SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

24    C
... ...View News by News Source

ऐसी मती जयाची थोर!

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर१९९० नंतर जगात जागतिकीकरण खासगीकरण-उदारीकरण हे शब्द आपल्या सतत कानांवर आदळत आले. त्याचबरोबर जग हे ‘ग्लोबल व्हिलेज’ झाले पाहिजे, हा घोषही जागतिकीकरणाच्या सुसाट वादळासोबत आमच्या कानावर आदळत आला. सगळेच ‘ग्लोबल’ म्हणजे अक्षरशः सपाटच करायचे असा सूर सर्वत्र घुमू लागला.जग एकसारखे करायच्या या सुरात सूर मिसळून सारेच गरागरा फिरू लागले. खरे तर खूप वेगळ्या अर्थाने ‘पृथ्वी हे कुटुंब’ वसुधैव कुटुंबकम् हा संदेश संबंध जगाला देत आले. यात जगातील प्रत्येकाशी पृथ्वीतलावरील ‘जीव’ या अर्थाने मनांचा भावस्पर्शी पूल जोडणे होते पण स्वत्वाचा त्याग करून तो जोडणे अभिप्रेत नव्हते.आमच्या ज्ञानोबांनी तर ‘हे विश्वचि घर, ऐसी मती जयाची थोर’ असे म्हटलेच आहे. त्यांचे पसायदान आणि त्यातील आशय समजून घेणे म्हणजे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे मर्मच जाणणे.व्यापक आणि उदार दृष्टिकोन किती तर केवळ माणूसच नाही तर प्राणी आणि किडे -मुंग्यांना देखील त्यांचा आनंद मिळवण्याचा, सुखाने जगण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यांच्यासाठीही ज्ञानोबांनी पसायदान मागितले आहे. अशा ज्ञानेश्वरांचा वसा आपण मिरवतो आहोत, हे विसरून चालणार नाही.मध्यंतरी एक बातमी वाचली. एका मराठी मुलाला रेल्वे गाडीतल्या एका भांडणात एका गटाने घेरले आणि त्याचा धसका घेऊन त्याने आत्महत्या केली.बातमीत त्याने जे सांगायचे, ते तो मराठीत बोलला नाही, असा संदर्भ होता. यात काय खरे, काय खोटे हे ठाऊक नाही, मात्र धर्म, जात या कारणांसारखे ‘भाषा’ हे दंग्यांचे कारण होऊ नये असे मनापासून वाटते.आपल्या भाषेचा अभिमान ही सहज स्वाभाविक गोष्ट आहे. तोच खरे तर इतर भाषेचा सन्मान करायला शिकवतो.आपले स्वत्व गमावू नये नि इतरांचे स्वत्व पायदळी तुडवू नये इतकी आपली मती थोर असू शकेल का?

फीड फीडबर्नर 3 Dec 2025 4:30 am

घातकी संगत

माेरपीस : पूजा काळेगुणदोषाच्या आधारे माणसाच्या स्वभावाचे विश्लेषण करता येते. अमूक एकाबद्दल बोलताना, त्या स्वभावाशी मिळतीजुळती माणसं, त्यांचे नमुने आपणास जागोजागी दिसतात. आपण स्वतः अमूक एका स्वभावाचे बनलेलो असतो. सकल स्वभावातील गुणदोषाचे रोपण जन्मजात असल्याने या जगातून आपण कायमचे जातो तेव्हाच हा हट्टी, फिरंगी, तुसडा, अतिविचारी, लोभस, आळशी, डंख मारणारा स्वभाव लुप्त होतो. त्याची साथ सुटते. स्वभाव स्वभाव असतो. इच्छशक्तीने तो बदलता येतो. पण शक्यतो माणसं स्वभाव बदलताना दिसत नाहीत. डंख मारणाऱ्या स्वभाव वैशिष्ट्यांची लांबलचक यादी तयार होईल. वरून साधा दिसत असलेला स्वभाव आतून आसक्ती, सूडाने पेटलेला असतो. अशी माणसं विषारी विंचवासारखी असतात. विषयानुरूप आलेला मानवी सूड स्वभाव हा विषारी विंचवाची आठवण करून देणारा असल्याने विषारी विंचवाचे घातक डंख, त्याचं जीवनमान तपासणं हा आजच्या अभ्यासाचा मूळ विषय आहे.विषारी विंचवाबद्दल आपल्याला फारशी माहिती असण्याचं कारण नाही. एकतर तो पाळीव नसतो. दगड, माती, कडेकपारीत, गवताळ प्रदेश वा अन्यत्र आढळणाऱ्या या कीटकाला पाळणं दुरापास्त आहे. दिसताक्षणी दगड, लाकडासारख्या धारदार वस्तूंनी त्याला चिरडण्यात येतं. विषारी गणल्या गेलेल्या नाग, फण्यार, लालमुंग्यांबरोबर कैक वर्षांपासून त्याची ख्याती आहे. विंचवाच्या जातीतला घातक डंख मारणारा विषारी विंचू एकीकडे तर पलीकडे... बाई हिला इश्काची इंगळी डसली ग् बाई ग् बाई ग्. लावणीवजा गाण्यातून प्रेक्षकांसमोर येत घायाळ करणारा बिनविषारी पण प्राणप्रिय असा त्याच्या वा तिच्या नजरेचा बाण डोळ्यांसमोर येतो. टोकाच्या डंखाची ही दोन उदा. पाहता प्रेम भावनेला बिलगलेल्या विंचवाची कहाणी अनेक किस्से रंगवते. तर जंगल झाडाझुडपातला विंचू किंवा इंगळी दंश करून मारते.दंश करणं, डसणं हा त्याचा स्थायीभाव असल्याने तो प्रेमाने चावला काय किंवा क्रूरतेने चावला काय विष ते विषच हो..! आज इथे तर उद्या तिथं असं घर, कुटुंब, संसार घेऊन फिरणाऱ्या आमच्यासारख्यांच्या जीवनात विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर अशी म्हण प्रसिद्ध आहे. इतर कीटकांसारखा विंचू प्रथम दर्शनी मनात वगैरे भरत नाही. संकटाची चाहूल लागताच तो नांगी टाकायला तयार असतो. गोल्डस्मिथ नावाच्या एका शास्त्रज्ञाने आपल्या हिस्टरी ऑफ द अर्थ ऍण्ड ॲनिमेटेड नेचर या ग्रंथात एक वर्णन केलंय ते असं... व्यायला आलेली एक मादी काचेच्या भांड्यात ठेवल्यावर वेळेनुसार पिल्लं बाहेर येऊ लागताचं ही मादी पिल्लांना खाण्याचा सपाटा लावते. पिल्लू जन्मताच ती त्यांना खाते. यातून फक्त एक पिल्लू वाचतं, कारण ते झटकन आईच्या पाठीवर चढून बसतं. या पिलाने पुढे आपल्या आईला खाऊन टाकले आणि आपल्या भावंडांच्या मृत्यूचा बदला घेतला. यातला अभ्यास आणि निरीक्षण सांगतं की भूक केवळ मानवाची चिंता नसून समस्त प्राणीमात्रांना, कीटक, जीवाणूंना लागू पडते. दोन हात-दोन पाय, सरपटणारे प्राणी, पक्षी, पशू यांनाही अन्नासाठी आटापिटा करावा लागतो. वरील उदाहरण या कीटकाचा स्वभाव दाखवायला पुरेसं आहे.”विंचवाला भेटणारा सर्वाधिक घातक शत्रू म्हणजे दुसरा विंचू होय. विंचू स्वजाती भक्षक असण्याचं कोडं उलगडण्याचा प्रयत्नात, शास्त्रज्ञांच्या मते ‘अन्नपुरवठा’ शब्दात याचं उत्तर आढळतं. भक्ष मिळवण्यासाठी भरपूर कीटक उपलब्ध असतील अशावेळी विंचू रात्री संचार करतात. आपल्या निवासस्थानी ते फार वेळ नसतात. मोठे विंचू बाहेर पडले की छोटे विंचू बाहेर पडतातच असं नाही, याउलट मोठे विंचू परतले की छोटे विंचू शिकार करायला बाहेर पडतात. तेव्हा बाहेर फारसे कीटक असतील याची खात्री नसते. डॉ. पोलीज यांच्या मते छोटे विंचू मोठ्यांना टाळण्यासाठी हा उपाय करतात. कारण मोठे विंचू या छोट्या विंचवांना गिळंकृत करण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात खाद्य पुरवठा कमी होतो तेव्हा मोठे विंचू काही धोके पत्करतात. इतर वेळी ते ज्या किड्यांच्या वाटेलाही जात नाही अशा कीटकांना पकडण्याचा प्रयत्न करतात. स्ट्रिंकबीटल्स, मुंगळे यांना पकडू पाहतात. जगण्यासाठी विंचवांना धोके पत्करावे लागतात. या काळात मोठ्या विंचवांचा खाद्याचा निम्मा वाटा छोटा विंचवांचा असतो. जगण्यासाठी निसर्गांनं अनेक क्लृप्त्या बहाल केलेल्या असताना गाभण राहिलेली मादी गर्भाना होणारा अन्नपुरवठा रोखून स्वतःसाठी वापरू शकते. तसंच गर्भातल्या अन्नरसाचं पुन:श्च शोषण करू शकते यामुळे गर्भाची वाढ मंदावते. वसंताच्या आगमनानंतर कीटकांची संख्या वाढताच गर्भाची वाढ जोमाने होऊ लागते. अन्नाचा साठा भरपूर प्रमाणात असेल तर, विंचू अधाशासारखे खातात. अन्नाचे कर्बोदकात रूपांतर करून यकृत आणि स्नायूंमध्ये साठवून ठेवतात.नेहमीच्या वजनापेक्षा ३४ टक्के जास्त वजन मिळण्याची क्षमता त्यांच्यात असते. शारीरिक क्रियांचा विचार करता विंचू ज्यावेळी विश्रांती घेतात तेव्हा ते मंदावलेले असतात. त्यांची वेगमर्यादा इतर कीटकांपेक्षा कमी असल्याने, फारशी ऊर्जा न वापरल्याने ते वर्षभर उपाशी राहू शकतात. डॉ. पोलीज यांनी वाळवंटातल्या विंचवांचा अभ्यास केला असता काही निष्कर्ष काढले ते असे.विंचू ऑगस्टमध्ये पिल्लांना जन्म देतात. या काळात अन्नपुरवठा स्वल्प असल्याने बळकट पिल्ले अशक्त पिलांना मटकवतात. मादी पिलांना मारून खाते यातून जी पिल्लं वाचतात, ती जगण्याची आणि हिवाळा पार पडून जाण्याची शक्यता असते. यासाठी स्वजाती भक्षण आवश्यक. नांगीधारी विषारी विंचू तपासता विंचू चावला म्हणजे काय? याची प्रचिती येते. विंचवाचे बहुतेक गुण आपल्या स्वभावाशी जुळतात. शेवटी स्वभाव महत्त्वाचा. माणसं स्वभावाला धरून चालतात. स्वभावाला धरून बोलतात. विष पेरतात. असो आपल्याला काय.? आपण काही करून त्या विंचवाच्या नादी लागू नये. घातकी संगत जोडू नये. कासवाच्या गतीने का होईना उद्दिष्टपूर्ती करू. उत्कर्ष साधू, हेच धोरण ठेवू.

फीड फीडबर्नर 3 Dec 2025 4:10 am

पहिली दलित महिला उद्योजिका

दी लेडी बॉस :अर्चना सोंडेआज स्त्रियांचं जीवन कितीतरी पटीनं सुसह्य झालं आहे. असं एकही क्षेत्र नाही जिथे स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत नाही. १००वर्षांपूर्वी मात्र परिस्थिती फार बिकट होती. दलितांच्या वाटेला अस्पृश्यतेचं जिणं आलं होतं. प्राण्यांना देखील चांगली वागणूक मिळे तिथे दलितांचा स्पर्श देखील विटाळ मानला जाई. अशा भयाण काळात दलित स्त्रियांची परिस्थिती किती बिकट असेल याचा निव्वळ विचार केलेलाच बरा. अशा या प्रचंड विषम परिस्थितीत ती पहिली महिला उद्योजिका म्हणून उदयास आली. तिने आपल्या तिन्ही मुलांना उद्योजक बनवले. आमदार बनवले. समाजाला दिशा दिली. ही प्रेरणादायी गोष्ट आहे, पैकाबाई खोब्रागडे या भारतातील पहिल्या दलित महिला उद्योजिकेची.भिवाजी हे पैकाबाई यांचे पती. भिवाजी यांचे मूळगाव गडचिरोली जिल्ह्यात. या ठिकाणी असणाऱ्या खोब्रागडी नदीच्या किनारी राहणाऱ्या रहिवाशांना खोब्रागडे नाव पडले. पोटापाण्यासाठी चांगला कामधंदा करायला पाहिजे त्यासाठी शहरात जाण्याशिवाय गत्यंतर नाही हे उमजल्यानंतर भिवाजी यांनी आपली पत्नी पैकाबाई व दोन मुलांसह देवाडा हे गाव सोडलं. ते चांदा शहरात आले. चांदा म्हणजे आताचे चंद्रपूर. चंद्रपूर परिसर हा जंगलाने वेढलेला, कोळसा, लोखंड, चिनीमाती, बेरियम सल्फेट खनिजे मुबलक प्रमाणात मिळणारा प्रदेश. त्यामुळे चंद्रपूर हे समृद्ध शहर म्हणून ओळखले जाई.चांदामध्ये जिल्हा मध्यवर्ती कारागृह आहे. त्याच्यामागे त्यांनी आपलं बिऱ्हाड थाटलं. याठिकाणी त्यांनी फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला. पेरूच्या बागा, आमराई, चिंचेची झाडे, खरबूज-टरबूज-कलिंगड यांच्या वाड्या ठेक्याने घेऊन ते फळे विकू लागले. पैकाबाई प्रपंच सांभाळून आपल्या पतीला व्यवसायात हातभार देखील लावत. मनमिळाऊ स्वभावामुळे भिवाजी यांनी अल्पावधीतच फळ उद्योगात आपले स्थान निर्माण केले. भिवाजी यांनी स्वतःपुरते मर्यादित न राहता गावातील अनेक दलित कुटुंबांना शहरात आणले. त्यांना नोकरी-उद्योगास लावले. अनेक कुटुंबांना आधार दिला. परिसरातील तत्कालिन दलित समाजाला स्वाभिमानाने, सन्मानाने जगायला शिकवले.जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही हे भिवाजी आणि पैकाबाई या दांपत्याने जाणले होते. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना, पत्रुजी आणि गोविंद यांना शाळेत घातले. दोन्ही मुले लिहायला, वाचायला शिकली. आकडेमोड करू लागली. भिवाजी आणि पैकाबाई यांना तिसऱ्यावेळेस देखील पुत्रप्राप्ती झाली. या तिसऱ्या बाळाचं नाव देवाजी ठेवण्यात आले. आता कुठे चांगले दिवस येण्यास सुरुवात झाली असे वाटत असतानाच काळाने डाव साधला. भिवाजी यांचे अकाली निधन झाले. भिवाजी यांच्या निधनाने निव्वळ खोब्रागडे कुटुंब पोरके झाले नाही, तर त्यांनी वसवलेली अनेक दलित कुटुंबे अनाथ झाली होती.अशा कठीण प्रसंगी पैकाबाई खंबीरपणे उभ्या राहिल्या. आपल्या पतीने उभारलेल्या व्यवसायाला त्यांनी ढासळू दिले नाही. व्यवसायाची सारी सूत्रे हाती घेत हळूहळू उद्योगाची गाडी पूर्वपदावर आणली. मुलं सुद्धा मोठी झाली होती. त्यांच्यामध्ये समंजसपणा इतका होता की आपल्या आईवर व्यवसायाचा सगळा भार पडतोय हे ते पाहत होते. तिला मदत व्हावी आणि धाकट्या भावाची पण काळजी घेता यावी म्हणून पत्रुजी आणि गोविंदने शाळा अर्ध्यात सोडली. शिंपी असणाऱ्या एका दूरच्या नातेवाइकाकडे जाऊन शिंपीकाम शिकून घेतले. देवाजीने दहावी पूर्ण केली. तो कोळशाच्या खाणीत टाइमकिपर म्हणून काम करू लागला.फळविक्रीचा व्यवसाय उत्तम चालला होता. मात्र जंगल भाग असलेल्या चंद्रपुरात लाकडाच्या व्यवसायास भविष्य आहे हे खोब्रागडे बंधूंनी जाणले. आईला या व्यवसायाचं महत्त्व पटवून दिलं. बल्लारपूर येथे मोठी जागा विकत घेऊन त्यांनी लाकडाची वखार सुरू केली. चांदा ते सिरोंचा या भागातील अनेक मजुरांना रोजगार दिला. जसं जमशेटजी टाटा यांनी जमशेदपूर वसवलं तसंच खोब्रागडे बंधूंनी बल्लारपुरात हिंगणघाटची वस्ती वसवली. लाकडाचे व्यापारी म्हणून खोब्रागडे बंधू यांचे नाव देशभरात ओळखले जाऊ लागले. एक काळ असा होता ज्यावेळेस महालामध्ये अस्पृश्यांना जाण्याची परवानगी नसे. त्याकाळी आंध्र प्रदेशात चक्क राजवाडा भाड्याने घेऊन खोब्रागडे बंधू व्यवसाय करू लागले. या राजवाड्यातील लाकडाच्या डेपोचे उद्घाटन पैकाबाई यांनी केले.त्याकाळी विदर्भामध्ये चांदा ही कापसाची भली मोठी बाजारपेठ होती. दक्षिण-उत्तर रेल्वे जोडणारे ते एक प्रमुख जंक्शन होते. व्यापारी दृष्टिकोनातून मोक्याचे ठिकाण होते. देशभरातून येथे कापसाची मोठी उलाढाल होत असे. दूरदृष्टीच्या देवाजीने ही संधी हेरली. तो कापसाच्या उद्योगात उतरला. हा-हा म्हणता हा व्यवसाय देखील भरभराटीस आला. अशाप्रकारे कापसापासून ते अगदी सोने-चांदी, जमीन खरेदी-विक्री व्यवसायात खोब्रागडे बंधू उतरले आणि भरभराटीस आले. असं म्हणतात १९३० साली चंद्रपूरमध्ये पहिली फोर्ड मोटर घेणारे खोब्रागडे पहिले उद्योजक होते. मात्र या भरभराटीमागे पैकाबाईंची अपार मेहनत आणि आशीर्वाद होता. याचदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलित चळवळ जोमाने सुरू होती. खोब्रागडे बंधू देखील बाबासाहेबांच्या अभूतपूर्व कार्याने भारावून गेले. बाबासाहेबांनी उभारलेल्या आंदोलनात देवाजीबापू सहभागी झाले. १९३७ ला बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे ते बहुमताने आमदार म्हणून निवडून आले. बाबासाहेब इंग्रजांच्या काळात मंत्री होते. दलित समाजातील १४ मुलांना परदेशी शिक्षणासाठी पाठवण्याची त्यांची योजना होती. देवाजी बापूंच्या मुलाची पण त्या १४ जणामध्ये निवड झाली. मात्र आपण मुलाला परदेशी पाठविण्यास सक्षम आहोत त्याऐवजी दुसऱ्या दलित मुलाची निवड करावी ही विनंती त्यांनी बाबासाहेबांना केली. बाबासाहेबांनी एका अटीवर ही विनंती मंजूर केली ती म्हणजे परदेशी शिकून आल्यानंतर देवाजी बापूंनी त्यांच्या मुलाला चळवळीसाठी पाठवावे. हा मुलगा पुढे दलित चळवळीचा आधारस्तंभ ठरला. त्यांचे नाव बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे.उद्योजकता आणि समाजाची परतफेड हे पैकाबाई आणि भिवाजी यांनी दिलेली शिकवण खोब्रागडे परिवाराने अविरत अमलात आणली. भारतातील पहिल्या महिला उद्योजिकेला विनम्र अभिवादन.

फीड फीडबर्नर 3 Dec 2025 3:30 am

भारताची भीती दाखवून चीनचा शस्त्र पुरवठा

विश्वभ्रमण : प्रा. जयसिंग यादवट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरनंतर भारताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, हे वारंवार सिद्ध झाले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान चीनची शस्त्रास्त्रे किती कुचकामी आहेत, हे जगाने पाहिले; परंतु त्यानंतर मुस्लीम राष्ट्रांना भारताची भीती दाखवून चीनने आपली शस्त्रास्त्रे विकण्याची सोय केली आहे. त्याचा परिणाम आशिया आणि मध्य पूर्वेतील व्यूहात्मक बाबींवर होणार आहे.दोन देशांमध्ये संघर्षाचे परिणाम जगाला भोगावे लागत असतात. अशा वेळी मध्यस्थी करून संघर्ष मिटवण्याची अपेक्षा असते. शेजारच्या देशांनी त्यासाठी पुढाकार घ्यायचा असतो; परंतु चीन नेमके याविरोधात वागत असतो. ‘दोघात भांडण, तिसऱ्याचा लाभ’ असे म्हटले जाते. भारत आणि पाकिस्तानमधील तीव्र संघर्षाकडे चीनने सुवर्णसंधी म्हणून पाहिले. अमेरिकेच्या अलीकडच्या एका अहवालानुसार, चीनने पाकिस्तानच्या सहकार्याने या संघर्षाचे रूपांतर त्यांच्या शस्त्रांच्या युद्धभूमी चाचणीत केले. त्यानंतर त्यांनी मुस्लीम देशांना शस्त्रे विकण्यासाठी या चाचणी निकालांचे अतिरंजित वर्णन केले. अहवालात म्हटले आहे की, चीनने केवळ जमिनीवरच आपल्या शस्त्रांची चाचणी केली नाही, तर पाश्चात्य देशांविरुद्ध शस्त्रास्त्रांचा बाजार मजबूत करण्यासाठी जगभरात आक्रमकपणे त्यांचा प्रचार केला. मे २०२५ च्या संघर्षादरम्यान, चीनच्या अनेक प्रगत शस्त्रांचा वापर प्रत्यक्ष युद्धात पहिल्यांदाच करण्यात आला. यामध्ये एचक्यू-९ हवाई संरक्षण प्रणाली, पीएल-१५ हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आणि जे-१०सी लढाऊ विमान यांचा समावेश आहे. भारतासमोर चीनची अनेक शस्त्रे निष्प्रभ ठरली; परंतु त्याची जगभर चर्चा होऊ नये, म्हणून आपली शस्त्रास्त्रे किती परिणामकारक ठरली, याचा आक्रमक प्रचार करून चीनने शस्त्रास्त्रांची जागतिक बाजारपेठ मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पाकिस्तानचा उपयोग करून घेतला. पाकिस्तानने मुस्लीम राष्ट्रांचे मत परिवर्तन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.पाकिस्तान-भारत संघर्षावेळी चीनची आधुनिक शस्त्रे सक्रिय लढाईत तैनात करण्याची ही पहिलीच वेळ होती आणि चीनने संपूर्ण संघर्षाचा वापर एक प्रकारचा ‘फील्ड एक्सपिरीमेंट’ म्हणून केला. अहवालानुसार, चीनने पाश्चात्य शस्त्रांविरुद्ध आपल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी पाकिस्तानच्या लष्करी यशाचा फायदा घेतला. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी संसदेत दावा केला की, पाकिस्तानी जे-१० सी विमानांनी राफेलसह भारतीय हवाई दलाची अनेक विमाने पाडली. अहवालात म्हटले आहे, की पाकिस्तानचे हे दावे अतिशयोक्तीपूर्ण आहेत; परंतु चीनी दूतावासांनी जगभरात शस्त्रास्त्र विक्री वाढवण्यासाठी हे दावे केले. चीनने ‘सोशल मीडिया’वरील बनावट खात्यांद्वारे ‘एआय’ व्युत्पन्न प्रतिमा आणि व्हिडीओ-गेम ग्राफिक्स भारतीय विमानांचे अवशेष म्हणून प्रसारित केले. फ्रेंच राफेलची प्रतिमा खराब करण्यासाठी आणि स्वतःच्या जे-३५ लढाऊ विमानांचा प्रचार करण्यासाठी याचा वापर करण्यात आला होता. फ्रेंच गुप्तचर यंत्रणेचा हवाला देत, अहवालात दावा केला गेला, की चीनच्या प्रचार मोहिमेनंतर इंडोनेशियाने राफेल खरेदी प्रक्रिया थांबवली. अहवालात म्हटले आहे, की पाकिस्तान चिनी शस्त्रांवर खूप अवलंबून आहे. जूनमध्ये चीनने पाकिस्तानला ४० जे-३५ लढाऊ विमाने, केजे-५०० आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकण्याची ऑफर दिली. ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या मते, गेल्या पाच वर्षांमध्ये पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र आयातीपैकी ८१ टक्के शस्त्रे चीनमधून आली आहेत.मध्य पूर्वेला चीनची वाढती शस्त्रास्त्र निर्यात चीनच्या व्यापक ऊर्जा सुरक्षेच्या प्रयत्नात रुजली आहे आणि ही प्रवृत्ती उदयोन्मुख बहुध्रुवीय जागतिक संरचना दर्शवते. जागतिक शस्त्रास्त्र बाजारपेठेत एक प्रमुख खेळाडू म्हणून चीनचा उदय ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ (पीएलए)च्या क्षमता वाढवण्याच्या प्रेरणेने झाला. परिणामी, त्यांनी त्यांच्या संरक्षण उद्योगात सुधारणा केल्या आहेत आणि त्यांची संरक्षण उपकरणे सुधारण्यासाठी लष्करी खर्च सातत्याने वाढवला आहे. शस्त्रास्त्र बाजारपेठेतील चीनची भूमिकादेखील बदलत्या सुरक्षा वातावरणाची जाणीव करून देते. २०१२ ते २०१६ दरम्यान जागतिक शस्त्रास्त्र निर्यातीत चीनचा वाटा ३.८ टक्क्यांवरून ६.२ टक्क्यांपर्यंत वाढला. २०१६-२०२० या काळात तो ५.२ टक्क्यांपर्यंत घसरला असला, तरी चीन जगातील पाचव्या क्रमांकाचा शस्त्रास्त्र निर्यातदार राहिला आहे. अमेरिका आणि रशियाच्या तुलनेत त्याचा वाटा माफक असला, तरी नवीन तंत्रज्ञानासह नवीन बाजारपेठेत प्रवेश करण्यास सज्ज आहे. ‘सेंटर फॉर नेव्हल ॲनॅलिसिस’च्या विश्लेषणानुसार चीनने शस्त्रास्त्रनिर्यातीत एक स्थान निर्माण केले आहे. २०२० च्या अमेरिकन संरक्षण विभागाच्या अहवालानुसार, टनेजच्या बाबतीत चीन जगातील अव्वल जहाज उत्पादक देश आहे. चीन आघाडीवर असणारे आणखी एक क्षेत्र म्हणजे सशस्त्र ड्रोन. (ज्याला मानवरहित हवाई वाहने, यूएव्ही असेही म्हणतात). २०१८ पर्यंत चीनने जगभरातील १० हून अधिक देशांना जड आणि सशस्त्र यूएव्हीज निर्यात केले होते. चीनने पाकिस्तानी हवाई दलासह संयुक्तपणे चिनी विंग लूंग २ ड्रोन तयार करण्यास सहमती दर्शविली आहे.२०१३ च्या ‘एसआयपीआरआय’ अहवालानुसार चीन लहान शस्त्रे आणि हलक्या शस्त्रांचादेखील एक प्रमुख निर्यातदार आहे. चीन शस्त्रास्त्रे खरेदी करणाऱ्या देशांना लवचिक ‘पेमेंट स्ट्रक्चर्स’देखील ऑफर करतो. ते विकसनशील देशांसाठी आकर्षक आहे. शिवाय लष्करी उपकरणांच्या स्त्रोतांमध्ये विविधता आणू इच्छिणाऱ्या देशांनाही चिनी शस्त्रे चांगली वाटतात. चिनी उपकरणांची गुणवत्ता आणि टिकाऊपणाबद्दल साशंकता असली, तरी पैसे, सवलती आणि संबंधित देशांमधील राज्यकर्त्यांना लाच देऊन खरेदी करणे भाग पाडले जाते. चीनला प्रामुख्याने शस्त्रास्त्रनिर्यातीच्या राजकीय नव्हे, तर व्यावसायिक फायद्यांमध्ये रस आहे; शिवाय हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, की या व्यवहारातले आर्थिक फायदे खूप मोठे असून शस्त्रास्त्र निर्यातदार असण्याचा प्रभाव, विशेषतः कमकुवत देशांवर राहणारा वरचष्मा तितकाच शक्तिशाली आहे. चीनची व्यापक मध्य पूर्व रणनीती अशा उद्दिष्टांना समर्थन देते. २०१६ मध्ये त्यांनी अरब पॉलिसी पेपर जारी केला आणि मध्य पूर्वेला आपल्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’चा एक महत्त्वाचा भाग बनवले. मध्य पूर्वेतील अस्थिर प्रादेशिक परिस्थितीमुळे या प्रदेशातील देशांसोबत चीनच्या ऊर्जा सहकार्याला धोका वाढतो. हे अशा वेळी घडत आहे, जेव्हा अमेरिका मध्य पूर्वेवरील आपले लक्ष कमी करून इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर पुन्हा लक्ष केंद्रित करत आहे.मध्य पूर्वेमध्ये, चिनी ड्रोन्स विशेष लोकप्रिय आहेत. इजिप्त, इराक, जॉर्डन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या सर्वांना विंग लून आणि सीएच-४ ड्रोनसह सशस्त्र चिनी यूएव्ही मिळाले आहेत. अशा प्रकारे चीन मध्य पूर्वेतील यूएव्ही शस्त्रास्त्रांच्या शर्यतीला चालना देत आहे. शिवाय, अमेरिकेने मध्य पूर्वेतील अरब देशांना सशस्त्र ड्रोन विकण्यासाठी प्रतिबंधात्मक निर्यात धोरण लागू केले आहे. चीनने या संधीचा फायदा घेत या प्रदेशात आपली उपस्थिती वाढवली आहे. अमेरिकेने जॉर्डनला प्रीडेटर एक्सपी ड्रोन देण्यास नकार दिला. त्यानंतर हा देश सीएच-४ बी ड्रोन खरेदी करण्यासाठी चीनकडे वळला. इराकनेही अशीच भूमिका घेतली. अमेरिकेचा दृढ मित्र असलेला सौदी अरेबिया हा चीनी शस्त्रास्त्रांच्या सर्वोच्च आयातदारांपैकी एक आहे. सौदी अरेबियाने चीनी डीएफ-२१ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि विंग लूंग ड्रोन खरेदी केले आहेत. तसेच चीनने सौदी अरेबियामध्ये संयुक्तपणे सीएच ड्रोन तयार करण्याचा करार केला आहे. सौदी अरेबिया सध्या चीनला होणाऱ्या तेलाचा सर्वोच्च पुरवठादार आहे. या वस्तुस्थितीवर आधारित हे संबंध आहेत. इराण हा चीनी शस्त्रास्त्र निर्यातीचा पहिला खरेदीदार होता. आतापर्यंत चीनने इराणला सिल्कवर्म आणि सी-८०२ क्षेपणास्त्रे विकली आहेत. ही दोन्ही जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आहेत. शिवाय, इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे चिनी डिझाइनवर आधारित विकसित केली गेली आहेत. चिनी तंत्रज्ञांनी या विकासात मदत केल्याचे वृत्त आहे.

फीड फीडबर्नर 3 Dec 2025 3:10 am

मध्य महाराष्ट्रात नाट्यक्षेत्रात अनास्थेचे प्रयोग

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या सांस्कृतिक प्रवाहात नाट्यकलेला विशेष स्थान आहे. बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह टिळक स्मारक, भरत नाट्य मंदिर यांसह अनेक नाट्यगृहे आहेत. यामुळेच पुण्यामध्ये नाट्यसंस्कृती फुलली; परंतु गेल्या काही वर्षांत या नाट्यगृहांची अवस्था बदलत चालली आहे. जी रंगभूमी कलेचा केंद्रबिंदू होती तिथेच आता देखभालीबाबत अनास्था दिसून येत आहे. त्यामुळे कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे.बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, टिळक स्मारक, भरत नाट्य मंदिर, विठ्ठलराव तुपे पाटील नाट्यगृह या नाट्यगृहांमध्ये मोठ्या प्रमाणात नाटकांचे प्रयोग होत असतात. पण, सर्वच नाट्यगृहांची दुरवस्था होत चालली आहे. बालगंधर्व रंगमंदिरात कधी एसीच्या डक्टमध्ये आग लागते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये उंदरांचे साम्राज्य आहे. इतर काही नाट्यगृहांत स्वच्छतागृहांची परिस्थिती दुर्लक्षित आहे. काही ठिकाणी रंगकर्मींच्या सुविधांमध्ये त्रुटी आहेत. कुठे ध्वनियंत्रणा बंद, कुठे वातानुकूलित यंत्रणा बंद, कुठे तुटलेल्या अवस्थेतील खुर्च्या, कुठे भेगा पडलेले मंच अशा तक्रारी कायमच असतात. यावर तात्पुरती डागडुजी होते. त्यामुळे या सर्व अडचणींवर महापालिकेने भूमिका घेणे गरजेचे आहे. तात्पुरत्या उपाययोजना करून काहीच उपयोग नाही. त्यावर कायमचा तोडगा काढणे आवश्यक आहे. शहरातील १५ नाट्यगृहांपैकी केवळ महत्त्वाच्या चार-पाच ठिकाणी नाटकांचे प्रयोग होत असतात. बाकी ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, शाळांची स्नेहसंमेलने, राजकीय कार्यक्रम होत असतात. प्रेक्षक हे नाटकांचे प्रयोग पाहण्यासाठी येतात. पण, त्यांच्यासाठी स्वच्छता, वाहनतळ, रंगमंच व्यवस्था अशा महत्त्वाच्या सुविधा पुरविण्यास महापालिका अपुरी पडते.वारंवार हेच प्रश्न उपस्थित होऊन तात्पुरती मलमपट्टी केली जाते. कोरोनानंतर याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेने सांस्कृतिक धोरण तयार करून नाट्यगृहांच्या प्रश्नाबाबत तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. या सर्व समस्यांसह नाट्यगृहांच्या ऑनलाईन बुकिंगबाबत येणाऱ्या अडचणी ही समस्या सर्वांनाच येते. यावरही काहीतरी तोडगा काढला पाहिजे. महापालिकेकडून नाट्यगृहांची देखभाल, दुरुस्ती केली जाते. त्यासाठी कोट्यवधींचा खर्चही होतो. पण, तरीसुद्धा समस्या काही सुटत नाहीत. नाट्यागृहांमध्ये बांधकाम व अन्य सुधारणांबाबत भवन विभागाला आणि विद्युतविषयक कामांबाबत विद्युत विभागाला कळवले जाते. त्यानुसार कामे करून घेतली जातात. वारंवार तक्रारी केल्यानंतरही नाट्यगृहात स्वच्छता नसते. तक्रारी केल्यानंतर स्वच्छतेत फारशी सुधारणा होत नाही. त्यामुळे स्वच्छता आणि पेस्ट कंट्रोलचा मुद्दा वारंवार ऐरणीवर येतो. पुण्यातील अनेक नाट्यगृहांच्या इमारतींना गळती, भेगा, जुनी झालेली रंगमंच व्यवस्था आणि अपुरी देखभाल यांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात काही नाट्यगृहांमध्ये छताला गळती लागते; तर काही ठिकाणी बसण्याची आसने तुटकी, डळमळीत किंवा अस्वच्छ असल्याचे चित्र दिसते. रंगमंचावरील लाकडी फ्लोअरिंग जुने झाल्याने कलाकारांना सराव वा प्रयोगांच्या वेळी अडचणी निर्माण होतात. प्रकाशव्यवस्था आणि ध्वनिसंस्था देखील कालबाह्य झाल्याने प्रयोगांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. नाट्यगृहांच्या मागील भागात संग्रहित पडदे, सेट्स आणि साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक जागा व सुविधा उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी विद्युत व्यवस्थेतील तांत्रिक बिघाडामुळे प्रयोग थांबण्याचीही उदाहरणे घडली आहेत. अशा स्थितीमुळे व्यावसायिक गटच नव्हे तर शालेय व महाविद्यालयीन संघांनाही योग्य जागा मिळणे कठीण झाले आहे. नाट्यगृहांच्या सुधारणा आणि आधुनिकीकरणासाठी शासन, स्थानिक संस्था, खासगी प्रायोजक आणि नागरिक यांचा समन्वयित सहभाग आवश्यक आहे. आधुनिक प्रकाशयोजना, अत्याधुनिक ध्वनिव्यवस्था, सुरक्षित रंगमंच, प्रशस्त बसण्याची व्यवस्था, तसेच दिव्यांगांना सोयीस्कर अशा मार्गदर्शक सुविधा असणाऱ्या गोष्टी तातडीने उपलब्ध करण्याची गरज आहे. नाट्यगृहांची दुरवस्था ही केवळ भौतिक सुविधांची कमतरता नाही; तर प्रशासनाच्या दीर्घकाळच्या दुर्लक्षाचे परिणाम आहेत. अनेक नाट्यगृहांचे रखडलेले दुरुस्ती प्रस्ताव, निधीअभावी होणारा उशीर, तसेच जबाबदार विभागांच्या समन्वयाची कमतरता यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. काही नाट्यगृहांना नव्याने दुरुस्तीचे निधी मंजूर झाले असले, तरी काम केव्हा सुरू होईल, कसे होईल याबाबतची स्पष्टता नसते.नवीन नाट्यगृहे रखडलेलीचपुण्यात गेल्या काही वर्षांत केवळ हडपसर येथील विठ्ठलराव तुपे पाटील नाट्यगृह सोडले तर एकही नवे नाट्यगृह सुरू झालेले नाही. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या आवारातील बाळासाहेब ठाकरे कलादालन, छत्रपती शिवाजीराजे भोसले सांस्कृतिक भवन व कला मंदिर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रखडले आहे. निवडणूक होऊन सभागृह अस्तित्वात आल्यावर लवकर या नाट्यगृहांकडे लक्ष दिले पाहिजे.उपाययोजना आणि पुढील दिशापुण्यातील नाट्यगृहांचे उन्नतीकरण करण्यासाठी नियमित देखभाल निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. वर्षाकाठी नाट्यगृहांना आवश्यक असलेला देखभाल निधी निश्चित करणे महत्त्वाचे आहे. मोठ्या नाट्यगृहांच्या आधुनिकीकरणासाठी प्रायोजक आकर्षित करणे. ध्वनी, प्रकाश आणि रंगमंच व्यवस्थेचे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिकीकरण करायला पाहिजे. अग्निसुरक्षा, विद्युतसुरक्षा आणि संरचनात्मक सुरक्षिततेची नियमित तपासणी केली गेली पाहिजे. लहान-मोठ्या गटांना सहज उपलब्ध होईल अशी सरावाच्या जागेची निर्मिती असली पाहिजे. पार्किंग, प्रसाधनगृह, तिकीट व्यवस्था आणि मार्गदर्शन फलकांची सुधारणा करणे गरजेचे आहे. या उपाययोजनांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी केली तरच नाट्यगृहांचे पुनरुत्थान शक्य होईल. पुणे ही केवळ शैक्षणिक राजधानी नाही, तर मराठी नाट्यजगताचे महत्त्वाचे केंद्र आहे. आज हीच केंद्रे दुरवस्था, दुर्लक्ष आणि कालबाह्य व्यवस्थेमुळे झाकोळून गेली आहेत. नाट्यगृहांची अधोगती थांबवून त्यांचे आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे. नागरिकांचा सहभाग, प्रशासनाची इच्छाशक्ती आणि सांस्कृतिक संस्थांची सक्रिय भूमिका या तिन्हींच्या संयुक्त प्रयत्नांतूनच पुण्यातील नाट्यगृहांना पुन्हा नवसंजीवनी मिळू शकते. नाटक हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नाही; तर समाजमन घडवणारे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे नाट्यगृहांचे संवर्धन हे कलाप्रेमी पुणेकरांचे सांस्कृतिक कर्तव्यच ठरते.

फीड फीडबर्नर 3 Dec 2025 12:10 am

मानवतावादाचा मुखवटा

कोणताही संघर्ष आतापर्यंत युद्धाने संपलेला नाही आणि कोणताही पेच युद्धाने सुटलेला नाही. तरीही युद्धे सातत्याने घडत असतात आणि त्यात हजारो लोकांचे बळी जातात.अनेक युद्धांत असे दिसले आहे, की फक्त त्यांच्या शस्त्रास्त्र कंपन्यांना युद्धाचा फायदा झाला आहे आणि नागरिकांचे जीव युद्धात गेले आहेत. सध्या ज्वलंत उदाहरण आहे ते रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे. युक्रेनमध्ये रोज शेकडो निरपराध नागरिक आपले जीव गमावत आहेत आणि कोणत्या तरी देशाच्या युद्धलालसेपायी आणि सीमा बळकावण्याच्या हव्यासापायी लोकांचे जीव घेत आहेत. यात केवळ शस्त्र कंपन्या मात्र मालामाल होत आहेत. युक्रेन आणि गाझा पट्टीतील युद्धे चर्चेचा विषय बनली आहेत आणि त्यात लक्ष वेधून घेतले आहे ते केवळ शस्त्रे बनवणाऱ्या कंपन्यांनी. एका अहवालानुसार, त्यांची कमाई गेल्या वर्षी ५.९ टक्क्यांनी वाढली आहे. त्यातही अमेरिका आणि युरोपातील कंपन्या आघाडीवर आहेत आणि अमेरिकेतील ३० उदा. लॉकहिड, मार्टिन, नॉथ्रॉप ग्रुम्मन आणि जनरल डायनेमिक्स यांसारख्या कंपन्यांना सर्वाधिक लाभ झाला आहे. या कंपन्यांचा एकूण महसूल ३३४ अब्ज डॉलर इतका झाला आहे. अर्थात यात भारतातील तीन कंपन्या समाविष्ट आहेत. सर्वच देश आज मानवतावाद आणि मानवी हक्क याबद्दल बोलतात, पण वैयक्तिक स्तरावर मात्र प्रत्येक राष्ट्र आपल्याकडे जास्तीत जास्त शस्त्र असावीत याच मताची आहेत आणि त्या दृष्टीने त्याचे प्रयत्नही सुरू असतात. अर्थात जागतिक शस्त्रस्पर्धेत आपण मागे पडू अशी भीतीही यामागे असते. त्यामुळे आज भारत अण्वस्त्र संपन्न राष्ट्र आहे, कारण त्याला पाकिस्तानची भीती आहे आणि वेळोवेळी भारताने अण्वस्त्र सज्ज नसल्याचे परिणाम भोगले आहेत. जेव्हा भारत अण्वस्त्र सज्ज नव्हता तेव्हा चिमुकली राष्ट्रेही त्याला डोळे दाखवत होती. आज तशी हिंमत अगदी अमेरिकेकडेही नाही. ती ताकद भारताने प्रयत्नपूर्वक मिळवली आहे. तरीही काही देशांनी स्थापन केलेल्या अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचा भारत भाग नसला तरीही १९९८ मध्ये पोखरण येथे अणुचाचणी केली आणि त्यानंतर न्यूक्लिअर मोरेटोरियमवर स्वाक्षरी केली. म्हणजे भारत आपल्या अणुबाॅम्बचा वापर आपणहून कुणाविरोधात करणार नाही असा तो करार होता. पण कंपन्यांच्या शस्त्रास्त्र स्पर्धा तीव्र झाल्या आहेत आणि त्यात सर्वच देशांच्या शस्त्र कंपन्या आहेत. रशिया, पश्चिम आशिया येथे सतत युद्धजन्य परिस्थिती असते आणि तेथे शस्त्रांची विक्री वाढली आहे.ईस्त्रायल आज जगातील सर्वात ताकदवान राष्ट्र आहे आणि ते तर सर्व बाजूंनी शत्रुराष्ट्रानी वेढले आहे. त्यामुळे त्याला काहीही वाटले तरीही शस्त्रसज्ज होण्याची आवश्यकता आहे. हे सारे समजून घेतले तर शस्त्र कंपन्यांच्या मालामाल होण्यामागील अर्थकारण कळू शकते. या शस्त्रास्त्र कंपन्या आणि त्यांच्यातील स्पर्धा यामुळे जागतिक अर्थकारणावर होणारा परिणाम तर दिसतोच आहे. पण तो अपरिहार्यही आहे. कारण आज जगाला केवळ ताकदीची भाषा कळते. भारताकडे जेव्हा सामर्थ्य नव्हते तेव्हा लहान देशही भारताला डोळे दाखवत असत.आज ती हिंमत कुणाकडेही नाही. भारताने ती ताकद कमावली आहे आणि हीच भाषा जगाला कळते. त्यामुळे शस्त्र कंपन्या मालामाल झाल्या तरीही कोणताही देश आज दुसऱ्याच्या हातातील बाहुले नाही हे आजच्या जगाचे वास्तव आहे. जागतिक अर्थशास्त्राचा टीकात्मक पैलू असा आहे, की शस्त्र उत्पादन कितीही नफाखोर असले तरीही त्यात अंति मानवतेचा मुडदा पडतो. विशेषतः जेव्हा युद्धाच्या काळात हे जास्त प्रकर्षाने समोर येते. मानवी आयुष्य जेव्हा हरवते तेव्हा शस्त्र कंपन्या मालामाल होत असतात. त्याला कुणाचाही इलाज नाही. शस्त्र कंपन्यांचे व्यवसाय करण्याचे मॉडेल असे असते, की जितके लष्करी साहित्याचे उत्पादन देशात जास्त होते तितका त्याचा नफा वाढत जातो आणि तितका त्या देशाचा विजय सोपा होतो. भारताने अनेकदा हे अनुभवले आहे. विशेषतः मोदी सरकार आल्यावर भारताने संरक्षण उत्पादनाचे महत्त्व ओळखले आणि प्रत्येक वेळेला पाकिस्तानला पाणी पाजले आहे. मग ते कारगीलचे युद्ध असो, की ऑपरेशन सिंदूर असो. त्यामुळे भारताला कुणी कितीही नावे ठेवली तरीही युद्धाचे महत्त्व पटले आहे आणि त्यात लोकांचे जीव वाचवणे जास्त महत्त्वाचे असते, हेही पटलेले आहे.युद्धकाळात आणि नंतरही कणव आणि दु:ख करण्याऱ्यांसाठी ढाळलेले अश्रू हे आपल्या दुर्बलतेची जाणीव करून देत असतात हे विसरून प्रत्येक राष्ट्राने प्रत्येक वेळेला वागले पाहिजे. त्यामुळे हे म्हणणे कितीही योग्य असले की लोकांचे जीव जात असले तरीही आपणही इतरांसारखे डोळ्यांवर कातडे ओढून शांत बसले पाहिजे हे चूक आहे. शेवटी आपल्या लोकांचे जीव वाचवणे आणि आपल्याला मुक्त आणि सुखी जीवन जगण्याची हमी असणे हेच आपल्या जीवनाचे उद्दिष्ट असते आणि ते युद्धातील विजयानेच मिळत असते. पण याचा अर्थ ऊठसूठ युद्ध करणे आणि आपल्याहून दुर्बल राष्ट्रांच्या लोकांचा बळी घेणे नव्हे. त्यामुळे युद्धपिपासू वृत्तीपासून आपण दूरच राहिले पाहिजे. पण वेळप्रसंगी आपण संरक्षणासही सिद्ध असले पाहिजे. शस्त्र कंपन्या मालामाल होत असतील तर त्या देशांची चूक आहे. पण रशिया आणि युक्रेन यांसारख्या देशांनी आपली युद्धखोर वृत्ती आवरली पाहिजे. म्हणून तर मोदी यांनी रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धात मध्यस्थी केली होती आणि आज दोन्ही देश मोदींचे म्हणणे मान्य करतात. भारताने तिसऱ्या देशांच्या प्रकरणात काही करू नये हे आपले अलिप्ततावादाचे धोरण झाले. मोदी यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात तोडगा सुचवला होता. अर्थात या युद्धात भारताला काहीही मिळणार नव्हते. पण एक देश दुसऱ्या देशाची सीमा बळकावू पाहतो आहे हे आपण सहन करू शकत नाही हेच मोदी यांनी दाखवून दिले. आज संरक्षण उद्योग हा कोणत्याही देशाचा आणि जागतिक अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कंपन्यांनी असा युक्तिवाद केला आहे, की ते देशाच्या सुरक्षेला पाठिंबा देतात. त्यांच्यामुळेच तर कामगार शक्तीला योग्य वेतन आणि काम मिळते. त्यामुळे कंपन्यांच्या युक्तिवादाकडे दुर्लक्ष करता येत नाही. पण हेही विसरून चालणार नाही की या कंपन्यांच्या आर्थिक यशात कित्येक बळी गेलेल्यांचे आत्मे आहेत आणि त्यांचे उद्ध्वस्त जीवन आहे. कॉर्पोरेट कंपन्यांचे यश आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करून गेलेले प्राण यांत विसंवाद आहे. आपल्याला भूमिका घेताना ही बाजूही लक्षात घेतली पाहिजे.

फीड फीडबर्नर 3 Dec 2025 12:10 am

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार दिनांक ३ डिसेंबर -२०२५

पंचांगआज मिती मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी शके १९४७. चंद्र नक्षत्र भरणी, योग परीघ चंद्र राशी मेष, भारतीय सौर १२ मार्गशीर्ष शके १९४७, बुधवार दिनांक ०३ डिसेंबर २०२५ .मुंबईचा सूर्योदय ०५.५६, मुंबईचा सूर्यास्त ०५.५९, मुंबईचा चंद्रोदय ०४.१९ मुंबईचा चंद्रास्त ०६.०० उद्याची राहू काळ १२.२८ते ०१.५० . जागतिक दिव्यांग दिन,चांगला दिवस-सायंकाळी-०६;०० पर्यन्तदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : जवळचे तसे दूरचे प्रवास संभवतातवृषभ : कुटुंबात शुभवार्ता मिळतील.मिथुन : कौटुंबिक आघाडीवर यशस्वी व्हाल.कर्क : जिद्द आणि चिकाटी मध्ये वाढ होईल.सिंह : घाई गर्दी ने निर्णय घेऊ नकाकन्या : वैचारिक परिवर्तन घडण्याची शक्यता.तूळ : केलेल्या कामाचे चीज होईल.वृश्चिक : मालमत्ते संबंधी कार्य पुढे ढकलावे.धनू : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतीलमकर : कुटुंबासाठी खरेदी कराल.कुंभ : नोकरीत आपली प्रशंसा होऊ शकतेमीन : तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल

फीड फीडबर्नर 3 Dec 2025 12:10 am

'पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा'

पुणे : पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ताब्यातील जागा शासनाकडे हस्तांतरित करून ती जनहितासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. संबंधित जागा सार्वजनिक उपयोगासाठी उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात यावा. यासंदर्भातील सर्व मुद्यांची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.विधानभवन येथे झालेल्या बैठकीस अपर मुख्य सचिव (नगरविकास) असीम गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, महाव्यवस्थापक श्रीमंत पाटोळे, तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे शैलेंद्र मोरे, दीपक गायकवाड, निखिल दुर्गाई, जीवन घोंगडे, आनंद घेडे, नीता अडसुळे, स्वाती गायकवाड, अर्चना केदारी, संदीप शिंदे, मिलिंद अहिरे, सुधीर कुरूमकर उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 11:10 pm

Buldhana Crime : शिवसेना आमदार संजय गायकवाडांच्या मुलावर बोगस मतदाराला पळवण्याचा आरोप; काँग्रेसच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

बुलढाणा : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीदरम्यान (२ डिसेंबर) बुलढाणा नगरपरिषदेच्या मतदानाला सुरुवात होताच बोगस मतदानाच्या आरोपांनी खळबळ उडाली. शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि नातेवाईक श्रीकांत गायकवाड यांनी पोलिसांच्या ताब्यातील एका बोगस मतदाराला पळवण्यास मदत केल्याचा व्हायरल व्हिडिओ आणि आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस पक्षाच्या तक्रारीनंतर […] The post Buldhana Crime : शिवसेना आमदार संजय गायकवाडांच्या मुलावर बोगस मतदाराला पळवण्याचा आरोप; काँग्रेसच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 10:46 pm

Sugar production Maharashtra: ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये एकूण साखर उत्पादन वाढले 43 टक्क्यांनी

नवी दिल्ली – नवीन साखर वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात म्हणजे ऑक्टोबर -नोव्हेंबर मध्ये भारतातील साखर उत्पादन तब्बल 43 टक्क्यांनी वाढून 4.11 दशलक्ष टनावर गेले आहे. साखर जास्त प्रमाणात निर्माण करणार्‍या राज्यात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रातील साखर उत्पादन या दोन महिन्यात वाढल्यामुळे एकूण उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. ही आकडेवारी जाहीर करताना इंडियन शुगर अँड बायो एनर्जी […] The post Sugar production Maharashtra: ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये एकूण साखर उत्पादन वाढले 43 टक्क्यांनी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 10:42 pm

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांची शेअर बाजारावर होणार नोंदणी –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – महाराष्ट्रातील वीज निर्मिती आणि ट्रान्समिशन करणार्‍या कंपन्यांची शेअर बाजारावर नोंदणी करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि लवकरच या कंपन्यांची शेअर बाजारावर नोंदणी होऊ लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, ट्रान्समिशन कंपनीची नोंदणी शेअर बाजारात पुढील वर्षी म्हणजे 2026 मध्ये होण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत. इतर कंपन्यांचीही नोंदणी लगेच शेअर बाजारावर […] The post महाराष्ट्रातील वीज कंपन्यांची शेअर बाजारावर होणार नोंदणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 10:39 pm

सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला

मुंबई : राज्यातील सर्व २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्याचबरोबर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्षही २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान समाप्तीच्या अर्ध्या तासापर्यंत जाहीर करता येणार नाहीत, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे. न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगानेही संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.मतदान यंत्रांची हातळणी काळजीपूर्वक करण्यात यावी. मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या गोदामांसाठी २४ तास चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करावी. सुरक्षा उपकरणे (गोदामाच्या प्रवेद्वाराबाहेरील सीसीटीव्ही, सुरक्षा आलार्म सिस्टीम, अग्निशमन यंत्रणा इ.) व्यवस्थित कार्यांन्वित असल्याची खात्री करून घ्यावी. राजकीय पक्षांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींना गोदामांबाबत आणि तिथल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत अवगत करावे. त्याचबरोबर निवडणूक लढविणारे उमेदवार अथवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना गोदामाचे द्वार दिसेल अशा ठिकाणी बसण्यासाठी जागा निश्चित करून द्यावी, असेही निर्देश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.राज्यातील २६४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान झाले; तसेच सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि ७६ नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांसाठी २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी आता २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 10:30 pm

महाराष्ट्र ‘राजभवन; झाले आता ‘लोकभवन’

मुंबई : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले आहेत. राजभवन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि लोक कल्याणासाठी समर्पित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय दिशादर्शक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.‘लोकभवन’ म्हणून ओळखले जाणारे राजभवन आता केवळ राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय न राहता, राज्यातील नागरिक, समाजातील विविध घटक, विद्यार्थी, संशोधक, शेतकरी आणि नागरी संघटनांशी संवाद व सहभाग यांचे एक केंद्र व्हावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. ‘लोकभवन’ हे सरकार आणि राज्यातील जनतेमध्ये सेवा, सहकार्य व संवादाचा सेतू व्हावे, हीच या नामांतरामागची भूमिका आहे, असे राज्यपालांनी सांगितले.‘लोकभवन’ केवळ संवैधानिक कर्तव्यांपुरते मर्यादित न राहता, समाजाच्या आशा, आकांक्षा आणि समस्यांप्रति संवेदनशील राहून त्यांच्याशी थेट नाते जपणारे खऱ्या अर्थाने लोकभवन असेल असे राज्यपालांनी स्पष्ट केले.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 10:30 pm

विमान प्रवाशांना दागिने आयात-निर्यातीचे पार्सल सोबत बाळगता येणार; केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली – अहमदाबाद मधून निघणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानातून प्रवाशांना दागिन्याच्या आयातीची किंवा निर्यातीची पार्सल सोबत बाळगता येणार आहेत. या सदर्भातील निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. वाणिज्य मंत्रालयाने या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दागिन्यांची आयात आणि निर्यात सुरक्षितरीत्या होण्याची गरज ध्यानात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या अगोदर दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, […] The post विमान प्रवाशांना दागिने आयात-निर्यातीचे पार्सल सोबत बाळगता येणार; केंद्र सरकारचा निर्णय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 10:28 pm

‘संचार साथी अ‍ॅप’डिलीट करण्याचा पर्याय; दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली – दूरसंचार मंत्रालयाने मोबाईल कंपन्यांना मोबाईल तयार करताना संचार साथी हे मोबाईल अ‍ॅप मोबाईलमध्ये उपलब्ध करण्याची सूचना केली होती. याला बर्‍याच ग्राहकांनी आणि मोबाईल कंपन्यांनी हरकत सूचित केल्यानंतर दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, ग्राहकांना संचारसाथी हे अ‍ॅप डिलीट करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. जोपर्यंत ग्राहक हे अ‍ॅप पुन्हा डाऊनलोड करणार नाहीत तोपर्यंत […] The post ‘संचार साथी अ‍ॅप’ डिलीट करण्याचा पर्याय; दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे स्पष्टीकरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 10:24 pm

Hardik Pandya-Mahieka Sharma: हार्दिक पांड्या आणि महिका शर्मा लग्न करणार? व्हायरल व्हिडिओमुळे साखरपुड्याची रंगली चर्चा

Hardik Pandya-Mahieka Sharma: भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि मॉडेल माहिका शर्मा यांच्या कथित साखरपुड्याच्या चर्चांनी सध्या सोशल मीडियावर जोर धरला आहे. दोघांचा एक खासगी पूजा समारंभातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या अफवांना अधिक हवा मिळाली आहे. व्हायरल व्हिडिओमुळे साखरपुड्याची चर्चा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा एका खासगी पूजा समारंभात शेजारी बसलेले […] The post Hardik Pandya-Mahieka Sharma: हार्दिक पांड्या आणि महिका शर्मा लग्न करणार? व्हायरल व्हिडिओमुळे साखरपुड्याची रंगली चर्चा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 10:12 pm

डी.के शिवकुमार कधी होणार मुख्यमंत्री? सिद्धरामय्या यांनी स्प्ष्टचं सांगितलं

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी मंगळवारी पुन्हा ऐक्याचे दर्शन घडवले. त्यांच्यात चार दिवसांत दुसऱ्यांदा ब्रेकफास्ट पे चर्चा झाली. त्यानंतर कॉंग्रेस श्रेष्ठी ठरवतील तेव्हा शिवकुमार मुख्यमंत्री बनतील, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले. त्यातून त्यांनी मुख्यमंत्री बदल करायचा की नाही याविषयीच्या निर्णयाचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात ढकलल्याचे स्पष्ट झाले. कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या कर्नाटकात सत्तासंघर्ष, मुख्यमंत्रिपदावरून […] The post डी.के शिवकुमार कधी होणार मुख्यमंत्री? सिद्धरामय्या यांनी स्प्ष्टचं सांगितलं appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 10:12 pm

कोणी परदेशातून, कोणी घोड्यावरुन, कोणी गब्बरसिंहच्या वेशात आलं पण मतदान करुन गेलं, नवरदेवानं लग्नाआधी मतदान केलं

मुंबई : राज्यातल्या २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान झाले. लोकशाहीच्या दृष्टीने एक चांगले सकारात्मक चित्र दिसले. कोणी परदेशातून आले तर कोणी घोड्यावरुन आले पण मतदान करुन गेले. हौशी मतदार आकर्षक वेशात आले आणि मतदानाचा हक्क बजावून गेले. आधी लगीन लोकशाहीचं मग आपलं असं म्हणत काही नवरदेवांनी आणि नवरदेवींनी लग्नाआधी मतदान करुन नव्या आयुष्याची सुरुवात सकारात्मक वातावरणात केली. मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच अशी होती. वेळ संपली असली तरी अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा असल्यामुळे मतदान अद्याप सुरू आहे. नियमानुसार मतदानाची वेळ संपते त्यावेळी रांगेत उभ्या असलेल्या सर्वात शेवटच्या व्यक्तीची नोंद करतात आणि त्या व्यक्तीचे मतदान होईपर्यंत मतदान केंद्रावर प्रक्रिया सुरू असते. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी उत्साहाने मतदान झाले.मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे हे रविवार २१ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी झाल्यावर समजणार आहे. पण त्याआधी नागरिकांनी उत्साहाने त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. काही ठिकाणी राडे झाले. पण या निवडक घटना वगळल्या तर सर्वत्र मतदारांचा उत्साह दिसला. ज्यांची लग्न होती अशा अनेक नवरदेवांनी आणि नवरदेवींनी लग्नाआधी मतदान करुन नवी सुरुवात केली. या तरुण तरुणींनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन केले. मनमाडमध्ये शिवसेना उमेदवार रोहनने लग्न, मतदान आणि उमेदवार म्हणून निवडणूक नियोजन ही कसरत लिलया केली. नोकरीसाठी अमेरिकेत गेलेल्या अमेय सोमवंशीने बदलापूर नगरपालिकेसाठी मतदानाचा हक्क बजावला. वर्ध्यात अक्षय बहादूरकरने पुलगाव येथे नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान केले. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये नवरदेव घोड्यावर बसून थेट मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आला. तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील बूथवर जाऊन संकेत भोजनेनं मतदान केलं. पंढरपूरमध्ये गब्बरसिंगच्या पोषाखात येऊन दत्तात्रय सूर्यवंशी यांनी मतदानाचा हक्क बजावला.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 10:10 pm

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन 12 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आणि सचिव आर. विमला यांनी दिली.कस्तुरबा मार्गावरील महाराष्ट्र सदनात आयोजित या महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध प्रादेशिक खाद्यसंस्कृतीचा आणि कलेचा संगम पाहायला मिळणार आहे. चवदार पदार्थांची रेलचेल दिल्लीकरांना या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. खाद्य महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते होणार आहे.खाद्य महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ उपलब्ध असतील. नागपूर विभागातील सावजी चिकन, मटण रस्सा, तर्री पोहा आणि संत्री-आधारित मिठाई; पुणे भागातील मिसळ-पाव, वडा पाव आणि पुरणपोळी, जळगावातील शेव भाजी, वांग्याचे भरित आणि केळीशी संबंधित पदार्थ; मालवणातील मालवणी सीफूड, कोंबडी वडे आणि सोलकढी; छत्रपती संभाजी नगरमधील नान कालिया, डालिंबी उसळ आणि स्थानिक बिर्याणी; तसेच कोल्हापुरी नॉन-व्हेजमधील तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि कोल्हापुरी चिकन किंवा मटण यांचा समावेश असेल. हे पदार्थ महाराष्ट्राच्या समृद्ध पाककृती परंपरेचे प्रतिनिधित्व करतील. या खाद्य महोत्सवात सातारा, कोल्हापूर, जळगाव,पुणे अमरावती, रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतर्गत असलेले महिला स्वयंम सहायता समूह सहभागी होणार असून त्यांच्याकडील रुचकर पदार्थांचा देखील गरमागरम आस्वाद घेता येणार आहे.हा महोत्सव केवळ खाद्यपदार्थांपुरता मर्यादित नसून, महाराष्ट्राची समृद्ध कला आणि संस्कृती दर्शवणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.लहान मुलांसाठी खास आकर्षण म्हणून ‘करमणूकीचे’चे खेळ आणि जादूचे प्रयोग याचे आयोजन करण्यात आले. ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना या महोत्सवाचा आनंद घेता येईल.या महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीबीसी) विशेष माहिती स्टॉल देखील असणार आहे. या स्टॉलद्वारे महाराष्ट्रातील ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती देण्यात येईल. पर्यटन स्थळांच्या माहितीपत्रकांचे वितरण करून महाराष्ट्राच्या पर्यटनाला अधिकाधिक चालना देण्याचा मानस असल्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राच्या अस्सल चवीचा संस्कृतीचा, पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी दिल्लीतील नागरिकांनी या तीन दिवसीय खाद्य महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी आयुक्त आर. विमला यांनी केले आहे.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 10:10 pm

महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसर तसेच मुंबईत लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. येणाऱ्या अनुयायांची सुरक्षितता आणि सोयीसुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. चैत्यभूमी येथे उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात विविध सूचना प्राप्त झाल्या असून याबाबत समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला ज्ञान दिले आणि जागरूक केले. या जागरूकतेला अधिक बळकटी देण्याचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण करुया, असेही आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. या बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय गिरकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, बेस्ट’च्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, तसेच विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.चैत्यभूमी परिसरात योग्य मंडप व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दादर व आसपासच्या परिसरात वाहतूक पोलीस यंत्रणांनी रहदारीचे योग्य नियोजन आणि नियंत्रण करावे. अनुयायांना मार्गदर्शन मिळावे यासाठी जागोजागी सूचनाफलक लावावेत. तसेच, नागरिकांना सुलभ प्रवासासाठी बेस्टतर्फे अतिरिक्त बससेवा उपलब्ध ठेवावी. या बैठकीच्या निमित्ताने अनेक चांगल्या व उपयुक्त सूचना प्राप्त होतात. यामुळे मूलभूत बाबींवर लक्ष देत दरवर्षी अधिक चांगले काम करता येते, तसेच काही उणीवा राहिल्या असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करता येतो. उत्तम नियोजन आणि समन्वयासाठी ही बैठक आयोजित केली आहे; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.बैठकीत येणाऱ्या अनुयायांची व्यवस्था, सुरक्षेची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बस सेवा, भोजन व्यवस्था, चैत्यभूमी परिसरात वॉटरप्रूफ मंडप, स्वच्छतागृहे, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, पुष्पवृष्टी, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सर्व सोयीसुविधा यांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे अनावरण तसेच माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 10:10 pm

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग सेवा राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार ‘आसाम कॅन्सर केअर मॉडेलच्या’ धर्तीवर राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा एल 1, एल 2, एल 3 उपलब्ध होणार आहेत. एल 1 या स्तरामध्ये टाटा स्मारक रूग्णालय ही कर्करोगाकरिता शिखर संस्था म्हणून काम करणार आहे. एल 2, एल 3 या स्तरावर असणाऱ्या या रूग्णालयात कर्करोगासंबधित प्रशिक्षण मनुष्यबळ निर्माण करणे तसेच या आजाराविषयी संशोधन कार्यात प्रगती करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने याबाबत धोरण निश्चित केले आहे. जिल्हास्तरावर सुरू होणाऱ्या उपचारामुळे अनेक कर्करोगग्रस्त रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा वेळ वाचणार असून स्थानिक जिल्ह्यातच आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने या रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा उपलब्ध होणार आहेत. L1 मध्ये टाटा स्मारक रूग्णालय ही कर्करोगाकरिता शिखर संस्था म्हणून काम करणार आहे. एल 2 या स्तरावरती कायमस्वरूपी संपूर्ण कर्करोग शिक्षण व सेवा असेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, मुंबई (जे.जे.), कोल्हापूर, पुणे (बैरामजी जिजीभॉय शासकीय महाविद्यालय), नांदेड येथील सात शासकीय महाविद्यालयांशी संलग्नित रूग्णालये, नाशिक व अमरावती येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील दोन संदर्भ सेवा रूग्णालयांचा यामध्ये समावेश आहे. अशी नऊ केंद्रे एल 2 मध्ये समाविष्ट आहेत. एल 3 यास्तरामध्ये मध्ये कर्करोग निदान आणि डे-केअर रेडिओथेरिपी व किमोथेरिपी युनिटस यामध्ये कार्यरत असणार आहेत. अंबाजोगाई (बीड), यवतमाळ, मुंबई (कामा व आल्ब्लेस रूग्णालय), सातारा, बारामती, जळगाव व रत्नागिरी येथील शासकीय महाविद्यालयांशी संलग्नित सात रूग्णालये, ठाणे जिल्हा रूग्णालय संलग्नित व शिर्डी संस्थानचे रूग्णालय अशी एकूण नऊ केंद्रे एल 3 म्हणून कार्यरत होतील. एल 2 स्तरामध्ये व एल 3 स्तरामध्ये एकूण अठरा रूग्णालये कार्यरत असतील. एल 3 स्तरावरील कर्करोग रूग्णालयांचे बांधकाम शासनामार्फत होऊन ही रूग्णालये सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर उभारण्यात येतील मात्र, या रूग्णालयावर शासनाचे सर्व नियंत्रण असेल.एल २ व एल ३ स्तरावरील आरोग्य संस्थांना आवश्यकतेनुत्तार मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे, संस्थांचे व्यवस्थापन करणे, पीपीपी धोरण राबविणे तसेच इतर अनुषंगिक बाबी पार पाडणे इ. बाबींकरिता मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कंपनी कायदा, २०१३ मधील सेक्शन-८ अंतर्गत महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फांउडेशन” महाकेअर फांउडेशन (MAHACARE Foundation) ही कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना निमंत्रित सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात येईल. त्रिस्तरीय कर्करोग सेवा देणाऱ्या या संस्थाच्या योग्य समन्वयासाठी सिंगल क्लाऊड कमांड आणि कंट्रोल असेल. एल 2 स्तर रुग्णालयामध्ये कर्करोगासंबधी पदव्युत्तर व अतिविशेषोपचार शिक्षण एमडी, एएस, डीएम, एमसीएच, डीएनबी फेलोशिप उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे. रुग्णसंख्या व शैक्षणिक बाबी यांसाठी भविष्यातील मागणी विचारात घेता एल 2 स्तरावरील संस्थांचे रूपांतर एल 1 संस्थेत करणे तसेच भविष्यात या संस्थांच्या संख्येत वाढ देखील करण्यात येणार आहे.महाकेअर फाऊंडेशनला दैनंदिन भागभांडवल म्हणून सुरुवातीला १०० कोटी रूपये इतका निधी ‘कॉर्पस फंड’ म्हणून राज्य शासनामार्फत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतर्गत दुर्धर आजारासाठी उभारण्यात येणाऱ्या २० टक्के राखीव निधीतून (Corpus fund) उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कर्करोग रुग्णालयास प्राप्त होणाऱ्या शुल्कापैकी २० टक्के शुल्क महाकेअर फाऊंडेशनला देण्यात येईल. या फाऊंडेशनला क्लिनिकल ट्रायल्स मधून निधीची उभारणी करता येईल, आशियाई विकास बैंक, जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सी, जागतिक बैंक तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अशा आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत तसेच देणग्या, अनुदाने, सीएसआर अंतर्गत देखील निधी शासनाच्या मान्यतेने मिळवता येवू शकेल. आवश्यकता भासल्यास जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सी, आशियाई विकास बँकेमार्फत राज्य शासनात्त प्राप्त होणा-या कर्जातून विहित प्रक्रियेद्वारे निधी उपलब्ध करून घेता येईल.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 10:10 pm

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी 62 व्या वर्षी केले दुसरे लग्न; 16 वर्षांनी लहान असलेली पत्नी कोण आहे?

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲन्थनी अल्बानीज आणि त्यांची प्रेयसी जोडी हेडन यांनी गेल्या आठवड्यात विवाहबंधनात अडकून एक नवा इतिहास रचला आहे. ६२ वर्षीय पंतप्रधानांनी १६ वर्षांनी लहान असलेल्या जोडी हेडन यांच्याशी विवाह केला. विशेष म्हणजे, कार्यरत असलेले ऑस्ट्रेलियन पंतप्रधान आपल्या कार्यकाळात विवाह करण्याची ही १२४ वर्षांच्या फेडरल इतिहासातील पहिलीच वेळ आहे. ‘द लॉज’ मध्ये खासगी […] The post ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी 62 व्या वर्षी केले दुसरे लग्न; 16 वर्षांनी लहान असलेली पत्नी कोण आहे? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 10:01 pm

काँग्रेस-राजद संघर्ष शिगेला, तेजस्वी आघाडीतून बाहेर पडणार?

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या अलिकडच्या निकालांमुळे विरोधी आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसची कामगिरी निराशाजनक होती आणि पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करणारा राष्ट्रीय जनता दल बराच मागे फेकला गेला आहे. मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्या तेजस्वी यादव यांना आता पाच वर्षे विरोधात बसावे लागणार आहे. या पराभवामुळे आघाडीतील तणाव वाढत आहे. काँग्रेसने जागावाटपाबाबत असंतोष व्यक्त केला […] The post काँग्रेस-राजद संघर्ष शिगेला, तेजस्वी आघाडीतून बाहेर पडणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 9:44 pm

महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीला राड्यांचे ग्रहण

मुंबई : महाराष्ट्रातील २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मंगळवार २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झाले. मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच अशी होती. वेळ संपली असली तरी अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा असल्यामुळे मतदान अद्याप सुरू आहे. नियमानुसार मतदानाची वेळ संपते त्यावेळी रांगेत उभ्या असलेल्या सर्वात शेवटच्या व्यक्तीची नोंद करतात आणि त्या व्यक्तीचे मतदान होईपर्यंत मतदान केंद्रावर प्रक्रिया सुरू असते. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी उत्साहाने मतदान झाले. लोकशाहीच्या दृष्टीने एक चांगले सकारात्मक चित्र दिसले. पण या निवडणुकीला निवडक ठिकाणी राड्यांचे ग्रहण लागले.रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. शिवसेनेचे विकास गोगावले आणि आणि राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांचे समर्थक भिडले. सुशांत जाबरेंच्या समर्थकांनी विकास गोगावलेंवर रिव्हॉल्व्हर रोखल्याचा आरोप केला. सुशांत जाबरे यांच्या समर्थकांच्या अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.बीड जिल्ह्यातील गेवराईत मोंढा भागात असलेल्या मतदान केंद्राबाहेर पवार आणि पंडित गट यांच्यात हाणामारी झाली. गेवराईचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या एका गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. पोलिसांनी लगेच हस्तक्षेप केला. राज्य राखीव दलाची एक अतिरिक्त तुकडी नियुक्त करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. बीड शहरातील शाहू नगर भागातही राडा झाला. दगडफेक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन पक्षांचे मर्थक भिडले.जळगावच्या मुक्ताईनगरांत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. मतदान केंद्रावर असलेल्या पोलिसांवरच रक्षा खडसे संतापल्या. भाजपच्या उमेदवाराला केंद्रावर पोलिसांनी अडवल्यामुळे रक्षा खडसे संतापल्या होत्या.ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तर पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे मतदान केंद्राबाहेर शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथल्या नूतन त्रंबकेश्वर विद्यालयात एका उमेदवाराचे प्रतिनिधी आणि स्थानिक पोलीस यांच्यात वाद झाला.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 9:30 pm

भिवंडीत बेकायदेशीर वाळू उत्खननाचा पर्दाफाश !

ठाणे – ठाणे जिल्ह्यातील प्रशासनाने भिवंडीतील एका खाडीत बेकायदेशीर वाळू उत्खननावर कारवाई केली आहे. यामध्ये वापरलेली यंत्रे नष्ट करण्यात आली आहेत. भिवंडी तहसीलदार अभिजित कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मौजे केवणी येथील खाडीत ही कारवाई केली. पथकाला संशयास्पद हालचाली आढळल्या आणि वाळू उत्खननासाठी बार्ज आणि सक्शन पंप वापरणाऱ्या एका गटाला पकडले, […] The post भिवंडीत बेकायदेशीर वाळू उत्खननाचा पर्दाफाश ! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 9:29 pm

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर पाकिस्तान सरकार नरमले. यानंतर बहिणीला डॉ. उज्मा खानुमना माजी पंतप्रधान इमरान खान यांना तुरुंगात जऊन भेटण्यासाठी परवानगी दिली. पाकिस्तान सरकार नरमले आणि डॉ. उज्मा खानुम यांनी माजी पंतप्रधान इमरान खान यांची तुरुंगात भेट घेतली. तुरुंगात तब्बल वीस मिनिटे माजी पंतप्रधान इमरान खान यांना त्यांची बहीण डॉ. उज्मा खानुम भेटल्या. या भेटीत इमरान खान यांनी डॉ. उज्मा खानुम यांना धक्कादायक माहिती दिली.पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे शाहबाज शरिफ यांच्या सरकारवर विविध पद्धतीने दबाव आणत आहेत. या दबावांमुळेच शाहबाज शरिफ सरकारने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या हाती देशाची सूत्रे सोपवण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. एकदा पाकिस्तानवर पूर्ण नियंत्रण मिळवले की असीम मुनीर हे कधी कसे वागतील याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचे अनेक पाकिस्तानचे अभ्यासक सांगत आहेत.मागील अनेक दिवसांपासून माजी पंतप्रधान इमरान खान आणि त्यांच्या जवळच्या नातलगांपैकी कोणाचीही भेट झाली नव्हती. यामुळे इमरान जिवंत आहेत की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. पाकिस्तानमधील इमरान समर्थकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन सुरू केले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याचे बघून पाकिस्तान सरकारने इमरान आणि त्यांच्या बहिणीची भेटण्याची वेळ निश्चित केली. यानंतर इमरान यांना त्यांची बहीण भेटली. या भेटीत इमरान यांनी बहिणीला धक्कादायक माहिती दिली आहे.पाकिस्तानचे लष्करप्रमुख देश नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. इमरान खान यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून इमरान यांना दिवसभर तुरुंगात डांबले जाते. इमरान यांना कोणीही भेटणार नाही तसेच त्यांच्याशी कोणीही बोलणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. असीम मुनीर यांच्यापासूनच पाकिस्तानला सर्वाधिक धोका आहे; असे इमरान यांना भेटल्यानंतर त्यांच्या बहिणीने म्हणजेच डॉ. उज्मा खानुम यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 9:10 pm

वसईत आयकर विभागाच्या धाडी, हॉटेल व्यवसायिकाच्या मालमत्तेची छाननी

वसई : राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान सुरू असताना वसईत आयकर विभागाने एका हॉटेल व्यावसायिकाच्या बंगल्यावर धाड टाकली. पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. वसईच्या पापडी येथील साई योग बंगल्यावर आयकर विभागाने धाड टाकली.ज्या व्यक्तीच्या बंगल्यावर धाड पडली त्याचे नाव शेट्टी असल्याचे समजते. कर चुकवेगिरी प्रकरणात आयकर विभागाने धाड टाकली आहे. आयकरच्या अधिकाऱ्यांनी बंगल्यातून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. हॉटेल व्यावसायिकाच्या मालमत्तेची कसून छाननी सुरू झाली आहे. या धाडीचा निवडणुकीशी काही संबंध आहे की नाही हे अद्याप समजलेले नाही. पण ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आयकर विभागाच्या कारवाईमुळे चर्चेला उधाण आले आहे.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 9:10 pm

झारखंडमध्ये मोठी उलथापालथ होण्याचे संकेत; सोरेन करणार भाजपसोबत हातमिळवणी

नवी दिल्ली : बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) प्रचंड विजयानंतर राजकीय सकाणु आता झारखंडकडे सरकत असल्याचे दिसून येत आहे. येथील सत्ताधारी पक्ष स्थिर दिसत असला तरी, अंतर्गत पातळीवर बदल होण्याची जोरदार शक्यता वर्तवली जाते आहे आणि तसे संकेतही मिळत आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी दोन […] The post झारखंडमध्ये मोठी उलथापालथ होण्याचे संकेत; सोरेन करणार भाजपसोबत हातमिळवणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 9:02 pm

Devendra Fadnavis : “मला तरी निर्णय अयोग्य वाटतो…”; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis – आज ज्या ठिकाणी मतदान झाले आहे, त्या ठिकाणची मतमोजणी देखील 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोग व न्यायालये या दोन्ही स्वतंत्र संस्था आहेत, आणि त्यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र मला तरी आज घेण्यात आलेला निर्णय अयोग्य वाटतो, असे म्हणताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य निवडणूक […] The post Devendra Fadnavis : “मला तरी निर्णय अयोग्य वाटतो…”; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर फडणवीस स्पष्टच बोलले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 8:32 pm

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या, पीए अनंत गर्जेच्या शरीरावर आढळल्या २८ जखमा

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याची पत्नी गौरी पालवे यांच्या मृत्यू प्रकरणात नवी आणि महत्त्वाची माहिती हाती आली आहे. गौरी पालवे यांनी मुंबईत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उघड झाल्यानंतर गौरीच्या वडिलांनी आणि माहेरच्या इतर नातलगांनी अनंत गर्जे आणि त्याच्या भावंडांवर गंभीर आरोप केले. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. गुन्हा नोंदवल्यानंतर अनंत गर्जेला अटक करुन त्याची कसून चौकशी करण्यात आली तसेच त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यातून भरपूर नवी महिती पोलिसांच्या हाती आली आहे.गौरीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अनंतने भिंतीवर डोकं आपटण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली. पोलिसांना या संदर्भातले एक सीसीटीव्ही फूटेज मिळाले आहे. अनंतने खिडकीतून घरात प्रवेश केला होता. त्यामुळे घराच्या खिडकीला ज्या व्यक्तीने जाळ्या बसवल्या त्यालाच जाळीमधून आतमध्ये प्रवेश करता येतो का? याचं प्रात्याक्षिक दाखवायला सांगण्यात आलं होतं. यातून आवश्यक ती माहिती पोलिसांनी मिळवली आहे. डॉक्टरांनी अनंतच्या शरीरावर २८ ताज्या जखम असल्याचे पोलिसांना सांगितले. या संदर्भात न्यायालयाला माहिती देऊन पोलीस नंतर अनंतची पॉलिग्राफ टेस्ट करणार आहेत. मानसशास्त्रीय तज्ज्ञाच्या सहकार्याने अनंतची तपासणी केली जाणार आहे.अनंतच्या जुन्या प्रेयसीचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. या जबाबानुसार अनंतसोबत २०२२ पासून तिचा संबंध नव्हता. गौरीच्या घरी सापडलेल्या कागदपत्रांबाबत कल्पना नाही, असा जबाब संबंधित महिलेने पोलीस चौकशीत दिला आहे.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 8:10 pm

Pakistan : “इम्रान यांच्या बहिणींवरील दहशतवादाचे आरोप रद्द होणार नाही”; न्यायालयाने स्पष्टच सांगितलं…

Pakistan – इम्रान खान यांच्या भगिनी अलिमा खान यांच्यावरील दहशतवादाचे आरोप रद्द करण्यास पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने आज नकार दिला. आलिमा खान यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने काल फेटाळून लावली. नोव्हेंबर २०२४ मध्ये पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या आंदोलनात आलिमा खान सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर अलिमा आणि अन्य ११ जणांविरोधात रावळपिंडीतील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला […] The post Pakistan : “इम्रान यांच्या बहिणींवरील दहशतवादाचे आरोप रद्द होणार नाही”; न्यायालयाने स्पष्टच सांगितलं… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 7:57 pm

‘इम्रान खान पूर्णपणे ठीक नाहीत,’बहीण उझमा यांचा मोठा खुलासा, लष्करप्रमुख मुनीरवर गंभीर आरोप

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची बहीण उझमा खान यांनी अदियाला तुरुंगातून बाहेर येताच एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. खानम यांनी सांगितले की तुरुंगात इम्रान खान यांची शारीरिक प्रकृती ठीक असली तरी त्यांना मानसिक त्रास (Mental Torture) दिला जात आहे. तसेच, आपल्या भावावर होत असलेल्या या अत्याचारासाठी त्यांनी थेट पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम […] The post ‘इम्रान खान पूर्णपणे ठीक नाहीत,’ बहीण उझमा यांचा मोठा खुलासा, लष्करप्रमुख मुनीरवर गंभीर आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 7:56 pm

Maharashtra Voting Rada : कुठे हाणामारी, कुठे बोगस वोटींग.! मतदानादरम्यान नेमकं काय-काय घडलं, पाहा….

Maharashtra Voting Rada : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांचे पहील्या टप्प्यातील मतदान सुरू असताना अनेक ठिकाणी सलग राड्यांच्या घटना घडल्याने निवडणुकीचे वातावरण तणावपूर्ण बनले होते. राज्यात बीड, मनमाड, येवला, गेवराई, सटाणा आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी प्रतिस्पर्धी कार्यकर्ते आमनेसामने आल्याने संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. येवल्यात राष्ट्रवादी(अप) आणि शिवसेनेत वाद येवल्यातील सहस्रार्जुन मंगल कार्यालय मतदान केंद्राबाहेर […] The post Maharashtra Voting Rada : कुठे हाणामारी, कुठे बोगस वोटींग.! मतदानादरम्यान नेमकं काय-काय घडलं, पाहा…. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 7:37 pm

Bamboo biomass : ऊर्जा प्रकल्पांमध्ये बांबू बायोमास मिश्रण अनिवार्य

मुंबई : राज्य सरकारने ऊर्जा प्रकल्पांमध्ये बांबू बायोमासचे मिश्रण अनिवार्य केले आहे. तसेच, चालू आर्थिक वर्षात बांबू आधारित उद्योजकतेसाठी ५० कोटी रुपये राखीव ठेवले आहेत. राज्यातील सर्व पात्र ऊर्जा-निर्मिती प्रकल्पांमध्ये ५-७ टक्के बांबू बायोमास मिसळले पाहिजे, असे नव्याने मंजूर झालेल्या महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे उद्दिष्ट अपारंपारिक इंधन […] The post Bamboo biomass : ऊर्जा प्रकल्पांमध्ये बांबू बायोमास मिश्रण अनिवार्य appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 7:32 pm

Dollar vs Rupee: रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला, या ऐतिहासिक घसरणीचे कारण जाणून घ्या..

Rupee Hits All Time Low: भारताचा जीडीपी मजबूत असूनही, रुपया लक्षणीय घसरत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला असून तो प्रति डॉलर ८९.८५ या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. डॉलरची जोरदार मागणी ही घसरण घडवून आणत आहे. ही घसरण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचे कारण असून महागाईचा धोका वाढवणारी आहे. रुपयाची सर्वात मोठी घसरण – २०२५ पूर्वी, […] The post Dollar vs Rupee: रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला, या ऐतिहासिक घसरणीचे कारण जाणून घ्या.. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 7:11 pm

कर्जाचा हप्ता कमी होणार? RBI MPC ची बैठक उद्यापासून सुरू; रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात होण्याची शक्यता

RBI MPC meeting : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) डिसेंबर २०२५ ची बैठक उद्या, ३ डिसेंबर रोजी सुरू होऊन ५ डिसेंबर रोजी संपेल, त्यानंतर RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​निकाल जाहीर करतील. दरम्यान, लोकांच्या मनात प्रश्न आहे की, RBI यावेळी रेपो दर कमी करेल का? क्रेडिट रेटिंग एजन्सी CareEdge ने या प्रकरणावर एक नवीन […] The post कर्जाचा हप्ता कमी होणार? RBI MPC ची बैठक उद्यापासून सुरू; रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात होण्याची शक्यता appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 7:00 pm

8th Pay Commission: सरकारने DA आणि DR विलीनीकरणाच्या अफवांना दिला पूर्णविराम, काय दिलं स्पष्टीकरण वाचा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने संसदेत स्पष्ट केले की, आठव्या वेतन आयोगाची अधिकृत स्थापना झाली आहे. महागाई भत्ता (डीए) आणि महागाई मदत (डीआर) मूळ वेतनात विलीन करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचेही स्पष्ट केले. डीए/डीआर विलीनीकरणाच्या अफवा फेटाळल्या- गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर असे दावे फिरत होते की आठव्या वेतन […] The post 8th Pay Commission: सरकारने DA आणि DR विलीनीकरणाच्या अफवांना दिला पूर्णविराम, काय दिलं स्पष्टीकरण वाचा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 6:45 pm

निवडणूक रणधुमाळीमध्ये बुलढाण्यात गोंधळ; बोगस मतदाराला नागरिकांकडून चोप

बुलढाणा : राज्यात सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात एक बोगस मतदार पकडल्याची घटना समोर आली. नागरिकांनी या तरुणाला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र काही क्षणातच हा बोगस मतदार पोलिसांच्या हातातून निसटल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.घटनेदरम्यान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कुणाल गायकवाड हे पकडलेल्या तरुणाचा बचाव करताना, तसेच उपस्थित पोलिसांशी उध्दट वर्तन करताना दिसत आहेत. कुणाल यांनी पोलिसांना धमकावत बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.दरम्यान, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता पुढे ढकलण्यात आले आहेत. नामनिर्देशन प्रक्रियेत काही तांत्रिक कारणे आणि प्रलंबित अपीलांमुळे काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे आता २१ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व नगरपरिषद-नगरपंचायतींचे निकाल जाहीर होणार आहेत.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 6:30 pm

sanjay raut : राज ठाकरे यांच्या युतीनंतर भाजपचा पराभव निश्चित.! –संजय राऊत

sanjay raut | uddhav thackeray | raj thackeray : रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीबद्दलही प्रश्न उपस्थित केले. संजय राऊत म्हणाले, “माझ्यासारखा माणूस निष्क्रिय बसू शकत नाही. माझी तब्येत सुधारत आहे. मी […] The post sanjay raut : राज ठाकरे यांच्या युतीनंतर भाजपचा पराभव निश्चित.! – संजय राऊत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 6:12 pm

Vaibhav Suryawanshi : '७ षटकार, ७ चौकार'! वैभव सूर्यवंशीने महाराष्ट्राच्या गोलंदाजीचे मोडले कंबरडे, केली नाबाद १०८ धावांची वादळी खेळी!

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ (Syed Mushtaq Ali Trophy Elite 2025) मध्ये सातत्याने अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी केल्यामुळे युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीवर (Vaibhav Suryavanshi) मोठ्या प्रमाणात टीका होत होती. सलग तीन सामन्यांत फॉर्म नसल्यामुळे अनेकांनी त्याच्या क्षमतेवर आणि निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, या सर्व टीकेला वैभव सूर्यवंशीने चौथ्या सामन्यात आपल्या बॅटनेच योग्य उत्तर दिले. महाराष्ट्राविरुद्ध मैदानात उतरताच वैभवने जबरदस्त शतकी खेळी साकारली. त्याने फक्त ५८ चेंडूंत हे झंझावाती शतक पूर्ण केले. वैभवच्या या शतकाची खास गोष्ट म्हणजे, त्याने षटकार मारत आपली शतकी धावसंख्या पूर्ण केली. त्याने आपल्या शतकात जितके षटकार मारले, तितकेच चौकारही ठोकले. या आक्रमक खेळीमुळे त्याने टीकाकारांची तोंडे बंद केली असून, संघात आपला फॉर्म परतल्याचे सिद्ध केले आहे. वैभव सूर्यवंशीची ही वादळी खेळी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सध्या चर्चेचा विषय बनली आहे. The teenage sensation continues to impress Vaibhav Suryavanshi smashed his first century in the Syed Mushtaq Ali Trophy against Maharashtra today.Reminder: He has one in IPL too #SMAT #SMAT2025 pic.twitter.com/Dag48BBeER— Cricbuzz (@cricbuzz) December 2, 2025६१ चेंडूंमध्ये ठोकल्या नाबाद १०८ धावामहाराष्ट्राविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात बिहार संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ गडी गमावून १७६ धावांचा टप्पा गाठला. या धावसंख्येत उपकर्णधार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याने केलेली एकहाती नाबाद १०८ धावांची खेळी सर्वात महत्त्वाची ठरली. वैभवने केवळ ६१ चेंडूंमध्ये नाबाद १०८ धावा ठोकल्या. त्याने १७७ पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने खेळलेल्या या इनिंगमध्ये ७ षटकार आणि ७ चौकार मारत आक्रमकतेचा परिचय दिला. ओपनर म्हणून मैदानात उतरलेल्या वैभवची बिपिन सौरभसोबत मोठी भागीदारी जमली नाही, तसेच त्यानंतर पीयूषसोबतही तो जास्त वेळ टिकू शकला नाही. मात्र, तिसऱ्या विकेटसाठी त्याने आकाश राज सोबत महत्त्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी रचली. या भागीदारीमुळेच बिहार संघाने महाराष्ट्रासमोर एक चांगली आणि सन्मानजनक धावसंख्या उभी केली. वैभव सूर्यवंशीच्या उपकर्णधारपदाला साजेसा खेळ करत नाबाद १०८ धावा केल्यामुळे, संघाला आता सामन्यात चांगल्या स्थितीत राहण्याची संधी मिळाली आहे.SMAT कारकिर्दीतील पहिलंच शतक 14-YEAR-OLD VAIBHAV SURYAVANSHI SMASHED 108* FROM JUST 61 BALLS IN SMAT - 3rd T20 Hundred from just 16 matches, Madness. pic.twitter.com/gtji1opsvf— Johns. (@CricCrazyJohns) December 2, 2025वैभवने १४ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आकाश राज बाद झाल्यानंतर (जेव्हा बिहारचा स्कोर ३ बाद १०१ होता) धावांचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढवला. या निर्णायक क्षणी त्याने हात मोकळे करत अत्यंत जलद गतीने अर्धशतक पूर्ण केले आणि त्याच धडाक्यात शतकाची उंबरठाही पार केली. विशेष म्हणजे, स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांत मिळून केवळ ३२ धावा करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने चौथ्या सामन्यात हे तडाखेबाज शतक झळकावले. यामुळे त्याच्या फॉर्मवर टीका करणाऱ्यांना त्याने आपल्या बॅटनेच योग्य प्रत्युत्तर दिले. SMAT स्पर्धेतील त्याच्या कारकिर्दीतले हे पहिलेच शतक ठरले असून, या खेळीमुळे त्याने निवडकर्त्यांना आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली आहे.https://prahaar.in/2025/12/02/maharashtra-local-body-elections-2025-voting-percentage-1130-am-update-voter-turnout/१४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच्या नावावर विश्वविक्रमयुवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (SMAT) महाराष्ट्राविरुद्ध शतक झळकावून केवळ एक सामना जिंकला नाही, तर जागतिक क्रिकेटच्या इतिहासात आपला ठसा उमटवला आहे! क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवल्यापासून तुफानी कामगिरी करणाऱ्या वैभवने आता इतिहास रचला आहे. तो वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी आणि फक्त १७ टी-२० सामन्यांमध्ये तीन टी-२० शतके झळकावणारा जगातील पहिला तरुण खेळाडू बनला आहे. क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूने इतक्या लहान वयात ही विक्रमी कामगिरी केलेली नाही. स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांत अपेक्षेपेक्षा कमी कामगिरीमुळे वैभववर टीका झाली होती. मात्र, या टीकाकारांना आपल्या बॅटने उत्तर देत त्याने दमदार पुनरागमन केले आहे. हे शतक संघाचे मनोबल उंचावणारे असून, आगामी सामन्यांसाठीही तो तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 6:10 pm

नव्या पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले; आता ‘या’ नावाने ओळखले जाणार, केंद्राचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शासनव्यवस्थेत ‘सेवा’ आणि ‘कर्तव्य’ या मूल्यांना प्राधान्य देणाऱ्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले आहेत. सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत उभारल्या जाणाऱ्या नव्या पंतप्रधान कार्यालय संकुलाला आता ‘सेवा तीर्थ’ असे नाव देण्यात आले आहे. हा बदल केवळ नामांतर नसून, शासनाची ओळख ‘सत्ते’ऐवजी ‘सेवा’ आणि ‘अधिकारां’ऐवजी ‘जबाबदारी’कडे वळवण्याचा संकेत देतो, असे सरकारी सूत्रांनी […] The post नव्या पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले; आता ‘या’ नावाने ओळखले जाणार, केंद्राचा मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 5:47 pm

मुंबईसह देशातील ७ विमानतळावर जीपीस स्पूफिंग माध्यमातून सायबर हल्ला मंत्रिमहोदयांनी म्हटले या तांत्रिक कारणांमुळे.....

मुंबई: मुंबईसह देशातील सात विमानतळावर सायबर हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जीपीस स्पूफिंग (GPS Spoofing) या नव्या तंत्रज्ञानातून एअरपोर्टमधील नेव्हिगेशन प्रणालीवर हल्ला करण्याचा प्रयत्न सायबर गुन्हेगारांनी केला आहे. संसदेतील हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर विचारले असता त्यांनी या हल्ल्याची पुष्टी करत मात्र त्यामुळे एव्हिऐशन सिस्टिमचे कुठल्याही प्रकारचे तांत्रिक नुकसान झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय या तांत्रिक कारणामुळे कुठलेही विमान उड्डाण रद्द करण्यात आलेले नसल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे. यामुळे तांत्रिक प्रणाली प्रतिरोधक म्हणून सक्षमतेने काम करत असली तरी देशाच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी संसदेत या घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर बोलताना त्यांनी अनेक प्रमुख विमानतळांवर येणाऱ्या विमानांमध्ये जीपीएस स्पूफिंगची तक्रार आल्याचे उघड केले आहे. विशेषतः दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (आयजीआय) विमानतळाच्या रनवे १० वर लँडिंग करताना ही घटना झाली असल्याचे उघड झाले आहे. त्यांनी बोलताना अधिकृत पुष्टी केली की सायबर हल्ल्यांमध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि बेंगळुरूसह इतर विमानतळांना लक्ष्य केले गेले होते, ज्यामुळे ते भारतातील सर्वात व्यापक विमान वाहतूक सायबर सुरक्षा उल्लंघनांपैकी एक अशी ही घटना घडलेली आहे. सरकार यावर आगामी काळात मोठ्या पातळीवर चौकशी करण्याची शक्यता आहे.अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की हल्लेखोरांनी विमानांच्या नेव्हिगेशन सिस्टीममध्ये अडथळा आणणारे खोटे सिग्नल सोडून जीपीएसच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. जीपीएस स्पूफिंगमुळे विमानांना त्यांच्या रिअल-टाइम स्थान, उंची आणि दिशानिर्देशाबद्दल दिशाभूल होऊ शकते ज्यामुळे लँडिंगसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये संभाव्य सुरक्षितता धोके उद्भवू शकतात. दिल्ली विमानतळावर एका मोठ्या तांत्रिक समस्येनंतर काही आठवड्यांपूर्वी सायबर हल्ल्यांची पुष्टी झाली होती.नंतरच्या तपासात असे दिसून आले की ही समस्या हॅकिंगपेक्षा ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टम (AMMS) मधील बिघाडामुळे झाली होती.त्याच वेळी, भारतीय विमान कंपन्यांद्वारे मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या एअरबस ए३२० विमानांना प्रभावित करणाऱ्या जागतिक सॉफ्टवेअर बगमुळे जवळजवळ ३८८ उड्डाणांमध्ये व्यत्यय आला होता. धोक्याची तीव्रता असूनही, सरकारने आश्वासन दिले की सायबर हल्ल्यामुळे कोणतेही उड्डाण विलंबित किंवा रद्द झाले नाही. नेव्हिगेशनल विसंगती हाताळण्यासाठी डिझाइन केलेल्या आकस्मिक प्रक्रियांद्वारे एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) प्रणाली सामान्यपणे कार्य करत राहिल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा उड्डाण वेळापत्रक गोंधळ अथवा प्रवाशांची सुरक्षा आणि विमानतळ ऑपरेशन्स यावर नकारात्मक परिणाम झालेला नाही.GPS Spoofing म्हणजे नक्की काय?ही एक नवी सायबर क्राईमची नवी पद्धत आहे. जीपीएस स्पूफिंग म्हणजे रिसीव्हरला खोटे जीपीएस सिग्नल प्रसारित करून त्याला चुकीची स्थिती वेग किंवा वेळ मोजण्यास भाग पाडले जाते. जीपीएस स्पूफिंग हे खऱ्या उपग्रह सिग्नलच्या अंतर्गत कमकुवतपणाचा फायदा घेत त्यांना अधिक मजबूत, बनावट सिग्नलने मात देते ज्यामुळे सायबर घोटाळेबाजांना सिस्टिमवर हल्ला करून मात करणे अधिक सोयीस्कर होते. सायबर हल्ल्याचा हा प्रकार जीपीएस जॅमिंगपेक्षा वेगळा आहे जो फक्त कायदेशीर सिग्नल ब्लॉक करतो.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 5:30 pm

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात मदत पाठवली आहे. पाकिस्ताननेही मदत साहित्य पाठवून सहकार्य केल्याचा दावा केला आहे. मात्र पाकिस्तानने पाठवलेल्या सर्व मदतीच्या साहित्याची एक्सपायरी झाली होती. सर्व बाद करायच्या वस्तू पाकिस्तानने मदत म्हणून श्रीलंकेला पाठवल्या होत्या. पाकिस्तानच्या या कृत्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. यामुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की झाली.याआधी पाकिस्तानच्या दुतावासाने एक्सवर मदत साहित्याचे फोटो शेअर करत, “श्रीलंकेसोबत पाकिस्तान कायम उभा आहे,” असे सांगितले. पण हे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी साहित्यावरील तारीख दाखवून पाकिस्तानचा खोटेपणा उघड केला. पाठवलेले साहित्य ऑगस्ट २०२२ मध्ये तयार झाले होते आणि त्याची वापरण्याची मुदत दोन वर्षांची होती. म्हणजेच २०२४ च्याआधी हे साहित्य वापरायला हवे होते, परंतु आता त्याची मुदत संपून सव्वा वर्ष उलटले आहे.पूरग्रस्तांना तातडीने मदत करत असल्याचा दावा पाकिस्तानने केला असला, तरी प्रत्यक्षात कालबाह्य आणि निकृष्ट साहित्य पाठवले. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची नामुष्की झाली आहे.दरम्यान, पाकिस्तानचे मदत साहित्य श्रीलंकेत पोहोचण्यासाठी भारताने महत्त्वाची भूमिका बजावली. भारत-पाकिस्तान संबंध ताणलेले असतानाही, मानवतेच्या दृष्टिकोनातून भारताने पाकिस्तानी विमानाला आपली हवाई हद्द वापरण्याची परवानगी दिली. भारताच्या या निर्णयाचे जागतिक स्तरावर कौतुक होत असताना पाकिस्तानने पाठवलेल्या कालबाह्य मदतीमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 5:30 pm

Stocks to buy today: 'या'५ शेअरला तज्ज्ञांकडून लघू व मध्यम कालावधीसाठी 'बाय कॉल'या शेअर्समधून चांगला परतावा अपेक्षित

शेअर बाजारात अस्थिरता व नफा बुकिंग सुरू असले तरी लघु व मध्यमकालीन चांगल्या परताव्यासाठी ब्रोकरेजने काही शेअर गुंतवणूकदारांसाठी सुचवले आहेत. चांगल्या फंडामेंटलमुळे कंपनीचे प्रदर्शन आणखी सकारात्मक होत असून कंपनीच्या ऑर्डर फ्लोमध्ये सुधारणा अपेक्षित आहे. त्यामुळे आगामी काळात तज्ञांच्या मते हे शेअर चांगला परतावा देऊ शकतील. ब्रोकरेजने कंपनीने बजाज हाउसिंग फायनान्स, हिरो मोटोकॉर्प, भारत डायनामिक्स, रेमंड रिअल्टी, आफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या शेअर्सला बाय कॉल दिला असून या शेअर्समध्ये आगामी दिवसात वाढ तज्ञांच्या मते वाढ अपेक्षित आहे.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 5:10 pm

आमदारांचे नाव यादीत ७ वेळा; तुम्ही सर्कस करत आहात का? आदित्य ठाकरेंचा आयोगाला संतप्त सवाल

मुंबई : आमदार सुनील गोविंद शिंदे यांचे यादीत 7 वेळा नाव आले आहे. त्यांचे वय, फोटो वेगळे आहेत. तर श्रद्धा जाधव यांचे नाव 8 वेळा आल्याने निवडणूक आयोग तुम्ही सर्कस करत आहात का? असा संतप्त प्रश्‍न करत, ठाकरेसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, 20 नोव्हेंबरला मुंबई महापालिकेची […] The post आमदारांचे नाव यादीत ७ वेळा; तुम्ही सर्कस करत आहात का? आदित्य ठाकरेंचा आयोगाला संतप्त सवाल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 5:07 pm

“माझ्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यात कुठलेही वाद नाहीत, घरातही दोन भावांची मते वेगवेगळी असतात…”–मुख्यमंत्री फडणवीस

devendra fadnavis । eknath shinde – माझ्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यात कुठलेही वाद नाहीत. आपल्या घरातही दोन भावांची मते ही काही प्रमाणात वेगवेगळी असतात. प्रखरतेने दोन्ही भाऊ आपापली मते मांडत असतात. सगळ्याच गोष्टींमध्ये आमचे एकमत झाले असते, तर आम्ही एकाच पक्षात असतो, तर मग आम्ही वेगवेगळ्या पक्षात का आहोत? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र […] The post “माझ्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यात कुठलेही वाद नाहीत, घरातही दोन भावांची मते वेगवेगळी असतात…” – मुख्यमंत्री फडणवीस appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 5:00 pm

Gauri Palve case : अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीच्या गर्भपाताबाब मोठी अपडेट समोर; तिनेच सांगितलं सत्य?

मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जे हिने फेब्रुवारी २०२५ मध्ये लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांत मुंबईतील राहत्या सदनिकेत गळफास घेऊन जीवन संपवलं. या प्रकरणात अनंत गर्जे यांच्यावर वरळी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. घर शिफ्टिंगदरम्यान गौरीला काही जुनी कागदपत्रे सापडली होती, यामध्ये एका […] The post Gauri Palve case : अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीच्या गर्भपाताबाब मोठी अपडेट समोर; तिनेच सांगितलं सत्य? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 4:45 pm

Share Market: ‘या’कारणांमुळे बाजारात घसरण; सेन्सेक्स 503 अंकांनी कोसळला, निफ्टी 26032 वर

Share Market: मंगळवार, २ डिसेंबर रोजी सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स जवळपास ५०० अंकांनी घसरला, तर निफ्टी २६,००० पर्यंत घसरला. परदेशी गुंतवणूकदारांची विक्री, रुपयाची घसरण आणि हेवीवेट शेअर्समध्ये नफा वसुली यामुळे गुंतवणूकदारांची भावना कमकुवत झाली. व्यापक बाजारही घसरणीसह बंद झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.१४ टक्के घसरला, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.४९ […] The post Share Market: ‘या’ कारणांमुळे बाजारात घसरण; सेन्सेक्स 503 अंकांनी कोसळला, निफ्टी 26032 वर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 4:37 pm

'प्रहार'शेअर बाजार विश्लेषण: एका दिवसात गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी पाण्यात सेन्सेक्स ५०३.६३ व निफ्टी १४३.५५ अंकाने कोसळला'या'कारणामुळे

मोहित सोमण: शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचा मूड संमिश्र व संभ्रमात झाल्याचे अधोरेखित झाले आहे. मोठ्या घसरणीचा फटका म्हणून गुंतवणूकदारांनी एकाच सत्रात २ लाख कोटी पाण्यात घालवले आहेत. दुसऱ्या तिमाहीत वाढलेल्या जबरदस्त ८.२% जीडीपी वाढीनंतर रेपो दरातही कपात अपेक्षित असताना अद्याप यावर चित्र स्पष्ट झाले नाही हीच परिस्थिती युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची असून युएस व भारत यांच्यातील कराराची अनिश्चितता, बँक निर्देशांकातील वेटेजमध्ये आगामी बदल या कारणामुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. एकीकडे घरगुती गुंतवणूकदारासह परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी अस्थिरता व घसरलेला रूपया या कारणामुळे गुंतवणूक काढून घेतली असून दुसरीकडे मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग झाल्याचेही वर्तवले जात आहे. घसरणीचाच परिपाक म्हणून आज सेन्सेक्स ५०३.६३ अंकाने घसरत ८५१३८.२७ व निफ्टी १४३.५५ अंकाने घसरत २६०३२.५० पातळीवर स्थिरावला आहे. दोन्ही बँक निर्देशांकात ४०० अंकाहून अधिक घसरण बाजारात झाली आहे ज्याचा फटका सपोर्ट लेवल मिळण्यास बसला. याखेरीज मिडकॅप शेअर्समध्ये सकाळची तेजी वगळता अखेरच्या सत्रात मिडकॅप लार्जकॅपसह स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण आज नोंदवली गेली. विशेषतः सर्वाधिक घसरण फायनांशियल सर्विसेस २५/५० (०.७८%), निफ्टी केमिकल्स (०.७५%), मिडिया (०.४०%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.४४%) निर्देशांकात झाले असून वाढ फार्मा (०.०८%),मिड स्मॉल हेल्थकेअर (०.२८%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.२८%) निर्देशांकात झाली आहे.आज अखेरच्या सत्रात आशियाई बाजारात एकूणच तेजीची भावना होती. फेडरल व्याजदरात कपातीची अपेक्षा जोरदार बाळगल्याने आशियाई बाजारातील बहुतांश मात्र वाढ झाली आहे. आज गिफ्ट निफ्टी (०.५५%) वगळता सर्वाधिक घसरण शांघाई कंपोझिट (०.४२%) निर्देशांकात झाली असून वाढ कोसपी (१.८७%), तैवान वेटेड (०.८०%), जकार्ता कंपोझिट (०.७९%) बाजारात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.१५%) निर्देशांकात वाढ झाली असून एस अँड पी ५०० (०.५३%), नासडाक (०.४६%) बाजारात घसरण झाली आहे. अखेरच्या सत्रात अस्थिरता राहण्यासाठी आणखी एक कारण म्हणजे उद्यापासून आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक सुरु होणार आहे ज्याचा निकाल ५ डिसेंबरला लागणार आहे. हेवीवेट शेअर आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अदानी एंटरप्राईजेस, रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या शेअर्समध्ये आज घसरण झाली असून ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपपैकी मारूती सुझुकी, बजाज फायनान्स, टाटा इलेक्सी शेअर्समध्ये वाढ झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ बालकृष्ण इंडस्ट्रीज (६.३३%),अकझो नोबेल (५.५६%), बिर्लासॉफ्ट (५.०६%), शिंडलर इलेक्ट्रॉनिक्स (४.४९%), मिंडा कॉर्पोरेशन (४.२९%), एशियन पेंटस (३.०३%) समभागात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण बजाज हाउसिंग (७.१५%), गार्डन रीच (४.६३%), वेलस्पून लिविंग (३.९६%), सिटी युनियन बँक (३.५२%), एथर एनर्जी (३.३८%), इंडियन बँक (३.१४%),अनंत राज (२.९७%), एचबीएल इंजिनिअरिंग (२.७४%), दीपक फर्टिलायजर (२.७१%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' रुपया कमकुवत होत चालल्याच्या चिंतेमुळे आणि सततच्या एफआयआयच्या बहिर्गमनामुळे देशांतर्गत बाजारपेठांमध्ये नफा बुकिंग सुरूच राहिली. दरम्यान, सेबीच्या नियमांनुसार एनएसईच्या क्षेत्रीय निर्देशांकात सुधारणा झाल्यामुळे प्रमुख बँकिंग काउंटरमध्ये सुधारणा झाल्या. जवळच्या काळात, मजबूत जीडीपी डेटा आणि अमेरिका-भारत व्यापार चर्चेभोवती अनिश्चितता यामुळे आरबीआयकडून दर कपातीची अपेक्षा कमी होत असल्याने गुंतवणूकदारांना आशा निर्माण होऊ शकते. तरीही, मजबूत देशांतर्गत मॅक्रो फंडामेंटल्स आणि आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत मजबूत कमाईचा अंदाज पुढे जाण्यास आधार देण्याची शक्यता आहे.'आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,' भारतीय बाजार आज नकारात्मक स्थितीत उघडले, बेंचमार्क निफ्टी निर्देशांक २६०८७ पातळीवर गॅप-डाउनने सुरुवात करत होता. सुरुवातीच्या सत्रात निर्देशांकाने २६१५४ पातळीच्या इंट्राडे उच्चांकाला स्पर्श करून पुनर्प्राप्तीचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर लवकरच हा वेग कमी झाला. निफ्टी नंतर २६००० पातळीच्या महत्त्वाच्या तांत्रिक आणि मानसिक पातळीची चाचणी घेण्यासाठी घसरला. क्षेत्रनिहाय, वाढ केवळ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपुरती मर्यादित होती, तर बहुतेक इतर क्षेत्रे लाल रंगात व्यवहार करत होती. मीडिया, वित्तीय सेवा, खाजगी बँका, तेल आणि वायू आणि ग्राहक टिकाऊ वस्तूंमध्ये लक्षणीय कमकुवतपणा दिसून आला.डेरिव्हेटिव्ह्ज आघाडीवर, पॉवरइंडिया, नौक्री, युनियन बँक, बीडीएल आणि सीएएमएसमध्ये ओपन इंटरेस्टमध्ये लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. ९ डिसेंबर २०२५ रोजी साप्ताहिक समाप्तीसाठी निफ्टी ऑप्शन्स विभागात, सर्वोच्च कॉल ओपन इंटरेस्ट २६२०० आहे, तर पुट बाजूला, महत्त्वपूर्ण ओपन इंटरेस्ट २६००० आणि २५५०० पातळीवर दिसून येत आहे.'

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 4:30 pm

Sanchar Saathi App : ‘संचार साथी’ॲप काय आहे? जे सरकारला प्रत्येकाच्या फोनमध्ये इन्स्टॉल करायचे आहे, वाचा सविस्तर…

Sanchar Saathi App। Technology – दूरसंचार विभागाने २८ नोव्हेंबर रोजी एक मार्गदर्शक सूचना जारी केली असून त्यानुसार सर्व मोबाइल कंपन्यांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी’ अ‍ॅप प्री-इंस्टॉल करणे आवश्यक आहे. कंपन्यांना हा नियम लागू करण्यासाठी ९० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विरोधकांनी आता या मुद्द्यावर हल्ला तीव्र केला आहे. सरकारचा दावा आहे की हे अ‍ॅप फसवणूक, […] The post Sanchar Saathi App : ‘संचार साथी’ ॲप काय आहे? जे सरकारला प्रत्येकाच्या फोनमध्ये इन्स्टॉल करायचे आहे, वाचा सविस्तर… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 4:28 pm

पर्सनल फायनान्स: चार वर्षांत करोडपती बनणे शक्य? तर किती दरमहा गुंतवावे लागतील वाचा....

मोहित सोमण: योग्य गुंतवणूक व गुंतवणूकीचे विविधीकरण माणसाला केवळ सक्षम नाही तर बाजारातील जोखीम आपल्यापासून दूर राखण्याची परवानगी देते. ४ ते ५ वर्षात करोडपती होणे शक्य आहे का? पाहूयात....जर महिन्यात २०००० रूपयांची बचत केल्यास १२ महिन्यात ती रक्कम २४०००० रूपये होते.जर आपण त्यामध्ये १२% परतावा (Returns) पकडल्यास एकूण एसआयपी रक्कम वर्षाला २८८०००० होते.आता हा कॉर्पस चार वर्षांचा पकडल्यास एकूण रक्कम २८८०००० रूपये ४ वर्ष = ११५२०००० कोटी रूपये होतात. अर्थात आपण त्यात इतर खर्च (म्युच्युअल फंडातील कमिशन व इतर प्रोविजनल रक्कम पकडल्यास १००००० लाख रूपये वगळून ११४२०००० कोटी रुपये पकडूयात.....आता एसआयपी गुंतवणूकीशिवाय एकत्रित एक लाख रूपयांची गुंतवणूक वगळता इतर खर्च बाजारात अस्थिरता, अचानक बाजारात घसरणीचा कौल, कंटीजंसी रक्कम अशा रक्कमा वगळून आणखी १ लाख (१००००० रूपये) वगळूयात त्यामुळे आता आधीची प्रोविजनल १ लाख अधिक आताची १ लाख बघता ११५२०००० कोटी रुपयांतून वगळता एकूण रक्कम ११३२०००० रूपयांची गुंतवणूक असेल. आता यामध्ये एकत्रित (Lumpsum) रक्कम १०००० लाख रूपये पकडूयात यात इतर खर्च, प्रोव्हिजनल खर्च, टॅक्स, इतर खर्च वगळता ८०००० रूपये पकडूयात आता ८०००० रूपयांवर ८% एनएव्ही (Net Asset Value) सह ती रक्कम १५००० रूपये पकडूयात म्हणजेच १५०००४म्हणजेच १ वर्षासाठी ही गुंतवणूक रक्कम ११४२०००० अधिक ९५००० रूपये म्हणजेच १ कोटी पंधरा लाख पंधरा हजार (११५१५०००) रूपये होणार आहे. किंवा इतर रक्कम चार वर्षांची पाहिल्यास ११४२००००+ ३८०००० रूपये ११८००००० रुपये गुंतवणूकदारांना मिळू शकतात. याशिवाय जर पोस्ट ऑफिसमध्ये केलेली गुंतवणूक, एफडीतील गुंतवणूक, बँकेच्या व्याजदरात मिळणारा परतावा व ईटीएफमध्ये ४ वर्षात एकूण ५% परतावा पकडल्यास (वर्षाला ५०००० पकडल्यास) २ लाख रूपये मिळू शकतात त्यामुळे एकूणच रक्कम ११४२००००+ ३८०००० + (५००००४) रूपये म्हणजेच २००००० पकडल्यास १ कोटी २० लाख रूपये कमावू शकतो (१२०००००) रूपये मिळाल्यास ४ वर्षात करोडपती बनवण्याची शक्यता आपल्याला निर्माण करता येते. परंतु प्रातिनिधिक दृष्ट्या हे चित्र निर्माण झाले असले तरी भूराजकीय, घरगुती शेअर बाजारात, अर्थव्यवस्थेत अस्थिरता व इतर अडचणीही येऊ शकतात. त्यामुळे आपण एकूण १ कोटी २० लाखांची गुंतवणूक मिळवण्यासाठी प्रथम ५ लाख कमी पकडूयातम्हणजेच प्रस्तावित रक्कम ७०००००० रूपये होऊ शकते. त्यामुळे शिल्लक रक्कम ४८ महिने पकडल्यास एकूण शिल्लक रक्कम १४५८३ रुपये होते. २०००० रूपयांची गुंतवणूक केल्यास त्यामुळे वरील तूट अंदाचे ६००० रुपयांची पकडूयात. त्यामुळे केवळ एसआयपीसाठी रक्कम धरल्यास २०००० अधिक ६०००= २६००० रूपयांची एसआयपी गुंतवणूक आवश्यक आहे. तसेच इतर गुंतवणूक वर्षाला १ लाख पकडल्यास ८३३३ म्हणजेच अंदाजे ८३३५ रूपयांची आवश्यक असेल.त्यामुळे ४ वर्षात करोडपती एकूण गुंतवणूक ३४३३५ पकडल्यास अंदाजे ३५००० रूपयांची गुंतवणूक करणे किमान आवश्यक आहे.(टीप- हा एक केवळ अंदाज असून कुठलीही गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. झालेल्या नुकसानीसाठी प्रकाशक व लेखक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती)

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 4:10 pm

हरमनप्रीत कौर पंजाब नॅशनल बँकेची पहिली महिला ब्रँड ॲम्बेसडर होणार

मुंबई: भारतातील सर्वात मोठ्या पीएसयु बँकेपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँक (PNB) ने आज बँकेची पहिली महिला ब्रँडअ‍ॅम्बेसेडर म्हणून भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि विश्वचषक विजेत्या हरमनप्रीत कौर यांना घोषित केले आहे. ही भागीदारी पीएनबीच्या ब्रँड परिवर्तन प्रवासातील एक रणनीतिक टप्पा म्हणून ओळखली जाणार आहे. बँकेच्या कॉर्पोरेट कार्यालयात ‘बँकिंग ऑन चॅम्पियन्स’ या व्यापक थीमअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.ब्रँड ॲम्बेसडर म्हणून आपल्या पहिल्या अधिकृत कार्याचा निभाव करताना, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि विश्वविजेती हरमनप्रीत कौर यांनी सचिव (FS) एम. नागराजू आणि पीएनबीचे एमडी व सीईओ अशोक चंद्र यांच्यासह बँकेची चार वित्तीय उत्पादने (Financial Products) लाँच केली आहेत. पीएनबी रुपे मेटल क्रेडिट कार्ड ‘लक्सरा’, पीएनबी वन २.० ‘डिजी सूर्य घर’ आणि आयआयबीएक्स पोर्टलवरील पीएनबीचे ऑनबोर्डिंग ही सगळी उत्पादन या कार्यक्रमात घोषित केली गेली आहेत.या प्रसंगी बोलताना सचिव (एफएस) एम. नागराजू म्हणाले आहेत की,'हरमनप्रीत कौर यांनी पहिल्यांदाच महिला क्रिकेट संघाला विजय मिळवून देत भारताचा गौरव वाढविला आहे आणि लाखो तरुण महत्त्वाकांक्षी लोकांना प्रेरित केले आहे. पीएनबीबद्दल बोलायचे झाले तर, ते विलक्षण काम करत आहेत, विशेषतः एमएसएमई अभियान आणि या मेटल क्रेडिट कार्डच्या लाँचमुळे विशिष्ट ग्राहक समूहासाठी एक महत्त्वपूर्ण उत्पादन जोडले गेले आहे.' तसेच त्यांनी सोन्याच्या बुलियनच्या ऑनलाइन ट्रेडिंगसाठी पीएनबीला आयआयबीएक्सवर ऑनबोर्ड करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.या घडामोडींवर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि विश्वविजेती हरमनप्रीत कौर म्हणाल्या आहेत की,' हे खरंच अविश्वसनीय वाटत आहे. मी जेव्हा १८ वर्षांची होते, तेव्हापासून मी पीएनबीसोबत बँकिंग करत आहे, आणि माझे पहिले खाते पीएनबीच्या मोगा शाखेत होते. आज या बँकेची ब्रँड ॲम्बेसडर म्हणून येथे उभे राहणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. पीएनबीने पिढ्यान् पिढ्या भारतीयांच्या आर्थिक आकांक्षा पूर्ण करण्यास मदत केली आहे, आणि लोकांना विशेषतः महिलांना आणि तरुण प्रतिभांना सशक्त करण्याची त्याची बांधिलकी माझ्या मनाला स्पर्श करते. संपूर्ण भारतातील आणखी अनेक चॅम्पियन्सना प्रेरित करण्यासाठी एकत्र काम करण्याची मला आशा आहे. पीएनबी मेटल क्रेडिट कार्ड ‘लक्सरा’ची पहिली ग्राहक बनण्याचा मला आनंदही होत आहे.'पीएनबीचे एमडी आणि सीईओ अशोक चंद्र म्हणाले आहेत की,'भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार आणि विश्वविजेत्या हरमनप्रीत कौर यांचे पीएनबी परिवारात स्वागत करताना आम्ही अत्यंत उत्साहित आहोत. पीएनबीच्या इतिहासात प्रथमच आमच्याकडे एक महिला ब्रँड ॲम्बेसडर आहे. त्यांचे नेतृत्व, जिद्द आणि उत्कृष्टतेच्या शोधाची वृत्ती आमच्या बँकेच्या मूल्यांना प्रतिबिंबित करते. आम्हाला ‘लक्सरा’आमच्या विशिष्ट ग्राहकांसाठी तयार केलेले पहिले मेटल क्रेडिट कार्डसादर करताना देखील आनंद होत आहे. हे कार्ड अद्वितीय अनुभव प्रदान करण्यासाठी आणि विद्यमान बाजारात एक नवा मापदंड स्थापित करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.'बँकेच्या माहितीनुसार, पीएनबीचे रुपे मेटल क्रेडिट कार्ड लक्सरा हे एक प्रीमियम क्रेडिट कार्ड बँक ऑफर करत आहे जे विशेष विशेषाधिकार आणि अधिक मूल्य शोधणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन केलेले आहे असे कंपनीने यावेळी स्पष्ट केले. कार्डमध्ये व्यापक रिवॉर्ड प्रोग्रॅम आहे, ज्यामध्ये ९० दिवसांच्या आत ५०००० खर्च केल्यास ४०००० वेलकम रिवॉर्ड पॉइंट्स (१०००० मूल्यांचे) आणि ५ लाख वार्षिक खर्चावर एकूण १०००० माइलस्टोन रिवॉर्ड पॉइंट्स दिले जातात असे बँकेने स्पष्ट केले. हे कार्ड हॉटेल संबंधी बँक ऑफर धारकांना विशेषाधिकार देईल अशी माहिती पुढे आली आहे. उदाहरणार्थ ITC हॉटेल्समध्ये 2+1 पूरक (कॉम्प्लिमेंटरी) नाइट आणि निवडक ITC रेस्टॉरंट्समध्ये 1+1 सेट मेनू सारखे डाइनिंग फायदे या बँक ऑफर मध्ये समाविष्ट असतील. लक्स एलिट प्लस सदस्यत्व असलेल्या कार्डधारकांना हयात, मॅरियट, फोर सीझन्स, हिल्टन, अकोर आणि इतर अनेक सदस्य हॉटेल शृंखलांसह (Hotel Chain) सह इतर विविध फायदे मिळू शकतात.पीएनबीने पीएनबी वन 2.0 (त्याच्या मुख्य मोबाइल ॲपचे नवीन आवृत्ती) आणि डिजी सूर्य घर (रुफटॉप सौर ऊर्जा प्रणालींसाठी पूर्णपणे डिजिटल वित्तपुरवठा उपक्रम) देखील लाँच करत पीएनबीला आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज (IIBX) वर देखील ऑनबोर्ड नुकतेच केले गेले. सोहळ्यात आकर्षक रॅपिड-फायर संवाद, वृक्षारोपण आणि सांस्कृतिक सादरीकरणांचा समावेश होता. सोहळ्याच्या भाग म्हणून, पीएनबीने 10 तरुण महिला क्रिकेटपटक्यांना आमंत्रित केले, ज्यांना हरमनप्रीतच्या स्वाक्षरीसह पीएनबी-ब्रँडेड क्रिकेट किट दिल्या गेल्या, ज्यामुळे तरुण क्रीडापटूंना आत्मविश्वासाने त्यांच्या खेळाच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 4:10 pm

Santosh Bangar : आमदार संतोष बांगरांवर मोठी कारवाई, मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Devedra Fadnavis on Santosh Bangar | राज्यात नगरपरिषद तसेच नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली आहे. तर काही ठिकाणी EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांचा खोळंबा झाला आहे. याच दरम्यान हिंगोली जिल्ह्यातही मतदानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना गटाचे आमदार संतोष […] The post Santosh Bangar : आमदार संतोष बांगरांवर मोठी कारवाई, मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 4:08 pm

हे पाऊल नागरिकांच्या गोपनीयतेवर थेट हल्ला आहे.! ‘संचार साथी अ‍ॅप’वरून मोठा राजकीय वाद सुरु

sanchar saathi app – दूरसंचार विभागाने २८ नोव्हेंबर रोजी एक मार्गदर्शक सूचना जारी केली असून त्यानुसार सर्व मोबाइल कंपन्यांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी‘ अ‍ॅप प्री-इंस्टॉल करणे आवश्यक आहे. कंपन्यांना हा नियम लागू करण्यासाठी ९० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विरोधकांनी आता या मुद्द्यावर हल्ला तीव्र केला आहे. सरकारचा दावा आहे की हे अ‍ॅप फसवणूक, फोन […] The post हे पाऊल नागरिकांच्या गोपनीयतेवर थेट हल्ला आहे.! ‘संचार साथी अ‍ॅप’वरून मोठा राजकीय वाद सुरु appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 3:59 pm

संतोष बांगरांकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग फडणवीसांनी सुनावले खडेबोल; म्हणाले “लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची…”

Devedra Fadnavis on Santosh Bangar | राज्यात नगरपरिषद तसेच नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली आहे. तर काही ठिकाणी EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांचा खोळंबा झाला आहे. याच दरम्यान हिंगोली जिल्ह्यातही मतदानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना गटाचे आमदार संतोष […] The post संतोष बांगरांकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग फडणवीसांनी सुनावले खडेबोल; म्हणाले “लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची…” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 2:52 pm

“ट्रम्प भारतावरील टॅरिफ २० टक्क्यांपर्यंत कमी करणार” ; ‘या’कंपनीचा मोठा दावा, ट्रेंड डील संदर्भातही दिली माहिती

Trump Tariff। भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल परदेशी ब्रोकरेज फर्म नोमुराने एक मोठी बातमी दिली आहे. कंपनीने भारतावर लादलेला ५० टक्के अमेरिकन टॅरिफ फक्त २० टक्के केला जाऊ शकतो” असा दावा केला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराबाबत आधीच सहा फेऱ्या झाल्या आहेत, परंतु अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही […] The post “ट्रम्प भारतावरील टॅरिफ २० टक्क्यांपर्यंत कमी करणार” ; ‘या’ कंपनीचा मोठा दावा, ट्रेंड डील संदर्भातही दिली माहिती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 2:48 pm

‘तेरे इश्क में’लवकरच १०० कोटी क्लबमध्ये! बॅाक्स अॅाफिसची आकडेवारी आली समोर

Tere Ishq Mein : धनुष आणि क्रिती सॅनेन या फ्रेश जोडीच्या ‘तेरे इश्क में’ चित्रपटाची जादू केवळ भारतातच सीमित राहिली नसून ती या वीकेंडनंतर जगभरात पोहचली आहे. आनंद एल राय दिग्दर्शित ‘तेरे इश्क में चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद चित्रपटाला दिला आहे. या चित्रपटाची सुरुवात बॅाक्स अॅाफिसवर संथ गतीने झाली असली, तरी […] The post ‘तेरे इश्क में’ लवकरच १०० कोटी क्लबमध्ये! बॅाक्स अॅाफिसची आकडेवारी आली समोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 2:46 pm

“माझ्यावरचे आरोप खोटे, बदनामीचा कट”; चित्रा वाघ यांचा आरोप

Chitra Wagh | स्नेहल घुगे नावाच्या महिलेनं एका खाजगी चॅनेलवर मुलाखतीत “चित्रा वाघ यांनी मला घटस्फोट घ्यायला सांगितलं” असा दावा केला होता. या दाव्याला प्रत्युत्तर देताना चित्रा वाघ “स्नेहल घुगे नावाच्या महिलेला मी कधी भेटले नाही, बोलले नाही, कोणताही संवाद नाही. तिचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत,” असे स्पष्ट केले. चित्रा वाघ […] The post “माझ्यावरचे आरोप खोटे, बदनामीचा कट”; चित्रा वाघ यांचा आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 2:39 pm

चौथ्यांदा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष यूपीमधून होणार?:मागासवर्गातून केशव आणि ब्राह्मण चेहरा डॉ. दिनेश शर्मा दावेदार

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि राज्यसभा सदस्य डॉ. दिनेश शर्मा यांची नावेही दावेदारांच्या यादीत समाविष्ट आहेत. दिल्लीत यावर विचारमंथन सुरू आहे. जर राष्ट्रीय अध्यक्षपदावर या दोन्ही नेत्यांपैकी कोणाची निवड झाली, तर ते उत्तर प्रदेशमधून भाजपचे चौथे राष्ट्रीय अध्यक्ष ठरतील. बिहार निवडणूक जिंकल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत हालचालींना वेग आला आहे. खरं तर, राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मागासवर्गीयांमधून केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव आणि मनोहर लाल खट्टर यांसारख्या मोठ्या नेत्यांच्या नावांची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. परंतु, बिहार निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचे नावही वेगाने पुढे आले आहे. वाचा ही खास बातमी... राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, आरएसएस, बजरंग दल, विहिंप आणि भाजपमध्ये सुमारे 40 वर्षांचा राजकीय अनुभव असल्यामुळे केशव या पदासाठी मोठे दावेदार बनले आहेत. आरएसएसच्या शीर्ष नेत्यांचे विश्वासू असल्यामुळे केशव एक मजबूत नाव आहे. त्यांच्यावर संघ, भाजप आणि मोदी सरकार एकमत होऊ शकते. दुसरीकडे, जाणकारांचे मत आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि आरएसएसमध्ये सामान्य वर्गातून राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यावर विचार सुरू आहे. यामध्ये राज्यसभा सदस्य डॉ. दिनेश शर्मा यांच्या नावावरही चर्चा सुरू आहे. डॉ. शर्मा उत्तर प्रदेशात भाजपचे मोठे ब्राह्मण चेहरा आहेत. म्हणूनच भाजप डॉ. शर्मा यांच्या नावावर विचार करत आहे. केशव यांच्याकडे बजरंग दल, आरएसएस सोबत भाजपचा अनुभवकेशव प्रसाद मौर्य यांनी बजरंग दल आणि आरएसएसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. ते विहिंपचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक सिंघल यांचे जवळचे आणि विश्वासू होते. 2012 मध्ये ते पहिल्यांदा कौशांबीच्या सिराथू येथून आमदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये केशव फुलपूरमधून लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले. 2016 मध्ये त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले. 2017 मध्ये केशव यांच्या कार्यकाळातच यूपीमध्ये भाजपला विक्रमी 312 जागा मिळाल्या. त्यानंतर केशव यांना उपमुख्यमंत्री बनवून पीडब्ल्यूडीसारखे मोठे मंत्रालय देण्यात आले. भाजपने रणनीतीनुसार केशवना मागासवर्गीयांचा सर्वात मोठा नेता बनवले. 2018 मध्ये भाजपने लखनऊमध्ये मागासवर्गातील सर्व जातींचे एकेक करून संमेलन घेतले. त्या संमेलनांचे नेतृत्व केशव यांनीच केले. राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की केशव मागासवर्गांचे मोठे नेते आहेत. जर त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवले जाते, तर उत्तर भारतात मागासलेल्या जातींमध्ये चांगला संदेश जाईल. त्याचबरोबर मागासवर्गीयांच्या व्होटबँकेत भाजपची पकड मजबूत होईल. याचा फायदा केवळ यूपीच्या पंचायत निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्येच नाही, तर इतर राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपला मिळेल. राजनाथ यांच्या भेटीनंतर पुन्हा चर्चेत नावउपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. यापूर्वीही जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात केशव यांनी राजनाथ यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचीही भेट घेतली होती. अलीकडेच केशव यांनी राजनाथ यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत आले आहे. केशव प्रसाद मौर्य भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वासाठी आणि आरएसएससाठी महत्त्वाचे आहेत. याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, 2022 च्या विधानसभा निवडणुकीत सिराथूमधून निवडणूक हरल्यानंतरही भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री बनवले. केशव यांचा राजकीय प्रभाव सातत्याने वाढत आहेभाजप मागासलेल्या समाजात पकड निर्माण करण्यात गुंतला आहे. म्हणूनच केशव मौर्य यांचा पक्षाकडून राजकीय प्रभाव सातत्याने वाढवला जात आहे. तीन दशकांपासून सातत्याने पदावर आहेत दिनेश शर्मा यूपीचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य डॉ. दिनेश शर्मा गेल्या तीन दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत. तेव्हापासून ते सरकार आणि संघटनेत कोणत्या ना कोणत्या पदावर राहिले आहेत. 1993 ते 1998 पर्यंत भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते. राष्ट्रीय युवा आयोगाचे अध्यक्ष होते. उत्तर प्रदेश पर्यटन महामंडळाचे उपाध्यक्ष तसेच इतर पदांवर होते. 2007 ते मार्च-2017 पर्यंत लखनऊचे महापौर होते. 2014 मध्ये भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले. याच वर्षी भाजपच्या सदस्यत्व अभियानाचे राष्ट्रीय संयोजक बनवण्यात आले. 2017 ते 2022 पर्यंत यूपीचे उपमुख्यमंत्री होते. 2023 मध्ये पुन्हा राज्यसभा सदस्य निवडले गेले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचे निवडणूक प्रभारी बनवण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 2 Dec 2025 2:00 pm

लग्नात ‘रिटर्न गिफ्ट’म्हणून दिले ‘हेल्मेट’ ; सोशल मीडियावर उपक्रमाची चर्चा अन् कौतुक

Helmet return gift। राजस्थानच्या एका लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. कुचामन शहरात पार पडलेल्या एका लग्नात पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून चक्क हेल्मेट देण्यात आले आहे. त्यामुळे याची सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे. जीवन आणि सुरक्षिततेचा संदेश देत, वधूच्या कुटुंबाने ‘जांझुवारी’ नुसार वराच्या मिरवणुकीतील एकूण २८६ जणांना हेल्मेट भेट दिले. पिढ्यानपिढ्या चालत आलेली, […] The post लग्नात ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून दिले ‘हेल्मेट’ ; सोशल मीडियावर उपक्रमाची चर्चा अन् कौतुक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 1:46 pm

‘कांतारा’च्या ऋषभ शेट्टीची नक्कल केल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त; अखेर रणवीरला मागावी लागली माफी

Ranveer singh | अभिनेता, दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या बहुचर्चित‘कांतारा चाप्टर १’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचे आणि कथेचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले. मात्र एका कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने ‘कांतारा चाप्टर १’ चित्रपटावर टीका केल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. इतकेच काय तर रणवीरने त्याचा ‘भूत’ म्हणूनही उल्लेख केला होता. यावर […] The post ‘कांतारा’च्या ऋषभ शेट्टीची नक्कल केल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त; अखेर रणवीरला मागावी लागली माफी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 1:40 pm

“आम्हाला बहीण-भाऊ म्हणणं बंद करा”; पंकजा मुंडे असं का म्हणाल्या? ‘त्या’प्रश्नावर केला खुलासा

Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे मैदानात उतरले होते. बहीण भावानी आयोजित केलेल्या प्रचार सभांमधून जोरदार भाषणबाजी करत मतदान करण्याचे आवाहन केले होते. दोघेही अनेक वर्षांनी या निवडणुकांसाठी एकत्रित पाहायला मिळाल्याने बीड जिल्ह्यासह राज्यात मोठी […] The post “आम्हाला बहीण-भाऊ म्हणणं बंद करा”; पंकजा मुंडे असं का म्हणाल्या? ‘त्या’ प्रश्नावर केला खुलासा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 1:33 pm

बँक ऑफ महाराष्ट्राचा ओएफएस शेअर विक्री आजपासून किरकोळ गुंतवणूकदारांना मात्र उद्या विंडो उघडणार

मोहित सोमण: बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) बँकेने ओएफएस निर्देश (Offer for Sale OFS Guidelines) नियमांची पूर्तता करण्यासाठी आपल्या भागभांडवल हिस्सातील एकूण ३८४५७७७४८ शेअर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. बँकेच्या एकूण भागभांडवलातील हा ५% हिस्सा असणार आहे. आज विना किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Non Retail Investors) व उद्या किरकोळ गुंतवणूकदारांसाठी हा ओएफएस विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या ऑफर अंतर्गत उपलब्ध वाट्यापैकी ७६९१५५४९ अतिरिक्त शेअर विकण्याची परवानगी असेल. बीएसई व एनएसईवरील स्वतंत्र विंडो व संयुक्त विंडो अंतर्गत या शेअरची विक्री होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, फ्लोअर प्राईज रूपये ५४ प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र OFS ची फ्लोअर प्राईस प्रति शेअर ५४ आहे, जी सोमवारच्या बीएसईवरील ५७.६६ या बंद झालेल्या किमतीपेक्षा ६.३४% कमी आहे.प्रस्तावित माहितीनुसार, ही ऑफर स्टॉक एक्सचेंजच्या वेगळ्या विंडोवर T+1 दिवशी, म्हणजेच ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९:१५ वाजता सुरू होईल आणि त्याच दिवशी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता बंद होईल.फक्त किरकोळ गुंतवणूकदारांना T+1 दिवशी, म्हणजेच ३ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्या बोली लावण्याची परवानगी असेल. शिवाय, ज्या विना किरकोळ गुंतवणूकदारांनी T दिवशी त्यांच्या बोली लावल्या आहेत आणि त्यांच्या वाटप न केलेल्या बोली T+1 दिवशी पुढे नेण्याचा पर्याय निवडला आहे त्यांना त्यांच्या वाटप न केलेल्या बोली रिटेल श्रेणीच्या सदस्यता रद्द केलेल्या भागात (अनुसरण न केलेल्या) वाटपासाठी पुढे नेण्याची आणि OFS मार्गदर्शक तत्त्वांनुसार T+1 दिवशी त्यांच्या बोली सुधारण्याची (Revised) परवानगी असेल. माहितीप्रमाणे बँकेच्या कर्मचाऱ्यांना ७५०००० इक्विटी शेअर्स ओएफएस अंतर्गत विकण्यासाठी उपलब्ध असणार आहे.माहितीनुसार, ही ऑफर एक्सचेंज एक्सचेंजवर T+1 च्या दिवशी, प्रत्येक दिवशी ३ डिसेंबर २०२५ रोजी ९.१५ नियमितपणे सुरू होईल आणि त्याच दिवशी भारतीय प्रमाण वेळेनुसार ३:३० वाजता बंद होणार आहे.फक्त किरकोळ गुंतवणूकदारांनी (खाली बदललेले) T+1 दिवशी, डिसेंबर ३ डिसेंबर २०२५ त्यांच्या बोली लावण्याची परवानगी असेल. शिवाय ज्या विना रिटेल उमेदवारांनी T+1 च्या दिवशी बोली लावल्या आहेत आणि त्यांच्या वाटप न केलेल्या बोली T+1 च्या दिवशी निवडल्या गेल्या आहे त्यांना वाटप न करता बोली रिटेल श्रेणीच्या (खालील बदल) करता अनुसरण होणार आहे. ओएफएस तत्वांनुसार T+1 दिवस त्यांच्या बोली सुधारण्याची (Revised) परवानगी असेल.बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सध्या सरकारचा ज्यात ७९.६०% हिस्सा आहे. ओएफएसमुळे, बँक ऑफ महाराष्ट्र २५% या किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग नियमाची पूर्तता करू शकणार आहे. कारण सरकारी हिस्सा ७५% पेक्षा कमी होईल. नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने जारी केलेल्या सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन) नियमांनुसार ही विक्री होणार आहे त्यात सार्वजनिक हिस्सा २५% अनिवार्य असतो.सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसह सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग २५% असणे आवश्यक आहे. भांडवली बाजार नियामकाने सीपीएसई आणि सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांना ऑगस्ट २०२६ पर्यंत सूट दिली गेली आहे.बँक ऑफ महाराष्ट्र व्यतिरिक्त, इतर चार कर्जदाते जिथे सरकारचा हिस्सा किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग मर्यादेपेक्षा जास्त आहे ते म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक ९४.६%, पंजाब अँड सिंध बँक ९३.९%, युको बँक ९१% आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया ८९.३% आहेत. बँकेचा शेअर दुपारी १.१६ वाजेपर्यंत ०.२४% उसळला होता तर बँकेच्या शेअर्समध्ये एक महिन्यात ३.५९% घसरण झाली असून इयर टू डेट (YTD) बेसिस वर ९.८९% वाढ झाली आहे.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 1:30 pm

Love In Vietnam Release In Korea: भारतानंतर आता कोरियामध्येही प्रदर्शित होणार ‘लव्ह इन व्हिएतनाम’; अवनीत कौर आणि शांतनु माहेश्वरी उत्साहित

Love In Vietnam Release In Korea: शांतनु माहेश्वरी आणि अवनीत कौर अभिनीत ‘लव्ह इन व्हिएतनाम’ ही फिल्म भारतात चार महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली होती. भारतात या चित्रपटाला खास प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र आता ही फिल्म भारतानंतर कोरियामध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. 8 डिसेंबरला कोरियामध्ये रिलीज राहत शाह काझमी दिग्दर्शित लव्ह इन व्हिएतनाम 8 डिसेंबर 2025 रोजी […] The post Love In Vietnam Release In Korea: भारतानंतर आता कोरियामध्येही प्रदर्शित होणार ‘लव्ह इन व्हिएतनाम’; अवनीत कौर आणि शांतनु माहेश्वरी उत्साहित appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 1:28 pm

“हे अ‍ॅप तुम्ही डिलीट.. ” ; ‘संचार साथी’वरून सुरु असणाऱ्या गोंधळावर केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान

Sanchar Saathi App। देशात सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एका ऍपवरून गोंधळ सुरु आहे. केंद्र सरकारने संचार साथी अ‍ॅप हे प्रत्येक स्मार्टफोनमध्ये प्री-इन्स्टॉल करण्याच्या निर्णयावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी याविषयी माहिती देताना,”हे अ‍ॅप कोणाचीही हेरगिरी करणार नाही किंवा कॉल्सवर लक्ष ठेवणार नाही.” […] The post “हे अ‍ॅप तुम्ही डिलीट.. ” ; ‘संचार साथी’वरून सुरु असणाऱ्या गोंधळावर केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 1:22 pm

बजाज हाउसिंग फायनान्सचा शेअर ९% कोसळला, गुंतवणूकदारांचा शेअरला धक्का 'या'कारणामुळे

मोहित सोमण: बजाज हाउसिंग फायनान्स (Bajaj Housing Finance Limited) लिमिटेड कंपनीचा शेअर आज ५२ आठवड्यातील निचांकी पातळीवर घसरला आहे. कंपनीच्या प्रवर्तकांनी (Promoter) आपला काही हिस्सा ब्लॉक डील अंतर्गत विकला आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, प्रवर्तकांनी आपला ९% भागभांडवल हिस्सा (Stake) विकला आहे. बजाज फायनान्समधून २.३५% हिस्सा म्हणजेच १८९० कोटी मूल्यांकनाचा हिस्सा विकला गेला आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली आहे. सत्राच्या सुरुवातीला कंपनीचा शेअर ९% कोसळत ९४.९० रूपयावर व्यवहार करत होता. दुपारी १२.३७ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ५.८५% घसरण झाल्याने हा शेअर ९८.३८ रूपये प्रति शेअरवर पोहोचला आहे. १ डिसेंबर २०२५ रोजी प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाचे एकूण शेअरहोल्डिंग कंपनीच्या एकूण पेड-अप इक्विटी शेअर भांडवलाच्या ७,३९१००३८४५ (८८.७०%) आहे. आज एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत कंपनीने म्हटले,' प्रवर्तक, कंपनीतील २% पर्यंत हिस्सा विकण्याची योजना आखत आहेत. कंपनीचे प्रवर्तक बजाज फायनान्स लिमिटेडकडे कंपनीच्या एकूण पेडअप भांडवलाच्या ८८.७०% असे एकूण ७३९१००३८४५ इक्विटी शेअर्स आहेत.एकूण धारण केलेल्या शेअर भांडवलांपैकी बजाज फायनान्स कंपनीच्या इक्विटी शेअर भांडवलाच्या २% पर्यंत, एक किंवा अधिक टप्प्यांमध्ये एकूण १६६६००००० शेअर्सपेक्षा जास्त नसावेत या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपनी विकण्याचा प्रस्ताव ठेवत आहे असे कंपनीने स्पष्ट केले. ही विक्री २ डिसेंबर २०२५ पासून २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत किंवा सर्व इक्विटी शेअर्सची विक्री पूर्ण झाल्याच्या प्रत्यक्ष तारखेपर्यंत एकाच किंवा अनेक टप्प्यांमध्ये, यापैकी जे आधी असेल त्या तारखेपर्यंत सुरू होईल.यापूर्वी गेल्या वर्षी बजाज हाउसिंग फायनान्सचा आयपीओ बाजारात दाखल झाला होता ज्यामध्ये ७० रूपयांचा प्राईज बँड निश्चित करण्यात आला होता. एकूण शेअरची कामगिरी पाहता गेल्या ५ दिवसात कंपनीचा शेअर ६.५४% घसरला असून गेल्या महिनाभरात शेअर १०.३३%, व गेल्या सहा महिन्यांत २०.४६% शेअर घसरला आहे. तर इयर टू डेट (YTD) बेसिसवर २२.१८% घसरण झाली आहे.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 1:10 pm

Nagarparishad Election Result : उद्याची मतमोजणी रद्द! उच्च न्यायालयाच्या आदेशाने निकालाची तारीख ढकलली पुढे, निकाल आता 'या'दिवशी लागणार!

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालासंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी म्हणजे २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील जवळपास २० नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया काही न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने पुढे ढकलण्यात आली होती. ही निवडणूक २० डिसेंबर रोजी होणार होती. सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत, अन्यथा २० नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याबाबतचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निर्णय दिला की, जर आज मतदान झाले तरी त्याचे निकाल २१ तारखेलाच जाहीर करावेत. हा निर्णय सर्व निवडणुकांमध्ये समरूपता राखण्यासाठी घेण्यात आला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही २० डिसेंबरपर्यंत लागू राहील. या निवडणुकीचे एक्झिट पोलही २० तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करता येतील. ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झाली, तेथील उमेदवारांना आत्ताच्या प्रक्रियेत जे निवडणूक चिन्ह मिळाले होते, ते त्यांचे चिन्ह कायम राहणार आहे. मात्र, निवडणूक रद्द झालेल्या ठिकाणी उमेदवारांनी केलेल्या खर्चाची मर्यादा वाढवून देण्यात यावी, ही मागणी न्यायालयाने मान्य केलेली नाही. या निर्णयामुळे निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया आता २१ डिसेंबरच्या निकालावर केंद्रित झाली आहे.https://prahaar.in/2025/12/02/wipro-acquires-harman-groups-digital-transformation-solutions-company/देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगाच्या 'प्रक्रियेवर' तीव्र नाराजीदेवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, त्याचा निकाल पुढे जातोय, हे पहिल्यांदाच होतंय. ते पुढे म्हणाले, हे यंत्रणांचं अपयश आहे. मी पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहतोय. निवडणुकांचे निकाल पुढे ढकलण्याच्या प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला. न्यायालयाच्या निर्देशानुसार काही निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत. यावर भाष्य करताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मतमोजणी पुढे ढकलणे हे मला तरी पटत नाही. हे अतिशय चूक आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले, माझी वैयक्तिक नाराजी मी व्यक्त केली होती ती कायद्यावर आधारित होती. माझी नाराजी निवडणूक आयोगावर नाही, तर प्रक्रियेवर आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या संपूर्ण प्रक्रियेत तातडीने सुधारणा करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.मतमोजणी पुढे ढकलल्याने प्रशासनावर वाढला मोठा ताण! राज्यामध्ये जवळपास २८० हून अधिक ठिकाणी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका होत आहेत. या सर्व ठिकाणच्या मतदानाचे ईव्हीएम (EVM) सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाला २१ डिसेंबरपर्यंत संबंधित स्ट्राँग रूम्स आणि मतमोजणी केंद्रे आरक्षित ठेवावी लागतील. तब्बल तीन आठवड्यांहून अधिक काळ ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी २८० हून अधिक स्ट्राँग रूम्समध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवावा लागेल. यासाठी प्रशासन आणि पोलिसांची यंत्रणा दीर्घकाळासाठी कामाला लागेल. निवडणूक निर्णय अधिकारी तसेच प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना दररोज स्ट्राँग रूममध्ये जाऊन ईव्हीएमची पाहणी करणे आणि स्वाक्षरी करणे बंधनकारक असते. ही सर्व प्रक्रिया त्यांना रोज २१ डिसेंबरपर्यंत पार पाडावी लागेल, ज्यामुळे कामाचा ताण वाढेल. विधानसभा निवडणुकीत साधारणपणे २८८ ठिकाणी मतमोजणी होते. नगरपरिषद निवडणुकीतही जवळपास तेवढ्याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे. परंतु, विधानसभेची मतमोजणी मतदानानंतर लगेच एका-दोन दिवसांत होते, तर या नगरपरिषद निवडणुकांसाठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणांना सुमारे तीन आठवड्यांसाठी कामी लागावे लागणार आहे.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 1:10 pm

पाकिस्तानात मोठा गोंधळ! खैबर पख्तूनख्वामध्ये राष्ट्रपती राजवटीची तयारी ; इम्रान खानचे हजारो समर्थक एकवटले

Imran Khan। माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दलच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) चे हजारो समर्थक रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगाबाहेर एकवटले आहेत. निदर्शने रोखण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा दलांनी संपूर्ण रावळपिंडीमध्ये कलम १४४ लागू केले आहे. असे असूनही, इम्रान खान यांचे समर्थक मोठ्या संख्येने याठिकाणी येत आहेत. दरम्यान, पाकिस्तान सरकारने खैबर पख्तूनख्वा (केएपी) मध्ये राष्ट्रपती राजवट (राज्यपाल राजवट) […] The post पाकिस्तानात मोठा गोंधळ! खैबर पख्तूनख्वामध्ये राष्ट्रपती राजवटीची तयारी ; इम्रान खानचे हजारो समर्थक एकवटले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 1:04 pm

नगरपरिषद-नगरपंचायतींच्या निकालाची तारीख लांबणीवर; काय होणार परिणाम?

Maharashtra Local Body Elections 2025 | राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा पहिला टप्पा आज पार पडत असून नगर परिषद, नगर पंचायतीसाठी मतदान सुरू झाले आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. मात्र यात मोठा बदल करण्यात आला आहे. सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे […] The post नगरपरिषद-नगरपंचायतींच्या निकालाची तारीख लांबणीवर; काय होणार परिणाम? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 1:01 pm

Local elections : मतमोजणीची तारीख पुढे ढकलली; राज ठाकरेंनी मोजक्याच शब्दांत दिली पहिली प्रतिक्रिया, विषयच संपवला

Raj Thackeray : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानगरपरिषदाआणिनगरपंचायत निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली असून, मोठ्या उत्साहात मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली. या निव़डणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी करण्यात येणार होती. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २ डिसेंबर आणि २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाची […] The post Local elections : मतमोजणीची तारीख पुढे ढकलली; राज ठाकरेंनी मोजक्याच शब्दांत दिली पहिली प्रतिक्रिया, विषयच संपवला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 12:55 pm

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा : दहशतवादी दानिशच्या फोनमधून महत्वाचे पुरावे हाती

Delhi Blast Case। दिल्ली बॉम्बस्फोटांच्या तपासादरम्यान, दहशतवादी दानिशच्या फोनमधून अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. डिलीट केलेला इतिहास, फोटो, व्हिडिओ आणि अॅप डेटा स्कॅन करण्यात आला आहे. त्यातून दानिश ड्रोन तंत्रज्ञान आणि शस्त्रांवर सक्रियपणे काम करत होता अशी माहिती समोर आली आहे. फोनमधून डझनभर ड्रोन प्रतिमा जप्त Delhi Blast Case। तपासादरम्यान दानिशच्या फोनमधून डझनभर ड्रोन […] The post दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा : दहशतवादी दानिशच्या फोनमधून महत्वाचे पुरावे हाती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 12:32 pm

सूरजच्या लग्नातील धमाल जान्हवीला भोवली, थेट रूग्णालयात दाखल! पोस्ट करत म्हणाली, नजर...

मुंबई: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचे २९ नोव्हेंबर २०२५ रोजी लग्न झाले. सूरज चव्हाणच्या लग्नाचे आणि लग्नाआधीच्या सर्व शुभविधींचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. यावरून सूरज चव्हाणच्या लग्नाला अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने हजेरी लावल्याचे दिसते. त्यापैकी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची स्पर्धक आणि इन्फ्लुएन्सर जान्हवी किल्लेकरचे सूरजच्या हळदी समारंभाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मात्र लग्नातील धमाल वातावरणानंतर जान्हवीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.जान्हवीने सूरजच्या लग्नात मेंदी, हळद, साखरपुडा, लग्नाची वरात या सर्वच विधींमध्ये केलेली धमाल सोशल मीडीयावर पाहायला मिळाली. तसेच जान्हवीने सूरजच्या पत्नीसोबतही डान्स केला. जान्हवीने मनमोकळेपणाने केलेल्या सर्व मज्जा मस्तीला नजर लागल्यामुळे तिची तब्येत बिघडली असल्याचे जान्हवीने सोशल मीडीया पोस्टमध्ये लिहले आहे. तिला सध्या 'कोकिलाबेन धीरूभाई अंबानी' या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. दरम्यान सूरज चव्हाणच्या लग्नसोहळ्यात उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल चाहते जान्हवी किल्लेकरचे कौतुक करत आहेत.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 12:30 pm

मोठी बातमी: आता प्रत्येक स्मार्टफोनमध्ये संचार सारथी ॲप सरकारकडून बंधनकारक दूरसंचार विभागाकडून मोठे विधान

नवी दिल्ली: सरकारने भारतात आगामी उत्पादन घेणाऱ्या मोबाईल उत्पादक कंपन्यांना स्मार्टफोनमध्ये संचार सारथी ॲप इन्स्टॉलेशन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या उत्पादकांना हे ॲप इन्स्टॉलेशन करणे अनिवार्य असेल यामध्ये ग्राहकांच्या सुरक्षेसाठी, ग्राहकांच्या खाजगी माहितीचे संरक्षण करण्याची, व विना अडथळा ग्राहकांना वापर सुनिश्चित करण्यासाठी आणखी सर्वात मुख्य म्हणजे खाजगी डेटाचा गैरवापर टाळण्यासाठी हे पाऊल सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (DoT) विभागाने केले आहे. त्यामुळे सरकारने नुकत्याच जारी केलेल्या 'संचार साथी इनिशिएटिव' मोहीमेचे अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने काही उत्पादक व बाहेरून पार्टस अथवा स्मार्टफोन मागवणाऱ्या आयातदारांना या नियमांचे पालन बंधनकारक केले गेले आहे.सोमवारी दूरसंचार मंत्रालयाकडून जारी केले गेलेल्या निवेदनानुसार ग्राहकांना हे ॲप अनइन्स्टॉल किंवा डिसेबर करता येणार नाही असे म्हटले आहे. ज्यांना स्मार्टफोनची विक्री केली आहे अथवा नुकतेच उत्पादन केलेले आहे त्यांना सॉफ्टवेअर अपेडटमधून ॲप प्रसारित करणे बंधनकारक असणार आहे. नव्या नियमानुसार, या नियमांची अंमलबजावणी लागू झालेल्या तारखेपासून ९० दिवसात अथवा रिपोट पाठवल्यानंतर १२० दिवसात करणे उत्पादकांना बंधनकारक असेल. सायबर घोटाळे रोखण्यासाठी सरकारने हे धोरणात्मक पाऊल उचलले आहे.या ॲपचा ग्राहकांना फायदा कसा?सरकारने संचार सारथी पोर्टल व ॲप विकसित केले आहे. याला भेट व इन्स्टॉल करून ग्राहकांना यांच्या आयएमईआय (IMEI) नंबरची अस्सलता तपासता येणार आहे. याशिवाय संशयी फोन, मेसेज, संशयी सायबर क्रियांचे रिपोर्टिंग या माध्यमातून करता येणार आहे.चोरी गेलेल्या मोबाईलचा आयएमईआय तपासता येऊन स्मार्टफोन कोणाच्या नावावर आहे याची खात्रीलायक तपासणी करता येणार आहे. तसेच बँक फायनांशियल इन्स्टिट्युशनची खात्रीलायकता यातून स्पष्ट होणार आहे. ब्लॉक केलेले/काळ्या यादीतील (Black List) IMEIs संचार साथी ॲप वापरून तपासता येतात. अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही उपकरणांवर विविध सेवा मिळविण्यासाठी संचार साथी मोबाईल ॲप डाउनलोड करता येते.या नियमात आणखी काय?टेलिकॉम सायबर सिक्युरिटी (TCS) नियमांनुसार केंद्र सरकारला आता आंतरराष्ट्रीय मोबाइल उपकरण ओळख (IMEI) क्रमांक असलेल्या दूरसंचार उपकरणांच्या उत्पादकांना (Original Equipment Manufacturers OEMs) दूरसंचार उपकरणे किंवा IMEI क्रमांकाबाबत आवश्यकतेनुसार मदत करण्यासाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार आहे.नियमांमध्ये असेही म्हटले आहे की अशा उत्पादकांनी किंवा आयातदारांनी नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशांचे पालन करावे लागेल.याविषयी मंत्रालयाने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की,'डुप्लिकेट किंवा स्पूफ केलेले IMEI असलेले मोबाइल हँडसेट टेलिकॉम सायबर सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करतात. ई-कॉम नेटवर्कमध्ये स्पूफ केलेले/टॅप केलेले IMEI एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डिव्हाइसेसमध्ये काम करत असताना आणि अशा IMEI विरुद्ध कारवाई करण्यात आव्हाने निर्माण करतात. भारतात मोठ्या प्रमाणात सेकंड-हँड मोबाइल डिव्हाइस मार्केट आहे.' याशिवाय चोरीला गेलेली किंवा काळ्या यादीत टाकलेली उपकरणे पुन्हा विकली जात असल्याचेही आढळून आले आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. यामुळे खरेदीदार गुन्ह्यांमध्ये सहभागी होतो आणि त्यांचे आर्थिक नुकसान होते.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 12:30 pm

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीची तारीख पुढे ढकलली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Chief Minister Devendra Fadnavis : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. मोठ्या उत्साहात मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या निव़डणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतदानाचा निकाल जाहीर करण्यात येणार होता. पण आता ३ […] The post नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीची तारीख पुढे ढकलली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 12:19 pm

मला या गोष्टी आवडतात... श्रेयस अय्यरसोबतच्या डेटींग चर्चांवर मृणालचे उत्तर

मुंबई: बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर पुन्हा एकदा डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिचे नाव एका लोकप्रिय क्रिकेटपटूसोबत जोडले गेले आहे. काही महिन्यांपूर्वी मृणाल सुपरस्टार धनुषसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा झाली होती. दोघांनीही याविषयी कोणतेही स्पष्टीकरण दिले नव्हते. त्यानंतर आता एका ऑनलाइन पोस्टनंतर मृणालविषयी वेगळीच चर्चा रंगली. सोशल मीडीयावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, मृणाल आणि भारताचा स्टार क्रिकेटपटू श्रेयस अय्यर गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या पार्श्वभूमीवर मृणालने नुकतीच एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली असून यामुळे चाहत्यांमधील चर्चांना विरामचिन्ह मिळाले आहे.मृणालने रविवारी (३० नोव्हेंबर) इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक मजेशीर क्लिप शेअर केली. या स्टोरीच्या माध्यमातून सध्या तिच्याबद्दल सुरू असणाऱ्या गॉसिपबद्दलच ती उत्तर देत असावी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मृणालची आई डोक्याला मसाज करतेय आणि दोघीही हसत आहेत. या व्हिडीओवर तिने कॅप्शन दिले की, 'ते बोलतात आणि आम्ही हसतो. अफवा या मोफत पीआर असतात आणि मला मोफत गोष्टी आवडतात.' या कॅप्शनमुळे मृणाल तिच्या आणि श्रेयस अय्यरच्या डेटींग अफवांबद्दल कोणतेच नाव न घेता बोलत असल्याचे दिसले.https://prahaar.in/2025/12/02/pakistan-governments-big-step-discussion-about-imran-khan-banned-on-tv-internet-sons-first-reaction/काही दिवसांपूर्वी सोशल मीडीयावर अशी पोस्ट व्हायरल झालेली होती की, मृणाल आणि श्रेयस अय्यरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रेमाचे नातेसंबंध असून त्यांना हे नाते गोपनीय ठेवायचे आहे. तसेच सध्या ते त्यांच्या नात्याच्या प्राथमिक टप्प्यात असल्याचेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले होते. मात्र आता अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टनुसार, या दाव्यामध्ये काही तथ्य नसावे असे वर्तवण्यात येत आहे.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 12:10 pm

विप्रोने हर्मन समुहाच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोलूशन्स कंपनीचे अधिग्रहण केले

मोहित सोमण: विप्रो लिमिटेड (Wipro Limited) कंपनीने आज मोठी घोषणा केली आहे. कंंपनीने हर्मन समुहाच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोलूशन्स (Digital Transformation Solutions) युनिटचे अधिग्रहण (Acquisition) जाहीर केले आहे. कंपनीने यासाठी ऑगस्ट महिन्यात हालचाली सुरू केल्या असून अखेर यशस्वीपणे कंपनीने हे अधिग्रहण केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ही कंपनी विप्रो समुहाच्या अंतर्गत काम करणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या अधिग्रहणासाठी अद्याप नियामकांची (Regulatory) अंतिम मोहोर लागली नसल्याचे स्पष्ट केले. याविषयी अंतिम मंजुरी अद्याप बाकी आहे. आता नवी कंपनी विप्रो Engineering Global Business Line या नावाखाली कार्यरत असणार आहे. कंपनीने हे अधिग्रहण आपल्या डिजिटल ए आय इंटिग्रेशन तंत्रज्ञानातील इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी केले असल्याचे समजते आहे. कंपनीने हे अधिग्रहण आपली रिसर्च क्षमता वाढवून नावीन्य, शोध, रिसर्च डेव्हलपमेंट योजनेंतर्गत आपली ताकद वाढवण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, डीटीएस विप्रोमध्ये सखोल उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल परिवर्तन सेवा क्षमता आणते, ज्यामध्ये एम्बेडेड एआय, एम्बेडेड सॉफ्टवेअर, डिव्हाइस अभियांत्रिकी आणि ग्राहक अनुभव प्लॅटफॉर्ममधील मजबूत कौशल्य समाविष्ट आहे. हे अधिग्रहण डीटीएसच्या क्षमतांना विप्रोच्या कन्सल्टिंग नेतृत्वाखालील, एआय संचालित कौशल्याशी जोडेल तर हर्मनच्या एआय सोल्यूशन्सला विप्रो इंटेलिजेंस आमच्या एआय-संचालित प्लॅटफॉर्म, सोल्यूशन्स आणि परिवर्तनात्मक ऑफरिंग्जसह अखंडपणे एकत्रित करेल.यामुळे विप्रोला खऱ्या अर्थाने वेगळे आणि जोडलेले पुढील पिढीचे अनुभव देण्यास सक्षम करेलआणि अभियांत्रिकी सेवांमध्ये जागतिक आघाडीवर म्हणून त्याचे स्थान मजबूत करेल.' असे म्हटले आहे.या अधिग्रहणाविषयी बोलताना,' आम्हाला विप्रोमध्ये डीटीएस टीम आणि त्यांच्या क्लायंटचे स्वागत करताना आनंद होत आहे. डीटीएसचे अधिग्रहण विप्रोची एआय-संचालित, एंड-टू-एंड अभियांत्रिकी सेवा प्रदान करण्याची क्षमता बळकट करते'असे विप्रो लिमिटेडचे व्यवस्थापकीय भागीदार आणि जागतिक अभियांत्रिकी प्रमुख श्रीकुमार राव म्हणाले आहेत. आमच्या क्षमतांमध्ये डीटीएसची सखोल उत्पादन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान कौशल्य आणि त्यांच्या पूरक उद्योग समाधान आणि बाजारपेठेतील उपस्थितीसह आम्ही वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या लँडस्केपच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमचे अभियांत्रिकी डीएनए विकसित करत आहोत. हे अधिग्रहण मोठ्या प्रमाणात नवोन्मेष (Innovation) करण्याची, मोजता येण्याजोग्या व्यवसाय मूल्याची आणि सर्व क्षेत्रांमध्ये जटिल परिवर्तनांना समर्थन देण्याची आमची क्षमता वाढवते असेही ते पुढे म्हणाले आहेत.विप्रो ही आयटी कंपनी असून एआय आधारित तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार कंपनी आहे. कंपनी ६५ देशांमध्ये २३०००० हून अधिक कर्मचारी आणि व्यावसायिक भागीदारांसह कंपनी बाजारात कार्यरत आहे. दुपारी ११.३९ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ०.२३% घसरणीसह शेअर २४९.७० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ३.८३% वाढ झाली असली तरी इयर टू डेट (YTD) १६.८५% शेअर घसरला आहे.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 12:10 pm

Boman Irani Birthday: 44 व्या वर्षी मिळाला पहिला फिल्म ब्रेक; एका शॉर्ट फिल्मने बदलली बोमन इराणींच्या आयुष्याची दिशा

Boman Irani Birthday: बॉलिवूडचे दमदार अभिनेते बोमन इराणी आज आपला 66 वा वाढदिवस साजरा करत आहेत. करिअर लवकर सुरू केलं तरच यश मिळतं हा समज बोमन इराणींनी पूर्णपणे खोटा ठरवला आहे. त्यांनी 44 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि आज ते हिंदी सिनेमातील सर्वात भक्कम अभिनेत्यांपैकी एक आहेत. मुन्नाभाई MBBS पासून 3 इडियट्सपर्यंत त्यांच्या साकारलेल्या […] The post Boman Irani Birthday: 44 व्या वर्षी मिळाला पहिला फिल्म ब्रेक; एका शॉर्ट फिल्मने बदलली बोमन इराणींच्या आयुष्याची दिशा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 11:59 am

मोठी बातमी! नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला नाही; तर ‘या’दिवशी होणार सर्व मतमोजणी

Nagarparishad Election 2025 | राज्यात नगरपरिषद आणि नगर पंचायतीसाठी आज मतदान होत आहे. त्यानंतर या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार होते. मात्र आता नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली आहे. सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिला आहे. निवडणूक पारदर्शक राहिली पाहिजे यासाठी […] The post मोठी बातमी! नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला नाही; तर ‘या’ दिवशी होणार सर्व मतमोजणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 11:38 am

शेअर बाजाराची लाल रंगात ओपनींग! सेन्सेक्स १७० अंकांनी तर निफ्टी २६,१४५ च्या खाली

Stock Market। भारतीय शेअर बाजाराने आज आठवड्यातील दुसऱ्या सत्राला लाल रंगाने सुरुवात केली. बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५० लाल रंगात उघडले. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक ३१६.३९ अंकांनी म्हणजेच ०.३७ टक्क्यांनी घसरून ८५,३२५.५१ वर पोहोचला, तर एनएसई निफ्टी ५० ८७.८० अंकांनी म्हणजेच ०.३४ टक्क्यांनी घसरून २६,०८७.९५ वर पोहोचला. सकाळी ९:२० वाजता, सेन्सेक्स […] The post शेअर बाजाराची लाल रंगात ओपनींग! सेन्सेक्स १७० अंकांनी तर निफ्टी २६,१४५ च्या खाली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 11:19 am

सूरज चव्हाणच्या लग्नात मिरवणं पडलं महागात; जान्हवी किल्लेकर थेट रुग्णालयात दाखल! फोटो आला समोर

Janhvi Killekar : बिग बॅासच्या पाचव्या पर्वात आपली चमकदारी कामगिरी करत विजेता ठरलेला सर्वांचा लाडका सूरज चव्हाण याचा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सूरजने विवाहसोहळ्यासाठी अनेक मान्यवरांची नावे लग्नपत्रिकेत लिहिली होती. ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. अनेकांनी त्याच्या लग्नाला हजेरी लावली होती. पण या साऱ्यात अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने सर्वांचे लक्ष […] The post सूरज चव्हाणच्या लग्नात मिरवणं पडलं महागात; जान्हवी किल्लेकर थेट रुग्णालयात दाखल! फोटो आला समोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 11:14 am

kareena kapoor: सोशल मीडियावर करीनाचा धमाल खुलासा, ‘सैफ, बोलायचं होतं… पण मुलांनी थांबवलं!’

kareena kapoor: बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोड्यांपैकी एक म्हणजे करीना कपूर खान आणि सैफ अली खान. अलीकडेच करीना कपूरने आपल्या सोशल मीडिया हँडलवर पती सैफसाठी एक खास आणि मनापासून लिहिलेलं लेटर शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. करीनाचे लेटर करीनाने इंस्टाग्राम स्टोरीवर सैफसाठी काही भावनिक, तर काही मजेशीर ओळी लिहिल्या. तिने लिहिले, “हाय सैफ, मी फक्त […] The post kareena kapoor: सोशल मीडियावर करीनाचा धमाल खुलासा, ‘सैफ, बोलायचं होतं… पण मुलांनी थांबवलं!’ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 11:11 am

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल त्यांच्या पक्षात आणि त्यांच्या कुटुंबामध्ये संशय वाढत चालला आहे. अफगाणिस्तानच्या दाव्यानंतर, इम्रान खान यांच्या कथित हत्या प्रकरणामुळे राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता टीव्ही चॅनेल किंवा इंटरनेटवर इम्रान खान यांच्याबद्दल कोणतीही चर्चा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांचे दोन्ही पुत्र त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल वारंवार चिंता व्यक्त करत आहेत. तर पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते इम्रान खान यांच्या समर्थनार्थ रावळपिंडी मध्यवर्ती तुरुंगाबाहेर रात्रभर धरणे देत आहेत. तणाव इतका वाढला आहे की पाकिस्तानच्या दोन मोठ्या शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर इस्लामाबाद जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिसूचनेत इस्लामाबाद राजधानी प्रदेशात दोन महिन्यांसाठी कलम १४४ लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर रावळपिंडी उपायुक्तांच्या दुसऱ्या अधिसूचनेत सोमवारी कलम १४४ लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे रावळपिंडीमध्ये ३ डिसेंबरपर्यंत निर्बंध लागू करण्यात येत आहेत. रेड झोनसह इस्लामाबादच्या महसूल हद्दीतील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींनी एकत्र येत मेळावे, मिरवणुका आणि निदर्शने करण्यास मनाई आहे. सार्वजनिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी धोका निर्माण करणाऱ्या अशा बेकायदेशीर कारवायांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, असे इस्लामाबाद प्रशासनाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.https://prahaar.in/2025/12/02/election-update-first-phase-of-voting-begins-in-the-state-but-when-will-the-results-be-out/लंडनमध्ये राहणारे इम्रानचे सुपुत्र कासिम खान यांनी याबाबत एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की, आम्ही आमच्या वडिलांना शेवटचे नोव्हेंबर २०२२ मध्ये पाहिले होते. कुटुंब म्हणून आम्ही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांकडूनही मदत मागत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना भेटण्याची सुविधा तात्काळ सुरू करावी. डॉक्टरांना आरोग्य तपासणी करण्याची परवानगी द्यावी आणि इम्रान खानच्या प्रकृतीबद्दल अधिकृत अपडेट द्यावे. तसेच गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्या ठावठिकाणाची पुष्टी करणारा कोणताही पुरावा कुटुंबाला मिळालेला नसल्याने त्यांच्याबद्दल कोणतीच माहिती समोर आली नाही. त्यामुळे माहित न देणे हा एक प्रकारचा मानसिक छळ आहे, असा दावा त्यांनी केला आहे. कासिम यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने आठवड्यात एकदा भेट घेण्याचे आदेश दिले होते, परंतु तुरुंग प्रशासनाने सातत्याने टाळाटाळ केली आहे.कलम १४४ काय आहे?कलम १४४ लागू करणे म्हणजे कर्फ्यू लादणे. पाकिस्तानच्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ ही एक कायदेशीर तरतूद आहे जी जिल्हा प्रशासनांना मर्यादित कालावधीसाठी एखाद्या भागात चार किंवा त्याहून अधिक लोकांच्या मेळाव्यावर बंदी घालण्याचा अधिकार देते. कर्फ्यू लादून, शाहबाज सरकार इम्रान खानच्या समर्थकांना एकत्र येण्यापासून रोखण्याचे उद्दिष्ट ठेवते.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 11:10 am

HMSI Sales: हिरो मोटरसायकलची 'अटकेपार'कामगिरी गाड्यांच्या विक्रीत २५% वाढ नोंदवली

मोहित सोमण: हिरो मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) कंंपनीने आज आपली नोव्हेंबर महिन्यातील विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. कंपनीने इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २५% वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यातील ४२०६७७ युनिटची विक्री झाली होती ती इयर ऑन इयर बेसिसवर २८% वाढत ५९११३६ युनिटवर नोंदवली गेली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, दुचाकी निर्यातीत ५७४९१ युनिट्सची वाढ नोंदवली गेली आहे. इयर टू डेट (Year to Date YTD) पाहता कंपनीच्या एकूण युनिट्स विक्रीत ४२३७७४८ पर्यंत वाढ नोंदवली गेली आहे. त्यापैकी ३८१२०९६ युनिट्सची घरगुती बाजारात विक्री झाली असून उर्वरित ४२०६५२ युनिट्सची विक्री परदेशात निर्यातून झाली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.गेल्या वर्षी एकूण युनिट्स विक्रीत कंपनीने इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) घरगुती बाजारपेठेत २.९०%,निर्यातीतून ४७% व एकूणच ५.५६% वाढ नोंदवली होती. कंपनीने म्हटल्याप्रमाणे, कंपनीने मोठ्या प्रमाणात सीएसआर (Corporate Social Responsibility CSR) या उपक्रमात पण आपली उपस्थिती नोंदवली असल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. कंपनीने कोइंबतूर येथे कन्व्हेशन सेंटर उघडले असून त्यातून रोड सेफ्टी प्रकल्पात कंपनी कार्यरत असल्याचे कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे. सीएसआर (CSR) योजनेचा भाग म्हणून दिव्यांगासाठी कुशल विकास केंद्र घोषित केले.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 11:10 am

Pune Crime : पुण्यात गुंगीकारक औषधांचा मोठा साठा जप्त; दोन जण अटकेत

पुणे – नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गुंगीकारक औषधी गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल ६ हजार ९०० प्रतिबंधित गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी स्वारगेट येथील जेधे चौक परिसरात करण्यात आली. समीर हमीद शेख (४० , कोंढवा ) आणि सुनिल गजानन शर्मा (३४,रा.कोंढवा) यांना अटक करण्यात […] The post Pune Crime : पुण्यात गुंगीकारक औषधांचा मोठा साठा जप्त; दोन जण अटकेत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 10:56 am

डोनाल्ड ट्रम्प यांच्या तब्येतीविषयी मोठा खुलासा ; MRI रिपोर्टसंदर्भात व्हाईट हाऊसने दिली ‘ही’माहिती

Donald Trump Health। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजारपणा संदर्भात एक फोटो व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या फोटोवर अखेर व्हाईट हाऊसने मौन सोडत उत्तरं दिली आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा एमआरआय स्कॅन अहवाल आणि त्याचे निकाल जाहीर करण्यात आले असल्याचे संग्न्येत येत आहे. हा एमआरआय ऑक्टोबरमध्ये करण्यात आला होता आणि तो नियमित वैद्यकीय तपासणीचा भाग असल्याचे […] The post डोनाल्ड ट्रम्प यांच्या तब्येतीविषयी मोठा खुलासा ; MRI रिपोर्टसंदर्भात व्हाईट हाऊसने दिली ‘ही’ माहिती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 10:54 am

शिंदेसेनेच्या आमदाराकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग; मतदान केंद्रातच घोषणाबाजी

Santosh Bangar | राज्यातील २२६ नगर परिषदा आणि ३८ नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी सकाळीच मतदान करण्यास पसंती दिली आहे. त्यानुसार अनेक मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी झाली आहे. हिंगोलीतील कळमनुरी येथेही मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र शिवसेना शिंदेसेनेच्या आमदारांकडूनच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाला आहे. शिवसनेचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार […] The post शिंदेसेनेच्या आमदाराकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग; मतदान केंद्रातच घोषणाबाजी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 10:47 am

ठाकरे गटाच्या नेत्याकडून एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ पोस्ट; बॅगेत पैसे भरून आणल्याचा गंभीर आरोप, संजय राऊत म्हणाले…

Vaibhav Naik : गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकारण महाराष्ट्रात चर्चिले जात आहे. विशेषकरून मालवणमधील राजकारण तापले असून, काल मध्यरात्री पोलिसांना एका गाडीत तपासणीवेळी दीड लाखांची रोकड सापडली. या प्रकाराची माहिती शिवसेना पक्षाचे आमदार निलेश राणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी थेट मालवण पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पुन्हा एकदा पैसे वाटप करण्यात आल्याचा […] The post ठाकरे गटाच्या नेत्याकडून एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ पोस्ट; बॅगेत पैसे भरून आणल्याचा गंभीर आरोप, संजय राऊत म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 10:44 am

Shahid kapoor: तीन वर्षांच्या वयातच पालक वेगळे; ‘स्टार किड’ असूनही शाहिद कपूरला कधी मिळाला नाही फायदा

Shahid kapoor: बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता शाहिद कपूर सध्या अनेक नवीन प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. आज तो लाखोंच्या पसंतीचा कलाकार आहे, पण या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी शाहिदने खूप संघर्ष केला आहे. एका पॉडकास्टमध्ये त्याने आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक आठवणी आणि अनुभव स्पष्टपणे सांगितले. लहानपणीच पालकांचा घटस्फोट शाहिद म्हणाला की, जेव्हा ते फक्त 3-4 वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या आई-वडिलांचा […] The post Shahid kapoor: तीन वर्षांच्या वयातच पालक वेगळे; ‘स्टार किड’ असूनही शाहिद कपूरला कधी मिळाला नाही फायदा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 10:36 am

तुमच्या मोबाईलमध्ये डिलिट करता न येणारे ‘हे’ऍप प्री-इंस्टॉल होणार ; सरकारचा आदेश अन् विरोधकांचा आक्षेप

Sanchar Saathi। देशातील मोबाइल सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी, दूरसंचार विभागानं एक नवीन निर्देश जारी केला आहे. या निर्देशानुसार, भारतात उत्पादित होणाऱ्या किंवा परदेशातून आयात केलेल्या प्रत्येक नवीन स्मार्टफोनमध्ये आता संचार साथी अॅप प्री-इंस्टॉल केलेले असेल. सर्व मोबाइल उत्पादक आणि आयातदारांना हा नियम त्वरित लागू करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. संचार […] The post तुमच्या मोबाईलमध्ये डिलिट करता न येणारे ‘हे’ ऍप प्री-इंस्टॉल होणार ; सरकारचा आदेश अन् विरोधकांचा आक्षेप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 2 Dec 2025 10:31 am

Bomb Threat : 'बॉम्ब'च्या धमकीने इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : हैदराबादहून कुवैतकडे जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सच्या एका विमानाला धमकीचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी सकाळी मुंबईत तात्काळ इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या धमकीमध्ये विमानात 'मानवी बॉम्ब' असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती, ज्यामुळे तातडीने सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले. मंगळवारी (०२ डिसेंबर, २०२५) सकाळी इंडिगोच्या एका विमानाने हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (RGIA) कुवैतकडे जाण्यासाठी उड्डाण केले. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच सुरक्षा यंत्रणांना एक धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. यात विमानात बॉम्ब असल्याची गंभीर धमकी देण्यात आली होती. या माहितीची सत्यता तपासण्यासाठी कोणतीही जोखीम न घेता, एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ने तात्काळ कार्यवाही करत विमानाला मुंबईच्या दिशेने वळवले आणि इमर्जन्सी लँडिंगसाठी सूचना दिल्या. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. लँडिंग होताच, विमानाला तत्काळ एअरपोर्टच्या आयसोलेशन बे (Isolation Bay) मध्ये पाठवण्यात आले. विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि त्यांच्यासाठी पर्यायी प्रवासाची व्यवस्था केली जात आहे. सध्या सुरक्षा यंत्रणा, बॉम्ब निकामी पथक (Bomb Disposal Squad) आणि तपास यंत्रणा विमानाची कसून तपासणी करत आहेत आणि धमकीचा ई-मेल नेमका कुठून आला याचा तपास सुरू आहे. या संवेदनशील घटनेमुळे विमानतळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र एटीसी आणि सुरक्षा पथकाच्या तत्परतेमुळे मोठे संकट टळले आहे.https://prahaar.in/2025/12/02/election-update-first-phase-of-voting-begins-in-the-state-but-when-will-the-results-be-out/'बॉम्ब' धमकी खोटी ठरली? इंडिगो विमानाची कसून तपासणीसुरक्षित लँडिंगनंतर विमानाला तात्काळ एअरपोर्टच्या आयसोलेशन (वेगळ्या पार्किंग) बे मध्ये नेण्यात आले. बॉम्ब निकामी पथक (Bomb Disposal Squad), सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्योरिटी फोर्स (CISF), आणि अन्य विशेष सुरक्षा पथकांनी (Security Teams) विमानाची कसून तपासणी सुरू केली. तपास करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाची प्रारंभिक तपासणी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत कुठलीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटकं (Explosives) सापडलेली नाहीत. धमकीचा ई-मेल खोटा (Hoax) असल्याची शक्यता बळावली असून, सुरक्षा यंत्रणा आता हा ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा किंवा गटाचा शोध घेत आहेत. या तपासामुळे प्रवाशांना आणि विमानतळ प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. विमानाची संपूर्ण तपासणी झाल्यावर प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल.

फीड फीडबर्नर 2 Dec 2025 10:30 am