SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
... ...View News by News Source

भारताच्या ‘या’अष्टपैलू खेळाडूचा क्रिकेटला रामराम; IPLमध्ये गाजवले होते मैदान

बेंगळुरू: २०२५ हे वर्ष संपण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आली आहे. कर्नाटकचा दिग्गज फिरकीपटू आणि आक्रमक फलंदाज कृष्णप्पा गौतम याने २२ डिसेंबर रोजी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. सुमारे १४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर त्याने पॅव्हेलियनकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकचा ‘मॅच विनर’ गोलंदाज कृष्णप्पा गौतमने २०१२ मध्ये आपल्या व्यावसायिक क्रिकेट कारकीर्दीला […] The post भारताच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूचा क्रिकेटला रामराम; IPLमध्ये गाजवले होते मैदान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 7:26 pm

ऑनलाइन फसवणुकीचा धक्का: पंजाबचे माजी आयजी अमर सिंह चहल यांचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक

पटियाला: पंजाब पोलीस दलातील माजी आयपीएस अधिकारी आणि निवृत्त महानिरीक्षक (IG) अमर सिंह चहल यांनी सोमवारी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण पंजाबमध्ये खळबळ उडाली असून, यामागे मोठे आर्थिक नुकसान आणि ऑनलाइन फसवणूक कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पटियाला येथील आपल्या […] The post ऑनलाइन फसवणुकीचा धक्का: पंजाबचे माजी आयजी अमर सिंह चहल यांचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 7:17 pm

Axar Patel : दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलला कर्णधारपदावरून हटवले? ‘हा’खेळाडू असणार नवा कर्णधार

Axar Patel removed from Delhi Capitals captaincy : आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी सर्वच संघांनी कंबर कसली असताना, दिल्ली कॅपिटल्स (DC) च्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्रँचायझीने स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षरने आयपीएल २०२५ मध्ये संघाचे नेतृत्व केले होते, मात्र आगामी हंगामात तो केवळ एक […] The post Axar Patel : दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलला कर्णधारपदावरून हटवले? ‘हा’ खेळाडू असणार नवा कर्णधार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 7:13 pm

उड्डाणानंतर दिल्ली - मुंबई विमानात बिघाड, इंजिन हवेतच पडलं बंद

नवी दिल्ली : दिल्लीहून मुंबईकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाणानंतर अवघ्या ४० मिनिटांत तांत्रिक बिघाड झाल्याने आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. या विमानात ३५५ प्रवासी प्रवास करत होते. उजव्या बाजूचं इंजिन बंद पडल्याने वैमानिकाने तातडीने विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरवलं.एअर इंडियाचं AI887 हे विमान आज सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झालं होतं. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या उजव्या इंजिनमधील ऑईल प्रेशर शून्यावर आल्याचं वैमानिकाच्या निदर्शनास आलं. ही बाब लक्षात येताच वैमानिकांनी हवेतच यू-टर्न घेतला आणि ६ वाजून ५२ मिनिटांनी विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवलं.ऑईल प्रेशर कमी होणं ही विमानासाठी गंभीर तांत्रिक अडचण मानली जाते. या स्थितीत इंजिनच्या काही भागांपर्यंत तेल पोहोचत नाही, ज्यामुळे इंजिन गरम होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत उड्डाण सुरू ठेवल्यास इंजिन पूर्णपणे निकामी होण्याची शक्यता असते. मात्र विमानातील दुसरं इंजिन कार्यरत असल्यास वैमानिक सुरक्षित लँडिंग करू शकतात, म्हणूनच तत्काळ लँडिंगचा निर्णय घेण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांना पुढील प्रवासासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली.दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एअर इंडियाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 7:10 pm

बांगलादेशमध्ये उस्मान हादी पाठोपाठ मोहम्मद मोतालेब शिकदारची हत्या

ढाका : बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी सरकारला परिस्थिती नियंत्रणात ठेवणे जमत नसल्याचे चित्र आहे. जून २०२४ मध्ये बांगलादेशमध्ये हिंसा सुरू झाली आणि निवडून आलेल्या पंतप्रधान शेख हसिना यांना स्व - संरक्षणासाठी देश सोडावा लागला. सध्या शेख हसिना भारतात सुरक्षित आहेत. पण त्यांच्या अनुपस्थितीत अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर सत्तेत आलेल्या युनूस यांना देशात कायदा सुव्यवस्था राखणे जमत नसल्याचे चित्र आहे.भारताचा काही भाग तोडून बांगलादेशशी जोडण्याची भाषा करणाऱ्या शरीफ उस्मान हादीची काही दिवसांपूर्वी हत्या झाली. हादीवर अज्ञातांनी गोळीबार केला होता. बांगलादेशमध्ये काही दिवस उपचार झाले तरी हादीच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. अखेर त्याला सिंगापूरच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच मोहम्मद मोतालेब शिकदार या ४२ वर्षांच्या युवा नेत्याची हत्या झाली. मोहम्मद मोतालेब शिकदारवर अज्ञातांनी गोळीबार केला. काही दिवसांपूर्वी ठार झालेला शरीफ उस्मान हादी बांगलादेशच्या नॅशनल सिटिझन्स पार्टीचा प्रमुख युवा नेता होता. तर आता ठार झालेला मोहम्मद मोतालेब शिकदार हा नॅशनल सिटिझन्स पार्टीशी संलग्न कामगार संघटनेचा वरिष्ठ नेता होता. बांगलादेशची पोलीस यंत्रणा शरीफ उस्मान हादी आणि मोहम्मद मोतालेब शिकदार या दोन्ही यवा नेत्यांच्या हत्येचा तपास करत आहेत. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. यामुळे हादी आणि शिकदारचे समर्थक नाराज आहेत.भारताचा हत्येशी संबंध नाहीहादीच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा संशय बांगलादेशमध्येच काही जण व्यक्त करत होते. पण भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत पत्रक काढून हादीच्या हत्येचा निषेध केला आणि भारताचा या हत्येशी संबंध नसल्याचे जाहीर केले. अद्याप बांगलादेश पोलिसांनी हादीच्या हत्येप्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 7:10 pm

Devendra Fadanvis : पाच वर्षांनंतरही राज्यात महायुतीच दिसणार; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास

गोंदिया : राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध राजकीय चर्चा आणि अफवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. गोंदिया दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महायुतीच्या भविष्याबद्दल अत्यंत महत्त्वाचे विधान केले. ऐकीव गोष्टींवर प्रतिक्रिया देणे हे आमचे तत्व नाही, मात्र राज्यात महायुती पूर्णपणे भक्कम आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.https://prahaar.in/2025/12/22/cm-devendra-fadnavis-criticizs-mva-congress-bjp-get-victory-in-maharashtra-local-body-elections-2025/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, या निवडणुका त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीनुसार लढवल्या जातात. स्थानिक समीकरणे वेगळी असू शकतात, मात्र याचा अर्थ महायुतीत फूट असा होत नाही. महायुतीमधील तिन्ही पक्ष (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस) राज्यात पूर्ण समन्वयाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस पुढे म्हणाले, आमची महायुती कायम आहे आणि ती यापुढेही कायमच राहणार आहे. केवळ हे पाच वर्षच आमचे सरकार राहणार नाही, तर पाच वर्षांनंतर जेव्हा पुन्हा विधानसभा निवडणुका समोर येतील, तेव्हाही ही महायुतीच तुम्हाला मैदानात दिसेल. या विधानामुळे मुख्यमंत्र्यांनी केवळ सध्याच्या सत्तेचा दावा केला नाही, तर भविष्यातील प्रदीर्घ राजकीय नियोजनाचे संकेतही दिले आहेत. विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या 'नॅरेटिव्ह'ला उत्तर देताना त्यांनी महायुतीमधील एकजूट अधोरेखित केली.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 7:10 pm

PAN-Aadhaar लिंक करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक; न केल्यास मोठे नुकसान होणार, जाणून घ्या कसे करायचे

PAN-Aadhaar Link: तुमचे पॅन कार्ड (PAN) आधार कार्डशी (Aadhaar) लिंक करण्याची अंतिम मुदत अत्यंत जवळ आली आहे. जर तुम्ही अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचे पॅन कार्ड ‘इनऑपरेटिव्ह’ म्हणजेच निकामी होऊ शकते. ज्या नागरिकांचे आधार कार्ड १ ऑक्टोबर २०२४ पूर्वी जारी झाले आहे, त्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ही […] The post PAN-Aadhaar लिंक करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक; न केल्यास मोठे नुकसान होणार, जाणून घ्या कसे करायचे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 7:10 pm

निवडणुकीत फडणवीस, शिंदे अन् अजित पवारांनी मिळून 15 हजार कोटी उडवले; ‘या’खासदाराच्या दाव्याने खळबळ

मुंबई : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अभूतपूर्व’ म्हटले आहे. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी या विजयावर जोरदार टीका करत गंभीर आरोप केले आहेत. महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीत १५ हजार कोटी रुपये उडवले असून, मतदारांना पैसा पाण्यासारखा वाहिला गेला, असा दावा राऊत यांनी केला. राऊत […] The post निवडणुकीत फडणवीस, शिंदे अन् अजित पवारांनी मिळून 15 हजार कोटी उडवले; ‘या’ खासदाराच्या दाव्याने खळबळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 7:03 pm

8th Pay Commission: किमान वेतन हा चिंतेचा विषय का बनला? कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय? संपूर्ण माहिती जाणून घ्या

8th Pay Commission: ८ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच, केंद्र सरकारी कर्मचारी आणि संघटनांनी किमान वेतन (Minimum Wage) आणि फिटमेंट फॅक्टरबाबत (Fitment Factor) आक्रमक भूमिका घेतली आहे. वाढती महागाई आणि आधुनिक काळातील गरजा लक्षात घेता, वेतन निश्चितीचे जुने निकष बदलून नव्या फॉर्म्युल्यानुसार पगारवाढ करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून जोर धरत आहे. ‘टर्म्स ऑफ […] The post 8th Pay Commission: किमान वेतन हा चिंतेचा विषय का बनला? कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय? संपूर्ण माहिती जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 7:00 pm

Ajit Pawar : खळबळजनक! ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या ‘या’निष्ठावन शिलेदाराचे अपहरण

नांदेड: नांदेड शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Ajit Pawar) चे प्रदेश सरचिटणीस आणि पक्षाचे निष्ठावंत नेते जीवन घोगरे पाटील यांचे आज सकाळी अपहरण झाले. सुदैवाने काही तासांतच त्यांची सुटका करण्यात आली असली तरी, अपहरणकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या […] The post Ajit Pawar : खळबळजनक! ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या ‘या’ निष्ठावन शिलेदाराचे अपहरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 6:58 pm

‘बंगालमध्ये TMC ला एकही जागा जिंकू देणार नाही’; नव्या पक्षाची घोषणा करताच हुमायून कबीर यांचे ममता बॅनर्जींना खुले आव्हान

मुर्शिदाबाद: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील भरतपूरचे आमदार हुमायून कबीर यांनी सोमवारी (२२ डिसेंबर) आपल्या नव्या पक्षाची अधिकृत घोषणा करत तृणमूल काँग्रेस (TMC) आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. ‘जनता उन्नयन पार्टी’ असे या नव्या पक्षाचे नाव असून, कबीर यांनी मुर्शिदाबादमधील २२ पैकी एकही […] The post ‘बंगालमध्ये TMC ला एकही जागा जिंकू देणार नाही’; नव्या पक्षाची घोषणा करताच हुमायून कबीर यांचे ममता बॅनर्जींना खुले आव्हान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 6:47 pm

Yuzvendra Chahal : युझी चहलने आरजे महावशला नव्हे, तर ‘या’खास व्यक्तीला गिफ्ट केली नवी कोरी BMW कार

Yuzvendra Chahal buys a new BMW car for parents : भारतीय लेग स्पिनर युझवेंद्र चहल सध्या टीम इंडियाबाहेर असला तरी, त्याच्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेत कोणतीही घट झालेली नाही. आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या चहलने नुकतेच एक नवीन बीएमडब्ल्यू (BMW) कार खरेदी केली आहे. त्याने ही कार स्वत:साठी न घेता त्याच्या खास जवळच्या व्यक्तिंसाठी भेट म्हणून […] The post Yuzvendra Chahal : युझी चहलने आरजे महावशला नव्हे, तर ‘या’ खास व्यक्तीला गिफ्ट केली नवी कोरी BMW कार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 6:45 pm

BSF भरतीमध्ये मोठा बदल: माजी अग्निवीरांसाठी 50% जागा आरक्षित; वयोमर्यादा, शारीरिक चाचणीतही सवलत

नवी दिल्ली: माजी अग्निवीरांच्या उज्वल भविष्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. सीमा सुरक्षा दलातील (BSF) कॉन्स्टेबल पदाच्या भरती प्रक्रियेत बदल करत, माजी अग्निवीरांचे आरक्षण आता १० टक्क्यांवरून थेट ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयामुळे आता BSF मधील निम्म्या जागा अग्निवीरांसाठी राखीव असतील. आरक्षणाचे नवे समीकरण – गृह मंत्रालयाने जारी […] The post BSF भरतीमध्ये मोठा बदल: माजी अग्निवीरांसाठी 50% जागा आरक्षित; वयोमर्यादा, शारीरिक चाचणीतही सवलत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 6:37 pm

कल्याण डोंबिवलीत भाजपचा एकनाथ शिंदेंना दे धक्का; रविंद्र चव्हाणांच्या वक्तव्याने चर्चाना उधाण

मुंबई : महायुतीतर्फे राज्यातील बहुतेक महापालिका निवडणुका एकत्र लढवल्या जाणार असल्या तरी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) निवडणुकीत भाजप स्वबळावर उतरण्याचे स्पष्ट संकेत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड वगळता इतर महापालिकांमध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुती एकत्र लढेल, असे जाहीर […] The post कल्याण डोंबिवलीत भाजपचा एकनाथ शिंदेंना दे धक्का; रविंद्र चव्हाणांच्या वक्तव्याने चर्चाना उधाण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 6:36 pm

Divorce alimony news : पगार असला तरी राहणीमानासाठी पोटगी आवश्यक; पुणे न्यायालयाचा डॉक्टर पत्नीच्या बाजूने निकाल, दरमहा ‘इतकी’रक्कम द्यावी लागणार

पुणे – पती आणि पत्नी यांच्या उत्पन्नामध्ये असणारी तफावत, पत्नीला शिक्षणाप्रमाणे राहणीमान ठेवण्यासाठी पोटगी देणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने डॉक्टर पत्नीला दरमहा १० हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश दिला. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश शुभांगी यादव यांनी हा आदेश दिला आहे. तिने मिळकत व जबाबदारीचे पत्र दाखल केलेल्या तारखेपासून म्हणजे १७ मे पासून ही रक्कम […] The post Divorce alimony news : पगार असला तरी राहणीमानासाठी पोटगी आवश्यक; पुणे न्यायालयाचा डॉक्टर पत्नीच्या बाजूने निकाल, दरमहा ‘इतकी’ रक्कम द्यावी लागणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 6:27 pm

UIDAI कडून 7.7 लाखांचे बक्षीस जिंकण्याची संधी; Aadhaar ‘बायोमेट्रिक चॅलेंज’चा दुसरा टप्पा सुरू, जाणून घ्या सविस्तर

UIDAI Bio Challenge: आधार कार्ड जारी करणारी संस्था ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ (UIDAI) ने आपल्या तंत्रज्ञानाला अधिक सक्षम करण्यासाठी ‘बायोमेट्रिक चॅलेंज’च्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. फिंगरप्रिंटनंतर आता ‘आयरिस’ (डोळ्यांची बाहुली) आणि ‘फेस मॅचिंग’ तंत्रज्ञानातील त्रुटी दूर करून ते अधिक अचूक बनवणाऱ्या संशोधकांना ७.७ लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि UIDAI सोबत काम करण्याची संधी […] The post UIDAI कडून 7.7 लाखांचे बक्षीस जिंकण्याची संधी; Aadhaar ‘बायोमेट्रिक चॅलेंज’चा दुसरा टप्पा सुरू, जाणून घ्या सविस्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 6:11 pm

Uddhav Thackeray : नगर परिषदेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना पहिला धक्का ! ‘या’नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरणात (Uddhav Thackeray) मोठी उलथापालथ झाली आहे. महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, महायुतीने विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दणदणित विजय मिळवला आहे. या निकालांनुसार, भारतीय जनता पार्टी (भाजप) राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, […] The post Uddhav Thackeray : नगर परिषदेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना पहिला धक्का ! ‘या’ नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 6:10 pm

मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

मुंबई : नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वर मलकापूरजवळ भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. धुपेश्वरहून मलकापूरकडे येणारी कार रस्त्यालगत असलेल्या झाडावर जोरात आदळल्याने हा अपघात घडला.धडक इतकी तीव्र होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात रुद्र उमेश पवार आणि विनायक जनार्दन अत्तरकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रशांत राजू वडारे, गणेश दीपक इंगळे आणि तक्ष धुरंधर हे तिघे गंभीर जखमी झाले होते. जखमींना तातडीने अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान गणेश दीपक इंगळे यांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तिघांवर पोहोचला.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन हटवून पंचनामा करण्यात आला. प्राथमिक तपासात अतिवेग आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचं स्पष्ट झालं आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. या भीषण अपघातामुळे मलकापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 6:10 pm

ज्युपिटर वॅगन्सचा शेअर इंट्राडे २०% का उसळला? 'हे'आहे कारण

मोहित सोमण: रेल्वे उत्पादनाशी संबंधित मोबिलिटी सोलूशन व अँक्सेसरीज कंपनी असलेल्या ज्युपिटर वॅगन्स (Jupiter Wagons) कंपनीचा शेअर आज जबरदस्त पातळीवर उसळला आहे. आज कंपनीचा शेअर २०% इंट्राडे उच्चांकावर (All time High) बंद झाल्याने प्रति शेअर किंमत ३१२.३० रूपयावर बंद झाली आहे. कंपनीच्या प्रवर्तक असलेल्या त्रत्ररवगोअंका (Tatravagnka) यांनी ओपन मार्केट ऑपरेशनमधून २८६२३४० इक्विटी शेअर्सची खरेदी केल्याने शेअर उसळले. प्रामुख्याने प्रवर्तकांचे कंपनीमधील होल्डिंग्स वाढल्याने गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअरला सकारात्मक कौल दिला आहे. सेबी पीआयटी (Prohibition of Insider Trading) रेग्युलेशन २०१५ नुसार कंपनीने ही घडामोड घोषित केल्यानंतर शेअर आणखी उसळला.माहितीप्रमाणे ४७० रुपये प्रति शेअर या सौद्याने हे शेअर खरेदी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रवर्तकांचे भागभांडवल १८.६९% वरुन १९.२४% वर वाढले आहे. प्रेफरन्सशियल इशू (Preferential Issue Allotment) अंतर्गत हा व्यवहार झाल्याचेही कंपनीने स्पष्ट केले. उपलब्ध माहितीनुसार, गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये या शेअरमध्ये ११% ची वाढ झाली असून एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये २% ची वाढ झाली तर २०२५ च्या सुरुवातीपासून त्यात २१.३% ची घसरण झाली आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) १२४२९.३० कोटी रुपये आहे.सप्टेंबर तिमाहीसाठी, या रेल्वे कंपनीचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या ९० कोटींवर घसरण ४६.६ कोटीवर पोहोचला होता. तिमाहीतील कंपनीचा महसूल देखील इयर ऑन इयर बेसिसवर २२% ने घसरून १००९ कोटींवरून ७८६ कोटी झाला होता. कंपनीचा ईबीटा (करपूर्व कमाई EBITDA) १४० कोटींवरून १०४ कोटींवर घसरली असून ज्यात २५.६% ची घट नोंदवली गेली. मार्जिनमध्ये इयर बेसिसवर ६० बेसिस पॉइंट्सने कमी होऊन १३.८% वरून १३.२% झाले आहे.हा स्टॉक त्याच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीपेक्षा ४५% पेक्षा कमी किमतीवर व्यवहार करत आहे. ही उच्चांकी पातळी ५४८.५० होती. २० डिसेंबर २०२४ रोजी शेअरने नवा उच्चांक गाठला होता. गाठली गेली होती. एक्सचेंजमधील माहितीनुसार, एका वर्षातील कंपनीच्या शेअरची नीचांकी पातळी २४७.१५ रूपये प्रति शेअर होती. ९ डिसेंबरला ही घसरण झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात शेअरने रिकव्हरी केली आहे. गेल्या ५ दिवसात शेअर १८.४७% उसळला असून गेल्या महिनाभरात शेअर ८.८३% उसळला. मात्र इयर टू डेट (YTD) बेसिसवर कंपनीचा शेअर ३८.४१% घसरला.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 6:10 pm

लोणावळ्यात महिलेचा फळविक्रेती ते नगरसेविकापर्यंतचा प्रवास

लोणावळा : लोणावळ्यातील फळविक्रेती भाग्यश्री जगताप यांच्यावर मतदारांनी मोठा विश्वास दाखवत त्यांना नगरसेविका म्हणून निवडून दिलं. साध्या कुटुंबातून राजकारणात आलेल्या भाग्यश्री यांचं भाग्य जरी उजळलं असलं, तरी सत्ता मिळाल्यानंतरही त्यांनी आपली मुळं विसरलेली नाहीत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या २४ तासांतच भाग्यश्री पुन्हा फळांच्या गाडीवर परतल्या आणि त्यांच्या कामानं अनेकांना सुखद धक्का दिला.गेल्या दहा वर्षांपासून फळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या भाग्यश्री जगताप यांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. राजकारणाचा कोणताही अनुभव नसतानाही त्यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत उतरून मतदारांशी थेट संवाद साधला. दिवसा फळ विक्री करत प्रचार आणि संध्याकाळी घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत पोहोचत त्यांनी आपली लढत यशस्वी केली.राज्यातील २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर झाला. या निवडणुकांमध्ये ११७ ठिकाणी नगराध्यक्ष आणि ११०० नगरसेवक निवडून आले. सर्वाधिक १२९ जागा भाजपला मिळाल्या, तर शिंदे गटाच्या शिवसेनेला ५१ आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३३ जागांवर यश मिळालं.या निवडणुकांत अनेक ठिकाणी प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी देण्यात आली असताना लोणावळ्यात मात्र एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. आदिवासी समाजातील जगताप कुटुंबातील भाग्यश्री यांना संधी देत मतदारांनी फळविक्रेतीवर विश्वास टाकला. नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतरही भाग्यश्री यांनी फळ विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवला आहे. राजकारणात सत्ता मिळाल्यावर माणसं बदलतात हा समज खोडून काढत भाग्यश्री यांनी लोकशाहीचं सकारात्मक चित्र समाजासमोर ठेवलं आहे.“दहा वर्षे ज्या व्यवसायानं आपलं पोट भरलं, तो व्यवसाय नगरसेविका झाले तरी सोडणार नाही. मतदारांनी जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरवणं ही माझी जबाबदारी आहे,” असं भाग्यश्री जगताप यांनी सांगितलं. “माझ्या मतदारांची अपेक्षा आहे की मी नगरपरिषदेत काम करावं, पण माझा उदरनिर्वाह फळ विक्रीतूनच चालतो. त्यामुळे व्यवसाय आणि राजकारण या दोन्हींची सांगड घालत पुढे जाणार आहे,” असंही त्या म्हणाल्या.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 6:10 pm

मंत्रिपद येतं अन् जातं, ज्यांच्याकडे मुख्यमंत्री पद तेही जाणार…; फडणवीसांच्या विधानावर मुनगंटीवार यांचा पलटवार

चंद्रपूर : रविवारी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा निकाल लागला, या निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, मात्र जरी असं असलं तरी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळवता आलं नाही, यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार यांना ताकद देऊ […] The post मंत्रिपद येतं अन् जातं, ज्यांच्याकडे मुख्यमंत्री पद तेही जाणार…; फडणवीसांच्या विधानावर मुनगंटीवार यांचा पलटवार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 5:59 pm

Mitchell Starc : DRSसाठी आयसीसीने पैसे द्यावेत! Snickometer वादानंतर मिचेल स्टार्कची मागणी

Mitchell Starc on DRS Controversy : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना सध्या तंत्रज्ञानाच्या वादामुळे चर्चेत आला आहे. अ‍ॅडलेड ओवल येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात ‘डिसीजन रिव्ह्यू सिस्टम’ (DRS) मध्ये झालेल्या एका तांत्रिक चुकीमुळे ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरीला जीवदान मिळाले. या संधीचे सोने करत कॅरीने शानदार शतक ठोकले, मात्र यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील […] The post Mitchell Starc : DRSसाठी आयसीसीने पैसे द्यावेत! Snickometer वादानंतर मिचेल स्टार्कची मागणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 5:58 pm

Supriya Sule : भाजपने निवडणुका स्वबळावर जिंकल्या का? सुप्रिया सुळे यांचा सवाल

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीने मोठा विजय मिळवल्यानंतर, भाजपने हा विजय स्वतःच्या नेत्यांच्या बळावर मिळवला की इतर पक्षांतून आलेल्या आयारामांमुळे, असा प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २०७ नगराध्यक्षपदे जिंकली आहेत. विरोधी महाविकास आघाडीला एकत्रितपणे केवळ ४४ जागा […] The post Supriya Sule : भाजपने निवडणुका स्वबळावर जिंकल्या का? सुप्रिया सुळे यांचा सवाल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 5:48 pm

Today TOP 10 News: भाजपची कोंडी करण्यासाठी अजित पवारांची काँग्रेसला साद ते आयुष्मान भारत योजनेत 1356 आजार…वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या

भाजपची कोंडी करण्यासाठी अजित पवारांची काँग्रेसला साद सतेज पाटलांशी साधला संवाद? – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आलाय. पुण्यात भाजपला रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याची रणनीती आखल्याची माहिती समोर येतेय. या संदर्भात अजित पवार यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी फोनवरून प्राथमिक चर्चा केल्याचे वृत्त आहे. भाजप नेते […] The post Today TOP 10 News: भाजपची कोंडी करण्यासाठी अजित पवारांची काँग्रेसला साद ते आयुष्मान भारत योजनेत 1356 आजार… वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 5:39 pm

National Herald Case : सोनिया गांधी अन् राहुल गांधींना नॅशनल हेराल्‍ड प्रकरणात मोठा धक्का

नवी दिल्‍ली : नॅशनल हेराल्‍ड प्रकरणात कॉंग्रेस नेत्‍या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाने नोटीस बजाविल्‍याने त्‍यांच्‍यासमोरील अडचणी वाढण्‍याची शक्‍यता आहे. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार देणाऱ्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) याचिकेवर उत्तर देण्यास सांगितले. न्या. रविंदर दुडेजा यांनी गांधी आणि इतरांना ईडीच्या अर्जावर […] The post National Herald Case : सोनिया गांधी अन् राहुल गांधींना नॅशनल हेराल्‍ड प्रकरणात मोठा धक्का appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 5:38 pm

Gautami Patil : लाखोंच्या सुपाऱ्या घेणाऱ्या गौतमी पाटीलचा मुलींना अजब सल्ला; म्हणाली…

मुंबई: महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या मनात घर करून असलेली आणि सोशल मीडियावर नेहमी ट्रेंडिंग ठरणारी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेच्या केंद्रबिंदूत आहे. झगमगत्या स्टेज लाइट्स आणि शिट्ट्यांच्या गजरात लावणीच्या तालावर थिरकणारी गौतमी आता ‘रुपेरी वाळूत’ या नव्या म्युझिक व्हिडीओतून मराठमोळ्या पण आधुनिक रूपात प्रेक्षकांसमोर आली आहे. हे गाणे ज्येष्ठ गायिका आशा […] The post Gautami Patil : लाखोंच्या सुपाऱ्या घेणाऱ्या गौतमी पाटीलचा मुलींना अजब सल्ला; म्हणाली… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 5:23 pm

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, फक्त घोषणा बाकी; अजित पवारांच्या जवळच्या नेत्याचा दावा

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार गटाचे नेते दत्ता धनकवडे यांनी मोठा दावा करत सांगितले की, शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असून, फक्त अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. ही घोषणा लवकरच, कदाचित आज-उद्या दोन दिवसांत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त […] The post पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, फक्त घोषणा बाकी; अजित पवारांच्या जवळच्या नेत्याचा दावा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 5:17 pm

Shardul Thakur : लॉर्ड शार्दुल ठाकूर बनला बापमाणूस! नवीन वर्षापूर्वी चाहत्यांना दिली गोड बातमी!

Shardul Thakur Baby Boy : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू ‘लॉर्ड’ शार्दुल ठाकूर याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी शार्दुलच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. शार्दुलची पत्नी मिताली पारुळकर हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, शार्दुलने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. गुप्त […] The post Shardul Thakur : लॉर्ड शार्दुल ठाकूर बनला बापमाणूस! नवीन वर्षापूर्वी चाहत्यांना दिली गोड बातमी! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 5:16 pm

पर्यटकांसाठी खुशखबर! कोकण रेल्वेवर नाताळ-नवीन वर्षासाठी विशेष गाड्या

मुंबई : नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. ही वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी खास भेट देत विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.नाताळ आणि सरत्या वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कोकण रेल्वे मार्गावर मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि कर्नाटकला जोडणाऱ्या विशेष गाड्या धावणार आहेत. या निर्णयामुळे पर्यटनप्रेमी प्रवाशांना थेट कोकण आणि गोव्याचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.या विशेष सेवांमध्ये डॉ. आंबेडकर नगर (मध्य प्रदेश) ते ठोकूर (कर्नाटक) आणि बिलासपूर (छत्तीसगड) ते मडगाव (गोवा) या मार्गांचा समावेश आहे. डॉ. आंबेडकर नगर ते ठोकूर दरम्यान धावणारी विशेष गाडी २८ डिसेंबर रोजी दुपारी ४:३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता ठोकूर येथे पोहोचेल.परतीच्या प्रवासात हीच गाडी २३ आणि ३० डिसेंबर रोजी ठोकूर येथून पहाटे ४:४५ वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३:३० वाजता डॉ. आंबेडकर नगर येथे पोहोचेल. या गाडीला वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.याशिवाय बिलासपूर ते मडगाव दरम्यानही विशेष फेऱ्या चालवण्यात येणार असल्याने मध्य भारतातील प्रवाशांना थेट कोकण आणि गोव्याकडे जाण्याची मोठी सोय उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळे नियमित गाड्यांवरील प्रवासी ताण कमी होण्यासही मदत होणार आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 5:10 pm

Gujarat Kidney and Super Speciality Hospital IPO Day 1: पहिल्याच दिवशी गुजरात किडनी व सुपर स्पेशालिटी आयपीओ 'खल्लास'१.३१ पटीने सबस्क्रिप्शन पूर्ण

मोहित सोमण: पहिल्या दिवशीच गुजरात किडनी आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लिमिटेड आयपीओ आजपासून बाजारात दाखल झाला होता. आकडेवारीनुसार, पहिल्याच दिवशी कंपनीचा आयपीओ 'फूल' झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्याच दिई कंपनीला एकूण १.३१ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. त्यामुळे एकूणच १३२२६८८० शेअर तुलनेत आयपीओसाठी १७३४०२८८ वेळा बिडींग (बोली) मिळाल्याचे स्पष्ट झाले. पहिल्या दिवशी कंपनीला एकूण रिटेल गुंतवणूकदारांकडून ४.३८ वेळा, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.३४ वेळा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १.५३ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले आहे. त्यामुळे २५०.८० कोटींच्या या आयपीओला अनपेक्षितपणे चांगला प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले. आज २२ डिसेंबर ते २४ डिसेंबर कालावधीत हा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध असून ३० डिसेंबरला कंपनीचा शेअर बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध (Listed) होणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४५९२ रुपयांची गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली असून प्राईज बँड १०८ ते ११४ रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता.२०१९ साली स्थापन झालेल्या कंपनी झालेली गुजरात किडनी अँड सुपर स्पेशालिटी लिमिटेड (GKASSL) ही कंपनी गुजरात राज्यातील विविध ठिकाणी दुय्यम आणि तृतीय श्रेणीच्या आरोग्यसेवा पुरवते. कंपनीच्या पोर्टफोलिओत एकूण ४९० खाटांची (Beds) क्षमता, ४५५ खाटांची मंजूर क्षमता (Approved Bed) आणि ३४० खाटांच्या कार्यान्वित क्षमतेसह सात मल्टीस्पेशालिटी रुग्णालये आणि चार फार्मसीचा समावेश आहे. यात कंपनीच्या रुग्णालयांमध्ये गुजरात किडनी अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल (वडोदरा), गुजरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (गोधरा), राज पामलँड हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड (भरुच), मेसर्स सूर्या हॉस्पिटल अँड आयसीयू (बोरसद), गुजरात सर्जिकल हॉस्पिटल (वडोदरा) आणि अश्विनी मेडिकल सेंटर (आणंद) यांचा समावेश आहे. ही कंपनी अश्विनी मेडिकल स्टोअर (आणंद) देखील चालवते.आयपीओआधीच कंपनी अँकर गुंतवणूकदारांकडून १००.०१ कोटीची गुंतवणूक प्राप्त केली होती. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation)८९८.८१ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर ६३७% अधिक महसूल मिळाला असून करोत्तर नफ्यात ४५४% वाढ झाली आहे. कंपनीच्या आरओई (Return on Equity) ३६.६१% असून आरओसीई (Return on Capital Employed ROCE) ३७.६५% आहे. डॉ. प्रग्नेश यशवंतसिंह भरपोडा, डॉ भारतीबेन प्रग्नेश भरपोडा, डॉ. यशवंतसिंह मोतीसिंह भरपोडा आणि अनिताबेन यशवंतसिंह भरपोडा हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 5:10 pm

Politics : ‘या’ठिकाणी विजयी मिरवणुकीत राडा; भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून दोघांना मारहाण

पालघर जिल्ह्यातील वाडा नगरपंचायत निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे नगरसेवक तेजेश पाटील यांच्या विजयाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान सीएनजी गाडीसमोर फटाके फोडण्यास विरोध करणाऱ्या दोन महिलांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची गंभीर घटना घडली. ही घटना वाडा शहरात दुपारी घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीत भाजपला वाडा नगरपंचायतीत यश मिळाले असून, […] The post Politics : ‘या’ ठिकाणी विजयी मिरवणुकीत राडा; भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून दोघांना मारहाण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 5:03 pm

Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला हायकोर्टाचा मोठा झटका

Walmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी राज्यभर खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा झटका दिला आहे. कराड यांनी दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला असून, ते सध्या बीड कारागृहातच राहतील. या प्रकरणात वाल्मिक कराड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे […] The post Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला हायकोर्टाचा मोठा झटका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 4:45 pm

Stock Market: ‘या’ 6 कारणांमुळे सेन्सेक्स 638 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांनी कमावले 4 लाख कोटी रुपये

Stock Market: भारतीय शेअर बाजारात सोमवारी (२२ डिसेंबर) सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तेजी पाहायला मिळाली. विदेशी गुंतवणूकदारांचे पुनरागमन आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण होते. दिवसभराच्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ ६३८.३३ अंकांनी (०.७५%) झेप घेत ८५,५६७.४८ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ २०६ अंकांनी (०.७९%) वधारून २६,१७२.४० च्या पातळीवर बंद […] The post Stock Market: ‘या’ 6 कारणांमुळे सेन्सेक्स 638 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांनी कमावले 4 लाख कोटी रुपये appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 4:39 pm

Gaurav Gogoi : पंतप्रधानांच्या आसाम दौऱ्यात इतिहासाचे विकृत चित्रण; गौरव गोगोई यांची टीका

गुवाहाटी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यपूर्व काळात आसामला पूर्व पाकिस्तानचा भाग बनवण्याचा कट रचला गेला होता आणि काँग्रेसही त्यात सामील होणार होती, असा दावा आपल्या आसाम दौऱ्यात केला होता. यावरुन कॉंग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी जोरदार आक्षेप घेताना टीका केली आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणांत काँग्रेसवर हल्ला करण्यावर आणि ऐतिहासिक घटनांचे चुकीचे सादरीकरण करण्यावर भर दिला […] The post Gaurav Gogoi : पंतप्रधानांच्या आसाम दौऱ्यात इतिहासाचे विकृत चित्रण; गौरव गोगोई यांची टीका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 4:32 pm

Stock Market Closing Bell: शेअर बाजारात 'ख्रिसमसची'तयारी जोरात,आयटी, मिडकॅप, मेटल शेअरची कमाल! सेन्सेक्स ६३८.१२ निफ्टी २०६.०० अंकाने उसळला 'या'कारणांमुळे

मोहित सोमण: शेअर बाजारात अखेरच्या सत्रात आणखी झाल्याने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने मोठी वाढ नोंदवली आहे. सेन्सेक्स ६३८.१२ अंकांने उसळत ८५५६७.४८ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी २०६.०० अंकाने उसळत २६१७२.४० पातळीवर स्थिरावला आहे. त्यामुळे आज सेन्सेक्सला ८५४५० व निफ्टीला २६१५० पातळी पार करण्यास यश मिळाले. आज सकाळच्या सत्रातील मिडकॅपमधील वाढीला मागे टाकत ब्रोकरेजने मिड व स्मॉलकॅपने थेट १.१२% वाढ नोंदवली. स्मॉलकॅपमधील वाढलेल्या ब्रोकरेजच्या आशावादाचा फायदा गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात झाला. आयटी, मेटल, केमिकल्स,ऑटो शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बाजारात गुंतवणूकदारांमध्ये औत्सुक्याचे वातावरण कायम राहिल्याचे स्पष्ट झाले. अस्थिरतेचा जगभरात संमिश्र प्रतिसाद कायम असताना आशियाई बाजारात विशेषतः भारतात मात्र मजबूत फंडामेंटलमुळे बाजार निर्विवादपणे वाढला आहे. कंज्यूमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये किरकोळ घसरणीचा अपवाद वगळता बाजारात नवा ट्रिगर नसतानाही वाढलेल्या स्पॉट व्यवहार वाढल्याचे पहावयास मिळाले दरम्यान परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली रोख गुंतवणूक बाजारात कायम ठेवली असल्याचे चित्र निर्माण होत बाजारातील शुक्रवारचे नफा बुकिंग आता खरेदीत व विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढल्याने ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही बूक व्होल्युममध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे.युएस व व्हेनेझुएला यांच्यातील द्वंद्व, इस्त्राईल इराण यांच्यातील तणाव कायम असल्याने आज सोन्याचांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वधारल्याने त्याचा फायदा बाजारात झाला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक विशेषतः राखल्याने घरगुती गुंतवणूकदारांकडूनही वाढलेल्या एकूण गुंतवणूकीचा फायदा बाजारात झाला. आज शेअर बाजारात अर्थात ब्लू चिप्स शेअर्समध्येही चांगली वाढ झाल्याचे दिसून आले. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, विप्रो अशा शेअर्समध्ये झालेल्या वाढीसह मात्र डिक्सन टेक्नॉलॉजी, अदानी ग्रीन, अदानी गॅस, एचडीएफसी एएमसी, सिमेन्स इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज यांसारख्या शेअर्समध्ये झालेल्या किरकोळ घसरणीमुळे बाजारातील रॅलीला मर्यादा आल्या.बँक ऑफ चीनने एक व तीन वर्षासाठी आपल्या व्याजात स्थिरता ठेवल्याने त्याचा मोठा फायदा आशियाई बाजारात झाला. अमेरिकेतील टेक, एआय शेअर्समध्ये होत असलेल्या वाढीला चीनच्या नव्या निर्णयाच्या ट्रिगरमुळे बाजारात फिल गुड वातावरण कायम होते. अखेरच्या सत्रात आशियाई बाजारात गिफ्ट निफ्टी (०.६६%) सह सगळ्याच निर्देशांकात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ कोसपी (२.०८%), निकेयी २२५ (१.८२%), तैवान वेटेड (१.६२%), सेट कंपोझिट (१.३८%) निर्देशांकात झाली आहे तर युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात तिन्ही बाजारात वाढ झाली आहे. डाऊ जोन्स (०.२१%), एस अँड पी ५०० (०.८८%), नासडाक (१.२३%) यांचा या निर्देशांकात ही वाढ झाली आहे.अखेरच्या सत्रात ज्युपिटर वॅगन्स (१९.२९%), कोचीन शिपयार्ड (७.६२%), देवयानी इंटरनॅशनल (६.४३%), रामकृष्ण फोर्ज (६.४०%), सोलार इंडस्ट्रीज (५.९५%), जीई व्हर्नोवा (५.८४%), माझगाव डॉक (५.५७%), किर्लोस्कर ऑईल (५.४३%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण रिलायन्स पॉवर (८.५१%), हेक्सावेअर टेक्नॉलॉजी (५.८७%), सिमेन्स इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज (४.७४%), डिक्सन टेक्नॉलॉजी (३.१९%), इंटलेक्ट डिझाईन (२.४६%), सम्मान कॅपिटल (२.२१%), न्यूलँड लॅब्स (१.८८%), पतांजली फूड (१.६५%) समभागात झाली आहे.निफ्टीमध्ये सोमवारीआजच्या बाजारातील परिस्थितीवर टेक्निकल विश्लेषण करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक रिसर्च विश्लेषक नागराज शेट्टी म्हणाले आहेत की,'एकत्रीकरण हालचालीतून जोरदार ब्रेकआउट दिसून आला आणि तो २०६ अंकांच्या मोठ्या वाढीसह बंद झाला. ९० अंकांच्या तेजीच्या फरकाने सुरुवात केल्यानंतर, निफ्टी सुरुवातीनंतर लगेचच आणखी वाढला. सत्रामधील मध्य ते उत्तरार्धात तो सकारात्मक कल असलेल्या मर्यादित श्रेणीत स्थिरावला आणि सुरुवातीची तेजीची दरी भरली गेली नाही.दैनंदिन आलेखावर गॅप-अप ओपनिंगसह एक लांब तेजीची कँडल (Long Speed Candel) तयार झाली. तांत्रिकदृष्ट्या, ही बाजाराची हालचाल २६००० पातळीच्या पातळीजवळच्या महत्त्वपूर्ण अडथळ्याचा आणि त्रिकोणी पॅटर्नचा निर्णायक ब्रेकआउट दर्शवते. हे एक सकारात्मक संकेत आहे आणि हे बाजाराच्या तेजीच्या दिशेने झालेल्या महत्त्वपूर्ण ट्रेंड बदलाचे प्रतिबिंब आहे. नजीकच्या काळात २६३००-२६४०० पातळीच्या पातळीवर पुढील तेजीच्या पातळ्यांवर लक्ष ठेवावे. तात्काळ आधार (Immediate Support) २६००० पातळीवर आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 4:30 pm

India-New Zealand FTA: भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार पूर्ण; दोन्ही देशांना काय फायदा होईल ते जाणून घ्या…

India-New Zealand FTA: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील द्विपक्षीय मुक्त व्यापार करारावर (FTA) शिक्कामोर्तब झाले असून, भारताने आपल्या दुग्धव्यवसाय (डेअरी) क्षेत्राला या करारातून पूर्णपणे सुरक्षित ठेवले आहे. “दुग्धव्यवसाय ही भारतासाठी ‘रेड लाईन’ आहे आणि या क्षेत्रात आयात शुल्कात कोणतीही सवलत दिली जाणार नाही,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी स्पष्ट केले. कृषी उत्पादकता वाढवण्यावर भर – केंद्रीय […] The post India-New Zealand FTA: भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार पूर्ण; दोन्ही देशांना काय फायदा होईल ते जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 4:22 pm

पुण्यात शरद पवार अन् अजित पवारांचं ठरलं, पण कोणत्या चिन्ह्यावर लढणार? प्रशांत जगतापांनी सगळंच सांगितलं

पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जगताप म्हणाले की, कुणासोबत युती करायची याचा अंतिम […] The post पुण्यात शरद पवार अन् अजित पवारांचं ठरलं, पण कोणत्या चिन्ह्यावर लढणार? प्रशांत जगतापांनी सगळंच सांगितलं appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 4:12 pm

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मुंबई : मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर (OTT) प्रदर्शित होणार्‍या चित्रपट आणि वेब सिरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात असतात. वेगळे आशयविषय घेऊन आलेले मराठी चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवित असतात. आणीबाणीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेली हलकीफुलकी गोष्ट असलेला अरविंद जगताप लिखीत आणि दिनेश जगताप दिग्दर्शित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची तुमची संधी हुकली असेल तर आता ‘प्रसारभारती’ च्या वेव्हज (waves) ओ.टी.टी. चॅनलवर हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे.हा चित्रपट ‘प्रसारभारती’ च्या वेव्हज (waves) ओ.टी.टी. चॅनलवर जगभरात प्रदर्शित झाला आहे. उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, प्रविण तरडे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, सुनिल अभ्यंकर आदी कलाकारांच्या चित्रपटातील भूमिका लक्षवेधी आहेत.एखाद्या सरकारी आदेशाची अंमलबजावणी करताना होणाऱ्या गोंधळाची, नवरा बायकोच्या प्रेमाची आणि त्यासोबत बापलेकाच्या नात्याची रंजक कथा लेखक अरविंद जगताप यांनी मिश्कीलपणे मांडली आहे. ही आणीबाणी कोणासाठी अडचणीची ठरणार ? आणि कोण यातून सहीसलामत बाहेर पडणार याची मनोरंजक कथा पहायला मिळणार आहे

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 4:10 pm

आताची सर्वात मोठी बातमी: किवी स्वस्त होणार? भारत व न्यूझीलंड एफटीए झाला!

न्यूझीलंड पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांची घोषणामुंबई: भारताने आणखी एक भरारी घेतली आहे.ओमानशी यशस्वी बोलणी केल्यानंतर आता भारताने न्यूझीलंड बरोबर द्विपक्षीय करार (Bilateral Trade) घोषित केला आहे. या एफटीएनुसार (Free trade Agreement) मोठ्या प्रमाणात दोन्ही देशात औद्योगिक व व्यापारी सहकार्य वाढणार आहे. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी सोमवारी सांगितले की, भारतासोबतच्या मुक्त व्यापार करारासाठीची वाटाघाटी पूर्ण झाली आहे. या मुक्त व्यापार करारामुळे (FTA) भारताला होणाऱ्या आमच्या ९५% निर्यातीवरील शुल्क कमी होईल किंवा पूर्णपणे काढून टाकले जाईल.यामुळे आगामी काळात न्यूझीलंडची भारतातील निर्यात १.१ अब्ज डॉलरने वाढत १.३ अब्ज डॉलरवर पोहोचू शकते. भारताच्या न्यूझीलंडला केल्या जाणाऱ्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित आहे असे म्हटले जाते. आर्थिक वर्ष २२०४-२५ मध्ये भारताची न्यूझीलंडमधील निर्यात २१४.१ दशलक्ष डॉलर होती तर न्यूझीलंडची भारतातील निर्यात ४५६.५ दशलक्ष डॉलर्स होती. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारताची निर्यात ७११.१ दशलक्ष डॉलर्स असून आयात ५८७.१ दशलक्ष डॉलर्स होती.मे महिन्यात सुरूवात झालेल्या या बोलणीला अंतिम मोहोर लागल्याने मोठ्या प्रमाणात न्यूझीलंडकडून भारतात होत असलेल्या ९५% निर्यात होणाऱ्या किवीला ड्युटी फ्री अथवा कमी ड्युटीत प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे याचा फायदा दोन्ही देशातील व्यापाऱ्यांना होणार असून यातून किवी इकोसिस्टीम आणखी बळ मिळेल.उपलब्ध माहितीनुसार, न्यूझीलंडचा सरासरी आयात शुल्क दर केवळ २.३% आहे, तर भारताचा हा दर १७.८% आहे, आणि न्यूझीलंडच्या ५८.३% शुल्क श्रेणी आधीच शुल्कमुक्त आहेत. न्यूझीलंडला होणारी भारताची निर्यात अनेक क्षेत्रांत पसरली असली तरी ती प्रामुख्याने इंधन, वस्त्रोद्योग आणि औषध उद्योगात केंद्रित असे म्हटले जाते. एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) च्या निर्यातीने ११०.८ दशलक्ष डॉलर्सने सर्वाधिक आकडेवारी नोंदवली असून त्यानंतर कपडे, कापड आणि घरगुती वस्त्रोद्योगाची निर्यातीचा क्रमांक लागतो ती साधारणतः ९५.८ दशलक्ष डॉलर्स नोंदवण्यात आली होती.इतर उत्पादनात औषधांचीही निर्यात ५७.५ दशलक्ष डॉलर्स होती तर टर्बोजेटसह यंत्रसामग्रीचे योगदान मोठे असून ५१.८ दशलक्ष डॉलर निर्यात होती. पेट्रोलियम उत्पादने हा आणखी एक प्रमुख घटक होता, ज्यामध्ये डिझेलची निर्यात ४७.८ दशलक्ष डॉलर्स आणि पेट्रोलची निर्यात २२.७ दशलक्ष डॉलर्स होती.इतर मोठ्या निर्यातीमध्ये ऑटोमोबाईल्स आणि सुटे भाग (१९.३ दशलक्ष डॉलर्स), कागद आणि पुठ्ठा (१८.३ दशलक्ष डॉलर्स), इलेक्ट्रॉनिक्स (१६.५ दशलक्ष डॉलर्स), लोखंड आणि पोलाद (१४.१ दशलक्ष डॉलर्स), कोळंबी (१३.७ दशलक्ष डॉलर्स), बासमती तांदूळ (११.९ दशलक्ष डॉलर्स) आणि सोन्याचे दागिने (९.९ दशलक्ष डॉलर्स) यांचा समावेश होता असे एका अहवालात म्हटले गेले होते याउलट, न्यूझीलंडच्या भारताला होणाऱ्या निर्यातीमध्ये कच्चा माल आणि कृषी उत्पादनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यासह लाकूड आणि लाकडी वस्तू (७८.४ दशलक्ष डॉलर्स) आणि लाकडी लगदा (३९.८ दशलक्ष डॉलर्स) कागद, पॅकेजिंग आणि बांधकाम क्षेत्रातील इकोसिस्टीममधील भारताची आयात आकडेवारी अधोरेखित करते.कृषी आणि पशु-आधारित उत्पादने देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, ज्यामध्ये कापलेली लोकर (४७.३ दशलक्ष डॉलर्स), मिल्क अल्ब्युमिन (३२.१ दशलक्ष डॉलर्स), सफरचंद (३२.८ दशलक्ष डॉलर्स) आणि किवी फळे (१७ दशलक्ष डॉलर्स) यांचा समावेश आहे. सेवा व्यापार हा या संबंधांचा अधिक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहे.आर्थिक वर्ष २४ मध्ये, भारताची न्यूझीलंडला सेवा निर्यात २१४.१ दशलक्ष डॉलर्स होती, तर न्यूझीलंडची भारताला सेवा निर्यात ४५६.५ दशलक्ष डॉलर्स होती.उपलब्ध माहितीनुसार, भारताची ताकद आयटी आणि सॉफ्टवेअर सेवा, दूरसंचार सहाय्य, आरोग्यसेवा आणि वित्तीय सेवांमध्ये व त्यांच्या निर्यातीत आहे. ते पुढे म्हणाले की, न्यूझीलंडच्या सेवा निर्यातीत शिक्षणाचा वाटा सर्वाधिक आहे. ज्याला भारतीय विद्यार्थ्यांमुळे चालना मिळते यानंतर पर्यटन, फिनटेक सोल्यूशन्स आणि विशेष विमानचालन प्रशिक्षणाचा क्रमांक या सहकार्यात लागतो. किवीला मोठा दिलासा भारतीय बाजारात मिळाल्याने त्याचा फायदा बाजारात दिसेल. कारण किवी फळ अनेक उत्पादनात महत्वाचे ठरते. किवी ड्युटी फ्री झाल्यास त्याचा इकडील फळ उद्योग, संबंधित औषध उद्योग, वाईन उद्योग, आरोग्य सेवा इत्यादीत होणार आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 4:10 pm

विजयाने मातू नका, माजू नका!; मुख्यमंत्र्यांनी दिला नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना कानमंत्र

मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व विजय मिळवला असून, विजयाचा जल्लोष साजरा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना महत्त्वाचा कानमंत्र दिला. विजयाने मातणार नाही, माजणार नाही हा आपला संकल्प असला पाहिजे. निवडणुकीतील विजय हा आपल्या कामांची पोचपावती असतो, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला.राज्यातील २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीने एकूण २१४ नगराध्यक्ष पदे जिंकली आहेत. यापैकी एकट्या भारतीय जनता पक्षाने १२९ पदे पटकावली, तर शिवसेना ५१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ३५ पदे मिळवली. दुसरीकडे, महाविकास आघाडीला फक्त ४४ पदांवर समाधान मानावे लागले. भाजपने नगरसेवकांमध्येही रेकॉर्ड ब्रेक केला असून, ३ हजार ३०० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणले आहेत. राज्यातील एकूण नगरसेवकांच्या सुमारे ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपचे आहेत. गेल्या ३० वर्षांतील निवडणुकांचा विचार करता, एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच पक्षाचे नगरसेवक निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे.निकालानंतर सोमवारी नागपूरमधील 'रामगिरी' निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य करत म्हटले, महाराष्ट्रात भाजप हाच नंबर एकचा पक्ष आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. महायुतीने राज्यातील ७५ टक्के नगराध्यक्ष पदे जिंकली असून, विरोधकांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त केले आहेत.नागपूर जिल्ह्यातील कामगिरीवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील जवळपास सर्व नगरपरिषदांमध्ये भाजपने निर्विवाद यश मिळवले आहे. सावनेर नगरपालिका पूर्णपणे काँग्रेसमुक्त केली आहे. काटोलचा अपवाद वगळता आम्ही विरोधकांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त केले. हा विजय जनतेने सरकारच्या कामावर आणि विकासावर दाखवलेला विश्वास आहे.विजयाचा खरा मानकरी कार्यकर्ताविजयाचे श्रेय देताना फडणवीस यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांचे कौतुक केले. अनेकजण माझे अभिनंदन करत आहेत, पण या विजयाचा खरा मानकरी मी नव्हे, तर तुम्ही सर्व कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित प्रतिनिधी आहात. तुमच्या मेहनतीमुळेच भाजपला हा अभूतपूर्व जनादेश मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणाला जनतेने दिलेला हा प्रतिसाद आहे, असे फडणवीस म्हणाले.विजयाने मातू नका, माजू नका. जिंकलेल्या शहरांमध्ये चांगले काम करू, न जिंकलेल्यांमध्येही परिवर्तन घडवू. ही चांगली सुरुवात महापालिका निवडणुकीतही प्रतिबिंबित होईल, याबाबत मला पूर्ण खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 4:10 pm

Maharashtras 288 Municipal Election Result 2025 : राज्यातील २८८ नगरपालिकांमध्ये कोण जिंकलं? वाचा सविस्तर

मुंबई: राज्यात २८८ नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आज २१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. भाजपने कोकण विभागात (९), पश्चिम महाराष्ट्र (१९), उत्तर महाराष्ट्र (२१), मराठवाडा (१८) आणि विदर्भात (५३) जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेनं कोकण विभागात (१०), पश्चिम महाराष्ट्र (१४), उत्तर महाराष्ट्र (१४), मराठवाडा (११) आणि विदर्भात (०८) जागांवर बाजी मारली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने कोकण विभागात (३), पश्चिम महाराष्ट्र (१४), उत्तर महाराष्ट्र (६), मराठवाडा (११) आणि विदर्भात (०५) इतक्या जागा जिंकल्या आहेत. शिवसेना (UBT) ने कोकण विभागात (१), पश्चिम महाराष्ट्र (१), उत्तर महाराष्ट्र (२), मराठवाडा (२) आणि विदर्भात (४), काँग्रेसने कोकण विभागात (१), पश्चिम महाराष्ट्र (२), उत्तर महाराष्ट्र (१), मराठवाडा (४) आणि विदर्भात (२२), राष्ट्रवादी काँघ्रेस पक्ष (शरद पवार) गटाने कोकण विभागात (१), पश्चिम महाराष्ट्र (३), उत्तर महाराष्ट्र (२), मराठवाडा (२) आणि विदर्भात (२) इतक्या जागा जिंकल्या आहेत. तर इतरमध्ये कोकण विभागात (२), पश्चिम महाराष्ट्र (७), उत्तर महाराष्ट्र (३), मराठवाडा (४) आणि विदर्भात (८) जागांचा समावेश आहे.ठाणे आणि पालघर जिल्ह्यात कोण झाले नगराध्यक्ष?अंबरनाथ - तेजश्री करंजूले - भाजपबदलापूर - रूचिता घोरपडे - भाजपपालघर डहाणू - राजेंद्र माच्छी - शिवसेनाजव्हार पूजा उदावंत - भाजपपालघर उत्तम घरत - शिवसेनावाडा (न पं) रिमा गंधे - भाजपरायगड जिल्ह्यात कोण झाले नगराध्यक्ष अलिबाग अक्षया नाईक - शेकापकर्जत पुष्पाताई दगडे - NCP (AP)खोपोली कुलदीप शेंडे - शिवसेनामहाड सुनिल कविस्कर - शिवसेनामाथेरान चंद्रकांत चौधरी - शिवसेनामुरूड-जंजिरा आराधना दांडेकर - NCP (AP)पेण प्रीतम पाटील - भाजपरोहा वनश्री शेडगे - NCP (AP)श्रीवर्धन- अतुल चौगुले - शि.से (UBT)उरण- भावना घाणेकर - NCP (SP)रत्नागिरी जिल्ह्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी चिपळूण - उमेश सकपाळ - शिवसेनाखेड - माधवी बुटाला - शिवसेनाराजापूर-हुसनबानू खलिफे - कॉग्रेसरत्नागिरी- शिल्पा सुर्वे - शिवसेनालांजा (न पं)-सावली कुरूप - शिवसेनादेवरूख (न पं)- मृणाल शेट्ये - भाजपगुहागर (न पं)- निता मालप - भाजपसिंधुदुर्ग जिल्ह्यात कोण-कोण झाले नगराध्यक्ष?मालवण- ममता वराडकर - शिवसेनासावंतवाडी - श्रद्धाराजे भोसले - भाजपवेंगुर्ला- दिलीप गिरप - भाजपकणकवली (न पं)- संदेश पारकर - श.वि.आपुणे जिल्ह्यात कोण झाले नगराध्यक्षपदी विराजमान?आळंदी-प्रशांत कुऱ्हाडे - भाजपबारामती- सचिन सातव - NCP (AP)भोर - रामचंद्र आवारे - NCP (AP)चाकण- मनीषा गोरे - शिवसेनादौंड - दुर्गादेवी जगदाळे - NCP (AP)फुरसुंगी-संतोष सरोदे - NCP (AP)इंदापूर- भरत शहा - NCP (AP)जेजुरी-जयदीप बारभाई - NCP (AP)जुन्नर -सुजाता काजळे - शिवसेनालोणावळा -राजेंद्र सोनवणे - NCP (AP)राजगुरूनगर-मंगेश गुंडाळ - शिवसेनासासवड-आनंदी जगताप - भाजपशिरूर- ऐश्वर्या पाचर्णे - NCP (AP)तळेगाव-संतोष दाभाडे - भाजपमाळेगाव बु (न पं)-सुयोग सातपुते - NCP (AP)मंचर (न पं)-राजश्री गांजाळे - (शिवसेना)वडगाव (न पं)-अबोली ढोरे - NCP (AP)कोल्हापूर जिल्ह्यातील नव्या नगराध्यक्षांची संपूर्ण यादीगडहिंग्लज - महेश तुरबतमठ - NCP (AP)हूपरी - मंगलराव माळगे - भाजपजयसिंगपूर - संजय पाटील - शिवसेनाकागल- सविता माने - NCP (AP)कुरुंदवाड- मनिषा डांगे - शिवसेनामलकापूर - रश्मी कोठवळे - जनसुराज्यमुरगड - सुहासिनी पाटील - शिवसेनापन्हाळा - जयश्री पवार - जनसुराज्य पक्षशिरोळ - योगिता कांबळे - कॉग्रेसवडगाव - विद्या पोळ - स्था.आचंदगड (न पं) - सुनिल कानेकर - भाजपहातकणंगले (न पं) - अजित पाटील - शिवसेनाआजरा (न पं) - अशोक चराटी - भाजपसांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादीआष्टा - विशाल शिंदे - NCP (SP)इस्लामपूर - आनंदराव मलगुंडे - NCP (SP)जत - रविंद्र आरळी - भाजपपलूस - संजीवनी पुदाले - कॉग्रेसतासगाव - विजया पाटील - स्था.आविटा - काजल म्हेत्रे - शिवसेनाआटपाडी - उत्तम जाधव - भाजपशिराळा (न पं)- पृथ्वीसिंग नाईक - शिवसेनासातारा जिल्ह्यात कोण-कोण झाले नगराध्यक्ष?कराड -राजेंद्रसिंह यादव - शिवसेनामहाबळेश्वर - सुनिल शिंदे - NCP (AP)मलकापूर -तेजस सोनावले - भाजपम्हसवड - पूजा विरकर - भाजपपाचगणी- दिलीप बगाडे - NCP (AP)फलटण - समशेरसिंह निंबाळकर - भाजपरहिमतपूर - वैशाली माने - भाजपसातारा - अमोल मोहिते - भाजपवाई - अनिल सावंत - भाजपमेढा (न पं)रूपाली वाराघडे - भाजपासोलापूरमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादीअक्कलकोट - मिलन कल्याणशेट्टी - भाजपअकलूज -रेश्मा आडगळे - NCP (SP)बार्शी - तेजस्वीनी कथले - भाजपदुधणी -प्रथमेश म्हेत्रे - शिवसेनाकरमाळा -मोहिणी सावंत - स्था.आकुर्डूवाडी -जयश्री भिसे - शि.से (UBT)मैंदर्गी -अंजली बाजारमठ - भाजपमंगळवेढा -सुनंदा आवताडे - स्था.आमोहोळ -सिद्धी वस्त्रे - शिवसेनापंढरपूर -प्रणिता भालके - स्था.आसांगोला - आनंदा माने - शिवसेनाअनगर (न पं) -प्राजक्ता पाटील - भाजपनाशिक जिल्ह्यात कोण झाले नगराध्यक्ष?भगूर -प्रेरणा बलकवडे - NCP (AP)मनमाड - योगेश पाटील - शिवसेनानांदगाव -सागर हिरे - शिवसेनापिंपळगाव बसमत -मनोज बरडे - भाजपसटाणा - हर्षदा पाटील - शिवसेनासिन्नर - विठ्ठल उगले - NCP (AP)येवला-राजेंद्र लोणारी - NCP (AP)चांदवड -वैभव बागुल - भाजपइगतपुरी -शालिनी खताळे - शिवसेनाओझर -भारती घेगडमल - भाजपत्र्यंबक -त्रिवेणी सोनावणे - शिवसेनाअहिल्यानगरमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादीदेवळाली पारवा -सत्यजित कदम - भाजपजामखेड - प्रांजल चिंतामणी - भाजपकोपरगाव -पराग संधान - भाजपपाथर्डी -अभय आव्हाड - भाजपराहता - स्वाधीन गाडेकर - भाजपराहुरी -भाऊसाहेब मोरे - NCP (SP)संगमनेर -मैथिली तांबे - स्था.आशेवगाव -माया मुंडे - शिवसेनाशिर्डी -जयश्री थोरात - भाजपश्रीगोंदा -सुनिता खेतमाळीस - भाजपश्रीरामपूर -करण ससाणे - कॉग्रेसनेवासा (न पं) -करणसिंह भुले - शिवसेनाधुळे जिल्ह्यात कोण-कोण झाले नगराध्यक्षपदी विराजमान?पिंपळनेर -योगिता चौरे - भाजपशिरपूर - चिंतण पटेल - भाजपदोंडाईचा वरवडे -नयन कुवर रावल - भाजपसिंदखेडा (न पं) -कलावती माळी - NCP (AP)जळगावमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादीजामनेर -साधना महाजन - भाजपअमळनेर परिक्षित बाविस्कर - शिवसेनाभडगाव -रेखा मालचे - शिवसेनाभुसावळ -गायत्री भंगाळे - NCP (SP)चाळीसगाव -प्रतिभा चव्हाण - भाजपचोपडा -नम्रता पाटील - शिवसेनाधरणगाव - लिलाबाई चौधरी - शि.से (UBT)एरंडोल -नरेंद्र ठाकूर - भाजपफैजपूर -दामिनी सराफ - भाजपपाचोरा -सुनिता पाटील - शिवसेनापारोळा -चंद्रकांत पाटील - शिवसेनारावेर -संगिता महाजन - भाजपसावदा- रेणुका पाटील - भाजपवरणगाव -सुनिल काळे - अपक्षयावल -छाया पाटील - शि.से (UBT)नशिराबाद -योगेश पाटील - भाजपशेंदुर्णी (न पं)-गोविंद अग्रवाल - भाजपमुक्ताईनगर (न पं)-संजना पाटील - शिवसेनानंदूरबारमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादीनंदूरबार -रत्नाबाई रघुवंशी - शिवसेनानवापूर -जयवंत जाधव - NCP (AP)तळोदा -भाग्यश्री चौधरी - NCP (AP)शहादा -अभिजीत पाटील - स्था.आछ.संभाजीनगरमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादीगंगापूर -संजय जाधव - NCP (AP)कन्नड -शेख फरिनबेगम - कॉग्रेसखुलताबाद -अमीर पटेल - कॉग्रेसपैठण -विद्या कावसानकर - शिवसेनासिल्लोड -समीर सत्तार - शिवसेनावैजापूर - दिनेश परेशी - भाजपफुलंब्री (न पं) -राजेंद्र ठोंबरे - शि.से (UBT)बीड जिल्ह्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादीअंबेजोगाई -नंदकिशोर मुंदडा - भाजपबीड -प्रेमलता पारवे - NCP (AP)धारूर -बाळासाहेब जाधव - NCP (AP)गेवराई -गीता पवार - भाजपमाजलगाव -शिफा बिलाल चाऊस - NCP (SP)परळी-पद्मश्री धर्माधिकारी - NCP (AP)जालना जिल्ह्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादीभोकरदन -समीना मिर्जा - NCP (SP)परतूर -प्रियंका राक्षे - भाजपअंबड -दिव्याणी कुलकर्णी - भाजपधाराशिवमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादीभूम - संयोगिता गाढवे - शिवसेनाकळंब -सुनंदा कापसे - शिवसेनामुरूम - बापूराव पाटील - भाजपनळदूर्ग -बसवराज धरणे - भाजपधाराशिव -नेहा काकडे - भाजपपरंडा -जाकिर सौदागर - शिवसेनातुळजापूर -विनोद गंगणे - भाजपउमरगा -किरण गायकवाड - शिवसेनालातूरमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादीअहमदपूर - स्वप्निल व्हते - भाजपउदगीर - स्वाती हुडे - भाजपनिलंगा - संजय हलगर - भाजपऔसा - परविण शेख - NCP (AP)रेणापूर (न पं) - शोभा अकगिरे - भाजपनांदेड जिल्ह्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादीबिलोली - संतोष कुलकर्णी - अपक्षदेगलूर - विजयमाला टेकाळे - NCP (AP)धर्माबाद - संगिता बोलवार - अपक्षहदगाव - रोहिणी वानखेडे - शिवसेनाकंधार - शहाजी नलगे - कॉग्रेसकुंडलवाडी- प्रेरणा कोटलावार - भाजपमुदखेड - विश्रांती कदम - भाजपमुखेड - विजय देबडवार - शिवसेनाउमरी - शकुंतला मुदिराज - NCP (AP)भोकर - भगवान दंडवे - भाजपकिनवट -सुजाता यांद्रलवार - शि.से (UBT)लोहा -शरद पवार - NCP (AP)हिमायतनगर (न पं) - रफिक सेठ - कॉग्रेसहिंगोलीमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादीवसमत - सुनिता बाहेती - NCP (AP)हिंगोली - रेखा बांगर - शिवसेनाकळमनुरी -अश्लेषा चौधरी - शिवसेना टपरभणीमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहागंगाखेड - उर्मिला केंद्र - NCP (AP)जिंतूर - प्रतापराव देशमुख - भाजपमानवत - राणी लाड - NCP (AP)पाथरी - आसिफ खान - शिवसेनापूर्णा - प्रेमला कदम - अपक्षसेलू - मिलिंद सावंत - भाजपसोनपेठ - परमेश्वर कदम - श.वि.आअकोल्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादीअकोट - माया धुळे - भाजपबाळापूर - अरफिन परवीन - कॉग्रेसहिवरखेडा - सुलभा दुतोंडे - भाजपमुर्तिजापूर - हर्षल साबळे - भाजपतेल्हारा - वैशाली पिल्लेवार - भाजपबार्शी-टाकळी (न पं) - अख्तर अलीमोद्दीन - वंचितअमरावतीतील नगराध्यक्षांची संपूर्ण यादीअचलपूर - रूपाली माथने - भाजपअंजनगाव- अविनाश गायगोले - भाजपचांदूरबाजार - मनिषा नांगलिया - प्रहारचांदूर रेल्वे - प्रियंका विश्वकर्मा - वंचितचिखलदरा - शेख अब्दुल हैदर - कॉग्रेसदर्यापूर - मंदाकिनी भारसाकडे - कॉग्रेसधामणगाव रेल्वे - अर्चना रोठे - भाजपमोर्शी रश्मी उमाळे - प्रतिक्षा गुल्हाने - शिवसेनाशेंदूरजनाघाट - सुवर्णा वरखडे - भाजपवरूड - ईश्वर सलामे - भाजपधरणी (न पं)- सुनिल चौथमल - भाजपनंद-खांदेश्वर (न पं) - प्राप्ती मारोटकर - शि.से (UBT)बुलढाण्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादीचिखली - पंडितराव देशमुख - भाजपदेऊळगाव - माधुरी शिंपणे - NCP (AP)जळगाव - गणेश दांडगे - भाजपखामगाव - अपर्णा फुंडकर - भाजपलोणार - मीरा मापारी - कॉग्रेसमलकापूर -आतिकभाई ज्वारीवाले - काँग्रेसमेहकर - किशोर गारोळे - शि.से (UBT)नांदूरा - मंगलाताई मुऱ्हेकर - भाजपशेगाव - प्रकाश शेगोकार - काँग्रेससिंदखेडराजा - सौरभ तायडे - NCP (SP)बुलढाणा (न पं) - पूजा गायकवाड - शिवसेनायवतमाळमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादीआर्णी - नालंदा भरणे - काँग्रेसदारव्हा - सुनील चिरडे - शिवसेनादिग्रस - पंचशिला इंगोले - शि.से (UBT)घाटंजी - काँग्रेस परेश केरीया - काँग्रेसपूसद - मोहिनी नाईक - NCP (AP)उमरखेड - तेजश्री जैन - अपक्षवणी - विद्या आत्राम - भाजपयवतमाळ - प्रियंका मोघे - काँग्रेसनेर - सुनिता जयस्वाल - शिवसेनापांढरकवडा - अतिश बोरेल - भाजपढाणकी (न पं)- अर्चना वासमवार - शि.से (UBT)वाशिममधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादीकारंजा - फरिदा बानो - एमआयएममंगळूरपीर -अशोक परळीकर - NCP (AP)रिसोड - भगवानराव शिरसागर - भाजपवाशिम - अनिल केंदळे - भाजपमालेगाव (न पं) -ओमप्रकाश खुरसुडे - शिवसेनानागपूरमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा बुटीबोरी - सुमित मेंढे - स्था.आडिगडोह - पूजा उके - भाजपकळमेश्वर- अविनाश माकोडे - भाजपकामठी - अजय अग्रवाल - भाजपकाटोल - अर्चना देशमुख - NCP (SP)खापा - पीयूष बुरडे - भाजपामोहपा - माधव चर्जन - काँग्रेसनारखेड - मनोज कोरडे - भाजपारामटेक - विकेंद्र महाजन - शिवसेनासावनेर - संजना मंगळे - भाजपाउमरेड - प्राजक्ता आदमने - भाजपावाणडोंगरी - सुनंदा बागडे - भाजपाकन्हान-पिंपरी - राजेंद्र शेंद्रे - भाजपामोवाड -दर्शना ढोरे - भाजपावाडी -नरेश चरडे - भाजपामहादुला (न पं) - हेमलता ठाकूर - भाजपबहादुरा (न पं) - प्रतीक्षा खंदाडे - भाजपाबेसा पिंपळा (न पं) -किर्ती बडोले - भाजपाकांद्री कन्हान (न पं) - लीलाधर बर्वे - भाजपगोधनी (न पं) - रोशन कोलते - भाजपनीलडोह (न पं) - भूमिका मंडपे - भाजपापारशिवनी (न पं) - सुनीत डोमकी - शिवसेनाकोंढाळी (न पं) - योगेश चाफले - भाजपबीडगाव तरोडी (न पं) - वीरु जामगडे - भाजपभिवापूर (न पं) - सुषमा श्रीरामे - भाजपयेरखेडा (न पं) - राजकिरण बर्वे - भाजपमौदा (न पं) - प्रसन्ना (राजा) तिडके - भाजपा टवर्ध्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादीआर्वी -स्वाती गुल्हाने - भाजपदेवळी - किरण ठाकरे - स्था.आहिंगणघाट - स्वाती तुळसकर - भाजपपुलगाव -कविता ब्राम्हणकार - कॉग्रेससिंदी रेल्वे - राणी कलोडे - भाजपवर्धा - सुधीर पांगुळ - काँग्रेसभंडाऱ्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादीभंडारा - मधुरा मदनकर - भाजपपवनी - विजया नंदुरकर - NCP (AP)साकोली - देवश्री कापगते - भाजपतुमसर - सागर गभणे - भाजपगोंदियागोंदिया - सचिन शेंडे - काँग्रेसतिरोरा - अशोक असाटी - भाजपगोरेगाव (न पं) - तेजराम बिसणे - कॉग्रेससालेकसा - विजय पुंडे - कॉग्रेसचंद्रपूर जिल्ह्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादीबल्लारपूर - अल्का वाढई - कॉग्रेसब्रह्मपुरी - योगेश मिसार - कॉग्रेसभद्रावती -प्रफुल्ले चटकी - शिवसेनाचिमूर -गीता लिंगायत - भाजपगडचांदूर - निलेश ताजणे - अपक्षघुघ्घूस - दीप्ती सोनटक्के - काँग्रेसमूल - एकता समर्थ - काँग्रेसनागभिड - स्मिता प्रफुल्ल खापर्डे - काँग्रेसराजुरा - अरुण धोटे - काँग्रेसवरोरा - रंजना पारशिवे - NCP (AP)भिसी (न पं) - अतुल पुरवे - भाजपगडचिरोली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादीआरमोरी - रुपेश पुणेकर - भाजपदेसाईगंज - लता सुंदरकर - भाजपगडचिरोली - प्रनोती आंबोकर - भाजप

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 4:10 pm

हिंगोली जिल्ह्यात महायुतीचा डंका, तिन्ही नगरपरिषदांवर महिला नगराध्यक्ष

हिंगोली : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यभरात भाजपचे १२० नगराध्यक्ष निवडून आले असून शिंदे गटाची शिवसेना ५७, अजित पवार गट ३८, काँग्रेस ३०, ठाकरे गट १०, शरद पवार गट १० तर इतर पक्षांचे २३ नगराध्यक्ष निवडून आले आहेत.या निकालांमध्ये हिंगोली जिल्ह्यात महिलांचा प्रभाव ठळकपणे दिसून आला आहे. हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तिन्ही नगरपरिषदांमध्ये महिला नगराध्यक्ष निवडून आल्या असून महाविकास आघाडीला या तिन्ही ठिकाणी एकही जागा राखता आलेली नाही.हिंगोली नगरपरिषदेत शिंदे गटाच्या शिवसेनेचा मोठा विजय झाला आहे. नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या रेखा बांगर यांनी २३ हजार ७९ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून उभ्या असलेल्या शिवसेना उबाठा उमेदवाराला केवळ ३ हजार ३८४ मतांवर समाधान मानावं लागलं.वसमत नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनीता बाहेती यांनी २० हजार १६५ मते मिळवत नगराध्यक्षपद पटकावलं. काँग्रेसच्या सीमा अब्दुल हाफिज यांना १६ हजार ७१४ मते मिळाली असून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. वसमत नगरपरिषदेत महाविकास आघाडीचे केवळ सहा नगरसेवक निवडून आल्याने आघाडीला मोठा फटका बसल्याचं चित्र आहे.कळमनुरी नगरपरिषदेतही शिंदे गटाच्या शिवसेनेचा वरचष्मा राहिला. नगराध्यक्षपदासाठी आश्लेषा चौधरी यांनी ५ हजार ६३५ मते मिळवत विजय मिळवला. काँग्रेसच्या उमेदवाराला ३ हजार २८८ मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला आहे. या नगरपरिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही, तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.हिंगोली जिल्ह्यातील या निकालांनी महिलांचं नेतृत्व आणि महायुतीचं वर्चस्व स्पष्ट केलं असून महाविकास आघाडीसाठी हा निकाल मोठा इशारा मानला जात आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 4:10 pm

Rohit Sharma : “मला सगळं संपलं वाटलं, निवृत्ती घेणार होतो पण…”, हिटमॅन ‘त्या’पराभवानंतर घेणार होता मोठा निर्णय

Rohit Sharma Revealed : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात शानदार कामगिरी केली होती. मात्र, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवाने कोट्यवधी भारतीयांसह रोहित शर्माचेही स्वप्नभंग झाले होते. या पराभवानंतरच्या आपल्या मनस्थितीवर रोहितने नुकतेच भाष्य केले असून, त्या काळातील आपला संघर्ष त्याने जगासमोर मांडला आहे. मैदानावरच नव्हे, मनातूनही […] The post Rohit Sharma : “मला सगळं संपलं वाटलं, निवृत्ती घेणार होतो पण…”, हिटमॅन ‘त्या’ पराभवानंतर घेणार होता मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 4:10 pm

2025मध्ये सुस्तावलेला भारतीय बाजार 2026मध्ये भरारी घेणार का? अहवाल काय सांगतो पहा…

मुंबई: जागतिक राजकारण, वाढते कर्ज आणि एआय (AI) क्षेत्रातील अनिश्चितता यामुळे २०२५ हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी आव्हानात्मक ठरले. मात्र, २०२६ मध्ये चित्र पूर्णपणे पालटण्याची चिन्हे आहेत. रिझर्व्ह बँकेची (RBI) मवाळ भूमिका, अमेरिका-युरोपमधील संभाव्य व्याजदर कपात आणि भारताची भक्कम मॅक्रो-इकॉनॉमिक स्थिती यांच्या जोरावर भारतीय बाजार पुन्हा एकदा तेजीच्या मार्गावर परतेल, असा विश्वास बजाज अलियान्झच्या अहवालात […] The post 2025मध्ये सुस्तावलेला भारतीय बाजार 2026मध्ये भरारी घेणार का? अहवाल काय सांगतो पहा… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 4:09 pm

Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रियेत गंभीर चुका; ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत राबवण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेत गंभीर चुका झाल्या असून निवडणूक आयोग भाजपचे हित- संबंधांसाठी काम करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केला. येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये टीएमसीच्या बूथस्तरीय एजंट्सच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदार मॅपिंगमध्ये मोठ्या […] The post Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रियेत गंभीर चुका; ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 4:01 pm

नगरपालिका निवडणुकीत भाजपने 30 वर्षांचे रेकाॅर्ड मोडले, 48 टक्के नगरसेवक एकट्या भाजपचे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाचा जल्लोष आज नागपुरातील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘रामगिरी’ बंगल्यावर पाहायला मिळाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकट्याने २०० हून अधिक नगराध्यक्ष निवडून आणत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार केला. विरोधकांचे किल्ले उद्ध्वस्त; भाजपच नंबर […] The post नगरपालिका निवडणुकीत भाजपने 30 वर्षांचे रेकाॅर्ड मोडले, 48 टक्के नगरसेवक एकट्या भाजपचे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 3:55 pm

iPhone 18 Pro सीरीजमध्ये होणार मोठे बदल; कधी होणार लाँच आणि काय असेल किंमत? जाणून घ्या…

iPhone 18 Pro: Apple च्या आगामी iPhone 18 सीरीज लाँचिंगला अजून बराच अवधी असला, तरी टेक जगतात आतापासूनच ‘iPhone 18 Pro’ आणि ‘iPhone 18 Pro Max’ बाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ताज्या लीक्सनुसार, ॲपल आगामी काळात आपल्या डिझाइन आणि तंत्रज्ञानात आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. विशेषतः फोनचा डिस्प्ले आणि कॅमेरा सेटअप सर्वांचे […] The post iPhone 18 Pro सीरीजमध्ये होणार मोठे बदल; कधी होणार लाँच आणि काय असेल किंमत? जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 3:42 pm

Siddaramaiah : नेतृत्व बदलावर अंतिम निर्णय राहुल गांधी व हायकमांड घेतील; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले स्पष्ट

म्हैसूर : कर्नाटकातील मुख्यमंत्री बदलाच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या हायकमांडलाच घ्यावा लागेल, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी व्यक्त केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटकातील नेतृत्वपदाचा वाद हा स्थानिक पातळीवरचा असून हायकमांडमध्ये कोणताही गोंधळ नाही, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांचे हे विधान आले आहे. […] The post Siddaramaiah : नेतृत्व बदलावर अंतिम निर्णय राहुल गांधी व हायकमांड घेतील; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले स्पष्ट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 3:38 pm

Vidya Wires Quarterly Results: विद्या वायर्स कंपनीचा तिमाही निकाल जाहीर! कंपनीच्या नफ्यात वाढ मात्र...

मोहित सोमण: विद्या वायर्स लिमिटेडने आज आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर सप्टेंबर महिन्यात निव्वळ नफ्यात गेल्या वर्षीच्या ३६.३२ कोटींच्या तुलनेत ३८.०९ कोटींवर वाढ झाली आहे. तसेच कंपनीच्या इतर उत्पन्नातही इयर ऑन इयर बेसिसवर सप्टेंबर तिमाहीत ६.५५ कोटीवरून २६.२८ कोटींवर वाढ झाली आहे. दरम्यान कंपनीच्या खर्चात मात्र सप्टेंबरपर्यंत इयर ऑन इयर बेसिसवर ३५.३१ कोटीवरून ३६.९१ कोटीवर वाढ झाली आहे. निकालातील माहितीनुसार, कंपनीच्या करपूर्व नफ्यात (PBT) इयर ऑन इयर बेसिसवर १०.७ कोटीवरून १४.४४ कोटीवर वाढ झाली असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) ८ कोटीवरुन १० कोटींवर वाढ झाल्याचे दिसून आले. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, तिमाही निकालानंतर ईपीएस (Earning per equity share EPS) ०.५१ रुपये प्रति शेअरवरून ०.६५ रूपये प्रति शेअरवर वाढले आहेत. निकालानंतर कंपनीचा शेअर ०.४२% वाढत ५२.६६ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. आज दिवसभरात कंपनीचा शेअर २% पातळीवर उच्चांकावर पोहोचला होता सर्वाधिक पातळी शेअरने ५४.९० रुपयांची नोंदवली आहे. शेअर १० डिसेंबरला बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध (Listed) झाला होता. गेल्या दोन आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये मूळ प्राईज बँड निश्चित केलेल्या ५२ रुपयांच्या तुलनेत पुन्हा ५२ रुपयांवर व्यवहार करत आहे.नुकत्याच आलेल्या कंपनीच्या ३००.०१ कोटींच्या आयपीओला एकूण २८.५३ कोटीचे सबस्क्रिप्शन मिळाले होते. कंपनीच्या पब्लिक इशूला रिटेल गुंतवणूकदारांकडून २९.९८ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ५.४५ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ५५.९४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. निकालातपूर्वी सकाळच्या सत्रात शेअर २.९९% पातळीवर उसळला होता. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ११४४.०७ कोटी रुपये आहे.कंपनी वायरिंग संबंधित उत्पादने तयार करते ज्यामध्ये कंपनीतचे उत्पादन असलेल्या वायर ऊर्जा निर्मिती,इलेक्ट्रिक मोटर्स, स्वच्छ ऊर्जा प्रणाली (Clean Energy System), विद्युत प्रणाली इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि रेल्वे यांसारख्या विविध महत्त्वाच्या उपयोगांमध्ये वापरल्या जातात. इनॅमल्ड तांब्याच्या आयताकृती पट्ट्या,अचूकपणे डिझाइन केलेल्या इनॅमल्ड तारा, विशेष वाइंडिंग तारा, पीव्ही रिबन, अँल्युमिनियम पेपर-कव्हर केलेल्या पट्ट्या आणि पेपर-इन्सुलेटेड तांब्याच्या वाहकांचा समावेश आहे.गेल्या वर्षी कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर २५% अधिक महसूल मिळाला असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर ५९% वाढ झाली आहे. आयपीओनंतर एकूण ईपीएस २.५५ वरून २.२७ रूपये प्रति शेअरवर घसरला होता. कंपनीचे मार्च महिन्यापर्यंत पीएटी मार्जिन (Profit after tax margin) २.७४% होते तर ईबीटा (EBITDA) म्हणजेच करपूर्व कमाईवरील मार्जिन २.७४% होते. श्यामसुंदर राठी, शैलेश राठी, शिल्पा राठी हे कंपनीचे प्रवर्तक (Promoters) आहेत.आतापर्यंत दोन आठवड्यातील कंपनीच्या शेअरची निचांकी पातळी (All time Low) ४८.६५ रूपये आहे. तर ५२ आठवड्यातील सर्वाधिक पातळी ५८.४५ रूपये होती.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 3:30 pm

मराठवाड्यात मविआला मोठा धक्का; परभणी-धाराशिवमध्ये महायुतीचा डंका

धाराशिव : राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मराठवाड्यातील परभणी आणि धाराशिव या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मविआचा पूर्णपणे सुपडा साफ झाला असून महायुतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निकालांचे राजकीय पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीला एकही नगराध्यक्ष पद जिंकता आलं नाही. काँग्रेसला विजयाच्या जवळ जाऊनही पराभव स्वीकारावा लागला, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचं अस्तित्वच दिसून आलं नाही. धाराशिव जिल्ह्यातही याच स्वरूपाचं चित्र पाहायला मिळालं.धाराशिवमधील आठ नगरपालिकांच्या निकालात महाविकास आघाडीला एकही नगराध्यक्ष पद मिळालं नाही. सर्व जागांवर महायुतीने आपली ताकद दाखवत वर्चस्व कायम ठेवलं आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांत मविआसाठी राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं बोललं जात आहे.निकाल जाहीर होताच महायुतीतील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. परभणीतील मेघना बोर्डीकर यांनी कार्यकर्त्यांसोबत विजयाचा आनंद साजरा करत ‘मै हूँ डॉन’ या गाण्यावर जल्लोष केला. आमच्या घरात सुरुवातीपासूनच विजय मिळाला की हेच गाणं लावलं जातं, असं त्यांनी यावेळी सांगितलं.धाराशिवमध्येही अशाच प्रकारचा उत्साह पाहायला मिळाला. शिवसेनेचे नेते राजन साळवी यांनी ‘धाराशिव जिल्हा हा युतीचा बालेकिल्ला आहे’ असं म्हणत विरोधकांवर निशाणा साधला. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचा लोकसंपर्क कमी पडल्यामुळेच हा पराभव ओढवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.धाराशिव जिल्हा निकालभाजप – ४धाराशिव – नेहा राहुल काकडेतुळजापूर – विनोद उर्फ पिंटू गंगणेनळदुर्ग – बसवराज धरणेमुरूम – बापूराव पाटीलशिवसेना – ३उमरगा – किरण गायकवाडकळंब – सुनंदा शिवाजी कापसेपरंडा – झाकीर सौदागरस्थानिक आघाडी – १भूम – संयोगिता संजय गाढवे (शिवसेना तानाजी सावंत समर्थक)उबाठा – ०काँग्रेस – ०राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार – ०राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार – ०परभणी जिल्हा निकालभाजप – २जिंतूर – प्रतापराव देशमुखसेलू – मिलिंद सावंतशिवसेना – १पाथरी – आसेफ खानराष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – २गंगाखेड – उर्मिला केंद्रेमानवत – राणी अंकुश लाडकाँग्रेस – ०उबाठा – ०राष्ट्रवादी (शरद पवार) – ०अपक्ष – २

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 3:30 pm

लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीमकडून ‘प्रोजेक्ट ब्राईट व्हिजन’चे उद्घाटन

पुणे – लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम, जिल्हा ३२३४-डी२ यांच्या वतीने ‘प्रोजेक्ट ब्राईट व्हिजन’ (दृष्टीहीनांसाठी स्मार्ट गॉगल) या पहिल्या प्रमुख उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच पीवायसी हिंदू जिमखाना, पुणे येथे करण्यात आले. हा उपक्रम क्लब अध्यक्षा लायन संजना झामवर यांच्या नेतृत्वाखाली जयवंत साळवी फाउंडेशन यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा राज्यपाल एमजेएफ लायन राजेश अग्रवाल यांच्या […] The post लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीमकडून ‘प्रोजेक्ट ब्राईट व्हिजन’चे उद्घाटन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 3:28 pm

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! २१०० हप्त्याबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’बाबत मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींना सध्या दरमहिन्याला १५०० रुपये मिळत असले तरी, लवकरच हा हप्ता २१०० रुपयांपर्यंत वाढवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक निकालानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, […] The post Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! २१०० हप्त्याबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 3:28 pm

अल्ट्राटेक सिमेंटला ७८२.२ कोटींची जीएसटी नोटीस

मोहित सोमण: अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड (Ultratech Cement) कंपनीला जीएसटी विभागाने ७८२.२ कोटीची नोटीस दिल्याचे कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे. व्याजासगट प्रलंबित ७८२.२ कोटीची रक्कम थकबाकी असल्याचे जीएसटी नियामकांनी (GST Regulator) कंपनीला कळवले असल्याचे कंपनीने फायलिंगमध्ये म्हटले आहे. नेमक्या शब्दात कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मूळ आदेशात ३९०९५५८१९४/रूपये इतकी कर दायित्व रक्कम, तसेच कर मागणीवरील लागू व्याज, अतिरिक्त व्याज २७६८२८९ आणि ३९०९५५८१९४ रूपये इतका दंड कायम ठेवण्यात आला असे म्हटले. १९ डिसेंबरला ही अंतरिम नोटीस कंपनीला बजावण्यात आली आहे. मात्र कंपनीने उपलब्ध असलेल्या कायदेशीर पर्यायाचा वापर करून यावर निर्णय घेऊ असेही कंपनीने निवेदनात म्हटले. जीएसटी टॅक्स भरण्यात प्रलंब, व प्रलंबित इनपूट टॅक्स क्रेडिट यामुळे हा एकत्रित दंड कंपनीवर लावण्यात आल्याचे समजते.भारतातील मोठ्या सिमेंट कंपन्यापैकी एक म्हणून अल्ट्राटेक सिमेंट म्हणून ओळखले जाते. आदित्य बिर्ला समूहाची ही कंपनी असून शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी पाटणा येथील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (GST) आणि केंद्रीय उत्पादन शुल्क (Central Excise Duty) विभागाच्या सहआयुक्तांनी पारित केलेला आदेश प्राप्त झाल्याचेही कंपनीने म्हटले. अल्ट्राटेक कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता सुमारे २०० दशलक्ष टन आहे. उपलब्ध माहितीनुसार, आर्थिक २०१८-२०१९ व २०२२-२३ दरम्यानचे हे प्रकरण आहे. आर्थिक स्थिती मजबूत आल्याचे यापूर्वी स्पष्ट झालेले असताना कंपनीच्या विक्रीतही इयर ऑन इयर बेसिसवर २०.३% वाढ झाल्याचे स्पष्ट झाले होते.अल्ट्राटेकने म्हटले आहे की, या कर मागणीमुळे त्यांच्या व्यवसायावर किंवा आर्थिक स्थितीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होईल असे त्यांना वाटत नाही. आज दुपारी २.१८ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ०.२७% वाढ झाल्याने शेअर ११५२७ रूपयांवर व्यवहार करत आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 3:10 pm

Maharashtra Local Body Elections : विरोधकांचे 'नरेटिव्ह'भुईसपाट...; भाजपच्या ऐतिहासिक यशावर मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर सणसणीत टोलेबाजी!

नागपूर : राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांनी महाराष्ट्राचे राजकीय चित्र पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. काल जाहीर झालेल्या निकालांमध्ये महायुतीने विरोधकांना धोबीपछाड देत घवघवीत यश संपादन केले आहे. विशेषतः भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून, पक्षाचे ३ हजारांहून अधिक नगरसेवक निवडून आल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक विजयाचे औचित्य साधून आज नागपूरमध्ये एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आणि सरकारच्या विकासकामांना दिले. नगरपालिका निवडणुकीतील हे यश आगामी काळातील राजकारणाची दिशा ठरवणारे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. निकालांच्या आकडेवारीनुसार, भाजपने अनेक महत्त्वाच्या नगरपालिकांमध्ये स्वबळावर आणि मित्रपक्षांच्या साथीने सत्ता काबीज केली आहे. ३ हजारपेक्षा जास्त नगरसेवक निवडून येणे, हा भाजपचा राज्यातील आजवरचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या संबोधनात निवडून आलेल्या प्रतिनिधींना जनतेची कामे प्राधान्याने करण्याचा सल्ला दिला. या विजयामुळे स्थानिक पातळीवर महायुतीची पकड अधिक घट्ट झाली असून, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.https://prahaar.in/2025/12/22/mahayuti-will-win-more-than-150-seats-in-the-mumbai-municipal-corporation-elections/नगरपालिका निवडणुकीत महायुतीचा झंझावातLIVE | पत्रकार परिषद दु. १.३३ वा. | २२-१२-२०२५ नागपूर.@BJP4Nagpur#Maharashtra #NagarParishad2025 #BJPNo1 https://t.co/muwMCrtZNL— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 22, 2025राज्यातील जनतेने महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया केला असून महायुतीच्या विकासकामांवर शिक्कामोर्तब केले आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. नागपूर जिल्ह्याच्या निकालावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूरमधील २७ नगरपालिकांपैकी तब्बल २२ नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. विशेष म्हणजे, ज्या भागात विरोधकांचे अभेद्य बालेकिल्ले मानले जात होते, ते आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. सावनेरमध्ये आम्ही 'काँग्रेसमुक्त' नगरपालिका तयार केली आहे, हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. राज्यातील एकूण चित्रावर प्रकाश टाकताना फडणवीस यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचे ७५ टक्क्यांहून अधिक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. याउलट, महाविकास आघाडीला केवळ ५० च्या आसपास नगराध्यक्षांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपचा राज्यात सर्वाधिक 'स्ट्राइक रेट' राहिला असून, नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या मार्गाला कौल दिला आहे. हा विजय म्हणजे केवळ आकडेवारी नसून जनतेने आमच्या कामाला दिलेली पावती आहे, असे म्हणत फडणवीस यांनी मतदारांचे आभार मानले. महायुतीला मिळालेले हे प्रचंड बहुमत आगामी राजकीय वाटचालीस अधिक बळ देणारे ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.भाजपचा २३६ जागांवर झेंडा, विरोधकांचे 'नॅरेटिव्ह' भुईसपाटराज्यातील नगरपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने विरोधकांचा धुव्वा उडवत घवघवीत यश संपादन केले आहे. एकूण २८८ जागांपैकी तब्बल २३६ ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांनी विजय मिळवत स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील यशाची परंपरा महायुतीने या स्थानिक निवडणुकीतही कायम राखल्याचे चित्र दिसत आहे. या विजयामागे भाजप नेत्यांचे सूक्ष्म नियोजन आणि कार्यकर्त्यांची अहोरात्र मेहनत असल्याचे बोलले जात आहे. नेत्यांनी केवळ आदेश न देता प्रत्यक्ष मैदानात उतरून कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही निवडणूक लढवली, ज्याचा मोठा फायदा महायुतीला झाला. निवडणुकीपूर्वी विरोधकांनी महायुतीविरोधात नकारात्मक 'नॅरेटिव्ह' तयार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जनतेने आणि कार्यकर्त्यांनी या प्रचाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत विकासाच्या राजकारणाला पसंती दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे या विजयाचे मुख्य कारण मानले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जो 'रोडमॅप' तयार केला आहे, त्यावर जनतेने विश्वास दर्शवला आहे. सामान्य नागरिकांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते कटिबद्ध आहेत, अशी भावना या विजयानंतर व्यक्त केली जात आहे. आगामी काळात याच विकासकामांच्या जोरावर महायुती आपला जनाधार अधिक भक्कम करेल, असा विश्वास राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 3:10 pm

Dhruv Rathee on Dhurandhar: “धुरंधर हा धोकादायक प्रचारपट आहे, कारण…” युट्यूबर ध्रुव राठीची निरीक्षणे काय आहेत?

Dhruv Rathee on Dhurandhar: युट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर ध्रुव राठी यांनी दिग्दर्शक आदित्य धर यांच्या धुरंधर या चित्रपटावर टीका करणारा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी धुरंधर हा केवळ चित्रपट नसून धोकादायक प्रचाराचा आणि खोटेपणाचा नमुना असल्याचा आरोप केला आहे. ध्रुव राठी म्हणतात की, धुरंधर हा इतर वाईट प्रचारपटांपेक्षा जास्त धोकादायक आहे, कारण तो […] The post Dhruv Rathee on Dhurandhar: “धुरंधर हा धोकादायक प्रचारपट आहे, कारण…” युट्यूबर ध्रुव राठीची निरीक्षणे काय आहेत? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 3:00 pm

बांगलादेशात आणखी एका विद्यार्थी नेत्यावर हल्ला ; मोतालेब सिकदरवर गोळीबार

student leader motaleb shikder।बांगलादेशमध्ये विद्यार्थी राजकीय नेत्यांवरील हिंसाचार सुरूच आहे. २०२४ च्या विद्यार्थी चळवळीतील एक प्रमुख व्यक्ती उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनीच सोमवारी आणखी एका विद्यार्थी नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे देशात आधीच वाढलेला तणाव आणखी वाढला आहे. मोतालेब सिकदर यांच्यावर गोळीबार student leader motaleb shikder। स्थानिक माध्यमानुसार, नॅशनल सिटीझन पार्टी (एनसीपी) […] The post बांगलादेशात आणखी एका विद्यार्थी नेत्यावर हल्ला ; मोतालेब सिकदरवर गोळीबार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 2:58 pm

व्लादिमीर पुतिन यांना मोठा धक्का ; मॉस्को कार बॉम्ब स्फोटात रशियन जनरलचा मृत्यू

Vladimir Putin। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मोठा धक्का बसला आहे. व्लादिमीर पुतिन यांच्या सैन्याच्या ऑपरेशनल ट्रेनिंग विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फानिल सर्वारोव यांचा मॉस्कोमध्ये झालेल्या संशयास्पद कार बॉम्ब स्फोटात मृत्यू झाला. हा हल्ला आज झाला आहे. लेफ्टनंट जनरल फानिल सर्वारोव हे रशियन सशस्त्र दलात अत्यंत महत्त्वाचे पद भूषवत होते. ते ऑपरेशनल ट्रेनिंग विभागाचे प्रमुख […] The post व्लादिमीर पुतिन यांना मोठा धक्का ; मॉस्को कार बॉम्ब स्फोटात रशियन जनरलचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 2:34 pm

निसस फायनान्स सर्विसेसकडून दुबईत ५३६ कोटीची नवी गुंतवणूक

मोहित सोमण: निसस फायनान्स सर्विसेस (Nisus Finance Services NIFCO) इन्व्हेसमेंट व फंड मॅनेजर कंपनीने युएई येथे ५३६ कोटींची गुंतवणूक केली असल्याचे जाहीर केले आहे. दुबई मोटर येथे कंपनीने एक इमारत प्रकल्पाची उभारणी केली असून त्यासाठी लागलेल्या बांधकाम खर्च, व्यवहार खर्च, नूतनीकरण खर्च असा एकत्र मिळून ही ५३६ कोटीची गुंतवणूक केली असल्याचे कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये आज स्पष्ट केले आहे. कंपनी फंड मॅनेजर देखील असून इन्व्हेसमेंट मॅनेजमेंट कंपनी म्हणून रियल इस्टेट व इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणूकीत विशेषज्ञ कंपनी म्हणून ओळखली जाते. मुंबईस्थित कंपनीने निसस हाय यील्ड ग्रोथ फंड (Nisus High Growth Fund) या डिआय एफसी येथे असलेल्या फंडातून देय (Payments) दिले असल्याचेही कंपनीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.आर्थिक वर्ष २०२१ मध्ये पूर्ण झालेले लूताह अव्हेन्यू हे एक फ्रीहोल्ड निवासी बांधकाम प्रकल्प आहे. २७३ युनिट्सचा समावेश असुन ११० स्टुडिओ, ११० एक-बेडरूम अपार्टमेंट आणि ४४ दोन-बेडरूम अपार्टमेंट्स, तसेच एक वैद्यकीय केंद्र आणि आठ रिटेल विक्री दुकाने असल्याचे कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले. ही इमारत दोन तळघर, एक तळमजला, २३ निवासी मजले असलेली असून माहितीनुसार ही इमारत १३,५३३.०९ चौरस मीटरच्या भूखंडावर वसलेली आहे.या प्रकल्पाला एमिरेट्स एनबीडी बँकेचा पाठिंबा असल्याचे . निससने आपल्या निवेदनात म्हटले. दुबईत मालमत्तेला मोठ्या प्रमाणात मागणी असताना दुबईत आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या ११ महिन्यांत एकूण स्थावर मालमत्ता व्यवहार १५ लाख कोटी रुपये (१७० अब्ज डॉलर्स) पर्यंत पोहोचले आहेत असे सांगितले जात आहे निवासी प्रकल्पांना वाढलेली मागणी आणि प्रादेशिक व जागतिक गुंतवणूकदारांच्या सततच्या स्वारस्यामुळे चालना या रिअल इस्टेट गुंतवणूकीत चालना मिळाली आहे असे अहवाल सांगतो. यापूर्वी १८ तारखेला कंपनीचे प्रवर्तक (Promoter) अमित गोएंका यांनी ओपन मार्केट ऑपरेशनमधून आपल्या कंपनीचे ४५२०० इक्विटी शेअरची खरेदी केली होती. त्यामुळे त्यांचे भागभांडवल (Stake) ७३.५५% वरुन ७५.२२% पर्यंत वाढला होता. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीने मजबूत आर्थिक कामगिरी बजावली होती. कारण पर्यायी गुंतवणूक (Alternative Investment) मध्ये कंपनीने इयर ऑन इयर बेसिसवर ३१२% वाढ नोंदवली होती तर कंपनीला गेल्या वर्षी ६७.३ कोटींचा महसूल मिळाला होता. यापूर्वी कंपनीने ऑगस्ट २०२५ मध्ये एनसीसीसीएल (New Consolidated Construction Company Limited) कंपनीचे यशस्वीपणे अधिग्रहण केले होते. कंपनी शहरी गुंतवणूक व पायाभूत सुविधा गुंतवणूक सुविधा उपलब्ध करून देणारे आघाडीचे व्यासपीठ म्हणून ओळखले जाते.निसस ही केअरएजकडून BBB+ रेटिंग मिळवणारी पहिली भारतीय पर्यायी गुंतवणूक निधी (AIF) कंपनी ठरली आहे. हे मानांकन तिच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स, झिरो नुकसान गुंतवणुकीचा विक्रम आणि गुंतवणूकदारांना सातत्याने मिळणाऱ्या परताव्याची पावती आहे असे लक्षात येते. या मानांकनामुळे (Standards) निससला भारतातील सर्वात विश्वासार्ह संस्थात्मक-श्रेणीच्या एआयएफ (Alternative Investment Fund AIF) प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक म्हणून ओळखली जाते. कंपनीच्या शेअर्समध्ये दुपारी २ वाजेपर्यंत ३.८९% वाढ झाल्याने शेअर २८६ रूपयांवर व्यवहार करत आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 2:30 pm

मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती १५० हून अधिक जागा जिंकणार

कार्यकर्ता मेळाव्यात भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला विश्वास, विविध राजकीय पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेशमुंबई: महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत १२० जागा भाजपने जिंकल्या. विरोधक नावालाही शिल्लक नाही. उबाठा सेनेच्या केवळ ९ जागा आल्या. जनतेचा भाजपावर विश्वास आहे. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत १५० पेक्षा जास्त जागा महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला.मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ५ तर्फे आज बोरिवली येथील पाटीदार समाज हॉल येथे कार्यकर्ता मेळावा व जाहीर पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा अध्यक्ष बाळा तावडे यांच्या हस्ते समीर सरोज यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.याप्रसंगी मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, सुभाष येरुणकर, मोतीभाई देसाई, शिवाजी चौगुले, मंडल अध्यक्ष अमित उतेकर, महामंत्री संजय घाडी, महिला मोर्चा अध्यक्षा प्रियांका रेडकर, वॉर्डअध्यक्षा मृदुला पवार, वॉर्ड अध्यक्ष तेजस माने, कृष्णा दरेकर, रश्मी भोसले, अशोक कांबळे, कमला राजपुरोहित, ललित शुक्ला, सुरज नवाडकर, आदित्य दरेकर यांसह मोठ्या संख्येने प्रभाग क्रमांक ५ मधील पुरुष आणि महिला कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले की, भाजपचे उत्तम संघटन असणारा प्रभाग क्रमांक ५ वॉर्ड आहे. भाजपा हा विकासाचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला पुढे नेण्याचे काम होतेय. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाचे राजकारण आम्ही करतोय. जातीपातीवर राजकारण होत असताना विकासवरही राजकारण होते हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला दाखवून दिलेय. त्यामुळे मुंबई आज वेगाने बदलताना दिसतेय. मुंबईला आकार महायुती देऊ शकते, विकासासाठी भाजपासारखा दुसरा पक्ष नाही म्हणून आज समीर सरोज यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवकांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतल्याचेही दरेकरांनी म्हटले.दरेकर पुढे म्हणाले की, भाजपा शिस्तीचा पक्ष आहे. ज्याला राजकारण पोटात ठेवता येते तो यशस्वी होतो. जगवाटपाची चर्चा सुरु आहे. मागाठाणे हा भाजपचा बालेकिल्ला आहे. युती आघाड्या होत असतात. जास्तीत जास्त जागा मागाठाणेत भाजपाला कशा मिळतील हा प्रामाणिक प्रयत्न करणार असून पक्ष वाढ आणि कमळ फुलविण्यासाठी प्रयत्न करणे ही कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी असल्याचेही दरेकर म्हणाले.दरेकर पुढे म्हणाले की, विकासकामांची चिंता करू नका. केंद्रात व राज्यात आपले सरकार आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीतही सरकार भाजपा महायुतीचेच असणार. महायुती म्हणून मागाठाणेतील सातच्या सात जागा कमळ व धनुष्यबाणाच्या निवडून आणणार आहोत. प्रभाग क्रमांक ५ मधील बूथ अध्यक्ष, कमिटी मेम्बर, बूथ सदस्य यांनी सज्ज राहायला हवे. नियोजन पद्धतीने काम करा. संघटन भक्कम करा, हे संघटन नक्कीच यश मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा दृढ विश्वासही दरेकरांनी यावेळी व्यक्त केला.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 2:30 pm

VIDEO: धक्काबुक्की अन् पाय लटपटले…; चाहत्यांच्या उतावळेपणामुळे समंथा रुथ प्रभू अस्वस्थ

Samantha Ruth Prabhu | काही दिवसांपूर्वी अभिनेत्री निधी अग्रवालचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यात तिच्याभोवती चाहत्यांची मोठी गर्दी जमल्याचे पाहायला मिळाले होते. इतकेच काय तर, तिला धक्काबुक्की देखील झाली होती. गर्दीतून वाट काढत गाडीपर्यंत पोहोचण्यासाठीही तिला खूप कसरत करावी लागली होती. ज्यामुळे ती काहीशी घाबरल्याचे देखील पाहायला मिळाले होते. निधीनंतर आता […] The post VIDEO: धक्काबुक्की अन् पाय लटपटले…; चाहत्यांच्या उतावळेपणामुळे समंथा रुथ प्रभू अस्वस्थ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 1:46 pm

“१०% नाही तर ५% कमिशन घ्या,” ; जितन राम मांझी यांच्या विधानामुळे उडाला राजकीय गोंधळ

Jitan Ram Manjhi। बिहारमधील गया याठिकाणी हरिदास सेमिनरी हायस्कूलमध्ये “हम” पक्षाच्या चिन्हावर विजयी झालेल्या आमदारांचा सत्कार आणि सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांनी कमिशनचा उघडपणे उल्लेख केला, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. “प्रत्येक खासदार आणि आमदार कमिशन घेतो…” Jitan Ram Manjhi। […] The post “१०% नाही तर ५% कमिशन घ्या,” ; जितन राम मांझी यांच्या विधानामुळे उडाला राजकीय गोंधळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 1:38 pm

हैदराबादमध्ये निधी अग्रवालनंतर समंथा प्रभूभोवती चाहत्यांचा गराडा, व्हिडीओ व्हायरल

हैद्राबाद : दाक्षिणात्य अभिनेत्री निधी अग्रवालप्रमाणेच आता समंथा रूथ प्रभूही चाहत्यांच्या गर्दीत अडकली आहे. हैदराबादमध्ये आयोजित एका स्टोअरच्या लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी झाल्यानंतर समंथाभोवती चाहत्यांनी अचानक गराडा घातला. कार्यक्रम संपवून बाहेर पडताना गर्दी इतकी वाढली की समंथाला कशीबशी वाट काढत आपल्या गाडीपर्यंत पोहोचावं लागलं.या वेळी काही चाहते तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी आरडाओरडा करत होते, तर काहींनी मर्यादा ओलांडत तिच्या साडीचा पदर ओढल्याचंही पाहायला मिळालं. एका व्हिडीओमध्ये समंथा गर्दीत वेढलेली दिसत असून तिची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाल्याचं स्पष्ट दिसत आहे.काही दिवसांपूर्वी हैदराबादमधील लूलू मॉलमध्ये निधी अग्रवाल चाहत्यांच्या गर्दीत अडकली होती. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आता त्याच शहरात समंथा रूथ प्रभूसोबतही असाच प्रकार घडल्याने चाहत्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.समंथानं या लॉन्च कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती आणि कार्यक्रमातील तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कार्यक्रम सोडून गाडीकडे जात असताना परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं दिसून आलं.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 1:30 pm

NFO Alert: आयसीआयसीआय प्रुडेंशियल इन्शुरन्स कंपनीकडून नवा Pru Sector Index Fund बाजारात लाँच

मुंबई: आयसीआयसीआय प्रुडेंशियल इन्शुरन्स कंपनी (ICICI Prudential Life Insurance Company) आपला नवा आयसीआयसीआय प्रु सेक्टर इंडेक्स फंड बाजारात आणला आहे. याची खासियत म्हणजे हा फंड आयसीआयसीआय युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन (Unit Linked Insurance Plan ULIP) सुसंगत असल्याचे लाँच दरम्यान आयसीआयसीआयने म्हटले. याचा सर्वाधिक फायदा म्हणजे आता गुंतवणूकदार एकाच वेळी विमा व गुंतवणूक करु शकणार आहेत. त्यामुळे यामध्ये आपल्या गरजेनुसार गुंतवणूकदार आपली गुंतवणूकीची किंमत निश्चित करू शकतील. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, किमान १००० रूपयांची गुंतवणूक असेट मॅनेजमेंट कंपनीने निश्चित केली आहे. या विमा लिंक असलेल्या गुंतवणूक फंडातील (एनएफओ) गुंतवणूक ९५ ते १००% इक्विटी मालमत्तेत म्हणजेच सेन्सेक्सवरील निर्देशांकातील कंपन्यात केली जाणार आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, उर्वरित ५% फंड बाजारातील डेट व मनी मार्केट इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवला जाईल. ज्यामुळे फंड मॅनेजरला या ५% निधीतून तरलता (Liquidity), व निश्चित परतावा निर्माण करण्यात मदत मिळणार आहे.माहितीनुसार हा पॅसिव्ह फंड असून विविध २० प्रकारच्या उद्योगक्षेत्रातील कंपन्यात हा निधी गुंतवला जाणार आहे. तसेच माहितीनुसार, मिळालेल्या कंपन्यांच्या लाभांशातून (Dividend) मधून ती रक्कम पुन्हा पोर्टफोलिओत गुंतवली जाणार आहे. विशिष्ट शेअर विकत घेण्यापेक्षा इंडेक्समधील विविध कंपन्यात ही गुंतवणूक केली जाईल. एकत्रित फायदा घेण्यासाठी हा फंड दीर्घकालीन गुंतवणुकदारांसाठी अधिक प्रमाणात लाभदायक ठरणार आहे.या लाँचबद्दल भाष्य करताना, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी मनीष कुमार म्हणाले की, 'या फंडाचा उद्देश गुंतवणूकदारांना क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून भारताच्या दीर्घकालीन वाढीमध्ये सहभागी होण्याचा एक सुव्यवस्थित आणि वैविध्यपूर्ण मार्ग उपलब्ध करून देणे आहे. विशेषतः बाजारातील अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकीत शिस्त आणि सातत्य प्रदान करण्यासाठी निर्देशांकावर आधारित दृष्टिकोन तयार करण्यात आला आहे.'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफने सांगितले की, हा नवीन फंड त्यांच्या अनेक युलिप योजनांमध्ये उपलब्ध आहे,ज्यात आयसीआयसीआय प्रू सिग्नेचर ॲश्युर, स्मार्टकिड ॲश्युर आणि आयसीआयसीआय प्रू स्मार्ट इन्शुरन्स प्लॅन प्लस (SIP+) यांचा समावेश आहे.आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीला आयसीआयसीआय बँक लिमिटेड आणि प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंग्ज लिमिटेड यांची एकत्रित कंपनी आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत, कंपनीने ३.२१ लाख कोटींची व्यवस्थापनाखालील मालमत्ता असून ४२.१६ लाख कोटींची एकूण लागू असलेली विमा रक्कम नोंदवली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये आज सकाळी १ वाजेपर्यंत ०.७१% घसरण झाल्याने शेअर ६४५.७० रूपयांवर व्यवहार करत आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 1:30 pm

मंचरमध्ये पडली समान मत; ईश्वर चिठ्ठीने निवडला नगरसेवक

मंचर : राज्यातील २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांत अनेक ठिकाणी अत्यंत चुरशीचे आणि धक्कादायक निकाल लागले. काही ठिकाणी अवघ्या एका मताने विजय-पराभव ठरला, तर काही ठिकाणी चिठ्ठीनेच निकाल दिला. मंचर नगरपंचायतीत घडलेला असाच एक अनोखा निकाल सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतो आहे.मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये दोन उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीचा आधार घ्यावा लागला. पहिल्यांदाच झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी दोन्ही उमेदवारांना समान कौल दिल्याने अंतिम निर्णय नशिबावर सोडण्यात आला.या प्रभागात शिंदे शिवसेनेकडून लक्ष्मण मारुती पारधी तर भाजपकडून ज्योती संदीप बाणखेले रिंगणात होते. निवडणुकीच्या निकालात दोघांनाही प्रत्येकी २२३ मते मिळाल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण झालं. अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेतला.चिठ्ठी उघडताच लक्ष्मण पारधी यांचं नाव बाहेर आलं आणि नगरसेवक पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. चिठ्ठीने विजय निश्चित होताच लक्ष्मण पारधी आणि त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. दुसरीकडे, समान मते मिळूनही ज्योती बाणखेले यांना मात्र नशिबाने साथ दिली नाही आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला.मंचरमधील हा निकाल लोकशाहीत मतांइतकंच नशिबालाही कधी कधी महत्त्व येतं, याचं जिवंत उदाहरण ठरत असून या घटनेची जोरदार चर्चा होत आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 1:30 pm

अशांत बांगला

१९७१ मध्ये इंदिरा गांधी यांनी युद्ध करून पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेशची निर्मिती केली. पण तो बांगलादेश आज हिंसाचाराच्या आणि सरकारविरोधी निदर्शनांच्या आगीत होरपळतोय. काल परवा तेथे शरीफ उस्मान हादी या विद्यार्थी नेत्याची हत्या झाली आणि त्यानंतर तेथे जो हिंसाचार उफाळला त्यातून देश सावरलाच नाही. बांगलादेश हा शेख हसीना यांची राजवट होती, तेव्हापर्यंत शांत निदान भासत तरी होता. पण तेथील विद्यार्थ्यांनी उठाव करून राखीव जागांविरोधी आंदोलन केले आणि हसीना यांना भारतात आश्रय घ्यावा लागला. त्यानंतर बांगलादेश कधीही शांत झाला नाही. तेथील हिंदूंना या हिंसाचाराचा सर्वाधिक त्रास होत आहे आणि या हिंदूंचे रीतसर शिरकाण सुरू आहे. तेथील अल्पसंख्याक हिंदूंची हत्या होणे हे चिंताजनक आहे. एका हिंदू इसमाला दंगलखोरांनी मारहाण करून ठार मारल्याची घटना घडली आणि तेथील मोहम्मद युनूस सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. हा खरं तर त्या सरकारचा आगीशी खेळ आहे. कारण याचे फारच गंभीर परिणाम होतील आणि युनूस यांना सध्या याची जाणीव नाही. उस्मान हादी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस प्रचंड प्रमाणात गर्दी जमली होती. यावरून हाच निष्कर्ष काढता येतो की बहुसंख्य जनता ही भारतविरोधी आहे.बांगलादेशात आता निवडणुका होत आहेत. त्यामुळे परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. खास करून भारतीयांसाठी. बांगलादेश सरकारविरोधात आंदोलन चरमसीमेवर पोहोचले असताना एका तरुण नेत्याची हत्या करण्यात आली आणि त्याला चिथावणी देणारे बांगलादेशी लोक होते. त्यामुळे अशा कृत्यांना कुणाची मान्यता असणार, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या गदारोळामध्ये दोन मीडिया हाऊसेसची कार्यालये दंगलखोरांनी जाळली आणि कर्मचाऱ्यांना कसेबसे पळून जावे लागले. बांगलादेशात मीडियाची इतकी दारुण अवस्था कधीही नव्हती. अगदी भारत बांगलादेश युद्धातही नव्हती. आता बांगलादेशी लोक भारतीयांविरोधात आपला राग अकारण काढत आहेत, पण ते विसरत आहेत की त्यांना याची शिक्षा पुरेपूर होऊ शकते. भारताने ठरवले तर बांगलादेशला कधीही धडा शिकवू शकतो. पण त्यापेक्षाही हे महत्त्वाचे आहे, की बांगलादेशात ज्या अविचारी शक्तींनी देश हाती घेतला आहे, त्यांना हे माहीत नाही की ही स्थिती देशात अस्थिरता आणू शकते. उस्मान हादीच्या हत्येनंतर देश आता अशांततेने ग्रासला आहे. बांगलागदेशात हिंदूवर अत्याचार आणि त्यांच्या हत्या होण्याच्या घटना घडत आहेत आणि हे चांगले नाही. बागंलादेशसाठी नाही आणि भारतासाठी तर नाहीच नाही. कारण भारत आणि बांगलादेश यांच्यात पूर्वी सलोख्याचे संबंध होते. पण बांगलादेशात हसीना यांची सत्ता गेल्यानंतर तेथे मोहम्मद युनूस यांचे सरकार आले आणि आज देश त्यांच्या हातात आहे की काय अशी स्थिती झाली आहे. बांगलादेश आता पाकच्या वळचणीला जाऊ पाहत आहे आणि हाच धोका आहे. कारण पाक-भारताचे प्रत्यक्षात तर काही वाकडे करू शकत नाही, पण अशा आडवळणाने पाक भारताला त्रास देऊ शकतो. बांगलादेशात आता अल्पसंख्याकांना म्हणजे हिंदूना वाढता धोका निर्माण झाला आहे. ईशनिंदाचे आरोप करणे हे हिंदूच्या छळाचे कारण आहे. हिंदूंची हत्या झाली त्याला हेच कारण होते. त्यामुळे एकेकाळी हिंदू-मुस्लीम सद्भावानेच्या वातावरणात जगत असलेला देश आज परस्परांचा शत्रू बनला आहे. भारत-बांगलादेश यांच्यात एकेकाळी मधुर संबंध होते आणि बांगलादेशाचे निर्माते शेख मुजीबूर रहमान यांच्याशी तत्कालीन काँग्रेस सरकारचे अत्यंत चागंले सबंध होते. मुळात भारतानेच बांगलादेशाच्या निर्मितीला मदत केली होती. पाकिस्तानी सैनिकांच्या अत्याचारापासून बांगलादेशी नागरिकांना वाचवले होते. मात्र आज तशी परिस्थिती राहिली नाही आणि बांगलादेशाची अवस्था नाजूक झाली आहे. हादीच्या हत्येनंतर युनूस सरकार ग्रेटर बागंलादेशचे स्वप्न पाहत आहे, जे की शक्य नाही. ज्याची व्याप्ती बंगाल, ओडिशा आणि बिहारपर्यंत जाऊ शकते. म्हणूनच युनूस सरकार आता बांगलादेशातील निवडणुका कट्टरपंथीयांच्या जोरावर जिंकू पाहत आहे. भारतात मिनी बांगलादेशीयांची वस्ती ठिकठिकाणी आहे आणि त्यांना कायदेशीर कागदपत्रे आपल्याकडील काँग्रेसनेत्यांनीच मिळवून दिली होती.बांगलादेशने आता हादीच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला असला तरीही त्याच्या मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही, त्यामुळे बांगलादेश हादीच्या हत्येच्या आगीत अजूनही जळतच रहाणार आहे. आता यातून मार्ग काढण्यासाठी युनूस सरकारपुढे एकच मार्ग आहे, तो म्हणजे शांतता आणी सलोख्याचे आवाहन करणे आणि भविष्यात अशी भडक हिंसा घडणार नाही याची काळजी घेणे. पण युनूस सरकार त्याबाबतीत कसे वागते हे पाहावे लागेल. या दंगलीत हल्लेखोरांनी दैनिकावर हल्ले केले. बांगलादेश अजूनही प्रचंड मागास आहे. त्यामुळे अर्धी लोकसंख्या इंटरनेटपासून वंचित आहे. पण अशा लोकांना भावना भडकावणे सोपे असते आणि तेच बाांगलासरकारने केले. त्यातही भारताच्या विरोधात भडकावण्याने लोक खरेखोट्याची शहानिशा न करता सरकार सांगतील त्या बाबींवर विश्वास ठेवतात. त्याचा फटका भारताला बसला. ज्या दैनिकांची कार्यालये जाळली त्यांच्या संपादकानी हा दिवस स्वतंत्र पत्रकारितेसाठी काळा दिवस असल्यचे म्हटले आहे. देशाची प्रतिमा मलिन होईल असे कृत्य कुणीही करू नये पण युनूस सरकारला धर्मांध शक्तींपुढे न झुकता कारवाई करावी लागेल, तरच बांगलादेश या संकटातून बाहेर पडेल. बांगलादेश हिंसाचारात कुणाचा हात आहे आणि कुणाचे अंतस्थ हेतू आहेत हे कळण्यासाठी घटनेची चौकशी होऊन दंगेखोर समोर आले पाहिजे ही प्रत्येक देशवासीयाची इच्छा आहे. त्याला युनूस यांनी प्रतिसाद दिला पाहिजे. त्यांचे सरकार लेचेपेचे नाही हे त्यांनीच दाखवून दिले पाहिजे. अन्यथा त्यांची गत खलिदा झिया यांच्यासारखी होईल. या गोंधळाचा उपयोग करून मोहम्मद युनूस कदाचित निवडणुका पुढे ढकलतील किंवा कट्टरपंथीयांची सहानुभूती मिळवतील. तसे झाले तर लोकशाहीचा पराभव होईल.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 1:30 pm

जांबूत : बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश; नागरिकांना काहीसा दिलासा

जांबूत – चांडोह (ता. शिरूर) येथील शेतकरी हर्षल भुजबळ यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी (दि. २१) रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. सहा वर्षे वयाची ही बिबट मादी संवर्गातील असून तीला पुढील उपचार व निरीक्षणासाठी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले असल्याचे वनरक्षक लहू केसकर यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरखेड, […] The post जांबूत : बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश; नागरिकांना काहीसा दिलासा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 1:24 pm

टेक ऑफनंतर काही वेळातच एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग ; हवेत ३३७ प्रवाशांचा जीव टांगणीला

Air India Flight। मुंबईला जाणारे एअर इंडियाचे विमान AI-887 (बोईंग 777-300ER) तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीला परतावे लागले. विमानाचे आज सकाळी 7:47 वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. आज सकाळी दिल्लीहून मुंबईला उड्डाण घेतल्यानंतर, विमानाच्या इंजिन क्रमांक 2 मधील तेलाचा दाब शून्यावर आला, ज्यामुळे पायलटने आपत्कालीन लँडिंगसाठी दिल्लीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. आपत्कालीन कॉल […] The post टेक ऑफनंतर काही वेळातच एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग ; हवेत ३३७ प्रवाशांचा जीव टांगणीला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 1:21 pm

निर्देशांक पुन्हा तेजीत...

डॉ. सर्वेश सुहास सोमणगेल्या चार सत्रांपासून सुरू असलेल्या घसरणीच्या मालिकेला शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, रुपयातील स्थिरता आणि 'बँक ऑफ जपान'चा धोरणात्मक निर्णय अपेक्षेनुसार राहिल्याने गुंतवणूकदारांनी बाजारात जोरदार खरेदी केली. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४४८ अंकांनी उसळला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने १५१ अंकांची आघाडी घेत आठवड्याचा शेवट सकारात्मक केला.निफ्टी ५० मध्ये नफा देणाऱ्या शेअर्समध्ये श्रीराम फायनान्स ३.७१ टक्क्यांच्या वाढीसह बाजी मारली. त्याखालोखाल मॅक्स हेल्थकेअर (२.६१%), भारत इलेक्ट्रॉनिक्स (२.४६%), पॉवर ग्रिड (२.१४%) आणि टाटा मोटर्स (१.५५%) या शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली. दुसरीकडे आयटी क्षेत्रातील दिग्गज एचसीएल टेकला १.१५ टक्क्यांच्या घसरणीचा फटका बसला. हिंदाल्को (०.५५%), जेएसडब्ल्यू स्टील (०.२५%), कोटक बँक (०.२४%) आणि आयसीआईसीआय बँक (०.२०%) हे शेअर्सही नकारात्मक राहिले. जपानची आघाडीची बँक मित्सुबिशी यूएफजे फायनान्शियल ग्रुप(एमयूएफजी)ने श्रीराम फायनान्समध्ये ₹३९,६१८ कोटी (सुमारे ४.४ अब्ज अमेरिकन डॉलर) गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीद्वारे एमयूएफजी ने कंपनीतील २०% हिस्सेदारी विकत घेतली आहे. ही गुंतवणूक भारतातील कोणत्याही फायनान्स कंपनीतील सर्वात मोठ्या थेट परदेशी गुंतवणुकांपैकी एक मानली जात आहे. एमयूएफजी चा प्रमुख गुंतवणूकदार म्हणून प्रवेश कंपनीच्या दीर्घकालीन विकास क्षमतेला बळ देईल. यामुळे भारताच्या वित्तीय सेवा क्षेत्रातील जागतिक विश्वास अधिक दृढ होईल, असे त्यांनी सांगितले.एमयूएफजीसाठी भारतातील सर्वात मोठी गुंतवणूकसुमारे १३० वर्षे जुनी असलेल्या एमयूएफजी बँकेसाठी ही भारतामधील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. एमयूएफजीचे ग्रुप सीईओ हिरोनोरी कामेजावा यांच्या नुसार दोन्ही कंपन्यांचे दीर्घकालीन दृष्टिकोन आणि मूलभूत मूल्ये समान आहेत जे श्रीराम फायनान्सच्या वाढीच्या उद्दिष्टांना पाठबळ देतात.आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी रुपयानं जोरदार पुनरागमन करत डॉलरच्या तुलनेत सुमारे २% मजबूती दर्शवली. ही गेल्या तीन वर्षांतील सर्वात मोठी एका दिवसातील सुधारणा मानली जात आहे. शुक्रवारी रुपया ८९.२७ च्या पातळीवर बंद झाला, जो आदल्या दिवसाच्या तुलनेत १.१% ची मोठी झेप आहे. काही तासांपूर्वी ९१ च्या पार कमकुवत दिसणारा रुपया पुन्हा एकदा सावरलेला दिसला. या रिकव्हरीमागील सर्वात मोठं कारण आरबीआयची आक्रमक भूमिका हे होतं.दीर्घकाळ विक्री करणाऱ्या परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात खरेदी केली आहे, जे अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक मानलं जात आहे. भविष्यातील वाटचालीबद्दल बोलायचं झाल्यास, बाजार विश्लेषकांचे असे मत आहे की आरबीआयच्या सक्रिय उपस्थितीमुळे नजीकच्या भविष्यात रुपयामध्ये मोठी चढ-उतार होण्याची शक्यता कमी आहे. सध्या ८९.२५ ची पातळी आधार म्हणून आणि ८९.९० च्या आसपासची पातळी महत्त्वाची वरची सीमा मानली जात आहे.जीआरएम ओव्हरसीजच्या शेअरने गेल्या वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने एका वर्षात तब्बल १३९ टक्के परतावा दिला आहे, तर केवळ २०२५ या वर्षात आतापर्यंत १३५ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. गेल्या तीन महिन्यांचा विचार करता या शेअरने ३३ टक्क्यांची रॅली केली आहे.शुक्रवारी बाजारामध्ये हा शेअर ४७५ रुपये या उच्चांकी स्तरावर व्यवहार करत होता. कंपनीने आपल्या भागधारकांसाठी २:१ या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली असून, त्यासाठी आता 'रेकॉर्ड तारीख' देखील निश्चित केली आहे. शुक्रवारी या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी हालचाल पाहायला मिळाली. बुधवार २४ डिसेंबर ही बोनस शेअर्ससाठीची रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, ज्या गुंतवणूकदारांकडे रेकॉर्ड तारखेपर्यंत कंपनीचा एक शेअर असेल, त्यांना अतिरिक्त दोन शेअर्स बोनस म्हणून दिले जातील. या बोनस शेअर्सचे वाटप शुक्रवार २६ डिसेंबर रोजी केले जाणार आहे.पुढील आठवड्याचा विचार करता निफ्टीची २५८००ही महत्त्वाची खरेदीची पातळी असून जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर आहे तोपर्यंत ही तेजी टिकून राहील.(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही) samrajyainvestments@gmail.com

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 1:10 pm

NSE Report: देशात गुंतवणूक डंके की चोट पे! ९.७ लाख कोटीचा निधी एक वर्षात 'यातून'उभा महत्वाची माहिती पुढे

मोहित सोमण: नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (National Stock Exchange) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत शेअर बाजारात निधी उभारणी मोठ्या प्रमाणात राहिली असून आर्थिक वर्ष २६ मध्ये नोव्हेंबरपर्यंत ८३ कंपन्यांनी १.३ लाख कोटी रुपये उभे केले आहेत. मोठ्या प्रमाणात समाजाच्या प्रत्येक स्तरावर आयपीओतील गुंतवणूक वाढ केल्याने अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. एनएसईने मासिक मार्केट प्लस डिकोडेड २०२५ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यातील निरिक्षणानुसार , संपूर्ण आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात आयपीओतून भांडवल निर्मिती झाली आहे. आपल्या अहवालात एनएसईने म्हटले आहे की, मेनबोर्डवर, ८३ कंपन्यांनी १.३ लाख कोटी रुपये उभे केले, ज्यात ४१% निधी नवीन इक्विटीद्वारे आणि ५९% निधी 'ऑफर फॉर सेल' (Offer for Sale) द्वारे उभारण्यात आला आहे.आयपीओतील निधी उभारणीची गती मोठ्या संख्येने वाढली असून या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भांडवल निर्मिती झाली असल्याचे अहवालाने नमूद केले आहे. नवीन इक्विटीमध्ये, कंपनी नवीन शेअर्स तयार करून ते जनतेला विकते. या नवीन शेअर्समधून उभारलेला सर्व पैसा थेट कंपनीकडे जातो, जी नंतर तो निधी व्यवसाय विस्तारण्यासाठी, नवीन प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी किंवा कर्जे फेडण्यासाठी वापरते. याउलट, ओएफएसमध्ये (ऑफर फॉर सेल) कंपनीचे संस्थापक किंवा सुरुवातीचे गुंतवणूकदार यांसारखे विद्यमान गुंतवणूकदार त्यांचे आधीपासून असलेले मालकीचे शेअर्स नवीन गुंतवणूकदारांना विकतात.अहवालात पुढे नमूद केले आहे की, या नव्याने सूचीबद्ध (Listed) झालेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल आता १० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे, जे देशांतर्गत बाजारातील अलीकडील विस्ताराची व्याप्ती दर्शवते. ही वाढ भारतीय भांडवली बाजारांची मोठ्या प्रमाणात निधी उभारणी आकर्षित करण्याची आणि विविध क्षेत्रांतील कंपन्यांना पाठिंबा देण्याची वाढती क्षमता देखील दर्शवते. अहवालातील माहितीनुसार, गुंतवणूकदारांच्या सहभागाच्या पद्धतींमध्येही लक्षणीय कल दिसून आले. केवळ किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग २५% वाढला.त्यामुळे प्राथमिक बाजारातील ऑफरमध्ये (IPO) वैयक्तिक गुंतवणूकदारांची आयपीओतील वाढलेल्या कलाची नोंद घेतली गेली आहे. त्याच वेळी पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा वाटा मात्र तुलनेने कमी झाला आहे असे अहवालात म्हटले आहे.एनएसईच्या अहवालात 'इमर्ज' प्लॅटफॉर्मद्वारे एसएमई (SME) विभागातही सातत्यपूर्ण गती असल्याचे नमूद केले आहे.'इमर्ज' प्लॅटफॉर्मवर ८० कंपन्या सूचीबद्ध झाल्या आणि त्यांनी एकूण ३९११ कोटी रुपये उभे केले. विशेष म्हणजे, या रकमेपैकी ९५% निधी नवीन इक्विटीद्वारे उभारण्यात आला. खासकरून लहान आणि मध्यम उद्योगांना वाढीसाठी भांडवलीसाठी ही रक्कम कामी येते. याव्यतिरिक्त, अहवालात म्हटले आहे की, अलीकडील नियामक उपायांमुळे भारताची सूचीकरण परिसंस्था (Listing Ecosystem) आणखी मजबूत झाली आहे.या उपाय योजनेत किमान सार्वजनिक भागविक्रीची आवश्यकता कमी करणे, मोठ्या संस्थांसाठी किमान सार्वजनिक भागभांडवल साध्य करण्यासाठी मुदतवाढ देणे, 'इमर्ज' प्लॅटफॉर्मवरून मेनबोर्डवर जाणाऱ्या एसएमई कंपन्यांसाठी स्थलांतर निकष सुलभ करणे आणि डिस्क्लोजर संबंधित नियम अधिक कठोर करणे यांचा समावेश असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. एकंदरीत, अहवालाने असा निष्कर्ष काढला की भरीव निधी उभारणीची प्रक्रिया, किरकोळ गुंतवणूकदारांचा मोठा सहभाग आणि सहाय्यक नियामक उपाययोजना (Regulatory Measures) यामुळे दीर्घकालीन वाढ आणि विस्ताराला चालना देण्यासाठी भारताच्या भांडवली बाजारांची भूमिका अधिक मजबूत होत आहे.एनएसईवरील मार्केट प्लस असलेल्या ईपीआर (Economic Policy and Research EPR) अहवालातील आणखी महत्वाची उपयुक्त माहिती -१) भारताच्या भांडवली बाजारांनी आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या सहामाहीत मजबूत लवचिकता (Flexibility)२) इक्विटी आणि कर्जाद्वारे ९.७ लाख कोटी रुपये उभे केले गेले जो निधी इयर ऑन इयर बेसिसवर १३% जास्त आहे३)इक्विटीद्वारे निधी उभारणी २ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली ज्यात आयपीओमधून ६४३६३ कोटी रुपयांचा समावेश४)१२२ नवीन सूचींमुळे (५४ मेनबोर्ड, ६८ एसएमई) बाजार भांडवलात ४.१ लाख कोटी रुपयांची भर५) टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या नेतृत्वाखाली ऑक्टोबर २०२५ मध्ये विक्रमी आयपीओ व्यवहार६) एनएसईचा नोंदणीकृत गुंतवणूकदार वर्ग २२ सप्टेंबर २०२५ रोजी १२ कोटींच्या पुढे गेला. केवळ आठ महिन्यांत १ कोटींची वाढ७) गुंतवणूकदारांमध्ये महिलांचे प्रमाण जवळपास २५% आहे; ५५.६% नवीन गुंतवणूकदार ३० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत८) उत्तर प्रदेश सलग ३२ व्या महिन्यासाठी नवीन नोंदणीमध्ये आघाडीवर होता९) एकूण क्लायंट खात्यांची संख्या अंदाजे २३.७ कोटींवर पोहोचली.बाजारातील इतर माहिती -इक्विटी कॅश एडीटी मासिक तुलनेत ५.१% वाढून ९८,३१२ कोटी रुपयांवर पोहोचला; इक्विटी ऑप्शन्स एडीटी वाढून ४८,६६२ कोटी रुपयेएक्सपायरी मंगळवारी स्थलांतरित केल्यामुळे निफ्टी५० प्रीमियम उलाढाल मासिक तुलनेत २.७% वाढून ३७३९३ कोटी रुपयांवर पोहोचलीएकूणच, बाजारात दररोज सरासरी ८.५ कोटी व्यवहारवीजेतील फ्युचर्समुळे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज एडीटी व्यवहार विक्रमी १०६ कोटी रुपयांवरवैयक्तिक गुंतवणूकदारांचा सहभाग वाढला, सप्टेंबरमध्ये १.१९ कोटी गुंतवणूकदारांचा कॅश इक्विटीमध्ये सहभागडेरिव्हेटिव्ह्जमधील किरकोळ सहभाग ३३.६ लाखांपर्यंत वाढला, त्यापैकी ७७% गुंतवणूकदार कॅश इक्विटीमध्येही सक्रियउलाढाल काही ठराविक गुंतवणूकदारांमध्येच केंद्रितशीर्ष (Top) ०.२% गुंतवणूकदारांनी इक्विटी कॅश उलाढालीपैकी ७७% उलाढाल केलीशीर्ष ०.३% ऑप्शन्स व्यापाऱ्यांनी प्रीमियम उलाढालीत ६९% योगदान दिलेआर्थिक वर्ष २६ साठी जीडीपी वाढीचा अंदाज ६.८% (आरबीआय) आहे, तर महागाई २.६% पर्यंत कमी होण्याची शक्यतासप्टेंबरमध्ये सीपीआय आणि डब्ल्यूपीआय महागाई कमी झालीऑगस्टपर्यंत वित्तीय तूट आर्थिक वर्ष २६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ३८% होतीमजबूत बँक कर्जपुरवठ्यामुळे क्रेडिट-डिपॉझिट गुणोत्तर ८०% च्या वर गेले.मान्सून अतिरिक्त पर्जन्यासह संपला जो २००१ पासूनचा सर्वाधिक पाचवा दर ज्याचा ग्रामीण भागात फायदाजागतिक अनिश्चितता उच्च पातळीवर कायमभूराजकीय जोखीम काही प्रमाणात कमी झालीसूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ५.०५ ट्रिलियन आहे१२ कोटींहून अधिक पॅन लिंक गुंतवणूकदार, जे ९९.८५% पिन कोड्सना व्यापतातनिफ्टी निर्देशांकांचा मागोवा घेणारी पॅसिव्ह एयूएम (Pasive Asset Under Management AUM) ९७.२ अब्ज डॉलर्सवरएनएसई जगातील सर्वात मोठा डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंजव्यवहारांच्या बाबतीत तिसरा सर्वात मोठा इक्विटी एक्सचेंज बनला.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 1:10 pm

‘गुगल पे’चे पहिले क्रेडिट कार्ड; आता यूपीआयद्वारे पेमेंट

नवी दिल्ली : गुगलने अखेर आपले पहिले ग्लोबल क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. विशेष म्हणजे, हे कार्ड सर्वात आधी भारतात सादर करण्यात आले आहे. गुगलने भारतात 'Flex by Google Pay' या नावाने नवीन डिजिटल क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. हे कार्ड वापरण्यास यूपीआयसारखे सोपे आहे, परंतु यात क्रेडिट कार्डच्या सुविधा मिळतात.आता क्यूआर कोड स्कॅन करून किंवा ऑनलाइन पेमेंट करताना वापरकर्ते फिजिकल कार्डशिवाय 'क्रेडिट'द्वारे पेमेंट करू शकतील. अॅक्सिस बँकेच्या सहकार्याने आणलेले हे नवीन फीचर केवळ त्वरित पेमेंटची सुविधाच देत नाही, तर प्रत्येक पेमेंटवर रिवॉर्ड्स देखील देते.झपाट्याने वाढणारी युपीआय पेमेंट सिस्टीम लक्षात घेऊन कंपनीने हे कार्ड यूपीआयशी लिंक करण्याची सुविधाही दिली आहे. म्हणजेच, ग्राहक हे कार्ड आपल्या यूपीआय अकाउंटला जोडून दुकानांमध्ये आणि व्यापाऱ्यांना सहजपणे पेमेंट करू शकतील. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या RuPay नेटवर्कवर चालणारे हे कार्ड वापरकर्ते यूपीआय शी जोडू शकतात.जाणून घ्या कार्डची वैशिष्ट्येगुगल पेच्या या क्रेडिट कार्डचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे इन्स्टंट कॅशबॅक आणि रिवॉर्ड्स. सहसा बाजारात उपलब्ध असलेली क्रेडिट कार्ड्स महिन्याच्या शेवटी कॅशबॅक देतात; परंतु गुगलने ही प्रक्रिया बदलून प्रत्येक व्यवहारावर त्वरित रिवॉर्ड देण्याची सुविधा दिली आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही मिळालेले रिवॉर्ड पॉइंट्स पुढच्याच खरेदीत लगेच वापरू शकता.गुगलचे सिनियर डायरेक्टर शरथ बुलूसु यांनी सांगितले की, ग्राहकांना रिवॉर्ड रिडीम करताना जास्त त्रास होऊ नये, यासाठी कंपनीने या फीचरवर खास काम केले आहे.याआधी पेटीएमने २०१९ मध्ये सिटी बँक आणि २०२१ मध्ये एचडीएफसी बँकेसोबत आपले को-ब्रँडेड कार्ड लाँच केले होते, ज्यामध्ये नंतर एसबीआयचाही समावेश झाला. याशिवाय Cred आणि super money सारखे अॅप्स देखील यूपीआयशी संबंधित क्रेडिट कार्ड ऑफर करत आहेत.गुगल क्रेडिट कार्ड कसे मिळवायचे?फ्लेक्स क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे खूप सोपे आहे असा गुगलचा दावा आहे. ते मिळविण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची किंवा कोणतेही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. अर्जापासून ते मंजुरीपर्यंत, सर्व काही काही मिनिटांत ऑनलाइन केले जाते. एकदा तुमचे क्रेडिट कार्ड मंजूर झाले की, तुम्ही तुमची क्रेडिट मर्यादा ताबडतोब वापरण्यास सुरुवात करू शकाल.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 1:10 pm

विमा क्षेत्रात मोठी उलथापालथ

नवी दिल्ली : संसदेने विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआयला मंजुरी दिल्याने मोठा बदल होणार आहे. या निर्णयामुळे स्वस्त विमा, अधिक पर्याय आणि लवकर क्लेम सेटलमेंट शक्य होणार आहे. केंद्र सरकारने आणलेलं ‘सबका बीमा सबकी रक्षा (विमा कायदा सुधारणा) विधेयक २०२५ संसदेनं मंजूर केलं असून, यानंतर विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीची (एफडीआय) मर्यादा ७४ टक्क्यांवरून थेट १०० टक्के करण्यात आली आहे. लोकसभेनंतर राज्यसभेनेही या विधेयकाला मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, या निर्णयामुळे देशात नव्या विमा कंपन्या, ब्रोकर्स आणि सेवा येतील.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 1:10 pm

‘भारत टॅक्सी’मुळे प्रवास माफक आणि सुरक्षित

नवी दिल्ली : ओला आणि उबरसारख्या बड्या कंपन्यांना तगडी फाईट देण्यासाठी १ जानेवारी २०२६ पासून 'भारत टॅक्सी' (Bharat Taxi) हे नवीन ॲप लाँच होणार आहे. सहकारी मॉडेलवर आधारित असलेले हे ॲप प्रवासी आणि ड्रायव्हर्स या दोघांसाठीही अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. प्रवाशांना 'पीक आवर्स'मध्ये वाढीव भाड्यापासून दिलासा मिळणार आहे, तर ड्रायव्हर्सना एकूण भाड्याचा ८० टक्क्यांहून अधिक हिस्सा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुरुवातीला हे ॲप दिल्लीत लाँच केलं जाणार आहे.सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड अंतर्गत ही सेवा चालवली जाईल. याला नाबार्ड, इफको आणि अमूल यांसारख्या मोठ्या संस्थांचे सहकार्य लाभले आहे.या मॉडेलमध्ये टॅक्सी चालक हे केवळ कर्मचारी नसून ते या व्यवसायाचे मालक म्हणून काम करतील. सध्या दिल्ली आणि गुजरातमध्ये याची चाचणी सुरू असून ५१,००० हून अधिक चालकांनी नोंदणी पूर्ण केली आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 1:10 pm

दिपू दासच्या मृत्यूला जबाबदार कोण?बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोलकाता : भारतीय राजकारणात पश्चिम बंगाल हे नेहमीच संघर्षाचे केंद्र राहिले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ज्या ध्येयाने हिंदू बहुल पश्चिम बंगाल भारताचा अविभाज्य भाग राहील याची खात्री केली, त्या ध्येयाला आज तडा जात असल्याचा आरोप केला जात आहे. फाळणीनंतर आणि त्यानंतरच्या दशकात धार्मिक छळ सोसून सीमेपलीकडून आलेल्या हिंदू बंगाली बांधवांना हक्काचे घर आणि नागरिकत्व मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नागरिकत्व सुधारणा कायदा' (CAA) आणला. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कायद्याला केलेल्या तीव्र विरोधामुळे आता बंगाली हिंदूंच्या सुरक्षेचा आणि अस्मितेचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे.सीएए (CAA) विरोधामागील राजकारणमानवतावादी दृष्टिकोनातून आणलेल्या या कायद्याला ममता बॅनर्जी यांनी केवळ राजकीय फायद्यासाठी विरोध केल्याचा आरोप होत आहे. टीकाकारांच्या मते, त्यांनी कट्टरपंथी घटकांना एकत्र करून सीएए विरोधात आंदोलने छेडली, ज्यामुळे बंगालमधील रस्त्यांवर हिंसाचार झाला, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आणि विशेषतः हिंदू समुदायाला लक्ष्य करण्यात आले. यामुळे ज्या हिंदूंना सन्मानाने जगायची आशा होती, त्यांच्या मनात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वंचित समुदायांची छळवणूकमथुआ, नमशूद्र आणि राजवंशी यांसारख्या अत्यंत गरीब आणि गरजू समुदायांना नागरिकत्वाचे अर्ज करण्यापासून परावृत्त करण्यासाठी राज्य सरकारने भीतीचे राजकारण केल्याचा दावा केला जात आहे. जर तुम्ही निर्वासित म्हणून नोंदणी केली, तर तुमचे जुने दस्तऐवज अवैध ठरतील आणि सरकारी योजनांचे लाभ बंद होतील, अशी भीती पसरवून या समुदायांचे खच्चीकरण केले गेल्याचे बोलले जात आहे. या वादात बांगलादेशातील दिपू चंद्र दास सारख्या व्यक्तींच्या बलिदानाचा संदर्भ दिला जात आहे. जर ममता बॅनर्जी यांनी तुष्टीकरणाचे राजकारण बाजूला ठेवून सीएए कायद्याला सहकार्य केले असते, तर आज अनेक छळ सोसणारे हिंदू नागरिकत्वाच्या अधिकारासह सुरक्षित जीवन जगत असते. केवळ व्होट बँकेच्या राजकारणामुळे बंगाली हिंदूंना असुरक्षिततेच्या खाईत लोटले गेल्याचा आरोप आता जोर धरत आहे.२०२६ ची निवडणूक आणि मतदारांचे कर्तव्यपश्चिम बंगालच्या इतिहासात या राजकीय निर्णयांची नोंद काळी अक्षरे म्हणून केली जाईल. आता ही वेळ आहे की बंगालच्या जनतेने या अन्यायाचा विचार करावा. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत या तुष्टीकरणाच्या राजकारणाला चोख उत्तर देऊन हिंदू हित आणि राज्याची सुरक्षा जपणाऱ्या नेतृत्वाला निवडून देण्याचे आवाहन या निमित्ताने केले जात आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 1:10 pm

कोकणातही पसरली बिबट्यांची दहशत

वार्तापत्र : कोकणवन्यप्राणी रस्त्यावर आलेत. याची अनेक कारणं असली तरी, जंगलाला रानमोडी वनस्पतीने घातलेला वेढा हे देखील एक प्रमुख कारण आहे. रानमोडीने जंगलातील अनेक झाडं-झुडपं नष्ट केली आहे. रानमोडी पसरल्यावर कोणत्याही भागातील अन्य झाडांवर अतिक्रमण होतं आणि एकदा रानमोडी पसरली की, आपोआपच परिसरातील इतर झाडं नष्ट होतात ही वस्तुस्थिती आहे. कोकणातील जंगलांमध्ये आता रानमोडीच वाढलेली दिसते. बाकीची सगळीच झाडं आणि झुडपांच्या जागी रानमोडी मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते. रानमोडीच्या अतिक्रमणामुळेही जंगलातील वन्यप्राणी जंगल सोडून गावो-गावच्या मानवी वस्तीकडे आले आहेत. बिबटे तर एवढे वाढले आहेत, की आज कोकणातील पालघरपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील बांद्यापर्यंत बिबटे दिसतात. कधी कोणाच्या अंगणात, तर कधी घराशेजारी, कधी गुरांच्या गोठ्यात, तर कधी अगदी भरदिवसा बिबट्या रस्त्यावर फिरताना दिसून येतो...महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वन्यप्राण्यांनी जंगल सोडून मानवी वस्तीत प्रवेश केला. कोकणात तर हत्ती, बिबटे, गवारेडे आदी वन्यप्राण्यांनी कोकणातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांचे जगणेच हैराण करून सोडले आहे. कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्यांमध्ये दिवसा-ढवळ्या वन्यप्राणी महामार्गांवर फिरताना आढळून येत आहे. पंधरा-वीस वर्षांपूर्वी बिबट्याचे दर्शन दुर्मीळ होते. फार क्वचित कुठल्यातरी जंगलाच्या शेजारच्या एखाद्या गावात वाघाची डरकाळी कानी पडायची. तेव्हा कुठे गावात चर्चा व्हायची, 'जंगलात वाघ इलो असो वाटता'. आज-काल वाटण्याचा विषयच नाही. बिबट्यांचा तर गावो-गावी मुक्त संचारच असतो. ग्रामीण भागातील अनेकवेळा रात्री आणि दिवसाच्या प्रवासातही बिबट्या रस्ता अडवून बसलेला असतो. पाणवठ्याच्या जागांवर, नदी, ओढ्यांच्या किनाऱ्यावर बिबट्या हमखास पाणी प्यायला येतो. काही गावकुसाबाहेर वन्यप्राणी पाणी प्यायला येण्याच्या काही खास जागाही आहे. या पाणीसाठा असणाऱ्या ओढ्यांवर हमखास वन्यप्राणी असतातच. पूर्वीच घनदाट असणार कोकणातील जंगल आज विरळ होत गेलंय. जंगलातील जुनाट मोठे वृक्ष, जंगली फळ देणारी झाडं आज फारशी कुठे दिसत नाहीत. तेथे जंगल वाढलेय ते रानमोडीने. साहजिकच यामुळे कोकणातील पूर्वीची जंगले कुठे दृष्टीस पडत नाही. पक्षी आणि माकडं सारेच त्यांच्या-त्यांच्या भागांतून स्थलांतरीत झाले आहेत.माकडांनी तर वस्तीतच ठाण मांडले आहे. गावो-गावच्या वस्तीत तर झाडांवर माकडे दिसतात. एवढच कशाला गावातील घराशेजारील झाडांवर असणारी माकड झाडांवरून थेट घरात कधी प्रवेश करतात हेच मुळी कोणाला कळत नाही. घरातील माणसं शेतात कामाला जातात. घरामध्ये कोणाचीही चाहूल लागत नाही, घरात कोणीच नाही. हे पाहून माकडं घरात शिरतात. शेतात कामासाठी जाणारी शेतकरी लोक शेतात कामाला जाताना जेवण तयार करून ठेवतात आणि शेतात जातात. कोणत्या तरी मार्गाने माकड घरात प्रवेश करतात आणि तयार करून ठेवलेल्या जेवणाचा फडशा पाडतात. अनेक कुटुंबीयांनी माकडांचा हा अनुभव घेतला आहे. हा प्रकार ग्रामीण भागातच घडतोय असे नव्हे तर शहरी भागातही असेच अनेकांना अनुभव आलेले आहेत. एवढच कशाला अनेक बंगल्यात थेट प्रवेश करून माकड डायनिंग टेबलवर ठेवलेल्या फळांची नासधूस करतात याची चर्चा अनेकवेळा कानावर येते. त्यामुळे कोकणातील सर्वसामान्य, शेतकरी या वन्यप्राण्यांच्या मुक्त संचाराने पूर्ण हैराण आहेत. वन्यप्राणी रस्त्यावर,गावात शिरायला अनेक कारण आहेत. त्यात जंगलाला रानमोडी वनस्पतीने घातलेला वेढा हे देखील प्रमुख कारण आहे. रानमोडीने जंगलातील अनेक झाडं-झुडपं नष्ट केली आहेत.रानमोडी पसरल्यावर कोणत्याही भागातील अन्य झाडांवर अतिक्रमण होत आणि एकदा रानमोडी पसरली, की आपोआपच परिसरातील इतर झाडच नष्ट होतात. ही वस्तुस्थिती आहे. कोकणातील जंगलांमध्ये आता रानमोडीच वाढलेली दिसते. बाकीची सगळीच झाडं आणि झुडपांच्या जागी रानमोडी मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते. रानमोडीच्या अतिक्रमणामुळेही जंगलातील वन्यप्राणी जंगल सोडून गावो-गावच्या मानवी वस्तीकडे वळत आहेत.बिबटे तर एवढे वाढले आहेत, की आज कोकणातील पालघरपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांद्यापर्यंत बिबटे दिसतात. कधी कोणाच्या अंगणात तर कधी घराशेजारी, कधी गुरांच्या गोठ्यात तर कधी अगदी भरदिवसा बिबट्या रस्त्यावर फिरताना दिसून यायला लागले. बऱ्याचवेळा बिबट्या गावातील विहिरीत पडल्याचे देखील आपण ऐकले, पाहिले आहे. बिबट्या विहिरीत पडण्याविषयी कोकणातील विविध विषयांचे अभ्यासक सेवानिवृत्त प्रा. जी. ए. सावंत यांनी तर यावर एक विश्लेषण केलंय, त्यांनी सांगितल, की कोकणात विहिरीत बिबट्या पडतो यामागच कारण असं आहे, कोकणातील लोकांप्रमाणेच कोकणातील कुत्रेही भयंकर हुशार असतात. गावात जेव्हा बिबट्या येतो तेव्हा बिबट्याची पहिली शिकार ही गावात फिरणारी कुत्री असतात. यामुळे गावातील हे भटके कुत्रे बिबट्याच्या नजरेस पडले की बिबटे या कुत्र्यांचा पाठलाग करतात. कुत्रे बरोबर पाठलाग करणाऱ्या बिबट्यांना विहिरीशेजारी घेऊन येतात. बिबट्यांना अंदाज येत नाही. परंतु त्या कुत्र्यांना मात्र विहीरीचा अंदाज असतो. अशातच कुत्रे सहीसलामत बिबट्यांच्या तावडीतून सुटतात; परंतु बिबटे मात्र विहिरीत पडतात. यातल्या गंमतीचा भाग सोडला तरीही अनेकवेळा कोकणातील विविध भागांत बिबटे विहीरीत पडतात ही वस्तुस्थिती आहे. त्याच नेमकेपणाने कारण कोणतेही असले तरीही बिबट्याच विहिरीत पडण्याचं प्रमाणही काही कमी नाही.आज शासनस्तरावर हत्ती, बिबटे, माकड यांचा बंदोबस्त करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आणि उपाय कितीही होत असले तरीही शेतकऱ्यांना या वन्यप्राण्यांपासून होणारा त्रास काही कमी होत नाही. पूर्वी गावातील वाडी-वस्तीत गावकरी सहजपणे फिरत असत. आज तशी स्थिती राहिलेली नाही. गावातून फिरतानाही काळजी घेत जीव मुठीत धरूनच गावात शेतकऱ्यांना फिरावे लागत आहे.- संतोष वायंगणकर

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 1:10 pm

What Is White Noise: चांगली झोप आणि मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त आहे व्हाइट नॉइज, जाणून घ्या किती डेसिबल आवाज योग्य ठरतो

What Is White Noise: सध्या हिवाळ्याचा काळ सुरू असून या दिवसांत अनेकांना जास्त आणि गाढ झोप लागते. झोप अधिक चांगली लागण्यासाठी काही गोष्टी उपयोगी ठरतात. त्यापैकीच एक म्हणजे व्हाइट नॉइज. झोपताना खोलीत पंख्याचा किंवा रेडिओचा हलका “श्श्श” असा आवाज येत राहतो, तोच व्हाइट नॉइज मानला जातो. हा आवाज आजूबाजूचा त्रासदायक गोंगाट कमी करून झोपेसाठी मदत […] The post What Is White Noise: चांगली झोप आणि मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त आहे व्हाइट नॉइज, जाणून घ्या किती डेसिबल आवाज योग्य ठरतो appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 1:08 pm

लवासा प्रकरणाची मोठी अपडेट समोर; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Lavasa Project | लवासा हिल स्टेशन प्रकल्पाला दिलेल्या कथित बेकायदेशीर परवानगी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस(शप)चे प्रमुख शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंडा यांच्या खंडपीठासमोर दीर्घ सुनावणी पार पडली. […] The post लवासा प्रकरणाची मोठी अपडेट समोर; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 1:03 pm

भारत-न्यूझीलंडमध्ये २० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक ; मुक्त व्यापार कराराची घोषणा

India New Zealand FTA।जागतिक व्यापार आघाडीवर भारताला आणखी एक मोठे राजनैतिक यश मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्यात झालेल्या दूरध्वनी संभाषणादरम्यान भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार (FTA) संयुक्तपणे जाहीर करण्यात आला. हा करार दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांनाच उंचावेल असे नाही तर अमेरिकेच्या संरक्षणवादी व्यापार धोरणांना तोंड देताना भारताच्या पर्यायी जागतिक भागीदारीलाही […] The post भारत-न्यूझीलंडमध्ये २० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक ; मुक्त व्यापार कराराची घोषणा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 12:54 pm

युवा भारताचे स्वप्न अधुरे!

१३ वर्षांनंतर पाकची जेतेपदावर मोहोरदुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी झाला. या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर ३४८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. मात्र भारताची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. भारतीय संघाकडून ३४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे सलामीला फलंदाजीला उतरले. वैभवने पहिल्याच षटकात दोन षटकार आणि चौकारासह १८ धावा चोपल्या. एका बाजूने वैभव आक्रमक खेळत असताना आयुष म्हात्रे मात्र तिसऱ्या षटकात फरहान युसूफच्या हातून अली रझाच्या गोलंदाजीवर बाद झाला. तो २ धावांवर बाद झाला. त्यानंतरही फलंदाजीला आलेल्या ऍरॉन जॉर्जने आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यान चौथ्या षटकात तीन चौकार मारले, मात्र त्यानंतर त्यालाही मोहम्मद सय्यमने चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद केले. तो ९ चेंडूंत १६ धावा करून बाद झाला.तो बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर अली रधाने वैभव सूर्यवंशीलाही बाद करत भारताला धक्का दिला. वैभवचा झेल हामझा झहुरने घेतला. वैभवने १० चेंडूंत १ चौकार आणि ३ षटकारांसह २६ धावांवर बाद झाला.इतकेच नाही, तर उपकर्णधार विहान मल्होत्राही ७ धावांवर बाद झाला. त्यामुळे आक्रमक सुरुवातीनंतर भारताने ५९ धावांवरच ४ विकेट्स गमावल्या. भारतासमोर मोठे लक्ष्य असताना आता हे लक्ष्य पार करण्याची जबाबदारी मधल्या आणि तळातल्या फलंदाजांवर आहे.तत्पूर्वी, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ बाद ३४७ धावा केल्या. पाकिस्तानकडून समीर मिन्हासने ११३ चेंडूंत १७२ धावा केल्या. अहमन हुसैनने ७२ चेंडूंत ५६ धावांची खेळी केली. उस्मान खानने ३५ धावांची खेळी केली. भारताकडून दीपेश देवेंद्रनने ३ विकेट्स घेतल्या.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 12:30 pm

एपस्टाईन फाइल्सच्या डेटाबेसमध्ये पुन्हा अपलोड केला ट्रम्पचा ‘तो’फोटो ; कोणी केला हा दावा?, वाचा

Jeffrey Epstein Files। अमेरिकेतील कुप्रसिद्ध जेफ्री एपस्टाईन लैंगिक शोषण प्रकरणातील सोळा फायली सापडल्या आहेत आणि एका वेबसाइटवर अपलोड करण्यात आल्या आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एपस्टाईन फाइल्समधील या १६ फायली गायब झाल्याने वादळ निर्माण झाले होते. त्यानंतर हा वाद शांत करण्यासाठी, अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) त्या गायब होण्याचे कारण स्पष्ट करून त्या प्रसिद्ध केल्या आहेत. अमेरिकेच्या […] The post एपस्टाईन फाइल्सच्या डेटाबेसमध्ये पुन्हा अपलोड केला ट्रम्पचा ‘तो’ फोटो ; कोणी केला हा दावा?, वाचा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 12:19 pm

माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा! आमदारकी कायम राहणार…

Manikrao Kokate | शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने माजी क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. मात्र या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, त्यामुळे त्यांची आमदारकी कायम राहणार […] The post माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा! आमदारकी कायम राहणार… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 12:17 pm

जव्हार नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या पूजा उदावंत विजयी

जव्हार : जव्हार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवत नगर परिषदेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जनतेने दिलेल्या कौलाचा सन्मान राखत आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी भाजपच्या वतीने जव्हारमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात विजयाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भाजपचे विजयी उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पालघर लोकसभा खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा, विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते प्रकाश निकम, तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष पूजा उदावंत उपस्थित होते.भारतीय जनता पार्टी ही सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन जव्हारचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि नागरी सुविधा या क्षेत्रांमध्ये ठोस विकासकामे हाती घेतली जातील. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा प्रभावी लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात येईल.भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवारजव्हार नगर परिषद निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : प्रभाग क्र. १ – नकुल पटेकर, प्रभाग क्र. २ – हितेश जाधव, पूजा खोरगडे, प्रभाग क्र. ३ – आफरीन शेख, प्रभाग क्र. ४ – कुणाल उदावंत, प्रभाग क्र. ६ – स्वप्निल औसरकर, स्नेहा घाटाळ, प्रभाग क्र. ७ – अनंता गरेल, प्रभाग क्र. ८ – सचिन सटणेकर, मनीषा वड, प्रभाग क्र. ९ – संगीता मुकणे, सुशील सहाने, प्रभाग क्र. १० – दर्शन तामोरे, रुचिता वाजे या निकालात भाजपच्या पूजा उदावंत यांची नगराध्यक्षपदी निवड झाली.तसेच इतर पक्षांचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे: प्रभाग क्र. १ – पद्मा रजपूत (शिवसेना), प्रभाग क्र. ३ – अमोल बर्वे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग क्र. ४ – अश्विनी चव्हाण (मविआ), प्रभाग क्र. ५ – कमल कुवरे, इमरान मेमन (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग क्र. ७ – नसीमा मेमन (शिवसेना गट)

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 12:10 pm

सोन्याचांदीत 'ऐतिहासिक'वाढ! सोने १३५००० पार चांदी २२०००० जवळ का सर्वोच्च स्तरावर वाचा!

मोहित सोमण: सकाळी सोने व चांदीत विक्रमी वाढ झाली आहे. जगभरातील नव्या ट्रिगरचा लाभ सोन्याचांदीच्या दरात होत असल्याने सोन्याचांदीत ऐतिहासिक वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १०० रुपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८२ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा किंमत २४ कॅरेटसाठी १३५२७, २२ कॅरेटसाठी १२४००, १८ कॅरेटसाठी १०१४६ रूपयांवर पोहोचली आहे. तोळ्याबाबत दर २४ कॅरेटमागे ११०० रूपयांनी, २२ कॅरेटमागे १००० रूपयांनी, १८ कॅरेटमागे ८२० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १३५२८०, २२ कॅरेटसाठी १२४०००, १८ कॅरेटसाठी १०१४६० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसी+एक्समध्ये सोन्याचा निर्देशांकात तब्बल १.१६% वाढ झाल्याने दरपातळी १३५७५१ रूपयांवर पोहोचली आहे. तर मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १३५२८, २२ कॅरेटसाठी १२४००, १८ कॅरेटसाठी १०१४६ रूपयांवर पोहोचले आहेत. गेल्या १० दिवसात सरासरी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी ३०० रूपयाने, २२ कॅरेटसाठी २५० रुपयांनी वाढले आहेत.संपूर्ण डिसेंबर महिन्याचा विचार केल्यास सोने ४% उसळले असून आज सोन्याने १३५००० पातळीही पार केली. तर जागतिक स्तरावर पाहिल्यास गोल्ड फ्युचर निर्देशांकात १.१८% वाढ झाली असून जागतिक मानक असलेल्या युएस गोल्ड स्पॉट दरात १.४८% वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति डॉलर दर आज ४४०३.१८ औंसवर गेला आहे.आज मोठ्या प्रमाणात सोने वाढण्याचे महत्वाचे ट्रिगर कुठले?१) आज प्रामुख्याने डॉलर निर्देशांकातील दबाव घसरला ज्यामध्ये डॉलर निर्देशांकात घसरण झाल्याने गुंतवणूक म्हणून सोन्यातील दबाव वाढला२) भूराजकीय स्थितीत स्थिरतेकडून पुन्हा एकदा अस्थिरतेकडे वाटचाल,आशिया खंडात इस्त्राईल इराण यांच्यातील युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने सोन्यातील पुरवठ्यात दबाव वाढला.३) युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरावर पुन्हा एकदा कपातीचे संकेत मिळाल्यावर सकारात्मक भावनेत वाढ४) युएस आणि व्हेनेझुएला यांच्यातील संभाव्य संघर्षामुळे सुरक्षित गुंतवणूकीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली दरम्यान पुरवठा मर्यादित राहिला आहे.५) सोने एक सुरक्षित गुंतवणूक साधन म्हणून वाढलेला गोल्ड स्पॉट व्यवहार६) ईटीएफ (Exchange Traded Fund ETF) झालेली वाढ७) आरबीआयकडून वाढलेले हेजिंग८) अस्थिरतेत सुरक्षित गुंतवणूक म्हणून भारतीय गुंतवणूकदारांनी वाढवलेली सोन्यातील गुंतवणूकया एकत्रित कारणांमुळे आज सोन्यात भारत व संपूर्ण आशियाई बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान चीनने ही आपला व्याजदर कायम ठेवल्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणात आज सोन्याच्या मागणीत आणखी वाढ झाली होती. वाढलेल्या मागणीचा परिणाम म्हणून या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या भावात ६७% वाढ झाली आहे. ज्यामुळे अनेक विक्रम मोडीत निघाले आहेत आणि प्रति डॉलर ३००० औंसवर वाढ झाली असून आणि ४००० डॉलरचे टप्पा प्रथमच ओलांडला गेला आहे ज्यामुळे तज्ञांच्या मते १९७९ नंतरच्या सर्वात मोठ्या वार्षिक वाढीसाठी सोने सज्ज होत आहे.चांदीच्या दरातही मोठी वाढ !चांदीच्या दरातही आज प्रचंड वाढ झाली आहे. युएस फेड दरातील व्याजदरातील कपात वर्तवली जात आहे. तसेच वाढलेल्या औद्योगिक मागणीसह वाढलेली सिल्वर स्पॉट फ्युचर बेटिंगमध्ये झालेल्या वाढीमुळे चांदीला कमोडिटी म्हणून मागणीत वाढ झालेलीच आहे परंतु युएसने मौल्यवान धातूत चांदीचा समावेश वाढल्याने सोन्याहून किंबहुना अधिक पातळीवर दिवसेंदिवस चांदीचे आकर्षण व मागणी वाढत आहे. याचाच परिणाम म्हणून युएस आणि व्हेनेझुएला अस्थिरतेचे निमित्त साधल्याने चांदीने आज ऐतिहासिक पातळी गाठली आहे.'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज ५ रूपयांनी, प्रति किलो दरात ५००० रुपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे प्रति ग्रॅम दर २१९ रूपयांवर व प्रति किलो दर २१९००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात १.९५% वाढ झाल्याने चांदी २१२५०० रूपयांवर पोहोचली आहे. तर मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर आज २१९० रूपयांवर, प्रति किलो दर २१९००० रूपयांवर पोहोचले आहेत. तर जागतिक स्तरावरील चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात २.१७% वाढ झाली आहे.चांदीत आणखी वाढ का होत आहे?१) चांदीच्या साठ्यांची कमतरता२)मजबूत औद्योगिक मागणी३) अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण खनिजांच्या यादीत समावेश यामुळे चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आणि ती २.३९% वाढून २०८,४३९ वर स्थिरावली.४) ईटीएफमधील मोठ्या प्रमाणातील गुंतवणूक आणि सातत्यपूर्ण किरकोळ खरेदीमुळे याला आणखी गती ज्यामुळे आगामी वर्षांमध्ये पुरवठ्यात संरचनात्मक तूट निर्माण होण्याच्या अपेक्षांना बळकटी मिळाली आहे असे तज्ञांचे मत आहे.५) सौर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने आणि डेटा-सेंटर पायाभूत सुविधांमधील औद्योगिक वापर वाढतच आहे.६) चांदीच्या दरात पुढे काय अपेक्षित- जागतिक खाण उत्पादन आणि इतर कार्यात चांदीचा पुनर्वापर गेल्या दशकाहून अधिक काळ मोठ्या प्रमाणात स्थिर राहिला. परिणामी, चांदीचे बाजार सलग पाचव्या वार्षिक तुटीच्या दिशेने वाटचाल करत आहे. तज्ञांचे मत आहे की, एकूण तूट येणाऱ्या काळात ८०० दशलक्ष औंसच्या जवळ पोहोणार आहे.एकाच आठवड्यात चांदी प्रति किलो २०००० हून अधिक पातळीवर उसळली आहे. त्यामुळेच स्पॉट चांदीच्या दरात ३% पेक्षा जास्त वाढ होऊन तो प्रति औंस ६९.४५४५ डॉलर पातळीच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला, तर चांदी फ्युचर्सने प्रति औंस ६९.५१५ डॉलरचा उच्चांक गाठला आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये अमेरिकेच्या व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यता वाढल्याने भौतिक मालमत्तेच्या मागणीलाही चालना मिळाली आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 12:10 pm

Rohit Sharma...२०२३ वर्ल्ड कपचा पराभव जिव्हारी लागला; क्रिकेट कायमचा सोडण्याचा विचार केला होता

मुंबई : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाबाबत मनमोकळं वक्तव्य केलं आहे. त्या पराभवाने आपण पूर्णपणे खचून गेलो होतो आणि त्या काळात क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी, असा विचार मनात आला होता, असं रोहित शर्माने सांगितलं.ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यातील पराभव जिव्हारी लागलेला होता. अहमदाबादमध्ये झालेल्या त्या पराभवानंतर आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे खचल्यासारखं वाटत होतं, असंही रोहितने नमूद केलं. त्या वर्ल्ड कपसाठी आपण २०२२ मध्ये कर्णधारपद स्वीकारल्यापासूनच सर्वस्व पणाला लावलं होतं, असं त्याने स्पष्ट केलं.भारतामध्ये झालेल्या या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत ११ सामन्यांत ५४.२७ च्या सरासरीने ५९७ धावा केल्या होत्या. मात्र, अंतिम फेरीत भारतीय फलंदाज अपेक्षेप्रमाणे खेळ करू शकले नाहीत. भारताने २४० धावांचं आव्हान उभं केलं होतं, जे ऑस्ट्रेलियाने सहज पार केलं.या पराभवानंतर संपूर्ण देश निराश होता. जे घडलं त्यावर विश्वास बसत नव्हता, असं सांगत रोहित म्हणाला की वैयक्तिक आयुष्यातील तो काळ त्याच्यासाठी अत्यंत कठीण होता. त्या क्षणी मला आता यापुढे आणखी क्रिकेट खेळायचं नाही, असं प्रामाणिकपणे वाटलं होतं, असंही रोहितने कबूल केलं.मात्र, या अपयशानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दमदार पुनरागमन केलं. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताने विजेतेपद पटकावलं. त्यानंतर रोहितने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पुढे कसोटी क्रिकेटमधूनही त्याने निवृत्ती घेतली असून सध्या तो भारतासाठी केवळ वनडे क्रिकेट खेळत आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 12:10 pm

Priyanka Nick: प्रियंका चोप्रासोबत बॉलिवूड गाण्यावर थिरकले निक जोनस, चाहत्यांनी म्हटलं…जीजू, प्लेलिस्ट शेअर करा

Priyanka Nick: हॉलीवूड गायक निक जोनस आणि त्यांचे भाऊ गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या गाण्यांवर धमाल करताना दिसत आहेत. कधी ऋतिक रोशन–कियारा अडवाणीच्या गाण्यावर, तर कधी इतर लोकप्रिय हिंदी गाण्यांवर ते कॉन्सर्टपूर्वी मजा करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता या मजेत स्वतः प्रियंका चोप्राही सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. निक जोनसने इंस्टाग्रामवर एक […] The post Priyanka Nick: प्रियंका चोप्रासोबत बॉलिवूड गाण्यावर थिरकले निक जोनस, चाहत्यांनी म्हटलं… जीजू, प्लेलिस्ट शेअर करा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 11:55 am

“महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा”; भाजप आणि महायुतीच्या यशानंतर PM मोदींनी मराठीतून मानले आभार

PM Narendra Modi | महाराष्ट्रातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात विविध कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही वर्षांपासून प्रलंबित होत्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2017 नंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी झाली. या स्‍थानिक निवडणूकीतही महायुतीने विरोधकांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि […] The post “महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा”; भाजप आणि महायुतीच्या यशानंतर PM मोदींनी मराठीतून मानले आभार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 11:54 am

निवडणूक रोखे रद्द करूनही भाजपचा मालामाल ; वर्षभरात काँग्रेसपेक्षाही १२ पट जास्त मिळाल्या देणग्या, वाचा देणगी देणाऱ्यांची संपूर्ण यादी

Donation Report Card। सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणूक बाँड योजना रद्द केली आहे. मात्र याचा राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे. नाही. कारण बाँड योजना रद्द केल्यानंतर एका वर्षानंतर, २०२४-२५ मध्ये भाजपचा सर्वात श्रीमंत पक्ष ठरला आहे. भाजपच्या २०२४-२५ च्या योगदान अहवालानुसार, या काळात पक्षाला ₹६,०८८ कोटी देणग्या मिळाल्या. लोकसभा […] The post निवडणूक रोखे रद्द करूनही भाजपचा मालामाल ; वर्षभरात काँग्रेसपेक्षाही १२ पट जास्त मिळाल्या देणग्या, वाचा देणगी देणाऱ्यांची संपूर्ण यादी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 11:53 am

पालघरमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेनेला कौल

तीन ठिकाणी नगराध्यक्षाच्या पक्षालाच बहुमतपालघर : पालघर जिल्ह्यात पार पडलेल्या तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. पालघर आणि डहाणू या दोन नगर परिषदेवर नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाने आपला झेंडा फडकविला आहे. जव्हार नगर परिषद आणि वाडा नगरपंचायत भाजपने काबीज केली आहे. पालघर नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उत्तम घरत, डहाणू नगराध्यक्षपदी शिवसेनेचे राजेंद्र माछी, तर वाडा नगरपंचायत अध्यक्ष म्हणून भाजपच्या रिमा गंधे आणि जव्हार नगराध्यक्षपदी भाजपच्या पूजा उदावंत निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे पालघर, जव्हार आणि वाडा या तीन ठिकाणी थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षाच्या पक्षालाच मतदारांनी पालिकेतसुद्धा स्पष्ट बहुमत दिले आहे. डहाणू येथे मात्र चित्र वेगळे आहे. या ठिकाणी मतदारांनी नगर परिषदेतील बहुमत भाजपच्या पारड्यात टाकले असून, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मात्र शिवसेनेचे निवडून दिले आहेत.पालघर नगर परिषदेच्या ३० सदस्य पदासह नगराध्यक्ष पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या निकालात, शिवसेना शिंदे गटानेच बाजी मारली आहे. एकूण ३० जागांपैकी १९ जागी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. भाजपचे ८ आणि शिवसेना उबाठाचे ३ नगरसेवक येथे निवडून आले आहेत. डहाणू येथील २७ जागांपैकी शिवसेना शिंदे गटाला केवळ २ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी गटाचे ८ नगरसेवक निवडून आले आहेत, तर भाजपच्या १७ सदस्यांना डहाणू वासियांनी पालिकेच्या सभागृहात पाठविले आहे. जव्हार नगरपरिषदेच्या २० जागांपैकी १४ जागांवर भाजपने बाजी मारली आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी गटाचे ३ नगरसेवक निवडून आले असून, एका नगरसेवकाचा रूपाने राष्ट्रवादी गटाचे खाते सुद्धा उघडले आहे.वाडा नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी ११ जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. ३ जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाल्या असून, शिवसेना उबाठा , काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या तिन्ही राजकीय पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. दरम्यान, पालघर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उत्तम मोरेश्वर घरत यांना एकूण १६,५८० मते मिळाली असून, त्यांनी भाजपचे उमेदवार कैलाश म्हात्रे यांचा ५,१५३ मतांनी पराभव केला आहे. म्हात्रे यांना एकूण ११,४२७ मते मिळाली. शिवसेना उबाठाचे उमेदवार उत्तम पिंपळे हे ४,०९२ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. काँग्रेसच्या प्रीतम राऊत यांना ३,५४७ मते मिळाली. जव्हार नगर परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार पूजा उदावंत यांना ३,८६५ मते मिळाली असून त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार रश्मीन मणियार यांचा १,६५३ मतांनी पराभव केला आहे. मणियार यांना एकूण २,२१२ मते मिळाली आहेत. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार पद्मा राजपूत यांना १,४७९ मते मिळाली आहेत.डहाणू येथे दोन उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र माच्छी यांनी भाजप उमेदवार भरत राजपूत यांचा ४,०५५ मतांनी पराभव केला आहे. माच्छी यांना एकूण १४,८१५ मते मिळाली असून, राजपूत यांना १०,७६० मते मिळाली आहेत. वाडा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या रिमा हर्षद गंधे यांनी बाजी मारली असून, त्यांना ३,९६७ मते मिळाली आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार हेमांगी पाटील यांना २,९९५ तर शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवार निकिता गंधे यांना २,४८७ मते मिळाली आहेत. डहाणूत मात्र नगराध्यक्ष सेनेचा, बहुमत भाजपला पालघर नगर परिषदेतील नवे नगरसेवक१)प्रियंका म्हात्रे, २)आरिफ कलाडिया, ३)मीना मिश्रा, ४) भारती धोत्रे, ५) महेश कोटी, ६)कृपा मोरे, ७) आनंद राऊत, ८) प्रीती मोरे, ९) राजेंद्र पाटील, १०) पुष्पा जैन, ११) प्रगती म्हात्रे, १२) रईस खान, १३)ज्योती जाधव, १४) मुनाफ मेमन, १५) राधा मनकामे, १६) राहुल पाटील, १७) मेघा आघाव, १८)अमोल पाटील, १९) विभूती चंपानेलकर, २०) नीलम कुमार संख्ये, २१)सोनाली शिंदे, २२) भावनंद संख्ये, २३) अनिश पिंपळे, २४) उज्वला काळे, २५) चंद्रशेखर वडे, २६) शिल्पा वाजपेयी, २७) दिनेश घरत, २८) गीतांजली माने, २९) माधुरी सपाटे, ३०) जस्विन घरत.डहाणू नगर परिषदेतील नवे नगरसेवक१) अश्विनी पटेल २) रमेश काकड ३) प्रतीक्षा सुरती ४) विक्रम नायक ५) प्रदीप चाफेकर ६) अभिलाश जाहीवाला ७) दीप्ती शेलारे ८) जगदीश राजपूत ९) माधुरी धोडी १०) दिनेश माच्छी ११) आर्या गोहेल १२) मनीषा वावरे १३) शैलेश रखमुठा १४) आशा पाठक १५) वरुण पारेख १६) शुभांगी पाटील १७) युगाली पाटील १८) चंद्रकांत खुताडे १९ )रेखा माळी २०) कीर्ती मेहता २१) समीउउद्दीन पिरा २२) विशाल नांदस्कर २३) स्नेहा मार्डे २४) बिजली माच्छी २५) तन्मय बारी २६) भारती पाटील २७) दीपक जयस्वाल.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 11:30 am

खासदारांची ‘फिल्डिंग’ होम ग्राउंडवर यशस्वी!

वाडा पालिकेत स्पष्ट बहुमतासह नगराध्यक्षही भाजपचागणेश पाटील पालघर : जिल्ह्यात निवडणूक झालेल्या तीन नगर परिषदांपैकी दोन नगर परिषदेमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, तर वाडा नगरपंचायतीमध्ये सुद्धा भाजपने स्वबळावर नगराध्यक्ष आणि पालिकेतील बहुमत मिळवले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपने पालघर, वाडा, जव्हार आणि डहाणू या चारही ठिकाणी चांगलीच मुसंडी मारली आहे. तसेच पालघर जिल्ह्याचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा हे राहत असलेल्या वाडा नगरपंचायतवर सुद्धा भाजपचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे महायुतीच्या वादात अडकलेल्या या निवडणुकीत खासदारांनी योग्य ‘फिल्डिंग’ लावून वाडा हे आपले ‘होम ग्राउंड’ चांगल्या पद्धतीने सांभाळले आहे.वाडा नगर पंचायतीची ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक होती. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत खासदारांच्या भगिनी निशा सवरा या भाजपच्या उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. १७ सदस्यीय असलेल्या या नगरपंचायतीत २०१७ मध्ये भाजप ६, शिवसेना ६, काँग्रेस २, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि आरपीआयचा प्रत्येकी एक नगरसेवक होता. त्यावेळी शिवसेनेच्या गीतांजली कोल्हेकर नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. दरम्यान, यावेळी घेण्यात आलेल्या नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये सुद्धा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्यात आले आहेत. तथापि, राज्यात महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासोबत नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये जिल्ह्यात फारकत घेण्यात आली होती. अशा परिस्थितीत केवळ स्वबळावर निवडणूक लढवून भाजपला तीन ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळवून देणे कठीण बाब होती.मात्र खासदार डॉ. सवरा यांनी या निवडणुकीच्या पूर्वीच काही ठिकाणी इतर राजकीय पक्षातील पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा प्रवेश भाजपमध्ये करून घेतला. वाडा या ठिकाणी गेल्यावेळी नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या रिमा हर्षद गंधे यांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात उतरविले. त्याचप्रमाणे राजकारण आणि समाजकारणात असलेल्या चेहऱ्यांना नगरसेवक पदाची निवडणूक लढण्याची संधी दिली.इतर तीन ठिकाणचा प्रचार, नेत्यांच्या सभा, आणि पक्षाच्या बैठका, सांभाळून वाडा नगरपंचायत निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळेच या ठिकाणी १७ पैकी ११ जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुद्धा भाजपच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सहापैकी पाच जागा महायुतीच्या निवडून आल्या होत्या. आता नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने चांगले काम केले आहे. परिणामी आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या बाबतीत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला आहे.

फीड फीडबर्नर 22 Dec 2025 11:30 am

फुकुशिमा दुर्घटनेनंतर जपान जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा सुरू करणार

Japan Nuclear Restart। जपानच्या निगाता प्रदेशातील जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाला आज मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. २०११ च्या फुकुशिमा दुर्घटनेनंतर जपान अणुऊर्जेकडे परतण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण निर्णय मनाला जात आहे. टोकियोच्या वायव्येस सुमारे २२० किलोमीटर अंतरावर असलेला काशीवाझाकी-कारीवा प्रकल्प हा फुकुशिमा दाईची प्रकल्पातील भूकंप आणि त्सुनामीनंतर बंद पडलेल्या ५४ अणुभट्ट्यांपैकी […] The post फुकुशिमा दुर्घटनेनंतर जपान जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा सुरू करणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 11:26 am

Indian Films Trending on Pakistani Netflix: पाकिस्तानी नेटफ्लिक्सवर नंबर 1 वर ट्रेंड होतेय भारतीय चित्रपट, टॉप 10 मध्ये आणखी 4 भारतीय फिल्म्स

Indian Films Trending on Pakistani Netflix : ओटीटी प्लॅटफॉर्मवर सतत नवे चित्रपट आणि वेब सीरिज येत असतात. भारतीय चित्रपटांना भारताबाहेरही मोठी पसंती मिळत असून पाकिस्तानमध्येही ते आवडीने पाहिले जात आहेत. सध्या पाकिस्तानी नेटफ्लिक्सवर एक भारतीय चित्रपट नंबर 1 वर ट्रेंड करत आहे. २१ डिसेंबर रोजी पाकिस्तानमध्ये नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर असलेला भारतीय चित्रपट म्हणजे तेलुगू भाषेतील […] The post Indian Films Trending on Pakistani Netflix: पाकिस्तानी नेटफ्लिक्सवर नंबर 1 वर ट्रेंड होतेय भारतीय चित्रपट, टॉप 10 मध्ये आणखी 4 भारतीय फिल्म्स appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Dec 2025 11:12 am