गोव्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते ७७ फुटी रामाच्या मूर्तीचे अनावरण
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात रामाच्या जगातील सर्वात उंच ७७ फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण केले . श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम मठाच्या आवारात ही मूर्ती उभारण्यात आली आहे. मठाला ५५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रामाची जगातली सर्वात उंच मूर्ती उभारण्यात आली आहे.पंतप्रधान मोदींनी अनावरण केलेला हा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी साकारला आहे. याआधी शिल्पकार राम सुतार यांनीच गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांची जगातली सर्वात उंच मूर्ती उभारली आहे.मठाला ५५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांच्या निमित्ताने दररोज मठात दहा हजार भाविक दर्शनासाठी येत आहेत. दक्षिण गोव्यातील कॅनाकोना येथील परतागल गावात असलेल्या मठाचे सध्याचे संकुल सुमारे ३७० वर्षांपूर्वी बांधले आहे.गोव्याला जाण्यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी कर्नाटकातील उडुपी येथे रोड शो केला. तिथे त्यांनी श्रीकृष्ण मठात लक्ष कंठ गीता पारायण कार्यक्रमात भाग घेतला . या कार्यक्रमात, पंतप्रधानांनी विद्यार्थी, संत, विद्वान आणि विविध क्षेत्रातील लोकांसह एक लाखांपेक्षा जास्त लोकांसह भगवद्गीतेतील श्लोकांचे पठण केले.उडुपीमध्ये पंतप्रधानांनी सुवर्ण तीर्थ मंडपाचे उद्घाटन केले आणि कनकदासाशी संबंधित पवित्र स्थान 'कनकण किडी' साठी सोन्याच्या आवरणाचे उद्घाटन केले.कार्यक्रमाला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी उडुपीमध्ये जनसंघ आणि नंतर भाजपच्या सुशासन मॉडेलची आठवण करून दिली. ते म्हणाले की, १९६८ मध्ये व्हीएस आचार्य उडुपी महानगरपालिकेत निवडून आल्यानंतर येथे स्वच्छता आणि ड्रेनेज व्यवस्थेचे एक नवीन मॉडेल तयार करण्यात आले.पंतप्रधान म्हणाले की, आज जेव्हा जगाने एक लाख लोकांना गीतेतील श्लोकांचे एकत्र पठण करताना पाहिले, तेव्हा भारताची आध्यात्मिक शक्ती जगासमोर प्रकट झाली.
Putin visit India : पुतीन ४ डिसेंबरपासून भारत दौऱ्यावर
नवी दिल्ली : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा भारत दौरा निश्चित झाला आहे. ते दोन दिवसीय दौऱ्यासाठी ४ डिसेंबरला भारतात दाखल होतील. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पुतीन यांच्या दौऱ्याविषयीची औपचारिक घोषणा केली आहे. भारत आणि रशियामध्ये २३ वी वार्षिक शिखर परिषद होईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात महत्वाच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होईल. संबंधित परिषदेसाठी […] The post Putin visit India : पुतीन ४ डिसेंबरपासून भारत दौऱ्यावर appeared first on Dainik Prabhat .
Devendra Fadnavis : “विकासाची दृष्टी नसलेले लोक टीका करतात”–देवेंद्र फडणवीस
Election News | Devendra Fadnavis – ज्या पक्षांकडे विकासाची दृष्टी नाही किंवा ज्यांना बोलायला काहीच नाही त्यांना टीका करण्याची गरज वाटते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील परतूर येथे एका सभेत बोलताना फडणवीस म्हणाले होते की, भाजपकडे राज्याच्या विकासाची दृष्टी आहे, म्हणूनच ते टीका करत नाहीत. […] The post Devendra Fadnavis : “विकासाची दृष्टी नसलेले लोक टीका करतात” – देवेंद्र फडणवीस appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : निवडणुकीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडणार नाही, त्यासाठी जिथे जास्त आरक्षण कोटा असेल तिथे पुन्हा सोडत घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणी 21 जानेवारीला ठेवली आहे. मात्र सर्व निवडणुका कोर्टाच्या संभाव्य आदेशाधीन राहणार आहेत. न्यायालयाच्या निर्देशानंतर आता ज्या ठिकाणी आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे, त्या जिल्हा […] The post Maharashtra OBC Reservation : ‘या’ ठिकाणी नव्याने सोडत काढणार; न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोग सक्रिय appeared first on Dainik Prabhat .
Ayush Mhatre smashes century in SMAT 2025 : भारतीय क्रिकेट संघ सध्या मैदानापासून दूर असला तरी, देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीमध्ये खेळाडू जोरदार प्रदर्शन करत आहेत. या स्पर्धेत युवा फलंदाज आयुष म्हात्रेने शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) मुंबई विरुद्ध विदर्भ सामन्यात शानदार शतक झळकावले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे, आजच बीसीसीआयने त्याची अंडर-१९ […] The post Ayush Mhatre Century : कर्णधारपद मिळताच आयुष म्हात्रेनं ठोकलं तुफानी शतक; मुंबईचा विदर्भावर दणदणीत विजय! appeared first on Dainik Prabhat .
फॅन्सी नंबरप्लेटसाठी पठ्याने मोजले तब्बल 1.17 कोटी; ‘या’नंबरमध्ये काय आहे खास? वाचा…
India Most Expensive Number Plate : हरियाणातील हिसार येथे कार नंबर प्लेटसाठी देशातील सर्वात मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. ‘HR88B8888’ या व्हीआयपी नंबर प्लेटसाठी झालेल्या लिलावात तब्बल 1.17 कोटी रुपयांची अविश्वसनीय बोली लागली आहे. त्यामुळे हा क्रमांक भारतातील सर्वात महागडा वाहन नोंदणी क्रमांक ठरला आहे. या खास श्रेणीतील नंबरसाठी बुधवारी लिलाव झाला. सुरुवात फक्त 50, […] The post फॅन्सी नंबरप्लेटसाठी पठ्याने मोजले तब्बल 1.17 कोटी; ‘या’ नंबरमध्ये काय आहे खास? वाचा… appeared first on Dainik Prabhat .
प्रतिनिधी: भारतात मोठ्या प्रमाणात डिजिटल फसवणूकीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. वाढत्या सायबर गुन्ह्यांचे केसेस पाहता भारती एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाळ विठ्ठल यांनी या सततच्या वाढत्या गुन्ह्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या घटना आटोक्यात येण्यासाठी एअरटेलकडून राबवल्या जाणा-या आवश्यक उपाययोजनांबद्दल माहिती देण्यासाठी ग्राहकांना उद्देशून त्यांनी पत्र लिहिले आहे.यामध्ये म्हटले गेले आहे की,आजकाल बनावट पार्सल डिलीव्हरीचे कॉल, फिशिंग लिंक्स आणि डिजिटल अरेस्ट आदी घोटाळे मोठ्या प्रमाणात घडत असताना एअरटेल आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर त्यांनी एअरटेल पेमेंट्स बँकेच्या सेफ सेकं अकाउंटची घोषणा केली. हे खाते ग्राहकांच्या मुख्य बँक खात्यापासून स्वतंत्र ठेवले जाते. यामुळे डिजिटल पेमेंटसाठी वापरण्यात येणारा पैसा सुरक्षित राहतो आणि कोणत्याही संभाव्य फसवणूकीपासून अतिरिक्त संरक्षण मिळते.'एअरटेल नेटवर्कमध्ये होणारे गुन्हे किंवा फसवणूकीच्या घटना आमच्यासाठी मोठी चिंतेची बाब आहे. ग्राहकांची सुरक्षितता हेच आमचे कायमस्वरुपी प्राधान्य राहील' असे एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाळ विठ्ठल यांनी पुढे सांगितले.आपल्या ग्राहकांच्या डिजीटल सुरक्षिततेसाठी एअरटेलकडून होत असलेल्या उपाययोजनांचीही त्यांनी यावेळी माहिती दिली.ते म्हणाले आहेत की,' एअरटेल कंपनी अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा उपयोग करुन ग्राहकांना स्पॅम कॉल आणि मेसेजबाबत कल्पना यावी याकरिता त्वरित अलर्ट देते. ग्राहकांनी चुकून एखादी लिंक क्लिक केली असेल तर ती लिंक ब्लॉक करण्याचीही सोय उपलब्ध करण्यात आली आहे.'आपल्या निवेदनात्मक पत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की, 'परंतु आजच्या डिजिटल युगात आपले प्राथमिक बँक खाते किंवा इतर पेमेंट एप्लिकेशनशी जोडल्यास आपल्या बचतीला धोका निर्माण हो शकतो.' अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. हा धोका टाळण्यासाठी तसेच ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी सेफ सेकंड अकाऊंट हा सुरक्षित आणि सोप्पा उपाय आता उपलब्ध करुन दिल्याचे ते म्हणाले आहेत.ग्राहकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात गोपाळ विठ्ठल यांनी सेफ सेकंड अकाउंटबद्दल तपशीलवार माहिती दिली.पत्रातील माहिती -सेफ सेकंड अकाउंट हे मुख्यतः दैनंदिन डिजीटल पेमेंटसाठी तयार करण्यात आले आहे.या खात्यात कमी रक्कम ठेवण्याचीही मुभा आहे. या शिल्लक रकमेवर व्याजही दिले जाते.एअरटेल पेमेंटंस बँकेतून कर्ज किंवा क्रेडिट सुविधा देत नसल्याने या खात्यात मोठी रक्कम ठेवण्याची गरज नसतेहे खाते एअरटेल थॅँक्स एप्लिकेशनच्या मदतीने सुरु करता येते. याकरिता एप्लिकेशनमधील पेमेंट बँक या ऑप्शनवर क्लिक करा, आधार आणि पॅन आधारित केव्हायसी पूर्ण करा. एमपीन सेट करा, खात्यात थोडी रक्कम जमा करा. या प्रक्रियेनंतर तुम्ही व्यवहार सुरक्षितपणे सुरु करु शकता.ग्राहकांना आपल्या मुख्य बँकेतील खात्यातून पैसे हस्तांतरित करुन किंवा एअरटेल पेमेंट्स बँकेच्या कोणत्याही अधिकृत रिटेल पोइंटवर रोख रक्कम जमा करुन सेफ सेकंड अकाउंटमध्ये सहजपणे पैसे अदा करता येतात. या सुविधेमुळे ग्राहकांना कोणत्याही अडथळ्याविना त्यांचे आर्थिक व्यवहार अनधिकृत पेमेंट्स तसेच फसवणूकीपासून सुरक्षित ठेवतात.डिजीटल सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी गोपाळ विठ्ठल यांनी ग्राहकांना सेफ अकाउंट सुरु करण्याचे आवाहन केले.सेफ सेकंड अकाउंट सुरु करण्यासाठी काही मिनिटे लागतात. हे अकाउंट तातडीने सुरु करा.आपले पैसे सुरक्षित ठेवा. एअरटेल आपल्या ग्राहकांना सुरक्षित, सर्वसमावेशक आणि वापरण्यास सोप्या अशा आर्थिक सेवा देण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहील.’ अशा शब्दांत त्यांनी ग्राहकांना पत्राद्वारे आश्वासन दिले आहे.संबंधित सुविधेकरिता नियम व अटी लागू राहतील. अधिक माहितीसाठी एअरटेलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या असे कंपनीने यावेळी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय, जन्मतारखेचा पुरावा म्हणून ‘आधार कार्ड’ ग्राह्य नाही
मुंबई : जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारण्यावर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकारने बंदी घातली आहे. बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे तयार होण्याचे प्रकार रोखण्यासाठी आणि अनियमिततेवर नियंत्रण आणण्यासाठी दोन्ही राज्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, आधारचा वापर करून काढलेली सर्व विलंबित जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.उत्तर प्रदेशच्या नियोजन विभागाने स्पष्ट केले आहे की, आधार कार्डाशी कोणतेही जन्म प्रमाणपत्र जोडलेले नसल्याने ते जन्मदाखला म्हणून ग्राह्य धरणे चुकीचे ठरते. विशेष सचिव अमित सिंग बन्सल यांनी सर्व विभागांना या संदर्भातील सूचना पाठवल्या आहेत.महाराष्ट्र महसूल विभागानेही अशाच प्रकारचे आदेश जारी केले आहेत. जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा, २०२३ लागू झाल्यानंतर आधाराच्या आधारे तयार केलेली प्रमाणपत्रे वैध मानली जाणार नाहीत, असे निर्देश देण्यात आले. तसेच कॅबिनेट मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी संशयास्पद प्रमाणपत्रे जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.महसूल विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांत ११ ऑगस्ट २०२३ नंतर जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणांनंतर जारी करण्यात आलेले उप-तहसीलदारांचे आदेश पुनरावलोकनासाठी मागे घेण्यास सांगितले आहे. योग्य निकषांनुसार नसलेले अर्ज तत्काळ रद्द केले जातील आणि CRS पोर्टलवरील नोंदी हटवण्यात येतील.निवडणूक प्रक्रियेसंदर्भात मात्र सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड ओळखपत्र म्हणून वापरण्यास परवानगी दिली आहे. बिहारमधील मतदार याद्यांमध्ये इतर ११ कागदपत्रांसोबत आधारही स्वीकारण्याचे निर्देश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.सरकारच्या नवीन निर्णयानुसार, जन्म प्रमाणपत्रासाठी आधार पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही. अधिकृत कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल. या पावलामुळे प्रशासनात पारदर्शकता वाढून बनावट कागदपत्रांचा वापर रोखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आता ‘या’राज्यात वाढला बिबट्याचा धोका; आठवड्याभरात तिसऱ्यांदा झाले दर्शन !
Leopard news – जयपूरमध्ये बिबट्या दिसल्याने पुन्हा एकदा घबराट पसरली आहे. शास्त्री नगर, कल्याण कॉलनी आणि सिकर हाऊस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची उपस्थिती दिसून आली आहे. आठवड्यात बिबट्याचे हे तिसरे दर्शन झाले आहे. स्थानिक वन विभागाने शोध मोहीम सुरू केली आहे आणि बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेत आहे. जयपूरच्या मुख्य शहरी लोकसंख्येमध्ये बिबट्यांच्या वारंवार हालचालींमुळे दहशतीचे […] The post आता ‘या’ राज्यात वाढला बिबट्याचा धोका; आठवड्याभरात तिसऱ्यांदा झाले दर्शन ! appeared first on Dainik Prabhat .
India U19 squad Annonce for Asia Cup 2025 : बीसीसीआयने शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) दुबई येथे १२ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या अंडर-१९ आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. या १५ सदस्यीय संघात वैभवला स्थान मिळाले असले तरी, कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्यापेक्षा थोडा वरिष्ठ असलेल्या मराठमोळ्या आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघाचा युवा […] The post India U19 Squad : आशिया कपसाठी भारताचा संघ जाहीर! मराठमोळ्या खेळाडूची कर्णधारपदी वर्णी, वैभव सूर्यवंशीला मिळाली संधी appeared first on Dainik Prabhat .
रशियाचे राष्ट्रपती पुतिन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार
नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्रपती पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते चार आणि पाच डिसेंबर २०२५ रोजी भारतात असतील. या दौऱ्यात पुतिन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. पुतिन यांच्या भारत दौऱ्यात रशिया आणि भारत यांच्यातील सहकार्याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.At the invitation of Prime Minister Narendra Modi, President of the Russian Federation Vladimir Putin will pay a State visit to India from 04 - 05 December 2025 for the 23rd India-Russia Annual Summit. During the visit, President Putin will hold talks with Prime Minister Narendra… pic.twitter.com/EHmRqtxw9e— ANI (@ANI) November 28, 2025राष्ट्रपती भवन येथे रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावतीने परंपरागत पद्धतीने स्वागत केले जाईल. पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवन येथे डिनर पार्टीचे आयोजन केले जाणार आहे.युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच पुतिन भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, ऊर्जा यांसह अनेक विषयांतील रशिया आणि भारत यांच्यातल्या सहकार्याबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे दोन्ही देशांपुढे निर्माण झालेली आव्हाने आणि त्यावरील तोडगा यावरही चर्चा होणार आहे. रशिया आणि भारत यांच्यात युक्रेन युद्ध या विषयावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.पुढील काही वर्षांत भारत-रशिया व्यापार १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. थेट रुपया-रुबल व्यवहार अधिक मजबूत केले जातील. खते, कोळसा, अणुऊर्जा आणि शेती या क्षेत्रात नवीन करार केले जातील. त्याच वेळी, डॉलरपासून दूर जाऊन, दोन्ही देश अमेरिकेच्या निर्बधांना समर्थपणे तोंड देण्याचा प्रयत्न करतील.भारत रशियाकडून आयात करायच्या संरक्षण साहित्य, तेल आदी विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहे.
मोहित सोमण: काही क्षणापूर्वी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) दुसऱ्या तिमाहीची जीडीपी व इतर सांख्यिकी आकडेवारी जाहीर केली आहे. चकित करणाऱ्या अभ्यासातील माहितीप्रमाणे बहुप्रतिक्षित सकल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product GDP) रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली आहे. कारण यंदाच्या दुसऱ्या तिमाहीत इयर ऑन इयर बेसिसवर तगड्या ८.२% संख्येने जीडीपी वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत हा दर ५.६% होता. विशेषतः वाढलेल्या जीडीपीत सर्वाधिक योगदान शेतीच्या तुलनेत उत्पादन व दुय्यम क्षेत्राची दिसली आहे. जीडीपीत हा गेल्या सहा तिमाहीतील सर्वाधिक प्रमाणात वाढलेला हा दर असून देशाची नाममात्र वाढ (Nominal Growth) इयर ऑन इयर बेसिसवर दुसऱ्या तिमाहीत (Q2FY26) ८.७% वाढली आहे. वास्तविक जीडीपी (Real GDP) दर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ५.६% तुलनेत यंदा ८.२% वाढला असल्याचे सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे. याच वास्तविक दराचे प्रमाण यंदाच्या पहिल्या तिमाहीत (Q1) ८.०% होते. विशेषतः क्षेत्रीय पातळीवर पाहिल्यास वास्तविक जीवीए (Gross Value Added GVA) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) गेल्या वर्षीच्या ४४.९४ लाखकोटींच्या तुलनेत या तिमाहीत ४८.६३ लाख कोटीवर वाढले आहे असे सांख्यिकी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. माहितीनुसार, जीवीएतील नाममात्र वाढदर (Nominal GVA) इयर ऑन इयर बेसिसवर ७१.४५ लाखकोटींच्या तुलनेत ७७.६९ लाख कोटींवर वाढले आहे.विशेषतः उपभोग खर्चातही (Real Consumption Expenditure) यामध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ६.४% तुलनेत ७.९% वाढ झाली आहे. विशेषतः सरकारने जीएसटी दरकपात व तर्कसंगतीकरण (GST Rationalisation) केल्याचा फायदा बाजारपेठेत ग्राहकांना झाल्याचे स्पष्ट होते. उत्पादन क्षेत्रात ९.१%, बांधकाम व्यवसायात ७.२%, वित्तीय व व्यवसायिक व रिअल इस्टेट क्षेत्रात इयर ऑन इयर बेसिसवर १०.२% वाढ झाली आहे. शेती व उत्पादन क्षेत्रात सर्वाधिक वाढ दिसून आली आहे कारण आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ४.१% तुलनेत यंदा ८.५% वाढ झाली आहे. उत्पादन क्षेत्रात इयर बेसिसवर गेल्या गेल्या तिमाहीतील २.२% तुलनेत यंदा ९.१% वाढ झाली आहे.प्राथमिक क्षेत्रातील तुलनेत यंदा दुय्यम क्षेत्रात (Secondary Sector) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर सर्वाधिक वाढ झाली आहे. दुय्यम क्षेत्रात उत्पादन, इलेक्ट्रिसिटी, गॅस, पाणीपुरवठा, व इतर संबंधित सेवा सुविधांचा समावेश तर प्राथमिक क्षेत्रात शेती व संबंधित क्षेत्राचा समावेश होतो. सेवा क्षेत्रात (Teritary Sector or Service Sector) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ७.२% तुलनेत यंदा ९.२% वाढ झाली आहे. चकित करणारा निकाल लागला आहे कारण यापूर्वी विश्लेषकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात जीडीपीतील वाढ भूराजकीय कारणांमुळे व अस्थिरतेमुळे दर्शविली नव्हती. मात्र देशांतर्गत वाढलेल्या उपभोग (Consumption) वाढत्या मागणीमुळे (Demand) सह वाढलेल्या उत्पादनामुळे (Manufacturing) झाली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. प्रामुख्याने सरकारने केलेल्या सकारात्मक जीएसटी निर्णयासह उत्पादन वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा फायदा जीडीपीत दिसून आला आहे.
Women Employment Scheme : ‘या’ 10 लाख महिलांच्या खात्यात 10 हजार जमा; कोणाला मिळाला लाभ?
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी राज्यातील महिलांमध्ये उद्योजकाता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेतील 10 लाख महिलांच्या 1 हजार कोटी रुपयांचे वाटप केले. पाचव्यांदा सत्तेत आल्यानंतर नितीशकुमार यांनी मंत्रीमंडळातील सहकारी व उच्चस्तरीय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये डीबीटी प्रणालीद्वारे प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये 10 हजारांची रक्कम पाठवले. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना ग्रामीण विकासमंत्री श्रवणकुमार […] The post Women Employment Scheme : ‘या’ 10 लाख महिलांच्या खात्यात 10 हजार जमा; कोणाला मिळाला लाभ? appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : भारताला शिक्षणाची जागतिक राजधानी बनवण्याच्या स्वप्नाला वाचा फोडणाऱ्या “अनलॉकिंग द ग्लोबल युनिव्हर्सिटी : रीइमॅजिनिंग इंडिया ॲज द वर्ल्ड्स एज्युकेशन कॅपिटल” ( Unlocking the Global University : Reimagining India as the World’s Education Capital) या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच राजधानी दिल्लीत मोठ्या दिमाखात पार पडला. विश्वकर्मा विद्यापीठ व संस्थांचे वरिष्ठ प्राध्यापक तथा मुख्य […] The post अनलॉकिंग द ग्लोबल युनिव्हर्सिटी: प्रा. डॉ. बिपीन सुळे यांच्या पुस्तकाचे चेतन भगत यांच्या हस्ते दिल्लीत प्रकाशन appeared first on Dainik Prabhat .
कुर्ला बस स्थानकावर १४ वर्षीय मुलाच्या लैंगिक छळप्रकरणी एकाला अटक
मुंबई : कुर्ला बस स्थानकावर अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ३५ वर्षीय आनंद बाळू जाधव याला विशेष पोक्सो न्यायालयाने तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश पी. एन. राव यांनी दिलेल्या निकालात पीडित मुलाची साक्ष विश्वासार्ह ठरली असून तीच गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेशी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.न्यायालयाने म्हटले की पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्ह्यांमध्ये पीडिताची साक्षदेखील ठोस पुरावा ठरू शकते. आरोपीने मुलावर लैंगिक हेतूने अयोग्य स्पर्श केला आणि अश्लील शब्द वापरल्याचे न्यायालयाला पटले.जाधव याला पोक्सो कायद्याच्या कलम ८ (लैंगिक अत्याचार) आणि कलम १२ (लैंगिक छळ) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. तसेच आरोपीने खटल्यादरम्यान तुरुंगात घालवलेले ११ महिने १३ दिवस शिक्षेत समायोजित करण्यात आले. पीडित मुलाला नुकसानभरपाई देण्यासाठी प्रकरण जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाकडे पाठवण्याचे आदेशही देण्यात आले.विशेष सरकारी वकील गीता शर्मा यांनी आठ साक्षीदारांच्या साक्षी सादर करत आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध केले. यात मुलगा, त्याची आई, पोलिस अधिकारी आणि शाळेतील कर्मचारी यांचा समावेश होता. शाळेच्या नोंदी आणि अधिकारी यांच्या साक्षीतून मुलाचे वय १४ वर्षे असल्याची खात्री पटली.३ नोव्हेंबर २०१८ रोजी पहाटेच्या सुमारास मुलगा बसची वाट पाहत असताना आरोपी त्याच्याजवळ आला आणि पैशांचे आमिष दाखवत अश्लील वर्तन केले. घाबरलेला मुलगा सरळ जवळच्या पोलिस चौकीकडे धावला. आरोपी त्याचा पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी जाधवला पकडले आणि कुर्ला पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला.
मोठी बातमी: पडद्यामागे भारत व युएस व्यापारी करार होणार? वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांचे मोठे विधान
प्रतिनिधी: युएस व भारत यांच्यातील' ट्रेड डील' आता पूर्णत्वास येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण नवी दिल्लीतील वाणिज्य (व्यापार( विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी आज लवकरच या व्यापारी करार या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल असे विधान केले आहे. नव्या माहितीनुसार,'प्रथम गरज आहे ती म्हणजे फ्रेमवर्क ट्रेड डील, जी परस्पर शुल्कांना तोंड देण्यास सक्षम आहे' असे भारताचे व्यापार सचिव राजेश अग्रवाल यांनी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या एका कार्यक्रमात म्हटले.भारत युएस यांच्यातील संबंध अतिरिक्त टॅरिफ मुद्यावर चांगले राहिलेले नाहीत हे सर्वश्रुत आहे परंतु तरीही वेळोवेळी युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेकांची स्तुतीही केली आहे. ही अडलेली व्यापारी चर्चा आता निर्णायक पातळीवर पोहोचल्याची शक्यता झाला आहे. युएसने भारतावर एकूण ५०% टॅरिफ कर लावला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दोन्ही देशांच्या व्यापाऱ्यांना याचा नाहक त्रास झाला. रशियन तेलाच्या खरेदीत कपात करण्याच्या अटीवर अमेरिकेन कर कमी करण्याचे वेळोवेळी सांगितले होते तर भारताकडून देशाच्या हितासाठी जो योग्य निर्णय घेतला जाईल जिथून वाजवी दरात मिळेल तिथून व्यापार करार केला जाईल असे यापूर्वीच म्हटले गेले होते. मात्र गेल्या महिन्यात रिलायन्स रिफायनरीने रशियन तेल आयातीत कपात केली होती.याविषयी अधिक बोलताना,'मला वाटते की मी एवढेच म्हणू शकतो की आम्ही जवळ आहोत, आम्ही बहुतेक मुद्दे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे' असे अग्रवाल अग्रवाल म्हणाले आहेत. उर्वरित कोणत्याही समस्या राजकीय पातळीवर सोडवता येतील असाही उल्लेख त्यांनी केला होता.'आम्ही खूप आशावादी आहोत आणि या कॅलेंडर वर्षात आपल्याला तोडगा निघेल अशी खूप आशा आहे' ते पुढे म्हणाले आहेत.ऑक्टोबरमध्ये भारताची व्यापार तूट ४१.६८ डॉलर अब्जच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली होती. नुकत्याच एका कार्यक्रमात वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले आहेत की,' भारत जागतिक व्यापार विस्तारत आहे आणि सध्या अमेरिका आणि युरोपियन युनियनसह विविध भागीदारांसह मुक्त व्यापार करारांवर (FTA) वाटाघाटी करत आहे'. माहितीप्रमाणे भारत युएसकडून झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून ५० देशांशी एफटीएसाठी चर्चेत आहे. नुकतेच कॅनडाशी व इस्त्राईलशी भारत व्यापारी करारासाठी चर्चेत असल्याचे समजले होते.
‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ने मारली झेप; प्राइम व्हिडिओवरील टॉप अनस्क्रिप्टेड शो
मुंबई : भारताची आवडती एंटरटेनमेंट डेस्टिनेशन असलेल्या प्राइम व्हिडिओने आपल्या अनस्क्रिप्टेड ओरिजिनल मालिकेच्या—टू मच विथ काजोल अँड ट्विंकल—पहिल्या सीझनच्या अप्रतिम यशाचा उत्सव साजरा केला आहे. आपल्या पदार्पणातील या सीझनमध्ये हा टॉक शो प्रचंड हिट ठरला असून भारतातील 93% पेक्षा जास्त पिनकोडपर्यंत पोहोचत प्राइम व्हिडिओवरील सर्वात जास्त पाहिली जाणारी अनस्क्रिप्टेड मालिका ठरला आहे.या टॉक शोचे सूत्रसंचालन काजोल आणि ट्विंकल खन्ना यांनी केले असून त्याचे निर्मितीकार्य बनिजे आशिया यांनी केले आहे. सामान्य सीझनमध्ये सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार, सैफ अली खान, आलिया भट्ट, कृति सेनन, वरुण धवन, करण जोहर आणि असे अनेक मोठे बॉलिवूड तारे सहभागी झाले होते. याशिवाय विशेष भागात क्रिकेट वर्ल्ड कप चॅम्पियन्स जिमिमा रोड्रिग्ज आणि शेफाली वर्मा यांनीही हजेरी लावली होती. भारतात आणि जगातील 240+ देश व प्रदेशांमध्ये स्ट्रीम होत असल्याने टू मच विथ काजोल अँड ट्विंकल हा सर्वात चर्चेत असलेल्या शोमधील एक ठरला असून प्राइम व्हिडिओवरील सर्वात यशस्वी अनस्क्रिप्टेड मालिका म्हणून ओळख मिळवली आहे.निखिल माधोक, डायरेक्टर आणि हेड ऑफ ओरिजिनल्स, प्राइम व्हिडिओ इंडिया म्हणाले, “टू मच विथ काजोल अँड ट्विंकल*ला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद हे सिद्ध करतो की या शोने टॉक शोच्या दुनियेत एक ताजे आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोन आणला आहे आणि त्यामुळेच तो प्राइम व्हिडिओवरील आतापर्यंतचा सर्वात जास्त पाहिला गेलेला अनस्क्रिप्टेड शो बनला आहे.”ते पुढे म्हणाले, या शोची खासियत म्हणजे आमच्या होस्ट्सची अद्वितीय जोडी—ज्या पूर्ण मोकळेपणाने आणि बेधडकपणे आपले विचार मांडतात. त्यांची अप्रतिम केमिस्ट्री एकमेकांसोबत आणि सेलिब्रिटी पाहुण्यांसोबत संपूर्ण देशभर चर्चा घडवते, वेगळे आणि ठळक दृष्टिकोन समोर आणते आणि त्यामुळे हा शो खरोखरच हेडलाईनमध्ये राहणारा ठरला आहे.”मिणालिनी जैन, ग्रुप चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर, बनिजे आशिया आणि एंडेमॉल शाइन इंडिया म्हणाल्या, “काजोल आणि ट्विंकलसह ‘टू मच’ हा एक फिनॉमेनन बनला कारण त्याने प्रेक्षकांना हवी असलेली गोष्ट दिली—म्हणजे अनफिल्टर्ड आणि विनोदी संभाषण. काजोल आणि ट्विंकल एकत्र आल्या क्षणी आम्हाला माहीत होते की त्यांची डायनॅमिक काहीतरी खास करेल, पण या शोने तयार केलेली चर्चा आणि सांस्कृतिक संवाद आमच्या सर्व अपेक्षांहून जास्त होता. प्राइम व्हिडिओसोबतची भागीदारीने त्या एनर्जीला आणखी वाढवले आणि आम्ही मिळून त्यांच्या सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या अनस्क्रिप्टेड मालिकेची निर्मिती केली, जी खरोखर बिंज-वर्थी होती आणि दुर्लक्षित करणे अशक्य होते.”ट्विंकल खन्ना म्हणाल्या, “थेट सांगायचे झाले तर, काजोल आणि ट्विंकलसोबतचे ‘टू मच’ म्हणजे जणू आपल्या मित्रांसोबत बसल्यासारखे—जेथे वातावरण अगदी घरासारखे असते. येथे प्रत्येकजण आरामात राहू शकतो, मनातील गोष्टी बोलू शकतो आणि त्या आठवणी आठवू शकतो ज्या सहसा फक्त मनाच्या कोपऱ्यातच राहतात. सत्य बोलणे आणि मोकळेपणाने व्यक्त होणे हे आमच्या शोचे खरे आकर्षण आहे. हे सर्व लोकांपर्यंत पोहोचताना, त्यांचे लक्ष वेधताना, प्रेम मिळवताना आणि आमच्या शोतील गोष्टींवर चर्चा सुरू करताना पाहणे अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायी आहे.”काजोल पुढे म्हणाल्या, “माझ्या करिअरच्या बहुतांश काळात मी प्रश्नांची उत्तरे देणारी होते, मुलाखत घेणारी नाही. ‘टू मच’साठी सोफ्याच्या दुसऱ्या बाजूला बसणे खूपच ताजेतवाने होते—विशेषतः ट्विंकलसारख्या माझ्या ओळखीतील सर्वात विनोदी आणि चपळ बुद्धीच्या महिलेसोबत. पाहुण्यांनीदेखील आपली खरी आणि बेधडक ऊर्जा घेऊन येणे, आणि त्यांनी जगाला दाखवलेली ती बाजू जी क्वचितच दिसते—हे सर्व खरोखरच खूप खास होते.”
सरकारी कर्मचारी असूनही भाजपचा प्रचार? देवेंद्र फडणवीसांचा सहाय्यक अडचणीत?
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव आणि भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले हे सरकारी कर्मचारी असूनही भाजपचा प्रचार करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल बोंद्रे यांनी केला आहे. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी विद्याधर महाले हे सत्ताधारी पक्षासाठी उघडपणे प्रचार करत असल्याचा दावा माजी आमदार बोंद्रे यांनी […] The post सरकारी कर्मचारी असूनही भाजपचा प्रचार? देवेंद्र फडणवीसांचा सहाय्यक अडचणीत? appeared first on Dainik Prabhat .
IAS Rajesh Agrawal : राजेश अगरवाल राज्याचे नवे मुख्य सचिव; कोण आहेत ते जाणून घ्या…
IAS Rajesh Agrawal : आधार (Aadhaar), जनधन (Jan Dhan), आणि डिजिलॉकर (DigiLocker) यांसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या डिजिटल इंडिया प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि तंत्रज्ञान-स्नेही प्रशासक म्हणून ओळखले जाणारे राजेश अगरवाल (IAS) यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार मीना हे ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असल्याने, १ डिसेंबरपासून अगरवाल हे […] The post IAS Rajesh Agrawal : राजेश अगरवाल राज्याचे नवे मुख्य सचिव; कोण आहेत ते जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .
MS Dhoni hosts Virat Kohli and Rishabh Pant for dinner : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ आता तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना ३० नोव्हेंबर रोजी रांची येथे होणार आहे. रांचीमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्यासाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने खास पाहुणचार आयोजित केला […] The post MS Dhoni Dinner : धोनीकडून विराटचा खास पाहुणचार! डिनरनंतर ‘माही’ने स्वतः कोहलीला हॉटेलवर सोडले, पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .
Share Market Today: सलग तिसऱ्या आठवड्यात तेजी कायम; नोव्हेंबरमध्ये 2% ची दमदार वाढ
Share Market Today: भारतीय शेअर बाजारातील तेजीचा सिलसिला नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस, सलग तिसऱ्या आठवड्यातही कायम राहिला आहे. मात्र, शुक्रवार, २८ नोव्हेंबर रोजी आठवड्याच्या शेवटच्या सत्रात बाजारात किरकोळ नफावसुली दिसून आली. बीएसई सेन्सेक्स 13.71 अंकांनी (0.016%) घसरून 85,706.67 च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 12.60 अंकांनी (0.048%) खाली येत 26,202.95 वर स्थिरावला. विदेशी […] The post Share Market Today: सलग तिसऱ्या आठवड्यात तेजी कायम; नोव्हेंबरमध्ये 2% ची दमदार वाढ appeared first on Dainik Prabhat .
ट्रेनमध्ये ‘मॅगी कुकिंग’चा व्हिडिओ व्हायरल; महिला अटकेत
पुणे : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रेल्वेतील एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला होता. रेल्वेच्या डब्यात प्रवासादरम्यान काहीजण अनोख्या कल्पना अमलात आणतात, मात्र यापैकी काही कृती धोकादायकही ठरू शकतात. अशाच एक प्रकार मध्य रेल्वेच्या एका एक्सप्रेस ट्रेनमध्ये घडला आणि त्याचा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला ट्रेनच्या चार्जिंग पॉइंटमध्ये इलेक्ट्रिक किटली लावून त्यात मॅगी बनवताना दिसते. विशेष म्हणजे, याच किटलीत तिने यापूर्वी सुमारे १५ प्रवाशांसाठी चहा तयार केला होता. प्रवासात अन्न शिजवणे, तेही ट्रेनमधील वीजपुरवठ्याचा वापर करून, हे नियमांच्या पूर्णपणे विरुद्ध असल्याने नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या अधिकृत एक्स हँडलवरून कठोर इशारा देण्यात आला आहे. रेल्वेने स्पष्ट सांगितले की, ट्रेनमध्ये इलेक्ट्रिक किटली किंवा कोणतेही हाय-व्होल्टेज उपकरण वापरण्यास मनाई आहे. अशा वस्तूंमुळे स्पार्क होण्याची किंवा आग लागण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे शेकडो प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ शकतात. अशी कृती ही केवळ असुरक्षितच नाही तर कायद्याने गुन्हा आहे.व्हिडिओतील महिलेची ओळख पटल्यानंतर रेल्वे पोलिसांनी पिंपरी-चिंचवड परिसरातून तिला ताब्यात घेतले. तिच्याविरोधात भारतीय रेल्वे कायदा, १९८९ च्या कलम १५४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा कलम निष्काळजी कृतीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याबाबत आहे.यासंदर्भात महिलेने पुढे येऊन माफी मागितली असून, तिचा उद्देश कोणालाही धोका निर्माण करण्याचा नव्हता, असे तिने स्पष्ट केले. तसेच इतरांनीही असे स्टंट करू नयेत, असे आवाहन तिने केले आहे.रेल्वेच्या नियमानुसार :ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारचे अन्न शिजवणे प्रतिबंधित आहे.चार्जिंग सॉकेटचा वापर केवळ मोबाइल, लॅपटॉपसारख्या कमी वीजेच्या उपकरणांसाठीच केला जाऊ शकतो.स्टोव्ह, चूल, लहान कुकिंग उपकरणे किंवा जास्त वीज खेचणारी साधने वापरण्यास सक्त मनाई आहे.प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत रेल्वे प्रशासनाने अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सर्वांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई : तब्बल १८ वर्षांनंतर ठाकरे कुटुंबियांचं एकत्र येणं आता प्रत्यक्षात उतरल आहे शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’वर जाऊन भेट घेतली. या भेटीत दोन्ही पक्षांनी राज्यातील सहा मोठ्या महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा अंतिम निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. तसेच ठाणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे, […] The post मोठी बातमी..! मुंबईसह ‘या’ 6 महापालिकेच्या निवडणुका उद्धव अन् राज ठाकरे एकत्र लढणार, महाराष्ट्रात ‘त्सुनामी’ येणार? appeared first on Dainik Prabhat .
Narendra Modi : “अत्याचारी व्यक्तींचा अंतही आवश्यक”–पंतप्रधान नरेंद्र मोदी
Narendra Modi – श्रीकृष्णाने युद्धभूमीवर गीतेचा संदेश दिला आणि भगवद्गीता आपल्याला शिकवते की, शांती आणि सत्याच्या स्थापनेसाठी अत्याचारींचा अंत करणे देखील आवश्यक आहे. आम्ही लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून श्रीकृष्णाच्या करुणेचा संदेश देतो आणि त्याच तटबंदीवरून आम्ही मिशन सुदर्शन चक्राची घोषणा देखील करतो. ऑपरेशन सिंदूरमध्ये राष्ट्राने आमचा संकल्प पाहिला आहे. आम्हाला शांतता कशी स्थापित करायची आणि शांतीचे […] The post Narendra Modi : “अत्याचारी व्यक्तींचा अंतही आवश्यक” – पंतप्रधान नरेंद्र मोदी appeared first on Dainik Prabhat .
एल्फिन्स्टन पूल पाडकामाला वेग; मध्य रेल्वेवर १८ तासांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम
मुंबई : मुंबईच्या प्रवासाला साक्षी राहिलेला ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन रोडवरील तब्बल १२५ वर्षे जुना पूल आता इतिहासजमा होत आहे. वरळी–शिवडी उन्नत मार्गाच्या कामाला गती मिळण्यासाठी या जुन्या पुलाचे पाडकाम सुरू केले असून पुलाचा पूर्व आणि पश्चिम भाग आधीच पाडण्यात आला आहे. हा पूल पाडून त्याच्याजागी मुंबईतील पहिला डबल डेकर ब्रीज बांधण्यात येणार आहे. हा डबल डेकर ब्रीज रस्ते वाहतुकीसाठी असणार आहे. या पुलाचा एक डेक हा स्थानिक वाहतुकीसाठी असणार आहे तर दुसरा डेक वरळी आणि शिवडी दरम्यानची वाहतूक अधिक वेगवान व्हावी यासाठी उभारण्यात येणार आहे. जुन्या एल्फिन्स्टन ब्रिजचा रेल्वे मार्गिकेवर उभा असलेला लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम गेल्या महिनाभरापासून रखडले होते. या कामासाठी आता मध्य रेल्वेने एकूण आठ ब्लॉक घेण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे.'महारेल'कडून वारंवार विनंती केल्यानंतर मध्य रेल्वेने अखेर एकूण आठ ब्लॉक्स देण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. यातील एक ब्लॉक सलग १८ तासांचा असणार असून उर्वरित सात ब्लॉक्स प्रत्येकी दोन तासांचे असतील. दोन तासांचे ब्लॉक दररोज रात्री १२ ते पहाटे ३ या वेळेत घेण्यात येणार आहेत.एल्फिन्स्टन पुलाखालूनच उपनगरीय लोकल्स तसेच सीएसएमटीकडे जाणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्या धावत असल्याने या ब्लॉक्सचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होणार आहे. रेल्वेच्या १८ तासांच्या ब्लॉकदरम्यान लोकल सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होईल; तर दूरगामी गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्याची शक्यता आहे. प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार असल्याने रेल्वे प्रशासन त्यावर उपाययोजना आखत आहे.'महारेल'ने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच क्रेन, यंत्रसामग्री आणि पाडकामाची प्राथमिक तयारी पूर्ण केली होती. मात्र रेल्वेकडून ब्लॉक मंजूर न झाल्याने जवळपास महिनाभर हे काम ठप्प राहिले. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे आणि महारेल यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली असून त्यात आठ ब्लॉक्सची योजना निश्चित करण्यात आली आहे.वेळापत्रक लवकरच जाहीर होणारआता या आठ ब्लॉक्सपैकी, दोन तासांचे ब्लॉक कोणत्या दिवशी घेण्यात येणार आणि सलग १८ तासांचा मोठा ब्लॉक नेमका कधी असेल, याचे वेळापत्रक मध्य रेल्वे लवकरच अधिकृतपणे जाहीर करणार आहे. प्रवाशांना आगाऊ सूचना देऊन पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू आहे.एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम पूर्ण झाल्यानंतर वरळी–शिवडी उन्नत मार्गाचा वेग वाढणार असला तरी, येत्या काही दिवसांत मुंबईकरांना रेल्वे प्रवासात मोठी तडजोड करावी लागणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर ५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर 'या'२ प्रमुख कारणांमुळे
मोहित सोमण:रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर ५२ आठवड्यातील उच्चांकावर (All time High) पोहोचला आहे. प्रामुख्याने शेअर दोन कारणांमुळे आज चर्चत राहिला आहे. दिवसभरात शेअर मोठ्या प्रमाणात तेजीत राहिला. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने डिजिटल रिअल्टी, ब्रुकफिल्ड असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड या दोन कंपन्यांशी हातमिळवणी करत डिजिटल कनेक्शियन (Digital Connexion) नावाच्या डेटा सेंटर प्रकल्पाची घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष २०३० पर्यंत भारतातील ए आय (Artificial Intelligence) डेटा सेंटरमध्ये अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे समुहाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हा करार दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर उघडण्यात येणार आहेत. माहितीप्रमाणे, मोठ्या प्रमाणात या प्रकल्पात गुंतवणूक करण्यात येईल. विशाखापट्टणम येथील ४०० एकर परिसरात १ गिगावॉट इतका भव्य प्रकल्प हा असणार आहे. डिजिटल कनेक्शियन कंपनीने डिजिटल कनेक्शनने बुधवारी एका प्रेस निवेदनात म्हटले आहे की, ' कंपनी दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम येथे ४०० एकर (१.६१८७ चौरस किलोमीटर) पसरलेल्या सुविधेत कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित मूळ डेटा सेंटर्सचा १ गिगावॅटचा भव्य कॅम्पस बांधणार आहे. त्यांनी आंध्र प्रदेश आर्थिक विकास मंडळासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.'याखेरीज जेफरीज या ब्रोकरेज कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीजमधील डिजिटल सर्विसेस, एनर्जी, रिटेल या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये दुप्पटीने वाढ होऊ शकते असे म्हटल्यावर गुंतवणूकदारांनीही रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला मोठा प्रतिसाद दिला आहे. रिस्क टू रिवार्ड या गुणोत्तरात कंपनी चांगली कामगिरी करत असून सणासुदीच्या काळात वाढलेली मोठी मागणी, वाढलेल्या विक्रीसह वाढलेले मार्जिन, अपेक्षित महसूल वाढ या कारणामुळे शेअर्समध्ये अपसाईड वाढ दर्शविली गेल्याने शेअर आज मोठ्या प्रमाणात उसळला होता. ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिल्याने १५८०.९० रूपये प्रति शेअरवर उसळला होता. ब्रोकरेज कंपनीने १७८५ रूपये प्रति शेअरची लक्ष्य किंमत (Target Price TP) निश्चित केली होती. त्यामुळे सध्याच्या मूळ किमतीपेक्षा १४% अपसाईडवर (वरच्या पातळीला) शेअर वाढणे अपेक्षित आहे.ब्रोकरेज मते, कंपनीच्या एफएमसीजी क्षेत्रीय कंपनीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सलग गेल्या सहा तिमाहीत कंपनीची वाढ १००% झाल्याने त्यांचा महसूल २.४ अब्ज डॉलरवर पोहोचला होता. याशिवाय रिलायन्सने नुकतीच डेटा सेंटरची घोषणा केल्याने जागतिक ए आय तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत उतरण्याचे कंपनीने ठरवले आहे. जागतिक पातळीवर मोठ्या कंपन्या अभूतपूर्व एआय शर्यतीत टिकून राहण्याचा प्रयत्न करत असताना डेटा सेंटरच्या बांधकामात ट्रिलियन डॉलर्सचा ओघ वाढत आहे. अल्फाबेट इंक कंपनी आंध्र प्रदेश देखील एक प्रमुख ठिकाण म्हणून उदयास येत आहे. गुगलने गेल्या महिन्यात विशाखापट्टणममध्ये एआय इन्फ्रास्ट्रक्चर हब बांधण्यासाठी सुमारे $१५ अब्ज गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली होती. याशिवाय अमेझॉन कंपनीने आर्थिक वर्ष २०३० पर्यंत भारतात क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी १२.७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे, तर चाट जीपीटी (ChatGPT) OpenAI कंपनीने १ गिगावॅट डेटा सेंटर उभारण्याचा प्रयत्न करत आहे अशी माहिती प्रसारमाध्यमांनी यापूर्वी दिली होती. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने गेल्या आठवड्यात TPG Inc. कडून १ अब्ज डॉलर्स मिळवले होते. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, डीमार्ट आणि भारती एअरटेल तुलनेत आरआयएल अर्थपूर्ण सवलतीवर व्यवहार करत आहे.
कौटुंबिक कथेमुळे प्रसिद्ध झालेलं एक अनोख मंदिर
राजस्थान : भारतातील मंदिरांची ओळख साधारणपणे त्या मंदिरातील देवतेवरून होती असते. मात्र राजस्थानात एक अशी ऐतिहासिक धार्मिक वास्तू आहे, जी देवतेपेक्षा तिच्या मागील कौटुंबिक कथेमुळे अधिक परिचित झाली आहे. ‘देवरानी-जेठानी मंदिर’ नावाने ओळखली जाणारी ही दोन मंदिरे प्रत्यक्षात दोन भावजयांनी उभारली आहेत.शेकडो वर्षे जुन्या या मंदिरांची निर्मिती भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात झाली होती. दोन्ही मंदिरं भगवान कृष्णाला समर्पित असली तरी इथली खासीयत म्हणजे शिवलिंगांची अनोखी रचना. एका मंदिरात तब्बल ११ शिवलिंगांची स्थापना करण्यात आली असून या भागात शिवपूजेचा खोलवर प्रभाव असल्याने या शिवलिंगांना विशेष धार्मिक महत्त्व दिले जाते. स्थानिक भाविकांचा असा विश्वास आहे की या शिवलिंगांवर पाणी अर्पण केल्यास घरात शांतता, समाधान आणि समृद्धी नांदते.मंदिर परिसरात खास हवन छत्रही आहे, जिथे वेळोवेळी यज्ञ-विधी पार पडतात. भगवान कृष्णाच्या मनोहर मूर्ती तसेच भिंतीवरील आकर्षक नक्षीकाम आजही दशकांपूर्वीच्या कलेची साक्ष देतात. मजबूत बांधकाम व पारंपरिक राजस्थानी शैलीमुळे हे मंदिर स्थानिकांसह पर्यटकांसाठीही केंद्रबिंदू ठरते.या मंदिरामागे एक रंजक कौटुंबिक कथा सांगितली जाते. बयानी कुटुंबातील दोन भावजयी भगवान श्रीकृष्णाच्या परमभक्त होत्या. त्या दररोज सिकरमधील मदन मोहन मंदिरात पूजेला जात असत. एके दिवशी मोठी भावजय आधी पोहोचली आणि तिने मंदिराचा दरवाजा बंद केला. छोटी भावजय आत येण्यासाठी विनंती करत असताना तिला उत्तर मिळाले—“पूजा करायची असेल तर स्वतःचं मंदिर बांध.” या घटनेनंतर, १९४९ मध्ये छोट्या भावजयीने स्वतःचं मंदिर उभारलं, जे आज देवरानी मंदिर म्हणून ओळखलं जातं. समोरच असलेलं दुसरं मंदिर जेठानीचे, म्हणूनच या दोन्ही मंदिरांना 'देवरानी-जेठानी मंदिर' अशी ओळख मिळाली.ही मंदिरे राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील सीकर शहरातील चांदपोल गेटजवळ एकमेकांसमोर उभी आहेत. त्यामुळे त्यांना ‘आमनेसामने मंदिर’ असंही म्हटलं जातं. ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक वारसा आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायचा असेल तर या मंदिरांना भेट देण्यास हरकत नाही.
'स्थानिक'च्या निवडणुकांबाबत काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय ?
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची पन्नास टक्क्यांची कमाल मर्यादा ओलांडण्यात आल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. या प्रकरणात झालेल्या सुनावणीअंती सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगित देणार नसल्याचे जाहीर केले. पुढील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने २१ जानेवारी २०२६ ही तारीख दिली आहे.नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका निर्धारित वेळेतच होणार आहेत. एकूण ५७ नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम निर्धारित वेळेत होईल, मात्र येथील निवडणूक ही न्याय प्रविष्ट असेल. अंतिम निर्णय २१ जानेवारी २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालय देणार आहे. हा निर्णय या नगरपरिषद आणि नगरपंचायतींना बांधील असणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सप्टेंबर २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या नगरपंचायत, नगरपरिषद, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. मतदारसंघांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर करतेवेळी गडबड झाली आणि ४० नगर परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला. या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या ४० नगर परिषदांचे आणि १७ नगर पंचायतींचे निकाल न्यायप्रविष्ट राहतील आणि या प्रकरणातील पुढील सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी होईल, असे जाहीर केले. ही सुनावणी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एकूण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होईल.याआधी मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणाच्या पेचामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. पण सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका रखडवणे योग्य नाही, असे सांगत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. निवडणूक प्रक्रिया राबवताना जिथे आरक्षण मर्यादा ओलांडण्यात आल्याचा आरोप झाला आहे त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरच निकाल जाहीर करता येईल.निवडणूक प्रचाराच्या वेळेत वाढ आणि मतदानाच्या वेळेत बदलराज्य निवडणूक आयोगाकडून नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियोजनानुसार २ डिसेंबरला राज्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, उमेदवारांना ३० नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रचार करता येईल, त्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावतील. मात्र, आता निवडणूक आयोगाने प्रचाराच्या वेळेत वाढ केली आहे. उमेदवारांना १ डिसेंबरला रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. अपक्षांना बुधवारी चिन्हाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे प्रचारासाठीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. तर, निवडणूक आयोगाने मतदानाच्या वेळेतही बदल केला असून २ डिसेंबरला सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. प्रचार बंद झाल्याच्या वेळेपासून सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी, प्रसारण देखील बंद करावे, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पक्षांना आणि उमेदवारांना दिले आहेत.
धोनीच्या घरी टीम इंडियाची पार्टी; पण गौतम गंभीरची गैरहजेरी
रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये झालेल्या २-० अशा पराभवानंतर भारतीय संघ आता वनडे सामन्यांसाठी रांचीमध्ये दाखल झाला आहे. रांचीत ३० नोव्हेंबरला होणाऱ्या पहिल्या वनडेपूर्वी टीम इंडिया हॉटेलवर पोहोचली असली, तरी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर मात्र अद्याप आलेला नाही. गंभीर अनुपस्थित असतानाच भारतीय खेळाडू माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या फार्महाऊसला भेट देण्यासाठी गेले.रांचीमध्ये धोनीच्या फार्महाऊसवर भारतीय खेळाडूंसाठी खास पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह बहुतेक वरिष्ठ खेळाडूंनी धोनीची भेट घेतली असून टीमचा कोच गंभीर मात्र या वेळी गैरहजर होता.धोनी आणि गंभीर यांच्यातील जुन्या वादाची चर्चा पुन्हा एकदा रंगताना दिसत आहे. याआधी २०११ च्या विश्वविजयानंतर गंभीरने अनेकदा अप्रत्यक्षपणे केलेल्या टीकेमुळे दोघांमध्ये मतभेद असल्याची चर्चा वारंवार झाली. ‘वर्ल्ड कप केवळ एका सिक्समुळे नव्हे, तर संपूर्ण संघाच्या कामगिरीमुळे जिंकला’ असे गंभीरचे मत त्या काळात चर्चेत आले होते.दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज हरल्यानंतर गंभीरवर चाहत्यांचा रोष वाढला आहे. गुवाहाटीतील पराभवानंतर स्टेडियममध्ये गंभीरविरोधात घोषणा देण्यात आल्या आणि त्याला पदावरून दूर करावे, अशी मागणीही झाली. या प्रतिक्रियांबाबत विचारले असता, आपल्या पदाबाबतचा निर्णय बीसीसीआय घेईल, मी टीमपेक्षा मोठा नाही, असे गंभीरने सांगितले. तसेच आपल्या कार्यकाळात भारताने इंग्लंड सीरिज २-२ अशी बरोबरीत सोडवली, तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकले, हेही त्याने स्पष्ट केले.
श्रीलंकेतील भीषण पुरामुळे ५६ जणांचा मृत्यू ; ६० हून अधिक बेपत्ता
shrilanka Floods। श्रीलंका सध्या अतिशय कठीण काळातून जात आहे. दिवसेंदिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे देशाचा मोठा भाग पाण्याखाली गेला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सरकारी अहवालानुसार, आतापर्यंत ५६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ६०० हून अधिक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. श्रीलंकेतील पुरामुळे साठ लोक बेपत्ता आहेत. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, […] The post श्रीलंकेतील भीषण पुरामुळे ५६ जणांचा मृत्यू ; ६० हून अधिक बेपत्ता appeared first on Dainik Prabhat .
‘इश्क’चित्रपटाला 28 वर्ष पूर्ण; अजय देवगणने शेअर केली खास पोस्ट
Posted by Ajay Devgn : अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘इश्क’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आज २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने अजय देवगणने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये […] The post ‘इश्क’ चित्रपटाला 28 वर्ष पूर्ण; अजय देवगणने शेअर केली खास पोस्ट appeared first on Dainik Prabhat .
व्लादिमिर पुतीन यांचे भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर ; पंतप्रधानांसह ‘या’नेत्यांसोबत होणार बैठक
Vladimir Putin visti India। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या वर्षी डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या भारत दौऱ्याच्या वेळापत्रकाची संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुतिन ४ आणि ५ डिसेंबर रोजी भारतात येणार आहेत. या भेटीदरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील. रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेने भारतावर शुल्क लादले […] The post व्लादिमिर पुतीन यांचे भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर ; पंतप्रधानांसह ‘या’ नेत्यांसोबत होणार बैठक appeared first on Dainik Prabhat .
दक्षिण आफ्रिकेने केलेल्या पराभवाचा बदला भारत एकदिवसीय मालिकेत घेणार ?
रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका रविवार ३० नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना रविवार ३० नोव्हेंबर २०२५ रोजी झारखंडमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये दुपारी १:३० वाजता सुरू होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने ०-२ अशी जिंकली. दोन्ही सामन्यात भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. या पराभवाचा बदला भारत एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकून घेणार का ? याचीच सध्या चर्चा आहे.सलामीची जोडी म्हणून भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हेच खेळण्याची शक्यता आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमाकांवर खेळण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा यांच्यापैकी एकजण चौथ्या क्रमांकावर तर पाचव्या क्रमांकावर केएल राहुल खेळण्याची शक्यता आहे.दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.वेळापत्रकानुसार रविवार ३० नोव्हेंबर २०२५ पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना झारखंडमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १:३० वाजता सुरू होईल.भारत आणि दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यांमध्ये ९४ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने ९४ पैकी ५१ सामने जिंकले आहेत तर भारतीय संघाने ४० सामने जिंकले आहेत आणि तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय संघाने घरच्या मैदानावर १८ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने २६ सामने जिंकले आहेत. परदेशात, भारतीय संघाने १२ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने १४ सामने जिंकले आहेत. तटस्थ ठिकाणी झालेल्या सामन्यांपैकी १० सामने भारताने आणि ११ सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत.एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघकेएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), रिषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह और ध्रुव जुरेलभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका पहिला सामना - ३० नोव्हेंबर २०२५ - रांची, झारखंड दुसरा सामना - ०३ डिसेंबर २०२५ - रायपूर, छत्तीसगड तिसरा सामना - ०६ डिसेंबर २०२५ - विशाखापट्टणम (वायझॅग), आंध्र प्रदेश
Local government elections : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या ५० टक्के आरक्षणाच्या आक्षेपावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत कोर्टाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ५७ संस्थांमधील निवडणुका […] The post स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा! अखेर सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय; सुनावणीवेळी नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .
आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्राशी संबंधित नियमात मोठा बदल ; ‘या’राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
Yogi Adityanath on UIDAI। उत्तर प्रदेशातील योगी सरकारने आधार कार्डबाबतचे नियम बदलले आहेत. सरकारने आधार कार्ड आता जन्म प्रमाणपत्र किंवा जन्मतारखेचा पुरावा म्हणून स्वीकारले जाणार नाहीत हे स्पष्ट केले आहे. नियोजन विभागाने या संदर्भात सर्व विभागांना सूचना जारी केल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारचा हा निर्णय ३१ ऑक्टोबर रोजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (UIDAI) प्रादेशिक कार्यालयाने […] The post आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्राशी संबंधित नियमात मोठा बदल ; ‘या’ राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
Jyotiba Phule Death Anniversary: ज्योतिराव फुलेंच नाव उच्चारलं, की सावित्रीमाईचं नाव आपोआप ओठांवर येतं. कारण हे नातं ‘पती-पत्नी’ या चौकटीपलीकडे जाऊन ‘विचारसहचरत्वा’चं प्रतीक बनलं आहे. समाजात पितृसत्तेला जेव्हा उच्च स्थान होतं, तेव्हा पुरुषांच्या खांद्यावर ठेवलेली सर्वाधिकारांची पिशवी जोतिबांनी धाडसाने दूर फेकली. आणि हाच क्षण होता, ज्यातून सावित्रीचा दर्जा ‘पत्नी’ वरून ‘सहप्रवासी’ झाला. समतेच्या प्रवासातील पहिला […] The post Jyotiba Phule Death Anniversary: आजच्या सावित्रींना महात्मा लाभतील? महात्मा ज्योतिराव फुलेंकडून आजच्या पुरुषांनी धडे घ्यावे असं सर्व काही… appeared first on Dainik Prabhat .
बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादीच्या आठ जणांचा बिनविरोध विजय होताच काका पुतण्यात जुंपली
बारामती: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना बारामती नगर परिषद सातत्याने चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ८ उमेदवारांना बिनविरोध विजय मिळाला. विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अजित पवारांच्या पक्षाच्या ८ नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वीस कोटी रुपयांपर्यंत लाच देण्यात आल्याचा आरोप युगेंद्र पवार यांनी केला आहे. मात्र कोणतेच पुरावे दिलेले नाहीत.न्यायालयाच्या आदेशामुळे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्देशांमुळे दोन प्रभागांतील निवडणुका तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. प्रभाग क्रमांक १३ (ब) व प्रभाग क्रमांक १७ (अ) या दोन जागांसाठी निवडणूक आयोगाकडून सुधारित आदेश आल्यानंतरच पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र, नगराध्यक्ष पदासह उर्वरित सर्व जागांच्या निवडणुका पूर्वनिश्चित वेळापत्रकानुसार होणार आहेत.https://prahaar.in/2025/11/28/the-decision-to-cancel-the-elections-in-these-three-wards-what-is-the-reason-know-in-detail/निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी नव्याने दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले. या अर्जांच्या स्वीकृतीवर तांत्रिक बाबी वरून अर्ज नामंजूर करण्यात आले होते. मात्र यानंतर भाजपचे सतीश फाळके व अविनाश गायकवाड यांनी न्यायालयात धाव घेऊन यावर याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाने सुनावणीनंतर हे अर्ज स्वीकारण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. न्यायालयाने ‘नैसर्गिक न्याय’ तत्त्वानुसार दोन्ही अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले.नव्या अर्जांची छाननी, अर्ज माघार प्रक्रिया आणि अंतिम मान्यता या सर्व बाबींवर राज्य निवडणूक आयोगाचे सुधारित आदेश आवश्यक आहे. तसेच नगराध्यक्ष पद आणि बाकी सर्व प्रभागांची निवडणुका नियोजित वेळापत्रकानुसारच होतील. फक्त दोन जागांची निवडणूक राज्य आयोगाचा पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित राहील, अशी माहिती निवडणूक अधिकारी डॉ. संगीता राजापूरकर यांनी दिली.
सायबर घोटाळे रोखण्यासाठी दूरसंचार विभागाकडून सायबर सुरक्षा कायदा २०२४ लागू
नवी दिल्ली: डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (DoT) विभागाकडून कायद्यामध्ये महत्वाचे बदल सादर केले आहेत. यापूर्वी दूरसंचार विभागाने अस्तित्वात असलेल्या कायद्यात आवश्यक बदल केले गेले होते ज्यामुळे सायबर सुरक्षा कायदा मजबूत होईल. परंतु ते नवीन बदलाचे पुन्हा नोटिफिकेशन काढल्याने संभ्रमाचे वातावरण कायम होते. नव्या बदलासहित सायबर सुरक्षा कायदा २०२४ लागू झाल्याचे स्पष्टीकरण विभागाने दिले आहे. या निमित्ताने ग्राहकांची सायबर घोटाळ्यात अडकण्याची शक्यता दुर्मिळ होणार आहे. यावेळी विभाग सायबर सुरक्षेसाठी महत्वाची नियमावली घेऊन आली आहे. या सुधारित कायद्यानुसार बँकिंग, ई-कॉमर्स, प्रशासन आणि इतर डिजिटल सेवांमध्ये दूरसंचार ओळखपत्रांच्या व्यापक वापरामुळे उद्भवणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी नवीन उपाययोजना सादर केल्या जाणार आहेत.दूरसंचार-सक्षम फसवणुकींपासून संरक्षण वाढेल अशा उपकरणांची ट्रेसेबिलिटी सुनिश्चित होईल असे विभागाने आपल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. यानुसार नव्या नियमात डिजिटल ओळख पडताळणी अत्यंत कडक होऊन सर्व क्षेत्रांमध्ये दूरसंचार ओळखपत्रे वापरणाऱ्या संस्थांची जबाबदारी वाढणार आहे.या दुरुस्तीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मोबाइल नंबर व्हॅलिडेशन (MNV) प्लॅटफॉर्मचे संस्थात्मकीकरण (Institutaionalisation) समावेश आहे. ही नियमावली सेवा प्रदात्यांना (Provider) विकेंद्रित आणि गोपनीयता-अनुपालन यंत्रणेद्वारे, डिजिटल सेवेशी जोडलेला मोबाइल नंबर खरोखरच दावा केलेल्या युजरचा आहे का नाही हे पडताळण्यासाठी ही यंत्रणा अनुमती देते. या उपक्रमामुळे म्यूल अकाउंट्सला आणि ओळखीत फसवणूक करत असलेल्या घोटाळेबाजांपासून सायबर सिक्युरिटी वाढणार आहे व या घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.कायदेशीर उपकरणांमध्ये व्यवहार करणाऱ्या सर्व संस्थांसाठी आरडीएस (Resale Device Scrubbing RDS) प्रक्रिया सादर करतात. या केंद्रीकृत काळ्या यादीत आयएमईआय क्रमांक तपासण्याची आवश्यकता निर्माण करून सरकार ग्राहकांना चोरीला गेलेले क्लोन केलेले किंवा काळ्या यादीत टाकलेले उपकरण नकळत खरेदी करण्यापासून संरक्षण देण्याचे आणि बेकायदेशीर उपकरणे ट्रॅक करण्यात कायद्याच्या अंमलबजावणी करणे विभागाला शक्य होणार आहे.सायबर सिक्युरिटीसाठी वेगळी इकोसिस्टिम निर्माण करून मोबाइल नंबर, आयएमईआय आणि आयपी अँड्रेस यांसारख् गोष्टीचे महत्व ओळखून सरकारने या तिन्ही व्यासपीठांचे एकत्रिकरण करून ही दुरुस्ती केली जाईल यामुळे खरा व्यक्ती तपास यंत्रणांना मिळणे अधिक सोपे ठरू शकते. टेलिकॉम आयडेंटिफायर युजर एटिंटिज (TIUEs) काही प्रमाणात नियंत्रित परिस्थितीत सरकारसोबत संबंधित ग्राहकाचा डेटा शेअर करण्याचे अधिकार यंत्रणेला देते. डेटा संरक्षण मानदंडांचे पालन करताना ट्रेसेबिलिटी, समन्वय आणि फसवणूक प्रतिबंध सुधारण्यासाठी हा उपाय केला गेला असल्याचे विभागाने म्हटले आहे.दूरसंचार विभागाने सलग गॅझेट प्रकाशनांमध्ये दिसणाऱ्या विसंगती देखील स्पष्ट केल्या. त्यांनी आपल्या प्रेस नोटमध्ये दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, टीसीएस सुधारणा नियम, २०२५ २२ ऑक्टोबर २०२५ रोजी जी.एस.आर. ७७१(ई) द्वारे योग्यरित्या सूचित केले गेले होते, परंतु ते अनवधानाने २९ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा प्रकाशित केले गेले. त्यानंतर ही त्रुटी जी.एस.आर. द्वारे दुरुस्त करण्यात आली आहे. 863(E) दिनांक २५ नोव्हेंबर २२०५ सरकारने पुनरुच्चार केला आहे की मूळ दुरुस्ती पूर्णपणे वैध आणि अंमलात आहे.'
“…तर ती तुमची चूक आहे” ; SIR प्रकरणात कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
Supreme Court on SIR। मतदार यादीच्या सध्या सुरू असलेल्या विशेष सघन सुधारणा (SIR) वर याचिकाकर्ते राजद खासदार मनोज झा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी, “ही प्रक्रिया व्यावहारिकदृष्ट्या अन्याय्य आहे” असे म्हटले आहे. त्यांनी असा युक्तिवाद केला की, मतदारांनी त्यांचे जन्म प्रमाणपत्र किंवा त्यांच्या पालकांपैकी एक भारतीय असल्याचे सिद्ध करणारे इतर कागदपत्रे सादर करावीत. जर […] The post “…तर ती तुमची चूक आहे” ; SIR प्रकरणात कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी appeared first on Dainik Prabhat .
Pune District : मोठी बातमी! २ डिसेंबरला सुट्टी जाहीर; पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांची घोषणा
Pune News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी निकालाची घोषणा होणार आहे. नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत पात्र मतदारांना मतदान करता यावे, याकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी […] The post Pune District : मोठी बातमी! २ डिसेंबरला सुट्टी जाहीर; पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांची घोषणा appeared first on Dainik Prabhat .
PM Modi in Goa। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दक्षिण गोव्यातील ऐतिहासिक श्री संस्थान गोकर्ण जीवत्तम मठात भगवान रामाच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. ७७ फूट उंचीचा हा कांस्य पुतळा प्रसिद्ध भारतीय शिल्पकार राम सुतार यांनी बनवला आहे, ज्यांनी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीची रचना देखील केली आहे. पंतप्रधान मोदी दुपारी ३:४५ वाजता मठ परिसरात […] The post प्रभू श्रीरामांच्या भव्य मूर्तींचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार अनावरण ; ७७ फूट उंच मूर्तीची खासियत काय ? वाचा appeared first on Dainik Prabhat .
'या'तीन प्रभागातील निवडणूका रद्दचा निर्णय, काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
पुणे: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या तारखा जवळ आल्यामुळे सर्व पक्षांचे प्रचार दौरे सुरू आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तीन प्रभागामधील निवडणूका थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे. उमेदवारांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे आयोगाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४६ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रचाराचा धुरळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच बड्या पक्षांचे स्टार प्रचारक मैदानात उतरल्याने राजकीय क्षेत्रातून रोज नव्या बातम्या येत आहेत. मात्र, लोकशाहीच्या उत्सावात काही ठिकाणी नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे निवडणूक आयोगाने संबंधित प्रभागांतील निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.https://prahaar.in/2025/11/27/cause-of-massive-fire-in-hong-kong-revealed-55-dead-279-still-missing/यामध्ये पिंपळनेरमधील प्रभाग २, मनमाडमधील प्रभाग १० आणि गेवराईमधील प्रभाग ११ या तीन प्रभागात निवडणुका स्थगित करण्याचे आदेश आयोगाने दिले आहे. मात्र अध्यक्ष पदाच्या निवडणुकीस कुठलीही स्थगिती नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. धुळ्याच्या पिंपळनेर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ मधील पाथरे कुसुमबाई खडू, नाशिकच्या मनमाज नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १० मधील नितीन अनिल वाघमारे, बीडच्या गेवराई नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ११ मधील दूरदानाबेगम सलीम फारूकी यांचे निधन झाल्याने निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे.निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे नियमानुसार निवडणूका रद्द करण्यात आल्या आहेत. १९६६ च्या निवडणूक नियम २३ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र अध्यक्ष पदासाठी या प्रभागातील निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात येत नसून ही प्रक्रिया नियोजीत कार्यक्रमानुसार सुरू होईल.
Sanjay Shirsat : शिवसेना शिंदे पक्षाचे नेते मंत्री संजय शिरसाट हे नवी मुंबईमधील सिडकोचे अध्यक्ष असताना त्यांनी तब्बल पाच हजार कोटीची जमीन यशवंत बिवलकर यांना नाममत्रात दिली. या व्यवहारात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. अखेर या प्रकरणाची चौकशी […] The post शिवसेना नेते संजय शिरसाट यांची चौकशी; राज्य सरकारकडून ‘त्या’ जमीन घोटाळा प्रकरणी समिती स्थापन, नेमकं प्रकरण काय? appeared first on Dainik Prabhat .
Kiara Advani Sidharth Malhotra Daughter Name: बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी अखेर आपल्या लहानग्या राजकुमारीच्या नावाचा खुलासा केला आहे. 15 जुलै 2025 रोजी मुंबईतील एका रुग्णालयात कियाराने मुलीला जन्म दिल्यानंतर, तिच्या नावाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. आज कियाराने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत मुलीचं सुंदर नाव जाहीर […] The post Kiara Advani Sidharth Malhotra Daughter Name: कियारा–सिद्धार्थ यांनी शेअर केली आपल्या लाडक्या राजकुमारीची पहिली झलक; जाणून घ्या मुलीचं नाव appeared first on Dainik Prabhat .
Donald Trump on “Third World”। अमेरिकेच्या वॉशिंग्टन, डीसीमध्ये झालेल्या गोळीबारानंतर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण त्यांनी आज एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर ट्रम्प यांनी त्यांचे प्रशासन “‘थर्ड वर्ल्ड” मधून म्हणजेच तिसऱ्या जगातून येणाऱ्या स्थलांतरितांना देशात कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी […] The post “”थर्ड वर्ल्ड” च्या नागरिकांना अमेरिकेत घुसू देणार नाही” ; गोळीबार प्रकरणानंतर ट्रम्प यांचा आक्रमक पवित्रा appeared first on Dainik Prabhat .
विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आज शेअर बाजार सपाट ; निफ्टी २६००० च्या वर
Share Market। गेल्या तीन दिवसांपासून तेजी कायम ठेवल्यानंतर आज भारतीय शेअर बाजार स्थिर राहिला. निफ्टी ५० २६,२३७.५ अंकांवर उघडला, तर बीएसई सेन्सेक्स किंचित वाढून ८५,७९१ अंकांवर पोहोचला. मात्र, सुरुवात सपाट असूनही, बेंचमार्क निर्देशांक वाढत राहिला, ज्याला एफएमसीजी, धातू आणि इतर क्षेत्रातील समभागांनी पाठिंबा दिला. निफ्टीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, हिंडाल्को, टायटन आणि अदानी […] The post विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आज शेअर बाजार सपाट ; निफ्टी २६००० च्या वर appeared first on Dainik Prabhat .
Skin Care Tips: घरीच तयार करा Vitamin C Serum; जाणून घ्या सोपे व सर्वात उत्तम उपाय
Skin Care Tips: त्वचा निरोगी, तजेलदार आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी योग्य आहार, भरपूर पाणी आणि हेल्दी लाइफस्टाइलची गरज असते. त्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो विटामिन C. कारण ते कोलेजन तयार करण्यात मदत करते, त्वचेची इलास्टिसिटी टिकवून ठेवते आणि सुरकुत्या, फाइन लाइन्स व काळे डाग कमी करण्यात उपयुक्त ठरते. बाजारात अनेक व्हिटॅमिन C सिरम उपलब्ध असतात, परंतु […] The post Skin Care Tips: घरीच तयार करा Vitamin C Serum; जाणून घ्या सोपे व सर्वात उत्तम उपाय appeared first on Dainik Prabhat .
“रस्त्यांची अवस्था पाहून पालकमंत्री म्हणून मला लाज वाटली “; अजित पवार भरसभेतून असं का म्हणाले?
Ajit Pawar : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकासाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुतांशी ठिकाणी निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने प्रचाराची मोहिम सर्वत्र मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार […] The post “रस्त्यांची अवस्था पाहून पालकमंत्री म्हणून मला लाज वाटली “; अजित पवार भरसभेतून असं का म्हणाले? appeared first on Dainik Prabhat .
विरारमध्ये ११ वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू; पालिकेच्या गार्डनमध्ये दुर्घटना
विरार : विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिकेच्या गार्डनमधील तलावात खेळता खेळता पाय घसरल्याने ११ वर्षीय सार्थक मोरे या मुलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पालिकेचा सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहेही घटना विरारच्या फुलपाडा परिसरातील खाडग्या तलावात घडली. सार्थक खेळण्यासाठी तलावाजवळ गेला असताना त्याचा पाय घसरून तो थेट पाण्यात पडला. मात्र तलावाजवळ ना सुरक्षारक्षक, ना जीवरक्षक… त्यामुळे वेळेत मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तलावाचे काम काही दिवसांपासून सुरू असून, ठेकेदाराकडून नवीन जाळी बसवण्याचे काम सुरू होते. पण प्रत्यक्षात परिसरात ना जाळी पूर्ण, ना बॅरिकेड, ना सूचना फलक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकही सुरक्षा कर्मचारी तैनात नव्हता. या गंभीर निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.रहिवाश्यांनी थेट आरोप केला आहे की, पालिका आणि ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळेच एका निरागस मुलाचा जीव गेला. तलावावर कोणतेही नियंत्रण अथवा देखरेख नसल्याने मुलांना निर्बंधाशिवाय जागेवर फिरता येत होते, असेही नागरिकांनी सांगितले.वसई-विरार भागातील तलावांमध्ये गेल्या काही महिन्यांत बुडून मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. तरीही महापालिकेकडून ठोस सुरक्षा उपाययोजना होत नसल्याची तीव्र नाराजी नागरिकांत आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
मोहित सोमण: सुदीप फार्मा लिमिटेडचे आज जोरदार लिस्टिंग झाले आहे. शेअर थेट मूळ प्राईज बँडपेक्षा ३०% अधिक प्रिमियम किंमतीवर व्यवहार करत असल्याने एक शेअरची किंमत ७६६- ७६७ या पातळीवर सुरु आहे. ८९५ कोटी मूल्यांकनाचा हा आयपीओ (IPO) २१ ते २५ नोव्हेंबर कालावधीत बाजारात दाखल झाला होता. आज २८ जूनला शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) झाला आहे. कंपनीने आयपीओसाठी ५९३ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित केला होता. एकूण ०.१६ कोटी शेअर बाजारात विक्रीसाठी दाखल झाले होते. त्या पब्लिक इशूपैकी ९५ कोटींचे शेअर फ्रेश इशू असून उर्वरित १.३५ कोटी शेअर ऑफर फॉर सेल (Offer for Sale OFS) उपलब्ध होते ज्यांचे मूल्यांकन ८०० कोठुन होते. बीएसई व एनएसईवर शेअर सूचीबद्ध झाला आहे.आयपीओपूर्वी कंपनीने २६८.५० कोटी रुपये अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले होते. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे (Promoter) भागभांडवल ८९.३७% होते ते आयपीओनंतर आता ७६.१५% आहे. कंपनी प्रामुख्याने फार्मा उत्पादनात कार्यरत आहे. कंपनीचे सहा उत्पादन प्रकल्प (Manufacturing) ५०००० MT क्षमतेसह बाजारात कार्यरत आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर भांडवली खर्चासाठी (Capital Expenditure) व दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे. कंपनीच्या आयपीओला एकूण ९३.७१ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते ज्यामध्ये किरकोळ (Retail) गुंतवणूकदारांकडून १५.६५ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २१३.०८ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) ११६.७२ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते.
मध्य प्रदेशातील आगर-मालवा येथे काजू, बदाम, पिस्ता, कांदा आणि टीव्ही, अगदी अँटेनापर्यंत नावे असलेले लोक मतदान करतात. अखेर पारधी समाजातील लोकांच्या इतक्या विचित्र नावांची कहाणी काय आहे, हे चर्चेत का आणि कधी आले, संपूर्ण माहितीसाठी वर दिलेल्या इमेजवर क्लिक करून व्हिडिओ पाहा.
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री ड्रामा ; इम्रान खानचा मुलगा म्हणाला, “माझे वडील जिवंत आहेत याचा…”
Imran Khan Dead। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या कुटुंबाला आणि पीटीआयच्या कोणत्याही नेत्याला त्यांना भेटण्याची परवानगी नाही. दरम्यान, याच कारणावरून पाकिस्तानच्या आदियाला तुरुंगाबाहेर रात्री उशिरापर्यंत नाट्यमय घडामोडी घडत होत्या. दरम्यान, इम्रान खान यांचे पुत्र कासिम खान यांनी केलेल्या पोस्टमुळे या प्रकरणात तणाव निर्माण झाला आहे. […] The post पाकिस्तानमध्ये मध्यरात्री ड्रामा ; इम्रान खानचा मुलगा म्हणाला, “माझे वडील जिवंत आहेत याचा…” appeared first on Dainik Prabhat .
Manoj Jarange : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा माहोल आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सर्वच पक्षांकडून केला जात आहे. स्थानिक निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीमधील पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचार सभांमध्ये ‘लाडकी बहीण’ योजनाचा उल्लेख करत नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. २ डिसेंबर रोजी येऊन ठेपलेल्या २४७ नगपरिषदा आणि […] The post “मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडणारच”; ऐन निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगेंचा थेट इशारा appeared first on Dainik Prabhat .
Donald Trump on Joe Biden। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. ट्रम्प यांनी बायडेन यांच्या कारकिर्दीत १९ देशांच्या नागरिकांना देण्यात आलेल्या ग्रीन कार्डची चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत. यासोबतच त्यांनी निर्वासितांच्या मुद्यावरही व्यापक आढावा घेण्यास प्रशासनाला सांगितले आहे. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती […] The post गोळीबार प्रकरणानंतर ट्रम्प यांच्या रडारवर पुन्हा जो बायडेन ; ‘त्या’ निर्णयाची करणार चौकशी, ‘या’ १९ देशावरही करडी नजर appeared first on Dainik Prabhat .
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान रविवारपासून एकदिवसीय सामन्यांची मालिका, कोण मारणार बाजी ?
रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने ०-२ अशी जिंकली. दोन्ही सामन्यात भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. या धक्क्यातून सावरत भारतीय संघ एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज होत आहे. वेळापत्रकानुसार रविवार ३० नोव्हेंबर २०२५ पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना झारखंडमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १:३० वाजता सुरू होईल.भारत आणि दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यांमध्ये ९४ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने ९४ पैकी ५१ सामने जिंकले आहेत तर भारतीय संघाने ४० सामने जिंकले आहेत आणि तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय संघाने घरच्या मैदानावर १८ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने २६ सामने जिंकले आहेत. परदेशात, भारतीय संघाने १२ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने १४ सामने जिंकले आहेत. तटस्थ ठिकाणी झालेल्या सामन्यांपैकी १० सामने भारताने आणि ११ सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत.एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघकेएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), रिषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह और ध्रुव जुरेलभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकापहिला सामना - ३० नोव्हेंबर २०२५ - रांची, झारखंडदुसरा सामना - ०३ डिसेंबर २०२५ - रायपूर, छत्तीसगडतिसरा सामना - ०६ डिसेंबर २०२५ - विशाखापट्टणम (वायझॅग), आंध्र प्रदेश
‘वनतारा’च्या उद्दिष्टांचे जागतिक स्तरावर पुनरुज्जीवन
सीआयटीईएसच्या बैठकीत भारताच्या भूमिकेला मान्यताजामनगर : उझबेकिस्तानमधील समरकंद येथे नुकतेच पार पडलेल्या ‘सीआयटीईएस’च्या (साईट्स) २०व्या परिषदेच्या बैठकीत स्थायी समिती आणि सदस्य राष्ट्रांनी प्रचंड बहुमताने भारताच्या भूमिकेला ठाम मान्यता दिली. प्राण्यांच्या आयातीसंदर्भात भारताविरोधात कोणतीही कारवाई करण्यासारखे पुरावे किंवा कारणे नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.या निष्कर्षामुळे वनताराच्या कायदेशीर, पारदर्शक आणि विज्ञानाधिष्ठित वन्यजीव संवर्धन मॉडेलची ठोस पुष्टी झाली असून, जागतिक नियमांचे पालन करणारे आणि नैतिकदृष्ट्या सर्वाधिक सुशासित असे वन्यजीव संवर्धन केंद्र म्हणून वनताराची प्रतिष्ठा अधोरेखित झाली. जागतिक वन्यजीव नियमपालनाचे मूल्यमापन करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांशी संबंधितसचिवालयाने सप्टेंबर २०२५ मध्ये वनताराची दोन दिवस तपासणी केली. या भेटीत त्यांनी वनतारातील प्राणीसाखळी, पशुवैद्यकीय व्यवस्था, नोंदी, बचावकार्य आणि कल्याण प्रक्रियेची सखोल छाननी केली.३० सप्टेंबर २०२५ रोजी स्थायी समितीकडे सादर केलेल्या अहवालात सचिवालयाने वनताराला अत्याधुनिक पायाभूत सुविधा, प्रगत पशुवैद्यकीय सेवा आणि सक्षम बचाव-पुनर्वसन प्रणाली असलेले, जगातील सर्वोत्तम कल्याणकेंद्रित संस्थांपैकी एक म्हणून मान्यता दिली. त्यांनी स्पष्टपणे नोंदवले की, वनताराचे कार्य प्राणीकल्याण आणि संवर्धनावर आधारित आहे आणि ही संस्था कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक प्राणी व्यापारात सहभागी नाही. वनताराचे खुलेपण, सहकार्य व संबंधित प्रक्रियांशी सुसंगतता यांचाही त्यांनी उल्लेख केला.रविवारी स्थायी समितीतील चर्चेत सदस्य देशांच्या प्रचंड बहुमताने भारताच्या भूमिकेला दिलेले समर्थन हे वनताराच्या प्रामाणिकपणाचे व उद्दिष्टांचे जागतिक स्तरावर पुनरुज्जीवन आहे. यामुळे चुकीच्या समजुती दूर होऊन जनमतात पसरलेल्या अपूर्ण किंवा दिशाभूल करणाऱ्या कथनांना वस्तुनिष्ठ आधार मिळाला आहे. वनतारा संवर्धन, नियमपालन आणि प्राणीसेवा या तिन्ही क्षेत्रांत योग्य पद्धतीने कार्यरत आहे.पक्षकारांचा हा व्यापक पाठिंबा भारताच्या अंमलबजावणी चौकटीवरील विश्वास दृढ करणारा आहे, तसेच स्थापना दिनापासून वनताराने या मानकांचे सातत्याने पालन केल्याची आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली आहे. जागतिक संवर्धन क्षेत्रातील वनताराच्या योगदानाचे हे एक प्रभावी प्रमाणपत्र आहे.हे आंतरराष्ट्रीय निष्कर्ष भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) निष्कर्षांची पूर्णपणे जुळणारे आढळून येतात. एसआयटीने वनताराविरुद्धच्या सर्व आरोपांची कायदेशीर, आर्थिक, कल्याणविषयक तसेच साईट्ससंदर्भात सखोल चौकशी केली. दस्तऐवज परीक्षण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांशी सल्लामसलत आणि जामनगर सुविधेची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर एसआयटीने सर्व तक्रारी आणि माध्यमांमध्ये व्यक्त झालेले आरोप ‘समर्थन न होणारे, आधारहीन आणि कायदेशीर व तथ्यात्मक पुराव्यांपासून पूर्णपणे दूर’ असल्याचे नमूद केले.तपासणीत हेही स्पष्ट झाले की, सर्व प्राणी वैध आयात परवानग्यांसह आणि गैर-व्यावसायिक उद्देशांसाठीच आणले गेले, कोणतीही वन्यजीव तस्करी, मनी लॉन्डरिंग किंवा आर्थिक अनियमितता झालेली नाही आणि इनव्हॉइसविषयक उल्लेख हे केवळ सीमाशुल्क मूल्यांकनाची नियमित प्रक्रिया होती. तसेच, वनतारा केवळ केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांचे पालन करतेच असे नाही, तर ते मानकांपेक्षा अधिक काटेकोरपणे पाळते. त्याला ‘ग्लोबल ह्यूमेन सर्टिफाइड’ दर्जा आहे आणि ते खासगी संकलन नसून एक प्रमाणित, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र आहे.
राजकीय निष्ठा आणि पक्षांतराच्या चर्चेत, भोर नगरपरिषदेच्या निवडणुकीने एक नवा आणि निर्णायक अध्याय सुरू केला आहे. भाजचे (थोपटे गट) निकटवर्तीय आणि शहरातील प्रतिष्ठित उद्योगपती रामचंद्र नाना आवारे यांनी भाजप सोडून थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने, भोरच्या राजकारणाची दिशा स्पष्टपणे बदलणार आहे. उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. विकास आणि प्रामाणिकपणाची घुसमट […] The post Pune District : थोपटेंचे निकटवर्तीय, मांडेकरेंचे विश्वासू; रामचंद्र आवारे यांच्यामुळे भोरच्या राजकारणाची दिशा बदलणार! appeared first on Dainik Prabhat .
डोंबिवलीच्या रेल्वे स्थानकातून नावच गायब
बाहेरगावच्या प्रवाशांंमध्ये संभ्रमडोंबिवली : गेल्या वर्षापासून डोंबिवली स्थानकाचे नूतनीकरण, डागडूजी, प्लेटफॉर्म रुंदीकरण, वाढीव जिना, सरकते जिने पत्र्याचे शेड असे अनेक काम सुरू आहेत. मात्र हे काम करत असताना रेल्वे प्रशासनाकडून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे जणू नव्याने नामकरण केले गेले आहे. स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूला एकूण आठ प्रवेशद्वार आहेत. एकाही प्रवेशद्वारावर कुठेच 'डोंबिवली' असा उल्लेख नाही. त्यामुळे बाहेरून आलेल्या प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतो. आपण नक्की कोणत्या स्थानकाजवळ आहोत असा प्रश्न ते विचारतात.आठही प्रवेशद्वारांवर नाट्यनगरी, नृत्यनगरी, क्रिडा नगरी, साहित्य नगरी, उद्योग नगरी, संगीत नगरी, एकता नगरी, कला नगरी असे लिहिले गेले आहे. ही नावे म्हणजे डोंबिवली शहराला मिळालेल्या उपमा आहेत. उपमा मिळाल्या म्हणून आपण मूळ नाव मिटवू शकत नाही.ठाणे ग्रामीण भागातील प्रमोद कांबळे यांनी मध्य रेल्वे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) हिरेश मीना यांची कार्यालयात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. लवकरात लवकर डोंबिवली स्थानकाबाहेरील कमावर डोंबिवली हे मूळ नाव सुद्धा लिहावे. अनेक दिवसांपासून रेंगाळत चाललेली कामे लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावी अशी विनंती करून सांगितले. अन्यथा शिवसेना स्टाइल तीव्र आंदोलन करू असा इशारादेखील देण्यात आला. गेल्या वर्षी निवडणुकीच्या दरम्यान अर्धवट काम झाले असताना रेल्वे प्रशासनाने आमदारांना डोंबिवली स्थानक नूतनीकरण लोकार्पण करण्याची परवानगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
डोंबिवलीत सापडला महिलेचा मृतदेह; पती फरार
डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी किरकोळ घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून पतीने हत्या केली. त्यानंतर पती फरार झाला. त्याला शोधण्यासाठी मानपाडा पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटनेही तपासास गती दिली आहे. पोलिसांनी सद्गुरू निवास चाळीतील घरमालक वासुदेव दिवाणे यांच्या फिर्यादीवरून पोपट दाहिजे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. काटई नाक्यावरील कोळेगावात असलेल्या कृष्णाई नगरमध्ये असलेल्या सद्गुरू निवास चाळीतील रूम नं. ४ मध्ये ज्योती आणि पोपट दाहिजे वास्तव्यास होते. पोपट यश डेव्हलपर्सकडे बिगारीचे काम करतो. बुधवारी सकाळी यश डेव्हलपर्सचे बाळासाहेब म्हस्के यांनी पोपट कामावर का आला नाही हे पाहण्यासाठी गेले असता घराचा दरवाजा बाहेरून बंद होता. घरमालक वासुदेव यांना याबबत कळविले. म्हस्के यांनी ज्योतीच्या मोबाईलवर संपर्क साधला. ज्योतीच्या मोबाइल फोनचा आवाज घरातून येत होता. खिडकीतून डोकावून पाहिले असता फरशीवर रक्त आढळले. दिवाणे आणि म्हस्के यांनी दाराला बाहेरून लावलेले कुलूप तोडून खोलीत प्रवेश केला. वासुदेव यांनी पोलीसांच्या मदतीने स्थानिक डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी ज्योतीला मृत घोषित केले. पती पोपटने ओढणीच्या मदतीने गळा आवळून पत्नला ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केल्यानंतर ज्योतीचा मृतदेह कडोंमपाच्या शास्त्रीनगर रुग्णालयाकडे पाठवून दिला.
मोहित सोमण:आज शेअर बाजारात सकाळच्या सत्रात तेजीयुक्त संमिश्र प्रतिसाद कायम आहे. प्रामुख्याने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात किरकोळ वाढ झाली आहे. सेन्सेक्स २०.९९ व निफ्टी १.६० अंकाने किरकोळ वाढला आहे. किरकोळ वाढलेल्या बँक निर्देशांकासह मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये सुरू असलेल्या घसरणीचा बाजारात धोका कायम राहू शकतो. याशिवाय परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणूक 'अंतिम' निर्देशांकांची आकडेवारी अखेरच्या सत्रात निश्चित करतील. पण एकूणच बाजारात औत्सुक्याचे वातावरण असले तरी अस्थिरता कायम राहू शकते. आज अधिक निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली असली तरी ऑटो (०.४९%), एफएमसीजी (०.१६%) निर्देशांकात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.युएस बाजारातील तेजीचा परिणाम आजही बाजारात कायम असला तरी जपानमधील वाढलेल्या महागाई निर्देशांकामुळे आशियाई बाजारात संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी भारतातील दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीतील आकडेवारीवर गुंतवणूकदारांची बारीक नजर असू शकते. त्यामुळे सुरूवातीच्या कलात मजबूत फंडामेंटल असूनही गुंतवणूकदार सावधगिरीची भावना बाळगू शकतात.सकाळच्या सत्रात बँक ऑफ इंडिया (४.९९%), बंधन बँक (२.८१%), अदानी टोटल गॅस (२.७५%), बीएसएसएफ इंडिया (२.३७%), प्राज इंडस्ट्रीज (१.८४%) समभागात सर्वाधिक वाढ झाली असून सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण जेल इंडिया (१०%), पीसीबीएल केमिकल्स (८.३३%), नुवोको विस्टा (४.८४%), व्होल्टास (२.८६%), आयनॉक्स इंडिया (१.५७%), झेन टेक्नॉलॉजी (१.५५%) समभागात झाली आहे.आज सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्या कलावर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'निफ्टी आणि सेन्सेक्सने काल प्रस्थापित केलेल्या नवीन विक्रमांमधून महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की मर्यादित संख्येने कामगिरी करणाऱ्या लार्जकॅप कंपन्यांमध्ये झालेल्या कमी तेजीमुळे हे नवीन विक्रम आहेत. बाजार नवीन उच्चांकावर असूनही, बहुतेक किरकोळ गुंतवणूकदार, विशेषतः मार्च २०२० मध्ये कोविड क्रॅशनंतर बाजारात आलेले नवीन गुंतवणूकदार, तोटा दर्शविणारे पोर्टफोलिओ धारण करत आहेत. हा विरोधाभास किरकोळ गुंतवणूकदारांना स्मॉलकॅप्सबद्दल असलेले वेड आणि त्यांच्या मूल्यांकनाकडे दुर्लक्ष करून स्मॉलकॅप्स चांगले प्रदर्शन करतील असा त्यांचा विश्वास यामुळे आहे. जर किरकोळ गुंतवणूकदारांना २०२६ मध्ये अपेक्षित असलेल्या तेजीत सहभागी व्हायचे असेल, तर त्यांना वाढीची क्षमता असलेल्या लार्जकॅप्स आणि दर्जेदार मिडकॅप्समध्ये गुंतवणूक करावी लागेल.जरी सेन्सेक्स आणि निफ्टीने काल नवीन उच्चांक गाठला असला तरी, निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक त्याच्या शिखरापेक्षा सुमारे ९% खाली आहे. ही मोठी घसरण प्रामुख्याने या विभागातील खराब कमाई वाढ आणि उच्च मूल्यांकनामुळे आहे. सर्वसाधारणपणे, स्मॉलकॅप्स अल्प ते मध्यम कालावधीत कमी कामगिरी करत राहण्याची शक्यता आहे.'सकाळच्या सत्रातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'कालची घसरण आमच्या २६१६५ पातळीच्या घसरणीच्या जवळ संपली, ज्यामुळे आणखी एक वरच्या प्रयत्नाची शक्यता कायम राहिली. परंतु २६४६०-५५० पातळीच्या मार्गावर चालण्यासाठी आपण गती गमावत आहोत. तोपर्यंत, २६२२५ पातळीच्या दोन्ही बाजूंनी चढउतार होण्याची अपेक्षा करा. दरम्यान, २६०९८-२६०३२ पर्यंत घसरण बुल्सना पुन्हा एकत्र येण्यास प्रोत्साहित करू शकते. त्याच खाली घसरण २५८६० उघड करेल.'
पेण, अलिबाग, रोहा नगरपालिकांमध्ये अाठ उमेदवार बिनविरोध
रायगडमध्ये आता २०९ नगरसेवक पदांसाठी निवडणूकअलिबाग : रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग आणि रोहा या तीन नगरपालिकांमध्ये एकूण आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पेण नगरपरिषदेत सर्वाधिक ६ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत, तर अलिबाग आणि रोहामध्ये प्रत्येकी एक नगरसेवक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये रोह्यात राजेंद्र जैन (काँग्रेस), अलिबागमध्ये प्रशांत नाईक (शेकाप), पेणमध्य दीपक गुरव (राष्ट्रवादी काँग्रेस), वसुधा पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), सुशिला ठाकूर (राष्ट्रवादी काँग्रेस), मालती म्हात्रे (भाजप), स्मीता माळी (भाजप), अभिराज कडू (भाजप) यांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन, महाड, रोहा, पेण, उरण, खोपोली, कर्जत, माथेरान या दहा नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सर्व ठिकाणी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक चार नगरसेवक बिनविरोध निवडून आले.भाजपचे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले, तर शेकापचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, मरूड रोहा, महाड, पेण, उरण, माथेरान या १० नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी लढत होणार असून, दहा नगर परिषदांमध्ये २१७ नगरसेवक निवडून द्यायचे होको, त्यापैकी आठ नगरसेवक निवडून आल्यामुळे आता २०९ नगरसेवक पदांसाठी निवडणूक होत आहे.रायगड जिल्ह्यात ७७० जणांची शस्त्रे पोलिसांकडे जमानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीरायगड जिल्ह्यातील नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील नगरपालिकांच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाल्यानंतर परवाना असलेली पिस्तूल, बंदूक, आदी शस्त्रे पोलिसांकडे जमा करावी लागतात. जिल्ह्यातील दहा नगर परिषद क्षेत्रातील शस्त्रे परवानाधारक ७७० जणांनी आपली शस्त्रे पोलिसांकडे जमा केली आहेत. राज्यात ४ नोव्हेंबर रोजी नगर परिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन, महाड, रोहा, पेण, उरण, खोपोली, कर्जत, माथेरान या दहा नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था चोख राहावी, तसेच निवडणूक प्रक्रियेच्या काळात अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी निवडणूक काळात नागरिकांनी स्वसंरक्षणासाठी घेतलेली शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यात येतात.नगर परिषद निवडणुकीत उमेदवारांना चिन्हांचे वाटपरायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांसाठी बुधवारी झालेल्या चिन्ह वाटपासह स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला आहे. जिल्ह्यात सर्वच नगर परिषदांमध्ये चिन्ह वाटपाची प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार पडली. अलिबाग नगर परिषद क्षेत्रात एकूण दहा प्रभागांमध्ये २० जागांसाठी निवडणूक होत आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय आघाड्या स्पष्टपणे दिसून आल्या आहेत. शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी केली आहे, तर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी महायुती म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. याशिवाय शिवसेना (ठाकरेंचा गट)ने स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकीत शेकाप पक्षाला 'खटारा' हे चिन्ह देण्यात आले असून, अपक्ष उमेदवार 'कपबशी' चिन्हावर रिंगणात उतरणार आहेत. इतर राष्ट्रीय आणि प्रमुख पक्ष मात्र आपल्या अधिकृत चिन्हांवरच निवडणूक लढवत असल्याची माहिती तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिली. अलिबाग नगर परिषदमध्ये एकच उमेदवार अपक्ष आहे. चिन्ह वाटपाची प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यात शांततेत पार पडल्याने उमेदवार आता प्रचार युद्धासाठी सज्ज झाले आहेत. आघाड्या, स्वतंत्र उमेदवारी आणि प्रत्येक प्रभागातील स्थानिक समीकरणांमुळे अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नगर परिषदांची निवडणूक अधिक रंगतदार होणार एवढे मात्र निश्चित!
माथेरानच्या निवडणुकीत ई-रिक्षा ठरतेय कळीचा मुद्दा
माथेरान : माथेरान नगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई व खासदार सुनील तटकरे यांच्या सभा एकाच दिवशी झाल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. मतदारांना आकर्षित करणारे मुद्दे नसल्याने मरगळ दिसत आहे मात्र ई-रिक्षाच्या मुद्द्यावरून प्रचाराला गती येऊ लागली आहे.पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी भाषणात सांगितले ई-रिक्षा बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची राज्य सरकार तत्काळ अंमलबजावणी करणार आहे तसेच ई-रिक्षा देखील स्वतः राज्य सरकार खरेदी करणार आहे या मध्ये घोडेवाल्यांचा व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही याची ग्वाही शंभूराज देसाई यांनी दिली. शिवराष्ट्र पॅनलच्या सभेत खासदार सुनील तटकरे यांनी देखील ई-रिक्षामुळे येथील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मोठी मदत झाली असून स्थानिक व पर्यटकांची पायपीट वाचली आहे याचा चांगला परिणाम येथील पर्यटन वाढीसाठी होणार आहे मात्र या बदलाचा परिणाम येथील आश्वचालकांवर होणार नाही याउलट त्यांचा व्यवसाय वाढेल ई-रिक्षा पॉइंटवर जाणार नाहीत त्यामुळे त्यांनी निश्चिंत राहावे असे स्पष्ट केले.आश्वचालकांची मतदार संख्या मोठी असल्यामुळे त्यांना सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीत गोंजारत असतात, मात्र निवडणूक संपल्यावर सर्वजण घोडेवाल्यांना विसरून जात असल्याची भावना घोडेवाल्यांमधून व्यक्त केली जातं आहे. गेल्या चाळीस वर्षांत एकही नवीन तबेला आश्वचालकांना कोणी बांधून दिला नाही हे देखील कटू सत्य आहे.
चक्क पोलीस ठाण्याचीच जागा हडपली!
अनधिकृत इमारतही केली अधिकृत, माजी आयुक्त, नगररचना संचालकांविरोधात गुन्हेपालघर : वसई पोलीस ठाण्याच्या मालकीची जमीन हडप करून खासगी कंपनीच्या नावे केली. तसेच राजकीय वरदहस्त असलेल्या एका स्थानिक नेत्याची अनधिकृत इमारतसुद्धा नियमित करण्यात आली. दहा वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात चौकशीअंती बुधवारी वसई पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात फसवणूक, बनावट दस्तएवेज तयार करणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संबंधित कंपनीचे व्यवस्थापक संचालक माजी नगरसेवक जमील शेख, तत्कालीन महापालिका आयुक्त, तत्कालीन उपायुक्त, नगररचना संचालक, वास्तुविशारद, पुरातत्त्व विभागाचे अधिक्षक यांचा समावेश आहे.वसई पोलीस ठाण्याच्या मालकीची १ हेक्टर ८४ गुंठे जागा आहे. या जागेचा सातबारा उतारा सर्वेक्षण क्रमांक ९ ब अंतर्गत शासकीय जमीन पोलीस विभागाच्या नावे आहे. या ठिकाणी पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. या ठिकाणी पोलीस ठाण्याची अथवा पालिकेची कोणतीही विनापरवानगी न घेता अनधिकृत रस्ता तयार करण्यात आला असून तो ग्रॅड लॉजेस्टीक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावे करण्यात आल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र नगररचना अधिनियम अंतर्गत रस्ता निष्कासित करून संबंधित विभागांना हस्तांतरण करणे बंधनकारक होते. मात्र गैरमार्गाने दस्तऐवज तयार करून ते पोलिस विभाग, विभागीय आयुक्त, नगरपालिकेचे प्रशासन आणि कोकण विभागाकडे सादर करून दिशाभूल करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी सुकेशीनी कांबळे यांनी तक्रार करून पाठपुरावा सुरू केला होता. हा घोटाळा करण्यासाठी वसई पोलीस ठाण्याच्या मूळ नकाशा देखील गायब करण्यात आला होता. त्यावर अनेक आंदोलने, तक्रारी देखील झाल्या. त्या प्रकरणी पोलिसांतर्फे चौकशी सुरू होती. चौकशी अंती आणि १० वर्षांच्या पाठपुराव्या नंतर अखेर वसई पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तयार करण्यात आलेला अनधिकृत रस्ता माजी स्वीकृत नगरसेवक जमील शेख यांच्या खासगी निवासस्थानी जाण्यासाठी आहे. त्यांचे खासगी निवास्थान सर्वे क्रमांक ११ अ आणि ब या जागेत आहे. मात्र त्याला लागूनच वसईचा ऐतिहासिक किल्ला असून वसई किल्ल्याच्या परिसरात हे बांधकाम करण्यात आलेले आहे. हे बांधकाम अनधिकृत असून ते देखील त्यावेळी नियमित करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलीस आयुक्तालयातील वसई विभागात कार्यरत सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोरगे यांच्या फिर्यादीनंतर पोलीस ठाण्याची जागा हडपून अनधिकृत रस्ता तयार करणे आणि अनधिकृत निवासी बांधकाम नियमित करणे या प्रकरणी वसई विरार महापालिकेचे माजी सभापती अफीफ शेख यांचे वडील जमील शेख आणि त्यांच्या ग्रॅड लॉंजेस्टीक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक संचालक- सदस्य, छोटू बिस्मिला शेख, वास्तुविशारद संजय नारंग त्यांचे अन्य साथीदार, वसई विरार महानगरपालिकेचे सन २०१६ ते २०१७ या कालावधीत कार्यरत तत्कालीन आयुक्त, तत्कालीन उपायुक्त, तत्कालीन नगररचना संचालक, तत्कालीन प्रभाग समिती आय सहा. आयुक्त तसेच पुरातत्त्व विभागाचे सन २०१५ मधील कार्यरत तत्कालीन अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१११ कोटींचा बँक व्यवहार अन् अधिकाऱ्यांचे कानावर हात
जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रकारपालघर : जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका खात्यातून एकाचवेळी १११ कोटी ६५ लाख रुपयांचा व्यवहार (डिमांड ड्राफ्ट) बुधवारी केला जात होता. मात्र बँक अधिकाऱ्यांना संशय आल्याने हा व्यवहार रोखण्यात आला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत आपल्याला कल्पनाच नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा हा व्यवहार करण्यामागे कोण होते याबाबतची आता सार्वजनिक बांधकाम विभागात आणि बँकेत चौकशी करण्यात येत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे देताना ठेकेदारांकडून प्रत्येक कामात अनामत रक्कम जमा करून घेण्यात येते. कामासाठी मंजूर रकमेच्या एक ते दोन टक्का तर काही विशिष्ट कामांमध्ये ही अनामत रक्कम ही पाच टक्क्यांपर्यंत जमा करून घेतल्या जाते. विकास कामे पूर्ण झाल्यानंतर ठेकेदारांनी अनामत रकमेची मागणी केल्यास काही काळानंतर त्यांना ती रक्कम परत केली जाते.दरम्यान, जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये ठेकेदारांची अनामत रक्कम जमा असलेले वेगळे खाते आहे. याच खात्यातून २७ नोव्हेंबर रोजी जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका कर्मचाऱ्यांने १११ कोटी ६५ लक्ष रुपयांचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) काढण्यासाठी चेक व आवश्यक स्लीप जव्हारच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा केली. एकाचवेळी इतक्या मोठ्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट काढण्यात येत असल्याने बँक कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना संशय आला. परिणामी बँक अधिकाऱ्यांनी डिमांड ड्राफ्टकरिता देण्यात आलेल्या चेकच्या स्वाक्षऱ्या व इतर बाबीची पडताळणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट दिली. त्यावेळी कार्यालयात उपस्थित असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी आपण हा चेक दिला नसल्याची भूमिका घेतली. तसेच इतक्या मोठ्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट काढू नये अशी सूचनाही बँकेला केली आहे.
रेल्वेमध्ये ‘हलाल’ प्रमाणित अन्न विकण्याची अधिकृत तरतूद नाही
'एनएचआरसी'च्या नोटिसीला भारतीय रेल्वे बोर्डाचे स्पष्टीकरणनवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या मांसाहारी भोजनात 'हलाल' प्रमाणित मांस वापरले जाते की नाही, यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच एकाने माहितीच्या अधिकाराखाली (आरटीआय) अर्ज दाखल करून अधिकृत उत्तर मागितले होते. हा प्रश्न अखेरीस केंद्रीय माहिती आयोगापर्यंत (सीआयसी) पोहोचला. अखेर यावर भारतीय रेल्वेने औपचारिक उत्तर दिले आहे.काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे भारतीय रेल्वेविरुद्ध एक तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीत असा आरोप करण्यात आला होता की, रेल्वेत मांसाहारी जेवण करणाऱ्या प्रवाशांना केवळ 'हलाल' पद्धतीने प्रक्रिया केलेले मांस दिले जात आहे. तक्रारदाराने असा युक्तिवाद केला की ही कृती भेदभावात्मक असून मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. यावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगने (एनएचआरसी) रेल्वे बोर्डाला नोटीस बजावली होती. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) तसेच आरटीआयमध्ये दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देताना, रेल्वे बोर्डाने आता स्पष्ट केले आहे की, रेल्वेमध्ये 'हलाल' प्रमाणित अन्न विकण्याची किंवा देण्याची कोणतीही अधिकृत तरतूद नाही.अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानकांचे काटेकोरपणे पाल या तक्रारीला उत्तर देताना रेल्वे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसी (IRCTC) प्रवाशांना जेवण देताना अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानकांचे काटेकोरपणे पालन करतात. निवेदनात म्हटले आहे की, रेल्वेत दिले जाणारे जेवण भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI)च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार केले जाते. 'हलाल' प्रमाणित मांस पुरवणे बंधनकारक करणारा कोणताही सरकारी नियम नाही. अधिकाऱ्याने पुनरुच्चार केला की, भारतीय रेल्वेमध्ये 'हलाल' प्रमाणित अन्न देण्याची कोणतीही अधिकृत तरतूद नाही आणि केवळ असेच मांस पुरवले जात असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला.रेल्वेने सीआयसी (CIC) समोर आपली भूमिका मांडली आणि स्पष्टपणे सांगितले की, 'हलाल' प्रमाणित अन्न दिले जात नाही. आयआरसीटीसी केवळ अन्न गुणवत्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करते. रेल्वेने पुढे नमूद केले की, आयआरसीटीसीला 'हलाल' प्रमाणपत्रासंबंधी कोणतेही मार्गदर्शन किंवा निर्देश दिलेले नाहीत, ज्यामुळे केवळ 'हलाल' मांस पुरवण्याच्या दाव्याला कोणताही आधार नसल्याचे सिद्ध होते.
Aishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री व माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही महिन्यांत ती बच्चन कुटुंबासोबत क्वचितच दिसल्याने तिच्या आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल अफवा पसरू लागल्या आहेत. अशातच पाकिस्तानातील धर्मगुरू मुफ्ती अब्दुल कावी यांनी ऐश्वर्याबद्दल केलेलं विधान मोठ्या वादाला तोंड फोडत आहे. मौलवीचं वक्तव्य व्हायरल मौलवी […] The post Aishwarya Rai: ऐश्वर्या रायबद्दल पाकिस्तानी मौलवीचं वादग्रस्त वक्तव्य; सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप appeared first on Dainik Prabhat .
बारामतीतील निवडणूक स्थगितीपासून ते ऐश्वर्या राय पर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर
आता घड्याळाची वेळ चांगली नाही – शिवेंद्रराजे भोसले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. रहिमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ सभेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळावर जोरदार टीका केलीय. आपलं चिन्ह कमळ आहे आता घड्याळाची वेळ चांगली नाही, आता […] The post बारामतीतील निवडणूक स्थगितीपासून ते ऐश्वर्या राय पर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .
मुंबईत मोठ्या आकाराच्या जाहिरात फलकाला बंदी
फुटपाथ, गच्चीवरही जाहिरात लावण्यास नसेल परवानगीमुंबई : मुंबईत मागील अनेक महिन्यांपासून लटकलेल्या जाहिरात धोरणासाठी आता मार्गदर्शक तत्वे बनवण्यात आली आहेत. या धोरणामध्ये ४० बाय ४० चौरस फुटांपेक्षा अधिक आकाराचा जाहिरात फलक लावण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या आकाराच्या फलकाला परवानगी दिली जाणार नाही. पदपथ तसेच इमारतीच्या गच्चीवरही जाहिरात प्रदर्शित करण्यास नव्याने परवानगी दिली जाणार नाही.मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी जाहीर केलेल्या ‘जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे- २००८’ मध्ये सुधारणा करत २०२५ मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही नवीन बाबींचा समावेश केला आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मुंबईत क्षेत्रात ४० बाय ४० फुटांपेक्षा जास्त आकारमानाच्या जाहिरात फलकास परवानगी दिली जाणार नाही. पदपथ तसेच इमारतीच्या गच्चीवर जाहिरात प्रदर्शित करण्यास नव्याने परवानगी दिली जाणार नाही. डिजिटल जाहिरात फलकांची (डिजिटल होर्डिंग) प्रकाशमानता (ल्यूमिनन्स रेशिओ) ३:१ या गुणोत्तरापेक्षा अधिक ठेवता येणार नाही. तसेच, लुकलुकणाऱ्या (फ्लिकरिंग) जाहिरात प्रदर्शित करण्यास परवानगी नसेल. मॉल्स, मल्टिप्लेक्सेस, व्यापारी संकुल (शॉपिंग कॉम्प्लेक्स), वाणिज्यिक इमारती (कमर्शिअल बिल्डिंग), पेट्रोल पंप येथे एलईडी जाहिरात प्रदर्शित करता येईल. तसेच, बांधकाम सुरू असलेल्या व दुरुस्तीची कामे सुरू असलेल्या इमारतींच्या कुंपणावर तसेच इमारतीच्या बाह्यभागावर व्यावसायिक व अव्यावसायिक जाहिराती प्रदर्शित करता येतील.दरम्यान, मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रथमच एकेरी (सिंगल) व पाठपोट (बॅक टू बॅक) फलकांसोबतच ‘व्ही’ व ‘एल’ आकार तसेच त्रिकोणी (ट्राय व्हिजन), चौकोनी (स्केअर व्हिजन), पंचकोनी (पेंटागॉन व्हिजन), षटकोनी स्वरुपाच्या (हेक्झागॉन व्हिजन) जाहिरात फलकांना यापुढे परवानगी देण्यात येईल. याकरीता वाहतूक पोलीसांची ‘ना हरकत’ लागेल.मुंबईतील जाहिरातींचे नियमन करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून ‘जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे-२०२५’ (पॉलिसी गाईडलाइन्स फॉर डिस्प्ले ऑफ आऊटडोअर अॅडव्हर्टाइजमेंट) जाहीर करण्यात आली आहेत. २७ नोव्हेंबर २०२५ पासून ही मार्गदर्शक तत्त्वे महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत आहेत. जाहिरातदार, जाहिरात संस्था तसेच संबंधित सर्व घटकांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्यामार्फत जाहिरातींना परवानगी देणे तसेच अनधिकृत जाहिरातींविरोधात कारवाई करण्याची कार्यवाही केले जाते. मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३२८/३२८ अ अंतर्गत, मुंबईतील हद्दीतील जाहिरातींचे नियमन केले जाते.या पार्श्वभूमीवर, माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या समितीने सुचविलेल्या शिफारसी तसेच नागरिकांच्या हरकती व सूचना विचारात घेऊन ‘जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे – २०२५’ जाहीर करण्यात येत आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे सविस्तर स्वरुपात महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर २७ नोव्हेंबर २०२५ पासून उपलब्ध करण्यात येत आहेत, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.
बीएमसी गुंतवणूक घोटाळ्याच्या वादाला नवीन वळण
मुंबई : मुंबई महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्ताने वांद्रे येथील एका पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूक केल्यास स्वस्त दरात घरे मिळतील, असे आमिष दाखवत थेट उच्चपदस्य पोलस, पालिका अधिकारी यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्यालाही गुंतवणूक करण्यास भाग पाडत तब्बल ८० कोटींची रक्कम हडपल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यानेच आरोप करणाऱ्याला कायदेशीर नोटीस पाठविल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. गुंतवणूक घोटाळ्याच्यादरम्यान, सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांनी त्यांच्यावरील सर्व गंभीर आरोपांचे सविस्तर आणि अधिकृत खंडन केले. कायदेशीर प्रक्रियेनुसार, सहाय्यक आयुक्त पाटील यांनी युकेस्थित व्यावसायिक निशित पटेल यांना ४ नोव्हेंबर रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तीन दिवसांत ठोस पुरावे सादर करण्याची नोटीस बजावली. अन्यथा, ही तक्रार उच्चपदस्थ अधिकाऱ्याची बदनामी करण्याच्या उद्देशाने आहे असे गृहीत धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नोटीशीत नमूद केले होते.ही तक्रार पूर्णपणे खोटी, निराधार आणि कोणत्याही पुराव्याशिवाय आहे. हा विषय आता तपास संस्था आणि राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, असे स्पष्ट करत महेश पाटील यांनी कोणत्याही चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. घोटाळ्याभोवतीच्या आरोपांमुळे महाराष्ट्र प्रशासनातील भ्रष्टाचाराबद्दलच्या चर्चेला आणखी बळकटी मिळाली आहे. आता, पाटील यांच्या अधिकृत प्रतिक्रियेमुळे, प्रकरणाने एक नवीन वळण घेतले आहे.
वातानुकूलित लोकलमध्ये बनावट तिकिटावर प्रवास करणाऱ्या महिलेस अटक
मुंबई : रेल्वे तिकीट तपासनिसाच्या सतर्कतेमुळे एका महिला प्रवाशाकडून बनावट तिकीट कल्याण-दादर वातानुकूलित लोकलमधून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली. नियमित तपासणीदरम्यान आज उजेडात आले. मुंबई विभागाचे तिकीट निरीक्षक विशाल नवले यांनी १०.०२ च्या कल्याण–दादर वातानुकूलित लोकलमध्ये नियमित तपासणीदरम्यान एका महिला प्रवाशाला थांबवले. त्यांनी वातानुकूलित लोकलमध्ये अंबरनाथ –दादर मार्गावर प्रवासासाठी ११ डिसेंबर २०२५ पर्यंत वैध असलेले युटीसद्वारे निर्मित सीझन तिकीट दाखवले. सखोल तपासणी केल्यावर नवले यांना तिकीट संशयास्पद वाटले आणि त्यांनी तत्काळ त्याची पुष्टी मागितली. पडताळणीनंतर हे तिकीट मागील कालबाह्य तिकीटावरून बनवलेले बनावट तिकीट असल्याचे स्पष्ट झाले. महिला प्रवासी गुडिया शर्मा यांना कारवाईसाठी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले.त्यानंतरच्या तपासात असे दिसून आले की, बनावट सीझन तिकीट तिचे पती ओंकार शर्मा यांनी तयार केले होते आणि ते तिला वापरण्यासाठी देण्यात आले होते. भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ (BNS) कलम ३१८/४, ३३६/२, ३३६/३, ३४० आणि ३/५ अंतर्गत फसव्या तिकीट पद्धतींमध्ये सहभागी असल्याबद्दल दोन्ही व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विशाल नवले यांच्या सतर्कतेमुळे बनावट तिकीट रॅकेटचा पर्दाफाश झाला. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .अधिकृत विक्रेत्यांकडून, रेल्वे स्थानकावरील बुकिंग काऊंटरमधून किंवा एटीव्हीएमद्वारे जारी केलेले वैध तिकिटे घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रवाशांना केले आहे. प्रवासी त्यांच्या मोबाईल फोनवर युटीस ॲप डाउनलोड करू शकतात आणि मोबाईल युटीस ॲपद्वारे तिकिटे बुक करू शकतात. प्रवाशांना इशारा देण्यात येतो की, बनावट तिकिटे तयार करणे / मिळवणे किंवा त्यावरून प्रवास करणे यांसारख्या फसवणूक करणाऱ्या मार्गांचा वापर करू नये. अशी कृत्ये भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत दंडनीय असून, दंड अथवा कमाल ७ वर्षांपर्यंतची कैद किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
टोरेसनंतर 'वन क्लिक मल्टिट्रेड'कंपनीचा घोटाळा, गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन संस्थापक पसार
मुंबई: टोरेस घोटाळ्यापाठोपाठ दादरमध्ये आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. विविध ऑफर्सच्या नावाखाली सुरू असलेल्या या घोटाळ्यात सुमारे दोन हजार गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. 'वन क्लिक मल्टिट्रेड' नावाच्या संस्थेने केलेल्या या घोटाळ्यातील फसवणुकीच्या रकमेचा आकडा सुमारे सव्वाचार कोटींपर्यंतचा आहे. या प्रकरणात संस्थेचे संस्थापक नामदेव बाबाजी नवले व सहकारी अलका दीपक महाडिक यांच्याविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या संस्थेतील दोन्ही आरोपी गुंतवणूक दारांचे पैसे घेऊन पसार झाले आहेत. वडाळा परिसरात राहणाऱ्या मधुरा महेश भोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संस्थेची सहकारी अलका हीने तक्रारदार मधुरा यांच्या घरी येऊन 'वन क्लिक मल्टिट्रेड' या योजनेची माहिती दिली होती. दर महिना हजार रुपये अशी रक्कम वीस महिने गुंतविल्यानंतर एकविसाव्या महिन्यांत पंचवीस हजार परतावा आणि महिन्याच्या १६ तारखेला लकी ड्रॉ या ऑफरला बळी पडून मधुरा यांनी योजनेत गुंतवणूक केली. सुरुवातीला सर्व देयके एप्रिल २०२५ पर्यंत सुरळीत मिळत होती. त्यानंतर पैसे मिळण्यास बंद झाले. पैसा मिळत नसल्यामुळे चौकशी केल्यावर नवले यांनी पैसे शेअर मार्केटमध्ये अडकले असल्याचे सांगत वेळ मारून नेली. मात्र काही दिवसांतच दादर येथील कार्यालयाला टाळे लागल्याचे समोर आले. तक्रारदार मधुरा भोळेच्या अंतर्गत ८२ सदस्यांनी आठ लाख एकोणावीस हजार रुपये भरले. ज्यातील केवळ २५ हजार रुपये परतावा मिळाला. मधुरा यांच्या ओळखीतून गुंतवणूक केलेल्या ३२ जणांनी या ऑफर्ससाठी अजून गुंतवणूकदारांची साखळी तयार केली. अशाप्रकारे सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त ठेवीदारांकडून गोळा केलेली रक्कम अशी सुमारे चार कोटी एकेचाळीस लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजेच संस्थेचे संस्थापक नामदेव बाबाजी नवले वेगवेगळ्या ठिकाणी भाडेतत्त्वावर कार्यालय घेऊन फसवणूकीची मालिका सुरू ठेवत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, भोईवाडा ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) नितिन महाडिक या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.
जोगेश्वरीत उबाठासमोरच मोठे आव्हान! भाजपा, शिवसेना एकाचे दोन करू देणार का?
मुंबई (सचिन धानजी):उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील जोगेश्वरी विधानसभेत उबाठाचे आमदार म्हणून बाळा नर हे निवडून आले आहेत. परंतु या विधानसभेत उबाठाचे ते एकमेव नगरसेवक शिल्लक राहिले होते. त्यामुळे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर बाळा नर यांचा आपले जास्तीत नगरसेवक निवडून आणण्याच प्रयत्न असेल तर उबाठाचा एकमेव नगरसेवकही कमी करण्याचा प्रयत्न शिवसेना आणि भाजपाचा असणार आहे. या विधानसभेत एकही खुला प्रभाग नसल्याने आपली पत्नी, सून किंवा मुलीला निवडून रिंगणात उतरवण्याचा माजी नगरसेवकांह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर वेळ आली आहे. त्यामुळे जोगेश्वरीत शिवसेना, भाजपा पेक्षा उबाठामध्ये इच्छुकांची मोठी यादी असल्याने बंडखोरीची सर्वाधिक भीती याच पक्षाला राहणार आहे.जोगेश्वरी विधानसभेत एकूण आठ नगरसेवकांचे प्रभाग आहेत. त्यात भाजपाच्या प्रीती सातम, पंकज यादव आणि उज्ज्वला मोडक हे तीन नगरसेवक आहेत, तर रेखा रामवंशी, प्रविण शिंदे, सदानंद परब आणि सोफिया नाझिया हे शिंदे शिवसेनेचे चार नगरसेवक आणि उबाठाचे बाळा नर हे एकमेव नगरसेवक शिल्लक राहिले होते. पण आता तेही आमदार बनले आहेत. या विधानसभेत एकही प्रभाग सर्वसाधारण खुला न झाल्याने सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. या प्रभागात पाच सर्वसाधारण महिला, दोन ओबीसी महिला आणि अनुसूचित जमाती अर्थात एसटी करता एक अशाप्रकारे राखीव प्रभाग झाले आहेत.महिला राखीव झाल्याने या माजी नगरसेविका शिवानी शैलेश परब, सुगंधा शेट्ये, जितू वळवी, मनिषा पांचाळ आदींना पुन्हा संधी निर्माण झाली आहे. रविंद्र वायकर शिवसेनेत गेल्याने शैलेश परब यांनी पुन्हा एकदा अंधेरी जोगेश्वरीत आपले बळ निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून माजी नगरसेविका शिवानी परब यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचार केल्याचे बोलले जात आहे. जोगेश्वरी विधानसभेत भाजपाला तीन जागा राखून अन्य जागांवर विजय मिळवायचा आहे, तर शिवसेनेला आपल्या जागा कायम राखण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागणार आहे.प्रभाग क्रमांक ५२ (ओबीसी महिला)हा प्रभाग सलग दुसऱ्यांदा ओबीसी महिला राखीव झाला आहे. या प्रभागातून भाजपाच्या प्रीती सातम या मागील वेळेस निवडून आल्या होत्या. आता आरक्षणाने त्याचं प्रभाग कायम राखल्याने विद्यमान नगरसेवक म्हणून त्यांची दावेदारी प्रथम मानली जात आहे. तर उबाठाकडून माजी नगरसेविका आणि शिवसेनेतून मनसे आणि मनसेतून पुन्हा उबाठात प्रवेश केलेल्या सुगंधा शेटे यांचे नाव चर्चेत आहे. तसेच उबाठाचे शाखाप्रमुख संदीप गाढवे हे आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्ना आहे. या प्रभागात खरी लढत ही भाजपा आणि उबाठा यांच्यातच होण्याची शक्यता आहे. मनसेचा प्रभाव या मतदार संघात दिसून येत नाही.प्रभाग ५४ (एस टी)हा प्रभाग मागील निवडणुकीत अनुसूचित जाती करता राखीव होता. या प्रभागातून शिवसेनेतून रेखा रामवंशी या निवडून आल्या होत्या. पण आता त्या शिंदे शिवसेनेत आहेत. प्रभाग आता अनुसूचित जमाती करता राखीव झाला आहे. त्यामुळे रामवंशी यांना घरी बसावे लागणार आहे. तर अनुसूचित जमाती करता म्हणजे एस टी करता राखीव झाल्याने उबाठाकडून पुन्हा माजी नगरसेवक जितेंद्र वळवी यांना संधी मिळू शकते. तर याच प्रभागात उबाठाकडून अशोक खांडवे हेही इच्छुक असल्याने दोघांमध्ये उमेदवारीबाबत स्पर्धा दिसून येणार आहे. तर काँग्रेसकडून काँग्रेसच्या आदिवासी विभागाचे मुंबई अध्यक्ष सुनील कुमरे हे आपल्या मुलीला निवडणूक रिंगणात उतरवण्यास इच्छुक आहे. हा प्रभाग शिवसेनेच्या वाट्याला येणार असल्याने जर उबाठाच्या कुणाला उमेदवारी मिळते आणि कोण नाराज होतो याकडे शिवसेनेचे लक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेकडे उमेदवार नसल्यास भाजपा या जागेवर दावा करु शकते असे बोलले जात आहे.प्रभाग क्रमांक ७२(ओबीसी महिला)हा प्रभाग पूर्वी ओबीसी होता आणि आगामी निवडणुकीत हा प्रभाग ओबीसी महिला राखीव झाला आहे. या प्रभागातून भाजपाचे पंकज (सर) यादव हे निवडून आले होते. पण आता ओबीसी महिला प्रभाग राखीव झाल्याने त्यांच्या पत्नी ममता यादव यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यास इच्छुक आहेत. तर या प्रभागावर उबाठा शिवसेनेचा दावा असेल. उबाठाच्या वतीने समिक्षा माळी आणि माजी नगरसेविका मनिषा पांचाळ यांचीही नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडूून इच्छुकाच्या नावाची चर्चा अद्याप ऐकायला येत नाही.प्रभाग क्रमांक ७३(महिला)हा प्रभाग सर्वसाधारण खुला होता. पण आता हा प्रभाग महिला राखीव झाला आहे. या प्रभागात शिवसेनेचे प्रविण शिंदे हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यामुळे या प्रभागात शिवसेनेचा दावा असल्याने प्रविण शिंदे हे आपल्या सुनेला निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे. तर उबाठाकडून रोणा रावत आणि सुचित्रा चव्हाण यांच्या नावाची इच्छुक म्हणून चर्चा आहे. हा प्रभागात मनसेचा पहिला दावा असेल आणि माजी नगरसेवक भालचंद्र आंबोरे हे आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्नात आहे. तर काँग्रेसच्या इच्छुकाचे नाव चर्चेत दिसून येत नाही.प्रभाग क्रमांक ७४ (महिला)प्रभाग महिला राखीव होता आणि या मतदार संघातून भाजपाच्या उज्ज्वला मोडक निवडून आल्या होत्या. पुन्हा हा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने भाजपकडून मोडक यांचे नाव अग्रक्रमावर आहे. मोडक यांच्यासह प्रविण मर्गज हे आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी तयारीत असल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेनेकडून दिप्ती वायकर यांचेही नाव चर्चेत आहे. तर उबाठाकडून श्रावणी मंदार मोरे यांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेसकडून समिता नितीन सावंत यांचेही नाव चर्चेत आहे.प्रभाग क्रमांक ७७ (महिला)हा प्रभाग सर्वसाधारण अर्थात खुला असून या प्रभागातून उबाठा शिवसेनेचे बाळा नर हे निवडून आले होते. पण आता बाळा नर हे जोगेश्वरीचे आमदार म्हणून निवडून आले असून हा प्रभाग महिला राखीव झाला आहे. महिला राखीव प्रभाग झाल्याने उबाठाच्यावतीने शिवानी शैलेश परब या इच्छुक आहेत. तर विश्वनाथ सावंत हे आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवण्यास इच्छुक आहेत. याशिवाय नंदकुमार ताम्हणकर हेही आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मिळत आहे. तर शिवसेनेकडून प्रियंका आंबोळकर, रचना सावंत आणि प्राजक्ता सावंत यांच्या नावाची चर्चा आहे. या प्रभागात शिवसेना विरुध्द उबाठा अशीच लढत होणार आहे. या प्रभागात काँग्रेसच्यावतीने मोनिका प्रविण वाडेकर यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत आहे.प्रभाग क्रमांक ७८ (महिला)हा प्रभाग ओबीसी महिला राखीव होता. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोफिया नाझिया या निवडून आल्या होत्या. परंतु आता हा प्रभाग महिला राखीव झाला आहे. सोफिया नाझिया या आता शिवसेनेत असल्याने या प्रभागात शिवसेनेचा दावा असेल. शिवसेनेकडून नाझिया या प्रमुख दावेदार आहेत. तर हा प्रभाग मनसेला सोडला जाण्याची शक्यता आहे. या प्रभागातून मनसेचे भालचंद्र आंबोरे हे निवडून आले होते. त्यामुळे मनसेसाठी हा प्रभाग सोडला जाण्याची शक्यता आहे, पण यावर राष्ट्रवादी काँग्रेसही दावा करू शकेल. त्यामुळे मनसेचे भालचंद्र आंबोरे हे आपल्या पत्नीसाठी या प्रभागातूनही प्रयत्नशील असतील असेही बोलले जात आहेत. तर उबाठाकडून वैशाली भिंगार्डे तर काँग्रेसकडून रौफ हे आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.प्रभाग क्रमांक ७९ (महिला)हा प्रभाग सर्वसाधारण अर्थात खुला असल्याने या प्रभागातून शिवसेनेचे सदानंद परब हे निवडून आले होते. पण हा प्रभाग आता महिला आरक्षित झाला आहे. महिला राखीव प्रभाग झाल्याने या प्रभागातून शिवसेनेचे सदानंद परब हे आपल्या पत्नीला निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. तर भाजपाकडून संतोष मेढेकर आपल्या वहिनीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. तर उबाठाकडून शिवानी परब ,मानसी जुवाटकर याही इच्छुक असल्याची माहिती मिळत् आहे. या प्रभागातून शिवसेना विरुध्द उबाठा अशी लढत पाहायला मिळणार आहे.
नगर परिषद, नगरपंचायतीच्या मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज
१ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदानाचा हक्क बजावणारमुंबई : राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी सुमारे १३ हजार ३५५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. या निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीनचा व्यवस्था करण्यात आली असून त्यात १३ हजार ७२६ कंट्रोल युनिट आणि २७ हजार ४५२ बॅलेट युनिटची उपलब्धता करण्यात आली आहे.राज्यातील २४६ नगर परिषदा तर ४२ नगरपंचायतींच्या (एकूण २८८) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे.दुबार नावांसमोर डबल स्टार चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे डबल स्टार चिन्ह नमूद करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्याच्या नावासमोर ते चिन्ह आहे त्याने कुठे मतदान करणार आहोत याची माहिती देणे आवश्यक आहे. अशा मतदाराने एका ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला, तर दुसऱ्या ठिकाणी तशी माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे दोन ठिकाणी त्याला मतदान करता येणार नाही याची खबरदारी निवडणूक आयोगाने यावेळी घेतली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या या निवडणुकांसाठी २८८ निवडणूक निर्णय अधिकारी आणि २८८ सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर६६ हजार ७७५ इतके अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.नगर परिषद / नगरपंचायतींची जिल्हा व विभागनिहाय संख्या कोकण विभाग एकूण - २७ नाशिक विभाग एकूण - ४९ पुणे विभाग एकूण - ६० छत्रपती संभाजीनगर एकूण- ५२ अमरावती विभाग एकूण - ४५ नागपूर विभाग एकूण - ५५एकूण मतदार व मतदान केंद्र पुरुष मतदार-५३,७९,९३१ महिला मतदार-५३,२२,८७० इतर मतदार-७७५ एकूण मतदार-१,०७,०३,५७६ एकूण मतदान केंद्र- सुमारे १३,३५५
लाल किल्ला पर्यटकांसाठी १० दिवस बंद
नवी दिल्ली : दिल्लीचा ऐतिहासिक लाल किल्ला येत्या डिसेंबर महिन्यात १० दिवसांसाठी सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. ५ ते १४ डिसेंबरपर्यंत पर्यटकांसाठी लाल किल्ला पूर्णपणे बंद असणार आहे.भारत पहिल्यांदाच ‘अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणा’संदर्भातील युनेस्कोच्या २०व्या सत्राचे आयोजन करत आहे. यासाठी लाल किल्ला हे ठिकाण निवडण्यात आले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या सहसंचालक नंदिनी भट्टाचार्य साहू यांनी सांगितले की, ‘अमूर्त सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्यासंदर्भातील सत्र ८ ते १३ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.या प्रतिष्ठित जागतिक कार्यक्रमात २४ हून अधिक देशांचे प्रतिनिधी व एक हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होतील, ज्यामध्ये सांस्कृतिक वारसा, संवर्धन व जागतिक वारसा व्यवस्थापनाशी संबंधित तज्ज्ञ आणि अधिकारी यांचा समावेश असणार आहे.
नियोजनबद्ध तयारी आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे भुयारी मेट्रो प्रकल्प यशस्वी
व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची माहितीमुंबई : मुंबईतील वाहतूक सुलभ व सुरळीत होण्यासाठी मेट्रो आणि कोस्टल रोडसारख्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या प्रकल्पांमध्ये सुरुवातीला आलेल्या समस्या, कायदेशीर व पर्यावरणीय परवाने, नागरिकांचे प्रश्न अशा अनेक आव्हानांवर नियोजनबद्ध तयारी, पारदर्शक संवाद, विविध शासकीय संस्थांचा समन्वय आणि जनतेचा सहभाग यामुळे या प्रकल्पांना यश मिळाल्याचे मुख्यमंत्री यांच्या अपर मुख्य सचिव तथा मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले.भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित दिवंगत. बी. जी. देशमुख स्मृती व्याख्यानमालेत अश्विनी भिडे यांनी मेट्रो आणि किनारी मार्ग या प्रकल्पाच्या उभारणीमागचे नियोजन, कार्यपद्धती उलगडून सांगितली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे (प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता आणि सुशासन) अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष व माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मानद सचिव विजय सतबीरसिंग, खजिनदार विकास देवधर आदी यावेळी उपस्थित होते. अश्विनी भिडे यांनी भारतातील पहिली संपूर्ण भुयारी मेट्रो लाईन ३ कुलाबा ते सिप्झच्या निर्मिती मागची संपूर्ण माहिती सादरीकरणाद्वारे दिली.अपर मुख्य सचिव भिडे म्हणाल्या की, संपूर्ण भुयारी असलेला मेट्रो प्रकल्प हा केवळ अभियंता प्रकल्प नसून सामाजिक अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण आहे. पाचपेक्षा अधिक वर्षे वर्दळीची ठिकाणे, रहिवासी भागात काम चालले असतानाही व्यापक संवाद आणि समाजमाध्यमाद्वारे पारदर्शकपणे माहिती दिल्यामुळे लोकांचा विश्वास टिकवता आला. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजनपूर्वक पूर्वतयारी, सक्षम व कटिबद्ध नेतृत्व, जलद निर्णय क्षमता, कामाच्या ठिकाणाची सतत पाहणी व आढावा, उत्तम सांघिक कार्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नागरिकांशी खुला संवाद, समस्या सोडविण्याची वृत्ती आणि राजकीय इच्छाशक्ती हे सर्वात महत्त्वाचे घटक ठरले. मुंबई पोलीस, महापालिका, बंदरे, रेल्वे, संरक्षण, विमानतळ प्राधिकरण आदी विविध संस्थांच्या समन्वयामुळे आणि मुख्यमंत्री वॉररुममधील सातत्यपूर्ण मार्गदर्शन व पाठिंब्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.आतापर्यंत अटल सेतू, मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सी लिंक सागरी किनारी मार्ग आणि नवी मुंबई विमानतळ हे प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर बांद्रा-वर्सोवा, वर्सोवा-दहिसर-भाईंदर व उत्तन विरार हे सागरी किनारा मार्ग, वरळी-शिवडी कनेक्टर आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग ते समृद्धी महामार्ग तसेच बोरीवली-ठाणे टनेल, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह टनेल रोड यांची कामे सुरू आहेत. याशिवाय पुढील काळात विरार-अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडॉर आणि वाढवण बंदर हे प्रकल्प सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले की, मुंबईसारख्या ठिकाणी भुयारी मेट्रोचा प्रकल्प उभारणे ही अतिशय कठिण गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्राने ती साध्य केली आहे. राज्यातील या प्रकल्पाची यशस्विता पाहून दिल्लीतील मेट्रोही भुयारी करण्याची मागणी होत आहे. अशा प्रकल्पातून नागरिकांना चांगली सेवा मिळते. याप्रमाणेच प्रशासनातील प्रत्येकाने सांघिक व सकारात्मक भावनेने काम करावे.
Yami Gautam Birthday: बॉलिवूडमधील साध्या-सोप्या व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारी यामी गौतम आज एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण मजेशीर गोष्ट म्हणजे, यामीला लहानपणापासून कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. तिचं एकच स्वप्न होतं ते म्हणजे IAS ऑफिसर बनून देशाची सेवा करण्याचं. 28 नोव्हेंबरला जन्मलेल्या यामी गौतमचा वाढदिवस आज साजरा होत आहे. बिलासपूर (हिमाचल प्रदेश) येथे […] The post Yami Gautam Birthday: आयएएसचं स्वप्न सोडलं आणि बॉलिवूडची स्टार बनली! जाणून घ्या यामी गौतमची प्रेरणादायी स्टोरी appeared first on Dainik Prabhat .
Dr. Gauri Garje Death Case : भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी डॅा. गौरी गर्जे पालवे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. गौरी यांच्या मृत्यू प्रकरणी पती अनंत गर्जेला पोलिसांना अटक केली आहे. कोर्टाने अनंतला २७ नोव्हेंबरपर्यंत […] The post गौरी गर्जे प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; अनंतच्या शरीरावरही आढळल्या जखमा: ‘तो’ संशय बळावला, कोर्टात काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .
मुंबईतील प्रदूषित हवेवर आज न्यायालयात सुनावणी
महापालिकेला स्पष्टीकरण देण्याचे निर्देशमुंबई : गेल्या काही दिवसांत हवेची गुणवत्ता ही सध्या खराबहून अति खराब वर्गात पोहोचली आहे. वातावरणात पसरलेली धूळ आणि धुराचे कण यामुळे दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. या गोष्टीची दखल घेत या संदर्भात दाखल जनहित याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.मुंबईत खासकरून हिवाळ्याच्या दिवसांत घसरणाऱ्या ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ (एक्यूआय)वरून उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल केली होती. या याचिकेत न्यायालयाने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ दरायस खंबाटा याची अमायकस क्युरी (कोर्टाचा मित्र) म्हणून नियुक्ती केली आहे. ज्यात वनशक्ती या पर्यावरणवादी संस्थेतर्फे हस्तक्षेप याचिका दाखल करत जनक द्वारकादास यांनीही युक्तिवाद केला होता. साधारणत: वर्षभरापूर्वी झालेल्या सुनावणीत एक्यूआय सुधारण्यासाठी एकूण २७ उपाययोजनांची यादी दिली गेली होती. ज्यांचा स्वीकार करत महापालिकेने १२ जूनपर्यंत आपला अहवाल सादर करणे अपेक्षित होते. मात्र हा अहवाल विचारणा करूनही अद्याप सादर झालेला नसल्याची माहिती गुरुवारी वनशक्तीतर्फे जनक द्वारकादास यांनी न्यायालयाला दिली. याची नोंद घेत मुंबई महापालिकेला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देत न्यायालयाने शुक्रवारी यावर तातडीची सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठापढे तातडीची सुनावणी होणार आहे.मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स २७० वरमुंबईकरांसाठी चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे, वाढत्या प्रदूषणामुळे इथल्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. सध्या मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स २७० या खराब प्रकारात असून, तो ३०० ते ४०० या ‘अत्यंत खराब’ पातळीच्या जवळ पोहोचला आहे. ज्यामुळे मुंबईकरांना श्वसनाच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. सध्या मुंबईचा एक्यूआय 'खराब' दर्शवण्यात आला असून, पुढील दोन दिवस तो 'खराब'च राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या काळात खासकरून श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घेऊन मास्कचा वापर करणे फायद्याचे ठरेल.श्वसनाच्या विकारात वाढया परिस्थितीमुळे मुंबईकरांना सध्या खोकला आणि घशाचा त्रास जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीत श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तापमानात अचानक झालेली घट आणि समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांचा मंदावलेला वेग यामुळे पुढचे काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची चिन्हे आहेत. याशिवाय मुंबईत कोस्टल रोडची अखेरची कामं, मेट्रो यांसारखी विकासकामेही युद्धपातळीवर सुरू असल्याने हे प्रदूषण येत्या काळातही कायम राहणार आहे.
पाच वर्षं उलटले तरी किती वेळ चौकशी करणार?
दिशा सालियन प्रकरणी न्यायालयाने पोलिसांना फटकारलेमुंबई : दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी मालाड येथील इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. तिच्यावर सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. मृत्यूनंतर पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून गुन्हा नोंदवला. मात्र, पाच वर्षे उलटूनही चौकशी प्रलंबित असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.न्यायालयाने गुरुवारी (दि. २७) दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील चौकशीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत पोलिसांना फटकारले. दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी मालाड येथील इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. तिच्यावर सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.मृत्यूनंतर पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून गुन्हा नोंदवला. मात्र, पाच वर्षे उलटूनही चौकशी प्रलंबित असल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि आर. आर. भोसले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने विचारले की, एवढ्या काळानंतरही चौकशी प्रलंबित कशी? कोणीतरी मरण पावले आहे. तुमचे काम इतकेच आहे, की ती आत्महत्या होती की सदोष मनुष्यवध. मग अजूनही चौकशी कशासाठी चालू आहे? यावर सरकारी वकील एम. देशमुख यांनी सांगितले की, या प्रकरणी सर्व शक्यता तपासून पाहण्यासाठी चौकशी सखोल पद्धतीने केली जात आहे.सालियन कुटुंबाचा आरोपदिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मार्च २०२५ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामध्ये त्यांनी दावा केला की दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. हे प्रकरण राजकीय स्तरावर दडपण्यात आले आहे. त्यामुळे या चौकशीची जबाबदारी सीबीआयकडे द्यावी. तसेच, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल करावा. त्यांची मुलगी अत्यंत संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळली व तिच्याशी संबंधित पुरावे व माहिती लपवण्यात आली.सरकारी वकिलांचा प्रतिवादसरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला, की घटनेनंतर पोलिसांनी अनेकवेळा दिशाच्या आई-वडिलांचे जबाब घेतले होते व त्यांनी त्यावेळी कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता. आता पाच वर्षांनी वडील असे गंभीर आरोप करत आहेत. न्यायालयाने पोलिसांना फटकारत प्रश्न केला की, सतीश सालियन हे पीडितेचे वडील आहेत. कायद्याने परवानगी असलेली कागदपत्रे त्यांना देण्यात काय अडचण आहे? खंडपीठाने पोलिसांकडून स्पष्ट भूमिका मागवली आहे. तसेच न्यायालयाने पोलिसांना शवविच्छेदन अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले.
Pune District : महाविकास आघाडीचा सासवडमध्ये वचननामा जाहीर
सासवड : सासवड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजित मधुकर जगताप यांनी विस्तृत आणि सर्वसमावेशक वचननामा जाहीर केला असून शहराच्या समतोल, पर्यावरणपूरक आणि वेगवान विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “मशाल” या निवडणूक चिन्हावर मतदान करून नागरिकांनी आपल्या सेवेसाठी संधी द्यावी, असे ते म्हणाले. वचननाम्यात शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, […] The post Pune District : महाविकास आघाडीचा सासवडमध्ये वचननामा जाहीर appeared first on Dainik Prabhat .
Pune District : जेजुरी शहर स्मार्ट सिटी करणार : अजित पवार
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस हा केंद्र व राज्य सरकारमध्ये सत्तेत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून जेजुरी शहरासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. पालखी महामार्ग, रस्ते, पाणीपुरवठा, शहर सुशोभीकरण, बागबगीचा पार्किंग, आदी कामे पूर्ण केली जातील. पर्वत योजनेत रोप वेचा समावेश करून जेजुरीत उभारणार आहे. जेजुरी शहर हे स्मार्ट सिटी करणार आहे. जेजुरी शहरातील […] The post Pune District : जेजुरी शहर स्मार्ट सिटी करणार : अजित पवार appeared first on Dainik Prabhat .
संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने दमदार पावले टाकली जात असतानाच भारताला एक धक्का बसला. दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात तेजस दुर्घटनाग्रस्त झाले. हे भारताचे संपूर्ण स्वदेशी आणि बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. भारतीय तंत्रज्ञांच्या तंत्रदृष्टीचा आणि अथक परिश्रम व इच्छाशक्तीचा परिपाक असलेले हे तेजस अचानक असे कोसळणे हा सर्व भारतीयांच्या आणि विशेषत: त्या स्वप्नासाठी वाटचाल […] The post अग्रलेख : स्वप्नांना धक्का appeared first on Dainik Prabhat .
धक्कादायक! चौथ्या मजल्यावरून उडी घेत विवाहित तरुणीने संपवलं जीवन, कारण अस्पष्ट
प्रभात वृत्तसेवा पुणे – बुधवार पेठेत एका विवाहित तरुणीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. संबंधित तरुणी काही वर्षांपूर्वी इमारतीत राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. तिची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नाही.तरुणीने टेरेसवर जाऊन इमारतीच्या मध्य भागात उडी मारल्याने ती जागेवरच मृत पावली. आवाज आल्याने रहिवाशांनी पाहिले असता, […] The post धक्कादायक! चौथ्या मजल्यावरून उडी घेत विवाहित तरुणीने संपवलं जीवन, कारण अस्पष्ट appeared first on Dainik Prabhat .
'मला किंवा माझ्या मुलाला कधीही कोणती धमकी मिळाली नाही. आजपर्यंत त्याचे कोणाशीही भांडण झाले नाही. तो कोणत्याही प्रकारचे व्यसन करत नव्हता किंवा त्याला वाईट सवयीही नव्हत्या. मग तो का निशाण्यावर आला, हे कळत नाही?' पंजाबमधील फिरोजपूर येथे राहणारे RSS कार्यकर्ते बलदेव अरोरा अजूनही त्यांचा मुलगा नवीनच्या मृत्यूच्या दुःखातून सावरलेले नाहीत. 15 नोव्हेंबरच्या संध्याकाळी, जेव्हा 38 वर्षीय नवीन आपल्या मुलांना शाळेतून आणायला जात होते, तेव्हा मोची बाजारात दोन बाईकस्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. वडील बलदेव यांचे म्हणणे आहे की, पंजाबमधील परिस्थिती खूपच वाईट आहे. कधी, कोण, कोणाला गोळी मारेल हे माहीत नाही. येथे प्रशासनासारखी कोणतीही गोष्ट दिसत नाही. पंजाब पोलिसांनुसार, आतापर्यंतच्या तपासात लुटमार, खंडणी किंवा आपापसातील वैमनस्याचा कोणताही अँगल समोर आलेला नाही. पोलीस टार्गेट किलिंगच्या दृष्टिकोनातून तपास करत आहेत. पोलिसांमधील आमच्या सूत्रांनी सांगितले की, नवीनच्या मारेकऱ्यांच्या निशाण्यावर येण्याचे कारण त्याची RSS पार्श्वभूमी आहे. हत्येचे धागेदोरे पाकिस्तानशीही जोडले जात असल्याचे दिसत आहे. पंजाबमध्ये यापूर्वीही आंतरराष्ट्रीय लक्ष्यित हत्या आणि हल्ले झाले आहेत. ज्यात पाकिस्तानसोबत इतर अनेक देश सामील होते. तपास पूर्ण झाल्यानंतरच कटाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. दैनिक भास्करने नवीनच्या वडिलांशी आणि पोलिसांमधील आपल्या सूत्रांशी बोलून संपूर्ण प्रकरण समजून घेतले. पंजाबमधील परिस्थिती खूप वाईट आहे, कोण कोणाला मारेल, काही सांगता येत नाहीफिरोजपूरचे रहिवासी बलदेव अरोरा आरएसएस कार्यकर्ते आहेत. नवीन त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांना एक मुलगीही आहे, ती चंदीगडमध्ये राहते. बलदेव १५ नोव्हेंबरचा दिवस आठवून सांगतात, ‘मी घटनेच्या १० मिनिटांपूर्वीच दुकानात पोहोचलो होतो. नवीन म्हणाला की बाबा, आता मी घरी जातो. मुलांना फिरायला घेऊन जाईन. तो निघालाच होता आणि बातमी आली की त्याला कोणीतरी गोळी मारली. नवीनला २ वर्षांचा मुलगा आणि ८ वर्षांची मुलगी आहे.' पोलिसांच्या तपासाबाबत काही माहिती मिळाली का? 'नाही, पंजाबची परिस्थिती खूप वाईट आहे. कोण, कोणाला आणि कधी मारेल, काही सांगता येत नाही. यांना शिक्षा देणारेही कोणी नाही.' आरएसएसची पार्श्वभूमी हत्येचे कारण ठरली का? हे तर माहीत नाही. आम्ही नेहमीच निशाण्यावर असतो. मीच नाही तर माझे वडील दीनानाथ अरोरा हे देखील RSS चे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. 'काँग्रेसच्या काळात जेव्हा आणीबाणी लागली होती. तेव्हा माझ्या वडिलांनी सत्याग्रह केला होता. लोकांनी समजावले की तुम्हाला तुरुंगात टाकले जाईल, तेव्हा ते म्हणायचे - मला हेच तर हवे आहे. मी देखील लहानपणापासून संघटनेशी जोडलेला आहे. आता मला प्रौढ कार्य प्रमुखपदाची जबाबदारी मिळाली आहे. 40 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांशी विचार विनिमय करणे आणि त्यांच्यासोबत बैठका घेणे हे माझे काम आहे.' संघाला थांबवणे हा हल्लेखोरांचा उद्देश असू शकतो का? यावर बलदेव अरोरा म्हणतात, '1989 मध्ये मोगा येथे शाखेच्या वेळी हल्ला झाला होता. अंदाधुंद गोळीबार झाला होता आणि 25 कार्यकर्ते मारले गेले होते. त्यात माझ्या वडिलांचे अनेक सहकारीही मारले गेले होते. तरीही दुसऱ्या दिवशी शाखा लागली होती. माझे वडील त्यात गेलेही होते. पंजाबमध्ये संघटनेवर हल्ल्यांचा जुना इतिहास आहे, पण संघ आपले काम करत राहतो.' वैयक्तिक वैमनस्य-खलिस्तानी पत्राशी संबंध, दोन्ही सिद्धांत फेटाळलेघटनेबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले की, 'हत्येचे नियोजन व्यावसायिक पद्धतीने झाले होते. त्यामुळे वैयक्तिक वैमनस्याचा सिद्धांत फेटाळण्यात आला. त्यानंतर खलिस्तानी संघटना असल्याचा दावा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर समोर आली. जेव्हा तिची चौकशी झाली, तेव्हा ती बनावट निघाली.' खालिस्तानी संघटना असल्याचा दावा करणाऱ्या पत्राची चौकशी झाली का? 'होय, पत्रात 1984 मध्ये झालेल्या ऑपरेशन ब्लूस्टारचा उल्लेख आहे. या मुलाच्या (नवीन) कुटुंबीयांनी तेव्हा शिखांच्या अकाल तख्तवरील हल्ल्यानंतर जल्लोष केला होता, असे लिहिले आहे. हे सर्व खूप अनौपचारिक पद्धतीने लिहिले आहे. सामान्यतः संघटना अशा प्रकारचे तर्क किंवा कारणे देत नाहीत. हे पूर्णपणे बनावट आहे.' ते पुढे म्हणतात, 'मृतक नवीन 38-39 वर्षांचा आहे. ऑपरेशन ब्लूस्टार 41 वर्षांपूर्वी झाले. जर 1984 च्या दंगली हे कारण होते, तर त्यावेळी हयात असलेल्या व्यक्तीला लक्ष्य केले असते, त्यावेळी जन्मालाही न आलेल्या व्यक्तीला नाही. ज्या अकाउंटवरून पत्र पोस्ट झाले, त्याचीही चौकशी झाली आहे. ते बनावट आहे.' पाकिस्तानशी संबंधांच्या सिद्धांतावर तपास सुरूपंजाब पोलिसांनी हत्येप्रकरणी आतापर्यंत 3 जणांना अटक केली आहे, तर 2 जण फरार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये कनव, हर्ष आणि जतिन यांना एन्काउंटरनंतर पकडण्यात आले. 2 साथी फरार आहेत. जतिनला एन्काउंटरदरम्यान दोन गोळ्या लागल्या असून तो रुग्णालयात दाखल आहे. मात्र, जतिनला पैसे कुठून मिळाले, नवीनची हत्या कोणी करवून घेतली, याचा तपास सुरू आहे. पाकिस्तान कनेक्शनचीही चौकशी केली जात आहे. पाकिस्तानमधील एखाद्या संघटनेने RSS ला लक्ष्य केले आहे का? यावर पोलीस सूत्रांनी सांगितले, 'बघा, आतापर्यंतच्या तपासात वैयक्तिक शत्रुत्व आणि खलिस्तान कनेक्शनची शक्यता फेटाळण्यात आली आहे.' आरोपींकडून खलिस्तानी लिबरेशन फ्रंट (KLF) संघटनेबद्दलही चौकशी केली जात आहे. पाकिस्तानशी संबंधांच्या सिद्धांतावर तपास सुरू आहे. हत्येचे धागेदोरे पाकिस्तानशीही जोडले जात असल्याचे दिसत आहे. 'हे अगदी स्पष्ट आहे की हिंदूवादी संघटना लक्ष्यावर होती. आता तपास पूर्ण झाल्यानंतरच सर्व काही स्पष्ट होईल. यामागे पंजाबला अस्थिर करण्याचा प्रयत्न दिसत आहे. नवीन लक्ष्यावर येण्याचे कारण त्याची RSS पार्श्वभूमी आहे. एखाद्या सामान्य माणसाला किंवा व्यापाऱ्याला मारून तो संदेश दिला जाऊ शकत नव्हता, जो संदेश RSS पार्श्वभूमीच्या व्यक्तीला मारून दिला जाऊ शकतो.' पोलिसांना आरोपींच्या चौकशीतून असे समजले आहे की, हत्येचा कट कनवच्या वाढदिवसाच्या पार्टीत रचण्यात आला. हत्येचा सूत्रधार जतिन आहे. त्याने इतर साथीदारांना पैशांचे आमिष दाखवून काम करवून घेतले. हर्ष आणि कनव यात सहभागी होते. नवीनवर गोळी झाडणारा आरोपी बादल फरार आहे. या कामात वापरलेली बंदूक पंजाबबाहेरून मागवण्यात आली होती. मात्र, ती कुठून मागवण्यात आली, हे अजून कळलेले नाही. प्रकरणात NIA ची एन्ट्री होईलपोलिस सूत्रांनुसार, 2-3 दिवसांच्या आत पोलिसांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पोलिसांच्या तपासाला काही मर्यादा आहेत. प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ची एन्ट्री जवळपास निश्चित आहे. यापूर्वीही अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि व्यक्तींवरील हल्ल्यांचा तपास NIA ने केला आहे. आतापर्यंत समोर आलेला पॅटर्न, तो 2016 ते 2017 दरम्यान झालेल्या टार्गेट किलिंग आणि हल्ल्यांच्या कार्यपद्धतीसारखा वाटत आहे. आरएसएसने म्हटले- संस्थेवर हल्ला करण्यासाठी सॉफ्ट टार्गेट निवडलेया प्रकरणी आम्ही आरएसएस कार्यकर्ते प्रमोद यांच्याशीही बोललो. ते म्हणतात, 'यापूर्वीही पंजाबमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ले झाले आहेत. त्यामुळे हा हल्लाही आरएसएसला लक्ष्य करून करण्यात आला आहे, हे नाकारता येत नाही.' 'खरं तर संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. देशभरात कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. पंजाबमध्ये घरोघरी संपर्क साधून संघ लोकांना संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. हा हल्ला संघाचा प्रसार रोखण्यासाठी असू शकतो. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतरच निश्चितपणे काही सांगता येईल.' 10 वर्षांत 9 लक्ष्यित हत्या - एकच पॅटर्ननवीनची हत्या अशी काही पहिली घटना नाही. 6 ऑगस्ट 2016 रोजी जालंधरमध्ये आरएसएसच्या पंजाब युनिटचे उपाध्यक्ष निवृत्त ब्रिगेडियर जगदीश गगनेजा यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एनआयएने 2019 मध्ये अहवाल सादर केला होता. चौकशी अहवालात हत्येचा कट रचणाऱ्या 11 लोकांची नावे समाविष्ट होती. अहवालानुसार हे नियोजन पाकिस्तानात झाले होते. मात्र, निधी पुरवण्यापासून ते लक्ष्यित हत्येपर्यंत अनेक देशांतील लोक सामील होते. एजन्सीच्या तपासणीत असे म्हटले होते की, ही हत्या खालिस्तान लिबरेशन फोर्स (KLF) च्या सर्वोच्च नेतृत्वाने रचली होती आणि हा एका आंतरराष्ट्रीय कटाचा भाग होता. या अहवालात 2016 ते 2017 पर्यंत मारल्या गेलेल्या विशिष्ट संघटना आणि समुदायाच्या लोकांच्या तपासाचाही समावेश करण्यात आला होता. सर्व हत्यांचा नमुना आणि उद्देश एकच होता. या हत्येमध्ये पाकिस्तान, इटली, यूके, ऑस्ट्रेलियाच्या नेटवर्कचा वापर करण्यात आला होता. अहवालात या हत्यांना ‘आंतरराष्ट्रीय कट’ असे म्हटले होते. अर्थसहाय्यापासून ते नियोजनापर्यंत अनेक देश यात सामील होते, असे स्पष्टपणे नमूद केले होते. पाकिस्तान यात प्रमुख भूमिकेत होता. जालंधरचे जगदीश गगनेजा, लुधियानाचे रविंदर गोसाईं आणि अमृतसरचे विपिन शर्मा यांच्यासह सर्वांच्या लक्ष्यित हत्यांच्या पद्धती आणि निधीवर सविस्तर तथ्ये दिली होती. पुन्हा तेच स्वरूप - मास्क घातलेले दोन बाईकस्वार आले पंजाब पोलिसांच्या एका अन्य अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आमच्याशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, 'आरएसएस पदाधिकारी बलदेव अरोरा यांच्या मुलाच्या, नवीन अरोराच्या हत्येमध्येही बाकीच्या लक्ष्यित हत्यांप्रमाणेच स्वरूप आहे. तिथेच गर्दीने भरलेल्या बाजारात दोन बाईकस्वारांनी लक्ष्यावर गोळ्या झाडल्या.' ते पुढे म्हणतात, ‘तुम्ही बघा, शाखांवर जे हल्ले झाले, तेही याच पद्धतीचे होते. पंजाबमध्ये असे नाही की फक्त हिंदूवादी संघटनाच निशाण्यावर आल्या आहेत, पाद्री आणि नामधारीही आहेत. पण हे तुरळकच आहेत. खालिस्तानी असोत किंवा पाकिस्तानी, RSS त्यांच्यासाठी शत्रू नंबर-1 आहे.
प्रभात वृत्तसेवा पुणे – मध्य रेल्वे विभागातील बदलापूर- कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या लाइन प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना हिरवा कंदील दिला. मंजूर झालेल्या या प्रकल्पांची एकूण किंमत सुमारे २ हजार ७८१ कोटी रुपये आहे. यामुळे पुणे-मुंबई प्रवास […] The post Central Railway: पुणे-मुंबई प्रवास होणार सुपरफास्ट! बदलापूर-कर्जत नवीन रेल्वे लाईनला केंद्र सरकारचा ग्रीन सिग्नल appeared first on Dainik Prabhat .
हिंजवडीत धक्कादायक प्रकार! १५ बालकांना वर्गात कोंडून अंगणवाडी मदतनीस बैठकीला; दोषींवर कारवाईचे आदेश
प्रभात वृत्तसेवा पुणे – हिंजवडीसारख्या आयटी पार्कमध्ये धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. हिंजवडी ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटातील तब्बल १५ चिमुकल्यांना वर्गातच कोंडून आणि बाहेरून सेफ्टी दरवाजाला कुलूप लावून मदतनीस चक्क माजी सरंपचांच्या बैठकीला हजेरी लावण्यासाठी गेल्याची घटना घडली आहे. ही बाब जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीतून समोर […] The post हिंजवडीत धक्कादायक प्रकार! १५ बालकांना वर्गात कोंडून अंगणवाडी मदतनीस बैठकीला; दोषींवर कारवाईचे आदेश appeared first on Dainik Prabhat .
राज्यव्यापी शाळा बंद! मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यव्यापी संपाचा इशारा, ‘या’दिवशी शाळा राहणार बंद
प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.राज्यातील २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये, १५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यता शासन निर्णय […] The post राज्यव्यापी शाळा बंद! मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यव्यापी संपाचा इशारा, ‘या’ दिवशी शाळा राहणार बंद appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी शस्त्र वापरण्याचे वनविभागाने आदेश दिले आहेत अशी अफवा औंध भागात पसरली आहे. परंतु, असे कोणतेही आदेश दिले नसल्याचे स्पष्टीकरण वनविभागाने दिले आहेत. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशाप्रकारच्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. औंध येथे रविवारी (दि.२३ नोव्हेंबर) बिबट्या आढळून आला होता, त्यानंतर वनविभागाने नागरिकांना […] The post Pune News: बिबट्यापासून वाचण्यासाठी शस्त्र उचला? व्हायरल मेसेजवर वन विभागाने दिले स्पष्टीकरण..जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
पुणेकरांनो सावधान! भटक्या कुत्र्यांना खाऊ घालताय? मग ही बातमी आधी वाचा, महापालिकेचा कडक आदेश
प्रभात वृत्तसेवा पुणे – भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालताय तर त्याची माहिती १५ दिवसांच्या आत महापालिकेला द्यायची आहे. नागरिक, प्राणिप्रेमी संस्था, संघटना यांना महापालिकेने या सूचना दिल्या आहेत. तसे लेखी आदेशही महापालिकेच्या आरोग्य विभागाने काढले आहेत. हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशावरून काढण्यात आला आहे. एका अर्जामध्ये याची तपशीलवार माहिती भरायची आहे. त्यामध्ये मोकाट श्वानांना […] The post पुणेकरांनो सावधान! भटक्या कुत्र्यांना खाऊ घालताय? मग ही बातमी आधी वाचा, महापालिकेचा कडक आदेश appeared first on Dainik Prabhat .
ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शेवटचे दीड वर्षापूर्वी पाहिले गेले होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर राहायचे होते, परंतु त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता किंवा त्यांचा आवाजही स्पष्ट ऐकू येत नव्हता. इम्रान यांना भेटायला गेलेल्या त्यांच्या बहिणींनाही वाईट वागणूक देण्यात आली. त्यांनाही गेल्या एका महिन्यापासून त्यांच्या भावाला भेटता आले नव्हते. आता सोशल मीडियावर अफवा पसरल्या आहेत की १७ दिवसांपूर्वी तुरुंगात इम्रान यांची हत्या झाली. सरकारने स्पष्ट केले आहे की इम्रान पूर्णपणे ठीक आहेत. इम्रान खान यांच्या हत्येच्या दाव्याला काही आधार आहे का? लष्करप्रमुख असीम मुनीर हे इम्रान खान यांचे कट्टर शत्रू का बनले आहेत? आणि पुढे काय होईल? जाणून घ्या… प्रश्न-1: इम्रान खान शेवटचे कधी दिसले होते? उत्तर: इम्रान खान ऑगस्ट 2023 पासून पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात बंद आहेत. सुमारे दीड वर्षांपूर्वी, 16 मे 2024 रोजी न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इम्रान खानचे जबाब नोंदवले होते. सप्टेंबर 2025 मध्येही रावळपिंडीच्या अँटी टेररिझम कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इम्रान खानला हजर राहायचे होते. इम्रान सामील झाले, पण त्यांची स्पष्ट प्रतिमा दिसली नाही किंवा आवाजही ऐकू आला नाही. इम्रान यांचे वकील सलमान अक्रम राजा आणि फैसल मलिक यांनी न्यायमूर्ती अमजद अली शाह यांना इम्रानशी थेट बोलण्याची विनंती केली, परंतु न्यायालयाने त्यांना परवानगी दिली नाही. यानंतर इम्रान यांच्या वकिलांनी न्यायालयाची कार्यवाही अपारदर्शक आणि चुकीची असल्याचे सांगून बहिष्कार केला. शिवाय, इम्रान खान यांची बहीण अलिमा खानच्या अलीकडील निवेदनानुसार, 'इम्रान किमान सहा आठवड्यांपासून एकाकी आहेत. कुटुंबाला त्यांना भेटू दिले जात नाही, तर न्यायालयाने त्यांना महिन्यातून 2 मंगळवारी भेटण्याची परवानगी दिली आहे. त्यांच्या जीवाला धोका असू शकतो किंवा ते सध्या खूप आजारी आहेत अशा अफवा पसरत आहेत. मला वाटत नाही की ते इम्रानला हात लावण्याची हिंमत करतील, कारण त्यांना चांगलेच माहीत आहे की पाकिस्तानात खूप राग आहे.' प्रश्न-2: इम्रान खानच्या तुरुंगात हत्येचा दावा कोणी केला? उत्तर: इम्रान खानच्या तिन्ही बहिणी आणि त्यांच्या पक्षाचे (PTI) कार्यकर्ते अदियाला तुरुंगाबाहेर निदर्शने करत होते. इम्रान खानच्या बहिणींनी पंजाब पोलीस प्रमुखांना पत्र लिहून तुरुंगात इम्रानला एकाकी कोठडीत ठेवल्याचा आणि त्यांच्यासोबत क्रूरता केल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानंतरही 3 आठवड्यांपासून त्यांना इम्रानला भेटू दिले जात नाही, हे 'हत्येच्या कटा'चे संकेत आहे. अफवा पसरताच तुरुंगाबाहेर शेकडो पीटीआय समर्थकांची गर्दी जमली. याच दरम्यान 26 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानच्या 'अफगाणिस्तान टाइम्स' या वृत्तपत्राने X वर लिहिले, 'पाकिस्तानमधील एका विश्वसनीय स्रोताने याची पुष्टी केली आहे की पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांची रहस्यमय पद्धतीने हत्या करण्यात आली आहे आणि त्यांचे शरीर तुरुंगाबाहेर नेण्यात आले आहे.' यानंतर 27 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या फुटीरतावादी गटांच्या स्वघोषित बलुचिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या हँडलवरून लिहिले गेले, 'इम्रान खान यांना वाईट रीतीने छळ करून काळकोठडीत मरण्यासाठी सोडून देण्यात आले. सर्व संभाव्य स्रोत सांगत आहेत की पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी इम्रान खान यांची हत्या केली आहे. आम्ही अजूनही त्यांच्या पुष्टीची वाट पाहत आहोत.' याव्यतिरिक्त, अनेक पाकिस्तानी हँडलवरून सोशल मीडियावरही अशा प्रकारचे दावे करण्यात आले. भारतीय माध्यमांमध्येही या बातम्या, अफवा आणि स्रोतांच्या हवाल्याने इम्रान खान यांच्या हत्येची शक्यता व्यक्त करण्यात आली. प्रश्न-3: या दाव्यात किती सत्यता आहे, पाकिस्तान सरकारने काय म्हटले? उत्तर: इम्रान खान यांच्या हत्येच्या दाव्यांसह त्यांची दोन छायाचित्रे शेअर केली जात आहेत. पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या छायाचित्रांचे आणि दाव्यांचे 'फॅक्ट चेक' करत X वर एक पोस्ट शेअर केली. त्यात म्हटले आहे की ही छायाचित्रे 2012 आणि 2022 ची आहेत. निवेदनात पुढे म्हटले आहे, 'काही अफगाणी ट्विटर हँडलद्वारे इम्रान खान यांच्या मृत्यूची अफवा पसरवली जात आहे. याच आधारावर भारतीय माध्यमांनीही हा दावा केला आहे. मृत्यूची अफवा पूर्णपणे खोटी आहे. ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.' पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार, अदियाला कारागृह प्रशासनानेही इम्रान यांच्या मृत्यूच्या दाव्यांना फेटाळून लावले आहे. कारागृह प्रशासनाने आपल्या निवेदनात म्हटले आहे, 'इम्रान खानला अदियाला कारागृहातून हलवण्यात आलेले नाही. या बातम्यांमध्ये कोणतेही सत्य नाही. ते पूर्णपणे ठीक आहेत. हे पाकिस्तानातील वातावरण बिघडवण्यासाठी केले जात आहे.' पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही सांगितले की, इम्रान खानला तुरुंगात पूर्वीपेक्षा जास्त आराम मिळत आहे. ख्वाजा आसिफ यांनी X वर लिहिले, 'त्यांचे जेवण बाहेरून येते. आणि इम्रान खानला जे जेवण मिळते, ते कोणत्याही 5 स्टार हॉटेलमध्येही मिळत नाही. आराम करण्यासाठी डबल बेड आणि मखमली गादी देण्यात आली आहे.' मात्र, पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार, जुलै 2024 मध्ये इम्रानने स्वतः सांगितले होते की ते 8 फूट तुरुंगात राहत आहेत. जेव्हा त्यांची लांबी 6 फूट 2 इंच आहे. त्यांना हालचाल करण्यातही अडचण येत आहे. इम्रानने सांगितले होते, 'मी नेहमी एजन्सींच्या निगराणीखाली असतो. माझी 24 तास निगराणी केली जाते. इतकेच काय, मला कोणालाही भेटू दिले जात नाही.' PTI या गोष्टीवर ठाम आहे की इम्रानच्या आरोग्याबद्दल आणि ते पूर्णपणे सुरक्षित असल्याबद्दल राज्याकडून एक औपचारिक निवेदन जारी केले जावे. PTI नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्र्यांची मुलगी मेहर बानो कुरेशीने X वर लिहिले, 'इम्रान खान साहेबांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. या अफवांना विराम देण्याचा एकच मार्ग आहे, खान साहेबांच्या बहिणींना, वकिलांना आणि पक्षाच्या सदस्यांना त्यांना भेटू दिले जावे.' प्रश्न-4: मग इम्रान यांना त्यांच्या कुटुंबाला भेटू का दिले जात नाही? उत्तर: मार्च 2025 मध्ये इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात दर मंगळवारी इम्रान खान यांना त्यांचे वकील आणि कुटुंबीय यांना भेटण्याची परवानगी दिली होती. ऑक्टोबर 2025 मध्ये न्यायालयाने पुन्हा भेटी सुरू करण्याचे निर्देश दिले. तरीही, त्यांच्या तिन्ही बहिणी - अलीमा खान, नोरिन नियाझी आणि डॉ. उझमा खान यांचे म्हणणे आहे की, तीन आठवड्यांपासून त्यांना भावाला भेटू दिले जात नाही. यामागे अदियाला तुरुंग प्रशासन सुरक्षा कारणांचा हवाला देत आहे. 18 नोव्हेंबर रोजी जेव्हा तिन्ही बहिणींना इम्रानला भेटू दिले नाही, तेव्हा त्या पीटीआयच्या समर्थकांसह तुरुंगाबाहेर धरणे धरून बसल्या. यादरम्यान रावळपिंडी पोलिसांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले. बहिणींनी आरोप केला की, विरोधादरम्यान त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यांना रस्त्यावर फरफटत नेण्यात आले. परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ जेएनयूचे प्राध्यापक राजन कुमार म्हणतात की पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरतेची स्थिती आहे, इम्रान तुरुंगात असूनही त्यांचा पक्ष पीटीआय मजबूत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्ष मुस्लिम लीग-एन, पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर त्यांना कोणतीही सवलत देऊ इच्छित नाहीत. त्यांच्यासाठी इम्रान खानच सर्वात मोठे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. असेही म्हटले जात आहे की इम्रान खानला आसिम मुनीरसोबतच्या जुन्या वैमनस्याची शिक्षा मिळत आहे. प्रश्न-5: आसिम मुनीरसोबतच्या शत्रुत्वाची शिक्षा भोगत आहेत का इम्रान खान? उत्तर: आसिम मुनीर आणि इम्रान खान यांच्यातील संघर्ष 2019 मध्ये सुरू झाला होता... खरं तर, सप्टेंबर 2018 मध्ये आसिम मुनीर पाक सैन्यात लेफ्टनंट जनरल बनले होते. मुनीर यांची लष्करी कारकीर्द शानदार सुरू होती. मार्चमध्ये त्यांना पाकिस्तानचा दुसरा सर्वात मोठा नागरी सन्मान ‘हिलाल-ए-इम्तियाज’ प्रदान करण्यात आला. 25 ऑक्टोबर 2018 रोजी त्यांना ISI चे डीजी बनवण्यात आले, परंतु आठ महिन्यांनंतर जून 2019 मध्ये त्यांना हटवून त्यांच्या जागी लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांना ISI चे नवीन डीजी बनवण्यात आले आणि मुनीर यांना पाकिस्तानच्या गुजरांवाला येथील XXX कॉर्प्समध्ये कमांडर म्हणून तैनात करण्यात आले. इतक्या कमी वेळात एखाद्या डीजीला पदावरून हटवण्याची ही पहिलीच वेळ होती, ज्याचे कारण मुनीर यांचा इम्रान खानसोबतचा वाद होता. त्यावेळचे पाक लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा, इम्रानचे जवळचे होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुनीर यांनी इम्रान खानची पत्नी बुशरा बीबीच्या भ्रष्टाचाराचे एक प्रकरण उघड केले होते. त्यामुळे इम्रान खानच्या सांगण्यावरून बाजवा यांनी मुनीर यांना ISI मधून बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र, नंतर इम्रान खानने हे नाकारत म्हटले होते, 'हे पूर्णपणे खोटे आहे. जनरल असीमने मला आणि माझ्या पत्नीच्या भ्रष्टाचाराचा कोणताही पुरावा दिला नाही आणि यामुळे मी त्यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडले नाही.' यानंतर, जानेवारी 2021 ते नोव्हेंबर 2022 पर्यंत मुनीर क्वार्टरमास्टर जनरल राहिले. आयएसआय प्रमुखपदावरून येथे येणे मुनीरसाठी डिमोशन होते. असे म्हटले जाते की, 2022 मध्ये इम्रानचे सरकार पाडण्याच्या कटात मुनीर देखील सामील होते. 10 एप्रिल 2022 रोजी अविश्वास प्रस्ताव आणून इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले. त्यापूर्वीच विरोधामुळे त्यांनी पंतप्रधान निवासस्थान सोडले होते. दुसऱ्या दिवशी शाहबाज शरीफ पंतप्रधान बनले. मुनीर आणि शाहबाज यांचे जुने आणि जवळचे संबंध आहेत. यामुळे 29 नोव्हेंबर 2022 रोजी बाजवा यांना हटवून मुनीर यांना पाक लष्कराचे नवे प्रमुख बनवण्यात आले. मुनीर लष्करप्रमुख झाल्यावर इम्रान खानने उघडपणे लष्करावर त्यांचे सरकार पाडल्याचा आरोप केला. अल-कादिर प्रकरणात 9 मे 2023 रोजी इम्रान खानला तुरुंगात टाकण्यात आले. सुमारे 2 महिन्यांसाठी जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या इम्रानने आसिम मुनीरवर नवाज शरीफसोबत संगनमत करून त्यांना अटक केल्याचा आरोप केला. इम्रानचे म्हणणे होते की मुनीरने स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी पाकिस्तानचे भविष्य पणाला लावले. प्रश्न-6: इम्रान कधी तुरुंगातून बाहेर येऊ शकतील का? उत्तर: पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्रानुसार, 'शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांना इम्रान कधीही तुरुंगातून बाहेर यावा असे वाटणार नाही. जर इम्रान तुरुंगातून बाहेर आले, तर ते पाकिस्तानात पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी करतील.' तुरुंगात असूनही इम्रान यांच्या राजकीय ताकदीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, पाकिस्तानात 2024 मध्ये 8 फेब्रुवारी रोजी एकूण 342 पैकी 265 जागांवर सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. निवडणुकीपूर्वी पीटीआयवर बंदी घालून तिचे निवडणूक चिन्ह काढून घेण्यात आले. यानंतर इम्रानने आपल्या पक्षाच्या नेत्यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरवले. पीटीआय समर्थित असे 97 अपक्ष उमेदवार निवडणूक जिंकले. तर, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पक्ष मुस्लिम लीग-एन दुसऱ्या क्रमांकावर राहिला, त्याने 75 जागा जिंकल्या आणि बिलावल भुट्टोच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला फक्त 54 जागांवर विजय मिळाला. इम्रान तुरुंगात असताना, इथे पीपीपी आणि मुस्लिम लीग एकत्र आले आणि नवाझचे भाऊ शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. इंग्रजी वृत्तपत्र 'द डिप्लोमेट' च्या जुलै 2025 च्या अहवालानुसार, 'इम्रान खानची तुरुंगातून सुटका केवळ पाकिस्तानच्या लष्कराशी आणि आसिम मुनीरशी समझोता करूनच होऊ शकते. तर, इम्रान यासाठी कधीही सहमत होणार नाहीत.' प्रश्न-7: इम्रान यांचा पक्ष त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न करत आहे? उत्तर: ऑगस्ट 2023 मध्ये इम्रानच्या अटकेनंतर पीटीआयने संपूर्ण पाकिस्तानात हिंसक निदर्शने केली होती.

29 C