SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

31    C
... ...View News by News Source

‘त्या’लाडक्या बहिणींवर कारवाई होणार ; योजनेतून घेतलेले पैसेही सरकार वसूल करणार, KYC ने मोठा घोळ उघड

Ladki Bahin Yojana। राज्य सरकारची महत्वकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आता होणार कारवाई होणार असल्याची माहिती समोर आलीय. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. सोबतच घेतलेले पैसेदेखील वसूल केले जाणार आहे, एवढच […] The post ‘त्या’ लाडक्या बहिणींवर कारवाई होणार ; योजनेतून घेतलेले पैसेही सरकार वसूल करणार, KYC ने मोठा घोळ उघड appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 12:25 pm

शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स १६५ अंकांनी घसरला ; निफ्टीही गडगडला

Stock market crashes। भारतीय शेअर बाजारात आज घसरण झाली, ज्यामुळे मागील दोन दिवसांची वाढ थांबली. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स १६५.१९ अंकांनी किंवा ०.१९% ने घसरून ८५,४६७.४९ वर व्यवहार करत होता, जो त्याच्या सुरुवातीच्या पातळी ८५,३४७.४० पासून खाली आला होता. निफ्टी ०.२१% ने किंवा ५४.७५ अंकांनी घसरून […] The post शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स १६५ अंकांनी घसरला ; निफ्टीही गडगडला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 12:14 pm

पार्थ पवारांच्या जमीन घोटाळा प्रकरणात शितल तेजवानींची पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली पाच तास चौकशी!

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या फर्मशी संबंधित पुणे जमीन व्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानी यांचा पुन्हा एकदा जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी मंगळवारी तेजवानी यांचा प्रथम जबाब नोंदवला होता. तर दुसरी चौकशी काल (२० नोव्हेंबर) करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमांचे उल्लंघन करून पवारांच्या अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपीला ज्या २७२ मूळ वतनदारांची जमीन विकण्यात आली होती, त्यासाठी तेजवानी यांनी पॉवर ऑफ अॅटर्नी घेतली होती.काल झालेल्या चौकशीमध्ये तेजवानी आयुक्त कार्यालयात चार तासांहून अधिक काळ उपस्थित होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, तेजवानी यांनी दिलेली माहिती, सादर केलेली कागदपत्रे किंवा संबंधित सरकारी विभाग आणि कार्यालयाकडून आम्हाला जे काही मिळाले आहे त्याची पडताळणी सुरू असल्यामुळे चौकशीबाबत नोंदवलेल्या जबाबातील कोणताच मजकूर उघड करणार नसल्याचे पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.https://prahaar.in/2025/11/21/shocking-after-nashik-child-abuse-in-pune-too-inhuman-act-by-sugarcane-worker/मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात तेजवानी, पार्थ पवार यांचे भागीदार दिग्विजय पाटील, निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि इतरांवर गैरव्यवहाराचा आरोप आहे. अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी आणि तेजवानी यांच्यातील ३०० कोटी रुपयांचा वादग्रस्त करार, ज्यामध्ये पार्थ पवार यांचा ९९ टक्के हिस्सा आहे. या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क देखील वादग्रस्तपणे माफ करण्यात आले. हा भूखंड सरकारने दशकांपूर्वी ताब्यात घेतला होता आणि २०३८ पर्यंत बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला भाडेतत्त्वावर दिला होता.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 12:10 pm

मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आफ्रिकेत रवाना जागतिक महत्वाच्या 'या'मुद्यांवर G20 परिषदेत चर्चा होणार

प्रतिनिधी: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी २० (G20) परिषदेला निघाले आहेत. आज त्यांनी जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेत निघण्यासाठी उड्डाण घेतले आहे. जगभरातील चाललेल्या विविध घडामोडींचा आर्थिक भूराजकीय, व सामाजिक धांदोळा या बैठकीत घेतला जाऊ शकतो. भारत व दक्षिण देशासाठी ही महत्वाची परिषद असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देखील या परिषदेत सहभागी होतील. तीन दिवसांच्या दौऱ्यावर पंतप्रधान असताना यामध्ये अनेक विषयांवर संवाद होईल. दक्षिण आफ्रिकाकडे यंदाचे यजमानपद असणार आहे. यापूर्वी ते गेल्या वर्षी ब्राझीलकडे होते व तत्पूर्वी २०२३ मध्ये भारतात व २०२२ मध्ये इंडोनेशियात या परिषदेचे नियोजन केले गेले होते. या परिषदेतील महत्वाच्या तीन सत्रांना तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती लावतील अशी चिन्हे आहेत. आज २१ पासून २३ नोव्हेंबरपर्यंत ही परिषद संपन्न होणार आहे. उल्लेखनीय यंदा अमेरिकेतील प्रतिनिधी मात्र या परिषदेला हजेरी लावणार नाहीत असे व्हाईट हाऊसने सांगितले आहे.मात्र अमेरिकेचे आफ्रिकेतील दुतावास या बैठकीला उपस्थित राहतील असे सांगण्यात येत आहे.विकसनशील देश त्यांची आर्थिक सामाजिक, भूराजकीय भौगोलिक परिस्थिती व त्यांच्यावर होणारे जागतिक परिणाम, विकसित राष्ट्रांशी असलेले त्यांचे संबंध, पर्यावरण, आर्थिक प्रगती, शाश्वतता, हवामान बदल यासह व्यापारी संबंध, उर्जा निर्मिती, अन्नधान्य उत्पादन व वितरण या अशा अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा अपेक्षित आहे.भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिसूचनेत पंतप्रधान शिखर परिषदेच्या तिन्ही मुख्य सत्रांना संबोधित करतील अशी अपेक्षा आहे. या सत्रांमध्ये समावेशक आणि शाश्वत आर्थिक वाढ, व्यापार, विकास वित्तपुरवठा आणि जागतिक कर्ज आव्हान यांचा समावेश असेल. इतर चर्चा आपत्ती-जोखीम कमी करणे, व्यवस्थापन करणे, हवामान कृती, ऊर्जा संक्रमण आणि अन्न व्यवस्था याद्वारे एक लवचिक जग निर्माण करण्यावर केंद्रित असतील. अंतिम सत्रात प्रत्येकासाठी एक निष्पक्ष भविष्य निर्माण करण्यावर चर्चा केली जाईल, ज्यामध्ये महत्त्वाचे खनिजे, सभ्य काम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारखे विषय असतील.' असे नमूद केले आहे.माहितीनुसार चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपींग देखील या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही. त्यामुळे भारत चीन, भारत युएस यांच्यातील चर्चेसाठी आयता तयार झालेल्या व्यासपीठाला फुली लागली आहे. एकूण १९ राष्ट्रांचा समुह म्हणून ओळखली जाणारी जी २० परिषद विविध कारणावर, प्रश्नांवर वेळोवेळी चर्चा करते. यामध्ये बहुतांश विकसनशील देशांसह काही विकसित देशांचाही समावेश आहे. १९९९ साली या परिषदेची स्थापना झाली होती. प्रामुख्याने जागतिकीकरणात विकसनशील व विकसित देशांचे बदललेले संबंध, बदललेले जागतिक संदर्भ या विषयावर विस्तृत चर्चा करण्यासाठी हे व्यासपीठ तयार करण्यात आले होते. या देशांमध्ये ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, अर्जेन्टिना, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूके, अमेरिका, युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन यांचा समावेश होतो.यापूर्वी युरोपियन युनियन आणि दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी सांगितले की त्यांनी हरित संक्रमणासाठी आवश्यक असलेला पुरवठा सुरक्षित करण्यासाठी संसाधनांनी समृद्ध आफ्रिकन राष्ट्रात खनिजे आणि धातूंचे अन्वेषण, उत्खनन आणि शुद्धीकरण वाढवण्यावर सहमती दर्शविली आहे.शिखर परिषदेच्या शेवटी, पंतप्रधान जोहान्सबर्गमध्ये उपस्थित असलेल्या काही नेत्यांशी द्विपक्षीय बैठका घेण्याची अपेक्षा आहे. माहितीनुसार ते तेथे असलेल्या सहाव्या IBSA शिखर परिषदेलाही उपस्थित राहणार आहेत.या वर्षीच्या G20 चा विषय 'एकता, समानता आणि शाश्वतता' आहे. दक्षिण आफ्रिकेने नवी दिल्ली आणि ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथे झालेल्या मागील शिखर परिषदेतील निघालेल्या निष्कर्षावर यावेळी पुढे चर्चा अपेक्षित आहे.याविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले आहेत की,'वसुधैव कुटुंबकम' आणि 'एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य' या आपल्या दृष्टिकोनाशी सुसंगत असलेल्या शिखर परिषदेत मी भारताचा दृष्टिकोन मांडेन'.शिखर परिषदेच्या तीन सत्रांमध्ये 'सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक वाढ', 'कोणालाही मागे न ठेवता: आपल्या अर्थव्यवस्थांची उभारणी' 'व्यापाराची भूमिका', 'विकासासाठी वित्तपुरवठा आणि कर्जाचा बोजा' अशा विषयांवर चर्चासत्रे समाविष्ट आहेत.उपलब्ध माहितीनुसार, उर्वरित दोन सत्रे 'एक लवचिक जग- G20 चे योगदान (A Resilient World) - आपत्ती जोखीम कमी करणे (Disaster Risk Reduction) हवामान बदल फक्त ऊर्जा संक्रमण, अन्न व्यवस्था' (Just Energy Transitions, Food Systems) आणि 'सर्वांसाठी एक निष्पक्ष भविष्य: गंभीर खनिजे, सभ्य काम, कृत्रिम बुद्धिमत्ता' (A Fair and Just Future for all : Critical Minerals, Decent Work, Artificial Intelligence) अशी आहेत. G20 माहितीनुसार , G20 सदस्यांमध्ये जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचा समावेश आहे, ज्या जागतिक जीडीपीच्या ८५%, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या ७५% तसेच जगातील दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व परिषद करते.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 12:10 pm

नाशिकमध्ये आफ्रिकन स्वाईन फिव्हरची नोंद, प्रशासन अलर्ट मोडवर!

मुंबई : नाशिक शहरात आफ्रिकन स्वाईन फिव्हरचा प्रादुर्भाव आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील एका मृत वराहाचा नमुना भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी अ‍ॅनिमल डिसीज येथे पाठवण्यात आला होता. तपासणीत नमुन्यात आफ्रिकन स्वाईन फिव्हरचा संसर्ग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाथर्डी येथील महापालिकेच्या खतप्रकल्पाजवळील एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.तपासणीनंतर लगेचच जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि महापालिकेला रोग नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.अलीकडे वराहांच्या (डुक्करांच्या) मृत्यूचे प्रमाण अचानक वाढल्याने प्रशासनाने मृत प्राण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर बाधित आणि त्यालगतचा दहा किलोमीटर परिसर 'निरीक्षण क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच रोग प्रतिबंधासाठी बाधित क्षेत्रातील एक किलोमीटरच्या परिसरातील सर्व वराहांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावून परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित भागात सक्रिय निरीक्षण आणि जैवसुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.वराह मांस विक्री करणाऱ्या सर्व आस्थापनांची नोंदणी करून त्यांच्यावर स्थानिक पशुवैद्यकांकडून नियमित तपासणी करण्याचे आदेश आहेत. तसेच मोकाट वराहपालन पूर्णपणे बंद करण्यास सुचना देण्यात आल्या आहेत.हा रोग झुनोटिक म्हणेजच प्राण्यांमधून माणसांमध्ये येत नाही. हा रोग फक्त आजारी वराहांपासून इतर वराहांमध्ये गेल्यास त्यांच्यामध्ये झपाट्याने संसर्ग पसरतो. मात्र जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग याबाबत अलर्ट मोडवर असल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रकारचे खाद्य देणे पूर्णपणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 12:10 pm

शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर! 'या'खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी

मुंबई : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. ईडन गार्डनवर झालेल्या पहिला कसोटी सामन्यात हरल्यानंतर भारतीय संघावर दबाव वाढला असून आता दुसरा कसोटी सामना निर्णायक ठरणार आहे. हा सामना गुवाहाटीत खेळला जाणार आहे. मात्र, या महत्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे.पहिल्या कसोटीत फलंदाजी दरम्यान गिलच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट व्हावे लागल्याने पुढील डावांत तो खेळू शकला नव्हता. परिणामी भारताला १० फलंदाजांसह खेळावे लागले. पण फलंदाजांच्या फ्लॉप शो मुळे भारतीय संघाचा डाव अवघ्या ९३ धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघ विजयापासून ३० धावा दूर राहिला.यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ गुवाहाटीत दाखल झाला आहे. गिललासुद्धा उपचारानंतर रविवारी डिस्चार्ज मिळाला असून तो संघासोबत गुवाहाटीत दाखल झाला होता. यामुळे गिल सामना खेळेल अशी आशा सर्वांना होती. मात्र त्याच्या तब्येतीमध्ये आवश्यक सुधारणा न झाल्याने दुसरा कसोटी सामना खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच पुढील उपचारासाठी तो मुंबईत येणार आहे. एका वृत्तानुसार ,आता संघाचे नेतृत्व ऋषभ पंत करणार असून, उपकर्णधार कोण असेल याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 12:10 pm

मोठी बातमी ! कोलकातामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के ; घाबरून लोक घराबाहेर पळाले

Kolkata Earthquake। आज पश्चिम बंगालला जोरदार भूकंपाचा धक्का बसला. कोलकातासह अनेक जिल्ह्यांमध्ये हादरे जाणवले. समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी बांगलादेशातील तुंगीपासून सुमारे २७ किलोमीटर पूर्वेला भूकंप झाला. बंगालपर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले. स्थानिक वेळेनुसार, सकाळी १०:३८ वाजता हा भूकंपाची नोंद झाली. युरोपियन-भूमध्य भूकंप केंद्र (EMSC) नुसार, अनेक भागातून सौम्य भूकंपानंतरचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. […] The post मोठी बातमी ! कोलकातामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के ; घाबरून लोक घराबाहेर पळाले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 12:00 pm

पुण्यात म्हाडाची मोठी घोषणा; ४ हजारांहून अधिक घरांसाठी वाढीव मुदत

पुणे : पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए हद्द तसेच सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ४,१८६ घरांसाठी आयोजित संगणकीय सोडतीच्या अर्जाची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली आहे. आता इच्छुक नागरिकांना ३० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.या सोडतीसाठी आतापर्यंत तब्बल १,८२,७८१ ऑनलाईन अर्ज दाखल झाले असून त्यापैकी १,३३,८८५ अर्ज अनामत रकमेच्या भरण्यासह नोंदवले गेले आहेत. संगणकीय सोडत ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता काढली जाणार आहे. अर्जदारांना ३० नोव्हेंबरपर्यंत RTGS अथवा NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा करता येईल.तांत्रिक अडचणींमुळे काही अर्जदारांची कागदपत्रे पडताळणीसाठी अपूर्ण राहिल्याने मुदतवाढ मागणी करण्यात आली होती. तसेच नागरिकांकडून आलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा विचार करून म्हाडाने ही अंतिम मुदतवाढ जाहीर केली आहे. नव्या वेळापत्रकाची माहिती म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. इतर अटी पूर्वी जाहीर केलेल्या जाहिरातीनुसारच राहणार आहेत, अशी माहिती पुणे मंडळाच्या अधिकार्‍यांनी दिली.या सोडतीत चार प्रमुख गटांमध्ये सदनिका उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेत १६८३ घरांचा समावेश आहे, तर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत २९९ घरे उपलब्ध आहेत. १५ टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत पीएमआरडीए हद्दीत ८६४ घरे देण्यात आली आहेत. तसेच २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्रातील ३२२२ घरांचा समावेश आहे.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 11:10 am

“अत्यंत साधी..सोपी आणि सुटसुटीत…” ; राम मंदिर ध्वजारोहण सोहळ्याची निमंत्रण पत्रिका आली समोर

Ram Mandir Flag Hoisting। अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात होणाऱ्या भव्य ध्वजारोहण समारंभाची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते संपूर्ण औपचारिक विधींसह राम मंदिराचा ध्वजारोहण करण्यात येणार आहे. दरम्यान, या समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेची पहिली झलक देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण समारंभाचे […] The post “अत्यंत साधी..सोपी आणि सुटसुटीत…” ; राम मंदिर ध्वजारोहण सोहळ्याची निमंत्रण पत्रिका आली समोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 11:10 am

धक्कादायक! नाशिकनंतर पुण्यातही चिमुकलीवर अत्याचार, ऊसतोड कामगाराचे अमानुष कृत्य

पुणे: नाशिकच्या मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येचा विषय ताजा असतानाच, पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर गावात ऊसतोड मजूर कुटुंबातील सात वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. महत्त्वाचे म्हणजे पीडीत लहानगीवर अत्याचार करणारा तरूण त्याच वस्तीत राहणारा आहे. यामुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून ऊसतोड कामगारांच्या वस्त्यांमध्ये अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला जबरदस्तीने एका निर्जन जागी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलगी घाबरून घरी परतल्यानंतर तिने आई-वडिलांना याबाबत सांगितली. मुलीने आरोपीचे नाव स्पष्टपणे सांगितल्याने पालकांनी तात्काळ ओतूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. देवीदास रोहीदास गर्जे (वय अंदाजे ३५) असे आरोपीचे नाव असून तोसुद्धा ऊसतोड कामगार आहे.https://prahaar.in/2025/11/21/delhi-bomb-blast-update-terrorist-dr-muzammil-got-bomb-making-videos-foreign-handler-who-sent-the-videos/तक्रार दाखल केल्यानंतर ओतूर पोलिसांनी त्वरित कारवाई करत काही तासांच्या आत आरोपी देवीदास गर्जेला अटक करून भारतीय दंड संहितेनुसार कलम ३७६, ३७६ (२)(एन) आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांन्वये देविदास गर्जे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान पीडित बालिकेवर पुण्यातील शासकीय रुग्णालयात तात्काळ उपचार सुरू करण्यात आले असून वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा आहे.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 11:10 am

गोदरेज प्रॉपर्टीजडून नागपूरात ७५ एकर जागेचे अधिग्रहण

मुंबई: गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (Godrej Properties Limited) कंपनीकडून नागपूरात मोठी गुंतवणूक होणार आहे. कंपनीने नागपूरमध्ये ७५ एकर जमीनीचे अधिग्रहण केल्याचे एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत म्हटले आहे. आर्थिक वर्ष १०२६ मध्ये एकूण २०००० कोटींचा व्यवसायिक टप्पा पार केल्याचे कंपनीने यावेळी स्पष्ट केले आहे.१.७ दशलक्ष स्क्वेअर फूटांचा हा विक्रीयोग्य भूखंड असून कंपनीने नागपूरमध्ये गेल्या चार वर्षांत हा तिसरा भूखंड खरेदी केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या क्षेत्रात गृहनिर्माण होणार आहे. मिहान सेझ व समृद्धी महामार्गाला कनेक्ट होणारा हा भूखंड असणार आहे असे कंपनीने म्हणत कनेक्टिव्हिटीमध्ये महत्वाच्या मोक्याच्या जागी हा भूखंड विकसित केले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.या विषयी बोलताना, गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पांडे म्हणाले आहेत की,'नागपूर पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून आपले स्थान मजबूत करत आहे, ज्याला कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि वाढत्या निवासी मागणीमुळे पाठिंबा मिळत आहे. भारतातील उदयोन्मुख रिअल इस्टेट बाजारपेठांमध्ये आमची उपस्थिती मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याने, हे अधिग्रहण आमच्या विस्ताराच्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.आम्ही आमच्या विकसित होत असलेल्या आकांक्षांशी सुसंगत, त्याच्या रहिवाशांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणारी दर्जेदार प्लॉटेड टाउनशिप विकसित करण्यास उत्सुक आहोत.'

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 11:10 am

निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

जागतिक मराठी संमेलन गोव्यात ; ९ जानेवारीला देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन ; महेश मांजरेकर यांना जीवनगौरव पुरस्कारमुंबई, दि. (प्रतिनिधी) : पणजी (गोवा) येथे ९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान जागतिक मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ९ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. जागतिक मराठी अकादमी आयोजित गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, ‘पद्मविभूषण’ डॉ. अनिल काकोडकर हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.या जागतिक मराठी संमेलनात दिले जाणारे मानाचे पुरस्कार यंदा गोव्याच्या उद्योगक्षेत्रातील दिग्गज श्री. अनिल खवटे यांना ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कार’, तर चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते श्री. महेश मांजरेकर यांना ‘मराठी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील. संमेलनाचे कार्याध्यक्ष दशरथ परब व सहकारी अनिल सामंत, रमेश वंसकर संमेलनाच्या आयोजनाची उत्तम तयारी करत आहेत. असे जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी अकादमी सदस्य संजय ढेरे, कार्यकारिणी सदस्य महेश म्हात्रे (मुंबई) व संमेलन कार्यवाह गौरव फुटाणे उपस्थित होते.जागतिक मराठी अकादमीतर्फे दिले जाणारे हे मानाचे सन्मान उद्योग, संस्कृती व कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाला दिलेली संस्थात्मक दाद आहे. श्री. अनिल खवटे यांची उद्यमशीलता आणि सामाजिक बांधिलकी तसेच श्री. महेश मांजरेकर यांच्या कलात्मक संवेदना आणि प्रयोगशील दिग्दर्शनाने मराठी विश्व समृद्ध झाले आहे. ख्यातनाम अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरणार्‍या ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनात जगभरातील कर्तबगार मराठी बांधवांच्या उपस्थितीत या दोन्ही मान्यवरांचा गौरव करण्याचा सन्मान अकादमीला लाभत आहे, याबद्दल रामदास फुटाणे यांनी आनंद व्यक्त केला.या तीन दिवसांच्या संमेलनात कर्तबगार मराठी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला जाणार आहे. त्यांच्या मुलाखती घेऊन, त्यांचा जीवनप्रवास समजून घेण्यात येणार आहे. याशिवाय, गोव्यातील स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.गोव्याचे ख्यातनाम उद्योगपती श्री. अनिल खवटे यांनी सिव्हिल इंजिनिअर म्हणून करिअरची सुरुवात करून अल्कॉन एंटरप्रायझेसच्या माध्यमातून बहुविध उद्योगसमूह उभारला. १९७० च्या दशकात लघुउद्योगातून झालेली त्यांची वाटचाल बांधकाम, रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी, सिमेंट, ऑटोमोबाईल्स, लॉजिस्टिक्स आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत यशस्वीपणे विस्तारली. त्यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल डेल्मन, हॉटेल रोनिल (Hyatt JdV), अल्कॉन सिमेंट, रेडिमिक्स काँक्रीट, Hyundai व Mercedes-Benz डीलरशिप, मायक्रोफाईन प्रॉडक्ट्स आणि अल्कोलॅब यांसह अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारले गेले. उद्योग क्षेत्राबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान असून मुश्तिफुंड संस्था, दिशा चॅरिटेबल ट्रस्ट आणि विद्या विकास मंडळ अशा संस्थांतून ते सक्रिय आहेत. उद्योग रत्न, राजीव गांधी एक्सलन्स पुरस्कार, प्राईड ऑफ गोवा, गोअन ऑफ द इयर तसेच पोर्तुगाल राष्ट्राध्यक्षांचा 'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिट' यांसारख्या राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय सन्मानांनी त्यांचा गौरव झाला आहे.चित्रपटसृष्टीतील दमदार आणि बहुमुखी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखण्यात येणाऱ्या श्री. महेश मांजरेकर यांनी रंगभूमीपासून सुरुवात करीत मराठी आणि हिंदी या दोन्ही चित्रपटसृष्टीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. अस्तित्व, वास्तव, नटसम्राट, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, सिटी ऑफ गोल्ड, तसेच काँटे, कुरुक्षेत्र आणि दबंग ३ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी दिग्दर्शन, अभिनय आणि निर्मितीच्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे. ओटीटी माध्यमातील त्यांच्या निर्मिती व दिग्दर्शनालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. सामाजिक वास्तव, तीक्ष्ण निरीक्षण, संवेदनशील मांडणी आणि प्रभावी कथनशैली ही त्यांची वैशिष्ट्ये मानली जातात. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर, महाराष्ट्र राज्य पुरस्कार व झी गौरव यांसह अनेक मान्यताप्राप्त पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 11:10 am

Dipika Kakar: दीपिका कक्कडच्या कॅन्सर उपचारादरम्यान भावनिक क्षण; पती शोएब इब्राहिमने दिला आधार

Dipika Kakar: टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कड गेल्या काही महिन्यांपासून लिव्हर कॅन्सरशी लढा देत आहे. उपचारांच्या या कठीण प्रवासात त्यांना अनेक साइड इफेक्ट्स, वेदना आणि मानसिक ताण सहन करावा लागत आहे. अलीकडेच त्या डॉक्टरांना भेटण्यासाठी गेल्या असताना भावनिक झाल्या आणि रडू लागल्या. त्यांच्या नवऱ्याने, अभिनेता शोएब इब्राहिमने, त्यांना शांत करत सांभाळले. हा भावनिक क्षण दीपिकाने आपल्या […] The post Dipika Kakar: दीपिका कक्कडच्या कॅन्सर उपचारादरम्यान भावनिक क्षण; पती शोएब इब्राहिमने दिला आधार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 10:53 am

स्पॉटलाइट: वाहनावर सरकारी स्टिकर, चेहऱ्यावर मास्क:कॅश भरलेली व्हॅन थांबवून म्हणाले, आम्ही RBI अधिकारी, बंगळुरूत दिवसाढवळ्या 7 कोटी कसे लुटले?

आरबीआय अधिकाऱ्यांच्या वेशात आलेल्या चोरांच्या एका टोळीने 7 कोटी रुपयांचा दरोडा टाकला. पण हे चोर पूर्ण सुरक्षेसह बँकेतून येणारी कॅश व्हॅन कशी लुटून पळून गेले? या भरदिवसा झालेल्या दरोड्यामागील संपूर्ण कहाणी काय आहे? अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी वरील प्रतिमेवर क्लिक करा.

दिव्यमराठी भास्कर 21 Nov 2025 10:33 am

क्लिअर मेसेज- बिहारमध्ये नितीश यांचीच चलती:भाजपने नितीश कुमार यांच्या पसंतीचे मंत्री केले, पण टार्गेट 2030; 10व्या शपथविधीमागची इनसाइड स्टोरी

२० वर्षांपासून सत्तेत असलेले नितीश कुमार सरकार बिहारमध्ये पुन्हा सत्तेत आले आहे. नितीश कुमार यांनी विक्रमी १० व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २९ ऑक्टोबरपूर्वी, माध्यमांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये त्यांच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्तीबाबत बरीच अनिश्चितता होती. तथापि, आज परिस्थिती वेगळी आहे. नितीश कुमार केवळ मुख्यमंत्री झाले नाहीत तर या वयात ते २०२० पेक्षाही अधिक मजबूत झाले आहेत. हे त्यांच्या मंत्रिमंडळातही दिसून येते. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा प्रभाव कायम आहे असे म्हणता येईल. भाजपने नितीश कुमार यांच्यासारख्याच मंत्र्यांची नियुक्ती केली आहे आणि हे खरे आहे की त्यांनी काही नवीन आणि तरुण चेहऱ्यांसह २०३०चा रोडमॅपदेखील तयार केला आहे. नितीश कुमार कसे बलवान झाले? गुजरात आणि मध्य प्रदेशचा प्रयोग भाजप येथे का करू शकला नाही? नितीश यांच्या पसंतीचे मंत्री भाजपला का नियुक्त करावे लागले? वाचा दिव्य मराठी विश्लेषण... नितीश कुमार किती मजबूत आहेत, ते २ मुद्द्यांमध्ये समजून घ्या १. नितीश मुख्यमंत्री राहतील, सरकार स्थिरतेचे संकेत २० नोव्हेंबर रोजी २६ आमदारांनी एकाच वेळी मंत्री म्हणून शपथ घेतली. तथापि, १० मंत्रीपदे अजूनही रिक्त आहेत. बिहारमध्ये जास्तीत जास्त ३६ मंत्रिपदे आहेत, जी एकूण २४३ आमदारांपैकी १५% आहेत. २६ मंत्र्यांमध्ये भाजपचे १४, जेडीयूचे ८, एलजेपी(आर)चे २ आणि एचएएम आणि आरएलएमचा प्रत्येकी १ मंत्र्यांचा समावेश आहे. हे सरकारच्या स्थिरतेचे संकेत देते. याचा अर्थ असा की सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. जेव्हा नितीश कमकुवत झाले तेव्हा वारंवार मंत्रिमंडळ विस्तार झाला २. नितीश आपल्या जवळच्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवतात, भाजप आपला पवित्रा बदलतो, पण मृदू चेहऱ्याने नितीश कुमार यांनी मागील सरकारमधील त्यांच्या कोट्यातील आठ मंत्र्यांना पुन्हा नियुक्त केले आहे. यामध्ये विजय कुमार चौधरी, बिजेंद्र यादव, श्रवण कुमार, अशोक चौधरी, लेसी सिंग, सुनील कुमार, जमा खान आणि मदन साहनी यांचा समावेश आहे. दरम्यान, भाजपने बिहार सरकारमध्ये पहिल्यांदाच त्यांच्या कोट्यातील सहा नवीन चेहऱ्यांना मंत्री म्हणून नियुक्त केले आहे. त्यापैकी पाच जणांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आले आहे आणि तीन जुन्या मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपदावर घेण्यात आले आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भाजपने मंत्री म्हणून नियुक्त केलेले नवीन आणि जुने नेते सौम्य राजकारण करत आहेत, म्हणजेच ते कट्टर हिंदू राजकारण करत नाहीत. भाजपने २०३० साठी रोडमॅप तयार केला नितीश कुमार यांच्या निवडीव्यतिरिक्त, भाजपने त्यांच्या राजकीय भविष्यासाठी इतर काही उमेदवारांवरही पैज लावली आहे. नितीश यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीशी भाजपला सहमती द्यावी लागली, का... १८व्या विधानसभेत, भाजपने १०१ जागा लढवल्या आणि ८९ जागा जिंकल्या. तो विधानसभेत नंबर वन पक्ष बनला आहे. नितीश कुमार नसतानाही भाजप हेराफेरी करून सरकार स्थापन करू शकला असता. कारण… असे असूनही, भाजपला नितीश कुमारांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीशी सहमत व्हावे लागले. किंवा असं म्हणा, नितीश कुमारांनी भाजपला त्यांच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत करून घेतले. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मोदी आणि शहा आश्चर्यकारक निर्णय घेतात. पण त्यांनी बिहारमध्ये असे काहीही केलेले नाही. यामागे तीन प्रमुख कारणे आहेत... १. बिहारमध्ये संघाचा प्रभाव कमी गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्री बदलले. गुजरातमध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्यात आले. कारण तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा प्रभाव आहे. बिहारमध्ये आरएसएसचे अस्तित्व आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सुमारे २०,००० स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. त्याचा परिणाम झाला, परंतु केवळ त्यांच्या ताकदीवर निवडणुका जिंकता येत नाहीत. २०१५च्या विधानसभा निवडणुकीत मोदी आणि शहा यांना हे लक्षात आले. त्यावेळी भाजप आणि आरएसएसने त्यांची पूर्ण ताकद लावली, परंतु त्यांना फक्त ५२ जागा मिळाल्या. २. नितीश कुमार भावनिक आहेत नितीश कुमार हे बिहारमधील, विशेषतः महिलांमध्ये भावना आहेत. म्हणूनच गेल्या पाच निवडणुकांमध्ये, ते जिथे जिथे नेतृत्व करतात तिथे तिथे सरकारे स्थापन होतात. नितीश कुमार यांच्यावरील टीकेचाही निवडणुकांवर परिणाम होतो. २०१५च्या निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी नितीश कुमार यांच्या डीएनएवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ३. नितीश कुमार यांचे सामाजिक संबंध नितीश कुमार यांना किमान १६% मते आहेत. महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या बदलीचा त्यांच्या मतदारांवर परिणाम होत नाही.

दिव्यमराठी भास्कर 21 Nov 2025 10:28 am

helen: ‘मेरा नाम चिन चिन चू’ने रातोरात स्टार बनलेल्या हेलनचा आज वाढदिवस; बर्मा ते बॉलीवूडचा संघर्षमय प्रवास

helen: भारतीय सिनेमात काही कलाकार असे असतात ज्यांची उपस्थितीच फिल्मच्या यशाची खात्री मानली जाते. अशा चमकदार कलाकारांमध्ये 1950 ते 1970 या दोन दशकांत अविरत राज्य करणारे नाव म्हणजे हेलन. आज त्यांचा वाढदिवस असून या निमित्ताने त्यांच्या संघर्षमय आयुष्याचा आणि सुपरस्टारडमचा वेध घेऊया. बर्मातील लहानपण ते भारतातला वेदनादायक प्रवास हेलन यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1938 रोजी […] The post helen: ‘मेरा नाम चिन चिन चू’ने रातोरात स्टार बनलेल्या हेलनचा आज वाढदिवस; बर्मा ते बॉलीवूडचा संघर्षमय प्रवास appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 10:16 am

आज भारत-बांगलादेश सामना; टॉस, वेळ आणि लाइव्ह स्ट्रीमिंग अपडेट

मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यात आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेतील सेमी फायनलचा पहिला सामना २१नोव्हेंबर रोजी दोहामध्ये रंगणार आहे. या सामन्यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात दुसरा सेमी फायनल खेळवला जाणार आहे. प्रेक्षकांना हे सामने कुठे पाहायला मिळणार चला जाणून घेऊया ?भारत आणि बांगलादेशचा सामना दोहातील वेस्ट पार्क आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी पंच दुपारी १.३० वाजता मैदानाची पाहणी करतील. दुपारी २.३०वाजता टॉस पार पडेल. सामना दुपारी ३.००वाजता सुरू होईल. तसेच पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्याचा टॉस संध्याकाळी ६.३०ला आणि सामना ७.०० वाजता होईल.महत्त्वाचे म्हणजे, यावेळी भारताचा सेमी फायनल हॉटस्टार किंवा जिओवर उपलब्ध नसून, प्रेक्षकांना हा सामना सोनी स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येणार आहे. Sony Liv या ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील दोन्ही सेमी फायनल्सचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.भारत आणि बांगलादेशपैकी विजेता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल, तर पराभूत संघाची मोहीम इथेच संपणार आहे.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 10:10 am

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही'तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या विवाहाची तारीख आणि ठिकाण दोन्ही स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा पत्रामुळे या दोघांनी गुपित ठेवलेली माहिती पुढे आली आहे. स्मृती आणि पलाशच्या रिलेशनशिपबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी त्यांनी कधीही यावर बोलणे टाळले. दरम्यान, एका पत्रकार परिषदेत पलाशला स्मृतीबद्दल प्रश्न विचारला असता त्याने सांगितले होते की स्मृती ही इंदूरचीच सून होणार आहे. यामुळे त्यांच्या नात्याला अप्रत्यक्षपणे पुष्टी मिळाली होती.लग्न कुठे होणार, याबाबतही अनेक अंदाज बांधले जात होते. पण स्मृतीने महाराष्ट्रातच लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने दोघांचा विवाह सांगलीत होणार असल्याची माहिती समोर आली. सुरुवातीला विवाहाची तारीख २० नोव्हेंबर अशी चर्चेत होती. त्यामुळे त्या दिवशी चाहते सोशल मीडियावर त्यांच्या फोटोची वाट पाहत होते.मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती आणि पलाश यांना शुभेच्छा देत एक पत्रक प्रसिद्ध केले. त्या पत्रकात लिहिलेल्या तपशीलानुसार त्यांचा विवाह २३ नोव्हेंबरला होणार आहे. दोघांनीही हा दिवस गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंतप्रधानांच्या शुभेच्छांमुळे हे सिक्रेट अखेर उघड झाले. भारताच्या वर्ल्ड कप विजयावेळी पलाश मैदानात उपस्थित होता. विजयानंतर दोघांनी एकमेकांना भेटून कॅमेऱ्यासमोर सेलिब्रेशन केले होते. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना अधिकच जोर आला.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 10:10 am

Stock Market Opening Bell: शेअर बाजारात पडझड सेन्सेक्स २२१ व निफ्टी १९.६० अंकाने घसरला 'या'कारणांमुळे जाणा आजची निफ्टी टेक्निकल पोझिशन

मोहित सोमण: आयटी शेअरमधील वाढ मंदावून इतर मेटल, रिअल्टी, केमिकल्स, फायनांशियल सर्विसेस शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे आज बाजार पडले आहे. सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सेन्सेक्स २२१ अंकाने व निफ्टी १९.६० अंकाने कोसळला आहे. प्रामुख्याने आज नवा 'ट्रिगर' बाजारात नसल्याने व आगामी आकडेवारी व व्याजदरातील कपातीतील अनिश्चितता यामुळे बाजार थंडावले आहे. आज बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडू सेल ऑफ अधिक पातळीवर व घरगुती गुंतवणूकदारांकडून नफा बुकिंग अपेक्षित असल्याने शेअर बाजारात पहिल्या कलात घसरण दिसत आहे. बँक निर्देशांकातील दबाव आज जाणवत आहे. विशेषतः आज एचडीएफसी, आयसीआयसीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्ससारख्या हेवी वेट शेअर्समध्ये वाढ झाली असली तरी दुसरीकडे टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस सारख्या शेअर्समध्ये वाढ झाली असल्याने बाजारातील घसरण मर्यादित राहिली. युएससह आशियाई बाजारातील कमकुवत कलांचा फटका आज बाजारात बसला कारण युएस बाजारातील डिसेंबर दरकपातीवरील अनिश्चितता व प्राईज करेक्शनचा फटका आयटी शेअर्सला बसला. त्यामुळे युएस शेअर बाजार डाऊ जोन्स (०.४६%) वगळता एस अँड पी ५०० (१.५५%), नासडाक (२.१६%) निर्देशांकात घसरण झाली आहे. आशियाई बाजारातील सगळ्याच बाजारात आज मोठी घसरण झाली.सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ टीबीओ टेक (४.४५%), रिटस (३.८६%), सम्मान कॅपिटल (३.२१%),अलेंबिक फार्मा (२.८४%), सोना बीएलडब्लू प्रिसिजन (१.५४%), केईसी इंटरनॅशनल (१.४४%), जेके टायर्स (१.४३%) समभागात झाली आहे तर सर्वाधिक घसरण जेपी पॉवर वेंचर (५.८२%),नेटवेब टेक्नॉलॉजी (२.६६%), जीएमडीसी (२.६१%) झेन टेक्नॉलॉजी (२.३४%), ईक्लर्क्स सर्विसेस (२.२९%), सुप्रीम इंडस्ट्रीज (२.२६%), किर्लोस्कर ऑईल (२.१६%), हिंदाल्को इंडस्ट्रीज (२.०३%), उषा मार्टिन (१.९८%), विशाल मेगामार्ट (१.९२%) समभागात झाली आहे.सुरूवातीच्या परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'बाजारातील अस्थिरता वाढली आहे. एआय ट्रेडचा बॅरोमीटर, नॅस्डॅक, काल दिवसाच्या शिखरावरून २.१५% ने घसरून ४.४% ने घसरला. बाजारातील या प्रकारची हालचाल स्टोअरमध्ये अधिक अस्थिरतेचे संकेत आहे. एआय स्टॉकमध्ये मूल्यांकनाची चिंता असताना, अनेक तज्ञांनी बुडबुडा फुटण्याचा इशारा दिला आहे, परंतु एनव्हीडियाचे सीईओ या सावधगिरीच्या इशाऱ्याशी असहमत आहेत.आम्हाला प्रगत एआय सिस्टमच्या शाश्वत वाढीद्वारे वैशिष्ट्यीकृत एक वेगळे चित्र दिसते. कमी मूल्यांकनावर, एआय स्टॉकमध्ये पुन्हा नवीन खरेदी येऊ शकते. आपल्याला वाट पहावी लागेल आणि हा अस्थिर टप्पा कसा उलगडतो ते पहावे लागेल.भारतातील अनेक स्टॉकमध्ये, विशेषतः काही नवीन सूचीबद्ध स्टॉकमध्ये, अत्यधिक सट्टेबाजीचा व्यापार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी अशा सट्टेबाजीच्या व्यवहारांपासून दूर राहणे चांगले जे सहसा बहुसंख्य लोकांसाठी अश्रू ढाळतात. आता आदर्श गुंतवणूक धोरण म्हणजे घसरणीवर बऱ्यापैकी मूल्यवान उच्च दर्जाचे स्टॉक खरेदी करणे आणि धीराने वाट पाहणे. या वर्षीच्या एआय ट्रेडमध्ये भारत कमी कामगिरी करणारा असल्याने, एआय ट्रेड कमी झाल्यास आणि भारतासारख्या देशांमध्ये नॉन-एआय स्टॉकमध्ये पैसे येऊ लागल्यास भारताला फायदा होईल. पण मोठी घसरण सर्व बाजारपेठांवर परिणाम करेल. म्हणून वाट पहा आणि गोष्टी कशा घडतात ते पहा.'सुरूवातीच्या परिस्थितीवर चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक अमृता शिंदे म्हणाल्या आहेत की,' मिश्र जागतिक संकेत आणि प्रमुख देशांतर्गत ट्रिगर्सच्या अनुपस्थितीत व्यापक भावना सावधपणे आशावादी आहे. नजीकच्या काळात, व्यापारी दिशात्मक स्पष्टतेचे मूल्यांकन करण्यासाठी जागतिक बाजारातील ट्रेंड, कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतार आणि संस्थात्मक प्रवाहांचा मागोवा घेत राहतील. निफ्टी लवचिकता दाखवत आहे, मागील सत्रात जवळजवळ १४० अंकांनी वाढला होता आणि तेजीच्या गतीच्या सातत्यपूर्ण खरेदीसह सतत रस दर्शवित आहे. निर्देशांक २६१९०-२६२०० झोनभोवती फिरला, ज्यामुळे त्याचा सकारात्मक प्रभाव आणखी मजबूत झाला. तात्काळ आधार आता २६०५०-२६१०० पातळीवर आहे, तर प्रतिकार २६३००-२६३५० पातळीवर आहे, जो पुढील सत्रांसाठी सु-परिभाषित वरच्या श्रेणीचे संकेत देतो.बँक निफ्टी बाजूच्या ते तेजीच्या रचनेत राहिला, जो सकारात्मक पूर्वाग्रहासह स्थिर एकत्रीकरण दर्शवितो. निर्देशांक दिशेने सरकला ५९३०० हा नवीन उच्चांक दर्शवितो आणि वित्तीय क्षेत्रातील सततची ताकद अधोरेखित करतो. प्रमुख आधार ५९०००-५९२०० पातळीवर ओळखला जातो, तर प्रतिकार ५९५००-५९७०० पातळीवर स्थित आहे आणि या श्रेणीच्या पलीकडे ब्रेकआउटमुळे वरच्या दिशेने वेग येऊ शकतो. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) २० नोव्हेंबर रोजी सलग दुसऱ्या सत्रात त्यांची खरेदीची मालिका सुरू ठेवली, ज्यामध्ये २८३ कोटींची निव्वळ खरेदी झाली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) ८२४ कोटींची भर घातली.सध्याची अस्थिरता आणि जागतिक अनिश्चितता लक्षात घेता, व्यापाऱ्यांना सल्ला दिला जातो की त्यांनी निवडक खरेदी-ऑन-डिप्स धोरण स्वीकारावे आणि लीव्हरेजचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करावे. कडक ट्रेलिंग स्टॉप-लॉस आणि आंशिक नफा-बुकिंग आवश्यक आहे आणि जागतिक संकेतांचे बारकाईने निरीक्षण करून आणि प्रमुख तांत्रिक पातळींना पाठिंबा देऊन नवीन दीर्घ पोझिशन्स फक्त २६३०० पातळीच्या वरच विचारात घेतल्या पाहिजेत.'सुरूवातीच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,' महिनाभर चालणाऱ्या ट्रेडिंग रेंजच्या वरच्या मजबूत दाबामुळे जवळच्या काळात २६५५० किंवा त्याहून अधिक पातळी गाठण्याचा आत्मविश्वास वाढतो. दरम्यान, काल वरच्या बोलिंगरच्या वरचा थोडासा दबाव आणि त्यानंतर खाली असलेला बंदचा धक्का, असे सूचित करतो की आज देखील चढ-उतार मर्यादित असू शकतात. २६२३७ पातळीवर तरंगण्यास असमर्थता किंवा २६१६० च्या खाली थेट घसरण यामुळे २६०२८-२५९८४ पातळीच्या अपेक्षांसह, मंदीचा पक्षपात दिसून येऊ शकतो.'

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 10:10 am

लॉरेन्सनंतर एजन्सीकडून अनमोलच्या पाकिस्तानी नेटवर्कची चौकशी:तुर्किये-चीनची शस्त्रे बॉर्डरहून ड्रोनद्वारे मागवण्याचा संशय, अनेक घटनांमध्ये वापरली

अमेरिकेतून हद्दपार झालेल्या अनमोल बिश्नोईची सुरक्षा एजन्सी त्याच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधांबद्दल सविस्तर चौकशी करतील. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मते, अनमोलने भारतात दहशतवादासाठी चिनी आणि तुर्की शस्त्रे वापरली. राजस्थानमधील राजू तेहत हत्याकांड, मुंबईत बाबा सिद्दिकी हत्याकांड आणि पंजाबमधील सिद्धू मूसेवाला हत्याकांड यासारख्या प्रसिद्ध हत्याकांडांमध्येही तुर्की बनावटीच्या शस्त्रांचा वापर झाल्याचे सिद्ध झाले आहे. राजस्थान एटीएसच्या म्हणण्यानुसार, राजस्थानला लागून असलेल्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून ड्रोनद्वारे ही शस्त्रे भारतात आणण्यात आली. अलीकडेच गुजरात एटीएसने अटक केलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांना राजस्थानमधील हनुमानगड येथून शस्त्रे पुरवण्यात आली होती. ही शस्त्रे ड्रोनद्वारेदेखील पोहोचवण्यात आली होती. अनमोलने चीन आणि तुर्कीमधून शस्त्रे पाकिस्तानात कशी आणली आणि नंतर ती भारतात कशी पोहोचवली? पाकिस्तानमध्ये लॉरेन्स गँगला कोण पाठिंबा देत आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एजन्सी अनमोलची चौकशी करत आहेत. अनेक घटनांमध्ये वापरली परदेशी शस्त्रे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स गँग ही देशातील पहिली गँग आहे जी दहशत पसरवण्यासाठी चीन आणि तुर्कीमध्ये बनवलेल्या शस्त्रांचा वापर करते. इतर बहुतेक गँग्जकडे देशांतर्गत शस्त्रे असतात. लॉरेन्स गँगच्या चीन आणि तुर्कीमध्ये मजबूत उपस्थितीमुळे, त्यांना शस्त्रे सहज उपलब्ध आहेत. ही शस्त्रे अनेकदा भारतीय शस्त्रांपेक्षा कित्येक पटीने महाग असतात. ती एका वेळी 30 ते 40 राउंडदेखील फायर करू शकतात. संशय: पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे पुरवठा राजस्थानच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानमधून ड्रग्ज येण्याच्या घटना सामान्य आहेत. एटीएसचे आयजी विकास कुमार यांनी सांगितले की, पाकिस्तान गेल्या तीन वर्षांपासून ड्रोनचा वापर करून भारताला ड्रग्जचा पुरवठा करत आहे. बीएसएफ, स्थानिक पोलिस आणि एटीएसने या संदर्भात अनेक वेळा कारवाई केली आहे. परिणामी, राजस्थान एटीएसला संशय आहे की पाकिस्तान शस्त्रास्त्रे पोहोचवण्यासाठी लांब पल्ल्याच्या ड्रोनचा वापर करत आहे. अलीकडेच, गुजरात एटीएसच्या रडारवर आलेल्या मोहिउद्दीन, सुलेमान शेख आणि मोहम्मद सुहेल या तीन संशयितांनीही हनुमानगड येथून शस्त्रे पोहोचल्याचे उघड केले होते. एनआयए अनमोलचे पाकिस्तान कनेक्शन पडताळणार एनआयएने लॉरेन्सचे पाकिस्तानशी असलेले कनेक्शन आणि तो पाकिस्तानी दहशतवाद्यांशी संगनमत करून भारतात शस्त्रे कशी आयात करत असे याची पुष्टी केली आहे. त्याचा भाऊ अनमोल पाकिस्तानात कोणत्या गटाशी संबंधित होता याबद्दल अद्याप त्याची चौकशी झालेली नाही. तथापि, एनआयएने कबूल केले आहे की अनमोल त्याचा भाऊ लॉरेन्स बिश्नोईच्या दहशतवादी सिंडिकेटचा भाग आहे. अनमोल बिश्नोईदेखील ड्रग्जच्या व्यापारात सहभागी असल्याचा दावा केला जात आहे. तपास यंत्रणांचे म्हणणे आहे की हे बनावट चलनाचाही व्यवहार करत होते. ही टोळी खंडणीद्वारे गोळा केलेले पैसे एका देशातून दुसऱ्या देशात पाठवते. शस्त्रास्त्रे पोहोचवण्याची जबाबदारी अनमोलवर होती भारत-पाकिस्तान सीमेवरील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्ये ड्रोनच्या मदतीने अनमोल शस्त्रे कुठून ऑर्डर करायचा आणि ती शस्त्रे तो एकमेकांमध्ये कशी वितरीत करायचा हे शोधण्यासाठी एजन्सी संपूर्ण नेटवर्कचा तपास करण्यात व्यग्र आहेत. अनमोलच्या गँगचे प्राथमिक काम शस्त्रे पोहोचवणे होते. स्थान मिळवल्यानंतर, अनमोलला शस्त्रे कशी आणि केव्हा पोहोचतील याची संपूर्ण माहिती होती. डिलिव्हरीसाठी, गँगच्या तरुणांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नियुक्त केले गेले होते आणि त्यांना डिलिव्हरीसाठी पैसे दिले जात होते. अनमोल गँगमधील सदस्यांना परदेशात स्थायिक होण्यासाठी आमिष दाखवत असे अटक केलेल्या टोळीतील सदस्यांनी चौकशीदरम्यान वारंवार सांगितले आहे की ते अनमोलच्या सतत संपर्कात होते. ते शस्त्रास्त्रांच्या वितरणाबद्दल माहिती देत ​​असत. त्यानंतर अनमोल त्यांना त्यांच्या कामाची आणि वेळेची माहिती देत ​​असे. काम पूर्ण झाल्यावर अनमोल रोख रक्कमदेखील देत असे. दोन ते तीन महिने, अनमोल त्याच्या टोळीतील तरुणांशी इंटरनेट कॉलिंगद्वारे संपर्क साधत असे. तो त्यांना परदेशात स्थायिक होण्याचे आमिष दाखवत असे. तो असा दावा करायचा की जर कोणत्याही टोळी सदस्याला भारतात काही समस्या आल्या तर तो त्यांच्या कुटुंबीयांनाही परदेशात हलवेल. ६ देशांमध्ये १८ टोळी सदस्यएनआयएच्या मते, अनमोल बिश्नोईच्या टोळीतील १८ सदस्य सहा देशांमध्ये आहेत. बहुतेक सहकारी पोर्तुगाल, इटली, अमेरिका, बल्गेरिया, तुर्की आणि दुबई येथे आहेत. गोल्डी ब्रार अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आहे आणि अशा नऊ साथीदारांनी अलीकडेच बनावट ओळखपत्र वापरून पासपोर्ट मिळवून भारतातून पळ काढला आहे. अनमोल बिश्नोईवर राजस्थानमध्ये सर्वाधिक २२ गुन्हे दाखल आहेत अनमोल बिश्नोईवर राजस्थान आणि पंजाब राज्यात अंदाजे ३१ गुन्हे दाखल आहेत. राजस्थानमध्ये त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली २२ गुन्हे दाखल आहेत. २०१७ मध्ये जोधपूरमधील व्यापारी वासुदेवची खंडणी न मिळाल्याने लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई यांनी हत्या केली. या हत्येत बिश्नोईने गोळीबार करणाऱ्यांना मदत केली.

दिव्यमराठी भास्कर 21 Nov 2025 9:48 am

“मी हस्तक्षेप करत नाही पण मणिपूरमध्ये…” ; मोहन भागवत यांचे मोठे विधान

Mohan Bhagwat on Manipur। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत हे सध्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. दोन वर्षांपूर्वी मे २०२३ मध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारानंतर त्यांचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे. इंफाळमधील एका कार्यक्रमात, मोहन भागवत यांनी सामाजिक सौहार्द आणि संस्कृती एकतेवर भर दिला. त्यांनी मणिपूरमध्ये सरकार स्थापनेबद्दलही भाष्य करत याठिकाणी एक सरकार असले पाहिजे आणि […] The post “मी हस्तक्षेप करत नाही पण मणिपूरमध्ये…” ; मोहन भागवत यांचे मोठे विधान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 9:37 am

aishwarya rai bachchan: वडिलांच्या स्मृतिदिनी ऐश्वर्या रायची भावनिक पोस्ट; शेअर केल्या खास आठवणी

aishwarya rai bachchan: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनी वडील कृष्णराज राय यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी या खास दिवशी वडिलांसोबतच्या आणि मुलगी आराध्याच्या काही सुंदर, जुन्या छायाचित्रांची मनाला भिडणारी झलक शेअर केली. ऐश्वर्याची भावनिक पोस्ट अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनी वडील कृष्णराज राय यांच्या जन्मदिनी त्यांना […] The post aishwarya rai bachchan: वडिलांच्या स्मृतिदिनी ऐश्वर्या रायची भावनिक पोस्ट; शेअर केल्या खास आठवणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 9:32 am

पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्ग ठरतो मुंबई महापालिकेसाठी पांढरा हत्ती, पुन्हा सुमारे दीडशे कोटींची निविदा मागवला

मुंबई (खास प्रतिनिधी):मुंबई महापालिकेच्या ताब्यात पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग आल्यानंतर या रस्त्यांच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च मागील दोन ते तीन वर्षांत करण्यात आला आहे. हा खर्च करण्यात आल्यानंतर आता या दोन्ही मार्गावरील एमएसआरडीसीच्या ताब्यातील सर्व पुलांची डागडुजी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहे. या दोन्ही मार्गावरील एमएसआरडीसीच्या ताब्यातील पूल तसेच महत्वाच्या भागांच्या पृष्ठभागाची सुधारणा करण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एम.एम.आर.डी.ए यांच्या ताब्यातून पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग हा मुंबई महापालिकेला या रस्त्याची सुधारणा आणि देखभाल करण्याच्या दृष्टिकोनातून ०३ ऑक्टोबर २०२२ ला हस्तांतरित करण्यात आला. तब्बल २७.८५ किलोमीटर लांबीच्या व ४२ मीटर रुंदीचा पश्चिम द्रुतगती महामार्ग, तर १८.६ किलोमीटर असून ६० मीटर रुंद असा शीव ते मुलुंड हा पूर्व द्रुतगती महामार्ग आहे. या दोन्ही मार्गांवरील पावसाळ्यापूर्व व पावसाळ्यातील खड्डे भरण्यासाठी,खराब भागाचा विकास करण्यासाठी तसेच सेवा रस्ते,पदपथ यांची देखभाल, गटारांवरील झाकणे आदी कामांसाठी दोन्ही मार्गांसाठी एकाच ठेकेदाराची अडीच वर्षांपूर्वी निवड करण्यात आली होती.तब्बल २७.८५किलोमीटर लांबीच्या व ४२ मीटर रुंदीच्या पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पावसाळ्यापूर्वीची प्रतिबंधात्मक देखभाल पावसाळ्यात दरम्यान या रस्त्याची कामे पूर्ण करून वाहतूक सुरळीत राखण्याच्या दृष्टिकोनातून दोन वर्षांच्या कालावधी के.आर कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड - कोणार्क आणि आर अँड बी या संयुक्त भागीदारीतील कंपनीची निवड केली आहे. या साठी करांसह १३१कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली होती.तर मुंबईतील मुलुंड ते शीव हा पूर्व द्रुतगती महामार्ग १८.६ किलोमीटर असून ६० मीटर रुंद आहे. पावसाळ्यात या महामार्गावर खड्डे पडू नये यासाठी मागील वर्षी दोन वर्षांकरता के आर कंस्ट्रक्शन कंपनीची निवड केली. या यासाठी विविध करांसह ९३ कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली होती. याशिवाय दोन्ही मार्गांवर सेवा रस्त्यांवर एकूण २०० कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यास आली आहे.त्यातच आता पूर्व द्रुतगती महामार्गावरील एमएसआरडीसी च्या ताब्यातील पुलावरील खराब झालेल्या पृष्ठभागाची सुधारणा करणे आणि इतर भागाची सुधारणा करणे तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावर साईट कॅरेजेस ची आणि खराब झालेल्या भागाची सुधारणा करण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. यासाठी विविध करांसह सुमारे १५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.अशाप्रकारे करण्यात आलेला आणि मंजूर झालेले कंत्राट काम..पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवेश नियंत्रण प्रकल्पप्रकल्प खर्च : ११२५.८८ कोटी रुपयेकंत्राटदार : आर पी एस इन्फ्राप्रोजेक्टपूर्व द्रुतगती महामार्गाची पावसाळ्यापूर्वीची डागडुजीएकूण खर्च : ९३ कोटी रुपयेकंपनी : के आर कंस्ट्रक्शनपूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांचे मास्टिकमध्ये खड्डे बुजवणे व दुरुस्तीएकूण खर्च : सुमारे ८५ कोटी रुपयेकंत्राट कंपनी : प्रीती कंस्ट्रक्शन कंपनीपूर्व द्रुतगती मार्गाची मास्टिकने सुधारणाएकूण खर्च : सुमारे १८ कोटी रुपयेकंत्राट कंपनी : शहा आणि पारीखपूर्व द्रुतगती मार्गाची मायक्रो सरफेसिंगने सुधारणाएकूण खर्च : ४६.३१ कोटी रुपयेकंत्राट कंपनी : मारकोलाईन्स पेवमेंट टेक्नॉलॉजिसपश्चिम द्रुतगती महामार्गाची पावसाळ्यापूर्वीची डागडुजीएकूण खर्च : सुमारे १३१ कोटी रुपयेकंत्राट कंपनी : के.आर कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड - कोणार्क आणि आर अँड बी या संयुक्त भागीदारपावसाळ्यापूर्वी पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांचे मास्टिकमध्ये खड्डे बुजवणेएकूण खर्च : सुमारे ९० कोटी रुपयेकंत्राट कंपनी : कोणार्क स्ट्रक्चरल इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 9:30 am

दादरमधील प्रभाग १९२ कुणाकडे? उबाठा आणि मनसेमध्येच चढाओढ

मुंबई (सचिन धानजी) : उबाठा आणि मनसेची युती होणार असल्याचे बोलले जात असून त्यादृष्टीकोनातून पावले टाकली जात असली तरी माहिम विधानसभेतील दादर मधील प्रभाग १९२मध्ये जागा वाटपावरून दोन्ही पक्षांत मारामारी होण्याची चिन्हे आहेत. हा प्रभाग उबाठाचा असला तरी यंदा हा प्रभाग खुला झाल्याने मनसेचा दावा आहे. परंतु या दोन्ही पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी आणि स्पर्धा एवढी वाढली आहे की नक्की कोणत्या पक्षाला हा प्रभाग मिळेल याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दादरमधील प्रभाग क्रमांक १९२ हा महिला आरक्षित होता आणि आता हा प्रभाग सर्वसाधारण खुला प्रवर्गाकरता राखीव झाला आहे. या प्रभागातून उबाठा शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांची पत्नी प्रीती पाटणकर हे निवडून आली होती. परंतु आता हा प्रभाग खुला झाल्याने यावर उबाठाचा पहिला दावा असला तरी माहिम विधानसभेत तीन प्रभाग खुले झाल्याने त्याच ठिकाणी मनसेने दावा केला आहे. त्यामध्ये भाजपाच्या नगरसेविका असलेल्या शीतल गंभीर यांचा प्रभाग १९०. उबाठाच्या नगरसेविका प्रीती पाटणकर यांचा १९२ आणि शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर यांचा प्रभाग १९५वर दावा केला आहे. त्यात उबाठाच्या प्रीती पाटणकर यांच्या प्रभाग १९२वर मनसेने हक्काने दावा केला असला तरी हा प्रभाग आपल्या पक्षाचा असल्याने तो मनसेला सोडण्यात येवू नये यासाठी प्रकाश पाटणकर यांचा प्रयत्न आहे. या प्रभागातून उबाठाचे चंद्रकांत झगडेही इच्छुक आहेत. तसेच शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांच्याही नावाची चर्चा आहे.तर या प्रभागातून मनसेच्यावतीने यशवंत किल्लेदार आणि स्नेहल जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. राज ठाकरे हे यंदा यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहेत. त्यासाठी प्रभाग १९२ हाच अनुकूल आहे. त्यामुळे यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी देण्यावर पक्ष ठाम असला तरी माजी नगरसेविका स्नेहल जाधव यांचेही जोरदार प्रयत्न सुरु आहे. परंतु पक्षाने स्नेहल जाधव यांच्या इच्छुकांच्या यादीतील नावानंतर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी अशाप्रकारचा सूर आळवल्याचेही एेकायला मिळत आहे. तर उबाठा आणि शिवसेनेत हा प्रभाग कुणाच्या वाट्याला जाईल याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यात इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्याने तसेच त्यांचा तिढा सोडवणे कठिण असल्याने दोन्ही पक्षापुढे या प्रभागात मोठ्या अडचणी आहे.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 9:30 am

म्हाडासह इतर शौचालयांच्या देखभालीसाठी आता संस्थांची नेमणूक, मुंबईतील इतर शौचालयेही होणार आता चकाचक आणि दुर्गंधीमुक्त

मुंबई (सचिन धानजी): मुंबईतील म्हाडासह इतर ४३०९ शौचालयांची डागडुजी तसेच सुधारणा केल्यानंतर आता याची देखभाल करण्यासाठी महापालिकेच्यावतीने वस्ती पातळीवर अशासकीय संस्थांची नेमणूक केली जात आहे. यासाठी सुमार १७०० संस्थांची नेमणूक केली जाणार असून यामुळे आता स्थानिक पातळीवरील म्हाडासह इतरांच्या ताब्यातील शौचालये स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त दिसणार आहेत.मुंबईतील झोपडपट्टयांमध्ये आरसीसी पध्दतीचे तळमजला, तळ अधिक एक आणि तळ अधिक दोन मजल्यांची सामुदायिक शौचालयांची उभारणी केली जात आहे. मुंबईतील झोपडपट्टयांमध्ये विविध ठिकाणी कंत्राटदारांमार्फत टप्पा एक ते टप्पाा ११मध्ये १७४५ सामुदायिक शौचालयांची निर्मिती करण्यात आली असून यांच्या देखभालीसाठी अशासकीय संस्थांची नेमणूक करण्यात येते.मात्र स्वच्छ भारत मिशनच्या मार्गदर्शक तत्वानुसार म्हाडा व इतर सामुदायिक शौचालयांंकरता वस्ती पातळीवर अशासकीय संस्थांची नेमणूक करण्याचा करार करण्यात आला आहे. त्यानुसार म्हाडा आणि इतर सामुदायिक शौचालयांच्या दैनंदिन कामकाजासाठी व दैनंदिन देखभालीसाठी संस्थेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तत्कालिन पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही अशाप्रकारचे निर्देश दिल्यामुळे मुंबईतील म्हाडा व इतर सामुदायिक शौचालये जी महापालिकेला हस्तांतरीत झाली आहेत, त्याच्या देखभालीसाठी अशासकीय संस्थेची नेमणूक करण्यात येत आहे.https://prahaar.in/2025/11/21/western-and-eastern-expressway-becomes-a-white-elephant-for-mumbai-municipal-corporation-tenders-of-around-150-crores-invited-again/मुंबईत म्हाडाची ३८०९ म्हाडा व ४७९ इतर सामुदायिक शौचालये अशाप्रकारे ४३०९ शौचालये असून ही शौचालये एकत्र करून देखभालीसाठी संस्थेची नेमणूक करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार म्हाडाकडून हस्तांतरीत झालेल्या ३८३० शौचालयांच्या देखभालीसाठी वस्ती पातळीवर १४७० संस्था नियुक्त केल्या केल्या जाणार आहेत.त र इतर ४७९ शौचालयांच्या देखभालीसाठी १९६ संस्थांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे २३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे त्यातील ७ कोटी २८ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात येत आहे.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 9:30 am

G20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेला रवाना ; तीन प्रमुख सत्रांना संबोधित करणार

Pm Modi South Africa Visit। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज २० व्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग याठिकाणी २१ ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान ही शिखर परिषद होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने आयोजित केली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे, आफ्रिकन खंडात होणारी ही सलग चौथी G20 शिखर परिषद आहे. ग्लोबल साउथमध्ये होणारी […] The post G20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेला रवाना ; तीन प्रमुख सत्रांना संबोधित करणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 9:24 am

द. आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत भारताचे नेतृत्व पंत की राहुलकडे?

दुखापतीमुळे कर्णधार शुभमन गिलवर टांगती तलवारमुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका निर्णायक टप्प्यावर असतानाच, उभय संघांमधील तीन सामन्यांच्या बहुप्रतिक्षित एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय येत्या २३ नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत भारतीय संघाची घोषणा करू शकते.सध्या भारतीय कसोटी आणि वन-डे संघाचे नेतृत्व युवा फलंदाज शुभमन गिल याच्याकडे आहे. पण मानेच्या दुखापतीमुळे त्याच्या वन-डे मालिकेतील सहभागावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात गिलच्या मानेला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला त्याच सामन्यातून माघार घ्यावी लागली.दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ गुवाहाटीत दाखल झाला आहे. कर्णधार गिल पहिल्या कसोटीवेळी रुग्णालयात होता. तसेच हाती आलेल्या वृत्तानुसार, गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला असल्याचे म्हटले जात आहे. त्याच्या जागी ऋषभ पंत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. त्याचप्रमाणे गिलच्या दुखापतीची नेमकी तीव्रता स्पष्ट झालेली नाही. असे असले तरी, गिल हा भारतीय क्रिकेटचे 'लॉन्ग टर्म' भविष्य मानले जात असल्याने, त्याला अनफिट अवस्थेत मैदानात उतरवणे बीसीसीआयसाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे, गिल आगामी वनडे मालिकेतूनही बाहेर राहण्याची दाट शक्यता आहे.२३ नोव्हेंबरपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा? : फिट नसलेल्या गिलला खेळवणे संघासाठी आणि त्याच्यासाठीही धोकादायक ठरू शकते,’ असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआयकडे राहुल आणि ऋषभ पंत हे दोन पर्याय कर्णधारपदासाठी आहे असे मानले जात आहे. राहुलने मागील काळात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. तर युवा आणि आक्रमक कर्णधार म्हणून पंचीची ओळख आहे. जर गिल मालिकेतून बाहेर राहिला, तर या दोघांपैकी एकाकडे नेतृत्वाची धुरा सोपवली जाईल, अशी अपेक्षा आहे. यासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.दुसरा कसोटी सामना भारतासाठी महत्वाचा : भारतीय संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. भारतीय संघाला जर मालिका बरोबरीत आणायची असेल, तर कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिकंणे अतिशय महत्वाचे असणार आहे. कोलकाता कसोटीत पराभव झाल्यानंतर मंगळवारी भारतीय खेळाडूंनी ईडन गार्डन्सच्या मैदानावर सराव केला. त्यावेळी ध्रुव जुरेल, साई सुदर्शन, रवींद्र जडेजा आणि आकाशदीप हे खेळाडू सराव करताना दिसले. आता दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ पुनरागमन करणार का? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.'गुवाहाटीच्या खेळपट्टीची पहिली झलक : सामन्याच्या ४८ तास आधी गुवाहाटीच्या खेळपट्टीची पहिली झलक समोर आला होती. सध्या तरी मधल्या भागात दाट गवत आहे. त्याचबरोबर सामन्यासाठी शक्यतो लाल मातीतील खेळपट्टीच असण्याची शक्यता आहे. लाल मातीतील खेळपट्टी ही वेग आणि उसळीसाठी प्रसिद्ध असते. काळ्या मातीतील खेळपट्टीसारखी ही खेळपट्टी फुटत नाही. मात्र याचा अर्थ ती फिरकीला साथ देणार नाही असे नाही. जर खेळपट्टीवर जास्त गवत ठेवलं तर जसजशी कसोटी पुढे सरकेल तसतसे भारतीय फिरकीपटू सामन्यावर अधिराज्य गाजवू शकतील.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 9:10 am

ऐतिहासिक! भारत आणि इस्त्राईलमध्ये मुक्त व्यापार करार, सर्व्हीस सेक्टरला होणार फायदा

तेल अवीवः तेल अवीवमध्ये भारत आणि इस्राईलचा संबंध घट्ट करणारी ऐतिहासिक घटना घडली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारत आणि इस्रायलमध्ये मुक्त व्यापार कराराच्या अटी-शर्तीना व्यापार शिखर परिषदेमध्ये अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांच्या सीमेवरील राष्ट्रांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे दोन्ही देशांना अतिरेक्यांचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर दोनही देशांमध्ये होत असलेला मुक्त व्यापार करार महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.मुक्त व्यापार करारावर भारताकडून केंद्रीय मंत्री गोयल तर इस्रायलकडून केंद्रीय वाणिज्यमंत्री नीर बरकत यांनी काल (२० नोव्हेंबर) रात्री स्वाक्षऱ्या केल्या. भारताकडून 'चीफ निगोशिएटर' म्हणून प्रिया नायर यांनी काम पाहिले. या कराराला दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत अंतिम स्वरूप देण्यात येईल, अशी माहिती मंत्री गोयल यांनी दिली आहे. भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश एकमेकांचे विश्वासू सहकारी असून दोघांमध्ये अंतर्विरोध नाही याचा फायदा दोन देशातील व्यवहारांना आणि सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक देवाण-घेवाणीसाठी होईल, असे पीयूष गोयल यांनी सांगितले.https://prahaar.in/2025/11/21/the-deadline-for-applications-for-flat-lottery-conducted-by-the-pune-housing-board-has-been-extended/या व्यापार करारामुळे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, डिफेन्स, स्पेस, फिनटेक, अॅग्री टेक, ए आय, सायबर सिक्युरिटी याबाबतीत दोन देशांची देवाण-घेवाण होईल. भारतातून आंबे, द्राक्ष, केळी, दूध, औषधे पाठवण्याची प्रक्रीया फास्ट ट्रॅकवर केली जाईल. ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नात फायदा होईल. पहिल्या टप्प्यात दिल्ली तेल अवीव आणि दुसऱ्या टप्प्यात मुंबई ते तेल अवीव थेट विमानसेवा सुरू होणार आहे. यामुळे भारतातून डॉक्टर, नर्सेस, इंजिनिअर असे कुशल मनुष्यबळ देण्यासाठी दोन देशांमध्ये पूल निर्माण होणार आहे. याचा फायदा सर्व्हीस सेक्टरला होईल. तसेच दोनही देशांमध्ये पर्यटनाला गती मिळणार आहे.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 9:10 am

भारताच्या लेकींची सुवर्ण हॅटट्रिक!

जागतिक बॉक्सिंग कप : मीनाक्षी, प्रीती आणि अरुंधतीचा 'गोल्डन पंच'नवी दिल्ली : जागतिक बॉक्सिंग कपच्या अंतिम फेरीत तीन भारतीय महिलांनी सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यापैकी रोहतक जिल्ह्यातील एका गावातील ऑटो चालकाची मुलगी मीनाक्षी हुड्डा आहे. प्रीती पवार आणि अरुंधती चौधरी यांनीही भारताच्या नावावर सुवर्णपदके मिळवली आहेत.ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह पथिक क्रीडा संकुलात सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग कप मध्ये भारताच्या मुलींनी सुवर्णपदकांची हॅटट्रिक साधली आहे. या स्पर्धेत तीन भारतीय महिला बॉक्सर्सनी सुवर्णपदके जिंकली. ४८ किलो वजनी गटात भारताचे सुवर्णपदकाचे खाते उघडणारी मीनाक्षी हुड्डा ही पहिलीच खेळाडू होती. बॉक्सिंग कपच्या अंतिम सामन्यात तिने उझबेकिस्तानच्या फरझोना फोझिलोवाचा ५-० असा पराभव केला.मीनाक्षी ही रोहतक जिल्ह्यातील रुरकी या छोट्याशा गावातून येते. तिचे कुटुंब साधे आहे आणि तिचे वडील अजूनही ऑटोरिक्षा चालवतात. तिच्या या कामगिरीनंतर मीनाक्षी हुड्डा भावुक झाली आणि तिने सांगितले की तिचे वडील अजूनही ऑटोरिक्षा चालवतात आणि आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरही त्यांनी रिक्षा चालवणे सोडलेले नाही.तिच्या वडिलांचा असा विश्वास आहे, की आज त्यांची मुलगी जे काही आहे ते तिने केलेल्या कठोर परिश्रमामुळे आहे. ऑटोमधूनच त्यांच्या मुलीने रिंगपर्यंतचा प्रवास केला. यापूर्वी, मीनाक्षीने २०२२ च्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक, आशियाई स्पर्धेत रौप्यपदक आणि वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. मीनाक्षी आयटीबीपीमध्ये देखील तैनात आहे. आशियाई स्पर्धेत तिच्या प्रभावी कामगिरीनंतर, तिला इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये तैनात करण्यात आले.१५ भारतीय मुष्टियोद्धांचा अंतिम फेरीत प्रवेशमीनाक्षी व्यतिरिक्त, प्रीती पवारने ५४ किलो वजनी गटात भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. तिने २०२५ च्या जागतिक कांस्यपदक विजेत्या इटलीच्या सिरीन चाराबीला हरवून सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर अरुंधती चौधरीने ७० किलो वजनी गटात भारतासाठी तिसरे सुवर्णपदक जिंकले. अरुंधतीने उझबेकिस्तानच्या अजीजा झोकिरोवाला हरवून या स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदकांची हॅटट्रिक पूर्ण केली. १५ भारतीय बॉक्सर्सनी अंतिम फेरीत प्रवेश केला. आता पुढील सत्रात सर्वांच्या नजरा निखत जरीन आणि जास्मिन लांबोरिया यांच्यावर आहेत.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 9:10 am

तेंडुलकरच्या घरी लगीनघाई? सारा-अंजलीची शॉपिंगला सुरुवात...

विख्यात क्रिकेटर सचिन तेंडुलकर याची पत्नी अंजली आणि सारा नुकत्याच शॉपिंग करताना दिसल्या. साड्यांच्या दुकानात तासनतास घालवल्यावर त्यांनी काही खास साड्या निवडल्या. भावी सुनबाई, अर्जुनची होणारी पत्नी सानिया हिच्यासाठीही त्यांनी साड्या विकत घेतल्याचे समजते.क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला सचिन तेंडुलकर आता लवकरच सासरेबुवा होणार आहेत. त्याचा धाकटा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला. मुंबईतील अतिशय प्रतिष्ठित उद्योगपती रवी घई यांची नात असलेली सानिया चंडोक हिच्याशी अर्जुनची एंगेजमेंट झाली असून लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे आता तेंडुलकर कुटुंबात लगीनघाई सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे.सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली आणि लेक सारा सध्या काशीच्या दौऱ्यावर असून, याचदरम्यान अंजली यांनी त्यांच्या लेकाच्या लग्नासाठी तसेच भावी सुनबाई, सानियासाठी काही साड्या खरेदी केल्या आहेत. सारासह अंजली यांनी मुख्य लग्न समारंभ, मेहंदी समारंभ आणि रिसेप्शनसाठी वेगवेगळ्या थीम्सना अनुकूल असलेल्या प्रीमियम कलेक्शनमधून साड्या निवडल्या आहेत. त्यांना पारंपरिक डिझाईन्समध्ये खूप रस होता. अंजली आणि साराच्या दोघींना राजेशाही रंग खूप आवडले. त्यांनी अनेक साड्या ऑर्डर केल्या तसेच गुणवत्ता, कलेक्शन आणि सेवेचे कौतुक केले.साधारण चार महिन्यांपूर्वी, ऑगस्ट महिन्यात सचिनचा लाडका लेक अर्जुन तेंडुलकर आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोक यांचा साखरपुडा झाला. अत्यंत खासगी अशा समारभांत दोन्ही कुटुंब, त्यांचे जवळचे नातेवाईक आणि काही खास मित्र-मैत्रिणी एवढेच लोक उपस्थित होते. अर्जुनची भावी पत्नी सानिया ही मुंबई स्थित मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपीची संचालक आहे. दोघेही बालपणीचे मित्र आहेत.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 9:10 am

देवीच्या जत्रेत छाया कदमची कोकणात हजेरी

अभिनेत्री छाया कदम यांनी कोकणातील धामापूर गावातील सातेरी देवीच्या जत्रेला हजेरी लावत एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही त्यांनी सामान्य लोकांसारखेच जत्रेत सहभागी होत साधेपणा जपला आहे.अभिनेत्री छाया कदम यांनी अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केलंय. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका त्या सिनेमासाठी विशेष ठरलीय. छाया कदम यांनी साध्या, सहज आणि सुंदर अभिनयातून प्रेक्षकांना वेगळेपण दाखवून दिलं. अभिनेत्री छाया कदम या सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असतात. नुकतेच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचा साधेपणा पुन्हा चाहत्यांना अनुभवायला मिळाला आहे. छाया कदम या मूळच्या कोकणातील धामापूरच्या रहिवासी आहेत. त्यांनी नुकतीच त्यांच्या गावी भेट दिली. गावाकडे गेल्यावर छाया कदम यांनी सरंबळच्या सातेरी देवीच्या जत्रेत हजेरी लावली. या जत्रेच्या व्हिडीओमध्ये देवीची पालखी आणि जत्रेतील पारंपरिक लोकप्रकार पाहायला मिळताहेत.इतक्या मोठ्या अभिनेत्री असून सुद्धा छाया कदम या एका सामान्य माणसाप्रमाणे जत्रेत सहभागी झाल्या याबद्दल अनेकांनी कमेंट करत छाया कदम यांचं कौतुक केलं आहे.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 9:10 am

पनवेलकरांसाठी २३ नोव्हेंबरला पीव्हीआरमध्ये ‘असंभव'चे प्रदर्शन

मराठीतील चार नावाजलेले, गुणी आणि दमदार कलाकार म्हणजे मुक्ता बर्वे, सचित पाटील, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे ‘असंभव’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. त्यांची अभिनयातील प्रगल्भता आणि विविध भूमिकांचा अनुभव यामुळे या चित्रपटात काहीतरी दर्जेदार पाहायला मिळणार असल्याचा विश्वास प्रेक्षक व्यक्त करत आहेत. ‘असंभव’मध्ये कलाकारांइतकीच ताकद निर्मिती विभागातही आहे.अनुभवी निर्माते, सहनिर्माते एकत्र आल्याने हा प्रकल्प भक्कम पाया घेऊन उभा राहिला आहे. सदर चित्रपट हा येत्या रविवारी म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२५ रोजी पनवेल येथील ओरायन मॉल येथे असलेल्या पीव्हीआर मध्ये मोठ्या थाटात पदर्शित होत असून पनवेलकरांना त्याची उत्कंठा लागली आहे.मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट’चे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे चित्रपटाचे निर्माते असून, एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर व संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत. रहस्य, भावना आणि नात्यांच्या गुंफलेल्या कथेतून उलगडणारा हा थरारक सिनेमा आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 9:10 am

‘बोल बोल राणी, इता इता आणी’ या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग

बालदिनाच्या पूर्वसंध्येला ऑल प्ले प्रोडक्शन्सतर्फे त्यांच्या पहिल्या शॉर्ट फिल्मची “बोल बोल राणी, इता इता आणी”ची खास स्क्रीनिंग अथर्व ऑडिटोरियम मध्ये आयोजित करण्यात आली. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही भूमिकांमध्ये वर्षा राणेनी आपल्या विद्यार्थ्यांसह ही फिल्म साकारत एक आगळी कलाकृती सादर केली. मुलांच्या कल्पक विचारांवर आधारित असलेल्या या चित्रपटाने भावनिक आणि रोचक मांडणीमुळे पाहणाऱ्यांना गुंतवून ठेवले. वर्षा राणेची स्क्रीनवरील उपस्थिती, अभिनय आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन विशेषत्वाने उल्लेखनीय ठरलं. सर्वांनी चित्रपटाची आणि वर्षा राणेंच्या योगदानाची प्रशंसा करत, ही कलाकृती मुलांच्या कलेला दिलेली सकारात्मक दिशा असल्याचं नमूद केलं. कार्यक्रमादरम्यान वर्षा राणे म्हणाल्या, “आम्हाला या फिल्मद्वारे मुलांना त्यांची कल्पनाशक्ती मुक्तपणे व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ द्यायचं होतं. त्यांच्या या प्रवासातून त्यांनी स्वतःला नव्या रूपात ओळखलं आहे.” या सोहळ्याने ऑल प्ले प्रोडक्शन्स आणि मुंबईतील अथर्व युनिव्हर्सिटी यांच्यातील सर्जनशील सहकार्यास आणखी बळकटी मिळाली.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 9:10 am

जुन्या चित्रपटांचे वैभव प्रेक्षक पुन्हा अनुभवणार

वंचितांचं जगणं आणि त्यात आत्मजाणिवेनं होणारं परिवर्तन यांची हृदयस्पर्शी आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी असलेल्या 'जिप्सी' या सिनेमाच्या प्रदर्शनाला प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे नुकतेच शशी खंदारे दिग्दर्शित जिप्सी सिनेमाचा खेळ आयोजित करण्यात आला होता. यावेळी महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, चित्रपटाचे दिग्दर्शक शशी खंदारे, राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार कबीर खंदारे यांच्यासह जिप्सी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. चित्रपट निर्मितीच्या प्रवासातील गमतीदार किस्से आणि राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा प्रवास आदी गोष्टी मुलाखतीतून उलगडण्यात आल्या.रसास्वाद मंडळाचा उपक्रम महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. जुन्या चित्रपटांचे वैभव प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता यावे आणि नव्या पिढीने तयार केलेले उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत हा या मंडळाचा उद्देश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दर महिन्याला किमान एक चित्रपट प्रेक्षकांना दाखवला जातो.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 9:10 am

हिरकणी महाराष्ट्राची

करिअर : सुरेश वांदिलेमहाराष्ट्र राज्य इनोव्हेटिव्ह सोसायटीने, ‘महिला उद्योजकता कक्ष (वूमेन्स आंत्रप्रिन्युरशीप सेल)’ची स्थापना केली आहे. राज्यातील अधिकाधिक महिलांनी उद्योजकतेकडे वळावं, यासाठी या कक्षामार्फत विशेष प्रयत्न केले जातात. यासाठी, या कक्षानं सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रासोबत सहकार्याचं धोरण अवलंबलं आहे.इनक्युबेशनची सुविधानव्या उद्योजकांना सुरुवातीच्या काळात, भक्कम पायाभरणी करण्यासाठी, इनक्युबेशन (उद्योजकता संवर्धन/ विकास) केंद्राची जरूरी असते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य इनोव्हेटिव्ह स्टार्टअप (नवोपक्रमशील धोरण) कक्षामार्फत मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाच्या सहकार्यानं, केवळ महिलांच्या उद्योजकतेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या, इनक्युबेशन केंद्राची स्थापना केली आहे. अशा इनक्युबेटरसाठी अनुदान स्वरूपातील साहाय्य दिलं जातं. त्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एसएनडीत असे इनक्युबेशन केंद्र उभारल्यामुळे महिला उद्योजकांच्या साहाय्यासाठी शासनाच्या प्रयत्नांची निश्चित भूमिका स्पष्ट झाली आहे. या केंद्रात गतीने कार्यान्वित करता येऊ शकेल, असे उद्योजकीय उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर आवश्यक तांत्रिक साहाय्य, बाजारपेठीय साहाय्य आणि उद्योजकीय मार्गदर्शन सुलभतेनं उपलब्ध करून दिलं जातं. महिला उद्योजकीय कक्षामार्फत महिला उद्योजकांच्या साहाय्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याने त्यांच्यासाठी अत्यंत अनुकूल, ‘उद्योजकीय पर्यावरण निर्मिती’ होण्यास साहाय्य झालं आहे. विविध सुविधा या कक्षामार्फत ॲक्लेरेशन (वेगवर्धन) कार्यक्रम, मेंटॉरशीप (मार्गदर्शन/ सल्ला/ साहाय्य/ प्रशिक्षण) कार्यक्रम आणि इनक्युबेकशन (उद्योजकता संवर्धन) साहाय्य, वित्तीय साहाय्य आणि नियामक बाबींमध्ये साहाय्य, असे विविध कार्यक्रम प्राधान्याने राबवले जातात.महिला उद्योजक, सध्याच्या योजना आणि भविष्यातील योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतात. स्टार्टअप आठवड्यात पात्र ठरणाऱ्या २४ नवोपक्रमांना १५ लाख रुपयांचे कार्यादेश दिले जातात. नवोपक्रम संस्थेचे पाठबळ मिळालेल्या इनक्युबेटर्सची स्थापना राज्यभर केली जात आहे. राष्ट्रीय स्तरावरील बौद्धिकसंपदा (पॅटेंट) साहाय्यासाठी २ लाख रुपये आणि आंतरराष्ट्रीय पॅटेंट साहाय्यासाठी १० लाख रुपयांचं साहाय्यं केलं जातं. गुणवत्ता चाचणी आणि प्रमाणीकरणासाठी२ लाख रुपयांपर्यंतचं साहाय्य केलं जातं. महिला संस्थापक किंवा सह-संस्थापक, संचालक भागीदार, मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या कोणत्याही नवोपक्रमावर आधारित कार्यरत असणारे उद्योग, व्यवसाय, भागीदारी, स्टार्टअप यांचा समावेश महिला उद्योजकतेच्या कक्षेत होतो.महाराष्ट्रातील महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी, राज्य महिला उद्योजकता धोरण आखण्यात आले आहे. यासाठी, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आणि ग्लोबल अलायन्स वुइथ मास आंत्रप्रिन्युरशीप यांनी सहकार्य केलं आहे. ही योजना ६ मार्च २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. या कक्षामार्फत सर्वसमावेशक धोरण अवलंबवण्यात येत असल्याने, ‘हिरकणी महाराष्ट्राची’ हा उपक्रम ग्रामीण भागातील महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आला आहे. विशेषत: कृषी, हस्तकला, अन्नप्रकिया आणि सेवाक्षेत्रातील उद्योग/व्यवसायाला प्राधान्य दिलं जातं. अशा महिलांना स्थानिक पातळीवरच उद्योग सुरु करण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं. बाजारपेठीय साहाय्य केलं जातं. या योजनेसाठी जिल्हा उद्योग केंद्र, एसएनडीटीतील इनक्युबेशन केंद्र, सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योजकता प्रशिक्षण केंद्रे या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. या योजनेसाठी पुढील काही पात्रता आहेत - (१) संबंधित माहिलेचं वय १८ वर्षे ते ५५ वर्षे असावं. (२) अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास संवर्गातील महिलांना प्राधान्य दिलं जातं. (३) बचत गट आणि स्वयंसाहाय्यता गटांना साहाय्य दिलं जातं.या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. अर्जासोबत आधार कार्ड, पत्त्याच्या पुरावा, बँक पासबुक, व्यवसाय आराखडा, उत्पन्नाचा दाखला, आवश्यकता असल्यास स्वयंसाहाय्यता गटाचं सदस्य असल्याचं प्रमाणपत्र, सादर करावे लागतात.संपर्क - पहिला माळा, कक्ष क्रमांक ९,एलफिन्स्टन तांत्रिक शाळा परिसर, ३, महापालिका मार्ग धोबी तलाव, मुंबई- ४००००१, दूरध्वनी- ०२२-३१०५९०००, ईमेल-team@msins.in, संकेतस्थळ- https://msins.in

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 9:10 am

satara news: सातारकर भाजपच्या सर्व उमेदवार विजयी करतील शिवेंद्रसिंहराजे भोसले; उमेदवार न मिळणे हे महाविकास आघाडीचे अपयश

सातारा – सातारकर मताच्या रूपाने भाजपचे सर्व उमेदवार विजयी करून त्यांना निश्चित आशीर्वाद देतील. सातारा शहरातच नव्हे तर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी स्वबळावर काही अपवाद वगळता लढत असून तेथेही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा वरचष्मा राहील, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने आयात उमेदवार दिले […] The post satara news: सातारकर भाजपच्या सर्व उमेदवार विजयी करतील शिवेंद्रसिंहराजे भोसले; उमेदवार न मिळणे हे महाविकास आघाडीचे अपयश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 9:05 am

अलिबाग प्रभाग दोनमधून ॲड. प्रशांत नाईक बिनविरोध

अलिबाग : अलिबाग नगर परिषद निवडणुकीत शेकाप, काँग्रेस आघाडीने विजयाचा गुलाल उधळला असून, भाजप, शिवसेना (शिंदे गट) युतीला पहिला धक्का दिला आहे. प्रभाग क्रमांक दोनमधून शेकापचे उमेदवार प्रशांत नाईक हे बिनविरोध निवडून आले आहेत.प्रशांत नाईक यांच्यासमोर निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल केलेले भाजपचे संतोष साळुंखे यांनी गुरुवारी (दि.२०) आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले. यानंतर शेकाप कार्यकर्त्यांनी शेतकरी भवन येथे जल्लोष करीत ॲड. प्रशांत नाईक यांचे अभिनंदन केले. अलिबाग नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. २ डिसेंबर रोजी मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नगरपरिषद निवडणुकीत शेकाप, काँग्रेस आघाडी व भाजप, शिवसेना (शिंदे गट) युती यामध्ये लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर आघाडीने युतीला पहिला धक्का देत विजयाचा गुलाल उधळला. नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवरी अर्ज मागे घेण्याची मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत आहे. गुरुवारी प्रभाग क्र. २ मधील भाजपचे उमेदवार संतोष साळुंखे यांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले. यामुळे आघाडीकडून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविणारे ॲड. प्रशांत नाईक हे बिनविरोध निवडून आले. बिनविरोध निवडून आल्यानंतर ॲड. प्रशांत नाईक यांचे आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक, नगरसेवक पदाच्या उमेदवार ॲड. मानसी म्हात्रे यांच्यासह इतर उमेदवार तसेच शेकाप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 8:30 am

रायगडमध्ये दोन मंत्री, पाच आमदार, तीन खासदारांची प्रतिष्ठा पणाला !

नगरपालिकांच्या निवडणुकांमुळे ऐन थंडीत वातावरण तापलेसुभाष म्हात्रे अलिबाग (प्रतिनिधी) : नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी रायगड जिल्ह्यात सुरु असून, जिल्ह्यातील दोन मंत्री, पाच आमदार आणि तीन खासदारांची या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या नगरपालिकांवर आपल्याच पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या नेतेमंडळींना खूपच प्रयत्न करावे लागणार आहेत. या प्रयत्नात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. सध्यातरी रायगड जिल्ह्यात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापलेले असून, जस-जसा प्रचार शिगेला पोहोचणार आहे. तसे एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः खासदार सुनील तटकरे आणि रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांना राजकीयदृष्ट्या आपले प्राबल्य वाढविण्यासाठी या नगरपालिका निवडणुकांकडे गांभीर्याने पहावे लागत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. या निवडणुकांनंतर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार असल्याने या निवडणुकीचा कठीण पेपर कोण सोडविणार याकडे रायगडकरांचे लक्ष आहे.रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, उरण, कर्जत, माथेरान, रोहा, महाड, श्रीवर्धन, मुरुड, खोपोली या नगरपालिकांच्या निवडणुका चार वर्षांनी होत असल्याने सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अंगात उत्साह संचारलेला आहे. त्यामुळे या सर्व नगरपालिकांवर कुणाची सत्ता येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महाडमध्ये गोगावले यांच्या विरोधात राष्ट्रवादीने भाजपसमवेत युती केली आहे. त्यामुळे महाड जिंकणे हे तटकरे आणि गोगावले यांच्यासाठी प्रतिष्ठेचे ठरणार आहे. असाच प्रकार रोहा, कर्जत, श्रीवर्धन, खोपोलीमध्येही निर्माण झालेला आहे. तेथेही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच राजकीय सामना होणार असल्याने खासदार सुनिल तटकरे विरुद्ध आमदार महेंद्र थोरवे यांचा कस लागणार आहे. कर्जतला भाजपाने शिवसेनेला साथ दिली आहे, तर खोपोलीत शिवसेना, भाजप, रिपाइं एकत्र आलेले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने ठाकरे शिवसेना आणि शेकाप यांची मोट बांधून विकास परिवर्तन आघाडी गठीत केलेली आहे. त्यामुळे येथेही थोरवे आणि तटकरे यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे. माथेरानमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध महायुती असाच सामना होणार आहे. अलिबागमध्ये शेकाप, काँग्रेस यांची महाआघाडी आहे. त्या विरोधात शिवसेना, भाजप एकत्र आलेले आहेत. मात्र यामध्ये राष्ट्रवादीचा समावेश नाही. त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झालेली नाही. उरणला भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विरोधात शिवसेना आणि महाविकास आघाडीही मैदानात उतरलेली आहे. यामुळे येथे भाजपचे आमदार महेश बालदी यांना आपल्या अस्तित्वासाठी झगडावे लागणार एवढे निश्चित. रोह्यात खासदार सुनिल तटकरे यांच्या विरोधात शिवसेना उभी ठाकली आहे. अशी स्थिती श्रीवर्धन, मुरुडला देखील आहे. एकूणच महायुतीच्या सर्व आमदारांना आपापल्या मतदार संघातील नगरपालिकांवर सत्ता टिकविण्यासाठी झगडावे लागणार हे नक्की !

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 8:30 am

पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्ग ठरतो मुंबई महापालिकेसाठी पांढरा हत्ती

पुन्हा सुमारे दीडशे कोटींची निविदा मागवलीमुंबई : मुंबई महापालिकेच्या ताब्यात पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग आल्यानंतर या रस्त्यांच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च मागील दोन ते तीन वर्षांत करण्यात आला आहे. हा खर्च करण्यात आल्यानंतर आता या दोन्ही मार्गावरील एमएसआरडीसीच्या ताब्यातील सर्व पुलांची डागडुजी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहे. या दोन्ही मार्गावरील एमएसआरडीसीच्या ताब्यातील पूल तसेच महत्वाच्या भागांच्या पृष्ठभागाची सुधारणा करण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एम.एम.आर.डी.ए यांच्या ताब्यातून पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग हा मुंबई महापालिकेला या रस्त्याची सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून ३ ऑक्टोबर २०२२ ला हस्तांतरित करण्यात आला. तब्बल २७.८५ किलोमीटर लांबीच्या व ४२ मीटर रुंदीचा पश्चिम द्रुतगती महामार्ग, तर १८.६ किलोमीटर असून ६० मीटर रुंद असा शीव ते मुलुंड हा पूर्व द्रुतगती महामार्ग आहे. या दोन्ही मार्गांवरील पावसाळ्यापूर्व व पावसाळ्यातील खड्डे भरण्यासाठी, खराब भागाचा विकास करण्यासाठी तसेच विविध कामांसाठी दोन्ही मार्गांसाठी एकाच ठेकेदाराची अडीच वर्षांपूर्वी निवड करण्यात आली होती.तब्बल २७. ८५ किलोमीटर लांबीच्या व ४२ मीटर रुंदीच्या पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पावसाळ्यापूर्वीची प्रतिबंधात्मक देखभाल पावसाळ्या दरम्यान या रस्त्याची कामे पूर्ण करून वाहतूक सुरळीत राखण्याच्या दृष्टिकोनातून दोन वर्षांचा कालावधी के. आर कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड - कोणार्क आणि आर अँड बी या संयुक्त भागीदारीतील कंपनीची निवड केली आहे. यासाठी करांसह १३१कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली होती, तर मुंबईतील मुलुंड ते शीव हा पूर्व द्रुतगती महामार्ग १८.६ किलोमीटर असून ६० मीटर रुंद आहे. पावसाळ्यात या महामार्गावर खड्डे पडू नये यासाठी मागील वर्षी दोन वर्षांकरिता के. आर. कंस्ट्रक्शन कंपनीची निवड केली. यासाठी विविध करांसह ९३ कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली होती. याशिवाय दोन्ही मार्गांवर सेवा रस्त्यांवर एकूण २०० कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यास आली आहे. त्यातच आता पूर्व द्रुतगती महामार्गावरील एमएसआरडीसीच्या ताब्यातील पुलावरील सुधारणा तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावर साईट कॅरेजेसची आणि खराब झालेल्या भागाची सुधारणा करण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. यासाठी विविध करांसह १५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.अशाप्रकारे करण्यात आलेला आणि मंजूर झालेले कंत्राट काम :पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवेश नियंत्रण प्रकल्पप्रकल्प खर्च : ११२५.८८ कोटी रुपयेकंत्राटदार : आर पी एस इन्फ्राप्रोजेक्टपूर्व द्रुतगती महामार्गाची पावसाळ्यापूर्वीची डागडुजीएकूण खर्च : ९३ कोटी रुपयेकंपनी : के आर कंस्ट्रक्शनपूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांचे मास्टिकमध्ये खड्डे बुजवणे व दुरुस्तीएकूण खर्च : सुमारे ८५ कोटी रुपयेकंत्राट कंपनी : प्रीती कंस्ट्रक्शन कंपनीपूर्व द्रुतगती मार्गाची मायक्रो सरफेसिंगने सुधारणाएकूण खर्च : ४६.३१ कोटी रुपयेकंत्राट कंपनी : मारकोलाईन्स पेवमेंट टेक्नॉलॉजिसपश्चिम द्रुतगती महामार्गाची पावसाळ्यापूर्वीची डागडुजीएकूण खर्च : सुमारे १३१ कोटी रुपयेकंत्राट कंपनी : के.आर कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड - कोणार्क आणि आर अँड बी या संयुक्त भागीदारपावसाळ्यापूर्वी पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांचे मास्टिकमध्ये खड्डे बुजवणेएकूण खर्च : सुमारे ९० कोटी रुपयेकंत्राट कंपनी : कोणार्क स्ट्रक्चरल इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 8:10 am

राज्यातील फार्मसी अभ्यासक्रमांच्या यंदाही २५ ते ३० टक्के जागा रिक्त

मुंबई : कोरोना महामारीत फार्मसी उद्योगाला मिळालेल्या महत्त्वामुळे या क्षेत्रातील अभ्यासक्रमांची लोकप्रियता वाढली होती. हीच वेळ साधून राज्यातील संस्थांनी फार्मसी अभ्यासक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात नवीन महाविद्यालये सुरू करण्यास अनुमती घेतली. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियानेही या संस्थांच्या अर्जांना तातडीने मान्यता दिली. मात्र गेल्या चार वर्षांत राज्यात बी. फार्म आणि डी. फार्म अभ्यासक्रमांसाठी कार्यरत असलेल्या महाविद्यालयांची संख्या अल्पावधीत झपाट्याने वाढली.आता मात्र गेल्या दोन वर्षांत परिस्थिती बदलली. गेल्या दोन वर्षांत या अभ्यासक्रमांना उतरती कळा लागली असून एकूण जागांपैकी सुमारे २५ ते ३० टक्के जागा यंदाही रिक्त राहिल्या आहेत, यावरून असे स्पष्ट होते की, महाविद्यालयांची वाढलेली संख्या ही गरज नसताना निर्माण झालेला भार असल्याचेही दिसून येत आहे. चार फेऱ्यानंतर बी. फार्मसीच्या १४ हजार ६५४ जागा रिक्त राहिल्या आहेत.राज्यातील बी. फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत चारही फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्या आहेत. चौथ्या फेरीनंतर १४ हजार ४५५ जागा रिक्त आहेत. फार्मसीचे प्रवेश चालू झाल्यानंतर पहिल्या फेरीत १६ हजार ६०४, दुसऱ्या फेरीत ८ हजार ८०, तिसऱ्या फेरीत ३ हजार ५७८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. राज्यभरात ५३१ फार्मसी महाविद्यालयात ३१ हजार ६९६ प्रवेश झाले.राज्यात आवश्यकतेपेक्षा मोठ्या प्रमाणात फार्मसी महाविद्यालये स्थापन झाल्याने प्रवेश प्रक्रियेवर गंभीर परिणाम दिसून येत आहेत. नवीन महाविद्यालयांबद्दल विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती नसल्याने अनेक संस्थांमध्ये प्रवेश घटले आहेत; तर उत्तम व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये मात्र प्रवेशवाढ झाली आहे. यावर्षी फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अभियांत्रिकीच्या तुलनेत खूप उशिरा सुरू झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रमांचा पर्याय निवडला. महाविद्यालयांची अनियंत्रित वाढ आणि केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेतील विलंब यामुळे विद्यार्थी फार्मसी शिक्षणापासून दूर जात आहेत, असे एसोसिएशन ऑफ फार्मास्यूटिकल टिचर्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद उमेकर यांनी सांगितले.नवीन महाविद्यालयांना दिली जाणारी परवानगी ही चिंतेची बाब असून, भविष्यात फार्मसी क्षेत्रात बेरोजगारीची समस्या गंभीर रूप धारण करू शकते. शासन, विद्यापीठ आणि तंत्रशिक्षण विभाग यांनी तातडीने हस्तक्षेप करून मागणी-पुरवठा संतुलित ठेवण्यासाठी ठोस धोरण आखणे अत्यावश्यक आहे. - प्रा. मिलिंद उमेकर, राष्ट्रीय अध्यक्ष, एसोसिएशन ऑफ फार्मास्यूटिकल टिचर्स ऑफ इंडिया

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 8:10 am

४५ आयटीआयमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी

८ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधीमुंबई : राज्यातल्या तरुणांना दर्जेदार रोजगाराभिमुख औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या जागतिक संधी निर्माण करण्याच्या कौशल्य विकास विभागाच्या उद्दिष्टानुसार मंत्रालयात कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.या करारान्वये टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी राज्यातील ४५ आयटीआय संस्थांमध्ये ( एलएमव्ही) हलकी वाहन तंत्रज्ञ अभ्यासक्रमांसाठी सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी करणार असून तेथे शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ८ हजार आयटीआय विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात टोयोटा-किर्लोस्कर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. येत्या दोन महिन्यात कंपनीकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून मार्च २६ पर्यंत पहिल्या टप्प्यात १३ प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी यांनी दिली, तर तीन टप्प्यात उर्वरित प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहेत.राज्यातल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विभाग नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दर्जेदार प्रशिक्षणामुळे रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध होतील असा विश्वास यावेळी कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. तसेच राज्य शासनाकडे आयटीआयच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, उद्योग क्षेत्रातील ज्ञान, अनुभव या सहभागातून कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी उद्योग समूहांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. पुढच्या या अनुषंगाने अनेक रोजगाराभिमुख सामंजस्य करार होतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले.यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे सह संचालक सतीश सूर्यवंशी, टोयोटा किर्लोस्कर कंपनीचे उपाध्यक्ष रमेश राव, कंपनीचे मानव संसाधन व्यवस्थापक भास्कर पै आणि मुख्य व्यवस्थापक रवी सोनटक्के उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 8:10 am

पुणे गृहनिर्माण मंडळातर्फे करण्यात येणाऱ्या सदनिका सोडतीच्या अर्जाची मुदत वाढली

पुणे: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ४,१८६ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन सोडत करण्यात येणार आहे. सदनिकांची सोडत ११ डिसेंबर, २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता करण्यात येणार आहे. या योजनेला पुणेकरांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिल्यामुळे अधिक इच्छुकांना अर्ज सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे, पुणेकरांना किंवा पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना आणखी एक संधी मिळाली आहे.पुण्यातील ४१८६ सदनिकांसाठी आतापर्यंत अंदाजे दोन लाखापर्यंत अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी सव्वा लाख अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन सोडत दिनांक ३० नोव्हेंबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करू शकणार आहेत. तर ०१ डिसेंबर, २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम अर्जदारांना भरता येणार आहे.काही तांत्रिक कारणांमुळे बऱ्याच अर्जदारांची कागदपत्रे पडताळणीसाठी अडचणी आली. तसेच अनेक नागरिकांकडून कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी अडचण येत होती म्हणून आणखी काही दिवसांची मुदतवाढ मिळण्याविषयी मागणी करण्यात येत होती. नागरिकांची मागणी व सोडतीसाठीचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. सोडतीसाठीचे नवीन वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. इतर मजकुर पुर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीप्रमाणे राहील, असे पुणे मंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.पुणे मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत चार घटकांमध्ये विभागण्यात आली असून यामध्ये गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत १६८३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २९९ सदनिका, १५ टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील ८६४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण ३२२२ सदनिकांचा समावेश आहे.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 8:10 am

शौचालयांच्या देखभालीसाठी आता संस्थांची नेमणूक

मुंबईतील स्वच्छतागृह होणार चकाचक आणि दुर्गंधीमुक्तसचिन धानजी मुंबई : मुंबईतील म्हाडासह इतर ४३०९ शौचालयांची डागडुजी तसेच सुधारणा केल्यानंतर आता याची देखभाल करण्यासाठी महापालिकेच्यावतीने वस्ती पातळीवर अशासकीय संस्थांची नेमणूक केली जात आहे. यासाठी सुमार १७०० संस्थांची नेमणूक केली जाणार असून यामुळे आता स्थानिक पातळीवरील म्हाडासह इतरांच्या ताब्यातील शौचालये स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त दिसणार आहेत.मुंबईतील झोपडपट्टयांमध्ये आरसीसी पध्दतीचे तळमजला, तळ अधिक एक आणि तळ अधिक दोन मजल्यांची सामुदायिक शौचालयांची उभारणी केली जात आहे.येथे विविध ठिकाणी कंत्राटदारांमार्फत टप्पा एक ते टप्पा ११मध्ये १७४५ सामुदायिक शौचालयांची निर्मिती करण्यात आली असून यांच्या देखभालीसाठी अशासकीय संस्थांची नेमणूक करण्यात येते. मात्र स्वच्छ भारत मिशनच्या मार्गदर्शक तत्वानुसार म्हाडा व इतर सामुदायिक शौचालयांंकरता वस्ती पातळीवर अशासकीय संस्थांची नेमणूक करण्याचा करार करण्यात आला आहे. त्यानुसार म्हाडा आणि इतर सामुदायिक शौचालयांच्या दैनंदिन कामकाजासाठी व दैनंदिन देखभालीसाठी संस्थेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तत्कालिन पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही अशाप्रकारचे निर्देश दिल्यामुळे मुंबईतील म्हाडा व इतर सामुदायिक शौचालये जी महापालिकेला हस्तांतरीत झाली आहेत, त्याच्या देखभालीसाठी अशासकीय संस्थेची नेमणूक करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार म्हाडाकडून हस्तांतरीत झालेल्या ३८३० शौचालयांच्या देखभालीसाठी वस्ती पातळीवर १४७० संस्था नियुक्त केल्या केल्या जाणार आहेत. तर इतर ४७९ शौचालयांच्या देखभालीसाठी १९६ संस्थांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे २३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे त्यातील ७ कोटी २८ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात येत आहे.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 8:10 am

Pimpri : अरे बापरे! शहरातील ३२ प्रभागात ४६ हजार दुबार मतदार

नावासमोर दोन स्टार : ९२ हजारांहून अधिक नावे पिंपरी – दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्यात रणकंदन माजवले आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे. असे असताना पिंपरी चिंचवड शहरामध्ये तब्बल ४६ हजार ३३२ दुबार मतदार असून यादीमध्ये तब्बल ९२ हजार ६६४ नावे मतदारयादीमध्ये आली असल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीतून समोर आले […] The post Pimpri : अरे बापरे! शहरातील ३२ प्रभागात ४६ हजार दुबार मतदार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 8:09 am

Pimpri : या निवडणुकीत स्‍थानिकालाच प्राधान्‍य द्यायचे

गांधीनगर-खराळवाडीमधील सर्वपक्षीय इच्‍छुकांच्‍या बैठकीत निर्णय १८ वर्षांत एकही स्‍थानिक नगरसेवक नाही पिंपरी – महापालिकेच्‍या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ९ गांधीनगर–खराळवाडी परिसरातील (अनुसूचित जाती राखीव)सर्वपक्षीय इच्‍छुकांची तातडीची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमसृष्टी, पिंपरी चौक येथे पार पडली. बैठकीची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच प्रभागातील सध्याच्या राजकीय स्थितीवर तसेच […] The post Pimpri : या निवडणुकीत स्‍थानिकालाच प्राधान्‍य द्यायचे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 8:06 am

Pimpri : महापालिकेचे प्रभाग मिनी विधानसभा

चिखलीत सर्वाधिक ७४ हजार, थेरगावात सर्वात कमी ३४ हजार मतदार पिंपरी – शहरातील प्रभाग क्रमांक १ चिखली हा सर्वात मोठा प्रभाग असून या प्रभागामध्ये सर्वाधिक ७४ हजार ३४० मतदार आहेत. एवढ्या मतदारांपर्यंत पोहचताना उमेदवारांची पळता भुई थोडी होणार आहे. तर सर्वात कमी मतदारसंख्या ही थेरगाव गावठाण येथील प्रभाग क्रमांक २३ मध्ये आहे. या प्रभागातील उमेदवारांना […] The post Pimpri : महापालिकेचे प्रभाग मिनी विधानसभा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 8:03 am

Weather Update : थंडीचा जोर ओसरणार! महाराष्ट्रात ‘या’तारखांना पावसाची शक्यता; हवामान खात्याचा नवा अंदाज

प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्यात पुढील २४ तासांत थंडीचा जोर कमी होऊन कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील. त्यानंतर कमाल व किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होऊन हवामान कोरडे राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, आज अहिल्यानगर येथे सर्वात कमी ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. […] The post Weather Update : थंडीचा जोर ओसरणार! महाराष्ट्रात ‘या’ तारखांना पावसाची शक्यता; हवामान खात्याचा नवा अंदाज appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 7:45 am

Pune News : गोव्यात जागतिक मराठी संमेलन; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन

प्रभात वृत्तसेवा पुणे – पणजी (गोवा) येथे ९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान जागतिक मराठी अकादमी आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक संमेलनाचे उद्घाटन नऊ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, ‘पद्मविभूषण’ डॉ. अनिल काकोडकर हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या […] The post Pune News : गोव्यात जागतिक मराठी संमेलन; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 7:30 am

MHADA : स्वप्नातील घर मिळवण्याची ‘शेवटची संधी’; म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यास मिळाली मुदतवाढ

प्रभात वृत्तसेवा पुणे – म्हाडाने पुणे, पिंपरी- चिंचवड शहर आणि पीएमआरडीएमधील 6 हजार 168 घरांसाठी सोडत जाहीर केली होती. त्यासाठी अर्ज करण्यासाठी दि. 21 नोव्हेंबर, 2025 पर्यंत मुदत दिली होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे बऱ्याच अर्जदारांनी कागदपत्रांची पडताळणीसाठी अडचणी आल्याने मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतवाढ दिली असून, 30 नोव्हेंबर […] The post MHADA : स्वप्नातील घर मिळवण्याची ‘शेवटची संधी’; म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यास मिळाली मुदतवाढ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 7:30 am

आजचे एक्सप्लेनर:200 लोकांनी ज्या गाईच्या दुधाचे पंचामृत प्यायले, तिचा तडफडून मृत्यू; कुत्र्याने चावा घेतला होता; दुधामुळे रेबीज पसरतो का?

उत्तर प्रदेशातील एका गावात रेबीजची लस घेण्यासाठी अचानक सुमारे २०० लोक आले. पण त्यापैकी कोणालाही कुत्र्याने चावले नव्हते. खरं तर, काही दिवसांपूर्वी, या लोकांनी गावात झालेल्या शिव आणि रामकथेत पंचामृत सेवन केले होते. ज्या गायीच्या दुधापासून बनवले होते. तिचा तडफडून मृत्यू झाला. असे दिसून आले की तीन महिन्यांपूर्वी त्या गायीला एका वेड्या कुत्र्याने चावले होते. संपूर्ण प्रकरण काय आहे, संक्रमित प्राण्याच्या दुधामुळे रेबीज खरोखरच होऊ शकतो का, पाळीव प्राण्याला रेबीज झाल्यास काय करावे, जाणून घेऊया... प्रश्न-१: उत्तर प्रदेशात गायीचे दूध पिल्यानंतर लस घेण्याचे संपूर्ण प्रकरण काय आहे?उत्तर: रामडीह गाव गोरखपूरच्या उरुवा ब्लॉकमध्ये आहे. ही कहाणी येथील एका धार्मिक कार्यक्रमाने सुरू झाली... प्रश्न-२: रेबीज म्हणजे काय, तो कसा होतो?उत्तर: रेबीज हा लायसाव्हायरस नावाच्या विषाणूमुळे होणारा आजार आहे. हा विषाणू संक्रमित प्राण्यांच्या लाळेमध्ये आढळतो. WHO च्या मते, मानवांमध्ये रेबीजचे ९९% प्रकरणे कुत्र्यांमधून पसरतात. याशिवाय, मांजर, गाय, म्हैस, बकरी किंवा घोडा यासारख्या पाळीव प्राण्यांमध्येही रेबीजचा विषाणू असू शकतो. वटवाघुळ, कोल्हे, गिधाडे आणि रॅकून यासारख्या काही इतर उष्ण रक्ताच्या वन्य प्राण्यांमध्ये देखील रेबीज दिसून येतो. हा विषाणू मानवांमध्ये तीन प्रकारे येतो: रेबीज विषाणूचे वैशिष्ट्य म्हणजे मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर ते थेट मज्जासंस्थेवर हल्ला करते. करते. मज्जासंस्थेचे केंद्र म्हणजे आपला मेंदू. त्यामुळे संसर्ग अखेर मेंदूपर्यंत पोहोचतो. तथापि, मेंदूपर्यंत विषाणू पोहोचण्याचा वेग मंद असतो. न्यूरोसर्जन डॉ. सतीश कुमार म्हणतात, 'सामान्यत: रेबीजची लागण झालेल्या प्राण्याचे हात आणि पाय. इंजेक्शन दिल्यानंतर, मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे १४ दिवस लागतात. तथापि, जर कुत्र्याने मेंदूजवळ म्हणजेच मान, डोके किंवा चेहऱ्यावर चावा घेतला असेल तर ते हानी पोहोचवू शकते. जर संसर्ग झाला तर विषाणू ४ ते ७ दिवसांत मेंदूवर परिणाम करू शकतो.' 'काही प्रकरणांमध्ये, गंभीर लक्षणे दिसण्यास जास्त वेळ लागू शकतो. हे जखम किती मोठी आहे आणि जखमेतून किती विषाणू आत शिरला आहे यावर अवलंबून असते. तसेच, व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता किती आहे?' प्रश्न-३: जनावरांचे दूध पिल्याने रेबीज होऊ शकतो का?उत्तर: अहवालांनुसार, जर एखाद्या प्राण्याच्या रक्तात रेबीज विषाणू असेल तर तो त्याच्या स्मृती ग्रंथींमध्ये आढळतो. तो दुधाच्या ग्रंथींपर्यंत पोहोचत नाही. तथापि, यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) नुसार, 'जर कोणत्याही प्राण्याचे दूध पाश्चरायझेशनशिवाय सेवन केले तर सैद्धांतिकदृष्ट्या रेबीज संसर्ग होऊ शकतो, परंतु आतापर्यंत मानवांमध्ये असा कोणताही प्रकार आढळलेला नाही.' पाश्चरायझेशन म्हणजे दूध अनेक वेळा उकळणे आणि नंतर ते थंड करणे. दूध खराब होऊ नये म्हणून, दूध साठवण्यापूर्वी ते सामान्यतः घरांमध्ये उकळले जाते. यामुळे साल्मोनेला, कोलाई सारखे बॅक्टेरिया आणि दुधात असलेले अनेक विषाणू नष्ट होतात. सीडीसीच्या अहवालात म्हटले आहे की, 'गाईच्या दुधात रेबीज विषाणूचे प्रमाण कितीही असले तरी, त्याचे पाश्चरायझेशन केल्याने रेबीज संसर्गाचा धोका कमी होतो.' WHO सारख्या इतर अनेक प्रमुख आरोग्य संघटना देखील म्हणतात की दूध उकळल्यानंतर ते रेबीज बरे करते. WHO च्या अहवालात असेही म्हटले आहे की रेबीज विषाणू गायींच्या दुधात आढळलेले नाही. अशा प्राण्यांचे कच्चे दूध पिल्याने मानवांना रेबीज झाल्याची कोणतीही नोंद नाही. भारताचे राष्ट्रीय आरोग्य नियंत्रण केंद्र (NCDC) नुसार, रेबीजची लागण झालेल्या प्राण्यांच्या दुधाद्वारे किंवा दुग्धजन्य पदार्थांद्वारे रेबीज पसरतो असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. यापूर्वी, भारतासह अनेक देशांमध्ये रेबीज बाधित गायींचे दूध पिणाऱ्यांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, परंतु यापैकी कोणत्याही प्रकरणात रेबीजचा प्रसार झाल्याची पुष्टी झालेली नाही. त्यानुसार १९९६ आणि १९९८ मध्ये, डझनभर लोकांनी रेबीजची लागण झालेल्या गायींचे दूध प्यायले. तथापि, या प्रकरणांमध्ये, दूध आणि आईच्या दुधाचे पदार्थ ऊती रेबीजची कोणतीही चाचणी नव्हती, परंतु सर्व लोकांना रेबीजची लस देण्यात आली. मार्च २०२५ मध्ये, नोएडामध्ये एका महिलेला संक्रमित गायीचे दूध प्यायल्यानंतर रेबीज झाला. तिचा मृत्यू झाला. तथापि, महिलेने कच्चे दूध घेतले होते की उकळलेले दूध हे स्पष्ट झाले नाही. तिच्या वैद्यकीय अहवालातही तिचा मृत्यू रेबीजमुळे झाल्याची पुष्टी झाली नाही. प्रश्न-४: रेबीज बाधित प्राण्याचे दूध पिल्यानंतर लसीकरण करण्याची गरज नाही का?उत्तर: WHO ने रेबीजच्या संपर्काचे तीन प्रकार तयार केले आहेत. त्यानुसार, लस द्यायची की नाही हे ठरवले जाते... १ एखाद्या प्राण्याला स्पर्श करणे किंवा चाटणे: जर एखाद्या प्राण्याने तुम्हाला स्पर्श केला किंवा चाटले आणि तुमच्या त्वचेवर काही जखम झाली. जर कोणतेही ओरखडे नसतील, म्हणजेच त्वचा पूर्णपणे सामान्य असेल, तर त्याचा धोका नाही. या प्रकरणात उपचारांची आवश्यकता नाही. २ नखांनी किंवा दातांनी दुखापत: जर तुम्हाला एखाद्या प्राण्याच्या नखांनी किंवा दातांनी दुखापत झाली असेल, तर लसीकरणाचा कोर्स घेणे आवश्यक आहे. ३. चावणे: जर एखाद्या प्राण्याने तुम्हाला चावले आणि थोडासा रक्तस्त्राव झाला, तर लसीच्या संपूर्ण कोर्ससोबत, जखमेच्या आजूबाजूला किंवा आत RIG म्हणजेच रेबीज इम्युनोग्लोबुलिनचे इंजेक्शन घेणे देखील आवश्यक आहे. WHO आणि NCDC सारख्या संस्थांनुसार, प्राण्यांचे दूध पिल्यास रेबीजची लस घेणे आवश्यक नाही. तथापि, रेबीजची लागण झालेल्या प्राण्यांच्या लाळेद्वारे रेबीज पसरू शकतो, म्हणून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. डॉ. सतीश म्हणतात, जर गायीला रेबीजची लक्षणे दिसली तर तिचे दूध पिऊ नये. कधीकधी, दूध काढताना, दूध गायीच्या लाळेत मिसळू शकते, ज्यामुळे दूध दूषित होऊ शकते. अशा परिस्थितीत, लसीचा डोस घ्यावा. प्रश्न-५: रेबीज झाल्यावर कोणती लक्षणे दिसतात?उत्तर: रेबीज संसर्गाची लक्षणे दोन प्रकारात विभागली जाऊ शकतात: सुरुवातीची लक्षणे: रेबीज विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर काही दिवसांनी ताप, थकवा, जखमेच्या ठिकाणी सूज येणे, खळबळ, खाज सुटणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. गंभीर लक्षणे: ​​​​​​​रुग्णाला प्रथम पाण्याची भीती वाटते. पाणी पिण्यामुळे त्याला गुदमरण्याची समस्या निर्माण होते. त्यानंतर हवा आणि प्रकाशाची भीती निर्माण होते. यामुळे चिंता, गोंधळ, जास्त लाळ गळणे आणि शेवटी अर्धांगवायू होतो, ज्यामुळे मृत्यू होतो. रेबीज विषाणू चावलेल्या ठिकाणापासून नसा आणि पाठीच्या कण्यापर्यंत पोहोचतो. यामुळे मेंदूच्या विविध भागांमध्ये जळजळ होते जे वर्तन नियंत्रित करतात, जसे की सेरेब्रल कॉर्टेक्स आणि ब्रेनस्टेम. यामुळे असामान्य वर्तन होते, अगदी पॅरानॉइड वर्तन देखील. रेबीज विषाणू मेंदूच्या स्टेम आणि मेडुला वर देखील परिणाम करतो, जे गिळणे आणि श्वास घेणे नियंत्रित करतात. जेव्हा रुग्ण पिण्याचा किंवा श्वास घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांना घशात तीव्र वेदना होतात. यामुळे रुग्ण पाणी पाहताच पळून जातो. प्रश्न-६: लक्षणे दिसू लागल्यानंतर रेबीजवर उपचार शक्य आहेत का?उत्तर: नाही. एकदा लक्षणे दिसू लागली की, रेबीज झालेल्या व्यक्तीला पूर्णपणे बरे करणे जवळजवळ अशक्य असते. याचा अर्थ असा की विषाणू नष्ट करण्याचा कोणताही मार्ग नाही. त्या व्यक्तीला असलेल्या लक्षणांवर उपचार केले जातात. जेव्हा विषाणू मेंदूपर्यंत पोहोचतो तेव्हाच गंभीर लक्षणे दिसून येतात. जवळजवळ १००% प्रकरणांमध्ये यामुळे मृत्यू होतो.WHO च्या मते, जगात दरवर्षी सुमारे ५५ हजार लोक रेबीजमुळे मरतात. त्यापैकी सुमारे २० हजार मृत्यू भारतात होतात. त्यापैकी सुमारे ६०% १५ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आहेत. प्रश्न-७: रेबीजची लस आगाऊ का दिली जात नाही?उत्तर: इन्फ्लूएंझा लस सामान्यतः संसर्गापूर्वी दिली जाते, तर रेबीज किंवा एचआयव्ही लसीकरण उपचार केवळ संशयास्पद संसर्गानंतरच सुरू केले जातात. याला पीईपी किंवा पोस्ट-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस म्हणतात. डॉक्टर याची दोन कारणे देतात: प्रश्न-८: रेबीज लसीचा कोर्स कधी आणि कसा घेतला जातो?उत्तर: रेबीजची लस सामान्यतः दोन प्रकारे दिली जाते. डॉक्टरांच्या मते... १. स्नायूंमध्ये IM लस:यामध्ये एकूण ५ डोस दिले जातात.रेबीज बाधित प्राण्याच्या संपर्कात आल्यानंतर २४ तासांच्या आत पहिला डोस दिला जातो, दुसरा डोस तिसऱ्या दिवशी, तिसरा डोस सातव्या दिवशी, चौथा डोस चौदाव्या दिवशी आणि पाचवा डोस २८ व्या दिवशी दिला जातो. २. आयडी लस:आयडी म्हणजे त्वचेच्या थरांमध्ये दिली जाणारी लस: ही लस दिवसातून चार वेळा दिली जाते, साधारणपणे कुत्रा चावल्यानंतर २४ तासांच्या आत, त्यानंतर तिसऱ्या दिवशी दुसरा डोस, सातव्या दिवशी तिसरा डोस आणि २८ व्या दिवशी चौथा डोस दिला जातो. डॉ. सतीश म्हणतात की सामान्यतः स्नायूंमध्ये इंजेक्शन दिलेली लस चांगली मानली जाते. जर कॅटेगरी ३ चा संसर्ग असेल तर, जखमेत किंवा आजूबाजूला RIG (रेबीज इम्युनोग्लोबिन) इंजेक्शन देखील दिले जाऊ शकते. काही डोस इंजेक्शन दिले जातात आणि काही जखमेभोवती फवारले जातात. प्रश्न-९: पाळीव प्राण्यांनी चावा घेतला तरी रेबीजची लस घ्यावी का? उत्तर : अगदी सौम्य दुखापतीमध्येही, जर रक्त त्वचेच्या खालच्या भागाशी संपर्क साधला असेल, तर रेबीज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ. सतीश म्हणतात की विषाणूचा आकार खूपच लहान आहे, जो डोळ्यांनीही दिसत नाही. बऱ्याचदा प्राण्यांची लाळ आपल्या शरीराच्या संपर्कात येऊ शकते, कारण प्राणी सहसा शरीराला चाटत राहतात. रेबीज लस पूर्णपणे सुरक्षित आहे. तिचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. संसर्गाची थोडीशीही शंका असल्यास, घरगुती उपाय करून पाहण्याऐवजी लसीकरण करून घ्या. जर कुत्रा १० दिवस जिवंत राहिला तर सामान्यतः असे गृहीत धरले जाते की कुत्रा चावल्यावर त्याला रेबीज झाला नव्हता. तथापि, भटक्या प्राण्यांचा शोध घेणे कठीण असते, म्हणून पहिल्या दिवसापासून लसीकरणाचा कोर्स सुरू करणे महत्वाचे आहे. डॉ. सतीश यांच्या मते, कुत्र्याला लसीकरण झाले आहे की १० दिवसांपासून तो पूर्णपणे निरोगी आहे याची पर्वा न करता, सर्व डोस घेणे आवश्यक आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Nov 2025 7:19 am

Naval Kishore Ram : निकृष्ट, चुकीच्या कामाला थारा नाही; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचा थेट इशारा

प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका ही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘मिशन मोड’वर काम केलेच पाहिजे. काम न करणाऱ्या किंवा चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई निश्चित आहे. कितीही मोठा अधिकारी असला, तरी त्याला सूट मिळणार नाही, असा थेट इशारा महापालिका आयुक्त व प्रशासक नवलकिशोर राम यांनी गुरुवारी दिला आहे. कामात कोणी दबाव आणला किंवा […] The post Naval Kishore Ram : निकृष्ट, चुकीच्या कामाला थारा नाही; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचा थेट इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 7:15 am

नितीन गडकरींचे कडक आदेश! नवले पुलावरील ‘ब्लॅक स्पॉट्स’तातडीने हटवा, अपघात थांबलेच पाहिजेत

प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांचे प्रमाण थांबवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात, असे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. ही माहिती पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. नवले पूल परिसरातील अलीकडील भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता. […] The post नितीन गडकरींचे कडक आदेश! नवले पुलावरील ‘ब्लॅक स्पॉट्स’ तातडीने हटवा, अपघात थांबलेच पाहिजेत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 7:00 am

अग्रलेख : कुबड्या नको

जेव्हा तुम्ही स्वत:हून एखादी गोष्ट करू शकत नसाल तेव्हा कोणाची किंवा कशाची मदत घेतली जाते त्याला ‘कुबड्या’ म्हणतात. हा शब्द सर्रास सर्वत्र वापरला जातो आणि राजकीय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. अलीकडच्या काळात साधारण महिनाभरापूर्वी भाजपाचे चाणक्य अमित शहा यांनी तो वापरला. आता शहांनी ‘कुबड्या’ म्हणून कोणाचा उल्लेख केला तर अर्थातच अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस […] The post अग्रलेख : कुबड्या नको appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 6:55 am

PMC Election : पुण्यात तीन लाख दुबार मतदार! महापालिका एकाच ठिकाणी मतदानाची देणार संधी

प्रभात वृत्तसेवा पुणे – देशभरात मतदार याद्यांमधील घोळ आणि दुबार मतदारांवरून आरोप- प्रत्यारोप सुरू असतानाच पुण्यात प्रारूप मतदार यादीत सुमारे ३५ लाख ५१ हजार मतदारांपैकी तब्बल ३ लाख ४६८ दुबार मतदार शोधण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार अशा दुबार मतदारांच्या नावापुढे दोन स्टार करण्यात आलेले आहेत.या मतदारांना महापालिकेचे कर्मचारी भेटून त्यांना कोणत्या तरी एकाच ठिकाणी […] The post PMC Election : पुण्यात तीन लाख दुबार मतदार! महापालिका एकाच ठिकाणी मतदानाची देणार संधी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 6:45 am

पुणेकरांना दिलासा! कडाक्याच्या थंडीचा जोर ओसरला; पाहा तुमच्या भागातील तापमान

प्रभात वृत्तसेवा पुणे – गेल्या २४ तासांत किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील कडाक्याचा थंडीचा जोर कमी झाला आहे. ७ अंशांवरील थंडीचा पारा आज ९ अंशांपर्यंत आला. हवेली आणि माळीण परिसरात पारा ९, तर अन्य परिसरातील किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात शहरासह जिल्ह्यातील किमान […] The post पुणेकरांना दिलासा! कडाक्याच्या थंडीचा जोर ओसरला; पाहा तुमच्या भागातील तापमान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 6:15 am

UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘बार्टी’चा मोठा निर्णय! आता थेट मिळणार २५ हजार रुपये, असा करा अर्ज

प्रभात वृत्तसेवा पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तर्फे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्त्व चाचणी 2025 साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी एकरकमी आर्थिक साहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना बार्टीमार्फत 25 हजार रुपये एकरकमी अर्थसाहाय्य दिले जाणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी […] The post UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘बार्टी’चा मोठा निर्णय! आता थेट मिळणार २५ हजार रुपये, असा करा अर्ज appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 6:00 am

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षांच्या वेळापत्रकात अचानक बदल, जाणून घ्या नव्या तारखा

प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्‍यात नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होत आहे. त्‍या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) तंत्रशिक्षण अभ्यासक्रम अर्थात पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यामुळे १ व २ डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा आता ४ आणि ५ डिसेंबरला होणार आहेत. निवडणुकांसाठी शैक्षणिक संस्थांच्या इमारती व वर्ग […] The post पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षांच्या वेळापत्रकात अचानक बदल, जाणून घ्या नव्या तारखा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 5:45 am

निवडणुकीआधीच गुलाल उधळला! राष्ट्रवादीचे दोन शिलेदार बिनविरोध; तळेगाव दाभाडेत महायुतीची जोरदार एन्ट्री

प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत गुरुवारी (दि. २०) उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून पाच उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे एकूण सात जणांनी माघार घेतली असून आता ९३ उमेदवार अद्याप रिंगणात आहेत.संगीता महेंद्र साळवे (प्रभाग २ ब), सुनील भिवा करंजे (प्रभाग ३-ब), किरण सुरेश ढोरे (प्रभाग ४-ब), […] The post निवडणुकीआधीच गुलाल उधळला! राष्ट्रवादीचे दोन शिलेदार बिनविरोध; तळेगाव दाभाडेत महायुतीची जोरदार एन्ट्री appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 5:30 am

एकाच दिवसात दोन अपघात! सुस आणि बालेवाडीत दोन भीषण अपघात; चिमुकल्यासह महिलेने गमावला जीव

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पुनावळे येथे भरधाव डंपरने तरुणीला चिरडल्याची घटना ताजी असतानाच बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या अपघातात चिमुकल्यासह महिलेने जीव गमावला. बालेवाडी येथे भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने आजोबा आणि लहान नातू गंभीर जखमी झाले तर सात वर्षीय नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सुस येथे ट्रकने धडक दिल्याने ४४ वर्षीय महिलेचा मृत्यू […] The post एकाच दिवसात दोन अपघात! सुस आणि बालेवाडीत दोन भीषण अपघात; चिमुकल्यासह महिलेने गमावला जीव appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 5:15 am

बारामतीत दारू पार्टीत राडा! जंगलात दोन गट भिडले; एकावर धारदार शस्त्राने वार, तिघे गजाआड

प्रभात वृत्तसेवा काटेवाडी – बारामतीजवळील वंजारवाडी परिसरातील जंगलात दारू पिताना दोन अनोळखी गटांमध्ये किरकोळ वादातून सुरुवात झालेली बाचाबाची अखेर गंभीर हाणामारीत परिवर्तित झाली. या घटनेत एकाला धारदार शस्त्राने जखम झाल्याचे समोर आले असून, बारामती तालुका पोलिसांनी अल्पावधीत गुन्ह्याचा उलगडा करून तीन आरोपींना अटक केली आहे.वनक्षेत्रात दोन्ही गट काही अंतरावर दारू पित बसलेले असताना बोलाचाली झाली. […] The post बारामतीत दारू पार्टीत राडा! जंगलात दोन गट भिडले; एकावर धारदार शस्त्राने वार, तिघे गजाआड appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 5:00 am

बारामती नगरपालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा! काही जागा बिनविरोध होणार? बंडखोरांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती नगरपरिषद निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगतदार झाला आहे. माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोण कोण अर्ज माघारी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्ज माघारीसाठी मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. बंडखोर उमेदवारांमुळे मतांची विभागणी होऊ नये, याकडे लक्ष देत बंडखोर उमेदवारांच्या विनवण्या सुरू आहेत. अपक्ष व बंडखोरांचा फटका कोणाला बसणार याकडे देखील लक्ष […] The post बारामती नगरपालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा! काही जागा बिनविरोध होणार? बंडखोरांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 4:45 am

Shirur News : जांबूत परिसरात दोन दिवसांत दोन बिबटे जेरबंद! वनविभागाचा ‘ट्रॅप’यशस्वी

प्रभात वृत्तसेवा जांबूत – मागील एक महिन्यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शिवन्या बोंबे, भागुबाई जाधव आणि रोहन बोंबे यांच्या दुःखद घटनांनंतर वनविभागाकडून बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. रोहन बोंबे यांच्या मृत्यूनंतर अलर्ट झालेल्या वनविभागाने ४८ तासांत दोन बिबटे जेरबंद केले, तर नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यश मिळवले. बुधवारी (दि. २०) रोजी रात्री […] The post Shirur News : जांबूत परिसरात दोन दिवसांत दोन बिबटे जेरबंद! वनविभागाचा ‘ट्रॅप’ यशस्वी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 4:45 am

Rajgurunagar : कचरा संकलन केंद्राचे काम थांबवा! मुंबई उच्च न्यायालयाचे कडक आदेश; टाकळकरवाडी ग्रामस्थांचा मोठा विजय

प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – राजगुरुनगर नगरपरिषद प्रस्तावित कचरा संकलन केंद्रासाठी आवश्यक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात विलंब झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम करण्यास मनाई केली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोक टाव्हरे यांनी दिली.टाकळकरवाडीच्या सरपंच शीतल टाकळकर, जऊळके खुर्दचे माजी सरपंच सुभाष बोर्‍हाडे, बाजार समितीचे माजी संचालक कैलास टाकळकर, प्रा. गीताराम टाकळकर आणि इतर […] The post Rajgurunagar : कचरा संकलन केंद्राचे काम थांबवा! मुंबई उच्च न्यायालयाचे कडक आदेश; टाकळकरवाडी ग्रामस्थांचा मोठा विजय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 4:15 am

कोकण ट्रिप ठरली शेवटची! उत्तमनगरच्या सहा मित्रांचा ताम्हिणीत करुण अंत; लोकेशन ट्रेस करत पोलीस पोहोचले तेव्हा..

प्रभात वृत्तसेवा पौड – ताम्हिणी घाट (जि. रायगड) हद्दीत पुण्यातील सहा तरुणांची थार मोटार ताम्हिणी घाटातील सुमारे 500 ते 1000 फूट खोल दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली. मध्यरात्री झालेल्या या अपघातात सर्व तरुणांचा मृत्यू झाला असून, जखमी अवस्थेत एकही जण सापडलेला नाही. दरी अतिशय खोल आणि परिसर निर्जन असल्याने अपघात रात्रीच्यावेळी कुणाच्याही लक्षात आला नाही. […] The post कोकण ट्रिप ठरली शेवटची! उत्तमनगरच्या सहा मित्रांचा ताम्हिणीत करुण अंत; लोकेशन ट्रेस करत पोलीस पोहोचले तेव्हा.. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 4:00 am

Manchar Election : मंचरमध्ये ८३ उमेदवार, पण लक्ष फक्त दोघींवर! कोण माघार घेणार, कोण रिंगणात राहणार?

प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायत निवडणुकीत माघारीच्या प्रक्रियेला वेग आला असून दोन दिवसांत एकाच उमेदवाराने माघार घेतली आहे. प्रभाग क्र. १५ मधील अपक्ष उमेदवार रूपाली इंद्रजीत दैने यांनी आज माघार घेतली. शुक्रवार दि.२१ रोजी माघारीचा शेवटचा दिवस असल्याने अनेक जणांच्या भूमिकेकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.नगराध्यक्षपदासाठी एकूण सहा उमेदवारी अर्ज वैध ठरले असून त्यात दोन […] The post Manchar Election : मंचरमध्ये ८३ उमेदवार, पण लक्ष फक्त दोघींवर! कोण माघार घेणार, कोण रिंगणात राहणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 3:30 am

Junnar Election : महायुती आणि महाविकास आघाडीत फूट! पाचही पक्ष स्वतंत्र लढणार; नगराध्यक्षपदासाठी ‘पंचरंगी’सामना

प्रभात वृत्तसेवा जुन्नर – जुन्नर नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष आणि २० नगरसेवकांच्या निवडीसाठी निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत एकी असताना, जुन्नरमध्ये मात्र दोन्ही आघाड्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षित संवाद न झाल्याने हे तिन्ही […] The post Junnar Election : महायुती आणि महाविकास आघाडीत फूट! पाचही पक्ष स्वतंत्र लढणार; नगराध्यक्षपदासाठी ‘पंचरंगी’ सामना appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 3:15 am

पक्षश्रेष्ठींना मोठा धक्का! तिकीट नाकारताच निष्ठावंत बनले ‘बंडखोर’; मंचर नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट

प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय रंगत चांगलीच वाढली आहे. अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून किंवा प्रतिस्पर्धी पक्षात जाऊन उमेदवारी अर्ज भरत पक्षश्रेष्ठींनाच मोठा धक्का दिला आहे.अनपेक्षितरीत्या वाढलेल्या बंडखोरीमुळे पक्षांच्या रणनीतीत गोंधळ निर्माण झाला असून, या नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा गाठीशी बांधण्यासाठी नेत्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे.बंडखोर उमेदवारांना पटवण्याचे प्रयत्न वाढल्याने त्यांचाही भाव चढू […] The post पक्षश्रेष्ठींना मोठा धक्का! तिकीट नाकारताच निष्ठावंत बनले ‘बंडखोर’; मंचर नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 3:00 am

PCMC Election : महापालिकेचे प्रभाग मिनी विधानसभा; चिखलीत सर्वाधिक ७४ हजार, थेरगावात सर्वात कमी ३४ हजार मतदार

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – शहरातील प्रभाग क्रमांक १ चिखली हा सर्वात मोठा प्रभाग असून या प्रभागामध्ये सर्वाधिक ७४ हजार ३४० मतदार आहेत. एवढ्या मतदारांपर्यंत पोहचताना उमेदवारांची पळता भुई थोडी होणार आहे. तर सर्वात कमी मतदारसंख्या ही थेरगाव गावठाण येथील प्रभाग क्रमांक २३ मध्ये आहे. या प्रभागातील उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचणे सहज शक्य आहे.शहरातील पिंपरी, भोसरी, चिंचवड […] The post PCMC Election : महापालिकेचे प्रभाग मिनी विधानसभा; चिखलीत सर्वाधिक ७४ हजार, थेरगावात सर्वात कमी ३४ हजार मतदार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 2:45 am

बिकट वाट वहिवाट...

बिहारचे ३५वे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी काल पदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांनी भारतात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदी राहिलेल्या आतापर्यंतच्या पहिल्या दहा मुख्यमंत्र्यांत आपलं स्थान नक्की केलं. या यादीत सिक्कीमच्या पवनकुमार चामलिंग, ओडिशाच्या नवीन पटनाईक, पश्चिम बंगालच्या दिवंगत ज्योती बसू, अरुणाचल प्रदेशच्या गेगॉंग अपांग, मिझोरामच्या लाल ठाणवाला, हिमाचल प्रदेशच्या वीरभद्र सिंग आणि त्रिपुराच्या माणिक सरकारनंतर त्यांचा नंबर लागला असला, तरी त्यांची ही कारकीर्द किती मोठी ठरते, यावर ते या यादीत किती पायऱ्या वर चढणार, ते ठरेल. गंमत म्हणजे, ज्या लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली, काही काळ त्यांच्याबरोबर सत्तेतही राहिले, वैचारिक सहप्रवासी म्हणून सरकार बनवताना एकत्र निर्णय घेतले, त्या लालूप्रसादांच्या राष्ट्रीय जनता दलाला पराभूत करूनच नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. १९८९ ची लोकसभा आणि १९९० ची विधानसभा निवडणूक लालूप्रसाद आणि नितीश कुमार यांच्या एकत्रित नेतृत्वाखाली लढवली गेली होती. पण, मुख्यमंत्री झाल्यानंतर लालूंचे रंग बदलू लागले. त्या वादातून १९९४ मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली 'समता पार्टी'ची स्थापना झाली. लालूंचा सामाजिक न्यायाचा अजेंडा तेव्हा एवढा जोरात होता, की समता पार्टीला यश मिळणं शक्यच नव्हतं. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज आणि नितीश यांनी त्यामुळे १९९८ मध्ये एकत्र येऊन (मुख्यतः बिहारला डोळ्यासमोर ठेवून) राष्ट्रीय स्तरावर' राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन'ची स्थापना केली. या आघाडीने नितीशना खरी चाल दिली. चारा घोटाळ्यात लालूंची प्रतिमा धुळीला मिळाली असताना तुरुंगात जाण्यापूर्वी त्यांनी राजकारणात पूर्ण अननुभवी असलेल्या पत्नी राबडीदेवी यांना मुख्यमंत्रीपदी बसवल्याने त्यांची होती नव्हती तीही मान्यता संपली. परिणामी सन २००० पर्यंत लालूंचा जनाधार घटत गेला आणि नितीश कुमार यांचा वाढत गेला!सन २००० मध्येच नितीश कुमार यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण, ते सरकार प्रत्यक्षात आलंच नाही. त्याची नुकसानभरपाई म्हणून नितीश कुमार यांची वर्णी थेट अटलजींच्या मंत्रिमंडळात, केंद्रात लागली. तिथे त्यांनी आपल्या प्रशासन कुशलतेचा चांगला ठसा उमटवला. देशभर त्यांची प्रतिमा तयार झाली. लालूंवर भ्रष्टाचाराची एकामागोमाग एक प्रकरणं शेकत असताना, त्यातून सावरण्यासाठी त्यांनी घेतलेल्या 'अतिरेकी सामाजिक न्याया'च्या धोरणाने गांवागांवात वेगळ्या चर्चा सुरू झाल्या. लालू आणि नितीश यांच्यातील त्यावेळच्या तुलनेतच नितीश पुढे निघून गेले. लालू वेगवेगळ्या आरोपात अडकत गेले. लालू आणि नितीश यांचे राजकीय-सामाजिक विचार एक असले, तरी राजकीय मूल्यकल्पना कशा वेगळ्या होत्या, याचा एक किस्सा बिहारमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. २००५ मध्ये विधानसभा निवडणुकीत 'राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन'ला बहुमत मिळालं. पण, ते स्पष्ट बहुमत नव्हतं. काही आमदार कमी पडत होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी समता पार्टीचे अध्यक्ष म्हणून जॉर्ज यांच्या निवासस्थानी एक बैठक बसली. बैठकीला नितीश कुमार, शरद यादव, दिग्विजयसिंह असे चार-पाच महत्त्वाचे नेते होते. बरीच आकडेमोड करूनही गणित जुळत नव्हतं. शेवटी आपल्यातल्याच काही आमदारांशी बोलून निधीची व्यवस्था करावी आणि त्यातून सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला गती द्यावी, अशी सूचना पुढे आली. ती सूचना ऐकून नितीश कुमार यांनी जागच्या जागी त्या सूचनेला तीव्र विरोध केला. 'अशा प्रकारे मुख्यमंत्रीपद मिळणार असेल, तर ते मला नको' असं त्यांनी त्या बैठकीत बजावलं आणि बैठक मोडली. राजकीय पेच कायम राहिला. त्यामुळे, पुन्हा निवडणूक घ्यावी लागली. ऑक्टोबर २००५ मध्ये झालेल्या त्या निवडणुकीत जनता दलाला (संयुक्त) ८८ जागा मिळाल्या! विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून बिहारी जनतेने नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं. नितीश कुमार त्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. पुढे त्यांनी आपला सिलसिला चालूच ठेवला. त्याचाच पुढचा अध्याय कालपासून सुरू झाला. गेल्या १९ वर्षांच्या प्रवासात नितीश कुमार यांनी कधी लालूप्रसादांच्या राष्ट्रीय जनता दलाची साथ घेतली, तर कधी भारतीय जनता पक्षाची. त्यावरून त्यांचा 'पलटूराम' असा उपहासही झाला. पण, आपल्या राजकीय अस्तित्वासाठी आणि राजकीय अजेंड्यासाठी केलेल्या अशा तडजोडींतही त्यांची 'सुशासनबाबू' ही प्रतिमा कायम राहिली. ज्या राज्याचा उल्लेख देशात केवळ 'अतिमागास', 'जंगली', 'मध्ययुगीन मानसिकतेचे राज्य' असा केला जात होता, त्याच राज्याला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. बिहारच्या आमूलाग्र परिवर्तनाला हात घातला. २०२४-२५ची ताजी आकडेवारी पाहिली, तर बिहारची अर्थव्यवस्था ८.६४ टक्के दराने वाढते; खरं तर धावते आहे!सलग १९ वर्षे मुख्यमंत्रीपदी असलेल्याच्या विरोधात आपोआपच जनमत तयार होतं. सत्तेच्या विरोधातला रोष एकवटतो, असं म्हटलं जातं. नितीश कुमार यांच्याविषयी ते घडलं नाही. उलट, त्यांचा पाठिंबा वाढतच राहिला. याचं कारण, सामाजिक बदलासाठी निर्णय करण्याचा आग्रह आणि स्वतःची मतपेढी तयार करण्याची दूरदृष्टी. समाजातील सर्वात मोठ्या घटकाला, महिलांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी सातत्याने योजना आखल्या आणि त्याची गावपातळीपर्यंत नीट अंमलबजावणी होईल, याची दक्षताही घेतली. लालूप्रसाद यांच्याप्रमाणे न वागता त्यांनी आपल्या कुटुंबाला, नातेवाइकांना राजकीय पटलापासून कटाक्षाने दूर ठेवलं. नाही. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर लगेच मुख्यमंत्रीपद न घेता त्यांनी सामाजिक समीकरण आणि आपली प्रतिमा या दोन्हींचा विचार करून खुबीने जितनराम मांझी यांना मुख्यमंत्री केलं. राजकारणात वेगापेक्षा असा हिशोबी संयमच बहुतेकदा हुकमी यश देत असतो. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी जाहीर केलेल्या 'मुख्यमंत्री महिला रोजगार योजने' वर चहूबाजूंनी टीका झाली. 'पोल्समॅप' या संस्थेने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत ज्यांना या योजनेचा लाभ झाला, त्यापैकी ६९ टक्के महिलांनी 'अशाप्रकारे निवडणुकीआधी थेट लाभाच्या योजना अयोग्य असल्या'चं मत नोंदवलं. पण, हे पैसे आपल्या खात्यात कशासाठी आले, तेही त्यांना नीट माहीत होतं. त्यांनी त्यानुसार मतदानही केलं! महिलांना दिलेल्या अशा थेट लाभाच्या योजनांनी महाराष्ट्रासह इतर राज्यातही 'जादू' केली, हे जगजाहीर आहे. त्याचा लाभ नितीश कुमार यांना झालाच. पण, त्याआधी गेली काही वर्षं ते 'महिला' हाच आपला जनाधार, असं ठरवून काम करत होते. शाळेत जाणाऱ्या मुलींना मोफत सायकलपासून बचत गटांना दिलेल्या विविध प्रोत्साहन योजना, ग्रामीण जीवनोन्नती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी त्यांना हात देऊन गेली. जात आणि जातीभेदाने ग्रासलेल्या बिहारला, बिहारच्या राजकारणाला नितीश कुमार यांनी यानिमित्ताने अलगद भौतिक कार्यक्रमांवर आणलं, हे त्यांचं यश इतिहासात कायमचं नोंदवलं जाईल. भविष्यात त्यांच्याकडून म्हणूनच अधिक अपेक्षा आहेत.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 2:30 am

पिंपरी-चिंचवडची प्रारूप मतदार यादी जाहीर; तुमचं नाव बरोबर आहे का? २७ नोव्हेंबरपर्यंतच दुरुस्तीची संधी!

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करून प्रारूप मतदार यादी गुरूवारी (दि. २०) प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी २० ते २७ नोव्हेंबर हा कालावधी देण्यात आला आहे. नागरिकांकडून येणाऱ्या हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी अ, ब, क, ड, ई, फ, […] The post पिंपरी-चिंचवडची प्रारूप मतदार यादी जाहीर; तुमचं नाव बरोबर आहे का? २७ नोव्हेंबरपर्यंतच दुरुस्तीची संधी! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 2:30 am

मराठवाड्यात उमेदवारी अर्जांचा पाऊस

छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. २१ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. आता राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे. नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने, स्थानिक पातळीवर चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. विशेषतः अध्यक्षपदासाठी अनेक ठिकाणी इच्छुकांची गर्दी दिसून येत आहे. २६ नोव्हेंबरला चिन्हे वाटप होतील. २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला निकाल जाहीर होतील. या निवडणुकीत अनेक ठिकाणी राजकीय सोयीनुसार युतीधर्म पाळला जाणार नाही, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. याचा अर्थ असा की, जे पक्ष किंवा गट एकत्र आहेत, ते स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधातही उभे राहू शकतात. यामुळे निवडणुकीचे निकाल अनपेक्षित लागू शकतात.मराठवाड्यात असलेल्या आठ जिल्ह्यांतील ४८ नगर परिषदा आणि ११ नगरपंचायतींच्या नगरसेवक व अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली. नांदेड जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी २१२, तर नगरसेवक पदासाठी २१५३ जणांनी अर्ज दाखल केले. त्या पाठोपाठ बीड जिल्ह्यात १६९ व नगरसेवक पदासाठी २१२७, परभणी जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी ११७, तर नगरसेवक पदासाठी १२१० जणांनी, लातूर जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी १०३ व नगरसेवक पदासाठी १२५७ जणांनी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी ९४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर नगरसेवक पदासाठी १४३६ अर्ज दाखल झाले. हिंगोली जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी ७१ व नगरसेवक पदासाठी ९१० जणांचे अर्ज, धाराशिव जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी ५३, तर नगरसेवक पदासाठी ६१० अर्ज तसेच सर्वात कमी जालना जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी ४२ व नगरसेवक पदासाठी ४१८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत अध्यक्षपदासाठी ७५० पेक्षा अधिक तर नगरसेवक पदासाठी तब्बल दहा हजारांपेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले.या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यात विद्यमान व माजी आमदारांनी स्वतःच्या नातलगांना उमेदवारी अर्ज भरायला लावले. सत्ताधारी व विरोधी पक्षांतील नेत्यांच्या परिवारातील सदस्यांनी या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आपलेच सगे-सोयरे सत्तेवर राहावेत या उद्देशाने काँग्रेस, भाजप, अजित पवार गट, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट तसेच एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी स्वतःच्या पाहुण्यांचा उमेदवारी अर्जात भरणा केलेला आहे. त्यामुळे भविष्यात याच परिवारांकडे सत्तेची सूत्र राहणार असल्याचे उमेदवारी अर्जांवरून दिसून येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे स्वतःचे चिरंजीव समीर सत्तार यांची उमेदवारी दाखल केली. याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील आमदगर संतोष बांगर, परभणी जिल्ह्यातील राजेश विटेकर, नारायण कुचे यांनी स्वतःच्या नातलगांना व विशेषतः घरातील सदस्याला उमेदवारी दिली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराईत भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भावजई गीता पवार यांनी भाजपकडून उमेदवारी दाखल केली, तर अंबाजोगाईमध्ये भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांनी शहर परिवर्तन जनविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याचबरोबर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात गेलेले डॉ. योगेश क्षीरसागर यांची पत्नी डॉ. सारिका यांनी भाजपकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बीड जिल्ह्यातील आमदार धनंजय मुंडे यांच्या भगिनी तथा गंगाखेडचे माजी आमदार मधुसूधन केंद्रे यांची पत्नी उर्मिला यांनी गंगाखेडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. आता मराठवाड्यात उमेदवारी मागे घेण्यासाठी एकमेकांची मनधरणी करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या निवडणुकीच्या लढतीचे सर्व चित्र २५ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत कोण-कोण उमेदवारी मागे घेतो हे स्पष्ट झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र समोर येणार आहे.राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी तीन ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. जिंतूर, सेलू व गंगाखेड या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची कसोटी पणाला लागली आहे. याव्यतिरिक्त पाथरी व पूर्णा या ठिकाणी बोर्डीकर यांना उमेदवार मिळालेला नाही. त्या ठिकाणी शिंदेसेना तसेच काँग्रेसचे उमेदवार एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात माजी मंत्री तानाजी सावंत समर्थक विरुद्ध इतर सर्वजण परंडा व भूम येथे एकमेकांच्या विरुद्ध लढणार आहेत. या ठिकाणी नळदुर्ग, उमरगा येथे शरद पवार गटाचे स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात थांबणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीची कसोटी पणाला लागलेली आहे. लातूर जिल्ह्यात पाच नगराध्यक्ष पदासाठी १०३ उमेदवार इच्छुक होते, तर नगरसेवकाच्या १२८ जागांसाठी १२५७ उमेदवारांनी अर्ज भरले. या जिल्ह्यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे आमदार सुपुत्र काँग्रेसला किती ठिकाणी विजय मिळवून देणार याकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. हिंगोली जिल्ह्यात युती स्वतंत्र निवडणूक लढविणार आहे, तर आघाडी मात्र एकत्र राहून सोयीच्या ठिकाणी उमेदवार उभे करून सत्ता हातात घेण्याच्या तयारीत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील तीन नगरपालिका कोणाच्या ताब्यात जातील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वसमत, कळमनुरी व हिंगोली या तीन नगरपालिकेसाठी निर्णायक निवडणूक होणार आहे. जालना जिल्ह्यातील परतुर, अंबड व भोकरदन येथील निवडणूक रंगतदार ठरणार आहे. नांदेड जिल्ह्यात राज्यसभेचे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या आमदार कन्या श्रीजया यांचा बालेकिल्ला भोकर येथे नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक उमेदवार उभे आहेत. नांदेड जिल्ह्यात भोकर येथील निवडणुकीकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच १३ नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत. हा जिल्हा मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत भौगोलिकदृष्ट्या मोठा जिल्हा आहे. लोकसभा निवडणुकीत नांदेड येथे भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर भाजपने दोन जणांना राज्यसभेवर घेऊन त्यांना खासदार बनविले. त्यामध्ये अशोक चव्हाण व डॉ. अजित गोपछडे यांचा समावेश आहे. त्यामुळे हे भाजपचे दोन खासदार किती नगराध्यक्ष निवडून आणणार आहेत हे भाजपच्या वरिष्ठांनी त्यांच्याकडून एक परीक्षा म्हणून तपासून घ्यावे, असे नांदेड जिल्ह्यातील राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड, पैठण, वैजापूर तसेच खुलताबाद व गंगापूर, फुलंब्री नगरपंचायत या ठिकाणी भाजपला किती नगराध्यक्ष निवडून आणता येतील याकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार हे सिल्लोड नगरपालिकेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून येण्यासाठी मैदानात आहेत. त्यांच्या निवडणुकीकडे सर्वच पक्षाचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर आहे, तर २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटप केले जातील तसेच २ डिसेंबर रोजी मतदान व लगेच दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.- डॉ. अभयकुमार दांडगे

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 2:10 am

पिंपरीत ४६ हजार ‘दुबार’मतदार! दुबार मतदारांना शोधण्यासाठी निवडणूक विभागाची ‘ही’आहे युक्ती

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्यात रणकंदन माजवले आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे. असे असताना पिंपरी चिंचवड शहरामध्ये तब्बल ४६ हजार ३३२ दुबार मतदार असून यादीमध्ये तब्बल ९२ हजार ६६४ नावे मतदारयादीमध्ये आली असल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीतून समोर आले आहे. निवडणूक विभागाने गुरूवारी (दि. २०) […] The post पिंपरीत ४६ हजार ‘दुबार’ मतदार! दुबार मतदारांना शोधण्यासाठी निवडणूक विभागाची ‘ही’ आहे युक्ती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 2:00 am

PCMC Election : तिकीट कुणालाही द्या, पण स्थानिकच हवा! अन्यथा…; पिंपरीत मतदारांचा राजकीय पक्षांना ‘असा’आहे इशारा

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिकेच्‍या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ९ गांधीनगर–खराळवाडी परिसरातील (अनुसूचित जाती राखीव)सर्वपक्षीय इच्‍छुकांची तातडीची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमसृष्टी, पिंपरी चौक येथे पार पडली. बैठकीची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच प्रभागातील सध्याच्या राजकीय स्थितीवर तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सखोल चर्चा करण्यात आली. गेल्या 18 […] The post PCMC Election : तिकीट कुणालाही द्या, पण स्थानिकच हवा! अन्यथा…; पिंपरीत मतदारांचा राजकीय पक्षांना ‘असा’ आहे इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 1:45 am

नमस्कार : मानवी नात्यांना जोडणारी शक्ती

‘नमस्कार’ हा शब्द उच्चारताच मनात एक ऊबदार भावना निर्माण होते. समोरच्या व्यक्तीला मान देणे, त्याच्याशी संवादाची पहिली पायरी टाकणे आणि सामाजिक नात्यांची विण घट्ट करण्याची प्रक्रिया याची सुरुवात या छोट्याशा शब्दातून होते. म्हणूनच २१ नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक नमस्कार दिन’ (World Hello Day) म्हणून जगभर पाळला जातो. १९७३ मध्ये इजिप्त आणि इस्रायल दरम्यान झालेल्या युद्धानंतर शांततेचा संदेश देण्यासाठी या दिवसाची निर्मिती झाली.१८० हून अधिक देश हा दिवस पाळतात. नमस्कार हा केवळ अभिवादनाचा शब्द नाही; तो सामाजिक व्यवहारातील सभ्यता, नम्रता आणि परस्पर आदराचे प्रतीक आहे. समाजशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास ‘नमस्कार’ म्हणजे मानवसंस्कृतीचा मूलभूत पाया होय. मानवी संबंध, सामाजिक भांडवल, सांस्कृतिक मूल्ये आणि शांततामय सहजीवनाची तत्त्वे यांची सांगड ‘नमस्कार’ या एका छोट्याशा कृतीतून दिसून येते.आजच्या जागतिकीकरणाच्या युगात, संवादाच्या असंख्य साधनांची उपलब्धता असली तरी मानवी नात्यांतील ऊब, आदर आणि संवेदनशीलतेचे स्थान धोक्यात येताना दिसते. व्हर्च्युअल संवाद वाढल्याने ‘हॅलो’, ‘हाय’ अशी इंग्रजी स्वरूपातील अभिवादने प्रचलित झाली; परंतु भारतीय ‘नमस्कार’ या संकल्पनेतील सांस्कृतिक खोली आजही अधिक प्रभावी आहे. भारतीय समाजात अभिवादन हा एक संस्कार मानला जातो. वडीलधाऱ्यांना वंदन करणे, पाहुण्यांचे स्वागत करणे, रस्त्यावर भेटलेल्या व्यक्तीला नम्रपणे ‘नमस्कार’ म्हणणे ही कृती मनातील आदर जागवते. एखाद्या व्यक्तीला केलेला नमस्कार म्हणजे त्याच्या अस्तित्वाची पावती होय. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले असता ‘नमस्कार’ ही सामाजिक सलोखा, स्नेहभाव, समुदायभावना आणि नागरिकांमधील विश्वास वाढवणारी कृती आहे. आजचा काळ तंत्रज्ञानाने अवकाश कवेत घेतलेला काळ आहे. पण त्याच वेळी व्यक्तिगत एकाकीपण, तणाव, भीती, मानसिक आरोग्याशी संबंधित संकटे वाढत आहेत. मानसशास्त्र सांगते की, सर्वात छोटा सामाजिक संकेत जसे की स्मित, अभिवादन, नमस्कार ही कृती व्यक्तीला सामाजिक अस्तित्वाची जाण करून देते, आत्मविश्वास वाढवते आणि सकारात्मक ऊर्जा देते. म्हणून ‘नमस्कार’ ही संस्कृती केवळ आदराची खूण नसून मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीलाही नमस्कार केल्यावर तो क्षण एक प्रकारची सुरक्षितता निर्माण करतो. अनोळखी लोकांमधील संवादाची सुरुवात तणाव कमी करते आणि सामाजिक विश्वास वाढवते. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी, शाळा-कॉलेजमध्ये, शासकीय कार्यालयांत किंवा गावपातळीवरील सामूहिक जगामध्ये अभिवादन संस्कृती वाढवणे म्हणजे सामाजिक सकारात्मकतेचा पाया मजबूत करणे होय.समाजशास्त्रामध्ये अभिवादनाला ‘प्रतीकात्मक आंतरक्रीयावाद’ याच्या मुळाशी सामावलेले मानले जाते. प्रत्येक व्यक्ती स्वतःबद्दल आणि इतरांबद्दलची धारणा निर्माण करताना या प्रतीकात्मक कृतींचा आधार घेतो. ‘नमस्कार’ हा केवळ हात जोडणे किंवा शब्द उच्चारणे नाही; तो आपल्या संस्कारांचे, मूल्यांचे आणि सामाजिक ओळखीचे प्रतीक आहे. एका व्यक्तीचा नमस्कार दुसऱ्यात आदर, स्वीकार आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करतो. यामुळे सामाजिक नातेसंबंध दृढ होतात. परिणामी समाजातील तणाव घटतो, स्पर्धा आणि संघर्षाच्या वातावरणात मानवी संवेदना टिकून राहतात. जागतिक नमस्कार दिनाचा मुख्य संदेश हा जगातील शांतता, सौहार्द, संवाद आणि सामोपचार टिकवण्याचा आहे. आज जेव्हा देशांमध्ये राजकीय तणाव, सांस्कृतिक संघर्ष, धार्मिक मतभेद, हिंसा आणि डिजिटल दरी वाढत आहे, तेव्हा ‘हॅलो’ किंवा ‘नमस्कार’ हा शब्द छोटा असला तरी त्यामागील विचार मोठा आहे, तो म्हणजे संवादाद्वारे तणाव कमी करणं. इतिहास सांगतो की युद्ध, संघर्ष आणि कटुता हे गैरसमजातून वाढतात. संवादाची पहिली पायरी म्हणजे अभिवादन होय. त्यामुळे जागतिक नमस्कार दिन हा शांततेच्या प्रक्रियेतील एक प्रतीकात्मक पाऊल आहे. भारतीय समाजात ‘नमस्कार’ दिन साजरा करण्याचे सामाजिक महत्त्व अधिक व्यापक आहे. नमस्कार म्हणजे संस्कृती टिकवण्याचा मार्ग आणि सामाजिक भांडवल वाढवण्याचे साधन आहे. आधीच्या पिढ्या सकाळी उठल्याक्षणी घरातील ज्येष्ठांना नमस्कार करून दिवसाची सुरुवात करायच्या. आजच्या पिढीत हे बंधन शिथिल झाले; परंतु अभिवादन संस्कृतीचे मूल्य आज अधिकाधिक महत्त्वाचे आहे. समाज माध्यमांवरील आभासी जगात ‘हाय’, ‘हॅलो’, ‘गुड मॉर्निंग’चे संदेश हजारो मिळतात, पण प्रत्यक्ष आयुष्यातील नमस्कार देणारा जवळचा माणूस नसल्यास त्या संबंधांचा ऊबदारपणा टिकत नाही. याच अानुषंगाने, या दिवशी शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना अभिवादनाचे महत्त्व शिकवणे आवश्यक आहे. वर्गात प्रवेश करताना शिक्षकाला नमस्कार करणे, मित्रांना अभिवादन करणे, एकमेकांचा आदर राखणे, ही छोटी कृती मुलांमध्ये सामाजिक कौशल्ये विकसित करते. आजची युवा पिढी तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने प्रगती करत असली तरी सामाजिक कौशल्यांमध्ये घट जाणवते. मूलभूत संवादकौशल्य, सौजन्य, विनम्रता व परस्पर आदर या मूल्यांत सातत्य ठेवणे आवश्यक आहे. नमस्कार हा केवळ परंपरा नाही, तर सामाजिक, भावनिक शिक्षणाचा मूलाधार आहे.याहूनही महत्त्वाचे म्हणजे विविधतेने नटलेल्या भारतीय समाजात ‘नमस्कार’ ही कृती सर्वांना जोडणारा पूल आहे. भाषा, धर्म, जात, प्रदेश, वंश, आर्थिक विभाजन या सर्व भिंतींच्या पलीकडे ‘नमस्कार’ हा समान संस्कार आहे. महामार्गावर भेटलेला ट्रकचालक असो, सायकलवर जाणारा शेतकरी असो, उंच इमारतीत राहणारा व्यावसायिक असो किंवा गावातील वृद्ध महिला-पुरुष असो ‘नमस्कार’ हा शब्द सर्वांना सारखाच ऊबदार वाटतो. सामाजिक समता आणि परस्पर आदर टिकवण्यास ही कृती महत्त्वाची ठरते. आजच्या काळात संवादाच्या तुटलेल्या धाग्यांची जुळवाजुळव करणे ही मोठी गरज आहे. कुटुंबांमध्ये पिढ्यांमधील संवाद कमी झाला आहे, समाजात परस्पर अविश्वास वाढतो आहे, सार्वजनिक क्षेत्रात चिडचिड, आक्रमकता आणि असहिष्णुता वाढत आहे. पण या नकारात्मकतेत ‘नमस्कार’ हा छोटासा शब्द मनातला राग विरघळवतो, नव्या संवादाचे दार उघडतो आणि सामाजिक ऊबदारपणा निर्माण करतो. मानसशास्त्रीयदृष्ट्या नमस्कार केल्याने हसरा चेहरा आणि नम्र आवाज मेंदूतील सकारात्मक हार्मोन्स सक्रिय करतात. त्यामुळे व्यक्तीचा मूड सुधारतो, तणाव कमी होतो आणि नात्यांमध्ये सौम्यता वाढते. जागतिक नमस्कार दिन हा केवळ औपचारिक दिन नाही; तो सामाजिक संवेदना, मानवता आणि परस्पर आदराचा उत्सव आहे. वाईट बातम्यांनी भरलेल्या जगात चांगल्या संवादाची, सकारात्मक सामाजिक वर्तणुकीची आणि मानवी मूल्यांची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे. खरा संवाद ‘नमस्कार’पासूनच सुरू होतो. एखाद्या छोट्या अभिवादनानेही आपण एखाद्याच्या मनात आशेचा दिवा पेटवू शकतो. आज या दिवसाचे औचित्य साधून आपण आपल्या जीवनात खालील विचार दृढ करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला मान द्या, कोणालाही भेटताना अभिवादन करण्याची संस्कृती रुजवा, नात्यांमध्ये संवादाची दारे सतत उघडी ठेवा आणि समाजात सकारात्मकतेचा संदेश पसरवा. जागतिक नमस्कार दिन आपल्याला स्मरण करून देतो की, मोठा बदल करण्यासाठी मोठी भाषणे किंवा मोठी कृती आवश्यक नसते; कधी कधी एका साध्या ‘नमस्कार’मध्येही मानवतेचे सर्वात मोठे सामर्थ्य दडलेले असते. म्हणूनच आजच्या या जागतिक नमस्कार दिनी आपण सर्वांनी एकच संकल्प करूया की प्रत्येक दिवशी भेटलेल्या प्रत्येक व्यक्तींना मनापासून अभिवादन करायचे. ‘नमस्कार’ या शब्दात सामाजिक बंधुभावाचे, संस्कारांचे आणि शांततेचे बीज आहे. या बीजातूनच मानवतेचा वटवृक्ष उभा राहतो. नमस्कार म्हणजे फक्त अभिवादन नाही; तो मनुष्यत्वाचा उत्सव आहे.- डॉ. राजेंद्र बगाटे

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 1:30 am

Pathardi Crime : वर तुरीची शेती, आत ‘गांजा’चा मळा! पाथर्डीत शेतकऱ्याचा ‘जुगाड’पोलिसांना असा लावला छडा

प्रभात वृत्तसेवा पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी परिसरात तुरीच्या पिकामध्ये लपवून गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, पाथर्डी पोलिसांनी बुधवारी धडक कारवाई करत २ लाख १० हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विक्रम मुरलीधर खेडकर (वय ४३, रा. मालेवाडी) या शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे.पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने […] The post Pathardi Crime : वर तुरीची शेती, आत ‘गांजा’चा मळा! पाथर्डीत शेतकऱ्याचा ‘जुगाड’ पोलिसांना असा लावला छडा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 1:30 am

Shirdi News : बिबट्या आला कुठून? शिर्डीच्या गजबजलेल्या भागात बिबट्याचा वावर; भाविकांमध्ये भीतीचे सावट

प्रभात वृत्तसेवा शिर्डी – शहरात स्थानिक नागरिक आणी भाविकांची मोठी वर्दळ असलेल्या पिंपळवाडी रोडलगतच्या माऊलीनगर परिसरात नागरी वस्तीत बुधवारी रात्री बिबट्या मुक्तपणे फिरताना दिसल्याची घटना समोर आली आहे. बिबट्या नागरी भागातील रस्त्यांवर मुक्त संचार करीत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाल्याने परिसरातील नागरिकांसह शिर्डीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा […] The post Shirdi News : बिबट्या आला कुठून? शिर्डीच्या गजबजलेल्या भागात बिबट्याचा वावर; भाविकांमध्ये भीतीचे सावट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 1:15 am

Satara TET Exam : टीईटीसाठी साताऱ्यात ११ हजार उमेदवार; प्रशासनाचा ‘हा’आहे मास्टर प्लॅन

प्रभात वृत्तसेवा सातारा – यावर्षीची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी (दि.२३) सातारा शहरातील ३१ केंद्रांवर पार पडणार आहे. नवीन शिक्षक व कार्यरत शिक्षकांसाठी ही परीक्षा असणार आहे. या परीक्षेत केंद्रातील प्रत्येक वर्गात बसवलेल्या एआय कॅमेऱ्यांद्वारे नियंत्रण कक्षापर्यंत तत्काळ अलर्ट पाठवला जाणार आहे. विद्यार्थी संशयास्पद हालचाल करत असल्यास, मागे वळत असल्यास किंवा संकेत देत असल्यासही हॉटलाइन […] The post Satara TET Exam : टीईटीसाठी साताऱ्यात ११ हजार उमेदवार; प्रशासनाचा ‘हा’ आहे मास्टर प्लॅन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 1:00 am

भाजपची प्रतिष्ठा पणाला! अमोल मोहितेंसाठी दोन्ही ‘राजे’एकवटले, पण सुवर्णाताईंची ‘ही’रणनीती ठरणार गेमचेंजर?

प्रभात वृत्तसेवा सातारा – सातारा शहराचा प्रथम नागरिक कोण, या प्रतिष्ठेच्या प्रश्नासाठी भाजपला महाविकास आघाडीने जोरदार टक्कर देण्याची रणनीती स्पष्ट केली आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुवर्णाताई पाटील यांचे जोरदार आव्हान मिळाले आहे. सातारा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणार्‍या सातारा पालिकेच्या रणसंग्रामात कोण बाजी मारणार, हा राजकीय वर्तुळातील चर्चेचा […] The post भाजपची प्रतिष्ठा पणाला! अमोल मोहितेंसाठी दोन्ही ‘राजे’ एकवटले, पण सुवर्णाताईंची ‘ही’ रणनीती ठरणार गेमचेंजर? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 12:45 am

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५

पंचांगआज मिती मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा शके १९४७, चंद्र नक्षत्र अनुराधा योग अतिगंड चंद्र राशी मीन, भारतीय सौर ३० मार्गशीर्ष शके १९४७, शुक्रवार, दि. २१ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४९, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ७.३७, मुंबईचा चंद्रास्त ६.३७, राहू काळ ११.०० ते १२.२४. मार्गशीर्ष मासारंभ, मार्तंड्भैरव षडरात्रोस्सव आरंभ, शुभ दिवस दुपारी १.५५ पर्यंत.दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : जवळचे प्रवास करावे लागतील.वृषभ : निरनिराळ्या मार्गांनी धनलाभ होऊ शकतो.मिथुन : कौटुंबिक सुख चांगले राहील.कर्क : महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे.सिंह : आर्थिक आवक चांगली राहून कौटुंबिक सुख मिळेल.कन्या : चालू नोकरीमध्ये वातावरण बदल.तूळ : महत्त्वाच्या कामात यश मिळेल.वृश्चिक : नशिबावर फार विसंबून राहू नका.धनू : आज आपला प्रवास फलदायी होऊ शकतो.मकर : आरोग्याची काळजी घ्या.कुंभ : जीवनसाथीबरोबर सूर जुळतील.मीन : प्रेमात यश मिळणार आहे.

फीड फीडबर्नर 21 Nov 2025 12:30 am

Nitin Patil : रामराजेंचा पक्षप्रवेश का रखडला? मुंबईतील बैठकीत नेमकं काय ठरलं? नितीन पाटलांनी उलगडले ‘ते’गुपित

प्रभात वृत्तसेवा वाठार स्टेशन – प्रभात वृत्तसेवास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी असतात. त्यासाठी स्थानिक पातळीवरील परिस्थिती आणि कार्यकर्त्यांचा कल पाहून निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास युती करू, असे मत खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केले.वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथे उद्योजक राजेंद्र […] The post Nitin Patil : रामराजेंचा पक्षप्रवेश का रखडला? मुंबईतील बैठकीत नेमकं काय ठरलं? नितीन पाटलांनी उलगडले ‘ते’ गुपित appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 21 Nov 2025 12:15 am

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक…मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व पारदर्शक यंत्रणा उभारण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण तयार करावे, असे निर्देश काल सर्वोच्च न्यायालयाने दिले. प्रत्यारोपणानंतर अनेक दाते उपचाराअभावी उपेक्षित राहतात, याबाबत चिंता व्यक्त करत न्यायालयाने दानकर्त्यांच्या फॉलो-अप वैद्यकीय सेवेला बंधनकारक करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर भारतीय ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन सोसायटीने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी झाली. जीवंत दाता मौल्यवान अवयव देतो. प्रत्यारोपणानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.न्यायालयाने केंद्राला अवयव वाटपासाठी ‘आदर्श वाटप निकष’ निश्चित करून देशभर तीच निकष लागू करण्यास सांगितले. अवयव प्रत्यारोपणासाठी लिंग, प्रदेश किंवा आर्थिक स्तर यांसारख्या मर्यादा नसाव्यात. सर्वांसाठी समान नियम असणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने नमूद केले.दरम्यान, अवयव प्रत्यारोपणाच्या कायदेशीर तरतुदींमध्ये प्रलंबित असलेल्या दुरुस्त्यांबाबत काही राज्यांनी अद्याप कारवाई न केल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणले. न्यायालयाने केंद्र सरकारला आंध्र प्रदेश सरकारला १९९४ च्या मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यात २०११1 मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्त्या स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करण्यास सांगितले. तसेच कर्नाटक, तमिळनाडू आणि मणिपूरने २०१४ च्या अवयव व ऊतक प्रत्यारोपण नियमावलीची अंमलबजावणी त्वरित करावी, असे निर्देश दिले.न्यायालयाने पुढे सांगितले की मणिपूर, नागालँड, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपमध्ये अद्याप राज्य अवयव व ऊतक प्रत्यारोपण संस्था (सोटो) अस्तित्वात नाहीत. त्यामुळे या संस्थांची स्थापना राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमांतर्गत केंद्राने करावी, असा आदेश देण्यात आला. तसेच मृत्यू नोंदणीच्या फॉर्ममध्ये सुधारणा करून,मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना अवयव दानाचा पर्याय विचारला गेला का याची नोंद अनिवार्य करण्याबाबत केंद्राने राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्था (नोटो) यांच्यासोबत चर्चा करावी, असेही खंडपीठाने निर्देशित केले.खंडपीठाने पुढे सरकारला राष्ट्रीय अवयव व ऊतक प्रत्यारोपण संस्थेच्या सल्ल्याने मृत्यू नोंदणी फॉर्ममध्ये बदल करण्याचे निर्देश दिले, ज्यामध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना अवयव दानाबाबत पर्याय विचारला गेला का, हे स्पष्टपणे नमूद करण्याची तरतूद असावी असे म्हटले आहे.एकसमान राष्ट्रीय धोरण तयार करताना दानकर्त्यांच्या उपचार व फॉलो-अपची गरज अधोरेखित आहे. मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई व न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने लक्ष वेधले की अनेक वेळा अवयव दान करणारे दाते प्रत्यारोपणानंतर कोणत्याही उपचार किंवा वैद्यकीय फॉलो-अपशिवाय असहाय्य स्थितीत राहतात. ‘जीवंत दाता मौल्यवान अवयव देतो; त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये आणि त्याची प्रत्यारोपणानंतर योग्य काळजी घेतली पाहिजे,’ असे न्यायालयाने भारतीय ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन सोसायटी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावताना नमूद केले.न्यायालयाने म्हटले की ही यंत्रणा लिंग, प्रदेश आणि सामाजिक स्तराच्या मर्यादा ओलांडणारी असावी आणि देशातील सर्व राज्यांमध्ये समानपणे लागू व्हावी. अवयव प्रत्यारोपणासाठी सर्वांसाठी समान निकष असावेत, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 11:10 pm

IND vs SA : फक्त गिलच नाही तर ‘हा’स्टार खेळाडू देखील दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-११ मधून होणार बाहेर

Shubman Gill ruled out of IND vs SA Guwahati Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. गुवाहाटी येथे होणाऱ्या या निर्णायक कसोटीत कर्णधार शुबमन गिल खेळणार नसल्याचे आता निश्चित झाले आहे. गिलच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याच्या मानेला झालेला ताण अजूनही पूर्णपणे बरा न […] The post IND vs SA : फक्त गिलच नाही तर ‘हा’ स्टार खेळाडू देखील दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-११ मधून होणार बाहेर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 10:39 pm

डॉलर जोरात! सोनं-चांदी कोसळलं; बाजारात घबराटीचे वातावरण

नवी दिल्ली – अमेरिकेत व्याजदर कपात होण्याची शक्यता मावळल्यामुळे डॉलर बळकट होत आहे. त्याचबरोबर रशिया- युक्रेन युद्ध संपविण्यासाठी अमेरिका प्रयत्न वाढविणार आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीचे आकर्षण कमी झाले आहे. अशा परिस्थितीत या दोन धातूच्या दरात वेगाने घट होत आहे. दिल्ली सराफात गुरुवारी सोन्याचा दर 600 रुपयांनी घसरून 1 लाख 26 हजार […] The post डॉलर जोरात! सोनं-चांदी कोसळलं; बाजारात घबराटीचे वातावरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 10:35 pm

अमूलचा मोठा डाव! आता इस्रायलच्या बाजारात भारतीय दूध-तूपाची धमाकेदार एन्ट्री?

तेल अविव – अमूल कंपनी इस्त्रायलला अगोदरच तुपाची निर्यात करीत आहे. लवकरच इतर दुग्धोत्पादने इस्रायलला निर्यात करण्याची शक्यता पडताळण्यात येत आहे, असे या कंपनीची पालक कंपनी असलेल्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी सांगितले. सध्या पाठविले जात असलेले तूप इस्त्रायलमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांना पाठविले जात आहे. आता दूध आणि इतर […] The post अमूलचा मोठा डाव! आता इस्रायलच्या बाजारात भारतीय दूध-तूपाची धमाकेदार एन्ट्री? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 10:33 pm

शिक्षकांसह मुख्याध्यापकाकडून होणाऱ्या मानसिक छळामुळे शौर्यची आत्महत्या

शिक्षण व्यवस्थेतील मानसिक छळाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेतनवी दिल्ली (वृत्तसंस्था): प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीमध्ये शिकणाऱ्या सांगलीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेमध्ये हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. मंगळवारी दिल्लीतील मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून त्याने आत्महत्या केली. शौर्य प्रदीप पाटील असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव होते. तो नवी दिल्लीतील राजीवनगर भागात राहत होता. शौर्य हा मूळचा सांगली जिह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी होता.सांगलीच्या खानापूर तालुक्यातील प्रदीप पाटील हे सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षापासून दिल्ली येथे स्थायिक आहेत. त्यामुळे शौर्य हा त्यांच्या कुटुंबीयांसह दिल्लीतील राजीवनगर भागात भागात कुटुंबीयांसोबत राहत होता. दिल्लीच्या या धक्कादायक घटनेने शिक्षण व्यवस्थेतील मानसिक छळाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.१८ नोव्हेंबरला दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी नेहमीप्रमाणे शौर्य शाळेसाठी घरातून बाहेर पडला होता. त्याच दिवशी वडील आईच्या उपचारासाठी कोल्हापूरला जायच्या तयारीत होते. तेवढ्यात त्यांना शौर्य मेट्रो स्टेशनवरून खाली पडल्याची माहिती देणारा फोन आला. धावपळ करत रुग्णालयात पोहोचेपर्यंत डॉक्टरांनी शौर्यला मृत घोषित केले होते. या घटनेनंतर शौर्यची शाळेची बॅग तपासण्यात आली आणि त्यात एक चिठ्ठी मिळाली. त्या नोटमध्ये त्याने आई-वडिलांची माफी मागितली आणि आपल्या अवयवांचे दान करण्याची विनंती केली होती. पण सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे त्याने शाळेतील काही शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी केलेल्या मानसिक छळाचाच उल्लेख आत्महत्येचे कारण म्हणून केला होता.संबंधित शिक्षकांची पोलिसांकडून चौकशीवडील प्रदीप पाटील यांनी तक्रार दिल्यानंतर राजेंद्र नगर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक, को-ऑर्डिनेटर आणि दोन शिक्षकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून एका शिक्षिकेने ‘तुझ्या पालकांना बोलावून तुझे अॅडमिशन रद्द करेन’ अशा धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. १८ नोव्हेंबरला वर्गात शौर्यचा तोल जाऊन तो पडल्यावर, त्यावर थट्टा करत ‘हे सगळे नाटक आहे’, असे वर्गासमोर त्याला हिणवण्यात आले. शौर्य रडू लागल्यावरही ‘रडलास तरी मला काही फरक पडत नाही’ अशा शब्दांत त्याला अधिक त्रास दिला गेला, अशी माहिती मित्रांकडून मिळाली आहे. त्यावेळी मुख्याध्यापकही उपस्थित होते, पण त्यांनी हस्तक्षेप केला नाही, असा आरोप आहे. त्याच्या मृत्यूची चौकशी सुरु असून संबंधित शिक्षकांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. शिक्षण देणाऱ्यांकडूनच जर मानसिक छळ होत असेल, तर विद्यार्थी कोणाकडे पाहणार?

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 10:30 pm

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची दमदार सुरुवात

मुंबई : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया झाली. नियमानुसार अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली. या कालावधीत अर्ज मागे घेण्यात आल्यामुळे निवडक जागांवर भाजपने बिनविरोध विजय मिळवला. या विजयांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने दमदार सुरुवात केली.जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, जामनेर आणि सावदा या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा नगरसेवक पदाचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. भुसावळ येथे वार्ड क्र. ७ (अ) मधून भाजपच्या प्रीती मुकेश पाटील, जामनेरमध्ये वार्ड क्र. ११ (ब) मधून भाजपच्या उज्वला दीपक तायडे, सावदा मध्ये वार्ड क्र. ७ (अ) मधून भाजपच्या रंजना जितेंद्र भारंबे बिनविरोध विजयी झाल्या. एकाच दिवशी तीन नगरसेवकांचा बिनविरोध विजय झाला. जामनेर नगराध्यक्षपदी भाजपच्या साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली. मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी साधना महाजन सलग तिसऱ्यांदा बिनविरोध जामनेरच्या नगराध्यक्ष झाल्या आहेत. साधना महाजन यांनी जामनेरच्या नगराध्यक्षपदावर बिनविरोध विजयाची हॅटट्रिक केली.https://prahaar.in/2025/11/20/sadhana-mahajans-hat-trick-of-victories-as-jamner-mayor-unopposed/अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे नगरसेवकपदाचे उमेदवार होते. आल्हाद कलोती यांच्या प्रभागातून रिंगणात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारासह नऊ उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली आहे. या घडामोडीनंतर आल्हाद कलोती यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व उमेदवारांनी माघार घेणे पसंत केले. हा दूरदृष्टीचा विजय आहे, असे युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी सांगितले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे १७ उमेदवार आणि नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले. भाजपने निवडणुकीआधीच विजय मिळवला.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 10:30 pm

नेमक्या कोणत्या कारणामुळे पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या ?

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील महार वतनाच्या तब्बल ४० एकर जमिनीच्या नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष चौकशी समितीच्या अहवालातून समोर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र संचालक म्हणून कार्यरत असलेल्या ‘अमेडिया’ कंपनीशी संबंधित या व्यवहारात नोंदणी करताना नियमबाह्य पद्धतींचा अवलंब करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः, दस्त नोंदविताना जुन्या आणि वापरात नसलेल्या सातबारा उताऱ्याचा उपयोग करण्यात आला, तसेच ई-फेरफार (ई-म्युटेशन) प्रक्रिया टाळल्याचे अहवालात नोंदविण्यात आले आहे. याशिवाय, जमिनीचे स्वरूप स्थावर असताना ती जंगम मालमत्ता म्हणून नोंदविली गेल्यामुळेही संशय निर्माण झाला आहे.या जमिनीबाबत ‘अमेडिया’चे भागीदार दिग्विजयसिंह पाटील आणि जागेचे कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांच्यात खरेदी-विक्री करार झाला होता. मात्र संबंधित जमीन शासकीय स्वरूपाची आणि महार वतनात समाविष्ट असल्यामुळे तिची विक्री किंवा हस्तांतरण करणे नियमांनुसार मान्य नाही. या व्यवहाराची माहिती पुढे आल्यानंतर संपूर्ण प्रकरणावर चौकशीची आवश्यकता भासली आणि त्यासाठी नोंदणी उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आली. या समितीने तयार केलेला अहवाल नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांच्याकडे सादर करण्यात आला असून, निलंबित सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्या वर्तनाबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत.अहवालात म्हटले आहे की, दस्त नोंद करताना संबंधित भूखंडाचा अधिकृत ऑनलाइन सातबारा उतारा तपासणे अत्यावश्यक असतानाही, ते न करता अप्रचलित सातबारा दस्ताशी जोडण्यात आला. तसेच, उद्योग संचालनालयाकडून आवश्यक पात्रता प्रमाणपत्र नसतानाही मुद्रांक शुल्क सवलत मिळवून नोंदणी करण्यात आली. दस्ताची ई-म्युटेशन प्रक्रियेसाठी पाठवणी करताना स्थावरच्या जागी जंगम मालमत्ता हा पर्याय निवडण्यात आला, आणि संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ‘ऑफलाइन’ स्वरूपात हाताळण्यात आली.‘सर्व्हेअर’ यंत्रणेत अडचणी आल्यास नागरिकांना पर्याय म्हणून ऑफलाइन दस्त नोंदणीची सुविधा उपलब्ध असते. मात्र, या प्रकरणात त्या सुविधेचा वापर प्रत्यक्षात नियमांचं उल्लंघन करण्यासाठी झाल्याचे समितीने स्पष्टपणे अधोरेखित केले आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर, या व्यवहारात लक्षणीय अनियमितता झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी सुरु आहे.

फीड फीडबर्नर 20 Nov 2025 10:30 pm

AI शेअर मार्केटमध्ये उधाण! गुगलचे CEOच म्हणाले –‘फुगा फुटला तर सर्व काही संपेल

लॉस एंजल्स – कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि या क्षेत्रासाठी सेमीकंडक्टर तयार करणार्‍या कंपन्यांच्या शेअरच्या भावात गेल्या एक वर्षात अभूतपूर्व वाढ झाली आहे. एन व्हिडिवा या कंपनीच्या शेअरचा भाव तर इतका वाढला आहे की या कंपनीचे बाजार मूल्य भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त म्हणजे पाच लाख कोटी डॉलर इतके झाले आहेत. या क्षेत्रावर गुंतवरूकदार आवश्यकतेपेक्षा जास्त […] The post AI शेअर मार्केटमध्ये उधाण! गुगलचे CEOच म्हणाले – ‘फुगा फुटला तर सर्व काही संपेल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 10:28 pm

Prakash Abitkar : गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा; मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

मुंबई : गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे तसेच, एकही पात्र गिरणी कामगार हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगारांच्या घरांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह म्हाडा, नगर विकास […] The post Prakash Abitkar : गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा; मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 10:27 pm

रुपया कोसळला 88.71 वर! RBI गव्हर्नरचा मोठा खुलासा – डॉलरची मागणी वाढली, पण भारत सुरक्षित?

मुंबई – जागतिक आर्थिक आणि भूराजकीय परिस्थितीमुळे गेल्या काही महिन्यात रुपयाचे बरेच अवमूल्यन झाले आहे. गुरुवारी रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत 23 पैशांनी कोसळून 88 रुपये 71 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेला. चलन बाजारात रिझर्व बँक शक्यतो हस्तक्षेप करत नाही. सध्याचे रुपयाचे अवमूल्यन डॉलरची मागणी वाढल्यामुळे होत आहे, असे रिझर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी […] The post रुपया कोसळला 88.71 वर! RBI गव्हर्नरचा मोठा खुलासा – डॉलरची मागणी वाढली, पण भारत सुरक्षित? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Nov 2025 10:22 pm