SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

29    C
... ...View News by News Source

'कैरी'सिनेमातून सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची निखळ मैत्री १२ डिसेंबरला येणार स्क्रीनवर

सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची ‘कैरी’मधील मनाला भिडणारी दोस्ती, दोघांचा इमोशनल बॉण्ड ठरणार लक्षवेधीमैत्री करणं आणि ती निभावणं हे फार कमी लोकांच्या आयुष्यात असतं. पण असे बरेच मित्र असतात जे त्यांच्या मैत्रीला जगतात आणि मदतीला हात पुढे करतात. बरेचदा हीच मैत्री आपल्या मित्र-मैत्रिणीच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरते. अशीच मैत्री आता सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीव यांच्या आगामी 'कैरी' चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ नेहमीच त्याच्या कलाकार मित्रांबरोबर धमाल करताना दिसतो. आता सिद्धार्थचा हाच मैत्री जपणारा स्वभाव 'कैरी' चित्रपटातून मोठ्या स्क्रीनवरही पाहायला मिळणार आहे.सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीव यांच्यातील स्पेशल बॉण्डिंगची झलक 'कैरी' सिनेमाच्या ट्रेलर, गाण्यातून पाहायला मिळालीच आहे. आपल्या विनोदी स्वभावाने नेहमीच साऱ्यांना खळखळवून हसवणारा सिद्धार्थ या चित्रपटात सायलीला आनंद देताना दिसतोय. इतकंच नाहीतर दोघांचा इमोशनल बॉण्डही पाहायला मिळाला. मित्र म्हणून तो सायलीच्या पाठीशी तिच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभा असलेला दिसला. या ट्रेलरनंतर सिद्धार्थ खऱ्या आयुष्यात जसा आहे तसाच सिनेमात वावरताना दिसत असल्याची चर्चा रंगली आहे.https://prahaar.in/2025/12/06/on-the-occasion-of-the-diamond-jubilee-year-of-the-constitution-the-cultural-affairs-department-pays-tribute/चित्रपटात आता सायली-सिद्धार्थची मैत्री कशी रंगत आणणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. कैरी सिनेमात सायली-शशांकची लव्हेबल केमिस्ट्री जितकी भावतेय त्याहून दुप्पट सायली-सिद्धार्थची मैत्री पसंतीस पडत आहे. सिद्धार्थसह काम करण्याबाबत बोलताना सायली म्हणाली, मला एकूणच या चित्रपटात काम करताना धमाल आली. पण सिद्धार्थने ही धमाल अधिक रंगतदार केली. सिद्धार्थ खूप जॉली आहे हे सर्वांनाच माहित आहे, आणि सिनेमातही तो अगदी शेवटपर्यंत तसाच होता. आम्ही दोघांनी खरंच खूप एन्जॉय केलं.

फीड फीडबर्नर 6 Dec 2025 12:30 pm

मुलुंड कचराभूमीतील कचरा विल्हेवाट प्रकल्पाला फेब्रुवारी २०२६ची मुदत

कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे ६८ टक्के काम पूर्णमुंबई : मुलुंड कचराभूमीतील कचऱ्याच्या डोंगरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून जमीन पुनर्प्राप्त करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. जून २०२५ ची मुदत हुकली असून आता कंत्राटदाराला फेब्रुवारी २०२६ ची मुदत देण्यात आली आहे. कचराभूमीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे ६८ टक्के काम झाले आहे. पालिकेच्या क्षेपणभूमीची क्षमता संपत आल्यामुळे या क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पालिकेने मुलुंड कचराभूमी बंद करण्याचे ठरवले आहे. मात्र प्रकल्पाचे काम धीम्यागतीने सुरू आहे. या कचराभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून साठलेल्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून जमीन पुनर्प्राप्त करण्यासाठी पालिकेने जून २०१८ मध्ये कंत्राटदार नेमून कार्यादेशही दिला होता.कार्यादेश दिल्यानंतरही बराच काळ या कचराभूमीवर कचरा स्वीकारला जात होता. विविध परवानग्यांमुळे प्रत्यक्ष प्रकल्प सुरू होण्यास विलंब झाला होता. त्यातच करोना व टाळेबंदीमुळे मनुष्यबळ नसल्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला उशीर झाला होता. त्यामुळे तीन वर्षांत या कामाने वेग घेतला नव्हता. टाळेबंदीनंतर प्रकल्पाच्या कामाला वेग आला. मात्र टाळेबंदी व तौक्ते वादळामुळे प्रकल्पाचे काम रखडले. त्यामुळे सहा वर्षांच्या या प्रकल्पाला एक वर्षांची मुदत वाढवून देण्यात आली होती. जून २०२५ मध्ये या कामाची वाढीव मुदत संपली असली तरी अद्याप प्रकल्पाचे केवळ ६८ टक्के काम झाले असून ३२ टक्के काम बाकी आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आता फेब्रुवारी २०२६ ची मुदत देण्यात आली आहे.या कचराभूमीवर एकूण ७० लाख टन कचरा आहे. त्यापैकी आतापर्यंत ४८ लाख मेट्रीक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तर अद्याप २१ लाख मेट्रीक टन कचरा शिल्लक आहे. सध्या दर दिवशी साडेआठ ते नऊ हजार मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे.२४ हेक्टर जागा खुली होणारप्रक्रिया केलेला कचरा टाकून झाल्यानंतर शहराला २४ हेक्टर खुली जागा प्राप्त होईल. या जागेचा वापर कशासाठी करावा याबाबत विविध राजकीय पक्षांनी विविध मागण्या केल्या आहेत. या जागेवर गोल्फ कोर्स बनविण्याची मागणी आमदार मिहीर कोटेचा यांनी केली होती.डिसेंबर २०१८ पासून कचरा टाकणे बंदमुंबई महानगरपालिकेने डिसेंबर २०१८ मध्ये मुलुंड कचराभूमी बंद करण्यासाठीdisposalकंत्राटदार म्हणून नियुक्त केले आहे. या प्रकल्पाचा खर्च सहा वर्षांच्या कालावधीसाठी ७३१ कोटी रुपये आहे. डिसेंबर २०१८ पासून या ठिकाणी कचरा टाकणे बंद केले आहे. मुलुंड कचराभूमी १९६७ पासून २०१८ पर्यंत सुरू होती.

फीड फीडबर्नर 6 Dec 2025 12:30 pm

मुंबईत पहिल्यांदाच ३ किलोमीटरचा भुयारी पादचारी बोगदा!

मेट्रो लाईन ३ च्या विज्ञान केंद्र व बीकेसी स्थानकांना जोडणारमुंबई : मुंबईतील भविष्यातील प्रवाशांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर करण्यासाठी, एमएमआरसीने एक मोठी योजना प्रस्तावित केली आहे. ३ किलोमीटर लांबीचा भूमिगत पादचारी मार्ग बांधण्याची त्यांची योजना आहे. हे भूमिगत नेटवर्क मेट्रो लाईन ३ च्या विज्ञान केंद्र आणि बीकेसी स्थानकांना जोडेल. एमएमआरसीने सायन्स सेंटर स्टेशनपासून नेहरू तारांगणापर्यंत ५०० मीटर लांबीचा पादचारी बोगदा प्रस्तावित केला आहे. या लहान बोगद्यामुळे शहरात येणाऱ्या पर्यटकांना सांस्कृतिक संकुलात प्रवेश मिळेल. व्हर्टी परिसरातील प्रमुख सार्वजनिक जागांमधील हालचाल सुलभ होईल.महापालिका आणि एमएमआरसी करणार खर्च :या बोगद्यांच्या बांधकामासाठी अंदाजे २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिका आणि एमएमआरसी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा प्रस्ताव अंतिम करण्यात आला. दोन्ही एजन्सींना खर्च समान वाटून घेण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प मुंबईतील वाहतुकीच्या विविध पद्धती एकत्रित करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. एमएमआरसीचे नियोजन संचालक आर. रामण्णा यांच्या मते, हे बोगदे वाहतूक ग्रिड तयार करतील. सर्व हवामानात वापरण्यासाठी बांधलेले, हे बोगदे सुरक्षितता सुधारणे, पादचाऱ्यांना आणि रस्त्यांवरील टक्कर कमी करणे आणि मुंबईतील दोन सर्वात व्यस्त व्यावसायिक आणि मनोरंजन केंद्रांमध्ये चालण्याचा अनुभव सुलभ करणे हे उद्दिष्ट आहे. वरळी-प्रोमेनेड बोगदा वाहतुकीचा प्रवाह सुलभ करेल.

फीड फीडबर्नर 6 Dec 2025 12:30 pm

इन्कम टॅक्स झाले जीएसटी झाले आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा 'कस्टम बॉम्ब'दिल्लीत मोठे विधान

नवी दिल्ली: नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात बोलताना देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी मोठे विधान केले आहे. थेट कस्टम ड्युटी करात मोठे बदल होणार असल्याची घोषणा यावेळी केली. कार्यक्रमात बोलताना, जीएसटी, इन्कमटॅक्सनंतर आता कस्टम करात बदल होणार आहेत असे मोठे विधान केले आहे. याविषयी सरकार काम करत असून यावर विचारविनिमय सुरू असल्याचे अर्थमंत्र्यांनी बोलताना अधोरेखित केले आहे. सरकारच्या कामगिरीवर विचारले असता अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत फंडामेंटलवर (Sorted) असल्याचे विधान केले. परंतु ज्यामध्ये परिवर्तन अपेक्षित आहे त्यामध्ये कस्टम ड्युटीचा 'हेवी ड्युटी' असल्याने त्यात परिवर्तन होणे गरजेचे आहे. यातील नियमही सोपे करून विरोधकांच्या काळातील क्लिष्ट व महागडा कर लादणारा कर दहशतवाद बंद करण्याची गरज असल्याचे सीतारामन यांनी अधोरेखित केले आहे.त्यामुळे आगामी दिवसात सरकार यावर नवीन कायदा आणू शकतात ज्यात मोठ्या प्रमाणात जीएसटीप्रमाणे दरकपात होईल अशी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे अर्थव्यवस्थेवर बोलतानाही भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असताना काही भूराजकीय स्थितीतील कारणांमुळे निश्चितच आव्हाने आहेत. परंतु त्यावर जागतिक दर्जाशी सुसंगत उपाययोजना भारतात असल्यातरी त्याची प्रभावी अंमलबजावणी आणखी केली पाहिजे याची कबूली त्यांनी कार्यक्रमात बोलताना दिली.याविषयी बोलताना सीतारामन म्हणाल्या आहेत की,'अर्थसंकल्पीय गुपित नाही' असे म्हणत मी अर्थसंकल्पासमोर हे गुपित उघड करत नाही असे म्हणत भारत जागतिक मान कांशी (Standard) व्यापकपणे जुळवून घेत असला तरी अंमलबजाव णीत अडचणी येत आहेत यावर भर दिला. पूर्वीच्या कर सुधारणांचा विचार करताना त्या म्हणाल्या आहेत की,'आयटीमध्येही कर प्रशासनच समस्या निर्माण करते ज्यामुळे कर दहशतवाद निर्माण झाला. म्हणून आम्ही आयटीवर काम केले आणि ते सोपे केले, ते चेहरारहित केले आहे '.बेकायदेशीर तस्करी (Smuggling) ही एक मोठी चिंता आहे त्यामुळे आता कस्टम (सीमाशुल्क प्रक्रिया) सर्वसमावेशकपणे चेहरारहित (Faceless) करण्याची आहे असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी नमूद केले. आपण अजूनही असलेल्या कस्टमचा उच्च असलेल्या ठिकाणी दर खाली आणावे लागतील असे कस्टम्ससाठी पुढील मोठे स्वच्छता काम' असे संबोधले आहे.याशिवाय अर्थसंकल्प निर्माण करण्यापूर्वी रूपयावरही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.सध्याच्या आर्थिक मूलभूत तत्त्वांच्या संदर्भात चलनाचे मूल्यांकन केले पाहिजे. त्या म्हणाल्या, 'रुपयाला स्वतःची पातळी शोधावी लागेल' विनिमय दरांना अत्यंत संवेदनशील असे त्यांनी संबोधले आहे. यावेळी सीतारामन यांनी विरोधी पक्षाची सत्ता असताना तेव्हा अर्थव्यवस्थेची स्थिती 'दयनीय' असल्याचे म्हटले आहे.अर्थव्यवस्थेतील बदलांवर विचारले असताना त्या म्हणाल्या आहेत की,'आज अर्थव्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांचे निराकरण झाले आहे असे म्हणत त्यांनी पुढे म्हटले की चालू चलन चर्चेला आजच्या आर्थिक वास्तवात पाहिले पाहिजे, पूर्वीच्या संदर्भापेक्षा (Context) आजच्या वास्तवाशी ते जोडणे आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.व्यापक अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, भारताला बाह्य धक्क्यांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. कोविड-१९ आणि इतर देशांतील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी (Global Supply Chain) विस्कळीत झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आणि असेही म्हटले की, भारत प्रशासनातील अकार्यक्षमतेची भरपाई करत आहे. निवडणूक चक्राचा निश्चित भांडवली खर्चावर परिणाम झाला आहे आणि अर्थव्यवस्था अनेक आव्हानांमधून गेली आहे, त्यापैकी बहुतेक आव्हाने देशाबाहेरून उद्भवली आहेत असेही त्यांनी यावेळी नमूद केले. भारतीय अर्थव्यवस्था अनेक मोठ्या बदलांमधून जात आहे हे अंतिमतः त्यांनी अधोरेखित केले.

फीड फीडबर्नर 6 Dec 2025 12:30 pm

डिसेंबरमध्ये लाडक्या बहिणींना थेट दुप्पट हप्ता!

मुंबई : डिसेंबरमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दीड हजार रुपये नव्हे, तर तीन हजार रूपये जमा होणार आहेत. डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली असली तरी, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात नोव्हेंबरचा हप्ता अजून जमा झालेला नाही. राज्य सरकार या महिन्यातील आणि मागील महिन्यातील असे दोन हप्ते मिळून एकूण ३ हजारची रक्कम एकाच वेळी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करू शकते. जर हा अंदाज खरा ठरला, तर राज्यातील लाखो महिलांना एकाच वेळी ३ हजार आर्थिक मदत मिळणार आहे.नोव्हेंबरचा हप्ता जारी न होण्यामागे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे प्रमुख कारण असू शकते. यापूर्वी, राज्यात विधानसभा निवडणुकांदरम्यान देखील योजनेच्या लाभार्थ्यांना दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी पाठवण्यात आले होते. त्यामुळे, यावेळी देखील निवडणुकांमुळे हप्ता जमा होण्यास विलंब होत असावा आणि दोन्ही हप्ते एकाच वेळी मिळतील, असा अंदाज आहे. पुढील आठवड्यापर्यंत सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा करू शकते, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.दरम्यान, सरकारने स्पष्ट केले आहे की जर लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नाही, तर पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत. लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यात दोन महिन्याचा एकत्रित हप्ता मिळावा यासाठी मंत्रालयीन पातळीवरून प्रयत्न सुरू झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

फीड फीडबर्नर 6 Dec 2025 12:30 pm

महापािलका, जि.प. निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या : सर्वोच्च न्यायालय

नगरपंचायत व नगरपंचायतींचा निकाल २१ डिसेंबरलाचनवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेवरील अनिश्चिततेला पूर्णविराम दिला. तसेच २ डिसेंबरला झालेल्या नगरपंचायत व नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले. २१ तारखेपूर्वी मतमोजणी घेण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला.निवडणूक आयोगाने मतमोजणी २१ डिसेंबर रोजी घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला. तसेच ३ डिसेंबर रोजीच मतमोजणी व्हावी, असा आग्रह धरला. या विरोधात नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर खंडपीठात याचिका दाखल झाल्या होत्या. दरम्यान आता सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर मतमोजमीच्या विषयासंदर्भात सुनावणी पार पाडली. यावेळी खंडपीठाने निवडणुकांचा जो कालावधी निश्चित केला आहे. त्याच्या आत म्हणजेच ३१ जानेवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी. कोणत्याही कारणास्तव निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न होऊ नये, असेही खंडपीठाने सांगितले. २ डिसेंबरला झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले. २१ तारखेपूर्वी मतमोजणी घेण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. उच्च न्यायालयांमधील विविध याचिकांचा, प्रकरणांचा किंवा खंडपीठांच्या आदेशांचा परिणाम होऊन निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाहीत, याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. नागपूर, औरंगाबाद खंडपीठ किंवा मुंबई उच्च न्यायालय असेल, त्यांच्या कोणत्याही आदेशाचा परिणाम निवडणुका लांबण्यावर होऊ नये, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले.गेल्या काही वर्षांपासून कोरोना महामारी, आरक्षण यासह अनेक कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात होत्या. यामुळे नागरिकांमध्ये तसेच लोकप्रतिनिधींमध्येही प्रचंड अस्वस्थता आणि संभ्रम निर्माण झाला होता; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशामुळे आता ही भीती संपुष्टात आली आहे. या आदेशामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला स्पष्ट दिशा मिळाली असून, निवडणुका पुन्हा अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. निवडणूक आयोगाने दिलेली वेळमर्यादा काटेकोरपणे पाळावी, उच्च न्यायालयांनी निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुका वेळेत पार पडाव्यात, या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले.

फीड फीडबर्नर 6 Dec 2025 12:30 pm

lifestyle: चहा करताना फक्त ‘ही’ एक सवय लावा; पचन सुधारेल, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोकाही कमी होईल!

lifestyle: लवंग हा भारतीय मसाल्यांमधील सुगंधी आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. साध्या चहात फक्त एक लवंग घातली तरी त्याची चव, सुगंध, आरोग्य फायदे सगळं प्रचंड वाढतं. लवंगामध्ये अँटीऑक्सिडंट, दाहक-विरोधी, अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. व्हिटॅमिन C, K, फायबर, मॅंगनीज आणि युजेनॉलसारखे फाइटोकेमिकल्स शरीरातील जळजळ, वेदना आणि संसर्गाचा धोका कमी […] The post lifestyle: चहा करताना फक्त ‘ही’ एक सवय लावा; पचन सुधारेल, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोकाही कमी होईल! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 12:29 pm

डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल नाही, पण फिफा शांतता पुरस्कार प्रदान; भारत-पाकिस्तान संघर्षाचा पुन्हा उल्लेख

FIFA-Donald Trump | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फिफाने शांतता पुरस्कार प्रदान केला आहे. ट्रम्प यांना हा नवीन फिफा शांतता पुरस्कार शुक्रवारी २०२६ च्या विश्वचषक स्पर्धेच्या ड्रॉमध्ये प्रदान करण्यात आला आहे. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी ट्रम्प यांना हा पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार फिफाचा पहिला शांतता पुरस्कार आहे. फिफाने पहिल्यांदाच हा पुरस्कार सुरू केला […] The post डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल नाही, पण फिफा शांतता पुरस्कार प्रदान; भारत-पाकिस्तान संघर्षाचा पुन्हा उल्लेख appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 12:19 pm

'24 वर्षे शिक्षिका होती, BLO बनवून आईला मारून टाकले':कामचोर म्हटले म्हणून फाशी घेतली, पश्चिम बंगाल SIR मध्ये 39 मृत्यूंचे कारण काय

‘आईच्या मृत्यूनंतर लोकांनी अनेक प्रकारच्या गोष्टी बोलल्या. त्यांना फाकीबाज (कामचोर) म्हटले गेले तेव्हा खूप वाईट वाटले. त्या शाळेत जीवशास्त्र शिकवत होत्या. त्यांचे वय ५३ वर्षे होते. काही वर्षांत त्या निवृत्त झाल्या असत्या. दोन महिन्यांपूर्वीच त्यांना बीएलओ बनवण्यात आले होते. २४ वर्षांच्या नोकरीत त्या पहिल्यांदाच हे काम करत होत्या. एसआयआरच्या कामामुळे त्या दबावाखाली होत्या. २२ नोव्हेंबरच्या रात्री त्यांनी आत्महत्या केली.’ पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील कृष्णानगर येथे राहणारे अरिक्तो हे रिंकू तरफदार यांचे पुत्र आहेत. रिंकू शिक्षिका होत्या, पण पश्चिम बंगालमध्ये एसआयआर (स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन) प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यांना बीएलओचे काम मिळाले होते. रिंकूवर काम वेळेत पूर्ण करण्यासाठी दबाव टाकला जात होता, असा आरोप आहे. यामुळे त्या त्रस्त होत्या आणि त्यांनी गळफास लावून घेतला. सुसाइड नोटमध्येही त्यांनी कामाच्या दबावाचा उल्लेख केला आहे. SIR च्या दुसऱ्या टप्प्यात राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह 9 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादीसाठी डेटा गोळा केला जात आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत 7 राज्यांमध्ये 29 बीएलओंचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे. सर्वाधिक 9 मृत्यू मध्यप्रदेशात झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये मार्च-एप्रिलमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे येथे SIR मुळे जास्त वाद आहे. सरकार चालवणाऱ्या TMC चा दावा आहे की SIR दरम्यान राज्यात 39 मृत्यू झाले आहेत. यापैकी 4 बीएलओ आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी SIR वर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये 4 बीएलओंचा मृत्यू, दोन आत्महत्या ‘माझ्या आत्महत्येसाठी निवडणूक आयोग जबाबदार आहे. माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. मी एक खूप सामान्य व्यक्ती आहे, जी निवडणूक आयोगाचा हा दबाव सहन करू शकत नाहीये. मी ९५% काम ऑफलाइन पूर्ण केले आहे, पण ऑनलाइन करू शकत नाहीये. यासाठी बीडीओ कार्यालय आणि पर्यवेक्षकांनाही सांगितले, पण त्यांनी ऐकले नाही. असा दबाव इतर बीएलओंवर टाकू नये.’ हा रिंकू तरफदार यांच्या आत्महत्या नोटमधील एक भाग आहे, ज्यात त्यांनी निवडणूक आयोग आणि कामाच्या ताणाचा उल्लेख केला होता. आम्ही याबद्दल रिंकूचा मुलगा अरिक्तोशी बोललो. रिंकूचे भाऊ कॅफे चालवतात, अरिक्तोशी आमची भेट त्यांच्या कॅफेतच झाली. अरिक्तो सांगतो, ‘आई दोन महिन्यांपूर्वीच बीएलओ बनली होती. हे काम शिकवण्या-शिकण्यापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. ती सतत चिंतेत होती. निवडणूक आयोगाकडून कोणतीही नवीन सूचना आली की, ती घाबरून जायची.’ ‘आईने इतकी वर्षे एका निश्चित पद्धतीत मुलांना शिकवले होते. या वयात येऊन काहीतरी नवीन शिकणे थोडे कठीण होते. तिने फील्डचे (क्षेत्राचे) सर्व काम जवळजवळ पूर्ण केले होते. तिला फक्त डेटा अपलोड करण्यात अडचण येत होती.' अरिक्तो पुढे सांगतात, 'मी आणि माझी दीदी दोघेही घरी नसतो. कोरोनाच्या काळात आईला ऑनलाइन क्लास घ्यावे लागत होते. तेव्हा मी किंवा दीदी झूममध्ये क्लास सुरू करून देत होतो. यावेळी काम थोडे कठीण होते. निवडणूक आयोगाकडून वारंवार गोष्टी बदलल्या जात होत्या.’ ‘आईला भीती होती, काही चूक होऊ नये’अरिक्तो आईसोबत व्हॉट्सॲपवर 18 नोव्हेंबर रोजी झालेल्या चॅट दाखवून सांगतात, ‘आत्महत्येच्या 4 दिवसांपूर्वी आईने माझ्याकडे निवडणूक आयोगाची अधिसूचना पाठवली होती. यात काय करायचे आहे, असे विचारले होते. त्या खूप घाबरल्या होत्या. त्यांना भीती होती की ऑनलाइन काही चूक झाली तर काय होईल. आधी दुरुस्तीचा पर्यायही नव्हता, ना कोणताही हेल्पलाइन नंबर होता.’ अरिक्तो सांगतात, ‘आईची ड्युटी 18 किलोमीटर दूर होती. त्यांची शाळाही तिथेच होती. आम्ही 2013 मध्ये चापरा येथून कृष्णानगरला स्थलांतरित झालो होतो. सर्व कागदपत्रे जुन्या घराच्या पत्त्यावरचीच होती, म्हणून आईला बीएलओचे कामही त्याच पत्त्यानुसार मिळाले होते.’ ‘आईला रोज 18 किमी दूर जावे लागत होते. ऑनलाइन अपलोडमुळे वाढणारा ताण लक्षात घेता त्यांनी बीडीओकडे याची तक्रार केली, जेणेकरून त्यांना कामातून मुक्त केले जाईल. बीडीओंनी ऐकले नाही आणि नोकरी सोडायला सांगू लागले. आईने लगेच नोकरी सोडण्यासाठी होकार दिला होता, पण त्यांना सांगण्यात आले की काम पूर्ण करून द्यावे लागेल.’ ‘नोकरी सोडण्याबद्दल सांगितले, पण सोडू शकल्या नाहीत’पुढील गोष्ट अरिक्तोच्या शेजारी बसलेले त्यांचे मामा अर्नब साह सांगतात. ते म्हणतात, ‘दीदी या कामामुळे त्रस्त होती. त्यांनी आधी शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितले होते. त्यांनी बीडीओला भेटायला सांगितले. बीडीओ ऑफिसमधून कलेक्टर ऑफिसमध्ये जाण्यास सांगितले. तिथे त्यांना नोकरी सोडण्यास सांगितले. दीदी घरी आल्या आणि आम्हाला विचारले की मी नोकरी सोडून देऊ का. तीन दिवस त्या म्हणाल्या की मला कळले आहे, जर मी नोकरी सोडली तरी, काम पूर्ण करावेच लागेल. अर्नब पुढे म्हणतात, ‘दीदींना नोकरीचा मोह नव्हता. त्यांचे कुटुंब संपन्न आहे. जीजाजींचा व्यवसाय आहे. दीदींना फक्त 14,500 रुपये पगार मिळत होता. शिकवणे ही त्यांची आवड होती. प्रत्येकाला फक्त आत्महत्येबद्दल जाणून घ्यायचे आहे, पण यानंतर काही सुधारणा होईल का? इतक्या मोठ्या प्रक्रियेअंतर्गत काम केले जात आहे, पण ना कोणताही हेल्पलाइन नंबर आहे, ना कोणताही हेल्प डेस्क, आणखी बीएलओच्या मृत्यूची वाट पाहिली जात आहे का?’ शांतिमणि एक्का अंगणवाडीत काम करत होत्या. बीएलओ बनल्यानंतर त्या घरोघरी जाऊन SIR चे फॉर्म वाटत होत्या. नंतर त्या ते परत घेण्यासाठी जात होत्या. 19 नोव्हेंबर रोजी त्यांनी आपल्या घराच्या अंगणात फाशी घेतली. शांतिमणि यांची मुलगी सुलेखा सांगते, ‘माझ्या आईसाठी हे काम करणे खूप कठीण होते. त्यांच्यावर लवकर काम पूर्ण करून देण्याचा दबाव होता. त्या हा दबाव सहन करू शकल्या नाहीत. आमचे घर चहाच्या बागेच्या परिसरात आहे.’ सुलेखा पुढे सांगते, ‘बहुतेक लोक फॉर्म भरू शकत नव्हते. सर्वजण आईकडूनच फॉर्म भरून घेत होते. काही लोक स्वतः फॉर्म भरून देत होते, त्यात अनेक चुका करत होते. लोक वारंवार आईला सांगत होते की, जर काही चूक झाली, तर आम्हाला सरकारी सुविधा मिळणार नाही. ‘दिवसभर फील्डमध्ये काम केल्यानंतर घरी फॉर्म भरत असे. त्यावरही अधिकारी रोज रात्री म्हणायचे की, लवकर काम करा, अजून एवढेच काम झाले आहे. हा दबाव सतत वाढत होता. आई भाषा आणि ऑनलाइन फॉर्म भरण्याबाबत चिंतेत होती.' 'त्या अंगणवाडी सेविका होत्या, त्यांच्याकडून ऑनलाइन कामाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. त्रासून आई आणि भाऊ जॉइंट बीडीओ मोहम्मद तौकीफ अली यांच्याकडे गेले होते. त्यांना सांगितले होते की हे काम होणार नाही. त्यांनी काहीही ऐकले नाही.' आम्ही याबद्दल जॉइंट बीडीओशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की, याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारा. माल बाजार एसडीओंनीही निवेदन देण्यास नकार दिला. बीएलओ म्हणाले- ऑनलाइन फॉर्म भरण्याचे प्रशिक्षण मिळाले नाहीआम्ही काही बीएलओंसोबत SIR च्या प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणींबद्दल बोललो. सबोरनी सन्याल मंडल कृष्णानगरच्या बीएलओ आहेत. त्यांचे ऑनलाइन फॉर्म भरण्याचे काही काम बाकी राहिले आहे. सबोरनी सांगतात, ‘14 नोव्हेंबरपासून SIR चे काम सुरू झाले. त्याच दिवसापासून ऑनलाइन फॉर्म देखील अपलोड करायचे होते. यासाठी अनेक वेळा नियम बदलले गेले. सर्वात मोठी समस्या अशी होती की फॉर्ममध्ये चूक सुधारण्याचा पर्याय नव्हता. यामुळे बीएलओ चिंतेत होते की सरकारी कागदपत्रे आहेत, कोणतीही चूक होऊ नये. तक्रारीनंतर ते दुरुस्त करण्यात आले. 22 नोव्हेंबरनंतर सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या. तेव्हापासून काम व्यवस्थित सुरू आहे.’ कामात काय अडचणी आल्या? सबोरनी सांगतात, ‘आम्हाला फक्त ऑफलाइन फॉर्म भरण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी प्रशिक्षण मिळाले नाही. सर्वात मोठी समस्या अपलोडिंगची होती. दिवसा बहुतेक वेळा वेबसाइट व्यस्त असते. अनेक वेळा ती इतकी हँग होते की पूर्ण फॉर्म भरल्यानंतर जर सबमिट झाला नाही, तर पुन्हा संपूर्ण प्रक्रिया करावी लागते.’ ‘मी अनेक वेळा अडकले होते. नंतर मी सकाळी 4 वाजता उठून फॉर्म भरायला सुरुवात केली. याशिवाय सीरियल नंबर मिळण्यासही उशीर झाला. यामुळे फॉर्म वाटप करण्यात अडचण आली.’ मात्र, आसनसोलचे बीएलओ मोहित कुमार सिंह सांगतात, ‘आम्हाला प्रत्येक गोष्टीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अनेक वेळा अधिकारी बीएलओसोबत फील्डवर गेले. भाषेमुळे एक समस्या निर्माण झाली, ज्यामुळे बीएलओचे काम वाढले.’ ‘संपूर्ण फॉर्म बांग्लामध्ये होता. हिंदी भाषिक प्रदेशातून आलेल्या लोकांना बांग्ला येत नाही. फॉर्म इंग्रजीमध्ये भरण्याची तरतूद आहे. मी अनेक मतदारांना प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजावून सांगितली, तरीही चुका झाल्या. शेवटी, मी मतदारांना घरी बोलावून, समोर बसवून फॉर्म भरून घेतला. यात बराच वेळ लागला, पण चुकीची शक्यता कमी झाली.’ याशिवाय, ऑनलाइन फॉर्म भरण्यात अडचण आली. अनेक वेळा फॉर्म भरल्यानंतरही त्यावर डेटा अपडेट होत नाही. आमच्याकडेही 11 डिसेंबरपर्यंतचा वेळ आहे. जर तोपर्यंत दिला नाही, तर ऑनलाइन अपडेटमध्ये अडचण येईल. उर्दू बोलणाऱ्या लोकांना एक अडचण येत आहे. पश्चिम बंगालच्या औद्योगिक परिसरात यूपी-बिहारमधील बहुतेक मुस्लिम उर्दू बोलतात. याचे कारण उर्दू शाळा आहेत. फरहद जबी उर्दू भाषेच्या शाळेत शिक्षिका आहेत. त्यांचे घर बर्धमान जिल्ह्यातील कुल्टी विधानसभा मतदारसंघात आहे. फरहद देखील बीएलओ आहेत. त्या म्हणतात, 'माझ्या परिसरात बहुतेक लोक उर्दू बोलणारे आहेत आणि फॉर्म बांगलामध्ये आहे. मला इंग्रजीचा एक ऑनलाइन फॉर्म मिळाला होता. त्याद्वारे मी मतदारांना समजावून सांगितले. ही अडचण माझ्यासाठीही होती.' कुल्टीच्या नियामतपूरमध्ये राहणारे मोहम्मद तबरेज अन्सारी SIR चा फॉर्म भरण्यासाठी आले होते. ते म्हणतात, 'SIR च्या फॉर्ममध्ये भाषेचा पर्याय नाही. तुम्ही फॉर्म इंग्रजीमध्ये भरू शकता, पण वाचायला बांगलामध्ये आहे. ही अडचण दूर करण्यासाठी बांगला समजणाऱ्या मुलांची मदत घ्यावी लागली.' ममताचे आश्वासन- कोणाचेही नाव मतदार यादीतून काढले जाणार नाहीपश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष टीएमसी एसआयआरला विरोध करत आहे. कोलकाताच्या धर्मतल्ला येथील पक्षाच्या रॅलीत ममता म्हणाल्या की, एसआयआरच्या भीतीने लोकांनी जीव देऊ नये, कोणाचेही नाव मतदार यादीतून काढले जाणार नाही. तर मुर्शिदाबादमध्ये झालेल्या रॅलीत त्यांनी सांगितले की, एसआयआरच्या नावाखाली भाजप पश्चिम बंगालमध्ये डिटेंशन कॅम्प उघडण्याचा प्रयत्न करत आहे. मी असे होऊ देणार नाही. याशिवाय, टीएमसी खासदारांचे एक शिष्टमंडळ 28 नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना भेटले होते. त्यांनी एसआयआर प्रक्रियेदरम्यान मृत्यू झालेल्या 39 लोकांची यादी सोपवली, ज्यात रिंकू तरफदार आणि शांतिमणी एक्का यांच्यासह आणखी 2 बीएलओ होते. भाजपने म्हटले- ममता सरकारने मदत केली असती तर बीएलओंवरील दबाव कमी झाला असताबीएलओच्या आत्महत्येबद्दल विचारले असता, भाजपच्या सरचिटणीस अग्निमित्रा पॉल यांनी ममता सरकारवर आरोप केले. त्या म्हणाल्या, 'निवडणूक आयोगाने ऑनलाइन प्रक्रिया सोपी करण्यासाठी राज्य सरकारकडे एक हजार डेटा ऑपरेटर मागितले होते, जेणेकरून ज्या बीएलओना ऑनलाइन फॉर्म भरण्यात अडचण येत आहे, त्यांना सुविधा मिळेल. राज्य सरकारने मदत केली नाही.' SIR साठी पश्चिम बंगालमध्ये 80,600 पेक्षा जास्त BLO, 8 हजार सुपरवायझर, 3 हजार AERO आणि 294 ERO तैनात आहेत. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात सुमारे 14 लाख फॉर्म 'अनकलेक्टेबल' म्हणून ओळखले गेले आहेत. हे मतदार एकतर गैरहजर होते, डुप्लिकेट होते, मरण पावले आहेत किंवा कायमचे दुसरीकडे स्थलांतरित झाले आहेत. SIR चा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 4 डिसेंबरवरून वाढवून 11 डिसेंबर करण्यात आली आहे. मसुद्याची पहिली यादी 16 डिसेंबरपर्यंत येईल. सर्वोच्च न्यायालयाने 4 डिसेंबर रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिला की, त्यांनी SIR मध्ये गुंतलेल्या बूथ लेव्हल अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याचा विचार करावा.

दिव्यमराठी भास्कर 6 Dec 2025 12:12 pm

अवधूत साठे यांनी सेबीला साफ 'नाकारले'साठे ट्रेडिंग ॲकेडमी सेबी निर्णयाला आव्हान देणार

मुंबई: अवधूत साठे यांच्या अवधूत साठे ट्रेडिंग ॲकेडमी लिमिटेड (ASTAL) कंपनीने सेबीच्या आरोपांना फेटाळले असून याविरुद्ध आवश्यक ती कार्यवाही करण्याचे संकेत दिले आहेत. अवधूत साठे यांच्याविरोधात बाजार नियामक सेबीने गंभीर आरोप केले होते. त्यामुळे १२५ पानांच्या अंतरिम आदेशात विना परवाना शेअर खरेदी सल्ल्याप्रकरणी दिल्याप्रकरणी अकादमी दोषी आढळल्याचे सेबीने काल स्पष्ट केले होते. त्यानंतर कारवाईला वेग आल्यानंतर ६०१ कोटींची दंड वसूली सेबीने करायचे ठरवले आहे. याविषयी आपल्या संस्थेकडून दिलेल्या नव्या निवेदनात, संस्थेचा असा कुठल्याच प्रकारचा हेतू नसल्याचे त्यांनी जाहीर केले. ही संस्था केवळ आणि केवळ ज्ञानार्जनासाठी असून केवळ ज्ञानाच्या हेतूकरता प्रात्यक्षिकासाठी केलेले प्रयोग (Illustration) हे सल्ले देण्याचा प्रकार नसून केवळ विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे समजावून सांगण्यासाठी उदाहरणे दिली गेली. संस्था कुठल्याही प्रकारची गुंतवणूक सल्लागार नसून केवळ वित्तीय बाजारात ट्रेडर व गुंतवणूकदार यांना शिकवण्याची पद्धत होती या आशयाचे संस्थेने निवेदन दिले आहे.शुक्रवारी दिलेल्या आपला निवेदनात,शुक्रवारी दिलेल्या निवेदनात, ASTA ने म्हटले आहे की,' ते सेबीच्या आदेशात नमूद केलेल्या आरोपांना स्पष्टपणे नाकारतात तसेच ते संस्था फक्त एक प्रशिक्षण संस्था म्हणून काम करते. आमचे कार्यक्रम शैक्षणिक आहेत आणि गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांमध्ये वित्तीय बाजारपेठेत निर्णय घेण्याचे कौशल्य निर्माण करणे आणि प्रशिक्षण देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.' असे अकादमीने नेमक्या शब्दात म्हटले आहे.मात्र यापूर्वी कारवाईदरम्यान आदेशात, नियामकाने म्हटले आहे की मार्च २०२४ मध्ये चुकीची माहिती आणि निवडक खुलासे केल्याबद्दल प्रशासकीय इशारा जारी करूनही, अकादमीने केवळ अभ्यासक्रम सहभागींच्या यशस्वी व्यवहारांचे प्रदर्शन करणारी दिशाभूल करणारी जाहिरात सामग्री प्रकाशित करणे सुरूच ठेवले. अनेक तक्रारदारांनी आरोप केला की प्रशिक्षण कार्यक्रमांनी असाधारण परताव्याचे आश्वासन दिले परंतु त्यामुळे मोठे नुकसान झाले आणि अकादमीने थेट बाजार व्यापार सत्रे आयोजित केली जिथे थेट व्यापार शिफारसी दिल्या गेल्या. सेबीच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या विश्लेषणात असे आढळून आले की थेट वर्गांदरम्यान विशिष्ट स्टॉक,लक्ष्य (Target Price) स्टॉप-लॉस पातळी आणि दिशात्मक दृश्ये (Directional Advice) नियमितपणे प्रदान केली जात होती. अवधूत साठे यांनी स्वतःचे एमटीएम पोझिशन्स देखील प्रदर्शित केले. सहभागींनी त्यांच्या सूचनांवर आधारित व्यवहार केल्याचे कबूल करताना पाहिले.सेबीच्या माहितीनुसार साठे यांच्या ट्रेडिंग एज्युकेशन अकादमीने केवळ शैक्षणिक म्हणून नाही तर आपल्या सहभागांच्या (Participants) माध्यमातून आपले शेअरचे सल्ले दिले होते. खासकरुन फी घेतलेल्या कार्यक्रमात लाईव्ह सेशन्स, सोशल मिडिया व्यासपीठाच्या आधारे बाय सेल व लाईव्ह मार्केट कॉल याची सार्वजनिक पद्धतीने प्रस्तुती करण्यात आली. सेबीने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षणाच्या व्यतिरिक्त सल्ले देण्यासाठी अथवा विशिष्ट गुंतवणूकीबाबत आवाहन करता सेबी नोंदणीकृत आर ए (Research Analyst), इए (Investment Advisor) असणे आवश्यक असते. या घटकांची पूर्तता साठे यांनी केली नाही.सेबीच्या मते आपल्या विद्यार्थ्यांवर प्रभाव पाडुन साठे यांनी व्यवहार घडवून आणले आहेत. सेबीने विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या ऑनलाइन प्रशस्तीपत्रे देखील अकादमीच्या सत्रांवर आधारित केलेल्या व्यवसायांचे वर्णन करताना लाखो रुपयांच्या सशुल्क अभ्यासक्रमांसह अधोरेखित केली गेली आहेत. 'आमच्या सत्रांमध्ये वापरलेले सर्व संवाद, संदर्भ आणि उदाहरणे केवळ शैक्षणिक आणि संकल्पनात्मक स्पष्टतेसाठी सादर केली जातात. ती संदर्भात्मक स्वरूपाची आहेत आणि त्यांचा कोणत्याही प्रकारच्या सल्लागार किंवा शिफारसी म्हणून अर्थ लावला जाऊ नये,' असे त्यात म्हटले आहे.अकादमीने असेही म्हटले आहे की त्यांनी सल्लागार किंवा संशोधन सेवांमधून कधीही कोणतेही बेकायदेशीर नफा मिळवला नाही असे राखून ठेवले आहे की सेबीने उद्धृत केलेले नियम केवळ प्रशिक्षण-संस्थांना लागू होत नाहीत. ASTA ने असेही म्हटले आहे की ते त्यांच्या कोणत्याही YouTube, Instagram किंवा Telegram चॅनेलचे मुद्रीकरण (Monetization) करत नाही, असा युक्तिवाद करत आहे की म्हणून ते 'finfluencer' म्हणून देखील वर्गीकृत केले जाऊ शकत नाही.सेबीच्या आदेशाने अकादमीला कथितपणे चुकीचे नफा एस्क्रो खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले होते आणि पुढील सूचना येईपर्यंत साठे यांना पुढील सूचना येईपर्यंत सिक्युरिटीज मार्केटमध्ये सहभागी होण्यास मनाई केली आहे. ऑनलाइन बाजार शिक्षक आणि व्यापारी समुदायांच्या महिन्यांच्या छाननीनंतर हे निर्देश आले आहेत जिथे सेबीने शिक्षण, प्रभाव आणि नोंदणीकृत नसलेल्या सल्ल्यामधील अस्पष्ट रेषांबद्दल वारंवार इशारा दिला आहे. अवधूत साठे यांच्या ट्रेडिंग एज्युकेशन कंपनीने ने म्हटले आहे की ते सल्लागार किंवा विश्लेषकांपासून वेगळे फक्त प्रशिक्षण घेणाऱ्या संस्थांच्या स्पष्ट नियामक ओळखीच्या कल्पनेचे समर्थन करते. आम्ही आमच्या कायदेशीर हक्कांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलू असे त्यात म्हटले आहे, तसेच या आदेशाला योग्य मंचासमोर आव्हान दिले जाईल असेही म्हटले आहे.तपासात पुढे असे दिसून आले की, ६.७५ लाख रुपयांपर्यंतच्या शुल्कासह मार्गदर्शन बॅचसाठी तयार केलेले अनेक खाजगी व्हॉट्सअँप ग्रुप स्टॉक शिफारसी, पर्याय धोरणे, प्रवेश आणि निर्गमन पातळी आणि निर्देशांक अंदाज सामायिक करण्यासाठी वापरले जात होते. सेबीने असे नमूद केले की असे वर्तन नोंदणीशिवाय गुंतवणूक सल्ला देण्यासारखे आहे यामुळे सेबी कायदा, गुंतवणूक सल्लागार नियम, संशोधन विश्लेषक नियम आणि PFUTP नियमांचे प्रथमदर्शनी उल्लंघन झाले आहे.सेबीने अंतरिम निर्देश लागू केले आहेत ज्यात (ASTAPL),अवधूत साठे आणि गौरी अवधूत साठे यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सिक्युरिटीज मार्केटमध्ये प्रवेश करण्यापासून यापुढे रोखले आहे. पुढील आदेशापर्यंत सिक्युरिटीज खरेदी, विक्री किंवा व्यवहार करण्यापासून शेअर बाजारातून पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आले आहे, त्यांच्या विद्यमान होल्डिंग्जचे लिक्विडेशन वगळता नोटिसींना कोणत्याही गुंतवणूक सल्लागार किंवा संशोधन सेवा देण्यास, थेट ट्रेडिंग किंवा स्टॉकविशिष्ट मार्गदर्शन, स्टॉकमार्केट प्रशिक्षण घेण्यास किंवा सोशल मीडिया, व्हॉट्सअँप ग्रुप्स किंवा इतर प्लॅटफॉर्मद्वारे अथवा माध्यमातून स्टॉकशी संबंधित कोणताही सल्ला देण्यास जारी मनाई केली आहे.सेबीने त्यांना गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले कोणतेही पैसे वळवू नयेत किंवा विल्हेवाट लावू नयेत आणि अशी रक्कम एस्क्रो खात्यातही ठेवू नये असे निर्देश दिले आहेत. सेबीने प्रथमदर्शनी बेकायदेशीर नफा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रकमा जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत आणि ही रक्कम १५ दिवसांच्या आत सेबीच्या बाजूने चिन्हांकित (Notified) करून मुदत ठेवींमध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे.याव्यतिरिक्त बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत की त्यांनी नोटिसधारकांच्या खात्यांमधून चिन्हांकित ठेवींमध्ये हस्तांतरण वगळता कोणत्याही डेबिट व्यवहारांना परवानगी देऊ नये. पुढील २१ दिवसांत आर्थिक दंड अर्थात व्याजासह ६०१ कोटी रुपये आणि परतफेड देणींसह असे आदेश सेबीने दिले आहेत. व कारणे दाखवा नोटीसही बजावली असल्याचे सेबीने स्पष्ट केले. सेबी आपली कार्यवाही पूर्ण करत नाही आणि अंतिम आदेश देत नाही तोपर्यंत अंतरिम निर्देश लागू राहतील असे सेबीने अंतिमतः आपल्या निरिक्षणात म्हटले.सेबि अधिकाऱ्यांनी यापूर्वी २० ते २१ ऑगस्टला कर्जत येथील त्यांच्या क्लासेसच्या जागांवर धाडी टाकून काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती. मार्च २०२४ पर्यंत अवधूत साठे यांना ताकीद (Warning) देऊनही साठे व त्यांच्या क्लासेसने यावर गांभीर्याने विचार केला नसल्याचे सेबीने आरोपपत्रात म्हटले आहे. त्यामुळे हे सल्ले न थांबवल्याने सेबीने ही कारवाई केली. विशिष्ट शेअर सूचवून व त्यातून गुंतवणूक गोळा करुन अथवा झटपट पैसे कमावण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकीच्या नावाखाली 'माया' जमावण्यात आली असा आरोप सेबीने केला आहे. सेबी कायद्याच्या (SEBI Act) या कायद्याचे उल्लंघन करत हे कार्य साठेंनी सुरू ठेवल्याचेही नियामकांनी यावेळी स्पष्टकेलेहोते.

फीड फीडबर्नर 6 Dec 2025 12:10 pm

निवडणुकीच्या कामाला नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भांतील विविध कामे प्रशासनाने युद्धपातळीवर हाती घेतली आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असून निवडणुकीच्या कामाचे आदेश हाती पडताच महापालिकेच्या विविध खात्यातील कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची कामे करण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस द्यावी, असे सक्त आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी नुकतेच अधिकाऱ्यांना दिले. सुमारे ८ वर्षांच्या कालावधीनंतर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे, निवडणुकीच्या संदर्भातील संपूर्ण प्रक्रिया अत्यंत गांभीर्याने आणि काटेकोरपणे पार पाडणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.आगामी महापालिका निवडणुक सुलभरीत्या पार पडवी यासाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अानुषंगाने आता दुबार मतदारांची छायाचित्रानुसार तपासणी करण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. यापूर्वी मतदार यादीतील चुका सुधारण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी क्षेत्रभेटी सुरू केल्या होत्या. दरम्यान, द म्युनिसिपल युनियनने कामगारांना निवडणुकीची कामे न देण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले होते.यापूर्वीही अनेक वेळा निवडणुकीच्या कामासाठी कामगार – कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक असून त्यासाठी विविध खात्यातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी नेमण्याची शक्यता आहे. येत्या १० डिसेंबरनंतर छायाचित्रांची तपासणी झाल्यांनतर दुबार नावे असलेल्या मतदारांच्या घरी महापालिका कर्मचाऱ्यांची क्षेत्रभेटी सुरू होणार आहेत. दरम्यान, निवडणुकीची कामे करण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस द्यावी, असे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना आता कोणत्याही परिस्थितीत ही कामे करावेच लागणार आहेत.गृहनिर्माण संस्थांमधील मतदान केंद्रांबाबत ना हरकत प्रमाणपत्र सादर करावेया निवडणुकीच्या अानुषंगाने, संबंधित सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिकेचे सह आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी परस्परांमध्ये संवाद साधून समन्वयाने कार्यवाही करावी, अशीही सूचना जोशी यांनी केली. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीसंदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेताना त्यांनी उपरोक्त आदेश दिले. तसेच, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, प्रभाग प्रारूप मतदार यादीसंदर्भात सुरू असलेल्या कामकाजाला गती द्यावी. प्रभाग प्रारूप मतदार यादीबाबत येणाऱ्या हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून यथोचित निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. निष्कासित करण्यात आलेल्या इमारतीत पूर्वी मतदान केंद्र असल्यास त्याच्या जागी पर्यायी मतदान केंद्र उपलब्ध करून द्यावे. तसेच, गृहनिर्माण संस्थांमधील मतदान केंद्रांबाबत ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे, अशा सूचना जोशी यांनी केल्या. त्यावेळी विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, महानगरपालिकेचे सह आयुक्त विश्वास शंकरवार, इतर सह आयुक्त व उपायुक्त, कोकण विभागाच्या अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोघ मुकादम, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) डॉ. गजानन बेल्लाळे, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी (मुंबई उपनगरे) अर्चना कदम, उपनिवडणूक अधिकारी (मुंबई शहर) शामसुंदर सुरवसे, महानगरपालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांचे सर्व सहायक आयुक्त आदी उपस्थित होते.अतिरिक्त महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देशनिवडणूक कामाबाबत पालिका कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीआठ वर्षांच्या कालावधीनंतर निवडणूकमतदार यादीतील चुका सुधारण्यासाठी घरटी अभियानदुबार नावेप्रकरणी मतदारांना भेटी

फीड फीडबर्नर 6 Dec 2025 12:10 pm

जामखेड प्रकरण: भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक; चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया समोर म्हणाल्या “देवाभाऊ कोणालाही…”

Jamkhed case : जामखेडच्या खर्डा रस्त्यावर असलेल्या एका लॅाजमध्ये कला केंद्रात नर्तिका म्हणून काम करणाऱ्या एका महिलेचा मृत्यदेह आढळून आल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. या महिलेने गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. दिपाली पाटील (वय ३५) असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणात भाजपचा माजी नगरसेवक संदीप गायकवाडचे नाव समोर आले असून, पोलिसांनी […] The post जामखेड प्रकरण: भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक; चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया समोर म्हणाल्या “देवाभाऊ कोणालाही…” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 11:53 am

बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची अपडेट ते ट्रम्प यांना फिफाकडून शांतता पुरस्कारपर्यंतच्या टॉप १० बातम्या…

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाविषयी फडणवीसांची मोठी घोषणा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. यानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाविषयी […] The post बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची अपडेट ते ट्रम्प यांना फिफाकडून शांतता पुरस्कारपर्यंतच्या टॉप १० बातम्या… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 11:52 am

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक लवकरच पूर्ण होणार; फडणविसांनी थेट तारीख सांगितली…

Devendra Fadnavis | आज 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शनिवारी चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु. डॉ. […] The post इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक लवकरच पूर्ण होणार; फडणविसांनी थेट तारीख सांगितली… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 11:30 am

संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची संविधानाच्या डिजिटल चित्ररथाद्वारे मानवंदना

संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल संविधान चित्ररथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनमुंबई: राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल संविधान चित्ररथ तयार करण्यात आलेला आहे. या चित्ररथाचे आज दिनांक ०६ डिसेंबर, २०२५ रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणात, प्रभादेवी मुंबई येथे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा, माजी राज्यमंत्री भाई गिरकर, श्री बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, श्रीमती मीनल जोगळेकर, संचालक पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व इतर मान्यवर उपस्थित होते.https://prahaar.in/2025/12/06/war-like-situation-once-again-on-the-pak-afghan-border-hundreds-of-families-have-left-their-homes/हा चित्ररथ राज्यात विविध ठिकाणी फिरणार आहे. या चित्ररथामध्ये संविधानाची माहिती, संविधानाच्या मुलतत्त्वावरील माहिती, महत्त्वाची घडामोडी व लोकशाहीच्या मुल्यांवरील कलात्मक सादरीकरण व याबाबतचे प्रदर्शन बघायला मिळेल. या चित्ररथाद्वारे संविधान बाबतची जनजागृती करण्यात येणार आहे. संविधानाची माहिती सर्वसामान्यांना माहित व्हावी, या उद्देशाने या चित्ररथाची निर्मिती करण्यात आलेली आहे. राज्यातील जास्तीत जास्त जनतेने या चित्ररथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

फीड फीडबर्नर 6 Dec 2025 11:30 am

इंडिगो विमानसेवेच्या कारभावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया; केंद्र सरकारडे केली ‘ही’मोठी मागणी म्हणाल्या “संसदेतही…”

Supriya Sule : गेल्या काही चार ते पाच दिवसांपासून इंडिगो विमानसेवेच्या विस्कळितपणामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांची गैरसोय झाली असून, यााबत प्रवाशी इंडिगो विमानसेवेच्या कारभावर टीका करत आहेत. गेल्या दोन दिवसांत पुणे विमानतळावरून इंडिगोची १६ हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. तर १९ हून अधिक विमानांना प्रचंड विलंब झाला आहे. असेच चित्र […] The post इंडिगो विमानसेवेच्या कारभावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया; केंद्र सरकारडे केली ‘ही’ मोठी मागणी म्हणाल्या “संसदेतही…” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 11:23 am

भारत व रशिया यांच्यातील अणुभट्ट्या प्रकल्पांना वेग पुतीन व मोदी यांच्यात महत्वाची चर्चा

नवी दिल्ली: भारत व रशिया यांच्यातील संबंध आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही देश आता नव्या एकत्र येत अणुभट्ट्या प्रकल्प बांधणी करता सहकार्य करत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात म्हटल्यानुसार रशियन बनावटीच्या VVER Reactors बनवण्यासाठी भारत रशियाला प्रकल्प उभारणीसाठी भूखंड देणार आहे. या अणुभट्ट्यांची (Nuclear Power) योजना २०२२ पासून आखण्यात आली होती. मात्र त्यानंतर रशिया युक्रेन यांच्यातील युद्धानंतर ती योजना लांबणीवर पडली. १.२ गिगवॉटचा भारत रशिया दरम्यानचा हा दुसरा प्रकल्प होणार आहे ज्यामध्ये ६ अणुभट्ट्या सुरू करण्याची योजना २०१६ मध्येच आखण्यात आली होती. तांत्रिक कारणामुळे ती योजना पूर्णत्वास गेली नव्हती. परंतु रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी नुकत्याच केलेल्या भारतातील दौऱ्यानंतर याला पूर्णत्व प्राप्त होईल असे दिसून येते.मुख्य म्हणजे भारत सरकार अणुभट्टीत खाजगी कंपन्यांना यापूर्वी प्रवेश देत नव्हते. पण या क्षेत्रातील आर्थिक बोजा व ताण कमी करून या क्षेत्रातील गुंतवणूकीला प्रोत्साहन व हातभार देण्यासाठी सरकार खासगीकरणाला मान्यता देण्याच्या निर्णयाप्रत जाऊ शकतो. यावर संसदेत चर्चा सुरू झाली आहे. असे झाल्यास आता मोठ्या कंपन्या अणुभट्टीतील आवश्यक घटकांच्या उत्पादनात बाजारात उतरू शकतात. यापूर्वी केवळ न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या पीएसयुला परवानगी होती.प्रस्तावित बदलांचा उद्देश या क्षेत्राची सध्याची व्यवस्था सुलभ करणे आहे ज्यामुळे पुरवठादारांना नुकसान होण्यापासछन वाचवणे आहे. क्षेत्रातील मर्यादांमुळे कायदेशीर अडचणीसही पुरवठा करणाऱ्यांना सामोरे जावे लागते.भारताच्या कायद्याने जनरल इलेक्ट्रिक कंपनी, वेस्टिंगहाऊस इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिसाइट डी फ्रान्स सारख्या अणुभट्टी उत्पादकांच्या प्रकल्पांना अडथळा निर्माण केला आहे. त्याला अंतिम मंजुरी सरकार देऊ शकते. सध्याच्या घडीला भारतात तामिळनाडू येथे भारताचे व्हीव्हीईआर (VVER) १ गिगावॉट प्रकल्प सुरू आहेत. येणाऱ्या काळात आणखी ५ भट्ट्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुतीन मोदी भेटीत उपलब्ध माहितीनुसार दोन्ही देशांनी छोट्या अणुऊर्जा प्रकल्पावर काम करण्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली आहे.गुरूवारि पुतिन म्हणाले आहेत की त्यांचा देश लहान मॉड्यूलर अणुभट्ट्या विकसित करण्यासाठी भारतासोबत सहकार्य करण्यास तयार आहे, ही तंत्रज्ञान अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे परंतु औद्योगिक डीकार्बोनायझेशनसाठी आशादायक असल्याचेदिसूनयेते.

फीड फीडबर्नर 6 Dec 2025 11:10 am

Sonu Sood: इंडिगो एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ सोनू सूद; म्हणाले…“स्वतःला त्यांच्या जागी कल्पना करा”

Sonu Sood: इंडिगो एअरलाइन सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत आणि अनेक विमानतळांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्थितीवर अनेक सेलिब्रिटी नाराजी व्यक्त करत असताना, समाजकार्यासाठी ओळखले जाणारे अभिनेता सोनू सूद मात्र इंडिगोच्या स्टाफच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. लोकांना जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन सोनू सूद […] The post Sonu Sood: इंडिगो एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ सोनू सूद; म्हणाले… “स्वतःला त्यांच्या जागी कल्पना करा” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 10:57 am

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत झालेल्या बिघाडामुळे विमान कंपनीने अनेक उड्डाणे रद्द केली असून प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.देशातील प्रत्येक विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ उडालेला पहायला मिळत आहे. विमान रद्द झाल्यामुळे आणि विमान उशीर उड्डाण घेणार या बिनभरोसे कामकाजावर नाराजी व्यक्त करत तिकिटाची परतफेड करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. यावर इंडिगोने महत्त्वाची माहिती दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मागील चार दिवसांपासून इंडिगोचे अनेक उड्डाणे रद्द केली जात असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत इंडिगोने प्रवाशांची माफी मागितली आहे. तसेच ही परिस्थिती एका रात्रीत सुटणार नसून लवकरात लवकर सर्व विमान सेवा पूर्ववत करण्यासाठी पथके काम करत आहेत, अशी महत्त्वाची माहिती इंडिगोने दिली आहे. दरम्यान सर्व रद्दीकरणांसाठी पूर्ण परतफेड स्वयंचलितपणे मूळ पेमेंट पद्धतीवर केली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.याबाबत इंडिगोने द्विटरवर पोस्ट केली असून त्यामध्ये, इंडिगोने कबूल केले की अनेक प्रवाशांना रद्दीकरण, विमानतळांवर दीर्घ प्रतीक्षा वेळ आणि मर्यादित माहितीचा सामना करावा लागला. मात्र शनिवारपासून हळूहळू सुधारणा करण्यासाठी सर्व सिस्टम आणि वेळापत्रक रीबूट करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.We are sorry pic.twitter.com/8DmY2rJrjR— IndiGo (@IndiGo6E) December 5, 2025एअरलाइनकडून बाधित प्रवाशांसाठी उपाययोजना जाहीर सर्व रद्दीकरणांसाठी पूर्ण परतफेड स्वयंचलितपणे मूळ पेमेंट पद्धतीवर केली जाईल. ५ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान बुकिंगसाठी रद्दीकरण आणि रीशेड्युलिंग शुल्कावर पूर्ण माफी. प्रवाशांसाठी शहरांमधील हॉटेल रूम आणि वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. विमानतळांवर जेवण आणि नाश्ता दिला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी शक्य असेल तिथे लाउंज अक्सेसची व्यवस्था केली जात आहे.

फीड फीडबर्नर 6 Dec 2025 10:30 am

बाजारात जाते म्हणून गेली अन्….; जामखेड प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, नेमकं काय घडलं? कोण आहे संदिप गायकवाड?

Jamkhed case : जामखेडच्या खर्डा रस्त्यावर असलेल्या एका लॅाजमध्ये कला केंद्रात नर्तिका म्हणून काम करणाऱ्या एका महिलेचा मृत्यदेह आढळून आल्याने मोठी सर्वत्र खळबळ उडाली आहे. या महिलेने गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. दिपाली पाटील (वय ३५) असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणात राजकीय नेत्याचे नाव समोर आले आहे. भाजपचा माजी नगरसेवक संदीप […] The post बाजारात जाते म्हणून गेली अन्….; जामखेड प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, नेमकं काय घडलं? कोण आहे संदिप गायकवाड? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 9:51 am

Dhurandhar Box Office Collection: रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ची तुफानी सुरुवात; पहिल्याच दिवशी कमावले तब्बल ‘इतके’कोटी रुपये!

Dhurandhar Box Office Collection: रणवीर सिंहचा बहुप्रतिक्षित ‘धुरंधर’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे आणि रिलीज होताच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळूनही, प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चित्रपटाने दमदार ओपनिंग नोंदवली आहे. पहिल्या दिवसाची कमाई प्रभावी या शुक्रवारी ‘धुरंधर’सोबत इतर कोणताही मोठा चित्रपट रिलीज न झाल्याने रणवीरच्या चित्रपटाला मोठा फायदा मिळाला. ५ […] The post Dhurandhar Box Office Collection: रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ची तुफानी सुरुवात; पहिल्याच दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी रुपये! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 9:48 am

भारत-रशियामधील महत्त्वपूर्ण करारानंतर अमेरिकेत खळबळ! नवी नॅशनल सिक्योरिटी स्टॅटजी जारी करण्याचा राष्ट्राध्यक्षांचा निर्णय

अमेरिका: रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काल (५ डिसेंबर) महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा सुरूच ठेवणार असल्याची पुतिन यांनी मोठी घोषणा केली. पुतिन यांचा हा निर्णय अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.पुतिन यांच्या भारत दौऱ्यामध्ये भारत आणि रशियामध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले. ज्यामुळे आता रशिया आणि भारत यांच्यातील नाते अधिक मजबूत होण्याची शक्यता वाढली आहे. परंतु दुसरीकडे पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे अमेरिकेत मोठा भूकंप आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कारण, अमेरिका आपली नवी नॅशनल सिक्योरिटी स्टॅटजी जारी करणार असल्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे.https://prahaar.in/2025/12/06/the-cost-of-construction-of-drains-in-sai-sundar-nagar-and-kamgar-nagar-two-in-prabhadevi-has-increased/या नव्या धोरणामध्ये अमेरिकेने चीन आपला नंबर वनचा शत्रू असल्याचे म्हटले आहे. तर भारत हा आपला महत्त्वाचा भागीदार देश असल्याचे म्हटले आहे. रशियासंदर्भात देखील अमेरिकेने नरमाईचे धोरण ठेवल्याचे पहायला मिळत आहे. यासंदर्भात अमेरिकेकडून ३३ पानांचा एक रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये अमेरिकेने आता आपले नवे परराष्ट्र धोरण कसे असणार याबाबत स्पष्ट सांगितले आहे. अमेरिकेच्या या नव्या धोरणामुळे भारताला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे भारताची चीन आणि रशियासोबत जवळीक वाढली आहे. त्यानंतर आता अमेरिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अमेरिकेने आपल्या नव्या धोरणामध्ये चीनला आपला नंबर एकचा शत्रू असल्याचे म्हटले आहे. तर भारताला आपला महत्त्वाचा भागीदार देश असल्याचे म्हटल्याने चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला भारताकडून मदतीची अपेक्षा असल्याचे सुचित होते.

फीड फीडबर्नर 6 Dec 2025 9:30 am

प्रभादेवीतील साई सुंदर नगर आणि कामगार नगर दाेनमधील नाल्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

नाल्याच्या रुंदीकरण कामासाठी विकासकाची केली नियुक्तीमुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील प्रभादेवी येथील साई सुंदरनगर, कामगारनगर -२ व इतर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील अस्तित्वात असलेल्या पर्जन्य जलवाहिनीचे रुंदीकरण करून त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. या नाल्याच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येत असून महापालिकेने यासाठी विकासक असलेल्या स्कायलार्क बिल्डकाॅन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड केली आहे. या नाल्याचे रुंदीकरण करण्यासाठी तब्बल सुमारे ५० काेटी रुपये खर्च केले जाणार आहे.साई सुंदरनगर सहकारी गृहनिर्माण संस्था या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेस प्रथमतः १९९८ साली झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणामार्फत मंजूरी देण्यात आली होती. अंतिम भूभाग क्र १०७८ मधील एकूण १७२७४.२२ चौ.मी.एवढृया क्षेत्रावरील भूभागावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना मंजूर केली. ड्रेनेज आणि रस्त्याच्या संपूर्ण कामाचा खर्च ७५ टक्के महापालिका आणि २५ टक्के सोसायटी तथा विकासक या प्रमाणात वाटून घेतला जाईल आणि २५ टक्के महानगरपालिकेने ठरवल्याप्रमाणे महानगरपालिकेला आगाऊ ठेव म्हणून द्यावी असे निश्चित करण्यात आले हाेते. सन १९९८ साली मुळ मंजूर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये लगतच्या वेगवेगळ्या अनुक्रमे ९ गृहनिर्माण संस्था कालांतराने समाविष्ट करून मुळ झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे क्षेत्र वेळोवेळी वाढविण्यात आले आहे. अलीकडेच कामगार नगर-२ व माहिम नगर विकास योजना क्र.४ मधील अंतिम भूभाग क्र. १०७८ वरील शिव सम्राट गृहनिर्माण संस्था या योजनेमध्ये समाविष्ठ करण्यात आली आहे.https://prahaar.in/2025/12/06/money-from-the-east-and-west-expressway-access-control-project-has-been-diverted-for-road-cement-concrete-works/डॉ. ऍनी बेझंट रस्ता येथील सुमारे ८०० मी. लांबीच्या रस्त्याचे व नाल्याचे काम यात अंतर्भूत होते. राज्य शासनाच्या सन २००५ रोजीच्या अधिसूचनेमध्ये समाविष्ट असलेल्या नाल्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. तर नाल्याच्या कामासाठी एकूण खर्चाच्या ८४.२१ कोटीपैकी रुपयांपैंकी ६३.५५ कोटी रुपये एवढी रक्कम आजतागायत खर्च करण्यात आली आहे. दरम्यान, कामगार नगर-२ या झोपडपट्टीतील अस्तित्वातील नाला वळवून शिवडी वरळी उन्नत मार्गाच्या खांब क्र.८४ ते खांब क्र.८८ यांच्या रेषेत करण्याची विनंती एमएमआरडीएला एसआरएच्या अधिकारयांनी केली हाेती. त्यानुसार अस्तित्वातील नाला वळवतांना जुन्या नाल्याचे बांधकाम हे शिवडी वरळी उन्नत मार्गाच्या रेषेत करताना खांबाच्या पायाभोवती सुरक्षित अंतर ठेवून करण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता.नव्याने समाविष्ट कामगार नगर-२ मधील एसअाए प्रकल्पामध्ये सुमारे २००० झोपड्या बाधित असून त्यांना नवीन इमारतीमध्ये त्यांना सामावून घ्यायचे आहे. या झोपडी धारकांनी अस्तित्वात असलेल्या नाल्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नाल्याची देखभाल आणि नाल्यातील गाळ काढणे शक्य होत नाही. तसेच नाला धोकादायक स्थितीत असल्याने त्याची दुरुस्ती व पुर्नबांधणी करणे आवश्यक आहे. हा नाला हिंदमाता मार्केट व दादर पुर्वेकडील पावसाळी पाण्याचा विसर्ग होण्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे या नाल्यावरील अतिक्रमण हटवून त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी महापालिकेने संबंधित विकासकाचीच निवड करून त्यांच्या मार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. या नाल्याच्या रुंदीकरणासाठी सुमारे ४९.३५ काेटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

फीड फीडबर्नर 6 Dec 2025 9:10 am

Samantha Ruth Prabhu: लग्नानंतर केवळ चार दिवसांत समंथा पुन्हा कामावर हजर; हातावरची मेहंदी अद्याप ताजी

Samantha Ruth Prabhu: दक्षिण भारतीय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि चित्रपट निर्माते राज निदिमोरू यांच्या विवाहाची चर्चा सध्या सर्वत्र रंगलेली आहे. दोघांचे एक डिसेंबरला लग्न झाले असून, अवघ्या चार दिवसांत सामंथा पुन्हा शूटिंगसाठी सज्ज झाल्याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावर दिली आहे. कामावर परतली समंथा शुक्रवारी समंथाने इंस्टाग्राम स्टोरीवरून आपल्या पुनरागमनाची माहिती दिली. शेअर केलेल्या […] The post Samantha Ruth Prabhu: लग्नानंतर केवळ चार दिवसांत समंथा पुन्हा कामावर हजर; हातावरची मेहंदी अद्याप ताजी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 8:58 am

'फ्लाइंग क्रेमलिन'मधून रशियाला परतलेल्या पुतिन यांचे लक्झरीचे किस्से:काळ्या समुद्रकिनारी आणि जंगलांच्या मध्ये गुप्त राजवाडा, घोडेस्वारीसारखे छंद

भारताच्या दौऱ्यावर पुतिन यांची 'ऑरस सीनेट' कार चर्चेत होती. ही जगातील सर्वात महागडी कार मानली जाते. जी बुलेट, ग्रेनेडसोबत रासायनिक हल्लाही सहन करू शकते. यात प्रीमियम लेदर-वुड इंटीरियर, मसाज सीट, मल्टिपल स्क्रीन आणि फ्रिज कंपार्टमेंट यांसारख्या लक्झरी सुविधा आहेत. 5 डिसेंबरच्या रात्री ते त्यांच्या 'फ्लाइंग क्रेमलिन' विमानातून रशियाला परतले. एक्सप्लेनरमध्ये पुतिन यांच्या लक्झरी-सिक्रेट आयुष्याची रंजक कहाणी… क्रेमलिनच्या अधिकृत कागदपत्रांनुसार, पुतिन यांचा वार्षिक पगार 1 लाख 40 हजार डॉलर आहे, म्हणजेच सुमारे 1 कोटी 26 लाख भारतीय रुपये. पुतिन यांच्याकडे 800 स्क्वेअर फूटचे अपार्टमेंट आणि तीन कार आहेत. हा तो अधिकृत डेटा आहे जो त्यांनी सार्वजनिक केला आहे. तरीही, काही तज्ञांचे मत आहे की पुतिन जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रपती आहेत. अमेरिकन वंशाचे ब्रिटिश फायनान्सर आणि प्रसिद्ध राजकीय कार्यकर्ते बिल ब्राउनर यांच्या मते, पुतिन यांची एकूण संपत्ती 200 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 18 लाख कोटी रुपयांपर्यंत असू शकते. ब्राउनर हे पूर्वी रशियातील सर्वात मोठे परदेशी गुंतवणूकदार होते. त्यांनी 2017 मध्ये सांगितले की पुतिन यांनी ही संपत्ती तेव्हा जमा करण्यास सुरुवात केली, जेव्हा रशियन ओलिगार्क मिखाईल खोदोरकोव्स्की यांना 2003 मध्ये फसवणूक आणि करचोरीच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्यात आले. पुतिन यांचे अधिकृत निवासस्थान मॉस्कोमधील ग्रँड क्रेमलिन पॅलेस आहे, ज्याला रशियन सत्तेचे प्रतीक मानले जाते. 1990 च्या दशकात या पॅलेसचे नूतनीकरण करण्यात आले होते, ज्यावर त्यावेळी सुमारे 1 अब्ज डॉलर म्हणजेच 8 हजार कोटी रुपये खर्च झाले होते. ग्रँड क्रेमलिन पॅलेस सुमारे 25,000 चौरस मीटरमध्ये पसरलेला आहे आणि त्यात 700 हून अधिक खोल्या आहेत. या पॅलेसचे आतील भाग सोने आणि महागड्या क्रिस्टल्सने सजवले आहे, ज्यांचे वजन अनेक टन आहे. त्यात 5 शाही हॉल आहेत, त्यापैकी सेंट अँड्र्यू हॉल सर्वात आलिशान मानला जातो. या हॉलमध्ये सोन्याची तीन शाही सिंहासने ठेवलेली आहेत. या पॅलेसच्या खाली आणि भिंतींच्या आत सोव्हिएत काळातील सुरक्षित बंकर आणि बोगदे आहेत, जे याला जगातील सर्वात सुरक्षित इमारतींपैकी एक बनवतात. याशिवाय, पुतिनचे अनेक गुप्त पॅलेस देखील आहेत. ब्लॅक सीच्या किनाऱ्यावर असलेला गुप्त ‘पुतिन पॅलेस’ रशियाचे विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांनी २०२१ साली एक व्हिडिओ जारी करून दावा केला की, ब्लॅक सीच्या किनाऱ्यावर असलेला पुतिनचा जेलेंडझिक येथील गुप्त पॅलेस मोनाको देशापेक्षा ३९ पट मोठा आहे. मोनाकोचे क्षेत्रफळ २ चौरस किमी आहे आणि पुतिनच्या गुप्त पॅलेसचे क्षेत्रफळ सुमारे ७७-७८ चौरस किमी असू शकते. तेव्हा विरोधी पक्षनेत्याने म्हटले होते की, हे भ्रष्टाचारातून बनवले आहे. मात्र, तेव्हा पुतिन यांनी तो व्हिडिओ आणि अलेक्सी नवलनी यांचा दावाही फेटाळून लावला होता. नंतर नवलनी यांना तुरुंगवास झाला आणि २०२४ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. नवलनी यांच्या मते या पॅलेसची किंमत सुमारे 1.35 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 11 हजार कोटी रुपये आहे. पूर्णपणे इटालियन शैलीत बांधलेला हा महल लक्झरी वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो. या पॅलेस परिसरात स्वीमिंग पूल, हुक्का बार किंवा स्ट्रिप क्लब, कॅसिनो, थिएटर, आइस पॅलेस यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. पॅलेसचे आतील भाग इटालियन ब्रँड्सच्या फर्निचरने सजवण्यात आले आहे. अहवालानुसार, या गुप्त राजवाड्याखाली 16 मजली भूमिगत बांधकाम आहे. ज्याला गुहा म्हणतात. पुतिन पॅलेस हा नो-फ्लाय झोन आहे, जिथे कोणत्याही विमानाला उडण्याची परवानगी नाही. राजवाड्याभोवती सुमारे 7,000 हेक्टरचा सुरक्षा बफर झोन आहे, ज्यावर रशियाची फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (FSB) नियंत्रण ठेवते. राजवाड्याखालून अनेक बोगदेही आहेत जे वेगवेगळ्या दिशांना उघडतात. चारही बाजूंनी उंच भिंतींनी वेढलेले नोवो-ओगार्योवो- 'द रियल होम' पुतिन ज्या घरात सर्वाधिक राहतात ते मॉस्कोच्या बाहेरील 'रुब्लियोव्का' येथे असलेले नोवो-ओगार्योवो आहे. पुतिन 2000 सालापासून येथे राहत आहेत. त्यांनी क्रेमलिन कार्यालयात जाण्याऐवजी ही जागा निवडली, जेणेकरून रस्त्यातील वाहतूक कोंडी टाळता येईल. तसे तर हे आलिशान घर 1950 मध्येच बांधले गेले होते, परंतु पुतिन यांच्यासाठी ते पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आले. इंग्लिश गॉथिक शैलीत बांधलेले हे आलिशान घर त्याच्या सुविधांसाठीही खूप प्रसिद्ध आहे. नोवो-ओगार्योवोमध्ये एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, ज्यात एक मोठा स्विमिंग पूल, जिम आणि घोड्यांचा तबेला आहे. येथे पुतिनचे आवडते घोडे राहतात. या घराच्या आत एक छोटे चर्च देखील आहे. याव्यतिरिक्त, अधिकृत भेटींसाठी 'रिसेप्शन हाऊस', सिनेमा हॉल, हेलिपॅड आणि गुप्त बंकर देखील उपलब्ध आहे. रशियाच्या इंडिपेंडेंट इन्वेस्टिगेटिव्ह मीडिया आउटलेटनुसार, पुतिनच्या नोवो-ओगार्योवो ऑफिसप्रमाणेच इतर पॅलेसमध्येही हुबेहूब ऑफिस बनवण्यात आले आहेत. जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत शत्रूला गोंधळात टाकता येईल. जंगलात बनलेला पुतिनचा सर्वात सुरक्षित फॉरेस्ट पॅलेस पुतिनचे एक ठिकाण मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गच्या मध्ये घनदाट जंगल आणि तलावाच्या मध्येही आहे. याला फॉरेस्ट पॅलेस म्हटले जाते. पुतिन येथे जाण्यासाठी विमान किंवा कारऐवजी गुप्त चिलखती ट्रेनचा वापर करतात. डोजियर सेंटरच्या अहवालानुसार, या पॅलेसजवळ एक गुप्त रेल्वे स्टेशन देखील आहे, जे सामान्य नागरिकांसाठी नाही. हे स्टेशन चारही बाजूंनी उंच कुंपण आणि सुरक्षा रक्षकांनी वेढलेले आहे. या घरात रेसिंग ट्रॅक, मोठे खेळाचे मैदान, स्विमिंग पूल, मड बाथ आणि क्लिनिक देखील उपलब्ध आहे. असे मानले जाते की पुतिनची मुलेही इथेच राहतात. पुतिन यांना मार्शल आर्टमध्ये सर्वाधिक रुची आहे- विशेषतः ज्युडो आणि सांबोमध्ये. वयाच्या 11 व्या वर्षीच त्यांनी ज्युडोचे प्रशिक्षण सुरू केले होते. 1975 मध्ये त्यांनी कायद्याच्या अभ्यासासाठी 'लेनिनग्राद स्टेट युनिव्हर्सिटी'मध्ये प्रवेश घेतला. या काळात पुतिन ज्युडोमध्ये लेनिनग्रादचे चॅम्पियन बनले. 1978 मध्ये त्यांना 'मास्टर ऑफ स्पोर्ट्स' हा किताब मिळाला. त्यांनी ज्युडोवर एक पुस्तकही लिहिले, ज्याचे नाव आहे- ज्युडो: हिस्ट्री, थिअरी, प्रॅक्टिस. पुतिन या पुस्तकाचे सह-लेखक आहेत. याशिवाय, त्यांनी ज्युडोवर अनेक व्हिडिओ देखील बनवले आहेत. जुडोच्या प्रशिक्षणाबद्दल, पुतिनचे जवळचे मित्र आणि प्रशिक्षक इजिओ गाम्बा म्हणतात- ‘पुतिन असे प्रशिक्षण घेतात जसे एखादे मूल लेगो (ब्लॉक्सने खेळला जाणारा क्रिएटिव्ह गेम) खेळत असेल. पुतिन अत्यंत गांभीर्याने जुडो खेळत असत.’ आजही पुतिन फिटनेससाठी जुडो खेळतात. दिग्दर्शक ऑलिव्हर स्टोनच्या 'द पुतिन इंटरव्यूज' या माहितीपटात असे सांगितले आहे की ते आठवड्यातून सातही दिवस व्यायाम करतात. ते आधी जिममध्ये जातात, नंतर पोहतात. हिवाळ्यात पुतिन अल्पाइन स्कीइंग करतात. पुतिन याला सक्रिय राहण्याचा आणि फिटनेस राखण्याचा उत्तम मार्ग सांगतात. 60 वर्षांच्या वयात पुतिन पहिल्यांदा स्केट्सवर चढले. एका मुलाखतीत याची आठवण करून देताना पुतिन म्हणतात- मी आधीच एक म्हातारा काका होतो. खरं सांगायचं तर, मला वाटलं की त्यांना लगेच फेकून द्यावं. कारण स्केट्स थांबवणे कठीण होत होते, मी थेट काठावर आदळत होतो. नंतर हॉकी खेळाडू अलेक्सी कसातोनोव यांनी पुतिन यांना प्रशिक्षण दिले, त्यानंतर ते नियमितपणे आइस-हॉकी खेळू लागले. ते कधी नाईट हॉकी लीगच्या सामन्यांमध्ये खेळत, तर कधी सुरक्षा सेवा (FSO) च्या कर्मचाऱ्यांसोबत. पुतिन यांनी अनेकदा गाला आइस हॉकीचे सामने खेळले आहेत आणि अनेक गोलही केले आहेत. एका सामन्यात त्यांनी 8 गोल केले होते. 2016 मध्ये एका आइस हॉकी सामन्यादरम्यान पुतिन घसरून पडले होते. हा सामना रशियाच्या नाईट हॉकी लीगच्या गालामध्ये झाला होता. आइस हॉकी सामन्यावर पुतिन म्हणतात- एका सामन्यात माझे 1.5-2 किलो वजन कमी होते. हा खूप तणावपूर्ण खेळ आहे. पुतिन यांना साहसी खेळांचीही आवड आहे. त्यांनी अनेकदा नद्यांमध्ये राफ्टिंग केले आहे आणि स्वतःला फॉर्म्युला-1 ड्रायव्हर म्हणूनही आजमावले आहे. पुतिन यांनी अनेकदा 240 किमी/तास वेगाने रेसिंग कार चालवली आहे. ते बाथिस्काफ म्हणजे लहान पाणबुडीसारख्या मशीनमध्ये बसून बैकाल सरोवराच्या खोलवरही उतरले आहेत. अनेकदा ते टीयू-160 आणि टीयू-160एम सारख्या लष्करी बॉम्बर्सच्या कॉकपिटमध्ये बसून उड्डाण केले आहे, जिथे फक्त व्यावसायिक पायलट बसतात. 2009 मध्ये असे म्हटले जाऊ लागले की पुतिन आता वृद्ध आणि कमकुवत झाले आहेत. त्यांना राजकीयदृष्ट्या थकल्यासारखे वाटत होते. पण त्याच वेळी ऑगस्ट 2009 मध्ये पुतिनचे काही फोटो समोर आले, ज्यात ते दक्षिण सायबेरियातील तुवा प्रदेशात शर्टशिवाय घोडेस्वारी करताना, मासे पकडताना आणि पोहताना दिसले. मॉस्को टाइम्सनुसार, या फोटोंद्वारे पाश्चात्त्य देशांच्या नेत्यांना हे दाखवण्यात आले की पुतिन मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. हा फोटो जगभरात खूप व्हायरल झाला. 2017 मध्येही पुतिन ब्लागोवेशचेन्स्कला जात असताना अचानक दक्षिण सायबेरियामध्ये थांबले होते. याला रोमांचकारी सांगत पुतिन म्हणतात - मी दुर्गम तैगामध्ये गेलो, डोंगराळ तलावांमध्ये मासे पकडले, उन्हात झोपलो, डोंगराळ नद्या आणि वेगाने वाहणाऱ्या प्रवाहातून खाली उतरलो, कालव्यांमध्ये मोटरबोट आणि राफ्ट चालवले, हायकिंग केली आणि एटीव्ही चालवत डोंगरांमधून फिरलो. यानंतरही पुतिन अनेकदा सायबेरियाला येत राहिले. याशिवाय पुतिन अनेकदा बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्यासोबत वलामलाही जातात. वलाम मठाला पुतिन 'रशियाचा आरसा' म्हणतात, एक असे ठिकाण जिथे त्यांना आध्यात्मिक शांती मिळते. पुतिन यांना पुस्तकांचाही छंद आहे. ते सांगतात की त्यांनी तरुण वयात जॅक लंडन, जूल्स वर्न आणि अर्नेस्ट हेमिंग्वे यांसारख्या लेखकांची पुस्तके वाचली. पुतिन रशियन, जर्मन आणि इंग्रजी भाषा जाणतात. त्यांचे प्रेस सेक्रेटरी दिमित्री पेस्कोव सांगतात की, या भाषांमध्ये स्वतःला उत्कृष्ट ठेवण्यासाठी पुतिन जर्मन आणि इंग्रजी टीव्ही चॅनेल्स पाहतात आणि वर्तमानपत्रे वाचतात. त्यांच्या बेडसाइड टेबलवर अनेकदा इतिहासाची पुस्तके आणि संस्मरणे ठेवलेली असतात. काल्पनिक साहित्यात त्यांचे आवडते लेखक रशियन साहित्यिक लेर्मोनतोव आहेत. याशिवाय, पुतिन यांना लहानपणापासूनच रुडयार्ड किपलिंग देखील आवडतात. अनेकदा ते राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थिती समजावून सांगण्यासाठी किपलिंगच्या पात्रांची - जसे की शेर खानचे उदाहरण देतात. पुतिन रशियन, जर्मन आणि इंग्रजी भाषा बोलतात. त्यांचे प्रेस सेक्रेटरी दिमित्री पेस्कोव सांगतात- जर्मन आणि इंग्रजी भाषेवर पकड कायम ठेवण्यासाठी ते जर्मन आणि इंग्रजी टीव्ही चॅनेल्स पाहतात. आठवड्यातून अनेकदा ते इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात. असे ते यासाठी करतात कारण त्यांना आपला शब्दसंग्रह कमी होऊ द्यायचा नाही. खाण्यात पुतिन यांना सेंद्रिय आणि पारंपरिक रशियन जेवण आवडते. मासे हे त्यांचे सर्वात आवडते अन्न आहे. त्यांना कमी साखरेची आईस्क्रीम खाणेही आवडते. पुतिन आपल्या फिटनेसवर खूप लक्ष देतात.. त्यामुळे ते अनेक प्रकारचे सॅलडही खातात. याशिवाय रशियाचे राष्ट्रपती कधीकधी स्वयंपाकही करतात. 2018 मध्ये एका मीडिया फोरममध्ये त्यांनी सांगितले की, 'मी सॅलड बनवतो, ते खूप चविष्ट बनते.' एकदा पुतिन यांनी गुप्त मॅरीनेटमध्ये बनवलेले रशियन कबाब तयार केले होते, ज्याची प्रशंसा तुवा प्रजासत्ताकाचे माजी प्रमुख, शोल्बान कारा-ओल यांनी केली होती.

दिव्यमराठी भास्कर 6 Dec 2025 8:57 am

Khalapur : खोपोलीत कडेकोट बंदोबस्त; महा-युतीतील दोन्ही गट समोरासमोर

खालापूर – खोपोली नगरपरिषद निवडणुकीत महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे दोन्ही गट समोरासमोर उभे ठाकले होते. एका बाजूला आमदार महेंद्र थोरवे तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने स्पर्धा चुरशीची ठरली. मतदान दिवशी काही इव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, काही प्रभागांमध्ये वातावरण खेळीमेळीचे राहिले, […] The post Khalapur : खोपोलीत कडेकोट बंदोबस्त; महा-युतीतील दोन्ही गट समोरासमोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 8:49 am

Vadgaon Maval : मतदान मशीन स्ट्रॉंग रूमवर पोलिसांचा जागता पहारा

वडगाव मावळ – राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचे मतदान २ डिसेंबरला पार पडल्या. परंतू मतमोजणी ३ डिसेंबरऐवजी तब्बल २० दिवसांनी म्हणजे २१ डिसेंबरला घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यामुळे स्थानिक राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. मतमोजणी लांबणीवर गेल्याने उमेदवार, त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांची धडधड आणखी वाढली असून सर्वांचे लक्ष स्ट्रॉंग रूमकडे खिळले आहे. […] The post Vadgaon Maval : मतदान मशीन स्ट्रॉंग रूमवर पोलिसांचा जागता पहारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 8:47 am

Pimpri : आमदार महेश लांडगे यांची हिवाळी अधिवेशनासाठी तयारी; १५ मुद्यांवर लक्ष वेधणार

पिंपरी – सोमवारपासून सुरु होत असलेल्‍या हिवाळी अधिवेशनात शहरातील नागरिकांच्‍या सुविधांसाठी विविध १५ मुद्दे मांडणार असल्‍याची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. आमदार लांडगे यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांना गती देण्यासाठी भाजपा महायुती सरकारने प्राधान्य दिले. त्यामुळे सरसकट शास्तीकर माफीपासून आंद्रा- भामा आसखेड सारखी जलसंजीवनी देणारी योजनापर्यंत पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्कांना न्याय मिळाला […] The post Pimpri : आमदार महेश लांडगे यांची हिवाळी अधिवेशनासाठी तयारी; १५ मुद्यांवर लक्ष वेधणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 8:41 am

Pimpri: अधिवेशनात मांडणार विविध लक्षवेधींसह 48 तारांकित प्रश्न –आमदार शंकर जगताप

पिंपरी – राज्याचे हिवाळी अधिवेशन येत्या 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. अधिवेशनात मांडणार विविध लक्षवेधींसह 48 तारांकित प्रश्न मांडणार असल्‍याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. यात प्रामुख्याने विविध कंपन्यांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सेफ्टी ऑडिट, पवना नदी सुधार प्रकल्प, अप्रशिक्षित वाहन चालकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सक्षम प्रशिक्षण प्रणाली उभारणे, उद्योग नगरीतील […] The post Pimpri: अधिवेशनात मांडणार विविध लक्षवेधींसह 48 तारांकित प्रश्न – आमदार शंकर जगताप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 8:37 am

ज्ञानाच्या अथांग महासागरास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन... भाषणाची सुरुवात करताना लक्षात ठेवा 'हे'मुद्दे

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६९वा महापरिनिर्वाण दिन आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक वैचारीक आणि बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांदरम्यान बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण केले जाते. तुम्हाला सुद्धा बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घ्यायचा असेल तर काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील मुद्द्यांच्या अनुसार भाषण केल्यास तुमच्या भाषणाचे महत्त्व वाढेल.भाषणाचे १० प्रमुख मुद्दे1. अभिवादन आणि दिवसाचे महत्त्व: महापरिनिर्वाण दिनाचे स्मरण आणि डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन2. बालपण आणि संघर्ष: बाबासाहेबांच्या लहानपणी आलेला जातीय भेदभावाचा अनुभव3. शिक्षणाचे महत्त्व: शिक्षण हेच प्रगतीचे साधन मानून त्यांनी घेतलेले उच्च शिक्षण4. राज्यघटनेचे शिल्पकार: भारताची राज्यघटना लिहिण्यात त्यांचे सर्वात मोठे योगदान5. समानतेचा संदेश: समाजात समानता, न्याय आणि बंधुता आणण्यासाठी केलेले कार्य6. दलित आणि महिलांसाठी कार्य: समाजातील दुर्बळ घटकांना आणि महिलांना अधिकार मिळवून देण्यासाठी दिलेला लढा7. शिकण्याची प्रेरणा: त्यांच्या जीवनातून कठोर परिश्रम, जिद्द आणि ज्ञानाची आवड आत्मसात करण्याची प्रेरणा8. धर्म आणि तत्त्वज्ञान: त्यांनी स्वीकारलेला बौद्ध धर्म आणि त्यांचे 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हे विचार9. आधुनिक भारताचे निर्माते: आधुनिक आणि प्रगतीशील भारत घडवण्यात त्यांचे मोलाचे योगदान10. कृतज्ञता आणि संकल्प: त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे विचार पुढे नेण्याचा संकल्प करणेभाषणाचा विस्तारनमस्कार,आज ६ डिसेंबर, भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक दिवस. आज आपण भारतीय घटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक, ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण एकत्र जमलो आहोत. या महान नेत्याला मी विनम्र अभिवादन करतो/करते.मित्रांनो, बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन म्हणजे संघर्ष आणि प्रेरणा यांची एक अनोखी गाथा आहे. त्यांचे बालपण खूप खडतर होते. त्यांना लहान असतानाच समाजात असलेल्या जातीय भेदभावाचा आणि अस्पृश्यतेचा अनुभव आला. पण बाबासाहेब या संकटांसमोर झुकले नाहीत. त्यांनी ठरवले की, या अन्यायावर मात करण्यासाठी शिक्षण हेच सर्वात मोठे शस्त्र आहे.त्यांनी खूप कष्ट घेऊन शिक्षण घेतले. ते कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससारख्या जगातल्या मोठ्या विद्यापीठांमध्ये शिकले. त्यांच्यासारखे प्रचंड ज्ञान असलेले व्यक्ती जगात फार कमी होते.‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा त्यांचा संदेश होता. त्यांनी आपल्याला शिकवले की, ज्ञान मिळवल्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही.डॉ. आंबेडकरांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी आपल्याला दिलेली भारतीय राज्यघटना! ही केवळ एक कायद्याची पोथी नाही, तर ती आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता शिकवणारी एक पवित्र गोष्ट आहे. या घटनेमुळेच आज आपल्याला अनेक अधिकार मिळाले आहेत आणि प्रत्येक भारतीयाला समान मानले जाते.बाबासाहेबांनी समाजातील गरीब, दलित आणि विशेषतः महिलांसाठी खूप मोठे काम केले. त्यांना समाजात मान मिळावा, हक्क मिळावेत यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. ते फक्त एका समाजाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण देशाचे, न्यायाचे आणि समानतेचे प्रतीक होते.आज या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी: बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. ते स्वप्न आहे, समानता आणि बंधुता असलेल्या भारताचे. त्यांच्या जीवनातून आपण कठोर परिश्रम करण्याची, सतत शिकत राहण्याची आणि सत्यासाठी लढण्याची प्रेरणा घेतली पाहिजे.चला, आज आपण सर्वजण मिळून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांच्या विचारांवर चालण्याचा, तसेच एक सुजाण आणि समतावादी नागरिक बनण्याचा संकल्प करूया.जय भीम! जय हिंद!

फीड फीडबर्नर 6 Dec 2025 8:30 am

पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्ग प्रवेश नियंत्रण प्रकल्पाचा पैसा वळवला रस्ते सिमेंट काँक्रिट कामांसाठी

रस्त्याचा निधी कमी पडल्याने तब्बल २५० कोटी रुपये करावे लागले वळतेमुंबई (विशेष प्रतिनिधी):मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या रस्ते कामांसाठी तरतूद केलेला निधी आता कमी पडू लागला असून या रस्ते कामांचे बिले देण्यासाठी पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या प्रवेश नियंत्रण प्रकल्पासाठी तरतूद केलेला निधी वळता करण्याची वेळ आली आहे. रस्ते कामांची बिले देण्यासाठी तब्बल २५० काेटी रुपये अन्य वळते करण्यात आले आहेत.मुंबई महापालिकेच्यावतीने टप्पा एक आणि टप्पा दाेन अंतर्गत तब्बल ८०० किलाेमीटर लांबीची कामे हाती घेतली आहे. यातील अर्धवट कामे ही ०१ ऑक्टाेबर २०२५नंतर टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात आली आहे़ ही अर्धवट कामे पूर्णत्वास येणार असल्याने तसेच चालू आर्थिक वर्षांत पूर्ण होणार आहे. यासाठी मार्च २०२६ पर्यंत पुरेसा निधी नसल्याने महापालिकेने रस्ते कामांसाठी तरतूद केलेला निधी संपत आल्याने अन्य कामांसाठी केले निधी वळता करण्याचा निर्णय घेतला आहे.https://prahaar.in/2025/12/06/additional-commissioner-dr-dhakne-has-the-responsibility-of-the-property-department-as-well-as-the-environment/शहर भागातील कामांसाठी मुख्य रस्ते आणि संगमस्थानाच्या विकासासाठी एका सांकेतांकमध्ये ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती, त्यातील सुमारे ३२६ कोटी रुपये आणि दुसऱ्या सांकेतांकमध्ये ३३३.६० कोटी रुपयांची तरतूद केली होती, त्यातून १९१.१३ कोटी रुपयांचा निधी वापरला गेला आहे. परंतु रस्ते कामे पूर्ण होणार असल्याने भविष्यात रस्ते कामांची बिले देण्यासाठी दुसऱ्या खात्यातून पैसे वळवण्यात येत आहे. पूर्व आणि पश्चिम महामार्गावरील प्रवेश नियंत्रण प्रकल्पासाठी ४४२ कोटी रुपयांची ठोक तरतूद केली होती. परंतु आजमितीस ४३९.०७ कोटी एवढा निधी उपलब्ध आहे. त्यामुळे या उपलब्ध निधीतून ५० कोटी रुपये आणि २०० कोटी रुपये अशाप्रकारे एकूण २५० कोटी रुपये वळते करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पूर्व आणि पश्चिम महामार्गावरील प्रवेश नियंत्रण प्रकल्पाचे काम चालू आर्थिक वर्षात होणार नसल्याने तसेच त्यासाठीचा निधी वाया जाणार असल्याने हा पैसा रस्ते सिमेंट काँक्रिट कामांसाठी वळता करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

फीड फीडबर्नर 6 Dec 2025 8:30 am

Pune District : निकालाच्या दीर्घ प्रतीक्षेमुळे उमेदवारांमध्ये धाकधूक

भोर :भोर नगरपालिकेसाठी २ डिसेंबरला मतदान झाले असून मतमोजणी दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला होणार होती. परंतु अचानक उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मतमोजणी १९ दिवस पुढे ढकलल्याने निकालासाठी उमेदवारांना दीर्घ कालावधीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या प्रदीर्घ काळात उमेदवारांना चिंतेत राहावे लागणार आहे. उमेदवारांना एक एक दिवस मोठा वाटत असून या प्रदीर्घ कालावधीत उमेदवारांबरोबरच कार्यकर्त्यांनाही […] The post Pune District : निकालाच्या दीर्घ प्रतीक्षेमुळे उमेदवारांमध्ये धाकधूक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 8:30 am

Pune : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचा मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

पुणे – शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक केल्याच्या निर्णयाविरोधात शुक्रवारी हजारोंच्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुणे जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. शासनाने टीईटी परीक्षा बंधनकारक करण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी हालचाली न केल्यास ९ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान आणि त्यानंतर सहकुटुंब मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्याबाबतचा शासनाला इशाराही देण्यात आला […] The post Pune : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचा मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 8:29 am

Pune District : इव्हीएमच्या स्ट्रॉंग रूमला कडेकोट बंदोबस्त

भोर : भोर शहरातील मतदान केंद्रावर मतदान झाल्यानंतर इव्हीएम मशीन भोर शहराच्या दक्षिण बाजूस असणाऱ्या सरदार कान्होजी जेधे शासकीय प्रशिक्षण संस्थेच्या गोदामात स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवल्या आहेत. या मशीनमध्ये उमेदवारांचे भविष्य बंद अवस्थेत आहे. या मशीनच्या सुरक्षेची जबाबदारी भोर पोलिसांवर आहे. या ठिकाणी दिवस रात्र जागता पहारा ठेवण्यासाठी १६ पोलीस कर्मचारी व सीआरएफचे जवान तैनात करण्यात […] The post Pune District : इव्हीएमच्या स्ट्रॉंग रूमला कडेकोट बंदोबस्त appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 8:26 am

Pune District : वाघोलीकरांसाठी 50 टाक्यांमधून पाण्याची साठवणूक; पुणे महानगरपालिकेचा उपक्रम

वाघोली : पुणे महानगरपालिके च्या माध्यमातून शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी वाघोलीचे माजी उपसरपंच शांताराम कटके यांच्या पाठपुराव्याला यश आले असून वाघोली मध्ये दोन हजार लिटर क्षमतेच्या एकूण 30 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या विविध ठिकाणी बसवण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. वाघोलीमध्ये यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून 20 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या होत्या त्याबाबत नागरिक […] The post Pune District : वाघोलीकरांसाठी 50 टाक्यांमधून पाण्याची साठवणूक; पुणे महानगरपालिकेचा उपक्रम appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 8:22 am

Pune District : सोरतापवाडी गणातील निवडणूक रंगतदार

सोरतापवाडी : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका 2025 च्या शेवटी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले असून हवेली तालुक्यातील सोरतापवाडी गणात मागासवर्ग प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. या गणात मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्यात होण्याची शक्यता […] The post Pune District : सोरतापवाडी गणातील निवडणूक रंगतदार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 8:18 am

आठ दिवसांत मतदान केंद्रे अंतिम करा; अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचे आदेश

पुणे– राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणूक तयारीचा आढावा गुरुवारी घेण्यात आला. त्यानंतर महापालिकेत निवडणुकीसाठीच्या हालचालींना वेग आला असून, आठ दिवसांच्या आत मतदान केंद्रे अंतिम करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार निवडणूक विभागाकडून उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत मतदान केंद्रे तातडीने अंतिम करण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त […] The post आठ दिवसांत मतदान केंद्रे अंतिम करा; अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचे आदेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 8:16 am

Pune District : निवडणुका लांबत चालल्याने इच्छुकांचा हिरमोड

लोणीकंद : लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून इच्छूक उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी काशी-अयोध्ये सह बाळूमामा, कोल्हापूर, अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर आणि तिरुपती बालाजीच्या देवदर्शनचे नियोजन केल्याने इच्छूकांसह या गटाची जिल्हाभर चर्चा रंगली आहे. प्रमुख एकही पक्षाने उमेदवारी जाहीर केली नसली तरी इच्छुकांमध्ये आपणच उमेदवार असल्याचे गृहीत […] The post Pune District : निवडणुका लांबत चालल्याने इच्छुकांचा हिरमोड appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 8:14 am

Pune District : सततच्या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण?

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान वारंवार अपघात होत आहेत. या अपघातात अनेक जीव जात आहेत तर काही प्रवासी गंभीर जखमी होत आहेत. या अपघातांना कारणीभूत ठरणार्‍या रस्त्यांवरील धोक्यांकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. ही वाहतूक कोंडी हा खूपच ज्वलंत प्रश्न आहे. या प्रश्नावर मात करण्यासाठी उपाययोजनांची जबाबदारी पुणे […] The post Pune District : सततच्या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 8:11 am

पुतिन यांच्या भारत भेटीमुळे काय बदलले:तेल पुरवठ्याची हमी यासह 19 करार, फायटर जेट आणि संरक्षण कराराची घोषणा नाही

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आपला 27 तासांचा भारत दौरा पूर्ण करून परतले आहेत. त्यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा केली आणि बिझनेस फोरमला संबोधित केले. यावेळी भारत-रशिया दरम्यान कोणत्याही मोठ्या कराराची घोषणा झाली नाही. यापूर्वी अहवालात दावा केला जात होता की दोन्ही देशांमध्ये SU-57 फायटर जेट आणि S-400 डिफेन्स सिस्टिमबाबत करार होऊ शकतो. तथापि, दोन्ही देशांमध्ये तेल पुरवठ्याच्या हमीसह 19 करारांवर सहमती झाली. यात अनेक महत्त्वाचे करारही समाविष्ट आहेत. पुतिन यांच्या भारत दौऱ्यातील महत्त्वाचे करार 1. मनुष्यबळ गतिशीलता भारत आणि रशियाने मनुष्यबळ गतिशीलता (Manpower Mobility) करार केला आहे. यामुळे दोन्ही देशांचे नागरिक तात्पुरत्या स्वरूपात एकमेकांच्या देशात काम करू शकतील. जर एखाद्या भारतीयाला रशियामध्ये किंवा एखाद्या रशियन नागरिकाला भारतात काम करायचे असेल, तर ते आता अधिक सोपे होईल. तसेच, बेकायदेशीर ये-जा करण्यावर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येईल. 2. आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षण भारत आणि रशियाच्या आरोग्य मंत्रालयांमध्ये आरोग्य सेवा, वैद्यकीय संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये सहकार्याचा करार झाला आहे. हा करार तीन मोठ्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. 3. अन्न सुरक्षा आणि मानके- हा करार भारताच्या FSSAI आणि रशियाच्या ग्राहक संरक्षण एजन्सी यांच्यात झाला आहे. भारत आणि रशिया दोन्ही देशांतील लोकांना सुरक्षित आणि चांगल्या दर्जाचे अन्न मिळावे यासाठी एकत्र काम करतील. कोणतेही खाद्य उत्पादन एका देशातून दुसऱ्या देशात गेल्यास, त्याची गुणवत्ता सुनिश्चित केली जाईल. 4. जहाज बांधणी भारत आणि रशियाने शिपिंग, बंदरे, जहाज बांधणी आणि आर्कटिक सहकार्य मजबूत करण्यासाठी एक नवीन करार केला आहे. 5. खत करार भारत आणि रशियाच्या मोठ्या खत कंपन्यांमध्ये एक महत्त्वाचा करार झाला आहे. यात रशियाची उरलकेम (UralChem) आणि भारताची राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCF), नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) आणि इंडियन पोटॅश लिमिटेड (IPL) यांचा समावेश आहे. या कराराचा उद्देश भारतातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध करून देणे हा आहे. करारानुसार, रशियाची उरलकेम भारताला मोठ्या प्रमाणात युरिया, पोटॅश, फॉस्फेट आणि इतर खतांचा नियमित पुरवठा करेल. यामुळे भारतातील शेतकऱ्यांना खतांच्या तुटवड्याचा सामना करावा लागणार नाही. या दीर्घकालीन भागीदारीमुळे भारताला स्थिर आणि नियंत्रित दरात खते उपलब्ध होतील. भारतीय कंपन्या आणि उरलकेम तंत्रज्ञान, कच्चा माल आणि उत्पादनात सहकार्य वाढवतील. 6. अणुऊर्जा करार भारत आणि रशियाने अणुऊर्जा क्षेत्रात एक मोठा आणि धोरणात्मक करार केला आहे. भविष्यातील गरजांनुसार अणुऊर्जा तंत्रज्ञानात एकत्र काम करणे हा याचा उद्देश आहे. या कराराचे दोन भाग आहेत- 26 तासांनंतर पुतिन भारतामधून रवाना झाले अध्यक्ष पुतिन शुक्रवारी रात्री सुमारे 10 वाजता आपला 26 तासांचा दौरा संपवून मॉस्कोला परतले. जाण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या शाही भोजनात (स्टेट डिनर) सहभाग घेतला. याचे आयोजन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले होते. त्यांच्यासाठी आयोजित शाही भोजनात (राजकीय भोज) भारतातील विविध प्रांतांतील खास पदार्थ वाढण्यात आले. मेनूमध्ये गुच्ची दून चेटिन (काश्मिरी अक्रोड चटणीसह भरलेली गुच्ची), अचारी वांगी आणि यलो डाळ तडका यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा समावेश होता. रशियन शिष्टमंडळाला वाढण्यात आलेल्या ‘ऑन टेबल’ पदार्थांमध्ये बंगालचा गूळ संदेश आणि दक्षिण भारतातील लोकप्रिय स्नॅक मुरुक्कू यांचाही समावेश होता. भोजनाचे वातावरण भारतीय आणि रशियन संगीताने सजवले होते. नौदल बँड आणि भारतीय वाद्यकलाकारांनी भारतीय शास्त्रीय संगीत, बॉलिवूड धुन आणि प्रमुख रशियन संगीत सादर केले. नौदल बँडने शाहरुख खानच्या 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' या चित्रपटातील गाणेही वाजवला. भारत-रशिया दरम्यान महत्त्वाच्या घोषणा भारत आणि रशियाने 2030 पर्यंत आर्थिक क्षेत्रांमध्ये भागीदारी वाढवण्यासाठी एक विशेष कार्यक्रम जारी केला. भारताने रशियाच्या नागरिकांसाठी 30 दिवसांचा ई-टूरिस्ट व्हिसा मोफत देण्याची घोषणा केली. गटाने येणाऱ्या रशियन पर्यटकांनाही भारत मोफत व्हिसा सुविधा देईल. रशियन सैन्यात भरती झालेल्या भारतीयांचा मुद्दा उपस्थित झाला पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्या भेटीदरम्यान रशियन सैन्यात भरती झालेल्या भारतीय नागरिकांचा मुद्दा ठामपणे मांडला. मोदींनी रशियाला विनंती केली की, तेथे अडकलेल्या भारतीयांना लवकरात लवकर सुरक्षितपणे सोडण्यात यावे. रशियात अडकलेल्या भारतीयांचे कुटुंबीय सातत्याने निदर्शने करत सरकारकडे आपल्या नातेवाईकांना परत आणण्याची मागणी करत आहेत. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले, पंतप्रधान मोदींनी रशियन सशस्त्र दलांमध्ये भारतीय नागरिकांच्या भरतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. भारतीय नागरिकांना लवकरात लवकर तेथून सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. नोव्हेंबरमध्ये, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते की, सध्या किमान 44 भारतीय नागरिक रशियन सैन्यात आहेत. मंत्रालयाने म्हटले की, हा मुद्दा रशियासमोर मांडण्यात आला आहे आणि भारतीयांना अशा भरतीच्या ऑफरपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण यात जीवाला धोका आहे. VIDEO | Delhi: “The Prime Minister raised the issue of Indian citizens being recruited into the Russian armed forces. Our efforts continue to secure their early release, and I reiterate that our citizens should avoid any offers to join the Russian armed forces,” said Foreign… pic.twitter.com/s8FlKDeKwn— Press Trust of India (@PTI_News) December 5, 2025 पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना 6 भेटवस्तू दिल्या पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती पुतिन यांना 6 भेटवस्तू दिल्या आहेत. यामध्ये आसामी चहा, मुर्शिदाबादचा चांदीचा टी सेट भेट, काश्मीरचे केशर, महाराष्ट्राचा चांदीचा घोडा, मार्बल बुद्धिबळ संच आणि श्रीमद् भगवद्गीता यांचा समावेश आहे. 1. आसाम ब्लॅक टी- ब्रह्मपुत्रेच्या सुपीक खोऱ्यांमध्ये पिकवलेला हा चहा त्याच्या मजबूत माल्टी चवीसाठी, चमकदार रंगासाठी आणि पारंपरिक आसामी प्रक्रियेसाठी ओळखला जातो. 2007 मध्ये जीआय टॅगने सन्मानित केलेला हा चहा भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि संभाव्य आरोग्य फायद्यांचे प्रतीक आहे. 2. मुर्शिदाबाद सिल्व्हर टी सेट- गुंतागुंतीच्या नक्षीकामाचा हा सिल्व्हर सेट पश्चिम बंगालची कला आणि चहाचे सांस्कृतिक महत्त्व दर्शवतो. भारत आणि रशिया दोन्ही देशांमध्ये चहा प्रेम, नातेसंबंध आणि सामायिक कथांचे प्रतीक आहे. हा सेट भारत-रशिया मैत्री आणि चहाच्या परंपरेचा उत्सव साजरा करण्यासाठी देण्यात आला. 3.काश्मिरी केशर- काश्मीरमध्ये पिकवले जाणारे हे केशर, स्थानिक पातळीवर 'कंग' किंवा 'जाफरान' या नावाने ओळखले जाते. आपल्या गडद रंग, सुगंध आणि चवीसाठी प्रसिद्ध आहे. हे GI आणि ODOP अंतर्गत संरक्षित आहे. याला रेड गोल्ड असेही म्हटले जाते आणि हे आरोग्य फायदे, परंपरा आणि कारागिरीचे प्रतीक आहे. 4. सिल्व्हर हॉर्स- महाराष्ट्रामध्ये हस्तकलेने तयार केलेला हा चांदीचा घोडा गुंतागुंतीच्या डिझाईन्सने बनलेला आहे. हे भारताच्या धातू कलेची परंपरा दर्शवते. हा घोडा सन्मान आणि धैर्याचे प्रतीक आहे, ज्याला भारतीय आणि रशियन संस्कृतीत सारखेच महत्त्व आहे. 5. मार्बल चेस सेट- आग्र्यात तयार केलेला हा हस्तकला मार्बल चेस सेट या क्षेत्रातील दगडी कोरीव कामाच्या कलेला अधोरेखित करतो. यात व्यक्तिगत कोरीव काम केलेले मोती, विविध रंगांचे दगडी प्यादे आणि फुलांच्या डिझाइन असलेला चेकर बोर्ड आहे. मार्बल, लाकूड आणि अर्ध-मौल्यवान दगडांचे मिश्रण याला केवळ खेळासाठीच नव्हे तर सजावटीसाठीही आकर्षक बनवते. 6. श्रीमद् भगवद् गीता (रशियन भाषेत)- पंतप्रधान मोदींनी रशियन भाषेत अनुवादित केलेली श्रीमद् भगवद् गीता पुतिन यांना भेट दिली.

दिव्यमराठी भास्कर 6 Dec 2025 8:08 am

Pune District : ऊस वाहतुकीत दक्षता आवश्यक; बैलांचीही काळजी घ्या

भवानीनगर : ऊस वाहतूक करताना ऊसतोड मजुरांनी स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाचा विचार करून सुरक्षिततेने काम करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषत: उसाने भरलेली बैलगाडी रस्त्याच्या उतारावर किंवा चढावर चालवताना बैल घसरून होणार्‍या अपघातांची शक्यता मोठी असल्याने खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात येत आहे. इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सध्या […] The post Pune District : ऊस वाहतुकीत दक्षता आवश्यक; बैलांचीही काळजी घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 8:05 am

महसूल अधिकाऱ्यांवर आता शासनाचा वॉच

पुणे – सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, म्हणून महसूल विभागांर्तगत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर सात दक्षता पथके स्थापन करण्यात येत असून, या पथकांच्या कामाचा नियमित आढावा घेण्यासाठी महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून महसूल विभागातील विविध गैरप्रकार उघडकीस येत […] The post महसूल अधिकाऱ्यांवर आता शासनाचा वॉच appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 8:04 am

Pune District : चोरीतील १२ लाखांचा मुद्देमाल फिर्यादींच्या ताब्यात; शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

शिरूर :शिरूर पोलिसांनी घरफोडी, जबरी चोरी आणि चोरी अशा क्लिष्ट गुन्ह्यांमागील सराईत आरोपींचा पाठपुरावा करत कौशल्यपूर्ण तपास करून तब्बल १२ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल शोधून काढत १८ गुन्ह्यांचे फिर्यादींना परत केला. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुद्देमालामध्ये साडे सोळा तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख रक्कम यांचा समावेश […] The post Pune District : चोरीतील १२ लाखांचा मुद्देमाल फिर्यादींच्या ताब्यात; शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 8:00 am

Pune : मेट्रो हडपसर ते लोणी काळभोर, सासवडपर्यंत धावणार

पुणे– पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा-२ मधील महत्त्वाकांक्षी खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या मार्गाच्या दोन उपमार्गीकांना राज्य शासनाने प्रशासकीय आणि आर्थिक मान्यता दिली आहे. त्यामुळे हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दरम्यान मेट्रो उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रोचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हडपसर, लोणी काळभोर, फुरसुंगी आणि सासवड सारख्या वेगाने […] The post Pune : मेट्रो हडपसर ते लोणी काळभोर, सासवडपर्यंत धावणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 7:59 am

अभिजीत खुनी नसेल तर मॉडेल दिव्या पाहुजाला कोणी मारले:9 साक्षीदार फिरले, गँगस्टरच्या कुटुंबावर संशय; हॉटेल म्हणाले- CCTV फुटेज आमचे नाही

2 जानेवारी 2024 रोजी, संध्याकाळचे सुमारे 6 वाजले होते. गुरुग्राममधील एका हॉटेलमध्ये 27 वर्षीय मॉडेल दिव्या पाहुजाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. प्राथमिक तपासानुसार, ही घटना सिटी पॉइंट हॉटेलच्या खोली क्रमांक-111 मध्ये घडल्याचा दावा करण्यात आला. हत्येचा आरोप व्यावसायिक अभिजीतवर लावण्यात आला. अभिजीतने यापूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले होते की, दिव्या 30 लाख रुपयांची मागणी करत होती. तिने पैशांसोबत गुरुग्राममधील हॉटेलमध्ये एका लेस्बियन (समलिंगी) पार्टनरची मागणी केली होती. यामुळे संतापून अभिजीतने दिव्यावर गोळी झाडली होती. नंतर मित्र बलराज आणि हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह कालव्यात फेकून दिला. आता या घटनेला सुमारे 2 वर्षे पूर्ण होणार आहेत. मॉडेलची बहीण नैना पाहुजा आणि आई सोनिया पाहुजा यांनी आता अभिजीतवरील हत्येच्या आरोपावरून माघार घेतली आहे. दोघींनी गुरुग्राम न्यायालयात जबाब नोंदवला आहे की, त्यांना दिव्याच्या हत्येचा संशय गँगस्टर संदीप गाडोलीच्या कुटुंबीयांवर आहे, परंतु पोलिसांनी या दिशेने तपासच केला नाही. न्यायालयात आतापर्यंत 15 पैकी 9 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आहेत. सर्वजण आपल्या जबाबावरून फिरले आहेत. 2 डिसेंबर 2025 रोजी चंदीगड उच्च न्यायालयानेही आरोपी अभिजीतला सशर्त जामीन मंजूर केला आहे. अखेर दिव्या पाहुजा प्रकरणात काय नवीन वळण आले आहे. हॉटेलच्या ज्या सीसीटीव्ही फुटेजला पोलिसांनी प्रकरणात महत्त्वाचे मानले होते. त्याबाबत हॉटेल कर्मचाऱ्यांनी दावा केला आहे की फुटेज त्यांच्या हॉटेलचे नाहीत. दिव्य मराठीच्या टीमनेही साक्षीदारांनी न्यायालयात दिलेल्या जबाबांची आणि आरोपपत्राची पडताळणी केली. सर्वात आधी आरोपी अभिजीतबद्दल...2 डिसेंबर रोजी चंदीगड उच्च न्यायालयातून अटींसह जामीन मिळाला मॉडेल दिव्या पाहुजा खून प्रकरणासंदर्भात आम्ही चंदीगड उच्च न्यायालयात अभिजीतची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील विनोद घई यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितले, ‘2 डिसेंबर रोजी अभिजीतला नियमित जामिनाचा आदेश जारी झाला. या प्रकरणात तक्रारदार दिव्याची बहीण आणि आई या दोघांनीही आपले जबाब मागे घेतले.’ ‘प्रकरणात साक्षीदार असलेल्या हॉटेल कर्मचाऱ्यांनीही कनिष्ठ न्यायालयात सीसीटीव्ही फुटेजबाबत प्रश्न उपस्थित केले होते. कर्मचाऱ्यांनी सांगितले होते की, पोलिसांनी जे सीसीटीव्ही फुटेज सादर केले आहे, ते हॉटेलमधून जप्त केले नव्हते. त्यामुळे उच्च न्यायालयाने अटींसह अभिजीतला जामीन मंजूर केला आहे.’ 15 पैकी 9 साक्षी फिरले, आई-बहिणीला गँगस्टरच्या कुटुंबावर संशय गुरुग्राम न्यायालयात आरोपी अभिजीतचा खटला पाहणारे वकील प्रशांत यादव म्हणतात, ‘या प्रकरणात घटनेच्या सुमारे 88 दिवसांनंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. एकूण 15 साक्षीदार होते. यापैकी 9 साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवले गेले आहेत. न्यायालयात दिव्याची आई-बहीण आणि हॉटेलमधील 5 कर्मचाऱ्यांची चौकशी झाली आहे. मेघा या प्रकरणात माफीची साक्षीदार होती. तिचीही तपासणी करण्यात आली आहे.’ ‘सर्वांनी आरोपीच्या बाजूने जबाब दिला आहे. त्यांनी दावा केला आहे की, त्या दिवशी दिव्या पाहुजा नावाची मुलगी हॉटेलमध्ये आलीच नव्हती. मॉडेलची बहीण नैना आणि आई सोनिया यांनी सर्व आरोप मागे घेतले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, त्यांना अभिजीतवर संशय नाही. उलट, त्यांनी मुंबईत मारल्या गेलेल्या गँगस्टर संदीप गाडोलीच्या कुटुंबावर संशय व्यक्त केला आहे.’ ‘नैनाने जबाबात म्हटले आहे की, दिव्या मुंबईतील संदीपच्या एन्काउंटर प्रकरणात आरोपी होती. त्या प्रकरणात तिला धमक्याही मिळाल्या होत्या.’ आता मॉडेलच्या बहिणीचे, नैनाचे विधान…शेवटी दिव्याच्या बहिणीने कोर्टात काय जबाब दिलामृत दिव्या पाहुजाच्या हत्येनंतर तिची बहीण नैना हिने एफआयआर (FIR) दाखल केली होती. पोलिसांनी आरोपपत्रात नैनाचा जबाबही नोंदवला आहे. ज्यात अभिजीतवर हत्येचा आरोप लावण्यात आला होता. मात्र न्यायालयात साक्षीदारांच्या उलटतपासणीदरम्यान त्या आपल्या या जबाबावरून फिरल्या. १३ ऑगस्ट २०२५ रोजी हे नोंदवले गेले होते. नैनाने निवेदनात म्हटले आहे की- ‘25 सप्टेंबर 2024 रोजी गुरुग्राम पोलिसांसमोर दिलेले माझे विधान माझ्या इच्छेने घेतले नव्हते. त्यावेळी गुरुग्राम पोलिसांनी जसे सांगितले, तसे मी विधान दिले होते. कारण त्यावेळी मी बहिणीच्या मृत्यूमुळे खूप अस्वस्थ होते. पोलिसांनी मला जिथे सही करायला सांगितले, तिथे मी सह्या केल्या होत्या. मी पोलिसांकडे अभिजीत आणि बलराज यांच्याविरुद्ध हत्येची तक्रार केलेली नाही.‘ आम्हाला संदीप गाडोलीच्या कुटुंबावर संशय आहे, पोलिसांनी चौकशी केली नाही नैनाने निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘मी माझ्या बहिणीच्या हत्येसाठी गँगस्टर संदीप गाडोलीच्या कुटुंबावर संशय व्यक्त केला आहे, आरोपी अभिजीत किंवा न्यायालयात उपस्थित असलेल्या इतर आरोपींवर नाही. पोलिसांनी या प्रकरणात गाडोली कुटुंबाची जाणूनबुजून चौकशी केली नाही. गँगस्टरच्या हत्येमध्ये त्याच्या कुटुंबीयांनी माझ्या बहिणीचे नाव विनाकारण गोवले होते. या सगळ्यामुळे तिला तुरुंगात जावे लागले आणि तिथेही तिला त्रास दिला गेला.’ ‘तेव्हा संदीपची बहीण सुदेश कटारिया आणि भाऊ ब्रह्म प्रकाश यांनी उघडपणे सांगितले होते की, या प्रकरणात कोणताही आरोपी जामिनावर सुटताच, ते त्याला मारून टाकतील. त्यांनीच माझ्या बहिणीला लक्ष्य केले आहे, पण पोलिसांनी प्रकरणाला दुसरी दिशा दिली आहे.‘ ‘मी आज कोर्टात पोलिसांनी सादर केलेले सीसीटीव्ही फुटेज पाहिले, पण माझी बहीण फुटेजमध्ये कुठेही दिसत नाहीये.‘ आता हॉटेल कर्मचाऱ्यांच्या जबाबाची गोष्ट…हॉटेल कर्मचाऱ्यांचा दावा- आमच्या हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेजच नाहीआरोपी अभिजीतच्या ज्या सिटी पॉइंट हॉटेलमध्ये दिव्या पाहुजाच्या हत्येची गोष्ट सांगितली गेली आहे. त्याच्या 35 वर्षांच्या रिसेप्शनिस्ट दिनेशच्या जबाबाने केसला नवीन वळण आले आहे. दिनेशने 5 सप्टेंबर 2025 रोजी कोर्टात जबाब नोंदवला आहे, ज्यात म्हटले आहे, ‘मी हॉटेल सिटी पॉइंटमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करतो. 3 जानेवारी 2024 रोजी पोलीस हॉटेलमध्ये आले होते. मला दिव्या पाहुजाबद्दल विचारण्यात आले होते.‘ ‘हे देखील विचारण्यात आले होते की 2 जानेवारीच्या रात्री अभिजीतसोबत कोणती मुलगी हॉटेलमध्ये आली होती की नाही. आम्ही पोलिसांना सांगितले होते की या नावाच्या कोणतीही मुलगी 2 जानेवारीला हॉटेलमध्ये आली नव्हती. आम्ही सीसीटीव्ही फुटेज, सर्व खोल्या आणि व्हिजिटरचे रेकॉर्ड देखील दाखवले होते. पोलिसांना त्या दिवशी येथून काहीही मिळाले नाही आणि ते परत गेले होते.‘ ‘आम्हाला कोर्टात जे सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले, त्यातही दिव्या नावाच्या कोणतीही मुलगी दिसत नाहीये. खरं तर जे फुटेज दाखवले जात आहे, ते आमच्या हॉटेलचे देखील नाही. याबद्दल आम्ही आधीही पोलिसांना माहिती दिली होती.‘ आरोपी अभिजीतचे म्हणणे…30 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल करत होती म्हणून गोळी मारली दिव्या खून प्रकरणाबाबत अभिजीतने गुरुग्राम पोलिसांसमोर दोनदा जबाब दिला होता. पहिल्या जबाबात दिव्या 30 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल करत असल्याची बाब होती. याच रागातून हत्या केल्याचे त्याने सांगितले होते. तर दुसऱ्यांदा नोंदवलेल्या जबाबात अभिजीतने दिव्याला लेस्बियन म्हटले होते. त्याने आपल्या जबाबात दिव्यावर आरोप केला- ‘2014 मध्ये माझी दिव्याशी भेट झाली होती. ती गुरुग्राममधील माझ्या सिटी पॉइंट हॉटेलजवळच्या बस स्टँडवरून ये-जा करत असे. तिच्यासोबत माझे अनैतिक संबंध होते. ती 2016 मध्ये संदीप गाडोली खून प्रकरणात तुरुंगातही गेली होती. 2023 मध्ये तिला जामीन मिळाला होता. त्यानंतर ती पुन्हा मला भेटू लागली.‘ ‘मी तिला पैसेही देत असे. तेव्हापासून दिव्याने माझ्याकडून 3 लाख 50 हजार रुपये घेतले होते. सुमारे 1 लाख 40 हजार रुपयांचा एक आयफोनही दिला होता. नंतर तिची मागणी वाढू लागली. जेव्हा देण्यास नकार दिला, तेव्हा ती म्हणाली की, तुझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना सांगेन. ती म्हणाली की, या सगळ्यापासून वाचायचे असेल तर 30 लाख रुपये दे.‘ ‘मी दिव्याला पैसे देण्यास नकार दिला. 1 जानेवारी 2024 रोजी ती माझ्या घरी आली होती. तेथे माझे मित्र बलराज आणि रवी बंगा देखील होते. त्यांच्या नंतर मेघाही आली होती. मात्र, ती लवकर निघून गेली होती. मग दिव्याने माझ्यावर पैसे घेण्यासाठी दबाव टाकला. मी विचार केला की दिव्या माझी बदनामी करू नये, म्हणून आम्ही त्याच रात्री पहाटे सव्वा 3 वाजता दिल्लीहून गुरुग्रामसाठी निघालो.‘ दिव्याची मागणी- मी लेस्बियन आहे, माझ्यासाठी महिला पार्टनर बोलवाअभिजीत पुढे जबाबात सांगतात, ‘आम्ही सुमारे सव्वा चार वाजता गुरुग्रामच्या हॉटेलमध्ये पोहोचलो. तिथे मी माझ्यासाठी 114 नंबरची खोली कायमस्वरूपी बुक ठेवतो, पण त्या दिवशी चावी मिळाली नाही. त्यामुळे आम्ही 111 नंबरची खोली उघडली. मग बलराज निघून गेला, पण मी आणि दिव्या तिथेच थांबलो. दुसऱ्या दिवशी (2 जानेवारी) आम्ही दुपारनंतर झोपेतून उठलो. तेव्हा दिव्याने बोलता बोलता सांगितले की ती लेस्बियन आहे. तिला आता एक पार्टनर पाहिजे आहे.‘ ‘मग मी मेघाला फोन करून बोलावले. दिव्या पुन्हा माझ्यावर पैशांसाठी दबाव टाकू लागली. माझ्याकडे देशी पिस्तूल होती. संध्याकाळी सुमारे 6 वाजताच मी दिव्याच्या डोक्यात समोरून गोळी मारली. ती जमिनीवर पडली. मी काही वेळ बेडवर बसून राहिलो.' ‘सुमारे 7 वाजून 50 मिनिटांनी मेघाचा फोन आला. मी तिला घेऊन रूम नंबर-111 मध्ये पोहोचलो. मेघा आत गेली तेव्हा रक्त पाहून म्हणाली की, काका हे तुम्ही काय केले? मी मेघाला सांगितले की, दिव्या वारंवार पैसे मागत होती. म्हणून तिला गोळी मारली.‘ ‘मी मेघाला दिव्याचा फोन आणि पिस्तूल नष्ट करण्यासाठी दिले. रात्री सुमारे साडेदहा वाजता बलराज आणि रवी आले, तेव्हा मी हॉटेल स्टाफ हेमराज आणि ओमप्रकाश यांना 5-5 लाख रुपयांचे आमिष दाखवले आणि त्यांना दिव्याचा मृतदेह कालव्यात फेकून देण्यास सांगितले.‘ पेट्रोल, सॅनिटरी पॅड्सने गुन्हेस्थळावरील रक्ताचे डाग मिटवलेचार्जशीटनुसार, दिव्या पाहुजाच्या खून प्रकरणात जेव्हा फॉरेन्सिक टीमने हॉटेलमधील रूम नंबर १११ ची तपासणी केली होती, तेव्हा तिथून पेट्रोलचा वास येत होता. घटनास्थळावरून हिरव्या रंगाची पेट्रोलची बाटलीही मिळाली होती. त्याचबरोबर अनेक सॅनिटरी डिस्पोजेबल पॅड्स मिळाले होते. यांनी भिंतीवरील आणि फरशीवरील रक्ताचे डाग साफ करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तपास पथकाला जिन्यांसह अनेक ठिकाणांहून रक्ताचे नमुने मिळाले होते. चार्जशीटमध्ये लिहिले आहे की, जेव्हा कालव्यातून दिव्या पाहुजाचा मृतदेह सापडला, तेव्हा शवविच्छेदनादरम्यान असे आढळून आले की खुनाच्या वेळी तिला मासिक पाळी होती. त्यामुळे अशी शक्यता वर्तवण्यात आली की दिव्या स्वतःसोबत सॅनिटरी पॅडचे पाकीट घेऊन आली होती. ज्याचा वापर करून रक्ताचे डाग पुसण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. नवीन वर्षाच्या दिवशी पहिल्यांदा दिव्याला भेटली, 2 जानेवारीला पार्टीत बोलावलेआम्ही या प्रकरणात साक्षीदार असलेल्या मेघाने न्यायालयात दिलेल्या जबाबाचीही तपासणी केली. मेघाने हा जबाब 30 जुलै 2024 रोजी दिला होता. यात म्हटले होते- ‘मी डिलिव्हरी गर्ल होते. पोर्टर ॲप्लिकेशनसाठी डिलिव्हरीचे काम करत होते. मला एका ओळखीच्या व्यक्तीने अभिजीतशी भेटवून दिले होते.‘ ‘मी 1 जानेवारी 2024 रोजी त्यांच्या न्यू इयर पार्टीत गेले होते. तिथेच मी पहिल्यांदा दिव्याला भेटले, ती नशेत होती. यापूर्वी अनेकदा तिचे नाव ऐकले होते. तिने खूप शॉर्ट ड्रेस घातला होता. तिच्याकडे एक छोटी पिस्तूलही होती, जिने तिने गोळीबारही केला होता. रात्री सुमारे 8 वाजता मी पार्टीतून बाहेर पडले होते.‘ ‘2 जानेवारीच्या सकाळी सुमारे 11 वाजता एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. तो दिव्याचा होता. तिने मला गुरुग्राममधील सिटी पॉइंट हॉटेलमध्ये पार्टीसाठी बोलावले. त्यानंतर मी अभिजीतला फोन करून विचारले होते की हॉटेलमध्ये यायचे आहे की नाही. अभिजीतने होकार दिल्यावर मी संध्याकाळी सुमारे 7 ते 7:30 च्या दरम्यान तिथे पोहोचले होते.‘ ‘अभिजीतने आधी मला हॉटेल दाखवले, मग रूम नंबर-111 मध्ये घेऊन गेले. तिथे दिव्या नव्हती. बेडवर अनेक शॉपिंग बॅग्स पडल्या होत्या. तिथे आम्ही काही वेळ दिव्याची वाट पाहिली. अभिजीतने दिव्याला अनेकदा कॉलही केला पण ती कॉल कट करत होती. त्यानंतर आम्ही हॉटेलच्या खोलीतून बाहेर आलो.‘ ‘मी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान हॉटेलमधून बाहेर पडले होते. हॉटेलमध्ये यापूर्वी काय झाले होते किंवा काय झाले नव्हते, याबद्दल मला काहीही माहिती नाही.‘

दिव्यमराठी भास्कर 6 Dec 2025 7:59 am

Pune District : कोरमअभावी शिवरीची ग्रामसभा तहकूब; परमिट बारच्या प्रस्तावाचा मुद्दा तापला

सासवड : तीर्थक्षेत्र श्री यमाई शिवरी ग्रामपंचायतीमध्ये परमिट रूम बिअर बार याच्या परवानगीसाठी आलेल्या अर्जावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन केले होते. ग्रामसभेची आवश्यक संख्याबळ पूर्ण न झाल्यामुळे गणपूर्तीअभावी ग्रामसभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे दारू व्यवसायांना परवानगी द्यायची किंवा नाही याबाबतचा निर्णय अखेर पुढे ढकलला आहे. दरम्यान, तहकूब झालेल्या ग्रामसभेची पुढील तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. […] The post Pune District : कोरमअभावी शिवरीची ग्रामसभा तहकूब; परमिट बारच्या प्रस्तावाचा मुद्दा तापला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 7:57 am

Pune District : खाजगी भागीदारातून नगर महामार्गावर उड्डाणपूल

प्रभात वृत्तसेवा पुणे : पुणे-शिरूर-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पुणे ते शिरूमहामार्ग दरम्यान उड्डाणपुलाचा उभारण्याच्या कामाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. एकूण 54 किमी लांबीचा हा महामार्ग असणार असून त्यापैकी 35 किमी लांबीचा उड्डाणपुल असणार आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प डीबीएफओटी ( डिझाईन, बिल्ट, फायनान्स,ऑपरेट आणि ट्रन्संफर) या तत्त्वावर उभारण्यास […] The post Pune District : खाजगी भागीदारातून नगर महामार्गावर उड्डाणपूल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 7:52 am

इंडिगोने उधार घेतलेल्या विमानाने पहिले उड्डाण केले होते:आता देशातील 60% पेक्षा जास्त विमानांवर ताबा; सध्याच्या संकटातून बाहेर पडू शकेल का

गेल्या 4 दिवसांत इंडिगो एअरलाइन्सची 1700 हून अधिक उड्डाणे रद्द झाली. हजारो उड्डाणे विलंबाने सुरू आहेत. देशभरातील विमानतळांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. इंडिगो दररोज सुमारे 2,200 विमानांचे संचालन करते आणि भारतीय विमान वाहतूक बाजारात तिचा 60 टक्क्यांहून अधिक वाटा आहे. सध्याचे संकट सुरू झाल्यापासून इंडिगोचे बाजार भांडवल सुमारे 21 हजार कोटींनी घटले आहे. इंडिगोच्या मेगा साम्राज्याची संपूर्ण कहाणी आणि सध्या कंपनी संकटात का आहे; जाणून घेऊया… साल 1984 होते. दिल्लीचे रहिवासी राहुल भाटिया कॅनडातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन भारतात परतले. ते कॅनडाच्या नॉर्टेल कंपनीसोबत भारतात टेलिकॉम व्यवसाय सुरू करू इच्छित होते. याच स्वप्नासह ते भारतात परतले होते. त्या काळात भारत सरकार परदेशी तंत्रज्ञानाच्या बाजूने नव्हते, त्यामुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. राहुल एका मध्यमवर्गीय कुटुंबातून होते. त्यांचे वडील 'दिल्ली एक्सप्रेस' नावाच्या एअरलाइन तिकीट बुकिंग एजन्सी चालवत होते. ही एजन्सी त्यांच्या वडिलांनी 1964 मध्ये 9 भागीदारांसोबत मिळून सुरू केली होती. दिल्ली एक्सप्रेसमधील काही भागीदारांचा फसवणूक आणि वडिलांची बिघडत चाललेली तब्येत लक्षात घेता, राहुलने कौटुंबिक व्यवसायात प्रवेश केला. याच दरम्यान 1992 मध्ये भारत सरकारने एअरलाइन्ससाठी खाजगी परवाने देण्यास सुरुवात केली. यामुळे अनेक खाजगी कंपन्या विमान वाहतूक उद्योगात येत होत्या. राहुलला या उद्योगात यायचे होते, पण त्याला घाई नव्हती. राहुलने वेळ घेतला, उत्तम रणनीती आखली आणि त्यानंतर विमान वाहतूक बाजारात पाऊल टाकले. एअरलाइन व्यवसायासाठी त्यांना एका भागीदाराची गरज होती, जे एनआरआय राकेश गंगवाल बनले. दोन मित्रांनी मिळून स्वतःची एअरलाइन कंपनी सुरू केलीराहुलची राकेशसोबतची पहिली भेट कामाच्या निमित्तानेच झाली होती. राकेश अमेरिकेत युनायटेड एअरलाइन्सशी संबंधित होते. राहुलची कंपनी इंटरग्लोब ग्रुप, याच युनायटेड एअरलाइन्सची भारतात जनरल सेल्स एजंट होती. कामामुळे राहुल आणि राकेश यांच्यातील मैत्री वाढत गेली. एके दिवशी राहुलने राकेशला स्वतःची एअरलाइन कंपनी सुरू करण्याबद्दल सांगितले आणि दोघेही त्याची योजना बनवण्यात गुंतले. राकेश गंगवाल दशकांपासून एअरलाइन्समध्ये काम करत होते. त्यांनी आयआयटी कानपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि व्हार्टनमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. 1994 मध्ये गंगवाल एअर फ्रान्सचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट बनले, ज्यानंतर चार वर्षांनी 1998 मध्ये त्यांना यूएस एअरवेजचे प्रेसिडेंट आणि सीईओ बनवण्यात आले. 2004 मध्ये इंडिगोची बाजारात एंट्रीखूप प्रयत्नांनंतर राहुल आणि राकेश यांना 2004 मध्ये इंडिगो एअरलाईनसाठी परवाना मिळाला. याच वर्षी दोघांनी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडची स्थापना केली. या कंपनीत दोघांची समान भागीदारी होती. विशेष म्हणजे, इंधनाच्या किमतीत वाढ आणि रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण असताना इंडिगोने बाजारात प्रवेश केला. यावेळी भारतीय विमान कंपन्यांचा उद्योग वाईट परिस्थितीतून जात होता. किंगफिशर आणि स्पाइसजेटसारख्या कंपन्या तोट्यात होत्या. इंडिगोने 5 लाख कोटी रुपयांची 100 विमाने कर्जावर घेतली. 2005 मध्ये पॅरिसमध्ये एक एअर शो झाला. त्यात इंडिगोने एकाच वेळी 5 लाख 43 हजार कोटी (6.5 अब्ज डॉलर) रुपयांच्या 100 एअरबस A320 विमानांची ऑर्डर देऊन सर्वांना चकित केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राकेश आणि राहुल यांनी फक्त 100 कोटी रुपये गुंतवून कंपनी सुरू केली होती. अशा परिस्थितीत आश्चर्य वाटणे स्वाभाविक होते, की इतक्या कमी गुंतवणुकीत 100 विमाने कशी घेतली जाऊ शकतात. यामागे राकेश गंगवाल यांचा हात असल्याचे समोर आले. राकेश गेल्या तीन दशकांपासून विमान वाहतूक क्षेत्रात काम करत होते. यामुळे एअरबस कंपनीत त्यांची चांगली ओळख होती. एअरबस कंपनी त्यांच्या नावावर कर्जावर विमाने देण्यास तयार झाली. इंडिगोने 4% डाउन पेमेंटवर 100 विमाने घेतली, त्यांना यासोबत 40% सवलतही मिळाली. पहिले विमान उडवण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागलाकंपनीला आपले पहिले विमान उडवण्यासाठी २ वर्षांचा कालावधी लागला. २८ जुलै २००६ रोजी इंडिगोला आपले पहिले एअरबस मिळाले. त्यानंतर एका आठवड्याने, ४ ऑगस्ट २००६ रोजी, दिल्लीहून गुवाहाटीसाठी इंडिगोच्या पहिल्या विमानाने उड्डाण केले. इथून भारतीय विमान वाहतूक उद्योगाचे चित्र बदलण्यास सुरुवात झाली. पहिल्या उड्डाणानंतर जवळपास चार वर्षांतच इंडिगोने एअर इंडियाला मागे टाकत १७.३% बाजारपेठेतील वाटा मिळवून तिसरे स्थान पटकावले. खर्च कपातीसाठी इंडिगोने मोफत जेवण बंद केले इंडिगोने पूर्णपणे मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित केले. कंपनीने आपल्या विमानात फक्त इकोनॉमी क्लासच्या जागा बसवल्या. प्रत्येक विमानात १८० लोकांना बसण्याची सोय करण्यात आली. खर्च कपातीसाठी प्रवासादरम्यान मोफत जेवण काढून टाकण्यात आले. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांनाही वेगळ्या पद्धतीने प्रशिक्षित केले. सर्वांना विशेष सूचना देण्यात आली होती की 25 मिनिटांच्या आत विमान पुन्हा उड्डाणासाठी तयार झाले पाहिजे. ग्राउंड स्टाफलाही प्रशिक्षण देण्यात आले होते की त्यांनी 6 मिनिटांच्या आत सर्व प्रवाशांना विमानातून उतरवावे. प्रवाशांचे सामान 10 मिनिटांच्या आत लोड आणि अनलोड केले जावे. राकेश गंगवाल यांनी इंडिगोला पानाचे दुकान संबोधून राजीनामा दिलाइंडिगोची सतत वाढती उंची पाहून राकेश गंगवाल यांना ते वेगाने पुढे न्यायचे होते. त्यांनी फेब्रुवारी 2018 मध्ये सांगितले होते की, आर्थिक वर्ष 2019 मध्ये इंडिगो आपल्या क्षमतेत 52% वाढ करेल. म्हणजेच, 155 विमानांची कंपनी आता आपल्या ताफ्यात आणखी 95 विमाने वाढवणार आहे. यावर कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष आदित्य घोष यांनी थेट विरोध केला होता. राहुल यांनाही घाई न करता सावधगिरीने पुढे जायचे होते. यामुळे हळूहळू दोघांमध्ये मतभेद वाढत गेले. राकेश इंडिगोच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर नाराज होते. त्यांनी इंडिगोची तुलना पानांच्या दुकानाशी केली. याला उत्तर देताना राहुल म्हणाले होते, 'राकेश असे एकही प्रकरण सादर करू शकले नाहीत, ज्यामुळे इंडिगोला नुकसान झाल्याचे दिसून येते. सत्य हे आहे की, माझे पान दुकान चांगले चालले आहे.' दीर्घकाळ चाललेल्या वादामुळे 2022 मध्ये राकेश गंगवाल यांनी एअरलाइनच्या बोर्डातून राजीनामा दिला. आज दररोज इंडिगोच्या 2200 हून अधिक उड्डाणेइंडिगो दररोज 2200 हून अधिक विमानांचे संचालन करते. देशांतर्गत 90 हून अधिक आणि आंतरराष्ट्रीय 40 हून अधिक उड्डाणे आहेत. कंपनीच्या ताफ्यात 417 विमाने आहेत. भारतात इंडिगोचा 61.4% बाजार हिस्सा आहे. म्हणजेच, दर 10 पैकी 6 भारतीय इंडिगोच्या विमानाने प्रवास करत आहेत. कंपनीचा दावा आहे की ती दर 6 वर्षांनी आपले विमान निवृत्त करते. गेल्या 3-4 दिवसांपासून इंडिगोमध्ये गोंधळ गेल्या 4 दिवसांत इंडिगोने 1700 हून अधिक उड्डाणे रद्द केली आणि हजारो उड्डाणे उशिराने धावत आहेत...

दिव्यमराठी भास्कर 6 Dec 2025 7:40 am

इंदू मिलच्या जागेत महामानवाचे स्मारक प्रगतिपथावर

प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्राची संरचनात्मक कामे पूर्णमुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक दादर येथील इंदू मिलच्या जागेत आकाराला आले आहे. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) १२ एकर जागेत एक हजार ०८९ कोटी रुपये खर्चून हे स्मारक साकारले जात आहे. या स्मारकातील प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह, वाहनतळाची शंभर टक्के स्ट्रक्चरल कामे झाली आहेत. सध्या अंतर्गत सजावटीची कामे प्रगतिपथावर असून, बाह्य विकासाची कामेही सुरू आहेत. त्यामुळे वर्षभरात हे दिमाखदार स्मारक खुले होणार आहे.डॉ. बाबासाहेब यांनी दिलेला समतेचा संदेश जगभरात पोहोचावा, त्यांचे अनमोल कार्य, कायद्याचा अभ्यास, बहुजनांसाठी हक्कासाठी दिलेला लढा आदी बाबींची पुढील पिढ्यांना माहिती व्हावी, त्याचा अभ्यास करता यावा म्हणून राज्य सरकारने इंदू मिलच्या १२ एकर जागेवर ४५० फूट उंचीचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार २०१५मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. शंभर फूट उंचीचा विस्तीर्ण चौथरा असून, त्याच्या मध्यभागी चैत्य हॉल, लायब्ररी, म्युझियम, विश्रांतिगृह अशा वेगवेगळ्या सुविधा असणार आहेत, तर त्यावर बाबासाहेबांचा ३५० फूट उंचीचा ब्रॉझचा पूर्णाकृती पुतळा असणार आहे. त्यापैकी स्मारकातील सहाय्यभूत इमारतींची संरचनात्मक कामे पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर अंतर्गत सजावट आणि बाह्य विकासाची कामे सुरू असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.पुतळ्याच्या पॅनेल कास्टिंगचे काम पूर्णशंभर फूट उंचीच्या स्मारक इमारतीच्या विस्तीर्ण चौथऱ्यावर ३५० फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कांस्य धातूचे आवरण असलेला पुतळा उभारला जाणार आहे. पुतळ्याच्या पायथ्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. पुतळ्याच्या आर्मेचर फॅब्रिकेशनचे काम सुरू असून, सहा हजार टन पोलाद लागणार आहे. त्यापैकी १,४०० टन पोलाद आले असून, ६५० टनांचे फॅब्रिकेशन पूर्ण झाले आहे. कांस्य धातूच्या आवरणाचे कामही सुरू असून, पुतळ्याच्या दोन्ही बुटांच्या पॅनेल कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. त्यावरील शिलाई, लेस हुबेहूब दिसत आहे.दृष्टिक्षेपातील स्मारक- १२ एकर जागेत विस्तीर्ण स्मारक- स्मारकाची उंची ४५० फूट, तर पुतळ्याची उंची ३५० फूट- १,०८९ कोटी रुपये एकूण खर्च- पुतळ्याचे वजन सहा हजार मेट्रिक टन- पुतळ्यावरील ब्रॉझचे आवरण ८७० मेट्रिक टन- ४७० वाहनांसाठी दुमजली बेसमेंट पार्किंग

फीड फीडबर्नर 6 Dec 2025 7:30 am

आजचे एक्सप्लेनर:पुतिन पांढऱ्या फॉर्च्युनरमध्येच का बसले, महात्मा गांधींना श्रद्धांजली, मोदींसोबत 3 वेळा भेट; रशियन राष्ट्रपतींनी काय संदेश दिला?

4 डिसेंबर रोजी भारतात पोहोचलेले पुतिन त्यांच्या खास 'ऑरस सेनेट'ऐवजी पंतप्रधान मोदींसोबत पांढऱ्या फॉर्च्युनरमध्ये बसले. 5 डिसेंबरच्या सकाळी महात्मा गांधींच्या समाधीवर फुले वाहिली. 5 डिसेंबरच्या रात्री सुमारे 9 वाजता रवाना होईपर्यंत पंतप्रधान मोदींसोबत 3 वेळा भेट घेतली. भारत दौऱ्याच्या 27 तासांत पुतिन यांनी काय-काय केले आणि त्यामागे लपलेला संदेश काय आहे; जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न-1: पुतिन यांनी पांढऱ्या फॉर्च्युनरमधून प्रवास का केला?उत्तर: पुतिन जिथेही जातात, तिथे त्यांच्यासोबत रशियात बनवलेली त्यांची 'ऑरस सेनेट लिमोझिन' ही कार एअरलिफ्ट करून पोहोचते. 4 डिसेंबरच्या संध्याकाळी सुमारे 7 वाजता विमानतळावर पोहोचल्यानंतर, पुतिन यांनी आपली कार सोडून पंतप्रधान मोदींसोबत एका पांढऱ्या रंगाच्या टोयोटा फॉर्च्युनर सिग्मा 4 MT मधून पंतप्रधान निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी कारच्या मागे त्यांची लिमोझिन आणि पंतप्रधान मोदींची रेंज रोव्हर देखील धावत होती. MH01EN5795 क्रमांकाची ही फॉर्च्युनर एप्रिल 2024 मध्ये मुंबई RTO अंतर्गत एका अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नावावर नोंदणीकृत आहे. परदेश दौऱ्यादरम्यान पुतिन आपली कार सोडून दुसऱ्या गाडीत बसणे सहसा दुर्मिळ आहे. मात्र, पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यात चांगले मैत्रीचे संबंध आहेत. सप्टेंबर 2025 मध्ये SCO शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी चीनला गेलेले पंतप्रधान मोदी देखील पुतिन यांच्या कारमध्ये बसले होते. परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ, जेएनयूचे प्राध्यापक राजन कुमार म्हणतात- ‘असे आवश्यक नाही की पुतिन कोणत्या कारमध्ये बसतील, ते आधीच ठरवले गेले असेल. असे असू शकते की, परस्पर विश्वास दाखवण्यासाठी पुतिन यांनी त्याच वेळी आपली बुलेटप्रूफ गाडी सोडून भारतीय गाडीतून प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली असेल. याला अनेकदा 'कार-राइड डिप्लोमसी' असे म्हटले जाते. असेही होऊ शकते की, सुरक्षा कारणांमुळे अचानक पुतिन यांची गाडी बदलण्यात आली असेल.’ ते पंतप्रधान मोदींच्या रेंज रोव्हर कारमध्येही बसू शकले असते, परंतु टाटा मोटर्सच्या हातात विकण्यापूर्वीपर्यंत रेंज रोव्हर ब्रिटिश कंपनी होती. बीएमडब्ल्यू, मर्सिडीज सारख्या गाड्या युरोपीय देशांमध्ये बनतात. तर फॉर्च्युनर ही मूळतः जपानी कंपनी टोयोटाची कार आहे, जी भारतात बनवली जाते. पुतिन हे दाखवू इच्छित होते की, दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कोणत्याही युरोपीय किंवा अमेरिकन देशाचा प्रभाव नाही. याव्यतिरिक्त, पांढऱ्या रंगाची गाडी निवडण्यामागे हे कारण देखील असू शकते की, या दौऱ्याद्वारे पुतिन आणि पंतप्रधान मोदी जागतिक शांततेचा संदेश देऊ इच्छित होते. प्रश्न-2: महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुतिन का पोहोचले?उत्तर: 5 डिसेंबरच्या सकाळी सुमारे 11 वाजून 48 मिनिटांनी पुतिन महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले. त्यांनी राजघाटावरील 'व्हिजिटर्स बुक'मध्ये महात्मा गांधींबद्दल लिहिले, ‘महात्मा गांधींच्या सत्य आणि अहिंसेच्या सिद्धांतांचा प्रभाव आजही तितकाच आहे. त्यांनी एका नवीन जागतिक व्यवस्थेचा मार्ग दाखवला, जी आता आकार घेत आहे. आज भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर याच सिद्धांतांचे आणि मूल्यांचे रक्षण करत आहे. रशिया देखील असेच करतो.’ 2022 मध्ये युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर सुरू झालेले युद्ध अजूनही सुरू आहे, ज्यात दोन्ही देशांचे 10 लाखांहून अधिक सैनिक आणि सामान्य लोक मारले गेले आहेत. युद्ध थांबवण्यासाठी पुतिनने काही कठीण अटी ठेवल्या आहेत, ज्यातून ते मागे हटत नाहीत. 25 मे रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते- ‘पुतिन वेडे झाले आहेत. त्यांची ही वृत्ती रशियाच्या पतनाचे कारण बनेल.’ फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि इतर अनेक पाश्चात्त्य देशांचे नेते पुतिनला 'मानवतेचा शत्रू, क्रूर आणि निर्दयी' असेही संबोधले आहे. प्रोफेसर राजन कुमार म्हणतात- ‘गेल्या 3 वर्षांत पुतिन यांची प्रतिमा एका युद्धखोर हुकूमशहाची बनली आहे, पुतिन आता ती बदलू इच्छितात. महात्मा गांधींना श्रद्धांजली आणि त्यांच्या अहिंसेच्या सिद्धांताचा उल्लेख करण्यामागे पुतिन यांचा कूटनीतिक उद्देश जगभरात हा संदेश देण्याचा होता की त्यांनाही अहिंसा आणि शांतता हवी आहे. त्यामुळेच पुतिन यांनी भारत दौऱ्यादरम्यान युक्रेन युद्धासारख्या मुद्द्यांवर अमेरिका आणि सर्व पक्षांच्या मदतीने शांतता प्रस्थापित करण्याची गोष्ट सांगितली आहे.’ प्रश्न-3: प्रवासापूर्वी भारत-रशियामध्ये लष्करी तळांचा करार का झाला?उत्तर: भारत आणि रशियाने 18 फेब्रुवारी रोजी रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट (RELOS) करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. पुतिन यांच्या भारत भेटीपूर्वी 2 डिसेंबर रोजी रशियन संसदेने त्याला मंजुरी दिली. दोन्ही देश एकमेकांच्या लष्करी तळांचा, बंदरांचा आणि विमानतळांचा वापर करू शकतील. अहवालानुसार, रशिया भारतात सुमारे 5 युद्धनौका, 10 फायटर जेट्स आणि 3000 जवान तैनात करेल. भारतही आपले सैनिक, नौदलाची जहाजे आणि लढाऊ विमाने रशियाला पाठवू शकेल. खरं तर, दक्षिण आशियावर जागतिक लक्ष वाढत आहे. या दरम्यान, रशिया भारतासोबत लष्करी सहकार्याने दक्षिण आशियामध्ये आपली लष्करी उपस्थिती आणि प्रभाव वाढवू इच्छितो. याच दरम्यान, भारतही आपल्या परदेशी लष्करी तळांचा विस्तार करू इच्छितो. या करारानुसार, भारत पहिल्यांदाच थंड आर्कटिकमध्ये लष्करी सराव करू शकेल, जिथे सध्या भारताचा कोणताही कायमस्वरूपी तळ नाही. रशियाला युनायटेड स्टेट्सला हा संदेशही द्यायचा आहे की रशियावरील भारताचे अवलंबित्व वाढत आहे आणि तो अमेरिकन शस्त्रे आणि तंत्रज्ञानाचा वापर कमी करू शकतो. प्रश्न-4: रशियाने भारतातील कुशल कामगारांना नोकरीची ऑफर का दिली?उत्तर: मोदी आणि पुतिन यांनी 'मायग्रेशन अँड मोबिलिटी पार्टनरशिप' करारावर स्वाक्षरी केली. हा करार दोन्ही देशांमधील 'व्हिजन 2030 इकॉनॉमिक को-ऑपरेशन'चा एक भाग आहे. या अंतर्गत रशियाला आपल्या देशात आयटी, हेल्थकेअर, अभियांत्रिकी आणि टेक्स्टाईल यांसारख्या क्षेत्रांमध्ये सुमारे 10 लाख भारतीय कामगारांना नोकरी द्यायची आहे. युक्रेनसोबतच्या युद्धामुळे रशियामध्ये स्थलांतरित मजुरांची कमतरता निर्माण झाली आहे. सुमारे 7 लाखांहून अधिक रशियन सैनिक आघाडीवर तैनात आहेत. रशियाची कार्यरत लोकसंख्याही वेगाने घटत आहे. रशियाचे श्रम मंत्री अँटोन कोट्याकोव्ह यांच्या निवेदनानुसार, 2030 पर्यंत रशियामध्ये 1.1 कोटींहून अधिक कामगारांचे संकट निर्माण होईल. सध्या रशियातील बहुतेक कामगार उझबेकिस्तान, फिलिपिन्स, श्रीलंका, बांगलादेश, तुर्कस्तान आणि ताजिकिस्तानसारख्या देशांमधून येतात. आता रशियाला या मुस्लिम देशांवरील अवलंबित्व कमी करायचे आहे. रशियामध्ये कामगार दरमहा 1 लाख रुबलपर्यंत कमावतात, जे 1 लाख 11 हजार भारतीय रुपयांच्या बरोबरीचे आहे. प्रश्न-5: पुतिन यांनी भारताला स्वस्त तेल देणे सुरू ठेवण्याचे वचन का दिले?उत्तर: 2021 पर्यंत भारत रशियाकडून त्याच्या गरजेच्या 1% तेलही आयात करत नव्हता, परंतु 2025 पर्यंत रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 37% तेल रशियाकडून खरेदी करतो. तो दररोज सरासरी 16.7 कोटी बॅरल तेल आयात करत आहे. (1 बॅरलमध्ये 158 लिटर असतात). भारत सप्टेंबर महिन्यापर्यंत रशियन तेलाचा दुसरा सर्वात मोठा आयातदार राहिला आहे. पहिल्या क्रमांकावर चीन आहे. रशियाच्या कमाईचा सर्वात मोठा स्रोत तेल, वायू आणि शस्त्रास्त्रांची विक्री आहे. या पैशांचा वापर रशिया युद्धाचा खर्च चालवण्यासाठी करतो. 2022 मध्ये युक्रेनसोबत युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत रशियाने सुमारे 450 अब्ज डॉलर (40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त) युद्धावर खर्च केले आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी वाढवली कारण त्याला सवलतीच्या दरात स्वस्त तेल मिळत होते. जेव्हा ट्रम्प यांनी भारतावर 50% शुल्क वाढवून रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यासाठी दबाव आणला, तेव्हाही भारताने सांगितले की त्याचे तेल खरेदीचे निर्णय त्याच्या ऊर्जा गरजांवर आधारित असतील. तरीही, गेल्या काही महिन्यांत भारतीय खाजगी आणि सार्वजनिक कंपन्यांनी रशियन तेलाची खरेदी कमी केली आहे, कारण रशियन तेलावरील सवलत प्रति बॅरल सुमारे $30 वरून आता प्रति बॅरल सुमारे $5 पर्यंत कमी झाली आहे. याव्यतिरिक्त, भारत आता युनायटेड स्टेट्सकडून आपली तेल खरेदी वाढवण्याचा विचार करत आहे. रशिया भारतासोबत आपला तेल आणि वायू व्यापार सुरू ठेवू इच्छितो, कारण तो रशियाला परकीय चलन पुरवतो. भारताने रुपयाऐवजी रुबलमध्ये रशियन तेलाचा व्यापार सुरू केला आहे. त्यांच्या संयुक्त निवेदनात, पुतिन यांनी असेही म्हटले की भारत आणि रशियामधील 96% व्यापार स्थानिक चलनात होतो. याव्यतिरिक्त, रशियाला आपल्या युद्धाच्या खर्चासाठी निधी पुरवण्यासाठी भारताला तेल विकणे सुरू ठेवण्याची गरज आहे. पुतिन यांना हे देखील हवे आहे की भारताने अमेरिकन तेलाचा वापर वाढवण्याऐवजी रशियाकडून तेल खरेदी करणे सुरू ठेवावे, कारण यामुळे अमेरिकेला एक मजबूत संदेश जाईल की ट्रम्पच्या दबावामुळेही रशिया आणि भारतामधील व्यापारी संबंध अबाधित आहेत. प्रश्न-6: पंतप्रधान मोदी, पुतिन यांनी दहशतवादाविरुद्ध एकजुटीची गोष्ट का केली?उत्तर: पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्यासोबतच्या आपल्या संयुक्त निवेदनात म्हटले - 'भारत आणि रशिया दहशतवादाविरुद्ध एकत्र आहेत. मग तो पहलगाम दहशतवादी हल्ला असो किंवा रशियातील क्रोकस सिटी हॉलवरील हल्ला, त्यांची मुळे एकच आहेत. दहशतवाद हा मानवतेवर थेट हल्ला आहे आणि त्याविरुद्ध जगाची एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे.' पुतिन यांनीही आपल्या निवेदनात दहशतवादावरील पंतप्रधान मोदींच्या विधानाशी सहमती दर्शवली आणि सांगितले की दोन्ही देश मिळून सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करतील. राजन कुमार म्हणतात - पंतप्रधान मोदी जवळपास सर्व जागतिक मंचांवर दहशतवादाचा उल्लेख करतात. पुतिन यांचे विधान दहशतवादाविरुद्ध भारतासोबत एकजूटता दाखवण्याचे संकेत आहे. भारताच्या दृष्टिकोनातून हा पाकिस्तानसाठीही एक मजबूत संदेश आहे. भारतासाठी पाकिस्तानकडून दहशतवादाचा धोका सर्वाधिक आहे. तर रशियासाठी सर्वात मोठा दहशतवादी धोका इस्लामिक स्टेटचे खुरासान मॉड्यूल (ISIS-K) आहे. अफगाणिस्तान अजूनही ISIS-K चे ठिकाण आहे, जे ताजिकिस्तान, उझबेकिस्तानसारख्या मध्य आशियाई देशांतील लोकांना भरती करून रशियामध्ये स्थलांतरित मजूर म्हणून पाठवते. 2024 मध्ये रशियाच्या मॉस्कोमध्ये झालेल्या क्रोकस सिटी हॉल हल्ल्यात 140 लोकांचा मृत्यू झाला होता, ज्याची जबाबदारी ISIS-K ने घेतली होती. प्रश्न-7: पोर्टेबल अणु तंत्रज्ञान काय आहे, जे पुतिन यांनी भारताला देण्याचे वचन दिले?उत्तर: पुतिन यांनी त्यांच्या संयुक्त निवेदनात सांगितले की, रशिया आणि भारत मिळून भारतात सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प (न्यूक्लिअर पॉवर प्लांट) तयार करत आहेत. हा कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प (तमिळनाडू) आहे. या प्रकल्पात 1000 मेगावॉट वीज निर्माण करणारे 6 रिअॅक्टर बनवले जात आहेत. या प्रकल्पानंतर, रशियाच्या मदतीने भारतासाठी पोर्टेबल रिअॅक्टर, किंवा लहान आकाराचे अणुभट्ट्या विकसित करणे हे एक वेगळे पाऊल आहे. पुतिन यांनी त्यांच्या निवेदनात या सहकार्याचे वचन दिले होते. खरं तर, लहान मॉड्यूलर रिअॅक्टर (SMR) आणि तरंगत्या अणुऊर्जा प्रकल्पांना पोर्टेबल रिअॅक्टर असेही म्हणतात. ते पारंपारिक रिअॅक्टरपेक्षा लहान असतात आणि कारखान्यात आधीच तयार केले जातात, ज्यामुळे त्यांच्या स्थापनेचा वेळ 2 ते 3 वर्षांनी कमी होतो आणि खर्चही कमी होतो. ते कमी इंधनाचा वापर करतात. रशियाची रोसाटॉम कंपनी SMR चे उत्पादन करते. असे रिअॅक्टर भारताच्या पर्वतीय आणि दुर्गम भागांमध्ये वीज निर्माण करणे सोपे करतील. पुतिन यांच्या घोषणेनंतर, रोसाटॉम आणि न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) यांच्यात लवकरच पोर्टेबल रिअॅक्टरवर करार होऊ शकतो. प्रश्न-8: 27 तासांच्या भारत दौऱ्यात पुतिन यांच्या PM मोदींना 3 वेळा भेटण्याचे काय अर्थ?उत्तर: पुतिन आणि पंतप्रधान मोदी सुमारे 27 तासांत तीन वेळा भेटले. पंतप्रधान मोदींनी विमानतळावर पुतिन यांचे स्वागत केले आणि थेट पंतप्रधान कार्यालयात (PMO) गेले. तेथे, पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना खासगी जेवणासाठी आमंत्रित केले. 5 नोव्हेंबरच्या सकाळी, पुतिन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले. पंतप्रधान मोदी देखील त्यांचे स्वागत करण्यासाठी तेथे उपस्थित होते. दुपारी 12 वाजता, पुतिन राजघाटावरून हैदराबाद हाऊसमध्ये पोहोचले, जिथे पंतप्रधान मोदींनी द्विपक्षीय चर्चा केली. त्यानंतर, दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि भारत-रशिया व्यापार मंचाला संबोधित केले. पुतिन दीर्घकाळापासून रशियाचे सर्वोच्च नेते आहेत. पुतिन पहिल्यांदा 2000 मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात भारताच्या दौऱ्यावर आले होते, जिथे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदी पुतिन यांना भेटले होते. ते पुतिन यांना चांगले मित्र म्हणतात. दोन्ही नेत्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. ही भेट ट्रम्प यांना एक संदेश म्हणूनही काम करत होती, जे गेल्या काही काळापासून रशियाबाबत भारताला धमकावत आहेत आणि ज्यांना पंतप्रधान मोदींनी त्यांचे प्रिय मित्र म्हटले होते. एक कारण असे आहे की पंतप्रधान मोदी त्यांच्या सर्व परदेशी पाहुण्यांचे, विशेषतः राष्ट्रप्रमुखांचे, उत्साहाने स्वागत करतात. ऑक्टोबर 2019 मध्ये जेव्हा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दोन दिवसांसाठी भारताच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा पंतप्रधान मोदी त्यांना एकूण तीन वेळा भेटले होते.

दिव्यमराठी भास्कर 6 Dec 2025 7:23 am

अग्रलेख : घट्ट धागा

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित भारत दौरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उभय देशांतील संबंध अधिक घट्ट करण्याबाबत चर्चा झाली. विशेषत: ऊर्जा व्यापार, संरक्षण आणि आर्थिक सहकार्य दृढ करण्यावर भर दिला गेला. पुतीन त्या देशाचे प्रतिनिधी आहे जो अनेक दशकांपासून भारताचा मित्र आहे. सध्याच्या एकध्रुवीय जगात ‘अमेरिका बोले आणि जग […] The post अग्रलेख : घट्ट धागा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 6 Dec 2025 6:55 am

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ६ डिसेंबर २०२५

पंचांगआज मिती मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष ०८.४९ नंतर आर्द्रा. योग शुभ.चंद्र राशी मिथुन.भारतीय सौर १५ मार्गशीर्ष १९४७. शनिवार दिनांक ६ डिसेंबर २०२५ मुंबईचा सूर्योदय ०६.५८ , मुंबईचा सूर्यास्त ०६.०० , मुंबईचा चंद्रोदय ०७.२७ , मुंबईचा चंद्रास्त ०८.२० राहू काळ ०९.४३ ते ११.०६. भारतरत्न डॉ. आंबेडकर महापरीनिर्वाण दिन,शुभ दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : महत्त्वाच्या कामांमध्ये गैरसमज, वादविवाद टाळणे.वृषभ : प्रगतीतील अडथळे दूर होतील. भाग्योदय होईल.मिथुन : भावंडांबरोबर असलेले मतभेद संपुष्टात येतीलकर्क : महत्त्वाचा कामासाठी योग्य व्यक्तीच्या संपर्कात यालसिंह : घेतलेल्या परिश्रमाचे अपेक्षित फळ मिळेलकन्या : प्रवासाची शक्यता.तूळ : प्रसिद्धी बरोबर उत्पन्नात वाढ.वृश्चिक : अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागेलधनू : प्रकृतीस्वास्थ्य सांभाळा.मकर : नोकरीत वरिष्ठांशी जुळवून घेणे गरजेचे ठरेलकुंभ : स्वतःसाठी मनपसंत वस्तूंची खरेदी होईल.मीन : नोकरदारांना दिलासा मिळेल

फीड फीडबर्नर 6 Dec 2025 12:30 am

महामानवाला वंदन

जय भीम' अशी कोणी साद घातली, तर तो 'आंबेडकरवादी' असा पूर्वी समाजाचा दृष्टिकोन होता. दलित, वंचिताच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग हा आज एका विशिष्ट समाजापुरता मर्यादित नाही, तर समतावादी विचार करणारा प्रत्येक भारतीयांचे डॉ. आंबेडकर हे प्रेरणास्थान आहेत. अभिनेत्री चिन्मयी सुमित हिने अलीकडेच एका कार्यक्रमात 'मी जय भिमवाली' आहे असे म्हटल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. संविधानाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांनी स्त्रियांसाठी केलेले विशेष कायदे आणि दिलेल्या सवलतींमुळे प्रत्येक भारतीय स्त्रियांनी स्वत:ला 'जय भिमवाली' म्हणायला हवे, असे चिन्मयी म्हणाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमी परिसरात त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंची गर्दी उसळते, त्यात सर्वच जाती-धर्मांच्या व्यक्तींचा सहभाग पाहायला िमळतो. बाबासाहेबांचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व नव्या पिढीला भुरळ घालते. समाजातील उपेक्षित, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांचे कार्य अद्वितीय असे होतेच; पण त्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांत दिलेल्या प्रचंड योगदानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आधुनिक भारताला त्यांची सर्वात मोठी देणगी म्हणजे ’भारतीय राज्यघटना.’ जगातील श्रेष्ठ घटनांमध्ये आपल्या देशाच्या घटनेचा समावेश होतो. समता, बंधुभाव आणि न्याय ही तत्त्वे आपल्या घटनेचा भक्कम पाया आहेत. भारतीय संविधानामुळे देशाला लोकशाही व्यवस्था मिळाली. समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना विकास आणि प्रगती साध्य करण्यासाठी समान संधी राज्यघटनेमुळेच मिळाली. आपल्या देशाचे अखंडत्व आणि एकता टिकून ठेवण्याच्या संदर्भात भारतीय राज्यघटनेचे फार मोठे योगदान आहे, ही गोष्ट कोणालाही नाकारता येणार नाही.डॉ. आंबेडकर हे एक श्रेष्ठ संविधानतज्ज्ञ होते. त्यांनी ६० पेक्षा जास्त देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला होता. जगातील कोणत्याही राज्यघटनेत तरतूद नसलेली कलमे, म्हणजे मूलभूत हक्काची कलम १४ ते ३२ आपल्या संविधानात समाविष्ट करण्यात आली. 'कलम ३२’ तर डॉ. आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचे हृदय म्हटलेे आहे. कारण, या कलमाद्वारे आपल्या हक्कांवर कोणीही गदा आणत असेल, तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क दिला आहे. मग ती व्यक्ती कोणत्याही धर्माची, पंथाची, जातीची असो, त्यांना समान हक्काचे जीवन बहाल केले आहे. स्त्री-पुरुषांना समान अधिकार मिळवून दिला आहे. म्हणूनच आज मुख्यमंत्री, राज्यपाल, न्यायाधीश, लोकसभाध्यक्ष, पंतप्रधान, राष्ट्रपती आदी उच्चपदावर महिलांना मान मिळतो आहे. हे केवळ संविधानामुळेच शक्य झाले आहे. आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे, असे नमूद करून डॉ. आंबेडकरांनी कायद्यापुढे सर्व नागरिक समान आहेत, असे स्पष्ट केले होते. भारतीय राज्यघटनेचेे उगमस्थान भारतीय जनताच आहे, असा उल्लेख राज्य घटना सोपविताना त्यांनी केला होता. 'एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य’ हे तत्त्वच मुळात आपल्या राजघटनेने स्वीकारलेले आहे. त्याच वेळेस काही इशारेदेखील दिले आहेत. डॉ. आंबेडकरांनी असे म्हटले होते की, 'घटना कितीही चांगली असली तरी राबवणारे लोक जर वाईट असतील, तर त्या घटनेचा उपयोग होणार नाही.' त्यामुळे भारतीय संविधानाची अंमलबजावणी जोपर्यंत प्रामाणिकपणे होणार नाही, तोपर्यंत आपण महासत्ता म्हणून जगाला मान्य होणार नाही. सामान्य माणसाच्या हाती ती सत्ता जाणार नाही. श्रीमंत व्यक्ती अधिक श्रीमंत होत राहील व कालांतराने सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिकदृष्ट्या पराकोटीची विषमता माजेल. संविधानाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होणे म्हणून अत्यंत महत्त्वाचे आहे, हे द्रष्ट्या डॉ. बाबासाहेबांनी तेव्हाच ओळखले होते. डॉ. आंबेडकरांचा हा दृष्टिकोन लक्षात घेऊनच दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला यांनी आणि नेपाळने आपली राज्यघटना लिहिताना डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा सखोल अभ्यास केला होता. भारतीय राज्यघटनेत प्राचीन भारतीय परंपरा आणि सर्वंकष परिवर्तन यांचा समतोल साधण्याचे फार अवघड काम बाबासाहेबांनी केले होते. खरंतर हे भीमधनुष्य पेलणे सोपे नव्हते. संविधानाच्या रूपाने एक राजकीय-सामाजिक क्रांतिकारी विधानच त्यांनी अस्तित्वात आणले. त्यातून भारताच्या आधुनिकीकरणाला जोरदार चालना मिळाली, हे सत्य कोणीही नाकारत नाही.भारतीय राज्यघटना ही भारतीय समाजाच्या आधुनिकीकरणाची शक्तिशाली प्रेरणा ठरावी हा प्रमुख राजकीय उद्देश डोळ्यांपुढे ठेऊन त्यांनी संविधानाची सगळी उभारणी केली. लोकशाही जीवनपद्धती आणि सामाजिक क्रांती यांच्यात एकसंधता आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्याचाच भाग म्हणून, लोकशाही, प्रातिनिधिक सरकार, व्यक्तिस्वातंत्र्य, कायद्यापुढे सर्वांची समानता या गोष्टी फार क्रांतिकारी ठरल्या. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या वैश्विक मूल्यांवर आधारित नवभारताची जडणघडण करण्याची कामगिरी त्यातूनच साकारली गेली. राष्ट्रीय एेक्य आणि एकात्मता अबाधित राखण्याचे आव्हान संविधानाने पेलले आहे. डॉ. आंबेडकर हे आधुनिक भारताच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक आहेत. देशाची प्रगती मोजण्याची फूटपट्टी काय असावी, याबाबत मत मांडताना बाबासाहेब नेहमी सांगायचे, ज्या देशात स्त्रियांची प्रगती झाली असेल, तोच देश प्रगत मानला पाहिजे. राजकारणात व पक्षसंघटनेत स्त्रियांना अग्रक्रम दिला पाहिजे याबाबत ते नेहमी आग्रही होते. आज डॉ. बाबासाहेब हे सामाजिक न्याय, ज्ञाननिर्मिती आणि लोकशाही विचारधारेचे प्रतीक बनले आहेत. डॉ. आंबेडकर हे कायदेतज्ज्ञ होते, राजकीय विचारवंत होते, जागतिक राजकीय विचारांचा आणि राजकारणाचा त्यांचा गाढा व्यासंग होता. भारतात जे लोकोत्तर पुरुष जन्मले, त्यापैकीच बाबासाहेब एक हाेते. सगळं जग आज ज्यांच्या विद्वत्तेने स्तिमित होते, जसा द्रष्टा देशाला घटनाकार म्हणून लाभला हे या देशाचे खरोखरच अहोभाग्य आहे.

फीड फीडबर्नर 6 Dec 2025 12:10 am

मतमोजणी पुढे ढकलल्याने राजकीय वर्तुळात नाराजी

अविनाश पाठकमतमोजणी १९ दिवस पुढे ढकलली गेल्यामुळे सर्व ठिकाणच्या ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये बंद झालेल्या आहेत. आता त्या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी पहारे देत असल्याचे दिसून येत आहेत. गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्यात वादावादी झाल्याने राडे देखील झाल्याचे दिसून आले आहेत. नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख यांनी देखील या स्ट्राँग रूमच्या सुरक्षेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. मतमोजणी होईपर्यंत असे प्रकार आता होतच राहणार आहेत. मात्र आता सर्वांचे लक्ष २१ डिसेंबरकडे लागलेले दिसून येत आहे. त्यादिवशी गुलाल कुणाचा हे निश्चित होणार आहे.महाराष्ट्रात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्या. त्यात विदर्भातील ८० नगर परिषदा आणि २० नगरपंचायती यांचाही समावेश होता. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली. अर्ज भरले गेले अर्ज मागे घेण्याची तारीख उलटून सर्व उमेदवारांचे प्रचारही सुरू झाले. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह राजकीय नेत्यांची विदर्भात वर्दळ सुरू झाली. एकूणच विदर्भातील राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली होती. मात्र अचानकच मतदानाला अवघे २ दिवस उरले असताना काही ठिकाणी या प्रचाराला ब्रेक लागला. विदर्भातील ७ नगर परिषदांमध्ये निवडणुकांना निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. याशिवाय विविध नगर परिषदांमधील ५१ जागांवरील निवडणुकांना देखील स्थगिती देण्यात आली.स्थगिती मिळालेल्या नगर परिषदांमध्ये यवतमाळ, वाशिम, बाळापूर, देवळी, घुगुस, अंजनगाव सुर्जी, आणि देऊळगाव राजा यांचा समावेश होता. तर रामटेकमध्ये १ सदस्य, नरखेडमध्ये २, कोंढाळी २, कामठी २, वर्धा २, पुलगाव २, हिंगणघाट ३, वणी १, दिग्रस ३, पांढरकवडा २, गोंदिया ३, गडचांदूर १, मूल १, बल्लारपूर १,वरोरा १, रिसोड २, दर्यापूर १, अचलपूर २ वरूड १, धारणी २ गडचिरोलीतील आरमोरी १, खामगाव ४, शेगाव २, जळगाव जामोद ३ आणि भंडारा २ अशा नगर परिषदांमध्ये सदस्यांच्या निवडणुकांना देखील स्थगिती देण्यात आली. या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जशी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली, तशीच विदर्भातही सर्वत्र खळबळ उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत कोणत्या कायद्याच्या आधारे या निवडणुका स्थगित केल्या ते कळत नाही अशी शंका व्यक्त करत राज्य शासनातर्फे याबाबत निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली जाईल असेही त्यांनी जाहीर केले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांच्यासह सर्वच नेत्यांनी या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे. उर्वरित नगर परिषदांमध्ये आणि नगरपंचायतींमध्ये ठरल्याप्रमाणे २ डिसेंबरला मतदान पार पडले. काही किरकोळ घटना वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडल्याची बातमी आहे.हे मतदान शांततेत पार पडत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एका याचिकेवर सुनावणी सुरू होती. ही याचिका शकील अहमद अन्सारी, अश्विनी बुरडे आणि सचिन सुटे यांनी दाखल केली होती. राज्यातील ज्या ठिकाणच्या निवडणुका स्थगित केल्या असून त्या २० डिसेंबरला होणार आहेत, त्यांचे मतदान पार पडेपर्यंत उर्वरित निवडणुकांचे निकाल जाहीर केले जाऊ नयेत अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती.न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि रजनीश व्यास यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करत महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायती येथे होणाऱ्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी करण्यात यावी आणि त्यानंतरच निकाल जाहीर करावे असे आदेश दिले. या दरम्यान एक्झिट पोलचे निकाल देखील जाहीर करू नये असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. या निकालामुळे देखील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालाबद्दल देखील नाराजी व्यक्त केली आहे. राज्य शासनाने याबाबत सर्वोच्च न्यायालयात अपील देखील दाखल केले असून हे वार्तापत्र लिहीत असताना त्यावर सुनावणी होत असल्याची माहिती आहे. वार्तापत्र प्रसिद्ध होईल तेव्हा या प्रकरणात न्यायालयाचा काही निकालही आलेला असू शकतो. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे आता मतमोजणी १९ दिवस पुढे ढकलली गेली आहे. त्यामुळे सर्वांचेच ताबूत आता थंडावलेले दिसत आहेत. फक्त ज्या ठिकाणी मतदान होत आहे त्या ठिकाणी आता पुन्हा प्रचाराला सुरुवात झालेली दिसते आहे. या सर्व ठिकाणी उमेदवारांचा आतापर्यंत पैसा वेळ आणि मेहनत वाया गेली आहे. त्यामुळे या काळातील झालेला खर्च निवडणूक खर्चात जमा केला जाऊ नये अशी मागणीदेखील पुढे येते आहे. निवडणूक केंद्रांवर मतदान रद्द झाले होते, त्या ठिकाणच्या उमेदवारांना पूर्वी मिळालेले निवडणूक चिन्ह कायम राहणार आहे. मात्र, निवडणूक रद्द झाल्यामुळे वाढलेले निवडणूक खर्चाचे मर्यादेचे प्रस्ताव कोर्टाने नाकारले आहेत. निवडणूक प्रक्रियेत एकसंधता राहील आणि पुढे ढकललेल्या निवडणुकांच्या परिणामावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे आदर्श आचारसंहिता २० डिसेंबरपर्यंत लागू राहील, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर मोठा भार येणार आहे. ईव्हीएम आणि स्ट्राँग रूम व्यवस्था, जवळपास २८० मतमोजणी केंद्रे आणि स्ट्राँग रूम २१ डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावी लागतील. ईव्हीएम सुरक्षिततेसाठी सलग पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल. नेमके याच दरम्यान नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आहे. त्यामुळे विदर्भातील बराचसा पोलीस फौजफाटा नागपुरात व्यस्त राहणार आहे. परिणामी पोलीस यंत्रणेची चांगलीच ससेहोलपट होणार हे स्पष्ट दिसते आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी यांना दररोज स्ट्राँग रूमची पाहणी करून स्वाक्षरी करावी लागेल. या संपूर्ण प्रकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष ठेवून असलेल्या मतदारांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारांनी महिनोंमहिने केलेल्या प्रचारानंतर निकाल पुढे ढकलल्याने त्यांच्यातही नाराजीचे वातावरण आहे. या सर्व घडामोडींमुळे विदर्भात राजकीय वातावरण तापले असून २१ डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

फीड फीडबर्नर 6 Dec 2025 12:10 am

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९ डिसेंबरला होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या टी-२० सामन्याच्या तिकिटांसाठी चाहत्यांनी बाराबती स्टेडियमबाहेर अक्षरशः जनसागर उसळवला. तिकीट खरेदीसाठी एवढी अभूतपूर्व गर्दी झाली की, परिस्थिती हाताबाहेर गेली. अखेरीस, जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना नाईलाजाने सौम्य लाठीमार करावा लागला.ओडिशा क्रिकेट असोसिएशनने गुरुवारी (४ डिसेंबर) तिकीट विक्रीची घोषाणा केली होती. त्यानुसार शुक्रवारी (५ डिसेंबर)पासून सकाळी ९ वाजता तिकीट विक्री सुरू झाली. त्यामुळे उत्सुक हजारो चाहत्यांनी ‘भारतीय संघा’ला पाहण्याच्या ओढीने शुक्रवारी पहाटे ६ वाजण्यापूर्वीच बाराबती स्टेडियमच्या गेटवर गर्दी करण्यास सुरुवात केली. रात्री रांगा लावण्यास अधिकाऱ्यांनी मनाई केली असतानाही, काउंटर उघडण्यापूर्वीच गर्दीने प्रचंड रूप धारण केले होते. सकाळी ९ वाजता तिकीट विक्री सुरू होताच, गर्दीचे व्यवस्थापन करणे अधिकाऱ्यांसाठी एक मोठे आव्हान बनले.‘एक्स’वर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, परिस्थिती अत्यंत बिघडल्याचे दिसून येते. मैदानाबाहेर जवळजवळ चेंगराचेंगरीसदृश वातावरण निर्माण झाले होते. चाहत्यांची गर्दी अनियंत्रित होताना पाहून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. अखेर, जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना सौम्य लाठीमार करावा लागला. यावरून हे स्पष्ट होते की, या मैदानावर होणाऱ्या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये किती तीव्र उत्साह आहे. बाराबती स्टेडियमवर या वर्षातील हा दुसरा आंतरराष्ट्रीय सामना आहे. यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने इंग्लंडविरुद्ध येथे एकदिवसीय सामना खेळला होता, ज्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता.दरम्यान, एकीकडे टी-२० सामन्यासाठी इतकी उत्सुकता असताना, भारतीय संघ ६ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. रांची येथे रोमांचक विजय मिळवल्यानंतर, केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चार गडी राखून दारूण पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे, विशाखापट्टणम येथे विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्यास भारतीय संघाला संघर्ष करावा लागणार आहे. २-० अशा मानहानिकारक फरकाने कसोटी मालिकेत पराभव पत्करल्यानंतर, ही एकदिवसीय मालिका जिंकणे संघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

फीड फीडबर्नर 6 Dec 2025 12:10 am

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक, २०२५' सादर करून एक महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा केली आहे. या विधेयकाचा उद्देश देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि सार्वजनिक आरोग्याच्या खर्चासाठी कायमस्वरूपी निधीचा स्रोत उपलब्ध करणे आहे. या विधेयकानुसार, हा नवीन उपकर केवळ पान मसाला, गुटखा आणि अधिसूचित केलेल्या इतर हानिकारक उत्पादनांवर लावला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली. कारगिल युद्धाच्या वेळेस भारतीय सैन्याकडे शस्त्रास्त्रे आणि युद्धसामग्रीची मोठी कमतरता होती, हे अनेक सैन्य अधिकाऱ्यांनी नंतर स्पष्ट केले होते. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासून संरक्षण बजेटमध्ये सातत्याने होणाऱ्या कपातीमुळे ही परिस्थिती ओढवली होती. सैन्याकडे अधिकृतपणे मंजूर असलेल्या गरजेच्या तुलनेत केवळ ७० ते ८० टक्केच शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि उपकरणे उपलब्ध होती. यामुळे युद्धाच्या तयारीवर आणि सुरुवातीच्या टप्प्यात कारवाई करण्यावर थेट परिणाम झाला होता. ही परिस्थिती पुन्हा ओढवू नये म्हणून या कराचा पैसा देशाच्या सुरक्षेवर, सैन्याला सक्षम करण्यासाठी वापरला जाणार असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले.पान मसाल्यावर आतापर्यंत विक्री-आधारित जीएसटी आणि क्षतिपूर्ती उपकर लागत होता. मात्र, नवीन विधेयकानुसार, पान मसाला बनवणाऱ्या मशीनच्या उत्पादन क्षमतेवर आधारित मासिक उपकर लावला जाईल. उत्पादन क्षमतेवर कर लावल्यामुळे कंपन्यांना उत्पादन लपवून करचोरी करणे कठीण होईल, ज्यामुळे महसूल गळती थांबेल. पान मसाल्यावर ४०% जीएसटी (जीएसटीचा सर्वोच्च दर) आणि या नवीन उपकराची एकत्रित रक्कम पूर्वीच्या कराइतकीच राहणार आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 11:30 pm

सांगली पालिका निवडणूक: आष्ट्यात नेमका काय झाला गोंधळ? मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा

सांगली: सांगली जिल्ह्यातील सहा नगरपालिका व दोन नगरपंचायतीसाठी दि. २ डिसेंबर रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर आष्टा येथे निर्माण झालेल्या गोंधळामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत मतयंत्रे ठेवलेल्या कक्षाची सुरक्षा त्रिस्तरीय केली आहे. मतयंत्र कक्षातील प्रत्येक हालचालीचे चलतचित्रीकरण (व्हिडिओग्राफी) चोख ठेवण्यात आले असून, जिल्हा नियंत्रण कक्षातून या सुरक्षेवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. आष्ट्यात नेमका काय झाला […] The post सांगली पालिका निवडणूक: आष्ट्यात नेमका काय झाला गोंधळ? मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 10:57 pm

भारताकडील परकीय चलन साठा 1.8 अब्ज डॉलरने घटला

मुंबई – रिझर्व बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 28 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 1.8 अब्ज डॉलरने कमी होऊन 686.2 इतका झाला आहे. या अगोदरच्या आठवड्यातही भारताकडील परकीय चलन साठा 4.4 अब्ज डॉलरने कमी झाला होता. जगातील इतर मुख्य चलनाच्या स्वरूपात भारत आपल्याकडे परकीय चलन साठा करत असतो. संबंधित आठवड्यामध्ये या चलनाच्या विनिमय […] The post भारताकडील परकीय चलन साठा 1.8 अब्ज डॉलरने घटला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 10:44 pm

Rupee falls: व्याजदर कपातीनंतर घसरला रुपया…

मुंबई – रुपयाचे मूल्य बर्‍याच प्रमाणात घसरूनही रिझर्व बँकेने व्याजदरात कपात केल्यानंतर शुक्रवारी रुपयाचे मूल्य कालच्या तुलनेत पाच पैशांनी कमी होऊन 89.94 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेले. रिझर्व बँकेने भांडवल सुलभता मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या उपाययोजना केल्यामुळे रुपयाच्या मूल्यात जास्त घसरण झाली नसल्याचे विश्लेषकांनी नमूद केले. सकाळी रुपयाचा भाव 20 पैशांनी वधारला होता. पतधोरण जाहीर […] The post Rupee falls: व्याजदर कपातीनंतर घसरला रुपया… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 10:39 pm

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाहीमुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी शनिवारी ते रविवारी सकाळी ००:३० ते दुपारी ४:३० पर्यंत गोरेगाव आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर चार तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लॉक कालावधीत गोरेगाव आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर धावतील. रविवारी पश्चिम रेल्वे उपनगरीय विभागात दिवसा ब्लॉक राहणार नाही. महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– कल्याण मुख्य मार्ग तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– पनवेल हार्बर मार्गासह ट्रान्स-हार्बर व पोर्ट मार्गावर मध्य रेल्वेचा साप्ताहिक मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. सर्व मार्गांवरील नियमित उपनगरी सेवा रविवारी लागू असलेल्या वेळापत्रकानुसारच चालू राहतील.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 10:30 pm

ICC Nomination : विश्वचषक विजेती नायिका शफाली वर्माला ICC प्लेयर ऑफ द मंथसाठी नामांकन!

ICC Nomination Player of the Month November 2025 : आयसीसी महिला एकदिवसीय विश्‍वचषक विजेत्या भारतीय संघाची सदस्य असलेल्या सलामीवीर शफाली वर्माला आयसीसीच्या नोव्हेंबर महिन्याच्या ‘महिला प्लेयर ऑफ द मंथ’ साठी नामांकन मिळाले आहे. विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यात शफालीने नाबाद ८७ धावांची खेळी साकारली, तसेच २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेत भारताला पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकून दिला. या सामन्यात […] The post ICC Nomination : विश्वचषक विजेती नायिका शफाली वर्माला ICC प्लेयर ऑफ द मंथसाठी नामांकन! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 10:30 pm

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात पाव टक्के कपात; विकास दर वाढण्याबरोबरच महागाई कमी पातळीवर राहण्याचा अंदाज

Reserve Bank cuts interest rates: दुसर्‍या तिमाहित विकास दर वाढून 8.2% झाला असला तरी महागाई एक टक्क्यापेक्षा कमी आहे. रुपया घसरत असल्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीने शुक्रवारी अनपेक्षितरित्या आपल्या रेपो या मुख्य व्याजदरात पाव टक्का कपात केली आहे. एवढेच नाही तर रिझर्व बँकेने आगामी काळातही परिस्थिती पूरक राहिली तर […] The post रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात पाव टक्के कपात; विकास दर वाढण्याबरोबरच महागाई कमी पातळीवर राहण्याचा अंदाज appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 10:20 pm

Jay Pawar wedding: अजित पवारांनी मुलाच्या लग्नासाठी बहरीन का निवडलं? उपमुख्यमंत्र्या ‘झिंगाट’डान्स, लग्नाचे फोटो व्हायरल…

बहरीन: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या धाकट्या मुलाचा, जय पवार यांचा विवाह सोहळा सध्या बहरीनमध्ये शाही पद्धतीने पार पडत आहे. या शाही सोहळ्यात अजित पवारांचा ‘झिंगाट’ गाण्यावरील ठेका सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. बहरीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या लग्नसोहळ्याच्या वरातीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या लेकाच्या आनंदात सहभागी होत डान्स […] The post Jay Pawar wedding: अजित पवारांनी मुलाच्या लग्नासाठी बहरीन का निवडलं? उपमुख्यमंत्र्या ‘झिंगाट’ डान्स, लग्नाचे फोटो व्हायरल… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 10:08 pm

IndiGo Crisis : इंडिगोच्या संकटामुळे BCCI ची धावपळ; SMAT चे नॉकआऊट सामने इंदूरहून पुण्यात हलवले!

Indigo Flights Cancellation BCCI to Shift SMAT 2025 : विमान कंपनी इंडिगोमधील कर्मचारी संकटाचा आणि विमानसेवा रद्द होण्याच्या वाढत्या घटनांचा परिणाम आता थेट बीसीसीआयच्या कामकाजावरही दिसू लागला आहे. या इंडिगो संकटामुळे बीसीसीआयला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-२० स्पर्धेच्या नॉकआऊट फेरीच्या सामन्यांचे ठिकाण तातडीने बदलावे लागले आहे. इंदूरमध्ये १२ ते १८ डिसेंबर या कालावधीत होणारे हे […] The post IndiGo Crisis : इंडिगोच्या संकटामुळे BCCI ची धावपळ; SMAT चे नॉकआऊट सामने इंदूरहून पुण्यात हलवले! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 9:58 pm

जामखेड: कलाकेंद्रातील नृत्यांगनेचा लॉजमध्ये आढळला मृतदेह; माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल, आमदार रोहित पवारांच्या पोस्टने चर्चांना उधाण

जामखेड : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील नृत्यांगना दिपाली पाटील (वय 35) यांनी येथील एका लॉजमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांच्याविरुद्ध जामखेड पोलिसात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे गायकवाड यांची पत्नी लता संदीप गायकवाड या नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढलेल्या आहेत. त्यांच्याच […] The post जामखेड: कलाकेंद्रातील नृत्यांगनेचा लॉजमध्ये आढळला मृतदेह; माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल, आमदार रोहित पवारांच्या पोस्टने चर्चांना उधाण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 9:40 pm

Sunil Narine : केकेआरसाठी IPL 2026 मध्ये ‘हा’खेळाडू ठरु शकतो एक्स फॅक्टर ; सुनील नरेनचा दावा

Sunil Narine backs Umran Malik as KKR’s new X-factor : कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार फिरकीपटू सुनील नरेनने आगामी आयपीएल हंगामाबद्दल मोठे विधान केले आहे. आंद्रे रसेलने निवृत्ती घेतल्यामुळे मैदानावरील त्याची पॉवर हिटिंगची उणीव संघाला निश्चितच जाणवेल, पण उमरान मलिक त्याच्या १५० किमी प्रतितास वेगाच्या गोलंदाजीमुळे संघासाठी ‘एक्स फॅक्टर’ ठरू शकतो, असे मत नरेनने व्यक्त केले […] The post Sunil Narine : केकेआरसाठी IPL 2026 मध्ये ‘हा’ खेळाडू ठरु शकतो एक्स फॅक्टर ; सुनील नरेनचा दावा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 9:15 pm

‘मंदिराचा पैसा देवाचा, बँका वाचवण्यासाठी नाही’; सुप्रीम कोर्टने सुनावले सहकारी बँकांना सुनावले

नवी दिल्ली – मंदिराला दान मिळालेले पैसे हे देवाचे असतात आणि त्यांचा वापर सहकारी बँकेला वाचवण्यासाठी किंवा समृद्ध करण्यासाठी केला जाऊ शकत नाही अशी टिप्पणी एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केली. केरळ उच्च न्यायालयाने थिरुनेली मंदिर देवस्वोमला त्यांच्या ठेवी परत करण्याचे आदेश दोन सहकारी बँकांना दिले आहेत. त्याला आव्हान देणाऱ्या बँकांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सरन्यायाधीश […] The post ‘मंदिराचा पैसा देवाचा, बँका वाचवण्यासाठी नाही’; सुप्रीम कोर्टने सुनावले सहकारी बँकांना सुनावले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 9:12 pm

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत. माहिती मिळताच अनेक जण घटनास्थळी पक्ष्यांना पाहण्यासाठी गोळा होऊ लागले. परिसरातील रस्ता आणि झाडाझुडपांमध्ये मेलेल्या पक्ष्यांचा खच आहे. इतक्या मोठ्या संख्येने तेही एकाच ठिकाणी मृत पक्षी आढळल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पोलिस तसेच वनविभागाला ही माहिती मिळताच अधिकारी, कर्मचारी आणि पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने सर्व मृत पक्ष्यांना ताब्यात घेत पंचनामा केला. सर्व पक्षी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या पक्षांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. काही नागरिकांना रस्त्याच्या दुतर्फा काही मृत पक्षी पडलेले आढळले. अशाचप्रकारे अन्य ठिकाणीही पक्षी मृतावस्थेत पडल्याच्या बातम्या स्थानिकांमध्ये पसरल्या. एकाला माहिती मिळताच अन्य लोकही लगेच त्यांच्या कुटुंबियांना ही बातमी सांगू लागले. हे मृत्यू नैसर्गिक आहेत का या पक्ष्यांवर कुठल्या रोगाचा फैलाव झाला आहे की विषबाधा याची चाचपणी केली जाईल. कोणी हेतूपुरस्सर त्यांना विषारी पदार्थ दिला का ? ही शक्यता तपासण्यात येत आहेत. या प्रकरणाचा तपास ठाणे उपवनसंरक्षक सचिन रेपाले, ठाणे वन्यजीव अधिकारी सोनल वळवी आणि इतर अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वन विभागाने घटनास्थळ आणि आसपासच्या परिसराची तपासणी केली असून माती, अन्नाचे नमुने तसेच पक्ष्यांचे ऊतक नमुने गोळा करण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 9:10 pm

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस स्टँडसारखी झाली असून, प्रवाशांची मोठी गर्दी विमानतळावर पाहायला मिळत आहे. इंडिगाने पत्रक जारी करत प्रवाशांची माफी देखील मागितली. मात्र, अचानक विमानसेवा खंडीत झाल्याने पुणे, मुंबई, कोलकाता, दिल्ली, बंगळुरू येथील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या विमातळावरुन दुसरीकडे मार्गस्थ होणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यातच, पुण्याहून मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर गगनाला भिडल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे ते मुंबई विमान प्रवास करण्यासाठी तब्बल ६१ हजार रुपये प्रवाशांना मोजावे लागले. या वाढीनुसार, पुणे ते दिल्ली विमानाचे तिकीट २७ हजार आणि पुण्याहून बंगळुरूसाठी ४९ हजार रुपये प्रवाशांना मोजावे लागले.दरम्यान, मुंबईहून लंडनला जाण्यासाठी किमान प्रिमियम इकॉनॉमीचे तिकीट ५० हजार ते ७० हजार रुपयांपर्यंत आहेत. तर, मुंबईहून थायलंडसाठी १५ ते ३० हजार रुपयांपर्यंत विमान भाडे आकारले जाते. मात्र, इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेमुळे पुणे ते मुंबई विमानाचे तिकीट चक्क ६१ हजार रुपयांपर्यंत पोहोचले.सलग चौथ्या दिवशी इंडिगो कंपनीला ऑपरेशनल समस्यांशी गंभीरपणे झुंजावे लागत असून प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत आहे. विमान उड्डाणाची संख्या कमी झाल्यामुळे इतर विमान कंपन्यांची तिकिटे मात्र चौपट दराने विकली जात आहेत. देशभरातून इंडिगोची तब्बल ६०० हून अधिक विमाने शुक्रवारी रद्द करण्यात आली आहेत. त्यामध्ये राजधानी दिल्लीतून आज रात्री ११.५९ वाजेपर्यंत इंडिगोचे एकही विमान उड्डाण होणार नाही, असे निवेदन कंपनीने जारी केले.दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांना घालून दिलेल्या नवीन नियमांमुळे इंडिगो या देशातील सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीला मोठा फटका बसला आहे. या कंपनीची वाहतूक सेवा पूर्णपणे कोलमडून पडली. नवीन ‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन’च्या (एफडीटीएल) नियमांमुळे कर्मचाऱ्यांची (क्रू) कमतरता निर्माण झाली आहे. मात्र, आता डीजीसीएने एफडीटीएलशी संबंधित सर्व निर्देश मागे घेतले. त्यामुळे आता इंडिगोसह देशभरातील विमान वाहतूक कंपन्यांची सेवा सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 9:10 pm

Anil Ambani: अनिल अंबानींच्या रिलायन्सवर ईडीची पुन्हा कारवाई, 1120 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई: उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स ग्रुपभोवती ईडीचा फास अधिकाधिक आवळत चालला आहे. येस बँक आणि ग्रुप कंपन्यांशी संबंधित कथित फसवणूक प्रकरणात ईडीने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत 1,120 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या 18 मालमत्ता जप्त केल्या आहेत. या ताज्या कारवाईमुळे अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या आहेत. यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांसह आतापर्यंत 10,117 कोटी […] The post Anil Ambani: अनिल अंबानींच्या रिलायन्सवर ईडीची पुन्हा कारवाई, 1120 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 8:54 pm

बिग बॉस १९ स्पर्धकांना दाखवली ट्रॉफीची पहिली झलक, टॉप ५ स्पर्धकांचे डोळे दिपले

मुंबई : बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना घरातील पाच फायनलिस्ट निश्चित झाले आहेत. बिग बॉसने या सीझनच्या ट्रॉफीची पहिली झलक दाखवून घरातील स्पर्धकांना रोमांचित केले. यंदाची ट्रॉफी विशेष आहे कारण तिचा लूक अगदी तसा आहे जसा सलमान खान शोच्या प्रोमोमध्ये पोज देताना दिसतो.पाच फायनलिस्ट जाहीरफायनल फेरीसाठी निवडले गेलेले पाच स्पर्धक आहेत गौरव खन्ना, अमल मलिक, तान्या मित्तल, फरहाना आणि प्रणित मोरे. मालतीची शोमधून एक्झिट झाली. असेम्बली रूममध्ये बिग बॉसने यंदाच्या सीझनच्या ट्रॉफीचं अनावरण केलं. दोन हात जोडलेल्या डिझाइनमधील ही खास ट्रॉफी पाहताच स्पर्धकांना आनंद गगनात मावेनासा झाला.बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले ७ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. यात विजेत्याला मिळणार आहे एक सोनेरी स्वप्नांची ट्रॉफी.. खास डिझाईन केलेली आणि विजेत्यांना अविस्मरणीय ठरेल अशी ही ट्रॉफी आहे. ही ट्रॉफी एक खास प्रतीक आहे. यंदाच्या सीझनची थीम घरवालों की सरकार अशी आहे. ट्रॉफीचा वरचा भाग दोन हातांच्या आकाराचा आहे जो बोटांनी एकत्र जोडलेला आहे. ही ट्रॉफी आहे सिल्व्हर क्रॉस हातांची आणि हिऱ्यांनी मढवलेली आहे. त्यामुळे ती चमकदार दिसतेय. याच हातांच्या खाली BB हा लोगो आहे. ही आकर्षक अशी ट्रॉफी घराच्या आकारासारखी आहे. महत्त्वाचं म्हणजे ही ट्रॉफी सलमान खान ज्याप्रमाणे हात जोडतो त्या प्रतिमेशी मिळतीजुळती आहे.आता लक्ष सात डिसेंबरच्या रात्रीकडे...रात्री नऊ वाजता बिग बॉसचा लाईव्ह फिनालेचा महाप्रसंग रंगणार आहे. त्यातच या आकर्षक ट्रॉफीवर नाव कोण कोरणा र? स्टारडम कोणाच्या वाट्याला येणार? बस... काही तास शिल्लक आहेत...आणि त्यानंतर ठरणार आहे बिग बॉस सीझन १९ चा खरा बॉस...

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 8:10 pm

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही. वरळीतील एका खासगी हॉटेलमध्ये भाजपप्रणित युनियनचा फलक लावण्यावरून शिउबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी राडा घातला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.वरळीतील हॉटेल सेंट रेजिसमध्ये भाजपने आपली कामगार संघटना स्थापन केली असून, त्याबाबतचा फलक लावण्याचे काम शुक्रवारी सुरू होते. मात्र, शिउबाठाच्या कार्यकर्त्यांना दादागिरी करीत, फलक लावण्यास विरोध केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही त्याला जशासतसे उत्तर दिल्यामुळे हॉटेलच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करावा लागला.याविषयी माहिती देताना स्थानिक पदाधिकारी समीर कदम म्हणाले, “आमच्या युनियनचा बोर्ड लावण्याकरिता आम्ही तेथे जमलो होतो. कामगारांचा युनियनशी चांगला संपर्क राहील आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी आम्हालाही आवाज उठवता येईल, हा त्यामागचा हेतू होता. मात्र, शिउबाठाच्या काही कार्यकर्त्यांनी उगाच गोंधळ घालायला सुरवात केली. भाजपने कोणतीही संघर्षाची भूमिका घेतलेली नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. याविषयी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, “सगळ्यांना कामगार युनियनमध्ये त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे काम करण्याचा पूर्ण हक्क आहे. संविधानानुसार सगळ्यांना मनाप्रमाणे काम करू द्यावे”, असे त्यांनी स्पष्ट केले.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 8:10 pm

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशी इंडिगोच्या शेकडो उड्डाणांना रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाला. इंडिगोच्या या बेफिकीर कामामुळे बरेच प्रवासी एकाच ठिकाणी अडकून पडले.इंडिगोचे एक विमान नागपूरहुन पुण्याला जाणार होते. पण ते पुण्याला न पोहोचता थेट हैदराबादला गेले. विमान हैदराबादला पोहोचलं, तेव्हा तिथे देखील त्यांना तब्बल एक तास विमानाच्या बाहेर येऊच दिलं नाही, झालेल्या घटनेमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अखेर प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी विमानातच गोंधळ घालायला सुरुवात केली. प्रवाशांनी विमानात गोंधळ सुरू केल्यामुळे अखेर या प्रवाशांना विमानातून बाहेर सोडण्यात आलं, नागपुरहून पुण्याला निघालेले अनेक प्रवासी अजूनही हैदरबाद विमानतळावरच अडकून पडले आहेत. सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.हाती आलेल्या माहितीनुसार नागपूरमधील प्रवाशांना इंडिगोच्या विमानाने पुण्याला जायचे होते. मात्र इंडिगोने गुरुवारी प्रवाशांना मध्यरात्री नागपुरातून घेऊन पुण्याऐवजी हैदराबादला सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी नागपूर – पुणे अशी इंडिगोची फ्लाईट नियोजित होती. मात्र ती फ्लाईट एक वाजेपर्यंत नागपुरातून उडालीच नाही, त्यानंतर रात्री एक वाजता फ्लाईटने उड्डाण घेतले. मात्र अर्ध्या तासाच्या उड्डाणानंतर आपल्या विमानाला पुण्यात लँड होण्याची परवानगी मिळत नाही, त्या ठिकाणी लँड होण्यासाठी जागा नाही, असं कारण सांगून इंडिगोच्या पायलटने आणि व्यवस्थापनाने फ्लाईट पुण्या ऐवजी हैदराबादला लँड केलं.हे विमान हैदराबादला लँड झाल्यानंतरही प्रवाशांना सुमारे एक तास विमानाच्या बाहेर येऊ दिले नाही. अखेरीस काही प्रवाशांनी विमानाच्या आत गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना हैदराबाद टर्मिनल्सवर विमानातून बाहेर सोडण्यात आले. अजूनही नागपूरचे अनेक प्रवासी जे पुण्याला जायला निघाले होते, ते हैदराबादमध्येच अडकून पडले आहेत. नागपूरातील प्रवाशांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वाराणसीवरून पुण्याला जाण्यासाठी निघालेले देखील अनेक प्रवासी सध्या हैदराबादमध्ये अडकून पडले आहेत. हैदराबाद विमानतळावर प्रचंड हाल होत असल्याची तक्रार या प्रवाशांनी केली आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 8:10 pm

Nashik Tapovan News : “हे म्हणजे, माणसं मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचे…”; वृक्षतोडीवरून सयाजी शिंदे पुन्हा भडकले

Nashik Tapovan News । Sayaji Shinde – प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे नाशिकच्या तपोवनात आले असता त्यांनी राज्‍य सरकारवर जोरदार टीका केली असून ‘निवडून दिले म्हणजे सगळे अधिकार तुमच्याकडे आहेत असे नाही. सर्वसामान्य माणसाचा विचार केला पाहिजे. मोठी झाडे तोडायची आणि नवीन झाडं लावायची हे चूक आहे. काही माणसे मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचे, […] The post Nashik Tapovan News : “हे म्हणजे, माणसं मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचे…”; वृक्षतोडीवरून सयाजी शिंदे पुन्हा भडकले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 7:47 pm

सातारा: उसाच्या ट्रॉलीचा डाबर तूटला; ट्रॅक्टर थेट पुलावर लोंबकळला…

कराड – ओंड ते उंडाळे यादरम्यान असलेल्या तुळसण पुलावर शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. अचानक पाठीमागील ट्रॉलीचा डाबर तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वेगात असलेला ट्रॅक्टर सरळ पुलाच्या कठड्यावर जाऊन अडकला. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शेवाळेवाडी- म्हासोली येथील अथणी- रयत कारखान्याकडे ऊस घेऊन […] The post सातारा: उसाच्या ट्रॉलीचा डाबर तूटला; ट्रॅक्टर थेट पुलावर लोंबकळला… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 7:31 pm

Vaibhav Suryavanshi : नाद करा पण वैभवचा कुठं! विराट-रोहितलाही मागे टाकत ठरला २०२५ चा ‘गूगल किंग’

Vaibhav Suryavanshi Trend in Google Search in 2025 : भारतीय क्रिकेटमधील युवा स्टार वैभव सूर्यवंशीने एक खास विक्रम आपल्या नावावर करत २०२५ मध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मासह सर्व दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. २०२५ हे वर्ष वैभवच्या कारकिर्दीसाठी अत्यंत यशस्वी ठरले, ज्यात त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि त्याने शतकी खेळी देखील साकारली. […] The post Vaibhav Suryavanshi : नाद करा पण वैभवचा कुठं! विराट-रोहितलाही मागे टाकत ठरला २०२५ चा ‘गूगल किंग’ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 7:27 pm

Vladimir Putin In India : “पुतिन तुम्हाला मदत करण्यासाठी नाही तर…”; अखिलेश यांनी मोदी सरकारला केले लक्ष्य

Vladimir putin | Narendra modi | Akhilesh Yadav – समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पुतिन यांच्या भारत भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रशियन अध्यक्ष तुम्हाला मदत करण्यासाठी नाही तर व्यवसाय करण्यासाठी आले आहेत. रशिया आणि चीनमधील संबंध खूप मजबूत आहेत असे अखिलेश यांनी म्हटले आहे. आज डॉलर कुठे पोहोचला आहे? टेरिफ लादण्यात आले […] The post Vladimir Putin In India : “पुतिन तुम्हाला मदत करण्यासाठी नाही तर…”; अखिलेश यांनी मोदी सरकारला केले लक्ष्य appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 7:14 pm

ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग! भाजप अन् अजित पवार गटाला धक्का; संभाजीनगरमधील राजकीय समीकरणे बदलणार?

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात प्रक्षप्रवेशाची राजकीय घडामोड समोर आली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने धक्का दिला आहे. केवळ राष्ट्रवादीचेच नव्हे, तर भारतीय जनता पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनीही ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील राजकीय समीकरणे बदलणार का, असा प्रश्न […] The post ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग! भाजप अन् अजित पवार गटाला धक्का; संभाजीनगरमधील राजकीय समीकरणे बदलणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 7:12 pm

हजारो विमानांच्या फेऱ्या सतत रद्द का होत आहेत?:कोणत्या नियमांवरून गोंधळ, DGCA ने सूट का दिली; इंडिगोलाच सर्वाधिक फटका कसा बसला

इंडिगो एअरलाइन्सच्या दर 10 पैकी 9 विमानांना उशीर होत आहे किंवा ती रद्द झाली आहेत. गेल्या 72 तासांत 1200 हून अधिक विमानांवर परिणाम झाला आहे आणि लाखो प्रवासी त्रस्त आहेत. इंडिगोचे म्हणणे आहे की, 'फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन'च्या (Flight Duty Time Limitation) नवीन नियमांची अंमलबजावणी करताना इतकी मोठी अव्यवस्था निर्माण झाली. सध्या, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत नियमांमध्ये तात्पुरती सूट दिली आहे, परंतु परिस्थिती सामान्य होण्यास वेळ लागेल. हजारो विमानांच्या थांबण्यामागचे खरे कारण काय आहे, समस्येची सुरुवात कशी झाली, इंडिगोवरच सर्वाधिक परिणाम का झाला, नियमांमध्ये सूट का द्यावी लागली आणि आता पुढे काय होईल; दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घ्या 6 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे... प्रश्न-1: गेल्या 2-3 दिवसांत असे काय घडले की देशभरातील हजारो विमाने थांबली? उत्तरः खरं तर, पायलट युनियनने जास्त कामाचे तास आणि थकवा यामुळे जानेवारी 2024 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर, DGCA ने फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांमध्ये बदल केले. पायलटला आराम देण्यासाठी 1 जुलै 2025 रोजी 'फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL)' चे नियम लागू करण्यात आले होते. यानुसार, एअरलाइन कंपन्यांसाठी पायलटना आठवड्यातून 36 तासांऐवजी 48 तास आराम, म्हणजेच दोन दिवसांची साप्ताहिक सुट्टी देणे बंधनकारक केले होते. या काळात कोणतीही सुट्टी साप्ताहिक सुट्टी म्हणून मोजण्यावर बंदी घालण्यात आली होती. FDTL च्या दुसऱ्या टप्प्यात, 1 नोव्हेंबरपासून नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) पायलट आणि इतर क्रू मेंबर्सच्या सलग रात्रीच्या शिफ्टवरही बंदी घातली होती. या नवीन नियमांमुळे इंडिगो पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करू शकले नाही आणि गेल्या 4 दिवसांत इंडिगोने 1200 हून अधिक उड्डाणे रद्द केली... DGCA ने म्हटले आहे की, FDTL फेज 2 च्या नियोजनातील कमतरतेमुळे क्रूची कमतरता निर्माण झाली आहे. इंडिगो काही ना काही कारणे देत राहिली. जेव्हा एक हजारहून अधिक विमानांची उड्डाणे रद्द झाली, तेव्हा इंडिगोने अखेर आपली चूक मान्य करत प्रवाशांची माफी मागितली आहे. प्रश्न-2: इंडिगो उपायांच्या ऐवजी सतत कारणे का देत राहिले? उत्तर: 2 डिसेंबर रोजी विमान रद्द झाल्यापासून इंडिगोने अनेक वेळा अधिकृत निवेदन जारी करून याची वेगवेगळी कारणे सांगितली, परंतु स्पष्टपणे हे सांगितले नाही की नवीन नियमांनुसार पायलट आणि क्रूला अधिक आराम देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही… इंडिगोने कबूल केले की, क्रूची आवश्यकता अंदाजित प्रमाणापेक्षा जास्त होती. इंडिगोने सांगितले की, नवीन क्रू रोस्टरिंग नियम आणि इतर तांत्रिक कारणे, हवामान इत्यादींच्या एकत्रित परिणामामुळे त्यांच्या विमानांवर परिणाम झाला. अहवालानुसार, इंडिगोला नवीन पायलट आणि इतर कर्मचारी नियुक्त करण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता, परंतु इंडिगोने गरजेनुसार नवीन भरती केली नाही. इंडिगोने एक लांब नोट लिहून प्रवाशांची माफी मागितली आहे आणि लवकरच सेवा पूर्ववत करण्याची ग्वाही दिली आहे. प्रश्न-3: पायलट-क्रूच्या विश्रांतीचा संपूर्ण नियम काय आहे? उत्तर: FDTL च्या नियमांनुसार… एअरलाईन्सना दरमहा थकवा-धोका अहवाल सादर करावा लागेल. असे न केल्यास 1 कोटी रुपयांपर्यंत दंड लागू शकतो. प्रश्न-4: सरकारने हे नियम का बनवले आणि त्यांची अंमलबजावणी करणे का आवश्यक होते? उत्तरः DGCA ने वैमानिकांच्या थकव्याशी संबंधित अहवालांचे पुनरावलोकन केल्यानंतर हे नियम लागू केले आहेत. गेल्या 3-4 वर्षांत वेळोवेळी अनेक वैमानिक संघटनांनी DGCA ला पत्र लिहून या नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती, जेणेकरून वैमानिकांना आवश्यक विश्रांती मिळू शकेल. दिल्ली उच्च न्यायालयात 2019 पासून सुरू असलेल्या या याचिकांनंतर DGCA ने हे नियम बनवले आहेत. DGCA चे म्हणणे आहे की, वैमानिकांचा थकवा मोठ्या अपघातांना जन्म देऊ शकतो. जगभरातील एअरलाईन्सही याला एक मोठा धोका मानतात. थकव्यामुळे खराब परिस्थितीत निर्णय घेण्याची आणि रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याची क्षमताही प्रभावित होऊ शकते. इकोनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, DGCA ने 2023 मध्ये 1,622 व्यावसायिक वैमानिकांना परवाने जारी करण्याची घोषणा केली होती, परंतु तरीही पुढील 5 वर्षांत 2,375 वैमानिकांची कमतरता राहील. 2029 पर्यंत एकूण 22,400 वैमानिकांची गरज असेल, तर सध्या फक्त 11,745 वैमानिक आहेत. 2022 ते 2025 दरम्यान उड्डाणे वाढल्यामुळे वैमानिकांवर, विशेषतः कॅप्टनवर कामाचा ताण वाढला आहे. भारतातील वैमानिक प्रशिक्षण संस्थांची क्षमताही कमी आहे. दरवर्षी फक्त 1200-1500 वैमानिकांनाच प्रशिक्षणानंतर परवाना मिळू शकतो. तर गरज यापेक्षा खूप जास्त आहे. प्रश्न-5: अमेरिका आणि यूकेमध्ये वैमानिकांना किती विश्रांती मिळते? उत्तरः अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FFA) आणि युरोपच्या युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (EASA) ने वैमानिकांना आवश्यक विश्रांती देण्यासाठी असेच काही नियम बनवले आहेत, जे अमेरिका आणि युरोपातील जवळपास सर्व एअरलाईन्सना लागू होतात… प्रश्न-6: नवीन नियमांमुळे सर्वाधिक इंडिगोलाच का फटका बसला? उत्तरः नवीन नियमांमुळे इंडिगो सर्वाधिक प्रभावित झाली आहे, कारण भारताच्या एअरलाइन्स मार्केटमध्ये तिचा सर्वाधिक 60% वाटा आहे. एअरलाइन दिवसभरात सुमारे 2,300 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवते. ही संख्या एअर इंडियाच्या एका दिवसात चालवल्या जाणाऱ्या उड्डाणांच्या जवळपास दुप्पट आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर जर 10–20 टक्के उड्डाणे देखील उशिराने धावली किंवा रद्द झाली, तर याचा अर्थ 200–400 उड्डाणे प्रभावित होणे असा होतो. इंडस्ट्री इनसाइडरच्या अहवालानुसार, इंडिगो भारतात मोठ्या प्रमाणावर काम करते. एअरलाइन्स मार्केटमध्ये तिचे वर्चस्व आहे. इंडिगोच्या सर्वाधिक आणि सातत्याने विमानांच्या फेऱ्या असतात. रात्री उशिराच्या आणि सकाळच्या उड्डाणांवर इंडिगो सर्वाधिक लक्ष केंद्रित करते. इंडस्ट्री इनसाइडरनुसार, या तुलनेत इतर एअरलाइन्स कंपन्या नवीन विमानांच्या वितरणातील विलंब आणि दुरुस्तीसाठी थांबलेल्या विमानांशी झगडत आहेत. अशा परिस्थितीत त्यांची उड्डाणे कमी आणि कर्मचारी जास्त आहेत. या एअरलाइन्स नवीन नियमांनुसार पायलट्सच्या ड्युटीचे वेळापत्रक सहजपणे तयार करू शकत आहेत. सध्या इंडिगोकडे 5,456 पायलट आणि 10,212 केबिन क्रू सदस्य आहेत. 41 हजारांहून अधिक कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. इंडिगोचे म्हणणे आहे की नवीन फ्लाइट टाइम लिमिटेशन नियमांमुळे पायलट आणि क्रूची कमतरता निर्माण झाली आहे. नवीन नियमांनुसार, पायलटांच्या उड्डाणाच्या वेळेची मर्यादा दररोज 8 तासांपर्यंत कमी करण्यात आली आहे. रात्रीच्या लँडिंगची संख्या 6 वरून 2 पर्यंत कमी करण्यात आली आहे. क्रूसाठी 24 तासांत 10 तास विश्रांतीची वेळ ठेवण्यात आली आहे. प्रश्न-7: या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होऊ शकते? उत्तरः एव्हिएशन तज्ज्ञ अनंत सेठी म्हणतात की, इंडिगोने विचारपूर्वक संप केला आहे. नवीन नियम अचानक लागू केले गेले नव्हते. कर्मचाऱ्यांची कमतरता पूर्ण करण्यासाठी इंडिगोकडे पुरेसा वेळ होता, परंतु भारतीय एव्हिएशन क्षेत्रात इंडिगोचा वाटा सुमारे 65% आहे. त्यांनी आपला खर्च कमी करण्यासाठी नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली नाही आणि दबाव निर्माण करण्यासाठी उड्डाणांवर परिणाम केला. अनंत म्हणतात, ‘सध्या सरकारकडे प्रवाशांची समस्या दूर करण्याचा पर्याय नाही, त्यामुळे सध्या इंडिगोशी बोलणी सुरू आहेत. DGCA ने इंडिगोला विचारले आहे की, ते किती टप्प्यांत आणि कोणत्या प्रकारे नवीन नियम लागू करतील. कदाचित काही दिवसांत इंडिगो नवीन वेळापत्रक जारी करून काही उड्डाणे कमी करेल, कारण हाच एक उपाय आहे, अचानक पायलट वाढवणे सोपे काम नाही.’ अनंत यांच्या मते, पायलटला 48 तास आराम देणे आवश्यक आहे, त्यामुळे सरकार त्यांचे कामाचे तास कमी करण्यास सहजासहजी तयार होणार नाही.

दिव्यमराठी भास्कर 5 Dec 2025 7:08 pm

Baramati : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; विदेशी दारूचा साठा आणि वाहन ताब्यात

बारामती – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत मद्य वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत सुमारे 6 लाख 97 हजार रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा आणि एक चारचाकी वाहन जप्त केले आहे. अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. तालुक्यातील मौजे शिरवली गावाच्या हद्दीत सांगवी–बारामती रोड, माळेगाव फाटा […] The post Baramati : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; विदेशी दारूचा साठा आणि वाहन ताब्यात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 6:54 pm

Bribe News: भूमी अभिलेख कर्मचाऱ्याला दीड लाखांची लाच घेताना रंगोहात अटक; शिवरस्ता मोजणी प्रकरण

अहिल्यानगर: नेवासा येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या भूकरमापक अजयभानसिंग गुलाबसिंग परदेशी (वय ४८) याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १.५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. शासकीय कामासाठी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःचा फायदा करून घेण्याच्या उद्देशाने ही लाच मागण्यात आली होती. हे प्रकरण पाथरवाला गायगव्हाण (ता. नेवासा) शिवारातील शिवरस्त्याच्या वादातून उद्भवले आहे. […] The post Bribe News: भूमी अभिलेख कर्मचाऱ्याला दीड लाखांची लाच घेताना रंगोहात अटक; शिवरस्ता मोजणी प्रकरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 6:53 pm

Fakhar Zaman : पाकिस्तानच्या खेळाडूला पंचांशी पंगा घेणं पडलं महागात! ICC ने केली मोठी कारवाई

ICC Fakhar Zaman fined 10% match fee : पाकिस्तान संघाने नुकतीच आपल्या मायदेशात खेळल्या गेलेल्या टी-२० तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयात पाकिस्तानने अष्टपैलू कामगिरी केली होती. मात्र, आता या सामन्यातील एका चुकीमुळे पाकिस्तानचा फलंदाज फखर झमानवर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला असून, […] The post Fakhar Zaman : पाकिस्तानच्या खेळाडूला पंचांशी पंगा घेणं पडलं महागात! ICC ने केली मोठी कारवाई appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 6:45 pm

राज्यात अपघाताचे सत्र सुरूच.! अंबा घाटात प्रवासी बसला अपघात; थेट १०० फूट खोल दरीत कोसळली

Bus accident – राज्यात अपघाताचे सत्र सुरू असून अंबा घाटात आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास प्रवासी बसचा अपघात घडला आहे. हा अंबा घाट महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि रत्नागिरीला या मुख्य शहरांना जोडतो. याच घाटात एका खासगी बसचा आज दुर्दैवी अपघात झाला आहे. मध्यप्रदेशचे पासिंग असलेली ही खासगी बस तब्बल ७० ते १०० फूट खोल दरीत कोसळली […] The post राज्यात अपघाताचे सत्र सुरूच.! अंबा घाटात प्रवासी बसला अपघात; थेट १०० फूट खोल दरीत कोसळली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 6:37 pm

‘महाराष्ट्राच्या विकासासाठी रात्रीची झोपही नाही’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण

मुंबई: महायुती सरकारने आज सत्तेत एक वर्ष पूर्ण केले असून, या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची महत्त्वपूर्ण कामगिरी आणि भविष्यातील धोरणे स्पष्ट केली आहेत. “मला रात्रीची झोप यासाठी येत नाही, कारण मला महाराष्ट्रासाठी अनेक गोष्टी करायच्या आहेत,” अशा शब्दांत त्यांनी राज्याप्रतीची आपली बांधिलकी व्यक्त केली. वर्षपूर्तीनिमित्त बोलताना फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आणि […] The post ‘महाराष्ट्राच्या विकासासाठी रात्रीची झोपही नाही’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 6:13 pm

indigo flight cancellation : इंडिगो समस्येचे मूळ काय आहे? कंपनीने प्रवाशांना काय सांगितलं, वाचा सविस्तर घटनाक्रम…

indigo flight cancellation : भारतातील आघाडीची विमान वाहतूक कंपनी इंडिगो एअरलाइन्सच्या ऑपरेशनल समस्यांमुळे देशभरातील अनेक फ्लाईट्स रद्द केल्याने बहुतांश विमानतळांवर प्रवाशांना अडचणी येत आहेत. या समस्येमुळे अन्य विमान कंपन्यांनी भाडेवाढ केली असून सध्या विमानतळ प्रशासन इंडिगोच्या अकार्यक्षमतेमुळे हतबल झाले आहे. या सगळ्यामध्ये प्रवाश्यांना होत असलेल्या त्रासाची कुणाला पर्वा आहे की नाही, असे चित्र निर्माण झाले […] The post indigo flight cancellation : इंडिगो समस्येचे मूळ काय आहे? कंपनीने प्रवाशांना काय सांगितलं, वाचा सविस्तर घटनाक्रम… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 6:11 pm

रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या आगामी चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टिझरमध्ये ‘बाई अडलीये म्हणून नडलीये’ ही प्रभावी टॅगलाईन आणि सायकलवरून गावागावांत फिरणाऱ्या आरोग्य सेविकेची झलक दाखवत चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधले होते. टिझरमधील वास्तववादी दृश्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात आशाच्या प्रवासाबद्दल वेगळे कुतूहल निर्माण झाले.या कुतूहलाला उधाण आले ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चालत रहा पुढे’ या प्रेरणादायी गाण्यामुळे. आशाच्या संघर्षाला बळ देणारे हे गीत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, प्रेक्षकांनी तिच्या जिद्दीचे आणि धैर्याचे कौतुक केले आहे. यानंतर प्रदर्शित झालेला दमदार ट्रेलर तर प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढवणारा ठरला आहे.चित्रपटाचा ट्रेलर लाँच आयुष्यमान भारत – मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, ज्येष्ठ साहित्यिक व ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू मंगलप्रभात लोढा आणि आशा सेविका यांच्या उपस्थितीत पार पडला.‘आशा’ हा महिलांच्या संघर्षाचा वास्तववादी प्रवास मांडणारा चित्रपट आहे. ट्रेलरमध्ये रिंकूने साकारलेली आशा गावोगावी आरोग्याची जबाबदारी पेलताना, कुटुंबातील ताणतणावांचा सामना करताना, अन्यायासमोर ठामपणे उभी राहताना दिसते. तिच्या आयुष्यातील वेदना, तळमळ आणि न थकणारी धडपड ट्रेलरमधून स्पष्टपणे जाणवते.रिंकूसोबत सयंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते या कलाकारांनी चित्रपटाला अधिक बळ दिले आहे. महिलांच्या आयुष्यातील कठोर निर्णय, सामाजिक वास्तव, भावनिक दडपण आणि अस्मितेची सतत सुरू असलेली लढाई या सर्वांचा प्रभावी संगम चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘आशा’ ही कथा एका सेविकेपुरती मर्यादित नसून दररोज जीवनाशी दोन हात करणाऱ्या लाखो महिलांची कहाणी आहे.दीपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’चे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दीपक पाटील असून मुरलीधर चटवानी आणि रवींद्र औटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओज या बॅनरखाली प्रदर्शित होणारा हा चित्रपट १९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. टिझर, गाणे आणि ट्रेलरमुळे ‘आशा’विषयीची उत्सुकता सध्या उच्चांक गाठत आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 6:10 pm

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मानवी वस्त्यांच्या जवळपास हे वन्य प्राणी मुक्तपणे फिरताना दिसत असून, गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी हल्ल्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.नारायणगाव–जुन्नर रस्त्यालगत साकार नगरी सोसायटीजवळ एका तरुणावर झालेला हल्ला चिंताजनक ठरला आहे. तनिष नवनाथ परदेशी हा १८ वर्षीय तरुण रात्री फोनवर बोलत उभा असताना बिबट्याने अचानक झडप घातली. त्याच्या पोटरीवर खोल ओरखडे झाले. तातडीची वैद्यकीय मदत मिळाल्याने तो सुदैवाने बचावला असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.घटनेनंतर वन विभागाने रात्रीच शोधमोहीम सुरू केली. ड्रोनच्या मदतीने जवळच्या मीनाक्षी कृपा वसतीगृह परिसरात तब्बल तीन बिबटे फिरताना दिसले. याच भागात एका दिवसात चार पाळीव जनावरांवर हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. धोक्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने परिसरात आठ पिंजरे लावले आहेत. जुन्नर तालुक्यात मागील काही वर्षांत अशा घटना सातत्याने घडत असल्याने मानव–वन्यजीव संघर्ष तीव्र होऊ लागला आहे.जुन्नर तालुक्यातील धोलवडमध्येही अशीच भीतीची घटना घडली. निसर्गरम्य परिसरात बिबट्यांचा वावर स्थिरपणे वाढत असून नागरिकांना अधिक सतर्क राहण्याची गरज भासते आहे. वन विभागाने नागरिकांना अंधारात बाहेर पडू नये, एकट्याने फिरणे टाळावे आणि कोणतीही हालचाल दिसल्यास त्वरित कळवावे, असे आवाहन केले आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 6:10 pm

दीड वर्षांच्या जलतरणपटू 'वॉटर बेबी'वेदाने इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड वर कोरलं नाव

रत्नागिरी : वय फक्त दीड वर्ष… आणि कामगिरी थेट राष्ट्रीय स्तरावर! रत्नागिरीच्या वेदा सरफरेने देशातील सर्वात लहान भारतीय जलतरणपटू होण्याचा मान पटकावत इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं आहे. अवघ्या ९ महिन्यांची असताना पाण्यात हातपाय मारून तिने आपली क्षमता दाखवून ती कोकणची ‘जलपरी’ ठरली आहे.वेदाचा मोठा भाऊ रूद्र हा राज्यस्तरीय जलतरणपटू. त्याच्या सरावासाठी आई पायल सरफरे रोज शासकीय जलतरण तलावावर जायची. त्या दरम्यान तलावाजवळ बसणारी वेदा पाण्याकडे आवडीने पाहायची. एके दिवशी प्रशिक्षक महेश मिलके यांनी तिला पाण्यात सोडलं; पण अपेक्षेप्रमाणे ती रडली नाही. उलट पाण्यात सहज हातपाय मारत तिने सर्वांना आश्चर्यचकित केलं.१०० मीटरचा वेगवान विक्रमनित्य सरावामुळे वेदा काही महिन्यांतच पोहण्यात पारंगत झाली. वयाच्या १ वर्ष ९ महिन्यांत तिने १०० मीटर पोहण्याचं अंतर फक्त १० मिनिटे ८ सेकंदांत पूर्ण करत विक्रम रचला. इतक्या लहान वयात इतकं मोठं अंतर पूर्ण करणारी वेदा देशात प्रथम ठरली आहे.वेदा जलतरण तलावाच्या कठड्यावरून सहज पाण्यात झेपावते. पाण्याशी झालेली तिची ‘मैत्री’च तिला थेट रेकॉर्ड बुकपर्यंत घेऊन गेली आहे. तिच्या या यशाने रत्नागिरीचे नाव देशभरात झळकले आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 6:10 pm

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत सुविधेपासून वंचित आहेत. त्यांना या मुलभूत सुविधा देण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने आरे कॉलनी तसेच दिंडोशी वन क्षेत्रात राहणाऱ्या रहिवाश्यांना पंतप्रधान आवास योजनांच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभा नियम ३७७ अन्वये मागणी केली.पंतप्रधान आवास योजने अतंर्गत राज्य तसेच संघ राज्य येथील सर्व पत्र लाभार्थी यांना मुलभूत सुविधांनी युक्त असलेली पक्की घरे बांधून देण्यासाठी केंद्र सरकार राज्य तसेच संघ राज्य यांना सर्वतोपरी मदत करीत आहे. या व्यतिरिक्त भारत सरकारने पंतप्रधान आवास योजना-शहर नव्या रुपात सुरु केली असून त्यानुसार या सुधारती पंतप्रधान आवास योजना-शहर २.० (पीएमएवाई-यु २.०) योजनेला १ सप्टेंबर २०२४ पासून सुरुवात झाली. या योजनेच्या माध्यमातून राज्य तसेच संघ राज्य क्षेत्र यांनी प्राधिकरणा मार्फत शहरी भागांसाठी गरीब, मध्यमवर्गातील कुटुंबांतील लाभार्थी यांच्यासाठी माफक दरात घरे (एएचपी) , माफक दरात घरे (एआरएच) तसेच व्याज सबसिडी योजनेच्या (आईएसएस) माध्यमातून योजनेसाठी मदत करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज जमा करण्यासाठी पीएमएवाई-२.० च्या संकेतस्थळावरून (https://pmay-urban.gov.in) करावे लागणार असल्याची माहिती, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी लेखी पत्राद्वारे खासदार वायकर यांना कळवले आहे.तसेच राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणामार्फत पीएमएवाई-यु २.० मधील नियम व तरतुदीला अनुसरून योजना तयार करून राज्य सरकारच्या तसेच निरीक्षण समिती यांच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पुढील मंजुरीसाठी पाठवण्यात यावा, अशी सूचना हि केंद्रीय गृहनिर्माण तसेच शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी खासदार वायकर यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

फीड फीडबर्नर 5 Dec 2025 6:10 pm

Shai Hope Century : डोळ्यांना संसर्ग असतानाही चष्मा लावून शतक; शाई होपने साकारली जिगरबाज खेळी

Shai Hope Century during NZ vs WI 1st Test Match : वेस्ट इंडिज संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे, जिथे टी-२० आणि एकदिवसीय मालिकेनंतर आता तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज शाई होपने एका अविस्मरणीय खेळीची नोंद केली आहे. डोळ्यांना संसर्ग झालेला असतानाही त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय […] The post Shai Hope Century : डोळ्यांना संसर्ग असतानाही चष्मा लावून शतक; शाई होपने साकारली जिगरबाज खेळी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 5 Dec 2025 6:09 pm