SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

30    C
... ...View News by News Source

निवडणुकांनंतर अहिल्यानगरमध्ये गोळीबाराची घटना; एकाचा मृत्यू, रुग्णालयात तणावपूर्ण परिस्थिती

अहिल्यानगर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात दोन गटांतील वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.माहितीनुसार, संध्याकाळच्या सुमारास घोडेश्वरी हॉस्पिटलमध्ये दोन गट आमनेसामने आले, आणि दोन्ही गटांमध्ये वाद सुरु झाले, वाद अधिक वाढल्यानंतर दोन्ही गटांकडून गोळीबार करण्यात आला . यात नितीन शिरसाट यांचा मृत्यू झाला. सुरज फुलमाळी यांच्यासह आणखी एक जण जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर शिरसाट यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.रुग्णालय परिसरात गोंधळनितीन शिरसाट यांच्या मृत्यची बातमी समजताच दोन्ही गटांचे समर्थक घोडेश्वर रुग्णालय परिसरात जमा झाले. काही वेळ तणाव निर्माण होऊन धक्काबुक्की सुद्धा झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून शस्त्रांचा वापर, हल्ल्याचे नेमके कारण आणि यामागील तपास सुरू आहे.घोडेगाव व आसपासच्या भागात यापूर्वीही गटांतर्गत संघर्षाच्या घटना घडल्याची नोंद आहे. नेवासा - श्रीरामपूर भागात वाळू तस्करी, अनेक अवैध धंदे गावठी कट्ट्या यामुळे या टोळ्यांमध्ये वारंवार गँगवॉर सुरु होता. काहीस राजकीय पाठबळ मिळत असलयाने कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनासमोर आव्हानात्मक आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 11:30 am

Pune: बांगलादेशच्या झेंड्यावरून फूड स्टॉल्सची तोडफोड; पुण्यातील MIT कॉलेजमध्ये राडा

पुणे: पुण्यातील कोथरुड येथील एमआयटी महाविद्यालयात आयोजित वर्ल्ड कल्चरल फेस्टिवलमध्ये मोठा राडा झाला आहे. फूड फेस्टिवलमध्ये बांगलादेशी विद्यार्थ्यांनी लावलेल्या झेंड्यांच्या स्टिकर्सवरून वाद निर्माण झाला आहे. ज्याचे रूपांतर नंतर तोडफोडीत झाले. या घटनेमुळे कॅम्पसमध्ये काही वेळ तणावाचे वातावरण होते. अखिल भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हा राडा केल्याचं समजत आहे. या घटनेनंतर फेस्टिवलच्या ठिकाणी एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.एमआयटी कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे विविध देशांतील संस्कृतीचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात सहभागी झालेल्या बांगलादेशी विद्यार्थ्यांनी आपल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर बांगलादेशच्या झेंड्याचे स्टिकर्स लावले होते. या स्टिकर्सवर काही विद्यार्थ्यांनी तीव्र आक्षेप घेतला. या वादाचे रुपांतर आंदोलनात झाले. भाजप युवा मोर्चाशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी तिथे धाव घेत बांगलादेशचे झेंडे असलेले स्टिकर जाळल्याचा आरोप आहे.संतापलेल्या आंदोलकांनी बांगलादेशी विद्यार्थ्यांचे फूड स्टॉल्स पाडून तिथे तोडफोड केली. यावेळी दोन्ही गटात बाचाबाची झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दोन्ही बाजूंना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या कॅम्पसमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्याच्या स्थितीत तेथे तणाव पूर्ण शांतता आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 11:30 am

लोणावळातील लायन्स पॉइंट परिसरात पुन्हा आढळला मृतदेह; पोलिस तपास सुरू

लोणावळा : पुण्यातील लोणावळा हे ठिकाण महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांपैकी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, पण हेच ठिकाण सध्या एकामागोमाग एक घडणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांमुळे हादरून गेले आहे. मागे मुंबईतील कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या मुलीने या ठिकाणी आत्महत्या केली होती आणि आता लोणावळ्यातील लायन्स पॉइंट परिसरात गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.नेमकं काय घडलं?मिळालेल्या माहितीनुसार, वीरेंद्र सिंह (३४) असं मृत तरुणाचं नाव असून तो आयटी कंपनीत कार्यरत होता. पहाटे ४: ३० च्या सुमारास लायन्स पॉइंटजवळ एक चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. वाहन चालकाचा शोध घेतला असता तिथे कोणीच दिसले नाही, त्यामुळे पोलिसांनी गाडी तपासली त्यात संबंधित मृत व्यक्तीचा फोन सापडला. वीरेंद्र याने आत्महत्या करण्यापूर्वी बायकोला आणि जवळच्या व्यक्तींना ई-मेल आणि मेसेजद्वारे आपण आत्महत्या करणार आहोत याचे संकेत दिले होते. यावरून पोलिसांचा संशय अधिक बळावला.स्थानिक पोलिसांनी शोधमोहीम सुरू केलीपोलिसांनी शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेहाचा दरीत शोध घेतला. ज्या ठिकाणी गाडी उभी होती त्याच दिशेने २५० फूट खोल दरीत संबंधित व्यक्ती आढळून आली. शिवदुर्ग टीम आणि वन्यजीव रक्षक मावळ यांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी पाठविण्यात आला. प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात असला तरी अधिक कारण स्पष्ट करण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे.आठवड्याभरात ही दुसरी धक्कादायक घटना घडली त्यामुळे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण हे मृत्यूचं ठिकाण तर बनणार नाही ना? याविषयी स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अलीकडच्या काळात टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट परिसरात घडलेल्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.अश्याच घटना सर्रास घडत असतील तर पर्यटनस्थळांवर सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 11:10 am

एडिट केलेलं फुटेज जाहीर करा’; ‘बिग बॉस मराठी’च्या निर्मात्यांना दिव्या शिंदेचा कायदेशीर इशारा

मुंबई : बिग बॉस मराठी’मधून बाहेर पडल्यानंतर स्पर्धक दिव्या शिंदेने निर्मात्यांवर गंभीर आरोप करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. शोदरम्यान घडलेल्या वादानंतर तिला बाहेरचा मार्ग दाखवण्यात आला होता. मात्र, घराबाहेर आल्यानंतर तिने पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडत बिग बॉस च्या प्रसारित करण्यात आलेल्या काही भागांविषयी प्रश्न उपस्थित केले.दिव्या शिंदेचा आरोप आहे की, प्रेक्षकांसमोर तिची केवळ आक्रमक बाजू दाखवण्यात आली, तर त्या प्रसंगांआधी काय घडले होते हे प्रसारित करण्यात आले नाही. “पूर्ण फुटेज जाहीर करण्यात यावे,” अशी तिची मागणी असून, अन्यथा पुढील पावले उचलण्याचा इशारा तिने दिला आहे.नेमकं काय घडलं?एका टास्कदरम्यान झालेल्या वादानंतर दिव्याने सहस्पर्धकांना उद्देशून केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेतला गेला. तिच्या बोलण्यातून धमकीचा अर्थ निघाल्याचा आरोप इतर स्पर्धकांनी आणि बिग बॉस या शोद्वारे करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रम व्यवस्थापनाने कारवाई करत तिला शोमधून तात्काळ बाहेर काढले.दिव्याची भूमिकाआपल्या वक्तव्याचा गैरसमज झाल्याचे दिव्याने स्पष्ट केले आहे. तिच्या मते, तिच्या विधानाचा अर्थ प्रत्यक्ष हिंसेशी जोडणे चुकीचे आहे. तसेच तिने स्वतः कार्यक्रम सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा दावा देखील तिने केला आहे.दरम्यान, या आरोपांवर शोच्या निर्मात्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. संपूर्ण प्रकरणामुळे रिअ‍ॅलिटी शोमधील संपादन प्रक्रियेवर आणि पडद्यामागील घडामोडींवर चर्चा सुरू झाली आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 11:10 am

Bengaluru: अंधश्रद्धेच्या पायात घेतला आईचा बळी, ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट

मुंबई: कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात अंधश्रद्धमधून एक भयावह घटना घडली आहे. आपल्या वडिलांच्या निधनाला आईचं जबाबदार आहे आणि तिने करणी ( 'ब्लॅक मॅजिक') केली होती. या संशयावरून मुलीने आईची निर्घृण हत्या केली आहे. पुष्पावती असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या ३३ वर्षीय सुचित्रा नावाच्या मुलीला पोलिसांनी अटक केली आहे.ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कटसुचित्रा ही तुमकूर शहरात आपल्या पतीसोबत राहत होती. सुमारे १८ महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनाचे दुःख पचवू न शकलेल्या सुचित्राने एका ज्योतिषाचा सल्ला घेतला. ज्योतिषाने सुचित्राला सांगितले की, तिच्या वडिलांचा मृत्यू नैसर्गिक नसून तिच्या आईने केलेल्या करणीमुळे झाला आहे. या शब्दांवर आंधळा विश्वास ठेवून सुचित्राने आईच्या घरी जाऊन, ती गाढ झोपेत असताना उशीने तिचे तोंड दाबून तिची हत्या केली.पोलीस घटनास्थळी पोहोचताच...आईची हत्या केल्यानंतर सुचित्राने हे प्रकरण नैसर्गिक मृत्यूचे असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. पुरावे नष्ट करण्यासाठी तिने घाईघाईने अंत्यसंस्काराची तयारीही सुरू केली. परंतु पुष्पावती यांचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार थांबवले. गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सुचित्राची चौकशी केली असता, तिने आपला गुन्हा कबूल केला.याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून सुचित्राच्या पतीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या हत्येच्या कटात पतीचा सहभाग होता का, किंवा त्याला याबद्दल माहिती होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. ज्या ज्योतिषाने सुचित्राला प्रवृत्त केले, त्याचाही शोध पोलीस घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 10:10 am

जे जे उड्डाणपूलाखाली परिसरातील वर्षानुवर्षांच्या कचऱ्यांसह अतिक्रमणांची जळमटेही केली दूर

मुंबई :दक्षिण मुंबईतील जे जे उड्डाणपूलाखालील भागात मागील काही वर्षांपासून अतिक्रमण होऊन मोठ्याप्रमाणात अस्वच्छता पसरलेली आहे. उड्डाणपुलाखाली अतिक्रमणांसह साचलेली कचरा आणि त्यापासून पसरलेली दुर्गंधीची जळमटेच आता महापालिकेने हटवून या पुलाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या बी विभागाच्या हद्दीतील पूलाच्या खालील भाग साफ करण्यात आल्याने कधी नव्हेतर जे जे उड्डाणपूलाच्या खाली भाग जळमटे दूर केल्याने सुंदर दिसू लागला आहे.मुंबई महापालिकेच्यावतीने फेरीवाल्यांसह पदपथांवरील अतिक्रमण हटवण्याची मोहिम हाती घेण्यात आल्यानंतर महापालिकेच्या बी विभागाच्यावतीनेही डोंगरी,मोहमद अली रोड, मस्जिद बंदर परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई हाती घेण्यात आली आहे. बी विभागाच्या सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी महापालिका परिमंडळ एकच्या उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आठवड्यापासून या मुस्लिम बहुल परिसरात जिथे महापालिकेच्यावतीने कारवाई करण्याची हिंमत दाखवली जात नाही तिथे आता कारवाई केली जात आहे. त्यामुळे फेरीवाल्यांसह पदपथावरील वाढीव बांधकामे हटवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शरीफ देवजी स्ट्रीट अर्थात चकला स्ट्रीट येथील वाढीव बांधकामे तसेच पदपथ अडवून केलेले बांधकामे हटवण्यास सुरुवात केली आहे. एवढे मस्जिद बंदर येथीलही बांधकामे आणि अतिक्रमण हटवतानाच मकदुम अली महिमी उड्डाणपूल अर्थात जे जे उड्डाणपूलाखाली सर्व अतिक्रमणांपासून तो तिथे वर्षांनुवर्षे जमा झालेला कचरा हटवून पुलाखालील परिसर स्वच्छ सुंद करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या बी विभागाच्या हद्दीत पुलाखालील परिसरात जो बकालपणा दिसत होता, तो बी विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी आपल्या चमुसह दूर करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता वाहनातून प्रवास करतानाही पुलाखालील परिसराचे स्वच्छ आणि सुंदर दर्शन होताना दिसणार आहे. तसेच पुलाखालील भागांमधील पदपथांवर अनावश्यक कठडे बांधून ठेवले आहेत तेही तोडून टाकण्यावर भर दिला आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 10:10 am

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी) आतापर्यंत १५१ जागा जिंकल्या आहेत. यासह, पक्ष बहुमताच्या जवळ आहे आणि सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा दिसत आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे बीएनपी अध्यक्ष तारिक रहमान यांनी ढाका-१७ आणि बोगुरा-६ या दोन्ही जागांवर जिंकले आहेत. त्यामुळे आता बांगलादेशात तारिक रहमान यांच्या नेतृत्वात बीएनपीचं सरकार स्थापन होणार आहे.बांगलादेशाच्या निवडणुकीत बीएनपीचा विजय झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदनबांगलादेश निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएनपी नेते तारिक रहमान यांना त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, हा विजय बांगलादेशच्या जनतेचा त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास दर्शवितो. भारत लोकशाही, प्रगतीशील आणि समावेशक बांगलादेशच्या समर्थनात उभा राहील. दोन्ही देश त्यांचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या सामायिक विकास उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी एकत्र काम करतील अशी आशाही मोदींनी व्यक्त केली.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 10:10 am

BNP Election Victory Bangladesh: ‘भारत पुरोगामी बांगलादेशच्या पाठीशी’ ; पंतप्रधान मोदींकडून तारिक रहमान यांचे ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन

BNP Election Victory Bangladesh: बांगलादेशातील १३ व्या संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) च्या प्रचंड विजयानंतर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारिक रहमान यांचे हार्दिक अभिनंदन केले.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 9:55 am

राज्यात हवामानात बदलाचे संकेत; फेब्रुवारीत 'या दिवशी'काही भागांत कोसळणार पावसाच्या सरी

मुंबई : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरडे वातावरण राहिल्यानंतर आता राज्यात हवामानाची घडी बदलताना दिसत आहे. उत्तर भारतात सक्रिय झालेल्या वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रावरही जाणवू लागणार असून येत्या १७ आणि १८ फेब्रुवारीदरम्यान काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हवामान तज्ज्ञांच्या मते, समुद्राकडून येणाऱ्या ओलसर वाऱ्यांचा आणि जमिनीवरील तापमानातील फरकाचा परिणाम म्हणून कमी दाबाची रेषा तयार होत आहे. या परिस्थितीमुळे पुणे विभागासह मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहू शकते. काही ठिकाणी किरकोळ सरी पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस जास्त वेळ राहणारा नसला तरी स्थानिक पातळीवर बदल जाणवू शकतो.दरम्यान, राज्यात उत्तर दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे किमान तापमानात किंचित घट झाली असून रात्रीचा गारवा वाढला आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि खान्देश भागात सकाळ-संध्याकाळ थंडीची जाणीव होत आहे. पुढील एक-दोन दिवस ही स्थिती कायम राहू शकते.दक्षिणेकडे मात्र परिस्थिती वेगळी आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेली कमी दाबाचा पट्टा तीव्र होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम तामिळनाडू आणि केरळ राज्यांवर होऊ शकतो. काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.राज्यातील शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनपूर्वक करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. ढगाळ वातावरणामुळे काही पिकांवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 9:30 am

भारतीय कापडाला मिळणार अमेरिकेत ‘ड्यूटी-फ्री’ प्रवेश

नवी दिल्ली : बांगलादेशला ज्याप्रमाणे अमेरिकन कापूस आणि सुतापासून तयार केलेल्या कपड्यांवर सवलती मिळतात, तशाच प्रकारच्या सवलती अमेरिका आणि भारत यांच्यात होऊ घातलेल्या आगामी व्यापारी करारामुळे आता भारतालाही मिळणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी दिली.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 9:10 am

पंतप्रधानांच्या हस्ते आज सेवा तीर्थ, कर्तव्य भवनाचे उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 'सेवा तीर्थ' आणि 'कर्तव्य भवन-१ आणि २'चे उद्घाटन करणार आहेत. नव्याने बांधलेल्या सेवा तीर्थ संकुलात पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय असेल.'कर्तव्य भवन-१ आणि २ मध्ये अर्थ मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, संस्कृती मंत्रालय, कायदा आणि न्याय मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, रसायने आणि खते मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय यांसह अनेक मंत्रालये असतील.पंतप्रधान मोदी दुपारी १.३० वाजता नव्याने बांधलेल्या पंतप्रधान कार्यालय संकुलाचे औपचारिक नाव 'सेवा तीर्थ' असे ठेवतील, त्यानंतर सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-१ आणि २ चे उद्घाटन करतील. सायंकाळी ६ वाजता, पंतप्रधान सेव तीर्थ येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित करतील. अनेक दशकांपासून, केंद्रीय मंत्रालये आणि कार्यालये सेंट्रल व्हिस्टा परिसरातील विविध इमारतींमध्ये विखुरलेली होती. यामुळे कार्यक्षमता कमी होणे, समन्वय आव्हाने, वाढता देखभाल खर्च आणि योग्य कामाच्या वातावरणाचा अभाव यांसारख्या समस्या निर्माण झाल्या होत्या. नवीन इमारतींच्या बांधकामामुळे या समस्यांचे निराकरण होईल.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 9:10 am

रेस्टॉरंट्सकडून 'सर्व्हिस चार्ज'आकारणी; मुंबई ग्राहक पंचायतीची कारवाईची मागणी

मुंबई : 'सर्व्हिस चार्ज देणे हे सक्तीचे नसून तो देणे हा ग्राहकांच्या पूर्णपणे स्वेच्छेवर अवलंबून असताना मुंबईतील अनेक रेस्टॉरंट्समध्ये ५ ते १० टक्के सर्व्हिस चार्ज बिलामध्ये आकारला जात असल्याचे आढळून आले आहे. मुंबई ग्राहक पंचायतीच्यावतीने संबंधित रेस्टॉरंट्सवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.मुंबई ग्राहक पंचायतीने नुकत्याच केलेल्या तपासणीत असे आढळून आले आहे की, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ४ जुलै २०२२ रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व्हिस चार्ज कोणत्याही प्रकारे वा कोणत्याही नावाने आकारणे ही अनुचित व्यापारी पद्धती घोषित करून त्यावर स्पष्टपणे बंदी घातली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२५ मध्ये दोन हॉटेल व रेस्टॉरंट संघटनांची या मार्गदर्शक सूचनांना आव्हान देणारी अपिले फेटाळून लावत या मार्गदर्शक सूचनांना वैध ठरवले असून, ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध सक्तीने सर्व्हिस चार्ज आकारणे हे अनुचित व्यापारी पद्धती व करारातील अनुचित अटी असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. तरीदेखील रेस्टॉरंट्सकडून या कायदेशीर आदेशाचे सरसकट उल्लंघन सुरूच आहे. त्यामुळे मुंबई ग्राहक पंचायतीने केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या अध्यक्षांना तक्रारपत्र पाठवून काही रेस्टॉरंट्सची बिलं व मेन्यू काईस जोडून कारवाईची मागणी केली आहे.संबंधित रेस्टॉरंट्सच्या मागील तीन आर्थिक वर्षांचे रेकॉर्ड तपासून त्यांनी सर्व्हिस चार्ज किंवा तत्सम नावाने किती रक्कम गोळा केली आहे ते शोधून ती रक्कम दंडात्मक व्याजासह केंद्रीय ग्राहक कल्याण निधीत जमा करण्याचे निर्देश द्यावेत. सक्तीचे सर्व्हिस चार्ज बेकायदेशीर असल्याचे पुन्हा एकदा जाहीर करून त्याला ठळक प्रसिद्धी द्यावी, असे पत्रात नमूद केले आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 9:10 am

Bangladesh: तारिक रहमानच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन होण्याची शक्यता

दिल्ली: बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर पार पडलेल्या ऐतिहासिक निवडणुकीत जनतेने तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला (BNP) कौल दिल्याचे चित्र दिसत आहे. बांगलादेशात ३५० जागांपैकी ५० जागा महिलांसाठी राखीव आहेत. तर उर्वरित ३०० पैकी एकाचा मृत्यू झाल्याने २९९ जागांवर मतदान पार पडले. निवडणूक निकालानंतर प्रत्येक पक्षाला त्याच्या विजयी उमेदवारांच्या प्रमाणात महिलांच्या राखीव जागांचा कोटा मिळणार आहे. बांगलादेशात गुरुवारी सकाळी साडेसात संध्याकाळी साडेचार या वेळेत मतदान झाले. त्यानंतर लगेच मतमोजणीला सुरूवात झाली. शुक्रवारी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी म्हणजेच आज सकाळी ११ वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान ३०० सदस्यीय संसदेत बीएनपीने १५१ जागांचा बहुमताचा आकडा सहज ओलांडत आतापर्यंत १९७ जागांवर विजय मिळवला आहे. ही निवडणूक बांगलादेशच्या लोकशाही पुनर्स्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.तारिक रहमान यांचा दोन मतदारसंघातून विजयमाजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे सुपुत्र आणि बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि दोन्ही ठिकाणी त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ढाका १७ या मतदारसंघातून त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. बोगुरा-६ या परंपरागत बालेकिल्ल्यातही त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. तारिक रहमान हे आता बांगलादेशचे पुढील पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेणार आहेत.'जमात-ए-इस्लामी' मुख्य विरोधी पक्ष होणारएकेकाळी बीएनपीची सहयोगी असलेल्या पण आता स्वतंत्र लढणाऱ्या 'जमात-ए-इस्लामी'ला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. जमातचे अध्यक्ष शफीकुर रहमान यांनी ढाका-१५ मधून विजय मिळवला असला, तरी त्यांच्या पक्षाला केवळ ६३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. जमातचे महासचिव मिया गोलाम पोर्वार यांना बीएनपीच्या उमेदवाराकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दरम्यान जमात-ए-इस्लामी मुख्य विरोधी पक्ष होण्याची चिन्हे आहेत.भारतासाठी ही निवडणूक का महत्त्वाची?बांगलादेश हा भारताचा महत्त्वाचा शेजारी देश असून ४ हजार किमीची सीमा सामायिक करतो. बीएनपीच्या सत्तेतील पुनरागमनामुळे भारतापुढील काही आव्हाने आणि संधी असतील. घुसखोरी, ड्रग्ज तस्करी आणि दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन सरकारसोबत समन्वय साधणे भारतासाठी गरजेचे असेल. शेख हसीना यांच्या काळात भारत-बांगलादेश व्यापारात मोठी वाढ झाली होती. ती गती कायम राखण्याचे आव्हान तारिक रहमान सरकारसमोर असेल. 'जमात-ए-इस्लामी'सारख्या कट्टरपंथी संघटनांच्या प्रभावावर नियंत्रण मिळवणे भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 9:10 am

दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन

नवी दिल्ली : दूरदर्शनच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे वयाच्या ७१व्या वर्षी निधन झाले. माहेश्वरी यांचे शांत भाषण, अचूक उच्चार आणि प्रभावी पडद्यावर उपस्थितीमुळे त्यांना प्रेक्षकांमध्ये एक विशेष स्थान मिळाले. जवळजवळ तीन दशके त्या भारतीय बातम्यांमध्ये एक आदरणीय व्यक्ती होत्या. त्यांच्या मृदू आवाजाने आणि मनमोहक सादरीकरणाने त्यांना प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवून दिले.सरला माहेश्वरी यांच्या निधनाची माहिती दूरदर्शनच्या एक्स हँडलवरून दिली. एक्स पोस्टमध्ये लिहिले होते की, दूरदर्शन कुटुंबाच्या वतीने, श्रीमती सरला माहेश्वरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्या एक आदरणीय आणि आदरणीय दूरदर्शन वृत्तनिवेदिका होत्या, ज्यांनी त्यांच्या सौम्य आवाजाने, अचूक उच्चाराने आणि सन्माननीय सादरीकरणाने भारतीय वृत्तजगतात एक विशेष स्थान निर्माण केले. त्यांच्या साधेपणाने, संयमाने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या हृदयात खोलवर विश्वास निर्माण केला.सरला माहेश्वरी या पत्रकारितेच्या युगाचा भाग होत्या. जेव्हा बातम्या केवळ माहिती नसून भाषेचा आणि शिष्टाचाराचा एक मानक होत्या. त्यांच्या स्पष्ट उच्चार आणि शांत वर्तनामुळे लाखो प्रेक्षकांना त्यांचे प्रेम लाभले. शम्मी नारंग आणि सरला माहेश्वरी या जोडीने दूरदर्शनवर दीर्घकाळ बातम्यांच्या जगाचे नेतृत्व केले.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 9:10 am

Rajpal Yadav's Brother Statement: अभिनेता राजपाल यादवच्या भावाने केले मोठे खुलासे; काय म्हणाले श्रीपाल यादव?

मुंबई: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव नऊ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक वाद प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. ५ फेब्रुवारी रोजी त्याने न्यायालयाच्या आदेशानुसार आत्मसमर्पण केले. त्यानंतर समाज माध्यम आणि माध्यमांमध्ये अशी चर्चा सुरू झाली की, राजपाल यादवनं म्हटले होते, ना माझ्याकडे पैसे आहेत आणि ना माझे मित्र आहेत. यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत चेहरे त्याच्या मदतीसाठी पुढे आले आणि फिल्म असोसिएशन FWICEनेही फिल्म इंडस्ट्रीला राजपाल यादवला मदत करण्याचे आवाहन केले. राजपाल यादवचे मोठे भाऊ श्रीपाल यादव यांनी एका वृत्तनाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.राजपाल यादवच्या भावाने केले मोठे खुलासेराजपाल यादव जेलमध्ये जाताना रडत होता आणि म्हणत होता की त्याचे कोणी मित्र नाहीत आणि त्याच्याकडे पैसे नाहीत. या गोष्टीवर बोलताना श्रीपाल यादव म्हटले की, आमच्या अनुभवावरून आम्ही सांगू शकतो की या गोष्टी खऱ्या वाटत नाहीत. तो माझा धाकटा भाऊ आहे. आम्ही एकत्र शिकलो, एकाच खोलीत राहिलो, एकाच बिछान्यावर झोपलो आहोत. मला पूर्ण विश्वास आहे की कितीही मोठी अडचण आली तरी तो कोणासमोर गयावया करणार नाही किंवा रडणार नाही आणि अशा प्रकारच्या गोष्टी तर नक्कीच बोलणार नाही. जाण्यापूर्वी त्याने मला फोन करून सांगितले होते. दादा, 'कोणतीही चिंता करू नको' त्यानं आम्हाला खात्री दिली की पैसे कर्ज म्हणून घेतले नव्हते, तर गुंतवणूक म्हणून दिले गेले होते. त्याने काही कागदपत्रांवर सही केली होती, ज्याबाबत आम्हाला सांगण्यात आले होते की ती कागदपत्रे गुंतवणुकीशी संबंधित आहेत. नंतर जेव्हा चित्रपट पुढे जाऊ शकला नाही, तेव्हा त्या कागदपत्रांच्या आधारे त्याला कर्ज म्हणून दाखवण्यात आले आणि परतफेडीची मागणी सुरू झाली. आम्ही चित्रपटाच्या क्रेडिट्समध्ये संबंधित व्यक्तीचे नाव निर्माता म्हणूनही पाहिलंय. सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये जे बोलले जात आहे की तो रडत होता किंवा म्हणत होते की त्याचे कोणी नाही- आम्ही मानू शकत नाही की, त्यानं असे काही म्हटले असेल.जेलमध्ये जाताना राजपाल भावाला काय सांगितलं?जेलमध्ये जाताना राजपालनं सांगितलं की, न्यायालयीन प्रक्रियेनुसार त्याला एक दिवसासाठी जावे लागेल आणि पुढे कायदेशीर प्रक्रिया सुरू राहील. त्याने आम्हाला पूर्ण विश्वास दिला की, दादा, कोणतीही गोष्ट चिंता करण्यासारखी नाही. आम्ही सिद्ध करू की पैसे गुंतवणुकीसाठी होते, कर्ज घेतलेले नव्हते. आम्हाला चित्रपटसृष्टीबद्दल फार माहिती नाही, पण आम्हाला सांगण्यात आले की चित्रपटांमध्ये अनेक जण गुंतवणूक करतात आणि ही एक सामान्य प्रक्रिया आहे.'आम्ही देवाकडे प्रार्थना करतोय की...'माझ्या मनात पूर्ण विश्वास आहे की, तो उद्या बाहेर येईल. आमच्या मुलीचे लग्न आहे आणि त्याची पूर्ण तयारी सुरू आहे. कोणीतरी पत्रकार आला आणि म्हणाला की घरात नैराश्य पसरलंय. अरे जिथे ५०-५० कामगार काम करत आहेत आणि आम्ही सर्व त्यात गुंतलोय. दुपारची वेळ होती, काम करणारे लोक जेवत असतील आणि घरी कोणी दिसलं नसेल तर त्याने फोटो काढून टाकला असेल की इथे नैराश्य पसरलंय वगैरे. कोणत्याही प्रकारे नैराश्य पसरलेले नाही. आम्ही पूर्ण धैर्याने काम करत आहोत आणि आम्हाला ठाऊक आहे की, तो उद्या बाहेर येईल आणि आम्ही लग्नसोहळा जल्लोषात साजरा करू. लग्न होणारच, कोणतीही अडचण नाही. त्यामुळे लग्नात त्याची उपस्थिती खूप महत्त्वाची आहे. यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करतोय की तो लवकर बाहेर येवो.१९ फेब्रुवारीला राजपाल यादवच्या पुतणीचे लग्न आहे आणि कुटुंबाला पूर्ण आशा आहे की तो लग्नसमारंभात नक्की सहभागी होतील. तसेच चित्रपटसृष्टीनेही राजपाल यादवला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 9:10 am

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींच्या संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करत लोकसभेत प्रस्ताव मांडला आहे. यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.राहुल गांधींनी संसदेत निराधार विधाने करून देशाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप निशिकांत दुबे यांनी केला आहे. राहुल गांधींचे संसदेचे सदस्यत्व त्वरित रद्द करण्यात यावे आणि त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी निशिकांत दुबे यांनी केली आहे. दुबे यांनी यासाठी लोकसभेत ‘स्वतंत्र प्रस्ताव’ सादर केला आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.हक्कभंग ऐवजी स्वतंत्र प्रस्तावराहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण करताना केंद्र सरकारने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत करारात देश विकला, असा आरोप केला होता. यानंतर आक्रमक झालेल्या भाजपने त्यांच्याविरोधात मांडलेल्या प्रस्तावामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष तीव्र होणार आहे. सभागृहात निराधार विधाने करून लोकसभेची दिशाभूल केल्याचा आरोप करत केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी राहुल गांधींविरोधात ‘हक्कभंग नोटीस’ दाखल करण्याचे संकेत दिले होते. पण, दुबेंनी हक्कभंग ऐवजी ‘स्वतंत्र प्रस्ताव’ मांडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाद्वारे गंभीर विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा घडवून आणता येते.याबाबत दुबे यांनी सांगितले की, राहुल गांधी देशाला दिशाभूल करत आहेत. या प्रस्तावात मागणी केली आहे की या प्रकरणावर चर्चा व्हावी, राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द करावे आणि त्यांना आयुष्यभर निवडणूक लढण्यावर प्रतिबंध लावावा. दुबे यांनी स्पष्ट केले की राहुल गांधींविरुद्ध कोणताही विशेषाधिकार प्रस्ताव आणण्याचा त्यांचा मानस नाही. हा एक स्वतंत्र प्रस्ताव असून, गांधींचे संसदेतून निलंबन करण्याची मागणी त्यात केली आहे. राहुल गांधी जॉर्ज सोरोससारख्या बाह्य शक्तींच्या पाठिंब्याने देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.दरम्यान, राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही एखाद्या देशाकडून तेल खरेदी करू शकत नाही, असे अमेरिका सांगते त्यावेळी भारताची ऊर्जा सुरक्षा बाह्यशक्तीच्या हातात आहे असा त्याचा अर्थ होतो.अमेरिकेने भारतावरील २५ टक्के टॅरिफ कमी केले, त्यावेळी ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी असे सांगितले. राहुल गांधी यांनी याचाच संदर्भ देऊन सभागृहात सरकारला धारेवर धरले होते.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 8:30 am

विजय मल्ल्या भारतात परतणारच नसतील, तर आम्ही याचिका का ऐकावी?

मुंबई उच्च न्यायालयाचा सवालमुंबई : फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याने आधी भारतात परत यावे. आम्ही तातडीने त्यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू करू. जर ते परत येणारच नसतील तर आम्ही ही याचिका का ऐकावी?, यातून काय साध्य होईल?, अशी स्पष्ट भूमिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने घेतली.केंद्र सरकारच्यावतीनंही हीच भूमिका मांडत विजय मल्ल्याने भारतात परत येऊन चर्चा करावी, त्यांचा काय दावा आहे?, ते कुठलं कर्ज मान्य करतात, कुठलं नाही?, ते कधी आणि कसे पैसे परत करणार?, आम्ही त्यांचं म्हणणे ऐकून घेण्यास तयार असल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्ट केले.विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये असल्याचे त्यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी उच्च न्यायालयात सांगितले. त्यावर, आर्थिक घोटाळा करून परदेशात पसार झालेल्यांनी तिथं बसून याचिका करू नये. आधी भारतात कधी येणार ते सांगा?, मग आम्ही त्यांची याचिका ऐकू, असे स्पष्ट करत समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेला स्थगिती दिली जाणार नाही. तसेच तुमची याचिका फेटाळून लावत आम्ही तुम्हाला ही अखेरची संधी देत आहोत, असे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने गुरुवारी स्पष्ट केले.भारतीय बँकांचे हजारो कोटी बुडवून परदेशात पसार झालेल्या विजय मल्ल्याला ब्रिटनहून भारतात परत आणण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्याने या कायदेशीर प्रक्रियेचा ब्रिटनमधील कोर्टात गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी केंद्र सरकारतर्फे न्यायालयाकडे केली. १८ फेब्रुवारीच्या पुढील सुनावणीत फरार मल्ल्या भारतात परत कधी येणार?याची माहिती त्यांच्या वकिलांना सादर करण्याचे निर्देश जारी केले.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 8:30 am

Ginny Wedss Sunny 2 First Look : ‘गिनी वेड्स सनी 2’चा फर्स्ट लूक समोर; ‘या’दिवशी येणार भेटीला

Ginny Wedss Sunny 2 First Look : या पोस्टरमध्ये अविनाश तिवारी एका कुस्तीगीराची भूमिका साकारताना दिसत आहे.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 8:15 am

एकत्रिकरणाचं भवितव्य

ज्यांच्या आग्रहाखातर दादा वेगळे झाले, त्या बहुतेक सगळ्या नेत्यांचा दोन्ही पक्षांच्या एकत्रिकरणाला विरोध होता, हे त्यांनाही माहीत होतं. त्यांचा तो विरोध आजही दिसतो आहेच. या विरोधाला काही तात्त्विक, वैचारिक आधार आहे, असं नाही. शुद्ध व्यावहारिक आहे. अजितदादांच्या वारसदारांना याची व्यवस्थित कल्पना आहे.२८जानेवारीच्या सकाळी बारामतीत दुर्दैवी विमान अपघात झाला नसता, त्यात अजितदादा पवार यांचं निधन झालं नसतं, तर आज कदाचित सर्व वृत्तपत्रांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाच्या बातम्यांचे मथळे असते. 'कदाचित' म्हणण्याचं कारण एवढंच, की दिशा निश्चित होती; पण प्रक्रियेचे तपशील ठरत होते. दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांविरोधात सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असल्याने काही तांत्रिक बाबी आडव्या येऊ शकल्या असत्या. शिवाय, राजकीय घडामोडींत कधी कोणते फाटे फुटतील, हे सांगता येत नसतं. त्यामुळे, एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडत नाही, तोपर्यंत त्याबाबत खात्रीने बोलण्याला काही अर्थ नसतो. 'घड्याळ'वाल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते 'अशी काही चर्चा सुरू असल्याचं आम्हाला माहीत नव्हतं. तसं असतं, तर दादा आमच्याशी बोलले असते' असं सुरुवातीला म्हणाले. पण, त्यानंतर संबंधितांकडून चर्चेच्या फेऱ्यांचे अनेक तपशील, चित्रफितीच दाखवल्या गेल्याने या नेत्यांकडून पुन्हा तशा प्रकारचं वक्तव्य झालं नाही. आता उघड झालेल्या एकूण तपशिलावरून अशी चर्चा सुरू होती आणि खुद्द अजितदादाच त्यासाठी आग्रही होते, असं दिसतं. या चर्चेतील खाचाखोचा ते आपल्या पक्षातील सहकाऱ्यांना किती सांगत असतील, हा प्रश्न आहे. कारण, ज्यांच्या आग्रहाखातर दादा वेगळे झाले, त्या बहुतेक सगळ्या नेत्यांचा दोन्ही पक्षांच्या एकत्रिकरणाला विरोध होता, हे त्यांनाही माहीत होतं. त्यांचा तो विरोध आजही दिसतो आहेच. या विरोधाला काही तात्त्विक, वैचारिक आधार आहे, असं नाही. शुद्ध व्यावहारिक आहे. अजितदादांच्या वारसदारांना याची व्यवस्थित कल्पना आहे. सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड, पदग्रहणापूर्वीचे सोपस्कार, दिल्ली भेटीसाठीचा आग्रह या वारसदारांना समजत नाही, असं नाही. पण, आत्ताच काही भूमिका जाहीर करण्याची गरज नाही. सगळ्यांचं ऐकून, प्रत्येकाची पावलं कुठे पडतात हे नीट समजावून घेऊन मगच आपली भूमिका स्पष्ट करण्याचं त्यांनी ठरवलं असावं. कुठेही काहीही न बोलता सरकारमधील, पक्षातील; अगदी पक्ष संघटनेतील घडी बसवण्याला त्यांनी प्राधान्य दिलेलं दिसतं. आजच्या घडीला हेच धोरण योग्य आहे. अजितदादांचे वारसदार नवखे किंवा अपरिपक्व आहेत, त्यांना आपल्यालाच पुढे घेऊन जायचं आहे, असा समज कोणी करून घेतला असेल, तर त्यांना लवकरच ठेच लागण्याची शक्यता यावरून दिसते.दोन राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या, तेव्हांही त्याबाबतच्या चर्चा वेगवेगळ्या पातळ्यांवर कितीतरी दिवस सुरू होत्या. तेव्हांही पक्षात आणि पवार कुटुंबात अशा दोन्ही आघाड्यांवर स्वतंत्रपणे बोलणी होत होती. दोन्ही बाजूला अग्रभागी पवार कुटुंबातील व्यक्तीच असल्याने साहजिकच त्यावेळीही 'केवळ पक्षात फूट, की कुटुंबात दरी?' अशा प्रकारच्या चर्चा झाल्या होत्या. भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासाठी जे आग्रही होते, त्यातील प्रत्येकाची त्या आग्रहामागे वेगवेगळी कारणं होती. त्याची चर्चाही त्यानंतर पुष्कळ झाली होती. पण, तो निर्णय घेण्याच्या काळात स्वतः अजितदादा किती तणावात होते, याची कल्पना भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह राजकीय वर्तुळालाही आहे. दोन राष्ट्रवादी स्वतंत्र झाल्यानंतरही सुरुवातीचे काही महिने सोडले, तर नंतर दोन्ही बाजूंनी परस्परांवरचे वार थांबले होते. विधिमंडळाच्या अधिवेशन काळात दोन्ही पक्षांचे नेते आणि आमदार किती समन्वयाने वावरायचे, हे तर जगजाहीर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी अनेक ठिकाणी आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्लीत शहा यांची भेट घेऊन त्यांना त्याची कल्पनाही दिली होती. भाजपसारख्या तगड्या पक्षाच्या युतीत असताना त्यांच्या संमतीशिवाय असा काही निर्णय कोणी पक्ष परस्पर घेईल, हे संभवत नाही. म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली निवडणूक आघाडी ही भाजपला पूर्ण अवगत होती आणि त्यांची त्याला मूळ संमती होती, असं मानायला जागा आहे. भाजपचं केंद्रीय नेतृत्व राजकीय परिणामांचा विचार केल्याशिवाय आणि एखाद्या राजकीय घडामोडीचं पूर्ण तार्किक चित्र स्पष्ट असल्याशिवाय गाफीलपणे परवानगी देणंही शक्य वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींची माहिती महायुतीतल्या अन्य पक्षांच्या वरिष्ठ वर्तुळात असणार असा निष्कर्ष यावरूनच काढला जातो आहे. राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी याही गोष्टीचा विचार उघड वक्तव्य करण्याआधी करायला हवा. अर्थात याविषयी आता कोणी उघड कबुली देण्याचा किंवा दुजोरा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण, त्या अपघाताने सर्व समीकरणंच बदलून गेली आहेत. एकत्रिकरणाचा विचार करणारे आपापला विचार करताहेत; पण हे एकत्रिकरण ज्या राजकीय चित्राचा भाग होतं, त्या चित्रातल्या अनेक घटकांची आताच्या घडीची गरज, सोय काय आहे, याचा विचार कोणी करतं आहे, असं दिसत नाही. सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली भेटीतही या विषयावर चर्चा झाल्याचं काही ठिकाणी प्रसिद्ध झालं आहे. त्याचे तपशील एक - दोन दिवसात कळतील. जर चर्चा झालीच असेल, तर बदललेल्या परिस्थितीत भाजपची भूमिका काय आहे, त्यांचा कल कुठे आहे, हे तिथे उपस्थित असलेल्यांना कळलंच असेल. राष्ट्रवादीतले प्रमुख चार-पाच नेते या एकत्रिकरणाला जो विरोध करताहेत, त्याची दखल भाजप कशी घेणार आहे, यावरच या 'चर्चेतल्या एकत्रिकरणा'चं भवितव्य अवलंबून आहे. अजितदादा या एकत्रिकरणाला तयार होते, त्यामागे राजकीय कारणांपेक्षा भावनिक कारणं जास्त होती, असं म्हणतात. ती भावनिक कारणं त्यांच्या वारसांच्या दृष्टीने किती महत्त्वाची ठरतात, हा मुद्दा आहेच. शिवाय, ही प्रक्रिया नेटाने पुढे नेण्याएवढी तीव्र इच्छाशक्ती आता कुणाकडे असण्याचं कारण नाही, ही वस्तुस्थितीही लक्षात घ्यावी लागेल. आधी कुटुंब; मग पक्ष याच क्रमाने ही दुरुस्ती व्हायची तेव्हां होईल.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 8:10 am

Nashik MNS Protest: शिक्षकाने मराठी बोलण्यास विरोध केल्याने मनसे कार्यकर्त्यांचा राडा

नाशिक: नाशिकमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. एका प्रसिद्ध कोचिंग क्लासमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी राडा केल्याची घटना समोर आली आहे. मराठी भाषेचा अवमान केल्याचा आरोप करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी फिजिक्सवाला या कोचिंग क्लासमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी क्लासच्या मॅनेजरने सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली असून, पोलिसांनी मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.नेमकं प्रकरण काय ?नाशिकमधील शरणपूर रोड परिसरात फिजिक्सवाला हे प्रसिद्ध कोचिंग सेंटर आहे. या क्लासमध्ये शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे मराठी भाषिक आहेत. मात्र, या ठिकाणी शिकवणारे अनेक शिक्षक हे परराज्यातील असून त्यांना मराठी भाषेचे ज्ञान नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भाषेवरून वारंवार खटके उडत होते.काही विद्यार्थ्यांना हिंदी विषय समजण्यास अडचण येत होती, त्यातूनच वादाची ठिणगी पडली. एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना चक्क हिंदीतच शिकावे लागेल, असे बजावत मराठी भाषेला गावठी म्हणून हिनवल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे.मनसे पदाधिकाऱ्यांचा क्लासमध्ये राडामराठी भाषेचा अपमान होत असल्याची माहिती मिळताच मनविसेचे शहराध्यक्ष ललित वाघ, उमेश भोई, बाजीराव मते, नितीन धानापुणे, अक्षय कोंबडे आणि रोहित उगावकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी थेट फिजिक्सवाला क्लास गाठला. तिथे त्यांनी व्यवस्थापनाला जाब विचारत गोंधळ घातला. संबंधित पांडे नामक शिक्षकाला समोर आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांवर दादागिरी करणे आणि मराठी बोलण्यास मज्जाव करणे यावरून वाद विकोपाला गेला. यावेळी संतापलेल्या कार्यकर्त्यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केली, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखलया आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी क्लास व्यवस्थापनाला एक गंभीर इशाराही दिला आहे. क्लासमधील सर्व परप्रांतीय शिक्षकांचे येत्या ७ दिवसांत राजीनामे घ्यावेत आणि त्यांच्या जागी मराठी शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण झाली नाही, तर क्लासची तोडफोड करून पुन्हा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. या प्रकारानंतर क्लासच्या मॅनेजरने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मारहाण, धमकी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवला असून पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 8:10 am

अमेरिका-‘जमात’ हातमिळवणी

बांगलादेशमधील ‘जमात-ए-इस्लामी’ या पक्षाशी संबंध सुधारण्यावर अमेरिका लक्ष केंद्रित करत आहे. पाकिस्तानशी चांगले संबंध आणि बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या ‘जमात’शी अमेरिकेचे सुधारत चाललेले संबंध भारतासाठी पुढील काळात डोकेदुखी ठरू शकतात.अमेरिकन प्रशासनाच्या अंदाजानुसार बांगलादेशमधील ‘जमात-ए-इस्लामी’ हा इस्लामिक पक्ष पुढील महिन्याच्या निवडणुकीत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करू शकेल आणि म्हणूनच अमेरिका त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. बांगलादेशमध्ये ‘जमात-ए-इस्लामी’ या संघटनेवर यापूर्वी अनेक वेळा बंदी घालण्यात आली होती. अलीकडेच शेख हसीना यांची राजवट आरक्षण आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे उलथवून टाकण्यात आली. तिथे युनूस मोहम्मद यांचे हंगामी सरकार सत्तेवर आहे. या सत्तेच्या काळात ‘जमात-ए-इस्लामी’ला अधिक महत्त्व मिळत गेले. हसीना यांच्या सरकारकडे युनूस हेही शत्रूपक्षाचे सरकार म्हणून पाहत होते. हे सरकार उलथवून टाकण्यात ‘जमात-ए-इस्लामी’ची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे युनूस याच पक्षाच्या सल्ल्याने कारभार करतात आणि धोरणे ठरवतात. हाच पक्ष सत्तेवर यावा, असे त्यांना वाटते. ‘जमात-ए-इस्लामी’ पक्षाने पारंपरिकपणे शरिया कायद्यावर आधारित शासन आणि महिलांचे कामाचे तास कमी करण्याचा पुरस्कार केला आहे; जेणेकरून त्या मुलांप्रती त्यांची कर्तव्ये पार पाडू शकतील. तथापि, अलीकडेच त्यांनी आपली सार्वजनिक प्रतिमा सौम्य करण्याचा आणि महिलांचा पाठिंबा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘जमात-ए-इस्लामी’चे प्रवक्ते मोहम्मद रहमान म्हणाले, की पक्ष भ्रष्टाचारविरोधी, पारदर्शकता, जबाबदारी आणि सुशासन या मुद्द्यावर निवडणुका लढवत आहे. महिलांसाठी कामाचे तास कमी करण्याचा प्रस्ताव प्राथमिक टप्प्यात आहे आणि पक्षाची शरिया कायदा लागू करण्याची कोणतीही योजना नाही.१९७१ मध्ये बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान, ‘जमात-ए-इस्लामी’च्या अनेक नेत्यांनी लोकांवर गंभीर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. पक्षाने वेगळ्या बांगलादेशला विरोध केला होता, कारण तो इस्लामविरोधी असल्याचे मानले जात होते. भारतात बाबरी मशीद पाडल्यानंतर, जमात नेते आणि विद्यार्थी संघटनांवर बांगलादेशमध्ये हिंदूविरोधी दंगली भडकवल्याचा आरोपही करण्यात आला होता. बांगलादेशमधील राजकीय परिस्थिती बदलत असताना तेथील अमेरिकन राजदूतांनी पुनरुज्जीवित इस्लामिक चळवळीसोबत काम करण्याची तयारी दर्शवली. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या अहवालानुसार अमेरिकेचा अंदाज आहे, की ‘जमात-ए-इस्लामी’ बांगलादेशच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक यश मिळवू शकते. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने मिळवलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगनुसार १ डिसेंबर रोजी बांगलादेशी महिला पत्रकारांसोबत बंद दाराआड झालेल्या बैठकीत ढाका येथे तैनात असलेल्या एका अमेरिकन राजदूताने सांगितले, की देश इस्लामिक झाला आणि १२ फेब्रुवारीच्या निवडणुकीमध्ये ‘जमात-ए-इस्लामी’ पूर्वीपेक्षा चांगले प्रदर्शन करेल. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्रानुसार ‘जमात-ए-इस्लामी’ बांगलादेशवर इस्लामिक कायद्याची आपली धारणा लादण्याचा प्रयत्न करेल, या चिंतेकडे अमेरिकन राजदूताने दुर्लक्ष केले. ते म्हणाले, की जमात शरिया लादू शकते, असे मला वाटत नाही. पक्षाच्या नेत्यांनी अशी भयानक पावले उचलल्यास अमेरिका दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर शंभर टक्के कर लादेल.‘द वॉशिंग्टन पोस्ट’ला दिलेल्या निवेदनामध्ये ढाका येथील अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्या मोनिका शिया म्हणाल्या, की डिसेंबरमध्ये झालेली चर्चा ही एक नियमित बैठक होती. ही अमेरिकन दूतावासाच्या अधिकाऱ्यांची आणि स्थानिक पत्रकारांमधील ‘ऑफ-द-रेकॉर्ड’ चर्चा होती. त्या म्हणाल्या, की बैठकीदरम्यान अनेक राजकीय पक्षांबाबत चर्चा झाली. अमेरिका कोणत्याही एका राजकीय पक्षाला दुसऱ्यापेक्षा जास्त पसंती देत नाही आणि बांगलादेशमधील लोक निवडत असलेल्या सरकारसोबत काम करण्याची अमेरिकन सरकारची योजना आहे. तथापि, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या अहवालात बांगलादेशमधील अमेरिकन राजदूत एका महत्त्वपूर्ण संक्रमणादरम्यान देशाच्या राजकीय भविष्याकडे कसे पाहतात, यावर प्रकाश टाकला आहे. ढाका येथील दूतावासाच्या बैठकीत, एका अमेरिकन अधिकाऱ्याने सूचित केले, की ‘जमात-ए-इस्लामी’शी संपर्क साधण्याव्यतिरिक्त मिशनचे कर्मचारी ‘हेफाजत-ए-इस्लाम बांगलादेश’ आणि ‘इस्लामी आंदोलन बांगलादेश’सह इतर रूढीवादी गटांसोबतही काम करत आहेत. ते इस्लामिक राजकीय पक्षांमध्येही सामील होऊ शकतात. राजनयिकाने जोर देऊन सांगितले, की ‘जमात-ए-इस्लामी’ सत्तेत आली आणि अमेरिकेला मान्य नसलेली धोरणे लागू केली, तर अमेरिका बांगलादेशच्या मोठ्या कापड उद्योगावर काही बंधने घालू शकेल. अधिकाऱ्याने सांगितले, की बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग अमेरिकेवर अवलंबून आहे. त्यांनी बांगलादेशच्या कापड निर्यातीचा उल्लेख केला. यामुळे भारताची चिंता कमी होण्याची शक्यता नाही.बांगलादेश हा राजकीय गोंधळातून जन्मलेला देश आहे. १९७१ मध्ये झालेल्या युद्धानंतर पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळाले, तेव्हापासून बांगलादेशने लष्करी उठाव, हुकूमशाही आणि प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेतृत्वाखाली अशांततेचा सामना केला आहे. भारत-बांगलादेश संबंध आधीच अनिश्चित स्थितीत आहेत. शेख हसीना भारताच्या जवळच्या मित्र मानल्या जात होत्या आणि त्यांना सत्तेवरून काढून टाकल्यापासून त्या भारतात राहात आहेत. नोव्हेंबरमध्ये बांगलादेशच्या एका न्यायाधिकरणाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यांना किमान १,४०० निदर्शकांच्या हत्येसाठी जबाबदार ठरवले. बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या विनंतीला न जुमानता भारताने त्यांचे ढाका येथे प्रत्यार्पण केले नाही. डिसेंबरमध्ये झालेल्या बैठकीत एका अमेरिकन राजनयिकाने म्हटले होते, की हसीनाला दोषी ठरवणे राजकीयदृष्ट्या योग्य होते. अधिकाऱ्याने पुढे म्हटले, की न्यायाधिकरण ‘स्वतंत्र आणि निष्पक्ष’ नव्हते; परंतु हसीना दोषी आहेत. भारतावर ‘जमात-ए-इस्लामी’चा राग आणि युनूस यांचीही तशीच भूमिका हे सारे पाहता अमेरिकेचे त्यांच्याशी वाढत चाललेले मैत्रीपूर्ण संबंध दक्षिण आशियातील राजनैतिक समीकरणांवर प्रतिकूल परिणाम घडवतील. अमेरिकेला शेख हसीना कधीच आवडत नव्हत्या. तसेच अमेरिकेला बांगलादेशमध्ये भारताचा प्रभाव मान्य नव्हता. हसीना यांच्यानंतरच्या सरकारच्या पहिल्या प्रमुख राजकीय निर्णयांपैकी एक म्हणजे ‘जमात-ए-इस्लामी’वरील बंदी उठवणे. यावरून अमेरिका बांगलादेशमध्ये तिला अपेक्षित आहे, तेच घडवू पहात आहे हे लक्षात येते. बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान नरसंहार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला पाठिंबा देणाऱ्या ‘जमात-ए-इस्लामी’चे हात रक्ताने माखले आहेत. ती बांगलादेशमधील धर्मनिरपेक्षता नष्ट करू इच्छितात आणि देशाला इस्लामी बनवू इच्छितात; परंतु गेल्या दीड वर्षांत त्यांना पद्धतशीरपणे मुख्य प्रवाहात आणले गेले आहे. या पार्श्वभूमीवर ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या विश्लेषणाचा अर्थ लावला, तर बांगलादेश-अमेरिकेचे वाढते संबंध भारतासाठी अडचणीचे ठरू शकतात, हे लक्षात येईल.(लेखक राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत.)'- प्रा. जयसिंग यादव

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 8:10 am

Krystle D’Souza: साडीमध्ये घाबरलेली क्रिस्टल डिसूजा; रणवीर सिंह म्हणाला…“हा तुझा क्षण आहे”

क्रिस्टलने सांगितले की, ‘शरारत’ गाण्याच्या लॉन्चवेळी स्टेजवर जाऊन परफॉर्म करण्याचा तिचा अजिबात विचार नव्हता. गाणे गायिका जॅस्मिन सँडलास आणि मधुबंती बागची यांनी सादर केले. गाणे सुरू होताच प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आणि संपूर्ण वातावरण उत्साहाने भरून गेले.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 8:09 am

Ambegaon News : कळंब, महाळुंगे की मंचर? आंबेगाव पंचायत समितीच्या सत्तेचे केंद्र कोण? ‘या’नावांची जोरदार चर्चा

Ambegaon News : दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील समन्वय सभापती निवडीत ठरणार निर्णायक; कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 8:00 am

Khed News : खेडमध्ये ‘मशाल’धगधगली! नवनिर्वाचित शिलेदारांचा ‘मातोश्री’वर सत्कार; उद्धव ठाकरें यांचे मार्गदर्शन

Khed News : पक्षाच्या ध्येयधोरणांशी तडजोड नको, कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचा महत्त्वाचा सल्ला; आगामी आव्हानांसाठी सज्ज राहण्याचे आदेश.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:30 am

मुंबईतील नौदल गोदीमध्ये लागलेली आग नियंत्रणात, जीवितहानी नाही

मुंबई: दक्षिण मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये गुरुवारी रात्री आग लागली, ज्यामुळे परिसरात काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली. डॉकयार्डमधील कचरा साठवणुकीच्या ठिकाणी ही आग लागली. रात्री १०.२५ च्या सुमारास ही आग लागली.एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, कुलाबा येथील गेटवे ऑफ इंडियासमोर तिरप्या दिशेने आग लागली. घटनेची माहिती मिळताच नौदलाच्या अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी आग विझवण्याचे काम जलद गतीने सुरु केले. आग वेळेत पसरण्यापासून रोखण्यात आली आणि थोड्याच वेळात त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले.मुंबई नौदल डॉकयार्ड आगीत कोणतीही जीवितहानी नाही

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 7:30 am

Ajit Pawar : नियोजन समिती बैठकीत ‘दादां’ची उणीव! पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज

Ajit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:20 am

PMC Fine 10 Lakhs : नदीत राडारोडा टाकणे पडले महागात! १० लाखाच्या दंडासह गुन्हा दाखल; कसा लागला छडा..वाचा

PMC Fine 10 Lakhs : शिवाजीनगर तोफखाना भागातून रात्रीच्या वेळी राडारोडा नदीत टाकल्याचे फुटेज समोर; महापालिका आयुक्तांकडून तत्काळ कठोर कारवाईचे आदेश.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:15 am

Pune Crime : शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा; कोरेगाव पार्कच्या ‘या’मोठ्या कंपनीवर गुन्हा दाखल

Pune Crime : दरमहा ४ ते १० टक्के परतावा देण्याचे प्रलोभन; कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:15 am

PMC News : ‘तिजोरी’ची चावी कुणाकडे? महापालिका स्थायी समितीसाठी भाजपमध्ये चढाओढ; आज होणार शिक्कामोर्तब

PMC News : १६ सदस्यांच्या समितीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व; प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून नावांची शिफारस, प्रदेश भाजप कोणाच्या नावावर देणार कौल?

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:10 am

Professor Recruitment : यूजीसीचे नियम धाब्यावर? प्राध्यापक भरतीचा नवा अध्यादेश वादाच्या भोवऱ्यात; वाचा काय आहे नवा पेच

Professor Recruitment : शासनाचा नवा अध्यादेश जारी, मात्र NIRF रँकिंगच्या अटीमुळे नामांकित विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनाच फायदा मिळणार असल्याचा आरोप.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:10 am

Pune DPC Meeting : पुणे जिल्हा नियोजन समितीचा १ हजार ३२ कोटींचा आराखडा मंजूर; कोणत्या कामांना मिळणार प्राधान्य? पाहा

Pune DPC Meeting : प्रशासकीय मान्यता ते निविदा प्रक्रिया; कामांचा दर्जा आणि कालमर्यादा पाळण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:01 am

Shirur Crime : शिरूरच्या ग्रामीण भागात चोरट्यांचा हैदोस! ५ रोहित्र फोडली, भरदिवसा घरफोडी; नागरिकांमध्ये दहशत

Shirur Crime : मलठण ते सविंदणे परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने नागरिक संतापले; नियमित रात्रगस्त आणि कडक बंदोबस्ताची मागणी.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:00 am

PMC Abhay Yojana : फक्त ४८ तास शिल्लक! महापालिकेची अभय योजना संपणार; कर भरा नाही तर, मिळकत होणार जप्त

PMC Abhay Yojana : थकबाकीदारांच्या सोयीसाठी शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत कर संकलन केंद्रे खुली; ऑनलाइन पेमेंटचा पर्यायही उपलब्ध.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:00 am

Pune News : अखेर नगर विकास विभागाचा आदेश निघाला! २३ गावांच्या बांधकाम परवानगीचे अधिकार आता महापालिकेकडे

Pune News : २३ गावांचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिकेची नियुक्ती, नगर विकास खात्याकडून शिक्कामोर्तब.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 7:00 am

यूपी निवडणुकीपूर्वी मायावतींना मोठा बंगला का मिळाला?:अखिलेश यांना सर्वात मोठा शत्रू म्हटले, योगींच्या भेटीनंतर काय बदलले!

एप्रिल, २०२४ ची गोष्ट आहे. लोकसभा निवडणुका होणार होत्या. मायावतींचे पुतणे आकाश आनंद उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे रॅली घेण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी भाजपला द्वेष पसरवणारा आणि दहशतवाद्यांचा पक्ष म्हटले. यामुळे बुआ मायावती इतक्या नाराज झाल्या की त्यांनी तत्काळ आनंद यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले. मायावतींनी आकाश यांना पदावरून हटवण्याची गोष्ट केवळ कार्यालयात जारी केलेल्या पत्रापुरती मर्यादित ठेवली नाही, तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, 'आकाश आनंदकडून पद काढून घेण्यात आले आहे. त्यांना अजून पूर्णपणे परिपक्व होण्यासाठी वेळ लागेल.' आकाश समाजवादी पक्षाच्या विरोधातही खूप बोलत होते, पण मायावती त्यावर गप्प राहिल्या. संदेश स्पष्ट होता की मायावती भाजपवर हल्ला करणे टाळत होत्या. होय, राजकीय विधान करण्याची सूट होती. मायावती स्वतः रॅलींमध्ये भाजपच्या विरोधात राजकीय विधान करत होत्या. यानंतर त्यांची भाजपशी जवळीक असल्याचे संकेत येऊ लागले. 9 ऑक्टोबर 2025 रोजी एका रॅलीत त्यांनी भाजपचे आभार मानले आणि मुख्यमंत्री योगींचे आभार व्यक्त केले. जानेवारी 2026 मध्ये मायावतींना दिल्लीत आणखी एक बंगला मिळाला आहे. हा टाईप-8 बंगला आहे, तर राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षा असल्याने त्यांना टाईप-6 किंवा 7 बंगलाच मिळू शकतो. भाजप आणि मायावती यांच्यात काहीतरी शिजत आहे का, दोघांमध्ये अधिकृत युती नसली तरी, आतून काहीतरी साटंलोटं झाले आहे का, मायावतींना मिळालेला बंगला याचंच परिणाम आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत बसपा-भाजपचे समीकरण समजून घ्या… नेत्यांना आदेश - भाजपवर तीव्र टीका करू नकालोकसभा निवडणुकीदरम्यान आकाश आनंद भाजपवर जोरदार टीका करत होते. एका सभेत त्यांनी म्हटले, ‘भाजपने केंद्रातील बहुतेक तपास यंत्रणांचे राजकीयीकरण केले आहे.’ दुसऱ्या सभेत ते म्हणाले, ‘सवर्ण जातींमधील गरिबांची अवस्था भाजपच्या राजवटीत खूप वाईट आहे. जर निष्पक्ष निवडणुका झाल्या तर भाजप सत्तेतून बाहेर पडेल.’ 28 एप्रिल 2024 रोजी सीतापूरच्या निवडणूक रॅलीत आकाशने भाजपला द्वेष पसरवणारे पक्ष म्हटले, तेव्हा त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले. मात्र, माफी मागितल्यानंतर त्यांना पुन्हा पक्षात स्थान मिळाले. येथे मायावतींचा दृष्टिकोन स्पष्ट दिसला की भाजपवर तीव्र हल्ले करणे टाळावे. यावर भाजपच्या प्रदेश स्तरावरील एका नेत्याने सांगितले, 'लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपला लक्ष्य करून तीव्र विधाने करण्यावर बंदी होती. आम्हाला फक्त राजकीय विधाने करण्यास सांगितले होते. भाजपच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका आणि त्याला जातीयवादीही म्हणू नका. माध्यमांमध्ये जी विधाने सुरू आहेत, ती देऊ शकता. आम्ही समजलो होतो की आम्हाला समाजवादी पक्षाला लक्ष्य करायचे आहे. भाजपबद्दल बहनजींचा दृष्टिकोन नरम आहे.' ‘तरीही बहनजी कधी, कोणता निर्णय घेतील, हे कोणालाच माहीत नाही. हे निश्चित आहे की आता अखिलेशसोबत तर त्या समझोता करणार नाहीत. मात्र त्यांचे भाजपसोबत खूप चांगले संबंध नसले तरी त्या सामान्य संबंध ठेवू इच्छितात.‘ भाजप आणि बसपा यांच्यात काही साटंलोटं झालं आहे का? सूत्रांनुसार, ‘नाही, असा कोणताही थेट संदेश नाही पण भाजपवर हल्ला करण्याचा कोणताही आदेश नाही.‘ बसपाच्या मोठ्या रॅलीपूर्वी मायावती योगींना भेटल्याबसपाने 9 ऑक्टोबर 2025 रोजी लखनौमध्ये अनेक वर्षांनंतर मोठी रॅली काढली. तेव्हा कांशीराम यांची पुण्यतिथी होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मायावती आणि त्यांचे जवळचे सतीश चंद्र मिश्रा या रॅलीच्या सुमारे 15 दिवसांपूर्वी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटले होते. त्यांच्यात काय चर्चा झाली, हे माहीत नाही. मात्र, या भेटीनंतर रॅलीचा कार्यक्रम आणखी मोठा करण्यात आला. यानंतर कोणत्याही अधिकृत युतीवर चर्चा झाली नाही.' ‘रॅलीत मायावतींनी समाजवादी पक्षावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, सपा सरकारमध्ये असताना पीडीए (मागास-दलित-अल्पसंख्याक) ला आठवत नाही. कांशीराम यांची जयंती विसरतात, पण सत्तेतून बाहेर पडल्यावर त्यांना कांशीराम आठवतात.‘ रॅलीमध्ये कार्यकर्त्यांना सांगण्यात आले की, मायावती त्यांच्या मतदारांना (दलितांना) संदेश देतील की त्यांची थेट लढत समाजवादी पक्षाशी आहे. काँग्रेसवरही त्यांची वक्रदृष्टी आहे. तर भाजपसाठी त्यांची भूमिका आभार व्यक्त करणारी होती. सूत्रांनी सांगितले की, 'रॅलीनंतर बहनजींचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही घरोघरी जाण्याची योजना आखत आहोत. काही भागांमध्ये तर 'घरोघरी जा' अभियान सुरूही झाले आहे.' निवडणूक रणनीती बनवण्यात RSS बीएसपीचा मदतगार ठरला का?आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यूपीमधील एका सक्रिय पदाधिकाऱ्याला विचारले की बीएसपी अचानक भाजपवर इतकी मवाळ का झाली? उत्तर मिळाले, ‘बीएसपीची सध्याची स्थिती पाहता, तिच्या जिंकण्याची शक्यता खूप कमी आहे. जर ती योग्य रणनीतीने लढली, तर काही जागा जिंकू शकते.‘ ‘दुसरीकडे समाजवादी पक्ष यावेळी पूर्णपणे तयार आहे. अशा परिस्थितीत बीएसपी जितकी सक्रिय होईल, तितके नुकसान समाजवादी पक्षाचे होईल. जर मायावती भाजपवर मवाळ राहिल्या, तर त्यांचे मतदारही भाजपवर मवाळ राहतील.' यावेळी RSS बीएसपीला रणनीती बनवण्यात मदत करत आहे का? यावर पदाधिकाऱ्याचे उत्तर थेट नव्हते. ते म्हणतात, 'RSS चे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. जो मदत मागेल, त्याला ती दिली जाईल.' यावेळी बीएसपी शांतपणे काम करत आहे. पक्षाचे कार्यकर्ते मतदारांच्या घरोघरी जात आहेत. योजना अशी आहे की मायावती स्वतः यूपीच्या प्रत्येक मंडळात जातील आणि तिथेच रात्री थांबतील. त्या मार्चपासून हे अभियान सुरू करतील. यादरम्यान चौपाळ (ग्रामसभा) आयोजित केल्या जातील.' पक्षाच्या निवडणूक रणनीतीवर बसपाचे एक नेते म्हणतात, ‘आरएसएसचे लोक रणनीती बनवण्यात सहभागी दिसले नाहीत, पण जी रणनीती बनवली आहे, ती आरएसएसच्या मॉडेलवर आधारित आहे. यावेळी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला जात आहे.’ मायावतींना लुटियन दिल्लीत मोठा बंगला कसा मिळाला?मायावतींना 7 डिसेंबर 2021 रोजी दिल्लीतील लोधी रोडवर टाइप-6 चा बंगला क्रमांक- 29 मिळाला होता. काही महिन्यांनंतर त्यांनी त्याचे केंद्रीय कार्यालयात रूपांतर केले. सुमारे दोन वर्षांनंतर फेब्रुवारी 2024 मध्ये मायावतींना याच रोडवर आणखी एक बंगला मिळाला. हा टाइप-7 चा बंगला क्रमांक-35 होता. हे देखील मायावती आणि भाजप यांच्यातील चांगल्या संबंधांचे संकेत मानले गेले. मे-जून 2024 मध्ये त्या बंगल्यात शिफ्ट झाल्या, पण एका वर्षानंतर 20 मे 2025 रोजी त्यांनी तो रिकामा केला. समोर असलेल्या शाळेमुळे मायावतींना त्रास होत असल्याचे कारण सांगण्यात आले. मात्र, मायावतींनी बंगला घेतला तेव्हाही ही शाळा तिथेच होती. सूत्रांचे म्हणणे आहे की मायावतींनी बंगला रिकामा केला नाही, तर तो त्यांच्याकडून रिकामा करून घेण्यात आला होता. गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाने त्यांच्याकडे दोन बंगले असल्याचे कारण देत तो रिकामा करून घेतला होता. मायावतींना तो रिकामा करायचा नव्हता, कारण त्यांनी तो आपल्या आवडीनुसार नूतनीकरण करून घेतला होता. तसेच, सांगितलेले कारणही त्यांना योग्य वाटले नव्हते. ‘विभागाकडून आदेश आला, मायावतींसाठी मोठा बंगला शोधा’जेव्हा त्यांना बंगला अलॉट करण्यात आला होता, तेव्हाही मंत्रालयाला माहीत होते की त्यांच्याकडे आधीच एक बंगला आहे. मग इतक्या महिन्यांनंतर विभागाला अखेर दोन बंगल्यांवर आक्षेप का आला? आम्ही हा प्रश्न गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांना विचारला. ते सांगतात, ‘ऑक्टोबर 2025 च्या शेवटच्या आठवड्यात विभागाकडे मायावतींसाठी टाइप-8 बंगल्याच्या शोधाचा आदेश आला. तेव्हा विभागाकडे कोणताही बंगला रिकामा नव्हता. विभागाला एक महिन्यापूर्वी सप्टेंबरमध्येच आणखी एका माजी पदाधिकाऱ्यासाठी टाइप-8 बंगला शोधण्याचा आदेश मिळाला होता. त्यांना एपीजे अब्दुल कलाम रोडवरील बंगला क्रमांक-34 वाटपही करण्यात आला होता. सूत्रांनुसार, बंगल्यात दुरुस्तीचे बरेच काम व्हायचे होते. यासाठी आदेशही जारी करण्यात आला होता. तेव्हा वरून सांगण्यात आले की, आता दुरुस्ती करायची नाही. त्यानंतर या वर्षी 20-21 जानेवारी रोजी आदेश निघाला की, हा बंगला मायावतींच्या नावावर वाटप केला जाईल.' आम्ही गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याला विचारले की नियमानुसार मायावतींना कोणत्या प्रकारचा बंगला मिळायला हवा? उत्तर मिळाले, ‘राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष किंवा संयोजक आणि केंद्रातील मंत्र्याला विभाग टाइप 6 किंवा 7 बंगला देतो.’ मग टाइप-8 बंगला कसा अलॉट झाला? ते म्हणाले- हे विशेष शिफारसीने दिले जाऊ शकते. असे असू शकते की कोणताही टाइप-7 बंगला रिकामा नसेल. म्हणून टाइप-8 अलॉट करण्यात आला. मायावतींच्या बंगल्यावर होती केजरीवाल यांची नजर, मोदींच्या मंत्र्याला मिळालासूत्रांनी सांगितले की मायावतींकडून लोधी रोडवरील बंगला क्रमांक-35 घेऊन केंद्रीय मंत्री आणि नंतर यूपीचे अध्यक्ष बनलेल्या पंकज चौधरी यांना देण्यात आला. या बंगल्यावर आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचीही नजर होती. मायावतींनी बंगला रिकामा केल्यावर अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय पक्षाचे संयोजक असल्याच्या हक्काने हाच बंगला अलॉट करण्याची विनंती केली होती. त्यांना बंगला मिळाला नाही. ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांना लोधी रोडवर बंगला क्रमांक- 95 अलॉट करण्यात आला. मायावतींच्या नवीन बंगल्याचे नूतनीकरण सुरूगृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाच्या GRPA विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंगल्याचे नूतनीकरण सुरू झाले आहे. मे महिना संपण्यापूर्वी बंगल्याची दुरुस्ती पूर्ण करण्याचे आदेश आहेत. बसपाच्या सूत्रांनुसार, मायावती ठरवतील की त्यांना येथे कधीपर्यंत स्थलांतरित व्हायचे आहे. आधी या बंगल्याचे नूतनीकरण होईल. त्यानंतर मायावती स्वतः एकदा बंगला पाहण्यासाठी आणि त्यांच्या सोयीनुसार नूतनीकरणाचे निर्देश देण्यासाठी येऊ शकतात.

दिव्यमराठी भास्कर 13 Feb 2026 6:51 am

Shirur News : शिरूर तालुक्यात राजकीय भूकंप! ७१ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक; तुमचं गाव या यादीत आहे का?

Shirur News : मुदत संपणाऱ्या ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश; राज्य सरकारच्या भूमिकेमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 6:30 am

Agriculture News : कांदा, गहू की हरभरा? धुक्यामुळे कोणत्या पिकाचा घास हिरावणार? शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

Agriculture News : खरिपाच्या अवकाळीतून सावरण्यापूर्वीच रब्बीवर धुक्याचे सावट; कांद्याची रोपे आणि गव्हाच्या ओंब्यांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 6:00 am

Jejuri News : शिखर लिंग ते गुप्त लिंग..महाशिवरात्रीला जेजुरी न्हाऊन निघणार! भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाचे तगडे नियोजन

Jejuri News : खंडोबा मंदिराच्या कळसातील शिवलिंग आणि स्वयंभू लिंग दर्शनासाठी खुले होणार; लाखो भाविकांच्या उपस्थितीची शक्यता.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 5:30 am

लक्षवेधी : भूसंपादनाला गती

आता जमिनीच्या संपादनाचा अंतिम निवाडा, भरपाईची रक्कम आणि संपूर्ण कार्यवाहीचा सारांश जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक केले आहे

दैनिक प्रभात 13 Feb 2026 5:30 am

Maval Panchayat Samiti : सुनीता येवले मावळच्या नव्या ‘सभापती’! साहेबराव कारके उपसभापती; आमदारांनी केली घोषणा

Maval Panchayat Samiti : जिल्हा परिषदेच्या पाचही जागांवर राष्ट्रवादीचा विजय; मावळचे राजकीय वजन वाढले, जिल्हा पातळीवर मोठ्या पदाची अपेक्षा.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 5:00 am

पर्यावरण : पुन्हा कासव जिंकणार का?

ससा आणि कासवाची शर्यत या गोष्टीमध्ये कासव जिंकला. मात्र आता वाढते तापमान, उद्ध्वस्त अधिवास यामुळे कासवांचा संघर्ष सुरू आहे. हवामान बदल विरुद्ध कासव यात कोण जिंकणार?

दैनिक प्रभात 13 Feb 2026 5:00 am

Pavana Dam Accident : पर्यटनाचा आनंद ठरला जीवघेणा! पवना धरणात पोहताना २१ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

Pavana Dam Accident : निसर्गसौंदर्याचा आनंद घेताना धरणाच्या पाण्यात उतरणे जीवावर बेतले; स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 4:30 am

PCMC News : आता स्वीकृतसाठी ‘फिल्डिंग’सुरू! १० खुर्च्या, १०० दावेदार; भाजप-राष्ट्रवादीत कुणाची लागणार लॉटरी?

PCMC News : २०२३ च्या नव्या नियमानुसार स्वीकृत नगरसेवकांची संख्या ५ वरून १० वर; संख्या वाढली तरी इच्छुकांच्या गर्दीमुळे नेत्यांसमोर पेच.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 4:00 am

Dehu News : देहू नगरपंचायतीचा दणका! ३ दिवसांत १६ लाखांची वसुली, ३० जणांचे नळ कनेक्शनही कापले

Dehu News : मालमत्ता आणि पाणी कर वसुलीसाठी मुख्याधिकारी चेतन कोंडे यांचे पथक मैदानात; थकबाकी न भरणाऱ्यांची आता खैर नाही.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 3:30 am

Nagar Parishad Fund : प्रत्येक प्रभागासाठी एक कोटींचा विकास निधी; आमदार शेळके यांची मोठी घोषणा

Nagar Parishad Fund : नगरपरिषदेच्या आढावा बैठकीत पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांवर सविस्तर चर्चा; प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे निर्देश.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 2:30 am

Karad North News : उंब्रजला अखेर मिळणार ‘अप्पर तहसीलदार’कार्यालय; आ. मनोज घोरपडेंचा मोठा पाठपुरावा यशस्वी

Karad North News : वाढती लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार लक्षात घेऊन उंब्रजमध्ये अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी; प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आता जलद होणार.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 2:00 am

Satara Zilla Parishad : प्रस्थापितांना धक्का, महिलांना संधी! सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ‘या’नावांची जोरदार चर्चा

Satara Zilla Parishad : महायुतीतील अंतर्गत रस्सीखेच की विरोधकांचे आव्हान? मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या रणनीतीकडे जिल्ह्याचे लक्ष.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 1:30 am

Mandhardev : ५१ वर्षांची अखंड परंपरा! मांढरदेवमध्ये भक्तीचा मळा फुलला; ‘त्या’१० लोकांनी लावलेलं रोप आज वटवृक्ष

Mandhardev : १९७५ पासून सुरू झालेला हा यज्ञ आजही तेवत; युवकांच्या सहभागाने मांढरदेवमध्ये भक्तीचा जागर.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 1:00 am

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६

पंचांगआज मिती माघ कृष्ण एकादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र मूळ. योग वज्र चंद्र राशी धनु.भारतीय सौर २३ माघ शके १९४७.शुक्रवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२६.मुंबईचा सूर्योदय ०७.०८, मुंबईचा सूर्यास्त ०६.३७, मुंबईचा चंद्रोदय ०४.४५ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०२.५२ , राहू काळ ११.२६ ते १२.५२ विजया एकादशी, चांगला दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

फीड फीडबर्नर 13 Feb 2026 12:30 am

Patan Election Result : ‘राजा’ने घेतली माघार, ‘गडा’वर झाला वार; पाटणच्या राजकारणात मोठा उलटफेर

Patan Election Result : केवळ नावावर नव्हे तर कामावर मत; हेळवाक जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे अशोकराव पाटील यांचा विजय, पाटणकर गटाला मोठा धक्का.

दैनिक प्रभात 13 Feb 2026 12:15 am

पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा

मुंबई : राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राज्यस्तरीय बैठक पार पडली.या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा पालकमंत्री नितेश राणे यांनी सादर केला. जिल्ह्यात सध्या सुरू असलेली कामे, तसेच आगामी काळात प्रस्तावित विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती यावेळी मांडण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या विकासाच्या गरजा लक्षात घेता पायाभूत सुविधा, पर्यटनविकास, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण भागातील रस्ते व जलसंधारण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी जिल्हा नियोजन निधीत भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री राणे यांनी केली. प्रस्तावित निधीमुळे जिल्ह्यातील प्रलंबित कामांना गती मिळून सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या बैठकीस मंत्री उदय सामंत, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जैसवाल, आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 11:30 pm

मुंबईची खड्डेमुक्तीच्या दिशेने वाटचाल, आतापर्यंत ६३ टक्के सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची कामे पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :‘खड्डेमुक्त मुंबई’ या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे वाटचाल करत मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण वेगाने सुरू आहे. काँक्रिट रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणि सुलभता वाढत असून नागरिकांचा मौल्यवान वेळ तसेच इंधनाची लक्षणीय बचत होत आहे. काँक्रिटीकरण टप्पा १ अंतर्गत निर्धारित उद्दिष्टांपैकी तब्बल ७७ टक्के कामे पूर्ण झाली आहेत, तर टप्पा २ अंतर्गत ५२ टक्के कामे पूर्णत्वास गेली असून एकूण मिळून ६३ टक्के कामे यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहेत.यापुढील कालावधीत काँक्रिटीकरण कामे करताना रस्तेनिहाय सूक्ष्‍म नियोजन करावे. हाती घेतलेला रस्‍ता, खोदण्‍यात आलेला रस्‍ता निश्चित केलेल्‍या कालमर्यादेत पूर्ण करावा, असे स्‍पष्‍ट निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. काँक्रिटीकरण कामे करताना लोकप्रतिनिधींसमवेत संवाद साधावा, त्‍यांना इत्यंभूत माहिती द्यावी, त्‍यांचा प्रतिसाद मिळवावा, असे निर्देशही गगराणी यांनी दिले आहेत.मुंबईच्या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वाकांक्षी सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. टप्‍पा १ आणि टप्‍पा २ अंतर्गत शहर आणि उपनगर भागात काँक्रिटीकरण कामे सुरू आहेत. या कामांचा महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बुधवारी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी आढावा घेतला. त्‍यावेळी त्‍यांनी हे निर्देश दिले. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्‍त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (रस्‍ते) मंतय्या स्‍वामी यांच्‍यासह संबंधित अभियंते उपस्थित होते.महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत १० फेब्रुवारी २०२६ अखेर एकूण १५९४ रस्‍त्‍यांचे मिळून ४३०.६९ किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. टप्‍पा १ अंतर्गतनिश्चित केलेल्‍या उद्दिष्‍टापैकी ७७ टक्‍के तर, टप्‍पा २ अंतर्गत निश्चित केलेल्‍या उद्दिष्‍टापैकी ५२ टक्‍के लक्ष्‍यपूर्ती करण्‍यात आली आहे. म्हणजेच टप्‍पा १ आणि टप्‍पा २ असे एकत्रित मिळून पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी ६३ इतकी आहे.काँक्रिटीकरण कामे करताना रस्तेनिहाय सूक्ष्म नियोजन केल्यामुळे नागरिकांना कमीत कमी असुविधा होईल, अशा पद्धतीने अंमलबजावणी सुरु आहे. मात्र, हे साध्य करण्यासाठी हाती घेतलेला रस्ता, खोदण्यात आलेला रस्ता, निश्चित केलेल्या कालमर्यादेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. मागील सत्रातील संगमस्थान ते संगमस्थान पूर्ण झालेल्या रस्त्यांची जी कामे १ ऑक्टोबर २०२५ नंतर या सत्रात चालू करण्यात आली आहेत, ती कामे प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. या सत्रात नव्याने चालू केलेले रस्तेकामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असेही गगराणी यांनी नमूद केले.कॉंक्रिट रस्त्यांची अंमलबजावणी सुरु असताना अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. कामे सुरु करताना कामाच्या गुणवत्तेत विशेष लक्ष द्यावे, गुणवत्तापूर्ण काम करणे म्हणजे केवळ रस्त्याचा पृष्ठभाग चांगला असणे नव्हे तर, त्याच्या बेस लेवलपासून प्रत्येक स्तरावर मानकाप्रमाणे सर्व घटकस्तर व त्याच्याशी संबंधित आर्द्रता , तापमान इत्यादीसह तांत्रिक निकष तंतोतंत पाळले जाणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीने कामे होण्यासाठी प्रचंड आग्रही असावे.भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे काँक्रिटीकरण कामे अधिक गुणवत्तापूर्ण होत आहेत, असा प्रतिसाद सहायक अभियंत्यांनी दिला आहे. विद्यमान सत्र संपण्यापूर्वी ७५ दिवसांचा कालावधी हातामध्ये आहे. या ७५ दिवसांचे सूक्ष्म नियोजन केले तर पावसाळ्यापूर्वी काँक्रिटीकरण प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्प्पा गाठता येऊ शकतो,असेही बांगर यांनी नमूद केले आहे.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 11:30 pm

भारताने अमेरिकेनंतर नामिबियालाही हरवले, आता प्रतिक्षा रविवारच्या लढतीची

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ नामिबिया विरुद्धचा सामना भारताने ९३ धावांनी जिंकला. सलग दोन साखळी सामने जिंकल्यामुळे भारत ए ग्रुप अर्थात अ गटात चार गुण आणि +३.०५० च्या नेट रनरेटसह अव्वलस्थानी आहे. गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानचेही चार गुण आहेत पण त्यांचा नेट रनरेट +०.९३२ आहे. यामुळे रविवारी होणार असलेल्या भारत - पाकिस्तान सामन्याचे महत्त्व आणखी वाढले आहे.नामिबिया विरोधात असा जिंकला भारतनामिबियाने नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या भारताने २० षटकांत नऊ बाद २०९ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या नामिबियाचा डाव १८.२ षटकांत ११६ धावांवरच आटोपला. यामुळे भारताचा ९३ धावांनी विजय झाला. नामिबिया विरूद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने १८५.७१ च्या स्ट्राईक रेटने खेळत २८ चेंडूत ४ षटकार आणि ४ चौकार मारत ५२ धावा केल्या. तसेच चार षटकांत २१ धावा देत बर्नार्ड स्कोल्झ (४ धावा) आणि बेन शिकोंगो (शून्य धावा) या दोघांना बाद केले. यामुळे हार्दिक पंड्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.नामिबियाची फलंदाजीनामिबियाकडून लॉरेन स्टीनकॅम्पने २९, जॅन फ्रायलिंकने २२, जॅन निकोल लॉफ्टी-ईटनने १३, कर्णधार असलेल्या गेरहार्ड इरास्मसने १८, जेजे स्मितने शून्य, झेन ग्रीनने ११, मालन क्रुगरने ५, रुबेन ट्रम्पेलमनने ६, बर्नार्ड स्कोल्झने ४, बेन शिकोंगोने शून्य, मॅक्स हींगोने नाबाद शून्य धावांचे योगदान दिले. भारताकडून वरुण चक्रवर्तीने ३ तर हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. शिवम दुबे, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी एक विकेट घेतली.भारताची फलंदाजीअभिषेक शर्मा रुग्णालयात असल्यामुळे ईशान किशन आणि संजू सॅमसन ही जोडी सलामीला आली. संजू सॅमसनने वर्ल्डकपमध्ये दमदार पदार्पण केले. त्याने आठ चेंडूत तीन षटकार आणि एक चौकार मारत २७५ च्या स्ट्राईक रेटने २२ धावा केल्या. संजूचा हा झंझावत बेन शिकोंगोच्या चेंडूवर लॉरेन स्टीनकॅम्पने कॅच पकडल्यामुळे थांबला. ईशान किशनने २४ चेंडूत पाच षटकार आणि सहा चौकार मारत २५४.१७ च्या स्ट्राईक रेटने ६१ धावांची वेगवान खेळी केली. गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर बेन शिकोंगोने त्याचा कॅच पकडला. तिलक वर्मा २१ चेंडूत ३ चौकार मारत ११९.०५ च्या स्ट्राईक रेटने २५ धावा केल्यानंतर गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर स्मिट बोल्डकडे कॅच देऊन परतला. कर्णधार सूर्यकुमार यादव (९२.३१ स्ट्राईक रेट) १३ चेंडूत १२ धावा करून बर्नार्ड स्कोल्झच्या चेंडूवर झेन ग्रीनने यष्टीचीत केल्यामुळे परतला.हार्दिक पंड्याने ४ षटकार आणि ४ चौकार मारत १८५.७१ च्या स्ट्राईक रेटने २८ चेंडूत ५२ धावा केल्या. गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर डायलन लीचरने त्याचा कॅच पकडला. शिव दुबे धावचीत झाला. त्याने १६ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार मारत २३ धावा केल्या. रिंकू सिंग अपयशी ठरला, तो ६ चेंडूत एक धाव करून स्मितच्या चेंडूवर गेरहार्ड इरास्मसकडे कॅच देून परतला. पाठोपाठ अक्षर पटेलही शून्य धावा करून गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. वरुण चक्रवर्ती एक धाव करून नाबाद राहिला तर अर्शदीप सिंग २ धावा करून धावचीत झाला. नामिबियाकडून गेरहार्ड इरास्मसने चार तर बर्नार्ड स्कोल्झ, जेजे स्मित आणि बेन शिकोंगोने प्रत्येकी एक विकेट घेतली.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 11:10 pm

IND vs NAM : इशान-हार्दिकच्या ‘पन्नाशी’नंतर वरुणच्या फिरकीची कमाल!नामिबियाला धूळ चारत भारताने नोंदवला संलग दुसरा विजय

IND vs NAM : इशान किशनची वादळी फलंदाजी आणि हार्दिक पंड्याचा अष्टपैलू खेळ यांच्या जोरावर भारताने नामीबियाला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 11:06 pm

ITA vs NEP : इटलीच्या ‘मॉस्को’बंधूंचा वानखेडेवर वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानच्या अकमल भावंडांना मागे टाकत रचला नवा इतिहास

ITA vs NEP : जस्टिन मॉस्को आणि अँथनी मॉस्को या दोन सख्ख्या भावांनी केवळ सामनाच जिंकून दिला नाही, तर विश्वचषकाच्या इतिहासात सख्ख्या भावांनी केलेली सर्वोच्च भागीदारी मोडत जागतिक विक्रमही प्रस्थापित केला.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 10:26 pm

Satara News : कोयनानगरमध्ये सत्ता बदल; पाटणकर गटाला आत्मचिंतनाची गरज

कोयना विभागातील हेळवाक जिल्हा परिषद गट आणि संबंधित पंचायत समिती गणांतील निकालाने स्थानिक राजकारणाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. चार दशकांहून अधिक काळ प्रभाव राखणाऱ्या प्रस्थापित गटाला मतदारांनी यावेळी स्पष्ट नकार दिला

दैनिक प्रभात 12 Feb 2026 10:12 pm

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन निधीत भरीव वाढ करण्याची पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ च्या राज्यस्तरीय बैठकीत सिंधुदुर्गातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांसमोर आढावामुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या विकासाच्या गरजा, पर्यटनवाढ, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार करता जिल्हा नियोजन निधीत भरीव वाढ करण्याची मागणी पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी गुरुवारी मुंबई येथील वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जैसवाल, आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, पर्यटन पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती तसेच ग्रामीण व नागरी भागातील विकासकामांची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या सुरू असलेल्या तसेच आगामी काळात प्रस्तावित विकासकामांची प्रभावी, दर्जेदार व वेळेत अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा नियोजन निधीत वाढ करण्याची मागणी या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या तसेच आगामी काळात प्रस्तावित विविध विकासकामांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडत, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक निधीची गरज स्पष्ट केली.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 10:10 pm

Trade deal: अमेरिकेसोबतच्या व्यापारी करारात भारताचा मोठा विजय; कापड उद्योगाला मिळणार ‘झिरो टॅरिफ’चा लाभ

Trade deal: भारतीय कापड उद्योगाला मोठी उभारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 10:05 pm

Narinder Kaur Bharaj : पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस राबवण्याचा प्रयत्न? आमदार नरिंदर कौर भराज यांचा खळबळजनक दावा

आम आदमी पार्टीच्या (आप) संगरूर येथील आमदार नरिंदर कौर भराज यांनी गुरुवारी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 10:01 pm

Supreme Court : ‘रेरा’बरखास्त झाले तरी चालेल..! बिल्डरांची पाठराखण करणाऱ्या यंत्रणेवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

नवी दिल्ली – रेरा ही संस्था सध्या केवळ थकबाकीदार आणि नियमबाह्य काम करणाऱ्या बिल्डरांची सोय पाहणारी यंत्रणा बनली आहे, अशा कडक शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपली नाराजी व्यक्त केली. ज्या लोकांसाठी ही संस्था निर्माण केली गेली, ते आज पूर्णपणे निराश आणि हतबल आहेत. ही संस्था केवळ नावापुरती उरली असेल, तर ती बरखास्त झाली तरी आम्हाला […]

दैनिक प्रभात 12 Feb 2026 9:48 pm

Pune: दोरखंडात अडकून दुचाकीस्वाराचा अपघात; महापौर मंजूषा नागपूरे यांनी घेतली जखमीची भेट

Pune: बुधवारी दुपारी दुचाकीवरून येणाऱ्या दोन जणांचा या दोरखंडात अडकून अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालविणाऱ्या रामेश्वर अवतीकर यांचा गळा गंभीररीत्या चिरला गेला, तर मणक्यालाही मार बसला.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 9:41 pm

भारताने ओलांडला २०० चा टप्पा, नामिबियाला दिले मोठे आव्हान

नवी दिल्ली : अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नामिबिया विरुद्धच्या सामन्यात भारताने २० षटकांत नऊ बाद २०९ धावा केल्या आणि नामिबियाला २० षटकांत २१० धावा करण्याचे आव्हान दिले.आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील १८ व्या साखळी सामन्यात नामिबियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आले. अभिषेक शर्मा रुग्णालयात असल्यामुळे ईशान किशन आणि संजू सॅमसन ही जोडी सलामीला आली. संजू सॅमसनने वर्ल्डकपमध्ये दमदार पदार्पण केले. त्याने आठ चेंडूत तीन षटकार आणि एक चौकार मारत २७५ च्या स्ट्राईक रेटने २२ धावा केल्या. संजूचा हा झंझावत बेन शिकोंगोच्या चेंडूवर लॉरेन स्टीनकॅम्पने कॅच पकडल्यामुळे थांबला. ईशान किशनने २४ चेंडूत पाच षटकार आणि सहा चौकार मारत २५४.१७ च्या स्ट्राईक रेटने ६१ धावांची वेगवान खेळी केली. गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर बेन शिकोंगोने त्याचा कॅच पकडला. तिलक वर्मा २१ चेंडूत ३ चौकार मारत ११९.०५ च्या स्ट्राईक रेटने २५ धावा केल्यानंतर गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर स्मिट बोल्डकडे कॅच देऊन परतला. कर्णधार सूर्यकुमार यादव (९२.३१ स्ट्राईक रेट) १३ चेंडूत १२ धावा करून बर्नार्ड स्कोल्झच्या चेंडूवर झेन ग्रीनने यष्टीचीत केल्यामुळे परतला.हार्दिक पंड्याने ४ षटकार आणि ४ चौकार मारत १८५.७१ च्या स्ट्राईक रेटने २८ चेंडूत ५२ धावा केल्या. गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर डायलन लीचरने त्याचा कॅच पकडला. शिव दुबे धावचीत झाला. त्याने १६ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार मारत २३ धावा केल्या. रिंकू सिंग अपयशी ठरला, तो ६ चेंडूत एक धाव करून स्मितच्या चेंडूवर गेरहार्ड इरास्मसकडे कॅच देून परतला. पाठोपाठ अक्षर पटेलही शून्य धावा करून गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. वरुण चक्रवर्ती एक धाव करून नाबाद राहिला तर अर्शदीप सिंग २ धावा करून धावचीत झाला.नामिबियाकडून गेरहार्ड इरास्मसने चार तर बर्नार्ड स्कोल्झ, जेजे स्मित आणि बेन शिकोंगोने प्रत्येकी एक विकेट घेतली.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 9:30 pm

Sunetra Pawar : “बीडच्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ वसतिगृहे”; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची माहिती

Sunetra Pawar – बीड जिल्ह्यात स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ सरकारी वसतिगृहे बांधण्यासाठी १५९.३६ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहीती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. बीडच्या पालकमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलांमध्ये शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि त्यांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय त्यांचा अभ्यास सुरू ठेवण्यास मदत करणे, […]

दैनिक प्रभात 12 Feb 2026 9:26 pm

Narhari Zirwal : पुणे, नाशिक, नागपूर येथे इन्क्युबेशन पार्क उभारणार; मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली माहिती

राज्यातील औषध संशोधन, उत्पादन व औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी नाशिक, पुणे आणि नागपूर येथे ‘इन्क्युबेशन पार्क’ व ‘फार्मा पार्क’ उभारण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 9:22 pm

वर्ल्डकपमध्ये संजू सॅमसनचे दमदार पदार्पण

नवी दिल्ली : अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नामिबिया विरुद्धच्या सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली आहे. आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील १८ व्या साखळी सामन्यात नामिबियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आले. अभिषेक शर्मा रुग्णालयात असल्यामुळे ईशान किशन आणि संजू सॅमसन ही जोडी सलामीला आली. संजू सॅमसनने वर्ल्डकपमध्ये दमदार पदार्पण केले. त्याने आठ चेंडूत तीन षटकार आणि एक चौकार मारत २७५ च्या स्ट्राईक रेटने २२ धावा केल्या. संजूचा हा झंझावत बेन शिकोंगोच्या चेंडूवर लॉरेन स्टीनकॅम्पने कॅच पकडल्यामुळे थांबला.ईशान किशनने २४ चेंडूत पाच षटकार आणि सहा चौकार मारत २५४.१७ च्या स्ट्राईक रेटने ६१ धावांची वेगवान खेळी केली. गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर बेन शिकोंगोने त्याचा कॅच पकडला. तिलक वर्मा २१ चेंडूत ३ चौकार मारत ११९.०५ च्या स्ट्राईक रेटने २५ धावा केल्यानंतर गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर स्मिट बोल्डकडे कॅच देऊन परतला. कर्णधार सूर्यकुमार यादव (९२.३१ स्ट्राईक रेट) १३ चेंडूत १२ धावा करून बर्नार्ड स्कोल्झच्या चेंडूवर झेन ग्रीनने यष्टीचीत केल्यामुळे परतला.भारत : संजू सॅमसन , इशान किशन (यष्टीरक्षक) , तिलक वर्मा , सूर्यकुमार यादव (कर्णधार) , हार्दिक पांड्या , शिवम दुबे , रिंकू सिंग , अक्षर पटेल , अर्शदीप सिंग , वरुण चक्रवर्ती ,जसप्रीत बुमराहनामिबिया : लॉरेन स्टीनकॅम्प , जॅन फ्रायलिंक , जॅन निकोल लॉफ्टी-ईटन , गेरहार्ड इरास्मस (कर्णधार) , जेजे स्मित , मालन क्रुगर , झेन ग्रीन (यष्टीरक्षक) , रुबेन ट्रम्पेलमन , बर्नार्ड स्कोल्झ , बेन शिकोंगो , मॅक्स हींगो

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 9:10 pm

अपात्र ठरलेल्या ९०० संस्थांवर विभागाची कारवाई; दिव्यांग क्षेत्रातील संस्थांसाठी नोंदणी बंधनकारक

मुंबई :राज्यात दिव्यांग व्यक्ती अधिनियम अंतर्गत दिव्यांगासाठी कार्यरत संस्थांना दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्याकडे नोंदणी असणे अनिवार्य आहे. राज्यात साधारणत: दोन हजारांहून अधिक संस्था दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्यरत आहेत. यापैकी सुमारे ९०० संस्था विविध कारणांमुळे अपात्र ठरल्याने त्यांच्यावर विभागाने कारवाई करून त्यांची नोंदणी रद्द केली असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले. विशेष म्हणजे सन २०२५ या वर्षातच ३६३ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. नोंदणी रद्द केलेल्या संस्थांमध्ये कोकण ५२, नाशिक ४९, पुणे ६०, नागपूर ४९, अमरावती ५० आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील १०३ संस्थांचा समावेश आहे.सचिव तुकाराम मुंढे म्हणाले, संस्था सोसायटी नोंदणी कायदा १८६०, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा,१९५० किंवा कंपनी कायदा (कलम ८) अंतर्गत नोंदणीकृत असल्यानंतरसुद्धा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम ५० अंतर्गत नोंदणी बंधनकारक आहे. विभागाने केलेल्या कारवाईमुळे शासनाचा निधी योग्य संस्थांवर खर्च होईल. ज्या संस्था दिव्यांग क्षेत्रात कार्यरत आहेत किंवा कार्य करू इच्छितात त्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा सर्व संस्थांनी २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत divyangkalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. नोंदणी न केल्यास संबंधित संस्थांवर अधिनियमातील कलम ९१ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.सचिव मुंढे म्हणाले, दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व नागरी समाज संघटनांच्या, संस्थांच्या कामकाजात एकसमानता यावी. तसेच त्यांची जबाबदारी आणि सेवांची गुणवत्ता सुनिश्चित करणे, नागरी समाज संघटना, संस्थांची नोंदणी, तपासणी, देखरेख, नूतनीकरण, जबाबदारी व पारदर्शकता निश्चित करण्यासाठी कार्यप्रणाली १७ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आली आहे. यानुसार संस्थांनी शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सुगम्यता तत्त्वे व इतर मानकांचे पालन करणे आवश्यक आहे.दिव्यांग कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य, कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण, पुनर्वसन, संशोधन व विकास, शिक्षण-प्रशिक्षण किंवा दिव्यांगांच्या कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व संस्थानी शासनाने निश्चित केलेल्या निकषांचे पालन करून दिव्यांग कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. याद्वारे दिव्यांग व्यक्तींची प्रतिष्ठा, हक्क आणि सुरक्षा यांचे संरक्षण होईल आणि त्यांना सन्मानजनक आयुष्य जगता येईल.संस्थानी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे नोंदणी केल्यामुळे त्यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण व पुनर्वसन करणे शक्य होईल. हे कार्य करताना दिव्यांगांच्या हक्कांचे, अधिकारांचे उल्लंघन होणार नाही व त्यांना न्याय दिला जाईल याबाबत दक्षता घेतली जाईल. त्यामुळे सर्व संस्थानी नोंदणी करून, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार त्याअंतर्गत नियमावली व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या योजना व धोरणानुसार कार्य करणे अपेक्षित आहे. जेणेकरून दिव्यांगांचे पुनर्वसन व सक्षमीकरण साध्य करणे शक्य होईल, असेही सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 8:10 pm

सॅमसंगच्‍या गॅलेक्‍सी अनपॅकचे २५ फेब्रुवारी रोजी आयोजन

मुंबई :सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सॅन फ्रान्सिस्‍को येथे ‘गॅलेक्‍सी अनपॅक’चे आयोजन करणार असून या मंचावर ब्रॅण्‍डची नवीन गॅलेक्‍सी एस सिरीज सादर केली जाणार आहे. एआयच्या युगात मोबाईल इनोव्हेशनचा नवा टप्पा गाठण्याच्या दिशेने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.नवीन गॅलेक्‍सी एस सिरीज वापरकर्त्यांच्या दैनंदिन जीवनातील टास्क्स अधिक सुलभ करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. रोजच्या परस्परसंवादांमधील व्यत्यय दूर करत, आत्मविश्वास वाढवणारा आणि अधिक स्मार्ट अनुभव देणारा हा मोबाइल अनुभव ‘गॅलेक्‍सी एआय’च्या सक्षम एकत्रीकरणासह येणार आहे. ही एआय क्षमता अधिक वैयक्तिक आणि अनुकूल (पर्सनल व अ‍ॅडॅप्टिव्ह) बनत असून, वापरकर्त्यांच्या गरजेनुसार अनुभव घडवेल.गॅलेक्‍सी अनपॅक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण २५ फेब्रुवारी रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ११.३० वाजता सॅमसंगडॉटकॉम, सॅमसंग न्यूजरूम इंडिया आणि सॅमसंगच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर करण्यात येणार आहे.ग्राहक आणि तंत्रज्ञानप्रेमींनी सॅमसंगडॉटकॉमअनपॅक येथे नोंदणी करून कार्यक्रमापूर्वी येणारे सर्व टीझर्स, ट्रेलर्स, अपडेट्स तसेच विशेष फायदे याबाबत माहिती मिळवावी, असे आवाहन कंपनीने केले आहे

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 8:10 pm

वर्ल्ड क्लास मुंबईसाठी सर्वसमावेशक अ‍ॅक्शन प्लॅन

मुंबई :मुंबईला ड्रग्स-फ्री, झोपडपट्टीमुक्त व अतिक्रमणमुक्त करून जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी राज्य सरकारने व्यापक अ‍ॅक्शन प्लॅन जाहीर केला असून प्रत्येक महापालिका रुग्णालयात डी-अ‍ॅडिक्शन सेंटरपासून पुनर्विकास, प्रदूषण नियंत्रण व पायाभूत सुविधांपर्यंत सर्वसमावेशक निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई शहर जिल्हा नियोजन समिती (DPDC) बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.विकासकामांमध्ये पक्षीय राजकारण आणले नाही, लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नांना न्याय देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे सांगत मंजूर आर्थिक तरतुदींना मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसआरए प्रकल्पांना गती देत रखडलेले प्रकल्प मार्गी लावले जाणार असून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ४० लाख घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रमाबाई आंबेडकरनगर येथील १७ हजार घरांच्या प्रकल्पाला एमएमआरडीएकडून चालना देण्यात आली असून धोकादायक इमारती व क्लस्टर पुनर्विकासालाही वेग देण्याच्या सूचना देण्यात आल्या.पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्ते, नाले व पूरनियंत्रणाची सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून पहिल्या टप्प्यातील काँक्रीट रस्ते पूर्ण झाले आहेत, दुसरा टप्पा सुमारे ९० टक्के पूर्ण असून तिसरा टप्पा लवकर सुरू होणार आहे. डांबरी रस्ते दुरुस्त करणे, नालेसफाई, पाणी साचणाऱ्या ठिकाणी यंत्रणा बसवणे व होल्डिंग पाँड कार्यान्वित ठेवणे याबाबत सर्व यंत्रणांना निर्देश देण्यात आले.फुटपाथ अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असून पादचाऱ्यांचा चालण्याचा हक्क सुरक्षित ठेवण्यावर भर देण्यात येणार आहे; फेरीवाल्यांमुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासही सांगण्यात आले. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी संयुक्तपणे उपाययोजना कराव्यात, रेल्वे स्टेशन व बाजारपेठ परिसरात मोबाईल टॉयलेट आणि महिलांसाठी पिंक टॉयलेट उभारावेत तसेच सर्व सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवावीत, असे निर्देश देण्यात आले.मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी बांधकामस्थळी स्प्रिंकलर, नेट व धूळ नियंत्रण उपाय अनिवार्य करण्यात येणार असून हे नियम खासगीप्रमाणेच सरकारी प्रकल्पांनाही लागू राहतील. ड्रग्स-फ्री मुंबई मोहिम राबवून प्रत्येक महापालिका रुग्णालयात डी-अ‍ॅडिक्शन, समुपदेशन व पुनर्वसन कक्ष सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांची कागदपत्रे व आधार रद्द करून हद्दपार करण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलिसांना सूचना देण्यात आल्या.आरोग्य सेवांबाबत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत एन्जिओग्राफी, स्टेंट व महागड्या शस्त्रक्रियांचा समावेश करण्याचा प्रस्ताव असून सर्व सरकारी रुग्णालयांत रुग्णांना १०० टक्के मोफत औषधे मिळावीत, असे निर्देश देण्यात आले. केईएम रुग्णालयातील अचानक भेटीदरम्यान औषधे विकत घ्यावी लागत असल्याच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली असून सध्या सुमारे ८० टक्के रुग्णालयांत औषधे मोफत मिळत आहेत, ती पूर्णतः मोफत करण्याचे आदेश देण्यात आले. मराठी भवनसह सांस्कृतिक प्रकल्पांना गती देण्याचेही निर्देश देण्यात आले.निधी वाटप करताना कधीही दुजाभाव केला नसून नागरिकांना तात्काळ दिलासा देणे ही कार्यपद्धती असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबई अतिक्रमणमुक्त, सुरक्षित आणि सर्व सुविधा असलेले ‘वर्ल्ड क्लास’ शहर बनवण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मुंबईतील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 8:10 pm

Shirur News : सरदवाडी येथे तरुणाची हत्या; दोघांना अटक

शिरूर तालुक्यातील (Shirur News) मौजे सरदवाडी हद्दीत आयएफबी कंपनीजवळ बुधवारी उशिरा रात्री धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 7:46 pm

Parbhani Muslim Mayor : कोण आहेत सय्यद इक्बाल? 2 वर्षांपूर्वी राजकारणात एन्ट्री अन् आता थेट महापौरपद

ज्या मराठवाड्यात 'खान हवा की बाण हवा' असा प्रचार केला गेला, त्या परभणी शहरात (Parbhani Muslim Mayor) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने धाडसी आणि पुरोगामी पाऊल उचलले आहे.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 7:31 pm

स्थलांतरीत उसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ शासकीय वसतिगृहांच्या बांधकामासाठी १५९ कोटींचा निधी

मुंबई :स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील ११ वसतिगृहांच्या बांधकामासाठी १५९ कोटी ३६ लाख ६० हजार इतक्या रकमेच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.आज बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी विकासकामांसाठीचा संपूर्ण निधी योग्य व काटेकोर पद्धतीने खर्च व्हावा, ठरलेल्या वेळेत सर्व कामे पूर्ण व्हावीत, बांधकामांचा दर्जा उत्कृष्ट असावा आणि कोणतीही कामे अर्धवट राहू नयेत, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.… pic.twitter.com/UbowCAqIhU— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) February 12, 2026ऊसतोड कामगारांच्या मुलांची शिक्षणाबाबतची आस्था वाढीस लावून त्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या ४१ तालुक्यांच्या ठिकाणी मुलांसाठी ४१ व मुलीसाठी ४१ अशी एकूण ८२ (प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमता) शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रथम टप्प्यात मुलांसाठी १० व मुलींसाठी १० अशी एकूण २० शासकीय वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या ८२ शासकीय वसतिगृहापैकी पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली २० शासकीय वसतिगृहे वगळता उर्वरित ६२ शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.या योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ०२ (मुलांचे १ व मुलीचे १) प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमता) अशी एकूण २२ शासकीय वसतिगृहे सुरु करण्यास सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णयाद्वारे यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींनी शिकले पाहिजे, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे असे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न होते.त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आणि या मुला- मुलींसाठी वसतिगृह बांधण्यासाठी पाठपुरावा केला आणि ते पालकमंत्री असताना अनेक ठिकाणी जागाही निश्चित करण्यात आल्या होत्या.सारथी संस्थेच्या वतीने मराठा समाजातील मुलांसाठी विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहांच्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहांचे दर्जेदार बांधकाम करावे,अशा सूचना दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना वेळेवेळी दिल्या होत्या,अशी माहितीही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.ही सर्व शासकीय वसतिगृहे शासकीय इमारतीत सुरु करावयाची आहेत. सद्यस्थितीत केवळ ३ ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध झाली असून त्या ठिकाणी वसतिगृहाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. उर्वरीत १९ वसतिगृहांपैकी ११ जागा उपलब्ध असलेल्या वसतिगृहांच्या बांधकाम अंदाजपत्रकास आज प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागातर्फे जारी करण्यात आला आहे.यामध्ये पाटोदा, केज, परळी, गेवराई, माजलगाव येथे प्रत्येकी २ (मुलांसाठी १ व मुलींसाठी १) आणि बीड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाचा समावेश आहे.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 7:30 pm

बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत ४७.९१ टक्के मतदान, मतमोजणीला सुरुवात

ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये मोठी दंगल उसळली आणि शेख हसीना यांनी देश सोडला. सध्या त्या भारतात सुरक्षित ठिकाणी वास्तव्यास आहेत. शेख हसीनांनी देश सोडल्यानंतर अमेरिकेच्या पाठिंब्याच्या जोरावर नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात एक हंगामी व्यवस्था निर्माण झाली. पण जनतेचा दबाव वाढू लागल्यामुळे निवडणुकीची घोषणा करण्यात आली. या घोषणेनुसार बांगलादेशमध्ये आज म्हणजेच गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी मतदान झाले.बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार सार्वत्रिक निवडणुकीत ४७.९१ टक्के मतदान झाले. मतदानाची नेमकी आकडेवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे. पण मतदान संपताच नियोजनानुसार मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवार १३ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत बांगलादेशमध्ये कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे.मतदानादरम्यान ठिकठिकाणी हिंसेच्या घटना घडल्या आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि इस्लामी जमात-ए-इस्लामी या माजी मित्रपक्षांच्या नेतृत्वाखालील दोन आघाड्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. बांगलादेशच्या राजकारणाचे अभ्यासक यंदाच्या निवडणुकीत बीएनपीला फायदा होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.बांगलादेशमध्ये १२ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त पात्र मतदार आहेत. पण मतदानाचा आतापर्यंतचा उत्साह बघता सार्वत्रिक निवडणुकीतले एकूण मतदान हे ५० टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेचार या वेळेत मतदान झाले. भारतीय वेळेनुसार बांगलादेशमध्ये संध्याकाळी पाच वाजता मतदानाची वेळ संपली आहे. यंदा सहा लाख ४८ हजार जणांनी बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी टपालाद्वारे मतदान केले आहे. बांगलादेशमध्ये १३ व्या संसदीय निवडणुकीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.ढाका येथे असलेल्या बांगलादेशच्या संसदेत एकूण ३५० जागा आहेत. यापैकी ५० महिलांसाठी राखीव असून त्यावर नामनिर्देशीत पद्धतीने विजयी पक्ष त्यांचे प्रतिनिधी पाठवतील. यासाठीचा प्रत्येक पक्षाचा कोटा त्यांना निवडणुकीत किती जागा मिळतात यावर अवलंबून असेल. संसदेतील ३०० जागांसाठी मतदान होणार होते. पण एका उमेदवाराचे निधन झाल्यामुळे २९९ जागांसाठीच मतदान झाले. एका जागेसाठी नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.बांगलादेशच्या संसदेतील २९९ जागांसाठी १९८१ उमेदवार रिंगणात होते. पात्र मतदारांनी या उमेदवारांमधून त्यांच्या पसंतीचा उमेदवार निवडण्यासाठी मतदान केले तसेच मुहम्मद युनूस यांच्या हंगामी सरकारने सादर केलेल्या ८४ कलमी सुधारणा कार्यक्रमासाठीही मतदान केले. निकाल शुक्रवार १३ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत येणार आहेत.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 7:10 pm

आशिष शेलार युनेस्को मुख्यालयात

युनेस्को :छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्को ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्को चे अधिकृत प्रमाणपत्र आज राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्वीकारले.युनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला उभारण्यात आला असून आज मंत्री आशिष शेलार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन ही केले.सुमारे दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर गतवर्षी ११ जुलै २०२५ रोजी, युनेस्कोच्या ४७व्या अधिवेशनात, ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले. या मानांकनाचे अधिकृत प्रमाणपत्र महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पॅरिस येथे स्वीकारले.छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणाशी लढून उभारलेल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणाकरता, सुरक्षित शासनव्यवस्था आणि लोककल्याण, यासाठी साकारलेली गड-किल्ल्यांची साखळी हा भारतीय इतिहासातील अद्वितीय लष्करी व राज्यकारभाराचा नमुना मानला जातो.रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी असा १२ किल्ल्यांचा समूह आज “जागतिक वारसा स्थळ” म्हणून संपूर्ण जगासमोर उभा राहिला आहे.या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी २०२५ मध्ये अॅड. शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारचे चार सदस्यीय प्रतिनिधीमंडळ पॅरिसमध्ये युनेस्कोसमोर तांत्रिक आणि धोरणात्मक मांडणी करून या मानांकनासाठी सादरीकरण आणि युक्तीवाद करून आले होते. आता प्रत्यक्ष मानांकन-पत्र मिळाले आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रमाचा आणि मराठा साम्राज्याच्या वारशाचा जागतिक सन्मान स्विकारताना आज ऊर भरून आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले मार्गदर्शन आणि परिश्रम तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या योगदानाबद्दल मंत्री शेलार यांनी आभार मानले आहेत. भारताचे युनेस्कोमधील स्थायी प्रतिनिधी श्री. विशाल शर्मा यांनी ही परिश्रमपूर्वक केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचेही तमाम महाराष्ट्रातर्फे मंत्री शेलार यांनी आभार मानले. तसेच हा महाराष्ट्रासाठी, देशासाठी शिवप्रेमींनसाठी गौरवाचा क्षण असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.दरम्यान, भारताचे संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा युनेस्को मुख्यालयाला भेट दिला असून, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिनानिमित्त या पुतळ्याची स्थापना पॅरिसमध्ये युनेस्को मुख्यालयात झाली आहे. सामाजिक न्याय, समानता, बंधुता आणि शिक्षणाद्वारे सक्षमीकरण यांची डॉ. आंबेडकरांनी दिलेली शिकवण ही युनेस्कोच्या मुलभूत ध्येयाशी सुसंगत आहे. पॅरीसमधील त्यांच्या या स्मारकाला आज मंत्री शेलार यांनी अभिवादन केले. यावेळी विशाल शर्मा यांच्यासह विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक हेमंत दळवी आणि मान्यवर उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 7:10 pm

राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ५,०१२ सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता

मुंबई :राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील ५ हजार १२ रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) निर्देशानुसार प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे अनिवार्य होते. याच पार्श्वभूमीवर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.भरती प्रक्रियेच्या प्रमुख अटी व शर्ती:- विद्यार्थी संख्येवर आधारित पदे दि.१ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या विद्यार्थी संख्येनुसार निश्चित झालेल्या कार्यभाराच्या आधारे ही ५,०१२ पदे भरली जातील. ही भरती प्रक्रिया विहित कालमर्यादेत आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवण्याची जबाबदारी उच्च शिक्षण संचालक (पुणे) आणि विभागीय सहसंचालकांची असेल. NAAC मानांकन अनिवार्य ज्या शैक्षणिक संस्थांकडे 'नॅक' (NAAC) मान्यता आहे, त्यांनाच नवीन पदनिर्मितीचा लाभ मिळेल. मात्र, ज्यांचे मूल्यांकन कमी आहे, त्यांना सुधारणेसाठी ३ वर्षांचा सवलतीचा कालावधी (Grace Period) देण्याबाबत शासन स्वतंत्र धोरण आखणार आहे. आचारसंहितेचे पालन- भरती प्रक्रियेदरम्यान राज्यात आचारसंहिता लागू असल्यास, निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सूचनांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी संचालक,उच्च शिक्षण पुणे व संबंधित विभागीय सहसंचालक यांची राहील. नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदांचा सुधारित आराखडा (आकृतीबंध) निश्चित करण्यासाठी उच्च शिक्षण संचालकांच्या स्तरावर एक समिती नियुक्त केली जाणार आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध आहे.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 7:10 pm

सिंधुदुर्गात पर्यटनविकासाला चालना; ५ स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी; मंत्री नितेश राणेंचे निर्देश

मुंबई :सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसोबत स्थानिक रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने ५ स्टार हॉटेल उभारण्याबाबतचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला गती द्यावी, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकासाला गती देण्यासाठी तसेच उच्च दर्जाच्या पर्यटन सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे, सिस्टुला ट्यूलिप पीएलसीचे अध्यक्ष माइक बेरी, संचालक अमित कामत आदी उपस्थित होते.राज्याचे पर्यटन मंत्री श्री.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली २३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रकल्पाच्या प्रलंबित बाबींवर सखोल चर्चा करून प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.या बैठकीत जिल्ह्यातील पर्यटनविकास उपक्रमांबाबत सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेऊन त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसंबंधी चर्चा झाली.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 7:10 pm

Harshwardhan Sapkal : काँग्रेसने आघाडी धर्म पाळला; हर्षवर्धन सपकाळ यांचे संजय राऊत यांना प्रत्‍युत्‍तर

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही तसेच संविधानासाठी काँग्रेसच्या सर्व 12 नगरसेवकांनी ठाकरेसेनेला मतदान केले, असे म्‍हणत कॉंग्रेस प्रदेशाध्‍यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी ठाकरेसेनेचे नेते संजय राऊत यांना प्रत्‍युत्‍तर दिले.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 7:04 pm

Sale of children: मानवतेला काळिमा! 10 दिवसांच्या बालिकेचा 3 लाखांत सौदा; गोंदियातील डॉक्टरचे धक्कादायक कृत्य

Sale of children: या प्रकरणी डॉ. नितेश बाजपेयी, ललेश्वरी सादेपाच, मालती वाघमारे, पौर्णिमा धुर्वे आणि उमेशसिंग गहलोत या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 6:51 pm

Piyush Goyal : भारतीय कापडाला मिळणार अमेरिकेत ‘ड्यूटी-फ्री’प्रवेश; मंत्री पियुष गोयल यांचे स्पष्टीकरण

बांगलादेशला ज्याप्रमाणे अमेरिकन कापूस आणि सुतापासून तयार केलेल्या कपड्यांवर सवलती मिळतात, तशाच प्रकारच्या सवलती अमेरिका आणि भारत यांच्यात होऊ घातलेल्या आगामी व्यापारी करारामुळे आता भारतालाही मिळणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी गुरुवारी दिली.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 6:40 pm

Vande Mataram: ‘मुसलमानांच्या मानेवर सुरी…’; केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीवरून AIMIM आक्रमक

Vande Mataram: पीटीआयशी बोलताना शोएब जमई यांनी केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे हुकूमशाही आणि दमनकारी वृत्ती असल्याचे म्हटले.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 6:36 pm

Todays Top 10 News: पार्थ पवार यांचा राज्यसभा प्रवेश निश्चित? ते महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के, वाचा आजच्या टाॅप बातम्या

Todays Top 10 News: पार्थ पवार यांचा राज्यसभा प्रवेश निश्चित?, अजित पवारांच्या अपघाताभोवती संशयाचे जाळे, नांदेडच्या मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के, दूरदर्शनचा आश्वासक चेहरा हरपला, भ्रष्टाचार निर्देशांकात भारताची कामगिरी सुधारली, किम जोंग उन यांनी निवडला वारसदार, टोयोटा फॉर्च्युनरला टक्कर, iPhone 18 Pro सीरीजच्या चर्चांना उधाण, राजपाल यादवचा मुक्काम तुंगातच, श्रीलंकेचा ओमानवर दिमाखदार विजय...

दैनिक प्रभात 12 Feb 2026 6:20 pm

Supriya Sule : “अजितदादांची स्वप्ने पूर्ण करणे ही नैतिक जबाबदारी”–सुप्रिया सुळे

दिवंगत नेते अजित पवार यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याचे, राष्ट्रवादी(शप) पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 6:19 pm

Raj Thackeray : नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा; कर्मचाऱ्यांना केली जबर मारहाण

नाशिक – शहरातील फिजिक्सवाला या खाजगी कोचिंग क्लासमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नाशिकमधील शरणपूर रोडवरील फिजिक्सवाला कोचिंग क्लासमध्ये घडली. मराठी भाषेचा अवमान झाल्याचा आरोप करत, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कोचिंग क्लासमध्ये जाऊन गोंधळ घातल्याचा आरोप आहे. याप्रकरणी क्लास मॅनेजरच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात पाच पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात […]

दैनिक प्रभात 12 Feb 2026 6:15 pm

Vijay Mallya : विजय मल्ल्या भारतात येत नाही तोपर्यत सुनावणी होणार नाही; मुंबई हायकोर्टाने दिला इशारा

फरार उद्योजक विजय मल्ल्या (Vijay Mallya) याने फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यातील तरतुदींना आव्हान देणाऱ्या त्याच्या याचिकेवर तो भारतात परत येईपर्यंत विचार करणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा म्हटले आहे.

दैनिक प्रभात 12 Feb 2026 6:10 pm

कोकणातील कातळशिल्पांच्या संशोधनासाठी 'वर्ल्ड हेरिटेज डेस्क'

राज्य सरकारचा निर्णय; शिल्पांचे पुरातत्त्वीय, सांस्कृतिक आणि जैविक महत्त्व जगासमोर आणणारमुंबई : आद्य मानवी संस्कृतीची साक्ष देणाऱ्या कोकणातील कातळशिल्पांना जागतिक वारशाचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या कातळशिल्पांच्या शास्त्रोक्त संशोधनासाठी आणि युनेस्को नामांकन प्रक्रियेला गती देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ‘वर्ल्ड हेरिटेज डेस्क’ स्थापन करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे या प्रकल्पासाठी १४ कोटी ६२ लाख ३२ हजार ६७१ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.कोकणात आढळलेली हजाराहून अधिक कातळशिल्पे आद्य ऐतिहासिक काळातील मानवी संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. या शिल्पांचे पुरातत्त्वीय, सांस्कृतिक आणि जैविक महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित करण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच युनेस्कोकडे प्रस्ताव सादर केला आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या नव्या डेस्कमुळे या प्रक्रियेला संस्थात्मक बळ मिळणार आहे.‘वर्ल्ड हेरिटेज डेस्क’ २०२६ ते २०२९ या कालावधीत कार्यरत राहणार असून त्याच्या मुंबई आणि रत्नागिरी अशा दोन शाखा असतील. मुंबई शाखा संशोधन आणि समन्वयाची जबाबदारी सांभाळेल. भारतीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कातळशिल्पांवरील साहित्याचा सखोल आढावा घेणे, ऐतिहासिक नकाशे व उपग्रह प्रतिमांच्या साहाय्याने तांत्रिक अभ्यास करणे आणि कातळशिल्पांचा अद्ययावत माहितीकोश तयार करणे ही या शाखेची प्रमुख कामे असतील. तसेच, युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्वेक्षण, नोंदणी आणि संवर्धनासाठी मानके निश्चित केली जातील. संशोधन लेखन, जागतिक परिषदांसाठी सादरीकरणे आणि धोरणात्मक अहवाल तयार करण्याचे कामही या शाखेकडे सोपविण्यात आले आहे.रत्नागिरी शाखा क्षेत्रीय कार्य आणि जनसहभागावर लक्ष केंद्रित करणार आहे. कातळशिल्पांचे प्रत्यक्ष स्थळी जाऊन शास्त्रोक्त सर्वेक्षण, जीपीएस आधारित नकाशांकन, ड्रोनद्वारे छायाचित्रण व व्हिडिओ दस्तऐवजीकरण ही कामे या शाखेतर्फे केली जाणार आहेत. स्थानिक परंपरा, लोककथा आणि स्थाननामांचा अभ्यास व संकलन करून सांस्कृतिक संदर्भही नोंदवले जातील. नैसर्गिक क्षरण किंवा मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या नुकसानीचे मूल्यमापन करून संवर्धनासाठी शिफारसी देण्याची जबाबदारीही या शाखेवर असेल. स्थानिक समुदायांशी संवाद साधून वारसा जतनासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.१४.६२ कोटींची तरतूदप्रकल्पांतर्गत वैज्ञानिक चाचण्या आणि सहकार्यासाठी ६ कोटी ३८ लाख २२ हजार रुपये, मनुष्यबळासाठी २ कोटी ९४ लाख ६६ हजार ७९२ रुपये, उपकरणे व पायाभूत सुविधांसाठी २ कोटी ६० लाख ५० हजार रुपये आणि १० टक्के प्रशासकीय अधिभारासाठी १ कोटी ३२ लाख ९३ हजार ८७९ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण खर्च १४ कोटी ६२ लाख ३२ हजार ६७१ रुपये इतका आहे.या प्रकल्पाचे नियंत्रण अधिकारी म्हणून मुंबईच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक काम पाहणार असून दर सहा महिन्यांनी शासनाला प्रगती अहवाल सादर केला जाणार आहे. कोकणच्या या अमूल्य वारशाला जागतिक नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी राज्य सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 6:10 pm

ओमानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा विजय, पवन रथनायके सामनावीर

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ओमानचा पराभव केला. ओमान विरुद्धचा सामना श्रीलंकेने १०५ धावांनी जिंकला. या सामन्यात श्रीलंकेचा पवन रथनायके सामनावीर झाला. त्याने २८ चेंडूत २१४.२९ च्या स्ट्राईक रेटने एक षटकार आणि आठ चौकार मारत ६० धावा केल्या.नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे ओमानला भोवले. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेने २० षटकांत पाच बाद २२५ धावा केल्या तर ओमानला २० षटकांत ९ बाद १२० धावा करणे जमले. ओमानकडून मोहम्मद नदीमने नाबाद ५३ धावा केल्या. वसीम अलीने २७ धावा केल्या. इतर फलंदाज दोन आकडी वैयक्तिक धावा करू शकले नाही. श्रीलंकेकडून महेश थीकशन आणि दुष्मंथा चामीराने प्रत्येकी दोन तर डुनिथ वेलागे, दुषण हेमंथ आणि कमिंडू मेंडिसने प्रत्येकी एक विकेट घेतली.याआधी श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने ६१, पवन रथनायकेने ६० तर कर्णधार असलेल्या दासुन शनाकाने ५० धावा केल्या. कमिंडू मेंडिसनेने नाबाद १९ आणि पथुम निस्सांकाने १३ धावांचे योगदान दिले. कामिल मिश्राराने ८ धावा केल्या तर डुनिथ वेलागेने नाबाद ६ धावा केल्या. ओमानकडून जितेन रामानंदीने २ तर जय ओडेद्रा आणि सुफियान मेहमूदने प्रत्येकी एक विकेट घेतली.श्रीलंकेसाठी मोठा विजयओमान विरुद्धचा श्रीलंकेचा विजय हा यंदाच्या वर्ल्डकपमधील लंकेचा सर्वात मोठा विजय आहे. श्रीलंकेच्या एकूण टी ट्वेंटी क्रिकेट कारकि‍र्दीचा विचार केल्यास हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय आहे. तसेच ओमानचा हा टी ट्वेंटी क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव आहे. याआधी त्यांचा पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात ९३ धावांनी पराभव झाला होता.श्रीलंकेने मोठ्या फरकाने मिळवलेले सर्वोत्तम चार विजय १७२ धावांनी विजय विरुद्ध केनिया, जोबर्ग, २००७ विश्वचषक १०५ धावांनी विजय विरुद्ध ओमान, पल्लेकेले, २०२६ विश्वचषक* ८३ धावांनी विजय विरुद्ध नेदरलँड, ग्रोस आयलेट, २०२४ विश्वचषक ८२ धावांनी विजय विरुद्ध झिम्बाब्वे, हंबनटोटा, २०१२ विश्वचषक

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 6:10 pm

टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात संथ अर्धशतक

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ओमानचा पराभव केला. ओमान विरुद्धचा सामना श्रीलंकेने १०५ धावांनी जिंकला. या सामन्यात ओमानच्या मोहम्मद नदीमने ५६ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकार मारत नाबाद ५३ धावा केल्या. हे टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात धीम्या गतीने केलेले अर्धशतक आहे. त्याने ५२ वा चेंडू खेळत अर्धशतक केले.टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात संथ अर्धशतक करणाऱ्यांच्या यादीत ओमानचा मोहम्मद नदीम दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान पहिल्या तर दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर तिसऱ्या स्थानी आहे.https://prahaar.in/2026/02/12/sri-lanka-won-by-105-runs-against-oman-in-16th-match-group-b-icc-mens-t20-world-cup-2026/टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात संथ अर्धशतक करणारे फलंदाज ५२ चेंडूत ५० धावा – मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) विरुद्ध कॅनडा, न्यू यॉर्क, २०२४ ५२ चेंडूत ५० धावा – मोहम्मद नदीम (ओमान) विरुद्ध श्रीलंका, पल्लेकेले, २०२६* ५० चेंडूत ५० धावा – डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध नेदरलॅंड्स, न्यू यॉर्क, २०२४ ४९ चेंडूत ५० धावा – डेवॉन स्मिथ (वेस्ट इंडिज) विरुद्ध बांग्लादेश, जोहान्सबर्ग, २००७ ४९ चेंडूत ५० धावा – डेविड हसी (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाऊन, २०१० ४९ चेंडूत ५० धावा – सूर्यकुमार यादव (भारत) विरुद्ध यूएसए, न्यू यॉर्क, २०२४ओमानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा विजयओमान विरुद्धचा सामना श्रीलंकेने १०५ धावांनी जिंकला. या सामन्यात श्रीलंकेचा पवन रथनायके सामनावीर झाला. त्याने २८ चेंडूत २१४.२९ च्या स्ट्राईक रेटने एक षटकार आणि आठ चौकार मारत ६० धावा केल्या. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे ओमानला भोवले. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेने २० षटकांत पाच बाद २२५ धावा केल्या तर ओमानला २० षटकांत ९ बाद १२० धावा करणे जमले.

फीड फीडबर्नर 12 Feb 2026 6:10 pm