दिल्ली वार्ता : केजरीवाल यांचे पुनरागमन!
न्यायालयाच्या निकालामुळे अरविंद केजरीवाल यांना संजीवनी मिळाली आहे. पंजाबची सत्ता कायम राखून गुजरात आणि गोव्यात आपला दम दाखविण्याची हुकमी संधी आपला मिळाली आहे.
Dilip Walse Patil : पुणे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची शिवाजीनगरमध्ये महत्त्वाची बैठक; ६ मार्च रोजी जिल्हा बँकेच्या सभागृहात गटनेत्याची निवड होणार.
होळी हा सण आपल्याकडे मोठ्या आनंदात साजरा केला जातो. मात्र, आज या सणाचा मूळ उद्देश कुठतरी हरपला आहे. मोठ्या प्रमाणात लाकूड जाळणे आणि पाण्याचा अपव्यय होत आहे.
Aundh District Hospital : मुंबईस्थित एजन्सीला नोव्हेंबर २०२३ मध्ये कंत्राट देऊनही एमआरआय सेवा नाही; सिव्हिल सर्जन डॉ. नागनाथ येम्पले यांनी बजावली कारणे दाखवा नोटीस.
Sadabhau Khot : उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समितीचा पळसदेवमध्ये पाचवा मेळावा; अतिरिक्त जमीन उद्योगपतींना देण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध.
National Science Day : पुणे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन; २५० हून अधिक प्रकल्पांतून उमटली विज्ञानाची जिज्ञासा.
Bike Burnt Case : मध्यरात्री ‘तो’आला अन् गाड्या पेटवून पळाला; पाडळी आळे गावात नेमकं घडलं काय? पाहा
Bike Burnt Case : पाडळी आळे गावात वारंवार घडताहेत जळीत कांडाच्या घटना; मध्यरात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची ग्रामस्थांची पोलिसांकडे मागणी.
Indapur News : नीरा नदीचा पिठेवाडी बंधारा कोरडा! इंदापूर-माळशिरसमध्ये पाणीबाणी, शेतकरी हवालदिल
Indapur News : पिठेवाडी (ता. इंदापूर) येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याअभावी पूर्णतः आटला; रब्बी हंगामातील पिके वाचवण्यासाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी.
Dangerous Bridge : रात्रीच्या वेळी पुलाचा अंदाज येणे कठीण; पिंपरी-पेंढार शिवारात मोठ्या अपघाताची टांगती तलवार, बॅरिकेड्स आणि फलक लावण्याची ग्रामस्थांची मागणी.
Sunetra Pawar : १६२ शाळा-महाविद्यालये आणि ३६०० कर्मचाऱ्यांची जबाबदारी; पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात पहिल्या महिला अध्यक्षांची निवड.
Khed News : महाराजस्व समाधान अभियान आढावा बैठकीत आमदारांचे आश्वासन; जेसीबी आणि पोकलँडच्या उपलब्धतेमुळे रस्ते कामांमधील अडथळे होणार दूर.
Junnar News : एका फवारणीला ९० हजार रुपये खर्चूनही बाग धोक्यात; पिता-पुत्रांनी निसर्गाशी दोन हात करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल.
Alephata Market : आळेफाट्यात कांद्याचा महापूर! १० हजार गोण्यांची विक्रमी आवक; काय राहिला बाजारभाव?
Alephata Market : आळेफाटा उपबाजारात ५४३३ क्विंटल कांद्याची आवक; नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे १० हजार गोण्यांचे लिलाव सुरळीत पार पडले.
Maval News : माळवाडीकरांचा पाण्याचा प्रश्न सुटणार; ४.४९ कोटींच्या जल जीवन मिशन योजनेचा शुभारंभ
Maval News : आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून ४ कोटी ४९ लाखांचा निधी; माळवाडीत पल्लवी दाभाडे आणि दिलीप ढोरे यांच्या हस्ते नळपाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण.
Rang Panchami 2026 : रंगाने भरलेल्या फुग्यांचा फटका थेट कॉर्नियाला; दरवर्षी रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ, रंग खेळताना 'गॉगल' वापरण्याचे आवाहन.
PCIFF 2026 : पिंपरी चिंचवड महापालिका आणि एफटीआयआय (FTII) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन; ४३ देशांतील ११६ चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.
PCMC News : पुस्तके, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा पुनर्वापर वाढणार; कचऱ्याचे प्रमाण घटवण्यासाठी पीसीएमसीच्या आरोग्य विभागाचा मास्टर प्लॅन.
Lonand News : लोणंदकरांना दिलासा! कोणताही करवाढ नाही; ९७.८७ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर
Lonand News : उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी यांच्या उपस्थितीत सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर; दिव्यांग, महिला आणि खेळाडूंसाठी विशेष योजनांवर भर.
Wai News : प्रशासनाचे दुर्लक्ष की इच्छाशक्तीचा अभाव? भुईंजमधील ‘त्या’गंभीर समस्येवर महिला आक्रमक
Wai News : बँका, शाळा आणि मोठ्या बाजारपेठेचे केंद्र असलेल्या भुईंजमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहाअभावी महिलांची दैना; डॉ. सुरभी भोसले यांनी लक्ष घालण्याची ग्रामस्थांची मागणी.
इराणच्या नौदलाची नऊ जहाजं बुडवली, ट्रम्पचा दावा
वॉशिंग्टन डीसी : ताज्या हल्ल्यात इराणची किमान नऊ जहाजं बुडवण्यात यश मिळाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन केला आहे. बुडवलेल्या जहाजांपैकी काही तुलनेने मोठी आणि महत्त्वाची आहेत; असेही ट्रम्पनी सांगितले. इराणच्या नौदलाच्या मुख्यालयाचे अंशतः नुकसान करण्यात अमेरिका यशस्वी झाल्याचाही दावाही ट्रम्प यांनी केला आहे. याआधी सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) ओमानच्या आखातातील एका बंदरात इराणी युद्धनौका बुडवल्याचे जाहीर केले आहे.इराणच्या काही जहाजांचा पाठलाग अमेरिका करत आहे. लवकरच इराणची आणखी काही जहाजं समुद्रतळाशी असतील, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. ट्रम्प यांच्या या दाव्यावर अद्याप इराणची प्रतिक्रिया समजलेली नाही.अमेरिका आणि इस्रायल यांच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे किमान ४८ महत्त्वाचे नेते मारले गेले आहेत. हा इराणसाठी मोठा धक्का असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. इराण विरूद्धच्या लष्करी कारवाईला मोठे यश मिळत असल्याचे ट्रम्प यांनी फॉक्स न्यूज या अमेरिकेतली वृत्तवाहिनीला सांगितले. इराणमध्ये नेतृत्व बदल करणे आणि इराणचे सैन्यबळ नष्ट करणे, इराणकडे असलेले आण्विक सामर्थ्य निकामी करणे हाच अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याचा मुख्य हेतू आहे, अशी माहिती ट्रम्प यांनी फॉक्स न्यूज या अमेरिकेतली वृत्तवाहिनीला दिली. जगात शांतता नांदावी तसेच जगाची सुरक्षा अबाधित रहावी यासाठी इराण विरुद्धची कारवाई आवश्यक असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
संजूची बॅट तळपली, टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली
कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या सुपर आठ फेरीतल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात भारत पाच विकेट राखून जिंकला. या सामन्यात भारताचा सलामीवीर संजू सॅमसनची बॅट तळपली. संजूने ५० चेंडूत ४ षटकार आणि १२ चौकार मारत नाबाद ९७ धावा केल्या. तोच आजच्या सामन्याचा सामनावीर झाला. वेस्ट इंडिजने दिलेले २० षटकांत १९६ धावा करण्याचे आव्हान भारताने १९.२ षटकांत ५ विकेट गमावून पूर्ण केले. या विजयासह भारत दिमाखात उपांत्य फेरीत (सेमी फायनल) पोहोचला. आता गुरुवार पाच मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध भारत हा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामना सुरू होणार आहे.भारताची फलंदाजीवेस्ट इंडिजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून अभिषेक शर्माने १०, संजू सॅमसनने नाबाद ९७, ईशान किशनने १०, सूर्यकुमार यादवने १८, तिलक वर्माने २७, हार्दिक पांड्याने १७, शिवम दुबेने नाबाद ८ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर आणि शमर जोसेफने प्रत्येकी २ तर अकील होसेनने १ विकेट घेतली.वेस्ट इंडिजची फलंदाजीशाई होपने ३३ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकार मारत ३२ धावा केल्या, त्याला वरुण चक्रवर्तीने त्रिफळाचीत केले. रोस्टन चेसने २५ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकार मारत ४० धावा केल्या, त्याला जसप्रीत बुमराहने सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. शिमरॉन हेटमायरने १२ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार मारत २७ धावा केल्या, त्याला जसप्रीत बुमराहने संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. शेरफेन रदरफोर्डने ९ चेंडूत १ षटकार मारत १४ धावा केल्या, त्याला हार्दिक पांड्याने संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. रोवमन पॉवेलने १९ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकार मारत नाबाद ३४ धावा केल्या. जेसन होल्डरने २२ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकार मारत नाबाद ३७ धावा केल्या.https://prahaar.in/2026/03/01/west-indies-hetmyer-fails-against-bumrah/बुमराहसमोर हेटमायर हतबलजसप्रीत बुमराहने वेस्ट इंडिजच्या चार पैकी दोन फलंदाजांना बाद केले. विशेष म्हणजे बुमराहने शिमरॉन हेटमायरला बाद केले. आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बुमराहने हेटमायरला आतापर्यंत सहा वेळा बाद केले आहे. बुमराहने हेटमायरला आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत २३ चेंडू टाकून ६ वेळा बाद केले आहे. आजच्या सामन्यात शिमरॉन हेटमायरने १२ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार मारत २७ धावा केल्या, त्याला जसप्रीत बुमराहने संजू सॅमसनकरवी झेलबाद केले.
बुमराहसमोर वेस्ट इंडिजचा हेटमायर हतबल
कोलकाता : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा निर्णायक सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने २० षटकांत ४ बाद १९५ धावा केल्या.जसप्रीत बुमराहने वेस्ट इंडिजच्या चार पैकी दोन फलंदाजांना बाद केले. विशेष म्हणजे बुमराहने शिमरॉन हेटमायरला बाद केले. आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बुमराहने हेटमायरला आतापर्यंत सहा वेळा बाद केले आहे. बुमराहने हेटमायरला आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत २३ चेंडू टाकून ६ वेळा बाद केले आहे. आजच्या सामन्यात शिमरॉन हेटमायरने १२ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार मारत २७ धावा केल्या, त्याला जसप्रीत बुमराहने संजू सॅमसनकरवी झेलबाद केले.शाई होपने ३३ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकार मारत ३२ धावा केल्या, त्याला वरुण चक्रवर्तीने त्रिफळाचीत केले. रोस्टन चेसने २५ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकार मारत ४० धावा केल्या, त्याला जसप्रीत बुमराहने सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. शिमरॉन हेटमायरने १२ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार मारत २७ धावा केल्या, त्याला जसप्रीत बुमराहने संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. शेरफेन रदरफोर्डने ९ चेंडूत १ षटकार मारत १४ धावा केल्या, त्याला हार्दिक पांड्याने संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. रोवमन पॉवेलने १९ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकार मारत नाबाद ३४ धावा केल्या. जेसन होल्डरने २२ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकार मारत नाबाद ३७ धावा केल्या.
जगात खळबळ..! मार्च-एप्रिल मध्ये ‘या’शक्तिशाली देशात युद्ध होणार?
World War : इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची २०२६ मधील महायुद्धाची भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आली आहे.
Maharashtra Cabinet Decision : महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यास मंजुरी दिली आहे.
Weather Update : ‘मार्च हिट’ने महाराष्ट्र होरपळणार; हवामान खात्याकडून अलर्ट जारी
राज्यात फेब्रुवारी संपताच उन्हाची तीव्रता (Weather Update) वाढू लागली असून मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी हवामान खात्याने मोठा अलर्ट जारी केला आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Life style : लघवी रोखून ठेवणं बेतेल जीवावर.! किडनी डॅमेज होतेच पण ‘या’मोठ्या आजारांचाही धोका…
जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे जास्त काळ लघवी रोखून ठेवतात, तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.
IND vs WI : भारतीय क्षेत्ररक्षकांनी, विशेषतः युवा खेळाडू अभिषेक शर्माने दिलेल्या जीवनदानांचा फायदा घेत वेस्ट इंडिजने दमदादर फटकेबाजी करत ४ गडी गमावून १९५ धावांचा डोंगर उभारला आहे.
इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा मृत्यू; मुलगी-जावयासह कुटुंबातील अनेकांचा अंत
तेहरान : इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. इराणी सरकारी माध्यमांनी खामेनी यांच्या निधनाची पुष्टी केली असून, त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्यांसह त्यांच्या मुलगी आणि जावईंचा देखील मृत्यू झाला आहे. इराण सरकारने ४० दिवसांचा सार्वजनिक शोक जाहीर केला आहे आणि ७ दिवसांची सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे.इराणी सरकारी दूरचित्रवाणी आणि अधिकृत वृत्तसंस्था आयआरएनएने ८६ वर्षीय खामेनी यांच्या निधनाची माहिती दिली, परंतु मृत्यूचे कारण स्पष्ट केलेले नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासांपूर्वी सांगितले की खामेनी यांचा मृत्यू अमेरिका-इस्रायली संयुक्त कारवाईत झाला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेसने या हल्ल्यात मारल्या गेलेल्या सात वरिष्ठ इराणी संरक्षण नेत्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अली शामखानी, मोहम्मद पाकपौर, सालेह असादी, मोहम्मद शिराजी, अझीझ नासिरजादेह, हुसेन जबल अमेलियन आणि रेझा मुझफ्फर-निया यांचा समावेश आहे.खामेनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये शोकाची लाट पसरली आहे. इराणी माध्यमांनी म्हटले की, देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे देशभर ४० दिवसांचा सार्वजनिक शोक जाहीर केला गेला आहे. अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक असलेल्या खामेनीचा मृत्यू झाला आहे. irans-supreme-leader-khamenei हा न्याय फक्त इराणच्या लोकांसाठी नाही, तर खामेनी आणि त्याच्या रक्तपिपासू टोळीने मारलेल्या किंवा त्रास दिलेल्या सर्व लोकांसाठी आहे.इस्त्रायल-इराण संघर्षावर भारताची बारीक नजर; दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवादतेहरान, अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावाचे रूपांतर आता हिंसक संघर्षात झाले आहे. रविवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि इतर उच्चपदस्थ नेतृत्व अमेरिकेच्या हल्ल्यात मारले गेले आहेत, या दाव्याला इराणी माध्यमांनी दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर जगभरातील शिया मुस्लिमांनी अमेरिकेच्या हल्ल्यांवर टीका केली आणि त्यांना अति हिंसक म्हटले.भारताने या तणावावर तात्काळ प्रतिक्रिया व्यक्त केली आणि सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आणि तणाव वाढू नये असे आवाहन केले. भारताने एक निवेदन जारी केले ज्यामध्ये म्हटले आहे की सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे. शिवाय, भारताने शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय राजनैतिकतेला चालना देण्याची गरज आहे. भारताने वाटाघाटीद्वारे तोडगा काढण्याची आणि युद्ध टाळण्याची विनंती केली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की इराण आणि आखाती प्रदेशातील अलिकडच्या घडामोडींबद्दल भारत चिंतित आहे. मंत्रालयाने सर्व देशांना संयम बाळगण्याचे तसेच चर्चेतून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.
इस्रायल-इराण युद्धाचा जगावर परिणाम होणार, या दहा गोष्टी बदलणार ?
तेहरान : अमेरिका-इस्रायलने (Israel) इराणवर (Iran) हल्ला केल्यानंतर मध्य-पूर्वेमध्ये युद्ध भडकले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामोनी यांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता इराणने अमेरिकेला मदत करणाऱ्या इतर देशावंर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे पश्चिम आशियामध्ये युद्ध भडकले आहे. या युद्धाचा परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत.जगावर हे दहा परिणाम होतील ?1) तेल आणि गॅसच्या किमती वाढतीलया युद्धामुळे जगभरात तात्पुरते ऊर्जा संकट निर्माण होईल. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढू शकतात.2) महागाईचा धोकाइंधनाच्या किमती वाढल्या तर त्याचा थेट परिणाम वाहतूक, अन्न आणि औषधांवर होईल.3) मध्य पूर्वेतील संकटहे युद्ध आणखी भडकले तर त्याचा परिणाम संपूर्ण मध्य पूर्वेवर होईल. इराणने अमेरिकेला मदत करणाऱ्यांना आठ देशांवर हल्ला केलाय. त्यामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती बिघडली आहे. अमेरिका, इस्रायल हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणचे मित्र राष्ट्र हिजबुल्लाह आणि हुथी सक्रिय होऊ शकतात. यामुळे युद्ध इस्रायल, लेबनॉन आणि येमेनमध्ये पसरू शकते.4) अमेरिका मध्य पूर्वेत लष्करी कारवाया वाढवेलइराणवर हल्ला करण्यापूर्वी अमेरिकेने अनेक देशांमध्ये आपले लष्करी तळ निर्माण केले आहेत. त्या ठिकाणी हवाई, नौदल व सैनिक तैनात केले आहेत. सुमारे चाळीस हजार सैनिक या तळांवर आहेत. त्यामुळे संघर्ष आणखी वाढल्यास अमेरिका मध्य पूर्वेत लष्करी कारवाया वाढवेल.5) इराण अण्वस्त्र निर्मिती मोहीम तीव्र करेलअमेरिकेने इराणला अण्वस्त्रे विकसित करू नयेत असे सातत्याने आवाहन केले होते. त्यावरूनच इराणवर हल्ला झाला आहे. त्यामुळे भविष्यातील शस्त्र सज्जता म्हणून इराण अण्वस्त्र विकसित करू शकतात.6) रशिया, चीन आणि भारताची भूमिका काय?अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे. त्यात मध्य पूर्वेतील अनेक मुस्लिम देशांचा अमेरिकेला मूक पाठिंबा आहे. पण मध्य-पूर्वे संघर्षात चीन, रशिया, भारत यांची ठोस भूमिका नाही. या तिन्ही देशांची भूमिका भविष्यात महत्त्वाची असणार आहे.7) इंधनाचे दर भडकणारहोर्मुझच्या सामुद्रधुनीतून कच्चा तेलाची आयात होते. हा मार्ग बंद पडला तर जगातील तेलाच्या व्यापाऱ्यावर वीस ते टक्के परिणाम होऊ शकते. एकटा भारत या मार्गातून तीस ते चाळीस टक्के तेल आयात करतो.8) जगभरातील बाजार कोसळतीलया युद्धाचा थेट परिमाण महागाईवर होईल. या भू राजकीय संघर्षाचा परिणाम जगाच्या बाजारावर होईल. तेल आणि ऊर्जा-संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होऊ शकते. युद्धाच्या भीतीमुळे गुंतवणूकदार शेअर बाजारातील गुंतवणूक काढून घेतातत. ज्यामुळे बाजारपेठेत अस्थिरता निर्माण होते.9) निर्वासितांचे मोठे संकटयुद्धाचा आणखी भडका उडू शकतो. त्यातून इराण आणि शेजारील देशांमधून लाखो लोक युरोप आणि आशियातील इतर देशात स्थलांतर करतील. त्यामुळे अनेक देशांमध्ये निर्वासितांचे संकट निर्माण होऊ शकते.10) संयुक्त राष्ट्रांचा प्रभाव (UN) किती दिसला ?या युद्धाने संयुक्त राष्ट्रांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. कारण अमेरिकेने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केलंय. या युद्धाने संयुक्त राष्ट्रांचा प्रभाव कमी झाला आहे.इराण-इस्रायल युद्धाचा भारताला फटका बसणार ?इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे पश्चिम आशियात तणाव वाढला आहे. दोन्ही देशात युद्ध भडकले आहेत. त्याचा परिणाम जगावर होणार आहे. भारताला मोठा फटका बसू शकतो.भारताचा इराणबरोबर व्यापार कसा होतो ?इराणसोबत भारताचा व्यापार १.६८ अब्ज डॉलरचाबासमती तांदूळ, चहा, साखर, फळे, मांस, औषधे, औद्योगिक यंत्रसामग्रीची निर्यातसफरचंद, पिस्ता, खजूर, खनिजे, खते, बांधकाम साहित्य, काचेच्या वस्तू, धातूंची आयातभारताचा इराणबरोबर व्यापार कमी का झाला ?भारत २०१९ पर्यंत इराणसोबत १७.०३ अब्ज डॉलरचा व्यापार करत होताआता केवळ १.६८ अब्ज डॉलरचा व्यापारअमेरिकेने कच्च्या तेलाच्या आयातीवर निर्बंध घातल्याने व्यापार घटलातुमचं युद्ध आमच्याशी नाही, शहाणपणाने वागा, नाहीतर...; इराणच्या हल्ल्यानंतर यूएईचा संतप्त इशारापश्चिम आशियातील संघर्ष आता अत्यंत भीषण वळणावर पोहोचला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या निधनानंतर पेटलेल्या वणव्यात इराणने आता थेट संयुक्त अरब अमिरातीला लक्ष्य केले आहे. इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे दुबई आणि अबू धाबीसह अनेक आखाती देश हादरले असून जगातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरांमध्ये आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.बुर्ज अल अरब आणि विमानतळाला लक्ष्यशनिवारी मध्यरात्री इराणने दुबईवर एकापाठोपाठ एक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात दुबईची शान मानले जाणारे आणि जगातील ७-स्टार हॉटेल बुर्ज अल अरबचे मोठे नुकसान झाले. याशिवाय, जगातील सर्वात व्यस्त असणाऱ्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही पाच मोठे स्फोट झाले असून इमारतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे विमानतळ तातडीने बंद करण्यात आले असून संपूर्ण आखाती क्षेत्रातील विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे.अबू धाबीतील अमेरिकन तळावर हल्लाइराणच्या क्षेपणास्त्रांनी केवळ दुबईच नव्हे, तर अबू धाबीमधील अमेरिकेच्या अल-धफ्रा या लष्करी तळालाही लक्ष्य केले. या तळावर झालेल्या थेट हल्ल्यामुळे संपूर्ण शहर हादरले. याव्यतिरिक्त, पाम जुमेराह या बेटावरील एका हॉटेलजवळही भीषण आग लागल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले. फक्त यूएईच नाही, तर कतारची राजधानी दोहा आणि ओमानमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.इराणने स्वतःलाच एकाकी पाडले; यूएईचे चोख प्रत्युत्तरया हल्ल्यानंतर यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी इराणवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. त्यांचे राजनैतिक सल्लागार अन्वर गरगाश यांनी इराणला खडे बोल सुनावले. इराणने केलेला हा हल्ला म्हणजे त्यांची खूप मोठी चूक आहे. तुमचं युद्ध तुमच्या शेजारी देशांशी (आमच्याशी) नाही, मग आम्हाला का लक्ष्य करत आहात? इराणने आता तरी शहाणपणाने वागावं, नाहीतर संपूर्ण जग त्यांच्याकडे पाठ फिरवेल आणि ते जगात एकटे पडतील, असं अन्वर गरगाश म्हणाले.खाडी देशांत युद्धाचा वणवा! दुबई, दोहानंतर ओमानवरही हल्ले; भारताला कसा बसणार फटका?पश्चिम आशियातील परिस्थिती आता हाताबाहेर गेली असून, युद्धाची व्याप्ती वाढली आहे. इस्राईल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर आता प्रत्युत्तरादाखल दुबई, दोहा आणि पहिल्यांदाच ओमानवरही क्षेपणास्त्र हल्ले झाले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता बळावली असून, यामुळे संपूर्ण जगावर जागतिक आर्थिक संकटाचे सावट पसरले आहे.इराणमध्ये सत्तांतराची नांदी की विनाशाची सुरुवात?खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचे भवितव्य अंधारात आहे. राजकीय तज्ज्ञ यांच्या मते, अमेरिका आणि इस्राईलने इराणमधील सत्ता उलथवून लावण्याचे 'मॅक्सिमम टार्गेट' ठेवले आहे. मात्र, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जेफ्री सॅक्स यांनी सावध केले आहे की, हा केवळ अणुऊर्जेचा वाद नसून मध्यपूर्वेत इस्राईलचा प्रभाव वाढवण्याचा मोठा डाव असू शकतो. बाह्य हल्ल्यांमुळे इराणची जनता आपल्या शासनाच्या मागे एकवटू शकते, ज्यामुळे सत्तापालट करणे कठीण होईल. इराणने गेल्या अनेक वर्षांच्या तेल उत्पन्नातून आपली क्षेपणास्त्र आणि ड्रोन शक्ती कमालीची वाढवली आहे.'होर्मुझ'ची नाकेबंदी आणि भारताची चिंताया युद्धाचा सर्वात मोठा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो. जर 'होर्मुझ' सामुद्रधुनीतून होणारा तेल पुरवठा विस्कळीत झाला, तर जहाजांना आफ्रिकेला वळसा घालून यावे लागेल. यामुळे वाहतूक खर्च आणि वेळ प्रचंड वाढेल. भारत आपल्या गरजेच्या ८५% तेल आयात करतो. जरी भारताने इराणकडून तेल खरेदी कमी केली असली, तरी जागतिक बाजारात वाढणाऱ्या किमतींमुळे देशांतर्गत पेट्रोल-डिझेल महाग होऊन महागाईचा भडका उडू शकतो. सध्याच्या संकटात अंदमान किनारपट्टीवरील गॅस शोध प्रकल्पांना गती देणे भारतासाठी अनिवार्य ठरले आहे.जागतिक बाजारपेठांची 'वेट अँड वॉच' भूमिकासध्या जागतिक शेअर बाजारांनी या तणावावर संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या किमतीत १०-१५ टक्क्यांची वाढ झाल्यास अमेरिकन आणि युरोपीय बाजारात मोठी घसरण पाहायला मिळू शकते. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी सध्या घाईघाईने निर्णय घेऊ नये, कारण भू-राजकीय घडामोडींमुळे बाजार अनपेक्षित वळण घेऊ शकतो.खामेनी यांच्या मृत्यूनंतर शिया समुदाय रस्त्यावर:इराणमध्ये 'डेथ टू अमेरिका' च्या घोषणाइस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. यानंतर इराणच्या रस्त्यांवर लोक शोक करताना दिसले. लोकांनी ‘डेथ टू अमेरिका’ आणि 'डेथ टू इस्रायल'च्या घोषणा दिल्या आणि प्रत्युत्तरादाखल कारवाईची मागणी केली. भारतातही शिया समुदायाचे लोक खामेनी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले. श्रीनगर, लेह, लखनऊ येथून निदर्शनांची छायाचित्रे समोर आली. मात्र, अमेरिका आणि इराणच्या काही भागांमध्ये लोकांनी या बातमीवर आनंदोत्सवही साजरा केला.
मोठी दुर्घटना..! सेफ्टिक टँक साफ करताना एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Septic Tank Cleaning Accident : बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील अन्वरपूर गावात सेफ्टिक टँक साफ करताना एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला.
कोकणात जलवाहतुकीचा नवीन अध्याय सुरू झाला आहे. मुंबईतून निघालेली सागरी रो-रो सेवा विजयदुर्ग बंदरापर्यंत पोहोचली आहे.
मध्य पूर्वेतील संघर्षाने भीषण रूप धारण केले असून, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धात (Iran Israel War) दोन्ही बाजू माघार घेण्यास तयार नाहीत. अमेरिकेच्या सक्रिय सहभागामुळे हे युद्ध आता पूर्णक्षमतेने सुरू झाले आहे.
“धर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड केली नाही”
खारघर : “धर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड केली नाही, हा आदर्शच आजच्या भारताला दिशा देणारा आहे,” असे प्रतिपादन करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेच्या रक्षणाचा ठाम संदेश दिला. खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद दि चादर’ गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीद समागम सोहळ्यात मार्गदर्शन करताना त्यांनी धर्माचा सन्मान, समाजाची एकजूट आणि राष्ट्रीय एकात्मता हीच खरी ताकद असल्याचे अधोरेखित केले. हा समागम सोहळा केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमितभाई शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या भव्य समागम सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आदरणीय बाबा हरिनाम सिंग जी, धर्मगुरु बाबू सिंग जी महाराज, महंत रघुमणीजी, मंत्री गिरीश महाजन, गणेश नाईक, संजय राठोड, नितेश राणे, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर आणि इतर प्रशासकीय अधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने शीख बांधव-भगिनींनी सहभाग नोंदवला.यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, “आज आपण नववे शीख गुरु, हिंद-दी-चादर गुरु तेग बहादुर साहेब यांच्या ३५०व्या शहीद दिनानिमित्त एकत्र आलो आहोत. हा दिवस केवळ शीख इतिहासाचा नाही, तर संपूर्ण मानवतेच्या इतिहासातील गौरवाचा दिवस आहे.” १७व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेब यांच्या कारकिर्दीत धार्मिक अत्याचार वाढले. काश्मिरी पंडितांवर जबरदस्ती धर्मांतराचे संकट ओढवले असताना त्यांनी गुरु साहेबांकडे मदतीसाठी धाव घेतली. “मी माझा धर्म सोडणार नाही आणि कोणालाही त्याचा धर्म सोडू देणार नाही,” अशी ठाम भूमिका घेत गुरु तेग बहादुर यांनी दिल्लीच्या चांदणी चौकात शिरच्छेद स्वीकारला; पण अन्यायासमोर झुकले नाहीत, असे शिंदे यांनी सांगितले.“त्यांच्याकडे सेना नव्हती, ताज नव्हता, खजिना नव्हता; पण अपार साहस, अढळ सत्य आणि असीम करुणा होती. म्हणूनच त्यांना ‘हिंद-दी-चादर’ म्हटले जाते जी चादर वादळांपासून संरक्षण करते, थंड रात्रीत उब देते आणि दुर्बलांना बळ देते,” असे ते म्हणाले.शिंदे पुढे म्हणाले, “गुरुजी असम आणि बंगालच्या दौर्यावर असताना एका निर्दयी जमीनदाराने गरीब शेतकऱ्यांवर अन्याय केला. गुरु तेग बहादुरजींनी कोणतेही शस्त्र न वापरता सत्य आणि शांततेच्या बळावर त्याला जाब विचारला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सामर्थ्यामुळे जमीनदार झुकला आणि शेतकऱ्यांची जमीन परत केली. यावरून सिद्ध होते की खरी ताकद बंदुकीत नसून सत्य आणि न्यायाच्या आवाजात असते.” “गुरुजींचे विचार जन-जनांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सरकार पूर्णतः कटिबद्ध आहे. ६००० हून अधिक गावांमध्ये डिजिटल रथांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवले जात आहे. सिख, बंजारा, वाल्मीकी, लबाना आणि सिकलीगर समाजांना एका सूत्रात बांधण्याचे कार्य सुरू आहे,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील ऐतिहासिक नातेसंबंध अधोरेखित करत शिंदे म्हणाले, “नांदेड ही भूमी शीख धर्माचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंह यांची कर्मभूमी आहे. याच पवित्र स्थळी त्यांनी ‘सब सिखन को हुकुम है, गुरु मान्यो ग्रंथ’ असा संदेश दिला. संत नामदेव महाराज यांनी भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत फडकवली.” पंजाबमधील घुमान येथे संत नामदेव महाराजांच्या ७५५व्या प्रकाशोत्सवानिमित्त ‘संत नामदेव महाराष्ट्र सदन’चे भूमिपूजन करण्याचा अनुभव सांगताना शिंदे म्हणाले, “तेथे ग्रामस्थांनी दिलेला ‘बाबा नामदेव महाराज सन्मान पुरस्कार’ माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. घुमानला राष्ट्रीय पर्यटन नकाशावर आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकद लावेल.”शिंदे म्हणाले, “१९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात शीखविरोधी दंगली उसळल्या. त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत शीख समाजाच्या संरक्षणासाठी शिवसैनिकांना रस्त्यावर उतरवले होते. महाराष्ट्राने नेहमीच बंधुभाव जपला आहे.”भाषणाच्या शेवटी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना आवाहन केले की, आपण आपली श्रद्धा कधीही कमकुवत होऊ देणार नाही. कोणाच्याही धर्मावर किंवा ओळखीवर हल्ला सहन करणार नाही. एकमेकांचे संरक्षण करू, जसे हिंद-दी-चादरने संपूर्ण हिंदुस्थानाचे रक्षण केले.
खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणच्या सर्वोच्च नेतेपदी अयातुल्ला अराफी!
तेहरान : अमेरिकेच्या हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर काही तासांतच, अनुभवी धर्मगुरू आणि खामेनी यांचे जवळचे सहकारी अयातुल्ला अलीरेजा अराफी यांना तात्पुरते इराणचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे.कोण आहेत अयातुल्ला अराफी?अराफी यांना नेतृत्व परिषदेचे कायदेतज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि त्यांना तात्पुरते सर्वोच्च नेत्याची भूमिका पार पाडण्याचे” काम देण्यात आले आहे, असे वृत्तसंस्था इराणी स्टुडंट्स न्यूज एजन्सीने दिले आहे. अयातुल्ला अली खामेनी यांच्या उत्तराधिकारी होण्याच्या शर्यतीत अराफी हे प्रमुख आघाडीवर होते. ६७ वर्षीय हे एक अनुभवी धर्मगुरू आणि खामेनी यांचे जवळचे सहकारी आहेत. अराफी सध्या सर्वोच्च नेत्याची नियुक्ती करणाऱ्या तज्ञांच्या सभेचे उपाध्यक्ष म्हणून काम करतात. ते इराणच्या मदरसा प्रणालीचेही प्रमुख आहे.शनिवारी झालेल्या अमेरिका-इस्रायल लष्करी हल्ल्यात १९८९ पासून इराणचे नेतृत्व करणारे ८६ वर्षीय खामेनी ठार झाले. या कारवाईत लष्करी तळ, सरकारी सुविधा आणि वरिष्ठ कमांड साइट्सना लक्ष्य करण्यात आले, ज्यात संरक्षण मंत्री अमीर नासरजादेह आणि कमांडर-इन-चीफ मोहम्मद पाकपूर यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता. अंतरिम परिषदेत आता अध्यक्ष मसूद पेझेश्कियान, मुख्य न्यायाधीश गुलाम-होसेन मोहसेनी-एजेई आणि पालक परिषदेतील धर्मगुरू यांचा समावेश आहे. खामेनी यांच्या निधनानंतर हे तिघेही एकत्रितपणे राज्य कारभाराचे मार्गदर्शन करतील.खामेनी यांच्या मृत्यूचे पाकिस्तानात पडसाद; अमेरिकन दूतावासावर हल्ला, ८ जणांचा मृत्यूअमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. खामेनी यांच्या मृत्यूमुळे इराण आणखी आक्रमक प्रतिहल्ले करत आहे. त्यामुळे आता अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. असं असताना आता अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचे पडसाद थेट पाकिस्तानात उमटले आहेत. पाकिस्तानच्या कराचीमधील अमेरिकन दूतावासावर जमावाने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. खामेनी यांच्या मृत्यूमुळे शिया समुदाय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने कराची येथील अमेरिकन दूतावासावर काही जमावाने संतप्त होत सुरक्षा व्यवस्था भेदून आतमध्ये प्रवेश करत दगड आणि काठ्यांनी तोडफोड केली आहे. तसेच अमेरिकन दूतावासाच्या कार्यालयाच्या काचा फोडत इमारतीला आग लावण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेत ८ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.…तर अतिशय शक्तिशाली हल्ला करू”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला पुन्हा मोठा इशाराअमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यामुळे इराण हादरलं आहे. इराणची राजधानी तेहरानवर अनेक भीषण हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणनेही प्रतिहल्ले केले असून युद्धाचा भडका उडाला आहे. तर अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. खामेनी यांच्या मृत्यूमुळे इराणने संतप्त होत अमेरिका आणि इस्त्रायलवर खूप मोठा हल्ला करण्याचा इशारा दिला आहे.दरम्यान, इराणच्या या इशाऱ्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत पुन्हा अतिशय शक्तिशाली हल्ला करण्याची धमकी इराणला दिली आहे. त्यामुळे आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच ट्रुथ सोशलवर एक पोस्ट केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, “इराणने नुकतंच म्हटलं की ते आज खूप मोठा हल्ला करणार आहेत. जो त्यांनी (इस्रायल-अमेरिकेने) यापूर्वी कधीही पाहिला नसेल. मात्र, त्यांनी (इराणने) असं करून नये. कारण जर इराणने असं केलं तर आपण त्यांच्यावर अतिशय शक्तिशाली हल्ला करू, ज्याची पूर्वी इराणने कधीही कल्पना केली नसेल”, असा मोठा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.भारतीय कर्मचारी असलेल्या तेल टँकरवर इराणचा भीषण हल्ला; होर्मुझच्या समुद्रात नेमकं काय घडलं?अमेरिका आणि इस्रायलने सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळील होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका तेल टँकरवर इराणने हल्ला केला आहे. यात १५ भारतीय क्रू होते असंही समोर आलं आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.ओमानच्या दुक्म बंदरावर ड्रोन हल्ल्यानंतर झालेल्या हल्ल्यात पलाऊ ध्वज असलेल्या तेल टँकरवर ओमानच्या मुसंदम द्वीपकल्पात हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात किमान चार जण जखमी झाले आहेत, असे ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने सांगितले. होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक तेल वाहतुकीसाठी एक धोरणात्मक मार्ग आहे, ज्याला जगातील सर्वात संवेदनशील सागरी अडथळा म्हणून वर्णन केले जाते. काल इराणच्या नौदलाने दिलेल्या रेडिओ इशाऱ्यात असा दावा करण्यात आला होता की कोणत्याही जहाजाला अरुंद कॉरिडॉरमधून जाण्याची परवानगी नाही, त्यामुळे हा मार्ग धोक्यात आला.तेल टँकरमधील कर्मचाऱ्यांना काढले बाहेरओमान एमएससीच्या म्हणण्यानुसार, स्कायलाईट नावाच्या या तेल टँकरमध्ये २० जणांचा क्रू होता, ज्यामध्ये १५ भारतीय आणि पाच इराणी नागरिक होते. मुसंदममधील खासाब बंदरापासून साडेनऊन किलोमीटर अंतरावर झालेल्या हल्ल्यानंतर क्रूला बाहेर काढण्यात आले.इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; देशभर सायरन, लाखो नागरिक आश्रयस्थानांकडे धावलेइराणने क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर इस्रायल हाय अलर्टवर आहे. तेल अवीव आणि देशातील इतर भागांत सायरन वाजत आहेत. टीपीएसच्या वृत्तानुसार, रविवारी इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन सुरू होण्याच्या काही काळापूर्वीच नागरिकांच्या मोबाईल फोनवर क्षेपणास्त्र, रॉकेट किंवा ड्रोन हल्ल्याची आगाऊ सूचना पाठवण्यात आली होती.इस्रायली संरक्षण दलांनी (आयडीएफ) पुष्टी केली आहे की इराणकडून क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत, ज्यामुळे देशभरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. रहिवाशांना आश्रयस्थानांच्या जवळ राहण्याचा आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अलर्ट सिस्टमने नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी जाण्याचे आणि परिसरात सायरन वाजल्यास सतर्क राहण्याचे निर्देश दिले. त्यानंतर काही वेळातच इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन ऐकू आले.“चिरडून प्रत्युत्तर” देण्याची शपथतेहरानवर अमेरिका-इस्रायलने संयुक्त हल्ला केल्यानंतर हा प्रतिहल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात लष्करी ठिकाणे आणि क्षेपणास्त्र उत्पादन केंद्रांना लक्ष्य करण्यात आले होते. इराणने या कारवाईला “चिरडून प्रत्युत्तर” देण्याची शपथ घेतली असून त्यामुळे प्रदेशातील तणाव अधिक वाढला आहे. दरम्यान, टीपीएसच्या माहितीनुसार, इस्रायलच्या हवाई दलाने गेल्या २४ तासांत इराणमधील लक्ष्यांवर १,२०० हून अधिक युद्धसामग्री टाकल्याचा दावा केला आहे.
Shimron Hetmyer Record : भारताविरुद्धच्या सुपर-८ मधील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात हेटमायरने दोन गगनचुंबी षटकार खेचत एकाच विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावे केला आहे.
Priyanka Gandhi : टार्गेटेड हत्येचा तीव्र निषेध व्हायला हवा; प्रियंका गांधींनी मांडली परखड भूमिका
इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनी मृत्युमुखी पडले. जागतिक सनसनाटी निर्माण करणाऱ्या त्या घडामोडीवर कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी परखड भूमिका मांडली.
मोठी घडामोड..! पंतप्रधान मोदींकडून सुरक्षा समितीची तातडीची बैठक
Iran Israel War : इराण-इस्रायल युद्धामुळे पंतप्रधान मोदींनी आज रात्री ९:३० वाजता CCS बैठक बोलावली आहे.
Sikandar Raza Record : सिकंदर रझाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रझाने या सामन्यात अशा विक्रमाची नोंद केली आहे, जो गेल्या १४ वर्षांत कोणालाही जमला नव्हता.
मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, गाऱ्हाणे घालून फोडला नारळ वेंगुर्ला, मालवण, रत्नागिरी आणि महाडमध्ये रो-रो सेवा सुरू करण्याची घोषणामुंबई : कोकणच्या लाल मातीचे आणि अथांग अरबी समुद्राचे नाते अधिक दृढ करणाऱ्या मुंबई-विजयदुर्ग रो-पॅक्स जलवाहतूक सेवेचा रविवारी, १ मार्च रोजी, भव्य शुभारंभ झाला. अनेक दशकांनंतर पुन्हा एकदा मुंबई आणि कोकण यांना समुद्रमार्गाने जोडणाऱ्या या सेवेच्या प्रारंभामुळे कोकणच्या सागरी विकासाला नवी गती मिळणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रत्यक्षात उतरलेल्या या प्रकल्पाचा शुभारंभ मुंबईतील ऐतिहासिक भाऊचा धक्का येथे पार पडला. रविवारी मंत्री राणे यांच्या हस्ते देवपूजा करून आणि गाऱ्हाणे घालून नारळ फोडत पहिली फेरी कोकणच्या दिशेने रवाना करण्यात आली. या वेळी मुंबईकर चाकरमानी आणि पर्यटकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला.एकेकाळी ‘स्टीमर’च्या माध्यमातून गजबजणारी ही जलवाहतूक एका दुर्दैवी अपघातानंतर खंडित झाली होती. रस्ते वाहतुकीतील अडचणी आणि रेल्वे आरक्षणातील प्रतीक्षा लक्षात घेता, जलमार्ग हा सक्षम पर्याय ठरू शकतो, या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. या सेवेसाठी ‘एम२एम प्रिन्सेस’ हे आधुनिक जहाज कार्यरत राहणार आहे. सुमारे ६२० ते ६२५ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या जहाजात एकाच वेळी चारचाकी वाहने आणि दुचाकी वाहने नेण्याची सुविधा आहे. अवघ्या ६ ते ७ तासांत मुंबईहून विजयदुर्ग गाठता येणार असून प्रवाशांसाठी आरामदायी आसनव्यवस्था, आधुनिक नेव्हिगेशन प्रणाली, आवश्यक सुरक्षा उपकरणे आणि बोटीवर डॉक्टरांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.वेंगुर्ला, मालवण, रत्नागिरी आणि महाडमध्ये रो-रो सेवा सुरू करणार - मंत्री नितेश राणेउद्घाटन प्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री नितेश राणे म्हणाले, ही सेवा आगामी काळात वेंगुर्ला, मालवण, रत्नागिरी आणि महाड अशा विविध ठिकाणी सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी जलवाहतुकीचा सक्षम पर्याय उभा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. राणे म्हणाले की, २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी मुंबई-कोकण जलवाहतुकीची संकल्पना मांडली होती. त्यांच्या मार्गदर्शनामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या असंख्य परवानग्या मिळवणे सुलभ झाले. आज ही सेवा प्रत्यक्ष सुरू झाल्यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती आणि पर्यटनवाढ निश्चितपणे साध्य होईल. कोकणच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न आदरणीय नारायण राणे साहेबांनी पाहिले आणि सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकणाला जगाच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे या प्रदेशाच्या प्रगतीला नवे आयाम मिळाले. आज मंत्री म्हणून त्यांच्या त्या स्वप्नपूर्तीत हातभार लावण्याची संधी मला लाभली, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, ही केवळ सुरुवात आहे; पुढील काळात कोकणाच्या विकासासाठी अजून अनेक उपक्रम राबवायचे आहेत आणि प्रगतीची नवी क्षितिजे गाठायची आहेत. आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. कामाच्या ओघात काही चुका झाल्या तर त्या मान्य करून सुधारण्याची आमची पूर्ण तयारी आहे. कोकणच्या जनतेने या उपक्रमाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केलेमुंबई-कोकण M2M रो-पॅक्स सेवेचा उद्घाटन सोहळा! भाऊचा धक्का, मुंबई | ०१-०३-२०२६@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mahamaritime1 @M2M_Ferries pic.twitter.com/9CihhaHcQu— Nitesh Rane (@NiteshNRane) March 1, 2026वेळापत्रकमुंबईहून दर बुधवारी आणि शनिवारी सकाळी ८.०० वाजता प्रस्थान होणार असून विजयदुर्गहून दर गुरुवारी आणि रविवारी दुपारी १२.०० वाजता फेरी सुटणार आहे.pic.twitter.com/ci8CbIKn8q— Nitesh Rane (@NiteshNRane) March 1, 2026तिकीट दर इकॉनॉमी – ३,००० रुपये प्रीमियम इकॉनॉमी – ५,००० रुपये बिझनेस – ७,००० रुपये फर्स्ट क्लास – ९,००० रुपयेवाहनांसाठी शुल्क (कार) एक्सएल – ९,००० रुपये एल – ८,००० रुपये एम – ७,००० रुपये एस – ६,००० रुपये दुचाकी – १,००० रुपये सायकल – ६०० रुपये
ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल, जमीन, दाखले व विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न थेट गावपातळीवर सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” टप्पा क्र. १ राबविण्यात येत आहे.
Election Announcement : होळीनंतर ‘या’निवडणुकांचे बिगुल वाजणार; संभाव्य तारखा आल्या समोर
तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि पुदुच्चेरी या पाच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये २०२६ मध्ये विधानसभा निवडणुका (Election Announcement) होणार आहेत.
एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; राज्यसभेसाठी ‘या’नेत्याचे नाव निश्चित?
Rajya Sabha election 2026: महाराष्ट्र राज्यसभा निवडणूक २०२६ साठी राष्ट्रवादीकडून पार्थ पवार तर शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांचे नाव निश्चित मानले जात आहे.
द. आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर ५ गडी राखून विजय
नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातील सुपर आठ फेरीत दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा ५ गडी राखून पराभव केला. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने आफ्रिकेच्या नाकीनऊ आणले होते, मात्र डेवाल्ड ब्रॅव्हिसची वादळी खेळी आणि जॉर्ज लिंडेचा संयम यांच्या जोरावर 'प्रोटीज'ने हा विजय साकारला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेची सुरुवात खराब झाली होती. केवळ ८७ धावांत ५ गडी गमावल्यानंतर कर्णधार सिकंदर रझाने डावाची सूत्रे हाती घेतली. रझाने अवघ्या ४३ चेंडूंत ७३ धावांची (८ चौकार, ४ षटकार) स्फोटक खेळी करत संघाला १५३ धावांपर्यंत पोहोचवले. आफ्रिकेकडून क्वेना माफाका आणि कॉर्बिन बॉश यांनी प्रत्येकी २ बळी टिपले.१५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची अवस्थाही १ बाद १ अशी बिकट झाली होती. मात्र, डेवाल्ड ब्रॅव्हिसने (४२ धावा, १८ चेंडू) मैदानात उतरताच षटकारांचा पाऊस पाडला. त्याने २३३ च्या स्ट्राईक रेटने धावा कुटत सामन्याचे पारडे आफ्रिकेच्या बाजूने झुकवले. मधल्या फळीत डेव्हिड मिलर (२२) आणि रायन रिकलटन (३१) यांनी साथ दिली. अखेरच्या टप्प्यात सिकंदर रझाने भेदक गोलंदाजी करत ३ बळी घेत सामन्यात रंगत निर्माण केली होती. मात्र, जॉर्ज लिंडेने (नाबाद ३०) आणि ट्रिस्टन स्टब्सने (नाबाद २१) कोणतीही अधिक पडझड होऊ न देता १७.५ षटकांतच विजय मिळवून दिला.संक्षिप्त धावफलक:झिम्बाब्वे: २० षटकांत १५३/७ (सिकंदर रझा ७३, क्लाइव्ह मदांडे २६*; क्वेना माफाका २/२१, कॉर्बिन बॉश २/४०)दक्षिण आफ्रिका: १७.५ षटकांत १५४/५ (डेवाल्ड ब्रॅव्हिस ४२, जॉर्ज लिंडे ३०*, रायन रिकलटन ३१; सिकंदर रझा ३/२९)निकाल: दक्षिण आफ्रिका ५ गडी राखून विजयी.महत्त्वाचे१. रझाचे अष्टपैलू प्रदर्शन: ७३ धावा आणि ३ बळी घेऊनही रझाला विजयाने हुलकावणी दिली.२. ब्रॅव्हिसचा इम्पॅक्ट: १८ चेंडूंतील ४२ धावांनी सामन्याचा निकाल बदलला.३. दक्षिण आफ्रिकेची विजयी घोडदौड: या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचे उपांत्य फेरीतील स्थान अधिक मजबूत झाले आहे.
ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून ठाणे जिल्ह्यातील २३ नागरिक सध्या दुबई येथे अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व नागरिक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यटनासाठी दुबईला गेले होते आणि नियोजित वेळेनुसार आज भारतात परतणार होते. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा रद्द झाल्याने त्यांचा परतीचा प्रवास अनिश्चित झाला आहे. अडकलेल्या प्रवाशांमध्ये कल्याण, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील नागरिकांचा समावेश असून २३ जणांपैकी १२ जण ज्येष्ठ नागरिक आहेत. परतीचा प्रवास असल्याने त्यांच्या जवळील आर्थिक तरतूद संपल्याची माहिती समोर येत आहे. हॉटेल खर्च आणि इतर आवश्यक खर्च भागविणे कठीण झाल्याने त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची विनंती केली आहे.हे सर्व नागरिक सध्या दुबईतील ए-१ फहादी स्ट्रीटवरील ‘ग्रँड अॅस्टोरिया’ हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याचे सांगण्यात येत आहे. अडकलेल्या रमेश धलपे यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालय यांच्याशी संपर्क साधून सुरक्षित परतीची मागणी केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर संदेश व्हायरल झाल्यानंतर शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी संबंधित कुटुंबांची माहिती घेण्यासाठी तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत. मात्र, या प्रकरणी नातेवाईकांनी अद्याप तहसील कार्यालय किंवा पोलिस प्रशासनाशी अधिकृत संपर्क साधलेला नसल्याचे समजते.सध्याच्या घडीला सर्व नागरिक सुरक्षित असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले असले, तरी परतीच्या प्रवासाबाबत अनिश्चितता कायम आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणावे, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक होणार असून महायुती ७ व्या जागेवर उमेदवार देऊन महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे.
Shirur News : शिरूरमध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेला ६ व्या दिवशी लाखोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली.
पुणे : पुण्यात लोणी काळभोर परिसरात मुळा-मुठा नदीपात्रात निमयित मोठ्या प्रमाणात कचरा टाकून तो जाळला जात आहे. या कचऱ्यामुळे विषारी धूर पसरला आणि पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून नदीपात्राजवळ असलेल्या एका कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक दिवसाची विशेष सुट्टी जाहीर केली. तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एमआयटी शैक्षणिक संकुलाने संकुलात शिकणाऱ्या २० हजार विद्यार्थ्यांना एक दिवसाची विशेष सुट्टी दिली.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाने नदीपात्रातील कचऱ्याला लावलेली आग नियंत्रणात आणली. नदीपात्रातल्या कचऱ्यात नेमके कोणते घटक होते हे जाणून घेण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने तपास सुरू आहे. नदीपात्रातील पाण्याचे आणि कचऱ्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.नदीपात्रात कचरा सतत टाकला जात असल्याने आग वारंवार भडकत असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले. या प्रकरणी तपासातून अधिक माहिती हाती येईल, असेही ते म्हणाले.
देशभरात राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. तथापि, अभिनेत्री एलनाज नोरोझी यांनी खामेनींच्या मृत्यूवर आनंद व्यक्त केला.
Accident News : होळीच्या आदल्या दिवशी भीषण अपघात ! 3 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
होळीच्या सणासाठी बाजारात खरेदी करण्यासाठी जात असताना तीन अल्पवयीन मुलांचा अपघातात (Accident News) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तेल्हारा शहराजवळील शेरी फाट्याजवळ दुचाकी आणि आयशर ट्रकच्या भीषण धडकेत माळेगाव येथील या तीन मुलांचा अंत झाला.
BJP Politics : राज्यसभा निवडणुकीआधी भाजपची मोठी चाल; मित्रपक्षाला थेट विलीनीकरणाचा प्रस्ताव
BJP Politics : बिहारमध्ये राज्यसभा निवडणुकीआधी भाजपने उपेंद्र कुशवाह यांच्या 'राष्ट्रीय लोकमोर्चा' पक्षाला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला आहे.
N. Rangaswamy : पुद्दुचेरीला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा; मुख्यमंत्र्यांनी मोदींना घातले साकडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुद्दुचेरीचा दौरा केला. त्यावेळी पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री एन.रंगासामी (N. Rangaswamy) यांनी त्यांना घातले.
SSC HSC Board Exam : इराण-इस्रायल युद्धाचा मोठा फटका; दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या!
SSC HSC Board Exam : इराण-इस्रायल युद्धामुळे CBSE ने आखाती देशांतील २ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
AFC Matches Postponed : खेळाडू आणि चाहत्यांच्या सुरक्षेचा विचार करून आशियाई फुटबॉल महासंघाने (AFC) या आठवड्यात होणारे सर्व महत्त्वाचे सामने तातडीने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांवर आणखी एक मोठी जबाबदारी; ‘या’मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या (PDEA) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
मध्य रेल्वेच्या १८ होळी विशेष गाड्यांची घोषणा
मुंबई : होळी सणाच्या निमित्ताने होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगांव/हटिया, लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगांव आणि पुणे - दानापूर दरम्यान १८ अतिरिक्त विशेष सेवा चालवणार आहे.(१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगांव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित विशेष - (४ सेवा)ट्रेन क्रमांक ०१०४९ विशेष दिनांक ०३.०३.२०२६ आणि ०६.०३.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.३० वाजता सुटेल आणि मडगांव येथे त्याच दिवशी दुपारी १३.३० वाजता पोहोचेल. (२ सेवा)ट्रेन क्रमांक ०१०५० विशेष दिनांक ०३.०३.२०२६ आणि ०६.०३.२०२६ रोजी मडगांव येथून १६.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०५.२० वाजता पोहोचेल. (२ सेवा)थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी.संरचना: १८ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी आणि २ जनरेटर व्हॅन.(२) लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगांव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष - (४ सेवा)ट्रेन क्रमांक ०१०४७ दिनांक २८.०२.२०२६ आणि ०७.०३.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२.१५ वाजता सुटेल आणि मडगांव येथे दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहोचेल. (२ सेवा)ट्रेन क्रमांक ०१०४८ दिनांक ०१.०३.२०२६ आणि ०८.०३.२०२६ रोजी १८.०० वाजता मडगाव येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०६.५० वाजता पोहोचेल. (२ सेवा)थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगांव रोड (फक्त 01047 साठी), कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी.संरचना: १ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ सामान्य द्वितीयसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.(३) लोकमान्य टिळक टर्मिनस - हटिया - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष- (४ सेवा)ट्रेन क्रमांक ०८६१० विशेष दिनांक ०४.०३.२०२६ आणि ११.०३.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ५.०० वाजता सुटेल आणि हटिया येथे दुसऱ्या दिवशी १८.०० वाजता पोहोचेल. (२ सेवा)ट्रेन क्रमांक ०८६०९ विशेष दिनांक ०२.०३.२०२६ आणि ०९.०३.२०२६ रोजी हटिया येथून १६.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ००.४० वाजता पोहोचेल. (२ सेवा)थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा आणि राउरकेला.संरचना: २ वातानुकूलित द्वितीय, ५ वातानुकूलित तृतीय, २ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ सामान्य द्वितीयसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.(४) पुणे - दानापूर - पुणे विशेष (६ सेवा)ट्रेन क्रमांक ०१४७९ विशेष दिनांक ०१.०३.२०२६, ०५.०३.२०२६ व ०९.०३.२०२६ रोजी पुणे येथून १९:५५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसऱ्या दिवशी ०८:०० वाजता पोहोचेल. (३ सेवा)ट्रेन क्रमांक ०१४८० विशेष दिनांक ०३.०३.२०२६, ०७.०३.२०२६ आणि ११.०३.२०२६ रोजी दानापूर येथून १०:०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १८:१५ वाजता पोहोचेल. (३ सेवा)थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगांव, मनमाड, जळगांव, भुसावळ, इटारसी, मदन महल, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.संरचना: १ वातानुकूलित प्रथम, १ वातानुकूलित द्वितीय, १ वातानुकूलित तृतीय, ११ शयनयान, ५ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीयसह गार्ड ब्रेक व्हॅन.आरक्षण:ट्रेन क्रमांक ०१०४७, ०१०४९ आणि ०१४७९ या विशेष गाड्यांसाठी बुकिंग सुरू आहे आणिट्रेन क्रमांक ०८६१० या विशेष गाडीसाठी बुकिंग दि. ०२.०३.२०२६ रोजीसर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.सामान्य शुल्कासह अनारक्षित डब्यांचे बुकिंग UTS प्रणालीद्वारे करता येईल.प्रवाशांनी तिकिटांचे बुकिंग करण्यासाठी RailOne ॲप डाउनलोड करावे.या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करावे.
Top 10 news : सुनेत्रा पवारांवर मोठी जबाबदारी, नागपूरमध्ये 16 जणांचा बळी ते इराणची सर्वात मोठी घोषणा...; वाचा आजच्या टॉप १० बातम्या
मध्य पूर्वेतील युद्धाने भीषण रूप धारण केले असून, इराण, इस्रायल आणि अमेरिका (Iran-Israel War) यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. अमेरिका आणि इस्रायल यांच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे.
हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची नोंद सरकारकडे अधिकृतपणे होत असते, मात्र उमरा या विधीसाठी जाणाऱ्यांची कोणतीही केंद्रीकृत नोंदणी होत नाही.
IND vs AUS : या मोठ्या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची ही वनडे मालिका ३-० अशी जिंकून भारताला 'व्हाईटवॉश' दिला आहे.
राज्यातील सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्धच्या अंतर्गत समित्यांचे एका महिन्याच्या आत ऑडिट करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
हा स्फोट इतका भयानक होता की, मृतदेह ओळखण्यापलीकडे जळाले आहेत आणि मृतांची ओळख पटविण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचे डीएनए चाचणीसाठी नमुने घेण्यात येत होते.
नागपूरच्या गनपावडर कारखान्यात स्फोट, १७ ठार
नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमधून होलिकोत्सवाच्या आदल्या दिवशी एक दुःखद बातमी आली आहे. नागपूर जिल्ह्यातील एसबीएल एनर्जी एक्सप्लोजिव्हज या गनपावडर तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आणि १८ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले.नागपूर दुर्घटनेप्रकरणी नियमानुसार पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये सानुग्रह मदत तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून केली आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील दुर्घटनेप्रकरणी नियमानुसार मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करून केली आहे. कंपनीकडूनही मृतांच्या वारसांना आणि जखमींना मदत दिली जाणार आहे.नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे एसबीएल एनर्जी एक्सप्लोजिव्हज या गनपावडर तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला. खाणकाम आणि औद्योगिक स्फोटके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला. घटना सकाळी सात ते सव्वासातच्या दरम्यान घडली. खाणकामासाठी तसेच विविध औद्योगिक कामासाठी कारखान्यात गनपावडरची निर्मिती सुरू होती. हे काम सुरू असताना दुर्घटना झाली. माहिती मिळताच जिल्हाधिकारी विपिन इटनकर आणि एसपी पोदार घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मदतकार्याचा आढावा घेतला.
इराणमध्ये जन्मलेली अभिनेत्री मंदाना करिमी या हल्ल्याच्या आगीत इराण बुडाल्याचे पाहून खूप दुःखी झाली आहे.
CSK New Jersey : अपेक्षेप्रमाणे, संघाने एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनीच्या संघात पुनरागमन झाल्याची पुष्टी करण्यात आली असून आयपीएल २०२६ च्या नव्या जर्सीची पहिली झलकही दाखवण्यात आली आहे.
Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांचा मोठा गौप्यस्फोट; विधानभवनातील फोडलं ‘ते’गुपीत
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी नुकत्याच नाशिकमध्ये आयोजित विश्व मराठी संमेलनात एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, कधीकधी विधानसभा किंवा विधान परिषदेचे सभागृह ठरवून तहकूब केले जाते.
BMC : मुंबईत शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन
मुंबई : जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित, महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा सन २०२५-२६ आज मुंबईत ५१ ठिकाणी पार पडली.स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी घाटकोपर (पूर्व) परिसरातील पंतनगर येथील आचार्य अत्रे मैदान येथे भेट दिली. महापौर तावडे यांनी हातात कुंचला घेत कॅनव्हासवर चित्र रेखाटले. माटुंगा येथील फाईव्ह गार्डन मध्ये शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.ग्रँट रोड ( पश्चिम ) येथील ऑगस्ट क्रांती मैदानात महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी भेट दिली. तसेच, वांद्रे परिसरातील एमआयजी क्लब येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.यावेळी उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे, सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू आदी उपस्थित होते.
Jammu and Kashmir : पाकिस्तानी ड्रोनच्या पुन्हा घिरट्या; लष्कराकडून जोरदार गोळीबार
गेल्या तीन दिवसांत सीमेपलीकडून ड्रोन हालचाली आढळल्यानंतर सैनिकांनी गोळीबार करण्याची ही दुसरी वेळ आहे.
IND vs WI : आज, १ मार्च (रविवार) रोजी कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज आमनेसामने येणार आहेत.
डोंगराळ भागात कट्टरतावादाला स्थान नाही, असे प्रतिपादन उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी केले आहे. चंपावत जिल्ह्यातील थुलीगड भागात प्रसिद्ध पूर्णगिरी मेळ्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
Naxalites : नक्षलवादी विकास उर्फ सुदर्शनचे आत्मसमर्पण; नऊ महिलांसह 15 जणांनी खाली ठेवली शस्त्रे
छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बालनगीर-बारगड-महासमुंद (बीबीएम) डिव्हिजन कमिटीशी संबंधित पंधरा माओवाद्यांनी काल रात्री उशिरा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
Maharashtra Politics : आता विधानसभा निवडणूक लढवणार नाही; भाजप आमदाराची मोठी घोषणा
Maharashtra Politics : जालन्यातील भाजपचे दिग्गज नेते बबनराव लोणीकर यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे.
Ali Khamenei Death: खमोनीच्या मृत्युमुळे जम्मू-काश्मीरमध्ये निदर्शने; शेकडो लोक उतरले रस्त्यावर
Ali Khamenei Death: अमेरिका-इस्रायली संयुक्त हल्ल्यात इराणी नेते खमेनी यांच्या मृत्युच्या बातमीनंतर रविवारी काश्मीरच्या अनेक भागात निदर्शने झाली. अधिकाऱ्यांच्या मते, शेकडो लोक रस्त्यावर उतरले, विशेषतः शिया बहुल भागात ही निदर्शने सर्वाधिक होती. एक निदर्शक म्हणाला, आज आमचे प्रिय नेते खमेनी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. निदर्शकांमध्ये खमेनींचे फोटो आणि इराणच्या समर्थनार्थ बॅनर, काळे झेंडे आणि […]
Nagpur Blast : नागपूर कारखाना स्फोट; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
नागपूर येथील कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला, आणि मृतांच्या कुटुंबीयांना भरपाईची घोषणा करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर लिहीले की, महाराष्ट्रातील नागपूर येथील कारखान्यात झालेला स्फोट अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या तीव्र संवेदना आहेत. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन बाधितांना मदत करत आहे.पीडितांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) कडून आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत दिली जाईल. घटनेत जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला अतिरिक्त ५०,००० मदत दिली जाणार आहे.महाराष्ट्रातील नागपूर येथील कारखान्यात झालेला स्फोट अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या तब्येतीत लवकर सुधार व्हावा, अशी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन प्रभावित नागरिकांना सर्वतोपरी मदत करत आहे.पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी… https://t.co/MKDMU9pGxS— PMO India (@PMOIndia) March 1, 2026नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या राहुळगांव स्थित एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात १५ जण ठार झाले. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनेला दुजोरा दिला असून जखमींचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे आज सकाळच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. बारुद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत हा मोठा स्फोट झाला. या भीषण स्फोटात आतापर्यंत या भीषण स्फोटत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर नागपुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. हल्ले-प्रतिहल्ल्यांमुळे अनेक देश सतर्क झाले असून या घडामोडींचा परिणाम दुबईवरही जाणवत आहे. काही प्रवासी दुबई विमानतळावर अडकले असल्याची माहिती समोर येत आहे.अशातच दुबईत असलेल्या एका भारतीय अभिनेत्याने सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. आपल्या घराजवळून आकाशात क्षेपणास्त्र झेपावत असल्याचा दावा त्याने केला आहे. स्फोटांच्या तीव्र आवाजामुळे संपूर्ण घर हादरल्याचे देखील त्याने सांगितले.हा अभिनेता म्हणजे तेलुगू चित्रपटसृष्टीतील स्टार Vishnu Manchu. कुटुंबाला भेटण्यासाठी तो सध्या दुबईत गेला आहे. त्याने पोस्टमध्ये नमूद केले की, आकाशात स्पष्टपणे मिसाईल्स दिसत होती आणि मोठ्या स्फोटांनी घर हलले. या घटनेमुळे त्याचे कुटुंब घाबरले असून लहान मुलगी आयराही भीतीने व्याकुळ झाल्याचे त्याने सांगितले.In Dubai visiting family tonight. Missiles visible in the sky. The loud interceptions shook our home and frightened little Ayra.Praying for peace. No child anywhere should grow up hearing the sound of war above their roof.Grateful to the UAE defense forces for keeping… pic.twitter.com/tCbE78eoBY— Vishnu Manchu (@iVishnuManchu) February 28, 2026आपल्या पोस्टमध्ये त्याने शांततेची प्रार्थना करत म्हटले की, “कोणत्याही मुलाला अशा परिस्थितीत वाढावे लागू नये, जिथे त्याला स्वतःच्या घराच्या छतावरून युद्धाचे आवाज ऐकावे लागतात.”दरम्यान, या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून दुबईतील परिस्थितीबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. यामुळे कल्की २ च्या शुटिंगला सुरूवात झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Shahabuddin Razvi: “त्यांनी जगाला विनाशाकडे ढकललं…” ; शहाबुद्दीन रझवी यांची ट्रम्पवर सडकून टीका
Shahabuddin Razvi: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्युची पुष्टी करणाऱ्या पोस्टमुळे राजकीय आणि धार्मिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अमेरिका - इराण युद्धाचा वर्ल्डकपवर परिणाम, आयसीसीची यंत्रणा लागली कामाला
नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात संयुक्तपणे हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. लढाई सुरू झाल्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली आहेत किंवा पुढे ढकलण्यात आली आहेत. विमानांच्या वेळापत्रकात झालेल्या या बदलामुळे अनेक विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. या घडामोडींचा परिणाम आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या आयोजनावरही दिसू लागला आहे.आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार आता सुपर आठ फेरीचे शेवटचे दोन सामने उरले आहेत. यातील पहिला सामना रविवारी १ मार्च रोजी दुपारी तीन वाजता झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तर दुसरा सामना याच दिवशी संध्याकाळी सात वाजता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. हे दोन्ही सामने भारतात आहेत. यानंतर ४ आणि ५ मार्च रोजी सेमी फायनल आणि ८ मार्च रोजी फायनल असे एकूण तीन सामने होणार आहेत. हे सामने पण भारतात होणार आहेत. यामुळे वर्ल्डकपशी संबंधित सर्व खेळाडू तसेच आयसीसीचे अधिकारी आणि कर्मचारी यांना आता भारतातच वेगवेगळ्या शहरांमध्ये विमानांतून प्रवास करायचा आहे. भारताबाहेर स्पर्धेचा आता एकही सामना खेळवला जाणार नाही.सुरू असलेल्या लढाईमुळे भारतातल्या देशांतर्गत विमान वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झालेला नाही. यामुळे वर्ल्डकपच्या आयोजनात कोणताही अडथळा येणार नाही. पण आव्हान संपलेल्या संघांना तसेच स्पर्धा संपल्यानंतर आयसीसीच्या अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांना आपापल्या देशात जाण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. ही शक्यता विचारात घेऊन आयसीसीने विविध आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांशी संपर्क साधला आहे. प्रवास सुरक्षितरित्या व्हावा यासाठी नियोजन केले आहे. आयसीसीने यासाठी एक ट्रॅव्हल सपोर्ट डेस्कही सक्रिय केला आहे. त्यामुळे खेळाडू तसेच आयसीसीचे अधिकारी - कर्मचारी यांची गैरसोय दूर केली जाईल.सुपर एट फेरीतले ग्रुप दोनचे सर्व सामने झाले आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन संघ सेमी फायनलसाठी पात्र झाले आहेत. ग्रुप एकमधून दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी पात्र झाली आहे. झिम्बाब्वे विरुद्धचा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेचा संघ धावगती सुधारण्यास उत्सुक आहे. तर भारत आणि वेस्ट इंडिज हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक आहे. विजेता संघ सेमी फायनल खेळणार आहे आणि हरणाऱ्याचे स्पर्धेतील आव्हान संपणार आहे. यामुळे या सामन्यात काय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.
Iran Israel War: इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी हे अमेरिका-इस्रायली हल्ल्यात मारले गेले आहेत. दरम्यान, इराणने त्यांच्या नवीन कमांडर-इन-चीफचे नाव जाहीर केले आहे.
Apple Pay : लवकरच भारतात होणार 'ऍपल पे'लाँच
जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी Apple Inc. भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रात मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘ऍपल पे’ (Apple Pay) ही सेवा भारतात लाँच होण्याची शक्यता असून, ब्लूमबर्गच्या ताज्या अहवालानुसार जून-जुलै २०२६ पर्यंत ती अधिकृतपणे सुरू होऊ शकते. भारतातील आयफोन वापरकर्त्यांसाठी ही मोठी बातमी मानली जात आहे.सध्या भारतातील डिजिटल पेमेंट बाजारात गुगल-पे, फोन-पे आणि पेटीएम यांसारख्या ऍप्सचं वर्चस्व आहे. मात्र ‘ऍपल पे ’ आयफोन आणि ऍपल वॉच वापरकर्त्यांसाठी अधिक सुरक्षित आणि गोपनीय पर्याय ठरू शकतो. ही सेवा ‘टोकनायझेशन’ तंत्रज्ञानावर आधारित असून व्यवहार करताना प्रत्यक्ष कार्ड क्रमांक शेअर केला जात नाही, त्यामुळे सुरक्षेची पातळी अधिक मजबूत राहते. एनएफसी तंत्रज्ञानाच्या मदतीनं ग्राहक दुकानांमध्ये ‘टॅप-टू-पे’ पद्धतीनं सहज व्यवहार करू शकतील. याशिवाय ऑनलाइन खरेदी आणि विविध ऍप्समधील पेमेंट्सही सुलभ होतील. फेस आयडी किंवा टच आयडीद्वारे प्रमाणीकरण केल्यामुळे गोपनीयता आणि सुरक्षिततेला अधिक बळ मिळणार आहे.भारतात सेवा सुरू करण्यासाठी ऍपलने आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि ऍक्सिस बँक यांसारख्या प्रमुख बँकांशी तसेच व्हिसा आणि मास्टरकार्ड या आंतरराष्ट्रीय कार्ड नेटवर्कशी चर्चा सुरू केली आहे. तसेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबतही प्राथमिक बोलणी सुरू असल्याची माहिती आहे.भारतीय नियमांनुसार डेटा लोकलायझेशन आणि यूपीआय एकत्रीकरण महत्त्वाचे असल्याने सुरुवातीला कार्ड-आधारित संपर्करहित पेमेंट्स सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर यूपीआय सेवा जोडली जाऊ शकते. भारतामध्ये डिजिटल व्यवहारांचा वेग झपाट्याने वाढत असताना ‘ऍपल पे’ची एन्ट्री स्पर्धा अधिक तीव्र करणार आहे. सेवा सुरू झाल्यास आयफोन वापरकर्त्यांना अधिक सुरक्षित, जलद आणि सुविधाजनक पेमेंट अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे.
The Kerala Story 2 Box Office : रिलीजच्या पहिल्या दिवशी सौम्य पण दुसऱ्या दिवशी चांगली कमाई केरल स्टोरी २ चित्रपटाने केली आहे.
Donald Trump on iran: “आम्ही असा हल्ला करू की…” ; खामेनींच्या मृत्यूनंतरही ट्रम्पच्या इराणला धमक्या
Donald Trump on iran: अमेरिका आणि इस्रायल इराणवर संयुक्त हल्ले करत आहेत आणि इराण प्रत्युत्तर देत आहे. काल रात्रीपासून तेहरानवर क्षेपणास्त्रांचा आणि बॉम्बचा वर्षाव अभूतपूर्व आहे.
Israel - Iran War : भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची इराण-इस्रायली समकक्षांशी फोनवरून चर्चा
-परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा कतारच्या पंतप्रधानांशीही फोनवरुन संवाद- पश्चिम आशिया प्रदेशातील परिस्थितीवर चर्चाअमेरिका - इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईनंतर मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जसीम अल थानी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. जयशंकर म्हणाले की, संभाषणादरम्यान त्यांना कतारमधील परिस्थितीची माहिती देण्यात आली आणि कतारच्या बाजूने भारतीय समुदायाच्या कल्याणाबाबत आश्वासन देण्यात आले.इराणमध्ये अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त लष्करी हल्ल्यांनंतर, या प्रदेशात तणाव वाढला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी त्यांचे इराणी समकक्ष सय्यद अब्बास अरघची आणि त्यांचे इस्रायली समकक्ष गिदोन सार यांच्याशी स्वतंत्रपणे फोनवरून चर्चा केली.जयशंकर यांनी अराघची यांच्याशी झालेल्या संभाषणात इराण आणि प्रदेशातील अलीकडील घडामोडींबद्दल भारताची तीव्र चिंता व्यक्त केली. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली. इराण आणि प्रदेशातील अलीकडील घडामोडींबद्दल भारताची तीव्र चिंता व्यक्त केली, असे परराष्ट्रमंत्र्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री सार यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल जयशंकर म्हणाले की, तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि राजनैतिक कूटनीति आवश्यक आहे या भारताच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, इराण आणि आखाती प्रदेशातील अलिकडच्या घडामोडींबद्दल भारताला खूप चिंता आहे. आम्ही सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे, तणाव वाढू नये आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन करतो, असे मंत्रालयाने म्हटले आहे. तणाव कमी करण्यासाठी आणि मुख्य समस्या सोडवण्यासाठी संवाद आणि राजनैतिक प्रयत्न केले पाहिजेत. सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे.
Pune: धक्कादायक! पुण्यात महिलेची गर्भाशयाची गाठ काढण्याऐवजी डॉक्टरांनी...
पुणे: पुण्यातील मांजरी परिसरातील एका खासगी रुग्णालयातून वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. गर्भाशयातील साधी गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करायला गेलेल्या एका ३५ वर्षीय महिलेचे डॉक्टरांनी तिची कोणतीही संमती नसताना थेट गर्भाशयच काढून टाकले. याप्रकरणी मांजरी पोलिसांनी साई केअर हॉस्पिटलमधील चार डॉक्टरांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.नेमकं घडलं काय?तक्रारदार महिलेच्या गर्भाशयात छोटी गाठ असल्याचे २०२३ मध्ये सोनोग्राफी अहवालात समोर आले होते. उपचारासाठी त्या १३ सप्टेंबर २०२५ रोजी मांजरीतील साई केअर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. डॉक्टरांनी त्यांना लेझर शस्त्रक्रियेद्वारे केवळ गाठ काढावी लागेल, असे आश्वासन दिले होते. १५ सप्टेंबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि १७ सप्टेंबरला त्यांना घरी सोडण्यात आले.तपासणीत धक्कादायक सत्य समोरशस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी महिलेला शारीरिक त्रास जाणवू लागला. त्या पुन्हा रुग्णालयात तपासणीसाठी गेल्या असता, डॉक्टरांनी गाठ काढण्याऐवजी संपूर्ण गर्भाशयच काढून टाकल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेपूर्वी महिलेने केवळ गाठ काढण्याची परवानगी दिली होती, गर्भाशय काढण्याबाबत कोणतीही संमती दिलेली नव्हती. याबाबत डॉक्टरांना जाब विचारला असता, त्यांनी कोणतीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.याप्रकरणी पीडितेने मांजरी पोलीस ठाण्यात पोलिसांनी डॉ. संदीप कराड, डॉ. मंदार साहुजी, डॉ. निहाल शेख, डॉ. शेहजाद शेख आणि सूरज कांबळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १२५ (ब) आणि ३ (५) अन्वये निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे.
Indian actor video : अभिनेत्री सोनल चौहान हिने पोस्टद्वारे मदतीची मागणी केल्यानंतर आता एका भारतीय अभिनेत्याने धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे.
Israel - Iran War : अली खामेनेई यांच्या मृत्युनंतर काश्मीरमधील लाल चौकात निदर्शने
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शिया समुदायातील लोकांनी अमेरिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. खामेनेई यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले असून त्यांनी कडक विरोध दर्शविला आहे. या वेळी आंदोलकांकडून अमेरिकेविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात येत आहे.हजारो लोकांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूविरोधात रोष व्यक्त केला आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरमधील लाल चौक येथे मोठी गर्दी जमली आहे. लाल चौक परिसरात पुरुष आणि युवक अली खामेनेई यांचे छायाचित्र हातात घेऊन दिसत आहेत. या वेळी आंदोलकांनी “रहबर तुझ्या रक्तातून क्रांती येईल”, “अमेरिका-इस्रायल मुर्दाबाद” अशा घोषणा देत आहेत. तसेच “जो अमेरिका समर्थक आहे, तो गद्दार आहे” असेही स्पष्टपणे सांगितले जात आहे. काश्मीरच्या विविध भागांत या घटनेबाबत संतापाची लाट उसळली असून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. मोठ्या संख्येने लोक घरे सोडून रस्त्यावर तसेच इमामबाड्यांमध्ये जमून आंदोलन करत आहेत.अधिकाऱ्यांनी सांगितले की शिया बहुल भागांत शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले. त्यांनी शांततेत मोर्चा काढत अमेरिका आणि इस्रायलविरोधी घोषणा दिल्या. अली खामेनेई यांच्या मृत्यूबाबत लोकांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे. दरम्यान इराणच्या सरकारी माध्यमांनी रविवारी (१ मार्च) सकाळी पुष्टी केली की इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे.शनिवारी (१ मार्च) इस्रायलने अमेरिकेसोबत मिळून इराणची राजधानी तेहरानवर प्रारंभीचा हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. इराणने सुमारे आठ देशांमध्ये प्रत्युत्तरात्मक कारवाई केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या कुटुंबावरही हल्ला झाल्याची माहिती समोर येत असून त्यात खामेनेई यांच्यासह अनेकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
US-Israel Iran Attack: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर पाकिस्तानातील कराचीमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली.
टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून ग्रुप ए मधील फक्त दोन सामने बाकी आहेत. यामध्ये एक सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे, तर दुसरा भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असा होणार आहे. पहिल्या सामन्याचा उपांत्य फेरीच्या समीकरणांवर फारसा परिणाम होणार नाही; मात्र भारत-वेस्ट इंडिज हा सामना एका अर्थाने ‘क्वार्टर फायनल’ ठरणार आहे.भारत वेस्टइंडीज सामना १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता कोलकाता येथील ईडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. सुपर ८ फेरीत दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे गुणतालिकेत दोघांचेही प्रत्येकी दोन गुण आहेत. हा सामना जिंकणारा संघ चार गुणांसह थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. पण जर पावसामुळे हा सामना रद्द झाला, तर दोन्ही संघाला प्रत्येकी १ गुण मिळेल. अशावेळी दोन्ही संघाचे तीन गुण होतील. त्यानंतर रनरेटनुसार एक संघ उपांत्य फेरीत पोहोचेल.वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :ब्रँडन किंग, शाई होप (यष्टिरक्षक/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रुदरफोर्ड, रोस्टन चेस/अकील हुसेन, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती आणि शमार जोसेफ.भारताचा संपूर्ण संघ :सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ :बॅंडन किंग, शाई होप (यष्टीरक्षक/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रुदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, अकिल हुसेन, गुडाकेश मोटी, शमर जोसेफ, क्वेंटिन सॅम्पसन, जेडेन सील्स, रोस्टन चेस आणि जॉन्सन चार्ल्स.
LPG Price: एलपीजी सिलिंडर महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन किमती
मुंबई: देशातील सर्व तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. गॅस सिलिंडरच्या किमती २८ रुपयांनी वाढवून ३१ रुपये करण्यात आल्या आहेत, नवीन किमती देखील आजपासून म्हणजेच १ मार्चपासून लागू झाल्या आहेत. तथापि, ही वाढ फक्त १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरवर झाली आहे. घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत १७४०.५० रुपयांवरून १७६८.५० रुपये झाली आहे.रेस्टॉरंट, हॉटेल, ढाबा चालकांना धक्कादिल्ली व्यतिरिक्त, कोलकातामध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आजपासून १८७५.५० रुपये झाली आहे, जी पूर्वी १८४४.५० रुपये होती. मुंबईत त्याची किंमत १६९२.०० रुपयांवरून १७२०.५० रुपये आणि चेन्नईमध्ये १८९९.५० रुपयांवरून १९२९.०० रुपये झाली आहे. तेल विपणन कंपन्यांचा हा निर्णय देशातील सर्व रेस्टॉरंट, हॉटेल आणि ढाबा चालकांसाठी मोठा धक्का आहे. होळीच्या सणाला आता फक्त २ दिवस उरले आहेत, अशा परिस्थितीत गॅसच्या किमती वाढल्याने रेस्टॉरंट, हॉटेल आणि ढाबा चालकांचा खर्च वाढेल. मात्र, सामान्य लोकांना जुन्या किमतीतच गॅस मिळेल.घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल नाहीघरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत ८५३.०० रुपये, कोलकातामध्ये ८७९.०० रुपये, मुंबईत ८५२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८६८.५० रुपये आहे. याशिवाय, पीएनजी म्हणजेच पाईपद्वारे थेट स्वयंपाकघरात पोहोचणाऱ्या गॅसच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पीएनजीची सध्याची किरकोळ किंमत प्रति एससीएम ४८.५९ रुपये, नोएडामध्ये प्रति एससीएम ४८.४६ रुपये, गुरुग्राममध्ये प्रति एससीएम ४७.४० रुपये, कानपूरमध्ये प्रति एससीएम ४९.९५ रुपये आणि अजमेरमध्ये प्रति एससीएम ५०.२७ रुपये आहे.
Mamta Kulkarni : ममता कुलकर्णीचे 25 वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक; ‘या’कॉमेडी शोमध्ये करणार काम
Mamta Kulkarni : अभिनेत्री ममता कुलकर्णी मध्यंतरी सिनेसृष्टीपासून दूर गेली होती. त्यानंतर तिने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. तिने महाकुंभ वेळी किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पद स्विकारले होते. यावरून वादही निर्माण झाले होते. मात्र 90 च्या दशकातील गाजलेली ममता कुलकर्णी जवळपास 25 वर्षांनंतर कॅमेऱ्यासमोर दिसली. मोठ्या ब्रेकनंतर एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये तिची उपस्थिती ही प्रेक्षकांसाठी एक धक्का […]
एका मोठ्या युद्धाच्या मध्यभागी, इराणमधील सत्तेचे सर्वात शक्तिशाली पद आता रिक्त आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेले आहेत. नवीन सर्वोच्च नेता कसा निवडला जाईल, अमेरिका-इस्रायलचे पुढील पाऊल काय असेल आणि इराणमध्ये सत्ता परिवर्तन खरोखरच शक्य आहे का; दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये अशा 5 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे… प्रश्न-1: इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या हत्येची पुष्टी कशी झाली? उत्तरः 28 फेब्रुवारी 2026 च्या सकाळी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले सुरू केले. या हल्ल्यांचे सांकेतिक नाव 'ऑपरेशन एपिक फ्युरी' असे सांगण्यात आले आहे. खामेनी यांच्यासह 30 मोठे इराणी नेते लक्ष्यावर होते. हल्ल्याच्या वेळी खामेनी तेहरानमधील त्यांच्या कार्यालयात उपस्थित होते. इराणी सरकारी माध्यमांनुसार, हल्ला झाला तेव्हा खामेनी त्यांची कर्तव्ये पार पाडत होते. इस्रायली उपग्रह प्रतिमांमध्ये कॅम्पस पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला दिसला. ढिगाऱ्याखाली कोणीही जिवंत वाचल्याचे संकेत मिळाले नाहीत. इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी शनिवारी रात्री सांगितले की, खामेनी मारले गेल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ट्रुथ सोशलवर पोस्ट करून खामेनी मारले गेल्याची पुष्टी केली. काही तासांनंतर इराणी सरकारी माध्यमांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. त्यांना 'शहीद' म्हटले गेले आणि इराणच्या स्टेट टीव्हीवर अँकर रडत बातमी वाचत होत्या. इराणने 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक आणि 7 दिवसांची सुट्टी जाहीर केली. प्रश्न-2: खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता इराणचा नवा सर्वोच्च नेता कोण बनेल? उत्तर: इराणमध्ये सर्वोच्च नेत्याचा कोणताही थेट उत्तराधिकारी निश्चित नसतो. इराणच्या संविधानानुसार, 88 शिया धर्मगुरूंनी बनलेली ‘असेंबली ऑफ एक्सपर्ट्स’ ही संस्था सर्वोच्च नेत्याची निवड करते. अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर हीच समिती सर्वोच्च नेत्याची निवड करेल. अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वीपासूनच खामेनी त्यांच्या मृत्यूच्या स्थितीत सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेची तयारी करत होते. त्यांनी देश चालवण्याची जबाबदारी त्यांच्या सर्वात जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक असलेल्या अली लारीजानी यांच्याकडे सोपवली होती, जे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख आहेत. त्यांनी राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांनाही बाजूला सारले आहे. अली खामेनी मृत्यूपूर्वी वारसासाठी 3 नावांवर चर्चा करत होते… गुलाम-हुसैन मोहसेनी: ते 2021 पासून इराणचे मुख्य न्यायाधीश आहेत. त्यांना अयातुल्ला खामेनी यांनीच नियुक्त केले होते. इराणमध्ये मोहसेनी यांची प्रतिमा कठोर आणि कट्टर नेत्याची आहे. मानवाधिकार प्रकरणांमुळे अमेरिका आणि युरोपने त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत. असगर हेजाजी: अयातुल्ला खामेनी यांचे सर्वात जवळचे सहकारी आणि चीफ ऑफ स्टाफ आहेत. ते सुरक्षा आणि गुप्तचर प्रकरणांमधील मोठे अधिकारी मानले जातात. त्यांना पडद्यामागून काम करणारी शक्तिशाली व्यक्ती म्हटले जाते. इस्रायलने दावा केला आहे की 28 फेब्रुवारीच्या हल्ल्यांमध्ये हेजाजी यांचा मृत्यू झाला आहे. हसन खामेनी: अयातुल्ला खामेनी यांचे नातू आणि एक शिया धर्मगुरू आहेत. यांच्या व्यतिरिक्त, अयातुल्ला खामेनी यांचे पुत्र मोजतबा यांनाही इराणमधील अनेक गट सुप्रीम लीडर बनवू इच्छितात, परंतु खामेनी यांनी त्यांना सांगितले होते की त्यांना सुप्रीम लीडर बनवण्यात वंशवाद आणायचा नाही. मृत्यूआधी खामेनी यांनी त्यांच्या राजकीय आणि लष्करी सहकाऱ्यांचा एक गट तयार केला होता. खामेनी यांच्या मृत्यूच्या किंवा त्यांच्याशी संपर्क साधता न आल्याच्या स्थितीत निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता. यामध्ये खामेनी यांचे चीफ ऑफ स्टाफ देखील होते, ज्यांचे निधन झाले आहे. याशिवाय, या गटात संसदेचे अध्यक्ष आणि रिव्होल्यूशनरी गार्ड्स कोरचे माजी कमांडर ब्रिगेडियर जनरल मोहम्मद बागेर गालिबफ आणि त्यांचे शीर्ष लष्करी सल्लागार, गार्ड्सचे माजी कमांडर-इन-चीफ जनरल याह्या रहीम सफावी यांचा समावेश आहे. प्रश्न-३: इराणची इस्लामिक सत्ता आता पुढे काय करू शकते? उत्तर: अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता इराणमध्ये पुढे ३ शक्यता दिसत आहेत… तात्पुरते नेतृत्व नवीन सर्वोच्च नेत्याची निवड हल्ले करून युद्ध लांबवण्याचा प्रयत्न प्रश्न-४: अमेरिका-इस्त्रायलचे पुढील पाऊल काय असेल? उत्तर: अमेरिका आणि इस्त्रायल आता ३ गोष्टींवर लक्ष केंद्रित करतील… नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न सत्ता परिवर्तनाचा प्रयत्न प्रॉक्सी गटांना कमकुवत करेल जर इराणची केंद्रीय इस्लामिक सत्ता विस्कळीत झाली, तर अराजकता, गटबाजीचा संघर्ष आणि गृहयुद्ध सुरू होऊ शकते. निर्वासित संकट निर्माण होऊ शकते. किंवा मग इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डचे कट्टर नेते सत्ता हाती घेऊ शकतात. म्हणजे चेहरा बदलेल, पण धोरण नाही. जर अमेरिकेचे हे ऑपरेशन अपूर्ण राहिले, तर त्याचा परिणाम काही महिन्यांनंतर किंवा वर्षांनंतर दिसू शकतो. प्रश्न-५: ट्रम्प ज्या सत्ता परिवर्तनाची चर्चा करत आहेत, ते कसे होईल? उत्तरः ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याची सुरुवात जाहीर करताना इराणी सैन्याला शस्त्रे खाली ठेवण्याचे आणि इराणी जनतेला सरकारची सूत्रे आपल्या हातात घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, व्यावहारिकदृष्ट्या या संदेशाला काही अर्थ नाही. ट्रम्प यांनी हे सांगितले नाही की इराणी सैनिकांनी कोणासमोर शरणागती पत्करायची आहे आणि इराणी लोक इराणच्या जटिल शासनव्यवस्था, सैन्य आणि सरकारी संरचनेवर नियंत्रण कसे मिळवतील. ओबामा आणि बायडेन यांच्या काळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे वरिष्ठ अधिकारी राहिलेले फिलिप एच. गॉर्डन म्हणतात, 'असे नाही की इराणमध्ये अमेरिकन सैनिक उपस्थित आहेत आणि इराणी सैनिक त्यांच्यासमोर शस्त्रे खाली ठेवू शकतात. इराणची लोकसंख्या 9 कोटी आहे.' खरं तर, इराणमध्ये कोणताही मजबूत विरोधी पक्ष नाही, ज्याच्या नेतृत्वाखाली लोक एकत्र येऊन सत्ता परिवर्तनासाठी उभे राहू शकतील. महागाईविरोधी निदर्शनांदरम्यानही आंदोलकांकडे कोणतेही नेतृत्व नव्हते. इराणमधील आंदोलक इराणचे शेवटचे शाह आणि अमेरिका तसेच पाश्चात्त्य देशांचे जवळचे असलेले मुहम्मद रझा यांचा मुलगा रझा पहलवी यांच्या इराणमध्ये परत येण्याची मागणी करत होते. अमेरिकेत निर्वासित जीवन जगत असलेल्या रझा पहलवीनेही आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तो स्वतःला इराणमध्ये सत्ता सांभाळण्यासाठी एक पर्याय म्हणून तयार करत आहे. रझाला डिसेंबरमध्ये ट्रम्प यांना भेटायचे होते, पण ट्रम्प म्हणाले होते की, अजून याची योग्य वेळ नाही. खामेनींच्या मृत्यूनंतर रझाने X वर एका पोस्टमध्ये लिहिले आहे, 'खामेनींच्या मृत्यूनंतर इस्लामिक राजवट खऱ्या अर्थाने संपली आहे.' मात्र, अमेरिका रझा पहलवीला पुढे करेल असे कोणतेही संकेत अजून तरी नाहीत. इराणमध्ये एक मोठा वर्ग अजूनही खामेनींचा समर्थक आहे. मागील युद्धांमध्ये अमेरिका व्हॉईस ऑफ अमेरिका (Voice of America) आणि रेडिओ फ्री युरोप (Radio Free Europe) यांसारख्या सरकारी माध्यम संस्थांद्वारे शत्रू देशांमध्ये सतत आपले संदेश देत असे. ट्रम्प प्रशासनाने याच संस्थांच्या निधीमध्ये आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात केली आहे. व्हीओए (VOA) च्या 1,400 कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 'रेडिओ फ्री युरोप' (Radio Free Europe) म्हणजेच आर.एफ.ई. (RFE) आपल्या फारसी माध्यम आउटलेट 'रेडिओ फर्दा' (Radio Farda) द्वारे इराणमध्ये रेडिओवर संदेश प्रसारित करत असे. हे प्रसारणही अनेक महिने बाधित राहिले आहे. जाणकार म्हणतात की ट्रम्प प्रशासनाने आपली सर्वात धारदार साधने स्वतःच कमकुवत केली आहेत. मात्र, आता ती पुन्हा वापरात आणली जातील. रेडिओ फ्री युरोपचे अध्यक्ष स्टीव्ह कॅपस म्हणाले, ‘फर्दा याच वेळेसाठी बनवले आहे. आम्ही इराणच्या लोकांना वेळेवर योग्य माहिती देऊन त्यांचा आवाज बुलंद करू. आम्ही प्रभावीपणे प्रसारण सुरू करण्यासाठी काम करत आहोत. VOA ने देखील इराणवरील हल्ल्याच्या लगेच नंतर ट्रम्प यांच्या भाषणाचे फारसीमध्ये भाषांतर करून ट्रम्प यांच्या ट्रुथ सोशल मीडिया अकाउंटवर टाकले. हल्ल्यांदरम्यान थेट प्रक्षेपण केले आणि इराणी सैनिकांना ट्रम्प यांचा संदेश दिला. मात्र, इराणसारख्या मोठ्या देशात सत्ता परिवर्तन किंवा कब्जा करण्यासाठी जमिनीवरील सैनिकांची गरज असते. गॉर्डन यांच्या मते, ट्रम्प यांच्या अस्पष्ट संदेशांदरम्यान अमेरिकेसाठी धोका हा आहे की, जमिनीवरील सैनिकांशिवाय सुरक्षेचा एक मोठा धोका निर्माण होईल आणि यात अनेक शक्ती सामील होतील.

24 C