Republic day parade: यंदा कर्तव्यपथावर अवतरणार गणपती बाप्पा
नवी दिल्ली : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर यंदा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख ठळकपणे दिसणार आहे. यावेळी महाराष्ट्राच्या वतीने सादर होणारा चित्ररथ गणेशोत्सवाच्या परंपरेवर आधारित असून, या उत्सवातून उभ्या राहणाऱ्या आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेवर भर देण्यात आला आहे.महाराष्ट्राच्या चित्ररथाची यंदाची संकल्पना ‘गणेशोत्सव आणि स्वावलंबन’ अशी असून, सार्वजनिक गणेशोत्सवाने समाजाला एकत्र आणण्याबरोबरच स्थानिक रोजगारनिर्मितीला कसा हातभार लावला आहे, याचे दर्शन घडवले जाणार आहे. या चित्ररथामध्ये मूर्तिकार, सजावट करणारे कलाकार, ढोल-ताशा पथके आणि विविध पारंपरिक घटक दाखवले जाणार आहेत.लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विचारांची आधुनिक रूपरेषा या सादरीकरणातून मांडली जाणार आहे. सांस्कृतिक एकात्मता आणि आर्थिक स्वावलंबनाचा संदेश एकाच मंचावरून देशभरात पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्ररथातून करण्यात आला आहे.दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्ररथ सादर करणाऱ्या महाराष्ट्राने यापूर्वीही अनेक वेळा विशेष दखल घेतली आहे. मागील वर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ गड-किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर केंद्रित होता. यंदा मात्र उत्सव, परंपरा आणि रोजगार यांची सांगड घालणारी मांडणी पाहायला मिळणार आहे. कर्तव्यपथावर सादर होणारा हा चित्ररथ प्रेक्षकांसाठी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची आणि सामाजिक ताकदीची झलक ठरणार आहे.
अखेर ठरले! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार
मुंबई : महानगरपालिकांमधील सत्तासंघर्ष, मित्रपक्षांतील कुरघोड्या आणि पडद्यामागील राजकीय हालचालींनंतर अखेर महायुतीच्या दोन्ही पक्षांनी आपापल्या तलवारी म्यान करत एकत्र सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाणे या तिन्ही महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये दोन्ही पक्ष मिळून महापौर बसवतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर यावर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.
Abhishek Sharma World Record T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माने इतिहास रचला. नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसं काढत अभिषेकने केवळ २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक असा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे, जो आजवर जगातील कोणत्याही फलंदाजाला जमला नव्हता. […] The post Abhishek Sharma : अभिषेकचा वर्ल्ड रेकॉर्ड! भल्याभल्या दिग्गजांना जे जमलं नाही, ते या २३ वर्षीय खेळाडूने करून दाखवलं appeared first on Dainik Prabhat .
Goa Government : गोवा सरकारचे मोठे पाऊल ! स्टारलिंकसोबत केला सामंजस्य करार
पणजी : गोव्यात डिजिटल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, गोवा सरकारने बुधवारी एलोन मस्क यांच्या मालकीच्या स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला. या भागीदारीअंतर्गत, मर्यादित किंवा अजिबात स्थलीय नेटवर्क कव्हरेज नसलेल्या निवडक भागांमध्ये हाय-स्पीड सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा पुरवण्यावर भर दिला जाणार आहे. यामध्ये सरकारी शाळा, आरोग्य सेवा केंद्रे आणि आपत्ती […] The post Goa Government : गोवा सरकारचे मोठे पाऊल ! स्टारलिंकसोबत केला सामंजस्य करार appeared first on Dainik Prabhat .
Sunita Williams : चंद्रावर जाण्यापूर्वी पतीचा अडथळा? सुनीता विल्यम्स
नवी दिल्ली : जगात सध्या अंतराळ शर्यत सुरू आहे. अनेक देश चंद्र आणि अवकाशात प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहेत. ध्येय फक्त प्रथम पोहोचणे नाही, तर मानवांनी सुरक्षित, शाश्वत आणि शाश्वत मार्गाने चंद्रावर पोहोचावे याची खात्री करणे आहे. मला चंद्रावर जायचे आहे, पण माझे पती मला परवानगी देत नाहीत. घरी परतण्याची आणि जबाबदारी सोपवण्याची वेळ आली […] The post Sunita Williams : चंद्रावर जाण्यापूर्वी पतीचा अडथळा? सुनीता विल्यम्स appeared first on Dainik Prabhat .
Suryakumar Yadav 9000 runs complete in T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला असला तरी, त्याने टी-२० क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक मैलाचा दगड गाठला आहे. नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळताना सूर्याने टी-२० फॉरमॅटमध्ये आपल्या ९,००० धावा पूर्ण केल्या आहेत. सूर्याचा धमाका; मोडला मोठा रेकॉर्ड भारतीय संघाने […] The post Suryakumar Yadav : सूर्याची बॅट तळपली, पण रेकॉर्डने वेधले लक्ष! रोहित-कोहली नंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरला चौथा भारतीय appeared first on Dainik Prabhat .
Donald Trump : डेन्मार्कला ग्रीनलँड परत देणे हा अमेरिकेचा मूर्खपणा होता; डोनाल्ड ट्रम्प यांची टीका
दावोस (स्वीत्झर्लंड) : दावोसमधील जागतिक आर्थिक मंचावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ग्रीनलँडबाबतच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. डेन्मार्कला कृतघ्न संबोधून दुसऱ्या महायुद्धानंतर ग्रीनलँड डेन्मार्कला परत देणे हा अमेरिकेचा मूर्खपणा होता, असे ट्रम्प म्हणाले. आम्ही डेन्मार्कसाठीच ग्रीनलँडमधअये तळ उभा केला. आम्ही डेन्मार्कसाठी लढलो. आम्हीच ग्रीनलँड वाचवले. शत्रूना ग्रीनलँडमध्ये पाय रोवण्यापासून आम्हीच रोखले. महायुद्धानंतर ग्रीनलँड डेन्मार्कला […] The post Donald Trump : डेन्मार्कला ग्रीनलँड परत देणे हा अमेरिकेचा मूर्खपणा होता; डोनाल्ड ट्रम्प यांची टीका appeared first on Dainik Prabhat .
Indian Air Force crash : हवाईदलाचे ट्रेनी विमान कोसळले; जलपर्णीमुळे विमानासह पायलट वाचले
प्रयागराज – उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये आज दुपारी भारतीय हवाईदलाचे एक प्रशिक्षण विमान कोसळून अपघात झाला. हे विमान शहरानजीक असलेल्या केपी कॉलेजमागील एका जलपर्णीने भरलेल्या तलावात कोसळले. वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे दाट लोकवस्तीच्या भागात कोसळण्याऐवजी विमान तलावात पडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाचे संतुलन बिघडले. विमानाचे इंजिन निकामी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रॉकेटसारखा मोठा […] The post Indian Air Force crash : हवाईदलाचे ट्रेनी विमान कोसळले; जलपर्णीमुळे विमानासह पायलट वाचले appeared first on Dainik Prabhat .
दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू
मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ५.३ किलोमीटर लांबीच्या, तिहेरी मार्गिका असलेल्या जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पासाठी भूमिगत जुळ्या बोगद्यांचे बांधकाम करण्याकरिता दोन अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्रे वापरण्यात येणार आहेत. त्यापैकी एका बोगदा खनन संयंत्राचे सर्व घटक भाग उपलब्ध असून दुस-या बोगदा खनन संयंत्राचे उर्वरित घटक भाग गुरूवारी २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री कार्यस्थळी दाखल हाेणार आहेत.खोदकामाच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण करून दिनांक १० मार्च २०२६ पर्यंत बोगदा खनन संयंत्र ‘शाफ्ट’मध्ये उतरविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर जून २०२६ पासून प्रत्यक्ष बोगदा खोदकामास सुरुवात केली जाईल. जोड रस्ता प्रकल्पाची कामे निर्धारित कालमर्यादेतच पूर्ण व्हावीत यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. कामाचा वेग व गुणवत्ता कायम राखावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प हा एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. टप्पा ३ (ब) मध्ये गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे ५.३ किलोमीटर लांबीच्या, तिहेरी मार्गिका असलेल्या बोगद्यासाठी लॉन्चिंग शाफ्ट उत्खनन जलद गतीने सुरू आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी २१ जानेवारी २०२६ रोजी या कामाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. त्यावेळी त्यांनी विविध निर्देश दिले. महानगरपालिका अभियंते, सल्लागार यावेळी उपस्थित होते.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) बांगर यांनी दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरातील 'लॉन्चिंग शाफ्ट' चे खोदकाम सुरू असलेल्या कार्यस्थळास भेट दिली. या शाफ्टचे एकूण आकारमान अंदाजे २०० मीटर लांब, ५० मीटर रुंद आणि ३० मीटर खोल आहे. खोदकाम खोलवर सुरू असून बाजूच्या भिंती खचू नयेत म्हणून 'रॉक ऍंकरिंग' करण्यात आले आहे. आतापर्यंत २०० मीटर लांब, ५० मीटर रुंद आणि २३ मीटर खोलीपर्यंतचे खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित ७ मीटरपर्यंत खोदकाम पूर्ण करून बोगदा खनन संयंत्र कार्यान्वित करण्याकामीचा साचा बनविण्याची कार्यवाही विनाविलंब करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले. सध्या दररोज खोदकामातून साधारणत: १४०० ते १५०० क्युबिक मीटर दगड व माती बाहेर पडत आहे. दररोज १२० वाहनांद्वारे त्याचे वहन केले जाते. निर्धारित कालमर्यादेत खोदकाम पूर्ण करण्यासाठी कामाची गती वाढवावी, असेही निर्देश बांगर यांनी दिले आहेत.गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग हा मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा नवीन प्रमुख जोडरस्ता आहे. विशेषत: उत्तर मुंबईतील वाहतुकीस मोठा फायदा होणार असून वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. जोगेश्वरी - विक्रोळी जोड रस्त्याच्या तुलनेत या नवीन जोडरस्त्यामुळे प्रवासाचे अंतर सुमारे ८.८० किलोमीटरने कमी होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांची प्रवास वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. तसेच, कार्बन उत्सर्जनात घट होणार आहे.
मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पात महानगरपालिकेचे अधिकारी आणि अभियंत्यांचा मोलाचा वाटा आहे. या अधिकारी आणि अभियंत्यांना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते बुधवारी २१ जानेवारी २०२५ रोजी प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) (अतिरिक्त पदभार) मंतय्या स्वामी, सहायक आयुक्त शंकर भोसले आदींसह मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे अभियंते उपस्थित होते.शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सदर रस्ता टप्याटप्याने १२ मार्च २०२४ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तसेच १५ ऑगस्ट २०२५ पासून सर्व मार्गिका पूर्णवेळ खुल्या करण्यात आल्या आहेत.मुंबईसारख्या गतिमान शहरातील प्रवासाचा कालावधी कमी करणे, इंधनाची बचत साधणे तसेच वायूप्रदूषणात घट घडविणे असा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून शहरातील वाहतुकीची गती व एकूणच शहरी गतिशीलता आणखी सुधारण्याचे लक्ष्य साध्य करण्यात आले.हा प्रकल्प हा मुंबई महानगरपालिकेचा प्रतिष्ठित, महत्त्वाकांक्षी आणि बहुविध घटकांचा समावेश असलेला पायाभूत सुविधा उपक्रम आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकारी व अभियंते यांनी प्रकल्पाच्या नियोजन, अभिकल्पना, समन्वय आणि बांधकाम या सर्व टप्प्यांमध्ये प्रदर्शित केलेल्या तांत्रिक कौशल्य, अभिनव अभियांत्रिकी उपाययोजना आणि अखंड कार्यनिष्ठा यांचे फलित म्हणजे हा प्रकल्प आहे.वरील प्रकल्पाशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान प्रदर्शित केलेली कार्यनिष्ठा, जबाबदारीची जाणीव आणि उत्कृष्ट समन्वय लक्षात घेता महानगरपालिका आयुक्तांनी सर्व अभियंत्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.यावेळी चंद्रकांत कदम, भूपेंद्र राठोड, ऋषिकेश पाटील, अर्चना रामगिरी, डॉ. विशाल ठोंबरे, संदीप चौरे, प्रशांत जगताप, विजय जोरे, प्रणव जगदाळे, श्री. अमित सिंग, निखिल मालुंजकर, नितेश चौधरी, आशीष फुलझेले, जयेश फंदाडे, प्रणाली भोसले आदी उपस्थित होते.
आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा
सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदावोस : महाराष्ट्राने आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून यशोगाथा रचली आहे, असे नमूद करून या वर्षाच्या अखेर पर्यंत १६ गिगा वॅट वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.वर्ल्ड ईकॉनॉमीक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने इंडिया पॅव्हेलियनमध्ये इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या वतीने आयोजित ‘स्केलिंग सोलर एनर्जी व्हेअर इट मॅटर’ या विषयावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मांडणी केली. यावेळी केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी रूफटॉप सोलर, सौर पंप, अब्जावधींची वीजखर्च बचत, कार्बन उत्सर्जनात मोठी घट, तसेच सौरऊर्जा, बॅटरी स्टोरेज आणि पंप स्टोरेजद्वारे भविष्यात राज्य व राष्ट्रीय वीज ग्रीड स्थिर करण्याच्या योजनांची माहिती दिली.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राने अवघ्या दशकापेक्षा कमी काळात संपूर्ण ऊर्जा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. महाराष्ट्रातील वीज ग्राहकांमध्ये १० टक्के हे कृषि पंपधारक आहेत. जे एकूण विजेच्या ३०% वीज वापरत होते. त्यांना वीज पुरवठा करण्याचा खर्च प्रति युनिट ८ रुपये होता, तर त्यांच्याकडून फक्त १ रुपया आकारला जात असे. उर्वरित ७ रुपये राज्याकडून किंवा 'क्रॉस सबसिडी'च्या स्वरूपात दिले जात होते, ज्यामुळे औद्योगिक आणि इतर ग्राहकांसाठीच्या विजेच्या दराचा भार वाढत होता. हे एक दुष्टचक्र होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीने आम्ही शेतीचा संपूर्ण वीज भार सौर ऊर्जेवर हलवण्याचा निर्णय घेतला. आशियातील सर्वात मोठी 'विकेंद्रित सौर ऊर्जा योजना' सुरू केली. याद्वारे प्रत्येक कृषी फिडर स्वतंत्रपणे सौरऊर्जेवर आणला गेला. शेतकऱ्यांना वीज पुरवण्यासाठी आम्ही स्वतंत्र कंपनी स्थापन केली. आता या वितरण प्रणालीद्वारे सुमारे १६ गिगावॅट वीज निर्माण केली जाईल आणि या वर्षाच्या अखेरीस आम्ही हा प्रकल्प पूर्ण करू. हे काम प्रगतीपथावर आहे. आम्ही दरमहा सुमारे ५०० मेगावॅट समर्पित करत आहोत आणि लवकरच १ गिगावॅट वीज निर्मिती पर्यंत पोहोचू. या दरम्यान, शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याचा जो खर्च ८ रुपये होता, तो आता ३ रुपयांपेक्षा कमी झाला आहे. यामुळे उद्योग आणि घरगुती ग्राहकांवरील खर्चाचा बोजा कमी झाला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.महाराष्ट्रात 'पीएम सूर्य घर योजना' उत्तमरित्या राबविली जात आहे. यातून सुमारे ४ गिगावॅट क्षमतेचे रूफटॉप सोलर संयत्र कार्यान्वित होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, यातून आता केवळ घरा-घरासाठी वीज मिळते आहे, असे नाही, तर ती प्रकाशाने उजळून निघताहेत. शिवाय यातून शिल्लक वीज ग्रीडलाही पुरवली जात आहे. यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. आम्ही आता केंद्र कृषि पंपाच्या नवीन जोडण्यांसाठी केंद्र सरकारच्या योजनेच्या धर्तीवर ' मागेल त्याला सौर पंप’ योजना सुरू केली. यात संपूर्ण भारतात जेवढे सौर पंप बसवले आहेत, त्यापैकी ६०% महाराष्ट्रात आहेत. लवकरच ही संख्या १० लाखांच्या पार जाईल. याचा परिणाम असा झाला आहे की, पुढील ५ वर्षांसाठी आमचा 'मल्टी-इयर टॅरिफ' (विजेचे दर), जो दरवर्षी ९% ने वाढत होता, तो आता कमी होत आहे. पुढील ५ वर्षांत आम्ही वीज खरेदीच्या खर्चात १० अब्ज डॉलर्सची बचत करू, असेही त्यांनी सांगितले.सौरऊर्जा कार्यक्रमामुळे होणारी कार्बन उत्सर्जन कपात ही ३०० कोटी झाडे लावण्याइतकी असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, २०३२ पर्यंत आम्ही आणखी ४५ गिगावॅट वीज निर्माण करू, ज्यापैकी ७०% सौर ऊर्जा असेल. ३-४ वर्षांपूर्वी आमचे नूतनीकरणक्षम ऊर्जेचे प्रमाण १३% होते, जे २०३० पर्यंत ५२% होईल. ग्रीड स्थिर करण्यासाठी आम्ही बॅटरी स्टोरेज आणि पश्चिम घाटातील भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत 'पंप स्टोरेज' प्रकल्पांवर भर देत आहोत. आम्ही ८०,००० मेगावॅट क्षमतेचे पंप स्टोरेज प्रकल्प सुरू केले आहेत, जे लवकरच एक लाख मेगावॅटपर्यंत पोहोचतील, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच : आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत महायुती म्हणून निवडणुका व्हाव्यात असा माझा प्रामाणिक हेतू होता. या निवडणुकीत शिवसेनेने मोठा त्याग केला आहे. त्यामुळे नैसर्गिक हक्काने कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल, असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. राजेश क्षीरसागर म्हणाले की, कोल्हापूरात महापालिकेत महायुतीच्या विजयामध्ये शिवसेनचा मोठा वाटा आहे. महायुतीच्या माध्यमातून निवडणूक व्हावी, यासाठी सुरवातीपासून माझा […] The post कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच : आमदार राजेश क्षीरसागर appeared first on Dainik Prabhat .
Rohit Sharma statement on Shreyas Iyer : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. करिअरमध्ये पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक मैदानाबाहेर बसून पाहणे हा अनुभव आपल्यासाठी खूप वेगळा असेल, असे रोहितने बुधवारी एका मुलाखतीदरम्यान सांगितले. यासह त्याने सिराज, युझी आणि श्रेयसबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. […] The post Rohit Sharma : टी-२० वर्ल्ड कप घरून पाहणं कठीण…”, निवृत्तीनंतर रोहित भावूक; श्रेयस अय्यरबद्दलही केला मोठा खुलासा! appeared first on Dainik Prabhat .
मदुराई : मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला आहे. या निर्णयात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांना पत्नीचा दर्जा देण्याचे म्हटले आहे. महिलांना कायदेशीर आणि सामाजिक संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी हे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक शोषण करणाऱ्या एका प्रकरणात न्यायालयाचे हे निरीक्षण आले. उच्च न्यायालयाने […] The post Madras High Court : लिव्ह इन रिलेशनशिपमधील महिलांना मिळणार पत्नीचा दर्जा; मद्रास उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
स्वित्झर्लंड (दावोस): जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) वार्षिक बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या आक्रमक शैलीने पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या मजबुतीचा पाढा वाचतानाच त्यांनी युरोपीय देशांना खडे बोल सुनावले. विशेष म्हणजे, ग्रीनलँड खरेदी करण्याच्या आपल्या जुन्या आणि वादग्रस्त इराद्याचा त्यांनी पुनरुच्चार केला असून, याला जगातील सर्वात मोठी ‘रिअल इस्टेट डील’ […] The post दावोसमध्ये ट्रम्प यांची गर्जना; ग्रीनलँडच्या मुद्द्यावर पुन्हा ठाम, ‘एअरफोर्स वन’मधील बिघाडामुळे खळबळ appeared first on Dainik Prabhat .
Dhurandhar 2:धुरंदरमध्ये 2 दिसणार हा अभिनेता..,प्रेक्षकांचा उत्साह वाढणार..
धुरंधर २: हिंदी चित्रपटसृष्टीत नुकताच प्रदर्शित झालेला ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला.तसचं रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त यांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि जगभरात तुफान कमाई केली. या यशानंतर आता दिग्दर्शक आदित्य धरच्या ‘धुरंधर २’कडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.‘धुरंधर’च्या यशानंतर दुसऱ्या भागाबाबत सतत चर्चा सुरू असतानाच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, आदित्य धरचा आवडता अभिनेता विक्की कौशल ‘धुरंधर २’मध्ये स्पेशल अपीयरन्स अर्थात कॅमियो करताना दिसू शकतो. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ‘धुरंधर’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ यांच्यातील कनेक्शनमुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. ‘धुरंधर’च्या पहिल्या भागाच्या क्लायमॅक्समध्ये रणवीर सिंगच्या पात्राचे नाव जसकीरत सिंह रांगी दाखवण्यात आले होते. हेच नाव ‘उरी’ चित्रपटात कीर्ती कुल्हारीने विक्की कौशलच्या पात्राच्या पतीचे नाव म्हणून घेतले होते. त्यामुळे ‘धुरंधर युनिव्हर्स’ तयार होत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, विक्की कौशल ‘धुरंधर २’मध्ये मेजर विहान शेरगिलच्या भूमिकेत काही अॅक्शन सीन्स करताना दिसू शकतो. जरी त्याची भूमिका छोटी असली, तरी ती कथेसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. या वरुन सोशल मिडीयावर चर्चा सुरु आहे. आदित्य धर या चित्रपटाबाबत सर्व तपशील गुप्त ठेवत असून, प्रेक्षकांसाठी काही मोठे सरप्राइजेस तयार करण्यात येत आहेत.
पुन्हा ‘तारीख पे तारीख’; शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुढे ढकलली, आता कधी होणार?
नवी दिल्ली : प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा खटला पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार होती. मात्र, सुनावणीआधीच कोर्टाने या खटल्याला पुढची तारीख दिली. त्यामुळे आता या खटल्याची सुनावणी पुढील दि. २३ जानेवारी, शुक्रवारी होणार आहे. राज्यात महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आज होणा-या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले […] The post पुन्हा ‘तारीख पे तारीख’; शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुढे ढकलली, आता कधी होणार? appeared first on Dainik Prabhat .
EPFO 3.0: आता पीएफ क्लेम होणार अधिक वेगवान; प्रादेशिक भाषांसह मिळणार नवीन सुविधा
EPFO 3.0: देशातील कोट्यवधी पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या तंत्रज्ञान प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्याच्या तयारीत असून, लवकरच ‘EPFO 3.0’ हे नवीन व्हर्जन लाँच केले जाणार आहे. या बदलामुळे पीएफशी संबंधित कामे आता बँकिंग प्रणालीप्रमाणेच जलद आणि पारदर्शक होणार आहेत. काय आहे ‘EPFO 3.0’ प्रोजेक्ट? EPFO 3.0 हा […] The post EPFO 3.0: आता पीएफ क्लेम होणार अधिक वेगवान; प्रादेशिक भाषांसह मिळणार नवीन सुविधा appeared first on Dainik Prabhat .
Suryakumar Yadav 100th T20I Milestone : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला आज, २१ जानेवारीपासून नागपुरात सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने मैदानात पाऊल ठेवताच एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० सामने खेळणारा सूर्या हा भारत चौथा खेळाडू ठरला आहे. सूर्याचे ‘विराट’ पाऊल; धोनीला टाकले मागे […] The post Suryakumar Yadav : नागपुरात सूर्याने झळकावलं ‘स्पेशल शतक’! भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला चौथाच खेळाडू appeared first on Dainik Prabhat .
Gold Silver Prices Today: देशांतर्गत सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींनी दररोज नवनवे विक्रम प्रस्थापित करण्याचा धडाका लावला आहे. बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम तब्बल ६,५०० रुपयांची वाढ झाली, तर चांदीनेही ११,३०० रुपयांची मोठी झेप घेत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. या दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. सोन्याचा नवा ऐतिहासिक […] The post सोन्या-चांदीचा भाव गगनाला! आज सोने 6500 तर चांदी 11,300 रुपयांनी वधारली; ऐतिहासिक उच्चांकी दरवाढ सुरूच appeared first on Dainik Prabhat .
Ramdas Athawale : …तर केरळला अधिक निधी मिळेल; मंत्री रामदास आठवले यांचे मोठे विधान
कन्नूर : केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सामील व्हावे, त्यामुळे केंद्र सरकारकडून केरळला अधिक निधी मिळू शकेल, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी सांगितले. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री असलेल्या आठवले म्हणाले की, विजयन यांचे एनडीएमध्ये प्रवेश करणे हे क्रांतिकारी पाऊल ठरेल आणि त्यामुळे केरळच्या विकासासाठी मोठ्या […] The post Ramdas Athawale : …तर केरळला अधिक निधी मिळेल; मंत्री रामदास आठवले यांचे मोठे विधान appeared first on Dainik Prabhat .
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये करार का? वर्षा गायकवाड यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
मुंबई – महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्याच दिवशी दावोस दौऱ्यावर गेले असून, महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येत असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. मात्र, या दावोस दौऱ्याची विरोधकांकडून खिल्ली उडवली जात असून, हा केवळ भाजपा महायुती सरकारचा दिखावा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. यासंदर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार करण्याची […] The post मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये करार का? वर्षा गायकवाड यांचा मुख्यमंत्र्यांना टोला appeared first on Dainik Prabhat .
अंगावर काटा येणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित, भूमी पेडणेकरची भूमिका थरकाप उडवणारी
मुंबई : सिरीयल किलरच्या कथांवर आधारित थ्रिलर नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. याच धाटणीतील एक नवी वेब सिरीज म्हणजे अभिनेत्री भूमी पेडणेकरची ‘दलदल’. या सिरीजचा अधिकृत ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यातील वातावरण आणि हिंसा पाहून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे.नुकताच समोर आलेला ट्रेलर हा भयानक आणि अस्वस्थ करणारा आहे. अवघ्या दोन मिनिटांच्या आसपासच्या या व्हिडिओत रहस्य, रक्तरंजित गुन्हे आणि मानसिक ताण यांचा भडिमार पाहायला मिळतो. ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर ही सिरीज प्रदर्शित होणार असल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे.मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घटनांमध्ये सलग खून दाखवण्यात आले असून, हे गुन्हे अत्यंत अमानुष पद्धतीने केल्याचं ट्रेलरमधून समोर येतं. या सर्व हत्यांमागे एकच व्यक्ती असल्याचा संशय व्यक्त केला जातो आणि कथा गुंतत जाते ती भूमी पेडणेकरच्या भूमिकेमुळे. ती एका महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत असली तरी, कथेत तिच्यावरच संशयाची सुई फिरते. दिवसा कायद्याची रक्षक आणि रात्री गुन्ह्यांशी संबंधित असण्याची शक्यता दाखवली गेल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. भूमी पेडणेकरने साकारलेली ही गंभीर आणि काळी छटा असलेली भूमिका तिच्या आतापर्यंतच्या प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याचं अनेकांनी नमूद केलं आहे. ही थरारक वेब सिरीज येत्या ३० जानेवारी २०२६ रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार असून, ट्रेलरमुळेच ‘दलदल’ आधीपासूनच चर्चेचा विषय ठरली आहे.
Nitish Kumar : नितीशकुमार, सम्राट चौधरी राजीनामा द्या; आंदोलनकर्त्यांनी केली मागणी
पाटणा : बिहारमध्ये महिलांवरील गुन्ह्यांत वाढ झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय जनता दलाने (राजद) बुधवारी पाटणा येथे जोरदार निषेध मोर्चा काढला. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि गृहखाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.पाटण्यात अलीकडेच दोन विद्यार्थिनी त्यांच्या वसतिगृहात मृतावस्थेत आढळल्यानंतर हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये १८ वर्षीय नीट परीक्षार्थी विद्यार्थिनी […] The post Nitish Kumar : नितीशकुमार, सम्राट चौधरी राजीनामा द्या; आंदोलनकर्त्यांनी केली मागणी appeared first on Dainik Prabhat .
ICC Ultimatum to BCB for T20 World Cup 2026 : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ पूर्वी क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेश क्रिकेट संघ या आगामी विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. आयसीसी (ICC) बुधवारी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीनंतर हा कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असून, लवकरच याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. नेमकं काय […] The post ICC Ultimatum BCB : मोठी बातमी! टी-२० वर्ल्ड कपमधून बांगलादेशची हकालपट्टी? ICC च्या बैठकीत झाला मोठा फैसला! appeared first on Dainik Prabhat .
C. P. Radhakrishnan : “देशाला शक्तिशाली बनविणे आवश्यक”–उपराष्ट्रपती राधाकृष्णन
C. P. Radhakrishnan । vice president radhakrishnan – भारताला जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र बनवण्याचा उद्देश हा इतर देशांवर वर्चस्व गाजवण्याचा नसून, कोणीही भारतावर अटी लादण्याचे धाडस करू नये, यासाठी आहे, असे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी स्पष्ट केले. सीएमआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या रौप्य महोत्सवी समारंभात बोलताना त्यांनी सांगितले की भारत आता केवळ तंत्रज्ञानाचा स्वीकार […] The post C. P. Radhakrishnan : “देशाला शक्तिशाली बनविणे आवश्यक” – उपराष्ट्रपती राधाकृष्णन appeared first on Dainik Prabhat .
नाहूर–ऐरोली उड्डाणपूल ठरणार गेमचेंजर, केबल-स्टेड रचनेतून ठाणे–मुंबईला नवी गती; जाणून घ्या सविस्तर
मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यात नाहूर ते ऐरोलीदरम्यान अत्याधुनिक उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार असून यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून १२९३ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.नाहूर–ऐरोली दरम्यान सुमारे १.३३ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. हा पूल थेट ऐरोली उड्डाणपुलाशी जोडला जाणार असून त्यामुळे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईतील प्रमुख मार्गांवरील वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील जंक्शन परिसरातील सततची कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.केबल-स्टेड रचनेत उभारला जाणार पूलया उड्डाणपुलाची रचना केबल-स्टेड पद्धतीने करण्यात येणार असून, हा पूल दोन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात नाहूर ते ऐरोली जोडणारा मुख्य उड्डाणपूल उभारला जाईल. आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा हा पूल वाहतूकीत मोठा बदल घडणार आहे.चार दिशांना थेट जोडणारे इंटरचेंजदुसऱ्या टप्प्यात चार प्रमुख इंटरचेंज उभारले जाणार आहेत. यामध्ये नाहूर–ठाणे, ठाणे–ऐरोली, मुंबई–ऐरोली आणि मुंबईकडून ऐरोलीकडे जाणाऱ्या मार्गांचा समावेश आहे. या इंटरचेंजमुळे सिग्नलविना वाहतूक शक्य होणार असून प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होणार आहे.प्रवासाचा वेळ तासावरून मिनिटांवर१२.२ किलोमीटर लांबीचा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड पूर्ण झाल्यानंतर पश्चिम द्रुतगती मार्ग थेट पूर्व द्रुतगती मार्गाशी जोडला जाणार आहे. सध्या साधारण ७५ मिनिटे लागणारा हा प्रवास केवळ 25 मिनिटांत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे पूर्व–पश्चिम मुंबईमधील दैनंदिन प्रवास अधिक वेगवान होणार आहे.१४ हजार कोटींचा महाप्रकल्पसंपूर्ण गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प सुमारे १४ हजार कोटी रुपयांचा असून यात उड्डाणपूल, जुळे बोगदे, अंडरपास आणि क्लोव्हरलीफ इंटरचेंजचा समावेश आहे. दिंडोशी न्यायालयाजवळील उड्डाणपूल, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारे बोगदे आणि मुलुंड परिसरातील मोठे इंटरचेंज या प्रकल्पाचे प्रमुख टप्पे आहेत.हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईला पूर्व–पश्चिम दिशेने मजबूत आणि जलद जोडणी मिळणार असून शहरातील वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबई : राज्यातील जलक्षेत्रांलगतच्या जमिनींचा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणस्नेही विकास साधण्यासाठी महाराष्ट्र सरकार विशेष धोरण राबविण्याच्या तयारीत आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांच्या धर्तीवर ‘लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट युज पॉलिसी’ महाराष्ट्रात लागू करण्याच्या दृष्टीने मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात आढावा बैठक पार पडली.या बैठकीत संबंधित धोरणाचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्राची भौगोलिक रचना, किनारपट्टी, नद्या तसेच विकासात्मक गरजा लक्षात घेऊन हे धोरण कशा पद्धतीने राबवता येईल, यावर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट युज पॉलिसी ही जमीन आणि जलक्षेत्रांचा शाश्वत व प्रभावी वापर करण्यासाठी तयार करण्यात आलेली धोरणात्मक चौकट आहे. या धोरणामध्ये नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, जल-आधारित उद्योगांना प्रोत्साहन, किनारपट्टी आणि जलक्षेत्रांचा नियोजित विकास यांचा समावेश आहे. यामुळे रोजगारनिर्मिती, दळणवळण आणि पर्यावरणीय समतोल साधण्यास मदत होणार आहे. या धोरणात जल-आधारित पायाभूत सुविधांचा विकास आणि शहरी जलव्यवस्थापनावर विशेष भर देण्यात येणार आहे.आर्थिक विकासाला चालना देणे, सागरी आणि जल-आधारित उद्योगांद्वारे रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी निर्माण करणे, नद्या, तलाव, आर्द्रभूमी आणि जलस्रोतांचे प्रदूषण आणि अतिक्रमणापासून संरक्षण करणे, तसेच जमीन व जल व्यवस्थापनाचे एकत्रित नियोजन करून शाश्वत विकास साधणे ही या धोरणाची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. यासोबतच बंदरे आणि लॉजिस्टिक्ससारख्या जल-आधारित प्रकल्पांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात येणार आहे.रेडिओ क्लब जेट्टीच्या कामाचा घेतला आढावा- दरम्यान, मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया जवळ बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब परिसरात विकसित होत असलेल्या जेट्टीच्या कामाचा मंत्री नितेश राणे यांनी आढावा घेतला. जेट्टीचे काम ठरविण्यात आलेल्या कालमर्यादेनुसार आणि बार चार्टप्रमाणे सुरू आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली. कामाचा दर्जा राखून ते वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.- याच बैठकीत महाराष्ट्र किनारपट्टी जाहिरात धोरण–२०२५ तसेच राज्याच्या किनारपट्टीवरील लहान बंदरांच्या हद्दीत भाडेपट्ट्याने देण्यात येणाऱ्या स्टॉल्ससंदर्भातील धोरणाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले. यावेळी स्टेट मेरीटाईम अँड वॉटरवेज मास्टर प्लॅनचाही आढावा घेण्यात आला.
मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे काम विहीत कालावधीत पूर्ण होऊन नागरिकांसाठी वॉटर टॅक्सी सेवेत आणण्यासाठी या कामाला वेग द्यावा. जेट्टीच्या कामात २५ फेब्रुवारीपर्यंत गती न दिसल्यास कंत्राटदारावर कारवाई करावी, असे निर्देश मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी दिले.रेडिओ क्लब जेट्टीच्या कामाबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, उपजिल्हाधिकारी अंजली भोसले, मुख्य बंदरे अधिकारी खराह आदी उपस्थित होते.रेडिओ जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथून नवी मुंबईसाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करावयाची आहे. त्यादृष्टीने या प्रकल्पाचे काम कुठल्याही प्रकारे रखडता कामा नये. जेट्टीच्या कामात २५ फेब्रुवारीपर्यंत गती न दिसल्यास कंत्राटदारावर कारवाई करावी. निविदेत दिलेल्या कालावधीत जेट्टीचे काम पूर्ण करण्यात यावे. या कामाचा प्रत्येक आठवड्यात प्रगती अहवाल सादर करावा, असे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी दिले.रेडिओ क्लब जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातून नवीन जलमार्ग विकसित होतील. त्यामुळे नागरिकांना अधिक जलमार्गाचा पर्याय देऊन नवी मुंबईला थेट जोडणी देता येईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि तेथून दक्षिण मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीचे होईल, असेही बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
Pension Scheme India : पेन्शनधारकांना सरकारने दिलयं मोठ गिफ्ट..नक्की काय ?
Pension Scheme India: केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत अटल पेन्शन योजनेचा वेळ वाढवण्याची मंजुरी दिली आहे. ही योजना आता आर्थिक वर्ष २०३०-३१ पर्यंत सुरू राहणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे कोट्यवधी गुंतवणूकदारांना थेट फायदा होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला. विशेषतः असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार, मजूर, छोटे व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. अटल पेन्शन योजना ही अशाच घटकांना वृद्धावस्थेत आर्थिक सुरक्षितता मिळावी,या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. अटल पेन्शन योजनेची सुरुवात मे २०१५ मध्ये करण्यात आली. नियमित गुंतवणुकीच्या माध्यमातून ६० वर्षांनंतर निश्चित पेन्शन मिळावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शासकीय आकडेवारीनुसार, १९ जानेवारी २०२६ पर्यंत या योजनेत ८.६६ कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी नोंदणी केली आहे. ही संख्या योजनेवरील वाढता विश्वास दर्शवते.या योजनेत सहभागी झाल्यास गुंतवणूकदारांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा किमान १,००० ते कमाल ५,००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. गुंतवणुकीच्या रकमेनुसार पेन्शनची रक्कम ठरते. त्यामुळे वृद्धापकाळात नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो.विशेषतः ग्रामीण भाग, छोटे गाव आणि लहान शहरांमधील मजुरांसाठी अटल पेन्शन योजना वरदान ठरत आहे. अशा घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे महत्त्वपूर्ण काम या योजनेच्या माध्यमातून केले जात आहे. २ पासून सरकारकडून या योजनेबाबत सातत्याने जनजागृतीही केली जात आहे.
मोठी बातमी.. ! भाजपाचा एकनाथ शिंदेंना दे धक्का, राजकारणात खळबळ
Solapur News : महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील राजकारण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत शिरले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने राज्यभरात अचानक घडामोडी, पक्षांतर आणि एबी फॉर्मसह उमेदवार समोर येत असल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजपकडून (BJP) झालेल्या एका निर्णयामुळे शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा धक्का बसल्याचे […] The post मोठी बातमी.. ! भाजपाचा एकनाथ शिंदेंना दे धक्का, राजकारणात खळबळ appeared first on Dainik Prabhat .
Pune Crime: ज्येष्ठ नागरिक महिलेच्या प्लॉटवर जबरदस्ती ताबा; आरोपींना समन्स
पुणे – वडगाव शेरी येथील सर्वे नंबर ५१/१ मधील प्लॉट क्रमांक ५५, ५६ व ६९ यांचा जबरदस्तीने ताबा घेतल्याचा गंभीर आरोप एका ज्येष्ठ नागरिक महिलेने केला आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून सदर प्लॉट अवनी रिएल्टर्सकडे कन्व्हेन्स डीड केल्याचा दावा करत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, सदर प्लॉटचा कायदेशीर ताबा […] The post Pune Crime: ज्येष्ठ नागरिक महिलेच्या प्लॉटवर जबरदस्ती ताबा; आरोपींना समन्स appeared first on Dainik Prabhat .
Mayor Politics : राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, आता सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार जुळवाजुळवी सुरू झाली आहे. अकोला महानगरपालिकेत (AMC) कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने सर्वाधिक ३८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आले असले तरी बहुमतासाठी (४१ […] The post Mayor Politics : सत्तेचं समीकरण बदलणार ! भाजपची ठाकरेंना ‘ऑफर’; पक्षप्रमुखांच्या निर्णयाकडे लागले लक्ष appeared first on Dainik Prabhat .
Trump vs Khamenei : खामेनींवरील कारवाई विरुद्ध इराणचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा
Trump vs Khamenei – इराणचे सर्वोच्च नेते आयोतोल्ला अली खामेनी यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करू नये, असा इशारा इराणने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिला आहे. खामेनी यांची ४० वर्षांपासूनची राजवटसमाप्त करण्याचे आवाहन ट्रम्प यांनी इराणी जनतेला केले होते. त्यावर इराणच्या सशस्त्र दलाचे प्रवक्ते जनरल अबोलफझल शेखरची यांनी हा इशारा दिला आहे. खामेनी हे आजारी व्यक्ती […] The post Trump vs Khamenei : खामेनींवरील कारवाई विरुद्ध इराणचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा appeared first on Dainik Prabhat .
Priya Saroj uncomfortable moment video viral : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत व्यस्त आहे. मात्र, दुसरीकडे त्याची होणारी पत्नी आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जौनपुरमधील एका कार्यक्रमादरम्यान घडलेल्या एका प्रसंगामुळे प्रिया सरोज काही काळ अस्वस्थ आणि घाबरलेल्या दिसल्या, ज्याची […] The post Priya Saroj Video : रिंकू सिंगची होणारी पत्नी खासदार प्रिया सरोज अचानक मंचावर का झाली अस्वस्थ? पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .
Ladaki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेत मोठी चूक; २४ लाख महिलांची मदत थांबली, नेमकं काय घडलं?
मुंबई : लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेतील सदोष चुकीमुळे राज्यातील २४ लाखांहून अधिक महिला लाभार्थींना चुकीने सरकारी कर्मचारी म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. यामुळे त्यांची मासिक आर्थिक मदत अचानक थांबवण्यात आली आहे. महिला आणि बाल कल्याण विभागाने ही चूक मान्य केली असून, आता या लाभार्थींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी राज्य सरकारने राज्यभरात जवळपास एक लाख अंगणवाडी […] The post Ladaki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेत मोठी चूक; २४ लाख महिलांची मदत थांबली, नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .
“इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस क्वालिफायर्स”स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती रेसिंग टीम ची उत्कृष्ट कामगिरी…
पुणे – इंडियन नॅशनल हिल क्लाइंब चॅम्पियनशिपच्या पुणे क्वालिफायर्स फेरीत दणदणीत विजय मिळवत वर्चस्व गाजवल्यानंतर, त्रिमूर्ती रेसिंग टीमने नुकत्याच पार पडलेल्या लोकेश गौडा इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस क्वालिफायर्स (INAC) स्पर्धेतही वर्चस्व गाजवत आपली ताकद दाखवून दिली. स्पर्धेत पूर्णपणे वर्चस्व गाजवत, त्रीमूर्ती रेसिंग टीमने १७/०१/२०२५ (शनिवार) रोजी १४ पोडियम आणि १८/०१/२०२५ (रविवार) रोजी १३ पोडियम अशी एकूण […] The post “इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस क्वालिफायर्स” स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती रेसिंग टीम ची उत्कृष्ट कामगिरी… appeared first on Dainik Prabhat .
Rahul Gandhi : ‘मनरेगा’मुद्द्यावर काँग्रेसचा देशव्यापी संवाद; राहुल गांधी करणार संबोधित
Rahul Gandhi – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) कमकुवत केली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसने या मुद्द्यावर देशव्यापी संवाद आयोजित करण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमात देशभरातील मनरेगा कामगार आपल्या-आपल्या कार्यस्थळावरून मुठीभर माती घेऊन सहभागी होणार आहेत, असे काँग्रेसने बुधवारी स्पष्ट केले. काँग्रेस जयराम रमेश यांनी सांगितले की, मनरेगा बचाओ मोर्चा अंतर्गत […] The post Rahul Gandhi : ‘मनरेगा’ मुद्द्यावर काँग्रेसचा देशव्यापी संवाद; राहुल गांधी करणार संबोधित appeared first on Dainik Prabhat .
Plane Crash News : हवेतच विमानाचे नियंत्रण सुटले अन् दोन्ही वैमानिकांचा...प्रयागराजमध्ये भीषण अपघात
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात आज दुपारी भारतीय वायू सेनेच्या एका प्रशिक्षणार्थी विमानाला भीषण अपघात झाला. तांत्रिक बिघाडामुळे हवेत नियंत्रण सुटल्याने हे विमान थेट केपी कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या तलावात कोसळले. विमान कोसळताच मोठा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. मात्र, प्रसंगावधान राखून दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मिळालेली माहिती अशी की, भारतीय वायू सेनेचे हे प्रशिक्षणार्थी विमान सरावावर असताना अचानक त्याचा हवेत तोल गेला. प्रयागराज शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या केपी कॉलेज परिसरातील आकाशात विमानाची धडपड सुरू झाली आणि काही क्षणांतच ते कॉलेजच्या मागे असलेल्या तलावात जोरात आदळले. विमान आदळताच झालेल्या मोठ्या आवाजामुळे कॉलेजमधील विद्यार्थी आणि शिक्षक भयभीत झाले. विमान कोसळत असल्याचे पाहताच दोन वैमानिकांनी पॅराशूटच्या साहाय्याने विमानातून उडी मारली. ते तलावात पडले असताना स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना सुखरूप बाहेर काढले. आम्ही कॉलेजमध्ये असताना अचानक मोठा आवाज आला, आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता तलावात विमान कोसळले होते आणि दोन जण पाण्यात अडकले होते, त्यांना आम्ही बाहेर काढले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अग्निशमन दल आणि वायू सेनेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून तलावात कोसळलेल्या विमानाचे अवशेष बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध वायू सेनेच्या वतीने घेतला जात आहे
Bigg Boss Marathi 6 :बिग बॉस मध्ये राधा पाटीलचा मोठा खुलासा; तीन वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिप कबुली
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी सीझन ६ मधील स्पर्धक व नृत्यांगना राधा पाटील सध्या बिग बॅासच्या घरात आणि बाहेरही चर्चेचा विषय ठरत आहे. सुरुवातीला शांत आणि अलिप्त दिसणारी राधा आता हळूहळू आपली भूमिका ठामपणे मांडतानाही दिसत आहे. गौतमी पाटील सोबतच्या जुन्या वादामुळे ती चर्चेत आली होती पण आता तिच्या खेळामुळे आणि वैयक्तिक आयुष्याविषयी केलेल्या खुलास्यामुळे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेत आहे.घरात चारित्र्यहननाच्या मुद्द्यावरून राकेश, अनुश्री आणि रुचिता जामदार यांच्यात जोरदार वाद रंगलेला असताना, त्याच एपिसोडमध्ये राधाने तिच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला. अनुश्रीशी बोलताना राधाने सांगितले की ती गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे आणि सध्या ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहते. राधाच्या मते, तिचा प्रियकर अत्यंत प्रेमळ आणि काळजीवाहू आहे. “माझा स्वतःचा २ बीएचके फ्लॅट आहे. आम्ही दोघंही तिथे राहतो. तो असा आहे की जर कोणी मला काही बोललं, तर तो ते सहन करणार नाही,” असं ती भावनिक होत सांगते. तिने हेही नमूद केलं की तिच्या बॉयफ्रेंडला कोणतेही व्यसन नाही आणि गेल्या तीन वर्षांत त्याने स्वतःच्या हाताने कधी जेवणही केलं नाही; तीच त्याला नेहमी भरवते.या चर्चेदरम्यान अनुश्रीने राधाच्या बॉयफ्रेंडबद्दल मोठी कबुली दिली. ती म्हणाली की ती त्याच्या गाण्यांची चाहती आहे. यावरून राधाचा प्रियकर एक लोकप्रिय गायक असल्याचं स्पष्ट झालं. राधानेही सांगितलं की अनेक जण त्याच्यावर फिदा आहेत, मात्र तो नेहमी तिचाच हात घट्ट धरून असतो.
मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठा प्रकल्प, बोरिवली–विरार पट्ट्यात रेल्वे स्थानकांचा कायापालट
मुंबई : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी मोठ्या पायाभूत बदलांचा आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे. बोरिवली ते विरारदरम्यान रेल्वे वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. या प्रकल्पामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या वेगळ्या मार्गावर धावणार असून, गर्दी आणि विलंब कमी होण्याची अपेक्षा आहे.कांदिवली ते बोरिवलीदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर आता पश्चिम रेल्वेने पुढील टप्प्याला सुरुवात केली आहे. सुमारे २६ किलोमीटरच्या या संपूर्ण पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बांधकाम आणि पुनर्रचना केली जाणार आहे. या कामासाठी आतापर्यंत विविध टप्प्यांमध्ये वाहतूक ब्लॉक्स घेण्यात आले होते.२१८४ कोटींचा खर्च, २०२८ पर्यंत पूर्ण होणार प्रकल्पया संपूर्ण योजनेसाठी अंदाजे २१८४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. विद्यमान मार्गिकांच्या पश्चिम बाजूला दोन नवीन रेल्वे ट्रॅक उभारले जाणार आहेत. यासोबतच तीन मोठे पूल, १६ लहान पूल आणि एक नवीन भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे.वसई खाडीवरील महत्त्वाचे पूल क्रमांक ७३ आणि ७४ या प्रकल्पाचा भाग असून, त्यातील एका पुलाच्या पायाभरणीचे काम सुरू झाले आहे. तर भाईंदर परिसरातील जुना आणि जीर्ण झालेला ऐतिहासिक पूल हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या स्थानकांमध्ये मोठे बदलभाईंदर आणि वसई रोड स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले जाणार आहेत. नव्या प्लॅटफॉर्मची उभारणी, सध्याच्या फलाटांचा पुनर्वापर आणि प्रवाशांच्या हालचाली सोप्या व्हाव्यात यासाठी रचना बदलली जाणार आहे. दहिसर, मीरा रोड, नायगाव, नालासोपारा आणि विरार या स्थानकांवरही सुधारणा केल्या जाणार आहेत.दहिसरचे प्लॅटफॉर्म उत्तरेकडे, भाईंदरचे पश्चिम दिशेला तर विरारचे प्लॅटफॉर्म थोडेसे दक्षिणेकडे हलवले जाणार आहेत. या बदलांमुळे स्थानकांतील गर्दी कमी होईल आणि गाड्यांच्या थांबण्याचा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.प्रवाशांना काय फायदा होणार?या प्रकल्पामुळे उपनगरीय लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होतील. परिणामी वेळापत्रक अधिक शिस्तबद्ध होईल, विलंब कमी होतील आणि रोजच्या प्रवासात मुंबईकरांना दिलासा मिळेल. पश्चिम रेल्वेवरील हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील रेल्वे प्रवास अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे.
Parbhani ZP Election News : जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत परभणी जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री रावसाहेब जामकर यांचे नातू आणि शिवसेना UBT चे स्थानिक नेते संग्राम जामकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला […] The post Shivsena UBT News : ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! जिल्हा परिषद निवडणुकीआधी ‘या’ माजी मंत्र्यांसह मुलाने सोडली साथ appeared first on Dainik Prabhat .
Election commission : निवडणूक आयोगाविरुद्ध एफआयआर दाखल
कोलकाता : पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात ८२ वर्षीय वृद्ध व्यक्तीने चालू असलेल्या एसआयआर प्रक्रियेच्या चिंतेमुळे आत्महत्या केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या पारा पोलीस ठाण्यात मृत व्यक्तीच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून घटनेच्या २३ दिवसांनंतर गुन्हा नोंदवण्यात आला. एफआयआरमध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि गुन्हेगारी कट रचणे असे आरोप करण्यात आले असून, […] The post Election commission : निवडणूक आयोगाविरुद्ध एफआयआर दाखल appeared first on Dainik Prabhat .
Haribhau Bagade : उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड नाही; हरिभाऊ बागडे यांनी दिले निर्देश
जयपूर : राजस्थानमध्ये उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. शैक्षणिक दर्जा खराब असलेल्या महाविद्यालये व संस्थांनी तात्काळ सुधारणा कराव्यात, अन्यथा त्यांना बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट निर्देश राज्यपाल व कुलपती हरिभाऊ बागडे यांनी दिले. राज्यात ‘सुधारा किंवा बंद करा’ हे धोरण काटेकोरपणे राबवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकभवन येथे […] The post Haribhau Bagade : उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड नाही; हरिभाऊ बागडे यांनी दिले निर्देश appeared first on Dainik Prabhat .
बारामतीत नव्या चेहऱ्यांना संधी.! झेडपीसाठी दावेदारांना धक्का; राष्ट्रवादीचे गुप्त डावपेच
माळेगाव – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण सध्या तापलेले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. बारामती येथे सकाळपासूनच अनेकांनी अर्ज दाखल केले. दुपारी ३ वाजेपर्यंत अपक्ष उमेदवारांचीही मोठी गर्दी दिसली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने गुप्तता पाळत एकाचवेळी सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल केले. उमेदवारी कोणाला मिळाली याबाबत पक्षाने पूर्ण गोपनीयता राखली. यंदा राष्ट्रवादीने […] The post बारामतीत नव्या चेहऱ्यांना संधी.! झेडपीसाठी दावेदारांना धक्का; राष्ट्रवादीचे गुप्त डावपेच appeared first on Dainik Prabhat .
तिसऱ्या मुंबईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
दावोस : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा करण्यात आली आहे. दावोस मधील पहिल्याच दिवसापासून जगभरातील विविध क्षेत्रातील उद्योगांनी महाराष्ट्रात […] The post तिसऱ्या मुंबईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा appeared first on Dainik Prabhat .
Stock Market: भारतीय शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. सुरुवातीच्या सत्रात १००० अंकांनी कोसळलेल्या सेन्सेक्सने दुपारी सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेरच्या तासात पुन्हा एकदा विक्रीचा दबाव वाढल्याने बाजार लाल निशाण्यावर बंद झाला. या घसरणीमुळे आज एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल १.४५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी सकाळी बाजार उघडताच […] The post Stock Market: ‘या’ 3 प्रमुख कारणांमुळे शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांना मोठा फटका appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: आज इटर्नल (Zomato) कंपनीच्या गोट्यातून दोन महत्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत आपला तिमाही निकाल जाहीर केला असून कंपनीचे सर्वेसर्वा संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंदर गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा घोषित केला आहे. आर्थिक निकालातील माहितीनुसार कंपनीच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ७३% यंदा वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या ५९ कोटी रुपये तुलनेत यंदा १०२ कोटींवर नफा पोहोचला. तर कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) इयर ऑन इयर बेसिसवर डिसेंबरपर्यंत ५४०५ कोटीवरून १६३१५ कोटींवर वाढ झाली. तर एकूण उत्पन्नात इयर ऑन इयर ५६५७ कोटी रुपये तुलनेत १६६६३ कोटींवर वाढ झाली आहे.कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये आज दिपेंदर गोयल यांच्या राजीनाम्याची घोषणा करताना नव्या संचालक पदावर अलबिंदर धिंडसा (Albinder Dhindsa) यांच्या नियुक्तीची माहिती यावेळी दिली.'अलीकडे, मी स्वतःला काही नवीन कल्पनांकडे आकर्षित झालेले पाहिले आहे ज्यामध्ये लक्षणीयरीत्या जास्त जोखमीचे संशोधन आणि प्रयोग समाविष्ट आहेत. या अशा प्रकारच्या कल्पना आहेत, ज्यांचा पाठपुरावा 'इटरनल'सारख्या सार्वजनिक कंपनीच्या बाहेर करणे अधिक योग्य आहे' असे गोयल यांनी भागधारकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यांनी एक्सचेंज फायलिंगमध्ये हे देखील म्हटले आहे की,आता कामकाजाचे निर्णय धिंडसा घेणार आहेत ग्रुप सीईओ म्हणून ते दैनंदिन कामकाज, कार्यान्वयन प्राधान्यक्रम आणि व्यावसायिक निर्णयांची जबाबदारी सांभाळतील. ब्लिंकिटच्या अधिग्रहणापासून ते नफा-तोटा समतोल साधण्यापर्यंतचा प्रवास त्यांनीच सांभाळला होता आणि आता ते ग्रुप सीईओ म्हणून इटर्नलचे नेतृत्व करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत.गोयल यांनी २००८ मध्ये पंकज चड्डा यांच्यासोबत झोमॅटोची एक स्टार्टअप म्हणून स्थापना केली होती. या संक्रमणाचा एक भाग म्हणून गोयल यांचे सर्व अवितरित स्टॉक पर्याय कर्मचारी स्टॉक ऑप्शन (Esop) पूलमध्ये परत जातील अशी माहिती मिळत आहे. ज्याचे सुरुवातीचे नाव फूडिबे होते. हे रेस्टॉरंटचे मेनू आणि पुनरावलोकने प्रदान करणारे एक प्लॅटफॉर्म होते जे कालांतराने आजच्या अन्न वितरण क्षेत्रातील कंपनीत परावर्तित झाले होते. गेल्या वर्षभरात, गोयल यांनी 'इटरनल'च्या बाहेर स्वतःचे अनेक डीपटेक, दीर्घायुष्य आणि वैयक्तिक संशोधन उपक्रम सुरू केले आहेत त्यांनी तशी माहिती यापूर्वी दिली होती.ढिंडसा हे भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या, पूर्वी ग्रोफर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्लिंकिटचे सह-संस्थापक आणि सीईओ म्हणून ओळखले जातात. पंजाबमधील पतियाळा येथे जन्मलेल्या त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले, नंतर अमेरिकेतील कोलंबिया बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी मिळवली, ज्यामुळे तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्समधील त्यांच्या करिअरचा पाया रचला गेला. ढिंडसा यांनी २०१३ मध्ये सौरभ कुमार यांच्यासोबत ग्रोफर्सच्या स्थापन केली होती. उद्योजक म्हणून त्यांनी सुरुवातीला स्थानिक दुकाने आणि ग्राहकांना जोडणारी एक हायपरलोकल डिलिव्हरी सेवा म्हणून सुरू झालेली ग्रोफर्स सुरू केली कालांतराने एका पूर्ण सेवा देणारी ऑनलाइन किराणा प्लॅटफॉर्ममध्ये विकसित झाली. २०२१ मध्ये, कंपनीने आपले नाव बदलून ब्लिंकिट केले आणि क्विक-कॉमर्स मॉडेलवर लक्ष केंद्रित केले ज्यामध्ये अवघ्या १० मिनिटांत किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणाचे आश्वासन दिले गेले. या धोरणामुळे भारतातील वेगवान डिलिव्हरी क्षेत्रात ग्राहकांच्या अपेक्षांमध्ये मोठे बदल झाले आता ते इटर्नलची सूत्रे हाती घेतील.यासह तिमाहीतील अतिरिक्त माहितीनुसार, कंपनीच्या करपूर्व नफ्यात (Profit before tax PBT) १२४ कोटीवरून १७० कोटींवर वाढ झाली होती तर कंपनीच्या इतर एकत्रित उत्पन्नात इयर ऑन इयर बेसिसवर ३९ कोटीवरून १३० कोटींवर वाढ झाली आहे. ईपीएस (Earning per share EPS) ०.०७ रूपयांवरून ०.११ रूपयावर वाढ झाली आहे. तर तिमाही बेसिसवर (QoQ) कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात २४८५ कोटींवरून २६७६ कोटींवर वाढ झाली आहे. आज कंपनीचा शेअर बाजार बंद होताना ४.९०% उसळत २८२.३० रूपयांवर बंद झाला आहे.गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये ३.३८% घसरण झाली असून गेल्या १ महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये १.३६% व गेल्या एक वर्षापासून ३१.८१% वाढ झाली आहे तर इयर टू डेट बेसिसवर कंपनीचा शेअर ०.३५% घसरला आहे.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’बड्या नेत्याने थेट राजीनामा देत वाढवलं टेन्शन
Uddhav Thackeray : राज्यातील महानगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना उबाठा) पक्षाला अपेक्षित यश मिळवता आले नाही. विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये (Uddhav Thackeray) पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एकामागून एक धक्के बसत असून, पक्षातील प्रमुख नेत्यांनी पक्षाची साथ सोडण्यास सुरुवात केली आहे. […] The post Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ बड्या नेत्याने थेट राजीनामा देत वाढवलं टेन्शन appeared first on Dainik Prabhat .
Breaking news : शिंदेसेनेला मनसेचा पाठिंबा.! युतीवरुन रंगली जोरदार चर्चा
Breaking news – महानगरपालिका निवडणुकांनंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असून, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिंदेसेनेला मनसेच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याचा दावा शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढत होते. शिवसेना-मनसेच्या या युतीवरुन जोरदार चर्चा रंगली आहे. यावरती खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे 53 नगरसेवक घेऊन आम्ही गट स्थापनेसाठी कोकण भवन येथे […] The post Breaking news : शिंदेसेनेला मनसेचा पाठिंबा.! युतीवरुन रंगली जोरदार चर्चा appeared first on Dainik Prabhat .
मुंबईत उबाठाला निवडणुकीनंतर पहिला मोठा धक्का, 'या'पहिल्या महिला नगरसेविकाचा होणार शिवसेनेत प्रवेश
मुंबई : महापालिका निवडणुकांनंतर ठाकरे गटाला मुंबईत पहिलाच मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक १५७ मधून निवडून आलेल्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के यांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्या उबाठाच्या अधिकृत बैठकींपासून दूर राहिल्याने आणि हालचालींमध्ये सहभागी न झाल्याने त्यांच्या पक्षनिष्ठेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.महापालिकेत सत्तास्थापनेसाठी शिंदे गट आणि भाजपकडून हालचालींना वेग आला असताना, इतर पक्षांतील नगरसेवकांशी संपर्क वाढवला जात असल्याची चर्चा आहे. अशाच पार्श्वभूमीवर डॉ. सरिता म्हस्के या शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे उबाठाच्या नगरसेवकांची बैठक आणि गटनोंदणीसाठी नवी मुंबईला जाण्याच्या प्रक्रियेत त्या अनुपस्थित राहिल्याने संशय अधिक वाढला आहे.डॉ. सरिता म्हस्के यांनी निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा हा संभाव्य निर्णय उबाठासाठी धक्का मानला जात आहे. जर त्या अधिकृतपणे गट बदलल्यास उबाठाच्या नगरसेवकांची संख्या कमी होऊन पक्षाची ताकद कमी होणार आहे.मुंबईबरोबरच कल्याण-डोंबिवलीतही काही नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेतल्याने उबाठाच्या अडचणी वाढल्या आहेत. या सर्व घडामोडींमुळे महापालिकेतील राजकारण अधिकच तापले असून पुढील काही दिवसांत सत्तासमीकरणे नेमकी कुठल्या दिशेने जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोहित सोमण: आज जागतिक अस्थिरतेत पुन्हा एकदा शेअर हल्लाबोल झाल्याने बाजार सलग चौथ्या दिवशी कोसळला आहे. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटीहून अधिक पैसै पाण्यात गेले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स २७०.८४ अंकाने घसरत ८१९०९.६३ पातळीवर व निफ्टी ७५ अंकांने घसरत २५१५७.५० पातळीवर बंद झाले आहे. शेअर बाजार आज इंट्राडे १००० हून अधिट पातळीवर कोसळला असला तरी देखील बाजारात अखेरच्या सत्रात पुन्हा जागतिक सकारात्मक घडामोडींमुळे इंट्राडे उच्चांकी घसरणीपासून सावरले आहे. बँक निर्देशांकात मात्र अस्थिरतेचा मोठा फटका बसल्याने बाजार हिरव्या रंगात बंद होऊ शकला नाही. व्यापक निर्देशांकातील अखेरच्या सत्रात मिडकॅप ५०, मिडकॅप १००, स्मॉलकॅप ५०, स्मॉलकॅप २०० निर्देशांकात झाली. क्षेत्रीय निर्देशांकात वाढ केवळ तेल व गॅस, मेटल शेअर्समध्ये झाली असून उर्वरित निर्देशांक घसरले. सर्वाधिक घसरण पीएसयु बँक, कंज्यूमर ड्युरेबल्स, मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस, फार्मा, फायनांशियल सर्विसेस २५/५० निर्देशांकात झाली आहे. आज अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) ८% हून अधिक पातळीवर उसळला होता.आज युएसने ग्रीनलँडवर ताबा घेण्यासाठी लष्करी कारवाई सुरु केली असल्याने बाजारातील अस्थिरता व गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र युएसचे फायटर जेट मध्यातून पुन्हा युएसकडे वळल्याने काही प्रमाणात गुंतवणूकदारांना तात्पुरता दिलासा मिळाला. दुसरीकडे जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर कमोडिटीत तुफान वाढ होत असताना निचांकी स्तरावर आज रूपया डॉलरच्या तुलनेत कोसळला. परिणामी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात सेल ऑफ झाले ज्यांचे नुकसान भारतीय गुंतवणूकदारांना झाले. व्हेनेझुएला, ग्रीनलँड व कॅनडा यांच्यावर कारवाई करण्याचे विस्तारवादी धोरण ट्रम्प यांनी अवलंबले असताना नाटो व युरोप राष्ट्रांकडून युएसमधील गुंतवणूक काढून घेतली जाऊ शकते याची चाचपणी गुंतवणूकदार करत आहेत. दुसरीकडे हे चित्र स्पष्ट होताना भारत व युएस यांच्यातील द्विपक्षीय करारावर अद्याप अनिश्चितता असताना फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का याकडेही युएस गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. ज्याचा नकारात्मक परिणाम आशियाई बाजारात परावर्तित होत असताना चीनच्या कमकुवत आकडेवारीसह जपानचे घसरलेले बाँड मार्केट याचाही परिणाम भारतीय बाजारपेठेत होताना दिसला. त्यामुळे गेल्या दोन दिवसात १५०० पूर्णांकाने बाजार कोसळला. एकूणच ही अस्थिर परिस्थिती स्पष्ट असताना गुंतवणूकदार नफा बुकिंग सुरू ठेवू शकतात.आज सर्वाधिक वाढ एमआरपीएल (९.१५%), क्रेडिट एसीसी (९.०६%), इंडिया मार्ट (५.७३%), इटर्नल (५.१६%), आयटीसी हॉटेल (४.३०%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण कल्याण ज्वेलर्स (१२.१६%), एस आर एफ (७.१६%), टाटा कम्युनिकेशन (५.१५%), वन ९७ (४.७०%), आदित्य बिर्ला फॅशन (४.६१%), फोर्स मोटर्स (४.४१%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'२१ जानेवारी रोजी, जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या (FII) सततच्या विक्रीमुळे भारतीय प्रमुख निर्देशांकांमध्ये तीव्र अस्थिरता दिसून आली. जागतिक अनिश्चितता, विशेषतः अमेरिकेच्या व्यापार करारासंदर्भातील अनिश्चिततेमुळे अस्थिरता वाढलेली राहिली, तर USDINR ने ९१.७४ या नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचून दबावात आणखी भर घातली. सेन्सेक्स २७०.८४ अंकांनी (-०.३३%) घसरून ८१९०९.६३ पातळीवर बंद झाला, तर निफ्टी ५० ७५ अंकांनी (-०.३०%) घसरून २५,१५७.५० पातळीवर स्थिरावला. क्षेत्रीय पातळीवर, बहुतेक निर्देशांक घसरणीसह बंद झाले, ज्यात ग्राहक टिकाऊ वस्तू, रसायने आणि खाजगी बँका आघाडीवर होत्या. निफ्टी मेटल आणि तेल व वायू हेच दोन क्षेत्र होते ज्यांनी काहीसा आधार दिला. व्यापक बाजारपेठांमध्येही कमजोरी दिसून आली, निफ्टी मिडकॅप निर्देशांक १.१४% आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक ०.९०% ने घसरला, जे सर्वसमावेशक विक्रीचा दबाव दर्शवते.निफ्टीचा दृष्टिकोन -निर्देशांकाने उच्च-तरंग कँडल तयार केली, तसेच नीचांकी उच्चांक आणि नीचांकी नीचांक नोंदवला, ज्यामुळे सध्याच्या घसरणीच्या विस्ताराला बळकटी मिळाली आणि सुधारात्मक घसरणीच्या सातत्याची पुष्टी झाली. सत्रादरम्यान, निफ्टी मागील दिवसाच्या नीचांकी पातळीच्या खाली घसरला आणि थोड्या काळासाठी २५००० पातळी ओलांडून २४९१९.८ पातळीच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला. तथापि, निर्देशांक ओव्हरसोल्ड झोनमध्ये गेल्याने सत्राच्या मध्यात काहीशी सुधारणा दिसून आली. या उसळी नंतरही, निफ्टी २००-दिवसांच्या ईएमए (Exponential Moving Average EMA) (सुमारे २५१६१) पातळीच्या खाली व्यवहार केल्यानंतर त्याच्या जवळ बंद झाला. पुढे, व्यापक दृष्टिकोन नकारात्मक राहतो. २०० दिवसांच्या ईएमएच्या खाली सातत्यपूर्ण घसरण झाल्यास, आगामी सत्रांमध्ये घसरण २५८०० पातळीच्या पातळीकडे वेग घेऊ शकते. वरच्या बाजूला, २५२०० पातळीवर तात्काळ प्रतिकार (Immediate Resistance) पातळी आहे त्यानंतर २५५०० वर दुसरी प्रतिकार पातळी आहे.बँक निफ्टीचा दृष्टिकोनया निर्देशांकाने निफ्टीपेक्षा कमी कामगिरी केली आणि नीचांकी उच्चांक व नीचांकी नीचांकसह सलग तिसरी मंदीची कँडल तयार केली, जी सुधारात्मक घसरणीचे सातत्य आणि उच्च स्तरावर सतत विक्रीचा दबाव दर्शवते. ५८७००–५९००० पातळीचा झोन एक महत्त्वाची अल्प मुदतीची आधार पातळी आहे. जरी निर्देशांक थोडक्यात ५८,२७८.६ पर्यंत खाली आला असला तरी, तो नीचांकी पातळीजवळ बंद झाला नाही, जे खालच्या पातळीवर (Down Side) खरेदीची आवड दर्शवते. हा स्तर सात आठवड्यांच्या एकत्रीकरण श्रेणीच्या खालच्या टोकाशी (Down Side) आणि ५० दिवसांच्या ईएमएशी जुळतो, ज्यामुळे तो महत्त्वपूर्ण आधार बनतो. या पातळीच्या खाली निर्णायक घसरण झाल्यास बाजारातील मंदीला वेग येऊ शकतो. वरच्या बाजूला (Up Side) तात्काळ प्रतिकार पातळी ५९५०० पातळीवर आहे, तर ६०२००–६०४०० पातळीचा सर्वकालीन उच्चांक असलेला स्तर एक मोठा अडथळा कायम आहे.'आजच्या बाजारातील तांत्रिक परिस्थितीवर विश्लेषण करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक नागराज शेट्टी म्हणाले आहेत की,'मंगळवारी तीव्र कमजोरी दाखवल्यानंतर बुधवारी निफ्टीमध्ये उच्च अस्थिरता दिसून आली आणि तो ७५ अंकांनी घसरून बंद झाला. निफ्टीची सुरुवात कमजोर झाली आणि सत्राच्या सुरुवातीच्या-मध्य भागापर्यंत नकारात्मक कल कायम राहिला. मध्य भागात २४९०० पातळीजवळून काही प्रमाणात सुधारणा झाली, परंतु बाजार ही सुधारणा शेवटपर्यंत टिकवू शकला नाही आणि घसरणीसह बंद झाला.दैनंदिन आलेखावर लांब वरच्या आणि खालच्या सावलीसह एक लहान हिरवी मेणबत्ती तयार झाली आहे. तांत्रिकदृष्ट्या, ही बाजारातील हालचाल डोजी प्रकारच्या कँडल पॅटर्नची निर्मिती दर्शवते (जरी तो पारंपरिक प्रकारचा नसला तरी), जी बाजारातील सध्याची अस्थिरता प्रतिबिंबित करते. सामान्यतः, लक्षणीय घसरणीनंतर डोजीची निर्मिती झाल्यास पुष्टीकरणानंतर (Confirmation) बाजारात उलटा बदल होण्याची शक्यता असते. बाजाराचा मूळ कल अजूनही कमजोर आहे. निफ्टीला २५१५० पातळीच्या महत्त्वाच्या आधार पातळीच्या (२००-दिवसांचा ईएमए) वर टिकून राहणे कठीण जात आहे. २४९०० च्या खाली आणखी कमजोरी आल्यास, नजीकच्या काळात निफ्टी २४५०० पर्यंत खाली घसरू शकतो. तथापि, २५२०० पातळीच्या वर टिकून राहणारी तेजी बाजारात अल्पमुदतीची उसळी आणू शकते.'आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'अनेक आठवड्यांत प्रथमच निफ्टी इंट्राडे आधारावर २००-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या (200DMA) खाली घसरला आहे. जेव्हा २००-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजला आव्हान दिले जाते, तेव्हा सामान्यतः बाजारात चढ-उतार होतात आणि परिस्थिती केवळ स्पष्ट नसते. पुढील काही दिवसांत, निर्देशांक अत्यंत अस्थिर राहू शकतो. खालच्या पातळीवर, २५१२५ पातळीवर आधार आहे. २५१२५ पातळीच्या खाली निर्णायक घसरण झाल्यास बाजारात आणखी घबराट पसरू शकते. वरच्या पातळीवर, बंद भावाच्या आधारावर २५२०० पातळीवर प्रतिरोध आहे.'आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की, 'जागतिक जोखमीच्या घटकांमुळे बाजारातील भावनांवर परिणाम झाल्याने देशांतर्गत बाजारपेठांमध्ये अस्थिरता दिसून आली. तथापि, सत्राच्या अखेरीस झालेल्या मूल्याधारित खरेदीमुळे बाजाराला सुरुवातीचे काही नुकसान भरून काढण्यास मदत झाली. या आव्हानात्मक परिस्थितीत, बँकिंग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील निराशाजनक कमाईमुळे इक्विटीवरील एकूण दबाव वाढत आहे. रुपयाचे अवमूल्यन आणि व्यापारी संबंधांभोवतीची अनिश्चितता ही अस्थिरता वाढवू शकते. असे असले तरी, सध्याचा कमाईचा हंगाम निवडक समभागांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देऊ शकतो, कारण लवचिक देशांतर्गत मागणीमुळे पुढील सत्र अधिक चांगले राहण्याची अपेक्षा आहे.'आजच्या रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'युरोप आणि ग्रीनलंडशी संबंधित वाढता भूराजकीय तणाव, अमेरिकेच्या शुल्कविषयक कारवाईबद्दलच्या नवीन चिंता आणि भारत-अमेरिका व्यापार कराराला अंतिम स्वरूप न मिळाल्यामुळे, रुपयावर दबाव कायम राहिला आणि तो ९१.६० रूपयांच्या खाली जवळपास ०.७०% घसरून कमजोर झाला. सोन्या-चांदीच्या दरांमधील तीव्र वाढीमुळे आयात बिल वाढले असून, त्यामुळे रुपयावर आणखी दबाव आला आहे. नजीकच्या काळात हे चलन ९०.९० ते ९२.०० रूपयांच्या विस्तृत मर्यादेत अस्थिर राहण्याची शक्यता आहे.'आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च वेल्थ मॅनेजमेंटचे सिद्धार्थ खेमका म्हणाले आहेत की,'भारतीय शेअर बाजारात बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली. इंट्राडे व्यवहारादरम्यान निर्देशांक २५००० पातळीच्या पातळीच्या खाली गेला होता, परंतु दिवसाच्या नीचांकी पातळीवरून २३७ अंकांनी सावरत तो या महत्त्वाच्या मानसिक पातळीच्या वर बंद झाला. तरीही, तो ०.३% घसरून २५१५७ अंकांवर स्थिरावला. जागतिक अनिश्चितता, युरोप आणि अमेरिका यांच्यातील सध्याचा भूराजकीय तणाव आणि संमिश्र तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर बाजारातील वातावरण दबावाखाली राहिले. व्यापक बाजारांची कामगिरी निराशाजनक राहिली, निफ्टी मिडकॅप १०० मध्ये १.१% आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० मध्ये १% घसरण झाली, जे बाजारातील जोखीम टाळण्याच्या वृत्तीचे द्योतक आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) विक्रीचा सपाटा सुरूच ठेवल्याने बाजारावर दबाव कायम राहिला त्यांनी मंगळवारी सुमारे २,९३८ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. भारतीय रुपया आणखी कमकुवत झाला आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९१.१९ रूपयांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला, ज्यामुळे बाजारातील सावधगिरीचे वातावरण वाढले. क्षेत्रीय कामगिरी बहुतांशी नकारात्मक होती, केवळ तेल आणि वायू (+०.३%) आणि धातू (+०.६%) निर्देशांक वाढीसह बंद झाले. कंझ्युमर ड्युरेबल्स १.६% घसरले, सलग नवव्या सत्रात त्यात घसरण झाली. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे (PSU) शेअर्स १% नी घसरले, तर रिअल्टी क्षेत्रात १.६% ची घट झाली. पुढे पाहता, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून युरोपीय मित्र राष्ट्रांशी झालेल्या अलीकडील तणावानंतर दावोसला जात असल्याने बाजार सावध राहणार आहे. या परिषदेत त्या प्रदेशाच्या अधिग्रहणाचा त्यांचा आग्रह हा एक प्रमुख केंद्रबिंदू ठरणार आहे. इंटरग्लोब एव्हिएशन, डीएलएफ, इंडियन बँक, कोफोर्ज, एपीएल अपोलो ट्यूब्स, एमफेसिस आणि रॅडिको खैतान यांच्या तिमाही निकालांच्या आसपास शेअर्समध्ये विशिष्ट हालचाल अपेक्षित आहे. एकूणच, सध्याचे तिमाही निकाल आणि दावोसमध्ये ट्रम्प यांच्या भाषणानंतरच्या जागतिक संकेतांची वाट पाहत निफ्टीमध्ये मर्यादित स्वरूपाचे व्यवहार अपेक्षित आहेत.'
ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन
ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही धक्कादायक मानली जानारी बातमी ठरली आहे. अवघ्या एका आठवड्यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी करत पहीलं स्थान पटकावणारा विराट कोहली आता त्या खुर्चीवरून खाली आला आहे. भारत-न्यूझीलंड वनडे मालिका संपल्यानंतर आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीनुसार न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डॅरिल मिशेल थेट नंबर-वन फलंदाज ठरला आहे.डॅरिल मिशेलने इतिहास रचत आपल्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवली आहे. सध्या त्याची रेटिंग 845 इतकी असून तो मोठ्या फरकाने अव्वल स्थानावर पोहोचला आहे. मागील आठवड्यात मिशेल दुसऱ्या क्रमांकावर होता आणि केवळ एका रेटिंग पॉइंटने कोहलीच्या मागे होता. मात्र, भारताविरुद्धच्या मालिकेतील सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीच्या जोरावर त्याने थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या वनडेत शतकी खेळी केली होती, तरीही त्याला अव्वल स्थान कायम ठेवता आले नाही. सध्या कोहली दुसऱ्या स्थानावर असून त्याची रेटिंग 795 इतकी आहे. विशेष म्हणजे, आगामी काळात कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमी दिसणार असल्याने पुन्हा नंबर-वन स्थान मिळवणे त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते.दरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मालाही या क्रमवारीत मोठा फटका बसला आहे. तो आता चौथ्या स्थानावर घसरला असून त्याची रेटिंग 757 आहे. संपूर्ण भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेत रोहितच्या बॅटमधून एकही अर्धशतक न निघाल्याने त्याला याचा फटका बसला. तिसऱ्या स्थानावर अफगाणिस्तानचा इब्राहिम झदरान असून त्याची रेटिंग 764 आहे. आयसीसी क्रमवारीतील या बदलांनी वनडे क्रिकेटमध्ये सध्या सुरू असलेली चुरस अधोरेखित केली आहे.
नवी दिल्ली : डिजिटल व्यवहारांच्या जगात आघाडीवर असलेले 'युपीआय' (UPI) आता केवळ पैसे पाठवण्याचे साधन न राहता, सर्वसामान्यांसाठी कर्जाचे सोपे व्यासपीठ बनणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि आघाडीच्या बँकांमध्ये सुरू असलेली चर्चा यशस्वी झाल्यास, लवकरच ग्राहकांना युपीआयच्या माध्यमातून 'इन्स्टंट' कर्ज मिळण्याची सोय उपलब्ध होणार आहे. या नवीन फिचरमुळे क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या मक्तेदारीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या क्रेडिट कार्ड कंपन्या ग्राहकांना छोटे कर्ज किंवा खरेदीसाठी ४० ते ४५ दिवसांची व्याजमुल्य सवलत देतात. मात्र, मुदत संपल्यानंतर व्याजाचा दर इतका प्रचंड असतो की, चक्रवाढ व्याजामुळे ग्राहक कर्जाच्या खाईत ओढला जातो. याउलट, युपीआयवर उपलब्ध होणारे कर्ज हे अत्यंत लवचिक असेल. विशेष म्हणजे, क्रेडिट कार्डप्रमाणेच या कर्जावरही एका ठराविक मर्यादेपर्यंत शून्य व्याज आकारले जाण्याची शक्यता आहे. कर्ज वसुलीची पद्धतही ग्राहकांसाठी सुटसुटीत असल्याने ग्राहकांचा कल युपीआयकडे वाढणार आहे. सध्या काही युपीआय प्लॅटफॉर्म्स बँकांच्या सहकार्याने फिक्स्ड डिपॉझिट (FD) किंवा गुंतवणुकीवर आधारित 'को-ब्रँडेड' क्रेडिट कार्ड्स देत आहेत, ज्यावर कॅशबॅकच्या सवलतीही मिळतात. मात्र, आता थेट युपीआय ॲपमध्येच कर्ज घेण्याची आणि परतफेड करण्याची सुविधा मिळाल्यास ग्राहकांना वेगळे क्रेडिट कार्ड बाळगण्याची गरज भासणार नाही.https://prahaar.in/2026/01/21/political-activity-intensifies-for-the-nashik-mayoral-post-three-influential-faces-from-the-bjp-are-in-the-running/क्रेडिट कार्ड भारी की UPI क्रेडिट लाईन?युपीआय क्रेडिट लाईन आणि क्रेडिट कार्ड यांच्यातील व्याजाच्या फरकामुळे ग्राहक आजही प्लास्टिक मनी म्हणजेच क्रेडिट कार्डलाच अधिक पसंती देत असल्याचे चित्र दिसत आहे. युपीआय क्रेडिट लाईन लोकप्रिय न होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे, या सुविधेचा वापर केल्यावर पहिल्याच दिवसापासून लागू होणारे व्याज. जेव्हा एखादा युझर युपीआय क्रेडिट लाईनद्वारे पेमेंट करतो, तेव्हा त्या क्षणापासूनच घेतलेल्या रक्कमेवर व्याजाची मोजणी सुरू होते. यामुळे कर्जाची रक्कम तातडीने महाग पडते, जे सर्वसामान्य ग्राहकांसाठी फायद्याचे ठरत नाही. दुसरीकडे, क्रेडिट कार्डच्या लोकप्रियतेचे गुपित त्याच्या 'इंटरेस्ट-फ्री' (व्याजमुक्त) कालावधीत दडलेले आहे. क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना महिना किंवा सव्वा महिन्यापर्यंत मोफत रक्कम वापरण्याची मुभा मिळते. जर ही रक्कम मर्यादित वेळेत बँकांकडे जमा केली, तर ग्राहकाला एक रुपयाही जास्तीचा व्याज म्हणून द्यावा लागत नाही. मात्र, या मुदतीनंतर लागणारे चक्रवाढ व्याज हे अत्यंत महाग असते. तरीही, महिनाभराच्या मोफत सुविधेमुळे ग्राहक क्रेडिट कार्डकडेच अधिक आकर्षित होत आहेत..काय आहे नवीन प्लॅन?NPCI च्या नवीन प्लॅननुसार युपीआय क्रेडिट लाईनमध्ये आता क्रेडिट कार्डप्रमाणेच ग्रेस पीरियड मिळेल. या कालावधीत ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागणार नाही. तर ठराविक मुदतीत ही रक्कम ग्राहकाला परतफेड करावी लागेल. म्हणजे क्रेडिट कार्डप्रमाणेच या क्रेडिट लाईनचा उपयोग होईल. म्हणजे क्रेडिट लाईन आधारे ग्राहकांना बिल अथवा इतर वस्तूंसाठी खर्च करता येईल. एका मुदतीसाठी ही रक्कम वापरता येईल. त्या रक्कमेवर व्याजही द्यावे लागणार नाही आणि ही रक्कम परत करता येईल. त्यावर त्यांना वेगळे अथवा अतिरिक्त शुल्क अदा करावे लागणार नाही.आता ४५ दिवसांपर्यंत फ्री पैसेक्रेडिट कार्डांच्या मक्तेदारीला शह देण्यासाठी काही बँकांनी 'युपीआय क्रेडिट लाईन'वर (UPI Credit Line) व्याजमुक्त कालावधी देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात ग्राहकांना खिशात क्रेडिट कार्ड न ठेवताही, ४५ दिवसांपर्यंत मोफत पैसे वापरण्याची सुविधा केवळ एका 'स्कॅन'वर उपलब्ध होणार आहे. क्रेडिट कार्डच्या 'इंटरेस्ट फ्री पीरियड'ला टक्कर देण्यासाठी यस बँकेने (Yes Bank) आपल्या युपीआय क्रेडिट लाईनवर तब्बल ४५ दिवसांपर्यंत विनाव्याज रक्कम परत करण्याची सुविधा देऊ केली आहे. पाठोपाठ सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेनेही ग्राहकांसाठी ३० दिवसांचा व्याजमुक्त कालावधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे 'वापरल्या क्षणापासून व्याज' या युपीआय क्रेडिट लाईनच्या मोठ्या त्रुटीवर बँकांनी आता तोडगा काढण्यास सुरुवात केली आहे. बँकांनी गुंतवणुकीच्या नव्या योजनाही आखल्या आहेत. काही बँका आता ग्राहकांना मोठी रक्कम 'मुदत ठेव' (FD) म्हणून ठेवण्यास प्रोत्साहित करत आहेत. यावर ग्राहकांना एफडीचे नियमित व्याज तर मिळेलच, शिवाय त्या मुदत ठेवीच्या जोरावर क्रेडिट कार्ड आणि त्यावर आकर्षक कॅशबॅकही दिला जात आहे. अशा 'स्मार्ट' गुंतवणुकीमुळे ग्राहकांना बचतीसोबतच खर्चासाठीही जास्तीचे फायदे मिळत आहेत. अनेक डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म्स सध्या यासंदर्भात नवनवीन प्रयोग करत आहेत. जर बहुतांश बँकांनी युपीआयवर ३० ते ४५ दिवसांचा व्याजमुक्त कालावधी दिला, तर ग्राहकांना क्रेडिट कार्डची गरजच उरणार नाही. सहज सोपी प्रक्रिया, सुरक्षित व्यवहार आणि आता मोफत कालावधी यामुळे युपीआय क्रेडिट लाईन नजीकच्या भविष्यात क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या व्यवसायासमोर मोठे संकट उभे करण्याची शक्यता आहे.
मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का; नगरसेविका फुटली, ‘या’पक्षाच्या वाटेवर?
मुंबई: कल्याण-डोंबिवलीतील पडझडीनंतर आता मुंबई महापालिकेतही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक १५७ च्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के यांनी ठाकरे गटाची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईतील ठाकरे गटाची ही पहिलीच गळती मानली जात आहे. सेना भवनातील बैठकीला दांडी – शिवसेना ठाकरे […] The post मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का; नगरसेविका फुटली, ‘या’ पक्षाच्या वाटेवर? appeared first on Dainik Prabhat .
Omar Abdullah : “जम्मू-काश्मीरच्या एकतेशी तडजोड नाही”–ओमर अब्दुल्ला
Omar Abdullah – जम्मू आणि काश्मीरची एकता अखंड असून काही भाजप नेत्यांनी केलेली राज्याच्या विभाजनाची मागणी दिशाभूल करणारी आहे. ही मागणी शेवटी जम्मू प्रदेशाच्या हिताला हानी पोहोचवेल. जोपर्यंत केंद्रशासित प्रदेशात नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) चा झेंडा फडकत राहील तोपर्यंत कोणतीही शक्ती प्रादेशिक किंवा धार्मिक आधारावर या प्रदेशाचे विभाजन करण्याचे धाडस करणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री ओमर […] The post Omar Abdullah : “जम्मू-काश्मीरच्या एकतेशी तडजोड नाही” – ओमर अब्दुल्ला appeared first on Dainik Prabhat .
मुंबई: मुंबई सेंट्रल परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ताडदेव–नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासिस उड्डाणपूल येत्या २६ जानेवारीपासून म्हणजेच प्रजासत्ताक दिनी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. अवघ्या १५ महिने आणि सहा दिवसांत या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने महापालिका आणि मध्य रेल्वेच्या यशस्वी समन्वयाचे हे कौतुकस्पद उत्तम उदाहरण मानले जात आहे. .मुंबई सेंट्रल स्थानकाजवळील ब्रिटिशकालीन जुना बेलासिस पूल धोकादायक घोषित करण्यात आले होते त्यांनंतर त्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले होते. सप्टेंबर २०२४ मध्ये या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले, तर १ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. निविदेनुसार पुलाच्या कामासाठी अजून चार महिन्यांची मुदत शिल्लक असतानाच हे काम वेळेआधी पूर्ण करण्यात आले आहे. महापालिकेचा पूल विभाग आणि मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी सुरुवातीपासूनच काटेकोर नियोजन करत कामाची विभागणी केली. रेल्वे रुळावरील कामे मध्य रेल्वेने पूर्ण केली, तर गर्डरचे मजबुतीकरण, स्लॅब कास्टिंग, पुलाचा पृष्ठभाग आणि पोहोच मार्गाची कामे महापालिकेने पार पाडली.या प्रकल्पादरम्यान बेस्ट वाहिन्यांचे स्थलांतर, अडथळा ठरणारी १३ बांधकामे हटवून पुनर्वसन, एका गृहनिर्माण संस्थेची सीमाभिंत हटवणे तसेच उच्च न्यायालयातील खटल्यासारखी आव्हाने समोर आली. मात्र, सर्व अडचणींवर मात करत कामात कोणताही विलंब होऊ दिला गेला नाही, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
मोहित सोमण: अवेंनडस वेल्थ व हुरून इंडिया यांनी युथ (Uth) सिरीज २०२५ केलेल्या उद्योजकांचा क्रमवारीत ईशा अंबानी यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. एकीकडे भारताची स्टार्टअप इकोसिस्टीम (परिसंस्था) भारतीय बाजारात मजबूत होत असताना तरूणांची वयोगटातील वर्गवारी करत अवेंनडस वेल्थ (Avendus Wealth) व हुरून इंडिया (Hurun India) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच U40 व Uth Series 2025 आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील तरूण स्टार्टअप कंपनीच्या मालकांनी उत्पन्न केलेली संपत्ती निर्मिती व वय, रोजगार निर्मिती अशा विविध निकषांचा मागोवा घेणारी देशातील प्रथम पिढीतील उद्योजकांची यादी जाहीर केली. ईशा अंबानी U35 वयोगटातील उद्योजकांच्या यादीत सर्वाधिक रोजगार निर्मिती तयार करणाऱ्या उद्योजिका ठरल्या आहेत. त्यांनी २४७७८२ रोजगार निर्मिती केली असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे ४३६ उद्योजकांच्या यादीत ३४९ म्हणजेच जवळपास ८०% नावे ही महिलांची असल्याचे अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. एकूण Uth सिरीजमध्ये ४०० पुरूष, ३६ महिला असून U30 (३० वर्ष व त्याखालील) पुरूष ७४, स्त्रिया ६, U35 (३५ व त्याखालील). १४० पुरूष, १५ महिला, U40 (१८६ पुरूष व १५ महिला) असल्याचे अहवालात म्हटले आहे.आणखी महत्वाची बाब म्हणजे Uth Series मध्ये स्टार्टअपमधून रोजगार निर्मिती करणारे बंगलोर हे प्रथम क्रमांकाचे शहर ठरले असून क्रमांक दुसरा व तिसरा अनुक्रमे मुंबई व दिल्ली असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले. या नंबर सिरिजमध्ये बंगलोर (१०९), मुंबई (८७), नवी दिल्ली (४५), गुरूग्राम (३६) ही शहरे सर्वाधिक पुढे असल्याचे अहवालात म्हटले गेले. खास आकर्षण म्हणजे या उद्योग निर्मितीत सर्वाधिक वाटा सॉफ्टवेअर उत्पादने व सेवा यांचा असून त्यानंतर वित्तीय सेवा व उत्पादने व हेल्थकेअर यांचा क्रमांक लागतो असे निरिक्षण अहवालाने नोंदवले आहे. जर संपूर्ण औद्योगिक क्षेत्रे पाहिल्यास त्यानंतर अनुक्रमे कंज्यूमर गूडस, ट्रान्सपोर्टेशन, एज्युकेशन, इ कॉमर्स, रिअल इस्टेट, फूड बेवरेजेस, टेक्सटाइल या क्षेत्रांचा क्रमांक लागतो असे अहवालाने म्हटले आहे.आयआयटी खरगपूर २७ प्रवेशकांसह Uth सिरीजमध्ये आघाडीवर आहे, आणि भारताच्या भावी पिढीच्या नेत्यांमध्ये सर्वोच्च योगदान दिलेली संस्था म्हणून संस्थेने अव्वल स्थान मिळवलेले असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. तसेच अहवालातील माहितीनुसार, आयआयटी दिल्ली २६ प्रवेशकांसह (Entrants) दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर आयआयटी मद्रास २२ प्रवेशकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.आयआयटी बॉम्बे २० प्रवेशकांसह चौथ्या क्रमांकावर आहे, ज्यामध्ये ३५ वर्षांखालील (U35) (९) आणि ४० वर्षांखालील (U40) (९) गटांचे मोठे प्रतिनिधित्व आहे. आयआयटी रुरकी १६ प्रवेशकांसह पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवते. त्यामुळेच अहवालाने एकत्रितपणे,आयआयटी संस्था भारताच्या प्रतिभेच्या परिदृश्याला आकार देत आहेत, आणि प्रभावशाली संस्थापक व व्यावसायिक आघाडी नेत्यांसाठी एक स्थिरता निर्माण करत आहेत असे म्हटले.सॉफ्टवेअर उत्पादने आणि सेवा Uth सिरीजमध्ये ७७ प्रवेशकांसह आघाडीवर आहेत जे एकूण प्रवेशकांच्या १८% आहेत, आणि विशेषतः ३० वर्षांखालील (U30) संस्थापकांमध्ये त्यांचा प्रभाव अधिक आहे. हे भारताच्या वेगाने वाढणाऱ्या SaaS बाजाराचे प्रतिबिंब आहे, जो २७.३% CAGR दराने वाढून २०२२ पर्यंत ६२.९३ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे असे अहवालात म्हटले गेले आहे.उपलब्ध माहितीनुसार वित्तीय सेवा (Financial Services) उद्योग ४४ प्रवेशकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत ज्यांना प्रामुख्याने ३५ वर्षांखालील (U35) गटाचा मोठा पाठिंबा आहे. फिनटेक क्षेत्र जी आता जगातील तिसरी सर्वात मोठी परिसंस्था (Ecosystem) आहे, त्याने आर्थिक २०२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांतच १.६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मिळवली असून ज्यात सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्सनी भांडवलाचा मोठा वाटा आकर्षित केला. दरम्यान, आरोग्यसेवा क्षेत्र ३७ कंपन्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित निदान आणि वंचित बाजारपेठांना सेवा देणाऱ्या प्रादेशिक डिजिटल आरोग्य उपायांमुळे चालना मिळाली आहे. या क्षेत्राने केवळ २०२५ च्या पहिल्या सहामाहीत ८२८ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक मिळवली आहे, ज्यामुळे ते येथे सॉफ्टवेअर उत्पादने आणि सेवांनंतर दुसरे सर्वाधिक निधी मिळवणारे क्षेत्र ठरले आहे असे अहवालात म्हटले.ग्राहक वस्तू क्षेत्रात ३४ कंपन्यांचा समावेश आहे, त्यानंतर वाहतूक आणि लॉजिस्टिक्समध्ये ३२ आणि शिक्षण व प्रशिक्षणामध्ये २६ कंपन्या आहेत. ई-कॉमर्स, रिअल इस्टेट, अन्न आणि पेय पदार्थ आणि वस्त्रोद्योग, पोशाख आणि उपकरणे या क्षेत्रांनी मिळून ७६ कंपन्यांची भर घातली आहे, जे Uth सिरीजमध्ये समाविष्ट असलेल्या उद्योजकांच्या विस्तृत औद्योगिक विविधतेवर प्रकाश टाकते.अहवालानुसार,मुंबई ८७ प्रवेशकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्यामध्ये ४० वर्षांखालील (U40) गटाचा मोठा वाटा आहे (४३), तर नवी दिल्ली ४५ प्रवेशकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुरुग्राम ३६ प्रवेशकांचे योगदान देते ज्यामध्ये प्रामुख्याने ४० वर्षांखालील (U40) उद्योजकांचा मोठा वाटा आहे.इतर प्रमुख शहरांमध्ये, नोएडा, हैदराबाद, अहमदाबाद, कोलकाता आणि चेन्नई या तिन्ही गटांमध्ये सातत्यपूर्ण सहभाग दर्शवतात असे अहवालाने पुढे म्हटले.सर्वाधिक रोजगार निर्मिती करत असलेल्या शीर्ष ५ कंपन्यांमध्ये रिलायन्स रिटेल, शाही एक्सपोर्ट, रिलायन्स जिओ इन्फोकॉम, आरपी संजीव गोयंका ग्रुप, अपोलो हॉस्पिटल यांचा क्रमांक लागतो. तर सर्वाधिक स्टार्टअप कंपन्यांचे कार्यालय असलेली बंगलोर सह अनुक्रमे मुंबई, गुरू ग्राम, नवी दिल्ली, नोएडा यांचा क्रमांक लागतो. एकूणच कंपनीचे मूल्यांकन (Valuation) पाहिल्यास निरीक्षण केलेल्या कंपन्यांपैकी १ ते १०० युएस दशलक्ष डॉलर्स असलेल्या ४७, १०१ ते ५०० युएस दशलक्ष डॉलर्स असलेल्या ११८, ५०१ ते १००० दशलक्ष डॉलर्स असलेल्या ४५, १००१ व त्यावर असलेल्या ८६ कंपन्या आहेत असे आकडेवारीत स्पष्ट झाले.अहवालातील अतिरिक्त महत्वाचे मुद्दे -अवेंनडसवेल्थ– हुरुन इंडिया युथ सिरीज २०२५ च्या उद्योजकांनी स्थापन केलेल्या कंपन्यांचे एकत्रित मूल्यांकन ९५० अब्ज डॉलर्स (८३ लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त आहे, जे स्वित्झर्लंडच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे.अवेंनडस वेल्थ हुरुन – इंडिया युथ सिरीज कंपन्यांमध्ये एकत्रितपणे १.२ दशलक्षाहून अधिक लोक काम करतात.२४७७८२ कर्मचाऱ्यांसह, U35 मध्ये स्थान मिळवलेल्या ईशा अंबानी (३३) यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स रिटेल, युथ सिरीज २०२५ मधील सर्वात मोठी नियोक्ता कंपनी आहे.४३६ पैकी जवळपास ८०% म्हणजेच ३४९ उद्योजकांसह, पहिल्या पिढीचे उद्योजक अँवेंडस वेल्थ– हुरुन इंडिया युथ सिरीज २०२५ मध्ये आघाडीवर आहेत.३७ उद्योजकांसह, दुसऱ्या पिढीने कौटुंबिक व्यवसाय नेत्यांमध्ये सर्वात मोठे योगदान दिले आहे, आणि सर्व जुन्या पिढ्यांना मागे टाकले आहे.युथ सिरीज २०२५ मध्ये ३६ महिलांचा समावेश आहे, ज्यात पुरुष आणि महिला दोघांचे सरासरी वय ३५ आहे.आयआयटी खरगपूरने अँवेंडस वेल्थ – हुरुन इंडिया युथ सिरीज २०२५ मध्ये सर्वाधिक उद्योजकांचे (२७) प्रतिनिधित्व केले आहे, त्यानंतर आयआयटी दिल्ली (२६) आणि आयआयटी मद्रास (२२) यांचा क्रमांक लागतो.सॉफ्टवेअर उत्पादने आणि सेवा हे सर्वाधिक प्रतिनिधित्व असलेले क्षेत्र आहे ज्यात ७७ उद्योजक आहेत, त्यानंतर वित्तीय सेवा आणि आरोग्यसेवा क्षेत्रांत अनुक्रमे ४४ आणि ३७ उद्योजक आहेत.युथ सिरीज २०२५ चे उद्योजक भारताच्या एआय शर्यतीत आघाडीवर आहेत, या क्षेत्रात ३७ उद्योजक आणि २.५५ लाख कोटी रुपयांचे एकत्रित मूल्यांकन आहे. बेंगळूरु हे भारताची निर्विवाद 'युथ उद्योजक' राजधानी म्हणून उदयास आले आहे. ज्यात १०९ उद्योजक आहेत, त्यानंतर मुंबई (८७) आणि नवी दिल्ली (४५) यांचा क्रमांक लागतो.निखिल कामथ हे लिंक्डइनवर १.३९ दशलक्ष फॉलोअर्ससह भारतातील सर्वात जास्त फॉलो केले जाणारे युवा उद्योजक आहेत.त्यानंतर १.३२ दशलक्ष फॉलोअर्ससह रितेश अग्रवाल यांचा क्रमांक लागतो.गझल अलघ या यादीतील ६३३ हजार फॉलोअर्ससह सर्वात जास्त फॉलो केल्या जाणाऱ्या महिला उद्योजक आहेत.बेंगळूरु सर्व तीन वयोगटांमध्ये १०९ उद्योजकांसह युथ सिरीजमध्ये आघाडीवर आहे, ज्यात U35 (५४) आणि U40 (४८) यादीतील मजबूत कामगिरीचा मोठा वाटा आहे.केवळ २०२५ मध्ये, कर्नाटकने पायाभूत सुविधांमध्ये १ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली, ज्यात एका एआय शहराचा विकास आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्सना (GCCs) आकर्षित करण्यासाठीच्या धोरणांचा समावेश आहे.अहवाल सादर करणाऱ्या कंपन्याबद्दल-हुरुन रिपोर्ट हा १९९९ मध्ये लंडनमध्ये स्थापन झालेला एक संशोधन, लक्झरी प्रकाशन कंपनी आहे. भारत, चीन, फ्रान्स, यूके, यूएसए, ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा आणि लक्झेंबर्ग येथे कामकाज असलेल्या या समूहाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी जगभरात व्यापकपणे ओळखले जाते. हुरुन रिपोर्ट हा जागतिक स्तरावर श्रीमंतांच्या याद्या तयार करणारा सर्वात मोठा समूह आहे.अवेंनडस ग्रुपचा संपत्ती व्यवस्थापन व्यवसाय असलेल्या अवेंनडस वेल्थ मॅनेजमेंटकडे ९ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मालमत्ता व्यवस्थापनाखाली (Asset Under Management) आहे. २०१० मध्ये सुरू झालेल्या या वित्तीय कंपनीने आघाडीच्या कौटुंबिक कार्यालये, अति-श्रीमंत व्यक्ती (UHNI) आणि कॉर्पोरेट कंपन्यांसह विविध प्रकारच्या ग्राहकांना सेवा दिली असून कंपनी आपल्या ग्राहकांची गुंतवणूकीतील माध्यमातून संपत्ती वाढवण्यासाठी आणि संरक्षित करण्यासाठी अनुरूप आणि वेगळे उपाय तयार करण्यासाठी काम करते.
नाशिक महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपमधील तीन प्रभावी चेहरे चर्चेत
नाशिक : महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तावर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्पष्ट संख्याबळासह सत्तेवर आलेल्या भाजपमध्ये आता पुढील सत्तास्थापनेची गणिते आखली जात असून, विशेषतः महापौरपद कोणाकडे जाणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. पक्षांतर्गत पातळीवर हालचाली वाढल्या असून, वरिष्ठ नेत्यांपर्यंत थेट संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे.नाशिक महापालिकेत भाजपने मोठे यश मिळवत बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे शहराचा पुढील महापौर भाजपकडूनच निवडला जाणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, अनेक इच्छुक नेते मैदानात असल्याने अंतिम नाव जाहीर होण्यास विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.यावेळी नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्यामुळे महापौरपदाला प्रशासकीयदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनात शहर विकास, रस्ते, वाहतूक, स्वच्छता आणि सुविधा याबाबत महापालिकेची जबाबदारी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे या पदासाठी अनुभवी आणि विश्वासार्ह नेतृत्वाची निवड होणे आवश्यक असल्याचे मत पक्षातील वरिष्ठ पातळीवर व्यक्त केले जात आहे.निवडणूक निकालांच्या संख्याबळानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, इतर पक्ष तुलनेने कमी जागांवर मर्यादित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपला महापौरपदासह महत्त्वाच्या समित्यांवर वर्चस्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.महापौरपदाच्या शर्यतीत सध्या तीन नावांची सर्वाधिक चर्चा होत आहे. भाजपकडून पाचव्यांदा विजयी झालेले ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत खोडे हे अनुभवी आणि संघटनात्मक ताकद असलेले नेते मानले जातात. याआधी त्यांनी तीन वेळा शिवसेना आणि एकदा भाजपकडून निवडणूक जिंकली आहे. तसेच सुप्रिया खोडे आणि माजी आमदार सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप हेही दुसऱ्यांदा निवडून आल्याने त्यांच्या नावालाही महत्त्व दिले जात आहे.दरम्यान, महापौरपदासाठी लागू होणाऱ्या आरक्षणाबाबत लवकरच निर्णय अपेक्षित असून, त्यानंतरच अंतिम समीकरण स्पष्ट होणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर पक्षाची कोअर कमिटी महापौरपदाचा निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नाशिकच्या सत्तास्थानावर कोण विराजमान होणार, याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय; मंत्रालयातून समुद्रकिनाऱ्याचा ‘नजारा’ दिसण्यासाठी सरकारच मोठं पाऊल ..
मुंबई : मुख्य मंत्रालय सरकारी कामासाठी अपुरे पडत आहे. याशिवाय जागा कमी असलयाने मंत्रयांची गैरसोयही होत आहे. जुन्या इमारतीतून दक्षिण मुंबईचा प्रशस्त नजाराही पाहता येत नसल्याने, नवी इमारत बांधणायचे काम सरकारने हाती घेतले आहे. या कामाला आता वेग आला असून मुख्य पाच माजली इमारत ही बांधली जाणार आहे.राज्य सरकारने मंत्रालयाच्या मुख्य इमारतीला लागून नवीन इमारत उभारण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला त्यांनी सात मजली इमारत बांधण्याचे नियोजन केले होते परंतु,हेरिटेज समितीचा आक्षेप आणि सर्वोच्च न्यायालयाने मंत्रालय परिसरातील इमारतींना घालून दिलेली २४ मीटर उंचीची मर्यादा यामुळे नवी इमारत पाच मजली बांधण्याचा निर्णय झाला.मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांची दलाने आहेत. याशिवाय सचिवांचीही कार्यालये आहेत. येथून समुद्रकिनारा दिसतो. नव्या इमारतीचा पाचवा मजला बांधला की, समुद्रकिनाऱ्याचा ‘नजारा’ मंत्रालयातून दिसणार नाही. त्यामुळे नवी इमारत पाचऐवजी चारच मजल्यांची बांधावी, असे सरकारच्या विचाराधीन आहे. त्या दृष्टीने गंभीर चर्चाही सुरू आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय झाला नसल्याने तूर्त चार मजल्यांपर्यंत बांधकाम करण्याचे नियोजन केले जात असल्याचेही समजते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाला मंत्र्यांसाठी सुसज्ज इमारत बांधण्याचे लक्ष्य दिले. त्यानुसार मंत्रालयाची नवी इमारत १०० दिवसांत बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यासाठी इमारत बांधकामाचा कार्यादेश १ एप्रिल २०२५ रोजी जारी करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष सुरू करताना अनेक अडचणी आल्याने बांधकाम विभागाला १०० दिवसांत इमारत बांधून पूर्ण करणे शक्य झाले नाही. आता येत्या ३० एप्रिलपर्यंत बांधकाम पूर्ण करून महाराष्ट्र दिनी इमारतीचे लोकार्पण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.
कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत; कोकणकन्या, मत्स्यगंधा...
पनवेल: कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक हे विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसणार आहे, जवळजवळ महिनाभर हे ब्लॉक जाहीर करण्यात आले आहे.मध्य रेल्वेनं पनवेल ते कळंबोली दरम्यान महिनाभराचा मोठा ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकचा परिणाम केवळ मध्य रेल्वेपुरता मर्यादित न राहता, या मार्गावरून धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या एक्सप्रेस गाड्यांवरही होणार आहे. तुतारी, मांडवी, कोकणकन्या आणि मत्स्यगंधा या चार प्रमुख एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.वेळापत्रक का बदलणार?पनवेल-कळंबोली रेल्वे स्थानकांदरम्यान ओपन वेब गर्डरची उभारणी करण्यात येणार असून, हे काम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (DDFC) अर्थात समर्पित मालवाहतूक मार्ग प्रकल्पाचा भाग आहे. या कामासाठी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला असून, हा ब्लॉक १८ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान लागू राहणार आहे. रात्रकालीन ब्लॉकमुळे नियमित लोकल सेवांवर फारसा परिणाम होणार नसला, तरी १६ मेल-एक्सप्रेस गाड्या विलंबाने धावणार आहेत. यामध्ये कोकण रेल्वेच्या गाड्यांचाही समावेश आहे.
कल्याण-डोंबिवलीत सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग; मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता कोणाच्या हाती जाणार, यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. महापालिकेतील बहुमतासाठी सुरू असलेल्या हालचालींमध्ये आता नवे समीकरण चर्चेत आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्या मनसेकडून साथ मिळू शकते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.मनसेचे पाच नगरसेवक नवी मुंबईतील कोकण भवन येथे दाखल झाल्याने या घडामोडींना अधिकच महत्त्व आलं आहे. या भेटीत मनसेचे माजी आमदार राजू पाटील उपस्थित असल्यामुळे सत्तास्थापनेबाबत गुप्त चर्चा सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे नगरसेवक स्वतंत्र गट नोंदणीसाठी आले आहेत की सत्तेच्या गणितासाठी, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी ६२ हा आकडा महत्त्वाचा मानला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिंदे गटाचे ५३, भाजपचे ५०, ठाकरे गटाचे ११ आणि मनसेचे ५ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र ठाकरे गटातील काही नगरसेवक गट नोंदणीवेळी अनुपस्थित राहिल्याने फूट पडल्याची चर्चा सुरू झाली.या घडामोडीनंतर ठाकरे गटाचे संख्याबळ घटून ७ वर आल्याच्या चर्चा सुरु आहेत. उर्वरित काही नगरसेवक मनसेच्या संपर्कात असल्याची चर्चा असून, हे सर्व मिळून शिंदे गटाला पाठिंबा देऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र यावर अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.दरम्यान, कल्याण-डोंबिवलीतील सत्तासंघर्षात पुढील काही तास निर्णायक ठरण्याची शक्यता असून, मनसे नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
छ.संभाजीनगर: संभाजीनगर मधील एका व्यापाऱ्यांने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली. व्यापाऱ्याने सावकाराकडुंन पैसे उधार घेतल्याने व पैसे वेळेवर न देता येत असल्यामुळे ससावकरांकडुंन छळ होत असल्याचे त्याने 42 सेंकदाचा व्हिडीओ बनवत सोशल मिडिया वर पोस्ट करत आपली व्यथा सांगीतली. आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचं नाव शेख करीम शेख चुन्नू (वय 45)असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार,आझम शेख, वसीम बाबू बागवान, विलास शेटे, घायवट, विनोद राजपूत, मुकेश राजपूत आणि विक्रम राजपूत असं आरोपींचे नाव आहेत.नेमकी पार्श्वभूमी: शेख करीम हे शहरात बटाटा विक्रीचा व्यवसाय करत होते. व्यवसायाची चक्रे फिरवण्यासाठी त्यांनी काही खासगी व्यक्तींकडून कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्ज त्यांच्या जीवावर उठेल याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. गेल्या काही दिवसांपासून सावकारांनी कर्जाच्या वसुलीसाठी त्यांच्याकडे तगादा लावला होता. १९ जानेवारी रोजी, जेव्हा शहरात आठवडी बाजार भरला होता, तेव्हा एका महिला सावकाराने भरबाजारात करीम यांना अडवून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. सर्वांसमोर झालेला हा अपमान करीम यांच्या जिव्हारी लागला. इतकेच नाही, तर आरोपींनी त्यांच्या घरापर्यंत जाऊन कुटुंबासमोरही त्यांना मानसिक त्रास दिला होता.हृदयद्रावक शेवटचा व्हिडिओ: मंगळवारी सकाळी, टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी करीम यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक भावूक व्हिडिओ संदेश रेकॉर्ड केला. माझं माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे, पण विक्या आणि मुक्या मला खूप त्रास देत आहेत. या जाचाला आता मी कंटाळलो आहे, असे म्हणत त्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे. सात जणांवर गुन्हा दाखल: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार आणि व्हिडिओ पुराव्याच्या आधारे पोलिसांनी सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अन्नू आझम शेख, वसीम बाबू बागवान, विलास शेटे, घायवट, विनोद राजपूत, मुकेश राजपूत आणि विक्रम राजपूत यांचा समावेश आहे.
मंत्रिमंडळाची भारतीय लघु उद्योग विकास बँकेला (सिडबी) इक्विटी सहाय्याला मंजुरी
सिडबी स्पर्धात्मक दरांवर अतिरिक्त संसाधने निर्माण करू शकणार असल्याने, एमएसएमई क्षेत्राला मिळणाऱ्या कर्जाचा प्रवाह वाढेलसुमारे २५.७४ लाख नवीन एमएसएमई लाभार्थी जोडले जातीलनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय लघु उद्योग विकास बँकेला (सिडबी) ५००० कोटी रुपयांच्या इक्विटी सहाय्याला मंजुरी दिली आहे.५००० कोटी रुपयांचे हे इक्विटी भांडवल वित्तीय सेवा विभागद्वारे (DFS) तीन टप्प्यांमध्ये सिडबीमध्ये गुंतवले जाईल,आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ३००० कोटी रुपये (३१.०३.२०२५ रोजीच्या ५६८.६५ रुपये प्रति शेअर बुक व्हॅल्यू नुसार) आणि आर्थिक वर्ष २०२६-२७ व आर्थिक वर्ष २०२७-२८ मध्ये प्रत्येकी १००० कोटी रुपये (संबंधित मागील आर्थिक वर्षाच्या ३१ मार्च रोजीच्या बूक व्हॅल्युनुसार) मंजुरी देण्यात आल्याचे बँकेने आज आपल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.परिणाम:५००० कोटी रुपयांच्या इक्विटी भांडवलाच्या गुंतवणुकीनंतर, आर्थिक वर्ष २०२५ च्या अखेरीस ७६.२६ लाख असलेल्या एमएसएमईंना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याची संख्या आर्थिक वर्ष २०२८ च्या अखेरीस १०२ लाखांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.सुमारे २५.७४ लाख नवीन एमएसएमई लाभार्थी जोडले जातील. एमएसएमई मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध नवीनतम माहितीनुसार (३०.०९.२०२५ पर्यंत), ६.९० कोटी एमएसएमईद्वारे ३०.१६ कोटी रोजगार निर्माण झाले आहेत (म्हणजेच प्रति एमएसएमई ४.३७ व्यक्तींना रोजगार). ही सरासरी लक्षात घेता आर्थिक वर्ष २०२७-२८ च्या अखेरीस २५.७४ लाख नवीन एमएसएमई लाभार्थी जोडल्याने १.१२ कोटी रोजगारांची निर्मिती होण्याचा अंदाज आहे.पार्श्वभूमी:निर्देशित कर्जावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आणि पुढील पाच वर्षांत त्या पोर्टफोलिओमध्ये अपेक्षित वाढ झाल्यामुळे, सिडबीच्या ताळेबंदावरील जोखीम-भारित मालमत्तांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. या वाढीमुळे भांडवल-जोखमी-भारित मालमत्ता गुणोत्तर (CRAR) समान पातळीवर टिकवून ठेवण्यासाठी अधिक भांडवलाची आवश्यकता भासेल. सिडबीद्वारे विकसित केली जात असलेली, पतपुरवठ्याला चालना देण्याच्या उद्देशाने असलेली डिजिटल आणि डिजिटल-सक्षम तारण-मुक्त कर्ज उत्पादने, तसेच स्टार्टअप्सना दिले जाणारे व्हेंचर डेट, यामुळे जोखमी भारित (Risk Oriented) मालमत्तांमध्ये आणखी वाढ होईल, ज्यामुळे निरोगी CRAR राखण्यासाठी अधिक भांडवलाची गरज भासेल.निर्धारित पातळीपेक्षा खूप जास्त असलेला निरोगी CRAR (Compound Annual Growth Rate CAGR) क्रेडिट रेटिंगचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. निरोगी CRAR राखल्यामुळे सिडबीला अतिरिक्त भागभांडवलाच्या गुंतवणुकीचा फायदा होईल. या अतिरिक्त भांडवलाच्या गुंतवणुकीमुळे सिडबीला वाजवी व्याजदराने संसाधने निर्माण करणे शक्य होईल, ज्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) स्पर्धात्मक दरात पतपुरवठा वाढेल. प्रस्तावित इक्विटी गुंतवणूक टप्प्याटप्प्याने केल्यामुळे सिडबीला पुढील तीन वर्षांत उच्च तणावाच्या परिस्थितीत CRAR १०.५०% पेक्षा जास्त आणि पिलर १ व पिलर २ अंतर्गत १४.५०% पेक्षा जास्त राखणे शक्य होईल.
pune : महानगरपालिका हद्दीतील शाळा ‘यादिवशी’१२ वाजेनंतर राहणार बंद ; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
pune : पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने चौथ्या टप्प्याच्याअनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व सरकारी व खाजगी शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात; त्यांनतर शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत. स्पर्धेचा चौथा टप्पा हा […] The post pune : महानगरपालिका हद्दीतील शाळा ‘यादिवशी’ १२ वाजेनंतर राहणार बंद ; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश appeared first on Dainik Prabhat .
European Union । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी धक्का बसणार आहे. युरोपियन युनियन (EU) भारतासोबत मुक्त व्यापार करार (FTA) जाहीर करणार आहे, तर अमेरिका-EU व्यापार करार स्थगित होऊ शकतो. एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, आज फ्रान्समधील स्ट्रासबर्गमधील युरोपियन संसद अमेरिकेसोबत व्यापार करार स्थगित करण्याची घोषणा करू शकते. युरोपियन देश आणि अमेरिकेतील हा व्यापार करार […] The post डोनाल्ड ट्रम्प यांना बसणार दुहेरी झटका ! अमेरिकेविरुद्ध २७ देश एकवटले ; भारतासोबतचा व्यापार करारही मोडणार…? appeared first on Dainik Prabhat .
अमेरिकेत घडत आहेत धक्कादायक घडामोडी; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग
वाशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेकरिता रवाना झाले होते. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच त्यांच्या विशेष विमानाला तांत्रिक कारणांमुळे प्रवास अर्धवट सोडावा लागला. विमानाने नियोजित मार्ग बदलत तातडीने अमेरिकेत परत येत सुरक्षित लँडिंग केले.व्हाईट हाऊसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून विमानात तांत्रिक अडचण आढळल्यामुळे प्रवास पुढे न नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विमानाचे मेरीलँडमधील जॉइंट बेस येथे इमर्जन्सी लँडिंग कऱण्यात आली.दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या घटनेला विशेष महत्त्व दिले जात आहे. अमेरिकेचे इराणसोबत तसेच ग्रीनलँडशी संबंधित मुद्द्यांवर मतभेद वाढलेले असताना ट्रम्प यांचा दावोस दौरा अचानक थांबल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.अधिकृत पातळीवर मात्र या घटनेचा आंतरराष्ट्रीय तणावाशी कोणताही थेट संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ट्रम्प पुढील काही तासांत पर्यायी विमानाने दावोसकडे रवाना होणार की दौरा रद्द होणार, याबाबत अद्याप अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. या घटनेमुळे अमेरिकेतील तसेच जागतिक राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
“खामेनींना हात लावला तर फक्त हात कापणार नाही तर…” ; इराणची डोनाल्ड ट्रम्प यांना उघडपणे धमकी
Iran threatens Donald Trump। इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या देशव्यापी सरकारविरोधी निदर्शनांमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणला सतत धमक्या देत आहेत. इराणने आता अमेरिकेला एक मोठी धमकी दिली आहे. इराणच्या सशस्त्र दलाच्या प्रवक्त्याने,”जर अमेरिकेने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्याविरुद्ध […] The post “खामेनींना हात लावला तर फक्त हात कापणार नाही तर…” ; इराणची डोनाल्ड ट्रम्प यांना उघडपणे धमकी appeared first on Dainik Prabhat .
रणपति शिवराय स्वारी आग्रा टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा
रणपति शिवराय स्वारी आग्रा टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरामुंबई : छत्रपती शिवराय केवळ धैर्य आणि नेतृत्वामुळे नव्हे, तर त्यांच्या तल्लख बुद्धिमत्ता, अद्वितीय रणनीती आणि विचारसरणी यामुळे सदैव आपल्या स्मरणात आहेत. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले. शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही एक जोखमीची घटना होती. पण या भेटीतून त्यांच्या कणखर नेतृत्वाची खरी झलक दिसली. हा सगळा शौर्याचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला, निमित्त होते…‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्याचे. शिववंदना, शिवशाहिरांकडून सादर झालेल्या दमदार पोवाडा सादरीकरणाने हा ट्रेलर अनावरण सोहळा रंगला.मराठी चित्रपटाच्या विस्तारणाऱ्या कक्षेसोबत त्याच्या मार्केटिंग आणि प्रसिद्धीच्या संकल्पनाही कमालीच्या विस्तारत आहेत.‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासात दडलेले सुपरहिरोज AI आधारित चॅटबॉटच्या मदतीने आता आपल्याशी संवाद साधणार आहेत. या ट्रेलर अनावरण प्रसंगी महाराजांचा ‘तिसरा डोळा’ अशी ख्याती असणाऱ्या बहिर्जी नाईक यांच्या व्यक्तिरेखेच्या चॅटबॉटचे अनावरण करण्यात आले. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाच्या निमित्तानं झालेला हा प्रयत्न जो मराठी सिनेसृष्टीसोबतच शिवप्रेमी रसिकांसाठीसुद्धा अभिमानास्पद आहे. हे चॅटबॉट युजरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं विविध भाषेत अवघ्या काही सेकंदात देते.औरंगजेबासारखा अत्यंत दगाबाज, कपटी बादशहा, सर्वत्र कडेकोट पहारा आणि आजूबाजूला निराशेचा अंधार अशा मोठ्या बिकट अवस्थेत शिवाजी महाराजांची आग्रा भेट झाली होती. माणसांची उत्तम पारख असणारे, दूरदृष्टी व राजकीय जाण असणाऱ्या महाराजांनी या सगळ्या गोष्टी कशा हाताळल्या आणि ही स्वारी कशी यशस्वी केली याची झलक या ट्रेलर मध्ये पहायला मिळते आहे. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ३० जानेवारीला प्रेक्षक भेटीला येणार आहे.‘शिवरायांच्या अष्टावधानी नेतृत्वाची, शौर्याची महती, शिस्तबद्ध आखणी या साऱ्यांचा अनुभव देणारा हा चित्रपट नव्या पिढीला खूप काही शिकवणारा असेल, असा विश्वास लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केला. शिवकाळातलं एक सुंदर आणि तेजस्वी पान उलगडण्याचा प्रयत्न आम्ही केला असून हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांची मेहनत लक्षात येईलच. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यात यशस्वी नक्की होईल अशी खात्री निर्मात्यांनी व्यक्त केली. चित्रपटाविषयीचे अनुभव आणि आपल्या भूमिकेचे नानाविध पैलू चित्रपटातील कलाकारांनी याप्रसंगी उलगडले.‘पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा, आलोक शर्मा (मुगाफी) आहेत.चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, नुपूर दैठणकर, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर, अभिलाष चौधरी, अयन कर्णे, अमित देशमुख, अभ्यंग कुवळेकर, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, भूषण शिवतारे, संकेत ओक कलाकारांच्या भूमिका आहेत. पॅनोरमा स्टुडिओज या चित्रपटाचे जगभरात (वर्ल्ड वाईड) वितरण करणार आहे.
मुंबई : भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सुरू केलेल्या 'अमृत भारत एक्सप्रेस' ताफ्यात आता आणखी ९ नव्या गाड्यांची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले असून, यामध्ये मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली अलीपुरद्वार-मुंबई (पनवेल) अमृत भारत एक्सप्रेस सामील आहे. या नव्या रेल्वेसेवेमुळे मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांना थेट पूर्व भारताशी जोडणारा एक परवडणारा आणि वेगवान पर्याय उपलब्ध झाला आहे. अमृत काळाच्या संकल्पनेतून साकारलेली ही 'अमृत भारत एक्सप्रेस' पूर्णपणे नॉन-एसी आणि लांब पल्ल्याची स्लीपर ट्रेन आहे. कमी तिकीट दरात आरामदायी प्रवास व्हावा, या उद्देशाने ही ट्रेन डिझाइन करण्यात आली आहे. विशेषतः कामानिमित्त ये-जा करणारे कामगार, विद्यार्थी आणि सणासुदीला गावी जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे. या गाडीत आधुनिक सुविधांचा समावेश असून प्रवाशांचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचणार आहेत. या नव्या गाडीचा टर्मिनस पनवेल ठेवण्यात आला आहे. पनवेल हे नवी मुंबई, रायगड आणि कोकण भागाचे प्रवेशद्वार असल्याने या परिसरातील नागरिकांना आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी दक्षिण मुंबईत जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वरील प्रवाशांचा भार कमी होण्यास मदत होईल. तसेच कल्याण आणि ठाणे परिसरातील प्रवाशांसाठीही ही गाडी अत्यंत सोयीची ठरणार आहे. अलीपुरद्वार ही गाडी पश्चिम बंगाल आणि उप-हिमालयीन भागाला जोडते. या नव्या सेवेमुळे पर्यटनासोबतच उत्तर-पूर्व भारताशी असणारे व्यापार आणि रोजगार संबंध अधिक दृढ होणार आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत ३० गाड्या धावत होत्या, ज्यात आता ९ नव्या गाड्यांची भर पडल्याने एकूण संख्या ३९ वर पोहोचली आहे.https://prahaar.in/2026/01/21/dahisar-bhayandar-metro-9-line-railway-first-phase-will-start-in-february-covering-13-kilometer-route-with-10-stations/वेळापत्रक काय आहे?ट्रेन क्रमांक ११०३१ पनवेल–अलीपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेसपनवेलहून सुटणार : दर सोमवारी सकाळी ११:५० वाजताअलीपुरद्वारला पोहोचणार: बुधवारी दुपारी १:५० वाजताट्रेन क्रमांक ११०३२ अलीपुरद्वार–पनवेल अमृत भारत एक्सप्रेसअलीपुरद्वारहून सुटणार : दर गुरुवारी पहाटे ४:४५ वाजतापनवेलला पोहोचणार: शनिवारी पहाटे ५:३० वाजताकसे असतील थांबे?कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, मिर्झापूर, पं. दीन दयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, कटिहार, न्यू जलपाईगुडी, सिलीगुडी यांसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर ही एक्सप्रेस थांबणार आहे.अवघ्या ५०० रुपयांत १००० किमीचा प्रवासरेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अमृत भारत एक्सप्रेसचे भाडे साधारणपणे ५०० रुपये प्रति १००० किलोमीटर या दराने आकारले जाणार आहे. याचा अर्थ असा की, अतिशय कमी खर्चात प्रवासी देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकतील. कमी अंतराच्या प्रवासासाठी देखील याच प्रमाणात माफक दर निश्चित करण्यात आले आहेत. खाजगी वाहने किंवा इतर एक्सप्रेस गाड्यांच्या तुलनेत हे दर अत्यंत कमी असल्याने सर्वसामान्य आणि स्थलांतरित कामगारांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. ही गाडी केवळ स्वस्तच नाही, तर मोठ्या संख्येने प्रवाशांना सामावून घेणारी आहे. अमृत भारत एक्सप्रेसमध्ये एकूण २२ डब्यांचे नियोजन करण्यात आले असून त्याची रचना खालीलप्रमाणे आहे. आरक्षणाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सर्वाधिक जागा. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायी शयनयान व्यवस्था. दिव्यांग प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र आणि सुलभ प्रवेशाचा डबा (कंपार्टमेंट) देण्यात आला आहे. १ पॅन्ट्री कार (खाद्यपदार्थांसाठी), २ सेकंड क्लास-कम-लगेज-कम-गार्ड व्हॅन. ही गाडी पूर्णपणे नॉन-एसी (विनावातानुकूलित) असली तरी, त्यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. प्रत्येक डब्यात आधुनिक स्वच्छतागृहे, मोबाइल चार्जिंग पॉईंट्स आणि प्रवासादरम्यान हादरे बसू नयेत यासाठी 'पुश-पुल' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
जय–पराजय विसरून एकत्र; वाघोलीत जपली राजकीय संस्कृती
वाघोली – वाघोली (तालुका हवेली) येथील पंचायत समिती हवेलीच्या माजी सभापती वसुंधरा शिवदास उबाळे व रत्नमाला संदीप सातव यांच्यात नगरसेवक पदासाठी निवडणूक झाली होती. रत्नमाला सातव या निवडणुकीत विजयी झाल्या असल्या तरीही वसुंधरा शिवदास उबाळे व रत्नमाला संदीप सातव यांचे कौटुंबिक संबंध असल्याने निवडणुकीतील जय पराजय विसरून एकमेकांना शुभेच्छा दोन्ही कुटुंबीयांनी दिल्या असून याच माणुसकीच्या […] The post जय–पराजय विसरून एकत्र; वाघोलीत जपली राजकीय संस्कृती appeared first on Dainik Prabhat .
स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र
गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थानमुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सरकारमधील महायुतीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढला आणि त्यांचे तीन नगरसेवक निवडून आले. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असल्याने या तीन नगरसेवकांची मते आपल्याला मिळतील अशाप्रकारची धारणा महायुतीतील भाजपा आणि शिवसेनेची असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्र्वादी काँग्रेस (शप) तसेच समाजवादी पक्ष येत एक स्वतंत्र गट स्थापन करत आहेत.त्यामुळे अशाप्रकारे गट केल्यास त्यांचाही एक सदस्य विविध समित्यांवर जावू शकतो आणि प्रसंगी या गटातील सदस्य परिस्थितीनुसार कुणाच्याही बाजूने मतदान करू शकतात असे चित्र बोलले जात आहे.मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची तसेच त्यांच्या गटांची नोंदणी प्रक्रिया सुरु असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस शपचा एक आणि समाजवादी पक्षाचे दोन अशाप्रकारे सहा नगरसेवक आहेत. यासर्वांची स्वतंत्र नगरसेवक म्हणून नोंदणी न करता एक गट म्हणून तिन्ही पक्षांची नोंदणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीकोनातून हालचाली सुरु आहेत. जर स्वतंत्र नगरसेवकांची नोंदणी झाल्यास या तिन्ही पक्षातील नगरसेवकांना स्वतंत्रपणे बसावे लागणार आहे तसेच त्यांना कोणत्याही समितीमध्ये स्थान मिळणार नाही. त्यातुलनेत तिन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी गट केल्यास महत्वाच्या समित्यांमध्ये प्रत्येक एक एक सदस्य जावू शकतो.राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डॉ सईदा खान, बुशरा मलिक,आयेश शम्स खान हे तिन नगरसेवक निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रसे (शप) पक्षाने उबाठा आणि मनसेने आघाडीमध्ये निवडणूक लढवली आहे. या पक्षाच्यावतीने अजित रावराणे हे एकमेव नगरसेवक निवडून आले आहेत. तर समाजवादी पक्षाच्यावतीने अमरीन शेहजाद अब्राहनी आणि इरम साजिद अहमद सिद्दीकी हे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे या तिन्ही पक्षाच्यावतीने गट करून प्रत्येक समित्यांमध्ये प्रत्येकी एक नगरसेवकांची वर्णी लावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.विशेष म्हणजे राष्ट्रवादी कांग्रेस हा सरकारमधील महायुतीतील घटक पक्ष असल्याने त्यांचे तीन नगरसेवकांसोबत भाजप तसेच शिवसेना यांची एकत्र येत गट स्थापन केला असता तरी विविध समित्यांमध्ये महायुतीचे संख्याबळ वाढू शकते. तसेच शिवसेना आणि भाजप यांचाही गट केल्यास त्यांचे संख्या बळ वाढू शकते. मात्र गट केल्यास पाच वर्षांतील बांधिलकी कायम राहणार असून एकच गट असल्याने या गटाचा प्रमुख नेता असलेल्याचा व्हिप पाळणे सर्व सदस्यांवर बंधनकारक राहणार आहे. त्यामुळेच सर्व पक्ष स्वतंत्र गट तयार करून अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रमुंबईत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडून शरद पवार हे उबाठा आणि मनसेसोबत गेले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वतंत्र निवडणूक लढली. परंतु आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईत एकत्र येण्याची चिन्हे असून गट करत हे दोन्ही पक्ष एकत्र येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक असल्यामुळे या पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका डॉ सईदा खान या गटनेत्या होवू शकतात,असे बोलले जात आहे.
मुंबईच्या महापौर पदाबाबत सस्पेंस कायम; एकनाथ शिंदेंनी गाठली दिल्ली, राजकीय हालचालींना वेग
Eknath Shinde | मुंबई महानगरपालिकेत 89 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. उद्धव ठाकरेंची शिवसेना 65 जागांवर विजयी झाली. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अवघ्या 29 जागांवर विजय मिळवता आला आहे. मात्र, भाजपला बहुमतासाठी आवश्यक असलेला 114 चा आकडा गाठण्यासाठी त्यांना शिंदे यांच्या 29 नगरसेवकांची साथ अनिवार्य आहे. दरम्यान, महापालिका निकालानंतर आता महापौर पदाबाबत सस्पेंस कायम […] The post मुंबईच्या महापौर पदाबाबत सस्पेंस कायम; एकनाथ शिंदेंनी गाठली दिल्ली, राजकीय हालचालींना वेग appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो-९ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला 'कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी' (CMRS) कडून अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. या तांत्रिक मंजुरीमुळे दहिसर ते काशिगाव हा मार्ग आता अधिकृतपणे प्रवाशांसाठी खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, फेब्रुवारी महिन्यात हा सुखद प्रवास सुरू होण्याची दाट शक्यता आहे. मेट्रो-९ मार्गिकेवर मेट्रो धावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे सुरक्षा प्रमाणपत्र मिळवणे ही मोठी उपलब्धी आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावरील ट्रॅक, सिग्नलिंग, वीज पुरवठा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची सखोल तपासणी पूर्ण केली आहे. या परीक्षणात मेट्रो यशस्वी ठरल्याने आता या मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त शोधण्याचे काम सुरू झाले आहे. मेट्रो-९ (दहिसर-काशिगाव) आणि मेट्रो २-बी (मंडाळे ते डी.एन. नगर) चा पहिला टप्पा एकाच वेळी किंवा काही दिवसांच्या अंतराने सुरू करण्याचे नियोजन आहे. दोन्ही मार्गिकांच्या कामाचा वेग पाहता, फेब्रुवारी महिन्यात मुंबईकरांना दुहेरी मेट्रो भेट मिळण्याची शक्यता आहे.https://prahaar.in/2026/01/21/maharashtra-makes-a-historic-leap-at-davos-signs-agreements-with-11-global-companies-for-the-third-mumbai-project/वाहतूक कोंडी आणि वेळेची बचतदहिसर ते मीरा-भाईंदर या दरम्यान सध्या रस्त्याने प्रवास करताना प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (WEH) गर्दीमुळे प्रवाशांचा तासनतास वेळ वाया जातो. मेट्रो-९ सुरू झाल्यामुळे हा प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होईल. दहिसर आणि काशिगाव ही दोन महत्त्वाची उपनगरे मेट्रोने जोडली गेल्याने रेल्वे आणि रस्त्यावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. आगामी फेब्रुवारी महिन्यात या मार्गिकेचे उद्घाटन सोहळा पार पडू शकतो. काही किरकोळ सुशोभीकरणाची कामे वगळता सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, आता फक्त प्रत्यक्षात प्रवाशांना मेट्रोमध्ये बसण्याची उत्सुकता लागली आहे.४.४ किमीचा पहिला टप्पा फेब्रुवारीत धावणारदहिसर ते मीरा भाईंदर (मेट्रो-९) या मार्गिकेतील पहिल्या टप्प्याला 'कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी' (CMRS) कडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. यामुळे दहिसर ते काशिगाव दरम्यानच्या ४.४ किलोमीटर अंतरावर मेट्रो धावण्यासाठी हिरवा कंदिल मिळाला असून, एमएमआरडीएने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. मेट्रो-९ ही मार्गिका एकूण १३.६ किलोमीटर लांबीची असून त्यावर एकूण १० स्थानके असणार आहेत. सध्या यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गामुळे दहिसर आणि भाईंदर दरम्यानचा प्रवासाचा वेग लक्षणीयरीत्या वाढणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीत तासनतास अडकणाऱ्या प्रवाशांसाठी ही मेट्रो संजीवनी ठरणार आहे. एमएमआरडीएचे सुरुवातीचे नियोजन ही मेट्रो जानेवारी २०२६ च्या अखेरीस सुरू करण्याचे होते. मात्र, सोमवारी मिळालेल्या सीएमआरएस (CMRS) प्रमाणपत्रामुळे आता सर्व कायदेशीर आणि तांत्रिक अडथळे दूर झाले आहेत. आता केवळ उद्घाटनाचा मुहूर्त मिळणे बाकी असून, फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना ही मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, एमएमआरडीए केवळ मेट्रो-९ च नव्हे, तर मंडाळे ते डी.एन. नगर (मेट्रो २-बी) या मार्गिकेचा पहिला टप्पा देखील याच मुहूर्तावर सुरू करण्याच्या तयारीत आहे.प्रमाणपत्र मिळूनही 'मेट्रो २-बी' स्थानकावरच रखडली! आता तरी लोकार्पण होणार का?आश्चर्याची बाब म्हणजे, या मार्गिकेतील मंडाळे ते चेंबूर या पहिल्या टप्प्याला 'कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी' (CMRS) कडून अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र मिळून आता तब्बल तीन महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप या मार्गावर मेट्रो धावू शकलेली नाही. मेट्रो २-बी मार्गिका तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे सज्ज असूनही केवळ उद्घाटनाच्या अधिकृत सोहळ्यासाठी ती थांबवण्यात आली आहे. मेट्रो २-बी ही मार्गिका पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. मंडाळे ते चेंबूर हा टप्पा सुरू झाल्यास मानखुर्द, चेंबूर आणि गोवंडी परिसरातील प्रवाशांना शिवाजी नगर किंवा चेंबूर गाठणे अत्यंत सोपे होणार आहे. बस आणि रिक्षेच्या रांगेतून प्रवाशांची सुटका होईल, मात्र उद्घाटनाचा पेच सुटल्याशिवाय हे शक्य नाही. मेट्रो २-बी आणि नुकत्याच सुरक्षा प्रमाणपत्र मिळालेल्या मेट्रो-९ (दहिसर-काशिगाव) या दोन्ही मार्गांचे उद्घाटन एकत्रितपणे करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जाऊ शकते. फेब्रुवारी महिन्यात दोन्ही मेट्रो मार्गिका एकाच वेळी सुरू करून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून होण्याची शक्यता आहे.
Donald Trump। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जात होते. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच त्यांचे विशेष विमान, एअर फोर्स वनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव, विमान ताबडतोब मेरीलँडमधील जॉइंट बेस अँड्र्यूज येथे परत आणण्यात आले जेणेकरून राष्ट्रपती कोणताही धोका न घेता दुसऱ्या विमानातून प्रवास करू […] The post ट्रम्प यांच्या फोर्स वन विमानात उड्डाणानंतर काही वेळातच बिघाड ; अर्ध्यातून परतले मायदेशी, दावोस दौरा रद्द appeared first on Dainik Prabhat .
Nidhi Aggarwal : गेल्या काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा ‘द राजा साब’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळताना दिसत आहे. त्यामुळे बॅाक्स अॅाफिसवर बऱ्यापैकी कलेक्शन गोळा करण्यात चित्रपटाला यश मिळताना दिसत आहे. अभिनेत्री निधी अग्रवाल हिने या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली असून, प्रभाससोबत काम करताना आलेला अनुभव तिने शेअर करत […] The post निधी अग्रवालने प्रभासोबत काम करण्याचा अनुभव केला शेअर; कौतुक करत म्हणाली “तुम्ही त्याला एकदा भेटलात की…” appeared first on Dainik Prabhat .
Kids Immunity Boosting Tips: हिवाळ्याचा ऋतू सुरू झाला की लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच थंडीचा त्रास जाणवतो. विशेषतः मुलांना सर्दी, खोकला, घसा दुखणं यांसारख्या तक्रारी जास्त होतात. त्यामुळे पालकांची चिंता वाढते. अशावेळी आयुर्वेदात सांगितलेल्या काही सोप्या उपायांनी मुलांची इम्युनिटी मजबूत करता येऊ शकते. रात्रीच्या दूधात काही नैसर्गिक मसाले योग्य प्रमाणात घातल्यास शरीराला उब मिळते आणि आजारांपासून […] The post Kids Immunity Boosting Tips: हिवाळ्यात मुलांची इम्युनिटी वाढवतील या ३ आयुर्वेदिक गोष्टी; अशा पद्धतीने करा सेवन appeared first on Dainik Prabhat .
सोनम कपूरचे खास अंदाजात ‘मॅटर्निटी’फोटोशूट; दुसऱ्यांदा होणार आई
Sonam Kapoor | अभिनेत्री सोनम कपूर तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. फॅशन आयकॉन म्हणून ओळख मिळवणाऱ्या सोनमने अलीकडेच केलेल्या फोटोशूटवरून ते पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अभिनेत्री लवकरच वयाच्या 40 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार असून, अलिकडेच तिने बेबी बंब फ्लॉन्ट करत स्टायलिश अंदाजात फोटोशूट केलं. सोनमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काही खास फोटो शेअर […] The post सोनम कपूरचे खास अंदाजात ‘मॅटर्निटी’ फोटोशूट; दुसऱ्यांदा होणार आई appeared first on Dainik Prabhat .
सोन्याच्या किमतींचा उच्चांक तर चांदी देखील तेजीत ; वाचा आजचा सोन्या-चांदीचा भाव
Gold Silver Price। भारतीय कमोडिटी बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. सोन्याच्या किमतींनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला. चांदीच्या किमतीतही मोठी वाढ झाली. अमेरिका-युरोप व्यापार युद्धाची शक्यता, कमकुवत डॉलर आणि मजबूत किरकोळ मागणी ही या वाढीमागील मुख्य कारणे असल्याचे सांगितले जात आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ फेब्रुवारीसाठी सोन्याचे वायदे प्रति ग्रॅम १,५८,२५० रुपयांवर पोहोचले. सोने […] The post सोन्याच्या किमतींचा उच्चांक तर चांदी देखील तेजीत ; वाचा आजचा सोन्या-चांदीचा भाव appeared first on Dainik Prabhat .
भूमी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत! ‘दलदल’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज
DalDal Movie Trailer : प्राइम व्हिडिओवर लवकरच ‘दलदल’ नावाची थ्रिलर वेबसिरीज येणार असून, या वेबसिरीचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या वेबसिरीजमधून अभिनेत्री भूमी पेडणेकर पुन्हा एकदा दमदार भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला आली आहे. या वेबसिरीजमध्ये भूमी एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या वेबसिरीजची कथा धामीजा यांचे बेस्टसेलिंग […] The post भूमी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत! ‘दलदल’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज appeared first on Dainik Prabhat .
मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार
मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. यंदाचा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.बुधवारी दुसऱ्या दिवशी प्रामुख्याने धोरणात्मक असे सामंजस्य करार करण्यात आले. ज्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्निया, युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह -लंडन, आयसीसीआय-इटली, अँलाँग ट्युनिंग इन्स्टिट्यूट, नॉर्वेजीयन जीओ टेक्निकल इन्स्टिट्यूट, अर्बन प्लॅनिंगमधील सुबाना जुराँग – सिंगापूर यांच्यासोबत टेक्निकल सामंजय्स करार केले आहेत. यातून एक प्रकारे आम्ही केवळ गुंतवणूक नाही, तर ज्ञान आणि तंत्रज्ञान आणतो. यातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणता येतील, वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्यारितीने काम करता येईल. अर्बन प्लॅनिंग, ट्रान्सपोर्टशी संबंधित करारांमुळे प्रत्येक शहरातील वाहतूक सुविधांची सरंचना चांगल्या रितीने करता येणार आहे.शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहचविण्यासाठी मेडटेक सहकार्यराज्यातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सुविधा पोहचविण्याचा प्रय़त्न आहे. त्यादृष्टीने यंदा दावोसमध्ये मेडीकल-टेक्नॉलॉजीबाबत एका सत्रात चांगली आणि सकारात्मक चर्चा केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यातून राज्यातील आरोग्य सुविधांसाठीचा रोडमॅप निश्चित करण्यात आला. यातून आपल्याला राज्यात मेड-टेक स्टार्टअपची चांगली इकोसिस्टिम निर्माण करण्याचा प्रय़त्न. त्यासाठी जगातील अशी सुविधा उभ्या करणाऱ्या सर्वोत्तम कंपनीशी करार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, नवीन बिझनेस डिस्ट्रीक्टची निर्मिती- नवी मुंबई विमानतळापासून पंधरा ते वीस किलोमीटरवर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. त्याबाबत दावोसमध्ये घोषणा करण्यात आली. गेल्या तीन-चार वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळविण्यात येत होत्या. त्या मिळाल्यानंतर आज या तिसऱ्या मुंबईतील पहिल्या शहराची घोषणा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.- याठिकाणी प्लग अँण्ड प्ले या धर्तीवर रेडी टू स्टार्ट पद्धतीने संबंधित घटक लगेच कामकाज सुरु शकणार आहेत. ही देशातील पहिली कंपनी, यामध्ये खासगी – सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) प्रकल्प असणार आहे. यात शासन, एमएमआरडीए आणि खासगी घटक एकत्र येऊन काम करतील. याठिकाणी नवीन बिझनेस डीस्ट्रिक्ट तयार करतो आहोत. याठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या तसेच ग्लोबल कॅपिसीटी सेंटर्स, फिनटेकची इकोसिस्टम तयार होईल. बीकेसीच्या धर्तीवर याठिकाणी बिझनेस डिस्ट्रीक्ट स्थापन होईल. या शहराच्या घोषणेनंतर सुमारे एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार देखील झाल्या आहेत. यासाठी जगातील दिग्गज अशा कंपन्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामध्ये रिपब्लिक ऑफ कोरीयाचा हवाना ग्रुप, स्वित्झर्लंडमधून एसएसबी ग्रुप, एन्सार, फेडेक्स हे अमेरितील समूह, फिनलंडचा रिव्हर रिसायकल समूह, दुबईचा एमजीएसए समूह, सिंगापूरचा स्पेसेस होल्डिंग मेपल ट्री, जीनव्ही आणि इंडोस्पेस पार्क समूह, अमेरिकेतून ट्रिबेका डेव्हलपर्स. या विदेशी गुंतवणूकीतून एक खूप चांगले शहर तयार होईल. याठिकाणी वॉक टू वर्क अशा पद्धतीने सुविधा निर्माण होतील. अशा रितीने तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर आता प्रत्यक्षात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.जागतिक बँकेचे अध्यक्ष बंगा यांच्याशी चर्चामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्याशी चर्चा केली. यामध्ये महाराष्ट्रात हरित औद्योगीक पट्टा (ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर) विकसित करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक येऊ शकते. यातून एमएसएमई क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरण तसेच निर्यात क्षमतेला मोठा वाव मिळणार आहे. शासन आणि बँकेच्या सहकार्यातून महाराष्ट्रातील धोरणात्मक आणि प्रभावी औद्योगिक विकासाला चालना देता येणार आहे.बर्मुडाचे पंतप्रधान बर्ट यांच्याशी संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बर्मुडाचे पंतप्रधान डेव्हिड बर्ट यांची भेट झाली. या भेटीत उभयतांनी विविध विषयांवर चर्चा केली. सर्वसमावेशक विकास, लोकाभिमूखता आणि विकास क्षेत्रातील नाविन्यपूर्णता या अनुषंगाने धोरणात्मक चर्चा झाली. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी आणि जगभरातील विविध घटकांच्या दृष्टीने स्वागतशील भूमिका घेऊन सज्ज आहे. यातून पारदर्शक, विश्वासार्ह आणि दीर्घकालीन अशी व्यवस्था निर्माण होणे अपेक्षित आहे. अशा संवादातून एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील दृढ संबंध प्रस्थापित होतील. ह्युंदाईचे अध्यक्ष सुंग किम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्रात असणे हे आमच्यासाठी आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. राज्य सरकारने जाहीर केलेले ईव्ही धोरण अतिशय चांगले असून येणाऱ्या काळात 5 नवीन ईव्ही मॉडेल्स आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. ह्युंदाई सीएसआर क्षेत्रात सुद्धा मोठे काम करीत असून शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रात अधिक सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. ह्युंदाईच्या पुणे येथील प्रकल्पाच्या उद्घाटनाचे निमंत्रण सुद्धा यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले.२.५ बिलियन डॉलर्स टर्मिनल संधीचे सूतोवाच जेबीआयसीचे गव्हर्नर हयाशी नोबुमित्सू यांनी भारत–जपान सहकार्य संबंधात महाराष्ट्रासोबत ईव्ही बसेस, अर्बन मोबॅलिटी या क्षेत्रात एकप्रकारे हरित गुंतवणूकीच्या मोठ्या संधी असल्याचे नमूद केले. एपी मोलर मर्सेकचे सीईओ विन्सेंट क्लार्क यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत महाराष्ट्रात 2.5 बिलियन डॉलर्स टर्मिनल संधीचे सूतोवाच केले. भारत आणि युरोपियन युनियन सप्लाय चेन कॉरिडॉर याबाबत सुद्धा चर्चा केली. फिनलंडचे परराष्ट्र व्यापार व्यवहार आणि विकास मंत्री विले त्याविओ यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेत भारत आणि फिनलंडमधील सहकार्यांबाबत चर्चा चर्चा केली. मुंबई येथे मे-जून महिन्यात सर्क्युलर इकॉनॉमीसंदर्भात एक परिषद आयोजित करण्याबाबत सुद्धा यावेळी चर्चा झाली. इस्रायल इनोव्हेशन अथॉरिटीचे अध्यक्ष अलोन स्टोपेल यांच्याशी विविध नाविन्यपूर्ण संशोधन क्षेत्रात भागीदारीबाबत सविस्तर चर्चा झाली. हॅवलेट पॅकर्डच्या अध्यक्ष पॅट्रिका रुसो आणि वरिष्ठ उपाध्यक्ष भावना अग्रवाल यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. सुरक्षाविषयक बाबींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आणि डिजिटायझेशन इत्यादी बाबत अधिक सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अँटोरा एनर्जीचे सीईओ अँड्र्यू पॉनेक यांच्याशी थर्मल एनर्जी साठवणूक सोल्यूशन्स, झिरो कार्बन इंडस्ट्रियल हीट इत्यादींबाबत चर्चा झाली. एमआयटी मीडिया लॅबच्या कार्यकारी संचालक जेसिका रोसेनवर्सेल यांचीही त्यांनी भेट घेतली.
शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई..सापळा रचून दोन युवक गजाआड
पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर सणसवाडी परिसरात अमली पदार्थांच्या विरोधात शिक्रापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी दोन तरुण सणसवाडी भागात येणार असल्याची गोपनीय माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार दामोदर होळकर, राकेश मळेकर आणि मच्छिंद्र निचित यांच्या पथकाने महामार्गालगतच्या एका दुकानासमोर सापळा रचला.यावेळी दोन संशयित युवक दुचाकीसह तिथे आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.पोलिसांच्या या कारवाईत पुणे-नगर महामार्गावर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन युवकांना पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले . युवकांकडून गांजाचा साठा आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये किरण दत्तात्रय इंगळे (वय २३, रा. दहिवडी) याच्यासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. सुरुवातीला या दोघांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र त्यांच्या जवळील पिशवीची झडती घेतली असता पोलिसांना गांजाच्या पुड्या आढळून आल्या. पोलिसांनी आरोपींजवळील एमएच १२ वायपी ०२५३ क्रमांकाची दुचाकी, दोन मोबाईल फोन आणि गांजाचा साठा असा मुद्देमाल जप्त केला आहे.
Donald Trump on Iran। इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा एक जोरदार विधान केले आहे. एका मुलाखतीत ट्रम्प यांनी,”जर इराणमधील परिस्थिती अशीच राहिली तर “संपूर्ण देश उद्ध्वस्त होऊ शकतो.” असे त्यांनी म्हटले आहे. आता त्यांच्या विधानामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. इराणबाबत ट्रम्पचा नवा इशारा Donald Trump […] The post युद्धाची काऊंटडाऊन सुरु ! “मी त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकीन” ; इराणच्या प्रत्युत्तरानंतर ट्रम्प संतापले appeared first on Dainik Prabhat .
‘धुरंधर 2’मध्ये प्रसिध्द बॉलीवूड अभिनेत्याची दमदार एन्ट्री
Dhurandhar 2 | अभिनेता रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. या चित्रपटात रणवीरसोबत, अक्षय खन्ना आणि संजय दत्तच्या अभिनयाचे देखील खूप कौतुक करण्यात आले. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर ‘धुरंधर 2’ साठी आदित्य धरने वेगाने हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. यातच आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत एक अपडेट समोर आली आहे. अभिनेता विकी […] The post ‘धुरंधर 2’मध्ये प्रसिध्द बॉलीवूड अभिनेत्याची दमदार एन्ट्री appeared first on Dainik Prabhat .
Rakul Preet Singh: ए. आर. रहमाननंतर रकुल प्रीत सिंहचा मोठा खुलासा; बॉलिवूडबाबत केलं धक्कादायक विधान
Rakul Preet Singh: बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी अलीकडेच इंडस्ट्रीत काम कमी मिळत असल्याचं विधान केल्यानंतर आता अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिनंही हिंदी चित्रपटसृष्टीबाबत स्पष्ट आणि धक्कादायक मत मांडलं आहे. रकुलच्या या वक्तव्यामुळे बॉलिवूडमधील ‘आउटसाइडर’ कलाकारांच्या संघर्षावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. रकुल प्रीत सिंहचा जन्म १० ऑक्टोबर १९९० रोजी नवी दिल्लीत […] The post Rakul Preet Singh: ए. आर. रहमाननंतर रकुल प्रीत सिंहचा मोठा खुलासा; बॉलिवूडबाबत केलं धक्कादायक विधान appeared first on Dainik Prabhat .
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी शहराच्या राजकारणात बदल घडवून आणला. तब्बल नऊ वर्षांनंतर पार पडलेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा पुण्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. ही निवडणूक अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातील प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिली जात होती. अखेर ही लढत भाजपच्या पारड्यात गेली. पुण्यातील सत्तासमीकरणे बदलणारा हा कौल असून, भाजपसाठी हा विजय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरला.वार्तापत्र मध्य महाराष्ट्र प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांच्या आघाडीकडील पुणे महापालिकेची सत्ता भारतीय जनता पक्षाने २०१७ मध्ये हिसकावून घेतली, तेव्हा भाजपच्या यशाचे श्रेय काही वर्षांपूर्वी आलेल्या मोदी लाटेला देण्यात आले होते, मात्र त्यानंतर आता आठ वर्षे उलटल्यावर आणि दृश्य मोदी लाट नसतानाही भाजपने पुणे महापालिकेवर पुन्हा झेंडा फडकावला. तसेच उपनगरातही भाजपने जोरदार मुसंडी मारून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे राजकीय रणांगणात पुण्यात पुन्हा भाजपने विजय मिळवला. पुणे महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवून ‘विकासपर्वा’च्या दुसऱ्या अध्ययाला सुरुवात केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासाठी दाखविलेले ‘व्हिजन’ आणि अभूतपर्व विजयानंतर जबाबदारी नव्या लोकप्रतिनिधींना असावी, अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. भाजपला मिळालेले बहुमत केवळ प्रचाराचे नव्हे तर, अनेक महिन्यांपासून राबवलेल्या सूक्ष्म नियोजनाचे फलित ठरले. उमेदवार निवडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक लक्ष, स्पष्ट व्हिजन, मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील यांच्याशी साधलेला समन्वय अशा अनेक घटकांमुळे भाजपने सत्ता अधिक बळकट केली. मुरलीधर मोहोळ यांनी प्रचारयंत्रणेची सूत्रे स्वत:कडे घेत सौम्य, पण परिणामकारक भाषेत अजित पवार यांच्याशी थेट राजकीय सामना केला. भाजपने प्रचाराचे मायक्रो प्लॅनिंग केलेले. ज्या ठिकाणी उमेदवार विजयी होण्याची शक्यता कमी वाटली त्याठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभा घेण्यात आल्या. भाजपने या निवडणुकीत पक्षसंघटनेचा चांगला वापर करून घेतला. प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन भाजप उमेदवार पोहोचवण्यात पक्षनेत्यांना यश आले. यासाठी संघाच्या यंत्रणेचा देखील फायदा करून घेण्यात आला. मतदानाच्या दिवशी मतदान जास्त होईल याची काळजीही घेण्यात आली. जाहीररनाम्यात देखील पुढच्या ५० वर्षांच्या विकासाचे व्हिजन मांडण्यात आले याचा फायदाही पक्षाला झाला. प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली तेव्हा देखील योग्य रणनिती आखली. योग्य तेथे प्रभावी पक्षप्रवेश घडवून आणले. वडगाव शेरीत पठारे, वारजेमध्ये सचिन दोडके, सायली वांजळे, धनकवडीत बाळा धनवडे, यांचे पक्षप्रवेश भाजपसाठी निर्णायक ठरले. परिणामी जे प्रभाग भाजपसाठी कायम अवघड मानले जायचे त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आल्याने पक्षाची ताकद वाढली. अनेक माजी नगरसेवकांची नाराजी ओढवली पण, त्याचा विचार न करता सर्वाधिक महिलांना संधी देत विरोधकांना आव्हान दिले. भाजपच्या बहुतांश महिला उमेदवारांनी चांगली कामगिरी करत विजय मिळवला. विरोधकांच्या फुटीचाही भाजपला फायदा झाल्याचे पाहायला मिळाले. शहरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र निर्माण केले गेले त्यामुळे काही प्रभागात चौरंगी, पंचरंगी लढती झाल्या याचा फायदा भाजपला झालेला बघायला मिळाला. याउलट अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यातील पाया पक्का असतानाही त्या पक्षाला निवडणूक चांगल्या प्रकारे खेळता आली नाही, असेच म्हणावे लागेल. एकतर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होणे, हीच या पक्षांची फार मोठी जमेची बाजू होती. शरद पवार यांची सभा, समाजमेळावे, पत्रकार परिषद या आघाडीच्या भल्यासाठी आवश्यक होती. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थिती-अनुपस्थितीपेक्षा शरद पवार यांची अनुपस्थिती लक्ष वेधून घेणारी ठरली. त्यामुळे एकसंध राष्ट्रवादी निवडणुकीला सामोरी गेलीच नाही. निवडणुकीच्या निकालातील शिंदे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कामगिरीबाबत बोलण्यासारखे फारसे काही नाही. याचे कारण शिंदे सेनेची पुण्यात अजून संघटनात्मक बांधणी झालेली नाही. आयात उमेदवार तसेच नवे कार्यकर्ते यांच्या भरवशावर शिंदेसेनेने सव्वाशे जागा लढवल्या. त्यात संघटनावाढ झाली असण्याची शक्यता हाच फायदा झाला असेल. उबाठा आणि मनसेचे नेतृत्व मुंबईच्या महासंग्रामात गुंतलेले असल्याने त्यांचे पुण्याकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविकच होते. राज ठाकरे यांचा शेवटचा रोड शो वगळता त्या पक्षाने जाहीर प्रचारात फारसा ठसा उमटवला नाही.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुण्याकडे दुर्लक्ष केल्याने पुणे गमावले. स्थानिक पातळीवर त्या त्या उमेदवाराने केलेल्या प्रचाराने निवडणुकीच्या निकालावर मोठा परिणाम होईल, असा भाबडा आशावाद त्या पक्षालाही नव्हता. तुलनेने काँग्रेस या एकेकाळी पुण्यावर राज्य केलेल्या पक्षाने यावेळी दोन आकडी संख्या ओलांडावी आणि गेल्या वेळच्या ११ या जागांपेक्षा काही जागा अधिक मिळवाव्यात, ही त्या पक्षाच्या दृष्टीने समाधानकारक बाब ठरली. एक खासदार, सात आमदार आणि सलग दुसऱ्यांदा महापालिकेची सत्ता पुणेकरांनी मोठ्या विश्वासाने भाजपच्या हातात सोपविली आहे. पालिकेतील सत्तेच्या पहिल्या पर्वात काही विकासकामांना शुभारंभ झाला असला, तरी त्याला अपेक्षित वेग मिळाला नव्हता. दुसऱ्या टप्प्यात केवळ प्रभागापुरता मर्यादित विचार न करता संपूर्ण शहराचा विचार करून विकासकामांचा विस्तार झाला. तरच, नागरिकांच्या अनेक अपेक्षा पूर्ण होतील.
भारताशी चाललेले शुल्क युद्ध, रशियाकडून भारत करत असलेली कच्च्या तेलाची आयात आणि त्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा अलीकडेच झालेला भारत दौरा या घटनांनी हवालदिल झालेल्या अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी आता भारताच्या तांदूळ निर्यातीला वेसण घालण्याची नवी खेळी केली आहे. त्याद्वारे त्यांनी भारताला एका नवीन मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला आहे.मुकुंद गायकवाडभारत आणि अमेरिका यांच्यात अनेक दशकांपासून व्यापारविषयक वाद असले तरी, ज्याला व्यापकपणे शुल्क युद्ध म्हटले जाते, तो काळ २०१९ मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाखाली सुरू झाला. १ ऑगस्ट २०१९ पासून अमेरिकेने बहुतेक भारतीय आयातीवर सुरुवातीला २५ टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केली. मात्र त्यामुळे भारतावर काही परिणाम होत नाही, हे पाहून २७ ऑगस्ट २०१९ रोजी अतिरिक्त २५ टक्के शुल्क लागू केले. यामुळे बहुतेक भारतीय वस्तूंवरील एकूण शुल्क ५० टक्के झाले. अमेरिकेने विविध व्यापार कायद्यांनुसार या शुल्कांचे समर्थन केले आणि भारताने तेलाची सतत खरेदी केल्याने युक्रेनविरुद्ध चाललेल्या युद्धामध्ये रशियाची एक प्रकारे मदत केल्याचा आरोप लावला. रशियाकडून कच्च्या तेलाची आयात थांबवण्यासाठी अमेरिका भारताला आग्रह करण्याचे मुख्य कारण म्हणजे युक्रेनमधील युद्धासाठी मॉस्कोला मिळणारा महसूल मर्यादित करणे होय. पाश्चात्त्य खरेदीदारांनी मोठ्या प्रमाणात रशियन तेल टाळल्यामुळे मॉस्कोने चीन आणि भारताला दिलेल्या सवलती आणि स्वस्त किमतीचा फायदा घेत भारताने अल्पावधीतच रशियन कच्च्या तेलाची एकूण आयात सुमारे ४० टक्क्यांपर्यंत नाट्यमयरीत्या वाढवली. अमेरिकेची पोटदुखी वाढण्याचे हे मूळ कारण आहे. पण भारताने अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता रशियाकडून मिळत असलेल्या कच्च्या तेलाची खरेदी थांबवली नाही. त्यामुळे चिडलेल्या ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकेसोबत करार करण्यास भारतावर येनकेनप्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.ट्रम्प यांनी नुकताच भारताने बासमती तांदळाचे डम्पिंग केल्याचा आरोप करत भारतीय आयात मालावर शुल्क वाढवण्याची धमकी दिली. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका गोलमेज परिषदेत ट्रम्प बोलत होते. त्यांनी परिषदेत म्हटले की, भारताला अमेरिकेत तांदळाचे ‘डंपिंग’ करण्याची परवानगी दिली जाऊ नये. तसेच भारताने तांदळाचे डंपिंग करू नये. आंतरराष्ट्रीय व्यापार नियमानुसार ते असे करू शकत नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतावर नवीन शुल्क आकारणे हा या समस्येवर एक जलद आणि सोपा उपाय असेल, कारण बेकायदेशीरपणे माल पाठवणाऱ्या देशांवर शुल्क लादल्यास ही समस्या सोप्या पद्धतीने सोडवली जाईल. काही अमेरिकन शेतकऱ्यांनी तक्रार केली की भारत, व्हिएतनाम आणि थायलंडसारख्या देशांमधून होणाऱ्या स्वस्त आयातीमुळे त्यांनी पिकवलेल्या तांदळाच्या किमती कमी होत आहेत. त्यामुळे अमेरिकेने शेतकऱ्यांसाठी एका संघीय मदत पॅकेजची घोषणा केली होती. भारत अमेरिकेत निर्यात करत असलेल्या तांदळाबद्दल भारतीय निर्यातदार आणि विश्लेषकांचे म्हणणे आहे की, बासमती हा एक विशेष प्रकारचा तांदूळ आहे, जो अमेरिकेत पिकवलेल्या तांदळाचा थेट पर्याय नाही आणि म्हणूनच डंपिंगचा दावा त्यांना मान्य नाही. कारण बासमती तांदळाचा व्यापार विशिष्ट ग्राहकांच्या आवडीनिवडींवर आधारित आहे. आपल्या उद्योगांना संरक्षण देण्यासाठी अमेरिकेने इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन या संस्थांची निर्मिती केली. १९८०-९० च्या दशकात वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन निर्माण केले. या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून शेतीचा व्यापार कसा केला जावा याची नियमावली तयार केली गेली. या नियमावलीअंतर्गत कोणत्याही देशाने दुसऱ्या देशात माल डम्पिंग करून स्थानिक शेतकऱ्यांना तोटा होईल अशी कृती करू नये, असे निर्बंध घालण्यात आले आहेत.ट्रम्प यांनी भारतावर सर्वाधिक टॅरिफ लादले असूनही भारत अमेरिकेमध्ये बासमती तांदूळ डम्पिंग करतो, हे नक्कीच भूषणावह आहे. अमेरिकेने गव्हाच्या बाबतीत क्रांती केली आणि भारताने बासमती तांदूळ पिकवत वाद निर्माण करून या क्षेत्रामध्ये उज्ज्वल यश संपादित केले आहे. बासमती तांदळाला जगभर मागणी असल्याने भारताच्या शेतीक्षेत्रातील चहा बरोबरच बासमती तांदळालाही अनन्य महत्त्व प्राप्त झाले आहे. बासमती तांदळाची जात प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणा प्रांतात पिकवली जाते आणि भारतातील पहिली आणि एकमेव हरित क्रांती याच दोन प्रांतांमध्ये झाली होती. वास्तविक, भारताने शेतीमालाच्या निर्यातीसाठी ‘आग्रेस्को’ नावाची संस्था निर्माण केली आहे. त्यामध्ये ५१ टक्के वाटा हा शेतकऱ्यांचा आणि ४९ टक्के सरकारी वाटा अशी पद्धत राबवली गेली आहे. या संस्थेअंतर्गत सरकारी शेतीतज्ज्ञ जगातल्या बाजारपेठेचा अभ्यास करून जास्तीत जास्त दर कोणत्या वेळी आणि कोणत्या मालाला मिळतो याची माहिती संस्थेला देतात. संस्था तेवढाच शेतमाल उत्पादित करून परदेशांना निर्यात करतात. इस्रायल हा वालुकामय प्रदेश आहे; परंतु या संस्थेमुळे तेथील मालाला जास्तीत जास्त दर मिळत असल्याने इस्राएलचा शेतकरी सधन झाला. आपल्याकडे तशी कोणतीही तरतूद नसताना भारताने अमेरिकेमध्ये बासमती तांदूळ डंपिंग करून अमेरिकन शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले. त्यामुळे होणारा ट्रम्प यांचा थयथयाट पाहता भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे जसे पाकला नमवले होते, त्या पद्धतीने ‘ऑपरेशन बासमती’ करून अमेरिकेलाही नमवले आहे असे स्पष्ट होते.डंपिंगबाबत वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने म्हटले आहे की डंपिंग तंत्राचा वापर करून कोणत्याही देशाने दुसऱ्या देशातील शेतकऱ्यांचे नुकसान करू नये. ते व्यापार तंत्राच्या विरोधी होईल आणि निषिद्ध मानले जाईल. डंपिंगमध्ये एखादा देश दुसऱ्या देशात इतका शेतमाल निर्यात करतो की दुसऱ्या देशातील भाव एकदम कोसळून तेथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. या पार्श्वभूमीवर भरपूर शुल्क लादले गेले असतानाही बासमती तांदूळ इतक्या मोठ्या प्रमाणात अमेरिकेच्या बाजारात कसा पोहोचला, याची सविस्तर माहिती उपलब्ध झाल्यास प्रत्येक भारतीयाला ‘ऑपरेशन सिंदूर’सारखाच याही घटनेचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. अमेरिकन शेती आणि उत्पादन मोठे असले तरी तेथील फक्त दोन टक्केच नागरिक शेती करतात. त्यांचे क्षेत्र मोठे असते, शिवाय उत्पादन खर्च जास्त असतो. त्या तुलनेत भारतीय शेतकरी नगण्य असूनही आपल्या कौशल्याने आणि मेहनतीने जास्तीत जास्त उत्पादन काढून देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करतो. पूर्वीच्या काळासारखी या देशाला अमेरिकेकडे अन्नधान्यासाठी भीक मागावी लागत नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दावोसमधून मोठी घोषणा! रायगड-पेणमध्ये ग्रोथ सेंटर उभं राहणार
Chief Minister Devendra Fadnavis :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दावोस येथील World Economic Forum (WEF) 2026 मध्ये पहिल्याच दिवशी१४.५ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. हे करार १९ विविध कंपन्यांसोबत झाले असून यातून राज्यात १५ लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. अशातच आता दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा […] The post मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दावोसमधून मोठी घोषणा! रायगड-पेणमध्ये ग्रोथ सेंटर उभं राहणार appeared first on Dainik Prabhat .
Sunita Williams Retired। प्रसिद्ध नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स २७ वर्षांच्या दीर्घ आणि ऐतिहासिक सेवेनंतर एजन्सीमधून निवृत्त झाल्या आहेत. २७ डिसेंबर २०२५ पासून त्या निवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या कारकिर्दीत सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) तीन मोहिमा पूर्ण केल्या आणि मानवी अंतराळ उड्डाणात अनेक विक्रम प्रस्थापित केले. नासाच्या मते, सुनीता विल्यम्स यांनी एकूण ६०८ दिवस […] The post एका पर्वाचा पूर्णविराम ! अवकाशात ६०८ दिवस, ९ अंतराळयात्रा करणाऱ्या नासाच्या ‘आयर्न लेडी’ सुनीता विल्यम्स निवृत्त appeared first on Dainik Prabhat .
डॉ. कणव कुमारभारतामध्ये डोके व मान कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे. या कर्करोगांमध्ये तोंड, घसा (आवाजपेटी), थायरॉईड, सायनस, नाक तसेच लाळग्रंथी यांचा समावेश होतो. यापैकी आवाजपेटीचा कर्करोग हा तोंडाच्या कर्करोगानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अनेक वर्षे या कर्करोगावर संपूर्ण आवाजपेटी काढून टाकणे (टोटल लॅरिंजेक्टॉमी) हा सर्वोत्तम उपचार मानला जात होता. जरी यामुळे कर्करोग बरा होण्याचे प्रमाण चांगले होते, तरी रुग्णाचा आवाज कायमचा हरपायचा. मात्र आजच्या प्रगत तपासणी आणि उपचारांमुळे बहुतेक रुग्णांमध्ये आवाजपेटी जपण्यावर भर दिला जातो.धूम्रपान आणि मद्यपान ही आवाजपेटीच्या कर्करोगाची दोन प्रमुख कारणे आहेत. हा कर्करोग प्रामुख्याने ५० ते ७० वयोगटातील पुरुषांमध्ये अधिक आढळतो. सततचा घसा बसणे किंवा आवाजात बदल होणे हे याचे सुरुवातीचे आणि महत्त्वाचे लक्षण आहे.कर्करोग लवकर ओळखला गेला तर ट्रान्सओरल लेझर मायक्रोसर्जरी (टीएलएम) या आधुनिक पद्धतीने उपचार करता येतात. लेझरच्या साहाय्याने आवाजपेटीतील लहान गाठी काढल्या जातात. या उपचारामुळे सुमारे ९० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होतात, आवाज व गिळण्याची क्षमता टिकून राहते, खर्च तुलनेने कमी असतो आणि बहुतेक वेळा हा उपचार डे-केअर पद्धतीने केला जातो.मध्यम टप्प्यातील कर्करोगात रेडिएशन थेरपीसोबत केमोथेरपी दिली जाते. या उपचारपद्धतीमुळे अवयव जपण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांचा नैसर्गिक आवाज कायम राहतो.प्रगत अवस्थेतील रुग्णांना अजूनही संपूर्ण आवाजपेटी काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. मात्र आजच्या घडीला आवाज पुनर्वसनासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. व्हॉइस प्रोस्थेसिस, इलेक्ट्रॉनिक लॅरिंक्स किंवा अन्ननलिकेच्या सहाय्याने बोलण्याचे प्रशिक्षण. यामुळे अशा रुग्णांनाही पुन्हा संवाद साधता येतो.आधुनिक उपचार आणि समर्पित पुनर्वसनामुळे कर्करोगामुळे आवाज गमावणे आता अटळ राहिलेले नाही. आज बहुतेक रुग्ण आपला नैसर्गिक आवाज जपू शकतात आणि ज्यांना मोठी शस्त्रक्रिया करावी लागते, तेही योग्य प्रशिक्षणामुळे पुन्हा बोलू शकतात. वेळेवर तपासणी आणि योग्य उपचारांमुळे प्रत्येक रुग्णाला केवळ आपला आवाजच नव्हे, तर आत्मविश्वास आणि जीवनाचा दर्जाही पुन्हा मिळवण्याची संधी मिळू शकते.- सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, हेड अॅण्ड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

27 C