Pimpri News: मराठवाडा मित्रमंडळ पॉलिटेक्निकचा आघाडीच्या दोन कंपन्यांसोबत सामंजस्य करार
प्रभात वृत्तससेवा पिंपरी – शैक्षणिक वातावरण समृद्ध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या करिअर संधीला बळ मिळण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मराठवाडा मित्रमंडळ पॉलिटेक्निकच्या संगणक विभागाने एन्थ्रॉलटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि फोराईज सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला . हा करार सैद्धांतिक ज्ञान आणि औद्योगिक पद्धतींमधील अंतर भरून काढणारा दूरगामी दृष्टिकोन दर्शवत दीर्घकालीन ध्येय साध्य करण्याची शाश्वती […] The post Pimpri News: मराठवाडा मित्रमंडळ पॉलिटेक्निकचा आघाडीच्या दोन कंपन्यांसोबत सामंजस्य करार appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तससेवा सोमेश्वरनगर – सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून सन २०२१ ते २०२४ या चार गाळप हंगामांतील एफ.आर.पी. आणि विलंबित रकमेवरील व्याज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. मात्र, या संपूर्ण यशाचे श्रेय कारखान्याच्या चेअरमनला नसून, शेतकरी कृती समितीच्या सातत्यपूर्ण लढ्याला आहे, असा थेट आरोप समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी केला आहे. कायद्यानुसार ऊस तुटल्यापासून १४ […] The post Baramati News: सोमेश्वर कारखान्याकडून विलंबित रक्कम अखेर जमा, पण लढा संपलेला नाही; कृती समितीचा इशारा appeared first on Dainik Prabhat .
Pimpri News: स्वच्छ पिंपरी-चिंचवडसाठी मोठे पाऊल! आयबीएमआर कॉलेजमध्ये आधुनिक कंपोस्ट युनिटचे लोकार्पण
प्रभात वृत्तससेवा पिंपरी – स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अभियान अधिक प्रभावीपणे व व्यापक पद्धतीने राबविण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “अ” क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक १० अंतर्गत आय.बी.एम.आर कॉलेज, इंदिरानगर येथे आधुनिक कंपोस्ट ड्रमचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सहा.आरोग्य अधिकारी राजू साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम उत्साहात पार पडला. महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमांना बळ […] The post Pimpri News: स्वच्छ पिंपरी-चिंचवडसाठी मोठे पाऊल! आयबीएमआर कॉलेजमध्ये आधुनिक कंपोस्ट युनिटचे लोकार्पण appeared first on Dainik Prabhat .
बदलत्या धोरणाने साखरपट्टा हैराण
वार्तापत्र : दक्षिण महाराष्ट्रदक्षिण महाराष्ट्राचा साखरपट्टा काळानुसार उद्योग-विकासाचा ठेवा असला तरी, आताची आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे. कारखान्यांनी इथेनॉल क्षमतेकडे वळण्यास मोठी गुंतवणूक केली. डिस्टिलरी व बायोइंधन युनिट उभारण्यावर हजारो कोटींची रक्कम कर्ज उभे करून गुंतवली आहे. ते सगळेच सध्या अडचणीत आहेत. उपायांवर तातडीने कृती न झाल्यास दक्षिण महाराष्ट्रातील साखर कारखानदारांची आर्थिक स्थिती आणखी बिकट होईल.सरकारने इथेनॉल ब्लेंडिंग वाढवण्यावर भर दिल्याने गेल्या काही वर्षांत तेल कंपन्यांकडून इथेनॉलची खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढवली गेली; परंतु मागील काही तिमाहींत खरेदीच्या पद्धतीत व प्रमाणात अनियमितता आणि अपेक्षित गती मिळाली नाही. सरकारी आकडेवारीनुसार इएसवाय अर्थात इथेनॉल सप्लाय इयर २०२३–२४ मध्ये एकूण ७०७ कोटी लिटर इतका इथेनॉल खरेदी/ब्लेंडिंग नोंदला गेला; परंतु २०२४–२५च्या सुरुवातीस मिळणाऱ्या आकडेवारीनुसार ब्लेंडिंगदर महिन्याअखेर बदलत राहिला; जुलै २०२५ मध्ये सरासरी ब्लेंडिंग सुमारे १९% वर नोंदले गेले. म्हणजे मागणीत काही प्रमाणात वाढ झाली असली तरी ती सर्वच कारखान्यांसाठी स्थिर करण्यात आलेली नाही. कारखान्यांनी इथेनॉल क्षमतेकडे वळण्यास मोठी गुंतवणूक केली. डिस्टिलरी व बायोइंधन युनिट उभारण्यावर हजारो कोटींची रक्कम कर्ज काढून गुंतवली आहे. माध्यमांमधील अहवालांनुसार साखर कारखाने आणि इतर उद्योगांनी इथेनॉल क्षमतेसाठी अंदाजे ४० हजार कोटींपर्यंत गुंतवणूक केली आहे; परंतु तेल कंपन्यांकडून खरेदीचे ठरावीक टेंडर व दीर्घकालीन खरेदी पर्याय न मिळाल्याने या गुंतवणुकीचा लाभ अपेक्षेनुसार प्राप्त होत नाही. अशा गुंतवणुकीवर घेतलेले कर्जही मोठे आहे आणि ते परतफेडीसाठी उद्योगाला दडपण वाढेल अशी चिंता आहे. हे दडपण शेवटी कारखान्यांची चाके रुतण्यापर्यंत वाढू शकते. सरकारकडून साखर निर्यातीवरील निर्बंध आणि धोरणात्मक निर्णयही उद्योगावर प्रभाव टाकतात. २०२३–२४ सीझनपासून भारताने मोठ्या प्रमाणावर निर्यातीवर मर्यादा आणल्या. २०२४ मध्ये निर्यातबंदी/मर्यादेचे निर्णय पडताळले गेले. पण या काळात पुरवठा साखळी बाधित झाल्यामुळे जागतिक बाजारात भारताचा पुरवठा कमी झाला आणि दरांची अनिश्चितता निर्माण झाली. एका अहवालानुसार सरकारने कधीकधी निर्यात मर्यादा आणि इथेनॉल प्रोत्साहनामुळे स्थानिक पुरवठा आणि इथेनॉलला प्राथमिकता दिली आहे; परंतु वास्तविक बाजारात त्यामुळे तत्काळ आर्थिक मदत कशी होईल हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.जागतिक साखर बाजारपेठेतील दरांमध्ये चढ-उतार अतिशय तीव्र आहेत. आंतरराष्ट्रीय फ्युचर्स आणि ट्रेडिंग डेटा दाखवतो की कधीकधी डॉलर/पाउंडच्या दरांमध्ये महिन्यांत ५–१०% चढ-उतार सामान्य झालेला आहे; किंबहुना २०२४–२५च्या काळात ब्राझीलच्या उत्पादनातील घट आणि भारतीय निर्यातीच्या मर्यादेमुळे जागतिक दरांवर दबाव पडला. ट्रेडिंग इकॉनॉमिक्सच्या स्रोतांनुसार जागतिक मागणी-पुरवठा संतुलन अनिश्चित असल्याने भारतीय कारखान्यांसाठी निर्यातातून अपेक्षित निराकरण वेळोवेळी बदलते. त्यामुळे स्थानिक विक्रीमुळे मिळणारी कमाईदेखील अस्थिर बनली आहे. दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांची स्वतःची आर्थिक आकडेवारीही स्पष्टच धोकादायक आहे. काही उद्योग अहवालांनुसार साखर उत्पादन अंदाज आणि ईथेनॉल व्हेरियबल्स विचारात घ्यावेत, तर २०२५ मध्ये देशस्तरीय शिल्लक व उत्पादन हा स्पष्ट अंदाजाबाहेर असून अनेक कारखान्यांवर कार्यकारी भांडवल आणि बँक कर्जांचे ताण वाढले आहे. भारतीय साखर कारखानदार संघटनेच्या ताज्या अंदाजानुसार नेट साखर उत्पादन व इथेनॉलकडे डायव्हर्जन या दोन्ही गोष्टींमुळे कारखाने वेगवेगळ्या परिणामांना सामोरे जात आहेत. अर्थात, महाराष्ट्र हे राज्य इथेनॉल क्षमतेमध्ये अग्रक्रमावर असले तरीही स्थानिक कारखान्यांना कर्ज परतफेडीसाठी तरलता मिळणे हे मोठे आव्हान ठरले आहे. स्थानिक पातळीवरील परिणाम गंभीर आहेत. ऊस खरेदीचे दर वाढत असताना साखरेचा विक्री दर स्थिर किंवा काही भागांत घटत असल्याने (काही ठिकाणी प्रति क्विंटल दरांमध्ये घट नोंदली गेली) कारखान्यांचा मॅर्जिन तुरळक झाला आहे. एफआरपीची कायदेशीर बांधिलकी असताना पैसे देण्यासाठी बँक कर्जावाचून कारखाने अडचणीत येतात. परिणामी शेतकऱ्यांना एफआरपी उशिरा मिळणे, थकबाकी वाढणे आणि पुढील हंगामासाठी तणाव सुरू झाले आहेत.या आर्थिक असमतोलामुळे काही लहान कारखाने तात्पुरते क्रशिंग थांबवण्याचा विचार करत आहेत, तर इतरांनी कर्ज स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. आता यासाठी लागणारी मदत आणि कर्ज देणार कोण? उपाय म्हणून साखर उद्योगाने तीन महत्त्वाचे मुद्दे नेहमीच मांडले आहेत. (१) केंद्राने इथेनॉलच्या खरेदीसाठी दीर्घकालीन, स्थिर आणि पारदर्शक टेंडर व किंमत धोरण आखावे (२) साखरेसाठी किमान आधारभाव किंवा समर्थन धोरण लागू करावे आणि (३) बँकांना कारखान्यांच्या तात्पुरत्या तरलतेसाठी सुलभ कर्ज/रीफायनान्सिंगची व्यवस्था द्यावी. या उपायांवर तातडीने कृती न झाल्यास दक्षिण महाराष्ट्रातील साखर कारखानदारांची आर्थिक स्थिती आणखी बिकट होईल आणि त्याचा परिणाम शेतकरी, मजूर व संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दिसेल. आकडेवारी सांगते, की, इथेनॉल ब्लेंडिंगची धोरणात्मक दिशा असूनही प्रत्यक्षात गुंतवणूक केलेल्या ४० हजार कोटींच्या कर्ज, व्याज प्रमाणात अपेक्षित परतावा देण्यास मार्ग न मिळणे, जागतिक बाजारातील अनिश्चितता व स्थानिक तरलतेचा तुटवडा हे सर्व एकत्र येऊन दक्षिण महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना गंभीर आर्थिक तणावात आणत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी धोरणात्मक स्पष्टता, बाजारात प्रवेश व आर्थिक सुलभता आवश्यक आहे.- प्रतिनिधी
एरवी गोवा हे तसे शांत राज्य. तिथे गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. अर्थात अगदी उत्तर प्रदेश किवा बिहारसारखी परिस्थिती नाही. पण तिथे क्लब संस्कृती रुजली आहे. या क्लब संस्कृतीत तल्लीन झालेले २५ जण या क्लबमध्ये जीवनाचा आनंद घेत असतानाच मृत्युमुखी पडले. ही घटना घडल्यानंतर आता या क्लबच्या उभारणीत अनेक गोष्टी समोर येत आहेत. या संपूर्ण घटनेला जबाबदार आहेत ती गोव्यातील भ्रष्टाचार आणि बेकायदा बांधकामे आणि त्यात बरबटलेले अनेकांचे हात. बर्च या उत्तर गोव्यातील लोकप्रिय क्लबमध्ये शनिवारी झालेल्या आगीच्या दुर्घटनेत २५ जण होरपळून ठार झाले. बेली डान्स चालू असताना हा प्रकार घडला आणि पहिला मजला आगीने संपूर्ण वेढला गेला. हा क्लब मिठागराच्या जमिनीवर बांधला होता आणि त्याच्यातून येण्या-जाण्यासाठी फारच चिंचोळा मार्ग होता. त्यामुळे डीजे सुरू असताना १५० लोक त्या अरुंद जागेत जमले होते आणि नंतर नृत्यांगनांनी हातात मेणबत्त्या घेऊन नाच सुरू केला आणि तेच खरे कारण होते असे सांगण्यात आले. हे तात्कालिक कारण झाले. नाच सुरू असताना फटाकेही फोडले जात होते. त्यामुळे आगीच्या ज्वाळांत लाकडी सिलिंग सापडले आणि आगीचा भडका उडाला. काही लोक खालच्या मजल्याकडे धावले; परंतु बेसमेंट किचनची जागा अरुंद असल्यामुळे २३ लोक गुदमरून मरण पावले. दोन जळालेले मृतदेह नंतर जिन्यावर सापडले. मुळात हा क्लब अत्यंत अरुंद जागेत होता आणि ही दुर्घटना घडण्यास खरे कारण आहे ते क्लब मालकाची अनिवार भूक आणि सगळे नियम धाब्यावर बसवून केलेली कामे. क्लबचा मालक सौरभ आणि गौरव लुथरा हे आहेत.गोव्यात झालेल्या या अग्नितांडवानंतर सर्वत्र शांतता होती. गोवा हे पर्यटन राज्य म्हणून विकसित आहे. तेथील अर्थव्यवस्थाही पर्यटनावरच चालते. पण ७ डिसेंबर हा दिवस गोव्याच्या पर्यटनाच्या इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल. जे लोक गोव्यात नव वर्ष साजरे करण्यासाठी येतात त्यांच्यावर आपल्या प्रियजनांसाठी शवपेटिका घेऊन जाण्याची वेळ आली. अनेक वर्षांपासून गोव्यातील नाईट लाईफ आणि क्बब संस्कृतीबद्दल आवाज उठवले जात आहेत. तेथे अनेकांना या नाईट लाईफचा मोह होतो आणि परिणामी दुर्घटना घडून त्यांचे जीव जातात. कालची घटना अशीच म्हणावी लागेल. एक तर गोव्यात बेकायदा बांधकामांवर कुणीही राजकीय नेता आळा घालू शकत नाही. गोव्यातील जो बीच साइडचा पट्टा आहे तो बेकायदेशीर आहे आणि त्याविरोधात सातत्याने आवाज उठवला तरीही राजकीय पक्ष त्याविरोधात कुणालाही कारवाई करू देत नाहीत. गेली अनेक वर्षे गोवा बेकायदेशीर बांधकामे, परवानाविरहित शॅक्स आणि नाईट क्लब्ज यांच्याशी लढत देत आहे. आगीच्या नियमांची पायमल्ली हे तर गोव्यातील रोजचे जीवन झाले आहे. या क्लबलाही फायर सेफ्टी नव्हती. त्यामुळे आग लागली, त्यात २५ जणांचे नाहक बळी गेले आणि येथील बेसमेंट तर पैसा आणि त्याच्या जोरावर राजकीय संरक्षण आणि नोकरशाहीचे वरदान यामुळे कायद्याचे राज्य पायाखाली तुडवले गेले आहे. त्यातून अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत. प्रत्येकवेळी नोकरशाही आगीपासून सुरक्षा यंत्रणा पुरवण्यात अपयशी ठरते आणि तरीही दुर्घटना घडली. सारे काही आलबेल होते. त्यामुळे बेसमेंट तर मृत्यूचे सापळे झाले आहेत.गोव्याच्या जीवनशैलीचा इथे गैरफायदा घेण्याची वृत्ती दिसून येते. गोव्यातील आगीची दुर्घटना ही केवळ प्रशासनाचे अपयश म्हणून पाहता येणार नाही, तर परवाने नसतानाही अशा क्लबमधून पैसा कमावण्याची भूक आहे. त्यामुळे २५ जणांचे हकनाक बळी गेले तरीही कुणालाही फारसा फरक पडणार नाही. आता अशी धक्कायदायक माहिती समोर आली आहे, की या क्लबला सेफ्टी क्लिअरन्स नव्हते. प्राथमिक सेफ्टी नॉर्म्स म्हणजे सुरक्षाविषयक निकषाचे पालनही करण्यात आले नाही. गोवा हे पर्यटन राज्य आहे आणि त्यामुळे येथे प्रत्येक पर्यटकांचा सन्मान झाला पाहिजे. पण नोकरशाही आणि क्लब मालकांची बेपर्वाई यामुळे लोकांचे जीव असुरक्षित आहेत. कालची दुर्घटना ही प्रशासकीय अपयशाचे आणि सेफ्टी नॉर्म्स म्हणजे सुरक्षेचे निकष पालन न करता मिळवलेले परवाने आणि त्यातून प्रशासनाची झालेली चांदी यांचे उदाहरण ठरावे. अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे, की त्यांना या क्लबकडे सुरक्षा निकषांची कमतरता आहे याची कल्पनाही नव्हती. ते खोटे बोलत आहेत किंवा त्यांना प्रसासकीय अपयशाची कल्पनाच नव्हती. सरकारने काही अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे आणि तातडीची मदत देऊ केली आहे. ते तर झालेच पण खरा प्रश्न हा आहे, की गोव्यातील प्रशासनाला स्वत:च्या जबाबदारीची जाणीव कधी होणार आणि कधी निरपराध लोकांचे जीव जाण्याचे थांबणार. या दुर्घटनेची व्याप्ती पाहता आता यात सरकारने ठोस काहीतरी करण्याची अपेक्षा आहे. गोव्यात राजकीय पक्ष नेहमीप्रमाणे राजकारणात गुंतले आहेत आणि त्यांच्यात भाजपविरोधात आग ओकणे सुरू झाले आहे, पण एक राजकीय पक्ष यास जबाबदार नाहीत तर येथील व्यवस्था आणि वर्षानुवर्षे चाललेले कुप्रशासन यास जबाबदार आहे. गोव्यात ऐन पर्यटन हंगामात ही दुर्घटना घडल्याने अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण हाच हंगाम गोव्यातील पर्यटनाला खऱ्या अर्थाने बहर येतो. त्याच काळात ही दुर्घटना घडल्याने गोव्याच्याच नाही तर भारताच्याच एकूण अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार आहे.
Baramati News: माळेगाव कारखान्याची पहिली उचल जाहीर; एफआरपीपेक्षा ‘इतके’रुपये जास्त मिळणार
प्रभात वृत्तससेवा माळेगाव – माळेगाव सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या गळितासाठी पहिली उचल म्हणून प्रतिटन ३३०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला. या हंगामासाठी कारखान्याचा एफ.आर.पी. दर ३२७० रुपये प्रतिटन निश्चित झाला असताना, संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या हिताचा […] The post Baramati News: माळेगाव कारखान्याची पहिली उचल जाहीर; एफआरपीपेक्षा ‘इतके’ रुपये जास्त मिळणार appeared first on Dainik Prabhat .
Bhigwan Accident: भिगवण-बारामती रोडवर अग्नितांडव; ट्रॅक्टर चालकाचा आगीत होरपळून दुर्दैवी अंत
प्रभात वृत्तससेवा भिगवण – भिगवण-बारामती रोडवरील पिंपळे गावच्या हद्दीत ट्रक आणि ट्रॅक्टर यांच्यात अपघात होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनाने पेट घेतल्यामुळे ट्रॅक्टर चालकाचा जागीच जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अपघातानंतर मृत चालकाचा जळून कोळसा झाल्याचे पहावयाला मिळाले. त्यामुळे प्रशासन आणि परिवहन विभागाने मोकाट ऊस वाहतुकीवर अंकुश ठेवून निष्पाप नागरिकांच्या जीवाचा विचार करावा, अशी मागणी […] The post Bhigwan Accident: भिगवण-बारामती रोडवर अग्नितांडव; ट्रॅक्टर चालकाचा आगीत होरपळून दुर्दैवी अंत appeared first on Dainik Prabhat .
ताथवडेत भीषण अपघात! भरधाव टेम्पोने दुचाकीला चिरडले; ५३ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
प्रभात वृत्तससेवा पिंपरी – भरधाव वेगातील आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. ६) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली.कुशेश्वर गेनौर प्रसाद (वय ५३) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. रिंकूकुमार मल्होत्रा (वय ३५, रा. एएमपीएल ट्रान्सपोर्ट, ताथवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी टेम्पो चालकाचे नाव आहे. सोनी कुशेश्वर प्रसाद (वय […] The post ताथवडेत भीषण अपघात! भरधाव टेम्पोने दुचाकीला चिरडले; ५३ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
Shankar Mandekar: जलजीवन मिशनच्या कामांची सखोल चौकशी करा; आमदार शंकर मांडेकर यांची मागणी
प्रभात वृत्तससेवा पिरंगुट – भोर – मुळशी – राजगड या तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत अनेक पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण व निकृष्ट दर्जाची झाली आहेत. सदर झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी केली आहे.याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. आमदार शंकर मांडेकर यांनी पुणे जिल्हा […] The post Shankar Mandekar: जलजीवन मिशनच्या कामांची सखोल चौकशी करा; आमदार शंकर मांडेकर यांची मागणी appeared first on Dainik Prabhat .
Matheran Election: मतांच्या कीमतीत विकासाचा पराभव; ९ वर्षांनंतर लोकशाहीच्या चौकटीत उघड झालेले वास्तव
प्रभात वृत्तससेवा माथेरान – तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या माथेरान नगरपरिषदेच्या निवडणुकीने केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार ठरवण्यापुरती मर्यादित न राहता, लोकशाही प्रक्रियेतील अनेक गंभीर आणि अस्वस्थ करणारे पैलू समोर आणले आहेत. २ डिसेंबर रोजी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असली, तरी त्याआधीच्या संपूर्ण निवडणूक काळात जे चित्र शहरात पाहायला मिळाले, ते लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर प्रश्नचिन्ह […] The post Matheran Election: मतांच्या कीमतीत विकासाचा पराभव; ९ वर्षांनंतर लोकशाहीच्या चौकटीत उघड झालेले वास्तव appeared first on Dainik Prabhat .
Rahu News: निधी मंजूर, तरीही काम ठप्प! राहू-नवले मळा रस्त्याची दयनीय अवस्था;ग्रामस्थांचा संताप अनावर
प्रभात वृत्तससेवा राहू – राहू ते नवले मळा या रस्त्यासाठी तब्बल 75 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. प्रशासकीय अनास्था आणि काही स्थानिक वादामुळे वर्षभरापासून रस्ता खोदून ठेवल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. या प्रकाराचा संताप व्यक्त करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून शासनाचा अनोखा निषेध केला आहे. […] The post Rahu News: निधी मंजूर, तरीही काम ठप्प! राहू-नवले मळा रस्त्याची दयनीय अवस्था;ग्रामस्थांचा संताप अनावर appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: सोशल मीडियावर भाई, पण वॉर्डात नाही! पिंपरी चिंचवडमध्ये डिजिटल उमेदवारांची भाऊगर्दी
प्रभात वृत्तससेवा पिंपरी – आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची औपचारिक घोषणा अद्याप व्हायची असली तरी राजकीय वातावरण तापू लागले आहे. मात्र, उमेदवारीपूर्व रिंगणात इच्छुकांची प्रचंड मोठी संख्या राजकीय पक्षांची परीक्षा घेणारी ठरत आहे. सोशल मीडिया, बॅनर, कटआऊट आणि डिजिटल प्रचाराची हवा करून इच्छुकांनी जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. परंतु प्रभाग पातळीवर जनतेशी नाळ जुळविणाऱ्या नेत्यांना […] The post PCMC Election: सोशल मीडियावर भाई, पण वॉर्डात नाही! पिंपरी चिंचवडमध्ये डिजिटल उमेदवारांची भाऊगर्दी appeared first on Dainik Prabhat .
दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक ९ डिसेंबर २०२५
पंचांगआज मिती मार्गशीर्ष कृष्ण पंचमी शके १९४७.चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग ऐद्र.चंद्र राशी कर्क,भारतीय सौर १८ मार्गशीर्ष शके १९४६. मंगळवार दिनांक ९ डिसेंबर २०२५ .मुंबईचा सूर्योदय ०७.०० , मुंबईचा सूर्यास्त ०६.०१ , मुंबईचा चंद्रोदय १०.४१ मुंबईचा चंद्रास्त ११.०५ राहू काळ ०३.१५ ते ०४.४८. शुभ दिवस-दुपारी-०२;३२ पर्यन्तदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : दैनंदिन कामे सुरळीत होतील.वृषभ : विचारांमध्ये बदल घडतील.मिथुन : आलेल्या संधीचा अवश्य फायदा घ्या.कर्क : नवीन योजना सफल होईल.सिंह : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.कन्या : प्रवासाचे योग आहेत.तूळ : एखादी नवीन संधी उपलब्ध होऊ शकते.वृश्चिक : मालमत्तेची कामे मार्गी लागतील.धनू : नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील.मकर : अपेक्षित सहकार्य लाभेल.कुंभ : महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल.मीन : मनोबल वाढून उत्साहात भर पडेल.
वाघोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा; जयश्री सातव पाटील यांचा नेल्सन मंडेला पुरस्काराने गौरव
प्रभात वृत्तससेवा वाघोली – वाघोली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि प्रभावी कार्याची दखल घेत नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.जागतिक पातळीवर देण्यात येणारा हा पुरस्कार समाजातील सकारात्मक बदल घडवणार्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यासाठी दिला जातो. जयश्रीताई सातव पाटील यांनी सरपंच पद भूषविताना […] The post वाघोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा; जयश्री सातव पाटील यांचा नेल्सन मंडेला पुरस्काराने गौरव appeared first on Dainik Prabhat .
खंबाटकी घाटात अपघात! ब्रेक निकामी झाल्याने ट्रकने ७ गाड्या उडवल्या; ट्रक चालक ताब्यात
प्रभात वृत्तससेवा भुईंज – पुणे ते सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील धोकादायक एस आकाराच्या वळणावर ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने त्याने सात वाहनांना ठोकारले. यामध्ये कोणतीही जीवित हानी आणि जखमी झाले नाही. मात्र गाड्यांचे मोठे नुकसान झाले. हा अपघात रविवारी सायंकाळी उशिरा झाला.या अपघातामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली. पोलिसांनी ट्रक चालक किशोर दमाजीभाई […] The post खंबाटकी घाटात अपघात! ब्रेक निकामी झाल्याने ट्रकने ७ गाड्या उडवल्या; ट्रक चालक ताब्यात appeared first on Dainik Prabhat .
Satara News: उरमोडी प्रकल्पास ४ हजार ४१४ कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता
प्रभात वृत्तससेवा सातारा – उरमोडी धरणातील पाणी सातारा, माण आणि खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध व्हावे, त्यासाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.कालच नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उरमोडी प्रकल्पासाठी ४४१४.२८ कोटी किंमतीची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. यामुळे या प्रकल्पाची उर्वरित […] The post Satara News: उरमोडी प्रकल्पास ४ हजार ४१४ कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता appeared first on Dainik Prabhat .
Suryakumar Yadav on Cuttack Red Soil Pitch : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना ९ डिसेंबर रोजी कटकच्या ऐतिहासिक बाराबाती स्टेडियमवर खेळला जाणार आहे. टी-२० विश्वचषक २०२६ च्या तयारीसाठी ही मालिका टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेमुळे संघ व्यवस्थापनाला आपल्या तयारीला अधिक मजबूत करण्याची चांगली संधी मिळणार […] The post Suryakumar Yadav : कटक टी-२० सामन्यापूर्वी सूर्याचे मोठे विधान! बाराबातीची ‘लाल मातीची’ खेळपट्टी भारताला देणार साथ? appeared first on Dainik Prabhat .
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड; कोल्हापूरात वादाचे पडसाद
बेळगाव/कोल्हापूर : कर्नाटकमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनासाठी बेळगावला जात असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटकात मराठी जनतेमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहे. कोल्हापुरात एसटी डेपोत जोरदार निदर्शने करून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला आहे. बेळगावात आजपासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने […] The post महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड; कोल्हापूरात वादाचे पडसाद appeared first on Dainik Prabhat .
नोव्हेंबरमध्ये किरकोळ वाहन विक्रीत वाढ
नवी दिल्ली – उत्सवानंतर नोव्हेंबर महिन्यात इतर क्षेत्रातील विक्री काही प्रमाणात कमी झाली असली तरी वाहन विक्री वाढली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी एस विघ्नेश्वर यांनी सांगितले की सर्वच प्रकारच्या वाहनांची विक्री वाढल्यामुळे वितरकांनी ग्राहकांना विकलेली वाहन विक्री नोव्हेंबर महिन्यात दोन टक्क्यांनी वाढून 33,00,832 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 32,31,526 […] The post नोव्हेंबरमध्ये किरकोळ वाहन विक्रीत वाढ appeared first on Dainik Prabhat .
Supreme Court : इंडिगोमुळे झालेला गोंधळ गंभीर बाब; सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल
नवी दिल्ली : इंडिगोने मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी झालेला गोंधळ ही गंभीर बाब आहे, असे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली. मात्र, न्यायालयीन हस्तक्षेप करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने केंद्र सरकारला […] The post Supreme Court : इंडिगोमुळे झालेला गोंधळ गंभीर बाब; सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल appeared first on Dainik Prabhat .
सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’हरपले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : श्रमिकांचे ‘बाबा’ अर्थात कष्टकरी, कामगारांचे नेते, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाने सामाजिक चळवळींचा आधारवड हरपला आहे, अशी शोकभावना व्यक्त करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ सामाजिक नेते बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आढाव यांचे निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींची भरून काढता येणार नाही अशी मोठी हानी झाली आहे, असेही […] The post सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on Dainik Prabhat .
बनावट बियाणे व खतांना रोखण्याची गरज
नवी दिल्ली – भारताचा कृषी क्षेत्राचा विकासदर समाधानकारक पातळीवर आहे. आणखी तो वाढण्याची गरज आहे. शेतकर्यांना बनावट बियाणे आणि खते मिळतात हा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे असे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. शेतकर्यांना त्यांच्या कृषी उत्पादनासाठी निश्चित आणि एकच भाव मिळत नाही. ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आहे. यातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर […] The post बनावट बियाणे व खतांना रोखण्याची गरज appeared first on Dainik Prabhat .
सेबी गुंतवणूकदार प्रशिक्षणासंदर्भातील नियम बदलणार
मुंबई – गुंतवणूकदारांना प्रशिक्षण देताना अनेक संस्था सध्या, बाजारातील सध्याच्या घडामोडीची आकडेवारी (करंट लाईव्ह मार्केट डेटा )वापरतात. यामुळे गुंतवणूकदारांची दिशाभूल होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत सध्याच्या घडामोडींची आकडेवारी इन्फ्लुएन्सरना किंवा प्रशिक्षकांना वापरता येणार नाही, अशा प्रकारचा नियम लवकरच बाजार नियंत्रक सेबी करणार आहे. सेबीचे अध्यक्ष तुहीन कांत पांडे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, यासंदर्भात […] The post सेबी गुंतवणूकदार प्रशिक्षणासंदर्भातील नियम बदलणार appeared first on Dainik Prabhat .
मुंबई – जगातील इतर मुख्य सहा चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य वेगाने कमी होत आहे. पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व व्याजदरात पाव टक्क्याची कपात करणार असल्यामुळे डॉलर कमकुवत होत आहे. मात्र या कमकुवत होत असलेल्या डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य मात्र कमी होत असल्याचे दिसून येते. सोमवारी रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत 44 पैशांनी घसरून 90.09 रुपये प्रति डॉलर […] The post Rupee Vs Dollar: सोमवारी रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत 44 पैशांनी घसरून 90.09 रुपये प्रति डॉलरवर, घसरण थांबेना appeared first on Dainik Prabhat .
Stock Market:…म्हणून किरकोळ गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज
मुंबई – भारताची स्थूल अर्थव्यवस्था भक्कम असताना जीएसटी दर कपात झाल्यानंतर विकासदराची विक्रमी आकडेवारी जाहीर झाली. त्यातच रिझर्व बँकेने गेल्या आठवड्यात पाव टक्के व्याजदर कपात करून दीड लाख कोटी रुपयांची भांडवल सुलभता उपलब्ध केली. असे असले तरी पुढील आठवड्यातील रिझर्वच्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी गुंतवणूकदारांनी तुफान नफेखोरी केली. अशा अवस्थेत किरकोळ गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज निर्माण […] The post Stock Market:…म्हणून किरकोळ गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज appeared first on Dainik Prabhat .
Sri Lanka : श्रीलंकेत पुन्हा दरडी-अतिवृष्टी कोसळण्याचा इशारा !
कोलंबो – दित्वाह चक्रिवादळाने केलेल्या थैमानानंतर झालेल्या विनासातून श्रीलंका अजूनही पुर्णपणे सावरलेली नसताना आता पुन्हा अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. श्रीलंकेतल्या प्रशासनाने रविवारी हा इशारा दिला आणि आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे. दित्वाह चक्रिवादळामुळे झालेले नुकसान अबूतपूर्व असून गेल्या दशकभरातील ही सर्वात विनाशकारी नैसर्गिक आपत्ती असल्याचे श्रीलंकेच्या प्रशासनाने म्हटले […] The post Sri Lanka : श्रीलंकेत पुन्हा दरडी-अतिवृष्टी कोसळण्याचा इशारा ! appeared first on Dainik Prabhat .
पुणे : राज्यातील पुरोगामी चळवळीला आणि शेतकरी-कामगार वर्गाला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते बाबा आढाव यांचे आज रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बाबा आढाव यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी पुना (Pune) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात जाऊन बाबा आढाव यांची भेट घेतली होती. पवारांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. सामाजिक क्षेत्रातील दोन मोठ्या नेत्यांचे ऋणानुबंध या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले होते. गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले होते. तेव्हाही शरद पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुराणा यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना आदरांजली वाहिली होती. सुराणा यांच्या निधनाची घटना ताजी असतानाच, लगेच बाबा आढावांसारख्या ज्येष्ठ नेत्याचे निधन झाल्याने, पुरोगामी आणि समाजवादी विचारधारेला मानणाऱ्या चळवळीसाठी ही दुहेरी आणि मोठी हानी मानली जात आहे. बाबा आढाव यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढण्यात समर्पित केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका लढवय्या पर्वाचा अंत झाला आहे.कष्टकऱ्यांसाठी लढणारे नेते बाबा आढाव यांचे आज रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील समाजवादी आणि पुरोगामी चळवळीचा एक मजबूत आधारस्तंभ कोसळल्याची भावना व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबा आढाव यांना प्रकृती गंभीर झाल्यामुळे गेल्या १० ते १२ दिवसांपासून पुण्यातील सुप्रसिद्ध पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयू (ICU) मध्ये ठेवण्यात आले होते. ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरू होते. मात्र, वृद्धापकाळामुळे आणि प्रकृतीची गंभीरता वाढल्याने उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, आज रात्री त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बाबा आढाव यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी, कामगार, रिक्षाचालक यांसारख्या असंघटित आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी समर्पित केले. त्यांच्या निधनाने कष्टकऱ्यांसाठी लढणारा एक निस्वार्थी नेता महाराष्ट्राने गमावला आहे, अशी भावना संपूर्ण राज्यात व्यक्त होत आहे.https://prahaar.in/2025/12/08/refund-passengers-money-without-charging-extra-fees-instructs-muralidhar-mohol-to-indigo/कोण होते बाबा आढाव?९५ वर्षांचे बाबा आढाव हे केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हते, तर ते महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाच्या चळवळीचे प्रेरणास्रोत होते. बाबा आढाव यांनी सार्वजनिक जीवनात ७० च्या दशकात सक्रिय भूमिका घेतली. ते तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि याच पक्षाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून कार्य केले होते. राजकीय जीवनासोबतच, त्यांनी आपले आयुष्य कष्टकरी समाजासाठी वेचले. ते पुण्यातील रिक्षा पंचायतीचे महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जात होते आणि त्यांनी रिक्षाचालकांच्या हक्कांसाठी मोठा लढा दिला. त्यांची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक ओळख म्हणजे 'एक गाव एक पाणवठा' या सामाजिक समतेच्या मोहिमेचे ते प्रणेते होते. गावागावात आजही दिसून येणाऱ्या अस्पृश्यता आणि भेदभावावर मात करण्यासाठी त्यांनी ही मोहीम चालवली आणि ती यशस्वी करून दाखवली.लढवय्या नेता ९३ व्या वर्षीही मैदानातज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी वयाच्या ९३ व्या वर्षीही आपल्या तत्त्वांशी कोणतीही तडजोड न करता, देशातील आणि राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य करत आंदोलन केले होते. त्यांच्या या कृतीने त्यांचा लढवय्या बाणा पुन्हा एकदा सिद्ध झाला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेवर बोलताना बाबा आढाव यांनी अत्यंत कठोर शब्दांत टीका केली होती. आजच्या राजकारणाची अवस्था सांगताना ते म्हणाले होते की, माणूस सकाळी कुठं असेल आणि संध्याकाळी कुठं असेल, सध्या अशी परिस्थिती आहे. कारण त्यांना केवळ सत्तेची भूक आहे. सत्तेसाठी सुरू असलेल्या या अस्थिर राजकारणावर भाष्य करताना त्यांनी १४० कोटी जनतेवर आपला विश्वास व्यक्त केला. बाबा आढाव म्हणाले की, हे नेते काय करत आहेत, हे जनता पाहत आहे; आणि जनताच ठरवेल, कोणाचं काय करायचं. त्याचबरोबर, राजकीय नेत्यांना जाणीव करून देत त्यांनी म्हटले की, काळ कठीण आहे, काळाचे भान ठेवा. सध्याचे राजकारण खूप विलक्षण आणि केवळ सत्तेसाठी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय परिस्थिती किती गंभीर झाली आहे, हे दर्शवताना त्यांनी एक वैयक्तिक अनुभव सांगितला. ते म्हणाले की, कॅनडामध्ये असलेले माझे कुटुंबीयही भारतात नेमकं काय चाललंय? असा प्रश्न विचारत आहेत. यावरून देशातील राजकारणाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी बिघडत आहे, यावर त्यांनी लक्ष वेधले.
IND vs SA : सलामीवीर कोण? संजू सॅमसन की शुबमन गिल? कर्णधार सूर्याने दिले थेट उत्तर
IND vs SA 1st T20I press match conference : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने कटक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. संघातील प्रमुख चर्चा होती की, सलामीची जबाबदारी कोणाला मिळणार संजू सॅमसनला की शुभमन गिलला? कर्णधाराने या विषयावर आपले मत स्पष्टपणे मांडले, तसेच […] The post IND vs SA : सलामीवीर कोण? संजू सॅमसन की शुबमन गिल? कर्णधार सूर्याने दिले थेट उत्तर appeared first on Dainik Prabhat .
पुण्यात थार चालकाचा धिंगाना; दारू पिऊन वाहन चालवत तीन गाड्यांना दिली धडक
पुणे : पुण्यातील पुरू सोसायटी परिसरात आज सकाळी अकरा वाजता थार वाहनचालकाने (क्र. MH-12-WP-6186) बेजबाबदार वाहन चालविल्याने भीषण अपघात झाला आहे. दारूच्या नशेत असलेल्या चालक जितेंद्र सिंह चहल यांनी अतिवेगात आणि बेदरकारपणे थार चालवताना प्रथम समोरून येणाऱ्या वॅगनआर कारला (क्र. MH-12-JU-3087) जोरदार धडक दिली. धडकेने थारचे नियंत्रण सुटल्याने ती पुढे जाऊन टेम्पोला (क्र. MH-12-LT-4521) धडकली. […] The post पुण्यात थार चालकाचा धिंगाना; दारू पिऊन वाहन चालवत तीन गाड्यांना दिली धडक appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली: ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आयोजित केलेल्या चर्चेचा उपयोग पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीचा अजेंडा सेट करण्यासाठी केल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटते आहे. तुष्टीकरणाच्या राजकारणावरून काँग्रेसला घेरताना, मोदींनी बंगालमध्ये भाजपसाठी पोषक ठरतील अशा भावनिक आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यांना हात घातल्याचे स्पष्ट दिसत आहे. तुष्टीकरण, विभाजन आणि ‘MMC’चा उल्लेख […] The post ‘वंदे मातरम्’ने सेट झाला बंगालच्या निवडणुकीचा अजेंडा? तुष्टीकरण आणि विभाजनाच्या मुद्द्यावर भाजपची ‘बॅटिंग’ appeared first on Dainik Prabhat .
म्यानमारमध्ये फुटबॉल सामना बघणाऱ्यांवर हवाई हल्ला !
बँकॉक – म्यानमारच्या लष्कराने गेल्या आठवड्यात सागाइंग प्रांतात एक हवाई हल्ला केला. त्यामध्ये किमान १८ सामान्य नागरिक ठार झाले आणि अन्य २० जखमी झाले आहेत. या प्रांतातल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवर हा हवाई हल्ला झाला. हा हल्ला ५ डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास मायाकान गावात झाला. हे गाव देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या मंडाले शहराच्या वायव्येला १२० […] The post म्यानमारमध्ये फुटबॉल सामना बघणाऱ्यांवर हवाई हल्ला ! appeared first on Dainik Prabhat .
Baba Adhav Death : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन; वयाच्या ९६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुणे : महाराष्ट्राच्या समाजसेवा आणि श्रमिक चळवळींचे प्रणे असलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव (बाबासाहेब पांडुरंग आढाव) यांचे आज पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने आयसीयूत दाखल होते. त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा, विशेषतः कष्टकरी आणि हक्कांसाठी लढणाऱ्यांचा एक मोठा आवाज हरपला आहे. बाबा आढाव कोण होते? डॉ. […] The post Baba Adhav Death : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन; वयाच्या ९६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास appeared first on Dainik Prabhat .
Suryakumar Yadav PC ahead T20 series against SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला मंगळवारपासून कटकच्या मैदानावर सुरुवात होत आहे. या मालिकेसह भारतीय संघ टी-२० विश्वचषक २०२६ च्या तयारीला औपचारिक सुरुवात करणार आहे. मात्र, भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने विश्वचषकाच्या तयारीबद्दल एक महत्त्वपूर्ण आणि दमदार विधान केले आहे. त्याने तयारीची […] The post Suryakumar Yadav : दोन दिवस आधी नव्हे, ‘या’ वेळेपासून वर्ल्ड कपची तयारी सुरू! सूर्याने सांगितला टीम इंडियाच्या यशाचा फॉर्म्युला appeared first on Dainik Prabhat .
'या'तारखेला १०३ वर्षांचा ब्रिटिशकालीन पूल पाडणार, कसं असेल मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक?
सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील जवळपास १०३ वर्षे जुना असलेला ब्रिटिशकालीन रोड ओव्हर ब्रिज अखेर पाडण्यात येत आहे. हा पूल १९२२ साली उभारण्यात आला होता. रेल्वेने १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० ते रात्री ७.३० या वेळेत ११ तासांचा मेगा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला असून, या काळात सोलापूर यार्डातील सर्व मेन लाईन आणि लूप लाईनवर वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. रेल्वेच्या या मेगाब्लॉकमुळे सोलापूर विभागातील हजारो प्रवाशांच्या रेल्वे प्रवासावर थेट परिणाम होणार आहे.या ब्लॉकमुळे सोलापूर विभागातील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून अनेक गाड्या रद्द, मार्गांतरित, उशिराने धावणार किंवा शॉर्ट-टर्मिनेट करण्यात येणार आहेत. विशेषतः सोलापूर–पुणे दरम्यानची इंटरसिटी (इंद्रायणी एक्सप्रेस) १४डिसेंबर रोजी कुर्डूवाडीपर्यंतच धावणार आहे. त्यामुळे सोलापूर–पुणे मार्गावरील प्रवाशांची गैरसोय वाढणार आहे. तसेच बागलकोट–म्हैसूर एक्सप्रेस त्या दिवशी १२.३० वाजता बागलकोटहून सुटेल.१४ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आलेल्या ९ गाड्यांमध्ये होस्पेट–सोलापूर डेमू, सोलापूर–पुणे डेमू, वाडी–सोलापूर डेमू, सोलापूर–दौंड डेमू विशेष यांसह एकूण नऊ स्थानिक व विशेष गाड्यांचा समावेश आहे. त्याच दिवशी नऊ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. गोलगुंबझ एक्सप्रेस, विजापूर–रायचूर पॅसेंजर, तिरुअनंतपुरम–मुंबई एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस, एलटीटी–विशाखापट्टणम, पुणे–सिकंदराबाद शताब्दी अशा प्रमुख लांब पल्ल्याच्या गाड्या पर्यायी मार्गांवरून धावतील.शॉर्ट-टर्मिनेशनमध्ये सर्वाधिक फटका सोलापूरकरांना बसणार आहे. पुणे–सोलापूर इंटरसिटी (इंद्रायणी) १४ डिसेंबर रोजी कुर्डूवाडीपर्यंतच येणार असून तेथूनच परतीस धावेल. त्याचप्रमाणे हसन–सोलापूर एक्सप्रेस १३ डिसेंबर रोजी कलबुर्गीपर्यंतच येणार आहे.१३ आणि १४ डिसेंबर रोजी काही लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने सुटतील. त्यात कन्याकुमारी–पुणे एक्सप्रेस, कोणार्क एक्सप्रेस, सिकंदराबाद–पुणे शताब्दी अशा गाड्यांचा समावेश आहे.१५ डिसेंबरला सकाळी ११.१० ते १३.४० या वेळेत २.५ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात सोलापूर–होस्पेट डेमू, होस्पेट–सोलापूर डेमू आणि सोलापूर–पुणे डेमू रद्द राहतील. त्याच दिवशी काही गाड्या 30 मिनिटांनी उशिराने सुटतील.१७ डिसेंबरला UP लाईनवर आणि १८–१९ डिसेंबरला DN लाईनवर प्रत्येकी ३.५ तासांचे ब्लॉक घेण्यात येणार आहेत. यामुळे सोलापूर–हसन, बागलकोट–म्हैसूर आणि कन्याकुमारी–पुणे एक्सप्रेससारख्या गाड्या उशिराने धावतील अथवा होटगीपर्यंतच येऊन परतीस निघतील.
बाणेरमधील आरोपीला दिल्लीतून पाच महिन्यांनंतर अटक
पुणे : बाणेर भागात रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यू प्रकरणी एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याऐवजी मरणासन्न अवस्थेत सोडून सदर चालक फरार झाला होता. इसाराईल गुर्जर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बाणेर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठाला वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. बाणेरमधील बालेवाडी फाटा चौकातून २० जुलैच्या सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास या ज्येष्ठ नागरिकाला रिक्षाने धडक दिली होती. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यावेळी रिक्षाचालक गुर्जर याने त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जातो, अशी थाप मारत स्वत: ची सुटका करुन घेतली. गुर्जरने रिक्षा गणेशखिंड रस्तामार्गे खडकीतील रेंजहिल्स परिसरात नेली. लोहमार्गाजवळील दाट झाडीत त्यांना सोडून गुर्जर फरार झाला. दरम्यान, ते गृहस्थ घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने बेपत्ता झाल्याची तक्रार बाणेर पोलीस ठाण्यात दिली. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह खडकीतील लोहमार्गाजवळ सापडला. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. रिक्षाचालक दिल्लीतील महिपालपूर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाणेर पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले.
अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप
नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला आठवडाभरात शेकडो उड्डाणे रद्द झाली असून अनेक फ्लाइटला उशीर झाला. डीजीसीएच्या फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (एफडीटीएल) नियमांच्या कडक अंमलबजावणीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या परिस्थितीत इंडिगोच्या एका वैमानिकाने नाव न सांगता लिहिलेल्या खुल्या पत्रामुळे वादाला नवे वळण मिळाले आहे. हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून कंपनीच्या अंतर्गत संस्कृतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.या गुप्त पत्रात वैमानिकाने कंपनीच्या व्यवस्थापनावर तीव्र टीका केली आहे. “इंडिगोची घसरण एका दिवसात झालेली नाही. अनुभवहीन आणि अयोग्य लोकांना उच्च पदांवर नियुक्त केल्यामुळे कंपनीचा पाया ढासळला,” असा गंभीर आरोप पत्रात करण्यात आला आहे. “कर्मचारी आणि वैमानिकांचा थकवा, सुरक्षितता आणि कामाचे तास यांची सातत्याने उपेक्षा करण्यात आली. थकवा किंवा जादा कामाबाबत तक्रार करणाऱ्या वैमानिकांना कार्यालयात बोलावून अपमानित केले जात होते. रात्रीच्या ड्युटी वाढवून कोणतेही अतिरिक्त वेतन दिले जात नव्हते. कर्मचारी आणि वैमानिक दोघांच्याही मनोबलावर याचा मोठा परिणाम झाला.” असे त्यात म्हटले आहे.कंपनीतील वातावरणाचे वर्णन करताना वैमानिक म्हणतो, “कंपनीत ‘‘बेगर्स हॅव नो चॉइस’अशा नावाने घेतल्या जाणाऱ्या सत्रांमध्ये आम्हाला अपमानित केले जात होते. खुर्च्या आणि पदांना बुद्धी व कौशल्यापेक्षा अधिक महत्त्व दिले जात होते. आजची परिस्थिती त्याच चुकीच्या संस्कृतीचे फलित आहे.” पत्रात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर बोट ठेवण्यात आले आहे. संकटाच्या काळात सीईओ नेदरलँड्समध्ये सुट्टीवर असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच काही जणांवर गैरव्यवस्थापन आणि ‘टॉक्सिक वर्क कल्चर’चा आरोप करण्यात आला आहे.वैमानिकाची सरकारला मागणीपत्राच्या शेवटी वैमानिकाने केंद्र सरकारला विमान कर्मचारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. ग्राउंड स्टाफसाठी किमान वेतन निश्चित करणे, प्रत्येक विमानासाठी किमान मनुष्यबळ अनिवार्य करणे, थकवा नियम (एफडीटीएल) पुन्हा तपासून वैमानिक व कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे या प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. त्याचे म्हणणे आहे की, वर्षानुवर्षे नफ्याच्या हव्यासामुळे आणि खर्चकपातीमुळे सुरक्षा आणि कामाचे वातावरण दोन्ही ढासळले असून आजची परिस्थिती त्याचेच परिणाम आहेत.
राज्यातील ४९ लाख जमिनी अधिकृत होणार
नागपूर : महाराष्ट्र सरकारने शेतजमिनीच्या तुकडेबंदी कायद्यात ऐतिहासिक सुधारणा करत मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरे आणि महानगर प्रदेशांतील अकृषिक झालेल्या जमिनींचे १९६५ ते २०२४ या कालावधीतील सर्व तुकडे विनाशुल्क नियमित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सुमारे ४९ लाख तुकडे एक पैसाही न भरता अधिकृत होणार असून, साधारण दोन कोटी नागरिकांना थेट मालकीहक्क मिळणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधानसभेत याबाबतचा अध्यादेश सादर केला. या अध्यादेशानुसार, शहरालगत आणि विकासक्षेत्रातील अकृषिक शेतजमिनींचे तुकडे पूर्णपणे मोफत नियमित होतील आणि खरेदीदारांचे नाव ७/१२ उताऱ्यावर मालक म्हणून नोंदले जाईल.१९४७ च्या बॉम्बे तुकडे प्रतिबंध कायद्यामुळे (सध्याचा महाराष्ट्र कायदा) शेत जमिनीचे छोटे तुकडे करण्यास बंदी होती. मात्र शहरांच्या विस्ताराबरोबर या जमिनी रहिवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक क्षेत्रात रूपांतरित झाल्या. लोकांनी त्या मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री केल्या, विभागल्या; परंतु कायद्याच्या भीतीमुळे ७/१२ व ८-अ वर नावे नोंदली गेली नाहीत. परिणामी बँक कर्ज, बांधकाम परवानगी, पुनर्विक्री असे अनेक व्यवहार रखडले. लाखो कुटुंबांना दस्तऐवज असूनही मालकीहक्कापासून वंचित राहावे लागले. या कायद्यात यापूर्वी २०१५-१६ मध्ये कलम ८ब जोडले होते, मात्र त्याचा फायदा फक्त अधिकृत लेआऊटमधील प्लॉटधारकांनाच मिळाला. २०१७ मध्ये २५ टक्के तर २०२५ मध्ये ५ टक्के प्रीमियमची तरतूद करण्यात आली होती; तरी मोठ्या दंडामुळे बहुतांश नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवली. आता नव्या अध्यादेशानुसार हे सर्व तुकडे ‘मानीव नियमित’ मानले जातील.सर्वसामान्यांना फायदा काय होणार?- १५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीतील सर्व तुकडे शून्य टक्के दंडात म्हणजेच विनामूल्य नियमित.- नोंदणीकृत खरेदीखत असल्यास थेट ७/१२ उताऱ्यावर खरेदीदाराचे नाव मालक म्हणून नोंद.- अनोंदणीकृत दस्त असल्यास आता सब-रजिस्ट्रारकडे नोंदणी करून ७/१२ वर नाव नोंदवता येईल.- लेआऊटमधील प्लॉटधारकांचेही नाव मालकासह ७/१२ वर येईल; यामुळे दशकानुदशके चाललेला गोंधळ संपुष्टात येईल.निर्णय कुठे-कुठे लागू होणार?- सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत हद्द- मुंबई (एमएमआरडीए), पुणे (पीएमआरडीए), नागपूर (एनएमआरडीए) महानगर प्रदेश- विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्र- एकसमान विकास नियंत्रण नियम अंतर्गत शहर-गावांच्या परिघीय नियोजन क्षेत्र- मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील सर्व प्रमुख शहरी व उपनगरीय भागातील अकृषिक झालेल्या शेतजमिनींचा यात समावेश आहे.दोन कोटी नागरिकांना कागदोपत्री मालकीहक्क मिळणारया निर्णयामुळे सुमारे ४९ लाख जमिनींचे तुकडे अधिकृत होऊन अंदाजे दोन कोटी नागरिकांना कागदोपत्री मालकीहक्क मिळेल. बँकेकडे गहाण ठेवणे, बांधकाम परवानगी मिळवणे, वारसा हक्क निश्चित करणे आणि जमीन बाजारात विक्री करणे सोपे होईल. गेल्या सहा-सात दशकांपासून अडकलेले व्यवहार एका झटक्यात मार्गी लागतील. राज्यातील लाखो कुटुंबांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
जास्तीचे शुल्क न आकारता प्रवाशांचे पैसे परत करा, मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश
पुणे : 'इंडिगो' च्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसलेल्या प्रवाशांकडून जास्तीचे शुल्क न आकारता प्रवाशांचे पैसे परत करा असे निर्देश कंपनीला देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ''प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची समिती नेमण्यात आली असून, अहवालानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाईल. ज्याची चूक असेल, त्याच्यावर कठोर कारवाई होईल'', अशी ग्वाही त्यांनी दिली. पिडीत प्रवाशांच्या तिकिटाचा परतावा आणि साहित्य परत करण्याबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयांची त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. विमान कंपन्यांच्या मनमानी कारभारावर त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयामार्फत तिकीट दरांवर मर्यादेसह प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. इतर विमान कंपन्यांनी वाढविलेले तिकीट दर नियंत्रणात आणले आहे. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे. स्थिती त्वरित सुधारण्यासाठी ‘फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन’ (एफडीटीएल) काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Nigeria News : नायजेरियामध्ये अपहरण झालेल्या 100 मुलांची सुटका
मिन्ना (नायजेरिया) : नायजेरियातल्या कॅथोलिक शाळेतून गेल्या महिन्यात अपहरण करण्यात आलेल्या मुलांपैकी १०० मुलांची सुटका करण्यात आली आहे, असे ख्रिश्चन असोसिएशन ऑफ नायजेरियाने आज सांगितले. पण अजूनही १०० पेक्षा जास्त मुले दहशतवाद्यांच्या ताब्यात असल्याचेही संस्थेने म्हटले आहे. नायजेरियातल्या निगेर प्रांतात २१ नोव्हेंबर रोजी हे अपहरण नाट्य घडले होते. सेंट मेरी कॅथोलिक शाळेवर काही सशस्त्र हल्लेखोरांनी […] The post Nigeria News : नायजेरियामध्ये अपहरण झालेल्या 100 मुलांची सुटका appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : ज्या राज्य बार कौन्सिलमध्ये अद्याप निवड प्रक्रिया सुरू झालेली नाही अशा ३० टक्के जागा महिला वकिलांसाठी राखीव ठेवाव्यात, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने सांगितले की, या वर्षी ज्या राज्य बार कौन्सिलच्या निवडणुका होणे अद्याप बाकी आहे त्यांनी २० टक्के जागा महिला उमेदवारांनी भरल्या […] The post State Bar Council : राज्य बार कौन्सिलमध्ये महिलांना 30 टक्के जागा द्याव्या; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश appeared first on Dainik Prabhat .
हैदराबाद: तेलंगणा सरकारने राज्याची ‘इनोव्हेशन इमेज’ अधिक मजबूत करण्यासाठी आणि जागतिक कंपन्यांशी असलेले संबंध दृढ करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि अनोखा निर्णय घेतला आहे. हैदराबाद शहरातील काही महत्त्वाच्या रस्त्यांची नावे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उद्योगपती रतन टाटा आणि गूगल, मायक्रोसॉफ्ट, विप्रो यांसारख्या जागतिक कंपन्यांच्या नावावर ठेवण्याचा प्रस्ताव आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाजवळच्या रस्त्याला […] The post डोनाल्ड ट्रम्प, रतन टाटा आणि गुगल यांच्या नावावर रस्त्यांची नावे ठेवणार, ‘या’ राज्य सरकारने घेतला निर्णय appeared first on Dainik Prabhat .
ठाकरे गटाचे १३ आमदार फुटणार? लवकर नावे जाहीर करणार, कॅबिनेट मंत्र्याच्या दाव्याने खळबळ
नागपूर : विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे यांनी शिंदेसेनेच्या २२ आमदारांच्या भाजप प्रवेशाचा दावा केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याला प्रत्युत्तर देत शिंदेसेना गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरेसेनेच्या १३ आमदारांबाबत मोठा दावा केला आहे. या आमदारांची नावे त्यांच्याकडे असून, वेळ आल्यावर जाहीर करणार असल्याचे शिरसाट म्हणाले. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमधील तणाव […] The post ठाकरे गटाचे १३ आमदार फुटणार? लवकर नावे जाहीर करणार, कॅबिनेट मंत्र्याच्या दाव्याने खळबळ appeared first on Dainik Prabhat .
थायलंडकडून कंबोडियाच्या सीमाभागात पुन्हा हवाई हल्ले.! सीमावादामुळे तणाव पुन्हा वाढला
Thailand-Cambodian border – थायलंडने सोमवारी कंबोडियाच्या सीमाभागात पुन्हा हवाई हल्ले केले आहेत पण दोन्ही देशांनी एकमेकांवर पहिल्यांदा हल्ले केल्याचा आरोप करत आहेत. थायलंड आणि कंबोडियामध्ये ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने शस्त्रसंधी करार करण्यात आला. पण तरीही दोन्ही देशांमध्ये एकमेकांबद्दलचा असंतोष खदखदत राहिला आहे. ही शस्त्रसंधी होण्यापुर्वी जुलै महिन्यात दोन्ही देशांमध्ये पाच दिवस […] The post थायलंडकडून कंबोडियाच्या सीमाभागात पुन्हा हवाई हल्ले.! सीमावादामुळे तणाव पुन्हा वाढला appeared first on Dainik Prabhat .
Gaurav Gogoi : मोदींना नेहरू, कॉंग्रेसचा उल्लेख करण्याची सवय; गौरव गोगोई यांची टीका
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्याही मुद्द्यावर बोलताना, भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू आणि काँग्रेसचा सतत उल्लेख करण्याची सवय आहे. ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान त्यांनी नेहरूंचे नाव १४ वेळा आणि काँग्रेसचे नाव ५० वेळा घेतले. जेव्हा संविधानाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त चर्चा झाली तेव्हा नेहरूंचे नाव १० वेळा आणि काँग्रेसचे नाव २६ वेळा घेतले गेले, […] The post Gaurav Gogoi : मोदींना नेहरू, कॉंग्रेसचा उल्लेख करण्याची सवय; गौरव गोगोई यांची टीका appeared first on Dainik Prabhat .
Mitchell Marsh retirement from red ball domestic cricket : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध अॅशेस कसोटी मालिका खेळत असतानाच, ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील एका स्टार खेळाडूने मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शने राज्य स्तरावरील ‘रेड-बॉल’ (लाल चेंडू) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे तो आता वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाकडून शेफील्ड शील्ड […] The post Mitchell Marsh Retirement : धक्कादायक! अॅशेस सुरू असतानाच मार्शचा मोठा निर्णय; ‘रेड बॉल’ क्रिकेटला ठोकला रामराम? appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : देशातील सर्वात स्वस्त विमानसेवा म्हणून मिरवणाऱ्या इंडिगो कंपनीची आठवड्याभरात काही हजार उड्डाणं रद्द झाली आहेत. कोणी कौटुंबिक कारणामुळे तर कोणी मुलाखत देण्यासाठी अथवा परीक्षेसाठी वा कामाच्या ठिकाणावर जाण्यासाठी म्हणून विमान प्रवास करत होते. कोणी लग्न, साखरपुडा आदी शुभकार्यांसाठी प्रवास करत होते. काही जण वैद्यकीय उपचारांसाठी विमानाने जात होते. पण सर्वांचे प्रवासाचे नियोजन कोलमडले कारण इंडिगोनं प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळाची गंभीर दखल केंद्र सरकारने तसेच डीजीसीएने घेतली आहे. डीजीसीएने नोटीस बजावताच इंडिगोने अनेक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन प्रवाशांची जाहीर माफी मगितली आहे.आता प्रवाशांनी काळजी करण्याची गरज नाही. फ्लाईट उशिरा येणार असेल किंवा रद्द झाली असेल, तर इंडिगो प्रवाशांना संपूर्ण रिफंड किंवा फ्लाईट री-शेड्युल करण्याची सुविधा सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देत आहे.रिफंड आणि री-शेड्युलिंग करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. प्रवाशांनी सर्वप्रथम इंडिगोच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ‘सपोर्ट’ या पर्यायावर क्लिक करायचे. त्यानंतर ‘प्लॅन बी’ हा पर्याय निवडल्यावर फ्लाईट बदलणे, तिकीट रद्द करणे किंवा रिफंड मिळवणे हे तीनही पर्याय उपलब्ध होतात. प्रवासी त्यांचा PNR/बुकिंग नंबर आणि ईमेल आयडी किंवा अंतिम नाव टाकल्यानंतर त्यांना दोन पर्याय मिळतात फ्लाईट री-शेड्युल करणे किंवा फ्लाईट रद्द करून पैसे परत घेणे. आवश्यक असल्यास प्रवासी नवीन तारीख किंवा वेळ निवडून त्यांचे प्रवास नियोजन बदलू शकतात.रिफंडची विनंती स्वीकारल्यानंतर साधारणतः सात कामकाजाच्या दिवसांत रक्कम संबंधित बँक खात्यात जमा होते. तिकीट जर कोणत्याही ट्रॅव्हल एजन्सीतून बुक केले असेल, तर रिफंडसाठी प्रवाशांना त्या एजन्सीशी संपर्क साधावा लागेल.सरकारकडून कडक सूचना मिळाल्यानंतर इंडिगोने रिफंड आणि प्रवासी सहाय्याची प्रक्रिया अधिक गतीने सुरू केली आहे. कंपनीने आतापर्यंत ६१० कोटी रुपये रिफंडच्या स्वरूपात परत केले असल्याचे सांगितले आहे. तसेच रद्द झालेल्या किंवा खूप उशिर झालेल्या फ्लाईट्सच्या री-शेड्युलिंगसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. प्रवाशांना मदत करण्यासाठी विशेष सपोर्ट सेल्स तयार करण्यात आले असून देशभरातील सुमारे ३००० गहाळ बॅगा संबंधित प्रवाशांना परत करण्यात आल्या आहेत; असेही इंडिगोने सांगितले आहे.
Prithviraj Chavan : विमान क्षेत्रातील मक्तेदारी देशासाठी धोकादायक : पृथ्वीराज चव्हाण
मुंबई : काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विमान वाहतूक क्षेत्रातील वाढत्या मक्तेदारीमुळे अर्थव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाला आहे आणि यामुळे प्रवाशांच्या हितावर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे. निष्पक्ष स्पर्धा होण्यासाठी संकटग्रस्त इंडिगोचे दोन कंपन्यांमध्ये विभाजन करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे. भारतातील हवाई प्रवासात आता फक्त दोन प्रमुख कपन्यांचे वर्चस्व आहे. या क्षेत्रात […] The post Prithviraj Chavan : विमान क्षेत्रातील मक्तेदारी देशासाठी धोकादायक : पृथ्वीराज चव्हाण appeared first on Dainik Prabhat .
Mohammed Shami 4 Wickets haul against Haryana in SMAT 2025 : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर असला, तरी त्याच्या गोलंदाजीतील आत्मविश्वास आणि धार किंचितही कमी झालेली नाही. निवड समिती त्याला कोणत्याही फॉरमॅटमध्ये संधी देत नसली तरी, शमी आपल्या मैदानातील कामगिरीने निवडकर्त्यांना मजबूत संदेश देत आहे. तो सध्या सय्यद मुश्ताक अली […] The post Mohammed Shami : मोहम्मद शमीचा कहर जारी…! वयाच्या पस्तीशीतही ‘SMAT’मध्ये ओकतोय आग, आकडेवारीने वेधलं लक्ष appeared first on Dainik Prabhat .
Elon Musk | Starlink subscription Plan : एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीची उपकंपनी स्टारलिंक लवकरच भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणार असून, कंपनीनं आपल्या मासिक सबस्क्रिप्शनची अधिकृत किंमत जाहीर केली आहे. दुर्गम, डोंगराळ आणि इंटरनेटपासून वंचित भागांमध्ये उच्च-गती इंटरनेट पोहोचवणे हा या सेवांचा मुख्य उद्देश आहे. कंपनीनं भारतासाठीच्या वेबसाइटवर रेसिडेन्शिअल प्लॅनचे दर अपडेट केले आहेत. […] The post Elon Musk : भारतात ‘स्टारलिंक’ सबस्क्रिप्शनची किंमत अखेर जाहीर; महिन्याला किती पैसे मोजावे लागणार? पाहा… appeared first on Dainik Prabhat .
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना दणका; 400 कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार, 18 कर्मचारी निलंबित
बीड : बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळविलेल्या कर्मचाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. बीड जिल्हा परिषदेतील सुमारे 400 कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाची थेट रुग्णालयांमध्ये तपासणी होणार आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत जिल्हा परिषदेतील 18 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण आयुक्ताचा पदभार घेतल्यानंतर राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या कर्मचाऱ्यांच्या तपासणीचे आदेश […] The post बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना दणका; 400 कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार, 18 कर्मचारी निलंबित appeared first on Dainik Prabhat .
Siddaramaiah : सिद्धरामय्या यांना सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस; नेमकं प्रकरण काय?
नवी दिल्ली : सन 2023 मध्ये झालेल्या राज्य निवडणूकीमध्ये वरुणा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या निवडून आले होते. त्यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सिद्धरामय्या यांना नोटीस पाठवताना, उत्तर मागितले आहे. मतदार संघातील मतदार असल्याचा दावा याचिका कर्त्याने केला असून निवडणूकीवेळी कॉंग्रेसच्या जाहीरनाञामध्ये पाच हमी देण्यात आल्या होत्या, मात्र लोकप्रतिनिधीत्व (आरपी) कायदा, […] The post Siddaramaiah : सिद्धरामय्या यांना सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस; नेमकं प्रकरण काय? appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज लोकसभेत ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीतावर विशेष चर्चा झाली. या चर्चेत सहभाग घेताना काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी ‘वंदे मातरम्’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हा महापुरुषांचा अपमान असल्याचे म्हंटले. काँग्रेसनेच या गीताला राष्ट्रीय गीत म्हणून घोषित केले, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेची सुरुवात केल्यानंतर प्रियांका गांधी […] The post लोकसभेत ‘वंदे मातरम्’वरील चर्चेदरम्यान प्रियंका गांधी काय-काय म्हणाल्या; वाचा त्यांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे appeared first on Dainik Prabhat .
एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलली; आयोगाने जाहीर केल्या नव्या तारखा
मुंबई : एमपीएससीची २१ डिसेंबर रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून आयोगाने नव्या तारखा जाहीर करून विद्यार्थ्यांच्या संभ्रमाला अखेर पूर्णविराम दिला आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या मतमोजणीमुळे परीक्षा त्या दिवशी घेणे शक्य नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले.एमपीएससी उमेदवारांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरत होती. निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबरलाच असल्याने परीक्षा आणि मतमोजणी एकाच दिवशी होणार का, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठी शंका निर्माण झाली होती. अखेर आयोगाने परिपत्रक काढून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.आयोगाच्या घोषणेनुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ आता नव्या तारखांना घेण्यात येणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा ४ जानेवारी २०२६ आणि ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. यासंबंधीचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार, २१ डिसेंबर रोजी परीक्षेच्या वेळेतच राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतींची मतमोजणी होणार होती. अनेक जिल्हा केंद्रांवर परीक्षा उपकेंद्र आणि मतमोजणी ठिकाणे अतिशय जवळ आहेत, लाऊडस्पीकरचा आवाज, मिरवणुकीमुळे होणारा गोंधळ, वाहतूक कोंडी, तसेच परीक्षा कर्मचारी उपलब्धतेची अडचण या कारणांमुळे परीक्षा सुरळीत घेणे अवघड होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या सर्व बाबींचा विचार करून आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर : विधानपरिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात जाहीर केली. तालिका सभापती म्हणून सदस्य सर्वश्री अमित गोरखे, कृपाल तुमाने, अमोल मिटकरी, धीरज लिंगाडे आणि सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सभापती प्रा. शिंदे यांनी जाहीर केले. तर विधानसभा तालिका अध्यक्षांची नावे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी जाहीर केली. विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी विधानसभा सदस्य सर्वश्री चैनसुख संचेती, किशोर आप्पा पाटील, डॉ. राहुल पाटील, उत्तमराव जानकर, रामदास मसराम, समीर कुणावार, श्रीमती सरोज अहिरे यांची नामनियुक्ती करण्यात आली आहे.यंदा नागपूरमध्ये ८ ते १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्याचे हिवाळी अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने झाली. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम’ या गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सभागृहात ‘वंदे मातरम’ गीताचे संपूर्ण गायन करण्यात आले. विधानसभेत आणि विधानपरिषदेत माजी मंत्री, माजी आमदार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव एकमताने मंजूर केला.राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी एकूण ७५ हजार २८६ कोटी ३८ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या मागण्यांमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कृषिपंप व वस्त्रोद्योग ग्राहकांना विद्युत सवलत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आदी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. यापैकी अनिवार्य खर्चासाठी २७ हजार १६७ कोटी ४९ लाख, कार्यक्रमांतर्गत ३८ हजार ५९ कोटी २६ लाख आणि केंद्र पुरस्कृत योजनांसाठी १० हजार ५९ कोटी ६३ लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. मात्र, या स्थूल रकमेचा निव्वळ भार ६४ हजार ६०५ कोटी ४७ लाख इतका असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.- महसूल व वन विभाग : १५,७२४.०८- उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग : ९,२०५.१०- नगर विकास विभाग : ९,१९५.७६- सार्वजनिक बांधकाम विभाग : ६,३४७.४१- महिला व बाल विकास विभाग : ५,०२४.४८- नियोजन विभाग : ४,८५३.९९- गृह विभाग : ३,८६१.१२- सार्वजनिक आरोग्य विभाग : ३,६०२.८०- जलसंपदा विभाग : ३,२२३.३९- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग : २,३१५.४४- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : २,३४४.५०- इतर मागास बहुजन कल्याण विभाग : १,७०३.९२- सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग : १,४७४.३५- आदिवासी विकास विभाग : १,४६१.५६- वैद्यकीय शिक्षण व औषधि द्रव्य विभाग : १,१८१.६२- ग्रामविकास विभाग : ७१८.८५- कृषी व पशु विभाग : ६१६.२१- कोशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग : ६०१.७०
ICC fines India for slow over rate : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका नुकतीच पार पडली, ज्यात टीम इंडियाने २-१ ने शानदार विजय मिळवला. कसोटी मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाने वनडेत जोरदार पुनरागमन केले खरे, पण या विजयानंतरही संघाला मोठा फटका बसला आहे. आयसीसीने दुसऱ्या वनडेतील एका चुकीसाठी भारतीय संघावर १० टक्के […] The post Team India : टीम इंडियाला मालिका विजयानंतर मोठा झटका! ICC ने केली मोठी कारवाई, नेमकं कारण काय? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
Pune Gramin : शिरूरमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताह आढावा बैठक उत्साहात संपन्न
शिरूर : तहसिलदार शिरूर यांच्या दालनामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाची आढावा बैठक तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे विभागप्रमुख आणि ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा या संस्थेचे पदाधिकारी आणि साधक उपस्थित होते. याप्रसंगी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय दिन ग्राहक […] The post Pune Gramin : शिरूरमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताह आढावा बैठक उत्साहात संपन्न appeared first on Dainik Prabhat .
Prashant Bamb : ”…तर प्रशांत बंब यांना काळं फासल्याशिवाय राहणार नाही”, ‘या’भाजप नेत्याने दिला इशारा
अमरावती : राज्यातील शिक्षकांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपा आमदार प्रशांत बंब पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. शिक्षकांना “लाडावलेले” संबोधत संपाच्या काळात वेतनकपात करण्याची आणि गरज भासल्यास “निलंबित करण्याची” मागणी प्रशांत बंब यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक शेखर भोयर यांनी आमदार बंब […] The post Prashant Bamb : ”…तर प्रशांत बंब यांना काळं फासल्याशिवाय राहणार नाही”, ‘या’ भाजप नेत्याने दिला इशारा appeared first on Dainik Prabhat .
‘वंदे मातरम्’ला 150 वर्षे: पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर मोठा हल्ला, म्हणाले –‘त्यामुळेच फाळणीला…’
नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुस्लिम लीगच्या दबावाखाली काँग्रेसने ‘वंदे मातरम्’चे काही भाग बदलले आणि त्यामुळेच देशाला फाळणीलाही सामोरे जावे लागले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष होते, तेव्हा मुस्लिम लीगच्या […] The post ‘वंदे मातरम्’ला 150 वर्षे: पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर मोठा हल्ला, म्हणाले – ‘त्यामुळेच फाळणीला…’ appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : महाराष्ट्रात मागील कही दिवसांपासून बिबट्याने उच्छाद मांडला आहे. वाघांचे, बिबट्यांचे नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या हल्ल्यात कोणी आपल्या घरचा कर्ता पुरुष गमावला आहे तर कोणी लहान मुले, घरातली कमावती माणसे गमावल्याने अनेकांची आर्थिक परिस्तिथी बिकट होत चालली आहे. गावागावांमध्ये नागरिक दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. काळोख पडू लागताच नागरिक दारं खिडक्या बंद करुन स्वतःला घरातच कोंडून घेऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभागाने महत्वाचा प्रस्तावावर विचार करत आहे.वाघ अथवा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील एका नातलगाला सरकारी नोकरीचे देण्याच्या प्रस्तावावर गंभीरपणे विचार सुरू आहे. कुटुंबातील कर्ती माणसे गेल्याने आर्थिक वाताहत, मुलांचे शिक्षण, घरखर्च, शेती, कर्ज या जबाबदाऱ्यांची ओझी होतात. त्यामुळे संबंधित कुटुंबावर आलेला आर्थिक भर लक्षात घेता सरकार लवकरच या संदर्भात सकारत्मक निर्णय घेऊ शकते अशी माहिती वन विभागातील सूत्रांनी दिली आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांत बिबट्या आणि वाघांच्या हालचाली वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी जनावरांवर हल्ले, तर काही प्रसंगी मानवांवरही हल्ले होऊन झाले आहेत. परिणामी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शासकीय नोकरीसंदर्भातला प्रस्ताव विचाराधीन असून लवकरच यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Baliraja Panand Road Scheme : ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजने’ला मंत्रिमंडळाकडून मान्यता
नागपूर : राज्यातील ग्रामीण भागातील शेती क्षेत्रांना जोडणाऱ्या सर्व हवामानात वाहन चालविण्यायोग्य रस्ते बांधण्यासाठी बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना १०० टक्के यांत्रिक पद्धतीने बांधकामांसाठी परवानगी देते. पावसाळ्यात शेतकऱ्यांना खराब झालेल्या किंवा दुर्गम रस्त्यांमुळे सतत आव्हानांना […] The post Baliraja Panand Road Scheme : ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजने’ला मंत्रिमंडळाकडून मान्यता appeared first on Dainik Prabhat .
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार? आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
नागपूर : विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून सरकारची भीती दिसत असल्याचा आरोप करत, आदित्य ठाकरे यांच्या एका दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महायुतीतील मित्रपक्षातील २२ आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळ येऊन पक्षांतराच्या तयारीत असल्याचा ‘गौप्यस्फोट’ त्यांनी केला आहे. हा […] The post राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार? आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट appeared first on Dainik Prabhat .
Sayaji Shinde : “राज ठाकरे मला खूप आवडतात…”; तपोवनातील वृक्षतोडीबाबत चर्चा, बैठकीत नेमकं काय ठरलं?
Sayaji Shinde | Raj Thackeray – नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेत सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात वृक्षप्रेमी आणि राजकीय पक्षातील नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत विरोध केला आहे. त्यावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. तसेच, सयाजी शिंदे यांनी तपोवनात जाऊन आंदोलन करत शासनाला देखील विनंती केली होती. याचं पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे यांनी मनसेचे […] The post Sayaji Shinde : “राज ठाकरे मला खूप आवडतात…”; तपोवनातील वृक्षतोडीबाबत चर्चा, बैठकीत नेमकं काय ठरलं? appeared first on Dainik Prabhat .
Jain Muni Nilesh Chandra : जैन मुन्नी निलेशचंद्र यांचा राज ठाकरेंना इशारा; म्हणाले…
मुंबई : जैन समाजाचे नेते तथा मुन्नी निलेशचंद्र यांनी कबुतरांना दाणा टाकण्याच्या मुद्द्यावरून मोठा जनजागृती अभियान सुरू केल्याची घोषणा केली आहे. याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट आव्हान देऊन संदेश दिला की, “तुम्ही मारवाडीला थोबाडीत मारायला सांगितलात तर आम्हीही तसाच बदला घेऊ. कबुतर रक्षक दल तयार करणार; प्रत्येक टॉवर-बिल्डिंगमध्ये जनजागृती निलेशचंद्र […] The post Jain Muni Nilesh Chandra : जैन मुन्नी निलेशचंद्र यांचा राज ठाकरेंना इशारा; म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .
लाडक्या बहिणींचा नोव्हेंबरचा हप्ता रखडला; दोन महिन्याचे ३००० रूपये जमा होणार?
मुंबई : लाडक्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्याचे १५०० रूपये अद्याप जमा झालेले नाहीत. राज्यात कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुका लागू शकतात. त्यामुळे महायुती सरकारकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे ३००० रूपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर टाकले जाऊ शकतात. नोव्हेंबर महिन्याचे १५०० रूपये ७ डिसेंबरपर्यंत खात्यावर येतील, असा अंदाज वर्तवला जात होता. पण अद्याप या हप्त्याबाबत सरकारकडून […] The post लाडक्या बहिणींचा नोव्हेंबरचा हप्ता रखडला; दोन महिन्याचे ३००० रूपये जमा होणार? appeared first on Dainik Prabhat .
Samsung : सॅमसंगच्या ‘या’दमदार स्मार्टफोन्सची भारतात होणार एन्ट्री; फीचर्स एकदा पाहाच…
Samsung Galaxy | Technology : सॅमसंगच्या २०२६ च्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, गॅलेक्सी एस२६, एस२६+ आणि एस२६ अल्ट्रा बद्दल एक मोठी लीक समोर आली आहे. कंपनी वन यूआय ८.५ सह अँड्रॉइड १६ सॉफ्टवेअरसह फोल्ड-सारखी कॅमेरा डिझाइन सादर करण्याची योजना आखत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एस२६ मालिकेत मोठे बदल होणार नाहीत, परंतु डिझाइन आणि वापरकर्त्याच्या अनुभवात किरकोळ सुधारणा […] The post Samsung : सॅमसंगच्या ‘या’ दमदार स्मार्टफोन्सची भारतात होणार एन्ट्री; फीचर्स एकदा पाहाच… appeared first on Dainik Prabhat .
Jemimah Rodrigues : स्मृती-पालाशचं लग्न रद्द झाल्यानंतर जेमिमाची ‘बी द मॅन आय नीड’ स्टोरी चर्चेत
Jemimah Rodrigues cryptic post viral : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांनी अखेर त्यांचे नातेसंबंध संपुष्टात आणल्याची अधिकृत घोषणा केली आहे. स्मृतीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लग्न रद्द झाल्याचे जाहीर केले, तर काही वेळाने पलाशनेही त्यांच्या नात्याचा शेवट झाल्याचे स्पष्ट केले. या घोषणेनंतर दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले […] The post Jemimah Rodrigues : स्मृती-पालाशचं लग्न रद्द झाल्यानंतर जेमिमाची ‘बी द मॅन आय नीड’ स्टोरी चर्चेत appeared first on Dainik Prabhat .
Aadhaar Card Updates : नागरिकांना आता ठिकठिकाणी आधार कार्डची फोटोकॉपी देण्याची गरज भासणार नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) लवकरच आधार व्हेरिफिकेशनसाठी नवा नियम लागू करणार आहे, ज्यामुळे हॉटेल, इव्हेंट ऑर्गनायझर यांसारख्या संस्थांकडून ग्राहकांच्या आधार कार्डची छायांकित प्रत कागदी स्वरूपात साठवून ठेवण्याच्या प्रथेला पूर्णविराम मिळेल. UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) भुवनेश कुमार यांनी पीटीआयला […] The post Aadhaar Card Updates: हॉटेलमध्ये चेक-इन करताना आधार कार्डची झेराॅक्स द्यायची गरज संपणार; नवा नियम काय आहे? appeared first on Dainik Prabhat .
Galwan War Memorial : ‘गलवान स्मारक’ नुतनीकरणानंतर पर्यटकांसाठी खुले
नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या सैनिकांना समर्पित स्मारक नुतनीकरणानंतर पर्यटकांसाठी रविवारपासून खुले करण्यात आले आहे. 15 जून 2020 च्या रात्री एलएसीवरील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याशी झालेल्या हिंसक चकमकीत वीस सैनिक शहीद झाले होते. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी हे स्मारक बांधण्यात आले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. हे […] The post Galwan War Memorial : ‘गलवान स्मारक’ नुतनीकरणानंतर पर्यटकांसाठी खुले appeared first on Dainik Prabhat .
Actor Dileep : लैंगिक अत्याचार प्रकरणात अभिनेता दिलीपची सुटका; न्यायालयाने स्पष्टच सांगितलं….
Actor Dileep | 2017 sexual assault case – २०१७ च्या बलात्कार प्रकरणात मल्याळम अभिनेता दिलीपला न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या केरळ न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. एका अभिनेत्रीच्या बलात्कार प्रकरणात दिलीपसह आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. तथापि, केरळ न्यायालयाने दिलीपला निर्दोष सोडले आहे. सत्र न्यायाधीश हनी एम. […] The post Actor Dileep : लैंगिक अत्याचार प्रकरणात अभिनेता दिलीपची सुटका; न्यायालयाने स्पष्टच सांगितलं…. appeared first on Dainik Prabhat .
Winter Session : विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न : आदित्य ठाकरे
नागपूर : ठाकरेसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करत, सत्ताधारी सरकारला नागरिकांशी संबंधित बाबींवर विधिमंडळात चर्चा नको आहे. राज्य सरकार भीतीने काम करत आहे. विधिमंडळात विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. सरकार इतके घाबरले आहे की ते विरोधी पक्षनेतेही पाहू इच्छित नाही. ही भीती लोकांना दिसत आहे. निवडणूक […] The post Winter Session : विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न : आदित्य ठाकरे appeared first on Dainik Prabhat .
Winter Session : विरोधी पक्षनेतेपद कधी नेमणार?; भाजप आमदाराने थेट वर्षचं सांगितलं
नागपूर : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असतानाच विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती रखडल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उबाठा) ने भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे केले असले, तरी महायुती सरकारने एक वर्ष उलटूनही ही नियुक्ती केलेली नाही. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांना थेट २०२९ ची वाट पाहण्याचा […] The post Winter Session : विरोधी पक्षनेतेपद कधी नेमणार?; भाजप आमदाराने थेट वर्षचं सांगितलं appeared first on Dainik Prabhat .
Priyank Kharge : विरोधी पक्षाला भान राहिले नाही; मंत्री प्रियांक खरगे यांची टीका
बेळगावी : भाजपला कर्नाटकातील विरोधी पक्ष म्हणून भान राहिले नाही. मक्यासाठी आधारभूत किंमत, उसासाठी एफआरपी केंद्राकडून ठरवली जाते. मात्र, ते केंद्र सरकरच्या अखत्यारित येणाऱ्या गोष्टींवर गप्प राहात आहेत. त्यांना जे करायचे ते करु द्या, त्यांनी कर्नाटकातील विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी सोडली आहे. त्यांनी केवळ क्षुल्लक मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे, अशी टीका कर्नाटकचे मंत्री […] The post Priyank Kharge : विरोधी पक्षाला भान राहिले नाही; मंत्री प्रियांक खरगे यांची टीका appeared first on Dainik Prabhat .
Share Market: शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स 610, निफ्टी 226 अंकांनी कोसळला
Share Market: भारतीय शेअर बाजारात आज (सोमवार, ८ डिसेंबर) मोठी पडझड पाहायला मिळाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, बेंचमार्क निर्देशांक धडाधड कोसळले आणि प्रमुख शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवली गेली. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आज ६०९.६८ अंकांच्या (०.७१%) मोठ्या घसरणीसह ८५,१०२.६९ अंकांवर बंद झाला. तर एनएसई निफ्टी ५० (NSE Nifty 50) […] The post Share Market: शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स 610, निफ्टी 226 अंकांनी कोसळला appeared first on Dainik Prabhat .
Nana Patole : केंद्र सरकार महागाई, घसरत्या रुपयावरुन लक्ष विचलित करत आहे; नाना पटोले यांचा दावा
नागपूर : केंद्रातील भाजप सरकार महागाई आणि रुपयाच्या घसरणी सारख्या महत्त्वाच्या मुद्यांवरुन लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा, कॉंग्रेस नेते आमदार नाना पटोले यांनी केला. सोमवारपासून सुरु हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यावेळी विधान भवन परिसरात नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पटोले यांना पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात बाबरी मशिदीच्या धर्तीवर बांधलेल्या […] The post Nana Patole : केंद्र सरकार महागाई, घसरत्या रुपयावरुन लक्ष विचलित करत आहे; नाना पटोले यांचा दावा appeared first on Dainik Prabhat .
धनंजय मुंडेंनी माझी 2.5 कोटींची सुपारी दिली; मनोज जरांगेचा आरोप
बीड : धनंजय मुंडे यांनी माझी 2.5 कोटींची सुपारी दिली होती. याबाबत तीन आरोपींनी कबुली दिली आहे. धनंजय मुंडे यांची चौकशी करा, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. सत्तेचा माज आहे. त्यामुळे चौकशी करत नाहीत. सत्ता गेल्यावर सोडणार नाही. तुमची सत्ता मराठा घालवणार असल्याची टीका जरांगे यांनी यावेळी केली. माझ्या घातपातामध्ये त्यांना […] The post धनंजय मुंडेंनी माझी 2.5 कोटींची सुपारी दिली; मनोज जरांगेचा आरोप appeared first on Dainik Prabhat .
Devendra Fadnavis : तर ठाकरे ब्रॅंडचा फुगा फुटेल.! देवेंद्र फडणवीसांची जळजळीत टीका
Devendra Fadnavis | Uddhav Thackeray | Raj Thackeray – नुकत्याच नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणूकांमध्ये विरोधी पक्षातील नेते आपल्याच कार्यकर्त्यांना विसरले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूका लढवल्या पण, नेत्यांनी त्यांना वाऱ्यावर सोडले. विरोधी पक्षातील नेते कार्यकर्त्यांसाठी मैदानात उतरलेच नाहीत. या निवडणूका हारलो तर आपल्याला महापालिकेच्या निवडणूकीत जो ठाकरे ब्रॅंड दाखवायचा आहे, त्याचा फुगा फुटेल. त्यामुळे त्यांनी […] The post Devendra Fadnavis : तर ठाकरे ब्रॅंडचा फुगा फुटेल.! देवेंद्र फडणवीसांची जळजळीत टीका appeared first on Dainik Prabhat .
मतमोजणीमुळे एमपीएससी परीक्षेच्या तारखेत बदल; आता ‘या’दिवशी होणार परीक्षा
MPSC Group B Preliminary Exam | नगरपरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी दि. २१ डिसेंबर रोजी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली. त्याच दिवशी एमपीएसीच्या पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमदेवार संभ्रमात पडले होते. यासंदर्भात एमपीएससीने परीक्षा त्याच दिवशी होणार की पुढे ढकलणार, याबाबत स्पष्टता करावी, […] The post मतमोजणीमुळे एमपीएससी परीक्षेच्या तारखेत बदल; आता ‘या’ दिवशी होणार परीक्षा appeared first on Dainik Prabhat .
Dipika Kakar: अभिनेत्री दीपिका कक्कड इब्राहिम सध्या लिव्हर कॅन्सरच्या उपचारांमधून जात आहेत. हा काळ त्यांच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर खूप कठीण ठरत आहे. उपचारांमुळे त्यांचे केस गळणे, वजन वाढणे, थकवा येणे असे दुष्परिणाम दिसत आहेत. तरीही दीपिका खंबीरपणे हा काळ पार करत आहेत. त्या म्हणतात, “पूर्ण बर व्हावं हेच सध्या माझं प्राधान्य आहे.” रिपोर्ट […] The post Dipika Kakar: “माझं वजन वाढलं, केस गळाले … पण मला काही तक्रार नाही”– कॅन्सरशी दोन हात करणारी दीपिका कक्कड appeared first on Dainik Prabhat .
जयपूर उच्च न्यायालय अन् कोटा जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी ; पोलिस सतर्क
Kota Collectorate Bomb Threat। राजस्थानमधील कोटा जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल मिळाल्याने कोटा जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा गोंधळात पडली. माहिती मिळताच, पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी तातडीने कारवाईला लागले आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर रिकामा केला आणि सुरक्षा व्यवस्था कडक केली. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत ईमेल पत्त्यावर धमकीचा ईमेल आला. ईमेलमध्ये धमकीची जबाबदारी स्वीकारणाऱ्या […] The post जयपूर उच्च न्यायालय अन् कोटा जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी ; पोलिस सतर्क appeared first on Dainik Prabhat .
“प्रत्येक परिस्थितीत सगळ्यांना एकत्र…”; रितेशने सासूबाईंसाठी शेअर केली आदरपूर्वक पोस्ट
Riteish Deshmukh | अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांची जोडी बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. जिनिलिया देशमुखची आई जीनेट डिसूजा यांच्यासाठी तिने खास पोस्ट शेअर केली होती. या खास प्रसंगी जिनिलियाने सोशल मीडियावर तिच्या आईला मिठी मारताना एक अतिशय गोड फोटो शेअर केरत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर रितेश देशमुखने देखील सोशल मिडियावर सासूबाईंसाठी […] The post “प्रत्येक परिस्थितीत सगळ्यांना एकत्र…”; रितेशने सासूबाईंसाठी शेअर केली आदरपूर्वक पोस्ट appeared first on Dainik Prabhat .
Skin Care Tips: क्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्टीत सुंदर दिसायचंय? मग आत्तापासून सुरू करा स्किन केअर!
Skin Care Tips: क्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्टीचं आकर्षण वर्षभर असतं. या खास दिवसांत प्रत्येकाला आपला लुक ग्लोइंग, फ्रेश आणि सगळ्यांपेक्षा वेगळा दिसावा असं वाटतं. पण पार्टीच्या दोन दिवस आधी स्किन केअर सुरू केल्याने जादू होत नाही. विशेषतः हिवाळ्यात त्वचा कोरडी, निस्तेज आणि खवट झालेली असते. त्यामुळे आजपासूनच योग्य स्किन रूटीन सुरू केल्यास तुमचा पार्टी […] The post Skin Care Tips: क्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्टीत सुंदर दिसायचंय? मग आत्तापासून सुरू करा स्किन केअर! appeared first on Dainik Prabhat .
‘Right to Disconnect’ Bill। भारतात कामाचे तास संपल्यानंतरही काम थांबत नाही. एकीकडे, देशात ७० तासांच्या कामाच्या आठवड्याची चर्चा जोरात सुरू आहे, तर दुसरीकडे, मानवी उत्पादकतेची तुलना आता एआयशी केली जात आहे. दरम्यान, एआयमुळे नोकऱ्या गेल्याच्या बातम्याही दररोज समोर येत आहेत. या वातावरणात, भारतातील कामगार वर्गासाठी एक नवीन विधेयक सादर करण्यात आले आहे, या विधेयकाला ‘राईट […] The post “ऑफिसनंतर बॉसचा फोन आला तर…” ; ‘राइट टू डिस्कनेक्ट’ आणखी कोणत्या देशात लागू आहे हा कायदा ? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
सप्तशृंगगड घाटात इनोव्हा कार ७०० फूट दरीत कोसळली; सहाजण ठार
सप्तशृंगगड : नांदुरी ते श्री सप्तशृंगगड घाटरस्त्यावर रविवारी ( दि.७) संध्याकाळी भाविकांची इनोव्हा कार सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन महिला आणि तीन पुरुष असे सहाजण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.घटनेची माहिती मिळताच सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या दोन रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन दल, रोपवे कर्मचाऱ्यांचे पथक आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले असून दरीत बचावकार्य सुरू आहे. वाहन खोल दरीत कोसळल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यास मोठी अडचण येत आहे. दोरीच्या सहाय्याने आपत्ती व्यवस्थापन दल दरीत उतरून मोबाईलच्या प्रकाशात मृतदेह शोधण्याचे काम करत आहे. ७०० फूट खोल दरी असलेल्या भवरीनाळा धबधबा घाट परिसरात इनोव्हा कार चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनावरील ताबा सुटून ते लोखंडी संरक्षक कठड्यावर आदळले. कठडा कमकुवत असल्याने वाहन थेट दरीत कोसळले. घटनेची माहिती मिळताच खासदार भास्कर भगरे आणि आमदार नितीन पवार यांनी प्रशासनाशी बोलून तातडीने मदतकार्य गतीमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.सर्व मृत पिंपळगाव बसवंत येथील रहिवासीअपघातात ठार झालेल्या सर्वजण पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. किर्ती पटेल, रशीलाबेन पटेल, विठ्ठल पटेल, लता विठ्ठल पटेल, पचन पटेल, मनिबेन पटेल.सार्वजनिक बांधकामवर कारवाईची मागणीग्रामपंचायत उपसरपंच संदीप बेनके आणि सदस्य राजेश गवळी यांनी घाटातील निर्दोष दुरुस्ती न केल्याचा आरोप करत सार्वजनिक बांधकाम विभागावर (पीडब्ल्यूडी) मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
भारत विरुद्ध द. आफ्रिका टी-२० चा रणसंग्राम!
‘कटक’मध्ये पहिला सामना; ‘अहमदाबाद’मध्ये अंतिम लढतमुंबई : के. एल राहुलच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेला २-१ ने धूळ चारल्यानंतर, आता भारतीय क्रिकेट संघ टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत त्यांच्याशी दोन हात करण्यास सज्ज झाला आहे. टी-२० विश्वचषक २०२६ च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही ५ सामन्यांची मालिका ९ डिसेंबरपासून कटक येथील सामन्याने सुरू होणार आहे.एकदिवसीय मालिकेत विराट कोहली, यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी शानदार शतके झळकावून भारतीय संघासाठी दमदार प्रदर्शन केले. आता टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा 'मिस्टर ३६०' अर्थात सूर्यकुमार यादव संघाची धुरा सांभाळणार आहे, तर आफ्रिकेची कमान एडन माक्ररम याच्या हाती असेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका क्रिकेट चाहत्यांसाठी मनोरंजक ठरणार आहे. दोन्ही संघात असे अनेक स्टार खेळाडू आहेत, जे काही चेंडूंमध्येच सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता ठेवतात. टी-२० क्रिकेटचे हे महारथी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी उत्सुक आहेत. ९ डिसेंबर रोजी कटकच्या मैदानावर मालिकेचा पहिला टी-२० सामना रंगणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ ११ डिसेंबरला न्यू चंदीगडमध्ये दाखल होतील. मालिकेतील तिसरा सामना १४ डिसेंबरला धर्मशाला येथील नयनरम्य मैदानात खेळला जाईल.सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेतही दमदार कामगिरी करण्यास उत्सुक असेल. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर हरवल्यानंतर, टीम इंडिया प्रोटीजविरुद्ध हीच लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. कर्णधार ‘सूर्या’ पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात कोणकोणत्या अकरा खेळाडूंना संधी देऊ शकतो हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र भारतीय संघासाठी चांगली बाब म्हणजे गिल दुखापतीतून सावरला आहे आणि तो संपूर्ण मालिकेत फलंदाजी करताना दिसेल. गिल, अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करताना दिसू शकतो. तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी खुद्द कर्णधार सूर्यकुमार यादव घेऊ शकतो, तर चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा खेळताना दिसण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनला पुन्हा एकदा मधल्या फळीत फलंदाजी करावी लागेल. सहाव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या आपल्या आक्रमक फलंदाजीने वर्चस्व गाजवू शकतो. भारतीय संघ अक्षर पटेलकडून फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीने जबरदस्त कामगिरीची अपेक्षा करेल. टी-२० मालिकेत जसप्रीत बुमराह आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांची परीक्षा घेताना दिसणार आहे. बुमराहच्या पुनरागमनामुळे अर्शदीप सिंगला बाहेर बसावे लागू शकते. बुमराहला हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे गोलंदाजीत साथ देतील. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी कुलदीप आणि वरुण चक्रवर्ती यांच्या हातात असेल आणि कुलदीप-वरुणला अक्षर पटेलची साथ मिळेल....असे आहेत संभाव्य संघभारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर.दक्षिण आफ्रिका : एडन माक्ररम (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), डोनोवन फरेरा, रीजा हेंड्रिक्स, मार्को जेनसन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, लुथो सिपामला आणि ट्रिस्टन स्टब्स.भारत विरुद्ध द आफ्रिका टी-२० मालिकेचे वेळापत्रक : पहिला टी-२० सामना : ९ डिसेंबर : कटक दुसरा टी-२० सामना : ११ डिसेंबर : चंदीगड तिसरा टी-२० सामना : १४ डिसेंबर : धर्मशाला चौथा टी-२० सामना : १७ डिसेंबर : लखनऊ पाचवा टी-२० सामना : १९ डिसेंबर : अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम)
महाराष्ट्र शासनाकडून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका ऐतिहासिक समारंभात, महाराष्ट्र सरकार आणि महावितरणने अधिकृतपणे घोषणा केली की राज्याने 'मागेल त्याला सौर पंप' उपक्रमांतर्गत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला. या योजनेत राज्याने एका महिन्यात एकूण ४५९११ सौरऊर्जा पंप स्थापना साध्य केले हा पहिल्यांदाच जागतिक विक्रम नोंदवण्यात महाराष्ट्र सरकार व महावितरणाला यश आले आहे. या सौरउर्जा योजनेत जगातील सर्वात मोठ्या आणि जलद अक्षय सिंचन उपयोजनापैकी एक मानली जाते.शक्ती पंप कंपनी १९८२ पासून नावीन्यपूर्णता आणि शाश्वततेसाठी ओळखली जाते या कंपनीच्या सहकार्याने पीएम कुसुम अंतर्गत सर्वाधिक देशांतर्गत बाजारपेठेतील वाटा असलेली कंपनीसह हा नवा विक्रमी प्रकल्प नोंदवला गेला. उपलब्ध माहितीनुसार, शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनी ही विक्रमी कामगिरीत सर्वात मोठे योगदान देणारी कंपनी ठरली. त्यांनी ८८४६ सौर पंप बसवले आहेत, जे कोणत्याही सहभागी कंपनीपेक्षा सर्वाधिक आहे.या सौर ऊर्जा प्रकल्पाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रयत्नासाठी ऑडिट केलेला विक्रमी कालावधी २७ ऑक्टोबर, रात्री १२:०१ ते २५ नोव्हेंबर, रात्री ११:५९ पर्यंत होता असे महाराष्ट्र सरकार व महावितरण यांच्या संयुक्त निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या कामगिरीचे अधिकृत सादरीकरण गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.'यामुळे महाराष्ट्र सौर शेतीसाठी भारतातील नंबर १ राज्य बनले आहे. ही कामगिरी सिंचन सुरक्षा सुनिश्चित करते, उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारते आणि पारंपारिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करते. राज्य सरकार ही गती वाढवण्यासाठी आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक लवचिक, शाश्वत आणि समृद्ध भविष्य निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) च्या पुढाकाराबद्दल त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित केले.'या कामगिरीमुळे महाराष्ट्र भारतातील सर्वात जलद सौर शेती करणारे राज्य आणि एकाच प्रशासकीय प्रदेशाद्वारे सौर पंप तैनात करण्याच्या प्रमाणात आणि गतीमध्ये जागतिक स्तरावर चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे' असे एका प्रेस निवेदनात म्हटले आहे.महाराष्ट्राने आतापर्यंत राज्यात ७.४७ लाख सौर पंप बसवले आहेत. १०.४५ लाख पंप बसवण्याचे लक्ष्य आहे.सरकारने सांगितले की सौर पंप बसवण्यासाठी दुष्काळग्रस्त क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पंपांचे आकारमान जमिनीच्या मालकीच्या आधारावर करण्यात आले होते. उदा. २.५ एकरपर्यंतच्या जमिनीसाठी ३ अश्वशक्तीचे पंप, ५ एकरपर्यंतच्या जमिनीसाठी ५ अश्वशक्तीचे पंप आणि मोठ्या शेतांसाठी ७ अश्वशक्तीचे पंप बसवण्यात आले.
भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव
उत्तर प्रदेश : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर आहे. देशात मुंबईलाही खास महत्त्व आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की एका शहराचे नाव २१ वेळा बदलले गेले आहे. हे शहर म्हणजे उत्तर प्रदेशातील कानपूर. याचे नाव भूतकाळात सुमारे २१ वेळा बदलले आहे. हे शहर त्याच्या संस्कृती, शैली आणि पाककृतीसाठी प्रसिद्ध आहे.कानपूरचे मूळ नाव कान्हापूर होते. त्याची स्थापना हिंदू सिंह चंदेल यांनी केली होती. त्यानंतर या शहराचे नाव वेळोवेळी बदलले आहे. मुघलांपासून ब्रिटिशांपर्यंत सर्वांनी त्याच्या नावात बदल केलेला आहे.ब्रिटिश राजवटीत कानपूर हे सत्तेचे एक प्रमुख केंद्र होते. कानपूरचे नाव शेवटचे १९४८ मध्ये बदलण्यात आले असे म्हटले जाते. मात्र त्यानंतर या शहराचे नाव बदललेले नाही. ब्रिटिश राजवटीत या शहराल कॉनपूर असे म्हटले जात होते, मात्र स्वातंत्र्यानंतर या शहराचे नाव कानपूर असे करण्यात आले आहे. त्या काळात ते एक मजबूत औद्योगिक केंद्र म्हणून विकसित झाले होते.
नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून नागपूर येथे सुरू झाले. या अधिवेशनाची सुरुवात देशाचे राष्ट्रीय गीत असलेल्या वंद मातरमने झाले. विधान परिषदेत संपूर्ण वंदे मातरम गीत सामूहिकपणे गायले गेले.वंदे मातरम्!सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्,शस्यश्यामलाम्, मातरम्!वंदे मातरम्!महाराष्ट्र विधिमंडळाच्या 'हिवाळी अधिवेशन 2025'ची सुरुवात...#Maharashtra #Nagpur #WinterSession2025 pic.twitter.com/qBCdTbOi0h— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 8, 2025नियोजनानुसार विधान परिषदेत कामकाज दुपारी बारा वाजता सुरू झाले. कामकाजाची सुरुवात वंदे मातरम आणि राज्यगीताने झाली.या वर्षी, वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त, सभागृहात संपूर्ण गीत सामूहिकपणे गायले गेले. सदस्यांनी उभे राहून आदरपूर्वक गीत गायले, ज्यामुळे सभागृहात एक विशेष वातावरण निर्माण झाले.वंदे मातरम आणि राज्यगीतानंतर, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विभागीय मंत्र्यांनी त्यांच्या संबंधित मंत्रालयांशी संबंधित विविध अध्यादेश मांडले. यामध्ये महसूल, पणन, ग्रामीण विकास आणि कामगार विभागांशी संबंधित अध्यादेशांचा समावेश होता.जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या 'हिवाळी अधिवेशन 2025'चा प्रारंभ...#Maharashtra #Nagpur #WinterSession2025 pic.twitter.com/VZSroPitKJ— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 8, 2025
भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर
नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची (प्रत्यार्पणाची) मागणी करत आहे. याबाबत आता भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे. भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्या निर्णयामागे बांगलादेशातील परिस्थिती कारणीभूत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा परराष्ट्रमंत्र्यांना विचारण्यात आले की, शेख हसीना जितका काळ इच्छितात तितका काळ भारतात राहू शकतात का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “हा वेगळा प्रश्न होता. त्या काही खास परिस्थितींमध्ये येथे आल्या, पण निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल.” परराष्ट्र मंत्र्यांनी हेही स्पष्ट केले की भारत हा बांगलादेशचा शुभचिंतक आहे.भारत-बांगलादेश संबंधांबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले की, बांगलादेशच्या विद्यमान नेतृत्वाने मागील निवडणुकीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी सांगितले की, जर मुद्दा निवडणुकीचा असेल, तर सर्वप्रथम निष्पक्ष निवडणुका होणे अत्यावश्यक आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी यावर जोर दिला की,भारताला बांगलादेशात स्थिरता आणि लोकशाहीची वैधता टिकून राहावी असे वाटते. पुढे त्यांनी सांगितले त्यांना विश्वास आहे की बांगलादेशातील लोकशाही प्रक्रियेतून जेही नेतृत्व पुढे येईल, ते भारताशी असलेल्या संबंधांविषयी संतुलित आणि परिपक्व दृष्टिकोन ठेवेल, ज्यामुळे परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर भारत–बांगलादेश संबंधांमध्ये किंचित तणाव निर्माण झाला आहे, हेही त्यांनी मान्य केले. गेल्या महिन्यातच बांगलादेशात मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बांगलादेश सरकारच्या मागणीवर भारत सरकारने अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ७५ हजार २८६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी एकूण ७५ हजार २८६ कोटी ३८ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या मागण्यांमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कृषिपंप व वस्त्रोद्योग ग्राहकांना विद्युत सवलत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आदी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. यापैकी अनिवार्य खर्चासाठी २७ हजार १६७ कोटी ४९ लाख, कार्यक्रमांतर्गत ३८ हजार ५९ कोटी २६ लाख आणि केंद्र पुरस्कृत योजनांसाठी १० हजार ५९ कोटी ६३ लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. मात्र, या स्थूल रकमेचा निव्वळ भार ६४ हजार ६०५ कोटी ४७ लाख इतका असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.राज्यातील विविध विभागांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या या पुरवणी मागण्या मुख्यत्वे आपत्ती व्यवस्थापन, कृषी व ऊर्जा क्षेत्रातील सवलती, महिला सशक्तीकरण, ग्रामीण रोजगार, आरोग्य व नगर विकास यांसारख्या प्राधान्य क्षेत्रांना भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी आणि आपत्ती प्रतिसाद निधीसाठी सर्वाधिक १५ हजार ६४८ कोटी रुपयांची तरतूद आहे. यानंतर कृषिपंप, यंत्रमाग व वस्त्रोद्योग ग्राहकांना विद्युत शुल्क सवलत आणि प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी ९ हजार २५० कोटी रुपयांची व्यवस्था प्रस्तावित आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ६ हजार १०३ कोटी २० लाख, तर केंद्राकडून भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत ५० वर्ष बिनव्याजी कर्ज म्हणून ४ हजार ४३१ कोटी ७४ लाख रुपयांचा समावेश आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या केंद्र व राज्य हिस्स्यासाठी ३ हजार ५०० कोटी, महानगरपालिका व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना मूलभूत सुविधा विकासासाठी विशेष अनुदान म्हणून २ हजार २०० कोटी, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी ३ हजार कोटी, परिवहन विभागाच्या विविध खर्च व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला विशेष अर्थसहाय्यासाठी २ हजार ८ कोटी १६ लाख अशा प्रमुख तरतुदी आहेत. याशिवाय अमृत २.० आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० साठी २ हजार ५०० कोटी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानासाठी ५२७ कोटी ६६ लाख, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानासाठी ९ हजार ७७८ कोटी ७८ लाख, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत अभियानासाठी ३ हजार २८१ कोटी ७१ लाख यांचा उल्लेख आहे.मुद्रांक शुल्क अधिभार परतफेडसाठी २ हजार ५०० कोटी, संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी ३०० कोटी, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी ४०० कोटी, घरकुल योजनांसाठी (प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना) ६४५ कोटी, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसाठी १ हजार ६१५ कोटी ३५ लाख, सारथी, बार्टी, महान्योती व वनार्टी संस्थांना विविध योजनांसाठी ४६५ कोटी आणि विविध पाटबंधारे विकास महामंडळांना नाबार्डकडून दीर्घ मुदतीचे कर्ज म्हणून २६१ कोटी ६४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.कोणत्या विभागाला किती निधी ?- महसूल व वन विभाग : १५,७२४.०८- उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग : ९,२०५.१०- नगर विकास विभाग : ९,१९५.७६- सार्वजनिक बांधकाम विभाग : ६,३४७.४१- महिला व बाल विकास विभाग : ५,०२४.४८- नियोजन विभाग : ४,८५३.९९- गृह विभाग : ३,८६१.१२- सार्वजनिक आरोग्य विभाग : ३,६०२.८०- जलसंपदा विभाग : ३,२२३.३९- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग : २,३१५.४४- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : २,३४४.५०- इतर मागास बहुजन कल्याण विभाग : १,७०३.९२- सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग : १,४७४.३५- आदिवासी विकास विभाग : १,४६१.५६- वैद्यकीय शिक्षण व औषधि द्रव्य विभाग : १,१८१.६२- ग्रामविकास विभाग : ७१८.८५- कृषी व पशु विभाग : ६१६.२१- कोशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग : ६०१.७०
पुणे: देशभरातील मुस्लीम महिलांच्या जीवनात अस्थिरता निर्माण करणाऱ्या बहुपत्नीत्व प्रथेला तातडीने कायदेशीर बंदी घालावी, अशी मागणी भारतीय मुस्लीम महिला आंदोलन (बीएमएमए)या संघटनेने केंद्र सरकारकडे केली आहे. सात राज्यांमध्ये घेतलेल्या विस्तृत सर्वेक्षण अहवालाच्या निष्कर्षांवर आधारलेल्या या मागणीला देशभरातील ३०० हून अधिक प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला आहे. या सर्वेक्षणातून मिळालेल्या आकडेवारीतून मुस्लीम महिलांची स्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट झाल्याचे नमूद केले आहे. बहुपत्नीकत्वामुळे ६९ टक्के महिला प्रचंड मानसिक तणावाखाली, ७९ टक्के महिलांना पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती वेळेवर मिळाली नाही, ४८ टक्के महिलांना शिक्षणाचा अभाव असल्याचे आढळले आहे.

26 C