Khopoli Election: कुलदीपक शेंडे विरुद्ध डॉ. सुनील पाटील; खोपोलीच्या आखाड्यात कोण मारणार बाजी?
प्रभात वृत्तसेवा खालापूर – शहरात आज निवडणूक मतदान होत असून संपूर्ण शहरात मोठी उत्सुकता पसरली आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांनी शक्तीप्रदर्शन करत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू ठेवली. यात मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. प्रामुख्याने नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना (शिंदे गट) – भाजप – आरपीआय महायुतीचे कुलदीपक शेंडे आणि राष्ट्रवादी (अजित […] The post Khopoli Election: कुलदीपक शेंडे विरुद्ध डॉ. सुनील पाटील; खोपोलीच्या आखाड्यात कोण मारणार बाजी? appeared first on Dainik Prabhat .
सणसवाडीत ‘फिल्मी स्टाईल’राडा! काळ्या थारमधून आला, कोयता काढला अन्..ठेकेदारीतून घडला थरार
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरूर) येथे कंपनीच्या कामाच्या ठेकेदारीच्या वादातून एका व्यक्तीचा कोयत्याने खून करण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना घडली आहे. यापूर्वी अनेकदा हाणामारी, खंडणी, फसवणूक यांसारखे गुन्हे दाखल असलेला आणि एका वर्षासाठी तडीपार झालेला सराईत गुन्हेगार पिंटू उर्फ संतोष दरेकर आणि त्याचा भाऊ विक्रम दरेकर या दोघांनी मिळून हा हल्ला केला. या […] The post सणसवाडीत ‘फिल्मी स्टाईल’ राडा! काळ्या थारमधून आला, कोयता काढला अन्..ठेकेदारीतून घडला थरार appeared first on Dainik Prabhat .
Pune News: लोणी काळभोर हादरले! घरात सिलिंडरचा भीषण स्फोट; दोघेजण गंभीर जखमी
प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – घरगुती सिलेंडरमधून गॅस गळती होऊन अचानक स्फोट झाल्यामुळे घरात एकटीच असलेली महिला भाजून गंभीर जखमी झाली आहे. या स्फोटामुळे पहिल्या मजल्यावरील घराची खिडकी तुटून खाली रस्त्यावर पडल्याने दुचाकीवरून चाललेला एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील नेहरू चौकाजवळ असलेल्या जगताप हाईट्स इमारतीत आज […] The post Pune News: लोणी काळभोर हादरले! घरात सिलिंडरचा भीषण स्फोट; दोघेजण गंभीर जखमी appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – जेजुरी शहरातील नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात मागील सत्ताधारी कमी पडले त्यामुळे जेजुरीत सत्तेचे परिवर्तन होणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षांसह सर्वच्या सर्व 21 उमेदवार उच्चांकी मताधिक्यांनी निवडून येणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जेजुरीचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष […] The post Jejuri Election: अजितदादांच्या नेतृत्वात जेजुरीचा चेहरामोहरा बदलणार? बारभाईंनी मांडलं विकासाचं व्हिजन appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून नगरपरिषदेत भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वास माजी सरपंच प्रदीप कासवा यांनी व्यक्त केला.नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार शिवाजी मांदळे तसेच नगरसेवक पदाचे सर्वच उमेदवार प्रचारात आघाडीवर असून आज शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत भाजप नेते बाळासाहेब सांडभोर, दत्ता […] The post Rajgurunagar Election: ‘राजगुरूनगरमध्ये कमळ फुलणारच!’; प्रदीप कासवांचा दावा, भाजपच्या रॅलीत दिसला मोठा उत्साह appeared first on Dainik Prabhat .
Ajit Pawar: खेडला लाल दिवा द्यायचा होता, पण…अजित पवारांनी व्यक्त केली मोठी खंत
प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – मी तुम्हाला लाल दिवा द्यायचं ठरवलं होतं. पण तुम्ही माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना संधी दिली नाही, आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदासह सर्व नगरसेवकांना निवडून द्या राजगुरूनगर शहराचा समतोल सर्वांगीण विकास करू. असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजगुरुनगर येथे केले. राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राजगुरुनगर […] The post Ajit Pawar: खेडला लाल दिवा द्यायचा होता, पण…अजित पवारांनी व्यक्त केली मोठी खंत appeared first on Dainik Prabhat .
Nagar Parishad Election: मतदारांसाठी ओळखपत्रांचे नियम जाहीर; वाचा, कोणते दस्तऐवज ग्राह्य धरले जातील
प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार, पुणे जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी मंगळवारी (दि. २) मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सुमारे ६.३ लाख नोंदणीकृत मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत. मतदानाची प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात आले आहे. या निवडणुकीचा […] The post Nagar Parishad Election: मतदारांसाठी ओळखपत्रांचे नियम जाहीर; वाचा, कोणते दस्तऐवज ग्राह्य धरले जातील appeared first on Dainik Prabhat .
Ajit Pawar: चाकण लवकरच ‘महानगरपालिका’होणार? अजित पवारांनी केले मोठे सूतोवाच..वाचा सविस्तर
प्रभात वृत्तसेवा चाकण – चाकण शहरात औद्योगिकरणामुळे लोकसंख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे येथे अनेक प्रश्न निर्माण झाली आहेत. काही दिवसांत चाकण महानगरपालिका म्हणून विकसित करावी लागेल असे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण येथे बोलताना केले.चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदाचे व नगरसेवक पदाचे उमेदवार निवडणुकीमध्ये उभे केले आहेत. त्यांच्या […] The post Ajit Pawar: चाकण लवकरच ‘महानगरपालिका’ होणार? अजित पवारांनी केले मोठे सूतोवाच..वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .
Ajit Pawar: आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीला साथ द्या –अजित पवारांचे मतदारांना आवाहन
प्रभात वृत्तसेवा आळंदी – आगामी नगरपरिषद निवडणुकीत आळंदीच्या विकासाचा दिशादर्शक आराखडा मांडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भरभरून साथ देण्याचे आवाहन केले. संत ज्ञानेश्वरांच्या पावन स्थळी झालेल्या आळंदी नगरपरीषद निवडणूकीच्या प्रचारसभेला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. पवारांच्या जोरदार भाषणाने प्रचारात चांगलीच रंगत चढली. पवार म्हणाले, आळंदी ही राज्यातील महत्त्वाची धार्मिक-सांस्कृतिक नगरी आहे. येथे दरवर्षी […] The post Ajit Pawar: आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीला साथ द्या – अजित पवारांचे मतदारांना आवाहन appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला काही तासच उरले असताना नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी उभे राहिलेले सर्वच उमेदवार सोमवारी (दि. 1) दिवसभर मतप्रचाराऐवजी आध्यात्मिक दौर्यावर दिसले. निवडणुकीत शुभ फलप्राप्ती व्हावी आणि मतदारांचा जास्तीत जास्त पाठिंबा मिळावा, यासाठी उमेदवारांनी ग्रामदैवत तसेच शहरातील विविध देवस्थानांना भेट देत मनोभावे प्रार्थना केली. ग्रामदैवताचे दर्शन घेऊन चांगलं मतदान […] The post Manchar Election: प्रचार संपला, आता ‘देवा’चा धावा! विजयासाठी उमेदवारांची मंदिरात गर्दी अन् ज्येष्ठांना साकडे appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी बुधवार (दि. 3) तालुका क्रीडा संकुल येथे होणार असून प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी प्रक्रिया दीड ते दोन तासांत पूर्ण होऊन विजयी उमेदवारांची घोषणा केली जाईल. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंजली कुलकर्णी यांनी दिली. या प्रक्रियेसाठी 40 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मतदान […] The post Manchar Election: नगराध्यक्ष आणि १६ प्रभागांच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी; ४० कर्मचारी नियुक्त appeared first on Dainik Prabhat .
Manchar Election: लोकशाहीचा बाजार? मंचर निवडणुकीत मतांसाठी पैशांचा पूर आणि देवाच्या शपथा
प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर शहरात नगरपंचायत निवडणुकीची धग दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत गतिमान पद्धतीने सुरू आहे. उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्ग अवलंबताना दिसत आहेत. मतदारांना पैसे देताना मत आमच्या उमेदवाराला मिळाले पाहिजे. यासाठी पैशांचा महापूर, भंडारा उचलणे, देवाच्या नावाने शपथा घेणे अशा पद्धतींनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न सातत्याने […] The post Manchar Election: लोकशाहीचा बाजार? मंचर निवडणुकीत मतांसाठी पैशांचा पूर आणि देवाच्या शपथा appeared first on Dainik Prabhat .
Manchar Election: निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज! ईव्हीएम वाटप पूर्ण, १६ प्रभागांसाठी मतदान सकाळी ७ पासून
प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 2) मतदान होणार असून प्रशासनातर्फे सर्व तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक प्रतिनिधींना यंत्रांचे वाटप आज (सोमवारी) दुपारी क्रीडा संकुल येथे करण्यात आले.नगरपंचायतीतील एकूण सोळा प्रभागांसाठी तसेच नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत आहे. मतदारांची सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत मतदानासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान […] The post Manchar Election: निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज! ईव्हीएम वाटप पूर्ण, १६ प्रभागांसाठी मतदान सकाळी ७ पासून appeared first on Dainik Prabhat .
धरणं तुडुंब, पण पिकांना थेंब मिळेना! निवडणुकीच्या धामधुमीत ‘कुकडी’चे पाणी अडकले; शेतकरी हवालदिल
प्रभात वृत्तसेवा मंचर – कुकडी प्रकल्पातून पाणी सोडण्यास विलंब होत असल्याने शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली. राजकीय व्यस्तता आणि निवडणूक धामधूम यामुळे जलसंपदा मंत्री आणि प्रशासन वरीष्ठांचे लक्ष या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर नसल्याने हजारो एकरातील शेतीपिके पाण्याअभावी धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कुकडी प्रकल्पाच्या पाणीवाटप संदर्भातील कालवा सल्लागार समितीची वार्षिक बैठक यंदा अद्यापही घेण्यात आलेली नाही. […] The post धरणं तुडुंब, पण पिकांना थेंब मिळेना! निवडणुकीच्या धामधुमीत ‘कुकडी’चे पाणी अडकले; शेतकरी हवालदिल appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायत निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंचर शहरात भावी नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार असलेल्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. यात मुख्यत्वे करून अपक्ष उमेदवार प्राचीताई आकाश थोरात यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात असून याच नगराध्यक्ष पदाच्या दावेदार असल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे. मंचर नगरपंचायत निवडणूक पहिल्यांदाच होत असल्याने नगराध्यक्ष पदावर आपला […] The post Manchar Election: मंचरमध्ये ‘रिक्षा’ सुसाट! ऑटो रॅलीने बदलले निवडणुकीचे वारे; विरोधकांसमोर मोठे आव्हान appeared first on Dainik Prabhat .
Alandi Election: नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; ३० केंद्रांवर आज होणार मतदान
प्रभात वृत्तसेवा आळंदी – आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 शांततेत व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नगरपालिकेने पूर्ण तयारी केली आहे. या अनुषंगाने, आज सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी नगरपालिका कर्मचार्यांसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या.निवडणूक प्रक्रियेतील बारकावे समजावून सांगताना, अधिकार्यांनी कर्मचार्यांकडून येणार्या शंकांचे निरसन केले. तसेच, निवडणुकीच्या कामात काही त्रुटी आढळल्यास त्या त्वरित कशा […] The post Alandi Election: नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; ३० केंद्रांवर आज होणार मतदान appeared first on Dainik Prabhat .
कामगार संहितेमुळे आधुनिक आणि दूरदर्शी युगाचा प्रारंभ
वीणू जयचंद(लेखिका EY मध्ये पार्टनर असून आफ्रिका, भारत आणि आग्नेय आशियातील परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट आणि कौशल्य विकास क्षेत्रात त्यांना व्यापक अनुभव आहे. सर्वसमावेशक आर्थिक प्रगतीला चालना देण्याच्या प्रयत्नांमध्ये त्या अग्रभागी राहिल्या आहेत.)भारत स्वातंत्र्यानंतर सर्वात परिवर्तनकारी कामगार सुधारणांपैकी एक असलेल्या सुधारणांच्या उंबरठ्यावर उभा आहे. वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामकाज अटी संहिता या चार सर्वसमावेशक कामगार संहितांची अंमलबजावणी, ही २९ केंद्रीय कामगार कायद्यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यातून मुक्त करून सुलभ, तंत्रज्ञान-सक्षम आणि कामगार-केंद्रित व्यवस्थेकडे वाटचाल करण्याचे निर्णायक पाऊल आहे. ही सुधारणा केवळ प्रशासकीय बदल नसून, आत्मनिर्भर भारताच्या महत्त्वाकांक्षेला आधार देणारी निष्पक्ष, स्पर्धात्मक, समावेशक आणि भविष्यासाठी सुसज्ज कार्यदल परिसंस्था निर्माण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे संकेत देणारी संरचनात्मक पुनर्रचना आहे.विखुरलेपण ते सुसंगतताअनेक दशके भारताचे कामगार कायदे विसंगत, परस्परव्यापी होते. त्यामुळे कंपन्यांवर खूप मोठा नियामक भार पडत असे आणि अनुपालनाच्या प्रयत्नांत गुंतागुंत निर्माण होत असे. केंद्र आणि राज्य कायद्याअंतर्गत अनेक नोंदणी, परवाने आणि तपासणीमुळे खर्च वाढला, कामगार कल्याणापासून लक्ष विचलित झाले आणि अनेकदा उद्योग व नियामकांमध्ये अविश्वास निर्माण झाला. तुकड्यात विभागलेल्या कायद्यातील अस्पष्टतेमुळे अंमलबजावणी कमकुवत राहिली आणि ‘इन्स्पेक्टर राज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमानी प्रथांना वाव मिळाला. परिणामी पारदर्शकता मर्यादित राहिली. नवीन कामगार संहिता देशभरात व्याख्या आणि अनुपालन गरजा यात संतुलन साधतात आणि 'एक देश, एक कामगार कायदा' या तत्त्वाला मूर्त रूप देतात. नियोक्ता आणि कर्मचारी दोघांनाही अधिक स्पष्टता, न्याय आणि सुलभ प्रक्रियांचा लाभ देतात. एकीकृत नोंदणी आणि डिजिटल प्रशासनामुळे अनावश्यक पुनरावृत्ती दूर होते, प्रक्रिया जलद होतात आणि उत्तरदायित्त्व वाढते. वेतन, लाभ आणि कामकाज अटी यांसाठी मानकीकृत व्याख्या संपूर्ण देशात लागू झाल्याने वाद कमी होऊन अनुपालन अधिक एकसमान होईल. थोडक्यात, नवीन कामगार संहिता ही पूर्वीची वसाहतकालीन वारशातील जटिलतेऐवजी नवोन्मेष, रोजगार निर्मिती आणि औद्योगिक वाढीस प्रोत्साहन देणारी, सुटसुटीत आणि कार्यक्षम रचना निर्माण करणारी आहे.सामाजिक संरक्षण केंद्रस्थानीकामगार संहितांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक सुरक्षेत लक्षणीय वाढ आणि विस्तार. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मते, भारतातील सामाजिक सुरक्षा व्याप्ती २०१५ मध्ये लोकसंख्येच्या सुमारे १९ टक्के होती. ती वाढून २०२५ मध्ये ६४ टक्के पेक्षा जास्त झाली आहे. यामध्ये जवळजवळ ९४० दशलक्ष लोकांचा समावेश आहे. कामगार संहिता, कामगार कायद्याच्या केंद्रस्थानी असलेल्या सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा तरतुदींना संस्थात्मक बनवून पुढे नेणाऱ्या आहेत. कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य नियुक्ती पत्रांसह देशभरात किमान वेतनाचा प्रारंभ, यामुळे उत्पन्न सुरक्षा वाढते, औपचारिकीकरण सुलभ होते आणि श्रम बाजारपेठेत निष्पक्षता निर्माण होते.कामाच्या बदलत्या जगाची दखलडिजिटल अर्थव्यवस्थेत कामाच्या विकसित होत असलेल्या स्वरूपाची, यातील गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांच्या वाढत्या संख्येनं होत असलेल्या समावेशाची दखल, या संहिता घेतात. प्रथमच, या कामगारांना कायदेशीर मान्यता मिळाली आहे आणि त्यांना डिजिटल अॅग्रीगेटर्सद्वारे काही प्रमाणात निधी देणाऱ्या विशेष सामाजिक सुरक्षा यंत्रणेद्वारे पाठबळ मिळणार आहे. राष्ट्रीय ई-श्रम पोर्टल, गिग आणि असंघटित कामगारांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करते, ज्यामुळे त्यांना प्लॅटफॉर्म आणि स्थानांवर सामाजिक सुरक्षेची पोर्टेबिलिटी मिळून लक्ष्यित फायदे मिळू शकतात. उदाहरणार्थ एखाद्या डिलिव्हरी वर्करला सामाजिक संरक्षणापर्यंतची पोहोच न गमावता एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका अॅपवरून दुसऱ्या अॅपवर स्थानांतरित होणे शक्य होईल.संहितेअंतर्गत आंतरराज्यीय स्थलांतरित कामगारांकडेही लक्ष पुरवण्यात आले आहे. यात लाभ पोर्टेबिलिटी, वार्षिक प्रवास भत्ते आणि त्यांच्या असुरक्षा कमी करण्यासाठी एक समर्पित राष्ट्रीय हेल्पलाइनची तरतूद आहे. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामकाज अटी संहिता कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मानके उंचावते, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक वस्तुनिर्माण केंद्र बनण्याच्या भारताच्या आकांक्षेला पाठबळ पुरवते. औद्योगिक संबंध संहिता निश्चित-मुदतीच्या रोजगाराची तरतूद करत कामगारांच्या वैधानिक हक्कांचे संरक्षण करताना नियोक्त्यांसाठी लवचिकता जोडतो.महिला, तरुण आणि लोकसंख्यात्मक लाभभारताच्या विकासगाथेत महत्त्वाच्या असलेल्या महिला आणि तरुण कामगारांना कामगार संहिता मोठ्या प्रमाणात लाभदायक आहेत. समान वेतनाची हमी आणि वाढीव किमान वेतन महिलांच्या आर्थिक सहभागाला बळकटी देते. सुधारित मातृत्व लाभ, सुरक्षित कामकाज स्थिती आणि नियमनित रात्रपाळी, यामुळे अधिक समावेशनाला चालना मिळते. तरुणांसाठी, औपचारिक रोजगार, अप्रेंटिसशिप आणि कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये स्पष्ट मार्ग रोजगारक्षमता सुधारतात आणि दीर्घकालीन करिअर प्रगतीला पाठबळ देतात.कामगार सुरक्षेचे आधुनिकीकरण करून आणि रोजगाराच्या संधींचा विस्तार करून, या सुधारणा भारताला त्याच्या लोकसंख्यात्मक लाभाचा अधिक प्रभावी वापर करण्यास सक्षम करतात. कामगारांचा सन्मान, सुरक्षा आणि सामाजिक संरक्षण सुरक्षित ठेवण्याचे कार्य करताना गुणवत्तापूर्ण रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देतात.आत्मनिर्भर भारत आणि ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था सक्षम करणेया सुधारणा आत्मनिर्भर भारताच्या पाच स्तंभांशी सुसंगत आहेत. त्या अनुपालन खर्च कमी करून आणि गुंतवणूक आकर्षित करून आर्थिक वाढीला चालना देतात. ते आधुनिक सुरक्षा नियम आणि राष्ट्रीयीकृत कामगार डेटाबेससह पायाभूत सुविधांना बळकटी देतात. त्या एकात्मिक तपासणी चौकटी आणि देशव्यापी डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे प्रशासनाला डिजिटल युगात आणतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या सुधारणा कामाचे उद्योन्मुख प्रकार ओळखून, स्थलांतरित कामगारांचे संरक्षण करून आणि महिला व तरुणांसाठी समावेशकता वाढवून भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभाचा उपयोग करून घेणाऱ्या आहेत. कामगार संहिता उत्पन्न वाढवून, वेतन सुरक्षा मजबूत करून आणि विस्तारित सामाजिक सुरक्षेद्वारे कुटुंबाचा आत्मविश्वास वाढवून मागणीला चालना देतात. एकत्रितपणे, ते भारताच्या विकास मार्गासाठी वाढ आणि समानतेचे एक सद्गुण चक्र तयार करतात.अंमलबजावणी : पुढील निर्णायक पाऊलकामगारसंहिता परिवर्तनासाठी एक आराखडा प्रदान करतात; परंतु त्यांची संपूर्ण परिणामकारकता वेळेवर आणि प्रभावी अंमलबजावणीवर अवलंबून असेल. केंद्र आणि राज्यांमधील मजबूत समन्वय, नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कार्यात्मक स्पष्टता तसेच तपासणी अधिकारी आणि नियोक्ते दोघांसाठी क्षमता निर्माण करणे आवश्यक असेल. एमएसएमई आणि कामगारांपर्यंत सक्रिय पोहोचणे तितकेच महत्त्वाचे आहे, जेणेकरून नवीन कायदेविषयक चौकटीचे फायदे आणि दायित्वे व्यापकपणे समजून आणि स्वीकारली जाण्याची सुनिश्चिती होईल.२०४७ मधील भारतासाठी एक नवीन सामाजिक करारभारतीय कार्यदलासाठी नव्या सामाजिक कराराचा संकेत देणाऱ्या चार कामगार संहितांचा प्रारंभ हा एक ऐतिहासिक क्षण आहे. व्यवसाय सुलभता आणि जीवनमान सुलभता, यात दोन्हीत त्या वाढ करणाऱ्या, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या, उद्योगांना सक्षम करणाऱ्या आणि पारदर्शक, तंत्रज्ञान-चालित आणि राष्ट्रीय स्तरावर सुसंगत नियमन आणणाऱ्या आहेत. या केवळ कामगार सुधारणा नाही, तर एका खऱ्या अर्थाने आधुनिक कार्यदल परिसंस्थेची पायाभरणी आहे. हा असा परिवर्तनाचा टप्पा आहे, जो पुढील अनेक दशकांपर्यंत भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विकासावर प्रभाव टाकत राहील. भारत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनण्याच्या आणि २०४७ मध्ये स्वातंत्र्याच्या शताब्दीची तयारीच्या दिशेने वाटचाल करत असताना या कामगार संहिता समृद्ध, सर्वसमावेशक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राष्ट्राच्या आकांक्षांना मूर्त रूप देतात.
पालिका निवडणुकीत दक्षिण महाराष्ट्रातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने दक्षिण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आठ-नऊ वर्षांनंतर स्थानिक पातळीवरील रणधुमाळी गाजली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पक्ष आणि नेत्यांना पुरता एक महिनाही मिळाला नाही. चिन्ह मिळाल्यानंतर अवघे सहा दिवस प्रचार झाला. परिणामी नेते फार काही करू शकले नाहीत. रात्र थोडी सोंगे फार अशा अवस्थेत आता त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दक्षिण महाराष्ट्रातील आरक्षणाने ५०% ची मर्यादा ओलांडली नसल्यामुळे इथले निकाल अडून राहणार नाहीत. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील कराड, मलकापूर, सातारा, फलटण, विटा, आष्टा, जत, पलूस, तासगाव, कागल, हातकणंगले यांसारख्या ठिकाणी आज होणारे मतदान या भागातील नेत्यांची कसोटी पाहणारे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर, सातारा जिल्ह्यातील नेते पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंहराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, नाईक निंबाळकर, सांगलीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप, विक्रम सावंत, विटा येथील आमदार सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, माजी खासदार संजय पाटील, आमदार रोहित पाटील, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, मुन्ना महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार मंडलिक, आमदार राजेंद्र यड्रावकर विनय कोरे यांसारख्या नेत्यांची शक्ती पणाला लागली आहे.दक्षिण महाराष्ट्र पारंपरिकदृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुती (भाजप-शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी अजित गट)ने या भागात धडाकेबाज विजय मिळवला. सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रराजे भोसले (भाजप) यांनी १ लाख ४२ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला, तर कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले (भाजप) यांनी पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) यांचा पराभव केला. जतमध्ये गोपीचंद पडळकर (भाजप) यांनी विक्रम सावंत (काँग्रेस)यांचा ३८,२४० मतांच्या फरकाने पराभव केला. हे निकाल स्थानिक निवडणुकीवर परिणाम करत आहेत. काही ठिकाणी विधानसभेची ती बाजी पलटली आहे. भाजपने स्थानिक पातळीवर राज्याची संघटन शक्ती लावली असून, देवेंद्र फडणवीस सरकारच्या नागरी विकास, रस्ते विकास आणि लोकोपयोगी योजनांचा प्रचार केला. मधूनमधून शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजना सुद्धा या नेत्यांच्या भाषणातून डोकावली. नागरी प्रश्नावर या निवडणुका लढवल्या गेल्या नाहीत हे निश्चित. मात्र महायुतीच्या नेत्यांच्या सभा व रॅलींना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने, ते आघाडीवर आहेत. त्यामानाने विरोधकांच्या सभा खूप कमी झाल्या. स्थानिक पातळीवरील नेत्यांनीच मैदान राखले. सत्ता पक्षातील नेते आता येतील मते मागतील आणि पुन्हा येणार नाहीत अशी टीका विरोधकांनी जोरदारपणे केली आहे. महाविकास आघाडी (काँग्रेस-राष्ट्रवादी शरद गट-शिवसेना उद्धव गट) अंतर्गत कलहाने आणि सरकारविरोधी भूमिकांनी घेण्यात कच खाल्ल्याने अनेक ठिकाणी ही आघाडी कमकुवत झाली. जयंत पाटील (राष्ट्रवादी शरद) आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा दक्षिण महाराष्ट्रात होतील असे वाटले होते. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. जयंत पाटील तर आपल्या ईश्वरपूर मतदारसंघातच घुटमळले.सातारा जिल्ह्यातील कराड आणि मलकापूर नगरपालिकांमध्ये पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) यांची शक्तिप्रदर्शन विधानसभा पराभवानंतर कमी झाली आहे. तरीही, काँग्रेसने प्रचार सभा घेतल्या असून, चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी एकत्रित लढत आहे. आजारपणातून बाहेर येऊन पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या पद्धतीने विरोधकांची एकी दाखवली त्यामुळे त्यांच्यातील नेतृत्व गुण पुन्हा एकदा उजळून निघाले आहेत मात्र या नगरपालिकेला खुल्या गटातून ओबीसी उमेदवार दिल्याने एका गटाने सर्वच पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन खुल्या जागी मराठा उमेदवार विजयी करण्याचे केलेले कॅम्पेन कितपत यशस्वी होते हे पाहायचे. उदयसिंह राजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले (भाजप) हे भाऊ सातारा आणि फलटणमध्ये प्रभावी आहेत. शिवेंद्रराजे यांच्या विधानसभा विजयामुळे भाजपला ६०-६५% जागा मिळण्याची शक्यता आहे. मंत्री जयकुमार गोरे (भाजप) आणि शंभूराज देसाई (शिवसेना शिंदे) हे पाटण आणि माणमध्ये निधी वाटप करून मतदार आकर्षित करत आहेत. नाईक-निंबाळकर कुटुंब फलटणमध्ये प्रभुत्व गाजवत असते, समशेरसिंह नाईक-निंबाळकर हे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाने काही प्रभागांत स्वतंत्र लढत दिल्याने महायुतीत तेढ निर्माण झाला आहे.सांगली जिल्ह्यातील आष्टा, ईश्वरपूर, जत, पलूस, तासगाव आणि विटा नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र गट आणि काँग्रेस यांच्यातील दरी रुंदावली आहे. जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील (अपक्ष) यांच्यातील संघर्ष संपलेला नाही. तासगावमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासोबत विलासराव जगताप (जत)आणि राजेंद्र देशमुख (आटपाडी) हे अजित पवारांच्या गटात जाऊन भाजप विरोधी पॅनल करून लढत आहेत. विश्वजित कदम (काँग्रेस) हे पलूसमध्ये प्रभावी असले तरी, विक्रम सावंत जत (काँग्रेस, विधानसभा पराभूत) गोपीचंद पडळकर यांना मात देतात का याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. विट्यात शिवसेना शिंदेचे आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीने भाजपचे वैभव पाटील यांच्यासमोर प्रथमच तगडे आव्हान आहे. येथे जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेला पाठिंबा दिला आहे. त्याच पद्धतीने आटपाडीत देखील केले असून त्यामध्ये गोपीचंद पडळकर यांचा विरोध स्पष्ट दिसत आहे. ईश्वरपूरमध्ये भाजपतर्फे माजी मंत्री अण्णा डांगे यांचे पुत्र चिमण डांगे हे उमेदवार असल्याने जयंत पाटील यांनी याच मतदारसंघात ठाण मांडले आहे. आष्टा आणि ईश्वरपूर या दोनवर त्यांनी खूप लक्ष केंद्रित केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, हातकणंगले आणि इतर पालिकांमध्ये काँग्रेसचे बंटी पाटील, मुन्ना महाडिक (भाजप), हसन मुश्रीफ राष्ट्रवादी, मंडलिक(शिवसेना शिंदे), राजेंद्र यड्रावकर (स्थानिक) आणि विनय कोरे जनसुराज्य पक्ष यांचे शक्तिप्रदर्शन होत आहे. काँग्रेसने शाहू महाराज छत्रपती, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि मुकुल वासनिक यांसारख्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असली तरी सभा कमीच लोकांच्या झाल्या. जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाडमध्ये चित्रविचित्र आघाडी बघायला मिळाली. तिन्ही जिल्ह्यांत महायुतीतील अंतर्गत स्पर्धा (भाजप विरुद्ध अजित पवार गट आणि शिंदे सेना) विरोधी पक्षांना फायदा देऊ शकते. मात्र, सत्तेच्या विकास योजनांमुळे आणि साम, दाम, दंड, भेदाच्या राजकारणामुळे भाजपला ५०% पेक्षा जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. सर्वाधिक जागा याच पक्षाने लढवल्या आहेत. तिथे आपल्यकडे मागणी कमी होती याची चिंता सर्वच पक्षांना लागली आहे. आजच्या मतदानादरम्यान शांतता राखण्यासाठी पोलीस सतर्क आहेत. दुबार मतदारांच्या मुद्द्यावर आक्षेप असले तरी, आयोगाने डबल स्टार मार्किंग केले आहे. एकंदरीत, ही निवडणूक विधानसभा निकालांचा 'रिपीट' ठरेल की नव्या आघाड्यांचा उदय होईल, हे लोकांच्या विचार करण्याच्या मुद्यावर आणि ३ डिसेंबरच्या मतमोजणीवर अवलंबून आहे.दक्षिण महाराष्ट्रात घराणेशाही ७०% नगराध्यक्ष पदे राजकीय कुटुंबांत आणि नात्यांच्या राजकारणाने लोकशाही कमकुवत झाली असली तरी, विकासाच्या मुद्द्यावर मतदार निर्णय घेतील की प्रलोभनाला बळी पडतील हा प्रश्न आहे. भाजपची मजबुती कागदावरच कायम राहील, पण महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांना लोकांनी कशी साथ दिली यावर त्यांचे भविष्य अवलंबून आहे. मात्र हे निश्चित की ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणातील नव्या अध्यायाची सुरुवात ठरेल.
पंधरा दिवसांचं कामकाज आखलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस काल तुलनेने शांतपणे व्यतीत झाला. संसदेचं अधिवेशन आणि गोंधळ हाच रिवाज झालेल्या परंपरेत अशी शांतपणे सुरुवात होणं हाच शुभशकुन मानायचा का, हे उरलेले १४ दिवस सांगतील. अधिवेशनात होणारा गोंधळ आणि त्यामुळे अपेक्षित चर्चांसह न होणारं कामकाज पाहून यावेळी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अधिवेशनापूर्वी मुद्दामच सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बैठकीला ३६ पक्षांचे ५० नेते उपस्थित होते. या बैठकीत सत्ताधारी पक्षाने आपल्या कामकाजाबाबतच्या अपेक्षा ठेवल्या आणि विरोधी पक्षांनी सहकार्य अपेक्षित असेल, तर कोणत्या विषयावर आपल्याला सविस्तर चर्चा अपेक्षित आहेत याची यादी ठेवली. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजुजू यांनी बैठकीत त्याला सहमती दर्शवली. दोन्ही बाजूंची तीव्र असंमती असेल, असे विषय त्या बैठकीतील चर्चेत तरी पुढे आले नाहीत. त्यामुळे, हे अधिवेशन असंच सुरळीत चालेल, अशी अपेक्षा ठेवायला थोडी जागा आहे. गेली अनेक वर्षं संसदेची अधिवेशनं सभागृहातला गोंधळ; त्यामुळे अशक्य झालेल्या वातावरणात कामकाजाला दिल्या गेलेल्या तहकुबीतच वाहून गेल्याने लोकसभेचं कामकाज उपलब्ध वेळेच्या ३१ टक्के, तर राज्यसभेचं ३९ टक्क्यांवर आलं आहे. ज्या कामकाजासाठी मिनिटाला लाखो रुपये खर्च होतात, त्या कामकाजाचा ६० ते ७० टक्के भाग प्रत्यक्षात होणारच नसेल, तर तो जनतेच्या पैशाचा आणि आकांक्षाचा मोठा चुराडा समजावा लागेल. देशाच्या सर्वोच्च सदनांची जबाबदारी संपूर्ण देशाचं भवितव्य घडविण्यासाठी साधकबाधक चर्चेने धोरणात्मक दिशा देण्याची असताना त्या सदनांत विधेयकं, कायदे चर्चेविनाच मंजूर झाले, तर त्याइतकं देशाचं दुर्दैव अन्य कोणतं नसेल. त्यामुळेच गोंधळ-दंगा-राडा न होता संसदेची दोन्ही सभागृहं विधायकरीत्या चालावी, एवढीच देशातील तमाम जनतेची अपेक्षा आहे.या अधिवेशनात सरकारला महत्त्वाची १९ विधेयकं मांडायची असून ती मंजूर करून घ्यायची आहेत. विमा क्षेत्रात परकीय कंपन्यांना मुक्त प्रवेश देण्याचं धोरण सरकारने यापूर्वी घेतलं आहे. त्या धोरणाला आणि त्या क्षेत्रातील व्यवसायासाठी लागणाऱ्या किमान भांडवलाच्या अटीत घट करण्याला सरकारला संसदेची संमती आवश्यक आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्याजागी केंद्र सरकार 'उच्च शिक्षण आयोगा' ची स्थापना करतं आहे. उच्च शिक्षणाच्या दर्जात वाढ, संशोधन, शास्त्रीय आणि तांत्रिक शिक्षणातील नवोपचारांना प्रोत्साहन यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून तेही सरकारला संमत करून घ्यायचं आहे. अणुउर्जेशी संबंधित महत्त्वाचं विधेयक सरकार या अधिवेशनात मांडणार आहे. गेल्या अर्थसंकल्पीय भाषणातच 'विकसित भारतासाठी अणुऊर्जा मोहीमे' ची घोषणा करण्यात आली होती. २०४७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे. हे क्षेत्र त्यासाठी खाजगी क्षेत्राला खुलं करून देण्याचा सरकारचा विचार असून त्यालाही याच अधिवेशनात मान्यता मिळवायची आहे. याशिवाय तोट्यात गेलेल्या उद्योगांची दिवाळखोरी जाहीर करण्याबाबतचे निकष आणि प्रक्रियात सुधारणा करणारं विधेयकही याच महिन्यात अपेक्षित आहे. त्या विधेयकाचा मसुदा यापूर्वीच खासदारांच्या एका समितीकडे अभ्यासासाठी देण्यात आला आहे. समितीचा अहवाल अधिवेशनात मांडला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या नियोजित कार्यक्रम पत्रिकेत 'जनविश्वास विधेयक'ही आहे. तेजस्वी सूर्य यांच्या अध्यक्षतेखाली या विधेयकाच्या मसुद्यासाठी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या गेल्याच महिन्यात तब्बल सहा बैठका झाल्याचं वृत्त आहे. ज्या गतीने या बैठका होत आहेत, त्यावरून हे विधेयक या अधिवेशनातच मांडलं जाण्याची दाट शक्यता आहे. तंबाखूजन्य पदार्थांवरील करांसंदर्भातही अधिवेशनात विधेयक मांडलं जाण्याची शक्यता असून हे सगळेच विषय दीर्घकालीन परिणामाचे असल्याने त्यावर सविस्तर चर्चा होणं गरजेचं आहे. विधेयकातील मुद्द्यांवर सर्व बाजूने योग्य प्रकाश पडला तरच कायदे अधिकाधिक बिनचूक आणि प्रभावी होतील. त्यासाठी विरोधकांनी आपल्या योगदानाची संधी गमावता कामा नये.विरोधी पक्षांच्या अजेंड्यावरही जनहिताचे अनेक विषय आहेत. त्यातला पहिला विषय अर्थातच मतदार याद्यांच्या सखोल पुन:निरीक्षणाचा असेल. या कामाला जे कर्मचारी जुंपले आहेत, त्यातील काहींनी वेगवेगळ्या राज्यात आत्महत्या केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. मतदार याद्यांचं पुनःनिरीक्षण ही आवश्यक बाब आहे. प्रत्येक राज्यातल्या बहुतेक प्रत्येक मतदारसंघात मतदार याद्यांत काही ना काही त्रुटी आढळत आहेत. गेली २० वर्षं जी प्रक्रिया झालीच नाही, ती होणं किती आवश्यक होतं तेच या त्रुटींतून दिसतं आहे. त्यामुळे, त्यात आक्षेप घेण्यासारखं काही नाही. आक्षेप अंमलबजावणीवर असू शकतो. ती प्रशासकीय यंत्रणेची जबाबदारी आहे. नवी दिल्ली आणि देशाच्या अन्य महानगरांतील असह्य प्रदूषण, वातावरणीय बदल, त्याचे शेतीवर- पर्यावरणावर आणि पर्वतीय क्षेत्रातील जनजीवनावर होत असलेले गंभीर परिणाम, न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि न्यायमूर्ती शेखर यादव यांच्याविरुद्धचे अभियोगाचे प्रस्ताव विरोधी पक्षांच्या यादीत असल्याचं सर्वपक्षीय बैठकीत उघड झालं आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम आणि केरळातील निवडणुकांना आता वर्षसुद्धा राहिलेलं नाही. त्याआधीच त्या होतील. त्यामुळे, तिथले खासदार कामकाजात भाग घेण्यास विशेष उत्सुक असतील. २०१९ पासून लोकसभेचं उपाध्यक्षपद रिक्त आहे. विरोधी पक्ष त्या संदर्भातही सरकारला साकडं घालण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन राज्यसभेचे सभापती झाल्यानंतरचं हे पहिलंच अधिवेशन असल्याने काल, पहिल्या दिवशी त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्या स्वागतावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी माजी सभापती जगदीप धनकड यांचा विषय काढताच गदारोळ झाला. तो शमलाही. सर्वोच्च सभागृहात असे राजकीय चिमटे काढले जाणारच. हे तिथपर्यंतच असावं. पुढे जाऊन त्याचे गुद्दे होऊ नयेत. तसं झालं तरच अधिवेशनाकडून देशाच्या पदरात काहीतरी पडेल.
Junnar Election: २५ मतदान केंद्रे सज्ज! नगराध्यक्ष आणि २० नगरसेवकांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार
प्रभात वृत्तसेवा जुन्नर – जुन्नर नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष आणि २० नगरसेवक पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. शहरातील नऊ शाळांच्या इमारतींमध्ये २५ मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून, २३,४९१ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम यांनी दिली.आज (दि. २) सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू होणार […] The post Junnar Election: २५ मतदान केंद्रे सज्ज! नगराध्यक्ष आणि २० नगरसेवकांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पिंपरी ( संदीप घिसे ) – पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या निवडणुका म्हणजे पुढाऱ्यांसाठी लोकशाहीची पहिली शाळा. या शाळेत पाऊल ठेवणाऱ्या नवोदित उमेदवारांसमोर उमेदवारीपासून ते मतपेटीपर्यंतचा प्रवास अत्यंत कठीण आणि शिकवण देणारा असतो. राजकारणातून समाजकारण करण्याची उमेद बाळगणाऱ्या नव्या चेहऱ्यांना उमेदवारी मिळवणे, प्रचार राबवणे आणि मतदारांना विश्वासात घेणे, या तिन्ही आघाड्यांवर कसोटी द्यावी लागणार […] The post PCMC Election: निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची ‘अग्निपरीक्षा’! जुने संघटन विरुद्ध नवा उत्साह, कोण जिंकणार ही लढाई? appeared first on Dainik Prabhat .
दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २ डिसेंबर २०२५
पंचांगआज मिती मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी शके १९४७, चंद्र नक्षत्र अश्विनी,योग वरीयान , चंद्र राशी मेष,भारतीय सौर मार्गशीर्ष ११ शके १९४७, मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५.मुंबईचा सूर्योदय ०६.५५, मुंबईचा सूर्यास्त ०५.५९, मुंबईचा चंद्रोदय ०३.३१, मुंबईचा चंद्रास्त ०४.५२ उद्याची, राहू काळ ०३.१३ ते ०४.३६ ,भौम प्रदोष,शुभ दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवावृषभ : धनलाभाचे योग.मिथुन : व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील.कर्क : हातातील कामे झटपट पूर्ण होतील.सिंह : जोडीदाराच्या मतांना प्राधान्य द्या.कन्या : मतभेद दूर होतील.तूळ : एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण होईल.वृश्चिक : प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील.धनू : अतिआत्मविश्वास नको.मकर : तज्ञांचा सल्ला उपयोगी पडू शकतो.कुंभ : वरिष्ठांशी मतभेद नको.मीन : अध्यात्मिक ओढ जाणवेल.
Pimpri Crime: कष्टाचे पैसे मागणे पडले महागात! तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका तरुणास तीन जणांनी मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. ३०) दुपारी एक वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील बेबड ओहोळ येथे घडली.विकी बाळासाहेब ढमाले (वय ३८), आयुष शरद ढमाले (वय १९) आणि विकी याचे वडील बाळासाहेब ढमाले (सर्व रा. भैरवनाथ मंदिरासमोर, बेबड ओहोळ, ता. मावळ, जि. पुणे) अशी […] The post Pimpri Crime: कष्टाचे पैसे मागणे पडले महागात! तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – उद्योगनगरी असलेले पिंपरी-चिंचवड शहर आणि चाकण भाग मेट्राेने जाेडण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) ने यापूर्वी केलेल्या आराखड्यात बदल करून सुधारित आराखडा तयार करण्यात येणार आहे. नवीन आराखड्यात काही गावांचा, स्टेशन वाढविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या महिन्याभरात आराखडा तयार हाेण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड […] The post Pimpri Metro: पिंपरी ते चाकण मेट्रो मार्गाचा सुधारित प्लॅन रेडी; तुमच्या भागातून मेट्रो धावणार का? पहा appeared first on Dainik Prabhat .
कुंभमेळा आरक्षित क्षेत्राचे संपादन न करता कारवाई रद्द करावी
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिका विकास आराखड्यानुसार साधूग्राम व संलग्न सुविधांसाठी एकूण सुमारे ३७७ एकर क्षेत्र आरक्षित करण्यात आलेले आहे. यापैकी सुमारे ९४ एकर क्षेत्र महानगरपालिकेकडून संपादित करण्यात आले असून उर्वरित २८३ एकर क्षेत्राचे संपादन प्रलंबित आहे.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात उपलब्ध मोकळ्या जागेचा वापर मंदिरांशी संलग्न व्यवस्था व आखाड्यांच्या निवासासाठी केला जातो. त्यामुळे आरक्षित क्षेत्राचे संपादन व हस्तांतरण न करता ही कारवाई रद्द करण्यात यावी, अशी मागणी संस्थांच्या प्रतिनिधींनी सुनावणीत नोंदविली आहे.आगामी कुंभमेळा २०२६-२७ दरम्यान साधूग्राम तसेच अन्य पूरक सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर जागेची आवश्यकता भासणार असल्याने, माननीय शासनाने आरक्षित क्षेत्र संपादन करण्याचे अधिकार नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणास प्रदान केले आहेत. प्राधिकरणाने ही कार्यवाही महानगरपालिकेमार्फत करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर निर्देशांच्या अनुषंगाने महानगरपालिकेतर्फे आरक्षित क्षेत्र संपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. प्रक्रियेनुसार प्रथम संबंधित जमीनमालकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी महानगरपालिका स्तरावर सुनावणी घेण्यात आली. आरक्षित क्षेत्रातील सुमारे ६७ एकर क्षेत्र हे १३ सार्वजनिक ट्रस्ट व संस्थांच्या मालकीचे असल्याने, प्रथम त्यांना त्यांचे मत मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. झालेल्या सुनावणीत संबधित संस्थांनी सांगितले की त्यांच्या मालकीच्या क्षेत्रात सद्यस्थितीत मंदिर, सभामंडप, गोशाळा इत्यादी बांधकामे असून त्या जागेचा उपयोग धार्मिक व सामाजिक कार्यासाठी केला जात आहे.
मुंबई: राज्यातील १६ जिल्ह्यांमधील २४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान न्यायालयीन अपील आणि निकालामुळे लांबणीवर पडले आहे. या ठिकाणी आता २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असल्याने, यापूर्वी २ डिसेंबर साठी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी केवळ संबंधित मतदारसंघांपुरती रद्द करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात दाखल […] The post ‘या’ 24 नगरपरिषदा-नगरपंचायतींमधील मतदान लांबणीवर; 2 डिसेंबरची सार्वजनिक सुट्टीही रद्द, संपूर्ण यादी पहा appeared first on Dainik Prabhat .
Gold-Silver Rates: आज सोने 3 हजार तर चांदी 5800 रुपयांनी वाढली; जाणून घ्या ताजे दर
नवी दिल्ली – गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्याची सुरुवातही सोने आणि चांदीच्या दरवाढीने झाली आहे. एचडीएफसी सिक्युरीटीज या संस्थेचे विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. एकूण जागतिक परिस्थिती पाहिली असता बर्याच ब्रोकरेज संस्था सोने खरेदीचा सल्ला देत आहेत. देश विदेशातील रिझर्व बँकांनीही सोन्याची खरेदी वाढविली आहे. त्यामुळे […] The post Gold-Silver Rates: आज सोने 3 हजार तर चांदी 5800 रुपयांनी वाढली; जाणून घ्या ताजे दर appeared first on Dainik Prabhat .
Virat Rohit Future ends all speculation : कसोटी आणि टी-२० मधून निवृत्त झालेले विराट कोहली आणि रोहित शर्मा एकदिवसीय विश्वचषक २०२७ बाबत गौतम गंभीर यांच्या योजनेत आहेत का? या बाबत बरीच चर्चा सुरू होती. या सगळ्यावर पडदा टाकत भारतीय फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांनी कोहलीच्या एकदिवसीय संघातील स्थानाबाबत कोणताही वाद नाही, असे प्रतिपादन केले. विराटच्या […] The post Virat Rohit Future : ‘वरिष्ठ खेळाडूंबद्दल अजून कोणतीही चर्चा नाही’; कोहलीच्या शतकानंतर बॅटिंग कोचचा मोठा खुलासा appeared first on Dainik Prabhat .
रुपयाची घसरण थांबेना; डाॅलरच्या तुलनेत रुपयाचे आजचे मूल्य किती ते जाणून घ्या…
मुंबई – एकीकडे राष्ट्रीय उत्पन्न विक्रमी पातळीवर गेले असताना अर्थव्यवस्थेच्या इतर बाबींची नकारात्मक आकडेवारी बाहेर येत आहे. सोमवारी डॉलरची मागणी वाढल्यामुळे रुपयाचे मूल्य एक वेळ 34 पैश्यांनी कोसळून 89.79 रुपये प्रति डॉलर या निचांकी पातळीवर गेले होते. व्याजदर कपातीची शक्यता मंदावल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढूनही शेअर बाजारात बरीच विक्री झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून व्यापार युद्ध आणि […] The post रुपयाची घसरण थांबेना; डाॅलरच्या तुलनेत रुपयाचे आजचे मूल्य किती ते जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .
देशाच्या अर्थव्यवस्थेत नेमकं काय चाललंय? औद्योगिक उत्पादनात मोठी घट
नवी दिल्ली – दुसर्या तिमाहित विकासदराची आकडेवारी अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त म्हणजे 8.2% इतकी भरल्यानंतर देशात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असतानाच औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी मात्र कमालीची नकारात्मक असल्याची आकडेवारी सोमवारी उपलब्ध झाली. ऑक्टोबर मधील औद्योगिक उत्पादन गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत केवळ 0.4 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या 13 महिन्यांमध्ये औद्योगिक उत्पादन इतक्या कमी प्रमाणात कोणत्याही महिन्यात […] The post देशाच्या अर्थव्यवस्थेत नेमकं काय चाललंय? औद्योगिक उत्पादनात मोठी घट appeared first on Dainik Prabhat .
नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलन केवळ 0.7 टक्क्यांनी वाढले
नवी दिल्ली – देशांतर्गत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जीएसटी परिषदेने 22 सप्टेंबर रोजी 375 वस्तूंवरील जीएसटी दरात कपात केली होती. त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलन वाढले होते. मात्र नोव्हेंबरमधील जीएसटी संकलन फारसे वाढले नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. देशांतर्गत ग्राहकाची क्रयशक्ती जास्त नाही. ती फक्त उत्सवाच्या काळातच माफक खरेदीपुरती मर्यादित होती, हे यावरून स्पष्ट […] The post नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलन केवळ 0.7 टक्क्यांनी वाढले appeared first on Dainik Prabhat .
नफेखोरीमुळे शेअर बाजार निर्देशांकात घट
मुंबई, – दुसर्या तिमाहीत विकासदर 8.2% या विक्रमी पातळीवर गेल्यामुळे सकाळच्या सत्रात शेअर बाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवर गेले होते. मात्र नंतर गुंतवणूकदारांनी विविध कारणावरून नफेखोरी केल्यामुळे निर्देशांक शुक्रवारच्या तुलनेत कमी पातळीवर बंद झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 64 अंकांनी कमी होऊन 85,641 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 27 […] The post नफेखोरीमुळे शेअर बाजार निर्देशांकात घट appeared first on Dainik Prabhat .
शेततळ्यात बुडून चिमुकल्या भाऊ-बहिणीचा मृत्यू
बीड – बीडच्या आष्टी तालुक्यात भाऊ-बहिणीचा शेततळ्यात बुडुन मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी ८:१५ वाजता टाकळसिंग गावात श्रावणी चव्हाण (१०) आणि तिचा भाऊ श्रवण (८) खेळत असताना ही घटना घडली. ते मुळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील कुसवडगाव येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील रोहिदास चव्हाण (३५) नुकतेच कुटुंबासह रोजंदारीसाठी टाकळसिंग येथे आले होते. अपघाती मृत्यूची नोंद […] The post शेततळ्यात बुडून चिमुकल्या भाऊ-बहिणीचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
निलेश राणेंना निवडणूक आयोगाचा धक्का; मालवण पैशाच्या प्रकरणात अडचणी वाढल्या
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांना राज्य निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकून फेसबुक लाईव्ह करणं हे आयोगाच्या नियमांनुसार चुकीचं असल्याची स्पष्ट भूमिका आयोगाने घेतली आहे. या प्रकरणात आधीच गुन्हा दाखल झालेल्या राणेंवर आता कायदेशीर कारवाईची भीती निर्माण झाली असून, त्यांच्या राजकीय […] The post निलेश राणेंना निवडणूक आयोगाचा धक्का; मालवण पैशाच्या प्रकरणात अडचणी वाढल्या appeared first on Dainik Prabhat .
दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवरील जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था ): दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवरील जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड करण्यात आल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी राज्यसभेत लेखी उत्तरातून दिली आहे.संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले.आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काही महत्वाच्या विषयांवर सभागृहात चर्चा पार पडली. यावेळी केंद्र सरकारने दिल्लीसह आदी महत्वाच्या विमानतळाच्या संदर्भातील महत्वाची माहिती सभागृहात देण्यात आली. दिल्ली विमानतळासह आणखी काही प्रमुख विमानतळावरील विमानांच्या जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड करण्यात आल्याच्या घटनांची माहिती केंद्र सरकारने सभागृहात दिली. गेल्या काही महिन्यांत दिल्लीसह देशभरातील काही महत्वाच्या विमानतळावरील फ्लाइट्सच्या जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड करण्यात आल्याच्या घटना घडल्याचे केंद्र सरकारकडून मान्य करण्यात आले. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात हा खुलासा केला आहे. ही माहिती देताना मंत्री राम मोहन नायडू यांनी या घडलेल्या घटनांची माहिती आणि त्यानंतर या समस्या दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देखील संसदेत दिली. यामध्ये दिल्ली, कोलकाता, अमृतसर, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नई येथील विमानतळांचा समावेश आहे.नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या काही विमानांनी रनवे १० वर उपग्रह-आधारित लँडिंग प्रक्रिया वापरताना जीपीएस स्पूफिंगची तक्रार नोंदवली होती. पण नेव्हिगेशन सिस्टम वापरणाऱ्या इतर धावपट्ट्यांवर ऑपरेशन्सवर परिणाम झाला नाही, याकडे मंत्री राम मोहन नायडू यांनी लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्रात गारठा वाढला, काही भागांत पावसाची शक्यता!
पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'दितवाह' चक्रीवादळाचा परिणाम देशभर जाणवू लागला असून, अनेक राज्यांमध्ये वातावरण ढगाळ, तर उत्तरेकडील भागात थंडीचा जोर वाढला आहे. पर्वतीय प्रदेशात हिमवर्षाव पुन्हा सुरु झाल्याने थंड वारे देशभर पसरत आहेत. त्याचा फटका महाराष्ट्रालाही बसत असून, पहाटेच्या वेळेत गारठा तीव्र जाणवत आहे. दिवसभरात तापमान स्थिर राहिले तरी सायंकाळनंतर थंडीचा गारठा अधिक जाणवत असून, काही ठिकाणी किमान तापमान ७ अंशापर्यंत खाली आले आहे.मध्य आणि मराठवाडा विभागात तापमान आणखी कमी होण्याचा अंदाज व्यक्त होत असून या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या सरींचे अनुमान हवामान विभागाने व्यक्त केले आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर घाटप्रदेशात गारठा वाढत असून पुढील काही दिवस थंडी आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत वातावरणातून मिळत आहेत.राज्यात पुढील २४ तासांत मुंबई व उपनगरांमध्येही थंडी वाढण्याची शक्यता आहे. तर जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, जालना आणि परभणी या जिल्ह्यांत हलक्या पावसासह थंडीची लाट जाणवू शकते. दरम्यान, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळी वारे दुर्बल झाले असले तरी, ते आता तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात परिवर्तित झाले असून १ डिसेंबरला ते उत्तर तामिळनाडू–पुदुच्चेरी किनाऱ्यापासून २० किमी अंतरावर येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दक्षिण किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या
मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या सुविधेसाठी ५ आणि ६ डिसेंबर (शुक्रवार – शनिवार)च्या मध्यरात्री परळ– कल्याण आणि कुर्ला – वाशी/पनवेल दरम्यान मध्य रेल्वे १२ अतिरिक्त उपनगरी विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरी विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबा देतील. मुख्य मार्ग – अप विशेष गाड्या (कल्याण/ठाणे/कुर्ला– परळ मार्ग) मुख्य मार्ग – डाउन विशेष गाड्या (परळ - कुर्ला/ठाणे/कल्याण मार्ग) हार्बर मार्ग – अप विशेष गाड्या (पनवेल/वाशी – कुर्ला मार्ग) हार्बर मार्ग – डाउन विशेष गाड्या (कुर्ला– वाशी/पनवेल मार्ग)अशा विशेष गाड्या चालवल्या जाणार असून सर्व संबंधितांनी याची कृपया नोंद घ्यावी व या सुविधेचा लाभ घ्यावा. प्रवाशांना गैरसोयी टाळण्यासाठी योग्य व वैध तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासन करीत आहे.
युक्रेन युद्धबंदीबाबत उच्चस्तरिय बैठकांचे सत्र; झेलेन्स्की यांची मॅक्रॉ यांच्याशी चर्चा
पॅरिस – युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी आज फ्रान्सचे अध्यक्ष मॅन्युएल मॅक्रॉ यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी मांडलेल्या युद्धबंदी प्रस्तावाबाबत चर्चा केली. रविवारी युक्रेन आणि अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये फ्लोरिडा येथे याच मुद्द्यावरून चर्चा झाली होती. ही चर्चा खूपच सकारात्मक झाल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माऱोको रुबिओ यांनी म्हटले होते. / बैठकीमध्ये अमेरिकेच्या युद्धबंदी प्रस्तावाच्या वाटाघाटींची उजळणी करण्यात […] The post युक्रेन युद्धबंदीबाबत उच्चस्तरिय बैठकांचे सत्र; झेलेन्स्की यांची मॅक्रॉ यांच्याशी चर्चा appeared first on Dainik Prabhat .
G-20 Summit: ट्रम्प यांच्या ‘त्या’निर्णयावर दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष रामफोंसा नाराज
जोहान्सबर्ग – अमेरिकेत होणाऱ्या जी-२० परिषदेत दक्षिण आफ्रिकेला निमंत्रण न देण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयावर दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामफोंसा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिका जी-२० गटाचा संस्थापक सदस्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. अल्पसंख्य श्वेतवर्णियांना भेदभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करून दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली जोहान्सबर्ग येथे २२ – २३ नोव्हेंबरला झालेल्या […] The post G-20 Summit: ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयावर दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष रामफोंसा नाराज appeared first on Dainik Prabhat .
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू; पहिल्याच दिवशी ‘या’मुद्द्यावरून गदारोळ
नवी दिल्ली – संसदेत सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा गदारोळ झाला. त्यासाठी मतदारयाद्या पडताळणीवर (एसआयआर) चर्चेची मागणी लावून धरत विरोधकांनी स्वीकारलेला आक्रमक पवित्रा कारणीभूत ठरला. देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत सध्या मतदारयाद्या पडताळणी सुरू आहे. त्या प्रक्रियेवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्याचे पडसाद संसद अधिवेशनातही उमटले. एसआयआरवर तातडीने चर्चा घेण्याची मागणी विरोधकांनी […] The post संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू; पहिल्याच दिवशी ‘या’ मुद्द्यावरून गदारोळ appeared first on Dainik Prabhat .
निवडणुकीसाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज
एकूण २५,००० बॅलेट युनिट आणि २०,००० कंट्रोल युनिट महानगरपालिकेच्या ताब्यातमुंबई (विशेष प्रतिनिधी) -मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरीता २० हजार कंट्रोल युनिट आणि २५ हजार बॅलेट युनिट मुंबई महानगरपालिकेला प्राप्त झाली आहेत. या कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटची साठवणूक विक्रोळी आणि कांदिवली येथील महानगरपालिकेच्या गोदामात कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये करण्यात आली आहे. या महत्वपूर्ण प्रक्रियेवेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिकेसाठी एकूण २० हजार कंट्रोल युनिट आणि २५ हजार बॅलेट युनिटचे वितरण केले आहे. प्राप्त झालेल्या या कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट यांची साठवणूक विक्रोळी आणि कांदिवली येथील महानगरपालिका गोदामात करण्यात आली आहे.मुंबई महानगरपालिकेच्या इव्हीएम गोदाम, वर्षा नगर, मुंबई महानगरपालिका शाळा संकुल, तळमजला, वीर सावरकर मार्ग, विक्रोळी पार्क साईट, विक्रोळी (पश्चिम) येथे १० हजार ८०० कंट्रोल युनिट आणि १३ हजार ५०० बॅलेट युनिटची साठवणूक करण्यात आली आहे. तर, मुंबई महानगरपालिका इव्हीएम गोदाम, महानगरपालिका इमारत, तळमजला, संस्कृती संकूल, ए विंग, सेंट लॉरेन्स हायस्कूल जवळ, ९० फूट मार्ग, ठाकूर संकूल, कांदिवली (पूर्व) येथे ९ हजार २०० कंट्रोल युनिट आणि ११ हजार ५०० बॅलेट युनिटची साठवणूक करण्यात आली आहे.मुंबई महानगरपालिका प्रशासन सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी सज्ज आहे. त्यासाठी विविध टप्पेनिहाय आखणी करण्यात आली आहे. महत्वाचा टप्पा म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची उपलब्धता होय. हा टप्पा आता पूर्ण झाला आहे. सर्व संबंधितांशी समन्वय आणि नियोजनपूर्वक तयारी करून महानगरपालिकेने विक्रोळी आणि कांदिवली येथील गोदामात कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटची साठवणूक केली आहे. या दोन्ही ठिकाणी महानगरपालिका सुरक्षा यंत्रणेसह पोलीस बंदोबस्तही तैनात आहे.
मुंबईतील पाणी कपात घेतली मागे, काय आहे कारण..
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे. या कारणाने बुधवारी ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून गुरुवारी ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत एकूण १४ प्रशासकीय विभागांमध्ये पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात लागू करण्याचे नियोजन होते. परंतु, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबई महानगरात येणार असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून १५ टक्के पाणीकपात रद्द करण्यात येत आहे.तानसा धरणातून भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी २७५० मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नियोजित आहे. जुनी जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी अंथरण्याकामी काही कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी साधारणतः २४ तासांचा कालावधी आवश्यक आहे. या कामकाजामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणा-या पाणीपुरवठ्यामध्ये अंदाजे १५ टक्के घट होणार आहे. याचा परिणाम म्हणून मुंबई शहर विभागातील ए, सी, डी, जी दक्षिण, जी उत्तर विभाग ; पश्चिम उपनगरातील एच पूर्व, एच पश्चिम, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य विभाग तसेच पूर्व उपनगरातील एल आणि एस विभाग अशा एकूण १४ प्रशासकीय विभागांना होणा-या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात केली जाणार होती. त्यामुळे बुधवार, ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून गुरूवार, ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात लागू राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.परंतु, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी दरवर्षी मुंबई महानगरात येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून १५ टक्के पाणीकपात रद्द करण्यात येत असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत कळविण्यात येत आहे.
ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन'
मुंबई (विशेष प्रतिनिधी) -आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा आनंदमय सोहळा माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात पार पडला. मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत आयोजित ह्या सोहळ्यामध्ये ७०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला.या कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेसकॉम) संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, ‘फेसकॉम’ अध्यक्ष (मुंबई विभाग) सुरेश पोटे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.डॉ. प्राची जांभेकर ह्यांच्या हस्ते पदाधिकारी तसेच ज्येष्ठांचा सत्कार आणि गौरव करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी एक व्यापक धोरण मंजूर केले आहे. अशाप्रकारचे धोरण राबविणारी ही एकमेव महानगरपालिका आहे. या धोरणामुळे ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुरक्षित आणि सन्मानाचे होणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठांना डिजिटल साक्षरता, नवनवीन उपक्रम, सुटीतील वाचनालय अशा महत्त्वाच्या मुद्यांवर मार्गदर्शनही करण्यात आले.सोहळ्याच्या पहिल्या सत्रात ‘युनोस्को’ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्ल्यांविषयी दृकश्राव्य माध्यमातून माहिती देण्यात आली. तर, अखेरीस ज्येष्ठांमधील गुणप्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये गाणी, नकला यांचे सादरीकरण करण्यात आले. दीप्ती कुलकर्णी यांनी सादर केलेल्या मनोरंजनात्मक गाण्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला.
Pune News : चांदणी चौक ते भूगाव वाहतूक कोंडीतून सुटका होणार
पुणे : पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौक–भूगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून अखेर पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. या मार्गावर महापालिका तब्बल २०३ कोटी रुपये खर्चून भुयारी मार्ग तसेच उड्डाणपूल उभारणार आहे. भूगाव आणि भूकूम परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्याने या भागातून लाखो वाहने शहरात येतात. तसेच या रस्त्याने हिंजवडी, घोटावडे, पिरंगूट, मुळशी व कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांचीही […] The post Pune News : चांदणी चौक ते भूगाव वाहतूक कोंडीतून सुटका होणार appeared first on Dainik Prabhat .
Jaydev Unadkat creates history in SMAT : भारतीय वेगवान गोलंदाज आणि सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनादकटने दिल्लीविरुद्धच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात, उनादकटने एक विकेट घेताच तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. उनादकटने दिल्लीचा कर्णधार […] The post SMAT 2025 : जयदेव उनाडकटने रचला इतिहास! सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : महाराष्ट्रातील काही नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पूर्णपणे स्थगित करण्याचा तर काही ठिकाणी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या काही प्रभागातील निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्यातील एकूण किती नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकींना स्थगिती देण्यात आली आहे, आणि त्यासाठी कधी मतदान होणार आहे, या संदर्भातील सुधारीत कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.आधी राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. आता निवडणूक आयोगाच्या सुधारीत कार्यक्रमानुसार राज्यातील एकूण २४ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षपदांच्या आणि विविध ठिकाणच्या १५४ सदस्यपदाच्या जागांवरील निवडणूक पुढे २ डिसेंबर ऐवजी २० डिसेंबर रोजी होणार आहे. ज्या ठिकाणी २ डिसेंबर रोजी मतदान होईल तिथे ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल आणि जिथे २० डिसेंबर रोजी मतदान होईल तिथे २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.निवडणूक आयोगाने सर्व २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया केली. यानंतर छाननी सुरू असताना अनेक आक्षेप आले. या आक्षेपांची दखल घेऊन तपासणी करुन योग्य ती कारवाई करण्यास वेळ लागला. यामुळे २४ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षपदांच्या आणि विविध ठिकाणच्या १५४ सदस्यपदाच्या जागांवरील निवडणूक २ डिसेंबर ऐवजी २० डिसेंबर रोजी होणार आहे. अध्यक्षपदासंदर्भातील अपिलांचा निकाल उशिरा आलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या संपूर्ण क्षेत्रासाठी निवडणूक प्रक्रिया सुधारीत कार्यक्रमानुसार राबविली जाईल. अध्यक्षपदासोबतच सदस्यपदांची एकत्रित निवडणूक घेण्याची कायद्यात तरतूद आहे. ज्या ठिकाणच्या सदस्यपदासाठी अपील होते, तिथे मात्र फक्त त्या जागेपुरताच सुधारित निवडणूक कार्यक्रम राबविला जाईल.अपील कालावधीनंतरच्या टप्प्यांसाठीच्या सुधारित कार्यक्रमानुसार आता दहा डिसेंबर २०२५ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप ११ डिसेंबर २०२५ रोजी होईल. यानंतर २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल.अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार निवडणूक होत असलेल्या २४ नगरपरिषदा व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे: ठाणे- अंबरनाथ. अहिल्यानगर- कोपरगाव, देवळालीप्रवरा, पाथर्डी व नेवासा. पुणे- बारामती व फुरसुंगी- उरुळी देवाची. सोलापूर- अनगर व मंगळवेढा. सातारा- महाबळेश्वर व फलटण. छत्रपती संभाजीनगर- फुलंब्री. नांदेड- मुखेड व धर्माबाद. लातूर- निलंगा व रेणापूर. हिंगोली- बसमत. अमरावती- अनंजनगाव सूर्जी. अकोला- बाळापूर. यवतमाळ- यवतमाळ. वाशीम- वाशीम. बुलढाणा- देऊळगावराजा. वर्धा- देवळी. चंद्रपूर- घुग्घूस.सुधारित कार्यक्रमानुसार निवडणूक होत असलेल्या ७६ नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांचा तपशील असा: अमरावती: अचलपूर-२, दर्यापूर-१, धारणी-२ व वरूड-१. अहिल्यानगर: जामखेड-२, राहुरी-१, शिर्डी-१, शेवगाव-3३, श्रीगोंदा-१, श्रीरामपूर-१ व संगमनेर-३. कोल्हापूर: गडहिंग्लज-१. गडचिरोली: आरमोरी-१ व गडचिरोली-३. गोंदिया: गोंदिया-३ व तिरोडा-१. चंद्रपूर: गडचांदूर-१, बल्लारपूर-१, मूल-१ व वरोरा-१. छत्रपती संभाजीनगर: गंगापूर-२, पैठण-४ व वैजापूर-२. जळगाव: अंमळनेर-१, पाचोरा-२, भुसावळ-३, यावल-१, वरणगाव-२ व सावदा-३. जालना: भोकरदन-२. ठाणे: बदलापूर-६. धाराशिव: उमरगा-३ व धाराशिव-३. नांदेड: कुंडलवाडी-१, भोकर-१ व लोहा-१. नागपूर: कामठी-३, कोंढाळी-२, नरखेड-३ व रामटेक-१. नाशिक: ओझर-२, चांदवड-१ व सिन्नर-४. परभणी: जिंतूर-१ व पुर्णा-२. पालघर: पालघर-१ व वाडा-१. पुणे: तळेगाव-६, दौंड-१, लोणावळा-२ व सासवड-१. बीड: अंबेजोगाई-४, किल्ले धारूर-१ व परळी-५. बुलढाणा: खामगाव-४, जळगाव जामोद-३ व शेगाव-२. भंडारा: भंडारा-२. यवतमाळ: दिग्रस-३, पांढरकवडा-२ व वणी-१. रत्नागिरी: रत्नागिरी-२. लातूर: उद्गीर-३. वर्धा: पुलगाव-२, वर्धा-२ व हिंगणघाट-३. वाशीम: रिसोड-२. सांगली: शिराळा-१. सातारा: कराड-१ व मलकापूर-२. सोलापूर: पंढरपूर-२, बार्शी-१, मैंदर्गी-१, मोहोळ-२ व सांगोला-२ आणि हिंगोली: हिंगोली-२.काही मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्दनगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत आहे. यापूर्वी मतदानाच्या दिवशीची जाहीर केलेली सुट्टी काही मतदारसंघात न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे केवळ त्या मतदारसंघापुरती रद्द करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी १६ जिल्ह्यांतील नगरपरिषद/नगरपंचायतीमध्ये सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, अहिल्यानगर (कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा), पुणे (बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची), सोलापूर (अनगर, मंगळवेढा), सातारा (महाबळेश्वर, फलटण), छत्रपती संभाजीनगर (फुलंब्री), नांदेड (मुखेड, धर्माबाद), लातूर (निलंगा, रेणापूर), हिंगोली (वसमत), अमरावती (अंजनगावसूर्जी), अकोला (बाळापूर), यवतमाळ (यवतमाळ), वाशिम (वाशिम), बुलढाणा (देऊळगावराजा), वर्धा (देवळी) आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस यांचा समावेश आहे, असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.
महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. या अनुयायांना पुरविण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांच्या पूर्वतयारीचा आढावा कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला.कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करावयाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे घेण्यात आली. बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, कोकण विभागअपर आयुक्त फरोग मुकादम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रत्येक विभागाने आपल्याला दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी. चैत्यभूमी परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये या दृष्टीकोनातून पोलीस बंदोबस्त याबाबत काटेकोर नियोजन करण्यात यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. चैत्यभूमी परिसरातील स्वच्छता, साफसफाई याबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.बैठकीत नियंत्रण कक्ष, आरोग्यसेवा, रुग्णवाहिका, रेल्वे व्यवस्था, बेस्ट आणि एसटी परिवहन व्यवस्था, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, सीसीटीव्ही देखरेख, पोलीस बंदोबस्त तसेच वाहतूक नियोजन या संदर्भातही विभागीय आयुक्तांनी निर्देश दिले. बैठकीस कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
तपोवनातील वृक्षतोडीचा वाद चिघळणार? पर्यावरणप्रेमी आक्रमक
नाशिक : नाशिकमधील कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू-महंतांची निवास व्यवस्था तपोवनात केली जाते. म्हणूनच हा परिसर कुंभमेळा कालावधीत साधुग्राम म्हणून ओळखला जातो. कुंभमेळ्यातील अमृत पर्वात स्नानासाठी साधू, महंत रामकुंडाकडे वळतात. रामकुंडापर्यंत त्यांना तपोवनातून येणेच सोयिस्कर ठरते. तपोवनापासून रामकुंडापर्यंतचे अंतरही तसे फारसे नाही. तसेच पौराणिक काळी साधू, महंतांनी त्या ठिकाणी तपश्चर्या केली होती. त्यामुळेच तपोवनाची ओळख असल्याने आधुनिक […] The post तपोवनातील वृक्षतोडीचा वाद चिघळणार? पर्यावरणप्रेमी आक्रमक appeared first on Dainik Prabhat .
Karnataka Politics : मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत ७ ते ८ नेते, भाजपचा दावा
बंगळुरू – कर्नाटक कॉंग्रेसमधील सत्तासंघर्ष संपुष्टात आल्याचे मानण्यास भाजप तयार नसल्याचे सूचित होत आहे. मुख्यमंत्रिपदाची शर्यत तीव्र बनली आहे. कॉंग्रेसचे ७ ते ८ मंत्री आणि आमदार त्या पदाच्या स्पर्धेत आहेत, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र यांनी केला. कॉंग्रेसमधील सत्तास्पर्धेमुळे कर्नाटकमधील प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे, असा आरोपही त्यांनी केला. ब्रेकफास्ट पे चर्चा झाल्यानंतर सिद्धरामय्या आणि शिवकुमार […] The post Karnataka Politics : मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत ७ ते ८ नेते, भाजपचा दावा appeared first on Dainik Prabhat .
राज्यात शुक्रवारी शाळा बंद आंदोलन
पुणे – टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशा विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील सर्व शाळा येत्या शुक्रवारी (दि. ५) बंद करून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षक व शिक्षकेतर […] The post राज्यात शुक्रवारी शाळा बंद आंदोलन appeared first on Dainik Prabhat .
पाणीपुरी खाल्ली आणि वाचा गेली, महिलेचा जबडा सरकला
ओरैया : उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पाणीपुरी खाल्ल्यामुळे एका महिलेची वाचा गेली. महिलेचा जबडा पाणीपुरी खात असताना सरकला. आता या महिलेला तोंड बंद करणे आणि बोलणे अशक्य झाले आहे. महिलेला आधी जवळच्या प्राथमिक उपचार केंद्रात नेण्यात आले. तिथल्या डॉक्टरांनी मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यानंतर महिलेला नातलगांनी मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.दिबियापूरच्या गोरी किशनपूर गावात वास्तव्यास असलेल्या ४२ वर्षांच्या इकला देवी कामानिमित्त औरैयाला गेल्या होत्या. कामं आटोपल्यावर त्या एका दुकानात पाणीपुरी खाण्यासाठी गेल्या. तिथे एक पाणीपुरी खाण्यासाठी तोंड उघडले, जे बंद करणे कठीण झाले. जबडा सरकल्यामुळे महिलेला वेदना होऊ लागल्या. वेदना असह्य झाल्यामुळे महिला कळवळू लागली. महिलेच्या नातलगांनी तिला आधी जवळच्या प्राथमिक उपचार केंद्रात नेले. तिथल्या डॉक्टरांनी दिलेला सल्ला ऐकून नातलगांनी महिलेला मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले. पण अद्याप महिलेचा जबडा जागेवर आलेला नाही. महिलेची अवस्था दयनीय झाली आहे. नातलग चिंतेत आहे.पाणीपुरी हा चटपटीत पदार्थ अनेकांना आवडतो. कित्येक महिलांसाठी पाणीपुरी म्हणजे जीव की प्राण. पण ही पाणीपुरी खाण्याचे निमित्त व्हावे आणि जबडा सरकावा असा प्रकार महिलेच्या बाबतीत पहिल्यांदाच घडला आहे. या प्रकारामुळे महिला आणि तिचे नातलग धास्तावले आहे. डॉक्टर महिलेचा त्रास कमी व्हावा, तिच्या तब्येतीला आराम पडावा आणि हललेला जबडा जागेवर यावा यासाठी उपचार करत आहेत.
हिंजवडी आयटी पार्क परिसरात भीषण अपघात; बस चढली पदपथावर, चिमुकल्या बहीण-भावांचा जागीच मृत्यू
पिंपरी – हिंजवडी आयटी पार्क परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. एका आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस पंचरत्न चौकाजवळ अचानक अनियंत्रित होऊन थेट पदपथावर चढल्याने सख्ख्या बहीण-भावांचा मृत्यू झाला. या अपघातात अर्चना देवा प्रसाद (वय ८) आणि सूरज देवा प्रसाद (वय ६) […] The post हिंजवडी आयटी पार्क परिसरात भीषण अपघात; बस चढली पदपथावर, चिमुकल्या बहीण-भावांचा जागीच मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
भवानीनगर: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाला सुरुवात झाली असून, कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे आणि सर्व संचालक मंडळाने ऊस उत्पादक सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करत यंदाच्या गाळपासाठी प्रति टन ३१०१ रुपये इतका पहिला हप्ता जाहीर करून मोठा दिलासा दिला आहे. यंदाच्या हंगामात कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांना दिलेला हा दर अपेक्षेपेक्षा जास्त […] The post श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा ऊस उत्पादकांना मोठा दिलासा; पहिला हप्ता ३१०१ रुपये प्रति टन जाहीर appeared first on Dainik Prabhat .
मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचा महानगरपालिकेचा दावा
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने शहर आणि त्याच्या उपनगरांमध्ये प्रदूषण नियंत्रणाच्या अनेक उपाययोजनांमुळे २६ नोव्हेंबरपासून हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली असल्याचा दावा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले की वायू प्रदूषण रोखण्यासाठी कठोर निर्बंध, ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन स्टेज-४ (जीआरएपी-४) सध्या मुंबईला लागू होत नाही, जरी सखोल देखरेखीचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त आणि बीएमसी प्रशासक […] The post मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचा महानगरपालिकेचा दावा appeared first on Dainik Prabhat .
‘…अन्यथा सर्व निवडणुका स्थगित कराव्या लागल्या असत्या’; राज्य निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण
मुंबई – राज्यातील एकूण २४ नगरपालिका आणि दीडशे सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने या निवडणुका २० डिसेंबरला होणार आहेत. मात्र, या निर्णयाचा सध्याच्या निवडणुकांवर परिणाम होणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. तसेच 17 (1ब) तरतुदीनुसार उमेदवाराने कोर्टात अपील केल्यास उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणे गरजेचे होते. अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झाला असता […] The post ‘…अन्यथा सर्व निवडणुका स्थगित कराव्या लागल्या असत्या’; राज्य निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण appeared first on Dainik Prabhat .
‘आत्ताच देश सोडा नाहीतर…’, डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरोंना अल्टिमेटम
वॉशिंग्टन – डोनाल्ड ट्रम्प आणि व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यातील तणाव शिगेला पोचला असून ट्रम्प यांनी मादुरो यांना तात्काळ देश सोडून निघून जाण्यास सांगितले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरहून झालेल्या चर्चेनंतर वाद मिटण्याऐवजी चिघळल्याचेच चित्र दिसायला लागले आहे. देशातून बाहेर जाण्यासाठी मादुरो यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तर मादुरो […] The post ‘आत्ताच देश सोडा नाहीतर…’, डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरोंना अल्टिमेटम appeared first on Dainik Prabhat .
Rohit Sharma : रोहित शर्माचे पुन्हा मागचे दिवस पुढे! पहिल्या वनडेनंतरचा ‘तो’ VIDEO होतोय व्हायरल
Rohit Sharma Forgets AirPod Case : रोहित शर्मा हा फलंदाजीसाठी जितका प्रसिद्ध आहे, तितकाच तो त्याच्या एका खास सवयीसाठीही ओळखला जातो. त्याची ही सवय म्हणजे वस्तू विसरणे. रोहितच्या या सवयीमुळे त्याचे मित्र, संघ आणि त्याची पत्नी रितिका देखील अनेकदा वैतागले आहेत. या सवयीमुळे त्याची बरीच खिल्ली उडवली जाते. रांची येथील पहिल्या वनडेनंतर रोहित शर्माने पुन्हा […] The post Rohit Sharma : रोहित शर्माचे पुन्हा मागचे दिवस पुढे! पहिल्या वनडेनंतरचा ‘तो’ VIDEO होतोय व्हायरल appeared first on Dainik Prabhat .
‘या’काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा ‘रोड शो’
चंद्रपूर: राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा (Municipal Council Elections) प्रचार आज सायंकाळी थंडावला. उद्या, २ डिसेंबर रोजी मतदान असून, त्यापूर्वीच्या अखेरच्या टप्प्यात प्रचाराला जबरदस्त गती मिळाल्याचे दिसून आले. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजांनी सभांचा धडाका लावला. विशेष म्हणजे, मतदारांना आकर्षित करण्यासाठी सेलिब्रिटींचाही मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. याच […] The post ‘या’ काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा ‘रोड शो’ appeared first on Dainik Prabhat .
फ्लेमिंगोच्या हंगामाची सुरुवात; ठाणे खाडी, नवी मुंबईतील डीपीएस तलावात गुलाबी पाहुण्यांचे दर्शन
ठाणे : ठाणे खाडी परिसरात या हंगामातील फ्लेमिंगो पक्ष्यांचे पहिले दर्शन झाले आहे, असे ज्येष्ठ पक्षी संशोधक मृगांक प्रभू यांनी सोमवारी सांगितले. ठाणे खाडीत ३०० ग्रेटर फ्लेमिंगो पक्ष्यांची उपस्थिती आधीच नोंदवण्यात आली आहे, तर नेरुळ येथील डीपीएस तलावात लवकरच पक्षी दिसले आहेत, असे प्रभू म्हणाले. जरी संख्या कमी असली तरी लवकरच मोठी संख्या अपेक्षित आहे, […] The post फ्लेमिंगोच्या हंगामाची सुरुवात; ठाणे खाडी, नवी मुंबईतील डीपीएस तलावात गुलाबी पाहुण्यांचे दर्शन appeared first on Dainik Prabhat .
Virat Kohli Ignores Gautam Gambhir Videos Viral : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने तुफानी १३५ धावांची खेळी करत इतिहास रचला. मात्र, या विजयानंतर सोशल मीडियावर कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील संबंधांवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ‘किंग कोहली’ गंभीर यांना जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली […] The post Virat Kohli : ड्रेसिंग रूम ते केक कटिंगपर्यंत विराटने गंभीरला जाणूनबुजून केले इग्नोर? व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ appeared first on Dainik Prabhat .
अजित पवार-शिंदेंसह ‘या’ 20 नेत्यांच्या अडचणी वाढणार? निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाषेचा ताळमेळ सोडून बोलणाऱ्या आणि मतदारांना प्रलोभने देणाऱ्या 20 नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून दखल घेतली गेली आहे. यामुळे नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी संबंधित नेत्यांनी वक्तव्य केली आहेत, तेथील जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल देण्यास सांगितले आहे. ज्या ठिकाणी नेत्यांच्या सभा असतात त्या त्या […] The post अजित पवार-शिंदेंसह ‘या’ 20 नेत्यांच्या अडचणी वाढणार? निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल appeared first on Dainik Prabhat .
ईश्वरपूर : राज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचा प्रचार आता ऐन रंगात आला आहे आणि सर्वच पक्षांचे नेते प्रचाराच्या तोफा घेऊन रणांगणात उतरले आहेत. प्रमुख नेत्यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या प्रचाराचा वेग वाढवला आहे. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी रविवारी (दिनांक द्या, उदा. २९ नोव्हेंबर) सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. भाषणादरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका विशिष्ट राजकीय नेत्याला लक्ष्य करत जोरदार शाब्दिक टोला लगावला. मुख्यमंत्र्यांनी हे विधान कोणत्या नेत्याला उद्देशून केले आणि या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, याबाबत राजकीय विश्लेषक वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहेत. कोणाला लक्ष्य केले? हे विधान भाजपमधील असंतुष्ट नेत्यांना इशारा आहे की विरोधी पक्षातील एखाद्या महत्त्वाच्या नेत्याला, याबद्दल अधिकृत माहिती अजून आलेली नाही. या वक्तव्यामुळे निवडणुकीच्या या अखेरच्या टप्प्यात विरोधकांवरील दबाव वाढवण्याचा आणि पक्षातील निष्ठावानांना विश्वास देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे, असे मानले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या या 'नो जागा'च्या टोल्यानंतर आता संबंधित नेत्याची यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.'ईश्वरपूर'चा विकास करणार; मुख्यमंत्र्यांकडून थेट आश्वासनमुख्यमंत्र्यांनी नमूद केले की, मला अतिशय आनंद आहे की या शहराचं नाव बदलून 'ईश्वरपूर' असं झालं आणि त्यानंतर मी पहिल्यांदाच या शहरात आलो आहे. नामकरणाच्या प्रक्रियेचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले, पहिल्यांदा (शहरातील लोकांनी) नाव बदलून ईश्वरपूर केलं, त्यानंतर लोक आमच्याकडे आले आणि आम्ही 'उरूण ईश्वरपूर' असे केले. आता मतदारांना साद घालताना मुख्यमंत्र्यांनी विकासाची पुढील दिशा स्पष्ट केली: आता आम्ही तुमच्याकडे आलोय. तुम्ही नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदाचे आमचे (भाजपचे) उमेदवार निवडून द्या. जर भाजपनेते नगरपालिकेत निवडून आले, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी वचन दिले की, आम्ही 'उरुण ईश्वरपूर' हे सांगली जिल्ह्यातले सर्वात विकसित शहर करू. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे स्थानिक पातळीवर उत्साह संचारला असून, त्यांनी नामकरणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून शहराच्या सर्वांगीण प्रगतीचे आश्वासन दिल्याने या निवडणुकीत विकासाचा मुद्दा अधिक प्रभावी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.https://prahaar.in/2025/12/01/rupali-patil-thombare-resigns-as-pune-ncp-city-executive-chairman-ajit-pawar-shocked/मंत्रिमंडळ 'फुल' आहे, 'व्हॅकन्सी' नाही!राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चा आणि तर्कवितर्कांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथील जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता, त्यांना थेट लक्ष्य करत जोरदार टोला लगावला. बाहेरच्यांना मंत्रीपद नाही... मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आता मंत्रिमंडळ फुल आहे. सध्या व्हॅकन्सी (रिक्त जागा) नाही. जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेश आणि संभाव्य मंत्रीपदाच्या चर्चांवर भाष्य करताना फडणवीस पुढे म्हणाले, एकच गोष्ट सांगतो, माझ्या मंत्रिमंडळात कुठलीही जागा नाही. नव्याने मागण्या करू नका. बाहेरच्याला मंत्रीपद देणार नाही. कोणालाही मंत्री पद मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्ट आणि कठोर विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.मुख्यमंत्र्यांनी एका बाजूला जयंत पाटील यांच्या संभाव्य प्रवेशाचे दरवाजे सध्या तरी बंद केले आहेत, तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि सहयोगी पक्षांतील इच्छुकांनाही सध्या मंत्रीपदाची शक्यता नाही, असा स्पष्ट संदेश दिला आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे जयंत पाटील यांच्यासह इतर अनेक इच्छुक नेत्यांच्या आशांवर पाणी फेरले गेले असून, आगामी काळात राज्यातील राजकीय समीकरणे कोणती नवी दिशा घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.२०१४ नंतर शहरांच्या विकासाचे चित्र बदलले: मुख्यमंत्री फडणवीसमुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ऐतिहासिक बदलापासून केली. ते म्हणाले की, आधी या देशात राजेशाही होती. राणीच्या पोटातून मुलगा बाहेर आला की तो राजा होत असे. परंतु आता संविधान (घटना) आल्यानंतर ती व्यवस्था बदलली आहे. या बदलामुळे, आता राजा मताच्या पेटीतून होतोय, असे त्यांनी ठामपणे सांगितले. देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या ६५ वर्षांतील परिस्थितीवर बोट ठेवत फडणवीस यांनी सांगितले की, आपल्या देशात गावकेंद्रित व्यवस्था होती. ६५ वर्षांत भारतात केंद्राकडे शहरांच्या विकासाकरिता कोणत्या योजना नव्हत्या. यामुळेच, देशातल्या शहरांचा हवा तसा विकास होऊ शकला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र, २०१४ नंतर परिस्थितीत मोठे परिवर्तन झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २०१४ नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले. शहरांचं चित्र बदललं पाहिजे, शहरांमध्ये सोयी दिल्या पाहिजेत, असा विचार त्यांनी मांडला. त्यानुसार, मोदी सरकारने देशात पहिल्यांदाच शहरांच्या विकासासाठी खालील महत्त्वाकांक्षी योजना तयार केल्या, स्मार्ट सिटी योजना, अमृत योजना, स्वच्छ भारत शहरी योजना या योजनांमधून लाखो कोटी रुपये निधी मोदी सरकारने शहरांना द्यायला सुरुवात केली, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या माध्यमातून उरुण ईश्वरपूरसारख्या शहरांनाही विकासाच्या संधी मिळणार असल्याचे त्यांनी सूचित केले.मुख्यमंत्र्यांनी सांगितला महाराष्ट्राचा 'कचरा व्यवस्थापन' फॉर्म्युला!कचरा व्यवस्थापन हा शहरांसाठी 'डोक्यावरचा ताण' असायचा, असे मान्य करत मुख्यमंत्री म्हणाले की, आता महाराष्ट्रात 300 पेक्षा जास्त शहरांमध्ये घनकचऱ्याचे व्यवस्थापन आपण (सरकार) करत आहोत. यामुळे, आता घनकचरा हा केवळ कचरा राहिला नसून, तो 'संपत्ती' बनला आहे. कचऱ्याचे मूल्यवर्धन (Value Addition) कसे केले जात आहे, हे सांगताना फडणवीस यांनी माहिती दिली की, घनकचरा व्यवस्थापन करून त्या माध्यमातून कोळसा (Coal) आणि खते (Fertilizers) तयार केली जात आहेत. मोठ्या महापालिकांमध्ये कचऱ्याद्वारे गॅस आणि विद्युत निर्मिती (Electricity Generation) देखील करण्यात आली आहे. स्थानिक विकासावर लक्ष केंद्रित करताना मुख्यमंत्र्यांनी ईश्वरपूर शहरासाठी मोठा प्रकल्प हाती घेण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, ईश्वरपूर शहरासाठी भविष्यात रिंग रोड तयार करून वाहतूक प्रश्न दूर करू. या शहराला सर्वांगीण पद्धतीने विकसित करण्याचा प्लॅन तयार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली, या शहराला वेगवेगळ्या पद्धतीने कसं विकसित करता येईल याचा प्लॅन आपल्याकडे आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे शहरातील स्वच्छतेच्या आणि वाहतुकीच्या समस्या सोडवण्याच्या दिशेने ठोस पाऊले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आश्चर्यकारक : हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : काही नगरपालिका आणि प्रभागांमध्ये आज होणारे मतदान पुढे ढकलण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे अराजक कामकाज आणि स्वतःच्या नियमांचे पालन करण्यात अपयश दिसून आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. आज ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका होणार नाहीत त्यांची सविस्तर यादी निवडणूक आयोगाने दिलेली नाही. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दावा केला की, २० नगरपरिषदा आणि […] The post निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आश्चर्यकारक : हर्षवर्धन सपकाळ appeared first on Dainik Prabhat .
Virat Kohli : किंग कोहलीने रांचीत पूर्ण केलं चाहतीचं स्वप्न! VIDEO होतोय व्हायरल
Virat Kohli Fan Girl Video Viral : क्रिकेटचा किंग विराट कोहली जेव्हा जेव्हा मैदानावर उतरतो, तेव्हा जगभरातील चाहते त्याच्या कौतुकात नतमस्तक होतात आणि जेव्हा तो शतक ठोकतो, तेव्हाचा उत्साह तर अवर्णनीय असतो. रांचीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडेतही असेच दृश्य पाहायला मिळाले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक चाहती […] The post Virat Kohli : किंग कोहलीने रांचीत पूर्ण केलं चाहतीचं स्वप्न! VIDEO होतोय व्हायरल appeared first on Dainik Prabhat .
जीएसटी कर संकलनात दणदणीत वाढ- नोव्हेंबर महिन्यात कर संकलन १.७ लाख कोटी पार!
मोहित सोमण: जीएसटी कर संकलनात (GST Collection) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नोव्हेंबरच्या महिन्यात जीएसटी कर संकलन ०.७% वाढत १.७ लाख कोटीवर पोहोचल्याचे सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीत म्हटले आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२४ मध्ये हे संकलन १.६९ लाख कोटी रुपये होते. मोठ्या प्रमाणात जीएसटी दर कपात झाल्याने मोठ्या प्रमाणात वस्तूंच्या उपभोगात, बचतीत, खर्चात वाढ झाली होती. अतिरिक्त तरलता (Liqudity) वाढल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात कर संकलनात वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. सप्टेंबर २२ पासून जीएसटी तर्कसंगतीकरण (GST Rationalisation) लागू झाले होते. त्यामुळे संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात कर संकलन वाढले. केवळ घरगुती कर संकलनात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २% वाढ झाली आहे. त्यामुळे हे संकलन १.२४ लाख कोटींवर पोहोचले आहे.याशिवाय माहितीनुसार, आयातीतून वाढलेल्या कर संकलनात १०% वाढ झाल्याने हे संकलन ४६००० कोटीवर पोहोचले. जीएसटी परतावा (GST Refund) मध्ये मात्र संमिश्रित कल पहायला मिळाला आहे कारण या संकलनात इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तुलनेत ४% घसरण झाली आहे जे १८१९६ कोटींवर पोहोचले. निर्यातीतील परतावा (Export Refund) इयर ऑन इयर बेसिसवर ३.५% वाढले आहे. निव्वळ जीएसटी महसूल (Net GST Revenue) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर नोव्हेंबर महिन्यात १.३% वाढ झाली आहे. इयर टू डेट (YTD) महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर नोव्हेंबर महिन्यात ७.३% वाढ झाली असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.नोव्हेंबर २०२५ मध्ये राज्यांमध्ये जीएसटी संकलनात संमिश्र कल दिसून आला. अनेक ईशान्येकडील राज्यांनी चांगली कामगिरी केली तर अनेक मोठ्या राज्यांनी घट नोंदवली.कर संकलनात प्रमुख राज्यांमध्ये, महाराष्ट्र (३%), कर्नाटक (५%) आणि केरळ (७%) यांनी मध्यम वाढ नोंदवली असून गुजरात (-७%), तामिळनाडू (-४%), उत्तर प्रदेश (-७%), मध्यप्रदेश (-८%) आणि पश्चिम बंगाल (-३%) यांनी घट नोंदवली आहे. केंद्रशासित प्रदेशांनी विविध कामगिरी दाखवली, ज्यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे ९% वाढली, तर लक्षद्वीपमध्ये ८५% घट झाली. तर छोट्या छोट्या राज्यात अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि आसाममध्ये सकारात्मक वाढ नोंदवण्यात आली. अरुणाचलमध्ये ३३% ची मजबूत वाढ झाली. याउलट, मिझोरम (-४१%), सिक्कीम (-३५%) आणि लडाख (-२८%) मध्ये तीव्र घट दिसून आली आहे.
शिंदेसेना संपवण्याचा भाजपचा प्रयत्न; संजय राऊतांचा गंभीर आरोप
मुंबई : भाजप नेतृत्व मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा ठाकरेसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नेत्यांना गळाला लावण्यावरून महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांचे हे वक्तव्य आले आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र, राऊत यांचे आरोप फेटाळून लावत, त्यांचे बोलणे […] The post शिंदेसेना संपवण्याचा भाजपचा प्रयत्न; संजय राऊतांचा गंभीर आरोप appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: शेअर बाजारात अखेरच्या सत्रात धूळधाण उडाली आहे. त्यामुळे आठवड्यातील पहिल्या दिवसाची अखेर घसरणीत झाली. एकीकडे मजबूत फंडामेंटल दुसरीकडे भूराजकीय अनिश्चितता, निचांकी पातळीवर घसरलेला रूपया, व्याजदरात कपातीबाबत अस्वस्थता, गुंतवणूकदारांनी गुंतवणूक न वाढवता नफा बुकिंग मोठ्या प्रमाणात केल्याने आज शेअर बाजाराने सकाळच्या सेन्सेक्स व निफ्टीतील उच्चांक वाढीनंतर अखेरीस थेट उलट्या दिशेने प्रवास सुरू केल्याने सेन्सेक्स ६४.७७ अंकाने घसरत ८५६४१.९० पातळीवर व निफ्टी २७.२० अंकाने घसरत २६१७५.७५ पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकासह रिअल्टी, केमिकल्स, हेल्थकेअर शेअर्समध्ये मोठी पडझड झाली असून मेटल, पीएसयु बँक, आयटी शेअर्समध्ये वाढ कायम राहिली आहे. परंतु मिड स्मॉल, लार्जकॅप शेअर्समध्ये पडझड झाल्याने बाजारात सपोर्ट लेवल मिळणे कठीण झाले होते. अखेरच्या सत्रात निचांकी रूपयामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः सकाळी ३% पेक्षा घसरलेल्या अस्थिरता निर्देशांक सपाट (Flat) पातळीवर उसळल्याने बाजारात दुपारनंतर अस्थिरता वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.शेअर बाजारात घसरण झाली असली तरी अखेरच्या सत्रापर्यंत बीएसई (BSE), एनएसई (NSE) मध्ये तेजीचा अंडरकरंट कायम दिसला कारण एनएसईवर ३२२ शेअर्सपैकी १३८४ शेअर्समध्ये वाढ झाली असून १७२८ शेअर्समध्ये घसरण झाली आहे. आज एनएसईत ८७ शेअर अप्पर सर्किटवर पोहोचले आहेत. रूपयात विक्रमी घसरण झाल्याने रूपया ८९.७६ पातळीवर पोहोचला होता. पहिल्यांदाच बँक निफ्टीने ६०००० पातळी आज पार पाडली आहे. युएस व व्हेनेझुएला यांच्यातील द्वंद्व सुरू झाल्याने भूराजकीय स्थितीत अस्थिरता निर्माण झाली आहे. एकीकडे चीनमधील घसरलेला उत्पादन निर्देशांक तसेच युएसमधील संभाव्य व्याजदरात कपातीची जेरोमी पॉवेल यांच्या नव्या विधानामुळे निर्माण झालेली गुंतवणूकदारांची अनास्था, सातत्याने अस्थिरतेमुळे घसरलेला डॉलर निर्देशांक या कारणामुळे अस्थिरता आणखी वाढली. खरं तर दुसऱ्या तिमाहीतील अनपेक्षितपणे वाढलेल्या ८.२% वाढीनंतर बाजारात वाढ झाली होती मात्र डिसेंबर ५ पर्यंत वित्तीय पतधोरण समिती (Monetary Policy Committee MPC) बैठकीत रेपो दरात कपात आरबीआय २५ बेसिसने करेल का यावर प्रश्नचिन्ह कायम असल्याने अद्याप गुंतवणूकदारांना दिशा मिळू शकली नाही.अखेरच्या सत्रात आशियाई बाजारात संमिश्र प्रतिसाद कायम राहिला आहे. सर्वाधिक वाढ सेट कंपोझिट (१.५६%), हेंगसेंग (०.५७%), जकार्ता कंपोझिट (०.६५%), जकार्ता कंपोझिट (०.४७%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण निकेयी (१.९६%) तैवान वेटेड (१.०४%), कोसपी (०.१६%) निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात नासडाक (०.६५%), एस अँड पी ५०० (०.५४%) निर्देशांकात झाली असून घसरण डाऊ जोन्स (०.४१%) निर्देशांकात झाली आहे.बाजार सत्र संपताना सर्वाधिक वाढ वोक्हार्ट (१९.२१%), झेड एफ कर्मशिअल (१२.२९%), जेएम फायनांशियल सर्विसेस (६.३५%), आयईएक्स (५.३२%), सिटी युनियन बँक (४.३८%), तेजस नेटवर्क (३.९२%), हिन्दुस्तान कॉपर (३.७६%), टीव्हीएस मोटर्स (३.६९%), वन ९७ (३.५७%), लेमन ट्री हॉटेल (३.१७%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण वर्लपूल इंडिया (७.३६%), वेलस्पून लिविंग (४.५८%), न्यूलँड लॅब्स (४.०५%), केपीआर मिल्स (३.३७%), लेटंट व्ह्यू (३%), जीई व्हर्नोवा (२.७८%), रिलायन्स पॉवर (२.५८%), बाटा इंडिया (२.५२%), ज्योती सीएनसी ऑटो (२.६१%), टीआरआयएल (२.४२%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'नवीन उच्चांक गाठल्यानंतर, डिसेंबरमध्ये आरबीआयकडून व्याजदर कपातीची अपेक्षा कमी झाल्यामुळे बाजार एका श्रेणीबद्ध टप्प्यात गेला कारण दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढ अपेक्षेपेक्षा चांगली झाली आणि रुपयाचे मूल्य घसरले. नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन मंदावल्याने, कमी दरांमुळे, भावनिक मंदीमुळे, भावनिक मंदीमुळे, बाजारातील भाव किंचित सावध झाला. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये झालेल्या विक्रीत, जीएसटी सुसूत्रीकरणामुळे, सौम्य चलनवाढीमुळे आणि लग्नाच्या हंगामातील मागणीमुळे ऑटो इंडेक्सने चांगली कामगिरी केली.'आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'दुसऱ्या तिमाहीतील अपेक्षेपेक्षा जास्त मजबूत जीडीपी वाढीमुळे बेंचमार्क निर्देशांकांनी एक नवीन टप्पा गाठला. तथापि, सुरुवातीचा आशावाद अल्पकाळ टिकला कारण बाजारात नफा बुकिंग दिसून आला, अखेर कमकुवत जागतिक संकेत आणि सततच्या एफआयआय विक्रीच्या दबावामुळे दिवसाचा शेवट अस्थिर राहिला. बंद होताना, सेन्सेक्स ६४.७७ अंकांनी (०.०८%) घसरून ८५,६४१.९० पातळीवर पोहोचला, तर निफ्टी २७.२० अंकांनी (०.१०%) घसरून २६१७५.७५ पातळीवर पोहोचला, जो मंद आणि अस्थिर ट्रेडिंग सत्र दर्शवितो. क्षेत्रीय आघाडीवर, निफ्टी ऑटो, मेटल, आयटी आणि पीएसयू बँक निर्देशांकांनी लक्षणीय ताकद दाखवली. याउलट, निफ्टी रिअल्टी, हेल्थकेअर आणि फार्मा हे प्रमुख पिछाडीवर राहिले, तर इतर क्षेत्रांमध्ये मिश्रित पूर्वाग्रह होता, जो व्यापक-आधारित गतीचा अभाव दर्शवितो. व्यापक बाजाराने देखील सावध भावना दर्शविली. निफ्टी मिडकॅप १०० फ्लॅटवर बंद झाला, ज्यामध्ये दिशात्मक हालचाल कमी दिसून आली, तर निफ्टी स्मॉलकॅप १०० ने किरकोळ ०.२५% वाढ केली, ज्याला निवडक खरेदीच्या व्याजाने पाठिंबा दिला.'आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,निर्देशांकाने मंदीची एक कॅडल तयार केली आहे, ज्यामध्ये सर्वकालीन उच्चांकाच्या जवळ उच्च पातळीवर समान खुले आणि उच्च नफा बुकिंग दर्शवित आहे. गेल्या तीन सत्रांमध्ये निफ्टी सर्वकालीन उच्चांकाच्या आसपास एकत्रित होताना दिसत आहे. पुढे जाऊन, आम्हाला अपेक्षा आहे की निर्देशांक एकूण सकारात्मक पूर्वाग्रह राखेल आणि येत्या आठवड्यात २६५०० आणि नंतर २६८०० पातळींकडे जाईल, कारण अलिकडच्या विस्तृत श्रेणीतील ब्रेकआउट (२६१००-२५४००) चे मोजमाप परिणाम आहे. २६१०० पातळीच्या खाली फॉलो-थ्रू कमकुवतपणा येत्या सत्रांमध्ये २६३००-२५८०० पातळीच्या श्रेणीत काही एकत्रीकरण दर्शवेल. गेल्या दोन महिन्यांतील अपट्रेंड वाढत्या चॅनेलमध्ये चांगला राहिला आहे, जो उच्च पातळीवर सतत मागणी दर्शवितो. २६०००-२५८०० पातळीच्या शेवटच्या आठवड्याच्या ब्रेकआउट क्षेत्रात तात्काळ आधार दिला जातो, तोच वर टिकून राहिल्याने पूर्वाग्रह सकारात्मक राहील.'आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'बँक निफ्टीने मंदीचा एक मेणबत्ती तयार केला आहे, ज्यामध्ये सर्वकालीन उच्चांकाच्या जवळ उच्च पातळीवर समान ओपन आणि हाय हायलाइटिंग प्रॉफिट बुकिंग दिसून येत आहे. पुढे जाऊन, सोमवारच्या उच्चांक (६०११४) पातळीवरील फॉलोथ्रू स्ट्रेंथ ६०४०० पातळीच्या दिशेने आणि नंतर येत्या आठवड्यात ६१००० पातळीच्या पातळीवर आणखी वर उघडेल. गेल्या २ महिन्यांतील संपूर्ण वरची हालचाल चांगल्या प्रकारे निर्देशांकित आहे जी वाढीव पातळीवर मागणी टिकवून ठेवण्याचे संकेत देते. गेल्या दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळी आणि अलिकडच्या ब्रेकआउट क्षेत्राचा संगम असल्याने ५८३००-५८६०० पातळीच्या पातळीवर प्रमुख आधार (Immdiate Support) आहे.'आजच्या बाजारातील रुपयांच्या हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,' रुपया कमकुवत झाला आणि डॉलरच्या तुलनेत ८९.७५ या नीचांकी पातळीवर पोहोचला. सोने ४२५० डॉलर्स आणि चांदी ५७ डॉलर्सच्या वर असलेल्या वस्तूंच्या किमतींमध्ये तीव्र वाढ झाली आहे. या दोन्ही किमती ऐतिहासिक उच्चांकावर आहेत. त्यामुळे भारताचे आयात बिल लक्षणीयरीत्या वाढले आहे आणि रुपयावरही त्याचा परिणाम झाला आहे.अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराच्या अनिश्चिततेमुळे भावनेला नाजूकपणा येत आहे. चर्चा सकारात्मक दिशेने सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सूचित केले असले तरी, बाजारात अर्थपूर्ण आधार मिळण्यासाठी आता अंतिम, ठोस कराराची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त, नोव्हेंबरमध्ये लक्षणीय हस्तक्षेपाचा अभाव असल्याने रुपया जास्त प्रतिकार न करता कमकुवत होऊ लागला आहे. येत्या सत्रांसाठी रुपयाची श्रेणी ८९.३५-८९.९० दरम्यान कमकुवत राहील.'
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या नेत्या आणि पुण्यातील माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा थेट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षातून बाहेर पडण्याबाबत मोठे संकेत दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, अजित पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर पक्षातून बाहेर पडण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत. पक्षांतर्गत वादामुळे त्या अस्वस्थ असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती, त्यामुळे त्या राष्ट्रवादीला रामराम ठोकणं निश्चित मानलं जात आहे. राजकीय वर्तुळात रुपाली पाटील यांच्या पुढील वाटचालीबद्दल चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. रुपाली पाटील यांनी त्यावेळी ही भेट राजकीय नसल्याचं सांगत 'घड्याळ' सोडण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. मात्र, आता राजीनामा दिल्यानंतर त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता बळावली आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकत रुपाली पाटील यांनी २०२१ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, आता पुन्हा त्या पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.https://prahaar.in/2025/12/01/samantha-ruth-prabhu-raj-nidimoru-wedding-photos-south-actress-bollywood-entertainment/'ख्वाडा' करणार! राष्ट्रवादीतील दोन 'रुपालीं'मध्ये उफाळला वादराष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात सध्या दोन प्रमुख नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असून, हा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. या दोन नेत्या म्हणजे रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकणकर. या वादाची ठिणगी बीडमधील एका डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातून पडली. या प्रकरणात पीडितेला न्याय न देता, उलट तिच्या चारित्र्यावर आघात करण्यात आल्याचा दावा रुपाली पाटील यांनी केला होता. या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवणार आणि 'माझा आवाज दाबला जाईल?' असा थेट सवाल रुपाली पाटील यांनी पक्षश्रेष्ठींना आणि रुपाली चाकणकर यांना विचारला होता. या संपूर्ण प्रकरणात रुपाली पाटील ठोंबरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की, आमचा इतिहास अन्याय सहन करणाऱ्यांचा नाही, तर गरज पडल्यास 'ख्वाडा' (प्रतिरोध/दडपशाही) करणाऱ्यांचा आहे. रुपाली पाटील यांनी चाकणकर यांना उद्देशून दिलेला हा इशारा दोन रुपालींमधील पक्षांतर्गत वाद किती टोकाला गेला आहे, हे दर्शवतो. या वादामुळे रुपाली पाटील ठोंबरे यांनी शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून त्या लवकरच पक्ष सोडण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.रुपाली पाटील ठोंबरेंना राष्ट्रवादीत 'डबल डच्चूआता स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही डच्चू देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर केली. या यादीत पक्षाच्या काही महत्त्वाच्या नेत्यांना स्थान देण्यात आले असले तरी, रुपाली पाटील ठोंबरे यांना पूर्णपणे वगळण्यात आले. विशेष म्हणजे, यापूर्वी प्रवक्त्यांच्या यादीत स्थान न मिळालेले आमदार अमोल मिटकरी यांना स्टार प्रचारकांच्या यादीत संधी देण्यात आली आहे. मात्र, रुपाली पाटील यांना दोन्ही महत्त्वाच्या याद्यांमध्ये स्थान न मिळाल्याने त्यांची पक्षातून गच्छंती (बाहेर पडणे) निश्चित मानली जात होती. या 'डबल डच्चू'मुळे रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाच्या शहर कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, त्या लवकरच पक्ष सोडण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
मुंबईत प्रभावी उपाययोजना, वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा
मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी बांधकामे व शासकीय प्रकल्पांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणारमुंबई : मुंबईतील वाऱ्याच्या वेगातही आता सुधारणा झाली आहे. या सर्वसमावेशक कारणांमुळे मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांकात (एक्यूआय) २६ नोव्हेंबर २०२५ पासून सातत्याने सुधारणा होत असून मागील ४८ तासांत लक्षणीय सुधारणा आढळली आहे. महानगरपालिकेने जारी केलेल्या २८ मुद्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन होईल, यावर भर दिला जात आहे. यासाठी विविध बांधकामांना ‘कामे थांबवा’ नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी, शासकीय, अशासकीय प्रकल्पांवर यापुढेही कारवाई सुरूच ठेवावी, असे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच, ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन स्टेज-४ (ग्रॅप-४) मुंबईसाठी सध्या लागू नाही. मात्र, संनियंत्रणासंदर्भात (मॉनिटरिंग) निर्देश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत.महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले की, मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेकडून प्रभावीपणे उपायोजना केल्या जात आहेत. यामध्ये बेकरी तसेच स्मशानभूमीचे स्वच्छ इंधनावर परिवर्तन, धूळ आटोक्यात आणण्यासाठी मिस्टींग मशीनच्या सहाय्याने फवारणी, पाण्याने रस्ते धुऊन काढणे आणि विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन, नागरिकांमध्ये जनजागृती यासह विविध उपाययोजनांचा समावेश आहे. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने २८ मुद्यांचा समावेश असलेली सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे काटकोरपणे पालन व्हावे, यासाठी महानगरपालिकेकडून सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर एकूण ९४ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांनी खासगी प्रकल्पांसह रस्ते, मेट्रो आदी शासकीय प्रकल्पांची पाहणी करत मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. बांधकाम स्थळी संवेदक (सेन्सॉर) आधारित वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) मोजणारे संयंत्र कार्यान्वित राहतील, याची पाहणीसुद्धा या पथकाकडून सुरू आहे. मुंबई बंदर प्राधिकरण परिसरात पेटवल्या जाणाऱ्या शेकोट्या बंद करण्याच्या सूचनेला संबंधित यंत्रणेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, असेही गगराणी यांनी नमूद केले.महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या विविध उपाययोजनांमुळे २६ नोव्हेंबर २०२५ पासून मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांकात (एक्यूआय) सातत्याने सुधारणा दिसून येत आहे. तसेच, २८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी वाऱ्याचा वेग ताशी ३ ते ४ किलोमीटर होता तसेच वातावरणात आर्द्रता होती. मात्र, आता त्यात सुधारणा होऊन वाऱ्याचा वेग ताशी १० ते १८ किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. परिणामी, वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा होत आहे.
Share Market: शेअर बाजार ‘लाल’रंगात बंद; तरीही गुंतवणूकदारांची 13 हजार कोटींची कमाई
Share Market: भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठ्या चढ-उतारासह व्यवहार झाले. सुरुवातीच्या जोरदार तेजीनंतर बाजारात नफावसुलीचे सत्र सुरू झाले आणि यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक आपली सर्व कमाई गमावून लाल निशाणीवर बंद झाले. मात्र, या घसरणीपूर्वीच दोन्ही निर्देशांकांनी नवा सर्वकालीन उच्चांक गाठला. निफ्टीने २६,३२५ चा शिखर गाठला होता, पण ही तेजी टिकू शकली नाही. सेन्सेक्स […] The post Share Market: शेअर बाजार ‘लाल’ रंगात बंद; तरीही गुंतवणूकदारांची 13 हजार कोटींची कमाई appeared first on Dainik Prabhat .
IND vs SA : रोहित-गंभीर यांच्यात ड्रेसिंग रुममध्ये झाला वाद? फोटो व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण
Rohit Gambhir Controversy Photos Viral : रांची येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने अशी आघाडी घेतली. या सामन्यात विराट कोहलीचे दमदार शतक आणि कुलदीप यादवच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला. सामन्यानंतर गंभीर-रोहितयांच्यात वाद झाल्याची चर्चा आहे, त्यामुळे हे नक्की काय प्रकरण […] The post IND vs SA : रोहित-गंभीर यांच्यात ड्रेसिंग रुममध्ये झाला वाद? फोटो व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण appeared first on Dainik Prabhat .
जामखेड : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगरपरिषदेची निवडणूक अत्यंत अटीतटीच्या वळणावर पोहोचली आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जामखेडमध्ये दाखल होताच, त्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आक्रमक विरोधाला सामोरे जावे लागले. फडणवीस यांच्या ताफ्यासमोरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर्स घेऊन जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. […] The post जामखेडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यासमोरच ‘ठाकरे गटा’ची जोरदार निदर्शने; ‘पोस्टर वॉर’ने राजकीय वातावरण तापले! appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली: उद्योगपती अनिल अंबानी यांनी सर्वोच्च न्यायालयात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) विरोधात धाव घेतली आहे.'फ्रॉड' या स्वतः अंबानी व त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन (Rcom) कंपनीवर लावलेल्या बिरूदाविरोधात अंबानी यांनी धाव घेत एसबीआयने कुठल्या आधारे आपल्यावर घोटाळेबाज शब्दाचा उल्लेख केला याचे स्पष्टीकरण बँकेने द्यावे हे अपील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अनिल अंबानी यांनी ३ ऑक्टोबरला या घटनेशी संबंधित आपलीही बाजू मांडण्याची संधी मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र खंडपीठाने याचिका फेटाळून लावल्याने अनिल अंबानी यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अनिल अंबानी यांनी एसबीआयकडून कर्ज घेतलेले होते मात्र ते परतफेड न करता अंबानी यांनी २९२९.०५ कोटींचा घोटाळा केल्याचा शिक्का एसबीआयने मारत नियामक यंत्रणेकडे धाव घेतली होती. तत्पूर्वी एसबीआयने जून महिन्यात कर्ज खाती फसवी असल्याचे घोषित करत कर्जाच्या अटींचे उल्लंघन करून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण २०१६ साली झालेल्या प्रकरणातील संबंधित आहे.बँकेच्या वर्गीकरणानंतर, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने तक्रारीची दखल घेत ऑगस्टमध्ये गुन्हा दाखल केला होता. ज्यामध्ये २९२९ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले होते. इतर अनेक बँकांनीही अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या आरोपांसह खटला दाखल केला आहे. एसबीआयनेही त्यानंतर सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ईडी व सीबीआयने मोठ्या प्रमाणात कंपनीच्या ठिकाणी व अनिल अंबानी यांच्या घरावरही छापे टाकले होते. मिळालेल्या कर्जाचा गैरवापर वैयक्तिक कारणासाठी केल्याचा आरोप अंबानीवर आहे.अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate ED) देखील मनी लाँडरिंगच्या वेगळ्या प्रकरणात अनिल अंबानी यांची मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत चौकशी करत त्यांची मालमत्ता नोव्हेंबर महिन्यात जप्त केली होती. या प्रकारात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) अंबानी यांच्याशी संबंधित १४५२ कोटींपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. नवी मुंबई, चेन्नई, पुणे आणि भुवनेश्वर येथील मालमत्ता रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स यांच्याशी संबंधित कथित फसवणुकीशी या मालमत्ता संबंधित आहेत असे सांगितले जात आहे. शेवटच्या केलेल्या कारवाईनंतर अंबानी समूहाशी संबंधित जप्त केलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य जवळपास ९००० कोटींवर पोहोचले आहे.ऑक्टोबर महिन्यात न्यायालयाने आपल्या निरिक्षणात नोंदवले होते की एसबीआयने रिझर्व्ह बँकेच्या फसवणुकीच्या जोखीम व्यवस्थापनावरील निर्देशांचे पालन केले आणि आरकॉमचे प्रवर्तक (Promoter) आणि नियंत्रणातील व्यक्ती म्हणून अंबानींना त्याचे परिणाम भोगावे लागतील असे म्हटले होते.
मोठी बातमी: केंद्र सरकारकडून बेकायदेशीर ॲप आधारित कर्ज देणाऱ्या ८७ कंपन्यावर बंदी जाहीर
प्रतिनिधी: केंद्र सरकारने अनाधिकृत ७७ कर्ज देणाऱ्या फिनटेक कंपन्यावर मोठी कारवाई करत या अँपवर बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने कंपनी कायदा २०१३ (Companies Act 2013) अंतर्गत अंतरिम कायद्याचे व लेखाजोखा (Book of Accounts) नियंत्रणाचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यावर कारवाई केली का या प्रश्नावर लिखित उत्तर देताना कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी सोमवारी लोकसभेत ही संबंधित माहिती दिली. राज्यमंत्री मल्होत्रा यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला (MeitY) माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६९अ अंतर्गत सार्वजनिक प्रवेशासाठी माहिती ब्लॉक करण्यासाठी ब्लॉकिंग निर्देश जारी करण्याचा अधिकार आहे. आतापर्यंत, योग्य प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, MeitY ने माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६९अ अंतर्गत एकूण ८७ बेकायदेशीर कर्ज अर्ज ब्लॉक केले आहेत' अशी माहिती कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी आज सोमवारी लोकसभेत दिली आहे.मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरात त्यांनी असेही सांगितले आहे की, कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत चौकशी, हिशोबपुस्तकांची तपासणी आणि तपासणीसाठी वेळोवेळी नियामक कारवाई केली जाते, ज्यामध्ये कर्ज अँप्सद्वारे ऑनलाइन कर्ज देणाऱ्या कंपन्यांचाही समावेश आहे. वरील आधारावर कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत कोणतेही उल्लंघन आढळल्यास, योग्य कायदेशीर कारवाई केली जाते' असेही ते म्हणाले आहेत.
पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का; रुपाली ठोंबरेंचा तडकाफडकी राजीनामा, ‘या’पक्षात करणार प्रवेश
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील प्रभावशाली महिला नेत्या तथा शहर कार्याध्यक्ष रुपाली ठोंबरे पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी दिलेला हा राजीनामा अद्याप पक्षाकडून मंजूर झालेला नाही, पण त्यामुळे अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे. रुपाली […] The post पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का; रुपाली ठोंबरेंचा तडकाफडकी राजीनामा, ‘या’ पक्षात करणार प्रवेश appeared first on Dainik Prabhat .
वाहनधारकांना मोठा दिलासा..! एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यास पुन्हा मुदतवाढ
मुंबई : राज्य परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता परिवहन विभागाकडून आता अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. आता वाहनचालकांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत नंबरप्लेट बसवणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहेत. त्यामुळे आता अनेक वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत देण्यात आलेली ही पाचवी मुदतवाढ असून ही अंतिम […] The post वाहनधारकांना मोठा दिलासा..! एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यास पुन्हा मुदतवाढ appeared first on Dainik Prabhat .
मुंबई:'हेवी डिपॉझिट'च्या नावाखाली फसवणुक करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही वाढ विशेषत: मुंबईमध्ये झाल्याचे दिसते. मुदत संपल्यावर अनामत रक्कम परत न करणे, घर मालकाच्या नकळत घर दुसऱ्याला भाड्याने देणे किंवा एकाच घरासाठी अनेकांकडून डिपॉझिटच्या स्वरूपात पैसे उकळणे असे प्रकार वाढले असल्याने याविरोधात मुंबई शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल झाल्याचे समोर आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीत राहणाऱ्या एका तरुणीच्या वडिलांनी मुंबईतील वांद्रे-माहीम परिसरात घर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला. याबाबत एका तरुणाने आईच्या नावावर घर असल्याचे सांगून चार लाख रुपये हेवी डिपॉझिट म्हणून घेतले. मात्र, घराची चावी देण्यास उशीर झाला म्हणून चौकशी केल्यावर हा तरुण आणि त्याच्या आईने अनेकांना अशाच प्रकारे फसवल्याचे समोर आले आहे.https://prahaar.in/2025/12/01/good-news-for-hoteliers-on-the-first-day-of-december-lpg-cylinder-prices-reduced-know-the-details/दुसरीकडे, वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात एका शिलाईकाम करणाऱ्याने चार लाखांचे हेवी डिपॉझिट देऊन खोली भाड्याने घेतली. मुदत संपल्यावर पैसे परत मागितले असता, घर मालकिणीने टाळाटाळ करत धमक्या देण्यास सुरुवात केली. तर वरळीतही असा प्रकार समोर आला. एका मालकाने बाराव्या मजल्यावरील खोली अकरा महिन्यांच्या आगाऊ भाड्यावर दिली होती. मुदत संपण्यापूर्वी मालक चौकशीला पोहोचला असता, भाडेकरूने मालकाच्या नकळत तीच खोली दुसऱ्याला पंधरा लाख रुपये हेवी डिपॉझिटवर भाड्याने दिल्याचे उघड झाले आहे.'हेवी डिपॉझिट' म्हणजे काय?घर भाड्याने घेताना घरमालकाला मोठी अनामत रक्कम देणे आणि त्या बदल्यात मासिक भाडे कमी किंवा अजिबात न भरणे. करार संपल्यावर किंवा घर सोडताना ही अनामत रक्कम भाडेकरूला परत मिळते. यामुळे घरमालकाला एकाच वेळी मोठी रक्कम मिळते, ज्यावर तो व्याज मिळवू शकतो. तर भाडेकरूला दरमहा भाडे देण्याची गरज नसते व शेवटी त्याला संपूर्ण रक्कम परत मिळते. दरम्यान, हे गैरप्रकार रोखण्यासाठी घरमालकांसह भाड्याने घर घेण्याच्या विचारात असणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
एकदिवसीय मालिकेत भारताची विजयी सुरुवात! केएलने केले रोहीत आणि विराटच्या जोडीचे कौतुक
मुंबई: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला वनडे सामना जिंकला. पण हा सामना संपल्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या फलंदाजीबाबत एक मोठं वक्तव्य राहुलने केले आहे. ज्याबद्दल चर्चांना जोर आला आहे. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही भारताचे नेतृत्व केले असताना गौतम गंभीरने त्यांना कसोटी क्रिकेटपासून लांब ठेवले आहे. त्यामुळे आता फक्त वनडे क्रिकेट खेळणे हे त्यांच्या हातात आहे. तरीसुद्धा विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सातत्याने दमदार कामगिरी करत आहेत. गेल्या सामन्यात रोहित आणि विराट यांनीच भारताला सहजपणे विजय मिळवून दिला होता. आजच्या वनडे सामन्यात जर विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळले नसते तर भारताचे काय झाले असते, याचा विचारही न केलेला बरा असे म्हटले जात आहे. त्यामुळे हा सामना संपल्यावर भारताचा हंगामी कर्णधार केएल राहुलने या दोघांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.केएल राहुल सामना संपल्यावर म्हणाला की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना एकत्र क्रिकेट खेळताना पाहणे ही एक मेजवानी असते. मी यापूर्वी काही वेळा त्यांना एकत्र खेळताना पाहिले आहे. पण आजही त्यांना जेव्हा एकत्र फलंदाजी करताना पाहतो, तेव्हा नजर त्यांच्यावरून हटत नाहीत. दोघांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे कधी नेमकं काय करायचं, हे त्यांना चांगलंच माहिती आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा जेव्हा खेळत असतात तेव्हा समोरचे प्रतिस्पर्धी किती मुर्ख वाटतात. कारण रोहित आणि कोहली दाखवून देतात की, ते नेमके कोण आहेत, त्यांनी केवढं मोठं स्थान मिळवलं आहे. ड्रेसिंग रुममध्येही जेव्हा ते एकत्र असतात तेव्हा त्यांचं वागण आनंद देणारं असतं.https://prahaar.in/2025/12/01/shocking-a-case-of-extortion-in-the-name-of-heavy-deposit-has-been-revealed-in-mumbai-citizens-are-urged-to-be-vigilant-while-renting-a-house/केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या वनडे सामन्यात विजय मिळवला. यामुळे मालिकेत त्यांनी १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात विराट आणि रोहीतसह हर्षित राणानेही चांगली गोलंदाजी केली. सुरुवातीला त्याने चांगल्या विकेट्स मिळवल्या. कुलदीप यादवनेही नेहमीप्रमाणे च त्याचे काम चोख बजावले आहे. त्यामुळे त्याची गोलंदाजीही मोलाची ठरली.
‘बॉर्डर २’मधील दिलजीत दोसांझचा पहिला लुक समोर
Diljit Dosanjh First Look | ‘बॉर्डर’ या देशभक्तीपर सिनेमाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. त्यानंतर आता ‘बॉर्डर 2’ सिनेमाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. बॉर्डर’च्या पहिल्या भागात सुनील शेट्टीही सनी देओलसोबत दिसला होता. मात्र, यावेळी त्याचा मुलगा अहान दिसणार आहे. यात सनी देओल, अहान शेट्टीसह वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ हे कलाकार देखील पाहायला मिळणार […] The post ‘बॉर्डर २’ मधील दिलजीत दोसांझचा पहिला लुक समोर appeared first on Dainik Prabhat .
Lifestyle: शरीरात ‘हॅपी हार्मोन्स’ कसे वाढवायचे? जाणून घ्या डॉक्टरांचे मार्गदर्शन
Lifestyle: हार्मोन्स हे आपल्या शरीरातील रासायनिक दूत असतात. ते रक्ताद्वारे वेगवेगळ्या अवयवांपर्यंत संदेश पोहोचवतात आणि शरीरातील अनेक प्रक्रिया नियंत्रित करतात. मूड, झोप, भूक, पचन, ताण, उर्जा आणि भावनिक आरोग्यावर त्यांचा थेट परिणाम होतो. मानसिक आरोग्यासाठी “खुश ठेवणारे” चार मुख्य हार्मोन्स महत्त्वाचे मानले जातात. डोपामाइन, सेरोटोनिन, एंडॉर्फिन आणि ऑक्सिटोसिन. डोपामाइन – मोटिव्हेशन आणि समाधानाची भावना वाढवतो. […] The post Lifestyle: शरीरात ‘हॅपी हार्मोन्स’ कसे वाढवायचे? जाणून घ्या डॉक्टरांचे मार्गदर्शन appeared first on Dainik Prabhat .
वक्फ मालमत्तांच्या नोंदणीच्या अंतिम मुदत वाढीस न्यायालयाचा नकार ; दिला ‘हा’महत्वाचा आदेश
Supreme Court on Waqf। सर्वोच्च न्यायालयाने UMEED पोर्टलवर वक्फ मालमत्तांची नोंदणी आणि डेटा अपलोड करण्याची अंतिम मुदत वाढवण्यास नकार दिला आहे. ही अंतिम मुदत ६ डिसेंबर रोजी संपत आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाने “ते या प्रकरणात कोणताही आदेश जारी करणार नाही. ज्यांना त्यांच्या वक्फ मालमत्तांची नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत […] The post वक्फ मालमत्तांच्या नोंदणीच्या अंतिम मुदत वाढीस न्यायालयाचा नकार ; दिला ‘हा’ महत्वाचा आदेश appeared first on Dainik Prabhat .
शरद पवारांचा पक्ष निवडणुकीत सक्रिय नसल्याचे चित्र; बालेकिल्ल्यातूनच ‘तुतारी’गायब?
Sharad Pawar | पुणे जिल्ह्यातील राजकारणावर राष्ट्रवादीचा आणि विशेष म्हणजे शरद पवारांचा दीर्घकाळ प्रभाव राहिला आहे. अनेक नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये आणि ग्रामीण भागात शरद पवार यांच्या पक्षाचा प्रभाव जाणवत असे. मात्र यंदाच्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकी शरद पवारांच्या पक्ष मागे राहिल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये दोन गट झाल्यानंतर एकीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने […] The post शरद पवारांचा पक्ष निवडणुकीत सक्रिय नसल्याचे चित्र; बालेकिल्ल्यातूनच ‘तुतारी’ गायब? appeared first on Dainik Prabhat .
मुलगा व्हावा म्हणून छळ; पैशांच्या मागणीला कंटाळून २५ वर्षीय गर्भवतीची आत्महत्या
नांदेड : मुलाच्या हव्यासापोटी आणि पैशांच्या सततच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या २५ वर्षीय गर्भवती विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये समोर आली आहे. प्रतीक्षा भोसले असे मृत विवाहितेचे नाव असून, तिला पहिली मुलगी आहे. मात्र मुलगा हवा म्हणून तिच्यावर सासरकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.या प्रकरणात पतीसह चार जणांविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार राजेश्वर वानखेडे यांनी सांगितले की, मुलगी प्रतीक्षाचा विवाह २०२३ मध्ये लक्ष्मण भोसले याच्याशी झाला होता. लग्नावेळी साडेचार लाख रुपये हुंडा दिला होता. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही सुरळीत चालले, पण नंतर पती लक्ष्मण भोसले दारूच्या नशेत प्रतिक्षाला मारहाण करू लागला.नणंद माधुरी किशोर देशमुख, दीपाली रामराव देशमुख आणि भाग्यश्री सूरज देशमुख ह्या फोनवरून शिवीगाळ करून प्रतिक्षाल सतावत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.प्रतिक्षाला पहिली मुलगी झाल्यानंतर छळ आणखी वाढला. मुलगा हवा म्हणून तिच्यावर ओरड, शिवीगाळ आणि पैशांची मागणी केली जात होती. स्कूल व्हॅन घेण्यासाठी पाच लाख रुपये आणण्याचा दबाव टाकण्यात आला. प्रतीक्षेच्या कुटुंबाने ५० हजार रुपये दिले, परंतु तरीही त्रास थांबला नाही. दरम्यान, प्रतीक्षा दुसऱ्यांदा गर्भवती राहिली असताना झालेल्या मारहाणीमुळे तिचा गर्भपात झाल्याचा कुटुंबाचा आरोप आहे. तरीही सासरकडच्या वागणुकीत कोणताही बदल झाला नाही.सततच्या छळाला कंटाळून प्रतीक्षाने २५ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर लहान मुलीच्या डोक्यावर आईचे छत्र हरपले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीसांनी पती लक्ष्मण शंकरराव भोसले आणि नणंदा माधुरी, दीपाली व भाग्यश्री देशमुख यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.
कणकवलीत उद्या नगरपंचायतीसाठी मतदान
ईव्हीएमसह अधिकारी - कर्मचारी केंद्रांकडे रवानाकणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या (२ डिसेंबर) मतदान होणार असून त्यासाठीची सर्व पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनसह आवश्यक साहित्य आणि अधिकारी-कर्मचारी आज ( सोमवारी ) संबंधित केंद्रांकडे रवाना झाले.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी मतदान पथकांना मार्गदर्शन केले. यावेळी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील उपस्थित होत्या.कणकवलीत एकूण १७ मतदान केंद्रांवर उद्या मतदान होणार असून अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस यांच्यासह सुमारे १६२ जणांची तैनाती करण्यात आली आहे. नगरपंचायतीचे १७ प्रभाग असून प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे.प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक पोलीस कर्मचारी तैनात असणार आहे. याशिवाय २० कर्मचारी राखीव दल म्हणून ठेवण्यात आले आहेत. तसेच तीन क्षेत्रीय अधिकारी आणि एक राखीव अधिकारीही नियुक्त करण्यात आले आहेत.ईव्हीएम मशीन आणि आवश्यक निवडणूक साहित्य आज (१ डिसेंबर) सकाळी १० वाजल्यापासून संबंधित मतदान केंद्रांकडे पाठविण्यात आले. उद्याच्या मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण असून शांततेत व सुरळीत मतदान पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
वॉकहार्ट शेअर दे दणादण! कंपनीचा शेअर १९% उसळला असून २०% इंट्राडे उच्चांकावर ! 'या'मोठ्या घडामोडीमुळे
मोहित सोमण: ड्रग्स बनवणारी कंपनी वॉकहार्ट कंपनीला जगातील मानक व प्रभावशाली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस एफडीएफ (अन्न आणि औषध प्रशासन FDA) या नियामक मंडळांकडून नवीन ड्रग्स बनवण्यासाठी परवानगी दिल्याने कंपनीचा शेअर १९% उसळला आहे. नियामकांनी कंपनीचा एनडीए म्हणजेच (New Drug Application) स्विकारल्याने शेअर्समध्ये जबरदस्त उसळी घेतली गेली आहे. झायनिच या प्रतिजैविके (Antibiotics) औषध उत्पादनावर कंपनी काम करत होती. याला अखेर मोहोर लागल्याने कंपनीच्या उत्पादनावर शिक्कामोर्तब झाल्याने कंपनीला जबरदस्त प्रतिसाद गुंतवणूकदारांनी दिला आहे. दुपारी १.५४ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर १८.१८% म्हणजेच १९% उसळल्याने १४५९.५० प्रति शेअर पातळीवर उसळला आहे.कंपनीने या नव्या उत्पादनाविषयक युएस अन्न नियामक मंडळाला ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज केला होता. यावेळी कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एनडीए ३० सप्टेंबर २०२५ रोजी दाखल करण्यात आला होता आणि त्याची स्वीकृती ही केवळ वोक्हार्टसाठीच नाही तर संपूर्ण भारतीय औषध उद्योगासाठी एक परिवर्तनकारी क्षण आहे, असे मुंबईस्थित कंपनीने एका निवेदनात म्हटले.'इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या भारतीय औषध कंपनीकडून नवीन रासायनिक अस्तित्वासाठी (एनसीई) एनडीए दाखल करण्यात आला आहे आणि यूएस एफडीएने तो स्वीकारला आहे' असेही त्यात म्हटले आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये रॅली झाल्याने ओपनिंग बेलला असलेल्या पातळीपेक्षा शेअर जवळपास २०% उसळला आहे. उपलब्ध माहितीनुसार, या बातमीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढलेल्या व्यवहारांमुळे परावर्तित झालेल्या मालकीत २०% वाढ झाली आहे. ही संख्या ७.७६ दशलक्ष रूपयांची सांगितली जात आहे.गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये १४% रॅली झाली असून संपूर्ण महिनाभरात ३.०८% वाढ व वर्षभरात २.०६% वाढ शेअर्समध्ये झाली आहे. यापूर्वी कंपनीने फेब्रुवारी महिन्यात ५२ आठवड्यातील सर्वाधिक उच्चांकी पातळी (All time High) ११०५.०५ रूपये प्रति शेअरवर नोंदवली होती.गेल्या तीन वर्षांत शेअर्समध्ये दीर्घकालीन वाढ ५०० % पेक्षा जास्त झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने ऑपरेटिंग नफ्यात लक्षणीय वाढ नोंदवली आहे. जुलै २०२५ मध्ये कंपनीने नवीन अँटीबायोटिक शोध आणि त्याच्या जैविक पोर्टफोलिओवर लक्ष केंद्रित करण्यासाठी यूएस जेनेरिक फार्मा सेगमेंटमधून बाहेर पडण्याची घोषणा केली.
विपुल अमृतलाल शाह यांनी लाँच केलं नवं म्युझिक लेबल, सिद्धिविनायक मंदिरात ‘शुभारंभ’ गाण्याचं उद्घाटन!
विपुल अमृतलाल शाह यांचं नवं म्युझिक लेबल लाँच झालं असून पहिलं गाणं ‘शुभारंभ’ सिद्धिविनायक मंदिरात रिलीज करण्यात आलं.मुंबई : विपुल अमृतलाल शाह आता त्यांचं क्रिएटिव्ह कार्य अधिक विस्तारत आहेत. त्यांच्या बॅनर सनशाइन पिक्चर्स सोबत त्यांनी नवं म्युझिक लेबल ‘सनशाइन म्युझिक’ लॉन्च केलं आहे. प्रभावी सिनेमे आणि लक्षात राहतील असे साउंडट्रॅक्स तयार करण्यासाठी ओळखले जाणारे शाह आता एका नवीन क्षेत्रात प्रवेश करत आहेत. या लेबलचा उद्देश नवीन संगीत प्रतिभा शोधणे, त्यांना संधी देणे आणि त्यांना पुढे नेणे हा आहे.लेबलची पहिली प्रस्तुती ‘शुभारंभ’ आज मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात एका विशेष समारंभात लॉन्च करण्यात आली, जिथे विपुल अमृतलाल शाह आणि शेफाली शाह उपस्थित होते. ही सुरुवात खरोखर शुभ आणि हृदयाला भिडणारी वाटली. शुभारंभ या गाण्याद्वारे सनशाइन म्युझिक पुढे कोणत्या प्रकारचं विविध आणि दर्जेदार कंटेंट देणार आहे, याची झलक मिळते.या प्रकल्पाचे सह–निर्माता आशिन ए. शाह आहेत, तर म्युझिक हेड सुरेश थॉमस यांनी या पहिल्या मोठ्या रिलीजची क्रिएटिव्ह डायरेक्शन आणि संपूर्ण लॉन्च प्रक्रिया सांभाळली आहे. शाह यांच्या चित्रपटांना नेहमीच त्यांच्या सोलफुल आणि मधुर संगीतासाठी ओळखलं जातं. नमस्ते लंडन, लंडन ड्रीम्स, अॅक्शन रिप्ले आणि सिंग इज किंग सारख्या संगीतप्रमुख चित्रपटांना आजही त्यांच्या संगीतामुळे मोठी लोकप्रियता आहे.विपुल अमृतलाल शाह नेहमीच परिणामकारक आणि विविध प्रकारच्या कथा सांगणारे सिनेमे बनवत आले आहेत. म्हणूनच ते आज भारतीय मनोरंजन उद्योगातील सर्वात आदरणीय आणि यशस्वी निर्मात्यांपैकी एक मानले जातात.
भूराजकीय स्थितीचा रूपयावर जबरदस्त फटका रूपया ८९.७६ या ऐतिहासिक पातळीवर घसरला
मोहित सोमण: प्रादेशिक पेक्षाही जागतिक भूराजकीय परिस्थितीत बदलत्या अस्थिर समीकरणामुळे आज रुपयात ऐतिहासिक घसरण झाली आहे. यापूर्वी असलेल्या निचांकी स्तरावरील ८९.४९ प्रति डॉलरचा विक्रम खोडून आता रूपया ८९.७६ रूपये प्रति डॉलरवर पोहोचला आहे. प्रामुख्याने भारताच्या मजबूत शेअर बाजारासह भारतीय सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) मोठी वाढ झाली असली तरी भूराजकीय परिस्थिती घसरलेल्या डॉलरचा दबाव पाहता रूपयातही विरुद्ध दिशेने घसरण झाली आहे. विशेषतः युएस व भारत यांच्यातील करार निश्चित न झाल्याने अद्याप भारतीय रूपयाला आणखी मागणी घटल्याने रुपयाचे अवमूल्यन आणखी जागतिक पातळीवरील वाढले. परिणामी आज मोठी घसरण बाजारात रूपयाची झाली आहे.याशिवाय ऑक्टोबर महिन्यात व्यापारी तूट (Trade Deficit) नव्या मोठ्या उच्चांकावर पोहोचली होती. अमेरिकेने लादलेल्या अतिरिक्त टॅरिफचा फटका व्यापारांना बसल्याने काहीसा प्रभाव या तूटीवर पडला आहे. मार्केट ऑपरेशन माध्यमांमधून आरबीआय चलनाला आधार देण्यासाठी हस्तक्षेप करत आहे परंतु दीर्घकालीन स्थिरता हे सुधारित परकीय प्रवाहावर किंवा व्यापार वाटाघाटींमध्ये प्रगतीवर अवलंबून असेल. आयात खर्च, चलनवाढ आणि बाजारातील भावनांवर परिणाम करू शकतो हे भविष्यात स्पष्ट होईल.उपलब्ध माहितीनुसार, ऑक्टोबर २०२५ मध्ये भारताने ४१.७ अब्ज डॉलर्सची आतापर्यंतची सर्वाधिक व्यापार तूट अनुभवली आहे ही वाढती तूट मुख्यत्वे सोन्याच्या आयातीत झालेल्या वाढीमुळे झाली, जी जवळजवळ तिप्पट होऊन १४.७ अब्ज डॉलर्स झाली आणि मे महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीत २८% घट होऊन ती ६.३ अब्ज डॉलर्स झाली.भारतीय रुपयातील विक्रीच्या या भारतीय शेअर बाजारावरही परिणाम झाला कारण बेंचमार्क निर्देशांक विक्रमी उच्च पातळीवरून नकारात्मक क्षेत्रीय पातळीवर जाण्यास सुरुवात केली आहे. मजबूत भारतीय आर्थिक वाढीमुळे रुपयाला फारसा दिलासा मिळाला नाही, जो अमेरिका-भारत व्यापार करारात प्रगती नसल्यामुळे दबावाखाली असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. यावर्षी रुपयातील कमकुवतपणामुळे तो केवळ आशियातील सर्वात कमकुवत कामगिरी करणाऱ्या देशांमध्येच नाही तर मानसिकदृष्ट्या महत्त्वाच्या ९० प्रति डॉलरच्या जवळही गेला आहे. विश्लेषकांचा असा विश्वास आहे की सध्याच्या मॅक्रो सेटअपसह या पातळीपेक्षा खाली घसरण अपरिहार्य असेल.
नव्या सभापतींना खरगेंचा सल्ला ; म्हणाले,”तिकडे पाहू नका , तिकडे धोका…”
Mallikarjun Kharge।संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. ते सोमवार (१ डिसेंबर) पासून सुरू झाले आणि १९ डिसेंबरपर्यंत चालेल. अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेचे अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांचे खास पद्धतीने स्वागत केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही त्यांना संबोधित केले. अधिवेशनादरम्यान खरगे यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. त्यांनी अध्यक्ष राधाकृष्णन […] The post नव्या सभापतींना खरगेंचा सल्ला ; म्हणाले,”तिकडे पाहू नका , तिकडे धोका…” appeared first on Dainik Prabhat .
Amla Chutney Recipe: हिवाळ्यात बनवा परफेक्ट चव आणि आरोग्याचा संगम असलेली आवळ्याची चटणी
Amla Chutney Recipe: हिवाळा सुरू झाला की बाजारात ताजे, रसाळ आवळे दिसू लागतात. व्हिटॅमिन C ने समृद्ध हा आवळा चव आणि आरोग्य दोन्हीसाठी फायदेशीर आहे. आवळ्याची चटणी हा असा एक पर्याय आहे, जो अगदी साध्या जेवणाचीही चव वाढवतो. घरी अगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने ही चटणी बनवता येते. आवळ्याची चटणी – आरोग्यदायी आणि चविष्ट […] The post Amla Chutney Recipe: हिवाळ्यात बनवा परफेक्ट चव आणि आरोग्याचा संगम असलेली आवळ्याची चटणी appeared first on Dainik Prabhat .
नांदा सौख्य भरे…!!! कोकण हार्टेड गर्लकडून सुरज-संजनाला खास शुभेच्छा
Ankita Walawalkar | बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या लग्नसोहळ्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली. त्याच्या लग्नासाठी मोठी गर्दी झाली होती. त्याच्या लग्नात जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवारसह बिग बॉस मराठीमधील काही कलाकार देखील उपस्थित राहिले होते. मात्र कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता प्रभु वालावलकर या लग्नाला आली नव्हती. […] The post नांदा सौख्य भरे…!!! कोकण हार्टेड गर्लकडून सुरज-संजनाला खास शुभेच्छा appeared first on Dainik Prabhat .

23 C