SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

29    C
... ...View News by News Source

कर्नाटक काँग्रेसमध्ये पडले दोन गट, ताकद वाढवण्यासाठी दोन्ही गटांकडून आमदारांना ५० कोटी रुपयांसह फ्लॅट आणि फॉर्च्युनरची ऑफर ?

बंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धारमैया आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार या दोघांच्या नेतृत्वात कर्नाटक काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. प्रत्येक गट आपली ताकद वाढवण्यासाठी प्रतिस्पर्धी गटाच्या आमदारांना ५० कोटी रुपयांसह फ्लॅट आणि फॉर्च्युनर गाडीची ऑफर देत आहे; असा आरोप भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चालवाडी नारायणस्वामी यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केला. काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यावर मंत्रिपद मिळवून देण्यासाठी २०० कोटींची मागणी केल्याचाही आरोप त्यांनी केला. या प्रकरणात सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी; अशीही मागणी चालवाडी नारायणस्वामी यांनी केली आहे.नारायणस्वामी यांचे आरोप अशा वेळी आले आहेत, जेव्हा माध्यमांमध्ये कर्नाटक काँग्रेसमधील नेतृत्व बदलाची चर्चा जोर धरत आहे. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने अलिकडेच अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धारमैया आणि डी.के. शिवकुमार यांच्यात सत्ता वाटपाचा करार झाला होता. त्यानुसार अर्धा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे कर्नाटकमध्ये आता सत्ता बदलाची चर्चा जोर धरू लागली आहे. काही काँग्रेस नेते या संभाव्य बदलाला 'नोव्हेंबर क्रांती' असेही म्हणत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.केंद्रीय मंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनीही कर्नाटकच्या राजकारणावर भाष्य केले आहे. येत्या पाच-सहा महिन्यांत राज्यात 'अविश्वसनीय घटनाक्रम' पाहायला मिळतील, असे भाकीत त्यांनी केले आहे. राजकारणात कोण कधी काय निर्णय घेईल हे सांगणे अशक्य आहे आणि राज्यात सध्या अशीच 'क्रांती' होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसने मात्र भाजपच्या नेत्यांचे आरोप फेटाळले आहेत.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 8:10 pm

डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण, FIR नोंदीत नेमकं काय?

मुंबई : मंत्री पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जेची पत्नी डॉ. गौरी गर्जे हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर घडली. लग्नाच्या काही महिन्यांतच असे घडलेल्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.डॉ. गौरी आणि अनंत गर्जे यांचे ७ फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. मात्र, अनंत गर्जे यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दोघांमध्ये सतत वाद चालू होते, असे गौरीच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. या वादामुळे मानसिक तणाव वाढल्याचेही कुटुंबीयांनी म्हटले आहे.या घटनेनंतर वरळी पोलिसांनी FIR नोंद केली असून, त्यात अनंत गर्जे यांच्यासह त्याचा भाऊ व बहीण यांच्यावरही आरोप नोंदवण्यात आले आहेत. FIR नुसार, या तिघांनी डॉ. गौरी यांच्यावर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.गौरीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात हत्या झाल्याचा दावा देखील केला आहे आणि पोलिसांना त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत आणि आरोपींविरुद्ध पुढील कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.नक्की काय आहे FIR मध्ये ? शब्दशः वाचा..गौरी गर्जे हिच्या वडिलांनी अनंत गर्जे आणि त्यांचा भाऊ, बहिणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, मुलगी गौरी ही मुंबईमध्ये रहावयास होती त्यावेळी ती मला व माझी पत्नी अलकनंदा हिचेशी फोनवर बोलत असे त्यावेळी ती मला व माझी पत्नी हिला सांगत असे की, अनंत हा तिच्या घरगुती किरकोळ कारणावरुन सतत वाद घालत असे. त्यावेळी मी व माझी पत्नी तिला समजविण्याचा प्रयत्न करत असे की, त्यांना कामाचा त्रास होत असेल त्यामुळे वाद होत असतील.तिने मोबाईलवरून माझ्या मोबाईल क्रमांकवर व्हॉट्सअँपद्वारे काही फोटो पाठवले. दिनांक ३०/०९/२०२५ रोजी संध्याकाळी ०७.०० वाजण्याच्या सुमारास माझी मुलगी गौरी हिने तिच्या ते फोटो मी पाहिले असता, त्यामध्ये दिनांक १६/११/२०२१ रोजीचे ममता हॉस्पिटल, लातूर येथील गर्भवती स्त्रीचे संमतीपत्र आणि जाहीरनामा असल्याचे दिसले. त्यामध्ये श्रीमती किरण सिध्दार्थ इंगळे असे महिलेचे नाव असून तिच्या पतीचे नाव अनंत भगवान गर्जे असे नमुद होते. त्या कागदपत्रावरुन अनंत याचे किरण या महिलेशी काहीतरी संबंध असल्याचे मला वाटले म्हणून मी तात्काळ गौरीला फोनद्वारे संपर्क करून तिला सदर कागदपत्राबाबत विचारले असता गौरीने सदरचे कागदपत्र हे तिला घर शिफ्ट करतांना मिळून आल्याचे रडत सांगत होती. तेव्हा तिला आम्ही तुझ्याकडे येतो तू रडू नकोस शांत बस असे सांगितले, तेव्हा तिने मला आपण येऊ नका, आपण आलात तर अनंत हा तिला तिचे नाव चिठ्ठीत लिहुन आत्महत्या करीन अशी धमकी देत आहे असे सांगितले. तसेच तिने मला अनंत व किरण सिध्दार्थ इंगळे यांच्या अफेयर बाबत माझा दीर अजय, नणंद शीतल राजेंद्र आंधळे यांना यापूर्वी माहित होते व तिने त्याबदल नणंद शीतल सोबत अनंतच्या अफेयर बाबत बोलले होते, परंतु नणंद शीतल हिने तिला तुझे अनंत सोबत जमले नाही तर मी माझ्या भावाचे दुसरे लग्न लावीन अशी धमकी देत असल्याचे सांगितले. त्यानंतर माझी पत्नी अलकनंदा हिने गौरी हिची नणंद शीतल यांना फोन करून सदरबाबत विचारले असता, शीतल हिने आम्ही आमचं बघून घेवू म्हणत फोन ठेवला.दिनांक ०३/१०/२०२५ रोजी माझा जावई अनंत याचा वाढदिवस असल्याने मी व माझी पत्नी गौरीकडे मुंबईला जाणार होतो. पण गौरीने आम्हाला फोनवरून कळविले की, तुम्ही माझ्याकडे मुंबईला येवू नका असे रडत रडत सांगत होती. तरी सुद्ध आम्हाला तिची काळजी वाटत असल्याने अनंत याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौरीला कोणतीही पूर्व कल्पना न देता दिनांक ०३/१०/२०२५ रोजी सकाळी ०६.३० वाजण्याच्या सुमारास मी व माझी पत्नी असे गौरी हिच्या मुंबई येथील वरळी येथील रुमवर आलो होतो. त्यावेळी ती आम्हाला म्हणाली की, तुम्ही कशाला घरी आलात, अनंत माझ्यावर रागावतील असे म्हणत होती. तेव्हा मी तिला अनंतच्या अफेयर बाबत त्याच्याशी कोणतीही चर्चा करणार नाही असे सांगितले होते. तेव्हा ती शांत झाली. त्यावेळी आम्हाला गौरी हिचे चेहऱ्यावर व गळ्यावर मारल्याचे व्रण दिसले. तेव्हा मी व माझे पत्नीने गौरी हिला त्या जखमांबाबत विचारणा केली असता, गौरी हिने आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली. यांनतर तिच्याकडे आम्ही अधिकची चौकशी केली असता तिने आम्हाला सांगितले की, तिचा दीर अजय याने याआधीच तिला अनंतच्या आणि किरण सिध्दार्थ इंगळे हिचेसोबत असलेल्या अफेयर बाबत सांगितले होते, परंतु ते तिने मनावर घेतले नव्हते. पण गौरी हि नविन घरी शिफ्ट करत असताना तिला किरण हिचे प्रेग्नंट असल्याचे कागदपत्र सापडले होते. त्या कागदप‌त्रामध्ये तिचा पती म्हणून अनंत याचे नाव नमुद होते, त्यामुळे ती नाराज होती.सदरबाबत तिने अनंत यास विचारले असता त्याने तुला काय करायचे ते कररामी कोणाला घाबरत नाही, जर तू याबददल कोणाला सांगितले तर तुझे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करीन अशी धमकी दिली होती. त्यानंतर आम्ही संध्याकाळी जावई अनंतचा वाढदिवस साजरा करून रात्री ०८.०० वाजण्याच्या सुमारास परत बीडला निघुन गेलो,दि २१/११/२०२५ रोजी जावई अनंत याने रात्री १०.१५ वाजता माझे मोबाईलवर दोन मिसकॉल आले होते. परंतु मी बाथरूमला गेलो असल्याने कॉल उचलू शकलो नाही. त्यानंतर मी जावई अनंत यांना फोन केला असता अनंत यांनी फोन उचलला नाही म्हणून मी गौरीला फोन करून विचारपूस केली असता तिने सर्व ठीक असल्याचे सांगितले. काल दिनांक २२/११/२०२५ रोजी संध्याकाळी ०६.४५ या सुमारास जावई अनंत याने गला फोन करून कळविले की, मामा गौरी सुसाइड करायला लागली तिला समजावा, मी अनंतला गौरीकडे फोन देण्यास सांगिताले असता त्यांनी गौरीला फोन न देता गौरीला दवाखान्यात घेवून जात असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने लगेचच माझे पत्नीला कॉल करून मामी माझे समोर गौरीचे प्रेत आहे असे सांगून फोन ठेवला त्यानंतर मी व माझी पत्नी सदरवेळी एकत्रच असल्याने आम्ही अनंतला पुन्हा कॉल केला. परंतु त्याने कॉलला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आम्ही आमचे मुंबई येथे राहणारे मामेभाऊ कारभारी खेडकर या नातेवाईकांना सदरची हकीकत सांगून गौरीच्या घरी जावून माहिती घेण्यास सांगितले असता रात्री ०८.०० वा दरम्यान त्यानी आम्हाला कॉल करून करून गौरी मयत झाली असून तिला सध्या नायर रुग्णालय येथे ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही मुंबईला येवून नायर रुग्णालय येथे गेलो असता अनंतने गौरीने आत्महत्या केल्याचे सांगितले.तरी माझी मुलगी नामे गौरी हीस तिचा पती अनंत गर्जे याने लग्न झाल्यानंतर काहि कालावधीतच किरकोळ कारणावरून वाद घालण्यास तसेच किरण सिध्दार्थ इंगळे या महिलेसोबत असलेले अफेरबाबत गौरी हिरा समजल्याने तिस मानसिक व शारिरिक त्रास देण्यास सुरुवात केली व जर तिने तिचे माहेरच्या लोकांना याबाबत काही सांगितले तर स्वतःचे जीवाचे काहीतरी बरेवाईट करेल अशी धमकी देवुन तिला ब्लॅकमेल करून त्रास देत असे. तसेच अनंत गर्जे यांची बहिण शीतल राजेंद्र आंधळे हि देखील गौरी हिस जर तुझे अनंत याचेशी जमत नसेल तर त्याचे दुसरे लग्न लावून देऊ अशी धमकी देत असे.त्यानंतर दिनांक २२/११/२०२५ रोजी अनंत भगवान गर्जे यांनी मला फोन करून सांगितले की, गौरी हीने आत्महत्या केली आहे. म्हणुन माझी मुलगी गौरी हिच्या मृत्युस तिचा पती अनंत भगवान गर्जे, बहीण शीतल भगवान गर्जे-आंधळे, दीर अजय भगवान गर्जे हे जबाबदार असून जावई अनंत गर्जे हा गौरी हिने आत्महत्या केल्याचे सांगत असला तरी त्यामध्ये खरेच आत्महत्या आहे की काही घातपात आहे? याबाबत माझी मुलगी गौरी हिंचे आत्महत्येचा कायदेशीर तपास होवून सत्य समोर येणेबाबत तपास होऊन मला न्याय मिळावा म्हणून वरील तीन लोकांविरूध्द माझी कायदेशीर तक्रार आहे, असे गौरीच्या वडिलांनी म्हटले.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 8:10 pm

Manoj Jarange : बीडमध्‍ये मनोज जरांगेंच्या कट्टर समर्थकाचा अपघाती मृत्यू; वाहनचालक झाला फरार

Manoj Jarange – बीडच्या दासखेड फाटा येथे एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांचे कट्टर समर्थक असलेल्या अतुल घरत यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे या अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. अतुल घरत हे बीड तालुक्यातील महाजनवाडीचे रहिवासी असून, पाटोदा येथून आपल्या गावी जात असताना दासखेड […] The post Manoj Jarange : बीडमध्‍ये मनोज जरांगेंच्या कट्टर समर्थकाचा अपघाती मृत्यू; वाहनचालक झाला फरार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 8:05 pm

Smriti Mandhana : स्मृतीच्या वडिलांची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी दिली माहिती; म्हणाले, ‘सतत ईसीजी मॉनिटरिंग…’

Smriti Mandhana Father Health Latest Updates : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा आज होणारा विवाहसोहळा अचानक स्थगित करण्यात आला आहे. ऐन लग्नाच्या दिवशी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती खालावल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे दिसल्याने तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. आता त्यांच्या […] The post Smriti Mandhana : स्मृतीच्या वडिलांची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी दिली माहिती; म्हणाले, ‘सतत ईसीजी मॉनिटरिंग…’ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 7:52 pm

एकीकडं ‘बिनविरोध पॅटर्न’ची चर्चा, तर दुसरीकडे पुतण्या युगेंद्र पवारांचे अजित पवारांवर गंभीर आरोप

बारामती (पुणे) : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे तब्बल ८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. याचा जल्लोष सत्ताधारी गट साजरा करत असतानाच दुसरीकडे शरद पवार गटाच्या युवा नेत्याने आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी थेट काकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नेमकं काय म्हणाले […] The post एकीकडं ‘बिनविरोध पॅटर्न’ची चर्चा, तर दुसरीकडे पुतण्या युगेंद्र पवारांचे अजित पवारांवर गंभीर आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 7:46 pm

De De Pyaar De 2 Box Office Collection : ‘दे दे प्यार दे 2’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम; 10 दिवसांत केलं मोठी कमाई !

De De Pyaar De 2 Box Office Collection : अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह यांची रोमँटिक कॉमेडी फिल्म ‘दे दे प्यार दे 2’ प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले असून, या कालावधीतही चित्रपटाची कमाई स्थिर गतीने सुरू आहे. 14 नोव्हेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटासमोर 21 नोव्हेंबरला ‘मस्ती 4’ आणि ‘120 बहादुर’ ही दोन नवीन चित्रपट […] The post De De Pyaar De 2 Box Office Collection : ‘दे दे प्यार दे 2’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम; 10 दिवसांत केलं मोठी कमाई ! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 7:38 pm

Nitin Gadkari : कृषी विकासासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची गरज : नितीन गडकरी

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याची गरज अधोरेखित केली. शेतकरी उत्पादक संघटनेवरील कार्यशाळेला संबोधित करताना त्यांनी सांगितले , शेतकऱ्यांच्या सर्व समस्या शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यांतील आयुक्तालय स्तरावर सोडवल्या पाहिजेत. शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या आणि नागपुरात मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या ॲग्रो व्हिजन 2025 या कृषी प्रदर्शनात […] The post Nitin Gadkari : कृषी विकासासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची गरज : नितीन गडकरी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 7:28 pm

Chennai bullet train : चेन्नईचे बुलेट ट्रेनचे स्वप्न साकारणार ! प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा समोर, पाहा….

Chennai bullet train : दक्षिण मध्य रेल्वेने दक्षिण भारतातील पहिली बुलेट ट्रेन साकारण्यासाठी या प्रकल्पाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल तमिळनाडू सरकारला सादर केला आहे आणि सर्वेक्षणाचे काम सुरू ठेवण्यासाठी मंजुरी मागितली आहे. हैदराबाद-चेन्नई हाय-स्पीड रेल कॉरिडॉर हा प्रकल्प ७७८ किमी लांबीचा असून त्यामुळे या दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे […] The post Chennai bullet train : चेन्नईचे बुलेट ट्रेनचे स्वप्न साकारणार ! प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा समोर, पाहा…. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 7:25 pm

Election News : नोटबंदी, लॉकडाऊनची आठवण.! मतदार पडताळणीवरून केंद्रावर निशाणा; राहुल गांधींची कडवट प्रतिक्रिया

Rahul Gandhi – मतदारयाद्या पडताळणीवरून (एसआयआर) कॉंग्रेसने निवडणूक आयोग आणि भाजपवरील टीकेचे सत्र कायम ठेवले. पडताळणी प्रक्रियेच्या अंमलबजावणीत सहभागी काही बुथस्तरीय अधिकाऱ्यांचा (बीएलओ) विविध कारणांवरून मृत्यू झाला. त्यावरून कॉंग्रेसने टीकेची धार वाढवली. मतदारयाद्यांची पडताळणी कुठली सुधारणा नसून जबरदस्तीने लादलेली प्रक्रिया आहे, असे भाष्य लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. तर, ती प्रक्रिया नोटंबदी आणि […] The post Election News : नोटबंदी, लॉकडाऊनची आठवण.! मतदार पडताळणीवरून केंद्रावर निशाणा; राहुल गांधींची कडवट प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 7:12 pm

वरळीतील आत्महत्या प्रकरण: पतीचे विवाहबाह्य संबंध आणि सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या, गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील वरळीमध्ये पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे हिने शनिवारी संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजताच परिसरात आणि राजकीय वर्तुळात तणाव निर्माण झाला.गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचा विवाह फेब्रुवारी महिन्यात बीडमध्ये झाला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडणे आणि मानसिक तणाव निर्माण झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. गौरी पालवे केईएम रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होती. शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत ती रुग्णालयात होती आणि नंतर घरी आली. यानंतर संध्याकाळी तिने हे धक्कादायक पाऊल उचलले.सुरुवातीला पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. परंतु गुन्हा दाखल करण्यास उशीर झाल्याने गौरीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. अखेर रविवारी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी अनंत गर्जे, त्याची बहीण शीतल गर्जे-आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम १०८, ८५, ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या तिघांवर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे याचा आरोप आहे.कुटुंबीयांच्या मते, सासरच्या मंडळींकडून सतत छळ होत होता. तसेच गौरीने पतीच्या मोबाईलमध्ये काही चॅटिंग पकडल्याचेही समोर आले. यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे पालवे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.गौरी पालवे गर्जेने आपला जीव दिला नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या घटनेमुळे मुंबईच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात तणाव निर्माण झाला आहे.सध्या अनंत गर्जे कुठे आहे, याची माहिती मिळालेली नाही. पोलिस आता या प्रकरणात अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध पुढील कारवाई काय करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 7:10 pm

IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर! कसोटीनंतर वनडेचाही बदलला कर्णधार, ‘हा’खेळाडू करणार नेतृत्त्व

India’s ODI squad Announced : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाचा नियमित कर्णधार शुबमन गिल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्याने संघाची धुरा अनुभवी खेळाडू के.एल. राहुलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला समतोल राखण्यात आला असून, स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचे बऱ्याच कालावधीनंतर […] The post IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर! कसोटीनंतर वनडेचाही बदलला कर्णधार, ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्त्व appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 7:03 pm

Sangram Thopate : थोपटे गेले आणि गड कोसळला.! ५० वर्षांच्या सत्तेनंतर भोर नगरपालिकेत काँग्रेसला एकही उमेदवार नाही

Sangram Thopate : एकेकाळी काँग्रेसचा अभेद्य गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा काँग्रेस पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. ज्या नगरपालिकेत काँग्रेसने तब्बल ५० वर्षे सत्ता गाजवली, तिथे यंदा पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणारा एकही उमेदवार काँग्रेसला उभा करता आलेला नाही. माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसची झालेली ही दयनीय अवस्था जुन्या […] The post Sangram Thopate : थोपटे गेले आणि गड कोसळला.! ५० वर्षांच्या सत्तेनंतर भोर नगरपालिकेत काँग्रेसला एकही उमेदवार नाही appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 6:52 pm

पालघरमध्‍ये खड्ड्यामुळे एकाचा बळी; एकजण गंभीर जखमी

पालघर – पालघर जिल्ह्यात नालासोपारा परिसरात रविवारी सकाळी एका मोठ्या खड्ड्यात स्कुटी आदळल्‍यानंतर एका ट्रकने चिरडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात सकाळी ८ वाजता घडला. मृत व्यक्तीचे नाव महेश देसाई असे आहे. तो एका खासगी कंपनीत व्यवस्थापक होता. त्याचा सहकारी लवकुश वर्मा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्‍यांना […] The post पालघरमध्‍ये खड्ड्यामुळे एकाचा बळी; एकजण गंभीर जखमी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 6:45 pm

मुथुस्वामीचे पहिले शतक आणि जॅन्सनची दमदार खेळी; दक्षिण आफ्रिकेने उभारला ४८९ धावांचा डोंगर

गुवाहाटी : गुवाहाटी येथे सुरू असलेल्या भारत–दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाने दुसऱ्या दिवशी प्रभावी फलंदाजी करत ४८९ धावांची मोठी मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी बजावत भारतीय गोलंदाजीचा कस लावला. सेनुरन मुथुस्वामीने कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक, तर मार्को जॅन्सनने ९३ धावांची झळाळती खेळी करत संघाला भक्कम धावसंख्या मिळवून दिली. भारताने दिवसाखेरीस बिनबाद नऊ धावा केल्या.दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटी कसोटीत दुसऱ्या दिवशी सहा बाद २४७ या धावसंख्येवरुन खेळ पुढे सुरू केला. मुथुस्वामी आणि काइल व्हेरेन यांच्या संयमी भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिले सत्र गाजवले. भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करून दडपण आणण्याचा प्रयत्न केला, परंतु फलंदाजांनी बचावात्मक शैलीत धावा करत भागीदारी ५० धावांच्या पार नेली.जडेजाने व्हेरेनला बाद केले. व्हेरेन ४५ धावा करून परतला. पण त्यापूर्वी त्याने मुथुस्वामीसोबत ८८ धावांची भागीदारी केली. पुढच्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या खालच्या फळीने भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. जॅन्सन आणि मुथुस्वामीने जडेजा तसेच वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत वेगाने धावा केल्या.मुथुस्वामीने कुलदीप यादवची गोलंदाजी फोडून काढली. चौकार–षटकार लगावत १०९ धावांची मजल मारली. जॅन्सनदेखील शतकाकडे वाटचाल करत होता, परंतु ९३ धावांवर तो बाद झाला. शेवटच्या चार जोड्यांनी धावसंख्येत आणखी २४३ धावांची भर घातली.दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८९ धावांवर आटोपला.मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाने संयमाने सुरुवात केली. यशस्वी जयस्वालने जॅन्सनच्या चेंडूवर चौकार मारत भारतीय डावाची सुरुवात केली. दिवसअखेर जयस्वाल आणि केएल राहुल खेळत होते. भारताने बिनबाद नऊ धाला केल्या.दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच डावात भक्कम धावसंख्या उभी केल्याने सामना त्यांच्या बाजूने झुकलेला दिसत आहे. भारतीय संघावर आता मोठी धावसंख्या ओलांडण्याचे आव्हान आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजीची कसोटी लागणार आहे. भारत अद्याप ३८० धावांनी पिछाडीवर आहे.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 6:30 pm

आयोगाची ही कृती राष्ट्रविरोधी; यादीच्या मसुद्यावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर निशाणा

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केलेली मुंबईच्या मतदार यादीची तारीख २० नोव्हेंबर रोजी अधिकृतपणे प्रकाशित झालेल्या यादीपेक्षा वेगळी आहे,आणि ही राष्ट्रविरोधी कृती असल्याचे ठाकरेसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. एक्स वरील एका पोस्टमध्ये ठाकरे म्हणाले, मतदार यादीचा मसुदा अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आला आणि २० नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत अपलोड करण्यात आला. आधी ती ७ […] The post आयोगाची ही कृती राष्ट्रविरोधी; यादीच्या मसुद्यावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर निशाणा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 6:21 pm

Sanju Samson : संजू सॅमसनचं मोठं कमबॅक! या स्पर्धेसाठी मिळाली संघाची मोठी जबाबदारी

Sanju Samson to lead Kerala in Syed Mushtaq Ali Trophy : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी भारताचा स्टार फलंदाज संजू सॅमसनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आगामी ‘सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी’ या देशांतर्गत टी-२० स्पर्धेसाठी केरळ क्रिकेट असोसिएशनने आपल्या संघाची घोषणा केली असून, संघाचे नेतृत्व संजू सॅमसन कडे सोपवण्यात आले आहे. आयपीएल २०२६ च्या […] The post Sanju Samson : संजू सॅमसनचं मोठं कमबॅक! या स्पर्धेसाठी मिळाली संघाची मोठी जबाबदारी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 6:20 pm

भारत–दक्षिण आफ्रिका मालिकेआधी दुखापतींचे सावट; गिल आणि अय्यर दोघेही एकदिवसीय मालिकेबाहेर

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आधीच उपकर्णधार श्रेयस अय्यर २-३ महिन्यांसाठी मैदानाबाहेर आहे. आता संघाचा कर्णधार शुभमन गिलही ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेतून बाहेर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोलकात्यात झालेल्या पहिल्या कसोटीत गिलच्या मानेला झालेल्या दुखापतीमुळे त्याला पुढील काही दिवस विश्रांतीची गरज भासणार आहे.दुखापतीनंतरही शुभमन गिल भारतीय संघासोबत कोलकाता ते गुवाहाटी अशा प्रवासात सहभागी झाला. येथे दुसरी कसोटी सामना सुरू आहे. शुभमन गिलला अधिक काळ आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अंदाज आहे की, गिल ९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकतो. पुढील आठवड्यात त्याची पुन्हा तपासणी होणार आहे, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “दुर्दैवाने शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाही. गुवाहाटीमध्ये निवड समितीची बैठक होणार असून केएल राहुल, अक्षर पटेल आणि ऋषभ पंत यांच्या नावांवरही चर्चा होऊ शकते.”ऋषभ पंत सध्या एकदिवसीय संघाचा नियमित भाग नसला, तरी संघ व्यवस्थापन त्याला या फॉरमॅटमध्ये पुन्हा संधी देण्याचा विचार करू शकतो. संघातील उजव्या हाताच्या फलंदाजांची संख्या जास्त असल्याने डावखुऱ्या फलंदाजाला संधी देण्याची शक्यता आहे.शुभमन गिल बाहेर पडल्याने यशस्वी जयस्वाल रोहित शर्मासोबत सलामीला येऊ शकतो. तर श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकासाठी ऋषभ पंत किंवा तिलक वर्मा हे पर्याय विचारात घेतले जाऊ शकतात.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 6:10 pm

Shahajibapu Patil : मला पाडण्यासाठी भाजपने शेकापला मदत केली; शहाजीबापू पाटलांचा आरोप

सोलापूर : सांगोला मतदारसंघात भाजप-शिंदे सेना यांच्यातील दरी रुंदावली आहे. शिंदे सेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाजपवर मोठा आरोप करत म्हटले आहे की, “गेल्या विधानसभा निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी भाजपने शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार बाबासाहेब पाटील यांना मदत केली. लोकसभा निवडणुकीत आजारी असतानाही भाजप उमेदवाराला १५ हजार मतांचे लीड देणाऱ्या शहाजीबापूंची साथ विधानसभेला भाजपने […] The post Shahajibapu Patil : मला पाडण्यासाठी भाजपने शेकापला मदत केली; शहाजीबापू पाटलांचा आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 5:56 pm

Shreyas Iyer Angry : श्रेयस अय्यर सुरक्षारक्षकावर भडकला; म्हणाला, “भाई, तुझं काम गर्दी हटवणं आहे…”, पाहा VIDEO

Shreyas Iyer Angry on Security Guard video viral : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सध्या दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत झालेली दुखापत गंभीर असल्याने तो आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यालाही मुकण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या अय्यर आपल्या दुखापतीपेक्षा एका व्हायरल व्हिडिओमुळे जास्त चर्चेत आला आहे, ज्यामध्ये तो सुरक्षारक्षकावर संतापलेला स्पष्ट दिसत आहे. […] The post Shreyas Iyer Angry : श्रेयस अय्यर सुरक्षारक्षकावर भडकला; म्हणाला, “भाई, तुझं काम गर्दी हटवणं आहे…”, पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 5:47 pm

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांचा छळाचा आरोप

मुंबई : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जेची पत्नी डॉ. गौरी पालवेने घरगुती वादातून मुंबईच्या वरळी येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. ती शनिवारी संध्याकाळी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. मात्र, तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या […] The post पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांचा छळाचा आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 5:29 pm

Ayodhya : अयोध्येतील राम मंदिरावर २५ नोव्हेंबर रोजी होणार ध्वजारोहण; ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार पंतप्रधान मोदी

Ayodhya – २५ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येत नवीन इतिहास लिहिला जाईल. श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर भगवा विजय ध्वज फडकवण्यासाठी एक भव्य समारंभ आयोजित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असतील. रामनगरीतील भव्य कार्यक्रमासाठी शहरात तयारी जोरात सुरू आहे आणि सुरक्षेपासून सजावटीपर्यंत प्रत्येक स्तरावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ध्वजात […] The post Ayodhya : अयोध्येतील राम मंदिरावर २५ नोव्हेंबर रोजी होणार ध्वजारोहण; ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार पंतप्रधान मोदी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 5:12 pm

सांगलीत स्मृती मंधानाच्या लग्नाआधी अनपेक्षित घटना; वडिलांची तब्येत बिघडल्याने विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला

सांगली : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि पलश मुच्छल यांच्या विवाह सोहळ्यात एक अनपेक्षित विघ्न आले. लग्न समारंभाची थाटामाटात तयारी सुरू असताना स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.सकाळी नाश्ता करताना श्रीनिवास मंधाना यांची तब्येत बिघडली. काही वेळातच त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल असे सांगितले असले तरी, पूर्ण बरे होण्यासाठी काही वेळ लागणार असल्याची शक्यता आहे.दुपारी ३.३० वाजता स्मृती आणि पलाशच्या विवाहाचा मुहूर्त ठरलेला होता. परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आणि आकर्षक सजावट करण्यात आली होती. मात्र, स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच लग्नस्थळी सर्व तयारी थांबवण्यात आली. फार्म हाऊसची सजावट काढण्याचे काम सुरू झाले आहे. कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.स्मृती मंधानाचा तिच्या वडिलांवर खूप जीव आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत लग्नाचा कोणताही कार्यक्रम करू नये, असा निर्णय तिने घेतला आहे. कुटुंबीयांनीही हा निर्णय मान्य केला आहे. विवाह सोहळा पुढे कधी होणार याबाबत अद्याप तारीख निश्चित नाही.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 5:10 pm

Pune news : पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

पुणे : पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने मंगळवार पेठ परिसरातून अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. रमजान उर्फ टिपू आदम पटेल (वय ३३, रा. भाजी बाजार, शिरूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलीस कर्मचारी हेमंत पेरणे आणि नीलेश साबळे हे मंगळवार पेठेत […] The post Pune news : पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 4:51 pm

Smriti Mandhana Wedding : ‘बाबा बरे होईपर्यंत लग्न नाही…’, वडिलांची प्रकृती बिघडल्याने स्मृतीचा विवाहसोहळा पुढे ढकलला

Smriti Mandhana Wedding Postponed : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा आज होणारा विवाह सोहळा अचानक पुढे ढकलण्यात आला आहे. आज (रविवार, २३ नोव्हेंबर) सांगलीमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र, लग्नाच्या आनंदी वातावरणात अचानक एक दुर्दैवी घटना घडली. स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांची प्रकृती अचानक खालावल्याने […] The post Smriti Mandhana Wedding : ‘बाबा बरे होईपर्यंत लग्न नाही…’, वडिलांची प्रकृती बिघडल्याने स्मृतीचा विवाहसोहळा पुढे ढकलला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 4:47 pm

Red Fort Blast Case : दहशतवाद्यांमधील भांडणाने निर्माण झाला वाद; दिल्ली स्फोटाबाबत मोठी माहिती समोर…

Red Fort Blast Case : १० नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात सहभागी असलेल्या ह्युंदाई आय२० कारचा चालक उमर-उन-नबी बद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. त्याचे आदिल अहमद राथेरशी गंभीर मतभेद होते. राथेरची सध्या चौकशी सुरू आहे. आदिल हा उमरसोबत स्फोटातही कट रचणारा आहे. या मतभेदांमुळे उमर आदिल अहमद राथेरच्या लग्नाला उपस्थित राहिला नसल्याचे […] The post Red Fort Blast Case : दहशतवाद्यांमधील भांडणाने निर्माण झाला वाद; दिल्ली स्फोटाबाबत मोठी माहिती समोर… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 4:36 pm

IND vs SA : ‘तू घरी खेळतोय का?’कुलदीपवर संतापला कर्णधार ऋषभ, नेमकं काय होतं कारण? पाहा VIDEO

Rishabh Pant Shout at Kuldeep Yadav : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुवाहाटीत खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सेनुरन मुथुसॅमीच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४८९ धावांचा डोंगर उभारला आहे. या सामन्यात भारतीय संघाला विकेट्स घेण्यासाठी अक्षरशः खूप कष्ट घ्यावे लागले. दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ऋषभत पंतचा एक […] The post IND vs SA : ‘तू घरी खेळतोय का?’ कुलदीपवर संतापला कर्णधार ऋषभ, नेमकं काय होतं कारण? पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 4:16 pm

मुंबईच्या मतदारयादीत ११ लाख दुबार मतदार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महानगरपालिकेने प्रकाशित केलेल्या प्रारूप मतदारयादीत तब्बल ११ लाखांपेक्षा जास्त मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवणे हे निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान आहे.प्रारूप यादी तपासताना ११,०१,५०५ मतदार दुबार असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, यापैकी सुमारे एक लाख मतदारांची नावे तीन किंवा चार वेगवेगळ्या यादीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या पश्चिम उपनगरांची (४,९८,५९७) असून, पूर्व उपनगरात ३,२९,२१६ आणि मुंबई शहरात २,७३,६९२ दुबार नोंदी आढळल्या आहेत.मतदारयादीवरील हरकती आणि सूचनांसाठी २७ नोव्हेंबर ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. तर ५ डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. मुंबईतील एकूण मतदारसंख्या १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ इतकी असून, त्यापैकी ११ लाखांहून अधिक नावे पुनरावृत्तीची असल्याने निवडणूक आयोग आणि महापालिका या दोघांवरही दुरुस्तीचे मोठे दडपण आले आहे.महापालिकेने दुबार मतदारांची समस्या दूर करण्यासाठी काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. प्रारूप मतदारयादीत जे मतदार दुबार नोंदले गेले आहेत, त्यांची नावे स्वतंत्रपणे चिन्हांकित करण्यात आली आहेत. अशा मतदारांना स्वतःहून आपले अतिरिक्त नाव वगळण्याची संधी दिली जाणार असून, अंतिम यादी जाहीर होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, मतदानाच्या दिवशी जर एखाद्या मतदाराची दुबार नोंदणी आढळली, तर त्या व्यक्तीकडून दुसरीकडे मतदान केले नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येईल. महापालिकेच्या या उपाययोजनांमुळे मतदारयादीतील चुका कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 4:10 pm

स्मृती–पलाशच्या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा; संगीत समारंभाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सांगली : भारतीय क्रिकेटमधील स्टार खेळाडू स्मृती मंधाना आणि प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक व चित्रपट निर्माते पलाश मुच्छल यांच्या राजेशाही लग्नसोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. प्रपोजलपासून ते हळद, मेहेंदी आणि आता झालेल्या धमाल संगीत समारंभापर्यंत प्रत्येक क्षणावर चाहत्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. आज (२३ नोव्हेंबर) या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार असून, त्याआधी झालेली संगीत नाईट खास चर्चेचा विषय ठरली आहे.या समारंभात स्मृती आणि पलाशच्या रोमँटिक परफॉर्मन्सने वातावरण आणखी आनंदमय केले. सलमान खानच्या ‘सालाम-ए-इश्क’ चित्रपटातील ‘तेनु लेके मे जावांगा’ या गाण्यावर दोघांनी जबरदस्त डान्स केला. स्मृतीने पलाशच्या गळ्यात हार घालत डान्सला सुरुवात केली आणि त्यानंतर दोघांनी एकत्र केलेल्या सिग्नेचर स्टेपनं उपस्थितांचे मन जिंकले. त्यांचा हा रोमँटिक व्हिडीओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.संगीत समारंभात आणखी एक आकर्षण ठरला तो टीम इंडियाच्या महिला क्रिकेटरांचा ग्रुप डान्स. स्मृतीच्या टीममेट जेमिमा रॉड्रीग्ज, श्रीयंका पाटील, राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि यष्टिवादी याचिका भाटिया यांनी ‘तेरा यार हू मै’ या गाण्यावर दिलखुलास परफॉर्मन्स देत कार्यक्रमात रंगत आणली. त्यांचा उत्साही डान्स पाहून उपस्थितांनी त्यांचेही तितकेच कौतुक केले.पलाश आणि स्मृतीच्या लग्नाला फिल्म आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. प्री-वेडिंग फोटोंनी आधीच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, त्यांच्या भव्य विवाहसोहळ्याची झलक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 4:10 pm

भारतामध्ये पहिली हायब्रिड SUV घेऊन ‘Kia’सज्ज; फीचर्स आणि किंमत एकदा पाहाच…

Kia Motors | SUV 2026 Kia Sorento – ‘Kia Motors’ लवकरच भारतीय बाजारात आपली पहिली हायब्रिड ‘SUV 2026 Kia Sorento’ लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ही SUV भारतात प्रथमच टेस्टिंगदरम्यान दिसली असून, Kia च्या लाइनअपमध्ये ती Seltos च्या वरच्या सेगमेंटमध्ये स्थान मिळवेल. थर्ड-रो सीटिंगसह ही मोठी SUV Toyota Fortuner सारख्या प्रीमियम गाड्यांना थेट टक्कर देऊ […] The post भारतामध्ये पहिली हायब्रिड SUV घेऊन ‘Kia’ सज्ज; फीचर्स आणि किंमत एकदा पाहाच… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 3:56 pm

Prashant Kishor : बिहार निवडणुकीत मतांची हाणामारी : प्रशांत किशोर

पाटणा : निवडणूक रणनीतीकार आणि जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या खराब कामगिरीनंतर रविवारी मौन सोडले आणि असा दावा केला की, या निवडणुकांमध्ये मतांची हाणामारी झाली आहे. पण त्यांनी हेही कबूल केले की सध्या त्यांच्याकडे आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते […] The post Prashant Kishor : बिहार निवडणुकीत मतांची हाणामारी : प्रशांत किशोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 3:37 pm

शाहांची भेट, फडणवीसांशी अबोला? महायुतीत मतभेदाची जोरदार चर्चा; आपला शत्रू कोण? एकनाथ शिंदेंनी किअर केलं म्हणाले…

Eknath Shinde : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. यामुळे अनेक राजकीय घडामोडींना वेग आला असून, स्थानिक पातळीवर राजकीय गरज पाहता निर्णय घेतले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री भाजपचे नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे शिंदे नाराजी असल्याची जोरदार […] The post शाहांची भेट, फडणवीसांशी अबोला? महायुतीत मतभेदाची जोरदार चर्चा; आपला शत्रू कोण? एकनाथ शिंदेंनी किअर केलं म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 3:17 pm

Justice Suryakant : न्या. सूर्यकांत नवे सरन्यायाधिश; न्या. भूषण गवई यांची घेणार जागा

Justice Suryakant – जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणे, बिहार मतदार यादी पुनरावृत्ती आणि पेगासस स्पायवेअर प्रकरण यावरील अनेक ऐतिहासिक निकाल आणि आदेशांचा भाग असलेले न्या. सूर्यकांत सोमवारी भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. ते आता निवृत्त होणाऱ्या न्या. भूषण गवई यांच्या जागी येतील. न्या. सूर्यकांत यांची ३० ऑक्टोबर रोजी पुढील सरन्यायाधीश म्हणून […] The post Justice Suryakant : न्या. सूर्यकांत नवे सरन्यायाधिश; न्या. भूषण गवई यांची घेणार जागा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 3:14 pm

स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी शिवसेनेची मोठी तयारी; मराठवाड्यात अनुभवी नेत्यांना प्रमुख भूमिका

मुंबई : मराठवाड्यातील शिवसेना (शिंदे गट) संघटनात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेऊन मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अनुभवी आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांना जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या बदलांमधून पक्षाने निवडणुकीकडे गांभीर्याने पाहत संघटना मजबुतीकडे स्पष्ट वाटचाल सुरू केल्याचे दिसते.मुंबईत पक्षाने केलेल्या या नव्या घोषणेनुसार छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत महत्त्वाची जबाबदारी अनुभवी नेत्यांना सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नियुक्त संपर्कप्रमुखांना निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संबंधित जिल्ह्यात राहून पक्षाची मोहीम मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत.शिवसेना सचिव संजय मोरे यांनी राज्यातील एकूण 40 जिल्हा संपर्कप्रमुखांची यादी शनिवारी जाहीर केली. नगरपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये संघटना बळकट करण्यासाठी आमदार आणि खासदार यांचा थेट सहभाग असणार आहे.नवीन नियुक्त्या पुढीलप्रमाणे:छत्रपती संभाजीनगर महानगर – विलास पारकरछत्रपती संभाजीनगर ग्रामीण – अर्जुन खोतकर, भास्कर आंबेकरबीड – टी. पी. मुंडे, मनोज शिंदेधाराशिव – राजन साळवीनांदेड – सिद्धराम मेहत्रेलातूर – किशोर दराडेपरभणी – आनंद जाधवहिंगोली – हेमंत पाटीलस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्यात अनेक बदल होताना दिसत आहेत. पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावर भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात वाद निर्माण झाला. फक्त वादच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट अमित शाह यांच्या भेटीला या मुद्द्यावरून पोहोचले. एकनाथ शिंदे गटाचे मंत्री देखील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले होते. यावेळी त्यांनी कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी दाखवत आपली नाराजी व्यक्त केली.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 3:10 pm

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्याविषयीची उद्या सुनावणी

Sonam Wangchuk – पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली जे. अँग्मो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. या याचिकेत गीतांजली जे. अँग्मो यांनी कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत हवामान कार्यकर्त्याची अटक बेकायदेशीर आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी मनमानी कारवाई असल्याचे म्हटले होते. त्यासाठी गीतांजली यांनी सुधारित याचिकेवर केंद्र सरकार आणि […] The post Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्याविषयीची उद्या सुनावणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 3:09 pm

“एकमेकांशी न बोलण्यासारखं काहीही घडलेलं नाही, फक्त…”; शिंदेंसोबतच्या दुराव्याच्या चर्चांवर फडणवीसांचे स्पष्टीकरण

Devendra Fadnavis And Eknath Shinde | मागील काही दिवसांपासून महायुतीत काही तरी बिनसल्याची चर्चा सुरू आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध बिघडल्याचे देखील म्हंटले गेले. याचदरम्यान, एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने नाराजीच्या चर्चेत आणखी भर पडली. मात्र या चर्चांवर प्रतिक्रिया देत फडणवीस यांनी आमच्या दोघात कुठलाही […] The post “एकमेकांशी न बोलण्यासारखं काहीही घडलेलं नाही, फक्त…”; शिंदेंसोबतच्या दुराव्याच्या चर्चांवर फडणवीसांचे स्पष्टीकरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 3:08 pm

health: दर आठ मिनिटांनी एका महिलेचा स्तन कर्करोगाने मृत्यू; धोका कमी करण्यासाठी दररोज सेवन करा ‘हे’खाद्यपदार्थ

health: स्तन कर्करोग हा जगभरातील महिलांमध्ये आढळणारा सर्वाधिक आजार आहे. दरवर्षी लाखो महिलांना या रोगाचे निदान होते. भारतातील स्थिती देखील अत्यंत चिंताजनक आहे. बीसीआयच्या (Breast Cancer in India) माहितीनुसार, देशात दर चार मिनिटांनी एका महिलेत स्तनकर्करोगाचे निदान होते आणि दर आठ मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू होतो. भारतामध्ये अंदाजे २८ महिलांपैकी १ महिलेला आयुष्यात कधीतरी या […] The post health: दर आठ मिनिटांनी एका महिलेचा स्तन कर्करोगाने मृत्यू; धोका कमी करण्यासाठी दररोज सेवन करा ‘हे’ खाद्यपदार्थ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 3:03 pm

“निवडणुकांमध्ये गडबड झाली, पण त्याचे पुरावे…”; निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर प्रशांत किशोरांचे महत्वाचे विधान

Prashant Kishor on Bihar Elections। जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बिहार निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या अपयशाबद्दल मौन सोडले आणि निवडणुकीत गडबड झाली असल्याचा दावा केला. परंतु, त्यांनी यावेळी या आरोपाचे समर्थन करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसल्याचे मान्य केले. प्रशांत किशोर यांनी जन सुराजचा पराभव “चिरडणारा” पराभव असल्याचे वर्णन केले, परंतु त्यांच्या तळागाळातील मोहिमेने निकाल दाखवल्याचा […] The post “निवडणुकांमध्ये गडबड झाली, पण त्याचे पुरावे…”; निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर प्रशांत किशोरांचे महत्वाचे विधान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 2:56 pm

दिग्दर्शक हेमंत ढोमेची नवी कलाकृती; ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’चित्रपटाचा टीझर रिलीज

Krantijyoti Vidyalaya Marathi Medium Movie Trailer : दिग्दर्शक, अभिनेता हेंमत ढोमे हा नेहमीच हटके विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘झिम्मा’, ‘फर्स्टक्लास दाभाडे’ यांसारख्या चित्रपटातून तुमच्या आमच्या जगण्यातून पैलूंवर भाष्य केले. आता पुन्हा एकदा हेंमत ढोमे त्याच्या पुढचा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे नाव ‘क्रांतिज्योती […] The post दिग्दर्शक हेमंत ढोमेची नवी कलाकृती; ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ चित्रपटाचा टीझर रिलीज appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 2:49 pm

गृह मंत्रालयाने चंदीगड विधेयकावर सोडले मौन ; विधेयकाविषयी दिली ‘ही’माहिती 

Chandigarh Bill। केंद्रीय गृह मंत्रालयाने चंदीगडशी संबंधित विधेयकावर सुरु असणाऱ्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चंदीगड प्रशासनावर विधेयक मांडण्याचा केंद्र सरकारचा कोणताही हेतू नाही. केंद्र सरकारने पुढे म्हटले आहे की, केंद्र सरकारकडून चंदीगड या केंद्रशासित प्रदेशासाठी कायदा करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या पातळीवर विचाराधीन आहे. मंत्रालयाने असेही […] The post गृह मंत्रालयाने चंदीगड विधेयकावर सोडले मौन ; विधेयकाविषयी दिली ‘ही’ माहिती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 2:31 pm

“मुस्लिमांना भारतापेक्षा…” ; मौलाना अर्शद मदानींच्या विधानाला शाहनवाज हुसेन यांचे प्रत्युत्तर

Shahnawaz Hussain। जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी देशातील मुस्लिमांबाबत केलेल्या विधानानंतर आरोप-प्रत्यारोपांची मालिका तीव्र झाली आहे. मदनी यांनी, “लंडन आणि न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरांमध्ये मुस्लिम महापौर होऊ शकतात, तर भारतात तीच व्यक्ती विद्यापीठाचा कुलगुरूही होऊ शकत नाही.”असे म्हणत वादाला तोंड फोडले होते. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी मदनी यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त […] The post “मुस्लिमांना भारतापेक्षा…” ; मौलाना अर्शद मदानींच्या विधानाला शाहनवाज हुसेन यांचे प्रत्युत्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 2:14 pm

मुंबईत भाजप विरोधात मविआ मनसेला सोबत घेऊन लढणार ?

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जवळ आल्याने सर्व राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. अनेक ठिकाणी आजपासून प्रचाराला औपचारिक सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्रित लढावे, असा सूर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे. विशेष म्हणजे, शिउबाठा आणि मनसेतील समीकरणे गेल्या काही महिन्यांत बदललेली दिसत आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच गोटात एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.सर्वच पक्ष २०१७ मध्ये स्वतंत्रपणे मैदानात उतरले होते. निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपने एकत्र सत्ता स्थापन केली होती. अवघ्या दोन जागांच्या फरकामुळे दोन्ही पक्षांत स्पर्धा तगडी होती. आता आठ वर्षांनी राज्यातील संपूर्ण राजकीय नकाशा बदललेला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले आहेत. तर ठाकरे बंधू पुन्हा जवळ येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. अशा परिस्थितीत विधानसभा आणि लोकसभेप्रमाणेच महानगरपालिकेतही महाविकास आघाडीने एकत्रित लढावे आणि त्यात मनसेलाही सामील करून घ्यावे, असे मत आघाडीतील अनेक नेते व्यक्त करत आहेत.मुंबई महापालिकेचा २०१७ मधील निकाल आणि आताच्या राजकीय परिस्थितीनुसार महाविकास आघाडीचा संभाव्य फॉर्म्युला असा असू शकतो :शिवसेना – ८४ जागा जिंकल्या आणि ११० जागांवर लढण्याची शक्यताकाँग्रेस –३१ जागा जिंकल्या आणि ५५ जागांवर लढण्याची शक्यताराष्ट्रवादी – ०९ जागा जिंकल्या आणि १२ जागांवर लढण्याची शक्यतामनसे – ०७ जागा जिंकल्या आणि ५० जागांवर लढण्याची शक्यतामुंबईतील अनेक मतदारसंघांमध्ये मराठी, मराठा आणि मुस्लिम समाजाचे मत निर्णायक ठरते. काँग्रेसने २०१७ मध्ये स्वतंत्रपणे ३१ जागा जिंकत दलित, मुस्लिम, ख्रिश्चन आणि उत्तर भारतीय मतदारांमध्ये आपली पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले होते.महाविकास आघाडीने पुन्हा एकत्र यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोर व्यक्त केली असून पवारांनीही भाजपला रोखण्यासाठी विरोधकांची एकजूटच गरजेची असल्याचे मत नोंदवले आहे.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 2:10 pm

परभणीत राजकीय राडा; पाथरीत दगडफेक आणि तलवारीने हल्ले

परभणी : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. स्थानिक स्तरावर प्रचाराला जोरदार रंग चढला असून अनेक नेते आणि उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका व्हाव्यात यासाठी हालचाली सुरू असताना, काही भागांत मात्र संघर्षाची शक्यता वाढत आहे. अशातच परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात प्रचारादरम्यान झालेल्या हिंसक घटनेने खळबळ उडाली आहे.दगडफेक, तलवारी आणि चाकूंसह हल्लेपाथरी तालुक्यात २१ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रचारादरम्यान शिंदे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत वाद चिघळला. अल्पावधीतच परिस्थिती ताणली गेली आणि वाद थेट हिंसक स्वरुपात बदलला. घटनेदरम्यान तलवारी आणि चाकूंसह हल्ले झाल्याची माहिती मिळाली असून दोन्ही गटातील काही जण जखमी झाले आहेत. दगडफेक आणि धारदार शस्त्रांच्या हल्ल्यांमुळे काहींना डोक्यावर टाके घालावे लागले आहेत. जखमींना तातडीने परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर हल्ल्याचे आरोप करत वातावरण आणखी तापवले आहे.हर्षवर्धन सपकाळ यांना काळे झेंडेकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पाथरीत प्रचारासाठी आले असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्या भाषणानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सपकाळ यांना काळे झेंडे दाखवले. नंतर सेलू शहरातही सपकाळ यांच्या आगमनावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत देवेंद्र फडणवीस झिंदाबादच्या घोषणा दिल्या.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 2:10 pm

“तू खूप स्वप्न बघणारी आणि…”; अमृताच्या वाढदिवसानिमित्त जवळची मैत्रीण सोनालीची खास पोस्ट

Amruta Khanvilkar | अमृता खानविलकर ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री मानली जाते. तिच्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला. सोशल मिडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अमृताच्या वाढदिवसानिमित्त तिची जवळची मैत्रीण अभिनेत्री सोनाली खरे हिने इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोनालीने अमृताबरोबरचे काही खास फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “माझ्या […] The post “तू खूप स्वप्न बघणारी आणि…”; अमृताच्या वाढदिवसानिमित्त जवळची मैत्रीण सोनालीची खास पोस्ट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 1:35 pm

शोभिताच्या नाग चैतन्याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; दोघांचा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर केला शेअर

Sobhita Dhulipala : दाक्षिणात्य अभिनेत्री शोभिता धुलिपालाने तिचा पती नागा चैतन्यला त्याच्या ३९ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या. शोभिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दोघांचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोला शोभिताने खास प्रकारचे कॅप्शन दिले आहे. शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य हे दक्षिणेतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या फोटोत […] The post शोभिताच्या नाग चैतन्याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; दोघांचा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर केला शेअर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 1:31 pm

प्रमोद महाजनांची हत्या, गोपीनाथ मुंडेंचा अपघाती मृत्यू, आता पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या

मुंबई : वरळीत प्रमोद महाजन यांची त्यांच्याच भावाने प्रवीणने हत्या केली. काही महिन्यांनतर प्रवीण महाजन ब्रेन हॅमरेजमुळे कोमात गेला. कोमातच काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. यानंतर काही वर्षांनी प्रमोद महाजन यांचे मित्र आणि नातलग असलेले गोपीनाथ मुंडे यांचा दिल्लीत कार अपघातात मृत्यू झाला. या घटनेला काही वर्षे होत नाहीत तोच गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केली.भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने शनिवारी संध्याकाळी आत्महत्या केली. गर्जे यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नाला वर्ष पण झाले नव्हते तोच पत्नीने आत्महत्या केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. आत्महत्येनंतर मुलीच्या घरच्यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. मुलीच्या घरच्यांनी वरळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून कारवाईची मागणी केली आहे.अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा विवाह ७ फेब्रुवारी २०२५ रोजी झाला. लग्नानंतर काही दिवसांतच पती - पत्नी यांच्यात वाद होऊ लागले. वादाचे प्रमाण वाढत गेले. अखेर गौरीने शनिवारी टोकाचे पाऊल उचलले. वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे.लग्नाआधी गौरी या वरळीच्याच बीडीडी चाळीत वास्तव्यास होत्या आणि केईएममध्ये डेंटिस्ट विभागात कार्यरत होत्या. लग्नानंतर अनंत गर्जे आणि गौरी यांच्यातील संबंध अवघ्या काही महिन्यांत बिघडले आणि गौरीने शनिवारी आयुष्य संपवले. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी त्यांचे सर्व दौरे रद्द केले आहेत. सध्या पंकजा मुंडे मुंबईतच वास्तव्यास आहेत. पण त्यांनी या प्रकरणावर काहीही बोलणे टाळले आहे. पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तपासाला मदत होईल, एवढीच मोघम प्रतिक्रिया दिली आहे.आत्महत्येचे नेमके कारण काय ?अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा विवाह 7 फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात झाला होता. या लग्नाला पंकजा मुंडे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या. लग्नाला दहा महिने होत नाहीत तोच गौरी यांनी आत्महत्या केली. अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याने गौरी अस्वस्थ होत्या आणि त्यातून आलेल्या नैराश्यापोटी त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. अद्याप पोलिसांनी या संदर्भात भाष्य केलेले नाही. तपास सुरू आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 1:30 pm

ईडीची सर्वात मोठी कारवाई! बंगाल-झारखंड कोळसा घोटाळा प्रकरणात ४४ ठिकाणी छापे ; १४ कोटी रोख अन् सोनं जप्त

ED Coal Scam। एका मोठ्या कारवाईत, ईडीने कोळसा घोटाळ्यासंदर्भात पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील ४४ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या छाप्यांमध्ये ईडीच्या पथकांनी १४ कोटी रुपयांहून अधिक किमतीची रोख रक्कम, सोने आणि दागिने जप्त केले. याशिवाय, मालमत्ता कागदपत्रे, जमीन खरेदी-विक्री करार, डिजिटल उपकरणे आणि अनेक कंपन्यांचे अकाउंट बुक्स […] The post ईडीची सर्वात मोठी कारवाई! बंगाल-झारखंड कोळसा घोटाळा प्रकरणात ४४ ठिकाणी छापे ; १४ कोटी रोख अन् सोनं जप्त appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 1:23 pm

शिंदे-फडणवीसांतील दुराव्यापासून ते अमेरिकेच्या टॅरीफपर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर

दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा दुरावा नाही शनिवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या दिव्यज फाऊंडेशनच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस परस्परांपासून अंतर राखून बसल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळाले होते. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असणाऱ्या दोन खुर्च्या मुकेश अंबानी […] The post शिंदे-फडणवीसांतील दुराव्यापासून ते अमेरिकेच्या टॅरीफपर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 1:01 pm

लग्न करण्याची इच्छा आहे का? अभिनेत्री तनुश्री दत्ता म्हणाली…

Tanushree Dutta : बॅालीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपला एक काळ गाजवला आहे. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे तनुश्री दत्ता. एकेकाळी बॅालीवूड इंडस्ट्रीमधील बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. अभिनेता इमरान हाशमीसोबत ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटात तिने स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटात तनुश्रीने दिलेल्या इंटीमेंट सीनची बरीच चर्चा झाली होती. त्यामुळे अभिनेत्री प्रकाशझोतात […] The post लग्न करण्याची इच्छा आहे का? अभिनेत्री तनुश्री दत्ता म्हणाली… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 12:59 pm

“एक-दोन नव्हे तर ८ युद्धे थांबवली” ; डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफवरून खळबळजनक दावा

Trump Tariffs। जगभरात खळबळ माजवणारे टॅरिफ लादणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या वारंवार त्यांच्या या कृतींचे समर्थन करत आहेत. तीव्र टीकेदरम्यान, त्यांनी सातत्याने दावा केला आहे की, त्यांचे शुल्क धोरण केवळ अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत करत नाही तर आंतरराष्ट्रीय संघर्ष रोखण्यास देखील मदत करत आहे. आता, ट्रम्प यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे, “त्यांनी आतापर्यंत […] The post “एक-दोन नव्हे तर ८ युद्धे थांबवली” ; डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफवरून खळबळजनक दावा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 12:57 pm

‘ही कसली फॅशन?’गायिका नेहा कक्कर अनोख्या एअरपोर्ट लुकमुळे ट्रोल

Neha Kakkar| बॉलीवूड गायिका नेहा कक्करने अनेक सुपरहिट गाणी केली आहेत. तिच्या गाण्यांना प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे. गाण्यासोबतच तिच्या अनोख्या लुकची अनेकदा चर्चा होत असते. नुकताच नेहाचा एअरपोर्ट लुक समोर आला आहे. ज्यात तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे तिला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. नेहा कक्कर अलीकडेच विमानतळावर दिसली. नेहाला पाहून पापाराझींनी तिचे फोटो कढले. […] The post ‘ही कसली फॅशन?’ गायिका नेहा कक्कर अनोख्या एअरपोर्ट लुकमुळे ट्रोल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 12:51 pm

Amitabh Bachchan: पेनकिलरशिवाय घेतला प्रसूतीचा निर्णय! ऐश्वर्याच धैर्य पाहून अमिताभ बच्चन झाले भावूक

Amitabh Bachchan: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत अनेक अफवा उठत असल्या तरी दोघेही वेळोवेळी स्पष्ट करतात की त्यांच्या नात्यात सर्व काही सुरळीत आहे. परंतु ऐश्वर्या राय यांच्या प्रसूतीवेळचा एक प्रसंग सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. आराध्याच्या जन्मावेळी ऐश्वर्या यांनी तीव्र वेदना सहन करत पेनकिलर घेण्यास नकार दिला होता. हा प्रसंग आठवताच सासरे […] The post Amitabh Bachchan: पेनकिलरशिवाय घेतला प्रसूतीचा निर्णय! ऐश्वर्याच धैर्य पाहून अमिताभ बच्चन झाले भावूक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 12:41 pm

चंदीगडला कलम २४० अंतर्गत आणण्याची सरकारची तयारी ; पंजाबमध्ये गोंधळ. नेमके हे कलम काय आहे? जाणून घ्या

Chandigarh Article 240। केंद्र सरकार लवकरच संसदेत संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक, २०२५ सादर करणार आहे. या प्रस्तावाचा प्राथमिक उद्देश संविधानाच्या कलम २४० अंतर्गत चंदीगडला केंद्रशासित प्रदेशांच्या श्रेणीत समाविष्ट करणे आहे, जिथे राष्ट्रपती थेट कायद्यांसारखेच परिणाम करणारे नियम बनवतात. ही दुरुस्ती मंजूर झाल्यानंतर, चंदीगडच्या प्रशासकीय रचनेच्या नवीन परिवर्तनाचा मार्ग मोकळा होईल. १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या […] The post चंदीगडला कलम २४० अंतर्गत आणण्याची सरकारची तयारी ; पंजाबमध्ये गोंधळ. नेमके हे कलम काय आहे? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 12:27 pm

Pune District : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बकोरी ग्रामपंचायत सदस्य अपात्र; नेमकं कारण काय?

वाघोली :बकोरी तालुका हवेली या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य संतोष रानबा वारघडे यांच्या सन 2001 नंतर जन्मलेल्या आपत्यांची संख्या तीन असल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिला आहे. याबाबत रामराव तुळशीराम कुटे राहणार बकोरी यांनी 7 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केला होता. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्य संतोष […] The post Pune District : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बकोरी ग्रामपंचायत सदस्य अपात्र; नेमकं कारण काय? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 12:27 pm

उदय सामंतांच्या दाव्याला ठाकरेंच्या रणराघीणीचे खणखणीत प्रत्युत्तर; थेट ठाकरेंसोबतचा ‘तो’फोटो शेअर करत साधला निशाणा

Sushma Andhare : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर उमटल्याची जोरदार चर्चा झाली. यामुळे शिवेसेना-भाजपमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली. या तणावाबद्दल शिवसेनेची मंत्री उघडपणे बोलताना दिसत नसले तरी, त्यांच्या विधानांमुळे त्या गोष्टी जाणावत आहेत. राज्याच्या राजकारणात या सगळ्यांचा उहापोह होत असतानाच आता शिवसेनेचे मंत्री उदय सावंत यांनी एक मोठा दावा केला आहे. सुषमा अंधारे […] The post उदय सामंतांच्या दाव्याला ठाकरेंच्या रणराघीणीचे खणखणीत प्रत्युत्तर; थेट ठाकरेंसोबतचा ‘तो’ फोटो शेअर करत साधला निशाणा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 12:19 pm

बुधवारी मुख्यमंत्री पेणमध्ये; फोडणार प्रचाराचा नारळ

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध ही पुन्हा सत्ता स्थापनेची नांदी स्वप्नील पाटील पेण : राज्यातील नगर परिषदेच्या निवडणुका पार पडत असून राज्यभरात निवडणुकीच्या प्रचाराच्या आनुषंगाने विविध पक्षांचे प्रमुख नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचाराच्या प्रमुख सभा घेत आहेत. त्या आनुषंगाने येत्या २६ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पेण पालिकेच्या निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पेणमध्ये येत असल्याची माहिती पेण विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी त्यांनी पेण अर्बन बँकेचे माजी चेअरमन शिशिर धारकर यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारामुळे यातील जे ठेवीदार मृत्युमुखी पडले आहेत त्याचे पाप ते कधीच फेडू शकणार नाहीत असे सांगितले. महायुतीचे मतदानापूर्वीच सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत ही तर पुनर्सत्ता स्थापनेची नांदी असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी आमदार रवींद्र पाटील यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील, ज्येष्ठ नेते सुधीर जोशी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस संजय डंगर, पीआरपीचे जिल्हा प्रमुख सीताराम कांबळे, भाजप शहर प्रमुख रवींद्र म्हात्रे, राष्ट्रवादीचे शहर प्रमुख जितेंद्र ठाकूर यांसह महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.पेण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी महायुती आणि पेण शहर विकास आघाडी यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने निवडणूक होणार आहे. त्यामुळे येत्या ३ तारखेला पेण शहरातील मतदार कोणाला आपले झुकते माप देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी आमदार रवींद्र पाटील यांनी मागील दहा वर्षांत पेण शहरात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला.पेण अर्बन बँकेच्या घोटाळ्यात पैसे अडकलेल्या खातेदारांपैकी आत्तापर्यंत पेण शहरातील चाळीसहून अधिक ठेवीदार त्या धक्क्याने मेहनतीच्या पैशाचा उपभोग न घेता आल्याने मृत्युमुखी पडले याचे हे पाप पेण अर्बन बँकेचे माजी चेअरमन शिशिर धारकर कधीच फेडू शकत नाहीत, असे देखील आमदार रवींद्र पाटील सांगितले. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सिताराम कांबळे यांनी आपल्या पक्षाचा महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा असल्याचे जाहीर करून तशा प्रकारचे पत्र आमदार रवींद्र पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.निकालाआधीच महायुतीची विजयाची मुहूर्तमेढपेण पालिकेच्या निवडणुकीत चोवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी असे एकूण पंचवीस उमेदवार निवडणूक रिंगणात असताना भाजपचे तीन आणि राष्ट्रवादीचे तीन असे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने पालिका निवडणुकीत निकालाआधीच महायुतीने विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यामुळे पेण शहरातील मतदारांचा महायुतीकडे कल वाढला असून या बिनविरोध झालेल्या विजयी उमेदवारांचे आमदार रवींद्र पाटील यांनी कौतुक केले आणि इतर उमेदवारांना देखील भरघोस मतांनी निवडून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 12:10 pm

ऑनलाईन ऑर्डर करणं भोवलं, महिलेला डिलिव्हरी बॉयचे अश्लील मेसेज

मुंबई : आजकाल आपण अगदी सहज प्रत्येक गोष्ट ऑनलाईन ऑर्डर करतो. त्यामुळे डिलिव्हरी बॉयकडे संपर्कासाठी आपला नंबर हा असतोच . अशा नंबरचा गैरवापर करून डिलिव्हरी बॉयने एका महिलेला व्हाट्सअॅपवरून धमक्या देत अश्लील मेसेज पाठवले आहेत.परिजान नावाच्या महिलेने २३ सप्टेंबर रोजी एका ऑनलाईन अॅपवरून घरचे किराणा सामान मागवले होते. दुपारी ४ च्या सुमारास डिलिव्हरी बॉय तिच्या घरी पोहोचला. काही वस्तू उपलब्ध नसल्याचे सांगून रिफंड करण्यासाठी नंबर हवा असे सांगत महिलेचा नंबर घेतला.पुढच्या दिवशी त्याने फोन करून रिफंडची माहिती दिली. यानंतर छेडछाडीची मालिका सुरू झाली. डिलिव्हरी बॉय तिला सतत व्हाट्सअॅप वरून अश्लील मेसेज पाठवू लागला.परिजानने ही गोष्ट तिच्या पतीला सांगितली. पतीने आरोपीला कडक शब्दात इशारा दिला आणि परिजानपासून दूर राहण्यास सांगितले, त्यानंतर आरोपी काही दिवस शांत राहिला, पण २८ नोव्हेंबरला पुन्हा त्याने अश्लील मेसेज पाठवलेमहिलेने संतापून पोलिसात तक्रार करण्याचा इशारा दिला. त्यानंतरही आरोपीने नंबर ब्लॉक करत वेळ मारून नेली . पण यानंतरही त्याची कृती काही थांबली नाही.आरोपीने १९ नोव्हेंबरला नवीन नंबरवरून पुन्हा मेसेज पाठवायला सुरुवात केली. परिजानला एकटीला भेटण्यासाठी बोलावले. तिने नकार दिल्यावर त्याने धमक्या देत खूप जास्त मेसेज,स्टॉकिंग केल्याने परिनाज पूर्णपणे घाबरली. अखेर तिने भायखळा पोलिस ठाण्यात जाऊन रितसर तक्रार नोंदवली.पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, या प्रकरणामुळे ऑनलाइन ऑर्डर देणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 12:10 pm

“नितीश कुमारांनी सम्राट चौधरींना गृहखाते दिले तर…” ; मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या नेत्याचा मोठा दावा

Ashok Choudhary। बिहारमध्ये नवीन एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर, मंत्र्यांनी आपापल्या विभागांचा कार्यभार स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. अनेक मंत्री आपापल्या विभागांमध्ये पोहोचले आणि त्यांनी पदभार स्वीकारला. नवीन सरकारमध्ये सर्वात चर्चेचा विषय गृह विभाग आहे. नितीश कुमार यांनी गृह विभागाची जबाबदारी भाजपचे सम्राट चौधरी यांना दिली आहे. विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करत असताना, सरकारमधील मंत्री याला एक […] The post “नितीश कुमारांनी सम्राट चौधरींना गृहखाते दिले तर…” ; मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या नेत्याचा मोठा दावा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 12:03 pm

दिल्लीचा नकाशा बदलणार! आता ११ ऐवजी १३ जिल्ह्यांची होणार नोंद ; जनतेला काय फायदा होणार? वाचा

Delhi Districts। दिल्लीतील प्रशासकीय व्यवस्था अधिक सुलभ, गतिमान आणि जनतेसाठी अधिक अनुकूल करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात पुनर्रचना करत आहे. या बदलाचा एक भाग म्हणून, दिल्लीतील विद्यमान ११ महसूल जिल्ह्यांचा विस्तार १३ पर्यंत केला जाईल. याव्यतिरिक्त, उपविभागांची (SDM कार्यालये) संख्या देखील ३३ वरून ३९ पर्यंत वाढवली जाणार आहे. सरकारकडून नवीन रचनेमुळे जनतेला जलद सेवा मिळेल आणि […] The post दिल्लीचा नकाशा बदलणार! आता ११ ऐवजी १३ जिल्ह्यांची होणार नोंद ; जनतेला काय फायदा होणार? वाचा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 11:41 am

लग्नाच्या १० महिन्यातचं मृत्यूला कवटाळलं; पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीने जीवन का संपवलं? धक्कादायक माहिती समोर

Anant garje : भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॅाक्टर गौरी पालवे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. वरळीतील राहत्या घरी गौरी यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. काल सायंकाळी सात वाजता त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून त्यांनी […] The post लग्नाच्या १० महिन्यातचं मृत्यूला कवटाळलं; पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीने जीवन का संपवलं? धक्कादायक माहिती समोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 11:35 am

anupam kher: अनुपम खेर यांनी साई पल्लवीसोबत शेअर केले खास क्षण; ‘रामायण’सह आगामी प्रकल्पांसाठी दिल्या शुभेच्छा

anupam kher: दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी साऊथ अभिनेत्री साई पल्लवी यांच्यासोबतचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिच्या आगामी चित्रपटांसाठी शुभेच्छा दिल्या. हा खास क्षण गोव्यात सुरू असलेल्या ५६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) दरम्यानचा आहे. गोव्यातील विशेष भेट गोव्यात होणाऱ्या ५६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (IFFI) अनुपम खेर उपस्थित होते. याच ठिकाणी […] The post anupam kher: अनुपम खेर यांनी साई पल्लवीसोबत शेअर केले खास क्षण; ‘रामायण’सह आगामी प्रकल्पांसाठी दिल्या शुभेच्छा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 11:32 am

नवीन लेबर कोडमुळे गिग वर्कर ते खासगी कर्मचाऱ्यांपर्यंत कसे बदलणार आयुष्य ? ; वाचा सविस्तर

Labour Law Reforms।भारत सरकारने २१ नोव्हेंबर रोजी कामगारांसाठी एक नवीन कामगार संहिता लागू केली आहे. नवीन कामगार संहितेत २९ वेगवेगळ्या कामगार कायद्यांचे चार भागात एकत्रीकरण करण्यात आले आहे. या निर्णयामागील केंद्र सरकारचा उद्देश देशातील कामगार चौकटीला बळकटी देणे आणि आधुनिकीकरण करणे आहे. यामुळे कामगारांना अधिक संरक्षण आणि फायदे मिळतील. नवीन कामगार कायद्यांमध्ये गिग कामगार, कंत्राटी […] The post नवीन लेबर कोडमुळे गिग वर्कर ते खासगी कर्मचाऱ्यांपर्यंत कसे बदलणार आयुष्य ? ; वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 11:30 am

रोहा नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत

नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी ४९ जण रिंगणातसुभाष म्हात्रे रोहा : रोहा नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या उबाठाच्या उमेदवार नेहा ओंकार गुरव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वनश्री समीर शेडगे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या शिल्पा धोतरे यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २० जणांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून, आता नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी सर्वपक्षीय ४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहून आपले नशीब आजमावत आहेत.प्रभाग एक (अ)मध्ये निता हजारे (राष्ट्रवादी), पुजा ऐनकर (शिवसेना), मीना जाधव (काँग्रेस) अशी तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग एक (ब)मध्ये प्रामुख्याने शिवसेना उबाठाचे मनोज लांजेकर, राष्ट्रवादीचे प्रशांत कडू यांच्यात लढत असून, काँग्रेस पक्षाचे विकास साळवी, शिवसेनेचे महेश बोथरे व अपक्ष उमेदवार रज्जाक म्हैसकर हेही रिंगणात आहेत. प्रभाग दोन (अ)मध्ये राष्ट्रवादीच्या फरहा यासिन पानसरे विरुद्ध अपक्ष उमेदवार असमा रफिक नाडकर अशी दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग दोन (ब)मध्ये राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडून आले आहेत.प्रभाग तीन (अ)मध्ये राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका अफरीन कादीर रोगे, शिवसेनेच्या आयेशा वसीम सावरटकर, तर अपक्ष उमेदवार फातिमा जुबेर चोगले यांच्यात चुरशीची तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग तीन (ब)मध्ये राष्ट्रवादीचे अरबाज मणेर विरुद्ध शिवसेना शहर प्रमुख मंगेश रावकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.प्रभाग चार (अ) मध्ये राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका स्नेह अंब्रे विरुद्ध शिवसेनेच्या नूतन शेडगे, काँग्रेसच्या राखी शेडगे, अपक्ष उमेदवार नाजिया मिरहसन रोहेकर यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. प्रभाग चार (ब)मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार अहमद दर्जी विरुद्ध शिवसेनेचे अजीज महाडकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग पाच (अ)मध्ये राष्ट्रवादीच्या अल्मास अलीम मुमेरे, शिवसेनेच्या शाहीन कागदी, काँग्रेसच्या यास्मिन पेडेकर व अपक्ष उमेदवार नीता गुंदेशा यांच्यात पंचरंगी लढत होणार आहे. प्रभाग पाच(ब)मध्ये राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र गुजर विरुद्ध शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष लालता कुशवाह यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग सहा (अ) मध्ये राष्ट्रवादीच्या गौरी बारटके, भाजपच्या पी. व्ही. ज्योती सनलकुमार व शिवसेच्या बेबी देशमुख अशी तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग सहा (ब) मध्ये शिवसेनेचे उबाठा रोहा शहर प्रमुख राजेश काफरे आणि महेंद्र दिवेकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग सातमध्ये (अ)मध्ये राष्ट्रवादीच्या डॉ. प्रियंका धनावडे विरुद्ध शिवसेनेच्या अनिता कोळी, प्रभाग सात (ब)मध्ये राष्ट्रवादीचे रविंद्र चाळके विरुद्ध शिवसेनेच्या धनश्री जगताप (भूतकर) यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग आठ (अ)मध्ये राष्ट्रवादीच्या संजना शिंदे विरुद्ध शिवसेनेच्या श्रद्धा पडवळ आणि प्रभाग आठ (ब)मध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक महेश कोलटकर विरुद्ध शिवसेनेचे शहर प्रमुख मंगेश रावकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग नऊ (अ)मध्ये राष्ट्रवादीच्या अश्विनी पवार विरुद्ध शिवसेनेच्या सुप्रिया जाधव, प्रभाग नऊ (ब)मध्ये देखील राष्ट्रवादीचे समीर सकपाळ विरुद्ध भाजपाचे रोशन चाफेकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग दहा (अ)मध्ये राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्ष पूर्वा मोहिते विरुद्ध शिवसेना उबाठाच्या नेहा गुरव यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग दहा (ब)मध्ये भाजपाचे शहर अध्यक्ष सुमित रिसबूड, राष्ट्रवादीचे अजित मोरे, काँग्रेसचे विनोद सावंत अशी तिरंगी लढत होणार आहे.नगराध्यक्ष आरक्षण : ओबीसी महिलानगराध्यक्ष पद निवडणूक प्रमुख उमेदवार : वनश्री समीर शेडगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट विरुद्ध शिल्पा अशोक धोत्रे शिवसेना शिंदे गट (थेट लढत)नगरसेवक पदाचे एकूण उमेदवार : ४९एकूण प्रभाग / नगरसेवक : १० / २०एकूण मतदार : १७,६६९

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 11:30 am

‘युनेस्को’च्या वर्ल्ड बुक कॅपिटल या दर्जासाठी पुण्याची दावेदारी

पुणे : ‘युनेस्को’च्या ‘जागतिक पुस्तक राजधानी’ (वर्ल्ड बुक कॅपिटल) या दर्जासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या माध्यमातून पुण्याचा अर्ज पाठवण्यात आला आहे. २०२७ साठीचा सन्मान पुण्याला मिळण्याची आशा आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (एनबीटी) आयोजित पुणे पुस्तक महोत्सव यंदा १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत वासापूजन करून महोत्सवाच्या मांडव उभारणीला सुरुवात करण्यात आली. ‘एनबीटी’चे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह प्रवीण दबडघाव, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यवाह आनंद काटीकर, लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे, बागेश्री मंठाळकर, या वेळी उपस्थित होते.पाटील म्हणाले, ‘पुणे पुस्तक महोत्सवाचे आता तिसरे वर्ष आहे. गेल्या दोन वर्षांत पुणेकर या महोत्सवाशी जोडले गेले आहेत. ‘युनेस्को’च्या २०२७च्या जागतिक पुस्तक राजधानी सन्मानासाठी पुण्याचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. जगातील अन्य देशांचेही अर्ज असतात. त्यामुळे कोणत्या स्थळाला पुस्तक राजधानीचा मान मिळणार, त्याची घोषणा फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. या घोषणेच्या अानुषंगाने यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवाची युनेस्कोच्या समितीकडून पाहणी होणार आहे. यंदाचा पुणे पुस्तक महोत्सव आणखी व्यापक होणार आहे.’डुडी म्हणाले, ‘काही वर्षांपूर्वी जयपूरला छोट्या स्तरावर सुरू झालेला साहित्य महोत्सव मोठा होत गेला. त्यातून तेथील पर्यटन, संस्कृतीसह अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी ‘युनेस्को’च्या जागतिक पुस्तक राजधानी या सन्मानासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या माध्यमातून पुण्याचा अर्ज पाठवण्यात आला आहे. ४५० किलोमीटरची ही स्पर्धा चार दिवसांत होणार आहे. या स्पर्धेला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा म्हणून मान्यता मिळाली आहे. या स्पर्धेमुळे पुणे शहराला ‘ग्लोबल सिटी’ म्हणून ओळख मिळणार आहे.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 11:10 am

अभिनेत्री श्रद्धा कपूर शूटिंगदरम्यान जखमी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूर तिच्या आगामी ईठा चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाली आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला. तथापि, अभिनेत्रीच्या टीमने अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. असे वृत्त आहे की श्रद्धा कपूरला सेटवर गंभीर दुखापत झाली होती यामुळे निर्मात्यांना शूटिंग थांबवावे लागले.श्रद्धा कपूर ईठा चित्रपटाच्या एका लावणीचे शूट करत होती. यासाठी तिने पारंपरिक नऊवारी साडी, जड दागिने आणि कंबरेचा पट्टा घातला होता. या शूट दरम्यानच तिचा अपघात झाला. या चित्रपटासाठी श्रद्धाने तिचं १५ किलो वजन वाढवले आहे. भारी वजनामुळे नऊवारी साडी आणि लावणी करता करता श्रद्धा कपूरचा तोल गेला आणि ती जोरात पडली. तिच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली. शिवाय, तिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचेही वृत्त आहे. 'ईठा' चित्रपटाचे चित्रीकरण मड आयलंडमध्ये सुरू आहे. दुखापतीनंतर, युनिटने ताबडतोब शूटिंग थांबवले. श्रद्धा कपूर बरी होईपर्यंत निर्मात्यांनी चित्रीकरण थांबवले आहे. युनिट आता तिच्या पूर्ण बरे होण्याची वाट पाहणार आहे.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 11:10 am

भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना मिळणार ५ लाखांची भरपाई

गंभीर जखमींना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत, सरकारचा मोठा निर्णयकर्नाटक : भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना ५ लाखांची भरपाई मिळणार असल्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली आहे. यामुळे कर्नाटकातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.देशात भटक्या कुत्र्यांचे नागरिकांवर वाढते हल्ले लक्षात घेता कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना ५ लाखांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. जखमींनाही आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडिताला एकूण ५००० रुपये मिळणार आहेत. यातील ३५०० हजार रुपये थेट पीडित व्यक्तीला मिळणार तर १५०० रुपये आरोग्य सुरक्षा ट्रस्टला दिले जाणार आहेत.वरिष्ठ काँग्रेस नेते, माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी तामिळनाडूमध्ये कुत्रा चावणे आणि रेबीजने मृत्यू होणाऱ्या घटनेवर चिंता व्यक्त केली होती. तामिळनाडूमध्ये भटक्या कुत्र्यांनी आतापर्यंत ५.२५ लाख लोकांवर हल्ले केले आहेत. यात २८ लोकांचा मृत्यू झाल्याचा संदर्भ चिदंबरम यांनी दिला होतासुप्रीम कोर्टाने याबाबत जे स्पष्ट केले ते सांगताना चिदंबरम यांनी म्हटलंय की, लसीकरण केलेल्या भटक्या कुत्र्यांची पुन्हा सुटका करण्यात येणार आहे. लसीकरणाचा अर्थ कुत्र्यांना मारणे, असा होत नाही. खरंतर श्वानप्रेमींनी कोर्टाचा आदेश लागू करण्यासाठी मदत करायला हवी. कोर्टाचा हा निर्णय विशेष म्हणजे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्वाचा आहे'.तत्पूर्वी, सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी सर्व राज्यातील शाळा, कॉलेज, रुग्णालय, खेळाचे मैदान, बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनाच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने स्पष्ट म्हटलं होतं की, पकडलेल्या कुत्र्यांना नसबंदी आणि लसीकरण करून पुन्हा त्याच भागात सोडले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 11:10 am

शिवसेना व रिपब्लिकन सेनेची युती

रिपब्लिकन सेनेचा ११ वा वर्धापन दिनठाणे : ''२५ वर्षांपूर्वी ठाण्यात आनंद दिघे यांनी भीमशक्ती आणि शिवशक्तीची मुहूर्तमेढ रोवली होती. आमची युती ही खुर्चीसाठी नव्हे, तर सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आहे. आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे रक्त आहेत आणि आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे भक्त आहोत'', असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यात केले. ठाण्यातील तलावपाळी येथील शिवाजी मैदानात रिपब्लिकन सेनेच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रिब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, युवा नेते ॲड. अमन आंबेडकर, माजी नगरसेवक रामभाऊ तायडे, आबासाहेब चासकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, संजीव बावधणकर, बाळासाहेब ओव्हाळ, सुनील वाघेकर आदी मान्यवर उपस्थित होते.शिंदे म्हणाले की, “या ठिकाणी शिवाजी महाराजांचे मैदान आणि शेजारी आनंद दिघे यांचे स्मारक आहे. हे शक्तीस्थान आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकत्र आल्या हा योगायोग नसून इतिहास आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जगातलं सर्वोत्तम संविधान दिलं.''

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 11:10 am

बोईसरच्या श्रीकृष्ण मंदिर तलावात काळ्या मानेची टिबुकली

दुर्मीळ परदेशी पाहुण्याच्या आगमनाने पक्षीप्रेमी आनंदित प्रशांत सिनकर ठाणे : हिवाळ्याच्या आगमनासोबतच बोईसरला एक दुर्मीळ परदेशी पाहुणा लाभला आहे. श्रीकृष्ण मंदिर तलावात सध्या आकर्षक व दुर्मिळ काळ्या मानेची टिबुकली (ब्लॅक नेक ग्रेब) दिसत असल्याने पक्षीनिरीक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ही टिबुकली साधारणपणे युरोप, आशिया, पूर्व व दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि दक्षिण/प. अमेरिका या भागांत वास्तव्य करते. लांब पल्ल्याच्या स्थलांतरासाठी प्रसिद्ध असलेला हा जलपक्षी हिवाळ्यात उत्तर भारत, पाकिस्तान, मध्य अमेरिका आणि आफ्रिका येथे दाखल होतो. युरोप, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानमध्ये जून ते जुलै या कालावधीत या पक्ष्याची वीण होते.पाण्यावर तरंगणारे, गवताचे कपासारखे घरटे हा पक्षी कुशलतेने बांधतो. त्यात साधारण ३ ते ४ अंडी घातली जातात व सुमारे २१ दिवसांत पिल्ले बाहेर पडतात. जन्मानंतर अवघ्या दहा दिवसांत पिल्ले तलावभर सहज पोहू लागतात. नर आणि मादी या दोघेही पिल्लांची जबाबदारी वाटून घेतात हा या प्रजातीचा विशेष गुणधर्म असल्याची माहिती पक्षी अभ्यासक विरेंद्र घरत यांनी दिली. काळ्या मानेची टिबुकली हा आकाराने टिबुकली (लिटील ग्रेब)पेक्षा थोडा मोठा असतो. त्याची लांबी २५–२८ सें.मी., वजन २५०–४५० ग्रॅम, पंखांची लांबी ५०–६० सें.मी. तर उड्डाण क्षमता तब्बल ३ हजार किमी पर्यंतचे अंतर कापू शकतो. याचा रंग काळा–पांढरा, मान पूर्ण काळी, पोट पांढरे, पंखांवर ठिपक्यांची छटा आणि सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे भडक लाल डोळे. चोच किंचित वर वळलेली असते. वीण काळात डोके व मानेचा रंग अधिक गडद काळसर–तपकिरी होत असल्याने याचे सौंदर्य आणखी खुलते.गवताने व्यापलेल्या शांत तलावात राहणे हा या पक्ष्याचा अत्यंत आवडता स्वभाव. पाण्यात सतत डुबक्या मारत, लहान मासे, शंख–शिंपले, बेडूक, किडे–किटक यावर तो भक्षण करतो. तलावाच्या पृष्ठभागावर त्याचे वेगवान पोहणे आणि अचानक मारलेल्या सलग डुबक्यांची मालिका पाहणे ही निसर्गप्रेमींसाठी एक वेगळीच मेजवानी ठरते. बोइसरमध्ये सध्या दिवसभर कॅमेरे व दुर्बिणी घेऊन फोटोग्राफर्स तलावाच्या काठावर तळ ठोकून बसलेले दिसत आहेत.''विशेष म्हणजे, या पक्ष्याचे महाराष्ट्रात दर्शन यापूर्वी २०१६–१७ मध्ये मुंबईतील भांडुप मिठागरात झाले होते. जवळपास आठ वर्षांनंतर तो पुन्हा राज्यात दिसल्याने यंदाच्या हिवाळ्यातील पक्षीउद्येशीय नोंदींमध्ये या नोंदीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.'' असे पक्षी अभ्यासक, विरेंद्र घरत सांगतात.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 11:10 am

आयआयटी मुंबईत पहिल्या वर्षासाठी मानसिक आरोग्य अभ्यासक्रम अनिवार्य

मानसिक आरोग्यावर आधारीत अभ्यासक्रम लावणारा मुंबई आयआयटी पहिलाचमुंबई : आयआयटी मुंबईने आपल्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य आणि कल्याण हा अनिवार्य अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम पास–नो पास (PNP) प्रकारात असेल. म्हणजेच यासाठी कोणतीही परीक्षा किंवा गुणांकन नसून विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्रात ठरावीक संख्या मानसिक आरोग्य कार्यशाळांना उपस्थित राहणे बंधनकारक असेल.आयआयटी मुंबई असा अभ्यासक्रम राबवणारे कदाचित पहिले आयआयटी ठरेल, असे संस्थेचे संचालक प्रा. शिरीष केदार यांनी सांगितले. “मानसिक आरोग्याशी संबंधित विविध विषयांवरील कार्यशाळांच्या माध्यमातून हा कोर्स घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांना सोयीने सहभागी होता यावे, म्हणून शैक्षणिक वर्षभर विविध वेळा या कार्यशाळा आयोजित केल्या जातील. प्रत्येक सत्रात किमान चार कार्यशाळांना उपस्थिती अनिवार्य असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.प्रा. केदार हे उच्च शिक्षण विभागाच्या सहकार्याने आयआयटी मुंबईत २२-२३ नोव्हेंबर रोजी आयोजित ‘नॅशनल वेलबिंग कॉन्क्लेव्ह २०२५’ची माहिती देत होते. या दोनaदिवसीय परिषदेत देशातील ७९ उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी विद्यार्थी कल्याणासाठी होणाऱ्या उपक्रमांवर कार्यशाळा, परिसंवाद आणि पॅनल चर्चेद्वारे विचारमंथन करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आयआयटी मुंबईने १९९८ च्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ‘फ्लॉरिशिंग हब’ नावाची विशेष सुविधा विकसित केली आहे. येथे प्रशिक्षित तज्ज्ञ मानसिक आरोग्य व जीवनशैलीविषयक उपक्रम राबवत आहेत.हा नवीन मानसिक आरोग्य अभ्यासक्रम ऑगस्ट २०२५ पासून नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आला आहे. विद्यार्थी कल्याण केंद्राचे उपाध्यक्ष आणि फ्लॉरिशिंग हबचे प्रभारी प्रा. दीपक मरला यांनी सांगितले, “पहिल्या सत्रात जीवन कौशल्ये, निरोगी सवयी, व्यसनविरोधी जागरूकता, तणाव व्यवस्थापन अशा विषयांवरील कार्यशाळा घेतल्या जातील. दुसऱ्या सत्रात वैयक्तिक प्रगती आणि जीवन नियोजनावर भर असेल.”विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा ताण शैक्षणिक अभ्यासापेक्षा आयआयटी नंतरच्या करिअरविषयी असतो — इंटर्नशिप, प्लेसमेंट, उच्च शिक्षणाच्या संधी यांचा दबाव त्यांना अधिक जाणवतो.” फ्लॉरिशिंग हबअंतर्गत शिक्षक, विद्यार्थी मार्गदर्शक यांना प्रशिक्षण देणे तसेच भविष्यात माजी विद्यार्थ्यांमार्फतही मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) युगाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणातील मूल्यांकनपद्धतीत बदल करण्याचे प्रयत्न आयआयटी मुंबईकडून सुरू आहेत. पारंपरिक पद्धतीऐवजी अधिक क्रियाशील आणि सहभागी शिक्षणपद्धतीवर भर देण्यासाठी १० वर्गखोल्यांचे नव्या तंत्रसुविधांसह आधुनिकीकरण करण्यात आले आहे. तसेच शिक्षकांसाठी अध्यापन पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 11:10 am

बेस्ट भरती करणार ५०० वाहक

मुंबई : दिवसेंदिवस कमी होत चाललेली कर्मचाऱ्यांची संख्या व सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर येणारा अतिरिक्त ताण पाहता बेस्ट उपक्रम ५०० नवीन बस वाहकांची भरती करणार आहे . ही भरती फक्त वाचकांसाठी असून यामुळे वाहकांवर होणार येणारा ताण कमी होणार आहे.गेली अनेक वर्ष बेस्टमध्ये भरती झालेली नाही तसेच बेस्टचा स्वमालकीचा बस ताफा ही आता ३०० च्या आसपास आला आहे. तसेच २ हजार ४०० च्या वर बस कंत्राटदारांमार्फत चालवली जाते. कंत्राटदारामार्फत चालवल्या जाणाऱ्या बस मार्गांवर कंत्राटदाराचा बस चालक असतो मात्र त्याला वाहक बेस्टचा द्यावा लागतो त्यामुळे वाढत चाललेला कंत्राटदाराचा बस ताफा पाहता बेस्टकडे बस चालकांची संख्या अपुरी पडू लागली आहे. त्यात काही ठिकाणी बस वाहकांच्या कमतरतेमुळे विनावाहक बस गाड्या चालवाव्या लागतात त्यामुळे फुकट्यांची संख्या ही वाढली आहे. हे पाहता बेस्ट आता पाचशे नवीन कायमस्वरूपी बसवाहकांची भरती करणार असल्याची माहिती नारायण राणेप्रणीत बेस्ट समर्थ कामगार सेनेचे सरचिटणीस विलास पवार यांनी दिली.काल बुधवारी त्यांनी आपल्या शिष्टमंडळासह बेस्ट व्यवस्थापक सोनिया सेठी यांची भेट घेतली त्यावेळी बेस्ट लवकरच पाचशे बसवाहकांची भरती करणार असल्याचे त्यांना सांगितले त्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ती घोषणा करण्यात येणार आहे . काही ठिकाणी अतिरिक्त बसचालकांची नेमणूक बस वाहक म्हणून करण्यात येत आहे मात्र कामगार संघटनेचा विरोध लक्षात घेता ही भरती झाल्यानंतर बसचालकांची कामेही थांबवण्यात येतील व त्यांना इतर ठिकाणी घेण्यात येईल त्यामुळे त्यांच्या बढती वरही कोणताही परिणाम होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या बसचालकांची संख्या ६ हजार ८०० सध्या बसवाहकांची संख्या ६ हजार ७०० सध्या बसगाड्यांची संख्या २३० [स्वमालकीच्या] सध्या बसगाड्यांची संख्या २ हजार ४०० [कंत्राटदाराच्या] येणाऱ्या कंत्राटदाराच्या बस ३ हजार ५००मुंबईतील सीएसएमटी अॅक्वा लाईन मेट्रो स्थानकात इंडिया पोस्टच्या सर्विस डेस्क आणि आर्ट इन्स्टॉलेशनचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंग यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. मेट्रो स्थानकातील एंट्री-एग्झिट गेट क्रमांक A२ आणि A३ येथे ही सुविधा उपलब्ध झाली आहे. या डेस्कवरून नागरिकांना इंडिया पोस्टच्या विविध सेवांची माहिती सहज मिळणार आहे. खास आकर्षण म्हणजे येथे उपलब्ध करून देण्यात आलेला ‘माय स्टॅम्प’ काउंटर. या काउंटरवर जनतेला आपल्या स्वतःच्या छायाचित्रासह खास वैयक्तिक टपाल तिकिटे तत्काळ मिळू शकतात. त्यामुळे स्वतःसाठी किंवा भेटवस्तू म्हणून हा एक अनोखा अनुभव ठरणार आहे. (छाया: अरुण पाटील)

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 11:10 am

पुन्हा हिरमोड? जिल्हा परिषदा निवडणुका लांबणीवर पडणार? अजित पवारांचे भरसभेतून संकेत म्हणाले…

Ajit Pawar : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिला टप्प्यातील नगरपरिषदा आणि नगरपंयतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी महाविकास आणि महायुतीमधील घटक पक्षांनी कंबर कसली असून, प्रचाराला सुरूवात केली आहे. या निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. या […] The post पुन्हा हिरमोड? जिल्हा परिषदा निवडणुका लांबणीवर पडणार? अजित पवारांचे भरसभेतून संकेत म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 10:43 am

‘हिंदूंशिवाय जग…’ ; मोहन भागवत यांचे मोठे विधान

Mohan Bhagwat। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या मणिपूर भेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी,” हिंदू समाजाशिवाय जगाची रचना अपूर्ण राहील, कारण हिंदू संस्कृतीमध्ये मानवतेला एकत्र आणणारी आणि टिकवून ठेवणारी जाणीव आहे” असे म्हटले आहे. मोहन भागवत यांच्या मते, “भारत हे केवळ नकाशावरील एक नाव नाही, तर शतकानुशतके कष्ट सहन […] The post ‘हिंदूंशिवाय जग…’ ; मोहन भागवत यांचे मोठे विधान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 10:30 am

शीळफाटा येथे उड्डाणपुलाच्या कामानिमित्त निळजे-दातिवलीदरम्यान ब्लॉक

मुंबई : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन प्रकल्पासाठी शीळ फाटा येथील उड्डाणपूल हटविण्याच्या कामासाठी, निळजे-दातिवलीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक २५ आणि ३० नोव्हेंबर, २ आणि ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १.१० ते पहाटे ४.१० दरम्यान असणार आहे.निळजे-दातिवली दरम्यान २५ आणि ३० नोव्हेंबर, २ आणि ७ डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे मंगळूरू – सीएसएमटी अतिजलद एक्स्प्रेस कळंबोली येथे ५० मिनिटे थांबविण्यात येईल. ३० नोव्हेंबर आणि ७ डिसेंबर रोजी दौंड – ग्वाल्हेर अतिजलद एक्स्प्रेस कर्जत – कल्याण – वसई रोड मार्गे वळविण्यात येतील आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी कल्याण येथे थांबा देण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.विभागातील लोणावळा – बीव्हीटी यार्ड, तसेच कल्याण – लोणावळा विभागातील अप यार्डमध्ये प्री नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.ब्लॉक कालावधीत लोणावळा – बीव्हीटी यार्डमधील यार्ड पुनर्रचना व इतर पायाभूत कामे करण्यात येणार आहेत. २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.२५ ते सायंकाळी ६.२५ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे जोधपूर – हडपसर एक्स्प्रेस कर्जत येथे ४५ मिनिटे थांबवण्यात येणार आहे. सीएसएमटी – चेन्नई एक्स्प्रेस लोणावळा येथे एक तास, एलटीटी – मदुराई एक्स्प्रेस भिवपुरी रोड येथे १० मिनिटे, सीएसएमटी-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, सीएसएमटी – हैदराबाद एक्स्प्रेस लोणावळा येथे १० ते १५ मिनिटे थांबवण्यात येतील. तर, २७ नोव्हेंबर रोजी एलटीटी – काकीनाडा एक्स्प्रेस भिवपुरी रोड येथे १० मिनिटे थांबवण्यात येईल. २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी सीएसएमटी – होस्पेट एक्स्प्रेस सीएसएमटीवरून उशिरा सुटेल.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 10:10 am

अंधेरी एमआयडीसीमध्ये रासायनिक गळती

एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीरमुंबई : अंधेरी (पूर्व) येथील एमआयडीसी परिसरातील भंगारवाडी येथे शनिवारी दुपारी एक मजली गाळ्यामध्ये अचानक वायूगळती सुरू झाली आणि त्यात तिघांना श्वास गुदमरल्यामुळे त्रास होऊ लागला. तिघांना रुग्णालयात दाखल केले असता एकाचा मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी ५ वाजता ही घटना घडली. रासायनिक गळती सुरू झाल्यामुळे अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. रासायनिक गळतीचा शोध सुरु असून कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाबरोबरच एनडीआरएफ दलालाही सतर्क ठेवण्यात आले आहे. या दुर्घटनेत तीन जणांना वायुगळतीमुळे श्वासोच्छवास घेण्यास त्रास झाला. त्यांना तातडीने होली स्पिरिट रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयातून मिळालेली माहितीनुसार अहमद हुसेन (२०) याला रुग्णालयात आणल्यावर मृत घोषित करण्यात आले, तर नौशाद अन्सारी (२८) आणि सबा शेख (१७) या दोघांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी अग्निशमन दल पुढील तपास करीत असून शोधकार्य सुरू आहे. रासायनिक गळतीचा स्रोत आणि प्रकार शोधण्याचे काम सुरू असल्याचे अग्निशमन दलाने सांगितले.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 10:10 am

एकदिवसीय मालिकेला ३० नोव्हेंबरपासून सुरुवात, मात्र शुभमन आणि श्रेयस संघातून बाहेर! केएल राहुल होणार संघाचा कॅप्टन ?

मुंबई: येत्या ३० नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. मात्र एकदिवसीय मालिकेच्या आधी सुरू असणाऱ्या कसोटी सामन्यातच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याला कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान मानेला दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले असल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात तो दिसला नाही. मात्र आगामी एकदिवसीय मालिकेमध्येही शुभमान दिसणार नसल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यर हा देखील दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने निवड समितीसमोर पेच निर्माण झाला होता.कोण करणार भारतीय संघाचे नेतृत्व?शुभमन गिलच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांच्या गैरहजेरीत राहुलला 'कॅप्टन' म्हणून जबाबदारी दिली जाऊ शकते. राहुलने यापूर्वीही भारतीय संघाचे नेतृत्व केले असून, त्याची एकदिवसीय सामन्यातील आकडेवारी देखील प्रभावी आहे. त्यामुळे केएल राहुल हे महत्त्वाचे नाव चर्चत आहे.https://prahaar.in/2025/11/23/horrific-accident-on-pune-mumbai-expressway-truck-driver-loses-control-and-overturns-on-four-wheeler-while-crossing-barrier/केएल राहुलने आतापर्यंत ८८ सामन्यांत ४८.३१ च्या सरासरीने तीन हजार ब्याण्णव धावा केल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या कठीण दौऱ्यात राहुलचा अनुभव संघासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे या मालिकेद्वारे पुनरागमन होत आहे. दक्षिण अफ्रिकाविरुद्धची एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबरला रांची येथे पहिल्या सामन्याने सुरू होईल. त्यानंतर ३ डिसेंबरला रायपूर आणि ६ डिसेंबरला विझाग येथे सामने खेळवले जातील.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 10:10 am

वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे १९-२० डिसेंबरला मुंबईत आयोजन

जगभरातील अग्रणी उद्योगपती, व्यावसायिक आणि विचारवंत यांना एकत्र आणणारे व्यासपीठमुंबई : वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूएचईएफ) २०२५ चे आयोजन मुंबईतील ग्रँड हयात, महाराष्ट्र येथे १९-२० डिसेंबर रोजी केले जाणार आहे. यंदाची थीम नवोपक्रम, स्वावलंबन आणि समृद्धी अशी आहे. या फोरममध्ये भारतासह जगभरातील अग्रणी उद्योगपती, धोरणनिर्माते, उद्योजक आणि जागतिक गुंतवणूकदार सहभागी होणार असून सर्वसमावेशक विकास, उद्योजकतेचा विस्तार आणि हिंदू सांस्कृतिक मूल्यांवर आधारित संपत्ती निर्मिती या विषयांवर विचारविनिमय केला जाणार आहे.महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि ओडिशाचे मुख्यमंत्री तसेच भारतातील अनेक अग्रगण्य उद्योगपती यांना देखील निमंत्रणे देण्यात आली आहेत.डब्ल्यूएचईएफचे प्रवर्तक स्वामी विज्ञानानंद म्हणाले, “आपली अर्थव्यवस्था हीच आपली ताकद आहे. डब्ल्यूएचईएफच्या माध्यमातून जागतिक हिंदू समाजातील प्रतिभा, ज्ञान आणि उद्योजकतेची एकत्रित शक्ती वापरून अधिकाधिक संपत्ती निर्माण करणे आणि ती सर्वांसोबत वाटणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ”दोन दिवसीय फोरमचा पहिला दिवस (१९ डिसेंबर) मोठ्या कॉर्पोरेट्ससाठी विशेष सत्राने सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी (२० डिसेंबर) एमएसएमई आणि उद्योजकीय सत्र आयोजित केले जाईल. या सत्रात विविध क्षेत्रांतील ४०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.प्रत्येक फोरम डब्ल्यूएचईएफच्या मूलभूत तत्त्वाची पुन्हा पुष्टी करतो “धर्मस्य मूलं अर्थः” आर्थिक सामर्थ्य हीच खरी शक्ती, आणि नैतिक, समाजकेंद्रित आर्थिक विकासातूनच शाश्वत समृद्धी मिळते वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम हे जगभरातील यशस्वी उद्योजक, गुंतवणूकदार, उद्योगपती, व्यावसायिक आणि विचारवंत यांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. नवोपक्रम, सहकार्य आणि धर्माधिष्ठित मूल्यांच्या आधारे उद्योजकता प्रोत्साहन, संपत्ती निर्मिती आणि समाजसमृद्धी हे डब्ल्यूएचईएफचे ध्येय आहे.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 10:10 am

भाजपवर दबाव टाकण्यासाठी शिवसेनेची राजस्थानमध्ये नवी खेळी

जयपूर : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. यानंतर राज्यात भाजपने अनेक ठिकाणी स्वतःची ताकद वाढवण्यासाठी आक्रमक हालचाली सुरू केल्या. भाजपच्या हालचाली बघून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली तसच दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर स्वतःची बाजू मांडली. एवढी धडपड करुनही हाती जास्त काही लागत नसल्याचे बघून शिवसेनेने दबावासाठी नवी खेळी केली आहे.शिवसेनेच्या राजस्थानमधील नेत्यांनी तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जास्त जागांची मागणी केली आहे. आमची मागणी पूर्ण होणार नसल्यास राजस्थानमधील स्थानिकच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा विचार करू; असा इशारा शिवसेनेने दिला आहे.मागच्या वर्षी राजस्थानमध्ये तीन आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर शिवसेना राजस्थानमध्ये मर्यादीत प्रमाणात सक्रीय झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील स्थानिकच्या सर्व जागा लढवण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेच्या या इशाऱ्यावर भाजपने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 10:10 am

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात! ट्रक चालकाचा ताबा सुटला अन् बॅरियर ओलांडत थेट चारचाकीवर उलटला

मुंबई: पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने बॅरियर ओलांडत थेट मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गामध्ये प्रवेश केला. बॅरियर ओलांडल्यावर हा ट्रक समोरून येणाऱ्या चारचाकीवर उलटला. हा धडक इतकी जबरदस्त होती की चारचाकीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.या अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी चारचाकीमधील चालकाचा समावेश आहे. तर चारचाकीमधील अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवरील हा अपघात कामशेत येथे पुणे लेनवर पहाटे सुमार चार वाजता झाला.दरम्यान, अपघातानंतर एक्सप्रेसवेवरील वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर तब्बल दहा किलोमीटर लांबीची वाहनरांग लागली होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 9:30 am

“चिखलात कमळ असत पण राज्यात ते…”; शिवसेनेच्या प्रवक्ताच्या पोस्टने खळबळ म्हणाले “भगव्याची शक्ती यांसमोर…”

Akshay Maharaj Post : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजप यांच्यात अंतर्गत धुसफूस असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या आहेत. या चर्चा होण्यामागे अनेक कारणे असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये झालेले पक्ष प्रवेश. यामुळे शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय […] The post “चिखलात कमळ असत पण राज्यात ते…”; शिवसेनेच्या प्रवक्ताच्या पोस्टने खळबळ म्हणाले “भगव्याची शक्ती यांसमोर…” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 9:26 am

kriti sanon: दिल्लीच्या वाढत्या वायुप्रदूषणावर कृति सेनन हिने व्यक्त केली चिंता; काँग्रेस नेत्यानेही दिला पाठिंबा

kriti sanon: बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन हिने आपल्या आगामी ‘तेरे इश्क में’ या चित्रपटाच्या प्रचारावेळी दिल्लीतील वाढत्या वायुप्रदूषणाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. तिच्या या वक्तव्याचे काँग्रेस नेते अभिषेक दत्त यांनी कौतुक केले आहे. दिल्लीच्या हवामानाबद्दल कृतिची चिंता चित्रपटाच्या प्रसारासाठी दिल्लीला आलेल्या कृतिनं पत्रकार परिषदेत दिल्लीतील हवामानातील झालेल्या तीव्र बदलांकडे लक्ष वेधले. तिनं सांगितले की ती […] The post kriti sanon: दिल्लीच्या वाढत्या वायुप्रदूषणावर कृति सेनन हिने व्यक्त केली चिंता; काँग्रेस नेत्यानेही दिला पाठिंबा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 9:21 am

kriti sanon: दिल्लीतील प्रदूषित हवेमुळे कृति सेनन चिंतित; म्हणाली…उपाययोजना न केल्यास परिस्थिती गंभीर होईल, काँग्रेस नेत्याकडून अभिनंदन

kriti sanon: बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन हिने आपल्या आगामी ‘तेरे इश्क में’ या चित्रपटाच्या प्रचारावेळी दिल्लीतील वाढत्या वायुप्रदूषणाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. तिच्या या वक्तव्याचे काँग्रेस नेते अभिषेक दत्त यांनी कौतुक केले आहे. दिल्लीच्या हवामानाबद्दल कृतिची चिंता चित्रपटाच्या प्रसारासाठी दिल्लीला आलेल्या कृतिनं पत्रकार परिषदेत दिल्लीतील हवामानातील झालेल्या तीव्र बदलांकडे लक्ष वेधले. तिनं सांगितले की ती […] The post kriti sanon: दिल्लीतील प्रदूषित हवेमुळे कृति सेनन चिंतित; म्हणाली… उपाययोजना न केल्यास परिस्थिती गंभीर होईल, काँग्रेस नेत्याकडून अभिनंदन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 9:21 am

अमेरिकेच्या आडकाठीनंतरही जी-२० घोषणापत्र मंजूर

शिखर परिषदेने परंपरा मोडलीजोहान्सबर्ग : अमेरिकेने कार्यक्रमावर बहिष्कार टाकूनही जागतिक नेत्यांनी संयुक्त घोषणापत्राला मंजुरी दिल्याचे जाहीर करत, दक्षिण आफ्रिकेने शनिवारी आपल्या जी-२० शिखर परिषदेच्या योजना पुढे नेल्या. अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला व सांगितले की, महिन्यांच्या वाटाघाटीनंतर अंतिम दस्तऐवज तयार झाला असून तो पुन्हा चर्चेसाठी खुला केला जाणार नाही. त्यावर पुन्हा वाटाघाटी होऊ शकत नाहीत. हे घोषणापत्र स्वीकारण्यासाठी आम्ही वर्षभर प्रयत्न केले व गेल्या आठवड्यात तर खूपच वेगाने काम झाले, असे प्रवक्त्याने सांगितले.अमेरिकेने जोहान्सबर्ग परिषदेत सहभागी होण्यास आधीच नकार दिला होता. अमेरिकेचा हा बहिष्कार, दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीय बहुसंख्य सरकार श्वेत नागरिकांसोबत भेदभाव करत असल्याच्या दाव्यांवर आधारित होता. हे आरोप दक्षिण आफ्रिकेने फेटाळले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही ते नाकारण्यात आले आहेत. या बहिष्कारामुळे आफ्रिकन भूमीवर प्रथमच आयोजित झालेल्या जी-२० शिखर परिषदेच्या सुरुवातीवर सावट पसरले होते.सामान्यतः जी-२० चे घोषणापत्र बैठकीच्या शेवटी पारित केले जाते. या वेळी परंपरा मोडत शिखर परिषद सुरू होताच घोषणापत्र एकमताने स्वीकारण्यात आले. यजमान देशाचा विकसनशील राष्ट्रांना हवामान संबंधित आपत्तींशी जुळवून घेण्यास मदत करणे, स्वच्छ ऊर्जेचा विस्तार करणे आणि कर्जाचा खर्च कमी करणे यावरचा भर ट्रम्प यांनी नाकारला होता.अनेक जागतिक नेत्यांशी सुसंवाददक्षिण आफ्रिकेतील जी-२० शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या इटालियन समकक्ष जॉर्जिया मेलोनी संभाषणादरम्यान मनमोकळेपणाने हसताना दिसल्या. जोहान्सबर्गमध्ये जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबतच्या हलक्या-फुलक्या गप्पांमधून लक्ष वेधून घेतले. दोन्ही नेते एकमेकांना शुभेच्छा देताना एका सहज व मनमोकळ्या क्षणी दिसले. या शिखर परिषदेदरम्यान मोदी यांनी ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांना आपुलकीने मिठी मारतानाही दिसले.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 9:10 am

मुंबई महापालिकेतील आरक्षणाची मर्यादा ३४ टक्के…

८५ हरकती सादर, लवकरच निवडणूक होणारमुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा अनेक ठिकाणी ओलांडल्यामुळे वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. मुंबई महापालिकेत आरक्षणाची मर्यादा ३४ टक्के आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक होणारच असे चित्र आहे. आरक्षणावर हरकती व सूचना मागवण्यासाठी दिलेल्या कालावधीत ८५ तक्रारी मुंबई महापालिकेकडे सादर झाल्या आहेत.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित करताना राज्य सरकारने १५९ ठिकाणी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली. यामुळे निर्माण झालेला वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. मात्र मुंबई महापालिकेचा विचार करता या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आतच असून २२७ पैकी ३४.३६ टक्के प्रभाग आरक्षित आहेत.मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांपैकी इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी २७ टक्के प्रमाणे ६१ जागा आरक्षित आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातींसाठी १५ जागा व अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आरक्षित आहेत.काही ठिकाणी सर्व प्रभाग महिलांसाठी राखीवआरक्षण सोडतीत भाजप, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) या पक्षांतील ज्येष्ठ व अनुभवी माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत, तर काही विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रभाग आरक्षित झाले आहेत. दहिसर, बोरिवली, वरळी यासारख्या काही ठिकाणी सर्व प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत, तर मानखुर्द, शिवाजी नगरमध्ये सर्व प्रभाग आरक्षित झाले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी आहे.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 9:10 am

मुंबईतील धूर ओकणाऱ्या कारखान्यांना टाळे बसणार

वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांची नियुक्तीमुंबई : मुंबईतील वाढलेली प्रदूषणाची मात्रा कमी करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांबरोबर धूर ओकणाऱ्या कारखान्यांनाही टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. मुंबई शहरातील वाढते वायू प्रदूषण लक्षात घेऊन, महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. शहर व उपनगराच्या विविध भागात असलेल्या विविध उद्योगधंदे कारखाने यांच्याकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. विविध उपाययोजना राबवूनही वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सातत्याने २०० पेक्षा अधिक राहिल्यास त्या परिसरातील उद्योग ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन-४’ (ग्रॅप-४) अंतर्गत बंद करण्यात येतील, असा इशारा पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिला आहे.मुंबईतील उद्योगधंदे व कारखान्यांची संख्या २५ हजार ३३२ इतकी असून सर्वाधिक ४ हजार २८१ उद्योगधंदे व कारखाने गोरेगाव व परिसरात आहेत. अंधेरी पूर्वेलाही छोट्या मोठ्या कारखान्यांची संख्या ३ हजार ६४५ इतकी आहे. चेंबूर एम पश्चिम व गोवंडी एमपूर्व या विभागात कारखान्यांची संख्या कमी असली तरी, माहूल व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम, रिफायनरी अशा मोठ्या कारखान्यांची संख्या सर्वाधिक आहे. उद्योगधंदे व कारखान्यांमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. वायू प्रदूषण नियंत्रण उपायांच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेकडून विभाग स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.दंडात्मक व कारखाना बंद करण्याची तरतूदकारखान्यांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नियमावली प्रामुख्याने जल अधिनियम १९७४ आणि वायू अधिनियम १९८१ अंतर्गत येते. हवा आणि जल प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपकरणे उदा. सांडपाणी प्रक्रिया संयंत्र बसवणे आवश्यक आहे. पाणी आणि वायूच्या प्रदूषणासंबंधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेली मानके पाळणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, सांडपाण्यातील तेल आणि ग्रीसची पातळी १० मिग्रॅ पेक्षा कमी असावी. एकूण विरघळलेले घनपदार्थ २१०० मिग्रॅ पेक्षा जास्त नसावेत. नियमांचे पालन न केल्यास किंवा प्रदूषणकारी क्रिया केल्यास मंडळाकडून दंडात्मक अथवा कारखाना बंद करण्याची कारवाई केली जाऊ शकते.प्रदूषण मात्रेवर इतर उपाययोजना :१) कचरा जाळण्यावर देखरेख आणि बंदीची अंमलबजावणी.२) देवनार डम्पिंग ग्राउंड येथे कचऱ्याचे बायो मायनिंग.३) आठ ठिकाणी चार टन प्रतिदिन क्षमतेच्या घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्राची उभारणी.४) पाच अविरत वातावरणीय वायू गुणवत्ता देखरेख केंद्राची उभारणी.५) शहराची कृती योजना प्रभावी करण्यासाठी हायपर लोकल मॉनिटरिंग सुरू करणे६) तेल शुद्धीकरण कारखाने वीज प्रकल्प व अन्य प्रदूषण निर्माण करणाऱ्या कंपनीशी समन्वय साधण्याकरीता सल्लागाराची नियुक्ती.७) शाळा आणि महाविद्यालयांमध्ये इको क्लब तयार करणे.८) रस्त्यावरील धूळ साफ करण्याकरता स्वच्छता प्रशिक्षण.९) शहरातील हवेची गुणवत्ता ज्या दिवशी बिघडेल तेव्हा नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य सूचना जारी करणे.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 9:10 am

दिल्लीचा शौर्य-जालन्याची अरोही, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमागे कोण ?:पालकांनी सांगितले- शाळेत त्रास होता; मुलांनी समस्या सांगितल्या, पण शिक्षकांना समजल्या नाहीत

सॉरी मम्मी, मी तुझं मन खूप वेळा मोडलं आहे. आता मी शेवटचं एकदा तोडेन. शाळेतील शिक्षक असेच आहेत, मी काय बोलू? युक्ती मॅडम, पाल मॅडम, मनु कालरा, माझी शेवटची इच्छा आहे की त्यांच्यावर कारवाई व्हावी. मी जे केलं ते दुसऱ्या कोणत्याही मुलाने सहन करावं असं मला वाटत नाही. शौर्य पाटीलच्या दीड पानांच्या सुसाईड नोटचा हा भाग आहे. दिल्लीतील प्रसिद्ध सेंट कोलंबस स्कूलमध्ये दहावीत शिकणारा शौर्य १८ नोव्हेंबर रोजी दुपारी शाळा सोडून राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनवर गेला. दुपारी २:३० वाजता त्याने ट्रेनमधून उडी मारली. जवळच्या लोकांनी शौर्यला तातडीने रुग्णालयात नेले, पण तो वाचला नाही. त्याच्या सुसाईड नोटमध्ये त्याने त्याच्या शिक्षकांवर त्याचा छळ केल्याचा आरोप केला. बॉलिवूड स्टार शाहरुख खाननेही सेंट कोलंबस शाळेत शिक्षण घेतले होते आणि शौर्य त्याच्यासारखे बनण्याची आकांक्षा बाळगत होता. नोव्हेंबरमध्ये ४ मुलांनी आत्महत्या केल्याशौर्यने आरोप केलेल्या शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. पालक शाळेबाहेर निदर्शने करत आहेत. शौर्यप्रमाणेच, १ नोव्हेंबर रोजी जयपूर येथील चौथी इयत्तेत शिकणाऱ्या अमायरा आणि १६ नोव्हेंबर रोजी रेवा येथील ११वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. २१ नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्रातील जालना येथे एका १३ वर्षीय विद्यार्थिनीने तिच्या शाळेच्या इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणांमध्ये, शिक्षकांवर छळ किंवा मदतीचा अभाव असल्याचा आरोप देखील करण्यात आला. शाळकरी मुले आत्महत्या का करत आहेत आणि त्या कशा रोखता येतील हे समजून घेण्यासाठी आम्ही तज्ञांचा सल्ला घेतला. शौर्यला काय त्रास होता, हे समजून घेण्यासाठी आम्ही त्याच्या वडिलांशी आणि वर्गमित्रांशी बोललो. शौर्यच्या वडिलांचा अनुभव वाचा... 'शिक्षक मुलाला टीसीची धमकी द्यायचे'शौर्यचे वडील प्रदीप पाटील दिल्लीतील करोल बाग येथे सोन्याचा व्यवसाय करतात. ते महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहेत पण गेल्या २० वर्षांपासून दिल्लीतील राजिंदर नगर येथे राहत आहेत. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी २:४५ च्या सुमारास प्रदीप यांना फोन आला. फोन करणाऱ्याने त्यांना कळवले की त्यांचा मुलगा पडला आणि बेशुद्ध झाला आहे, म्हणून त्यांनी त्याला एका खाजगी रुग्णालयात नेले. प्रदीप आल्यावर त्यांना कळले की शौर्य आता जिवंत नाही. त्यानंतर प्रदीप यांना सुसाईड नोट आणि शौर्यचा त्रास कळला. ते म्हणतात, शिक्षक त्याला सांगत राहिले की ते त्याला टीसी (ट्रान्सफर सर्टिफिकेट) देतील. १० दिवसांत प्री-बोर्ड परीक्षा देणाऱ्या मुलाला वारंवार अशा प्रकारे छळले जात होते. मला माझ्या मुलाची शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे आणि दोषी शिक्षकांवर कठोर कारवाई करायची आहे. प्रदीप पुढे म्हणतात, चार-पाच महिन्यांपूर्वी, शिक्षकांनी मला फोन करून सांगितले, 'तुमचा मुलगा खोडकर आहे. तो विनोद सांगतो आणि नक्कल करतो.' मी उत्तर दिले, 'तो एक मुलगा आहे, जर तो नक्कल किंवा खोडसाळपणा करणार नाही तर तो काय करेल?' मग शिक्षक म्हणाले की त्याचे गुण कमी आहेत. मी कधीही त्याला गुण मिळवण्यासाठी दबाव आणला नाही. १७ नोव्हेंबर रोजी तो दिवसभर माझ्यासोबत होता. माझी सुट्टी होती. त्याने माझ्यासाठी मिल्कशेक आणि आईस्क्रीम ऑर्डर केले. आम्ही मस्करी करत राहिलो. मी त्याला सांगितले की तो इतका उंच आहे की त्याला आधी लग्न करावे लागेल. दुसऱ्या दिवशी, जेव्हा तो शाळेत जात होता, तेव्हा त्याने त्याच्या आईला स्वयंपाक करू नको असे सांगितले. 'शौर्य म्हणाला होता की तो आत्महत्या करेल'त्या दिवशी शाळेत काय घडले? प्रदीप सांगतात, शौर्य शाळेत पडला. शिक्षक म्हणाले की तो अभिनय करत आहे. शौर्य म्हणाला नाही, तो अभिनय करत नाही. मग तो रडू लागला. शिक्षक म्हणाले की त्याला काही फरक पडत नाही. हे सर्व मुख्याध्यापिकेसमोर घडले. शौर्यच्या मित्रांनी मला सांगितले की त्याने शिक्षकांना सांगितले की तो आत्महत्या करेल. ते त्याचा खूप छळ करत होते. प्रदीप क्षणभर गप्प बसतात, मग म्हणतात, शिक्षकांनी मला फोन करायला हवा होता. किंवा ड्रायव्हरला फोन करायला हवा होता. त्यांनी आम्हाला सांगायला हवे होते की मूल असं म्हणत आहे. त्यांनी असं काहीही केलं नाही. कोणत्याही शिक्षकाने फोन केला नाही. घटनेनंतरही, मला शाळेकडून फोन आला नाही. १९ तारखेला संध्याकाळी ४ वाजता मुख्याध्यापकांनी फोन केला. त्यांनी मला विचारले की मला काय हवे आहे आणि ते मला मदत करतील. मी त्यांना विचारले की ते माझा मुलगा परत करू शकतात का. वर्गमित्र म्हणाले - शिक्षकाने त्याला फटकारले, शौर्य रडत निघून गेला शौर्यसोबत शिकणारे विद्यार्थी पुढे येऊ इच्छित नाहीत. त्याचा एक मित्र म्हणतो, शिक्षक त्याला क्षुल्लक गोष्टींवरून त्रास द्यायचे. गेल्या ५-१० दिवसांपासून तो इतका नाराज होता की त्याने सर्वांशी बोलणे बंद केले होते. शेवटच्या दिवशी तो ड्रामा प्रॅक्टिस दरम्यान तो पडला. त्याला बोलावून शिवीगाळ करण्यात आली. त्याला खूप त्रास देण्यात आला. शिक्षकाने त्याला अशा प्रकारे फटकारले की जणू काही त्याने कोणाचा तरी खून केला आहे. त्यानंतर तो कोणाशीही बोलला नाही. तो रडत शाळेतून निघून गेला. शौर्य म्हणायचा, मला शाळेचा पुढचा शाहरुख खान व्हायचे आहे. तो चांगला वागायचा, विनोद करायचा आणि सर्वांशी जुळवून घ्यायचा. तक्रार केल्यानंतरही शिक्षक त्रास देत राहिले१९ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील राजा गार्डन मेट्रो पोलिस स्टेशनमध्ये आरोपी शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एफआयआरनुसार, वडिलांनी सांगितले की तक्रारीनंतरही शिक्षक शौर्यला त्रास देत राहिले. शौर्यच्या वर्गमित्राने सांगितले की, चार दिवसांपासून त्याला धमक्या दिल्या जात होत्या की ते त्याच्या पालकांना फोन करून टीसी देतील. यानंतर, शाळेने चार शिक्षकांना निलंबित केले: युक्ती अग्रवाल महाजन, मनु कालरा, जूली वर्गीस आणि अपराजिता पाल. २० नोव्हेंबर रोजी, शाळेने जाहीर केले की या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्यांचे निलंबन लागू राहील. या काळात, हे शिक्षक प्रशासनाच्या परवानगीशिवाय शाळेच्या आवारात प्रवेश करणार नाहीत आणि कोणत्याही विद्यार्थी, कर्मचारी किंवा पालकांशी संवाद साधणार नाहीत. शौर्यचे काका प्रवीण पाटील शाळेविरुद्ध कारवाईची मागणी करत आहेत. ते शाळेबाहेर निदर्शने करत आहेत. प्रवीण म्हणतात, शौर्यने आम्हाला घरी शिक्षकांबद्दल अनेक वेळा सांगितले आहे. आम्हाला वाटले की शाळा संपण्यास फक्त आठ ते दहा दिवस शिल्लक आहेत. मग आम्ही शाळा बदलू. शौर्यचा मृत्यू ही आत्महत्या नाही; ती शाळेने केलेली हत्या आहे. आरोपी शिक्षकांना अटक केली पाहिजे. मुख्याध्यापकांना त्यांच्या नोकरीवरून काढून टाकले पाहिजे. त्यांना शिक्षा होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. माजी विद्यार्थ्यांनी सांगितले की शिक्षक मुलांना लक्ष्य करतात सीरत पाल सिंग या वर्षी सेंट कोलंबस शाळेतून बारावीत पदवीधर झाला. शौर्यच्या आत्महत्येनंतर तो निषेध करत आहे. सीरत म्हणतो, शाळेत शैक्षणिक दबाव आहे, परंतु काही शिक्षक काही विद्यार्थ्यांशी खूप कडक आहेत, त्यांना लक्ष्य करत आहेत. बरेच विद्यार्थी ते सहन करू शकत नाहीत. आम्ही येथे शालेय व्यवस्थेच्या विरोधात उभे आहोत. निषेधात सहभागी झालेल्या विशालचा एक मुलगा सातवीत शिकतो. आठवड्याभरापूर्वी त्यांच्या मुलालाही निलंबित करण्यात आले होते. विशाल म्हणतात, शिक्षक लहानसहान चुकांवरून मुलांना त्रास देतात. पालकांना क्षुल्लक बाबींसाठी बोलावले जाते. कधीकधी त्यांना फक्त एक तासाच्या सूचनेवर बोलावले जाते. माझ्या मुलाला एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. तो म्हणतो, 'बाबा, मी शाळेत जाणार नाही.' जर तुम्ही मुलांवर दबाव आणला तर कोण जबाबदार असेल? निषेधात सहभागी झालेल्या भावना म्हणाल्या, शाळेत मुलांना त्रास दिला जातो. हे थांबवायला हवे. मुले भीतीमुळे आम्हाला सांगत नाहीत. जेव्हा ते सांगतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. शिक्षकांनी मुलांशी असे वागू नये की ते इतका कठोर निर्णय घेतात. हे करण्यापूर्वी त्यांच्या मनात अनेक गोष्टी येत असतील. हे सोपे नाही. पोलिसांनी सांगितले - शिक्षकांची चौकशी सुरू आहे, काहीही सांगणे घाईचे ठरेलराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाला मानवी हक्कांचे उल्लंघन घोषित केले आहे. आयोगाने दिल्ली पोलिस आणि मध्य दिल्लीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून १० दिवसांच्या आत चौकशी अहवाल मागितला आहे. या प्रकरणातील तपास अधिकारी बिक्रमजीत सिंह यांच्या मते, सध्या सर्वांची चौकशी सुरू आहे. मुले आणि शिक्षकांचीही चौकशी केली जाईल. यावर भाष्य करणे घाईचे ठरेल. दैनिक भास्करने सेंट कोलंबस शाळेचे प्राचार्य रॉबर्ट फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधला. आम्ही त्यांना ईमेलद्वारे काही प्रश्न पाठवले. आम्हाला अद्याप उत्तर मिळालेले नाही. आम्हाला उत्तर मिळाल्यावर आम्ही ही बातमी अपडेट करू. एका वर्षात १३,००० हून अधिक आत्महत्यानॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी) च्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये देशभरात १३,८९२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. हे एकूण आत्महत्यांच्या (१.७१ लाख प्रकरणांच्या) ८.१% आहे. २०१३ मध्ये ८,४२३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या १० वर्षांमध्ये ६५% वाढ दर्शवतात. या १० वर्षात १,१७,८४९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मुलांच्या आत्महत्येच्या आणखी तीन घटना १. राजस्थान: ९ वर्षांच्या अमायराने शाळेच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली १ नोव्हेंबर रोजी जयपूरमधील चौथी इयत्तेत शिकणारी अमायरा हिने आत्महत्या केली. ती नीरजा मोदी शाळेत शिकत होती. तपासात असे दिसून आले की शाळेत इतर विद्यार्थ्यांनी तिचा छळ केला होता. अमायरा फक्त नऊ वर्षांची होती. कुटुंबाचा आरोप आहे की घटनेच्या दिवशी अमायरा वारंवार तिच्या वर्गशिक्षिकेकडे मदत मागत होती, परंतु तिला मदत मिळाली नाही. अमायराची आई शिवानी म्हणाल्या की, घटनेच्या दिवशी तिला खूप त्रास देण्यात आला होता. ती इतकी अस्वस्थ होती की ती शांत बसू शकत नव्हती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अमायरा वारंवार शिक्षकाकडे जाताना दिसत आहे, परंतु त्याने तिला हाकलून लावले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीएसईने एक चौकशी समिती स्थापन केली. २० नोव्हेंबर रोजी, बोर्डाने त्यांचा तपास अहवाल सादर केल्यानंतर शाळेला नोटीस बजावली. अहवालात असे म्हटले आहे की अमायरा १८ महिन्यांपासून छळाची बळी होती, परंतु शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले. वेळेवर हस्तक्षेप केला असता तर ही घटना टाळता आली असती. २. मध्य प्रदेश: ११ वीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली, शिक्षकावर आरोप१६ नोव्हेंबर रोजी, मध्य प्रदेशातील रेवा येथे ११वीच्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. तिचा मृतदेह तिच्या घराच्या बाथरूममध्ये आढळला. शाळेत तिचा छळ होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. विद्यार्थिनीकडून एक सुसाईड नोट देखील सापडली आहे, ज्यामध्ये तिने शिक्षिकेवर आरोप केले आहेत. त्यात असे म्हटले आहे की शिक्षिका शिक्षा म्हणून तिचा हात धरून तिच्या बोटांमध्ये पेन दाबत असे. तथापि, रेवा पोलिसांनी माध्यमांना सांगितले आहे की आत्महत्येमागील सर्व कारणांचा तपास केला जात आहे. 3. महाराष्ट्र: 13 वर्षीय आरोहीने शाळेच्या छतावरून उडी मारलीमहाराष्ट्रातील जालना येथे, १३ वर्षीय आरोहीने तिच्या शाळेच्या इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. ती सातवीत शिकत होती. आरोही त्या दिवशी सकाळी शाळेत आली. त्यानंतर काही वेळातच तिचे वडील दीपक बिडलान यांना शाळेतून फोन आला की त्यांच्या मुलीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. आरोहीच्या वडिलांनी आरोप केला की त्यांची मुलगी शिक्षकांकडून मानसिक छळाला बळी पडत होती. डॉक्टर म्हणाले - मुलांनी इशारा देणारे संकेत दिले, शिक्षकांना समजले नाहीसर गंगा राम रुग्णालयातील सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुयश शेंडये म्हणतात की, या आत्महत्यांच्या घटना शिक्षकांच्या असंवेदनशीलतेचे प्रतिबिंब आहेत. ते म्हणतात, या सर्व प्रकरणांमध्ये, मुलांनी आधीच इशारा देणारे संकेत दिले होते जिथे त्यांना ओळखता आले असते. त्यांना मदत करता आली असती, परंतु शिक्षकांनी मदत केली नाही. त्यामुळे ही समस्या वाढतच गेली. डॉ. सुयश पुढे म्हणतात की अशा परिस्थितीत शिक्षक आणि पालकांनी एकत्र काम केले पाहिजे. प्रत्येक मूल वेगळे असते. दहावी आणि बारावीच्या काळात मुले खूप संवेदनशील असतात. त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 9:08 am

देहू नगरपंचायतीचा अतिक्रमण विभाग कागदावरच; कारवाई शून्य, शहराच्या विद्रुपीकरणात होतेय वाढ

देहूगाव – देहू नगरपंचायतीकडून दीड महिन्यापूर्वी अतिक्रमण विभागामुळे कारवाईला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र फ्लेक्स, बॅनर, जाहिरातींचे फलक तसेच रस्त्यांवरील अतिक्रमणांवर अजूनही कुठलीही ठोस कारवाई न झाल्याने, हा विभाग कागदावरचा असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी दैनिक प्रभातमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेत अतिक्रमण विभागाची स्थापना केली. नगररचना […] The post देहू नगरपंचायतीचा अतिक्रमण विभाग कागदावरच; कारवाई शून्य, शहराच्या विद्रुपीकरणात होतेय वाढ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 8:43 am

Pimpri : मतदार यादीतील त्रुटी दूर कराव्‍यात; राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश बहल यांची मागणी

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनातील गंभीर त्रुटी व गोंधळ दूर करून, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्‍यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केली आहे. बहल यांनी म्‍हटले आहे की मतदारयाद्यांच्‍या प्रभागनिहाय विभाजनात मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला असून निवडणूक आयोगाच्‍या दिनांक १६ […] The post Pimpri : मतदार यादीतील त्रुटी दूर कराव्‍यात; राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश बहल यांची मागणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 8:37 am

patan: पाटण तालुक्यातील कामांसाठी 34 कोटींचा निधी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी

कोयनानगर – राज्याचे पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे पाटण तालुक्यातील महत्त्वाच्या विकासकामांसाठी तब्बल 34 कोटी 55 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रस्ते, साकव, पाणीपुरवठा, वस्ती सुधारणा, शैक्षणिक सुविधा आणि इतर बांधकामे होणार आहेत. पाटण तालुक्यातील अनेक पाड्यांना जोडणारे रस्ते व पूल मजबूत करण्यात येणार आहेत. पाणीटंचाई जाणवणार्‍या वस्त्यांसाठी […] The post patan: पाटण तालुक्यातील कामांसाठी 34 कोटींचा निधी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 8:37 am

आम्ही उंदरांसारखे डोंगर खोदून जीव वाचवतो:राष्ट्रपतींनी कौतुक केले, आमच्यावर एक चित्रपटही बनवण्यात आला; पण योग्य मोबदला मिळत नाही

माझे नाव फिरोज कुरेशी आहे. मी उत्तर प्रदेशातील कासगंजचा आहे. देशभरात आम्ही मोठमोठे बोगदे बांधतो म्हणून आम्हाला उंदीर खाण कामगार (रॅट मायनर्स) म्हणतात. हे काम उंदरांसारखे खड्डे खोदण्यासारखे आहे. जसे उंदीर माती खोदतात आणि उरलेली माती परत फेकतात. अगदी तसेच. देशभरातील मोठ्या बोगद्यांच्या अपघातांमध्ये आम्हाला मदत करण्यासाठी बोलावले जाते. कधीकधी आम्ही बोगद्यात अडकलेल्या कामगारांना किंवा कधीकधी बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलांना वाचवतो. आम्ही त्यांना वाचवण्यासाठी आमचे जीव धोक्यात घालतो, तरीही आम्हाला योग्य नुकसानभरपाई मिळत नाही. सरकारही कोणतीही मदत देत नाही. तेलंगणा बोगदा दुर्घटनेत वाराणसीतील एका वृद्ध महिलेच्या निधनाबद्दल मला खूप दुःख झाले आहे. बोगद्याबाहेर तिचे रडणे अजूनही माझ्या हृदयाला भिडते. उत्तराखंड बोगदा दुर्घटनेतून १४ कामगारांना वाचवल्याबद्दल राष्ट्रपतींनी आम्हाला अभिनंदन प्रमाणपत्र दिले. आम्हाला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या इंडियन आयडॉल या गायन कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. सनी देओलसह अनेक चित्रपट कलाकारांनी आमची भेट घेतली. एका परदेशी प्रॉडक्शन हाऊसने आमच्यावर एक डॉक्युमेंटरी फिल्मही बनवली, पण आमची परिस्थिती तशीच आहे. आमच्याकडे वैद्यकीय उपचारांसाठीही पैसे नाहीत. आम्हाला नुकतेच श्रीलंकेला आमंत्रित करण्यात आले आहे आणि आम्ही तिथे जाण्याची तयारी करत आहोत. मी उंदीर खाणकाम करणाऱ्या माझ्या कथेपासून सुरुवात करतो. मी शिकलो नव्हतो म्हणून माझ्याकडे काम नव्हते. मी मुंबईत माझ्या धाकट्या भावाकडे गेलो, जो भूमिगत पाणी, गटार आणि गॅस पाईपलाईन टाकत होता. मी त्याच्यासोबत १२ वर्षे काम केले, जिथे मी भूमिगत पाईप कसे टाकायचे आणि बोगदे कसे खोदायचे हे शिकलो. जमिनीखाली पाईपलाईन टाकणे अत्यंत धोकादायक आहे. त्यासाठी २० ते ४० फूट खोल खड्डा खणावा लागतो. खड्डा खणल्यानंतर पाईप टाकला जातो. एकदा टाकल्यानंतर आपण पाईपमध्ये प्रवेश करतो. आत दगड आणि लोखंड फोडतो. नंतर, एक बोगदा खणतो आणि पाईप पुढे ढकलतो. हे काम ८ ते १८ तास चालू राहते. आजही यंत्रे हे काम कार्यक्षमतेने करू शकत नाहीत. या कामादरम्यान आम्हाला मृत्यूचा सामना करावा लागतो. सर्वात मोठे आव्हान म्हणजे पाईपमध्ये योग्यरित्या श्वास न घेणे. ते प्राणघातक वायूने ​​भरते, ज्यामुळे गुदमरल्यासारखे होते. शिवाय, त्याच पाईपमधून पाणी काढले जाते. कधीकधी, ते विजेच्या झटक्याने देखील जाऊ शकते. डोळ्यांसमोर लोकांचा मृत्यू होताना पाहिले आहे. ते किती धोकादायक आहे याची तुम्ही कल्पना करू शकता. म्हणूनच अनेक देशांनी या कामावर बंदी घातली आहे. मी मुंबईत बराच काळ या नोकरीत काम केले. काम खूप कठीण होते, पण पगार फारसा चांगला नव्हता. मी माझ्या भावासोबत एक योजना आखली आणि दिल्लीला राहायला गेलो. तिथे मी संपूर्ण शहरात मोठ्या गटारांच्या पाईप टाकल्या. ते धोकादायक असल्याने, मी माझ्या कुटुंबाला या कामाबद्दल सांगत नाही. मी त्यांना सांगतो की आम्ही बांधकाम क्षेत्रात काम करतो, पण उत्तराखंडमधील सिल्कयारा बोगद्याच्या दुर्घटनेत आमचे नाव जगजाहीर झाले. बोगद्यात अडकलेल्या कामगारांची बातमी आली. आमच्या टीमला बोलावण्यात आले. त्यावेळी आमच्या एका सहकाऱ्याच्या बहिणीचे लग्न होते. तो लग्नाला उपस्थित राहिला नाही. दुसऱ्या सहकाऱ्याच्या भावाच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु टीममधील आम्ही सहा जण आमच्या कुटुंबियांना न कळवता तिथे गेलो. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा भारत आणि परदेशातील अनेक मोठ्या मशीन आणि सरकारी पथके बचाव कार्यात गुंतलेली होती. सर्व काही बिघडत होते, आत असलेल्या ४१ कामगारांच्या जीवाचा कोणताही पत्ता नव्हता. जेव्हा सर्वकाही बिघडले तेव्हा आमच्या पथकाने बचाव कार्य सुरू केले. प्रत्येक दिवस कठीण वाटत होता, परंतु हळूहळू आम्ही आमच्या मोहिमेत यशस्वी होत होतो. कामगार अडकून १७ दिवस झाले होते. १७ व्या दिवशी आमचे ध्येय यशस्वी झाले. आम्ही सर्व ४१ कामगारांना एक-एक करून बाहेर काढले. मोहीम यशस्वी होताच, आमचे फोटो टीव्हीवर दिसू लागले. माझ्या मुलाने मला टीव्हीवर पाहिले. त्याने लगेच फोन करून विचारले- 'अब्बू, तुम्ही उत्तराखंडमध्ये आहात का?' मी म्हणालो नाही, तुम्ही माझ्यासारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला पाहिले असेल. त्यानंतर, माझ्या धाकट्या भावाचा फोटो टीव्हीवर दाखवण्यात आला. कुटुंबातील सदस्यांनी ते पाहिले तेव्हा माझ्या मुलाने पुन्हा फोन केला. तो म्हणाला- अब्बू, काका देखील टीव्हीवर दिसत आहेत. शेवटी, मी त्याला सांगितले की- हो, आम्ही उत्तराखंडमध्ये आहोत. आम्ही येथे बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवले आहे. त्याच दिवशी आमच्या कुटुंबियांना कळले की आम्ही बोगद्यात काम करतो. अशाप्रकारे, मोठ्या यंत्रांच्या बिघाडानंतरही, आमचे यश जगभर प्रसिद्ध झाले. राष्ट्रपतींनी आम्हाला अभिनंदन प्रमाणपत्र पाठवले. उत्तराखंड सरकारने आम्हाला प्रत्येकी ५०,००० रुपये दिले. मोहीम यशस्वी झाल्यानंतर, आम्ही घरी परतलो. येथे आम्हाला उंदीर खाण कामगार म्हटले जात असे. त्या दिवशी, पहिल्यांदाच आम्हाला कळले की हे काम करणाऱ्या लोकांना उंदीर खाण कामगार म्हणतात, कारण आम्ही उंदरांसारखे बोगदे खोदतो. माध्यमांमध्ये आमची खूप चर्चा झाली. त्यानंतर, आम्हाला देशातील प्रसिद्ध गायन कार्यक्रम, इंडियन आयडॉलमध्ये आमंत्रित करण्यात आले. चित्रपट स्टार सनी देओल सारखे अभिनेते आमच्याशी भेटले, परंतु इंडियन आयडॉलमध्ये आम्हाला मिळालेले पैसे मध्यस्थांनी हडप केले. आम्हाला तिथे काही प्रसिद्धी मिळाली असली तरी, आम्हाला कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. त्या काळात, आमची चर्चा परदेशातही झाली. एका परदेशी प्रॉडक्शन हाऊसने आम्हाला भेट दिली आणि आमच्यावर एक माहितीपट बनवला. शिवाय, अनेक नेत्यांनी आम्हाला आमंत्रित केले आणि आमचा सन्मान केला, पण सत्य हे आहे की आम्हाला फक्त अभिनंदन मिळाले. आम्ही राष्ट्राच्या दृष्टीने हिरो झालो, पण आमची आर्थिक परिस्थिती शून्यावर राहिली. उत्तराखंड बोगद्याच्या दुर्घटनेनंतर, २२ फेब्रुवारी २०२५ रोजी तेलंगणा बोगद्याची दुर्घटना घडली. ४०० मीटर उंच डोंगरावर बांधल्या जाणाऱ्या बोगद्यात हा अपघात झाला, ज्यामध्ये आठ कामगार गाडले गेले. ५२ किलोमीटरचा बोगदा बांधला जात होता, परंतु १४ किलोमीटर नंतर अचानक कोसळला. बोगद्यात पाण्यासोबत हजारो टन लोखंड साचले होते. परिस्थिती इतकी वाईट होती की कोणीही आत जाण्यास तयार नव्हते. सरकारी पथकांनी हार मानली होती. आमच्या टीमला बोलावण्यात आले. तिथे पोहोचल्यावर आम्हाला एका ट्रेनने बोगद्याच्या आत नेले. बोगदा जिथे बसला होता तिथे पाणी आणि लोखंडाचा मोठा चिखल होता. त्या चिखलाच्या आधी ट्रेन थांबवण्यात आली. त्यानंतर, आम्ही चिखलात उतरलो आणि तो साफ करायला सुरुवात केली. तो चिखल ४ किलोमीटरचा होता. तो साफ करायला अनेक दिवस लागले. चिखल साफ केल्यानंतर, आम्हाला आढळले की पुढील ३५० मीटरपर्यंत दगड आणि लोखंडाचा ढिगारा होता. त्या ढिगार्यात ८ कामगार गाडले असण्याची शक्यता होती. आम्ही तेही साफ करायला सुरुवात केली. आम्हाला सर्वात आधी त्यात एक मृतदेह सापडला, जो पंजाबमधील रहिवासी गुरमीत सिंगचा होता. आम्ही त्याला बाहेर काढले. वाराणसीतील एक वृद्ध महिला बोगद्याबाहेर आली होती. तिचा नवरा गाडलेल्या आठ कामगारांपैकी एक होता. ती बोगद्याबाहेर बसून रडत असे. सकाळी मी बोगद्यात गेल्यावर ती रडत असे आणि मला तिच्या नवऱ्याला शोधण्याची विनंती करत असे. बोगद्यात जवळजवळ १८ तास घालवल्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा ती तिथे बसलेली आढळली. बाहेर आल्यावर ती तिच्या नवऱ्याबद्दल विचारायची, पण आमच्याकडे काहीच उत्तर नव्हते. आतापर्यंत आम्हाला दोन मृतदेह सापडले होते, पण तिच्या पतीचा मृतदेह सापडला नव्हता. आम्ही बोगद्यात जसजसे पुढे जात होतो तसतसे परिस्थिती आणखी बिकट होत गेली. दरम्यान, सरकारी आदेश आला की कोणत्याही कामगारांनी पुढे जाऊ नये. पुढे गेल्यास आमचे प्राण जाऊ शकतात. त्यानंतर, अधिकाऱ्यांनी आम्हाला उर्वरित मृतदेह शोधण्यास मनाई केली. आम्ही बाहेर आलो. मी सरकारी अधिकाऱ्यांना विनंती केली की आम्हाला मृतदेह शोधू द्या. आम्हाला खात्री होती की आम्ही शोधू, पण त्यांनी नकार दिला. त्यांनी आम्हाला कडकपणे थांबवले. दरम्यान, मी बाहेर बसलेल्या बनारसच्या त्या वृद्ध महिलेला पाहत होतो. ती रडत होती. मला वाटलं की तिच्या पतीचा मृतदेह सापडला असता तरी दिलासा मिळाला असता, पण आम्ही असहाय्य होतो. बोगद्यात सहा मृतदेह राहिले. त्या दिवशी मी जड अंतःकरणाने कासगंजला परतत होतो. त्या वृद्ध महिलेचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर होता. आजही तिचा रडणारा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर अनेकदा येतो. तिच्या पतीचा मृतदेह परत मिळवण्यात असमर्थता माझ्या हृदयाला छेद देते. त्याचप्रमाणे, राजस्थानमधील कोटपुतली येथील आणखी एक घटना आहे. तीन वर्षांची मुलगी १३० फूट खोल बोअरवेलमध्ये पडली होती. आम्हाला बोलावण्यात आले. सरकारी पथक तिथे आधीच उपस्थित होते, पण ते मुलीला वाचवू शकले नाहीत. मुलीचे पालक आणि कुटुंबातील सदस्य रडत असताना वाईट स्थितीत होते. ते वारंवार आमच्यासमोर हात जोडत होते, पण सरकारी पथकातील सदस्य आम्हाला आत जाऊ देत नव्हते. त्यांनी कुटुंबातील सदस्यांना धमकी दिली होती की मुलीला वाचवण्यासाठी आम्ही खूप पैसे घेतो. त्यांनी असेही म्हटले होते की जर मुलीला उंदीर खाण कामगारांनी बाहेर काढले आणि कोणतीही चूक झाली तर सरकार जबाबदार राहणार नाही आणि कोणतीही भरपाई दिली जाणार नाही. पण त्या क्षणी, आम्हाला जाणवले की सरकारी पथक, जसे काम करत होते, ते मुलीला वाचवू शकले नाही. आठ दिवस उलटले आणि ती मुलगी मरण पावली. नंतर तिचा मृतदेह सापडला. मला अनेकदा त्या मुलीची आठवण येते. मला वाटते, जर आम्हाला तिला वाचवण्याची परवानगी मिळाली असती तर ती अजूनही जिवंत असती. हे असे अपघात आहेत जे तुम्हाला सर्वांना माध्यमांद्वारे माहित आहेत, परंतु आम्ही देशभरात घडणाऱ्या अनेक अपघातांकडे देखील पाहतो ज्यांचा उल्लेख माध्यमांमध्येही केला जात नाही. सरकार त्यांना प्रकाशात येऊ देण्यास नकार देते. आम्हाला श्रीलंकेला आमंत्रित करण्यात आले आहे आणि सध्या आम्ही तिथे प्रवास करण्यासाठी आमचे पासपोर्ट तयार करत आहोत. शेवटी, मी हे म्हणेन: आम्ही आमचे काम पूर्ण जोशाने करतो. आम्हाला आमच्या जीवाचीही पर्वा नाही, पण आम्हाला योग्य पगार मिळत नाही. आम्हाला फक्त अभिनंदन आणि प्रशंसा मिळते, आणि केवळ प्रशंसा करून आमचे घर चालत नाही. आमची परिस्थिती अशी आहे की जर आज आमच्या कुटुंबातील कोणी रुग्णालयात दाखल झाले तर आम्हाला उपचारही परवडत नाहीत. एक प्रकारे, आम्ही आमच्या आर्थिक अडचणींच्या खाणीत अडकलो आहोत. सरकारने आम्हाला मदत करावी. (फिरोज कुरेशी यांनी भास्कर रिपोर्टर मनीषा भल्ला यांच्याशी या भावना शेअर केल्या .)

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 8:33 am

'पाकिस्तानचा देशव्यापी घातपाताचा कट उधळला; दिल्ली स्फोटावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई : २६/११ दहशतवादी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण होत असताना, या हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांना आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम अमृता फडणवीस यांच्या दिव्यज फाऊंडेशनतर्फे घेण्यात आला असून, यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यांनी उपस्थित होते.फडणवीस यांनी यावेळी दिल्लीतील स्फोटाबद्दल भाष्य केले. दिल्लीत घडवून आणलेला स्फोट हा केवळ एक संकेत होता, प्रत्यक्षात देशभरात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याची पाकिस्तानची योजना होती, असे ते म्हणाले. भारताच्या तपास यंत्रणांनी वेळेवर कारवाई करत जवळपास ३००० किलो आरडीएक्स जप्त केले आणि या कटाला मूळापासून आळा घातला, असा दावा त्यांनी केला.फडणवीस म्हणाले की, पाकिस्तानला भारताविरुद्ध थेट युद्धात पराभव स्वीकारावा लागेल, हे त्यांना माहीत असल्याने ते छद्म युद्धाच्या माध्यमातून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहतात. दिल्लीतील स्फोट हा त्यांच्या अस्तित्वाचा दावा करण्यासाठी केलेला प्रयत्न होता, मात्र भारतीय तपास यंत्रणांनी वेळेत केलेल्या कारवाईमुळे देशातील अनेक शहरांवरील दहशतवाद्यांचा डाव उधळला गेला.धोका अद्याप कायम आहे. पाकिस्तान अशा घटना घडवून जागतिक स्तरावर स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करीत राहील. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाने जागरूक राहण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.२६/११ च्या हल्ल्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, तो हल्ला फक्त ताज किंवा ट्रायडेंट हॉटेलांवर नव्हता; तर भारताच्या आर्थिक राजधानीवर आणि सार्वभौमत्वावर लावलेलं थेट आव्हान होतं. जशी ९/११ मध्ये ट्विन टॉवरवर हल्ला करून अमेरिकेला धमकावण्याचा प्रयत्न झाला, तसाच प्रयत्न भारताविरुद्ध करण्यात आला होता.त्यांनी पुढे सांगितले की, २६/११ नंतर भारताने धाडसी पावलं उचलली असती, तर अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडण्याची कोणाचीही हिंमत झाली नसती. मात्र, मोदी सरकारच्या काळात पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ठोस भूमिकेतून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाही, हे स्पष्ट करत भारतीय सैन्याला कारवाईसाठी मोकळीक दिली. त्यानंतर भारतीय तीनही दलांनी पाकिस्तानच्या तळांवर घुसून अचूक कारवाया केल्या आणि त्यावर पाकिस्तान काहीही प्रतिकार करू शकला नाही.ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरात भारताची लष्करी क्षमता अधोरेखित झाली आहे, पण हा संघर्ष अद्याप संपलेला नाही, असेही फडणवीस यांनी नमूद केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान छुप्या मार्गाने भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न पुढेही करेल; त्यामुळे सतर्कता हीच सर्वात महत्त्वाची आहे.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 8:30 am

Pune District : विकासासाठी राष्ट्रवादीला साथ द्या; कृषीमंत्री भरणे यांचे विकासाच्या मुद्यावर विरोधकांना कडक शब्दांत प्रत्युत्तर

इंदापूर :“इंदापूरचा चेहरा मोहरा बदलणे हा आमचा संकल्प आणि जबाबदारी.टीका-टिप्पणींना उत्तर देण्यात वेळ दवडणार नाही.आम्ही विकास केला आहे,करीत आहोत आणि पुढील चार वर्षे तालुक्याचा आमदार म्हणून आणखी मोठी कामगिरी करणार आहोत. इंदापूरच्या प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा आणि सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करा,” असे जोरदार आवाहन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी […] The post Pune District : विकासासाठी राष्ट्रवादीला साथ द्या; कृषीमंत्री भरणे यांचे विकासाच्या मुद्यावर विरोधकांना कडक शब्दांत प्रत्युत्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 8:23 am