विकी कौशलने खरेदी केली लग्जरी कार; पाहा नव्या गाड्याची झलक
Vicky Kaushal | बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ नुकतेच आई-बाबा झाले. यानंतर आता विकीने आपल्या कार कलेक्शनमध्ये नवीन आलिशान गाडीचा समावेश केला आहे. विकीने नुकतीच लेक्सस LM350h 4S ही लग्जरी कार खरेदी केली आहे.मुंबईतील एका कार्यक्रमात विकी सहभागी झाला होता. तिथे तो आपल्या ब्रँड न्यू गाडीसोबत स्पॉट झाला. लेक्सस LM350h 4S ही ४-सीटर […] The post विकी कौशलने खरेदी केली लग्जरी कार; पाहा नव्या गाड्याची झलक appeared first on Dainik Prabhat .
विजय दिवरकोंडाच्या चाहत्यांना धक्का! १३० कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटाच्या सिक्वलबाबत मोठा निर्णय?
Actor Vijay Deverakonda : दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा हा हिंदी प्रेक्षकांमध्येही खूप लोकप्रिय आहे. जगभरात लोकप्रिय झालेल्या अनेक दक्षिण भारतीय स्टार्सपैकी विजयकडे पाहिले जाते. मात्र, २०२५ हे वर्ष विजयसाठी फारसे चांगले नव्हते. आता त्याच्या आगामी चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे. त्याच्या काही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळला असून काही चित्रपट फारसे यशस्वी झाले […] The post विजय दिवरकोंडाच्या चाहत्यांना धक्का! १३० कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटाच्या सिक्वलबाबत मोठा निर्णय? appeared first on Dainik Prabhat .
डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन नियम ! नवीन व्हिसा नियम जारी ; भारतीयांवर काय परिणाम होईल? वाचा
Trump on Visa। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने व्हिसा नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नवीन आदेशानुसार, तथ्य तपासणी, सामग्री नियंत्रण, ऑनलाइन सुरक्षा, विश्वास आणि सुरक्षितता किंवा अनुपालन यामध्ये गुंतलेल्या व्यक्तींना अमेरिकेत प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, “हे निर्देश परराष्ट्र विभागाच्या मेमोद्वारे जारी करण्यात आले.” या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम तंत्रज्ञान […] The post डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन नियम ! नवीन व्हिसा नियम जारी ; भारतीयांवर काय परिणाम होईल? वाचा appeared first on Dainik Prabhat .
इंडिगोचा मंत्री, आमदारांनाही फटका, हिवाळी अधिवेशनाला कसे राहणार हजर ?
नागपूर : इंडिगोच्या गोंधळाचा मोठा फटका राज्याच्या हिवाळी अधिवेशनालाही बसण्याची शक्यता आहे. अनेक मंत्री आणि आमदार राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून रविवारी विमानाने नागपूरला पोहोचतात. या मंडळींपुढे नागपूरला कसे पोहचायचे हा प्रश्न आहे.हिवाळी अधिवेशनासाठी अनेक मंत्री, आमदार आणि अधिकारी मुंबई आणि इतर ठिकाणांहून विमानाने निघणार होते. इंडिगोची तिकिटांची खरेदी झाली होती. पण सलग सहाव्या दिवशीही इंडिगोचा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांप्रमाणेच राजकारण्यांना तसेच अधिकाऱ्यांनाही फटका बसला आहे. मुंबई – नागपूर आणि पुणे – नागपूर या महत्त्वाच्या मार्गांवरील अनेक उड्डाणे रद्द झाली आहेत. यामुळे व्हीआयपींसाठी इंडिगोच्या विमानाने नागपूरला पोहोचणे कठीण झाले आहे.तिकीट रद्द करुन अनेकांनी आयत्यावेळी रेल्वेने नागपूर गाठण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहींनी समृद्धी महामार्गावरुन नागपूर गाठण्याचे नियोजन केले आहे. इंडिगो विमानाच्या गोंधळानंतर इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात भरमसाठ वाढ केल्याने नागपूर अधिवेशनासाठी विमानाने जाणाऱ्यांचे हाल होत आहेत. मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची आयत्यावेळी पर्यायी मार्गाने प्रवासाचे नियोजन करावे लागल्यामुळे धावपळ झाली आहे.हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार ?यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक सरकारला विविध मुद्यांवर घेरण्याच्या प्रयत्नात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने घातलेला घोळ, मुंढव्यातील बेकायदा जमीन खरेदीचा व्यवहार, कथित सिडको जमीन घोटाळा, डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण या मुद्यांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असतील. तर सरकार या प्रकरणांमध्ये स्वतःची बाजू मांडेल तसेच महत्त्वाच्या विषयांवर विधिमंडळात सकारात्मक चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न करेल. विरोधक अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी आग्रह धरण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन कदाचित अधिवेशनाचा सर्वाधिक काळ खर्ची जाण्याची शक्यता आहे.राज्य निवडणूक आयोगाने २ डिसेंबरच्या मतदानाला जेमतेम ४८ तास उरले असताना निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल केला. या मुद्यावर विधिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. मतदार यादी, मतदारसंघांचे वाटप या मुद्यांवरुन सभागृहात वातावरण तापण्याची शक्यता आहे.यंदा पहिल्यांदाच विधानसभेत आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षनेताच नसल्यामुळे विरोधकांचे नेतृत्व कोण करणार याविषयी उत्सुकता आहे. 'इंडिगो'च्या गोंधळामुळे किती नेते वेळेत पोहोचणार याविषयी संभ्रम आहे. चहापानावेळी किती नेते नागपूरमध्ये असतील हे अद्याप समजलेले नाही. पण मागील काही अधिवेशनांच्या वेळी घडलेल्या घटना बघता शासकीय चहापानावर विरोधक बहिष्कार घालण्याची शक्यता आहे.
धक्कादायक! चक्क पोलिसांच्या घरी चोरी, काय आहे नेमकं प्रकरण?
बुलढाणा: बुलढाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरीचा गुन्हा करणाऱ्या चोरट्यांना धडा शिकवण्याचे काम करणाऱ्या पोलिसांच्या घरातच चोरी झाल्याचे समोर आले आहे. एक, दोन नाही तर तब्बल पाच पोलीसांच्या घरातील सोने आणि रोख रक्कम चोरांनी लंपास केली आहे. पोलिसांच्या घरातच चोरी झाल्याचा प्रकार घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे बुलढाणा शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची चर्चा सुरू आहे. चोरी सोडून बुलढाण्यात रोज नवनवीन गुन्हेगारीच्या घटनांनी सुद्धा डोके वर केले आहे. त्यामुळे बुलढाण्यातील सर्वसामान्य नागरिक भयभीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.https://prahaar.in/2025/12/07/finally-smriti-breaks-her-silence-decides-not-to-marry-palash/मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी बुलढाणा शहरातील पोलिस वसाहतीमधील पाच पोलिस कर्मचाऱ्यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश करत चोरी केली. चोरांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि रोख रक्कम चोरली आहे. या प्रकरणामुळे जनतेच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीसांचीच घरे सुरक्षित नसल्याचा प्रकार समोर आला आहे. आयएसआय गजानन वारे, पोलिस हेड कॉन्स्टेबल रिंढे, पोलिस कॉन्स्टेबल रुबीना शेख, पोलिस कॉन्स्टेबल ठाकूर यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून लाखो रुपयांचा मुद्देमाल व रोख चोरली. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूलाच ही चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस सुद्धा सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.
‘मिर्झापूर’मधील अभिनेत्रीची ‘ॲनिमल’चित्रपटावर टीका; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Rasika Duggal | अभिनेता रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा धुमाकूळ घातला. मात्र या चित्रपटाबाबत अनेक संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या. अतिशय क्रूर हिंसा दाखवणारे सीन्स दाखवण्यात आल्याचे म्हंटले. अलीकडेच अभिनेत्री रसिका दुग्गलने ‘ॲनिमल’ सिनेमाबाबत केलेले विधान चर्चेत आले आहे. ‘द वुमन एशइया इव्हेंट’मध्ये ‘मिर्झापूर’सीरिजमध्ये पंकज त्रिपाठींच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री रसिका दुग्गलने ‘ॲनिमल’सिनेमावर म्हंटले […] The post ‘मिर्झापूर’मधील अभिनेत्रीची ‘ॲनिमल’ चित्रपटावर टीका; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल appeared first on Dainik Prabhat .
अखेर स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं ; स्वतः पोस्ट करत म्हणाली,”याविषयी मी स्वतः बोलणं”
smriti mandhana-palash muchhal। भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न अखेर मोडलेआहे. स्मृतीने स्वत: माहिती देत याबाबत घोषणा केली आहे.स्मृतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. मी एक गोष्ट स्पष्ट करते लग्न रद्द झालंय smriti mandhana-palash muchhal। स्मृतीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, “गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबद्दल […] The post अखेर स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं ; स्वतः पोस्ट करत म्हणाली,”याविषयी मी स्वतः बोलणं” appeared first on Dainik Prabhat .
गोवा सिलिंडर स्फोट प्रकरणात मोठी कारवाई ! क्लब मालकाला अटक ; आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू
Goa Fire। गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे आणि सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत आणि सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोक आणि संताप व्यक्त होत आहे. दंडाधिकारी चौकशीचे आदेश Goa Fire। या घटनेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोशल मीडिया […] The post गोवा सिलिंडर स्फोट प्रकरणात मोठी कारवाई ! क्लब मालकाला अटक ; आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
अखेर स्मृतीने मौन सोडले, पलाशसोबत लग्न न करण्याचा निर्णय!
मुंबई: मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. स्मृतीने अखेर या विषयावर मौन सोडले असून लग्न रद्द झाल्याचे सोशल मीडीयाद्वारे सांगितले आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम खात्यावर स्टोरी टाकत लिहले आहे, गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याभोवती अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत आणि मला वाटते की सध्या मी बोलणे महत्त्वाचे आहे. मी एक अतिशय खाजगी व्यक्ती आहे असून मला असेच राहायचे असले तरी मला हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की लग्न रद्द करण्यात आले आहे.
अभिनेता गुलशन देवैय्या समंथासोबत स्क्रिन शेअर करणार; लवकरच ‘या’चित्रपटाच्या शुटिंगला होणार सुरूवात
Actor Gulshal Devaiah : अभिनेता गुलशल देवैया बॅालिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. कांतारा चॅप्टर १ मध्ये गुलशन खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. त्याने या चित्रपटात कुलशेखर ही खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले. या चित्रपटाद्वारे गुलशने कन्नड चित्रपटसृष्टीत पदापर्ण केले. यानंतर आता तो टॅालिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेत्री […] The post अभिनेता गुलशन देवैय्या समंथासोबत स्क्रिन शेअर करणार; लवकरच ‘या’ चित्रपटाच्या शुटिंगला होणार सुरूवात appeared first on Dainik Prabhat .
भारताला खुणावतेय रशियन बाजारपेठ
२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्टनवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातले व्यापारी संबंध अधिक दृढमूल करण्यासाठी पुतिन यांचा दौरा लाभकारी ठरणार आहे. पुतिन यांच्या भारत दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातल्या विविध क्षेत्रातल्या सहकार्याविषयीचे मोठे करार होणार आहेत. यामध्ये औषध निर्मिती, वाहन निर्मिती, कृषी उत्पादने, त्याचबरोबर सागरी वाहतूक उत्पादने यांचाही समावेश असून भारताला यानिमित्ताने रशियन बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे.खाद्यान्न, औषधे, दैनंदिन वापराच्या वस्तूंची रशिया मोठ्या प्रमाणावर आयात करते. तिथे भारताला बरीच व्यवसाय संधी असून, २०३० पर्यंत निर्यात ३५ अब्ज डॉलरवर नेता येऊ शकते, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हने (जीटीआरआय) म्हटले आहे.रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर आले आहेत. यात दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याचा निश्चय करण्यात आला. दोन्ही देशांनी २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या भारत आणि रशियातील द्विपक्षीय व्यापार ७० अब्ज डॉलर आहे. त्यातील भारताची निर्यात अवघी ५ अब्ज डॉलर आहे, तर भारताच्या आयातीत कच्च्या तेलाचा वाटा सर्वाधिक आहे.आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताने रशियाला ४.९ अब्ज डॉलरच्या वस्तूंची निर्यात केली असून, ६३.८ अब्ज डॉलरची आयात केली आहे. भारताची रशियाशी असलेली व्यापारी तूट तब्बल ५८.९ अब्ज डॉलर आहे. या द्विपक्षीय व्यापारात कच्च्या तेलाचा वाटा ५०.३ अब्ज डॉलर इतका प्रचंड आहे. दोन्ही देशांमध्ये प्रमुख व्यापार हा केवळ इंधन असल्याचे दिसून येते. रशिया आयात करीत असलेल्या बऱ्याच क्षेत्रात भारताची लक्षणीय निर्यात आहे. रशियाच्या आयातीतील अशी मर्मस्थळे शोधून निर्यातविस्तार करता येईल, असे जीटीआरआयच्या अहवालात म्हटले आहे. कृषी क्षेत्राला भरपूर वाव!रशिया दरवर्षी २०२.६ अब्ज डॉलरच्या वस्तूंची आयात करते. त्यातील अवघा २.४ टक्के वाटा भारताचा आहे. रशिया १३ अब्ज डॉलरच्या कृषी उत्पादनांची आयात करते. त्यात फळे, तेल, मांस आणि दुग्धोत्पादनांचा समावेश आहे. त्यातील केवळ २५ कोटी डॉलरची बाजारपेठ भारताकडे आहे. कृषी क्षेत्र भारताचे बलस्थान आहे. त्यामुळे इथे बरीच व्यापार संधी आहे. रशिया सुगंधी द्रव्ये आणि आवश्यक तेलावर ३.१३ अब्ज डॉलर, तर साबण, कपडे धुण्याची पावडर यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या आयातीवर १.०७ अब्ज डॉलर खर्च करते. यातील अवघा तीन ते चार टक्के हिस्सा भारताकडे आहे.याशिवाय कापड, कपडे आणि पादत्राणांच्या आयातीवर रशिया एक अब्ज डॉलर खर्च करते. यातील किरकोळ हिस्सा भारताकडे आहे. याशिवाय जगातील वाहनांचा प्रमुख उत्पादक असलेल्या भारताकडे रशियन वाहन बाजारपेठेचा नगण्य हिस्सा आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा औषध आणि औषधी घटकांचा निर्यातदार देश आहे. रशियाने २०२४ मध्ये ११.८ अब्ज डॉलरच्या औषधांची आयात केली आहे. त्यातील ४१.३५ कोटी डॉलरचा हिस्सा भारताचा आहे.
ठाणे घोडबंदर रोडवर आज वाहतूक कोंडीची शक्यता
दुरुस्तीच्या कामांमुळे जड वाहनांना प्रवेशबंदीठाणे (प्रतिनिधी) :ठाण्याचा घोडबंदर रोडवर उद्या (ता. ७) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. जोडून सुट्ट्या आणि रविवार असल्याने प्रवासासाठी बाहेर पडलेल्यांचे हाल होणार आहेत. हा रस्ता मुंबईतील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे व वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जोडतो. मीरा-भाईंदर पालिकेने फाउंटन हॉटेल ते काजुपाडा दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचे काम जाहीर केले आहे.ठाणे वाहतूक पोलिसांनी सांगितले की हे काम सलग २४ तास सुरू राहणार असून या मार्गावर जड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. हलक्या वाहनांना मात्र मार्ग मोकळा असेल, पण दुरुस्तीच्या ठिकाणाला वळसा घालण्यासाठी त्यांना समोरच्या (विरुद्ध दिशेच्या) मार्गांचा वापर करावा लागेल.संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता, अधिकाऱ्यांनी नागरिकांना प्रवासाची पूर्वतयारी करण्याचे, जास्तीचा वेळ हाती राखून बाहेर पडण्याचे आणि शक्य असल्यास गर्दीच्या वेळा टाळण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक रहिवासी आणि दररोज प्रवास करणाऱ्यांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबई व ठाण्याकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या वाहनांना माजिवडा व्हीवाय जंक्शन आणि कापुरबावडी चौक येथे प्रवेश निर्बंध आहे. अशा वाहनांना खारेगाव टोल नाका, मानकोली, अंजूरफाटा किंवा कशेळीमार्गे वळवले जाईल आणि त्यानंतर अंजूरफाट्याकडे मार्गक्रमण करू शकतील.मुंबईहून मुंब्रा बायपासमार्गे मुंबई-नाशिक महामार्गावरून येणाऱ्या जड वाहनांनाही खारेगाव टोल नाक्यावर निर्बंध आहेत. त्यांना खारेगाव टोल नाका–मानकोली–अंजूरफाटा या मार्गाने वळवले जाणार आहे. नाशिककडून घोडबंदरकडे येणारी वाहने मानकोली येथे थांबवून मानकोली अंडरब्रिजमार्गे अंजूरफाटा मार्गावर वळवली जातील. घोडबंदरकडे जाणारी हलकी वाहने दुरुस्ती क्षेत्रातून समोरच्या लेनचा वापर करून पुढे जाऊ शकतील; मात्र वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.घोडबंदर हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता मानला जातो. दररोज अनेक हलकी आणि अवजड वाहने या रस्त्यावरून ये-जा करतात. यंदा या रस्त्यावर वारंवार खड्डे पडत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे मीरा भाईंदर महापालिकेने चार वेळा या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केले होते. वाहतुकीत केलेल्या बदलामुळे नागरिकांना भीषण वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते. या कोंडीमुळे एका लहान मुलाला आपला जीवही गमवावा लागला होता. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील या वाहतुकीतील बदलामुळे पुन्हा अशी समस्या उद्भवण्याची भीती नागरीक व्यक्त करत आहेत.
अंदमान येथे होणार स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
अंदमान : अंदमान येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर गीताला ११५ हून अधिक वर्ष पूर्ण झाली. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून पोर्ट ब्लेअर येथे ‘सागरा प्राण तळमळला’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने बियोदनाबाद येथे सावरकरांच्या भव्य पुतळ्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात येणार आहे. अंदमानमधील श्री विजया पुरम येथे मुंबईतील ‘व्हॅल्युएबल ग्रुप’च्या वतीने १२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता ‘सागरा प्राण तळमळला’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने, बियोदनाबाद येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.‘
२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार
मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहितीनवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार केले. यात जानेवारी २०२५ पासून हद्दपार केलेल्या ३,२५८ भारतीयांचा समावेश आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितले.पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, मानवी तस्करीच्या प्रकरणांची चौकशी राज्यांनी तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केली आहे. यात पंजाबमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. २०२३ मध्ये ६१७ भारतीयांना आणि २०२४ मध्ये १,३६८ भारतीयांना हद्दपार करण्यात आले, असे मंत्र्यांनी सांगितले. जानेवारी २०२५ पासून अमेरिकेने एकूण ३,२५८ भारतीय नागरिकांना हद्दपार केले आहे. यापैकी २,०३२ भारतीय (अंदाजे ६२.३ टक्के) नियमित व्यावसायिक उड्डाणांनी परतले आणि उर्वरित १,२२६ भारतीय (३७.६ टक्के) यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (आयसीई) किंवा कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन (सीबीपी)द्वारे चालवल्या जाणाऱ्या चार्टर विमानांनी परतले,असे ते म्हणाले.
ग्रामीण भागातही ३० हजार दुबार मतदार
जिल्हा परिषदेच्या ५७ गटातील मतदारांचा समावेशपालघर : मतदार याद्यांमधील दुबार नावावरून सर्वत्र राजकीय वातावरण तापले असताना, पालघर जिल्ह्यातील ५७ जिल्हा परिषद गटांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारयाद्या मध्ये सुद्धा २९ हजार ७७० मतदारांची नावे दुबार असल्याचे समोर आले आहे. त्या अानुषंगाने राज्य निवडणूक आयोग आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतदारांच्या दुबार नावाबाबत प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे.पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५७ गट आणि पंचायत समितीच्या ११४ गणासाठी राखीव जागा आणि महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तसेच आगामी निवडणुकीसाठी मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या सुद्धा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण १२ लाख २२ हजार ९१३ मतदार आहेत. यापैकी ६ लाख १० हजार ९०८ पुरुष मतदार असून, ६ लाख ११ हजार ९४९ महिला मतदारांचा समावेश आहे. यामध्ये जवळपास ३० हजार मतदारांची नावे दुबार आहेत. दरम्यान, पालघर जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ जागा असून , यापैकी ३७ जागा या अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाच्या सदस्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर नागरिकांच्या मागास प्रवर्ग (ओबीसी)साठी १५ आणि अनुसूचित जाती प्रवर्ग (एसटी) साठी १ जागा राखीव ठेवण्यात आली आहे.या जिल्हा परिषदेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी केवळ ४ जागा शिल्लक आहेत. त्यामुळे एकूण ५७ जागांपैकी ५३ जागा या राखीव झाल्या असून, राखीव जागांचे आरक्षण ९३ टक्क्यांवर गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता राखीव जागांची आरक्षण मर्यादा एकूण जागांच्या ५० टक्के मर्यादेत ठेवावी लागणार आहे. परिणामी, पालघर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राखीव जागांचे आरक्षण नव्याने काढणे हाच पर्याय आयोग आणि शासनासमोर आहे. एकंदरीतच पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या जागांची संख्या ही आता २९ च्यावरअसणार नाही.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वसाधारण जागा मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. प्रभागांचे आरक्षण बदलणार असले तरी, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.त्यामुळे मतदार याद्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही. मतदार यादीमध्ये दुबार नाव असलेल्या मतदारांकडून एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याबाबत हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. परिणामी अशा मतदारांचा शोध प्रशासनाकडून घेतल्या जात आहे.नव्या आरक्षणामुळे अनेकांच्या आशा पल्लवीतजिल्हा परिषद निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेले राजकीय आरक्षण ५० टक्क्यांवर गेले असल्याने, या ठिकाणी नव्याने आरक्षण काढण्यात येणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणामध्ये जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सभापतींसह अनेक दिग्गज सदस्यांचे निवडणुकीची तयारी असलेले गट हातून गेले होते. काही ठिकाणी प्रवर्गाची तर काही ठिकाणी महिला आरक्षणाची अडचण अनेक माजी पदाधिकाऱ्यांना निर्माण झाली होती. आता राखीव जागांचे आरक्षण आणि पर्यायाने महिला आरक्षण बदलणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या आवडीच्या गटात निवडणूक लढायला मिळेल या आशेने काही माजी पदाधिकाऱ्यांनी पूर्वीच्याच गटात निवडणुकीची तयारी चालवली आहे.
'धुरंधर'ची बॉक्स ऑफिसवर चलती! दोन दिवसांत ५० कोटींचा टप्पा पार
आदित्य धर यांचा वादग्रस्त धुरंधर अखेर ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीच ५० कोटींचा टप्पा ओलांडला. ही कमाई पहिल्या दिवसापेक्षा जास्त आहे. दरम्यान निर्मात्यांनी धुरंधर २ ची घोषणा केली आहे, जो मार्चमध्ये प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे नाव 'रिव्हेंज' असे आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.धुरंधरचे दोन दिवसांत बॉक्स ऑफिस कलेक्शनबॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी २७ कोटी कमावले. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी आणि विकएंडमुळे या चित्रपटाने एकूण ३१ कोटी कमावले. परिणामी, भारतात चित्रपटाचा निव्वळ बॉक्स ऑफिसवर ५८ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात त्याचे कलेक्शन ७७.३५ कोटींवर पोहोचले असून एकूण कलेक्शन ६९.७५ कोटी असल्याचा अंदाज आहे.https://prahaar.in/2025/12/07/the-finale-of-hindi-bigg-boss-season-19-who-will-engrave-their-name-on-the-trophy/धुरंधर बनवायला २-३ वर्षे लागलीवृत्तानुसार, दिग्दर्शक आदित्य धर यांना 'धुरंधर' हा चित्रपट बनवण्यासाठी सुमारे २-३ वर्षे लागली. त्यांनी प्रथम चित्रपटासाठी व्यापक संशोधन केले आणि नंतर चित्रपटाची स्टारकास्ट अंतिम करण्यासाठी अथक परिश्रम केले. 'धुरंधर' मधील प्रत्येक पात्र अद्वितीय आहे आणि त्याची कथा वेगळी आहे. रणवीर सिंगच्या व्यक्तिरेखेबद्दल सस्पेन्स कायम असला तरी, इतर पात्रे एकमेकांपासून प्रेरित असल्याचे म्हटले जात आहे.'धुरंधर' हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे. तरीही, चित्रपटाचे लक्ष पूर्णपणे रणवीरच्या व्यक्तिरेखेवर आहे, म्हणूनच चाहते त्याच्यावर खूप प्रभावित झाले आहेत. हा चित्रपट देशभक्तीपर म्हणून देखील वर्णन केला जात आहे, ज्यामुळे तो चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. तथापि, धुरंधरचे बजेट २५० कोटी असल्याचे वृत्त आहे, जे पूर्ण होणे अद्याप खूप दूर आहे. त्यामुळे चित्रपट पहिल्या आठवड्यात किती कोटींची कमाई करतो हे पाहणे बाकी आहे.
अमेरिकेसाठी होणार सोशल मीडिया खात्यांची तपासणी; १५ डिसेंबरपासून नियम
न्यूयॉर्क : अमेरिकेत जायचे असेल, तर सोशल मीडियावर जपून पोस्ट करणे गरजेचे आहे. कारण, अमेरिकन व्हिसा मिळवताना सोशल मीडिया तपासला जाणार आहे. आता अमेरिकेने व्हिसासाठी नवे नियम लागू केले. त्यानुसार ज्यांना अमेरिकेचा एचवनबी व्हिसा आणि एच फोर व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या सोशल मिडिया खात्यांची तपासणी केली जाणार आहे. हे नियम १५ डिसेंबरपासून लागू केले जाणार आहेत. एच वन बी व्हिसा आणि एच फोर व्हिसा देण्यासाठी अर्जदारांची सोशल मीडिया खाती तपासली जाणार आहेत. यामुळे ज्या अर्जदारांची खाती प्रायव्हेट असतील ती पब्लिक करावी लागणार आहे. ज्यामुळे अमेरिकन यंत्रणा सोशल मीडिया खाती तपासू शकतात. अमेरिकेविरोधातील विचारांचे समर्थन केले असल्यास व्हिसा मिळणार नाही. अमेरिकेच्या व्हिसा मंजूर करणाऱ्या विभागाकडून अर्जदारांच्या सोशल मीडियावर तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक व्हिसा अर्ज मंजूर करताना राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.
पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष
इस्लामाबाद : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला असून पाकिस्तानमधील चमन आणि अफगाणिस्तानमधील स्पिन बोल्डक या सीमाभागात दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांमध्ये तुफान गोळीबार झाला. यात अनेक मोटारचे गोळे एकमेकांच्या दिशेने फायर करण्यात आले. काही आधुनिक शस्त्रांचा देखील वापर करण्यात आला. यामुळे सीमाभागात तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये सौदी अरेबिया इथं शांततेबाबत चर्चा सुरू होती. ही चर्चा फिसकटल्यानंतर सीमेवर हा गोळीबार सुरू झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानमधील स्पिन बोल्डकमधून पाकिस्तानच्या दिशेने फायरिंग झालं तर पाकिस्तानच्या चमनकडून अफगाणिस्तानच्या दिशेला फायरिंग झालं. सतत होणाऱ्या या फायरिंगमुळे दोन्ही देशातील शेकडो कुटुंबे आपला जीव मुठीत घेऊन सुरक्षित स्थान पळू लागले. स्थानिकांना त्यांचे सामान गोळा करण्याची देखील संधी मिळाली नाही. दिलासादायक बाब म्हणजे या गोळीबारात कोणाचा मृत्यू झाल्याची सध्या वृत्त नाही. मात्र सीमेवर स्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. नेहमीप्रमाणे अफगाणिस्ताननं पाकिस्तानला अन् पाकिस्ताननं अफगाणिस्तानला या संघर्षाला जबाबदार धरलं आहे. अफगाण तालिबानचे प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले की, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी कंधारच्या स्पिन बोल्डक जिल्ह्यात पहिल्यांदा हल्ला केला. त्यामुळं इस्लामिक अमिरातच्या सुरक्षा दलांना त्याचे प्रत्युत्त देणे भाग पडले. दुसरीकडं पाकिस्तान सराकरनं अफगाणिस्तानचे आरोप फेटाळून लावले. पाकिस्तान प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रवक्ते मोशर्फ जैदी यांनी अफगाण सुरक्षा दलांनी सीमेवर येत कारण नसताना गोळीबार केला. त्यांच्या या कृतीनंतर पाकिस्ताननं आपली क्षेत्रीय संप्रभुता आणि आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली.
जगभरातील बालमृत्यूच्या घटनांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी
नवी दिल्ली : जगभरात जवळपास १० लाख मुले पाच वर्षांचे वय गाठण्याआधीच मृत्युमुखी पडली. कुपोषणाशी संबंधित घटक-जसे की कमी वजन, कमी उंची व कुपोषण ही या मृत्यूंमागील प्रमुख कारणे असल्याचे नव्या अभ्यासात नमूद केले आहे. भारतात अशा प्रकारच्या १ लाखांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे.नायजेरियात बालवाढ अपयशाशी संबंधित १.९९ लाख बालमृत्यू नोंदले गेले असून ते जगात सर्वाधिक आहेत. त्याखालोखाल भारताचा दुसरा क्रमांक आहे. तिसऱ्या क्रमांकावर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोचा क्रमांक लागतो, जिथे पन्नास हजाराहून अधिक मृत्यू नोंदले गेले असल्याचे ‘द लॅन्सेट चाइल्ड अँड अडोलेसेंट हेल्थ’ जर्नलमध्ये प्रसिद्ध केलेल्या निष्कर्षांमधून समोर आले आहे. वयानुरूप मुलांची वाढ न झाल्यास मुलांमध्ये मृत्यू आणि अपंगत्वाचा धोका अधिक वाढतो. श्वसनसंस्थेचे संसर्ग, अतिसार, मलेरिया आणि गोवर यांसारख्या आजारांमध्ये हा धोका अधिक असल्याचे संशोधकांनी सांगितले. या विश्लेषणासाठी २०२३ मधील ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडीमधील डेटा वापरण्यात आला असून, जगातील २०४ देश आणि प्रदेशांमधील आजार, जखमा आणि विविध जोखमींमुळे झालेल्या आरोग्यहानीचे हे सर्वात अलीकडील मूल्यांकन आहे. अपुरे पोषण, अन्नसुरक्षेचा अभाव, हवामान बदल, स्वच्छतेची कमतरता किंवा युद्ध, असे ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी’चे सह-लेखक आणि वॉशिंग्टन विद्यापीठातील प्रोफेसर बोबी रेनर यांनी सांगितले. म्हणूनच सर्व प्रदेशांमध्ये लागू होईल अशी एकच रणनीती या समस्येवर उपाय ठरू शकत नाही, ते पुढे म्हणाले. या वयोगटातील १२ टक्के मृत्यूंमागे कमी वजन हे प्रमुख कारण होते. दक्षिण आशियात आढळलेल्या आतड्यांच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ७९ टक्के, आणि श्वसन संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ५३ टक्के प्रकरणे ‘चाइल्ड ग्रोथ फेल्युअर’शी जोडलेली होती. कमी उंचीची चिन्हे जन्मानंतरच्या पहिल्या तीन महिन्यांतच दिसतात, यावरून गर्भधारणेआधी आणि गर्भावस्थेत हस्तक्षेपांची गरज अधोरेखित होते, असे संशोधकांनी सांगितले.
इजिप्तमध्ये सापडले तीन हजार वर्षांपूर्वीचे ‘सोन्याचे शहर’
उत्खननात सोने वितळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या भट्ट्यांचा समावेशकैरो : जगभरातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ हजारो वर्षांपूर्वीच्या कलाकृतींचा शोध घेत आहेत. अशातच इजिप्तमधील पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या पथकाने मोठे संशोधन केले आहे. संशोधकांना ३,००० वर्षे जुने ‘सोन्याचे शहर’ सापडले आहे, जिथे एकेकाळी सोन्याचे खाणकाम केले जात असे. इजिप्तच्या भूदृश्याने जगभरातील पुरातत्त्वशास्त्रज्ञांना भुरळ घातली आहे. हजारो वर्षे जुन्या संस्कृतीचे घर असलेल्या या देशात अजूनही असंख्य रहस्ये आहेत. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी त्याच्या मातीत खोलवर दडलेले असेच एक रहस्य उलगडले आहे. अनेक वर्षांच्या बारकाईने उत्खननानंतर त्याचे पुनर्संचयितीकरण आता पूर्ण झाले आहे.२०२१ मध्ये इजिप्तशास्त्रज्ञांना ‘हरवलेले सुवर्ण शहर’ असे म्हटले जाणारे शहर सापडले होते. त्यावेळेपासून तिथे हे संशोधन सुरू होते. इजिप्तच्या लाल समुद्रातील गव्हर्नरेटमधील मार्सा आलमच्या नैऋत्येस असलेले जबल सुक्री हे ठिकाण १००० इ.स.पूर्व पासून औद्योगिक क्रियाकलापांचे केंद्र होते. अलीकडील संशोधनातून असे दिसून आले आहे की, सोन्याच्या खाणकाम आणि प्रक्रियेत या जागेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, ज्यामध्ये सोने काढण्यासाठी रचना करण्यात आल्या होत्या. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी या जागेला अलीकडच्या काळात झालेल्या सर्वात मोठ्या पुरातत्त्वीय शोधांपैकी एक म्हटले आहे. इजिप्तच्या सर्वोच्च पुरातन वास्तू परिषदेचे सरचिटणीस डॉ. मोहम्मद इस्माईल खालेद म्हणाले की, उत्खननात सोन्याच्या प्रक्रिया स्थळाचे अवशेष आढळले आहेत. ज्यामध्ये दळणे आणि क्रशिंग स्टेशन, गाळण्याचे बेसिन आणि सोने वितळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या भट्ट्यांचा समावेश आहे. या संशोधानवरून असे दिसून येते की, हे ठिकाण इजिप्तच्या प्राचीन सोन्याच्या व्यापाराचा एक महत्त्वाचा भाग होता. या ठिकाणी टॉलेमिक काळातील नाणीदेखील सापडली आहेत, ज्यावरून असे सूचित होते की, हे ठिकाण बराच काळ सक्रिय होते. इजिप्तचे पर्यटन आणि पुरातन वास्तू मंत्री शेरीफ फाथी म्हणाले की, उत्खननामुळे प्राचीन इजिप्शियन खाण कामगारांच्या अभियांत्रिकी आणि तांत्रिक कौशल्यावर प्रकाश पडतो, ज्यांनी कठोर वाळवंटातील लँडस्केपमध्ये सोने काढण्यासाठी अत्याधुनिक पद्धती विकसित केल्या.
नगर परिषदेच्या निकालापूर्वीच महापालिकेसाठी मनोमिलन
वसई-विरारमध्ये महायुती एकत्र लढण्याचे संकेतगणेश पाटील विरार : पालघर जिल्ह्यात नुकतेच पार पडलेल्या नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी वसई-विरार महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढण्याचे संकेत दिले आहेत. महापालिका निवडणुकीच्या अानुषंगाने दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक शनिवारी वसई-विरारमध्ये पार पडली आहे.राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. हे गल्लीपासून तर दिल्लीतील राजकारणातील विविध घडामोडींवरून अनेकदा स्पष्ट झाले आहे. राज्यात नुकतेच नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती महायुतीच्या फुटीरतेची. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांनीच आपल्या राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी एकमेकांविरुद्ध प्रचार केला. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली प्रचार सभा तर राज्याच्या कानाकोपऱ्यात गाजली. अहंकार आणि लंका दहन या विषयावर शिंदे आणि फडणवीस यांनी केलेले भाष्य महाविकास आघाडीतील काही नेत्यांसाठी आयते कोलीत हाती लागल्यासारखे होते.कार्यकर्त्यांमध्ये ही लढाई निकालानंतर सुद्धा सुरूच राहणार असली तरी, वरिष्ठ नेत्यांकडून मात्र निवडणूक संपली विषय संपला असाच संदेश दिल्या जात आहे. तथापि, वसई विरार महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आहे. एकत्र लढून महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी या बैठकीत ऊहापोह करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वसई विरारचे भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार राजन नाईक आणि शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत ही बैठक झाल्याने, महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत.या बैठकीसाठी आमदार विलास तरे, शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश तेंडोलकर, वसंत चव्हाण, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा पाटील, माजी जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील, शिवसेना जिल्हा सरचिटणीस अतुल पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सुदेश चौधरी उपस्थित होते.
देवोलीना भट्टाचार्जीने खरेदी केलं नवं घर; पतीच्या कृतीने जिंकली चाहत्यांची मनं
Devoleena Bhattacharjee | टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने मुंबईत नवं घर खरेदी केले आहे. तिने हिंदू रितीरिवाजांनुसार पती शाहनवाज शेखसोबत सर्व विधी पूर्ण केले. ज्याचे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या सोहळ्याला शाहनवाजने आरती देखील केली आणि देवाची मूर्ती हातात धरुन त्याची स्थापना देखील केली. त्याची ही कृती पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. […] The post देवोलीना भट्टाचार्जीने खरेदी केलं नवं घर; पतीच्या कृतीने जिंकली चाहत्यांची मनं appeared first on Dainik Prabhat .
मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर
बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणारमुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने मोठे पाऊल उचलले आहे. अनधिकृपणे उभ्या राहणाऱ्या झोपड्यांवर ‘नेत्रम’ या खास पोर्टलच्या माध्यमातून वॉच ठेवले जाणार आहे. यामुळे मुंबई पालिका, जिल्हाधिकारी आणि म्हाडासह विविध प्राधिकरणांच्या जागांवर नव्याने होणाऱ्या अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन तातडीने कारवाई करणे शक्य होणार आहे.झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यानसार खासगी विकसक, सरकारी आस्थापनांच्या माध्यमातून झोपडीधारकांचे पुनर्वसन केलेजात आहे. त्यामुळे झोपड्यांची संख्या कमी होणे अपेक्षित असतानाही त्यामध्ये वरचेवर भर पडत आहे. त्याची गंभीर दखल घेत एसआरए प्राधिकरणाने मुख्य अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गादर्शनाखाली नव्याने उभा राहणाऱ्या अनधिकृत झोपड्यांवर नजर ठेवता यावी, त्याचा शोध घेऊन सहजपणे कारवाई करता यावी म्हणून भास्कराचार्य नॅशनल इन्स्टट्युट ॲण्ड जिओ-इन्फॉर्मेटिक्स इन्स्टिट्यूटच्या (बीआयएसएजी-एन) या गुजरातमधील तांत्रिक संस्थेच्या मदतीने नेत्रम हे पोर्टल विकसित केले असून, ते लवकरच कार्यरत केले जाणार आहे. त्यासाठी एसआरए मुख्यालयात नेत्रम कक्ष सुरू केला आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी कधी अनधिकृत झोपड्या उभा राहिल्या आहेत, त्याचे प्रमाण किती आहे ही माहिती सहजपणे कार्यालयात बसून पोर्टलवर पाहता येणार असल्याची माहिती एसआरएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.नेत्रमचे कार्य आणि कारवाई प्रक्रियानेत्रम पोर्टल एक मोबाईल ॲपशी संलग्न असेल, ज्यामुळे कारवाईची प्रक्रिया जलद होईल. पोर्टलशी संलग्न मोबाईल ॲप अधिकाऱ्यांच्या मोबाईलमध्ये उपलब्ध असेल.अधिकारी ठरवून दिलेल्या कार्यक्षेत्रात नेव्हिगेशनच्या आधारे अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करू शकतील. अनधिकृत बांधकामाचे मोजमाप, त्याचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव इत्यादी माहिती मोबाईल ॲपवर भरून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केली जाईल. वरिष्ठ अधिकारी आलेल्या माहितीची पोर्टलवरील माहितीशी पडताळणी करून बांधकाम मालकाच्या नावाने कारवाईची ऑनलाइन नोटीस तत्काळ काढू शकणार आहेत.
हिंदी 'बिग बॉस सीझन १९'चा अंतिम सोहळा! कोण कोरणार ट्रॉफिवर नाव?
तीन महिन्यांहून अधिक काळ नाट्यमय संघर्ष, युती आणि भावनिक चढ-उतारांनंतर, 'बिग बॉस १९' चा महाअंतिम सोहळा आज पार पडणार आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या या रिअॅलिटी शोमध्ये आता फक्त पाचच स्पर्धक शिल्लक आहेत, त्यापैकी एक ट्रॉफी आणि भरघोस रोख बक्षीस घेऊन निघून जाईल. भारतातील सर्वाधिक पाहिलेला रिअॅलिटी शो काही तासांतच त्याचा विजेता निवडेल. महत्त्वाचे म्हणजे बॉलीवूड स्टार कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे त्यांच्या आगामी तू मेरी मैं तेरा या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या अंतिम सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.बिग बॉस १९ चा शेवट कधी आणि कुठे पाहायचा?७ डिसेंबर रोजी होणारा हा अंतिम सामना एक शानदार संध्याकाळ असण्याची अपेक्षा आहे. ज्यामध्ये अनेक भावनिक क्षणांचा समावेश असेल. प्रेक्षक रात्री ९:०० वाजता जिओ हॉटस्टारवर हा कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीम करू शकतात, तर टीव्हीवर पाहणारे रात्री १०:३० वाजता कलर्स टीव्हीवर पाहू शकतात.शेवटचे पाच स्पर्धकमूळ १८ स्पर्धकांपासून ते टॉप पाच फायनलिस्टपर्यंत, गौरव खन्ना, प्रणित मोरे, फरहाना भट्ट, अमाल मलिक आणि तान्या मित्तल हे विजेत्याच्या शर्यतीत आहेत. सुरुवातीच्या मतदानाच्या पद्धतींवरून असे दिसून आले की गौरव, फरहाना आणि अमाल हे प्रबळ दावेदार म्हणून उदयास आले आहेत, परंतु रिअॅलिटी टेलिव्हिजनमध्ये काहीही घडू शकते.बिग बॉस १९ च्या विजेत्याला काय मिळेल?बिग बॉस १९ च्या विजेत्याला काय मिळेल?कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी अधिकृतपणे बक्षीस रकमेची पुष्टी केलेली नाही. परंतु अनेक माध्यम रिपोर्ट्सनुसार या सीझनचा विजेता ५० लाख इतकी मोठी रक्कम जिंकेल. कार्यक्रमाची लोकप्रियता पाहता, ही रक्कम बिग बॉस ट्रॉफी जिंकण्याचे मोठे दावे आणि प्रतिष्ठा दोन्ही दर्शवते.
चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट
मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हालमुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची माध्यमिक शाळा नसल्याचा फटका येथील विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक विद्यार्थ्यांना खासगी शाळेची वाट धरावी लागत आहे. मात्र भरमसाठ शुल्क असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरिता शासकीय शाळेसाठी पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.चेंबूर येथील भारतनगर परिसरातील माहुल गाव, गव्हाणपाडा, गडकरी खाण, विष्णूनगर, म्हाडा कॉलनी, अयोध्यानगर, शंकर देऊळ, आणिक गाव, मारवली गाव, रामनगर, कोंकणनगर, चेंबूर कॅम्प परिसरातील एकूण लोकसंख्या सहा ते आठ लाख आहे. भारतनगर, माहुल व अन्य परिसरात एमएमआरडीए वसाहत आणि झोपडपट्टी भागात बहुसंख्य मराठी भाषिक व कामगारवर्ग राहतो. या परिसरात खासगी इंग्रजी शाळा, आंतरराष्ट्रीय शाळा, पालिकेची पब्लिक शाळा आणि मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा आहेत; परंतु मराठी माध्यमाची माध्यमिक शाळा नाही. त्यामुळे पालकवर्ग, विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.पालकांना खासगी शाळेचे भरमसाठ शुल्क भरणे परवडत नाही. त्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना चार ते पाच किलोमीटर दूर असलेल्या चेंबूर नाका येथील पालिकेच्या मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळेचा आधार घ्यावा लागत आहे. या त्रासामुळे काही विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाला रामराम ठोकला आहे.पालिका, एमएमआरडीए प्रशासन माहुल, वाशी नाका परिसरातील इमारतीत प्रकल्पग्रस्त रहिवाशांचे पुनर्वसन करते. मात्र लोकसंख्येनुसार कोणतीही सुविधा देत नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. दुसरीकडे मात्र मराठी माध्यमाच्या शाळांची गळचेपी केली जात आहे, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या परिसरात माध्यमिक शाळा सुरू करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. दरम्यान, याबाबत शिक्षण अधिकारी सुजाता खरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
Trudeau-Katy Perry Relationship। अमेरिकन पॉप स्टार केटी पेरीने अखेर तिच्या वैयक्तिक नात्याबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तिने इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी असलेले तिचे नाते मैत्रीच्या पलीकडे गेले आहे. पोस्टमध्ये दोघेही एकत्र आनंदी दिसत आहेत, ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना आणखी बळ […] The post अखेर कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो-केटी पेरीच्या नात्याचा खुलासा ; स्वतः पोस्ट शेअर करत दिली माहिती appeared first on Dainik Prabhat .
दोन्ही सभागृहांमधून विरोधी पक्षनेता पद गायब; महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच घटना, काय आहे नियम?
Maharashtra winter session 2025 | महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अधिकृत विरोधी पक्षनेता नसल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. 288 सदस्यांच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करण्यासाठी किमान 29 आमदार असणं आवश्यक आहे. परंतु महाविकास आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाकडे काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट स्वतंत्रपणे इतके संख्याबळ नाही. महाराष्ट्राच्या […] The post दोन्ही सभागृहांमधून विरोधी पक्षनेता पद गायब; महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच घटना, काय आहे नियम? appeared first on Dainik Prabhat .
नागपूरमध्ये सोमवारपासून हिवाळी अधिवेशन, कोणते मुद्दे गाजणार ?
नागपूर : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सोमवार ८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. राज्यात २ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आहे. आता २० डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान आहे. मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. यामुळे राज्यात आचारसंहिता लागू आहे. या वातावरणातच जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार हे अधिवेशन जेमतेम आठवडाभर असेल. अधिवेशनाची सुरुवात सोमवार ८ डिसेंबर रोजी होईल.यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक सरकारला विविध मुद्यांवर घेरण्याच्या प्रयत्नात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने घातलेला घोळ, मुंढव्यातील बेकायदा जमीन खरेदीचा व्यवहार, कथित सिडको जमीन घोटाळा, डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण या मुद्यांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असतील. तर सरकार या प्रकरणांमध्ये स्वतःची बाजू मांडेल तसेच महत्त्वाच्या विषयांवर विधिमंडळात सकारात्मक चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न करेल. विरोधक अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी आग्रह धरण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन कदाचित अधिवेशनाचा सर्वाधिक काळ खर्ची जाण्याची शक्यता आहे.राज्य निवडणूक आयोगाने २ डिसेंबरच्या मतदानाला जेमतेम ४८ तास उरले असताना निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल केला. या मुद्यावर विधिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. मतदार यादी, मतदारसंघांचे वाटप या मुद्यांवरुन सभागृहात वातावरण तापण्याची शक्यता आहे.यंदा पहिल्यांदाच विधानसभेत आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षनेताच नसल्यामुळे विरोधकांचे नेतृत्व कोण करणार याविषयी उत्सुकता आहे. 'इंडिगो'च्या गोंधळामुळे किती नेते वेळेत पोहोचणार याविषयी संभ्रम आहे. चहापानावेळी किती नेते नागपूरमध्ये असतील हे अद्याप समजलेले नाही. पण मागील काही अधिवेशनांच्या वेळी घडलेल्या घटना बघता शासकीय चहापानावर विरोधक बहिष्कार घालण्याची शक्यता आहे.राज्यात विरोधी पक्षनेता नसल्याने कोणालाही विरोधी पक्षनेत्याचा बंगला दिलेला नाही. नागपूरमध्ये विरोधकांची पत्रकार परिषद काँग्रेसच्या कार्यालयात होणार असल्याचे वृत्त आहे.
‘अयोध्या बस झाँकी है, काशी-मथुरा बाकी है’: योगी आदित्यनाथ
सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे कामकाज चालणारनागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार (८ डिसेंबर) पासून नागपुरात सुरू होणार आहे. हे अधिवेशन रविवार (१४ डिसेंबर) पर्यंत चालेल. १३ डिसेंबर शनिवार व १४ डिसेंबर रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे कामकाज घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने अधिवेशनावर आचारसंहितेची छाप दिसून येत आहे. यात कोणत्याही घोषणा होणार नसल्या तरी सरकारी कामकाज जोरात पूर्ण केले जाण्याची शक्यता आहे. सहा अध्यादेशांसह ११ विधेयकांचा अजेंडा असला तरी विधेयकाच्या यादीत अजून वाढ होण्याची शक्यता व्यक्त आहे.शासनाने जाहीर केलेल्या सहा अध्यादेशांचे विधेयकांमध्ये रूपांतर या अधिवेशनात ठरणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था (दुसरी सुधारणा), महाराष्ट्र दुकानं व आस्थापना, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन, महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व एकत्रिकरण, मुंबई महापालिका, महाराष्ट्र महापालिका व नगर परिषद-नगरपंचायतीं व औद्योगिक नागरी (सुधारणा) याचा समावेश आहे.पाच नवीन विधेयकांची नोंद होणार?शासनाने या अधिवेशनात ५ नवीन विधेयकांची नोंद केली आहे. यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता विधेयक, महाराष्ट्र जनविश्वास विधेयक, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था विधेयक, महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध विधेयक, महाराष्ट्र (तिसरी पुरवणी) विनियोजन विधेयकांचा समावेश आहे. या विधेयकांमध्ये महसूल, सामाजिक सुरक्षाव्यवस्था, वित्त व्यवस्थापन, भीकवृत्ती नियंत्रण आणि विश्वस्त व्यवस्थेतील पारदर्शकता वाढविणारी तरतुदी असल्याने त्यांची सर्वदलीय स्तरावर सखोल चर्चा अपेक्षित आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!
परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणारमुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने प्रयत्न सुरु केले राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिल २०२६च्या पहिल्या आठवड्यात सरकारकडे जमा होणार आहे. त्यानंतर ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करण्यात येईल, असे ते म्हणाले.कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले की, ही कमिटी कर्जमाफीची रूपरेषा निश्चित करणार असून कोणत्या घटकांचा समावेश करायचा आणि शेतकऱ्यांना मदत कशी दिली जाणार याबाबत निर्णय घेणार आहे. ‘एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल मिळाल्यावर आम्ही कर्जमाफीसंदर्भात अंतिम निर्णय घेऊ,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीवर परिणाम झाला असून १ कोटी ३१ लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. १ कोटी २ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २८ जीआर काढले आहेत. नुकसानीचा अहवाल केंद्राकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारने तातडीने मदत देत शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. केवायसी प्रक्रियेवरही युद्ध पातळीवर काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.कर्जमाफी प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांना वेळेत लाभ मिळेल असा विश्वास कृषिमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
Facebook post of Chhatrapati Sambhajiraje : दुर्गराज रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आज भग्नावस्थेत आहे. त्याचे संवर्धन करायचे म्हटले तरी पुरातत्व विभागाच्या अगणित नियम आणि अटींचे अडथळे आहेत. अगणित बैठका, वारंवार पाठपुरावा आणि लेखी परवानग्या घेतल्याशिवाय पुरातत्त्व विभाग रायगड विकास प्राधिकरणाला गडावरील एक दगडही हलवू देत नाही. पण रोपवे कंपनीस मात्र रायगडावर विनापरवानगी हॉटेल, रेस्टोरेंट, […] The post महाराजांच्या गडावर व्यावसायिक कंपनीला कुणाचे पाठबळ ? छत्रपती संभाराजेंची पोस्ट चर्चेत म्हणाले ” इतके धाडस…” appeared first on Dainik Prabhat .
Shirur News : टाकळी हाजी औटपोस्टमध्ये पोलीस अधिकारी दाखवा अन् बक्षीस मिळवा!
शिरूर : शिरूर पोलिस ठाणे अंतर्गत टाकळी हाजी पोलीस औटपोस्ट हद्दीतील गावांमध्ये अवैध धंदे, चोरी, अपघात आणि हाणामारीच्या घटनांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे उघड दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला आहे. औटपोस्टसाठी नेमणुकीवर असलेले अधिकारी प्रत्यक्षात टाकळी हाजी येथे फिरकतच नसून ते शिरूरमध्येच बसत असल्याने अनेकांना […] The post Shirur News : टाकळी हाजी औटपोस्टमध्ये पोलीस अधिकारी दाखवा अन् बक्षीस मिळवा! appeared first on Dainik Prabhat .
“जगात मंदीची चर्चा होते तेव्हा भारत विकासाची कहाणी लिहितो” ; पंतप्रधान मोदींचा जगाला संदेश
PM Modi on GDP। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, भारत आज जगात एक नवीन ओळख निर्माण करत आहे आणि आत्मविश्वासाने पुढे जात आहे. ते म्हणाले की, “दीर्घ काळाच्या गुलामगिरीमुळे भारताचा आत्मविश्वास कमकुवत झाला होता, परंतु आता देश या मानसिकतेवर मात करत आहे आणि नवीन संकल्प आणि नवीन उर्जेने प्रगतीकडे वाटचाल करत आहे.” […] The post “जगात मंदीची चर्चा होते तेव्हा भारत विकासाची कहाणी लिहितो” ; पंतप्रधान मोदींचा जगाला संदेश appeared first on Dainik Prabhat .
जांबुत : शिरूर तालुक्याचा बेट भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. अवैध दारू विक्री, ताडी विक्रीसह काही ठिकाणी चालू असलेल्या मटका, जुगार यावर पोलीस प्रशासनाचा अंकुश राहिला नसल्याचे दिसून येत आहे. अनेक दारू विक्री अड्डयावर सकाळच्या प्रहरी दारूचे सेवन करण्यासाठी मोठी रांग लागताना दिसत असुन याचा परिसरातील महिलांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा […] The post शिरुर तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट! पोलिस प्रशासनाकडून कारवाई करण्यास टाळटाळ? नेमकं चाललयं तरी काय? appeared first on Dainik Prabhat .
Nitesh Rane : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२६ मध्ये होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर येथे संत साधू येणार आहे. त्यामुळे येथे तयारीला वेग आला असून, त्यांच्या निवासाच्या सोईसाठी तपोवनात व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी तपोवन परिसरातील १८०० ते १८२५ झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाला पर्यावरणप्रेमींनी कडाकडून विरोध दर्शवला आला असून, मराठी कलाकारही वृक्षतोडीस विरोध […] The post “त्यांची काय अवस्था झालेली आहे हे त्यांनी त्यांच्या घरातच पाहावं”; नितेश राणेंनी ठाकरे बंधूंना पुन्हा डिवचलं, नेमकं काय म्हणाले? appeared first on Dainik Prabhat .
इंडिगोचा गोंधळ अन् हिवाळी अधिवेनालाही फटका; मंत्री, आमदारांची नागपूरमध्ये पोहचण्यासाठी उडाली तारांबळ
Nagpur Winter Session 2025 | इंडिगो एअरलाईन्सच्या सेवा विस्कळीत झाल्याने त्याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. इंडिगोच्या गोंधळाचा मोठा फटका हिवाळी अधिवेशनालाही बसला आहे. या विस्कळीत सेवेमुळे अधिवेशनात सहभागी होणारे मंत्री, आमदार, अधिकारी तसेच विविध कारणांसाठी नागपूरकडे येणारे सामान्य नागरिक यांच्यावर थेट परिणाम झाला आहे. अधिवेशन सोमवार, ८ डिसेंबरपासून सुरू होत असल्याने रविवारी […] The post इंडिगोचा गोंधळ अन् हिवाळी अधिवेनालाही फटका; मंत्री, आमदारांची नागपूरमध्ये पोहचण्यासाठी उडाली तारांबळ appeared first on Dainik Prabhat .
अर्पोरा: गोव्यातील अर्पोरा गावातील एका नाईट क्लबमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास भीषण आग लागली. बर्च बाय रोमियो लेन असे या रेस्टॉरंटचे नाव असून गोव्यातील नाईट क्लबसाठी ते प्रसिद्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे झालेल्या या दुर्घटनेत तेवीस जणांचा मृत्यू झाला, ज्यात चार पर्यटक आणि क्लबचे १९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ते रेस्टॉरंटच्या आतमध्ये गेले तेव्हा धुराचे लोट आणि जमिनीवर पसरलेले मृतदेह दिसले.या घटनेवर दुःख व्यक्त करताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मृतांच्या कुटुंबियांना धीर दिला आहे. त्यांनी सांगितले की, ही राज्याच्या पर्यटन इतिहासातील सर्वात मोठ्या घटनांपैकी एक दुर्घटना आहे. या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. दरम्यान स्थानिक प्रशासनाने मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर जखमी आणि बाधित लोकांसाठी मदत केंद्रे सुरू केली जात आहेत.https://prahaar.in/2025/12/07/small-kem-health-facility-for-maladkars-inauguration-of-urban-health-training-center/भाजप आमदार मायकल लोबो यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आणि म्हटले की, गोवा नेहमीच एक सुरक्षित पर्यटन स्थळ मानले गेले आहे. परंतु अशा घटना अत्यंत चिंताजनक आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी राज्यातील सर्व क्लब आणि रेस्टॉरंट्सनी अनिवार्य सुरक्षा ऑडिट करावे, असे ते म्हणाले. गोव्याचे डीजीपी आलोक कुमार म्हणाले की, आगीची माहिती मिळताच बचाव पथके तात्काळ रवाना करण्यात आली. सर्व २३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आगीचे कारण सध्या अस्पष्ट आहे, परं
दहिसर पूर्वमधील नव्याने बनवलेल्या यशवंतराव तावडे मार्ग खोदला
नव्याने जलवाहिनी टाकण्यासाठी काँक्रिट केलेला रस्ता खोदण्याचा प्रतापनवीन केलेला रस्ता खोदायला दिला जाणार नाही,या आयुक्तांसह अतिरिक्तांच्या वल्गना केवळ हवेतचमुंबई (विशेष प्रतिनिधी):मुंबई महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यांचा विकास सिमेंट काँक्रिटद्वारे केला जात असून एकदा सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनवल्यानंतर त्यावर सेवा सुविधांचे जाळे अर्थात युटीलिटीज टाकण्यासाठी कोणत्याही प्रकारे खोदकाम करता येणार नाही असा पावित्रा महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर कोणतेही खोदकाम करता येणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतरही दहिसरमधील एल टी मार्गला जोडणाऱ्या यशवंतराव तावडे मार्गावर जल वाहिनी टाकण्याचे काम सुरु झाले आहे. त्यासाठी नव्याने बनवलेला काँक्रिटचा रस्ता चक्क खोदण्यात आल्याचे दिसून येत आहे.दहिसर पश्चिम येथील रेल्वे मार्गाशेजारील समांतर जाणाऱ्या एल टी रोडला जोडून दिपा फॅमिली बारकडून यशवंतराव तावडे मार्ग जात आहे. हा तावडे मार्ग सिमेंट काँक्रिटचा आहे. या रस्त्याच्या एका बाजुचे सिमेंट काँक्रिटचे काम पूर्ण झाले असून एका मार्गिकेचे काम प्रलंबित आहे. परंतु ज्या मार्गिकेचे सिमेंट काँक्रिटचे काम पूर्ण झाले आहे, त्याच मार्गिकेवर चर खणून नवीन जलवाहिनी टाकण्याचे सुरु आहे. महापालिका जल अभियंता विभागाच्यावतीने मोठ्या व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी नव्याने बनवलेला रस्ता खोदण्यात आला आहे.https://prahaar.in/2025/12/07/fire-at-a-nightclub-in-goa-23-people-died-chief-minister-pramod-sawant-ordered-an-inquiry/महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी रस्ते कामांचे कंत्राट मंजूर केल्यानंतर ज्या रस्त्यांचा विकास केला जाणार आहे, त्या रस्त्याखालून नवीन युटीलिटीज टाकायची असेल तर रस्ते कामादरम्यान टाकली जावी अशाप्रकारच्या सूचना सर्व संबंधित खाते तथा विभागांना केले होते. त्यामुळे अत्यंत तातडीच्या दुरुस्तीचे काम वगळता नवीन कामांसाठी नव्याने बनवलेले रस्ते खोदकामाला परवानगी मिळणार नाही हे स्पष्ट असतानाही नव्याने सिमेंट काँक्रिटीकरण केलेला यशवंतराव तावडे मार्ग खोदण्यात आल्याचे दिसून येत आहे. याबाबत संबंधित सहायक अभियंता (रस्ते )यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असताना कुणाही संपर्क होवू शकला नाही.यशवंतराव तावडे मार्गाची स्थितीआजवर झालेले सिमेंट काँक्रिटचे काम : ९४.७४ टक्के प्रगतीपथावररस्त्याची लांबी आणि रुंदी : लांबी ७६० मीटर आणि १७.३ मीटर रुंदीसिमेंट काँक्रिटीकरणाचे काम ९४.७४ टक्के पूर्णपर्जन्य जलवाहिनी टाकण्याचे काम १०० टक्के पूर्णडक्टचे काम : ९६.०५ टक्के पूर्ण
माहिम मोरी रोड शाळेच्या पुनर्विकासाच्या भूमिपुजनाचा लवकरच वाढणार नारळ
तब्बल सात वर्षांपासून बंद करण्यात आली शाळा, दोन वर्षांपासून आहे जमिनदोस्तमुंबई (विशेष प्रतिनिधी):माहिममधील महापालिका शालेय इमारती अतिधोकादायक होवून बंद करावे लागत असल्याने मुलांना वरळीतील शाळांमध्ये पाठवयाची वेळ आल्याने शिक्षण विभागावर जोरदार टिका होत आहे. त्यातील सोनावाला अग्यारी मार्गावरील जमिनदोस्त केलेल्या माहिम मोरी महापालिका शालेय इमारतीच्या पुनर्विकासाला आता सुरुवात होणार आहे. तब्बल सात वर्षांनी या शालेय इमारतीच्या बांधकामाला आता सुरुवात होणार आहे. ही शालेय इमारत तब्बल दहा मजल्यांची शाळा आहे, त्यातील सात मजल्यांपर्यंत २४ वर्गखोल्या असणार आहेत. त्यामुळे मुलांना जिना चढून न जाता लिफ्टमधून जाता येणार आहे. महापालिकेच्या शालेय इमारतींचे दहा मजल्यांपर्यंत बांधकाम करण्यात येत असले तरी मुलांना खरोखरच लिफ्टमधून ये जा करायला दिले जाणार का असा सवाल उपस्थित होत आहे.महापालिकेच्या माहीम येथील मोरी रोडवरील शाळा ही सर्वप्रथम २०१९मध्ये सी टू अर्थात अतिधोकादायक घोषित करण्यात आली होती. ही शाळा त्यानंतर बंद करण्यात आली आहे. आणि त्यानंतर सन २०२४मध्ये शालेय इमारतीचे बांधकाम पाडण्यात आले. या इमारतीत मराठी, ऊर्दु आणि इंग्रजी भाषेच्या शाळा चालवल्या जात होत्या. त्यामुळे बंद करण्यात आलेल्या या शाळांमधील मुलांना आरसी मार्ग आणि न्यू माहीम शाळेत स्थलांतरीत करण्यात आले होते. त्यानंतर छोटानी मार्गावरील महापालिका शाळा ही आधी जुलै २०२४मध्ये सी वन अर्थात धोकादायक जाहीर करण्यात आली. आणि डिसेंबर महिन्यात सीटू अर्थात अतिधोकादायक म्हणून जाहीर करून खाली करण्याचे निर्देश दिले. माहीम भागांमध्ये महापालिका शाळांची पटसंख्या चांगल्याप्रकारे असतानाही मोरी रोडची शाळा अतिधोकादायक ठरल्यानंतर पाच वर्षांनी पाडण्यात आली आणि आजही त्याठिकाणी बांधकाम सुरु झालेले नाही. या उलटत मोरी रोडला याच शाळेच्या समोरील जागेत यानंतर खासगी इमारतीचे बांधकाम सुरु होवून १५ माळ्यांचे बांधकामही झाले आहे. मग महापालिका शाळेच्या बांधकामाला विलंब का होतो असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात होता.शालेय इमारती अतिधोकादायक झाल्याने बंद करण्यात येत असल्याने बोंबाबोंब झाल्यानंतर महापालिका पायाभूत सुविधा(शाळा) विभाग आता जागा झाला असून त्यांनी मोरी रोड महापालिका शाळेसाठी निविदा मागवून कंत्राटदाराची निवड केली आहे. या दहा मजली शालेय इमारतीच्या बांधकामांसाठी सुमारे ६० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठी पी.बी कस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे.https://prahaar.in/2025/12/07/bandra-lake-turned-into-a-mess-with-foul-smelling-water-and-garbage-in-the-lake/शालेय इमारतीचे बांधकाम:आरसीसी तळमजला अधिक ३ जिने आणि ४ लिफ्टसह १० मजलेतळ मजला: कारपार्किंगसह इतर सुविधापहिला मजला: १ वर्ग खोलीसह इतर सुविधादुसरा मजला : ४ वर्ग खोल्या आणि भौतिकशास्त्र प्रयोगशाळासह इतर सुविधातिसरा मजला: ०४ वर्ग खोल्या आणि रसायनशास्त्र प्रयोगशाळासह इतर सुविधाचौथा मजला : ०४ वर्ग खोल्या आणि जीवशास्त्र प्रयोगशाळासह इतर सुविधापाचवा मजला : ०३ वर्ग खोल्या आणि ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळासह इतर सुविधासहावा मजला : ०४ वर्ग खोल्यासह इतर सुविधासातवा मजला : ०४ वर्ग खोल्या आणि वैद्यकीय कक्ष गणित प्रयोगशाळासह इतर सुविधाआठवा मजला: किड्स क्लब एरिया, स्किल सेंटर आणि २ खोल्यांसह इतर सुविधनववा मजला : योगालय, बॅडमिंटन कोर्ट आणि इनडोअर गेमसह इतर सुविधादहावा मजला :इनडोअर गेम २ (टेबल टेनिस)आणि इनडोअर गेम३ (कॅरम बोर्ड) सह इतर सुविधा
गोवा नाईट क्लब अपघात! पंतप्रधान मोदींकडून घटनेवर दुःख व्यक्त ; नुकसान भरपाईची केली घोषणा
Goa Nightclub Fire। गोव्याच्या उत्तर जिल्ह्यातील अर्पोरा गाव शनिवारी रात्री हादरले. एका लोकप्रिय नाईटक्लबमध्ये आग लागली, ज्यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला. हा क्लब गेल्या वर्षीच सुरू झाला होता आणि पर्यटकांमध्ये तो खूप लोकप्रिय झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “गोव्यातील अर्पोरा येथे झालेली आगीची […] The post गोवा नाईट क्लब अपघात! पंतप्रधान मोदींकडून घटनेवर दुःख व्यक्त ; नुकसान भरपाईची केली घोषणा appeared first on Dainik Prabhat .
“काही लोकांना एवढी पोटदुखी आहे की….”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’मागणीवर एकनाथ शिदेंचा शाब्दिक हल्ला
Eknath Shinde : उद्यापासून (८ डिसेंबर) राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात होणार आहे. या अधिवेशनासाठी जय्यत तयारी विधिमंडळ परिसरात करण्यात आली आहे. मात्र, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते नेमलेले नाहीत, याचे कारण म्हणजे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे मिळून विरोधपक्षनेता म्हणून जितके संख्याबळ हवे असते तितके नाही. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सवाल […] The post “काही लोकांना एवढी पोटदुखी आहे की….”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ मागणीवर एकनाथ शिदेंचा शाब्दिक हल्ला appeared first on Dainik Prabhat .
गोव्यातील नाईट क्लबमध्ये भीषण आग ! २५ जणांचा मृत्यू ; घटनेचा भयानक व्हिडिओ समोर
Goa Nightclub Fire । उत्तर गोव्यातील अर्पोरा गावात एका नाईटक्लबमध्ये आग लागली आणि काही मिनिटांतच संपूर्ण इमारतीला वेढले. या घटनेत किमान २५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री घडलेल्या या दुःखद घटनेचा एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आग कशी वेगाने पसरली हे व्हिडिओमध्ये दाखवले आहे, ज्यामुळे क्लब धुराने आणि ज्वाळांनी भरला. दूरवर […] The post गोव्यातील नाईट क्लबमध्ये भीषण आग ! २५ जणांचा मृत्यू ; घटनेचा भयानक व्हिडिओ समोर appeared first on Dainik Prabhat .
Maharashtra Winter Session 2025 | विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवापासून नागपुरात सुरू होणार आहे. शेतकऱ्यांचा असंतोष, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा दबाव या पार्श्वभूमीवर फक्त एक आठवड्याच्या कालावधीत होत असलेले हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने घातलेला घोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्याशी संबंधित मुंढव्यातील […] The post नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात; राज्य निवडणूक आयोगाचा घोळ, शेतकऱ्यांचा असंतोष यासारखे मुद्दे ठरणार वादळी appeared first on Dainik Prabhat .
pune : समस्यांच्या विळख्यात सापडलेला प्रभाग
प्रशासनासह राजकीय इच्छाशक्ती अभावी ढोबळ विकासकामे पुणे – शिवणे-खराडी रस्त्यासह अन्य मिसिंग लिंकचे रखडलेले काम, अनधिकृत बांधकामाचा फुटलेले पेव, उद्यानांची दुरावस्था, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सोयी-सुविधांचा अभाव, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, झोपडपट्यांचा रखडलेला पुर्नविकास अशा एक ना अनेक समस्यांनी प्रभाग क्र. ३० ला विळखा घातलेला आहे. या प्रभागात विकासाला गती देण्याची संधी असतानाही केवळ प्रशासकीय आणि राजकीय […] The post pune : समस्यांच्या विळख्यात सापडलेला प्रभाग appeared first on Dainik Prabhat .
Satara : मला संधी दिली तर संधीचे सोने करेन : भारती गोरे
वडूज :सत्ताकेंद्रे हाती असताना प्रस्थापित नेतृत्वाने औंध गटाचा म्हणावा तसा विकास केला नाही. औंध गटातील प्रत्येक गावांत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. औंध गटाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सूज्ञ जनतेने औंध गटाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला द्यावी. मी त्या संधीचे सोने करेन, असे मत भारती गोरे यांनी व्यक्त केले. भुरकवडी (ता. खटाव) येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या […] The post Satara : मला संधी दिली तर संधीचे सोने करेन : भारती गोरे appeared first on Dainik Prabhat .
pune : सर्पोद्यानाच्या विस्ताराला गती ; स्थायी समितीत ४८ कोटींचा निधी मंजूर
पुणे : महापालिकेच्या कात्रज येथील सर्पोद्यानातील सरपटणाऱ्या प्राण्यांचे नवीन जागेत स्थलांतर केले जाणार आहे. त्यासाठी सुमारे २ एकर जागेत महापालिकेकडून मागील तीन वर्षांपासून बांधकाम सुरू आहे. मात्र, या कामासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याने हे काम रेंगाळले होते. मात्र, या कामास गती देण्याचा निर्णय घेत महापालिकेकडून हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी तब्बल ४८ कोटींचा निधी देण्यास शुक्रवारी […] The post pune : सर्पोद्यानाच्या विस्ताराला गती ; स्थायी समितीत ४८ कोटींचा निधी मंजूर appeared first on Dainik Prabhat .
मालाडकरांना छोटा 'केइएम'ची आरोग्य सुविधा, नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण
मुंबई (विशेष प्रतिनिधी): पश्चिम उपनगरात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मालाड मालवणी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण शनिवारी ६ डिसेंबर २०२५ रोजी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शुभहस्ते करण्यात आले, सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या डॉक्टर, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या माध्यमातून ही सेवा पश्चिम उपनगरातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.वर्षाकाठी मालवणी परिसरातील सुमारे साडेतीन लाख रुग्णांना या केंद्राच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे. येत्या काळात विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचे मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.या नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय, महिला आरोग्य, त्वचाविकार, दंत, क्षयरोग यासारख्या आजारांसाठीची बाह्यरुग्ण विभागाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याठिकाणी वैद्यकीय सुविधा घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना नजीकच्या हरिलाल भगवती महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, खुरशादजी बेहरामजी भाभा महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रू. न. कूपर रुग्णालय येथे संदर्भित करण्यात येईल. सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या डॉक्टर, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा एकूण ३५ जणांचा चमू या केंद्राच्या ठिकाणी कार्यरत असणार आहे. या कम्युनिटी मेडिसीन विभागामार्फत या चमूमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, २० निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी अशा ३५ जणांचा समावेश आहे. सकाळी ९.३० ते सायंकाळी ४ दरम्यान बाह्यरुग्ण विभागामार्फतची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सकाळ तसेच दुपार सत्रातील बाह्यरुग्ण विभाग सेवेसोबतच विशेष बाह्यरुग्ण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विविध आजारांसाठीची बाह्यरुग्ण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्रात येणाऱ्या रुग्णांच्या सुविधेसाठी प्रशस्त आसनव्यवस्था आणि प्रतीक्षा कक्षदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. दिवसापोटी २५० ते ३०० रुग्ण हाताळण्याची या बाह्यरुग्ण विभागाची क्षमता आहे. पाच मजली इमारतीतील तीन मजले हे कम्युनिटी मेडिसीन विभागासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येत्या कालावधीत कर्मचारी संख्या वाढवतानाच अद्ययावत अशी हॉस्पिटल मॅनजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (HMIS) प्रणालीही अंमलात येणार आहे. वाचनालय, माहिती शिक्षण आणि संवाद सभागृह, सार्वजनिक आरोग्य संग्रहालय, संशोधन केंद्र, लसीकरण कक्ष आदी सुविधाही याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.या सोहळ्यासाठी स्थानिक आमदार अस्लम शेख, उपआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक (के इ एम)रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, सहायक आयुक्त (पी उत्तर) कुंदन वळवी तसेच भाजपचे सुनील कोळी, माजी नगरसेविका योगिता कोळी, विनोद शेलार आदी उपस्थित होते.दरम्यान,मालवणीत येथील नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी झाल्याने या वास्तूला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची सूचना उपनगराचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली.
Satara : श्री गोंदवलेकर महाराज महोत्सव कोठीपूजनाने सुरु
सातारा : श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या 112 व्या पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात काल सकाळी अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात कोठी पूजनाने झाली. पहाटेपासूनच समाधी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. हवेतील गारवा, वातावरणातील मंगल ध्वनी आणि ‘श्री अनंत कोटी ब्रह्मांडनायक’ या जयघोषाने परिसर भारावून गेला होता. विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत श्रींच्या पादुका व अक्षय बटव्याचे विधिपूर्वक पूजन […] The post Satara : श्री गोंदवलेकर महाराज महोत्सव कोठीपूजनाने सुरु appeared first on Dainik Prabhat .
pune : शहरातील अग्निशमन दल नाॅट रिचेबल
नुसतीच वाजते रिंग, पिंपरी, कोल्हापूरचे फोन पुण्यात पुणे : शहरात आपत्तीच्या काळात नागरिकांकडून १०१ क्रमांकावर मदतीसाठी फोन केला जातो. मात्र, महापालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्राच्या कार्यालयातील लॅन्डलाईन फोन अनेकदा नाॅट रिचेबल होत आहेत. अनेकदा वारंवार फोन करूनही केवळ रिंगचा आवाज येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या केंद्रासाठी बीएसएनएलने फोनची सुविधा दिली असून त्यासाठी चार स्वतंत्र लाईन […] The post pune : शहरातील अग्निशमन दल नाॅट रिचेबल appeared first on Dainik Prabhat .
Satara : सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी
औंध : औंध येथे झालेल्या महारोजगार मेळाव्यामुळे परिसरातील हजारो युवकांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे. बेरोजगार युवक-युवतींच्या कुटुंबांना उभारी देणे, हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ध्येय आहे. यापुढेही सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही औंध संस्थानच्या अधिपती व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्यावतीने […] The post Satara : सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी appeared first on Dainik Prabhat .
pune : तब्बल ८९ टक्के सायकल ट्रॅकची दुर्दशा!
पुणे ग्रॅण्ड सायकल टूरच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा सायकल ट्रॅक भीषण स्थितीत पुणे : कधी काळी सायकलींचे शहर अशी पुण्याची असलेली ओळख हरवून बराच काळ लोटला. सायकलींचे शहर ही ओळख पुन्हा प्राप्त करण्यासाठी महापालिकेने उभारलेल्या सायकल ट्रॅकपैकी केवळ ११ टक्के ट्रॅकच सुस्थितीत असून ८९ टक्के ट्रॅकची दुर्दशा झाल्याचे चित्र समोर आले आहे. आयटीच्या आगमनाबरोबर बदलत्या काळात पुण्यात […] The post pune : तब्बल ८९ टक्के सायकल ट्रॅकची दुर्दशा! appeared first on Dainik Prabhat .
Satara : महामानवास अभिवादन करण्यासाठी सातार्यात उसळला जनसागर
सातारा :महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सातार्यातील छत्रपती शाहू चौकात शनिवारी सकाळपासून जनसागर उसळला होता. नगरपालिकेसमोरील उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, घोषणा देण्यात आल्या. महापरिनिर्वाण दिनानिमित्त छ. शाहू चौकात डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शनिवारी सकाळपासून गर्दी झाली होती. समता सैनिक दलाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर […] The post Satara : महामानवास अभिवादन करण्यासाठी सातार्यात उसळला जनसागर appeared first on Dainik Prabhat .
एक असा दहशतवादी, ज्याने भारतीय जवानाचे शिर कापून जनरल परवेझ मुशर्रफ यांना दिले. एक असा गँगस्टर, ज्याने 15 वर्षांच्या वयात आपल्या आईला गोळी मारली, गळा चिरला आणि नंतर पुरले. एक असा पोलीस अधिकारी, जो एका हातात सिगारेट आणि दुसऱ्या हातात सब-मशीन गन घेऊन फिरायचा. खऱ्या जगातील हे तिन्ही पात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मल्टीस्टारर 'धुरंधर' चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. याच भयानक आणि रंजक पात्रांची संपूर्ण कहाणी, एक्सप्लेनरमध्ये जाणून घ्या... 'धुरंधर' चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात अभिनेता अर्जुन रामपालच्या मेजर इक्बाल या पात्राने होते. सांगितले जात आहे की हे पात्र कुख्यात दहशतवादी इलियास काश्मिरीपासून प्रेरित आहे. इलियास कश्मीरी हा 'हरकत-उल जिहाद अल-इस्लामी' (हूजी) या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. त्याला अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा जवळचा मानले जात होते. इलियासचा जन्म 10 फेब्रुवारी 1964 रोजी PoK मधील भिंबर जिल्ह्यातील थाथी गावात झाला. त्याचे शाळेतील शिक्षक सांगतात, 'इलियास प्रत्येक गोष्ट ऐकणारा एक चांगला विद्यार्थी, खेळाडू आणि वादविवाद करणारा होता. त्याला राजकारणात खूप रस होता. याच कारणामुळे तो इस्लामिक जिहादमध्ये सामील झाला.' सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो इस्लामाबादमधील अल्लामा इकबाल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये कम्युनिकेशनचे शिक्षण घेऊ लागला, पण 20 वर्षांच्या वयात त्याने शिक्षण सोडून शस्त्रे हाती घेतली आणि दहशतवादी बनला. काही अहवालानुसार, इलियास पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सर्व्हिसेस ग्रुपमध्ये कमांडो देखील होता. तथापि, नंतर त्याने याचा इन्कार केला. 1980 च्या दशकात सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानमधील कम्युनिस्ट सरकार वाचवण्यासाठी लाखो सैनिक पाठवले. याविरोधात इस्लामिक संघटनांनी जिहाद सुरू केला. पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी गटही यात सामील झाले. 1980 मध्ये स्थापन झालेला हरकत-उल जिहाद अल-इस्लामी हा देखील असाच एक गट होता. इलियास यात सामील झाला. इलियासने लँडमाइन बनवण्याचे आणि पेरण्याचे प्रशिक्षण घेतले. नंतर तो प्रशिक्षण देऊ लागला. सोव्हिएत सैनिकांशी लढताना त्याने एक डोळा आणि एक बोट गमावले. यामुळे त्याला 'काना दहशतवादी' असेही नाव पडले. 25 वर्षांचा इलियास हूजीचा टॉप कमांडर बनला. सोव्हिएत-अफगाण युद्धांनंतर त्याने काश्मीरवर लक्ष केंद्रित केले. काश्मीरमध्ये घुसखोरीसाठी त्याने हूजीची 'ब्रिगेड 313' तयार केली. इलियासची उंची सुमारे 6 फूट आणि वजन 80 किलो होते. मेहंदी लावलेले दाट केस, दाढी-मिश्या आणि डोळ्यांवर नेहमी जाड एव्हिएटर स्टाईलचा काळा चष्मा असे. भारतीय सैनिकाचे शिर कापून पाकिस्तानात नेले, मुशर्रफला दिले 27 फेब्रुवारी 2000 च्या रात्री काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये इलियासने 25 दहशतवाद्यांसह LoC ओलांडली. सर्वांनी पाकिस्तानी लष्कराचा गणवेश परिधान केला होता. त्यांनी भारतीय सीमा चौकीवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात दोन भारतीय जवान शहीद झाले आणि दोन बेपत्ता झाले. काही वेळाने शिपाई भाऊसाहेब मारुती तालेकर यांचा मृतदेह सापडला, ज्याचे शिर गायब होते. इलियासनेच शिपायाचे शिर कापून नेले असल्याची बातमी मिळाली. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या कोटलीमध्ये शिपाई मारुतीचे शीर गाडीवर ठेवून फिरवण्यात आले. अहवालानुसार, इलियासने त्या शिरासोबत फुटबॉल खेळला. नंतर जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यासमोर ते ट्रॉफीसारखे सादर केले. हे पाहून मुशर्रफ इतके खूश झाले की त्यांनी लगेच इलियासला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर इलियासचा फोटो छापण्यात आला. त्याला नायकासारखे सादर करण्यात आले. हीच ती घटना होती, ज्यानंतर इलियासला भारताच्या सर्वात धोकादायक शत्रूंमध्ये गणले जाऊ लागले. 2009 मध्ये एका मुलाखतीत इलियासला विचारण्यात आले की, काश्मीर मिळाल्यास शस्त्रे खाली ठेवाल का? त्याने उत्तर दिले की, काश्मीर तर फक्त सुरुवात आहे. नंतर हैदराबाद आणि जुनागढही हिसकावून घेऊ. हे देखील साध्य झाले तरी, जिहाद संपणार नाही. जगात जिथे जिथे मुस्लिमांवर अत्याचार होतील, तिथे आम्ही लढू. इलियासने 26/11 च्या हल्ल्यापूर्वी मुंबईची रेकी करण्यात लष्कर-ए-तैयबाशी संबंधित डेव्हिड हेडलीला मदत केली होती. त्याने 2010 मध्ये पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये स्फोट घडवला होता. अफगाणिस्तानमधील सीआयएच्या कॅम्प चॅपमनमध्येही आत्मघाती हल्ला घडवला, ज्यात 7 अमेरिकन मारले गेले होते. अमेरिकेने इलियासच्या डोक्यावर 5 दशलक्ष डॉलरचे बक्षीस ठेवले होते. अमेरिकन सैन्याने जेव्हा जेव्हा इलियासला मारल्याचा दावा केला, तेव्हा तेव्हा तो काही दिवसांनी मुलाखत देताना दिसला. असे अनेक वेळा घडले. अखेरीस 3 जून 2011 रोजी दक्षिण वझिरीस्तानमध्ये अमेरिकन ड्रोनमधून सोडलेल्या 4 क्षेपणास्त्रांनी इलियास कश्मीरी आणि त्याच्या 8 साथीदारांना संपवले. याची पुष्टी इलियासच्याच ‘ब्रिगेड 313’ या गटाने केली. ‘रहमान दरोड्याने दिलेला मृत्यू अत्यंत क्रूर असतो.’ ‘धुरंधर’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेता अक्षय खन्नाने याच संवादासोबत रहमान दरोड्याची ओळख करून दिली आहे. मात्र, रहमान आणि इलियासची कथा एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. रहमानची कथा समजून घेण्यापूर्वी पाकिस्तानमधील ल्यारी भागाला समजून घ्यावे लागेल. कराची पोर्टजवळ असलेले हे शहर सुमारे 60 वर्षांपर्यंत क्रूर गुंडांच्या आपापसातील लढाईत भरडले गेले. येथे लूटमार, अंमली पदार्थांची तस्करी आणि लक्ष्यित हत्या (टार्गेट किलिंग) अशा घटना घडत असत की, केवळ 4 लाख लोकसंख्या असलेला ल्यारी न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट सारख्या परदेशी वृत्तपत्रांच्या मथळ्यांमध्ये येत राहिला. येथीलच एका टॉप गुंड मोहम्मद दादलच्या घरी 1979 मध्ये एका मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले - सरदार अब्दुर्रहमान बलोच उर्फ रहमान डकैत. रहमानबद्दल असे म्हटले जाते की, तो केवळ 13 वर्षांच्या वयापासूनच खून करू लागला होता. जेव्हा त्याला कळले की त्याची आई खदीजा बीबीचे प्रेमसंबंध वडिलांच्या मारेकरी आणि गुंड इक्बालसोबत सुरू आहेत, तेव्हा त्याने रागाने आपल्या आईला 3 गोळ्या मारल्या, नंतर तिचा गळा चिरला आणि मृतदेह गुपचूप दफन केला. तेव्हा रहमानचे वय केवळ 15 होते. वडिलांच्या मृत्यूनंतर टोळीचे नियंत्रण रहमानच्या हातात आले. हळूहळू त्याची दहशत संपूर्ण कराचीत पसरू लागली. रहमान आपल्या शत्रूंना अशी शिक्षा देत असे की कोणीही त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा विचारही करत नसे. पाक नेत्यांचा शूटर बनला, बेनझीर भुट्टोचा जीव वाचवला 4 जुलै 2003 रोजी रहमानने प्रतिस्पर्धी टोळीचा म्होरक्या हाजी लाला याला एका शाळेजवळ घेरले. त्याने पहिली गोळी लालाच्या पायात मारली, जेणेकरून तो पळून जाऊ नये. त्यानंतर AK-47 च्या 30 हून अधिक गोळ्या त्याच्या छातीत उतरवल्या. 2004 मध्ये त्याने वडिलांचा मारेकरी इक्बाललाही याच प्रकारे मारले. एका रात्री रहमान इक्बालच्या बिछान्याजवळ पोहोचला. रहमानने त्याच्या डोक्यात आणि छातीत संपूर्ण रायफल रिकामी केली. तो शत्रूंना अशा प्रकारे मारत असे की त्यांचे मृतदेहही ओळखता येत नव्हते. याच दरम्यान रहमान पाकिस्तानी नेत्यांच्या जवळ येऊ लागला. तो अनेक नेत्यांसाठी शूटर म्हणून काम करू लागला. रहमानचा राजकीय वर्तुळात दबदबा वाढू लागला. यासंबंधी एक किस्साही आहे… 18 ऑक्टोबर 2007 रोजी जेव्हा बेनझीर भुट्टो देशातून हद्दपार झाल्यानंतर पाकिस्तानात परतल्या, तेव्हा त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळापासून बिलावल हाऊसपर्यंत रॅली काढली, ज्यात हजारो लोक सहभागी झाले होते. त्यावेळी रहमानला बेनझीरचा सुरक्षा अधिकारी बनवण्यात आले. रॅलीदरम्यान एक मोठा अपघात झाला. एका आत्मघाती हल्लेखोराने भुट्टो यांच्या बुलेटप्रूफ ट्रकजवळ स्फोट घडवला, परंतु बेनझीर वाचल्या कारण त्या ट्रकच्या वरच्या पायऱ्यांवर उभ्या होत्या. तथापि, या स्फोटात 140 हून अधिक लोक ठार झाले आणि सुमारे 500 जखमी झाले. यानंतर रहमानने बेनझीरला आपल्या गाडीत बसवले आणि बिलावल हाऊसपर्यंत त्यांना सुरक्षित पोहोचवले. या घटनेनंतर रहमान पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चा महत्त्वाचा भाग बनला. 2008 मध्ये पाकिस्तानात निवडणुका झाल्या. PPP ला विजय मिळाला. यानंतर रहमानला PPP च्या पीपल्स अमन कमिटीचा नेता बनवण्यात आले. ल्यारीमध्ये PPP ला जिंकवून दिल्याबद्दल रहमानच्या टोळीला ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची सूट मिळाली. यामुळे ल्यारीमध्ये गुन्हेगारी आणखी वाढली. पण लवकरच रहमान PPP च्याही हातातून निसटू लागला. रहमानमुळे 2013 ची निवडणूक हातातून जाऊ नये अशी भीती PPP ला होती. म्हणून त्याला मार्गातून दूर करण्याची योजना आखण्यात आली. 9 ऑगस्ट 2009 रोजी कराची पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला. धुरंधरमधील तिसरे पात्र आहे- 'एनकाउंटर स्पेशलिस्ट' एसएसपी चौधरी असलम खान यांचे, जी भूमिका संजय दत्त साकारत आहेत. चौधरी असलम यांच्या एका हातात सिगारेट आणि दुसऱ्या हातात सब-मशीन गन घेऊन कराचीच्या गल्ल्यांमध्ये फिरतानाचे व्हिडिओ आजही यूट्यूबवर उपलब्ध आहेत. गँगस्टर रहमान डकैतचा खात्मा करण्यासाठी असलम यांनाच मोकळीक देण्यात आली होती. त्यांना ल्यारी गँग्सविरुद्ध विशेष प्राविण्य होते. त्यांनी यापूर्वी 2005 मध्ये रहमानच्या बंगल्यावर छापा टाकला होता. असलम यांनी गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने रहमानचा शोध घेतला. पोलिसांची एक विशेष टीम तयार केली आणि छाप्याची योजना आखली. त्यांचा उद्देश होता - एनकाउंटर दाखवून अतिरिक्त-न्यायिक हत्या करणे, जेणेकरून न्यायालयात खटला उभा राहू नये. 9 ऑगस्ट 2009 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता असलमच्या टीमने रहमान आणि त्याच्या साथीदारांना घेरले. अनेक तास गोळीबार सुरू होता आणि रात्रीपर्यंत संपूर्ण कराचीमध्ये रहमान दरोडेखोर मारला गेल्याची बातमी पसरली. कराची पोलिसांनी दावा केला की रहमानच्या टोळीने आधी गोळीबार केला, त्यानंतर पोलिसांना प्रत्युत्तर द्यावे लागले. तर पोस्टमॉर्टममधून असे दिसून आले की गोळ्या अगदी जवळून मारल्या गेल्या होत्या, जे चकमक नसून ताब्यात घेऊन केलेल्या हत्येकडे निर्देश करतात. यानंतर रहमानच्या बहिणीने सिंध उच्च न्यायालयात एफआयआर दाखल केला, परंतु तपास थांबला. असलमने नंतर याला एक वैध चकमक म्हटले, परंतु ल्यारीमध्ये याला पीपीपीने घडवून आणलेले प्रकरण मानले जाते. रहमानच्या मृत्यूनंतरही चौधरी असलम यांनी ल्यारीतील टोळ्यांचा खात्मा करण्यासाठी मोहीम राबवली. 2012 ते 2018 पर्यंत चाललेल्या या मोहिमेत पोलीस, एलिट फोर्सेस, सिंध रेंजर्स आणि लष्करालाही सामील करण्यात आले. पहिल्यांदाच कराचीच्या रस्त्यांपासून ते ल्यारीच्या चील चौकापर्यंत बुलेटप्रूफ वाहने आणि रणगाड्यांच्या रांगा दिसल्या. टोळ्यांच्या AK-47 चा मुकाबला करण्यासाठी मशीन गन्स, रॉकेट लाँचर्स आणि ग्रेनेड लाँचर्सचा वापर करण्यात आला. 2016 मध्ये हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, 6 वर्षे चाललेल्या या मोहिमेत 1000 ते 1800 लोकांचा मृत्यू झाला. दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबानने 9 जानेवारी 2014 रोजी चौधरी असलम यांची हत्या केली. ल्यारी एक्सप्रेस-वेवर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू झाला. असलम यांच्याशिवाय त्यांचे चालक, अंगरक्षक आणि इतर दोन अधिकारीही मारले गेले. धुरंधर चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. तो हमजा नावाच्या एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारत आहे, ज्याला भारताने एका विशेष मोहिमेवर पाकिस्तानात पाठवले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी, त्याची भूमिका मेजर मोहित शर्मा यांच्यापासून प्रेरित असल्याचे सांगितले गेले, जे 2009 मध्ये काश्मीरमधील कुपवाडा येथे शहीद झाले होते, परंतु यावर मेजर मोहित यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आणि चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी केली. मात्र, चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी या दाव्याचे खंडन केले. चित्रपट सेन्सॉर बोर्ड CBFC ने देखील मान्य केले की चित्रपटातील रणवीरची भूमिका मेजर मोहित शर्मा यांच्यापासून प्रेरित नाही. रणवीर सिंहच्या विरुद्ध सारा अर्जुन आहे, जी रहमान दरोडेखोराचा साथीदार नबील गबोलच्या मुलीची भूमिका साकारत आहे. चित्रपटात नबील गबोलचे नाव जमील जमाली आहे. शेवटी आर. माधवनचे पात्र येते. माधवनच्या लूकवरून स्पष्टपणे म्हणता येते की त्यांना चित्रपटात एनएसए अजित डोभालची भूमिका देण्यात आली आहे. तथापि, चित्रपटात या पात्राचे नाव अजय सान्याल आहे. त्यांच्या सांगण्यावरून रणवीर सिंहचे पात्र हमजा वेश बदलून पाकिस्तानला पोहोचले आहे. सुमारे 3 तास 32 मिनिटांच्या कालावधीसह 'धुरंधर' सर्वात लांब हिंदी चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. चित्रपटाचा पहिला भाग 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. इंडिया टुडेनुसार, दुसरा भाग 19 मार्च, 2026 रोजी प्रदर्शित होईल. **** ही कथा दैनिक भास्करमध्ये फेलोशिप करत असलेल्या प्रथमेश व्यासने लिहिली आहे. ****
Satara : दत्तजयंती सोहळ्यास मोर्वे येथे अलोट गर्दी
सातारा :दिवसभर अखंडपणे चाललेला ‘ॐ दत्त चिले ॐ’ चा गजर, विविध ठिकाणच्या जंगम वृंदांकडून महारुद्राभिषेकावेळी झालेला मंत्रोच्चार, महाआरतीने झालेली पारायण सोहळ्याची सांगता, आकर्षक फुलांच्या सजावटीत, वाद्यांच्या गजरात ग्रामप्रदक्षिणेसाठी निघालेली रथयात्रा आणि सायंकाळी सद्गुरु हिंगमिरे देवांच्या सानिध्यात, टिपेल्या पोचलेल्या दत्तनामाच्या उद्घोषात साजरा झालेला दत्त जन्मकाळ उपस्थितांना दत्त नामाच्या शाळेत तल्लिन करणारा ठरला. मोर्वे (ता. खंडाळा) येथील […] The post Satara : दत्तजयंती सोहळ्यास मोर्वे येथे अलोट गर्दी appeared first on Dainik Prabhat .
pune : येत्या दोन दिवसांत कडाका वाढणार
शहरात किमान तापमान १३ ते १७ अंशाच्या आसपास पुणे – शहरासह उपनगरातील किमान तापमान १२ अंशाच्या पुढे गेल्याने थंडीची लाट ओसरली असली तरी पहाटे धुके, थंडीचा जोर आहे. शनिवारी माळीण येथे सर्वात कमी १२.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शहर परिसरातील किमान तापमान १३ ते १७ अंशाच्या आसपास नोंदविले गेले आहे. चार-पाच दिवसांपूर्वी शहरासह […] The post pune : येत्या दोन दिवसांत कडाका वाढणार appeared first on Dainik Prabhat .
Talegaon Dabhade : मावळ तालुक्यात खरीप काढणी पूर्ण; रब्बी पेरणीला वेग
तळेगाव दाभाडे – तालुक्यात खरीप भात पिकाची कापणी अंतिम टप्प्यात पोहोचताच तालुक्यातील शेतकरी आता रब्बी पिकांच्या पेरणीस जोरात लागले आहेत. भात काढणी संपत आली असून संपूर्ण तालुक्याचे ग्रामीण वातावरण पुन्हा एकदा शेतीकामांनी गजबजले आहे. मावळ तालुका हा खरीप भात उत्पादनासाठी प्रसिद्ध असून तालुक्यात सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेतले जाते. साधारणपणे भात पिकाला […] The post Talegaon Dabhade : मावळ तालुक्यात खरीप काढणी पूर्ण; रब्बी पेरणीला वेग appeared first on Dainik Prabhat .
pune : कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
महापालिकेचा निर्णय, आयुक्तांचा प्रस्ताव तयार करण्याचा आदेश पुणे : कामावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तत्काळ ५ लाखांची मदत दिली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी कामगार कल्याण विभागास दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी एकाच दिवशी महापालिकेतील तीन कर्मचाऱ्यांना हृदयरोगाचा झटका आला. त्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून दोन कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर […] The post pune : कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत appeared first on Dainik Prabhat .
Pune District : शिरूर नगरपरिषद निवडणुकीचा अंदाज धूसर
शिरूर : दि. ६ – शिरूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यंदा अभूतपूर्व राजकीय समीकरणांमुळे वातावरण तापले असून, महायुतीमधील उभी फूट, महाविकास आघाडीचे ऐक्य, उद्योगपती प्रकाशशेठ धारीवाल यांची गैरहजेरी आणि प्रभागनिहाय बहुकोनी लढतींमुळे निकालाचा अंदाज लावणे अत्यंत धूसर झाले आहे. शहरातील प्रत्येक गल्लीत राजकीय अंदाज रंगत असले तरी कोणाही पक्षाला सरस ठरवणे कठीण झाले आहे. ओबीसी महिला […] The post Pune District : शिरूर नगरपरिषद निवडणुकीचा अंदाज धूसर appeared first on Dainik Prabhat .
pune : महापालिकेचे अंदाजपत्रक लांबणीवर?
निवडणुकांमुळे सादर होण्याची शक्यता कमीच पुणे – महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे, महापालिका आयुक्तांकडून पुढील आर्थिक वर्षासाठी (२०२६-२७) साठी सादर केले जाणारे अंदाजपत्रक लांबणीवर पडणार आहे. तर, डिसेंबर महिन्यातच आचारसंहिता लागल्यास नवीन सभागृह आल्यानंतरच आयुक्तांकडून अंदाजपत्रक सादर केले जाण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्तांकडून दरवर्षी २० जानेवारीपूर्वी महापालिकेचे […] The post pune : महापालिकेचे अंदाजपत्रक लांबणीवर? appeared first on Dainik Prabhat .
Pune District : मांडवगण येथे कटके यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन
मांडवगण फराटा :शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते शिरूरच्या पूर्व भागात अनेक विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. यामध्ये मांडवगण फराटा गावठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मॉडेल स्कूल म्हणून निवड झाली असून, त्यासाठी नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम, जुन्या वर्ग खोल्या दुरुस्ती व भौतिक कामांसाठी ७२ लाख रुपये निधी मंजूर केला. याशिवाय, जिल्हा परिषद प्राथमिक […] The post Pune District : मांडवगण येथे कटके यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन appeared first on Dainik Prabhat .
pune : अभय योजनेचा सव्वाशे कोटींचा दिलासा
दोन आठवड्यांत २४ हजार मिळकतधारकडून कर जमा पुणे : मिळकतकर वसुलीसाठी महापालिकेने राबवलेल्या अभय योजनेच्या पहिल्या १५ दिवसात पालिकेच्या तिजोरीत तब्बल १२५ कोटी रूपये जमा झाले आहेत. ४ लाख ५० हजार थकबाकीदारांमधील २४ हजार मिळकतधारकांनी हा कर जमा केला आहे. त्यामुळे पालिकेचे मिळकतकर उत्पन्न सुमारे १९०३ कोटी झाले आहे. योजनेच्या सुरूवाती प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेने […] The post pune : अभय योजनेचा सव्वाशे कोटींचा दिलासा appeared first on Dainik Prabhat .
विमान वाहतूक व्यवस्थेत तत्काळ सुधारणा करा; खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी
पिंपरी – देशातील विमान वाहतूक क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या गंभीर अव्यवस्थेमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विमान उड्डाण रद्द होण्याचे प्रमाण वाढले असून विमानांची उड्डाणे १५ ते २० तासांनी होत आहेत, यात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या अव्यवस्थेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी […] The post विमान वाहतूक व्यवस्थेत तत्काळ सुधारणा करा; खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी appeared first on Dainik Prabhat .
Pune District : पुणे-नाशिक रेल्वे मार्ग बदलल्याने आंबेगाव-जुन्नर विकासाला मोठा धक्का
मंचर : पुणे-नाशिक रेल्वे मार्ग शिर्डीमार्गे वळवण्याचा निर्णय जाहीर होताच आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रेल्वे मार्ग बदलल्याने विकासाला मोठा धक्का बसला असून पर्यटन आणि उद्योगक्षेत्रात नाराजीची भावना तयार झाली आहे. गेल्या तीन दशकांपासून आंबेगाव-जुन्नर या भागातून रेल्वेमार्ग जाणार अशी आशा नागरिक, व्यावसायिक, शेतकरी आणि पर्यटन क्षेत्राला होती. तीन वेळा […] The post Pune District : पुणे-नाशिक रेल्वे मार्ग बदलल्याने आंबेगाव-जुन्नर विकासाला मोठा धक्का appeared first on Dainik Prabhat .
pune : दोन्ही राष्ट्र्वादीच्या चुली वेगवेगळ्याच
महाविकास आघाडीद्वारेच निवडणुका लढविणार-प्रशांत जगताप पुणे – पुणे महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. पुण्यासह राज्यातही महाविकास आघाडीतून निवडणुका लढविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. यामुळे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना पूर्ण विरामच मिळाला आहे. नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध राजकीय समीकरणे तयार झाली […] The post pune : दोन्ही राष्ट्र्वादीच्या चुली वेगवेगळ्याच appeared first on Dainik Prabhat .
pune : मागितले आठ कोटी, घेतले तीस लाख
सोसायटीच्या नव्या सभासदांना प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी, एसीबी ने दोघांना पकडले पुणे – सोसायटीतील नवीन सभासदांना समभाग प्रमाणपत्र (शेअर सर्टिफिकेट) देण्यासाठी आठ कोटींची मागणी करून ३० लाखांची लाच घेणाऱ्या प्रशासकासह अवसायाकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल केला असून प्रशासकाला शनिवार पेठेत सापळा लावून पकडले. याप्रकरणी विनोद माणिकराव देशमुख (वय ५०, रा. सिंहगड […] The post pune : मागितले आठ कोटी, घेतले तीस लाख appeared first on Dainik Prabhat .
Lonavala : लोणावळ्यात भीषण अपघात; गोव्यातील दोन तरुणांचा मृत्यू
लोणावळा – लोणावळा-खंडाळा परिसरात फिरण्यासाठी आलेल्या गोव्यातील दोन तरुणांचा कार व टेम्पोच्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. ६) पहाटे साडेसहाच्या सुमारास टायगर-लायन्स पॉईंटजवळील शिवलिंग पॉईंट परिसरात घडला. दर्शन शंकर सुतार (वय २१) व मयुर वेंगुर्लेकर (वय २४, दोघेही रा. म्हापसा, गोवा) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर टेम्पो चालक भिमा […] The post Lonavala : लोणावळ्यात भीषण अपघात; गोव्यातील दोन तरुणांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
Pune District : महामानव डॅा. आंबेडकर यांच्या कार्याचा जागर
राजगुरुनगर : भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना नवा न्यायमार्ग दाखवणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजगुरुनगर शहरात अभिवादनाचा कार्यक्रम अत्यंत श्रद्धा, शिस्त आणि शांततेत पार पडला. जुन्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगतच्या एस. टी. स्थानकासमोर उभारलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास शासनामातर्फे उपविभागीय अधिकारी (प्रांत) अनिल दौंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. […] The post Pune District : महामानव डॅा. आंबेडकर यांच्या कार्याचा जागर appeared first on Dainik Prabhat .
Pimpri : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुरू केली निवडणुकीची तयारी
पिंपरी – आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील तयारी सुरू केली असून नुकतीच पक्षाच्या शहर कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली आहे. काही दिवसांपूर्वी पक्षांच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी महापालिका निवडणुकीच्या नियोजनासाठी कोअर कमिटी जाहीर केली होती. या कमिटीची बैठक नुकतीच पार पडली असून विशेष बाब म्हणजे पक्षाचे ज्येष्ठ नेते आजम पानसरे यांनी […] The post Pimpri : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुरू केली निवडणुकीची तयारी appeared first on Dainik Prabhat .
pune : सातारा साहित्य संमेलनाच्या मृदुला गर्ग उद्घाटिका
चार दिवसांत विविध कार्यक्रम, समारोपास रघुवीर चौधरी यांची उपस्थिती पुणे – सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन भारतीय पातळीवरील ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार असून समारोपास ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद […] The post pune : सातारा साहित्य संमेलनाच्या मृदुला गर्ग उद्घाटिका appeared first on Dainik Prabhat .
आळंदी : आळंदीतील देहू फाटा चौकातील एसटी महामंडळाच्या चार एकर जागेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस उभ्या करण्यास गेल्या शुक्रवारी (दि. 28) सुरुवात झाली. परंतु या बदलामुळे प्रवाशांची गैरसोय अधिकच वाढली आहे. आळंदीकरांना आता बसस्थानकासाठी दीड किलोमीटर चालत जावे लागत आहे. नव्या जागेत बसलागणी सुरू झाली असली तरी पायाभूत सुविधा नसल्याने प्रवासी त्रस्त झाले […] The post Pune District : चार एकर जागा घेऊनही सुविधा शून्य; आळंदी एसटीच्या जागेत पीएमपी आली : प्रवाशांची गैरसोय अधिकच वाढली appeared first on Dainik Prabhat .
pune : अजित पवार यांच्या पक्षाने इच्छुकांकडून मागविले अर्ज
सर्व जागा लढवणार, १८ डिसेंबरपर्यंत मुदत पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅग्रेसने सर्व जागांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. ही माहिती पक्षाचे शहर प्रमुख माजी आमदार सुनील टिंगरे, प्रसिध्दी प्रमुख बाबासाहेब पाटील यांनी दिली. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी निवडणूक स्वबळावरच लढविण्याचे अनेकवेळा सूतोवाच केले असून ४१ प्रभागांमधील सर्वच्या सर्व १६५ जागांसाठी […] The post pune : अजित पवार यांच्या पक्षाने इच्छुकांकडून मागविले अर्ज appeared first on Dainik Prabhat .
‘मी सुमारे 10 वर्षांपासून एअरलाइन उद्योगात काम करत आहे. आजपर्यंत इतके मोठे संकट पाहिले नाही. मला वाटते की इंडिगोची अडचण दुसऱ्या कोणाची नाही, तर कंपनीने स्वतःच निर्माण केलेली आहे. मी माझ्या अनेक सहकारी वैमानिकांशीही बोललो, तेव्हा या निष्कर्षावर पोहोचलो आहे.’ 34 वर्षीय वैमानिक कॅप्टन रोहित सक्सेना (बदललेले नाव) एअरलाइन कंपनी इंडिगोमध्ये 3 वर्षांपासून काम करत आहेत. रोहितला 5 हजार उड्डाण तासांचा अनुभव आहे. ते आपली ओळख उघड करू इच्छित नाहीत कारण नोकरी जाण्याचा धोका आहे. ओळख लपवून त्यांनी आम्हाला ते सर्व सांगितले, जे इंडिगो संकटाच्या मुळाशी आहे. 2 डिसेंबर रोजी या संकटाची सुरुवात झाली. 6 डिसेंबरपर्यंत इंडिगोची 2000 हून अधिक विमाने रद्द करावी लागली. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, कोलकाता यासह देशभरातील लाखो प्रवासी त्रस्त झाले. त्यांना अनेक तास विमानतळावर थांबावे लागले. याचे अनेक व्हिडिओ-फोटो समोर आले आहेत. इंडिगो संकटाचे कारण काय आहे, इंडिगो व्यतिरिक्त यासाठी आणखी कोण जबाबदार आहे, यावर आम्ही इंडिगोच्या दोन पायलट आणि चार एव्हिएशन तज्ञांशी बोललो. यातून असे समजले की या संकटासाठी दोन घटक जबाबदार आहेत. 1. इंडिगो: DGCA च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयारी केली नाहीDGCA ने जारी केलेले फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियम जानेवारी 2024 मध्ये पहिल्यांदा अधिसूचित करण्यात आले होते. इंडिगोकडे या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ होता. परिस्थिती बिघडल्यावर, त्यांनी 5 दिवसांत 4 हजारांहून अधिक उड्डाणे रद्द केली. यामुळे वेगवेगळ्या मार्गांवर प्रवासी अडकले आणि विमानतळावर गोंधळ निर्माण झाला. 2. DGCA: नियमांचे पालन करून घेणे अपेक्षित होते, इंडिगोच्या बाबतीत दुर्लक्ष केलेफ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशनच्या नियमांचे पालन करून घेण्याची जबाबदारी DGCA ची होती. काँग्रेसने यावर प्रश्न विचारला आहे की DGCA काय करत होते. पक्षाचे खासदार शशिकांत सेंथिल म्हणाले की, DGCA ला माहीत होते की देशातील सर्वात मोठी एअरलाइन यासाठी तयार नाही. हे नियम 1 नोव्हेंबर 2025 पासून पूर्णपणे लागू करण्यात आले. DGCA ने इंडिगोकडून त्यांचे पालन का करून घेतले नाही. एका पायलटच्या दृष्टिकोनातून समजून घ्या सिस्टम अचानक मंदावली, अर्ध्या तासाच्या प्रक्रियेला एक ते सव्वा तास लागलाइंडिगोचे पायलट रोहित सांगतात, '2 डिसेंबर रोजी मी दिल्ली विमानतळावर होतो. विमानतळावर उड्डाण करण्यापूर्वीच्या प्री-फ्लाइट तयारीला सरासरीपेक्षा जास्त वेळ लागला. ग्राउंड स्टाफ क्लिअरन्सपासून ते इतर प्रक्रिया ज्यांना अर्धा तास लागतो, त्यांना एक ते सव्वा तास लागला.' '3 आणि 4 डिसेंबर रोजीही असेच घडले. इंडिगोची सिस्टीम अचानक मंदावली आहे असे वाटले. यामागे काय तांत्रिक किंवा व्यवस्थापकीय कारणे आहेत, हे पायलट्सना माहीत नाही. आम्हाला तर विमान उडवण्यासाठी रोस्टर मिळते. आम्ही त्यानुसार उड्डाणासाठी निघतो.' अलीकडे अचानक जास्त विमाने उडवण्याचा आणि जास्त वेळ ड्युटी करण्याचा दबाव आला आहे का? रोहित उत्तर देतात, 'जास्त उड्डाणाचा दबाव नाही. होय, फ्लाइंग टाइम व्यतिरिक्त इतर अप्रुव्हल्स जसे की टॅक्सी, पार्किंग, एटीसी क्लिअरन्स, सिक्युरिटी क्लिअरन्स, चेकलिस्ट क्लिअरन्स, ग्राउंड क्लिअरन्स यांना जास्त वेळ लागला आहे.' या संकटामागे FDTL चे नवीन नियम सांगितले जात आहेत, हे तर 1 नोव्हेंबरपासून लागू झाले होते. हे संकट एक महिन्यानंतर का आले? एक महिन्यापासून पायलट जास्त उड्डाणे करत होते आणि अचानक अचानक कमी करू लागले का? रोहित सांगतात, ‘1 नोव्हेंबरपासून नियम लागू झाले, तेव्हापासून नियमांनुसारच रोस्टर बनवले जात होते. आठवड्यात 36 ऐवजी 48 तासांची विश्रांती दिली गेली. आम्ही आधीसारखीच उड्डाणे करत होतो. अचानक 3 डिसेंबरपासून काय झाले, हे समजत नाहीये.’ ‘पायलट कमी, नवीन भरती प्रक्रिया संथ’आम्ही इंडिगोमध्ये काम करणाऱ्या एका ट्रेनी पायलटशीही बोललो. त्यांना नाव उघड करायचे नाही. पायलट सांगतात, ‘असे नाही की नवीन नियम अचानक आले. कंपनीला आधीच माहिती होती. असे नाही की भरती होत नाहीये, पण प्रक्रिया खूप संथ आहे. बरेच पायलट सुट्टीवर गेले आहेत. वर्षाचा शेवटचा महिना सुरू आहे आणि त्यांच्या सुट्ट्या प्रलंबित होत्या.’ ‘अनेक पायलट नोकरी सोडत आहेत कारण अनुभव घेतल्यानंतर त्यांना मध्य पूर्व किंवा इतर देशांमध्ये चांगली पगार मिळते. गेल्या काही वर्षांपासून भारतात पायलटांच्या पगाराची वाढ थांबली आहे. हे स्पष्ट आहे की FDTL नियम योग्य आहेत. पायलटांना आराम हवा आहे. इंडिगो खूप जास्त उड्डाणे करते. कंपनीत नवीन नियमांनुसार पायलटांची कमतरता आहेच.’ ‘एअरलाइन क्षेत्रात इंडिगोचा वाटा 60% पेक्षा जास्त आहे. एका अर्थाने त्यांची मक्तेदारी आहे. कंपनी प्रत्येक गोष्टीची किंमत खूप कमी ठेवते, म्हणूनच ती नफ्यात राहते. आतून लोक असेच बोलत आहेत की इंडिगोने दबाव निर्माण करण्यासाठी हे सर्व केले आहे कारण कंपनीने DGCA समोर ज्या मागण्या ठेवल्या होत्या, त्या मान्य करण्यात आल्या आहेत.’ इंडिगोच्या 100 पैकी फक्त 3 विमानांनी वेळेवर उड्डाण केलेइंडिगो ही देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी आहे. तिची दररोज सुमारे 2300 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे आहेत. संकटाच्या काळात, इंडिगोची वेळेवर कामगिरी 5 डिसेंबर रोजी 3.7% पर्यंत खाली आली. म्हणजेच, 100 विमानांपैकी फक्त 3.7 विमानांनी वेळेवर उड्डाण केले. 5 डिसेंबर रोजी अकासा एअरची वेळेवर कामगिरी 79%, अलायन्स एअरची 73%, एअर इंडिया एक्सप्रेसची 66.3% आणि स्पाईसजेटची 62.3% होती. 4 डिसेंबर रोजी इंडिगोची फक्त 8.5% आणि 3 डिसेंबर रोजी 19.7% विमानेच वेळेवर उड्डाण करू शकली होती. इंडिगोने नियम का पाळले नाहीत, सरकारवरही प्रश्नचिन्हएअरलाईन्स पायलट असोसिएशनचे कॅप्टन अनिल राव पायलट आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित मुद्दे मांडत आले आहेत. राव म्हणतात, ‘आम्ही DGCA आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला हाच प्रश्न विचारला आहे की हे संकट अचानक का आले? FDTL चा नियम 2 वर्षांपासून लागू केला जात आहे. एअरलाईन कंपनीकडे तो लागू करण्यासाठी पुरेसा वेळ होता. तरीही असे केले गेले नाही.’ ‘DGCA आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला माहीत होते की नवीन नियमांनुसार एअरलाईन्स काम करत नाहीत.’ सरकार हे अचानक घडले असे कसे म्हणू शकते? सरकारला हवे असल्यास, हे पायलट आणि क्रूच्या कमतरतेमुळे झाले की इतर काही कारण होते याची स्वतः चौकशी करू शकते. नियम लागू झाल्यानंतर 35 दिवसांनी संकट कसे आले?कॅप्टन अनिल राव म्हणतात, 'सर्व काही अचानक घडले असे म्हणणे चुकीचे आहे. FDTL 1 नोव्हेंबरपासून लागू आहे आणि हे संकट सुमारे 35 दिवसांनंतर आले. एटीसी आणि क्रूचे रेकॉर्ड पाहिले तर कळेल की सर्व पायलट आणि क्रू वेळेवर जात होते, मग विमानांच्या येण्या-जाण्यात उशीर का झाला? ही संपूर्ण व्यवस्था पारदर्शक नाही. यामुळे संकटाचे खरे कारण काय आहे हे कळत नाहीये.' 'इंडिगोने सरकारवर दबाव टाकण्यासाठी हे संकट स्वतः निर्माण केले आहे. कंपनीला नियमांमध्ये सवलत हवी होती. सवलत मिळाली नाही, तर तिने संपूर्ण व्यवस्थाच बदलून टाकली. ही अडचण का निर्माण झाली, याचे स्पष्ट उत्तर देण्यात आलेले नाही.' तज्ज्ञ म्हणाले- या परिस्थितीसाठी फक्त इंडिगो जबाबदारएव्हिएशन तज्ज्ञ जितेंद्र भार्गव म्हणतात, ‘या संपूर्ण गोंधळासाठी फक्त इंडिगो जबाबदार आहे. एअरलाइन कंपन्यांच्या विनंतीवरूनच DGCA ने दोन टप्प्यांत नियम लागू केले होते. कदाचित इंडिगोच्या व्यवस्थापनाला खूप विश्वास होता की नियम लागू करण्यासाठी त्यांना थोडा अधिक वेळ मिळेल. कंपनीला कळले की DGCA ने त्यांची विनंती मान्य केली नाही. त्यांच्याकडे इतके पायलट नाहीत की सर्व ऑपरेशन्स सामान्यपणे चालवता येतील.’ भार्गव पुढे म्हणतात, ‘नियमांमधील बदलांनुसार अधिक कर्मचाऱ्यांची गरज होती. DGCA चा सामान्य नियम आहे की, एक पायलट एका वर्षात 1000 तासांपेक्षा जास्त उड्डाण करू शकत नाही. आता डिसेंबर आहे. नोव्हेंबरपर्यंत अनेक पायलटने त्यांची मर्यादा पूर्ण केली असेल आणि ते उपलब्ध नसतील अशी शक्यता आहे. यात अनेक घटक एकाच वेळी जोडलेले आहेत.’ ‘इंडिगोकडे दोनच पर्याय होते. पहिला, जो आता घडला आहे. त्यांनी सर्व फ्लाइट्सचे वेळापत्रक तसेच ठेवले. नंतर त्यांना रद्द कराव्या लागल्या आणि प्रवाशांना अडचणी आल्या. दुसरा, ज्या फ्लाइट्स ऑपरेट होऊ शकत नव्हत्या, त्या आधीच रद्द करायच्या होत्या. पायलटच्या संख्येनुसार फ्लाइट्स ऑपरेट करायला हव्या होत्या.’ ‘DGCA ने समस्येकडे दुर्लक्ष केले, परिस्थिती हाताबाहेर गेली’जितेंद्र भार्गव म्हणतात, ‘हे सर्व DGCA ला देखील माहीत असेल. तरीही त्यांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली. नोव्हेंबरमध्येही इंडिगोच्या १२०० हून अधिक विमानांच्या उड्डाणे रद्द झाली होती. अशा परिस्थितीत DGCA ने कारणे दाखवा नोटीस बजावायला हवी होती.’ ‘आता DGCA समोर आव्हान होते की परिस्थिती कशी नियंत्रणात आणावी. एक पर्याय होता की त्यांनी इंडिगोलाच उपाययोजना करू दिली असती. हे शक्य नव्हते कारण पायलट आधीच उपलब्ध नव्हते. अचानक पायलटची कमतरता पूर्ण करता आली नसती, म्हणूनच DGCA ने नियमांमध्ये पुन्हा शिथिलता दिली.’ एव्हिएशन एक्सपर्ट डॉ. सुभाष गोयल देखील या संकटासाठी इंडिगोला जबाबदार मानतात. ते म्हणतात, ‘जर इतर एअरलाईन्स नियमांनुसार त्यांच्या क्रू मेंबर्सची संख्या वाढवू शकत असतील, तर इंडिगो का नाही. त्यांच्याकडे 60% मार्केट शेअर आहे, त्यामुळे त्यांना वाटले की ते ब्लॅकमेल करून जुन्या नियमांवरच चालतील.’ ‘एअरलाईन कंपन्यांवर मोठा दंड आकारला पाहिजे’फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्सचे अध्यक्ष चरणवीर सिंग रंधावा सांगतात, ‘इंडिगो नवीन नियम लागू होऊ नयेत यासाठी प्रयत्न करत होती. गेल्या वर्षीही त्यांनी उशीर केला होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही कंपनी DGCA कडे गेली. पहिल्या टप्प्यात 60-70% नियम जुलैमध्येच लागू झाले आहेत. तेव्हा इंडिगोच्या एकाही फ्लाईटला उशीर झाला नाही.' '1 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील नियम लागू करण्यात आले, परंतु कंपन्या पुन्हा DGCA कडे गेल्या आणि नियमांमध्ये सवलत मागितली. एअरलाईन कंपन्यांची हे नियम लागू करण्याची कोणतीही इच्छा नव्हती.’ इंडिगो मनमानी करत राहिली, तर DGCA कुठे चुकले?चरणवीर सिंग रंधावा DGCA मध्ये फ्लाइट इन्स्पेक्टर आणि CFO राहिले आहेत. ते म्हणतात, 'DGCA मध्ये यंत्रणा (मेकॅनिझम) काम करते. या अंतर्गत वेळेवर स्पॉट चेकिंग होते. वर्षातून एकदा नियामक ऑडिट करतात. नियामक तपासणीसाठी वार्षिक पाळत योजना वर्षाच्या सुरुवातीला जारी होते. यात प्रत्येक एअरलाइन कंपनीबद्दल अहवाल असतो.' 'गेल्या काही वर्षांत ज्या प्रकारे विमान वाहतूक उद्योग वाढला आहे, त्याच्या तुलनेत DGCA कडे मनुष्यबळ वाढलेले नाही. यामुळे ऑडिट योग्य प्रकारे होऊ शकत नाहीये. एका एअरलाइनच्या ऑडिटसाठी 3 दिवसांचा वेळ मिळतो. इंडिगोच्या दिवसाला 2200 विमानांची उड्डाणे होत आहेत.' ‘सध्या जेवढे मनुष्यबळ आहे, त्यानुसार एक महिना ऑडिट करावे लागेल. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे DGCA व्यतिरिक्त नियमनासाठी दुसरी कोणतीही संस्था नाही.’ तिकिटांच्या मनमानी दरांवर बंदी, सरकारने भाडे निश्चित केलेइंडिगो संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने 6 डिसेंबर रोजी एअरफेअर कॅप (विमान भाड्याची कमाल मर्यादा) लागू केली. इंडिगोच्या उड्डाणे रद्द झाल्यामुळे अनेक मार्गांवर तिकिटांच्या किमती 60 हजारांपर्यंत पोहोचल्या होत्या. यानंतर, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, आम्ही सर्व प्रभावित मार्गांवर ‘योग्य आणि वाजवी भाडे’ सुनिश्चित करण्यासाठी आमच्या अधिकारांचा वापर केला आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत एअरफेअर कॅप लागू राहील. सर्व एअरलाईन कंपन्यांना याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू म्हणाले की, नवीन FDTL नियम 1 नोव्हेंबरपासून लागू आहेत, परंतु इतर कोणत्याही एअरलाइनला अडचण आली नाही. हे स्पष्ट आहे की चूक इंडिगोची आहे. एअरलाइनच्या निष्काळजीपणाची चौकशी केली जाईल आणि कारवाई निश्चित आहे. सरकार इंडिगोमुळे झालेल्या अडचणीची उच्चस्तरीय चौकशी करेल. याव्यतिरिक्त, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने इंडिगोला निर्देश दिले आहेत की त्यांनी प्रवाशांना विनाविलंब परतावा द्यावा. सर्व रद्द झालेल्या किंवा प्रभावित झालेल्या विमानांसाठी परतावा प्रक्रिया 7 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत पूर्ण झाली पाहिजे. कोणाकडूनही पुनर्निर्धारण शुल्क (rescheduling charge) घेतले जाणार नाही. जर परतावा देण्यास विलंब झाला, तर एअरलाइनविरुद्ध कारवाई केली जाईल.
‘रेश्माई’काव्यसंग्रहाचे प्रकाशन उत्साहात संपन्न
पुणे : कवी माणिक महाजन यांच्या ‘रेश्माई’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि त्यांच्या पत्नी मालती माणिक महाजन यांचा वाढदिवस सोहळा शनिवारी (दि. ०६ डिसेंबर) रोजी पुणे येथील नांदेड सिटी, ॲम्फिथिअटर (क्रीडांगण) येथे सायंकाळी मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी कराड वैभव प्रकाशन कराड, महाजन परिवार, नातेवाईक, कुटुंबीय, मित्रपरिवार, नवचैतन्य हास्य परिवार नांदेड सिटी शाखा आणि विविध […] The post ‘रेश्माई’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन उत्साहात संपन्न appeared first on Dainik Prabhat .
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन 27 तास भारतात राहिले. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये 19 करार झाले, परंतु ज्यावर सर्वांचे लक्ष होते, तो संरक्षण करार झाला नाही. भारताला Su-57 सारख्या 5व्या पिढीच्या फायटर जेट्सची आणि S-500 सारख्या एअर डिफेन्स सिस्टीमची नितांत गरज असताना, रशियाने याची ऑफरही दिली होती. पुतिन यांच्या दौऱ्यात संरक्षण करार का झाला नाही, S-500 आणि Su-57 सारख्या शस्त्रांवर चर्चा कुठे थांबली आणि भारत अमेरिकन शस्त्रे खरेदी करेल का; जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न-1: पुतिन यांच्या आगमनावर रशिया-भारत यांच्यात खरंच कोणताही संरक्षण करार होणार होता का?उत्तर: पुतिन यांचे प्रेस सेक्रेटरी दिमित्री पेस्कोव्ह यांनी पुतिन यांच्या भारत दौऱ्याच्या 3 दिवस आधी संरक्षण कराराबाबत संकेत दिले होते. 2 डिसेंबर रोजी त्यांनी सांगितले होते की सुखोई-57 आणि S-400/500 एअर डिफेन्स सिस्टीमचा करार पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्या भेटीच्या मुख्य अजेंड्यावर आहे आणि कदाचित दोन्ही नेत्यांमध्ये यावर चर्चाही होईल. यापूर्वी 1 डिसेंबर रोजी भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनीही सांगितले होते की, द्विपक्षीय बैठकीत मोदी पुतिन यांच्यावर 2018 मध्ये झालेल्या S-400 संरक्षण प्रणालीच्या कराराला पूर्ण करण्यासाठी दबाव आणतील आणि सुखोई-57 च्या खरेदीवरही चर्चा करतील. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्स आणि अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्समध्येही असे म्हटले होते की, पुतिन यांच्या दौऱ्यादरम्यान भारत S-500 एअर डिफेन्स सिस्टिमबाबत करार करू शकतो. मात्र, 3 डिसेंबर रोजी क्रेमलिनमध्ये 'आज तक' द्वारे पुतिन यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान जेव्हा या करारावर अपडेट मागण्यात आले, तेव्हा पुतिन यांनी कोणतेही थेट उत्तर दिले नाही. 5 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्या भेटीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पुतिन यांनी भारत-रशिया दरम्यान संरक्षण सहकार्य 2031 पर्यंत वाढवण्याबद्दल, पुढील वर्षापर्यंत उर्वरित 2 S-400 संरक्षण प्रणालीची डिलिव्हरी पूर्ण करण्याबद्दल सांगितले, परंतु सुखोई-57 किंवा इतर कोणत्याही शस्त्रास्त्रांबाबत नवीन संरक्षण कराराची घोषणा झाली नाही. प्रश्न-2: पुतिन यांच्या भारत दौऱ्यात संरक्षण कराराची घोषणा का झाली नाही?उत्तर: इतर देशांच्या मोठ्या नेत्यांच्या भारत दौऱ्यादरम्यान अनेक मोठ्या संरक्षण करारांची घोषणा होत असते. याला 'शिखर स्तरावरील यश' म्हणून सादर केले जाते. 2010 आणि 2015 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यात हेलिकॉप्टरचा करार झाला, 2016 मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांच्या दौऱ्यादरम्यान राफेल फायटर जेट कराराची घोषणा झाली. 2018 मध्ये पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान S-400 एअर डिफेन्स सिस्टीमचा करारही स्वाक्षरित झाला होता, परंतु यावेळी सर्व अटकळांना न जुमानता पुतिन यांच्या दौऱ्यादरम्यान कोणत्याही संरक्षण कराराची घोषणा झाली नाही. तज्ज्ञ यामागे 4 मोठ्या शक्यता सांगत आहेत… 1. भारताला ट्रम्प यांच्या नाराजीचा धोका पत्करायचा नाहीऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमधील स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामचे उपसंचालक विवेक मिश्रा यांच्या मते, ‘सध्या अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. अशा वेळी जर भारत आणि रशिया यांच्यात मोठा संरक्षण करार झाला, तर अमेरिका शुल्क (टॅरिफ) आणखी वाढवू शकते. यासोबतच व्यापार करारावरील चर्चाही रद्द होऊ शकते.’ चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनेही लिहिले, ‘भारताला फायटर जेटची तातडीने गरज आहे, परंतु ते रशियाचे सुखोई-57 असो किंवा अमेरिकेचे F-35, हा केवळ एक मोठा लष्करी करार नाही, तर यामुळे भारताला अमेरिका आणि रशिया यांच्यापैकी एकाची निवड करण्यास भाग पाडले जाईल.’ खरं तर, ट्रम्प यांचा आरोप आहे की रशियाकडून तेल खरेदी करून भारत त्याच्या युद्ध यंत्रणेत (वॉर मशीन) पैसे टाकत आहे. त्यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर 25% अतिरिक्त शुल्क (एक्स्ट्रा टॅरिफ) आणि रशियन तेल कंपन्यांवरही कठोर निर्बंध लादले. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात भारतातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांनी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे पूर्णपणे थांबवले होते. यामुळे रशियाला जे नुकसान होत आहे, त्याची भरपाई ते भारताला नवीन शस्त्रे विकून करू शकतात, परंतु यामुळे भारतासाठी अधिक गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होऊ शकली असती. 2. जुन्या करारातील शस्त्रांची डिलिव्हरी अजून झालेली नाहीगेल्या काही वर्षांत रशियाकडून चार मोठे संरक्षण करार झाले, ज्या अंतर्गत शस्त्रांची डिलिव्हरी वेळेवर होत नाहीये. 2018 मध्ये भारताने रशियाकडून सुमारे 40 हजार कोटी रुपयांच्या किमतीच्या पाच S-400 एअर डिफेन्स सिस्टीमचा करार केला होता. 2023 पर्यंत त्यापैकी फक्त 2 युनिट्स भारताला मिळू शकले आहेत. पुतिन यांनी लवकरच उर्वरित युनिट्सच्या डिलिव्हरीचे वचन दिले आहे.रशियाच्या अकुला क्लास पाणबुडीचा 25 हजार कोटींचा करार, 62 हजार कोटी रुपयांच्या खर्चाने 85 सुखोई-30 MKI विमानांचे अपग्रेडेशन आणि सुमारे 30 हजार कोटी रुपयांच्या 464 भीष्म टँकचे उत्पादन होणार आहे. हे सर्व करार आणि त्या अंतर्गत शस्त्रांची डिलिव्हरी अजून पूर्ण होऊ शकलेली नाही. याचे सर्वात मोठे कारण रशिया आणि युक्रेनचे युद्ध आहे. युद्धामुळे रशियन शस्त्र कंपन्या आपल्या सैन्याला साहित्य पुरवण्यात व्यस्त आहेत. शिवाय, पाश्चात्त्य देशांच्या निर्बंधांमुळे रशियाला इलेक्ट्रॉनिक्स आणि इंजिन पार्ट्स इत्यादी मिळत नाहीत. याशिवाय, शिपिंग रूट्स आणि वाहतुकीच्या अडचणी आहेत. अशा परिस्थितीत, भारत सुखोई-57 आणि S-500 डिफेन्स सिस्टीमचा करार करून अतिरिक्त लाखो कोटी रुपये अधिक अडकवू इच्छित नाही. 3. पुतिन यांचा भारत दौरा संरक्षण करारासाठी नव्हतारशियाने भारताला तेल विकणे, न्यूक्लिअर प्रकल्प, जहाजे आणि शस्त्रास्त्रांचे उत्पादन आणि परस्पर व्यापार 100 अब्ज डॉलरपर्यंत वाढवणे यासारखे 19 करार केले. जेएनयूचे प्राध्यापक आणि परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ राजन कुमार यांच्या मते, ‘पुतिन यांचा दौरा नवीन संरक्षण करारासाठी नसून, परस्पर व्यापार भागीदारी वाढवण्यासाठी आणि कूटनीतिक संदेशासाठी होता.’ अमेरिका युक्रेन आणि रशियामधील युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करू इच्छितो. पुतिनच्या युद्धाच्या अटींवर ट्रम्प तयार नाहीत. या तणावामध्ये भारताने एकट्या पडलेल्या रशियासोबत उभे राहून राजनैतिक संदेश दिला आहे, परंतु तो तटस्थ भूमिका देखील कायम ठेवू इच्छितो. म्हणूनच पुतिन यांच्या भेटीदरम्यान शस्त्रास्त्रांच्या खरेदीची घोषणा करण्यात आली नाही. निवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांच्या मते, 'रशिया आमचा जुना संरक्षण भागीदार आहे. त्याच्यासोबत अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांच्या करारांवर स्वतंत्रपणे चर्चा सुरू आहे. पुतिन यांच्या भेटीदरम्यान शस्त्रास्त्रांच्या कराराची घोषणा करण्याची गरज नव्हती.' 4. भारत शस्त्रास्त्रांसाठी रशियावरील अवलंबित्व कमी करू इच्छितोस्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालानुसार, भारत जगभरातून जितकी शस्त्रे खरेदी करतो, त्यात 2012 पर्यंत रशियाचा वाटा 76% पर्यंत होता, जो 2024 पर्यंत कमी होऊन 36% पर्यंत राहिला आहे. 1960 नंतर आतापर्यंत ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा भारताच्या शस्त्र आयातीमध्ये रशियाचा वाटा निम्म्याहूनही कमी झाला आहे. भारताने रशियाकडून नवीन सुखोई विमानांचा करार केला, पण त्याचबरोबर फ्रान्सकडून राफेलही घेतले. भारताने मिग-21 विमाने निवृत्त केल्यानंतर नवीन मिग विमानांसाठी रशियासोबत कोणताही करार केला नाही. प्रगत ड्रोनची गरज पूर्ण करण्यासाठी अमेरिकेकडून MQ-9B प्रीडेटर ड्रोन खरेदी केले. याशिवाय, भारत स्वतः शस्त्रास्त्रांच्या उत्पादनावर भर देत आहे. यासाठी भारताने रशियाकडून 60% पर्यंत तंत्रज्ञान हस्तांतरणाची (Transfer of Technology) मागणी केली आहे, जेणेकरून तंत्रज्ञान घेऊन तो स्वतः शस्त्रे बनवू शकेल. प्रश्न-3: भारताला या शस्त्रास्त्रांची किती गरज आहे?उत्तर: एअरफोर्सच्या एका फायटर युनिटला स्क्वॉड्रन म्हणतात, ज्यात 16-18 लढाऊ विमाने असतात. संरक्षण संबंधित मोठे निर्णय घेणारी संस्था कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) नुसार, भारतीय हवाई दलात 42 स्क्वॉड्रन असावेत. भारताकडे अजून फक्त 29 एअरफोर्स स्क्वॉड्रन शिल्लक आहेत. म्हणजेच पाकिस्तानी हवाई दलापेक्षा फक्त 4 स्क्वॉड्रन जास्त आहेत. पाकिस्तानकडे भारताच्या 522 फायटर जेट्सच्या तुलनेत 450 जेट्स आहेत. तर चीनकडे सुमारे 1200 विमानांचे 66 स्क्वॉड्रन आहेत. याच वर्षी सप्टेंबरमध्ये, 1963 पासून भारतीय वायुसेनेचा भाग असलेल्या मिग-21 ला निवृत्त करण्यात आले. भारतीय वायुसेनेत मिग-21 चे एकूण 2 स्क्वॉड्रन समाविष्ट होते. फेब्रुवारी 2025 मध्ये एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी सांगितले होते की भारताला दरवर्षी 35-40 नवीन फायटर जेट्सची गरज आहे. सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीजचे निवृत्त एअर व्हाईस मार्शल आणि अतिरिक्त संचालक आशिष वोहरा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, गेल्या दशकात पाकिस्तानी वायुसेनेचे आधुनिकीकरण खूप वेगाने झाले आहे आणि सध्या त्यांची क्षमता भारतीय वायुसेनेपेक्षा खूप जास्त आहे. नोव्हेंबरमध्ये जारी झालेल्या अमेरिकन संसदेच्या एका अहवालात दावा करण्यात आला होता की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीनने भारताच्या विरोधात आपल्या अनेक शस्त्रांची चाचणी केली होती. या शस्त्रांमध्ये HQ-9 एअर डिफेन्स सिस्टिम, J-10 फायटर जेट्स आणि PL-15 एअर-टू-एअर मिसाईल समाविष्ट आहेत. चीनने जूनमध्ये पाकिस्तानला पाचव्या पिढीची 40 J-35 लढाऊ विमाने, KJ-500 विमाने आणि HQ-9 मिसाईल डिफेन्स सिस्टिम विकण्याची ऑफर दिली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानने याच मदतीने भारताचे राफेल पाडल्याचा दावा केला होता. अशा परिस्थितीत भारताला भविष्यासाठी राफेलपेक्षा उत्तम फायटर जेट्सची गरज असेल, जे पाकिस्तान आणि चीनच्या एअर डिफेन्स सिस्टिमला चकमा देऊ शकतील. ऑपरेशन सिंदूरमध्ये रशियाच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टिमची मदत मिळाली, परंतु जर पुढे असे कोणतेही युद्ध झाले, तर पाकिस्तान आणि चीनच्या हायपरसोनिक मिसाईल आणि सॅटेलाइटने जोडलेल्या डिफेन्स सिस्टिमशी सामना करण्यासाठी S-500 एअर डिफेन्स सिस्टिमची गरज असेल, ज्याची रेंज S-400 पेक्षा जास्त आहे. प्रश्न-4: या कराराला अजून किती वेळ लागू शकतो?उत्तर: लाखो कोटी रुपयांच्या संरक्षण करारामध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण (टेक्नॉलॉजी ट्रान्सफर) आणि इतर अनेक अटी असतात, ज्यामुळे हे करार अनेकदा लांबतात. करार स्वाक्षरी झाल्यानंतर शस्त्रास्त्रांच्या वितरणालाही अनेक वर्षे लागतात. जनरल सतीश दुआ म्हणतात, ‘भारत आपल्या शस्त्रांमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करत असला तरी, रशिया अनेक वर्षांपासून आमच्यासाठी शस्त्रांचा सर्वात मोठा पुरवठादार राहिला आहे. ही एक प्रक्रिया आहे जी सतत चालू राहते. S-500 हवाई संरक्षण प्रणाली अजून रशियाच्या सैन्यात समाविष्ट झालेली नाही. तिच्या कामगिरीचे मूल्यांकन केल्यानंतरच यावर निर्णय घेतला जाईल.’ परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ हर्ष व्ही. पंत लिहितात, ‘युद्धात अडकलेले रशिया अजूनही आपल्या सैन्याला प्राधान्य देत आहे. भारताचे आपले शस्त्रे वैविध्यपूर्ण करण्याचे धोरण एक मोठे आव्हान आहे. तथापि, रशिया भारताचा एक प्रमुख संरक्षण भागीदार राहील, जरी भारतीय शस्त्रांमध्ये त्याचा वाटा कमी झाला तरीही.’ प्रश्न-5: भारत रशिया व्यतिरिक्त कोणत्या देशांकडून नवीन शस्त्रे खरेदी करू शकतो?उत्तर: भारताकडे अमेरिका आणि फ्रान्ससारख्या देशांकडून लढाऊ विमाने खरेदी करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत... याच वर्षी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला F-35 ची ऑफर दिली होती.अमेरिका, भारतावर F-35 खरेदी करण्यासाठी दबाव टाकत आहे. मात्र भारताला माहीत आहे की अमेरिका त्याला F-35 चा सोर्स कोड देणार नाही, शिवाय हे खूप महागडे विमान आहे, त्यामुळे भारताला अजून हे खरेदी करायचे नाही.शिवाय भारताने 2022 मध्ये फ्रान्सकडून 36 राफेल जेट्स खरेदी केले आहेत. 2030 पर्यंत फ्रान्सकडून 90 राफेल F4 स्टँडर्ड फायटर जेट्स आणि 2030 नंतर गरज पडल्यास राफेलचे अपडेटेड व्हर्जन F5 खरेदी करण्याची योजना आखत आहे. मिसाईल डिफेन्स सिस्टिमसाठी भारत इस्रायल, अमेरिका आणि फ्रान्सकडे वळू शकतो…भारत इस्रायलकडून अपडेटेड बराक-8 मिसाईल डिफेन्स सिस्टिम खरेदी करू शकतो, ज्याचे 5 स्क्वॉड्रन आधीच भारतीय सैन्याचा भाग आहेत.रिपोर्ट्सनुसार, अमेरिका भारताला आपली कमी पल्ल्याची मिसाईल डिफेन्स सिस्टिम (NASAMS) आणि पॅट्रियॉट मिसाईल डिफेन्स सिस्टिम विकू इच्छितो.राफेल करारासोबतच फ्रान्सची एस्टर-30 एअर डिफेन्स सिस्टिम घेण्यावरही चर्चा सुरू आहे.भारत इस्रायलसोबत मिळून प्रोजेक्ट कुशा अंतर्गत 150 ते 350 किमी पल्ल्याची एअर डिफेन्स सिस्टिम बनवत आहे, ज्याची 2025 मध्ये यशस्वी चाचणी झाली आहे. 2026 किंवा 2027 मध्ये त्याचे उत्पादन सुरू केले जाईल. प्रश्न-6: संरक्षण करार झाला नाही, तर भारत-रशियाच्या संबंधांवर काय परिणाम होईल?उत्तर: रशियाकडून दीर्घकाळापासून शस्त्रे आणि दारूगोळा खरेदी करत आहोत. यासाठी दोन्ही देशांच्या सरकारांनी इंटर गव्हर्नमेंटल कमिशन ऑन मिलिटरी-टेक्निकल कोऑपरेशन नावाचे एक आयोग स्थापन केले आहे. दोन्ही देश याच आयोगांतर्गत संरक्षणाशी संबंधित करारांवर चर्चा करतात. जनरल सतीश दुआ म्हणतात की, दोन्ही देशांचे राजनैतिक आणि ऐतिहासिक संबंध आणि IRIGC-MTC च्या कामकाजाकडे एकत्र पाहिले जाऊ नये. रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक संबंध सुधारण्यासाठी पुतिन यांचा दौरा झाला होता, ज्यात रशियाने अनेक करारही केले. पुतिन यांच्या दौऱ्यात कोणतीही मोठी संरक्षण डील न झाल्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर कोणताही परिणाम होईल असे म्हणणे योग्य ठरणार नाही.
अन्याय गगनाला भिडतो तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात... भारतातही असेच घडले होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वात उसळलेल्या अहिंसेच्या लाटांनी ब्रिटिशांना पळता भुई थोडी केली. तिकडे दक्षिण आफ्रिकेत असेच काहीसे घडले... तिथे वर्णभेदाच्या क्रूर पंजाने अवघ्या माणुसकीचा गळा घोटला होता. तेव्हा एक सडपातळ आणि शांत डोळ्यांचा कृष्णवर्णीय तरुण पुढे आला. त्याने आपल्या देशाला या जुलमातून मुक्त करण्याचा विडा उचलला. त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. तब्बल 27 वर्षे तुरुंगात काढली. दगड फोडले, पण स्वप्ने जोडली. त्यानंतर जेव्हा तो तुरुंगाबाहेर पडला तेव्हा तो फक्त माणूस राहिला नव्हता, तो गोरगरिबांची आशा बनला होता. एक प्रकाश बनला होता. या प्रकाशाने नंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष म्हणून इतिहास घडवला. चला तर मग 'धुरंधर'च्या आजच्या विशेष भागात आपण उभे राहूया त्या महान योद्ध्याच्या खांद्यावर, ज्याला जग 'मदिबा' अर्थात नेल्सन मंडेला म्हणून ओळखते.... म्वेझो गावात जन्म नेल्सन मंडेला यांचा जन्म 18 जुलै 1918 रोजी दक्षिण आफ्रिकेतील एका दुर्गम म्वेझो गावात झाला. हे गाव पूर्व केप प्रांतातील उम्टाटा शहरालगत आहे. त्यांच्या वडिलांचे नाव गाडला हेनरी मफानईसव्वा, तर आईचे नाव नोसेकेनी फॅनी असे होते. ती गाडला यांची तिसरी पत्नी होती. मंडेला हे त्यांच्या वडिलांच्या 13 अपत्यांपैकी एक होते. ते हे थेंबू राजघराण्याशी संबंधित होते. त्यांचे वडील गाडला यांची थेंबूच्या राजाने म्वेझोच्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती. नेल्सन यांना हे पद रक्ताच्या नात्यामुळे व तेथील परंपरेमुळे मिळाले. नेल्सन मंडेला हे मदिबा समूहातील होते. त्यामुळे त्यांना आदराने सर्वजण मदिबा म्हणत. मंडेला यांच्या वडिलांनी लाडाने त्यांचे नाव रोहिल्हाला ठेवले होते. त्याचा अर्थ झाडांच्या फांद्या तोडणारा किंवा लाडका खोडकर मुलगा असा होता. वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी मंडेला यांचे पितृछत्र हरपले. त्यामुळे त्यांना आपले घर सोडून अन्यत्र जावे लागले. ते मव्खक्वेज्वेनी नामक शहरात गेले. तिथे एका कुटुंबाने त्यांना दत्तक घेतले. त्यांचे पालनपोषण केले. गाढवावरून पडले अन् शहाणे झाले मदिबा लहानपणापासूनच अत्यंत संवेदनशील होते. जीवनातील लहान-मोठ्या घटनांतून ते शिकत गेले. बालपणी त्यांनी आपल्या मित्रांसोबत एका जंगली गाढवावर स्वार होण्याचा प्रयत्न केला. पण ते खाली पडले. त्यात ते जबर जखमी झाले. हा सर्व प्रकार पाहताना त्यांचे मित्र खदाखदा हसत होते. हे त्यांना अवमानास्पद वाटले. ही घटना त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. त्यांनी कुणाचाही अनादर न करता आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवण्याचा निश्चय केला. त्यामुळे ते आपल्या विरोधकांचा किंवा प्रतिस्पर्ध्यांचा नेहमी आदर करत. वर्णभेदाच्या चटक्यांतून जन्मला क्रांतिकारक नेल्सन यांना विद्यार्थीदशेतही वर्णभेद सहन करावा लागला. तुझा रंग काळा आहे, अशी आठवण त्यांना दररोज करून दिली जायची. त्यांना रस्त्यावरून ताठ मानेने चालण्याचीही परवानगी नव्हती. तसे केल्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागत असते. याच अन्यायामुळे त्यांच्यातील क्रांतिकारक घडला. मंडेला निवृत्त झाले असे लोकांना वाटत होते, पण ते स्वतः तसे मानत नव्हते. 1997 साली ते म्हणाले होते, सर्वांना शांतता, रोजगार, अन्न, पाणी व मीठ मिळावे हे माझे स्वप्न आहे. एकमेकांना समजून घेत एकमेकांच्या गरजांची पूर्तता करता येईल अशा न्याय जगाची निर्मिती करण्यासाठी आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. आपण मजल दरमजल करत तो पल्ला गाठलाच पाहिजे. मंडेलांची त्यांच्या वडिलांसारीच 3 लग्ने झाली नेल्सन मंडेला यांचे 1944 साली इव्हेलिन या परिचारिकेशी पहिले लग्न झाले. इव्हेलिन ह्या मंडेला यांचे तुरुंगतील मित्र वॉल्टर सिसुलू यांच्या भगिनी होत्या. त्यांना व नेल्सन यांना 2 मुले व 2 मुली झाल्या. हे लग्न 13 वर्षे टिकले. पण मंडेलांच्या प्रेम प्रकरणामुळे इव्हेलिन नाराज झाल्या. त्यांनी 1957 साली घटस्फोट घेतला. मंडेला यांनी 1958 साली विनी फ्रेड यांच्याशी दुसरे लग्न केले. त्यांनी मंडेलांना त्यांच्या संघर्षात खूप साथ झाली. यामुळे त्यांना राष्ट्रमाता म्हणूनही ओळख मिळाली. पण नंतर त्यांच्यावर हत्या व अपहरणाचे गंभीर आरोप झाले. हा खटला चालेपर्यंत मंडेला त्यांच्यासोबत राहिले. पण विनीची निर्दोष सुटका होताच दोघे विभक्त झाले. त्यानंतर 1998 मध्ये मंडेला यांनी आपल्या 80 व्या वाढदिवशी ग्रासा मसेल यांच्याशी लग्न झाले. ग्रासा मसेल ह्या मोझाम्बिकचे दिवंगत माजी अध्यक्ष समोरा मसेल यांच्या पत्नी होत्या. समोरा हे कधीकाळी मंडेला यांच्यासोबत तुरुंगात राहिले होते. विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. हा अपघात आफ्रिकेतील वर्णद्वेषी प्रशासनाने घडवून आणल्याचा दावा केला जातो. मंडेला व ग्रासा यांचे लग्न हे आफ्रिकेतील 2 मोठ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबाचे एकत्र येणे मानले गेले. विनी मंडेलांशी लग्न कसे झाले? नेल्सन मंडेला 1990 मध्ये तब्बल 27 वर्षांनंतर तुरुंगाबाहेर आले, तेव्हा एका महिलेने त्यांची कडकडून गळाभेट घेतली. तिथे असलेल्या असंख्य कॅमेऱ्यांनी हा क्षण टिपला. हा फोटो पुढे अनेक वर्ष वंशभेदाच्या संघर्षाविरोधातील प्रतीक म्हणून दाखवला गेला. मंडेलांना मिठी मारणारी ही महिला म्हणजे त्यांच्या पत्नी विनीफ्रेड मॅडकिजेला अर्थात विनी मंडेला. मंडेलांचे आयुष्य जेवढे संघर्षय तेवढेच त्यांची प्रेमकहाणीही रंजक होती. मंडेला देशद्रोहाचा खटला लढत होते, तेव्हा विनी व मंडेलांतील प्रेम फुलत होते. तेव्हा विनी 22 वर्षांच्या होत्या. त्या मंडेलांहून 22 वर्षे लहान होत्या. पण सामाजिक कार्यकर्या म्हणून त्यांच्या राजकीय जाणिवा अत्यंत प्रखर होत्या. मंडेला आपल्या आत्मचरित्रात म्हणतात, मी तिच्या प्रेमातही पडत होतो आणि तिला राजकीयदृष्ट्या सक्षमही करत होतो. मंडेला यांनी विनी यांना केव्हाच औपचारिक प्रपोज केले नाही. याविषयी त्या म्हणतात, एकदा नेल्सन यांनी रस्त्यावर चालताना मला विचारले की, तू त्या ड्रेस डिझायनर महिलेला ओळखतेस का? तू तिला जरूर भेट. मी तुझ्यासाठी लग्नाचा ड्रेस तयार करत आहे. तू तुझ्या बाजूच्या किती लोकांना बोलावणार आहेस? त्यांनी या पद्धतीने माझा त्यांच्याशी विवाह होणार असल्याचे मला कळवण्यात आले. मी रागावले नाही. मी फक्त एवढेच विचारले की कधी? विनी यांनी 1983 मध्ये चित्रपट निर्माते केविन हॅरिस यांना एक मुलाखत दिली. त्यात त्या म्हणाल्या, मी फक्त एका कैद्याशी लग्न करत नव्हते, तर त्यांच्यावर काही निर्बंधही लादण्यात आले होते. त्यांच्याविरोधात प्रिटोरियात एक खटलाही सुरू होता. त्यामुले त्यांना लग्नासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागली. त्यांना लग्नासाठी 4 दिवस मिळाले. मंडेला व विनी यांना 2 मुली झाल्या. मंडेला कैदेत होते, तेव्हा विनी यांनी त्यांचा लढा पुढे नेला. त्यामुळे त्यांनाही तुरुंगवास भोगावा लागला. 1942 साली राजकारणात प्रवेश नेल्सन मंडेला यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या माध्यमातून 1942 साली राजकारणात प्रवेश केला. लवकरच ते युवा आघाडीत सामील झाले. 1949 पर्ंत त्यांनी अहिंसक अनेक आंदोलने केली. समान अधिकार, शिक्षणाचा हक्क, जिनीच्या संपत्तीचा अधिकार व कामगारांचे हक्क यासाठी संघर्ष केला. या चळवळींमुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. 1956 मध्ये त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पण कालांतराने त्यांची सुटका झाली. 1961 मध्ये कामगारांच्या राष्ट्रीय संपाचे नेतृत्व केल्याच्या कारणावरून त्यांना 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. 1963 मध्ये त्यांना पुन्हा सरकारविरोधात केलेल्या अनेक अपराधांसाठी शिक्षा करण्यात आली. 27 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेत त्यांना अतिशय वाईट वागणूक देण्यात आली. जन्मठेपेची शिक्षा दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या लोकांच्या सरकारने कृष्णवर्णीय लोकांवर 'अपार्थाइड' (वर्णभेद) धोरण लागू केले होते. त्या अंतर्गत वर्णभेदाला कायदेशीर मान्यता देण्यात आली होती. मंडेला यांनी या सामाजिक वाईटाविरोधात शांततापूर्ण आंदोलन केले. समाजात सरकारविरोधात जनजागृती केली. यासाठी सरकारने त्यांना अनेकदा अटक केली. पण त्यांनी हार मानली नाही. 1962 साली मंडेला यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना रॉबेन बेटावर पाठवण्यात आले. तिथे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती. पण जन्मठेपेच्या 27 वर्षांतही मंडेला यांचा आत्मविश्वास कणभरही कमी झाला नाही. मदिबांनी तुरुंगातही वाचन व लिखान करत आपल्या सहकाऱ्यांना लढा पुढे नेण्याची प्रेरणा दिली. मंडेला यांच्या अटकेने जगाला धक्का बसला. अनेक देशांत त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात आले. फ्री मंडेला एक जागतिक चळवळ बनली. विविध जागतिक नेत्यांनी व संघटनांनी मंडेलांच्या सुटकेसाठी दक्षिण आफ्रिकन सरकारवर दबाव टाकला. अखेर 11 फेब्रुवारी 1990 रोजी त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यांची सुटका त्यावेळी मानवतेचा विजय म्हणून गणली गेली. मंडेला 27 वर्षांच्या कैदेनंतर बाहेर पडले, तेव्हा जगभरचे पत्रकार त्यांना विचारत होते, 'तुम्हाला राग नाही का? बदला घेणार का?' मंडेलांनी हसत हसत सांगितले, “जेव्हा मी तुरुंगातून बाहेर पडलो, तेव्हा माझ्या मनात खूप राग होता. पण जर मी तो राग घेऊन बाहेर आलो असतो, तर मी अजूनही कैदीच असतो. मी राग आणि द्वेष यांना माफ करून सोडून दिले, म्हणूनच मी खरेच स्वतंत्र झालो.' 3 वेगवेगळ्या तुरुंगांत काढली 27 वर्षे मंडेलांनी 5 ऑगस्ट 1962 ते 11 फेब्रुवारी 1990 पर्यंत 27 वर्षे 6 महिने 6 दिवस एवढा प्रचंड काळ तुरुंगात काढला. त्यांनी रॉबेन आयलंडवर 18 वर्षे काढली. 'द अल्काट्रॅझ ऑफ आफ्रिका' हा तुरुंग केपटाऊनपासून अवघ्या 7 किमी अंतरावर होता. तिथे त्यांची कोठडीत खूप छोटी होती. त्यांना पहाटे 5.30 वा. उठावे लागत होते. त्यानंतर सायंकाळी 4 वाजेपर्यंत चूना खाणीत दगड फोडावे लागत. त्यानंतर रात्री पुन्हा कोठडीत बंद व्हावे लागत होते. त्यांना वर्षातून केवळ 2 पत्रे लिहिण्याची व एकदा नातलगांना भेटण्याची परवानगी होती. मंडेलांनी पोल्समूर तुरुंगात 6 वर्षे काढली. रॉबेन आयलंडवरील वॉर्डनच्या तक्रारीनंतर सरकारला मंडेला तिथे शहीद होण्याची भीती वाटली. त्यामु्ळे त्यांना मुख्य भूप्रदेशात हलवण्यात आले. तिथे त्यांना खोलीत बेड, अभ्यासाचा टेबल व वर्तमानपत्रे मिळू लागली. याच काळात मंडेलांनी गुप्तपणे सरकारशी बोलणी सुरू केली. त्यांनी तुरुंगातूनच एएनसीला टॉक टू द एनिमी असा संदेश पाठवला. मंडेलांना आपली शेवटची 14 महिने व्हिक्टर व्हर्स्टर तुरुंगात घालवावी लागली. हा तुरुंग म्हणजे एक सुंदर बंगला होता. मंडेलांना आता सोडावेच लागेल हे आता सरकारच्या लक्षात आले होते. त्यामुळे या बंगल्यात त्यांना एक स्वयंपाकी, बाग, स्विमिंग पूल व अगदी टीव्हीही मिळाला. त्यांच्या इथेच तत्कालीन राष्ट्राध्यक्षांशी भेटी झाल्या. 11 फेब्रुवारी 1990 रोजी सकाळी त्यांची सुटका होणार होती. वॉर्डनने त्यांना त्यांची बॅग भरण्याची सूचना केली. त्यावर मंडेलांनी एक छोटी बॅग घेतली आणि म्हणाले मी 27 वर्षांपूर्वी जसा आलो, तसाच जातोय. फक्त मनात आता संपूर्ण देश आहे. त्यानंतर ते तुरुंगाबाहेर पडले. तेव्हा लोकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यावर मंडेलांनी हात वर करून शांतपणे म्हणाले, आता देश एकसंध ठेवण्याच्या आपल्या लढाईचा दुसरा टप्पा सुरू होतो. 27 वर्षे तुरुंगात काढल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, सूड घेण्याची भावना नव्हती. फक्त एक प्रचंड प्रेम आणि क्षमाशील हास्य होते. दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती तुरुंगातून सुटल्यानंतर नेल्सन मंडेला यांनी पुन्हा एकदा देशाला जोडण्याचे काम केले. त्यांनी गोऱ्या व काळ्या लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. 1994 साली दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा लोकशाही पद्धतीने सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात मंडेला यांच्या पक्षाचा विजय झाला. ते देशाचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती बनले. पण त्यांनी सूडाचे राजकारण केले नाही. राष्ट्रपती झाल्यानंतर मंडेला एका गोऱ्यांच्या शाळेत गेले. तेव्हा सगळी मुले भीतीने थरथर कापत होती. मंडेला हसले आणि म्हणाले, 'घाबरू नका. मी तुमचा राष्ट्रपती नाही. मी फक्त तुमचा आजोबा आहे.' त्यांचे हे वाक्य ऐकूण त्या शाळेतील विद्यार्थी अन् शिक्षकही गहिवरले. ऐतिहासिक सत्य अन् समेट आयोगाची स्थापना न्याय व सामाजिक सलोखा हे मंडेलांचे सर्वात मोठे योगदान होते. त्यांनी 'ट्रूथ अँड रिकॉन्सिलिएशन' (सत्य व समेट ) आयोगाची स्थापना केली. या माध्यमातून जनतेला वर्णभेदाच्या काळात घडलेल्या गुन्ह्यांची कबुली देण्याची व पीडितांचे म्हणणे ऐकण्याची संधी देण्यात आली. ही घटना द्वेष, हिंसाचार व अन्यायाने पिडलेला एखादा देश शांततेचा मार्ग कसा दाखवू शकतो? याचे सर्वोत्तम उदाहरण ठरली. मंडेलांची ही योजना संपूर्ण जगासाठी शांततेचे एक अद्वितीय मॉडेल ठरले. द्वेषाला द्वेषाने उत्तर देता येत नाही. न्याय व समता या दोन गोष्टींशिवाय कोणताही समाज पुढे जाऊ शकत नाही. खरे नेतृत्व तेच आहे, जे सर्वांना सोबत घेऊन जाते. मंडेलांवर होता पंडित नेहरूंचा प्रभाव नेल्सन मंडेला यांनी 1953 मध्ये 'No Easy Walk to Freedom' हा आपला सुप्रसिद्ध लेख प्रकाशित केला. त्यानंतर 1965 मध्ये त्याच शीर्षकाखाली त्यांच्या लेखसंग्रहाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. ते शीर्षक त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या एका लेखातून घेतले होते. त्या काळात मंडेला नेहरूंच्या विचारांनी भारावून गेले होते. स्वातंत्र्य मिळविणे किती कठीण आहे हे सांगण्यासाठी त्यांनी नेहरूंच्या 'Unity Of India' या पुस्तकातील Lucknow to Tripoli या लेखातील खालील मजकूर उद्धृत केला होता. नेहरू लिहितात, here is no easy walk to freedom anywhere and many of us will have to pass through the valley of the shadow of death again and again before we reach the mountain tops of our desires. (Cited in Mandela, Nelson. 1965. No Easy Walk to Freedom. London, Heinemann. P.31) मंडेला यांना अन्यायाविरोधात 10 वर्षे लढा दिल्यानंतर आपला पुढला मार्ग किती अवघड असेल याची जाणीव झाली होती. त्यामुळे त्यांनी ती भावना व्यक्त करण्यासाठी नेहरूंच्या काव्यमय भाषेचा आश्रय घेतला होता. 1995 च्या रग्बी विश्वचषकाचा किस्सा दक्षिण आफ्रिकेत रग्बी हा फक्त गोऱ्यांचा खेळ मानला जायचा. स्प्रिंगबॉक्स संघाकडे काळे लोक द्वेषाने पाहायचे. मंडेलांनी 1995 च्या रग्बी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गोऱ्यांच्या प्रिय स्प्रिंगबॉक्स संघाची हिरवी-पिवळी जर्सी घालून मैदानात प्रवेश केला. त्यांनी विजेत्या संघाच्या कर्णधाराला विजेतेपद दिले. या एका क्षणाने संपूर्ण देश एक झाला. गोरे आणि काळे दोघेही रडत होते. मंडेला यावेळी म्हणाले, 'खेळामध्ये राष्ट्राला एकत्र आणण्याची सर्वात मोठी ताकद आहे.' 1993 साली मिळाले शांततेचे नोबेल भारताने 1979 साली नेल्सन मंडेला यांचा जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार देऊन सन्मान केला. यावेळी मंडेला तुरुंगात होते. त्यामुळे त्यांच्या पत्नीने भारतात येऊन हा पुरस्कार स्वीकारला. 1986 मध्ये स्वीडिश ट्रेड यूनियन संघाने त्यांना आंतरराष्ट्रीय शांतता व स्वतंत्रता पुरस्कार दिला. इ. स. 1990 मध्ये 27 वर्षांच्या प्रदीर्घ कैदेतून सुटल्यावर नेल्सन मंडेला भारतात आले तेव्हा त्यांना 'भारतरत्न' हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. त्यानंतर 10 डिसेंबर 1993 रोजी नॉर्वेतील ओस्लो सिटी हॉलमध्ये नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. शेवटचा किस्सा - मृत्यूपत्र नेल्सन मंडेला यांचे फुफ्फुसांच्या संसर्गामुळे 5 डिसेंबर 2013 रोजी हॉटन, जोहान्सबर्ग येथील त्यांच्या घरी निधन झाले. तेव्हा ते 95 वर्षांचे होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत होते. त्यांच्या मृत्यूची घोषणा राष्ट्रपती झेकब झुमा यांनी केली. मंडेला यांनी आपल्या भाषणांत व मुलाखतीत अनेकदा सांगितले होते की, 'माझ्या मृत्यूनंतर माझ्या कबरीवर फक्त एकच वाक्य लिहा. ते म्हणजे, इथे तो माणूस झोपला आहे ज्याने कधीही स्वतःला मोठा समजलं नाही.' हा माणूस खरेच जगाला क्षमा, समता आणि प्रेम शिकवून गेला. धुरंधर मालिकेतील खालील स्टोरीज वाचा... धुरंधर-52; शकुंतला देवी:शाळेचे तोंड न पाहता संगणकाची परीक्षा पाहणाऱ्या अन् गणिताला खेळ मानणाऱ्या कानडी महिलेची जादूई कहाणी धुरंधर-51; केशवराव जेधे:ब्राह्मणेतर चळवळीचा प्रमुख चेहरा अन् सामाजिक न्यायासाठी झगडणारा ठसकेबाज दृढनिश्चयी मराठी लढवय्या धुरंधर-50; डॉक्टर सलीम अली:पक्ष्यांच्या जगाचे रहस्य उलगडून मानवाला निसर्गाच्या दिशेने जाण्यास प्रेरित करणारा पक्ष्यांचा 'चालता फिरता विश्वकोश' धुरंधर-49; सर रोनाल्ड रॉस:'साला एक मच्छर'! मलेरिया अन् डास यांच्यातील परस्पर संबंध शोधून मानवतेची सेवा करणारा थोर वैज्ञानिक धुरंधर-48; होमी जहांगीर भाभा:दगडधोंड्यांच्या भारतात अणुज्योत पेटवून अज्ञानाचा अंधःकार दूर करणारा श्रीमंत घरातला बंडखोर तरुण धुरंधर-47; बिंदेश्वरी प्रसाद मंडल:ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या इमारतीचा सर्वात मजबूत पाया रचणाऱ्या बिहारच्या जमीनदाराची कथा धुरंधर-46; कार्ल बुशबी:ना ट्रेन ना प्लेन ना बाईक, तब्बल 27 वर्षांच्या अन् 58 हजार किलोमीटरच्या पदयात्रेची अनोखी कथा जी आजही सुरूय धुरंधर-45; जाईबाई चौधरी:स्त्री जीवन फुलवणारी अन् दलित महिलांना शैक्षणिक, सांस्कृतिक संजीवणी देणारी विदर्भातील थोर सेविका धुरंधर-44; ओशो रजनीश:पापाला पुण्याचे अन् हिंसेला अहिंसेचे कपडे घालावे लागतात असे सांगत ईश्वरापूर्वी स्वतःला शोधण्याचा सल्ला देणारा थोर दार्शनिक धुरंधर-43; अमृता प्रीतम:मैं तेनु फिर मिलांगी, कित्थे? किस तरह? पता नहीं; प्रेम, वेदना अन् स्वातंत्र्याचा सूर छेडत बाईचे जगणे मांडणारी लेखिका धुरंधर-42; दगडाबाई शेळके:स्वतःच्या नवऱ्याचे दुसरे लग्न लावून मराठवाडा मुक्तिसंग्रामात स्वतःला झोकून देणारी जालन्याची 'झाशीची राणी' धुरंधर-41; यशवंत घाडगे:दुसऱ्या महायुद्धात मर्दुमकी दाखवत ब्रिटिशांकडून इटलीच्या सैनिकांना कंठस्नान घालणारा मराठी सैनिक धुरंधर-40; शाहीर अमर शेख:धग, रग, आग, धुंदी अन् बेहोशीची जिवंत बेरीज असणारा तथा 'बर्फ पेटला हिमालयाला विझवायला चला' म्हणणारा शाहीर धुरंधर-39; टी. एन. शेषन:'नेत्यांना नाश्त्यात खाणारे' तथा EC ला अभूतपूर्व ताकद अन् प्रतिष्ठा मिळवून देणारे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त धुरंधर-38; डॉ. एम एस स्वामीनाथन:उपासमारीच्या सावटाखाली झुरणाऱ्या भारताला स्वावलंबनाचे स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवणारा शास्त्रज्ञ धुरंधर-37; मेजर शैतान सिंह:1962 च्या भारत - चीन युद्धात 120 जवानांच्या जोरावर शत्रूचा फडशा पाडणारा अन् पोट फाटले तरी मैदान न सोडणारा बहाद्दर धुरंधर-36; राणी वेलू नाचियार:महिलांची फौज तयार करून ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांना पहिल्यांदा धूळ चारणारी शिवगंगाची 'वीर मंगई' धुरंधर-35; अय्यनकाली:महिलांना छाती झाकण्याची परवानगी मिळवून देणारा अन् दलितांनी पिकवलेले धान्य चालते, मग ते का चालत नाहीत? असा प्रश्न करणारा सुधारक धुरंधर-34; जगन्नाथ शंकरशेठ:लोकांचा विश्वास जिंकणारी श्रीमंती गरिबांवर उधळणारा अन् परकियांनाही आपला वाटणारा मुंबईचा खरा शिल्पकार धुरंधर-33; अण्णाभाऊ साठे:दीड दिवस शाळेत जाऊन साहित्याचा सूर्य झालेला लोकशाहीर; जात, धन अन् धर्मदांडग्यांना आव्हान देणारा अण्णा धुरंधर-32; धीरूभाई अंबानी:गरिबीवर मात करत कोट्यवधी भारतीयांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे भारताचे एक अप्रतिम उद्योग रत्न धुरंधर-31; राजर्षी शाहू महाराज:अस्पृश्याला मानाचे पान अन् नांगरासाठी तोफा वितळवून लोखंड देणारे शाहू महाराज ग्रेट का होते? धुरंधर-30; चे गेव्हारा:अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द जागवून अवघ्या जगातील क्रांतीचा चेहरा बनलेला तुमच्या 'T शर्ट'वरील क्रांतिदूत धुरंधर-29; संत कबीर:पैशांच्या मागे पळणाऱ्यांचा देव कसा? असा परखड सवाल करत समस्त मानवतेला साधेपणाचा संदेश देणारा महानायक धुरंधर-28; राणी चेन्नम्मा:स्वकियांची फंदफितुरी जमिनीत गाडून 1857 च्या सशस्त्र उठावापूर्वी इंग्रजांना धूळ चारणारी 'कर्नाटकची लक्ष्मीबाई' धुरंधर-27; अहिल्याबाई होळकर:न्यायबुद्धीने स्वतःच्या नवऱ्याला धारेवर धरत चोराच्याही पोटाचा प्रश्न सोडवणाऱ्या दूरदृष्टीच्या शासक धुरंधर-26; डॉ. जयंत नारळीकर:ब्रह्मास्त्र होते तर रामाच्या राज्यात वीज होती का? असा झोंबणारा प्रश्न करणारा भारताचा मराठमोळा शास्त्रज्ञ धुरंधर-25; मुथुलक्ष्मी रेड्डी:महिला हक्क अन् आईचे 'देवदासी'पण पाहून त्याविरोधात लढा पुकारणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला आमदार धुरंधर-24; कुलदीपसिंग चांदपुरी:पाकच्या 2000 हून अधिक सैनिकांना 120 जवानांच्या बळावर धूळ चारणारा लढवय्या; '1971' ची अमर गाथा धुरंधर-23; चंद्रप्रभा सैकियानी:पडदा प्रथेवर लाथ घालून महिलांना आभाळ खुले करणारी आसामची हिरकणी; कुमारी माता झाली तरी डगमगली नाही धुरंधर-22; कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील:महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणाचा सूर्य पेरून उपेक्षितांच्या झोपडीत ज्ञानाचे पीक काढणारा खरा 'धुरंधर' धुरंधर-21; प्रबोधनकार ठाकरे:मराठी समाज मनात मोक्याच्या ठिकाणी पक्क्या गाठी मारून जातिभेदांच्या जखमांचा खोलवर शोध घेणारा बहुजन हिंदुत्त्ववादी धुरंधर-20; भीमराव रामजी आंबेडकर:चवदार तळ्याला ताळ्यावर आणणारा दलितोद्धारक अन् सामाजिक समरसतेचा खरा विवेकी शिल्पकार धुरंधर-19; जिगर मुरादाबादी:'शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ खुदा नहीं,' असे म्हणत मौलवींकडून टाळ्या पिटवून घेणारा सूफी शायर धुरंधर-18; आनंदीबाई जोशी:'पृथ्वीच्या पाठीवर हिंदुस्तान इतका दुसरा रानटी देश नाही', असे ठणकावून सांगणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर धुरंधर-17; भगतसिंग:'बॉम्ब अन् पिस्तुले क्रांती आणत नाहीत, क्रांती लोकांच्या मनात जन्मते', असे ठामपणे सांगणारा 'शहीद ए आझम' धुरंधर-16; शहाजीराजे भोसले:छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रेरणास्थान अन् बृहन्महाराष्ट्राची स्थापना करणारा धोरणी राजा धुरंधर-15; ई. व्ही. रामासामी:देव आहे हे सिद्ध करण्याचे आव्हान देत तर्कशुद्ध अन् निर्भय मतांद्वारे समाजात क्रांती घडवणारा भारताचा 'पेरियार' धुरंधर-14; कार्नेलिया सोराबजी:रूढी परंपरांना आव्हान देत शिक्षण, समानता अन् मानवी हक्कांसाठी अथक झगडणारी भारताची पहिली महिला बॅरिस्टर धुरंधर-13; खासेराव जाधव:बहुजन समाजाच्या खांद्यावरील निरक्षरतेचे 'जू' काढून त्यांना उच्च शिक्षणाच्या गंगेचे पाणी पाजणारा अवलिया धुरंधर-12; तंट्या भिल्ल:आदिवासींमध्ये राष्ट्रीयत्व जागवणारा 'रॉबिनहूड', थोर स्वातंत्र्यसैनिक; वाचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचे सोनेरी पान धुरंधर-11; विठ्ठल सखाराम पागे:उकिरड्याला खरकटे माहिती नसल्याच्या काळात 'भूकबळी'वर नामी उपाय शोधणारा राजकारणी धुरंधर-10; मोहन हिराबाई हिरालाल:विनोबा भावेंचे 'सर्वायतन' नक्षलग्रस्त गडचिरोलीत रुजवणारा अन् गरिबांना लक्ष्मीदर्शन घडवणारा अवलिया धुरंधर-9; फातिमा शेख:सावित्रीमाईंची मैत्रीण अन् भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका; फातिमा एक काल्पनिक पात्र होत्या का? तुम्हीच ठरवा धुरंधर-8; एकनाथ दगडू आवाड:बापाचा बुचडा कापून 'पोतराज' प्रथेवर घाव घालणारा पोरगा; कथित गुन्हेगारीने बदनाम झालेल्या बीडचा थोर माणूस धुरंधर-7; स्वामी विवेकानंद:मानवतेचा उत्कृष्ट प्रेमी, महान निधर्मी तत्ववेत्ता; नरेंद्रनाथ दत्त यांचे अखेरचे काही तास कसे होते? धुरंधर-6; कंदुकुरी वीरेशलिंगम पंथुलु:अंधश्रद्धेवर लाथ घालून विधवा पुनर्विवाह अन् ज्ञानाची वात पेटवणारा आंध्रचा 'लेखणी'सम्राट धुरंधर-5; भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड:दोन वेळा वाचवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राण धुरंधर-4; डॉ. विश्राम रामजी घोले:महिला उत्थानासाठी पेटून उठलेला सुधारक, ज्यांची 'बाहुली' ठरली स्त्री शिक्षणाची पहिली बळी धुरंधर-3; पार्वतीबाई आठवले:वैधव्य अन् परावलंबन दैवी भोग मानणारी, पण पोटच्या गोळ्याच्या काळजीने असामान्य झालेली एक निरक्षर स्त्री धुरंधर-2; बसव प्रेमानंद:अंधश्रद्धेच्या खाटेवर आजारी पडलेल्या समाजाला विज्ञानाचे औषध देऊन चमत्कारांची पुरती हवा काढणारा थोर दार्शनिक धुरंधर-1; नरहर अंबादास कुरुंदकर:विचारांची श्रीमंती वाढवणारा अन् आजच्या किर्र वैचारिक काळोखात प्रकाशवाट दाखवणारा थोर विचारवंत
दिव्य मराठी डिजिटलमध्ये आपले स्वागत. संडे पोएम मालिकेच्या आजच्या भागात ऐकू कवी, समीक्षक, कादंबरीकार डॉ. पी. विठ्ठल यांची कविता 'नदीः एक चिरंतन कविता'. पी. विठ्ठल हे नव्वदोत्तर पिढीतील एक महत्त्वाचे कवी आहेत. सध्या ते नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा संकुलात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पी. विठ्ठल यांची समीक्षक म्हणूनही त्यांची ओळखय. त्यांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यासाठी अनेक महत्त्वाचे सन्मान प्राप्त झालेत. त्यांचे तीन कवितासंग्रह, पाच लेखसंग्रह, चार समीक्षाग्रंथ, एक कादंबरी आणि सहा संपादने प्रसिद्ध आहेत. तीन कवितासंग्रह प्रसिद्ध पी. विठ्ठल यांचे 'माझ्या वर्तमानाची नोंद', 'शून्य एक मी', 'मी सार्वकालिक सर्वत्र' हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांची 'संभ्रमाची गोष्ट' ही कादंबरी चांगलीच चर्चेत राहिली. त्यांनी विविध वर्तमानपत्रे, नियतकालिकांमधून विपुल लेखन केले. त्यांच्या लेखांची 'करुणेचा अंत:स्वर', 'संदर्भ: मराठी भाषा', 'समन्वयाचे क्षेत्र', 'वर्तमानाचा उच्चार' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या मराठी विषयाच्या काही पुस्तकांचे त्यांनी लेखन केले असून, काही काळ त्यांनी विश्वकोशाचे (कुमार चरित्रकोश ) अभ्यागत संपादक म्हणूनही काम केले आहे. समीक्षा लेखनात अग्रेसर कवी पी विठ्ठल यांनी समीक्षात्मक लेखन केले आहे. त्यांची 'जागतिकीकरण, बदलते सामाजिक वास्तव आणि समकालीन मराठी कविता' ही पुस्तिका तसेच ‘मराठी कविता: समकालीन परिदृश्य’ हा समीक्षाग्रंथ , 'समकालीन मराठी कविता : दोन लेख', आणि 'विश्लेषण' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी 'वाड:मयीन प्रवृत्ती : तत्वशोध', 'विशाखा : एक परिशीलन', 'सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर', 'जनवादी साहित्यिक: अण्णा भाऊ साठे', शिक्षणवेध, वैचारिक साहित्य या पुस्तकांचे संपादनही केले आहे. 'संडे पोएम'चे इतर भाग संडे पोएम:पाण्यावर तरते तेव्हा, गाथेची किंमत कळते...आजच्या भागात गझलेचा 'ध्यास' घेणारे कवी गझलगिरीश यांची कविता! संडे पोएम:जगप्रसिद्ध स्पॅनिश कवी निकानोर पार्रा यांची ज्येष्ठ कवी-समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी अनुवाद केलेली कविता 'निरोप' संडे पोएम:'निर्वाणीचा शब्द' लिहिणाऱ्या कवी रमेश इंगळे उत्रादकर यांची कविता, 'यत्किंचित दुःखाचे कारण होऊ देऊ नको' संडे पोएम:'भुईशास्त्र'ने लळा लावणारे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी ऐश्वर्य पाटेकर यांची कविता 'वावराचं मृत्यूपत्र' संडे पोएम:भारतीय भाषांचा दीपोत्सव साजरा करणाऱ्या 'काव्याग्रह'मधली गुजराती कवी पीयूष ठक्कर यांची कविता संडे पोएम:मोराची बायको, तिसरा डुळा अन् बाईच्या कविता लिहिणारे किरण येले यांची कविता, 'पुस्तके समजूतदार आणि हट्टी असतात' संडे पोएम:सातपुड्यातल्या डोंगरवाटेचा अनुबंध शोधणारी, कवी कमलेश महाले यांची 'चांदसैली' संग्रहातली कविता...! संडे पोएम:ऐका कवी अरुण सीताराम तीनगोटे यांची कविता...आपण सोबतीने जगलेल्या निरभ्र दिवसांचे काय झाले? संडे पोएम:कवी अजय कांडर यांची रौप्यमहोत्सवी सोहळा साजरा करणारी 'आवानओल' संग्रहातली कविता, 'बाया पाण्याशीच बोलतात' संडे पोएम:कवी विकास पालवे यांच्या 'चकवा' संग्रहातली समकालाला भिडणारी कविता, खिडकीतून दिसतं तेवढं जग...! संडे पोएम:कवी वसंत दत्तात्रेय गुर्जर यांची 'कोलाहल' कवितासंग्रहातली वैश्विक सिम्फनीची निरंतर रचना... 'सदानंद रेगेस'! संडे पोएम:सुप्रसिद्ध हिंदी कवी विष्णू खरे यांची ज्येष्ठ कवी-समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी अनुवाद केलेली कविता परतणे! संडे पोएम:'प्रलयानंतरची तळटीप' लिहिणाऱ्या कवयित्री सुचिता खल्लाळ यांची कविता, सारांश झाडपणाच्या आख्यानाचा... संडे पोएम:स्टँड-अप पोएटरीचा 'तुझे माझे नाते सांग!' हा भन्नाट प्रयोग करणारे कवी आदित्य दवणे यांची कविता...मांजरीणबाई संडे पोएम:कवी संदीप शिवाजीराव जगदाळे यांची जगणं शोधायला लावणारी कविता, गोदावरी, तुला आई म्हणू की शत्रू...! संडे पोएम:कवी विशाल पोतदार यांची लोभस कविता, तुझ्या मिठीची फुलोरटिपणं अजूनही तशीच आठवतात...! संडे पोएम:कवयित्री मानसी नितीन वैद्य यांची कविता...कुणी प्रवासी होता की, मग क्षितिजापुढली रंगीत गाणी! संडे पोएम:सुप्रसिद्ध कवी प्रफुल्ल शिलेदार यांची हरवलेल्या वस्तूचं मिथक या संग्रहातली कविता...शोधाशोध! संडे पोएम:साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांची 'बोलावें ते आम्ही'मधील कविता...दुष्काळाचा कोवळा हात! संडे पोएम:साहित्य अकादमी युवा पुरस्कारप्राप्त कवी वीरा राठोड यांची आगामी 'बिगुलबाजा' संग्रहातली कविता...उजेडाचा दिवा! संडे पोएम:नामदेव कोळी यांच्या 'काळोखाच्या कविता'मधली कविता, 'लवकरच पाऊस येईल म्हणून कसं उधाणतं घर!' संडे पोएम:सुप्रसिद्ध उर्दू कवी सादिक यांची ज्येष्ठ कवी-समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी अनुवाद केलेली कविता...हे शहर शापितांचं! संडे पोएम:ज्येष्ठ हिंदी कवी प्रियदर्शन यांची कविता...नष्ट काहीच होत नाही, धुळीचा एक कणही, पाण्याचा थेंब सुद्धा! संडे पोएम:अमेरिकन कवयित्री सारा टीसडेल यांची कविता...'हे माझ्या लाडक्या रुसलेल्या लहान मुली!' संडे पोएम:भाकर पाऱ्यासारखी निसटत राहिली आणि मी मोठा होत गेलो, तिला पकडता पकडता...आज कवी सुनील उबाळे यांची कविता! संडे पोएम:तुझं शहर हजारो मैलांवर...ऐकू कवयित्री सुनीता डागा यांची कविता! संडे पोएम:'अंधार पडलेल्या काळ्याभोर फळ्यासमोर...' ऐकूयात कवी अनिल साबळे यांची 'टाहोरा' कवितासंग्रहातली कविता! संडे पोएम:तुझ्या माझ्या संबंधात, मला एवढेच सांगायचे आहे...ऐकूयात कवी शंकर वैद्य यांची कविता! संडे पोएम:कवी अक्षय शिंपी यांच्या 'अव्याकृत' कवितासंग्रहातली कविता, पाणी सांगतं गोष्ट...ऐका! संडे पोएम:पांढरे निशाण उभारण्याची घाई करू नकोस...ऐकू कवयित्री संजीवनी बोकील यांची कविता! संडे पोएम:रवी कोरडे यांच्या भुंड्या डोंगरांचे दिवस काव्यसंग्रहातली कविता... विठूच्या वाटेची भूल! संडे पोएम:भालचंद्र नेमाडे यांची 'देखणी'तली कविता...इथे गंजलो मी गळाली झळाळी, कळे काहुरांचे उरी म्लान झाले...! संडे पोएम:अन्न शिजवायचं की घरं जाळायची, याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे...ऐकू वंसत आबाजी डहाके यांची कविता 'वास्तववाद'! संडे पोएम:माथ्यावरती उन्हे चढावी, पावलांत सावल्या विराव्या...ऐकू कवी सदानंद रेगे यांची कविता दुपार! संडे पोएम:हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात, किनारा सोडतात तेव्हा नदीहून बेफाम होतात, ऐकू शिरीष पै यांची कविता! संडे पोएम:माझ्या बालपणावर एक प्रचंड गुलमोहर डवरलेला दिसतो, मी मात्र सावलीच शोधतोय अजून... ऐकू कवी सौमित्र यांची कविता! संडे पोएम:'सूफी प्रार्थनेच्या किनाऱ्यावरून...' ऐकू कवी श्रीधर नांदेडकरांची कविता, जिव्हारी लागलेल्या गोष्टी! संडे पोएम:लोक शांत आहेत, त्यांच्या जवळ आहे एक पेटी, जिच्यात शिल्लक आहे थोडी कुजबुज, ऐकू कवी दासूंची कविता संडे पोएम:माझी आजी कशी, मऊ मऊ हाताची, चांदीच्या केसांची, फुलासारख्या मायेची...ऐकू इंदिरा संत यांची कविता! VIDEO संडे पोएम:आपणच आपल्याला लिहिलेली पत्रं वाचता वाचता...; ऐकू कवयित्री अनुराधा पाटील यांची धुंद करणारी कविता...! संडे पोएम:सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी; ऐका विंदांची कविता! संडे पोएम:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं; ऐका मंगेश पाडगावकरांची कविता संडे पोएम:अस्सल लाकूड, भक्कम गाठ, ताठर कणा, टणक पाठ; ऐका वसंत बापट यांची कविता बाभूळझाड! संडे पोएम:ऐका, सत्तेत जीव रमत नाही म्हणत एका ज्वालामुखीची, निर्वाणाअगोदरची पीडा सांगणारी नामदेव ढसाळ यांची कविता संडे पोएम:ऐका, कवी ना. धों. महानोर यांची कविता - एकदा आई गाणं म्हणाली काळीज कापणारं... संडे पोएम:काव्याच्या अद्भूत जगाची सफर घडविणाऱ्या पहिल्या भागात ऐका, दत्ता हलसगीकरांची 22 भाषांमध्ये अनुवादित कविता!
कौमार्य चाचणी प्रथा: अंधश्रद्धेच्या विळख्यातील कळ्यांचे अश्रू
पुस्तक परीक्षण : डाॅ. रमेश सुतार‘‘अभागी कळ्यांना ठेवून चितेवरी, द्या चुडा स्वप्नांना... हो भडाग्नी, अस्थी गंगाजळी अर्पण करूनी..., सुतक त्यांचे सुटेल देहीवरी...’’‘जातगंगा : कौमार्य चाचणी प्रथा अभियान’ या भरत बेर्डे लिखित कादंबरीची सुरुवातच मुळात वरील काव्यपंक्तीने झालेली आहे. एखाद्या ज्वलंत सामाजिक विषयाला लेखकाने हात घातला आहे. याचा प्रत्ययच सुरुवातीच्या काव्यपंक्तीमधून वाचकास येतो. भरत बेर्डे यांची ही पहिलीच कादंबरी आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी कौमार्य चाचणीसारखा ज्वलंत प्रश्न वाचकांसमोर आणला. खरं तर त्यांचं खूप खूप कौतुक.प्रस्तुत कादंबरी जळगाव जिल्ह्यामधील डोंगर कपारीत वसलेल्या ‘कंजार भाट’ या भटक्या-विमुक्त जमातीमधील अनिष्ट रूढी-परंपरांवर प्रकाशझोत टाकते. कादंबरीची सुरुवात लेखकाने फ्लॅशबॅक पद्धतीने केली आहे. कादंबरीच्या शेवटचा प्रसंग लेखकाने सुरुवातीलाच मांडला आहे. त्यामुळे समाजातील रूढी-परंपरांची जाचक दाहकता, मुलींच्या कौमार्य अवस्थेवर होणारे परिणाम आणि त्या अानुषंगाने पुरुषी समाजमनाची सामाजिक विषयाकडे पाहण्याची वृत्ती, याचा अंदाज आपल्याला सुरुवातीच्या प्रकरणावरून येतो.कादंबरीचा नायक स्वानंद प्रभाकर जाकडे, एक प्रशिक्षित वायरमन जो सरकारी नोकरी करणारा आहे. त्याचे एका मुस्लीम समाजातील मुलीवर (कोहिनूर) प्रेम जडते. लेखक स्वत: नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे हा प्रेमप्रसंग रंगवताना आपण एखादा चित्रपट पाहत आहोत असा भास निर्माण होतो. एवढ्या सहजतेने लेखकाने नायक नायिकेमधील प्रेमप्रसंग रंगवला आहे. त्यासोबतच नायिकेच्या सौंदर्याचे वर्णनही लेखकाने तेवढ्याच ताकदीने कुठेही अश्लीलतेचा दर्प न येता रेखाटले आहे.स्वानंदचे वडील प्रभाकर जाकडे आणि आई रुक्मिणी, तर भाऊ दिलीप आणि वहिनी लक्ष्मी. असे एकत्र कुटुंब असल्याचे सुरुवातीला आपल्याला कळते. स्वानंदचे वडील गावपंचायतीचे माजी सरपंच. जातीचा आणि समाजाचा प्रचंड अभिमान बाळगणारे आणि जुन्या चालीरीतींना (जरी जाचक असल्या तरी) प्राणापलीकडे जपणारे हेकेखोर, मग्रूर आणि अहंकारी व्यक्तिमत्त्व, तर दिलीप दादा आणि वहिनी प्रेमळ आणि जुन्या चालीरीतींना बदलत्या काळानुरूप गाढून टाकावे या विचारांची व्यक्तिमत्त्व. लहान भाऊ स्वानंदवर खूप प्रेम करणारे आणि त्याला वेळोवेळी मदत करणारे.मुस्लीम मुलीशी लग्न केलं तर बाप घरातून हाकलून देईल आणि जिवंत सोडणार नाही हे माहीत असूनदेखील भाऊ आणि वहिनी स्वानंदला रजिस्टर पद्धतीने लग्न लावण्यास मदत करतात. अर्थात बाप आणि गाव पंचायत मुस्लीम मुलीला ‘जातगंगा’ देऊन समाजात घ्यायला विरोध करतात. परिणामी दादाच्या सांगण्यानुसार स्वानंद आणि कोहिनूर दुरवरच्या गावात राहायला जातात. ‘जातगंगा’ म्हणजे कंजार भाट समाजामधील एक प्रकारचा विधी आहे. ज्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला समाजातून वाळीत टाकलेले असते त्यांना पुन्हा समाजामध्ये विधिवत प्रवेश दिला जातो. बहिष्कृत झालेली जर एखादी व्यक्ती असेल तर जातपंचायत बोलावून सर्व पंचांच्या समोर त्या व्यक्तीला हजर केले जाते आणि विशिष्ट मंत्राच्या जयघोषात त्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला स्वगृही प्रवेश दिला जातो.जग कितीतरी वेगाने प्रगती करीत आहे. लोक सुशिक्षित झालेले आहेत. तरीही अजून आपल्या भारतासारख्या देशात आपल्याला वंशाचा दिवा पाहिजे म्हणजे मुलगा पाहिजे ही वृत्ती सर्वच समाजातील लोकांमध्ये आपल्याला दिसून येते. यामध्ये सुशिक्षित समाजही मागे नसतो. आपल्या मुलाला मुलगा नाही म्हणून कितीतरी मुलींचा सासरच्या मंडळींकडून छळ झालेल्या आपण पाहतो. परिणामी सुनेलाच दोष देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त करायचं आणि मुलाचं दुसरं लग्न लावायचं अशा घाणेरड्या विचारांची माणसेही आपण पाहतो.या कादंबरीमधील दिलीप दादाला २ मुली असतात आणि स्वानंदलाही दोन्ही मुलीच होतात. त्यामुळे स्वानंदच्या वडिलांना हे समजल्यावर वडिलांचा पारा चढतो आणि आपल्याला वंशाचा दिवा पाहिजे, मुलगा पाहिजे म्हणून स्वानंदचा बाप परस्पर समाजातील मुलगी बघून स्वानंदचे दुसरे लग्न जमवतो. आपल्या सुखी संसाराला बापाकडून कोणताही त्रास होऊ नये म्हणून स्वानंद आपल्या बायको-मुलींना माहिती न देता बाप जबरदस्ती करतो म्हणून दुसऱ्या लग्नाला तयार होतो. कादंबरीतील हा प्रसंग स्वानंदच्या बंडखोर वृत्तीला शोभणारा वाटत नाही. लग्न लागल्यानंतर कंजार भाट समाजातील ‘कौमार्य चाचणी’ या अनिष्ठ रूढीला तो सामोरा जातो.या प्रथेप्रमाणे लग्नानंतर नवरानवरी शरीरसंबंध ठेवतात त्यावेळी सफेद चादरीवर रक्त दिसले नाही तर मुलगी ‘छिनाल’ आहे असे समजून मुलीला लाथाबुक्क्यांनी मारले जाते. तिच्या परिवारातील सर्वांना हाणले जाते आणि त्या परिवाराचे घरदार उद्ध्वस्त करून गाव सोडायला भाग पाडले जाते. अशा मुलीशी समाजातील कोणीही व्यक्ती लग्नाला तयार होत नाही. त्यानंतर तिला कोणाच्या तरी माडीवर धंद्याला बसावं लागतं. कादंबरीतील स्वानंदच्या दुसऱ्या लग्नाच्या वधूला अशा क्रूर पद्धतीने गावातून हाकलून दिले जाते. ‘काैमार्य चाचणी’ ही प्रथा फक्त महाराष्ट्रातच आहे असे नाही तर भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्येही काही समाजात पिढीजात परंपरा म्हणून ही प्रथा कवटाळली जातेय. शिक्षित व्यक्तींनी अशाप्रकारच्या चालीरीतींच्या विरोधात आवाज उठविणे आवश्यक आहे.कालांतराने जसजशी कादंबरी पुढे सरकते तसतसे गावकऱ्यांचे घरातील इतर माणसांचे स्वभाव तसेच समाजातील इतर चालीरीतींची माहिती उलगडत जाते. जातगंगा देण्यासंबंधीचा अजून एक प्रसंग लेखकाने या कादंबरीमध्ये चित्रित केला आहे. स्वानंदची मोठी मुलगी सुशिक्षित असूनसुद्धा केवळ तिची आई मुस्लीम आहे, समाजाने स्वानंदच्या कुटुंबाला वाळीत टाकलंय त्यामुळे सुशिक्षित वरपित्याच्या आग्रहावरून जातगंगा द्या म्हणून समाजाकडे विनवणी करते हा प्रसंग लेखकाने मोठ्या ताकदीने मांडला आहे. प्रसंगी मुलीच्या तोंडी डायलाॅग दिले आहेत. त्यामुळे तोही प्रसंग चित्रपटासारखा भासतो.पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेमध्ये काही समाजामध्ये परंपरेने घालून दिलेले जोखड शीतल शिक्षित असून सुद्धा सोडू शकली नाही. गर्विष्ठ आजोबाला शिक्षणाचे महत्त्व सांगून सुद्धा आजोबाच्या मनाला पाझर फुटला नाही. परिणामी शीतल आत्महत्या करून आपले जीवन संपवते.काही भटक्या-विमुक्त जमातींमध्ये पिढीजात परंपरेने आलेल्या चालीरीती आणि श्रद्धा यांच्या आहारी आजही काही सुशिक्षित जातात, तर समाजातील काही मोजकेच सुशिक्षित लोक या अनिष्ठ रूढी-परंपरेविरुद्ध आवाज उठवतात. याच समाजातील एक सुशिक्षित तरुण सध्या कौमार्य चाचणी आणि या समाजातील रूढी-परंपरा याविरुद्ध जनजागृती करीत आहे. त्याने ‘stop the V-ritual’ या नावाने एक ग्रुप तयार केला असून त्या ग्रुपच्या माध्यमातून तो आवाज उठवतोय. असे समाजातील सुशिक्षित तरुण-तरुणी जोपर्यंत आपल्या समाजातील अनिष्ठ रूढी आणि अंधश्रद्धांविरुद्ध आवाज उठवणार नाही तोपर्यंत कोणताही समाज आपली प्रगती करू शकणार नाही.अंधश्रद्धाविरोधी कायद्याच्या आधारे अशा प्रकारच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथा-परंपरा जोपर्यंत बंद केल्या जात नाहीत तोपर्यंत या समाजातील अंधश्रद्धांच्या विळख्यात अडकलेल्या कोमल कळ्यांचे अश्रू पुसले जाणार नाहीत. अजूनपर्यंत कित्येक मुलींची संसार करण्याची स्वप्ने उद्ध्वस्त झाली असतील. इतर समाजातील सुशिक्षित युवापिढीनेही याविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे.लेखक भरत बेर्डे यांनी आपल्या या कादंबरीमधून परंपरागत चालत आलेल्या ‘कौमार्य चाचणी’ या क्रुप्रथेला वाचा फोडली. स्वानंदची उच्चशिक्षित मुलगी ‘शीतल’ हिच्या माध्यमातून शिक्षित आणि अशिक्षित यांच्या विचारांमधील तफावत आजोबांशी झालेल्या संभाषणामधून अधोरेखित केली आहे. प्राण गेला तरी परंपरागत चालत आलेल्या रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, चालीरिती न सोडण्याची अशिक्षितांची जिद्दी, कर्मठ वृत्ती आणि या प्रथांना विरोध करणाऱ्या उच्चशिक्षित स्वानंदच्या मुली यांच्यामधील द्वंव लेखकाने व्यवस्थित रेखाटले आहे. उच्च शिक्षणामुळे शीतलच्या विचारामध्ये आलेली प्रगल्भता लेखकाने संयत पद्धतीने मांडली आहे. या कांदबरीमध्ये एकूण ३४ प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी तर काही वेळा प्रकरणाच्या मधेच प्रसंगानुसार लेखकाने चारोळ्या पेरलेल्या आहेत, त्यामुळे त्या त्या प्रकरणातील समर्पक माहिती चारोळ्यांमुळे वाचकाला कळते. ‘जातगंगा : कौमार्य चाचणी अभियान’ ही कादंबरी मराठी साहित्य विश्वात नक्कीच आपलं वेगळं स्थान निर्माण करेल यात शंका नाही.कादंबरीचे नाव : जातगंगा : कौमार्य चाचणी प्रथा अभियानलेखक : भरत पंढरीनाथ बेर्डेपृष्ठे : १९२प्रकाशक : संधीकाल प्रकाशन
आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानूअसं म्हणतात की, आपली मुलगी आपल्या खांद्यापर्यंत उंचीने पोहोचली आणि आईचे कपडे, चपला, पर्स, दागिने, कदाचित मेकअपचं सामान वापरायला लागली, आईला कामात मदत करायला लागली, आईची काळजी घ्यायला लागली, मोठी बहीण म्हणून धाकट्या भावंडांकडे लक्ष द्यायला लागली की ती आता मोठी झाली आहे असं समजा. टीनेजर मुलींशी मैत्रिणीसारखे वागा असं आपण ऐकत असतो. पण मैत्रीण बनणं या वयात सोपं नाही कारण टीनेजमध्ये आलेल्या मुलींशी आईचे संवादापेक्षा वाद जास्त होतात. डिस्कशनपेक्षा भांडणं जास्त होतात. बोलूया म्हटलं की, आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. आपल्या दोघींच्या बोलण्यात हास्य-विनोदाची कारंजी फुलण्या ऐवजी लेक्चरबाजी जास्त होते.आज जरी हे होत असलं तरी एके दिवशी मुलीला हे कळेल की, तुम्ही नेहमीच तिच्या बाजूने होता. तिच्या आनंदात तुमचा आनंद होता. तिच्या दुःखी होण्याने तुम्ही दुःखी होत होतात. तुमच्या मनात असणारी भीती, वाटणाऱ्या आशा-आकांक्षा यावर जसजशी ती मोठी व्हायला लागेल तसतसं तुम्ही बोलू शकाल. तुम्ही दोघी तिची स्वप्नं, तिचं अपयश यावरही चर्चा कराल. मनमुराद हसाल, अगदी हसून हसून डोळ्यांत पाणी येईपर्यंत. आईच्या कुशीत शिरताना तिला ऑकवर्ड वाटणार नाही. एक दिवस तिला कळेल की, तिला निराश करताना तुमचं मन किती दुखावलं गेलं होतं. ते सोपं नव्हतं अजिबात तुमच्यासाठी तिच्या मनाविरुद्ध करणे. ती खरं म्हणजे काळीज आहे तुमचं. तिला सुरक्षित ठेवण्यासाठी काहीही करायला तुम्ही तयार होतात पण आज तुम्हाला तिची मैत्रीण नाही तर आईच व्हायला हवं. अजून काही दिवस, महिने, वर्ष जायला हवीत.मुलगी अजाण आहे. अवघड, निसरड्या, अवखळ वयात आहे. तोवर तुम्हाला तिच्या आईच्याच भूमिकेत जगायचं आहे. प्रेम नक्कीच करायचंय पण तिच्यासाठी काही मर्यादा आखाव्या लागणार आहेत. तुम्ही ठरवलेले नियम तिला आवडणार नाहीत पण हे करणं आणि तेही सीरियसली हे तुमचं कर्तव्य आहे. चुकीच्या वेळेस केलेला मागण्या, चुकीच्या गोष्टींसाठी केलेला हट्ट यांना नाही म्हणावं लागेल.ते तुमचं तुमच्या मुलीवरचं प्रेम होतं हे काही वर्षांनी तिला समजेल. कळेल की आपली आई नाही म्हणाली पण त्यापेक्षा खूप जास्त गोष्टींना ती हो म्हणाली आहे. का असं नाही म्हणाली ती कारण त्या वेळेला ते तुमच्या मुलीच्या कल्याणासाठी होतं. आज कदाचित तिला वाटत असेल की तिच्या निवड केलेल्या मित्र-मैत्रिणीबद्दल, गोष्टींबद्दल, स्क्रीन टाईमबद्दल, सोशल मीडियावरील तिच्या वावराबद्दल तुम्ही खूप शंका घेत आहात. प्रश्न विचारता आहात. तुम्हाला वाटतं तिच्यावर विश्वास ठेवावा पण परिस्थिती, वातावरण तसं नाहीये. दिवसभरात तुमचे वाद होतात. अबोला होतो. रुसवे- फुगवे होतात. अगदी कडकडून भांडणंही. पण तरीही तिला सांगा की एक दिवस तुला हे नक्की समजेल की मी तुझ्यासाठी जे सर्वोत्तम होतं तेच केलं आणि आई म्हणून तुम्ही तिचा त्यावेळी कान पकडला म्हणून मी चुकले नाही हे कळेल तिला आणि तेव्हा तुम्ही तिची चांगली मैत्रीण बनाल.तुमच्या टीनेजर मुलीच्या डोक्यात या वयात हार्मोन्सच्या गोंधळाने मनाला जणू शॉक बसत असतात. शरीराच्या वाढीच्या प्रक्रियेने आणि बाहेरच्या अनेक गोष्टींमुळे. अभ्यासाच्या ताणामुळे, मीडियावरील बऱ्या वाईट पोस्ट आणि मेसेजमुळे, आव्हानात्मक पिअर प्रेशरमुळे, सोशल मीडियामुळे मेंदूत नुसता गोंधळ माजत असतो.या वयात वागण्याची पद्धत आणि शिस्त यांचा तोल सांभाळणं तिच्यासाठी कठीण जातं. समजून वागणं आणि तुमची शिस्त पाळणं हे दोन्ही एकाच वेळी कसं करावं हे तिला कळत नाही. तुम्हाला दोघींनाही असं वाटत असतं की तुमच्यामध्ये छान नातं तयार व्हावं पण तुम्ही मोठ्या असल्याने पालकत्वाच्या सिंहासनावर बसलेले असता. मग पॉवर स्ट्रगल सुरू होतो. एटिट्यूड दाखवला जातो. मुलीच्या अनादाराच्या वागण्याने तुम्ही थकून जाता, तर दुसरीकडे मुलीचं मानसिक आरोग्य डळमळीत झालेलं असतं. काही मुली निराशा, चिंता, खाण्याच्या डिसऑर्डर यांच्यासारख्या गोष्टींशी झुंज देत असतात अशा परिस्थितीत टीनेजर मुलींशी वागावं तरी कसं ? ते पाहू या पुढच्या लेखात.
जैसलमेरच्या वाळवंटात जवानांची शौर्यगाथा सांगणारे बीएसएफ पार्क
िवशेष : सीमा पवारसोनेरी धरती जठे चांदी रो आसमान’, है रंग रंगीलो रस भरियो रे ‘म्हारो प्यारो राजस्थान’... पधारो म्हारे देश... कण कण सु गुँजे जय जय राजस्थान... बीएसएफ अधिकारी आपल्या राजस्थानचं अशा शब्दात कौतुक करतात. ते एेकताना त्यांच्याविषयीचा आदर अजून वाढतो. विविध राज्यातून आलेले जवान देशाच्या रक्षणासाठी इथल्या सीमेवर छाती ठोकून उभे आहेत. या प्रत्येक जवानाकडून केवळ माझा देश आणि त्याचं रक्षण करणं माझं कसं कर्तव्य आहे हेच ऐकायला मिळालं. कोट्यवधी भारतीयांच्या रक्षणासाठी सम वाळवंटाच्या सीमेवर भारतीय सुरक्षा दलाचे सैनिक तैनात आहेत. इथे पहाटेच्या पहिल्या प्रहरी चेक पोस्टवर तैनात असणारा जवान आम्ही त्या दिवशी प्रत्यक्षात पाहिलाय. इथली एकूण परिस्थिती, इथलं वातावरणं पाहिलं की डोळे पाणावतात आणि आपसुकच या जवानांसमोर आपण नतमस्तक होतो. भारतीय जवानांच्या अशा अनेक शौर्यगाथा दाखवणारे आणि प्रत्येक नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी याकरिता राजस्थानमधील सम वाळवंटात बीएसएफ पार्क उभारण्यात आले आहे. येथील पार्कमध्ये भारतीय सीमा सुरक्षा दल पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेवर कसा पहारा देतात, त्यांना कोणत्या प्रकारे अडचणी येतात, येथील सुरक्षा भिंती कशा प्रकारे उभारण्यात आल्या आहेत. युद्धात कोणती शस्त्रे वापरली जातात याची सविस्तर माहिती दिली जाते.राजस्थानातील ४६ अंश तापमान, वाळवंटातील धुळीपासून स्वत:चे संरक्षण करत देशाच्या रक्षणासाठी जवान सज्ज आहेत. बीएसएफ येथे नागपूरपासून अकोल्यापर्यंत विदर्भातील अनेक तरुणांचा समावेश आहे, जे मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी चोवीस तास तैनात आहेत. या तरुणांचे एकच स्वप्न होते देशाची सेवा. बटालियनच्या मुलीही खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. एकेकाळी जे अशक्य वाटत होते ते आता अभिमानाने सांगणारे जवान आहेत. आमच्या बटालियनच्या अनेक मुली मातृभूमीच्या रक्षणासाठी खांद्याला खांदा लावून उभ्या असल्याचे अधिकारी हसत सांगतात. जनतेसाठी, राजस्थानचे वाळवंट आता केवळ पर्यटन स्थळ राहिलेले नाही, तर देशभक्तीचे प्रतीक आहे. बीएसएफने येथे एक विशेष उद्यान विकसित केले आहे, जे सीमेचे वास्तववादी दृश्य आहे. युद्धात वापरलेली शस्त्रे, सीमास्तंभ आणि काटेरी तारांचे कुंपण येथे प्रदर्शित केले आहे. पर्यटक परत येतात तेव्हा ते केवळ छायाचित्रच घेत नाहीत, तर सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांबद्दल अभिमान आणि आदराची भावना देखील सोबत घेतात.बीएसएफच्या कठोर निवड प्रक्रियेनंतर, ही संधी मिळणे हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे यश वाटते त्यांना. या दिवाळीत, आम्ही घरी जाऊ शकलो नाही; परंतु आम्हाला कोणताही पश्चात्ताप नाही. मुंबईतील प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने आयोजित केलेल्या मीडिया टूर दरम्यान, पत्रकारांचे एक पथक तनोटपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या सीमा चौकीवर पोहोचले आणि त्यांनी हे शूर सैनिक प्रत्येक क्षण देशासाठी कसे समर्पित करतात हे पाहिले. या छताखाली, त्यांचे चेहरे अभिमानाने आणि जबाबदारीने चमकत होते.‘लोंगेवाला’ १९७१च्या भारत-पाक युद्धाचे साक्षीदार पाकिस्तानने १९७१च्या युद्धात एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत जैसलमेरमध्ये सुमारे २००० सैनिक आणि टँकसह घुसखोरी केली होती. अचानक हल्ला करून रामगढ आणि जैसलमेरवर ताबा मिळवण्याचा त्यांचा विचार होता. मात्र ४ डिसेंबरचा नाश्ता जैसलमेरमध्ये करण्याचा पाकिस्तानचा कुटील डाव भारतीय सुरक्षा सैन्याने हाणून पाडला. लोंगेवाला येथे याच ऐतिहासिक युद्धाच्या आठवणी जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.या युद्धात वापरलेली शास्त्रात्रं, पाकिस्तानच्या उद्ध्वस्त झालेल्या रणगाड्यांचे अवशेष येथे पाहायला मिळतात. लोंगेवाला स्मारक दगडांनी केलेलं बांधकाम आहे. पण या दगडात त्या युद्धात शहिद झालेल्या भारतीय सैनिकाचे शौर्य, पराक्रम आणि मातृभूमीसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकाच्या वीरत्वाचे प्रतीक आहे.४ डिसेंबर १९७१ पाकिस्तानने केलेला अचानक हल्ला. पाकिस्तानचे २००० तर १२० भारतीय सैनिक होते. मात्र अशा परिस्थितही पाकिस्तानी सैन्याला पळ काढण्यास भारतीय सैनिकांनी भाग पाडले, याचा साक्षीदार आहे लोंगेवाला पिलर क्रमांक ६३८. राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यातील लोंगेवाला या ठिकाणी असलेल्या युद्ध स्मारकात १९७१च्या युद्धाच्या या सर्व आठवणी जतन केल्या आहेत. भारत पाकिस्तान सीमा रेशेपासून अवघ्या १८ किमी अंतरावर असलेल्या या स्मारकाच्या प्रवेशद्वारावर उभा असलेला हा रणगाडा पाकिस्तानच्या पराभवाची साक्ष देत उभा आहे.५ डिसेंबर १९७१ हा एक महत्त्वाचा दिवस समजला जातो. लोंगेवाल परिसरात असलेल्या चौकीवर लष्कराला तैनात करण्यात आले होते. भारतीय सैनिकांकडे दोन मीडियम मशीन गन, ८१ एमएमचे दोन मोर्टार, टँकपासून संरक्षणासाठी खांद्यावरून चालवले जाणारे चार रॉकेट लाँचर आणि एक रिकॉयलेस गन होती. त्यांच्याकडं काही भूसुरुंगही होते, पण तोपर्यंत ते शत्रूच्या मार्गावर पसरवण्यात आले नव्हते. या चौकीची जबाबदारी असलेले मेजर कुलदीप सिंह चाँदपुरी यांनी कॅप्टन धरमवीर भान यांच्या नेतृत्वात काही सैनिकांना पुढं गस्त घालण्यासाठी पाठवलं होतं. दरम्यान, पाकिस्तानी टँक भारतीय हद्दीत घुसले होते. ते लोंगेवालाकडे सरकले होते. मेजर चाँदपुरी यांनी बटालियन मुख्यालयाला फोन केला आणि शस्त्रांसह आणखी कुमक मागवली.पाकिस्तानच्या रणगाड्यांनी दुपारी मारा सुरू केला. मेजर जनरल आरएफ खंबाटा यांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा परिस्थिती गंभीर असल्याचं आणि त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुरेशी कुमक नसल्याचा अंदाज त्यांना आला. त्यांना हवाई दलाच्या मदतीची आशा होती. विंग कमांडर एमएस बावा यांच्याशी संपर्क केला. बेस कमांडर मेजर जनरल खंबाटा यांच्याशी बोलले. सकाळी सूर्योदय होताच हंटर विमानं उड्डाण घेतील असं आश्वासन त्यांनी दिलं. सकाळी ४ वाजता बावा यांनी स्क्वाड्रन लीडर आरएन बाली यांना ब्रीफ केलं. दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, एवढ्या मोठ्या मोहिमेसाठी पाकिस्तानकडे कोणत्याही प्रकारची हवाई मदत नव्हती. त्यामुळं भारतीय विमानांनी त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा ते एकापाठोपाठ नष्ट झाले. या युद्धात पाकिस्तानच्या ४५ पैकी ३६ रणगाडे उदध्वस्त झाले. हे युद्ध फक्त पाकिस्तानचे रणगाडे नष्ट केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्मरणात राहील असं नाही, तर पाकिस्तानी लष्कराचं मनोधैर्यही त्यामुळं खूप खचलं होतं. या युद्धात शौर्य गाजवणारे भारतीय कंपनी कमांडर कुलदीप सिंह चाँदपुरी यांचा महावीर चक्र देवू्न गौरव करण्यात आला होता, तर पाकिस्तानचे डिव्हीजनल कमांडर मेजर जनरल बीएम मुस्तफा यांना तपासानंतर पदावरून हटवण्यात आलं होतं.
विशेष : संजीव पाध्येमुंबईचं क्रिकेट म्हटलं की डोळ्यांसमोर नाव येतं ते आचरेकर सरांचं. सचिन तेंडुलकरसारखा महान खेळाडू तर त्यांनी घडवलाच; पण अमोल मुजुमदारसारख्या आणखी कितीतरी हिऱ्यांना त्यांनी पैलू पाडले. आचरेकर सरांची गेल्या आठवड्यात जयंती होती. त्यानिमित्ताने त्यांनी क्रिकेटला दिलेल्या योगदानाची पुन्हा एकदा आठवण.भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेता झाल्यावर या संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचं सुद्धा कौतुक होतंय. त्यांनी मात्र आपल्याला गुरू द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सर यांच्यासारखे गुरू लाभल्याने आपण आजवरची मजल मारल्याचं स्पष्ट केलं आहे.खरंय, आचरेकर सरांची पारखी नजर होती आणि त्यांचं अंतर्मन त्यांना अचूक कौल देत असायचं म्हणून त्यांनी घडवलेले नुसते चांगले क्रिकेटपटू झाले नाहीत, तर त्यातील बरेच जण पुढे चांगले प्रशिक्षक झाले. त्यांनी ही रत्नं बरोबर निवडली होती. आता आपण अमोलचंच उदाहरण बघतोच आहोत. या खेरीज त्यांनी पुढे आणलेल्यापैकी लालचंद राजपूत घ्या, २००७ ला धोनीच्या भारतीय संघाने पहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली, त्या संघाचा तो प्रशिक्षक होता. मानखुर्दमधल्या गरीब वस्तीतला हा मुलगा त्याचं क्रिकेट बघून सरांनी त्याच्या वडिलांना नोकरी नक्की लावून देईन या वचनावर क्रिकेटपटू केला आणि तो कसोटीपटूही झाला आणि चांगला प्रशिक्षक सुद्धा.चंदू पंडितची सुद्धा हीच कहाणी. त्याचे वडीलसुद्धा त्याला क्रिकेटमध्ये आणू पाहत नव्हते. सरांनी त्यांना सुद्धा मुलाच्या नोकरीची हमी दिली तेव्हा चंदू क्रिकेटपटू झाला आणि भारताकडूनही खेळला. नंतर कल्पक प्रशिक्षक म्हणून आजही त्याचंं नाव गाजत असतं. मुंबईला तर त्याने रणजी करंडक मिळवून दिलाच, पण नंतर मध्य प्रदेश, विदर्भ अशा संघाच्या बाबतीतसुद्धा त्याने ही किमया साधून दाखवली. आय. पी. एल. प्रतिष्ठेची झाल्यावर केकेआरला सुद्धा त्याने अजिंक्य करून दाखवलं. प्रवीण अमरेचे तर सर संपूर्ण मार्गदर्शक होते. त्याला मुंबई सोडून रेल्वेकडे त्यांनी पाठवले आणि त्यामुळे तो सुद्धा कसोटी क्रिकेट खेळला. नंतर तो सुद्धा आज एक मोठा प्रशिक्षक म्हणून ख्याती मिळवून आहे. मुंबईसाठी आणि आय. पी. एल. मधल्या दिल्ली संघासाठी तो यशस्वी राहिला आहे. विशेष म्हणजे अनेक जण भारताकडून खेळत असताना फलंदाजीमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला की त्याचा सल्ला घेऊन पुन्हा धावा काढताना दिसले आहेत. यष्टीरक्षक म्हणूनच प्रयत्न करत राहा अशी सारखी पाठ काढूनही, गोलंदाजीचा सराव करताना पाहून पाठीवर सरांनी स्टंप हाणल्यावर गुपचूप यष्टिरक्षकाकडे वळणारा समीर दिघे देखील यष्टीरक्षक म्हणूनच भारतीय संघात निवडला जाऊ शकला होता. त्याने सुद्धा प्रशिक्षक म्हणून पुढे छाप पाडून झाली आहे. आणखी यष्टीरक्षण करणारे सुलक्षण कुलकर्णी आणि विनायक सामंत यांनी सुद्धा आज प्रशिक्षकाच्या भूमिकेत ठसा उमटवला आहे. सरांचा ज्याच्यावर सर्वाधिक विश्वास असायचा आणि त्याला त्यांनी मॉनिटर’सारखा नेमला होता,तो बलविन्दर संधू सुद्धा भारताकडून खेळला, कपिलच्या विश्वविजेता संघाचा सदस्य राहिला आणि निवृत्त झाल्यानंतर मुंबईसाठी यशस्वी प्रशिक्षक सुद्धा झाला. सध्याचा भारताचा निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर हा सुद्धा सरांच्या शिष्यांपैकी एक आहे. सरांच्या आग्रहाखातर त्यांच्या बरोबर टेनिस क्रिकेट खेळता खेळता त्यांचा शिष्य होत भारतीय संघात निवडला जाण्याएवढी सर्वात पहिल्यांदा मजल मारणारा होता तो रामनाथ पारकर ! जाम्बोरी मैदानावरून सरांमुळे थेट सुनील गावसकरबरोबर भारतासाठी खेळताना तो दिसला होता. एक उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणूनही तो चमकला. तो सुद्धा नंतर वेन्गसरकर अॅकॅडमीत प्रशिक्षक म्हणून गाजला होता.सरांचा दत्तक पुत्र नरेश चुरी, तर सरांच्या शारदाश्रम शाळेचा वारसा, एक चांगली रणजी कारकीर्द संपल्यावर प्रशिक्षक म्हणून चालवताना दिसला. सरांच्या आणि नरेशच्या तालमीत तयार झालेला अभिषेक नायर तर आज देशातील अव्वल प्रशिक्षकांपैकी एक आहे. सर्वात आगळंवेगळं उदाहरण तर दिनेश लाड यांचं आहे. सरांनी कपडे, बूट दिल्यामुळे क्रिकेट खेळू शकलेली ही व्यक्ती सरांसारखाच गुरू द्रोणाचार्य पुरस्कार मिळविण्याएवढी मोठी झाली. म्हणजे आचरेकर सर खरोखर गुरूंचे गुरू म्हणायला हवेत आणि सर्वात महत्त्वाची त्यांनी दिलेली देणगी म्हणजे भारत रत्न सचिन तेंडुलकर! क्रिकेटचा देव म्हणून त्याला आता संबोधले जाते. सरांना देवगुरू म्हटलं तर वावगं ठरू नये. ३ डिसेंबर सरांची जयंती झाली. त्यांना ही आदरांजली.
जीवनगंध : पूनम राणेडिसेंबर महिना सुरू होता. जागोजागी विविध कार्यक्रमांची रेलचेल चालू होती. सगळीकडेच मंगलमय वातावरण होते.विद्यानिकेतन शाळेमध्ये इयत्ता तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. खरे म्हणजे या निवासी शिबिरामध्ये एक रात्र विद्यार्थ्यांना शाळेतच थांबायचे होते. वर्गामध्ये तशी सूचना मिळताच मुलांना खूप आनंद झाला; परंतु अथर्व खूपच घाबरलेला दिसत होता. सकपाळ बाई त्याच्याजवळ गेल्या आणि म्हणाल्या,” अथर्व उदास का दिसतो?” अथर्व म्हणाला,” बाई... बाई... मी माझ्या आई-बाबांना सोडून कुठेही रात्रीचा राहत नाही. त्यामुळे मला खूप भीती वाटते. मी या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही.सकपाळ बाई म्हणाल्या,” नाही बेटा, आई-वडिलांसोबत राहणं आणि आपल्या समवयस्क मित्रांसोबत राहणं यात खूप फरक असतो, तुला खूप आनंद मिळेल. तुझा वेळ कसा निघून जाईल हे तुला कळणारही नाही आणि हे बघ बेटा “याच करिता आपण हे शिबीर आयोजित केलेले आहे.शाळा सुटताच अथर्व घरी गेला. आईला सारी हकीगत सांगितली. आई म्हणाली,” हे बघ बेटा, आपल्याच शाळेतील आपल्याच वयाच्या मुलांसोबत राहण्यात खूप आनंद असतो. तो अनुभव घेतल्याशिवाय तुला कसं कळेल त्यामुळे तू मनातील भीती काढून टाक आणि या शिबिराला तू उपस्थित राहावं असं मला वाटतं.”आई आणि बाईंच्या बोलण्याने अथर्वने शिबिराला जायचे ठरवले. एखादा सण समारंभ असावा अशा पद्धतीने आज शाळा सजवलेली होती. प्रत्येकाला कामाची विभागणी करून देण्यात आली होती. कार्यक्रमाचे नियोजन उत्तम पद्धतीने केले होते. शाळेतील प्रत्येक घटक या उपक्रमात आनंदाने सहभागी झाला होता. रांगोळ्याने पटांगण सजवले होते. विद्युत रोषणाई केली होती. स्टेजच्या बाजूला तुळशी वृंदावन ठेवण्यात आले होते.निवासी शिबिराची वेळ शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून रविवारी संध्याकाळी ८वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती. नियोजनाप्रमाणे कार्यक्रम होत होते. विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना विविध उपक्रम देण्यात आले होते. या निवासी शिबिरामध्ये अभ्यासक्रमासारखं काही घेण्यात आले नव्हते.विद्यार्थी कौशल्य विकास हे शिबिराचे मुख्य उद्दिष्टे होते. संध्याकाळी ७ वाजता सर्व विद्यार्थ्यांना सभागृहात एकत्र आणून सर्वप्रथम तुळशीवृंदावनाजवळ दिवे लावण्यात आले. सर्वांकडून एक मुखाने शुभंकरोती म्हणून घेण्यात आले. शब्दउच्चार स्पष्ट होण्यासाठी मंत्र, स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, रामरक्षा मारुती स्तोत्र पठण करण्यात आले.काही विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण वाटत होते. सर्वच विद्यार्थी या निवासी शिबिराचा आनंद घेत होते.रात्री एकत्र जेवण. ऐरवी घरामध्ये हट्टीपणा करणारे विद्यार्थी मुले आज ताटात जे पडेल ते आनंदाने खात होती. एका मोठ्या हॉलमध्ये विद्यार्थ्यांची झोपण्याची व्यवस्था करण्यात आली होती. स्वतःचे कपडे स्वतः बदलणे, स्वतःचे अंथरूण स्वतः घालणे. अंथरुणांच्या घड्या घालणे. आपले सामान व्यवस्थित ठेवणे. इत्यादी कामे विद्यार्थी स्वतःहून आनंदाने करत होते. दोन दिवस ते मोबाईलला विसरले होते.निवासी शिबिराचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात अथर्वनेही आपले मनोगत व्यक्त केले. तो म्हणाला,” घरी राहण्यापेक्षा मला इथे कायम राहायला सांगितले तरी ते आवडेल.” इतका आनंद त्याला या शिबिरातून मिळाला होता. केव्हा एकदा आपण घरी जातो आणि या साऱ्या गोष्टी आई-बाबांना सांगतो असे अथर्वला झाले होते. सर्वच पालक आपल्या मुलांची वाट पाहत गेटवर उभे होते. अथर्व धावतच जाऊन आपल्या आईला बिलगला आणि म्हणाला ,”आई... आई... खूपच मज्जा आली.” आईलाही खूप आनंद झाला. आईने अथर्वला प्रेमाने जवळ घेतले.तात्पर्य : स्वानुभवातून आणि निरीक्षणातून विद्यार्थी शिकत असतो.
विशेष : डॉ. विजया वाड“लक्ष्मण ए लक्ष्मण” पार्वतीने हाक मारली.“काय गं पारू?”“अरे किती वेळ ड्यूटी करणार तू?”पारू त्याची पत्नी होती. लक्ष्मणवर तिचा फार जीव होता. आपला बालमित्र आपला पती झाला यासाठी देवाचे किती वेळा तिने आभार मानले असतील याला मोजमाप नव्हतं. पोलीस लायनीत जन्म गेला. दोघांचे बाप पोलीसच होते. दोघांची निवृत्ती ही पोलीस हवालदार म्हणूनच झाली. ठाण्याचा चेकनाका ही दोघांची ड्यूटी मिरवीत होती. हपिसर लोक या दोघांच्या जीवावर निर्धास्त असत. जेलर साहेब या दोघांचे मित्र होते. कडक सॅल्यूट डोकत ठाणा जेलचे जेलर साहेब खूश होत.“लक्षू, खूप झालं. एक आख्खा दिवस उलटला.”“अगं, पारू, दुसरा बदली येईपर्यंत मला ड्यूटी करावी लागणार.”“आता मी करते तुझी चाकरी. अगदी तुझ्यापरीस भारी करते बघ.” ती त्याचे हात खेचत म्हणाली.“उगा हट्ट करू नकोस गं पारू”“कोण? ती शेवंता?”“हां ! तीच ती! पटकनी तिचा ड्रेस मिळवते मी. शेवंता नाही म्हणायची नाय. पटकनी तयार होते नि झटकनी तुझी डिवटी करते.”“ऐक पारू ! माझे साहेब रागावतील. मला ड्यूटीवर नाही, असं बघून, तांबडे-लाल होतील.”“होऊ देत तांबडे-लाल.”“कदाचित मला कामावरून काढून टाकतील. काही सांगवा येत नाही.” तो आता थरथरू लागला होता.“लक्ष्मण” चिरपरिचित आवाज कानावर आला. साहेब होते.“सलाम साहेब.”“किती वेळ ड्यूटी करतो आहेस?”“१८ तास झाले साहेब.”“ऊठ आता. घरी जा !”“पण चेकनाका कोण सांभाळेल?”“तुझी बायको सांभाळेल.”“काSSय?”“अरे बायको म्हणजे काय? अर्धांगिनीच ना!”“अहो पण साहेब...”“आता पण नाही बिन नाही.”“तिच्या अंगावर ड्रेस नाही.”“मी घेऊन आलोय फीमेल पोलीसचा ड्रेस.”“काय सांगता काय साहेब?”लक्ष्मण आश्चर्यात बुडाला. साहेबाचे हे रूप नवेच होते लक्ष्मणसाठी“पार्वतीबाई, समोरच्या कंट्रोलरीमध्ये जा नि हा युनिफॉर्म चढवा अंगावर.”“चढवते साहेब.” पार्वतीने तो युनिफॉर्म घेतला नि ती कंट्रोलरूमकडे चालती झाली.“साहेब, तुमचे फार उपकार झाले.” लक्ष्मणच्या आवाजात हरिवर होता. काठोकाठ !अरे, तुला ऑप्शन शोधून जमलो नि दमलो बघ.”“का? काय झाल?”“एकही शिपाई कामावर यायला तयार नाही.”“म्हणजे?”“एकाला संडासला होतेय एकसारखी, दुसरा परगावी गेलाय. तिसऱ्यास ताप आहे. मग म्हटलं आपणच ड्यूटी करावी ! मग तेवढ्यात हा उपाय सुचला, नि पोलीस लायनीत गेलो, नि हा ड्रेस घेऊन आलो.”तेवढ्यात पार्वती आली. “मी तयार झाले साहेब. “आता उतर रे भर्तारा! मला करू दे डिवटी. पोलिसाची बायको आहे मी. हार मानायची नाही. पण एक विचारू का साहेब? मी नसते तर? काय केलं असतं हो साहेब? सांगा ना!” “मी केली असती त्याची ड्यूटी !” साहेब पटकन् म्हणाले. त्यांची माणुसकी तिच्या डोळ्यांत मावत नव्हती.
लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकरकेल्याने होत आहे रे।आधी केलेची पाहिजे।यत्न तो देव जाणावा।अंतरी धरतां बरे।अचूक यत्न तो देव।चुकणे दैत्य जाणिजे।न्याय तो दैत्य जाणावा।अन्याये राक्षसी क्रिया॥मी विवेकानंद म्हणतात, “ज्याचा देवावर विश्वास नाही तो नास्तिक आहे असा आपला जुना धर्म सांगतो; परंतु धर्मविषयक नवीन व्याख्येनुसार ज्याचा स्वत:वर विश्वास नाही तोच नास्तिक होय... जगात ३३ कोटी देवांवर विश्वास नसेल तर काही हरकत नाही; पण जर स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही नास्तिकच आहात.”मानवी जीवनाचे महान रहस्य स्वामीजींनी येथे सांगितले आहे. हीच गोष्ट समर्थांनी वरील ओव्यांत सांगितली आहे. ज्याला काम करायचे नसते तो आरंभापासून अनेक शंका-कुशंका काढतो आणि आळशासारखा पडून राहतो.हेलन केलर ही जन्मत:च आंधळी, मुकी आणि बहिरी होती. केवळ स्पर्शाच्या सहाय्याने ती एम.ए.पर्यंत शिकली व आपल्यासारख्या बहिऱ्या, आंधळ्या मुलींसाठी तिने शाळा सुरू केली. यशवंतराव चव्हाण अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले. त्यांना सर्व मुले ‘येशा’ म्हणत. त्यांना वाईट वाटे. एकदा वर्गात पर्यवेक्षक आले. त्यांनी प्रत्येक मुलाला एक प्रश्न विचारला, तू मोठेपणी कोण होणार? जेव्हा यशवंताला हा प्रश्न विचारला तेव्हा हा मुलगा म्हणाला,-’ मि यशवंत राव चव्हाण होणार. ‘या मुलाने आयुष्यभर प्रयत्नवादाची कास धरली. अनेक महान गोष्टी केल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, लोकांसाठी आयुष्य वाहिले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की, आपल्या प्रयत्नांनी, आपल्या प्रगतीची दिशा ठरवली पाहिजे. ज्ञान मिळण्याचे साधन पुस्तकात मिळणार नाही. परिश्रम करून खऱ्या अर्थाने नीट समजण्याचे काम आहे. अशक्य काहीही नाही, हेच त्यांनी शिकवलं. मानवी जीवनात यश-अपयशाची वाटचाल अपरिहार्य आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संधी, संघर्ष, चढ-उतार येतच असतात; परंतु या सर्वांवर मात करण्याची खरी किल्ली एका तत्त्वात दडलेली आहे प्रयत्नवाद. म्हणजेच परिस्थिती कोणतीही असो, मनुष्याने सतत प्रयत्न करत राहणे, हार न मानणे आणि प्रगतीसाठी सकारात्मक धडपड करत राहणे.१. प्रयत्नवाद का आवश्यक आहे?प्रयत्न हा माणसाच्या प्रगतीचा पाया आहे. यश नेहमी एका दिवसात मिळत नाही. तो सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम असतो. अपयश आले तरी प्रयत्न सोडले, तर विकास थांबतो. पण अपयशानंतरही प्रयत्न सुरू ठेवले, तर तेच अपयश भविष्यातील यशाची पायाभरणी करते.२. प्रयत्नवादी विचारसरणीचे फायदे -मनावरचा ताण कमी होतो कारण आपण परिणामाऐवजी प्रक्रियेला महत्त्व देतो. आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक छोट्या प्रयत्नातून अनुभव मिळतो. आव्हाने सहज वाटू लागतात कारण त्यांचा सामना करण्याची सवय तयार होते. समस्यांकडे नकारात्मक न बघता समाधान केंद्रित दृष्टिकोन वाढतो.३. ‘प्रयत्न’ आणि ‘यश’ यांचा संबंधयश आपोआप येत नाही; प्रयत्नांच्या खडतर वाटेवरून चालतच ते गाठता येते. जिद्द, चिकाटी आणि मेहनत यांच्या आधारेच लक्ष्य साध्य होते. ज्यांनी महान कार्य केले ते देखील सामान्यच होते पण त्यांची असामान्यता त्यांच्या निरंतर प्रयत्नांत होती.४. प्रयत्नवाद स्वीकारण्यासाठी काही मार्गदर्शक टिप्स -काम लहान-लहान टप्प्यात विभागा आणि प्रत्येक टप्पा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. चुका झाल्या तरी त्यातून शिका, स्वतःला दोष देऊ नका. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. दररोज स्वतःला एक प्रश्न विचारा – आज मी माझ्या ध्येयासाठी काय प्रयत्न केले? हार न मानता एक पाऊल पुढे टाकत राहा.जीवनात हमखास येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी प्रयत्नवाद हेच सर्वात प्रभावी तत्त्व आहे. प्रयत्न करत राहणे हीच मोठी जिंक आहे. कारण प्रयत्न करणारा कधीच हरत नाही - तो शिकतो, वाढतो आणि अखेर यशाकडे वाटचाल करतो. म्हणूनच, परिस्थिती काहीही असो, प्रयत्नवादाला स्वीकारा आणि आपल्या आयुष्याला सकारात्मक दिशादर्शन करा.
‘ब्लू इकॉनॉमी’चे वाढते महत्त्व
परामर्ष : हेमंत देसाईछत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी व्यापार आणि नौदल शक्तीला नवीन उंचीवर नेले होते. मातृभूमीच्या प्रगतीसाठी त्यांनी नवी धोरणे तयार केली ! आणि निर्णय घेतले. आपली ताकद इतकी होती की, संपूर्ण ईस्ट इंडियन कंपनीदेखील समुद्री सेनापती कान्होजी आंग्रे यांच्याशी बरोबरी करू शकली नाही. आता बंदरांचे आधुनिकीकरण केले जात असून जलमार्ग विकसित करण्यात येत आहेत. बहुतेक बंदरांची क्षमता पूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. खासगी गुंतवणूक वाढली असून, जहाजे बंदरात येण्या-जाण्याचा आणि मालहाताळणीचा वेळ कमी झाला आहे. मुंबईजवळ वाढवण हे देशातील जमिनीवरचे नव्हे, तर ऑफ शोअर बंदर असणार आहे. मुंद्रा वा जेएनपीटी बंदराची खोली किंवा ‘ड्राफ्ट’ १७ ते १८ मीटर अशी आहे, तर वाढवणची खोली २० ते २५ मीटरच्या आसपास असणार आहे. बंदरातील पाण्याची पातळी आणि बोटीचा तळाचा बिंदू यामधील अंतराला ‘ड्राफ्ट’ असे म्हणतात. हा ‘ड्राफ्ट’ जास्त असल्यामुळे मोठमोठी जहाजे वाढवण बंदरात आणता येणार आहेत. या बंदराची क्षमता वर्षाला ३० कोटी मेट्रिक टन इतकी प्रचंड असणार आहे. त्यामुळे जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये वाढवणचा समावेश असणार आहे. ‘ब्लू इकॉनॉमी’ हा भारताच्या हरित विकास प्रवासाचा नवा पाया आहे. आपल्याकडे ११ हजार किलोमीटरचा किनारा आणि २.५ दशलक्ष चौरस किलोमीटचे एक विशेष आर्थिक क्षेत्र आहे. ते प्रचंड क्षमता देते. ‘ब्लू इकॉनॉमी’ म्हणजे समुद्राशी संबंधित संपूर्ण आर्थिक पायाभूत सुविधा. त्यात मत्स्यव्यवसाय, बंदरे, जहाजबांधणी, सागरी जैवतंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा आणि खोल समुद्रातील शोध यांचा समावेश आहे.तज्ज्ञांचा विश्वास आहे, की हे क्षेत्र येत्या काही वर्षांमध्ये भारताला समृद्धी आणि स्वावलंबनाच्या नवीन उंचीवर नेईल. ‘सागरमाला’ कार्यक्रम बंदरांचे आधुनिकीकरण करत आहे आणि व्यापार स्पर्धात्मक बनवत आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मत्स्यव्यवसाय क्षेत्रात नील क्रांती घडवून आणत आहे. हरित समुद्र मार्गदर्शक तत्त्वे ही बंदरे हरित करण्यासाठी आणि शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे. याव्यतिरिक्त, ‘मिशन ओशन’ अंतर्गत, खोल समुद्रातील शोधासाठी सहा हजार पाणबुडी विकसित करण्यात आल्या आहेत. ‘नील अर्थव्यवस्था’ केवळ संसाधनांचा वापर करण्याबद्दल नाही. ती समाजाला सक्षम बनवते. महिलांना समुद्री शैवाल शेती आणि ‘इको-टुरिझम’मध्ये नवीन संधी मिळत आहेत. तरुणांना सागरी अभियांत्रिकी आणि डेटा विश्लेषणासारखे कौशल्य दिले जात आहे. ‘स्टार्टअप्स स्मार्ट फिशिंग’, ‘ग्रीन पोर्ट लॉजिस्टिक्स’ आणि सागरी जैवतंत्रज्ञान यांसारख्या नवीन क्षेत्रांमध्ये प्रयोग होत आहेत. भारत या दिशेने जागतिक स्तरावर आपली भूमिकादेखील मजबूत करत आहे. फ्रान्समधील युनो महासागर परिषदेत भारताने ‘एसएएचएव्ही’ पोर्टल सुरू केले. ते जागतिक समन्वय आणि ज्ञानाच्या देवाण-घेवाणीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनेल. साधी बाब अशी आहे, की येणाऱ्या काळात भारताचे भविष्य, समृद्धी आणि हरित विकास हे सर्व समुद्राशी जोडलेले आहे.देशात प्रथमच गुजरातमधील कांडला बंदरात हरित हायड्रोजनची निर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. हरित लॉजिस्टिक व्यवस्था, बंदरांची जोडणी आणि सागरी औद्योगिक समूहविकासावर केंद्र सरकार अधिक भर देणार आहे. मध्यंतरी केरळमधील तिरुअनंतपूरममध्ये विळिंजम येथे खोल पाण्यातील आंतरराष्ट्रीय बहुपयोगी बंदराचे उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. ८,८०० कोटी रुपये खर्चून उभारलेले हे बंदर देशातील पहिले अर्धस्वयंचलित तसेच खोल पाण्यातील कंटेनर वाहतूक करणारे बंदर ठरणार आहे. विळिंजम बंदरामुळे भारत, मध्य आशिया आणि युरोप यांच्या दरम्यान दळणवळणाचा सोयीचा मार्ग उपलब्ध होणार आहे. भारतीय नौकानयन आणि व्यापारी धोरणे दूरदृष्टीने आखण्यात आली असून, मध्यपूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. भारताने नौकानयनक्षेत्रात मूलभूत बदल करून आधुनिक काळाशी सुसंगत असे सागरी व्यापार व नौकानयन कायदे अमलात आणले आहेत. या नवीन कायद्यांतर्गत राज्यांच्या मेरिटाइम बोर्डांना सक्षमता बहाल करण्यात आली असून, आर्थिक विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने हे योग्य पाऊल आहे. बंदर व्यवस्थापनात डिजिटल तंत्रज्ञानाचा कालोचित वापर वाढला आहे.सागरी नौकानयन परिषदेचा आरंभ २०१६ मध्ये करण्यात आला आणि आज तिचे स्वरूप जागतिक पातळीवर विस्तारलेले आहे. जगभरातील ८५ देशांचे प्रतिनिधी मुंबईत अलीकडेच झालेल्या मेरिटाइम परिषेदेत सहभागी झाले होते. त्यावेळी पंतप्रधानांच्या उपस्थितीत १२ लाख कोटी रुपयांच्या विविध करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तसेच शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्याचप्रमाणे पंतप्रधानांच्या हस्ते या परिषेदत ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या भविष्यकालीन धोरणयोजनेचे अनावरण करण्यात आले. मोठ्या बंदरांची क्षमता चारपटींनी वाढवण्यासाठी केंद्र सरकार त्यात ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मेरिटाइम इंडिया व्हिजन अंतर्गत दीडशेहून जास्त उपक्रम राबवले गेले. अंतर्गत जलमार्गांची संख्या तीनवरून ३२ वर गेली आणि मालवाहतुकीत ७०० टक्के वाढ झाली. क्रूझ पर्यटनात वाढ होऊन किनारी भागांमध्ये प्रचंड रोजगारनिर्मिती झाली. समुद्र, किनारे, नद्या आणि जलस्रोत यांचा वापर करून, आर्थिक विकास साधणे, म्हणजेच ‘ब्लू इकॉनॉमी’ची प्रगती करणे होय.समुद्री साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून सागरी परिसंस्थेचे जतन करण्यावरही भर देण्याची आवश्यकता आहे. देशाच्या समुद्री क्षेत्राची क्षमता वाढवण्यासाठी आगामी काळात २ लाख २३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४३७ नवी जहाजे उतरवण्यात येणार आहेत. खनिज तेल उत्खनन, कंटेनर, टँकर, हरित टग, ड्रेजर्स किंवा गाळ काढणाऱ्या जहाजांचा त्यात समावेश असणार आहे. या गुंतवणुकीसाठी मुंबईत ‘भारत कंटेनर शिपिंग लाइन’ या उपक्रमाची घोषणाही करण्यात आली. समुद्रात विविध प्रकारचे मार्ग असतात. त्यांना चॅनेल असे म्हटले जाते. या चॅनेलमधून बंदरापर्यंत पोहोचताना बाहेरून येणाऱ्या जहाजांना ‘टग’ बोटी मार्ग दाखवतात. जी-२० राष्ट्रगटाचे अध्यक्षपद भारताकडे आल्यानंतर ‘ब्लू इकॉनॉमी’ किंवा ‘नील अर्थव्यवस्था’ केंद्रस्थानी आली. ‘नील अर्थव्यवस्थे’च्या विकासासाठी जी-२० राष्ट्रगटाच्या माध्यमातून संशोधन केले जात असून महत्त्वाच्या शिफारशीही केल्या जाणार आहेत.जागतिक तापमानवृद्धीमुळे सागराची पातळी वाढत आहे. त्यामुळे सागरी परिसंस्था धोक्यात आल्या असून अनेक देशांच्या अस्तित्वापुढे प्रश्नचिन्हही उपस्थित केले जात आहे. म्हणूनच सागरी स्रोतांचा शाश्वत पद्धतीने विकास करून लोकांचे जीवनमान उंचावण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे सागरी परिसंस्थेचे आरोग्य जपणेही आवश्यक आहे. मासेमारी, सागरातून खनिजे, खनिज तेल आणि वायू मिळवणे ही सध्याची ‘नील अर्थव्यवस्थे’ची काही उदाहरणे होत. राज्यांमध्येही सागरी संपत्तीच्या विकासाकडे लक्ष पुरवले जात आहे.खासगी बंदरांच्या मालकांना सवलती दिल्या जात आहेत. या बंदरांपर्यंत जाणारे रस्ते बांधण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा निम्मा बोजा राज्य सरकार उचलत आहे. नवीन जहाजांची बांधणी आणि जुन्या जहाजांच्या काही सुट्या भागांचा वापर करून, पुन्हा त्यांची उभारणी करण्यासाठीही सवलती दिल्या जात आहेत. समुद्रातील दीपगृहे तसेच पर्यटनस्थळांचा विकास, वॉटर स्पोर्टस, हाउसबोट्स यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. ही सर्व पावले महत्त्वाची असून सागरी वाहतूक वाढवण्यासाठीही ठोस उपाय योजणे आवश्यक आहे.
कथा : रमेश तांबेनमस्कार बाल मित्रांनो.आज मी तुम्हाला इटलीतील एका प्रसिद्ध शिल्पकाराची गोष्ट सांगणार आहे. इटलीतील शिल्पकलेतील जाणकार अशा एका प्रसिद्ध नेत्याने शहरातील एका शिल्पशाळेला भेट दिली. ती शिल्पशाळा खरोखरीच भरपूर मोठी होती. तिथे अनेक प्रकारची मूर्ती शिल्पे, पुतळे बनवून ठेवले होते. स्त्री-पुरुषांची विविध प्रकारची शिल्पे तिथे ओळीने मांडली होती. मग त्या नेत्याने त्या शिल्पकाराची संपूर्ण कार्यशाळा अगदी मनःपूर्वक पाहिली. त्यानं पाहिलं की तो शिल्पकार एका भल्यामोठ्या पुतळ्यावर अगदी नजाकतीने आपली हत्यारे फिरवत होता. त्याने तो पुतळा मोठा सुबक बनवला होता. त्याच्या शिल्पकलेवर तो नेता बेहद्द खूश झाला.ज्या पुतळ्यावर त्याचं काम चालू होतं, त्या पुतळ्याच्या बाजूलाच दुसरा एक पुतळा उभा होता. तो अगदी हुबेहुब तसाच होता. त्या नेत्याला वाटलं की या शिल्पकाराला नक्कीच दोन पुतळे बनवण्याचे काम मिळाले असणार, म्हणून तो दोन सारखेच पुतळे बनवत असावा. मग त्या नेत्याने शिल्पकाराला सहज विचारले, “काय रे बाबा, तुला हुबेहूब दोन पुतळे बनवण्याचं कंत्राट मिळाले आहे काय?” तसा शिल्पकार हसून म्हणाला, “नाही साहेब, तसं काही नाही. त्या पुतळ्यामध्ये थोडीशी चूक झाली म्हणून मी पुन्हा हा नवीन पुतळा बनवत आहे.” त्या नेत्याने पुन्हा एकदा बाजूच्या पुतळ्याकडे निरखून बघितलं, तर त्याला कुठेही, काहीही चूक दिसत नव्हती. तो नेता गंभीरपणे म्हणाला की, “मला तरी त्या पुतळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक दिसत नाही किंवा वेगळेपणाही जाणवत नाही. तरी पण तू नवीन पुतळा का बनवतो आहेस.” शिल्पकार पुन्हा हसला आणि म्हणाला, “साहेब तुम्ही एक काम करा. त्या ठिकाणी एक लाकडी शिडी आहे, ती शिडी घ्या आणि वर जाऊन बघा की त्या पुतळ्याच्या नाकावर एक लहानसा ओरखडा उमटला आहे. एक चरा पडलेला आहे आणि म्हणूनच मी नवीन पुतळा बनवत आहे.”मग शिल्पकाराने सांगितल्याप्रमाणे नेत्याने ती लाकडी शिडी घेतली आणि त्यावर चढून तो पाहू लागला. त्याने काळजीपूर्वक पाहिलं, तर खरंच नाकावर एक बारीकसा ओरखडा उमटला होता. ते पाहून त्या नेत्याला हसूच फुटले. त्याने हसत हसतच शिल्पकाराला विचारलं, “काय रे, हा जो नवा पुतळा बनवतो आहेस तो शहरांमध्ये कुठे बसवणार आहेत.” शिल्पकार म्हणाला, “रोममधल्या एका प्रसिद्ध चौकामध्ये वीस फुटी चबुतऱ्यावर हा पंधरा फुटी पुतळा बसवणार आहेत. आता तो नेता आणखी जोरजोरात हसू लागला. अन् म्हणाला, “अरे वेड्या वीस फुटी चबुतरा आणि त्यावर हा पंधरा फुटी पुतळा! मग मला सांग एवढ्या उंचीवरचा ओरखडा कोणाला दिसणार आहे? कशाला तू उगाच कष्ट घेतो आहेस?” तोच शिल्पकार म्हणाला, “नाही साहेब, तो ओरखडा पुतळ्याच्या नाकावर नसून माझ्या हृदयावर पडलेला आहे आणि म्हणूनच मी पुन्हा हा नवीन पुतळा बनवत आहे. मी माझं काम करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतो. मन लावून, चांगलं आणि उत्कृष्ट काम करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. कामाच्या गुणवत्तेबाबत मी कधीच तडजोड करीत नाही.” शिल्पकाराचे बोलणे ऐकून त्या नेत्याने मोठ्या आदराने शिल्पकारापुढे हात जोडले अन् म्हणाला, “एक दिवस जग जिंकशील मित्रा!”बालमित्रांनो, हाच शिल्पकार पुढे ‘मायकल अँजेलो’ या नावाने जगप्रसिद्ध झाला.
कथा : प्रा. देवबा पाटीलसीता व नीता या जुळ्या बहिणींचे अभ्यासासोबत त्याव्यतिरिक्त दररोज इतर अवांतर पुस्तकांचे वाचनही नेहमी चालूच राहायचे. अशा अवांतर वाचनामुळे त्यांना ज्ञानही मिळायचे, त्यांची जिज्ञासा जागृत व्हायची व विविध पुस्तकांच्या वाचनाद्वारे त्यांची जिज्ञासापूर्तीही व्हायची. अभ्यास करता करता संध्याकाळच झाली. सूर्याने आपला मावळतीचा प्रवास सुरू केला. तोही लाल-तांबडा झाला व त्याने आसमंतातही आपली सुंदरशी लाली पसरवली. गच्चीवरचे ऊनही पूर्णपणे उतरले व गच्चीवर छानसे सावलीसमान वातावरण तयार झाले.अशी संध्याकाळ झाल्यानंतर त्यांनी मावशीला म्हटले, “मावशी चल ना गच्चीवर.”“हो जाऊ ना गं. तुम्हाला एवढी काय घाई झाली आहे?” मावशी म्हणाली.“मावशी, आम्हाला घाई वगैरे काही नाही झाली. पण जास्त उशीर झाला तर नंतर अांधार पडेल व आई आपणास खाली येण्यासाठी आवाज देईल म्हणून म्हटले.” सीता म्हणाली.“मावशी, आम्हाला जरी नवनवीन माहिती जाणून घेण्याची उत्सुकता आहे पण आम्ही “उतावीळ नवरा गुडघ्याला बाशिंग” अशा मुली नाहीत बरं?” नीता म्हणाली.“अगं मी सहज म्हटले. चला जाऊया आपण गच्चीवर.” मावशी म्हणाली.तसे नीताने गच्चीवर बसण्याकरिता अंथरण्यासाठी सतरंजी घेतली. मावशी आधीच गच्चीवर जाऊ लागली होती. मावशीसोबत त्याही गच्चीवर गेल्या. दोघी बहिणींनी गच्चीवर सतरंजी टाकली व तिघीही खाली बसल्या.“पृष्ठीय ताण कसा निर्माण होतो मावशी?” सीताने विचारले.“प्रत्येक द्रवाच्या पृष्ठभागावर जो एक विशिष्ट प्रकारचा ताण असतो त्याला पृष्ठीय ताण म्हणतात. प्रत्येक द्रवामध्ये अनंत कण असतात. या सर्व कणांमध्ये आपापसात प्रबळ आकर्षण असते म्हणूनच तो द्रव द्रवरूपात टिकून राहतो. द्रवाच्या पृष्ठभागावरील कणांवर द्रवातील कणांच्या आकर्षणामुळे जो परिणाम दिसतो त्याला पृष्ठीय ताण असे म्हणतात. द्रवातील कणांवर सर्व बाजूंनी सारख्या प्रमाणात आकर्षण असते म्हणून आतमध्ये पृष्ठीय ताणाचा परिणाम दिसत नाही; परंतु द्रवातील कण पृष्ठभागावरील कणांना सतत त्यांच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणजे पृष्ठभागावरील कणांवर खालच्या व बाजूच्या दिशांकडील कणांचेसुद्धा आकर्षण असते; परंतु वरचा भाग मात्र पूर्णपणे मोकळा असतो. त्यामुळे पृष्ठभागावरील कण हे एकमेकांकडे व द्रवांतर्गत भागाकडे खेचले जातात व द्रवाचा पृष्ठभाग हा ताणला जातो व एखाद्या लवचिक पापुद्र्याप्रमाणे दिसतो. त्यालाच पृष्ठीय ताण असे म्हणतात. या पृष्ठीय ताणामुळे साबणाच्या फुग्यांचा पृष्ठभाग हा किंचितसा आतमध्ये व प्रत्येक बाजूकडे खेचला जातो व कमीकमी क्षेत्रफळ व्यापले जाते. समान आकारमानात गोलाचेच क्षेत्रफळ इतर आकारमानांपेक्षा कमी असते त्यामुळे साबणाच्या फुग्यांनागोलाकार प्राप्त होतो.” मावशीने खुलासेवार सांगितले.“हा साबणाचा फुगा हवेत कसा उडतो?” सीताने विचारले.मावशी म्हणाली, “फुगा फुगवून दोऱ्याने त्याचे तोंड बांधून ठेवले, तर आत जी हवा दाबली जाते ती फुग्याच्या पापुद्र्यावर सर्वत्र सारखा दाब देते. दाब सर्वत्र सारखा असल्याने फुगा स्थिरतेने बाहेरच्या हवेसोबत उडतो. जसजशी बाहेरची हवा वाहील तसतसा फुगा हवेत उडतो. हवा त्याला जिकडे नेते तिकडे तो जातो.”“हा फुगा कसा काय फुटतो मग?” नीताने प्रश्न केला. “फुग्याचा पापुद्रा आपणास जरी सर्वत्र सारखाच पातळ दिसत असला तरी तो सर्वत्र सारखा नसतो. कुठेना कुठे तो कमीजास्त पातळ असतोच पण तो आधीच खूपच पातळ असल्यामुळे ते आपल्या लक्षात येत नाही. फुग्यात असलेल्या हवेचा फुग्याच्या पापुद्र्यावर आतील बाजूने दाब पडत असतो. ज्या ठिकाणी पापुद्रा कमकुवत असतो त्या ठिकाणावर आतील हवेचा दाब सहन न झाल्याने तो पापुद्रा फाटतो व फुगा फुटतो. फुगा जसजसा वर वर जाऊ लागतो तसतसा वातावरणाचा दाब कमी होऊ लागतो. त्यामुळे फुग्याच्या आतील दाब वाढून फुगा थोडासाही वर गेला की फुटतो.” मावशीने खुलासा केला.नेमका त्यावेळी गावातील वीजपुरवठा बंद झाला व त्यांच्या गप्पांचाही मग फुगा फुटला.
साप्ताहिक राशिभविष्य, ७ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०२५
साप्ताहिक राशिभविष्य, ७ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०२५शुभवार्ता मिळतीलमेष : जे जातक नोकरीच्या शोधार्थ आहेत अशा जातकांचा नोकरी विषयक शोध संपून नवीन नोकरी मिळेल, बेरोजगारांना रोजगार मिळेल. चालू नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखतीतून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. कामानिमित्त लहान-मोठे प्रवास होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी अजिबात वेळ न दवडता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक राहील. व्यवसायात परिस्थिती ठीकठाक राहील. काहीवेळेस कामाचा ताण जाणवू शकतो. शांतपणे निर्णय घेण्याची गरज. कुटुंबात शुभवार्ता मिळाल्यामुळे आनंदी राहाल. अचानक झालेल्या धनलाभामुळे आश्चर्यचकित राहाल.मध्यस्थी यशस्वी होतीलवृषभ : समाजातील मान्यवर तसेच प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखी होऊन भेटीगाठी होतील. प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली महत्त्वाची कार्ये पूर्ण होण्यासाठी या भेटीगाठी उपयोगी पडतील. मध्यस्थी यशस्वी होतील. जमीन व स्थायी संपत्ती संबंधित असलेली रखडलेली कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. वडिलोपार्जित संपत्तीविषयी असलेले वाद-विवाद संपुष्टात येतील. सर्वमान्य तोडगा निघेल. भावंडांशी सख्य राहील. लहान-मोठे गैरसमज दूर होतील. जवळचे तसेस दूरचे प्रवास करावे लागतील. चांगल्या धनलाभाची शक्यता. प्रवासात आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे.अचानक धनलाभ मिथुन : अनुकूल ग्रहमान लाभल्यामुळे अनेक अनेक मार्गाने धन आगमन होऊ शकते. नेहमीच्या उत्पन्नाच्या मार्गांच्या शिवाय उत्पन्न वाढू शकते. खर्चाचे प्रमाण वाढेल. अनावश्यक खर्चाला कात्री द्या. अनेक चांगल्या घटना घडून येतील. कुटुंबाच्या सुखसोयीसाठी खर्च करावे. भावंडाच्या भेटीगाठी होतील. जवळचा तसाच दूरचा प्रवास करावा लागेल. नोकरीमध्ये आपली परिस्थिती चांगली राहील. प्रगती कारक घटना घडेल. काहींना पदोन्नती मिळेल, तर काहींची बदली देखील होऊ शकते. कामाच्या स्वरूपात बदल घडून कामाचा व्याप वाढेल. मुलांच्या प्रगतीच्या वार्ता कानावर येतील. अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. व्यवसायात नवीन बदल फायद्याचे ठरतील जुने येणे वसूल होतील.प्रवासाचे योग आहेतकर्क : अनुकूल ग्रहमानाची साथ मिळाल्यामुळे घरामध्ये अनुकूल वातावरण निर्माण होईल घरातील सदस्य एकमेकांच्या विषयी आपुलकी वाढवतील. जमिनीची तसेच मालमत्तेची कामे होतील मात्र थोडे सबुरीचे धोरण स्वीकारावे लागेल. घाईगर्दीत कोणताही निर्णय घेणे हितकारक ठरणार नाही. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. प्रवासाचे योग आहेत सहकुटुंब सहपरिवार प्रवास घडू शकतो. नोकरीमध्ये बदल होऊ शकतात. मात्र ते बदल सकारात्मक होतील व्यवसायात भरभराट होऊ शकते नवीन करारमदार होण्याची शक्यता.आर्थिक प्रगतीसिंह : या आठवड्यात आपली चांगलीच आर्थिक प्रगती होणार आहे. व्यवसाय मधील जुनी येणी वसूल झाल्यामुळे व्यावसायिक प्रगती होईल. अनेकानेक मार्गाने धंनागमन होऊ शकते. व्यवसायात नवीन बदल केल्यामुळे व्यवसायावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. जमीन जुमला यांच्या व्यवहारांमध्ये लाभ होईल. नातेवाईक आप्तेष्ट व जुने मित्र यांच्या गाठीभेटी होऊ शकतात. सामाजिक तसेच धार्मिक कार्यात भाग घ्याल. कुटुंबातील सर्व सदस्यांचे अपेक्षित सहकार्य लाभल्यामुळे अनेक कामे मार्गी लावू शकाल. मनोरंजनाकडे कल असेल. सप्ताह मजेत जाईल.भागीदाराची मदत मिळेल कन्या : आत्तापर्यंत आलेला मनावरचा ताण कमी होण्यास सुरुवात होईल जोडीदाराची साथ लाभेल धनलाभाचे योग आहेत. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराची मदत मिळेल आपल्या जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. मात्र आपल्या बोलण्यावर व वर्तनावर नियंत्रण आवश्यक. कोणाचाही अपमान करणे टाळा. कुटुंबात एखादे धार्मिक कार्य घडेल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे गतीमान होतील मतभेद मिटतील. नोकरीत अनुकूल स्थिती निर्माण होईल मात्र आपण राजकारण व गटबाजीपासून दूर राहा मित्रमंडळींच्या वर्तुळात वादविवाद टाळा प्रवास घडतील.मतभेद संपुष्टात येतीलतूळ : प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कामे गतीमान होतील. सरकारी कामात लागणारा विलंब नाहीसा होईल. त्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटेल. एखादे महत्त्वाचे काम होऊ शकते. व्यावसायिकांनी सरकारी कायदे व नियम कसोशीने पाळायला हवेत. आर्थिकदृष्ट्या काहींना दूरचे तसेच जवळचे प्रवास करावे लागतील. प्रवासात वाहनाच्या वेगावरती नियंत्रण आवश्यक अतिआत्मविश्वास नको. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. जीवनसाथी बरोबर असलेले मतभेद संपुष्टात येतील. घरातील वातावरण आनंद देईल. प्रेमिकांना अनुकूल कालावधी.मानाचे पद मिळेलवृश्चिक : अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करू शकाल यशाचे प्रमाण वाढते राहील नोकरीत आपल्याला नवीन अधिकार मिळेल. पदोन्नती आणि वेतन वृद्धिचे योग आहेत. सामाजिक मानसन्मानमध्ये वाढ होऊन प्रतिष्ठेत भर पडेल. एखाद्या समारंभात मानाचे पद मिळेल. आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम राहील. प्रेमामध्ये अनुकूल प्रतिसाद मिळू शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक यात्रा घडून देव दर्शन होईल. त्यामुळे समाधान लाभेल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या राहतील. त्यासाठी खर्चही करावा लागेल.महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकतेधनु : प्रदीर्घ काळ मनात असलेली एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकते. या सप्ताहात आपल्याला भाग्याची साथ मिळू शकते. प्रदीर्घ काळ मनात असलेली एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकते. अडलेली कामे होतील. पर्यटन किंवा कामानिमित्त दूरचे तसेच जवळचे प्रवास घडू शकतात. प्रवास कार्य सिद्ध होतील. नोकरीत मानसन्मान मिळू शकतो. पदोन्नती तसेच वेतन वृद्धि होईल. मात्र नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. त्याच प्रमाणे बदलीची तयारी ठेवा. आर्थिकदृष्ट्या उन्नती होईल. रागावर नियंत्रण आवश्यक.नियोजन उपयोगी पडेलमकर : आपल्यासमोरील दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे होतील विशेषतः सरकारी स्वरूपाची कामे. मात्र आजचे काम आजच करा. कामामध्ये विलंब नको. नोकरीत अपेक्षित सहकार्य मिळेल वरिष्ठांना बरोबर असलेले संबंध सुधारतील तसेच सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. जमीन जुमला व स्थानी संपत्ती विषयीचे व्यवहार गतीमान होतील. मध्यस्ती फलद्रूप होतील. वडिलोपार्जित संपत्ती विषयी असलेले मतभेद संपुष्टात येतील. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल. आपल्या मतास प्राधान्य मिळेल. गुरुजनांचे आशीर्वाद लाभतील. मात्र अभ्यासामध्ये दुर्लक्ष करू नका वेळेचे नियोजन उपयोगी पडेल.अपेक्षित सहकार्य लाभेलकुंभ : कुटुंबातून तसेच आपल्या कार्यक्षेत्रातून आपल्याला अपेक्षित सहकार्य लाभेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील यामुळे महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल. व्यवसायिक बद्दल फायदेशीर ठरतील. नवीन तंत्रज्ञान व नव्या संकल्पनांचा वापर करू शकाल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता मात्र आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. प्रवासाचे योग सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळींच्या समवेत लहान-मोठ्या प्रवासाचे योग आहेत. प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक राजकारणी जातकांना विरोध झेलावा लागेल विरोधक आक्रमक बनू शकतात. कुटुंबातील मुलांच्या विषयी सकारात्मक राहा. व्यवसायातील स्थिती समाधानकारक राहील. नोकरीतील परिस्थिती अनुकूल राहील.फायद्याच्या प्रमाणात वाढ होईलमीन : संमिश्र ग्रहमान यामुळे आपल्याला संमिश्र फळे मिळण्याची शक्यता आहे सुरुवातीला कामांमध्ये अडथळे जाणू शकतात त्याचप्रमाणे धावपळ आणि दगदग होईल स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे कुटुंबातील व्यक्तींकडून सहकार्य करावे मात्र स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण आवश्यक व्यवसायिक परिस्थिती समाधानकारक राहून आर्थिक परिस्थिती सुधारेल व्यवसायिक उलाढाल वाढून फायद्याच्या प्रमाणात वाढ होईल जमीन-जुमला यांची कामे गतिमान होऊ शकतात. सरकारी नोकरीत प्रलोभने टाळणे हिताचे ठरेल.
दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ७ डिसेंबर २०२५
पंचांगआज मिती मार्गशीर्ष कृष्ण तृतीया शके १९४७.चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग शुक्ल.चंद्र राशी मिथुन,भारतीय सौर १६ मार्गशीर्ष १९४७.रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२४ .मुंबईचा सूर्योदय ०६.५८ , मुंबईचा सूर्यास्त ०६.०० , मुंबईचा चंद्रोदय ०८.३६ , मुंबईचा चंद्रास्त ०९.२४ राहू काळ ०४.३७ ते ०६.००,संकष्ट चतुर्थी-चंद्रोदय-०८;२८,शुभ दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : जीवनसाथी बरोबर सुर जुळतील.वृषभ : समाजातील मान्यवरांच्या भेटीगाठी होतील.मिथुन : तरुण-तरुणींना प्रेमात यश. गैरसमज टाळा.कर्क : व्यवसायात भरभराट होऊन नवीन कामे मिळतील.सिंह : नव्या गुंतवणुका करू शकाल.कन्या : आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक.तूळ : कुटुंबा मधून पूर्ण सहकार्य मिळेल. वृश्चिक : वादग्रस्त प्रकरण मिटेल.धनू : व्यवसाय मध्ये चांगली परिस्थिती राहून प्रगति.मकर : दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता.कुंभ : कामानिमित्त लहान-मोठे प्रवास होऊ शकतात.मीन : अचानक काही समस्यांना तोंड द्यावे लागेल.
Ravi Shastri : ‘बुमराहला वापरण्याची अक्कल नाही!’रवी शास्त्रीचा अप्रत्यक्ष अजित आगरकरला सणसणीत टोला
Ravi Shastri slams Ajit Agarkar for bumrah workload : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (वय ३१) हा तिन्ही फॉरमॅटमधील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने आपल्या शानदार गोलंदाजीने भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याची कामगिरी लौकिकाला साजेशी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर, त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटची चर्चा क्रिकेट वर्तुळात जोरदार सुरू आहे. अशात […] The post Ravi Shastri : ‘बुमराहला वापरण्याची अक्कल नाही!’ रवी शास्त्रीचा अप्रत्यक्ष अजित आगरकरला सणसणीत टोला appeared first on Dainik Prabhat .
पुढच्या वर्षी डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : आज ६ डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या अनुयायांचा जनसागर उसळला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून मोठ्या संख्येने आंबेडकरांचे अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कधी पूर्ण होईल याचे […] The post पुढच्या वर्षी डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on Dainik Prabhat .

33 C