भायखळ्यातीलमिल परिसरात जागतिक दर्जाचे टेक्सटाईल क्राफ्ट आणि कल्चरल म्युझियम उभारण्याला गती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेलामूर्त रूपमुंबई : भायखळा परिसरातील ऐतिहासिक इंडिया युनायटेड मिल जागेवर अत्याधुनिक टेक्सटाईल, क्राफ्ट आणि कल्चरल म्युझियम प्रकल्प उभारण्याच्या कामांना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना आणि पुढाकारातून विकसित होणारा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार असून, या संदर्भातील सामंजस्य करार झाला आहेमुंबईच्या समृद्ध वस्त्रोद्योग वारशाचे जतन, पुनरुज्जीवन आणि सांस्कृतिक पुनरुत्थान साधण्याचे ध्येय या भव्य प्रकल्पामागे आहे. मुंबई महानगरपालिका, नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन (एनटीसी) आणि जिंदाल साऊथ वेस्ट (जेएसडब्लू) फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत असून, सुमारे चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे हे मिल प्रांगण जागतिक दर्जाच्या सांस्कृतिक केंद्रात रूपांतरित होणार आहे.या प्रकल्पांतर्गत आकर्षक गॅलरी, कला स्टुडिओ, परफॉर्मन्स स्पेसेस, खुल्या जागेतील शिल्प उद्यान, रेस्टॉरंट्स व कॅफे, कार्यशाळा व कार्यक्रमांसाठी स्वतंत्र सेक्शन्स अशा बहुउद्देशीय आणि आधुनिक सुविधांचा समावेश असणार आहे. संग्रहालयाला लिव्हिंग म्युझियम म्हणून विकसित करण्यात येणार असून, जुन्या गिरणीचा ऐतिहासिक औद्योगिक वारसा जतन करत आधुनिक सांस्कृतिक वातावरणाची सांगड घातली जाणार आहे.या प्रकल्पाचे संपूर्ण काम जेएसडब्ल्यू फाउंडेशन नॉट प्रॉफिट पद्धतीने करीत असून, संग्रहालयातून प्राप्त होणारे उत्पन्न देखभाल व सार्वजनिक उपक्रमांसाठी वापरले जाणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या 'शहरी वारसा संवर्धन व सांस्कृतिक पुनरुत्थान' या दृष्टीकोनाला हा प्रकल्प आधार देणारा असून मुंबईतील विस्मृतीत गेलेल्या गिरण्यांमधील वारसा नव्या पिढीसमोर आणण्यासोबतच हा प्रकल्प महत्त्वपूर्ण शहरी पुनरुत्थानाचे आदर्श उदाहरण ठरेल या प्रकल्पाला अधिक गती देण्यासाठी या प्रकल्पाचे कालबद्ध नियोजन करावे आणि सर्व संबधित विभागाने सहकार्य करावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेआहेत असे जेएसडब्ल्यू फाउंडेशनने स्पष्ट केले आहे.
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्ये संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ता याला अमेरिकन न्यायालयाने तब्बल २४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) न्यू यॉर्क कोर्टात निखिलने आपला गुन्हा कबूल केला. २९ मे रोजी निखिलच्या शिक्षेची औपचारिक घोषणा केली जाईल. अमेरिकन तपास संस्था एफबीआयने निखिल गुप्ताच्या कबुलीजबाबाबद्दल एक्स वर पोस्ट केले. एफबीआयच्या मते, एका अमेरिकन नागरिकाच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, जो अमेरिकन एजन्सींनी वेळीच उधळून लावला.पन्नूच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली ३० जून २०२३ रोजी झेक प्रजासत्ताक पोलिसांनी निखिल गुप्ता याला अटक केली होती. त्यानंतर १४ जून २०२४ रोजी त्याला अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात आले. अमेरिकेत त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला, जिथे त्याने आपला गुन्हा कबूल केला. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की निखिल गुप्ता, ज्याला निक म्हणूनही ओळखले जाते, त्याने अमेरिकन मॅजिस्ट्रेट न्यायाधीश सारा नेटबर्न यांच्यासमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याला २९ मे रोजी अमेरिकन जिल्हा न्यायाधीश व्हिक्टर मॅरेरो शिक्षा सुनावणार आहेत.अमेरिकन एजन्सींनुसार, माजी भारतीय अधिकारी विकास यादवने निखिल गुप्ताला पन्नूच्या हत्येचा कट रचण्यास सांगितले. अमेरिकन न्याय विभागाने असा दावा केला आहे की एका भारतीय सरकारी कर्मचाऱ्याने निखिल गुप्ताला पन्नूची हत्या करण्यासाठी एका हिटमनची व्यवस्था करण्यास सांगितले. मॅनहॅटनमधील फेडरल कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा आरोप करण्यात आला आहे. आरोपपत्रात त्या कर्मचाऱ्याचा उल्लेख सीसी-1असा करण्यात आला आहे.गुरपतवंत सिंग पन्नू हा मूळचा पंजाबमधील खानकोट येथील रहिवासी आहे. तो सध्या अमेरिकेत राहतो आणि शीख फॉर जस्टिस नावाची संघटना चालवतो. त्याच्याकडे अमेरिका आणि कॅनडा दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. २०१९ मध्ये, भारत सरकारने पन्नूची संघटना, एसएफजे, दहशतवादी कारवाया करत असल्याचा आरोप करत बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत (यूएपीए) बंदी घातली. शिखांसाठी जनमत चाचणीच्या नावाखाली, एसएफजे पंजाबमध्ये फुटीरतावाद आणि अतिरेकी विचारसरणीला पाठिंबा देत होते. २०२० मध्ये, पन्नूवर फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याचा आणि पंजाबी शीख तरुणांना शस्त्रे उचलण्यास प्रोत्साहित करण्याचा आरोप होता. त्यानंतर, केंद्र सरकारने १ जुलै २०२० रोजी त्याला यूएपीए अंतर्गत दहशतवादी घोषित केले.
अंधरेतील पहिल्या पुष्पोत्सवाचे प्रसिद्ध अभिनेते पद्मश्री अक्षय कुमारच्या हस्ते उद्घाटन
भाजपच्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ अभियानांतर्गत अभिनेता अक्षय कुमार यांनी दिलेल्या शहरव्यापी स्वच्छता स्पर्धेच्या सूचनेला बीएमसीची मान्यता – आमदार अमीत साटमबीएमसीच्या स्वच्छता स्पर्धेला ‘मुंबई क्लीन लीग’ असे नाव अभिनेता अक्षय कुमार यांनी दिले; या उपक्रमाचे नेतृत्वही ते करणार – आमदार अमीत साटमआमदार व भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांच्या पुढाकारे उपनगरात होणारा पहिला पुष्पोत्सवशिवलिंग, हत्ती आणि मोर यांच्या फुलांपासून तयार केलेल्या प्रतिकृती या प्रदर्शनातील खास आकर्षण – आमदार अमीत साटममुंबई : दरवर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे भायखळा येथील वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयामध्ये होणाऱ्या पुष्प महोत्सवाप्रमाणे पहिल्यांदाच मुंबई उपनगरातील अंधेरीतील जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये पहिला पुष्पोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी पुष्पोत्सवाचे उद्घाटन पद्मश्री अभिनेते अक्षय कुमार यांनी केले. यावेळी अंधेरी पश्चिमचे आमदार व भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम, महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते. उद्घाटनाला विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.यासदंर्भात माहिती देताना आमदार अमीत साटम म्हणाले की, गेली २९ वर्षे भायखळा येथील वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयामध्ये पुष्प महोत्सव आयोजित केला जातो. यंदा प्रथमच त्या धर्तीवर उपनगरातही पुष्पोत्सव होत आहे. हा पहिला पुष्पोत्सव अंधेरीमधील जुहू येथे आयोजित करण्यात आला आहे. १४ आणि १५ फेब्रुवारी सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत दोन दिवस हा पुष्पोत्सव आहे..भाजपच्या ‘आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा' या मोहिमेच्या अंतर्गत अभिनेते अक्षय कुमार यांनी ‘स्वच्छ मुंबई’ प्रतियोगिता आयोजित करण्याची सूचना केली होती. अक्षय कुमार यांची सूचना महानगरपालिकेने स्वीकारली आहे. मुंबईकरांचा सहभाग असलेली स्वच्छता प्रतियोगिता लवकरच आयोजित केली जाणार आहे. या प्रतियोगितेचे मूल्यमापन तृतीय पक्ष एजन्सी तर्फे करण्यात येईल. यासाठी मुंबई महानगरपालिका लवकरच एजन्सी नियुक्त करणार आहे. ‘मुंबई क्लीन लीग’ असे या प्रतियोगितेचे नाव अभिनेते अक्षय कुमार यांनी दिले असून याचे नेतृत्वही तेच करणार आहेत. मुंबई शहराचे ‘स्वच्छ भारत’ मधील स्थान वरती आणण्याच्या दृष्टिकोनातून या मोहिमेचा उपयोग होईल, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.स्थानिक नगरसेवक सुधा सिंह, उपायुक्त भाग्यश्री कापसे, प्रभाग अधिकारी चक्रपाणी अल्ले, उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी या उद्घटनाला उपस्थित होते. या पुष्पोत्सवात विविध प्रकारची फुले, रोपे तसेच भाज्या व दुर्मिळ वनस्पती पाहता येतील. या ठिकाणी फूलांपासून तयार केलेली भली मोठी शंकराची पिंडी, हत्ती व मोर या प्रदर्शनातील खास आकर्षण आहे. रविवारी रात्री ९ पर्यंत प्रदर्शन सर्वांना विनामूल्य खुले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण, ट्री सीटीज, माझी वसुंधरा या पुष्पोत्सवाचे आयोजक आहेत. महानगरपालिकेच्या के -पश्चिम विभागाने या पुष्पोत्सवासाठी पुढाकार घेतला आहे.
मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुखकर आणि गारवा देणारा ठरणार आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी १९ फेब्रुवारीपासून १२ नवीन एसी लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एसी लोकलची वाढती मागणी आणि प्रवाशांची गर्दी लक्षात घेता हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. एसी लोकलसोबतच प्रशासनाने ३ नवीन नॉन-एसी (साध्या) लोकल फेऱ्यादेखील वाढवल्या आहेत. या निर्णयामुळे आता पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल फेऱ्यांची संख्या १४१४ वर पोहोचली आहे. सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासाचे विविध आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देणे, तसेच पीक अवर्समधील गर्दीचे नियोजन करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. १९ फेब्रुवारीपासून लागू होणाऱ्या या नवीन वेळापत्रकामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास आता आणखी गतिमान आणि आरामदायी होणार आहे.https://prahaar.in/2026/02/14/pandharpur-crime-news-son-and-mother-life-ended-in-ten-minutes-investigating-officer-changed-and-mystery-solved/पश्चिम रेल्वेवर शनिवार-रविवारही धावणार जादा एसी लोकलपश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी आपल्या लोकल सेवेत मोठे बदल केले असून, एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता एसी लोकलची एकूण संख्या १२१ वरून १३३ वर पोहोचली आहे. यामध्ये ११ साध्या लोकलच्या जागी एसी सेवा सुरू करण्यात येणार असून, एक पूर्णपणे नवीन एसी फेरी वाढवण्यात आली आहे. शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी धावणाऱ्या एसी लोकलची संख्या आता ७७ वरून थेट १०६ करण्यात आली आहे. यामुळे सुट्टीच्या दिवशी फिरणाऱ्या प्रवाशांना गारेगार प्रवास करता येईल. पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल सेवांची संख्या आता १४१० वरून १४१४ झाली आहे. वांद्रे ते भाईंदर दरम्यान धावणारी लोकल आता थेट विरारपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे विरारच्या प्रवाशांना उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. हे सर्व बदल १९ फेब्रुवारीपासून लागू होणार असून, यामुळे कार्यालयीन वेळेसह सुट्टीच्या दिवशीही प्रवाशांची गर्दी विभागली जाण्यास मदत होणार आहे.
Mulund Metro Slab: थेट रिक्षावर कोसळला मेट्रोचा स्लॅब; ३ ते ४ जण जखमी
मुलुंड: मुलूंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा अचानक स्लॅब कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्लॅबखाली एका व्यक्तीसह दोन वहाने दबल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.मुंबईतील मुलुंड पश्चिम येथे शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी बांधकाम सुरू असलेल्या सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळला. रस्त्याने जाणाऱ्या रिक्षा आणि एका कारवर हा स्लॅब पडल्याने या घटनेत किमान तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज दुपारी १२:१५ वाजता मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील राजीव (मिलान) स्ट्रीटमधील मेट्रो लाईन बांधकामाच्या पियर पी१९६ जवळ घडली.या दुर्घटनेमुळे मुलूंड येथील हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या आधी देखील मेट्रो प्रकल्पावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अशातच हा स्लॅब कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा स्लॅब एका चार चाकी गाडीवर आणि रिक्षावर कोसळला आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.मुलूंड येथील मेट्रो दुर्घटनेत आणखी कोणी जखमी झाले आहे का? किंवा दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे यावर प्रशासन काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भलेमोठे गर्डर आणि स्लॅब वरती चढवण्याचे काम सुरु:मिळालेल्या माहितीनुसार मुलुंड येथील लाल बहादूर शास्त्री (LBS Road) मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून मेट्रो मार्गिकेचे काम सुरु आहे. त्यासाठी याठिकाणी दररोज भलेमोठे गर्डर आणि स्लॅब वरती चढवण्याचे काम सुरु असते. आज शनिवारी मेट्रोचा एक स्लॅब खाली कोसळला. त्यावेळी खालच्या एलबीएस रोडवरुन वाहने ये-जा करत होती. हा स्लॅब एका ऑटो रिक्षावर आणि कारवर कोसळला आहे.
Srilila video : दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Nikki And Arbaaz : ‘आमचे धर्म वेगळे, वडिलांचा विरोध…’; अरबाजने प्रपोज करताच निक्कीला अश्रु अनावर
Nikki And Arbaaz : ‘The 50’ शोमध्ये अरबाजने निक्कीला प्रपोज केलं, त्यावेळी तिला अश्रु अनावर होतात.
Ankita Lokhande Post : अंकिता लोखंडेच्या पोस्टमुळे लवकरच ती आनंदाची बातमी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
पंढरपूर : आषाढी वारीच्या पवित्र काळानंतर पंढरपूरला हादरवून सोडणाऱ्या मायलेकाच्या निर्घृण हत्याकांडाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हे प्रकरण पोलिसांसाठी एक मोठे आव्हान ठरले होते. अनेक तपास अधिकारी बदलले, जनतेचा रोष वाढला आणि आंदोलनेही झाली, मात्र ठोस पुरावा हाती लागत नव्हता. अखेर या गुंतागुंतीच्या प्रकरणाची सूत्रे IPS अधिकारी प्रशांत डगळे यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांनी सूत्रे हाती घेताच तपासाला वेग दिला आणि अवघ्या ३० दिवसांत या प्रकरणाचा छडा लावून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. प्रशासकीय कौशल्य आणि अचूक तपासाच्या जोरावर पोलिसांनी हे 'ब्लाईंड मर्डर' केस उलगडल्याने शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.https://prahaar.in/2026/02/14/6-years-of-pulwama-attack-pm-modi-pays-tribute-to-martyred-soldiers/दहा मिनिटांचा थरार अन् मायलेकाचा शेवटपंढरपूर शहराच्या मध्यवर्ती वस्तीत रात्रीच्या वेळी घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. लखन संजय जगताप आणि त्यांची आई सुरेखा जगताप या मायलेकाची त्यांच्याच घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली. अवघ्या दहा मिनिटांच्या कालावधीत आरोपींनी हे रक्ताळलेले क्रौर्य अंगावर आणणारे कृत्य केले. मारेकऱ्यांनी प्रथम लखन या तरुणावर १६ वेळा सपासप वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. पोटच्या मुलावर होणारा हा जीवघेणा हल्ला पाहून मदतीसाठी धावलेल्या सुरेखा जगताप यांनाही आरोपींनी सोडले नाही. त्यांच्यावर ९ वार करून त्यांचीही जीवनयात्रा संपवण्यात आली. अत्यंत वर्दळीच्या वस्तीत हे हत्याकांड घडवून आरोपींनी काही क्षणातच पळ काढला. या घटनेमुळे पंढरपुरात दहशतीचे वातावरण पसरले असून, गुन्हेगारांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते.ना CCTV, ना पुरावा! तरीही तपासाची होणार सुरुवात नव्यानेया तपासामध्ये घटनास्थळी एकही CCTV कॅमेरा नसल्याने आणि ठोस धागेदोरे मिळत नसल्याने हे प्रकरण 'ब्लाईंड मर्डर' ठरले होते. मात्र, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी हार न मानता तपासाची चक्रं शून्यातून फिरवली. पुराव्याअभावी डगळे यांनी तांत्रिक तपासावर भर दिला. त्यांनी तब्बल १,५०० हून अधिक फोन कॉल्स आणि इंटरनेट रेकॉर्ड्सची सूक्ष्म तपासणी केली. याच अवाढव्य डेटाच्या विश्लेषणातून संशयास्पद हालचालींची एक साखळी तयार झाली, ज्याने पोलिसांना थेट आरोपींच्या उंबरठ्यापर्यंत नेऊन सोडले. केवळ आधुनिक तंत्रज्ञान आणि संयमी तपासाच्या जोरावर पोलिसांनी हे कठीण कोडे सोडवण्यात यश मिळवले आहे.पोलिसांना गुंगारा देण्यासाठी रचला चोरीचा बनावपंढरपूर येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एखाद्या सिनेमाला शोभेल असा बनाव रचला होता, मात्र आयपीएस प्रशांत डगळे यांच्या चाणाक्ष नजरेतून ते सुटू शकले नाहीत. तपासात समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, आरोपींनी केवळ खूनच केला नाही तर पोलिसांना तपासापासून लांब ठेवण्यासाठी अनेक युक्त्या लढवल्या होत्या. मुख्य आरोपींपैकी एक, विशाल शिंदे नाईक याने खुनानंतर स्वतः पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली होती. आपण एक जागरूक नागरिक किंवा खबऱ्या आहोत असे भासवून पोलिसांचा संशय वळवण्याचा त्याचा प्रयत्न होता. हा खून चोरीच्या उद्देशाने झाला आहे असे वाटावे, यासाठी आरोपींनी घरातील ५५ इंची टीव्ही आणि काही मौल्यवान साहित्य लंपास केले होते. मात्र, तपासात हा केवळ पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी रचलेला बनाव असल्याचे सिद्ध झाले. खुनासाठी आरोपींनी साधे चाकू किंवा सुरा न वापरता, गवत कापण्याच्या मशीनच्या पात्यांपासून खास घातक हत्यार तयार करून घेतले होते, जेणेकरून तपासात तांत्रिक अडथळे येतील. अखेर 'डिजिटल पुरावे' आणि 'तपासातील चिकाटी' यामुळे आरोपींचा हा मास्टरप्लॅन फसला असून ते आता गजाआड आहेत. या हत्याकांडात एका अल्पवयीन मुलाने आरोपींना मदत केल्याचेही समोर आले आहे. खुनाच्या वेळी पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीशी पोलिसांच्या खबऱ्याने मैत्री करून त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळवली. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. या दुहेरी हत्याकांडात विशाल शिंदे नाईक याने अथर्व शिंदे नाईक यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी आणि जगताप कुटुंबीय हे शेजारी राहत होते. त्यांच्यातील वैमनस्य हेच खुनामागील प्रमुख कारण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी राजस्थानला कामासाठी गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. हत्येच्या वेळी विशालचा मोबाईल फोन सुमारे एक तास बंद होता. फोन बंद करण्यापूर्वी त्याने सहआरोपी अथर्वशी संपर्क साधल्याचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले. याच आधारावर दोघांनाही अटक करण्यात आली.चंद्रभागेच्या पात्रात दडवलं होतं खुनाचं रहस्यगेल्या आठ महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या दुहेरी हत्याकांडातील महत्त्वाचे पुरावे अखेर चंद्रभागा नदीच्या पात्रातून शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर, पोलिसांनी नदीपात्रातून ५५ इंची टीव्ही आणि हत्येसाठी वापरलेले खास हत्यार जप्त केले आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी घरातून चोरलेला टीव्ही आणि हत्येचे शस्त्र चंद्रभागेत फेकून दिले होते. तांत्रिक तपासापुढे नमतं घेत आरोपींनी हा गुन्हा मान्य केला. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा छडा लागत नसल्याने गेल्या आठ महिन्यांपासून पंढरपूर पोलिसांवर टीकेची झोड उठत होती. मात्र, IPS प्रशांत डगळे यांनी सूत्रे स्वीकारताच अवघ्या ३० दिवसांत या गुंतागुंतीच्या केसचा निकाल लावून पोलिसांची मान उंचावली आहे.
Sharad Pawar : शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज; तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय दिली माहिती?
Sharad Pawar : रुग्णालयातून बाहेर येताच शरद पवारांनी पहिल्यांदा हात दाखवून कार्यकर्ते आणि समर्थकांना अभिवादन केलं.
T20 World Cup 2026 IND vs PAK: अभिषेक शर्माबद्दल बोलताना पाकिस्तानी बॉलरची जीभ घसरली; म्हणाला...
कोलंबो: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. हा यंदाच्या वर्ल्डकपमधील २७ वा साखळी सामना असेल. क्रिकेटप्रेमींचे लक्ष असलेल्या या हायव्होल्टेज सामन्याआधीच एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट घोंगावत आहे. यामुळे क्रिकेटप्रेमी चिंतेत आहेत.अशातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मावर टीका केली आहे. मोहम्मद आमिरने अभिषेकला चक्क 'स्लॉगर' असे संबोधले आहे. पाकिस्तानी वाहिनीवरील 'हारना मना है' या कार्यक्रमात बोलताना आमिरने अभिषेकच्या तांत्रिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.काय म्हणाला मोहम्मद आमिर:मी जितके त्याला पाहिले आहे, त्यावरून तो प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो. त्याचा दिवस असेल तर तो मोठी खेळी करेल, अन्यथा अपयशाची शक्यता जास्त असते. तो तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण फलंदाज वाटत नाही, असे आमिरने आपले मत व्यक्त केले. त्याने पुढे सांगितले की, अभिषेकला रोखायचे असेल तर त्याच्यावर शरीरावर गोलंदाजी करणे प्रभावी ठरू शकते. चेंडू स्विंग होत असताना तो कसा खेळतो, हे पाहिल्यावरच त्याला खरा दर्जेदार फलंदाज मानता येईल, असेही आमिरने म्हटले.दरम्यान, अभिषेक शर्मा सध्या पोटाच्या संसर्गातून सावरत आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकता नव्हता. अमेरिकेविरुद्ध फलंदाजीत तो पोटाच्या विकारामुळे अस्वस्थ दिसत होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याचे सुमारे दोन किलो वजनही घटल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.भारत-पाकिस्तान (Ind vs Pak) सामन्यापूर्वी आमिरच्या वक्तव्यामुळे वातावरण आणखी तापले आहे. आता अभिषेक मैदानात उतरल्यास तो आपल्या कामगिरीतून टीकेला कसे उत्तर देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Narhari Zirwal : मंत्री नरहरी झिरवळ ‘नॉट रिचेबल’; पीएने पैसे घेण्यास सांगितल्याचा आरोप
Narhari Zirwal : अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचे सांगितले.
Sanjay Raut : संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर खळबळजनक वक्तव्य केले आहे.
Gold-Silver Rate: व्हॅलेंटाईन डे निमित्त जोडीदाराला दागिने गिफ्ट म्हणून द्या; जाणून घ्या आजचे दर
मुंबई: आज संपूर्ण देशात प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. या दिवसाचं औचित्य साधून तुम्ही तुमच्या जोडीदाराला सोन्या-चांदीचे दागिने भेट म्हणून देणार असाल तर आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या.शुक्रवारी देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण नोंदली गेली, तर आंतरराष्ट्रीय बाजारात किंचित सुधारणा होण्याची चिन्हे दिसली. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेटच्या किंमती कमी झाल्या आहेत. या घसरणीमुळे चांदीही अलिप्त राहिली नाही. आता गुंतवणूकदार आणि खरेदीदारांचे लक्ष शनिवार, १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेकडे आहे. जाणून घेऊया आज सोन्या-चांदीच्या ताज्या किंमती किती आहेत.शनिवार १४ फेब्रुवारी रोजी सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी १,५६,५०० रुपये तर १ किलो सोन्याचा भाव १,५६,५०,००० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव १ ग्रॅमसाठी १,४३,४५८ रुपये आणि १ किलो चांदीचा भाव २,४६,०२० रुपये आहे.देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सोने-चांदीचे दर वाढले आहेत:शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या किंमती वेगवेगळ्या पातळीवर नोंदविण्यात आल्या. नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि बेंगळुरू येथे २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याच्या दरात किंचित फरक दिसून आला.देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचा दर:नवी दिल्ली २४ कॅरेट- १,५५,९४० तर २२ कॅरेट- १,४२,९४५मुंबई २४ कॅरेट- १,५६,२१० तर २२ कॅरेट- १,४३,१९३कोलकाता २४ कॅरेट -१,५६,०१० तर २२ कॅरेट- १,४३,००९चेन्नई २४ कॅरेट- १,५६,६७० तर २२ कॅरेट- १,४३,६१४बंगळुरू २४ कॅरेट- १,५६,३४० तर २२ कॅरेट- १,४३,३१०
Pulwama Terror Attack: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे शहीद जवानांच्या बलिदानाचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
Free School Bag: राज्यसरकारच्या मोठा निर्णय! १ ते ८ विच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर
मुंबई: राज्यसरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार आहेत.४१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ:सविस्तर माहितीनुसार, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यात येणार आहे. यासाठी १६५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत ही दप्तरं पुरवण्यात येणार आहेत. या योजनेचा राज्यातील ४१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे.शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) जारी केला. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा २००९ आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने म्हटले आहे.ही योजना 'विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे' या विद्यमान योजनेंतर्गतच राबवली जाणार आहे. दप्तर हे शैक्षणिक साहित्याचा भाग असल्याने त्यासाठीचा खर्च संबंधित निधीतूनच करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे.या दप्तरांच्या खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश देण्यात आले असून, खरेदी प्रक्रियेत उद्योग विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वितरित निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला सादर करणे बंधनकारक राहणार आहे.या शाळांना वगळण्यात येणार:ज्या महानगरपालिकांमध्ये अगोदरच ही योजना राबवली जाते अथवा विद्यार्थ्यांना त्यासाठी निधी दिला जातो. त्या शाळांमध्ये या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. पण इतर सरकारी शाळांमध्ये या योजनेतंर्गत मोफत दप्तर देण्यात येणार आहे. या योजनेत चांगली दप्तर मिळावीत अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे. हलक्या दर्जाची अथवा बाजारगाळे दप्तरांचा पुरवठा करण्यात येऊ नये अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम सुरू होण्याची शक्यता आहे.
एक महिन्यात बोगस जन्मदाखले ताब्यात घ्या; डॉक्टर आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा
नवनिर्वाचित महापौरांनी पहिल्याच बैठकीत बांग्लादेशी विरोधात ऍक्शनमुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबईमध्ये बोगस जन्मदाखल्यांच्या तक्रारींमुळे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महापालिका प्रशासनाला जेरीस आणलेले असतानाच आता नवनिर्वाचित महापौरांनी आपली पहिलीच बैठक या विषयावर घेवून आरोग्य विभागाला चांगलेच फैलावर घेतले. या बैठकीमध्ये आरोग्य विभागाला सूचना देत महापौर रितू तावडे यांनी अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दिलेली बोगस २३७ जन्म प्रमाणपत्र आरोग्य विभागाने एक महिन्याच्या आत ताब्यात घ्यावी असे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा निर्धार महापौर रितू तावडे यांनी काही दिवसापूर्वी व्यक्त केला होता. त्याच अनुषंगाने महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात शुक्रवारी १३ फेब्रुवारी २०२६ संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नवनिर्वाचित महापौरांनी सूचना केल्या.याप्रसंगी उप महापौर संजय घाडी, भाजपचे गटनेते गणेश खणकर, माजी खासदार किरीट सोमय्या, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, निल सोमय्या, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.दक्षा शहा तसेच संबंधित तहसीलदार, परवाना विभागाचे व पोलीस विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.उपायुक्त शरद उघडे यांनी या बैठकीत २३७ प्रमाणपत्र पोर्टलवर रद्द करण्यात आले असल्याची माहिती दिली. परंतु अवैधरित्या प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या संबंधित डॉक्टर व संबंधित आरोग्य अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी महापौरांनी दिले. आतापर्यंत ८ जणांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली असली तरी उर्वरितांवर सोमवारपासून कारवाई करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले. विलंबित प्रकरणात २१ दिवसांनंतर जन्मप्रमाणपत्र वितरण करण्यात आली असून त्यांची फेर चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी केली.तसेच २ वैद्यकीय अधिकारी यांना निलंबित करण्यात आले असून इतरांवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले.१ जानेवारी २०१६ नंतरचे संपूर्ण दस्तऐवज तपासण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रारंभी, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बोगस जन्म प्रमाणपत्र ताब्यात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
Hingoli News : औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीला रात्री ओठला भक्तनिवास, पार्किंग परिसरात लेझर शो होणार असून यामध्ये तब्बल 200 ड्रोनचा वापर केला जाणार आहे.
मुंबई: अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवारांकडे असलेली जवळपास सर्व खाती सुनेत्रा पवारांना मिळाली होती. केवळ अर्थ खातं मात्र राष्ट्रवादीकडे देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे दादा जाताच महायुतीत राष्ट्रवादी बॅकफुटला गेल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता मोठी माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना राज्यात आणखी एक मोठी जबाबदारी मिळणार आहे.अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे:येत्या तीन ते चार महिन्यांत राज्याचे वित्त आणि नियोजन खाते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडे येण्याचे संकेत मिळत आहेत. अलीकडेच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. याच बैठकीत अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडं देण्याचा निर्णय झाला आहे.दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंत विक्रमी ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर हे महत्त्वाचे खाते कोणाकडे द्यावे, याबाबत पेच निर्माण झाला होता. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या सखोल चर्चेनंतर, तात्पुरत्या स्वरूपात हे खातं मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडेच ठेवावं, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा हे खाते राष्ट्रवादीला सुपुर्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
T20 World Cup 2026 IND vs PAK : भारत-पाक मॅच रद्द झाल्यास सुपर ८ मध्ये कुठली टीम जाणार ?
कोलंबो: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. हा यंदाच्या वर्ल्डकपमधील २७ वा साखळी सामना असेल. क्रिकेटप्रेमींचे लक्ष असलेल्या या हायव्होल्टेज सामन्याआधीच एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट घोंगावत आहे. यामुळे क्रिकेटप्रेमी चिंतेत आहेत.श्रीलंकेच्या हवामान विभागाने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तविली आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे कोलंबोत पावसाची ९३ टक्के शक्यता आहे. सामन्याच्या वेळेत म्हणजेच संध्याकाळी सात पासून पुढे पावसाची शक्यता फक्त नऊ टक्के आहे. पण संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता ४९ टक्के आहे. तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जर सामन्यावेळी किंवा सामन्याआधी पाऊस पडल्यामुळे सामन्याच्या नियोजनावर परिणाम झाला तर हायव्होल्टेज सामन्याची मजा कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.सामना रद्द झाल्यासं नुकसान कोणाचं?पावसामुळे ही मॅच रद्द झाल्यास कुठल्या टीमचा फायदा आणि नुकसान होईल? फायद्याबद्दल बोलायचं झाल्यास दोन्ही संघांना समान फायदा होईल. कारण दोन्ही टीम्सचे प्रत्येकी ४-४ पॉइंट्स आहेत. मॅच रद्द झाल्यास १-१ पॉइंट दोघांना मिळेल. म्हणजे दोन्ही टीम्सचे ५-५ पॉइंट होतील. दोन्ही टीम्स सुपर-८ मध्ये क्वालिफाय करतील. नुकसानीबद्दल बोलायचं झाल्यास अमेरिका आणि नेदरलँड्स दोन्ही टीम्सचं नुकसान होईल. USA ची सलग दुसऱ्यांदा सुपर ८ मध्ये पोहोचण्याची संधी हुकेल. नेदरलँड्स आणि USA चे २-२ पॉइंट्स आहेत. दोघांचा आता फक्त एक सामना बाकी आहे. दोघांनी आपपले सामने जिंकले तर त्यांचे ४-४ पॉइंट होतील. ते पुरेसे नसतील.USA सुपर-८ मध्ये पोहोचू शकते का?भारत-पाकिस्तान सामन्याचा निकाल लागल्यास एक टीम सुपर-८ राऊंडमध्ये पोहोचेल. पण दुसऱ्या टीमला नेदरलँड्स आणि USA शी खेळावं लागेल. नेदरलँड्सचा मार्ग कठीण आहे. कारण त्यांचा शेवटचा सामना भारताशी आहे. तेच USA चा शेवटचा सामना नामीबिया विरुद्ध आहे. १५ फेब्रुवारीला टीम इंडियाने पाकिस्तानला हरवलं आणि नामीबियाने पाकिस्तानला नमवलं आणि USA ने नामीबियाला हरवलं, तर अमेरिकी टीम पुढच्या राऊंडमध्ये पोहोचेल.भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ यंदाच्या वर्ल्डकपसाठी ए ग्रुप अर्थात अ गटामध्ये आहेत. भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी आणि नामिबियाविरुद्धचा सामना ९३ धावांनी जिंकला आहे. दोन्ही साखळी सामने जिंकल्यामुळे भारत चार गुण आणि +३.०५० च्या नेट रनरेटसह गटात अव्वलस्थानी आहे. पाकिस्तानने नेदरलँड विरुद्धचा सामना ३ विकेट राखून आणि अमेरिकेविरुद्धचा सामना ३२ धावांनी जिंकला आहे. हे दोन्ही साखळी सामने जिंकल्यामुळे पाकिस्तान चार गुण आणि +०.९३२ च्या नेट रनरेटसह गटात दुसऱ्या स्थानावर आहे.
Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले अर्थ आणि नियोजन खाते पुन्हा एकदा पक्षाकडे येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
Shirur accident News : भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; काळे कुटुंबावर काळाचा घाला
Shirur accident News : शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकी कार आणि ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने हा अपघात घडला.
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री एकाच आठवड्यात दोनदा दिल्लीमध्ये; राजकीय घडामोडींना वेग
दिल्ली: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. एकाच आठवड्यात ते दोनदा दिल्ली दौऱ्यावर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरतेचे ढग दाटले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. तसे घडल्यास महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.काही दिवसांपूर्वीच कोणालाही थांगपत्ता लागून न देता फडणवीस दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. देवेंद्र फडणवीस यांचे एकाच आठवड्यात दोन वेळा दिल्ली जाण्यामागील कारण काय, याची चर्चा होऊ लागली होती.राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट:मात्र, देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळच्या दिल्ली दौऱ्यात भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली.भाजपाचे नवनिर्वाचित मा. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नबीनजी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा अजून जोमाने प्रगती करेल असा विश्वास आहे.भाजपा के नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष एवं विधायक… pic.twitter.com/GwGhYuamJ1— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 13, 2026सदिच्छा भेट:देवेंद्र फडणवीस हे दावोस आर्थिक परिषदेसाठी स्वित्झर्लंडला गेले असताना नितीन नवीन यांनी दिल्लीत एका जंगी सोहळ्यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांना उपस्थित राहता आले नव्हते. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन अमित शाह यांना भेटले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा गुप्त होता. तसेच त्यावेळी नितीन नवीन हेदेखील बिहारच्या दौऱ्यावर होते. परिणामी या दोघांची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे कालच्या (१३ फेब्रुवारी) दिल्ली दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी नितीन नवीन यांची आवर्जून भेट घेतली. नितीन नवीन यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले. मात्र, नितीन नवीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर फडणवीस त्यांना पहिल्यांदाच भेटले आहेत. त्यामुळे साहजिकच या भेटीत महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत चर्चा झाली असू शकते. परंतू, या चर्चेचा नेमका तपशील अद्याप कळू शकलेला नाही.
वेरूळ : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरातील दर्शनाबाबत प्रशासनाने आपला निर्णय बदलला असून भाविकांना मोठा दिलासा दिला आहे. दरवर्षी होणारी अलोट गर्दी लक्षात घेता प्रशासनाने सुरुवातीला गाभारा दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता महाशिवरात्रीला येणाऱ्या लाखो शिवभक्तांना पूर्वीप्रमाणेच थेट गाभाऱ्यात प्रवेश मिळणार आहे. भाविकांना केवळ दर्शनच नाही, तर महादेवाच्या पिंडीला स्पर्श करून दर्शन घेता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सुलभ दर्शनासाठी आता मंदिर प्रशासनाकडून विशेष तयारी केली जात आहे.गाभारा दर्शन बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे भाविकांमध्ये नाराजीमहाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथील १२ वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर प्रशासनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पाहायला मिळत आहे. गर्दीचे नियंत्रण आणि सुरक्षेचे कारण देत यावर्षी महाशिवरात्रीला 'गाभारा दर्शन' बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासकीय बैठकीत घेण्यात आला होता. आता नव्या नियमानुसार भाविकांना पिंडीला स्पर्श करून किंवा डोके टेकवून दर्शन घेण्याऐवजी केवळ दरवाजातूनच दर्शन घेता येणार होते. ओंकारेश्वर मंदिराच्या धर्तीवर भाविकांना बाहेरूनच जलाभिषेक करण्याची सुविधा देण्यात येणार होती. ग्रामस्थांना आधार कार्ड दाखवून पहाटे ६ वाजेपर्यंतच दर्शनाची मुभा देण्यात आली होती. देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. दर्शन घेण्यासाठी ४-५ तास लागले तरी चालतील, मात्र आम्हाला गाभाऱ्यात जाऊन स्पर्श दर्शनच हवे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर, भाविकांच्या या तीव्र भावना लक्षात घेऊन प्रशासन आपल्या निर्णयात बदल करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रशासनाने मागे घेतला बंदीचा निर्णयशेकडो वर्षांची 'स्पर्श दर्शनाची' परंपरा खंडित न करता भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार आहे. सुरुवातीला गर्दीच्या नियोजनासाठी घातलेली बंदी आता पूर्णपणे उठवण्यात आली आहे. गाभारा दर्शन आणि स्पर्श दर्शनामुळे भाविकांना रांगेत अधिक वेळ लागण्याची शक्यता असली, तरी भाविकांनी या निर्णयाचे मनापासून स्वागत केले आहे. प्रशासनाने दाखवलेल्या या लवचिक भूमिकेबद्दल शिवभक्तांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत. १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या यात्रेसाठी आता देशभरातून येणाऱ्या भाविकांचा उत्साह द्विगुणीत झाला असून, मंदिर परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेचे सभागृह सुरु होणार घड्याळाच्या काट्यावरच
मुंबई (सचिन धानजी) :मुंबई महापालिकेचे सभागृह उबाठाच्या काळात निश्चित केलेल्या वेळेपेक्षा दीड ते दोन तास उशिराने सुरु व्हायचा. उबाठाच्या काळातील हा इतिहास आता महायुती पुसून टाकणार असून यापुढे महापालिकेचे सभागृह नवनिर्वाचित महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे गटनेते घड्याळाच्या काट्यावर सुरु करून सदस्यांना जास्तीत सभागृहात बोलण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.मुंबई महापालिकेच्या सभागृहाची लया मागील काही वर्षांपासून तत्कालिन सत्ताधारी उबाठाच्या महापौरांनी घालवली असून प्रत्यक्षात पहिल्या निश्चित केलेल्या सभेचे कामकाजही वेळेत सुरु करण्यात येत नव्हती. दुपारी अडीच वाजता सुरु होणारे सभागृह हे प्रत्यक्षात नगरसेवक सभागृहात उपस्थित असूनही महापौर हे सभागृहात उशिराने येत असत. त्यामुळे सभागृह तब्बल दीड ते तास उशिराने सुुरु होण्याची प्रथा मागील काही वर्षांमध्ये उबाठाच्या महापौरांनी घातली होती. तसेच सभागृहामध्ये विविध विषयांवर सदस्यांना चर्चा करू न देता त्यांचा बोलण्याचा हक्कही हिरावून घेतला जात होता. त्यामुळे बहुतांशी नगरसेवकांना मागील नगरसेवक काळात संसदीय कार्यप्रणाली समजून घेता आलेली नाही तसेच आपले प्रश्न आणि समस्याही मांडता आल्या नाहीत.मात्र, उबाठाची सत्ता जावून आता भाजप आणि शिवसेना महायुतीची सत्ता महापालिकेत आल्यानंतर त्यांनी यापूर्वीचा इतिहास आता पुसून नव्याने इतिहास लिहिणार आहेत. यामध्ये सभागृह भरण्याची वेळ दुपारी दोन वाजता देवून प्रत्यक्षात ठिक अडीच वाजता सभागृह सुरु केले जाईल अशाप्रकारची रणनिती आखली आहे.भाजपचे गटनेते आणि भावी सभागृहनेते गणेश खणकर आणि शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी यापुढे ठिक अडीच वाजताच सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात करून प्रत्येक विषयांवर साधक बाधक चर्चा करून यामध्ये जास्तीत जास्त नगरसेवकांना भाग घेता येईल अशाप्रकारे सभागृह चालवण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. त्यामुळे ज्या उबाठाच्या यापूर्वीच्या महापौरांनी सभागृहात चर्चा न करता कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला होता, तिथे आता महायुतीने खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्याची पूर्ण संधी देणार आहेत,तसेच वेळेत सभागृहाचे कामकाज सुरु करून वेळेत संपवून लांबच्या नगरसेवकांना गर्दीविना घरी जाण्यास देणार आहे.महापालिकेतील पहिली निश्चित केलेली सभा ही महत्वाची असून ती कोणत्याही कारणांशिवाय घ्यावी लागते. त्यानंतर दुसऱ्या सभेमध्ये ठरावाच्या सूचनांसह इतर कामकाज तसेच त्यानंतर तहकूब सभा अशाप्रकारे पाच ते आठ सभा किंवा त्यापेक्षा अधिकही घेता येवू शकतात. पण उबाठाच्या काळात तीनच्या वरही सभा घेण्यात आली नव्हती, त्यातुलनेत अधिक सभा घेण्याचा महायुतीच्या गटनेत्यांनी विचार प्रकट केला आहे.
मुंबईत आता फेरीवाल्यांची झाडाझडती
महापौरांच्या निर्देशानुसार फेरीवाल्यांचे ओळखपत्रे आणि कागदपत्रे तपासणारमुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईतील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याची घोषणा करून बांग्लादेशी फेरीवाल्यांना हटवण्याची घोषणा केल्यानंतर मुंबईच्या नवनिर्वाचित महापौरांनी यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून शहरातील फेरीवाल्यांची नोंद, त्यांचे परवाने, ओळखपत्रे आणि वास्तव्या संदर्भातील कागदपत्रांची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये फेरीवाल्यांची खरोखरच झाडाझडती घेवून त्यांना हटवले जाते की प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी हे कारवाईची नौटंकी करत महापौरांच्या निर्देशांना केराची टोपली दाखवतात हे येत्या काही दिवसांमध्ये दिसून येणार आहे.मुंबईतील वाढत्या बांग्लादेशी फेरीवाल्यांसंदर्भातील तक्रारींच्या अनुषंगाने महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित केली होती. याबैठकीला भाजपचे नेते किरीट सोमय्यांसह इतरही भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत नवनिर्वाचित महापौरांनी, मुंबईत फेरीवाला व्यवसाय करणाऱ्यांची आधार कार्ड इतर शासकीय ओळखपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करण्यात यावी, तसेच ज्यांच्याकडे अवैध कागदपत्रे आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, याबाबत महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांच्यात समन्वय वाढवण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.गेल्या काही वर्षात मुंबईत फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याच्या आणि त्यामध्ये परदेशी नागरिक अवैधरित्या वास्तव्यास राहून व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. यामुळे स्थानिक फेरीवाल्यांचा आर्थिक ताण वाढण्यासोबतच काही भागात महिलांच्या सुरक्षेबाबतही चिंता निर्माण झाली आहे. फुटपाथवरील गर्दी, अतिक्रमण आणि अनधिकृत व्यवसायामुळे कायदा सुव्यवस्थेचा समस्या निर्माण होत असून या पार्श्वभूमीवर अतिक्रमण हटवून नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे महापौर रितू तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.त्यासोबतच विविध प्रभागांमध्ये कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
Sunil Tatkare : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लिहिलेल्या लेखावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देत विलिनीकरणासंदर्भात मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Top 10 News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीत दाखले झाले होते. फडणवीस हे दिल्लीत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. तर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन अमित शाह यांना भेटले होते. त्यानंतर कालच्या दिल्ली दौऱ्यात फडणवीस यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय […]
रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन
मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे निधन झाले. आनंद सागर यांनी मुंबईत ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही वर्षांपासून पार्किसन्स या आजारामुळे आनंद सागर त्रस्त होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते. या आजारपणातच त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.आनंद सागर हे १९८७ मध्ये तयार झालेल्या रामायण या टीव्ही मालिकेचे सह निर्माते होते. वडील रामानंद सागर यांच्या पश्चात त्यांचा वारसा आनंद यांनीच समर्थपणे पुढे चालवला. आनंद सागर यांनी पौराणिक आणि भक्तीपर प्रकल्प केले. एकूण पाच भावंडांमध्ये केवळ आनंद सागर यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवला. ‘रामायण’ नंतर त्यांनी ‘अलिफ लैला’, ‘जय जय बजरंगबली’ आणि ‘जय शिव शंकर’ सारख्या मालिकांची निर्मिती केली. त्यांनी ‘आँखें’ आणि ‘अरमान’ सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील केली.सागर कुटुंबाने आनंद सागर यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी प्रसारमाध्यमांना दिली आहे. ही बातमी कळताच आनंद सागर यांच्या परिचितांपैकी अनेकांनी शोक व्यक्त केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत सागर कुटुंबाने 'आम्ही आमच्या प्रिय वडिलांचे, आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे निधन झाल्याची माहिती देत आहोत' असे नमूद केले आहे.
महाराष्ट्रातून थंडी जाणार पण काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार, कसं असेल हवामान ?
मुंबई : महाराष्ट्रातून थंडी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत दिसत आहे. पण राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात सक्रिय झालेले 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा, यामुळे महाराष्ट्राच्या हवामानात १७ आणि १८ फेब्रुवारीला मोठी उलथापालथ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे पश्चिम महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे १७ फेब्रुवारीच्या रात्रीपासून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची दाट शक्यता आहे. तसेच अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातही पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे.उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तापमानात १ ते २ अंशांची घसरण दिसत आहे. पण पावसाची शक्यता एकदम कमी आहे. विदर्भात १८ फेब्रुवारीनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन पारा चढण्यास सुरुवात होईल असे हवामान खात्याने सांगितले आहे.महाराष्ट्रात केवळ पावसाचा शिडकावा अपेक्षित असताना, दक्षिण भारतात मात्र निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळू शकते. श्रीलंकेवरून येणारे कमी दाबाचे क्षेत्र तमिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे कन्याकुमारी, मदुराई आणि तंजावर या भागात १७ आणि १८ फेब्रुवारीला 'अतिवृष्टी' होण्याचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळ सदृश स्थितीमुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही वाऱ्याचा वेग वाढणार आहे.
Amol Mitkari : एसबीने नरहरी झिरवळ यांच्या दालनात एका लिपिकाला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले
Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली आहे. जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारतीय पासपोर्ट आता १० स्थानांनी वर चढून ७५ व्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी मागच्या वर्षी भारतीय पासपोर्ट ८५ व्या स्थानावर होता. भारतीय पासपोर्टचे रँकिंग सुधारणे म्हणजे भारतीय नागरिकांना अधिकाधिक देशांकडून व्हिसा फ्री (व्हिसा मुक्त) किंवा आगमन होताच व्हिसाची सोय उपलब्ध होणे असा आहे.भारतीय नागरिक सध्या जगातील ५६ देशांमध्ये व्हिसा फ्री (व्हिसा मुक्त) किंवा आगमन होताच व्हिसाची सोय उपलब्ध होणे या पर्यायांचा लाभ घेऊन परदेश प्रवास करू शकतात. अंगोला, बार्बाडोस, भूतान, ब्रिटिश व्हर्जिन बेटे, कुक बेटे, डोमिनिका, फिजी, ग्रेनेडा, हैती, जमैका, कझाकस्तान, केनिया, किरिबाटी, मकाओ, मलेशिया, मॉरिशस, मायक्रोनेशिया, मोंटसेराट, नेपाळ, फिलीपिन्स, रवांडा, सेनेगल, सेशेल्स, सेंट किट्स आणि नेव्हिस, थायलंड, त्रिनिदाद आणि टोबॅगो, वानुआटु, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स येथे भारतीयांना व्हिसा फ्री (व्हिसा मुक्त) प्रवेश आहे. बुरुंडी, कंबोडिया, केप व्हर्डे बेटे, कोमोरो बेटे, जिबूती, इथिओपिया, गिनी-बिसाऊ, इंडोनेशिया, जॉर्डन, लाओस, मादागास्कर, मालदीव, मार्शल बेटे, मंगोलिया, मोझांबिक, म्यानमार, नियू, पलाऊ बेटे, कतार, सामोआ, सिएरा लिओन, श्रीलंका, सेंट लुसिया, टांझानिया, तिमोर-लेस्टे, तुवालू, झिम्बाब्वे येथे भारतीयांना आगमन होताच व्हिसाची सोय उपलब्ध आहे. अल्बेनिया, अँग्विला, अँटिग्वा आणि बारबुडा, आर्मेनिया, अझरबैजान, बहरीन, बांगलादेश, बेनिन, बोलिव्हिया, बोत्स्वाना, बुर्किना फासो, कॅमेरून, कोलंबिया, काँगो (डेमोक्रॅटिक रिपब्लिक), कोट डी'आयव्होअर, क्युबा, विषुववृत्तीय गिनी, गॅबॉन, जॉर्जिया, गिनी, किर्गिस्तान, मॉरिटानिया, मोल्दोव्हा, मोरोक्को, नामिबिया, नायजेरिया, ओमान, रशियन फेडरेशन, साओ टोमे आणि प्रिन्सिपे, सिंगापूर, सोमालिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण सुदान, सेंट हेलेना, सुरिनाम, सीरिया, ताजिकिस्तान, बहामास, टोगो, तुर्कीये, युगांडा, युक्रेन, उझबेकिस्तान, व्हिएतनाम, झांबिया या देशांचे ई-व्हिसा भारतीयांना उपलब्ध आहेत.हेन्ले पासपोर्ट इंडेक्स एखाद्या देशाच्या पासपोर्टला किती देशांमध्ये व्हिसा फ्री (व्हिसा मुक्त) किंवा आगमन होताच व्हिसाची सोय उपलब्ध आहे याआधारे रँकिंग देतो. जगभर या रँकिंगला महत्त्व आहे. ताज्या हेन्ले पासपोर्ट इंडेक्सनुसार भारतीय पासपोर्ट जागतिक रँकिंगमध्ये ७५ व्या स्थानावर आहे. या यादीत सिंगापूर पहिल्या तर जपान आणि दक्षिण कोरिया संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. सिंगापूरच्या पासपोर्टवर १९२ देशांत व्हिसा-मुक्त प्रवेश मिळतो तर जपान आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांच्या पासपोर्टवर १८७ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश मिळतो. स्वीडन आणि संयुक्त अरब अमिराती हे संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत कारण या दोन्ही देशांच्या पासपोर्टवर १८६ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश मिळतो.फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन आणि स्वित्झर्लंडसह अनेक युरोपीय देश चौथ्या स्थानावर आहेत, ज्यांचे पासपोर्ट १८५ ठिकाणी व्हिसा-मुक्त प्रवास करण्याची परवानगी देतात. ऑस्ट्रिया, ग्रीस, माल्टा आणि पोर्तुगाल पाचव्या स्थानावर आहेत कारण या देशांच्या पासपोर्टवर १८४ ठिकाणी व्हिसा-मुक्त प्रवास शक्य आहे. मजबूत पासपोर्ट असलेल्या इतर देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंग्डम (यूके), कॅनडा आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे.
2014 पूर्वी ईशान्येकडील 8 राज्यांपैकी कोणत्याही राज्यात भाजपचे सरकार नव्हते. एकूण 9 आमदार आणि केवळ 4 खासदार होते. त्रिपुरा, सिक्कीम आणि मिझोराममध्ये तर भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. आज ईशान्येकडील 6 राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे. चार राज्यांमध्ये त्यांचे मुख्यमंत्री आहेत. एकूण 197 आमदार आणि 13 खासदार आहेत. म्हणजेच, 2014 च्या तुलनेत 22 पट जास्त आमदार आणि तीन पट जास्त खासदार आहेत. आज पंतप्रधान मोदी आसाम दौऱ्यावर जात आहेत, तेव्हा पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला - भाजपने ईशान्येत इतका मोठा बदल कसा घडवला? जाणून घेऊया एक्सप्लेनरमध्ये… हिमंता यांना मुख्यमंत्री बनवणार होते आझाद, राहुल यांनी रोखले वर्ष 2014, जून-जुलै महिना… काँग्रेस खासदार गुलाम नबी आझाद श्रीनगरमध्ये सुट्ट्या घालवत होते. दुपारी 12 वाजता, दिल्लीहून अहमद पटेल यांनी आझाद यांना फोन केला- ‘मॅडमला तुमच्याशी बोलायचं आहे.’ आता टेलिफोनवर सोनिया गांधी होत्या. त्यांनी आझाद यांना विचारले- तुम्ही कुठे आहात, मी तुम्हाला कधीपासून शोधत आहे? आझाद यांनी उत्तर दिले- श्रीनगरमध्ये आहे. सोनिया- तुम्ही लगेच दिल्लीला या. जर विमान मिळत नसेल, तर सांगा मी इथून पाठवते. आझाद- नाही, त्याची काही गरज नाही. इथून दर तासाला दिल्लीसाठी विमान आहे. सोनिया- संध्याकाळी 5 वाजता आपण बैठक घेऊ, पण त्याआधी तुम्हाला दोन कामं करून यायची आहेत. आझाद- काय? सोनिया- आसाममध्ये खूप मोठं संकट आलं आहे. हिमंता बिस्व सरमा यांनी 40-50 आमदारांसह बंडखोरी केली आहे. मी ऐकलं आहे की ते तुमच्या जवळचे आहेत. तुम्ही फोन करून सांगा की त्यांनी सध्या त्यांची योजना थांबवून ठेवावी. राज्यपालही तुमच्या जवळचे आहेत, त्यांनाही सांगा की त्यांनी सध्या कोणताही निर्णय घेऊ नये. संध्याकाळी सुमारे 5 वाजता आझाद दिल्लीला पोहोचले आणि सोनिया गांधींना भेटले. सोनिया आझाद यांना म्हणाल्या - तुम्ही आसामला जा आणि तिथे नेता निवडा. आझाद - मॅडम, मी तिथे जाण्यापूर्वी इथेच सराव करू इच्छितो. तिथे जाऊन मी माझ्या मनाने कोणाला मुख्यमंत्री बनवले, तर तुम्ही म्हणाल की याला बनवायचे नव्हते. सोनिया - योजना (प्लॅन) लीक झाली तर? आझाद - कोणतीही योजना (प्लॅन) लीक होणार नाही. मी इंदिराजींच्या काळापासून हेच काम करत आलो आहे. यानंतर आझाद यांनी हिमंता बिस्व सरमा यांना फोन केला आणि सांगितले की त्यांनी वेगवेगळ्या विमानांनी आपल्या आमदारांना घेऊन दिल्लीला पोहोचावे. सरमा यांच्यासोबत 40-50 आमदार दिल्लीला पोहोचले. त्यांना दिल्लीतील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवण्यात आले. कोणालाही कुठेही विधान करण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. आझाद यांनी आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना सांगितले की, तुमच्या समर्थनार्थ जे आमदार आहेत, त्यांना दिल्लीला पाठवा. गोगोई यांनी 7 आमदारांना दिल्लीला पाठवले. आणखी 10 आमदार दिल्लीला आले, ज्यांचे म्हणणे होते की ते हायकमांडचा निर्णय मान्य करतील. आझाद यांनी सर्व आकडेवारी नोंदवली आणि सोनिया यांना जाऊन सांगितले की हिमंता बिस्व सरमा यांच्याकडे बहुमत आहे. सोनिया आझाद यांना म्हणाल्या- ठीक आहे…तुम्ही आसामला जा आणि तिथे जो नेता निवडला जाईल, त्याला मुख्यमंत्री बनवा. आझाद यांना ज्या दिवशी आसामला जायचे होते, त्याच्या एक दिवस आधी, रात्री सुमारे 8 वाजता राहुल गांधींनी त्यांना फोन केला. राहुल गांधी आझाद यांना म्हणाले - मला कळले आहे की तुम्ही आसामच्या मुख्यमंत्र्यांना बदलणार आहात? आझाद- हो. राहुल- तुम्ही योजना रद्द करा. कोणीही आसामला जाणार नाही. यानंतर आझाद, राहुल गांधींना भेटायला त्यांच्या घरी पोहोचले. तिथे त्यांनी पाहिले की राहुलसोबत तरुण गोगोई आणि त्यांचे पुत्र गौरव गोगोई बसले आहेत. राहुल, आझाद यांना म्हणतात- मी ऐकले आहे की तुम्ही लोक यांना त्रास देत आहात. आझाद- मी का त्रास देईन. मला जे काम दिले आहे, ते मी करत आहे. हिमंताकडे बहुमत आहे. तुम्ही विचार करून सांगा काय करायचे आहे. राहुल- विचार काय करायचा आहे… आता जो मुख्यमंत्री आहे, तोच राहील. आझाद- मग हिमंता पक्ष सोडून देतील. राहुल- त्यांना RSS मध्ये जाऊ दे. गुलाम नबी आझाद यांनी या संपूर्ण घटनेचा उल्लेख त्यांच्या ‘आझाद: एन ऑटोबायोग्राफी’ या पुस्तकात केला आहे. हिमंता बिस्व सरमा हे ईशान्येकडील काँग्रेसचे मोठे नेते होते. ते तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निकटवर्तीय मानले जात होते. 2001 ते 2011 पर्यंत हिमंता सलग 3 वेळा काँग्रेसचे आमदार होते. गोगोईंनी त्यांना मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती दिली होती. हिमंता आणि तरुण गोगोई यांच्या संबंधांमध्ये 2013 मध्ये दुरावा निर्माण होण्यास सुरुवात झाली, जेव्हा तरुण यांनी त्यांचा मुलगा गौरव याला राजकारणात आणले. 2014 मध्ये गौरव यांना कलियाबोरमधून लोकसभेचे तिकीट मिळाले आणि ते जिंकलेही. येथून सरकारच्या कामकाजातही गौरव यांची भूमिका वाढू लागली. असे म्हटले जाते की 2014 पूर्वीच हिमंता बिस्व सरमा भाजप नेते राम माधव यांच्या संपर्कात होते. आरएसएसमधून भाजपमध्ये आलेले राम माधव त्यावेळी आसामचे प्रभारी होते. एका मीडिया रिपोर्टनुसार, ते राम माधव, हिमंता यांना भाजपमध्ये आणण्यासाठी ब्लू प्रिंट तयार करत होते. हिमंता म्हणाले- बोलण्याऐवजी राहुल गांधी कुत्र्यासोबत खेळत राहिले भाजपमध्ये सामील झाल्यानंतर एका टीव्ही मुलाखतीत हिमंता बिस्व सरमा यांनी सांगितले- '2014 सालची गोष्ट आहे. आसाममधील संकटासंदर्भात मी दिल्लीत राहुल गांधींना भेटलो. माझ्यासोबत आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई आणि काँग्रेस नेते सी.पी. जोशी देखील होते. थोड्या वेळाने सी.पी. जोशी आणि गोगोई यांच्यात वाद झाला, पण राहुल यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. ते त्यांच्या कुत्र्यासोबत खेळत राहिले. याच दरम्यान कुत्र्याने टेबलावर प्लेटमध्ये ठेवलेले बिस्किट उष्टे केले. मला वाटले की राहुल कोणालातरी आवाज देऊन बोलावतील आणि प्लेट बदलून घेतील, पण तसे झाले नाही. लोक त्याच प्लेटमधून बिस्किट खात राहिले आणि त्यांना पाहून राहुल हसत राहिले. हा आम्हा सर्वांचा अपमान होता. त्याच दिवशी मी भाजपच्या राम माधव यांना भेटलो आणि मग जे घडले ते सर्वांना माहीत आहे.' वर्ष 2015 आणि तारीख 21 जुलै. आसामचे भाजप नेते सर्बानंद सोनोवाल आणि केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यांनी एक पुस्तिका जारी करून सांगितले की लुईस बर्जर घोटाळ्यात हिमंता बिस्व सरमा मुख्य संशयित आहेत. खरं तर, ईडीने दावा केला होता की 2010 मध्ये जल विकास प्रकल्पासाठी आसाम आणि गोव्यातील भारतीय अधिकाऱ्यांना बनावट कंपन्यांनी लाच दिली आहे. असे म्हटले जाते की पत्रकार परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 जुलै रोजी हिमंता भाजपमध्ये सामील होणार होते, परंतु घोटाळ्यात नाव आल्यानंतर सामील होणे पुढे ढकलण्यात आले. आसामचे भाजप अध्यक्ष राहिलेल्या सिद्धार्थ भट्टाचार्य यांनी एका मीडिया मुलाखतीत सांगितले- ‘सर्बानंद सोनोवाल यांच्या पत्रकार परिषदेनंतर मी, हिमंतासोबत दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांना भेटलो आणि त्यांना सांगितले की आरोप खोटे आहेत. शहा म्हणाले की, हे तर चुकीचे झाले. आता चूक सुधारा.’ बरोबर एक महिन्यानंतर, 23 ऑगस्ट 2015 रोजी हिमंता यांनी दिल्लीत शहा यांची भेट घेतली आणि त्याच दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला. इथूनच त्या पटकथेची सुरुवात झाली, ज्यामुळे भाजपला ईशान्य भारतात यश मिळाले… आसाम: हिमंता भाजपमध्ये आल्यानंतर 10 महिन्यांतच सरकार स्थापन केले 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईशान्य भारतात तीन मोठे मुद्दे उपस्थित केले होते - बांगलादेशी मुस्लिमांना घुसखोर ठरवून बाहेर काढणे, नेहरू-गांधी कुटुंबावर ईशान्य भारताशी भेदभाव केल्याचा आरोप आणि भ्रष्टाचार. या निवडणुकीत भाजपला आसाममधील 14 पैकी 7 जागा आणि 36.6% मते मिळाली. 2009 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा 2 जागा जास्त आणि सुमारे 20% जास्त मते. अरुणाचल प्रदेशातही एक जागा जिंकली. पण उर्वरित 6 राज्यांमध्ये भाजपला खातेही उघडता आले नाही. पहिल्यांदाच भाजपला ईशान्येकडील 25 पैकी 8 लोकसभा जागा मिळाल्या. त्याचवेळी सार्वत्रिक निवडणुकांसोबत अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये विधानसभा निवडणुकाही झाल्या. अरुणाचलमध्ये भाजपला 11 जागा आणि 33% मते मिळाली. तर सिक्कीममध्ये त्याला एकही जागा मिळाली नाही. सुमारे दीड वर्षानंतर 2016 मध्ये आसाम विधानसभा निवडणुका झाल्या. 29 जानेवारी 2016 रोजी भाजपने जुन्या चेहऱ्याला प्राधान्य देत सर्बानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवले. याशिवाय भाजपने बोडोलँड पीपल्स फ्रंट म्हणजेच BPF आणि आसाम गणपरिषदेसोबत युती केली. BPF आसाममधील बोडो जमातीच्या स्वतंत्र बोडोलँड राज्याच्या मागणीतून उदयास आली होती. 19 मे रोजी निकाल आले तेव्हा 126 जागांपैकी 60 जागांवर भाजपला आणि 26 जागांवर त्यांच्या मित्रपक्षांना विजय मिळाला. तर काँग्रेस 26 जागांवरच मर्यादित राहिली. पहिल्यांदाच ईशान्येकडील कोणत्याही राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले. सर्बानंद सोनोवाल मुख्यमंत्री झाले. 2021 मध्येही आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपला सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळाले. मात्र, यावेळी पक्षाने चेहरा बदलला आणि हिमंता बिस्व सरमा मुख्यमंत्री झाले. एनडीएऐवजी नेडा, जेणेकरून भाजपला बाहेरचा पक्ष मानले जाऊ नये ईशान्य भारतात भाजपसाठी सर्वात मोठे आव्हान होते - त्याची बाहेरचा पक्ष म्हणून असलेली ओळख. आरएसएस दीर्घकाळापासून तिथे काम करत होता, तरीही भाजपजवळ मजबूत कॅडर नव्हते. यावर उपाय म्हणून 26 मे 2016 रोजी ईशान्येकडील स्थानिक पक्षांना एकत्र करून ‘नॉर्थ-ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स’ म्हणजेच, NEDA या नवीन युतीची स्थापना झाली. हिमंता बिस्व सरमा यांना NEDA चे संयोजक बनवण्यात आले. भाजपसोबत नागा पीपल्स फ्रंट, सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल, आसाम गण परिषद, बोडोलँड पीपल्स फ्रंट यांसारखे स्थानिक पक्ष यात सामील झाले. सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि आसामचे मुख्यमंत्री याचे संस्थापक सदस्य बनले. अरुणाचल प्रदेश: 33 आमदार फोडून सरकार स्थापन केले 2014 च्या आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपला 11 जागा मिळाल्या. दोन वर्षांनंतर, सप्टेंबर 2016 मध्ये काँग्रेसचे 43 आमदार ‘पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल’ मध्ये सामील झाले. त्यानंतर डिसेंबर 2016 मध्ये या पक्षाचे 33 आमदार भाजपमध्ये गेले. अशा प्रकारे अरुणाचलमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले. पेमा खांडू मुख्यमंत्री बनले, जे आधी काँग्रेसमधून पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये आणि नंतर भाजपमध्ये आले होते. 2019 च्या विधानसभेत भाजपने 60 पैकी 41 जागा जिंकून पुन्हा सरकार स्थापन केले. पेमा खांडू पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री बनले. 2024 मध्ये भाजपने 46 जागा जिंकल्या आणि पेमा खांडू मुख्यमंत्री बनले. मणिपूर: काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला, पण भाजपने सरकार स्थापन केले 2017 मध्ये मणिपूरमध्ये निवडणुका झाल्या. 60 जागांच्या विधानसभेत काँग्रेसला 28 आणि भाजपला 21 जागा मिळाल्या. 2011 नंतर पहिल्यांदाच भाजपने मणिपूरमध्ये खाते उघडले. मागील निवडणुकीच्या तुलनेत सुमारे 34% मतांचा वाटा वाढला. भाजपने नॅशनल पीपल्स पार्टी, नागा पीपल्स फ्रंट आणि लोक जनशक्ती पार्टीसोबत मिळून मणिपूरमध्ये सरकार स्थापन केले. एन. बिरेन सिंह मुख्यमंत्री बनले, जे 2016 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले होते. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 32 जागा जिंकून पुन्हा सरकार स्थापन केले. विरेंद्र सिंह यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यात आले. पण मे 2023 पासून मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसाचार सुरू झाला. विरेंद्र सिंह यांच्यावर परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा आरोप झाला. अशा परिस्थितीत 9 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली. एक वर्षानंतर 4 फेब्रुवारी 2026 रोजी भाजपचे युमनाम खेमचंद सिंह मणिपूरचे मुख्यमंत्री बनले. त्रिपुरा: 25 वर्षांचा जुना डाव्यांचा गड उद्ध्वस्त केला 2018 मध्ये त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. 3 मार्च रोजी निकाल आले तेव्हा, 60 पैकी 35 जागा जिंकून भाजपने केवळ त्रिपुरामध्ये पहिल्यांदाच खाते उघडले नाही, तर स्वतःच्या बळावर सरकार स्थापन केले. डाव्यांचा 25 वर्षांचा जुना गड उद्ध्वस्त झाला. भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बिप्लव देब मुख्यमंत्री बनले, पण 4 वर्षांनंतर मे 2022 मध्ये त्यांना हटवून माणिक साहा यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. साहा 2016 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले होते. 2023 च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने 32 जागा जिंकून येथे पुनरागमन केले. मात्र, मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या 3 जागा कमी झाल्या. मतदानाचा वाटाही सुमारे 4% कमी झाला. सिक्कीम: एकट्याने निवडणूक लढवली, पण खाते उघडले नाही 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सिक्कीम विधानसभा निवडणुकीत भाजपला एकूण 5700 मते मिळाली. एकही जागा जिंकली नाही, पण नंतर भाजपचे 12 आमदार झाले आणि ते सरकारमध्येही राहिले. खरं तर, निवडणुकीनंतर 3 आमदारांना राजीनामा द्यावा लागला, कारण ते दोन-दोन जागांवरून लढले होते. या जागांवर पोटनिवडणुका झाल्या, तेव्हा भाजपने 2 जागा जिंकल्या. सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे १५ पैकी १० आमदार भाजपमध्ये गेले. म्हणजेच, सिक्कीममध्ये भाजपचे १२ आमदार झाले आणि ते युती सरकारच्या सामील झाले. मात्र, २०२४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपने युती तोडली आणि निकाल लागल्यावर त्यांना खातेही उघडता आले नाही. नागालँड: पाच वर्षांत ११ आमदार वाढले, युती सरकारचा भाग २०१८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच माजी मुख्यमंत्री केएल चिशी भाजपमध्ये सामील झाले. त्यांच्यासोबत १२ नेतेही भाजपमध्ये गेले. भाजपने नागा पीपल्स फ्रंटसोबतची युती तोडली आणि नेशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीसोबत निवडणुकीत उतरली. तेव्हा भाजपला १२ जागा मिळाल्या, म्हणजे मागील निवडणुकीपेक्षा ११ जास्त. २०२३ च्या विधानसभेतही भाजपला १२ जागा मिळाल्या आणि यावेळीही ते युती सरकारच्या सामील झाले. मिझोरम: २०१८ मध्ये पहिल्यांदा खाते उघडले 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 39 जागांवर निवडणूक लढवली आणि केवळ एकच जागा जिंकू शकली. येथे पहिल्यांदाच भाजपचे खाते उघडले. मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यांचा मतांचा वाटा सुमारे 8% नी वाढला. 2023 च्या निवडणुकीत भाजपला दोन जागा मिळाल्या. सध्या ते येथे विरोधी पक्षात आहेत. मेघालय: सलग दोन वेळा आघाडी सरकारच्या सत्तेत मेघालयमध्ये भाजपला 2018 आणि 2013 या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये प्रत्येकी 2-2 जागा मिळाल्या. दोन्ही वेळा ते आघाडी सरकारच्या सत्तेत सहभागी झाले. ईशान्य भारतात भाजपच्यायशाची 7 प्रमुख कारणे 1. मुस्लिम घुसखोर विरुद्ध मूळ रहिवासी 2014 मध्ये जेव्हा भाजपने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत प्रवेश केला, तेव्हा ईशान्य भारतात त्यांनी बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा जोरदारपणे उचलून धरला. जवळपास प्रत्येक सभेत मोदींनी याचा उल्लेख केला. 24 फेब्रुवारी 2014 रोजी आसाममधील रामनगर येथील सभेत मोदी म्हणाले- ‘काँग्रेस सरकारने डिटेंशन सेंटरच्या नावाखाली मानवाधिकारांचे उल्लंघन केले. घुसखोर तुमचे अधिकार हिरावून घेत आहेत. आसाममधील तरुण बेरोजगार आहेत आणि बाहेरचे लोक रोजीरोटी कमावत आहेत. हा अन्याय आहे की नाही? दिल्लीत सरकार बनवा, न्याय मिळायला सुरुवात होईल. सर्व डिटेंशन सेंटर संपवून टाकेन.’ आसामसोबतच संपूर्ण ईशान्य भारतात मूळ निवासी विरुद्ध बाहेरील व्यक्तींचा मुद्दा दीर्घकाळापासून आहे. 1980 च्या दशकात यावरून आसाममध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आणि 2 हजारांहून अधिक बांगलादेशी स्थलांतरित मारले गेले होते. 15 ऑगस्ट 1985 रोजी पंतप्रधान राजीव गांधी आणि विद्यार्थी संघटना आसू (AASU) यांच्यात एक करार झाला, ज्याला आसाम करार (Assam Accord) असे म्हटले जाते. यानंतर नागरिकत्व कायद्यात बदल करण्यात आले. जे लोक मार्च 1971 नंतर आसाममध्ये आले, त्यांना अवैध स्थलांतरित मानले गेले. 1980 च्या दशकापासूनच भाजप बांगलादेशी स्थलांतरितांना बाहेर काढण्याची मागणी करत आहे. मात्र, नंतर भाजपने आपली भूमिका बदलली आणि बांगलादेशी हिंदूंना नागरिकत्व देण्याची आणि बांगलादेशी मुस्लिमांना घुसखोर ठरवून त्यांना बाहेर काढण्याची मागणी करू लागली. 2. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण ईशान्येकडील 8 राज्यांपैकी 4 राज्ये - त्रिपुरा, आसाम, सिक्कीम आणि मणिपूर हिंदू बहुसंख्य आहेत. तर नागालँड, मेघालय आणि मिझोराममध्ये 80% पेक्षा जास्त लोकसंख्या ख्रिश्चन आहे. आसाममध्ये 34% मुस्लिम आहेत, जे ईशान्येकडील इतर राज्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे. संपूर्ण ईशान्येकडे 37% हिंदू, 42.3% ख्रिश्चन आणि 7.7% मुस्लिम लोकसंख्या आहे. भाजपचे मोठे नेते ईशान्येकडे हिंदू-मुस्लिम मुद्दा उपस्थित करत राहिले आहेत. 2021 मध्ये हिमंता बिस्व सरमा यांनी एका टीव्ही मुलाखतीत म्हटले होते की - 'मला मिया मतांची गरज नाही. मी त्यांच्याकडे मते मागण्यासाठी जाणार नाही आणि तेही माझ्याकडे येणार नाहीत.' बांगलादेशी मुस्लिम स्थलांतरितांना घुसखोर ठरवून बाहेर पाठवण्याची गोष्ट असो किंवा हिंदू निर्वासितांना नागरिकत्व देण्याची गोष्ट असो. तज्ञांचे मत आहे की असे करून भाजपने ईशान्येकडे ध्रुवीकरणाचा मुद्दा बनवण्यात यश मिळवले आहे. 24 फेब्रुवारी 2014 रोजी आसाममधील रामनगर येथील निवडणूक रॅलीत नरेंद्र मोदी म्हणाले- ‘जगातील कोणत्याही देशातून हिंदूंना हाकलून दिले, तर त्यांच्यासाठी एकच जागा उरली आहे, ते इथेच येतील. बांगलादेशी हिंदूंचा भार एकट्या आसामने उचलावा अशी आमची इच्छा नाही. संपूर्ण हिंदुस्थानने हा भार उचलला पाहिजे.’ 3. इतर पक्षांचे मोठे नेते-आमदार भाजपमध्ये आले ईशान्येकडील भाजपच्या यशामागे इतर पक्षांच्या मोठ्या नेत्यांची महत्त्वाची भूमिका आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, सध्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा, मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे सर्वजण पूर्वी काँग्रेसचे किंवा स्थानिक पक्षांचे मोठे नेते होते. याशिवाय, इतर पक्षांमधून मोठ्या संख्येने आमदार आणि नेते भाजपमध्ये सामील झाले. 2015 मध्ये हिमंता आपल्यासोबत 10 हून अधिक आमदार घेऊन भाजपमध्ये आले होते. 2016 मध्ये पेमा खांडू 33 आमदार घेऊन भाजपमध्ये सामील झाले. सिक्कीममध्ये तर भाजपने स्थानिक पक्षाच्या १५ पैकी १० आमदारांना पक्षात सामील करून घेतले. इतकंच नाही तर, ईशान्येकडील प्रत्येक राज्यात भाजपची कोणत्या ना कोणत्या पक्षासोबत युती नक्कीच आहे. ४. केंद्रात भाजप सरकार असणे सामान्यतः ईशान्येकडील लोक त्याच पक्षाला प्राधान्य देतात, ज्यांचे केंद्रात सरकार असते. ईशान्येकडील राजकारणावर दीर्घकाळापासून लक्ष ठेवून असलेले बिश्वेंदु भट्टाचार्य सांगतात, 'ईशान्येकडील बहुतेक पक्ष लहान आहेत. मोठ्या खर्चासाठी त्यांना सरकारच्या निधी आणि अनुदानावर अवलंबून राहावे लागते, ही त्यांची मजबुरी आहे. केंद्र सरकारमध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपने या पक्षांना आकर्षित केले, राज्यात त्यांचे सरकार बनले, तर त्यांना पद मिळेल, मंत्रिमंडळात जागा मिळेल. येथील स्थानिक नेते आदिवासी पट्ट्यात जाऊन सांगत होते, जर कमळाला मत दिले, तर आम्ही मंत्री बनू, तुमचा मुलगा हे बनेल. भाजपला याचा खूप फायदाही मिळाला.' स्वातंत्र्यापूर्वीपासून ईशान्येकडे सक्रिय आहे RSS 6. सांस्कृतिक रणनीती उत्तर भारतात भाजप आणि संघ गोमांसाला तीव्र विरोध करतात, पण ईशान्य भारतात ते तसे करत नाहीत. 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नागालँडचे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री यानथुंगो पॅटन म्हणाले होते की, नागालँडमध्ये गोमांस हे मुख्य अन्न आहे. भाजप, काँग्रेस किंवा कोणताही राष्ट्रीय पक्ष आमच्या खाण्यापिण्यात हस्तक्षेप करू शकत नाही. नागालँडमध्ये तसेच संपूर्ण ईशान्य भारतात गोमांस खाणे हा काही मुद्दा नाही. 7. पंतप्रधान मोदी 10 वर्षांत 70 वेळा ईशान्य भारतात गेले 2014 ते 2024 या 10 वर्षांच्या काळात पंतप्रधान मोदींनी सुमारे 70 वेळा ईशान्य भारताला भेट दिली आहे. मार्च 2024 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, पंतप्रधान म्हणून त्यांनी 70 वेळा ईशान्य भारताला भेट दिली आहे. त्यांच्या मंत्र्यांनी 10 वर्षांत 680 वेळा ईशान्य भारताला भेट दिली आहे. आतापर्यंत सर्व पंतप्रधानांनी मिळून जेवढ्या वेळा ईशान्य भारताला भेट दिली असेल, त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळा मी एकट्याने भेट दिली आहे.
ट्रम्पच्या नव्या निर्णयामुळे वाढली अमेरिका - इराण युद्धाची शक्यता
वॉशिंग्टन डीसी : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या निर्णयामुळे अमेरिका - इराण युद्धाची शक्यता वाढली आहे. अमेरिकेने जगातील सर्वात मोठी विमानवाहक नौका अशी ओळख मिरविणाऱ्या यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड या विमानवाहक नौकेला पश्चिम आशियात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच या भागात अमेरिकेची एक विमानवाहक नौका आहे. आता दुसरी विमानवाहक नौकाही पश्चिम आशियात येत आहे.जेव्हा एक विमानवाहक नौका समुद्रात मार्गक्रमण करत असते त्यावेळी त्या नौकेच्या अवतीभोवती संबंधित देशाच्या लहान - मोठ्या युद्धनौका आणि पाणबुड्यांचा ताफा पण असतो. यामुळे अमेरिकेच्या दोन विमानवाहक नौका तैनात होणे याचा दुसरा अर्थ अमेरिकेच्या नौदलाचा मोठा ताफा पश्चिम आशियात येणे असा आहे. यामुळेच अमेरिका - इराण युद्धाची शक्यता वाढल्याचे मत आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आणि अनेक माजी सैन्य अधिकारी व्यक्त करत आहेत.काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला होता. अमेरिकेच्या कमांडो पथकाने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली होती. यानंतर मादुरोंना तातडीने अमेरिकेत आणण्यात आले. अमेरिकेने व्हेनेझुएलातील सर्व तेल विहिरींच्या उत्खननाचे अधिकार स्वतःकडे घेतले. ही लष्करी कारवाई करण्यासाठी अमेरिकेने व्हेनेझुएलाजवळ समुद्रात नौदलाचा ताफा तैनात केला होता. आता इराण विरोधात अमेरिका वेगाने लष्करी कारवाई करण्यासाठी हालचाली करत असल्याचे चित्र आहे.ट्रम्प यांच्या यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड या विमानवाहक नौकेबाबतच्या निर्णयावर तज्ज्ञ वेगवेगळी मतं व्यक्त करत आहेत. काही जणांनी इराणवर दबाव टाकण्यासाठी अमेरिका यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड ही विमानवाहक नौका पश्चिम आशियात पाठवत असल्याचे मत व्यक्त केले. तर काही तज्ज्ञांनी अमेरिका - इराण युद्धाची शक्यता वाढल्याची भीती व्यक्त केली आहे. अमेरिकेची अब्राहम लिंकन अर्थात यूएसएस लिंकन ही विमानवाहक नौका काही दिवसांपूर्वीच पश्चिम आशियात पोहोचली आहे. आता यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड पोहोचल्यावर पश्चिम आशियातील अमेरिकेच्या विमानवाहक नौकांची संख्या दोनवर पोहोचणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर सुमारे दीड वर्षांनी झालेल्या निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच बीएनपी (BNP) बहुमताने विजयी झाली. विक्रमी विजयानंतरही कोणताही जल्लोष झाला नाही, ना विजयाचे मिरवणुका निघाल्या. ढाक्याचे रस्ते निर्मनुष्यच राहिले. बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितले की, शुक्रवारच्या नमाजानंतर संपूर्ण देशात विशेष प्रार्थना करावी आणि अल्लाहचे आभार मानावे. यानंतर लोक घरातून बाहेर पडले, मशिदींमध्ये नमाज अदा केली आणि परत गेले. ढाकासह संपूर्ण बांगलादेशात शांतता होती. बांगलादेशातील निवडणुकीच्या निकालातून तीन गोष्टी स्पष्ट झाल्या. तारिक रहमान देशाचे पुढील पंतप्रधान असतील. कट्टरपंथी मानल्या जाणाऱ्या जमात पक्षाचे धर्माचे राजकारण चालले नाही आणि शेख हसीना यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. तज्ञांच्या मते, बीएनपीच्या विजयामागे हिंदू मतदार, शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे समर्थक आणि महिला आहेत. दैनिक भास्करने निवडणूक निकालांवर विविध स्तरांतील लोकांशी संवाद साधला. त्यांच्याकडून बीएनपीच्या विजयाची कारणे, लोकांनी त्यांना का मतदान केले आणि अखेरीस त्यांना नवीन सरकारकडून काय अपेक्षा आहेत हे समजून घेतले. वाचा अहवाल… जमात समर्थक: शेख हसीना यांच्या काळात घोटाळे होत होते, यावेळीही झालेढाका येथील जमात कार्यालयात उपस्थित समर्थक निराश दिसले. त्यांना वाटत आहे की निवडणुकीत घोटाळा झाला आहे. कार्यालयात भेटलेले रेजा अल करीम स्वतःला जमात-ए-इस्लामीचे कट्टर समर्थक सांगतात. ते कार्यालयाबाहेर बसून जमात प्रमुख शफीकुर रहमान यांना भेटण्याची वाट पाहत होते. करीम म्हणतात, ‘लोकांमध्ये निवडणुकीसाठी सकाळपासून उत्साह होता. मतदानाच्या शेवटपर्यंत आम्हाला आशा होती की निवडणूक योग्य प्रकारे होईल. शेख हसीनांच्या काळातही आम्ही निवडणूक पाहिली आहे की रात्री मतदान करून कसा गैरव्यवहार होत असे. लोकांना मतदानही करू देत नव्हते. यावेळी किमान आम्ही मतदान करू शकलो. यावेळीही मतपेट्या हिसकावून घेण्याचा आणि बनावट मतदान करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आम्हाला शंका आहे की निकालात गैरव्यवहार झाला आहे.’ ‘आम्ही जिंकत होतो, रात्री 11 वाजेनंतर निकाल बदलला’ऑफिसमध्ये बसलेले मुफज्जल हुसेन व्यवसायाने व्यापारी आहेत. ते म्हणतात, ‘मतदानाच्या संध्याकाळपर्यंत येत असलेल्या ट्रेंडनुसार जमात-ए-इस्लामी आघाडीवर होती. रात्री 11 वाजेनंतर अचानक निकाल बदलले. आता जो कोणी सत्तेत येत आहे, त्याने भ्रष्टाचार आणि व्यावसायिक सिंडिकेट संपवण्यासाठी, नोकऱ्या निर्माण करण्यासाठी, परदेशात काम करणाऱ्यांना सुविधा देण्यासाठी काम केले पाहिजे.' आमच्याकडे अनेक सुशिक्षित लोक आहेत, पण त्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने मोठी पावले उचलली पाहिजेत. सामान्य लोक: रहमानचा विजय बांगलादेशसाठी खूप महत्त्वाचाजमात समर्थकांनंतर आम्ही काही सामान्य लोकांशी बोललो. ते निवडणुकीच्या निकालाने आनंदी दिसले. मोहम्मद सुहैल ढाक्यात रिक्षा चालवतात. ते म्हणतात, ‘बीएनपीला (BNP) संपूर्ण देशातून पाठिंबा मिळत होता. निवडणुकीच्या निकालात हेच दिसले आहे. बीएनपीचा (BNP) विजय बांगलादेशसाठी खूप महत्त्वाचा होता. मलाही हेच हवे होते.’ ‘बांगलादेशात बीएनपीला (BNP) संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीही लोकांनी त्याला मतदान केले आणि सत्तेत आणून उभे केले. देशात कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याची गरज आहे. जर कोणी रस्त्यावर चालले तर त्याला सुरक्षित वाटले पाहिजे. सरकारने कायदा आणि सुव्यवस्था ठीक केली, तर लोक तिच्यासोबत राहतील.’ अवामी लीग समर्थक: जमात नापसंत, बीएनपीचा चांगला विजय ई-रिक्षा चालक मोहम्मद सबुज भुईया हे अवामी लीगचे समर्थक आहेत. अवामी लीग आणि बीएनपी हे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. तरीही, मोहम्मद सबुज बीएनपीच्या विजयावर आनंदी आहेत. ते म्हणतात, तारिक रहमान निवडून आले आहेत. त्यांनी देश चांगला चालवावा, जास्त उत्साह दाखवू नये. ते पंतप्रधान होतील हे ऐकून बरे वाटले. मोहम्मद सबुज पुढे म्हणतात, ‘मला जमातचे लोक अजिबात आवडत नाहीत. काही काळापासून असे वातावरण निर्माण झाले होते की, मी स्वतःला अवामी लीगचा समर्थक सांगायलाही घाबरू लागलो होतो. आशा आहे की आता ही भीती कमी होईल. मी यावेळी मतदान केले नाही. जर अवामी लीगचा उमेदवार निवडणूक लढला असता, तर मी मतदान केले असते. आता देशाने तारिक रहमान यांना पंतप्रधान म्हणून निवडले आहे. आमच्यासाठीही हे चांगले आहे.’ हिंदू मतदार: जमातच्या पराभवाने दाखवून दिले की, धर्माचे राजकारण चालणार नाहीढाका विद्यापीठात आम्हाला दीपांकर चंद्र शील भेटले. ते विद्यार्थी नेते असण्यासोबतच बांगलादेश हिंदू बौद्ध छात्र एकता परिषदेचे सचिवही आहेत. ते बांगलादेशात अल्पसंख्याकांसाठी काम करतात. दीपांकर म्हणतात, ‘बांगलादेश एक धर्मनिरपेक्ष देश आहे. शेख हसीना सरकार पडल्यानंतर अल्पसंख्याकांवर हल्ले होत राहिले. संपूर्ण समुदाय भीतीच्या छायेत राहत होता. गेल्या दीड वर्षात आम्ही खूप अत्याचार सहन केले आहेत. निवडणुकीच्या निकालांनी दाखवून दिले की जमातसारखा पक्ष आम्हाला धर्माच्या आधारावर विभाजित करू शकत नाही.’ 'तारिक रहमान बांगलादेशसाठी सर्वोत्तम नेते आहेत. ते आमच्या पालकांसारखे आहेत. तारिक रहमान यांच्याकडे आमची मागणी आहे की, गेल्या काही दिवसांत अल्पसंख्याकांवर जे अत्याचार झाले आहेत, त्याची चौकशी करावी. बांगलादेशातील सर्व लोक निर्भयपणे राहू शकतील, असे वातावरण निर्माण करणे खूप महत्त्वाचे आहे.’ विद्यार्थी: ‘तारिक रहमान सज्जन, विद्यार्थी नेते त्यांच्या स्वार्थापायी हरलेढाका विद्यापीठात शिकणारे फाहिम मासूम शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनात सहभागी होते. शेख हसीना सरकार पडेपर्यंत ते रस्त्यावर लढत राहिले. आंदोलनातून उदयास आलेल्या विद्यार्थ्यांच्या NCP पक्षाचा निवडणुकीत दारुण पराभव झाला. त्याचे 30 पैकी फक्त 6 उमेदवार जिंकले आहेत. फहीम म्हणतात, 'आम्ही विद्यार्थी आंदोलनातून नेते उदयास येताना पाहिले. यापैकी अनेकांनी युनूस सरकार स्थापन झाल्यानंतर जसे ते बोलत होते, तसे वर्तन केले नाही. अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष स्थापन केले. येथेपर्यंतही ठीक होते. एनसीपीने जमातचे समर्थन केले, त्यानंतर पक्षाने आपला आधार गमावला. काही विद्यार्थी नेते जिंकले असले तरी, पण बांगलादेशच्या लोकांच्या नजरेत त्यांनी आपली प्रतिष्ठा गमावली आहे.' जमातच्या पराभवावर फाहिम म्हणतात, ‘जमात अजूनही 1971 च्या राजकारणातून वर येऊ शकलेली नाही. जमातचे लोक बांगलादेशवर राज्य करण्याबद्दल कसे बोलू शकतात? त्यांनी बांगलादेश निर्मितीला विरोध केला होता. आता याच बांगलादेशात त्यांना निवडणूक जिंकायची आहे. हा दुटप्पीपणा आहे. संपूर्ण देशाला जमातचा दुटप्पीपणा माहीत आहे. म्हणून लोकांनी त्यांना नाकारले.’ ‘तारिक रहमान यांचे देशाचे नेते म्हणून निवडून येणे ही एक खास संधी आहे. प्रचारादरम्यान त्यांनी जी परिपक्वता दाखवली, त्यामुळे संपूर्ण देश त्यांचा चाहता झाला. रहमान यांच्यात लोकांना एकत्र आणण्याची जिद्द आहे. ते सज्जन आहेत. तारिक रहमान यांनी संपूर्ण निवडणुकीदरम्यान संदेश दिला की त्यांना एक चांगला बांगलादेश हवा आहे. त्यांनी कोणत्याही पक्षाविरुद्ध बोलले नाही. ते फक्त लोकांना एकत्र आणण्याबद्दल आणि विकासाबद्दल बोलत राहिले.’ महिला: जमातला लोकांनी ओळखले, त्याला योग्य जागा दाखवलीढाका विद्यापीठात शिकणाऱ्या मालिहा खान बीएनपीच्या विजयाने आणि जमातच्या पराभवाने आनंदी आहेत. त्या म्हणतात, ‘गेल्या १७ वर्षांपासून आम्ही योग्य आणि निष्पक्ष निवडणुका होण्याची वाट पाहत होतो. अखेर या वेळी तशा निवडणुका पाहायला मिळाल्या. आम्हाला असे वाटत होते की, जो खऱ्या अर्थाने लोकांबद्दल बोलतो, तोच जनतेच्या मताने जिंकावा. जुलै महिन्यातील आंदोलनानंतर आमची ही अपेक्षा पूर्ण झाली.’ ‘गेल्या १७ वर्षांत बीएनपीने अनेक अडचणींचा सामना केला आहे. तारिक रहमान स्वतःही या काळातून गेले आहेत. इतक्या अडचणींनंतर ते देशाचे नेतृत्व करण्यासाठी येत आहेत. ही आमच्यासाठी आशेची गोष्ट आहे. त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात चांगल्या आणि स्वच्छ राजकारणाचे वचन दिले आहे. आम्ही इच्छितो की त्यांनी त्यांची वचने पूर्ण करावीत.’ ‘जमातच्या पराभवाचा प्रश्न आहे, लोकांनी त्यांना ओळखले आहे. मतांद्वारे आपले उत्तर दिले आहे. ढाका विद्यापीठाच्या निवडणुकीनंतर असे वाटले होते की ते राष्ट्रीय निवडणुकांवरही परिणाम करू शकतात. तसे झाले नाही.’ मालिहा खान पुढे म्हणतात, ‘आंदोलनात जे लोक पुढे होते, ते जनतेसाठी खंबीरपणे उभे राहतील अशी अपेक्षा होती. ते भ्रष्टाचार आणि जुलूमशाहीविरुद्ध बोलतील. नंतर त्यापैकी अनेकांवर वेगवेगळे आरोप झाले. काहीजण वादातही अडकले. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नावाचा नवीन पक्ष स्थापन झाला, पण तो लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही.’ ‘यामुळे प्रश्न निर्माण होतो की, ते खरोखरच जुलै आंदोलनाचा खरा आवाज होते का? कदाचित लोकांनी त्यांच्यामार्फत त्या आंदोलनाला स्वीकारले नाही. निवडणुकीच्या निकालांवरून असे दिसते की लोकांनी दुसऱ्या कोणावर तरी विश्वास ठेवला आहे. आम्हाला आशा आहे की यावेळी जे लोक संसदेत जातील, ते खरोखरच जनतेसाठी काम करतील.’
तारीख : 1 जानेवारी काय झाले : भुवनेश्वर-नवी दिल्ली तेजस राजधानी एक्सप्रेसमधील एका प्रवाशाने व्हिडिओ शेअर करून सांगितले की, दिलेले अन्न ‘माणसांच्या खाण्यायोग्य नाही’, यामुळे फूड पॉयझनिंगचा धोका आहे. तारीख : 23 जानेवारी काय झाले : कामाख्या-हावडा वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना अर्धवट शिजवलेले तांदूळ, कडक पोळ्या आणि खूप कमी प्रमाणात अन्न दिले गेले. तारीख : 25 जानेवारी काय झाले : कामाख्या-हावडा वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना दुर्गंधीयुक्त डाळ दिली गेली. गोंधळ झाल्यानंतर केटरिंग कर्मचाऱ्यांनी स्वतः अन्न फेकून दिले. तारीख : 7 मे काय झाले : 15 रुपयांची पाण्याची बाटली प्रवाशाला 20 रुपयांना दिली गेली. त्यांनी याची ऑनलाइन तक्रार केली. यानंतर पॅन्ट्री कार कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला मारहाण केली. अशा प्रकारच्या 6645 तक्रारी IRCTC ला 2024-25 मध्ये मिळाल्या. बहुतेक प्रकरणे मेनूमधून वस्तू गायब होणे, जास्त शुल्क आकारणे, शिळे अन्न, खराब अन्न, कमी प्रमाण यासंबंधी आहेत. दैनिक भास्करने तपासणी करून जाणून घेतले की रेल्वेच्या प्रणालीत गडबड कुठे आहे आणि प्रीमियम गाड्यांमध्ये तर प्रवाशांकडून आगाऊ पैसे घेतले जात आहेत, तरीही चांगली सेवा का मिळत नाहीये. कोण-कोण भागीदार आहेत IRCTC : कंत्राट, देखरेख आणि कारवाईची जबाबदारी निविदा घेणाऱ्या कंपन्या : जेवण बनवणे, वाहतूक, सेवा देण्याची जबाबदारी रेल्वे बोर्ड : धोरण आणि प्रणालीत सुधारणा करण्याची जबाबदारी प्रवासी : पैसे दिल्यानंतरही चांगली सेवा नाही प्रवाशांसोबत कुठे, काय गडबड, कोण दोषी, वाचा… पहिला जबाबदार : IRCTC मक्तेदारी थांबवत नाहीत, तक्रारींनंतरही कंत्राट रद्द नाही IRCTC ट्रेनमध्ये जेवणाची सुविधा पुरवण्याचे काम खाजगी कंपन्यांमार्फत करते. 5 वर्षांसाठी कंत्राटे दिली जातात. कामगिरीनुसार 2 वर्षांची मुदतवाढ मिळते. राजधानी, शताब्दी, दुरंतो, वंदेभारत, तेजस यांसारख्या प्रीमियम गाड्यांची बहुतेक कंत्राटे आरके ग्रुप या एकाच कंपनीला देण्यात आली आहेत. क्लस्टर ए मध्ये येणाऱ्या 265 गाड्यांपैकी 218 गाड्यांची कंत्राटे आरके ग्रुपकडे आहेत. तर या ग्रुपविरुद्ध रेल्वेला 2021 ते 2024 दरम्यान 1910 तक्रारी मिळाल्या. याव्यतिरिक्त, क्लासिक कॅटर्सविरुद्ध 1439, पी शिवा प्रसादविरुद्ध 1208, आरके ग्रुपच्याच वृंदावन फूड प्रोडक्ट्सविरुद्ध 1196 आणि एक्सप्रेस फूड सर्व्हिसेसविरुद्ध 1162 तक्रारी मिळाल्या. रेल्वेच्या धोरणात कमाल मर्यादा (सिलिंग लिमिट) नसल्यामुळे एकाच ग्रुपची मक्तेदारी आहे, ज्यामुळे स्पर्धा संपली आहे. 2017 मध्ये संसदेत सादर केलेल्या CAG च्या अहवालातही म्हटले आहे की, कमाल मर्यादा (सिलिंग लिमिट) नसल्यामुळे रेल्वेने मक्तेदारीला प्रोत्साहन दिले. दुसरा जबाबदार : कंत्राट घेणाऱ्या कंपन्या अनेक पट जास्त देऊन टेंडर घेतले, आता कमाई कशी कोणत्याही ट्रेनमधून वर्षभरात होणाऱ्या विक्रीनुसार IRCTC त्या ट्रेनसाठी एक राखीव किंमत निश्चित करते. टेंडर घेण्यासाठी हे किमान परवाना शुल्क असते. म्हणजे यापेक्षा कमी दरात टेंडर मिळणार नाही. सध्या हे 15 टक्के आहे. तपासणीत असे समोर आले की, टेंडर मिळवण्याच्या स्पर्धेत कंपन्या 70 टक्क्यांपर्यंत राखीव किंमत जमा करत आहेत. जुलै 2017 मध्ये संसदेत सादर केलेल्या CAG च्या अहवालात असेही म्हटले होते की, ‘रेल्वेने अनेक कॅटरिंग कंत्राटे खूप जास्त बोलीवर (परवाना शुल्क) दिली, जी व्यवहार्य नव्हती.’ ‘कंत्राटदार कंत्राट मिळवण्यासाठी राखीव किमतीपेक्षा खूप जास्त बोली लावत होते, पण रेल्वेकडे अशा ‘अवास्तव’ बोली थांबवण्यासाठी स्पष्ट नियम नव्हते.’ ‘याचा परिणाम असा झाला की विक्रेत्यांवर खर्चाचा दबाव वाढला आणि त्यांनी निकृष्ट दर्जाचे अन्न देणे, प्रमाण कमी करणे किंवा प्रवाशांकडून जास्त पैसे वसूल करणे यांसारखे मार्ग अवलंबले.’ आमच्याकडे IRCTC चे 24 एप्रिल 2024 चे लेटर ऑफ अवॉर्ड म्हणजेच LOA आहे. यात 10 गाड्यांचा उल्लेख आहे. या गाड्यांची कॅटरिंग 8 सप्टेंबर 2026 ते 14 जुलै 2029 पर्यंत आरके ग्रुपशी संबंधित वृंदावन फूड प्रोडक्ट्सला सोपवण्यात आली आहे. रेल्वेने स्वतः ठरवलेल्या वार्षिक शुल्कापेक्षा 70 टक्के जास्त रक्कम जमा करून टेंडर घेण्यात आले आहे. अशा परिस्थितीत प्रश्न असा निर्माण होतो की, कंपनी उर्वरित 30 टक्के रकमेतून चांगले अन्न कसे बनवेल, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि स्वतःचा नफा कसा काढेल. नफा कमावण्यासाठी ठेकेदार जास्त शुल्क आकारतात, मेनूमधून वस्तू गायब करतात, गुणवत्तेशी तडजोड करतात, एका उदाहरणाने समजून घ्या प्रवाशांची लूट कशी… ट्रेनमध्ये तुम्हाला मिळणाऱ्या थाळीतून एक छोटीशी वस्तू गायब करूनच IRCTC चे ठेकेदार कोट्यवधींचा नफा कमावत आहेत. IRCTC ने मान्य केले की एकाधिकारामुळे गुणवत्ता मिळत नाहीये IRCTC ने 28 नोव्हेंबर 2025 रोजी रेल्वे मंत्रालयाला एक पत्र लिहून नवीन कॅटरिंग धोरणाशी संबंधित आव्हाने सांगितली. याच्या मुद्दा क्रमांक-5 मध्ये म्हटले आहे की, कमाल मर्यादा (सिलिंग लिमिट) नसल्यामुळे काही फर्म/ कंपन्यांविरुद्ध मक्तेदारीच्या (मोनोपॉली) तक्रारी आहेत. जास्त परवाना शुल्क देऊन निविदा (टेंडर) घेण्यात आल्या, यामुळे आता खाण्याच्या गुणवत्तेशी तडजोड करत आहेत, आणि निविदेच्या अटी व नियमांचे पालन करू शकत नाहीत. तिसरा जबाबदार : रेल्वे बोर्ड नियम मोडले जात आहेत, तरीही कारवाई नाही धोरण आणि देखरेखीची मुख्य जबाबदारी रेल्वे बोर्डाची आहे. धोरण बनवणे, मेन्यू, दर निश्चित करणे, IRCTC वर देखरेख ठेवणे, गुणवत्ता तपासणे आणि तक्रारींवर कारवाई करण्याची जबाबदारी बोर्डाचीच आहे. 2010 च्या धोरणात हा नियम होता की, कोणताही कंत्राटदार एकूण कंत्राटाच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त घेऊ शकत नाही. पण मोठ्या समूहांनी वेगवेगळ्या नावांनी कंपन्या स्थापन करून हा नियम मोडला. 2017 च्या धोरणात रेल्वेने कमाल मर्यादेचा (सिलिंग लिमिट) उल्लेखच केला नाही, म्हणजेच कमाल मर्यादा (सिलिंग लिमिट) काढून टाकण्यात आली. रेल्वेने 14 नोव्हेंबर 2023 रोजी धोरणाशी संबंधित नवीन माहितीमध्ये सांगितले की, गाड्यांचे क्लस्टर आणि बेस किचनला दोन गट अ आणि ब मध्ये विभागले आहे. एक क्लस्टर म्हणजे – काही गाड्यांचा एक समूह. एका क्लस्टरमध्ये 10 जोड्या गाड्या असतात. क्लस्टर अ मध्ये प्रीमियम प्रीपेड गाड्या आणि पॅन्ट्री कार असलेल्या मेल/एक्सप्रेस गाड्या आहेत. असे सांगण्यात आले की, जर क्लस्टरमध्ये 5 जोड्या गाड्या समाविष्ट असतील तर यामध्ये मेल/एक्सप्रेस गाडीसोबत एक प्रीमियम प्रीपेड गाडी समाविष्ट असू शकते. जर क्लस्टरमध्ये 6 ते 10 जोड्या गाड्या असतील तर प्रीमियम प्रीपेड गाड्यांची संख्या जास्तीत जास्त दोन असू शकते. पण रेल्वेने स्वतःच या नियमाचे पालन केले नाही. एकाच कंपनीला एका मार्गावर 10 पैकी 7 प्रीमियम गाड्या देण्यात आल्या. भास्करकडे असलेल्या एका मार्गाच्या निविदेमध्ये 10 पैकी 7 प्रीमियम गाड्या दिसत आहेत. आयआरसीटीसीने रेल्वे बोर्डाने बनवलेल्या धोरणाचेच अनेक वेळा उल्लंघन केले. असे असूनही बोर्डाने कोणताही हस्तक्षेप केला नाही. खराब जेवणाच्या 6645 तक्रारी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सांगितले की, 2024-25 मध्ये IRCTC ला 6645 खराब दर्जाच्या जेवणाच्या 6645 तक्रारी मिळाल्या. यापैकी 1341 प्रकरणांमध्ये अन्न पुरवठादारांवर दंड आकारण्यात आला. 2995 प्रकरणांमध्ये ताकीद देण्यात आली. 1547 प्रकरणांमध्ये सल्ला देण्यात आला. 762 प्रकरणांमध्ये इतर आवश्यक कारवाई करण्यात आली. IRCTC ला प्रश्न पाठवले – भास्करने या संपूर्ण प्रकरणात IRCTC ला प्रश्न पाठवले आहेत, परंतु अद्याप उत्तर आलेले नाही. उत्तर येताच बातमीत अपडेट केले जाईल. आम्ही आरके ग्रुपचे सीईओ आणि प्रेसिडेंट कैलाश अग्रवाल यांच्याशीही संपर्क साधला. त्यांनी मीटिंगमध्ये असल्याचे कारण देत नंतर बोलण्याचे सांगितले.
कांजूरमार्ग येथे पादचारी पुलाच्या गर्डरच्या कामासाठी ब्लॉक
मुंबई : मध्य रेल्वेने शनिवारी आणि रविवारी विशेष मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेच्या कांजूर रेल्वे पादचारी उड्डाणपूलाच्या गर्डर लाँचिगसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषणा करण्यात आली आहे. या पॉवरब्लॉकमुळे मध्य रेल्वेवर काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी रेल्वे प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.https://prahaar.in/2026/02/13/block-on-western-railway-including-central-harbour/मध्य रेल्वेद्वारे कांजूरमार्ग रेल्वे स्थानक येथे कल्याण बाजूच्या दिशेने कि.मी. २४/१३–१४ दरम्यान पादचारी उड्डाणपुलासाठी ६ मीटर रुंदीचे ४ गर्डर, रोड क्रेनच्या सहाय्याने लाँच करण्यात येणार आहे. यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. मध्य रेल्वेकडून शनिवार १४ ते रविवार १५ फेब्रुवारी २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.या ब्लॉकमुळे १५ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१२ वाजता कर्जतसाठी सुटणारी गाडी माटुंगा रेल्वे स्थानक ते मुलुंड रेल्वे स्थानक दरम्यान डाउन जलद मार्गावरून वळविण्यात येईल. ही लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर येथे थांबणार नाही. त्यामुळे तिन्ही स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या स्टेशनवर उतरावे लागणार आहे.ब्लॉकमुळे उपनगरीय गाड्यांवरील परिणाम होणार आहे. या ब्लॉकमुळे दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १५ फेब्रुवारी २०२६ रोजी ठाण्यासाठी ००.२४ वाजता सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. तसेच १५ फेब्रुवारी २०२६ रोजी ठाण्यातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी ०४.०४ वाजताची गाडी रद्द करण्यात आली आहे.
Valentine's Day Wishes : व्हॅलेंटाइन डे २०२६ निमित्त पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश
Happy Valentine's Day 2026 Wishes In Marathi । मुंबई : व्हॅलेंटाइन डे म्हणजे मनातल्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा देणे म्हणजे नात्यातला गोडवा वाढवणे. काही वेळा चार ओळींची कविता सुद्धा मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी पुरेशी ठरते. व्हॅलेंटाइन डे निमित्त तुमच्या आवडत्या व्यक्तीला खास मराठी शुभेच्छा संदेश पाठवा.१. तुझं हसणं म्हणजे सकाळचा सूर्यतुझी साथ म्हणजे आयुष्याचं सौख्यहातात हात घेऊन चालू या पुढेप्रेमदिन साजरा करू आनंदाने खुलेहॅपी व्हॅलेंटाइन डे 2026!Happy Valentine's Day 2026२. तुझ्या प्रेमाचा गंध दरवळतो श्वासातमन हरवून जाते तुझ्या मधुर हास्यातजीवन फुलून येते तुझ्या सहवासातव्हॅलेंटाइन दिनी वचन देऊया साथ आयुष्यभरातहॅपी व्हॅलेंटाइन डे 2026!Happy Valentine's Day 2026३. तू आहेस म्हणून दिवस उजळतोतुझ्या नावानेच प्रत्येक क्षण सजतोहातात हात घेऊन स्वप्न रंगवू याप्रेमदिनाच्या शुभेच्छा मनापासून तुलाहॅपी व्हॅलेंटाइन डे 2026!Happy Valentine's Day 2026४. तुझ्या डोळ्यांत सापडली माझी दुनियातुझ्या हसण्यात उमलली माझे आनंदसाथ तुझी असू दे जन्मोजन्मीप्रेमदिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये सखीहॅपी व्हॅलेंटाइन डे 2026!Happy Valentine Day 2026५. गुलाबाच्या पाकळ्यांसारखं नातं आपलंसुगंधी आणि नाजूक असं प्रेम आपलंकाळाच्या ओघात वाढत जावो गोडवाहीच प्रेमदिनाची खास भावनाहॅपी व्हॅलेंटाइन डे 2026!Happy Valentine's Day 2026६. चांदण्यांनी सजलेली ही राततुझ्या आठवणींनी भरलेली प्रत्येक बातमन सांगते फक्त तुझंच नावहॅपी व्हॅलेंटाइन डे 2026!Happy Valentine's Day 2026७. तुझ्या सहवासात मिळे शांततातुझ्या प्रेमात सापडे खरी संपन्नतातूच आहेस माझ्या आयुष्याची शानहॅपी व्हॅलेंटाईन डे, माझी जानहॅपी व्हॅलेंटाइन डे 2026!Happy Valentine's Day 2026८. मनाच्या कोपऱ्यात तुझीच जागातुझ्याविना जीवन वाटे भकासहसत राहा नेहमी माझ्यासाठीप्रेमदिनाच्या शुभेच्छा खास तुझ्यासाठीहॅपी व्हॅलेंटाइन डे 2026!Happy Valentine's Day 2026९. तुझ्या स्पर्शात आहे जादू निराळीमनात फुलते भावना कोवळीतुझ्या प्रेमाचा रंग चढू दे असाकी आयुष्यभर न फिका होवो कधीच असाहॅपी व्हॅलेंटाइन डे 2026!Happy Valentine's Day 2026१०. तूच माझं स्वप्न, तूच माझी आसतुझ्याविना अपूर्ण प्रत्येक श्वासप्रेमाच्या या सुंदर क्षणीतुला देतो मनापासून शुभेच्छा प्रिये राणीहॅपी व्हॅलेंटाइन डे 2026!Happy Valentine's Day 2026
18 नोव्हेंबर 2022. उत्तर कोरियाच्या राजधानीत ‘ह्वासोंग-17’ आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण होते. या कार्यक्रमात हुकूमशहा किम जोंग उनचा हात धरून 9 वर्षांची एक गुबगुबीत मुलगी दिसली. तिने पांढऱ्या फर कॉलरचा कोट, काळी पॅन्ट आणि केसांची पोनीटेल बांधली होती. उत्तर कोरियाई माध्यमांनी तिला ‘डियर डॉटर’ म्हटले. त्यानंतर गेल्या 3 वर्षांत प्रत्येक मोठ्या प्रसंगी ती किम जोंग उनसोबत दिसू लागली. आता बातमी आहे की किमची मुलगी किम जू ए हिला आपली उत्तराधिकारी म्हणून निवडले गेले आहे. ती उत्तर कोरियाची पहिली महिला हुकूमशहा असेल. किम जोंगने 13 वर्षांच्या मुलीला उत्तराधिकारी का बनवले, किम जू ऐनची कहाणी काय आहे आणि तिचे हुकूमशहा बनण्याचे प्रशिक्षण कसे सुरू आहे; आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया… प्रश्न-1: किम जोंगला किती मुले आहेत आणि त्याने 13 वर्षांच्या मुलीलाच वारसदार म्हणून का निवडले?उत्तर: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन आपले कौटुंबिक जीवन खूप खाजगी ठेवतो. 2011 मध्ये हुकूमशहा बनल्यानंतर, त्यांची फक्त एक मुलगी किम जू ऐनच माध्यमांसमोर दिसली आहे. किमने कधीही सांगितले नाही की किम जू ऐनशिवाय त्याला दुसरे कोणतेही मूल आहे की नाही. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेनुसार, किम जोंग यांना आणखी दोन मुले असू शकतात, ज्यात एक मुलगा देखील आहे. काही अहवालानुसार, किम जोंग उनच्या गुप्त मुलाचा जन्म 2011 मध्ये झाला होता. तथापि, याची कधीही पुष्टी होऊ शकली नाही. जानकारांचे मत आहे की, जर किम जोंग उनला मुलगा नसेल, तर ते आपल्या मुलीला उत्तराधिकारी बनवण्यासाठी तयार करत आहेत. किम यांना असे नको आहे की, मुलगा नसल्यामुळे उत्तर कोरियामध्ये त्यांच्या कुटुंबाची चालत आलेली सत्ता संपुष्टात यावी. दक्षिण कोरियाची गुप्तचर संस्था नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिस (NIS) नुसार, किम जोंग उनने आपली मुलगी किम जू ऐ हिला उत्तराधिकारी बनवण्याची पूर्ण तयारी केली आहे. प्रश्न-2: उत्तर कोरियाची पुढील शासक किम जू ऐनची कथा काय आहे?उत्तर: किम जू ऐनचे नाव पहिल्यांदा 2013 मध्ये समोर आले, जेव्हा अमेरिकन बास्केटबॉल स्टार डेनिस रॉडमनने आपल्या उत्तर कोरियाच्या प्रवासानंतर सांगितले होते की किम यांना एक मुलगी आहे, जिचे नाव किम जू ऐन आहे. मात्र, त्यांच्याबद्दल अधिकृतपणे खूप कमी माहिती उपलब्ध आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार… प्रश्न-3: किम जू एला शासनासाठी कसे तयार केले जात आहे?उत्तर: किम जू एला सत्तेत आणण्यासाठी त्यांची सार्वजनिक प्रतिमा तयार करण्यापासून ते धोरण निर्मितीमध्ये सामील करण्यापर्यंत अनेक महत्त्वाची पावले उचलली जात आहेत… किमसोबत प्रत्येक कार्यक्रमात असते जू ए परदेश दौऱ्यांवर अधिकारी आणि नेत्यांसोबत भेटी अधिक शक्तिशाली दाखवण्याचा प्रयत्न लष्करी नियोजनात समाविष्ट करणे मीडियामध्ये उपस्थिती वाढवणे भारतीय थिंकटँक ORF मधील स्ट्रॅटेजिक स्टडीजचे तज्ञ अभिषेक शर्मा यांच्या मते, उत्तर कोरियामध्ये 3 टप्प्यांमध्ये सत्ता हस्तांतरित केली जाते. सर्वात आधी प्रतीकात्मकपणे व्यक्तीला वारसदार म्हणून सादर केले जाते, नंतर राजकीय प्रभाव वाढतो आणि निर्णय घेण्याची शक्ती दिली जाते. प्रश्न-4: किम जू ए उत्तर कोरियाची सुप्रीम लीडर बनते, तर तिच्याकडे कोणत्या शक्ती असतील?उत्तर: किम जू ए उत्तर कोरियाची सुप्रीम लीडर बनते, तर तिच्याकडे त्याच शक्ती असतील, ज्या सध्या तिचे वडील किम जोंग उन यांच्याकडे आहेत… राजकीय शक्ती संसदेचे निर्णय बदलू शकतेउत्तर कोरियामध्ये सुप्रीम लीडरचा आदेश म्हणजेच डिक्री सामान्य कायद्यांपेक्षा वरचढ मानली जाते. पदभार स्वीकारल्यानंतर जू ए कडेही ही ताकद येईल. संसद कोणताही नियम बनवो, अंतिम निर्णय घेणे त्यांच्या हातात असेल. सैन्य आणि अण्वस्त्रांची कमानकिम जोंग इल यांच्या काळात सैन्याला राजकीय व्यवस्थेच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले होते. त्यांचे पुत्र किम जोंग उन यांनीही सुप्रीम कमांडर बनून कोरियन पीपल्स आर्मी (KPA) आणि अण्वस्त्र कार्यक्रमावर नियंत्रण ठेवले. आज उत्तर कोरिया लष्करी क्रमवारीत 31व्या स्थानावर आहे.जर किम जू ए सर्वोच्च पदावर पोहोचल्या, तर त्या घटनात्मकदृष्ट्या सैन्याच्या कमांडर-इन-चीफ बनू शकतात आणि देशाच्या अण्वस्त्रांवर अंतिम नियंत्रण ठेवू शकतात. प्रश्न-5: किम जोंग उन इतक्या लवकर उत्तराधिकारी का तयार करत आहेत?उत्तर: 42 वर्षीय किम जोंग उन यांच्या या निर्णयामागे अनेक कारणे असू शकतात… किम अनेक आजारांनी त्रस्त आहेतदक्षिण कोरियाई मीडियानुसार, किम जोंग उन त्यांच्या जास्त वजनामुळे अनेक आरोग्य समस्यांनी त्रस्त आहेत. ते खूप धूम्रपान करतात आणि कामाच्या ताणामुळे तणावात राहतात.त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची तक्रार आहे. किमच्या कुटुंबात त्यांचे वडील आणि आजोबांचे निधन हृदयविकाराने झाले होते. 2020 मध्ये असे अहवाल आले होते की त्यांचीही हृदय शस्त्रक्रिया झाली आहे.सप्टेंबर 2025 मध्ये जेव्हा किम चीन दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांच्या अंगरक्षकांनी बैठकीनंतर खुर्च्या-टेबल सॅनिटाइज केले होते, जेणेकरून त्यांच्या डीएनएचे सर्व ट्रेस मिटवता येतील. तज्ञांनुसार हे त्यांच्या आरोग्याशी संबंधित माहिती लपवण्यासाठी केले गेले होते. जनता मुलीला पसंत करतेक्युबातील उत्तर कोरियाच्या दूतावासात असलेले मुत्सद्दी ली इल-क्यू यांच्या मते, उत्तर कोरियाची जनता जू ऐला उत्तराधिकारी मानणार नाही कारण ती एक मुलगी आहे.उत्तर कोरियामध्ये यापूर्वी कोणतीही महिला सुप्रीम लीडर राहिलेली नाही. तिथला समाज पितृसत्तेवर अधिक विश्वास ठेवतो. त्यामुळे किम जोंग आतापासूनच जनतेमध्ये आपल्या मुलीची एक लीडर म्हणून प्रतिमा तयार करू इच्छितो. किम जोंग 29 व्या वर्षी शासक बनले होतेकिम जोंग उन यांचे वडील जोंग इल यांचे निधन 2011 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने झाले होते. त्यावेळी जोंग उन फक्त 29 वर्षांचे होते. तोपर्यंत त्यांना उत्तराधिकारी बनवण्यात आले होते, पण त्यांच्या हातात सत्ता अचानक आली. किम आपल्या मुलीलाही अशाच एखाद्या परिस्थितीसाठी तयार करत आहेत. सत्तेसाठी अंतर्गत कलह होऊ नयेउत्तर कोरियामध्ये किम जोंग उनचे कुटुंबच सत्तेत राहिले आहे. किम यांना वाटते की त्यांच्यानंतरही सत्ता कुटुंबातच राहावी.किमच्या वडिलांनी मोठा मुलगा किम जोंग नामऐवजी किम जोंग उनला उत्तराधिकारी बनवले होते. 2017 मध्ये त्यांची हत्या झाली. आता किमची एक धाकटी बहीण किम यो जोंग आहे, जी राजकारणात खूप सक्रिय आहे.तज्ञांचे मत आहे की उत्तराधिकारीवरून कोणताही अंतर्गत कलह होऊ नये म्हणून किम आतापासूनच मुलीला सत्तेसाठी तयार करत आहेत. प्रश्न-6: उत्तर कोरियामध्ये यापूर्वी कोणती महिला सर्वोच्च नेता राहिली आहे का?उत्तर: उत्तर कोरियामध्ये आजपर्यंत कोणतीही महिला सर्वोच्च नेता राहिलेली नाही. 1948 मध्ये उत्तर कोरिया एक स्वतंत्र देश बनला. तेव्हापासून आतापर्यंत सत्ता किम कुटुंबातील पुरुष सदस्यांच्या हातातच राहिली आहे. आधी किम इल-सुंग, नंतर किम जोंग-इल आणि त्यानंतर किम जोंग-उन. तथापि, याचा अर्थ असा नाही की उत्तर कोरियाच्या राजकारणात महिलांची कोणतीही भूमिका राहिलेली नाही. किम जोंग उनची धाकटी बहीण किम यो जोंग वर्कर्स पार्टीमध्ये वरिष्ठ पदांवर राहिली आहे.त्याचप्रमाणे, किम क्यॉन्ग-हुई, ज्या किम जोंग-उन यांच्या आत्या आहेत, त्यांनी दीर्घकाळ पक्षाच्या महत्त्वाच्या पदांवर काम केले आणि अंतर्गत वर्तुळात त्यांचा प्रभाव होता. उत्तर कोरियाच्या पारंपरिक आणि पुरुषप्रधान समाजाला किम यो-जोंग सारख्या व्यक्तींच्या सक्रिय भूमिकेने अंशतः आव्हान दिले आहे. जर भविष्यात किम कुटुंबातील एखाद्या महिलेला नेतृत्वासाठी पुढे आणले गेले, तर हा उत्तर कोरियाच्या राजकीय परंपरेत एक मोठा बदल असेल.
PMPML News : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीएलचे नियोजन; प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेण्याचे आवाहन.
मुंबई (सुहास शेलार) : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या रोखठोक आणि धडाकेबाज शैलीसाठी ओळखले जाणारे मंत्री नितेश राणे सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री म्हणून त्यांनी पारंपरिक समजल्या जाणाऱ्या या खात्यात तंत्रज्ञानाचा ‘हाय-टेक’ स्पर्श देत परिवर्तनाची नवी दिशा दाखवली आहे. प्रशासनात गतिमानता, पारदर्शकता आणि मच्छीमारांच्या जीवनमानातील सुधारणा, या तिन्ही आघाड्यांवर त्यांनी एकाच वेळी मोहीम उघडली आहे‘मत्स्यवाणी’चा अभिनव प्रयोगसरकारी यंत्रणा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांचा संगम अजूनही अनेकांसाठी दूरची गोष्ट आहे. मात्र, नितेश राणे यांनी ‘व्हॉईस गव्हर्नन्स’चा मार्ग स्वीकारत ‘मत्स्यवाणी’ हा अभिनव प्लॅटफॉर्म पुढे आणला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. ‘मत्स्यवाणी’च्या माध्यमातून मच्छीमार, व्यापारी आणि अधिकारी यांच्यातील संवाद सुलभ होणार आहे. शिवाय अर्ज, परवानग्या, अनुदान किंवा तक्रारी, या सर्व प्रक्रियांना डिजिटल गती मिळणार आहे. त्यामुळे फाईलींच्या ढिगाऱ्यात अडकलेले प्रश्न आता एआयच्या सहाय्याने जलद मार्गी लागतील. पारदर्शकता वाढवून भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.‘ब्ल्यू इकॉनॉमी’ला चालनामुंबईच्या मासेमारी व्यवसायाला जागतिक पातळीवर नेण्याच्या दृष्टीने मरोळ (अंधेरी) येथे १३८ कोटी रुपयांच्या अत्याधुनिक घाऊक मासळी बाजाराला मंजुरी मिळवण्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी प्रचंड मेहनत घेतली. या सहा मजली इमारतीत कोल्ड स्टोरेज, सौरऊर्जा प्रकल्प, आधुनिक सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था आणि निर्यातक्षम सुविधा उभारण्यात येणार आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या ‘ब्ल्यू इकॉनॉमी’चा आधारस्तंभ ठरणार आहे. त्याचप्रमाणे मासळी प्रक्रिया, साठवणूक आणि निर्यात यांना एकाच छताखाली आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने स्थानिक मच्छीमारांना थेट फायदा होणार आहे.किनारपट्टीसाठी नवे तंत्रज्ञानकिनारी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई हा अनेक वर्षांचा प्रश्न आहे. यावर उपाय म्हणून ‘अॅटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन’ या तंत्रज्ञानाचा पायलट प्रकल्प राबवण्याचे संकेत मंत्री राणे यांनी दिले आहेत. हवेतल्या आर्द्रतेपासून पिण्यायोग्य पाणी निर्माण करणारे हे तंत्रज्ञान मच्छीमार वस्त्यांसाठी वरदान ठरू शकते. जलसुरक्षा आणि पर्यावरणपूरक उपाय या दोन्ही बाबींचा संगम साधणारा हा प्रयोग यशस्वी ठरल्यास राज्यातील इतर किनारी जिल्ह्यांतही तो राबवला जाऊ शकतो.मच्छीमारांसाठी आर्थिक आधारसागरी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना असोत किंवा मासेमारी बंद असलेल्या कालावधीत दिले जाणारे अनुदान, प्रत्येक निर्णयात तळागाळातील मच्छीमार केंद्रस्थानी ठेवले जात आहेत. सुमारे २ हजार ८१६ लाभार्थ्यांना उपजीविका सहाय्य देण्याचा निर्णय सामान्य कुटुंबांसाठी दिलासादायक ठरला आहे.‘हाय-टेक’ दृष्टी आणि मातीशी नाळमत्स्यव्यवसाय विभाग हा पारंपरिक आणि कागदी प्रक्रियांमध्ये अडकलेला असल्याची प्रतिमा आता बदलू लागली आहे. डिजिटल साधने, एआय तंत्रज्ञान आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांच्या साहाय्याने या खात्याला विकासाच्या महामार्गावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकीकडे तंत्रज्ञानाची कास, तर दुसरीकडे मच्छीमारांशी असलेले थेट संवादाचे नाते, या दुहेरी बळावर नितेश राणे आज मत्स्यव्यवसाय विभागाचे खरे अर्थाने ‘हाय-टेक’ कॅप्टन ठरत आहेत. महाराष्ट्राच्या सागरी अर्थव्यवस्थेला नवी झेप देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे राज्यभरातून कौतुक होत आहे.
Pune News : २.५ TMC पाणी वाचणार! खडकवासला बोगद्याचं काम सुसाट; ‘बुमर’मशिनचा धडाका सुरू
Pune News : कात्रज आणि वडकी येथूनही लवकरच कामाला सुरुवात; ३ वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे जलसंपदा विभागाचे उद्दिष्ट.
प्रेम…ना ते शब्दांच्या चौकटीत सामावतं, ना व्याख्यांच्या बंधनांत अडकतं, ना ते गुलाब पाकळ्यांच्या नाजुकतेत सापडतं, ना भेटवस्तूंच्या झगमगाटात, ते शांतपणे उमलतं दोन मनांच्या विश्वासात, आणि न बोललेल्या भावनांच्या स्पर्शात. आज व्हॅलेंटाईन डे... प्रेमाचा दिवस...पण खरं पाहिलं तर प्रेमाला एखाद्या दिवसाची गरज असते का? कदाचित नाही. तरीही, हा दिवस मनात साठवून ठेवलेल्या भावनांना व्यक्त करण्याचा एक सुंदर बहाणा ठरतो. प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीकडे ओढ लागते आणि न सांगितलेल्या भावनांचा प्रवाह आज शब्दांच्या रूपाने बाहेर पडताना दिसतो. असं म्हणतात की, पूर्वीच्या काळातील प्रेम आणि आजच्या पिढीतील प्रेम यामध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे. त्या काळी प्रेम पत्रांतून जपलं जायचं, प्रतीक्षेच्या दीर्घ सावल्यांमध्ये ते अधिक गहिरं व्हायचं. आजच्या काळात ते स्क्रीनच्या उजेडात, संदेशांच्या देवाणघेवाणीत आणि क्षणांच्या वाटाघाटीत जगताना दिसतं. पण स्वरूप बदललं म्हणून सार बदलत नाही. कारण प्रेमाचा आत्मा काळाच्या चौकटीपलीकडचा असतो. तो तेवढाच जिवंत, तेवढाच उत्कट राहतो. मग प्रश्न उरतो प्रेम म्हणजे नेमकं काय? प्रेम म्हणजे केवळ आकर्षणाचा क्षणभंगुर स्पर्श नाही...ते समजुतीचा आणि स्वीकाराचा दीर्घ प्रवास आहे. प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचं समाधान शोधणं. प्रेम म्हणजे स्वातंत्र्य देत जवळ राहणं आणि अंतर असूनही साथ न सोडणं. ती मालकी नसून सहप्रवास आहे, ते बंधन नसून विस्तार आहे. प्रेम म्हणजे उमललेलं फूल जे सूर्याचा प्रकाश पडताच निसर्गाला सुंदर बनवते. प्रेम म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर प्रियकर आणि प्रेयसी उभी राहते. पण प्रेम म्हणजे एवढंच का? तर नाही. यावर बोलताना कार्तिक जाधव म्हणतो की, 'आजकालची प्रेमाची परिभाषा थोडी वेगळी झाली आहे. कोणी पण प्रेम म्हणलं की एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यातच प्रेम असत असं समजतात. पण जर मला विचाराल तर माझ्यासाठी प्रेम म्हणजे माझे आई - वडील आहेत. माझ्यासाठी माझी व्हॅलेंटाईन माझी आई आहे. प्रेम म्हणजे माझ्यासाठी एक समजून घेण्याची भावना आहे. मग तुम्ही ते आई - वडील , मित्र - मैत्रीण किंवा तुमचा जोडीदार असू शकतो. फक्त समजून घेता आलं पाहिजे तेच प्रेम आणि तीच प्रेमाची व्याख्या आहे.' GEN -Z म्हणजे नवीन जनरेशन आणि नवीन म्हणलं की जुने विचार मागे सारून नवीन गोष्टी स्वीकाराव्या लागतातच. असा काहीसा मानस समाजाचा कुठेतरी असतो. पण आजही नवीन पिढीत कुठेतरी जुन्याचा आर्क दिसून येतो हे कार्तिकच्या भावनेतून आपल्याला समजून येते. यावरच बोलताना शांतनू खुजे म्हणतो की, 'माझ्यासाठी प्रेम म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही. मला ज्या गोष्टीतून आनंद भेटतो ते म्हणजे प्रेम आहे. म्हणजे बघा आज मला खूप एकटं वाटतंय. कारण माझ्याकडे माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी कोणतीही व्यक्ती नाहीये. त्यामुळे मी जर चित्र काढलं किंवा मग एखादी गोष्ट केली ज्यातून मला आनंद भेटतो तेही एक प्रकारचं प्रेम असत. आता पूर्वीसारखं काही राहिलेलं नाहीये. पूर्वी कस कोणाचं लग्न झालं किंवा कोणाचं कोणावरती प्रेम आहे हे पटकन समजायचं नाही. कारण तिथे दिखावा नव्हता. मात्र आता आम्ही काय करू शकतो, असा दिखावा हा सोशल मीडिया म्हणा किंवा इतर म्हणा त्यातून तो दाखवला जातो. मला प्रेमाचा तेवढा अनुभव नाही पण माझी एक मैत्रीण आहे. तिच्याशी माझे भांडण झालं तर मग आताच्या काळात खूप वाईट वाटतं मला. कुठंतरी वाटत की, आजच्या व्हॅलेंटाईन डे ला सगळ्यांकडे कोणी - कोणी आहे. पण माझ्याकडे तसं कोणी नाही. याची थोडीशी खंत वाटते.' व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यामागेही एक कथा दडलेली आहे. रोमन साम्राज्याच्या काळात संत व्हॅलेंटाईन नावाच्या धर्मगुरूंनी प्रेमासाठी, नात्यांच्या पवित्रतेसाठी उभं राहण्याचं धाडस केलं. विवाहांवर बंदी असतानाही त्यांनी प्रेमी युगुलांना एकत्र आणलं आणि त्यासाठी त्यांनी स्वतःचा जीवही अर्पण केला. त्यांच्या स्मरणार्थ १४ फेब्रुवारी हा दिवस प्रेमाच्या प्रतीकासारखा जगभर साजरा होऊ लागला प्रेमाच्या धैर्याचा, निष्ठेचा आणि समर्पणाचा दिवस म्हणून. प्रेमाबद्दल बोलताना कवींच्या शब्दांचा आधार घेतल्याशिवाय हा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही. कुसुमाग्रजांनी लिहिलं होतं “प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलंमातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं.” याचा अर्थ असा की प्रेम हे साधेपणातून जन्म घेऊनही उंची गाठण्याची ताकद ठेवतं. जगात प्रेम असेन तर कोणत्याही संकटाला समोर जाण्याची ताकद व्यक्तिमध्ये येते आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा असते की आपल्याला देखील समजून घेणार कोणीतरी आयुष्यात असावं. त्यामुळेच कदाचित म्हणतात की, 'कोणीतरी असावं गालातल्या गालात हसणारकोणीतरी असावं बाजूला येऊन बसणारकोणीतरी असावं सगळं ठीक होईन असं म्हणणारकोणीतरी असावं आपलंस वाटणार...' 'कुछ - कुछ होता है' मधल्या राहुलने (शाहरुख खानने) म्हंटल्याप्रमाणे की 'प्यार दोस्ती है. अगर वो मेरी सबसे अच्छी दोस्त नही बन सकती तो मैं उससे कभी प्यार कर ही नही सकता.' याप्रमाणेच काहीजणांसाठी प्रेम म्हणजे मैत्री असते. ही ओळ फक्त सिनेमातील डायलॉग नाही, तर अनेकांच्या मनात खोलवर रुजलेली एक भावना आहे. कारण प्रेम जर टिकवायचं असेल, तर त्याची पायाभरणी मैत्रीतूनच व्हायला हवी. जिथे मन मोकळं करता येतं, रुसवे-फुगवे निसंकोच व्यक्त करता येतात, चुका मान्य करता येतात आणि तरीही नातं तुटत नाही. तिथेच खरं प्रेम जन्माला येतं. मैत्रीत अपेक्षा कमी आणि स्वीकार जास्त असतो. तिथे दिखावा नसतो, अभिनय नसतो. आपण जसे आहोत तसेच स्वीकारलं जातं. यावर बोलताना R.J . अदनान म्हणतो की, 'तुम्हाला लाईफमध्ये एकदा तरी प्रेम झालं पाहिजे. जर तुम्हाला ते तुमच्या मैत्रिण किंवा मित्रासोबत झालं असल तर ती तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. कारण आपल्याला जर जास्त कोण ओळखत असेन तर ते आपले फ्रेंड्स असतात. त्यामुळे प्रेम केलंच पाहिजे. जर काव्यात्मक पद्धतीने बोलायचं झालं तर 'आप से चलकर तुम तक का जो सफर होता है उसे इश्क केहते है.' त्यामुळे प्रेम केलं पाहिजे. त्यातून खूप काही शिकायला मिळत.' उत्कर्षा म्हणते की, 'माझ्यासाठी प्रेम म्हणजे अशी गोष्ट आहे ज्याला आपण अनकंडिशनल लव्ह म्हणू शकतो. म्हणजे तुम्हाला ते झालं तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी सारं काही विसरून जाता आणि फक्त आणि फक्त त्याचाच विचार करता. कोणत्याच प्रकारचा विचार न करता ना कोणती अपेक्षा ठेवता तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीसाठी काहीतरी करता तेव्हा त्याला प्रेम म्हणतात.' आजकालच्या डिजिटल माध्यमाच्या युगात प्रेम ही थेट शब्दांनी व्यक्त करणारी जनरेशन जरी असली तरी आजही अशी काही मुले - मुली आहेत जे कवितेतून म्हणा किंवा शायरीतून म्हणा आपल्या भावना व्यक्त करतात. तृतीय वर्षात शिकत असलेला फारुख म्हणतो की, 'माझ्यासाठी प्रेम म्हणजे केवळ एक भावना नसून ती एक जबाबदारी आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याची ग्रोथ किंवा सक्सेसला तुमचं मानता तेव्हा तुमच्यासाठी ती जबाबदारी असते. मला यावर एक शायरी आठवते ती म्हणजे लोग पूछते हैं क्यों छोड़ दिया उसे,मैं कहता हूँ अब उसका मेरा कोई वास्ता नहीं। यक़ीन जब उनको आता ही नहीं मेरी बात पर,वो फिर पूछते हैं, मतलब अब भी नहीं?” फारुखने म्हणलेल्या या शायरीमध्ये जरी प्रेम तुटल्याची भावना असली तरीसुद्धा त्यातून प्रेमाचा एक वेगळाच पैलू समोर येतो. कारण कधी प्रेम टिकवणं ही जबाबदरी असते. पण कधी कधी त्यासाठी दूर जाण देखील भाग असतं. “अब उसका मेरा कोई वास्ता नहीं” असं म्हणताना जरी ओठांवर नकार असतो, तरी मनात आठवणींची एक शांत हालचाल सुरूच असते आणि लोक पुन्हा विचारतात, “मतलब अब भी नहीं?”. तेव्हा जाणवतं की प्रेम संपलं असलं, तरी त्याची जाणीव मात्र सहजपणे संपत नाही. आजच्या Gen-Z पिढीसाठी प्रेमाचा अर्थ खूप बदललेला आहे. व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त गुलाब, गिफ्ट्स किंवा सोशल मीडियावरचे पोस्ट्स नाहीत. त्यांच्या दृष्टीने प्रेम म्हणजे दिखावा नसून एकमेकांना समजून घेण्याची आणि स्वीकारण्याची प्रक्रिया आहे. Gen-Z प्रेमाला सतत बोलणं किंवा ऑनलाइन राहणं यापुरतं मर्यादित ठेवत नाही. कधी शांततेतही एकमेकांशी जोडलेलं राहणं, एकमेकांच्या भावना ओळखणं आणि नात्यात प्रामाणिक राहणं हाच त्यांच्या प्रेमाचा खरा भाग असतो. ते त्यांच्या मर्यादा आणि पर्सनल स्पेसला तितकंच महत्त्व देतात, कारण त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे स्वतःला हरवणं नाही, तर स्वतःसोबत दुसऱ्यालाही ग्रो होऊ देणं आहे. ही पिढी टॉक्सिक नात्यांपेक्षा स्वाभिमान आणि मानसिक शांतता निवडते. त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे मालकी गाजवणं किंवा नियंत्रण ठेवणं नाही... तर विश्वास, आदर आणि समानतेवर उभं असलेलं नातं आहे. कधी एक साधा meme शेअर करणं, कधी छोटसं “तू ठीक आहेस ना?” असा मेसेज पाठवणं यातही त्यांना प्रेम सापडतं. शेवटी, Gen-Z साठी प्रेम परिपूर्ण किंवा फिल्मी असण्याची गरज नाही. ते खऱ्या भावनांवर, प्रामाणिक संवादावर आणि एकमेकांसोबत असण्याच्या साध्या आनंदावर विश्वास ठेवतात. त्यांच्या दृष्टीने प्रेम म्हणजे परिपूर्ण नसणं चालतं. पण रिअल असणं महत्त्वाचं असतं. आजच्या पिढीत प्रेमाची व्याख्या बदलली आहे, पण त्याची गरज मात्र तितकीच जिवंत आहे. कुणासाठी प्रेम म्हणजे आई-वडिलांचा निःस्वार्थ आधार, कुणासाठी स्वतःच्या आवडींमधून मिळणारा आनंद, कुणासाठी मैत्रीतून जन्मलेली नाती, तर कुणासाठी एखाद्याच्या यशात स्वतःचा अभिमान शोधणं. डिजिटल जगात प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती बदलल्या असल्या, तरी भावना मात्र तशाच खोल आणि खर्या आहेत. प्रेम म्हणजे कोणीतरी असणं नाही तर कोणासाठी तरी असणं आहे. कदाचित म्हणूनच प्रेमाची एकच व्याख्या होऊ शकत नाही. प्रत्येकासाठी प्रेम वेगळं, पण भावना मात्र एकच जोडण्याची...आणि शेवटी, प्रेम हे फक्त एका दिवसापुरतं साजरं करण्याची गोष्ट नाही; ते दररोज जगण्याची, अनुभवण्याची आणि जपण्याची भावना आहे.
Pune Crime : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश? ५ कोटींहून अधिक किमतीच्या अमली पदार्थांच्या साठ्याने पुणे विमानतळावर खळबळ.
CET 2026 Registration : आधार प्रमाणीकरणातील तांत्रिक गोंधळामुळे हजारो विद्यार्थी होते चिंतेत; सीईटी सेलने आजपासून पोर्टलवर बदलला नियम.
PMC News : महापालिकेत खळबळ! मिळकत कराच्या वादातून नागरिकाने डोक्याला लावले रिव्हॉल्वर
PMC News : महापालिका बिल विभागातील धक्कादायक प्रकार; तांत्रिक कारणास्तव प्रस्ताव अडकल्याने अभय योजनेचा लाभ घेताना नागरिकाने गमावला संयम.
PMPML Bus Fire : तांत्रिक बिघाडामुळे बसचा सांगाडा शिल्लक; सुदैवाने जीवितहानी टळली, पण पीएमपीएमएलच्या देखभालीवर पुन्हा प्रश्नचिन्ह.
Pune Ring Road : पुणे रिंगरोड प्रकल्पाला 'स्व. नामदार अजितदादा पवार' यांचे नाव देण्याची मागणी; आमदार शंकर मांडेकरांनी मांडला ठराव.
Pune Zilla Parishad : १९८२ नंतर भोरला संधीची प्रतीक्षा; सहकार महर्षी दिवंगत माधवराव टापरेंनंतर तालुक्याला पुन्हा झेडपीचे अध्यक्षपद मिळणार का?
दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६
पंचांगआज मिती माघ कृष्ण द्वादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्धू.चंद्र राशी धनु,भारतीय सौर २४ माघ शके १९४७.शनिवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२६.मुंबईचा सूर्योदय ०७.०७, मुंबईचा सूर्यास्त ०६.३८ मुंबईचा चंद्रोदय ०५.३२ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०३.४८ , राहू काळ १०.०० ते ११.२६.शनि प्रदोष,१६ पर्यन्त चांगलादैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
Jaykumar Gore : “हा प्रकल्प ठरेल राज्यासाठी रोल मॉडेल”; मंत्री जयकुमार गोरेंची वडूजमध्ये मोठी घोषणा
Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरेंकडून वडूजच्या विकासासाठी २५ कोटींची तरतूद; जिल्हा नियोजन समितीमधून आणखी ५ कोटी देणार असल्याची घोषणा.
अमेरिकेचा नेदरलँडवर ९३ धावांनी विजय
नवी दिल्ली : आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील २१ वा सामना अमेरिका आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना सैतेजा मुक्कामल्लाने दमदार अर्धशतकी खेळी केली. तर शुभम रांजणेने शेवटी फलंदाजी करताना नाबाद ४८ धावा केल्या. या खेळीच्या बळावर अमेरिकेने ६ गडी बाद १९६ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघाचा डाव अवघ्या १०३ धावांवर आटोपला. यासह अमेरिकेने हा सामना ९३ धावांनी आपल्या नावावर केला आहे.या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला. कारण अमेरिकेच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. सलामीला आलेल्या मोनांक पटेलने ३६ धावांची खेळी केली. तर जहागीरने २० धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सैतेजा मुक्कामल्लाने ५१ चेंडूत ७९ धावांची दमदार खेळी केली. तर शेवटी शुभम रांजणेने २४ चेंडूत नाबाद ४८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि २ षटकार खेचले. या खेळीच्या बळावर अमेरिकेने २० षटकांअखेर ६ गडी बाद १९६ धावांचा डोंगर उभारला.नेदरलँड्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. मायकल लेव्हिटने अवघ्या ३ धावा केल्या. तर मॅक्स ओ डाऊडने अवघ्या १३ धावा केल्या. तर बस डी लीडने २३ धावा केल्या. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने जोर लावला. पण तो २० धावांवर माघारी परतला. नेदरलँड्स संघाचा डाव १०३ धावांवर आटोपला.या सामन्यातील पहिल्या डावात अमेरिकेच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. तर दुसऱ्या डावात गोलंदाजांनी नेदरलँड्सच्या फलंदाजांवर दबाव टाकला. नेदरलँड्सकडून हरमित सिंगने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर मोहम्मद मोहसीनने २ आणि शाल्क्विकचा शेडलीने ३ गडी बाद केले. अमेरिकेच्या फिरकी गोलंदाजांनी शेवटपर्यंत नेदरलँड्सच्या फलंदाजांवद दबाव बनवून ठेवला. परिणामी नेदरलँड्सचा डाव अवघ्या १०३ धावांवर आटोपला. हा अमेरिकेचा या स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला आहे.
‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा
नवी दिल्ली :ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मातोश्री ग्रामसमृद्धी’ पाणंद रस्ता कामांवर असलेली 'दहा कामांची मर्यादा' आता लवकरच हटवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली असून, यामुळे कामांना गती मिळणार असल्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.राज्यात मागील काही महिन्यांपासून एका गावात दहापेक्षा अधिक कामे सुरू करण्यास मर्यादा असल्याने अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यांची कामे प्रलंबित होती. या पार्श्वभूमीवर रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. केंद्रीय मंत्री चौहान यांनी पाणंद रस्त्यांच्या कामांना तातडीने गती देण्यास होकार दर्शवला असून राज्यात लागू असलेली मर्यादा लवकरच पूर्णपणे उठवली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.या निर्णयामुळे राज्यभर पाणंद रस्त्यांची कामे सुरळीतपणे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत जलद आणि. सुरक्षितरित्या पोहोचवता येईल, वाहतूक खर्च कमी होईल तसेच गावांच्या दळणवळण व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल. मातोश्री ग्रामसमृद्धी उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यास हा निर्णय महत्त्वाचा ठरेल असा विश्वास रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला.
जेव्हा झिम्बाब्वे हरते तेव्हा भारत वर्ल्ड चॅम्पियन होतो, यंदाही होणार इतिहासाची पुनरावृत्ती ?
कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक घटना घडली. कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना २३ धावांनी जिंकला. हा निकाल पाहून भारतीय क्रिकेटप्रेमींना प्रचंड आनंद झाला आहे. याला कारणही विशेष असेच आहे.झिम्बाब्वेने तब्बल १९ वर्षांनंतर वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. याआधी २००७ मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता, त्यावेळी भारत जगज्जेता झाला होता. यामुळे आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये सुरू झाली आहे. याआधी १९८३ मध्येही झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यावेळी झिम्बाब्वे १३ धावांनी जिंकली होती. नंतर २००७ मध्ये झिम्बाब्वे ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच विकेट राखून जिंकली होती. विशेष म्हणजे २००७ आणि त्याआधी १९८३ मध्येही भारत विश्वविजेता झाला होता. यामुळे आता २०२६ मध्येही भारत विश्वविजेता होणार का ? याविषयी क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे.झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पाजले पराभवाचे पाणीफलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर सर्वोत्तम खेळ करत झिम्बाब्वेने टी२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला हरवण्याची किमया केली. झिम्बाब्वेने कोलंबोतल्या आर. प्रेमदासा स्टेडियमच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर झिम्बाब्वेने सर्वांगीण सुरेख खेळ करत ऑस्ट्रेलियाला निष्प्रभ ठरवले. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावांची मजल मारली. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव १४६ धावांतच आटोपला. झिम्बाब्वेने २३ धावांनी विजय मिळवला.मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना जोश इंगलिस ८ धावा करून तंबूत परतला. मुझाराबानीने त्याला बाद केले. कॅमेरुन ग्रीनला इव्हान्सने बाद केले. तो भोपळाही फोडू शकला नाही. मुझाराबानीच्या उसळत्या चेंडूवर टीम डेव्हिड भोपळाही न फोडता तंबूत परतला. इव्हान्सने कर्णधार हेडला त्रिफळाचीत करत ऑस्ट्रेलियाची अवस्था २९/४ अशी केली. यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि मॅट रेनशॉ यांनी पाचव्या विकेटसाठी ५९ चेंडूत ७७ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेल सामना जिंकून देणार, असे चित्र असताना बर्लच्या चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. त्याने ३१ धावांची खेळी केली. दुखापतीमुळे गोलंदाजी अर्धवट सोडलेला मार्कस स्टॉइनस फलंदाजीला आला. चौकारासह त्याने चांगली सुरुवात केली. मात्र मासाकाटझाने त्याला बाद करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले. स्टॉइनसने ६ धावा केल्या. बेन ड्वारशियसने लगावलेल्या फटक्याचे मुनयोंगाने अफलातून झेलात रुपांतर केले. रेनशॉकडे सूत्रे होती. धावगतीचे आव्हान १५ च्या पलिकडे गेल्यामुळे रेनशॉने धोका पत्करला. मात्र तो रायन बर्लच्या हातात जाऊन विसावला. रेनशॉने ४४ चेंडूत ६५ धावांची खेळी साकारली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळू शकली नाही. रेनशॉ बाद होताच ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा मावळल्या. झिम्बाब्वेतर्फे ब्लेसिंग मुझाराबानीने ४ तर ब्रॅड इव्हान्सने ३ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले.झिम्बाब्वेने ब्रायन बेनेटच्या अर्धशतकाच्या बळावर १६९ धावांची मजल मारली. बेनेट आणि ताडिवानाशे मारुमानी यांनी ६१ धावांची सलामी दिली. स्टॉइनसने मारुमानीला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ३५ धावा केल्या. रायन बर्लने बेनेटला चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ५१ चेंडूत ७० धावांची भागीदारी केली. बर्लला ग्रीनने बाद केले. त्यानेही ३५ धावा केल्या. यानंतर बेनेटला सिकंदर रझाची साथ मिळाली. या जोडीने २४ चेंडूत ३८ धावा कुटल्या. बेनेटने ५६ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद ६४ धावांची खेळी केली. बेनेटने सूत्रधाराची भूमिका स्वीकारत खेळी केली. मात्र २० षटकं खेळूनही त्याच्या नावावर अर्धशतकच असल्याने स्ट्राईकवरून टीकाही झाली. त्याने ११४च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.झिम्बाब्वेच्या दर्जेदार खेळापुढे ऑस्ट्रेलिया निरुत्तरझिम्बाब्वेने सगळ्या आघाड्यांवर दर्जेदार खेळ करत ऑस्ट्रेलियाला निरुत्तर केले. या विजयासह ब गटाची गुणतालिका रंजक झाली आहे. श्रीलंकेने दोन लढतीत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने आयर्लंडचा धुव्वा उडवला मात्र झिम्बाब्वेविरुद्ध त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. झिम्बाब्वेने दोन सामने खेळून दोन्ही जिंकले आहेत. त्यांचे ४ गुण झाले आहेत. ते दुसऱ्या स्थानी आहेत. झिम्बाब्वेने आणखी एक विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागू शकतो. नियमांनुसार, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बादफेरीसाठी पात्र ठरतील.वनडेत झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला केले आहे चीतपटझिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३३ लढतींपैकी ३ मध्ये विजय मिळवला आहे. १९८३ वनडे वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेने १३ धावांनी थरारक विजय मिळवला होता. २०१४ आणि अगदी अलीकडे म्हणजे २०२२ मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती.
बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग
मुंबई :मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या विरोधात कार्यवाही करत असून उपनगर जिल्हा नियोजन बैठकीनंतर या कारवाईला अधिक वेग येणार आहे. मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार मुंबईत आता मुंबईची सुरक्षा धोक्यात घालणाऱ्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी ' जनहित सुरक्षा समित्या' स्थापन होणार आहेत. मंत्री लोढा यांनी नुकत्याच झालेल्या उपनगर जिल्हा नियोजन बैठकीत बांगलादेशींच्या शोध घेऊन कडक कारवाईच्या पाठपुराव्यासाठी जनहित सुरक्षा समित्या स्थापन करण्याची सूचना केली होती.मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मालवणी परिसरात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचा आणि तिथल्या अमलीपदार्थ माफियांचा मुद्दा सातत्याने उचलून धरला होता. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन बैठकीतही प्रामुख्याने हा मुद्दा चर्चिला गेला. मुंबईला बसत असलेला घुसखोरांचा विळखा आणि धोक्यात येत असलेली मुंबईची सुरक्षितता यावर गांभीर्याने चर्चा झाल्यानंतर जिल्हा नियोजन बैठकीतच मंत्री लोढा यांनी जनहित सुरक्षा समिती स्थापन करण्याबाबतची आपली भूमिका मांडली. घुसखोरीची समस्या अक्राळ विक्राळ रूप धारण करून असून शहराच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यासंदर्भात मंत्री लोढा यांनी म्हटले की, मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर असून देशाची आर्थिक राजधानी आहे. बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरीमुळे इथली सुरक्षा धोक्यात आली आहे. घुसखोरांवर कारवाई ही काळाची गरज आहे. नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला असून प्रशासन जनहित सुरक्षा समितीच्या स्थापने संदर्भात त्वरित कार्यवाही करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.जनहित सुरक्षा समितीच्या कार्याचे स्वरूपविधानसभा मतदारसंघाच्या पातळीवर ही समिती स्थापन करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून शहरातल्या विविध भागात बनावट आधार कार्ड आणि बनावट रेशन कार्ड देणाऱ्यांचा विशेष मोहिमेद्वारे शोध घेण्यात येईल. या शोधानंतर संबंधितांची माहिती समितीकडून पोलिसांना दिली जाईल. मुंबई उपनगरांतील सरकारी जमिनींवर असणारी अतिक्रमणे शोधण्यासाठीही समिती मदत करणार आहे. यासंदर्भातील सविस्तर अहवाल समितीकडून पोलिसांना दिला जाईल. या जनहित सुरक्षा समितीत मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, पोलिस विभागातील अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थेतील सदस्यांचा समावेश असेल, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. त्याचबरोबर राज्यात इतरत्र ही समिती स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव देण्याचा विचार असल्याचेही लोढा यांनी स्पष्ट केले.मंत्री लोढा यांच्या पाठपुराव्याने हजार कोटींची जमीन पुन्हा सरकारी ताब्यातमालाड मालवणी भागात मोठ्याप्रमाणात बांगलादेशी आणि रोहिंग्याची घुसखोरी असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या होत्या. यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश मंत्री लोढा यांनीच दिले होते. गेल्या वर्षभरात सातत्याने त्यांनी या कारवाईचा पाठपुरावा केला असून अनधिकृत बांधकामावर कारवाई अद्यापही सुरूच आहे. आतापर्यंत गेल्या वर्षभरात केवळ पश्चिम उपनगरात १५ एकर जमिनींवरील अनधिकृत बांधकामावर हातोडा पडला असून या जमिनी पुन्हा सरकारी ताब्यात आल्या आहेत. एक हजार कोटींपेक्षा जास्त या जमिनीची किमती असल्याची माहिती पश्चिम उपनगर (अतिक्रमण निष्कासन) अतिरिक्त आयुक्त श्री.गणेश मिसाळ यांनी ही माहिती दिली. धडक मोहीम अद्यापही सुरूच असल्याचे मिसाळ म्हणाले. दरम्यान सहपालकमंत्री लोढा यांनी स्पष्ट केले की, जनहित सुरक्षा समितीच्या या निर्णयामुळे घुसखोरीला प्रतिबंध होण्यास मदत मिळणार असून मुंबईकरांसाठी हा मोठा दिलासा असेल. याबाबत प्रशासन अधिक जबाबदारीने काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली
महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणारगटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या सूचनामुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिका सभागृहात आजवर सत्तेत बसणाऱ्या उबाठालाच्या नगरसेवकांना विरोधी पक्षात बसताच तेथील आसनाचा त्रास होऊ लागला आहे. ज्या आसनांवर मागील २००२पासुुन बसून सत्ता उपभोगणाऱ्या माजी महापौर आणि उबाठाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांना आता या आसनावर बसण्यास आणि उठण्यास त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे महापौरांच्या दालनात झालेल्या अनौपचारिक बैठकीत सदस्यांना सुलभपणे बसता आणि उठता यावे अशा पध्दतीने आसन व्यवस्थेत बदल करण्याची शिफारस करण्यात आली. त्यामुळे मागील २००२पासून महापालिकेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सदस्यांना जो त्रास झाला नाही तो त्रास आता विरोधी पक्षात बसल्यावर उबाठाच्या नगरसेवकांना होवू लागल्याचे दिसून येत आहे.महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महापालिका सभागृहात काँग्रेसच्या नगरसेवकांना बसण्यास जागा नसल्याने त्यांना उभेच राहावे लागले. त्यामुळे महापालिका सभागृहातील नगरसेवकांच्या आसन व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. या अनुषंगाने महापौरांच्या दालनात भाजप, उबाठा, शिवसेना, मनसे, एमआयएम आदींच्या गटनेत्यांच्या समवेत बैठक घेवून महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेबाबत चर्चा केली.मुंबई महापालिकेचे २२७ अधिक पाच स्वीकृत नगरसेवक अशाप्रकारे २३२ नगरसेवकांची आसन व्यवस्था आहे. आणि आजही तेवढेच नगरसेवक आहेत. तसेच भविष्यात आणखी पाच स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. याअनुषंगाने झालेल्या बैठकीत विद्यमान आसन व्यवस्थेमध्ये सुसुत्रता आणली जावी अशाप्रकारची सूचना करण्यात आली. यामध्ये लटकते माईक ही व्यवस्था काढून प्रत्येक बाकांवर कॉडलेस माईकची अद्यायावत सुविधा देण्यात यावी. तसेच ध्वनीक्षेपकाच्या आवाजाचे नियंत्रण करणाऱ्या साऊंड सिस्टीम कंट्राेल मशीन्सची जागा इतर ठिकाणी बसवण्यात यावी.जेणेकरून तिथे महापालिका सचिव विभागाचे कर्मचारी बसून त्या जागांवर नगरसेवक बसू शकतील.तसेच सभागृहातील पुतळ्यांनी जागा अडवली असली तर त्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचे सौदर्य अबाधित राखून नगरसेवकांच्या आसनाची व्यवस्था करण्यात यावी अशीही सूचना गटनेत्यांच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती भाजपाचे महापालिका गटनेते आणि भावी सभागृहनेते गणेश खणकर यांनी माहिती दिली.तसेच सभागृहातील आसनाची जागा बसण्यास योग्य नसून एकदा बसल्यानंतर उठणे कठिण होवू बसते. काही ज्येष्ठ नगरसेवकांना बसताना आणि उठतानाही त्रास होत आहे. मऊशाल आसने ही दिसायला योग्य असली तरी त्यावर अडीच ते तीन तास बसणे योग्य ठरत नाही.त्यामुळे मऊशाल आसन व्यवस्था सुधारण्यात यावी,जेणेकरून सदस्यांना तिथे बसल्यानंतर उठताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशाप्रकारची भावना किशोरी पेडणेकर यांच्यासह गणेश खणकर यांनी गटनेत्यांच्या बैठकीत मांडला.मात्र, २००२पासून मुंबईत महापालिकेतील या नुतनीकरण केलेल्या सभागृहात नगरसेवक बसत आहेत. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकांनी याच सभागृहात सत्तेचा गाढा हाकला आहे. परंतु, सत्ताकाळात उबाठा आणि पहारेकरी असताना भाजपच्या नगरसेवकांना जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास आत्ताच जाणू लागला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या नगरसेवकांना सभागृहात बसण्याचा त्रास होत नव्हता का? सभागृह उशिरा सुरु करून नगरसेवकांना प्रतीक्षेत बसायला भाग पाडणाऱ्या उबाठाच्या नगरसेवकांना विरोधी पक्षात बसल्यानंतर मऊशाल आसनाचा त्रास होऊ लागला आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे प्रथम उजव्या बाजुला बसताना न टोचणारी आसने आता डाव्या बाजुला बसायला लागल्यानंतर आसने टोचू लागली का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'
मुंबई :प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई एमएमआर क्षेत्रातील महापालिकांनी पॉड टॅक्सी सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.मेट्रो आणि लोकल प्रवासाला पूरक अशी ‘पॉड टॅक्सी’ सेवा एमएमआरमधील शहरांत सुरू करण्याबाबत सविस्तर आढावा उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतला. नागरिकांना 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' देण्यास महापालिकांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.नंदनवन येथे झालेल्या या आढावा बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, एमएमआरडीएचे अतिरीक्त आयुक्त अश्विन मुदगल, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, आदी अधिकारी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, प्रवाशांना घरापासून रेल्वे किंवा मेट्रो स्टेशनपर्यंत आणि तिथून गंतव्य स्थान हा टप्पा पार करण्यासाठी रिक्षा किंवा बसवर अवलंबून राहावे लागते. यासाठी होणारी गर्दी, तसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पॉड टॅक्सी चालवण्याचे नियोजन करावे. यामुळे मेट्रोचा वापर वाढण्यास मदत होईल आणि रस्त्यांवरील खासगी वाहनांचा भार कमी होईल. हा प्रकल्प राबवण्यासाठी एमएमआरडीएची मदत घेण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत.महापालिकांनी आपल्या विकास आराखड्यात लास्ट माईल कनेक्टिव्हिटीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून इंधन बचतीमुळे पर्यावरणाचे रक्षण होईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
उस्मान तारीकची गोलंदाजी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा!
कोलंबो : पाकिस्तानचा संघ गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीलंकेत आहे आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतले आहे. तर भारतीय संघ नामिबियाला पराभूत करून नुकताच श्रीलंकेला पोहोचला आहे. त्यामुळे भारताला या सामन्यात ताकही फुंकून प्यावे लागणार आहे. असे असताना भारतीय संघाला २८ वर्षीय पाकिस्तानी फिरकीपटू उस्मान तारिकची भीती आहे. कारण त्याची अनोखी गोलंदाजी शैली फलंदाजांना कळणे कठीण जात आहे.टी २० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत उस्मान तारिकने या स्पर्धेत एकच सामना खेळला आहे आणि तीन विकेट घेतल्या आहेत. त्यात भारतीय फलंदाज फिरकीचा सामना करताना अडचणीत येत असल्याचे दिसून आले आहे. त्यात उस्मानची गोलंदाजी शैली भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकते. गोलंदाजी करताना त्याचा हात खालून येतो. त्याला साइट आर्म असे म्हटले जाते. तसेच चेंडू सोडताना थोडा थांबतो. त्यामुळे चेंडू सावकाश येतो. पण या दरम्यान, वेगाने टाकण्याची कलाही त्याने आत्मसात केली आहे. इतकेच काय चेंडू वळतो देखील. त्यामुळे फलंदाजी करताना त्याचा अभ्यास करणे कठीण जाणार आहे.उस्मान तारिकने एका मुलाखतीत सांगितले की, ‘माझ्या हातात दोन कोपरं आहे. त्यामुळे माझा हात नैसर्गिकरित्या वाकतो. माझी चाचणी झाली असून मी निर्दोष ठरलो आहे. प्रत्येकाला वाटते की, मी हात वाकवतो. पण माझा हात जैविक कारणाने वाकतो.’ हातातलं वेगळेपण त्याला इतर गोलंदाजांपेक्षा वेगळे करते. त्याचा उस्मान तारिक पुरेपूर फायदा घेत आहे. दुसरीकडे, उस्मान दुबईत सेल्समनचे काम करत होता. त्याच्याकडे चांगली नोकरी होती. पण क्रिकेटचे वेड काही सुटत नव्हते. यावेळी त्याने एमएस धोनीचा बायोपिक पाहिला आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. धोनीने तिकीट कलेक्टरची नोकरी सोडून क्रिकेटकडे लक्ष केंद्रीत केले होते. तसेच उस्मान नोकरी सोडून पाकिस्तानला परतला आणि क्रिकेट खेळू लागला.
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित
नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी सभागृहाचे कामकाज ९ मार्चपर्यंत तहकूब केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आता ९ मार्चपासून सुरू होईल आणि २ एप्रिलपर्यंत चालेल. दरम्यान लोकसभेपाठोपाठ राज्यसभेचे देखील कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले.लोकसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू झाले तेव्हा काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी करत गोंधळ घातला. परिणामी, कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दुपारी १२ वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर, पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी जाहीर केले की अनेक सदस्यांनी स्थगन प्रस्तावासाठी सूचना सादर केल्या आहेत, ज्या फेटाळण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव घेतले.प्रधान यांनी त्यांच्या मंत्रालयाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सभागृहाचे कामकाज सादर केले. यानंतर, केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी, कायदा आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल, आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव, वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी त्यांच्या संबंधित मंत्रालयांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सभागृहात मांडले.लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंह यांनी माहिती दिली की औद्योगिक संबंध संहिता (सुधारणा) विधेयक, २०२६ राज्यसभेने १२ फेब्रुवारी रोजी कोणत्याही सुधारणांशिवाय मंजूर केले. हे विधेयक यापूर्वी लोकसभेत मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी सभागृहाचे कामकाज ९ मार्चपर्यंत तहकूब केले
Riyan Parag RR Captain : आरआर फ्रँचायझीने भविष्याचा विचार करून रियान परागची कर्णधार म्हणून निवड केली आहे. पराग २०१९ पासून या संघाचा अविभाज्य भाग आहे.
टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान मॅचवर पावसाचे सावट
कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. हा यंदाच्या वर्ल्डकपमधील २७ वा साखळी सामना असेल. क्रिकेटप्रेमींचे लक्ष असलेल्या या हायव्होल्टेज सामन्याआधीच एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट घोंगावत आहे. यामुळे क्रिकेटप्रेमी चिंतेत आहेत.भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ यंदाच्या वर्ल्डकपसाठी ए ग्रुप अर्थात अ गटामध्ये आहेत. भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी आणि नामिबियाविरुद्धचा सामना ९३ धावांनी जिंकला आहे. दोन्ही साखळी सामने जिंकल्यामुळे भारत चार गुण आणि +३.०५० च्या नेट रनरेटसह गटात अव्वलस्थानी आहे. पाकिस्तानने नेदरलँड विरुद्धचा सामना ३ विकेट राखून आणि अमेरिकेविरुद्धचा सामना ३२ धावांनी जिंकला आहे. हे दोन्ही साखळी सामने जिंकल्यामुळे पाकिस्तान चार गुण आणि +०.९३२ च्या नेट रनरेटसह गटात दुसरे स्थान पटकावले आहे.नेदरलँडने नामिबिया विरुद्धचा सामना सात विकेट राखून जिंकल्यामुळे ते दोन गुण आणि +०.३५६ च्या नेट रनरेटसह गटात तिसऱ्या स्थानी आहेत. अमेरिका शून्य गुण आणि -१.५२५ च्या नेट रनरेटसह गटात चौथ्या स्थानी तर नामिबिया शून्य गुण आणि -२.८८४ च्या नेट रनरेटसह गटात पाचव्या स्थानी आहे.भारताचा रविवार १५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान विरुद्ध आणि बुधवार १८ फेब्रुवारी रोजी नेदरलँड विरुद्ध खेळणार आहे. नेदरलँड विरूद्धच्या सामन्यात भारत जिंकण्याची शक्यता गृहित धरली तरी गटातले अव्वल स्थान राखण्यासाठी आणि सुपर ८ फेरीकरिता लिलया पात्र होण्यासाठी भारताला पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवणे आवश्यक आहे. यामुळेच पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ तयारीला लागला आहे.आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारताने आतापर्यंत १२ वेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे. तर पाकिस्तानने भारताचा ३ वेळा पराभव केला आहे. फक्त एकदाच भारत - पाकिस्तान दरम्यानचा सामना बरोबरीत सुटला आहे. यामुळे रविवारच्या सामन्याआधीच भारताचे पारडे जड असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. पण सामना होण्याआधीच हवामान विभागाने पावसाचे भाकीत वर्तविल्यामुळे क्रिकेटप्रेमी चिंतेत आहेत.श्रीलंकेच्या हवामान विभागाने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तविली आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे कोलंबोत पावसाची ९३ टक्के शक्यता आहे. सामन्याच्या वेळेत म्हणजेच संध्याकाळी सात पासून पुढे पावसाची शक्यता फक्त नऊ टक्के आहे. पण संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता ४९ टक्के आहे. तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जर सामन्यावेळी किंवा सामन्याआधी पाऊस पडल्यामुळे सामन्याच्या नियोजनावर परिणाम झाला तर हायव्होल्टेज सामन्याची मजा कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
यूएईच्या कॅनडावरील थरारक विजयाने अफगाणिस्तानवर संकट!
नवी दिल्ली : कॅनडा विरुद्ध युनायटेड अरब अमिराती यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ड गटातील सामना रोमहर्षक राहिला. कॅनडाच्या १५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईची गाडी रुळावरून घसरली होती, परंतु आर्यांश शर्मा आणि सोहैब खान यांच्या अर्धशतकी खेळीने यूएईला थरारक विजय मिळवून दिला.https://prahaar.in/2026/02/13/rain-threatens-india-pakistan-match-in-t20-world-cup/हर्ष ठाकेरने ४१ चेंडूंत २ चौकार व ३ षटकार मारून ५० धावांची खेळी केली. त्याला नवनीत धलिवाल ( ३४) व श्रेयस मोव्वा ( २१) यांची साथ मिळाली आणि कॅनडाने ७ बाद १५० धावांपर्यंत मजल मारली. जलदगती गोलंदाज जुनैदने ३५ धावांत ५ विकेट्स घेतल्या आणि वर्ल्ड कपमध्ये पाच विकेट्स घेणारा तो यूएईचा पहिला गोलंदाज ठरला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये पाच विकेट्स घेणारा तो दुसरा संलग्न देशाचा गोलंदाज ठरला. यापूर्वी नेदरलँड्सच्या अहसान मलिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९ धावांत ५ बळी टिपले होते.लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईने ६६ धावांत ४ विकेट्स गमावल्या होत्या. साद बिन जाफरने तीन विकेट्स घेतल्या. पण, आर्यांश शर्मा व सोहैब खान यांनी पाचव्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. शेवटच्या दोन षटकांत यूएईला विजयासाठी १२ चेंडूंत २६ धावांची गरज होती. कलीम सनाने १९व्या षटकात १८ धावा दिल्या आणि सामन्याला कलाटणी मिळाली. शर्माने पहिल्या ४ चेंडूंत ११ धावा जोडल्या आणि त्यानंतर खानने ७ धावा जोडल्या.२० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून शर्माने यूएईचा विजय पक्का केला. विजयासाठी एक धाव हवी असताना खान बाद झाला. त्याने २९ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारासह ५१ धावांची खेळी केली. जस्करन सिंगने विजयी धाव घेतली. आर्यांश ५३ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७४ धावांवर नाबाद राहिला. यूएईने या विजयासह ड गटात तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका प्रत्येकी दोन विजय मिळवून अव्वल दोन क्रमांकावर आहेत. अफगाणिस्तानची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आफ्रिकेविरुद्धचा सामना डबल सुपर ओव्हरमध्ये गमावल्यानंतर अफगाणिस्तानचा स्पर्धेतील मार्ग खडतर झाला होता. त्यात यूएईच्या विजयाने त्यांना सुपर ८ च्या शर्यतीतून बाहेर फेकले आहे. अफगाणिस्तानला उर्वरित दोन सामन्यांत यूएई व कॅनडा यांचा सामना करायचा आहे. त्यांना या दोन्ही लढती जिंकाव्या लागतील आणि त्याचवेळी किवी व आफ्रिका यांच्या पराभवाची प्रार्थना करावी लागेल.https://prahaar.in/2026/02/13/t20-world-cup-2026-zim-vs-aus-zimbabwes-historic-win-over-australia/झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पाजले पराभवाचे पाणीफलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर सर्वोत्तम खेळ करत झिम्बाब्वेने टी२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला हरवण्याची किमया केली. झिम्बाब्वेने कोलंबोतल्या आर. प्रेमदासा स्टेडियमच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर झिम्बाब्वेने सर्वांगीण सुरेख खेळ करत ऑस्ट्रेलियाला निष्प्रभ ठरवले. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावांची मजल मारली. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव १४६ धावांतच आटोपला. झिम्बाब्वेने २३ धावांनी विजय मिळवला. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३३ लढतींपैकी ३ मध्ये विजय मिळवला आहे. १९८३ वनडे वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेने १३ धावांनी थरारक विजय मिळवला होता. २०१४ आणि अगदी अलीकडे म्हणजे २०२२ मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती.
मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक
खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्दमुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येईल. हार्बर मार्गावरील कुर्ला – वाशीदरम्यान ब्लॉक असल्याने प्रवाशांचा प्रवास रखडण्याची शक्यता आहे. तर, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर जलद मार्गावर ब्लॉक असल्याने, सर्व लोकल धीम्या मार्गावर धावतील. त्यामुळे रविवारी प्रवाशांचा प्रवासाचा वेग मंदावण्याची चिन्हे आहेत. खारबाव येथे शनिवारी घेण्यात आलेला नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.मध्य रेल्वेवर माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सीएसएमटी येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल माटुंगा – मुलुंडदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकात पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ दरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल मुलुंड – माटुंगादरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.हार्बर मार्गावर कुर्ला – वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ दरम्यान सुटणाऱ्या वाशी / बेलापूर / पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल, तसेच पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि पनवेल – वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.पश्चिम रेल्वे मार्गावर राम मंदिर – बोरिवली रेल्वे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गिका आणि पाचवी मार्गिका दरम्यान सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बोरिवली – अंधेरीदरम्यान अप जलद मार्गिकेवरील सर्व लोकल सेवा अप धीम्या आणि सहाव्या मार्गिकेवर चालवण्यात येईल. पाचव्या मार्गिकेवरील सर्व लोकल डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील. ब्लाॅकमुळे काही अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द असतील. तसेच काही लोकल सेवा हार्बर मार्गावरील गोरेगावपर्यंत चालवण्यात येईल.
Praful Patel : सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षा होणार; प्रफुल्ल पटेलांची घोषणा
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार असल्याची घोषणा पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी शुक्रवारी केली
Seva Teerth: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालय (PMO) एका आधुनिक आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशा इमारतीत स्थलांतरित झाले असून, हा बदल प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे केंद्र सरकारचे मत आहे.
पॅलेस्टिनी ॲक्शन या गटावर बंदी घालण्याच्या ब्रिटनच्या सरकारच्या निर्णयाला ब्रिटनमधील उच्च न्यायालयाने (UK High Court) बेकायदेशीर ठरवले आहे.
AUS vs ZIM : १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर झिम्बाब्वेने विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला हरवण्याची किमया साधली आहे.
Budget session:
पिकांना फायदेशीर किमती सुनिश्चित करणारे आणि बाजारातील अस्थिरतेपासून संरक्षण करणारे केंद्राचे प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षक अभियान (पीएम-आशा) स्वीकारू नये असा निर्णय पंजाब सरकारने (Gurmeet Singh Khuddian) घेतला आहे.
Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा तीर्थ संकुलाचे उद्घाटन केले. या संकुलामध्ये पंतप्रधान कार्यालयासह (पीएमओ) राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय देखील आहे. नवीन संकुलात सेवा तीर्थच्या फलकाचे मोदींनी आज अनावरण केले.या संकुलाच्या भिंतीवर देवनागरी लिपीत नावे लिहिली असून त्याखाली 'नागरिक देवो भव' (नागरिक देवासारखे आहे) हे ब्रीदवाक्य कोरलेले आहे. पंतप्रधान कार्यालय रायसीना हिलवरील साउथ ब्लॉकमधून सेवा तीर्थ येथे हलवले जाईल, ज्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी असलेली कॅबिनेट सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाची कार्यालये एकत्र येतील.या इमारतींची रचना ४-स्टार GRIHA मानकांनुसार केली आहे आणि त्यात अक्षय ऊर्जा प्रणाली, जलसंवर्धन उपाय आणि डिजिटली एकात्मिक कार्यालये समाविष्ट आहेत. मोदींनी नवीन इमारतीचे उद्घाटन केले तेव्हा गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.देशवासियों की सेवा के अटूट संकल्प और 'नागरिक देवो भव' की पावन भावना को साथ लेकर, आज ‘सेवा तीर्थ’ को राष्ट्र को समर्पित करने का सौभाग्य मिला।‘सेवा तीर्थ’ कर्तव्य, करुणा और ‘राष्ट्र प्रथम’ के लिए हमारी प्रतिबद्धता का सशक्त प्रतीक है।मेरी कामना है कि यह आने वाली पीढ़ियों को… pic.twitter.com/YWYUuSHtsD— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026२०१४ पासून, मोदी सरकारने भारताच्या वसाहतवादी भूतकाळातील प्रतीकांपासून दूर जाण्यासाठी आणि मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी सातत्याने पावले उचलली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी निदर्शनास आणून दिले की पंतप्रधान कार्यालयाला आता सेवा तीर्थ असे नाव देण्यात येईल, केंद्रीय सचिवालयाच्या इमारतींना कर्तव्य भवन असे नाव देण्यात आले आहे आणि राजपथाचे कर्तव्य पथ असे नाव देण्यात आले आहे. त्याच भावनेने, पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या रेसकोर्स रोडचे नाव बदलून लोक कल्याण मार्ग आणि राजभवन आणि राज निवास यांचे नाव अनुक्रमे लोकभवन आणि लोकनिवास असे करण्यात आले आहे.दशकांपासून, सेंट्रल व्हिस्टा परिसरातील अनेक ठिकाणी पसरलेल्या तुटलेल्या आणि जुन्या पायाभूत सुविधांमधून अनेक प्रमुख सरकारी कार्यालये आणि मंत्रालये कार्यरत होती.
Anil Deshmukh : लीलावती रुग्णालय प्रकरणाची सखोल चौकशी करा; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी
मी गृहमंत्री असताना परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा कट रचला होता. मात्र आता त्यांचे भ्रष्टाचाराचे प्रकार एकामागून एक उघड होत आहेत.
PM Modi Calls Tarique Rahman:
Sunil Tatkare: विलीनीकरणाबाबत प्रस्ताव आल्यास भाजपला विश्वासात घेणे अनिवार्य - सुनील तटकरे
शशिकांत शिंदे यांच्या लेखाचा घेतला समाचारमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेमुळे राज्यातील राजकारण तापले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भूमिका स्पष्ट करत, कोणताही विलीनीकरणाचा प्रस्ताव समोर आल्यास भाजपला विश्वासात घेणे अनिवार्य असल्याचे सांगितले. तसेच, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलेल्या दाव्याचाही त्यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला.विलीनीकरणाच्या शक्यतेवर पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाले की, “विलीनीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव किंवा विचार समोर आला, तर त्यावर पक्षपातळीवर चर्चा होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्यावर विचार करतील. मात्र, आम्ही एनडीएचा घटक पक्ष आहोत आणि एनडीएचा मुख्य पक्ष भाजप आहे. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना भाजपला विश्वासात घेणे आवश्यक आहे.” २०२३ मध्ये एनडीएमध्ये सहभागी होताना भाजपची अनुमती घेतल्याची आठवण करून देत, भविष्यातही आघाडीतील मुख्य पक्षाशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या मुखपत्रात लिहिलेल्या लेखात, अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या आणि खोट्या षडयंत्रांमुळे अजित पवारांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागल्याचा दावा केला होता. तसेच, झालेली चूक दुरुस्त करण्याच्या उद्देशाने ते मागील काही महिन्यांपासून प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले होते. या पार्श्वभूमीवर संताप व्यक्त करत तटकरे म्हणाले की, “शिंदेंनी केलेले विधान अत्यंत गैर आहे. अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर अशा प्रकारचे लिखाण करणे अनाठायी आहे. दादांनी घेतलेले निर्णय स्वच्छ मनाने आणि पक्षाच्या हितासाठीच होते. आता असे लिहून ते नेमके काय साध्य करू इच्छितात, त्यांचा हेतू काय आहे, हे समजत नाही.”अजित पवार यांची भाजपबाबतची भूमिका पूर्वीपासूनच स्पष्ट होती, असा पुनरुच्चार करत तटकरे यांनी सांगितले की, २०१४, २०१६ आणि २०१७ मध्येही भाजपसोबत चर्चेचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले होते. २०१९ मध्येही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्याला स्थिरता देऊ शकते, असे मत अजित पवारांनी स्पष्टपणे मांडले होते. त्यांनी ही भूमिका कधीही लपवून ठेवली नव्हती, असेही तटकरे यांनी नमूद केले.
Ambernath traffic: महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्गांबद्दल
अंबरनाथ : महाशिवरात्री उत्सवानिमित्त अंबरनाथमधील प्राचीन अंबरेश्वर शिवमंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. याच पार्श्वभूमीवर आता १४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान शहरातील वाहतुकीत काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.हे मार्ग राहतील बंद:मिळालेल्या माहितीनुसार, काही मुख्य मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी लागू असेल. वैभव हॉटेलकडून शहरात थेट प्रवेश बंद राहील. संबंधित वाहनांना हिंदू स्मशानभूमी, वडवली सेक्शन आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे वळवण्यात येईल. स्वामी समर्थ चौकातून गोविंद तीर्थ पुलाकडे जाणाऱ्या वाहनांनाही ‘नो एन्ट्री’ असेल.अवजड वाहनांची सोय:अवजड वाहनांना शहराच्या मध्यवर्ती भागात येण्यास मनाई करण्यात आली आहे. एमआयडीसी आणि अन्य जड वाहनांसाठी आनंदनगर टी-जंक्शन, फॉरेस्ट नाका आणि लादीनाका हे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.पार्किंगची सुविधा:लहान वाहनांसाठी हिंदू स्मशानभूमी ते गोविंद तीर्थ पुलादरम्यान पार्किंगची सोय करण्यात आली आहे. बस व मोठ्या वाहनांसाठी लोकनगरी मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. भाविकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Stock Market Crash : शेअर बाजारात मोठी घसरण, एका झटक्यात सात लाख कोटींचे नुकसान
मुंबई : AI चे वाढते महत्त्व, अमेरिकेच्या शेअर बाजारांमध्ये झालेली घसरण आणि डॉलरच्या तुलनेत वाढत असलेले सोन्याचांदीचे महत्त्व यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक बड्या कंपन्यांच्या शेअरमध्ये शुक्रवारी घसरण झाली. आयटी कंपन्यांचे शेअर आपटले. या घडामोडींचा एकत्रित परिणाम दिसून आला. मुंबईचा शेअर बाजार अर्था बीएसई आणि निफ्टी फिफ्टी अर्थात राष्ट्रीय शेअर बाजार या दोन्हीत घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स ८२,७२६.७६ वर बंद झाला. घसरणीमुळे बीएसई सेन्सेक्स १०४८.१६ अंशांनी अर्थात सुमारे सव्व्या टक्यांची घसरण झाली.निफ्टी 50 मध्ये बीएसई सेन्सेक्स प्रमाणेच घसरण झाली. दिवसअखेर निफ्टी 50 हा २५,४७१.१० वर बंद झाला. निफ्टी 50 मध्ये ३३६.१० अंशांनी अंशांनी अर्थात सुमारे १.३० टक्क्यांची घसरण झाली. बॅक निफ्टी ५५३ अंशांनी घसरला. सुरुवातीला आयटी शेअरच्या दरांमध्ये घसरण झाली. हळू हळू इतर उद्योग क्षेत्रांतील शेअरमध्येही घसरण झाली. मोठ्या प्रमाणात शेअरची विक्री झाली.बीएसईच्या टॉप ३० शेअर्सपैकी, बजाज फायनान्स आणि एसबीआय वगळता सर्व शेअर्स तोट्यात गेले आणि बंद झाले. सेन्सेक्समधील २८ शेअरना मोठा मोठा तोटा झाला. हिंदुस्तान युनिलिव्हर, इटरनल, टायटन, टाटा स्टील आणि टीसीएसमध्ये सर्वात जास्त घसरण झाली, जवळजवळ ५% घसरण झाली. आयटी व्यतिरिक्त, धातू, ग्राहक उत्पादने, रिअल इस्टेट, ऊर्जा, बँकिंग आणि वित्तीय सेवांनीही घसरणीला हातभार लावला. यावरून स्पष्ट होते की ही घसरण व्यापक होती.'एआय'च्या प्रगतीमुळे आयटी कंपन्यांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. आयटी क्षेत्राची तांत्रिक प्रगती होईल पण रोजगारांच्या संख्येवर प्रतिकूल परिणाम होईल अशी भीती व्यक्त होत आहे. यामुळेच आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. गुरुवारी बीएसई मार्केट कॅप ४७२.४८ लाख कोटी होता, जो ६.८३ लाख कोटींनी घसरून ४६५.३१ लाख कोटींवर आला. एका अहवालानुसार, तीन दिवसांत अंदाजे ९० लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
रिलायन्सला मिळाला व्हेनेझुएलातून तेल खरेदीचा परवाना
मुंबई : व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांचे अमेरिकेने लष्करी बळावर अपहरण केले. यानंतर अमेरिकेने व्हेनेझुएलातील तेलाच्या उत्खननासाठी सरकारी आणि खासगी कंपन्यांना परवाने देण्यास सुरुवात केली आहे. भारतातल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला व्हेनेझुएलातील तेलाच्या उत्खननासाठी परवाना मिळाला आहे. हा परवाना मिळाल्यामुळे भारतीय उद्योजक मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी व्हेनेझुएलात तेलाचे उत्खनन करू शकेल.व्हेनेझुएलाच्या तेलात सल्फरचे प्रमाण जास्त आहे. या तेलाचे शुद्धीकरण करण्याचे तंत्रकौशल्य रिलायन्सच्या रिफायनरीकडे आहे. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला परवाना मिळवणे सोपे झाले. अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहाच्या रिफायनरी व्हेनेझुएलाच्या तेलाचे शुद्धीकरण करण्यासाठी सर्वाधिक सक्षम आहेत. यामुळे व्हेनेझुएलाचे स्वस्त तेल शुद्धीकरणासाठी मोठ्या प्रमाणात भारतात येण्याची शक्यता आहे. शुद्धीरणानंतर हे तेल भारतात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी जाईल. यामुळे भारतातील इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.व्हेनेझुएलातून भारतापर्यंत कच्च्या तेलाचा पुरवठा विना अडथळा सुरू ठेवण्यासाठी नियोजन सुरू आहे. एप्रिल २०२६ पासून व्हेनेझुएलाचे तेल मोठ्या प्रमाणात शुद्धीरणासाठी भारतात येणार आहे. सूत्रांच्या मते व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलामुळे रिलायन्सला मोठा आर्थिक फायदा अपेक्षित आहे.
Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'
मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत नियम ३७७ अन्वये केलेल्या मागणी नुसार मुंबई महानगर क्षेत्रात “जल मेट्रो प्रकल्प” सुरु करण्यासाठी मे. कोची मेट्रो लि. ने तयार केलेल्या फिजीबिलीटी अहवालानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी मे. कोची रेल लि. यांची सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही संस्था प्रस्तावित जलवाहतुकीच्या दृष्टीने, वाहतूक अभ्यास, पायुभूत सुविधा, नौकानयनविषयक बाबी, कनेकटीव्हिटी, जलयान, जलवाहतुकीचे कार्यचालन व व्यवस्थापन, खर्चाची अंदाजपत्रके, वित्तीय पृथ:क्करण, अंमलबजावणीचा आराखडा यांचा अभ्यास करून अहवाल देणार असल्याचे लेखी पत्राद्वारे महाराष्ट्र सागरी मंडळाचे नौकानयन सल्लागार व मुख्य बंदर अधिकारी कॅ. प्रवीण खरा यांनी खासदार वायकर यांना कळवले आहे. याप्रश्नी खासदार वायकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र पाठवले होते.मुंबईच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामानाने मुंबईतील अंतर्गत रस्ते पायाभूत सुविधा यात म्हणावा तसा बदल झालेला नाही. वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईच्या वाहतुकीवर याचा परिणाम होत असून मुंबईकरांना दरदिवशी तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे मोठ्याप्रमाणात इंधन वाया जात आहे. एमएमआरची लोकसंख्या २०२३ मध्ये २.५८ कोटीवरून २०३० पर्यंत अंदाजे ३ कोटीच्या वरती जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार समितीचा सदस्य म्हणून कोची येथील अभ्यास दौरानिमित्त “जल मेट्रो प्रकल्प” प्रणालीचा अनुभव व अभ्यास करण्याची संधी मिळाली तसेच बैठकाही घेण्यात आल्या. सागरमाला योजना २.० अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रात जल मेट्रो प्रकल्प सुरु करण्याची योजना तयार करण्यात यावी. यात ६० टक्के केंद्र सरकार व ४० टक्के राज्य सरकार निधीची गुंतवणूक करेल. त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी पर्याय म्हणून कोची जल मेट्रो प्रकल्पाच्या धर्तीवर मुंबई महानगर क्षेत्रात “जल मेट्रो प्रकल्प” सुरु करण्याची मागणी खासदार वायकर यांनी लोकसभेत नियम ३७७ च्या अंतर्गत मुंबईसाठी विशेष इन्फ्रास्ट्रक्चर पकेजची मागणी केली आहे. ज्यामध्ये मुंबई मेट्रो आणि मुंबई रेल्वे कनेक्टीव्हिटीचा उल्लेख करण्यात आला आहे. या मागणीवर वित्त राज्यमंत्री यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पासाठी तीन वर्षांसाठी ३,८३,१४७ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे लेखी उत्तर दिले आहे. केंद्र सरकारच्या या निधीचा उपयोग हा प्रकल्प राबवण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी विनंती खासदार रविंद्र वायकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना केली आहे.यासाठी संबंधित अधिकारी यांच्या समवेत एक विशेष बैठक आयोजित करून कोची मेट्रो प्रकल्पाच्या टीमला आणि त्यांना स्वत: बोलवावे, अशी पत्राद्वारे विनंती केली होती. त्यानुसार मुंबई व आसपासच्या नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, मीरा-भाईन्दर या शहरांभोवती असलेल्या जलमार्गाचा वापर करून प्रवासी जलवाहतूक सुरु करण्याबरोबरच प्रवासी वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी मे. कोची मेट्रो रेल लि. यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये फिजीबिलीटी अहवाल सरकारला सदर केला असून यात जलवाहतुकीसाठी २१ ठिकाणे निवडण्यात आली असून, १० नवीन जलमार्गावर जलवाहतूक सुरु करण्याचे प्रस्तावित केले आहे. याचा सविस्तर प्रकल्प आहवाल तयार करण्यासाठी मे. कोची मेट्रो रेल लि. यांची सल्लागार संस्थेची नियुक्ती केली आहे. या प्रकल्पाचा अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु असल्याचे लेखी उत्तर महाराष्ट्र सागरी मंडळातील नौकानयन सल्लागार व मुख्य बंदर अधिकारी कॅ. प्रवीण खरा यांनी यांनी खासदार वायकर यांनी पाठवले आहे.
- विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणारमुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “विज्ञान प्रेरणा अभियान” अंतर्गत विजाभज आश्रमशाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे विशेष शैक्षणिक विज्ञान सहलीचे १५ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.मंत्री सावे म्हणाले, ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाविषयी जिज्ञासा, संशोधनाची वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून त्या संधी ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी शासनाने विशेष उपक्रम हाती घेतला.मंत्री सावे म्हणाले, राज्यातील विविध ‘विजाभज’ आश्रमशाळांमधून गुणवत्ता परीक्षेद्वारे १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना इस्रो येथे भेट देऊन उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण तंत्रज्ञान, प्रत्यक्ष रॅाकेटचे प्रक्षेपण पाहणे आणि अंतराळ संशोधन प्रकल्पांविषयी प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच विज्ञानविषयक कार्यशाळा आणि शास्त्रज्ञांशी, तज्ज्ञांशी संवादाच्या माध्यमातून त्यांना अनुभवाधारित शिक्षणाचा लाभ होणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संस्थांशी जोडणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि उच्च शिक्षणाच्या संधींबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांचा प्रवास विमानाने होणार असून त्यांच्या सुरक्षित व सुसूत्र प्रवासाची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट दर्जाची निवास व्यवस्था करण्यात आली असून दररोज आवश्यक सर्व सुविधा व साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विभागामार्फत देण्यात आली आहे. असा उपक्रम विभागामार्फत पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे.९८० शाळांतून निवडलेले १०० गुणवंत विद्यार्थी:- राज्यातील ९८० विजाभज आश्रमशाळांमधून इयत्ता ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता परीक्षा घेण्यात आली. त्यातून ५० विद्यार्थी व ५० विद्यार्थीनी अशा एकूण १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.सहलीचे नियोजन:विद्यार्थी १५ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत पुणे, बेंगलुरू, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी या शहरातील विविध ठिकाणांना भेटी देणार आहेत.- १५ फेब्रुवारी रोजी पुणे - पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क व नॅशनल वॉर मेमोरियल येथे भेट. १६ फेब्रुवारी पुणे - भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था येथे प्रयोगाधारित विज्ञान कार्यशाळा व शास्त्रज्ञांशी संवाद.- १६ फेब्रुवारी रोजी पुणे विमानतळावर मंत्री अतुल सावे व विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून इस्त्रो दौऱ्यासाठी हिरवी झेंडी दाखवणार आहेत.- १७ फेब्रुवारी बंगळुरू – विश्वेश्वरय्या औद्योगिक व तंत्रज्ञान संग्रहालय, हिंदुस्तान विमान निर्मिती वारसा संग्रहालय व लालबाग वनस्पती उद्यान भेट.- १८ फेब्रुवारी तिरुवनंतपुरम (थुंबा) - भारतीय अंतराळ संशोधन संस्था केंद्र, उपग्रह प्रदर्शन विभाग व प्रक्षेपण तंत्रज्ञान गॅलरी भेट; रॉकेट प्रक्षेपणाचे अवलोकन. तसेच नेपियर संग्रहालय व कोवलम समुद्रकिनारा भेट.- १९ फेब्रुवारी कन्याकुमारी - पद्मनाभपुरम राजवाडा, विवेकानंद शिला स्मारक, तिरुवल्लुवर पुतळा, गांधी स्मारक तसेच सूर्यास्त दर्शन.
T20 WOrld Cup 2026 ZIM vs AUS: झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय
श्रीलंका: आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये (T20 WOrld Cup 2026) झिम्बाब्वेने सर्वात मोठा उलटफेर करून ऑस्ट्रेलियाला २३ धावांनी पराभूत केलं आहे.अंडर डॉग समजल्या जाणाऱ्या झिम्बाब्वे सारख्या संघाने क्रिकेटमधील बलाढ्य संघ समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. यापूर्वी २००७ मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला एका रोमांचक सामन्यात पराभूत केलं होतं. त्यानंतर आता वर्ल्ड कप २०२६ मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्यांदा पराभूत करून एक नवीन इतिहास रचला आहे.झिम्बाब्वेच्या गोलंदाजी समोर कांगारू सरेंडर :श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) सामना खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर २० ओव्हरमध्ये झिम्बाब्वेने २ विकेट गमावून १६९ धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७० धावांचं टार्गेट दिलं होतं. मात्र मैथ्यू रेनेशॉच्या अर्धशतकीय खेळीनंतर सुद्धा ऑस्ट्रेलियाचा संघ १९.२ ओव्हरमध्ये १४६ धावांवर ऑलआउट झाला. अनुभवी खेळाडूंशिवाय झिम्बाब्वेने वर्ल्ड कप सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेली ही कामगिरी अतिशय कौतुकास्पद ठरली.Blessing Muzarabani's four-wicket haul powers Zimbabwe to a win over Australia He wins the @aramco POTM : https://t.co/DGcVByz7gH pic.twitter.com/d6xZOZCtl1— ICC (@ICC) February 13, 2026कांगारूंचा डाव कोसळला:१७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात झाली. झिम्बाब्वेच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज एकामागून एक तंबूत परतले. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ १४६ धावांत गारद झाला. झिम्बाब्वेच्या कमालीच्या फिल्डिंग आणि बॉलिंगमुळे कांगारूंचा २३ धावांनी पराभव झाला.OH THAT’S OUTRAGEOUS! Munyonga flies across and plucks a stunner out of thin air! ✨Zimbabwe’s fielding has been top-tier and AUS are now seven down! ICC Men’s #T20WorldCup | #AUSvZIM | LIVE NOW https://t.co/WBa4qbbxs0 pic.twitter.com/4RlkjdsSGY— Star Sports (@StarSportsIndia) February 13, 2026गुणतालिकेतील समीकरण बदलले:या ऐतिहासिक विजयानंतर 'ग्रुप बी' मध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. झिम्बाब्वेने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर ऑस्ट्रेलिया थेट तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. झिम्बाब्वेसाठी हा केवळ विजय नसून जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करण्याची मोठी संधी ठरली आहे.
अनिल कपूर आणि राधिका मदान अभिनित ‘लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’ या गाण्यात भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह विशेष उपस्थितीत झळकले आहेत. तसेच यात ‘भारत आर्मी’ आणि शेफाली बग्गा देखील दिसणार आहेत. हे गाणे रोहन-विनायक यांनी संगीतबद्ध केले असून गीतकार ऋषी उपाध्याय आहेत. तर प्रसिद्ध गायक विशाल ददलानी यांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणे सादर केले आहे.संपूर्ण देश टीम इंडियाला पाठिंबा देत असताना प्राइम व्हिडिओने ‘द लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’च्या माध्यमातून उत्साह आणखी वाढवला आहे. हा एक हाय-एनर्जी अँथम असून आगामी अॅक्शन-ड्रामा चित्रपट ‘सूबेदार’मधील ‘लल्ला’ या मूळ गाण्यावर आधारित आहे.https://www.instagram.com/reels/DUsDRHrCJHG/‘सूबेदार’ ही कथा भारताच्या ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित असून अर्जुन मौर्य (अनिल कपूर) या व्यक्तिरेखेचा प्रवास दाखवते. तो शिस्त, अभिमान आणि अढळ नैतिक मूल्यांवर जगणारा व्यक्ती आहे. लवचिकता, सन्मान आणि कोणत्याही आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याची ताकद या चित्रपटातून अधोरेखित केली आहे — ज्या भावना मोठ्या जागतिक स्पर्धेदरम्यान प्रत्येक भारतीय अनुभवतो.या म्युझिक व्हिडिओत स्टेडियममधील उत्साह आणि सिनेमॅटिक तीव्रतेचा सुरेख मिलाफ दिसतो. हरभजन सिंह यांच्यासह अनिल कपूर आणि राधिका मदान झळकतात. ‘भारत आर्मी’ आणि शेफाली बग्गा यांच्या उपस्थितीमुळे गाण्यात आत्मविश्वास, स्वॅग आणि अभिमानाची झलक दिसते.रोहन-विनायक यांच्या संगीतासह ऋषी उपाध्याय यांच्या प्रभावी गीतांनी आणि विशाल ददलानी यांच्या दमदार आवाजामुळे हे गाणे सध्याच्या क्रिकेट सीझनमधील जोशपूर्ण वातावरण उत्तमरीत्या पकडते. ‘आपल्या जागी ठाम रहा आणि कधीही मागे हटू नका’ हा चित्रपटाचा संदेशही या गाण्यातून ठळकपणे मांडला आहे.अनिल कपूर म्हणाले, “‘सूबेदार’ ही एका अशा व्यक्तीची कथा आहे ज्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव आणि अंतर्मनातील ज्वाळा यांतून शक्ती आणि ध्येय मिळते. ‘लल्ला अँथम’ त्या ज्वाळेचे प्रतिबिंब आहे. सूबेदार अर्जुन मौर्य शांत आणि संयमी असला तरी योग्य वेळी ठामपणे उभा राहतो. या गाण्याचे शूटिंग करताना सेटवरील ऊर्जा अप्रतिम होती. टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी सूबेदारच्या टीमकडून हा एक छोटासा प्रयत्न आहे.”हरभजन सिंह म्हणाले, “‘लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’चा भाग होणे हा खरोखरच खास अनुभव होता. अनिल कपूर यांच्यासोबत काम करणे म्हणजे एका संस्थेसोबत काम करण्यासारखे आहे. त्यांची ऊर्जा आणि करिष्मा प्रत्येकाला प्रेरणा देतो. या गाण्याची बीट अत्यंत दमदार आहे आणि क्रिकेटच्या सध्याच्या उत्साहाशी पूर्णपणे सुसंगत आहे. टीम इंडिया आणि टीम सूबेदारला माझ्याकडून शुभेच्छा.”‘भारत आर्मी’ने म्हटले, “आमच्यासाठी क्रिकेट म्हणजे उत्कटता, विश्वास आणि प्रत्येक परिस्थितीत संघाच्या पाठीशी उभे राहणे. ‘लल्ला – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’मध्येही तीच ज्वाला आणि अभिमान दिसतो.”‘सूबेदार’चे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले असून त्यांना ‘तुम्हारी सुलु’, ‘जलसा’ आणि ‘दलदल’ यांसारख्या उत्कृष्ट कथांसाठी ओळखले जाते. या चित्रपटाची निर्मिती विक्रम मल्होत्रा, अनिल कपूर आणि सुरेश त्रिवेणी यांनी केली आहे. हा चित्रपट ५ मार्च रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार असून भारतासह २४० हून अधिक देशांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये पाहता येणार आहे.
Valentine's Day: व्हॅलेंटाइन्स डेला द बॉडी शॉपकडून वैयक्तिक आणि आकर्षक गिफ्टिंग पर्याय
मुंबई: यंदाच्या व्हॅलेंटाइन्स डेला पारंपरिक भेटवस्तूंना बाजूला ठेवत वैयक्तिक, विचारपूर्वक आणि आकर्षक पद्धतीने सादर केलेल्या गिफ्ट्सची निवड करण्याचे आवाहन द बॉडी शॉपने केले आहे. खास या प्रेमदिनासाठी ब्रँडने क्युरेटेड व्ही-डे प्री-किटेड गिफ्ट बॉक्सेस आणि क्रिएट युअर ओन पर्याय सादर केले आहेत, ज्यामुळे गिफ्ट देण्याचा अनुभव अधिक सोपा, आनंददायी आणि उत्साहवर्धक ठरतो.या विशेष श्रेणीमध्ये रेडी-टू-गिफ्ट आवडत्या उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. बेरी लव्हिंग गिफ्ट सेटमध्ये स्ट्रॉबेरी सुगंधातील शॉवर जेल, बॉडी योगर्ट आणि बॉडी मिस्टचा समावेश आहे, तर क्युपिड अप्रूव्ह्ड ब्रिटिश रोझ गिफ्ट सेटमध्ये शॉवर जेल, बॉडी बटर आणि हँड क्रीम यांचा समावेश आहे. हे दोन्ही गिफ्ट सेट्स उत्सवी आणि पुनर्वापर करता येणाऱ्या आकर्षक पॅकेजिंगमध्ये उपलब्ध आहेत, ज्यामुळे भेटवस्तू अधिक खास आणि संस्मरणीय बनते.सीझनमध्ये आकर्षक व जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या अनुभवाची भर करण्यासाठी जागतिक प्रख्यात ड्यूबेरी श्रेणी परत आली आहे, जी गिफ्ट बॉक्सेस् आणि वैयक्तिक उत्पादनांसह उपलब्ध आहे. फळांच्या सुगंधासाठी प्रसिद्ध असलेले ड्यूबेरी व्हॅलेंटाइन्स गिफ्टिंगमध्ये अधिक उत्साहाची भर करते. ब्रँडने टोबॅको फ्लॉवर बॉडी मिस्ट आणि टोबॅटो फ्लॉवर इओ डि टॉयलेट देखील सादर केले आहे. दरम्यान, क्रिएट युअर ओन (सीवायओ) व्हॅलेंटाइन्स डे गिफ्ट बॉक्स ग्राहकांना बाथ, बॉडी व फ्रॅग्रॅनन्स उत्पादने निवडून त्यांच्या गिफ्ट्समध्ये वैयक्तिक बदल करण्याची सुविधा देतो, ज्यामुळे प्रत्येक गिफ्ट वैयक्तिक बनते.सर्वोत्तम गिफ्ट बॉक्सेस्, वैयक्तिकृत क्रिएट युअर ओन पर्याय, प्रख्यात ड्यूबेरी श्रेणीचे पुनरागमन आणि लाँच करण्यात आलेले टोबॅको फ्लॉवर बॉडी मिस्ट व ईओ डी टॉयलेट यांसह द बॉडी शॉप व्हॅलेंटाइन्स डे आणि इतर उत्साहवर्धक प्रसंगांसाठी सोपे, विचारशील गिफ्टिंग पर्याय देत आहे.
रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट
जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाहीरायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षातील १५ दिवस ध्वनीवर्धक (स्पीकर) व ध्वनीक्षेपक वापरास सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सूट देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड, किशन जावळे यांनी १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत १५ दिवसांकरिता ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरास सूट दिल्याची अधिसूचना जारी केली आहे.या आदेशानुसार श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा पाळून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.सूट देण्यात आलेले दिवस : शिवजयंती १९ फेब्रुवारी (१ दिवस), होळी पौर्णिमा २ मार्च (१ दिवस), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल (१ दिवस), ईद-ए-मिलाद २६ ऑगस्ट (१ दिवस), गणपती उत्सव १५ सप्टेंबर (दुसरा दिवस), १९ सप्टेंबर (गौरी विसर्जन), २५ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) ३ दिवस, गणपती (साखरचौथ विसर्जन) ३० सप्टेंबर (१ दिवस), नवरात्री उत्सव १७ ते २० ऑक्टोबर (४ दिवस), दिवाळी (लक्ष्मीपूजन) ८ नोव्हेंबर (१ दिवस), ख्रिसमस २५ डिसेंबर (१ दिवस),३१ डिसेंबर – (१ दिवस)दरम्यान ही सूट राज्य शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात लागू राहणार नाही. ध्वनीप्रदूषण नियम, २००० मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ च्या कलम १९ (अ) अन्वये आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
PMO 'Seva Tirtha':
Bangladesh Election Results:
डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?
मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये डिझेलवर चालणाऱ्या प्रवासी वाहनांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या समितीने या संदर्भात शिफारस केली आहे, ज्यामुळे डिझेल वाहनांचे उत्पादन आणि वापर टप्प्याटप्प्याने बंद होऊन इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांना चालना मिळण्याची शक्यता आहे.भारताने २०७० पर्यंत 'शुद्ध-शून्य उत्सर्जन' लक्ष्य गाठायचे असेल, तर वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल अपरिहार्य असल्याचे नीती आयोगच्या ताज्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. डिझेल वाहनांना टप्प्याटप्प्याने हटवून सीएनजी, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वेगाने स्वीकार करणे ही पहिली आणि महत्त्वाची पायरी ठरेल, असे आयोगाने नमूद केले आहे.अहवालानुसार, शहरी प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी डिझेल वाहनांची संख्या कमी करणे आवश्यक आहे. त्याऐवजी सीएनजी, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवावा. यासोबतच इथेनॉल मिश्रित इंधनावर चालणाऱ्या फ्लेक्स-फ्युएल वाहनांना, उच्च बायो-सीएनजी मिश्रणाला आणि हायब्रिड फ्लेक्स-फ्युएल मॉडेल्सना प्रोत्साहन देण्याची शिफारस करण्यात आली आहे.आता पुढे काय बदलणार?ग्राहकांसाठी : आगामी काळात डिझेल गाड्यांची खरेदी महाग पडू शकते किंवा त्यांचे उत्पादन थांबविले जाऊ शकते,पर्याय : हायब्रिड आणि फ्लेक्स फ्यूल इंजिन असलेल्या गाड्यांकडे कल वाढणार.उद्योग : ऑटोमोबाईल कंपन्यांना आता बॅटरी निर्मितीसोबतच हायड्रोजन आणि बायोगॅस तंत्रज्ञानावर गुंतवणूक करावी लागेल.
बांगलादेशमध्ये तारिक रहमान यांचे सरकार स्थापन होणार आहे. त्यांच्या BNP पक्षाने 299 पैकी 165 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बीएनपीच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. तारिक रहमान यांच्यासमोरील मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणजे शेजारील भारतासोबतचे संबंध पूर्ववत करणे हे असेल. दशकांपासून भारताचा मित्र असलेला बांगलादेश, शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर चीन आणि पाकिस्तानसोबत उभा असलेला दिसत आहे. बांगलादेशमधील नवीन सरकारशी संबंधित 6 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया… प्रश्न-1: बांगलादेश निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या? उत्तर: 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत 299 जागांवर मतदान झाले. सुमारे 55% मतदान झाले. त्यानंतर मतमोजणी सुरू झाली आणि 13 जानेवारीच्या सकाळपर्यंत निकाल आले… बीएनपीचे तारिक रहमान पंतप्रधानपदाचे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांच्या पक्षाला १६५ जागा मिळाल्या आहेत. २० नोव्हेंबर १९६५ रोजी जन्मलेले तारिक रहमान माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आहेत. १७ वर्षांच्या वनवासानंतर ते २५ डिसेंबर २०२५ रोजी लंडनहून परतले. परतल्यानंतर अवघ्या ५ दिवसांनी त्यांच्या आई खालिदा झिया यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर बीएनपीची सूत्रे पूर्णपणे तारिक यांच्या हातात आली. त्यांच्याच नेतृत्वाखाली बीएनपी निवडणुकीत उतरली. तारिक यांनी स्वतः ढाका-१७ आणि बोगरा-६ या दोन जागांवरून निवडणूक लढवली आणि दोन्ही जागांवर विजय मिळवला. खरं तर, तारिकने स्वतःला तरुण आणि मध्यमवर्गीय मतदारांशी जोडले. त्यांनी स्वतःला शांत, ऐकणारे आणि धोरणांवर लक्ष केंद्रित करणारे नेते म्हणून सादर केले. याव्यतिरिक्त, तारिकला त्यांच्या आईच्या निधनानंतर मिळालेली सहानुभूती आणि त्यांच्या राजकीय पुनर्रप्रस्थापनेचाही फायदा झाला. प्रश्न-2: तारिक रहमान भारतासोबतचे संबंध सुधारतील का? उत्तर: शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधांमध्ये घसरण झाली. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताचे पारंपरिक विरोधक पाकिस्तान आणि चीन यांच्याशी मैत्री वाढवली. अशा परिस्थितीत भारताला आशा होती की बांगलादेशच्या नवीन सरकारशी संबंध सुधारले जातील. बीएनपी (BNP) भारताचा पसंतीचा पर्याय मानला जातो आणि ते संपर्कातही आहेत. जेव्हा खालिदा झिया यांचे निधन झाले, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. खालिदा यांच्या निधनावर परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर ढाका येथे पोहोचले आणि तारिक यांना भेटले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायोगात जाऊन शोक व्यक्त केला. बीएनपीने आपल्या जाहीरनाम्यात परराष्ट्र धोरण 'बांगलादेश फर्स्ट' आणि 'फ्रेंड येस, मास्टर नो' या घोषणांभोवती तयार केले आहे. एका निवडणूक रॅलीत तारिक रहमान म्हणाले, 'ना दिल्ली, ना पिंडी, बांगलादेश सर्वोच्च'. म्हणजेच त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या प्रभावापासून मुक्त राहण्याबद्दल सांगितले. माजी उच्चायुक्त रीवा गांगुली दास यांचे मत आहे की आपण शेजारी आहोत आणि शेजारी बदलता येत नाहीत. आपल्याला एकमेकांसोबत काम करावेच लागते. भारत सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की कोणतेही सरकार सत्तेत आले तरी आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यास तयार आहोत. बीएनपीने निवडणुकीत वचन दिले आहे की… बांगलादेशमधील भारताचे उच्चायुक्त राहिलेले हर्षवर्धन श्रृंगला यांचे म्हणणे आहे की, तारिक रहमान यांना समजले आहे की एक यशस्वी पंतप्रधान होण्यासाठी त्यांना भारताच्या पाठिंब्याची गरज आहे, किंवा किमान भारताचे शत्रुत्व त्यांना परवडणारे नाही. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की त्यांचे बोलणे आणि कृती जुळतात की नाही. अमेरिकन थिंकटँक अटलांटिक कौन्सिलमधील दक्षिण आशिया केंद्राचे वरिष्ठ फेलो मायकेल कुगेलमॅन यांचे मत आहे की, भारताला आशा आहे की नवीन सरकार चर्चेसाठी तयार असेल. ते अशा घटकांपासून प्रभावित होणार नाहीत, जे भारताच्या हितासाठी धोकादायक आहेत. बीएनपी आणि भारत दोन्ही एकमेकांसोबत काम करण्यास तयार आहेत. 13 फेब्रुवारीच्या सकाळी पंतप्रधान मोदींनी तारिक रहमान यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सोशल मीडिया X वर लिहिले, हा विजय दर्शवतो की बांगलादेशच्या जनतेचा तुमच्या नेतृत्वावर विश्वास आहे. भारत नेहमीच एका लोकशाहीवादी आणि प्रगतीशील बांगलादेशसोबत उभा राहील. मी दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आणि विकासासाठी एकत्र काम करण्यास तयार आहे. प्रश्न-३: भारत आणि बांगलादेशचे संबंध सुधारणे दोघांसाठी का महत्त्वाचे आहे? उत्तर: बांगलादेशची ९४% सीमा भारताला लागून आहे. बांगलादेश जवळपास चारही बाजूंनी भारताने वेढलेला आहे, म्हणून याला 'इंडिया लॉक्ड' देश म्हटले जाते. अशा परिस्थितीत बांगलादेश सुरक्षा आणि व्यापाराच्या बाबतीत भारतावर अवलंबून आहे. ईशान्येकडील राज्यांना उर्वरित भारताशी जोडण्यात बांगलादेशची महत्त्वाची भूमिका आहे. शेख हसीना सत्तेत असताना भारताला ईशान्येकडील राज्यांबाबत बांगलादेशकडून कोणत्याही अडचणींची चिंता करावी लागली नाही, परंतु त्यांच्या सत्तापालटानंतर एक सुरक्षा धोका निर्माण झाला. मार्च 2025 मध्ये बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी चीन दौऱ्यात म्हटले, 'भारताची ईशान्येकडील राज्ये भूभागाने वेढलेली आहेत. समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बांगलादेश हाच त्यांचा एकमेव मार्ग आहे.' याशिवाय अनेक बांगलादेशी नेत्यांनी 'सेव्हन सिस्टर्स'ना वेगळे करण्याची धमकी दिली आणि त्यांना बांगलादेशचा भाग असल्याचे सांगितले. ईशान्येकडील 7 राज्यांना उर्वरित देशाशी सिलीगुडी कॉरिडॉर जोडतो, जो फक्त 40 किमी लांब आणि 22 ते 30 किमी रुंद आहे. यालाच चिकन नेक म्हणतात. याच्या एका बाजूला नेपाळ आणि दुसऱ्या बाजूला बांगलादेश आहे. येथून चीन फक्त 200 किमी दूर आहे. मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड ॲनालिसिसच्या वरिष्ठ फेलो स्मृती पटनायक यांच्या मते, ईशान्येकडील सुरक्षेबाबत भारत थोडीही ढिलाई करणार नाही. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यावर भारत कोणतीही तडजोड करणार नाही. हा संदेश बांगलादेशच्या संपूर्ण नेतृत्वापर्यंत पोहोचवण्यात आला आहे. निवृत्त ब्रिगेडियर रणजीत बरठाकूर यांचे मत आहे की, बांगलादेशमध्ये चिकन नेकशी छेडछाड करण्याची ताकद नाही. तो कट्टरवाद्यांना मदत करून आणि घुसखोरी करून भारताला त्रास देऊ शकतो, पण चिकन नेकला लक्ष्य करण्याची हिंमत करणार नाही. खरी समस्या चीन आहे आणि आपल्याला तयार राहावे लागेल. बांगलादेशमधील भारताचे माजी राजदूत अनिल त्रिगुणायत यांचे मत आहे की, तारिक रहमान सत्तेत आल्यास भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान बांगलादेशात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तान आणि इतर भारतविरोधी दहशतवादी गटांवर लक्ष ठेवणे हे असेल. प्रश्न-४: तारिक सरकार पाकिस्तानशी अधिक जवळीक वाढवेल का? उत्तर: १९७१ मध्ये बांगलादेशची निर्मिती झाल्यापासून पाकिस्तानसोबतचे त्याचे संबंध दीर्घकाळ तणावपूर्ण राहिले. बीएनपीच्या मागील सरकारांच्या काळात, म्हणजे खालिदा झिया यांच्या काळात, पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारले, परंतु शेख हसीना यांनी पुन्हा अंतर ठेवले. हसीना यांच्या सत्तापालटानंतर मोहम्मद युनूस यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची ३ वेळा भेट घेतली. दोन्ही देशांचे नेते आणि लष्करी अधिकारीही भेटले. पाक लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनीही भेट घेतली. दशकांनंतर दोन्ही देशांमध्ये थेट सागरी सेवा सुरू झाली. संरक्षण भागीदारी वाढवण्यावर चर्चा झाली. संयुक्त लष्करी सराव आणि शस्त्रनिर्मितीवर विचार करण्यात आला. माजी उच्चायुक्त हर्षवर्धन श्रृंगला यांच्या मते, 2001-2006 च्या बीएनपी (BNP) राजवटीत बांगलादेशने भारतविरोधी भूमिका घेतली आणि पाकिस्तानच्या खूप जवळ गेला. त्यावेळी तारिक रहमान सरकारमधील एक महत्त्वाचे व्यक्ती होते आणि त्यांचा प्रभाव खूप जास्त होता. खरं तर, त्यावेळी भारतात भाजपचे अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. तर बांगलादेशात बीएनपीच्या खालिदा झिया सरकार चालवत होत्या. दोन्ही देशांमध्ये व्यापार, सीमा, नदी पाणी वाटप, अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार, स्थलांतर आणि सशस्त्र बंडखोरी यांसारख्या मुद्द्यांवर मतभेद होते. तेव्हा भारताने बीएनपीवर पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना मदत केल्याचा आरोपही केला होता, ज्याचे ढाकाने खंडन केले होते. ढाका विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे प्राध्यापक डेलवर हुसेन मानतात की, सत्तेत कोणीही आले तरी बांगलादेश-पाकिस्तान संबंध अधिक चांगले होतील आणि अचानक बदलाची कोणतीही शक्यता नाही. बीएनपी सरकारचे पाकिस्तानशी मजबूत संबंध असण्याचा इतिहास आहे. मात्र, पाकिस्तानसाठी नवीन सरकार हा मुद्दा नाही. ते पाहतील की नवीन सरकारचे भारताबाबत काय धोरण असेल आणि पाकिस्तानला ते किती प्रमाणात पाठिंबा देतील? आंतरराष्ट्रीय संबंध तज्ज्ञ स्मृती पटनायक मानतात की, बांगलादेश पाकिस्तानशी कितीही मजबूत संबंध ठेवू दे, त्यांना सुरक्षा तपासणीशिवाय बांगलादेशात बोलावू दे. हा भारताच्या चिंतेचा विषय नाही. खरं तर, पाकिस्तान बांगलादेशसोबत मिळून सार्कला पुन्हा सक्रिय करू इच्छितो. तर, आंतरराष्ट्रीय मंचांवर नवीन सरकारकडून काश्मीरसारख्या मुद्द्यावर सोबत राहण्याची किंवा तटस्थ राहण्याची अपेक्षा करतो. प्रश्न-५: तारिक रहमान चीनसोबत कसे संबंध ठेवतील? उत्तर: बांगलादेशवर भारताचा प्रभाव जसा कमी होत गेला, ती पोकळी चीनने भरून काढली. सामान्यतः बांगलादेशी नेते शपथ घेतल्यानंतर पहिला परदेश दौरा भारताचा करतात, पण युनूसने चीनची निवड केली. २६ ते २९ मार्च २०२५ पर्यंत त्यांनी चीनचा दौरा केला. या दरम्यान त्यांनी चीनसोबत ९ करारांवर स्वाक्षरी केली. यामध्ये तीस्ता नदी प्रकल्प, ९८% उत्पादनांवर शून्य शुल्क, संरक्षण लॉजिस्टिक्स, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि लालमोनिरहाट विमानतळाचे नूतनीकरण यांसारख्या करारांचा समावेश आहे. भारतीय थिंकटँक सेंटर फॉर सोशल अँड इकॉनॉमिक प्रोग्रेसचे कॉन्स्टँटिनो झेवियर यांचे म्हणणे आहे की, चीन भारत-बांगलादेश संबंधांमधील संकटाचा फायदा घेत उघडपणे आणि पडद्यामागे अशा दोन्ही प्रकारे आपला प्रभाव सातत्याने वाढवत आहे. अमेरिकन थिंकटँक 'कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स'चे फेलो जोशुआ कुर्लांट्झिक यांचे मत आहे की, बंगालच्या उपसागराच्या बाबतीत चीनच्या रणनीतीचे बांगलादेश केंद्र बनले आहे. चीनला विश्वास आहे की बांगलादेश त्याला यात मदत करेल. चीनमध्ये बांगलादेशचे राजदूत राहिलेले मुन्शी फैज अहमद यांच्या मते, बांगलादेशसाठी चीनचे स्थान इतर कोणत्याही देशाने बदलले जाऊ शकत नाही. कारण गेल्या काही वर्षांत चीन एक मोठा गुंतवणूकदार तसेच व्यापार भागीदार म्हणून उदयास आला आहे. बांगलादेशच्या राष्ट्रीय महसूल मंडळाच्या मते, 2024-25 मध्ये बांगलादेशचा चीनसोबतचा व्यापार 21.3 अब्ज डॉलरपेक्षा जास्त होता. तर भारतासोबत सुमारे 11.5 अब्ज डॉलरचा व्यापार झाला. अहमद यांचे मत आहे की, जरी लोकांना वाटत होते की भारत आपल्या खूप जवळ आहे, तरी व्यापार आणि वाणिज्यच्या बाबतीत चीनसोबतचे आपले संबंध सतत वाढत आहेत. आपल्या विकास प्रकल्पांमध्ये चीनचे पैसे गुंतले आहेत. बांगलादेश दीर्घकाळ चीनसोबतचे संबंध कायम ठेवेल, कारण चीन जे देऊ शकतो, ते इतर कोणीही देऊ शकत नाही. प्रश्न-६: बांगलादेशमध्ये सार्वमतचा निकाल काय लागला आणि याचा काय परिणाम होईल? उत्तर: सार्वमताच्या बाजूने ६६.७% लोकांनी मतदान केले. तर याच्या विरोधात ३२.२७% मते पडली. म्हणजेच आता बांगलादेशमध्ये जुलै चार्टर लागू झाला. नवीन संसद पहिल्या १८० दिवसांपर्यंत एक 'घटनात्मक सुधार परिषद' म्हणून काम करेल आणि चार्टरच्या शिफारसींना कायद्यात रूपांतरित करेल. खरेतर, बांगलादेशमध्ये राजकीय आणि घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी नॅशनल कन्सेंशस कमिशन (राष्ट्रीय सहमती आयोग) स्थापन करण्यात आले. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस याचे अध्यक्ष बनले. या कमिशनच्या ५ वेगवेगळ्या आयोगांनी ३३ राजकीय पक्ष आणि आघाड्यांसोबत ७२ बैठका घेऊन १६६ शिफारसींवर चर्चा केली. यानंतर ‘नॅशनल चार्टर ऑफ जुलै २०२५’ तयार झाला, ज्यात ८४ शिफारसींचा समावेश होता. यात काही बदल होणार आहेत…
pune accident:
Bangladesh Election 2026:
Pakistan Hockey Team: पाकिस्तानची पुन्हा नाचक्की; हॉटेलचे बिल न भरल्याने खेळाडू रस्त्यावर
पाकिस्तानी खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे. खेळाडूंच्या हॉटेलचं बिल न भरल्याने खेळाडूंना बराच वेळ रस्त्यावर बसून राहावे लागले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी हॉकी टीम ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे आपल्या स्पर्धेसाठी गेले असताना ते ज्या हॉटेलमध्ये थांबणार होते त्या हॉटेलचं पाकिस्तान हॉकी फेडरेशनने बिल न भरल्यामुळे त्यांना तिथे प्रवेश नाकारण्यात आला.होबार्ट येथे होणाऱ्या एफआयएच प्रो लीग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पाकिस्तानी हॉकी संघ ऑस्ट्रेलियात आहे. पाकिस्तान संघाला प्रो लीगमध्ये आतापर्यंत खेळलेल्या सर्व म्हणजेच सहा मॅचमध्ये हार पत्करावी लागली आहे.वृत्तानुसार, संघाला सांगण्यात आले की त्यांनी खेळाडू आणि व्यवस्थापन कर्मचाऱ्यांसाठी कॅनबेरा येथील एका चार स्टार हॉटेलमध्ये खोल्या बुक केल्या आहेत आणि बिले भरण्यात आली आहेत. परंतु जेव्हा संघ आला तेव्हा त्यांना कळले की हॉटेलचं बिल भरलेलंच नाही, त्यामुळे त्यांचं बुकिंग रद्द झालं आहे. वेळेच्या फरकामुळे संघाचे प्रशिक्षक ताहिर जमान हॉकी फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकले नाहीत.काही तासांनंतर, हॉटेल कर्मचाऱ्यांनी अखेर थकलेल्या खेळाडूंना काही खोल्या दिल्या. फक्त काही खोल्या असल्याने, संघाला त्यानुसार खोल्या विभागून घ्याव्या लागल्या. दुसऱ्या दिवशी, पाकिस्तान संघाने पुन्हा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना २-३ ने गमावला.काही स्थानिक पाकिस्तानी नागरिकांशी संपर्क साधल्यानंतर आणि त्यांनी आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आल्यानंतर हॉकी संघाला अखेर हॉटेलचे बिल भरता आले, असे वृत्त आहे.आर्थिक कारणांमुळे संघाला फटका बसण्याची ही पहिलीच वेळ नाही. अहवालानुसार, अर्जेंटिनामध्ये झालेल्या FIH प्रो लीगच्या पहिल्या टप्प्यात, कथित 'निधीअभावी' खेळाडूंना त्यांचे दैनिक भत्तेही देण्यात आले नव्हते.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकातून एक मोठा आणि खळबळजनक दावा करण्यात आला आहे. शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकातील अध्यक्षीय लेखात म्हटले आहे की, विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता. या दाव्यामुळे राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.अजित पवारांच्या निधनानंतर विलिनीकरणाच्या चर्चांना उधाणउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. जरी स्वतः शरद पवार यांनी सार्वजनिकपणे विलिनीकरणाच्या चर्चांपासून स्वतःला दूर ठेवले असले, तरी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे संकेत सातत्याने मिळत आहेत.‘दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले’साप्ताहिकातील लेखात शशिकांत शिंदे यांनी नमूद केले आहे की, विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचे सर्व नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देणार होतो. पण दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की, दादांचे स्वप्न पूर्ण करायचे. त्यासाठी प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर खुद्द शरद पवार यांनीच १२ फेब्रुवारीला विलिनीकरणाचा निर्णय होणार होता, असे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण अधिक तापले. याच मुद्द्यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे भावूक झाल्या होत्या. दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणाबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा केला होता. यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीतील दुसऱ्या गटाचे नेते प्रफुल्ल पटेल–सुनील तटकरे गटाकडून रोहित पवारांना खुले आव्हान देण्यात आले. त्यावर रोहित पवारांनी, दादांच्या निधनामुळे आम्ही सध्या संयम बाळगत आहोत, असे म्हणत आक्रमक भूमिका टाळल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु, आता शशिकांत शिंदे यांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता शशिकांत शिंदे यांच्या दाव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

34 C