बाजारपेठेत एरव्ही ८० ते १०० रुपये किलोने मिळणारी विलायती बोरे सध्या २०० रुपये किलो दराने विकली जात आहेत. विशेष म्हणजे, संक्रांतीच्या पूजेसाठी परंपरेने वापरली जाणारी गावरान बोरे आता तालुक्यात कुठेही उपलब्ध नसून ही झाडे नामशेष होण्याच्या […] The post मकरसंक्रांतीला बोरांचा ‘भाव’ वधारला! बाजारात चक्क २०० रुपये किलो; पण गावरान बोरं गेली कुठे? appeared first on Dainik Prabhat .
Alephata News: आळेफाटा स्टँडवर अनोळखी तरुणाचा गूढ मृत्यू; टॅटूंमुळे ओळख पटण्याची शक्यता
प्रभात वृत्तसेवा आळेफाटा – आळेफाटा एस.टी. स्टँड परिसरात एका २५ ते ३० वयच्या अनोळखी तरुणाचा गूढ मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.अचानक फिट येऊन खाली कोसळलेल्या या तरुणास तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदनानंतरही ठोस माहिती समोर आलेली नाही. मयत […] The post Alephata News: आळेफाटा स्टँडवर अनोळखी तरुणाचा गूढ मृत्यू; टॅटूंमुळे ओळख पटण्याची शक्यता appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी गणेश मोहनराव काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कामगार नेते शिवाजी आगळे, अमीर (बाबा) मुलानी आणि भारतीय जनता पक्षाकडून सुरज सातकर यांची नियुक्ती करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी […] The post Talegaon Dabhade: उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा सस्पेन्स संपला..पहा कुणाची लागली वर्णी? appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: “मतदान हीच खरी सामाजिक बांधिलकी”; निवडणुकीसाठी तरुणांनी घेतली मतदानाची शपथ
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – प्रत्येक मत हे लोकशाहीचे बळ आहे. मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येकाने आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, शिवाय सामाजिक बांधिलकीतून आपले कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांनाही मतदानासाठी प्रेरित करावे. भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक […] The post PCMC Election: “मतदान हीच खरी सामाजिक बांधिलकी”; निवडणुकीसाठी तरुणांनी घेतली मतदानाची शपथ appeared first on Dainik Prabhat .
पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; हातभट्टीचा हजारो लिटर कच्चा माल नष्ट; आरोपी महिला फरार!
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – तळेगाव एमआयडीसी आणि शिरगाव परिसरात पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी दारू तयार करण्यासाठी ठेवलेला कच्चा माल जप्त करून नष्ट केला आहे. दोन्ही ठिकाणी महिला आरोपी पोलिसांची चाहूल लागताच फरार झाल्या.तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. १२ जानेवारी) रोजी दुपारी ३.४५ वाजता ओढ्याच्या कडेला पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत हातभट्टी दारू तयार […] The post पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; हातभट्टीचा हजारो लिटर कच्चा माल नष्ट; आरोपी महिला फरार! appeared first on Dainik Prabhat .
ZP Election: सत्तेच्या मुकुटासाठी मैदानात प्रत्येक पक्ष स्वबळावर…!
प्रभात वृत्तसेवा सातारा – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी १५ दिवसांची मुदतवाढ मिळाली. अखेर निवडणूक जाहीर झाली. अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा करणाऱ्या ग्रामीण भागातील नेते व कार्यकर्त्यांमध्ये आता एक चैतन्य निर्माण होणार आहे. साडेचार वर्षांपासून रेंगाळलेल्या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष स्वबळावर लढण्यासाठी इच्छुक आहेत. राज्याच्या राजकारणात महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आलेले पक्ष या निवडणुकांत […] The post ZP Election: सत्तेच्या मुकुटासाठी मैदानात प्रत्येक पक्ष स्वबळावर…! appeared first on Dainik Prabhat .
दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ जानेवारी २०२६
पंचांगआज मिती पौष कृष्ण एकादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र अनुराधा.योग गंड, चंद्र राशी वृश्चिक भारतीय सौर २४ पौष शके १९४७. बुधवार दिनांक १४ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय ०४.१८ उद्याच मुंबईचा सूर्यास्त ०६.२० मुंबईचा चंद्रास्त ०२.३० राहू काळ १२.४७ ते ०२.१०,शततिला एकादशी,मकर संक्राती,आनंदी दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : मानसन्मान मिळेल.वृषभ : महत्त्वाच्या कामात कोणताही मोठा बदल करू नका.मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत .कर्क : अनावश्यक प्रवास करणे टाळा .सिंह : आपण नवीन प्रकल्प हाती घेणार आहात.कन्या : नवीन संधी मिळणार आहे.तूळ : तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.वृश्चिक : घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा.धनू : आपले मानसिक स्वास्थ्य चांगले राहणार आहे.मकर : आरोग्याचे प्रश्न समोर उभे राहणार आहेत.कुंभ : आपापली कामं चोख पणे पार पाडणार आहात .मीन : महत्वाची कामे नियोजनपूर्वक पूर्ण करा.
Satara News: दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे –जिल्हाधिकारी संतोष पाटील
प्रभात वृत्तसेवा सातारा – दिव्यांग हे समाजाचा अविभाज्य घटक असून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. दिव्यांगांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याबरोबर स्वयंरोजगारसाठी प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम […] The post Satara News: दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे – जिल्हाधिकारी संतोष पाटील appeared first on Dainik Prabhat .
मकरसंक्रांतीच्या दिवशी का खातात खिचडी ?
मुंबई : यंदा मकरसंक्रांत बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होईल. काही ठिकाणी मकरसंक्रांतीला 'उत्तरायण' असे म्हणतात तर काही ठिकाणी 'खिचडी' असेही म्हणतात. मकरसंक्रांतीनिमित्त पवित्र नदीत स्नान करतात नंतर सूर्यदेवाची उपासना करतात. सूर्याने मकर राशीत प्रवेश करताच महिनाभर सुरू असलेला खरमास संपतो. पुन्हा एकदा शुभ कार्यांचा काळ सुरू होतो. ऋतू परिवर्तन होते. वातावरणातील थंडावा हळू हळू कमी होऊ लागतो. वसंत ऋतूची सुरुवात होते. मकरसंक्रांतीनिमित्त अनेक ठिकाणी स्नान करुन सूर्याची उपासना केल्यानंतर खिचडी खाणे, खिचडी दान करणे असे केले जाते. या दिवशी खिचडीचे दान केल्याने ग्रहदोष शांत होतात आणि जीवनात स्थैर्य येते, अशी अनेकांची श्रद्धा आहे. अशी तयार करतात मकरसंक्रांतीनिमित्त खायची मुगाची खिचडी ?साहित्य : मूग डाळ, तांदूळ, तूप, जीरे, हिंग, धने पूड, चवीपुरते मीठपाककृती : तांदूळ आणि मूग डाळ धुवा. किमान अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. तांदूळ आणि डाळीतील पाणी गाळून घ्या. पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जीरे आणि हिंगाची फोडणी द्या. जीरे तडतडू लागले की त्यात तांदूळ आणि मूगडाळ मिक्स करून चांगले परतून घ्या. भांड्यामध्ये पाणी ओता आणि तापवा. पाणी पूर्णपणे आटू देऊ नका. नंतर त्यात धने पूड आणि मीठ टाका. भांड्यावर झाकण ठेवा. नंतरमंद आचेवर खिचडी किमान दहा मिनिटे शिजवा.
मतदानाला जाताना ओळखीच्या पुराव्यांपैंकी एक पुरावा बाळगा जवळ
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी पात्र मतदारांना मतदान केंद्रावर मतदार छायाचित्र ओळखपत्र दाखवल्यानंतर मतदान करता येईल. जर एखाद्या पात्र मतदाराकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास त्या व्यक्तीला राज्य निवडणूक आयोग, यांनी १४ जुलै २०२५ च्या आदेशानुसार निश्चित केलेल्या अन्य १२ प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येईल, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली आहे.मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ अंतर्गत गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र मतदाराने मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटविण्यासाठी छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करावे. परंतु ज्यांच्याकडे छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र नसेल, अशा मतदारांना ओळख पटविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा सादर करावा लागेल, अशी माहिती गगराणी यांनी दिली आहे.लोकशाही प्रक्रियेत मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. मतदान करताना प्रत्येक मतदाराने स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करावे. ज्यांच्याकडे सदर ओळखपत्र नसेल त्यांनी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा मतदान केंद्रावर सादर करावा. यामुळे मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरळीत पार पडण्यास मदत होईल, असेही गगराणी यांनी नमूद केले.मतदार ओळखपत्र नसल्यास ग्राह्य धरले जाणारे अन्य १२ प्रकारचे पुरावे भारताचे पारपत्र (पासपोर्ट) आधार ओळखपत्र वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र (पॅन कार्ड) केंद्र शासन / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना छायाचित्र (फोटो) सह दिलेली ओळखपत्रे राष्ट्रीयकृत बँका अथवा टपाल खात्यामधील खातेदाराचे छायाचित्र (फोटो) असलेले पासबूक सक्षम प्राधिकाऱयाने छायाचित्रासह दिलेला दिव्यांग (अपंगत्वाचा) दाखला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील छायाचित्र असलेले ओळखपत्र (मनरेगा जॉब कार्ड) निवृत्त कर्मचाऱयांची अथवा त्यांच्या विधवा / अवलंबित व्यक्तींची फोटो असलेली निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे (उदा. पासबूक, प्रमाणपत्र इ.) लोकसभा / राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा / विधानपरिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र स्वातंत्र्य सैनिकाचे छायाचित्र असलेले ओळखपत्र केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे छायाचित्रासह कार्ड
नवी मुंबईत ५ लाखांच्या लाचेप्रकरणी अधिकऱ्यासह तीघांना अटक
Navi Mumbai : नवी मुंबईत ५ लाखांच्या लाचेप्रकरणी अधिकऱ्यासह तीघांना अटक ठाणे जिल्ह्यात गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या एका व्यापारी पेढीच्या मालकाकडून ५ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आणि स्वीकारल्याप्रकरणी एका सरकारी अधिकाऱ्यासह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सीबीडी बेलापूर येथील कोकण विभागाचे उपआयुक्त (पुरवठा) अनिल सुधाकर तकसाळे (५५), ज्यांनी लाचेची मागणी केली […] The post नवी मुंबईत ५ लाखांच्या लाचेप्रकरणी अधिकऱ्यासह तीघांना अटक appeared first on Dainik Prabhat .
सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा प्लॅन; उद्योग महासंघाचे सरकारला नवे वेळापत्रक
नवी दिल्ली – गेल्या दहा वर्षात भारत सरकारने सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र परिस्थितीजन्य कारणामुळे या प्रयत्नांना पुरेसा वेग आलेला नाही. आगामी वर्षांमध्ये सरकारी कंपन्यांचे वेगात खासगीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशी सूचना भारतीय उद्योग महासंघाने अर्थ मंत्रालयाला अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केले आहे. या अगोदर खासगीकरणाला वेग का आला नाही याचा विचार करून […] The post सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा प्लॅन; उद्योग महासंघाचे सरकारला नवे वेळापत्रक appeared first on Dainik Prabhat .
School Holidays : महाराष्ट्रातील ‘या’शाळांना सलग 5 दिवस सुट्टी? महत्त्वाचं कारण समोर
मुंबई : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी, 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मतदानाच्या तयारीमुळे आणि शिक्षकांवर लावण्यात आलेल्या निवडणूक ड्युटीमुळे काही भागांतील शाळांना सलग सुट्ट्या मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 जानेवारी रोजी राज्यातील […] The post School Holidays : महाराष्ट्रातील ‘या’ शाळांना सलग 5 दिवस सुट्टी? महत्त्वाचं कारण समोर appeared first on Dainik Prabhat .
अमेरिकेला चोख प्रत्युत्तर: युरोपियन बाजारपेठेत भारतीय निर्यातीचा डंका, स्पेनसह ‘या’देशांत मोठी झेप
नवी दिल्ली – अमेरिकेने भारताविरोधात 50 टक्के आयातशुल्क लावल्यानंतर पर्यायी बाजारपेठात निर्यात वाढविण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. अशा परिस्थितीत 27 सदस्य युरोपियन युनियनला निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यापैकी स्पेन, जर्मनी, बेल्जियम, पोलंड या देशांना निर्यात वाढत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. त्यातल्या त्यात स्पेनला निर्यात जास्त प्रमाणात वाढत असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने […] The post अमेरिकेला चोख प्रत्युत्तर: युरोपियन बाजारपेठेत भारतीय निर्यातीचा डंका, स्पेनसह ‘या’ देशांत मोठी झेप appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : आंध्र प्रदेशच्या एका खासदाराला ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून ५ कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून मुंबईतून एका आरटीआय कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आरोपी रुशांत जयकुमार वाडके याला दक्षिण मुंबईतून अटक करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, स्वतःला आरटीआय कार्यकर्ता म्हणवणाऱ्या वाडकेने पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका खासदाराला लक्ष्य केले. […] The post Mumbai News : मुंबईत आरटीआय कार्यकर्त्याला अटक; आंध्र प्रदेशच्या खासदाराकडून 5 कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न appeared first on Dainik Prabhat .
Bank of Maharashtra Q3 Results: महाराष्ट्र बँकेच्या नफ्यात 27 टक्के वाढ
नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील महाराष्ट्र बँकेने मंगळवारी तिसर्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला. या तिमाहित बँकेचा नफा 27% वाढून 1,779 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहित बँकेला 1,406 कोटी रुपयांचा नफा झाला होता. ताळेबंद जाहीर करताना बँकेचे व्यवस्थापकीय संचालकन निधू सक्सेना यांनी सांगितले की, बँकेने भागधारकासाठी दहा रुपयाच्या शेअरवर एक रुपयाचा अंतरिम […] The post Bank of Maharashtra Q3 Results: महाराष्ट्र बँकेच्या नफ्यात 27 टक्के वाढ appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : शैक्षणिक संस्थांमध्ये गरीब मुलांना प्रवेश देणे हे एक राष्ट्रीय अभियान असले पाहिजे असे निरीक्षण नोंदवत, खाजगी विनाअनुदानित गैर-अल्पसंख्याक शाळांमध्ये आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बळ घटकांतील मुलांसाठी प्रवेशातील २५ टक्के कोटा लागू केला जाईल, यासाठी नियम तयार करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. खंडपीठ शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत प्रवेश मिळवताना आर्थिकदृष्ट्या […] The post Supreme Court : आरटीईतील आरक्षित जागांच्या अंमलबजावणीसाठी नियमन करा; सर्वोच्च न्यायालयाचे अधिकाऱ्यांना निर्देश appeared first on Dainik Prabhat .
Indigo Offier: विमान प्रवाशांना इंडिगोची नवीन वर्षाची भेट; अवघ्या 1499 रुपयांत करा हवाई सफर
मुंबई: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विमान प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांसाठी देशातील आघाडीची विमान कंपनी ‘इंडिगो’ने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने आपली विशेष न्यू इयर सेल ‘Sail into 2026’ जाहीर केली असून, या अंतर्गत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही मार्गांवर प्रवाशांना अत्यंत स्वस्त दरात विमान तिकिटे उपलब्ध करून दिली आहेत. या सेलमध्ये देशांतर्गत प्रवासाचे सुरुवातीचे भाडे […] The post Indigo Offier: विमान प्रवाशांना इंडिगोची नवीन वर्षाची भेट; अवघ्या 1499 रुपयांत करा हवाई सफर appeared first on Dainik Prabhat .
उबाठाने मिनी कोकण भांडुपला बकाल केले!
मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; १६ तारखेनंतर भांडुपमध्ये विकासाची गंगा आणूमुंबई : कोकण नगर, भांडुप येथे झालेल्या सभेत मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी उबाठा आणि ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. “उबाठाने ‘मिनी कोकण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भांडुपला बकाल अवस्थेत नेले असून, १६ तारखेनंतर येथे विकासाची गंगा आणू,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.राणे म्हणाले की, “पूर्ण राज्यभर प्रचार करत करत मी आता मिनी कोकणात, म्हणजेच भांडुपमध्ये येऊन थांबलो. कोकण आणि भांडुपमधील परिस्थितीत जमीन-आसमानाचा फरक आहे. कोकणातील घरे, रस्ते आणि निसर्ग सौंदर्य पाहा, आणि इथली परिस्थिती पाहा. येथील कोकणी माणसांची अवस्था बदलण्याची गरज आहे.”बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना मराठी माणसासाठी उभी केली; मात्र त्यांच्या पुढील पिढीने त्या विचारांशी प्रतारणा केली. त्यामुळे मराठी माणूस मुंबईत का कमी झाला, याचे उत्तर उबाठावाल्यांनी द्यायला हवे. त्यांच्या सोबत फरफटत गेलेल्यांनीही (मनसे) त्यांना जबाबदार धरले पाहिजे. ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे त्यांनाही पटले आहे. त्यामुळे आता कोकणी माणसाने त्यांचा नाही, तर स्वतःचा विचार केला पाहिजे, असे आवाहन नितेश राणे यांनी केले.कोकणातील लोकसभा आणि विधानसभा निकालांचा उल्लेख करत राणे म्हणाले, “कोकणातील जनतेने निर्धार केला आणि सर्व खासदार महायुतीचे निवडून आले. विधानसभेत फक्त भास्कर जाधव थोडक्या मतांनी निवडून आले. कोकणातील विकास भांडुपमध्ये पाहायचा असेल तर १५ तारखेला महायुतीशिवाय दुसरा विचार करू नका. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की कोकण हा शिवसेनेचा कणा आहे. तोच कणा मोडण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. येत्या १६ तारखेला महायुतीचा महापौर बसल्यावर उद्धव ठाकरे बॅग पॅक करून लंडनला जातील”, असा दावाही त्यांनी केला.शेवटी कोकणवासीयांना उद्देशून ते म्हणाले, “सरकारमध्ये तुमच्या या भावाचे वजन आहे. देवा भाऊंच्या आवडत्यांपैकी मी एक आहे. काळजी करू नका. १५ तारखेला फक्त ‘जय कोकण’ म्हणा आणि कमळ चिन्ह दाबा”, असे आवाहन देखील त्यांनी केले.
मुंबईत मतदान केंद्रासह परिसरही राखणार स्वच्छ
पुढील तीन दिवसांमध्ये राखली जाणार स्वच्छता मोहिममुंबई (विशेष प्रतिनिधी) :राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार, गुरुवार दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी मतदान होणार आहे. या निमित्ताने, मुंबई महानगरातील सर्व मतदान केंद्रांवर तसेच मतमोजणी केंद्रांवर उत्तम प्रकारची स्वच्छता राहावी, यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. १४ ते १६ जानेवारी २०२६ रोजी राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेच्या माध्यमातून मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र तसेच आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.मुंबईतील सार्वजनिक ठिकाणांवर उत्तम प्रकारची स्वच्छता ठेवण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात तसेच उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीत विविध उपाययोजना केल्या जातात. तसेच, विविध उपक्रमांचेही आयोजन केले जाते.याच पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने, मतदानाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ जानेवारी २०२६ रोजी, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी म्हणजेच १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान केंद्रांवर तसेच १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी केंद्र आणि परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. मतदानासाठी निश्चित केलेल्या सर्व १० हजार २३१ मतदान केंद्रांवर तसेच २३ मतमोजणी केंद्रांवर या मोहीम अंतर्गत स्वच्छता करण्यात येईल.दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने विविध मतदान केंद्रांच्या ठिकाणी सुमारे ४ हजार शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना अत्यंत सुलभतेने मतदान करता यावे. तसेच त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करुन लोकशाही बळकट करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. अश्विनी जोशी यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.मतदानाच्या पूर्णतयारीची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी एन विभागातील मध्यवर्ती निवडणूक केंद्र कार्यालय तसेच शिवाजी टेक्निकल इन्स्टिट्यूट येथील मतदान केंद्रास आज भेट दिली. मतदारांना मतदानाच्या दिवशी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याबाबत याव्यात. विशेषतः दिव्यांग मतदारांना आवश्यक त्या सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच फिरत्या प्रसाधनगृहांची (मोबाईल टॉयलेट) नियमित स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले.
मुंबईतील ८५ लाख मतदारांना झाले मतदार ओळखपत्रांचे वाटप
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या अनुषंगाने गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांचे नाव, पत्ता, मतदार यादीतील भाग क्रमांक, मतदान केंद्राचे नाव व खोली क्रमांक यांसह आवश्यक माहिती असलेली मतदार माहिती चिठ्ठी सुमारे ८५ लाख मतदारांपर्यंत वितरित करण्यात आली आहे. मुंबईतील प्रत्येक पात्र मतदारापर्यंत निर्धारित कालावधीत मतदार माहिती चिठ्ठी वेळेत व अचूकरित्या पोहोचविण्याची कामगिरी घनकचरा व्यवस्थापन विभागाने केली आहे. दरम्यान, मुंबईकर मतदारांनी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार मतदारांना आपले मतदान केंद्र, मतदार यादीतील क्रमांक आदी माहिती सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी मतदार माहिती चिठ्ठ्या दिल्या जातात. मतदारांपर्यंत ह्या चिठ्ठ्या त्या त्या प्रशासकीय विभागात (वॉर्ड) नियुक्त घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी - कर्मचारी यांच्यामार्फत वितरित करण्यात येत आहेत. अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली मतदार चिठ्ठया वितरणाची कार्यवाही सुरू आहे.उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर म्हणाले की, महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना मतदान प्रक्रिया अधिक सुलभ व सोयीस्कर व्हावी, या उद्देशाने मतदानापूर्वी काही दिवस अगोदर मतदारांची नावे, त्यांचा अनुक्रमांक, प्रभाग क्रमांक, प्रभागाचे नाव आदी तपशील असलेली मतदार चिठ्ठी वितरित करण्यात येते. मतदारांना मतदान करणे सोपे व्हावे तसेच एकूण मतदानाची टक्केवारी वाढावी, या दृष्टीने हा वैधानिक उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातील सहायक अभियंता, अवेक्षक यांच्या समन्वयाने मतदार माहिती चिठ्ठी घरोघरी पोहोचविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. या कामकाजासाठी एकूण मिळून ६ हजार ७०१ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यात ५ हजार १३८ कर्मचारी, ९४५ स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, १०० आशा कार्यकर्त्या आणि ५१८ बूथ स्तर अधिकारी यांचा समावेश आहे. आजपर्यंत सुमारे ८५ लाख मतदार ओळखपत्र चिठ्ठयांचे वितरण झाले आहे. उर्वरित १५ लाख मतदार ओळखपत्र चिठ्ठया मतदान केंद्रावर मतदारांना उपलब्ध करून देण्यात आल्याचे दिघावकर यांनी सांगितले.याशिवाय, निवडणूक प्रक्रियेदरम्यान स्वच्छता आणि स्वच्छतेची खात्री करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने सर्व १० हजार २३१ मतदान केंद्रांवर निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीच्या दिवशी व्यापक स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून घनकचरा व्यवस्थापन विभागाने मतदार आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी विविध मतदान केंद्रांवर ४ हजारांहून अधिक शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. त्यात पोर्टेबल आणि मोबाइल युनिट्सचा समावेश आहे. याखेरिज १४ जानेवारी आणि १५ जानेवारी २०२६ रोजी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. असेदेखील दिघावकर यांनी नमूद केले आहे.
Zp Election : जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलणार? नेमकं कारण काय?
मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हं दिसत आहेत. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत दिली आहे. मात्र निवडणुकांची […] The post Zp Election : जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलणार? नेमकं कारण काय? appeared first on Dainik Prabhat .
प्रचार थांबला…बिगुल वाजला..! शहरी भागांत उडालेला प्रचाराचा धुरळा आता ग्रामीण भागांत
मुंबई – राजकीय रणधुमाळीचे अनोखे चित्र मंगळवारी समोर आले. एकीकडे महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रचार तोफा थंडावल्या. तर, दुसरीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे राज्याच्या शहरी भागांत उडालेला प्रचाराचा धुरळा आता ग्रामीण भागांत पोहचेल. त्यातून ऐन थंडीत वाढलेला राजकीय तापमानाचा पारा जैसे थे स्थितीत राहील. महापालिका निवडणुकांतील प्रचारात शहरी मुद्दे महत्वाचे ठरले. […] The post प्रचार थांबला…बिगुल वाजला..! शहरी भागांत उडालेला प्रचाराचा धुरळा आता ग्रामीण भागांत appeared first on Dainik Prabhat .
बिनविरोध प्रकरणांवर पालिका आयुक्तांकडून मागवले अहवाल; राज्य निवडणूक आयोगाची माहिती
मुंबई : राज्यात सत्ताधारी आघाडीच्या ६० पेक्षा अधिक उमेदवारांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आलेल्या प्रकरणांबाबत पालिका आयुक्तांकडून अहवाल मागवण्यात आले आहेत, अशी माहीती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. उमेदवारांवर कोणताही दबाव आणला गेला होता का?, उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांना काही प्रलोभने दिली गेली होती का?, याबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झाली होती का? […] The post बिनविरोध प्रकरणांवर पालिका आयुक्तांकडून मागवले अहवाल; राज्य निवडणूक आयोगाची माहिती appeared first on Dainik Prabhat .
Mamata Banerjee : खरे मतदार एकतर्फी वगळले; ममता बॅनर्जीं यांचा निवडणूक अधिकाऱ्यांवर आरोप
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदार यादीच्या मसुद्यातून 54 लाख नावे ही एकतर्फी वगळण्यात आली असून, ज्यांची नावे वगळली आहेत, अशा मतदारांना स्वत:ची बाजू मांडण्याची कोणतीही संधी देण्यात आली नाही, असा थेट व गंभीर आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केला. नबन्ना येथील राज्य सचिवालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ममता म्हणाल्या की, […] The post Mamata Banerjee : खरे मतदार एकतर्फी वगळले; ममता बॅनर्जीं यांचा निवडणूक अधिकाऱ्यांवर आरोप appeared first on Dainik Prabhat .
Iran Protests: सरकारविरोधी आंदोलनात 2 हजारहून अधिक ठार; मृतांचा आकडा 12 हजारांवर असल्याचा दावा
Iran Protests: इराणमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’ने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात आतापर्यंत किमान २,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी हा आकडा १२,००० च्या पार गेल्याचा खळबळजनक दावा केला आहे. बिघडलेली आर्थिक स्थिती, गगनला भिडलेली महागाई आणि अमेरिकन डॉलरच्या […] The post Iran Protests: सरकारविरोधी आंदोलनात 2 हजारहून अधिक ठार; मृतांचा आकडा 12 हजारांवर असल्याचा दावा appeared first on Dainik Prabhat .
शिवउद्योग सेनेच्या माध्यमातून मिळवलेला फंड कुठे गेला?
अमित साटम यांचा राज ठाकरेंना सवाल; कोहिनूर मॉलमध्ये किती मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या?मुंबई : ठाकरेंनी १९९७ साली शिवउद्योग सेनेची स्थापना केली. फंड मिळवले. पण त्यातून किती तरुणांना उद्योग मिळाला? किती मराठी तरुणांना यांनी मोठे केले? याचे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी द्यावे. ठराविक एका उद्योगपतीला टार्गेट करणारे राज ठाकरे स्वतःची आर्थिक प्रगती कोहिनूर मॉलच्या माध्यमातून कशी झाली यावर कधी बोलणार आहेत? कोहिनूर मीलच्या जागेवर उभारलेल्या कोहिनूर मॉलमध्ये किती मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या? याचे उत्तर राज ठाकरे यांनी द्यावे, असे आव्हान भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मंगळवारी दिले.राज ठाकरे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना, माझा कोणत्याही उद्योग-धंद्यांना विरोध नाही. मात्र एकाच उद्योगपतीने दहा वर्षांत एवढी मोठी झेप घेणं खटकतंय, असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना साटम म्हणाले, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंचा ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा उघडकीस आणला. महाराष्ट्रात उद्योग कशाप्रकारे आले यावर विस्तृत विश्लेषण दिले. यावर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. उद्योगांना माझा विरोध नाही मात्र कमी वेळात मोठे होणाऱ्या उद्योगपतींवर माझा आक्षेप आहे असे म्हटले आहे. परंतु, मराठी तरुणांना उद्योजक बनवायची नीती देवेंद्र फडणवीस केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मागची काही वर्षे करत आहेत. पण या ठाकरे बंधूंनी मराठी तरुणांना उद्योगाच्या नावाखाली वडापावाच्या गाडीपर्यंतच मर्यादित ठेवले आहे.साटम म्हणाले, राज ठाकरे नेहमी मराठीविषयी बोलत असतात. मात्र, या ठाकरेंची मुले मराठी शाळांमध्ये न जाता बॉम्बे स्कॉटिश नावाच्या शाळेत का शिकली? कॉलेजमध्ये त्यांनी जर्मन आणि फ्रेंच या भाषा का शिकल्या? याचेही उत्तर राज ठाकरेंनी द्यावे. मनाचा मोठेपणा जपणाऱ्या मराठी माणसाची बदनामी करणाऱ्या राज ठाकरेंना शेवटी मी खुले आव्हान देतोय, की त्यांनी आपल्या नातवाचा प्रवेश बालमोहन विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेत घेऊन दाखवावा, असाही टोला साटम यांनी राज ठाकरेंना लगावला. अदानींबद्दल जर ठाकरेंचे ठाम मत असेल तर त्यांनी अदानींच्या गळाभेटी का घेतल्या? त्यांना घरी का बोलवलं? अदानींची कंपनी काही नवीन नाही. त्यामुळे एखाद्याला उगाचच टार्गेट करणे अतिशय चुकीचे आहे. भ्रष्टाचाराची भाषा करणाऱ्या ठाकरेंनी २५ वर्षे मुंबई महानगरपालिकेत राहून कशाप्रकारे पापाचा पैसा लाटला हे सर्वश्रुत आहे. २०१९ नंतर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर नेऊन ठेवले आहे, अशी टीका अमित साटम यांनी केली.
देवाचं दर्शन अधुरच..! जळगावात दोन अपघातात 6 जण दगावले; दोन सख्ख्या भावांचा अंत
जळगाव : जिल्ह्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. चाळीसगाव तालुक्यातील हे दोन्ही अपघात अत्यंत हृदयद्रावक असून, त्यात तरुणांचा बळी गेला आहे. आयशरच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू पहिला अपघात चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर हिरापूर गावाजवळ झाला. भरधाव आयशर वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात हिरापूर गावातील तिघांचा […] The post देवाचं दर्शन अधुरच..! जळगावात दोन अपघातात 6 जण दगावले; दोन सख्ख्या भावांचा अंत appeared first on Dainik Prabhat .
Myanmar-Bangladesh : म्यानमार-बांगलादेशमध्ये सीमाभागात तणाव; गोळीबारात १२ वर्षांची मुलगी गंभीर जखमी
Myanmar-Bangladesh – म्यानमारच्या हद्दीतून म्यानमारच्या सीमेवर अलिकडेच झालेल्या गोळीबाराबद्दल बांगलादेशने तीव्र संताप व्यक्त केला आहे. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्यानमारचे राजदूत यू क्याव सोई मोई यांना पाचारण करून या गोळीबाराच्या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. म्यानमारच्या हद्दीतून सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात एक १२ वर्षांची बांगलादेशी मुलगी गंभीर जखमी झाली आहे, असे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी एका निवेदनात […] The post Myanmar-Bangladesh : म्यानमार-बांगलादेशमध्ये सीमाभागात तणाव; गोळीबारात १२ वर्षांची मुलगी गंभीर जखमी appeared first on Dainik Prabhat .
Budget 2026: ब्लू बुक ते रेड टॅब्लेट…भारताचे बजेट कसे तयार केले जाते आणि त्याला इतका वेळ का लागतो?
Budget 2026: येत्या 1 फेब्रुवारी 2026 रोजी मांडला जाणारा केंद्रीय अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ नसून तो नव्या भारताच्या विकासाची दिशा ठरवणारा एक ‘आर्थिक होकायंत्र’ मानला जातो. देशाची अर्थव्यवस्था कोणत्या वळणावर जाणार आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होणार, याचे उत्तर या दस्तऐवजात दडलेले असते. अर्थमंत्री जेव्हा संसदेत अर्थसंकल्प सादर करतात, तेव्हा ते केवळ मागील खर्चाचा […] The post Budget 2026: ब्लू बुक ते रेड टॅब्लेट… भारताचे बजेट कसे तयार केले जाते आणि त्याला इतका वेळ का लागतो? appeared first on Dainik Prabhat .
Abhishek Banerjee : टीएमसीच्या रॅलीत 10 मृत मतदार सहभागी; अभिषेक बॅनर्जींचा दावा
कूचबिहार : पश्चिम बंगालमधील एसआयआर प्रक्रिया सुरु असून त्यानूसार निवडणूक आयोगाने मसूदा मतदार यादी देखील जाहीर केली आहे. यामधून 54 लाख नावे विविध कारणांसाठी वगळण्यात आली आहेत. त्यावरुन सध्या बंगालमध्ये धुमशान सुरु आहे. मसूदा यादीतून मृत म्हणून वगळण्यात आलेल्या १० मतदारांना टीएमसीने आपल्याच रॅलीमध्ये बोलवताना, निवडणूक आयोगाने या नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला असल्याचा आरोप […] The post Abhishek Banerjee : टीएमसीच्या रॅलीत 10 मृत मतदार सहभागी; अभिषेक बॅनर्जींचा दावा appeared first on Dainik Prabhat .
मकरसंक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये ?
मुंबई : हिंदू धर्मामध्ये मकरसंक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. मकरसंक्रांत हा सण दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला येतो. यंदा हा सण बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी साजरा होत आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणूनच याला मकरसंक्रांत असे म्हणतात. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना तिचा अक्ष कललेला असतो, त्यामुळे मकरसंक्रांतीपासून उत्तर गोलार्धात सूर्याची किरणे अधिक काळ पडू लागतात. दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. जाणून घ्या मकरसंक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये ?यंदा बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंतचा काळ हा पुण्यकाळ आहे.मकरसंक्रांतीच्या दिवशी ओळखीतल्या व्यक्तींना तसेच ज्यांच्याशी नव्याने ओळख करुन घेत आहात अशा सर्वांना तिळगूळ द्या. तिळगूळ देताना तिळगूळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणा. सर्व जुने वाद, कटुता आणि राग विसरून सर्वांशी प्रेमाने आणि गोडव्याने वागा.शक्य असल्यास सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर तीळ मिश्रीत पाण्याने स्नान करा. हे स्नान करण्याआधी तिळाच्या तेलाने शरीराला मालीश करा तसेच तीळ मिश्रीत उटणे शरीराला लावा. नंतर स्नान करा. स्नान केल्यानंतर इष्ट देवतेचे स्मरण करा. शक्य असल्यास चालत जवळच्या मंदिरात जाऊन देवदर्शन करा. यानंतर यथाशक्ती दानधर्म करा. शक्य असल्यास रक्तदान करा.मकरसंक्रांतीच्या दिवशी काय करू नये ?कठोर बोलू नये. वाद घालू नये. कटुता निर्माण होईल असे वागू नये. कोणावरही संतापू नये. वृश्रतोड करू नये. प्राणीपक्षी यांना त्रास देऊ नये. शरीराला अपायकारक असलेली व्यसनं करू नये.लक्षात ठेवामकरसंक्रांत हा सण आहे. हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करा. सूर्याचा मकर राशीतला प्रवेश तसेच दिवस मोठा होणे आणि रात्र लहान होणे हे एक निसर्गचक्र आहे. यात काहीही अशुभ असे नाही.
Vijay : अभिनेते विजय यांना सीबीआयकडून पुन्हा एकदा समन्स जारी
नवी दिल्ली : तमिळ अभिनेते आणि तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख विजय यांना सीबीआयने पुन्हा समन्स बजावले आहे. त्यांना चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशीसाठी दुसऱ्यांदा १९ जानेवारीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. सीबीआयच्या पहिल्या समन्सनुसार विजय सोमवारी त्या केंद्रीय यंत्रणेच्या दिल्लीतील मुख्यालयात हजर राहिले. त्यांची सुमारे ६ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना पुन्हा मंगळवारी बोलावण्यात […] The post Vijay : अभिनेते विजय यांना सीबीआयकडून पुन्हा एकदा समन्स जारी appeared first on Dainik Prabhat .
भारतीय पासपोर्ट धारकांसाठी जर्मनीची व्हिसा-मुक्त प्रवासाची घोषणा, सर्वकाही जाणून घ्या..
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जर्मनीमार्गे युरोप आणि अमेरिकेला जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी केंद्र सरकारने एक सुखद बातमी दिली आहे. जर्मनीने भारतीय पासपोर्ट धारकांसाठी असलेली एअरपोर्ट ट्रान्झिट व्हिसाची अट अधिकृतपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज सध्या भारत दौऱ्यावर असून १२ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत त्यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. […] The post भारतीय पासपोर्ट धारकांसाठी जर्मनीची व्हिसा-मुक्त प्रवासाची घोषणा, सर्वकाही जाणून घ्या.. appeared first on Dainik Prabhat .
मकर संक्रांतीचे महत्त्व सांगणारे मुलांसाठीचे भाषण
मुंबई : 'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला' हा प्रेमळ संदेश देत नात्यात गोडवा निर्माण करणारा हा सण. समाजातील एकतेची आणि स्नेहाची भावना वृद्धिंगत करतो. यंदा मकरसंक्रांत बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी आहे. या निमित्ताने काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी भाषणाच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. अशा स्पर्धेत भाषण करण्यासाठी दहा महत्त्वाचे मुद्दे आणि या मुद्यांआधारे तयार केलेले भाषण. मकरसंक्रांतीनिमित्त करायच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे मकर संक्रांतीचा दिवस आणि त्याचे महत्त्व. सूर्याचे मकर राशीत संक्रमण आणि उत्तरायणाची सुरुवात. खगोलशास्त्रीय बदल: दिवसाचा कालावधी वाढणे. तीळ आणि गूळ यांच्या सेवनाचे आरोग्यदायी फायदे. 'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला' हा सामाजिक संदेश. शेती आणि नवीन पिकांचे आगमन: सुगड पूजन. पतंग उडवण्याची परंपरा आणि त्यातील आनंद. दानाचे महत्त्व आणि सण साजरा करण्याची पद्धत. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. यशाची उंच भरारी घेण्याची प्रेरणा.मकरसंक्रांतीचे भाषणमकरसंक्रांत हा सण दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला येतो. यंदा हा सण बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी साजरा होत आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणूनच याला मकरसंक्रांत असे म्हणतात. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना तिचा अक्ष कललेला असतो, त्यामुळे मकरसंक्रांतीपासून उत्तर गोलार्धात सूर्याची किरणे अधिक काळ पडू लागतात. दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. संक्रांतीच्या काळात थंडीचा जोर असतो. या वातावरणात शरीराला उष्णता मिळावी यासाठी तीळ आणि गूळ हे दोन्ही उष्ण पदार्थ खाल्ले जातात. थंडीत तिळगूळ खाणे आरोग्यासाठी लाभाचे आहे. मकरसंक्रांतीला सगळे एकमेकांना तिळगूळ देतात. तिळगूळ घ्या, गोड गोड बोला असे याप्रसंगी म्हणतात. सर्व जुने वाद, कटुता आणि राग विसरून आपण सर्वांशी प्रेमाने आणि गोडव्याने वागावे असा एक सामाजिक संदेश या निमित्ताने सर्वांना दिला जातो. जसे तीळ आणि गूळ यांच्या मिश्रणातून एक रुचकर पदार्थ तयार होतो त्याच पद्धतीने राग लोभ विसरुन आणि सुसंवाद साधत एकत्र राहिल्यास नात्यांचे बंध घट्ट राहतात. मकरसंक्रांत हा सण कृषी क्षेत्राशी थेट जोडला आहे. शेतात नवीन धान्य आलेले असते, त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी शेतकरी सुगड पूजन करतात. आकाशात उडणारे रंगीबेरंगी पतंग आपल्याला उंच भरारी घेण्याची प्रेरणा देतात. पतंग जसा हवेच्या झोतासोबत झुलत झुलत वर जात असतो तसेच संकटांचा सामना करत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचले पाहिजे. आपल्याला मकरसंक्रांत हा सण निसर्गाशी कृतज्ञ राहण्याचा आणि मानवी नात्यातील गोडवा जपण्याचा संदेश देतो. मनातील नकारात्मकतेची संक्रांत करून विचारांमध्ये क्रांती घडवण्याची प्रेरणा देतो. सूर्याचे उत्तरायण प्रकाशाकडे वाटचाल करते, त्याचप्रमाणे आपणही अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि आळसाकडून कर्तृत्वाकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असाही एक सामाजिक संदेश देतो. पतंग जसा मांजाचा आधार घेत स्थिर राहतो. कितीही उंच उडाला तरी नियंत्रणात असतो. अगदी तसेच आपली मूल्यं आणि मूळं यांना न विसरता प्रगती करत भरारी मारावी. पण या प्रगतीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहाय्यक असलेल्यांना विसरू नये, असा संदेश मतकरसंक्रांत हा सण देतो.
दोन्ही ठाकरे उद्योजक, गुंतवणूक विरोधी, युवक विरोधी - मंत्री एँड आशिष शेलार
मुंबई : महाराष्ट्रात कोणी गुंतवणूकदार आला की, त्याला मारा, त्याच्या विरोधात आंदोलन करा. संस्कृती रक्षक तर आम्ही पण आहोत. पण आमच्या मराठी मुलांना, महाराष्ट्रातील मुलांना, मुंबईकरांना हाताला रोजगार मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मात्र राज ठाकरे हे उद्योजक विरोधी, गुंतवणूक विरोधी, युवक विरोधी आणि युवकांच्या रोजगार मिळण्याच्या कामाविरोधी आहेत, मुंबईकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील., अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेला मंत्री शेलार यांनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.यावेळी ते म्हणाले की, कधी-कधी सल्लागार कुणाची कशी वाट लावू शकतात, हे आपल्याला बरेचदा वेगवेगळी उदाहरणे दिसतात. राज ठाकरेंनी सुद्धा सल्लागारापासून सावधान राहावं. सल्लागाराने सांगितलं, एखादी ब्रीफ दिली आणि त्या आधारावर बोललं, की कशी अडचण निर्माण होते हे राज ठाकरेंच्या विधानावरून लक्षात येते. म्हणून त्यांना आता स्पष्टीकरण द्यायला लागलंय.आम्ही कुठल्याही उद्योग समूहाचे समर्थक नाही. जे नियमानुसार, कायद्यानुसार गुंतवणूकदार आणि उद्योजक आले पाहिजेत, ही कामं होत असतात, त्या कामाच्या बाबतीमध्ये संपूर्ण गुंतवणूकदारांचा आलेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत मांडला आहे.राज ठाकरेंचा आक्षेप काय? तर दहा वर्षात, अदानींची वाढ झाली. मी अदानी समूहाचा वकील नाही पण अदानी समूहाच्या नावावर भारतीय जनता पक्ष किंवा आमच्या सरकारवर दोषारोप करणार असाल, तर उत्तर द्यावं लागेल. आणि ते राज ठाकरेंच्या सल्लागारांनी त्यांना सांगितलं नाही की अदानी समूहाची सुरुवात १९८८ सालची आहे. दहा वर्षांपूर्वीची नाही.आणि मग तिथपासून मोजायचे झाले तर ३६-३७ वर्षे. आम्हाला त्यांची वकिली करायची गरज नाही पण आकडा सत्य सांगायला लागेल. ३७ वर्षे ते काम करतायत, मग दहा वर्षे आणली कुठून? ही सल्लागाराची चूक. बरं तेवढंच नाही, वाढ का झाली कशी झाली, तो वेठीस धरू नये मुद्दा बरोबर, पण जागा चुकीची.यासाठी की आपल्या देशामध्ये कॉम्पिटिशन कमिशन आहे. 'भारतीय स्पर्धा आयोग' आहे. त्या स्पर्धा आयोगाचे कामच हे आहे की ज्यामध्ये या स्पर्धा, व्यावसायिक ज्यामध्ये वेगवेगळे समूह असतात त्याबद्दल मोनोपॉली (एकाधिकारशाही) होऊ नये. म्हणून तिकडे तक्रार करता येते. राज ठाकरेंनी तक्रार केली आहे का? त्यांनी तक्रार करावी, तिथे आपलं म्हणणं मांडावं.अहो न्यायालयासमोर जामीन अर्ज केल्यावरच जामीन मिळतो. जामीन माझा अधिकार आहे म्हणून घरात किंवा लपून बसल्यावर जामीन मिळत नाही, असा जो कायदा आहे... तसंच वेठीस धरू नका मुद्दा बरोबर वाटत असेल तर आयोग आहे, कॉम्पिटिशन कमिशन आहे, पण केलं नाही कारण सल्लागाराने सांगितलं नाही, असा टोला एँड शेलार यांनी लगावला.ते पुढे म्हणाले की, जे जे समूह अदानींनी घेतले असं तुम्ही म्हणताय आणि त्यावरून आमच्यावर दोषारोप करताय त्यातले कित्येक प्रोजेक्ट्स NCLT मधून आलेत. मग NCLT नावाची व्यवस्था आहे, ती अर्ध-न्यायिक, न्यायिक व्यवस्था आहे. मग त्या न्यायिक व्यवस्थेतून दिलेल्या आदेशावरून सरकारवर आणि पक्षावर दोषारोप करावा असा बेबनावपणा कशाला करायचा? NCLT किंवा त्याच्या अपिलेटवर जावं आणि म्हणून आपलं म्हणणं खोटं बोल पण रेटून बोल हा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे, सल्लागाराने त्यांना तोंडघशी पाडलंय.आमचा आरोपच आहे, दोन्ही ठाकरे हे गुंतवणूक विरोधी आहेत, गुंतवणूकदार विरोधी आहेत, उद्योजक विरोधी आहेत आणि पर्यायाने आणि बरोबरीने रोजगार निर्मितीच्या विरोधात दोन्ही ठाकरे आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: जपानच्या सरकारकडून बिनव्याजी कर्ज. त्यावर हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर ९० हजार थेट व अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होणार. पण यांचा.बुलेट ट्रेनला विरोध. म्हणजे ९० हजार बेरोजगारांना रोजगार द्यायला विरोध. नाणार-बारसू रिफायनरी प्रकल्प: हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार, दोन्ही ठाकरेंचा विरोध. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष १.५ लाख रोजगार निर्मिती. किती? १.५ लाख लोकांना. दोन्ही ठाकरेंचा विरोध.जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प: २५ हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती. या गुंतवणुकीला कडाडून विरोध दोन्ही ठाकरेंनी केला. रोजगार निर्मितीला विरोध.मुंबई मेट्रो प्रकल्प: त्याला उद्धव ठाकरेंनी तर स्थगितीच दिली होती. ३ लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नोकऱ्यांची निर्मिती. या प्रकल्पाला, गुंतवणुकीला विरोध कोणाचा? या दोन्ही ठाकरेंचा.वाढवण बंदर: या बंदरातून सुद्धा १० लाख रोजगाराची निर्मिती. यांचा विरोध.आणि म्हणून, जे आपल्यावर बेरोजगारी लादू इच्छितात, गुंतवणूकदार विरोधी असतात, महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ घालू पाहतात आणि एका हाताने महाराष्ट्राच्या विकासाला विरोध करतात, त्या दोन्ही ठाकरे बंधूंना घरी बसवण्याची ही निवडणूक आहे. त्यांना घरी बसवण्याची निवडणूक आहे, असा शब्दात टीका केली.
मुंबई : मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार कालावधी आता संपला असून, शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी जोरदार प्रचारसभा घेतल्या. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतरही पाहायला मिळालं. […] The post नको तेच घडलं…! प्रचाराच्या अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; मुंबईत एकनाथ शिंदेंची ताकद वाढली? appeared first on Dainik Prabhat .
KDMC Election : कल्याण हादरलं..! महायुतीच्या प्रचार रॅलीत मोठा स्फोट, उमेदवार थोडक्यात बचावले…
KDMC Election : राज्यातील २९ महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीच्या (KDMC Election) प्रचाराची आज सांगता झाली. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते प्रचारात पूर्ण ताकदीने उतरले होते. मात्र प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कल्याण आणि अहमदपूर येथे दोन वेगळ्या, परंतु अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडल्या, ज्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. कल्याणमध्ये प्रचार रॅलीदरम्यान […] The post KDMC Election : कल्याण हादरलं..! महायुतीच्या प्रचार रॅलीत मोठा स्फोट, उमेदवार थोडक्यात बचावले… appeared first on Dainik Prabhat .
बिहारकडून झारखंडसोबतच्या पाणीवाटपाला मंजूरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
पाटणा – सोन नदीच्या पाणीवाटपासंदर्भात झारखंडसोबत करण्यात येणाऱ्या कराराला बिहार सरकारने मंगळवारी मंजुरी दिली, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, दोन्ही राज्यांमधील दीर्घकाळ प्रलंबित असलेला वाद संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने जलसंपदा विभागाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. या करारानुसार, अविभाजित बिहारला १९७३ च्या बानसागर कराराअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या […] The post बिहारकडून झारखंडसोबतच्या पाणीवाटपाला मंजूरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
Bangladesh : बांगलादेशात नेमकं चाललंय काय? हिंदू रिक्षाचालकाची केली निर्घृण हत्या
Bangladesh – बांगलादेशमध्ये हिंदू समुदायाविरुद्ध हिंसाचार सुरूच असून आता समीर कुमार दास या २८ वर्षीय हिंदू तरुणाची दागनभुईया येथे निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तो रामानंदपूर गावातील रहिवासी होता आणि ऑटोरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होता. रविवारी रात्री समीर घरी परतला नाही तेव्हा त्याच्या कुटुंबाने शहराच्या विविध भागात त्याचा शोध सुरू केला. त्याचा पत्ता […] The post Bangladesh : बांगलादेशात नेमकं चाललंय काय? हिंदू रिक्षाचालकाची केली निर्घृण हत्या appeared first on Dainik Prabhat .
Sad News : निवडणुकीचं मैदान मारलं, पण नियतीने हरवलं; नवनिर्वाचित नगरसेविकेचा धक्कादायक मृत्यू
Sad News : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरातून अत्यंत हृदयद्रावक (Sad News) आणि धक्कादायक वृत्त समोर आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नवनिर्वाचित नगरसेविका शाहूताई कांबळे यांचा पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या शाहूताई यांना वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत […] The post Sad News : निवडणुकीचं मैदान मारलं, पण नियतीने हरवलं; नवनिर्वाचित नगरसेविकेचा धक्कादायक मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
वडोदरा: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यापूर्वी वडोदरा येथे एक अत्यंत हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची भेट त्याच्यासारख्याच हुबेहूब दिसणाऱ्या एका चिमुरड्या चाहत्याशी झाली. या भेटीचा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी या लहान मुलाला ‘छोटा चीकू’ असे नाव दिले आहे. या खास भेटीचा अनुभव […] The post Virat Kohli: ‘ओये बघ, माझा डुप्लिकेट बसलाय!’; विराटची ‘छोट्या चीकू’शी भेट, व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल appeared first on Dainik Prabhat .
Japan Election system : निवडणूक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते अवाढव्य फ्लेक्स, कानठळ्या बसवणारे लाऊडस्पीकर आणि घराघरांत येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या टोळ्या. मात्र, तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या जपानमध्ये निवडणूक प्रक्रिया याच्या अगदी उलट, म्हणजेच अत्यंत शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडते. ‘शक्तीप्रदर्शन’ ऐवजी ‘भूमिका’ मांडण्याला तिथे अधिक महत्त्व दिले जाते. आणि म्हणूनच आज संपूर्ण जगात जपान मधील […] The post Japan Election system : निवडणुका असाव्यात तर अशा.! जपानची ‘झिरो फ्लेक्स’ आणि ‘शिस्तबद्ध’ निवडणूक प्रक्रिया appeared first on Dainik Prabhat .
हैदराबाद: आपल्या वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर आता तेलंगणा सरकार कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या पगारातून १० टक्के रक्कम कापून ती थेट त्यांच्या पीडित पालकांच्या बँक खात्यात जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी जाहीर केला आहे. या निर्णयामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता मोठा आर्थिक फटका […] The post वृद्ध माता-पित्यांकडे दुर्लक्ष केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 10 टक्के कपात; सरकारचा मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत जोरदार चर्चा सुरू होत्या. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी नेते एकत्र दिसल्यानंतर या चर्चांना अधिक बळ मिळालं होतं. मात्र, या सर्व चर्चांवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार नाही आणि खासदार सुप्रिया सुळे […] The post Maharashtra Politics : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अजित पवारांचं मोठं विधान, सुप्रिया सुळेंच्या मंत्रिपदावरही भाष्य appeared first on Dainik Prabhat .
डिलिव्हरी बॉईजच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 10 मिनिटांत डिलिव्हरीची सक्ती बंद
नवी दिल्ली: क्विक कॉमर्स कंपन्यांच्या १० मिनिटांत डिलिव्हरी देण्याच्या अवास्तव स्पर्धेमुळे डिलिव्हरी बॉईजच्या जिवावर बेतणाऱ्या संकटाची दखल अखेर केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्र सरकारने झोमॅटो (Zomato), स्विगी (Swiggy), ब्लिंकिट (Blinkit) आणि झेप्टो (Zepto) यांसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म्सना १० मिनिटांची अनिवार्य वेळमर्यादा हटवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे लाखो गिग वर्कर्सना मोठा दिलासा मिळाला असून, ‘ब्लिंकिट’ने आपल्या […] The post डिलिव्हरी बॉईजच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 10 मिनिटांत डिलिव्हरीची सक्ती बंद appeared first on Dainik Prabhat .
Shiv Sena : शिवसेनेने धाडसी निर्णय घेत ‘या’बड्या नेत्याची केली पक्षातून हकालपट्टी
Shiv Sena : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (Shiv Sena) निवडणुकीला केवळ दोन दिवस शिल्लक असतानाच पॅनल क्रमांक १८ मध्ये मोठा राजकीय वाद उफाळून आला आहे. महायुतीच्या अधिकृत पॅम्प्लेटमध्ये खोडसाळपणे फेरफार करून बनावट पॅम्प्लेट सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या घटनेमुळे मतदारांसह कार्यकर्ते आणि उमेदवारांमध्ये […] The post Shiv Sena : शिवसेनेने धाडसी निर्णय घेत ‘या’ बड्या नेत्याची केली पक्षातून हकालपट्टी appeared first on Dainik Prabhat .
12 झेडपी, 125 पंचायत समित्यांचा निवडणूका जाहीर; 5 फेब्रुवारीला मतदान, निकाल 7 फेब्रुवारीला राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केलीय. यात कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्हा परिषदांचा समावेश आहे. या […] The post Today TOP 10 News: ZP निवडणूका जाहीर, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून 10% कपात, 10 मिनिटांतील डिलिव्हरी बंद ते टाटा पंचचे ‘फेसलिफ्ट’ व्हर्जन लाँच… वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी १२ जिल्हा परिषदा आणि त्यांच्याअंतर्गत असलेल्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, ५ फेब्रुवारीला मतदान तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांना या टप्प्यातून वगळण्यात आले असून, संबंधित भागात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाणार आहेत. या निवडणुकांत जिल्हा परिषदेच्या एकूण ७३१ जागा आणि पंचायत समितीच्या १ हजार ४६२ जागांसाठी मतदान होणार असून, प्रत्येक मतदाराला दोन स्वतंत्र मते द्यावी लागणार आहेत.निवडणूक कार्यक्रम- निवडणूक सूचना १६ जानेवारी रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर १६ ते २१ जानेवारीदरम्यान नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जातील.- २२ जानेवारीला नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल, तर २७ जानेवारी ही उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होऊन अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.- मतदान ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.- या निवडणुका पूर्णतः ऑफलाइन पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत. नामनिर्देशन पत्रे व शपथपत्रे प्रत्यक्ष भरून सादर करावी लागतील.- यापूर्वी काही निवडणुकांमध्ये ऑनलाइन सुविधा देण्यात आली होती; मात्र राजकीय पक्षांच्या मागणीनुसार यावेळी ऑफलाइन प्रक्रियाच लागू ठेवण्यात आली आहे.आचारसंहिता लागू- संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या घोषणा, निर्णय किंवा जाहिराती करता येणार नाहीत. मात्र नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने मदतकार्य सुरू ठेवता येईल. आयोगाने नोव्हेंबर २०२५ मध्ये जारी केलेल्या आदेशांनुसार सर्व नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत. निवडणूक प्रचार ३ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता थांबेल. मतदानाच्या २४ तास आधी कोणत्याही माध्यमातून प्रचारास बंदी राहील.१ जुलैची मतदारयादी ग्राह्य- या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजीची विधानसभा मतदार यादी आधार मानण्यात आली आहे. दुबार नावे आढळल्यास ती (**) चिन्हाद्वारे दर्शवली जाणार आहेत. मतदारांच्या सोयीसाठी ‘मताधिकार’ हे मोबाइल ॲप उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याद्वारे मतदार यादी, मतदान केंद्र व उमेदवारांची माहिती मिळू शकते. तसेच अधिकृत संकेतस्थळावरूनही नाव शोधण्याची सुविधा आहे.- ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला तसेच लहान मुलांसह येणाऱ्या महिलांना मतदान केंद्रावर प्राधान्य देण्यात येईल. मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर, पाणी, वीज, सावली व शौचालय अशा मूलभूत सुविधा उपलब्ध असतील. ज्या केंद्रांवर महिला मतदारांचे प्रमाण अधिक आहे, तेथे सर्व कर्मचारी व पोलीस महिला असतील. अशा केंद्रांना ‘सखी मतदान केंद्र’ म्हणून ओळखले जाईल.- या निवडणुकांसाठी सुमारे २५,४८२ मतदान केंद्रे उभारली जाणार असून, ५१,५३७ कंट्रोल युनिट आणि १,१०,३२९ बॅलट युनिट्सची व्यवस्था करण्यात आली आहे.आरक्षण आणि जागांचा तपशील७३१ जिल्हा परिषद जागांपैकी ३६९ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी ८३, अनुसूचित जमातींसाठी २५ आणि नागरिकांच्या मागासवर्गासाठी १९१ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर, पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांपैकी ७३१ महिला, १६६ अनुसूचित जाती, ३८ अनुसूचित जमाती आणि ३४२ मागासवर्गासाठी आरक्षित आहेत. आरक्षित जागांसाठी उमेदवारांना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास अर्ज केल्याचा पुरावा देता येईल; मात्र निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत प्रमाणपत्र सादर न केल्यास निवड रद्द होणार आहे.उमेदवारांना खर्च मर्यादा किती?उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ६ ते ९ लाख रुपये, तर पंचायत समितीसाठी ४.५ ते ६ लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा राहील. या निवडणुकीसाठी १२५ निवडणूक निर्णय अधिकारी आणि १२५ सहाय्यक नियुक्त केले जाणार असून, एकूण सुमारे १ लाख २८ हजार कर्मचारी कार्यरत राहतील. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुका शांततेत, मुक्त व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी आयोग पूर्ण तयारीत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.२० जिल्हा परिषदांना वगळलेदरम्यान, आरक्षणाची टक्केवारी ५१ टक्के किंवा त्यावर गेलेल्या २० जिल्हा परिषदांना या टप्प्यातून वगळण्यात आले आहे. ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, अहिल्यानगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. या जिल्ह्यांतील निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेण्याचा विचार असून, त्यांचे भवितव्य न्यायालयीन निकालावर अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातील याचिकांवर २१ जानेवारीला सुनावणी होणार असून, तोपर्यंत कोणताही अंतिम निर्णय घेतला जाणार नसल्याचे आयोगातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! PM किसान योजनेची रक्कम वाढणार? आता ‘इतके’पैसे मिळणार?
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर होण्यास आता फारसा कालावधी उरलेला नसून, देशातील शेतकरी वर्गाचे लक्ष यंदाच्या बजेटकडे लागले आहे. वाढती महागाई, शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याचा वाढलेला खर्च आणि उत्पादन खर्च पाहता सरकारकडून मोठ्या दिलाशाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत (PM Kisan Scheme) मोठा बदल होणार का, याची […] The post शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! PM किसान योजनेची रक्कम वाढणार? आता ‘इतके’ पैसे मिळणार? appeared first on Dainik Prabhat .
Donald Trump : माझ्यामुळेच आज नाटो अस्तित्वात; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
वॉशिंग्टन : नॉर्थ अटलांटीक ट्रीटी ऑर्गनायझेशन अर्थात नाटो आज माझ्यामुळेच अस्तित्वात आहे असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यांनी ग्रीनलँडवर अमेरिकेचे नियंत्रण असावे अशी त्यांची इच्छाही पुन्हा व्यक्त केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोबद्दल म्हटले आहे की त्यांच्याशिवाय ही संघटना कोसळली असती. त्यांच्यामुळे नाटो सदस्य देशांनी त्यांच्या संरक्षण खर्चात लक्षणीय वाढ केली आहे. […] The post Donald Trump : माझ्यामुळेच आज नाटो अस्तित्वात; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा appeared first on Dainik Prabhat .
Maharashtra Politics : मतदानाआधीच काँग्रेस अन् भाजपचे ‘हे’दोन उमेदवार अडचणीत? नेमकं कारण काय?
लातूर : लातूर जिल्ह्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी आणि धमकावल्याच्या आरोपावरून एका काँग्रेस उमेदवाराविरुद्ध पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले. तसेच, एका भाजप उमेदवार आणि दोन कार्यकर्त्यांविरुद्धही एका शेतकऱ्याला पक्षाला मतदान करण्यासाठी पैसे देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस संजय वसंत गिर यांनी आरोप केला […] The post Maharashtra Politics : मतदानाआधीच काँग्रेस अन् भाजपचे ‘हे’ दोन उमेदवार अडचणीत? नेमकं कारण काय? appeared first on Dainik Prabhat .
Amit Thackeray : “काय वाटेल ते करा पण दोन भावांचा महापौर बसणारच”–अमित ठाकरे
Amit Thackeray : महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात पोहोचला असून मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेनंतर समीकरणांना वेगळीच कलाटणी मिळाल्याचं चित्र आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ऐतिहासिक सभेनंतर मुंबईत जबरदस्त वातावरणनिर्मिती झाली आहे. या सभेनंतर भाजपकडून ठाकरे बंधूंवर जोरदार टीकेची […] The post Amit Thackeray : “काय वाटेल ते करा पण दोन भावांचा महापौर बसणारच” – अमित ठाकरे appeared first on Dainik Prabhat .
Politics News : तब्बल 70 टक्क्यांहून अधिक मंत्र्यांची खुर्ची जाणार? सरकार घेणार मोठा निर्णय
उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारमध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात मंत्रिमंडळ फेरबदल (Politics News) किंवा विस्तार होण्याची तीव्र शक्यता आहे. गेल्या वर्षी गुजरातमध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ बदलून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती, त्याच धर्तीवर उत्तर प्रदेशातही मिशन २०२७’ च्या तयारीत हा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्याच्या मंत्रिमंडळातील ७० टक्क्यांहून अधिक मंत्री बदलले जाऊ शकतात. […] The post Politics News : तब्बल 70 टक्क्यांहून अधिक मंत्र्यांची खुर्ची जाणार? सरकार घेणार मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : ठाकरे बंधूंना अदानींच्या प्रगतीची समस्या नसून, स्वतःची 'आमदानी' कमी झाल्याचे हे दु:ख आहे. मराठी माणसाचा केवळ वापर करून स्वतःचे इमले उभे करणाऱ्या ठाकरे बंधूंचा दुटप्पीपणा आता उघड झाला आहे, अशा तिखट शब्दांत आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरेंच्या राजकीय आणि वैयक्तिक भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले.https://prahaar.in/2026/01/13/the-governments-stance-on-fast-delivery-schedules-guidelines-for-quick-commerce-companies-2/शिव उद्योग सेनेने किती रोजगार दिले?साटम म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांमुळे देशात स्टार्टअपची लाट आली असून त्यात मराठी तरुण मोठ्या संख्येने आहेत. मात्र, ठाकरेंनी मराठी तरुणाला केवळ वडापावच्या गाडीपर्यंत मर्यादित ठेवले. तुमच्या 'शिव उद्योग सेने'ने किती मराठी उद्योजक घडवले? केवळ इव्हेंट करायचे, पैसे गोळा करायचे आणि गायब व्हायचे हीच तुमची नीती राहिली आहे, अशी टीका त्यांनी केली.कोहिनूर स्क्वेअर आणि मातोश्री इन्फ्रावरून निशाणाराज ठाकरे यांच्या अदानींवरील टीकेला उत्तर देताना साटम यांनी त्यांच्या आर्थिक प्रगतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अदानींची प्रगती कमी वेळात झाली असे म्हणता, मग तुमची प्रगती कशी झाली हे ही सांगा. जिथे मराठी गिरणी कामगार होता, तिथे 'कोहिनूर स्क्वेअर' उभे राहिले. मातोश्री इन्फ्रा आणि मातोश्री डेव्हलपर्सनी उभारलेल्या वास्तूंमध्ये किती मराठी माणसांना घरे मिळाली? कृष्णकुंज ते शिवतीर्थ हा तुमचा प्रवास कसा झाला, याचे स्पष्टीकरण द्या, असे आव्हान त्यांनी दिले.शिक्षण आणि भाषेचा दुटप्पीपणामराठी भाषेच्या मुद्द्यावरूनही त्यांनी ठाकरेंना घेरले. तुमची मुले बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकली. तिथे मराठीचा पर्याय असताना त्यांनी जर्मन आणि फ्रेंच का निवडली? आता नातवाचा प्रवेश तरी मराठी माध्यमाच्या बालमोहन शाळेत करून आपला मराठी बाणा सिद्ध करा, असा टोला साटम यांनी लगावला. तसेच, राज ठाकरे केवळ परप्रांतीयांना शिव्या देतात, पण डोंगरी-मदनपुरा भागातील अतिरेकी प्रवृत्तींविरुद्ध कधी बोलत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.उद्धव ठाकरेंवरही टीकाउद्धव ठाकरेंचा उल्लेख करत साटम म्हणाले की, २५ वर्षे महापालिकेत सत्तेत असताना कोणी 'पापाचा पैसा' जमवला हे जनतेला माहित आहे. नोटाबंदीच्या काळात कोणाचे तळघर रिकामे झाले, हेही लपून राहिलेले नाही. राजकारणात किमान सुसंस्कृतपणा आणि तारतम्य बाळगणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी ठाकरेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.
महापालिकांनंतर राज्यात जिल्हा परिषदांसाठी निवडणूक
मुंबई : राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रात बारा जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे. या निवडणुकांसाठी मतदानाच्या २४ तास आधी प्रचार थांबेल असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले.महाराष्ट्र : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम २०२६उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख : १६ ते २१ जानेवारीअर्ज छाननी : २२ जानेवारीअर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - २७ जानेवारी, दुपारी ३ पर्यंतअंतिम उमेदवार यादी, चिन्ह वाटप : २७ जानेवारी, दुपारी ३.३० नंतरमतदान : ५ फेब्रुवारी २०२६, सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३०मतमोजणी, निकाल : ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी १० पासूनमहाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे.https://www.youtube.com/watch?v=Sryj19Ci5rE
अखेर १० मिनिटात होम डिलिव्हरी बंद! केंद्र सरकारचा क्विक कॉमर्सवरील महत्वाचा निर्णय
मुंबई: अखेर १० मिनिटात घरपोच डिलिव्हरी बंद होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. क्विक कॉमर्स क्षेत्रातील गिग वर्कर्स शिष्टमंडळाने केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मंडाविया यांची भेट घेतली होती. यावर स्पष्टीकरण देताना केंद्रीय मंत्री मंडाविया यांनी आपल्या डिलिव्हरी पार्टनर्सना आवश्यक त्या सगळ्या सुरक्षेची मानके पाळण्यास निर्देश दिले आहेत. अखेर गिग वर्कर्स युनियनला न्याय मिळाला असून गेले काही दिवस क्विक कॉमर्स कंपन्या व गिग वर्कर्स यांच्यात कामाच्या स्थितीवरून संघर्ष निर्माण झाला होता. मंडाविया यांनी मध्यस्थी करत महत्वाच्या झोमॅटो, स्विगी, झेप्टो, ब्लिंकीट यांसारख्या क्विक कॉमर्सला केंद्र सरकारने आपल्या धोरणातून १० मिनिटात डिलिव्हरीचा पर्याय काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. याचा मोठा परिणाम आता गिग वर्कर्स व क्विक कॉमर्स कंपन्यावर पडणे अपेक्षित असल्याचे सांगितले जाते.यापूर्वी कामगार कायद्यांच्या सुरक्षाचे लाभ मिळवण्यासाठी केंद्र सरकारने विशेषतः ९० दिवसांपेक्षा अधिक काम डिलीव्हरी एजंट म्हणून केलेल्या कामगारांना नोंदणी करण्याचे निर्देशित केले होते. ३१ डिसेंबरला कामगार सुरक्षा कायदा २०२० चे नवा मसुदा तयार करण्यात आला होता. त्यात कामगारांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या कामाच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी हा मसुदा तयार करण्यात आला होता. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लिंकीटने तर आपल्या संकेतस्थळावरून १० मिनिटात डिलिव्हरीचे आश्वासन पर्याय काढून टाकलेला आहे. गिग वर्कर्सने ३१ डिसेंबरला सर्वव्यापी कामगारांचा संप देशभरात पुकारला होता. त्याला आता यश आल्याचे दिसून आले होते.दरम्यान झोमॅटोचे मुख्य संस्थापक यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत गिग वर्कर्सचे उत्पन्न योग्य व कसे वाढले आहे यावर लिहिल्याने त्याचा विरोधही मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. गोयल यांनी लिहिले की, गिग इकॉनॉमीबद्दलच्या चर्चा केवळ धोरणात्मक चिंतांमुळेच नव्हे तर महागड्या वस्तूंची डिलिव्हरी करणाऱ्या पण कमी कमाई करणाऱ्या कामगारांना सामोरे गेल्यावर ग्राहकांना वाटणाऱ्या अपराधीपणामुळेही प्रेरित होत्या. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये गिग इकॉनॉमीने ग्राहक वर्ग आणि कामगार वर्ग यांच्यात एक थेट संवाद घडवून आणला आहे. ते म्हणाले की, शतकानुशतके गरिबांचे श्रम श्रीमंतांपासून अदृश्य राहिले, कारखाने, शेतात आणि मागच्या खोल्यांमध्ये लपलेले होते. ॲप-आधारित डिलिव्हरीने डिलिव्हरी कामगारांना ग्राहकांच्या दारापर्यंत आणून ती अदृश्यता नष्ट केली आहे, ज्यामुळे असमानता वैयक्तिक आणि भावनिकदृष्ट्या अस्वस्थ करणारी बनली आहे असे लिहिले होते ज्यावर टीकाही झाली.त्यानुसार, जर एखाद्या गिग वर्करने किंवा प्लॅटफॉर्म वर्करने त्या विशिष्ट दिवशी संबंधित एग्रीगेटरसोबत केलेल्या कामातून उत्पन्न मिळवले असेल, तर उत्पन्नाच्या रकमेची पर्वा न करता, त्या गिग वर्करला त्या दिवशी एग्रीगेटरसोबत कामावर असल्याचे मानले जाईल.त्यानुसार, जर एखाद्या गिग वर्करने किंवा प्लॅटफॉर्म वर्करने त्या विशिष्ट दिवशी संबंधित एग्रीगेटरसोबत केलेल्या कामातून उत्पन्न मिळवले असेल, तर उत्पन्नाच्या रकमेची पर्वा न करता, त्या गिग वर्करला त्या दिवशी एग्रीगेटरसोबत कामावर असल्याचे मानले जाईल.पुढे जर एखाद्या गिग वर्करने किंवा प्लॅटफॉर्म वर्करने त्या कॅलेंडर दिवशी थर्ड पार्टी एग्रीगेटरसोबत केलेल्या कामातून उत्पन्न मिळवले असेल, तर उत्पन्नाच्या रकमेची पर्वा न करता, त्याला त्या एग्रीगेटरसोबत एका दिवसासाठी कामावर असल्याचे मानले जाईल ज्यावर कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीच्या तो पात्र ठरणार आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, एकापेक्षा जास्त एग्रीगेटरसोबत काम करत असल्यास गिग वर्कर किंवा प्लॅटफॉर्म वर्करच्या कामाच्या दिवसांची गणना सर्व एग्रीगेटर्ससाठी एकत्रितपणे केली जाईल.जर एखादा गिग वर्कर किंवा प्लॅटफॉर्म वर्कर एका विशिष्ट कॅलेंडर दिवशी तीन एग्रीगेटरसोबत कामावर असेल, तर ते तीन दिवस म्हणून गणले जाईल, असे कामगार आणि रोजगार मंत्रालयाने यावेळी सांगितले आहे.
बिगूल वाजले.! ‘या’ 12 जिल्हा परिषदांसाठी होणार निवडणूक, वाचा सविस्तर…
panchayat samiti election | Zilla parishad election : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली. 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. ‘या’ 12 जिल्हा परिषदांसाठी होणार निवडणूक : दिनेश वाघमारे यांनी सांगितले […] The post बिगूल वाजले.! ‘या’ 12 जिल्हा परिषदांसाठी होणार निवडणूक, वाचा सविस्तर… appeared first on Dainik Prabhat .
मतदानाच्या २ दिवस आधी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, राज्यात पहिल्यांदाच घडणार
Municipal Corporation Election 2026 : राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना मुंबई निवडणूक विभागाने एक महत्त्वाचा आणि वादग्रस्त निर्णय घेतला आहे. प्रचाराचा अधिकृत कालावधी संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघर प्रचार करण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य आणि […] The post मतदानाच्या २ दिवस आधी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, राज्यात पहिल्यांदाच घडणार appeared first on Dainik Prabhat .
Stock Market: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा केल्याने जागतिक बाजारपेठेसह भारतीय शेअर बाजारातही खळबळ पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात तेजीने व्यवहार सुरू झाल्यानंतर दुपारच्या सत्रात बाजारात विक्रीचा दबाव निर्माण झाला. यामुळे सेन्सेक्स एका टप्प्यावर तब्बल ९९५ अंकांनी कोसळला होता, तर निफ्टीने २५,६०० च्या पातळीपर्यंत गटांगळी […] The post Stock Market: ट्रम्प यांच्या 25 टक्के टॅरिफच्या धमकीने शेअर बाजारात खळबळ; गुंतवणूकदारांचे 93 हजार कोटी स्वाहा appeared first on Dainik Prabhat .

25 C