SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

30    C
... ...View News by News Source

महाविकास आघाडीचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

मतदारयाद्या सदोष मुद्द्यांवर तपशीलवार खुलासा मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मतदारयाद्या सदोष असल्याचा महाविकास आघाडी आणि मनसेचा आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. विरोधकांनी आक्षेप घेतलेल्या मुद्द्यांवर निवडणूक आयोगाकडून तपशीलवार खुलासा करण्यात आला आहे.विरोधकांच्या आक्षेपांची दखल घेत मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी राज्यातील सबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून मतदार यादीबाबतचे विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले असून मतदार याद्या अचूक राहण्यासाठी राजकीय पक्षांनाच जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केंद्र निहाय प्रतिनिधी नेमण्याची सूचना केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारुप मतदार यादीत काही त्रुटी असल्यास राजकीय पक्षांनी मतदान केंद्र निहाय प्रतिनिधींच्या माध्यमातून या त्रुटी मतदान नोंदणी अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणाव्यात, त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केंद्र निहाय प्रतिनिधी नेमावेत अशी सूचनाही राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांकरिता राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ पर्यंत अद्यावत असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या वापरण्याचा निर्णय घेतला असून त्या याद्या प्रभाग निहाय विभागून प्रसिध्द केलेल्या आहेत. तसेच त्यावर हरकती सूचना मागविलेल्या आहेत. त्यामुळे या यादीमध्ये एकाच व्यक्तीची नावे अनेकवेळा असणे, मतदाराचे नांव, वय, पत्ता यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याबाबत सबंधित विधानसभा मतदार संघाच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे अर्ज करावा अशी सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यानी केली आहे.नाशिक मध्य मतदारसंघात एका घरात ८०० मतदार असल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला होता. हा परिसर दीड हजार चौरस मीटरचा आहे. या ठिकाणी ७०० निवासी वा अनिवासी बांधकामे आहेत. या घरांना कोणताही क्रमांक नसल्याने मतदारामंसोर समान घराचा उल्लेख करण्यात आल्याचा खुलासा निवडणूक आयोगाने केला आहे. अमरावती जिल्ह्यातील वडनेरा मतदारसंघात ४५० मतदारांचे घर क्रमांक शून्य दाखविण्यात आल्याचा विरोधकांचा आक्षेप होता. हे सारे मतदार झोपडपट्टी किंवा पाल टाकून राहतात. त्यांना महानगरपालिकेकडून घर क्रमांक देण्यात आलेले नाहीत. मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी केलेल्या अर्जात घराचा क्रमांक नमूद केलेले नाही. म्हणून त्या ठिकाणी शून्य क्रमांक दाखविण्यात आल्याचा निवडणूक आयोगाने म्हटले आहे. अन्य काही आक्षेपांवरही निवडणूक आयोगाने खुलासा केला आहे.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 11:10 pm

अक्षय कुमारच्या डीपफेक व्हिडिओवर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, सोशल मीडियावरून व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश!

मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा पर्याय सर्वांना सहज उपलब्ध असल्यामुळे त्याचा वापर वाढला आहे. त्यात सोशल मीडियामुळे कोणतीही गोष्ट वाऱ्यासारखी काही क्षणात पसरते. त्यामुळे एआयचा गैरवापर करून सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवण्याचे प्रकार वाढले आहेत. ज्यात अनेक सेलिब्रिटी अडकले जातात. बॉलिवूड स्टार अक्षय कुमार बाबतही हेच घडले. ज्यावर कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे.काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यात अक्षय महर्षी वाल्मिकींच्या वेशात दिसत होता. या खोट्या व्हिडीओनंतर अक्षयने न्यायालयात धाव घेतली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय कुमारच्या प्रतिमेचा व व्यक्तिमत्व हक्कांचा भंग करणारे डीपफेक व्हिडीओ आणि एआय कंटेंट तत्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अशा सामग्रीचा प्रसार करणाऱ्या अज्ञात व्यक्ती आणि काही ई-कॉमर्स साइट्सविरुद्ध कारवाईचे निर्देश दिले आहेत. यामुळे अक्षय कुमारला मोठा दिलासा मिळाला आहे.https://prahaar.in/2025/10/17/hasiyajatra-fame-actor-appeals-for-education-for-needy-students-wins-fans-hearts/डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अक्षयने त्याचा सोशल मीडिया खात्यावरून निवेदन केले होते. ज्यात तो म्हणाला होता की, एआयच्या मदतीने तयार केलेला व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात मला महर्षी वाल्मिकी म्हणून दाखवले आहे. पण हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा आहे. माध्यमांनीही त्यावरून बातम्या केल्या, जे चुकीचे आहे. कृपया अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी त्याची सत्यता तपासा.दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांना हा व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. असे व्हिडिओ पुन्हा अपलोड होऊ नयेत यासाठी कडक देखरेख यंत्रणांनाही न्यायालयाने राबवली आहे. यापूर्वी अशा चुकीच्या डीपफेकचा फटका दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला बसला होता.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 11:10 pm

Ranji Trophy 2025 : ऋतुराज-पृथ्वीच्या खेळीवर पावसाने फेरलं पाणी, महाराष्ट्र-केरळ सामना अनिर्णीत!

MAH vs KER Ranji Trophy 2025 Match Draw : महाराष्ट्र आणि केरळ यांच्यातील रणजी ट्रॉफीचा सामना पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे अखेर अनिर्णीत राहिला. चारही दिवस पावसाने हजेरी लावल्याने खेळाला मोठा अडथळा निर्माण झाला. पहिल्या डावात आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशानंतरही महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत २० धावांची आघाडी मिळवली होती. पहिल्या डावात महाराष्ट्राला ऋतुराजने सावरले – महाराष्ट्राने पहिल्या […] The post Ranji Trophy 2025 : ऋतुराज-पृथ्वीच्या खेळीवर पावसाने फेरलं पाणी, महाराष्ट्र-केरळ सामना अनिर्णीत! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 10:41 pm

भारत-अमेरिका व्यापार चर्चेला वेग; शेतकरी आणि लघुउद्योजकांच्या हिताशी तडजोड नाही – वाणिज्य मंत्रालय

नवी दिल्ली – भारत सरकार अमेरिकेबरोबर व्यापार करार करण्यासंदर्भात चर्चा करीत आहे. ही चर्चा सौदार्हपुर्ण पूर्ण वातावरणात चालू आहे. मात्र असे असले तरी भारत करार करताना शेतकरी आणि लघुउद्योजकांच्या हिताशी कसलीही तडजोड करणार नाही असे वाणिज्य मंत्रालयाने पुन्हा स्पष्ट केले आहे. या दोन विषयावरूनच अमेरिका आणि भारत सरकार दरम्यान मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे शिष्टमंडळ […] The post भारत-अमेरिका व्यापार चर्चेला वेग; शेतकरी आणि लघुउद्योजकांच्या हिताशी तडजोड नाही – वाणिज्य मंत्रालय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 10:38 pm

Bihar Politics : मोदींची स्तुती केल्याने आधी आऊट; आता तिकीट

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाने (जेडीयू) विधानसभेच्या एका मतदारसंघातील उमेदवार बदलला. त्या जागी माजी खासदार साबीर अली यांना उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याबद्दल जेडीयूने ११ वर्षांपूर्वी अली यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. बिहारमधील अमौर मतदारसंघातून याआधी जेडीयूने सबा जफर यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, अचानकपणे त्यांचा […] The post Bihar Politics : मोदींची स्तुती केल्याने आधी आऊट; आता तिकीट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 10:32 pm

रिझर्व बँकांनी खरेदी केले 600 टन सोने ; किंमती आणखी वाढणार!

मुंबई – जागतिक अनिश्चित आर्थिक परिस्थितीमुळे विविध देशातील विशेषतः आशिया खंडातील देशाच्या रिझर्व बँकांकडून सोने खरेदी वाढली आहे. विविध देशांदरम्यान संघर्षाचे वातावरण कायम आहे. अमेरिकेत मंदीसदृश्य परिस्थितीमुळे व्याजदर कपात होणार आहे. अशा परिस्थितीत जागतिक बाजारात सोन्याचा दर नजीकच्या काळात 5,500 डॉलर व चांदीचा दर 75 डॉलर प्रति औंस या पातळीवर जाऊ शकतो. ही माहिती मोतीलाल […] The post रिझर्व बँकांनी खरेदी केले 600 टन सोने ; किंमती आणखी वाढणार! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 10:24 pm

Bihar Assembly Election: बिहार विधानसभेसाठी काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी

Bihar Assembly Election: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने शनिवारी रात्री उशिरा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत पाच उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. यापूर्वी पक्षाने ४८ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे आतापर्यंत काँग्रेसने एकूण ५३ जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. यादीतील उमेदवार आणि मतदारसंघ: काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीनुसार, खालील उमेदवारांना […] The post Bihar Assembly Election: बिहार विधानसभेसाठी काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 10:16 pm

आगळीक कराल तर याद राखा; पाकिस्तानची इंच न् इंच जमीन 'ब्रह्मोस'च्या टप्प्यात

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारालखनऊमध्ये 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी तयार; संरक्षण क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरता सिद्धनवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर फक्त एक ट्रेलर होता, पाकिस्तानच्या जमिनीचा प्रत्येक इंच भाग आमच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या कक्षेत आहे’, असा इशारा भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी दिला.जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. मात्र, त्यानंतर अद्यापही पाकिस्तानकडून भारताविरोधात गरळ ओकण्याचे काम सुरूच आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हे भारताच्या विरोधात सातत्याने वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. मात्र, आता भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा ठणकावले आहे.भारताला खात्री आहे की आपले शत्रू आता ब्राह्मोसपासून सुटू शकणार नाहीत. पाकिस्तानी भूभागाचा प्रत्येक इंच आता आपल्या ब्राह्मोसच्या आवाक्यात आहे. आता आपल्याला आपल्या क्षमता आणखी वाढवण्याची गरज आहे. तो ऑपरेशन फक्त एक ट्रेलर होता. पण त्या ट्रेलरनेच पाकिस्तानला पुढे काय होऊ शकते याची जाणीव करून दिली आहे, असे त्यांनी सांगितले.संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाला बळकट करत, संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संयुक्तपणे लखनऊ येथील ब्रह्मोस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सेंटर (BrahMos Integration and Testing Facility Centre) मध्ये उत्पादित केलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला.या अत्याधुनिक सुविधेचे, जे यूपी डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा एक महत्त्वाचा भाग आहे, ११ मे रोजी संरक्षण मंत्र्यांनी व्हर्च्युअल उद्घाटन केले होते. पाच महिन्यांच्या आत, क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी तैनातीसाठी तयार झाली. सिंह यांनी ब्रह्मोसला केवळ एक क्षेपणास्त्र नाही, तर देशाच्या वाढत्या स्वदेशी क्षमतेचे प्रतीक म्हणून वर्णन केले.या क्षेपणास्त्रात पारंपरिक वॉरहेड आणि प्रगत मार्गदर्शित प्रणाली (advanced guided system) आहे आणि त्यात सुपरसोनिक वेगाने (supersonic speeds) लांब पल्ल्यावर हल्ला करण्याची क्षमता आहे. वेग, अचूकता आणि शक्ती यांचा हा मिलाफ ब्रह्मोसला जगातील सर्वोत्तम प्रणाल्यांपैकी एक बनवतो. ते आपल्या सशस्त्र दलांचा कणा बनले आहे, असे ते म्हणाले.आज भारत अशा टप्प्यावर उभा आहे जिथे तो आपली सुरक्षा मजबूत करत आहे आणि जगाला दाखवून देत आहे की तो संरक्षण आणि तंत्रज्ञानातील विश्वासार्ह भागीदार आहे, यावर त्यांनी भर दिला. ब्रह्मोससारख्या यशामुळे मेक-इन-इंडिया आता केवळ एक घोषणा नसून, एक जागतिक ब्रँड बनला आहे, हे सिद्ध झाले आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.ब्रह्मोसची फिलिपिन्सला निर्यात असो किंवा भविष्यात इतर देशांसोबतचे सहकार्य असो, भारत आता केवळ घेणाऱ्याची नव्हे, तर देणाऱ्याची भूमिका बजावत आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ज्या दृष्टिकोनाने आपला प्रवास सुरू केला, त्या आत्मनिर्भर भारताची हीच खरी ओळख आहे. २०२४ पर्यंत पूर्णपणे विकसित, आत्मनिर्भर आणि जगाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज असलेल्या भारताचा दृष्टिकोन पंतप्रधान मोदींनी आपल्याला दिला आहे. या प्रयत्नात संरक्षण क्षेत्राची भूमिका निर्णायक असेल, असे ते म्हणाले.सिंह यांनी माहिती दिली की, ब्रह्मोस टीमने गेल्या महिन्यात दोन देशांसोबत अंदाजे ४,००० कोटी रुपयांच्या करारांवर स्वाक्षरी केली आहे. येत्या वर्षांत अनेक देशांतील तज्ज्ञ लखनऊला भेट देतील, ज्यामुळे हे शहर ज्ञान आणि संरक्षण तंत्रज्ञानाचे केंद्र बनेल, असे त्यांनी सांगितले.ब्रह्मोसच्या लखनऊ युनिटची उलाढाल पुढील आर्थिक वर्षापासून सुमारे ३,००० कोटी रुपये असेल आणि जीएसटी संकलन सुमारे ५०० कोटी रुपये असेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.३८० कोटी रुपयांच्या एकूण खर्चाने बांधलेल्या २०० एकरच्या ब्रह्मोस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सेंटरबद्दल सिंह म्हणाले की, हा प्रकल्प केवळ एक संरक्षण सुविधा नाही, तर रोजगार आणि विकासाचा एक नवीन मार्ग आहे. उत्पादनाच्या दृष्टीने, या सुविधेत दरवर्षी अंदाजे १०० क्षेपणास्त्र प्रणाली तयार केल्या जातील. उत्तर प्रदेशात येत असलेली गुंतवणूक आणि राज्यात होत असलेली प्रगती पाहता, हा प्रदेश विकास आणि संरक्षण या दोन्हीच्या नवीन युगाचे प्रतीक बनण्यास सज्ज आहे, असे ते म्हणाले.काही देशांकडून संरक्षण सुटे भाग (spare parts) पुरवठा साखळीच्या समस्यांबाबतच्या अहवालांचा संदर्भ देत, त्यांनी मोठ्या शस्त्र प्रणालीच्या एकत्रीकरणासाठी आवश्यक असलेल्या हजारो घटक आणि तंत्रज्ञान तयार करणाऱ्या लहान उद्योगांना मजबूत करण्याची आणि इतरांवरील अवलंबित्व कमी करण्याची गरज अधोरेखित केली.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 10:10 pm

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का, 'या'बड्या नेत्याने दिले पक्षांतराचे संकेत

मुंबई: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय पक्षांची निवडणुकीच्या दिशेने तयारी सुरू झाली आहे. यात पक्षांतराला सुद्धा वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील राजन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती स्वत: राजन पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसणार आहे.राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीने एकत्रितपणे लोकसभा आणि विधानसभा लढवल्या. यावेळी महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला. मात्र आता महायुतीमधील नेते एका घटक पक्षातून दुसऱ्या घटक पक्षात पक्षांतर करताना दिसून येत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार की स्वतंत्र पक्ष म्हणुन लढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.https://prahaar.in/2025/10/18/senior-congress-leader-meets-chief-minister-devendra-fadanvis/#google_vignetteदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजन पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाचे संकते दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरु असलेल्या कारभाराविरोधात राजन पाटील यांनी व्यक्त केलेल्या नाराजीतून पक्षांतर निर्णय घेतल्याचे लक्षात येते.माध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर पाटलांनी टीका केली आहे. मी छोट्या माणसाबद्दल बोलत नाही, अशा शब्दात राजन पाटील यांनी उमेश पाटील यांच्यावर नेम साधला. तसेच माजी आमदार यशवंत माने हे निष्ठावंत आहेत. त्यामुळे ते देखील भाजपमध्ये येतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक पार्श्वभूमीवर अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 10:10 pm

'या'महिलांना पोटगी मिळणार नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : घटस्फोट प्रकरणात पोटगी हा महत्वाचा मुद्दा असतो. वैवाहिक भांडणे न्यायालयात सादर झाल्यावर पोटगी वरून अनेक वाद बघायला मिळतात. सगळ्याच बाजूने विचार केला तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अशातच, दिल्ली उच्च न्यायालयाने या महत्वाच्या मुद्द्याचा निकाल लावला आहे. जोडीदार जर स्वतंत्र आणि स्वावलंबी असेल तर पोटगी देता येणार नाही, असा महत्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.१७ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती अनिल क्षेत्रपाल आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथ यांनी एका खटल्याचा निकाल लावला. भारतीय वाहतूक सेवेच्या गट अ च्या कर्मचारी यांनी मांडलेल्या मुद्यांवर सुनावणी करण्यात आली.केस नक्की काय होती ?एका वकिलाबरोबर २०१० साली रेल्वे मध्ये अधिकारी असलेल्या महिलेचे लग्न झाले होते. २०२३ साली मानसिक छळामुळे त्यांचा घटस्फोट झाल्याचे समोर आले. पण घटस्फोटाच्या दरम्यान पतीने पोटगी देण्यास नाकारले. त्यामुळे, पत्नीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.याचिका दाखल झाल्यावर पतीने पत्नीवर मानसिक छळाचे आरोप केले व अपशब्द , अपमानास्पद बोलणे, व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात बदनामी करणे यांसारखे आरोप केले गेले. त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला पण पत्नीने ५० लाखांची मागणी केली व तिच्या प्रतिज्ञापत्रातही ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे.उच्च न्यायालयाचे म्हणणे काय होते ?हिंदू विवाह कायदा कलम २५ चा दाखला देत उच्च न्यायालयाने घटस्फोट झालेल्या महिलेला पोटगी देण्यात येणार आहे. पतीचे वेतन, मालमत्ता , उत्पन्न , कमाई क्षमता , आणि सारासार विचार करून पोटगी निश्चित केली जाईल. परंतु पत्नी जर स्वावलंबी असेल तर पोटगी दिली नाही, जाणार असेही न्यायालयाने म्हटले.न्यायमूर्ती अनिल क्षेत्रपाल आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथ यांच्या म्हणण्यानुसार कलम २५ हे सर्वांना आर्थिक न्याय मिळून देते. घटस्फोटानंतर ज्याच्याकडे उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नसलेला पक्ष निराधार होणार नाही याची खात्री केली जाते. तसेच पत्नी स्वावलंबी असेल तर पतीवर अन्याय होऊ देत नाही.सध्याच्या केस मध्ये पत्नी ही स्वावलंबी व रेल्वे अधिकारी असल्यामुळे ती स्वतःचे पालनपोषण करू शकते. त्याचबरोबर, आर्थिक असमर्थता आणि दबाव यांचा कोणताच पुरावा नसल्यामुळे पत्नीने मांडलेली पोटगीची याचिका रद्द करण्यात आली.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 10:10 pm

प्रेम बिर्‍हाडेचा 'नोकरी'चा दावा खोटा? कॉलेजने उघड केले धक्कादायक सत्य!

पुणे: लंडनमध्ये आपली नोकरी गमावल्याचा भावनिक दावा करत समाजमाध्यमांवर प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या प्रेम बिर्‍हाडे प्रकरणात आता एक नवे आणि धक्कादायक वळण आले आहे. प्रेमच्या दाव्यांमुळे समाजात गोंधळ निर्माण झाला होता, मात्र आता पुण्यातील मॉडर्न कॉलेज प्रशासन आणि एका वरिष्ठ प्राध्यापकांनी यामागील वास्तव सत्य समोर आणले आहे. यामुळे प्रेमचे सर्व दावे दिशाभूल करणारे असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.प्रेम बिर्‍हाडे याने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तो लंडनमधील आपल्या कंपनीबाहेर उभा राहून आपले आयडी कार्ड परत करत असल्याचे दाखवत होता. त्याने रडत-रडत दावा केला की, पुण्यातील मॉडर्न कॉलेजने त्याच्या शैक्षणिक पात्रतेची पडताळणी करण्यास नकार दिल्यामुळे त्याला ही नोकरी गमवावी लागली आहे. हे केवळ एक नोकरी गमावणे नाही, तर माझ्या कुटुंबाच्या संघर्षावर पाणी फेरण्यासारखे आहे, असे भावनिक शब्द त्याने वापरले होते.परंतु, या प्रकरणात आता मॉडर्न कॉलेजने अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली आहे. कॉलेजचे प्राध्यापक श्यामकांत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम बिर्‍हाडे याची नोकरी गेलेली नाही, असा स्पष्ट संदेश कॉलेजला संबंधित कंपनीकडून ई-मेलद्वारे प्राप्त झाला आहे. देशमुख यांनी सांगितले की, आम्ही सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे कंपनीला वेळेत पाठवली आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत काही गैरसमज झाले असले तरी, विद्यार्थ्याची कोणतीही हानी झालेली नाही.यादरम्यान, देशमुख यांनी हेही स्पष्ट केले की, प्रेमला कोणत्याही प्रकारे जात विचारण्यात आली नव्हती आणि या संपूर्ण प्रक्रियेत कोणताही भेदभाव झालेला नाही. जर कॉलेजमधील कर्मचाऱ्यांकडून काही चूक झाल्याचे आढळले, तर कॉलेज त्यावर निश्चितपणे कारवाई करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.कॉलेज प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रेम बिर्‍हाडेला आवश्यक असणारे प्रमाणपत्र १४ ऑक्टोबर रोजीच देण्यात आले होते. मात्र, तरीही त्याने सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून कॉलेजची बदनामी केली, असा थेट आरोप कॉलेज प्रशासनाने केला आहे.या प्रकरणात कॉलेज परिसरात विविध सामाजिक आणि विद्यार्थी संघटनांनी मोठी आंदोलने केली होती. परंतु, आता जेव्हा कंपनीनेच प्रेमची नोकरी कायम असल्याचे स्पष्ट केले आहे, तेव्हा या आंदोलनामागील सत्य काय होते, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.सोशल मीडियावर कोणत्याही संस्थांवर किंवा व्यक्तींवर आरोप करण्याआधी योग्य तथ्यांची खात्री करणे आणि वस्तुस्थितीची पूर्ण माहिती घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या प्रकरणावरुन स्पष्ट जाणवत आहे.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 10:10 pm

Newasa News : अहिल्यानगर –छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वडाळा बहिरोबा येथे चालत्या कार’ने घेतला पेट

नेवासा : अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील खारा आणि गोडा पुलाजवळ शनिवारी (१८ ऑक्टोबर २०२५) सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास दादापाटील मोटे यांच्या वस्तीसमोर हुंदाई कंपनीच्या हेन्यु मॉडेलच्या पेट्रोल कारला आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली. सुदैवाने, चालकाने प्रसंगावधान […] The post Newasa News : अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वडाळा बहिरोबा येथे चालत्या कार’ने घेतला पेट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 10:09 pm

Steven Smith : …तर पॅट कमिन्सच्या जागी स्टीव्हन स्मिथ करणार ऑस्ट्रेलियाच नेतृत्त्व, नेमकं कारण काय? जाणून घ्या

Steven Smith set to lead Australia in Test : भारतीय क्रिकेट संघ रविवार, १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात करणार आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघ टी-२० मालिकेत आमनेसामने येतील. या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया पुढील महिन्यापासून आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेस कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. …तर स्टीव्हन स्मिथकडे […] The post Steven Smith : …तर पॅट कमिन्सच्या जागी स्टीव्हन स्मिथ करणार ऑस्ट्रेलियाच नेतृत्त्व, नेमकं कारण काय? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 10:07 pm

नीलेश घायवळच्या घरझडतीत सापडला ‘ॲम्युनेशन बॉक्स’

पुणे : गुंड नीलेश घायवळ याच्यावर पुणे पोलिसांकडून आतापर्यंत वेगवेगळ्या गंभीर प्रकाराचे दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून नीलेशची आर्थिक बाजू कमकुवत करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी गुंड निलेश घायवळच्या कोथरूड परिसरातील घराची झडती घेतली. या कारवाईत दोन काडतुसे तसेच चार पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी घायवळविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात […] The post नीलेश घायवळच्या घरझडतीत सापडला ‘ॲम्युनेशन बॉक्स’ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 9:57 pm

श्रीधर गायकवाड पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे नवे अध्यक्ष; उपाध्यक्षपदी बिपीनकुमार शहा

मुंबई – पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि., पुणेचे जेष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सीए जनार्दन रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संचालक मंडळाच्या सभेत सन 2025-26 या वर्षासाठी श्रीधर गायकवाड यांची अध्यक्ष पदी व बिपीनकुमार शहा यांची उपाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली. श्रीधर गायकवाड हे यशस्वी उद्योजक असुन श्रीधर फॅब्रिकेशन या मान्यताप्राप्त कंपनीचे संस्थापक आहेत. […] The post श्रीधर गायकवाड पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे नवे अध्यक्ष; उपाध्यक्षपदी बिपीनकुमार शहा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 9:40 pm

दिवाळीनिमित्त पीएनजी एक्सक्लुझिव्हकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक सवलती

मुंबई – दिवाळी आली की सोन्याचांदीच्या दागिन्यांची खरेदी हमखास होतेच. याचेच औचित्य साधून पीएनजी एक्सक्लुझिव्हने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीनिमीत्त खास ऑफर आणली आहे. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 50% फ्लॅट सूट, हिर्‍यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100% फ्लॅट सूट, चांदीच्या वस्तूंच्या घडणावळीवर फ्लॅट 25% सूट आणि चांदीच्या फॅन्सी दागिन्यांच्या चठझ वर फ्लॅट 25% सुट देण्यात आली आहे. याबद्दल बोलताना […] The post दिवाळीनिमित्त पीएनजी एक्सक्लुझिव्हकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक सवलती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 9:34 pm

Chirag Paswan : एनडीएच्या जागावाटपात सन्मानजनक वाटा मिळाल्याने चिराग खुश

पाटणा : बिहारमधील सत्ताधारी एनडीएच्या जागावाटपात लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास) सन्मानजनक वाटा मिळाला. त्यामुळे त्या पक्षाचे नेतृत्व करणारे केंद्रीय मंत्री चिराग पासवान खुश झाले आहेत. त्यांनी मोठ्या मनाने लहान पक्षांना सामावून घेतल्याबद्दल भाजप, जेडीयू या एनडीएमधील प्रमुख पक्षांचे आभार मानले आहेत. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. भाजप आणि जेडीयू प्रत्येकी १०१ जागा लढवणार आहेत. […] The post Chirag Paswan : एनडीएच्या जागावाटपात सन्मानजनक वाटा मिळाल्याने चिराग खुश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 9:32 pm

सणासुदीच्या बाजारात ७ लाख कोटींची ऐतिहासिक खरेदी; मोदींच्या जीएसटी कपातीचा 'जादुई'प्रभाव!

महागाई ८ वर्षांच्या नीचांकी पातळीवरनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जीएसटी दर कपातीच्या धोरणात्मक निर्णयामुळे ग्राहक खर्चाची अभूतपूर्व लाट उसळली आहे, ज्यामुळे यावर्षीची नवरात्री अलीकडच्या काळातील सर्वात शानदार खरेदी महोत्सवांपैकी एक ठरली आहे आणि ऐतिहासिक दिवाळी बोनसची अपेक्षा वाढवली आहे.महागाई आठ वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणि अन्नधान्य महागाई नकारात्मक पातळीवर (-२.३ टक्के) गेल्याने, देशभरातील कुटुंबांच्या खिशाला मोठा दिलासा मिळाला. या आर्थिक दिलासामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि खर्चात मोठी वाढ झाली.हा परिणाम तात्काळ आणि नाट्यमय होता. सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात ७ लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे, जो गेल्या अनेक वर्षांतील भारतातील सर्वात मोठा ग्राहक खर्च आहे. जीएसटी कपातीमुळे झालेल्या बचतीचा फायदा घेण्यासाठी खरेदीदारांनी धाव घेतल्याने, डिजिटल पेमेंट एका रात्रीत २१ सप्टेंबर रोजीच्या १.१८ लाख कोटी रुपयांवरून २२ सप्टेंबर रोजीच्या ११.३१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.एकट्या दिल्लीत सणासुदीची विक्री ७५,००० कोटी रुपयांवर पोहोचल्याचा अंदाज आहे, तर अहमदाबादमध्ये २,५०० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या कपड्यांवरील जीएसटी कपातीनंतर कापसाच्या फॅब्रिकच्या मागणीत सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली.या धोरणात्मक निर्णयांनी केवळ किंमतीच कमी केल्या नाहीत, तर स्थानिक पुरवठा साखळ्यांना पुनरुज्जीवित केले आणि मेक इन इंडिया चळवळीला बाजारपेठेत आपले वर्चस्व पुन्हा मिळवण्यासाठी सशक्त केले. ऑटोमोबाइल क्षेत्राने गेल्या दशकातील आपली सर्वोत्तम नवरात्री विक्री नोंदवली. मारुती सुझुकीने गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट विक्री करत अवघ्या आठ दिवसांत १.६५ लाख वाहने विकली, ज्यात अष्टमीच्या दिवशी ३०,००० कारची विक्रमी विक्री समाविष्ट आहे, जो गेल्या ३५ वर्षांतील सर्वात मोठा एका दिवसाचा आकडा आहे.महिंद्रा अँड महिंद्राने एसयूव्ही विक्रीत ६० टक्के वाढ पाहिली, ज्यात XUV700 आणि Scorpio N अग्रस्थानी होत्या. टाटा मोटर्सने ५०,००० हून अधिक वाहने विकली, तर दुचाकी क्षेत्रातील दिग्गज हिरो मोटोकॉर्प आणि बजाज ऑटोने गेल्या वर्षीच्या तुलनेत शोरूममध्ये दोन पटीने जास्त ग्राहक आल्याची नोंद केली.फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन्स (FADA) ने नवरात्रीतील ऑटो विक्रीत ३४ टक्क्यांची ऐतिहासिक वाढ झाल्याचे कौतुक केले, याचे श्रेय जीएसटी सुधारणा आणि ग्राहकांच्या वाढलेल्या आत्मविश्वासाला दिले. ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स देखील या सणासुदीच्या तेजात चमकले.जीएसटी कपातीनंतर टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनच्या विक्रीत मोठी वाढ झाली, ज्यात प्रीमियम उत्पादनांच्या श्रेणीत ४०–४५ टक्के वाढ झाली. हायरने ८५ टक्के वाढ नोंदवली, ज्यामुळे त्यांच्या मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीचा साठा जवळजवळ संपला. रिलायन्स रिटेल, विजय सेल्स, एलजी आणि गोदरेज अप्लायन्सेस या सर्वांनी मजबूत दोन-अंकी वाढ नोंदवली.जीएसटी-प्रेरित खरेदीच्या लाटेमुळे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला सर्वात जास्त फायदा झाला. अमेझॉन इंडियाने या हंगामात २७६ कोटींहून अधिक ग्राहक भेटी नोंदवल्या, ज्यात ७० टक्के खरेदीदार टियर २ आणि टियर ३ शहरांमधील होते. लहान शहरांमध्ये प्राइम सदस्यत्व वाढले, तर मेट्रो शहरांमध्ये एकाच दिवशी आणि दुसऱ्या दिवशीची डिलिव्हरी वार्षिक आधारावर २९ टक्के वाढली आणि लहान शहरांमध्ये दोन दिवसांची डिलिव्हरी ३७ टक्के वाढली. मीशोने एक नवीन विक्रम स्थापित केला, दसऱ्याच्या आठवड्यात २०६ कोटी ग्राहक भेटी आणि ११७ दशलक्ष तासांची खरेदी नोंदवली.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 9:30 pm

दादरमधील वाढत्या फटाक्यांच्या दुकानांना कुणाचे अभय? दुकानदारांसह नागरिकांचा जीव धोक्यात

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त केल्या जाणाऱ्या आतषबाजींकरता मुंबईतील काही प्रमुख दुकानांमध्ये यापूर्वी फटाक्यांची विक्री होत असली तरी आता सरसकट रस्त्यांवरही मोठ्या आवाजांच्या फटाक्यांची विक्रीचे स्टॉल्स लागले जात आहेत. विशेष म्हणजे मुंबईतील दादरसारख्या गजबजलेल्या भागांमध्ये एकाला खेटून एक अशाप्रकारे मोठया संख्येने फटाक्यांची दुकाने लावली गेलेली आहेत. ज्यामुळे या गर्दीच्या ठिकाणी आगीसारख्या दुघर्टनेची भीती व्यक्त् केली जात आहे. मात्र, अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून परवानाधारक विक्रेत्यांची तपासणी करण्याचे अधिकार मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना असले तरी अनधिकृत स्टॉल्सची जबाबदारी महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाची आहे. परंतु, असे असूनही महापालिका अधिकारी आणि पोलिस यांच्या आशीर्वादामुळे दादरमध्ये पावलोगणिक फटाक्यांची विक्रीचे स्टॉल्स लावले जात असल्याने भविष्यात याठिकाणी काही घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.दीपावली निमित्त दादर पश्चिम भागातील डिसिल्व्हा रस्ता आणि जावळे मार्गावरील पदपथांवर मोठ्याप्रमाणात फटाक्यांची दुकाने लावण्यात आली आहेत. दादरसारख्या गर्दीच्याठिकाणी मोठ्या आवाजाचे फटाके शगुन हॉटेलपासून पुढे सलग सात स्टॉल्स लावण्यात आले आहे, तर या मार्गावर एकूण १० ते १२ फटाक्यांचे स्टॉल्स आहेत, तर जावळे मार्गावरही अशाचप्रकारे फटाक्यांची विक्री केली जाते. विशेष म्हणजे दादरमधील या दोन्ही गल्ली तथा रस्ते हे दाट गर्दीचे मानले जातात. याठिकाणी मोठ्याप्रमाणात खरेदीला नागरिक येत असल्याने कायमच गर्दी होत असते. त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी मोठ्या आवाजाचे तथा स्फोटक फटाक्यांची विक्री कशाप्रकारे केली जाते असा सवाल आता स्थानिकांकडूनच केला जात आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या आवाजाचे मोठया प्रमाणात फटाक्यांचे स्टॉल्स लागले असून शुक्रवारी पोलिसांच्या माध्यमातून काही कारवाई झाली. त्यांनी काही साहित्य जप्त केले. पण हे स्टॉल्स काही बंद झालेले नाही. मुंबई अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, परवानाधारक फटाके विक्रीच्या स्टॉल्सची तपासणी अग्निशमन दलाचे अधिकारी करू शकतात, पण रस्त्याच्या पदपथावरील स्टॉल्स हे अनधिकृतच आहेत. त्यामुळे विभागाच्या महापालिका अधिकाऱ्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी करून अशाप्रकारच्या स्टॉल्सवर कारवाई करायला हवी. फटाक्यांची विक्री ही गर्दीच्या ठिकाणी करताच येत नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.दादरमध्ये फेरीवाल्यांना बसवतो कोण? हेच महापालिकेचे आणि पोलिस ना!जर या दोघांनी मनात आणले तरी एकही फेरीवाला दादर रेल्वे स्थानकाबाहेर बसू शकणार नाही.आता हे जे फटाक्यांचे स्टॉल्स लावले आहेत, त्यांनाही याच अधिकाऱ्यांनी बसवले आहेत. पोलिसांच्या बीट ऑफीससमोर असे व्यवसाय लागत असताना पोलिसांना ते दिसत नाही का? त्यामुळे या फटाक्यांमुळे जर काही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास त्यात दुकानांचे तर नुकसान होईलच, पण गर्दीतील नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे तशाप्रकारची दुघर्टना घडल्यास त्याला सर्वस्वी महापालिका आणि पोलिस अधिकारीच जबाबदार असतील.सुनील शाह, अध्यक्ष, दादर व्यापारी संघ

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 9:30 pm

Babar Azam : बाबर आझमचे टी-20 आंतरराष्ट्रीय संघात लवकरच पुनरागमन; खरं की अफवा? जाणून घ्या

Babar Azam T20I Comeback Rumors : माजी कर्णधार बाबर आझमच्या टी-20 संघात पुनरागमनावरुन आणि मोहम्मद रिझवानला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवून नवीन कर्णधार नियुक्त करण्याच्या अफवांनी जोर धरला आहे. 24 ऑक्टोबरला कसोटी मालिका संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. यानिमित्ताने सोशल मीडियापासून मुख्य प्रवाहातील माध्यमांपर्यंत वरिष्ठ खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची स्पर्धा सुरू […] The post Babar Azam : बाबर आझमचे टी-20 आंतरराष्ट्रीय संघात लवकरच पुनरागमन; खरं की अफवा? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 9:25 pm

तेलंगणा: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील OBC आरक्षणावर उच्च न्यायालयाची स्थगिती; सत्ताधारी, विरोधकांसह विविध संघटनांचा ‘बंद’ला पाठिंबा

हैदराबाद: तेलंगणा सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) ४२ टक्के आरक्षण देण्याच्या घेतलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यात मोठा राजकीय आणि सामाजिक तणाव निर्माण झाला आहे. न्यायालयाच्या या आदेशाच्या निषेधार्थ शनिवारी ‘मागासवर्गीय संयुक्त कृती समिती’ने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला सत्ताधारी काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी (बीआरएस आणि भाजप) देखील पूर्ण पाठिंबा दिला. तेलंगणा सरकारने […] The post तेलंगणा: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील OBC आरक्षणावर उच्च न्यायालयाची स्थगिती; सत्ताधारी, विरोधकांसह विविध संघटनांचा ‘बंद’ला पाठिंबा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 9:18 pm

Trump–Zelenskyy : ट्रम्प यांची झेलेन्स्की यांच्याशी चर्चा; रशिया- युक्रेनला संघर्ष थांबवण्याचे केले आवाहन

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी युक्रेन आणि रशियाला ते जिथे आहेत तिथेच थांबा असे सांगून युद्ध तत्काळ थांबवण्याचे आवाहन केले. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा एकदा चर्चा केली. ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यापासून नऊ महिन्यांत संघर्षाबद्दलची त्यांची निराशा वारंवार समोर आली आहे. आता ट्रम्प युक्रेनला माघार घेऊन रशियाकडून गमावलेली […] The post Trump–Zelenskyy : ट्रम्प यांची झेलेन्स्की यांच्याशी चर्चा; रशिया- युक्रेनला संघर्ष थांबवण्याचे केले आवाहन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 9:12 pm

लाल महालात राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे भव्य दिपोत्सव; मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक आकर्षणाचा केंद्रबिंदू

पुणे : स्वराज्याच्या प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना सन्मान देत लाल महाल येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुणे शहर व आनंद दत्ताभाऊ सागरे यांच्या वतीने भव्य दिपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पारंपरिक मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते विकास अण्णा पासलकर यांच्या प्रमुख […] The post लाल महालात राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे भव्य दिपोत्सव; मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक आकर्षणाचा केंद्रबिंदू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 9:03 pm

विश्वकर्मा विद्यापीठ व व्हीआयटीत ‘एआय-चालित अर्थव्यवस्थेत उद्देशाधारित शिक्षण’ या विषयावर व्याख्यान

पुणे — विश्वकर्मा विद्यापीठ (VU) आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कोर्सेरा यांच्या सहकार्याने “Purpose-Driven Learning: The Human Foundation for Flourishing in an AI-Powered Economy” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या सत्राचे प्रमुख वक्ते अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाच्या सार्वजनिक आरोग्य शाळेतील प्रसिद्ध वर्तणूक वैज्ञानिक डॉ. व्हिक्टर स्ट्रेचर होते. या […] The post विश्वकर्मा विद्यापीठ व व्हीआयटीत ‘एआय-चालित अर्थव्यवस्थेत उद्देशाधारित शिक्षण’ या विषयावर व्याख्यान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 8:49 pm

दक्षिण आफ्रिकेचा विजयी चौकार

नवी दिल्ली : महिला विश्वकप स्पर्धेतील १८व्या लीग सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने सलग चौथा विजय नोंदवत गुणतालिकेत दुसरे स्थानही पटकावलं आहे.पावसामुळे हा सामना २० षटकांचा खेळवण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे आफ्रिकेच्या या विजयाने भारताची धाकधूक वाढली असून भारताचे टॉप ४ मधील स्थान धोक्यात आले आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या १२ षटकांत श्रीलंकेने २ गडी गमावत केवळ ४६ धावा केल्या. मात्र, त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला.जवळपास पास तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सामना पुन्हा सुरु झाला. मात्र, हा सामना २०-२० षटकांचा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे श्रीलंकेने २० षटकांत ७ गडी गमावत १०५ धावांचे लक्ष्य ठेवले. श्रीलंकेकडून विश्मी गुणरत्नेने सर्वाधिक ३४ धावा केल्या. पण याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पा गाठता आला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून मारिजाने कॅप आणि नॉनकुलुलेको म्लाबा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. तर मसाबाता क्लासने २ आणि नादिन डी क्लर्कने १ विकेट घेतली.दरम्यान, आफ्रिकेच्या या विजयाने भारताची धाकधूक वाढली आहे. भारताचं टॉप ४ मधील स्थान धोक्यात आले आहे. गुणतालिकेबाबत बोलायचे झाल्यास ऑस्ट्रेलियाकडे ९ गुण आहेत. त्यांनी यापूर्वीच सेमीफायनलचे तिकीट निश्चित केले आहे. तर आफ्रिका ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून त्यांचे काही सामने बाकी आहेत. यापैकी एक सामना जरी जिंकला, तरी त्यांची सेमीफायनलकडे जाण्याची वाट मजबूत होणार आहे. याशिवाय इंग्लंडने ७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंडकडे ३ गुण आहेत.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 8:30 pm

खासदारांची निवासस्थाने असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्सला भीषण आग

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना घडली. दिल्लीतील संसद भवनापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्सला आज भीषण आग लागली. डॉ. बिशंबर दास मार्गावर असलेल्या याच ब्रह्मपुत्र आपार्टमेंट्समध्ये लोकसभा आणि राज्यसभेतील अनेक खासदारांची निवासस्थाने आहेत.प्राथमिक माहितीनुसार, अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती दुपारी १ वाजून २० मिनिटांमी मिळाली. आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या टीमने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरू केले. या दुर्घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असली तरी सुदैवान कुठल्याही जीवितहानीचं वृत्त अद्याप हाती आलेलं नाही.https://prahaar.in/2025/10/18/ipl-auction-is-again-in-abroad/या घटनेमुळे रहिवशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीमुळे अधिकारी वर्गानेही चिंता व्यक्त केली आहे. ही आग कशी लागली याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्नाची शर्थ करण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची सहा वाहने तैनात करण्यात आली आहेत.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 8:30 pm

‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ विशेष तपासणी अभियानांतर्गत राज्यात ३ हजार ४८५ अन्न आस्थापनांची तपासणी

मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राज्यात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत १२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत राज्यात ३ हजार ४८५ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये दूध, खवा/मावा, खाद्यतेल, तूप, मिठाई, ड्रायफ्रूट्स, चॉकलेट्स, भगर व अन्य अन्नपदार्थांचे एकूण ४ हजार ६७६ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. या तपासणीत अनियमितता आढळलेल्या एक हजार ४३१ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली असून ४८ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले तर एका आस्थापनेचा परवाना रद्द करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.जनतेस सुरक्षित, दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम, सचिव धीरज कुमार व आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासना विभागांमार्फत राज्यात सणासुदीच्या कालावधीत अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान दिनांक ११ ऑगस्ट २०२५ ते २५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे.नागरिकांनीही सणासुदीच्या काळात अन्नपदार्थ खरेदी करताना गुणवत्ता, पॅकिंगवरील माहिती आणि परवाना क्रमांक यांची खात्री करूनच खरेदी करावी. भेसळीबाबत संशय आल्यास जवळच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 8:10 pm

यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने यंदा राज्यात दहा ठिकाणी रसिकांची दिवाळी स्वर संगीताने उजळण्यासाठी गाजलेल्या गीतांचा, भावगीतांचा तसेच शास्त्रीय संगीताचा बहारदार कार्यक्रम दिवाळी पहाट आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनातून साकारत आहे.ब्राम्हण सभा, डोंबीवली पूर्व येथे २० ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ७:०० वाजता रंगणाऱ्या या कार्यक्रमात निवेदिका – प्राची गडकरी यांचे निवेदन असून ख्यातनाम गायक ओंकार प्रभुघाटे, गायिका मृण्मयी भिडे, गायिका सोनिया पोंक्षे, गायक निलेश गायकवाड, आपली कला सादर करतील तर धनंजय पुराणिक, रवी पोंक्षे, रुपेश गायकवाड, कमलाकर मेस्त्री, अर्णव सुमित कानेटकर हे वादक कलाकार गाजलेल्या गीतांचा व भावगीतांचा कार्यक्रम रसिकांसाठी सादर करणार आहेत. हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 8:10 pm

आयपीएलचा लिलाव पुन्हा परदेशात?

नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव पुन्हा एकदा परदेशात होणार आहे. २०२६ च्या हंगामासाठीचा हा लघु-लिलाव १५ ते १८ डिसेंबर दरम्यान दुबई, मस्कत किंवा दोहा यापैकी एका ठिकाणी होणार आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.भारतात, डिसेंबरच्या मध्यापासून जानेवारीपर्यंत लग्नाचा हंगाम शिगेला पोहोचतो. जवळजवळ प्रत्येक मोठे हॉटेल, रिसॉर्ट किंवा कन्व्हेन्शन सेंटर लग्नासाठी बुक केलेले असतात. १० संघांमधील प्रतिनिधी, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि प्रसारण पथकांना सामावून घेणे कठीण आहे. त्यामुळे बोर्डाने यावेळीही परदेशात लिलाव आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात काही माध्यमांनी असा दावा केला होता की यावर्षीचा लिलाव भारतातील एका शहरात होणार आहे.गेल्या वर्षी, २०२४ मध्ये, आयपीएलचा मेगा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झाला होता. भारतात स्थळांचा अभाव आणि लॉजिस्टिक आव्हाने ही कारणे म्हणून उद्धृत करण्यात आली होती. यावेळी लिलावासाठी दुबई, मस्कत आणि दोहा ही नावे चर्चेत आहेत. दुबईला सर्वात प्रबळ दावेदार मानले जाते, कारण ते केवळ बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझींसाठी उत्कृष्ट पायाभूत सुविधा प्रदान करत नाही, तर गेल्या काही वर्षांत तेथे अनेक यशस्वी कार्यक्रमांचे आयोजन देखील केले आहे. दोहा (कतार) हे प्रथमच एक संभाव्य ठिकाण म्हणून चर्चेत आले आहे, जे दर्शवते की बीसीसीआय आता आखाती देशांमध्ये आपली क्रिकेट उपस्थिती आणखी मजबूत करण्याचा विचार करत आहे.बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, पुढील वर्षीचा आयपीएल हंगाम २० मार्च रोजी सुरू होऊ शकतो. २०२५ च्या देशांतर्गत हंगामाचे वेळापत्रक लक्षात घेऊन बोर्ड आयपीएल थोडे लवकर सुरू करू इच्छित आहे. जेणेकरून संपूर्ण स्पर्धा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करता येईल. यामुळे खेळाडूंना जून-जुलैमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 8:10 pm

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM Kisanचा 21वा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता; फक्त ‘हे’छोटे काम तात्काळ करा

PM Kisan 21st Installment: धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या दिवाळीच्या सणासुदीच्या काळात, देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा २१वा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार लवकरच ही बहुप्रतिक्षित २१वा हप्ता जारी करू शकते, ज्यामध्ये नेहमीप्रमाणे ₹२००० रुपये असणार आहेत. योजनेचा वार्षिक लाभ […] The post शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM Kisanचा 21वा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता; फक्त ‘हे’ छोटे काम तात्काळ करा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 8:08 pm

‘भोजपुरीची सनी लिओनी’कोण आहे? तीच्यामुळे NDAने निवडणूक न लढवता एक जागा गमावली

Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) जोरदार झटका बसला आहे. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) च्या उमेदवार, सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री सीमा सिंह यांचा उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान रद्द करण्यात आला आहे. यामुळे लढाई सुरु होण्याआधीच एनडीएला मढौरा विधानसभा मतदारसंघात एक जागा गमवावी लागली आहे. कागदपत्रांतील त्रुटी ठरल्या निमित्त सारण […] The post ‘भोजपुरीची सनी लिओनी’ कोण आहे? तीच्यामुळे NDAने निवडणूक न लढवता एक जागा गमावली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 7:39 pm

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी

मुंबई : दिवाळीचा सण म्हणजे फक्त दिव्यांचा, फटाक्यांचा किंवा सजावटीचा उत्सव नाही तर तो माणुसकीचा, प्रेमाचा आणि एकोप्याचा उत्सव आहे, हा विचार करून पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आज एका आगळ्यावेगळ्या आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमात अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मंत्री श्रीमती मुंडे भावूक झाल्या.केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि द चिल्ड्रन्स एड सोसायटी फॉर अंडरप्रिव्हिलेज्ड किड्स ऑर्फनेजच्या यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आधुनिक कला दालन, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात श्रीमती मुंडे यांनी भेट दिली. यावेळी आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालक निधी चौधरी उपस्थित होत्या.मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ही अनाथ मुलं कोणत्या जातीची, धर्माची आहेत हे महत्त्वाच नाही, तर ती माणसाची आहेत आणि त्यांच्या डोळ्यांतील आनंद हा समाजासाठी प्रेरणादायी आहे. असा समाज घडला पाहिजे, जिथे प्रत्येक माणूस स्वतःची ओळख स्वतः निर्माण करेल.प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी पर्यावरण विभागाने समाज माध्यमांद्वारे जनजागृती केली आहे, असे सांगून सर्व नागरिकांनी प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आपण ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळून, निसर्गाशी सुसंगत अशी पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करू, असे श्रीमती मुंडे म्हणाल्या.यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी मुलांसोबत आकाशकंदील तयार केले. तसेच पणत्या रंगवल्या आणि चित्रकला उपक्रमात सहभागही घेतला. या वेळी आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळेचे आणि प्रसिद्ध कलाकार ए. ए. अल्मेलकर यांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 7:30 pm

झारखंड मुक्ती मोर्चाचा महाआघाडीला धक्का, बिहारमध्ये स्वबळावर लढणार निवडणूक; ‘या’ 6 जागांवर उतरवणार उमेदवार!

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाआघाडीतील जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान एका घटक पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) बिहारमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. ६ जागांवर लढणार झामुमो शेजारील राज्य झारखंडमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या झामुमोचे महासचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष बिहारमधील सहा विधानसभा मतदारसंघांत आपले […] The post झारखंड मुक्ती मोर्चाचा महाआघाडीला धक्का, बिहारमध्ये स्वबळावर लढणार निवडणूक; ‘या’ 6 जागांवर उतरवणार उमेदवार! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 7:26 pm

IND vs AUS : पर्थच्या खेळपट्टीवर गिलच्या नेतृत्वाची कसोटी, भारताचा विजयी प्रारंभ होणार का? जाणून घ्या पिच रिपोर्ट

IND vs AUS 1st ODI Optus Stadium Pitch Report : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला उद्या, 19 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ या मालिकेत नवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. तो प्रथमच वनडे फॉर्मेटमध्ये कर्णधारपद भूषवणार आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य […] The post IND vs AUS : पर्थच्या खेळपट्टीवर गिलच्या नेतृत्वाची कसोटी, भारताचा विजयी प्रारंभ होणार का? जाणून घ्या पिच रिपोर्ट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 7:26 pm

कल्याणमध्ये रक्तरंजित थरार..! शिंदेंच्या माजी नगरसेवकसह २ शिवसैनिकांवर हल्ला; १५ जणांवर गुन्हा दाखल

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली शहरातील शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकावर आणि त्यांच्या दोन समर्थकांवर त्यांच्या प्रतिस्पर्धी गटाच्या सदस्यांना मदत केल्याबद्दल काही जणांनी हल्ला केला ज्यामध्ये ते जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी रात्री कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा भागात ही घटना घडली. या हल्ल्यात माजी शिवसेनेचे नगरसेवक उमेश बोरगावकर किरकोळ जखमी होऊन बचावले. तर त्यांचे दोन सहकारी […] The post कल्याणमध्ये रक्तरंजित थरार..! शिंदेंच्या माजी नगरसेवकसह २ शिवसैनिकांवर हल्ला; १५ जणांवर गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 7:18 pm

Donald Trump : भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही; ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा

वॉशिंग्टन : भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला आहे. रशियाच्या तेल खरेदीमुळे निर्माण झालेला तणाव भारताने यापुर्वीच मोठ्या प्रमाणात कमी केला आहे आणि रशियाकडून तेल खरेदी करण्याचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात जवळपास थांबवले आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. शुक्रवारी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की यांच्याबरोबरच्या द्विपक्षीय […] The post Donald Trump : भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही; ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 7:15 pm

Alimony case: स्वावलंबी जोडीदाराला पोटगी देता येत नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने घटस्फोट आणि पोटगी (Alimony) संदर्भात एका महत्त्वपूर्ण प्रकरणात निर्णय दिला आहे. कोर्टाने स्पष्ट केले की, जर एखादा जोडीदार आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर आणि कमावण्यास सक्षम असेल, तर त्याला/तिला भरण-पोषणासाठी (पोटगी) रक्कम दिली जाऊ शकत नाही. पोटगी हा सामाजिक न्यायाचा स्थायी उपाय आहे, आर्थिक समानता किंवा लाभ कमविण्याचे साधन नाही, असे न्यायालयाने […] The post Alimony case: स्वावलंबी जोडीदाराला पोटगी देता येत नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 6:58 pm

Rohit Sharma : हिटमॅनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहास रचण्याची संधी! ‘हा’पराक्रम करणारा ठरणार जगातील पहिलाच खेळाडू

Rohit Sharma Eyes Historic Record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका १९ ऑक्टोबरपासून पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर सुरू होत आहे. या मालिकेत भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याच्यासमोर एक मोठा विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये १०० षटकार लगावणारा तो पहिला फलंदाज ठरू शकतो. यासाठी त्याला केवळ १२ षटकारांची […] The post Rohit Sharma : हिटमॅनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहास रचण्याची संधी! ‘हा’ पराक्रम करणारा ठरणार जगातील पहिलाच खेळाडू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 6:50 pm

GST 2.0 मुळे सणांना आली नवी झळाळी! रोजच्या वस्तू स्वस्त, लक्ष्मी पोहोचली घरोघरी – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली: धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘GST 2.0′ च्या यशामुळे देशात निर्माण झालेल्या उत्साहावर शिक्कामोर्तब केला. वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी नमूद केले की, “GST 2.0’ नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लागू झाला आणि देशवासीयांनी त्याचा पूर्ण उत्साहाने स्वीकार केला […] The post GST 2.0 मुळे सणांना आली नवी झळाळी! रोजच्या वस्तू स्वस्त, लक्ष्मी पोहोचली घरोघरी – अर्थमंत्री निर्मला सीतारामन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 6:35 pm

नंदुरबारमध्‍ये भीषण अपघात, ७ भाविकांचा मृत्यू; १० जणांची प्रकृती चिंताजनक

नंदूरबार : ऐन दिवाळीत चांदशैली घाटात शनिवारी एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सात भाविकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, येथील चांदशैली घाटात पिकअप उलटून हा अपघात झाला. या वाहनातील लोक अस्तंबा यात्रेसाठी गेले होते. ही यात्रा संपवून माघारी परतत असताना […] The post नंदुरबारमध्‍ये भीषण अपघात, ७ भाविकांचा मृत्यू; १० जणांची प्रकृती चिंताजनक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 6:29 pm

ICICI Bank Q2 Result: आयसीआयसीआय बँकेला दुसऱ्या तिमाहीत ₹12,358 कोटींचा जबरदस्त नफा

ICICI Bank Q2 Result: देशातील अग्रगण्य खासगी बँक आयसीआयसीआय (ICICI) बँकेने जुलै-सप्टेंबर तिमाहीत अपेक्षेपेक्षा दमदार कामगिरी केली आहे. बँकेचा स्टँडअलोन निव्वळ नफा (Net Profit) वार्षिक आधारावर ५.२ टक्क्यांनी वाढून ₹१२,३५८.९ कोटी इतका झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेचा नफा ₹११,७४५.९ कोटी होता. बाजारातील तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा हा आकडा खूपच चांगला आहे. उत्पन्नातही मोठी वाढ: बँकेच्या […] The post ICICI Bank Q2 Result: आयसीआयसीआय बँकेला दुसऱ्या तिमाहीत ₹12,358 कोटींचा जबरदस्त नफा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 6:13 pm

Rohit Sharma : ‘हो, मी २०२७ चा विश्वचषक खेळणार…’, रोहितने खास चाहत्याला दिला शब्द, VIDEO होतोय व्हायरल

Rohit Sharma Viral Video : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने आपल्या वनडे क्रिकेट कारकिर्दीवरून सुरू असलेल्या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे. त्याने स्पष्ट केले की, तो 2027 चा वनडे विश्वचषक खेळण्यास इच्छुक आहे आणि त्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मेक-ए-विश फाउंडेशनच्या एका मुलांशी संवाद साधताना चाहत्याला दिलेल्या या शब्दाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल […] The post Rohit Sharma : ‘हो, मी २०२७ चा विश्वचषक खेळणार…’, रोहितने खास चाहत्याला दिला शब्द, VIDEO होतोय व्हायरल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 6:11 pm

मालाड पूर्वेत भीषण आग! लाकडी गोदामात लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप: नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या मालाड पूर्व भागात आज दुपारी भीषण आगीची घटना घडली. पिंपरीपाडा परिसरात पंजाब डेअरीजवळ असलेल्या लाकडी भंगाराच्या गोदामाला अचानक आग लागली आणि काही क्षणातच ही आग मोठ्या भागात पसरली. धुराचे प्रचंड लोट आकाशात पसरल्याचे दिसत होते.सदर गोदामात लाकडी प्लायवुड, फर्निचरचे तुकडे आणि इतर जळणारे साहित्य मोठ्या प्रमाणात साठवलेले होते. त्यामुळे आग लागल्यानंतर ती प्रचंड वेगाने पसरली. काही क्षणांतच गोदामाच्या संपूर्ण परिसराने आगीचा वेढा घेतला. धुरामुळे आजूबाजूचा परिसरही झाकला गेला.घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले की, आगीचा धूर इतका गडद होता की तो सुमारे एक किलोमीटर दूरवरूनही स्पष्टपणे दिसत होता. आगीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, विशेषतः ही वस्ती झोपडपट्टीजवळ असल्यामुळे आग झोपड्यांपर्यंत पोहोचेल का, याची भीती होती.मुंबई अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या, मात्र पिंपरीपाडा परिसरातील अरुंद रस्ते आणि प्रचंड वाहतूक कोंडीमुळे (ट्राफिक जॅम) अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. तरीदेखील, जवानांनी धाडसाने काम करत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त सुरू केली.या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. काहीजणांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आलं असून, कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही.सध्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर ‘कूलिंग ऑपरेशन’ सुरू केलं आहे, जेणेकरून आग पुन्हा भडकू नये. आगीचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा लाकडी साहित्यामुळे झालेला घर्षणाद्वारे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अधिकृत तपास अहवाल आल्यानंतरच या घटनेचं मूळ कारण समोर येईल.मुंबईसारख्या महानगरामध्ये अरुंद रस्ते, बिनधास्त साठवलेलं ज्वलनशील साहित्य आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार घडत आहेत.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 6:10 pm

शेतकऱ्यांना ३,२५८ कोटी रुपयांची मदत मंजूर; लाभ घेण्यासाठी ‘हे’निकष असणार?

मुंबई : सरकारने २३ जिल्ह्यांमधील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३,२५८ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे, असे राज्यमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांत, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक ठरावांद्वारे ५,३६४ कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. सरकारने आता पाऊस आणि पूरग्रस्त जिल्ह्यांमधील ३३.६५ लाख शेतकऱ्यांसाठी ३,२५८ कोटी रुपये मंजूर केले […] The post शेतकऱ्यांना ३,२५८ कोटी रुपयांची मदत मंजूर; लाभ घेण्यासाठी ‘हे’ निकष असणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 6:09 pm

ढाका विमानतळाच्या कार्गो टर्मिनलला भीषण आग; सर्व उड्डाणे तात्काळ थांबवली

ढाका: हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Hazrat Shahjalal International Airport) शनिवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. विमानतळाच्या कार्गो टर्मिनलला (Cargo Terminal) भीषण आग (Fire) लागल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे तात्काळ सर्व विमानांचे उड्डाण (Flights) थांबवण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि वायुसेनेचे संयुक्त पथक आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी […] The post ढाका विमानतळाच्या कार्गो टर्मिनलला भीषण आग; सर्व उड्डाणे तात्काळ थांबवली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 6:07 pm

HDFC Bank Q2 Result: एचडीएफसी बँकेला दुसऱ्या तिमाहीत ‘बंपर’नफा; 18 हजार कोटींचा आकडा ओलांडला!

HDFC Bank Q2 Result: देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने सप्टेंबर २०२५ ला संपलेल्या तिमाहीत दमदार कामगिरी करत बाजारातील तज्ज्ञांचे अंदाज खोटे ठरवले आहेत. या तिमाहीत बँकेने तब्बल १८,६४१.३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून, गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत हा नफा १०.८ टक्क्यांनी अधिक आहे. बाजारातील तज्ज्ञांनी १६,७१४ कोटी रुपयांचा अंदाज व्यक्त […] The post HDFC Bank Q2 Result: एचडीएफसी बँकेला दुसऱ्या तिमाहीत ‘बंपर’ नफा; 18 हजार कोटींचा आकडा ओलांडला! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 6:01 pm

प्रेम बिऱ्हाडे प्रकरणात मॉडर्न महाविद्यालयाने दिलं स्पष्टीकरण: जातीय भेदभावाचे आरोप फेटाळले, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : लंडनमध्ये नोकरी मिळालेल्या प्रेम बिऱ्हाडे या तरुणाने पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयावर जातीय भेदभावाचा गंभीर आरोप केला होता. त्याच्या म्हणण्यानुसार, महाविद्यालयाने दलित असल्यामुळे त्याची शैक्षणिक पडताळणी कागदपत्रं देण्यास नकार दिला आणि त्यामुळे त्याची लंडनमधील नोकरी गमवावी लागली. या आरोपांनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही प्रेमच्या बाजूने भूमिका घेतली. मात्र, या सर्व दाव्यांना नाकारत […] The post प्रेम बिऱ्हाडे प्रकरणात मॉडर्न महाविद्यालयाने दिलं स्पष्टीकरण: जातीय भेदभावाचे आरोप फेटाळले, नेमकं काय आहे प्रकरण? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 5:51 pm

देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांनाच दणका; आणखी एक माजी आमदार लावला गळाला?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत वर्षा बंगल्यावर बैठक झाली असून लवकरच त्यांचा भाजपा प्रवेश होणार असल्याचे समजते. आता आणखी एक माजी आमदार भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेना उबाठा नेते दीपक साळुंखे यांच्या कार्यालयात भेट देत भाषणही केले आहे. कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला […] The post देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांनाच दणका; आणखी एक माजी आमदार लावला गळाला? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 5:39 pm

Bihar Elections 2025: ‘एनडीए’ला मतदानापूर्वीच मोठा झटका; ‘ग्लॅमर क्वीन’सीमा सिंह यांचे आमदार होण्याचे स्वप्न भंगले

Bihar Assembly Elections 2025: बिहार विधानसभा निवडणुकीला सुरुवात होण्यापूर्वीच राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला मोठा धक्का बसला आहे. मतदानाच्या आधीच एनडीएने सारण जिल्ह्यातील मढौरा विधानसभा मतदारसंघातील जागा गमावली आहे. ही जागा NDA मधील चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती (रामविलास) पार्टीच्या वाट्याला आली होती. पक्षाने ‘ग्लॅमर क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीमा सिंह यांना येथून उमेदवारी दिली […] The post Bihar Elections 2025: ‘एनडीए’ला मतदानापूर्वीच मोठा झटका; ‘ग्लॅमर क्वीन’ सीमा सिंह यांचे आमदार होण्याचे स्वप्न भंगले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 5:33 pm

IDBI Q2Results: आयडीबीआय बँकेचा तिमाही निकाल जाहीर बँकेच्या निव्वळ नफ्यात तब्बल ९८% वाढ 'या'कारणामुळे

मोहित सोमण:आयडीबीआय या आघाडीच्या खाजगी बँकेने इयर ऑन इयर बेसिसवर निव्वळ नफ्यात ९८% वाढ नोंदवली आहे. प्रामुख्याने बँकेने एनएसडीएल (NSDL) मधील आपला ११% स्टेक (भागभांडवल) विकल्याने बँकेला मोठा आर्थिक लाभ झाला. बँ केने त्यांच्या आयपीओमध्ये नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडमध्ये ११.१% हिस्सा असलेले २.२२ कोटींहून अधिक इक्विटी शेअर्स ७९९.८७ रुपये प्रति शेअर या इश्यू किमतीत ऑफर केले होते आणि १,६९८.९६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला हो ता, असे बीएसई फाइलिंगमध्ये म्हटले आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेला या तिमाहीत ३६२७ कोटींचा निव्वळ नफा प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील तुलनेत ९८% वाढ निव्वळ नफ्यात झाली आहे.एलआयसीच्या अधिपत्याखाली असलेल्या बँकेने या तिमाहीत १८३६ कोटींचा नफा मिळवला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ८७५५ कोटींच्या तुलनेत बँकेच्या एकूण उत्पन्न (Total Income) ९५९४ कोटींवर पोहोचले आहे. तर बँकेच्या ऑपरेटिंग नफ्यात (Ope rating Profit) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) गेल्या वर्षीच्या ३००६ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ३५२३ कोटीवर वाढ झाली आहे. बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेतही इयर ऑन इयर बेसिसवर सुधारणा झाली आहे. माहितीनुसार, जीएपीए (Gross Perform ing Assets NPA) गेल्या वर्षीच्या ३.६८% तुलनेत २.६५% वर या तिमाहीत पोहोचले. बँकेच्या निव्वळ एनपीएत (Net Non Performing Assets NPA) कुठलाही बदल झालेला नसल्याचे बँकेने आकडेवारीतून स्पष्ट केले. गेल्या वर्षीच्या १३१३ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत बँकेच्या इतर उत्पन्नात (Other Income) मध्ये ८९.५७% वाढ झाली ज्यामध्ये हे इतर उत्पन्न २४८९ कोटींवर पोहोचले आहे. बँकेच्या माहितीनुसार, व्याज उत्पन्न (Interest Income) हे मात्र इयर ऑन इयर बेसिसवर ४.५४% घसरले असून ७४४२ कोटीवरून ७१०४ कोटींवर पोहोचले.बँकेच्या सीएआर (Capital Adequacy Ratio CAR) मध्ये सुधारणा झाली असून गेल्या वर्षीच्या तिमाहीतील २१.९८% तुलनेत यंदा २५.३९% वर वाढले.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 5:30 pm

Bangladesh News : ढाका विमानतळात भीषण आग! विमानतळाचे कार्गो क्षेत्र आगीच्या विळख्यात; धुरामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

ढाका : बांगलादेशची राजधानी ढाका येथून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Hazrat Shahjalal International Airport) भीषण आग लागल्याची घटना आज, शनिवारी (१८ ऑक्टोबर), दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग विमानतळाच्या कार्गो क्षेत्रात लागली. आग इतक्या वेगाने पसरली की, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विमानतळ प्रशासनाला सर्व उड्डाणे तातडीने थांबवावी लागली. सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणत्याही जीवीतहानीची माहिती समोर आलेली नाही. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. विमानतळावर अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.बचावकार्यात लष्कराचा सहभागइंटर-सर्विसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) नुसार, आग विझवण्यासाठी अनेक सरकारी आणि लष्करी पथके काम करत आहेत: बांगलादेश नागरी विमान वाहतूक प्राधिकरण, बांगलादेश फायर सर्व्हिस, बांगलादेश नौदल, बांगलादेश हवाई दलाचे दोन फायर युनिट्स याशिवाय, बॉर्डर गार्ड बांगलादेश (BGB) च्या दोन प्लाटून देखील बचावकार्यात सहभागी झाल्या आहेत. चटग्राम (Chattogram) येथील शाह अमानत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे जनसंपर्क अधिकारी मोहम्मद इब्राहिम खलील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाका विमानतळाचे एअरफील्ड आज सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे.आठ विमानांचे मार्ग बदलले :ढाका विमानतळ बंद असल्यामुळे, आतापर्यंत एकूण आठ देशांतर्गत (Domestic) आणि आंतरराष्ट्रीय (International) विमानांचे मार्ग बदलून त्यांना चटग्राम विमानतळावर उतरवण्यात आले आहे. यात यूएस-बांगला एअरलाइन्सची दोन आणि बांगलादेश एअरलाइन्सची दोन अशा चार आंतरराष्ट्रीय विमानांचा समावेश आहे. यामुळे चटग्राम विमानतळावर उतरलेल्या विमानांची एकूण संख्या आठ झाली आहे. विमानतळ अधिकारी म्हणाले की, ढाका विमानतळावरील परिस्थिती पूर्ववत झाल्यावर मार्ग बदललेली ही सर्व विमाने पुन्हा ढाका येथे परततील. दरम्यान, ढाका विमानतळावर सर्व उड्डाणे थांबवण्यात आल्यामुळे परदेशात जाण्यासाठी निघालेले सर्व प्रवासी हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरच प्रतीक्षा करत आहेत, ज्यामुळे तेथे मोठी गर्दी झाली आहे.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 5:30 pm

सफरचंद खाण्याची योग्य पद्धत, सालासकट की साल काढून?

सफरचंद हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त फळ आहे. डॉक्टर रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात, कारण त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असते. मात्र, अनेकांना याबाबत संभ्रम असतो की सफरचंद सालासकट खावे की साल काढून? काही लोक स्वच्छतेच्या कारणास्तव सफरचंद सोलून खातात, तर काहीजण पोषणमूल्य लक्षात घेऊन सालासकट खातात.तज्ज्ञांच्या मते, सफरचंद सालासकट खाणे जास्त फायदेशीर आहे. कारण सालीमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात, जे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. सफरचंदाच्या सालीमध्ये क्वेर्सेटिन नावाचे अँटी-इंफ्लेमेटरी संयुग असते, जे फुफ्फुसांचे संरक्षण करते आणि श्वसनाशी संबंधित आजारांपासून बचाव करते. तसेच सालीतील अँटीऑक्सिडंट्स रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य टिकून राहते.याशिवाय, सालीमध्ये भरपूर फायबर असल्याने ते पचनसंस्थेला कार्यक्षम ठेवते आणि वजन कमी करण्यात मदत करते. फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते, ज्यामुळे अनावश्यक खाणे टाळले जाते. बद्धकोष्ठता, गॅस किंवा पोटफुगीचा त्रास असलेल्यांसाठी हे विशेषतः फायदेशीर ठरते.सफरचंदाच्या सालीत जीवनसत्त्वे अ, क आणि के तसेच पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात. हे सर्व घटक मेंदू, हृदय, त्वचा, हाडे आणि मूत्रपिंडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात.परंतु, सफरचंद सालासकट खाण्यापूर्वी ते स्वच्छ धुणे अत्यंत आवश्यक आहे, कारण सालीवर कीटकनाशकांचे अवशेष असू शकतात. त्यामुळे नीट धुऊन, शक्य असल्यास ऑर्गेनिक सफरचंद निवडणे उत्तम.एकंदरीत, सफरचंद सालासकट खाल्ल्यास ते अधिक पोषक, फायदेशीर आणि आरोग्यवर्धक ठरते.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 5:10 pm

Gold Silver Rate: सोन्याचांदीत नफा बुकिंगमुळे मोठी घसरण एकाच सत्रात सोन्यात ३% चांदीत ८% घसरण जाणून घ्या सविस्तर विश्लेषण

मोहित सोमण:सलग दोन महिन्यांच्या धुवाधार वाढी नंतर आज सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे. एकाच सत्रात सोन्यात ३% घसरण नोंदवली गेली आहे. कालही कमोडिटी बाजार नव्या उच्चांकावर गेले असताना नफा बुकिंगसाठी बाजारात ईपीएफ 'सेल ऑफ' सुरू झाल्याने आज सोन्यासह चांदीत घसरण झाली.विशेषतः थंड जागतिक संकेतानंंतर जागतिक पातळीवरही नवा ट्रिगर नसल्याने बाजारात रॅली झाली नाही.राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीनवर घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आज आपले समझोता पू र्ण विधान केल्याने बाजारात काहीशी स्थिरता आली.'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १९१ रुपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १७५ रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १४४ रूपयांनी घसरण झा ली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १३०८६ रुपयांवर, २२ कॅरेटचा ११९९५ रूपयांवर, तर १८ कॅरेटसाठी ९८१४ रूपयांवर पोहोचला आहे.संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १९१० रुपयांनी घसरण झाली असून, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १७५० रूपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १३०८६० रूपये, २२ कॅरेटसाठी ११९ ९५० रूपये, १८ कॅरेटसाठी ९८१४० रुपयांवर पोहोचले. भारतीय सराफा बाजारात सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १३०७६ रूपये, २२ कॅरेटसाठी ११९९५ रुपये, १८ कॅरेटसाठी ९८१४ कोटी रुपयावर पोहोचले. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीए क्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) संध्याकाळपर्यंत सोन्याच्या निर्देशांकात ०.२५% वाढ झाली व दरपातळी १२७३२० रूपयांवर पोहोचली आहे. आज जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.१२% इतकी घसरण झाली असून युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत १.७६% घसरण झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ४२४९.९८ औंसवर गेली आहे.सोने का घसरलय?धनत्रयोदशीच्या आधीच्या उच्चांकी पातळीनंतर शनिवारी १८ ऑक्टोबर रोजी जुन्या आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. जागतिक अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांच्या मागणीमुळे सतत वाढलेल्या तेजीनंतर जवळजवळ दोन महिन्यांतील ही पहिली च मोठी सुधारणा आहे. सकाळच्या सत्राच्या सुरुवातीला सोन्याने $४,३७९.२९ या नवीन उच्चांकाला स्पर्श केल्यानंतर, स्पॉट गोल्ड २.३% घसरून $४२२६.४३ प्रति औंसवर आला. डिसेंबरसाठी यूएस गोल्ड फ्युचर्स १.५% घसरून $४२३७.६९ प्रति औंसवर आला होता. बाजारातील रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे,सोने देखील १३२२९४ रुपये प्रति १० ग्रॅम या शिखरावरून ४००० रुपयांनी घसरून १२५९५७ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. सुमारे ३% झालेल्या घसरणीवर बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले की, अलिकडच्या आठवड्यात झाले ल्या असाधारण वाढीनंतर ही घसरण अपेक्षित होती. बँकिंग आणि बाजार विश्लेषक अजय बग्गा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे की, ऐतिहासिक तेजीनंतर ही घसरण एक रणनीतिक आणि नैसर्गिक सुधारणा आहे. त्यांनी सांगितले की जागतिक तणाव कमी झाल्यामुळे ही घसरण झाली आहे. विशेषतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरुद्ध व्यापार शुल्काबाबत मऊ भूमिका घेतल्यानंतर सुरक्षित-आश्रयस्थान असलेल्या मालमत्तेची अल्पकालीन मागणी कमी झाली.जागतिक परिपेक्षात सोने आज थंडावले आहे. ज्याचा फायदा आज आशियाई बाजारात जाणवला. रुपयात ७ पैशाने पुन्हा एकदा घसरण झाल्याने भारतीय बाजारात घसरण मर्यादित झाली आहे. मात्र एकूणच जगभरात आज सोने स्वस्त झाले ज्यात नफा बुकिंगचा मोठा समावेश आहे.चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी होणाऱ्या भेटीपूर्वी अमेरिका-चीन व्यापार संबंधांमध्ये संभाव्य बदलाचे संकेत देणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी असे संकेत दिले की, चिनी वस्तूंवर लादलेले उच्च शुल्क दीर्घकाळ टिकणार नाही.'ते टिकाऊ नाही' असे ट्रम्प यांनी म्हणत प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सध्याचे शुल्क स्तर कायम राहू शकतात का या प्रश्नावर,'ते टिकू शकते, परंतु त्यांनी मला ते करण्यास भाग पाडले.' असे म्हटले होते. ट्रम्प यांनी दोन आठवड्यात दक्षिण कोरियामध्ये शी यांच्याशी भेट घेणार असल्याचे सांगितले आणि असे सुचवले की या भेटीमुळे व्यापार वाटाघाटी होऊ शकतात. 'मला वाटते की चीनसोबत आमचे काही संबंध ठीक असतील.' असे ट्रम्प यांनी म्हटले. त्यामुळे एक प्रकारे सोने स्वस्त होण्यास हे तांत्रिक कारण महत्वा चे ठरले.सोन्यापेक्षाही चांदीच्या दरात घसरण-चांदीच्या दरातही आज मोठी घसरण झाली. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १३ रूपयांनी, तर प्रति किलो दरात १३००० रुपयांनी घसरण झाली आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सराफा बाजारात चांदीचे दर प्रति १ ० ग्रॅमसाठी १७२० रूपये, तर प्रति किलोसाठी १७२००० रुपयांवर पोहोचले आहेत.सोन्यासह मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, चांदीच्या किमती १७०४१५ रुपये प्रति किलोवरून १०००० रुपयांपेक्षा जास्त घसरून १५३९२९ रुपये प्रति किलो झाल्या म्हणजेच ८% अधिक घसरण झाली आहे.सोन्याच्या तुलनेत चांदीत आणखी घसरण झाली. विशेषतः जागतिक अस्थिरतेत सोन्याच्या चांदीच्या दरात वाढ होत असताना आज मात्र सोन्याच्या तुलनेत चांदीत आणखी घसरण झाली. जागतिक पातळीवरील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीवरील अनिश्चितता असताना रशिया अमेरिका तसेच अमेरिका चीन यांच्यातील संवाद पुन्हा नरमाईने सुरू झाल्याने सुरक्षित आश्रित गुंतवणूक म्हणून आज चांदीकडे पाहिले गेली नाही. तसेच सिल्वर ईटीएफमधील घसरलेल्या मागणीमुळेही ही घसरण झाली आहे. बाजारातील आक ड्यांनुसार, सकाळच्या सत्रातच चांदी आदल्या दिवशीच्या तुलनेत ८% घसरली आहे. मात्र आज गुंतवणूकीत घसरण झाली असली तरी निश्चतच ती नकारात्मक नाही. केवळ प्राईज करेक्शन दृष्टीने ही तांत्रिकदृष्ट्या घसरण झाल्याचेही तज्ञांचे मत आहे.गेल्या सहा महिन्यांतील ही एक मोठी घसरण आहे. शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे व्यापार तणावाबाबतची चिंता कमी झाली तर प्रादेशिक बँकांकडून मिळालेल्या ठोस निकालांमुळे शेअर बाजार स्थिर होण्यास आणि बाँड उत्पन्न वाढविण्यास मदत झाली. उच्च दर सामान्यतः बुलियनसाठी नकारात्मक असतात, जे व्याज देत नाहीत. लंडनमधील चांदीच्या बाजारपेठेतील ऐतिहासिक घसरण देखील कमी होण्याची चिन्हे दर्शवित आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना काही प्रमाणात नफा मिळण्यास चालना मि ळत आहे असे जागतिक तज्ञ म्हणतात.या आठवड्यात चांदीने नवीन उच्चांक गाठला होता. शुक्रवारी प्रति औंस $५४.५० वर पोहोचला आणि नंतर तो लवकरच खूप वेगाने वाढला होता.सप्टेंबरच्या अखेरीपासून बरेच लोक चांदी खरेदी करत आहेत आणि किमतींमध्ये पुन्हा घट होण्याची शक्यता दर्शवते. गेल्या दोन आठवड्यात लंडनच्या चांदीच्या बाजारात नाट्यमय घसरण झाली आहे, ज्यामुळे न्यू यॉर्कच्या चांदीच्या फ्युचर्सपेक्षा किमती जास्त वाढल्या आहेत आणि व्यापाऱ्यांना अटलांटिक ओलांडून धातूची वाहतूक करण्यास भाग पाडले आहे. लंडनमधील ऐतिहा सिक घसरणीमुळे जगभरात धातूचा शोध सुरू झाला आहे, शुक्रवारी त्याचा एक महिन्याचा वार्षिक कर्ज खर्च सुमारे २०% राहिला आहे असे तज्ञ सांगतात.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 5:10 pm

वय वाढलं तरी त्वचा तरुण! 'या'८ पदार्थांचे गुपित तुम्हाला माहितीयेत का?

मुंबई : त्वचेचं सौंदर्य फक्त बाहेरून लावल्या जाणाऱ्या क्रीम्स, फेस मास्क किंवा लोशन्सवर अवलंबून नसतं. यामागे खरा आधार असतो आपल्या आहाराचा. आपण रोज काय खातो आणि आपल्या शरीरात कोणते पोषक घटक पोहोचतात, यावर त्वचेचं आरोग्य मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं.जर तुम्हाला नैसर्गिकरित्या त्वचा सुंदर, कोमल आणि तरुण ठेवायची असेल, तर फक्त बाह्य उपचार नव्हे, तर योग्य आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. शरीरात योग्य पोषण मिळालं तर त्वचा आतून आरोग्यपूर्ण राहते आणि चेहऱ्यावर तेज दिसून येतो. यासाठी काही विशिष्ट खाद्यपदार्थ तुमच्या रोजच्या आहारात असायलाच हवेत.चला तर पाहूया, असे कोणते ८ सुपरफूड्स आहेत जे तुमच्या त्वचेला दीर्घकाळ तरुण आणि तजेलदार ठेवू शकतात:१) डार्क चॉकलेटकोकोने भरलेले डार्क चॉकलेट केवळ चवीलाच भारी नाही तर त्वचेसाठीही फायद्याचं ठरतं. यामध्ये कोको फ्लेव्हॅनॉल्स असतात, जे एक प्रकारचे अँटिऑक्सिडंट आहेत. हे त्वचेला UV किरणांपासून संरक्षण देतात, रक्ताभिसरण वाढवतात आणि त्वचा मऊ ठेवतात. ७०% किंवा त्याहून अधिक कोको असलेले डार्क चॉकलेट निवडा.२) टोमॅटोटोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात लाइकोपीन नावाचा अँटिऑक्सिडंट असतो, जो त्वचेला सूर्यकिरणांपासून संरक्षण देतो आणि त्वचेला चमक देतो. विशेष म्हणजे, टोमॅटो शिजवल्यावर त्यातील लाइकोपीन अधिक प्रभावी होतो. त्यामुळे टोमॅटो रस किंवा भाजी रूपात नियमित खाणं फायदेशीर.३) डाळिंबडाळिंबामध्ये अँथोसायनिन्स, इलॅजिक अ‍ॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेवर होणारे वृद्धत्वाचे परिणाम कमी करतात. डाळिंब सॅलड, ज्यूस किंवा फळ म्हणून घेतल्यास त्वचेला नैसर्गिक उजळपणा मिळतो.४) सिमला मिर्चीसिमला मिर्ची ही व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत आहे. हे व्हिटॅमिन कोलेजन तयार करण्यासाठी आवश्यक असतं, जे त्वचेला घट्ट आणि लवचिक बनवते. शिवाय, यामध्ये कॅरोटीनॉइड्स नावाचे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला वय वाढल्यावर येणाऱ्या सुरकुत्यांपासून वाचवतात.५) रताळेरताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतो, जो शरीरात जाऊन व्हिटॅमिन A मध्ये रूपांतरित होतो. हे त्वचेला कोरडे होण्यापासून वाचवतो, लवचिकता राखतो आणि त्वचेच्या पेशींना संरक्षण देतो. त्याचबरोबर, रताळं व्हिटॅमिन C आणि E चा देखील चांगला स्रोत आहे.६) पालकही हिरवीपानांची भाजी केवळ लोहतत्त्वासाठीच नाही, तर त्वचेच्या आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. अँटिऑक्सिडंट्स आणि भरपूर पाण्याचं प्रमाण असल्यामुळे, पालक त्वचेला हायड्रेट ठेवतो. यासोबतच, यामध्ये त्वचेच्या संरक्षणासाठी आवश्यक असे विविध पोषक घटकही असतात.७) एवोकॅडोएवोकॅडोमध्ये चांगल्या प्रकारचे फॅट्स म्हणजेच मोनो आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे त्वचेला कोरडे होण्यापासून वाचवतात आणि आर्द्रता टिकवून ठेवतात. तसेच, यामध्ये जीवनसत्त्वे A, C, E आणि K भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचेला दीर्घकाळ उजळ आणि निरोगी ठेवतात.८) ब्रोकोलीब्रोकोली हे एक शक्तिशाली अँटी-एजिंग अन्न आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्ससह व्हिटॅमिन C आणि K असते, जे त्वचेच्या सुरकुत्या कमी करण्यात मदत करतात. ब्रोकोली कच्चं किंवा वाफवून खाल्ल्यास त्याचे पोषणमूल्य अधिक चांगल्या प्रकारे मिळते.त्वचेला दीर्घकाळ तारुण्य आणि तेज राखून द्यायचं असेल, तर वर सांगितलेले पदार्थ तुमच्या आहारात नक्की असावेत. हे केवळ त्वचेसाठी नव्हे तर एकूणच शरीरासाठी फायदेशीर आहेत. योग्य आहार, भरपूर पाणी, नियमित झोप आणि तणावमुक्त जीवनशैली हे त्वचेच्या सौंदर्याचं खरं रहस्य आहे.(अस्वीकारण : वरील सर्व बाबी प्रहार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. ही माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. यातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी प्रहार घेत नाही आणि कोणताही दावा करत नाही.)

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 5:10 pm

Karuna Sharma : वाल्मिक कराडने मला जिल्हाधिकारी कार्यालयातच…, करुण शर्मां यांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात काल (१७ ऑक्टोबर २०२५) ओबीसी समाजाच्या महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला राज्याचे मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातील प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते. ही सभा ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि राजकीय मुद्द्यांवर केंद्रित होती. मात्र, या सभेवर प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल […] The post Karuna Sharma : वाल्मिक कराडने मला जिल्हाधिकारी कार्यालयातच…, करुण शर्मां यांचा खळबळजनक आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 5:04 pm

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचा जामीन कधीही रद्द होऊ शकतो; ठाकरे गटाकडून संशय व्यक्त

छत्रपती संभाजीनगर : भुजबळ हे जामिनावर बाहेर असून त्यांचा जामीन रद्द होऊ शकतो, मंत्री मंडळाच्या निर्णयाला विरोध आहे तर, मग मंत्रिमंडळात का रहावे, असा प्रश्न उपस्थित करत राजीनामा देण्याचे शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सूचवले आहे. भुजबळ यांना मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा तिटकारा आहे, तर त्यांनी मंत्रिमंडळात गेल नाही पाहिजे, तिकडे ढुंकूनही नाही पाहिले पाहिजे. […] The post Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचा जामीन कधीही रद्द होऊ शकतो; ठाकरे गटाकडून संशय व्यक्त appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 4:41 pm

महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आयुक्तांनी दिले असे आदेश..

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व विकासकार्य महानगरपालिकेमार्फत हाती घेण्यात आले आहे. याअनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी महालक्ष्मी मंदिर येथे शनिवारी १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी प्रत्यक्ष भेट देऊन परिसराची पाहणी केली तसेच या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. महालक्ष्मी मंदिरातील भाविकांचा ओघ पाहता सुशोभीकरण त्याचप्रमाणे परिसरातील इतर कामे पूर्ण झाल्यानंतर भाविकांना जास्तीत जास्त नागरी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, तसेच दर्शन व इतर सर्व व्यवस्था सुलभ झाली पाहिजे, या दृष्टीने सर्व कामांमध्ये ताळमेळ साधण्याचे निर्देशही यावेळी गगराणी यांनी सर्व संबंधितांना दिल्या.मुंबईत विविध प्राचीन धार्मिक स्थळे आहेत. त्यामध्ये भुलाभाई देसाई मार्गावर स्थित महालक्ष्मी मंदिराचा प्रामुख्याने समावेश होतो. मंदिर आणि परिसराला भेट देणाऱ्या भाविकांकरिता अधिक चांगल्या नागरी सेवा-सुविधा पुरवता याव्यात, यासाठी मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि विकास कामे महानगरपालिकेने हाती घेतली आहेत. या पाहणीच्या वेळी डी विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, महालक्ष्मी मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे सल्लागार वास्तुतज्ज्ञ शशांक मेहंदळे या पाहणीवेळी उपस्थित होते. तसेच, महालक्ष्मी मंदिर न्यासाचे अध्यक्ष डॉ. व्ही. एन. गुपचूप, विश्वस्त एस. व्ही. डोंगरे, एस. एस. वैद्य, एस. के. दांडेकर, व्यवस्थापक एन. व्ही. कांबळी हेही बैठकीवेळी उपस्थित होते.महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील दुकाने तथा गाळे यांची पुनर्रचना करून सुसूत्रीकरण करणे व रस्त्यांची सुधारणा करणे; मार्गावरील भिंतींवर कलात्मक रंगरंगोटी करणे; पुरातन वारसा (हेरिटेज) शैलीतील विद्युत खांब आणि स्ट्रीट फर्निचर उभारणे; मार्ग दर्शक फलक (वे-फाइंडिंग साइनबोर्ड्स) स्थापित करणे; मुख्य मार्गावर आकर्षक कमानी उभारणे; गर्दीच्या नियोजनासाठी आवश्यक उपाययोजना करणे; परिसरात आकर्षक विद्युत रोशनाई करणे; आवश्यकतेनुसार भित्तीशिल्पे (म्युरल) साकारणे यासह इतर बाबींचा सुशोभीकरण कामांमध्ये समावेश आहे. दरम्यान, महालक्ष्मी मंदिर न्यासाकडून प्रस्तावित भक्तनिवास जागेचीही गगराणी यांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे मंदिराच्या मागील बाजूस मुंबई किनारी रस्त्याच्या दिशेने निर्गमन मार्ग व तेथील संभाव्य कामे, उपाययोजना यांचीही त्यांनी माहिती जाणून घेतली.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 4:30 pm

Delhi Fire : खासदारांचे निवासस्थान असणाऱ्या दिल्लीतील ‘ब्रह्मपुत्रा’इमारतीला भीषण आग

दिल्ली : दिवाळीच्या सणादिवशी दिल्लीतील डॉ. दिशंबर दास मार्गावरील ब्रह्मपुत्रा अपार्टमेंट्स या इमारतीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. ही इमारत संसद भवनापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर असून, याच परिसरात राज्यसभा आणि लोकसभा खासदारांचे निवासस्थान आहे. या संवेदनशील परिसरातील आगीच्या घटनेने सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. दुपारी साडेबारा ते दीडच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन […] The post Delhi Fire : खासदारांचे निवासस्थान असणाऱ्या दिल्लीतील ‘ब्रह्मपुत्रा’ इमारतीला भीषण आग appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 4:29 pm

Afghanistan vs Pakistan War : धक्कादायक! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे तीन क्रिकेटपटू ठार

Pakistan Airstrikes on Afghanistan : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील ड्युरंड रेषेवर तणाव वाढला आहे. 47 तासांपूर्वी झालेला शस्त्रविराम अल्पकालीन ठरला असून, पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बर्मल आणि अर्गुन जिल्ह्यांमधील निवासी भागांवर हवाई हल्ले केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या तीन युवा क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत, ज्यामध्ये […] The post Afghanistan vs Pakistan War : धक्कादायक! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे तीन क्रिकेटपटू ठार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 4:14 pm

Narhari Zirwal : लाडकी बहीण योजना रद्द केली जाणार नाही; नरहरी झिरवळ यांनी दिले आश्वासन

पालघर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असेपर्यंत राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना कोणत्याही परिस्थितीत बंद केली जाणार नाही, असे आश्वासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले आहे. पालघर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना झिरवळ यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आदिवासी शिष्यवृत्ती देण्याचा त्यांचा निर्णय आणि पक्षीय राजकारणापेक्षा लोकांच्या कल्याणावर त्यांचा भर असल्याचे […] The post Narhari Zirwal : लाडकी बहीण योजना रद्द केली जाणार नाही; नरहरी झिरवळ यांनी दिले आश्वासन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 4:12 pm

Vittal Mandir : वारकऱ्यांचा संताप अनावर! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीत 'चिकन मसाला'; बीव्हीजी कंपनी अडचणीत

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या दिवाळी भेटीमुळे सध्या तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिरात सुरक्षा रक्षक (Security Guards) पुरवण्याचे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीकडून (BVG Company) कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटवस्तू म्हणून 'चिकन मसाला'चे पॅकेट देण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदाय आणि जगभरातील विठ्ठल भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे वारकरी संप्रदायाचे पवित्र स्थान असून, अशा पवित्र ठिकाणी मांसाहाराशी संबंधित वस्तू दिवाळी भेट म्हणून दिल्यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकाराबद्दल बीव्हीजी कंपनीवर आणि मंदिर प्रशासनावर जोरदार टीका होत आहे.पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीवरून वादपंढरपूर येथील श्री क्षेत्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे वारकरी संप्रदायाचे केंद्रस्थान मानले जाते. या ठिकाणी दरवर्षी लाखो वारकरी 'माऊली माऊली'चा गजर करत पायी वारी करतात. वारकरी परंपरेनुसार शाकाहार, संयम आणि साधेपणा ही जीवनशैली अत्यंत महत्त्वाची आहे. या परंपरेत मांसाहार, मद्यपान किंवा त्यासंबंधित कोणत्याही वस्तूंना थारा नसतो. अशा पवित्र ठिकाणी मंदिरातील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेटवस्तू म्हणून 'चिकन मसाल्या'सारख्या वस्तूंचे वाटप झाल्यामुळे अनेक भक्तांमध्ये आणि वारकरी संप्रदायात तीव्र भावनिक रोष (Emotional Outrage) व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीव्हीजी कंपनी (BVG Company) ही मंदिरात सुरक्षारक्षक, स्वच्छता कर्मचारी आणि इतर काही सेवा आऊटसोर्सिंग पद्धतीने पुरवते. दिवाळीच्या निमित्ताने या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून इतर उत्पादनांसोबतच भेट पिशवीत चिकन मसाल्याचे पाकीट देण्यात आले. याच कारणामुळे आता वारकरी संप्रदायातून या भेटवस्तूबाबत मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे.बीव्हीजी ग्रुपकडून नियमांचे उल्लंघन?पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराला सुरक्षा रक्षक पुरवण्याच्या कामाचा ठेका मिळालेल्या बीव्हीजी ग्रुप बद्दलची माहिती सध्या चर्चेत आहे. या ग्रुपला तब्बल ५ कोटी ७७ लाख रुपयांचा हा महत्त्वाचा ठेका मिळाला आहे. मे महिन्यापासून विठ्ठल मंदिरात सुरक्षारक्षक पुरवण्याची जबाबदारी बीव्हीजी ग्रुपला देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या ठेकेदाराकडून मंदिराचे नियम पाळले जात नसल्यामुळे त्याचा ठेका रद्द करण्यात आला होता. त्यानंतर मंदिराने निविदा (Tenders) प्रसिद्ध केल्यावर देशभरातून आठ एजन्सींनी यासाठी दर (Rates) दिले होते. या आठही एजन्सीने सर्व्हिस चार्जेस म्हणून ३.८५% इतका समान दर कोट केल्याची माहिती आहे बीव्हीजी कंपनी मंदिरासाठी जवळपास २२० सुरक्षारक्षक पुरवणार आहे. या कर्मचाऱ्यांचा वापर मंदिर दर्शन रांगेत आणि मंदिर परिसरातील परिवार देवतांच्या ठिकाणी केला जाणार आहे. याशिवाय, यात्रेसाठी लागणाऱ्या जास्तीच्या सुरक्षारक्षकांची जबाबदारीही बीव्हीजीवर असणार आहे. मंदिर आणि परिसरात सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या बीव्हीजीसाठी मंदिर समितीची नियमावली असून, या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी बीव्हीजी ग्रुपवर असणार आहे.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 4:10 pm

ICICI Bank Q2Results: देशातील क्रमांक दोन खाजगी बँकेचा तिमाही निकाल जाहीर विश्लेषकांचा भाकीताला मागे टाकत बँकेच्या निव्वळ नफ्यात ५.२% वाढ

मोहित सोमण: देशातील क्रमांक दोन खाजगी बँक म्हणून ओळख असलेल्या आयसीआयसीआय बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. बँकेच्या इयर ऑन इयर बेसिसवर निव्वळ नफ्यात ५.२% वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ११७४५.९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत बँकेला १२३५८.९ कोटींचा निव्वळ नफा प्राप्त झाला. बँकेच्या निकालात अपेक्षित वाढ झाली नसली तरी विश्लेषकांच्या २ ते ३% अंदाजापेक्षा अधिक निव्वळ नफा मिळवण्यात बँक यशस्वी ठरली आहे. बँकेच्या मालमत्ता गु णवत्तेतही (Asset Quality) मध्येही इयर ऑन इयर बेसिसवर सुधारणा झाली आहे ज्यामध्ये जीएनपीए (Gross Non Performing Assets GNPA) इयर बेसिसवर २७१२१.२ कोटीवरून २३८४९.७ कोटींवर घसरले आहे. त्यामुळे जीएनपीए गुणोत्तर १.९७ वरू न १.५८% पातळीवर सुधारले आहे. निव्वळ एनपीए (Net Non Performing Assets NPA) या श्रेणीत मागील वर्षाच्या ०.४२% तुलनेत यंदा ०.३९% वर सुधारले.बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात (Net Interest Income NII) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील २००४८ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत २१५२९.५ कोटींवर पोहोचले. बँकेच्या एकूण उत्पन्नात (Total Income) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ४७७१४ कोटीवरून ४९३ ३३.५ कोटींवर वाढ नोंदवली. बँकेच्या माहितीनुसार, प्रोव्हिजनल आपात्कालीन तरतुदी (Provision and contingencies) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर २६% घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या १२३३ कोटींच्या तुलनेत यंदा तरतूद ९१४ कोटींवर ठेवण्यात आ ली होती. तर बँसेल ३ (Basel III) मधील सीएआर (Capital Adequacy Ratio CAR) इयर ऑन इयर बेसिसवर १५.३५% वरून १५.७६% वर वाढला आहे. उपलब्ध माहितीनुसार, आरओए (Return on Assets) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर २.३६% वाढ झाली आहे जी गेल्या वर्षीच्या तिमाहीत २.४०% होती.इंडसइंड बँकेचे एमडी आणि सीईओ राजीव आनंद निकालामधील निरीक्षण नोंदवताना म्हणाले आहेत की,'कॉर्पोरेट आणि किरकोळ कर्ज वितरण स्थिर राहिलेमायक्रोफायनान्स वगळता मालमत्तेची गुणवत्ता स्थिर राहिलीमायक्रोफायनान्स घसरणीविरुद्ध त्वरित तरतुदी घेतल्या घाऊक ठेवी सोडून दिल्यामायक्रोफायनान्स वितरणाबाबत सावधगिरी बाळगलीदरम्यान बँकेच्या माहितीनुसार,कासा ठेवी (Current Account to Saving Account CASA Ratio) आर्थिक वर्ष २०२६ मधील दुसऱ्या तिमाहीत ३९.२% होता. सध्या आयसीआयसीआय बँकेच्या देशभरात ७४२५ शाखा आहेत व १०६१० एटीएम अस्तित्वात आ हेत. बँकेने नोंदवले की ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत त्यांचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १७.००% होते आणि CET-१ प्रमाण स्वतंत्र आधारावर १६.३५% होते, जे अनुक्रमे ११.७०% आणि ८.२०% च्या नियामक आवश्यकतांपेक्षा (Regulatory Requirments) बरेच जास्त होते.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 4:10 pm

RSSच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने सरकारी अधिकाऱ्याचं तडकाफडकी निलंबन; भाजपने दिली ‘ही’प्रतिक्रिया

Karnataka : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दी समारंभात सहभागी झाल्याच्या कारणावरून कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील एका सरकारी अधिकाऱ्याचं तात्काळ निलंबन करण्यात आलं आहे. या कारवाईमुळे राज्यात राजकीय वाद भडकला असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) याला बेकायदेशीर ठरवत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. सिरवार तालुका पंचायत विकास अधिकारी प्रवीण कुमार के.पी. यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. प्रवीण […] The post RSSच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने सरकारी अधिकाऱ्याचं तडकाफडकी निलंबन; भाजपने दिली ‘ही’ प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 4:02 pm

Guess Actress Name : साऊथची ‘ही’अभिनेत्री एका आयटम सॉंगसाठी घेते 5 कोटी

चित्रपटसृष्टीत लीड रोल करणाऱ्या अभिनेत्रींच्या मानधनापेक्षा (Guess Actress Name) अनेकदा आयटम सॉन्ग करणाऱ्या अभिनेत्रींची कमाई जास्त असते. संपूर्ण चित्रपटात काम करूनही लीड अभिनेत्रींना मिळणारा मोबदला आयटम सॉन्गच्या काही मिनिटांच्या परफॉर्मन्सइतका नसतो. आयटम सॉन्ग्स (Guess Actress Name) चित्रपटांचा अविभाज्य भाग बनले आहेत आणि प्रेक्षकांनाही ते खूप आवडतात. काही अभिनेत्री फक्त आयटम सॉन्ग्ससाठीच ओळखल्या जातात, तर काही […] The post Guess Actress Name : साऊथची ‘ही’ अभिनेत्री एका आयटम सॉंगसाठी घेते 5 कोटी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 3:53 pm

Vaibhav Khedekar : मनसेतून हकालपट्टी केलेल्या वैभव खेडेकरांना भाजपकडून डबल रिटर्न गिफ्ट, पत्नीलाही मोठी संधी?

Ratnagiri News : तळकोकणातील खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेतून हकालपट्टी केलेले नेते वैभव खेडेकर यांनी अखेर 14 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तीनदा रखडलेला त्यांचा पक्षप्रवेश अखेर मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रवेशानंतर भाजपने खेडेकरांना दिवाळीचे डबल रिटर्न गिफ्ट दिल्याची चर्चा तळकोकणात रंगली […] The post Vaibhav Khedekar : मनसेतून हकालपट्टी केलेल्या वैभव खेडेकरांना भाजपकडून डबल रिटर्न गिफ्ट, पत्नीलाही मोठी संधी? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 3:46 pm

अमेरिकेच्या स्वस्त तेलाने आखाती देशांना धक्का; भारताच्या आयातीमध्ये अमेरिका चौथ्या क्रमांकावर

नवी दिल्ली: जगातील सर्वात वेगाने तेलाची मागणी वाढणाऱ्या भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीवर ताबा मिळवण्यासाठी अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आखाती देशांमध्ये मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. रशिया अजूनही सर्वात स्वस्त तेल पुरवत असला तरी, जागतिक पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका भारतासाठी स्वस्त तेल पुरवठादार म्हणून उदयास येत आहे, ज्यामुळे सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांसमोर आव्हान उभे […] The post अमेरिकेच्या स्वस्त तेलाने आखाती देशांना धक्का; भारताच्या आयातीमध्ये अमेरिका चौथ्या क्रमांकावर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 3:44 pm

Bharti Singh : छोट्या गोल्याचं उत्तर ऐकून भारती सिंह झाली भावुक; मुलाचा व्हिडिओ आला समोर

Bharti Singh : कॉमेडियन आणि होस्ट भारती सिंह यांनी नुकतीच आपल्या दुसऱ्या गर्भारपणाची घोषणा केली असून, त्यानंतर त्यांनी आपल्या मुलगा लक्ष्य सिंह लिम्बाचिया (ज्याला त्या प्रेमाने गोला म्हणतात) सोबतचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत भारतीच्या डोळ्यांत अश्रू तरळले, जेव्हा तिच्या दोन वर्षांच्या मुलाने आपल्या होणाऱ्या भावंडाची काळजी घेण्याचं गोड वचन दिलं. छोट्या […] The post Bharti Singh : छोट्या गोल्याचं उत्तर ऐकून भारती सिंह झाली भावुक; मुलाचा व्हिडिओ आला समोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 3:42 pm

Govind Barge Death : माजी उपसरपंच बर्गे मृत्यू प्रकरणात मोठी बातमी, नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणी वाढल्या; यंदाची दिवाळीही...

बीड : बीडमधील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली होती. कलाकेंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) हिच्या प्रेमात असलेल्या गोविंद बर्गे यांनी साधारण महिन्याभरापूर्वी टोकाचे पाऊल उचलून आपले आयुष्य संपवले. पूजा हिने केलेल्या ब्लॅकमेलिंगमुळे तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्यामुळेच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाडला त्वरित ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. याच प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिन्याभरापासून तुरुंगाच्या गजाआड असलेल्या पूजाची यंदाची दिवाळी देखील तुरुंगातच जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने पूजा गायकवाडचा जामीन अर्ज (Bail Application) फेटाळून लावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे, तसेच या प्रकरणातील कायदेशीर गुंतागुंत अजून वाढणार असल्याचे दिसून येत आहे.https://prahaar.in/2025/10/18/dehli-mp-residence-brahmaputra-apartment-fire/नेमकं प्रकरण काय?गोविंद बर्गे हे पत्नी, मुले आणि कुटुंबीयांसह राहत असले तरी, वर्ष-दीड वर्षापूर्वी ते कलाकेंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमात पडले होते. कलाकेंद्रात झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्री आणि नंतर प्रेमात झाले. मात्र, पूजासाठी गोविंद बर्गे हे फक्त एक 'कस्टमर' होते, ज्याच्याकडून महागड्या वस्तू, पैसे, सोनं-नाणं आणि मालमत्ता उकळता येईल. वर्षभरात गोविंद बर्गे यांनी पूजाला महागडे मोबाईल, दागिने, रोख पैसे आणि मालमत्ता अशी बक्कळ रक्कम खर्च करून दिली. एवढे देऊनही पूजाची नजर बर्गे यांच्या गेवराईतील बंगल्यावर पडली. पूजा हिने तो बंगला स्वतःच्या नावावर करण्याची मागणी केली, तसेच भावाच्या नावावर जमीन करून देण्याचा तगादा लावला. बर्गे यांनी या मागण्या फेटाळताच त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. पूजा हळूहळू बर्गे यांच्याशी बोलणे टाळू लागली आणि फोन उचलणे बंद केले. यावरही गोविंद बधत नसल्याचे पाहून तिने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पूजाने गोविंद बर्गे यांना 'खोट्या गुन्ह्यात अडकवेन', 'अत्याचार केल्याचा आरोप करेन' अशा धमक्या दिल्या. ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केले, तिचे हे रूप पाहून गोविंद बर्गे यांना मोठा धक्का बसला. त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण पूजाने काहीही ऐकले नाही. अखेरीस, या मानसिक त्रासाला कंटाळून गोविंद बर्गे यांनी टोकाचे पाऊल उचलले.'जर ती बोलली असती तर'...बीड येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणातील अखेरच्या क्षणांचा तपशील अत्यंत हृदयद्रावक आहे. ज्या रात्री गोविंद बर्गे यांचा मृत्यू झाला, त्यापूर्वी संध्याकाळी ते नर्तिका पूजा गायकवाड हिला भेटण्यासाठी तिच्या सासुरवाडीला गेले होते. गोविंद बर्गे जेव्हा तिथे पोहोचले, तेव्हा पूजा गायकवाड घरी नव्हती आणि ती फोनही उचलत नव्हती. तिच्या आईनेही गोविंद यांना फारसा प्रतिसाद दिला नाही. या संपूर्ण प्रकारामुळे मानसिक तणावात असलेल्या गोविंद बर्गे यांनी अखेर पूजाला व्हिडिओ कॉल करून आत्महत्येचा स्पष्ट इशारा दिला. दुर्दैवाने, समोरून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. हे पाहून गोविंद बर्गे यांचा संताप आणि नैराश्य वाढले. ते रागातच आपल्या कारमध्ये बसून तिथून निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी त्याच कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेनंतर परिसरात अशी जोरदार चर्चा सुरू आहे की, गोविंद बर्गे यांनी कॉल केल्यावर पूजाने त्यांच्याशी सहानुभूतीपूर्वक संवाद साधला असता, तर कदाचित त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले नसते आणि त्यांचा जीव वाचला असता. दुर्देवाने, त्यांच्या या शेवटच्या प्रयत्नाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे एका व्यक्तीचा जीव गेला.दिवाळीतही पूजा गायकवाडला 'नो बेल'गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पूजा गायकवाडला ताब्यात घेतले होते. तिच्यामुळेच गोविंद यांचा जीव गेला, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. तिला सुरुवातीला पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर, न्यायालयाने तिची रवानगी तुरुंगात केली. सरकारी वकिलांचा जोरदार युक्तिवाद: पूजा गायकवाडने पुन्हा जामिनासाठी अर्ज (Bail Application) केला होता. मात्र, तिला जामीन मिळू नये यासाठी जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत बाजू मांडली. वकिलांनी नमूद केले, जर आरोपी पूजा गायकवाडला जामीन मंजूर केला, तर समाजात एक अत्यंत चुकीचा संदेश जाईल. अशा महिलांकडून पुरुषांची आर्थिक आणि मानसिक छळवणूक होण्याची शक्यता आणखी वाढेल. जामीन फेटाळला, मुक्काम वाढला: न्यायालयाने डॉ. राजपूत यांचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत, पूजा गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे पूजाचा तुरुंगातील मुक्काम वाढला असून, यंदाची दिवाळीही तिला गजाआडच काढावी लागणार आहे.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 3:30 pm

HDFC Bank Q2 Results: देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेचा निकाल जाहीर HDFC Bank निव्वळ नफ्यात थेट १०.८% वाढ

मोहित सोमण:देशातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एचडीएफसी बँकेने आपला आर्थिक निकाल जाहीर केला आहे. बँकेच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर १०.८% वाढ झाल्याने निव्वळ नफा १८६४१.३० कोटीवर पोहोचला होता. तज्ञांच्या १६७१४ कोटींच्या भाकीताला मागे सारून बँकेच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत मोठी वाढ झाली आहे. आज संचालक मंडळाची (Board of Directors) बैठक होणार आहे. या निकालावर संचालक मंडळ अंतिम शिक्कामोर्तब करणार आहे.गेल्या ति माहीत बँकेच्या निव्वळ नफ्यात समाधानकारक वाढ झाली असली तरी अपेक्षित वाढ झाली नव्हती. मात्र या तिमाहीत बँकेने भरीव कामगिरी केली आहे. दुसऱ्या तिमाहीत बँकेने निव्वळ नफा १८६४१.२७ कोटी नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत हा नफा १६८ २०.९७ कोटी होता. बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात (Net Interest Income NII) ४.८% वाढत ३१५५१.५ कोटींवर पोहोचले आहे. प्री प्रोव्हिजनल ऑपरेटिंग नफ्यात (PROP) इयर ऑन इयर बेसिसवर १८.५% वाढ नोंदविण्यात आल्याचे बँकेने निकालात जाही र केले.उपलब्ध माहितीनुसार, बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेतही वाढ झाली आहे. जीएनपीए (Gross Non Performing Assets GNPA) तब्बल ७.४% तिमाही बेसिसवर (Quarter on Quarter QoQ) घसरले असून निव्वळ एनपीएत (Net Non Performing Assets NPA) ६.७५% घसरण तिमाही बेसिसवर झाल्याने एनपीए ११४४७.२९ कोटींवर पोहोचला. बँकेच्या माहितीनुसार, सीएसआर (Capital Adequacy Ratio CAR) इयर ऑन इयर बेसिसवर ३० सप्टेंबरपर्यंत २०.०% पातळीवर पोहोचला आहे. सप्टेंबर ३०, २०२४ मधील १९.८% पातळीपेक्षा तो किरकोळ वाढला आहे. नियामक तरतुदीनुसार तो ११.९% अ सावा लागतो.बँकेच्या इतर उत्पन्नात (Other Income) मध्येही २५% वाढ बँकेने नोंदवली. इयर बेसिसवर ही वाढ १४३५० कोटींवर पोहोचली आहे. रेग्युलेटरी फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एचडीबी फायनांशियल सर्विसेस (HDB) आयपीओ सूचीबद्ध (Listed) झा ल्यामुळे त्यातून झालेला आर्थिक लाभ बँकेला झाला.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 3:30 pm

दिवाळीत फटाके फोडताना काळजी घ्या, हात भाजल्यावर काय कराल?

दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा पर्व. या सणात प्रत्येक घर झगमगून जाते, अंगणात सुंदर रांगोळ्या सजतात, आकाशात रंगीबेरंगी कंदील लुकलुकतात आणि मुलं-मुली किल्ले बांधण्यात व्यस्थ असतात. पण दिवाळी म्हटलं की फटाके फोडल्याशिवाय सण अपूर्णच वाटतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फटाके फोडायला आवडतात. पण, या आनंदात थोडीशी बेपर्वाई झाली, तर अपघात होऊ शकतो. आणि त्याची ठिणगी तुमच्या शरीराच्या अवयवावर पडू शकते. फटाके फोडताना शरीर भाजलं.. तर या गोष्टी तातडीनं करायला अजिबात विसरू नका.दिवाळीत हात भाजल्यावर काय कराल?1) थंड पाणीशरीराचं जे भाग जळलं आहे, ते थंड पाण्याच्या खाली ठेवा. किमान 10-15 मिनिटांपर्यंत असं करत राहा. यामुळे शरीराला वेदना कमी होतील आणि फोड येण्याचा धोकाही कमी होतो. परंतु बर्फाचं पाणी किंवा बर्फ भाजलेल्या जागेवर लगेच लावू नये. यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकतो.2) कपडे आणि दागिने लगेच काढून टाकाजळलेल्या शरीराच्या भागावर जर एखादी अंगठी, बांगड्या किंवा टाईट कपडा असेल, तर ते लगेच काढून टाकावे. कारण शरीर जळाल्यानंतर सूज येऊ शकते. यामुळे शरीराला जखम किंवा वेदना होऊ शकतात.3) जळलेल्या भागाला खाजवू नकाशरीराच्या ज्या भागाला भाजलं असेल, त्या जागेवर हातने खाजवू नये. यामुळे इन्फेक्शन होऊ शकतो आणि त्वचा रोगही होण्याची शक्यता असते. त्वचेची जखम मोठी होऊ शकते.काय करू नका?1) टूथपेस्ट किंवा हळद लावू नकाहे घरगुती उपाय अनेकदा शरीरासाठी घातक ठरू शकतात. यामुळे परिस्थिती आणखी खराब होऊ शकते. यामध्ये असे तत्व असतात, ज्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्वचा खराब होऊ शकते.2) थेट बर्फ लावू नकाशरीराच्या ज्या भागात जळलं असेल, त्या ठिकाणी लगेच बर्फ लावू नये. त्यामुळे फ्रोस्टबाईटचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे त्वचेचं आणखी नुकसान होऊ शकतं. तसच त्वचेवर फोड आल्यास ते फोडू नका. यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं.First Aid नंतर काय करू नका?थंड पाण्याने दिलासा मिळाल्यानंतर तुम्ही शरीराचं जळलेल्या भागावर एंटीसेप्टिक क्रीम लावू शकता. जसं की सिल्व्हर सल्फेडियाजीन क्रीम, सामान्यपणे ही क्रीम जळलेल्या भागावर लावतात. जळलेलं भाग एखाद्या साफ कपड्याने किंवा पट्टीने झाकून ठेवा. जेणेकरून त्वचेला इन्फेक्शन होणार नाही. पट्टी खूप टाईट बांधा.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 3:30 pm

Brahmaputra Apartment Fire : खासदारांच्या 'ब्रह्मपुत्रा अपार्टमेंट'च्या पार्किंगला भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील विश्वंभरदास मार्गावर असलेल्या ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटमध्ये (Brahmaputra Apartment) आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. संसदेपासून (Parliament) अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या इमारतीत अनेक खासदारांची (MPs) निवासस्थाने आहेत, ज्यात राज्यसभेतील खासदारांच्या घरांचा समावेश आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) १२ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.https://prahaar.in/2025/10/18/explainer-what-is-muhurat-trading-what-exactly-is-its-relationship-with-spirituality-and-economics-find-out-all-the-changes-this-year/ही आग प्रामुख्याने ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटच्या पार्किंग परिसरात लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीचे स्वरूप लक्षात घेता, यावर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ही आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तातडीने रुग्णवाहिका (Ambulance) घटनास्थळी पोहोचली आहे. या आगीत जिवीतहानी झाली आहे की नाही, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. सध्या दिवाळीचा सण असल्याने अनेक खासदार इथे उपस्थित नाहीत. मात्र, त्यांचे कर्मचारी आणि खासगी सहायक (P.M.) इथे असताना ही आग लागल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.(बातमी अपडेट होत आहे)

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 3:10 pm

“माझ्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी व्हायरल…”अजिंक्य देव यांनी स्वत: दिले स्पष्टीकरण

Ajinkya Deo | अभिनेते अजिंक्य देव लवकरच ‘रामायण’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या अपघाताची माहिती सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. त्याबाबत आता अजिंक्य देव यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत या अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. अजिंक्य देव यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणाले की, ‘नमस्कार मी अजिंक्य देव. […] The post “माझ्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी व्हायरल…” अजिंक्य देव यांनी स्वत: दिले स्पष्टीकरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 3:03 pm

“तुम्ही विचारही केला नसेल असं उत्तर देऊ” ; असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला दिली धमकी

Pakistan India Tension । पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध चिथावणीखोर विधान करून तणाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. अबोटाबादमधील कालुल याठिकाणी पाकिस्तान मिलिटरी अकादमीमध्ये कॅडेट्सना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, भारताच्या कोणत्याही छोट्याशा चिथावणीला पाकिस्तान विचारही केला नसेल असं उत्तर देऊ असे म्हटले आहे. मुनीर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पाकिस्तान […] The post “तुम्ही विचारही केला नसेल असं उत्तर देऊ” ; असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला दिली धमकी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 3:02 pm

कोई मिल गया सिनेमातील ‘हा’अभिनेता क्रिश 4 मध्ये साकारणार व्हिलन? दिली हिंट म्हणाला “प्रेक्षक मला आणि….”

Rajat Bedi : ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेबसिरीजमधून पुन्हा एकदा सिनेइंडस्ट्रीत दमदार कम बॅक केल्यानंतर अभिनेता रजत बेदी चांगलाच चर्चेत आला आहे. २००३ मध्ये अभिनेता रजत बेदी ‘कोई मिल गया’ सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर तो सिनेमा इंडस्ट्रीपासून बराच काळ अलिप्त राहिला होता. आता मोठ्या ब्रेकनंतर तो या वेबसिरीजमधून प्रेक्षकांला भेटीला आला. या वेबसिरीजला […] The post कोई मिल गया सिनेमातील ‘हा’ अभिनेता क्रिश 4 मध्ये साकारणार व्हिलन? दिली हिंट म्हणाला “प्रेक्षक मला आणि….” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 3:01 pm

Alia Bhatt : आलिया भट्टचा नवा अवतार.! आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात; फोटो सोशलवर व्हायरल…

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने अखेर आपल्या पुढच्या चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या बहुप्रतिक्षित चित्रपटातील आलियाचे पहिले फोटो सोशल मीडियावर लीक झाले असून, ते सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. आलियाचा लुक पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि कौतुकाचं वातावरण आहे. या चित्रपटात […] The post Alia Bhatt : आलिया भट्टचा नवा अवतार.! आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात; फोटो सोशलवर व्हायरल… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 2:44 pm

“महाआघाडीसारखा कोणताही गोंधळ नाही…” ; अमित शहांच्या भेटीनंतर चिराग पासवान यांचे वक्तव्य

NDA Alliance। चिराग पासवान यांनी पटना येथील एका हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. बिहार विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी आणि एनडीए आघाडीच्या निवडणूक रणनीतीला बळकटी देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. चिराग पासवान म्हणाले की, त्यांच्या आघाडीचे वेगळेपण आणि ताकद हे आहे की सर्व मित्रपक्ष हातात हात घालून काम करत आहेत आणि […] The post “महाआघाडीसारखा कोणताही गोंधळ नाही…” ; अमित शहांच्या भेटीनंतर चिराग पासवान यांचे वक्तव्य appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 2:42 pm

लवकरच फरार मेहुल चौक्सीच्या मुसक्या आवळणार? भारत सरकारला प्रत्यार्पणासाठी 'हे'मोठे यश

प्रतिनिधी: लवकरच फरार उद्योगपती मेहुल चौक्सी भारतात परतणार का या अटकळी सुरू झाल्या आहेत. भारत सरकारने यासंदर्भात मोठे यश प्राप्त केले आहे. हिरा व्यापारी मेहुल चौक्सीच्या प्रत्यार्पणाला (Extradition) बेल्जियम येथील न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपी चौक्सी भारतात परतण्याची शक्यता आहे. मात्र सुत्रांच्या माहितीनुसार, मेहुल चौक्सी याविरोधात न्यायालयात अपील करू शकतो. अद्याप याविषयी अतिरिक्त माहिती उपलब्ध झालेली नाही. ए का प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अँटवर्प न्यायालयाने भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीला मान्यता देत प्राथमिक आदेश दिला आहे. मेहुल चोक्सी त्याविरुद्ध अपील करू शकतो' असे सुत्रांनी प्रसारमाध्यमांना स्पष्ट केले आहे. १२ एप्रिल २०२५ रोजी मेहुल चौक्सीला बेल्जियम पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारने वेळोवेळी विशेष पाठपुरावा परदेशी तपास यंत्रणांना केला होता. २०१८ साली मेहुल चौक्सीने देश सोडला होता. फरार निरव मोदी हा मेहुल चौक्सीचा पुतण्या आहे.भारतीय एजन्सी, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर बेल्जियमच्या अधिकाऱ्यांनी मेहुल चौक्सीला अटक केली होती. २०१८ मध्ये भारतातून पळून गेल्यापासून तो अँटिग्वामध्ये राहत होता आ णि त्याचे भारतीय नागरिकत्व वैध असल्याचे सांगितले जात असतानाही त्याने कॅरिबियन राष्ट्राचे नागरिकत्व घेतले होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये, तो वैद्यकीय उपचार घेण्यासाठी बेल्जियममध्ये पोहोचला असे वृत्त आहे.भारतीय एजन्सींनी बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना त्यां च्या प्रत्यार्पणाच्या विनंतीचा भाग म्हणून २०१८ आणि २०२१ मध्ये मुंबईच्या विशेष न्यायालयाने जारी केलेले किमान दोन ओपन-एंडेड अटक वॉरंट प्रदान केले आहेत.चोक्सी, त्याचा पुतण्या नीरव मोदी, कुटुंबातील अनेक सदस्य, कर्मचारी आणि बँक अधिकाऱ्यांसह, २०१८ मध्ये सीबीआय आणि ईडीने दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये नाव देण्यात आले होते. पीएनबीच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेत लेटर ऑफ अंडरटेकिंग (Lo U) जारी करणे आणि फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिट (FLC) मध्ये फेरफार करणे यासह मोठ्या प्रमाणात कर्ज फसवणुकीशी संबंधित आरोप आहेत.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 2:30 pm

जागतिक पातळीवर भारत आता ताकदीच्या स्थितीत व्यापारात सहभागी होतो: पियुष गोयल

प्रतिनिधी: वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले की, अलिकडच्या वर्षांत भारताने महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले आहेत आणि ते आता ताकदीच्या स्थितीतून वाटाघाटी करते, हे देशाच्या वाढत्या आर्थिक आत्मविश्वासाचे आणि मुक्त व्यापार करार (FTA) आणि इतर व्यापार व्यवस्थांबद्दलच्या भारताच्या दृष्टिकोनाच्या दृष्टीने जागतिक दर्जाचे प्रतिबिंब आहे.नवी दिल्ली येथे असोचॅमच्या वार्षिक परिषदेला आणि १०५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना गोयल म्हणाले की, देश आता प्रा मुख्याने अशा राष्ट्रांशी संबंध जोडत आहे जे भारताचे प्रतिस्पर्धी नाहीत, व्यापार भागीदारी संतुलित आणि परस्पर फायदेशीर आहेत याची खात्री करून घेत आहेत. मंत्र्यांनी सांगितले की,जेव्हा भारत स्वतःची ताकद ओळखल्याशिवाय असंतुलित मुक्त व्यापार क रार करत असे ते दिवस गेले.त्यांनी नमूद केले की या धोरणात्मक दृष्टिकोनामुळे भारताला त्याच्या देशांतर्गत उद्योगांचे रक्षण करण्यास, निर्यातीला प्रोत्साहन देण्यास आणि गुंतवणूक आणि तंत्रज्ञान सहकार्यासाठी संधी निर्माण करण्यास अनुमती मिळते,तर भारताच्या खर्चावर दुसऱ्या पक्षाला अ प्रमाणित फायदा होऊ शकणारे करार टाळता येतात. गोयल यांनी माहिती दिली की भारताचा परकीय चलन साठा सुमारे $७०० अब्ज इतका मजबूत आहे, जो भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूत पायाभूत बाबी प्रतिबिंबित करतो. ते म्हणाले की, प्रत्येक बाबतीत, भा रतातील लोक, व्यवसाय आणि उद्योग एकत्रितपणे एक नवीन गतिमानता, उत्साह आणि आत्मविश्वास दर्शवतात जो काही वर्षांपूर्वी पाहिला नव्हता. मंत्र्यांनी सांगितले की आज जग भारताला एक महत्त्वाचा व्यापारी भागीदार आणि काम करण्यासाठी एक विश्वासार्ह देश म्हणून ओळखते.त्यांनी असे निरीक्षण नोंदवले की जेव्हा भारत कमकुवत स्थितीतून व्यापार करारांवर वाटाघाटी करत असे ते दिवस आता संपले आहेत आणि भारतीय पासपोर्ट आता जगभरात आदर आणि मूल्य मिळवतो. गोयल यांनी निदर्शनास आणून दिले की जग आव्हानात्म क जागतिक काळाला तोंड देत असताना, भारत लवचिकता दाखवत आहे आणि सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यांनी अलिकडेच आयएमएफच्या अंदाजाचा संदर्भ दिला ज्याने भारताचा विकास अंदाज ६.४ वरून ६..६% पर्यंत वाढवला आणि सप्टेंबर मध्ये किरकोळ चलनवाढ आठ वर्षांतील सर्वात कमी १.५४% होती असे देखील नमूद केले. ते म्हणाले की, व्यवसाय सुलभतेचे उपाय, कायद्यांचे गुन्हेगारीकरण आणि प्रक्रिया आणि अनुपालन सुलभ करून भारताला व्यवसायासाठी एक आकर्षक ठिकाण बनव ण्यासाठी सरकारने काम केले आहे.मंत्र्यांनी पुढे सांगितले की, भारत त्याच्या शाश्वततेच्या उद्दिष्टांसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे आणि त्याने आधीच २५० गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता साध्य केली आहे, जी देशाच्या ट्रान्समिशन ग्रिडच्या ५०% आहे.ते म्हणाले की, २०३० पर्यंत, भारत ५०० गिगावॅट स्वच्छ ऊर्जा क्षमता साध्य करेल, ज्यामुळे ते डेटा सेंटर आणि स्वच्छ ऊर्जा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक बनेल.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 2:10 pm

Ranveer Singh : बॉलिवूड चित्रपटांनाही टक्कर! रणवीर सिंग-श्रीलीलाच्या 'एजंट चिंग अटॅक'ने बॉलिवूडचे बजेट तोडले; जाहिरातीचा फर्स्ट लूक रिलीज

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री श्रीलीला (Sreeleela) यांच्या आगामी जाहिरातीचा फर्स्ट लूक अखेर रिलीज झाला आहे. 'एजंट चिंग अटॅक' (Agent Ching Attack) नावाच्या या जाहिरातीने बॉलिवूडमध्ये सध्या मोठी खळबळ उडवून दिली आहे, कारण ती तब्बल ₹१५० कोटींच्या विक्रमी बजेटमध्ये बनवली गेली आहे.एचटी (HT) ने दिलेल्या वृत्तानुसार, ही जाहिरात इतक्या भव्य बजेटमध्ये बनली आहे की, तिने बॉलिवूडमधील अनेक पूर्ण-लांबीच्या चित्रपटांचा खर्चही मागे टाकला आहे. विकी कौशलच्या 'छावा' (₹१३० कोटी), 'रेड २' (₹१२० कोटी), 'स्त्री २' (₹६० कोटी) आणि 'सैयारा' (₹४५ कोटी) यांसारख्या चित्रपटांपेक्षा या जाहिरातीचा बजेट जास्त आहे. ही जाहिरात रणवीर सिंगला स्पाय एजंटच्या भूमिकेत दाखवते, तर श्रीलीला हिरोईनच्या भूमिकेत आहे आणि बॉबी देओल (Bobby Deol) यात खलनायक प्रोफेसर बनला आहे.https://prahaar.in/2025/10/18/rinku-singh-century-against-andhra-vs-uttar-pradesh-ranji-trophy-2025/'जवान' स्टाईलचे दिग्दर्शन

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 1:30 pm

विलिनीकरणाच्या बातम्यांवर तीव्र नाराजीसह बँक ऑफ महाराष्ट्र फेडरेशनचे थेट अर्थमंत्र्यांना पत्र

करून दिले 'या' शब्दांचे स्मरण!प्रतिनिधी:माध्यमांनी बुधवारी पब्लिक सेक्टर बँकांच्या विलीनीकरणाबाबत बातमी प्रसिद्ध केली होती त्यानुसार छोट्या पीएमयु बँकाचे तीन मोठ्या पीएसयु बँकात विलीनीकरणाची संभाव्यता माध्यमात व्यक्त केली गेली होती. प्रस्तावानुसार, ओव्हरसीज बँक, सें ट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांचे पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये विलीनीकरण होऊ शकते ही बातमी प्रसिद्धीस आली. मात्र या बातमीवर बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचारी व अ धिकारी फेडरेशनने तीव्र नाराजी व्यक्त करत थेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विनंती स्पष्टीकरण पत्र लिहिले आहे.माध्यमातील या बातम्यावर बँकेच्या फेडरेशने 'या' बातम्यांची सत्यता कितपत आहे असा प्रश्नवजा विनंती सीतारामन यांना केली आहे. याविषयी बँकेच्या मजबूत कामगिरीबाबत लिहिताना बँकेने वेळोवेळी चांगली कामगिरी करत आपले स्थान निर्माण केले असल्या चेही या पत्रात स्पष्ट केले. बँक ऑफ महाराष्ट्राला गेल्या काही वर्षांत अनेक पुरस्कार मिळाले होते. याचाच दाखला देत बँक सुस्थितीत असल्याने अशा बातम्यांमुळे विलीनीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच या बातमीमुळे बँकेच्या ग्राहक, कर्मचारी, भा गभांडवलधारक यांच्या मनात संभ्रमाची स्थिती निर्माण झाल्याने यावर भाष्य करण्याची विनंती सीतारामन यांना बँक ऑफ महाराष्ट्राच्या फेडरेशनने केली आहे.फेडरेशनने नेमक्या शब्दात पत्रात म्हटले आहे की,'त्यांच्या पत्रात, फेडरेशनने म्हटले आहे की,'बँक ऑफ महाराष्ट्रने बँकिंग क्षेत्रातील प्रमुख बाबींमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ऑपरेशनल कार्यक्षमता, क्रेडिट वाढ आणि आर्थिक समावेशनात ती अ जूनही आघाडीवर आहे. उद्योगातील तिच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत बँकेला अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.'फेडरेशनने महाराष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक रचनेतील बँकेचे महत्त्वाचे स्थान देखील अधोरेखित पत्रात केले आहे त सेच तिच्या मजबूत प्रादेशिक उपस्थिती आणि खोलवर रुजलेल्या समुदाय संपर्काद्वारे राज्यातील लाखो लोकांसाठी आर्थिक जीवनरेखा म्हणून काम करते असे म्हटले. त्यांनी २०२४ आणि २०२५ मध्ये बँकेच्या स्थापना दिनाच्या समारंभात अर्थमंत्र्यांची उपस्थिती आ णि प्रेरणास्रोत म्हणून त्यांचे 'कृतज्ञतेचे शब्द' यांचे स्मरणही अर्थमंत्र्यांना करून दिले आहे.कर्मचाऱ्यांनी सरकारला विलीनीकरणाशी संबंधित माध्यमांच्या वृत्तांचे खंडन करणारे अधिकृत स्पष्टीकरण जारी करण्याची विनंती केली की यामुळे भागधारकांचा विश्वास पुनर्संचयित होईल आणि बँकेला शाश्वत वाढ, नावीन्य आणि राष्ट्र उभार णीचा स्वतंत्र प्रवास सु रू ठेवता येईल. यापूर्वी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार बँकेच्या नव्या बँकिंग धोरणात्मक निर्णयाचा भाग म्हणून पीएसयु बँकांचे कंसोलिडेशन (एकत्रिकरण) करण्यास सरकार इच्छुक आहे. यासाठी उच्चस्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याविषयी बैठकांना सुरू वात केली होती. अंतिम आराखडा करुनच पंतप्रधान नरेंद्र मोदी व पंतप्रधान कार्यालयाला याविषयी अंतिम अहवाल सादर केला जाणार असल्याचे अहवालात म्हटले गेले होते.यापूर्वीही २०१७ ते २०२० काळात दहा पीएसयु बँकाचे विलीनीक रण झाले होते. शेवटचे मर्जर झाले तेव्हा युनायटेड बँक ऑफ इंडियाचे पंजाब नॅशनल बँकेत, तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे विलीनीकरण पंजाब नॅशनल बँकेतच करण्यात आले होते. सरकारने यापूर्वीच सरकारचा बँकिंग क्षेत्रात कमीत कमी हस्तक्षेप व्हावा यासाठी काही भविष्यकालीन योजना आखल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून निती आयोगाच्या शिफारशीनुसार,किमान पीएसयु बँका राखण्याचा सरकारचा मानस आहे अथवा अस्तित्वात असलेल्या पी एसयु बँकेच्या भागभांडवलातील आपला हिस्सा कमी करण्याचे धोरण आखण्यात आले. त्याच धोरणाअंतर्गत केवळ एसबीआय, पीएनबी, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक या बँका राखण्याचे सरकारने ठरवले असल्याचे वृत्त यापूर्वी प्रसारमाध्यमांनी दिले होते.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 1:30 pm

Federal Bank Q2Results: काही क्षणापूर्वी फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात उच्चांकी वाढ निव्वळ नफा १०.८५% वाढला

मोहित सोमण: फेडरल बँकेने आपला तिमाही निकाल काही क्षणापूर्वी जाहीर केला. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या कालावधीत आपला जबरदस्त निकाल नोंदवला आहे. बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात उच्चांकी वाढ (All time High) झाल्याचे बँकेने दिलेल्या आ कडेवारीत म्हटले. बँकेच्या निकालात म्हटल्याप्रमाणे बँकेला २४९५ कोटींचे निव्वळ व्याज उत्पन्न (Net Interest Income NII) या तिमाहीत मिळाले. तर बँकेच्या निव्वळ नफ्यात १०.८५% वाढ झाली असून तिमाही बेसिसवर (Quarter on Quarter QoQ) ते ९५५.२६ कोटींवर पोहोचले आहे.बँकेच्या कासा ठेवी (Current Account Saving Account CASA) गुणोत्तरात ९४ बेसिस पूर्णांकाने वाढ झाली असून ते ९५५.२६ कोटींवर पोहोचले आहे. बँकेच्या मते ऑपरेटिंग उत्पन्न व प्रभावीपणे किंमत नियंत्रित केल्याने का सा गुणोत्तर राखण्यात बँकेला यश आले.आरोए (Return on Assets) १.०९% वर व आरओई (Return on Equity) ११.०१% पोहोचला आहे.बँकेच्या ठेवीत इयर ऑन इयर बेसिसवर ७.३६% वाढ झाली असून निव्वळ आगाऊ ठेवीत (Net Advances) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ६.२३% वाढ झा ली आहे. बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेत (Asset Quality) मध्येही यंदा वाढ झाली असून जीएपीए (Gross Non Performing Assets) १.८३% वर व निव्वळ एनपीएत (Net Non Performing Assets) मध्ये ०.४८% पातळीवर स्थिरावले आहे. बँकेच्या माहितीनु सार, बँकेचा सीआरएआर (Capital to Risk (Weighted) Average Ratio) अर्थात सीएआर (Capital Adequacy Ratio) १५.७१% वर पोहोचला आहे. बँकेने आपली भांडवली स्थिती मजबूत असल्याचे स्पष्ट केले.गेल्या वर्षीच्या तिमाहीत बँकेला एकूण ४९९४१८.८३ कोटींचा एकूण व्यवसाय (Total Business) मिळाला होता जो यंदा इयर ऑन इयर बेसिसवर ६.८४% वाढत ५३३५७६.६४ कोटींवर पोहोचला.बँकेच्या ठेवीत गेल्या वर्षीच्या तिमाहीतील २६९१०६.५९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ७.३६% वाढ झाल्याने ठेवी २८८९१९.५८ कोटीवर पोहोचल्या आहेत. एकूण उत्पन्नात इयर ऑन इयर बेसिसवर ३.७५% वाढ झाली असून ते ७५४१.२३ कोटीवरून ७८२४.३३ कोटीवर पोहोचले आहे. बँकेच्या क्रेडिट ग्रोथमध्येही इयर ऑन इय र बेसिसवर ७.३६% वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तिमाहीतील २३०३१२.२४ कोटींच्या तुलनेत ते या तिमाहीत २४४६५७.०६ कोटींवर पोहोचले आहे.निकालावर भाष्य करताना व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हीएस मनियन म्हणाले आहेत की,' या भूमिकेत एक वर्षापेक्षा जास्त काळ घालवल्यानंतर, बँक आज कुठे आहे आणि आपण कोणत्या दिशेने जात आहोत याबद्द ल मला खोलवर खात्री आहे. गेल्या काही तिमाहीत, आम्ही आमचा पाया मजबूत करण्यासाठी आणि भविष्यासाठी बांधकाम करण्यासाठी अनेक धोरणात्मक पुनर्रचना केल्या आहेत आणि त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. आमची CASA फ्रँचायझी सतत आणि अर्थपूर्ण वाढ दाखवत आहे, जी आमच्या ग्राहकांचा विश्वास आणि आमच्या टीमच्या अंमलबजावणीची सातत्य दर्शवते. आम्ही आमच्या मालमत्तेचे मिश्रण विचारपूर्वक वाढवत आहोत, आमच्या मध्यम-उत्पन्न पोर्टफोलिओचा वाटा मोजमाप आणि शिस्तबद्ध पद्धतीने वाढवत आहोत. त्याच वेळी, आमच्या फी उत्पन्नात मजबूत, दुहेरी-अंकी अनुक्रमिक वाढ दिसून आली आहे, जी आमच्या कमाईची रुंदी आणि लवचिकता अधोरेखित करते. आमची मालमत्ता गुणवत्ता मजबूत राहते, विवेकी जोखीम व्यवस्थापन आणि वाढीच्या संतुलित दृष्टिकोनामुळे समर्थित आहे. आपण पुढे पाहत असताना, आपण एक अशी संस्था घडवत आहोत जी तिच्या विचारसरणीत चपळ आहे, तिच्या कृतींमध्ये शिस्तबद्ध आहे आणि फेडरल बँकेला परिभाषित करणाऱ्या स्थिरता आणि मूल्यांमध्ये दृढपणे स्थिर आहे.'

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 1:10 pm

Rinku Singh Century : दांडपट्ट्यागत बॅट फिरवली, ११ चौकार अन् षटकारांच्या मदतीने रिंकू सिंगचं रणजी ट्रॉफीत 'वादळी'शतक!

कानपूर : रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) २०२५-२६ हंगामाला जोरदार सुरुवात झाली असून, उत्तर प्रदेशचा स्टार फलंदाज रिंकू सिंग याने आपल्या पहिल्याच सामन्यात धुमाकूळ घातला आहे. उत्तर प्रदेश विरुद्ध आंध्र (Uttar Pradesh vs Andhra) या सामन्यात, आंध्रच्या संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ४७० धावांचा मोठा डोंगर उभारला. या आव्हानात्मक धावसंख्येसमोर उत्तर प्रदेश (UP) संघाची सुरुवात खराब झाली, आणि संघ अडचणीत सापडला. नेमक्या अशा कठीण परिस्थितीत रिंकू सिंग मैदानात आला आणि त्याने वादळी खेळी करत दमदार शतक झळकावले. रिंकू सिंगने सहकारी फलंदाज विपराज निगम याच्यासोबत महत्त्वाची शतकी भागीदारी रचली. या भागीदारीमुळे उत्तर प्रदेशचा संघ पुन्हा एकदा सामन्यात जोरदार पुनरागमन करू शकला. रिंकू सिंगची ही खेळी उत्तर प्रदेशसाठी संजीवनी ठरली आहे.https://prahaar.in/2025/10/18/terrible-accident-at-chandshaili-ghat-in-nandurbar-6-dead-more-than-15-seriously-injured-as-devotees-pickup-falls-into-a-valley/रिंकू सिंगचे रणजीमध्ये फर्स्ट क्लास आठवे दमदार शतककर्णधार करण शर्मा बाद झाल्यानंतर, रिंकू सिंग (Rinku Singh) मैदानात उतरला, त्यावेळी उत्तर प्रदेश (UP) संघाची धावसंख्या १४६/३ अशी होती. यानंतर लगेचच आर्यन जुयाल (६६) आणि भारताच्या अंडर-१९ संघाचा माजी कर्णधार प्रियम गर्ग (१८) हे महत्त्वाचे फलंदाजही पॅव्हेलियनमध्ये परतले. १७८ धावांवर यूपीची अर्धी टीम माघारी परतल्याने संघ मोठ्या संकटात सापडला होता. अशा परिस्थितीत रिंकूने प्रथम अराध्य यादवसोबत (१७) सहाव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करत डाव सावरला. अराध्य बाद झाल्यानंतर रिंकूला आयपीएल स्टार विपराज निगमची चांगली साथ मिळाली.शुक्रवारच्या (तिसऱ्या दिवसाच्या) अखेरीस या दोघांनी मिळून संघाचा स्कोअर ६ बाद २९४ पर्यंत पोहोचवला. त्यावेळी रिंकू ८२ धावांवर नाबाद होता, तर यूपी संघ आंध्रपेक्षा १७६ धावांनी मागे होता. आज (शनिवारी) रिंकूने आपला खेळ पुढे नेत, अत्यंत कठीण परिस्थितीत फर्स्ट क्लास कारकिर्दीतील आपले आठवे शतक पूर्ण केले. या शतकासाठी त्याने १८० चेंडू खेळले, ज्यात त्याने ९ चौकार आणि २ उत्तुंग षटकार झळकावले. रिंकू सिंगच्या या महत्त्वपूर्ण शतकी खेळीमुळे उत्तर प्रदेशचा संघ सामन्यात मजबूत स्थितीत पोहोचला आहे.यूपीला आघाडी मिळेल का?कानपूरमध्ये सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे. आंध्रने पहिल्या डावात उभारलेल्या ४७० धावांच्या आव्हानात्मक धावसंख्येसमोर यूपीला आघाडी मिळवता येणार की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. बातमी लिहेपर्यंत उत्तर प्रदेशचा स्कोअर ७ बाद ३५९ असा होता. यूपीचा संघ अजूनही आंध्रच्या धावसंख्येपेक्षा १११ धावांनी मागे आहे. रिंकू सिंगला चांगली साथ देणारा फलंदाज विपराज निगम (४२) धावा काढून बाद झाला आहे. सध्या रिंकू सिंग (Rinku Singh) ११८ धावांवर खेळत असून, त्याने एक बाजू यशस्वीरित्या सांभाळली आहे. त्याला सध्या शिवम शर्मा याची साथ मिळत आहे. सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता कमी असली तरी, पहिल्या डावात आघाडी (Lead) मिळवणे यूपी संघासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. ही आघाडी मिळवण्याची सर्वी भिस्त आता रिंकू सिंग आणि अखेरच्या फळीतील फलंदाजांवर आहे.रिंकू सिंग आता ऑस्ट्रेलियात 'धुमाकूळ' घालणारटीम इंडियाचा सध्याचा स्टार फलंदाज रिंकू सिंग याला आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. सध्या तो रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या पहिल्या सामन्यात खेळत असला तरी, त्याच्यासाठी हा आगामी दौरा अत्यंत खास असणार आहे. रिंकू सिंगने आतापर्यंत ऑस्ट्रेलियात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याचा हा ऑस्ट्रेलियातील पहिला आंतरराष्ट्रीय दौरा असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये मात्र रिंकूचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत ५ टी-२० सामने खेळले आहेत. या ५ सामन्यांमधील ४ डावांत त्याने ५२.५० च्या उत्कृष्ट सरासरीने १०५ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याचा स्ट्राइक रेट तब्बल १७५.०० इतका दमदार आहे. रिंकू सिंगचा हा उत्कृष्ट टी-२० रेकॉर्ड पाहता, ऑस्ट्रेलियातील पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यात तो आपल्या फिनिशिंगच्या जोरावर टीम इंडियाला नक्कीच मोठा फायदा मिळवून देईल, अशी अपेक्षा आहे.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 1:10 pm

Explainer: मुहूरत ट्रेडिंग म्हणजे काय? त्याचा नक्की आध्यात्म-अर्थशास्त्राशी काय संबंध? यावर्षी काय बदल सगळच जाणून घ्या

मोहित सोमणमुहुरत (मराठीत मुहूर्त) ट्रेडिंग म्हणजे शुभलक्षण व्यापारी सत्र. शेअर बाजारात 'लक' ला खूपच मोठे महत्व असत. कधीकधी फंडामेंटल टेक्निकल विश्लेषणानंतरही शेअर बाजारात नफा अथवा तोटा याची शाश्वती नसते. अशावेळी लक (नशीब) महत्वाचं ठरत. शुभ मुहूर्तावर ट्रेडिंग केल्यानंतर येणारे वर्ष आर्थिक दृष्ट्या सक्षम व फायदेकारी ठरेल अशी एक सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये समजूत आहे. विशेषतः हिंदू कालनिर्णयानुसार या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताला विशेष महत्व आहे. यावेळी व्यापारांचे 'गुड लक' मानले जाते. त्यामुळे शेअर बाजाराच्या या विशेष सत्रात लक्ष्मीपूजनाप्रमाणे विशेष वेळी ट्रेडिंग केल्यास त्यानंतर चांगला परतावा भविष्यात लक्ष्मी आशीर्वादाने मिळेल अशी समजूत आहे नव्हे ती तर परंपरा आहे. अगदी शेअर बाजारात १९५७ व एनएसईत १९९२ पासून मुहुरत ट्रेडिंग सुरु असते.हिंदू धर्मशास्त्रात आध्यात्म, अर्थकारण हे एकमेकांवर अवलंबून आहे. श्रद्धा, भक्ती, सामर्थ्य, दृष्टीकोन, कर्म, नशीब यांचे मिश्रण म्हणजे अध्यात्म शास्त्र होय. यासाठीच मुहूरत ट्रेडिंग अंतर्गत नव्या आर्थिक वर्षात शेअर बाजारात गुंतवणूकदार पदार्पण करतात. गुज राती मारवाडी समाजाच्या संस्कृतीत याला समवात (Samvat) देखील म्हटले जाते.एकूण बाजारातील भावना प्रतिबिंबित करण्याव्यतिरिक्त देशाच्या अर्थकारणावर सांस्कृतिक मूल्यांचा किती पगडा आहे हे ते दर्शवते. अनुभवी गुंतवणूकदारांसाठी, ही दीर्घकालीन त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी करण्याची संधी आहे जे नुकतेच गुंतवणूक करण्यास सुरु वात करत आहेत त्यांच्यासाठी देखील हा एक चांगला काळ मानला जातो.सामान्य ट्रेडिंग दिवसांपेक्षा, मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी फक्त एक तासासाठी खुले असते. या कालावधीत प्री-ओपन सेशन, सामान्य ट्रेडिंग सेशन आणि क्लोजिंग सेशन सामान्यतः होतात. प्रत्यक्ष ट्रेडिंगच्या काही दिवस आधी, एक्सचेंज सामान्यतः बाजाराच्या वेळा जा हीर करतात.यावर्षी मुहुरत ट्रेडिंग दुपारी १.४५ ते २.४५ वाजता होणार आहे. एक्सचेंजेसवरील परिपत्रकानुसार, मुहूर्त ट्रेडिंग २१ ऑक्टोबर, मंगळवार रोजी होणार आहे, सोमवार २० ऑक्टोबर रोजी नाही असे अधिकृत माहिती सांगते. या दिवशी भारतीय शेअर बाजार एक ता साच्या ट्रेडिंग सत्राशिवाय बंद राहील. यावर्षी भारत सोमवार २० ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी करणार असला तरी भारतीय शेअर बाजारासाठी टोकन मार्केट ट्रेडिंग सत्र त्याच दिवशी होणार नाही. खरं तर, दलाल स्ट्रीट सोमवारी सामान्य ट्रेडिंग तासांसाठी, म्हण जे सकाळी ९ ते दुपारी ३.३० पर्यंत खुले राहणार आहे. फक्त मंगळवारीच एका तासाचे शुभ मुहूर्त ट्रेडिंग सत्र होईल.ट्रेंडपासून वेगळे होऊन या वर्षीचे मुहूर्त ट्रेडिंग सत्र दुपारी १.४५ ते दुपारी २.४५ पर्यंत होईल. साधारणपणे, विशेष सत्र संध्याकाळी आयोजित केले जाते. यंदा वेळ बदलली गेली आहे. परिपत्रकानुसार, १५ मिनिटांचा प्री-ओपन सत्र दुपारी १.३० ते १.४५ पर्यंत असेल, तर सामान्य व्यवहार दुपारी १.४५ पासून सुरू होईल.गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवावे की दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग सत्रादरम्यान केलेल्या सर्व व्यवहारांमुळे सेटलमेंट बंधने लागू होणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले गेले आहे. दरम्यान, २१ ऑक्टोबर रोजी दिवाळी बंद राहण्याव्यतिरिक्त, मुहूर्त ट्रेडिंग सत्र वगळता भा रतीय स्टॉक एक्सचेंज बुधवार २२ ऑक्टोबर रोजी दिवाळी बलिप्रतिपदेनिमित्त सुट्टीवर जातील.गेल्या पाच मुहूर्त ट्रेडिंग सत्रांमध्ये (२०२०-२०२४) निफ्टी ५० सातत्याने सकारात्मक क्षेत्रात बंद झाला आहे, प्रत्येक वेळी ०.४०% ते ०.९०% च्या श्रेणीत परतावा देत असल्याचे तज्ञांचे मत आहे. या वर्षी देखील सहाय्यक तांत्रिक निर्देशक आणि सुधारित मूलभूत तत्त्वां च्या मिश्रणामुळे, एकूण बाजारातील भावना आशावादी राहिली आहे. तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टी ५० साठी व्यापक दृष्टिकोन रचनात्मक राहतो आणि बाय-ऑन-डिप्स धोरण प्रबळ राहण्याची शक्यता आहे असे तज्ज्ञ सांगतात.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 1:10 pm

पूर्णा आजी परतली! ‘ठरलं तर मग’मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री साकारणार भूमिका; धमाकेदार एन्ट्रीचा व्हिडीओ समोर

Tharala Tar Mag : स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनांतर ही व्यक्तीरेखा कोण साकारणार याबाबत कोणतीही माहिती समोर आली होती. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या मालिकेच्या निर्मात्यांनी पूर्णा आजीच्या व्यक्तिरेखेबाबत लवकरच निर्णय […] The post पूर्णा आजी परतली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री साकारणार भूमिका; धमाकेदार एन्ट्रीचा व्हिडीओ समोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 12:53 pm

परकीय चलनसाठ्यात २.१८ अब्ज डॉलरने घसरण तर सोन्याच्या साठ्यात ३.६ अब्ज डॉलरने वाढ

प्रतिनिधी:जागतिक आर्थिक धोरणांचा फायदा किंवा फटका हा कमोडिटी व चलनी बाजारात दिसून येतो. त्याचाच भाग म्हणून यातील समीकरणे वेळोवेळी बदलतात. आर्थिक मागोवा घेत आरबीआयने नवी आकडेवारी जाहीर केली ज्यामध्ये परकीय चलनसाठा (Foreign Exchange Reserves) मोठ्या प्रमाणात घसरला असून सोन्याच्या साठ्यात (Gold Reserves) मध्ये मात्र मोठी वाढ झाली आहे. आरबीआयने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, परदेशी चलनसाठा १० ऑक्टोबरपर्यंत २.१८ अब्ज डॉलरने घसर ला असून ६९७.७९ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. या आठवड्यात सोन्याच्या साठ्यात ३.६ अब्ज डॉलरने वाढत १०२.३७ अब्ज डॉलरवर वाढ झाली आहे.गेल्या आठवड्यातही परकीय चलनसाठा २७६ अब्ज डॉलरने घसरत ६९९.९६ अब्ज डॉलरवर पोहोचला होता.१० ऑक्टो बरपर्यंत परकीय चलन मालमत्ता (Foreign Currency Assets) ५.६१ अब्ज डॉलरने घसरत ५७२.१० अब्ज डॉलरवर पोहोचले होते असे आरबीआयने अहवालात म्हटले आहे. डॉलरच्या संदर्भात परकीय चलन मालमत्तेत परकीय चलन साठ्यात असलेल्या युरो, पौंड आणि येन सारख्या बिगर-अमेरिकन चलनांच्या मूल्यात वाढ किंवा घसरण यांचा समावेश आहे.आरबीआयने म्हटले आहे की आठव ड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य ३.६ अब्ज डॉलर्सने वाढून १०२.३७ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे.विशेष रेखांकन हक्क (Special Drawing Rights SDR) १३० दशलक्ष डॉलर्सने कमी होऊन १८.६८ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहेत, असे सर्वोच्च बँकेच्या आकडेवारीत म्हटले आहे.आयएमएफकडे (International Monetary Fund IMF) भारताची राखी व ठेव देखील अहवाल आठवड्यात ३६ दशलक्ष डॉलर्सने कमी होऊन ४.६३ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे, असे त्यात दिसून आले आहे.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 12:30 pm

Garib Rath Express Fire : गरीब रथ एक्सप्रेसला अचानक आग! 'ज्वाळा'पाहून प्रवाशांना फुटला घाम; अनेकजण जखमी, रेल्वेने दिली 'ही'माहिती

अमृतसर : पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्टेशनजवळ आज, शनिवारी, सकाळी अचानक मोठा गोंधळ आणि अफरातफरी माजली. लुधियानाहून दिल्लीकडे जाणाऱ्या १२२०४ अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेस या ट्रेनच्या एका कोचला अचानक आग लागली. सकाळी सुमारे सात वाजता घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली. धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसताच लोक घाबरून ओरडू लागले, ज्यामुळे संपूर्ण ट्रेनमध्ये घबराट आणि धावपळीचे वातावरण निर्माण झाले. या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांच्या माहितीनुसार, ट्रेनने जसे सरहिंद स्टेशन पार केले, त्याच वेळी एका प्रवाशाने बोगी क्रमांक १९ मधून धूर येत असल्याचे पाहिले. त्या प्रवाशाने तत्काळ चेन खेचून (Emergency Chain) ट्रेन थांबवली. लोको पायलट (Loco Pilot) यांनी त्वरित इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेनला सुरक्षित ठिकाणी थांबवले. याच दरम्यान, कोचमधून आगीच्या मोठ्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या, ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. प्रवाशांनी आपले मुले आणि सामान घेऊन घाईघाईने खाली उतरण्यास सुरुवात केली. या भगदडीमध्ये अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले, तर काहींचे सामान कोचमध्येच राहिले. सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.https://prahaar.in/2025/10/18/6-dhanvantari-temples-in-india-must-visit-travel/शॉर्ट सर्किटमुळे लागली आग?गरीब रथ एक्सप्रेसच्या बोगीला आग लागल्याची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकाने सुमारे एक तासभर अथक प्रयत्न केल्यानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासणीमध्ये ही आग शॉर्ट सर्किटमुळे (Short Circuit) लागली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. सुदैवाने, या घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही, हा मोठा दिलासा आहे. मात्र, एका महिला प्रवाशाला भाजल्यामुळे ती किरकोळ झुलसली आहे, तर अन्य एक प्रवासी मामूली जखमी झाला आहे. जखमींवर त्वरित उपचार करण्यात आले. रेल्वे आणि प्रशासनाकडून घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.रेल्वेने काय माहिती दिली?उत्तरी रेल्वेने या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, ट्रेन बठिंडा स्टेशनमधून जात असतानाच कोचला आग लागल्याचे दिसून आले होते. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरित कारवाई करत ट्रेन थांबवली आणि आग विझवली. घटनेत जखमी झालेल्या प्रवाशाला तात्काळ रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले असून, त्याची स्थिती आता धोक्याबाहेर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या संपूर्ण घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र, रेल्वे स्टाफच्या तत्परतेमुळे एक मोठा अपघात टळला. आग लागलेल्या कोचमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे दुसऱ्या डब्यांमध्ये (Coaches) स्थलांतरित करण्यात आले. थोड्या वेळाच्या तपासणीनंतर आणि आवश्यक दुरुस्तीनंतर ट्रेनला तिच्या गंतव्यस्थानासाठी पुन्हा रवाना करण्यात आले.गरीब रथ दुर्घटनेनंतर रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्हलुधियाना ते दिल्लीच्या दिशेने प्रवास करत असलेले अनेक व्यापारी या ट्रेनमध्ये होते. त्यापैकी एका प्रवाशाने सांगितलेल्या माहितीनुसार, जशी आग लागल्याचे समजले, तशी संपूर्ण बोगीमध्ये एकच चीत्कार (Screams) आणि ओरड सुरू झाली होती. लोक दरवाजाच्या दिशेने धावले, मुलांना घेऊन खाली उड्या मारू लागले. शनिवार सकाळची ही घटना काही मिनिटांची असली तरी, त्यावेळेस गरीब रथ एक्सप्रेसमध्ये असलेल्या प्रत्येक प्रवाशासाठी तो क्षण एका भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हता. या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरित कारवाई केल्यामुळे आग पसरण्यापूर्वीच परिस्थिती नियंत्रणात आली आणि एक मोठी दुर्घटना टळली. मात्र, प्रवाशांची ती दहशत, भीती आणि चीख-पुकार या घटनेला स्मरणार्थ (Memorable) बनवून गेली आहे. रेल्वे प्रशासनाकडून आग लागण्याच्या कारणांची सखोल चौकशी (Inquiry) अजूनही सुरू आहे. तसेच, भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक पाऊले उचलण्याचे आश्वासन रेल्वेने दिले आहे.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 12:30 pm

Chandshaili Ghat Accident : नंदुरबारच्या चांदशैली घाटात भीषण अपघात; भाविकांची पीकअप जीप दरीत कोसळून ६ ठार, १५ हून अधिक गंभीर जखमी

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळी एक हृदयद्रावक आणि भीषण अपघात घडला आहे. भगवान अस्तंबा ऋषी यांच्या यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या पीकअप जीपला (Pickup Jeep) चांदशैली घाटात मोठा अपघात झाला. भरधाव वेगात असलेली ही पीकअप जीप अचानक खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, ज्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. याशिवाय, १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य (Rescue Operation) सुरू केले.https://prahaar.in/2025/10/18/how-garib-rath-express-catches-fire-what-indian-railway-is-saying-on-this-train-accident/सर्व जखमींना तत्काळ तळोदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देवदर्शनासाठी, यात्रेला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला पडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामुळे नंदुरबार जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.अपघातात मृतांची संख्या वाढण्याची भीतीनंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात झालेल्या भीषण अपघातात प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. यापैकी १० जणांची प्रकृती गंभीर असल्याने दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. सध्या जखमी झालेल्या या सर्व भाविकांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचारासाठी हलवण्यात येत आहे. पीकअप व्हॅन घाटातून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली. गाडी पलटी झाल्यामुळे वाहनाच्या मागच्या भागात बसलेले लोक खाली दबले गेले आणि अनेकांना जबर मार लागला. याच कारणामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य (Rescue Operation) हाती घेतले. पोलिसांनी जखमींना पिकअप व्हॅनमधून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले. बचावकार्यासाठी पोलीस घटनास्थळी आले, तेव्हा येथील दृश्य भयावह होते. अनेक लोक जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते, त्यापैकी अनेकजण गंभीर जखमी दिसत होते. या भीषणतेमुळेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 12:30 pm

ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड, पेमेंट अडकले? रिफंडसाठी ‘ही’ पद्धत अवलंबा.

दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची अधिकृत वेबसाइट आणि मोबाईल ॲप दोन्ही अनेक तासांपासून ठप्प झाले होते. त्यामुळे हजारो प्रवाशांचे तिकीट बुकिंग रखडले अनेक अनेकांचे पैसेमध्येच अडकून राहिले. त्यामुळे हजारो यूझर्स चिंतेत पडले. जर तुमचेही पैसे अडकले असतील तर अजिबात घाबरू नका. ते पैसे कसे परत मिळतील त्याची पद्धत जाणून घ्या.नेमकं झालं काय?IRCTC ची सेवा ठप्प झाल्यावर युझर्सना लॉगिन करताना 'सर्वर अनअवेलेबल' असा मेसेज दिसत होता. याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर तक्रार देखील केली. वेबसाइट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म 'डाऊन डिटेक्टर'वरही 5,000 पेक्षा जास्त लोकांनी याची तक्रार नोंदवली होती. मात्र, काही तासांनंतर वेबसाइटवर लॉगइन सुरू झाले. तरीही अजून काही युजर्सना तिकीट बुकिंगमध्ये अडचणी येत आहेत.सेवा ठप्प होण्याची कारणे काय?ॲप आणि IRCTC वेबसाइट डाऊन होण्याचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र, दिवाळी आणि छठ पूजेच्या काळात लाखो प्रवाशांनी एकाच वेळी 'तत्काळ तिकीट' बुकिंगसाठी लॉगइन करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे सर्व्हरवर प्रचंड ताण येऊन ती क्रॅश झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.अडकलेले पैसे 'असे' मिळवा परततिकीट बुकिंग करताना तुमचे पेमेंट कट झाले असेल आणि तिकीट बुक झाले नसेल, तर घाबरून जाण्याची गरज नाही. IRCTC अशा परिस्थितीत पेमेंट ऑटोमॅटिक (Automatic) परत करते.ऑटोमॅटिक रिफंड: पेमेंट फेल झाल्यास, तुमचे पैसे 3 ते 5 व्यावसायिक दिवसांमध्ये आपोआप तुमच्या बँक खात्यात जमा होतात.जास्तीत जास्त कालावधी: काही तांत्रिक अडचणींमुळे कधीकधी रिफंड येण्यास 21 दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.वेळेत रिफंड न मिळाल्यास काय करावे?निर्धारित वेळेत रिफंड मिळाला नाही, तर तुम्ही IRCTC शी संपर्क साधू शकता. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा:स्क्रीनशॉट घ्या: ट्रांझेक्शन फेल झाल्यावर त्वरित त्याचा स्क्रीनशॉट घ्या.ईमेल करा: हा स्क्रीनशॉट संलग्न करून care@irctc.co.in या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवा.कस्टमर केअर: तुम्ही IRCTC च्या कस्टमर केअर नंबरवरही संपर्क साधू शकता.

फीड फीडबर्नर 18 Oct 2025 12:30 pm

धर्मासाठी बॉलीवूड सोडलेली ‘दंगल’गर्ल अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह

Zaira Wasim | ‘दंगल’ चित्रपटातील अभिनेत्री जायरी वसीम लग्नबंधनात अडकली आहे. जायराने वयाच्या २४ व्या वर्षी नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली आहे. सध्या तिची पोस्ट व्हायरल होत असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जायरा वसीमने सोशल मीडियावर दोन फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये ती […] The post धर्मासाठी बॉलीवूड सोडलेली ‘दंगल’ गर्ल अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 12:22 pm

“दोन भावांचं अब की बार 75 पार, दोन ठाकरे करणार….”; संजय राऊतांची मोठी घोषणा, भाजपवर साधाला जोरदार निशाणा म्हणाले…

Sanjay Raut : कालच मनसेच्या वतीने आयोजित दीपोउत्सवाच्या कार्यक्रमाचे उद्धघाटन उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांंनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही, पण ठाकरे फॅमिली पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी दिपावळीच्या शुभेच्छा दिल्या. आज […] The post “दोन भावांचं अब की बार 75 पार, दोन ठाकरे करणार….”; संजय राऊतांची मोठी घोषणा, भाजपवर साधाला जोरदार निशाणा म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 18 Oct 2025 12:19 pm