SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

30    C
... ...View News by News Source

निवडणुकीच्या कामांसाठी गैरहजर राहणाऱ्यांविरोधात सोमवारपासून पोलिस कारवाई

तब्बल ६,८७१ कर्मचारी,अधिकाऱ्यांना नोटीससोमवारपासून साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या घरी पोलिसांचे समन्समुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत निवडणूक प्रक्रियेत नियुक्त कर्तव्ये पार पाडण्यास गैरहजर राहिलेल्या एकूण ६ हजार ८७१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यापैकी २ हजार ३५० अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. तर, वारंवार सूचना देऊनही प्रशिक्षण, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया अथवा नेमून दिलेल्या निवडणूक कर्तव्यांस हजर न राहणाऱ्या ४ हजार ५२१ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोमवारपासून पोलीस कारवाई केली जाणार आहे.अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या कारवाईत मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह राष्ट्रीय बँक, बेस्ट, बीएसएनएल, एचपीसीएल, विमा कंपनी, एलआयसी, म्हाडा, एमटीएनएल, टपाल खाते, रेल्वे, आरसीएफ, नाबार्ड या शासकीय/ निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम आदींतील अधिकारी - कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.महानगरपालिका मुख्यालयात रविवारी ११ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या बैठकीस सहआयुक्त‍ (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे यांच्यासह परिमंडळ उप आयुक्त, सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त उपस्थित होते. मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ अनुषंगाने गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी - कर्मचा-यांचे मतदान प्रक्रियेविषयीचे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक होते. तरीही, जे अधिकारी - कर्मचारी प्रशिक्षण सत्रास गैरहजर राहिले आहेत, त्यांना शनिवार १० जानेवारी २०२६ रोजी अंतिम संधी देण्यात आली होती. निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित राहणाऱ्या किंवा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांविरुद्ध रविवार, ११ जानेवारी २०२६ पासून निवडणूक कायद्यांतर्गत कडक शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिला होता. त्यानुसार रविवारपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या की, निवडणूक ही संविधानिक व कायदेशीर जबाबदारी असून, त्यामध्ये कसूर करणे हा गंभीर गुन्हा मानण्यात येतो. त्यानुसार, संबंधित ४ हजार ५२१ कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन त्यांच्या कार्यालयात जाऊन पोलिसांमार्फत कारवाई सोमवारी १२ जानेवारी २०२६ पासून केली जाणार आहे. या कारवाईत अंतर्गत गुन्हा नोंद, दंडात्मक कारवाई तसेच विभागीय शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी सुमारे १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ इतकी मतदारांची संख्या आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्गाची आवश्यकता आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कमतरता प्रशासनाला दिसून येत आहे. यादृष्टीने प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागत असल्याचे अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 5:30 pm

मतदान करा आणि हॉटेलमध्ये जावून कमी पैशात खा - मतदार जानजागृतीसाठी आहार संघटनेचा पुढाकार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी ‘मतदारांचे सुनियोजित शिक्षण आणि निवडणूक सहभाग’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांना समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, महाराष्ट्रातील आदरातिथ्य क्षेत्रातील अग्रगण्य संघटना असलेल्या इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (आहार) यांनीही मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान केलेल्या मतदारांना आहार संघटनेशी संलग्न असलेल्या रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये विशिष्ट सवलत देण्यात येणार आहे.मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ करिता गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे.महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांच्या नेतृत्वाखाली आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ उपक्रम राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेचे सह आयुक्त (कर निर्धारण व संकलन / निवडणूक) विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) डॉ. गजानन बेल्लाळे यांच्या सूचनेनुसार महानगरपालिकेमार्फत सर्वसमावेशक व बहुआयामी मतदार जागृती अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या स्वीप उपक्रमांतर्गत पथनाट्यांचे आयोजन, मतदार जनजागृती फेरी, प्रभात फेरी, शाळा–महाविद्यालयांमधील उपक्रम, विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांसाठी मतदान संकल्पपत्र भरून घेणे, तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक माध्यमांतून मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे.याच पार्श्वभूमीवर, आहार संघटनेने मुंबई महानगरपालिका व निवडणूक प्रशासनाच्या सहकार्याने मतदार जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. आहार ही संस्था महाराष्ट्रातील सुमारे ८,००० हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व परमिट रूम्सचे प्रतिनिधित्व करत असून, राज्यभरातील ६५ जिल्हा संघटनांशी संलग्न आहे. हॉटेल व रेस्टॉरंट क्षेत्राचा सार्वजनिक संपर्क लक्षात घेता, नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान केलेल्या मतदारांना आहार संघटनेशी संलग्न असलेल्या रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये विशिष्ट सवलत देण्यात येणार आहे, असे आहार संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी सांगितले. मतदान हा लोकशाहीचा कणा असून, “मी समाजाचा एक जबाबदार घटक आहे” ही भावना नागरिकांमध्ये निर्माण करून, मतदानाद्वारे कर्तव्‍ये पूर्ण करणे हा या सर्व उपक्रमांचा केंद्रबिंदू आहे. मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मध्ये मतदार सहभाग वाढविण्यासाठी प्रशासन, विविध शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था व व्यावसायिक संघटना एकत्रितपणे कार्यरत असल्याचे सकारात्मक चित्र या माध्यमातून समोर येत आहे.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 5:30 pm

Ellyse Babar Photo : ऑस्ट्रेलियन क्रिकेट सुंदरी एलिस पेरीने बाबर आझमला केलं प्रपोज? फोटो होतोय व्हायरल

Ellyse Perry Babar Azam Photo Viral : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू एलिस पेरी आणि पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम यांचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एलिस पेरी गुडघ्यावर बसून बाबरला लग्नासाठी प्रपोज करत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या व्हायरल फोटोमागचं सत्य नेमकं काय आहे? जाणून घेऊया. […] The post Ellyse Babar Photo : ऑस्ट्रेलियन क्रिकेट सुंदरी एलिस पेरीने बाबर आझमला केलं प्रपोज? फोटो होतोय व्हायरल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 5:18 pm

Mahhi Vij : माहीच्या वीजच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्री?

टीव्ही विश्वातील आदर्श जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जय भानुशाली आणि माही विज यांच्या १५ वर्षांच्या सुखी संसाराला आता पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या आठवड्यात (४ जानेवारी २०२६) या दोघांनीही सोशल मीडियावरून अधिकृतपणे घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले. त्यांनी संयुक्त निवेदनात सांगितले की, “आम्ही वेगळे होत आहोत, पण आमच्यात कोणताही द्वेष किंवा नकारात्मकता नाही. आम्ही शांततेला प्राधान्य देतो […] The post Mahhi Vij : माहीच्या वीजच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्री? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 5:13 pm

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय ठरलेले गायक आणि अभिनेता प्रशांत तमांग यांचे रविवारी निधन झाले. दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. अवघ्या ४३व्या वर्षी त्यांच्या अकाली जाण्याने संगीतप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत तमांग यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, यासंदर्भात अधिकृत वैद्यकीय अहवाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. नुकतेच ते अरुणाचल प्रदेशातील एका कार्यक्रमातून दिल्लीला परतले होते. त्यानंतरच ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगितले जात आहे.चाहत्यांमध्ये शोककळाप्रशांतच्या निधनाची बातमी पसरताच भारतासह नेपाळमध्येही शोककळा पसरली. दार्जिलिंग परिसर, गोरखा समाज आणि संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे सहकलाकार, चाहते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, त्यांना याआधी कोणतीही गंभीर आरोग्य समस्या नव्हती, अशी माहितीही समोर येत आहे.पोलीस खात्यातून संगीत विश्वापर्यंतचा प्रवासदार्जिलिंग येथे जन्मलेले प्रशांत तमांग मूळचे नेपाळी भाषिक होते. संगीताची आवड असूनही त्यांनी सुरुवातीला कोलकाता पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून सेवा बजावली. पोलिस दलाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून त्यांचा आवाज अनेकांना परिचित झाला. याच आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी ‘इंडियन आयडॉल सीझन ३’मध्ये सहभाग घेतला आणि २००७ साली विजेतेपद पटकावले.या यशानंतर त्यांनी नेपाळी संगीतविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. निवडक पण आशयघन गाणी, सांस्कृतिक मुळांशी नातं जपणारी गायकी आणि साधेपणामुळे त्यांचा श्रोत्यांशी खास भावनिक संबंध निर्माण झाला होता. काही अभिनय प्रकल्पांमधूनही त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 5:10 pm

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डबल धक्का ! दगडू सपकाळांनंतर ‘या’निष्ठावंताने सोडली साथ

Uddhav Thackeray : राज्यातील महानगरपालिका निवडणुका, विशेषतः मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी मतदान अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. रॅली, कॉर्नर सभा, दारोदारी प्रचार यामुळे शहरात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. ठाकरे गट आणि मनसे यांची युती, महायुतीचे एकत्रित प्रयत्न यामुळे स्पर्धा […] The post Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डबल धक्का ! दगडू सपकाळांनंतर ‘या’ निष्ठावंताने सोडली साथ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 4:46 pm

आणखी एक धक्का, दगडू सकपाळांनंतर आणखी एक उबाठातून बाहेर पडले

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटासाठी नामुष्की झाली आहे, अवघ्या काही तासांत पक्षातून दोन महत्त्वाच्या नेत्यांनी फारकत घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. मनपासाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. प्रचाराचा जोर वाढलेला आहे. या परिस्थितीत उबाठामध्ये झालेली ही गळती उद्धव यांच्या पक्षासाठी धक्कादायक मानली जात आहे.सर्वप्रथम माजी आमदार दगडू सकपाळ यांनी उबाठाशी संबंध तोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. आता आणखी एका उद्धव समर्थकाने शिवसेना उबाठा सोडली आहे. गोरेगाव परिसरातील ठाकरे गटाचे जुने, विश्वासू नेते मानले जाणारे माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तब्बल चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले दिलीप शिंदे यंदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र मनसे–ठाकरे गट युतीमुळे त्यांच्या पारंपरिक वॉर्डमध्ये उमेदवारीची संधी न मिळाल्याने ते नाराज होते, अशी माहिती समोर येत आहे.उमेदवारीवरून असंतोष उफाळलाज्या प्रभागातून दिलीप शिंदे सातत्याने निवडून येत होते, तो प्रभाग यंदा मनसेला देण्यात आल्याने त्यांची राजकीय गणिते बिघडली. या निर्णयानंतर त्यांनी काही दिवस पक्षात अस्वस्थता व्यक्त केली होती. अखेर मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. राजीनाम्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.सपकाळांच्या पक्षप्रवेशामागचे कारणमाजी आमदार दगडू सकपाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी भावनिक प्रतिक्रिया देत, “अत्यंत कठीण मनाने निर्णय घ्यावा लागला,” असे सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या कन्या रेश्मा सकपाळ या शिवडी विधानसभा क्षेत्रातील एका प्रभागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. मात्र ठाकरे गटाकडून तिकीट न मिळाल्याने सकपाळ कुटुंब नाराज असल्याचे बोलले जात होते. महानगरपालिका निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात ठाकरे गटातून होत असलेली ही गळती प्रचाराच्या रणनीतीवर किती परिणाम करणार, याकडे आता राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 4:30 pm

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सर्वात मोठा दिलासा; ‘त्या’लाभार्थी महिलांची मोठी चिंता मिटणार

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील लाखो महिलांसाठी जीवनदायी ठरली आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे (विशेषतः BMC सह इतर २९ महापालिकांच्या) वातावरण तापले असून, १५ जानेवारी २०२६ […] The post Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सर्वात मोठा दिलासा; ‘त्या’ लाभार्थी महिलांची मोठी चिंता मिटणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 4:21 pm

कोल्हापूर ACB च्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर, दोघांचा मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरो (ACB) मध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक पोलीस (DYSP) वैष्णवी पाटील यांच्या कारचा कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून DYSP वैष्णवी पाटील यांच्यासह आणखी तिघे जण जखमी झाले आहेत. वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर चित्रदुर्ग येथील जिल्हा […] The post कोल्हापूर ACB च्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर, दोघांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 4:13 pm

Kolhapur Accident News: इनोव्हा-लॉरीची जोरदार धडक: दोघांचा जागीच मृत्यू DYSP वैष्णवी पाटील गंभीर...

कोल्हापूर : कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (ACB) म्हणून कार्यरत असलेल्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या खासगी वाहनाचा रविवारी पहाटे भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुर्दैवाने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून DYSP वैष्णवी पाटील यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बंगळुरूहून कोल्हापूरकडे येत असताना कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ घडला.वैष्णवी पाटील या आपल्या सहकाऱ्यांसोबत इनोव्हा कारमधून प्रवास करत होत्या. रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या कारने समोर चाललेल्या एका लॉरीला मागून जोरदार धडक दिली आणि धडक इतकी भीषण होती की इनोव्हा कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात कारमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची नावे अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाहीत. अपघातामुळे प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. गाडीचेही प्रंचड नुकसान झाल आहे.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. DYSP वैष्णवी पाटील यांच्यावर सध्या उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. इतर दोन जखमींवरही उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैष्णवी पाटील यांच्या अपघाताची बातमी समजताच कोल्हापूर पोलीस दल आणि अँटी करप्शन ब्युरोच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कोल्हापूरमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी चित्रदुर्ग पोलिसांच्या सतत संपर्कात असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 4:10 pm

Virat Kohli Record : ‘किंग’कोहलीचा सौरव गांगुलीला धोबीपछाड! मैदानात उतरताच रचला इतिहास

Virat Kohli broke Sourav Ganguly record : भारतीय क्रिकेटचा ‘रन मशीन’ विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात मैदानात पाऊल ठेवताच एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बॅटने धावांचा पाऊस पाडण्यापूर्वीच विराटने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा एक खास विक्रम मोडीत काढला असून, तो आता भारतासाठी सर्वाधिक वनडे खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ‘टॉप-५’ मध्ये सामील झाला […] The post Virat Kohli Record : ‘किंग’ कोहलीचा सौरव गांगुलीला धोबीपछाड! मैदानात उतरताच रचला इतिहास appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 3:56 pm

M.K.Stalin : आगामी विधानसभा निवडणुकीत द्रमुकला 200 हून अधिक जागा मिळणार; मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी व्यक्त केला विश्वास

चेन्नई : आगामी विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवण्यास आणि शक्यतो २०० हून अधिक जागा जिंकण्यास आत्मविश्वासाने सज्ज आहे. पक्षाने गेल्या साडेचार वर्षांत केलेले व्यापक संघटनात्मक कार्य आणि प्रशासकीय कामगिरी उल्लेखनीय असल्याने आम्हाला विजय मिळण्यात काही अडचण येईल, असे वाटत नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केले आहे. कोलथूर येथील अनिता अचिव्हर्स अकादमीने आयोजित […] The post M.K.Stalin : आगामी विधानसभा निवडणुकीत द्रमुकला 200 हून अधिक जागा मिळणार; मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी व्यक्त केला विश्वास appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 3:54 pm

जिल्हास्तरीय 53 व्या बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात स्वराली दाभाडेचे यश; तृतीय क्रमांकासह राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

जांबुत : (प्रफुल्ल बोंबे ) : जिल्हा परिषद पुणे अंतर्गत शिक्षण विभाग व पुणे जिल्हा मुख्याध्यापक तथा विज्ञान संघ आणि जी. एच. रायसोनी पब्लिक स्कुल वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन वाघोली (पुणे) येथे नुकतेच संपन्न झाले.या तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शनात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेली पिंपरखेड (ता. शिरूर ) येथील […] The post जिल्हास्तरीय 53 व्या बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात स्वराली दाभाडेचे यश; तृतीय क्रमांकासह राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 3:44 pm

मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

मुंबई भारताची आर्थिक राजधानी, स्वप्नांची नगरी आणि देशाचे आर्थिक इंजिन असलेल्या मुंबईने गेल्या दशकात एका अशा परिवर्तनाचा अनुभव घेतला आहे, ज्याची तुलना जागतिक स्तरावरील मोठ्या महानगरांशी केली जाऊ शकते. एकेकाळी रखडलेले प्रकल्प, वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांवरील प्रचंड ताण ही मुंबईची ओळख बनली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राबवलेल्या ‘मुंबई ट्रान्सफॉर्मेशन’ […] The post मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 3:35 pm

साताऱ्यात आनंदावर शोकाची छाया; लेकीच्या जन्मावेळीच सैनिक पित्याचा अपघाती मृत्यू

सातारा : नियतीचा खेळ कधी किती निर्दयी ठरेल, याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यातील एका हृदयद्रावक घटनेतून आला आहे. भारतीय सैन्यात सेवा बजावणारे जवान प्रमोद परशुराम जाधव हे काही दिवसांच्या रजेवर गावी आले असताना भीषण अपघातात दगावले. विशेष बाब म्हणजे, ज्या क्षणी त्यांच्या घरात नव्या जीवाच्या आगमनाची तयारी सुरू होती, त्याच वेळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.सातारा तालुक्यातील दरे गावचे रहिवासी असलेले प्रमोद जाधव सैन्य दलात कार्यरत होते. पत्नीच्या प्रसूतीसाठी ते काही दिवसांपूर्वीच रजा घेऊन गावी आले होते. आईचे छत्र आधीच हरपलेले असल्याने, पत्नीच्या या महत्त्वाच्या काळात तिच्या सोबत राहण्याचा त्यांचा निर्धार होता.शनिवारी सकाळच्या सुमारास काही वैयक्तिक कामासाठी प्रमोद जाधव दुचाकीवरून जात असताना, वाढे फाट्याजवळ एका मालवाहू वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.या दुर्घटनेने संपूर्ण दरे गाव शोकसागरात बुडाले. सर्वात हृदय पिळवटून टाकणारी बाब म्हणजे, प्रमोद यांचे पार्थिव गावी आणले जात असतानाच त्यांच्या पत्नीने एका गोंडस कन्येला जन्म दिला. एका बाजूला नव्या आयुष्याचे स्वागत, तर दुसऱ्या बाजूला घरच्या कर्त्या व्यक्तीचा अंत या घटनेमुळे प्रत्येकाचे डोळे पाणावले. जन्माच्या काही तासांतच त्या चिमुकलीला आपल्या वडिलांचे अंतिम दर्शन घ्यावे लागले. पित्याच्या छायेशिवाय सुरू झालेलं तिचं आयुष्य अनेकांना सुन्न करून गेलं.शनिवारी दुपारी दरे गावात प्रमोद जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. अंत्यविधीच्या वेळी जेव्हा त्यांच्या पत्नीला आणि नवजात बालिकेला तिथे आणण्यात आले, तेव्हा उपस्थित प्रत्येकाचा संयम ढासळला. प्रमोद जाधव यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि नवजात कन्या असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 3:10 pm

निवडणुकीच्या रणधुमाळीत बडतर्फ IAS पूजाच्या घरात घडली धक्कादायक घटना, पोलीस तपास सुरू

पुणे : बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरच्या घरात रविवारी मध्यरा‍त्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. घरातल्या नोकरानेच घरामध्ये चोरी केली असा आरोप पूजाने केला आहे. या घटनेत पूजाचे आई-वडील बेशुद्ध अवस्थेत आढळून आले, तर स्वतः पूजा खेडकर जाड रश्शीने बांधलेल्या स्थितीत आढळली.बाणेर रस्त्यावर खेडकर कुटुंबाचा बंगला आहे. या घरात कुटुंबासोबत काही नोकरही राहतात. त्यातील एक नोकर अवघ्या आठ दिवसांपूर्वी नेपाळहून कामासाठी आला होता. रविवारी मध्यरात्री या नोकराने दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर पूजा खेडकरचे हातपाय दोरीने बांधून घरातील मोबाईल फोन घेऊन तो फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर बांधून ठेवलेल्या अवस्थेत असलेल्या पूजा खेडकर यांनी दारावरील कडीचा वापर करून स्वतःचे हात मोकळे केले आणि दुसऱ्या एका फोनवरून चतुःश्रृंगी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं असता दिलीप आणि मनोरमा खेडकर हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केलं असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.महत्त्वाच म्हणजे, या घटनेनंतर अद्याप कोणतीही लेखी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. आपली मानसिक अवस्था व्यवस्थित झाल्यानंतर तक्रार दाखल करू, असं पूजा खेडकर यांनी पोलिसांना सांगितलं आहे. मोबाईल व्यतिरिक्त घरातून आणखी कोणत्या वस्तू चोरीला गेल्या आहेत का, याबाबतही अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. यापूर्वी लाल दिव्याच्या वापरावरून आणि खोटी कागदपत्रं सादर करून नोकरी मिळवल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या पूजा खेडकर प्रकरणात आता या गंभीर घटनेमुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 3:10 pm

महायुतीने मांडला मुंबईच्या भविष्याचा आराखडा

- 'विकसित मुंबई, सुरक्षित मुंबई'चा वचननामा; मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार, बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत, २४ तास पाणीपुरवठा करणार, लोकलला अतिरिक्त तीन डबे जोडणारमुंबई : 'विकसित मुंबई, सुरक्षित मुंबई' ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून महायुतीने (भाजप, शिवसेना, रिपाइं) रविवारी संयुक्त वचननामा प्रसिद्ध केला. त्यात मुंबई शहराच्या भविष्याचा संपूर्ण आराखडा देण्यात आला असून, वाहतूक, स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, महिला सक्षमीकरण, मराठी अस्मिता आदी मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले. खड्डेमुक्त मुंबई हे ध्येय साध्य करण्यासाठी जाहीरनाम्यात ठोस योजना मांडल्या आहेत. ९ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते डांबरी (अस्फाल्ट) आणि ९ मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे (सीसी) करण्यात येतील. याशिवाय, ९ मीटरपेक्षा मोठ्या रस्त्यांवर यूटिलिटी डक्ट तयार करून रस्ते खोदण्याची समस्या कायमची संपुष्टात आणली जाईल. नियोजित डीपी रोड ताब्यात घेण्यासाठी नोटीस देऊन कार्यवाही केली जाईल, तर प्रायव्हेट लेआऊटमधील रस्त्यांचे डांबरीकरण करून त्यांची मालकी अबाधित ठेवली जाईल. मुंबईत १७ सेवांसाठी वारंवार खड्डे खणले जातात, त्यावर तोडगा म्हणून या सेवांसाठी मुंबईभर यूटिलिटी टनेल बनवण्यात येईल, ज्यामुळे रस्त्यांची सततची खोदाई थांबेल आणि शहराच्या रस्त्यांचा दर्जा सुधारेल.मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी जाहीरनाम्यात मोठ्या पायाभूत प्रकल्पांवर विशेष भर देण्यात आला आहे. यासोबतच, 'राइट टू वॉक' अंतर्गत सर्व फुटपाथ स्टॅम्प्ड काँक्रीटमध्ये विकसित करून शहराला पादचारीस्नेही बनवण्यात येईल, ज्यामुळे वाहतूक केवळ वाहनांसाठी नसून पादचाऱ्यांसाठीही सुरक्षित आणि सोयीस्कर होईल. फेरीवाल्यांसाठीही स्पष्ट धोरण आखण्यात येणार आहे. सर्व पात्र फेरीवाल्यांचे हॉकिंग झोन्समध्ये पुनर्वसन केले जाईल, आणि हॉकिंग झोन्स व्यतिरिक्त इतर सर्व क्षेत्रे नॉन-हॉकिंग झोन्स म्हणून घोषित केली जातील. यासाठी फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करून त्यांना त्वरित विक्रेता प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जातील, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाला कायदेशीर संरक्षण मिळेल आणि शहरातील अव्यवस्था कमी होईल.कम्युनिटी पार्किंग धोरण अवलंबणारपार्किंगच्या समस्येवर उपाय म्हणून कम्युनिटी पार्किंग, रिक्षा आणि मोटारसायकल पार्किंगची व्यवस्था करण्यात येईल. शहरातील पार्किंग क्षमता वाढवण्यासाठी भुयारी आणि जमिनीवरील पार्किंगची निर्मिती केली जाईल. मोकळ्या जागा आणि मैदानांच्या बाबतीत, सर्व मोकळ्या जागांची देखभाल केवळ महापालिकेकडूनच केली जाईल, आणि खाजगी सहभागाला बंदी घालण्यात येईल. स्थानिक नागरिक संघटना आणि एएलएमएस यांना पहारेकरांची भूमिका देण्यात येईल, तर जी/आरजी/पीजी/पार्क्स/ओपन स्पेसेस यांचे संरक्षण कायद्याने सुनिश्चित करून त्यांना अर्थसंकल्पाचा भाग बनवले जाईल, ज्यामुळे शहरातील हिरवळ आणि मोकळ्या जागांचे जतन होईल.पाणी दरवाढीला पाच वर्षांसाठी स्थगितीमुंबईकरांचा पाणी हक्क साकार करण्यासाठी 'मागेल त्याला मुबलक पाणी' हे धोरण राबवले जाईल. संपूर्ण मुंबईला २४ तास स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण पाणी देण्यात येईल, आणि सध्याचा ३ हजार ८०० एमएलडी पाणीपुरवठा ४ हजार ७०० एमएलडीपर्यंत वाढवला जाईल. गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा पाणी प्रकल्प पुढील ५ वर्षांत पूर्ण करून ही प्रणाली तंत्रज्ञानाने आधुनिक केली जाईल. प्रत्येक प्रशासकीय विभागात पाणी गळती शोधक यंत्रणा आणि कॅमेरे बसवले जातील, तर प्रत्येक झोनमध्ये फ्लो मीटर बसवून समान पाणी वितरण सुनिश्चित केले जाईल. दरवर्षी होणाऱ्या ८ टक्के पाणी दरवाढीला पुढील पाच वर्षांसाठी स्थगिती देण्यात येईल. गोराई येथे समुद्र जलनिस्सारण (डिसॅलिनेशन) प्रकल्प उभारून समुद्राचे पाणी गोड केले जाईल, आणि 'टँकर माफिया फ्री' मुंबई हे धोरण राबवले जाईल. पर्जन्यजल साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) करणाऱ्या नागरिकांना पाणी बिल किंवा मालमत्ता करात सवलत देण्यात येईल, तर नवीन इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले जाईल.मुंबईला पूरमुक्त करणारपूरमुक्त मुंबई साकारण्यासाठी जपानी तंत्रज्ञान, आयआयटी आणि व्हीजेटीआयच्या मदतीने पुढील ५ वर्षांत शहर पूर्णपणे पूरमुक्त केले जाईल. यासाठी शहरात ४ नवीन भूमिगत फ्लडवॉटर टाक्या उभारल्या जातील. स्वच्छ आणि सुंदर मुंबईसाठी स्वच्छता स्पर्धा राबवल्या जातील, कचरामुक्त रस्ते विकसित केले जातील, आणि झोपडपट्टी भागात 'मागेल त्याला शौचालय' धोरण आणले जाईल. पर्यावरण संवर्धनासाठी १७,००० कोटी रुपयांची योजना राबवली जाईल, आणि हवेच्या गुणवत्तेसाठी डिस्प्ले बोर्ड बसवले जातील.वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणीआरोग्य क्षेत्रात महापालिका रुग्णालयांचा दर्जा एआयआयएमएसच्या धर्तीवर सुधारला जाईल. ६० वर्षांवरील नागरिकांना वर्षातून एकदा मोफत फुल बॉडी चेकअप देण्यात येईल, आणि 'मुंबईकर हेल्थ कार्ड' द्वारे वैद्यकीय इतिहास डिजिटल केला जाईल. प्रत्येक वॉर्डमध्ये 'आपला दवाखाना' योजना विस्तारित करून ३०-४० प्रकारच्या चाचण्या आणि औषधे मोफत उपलब्ध केली जातील. कर्करोग आणि हृदयरोग उपचारांसाठी समर्पित रुग्णालये उभारली जातील. वैद्यकीय शिक्षणात महापालिकेची भूमिका विस्तारित करून मोठ्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये, पीजी संस्था, संशोधन निधी आणि आधुनिक सिम्युलेशन लॅब्स उभारली जातील.महापालिका शाळांमध्ये एआय लॅब्स उभारणारशिक्षण क्षेत्रात महापालिका शाळांमध्ये एआय लॅब्स उभारली जातील, आणि संविधान मूल्यांचे शिक्षण देण्यात येईल. गृहनिर्माणात कोळीवाडे आणि गावठणांच्या पुनर्विकासाचा मार्ग खुला केला जाईल, रखडलेले २० हजार इमारतींचे ओसी तात्काळ वितरित केले जातील, आणि सफाई कामगार तसेच पोलिसांना हक्काची घरे दिली जातील.सर्व बेस्ट बस इलेक्ट्रिक करणार बेस्ट बस सेवेत २०२९ पर्यंत सर्व बसेस इलेक्ट्रिक (ईव्ही) केल्या जातील, आणि महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात येईल. महिला सक्षमीकरणासाठी 'लाडक्या बहिणींना' उद्योग सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येईल, आणि 'मुंबई डिजिटल सखी' अंतर्गत महिलांना एआय आणि कोडिंगचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. व्याजमुक्त कर्ज, महिला बचत गटांसाठी ई-मार्केट, पाळणाघर सुविधा, रात्रीचे गस्त पथक आणि तातडीच्या मदतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश करून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासोबत सामाजिक सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे.महापालिकेत स्वतंत्र 'मराठी भाषा विभाग'मराठी अस्मितेला मजबूत करण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र 'मराठी भाषा विभाग' स्थापन केला जाईल. शाळांमध्ये 'मुंबईचा मराठी इतिहास' आणि 'संयुक्त महाराष्ट्र चळवळीची' माहिती देणारे धडे समाविष्ट केले जातील. मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार होण्यापासून रोखण्यासाठी परवडणाऱ्या घरांचे धोरण आखले जाईल. मराठी भाषा, कला आणि संस्कृतीसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करून मराठी कला केंद्रे, मराठी चित्रपटांसाठी विशेष मल्टिप्लेक्स आणि शालेय अभ्यासक्रमात मुंबईचा मराठी इतिहास समाविष्ट करण्यात येईल.प्रत्येक वॉर्डमध्ये वाय-फाययुक्त अभ्यासिकायुवा कल्याणासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये २४ तास सुरू राहणाऱ्या वातानुकूलित आणि वाय-फाययुक्त अभ्यासिका उभारल्या जातील. महापालिकेत भ्रष्टाचारमुक्तीसाठी एआय आणि डिजिटल प्लॅटफॉर्म आणले जातील. बीकेसीमध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) स्थापन करून २ लाख नोकऱ्या निर्माण केल्या जातील.धारावीकरांना धारावीतच घर देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाला कोणत्याही परिस्थितीत मुंबई सोडावी लागणार नाही, त्याला मुंबईतच घर देणार असा आमचा संकल्प आहे. पात्र धारावीकरांना धारावीतच किमान ३५० स्क्वेअर फुटांचे घर देणार. येथील लघु उद्योगांसाठी चांगली इकोसिस्टम तयार करणार. शासनाची एक इंचही जमीन विकली जाणार नाही. महानगरपालिकेत काम करणाऱ्या सर्व सफाई कामगारांना मुंबईत मालकी हक्काची घरे देणार. महापालिका शाळांचे आधुनिकीकरण करणार. प्रत्येक शाळेत मुलांसाठी 'मराठी लॅब' तयार करणार जेणेकरून त्यांना मराठी नीट शिकता येईल. १७ हजार कोटींचा 'क्लायमेट अॅक्शन प्लॅन' राबवणार. कचऱ्यापासून वीज आणि गॅस निर्मिती करणार. मिठी नदी ५-६ वर्षात पूर्णपणे स्वच्छ (निर्मळ) करणार. मुंबई लोकलचे सर्व डबे एसीयुक्त आणि बंद दरवाजाचे करणार. लोकलला ३ डबे वाढवण्यासाठी चाचणी सुरू आहे. नवी मुंबई विमानतळ ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान 'वॉटर टॅक्सी' सुरू करणार. महापालिका रुग्णालयांत २ हजार नवीन बेडची व्यवस्था करणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुंबईतील मराठी माणसाच्या हिताचे रक्षण करणे आणि मराठी भाषा वाढवणे ही आमची जबाबदारी आणि वचन आहे. मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणणार. ४० लाख लोकांना घरे देऊन मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचे शिवसेना प्रमुखांचे स्वप्न पूर्ण करणार. २० हजार इमारतींना एका वर्षात ओसी देणार. कोळीवाडा आणि गावठाणांसाठी स्वतंत्र डीसीआर तयार करणार. मुंबईला 'फिनटेक सिटी' करणार. बीकेसीमध्ये इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर आणि स्टार्टअप हब उभारणार. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रम राबवणार. महापालिकेच्या रुग्णालयांना जोडून 'बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ' स्थापन करण्याचा आमचा मानस आहे. मुंबई खड्डेमुक्त करणार आणि प्रदूषित पाणी समुद्रात सोडणे बंद करणार, असे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 3:10 pm

मिर्झापूरबाबत श्रिया पिळगावकरची पोस्ट चर्चेत; पुन्हा परतण्याचे दिले संकेत

Mirzapur The Film Announced: ओटीटी विश्वात सर्वाधिक चर्चेत असलेली वेबसिरीज म्हणजे मिर्जापूर. या वेबसिरीजने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. आत्तापर्यंत जेवढे काही सीझन या वेबसिरीजचे रिलीज झाले आहेत, त्या सर्वच सीझनवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. सिरीजमधील कथा प्रेक्षकांना भुरळ पाडणारी होती. याशिवाय वेबसिरीजमधील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांना दखल घ्यायला भाग पाडले. वेबसिरीजमध्ये स्त्री कलाकारांनी देखील आपल्या अभिनयाने […] The post मिर्झापूरबाबत श्रिया पिळगावकरची पोस्ट चर्चेत; पुन्हा परतण्याचे दिले संकेत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 3:05 pm

द्रमुकला मिळणार २०० हून अधिक जागा; मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी विजयाबद्दल व्यक्त केला विश्वास

Chief Minister M.K. Stali| आगामी विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवण्यास २०० हून अधिक जागा जिंकण्यास आत्मविश्वासाने सज्ज आहे. पक्षाने गेल्या साडेचार वर्षांत केलेले व्यापक संघटनात्मक कार्य आणि प्रशासकीय कामगिरी उल्लेखनीय असल्याने आम्हाला विजय मिळण्यात काही अडचण येईल असे वाटत नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केले आहे. कोलथूर येथील अनिता अचिव्हर्स अकादमीने आयोजित […] The post द्रमुकला मिळणार २०० हून अधिक जागा; मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी विजयाबद्दल व्यक्त केला विश्वास appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 3:05 pm

न्यूयॉर्कमध्ये हमासच्या समर्थनार्थ घोषणाबाजी ; जोहरान ममदानी यांची प्रतिक्रिया समोर, वाचा काय म्हणाले ?

Zohran Mamdani। न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी यांनी “आम्ही हमासला पाठिंबा देतो” अशा घोषणांचा तीव्र निषेध केला आहे. क्वीन्सच्या बहुसंख्य यहूदी वस्तीत झालेल्या निषेधादरम्यान हे घोषणा देण्यात आले. निषेधाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत, ज्यामध्ये निदर्शक पॅलेस्टिनी झेंडे फडकवत आणि हमासच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत. अमेरिकन सरकारने हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. […] The post न्यूयॉर्कमध्ये हमासच्या समर्थनार्थ घोषणाबाजी ; जोहरान ममदानी यांची प्रतिक्रिया समोर, वाचा काय म्हणाले ? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 3:01 pm

अजय देवगणच्या ‘तान्हाजी’सिनेमाचा ६ वर्षांनी येणार सीक्वल? ‘त्या’पोस्टमुळे चर्चांना उधाण

Ajay Devgn | अभिनेता अजय देवगणचा 2020 साली प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शूरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा दाखवणाऱ्या या चित्रपटात अजय देवगण मुख्यभूमिकेत होता. तर अभिनेत्री काजोल हिची देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका होती. यशानंतर आता या सिनेमाच्या सीक्वलच्या चर्चा सुरू झाली आहे. त्याचे कारण म्हणजे अजय देवगणने शेअर केलेली […] The post अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ सिनेमाचा ६ वर्षांनी येणार सीक्वल? ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 2:48 pm

दाक्षिणात्य इंंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीची बॅालिवूडमध्ये एन्ट्री? स्वतः दिली हिंट म्हणाली “अॅाफर्स…”

Actress Kalyani Priyadarshan : लोका चॅप्टर १ चित्रपटातून लोकप्रिय झालेली दाक्षिणात्य अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन एका बॅालीवूड चित्रपटात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ‘प्रलय’ या हिंदी चित्रपटात अभिनेत्री दिसणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच आता अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन हिने प्रतिक्रिया दिली आहे. लोका चॅप्टर १ चित्रपटात अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन हिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. बॅाक्स […] The post दाक्षिणात्य इंंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीची बॅालिवूडमध्ये एन्ट्री? स्वतः दिली हिंट म्हणाली “अॅाफर्स…” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 2:39 pm

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा दिवस' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका, हा त्यांनी दिलेला मंत्र आजही जगातील करोडो तरुणांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे. आजच्या २०२६ च्या आधुनिक युगातही विवेकानंदांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांनी सांगितलेला राष्ट्रप्रेम, मानवता आणि चारित्र्य निर्मितीचा मार्ग आपल्याला एक सशक्त भारत घडवण्यासाठी मदत करेल.भाषणासाठी 10 प्रमुख मुद्दे ( Swami Vivekananda Jayanti Speech Marathi, Key Points)1. स्वामी विवेकानंद यांचा जन्म आणि बालपण (नरेंद्र ते विवेकानंद).2. त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्यासोबतची भेट.3. 1893 मधील ऐतिहासिक शिकागो धर्मपरिषद.4. 'उठा, जागे व्हा' हा तरुणांना दिलेला मंत्र.5. भारतीय संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रचार.6. चारित्र्यनिर्मिती आणि शिक्षणाचे महत्त्व.7. मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद.8. एकाग्रता आणि ध्येयवादाचे महत्त्व.9. रामकृष्ण मिशनची स्थापना.10. आधुनिक भारताच्या निर्मितीत विवेकानंदांचे योगदान.स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त शाळेत करण्यासाठी भाषण (Swami Vivekananda Jayanti Bhashan In Marathi)आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि माझ्या लाडक्या मित्र-मैत्रिणींनो,आज 12 जानेवारी, म्हणजेच संपूर्ण भारताला आपल्या विचारांनी नवी दिशा देणारे महापुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती. हा दिवस आपण 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा करतो. विवेकानंदांचा जन्म १८६३ मध्ये कोलकाता येथे झाला. त्यांचे बालपणीचे नाव नरेंद्र होते. लहानपणापासूनच ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आणि जिज्ञासू वृत्तीचे होते. 'देव कुठे आहे?' हा प्रश्न त्यांना नेहमी पडायचा, ज्याचे उत्तर त्यांना त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याकडून मिळाले.विवेकानंदांचे नाव घेताच डोळ्यांसमोर उभी राहते ती 1893 ची शिकागो येथील जागतिक धर्मपरिषद. जेव्हा त्यांनी 'अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो' असे म्हणून भाषणाची सुरुवात केली, तेव्हा संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले होते. त्यांनी पाश्चात्य जगाला भारतीय संस्कृती आणि वेदांताची खरी ओळख करून दिली. त्यांनी केवळ धर्मावरच नव्हे, तर मानवाच्या उद्धारावर अधिक भर दिला.त्यांच्या मते, शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर माणसाच्या चारित्र्याचा विकास होय. ते म्हणायचे की, तुम्हाला जर स्वतःवर विश्वास नसेल, तर तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही. आत्मविश्वास हाच यशाचा खरा मार्ग आहे. आजच्या काळात जेव्हा आपण छोट्या संकटांनी खचून जातो, तेव्हा त्यांचे विचार आपल्याला बळ देतात. शंभर वेळा अपयश आले तरी पुन्हा एकदा प्रयत्न करा, हा त्यांचा सल्ला आजही तितकाच लागू होतो.स्वामी विवेकानंदांना तरुणांकडून खूप अपेक्षा होत्या. ते म्हणायचे, मला शंभर नचिकेता द्या, मी या देशाचा चेहरा बदलून टाकीन. त्यांच्या दृष्टीने तरुण हा शारीरिकदृष्ट्या बलवान, मानसिकदृष्ट्या स्थिर आणि आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध असावा. त्यांनी समाजातील दीन-दलितांची सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा मानली. यासाठीच त्यांनी 'रामकृष्ण मिशन'ची स्थापना केली, जी आजही जगभरात मानवतेचे कार्य करत आहे.मित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला, पण त्यांनी दिलेले विचार अजरामर आहेत. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एक संकल्प करूया की, आपणही ध्येय निश्चित करू आणि ते गाठण्यासाठी कठोर परिश्रम करू. त्यांच्या शिकवणीनुसार आपण एक सुजाण आणि चारित्र्यवान नागरिक बनून देशाला प्रगतीपथावर नेऊया. शेवटी त्यांच्याच शब्दांत सांगावेसे वाटते - उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका!धन्यवाद! जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 2:30 pm

“हे पाकिस्तान नाही…” ; आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर ओवेसींचे जोरदार प्रत्युत्तर

Asaduddin Owaisi। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अलिकडच्या विधानावरून राजकीय वादळ निर्माण झाले आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी हिमंत सरमा यांच्यावर थेट हल्लाबोल केला. त्यांनी संविधान आणि त्याच्या मूलभूत भावनेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले. ओवैसी म्हणाले की, हिमंता बिस्वा सरमा यांच्या मनात “ट्यूबलाईट” जळत आहे आणि ते संविधानाचा मूलभूत भाव समजून घेण्यात अयशस्वी […] The post “हे पाकिस्तान नाही…” ; आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर ओवेसींचे जोरदार प्रत्युत्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 2:22 pm

क्रिती सॅननची बहीण नुपूरचा विवाह ख्रिश्चन रितीरिवाजानुसार पडले पार; व्हिडिओ व्हायरल

Nupur Sanon | बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅननची बहीण नुपूर सॅनन विवाहबंधनात अडकली आहे. उदयपूरमध्ये १० जानेवारी २०२६ रोजी ख्रिश्चन रीतीरिवाजानुसार नुपूर आणि गायक स्टेबिन बेन यांचा लग्नसोहळा पार पडला. लग्नापूर्वी संगीत आणि हळदी समारंभ झाला. त्याचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता नुपूरच्या लग्न सोहळ्याची झलक समोर आली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये क्रिती […] The post क्रिती सॅननची बहीण नुपूरचा विवाह ख्रिश्चन रितीरिवाजानुसार पडले पार; व्हिडिओ व्हायरल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 2:21 pm

'सतर्क राहिलो नाही तर १६ तारखेपासून मुंबईमध्ये जय श्रीराम म्हणता येणार नाही'

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवडी येथील वॉर्ड क्रमांक २०५ मध्ये भाजपा-महायुतीच्या उमेदवार सौ.वर्षा गणेश शिंदे यांच्या प्रचारार्थ आज शिवडी रामटेकडी येथे चौकसभा पार पडली.शिवडी आणि लालबाग हा हिंदुत्वाचा गड आहे. इथून हाकेच्या अंतरावर असलेल्या भायखळ्यात गेल्यावर जय श्रीराम म्हणता येतं का ? आपण सतर्क राहिलो नाही तर १६ तारखेपासून आपल्या हक्काच्या मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला जय श्रीराम म्हणता येणार नाही.अनेक वर्षे ठाकरे बंधूंची मुंबई पालिकेत सत्ता असताना या भागातील मराठी माणूस बाहेर का गेला ? हा मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे. इथे मराठी माणूस टिकायलाच पाहिजे, मराठी सण-उत्सव हक्काने साजरे झालेच पाहिजेत.त्यामुळे मुंबईमध्ये हिंदुत्व आणि अस्मिता जपायची असेल तर शिवडी, लालबाग, परळ, काळाचौकीतील प्रत्येक हिंदूने आपल्या अस्तित्वासाठी १५ तारखेला मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर येऊन हिंदुत्ववादी विचारांचे नगरसेवक निवडून दिले पाहिजे, असे आवाहन यावेळी केले.यावेळी राजेश हाटले, बबन कनावजे, गणेश शिंदे यांसह भाजपा-महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 2:10 pm

अजितदादांंचा एकेरी उल्लेख; महेश लांडगेंवर रुपाली पाटील ठोंबरे भडकल्या, थेट शब्दांत ठणकावलं

Rupali Patil Thombre : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध भाजप आमदार महेश लांडगे यांच्यात सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना आमदार महेश लांडगेंवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना महेश लांडगे यांनी एकेरी भाषेत अजित पवार यांचा उल्लेख […] The post अजितदादांंचा एकेरी उल्लेख; महेश लांडगेंवर रुपाली पाटील ठोंबरे भडकल्या, थेट शब्दांत ठणकावलं appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 1:58 pm

जगावर येणार एक मोठे संकट ; २०२६ साठी बाबा वांगाची भयानक भाकिते आली समोर

Baba Venga 2026 Predictions। जग आधीच अशांत काळातून जात आहे. अमेरिका आणि व्हेनेझुएलामधील वाढता तणाव, रशिया-युक्रेन युद्ध आणि पश्चिम आशियातील सतत बदलणारी परिस्थिती यावरून असे दिसून येते की, जागतिक राजकारण कधीही मोठे वळण घेऊ शकते. या वातावरणात, प्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवेत्त्ती बाबा वांगा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत, ज्यांच्या अनेक भविष्यवाण्या कालांतराने खऱ्या ठरत आहेत. असे […] The post जगावर येणार एक मोठे संकट ; २०२६ साठी बाबा वांगाची भयानक भाकिते आली समोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 1:50 pm

महापालिका निवडणूकीचे निकाल उशिराने लागणार? काय आहे नेमकं कारण?

Municipal Election | राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान येत्या गुरुवारी 15 जानेवारी रोजी होणार आहे. तर लगेच दुसऱ्या दिवशी 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मात्र निवडणूक निकाल संपूर्ण जाहीर होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. मनपा निवडणुकीसाठी एकावेळी एकाच वॉर्डच्या मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी स्पष्ट होणारे निकालाचे चित्र मध्यरात्रीपर्यंत स्पष्ट होणार की नाही याची खात्री […] The post महापालिका निवडणूकीचे निकाल उशिराने लागणार? काय आहे नेमकं कारण? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 1:28 pm

“गझनी अन् औरंगजेब इतिहासात दफन झाले, तिथेच सोमनाथ उभा” ; गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

PM Modi In Gujarat। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमनाथ स्वाभिमान पर्वात सहभागी होण्यासाठी सोमनाथ याठिकाणी पोहोचले. देशभरातील भाविक पंतप्रधानांची एक झलक पाहण्यासाठी उत्साहित होते. सोमनाथचे धैर्य, स्वाभिमान आणि सांस्कृतिक वारसा दाखवणाऱ्या ड्रोन शोमध्ये हे दाखवण्यात आले. या दरम्यान, सोमनाथमध्ये आज एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भाषण केले. सोमनाथ स्वाभिमान पर्वात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी, “महमूद गझनीपासून ते […] The post “गझनी अन् औरंगजेब इतिहासात दफन झाले, तिथेच सोमनाथ उभा” ; गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 1:22 pm

पूजा खेडकरला बांधून ठेवलं; आई वडिलांना गुंगीचे औषध दिलं अन्…; पुण्यात नेमकं काय घडलं?

Pooja Khedkar : आय ए एस पदावरून बडतर्फ करण्यात आलेल्या डॉ. पूजा खेडकरने त्यांच्या पुण्यातील घरी काल रात्री चोरीचा प्रकार घडल्याची माहिती फोन करून चतुःश्रृंगी पोलीसांना दिली असून, अजब चोरीचा प्रकारामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पूजा खेडकरचे आई आणि वडील यांना बेशुद्ध करुन तर पूजा खेडकरला बांधुन नोकराने चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले […] The post पूजा खेडकरला बांधून ठेवलं; आई वडिलांना गुंगीचे औषध दिलं अन्…; पुण्यात नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 12:51 pm

पूजा खेडेकरला बांधून ठेवलं; आई वडिलांना गुंगीचे औषध दिलं अन्…; पुण्यात नेमकं काय घडलं?

Pooja Khedkar : आय ए एस पदावरून बडतर्फ करण्यात आलेल्या डॉ. पूजा खेडकरने त्यांच्या पुण्यातील घरी काल रात्री चोरीचा प्रकार घडल्याची माहिती फोन करून चतुःश्रृंगी पोलीसांना दिली असून, अजब चोरीचा प्रकारामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पूजा खेडकरचे आई आणि वडील यांना बेशुद्ध करुन तर पूजा खेडकरला बांधुन नोकराने चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले […] The post पूजा खेडेकरला बांधून ठेवलं; आई वडिलांना गुंगीचे औषध दिलं अन्…; पुण्यात नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 12:51 pm

“जेएनयूमध्येच आम्ही त्यांची कबर…,” ; वादग्रस्त घोषणांवर विहिंप नेत्याचे खळबळजनक विधान

Surendra Gupta। दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात नुकत्याच झालेल्या आक्षेपार्ह घोषणांच्या निषेधार्थ, बजरंग दलाने हनुमान चालीसाचे सामूहिक पठण आयोजित केले होते, ज्यामध्ये विहिंपच्या दिल्ली प्रांतातील सर्व अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता. विहिंपच्या दिल्ली प्रांत मंत्र्यांचे विधान Surendra Gupta। विहिंपचे दिल्ली प्रांत मंत्री सुरेंद्र गुप्ता यांनी हनुमान चालीसाच्या पठणापूर्वी जे […] The post “जेएनयूमध्येच आम्ही त्यांची कबर…,” ; वादग्रस्त घोषणांवर विहिंप नेत्याचे खळबळजनक विधान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 12:42 pm

बालेकिल्ल्यातच खिंडार! माजी आमदाराने हाती घेतला धनुष्यबाण; भावूक प्रतिक्रिया देत म्हणाले “मी आयुष्याची….”

Former MLA Dagdu Dada Sakpal : आज ठाकरे बंधूंची मुंबईतील शिवाजी पार्कवर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून या सभेतून ठाकरे बंधू काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर दुसरीकडे ठाकरेंसोबत तब्बल ५९ वर्षाचे योगदान देणाऱ्या माजी आमदाराने त्यांची साथ सोडली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […] The post बालेकिल्ल्यातच खिंडार! माजी आमदाराने हाती घेतला धनुष्यबाण; भावूक प्रतिक्रिया देत म्हणाले “मी आयुष्याची….” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 12:25 pm

शिवाजी पार्कच्या सभेआधी उद्धवना धक्का, दगडू सकपाळांनी हाती घेतले धनुष्यबाण

मुंबई : उद्धव आणि राज यांची रविवारी शिवाजी पार्क मैदानावर प्रचारसभा होणार आहे. ही सभा होण्याआधीच उबाठाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. लालबाग परळ शिवडी पट्ट्यातील प्रभावी नेते दगडू सकपाळ यांनी उबाठा सोडून शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी यांच्या उपस्थितीत दगडू सकपाळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव यांच्या पक्षाचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दगडू सकपाळ यांनी उबाठा सोडली आणि एकनाथ शिंदे यांनी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उबाठा आणि मनसेच्या संयुक्त प्रचारसभेआधीच रविवारी सकाळी दगडू सकपाळ यांनी धनुष्यबाण हाती घेतले. मुक्तागिरी येथे झालेल्या सोहळ्यात दगडू सकपाळ यांनी एकनाथ शिंदेंची मुंबईतली ताकद वाढवली. अनेक वर्षे पक्षाचे काम करुनही मुलीसाठी तिकीट मागितल्यावर नकार ऐकावा लागला. यामुळे दगडू सकपाळ नाराज झाले. त्यांनी माध्यमांसमोर अतिशय भावनिक प्रतिक्रिया दिली. मी म्हातारा झालो, आता माझा पक्षाला उपयोग वाटत नसेल पण तरुणपणात मी पक्षासाठी सर्वस्व दिले. पण आता त्यांचा वेगळा विचार असेल तर मलाही विचार करावा लागेल, असे सांगत दगडू सकपाळ यांनी उबाठा सोडली आणि शिवसेनेत प्रवेश केला. दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक २०३ मधून इच्छुक होती. पण उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी देण्यास नकार दिला. रेश्मा सकपाळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर नाराज असलेल्या दगडू सकपाळ यांनी उबाठा सोडून शिवसेनेची वाट धरली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवसापूर्वी दगडू सकपाळ यांची त्यांच्या परळ येथील राहत्या घरी भेट घेतली होती. याच भेटीत एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेश करण्यासाठी बोलणी केली. विचार करून कळवतो, असे सपकाळ यांनी त्यावेळी सांगितले. अखेर दगडू सपकाळ यांनी उबाठा सोडण्याचा विचार पक्का केला. रविवारी सकाळी उबाठाचे दगडू सकपाळ एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसैनिक झाले. बाळासाहेबांच्या विचारांनी चालणार आणि शिवसेनेची मुंबईतली ताकद वाढवणार असे दगडू सकपाळ म्हणाले.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 12:10 pm

“रस्त्यावर टिकून रहा..” ; इराणमधील अशांततेदरम्यान रझा पहलवी यांचा मोठा संदेश

Reza Pahlavi। इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये, देशाचे निर्वासित युवराज रेझा पहलवी यांनी इराणी जनतेला एक नवीन भावनिक संदेश दिला आहे. रविवारी प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओ संदेशात त्यांनी लोकांना निदर्शनांपासून मागे हटू नका आणि रस्त्यावर राहण्याचे आवाहन केले. त्यांनी याविषयी बोलताना, “इराणी जनतेचा आवाज आता देशापुरता मर्यादित नाही, तर तो जगभरात घुमत आहे.”असे म्हटले आहे. इराणचे […] The post “रस्त्यावर टिकून रहा..” ; इराणमधील अशांततेदरम्यान रझा पहलवी यांचा मोठा संदेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 11:52 am

नितेश राणे यांच्या निवासस्थानाबाहेर घातपाताचा प्रयत्न? बेवारस बॅगेतील चिठ्ठीत नेमका काय दिला संदेश?

Nitesh Rane | भाजप नेते आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थान ‘सुवर्ण गड’ बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्या आहेत. यावरून नितेश राणे यांच्या निवासस्थानाबाहेर घातपाताचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बॉम्ब शोधक पथकाकडून बॅगची तपासणी सुरू आहे. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. याठिकाणी येण्या-जाण्यास बंदी घालण्यात आली […] The post नितेश राणे यांच्या निवासस्थानाबाहेर घातपाताचा प्रयत्न? बेवारस बॅगेतील चिठ्ठीत नेमका काय दिला संदेश? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 11:36 am

मी किन्नर आहे, मुलाने माझ्याशी लग्न केले:वडिलांनी बाजारात मारले, केस कापले, पण मुलगा मागे हटला नाही- मला वधू बनवले

माझे नाव सोनी आहे. मी पश्चिम बंगालमधील बनगावची रहिवासी आहे. मी स्वतःला नेहमी एक मुलगीच मानले, पण लोकांनी मला 'किन्नर', 'हिजडा' अशा शब्दांनी ओळख दिली. लोक म्हणायचे, ‘ना आई होऊ शकणार, ना कोणाची वधू… मग हिच्या जगण्याचा काय अर्थ?’ त्या गोष्टी ऐकत-ऐकत मी जगत तर होते, पण आतून मृतदेह बनले होते. पोट भरण्यासाठी ऑर्केस्ट्रामध्ये नाचत होते. छपरा येथील जनता बाजारातील एका औषधाच्या दुकानातून माझ्या प्रेमकथेला सुरुवात झाली. प्रियकर आदर्शला मी किन्नर आहे हे माहीत नव्हते- तरीही तो मला माणूस समजून जवळ आला. व्हिडिओ व्हायरल होताच कुटुंबात गोंधळ निर्माण झाला. आई म्हणाली- ‘किन्नरशी लग्न केले तर बहिणींची लग्ने होणार नाहीत.’ मी दोन भाऊ, दोन बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. जन्माला आल्यावर जशी एक मुलगी असते, मी पण तशीच होते. जेव्हा थोडी मोठी झाले, तेव्हा माझ्या शरीरात वेगळे बदल दिसू लागले. 12-13 वर्षांच्या वयानंतर जे इतर मुलींमध्ये होते, ते माझ्या शरीरात झाले नाही. मला मासिक पाळी आली नाही. शरीर आणि माझे हावभाव पाहून आजूबाजूचे लोक म्हणू लागले - ही तर किन्नर जन्माला आली आहे. आता तर हिला किन्नर लोक उचलून घेऊन जातील. मी त्यांचे बोलणे ऐकून भीतीने थरथर कापू लागले होते. आई उलटून उत्तर द्यायची - माझी मुलगी आहे. मी तिला जन्म दिला आहे. आता ती जी कोणी आहे, जशी आहे, माझ्यासोबतच राहील. माझे वडील शेती आणि मत्स्यपालन करतात आणि आई घर सांभाळते. 2019 ची गोष्ट आहे. मी बीएच्या दुसऱ्या वर्षात होते. घरी पैशांची अडचण होती, म्हणून माझ्या एका मैत्रिणीने मला विचारले- बिहारला येशील का? तिथे काम आहे. पैसे मिळतील. मी विचारले- काय काम आहे? मैत्रीण म्हणाली- तिथे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये नाचायचे आहे. मग मी लाजत म्हटले- मला तर नाचता येत नाही. मला फिरायला आवडते. घरी विचारून सांगेन. मी घरी येऊन आईला सांगितले की मी बिहारला जात आहे. एका महिन्याने फिरून परत येईन. आईने परवानगी दिली. मी पश्चिम बंगालमधून बिहारच्या छपरा येथे आले. तिथे माझ्या ग्रुपमध्ये अनेक मुली होत्या. त्या सर्व माझ्या जवळच्या एका गावातील होत्या. त्या गावातील बहुतेक मुली दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन अशाच प्रकारे नाचतात. त्यांच्यासोबत मलाही ठेकेदार छपरा-सिवानच्या आसपास जिथे कुठे कार्यक्रम असे, तिथे घेऊन जात असे. स्टेजवर जेव्हा नाच असायचा, तेव्हा मी उभीच राहायचे. मला नाचता येत नव्हते. समोरची गर्दी ओरडू लागायची. भोजपुरीमध्ये म्हणायची- तिला काढा, कुठून उचलून आणले आहे? नाचता येत नाही तर का येतेस? त्यावेळी मला हिंदी, भोजपुरी समजत नव्हती. त्यानंतर हळूहळू नाचायला शिकायला सुरुवात केली. एक महिना झाला तेव्हा परत घरी आले. त्यावेळेपर्यंत मी आदर्शला भेटले नव्हते, ना कधी पाहिले होते. 2021-22 ची गोष्ट आहे. माझे मोठे भाऊ तीन मजली इमारतीवरून खाली पडले. त्यांच्या शरीरातील अनेक ठिकाणची हाडे तुटली. ते अनेक महिने अंथरुणावर होते. त्यांच्याच कमाईवर घर चालायचे, जे आता कठीण झाले होते. मी विचार केला - आता तर नाचायला शिकलेच आहे. बिहारला जाऊन ऑर्केस्ट्रामध्ये नाचले तर घराची परिस्थिती सुधारेल. पुन्हा बिहारला परत गेले. तिथे एका ठेकेदाराकडे राहू लागले. तो आम्हाला कार्यक्रमांमध्ये नाचण्यासाठी घेऊन जात असे. या वेळेपर्यंत मी नाचायला शिकले होते. इतके चांगले की गर्दी माझाच नाच पाहण्यासाठी मला वारंवार स्टेजवर बोलावू लागली. मी पण खूप नाचत असे. जवळपास 7 महिने नाचले, पण ठेकेदाराने पैसे दिले नाहीत. मी अस्वस्थ होऊ लागले. त्याच्यासोबत माझी मारामारी झाली. त्यानंतर मी आणि बाकीच्या मुलींना सोबत घेऊन छपराच्या जनता बाजारात आले. तिथेच आदर्शचे एक औषधाचे दुकान होते. त्याच्या कुटुंबाने हे दुकान उघडून काहीच महिने झाले होते. तो दररोज औषधाच्या दुकानावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसत असे. माझ्या टीममधील काही मुलींची तब्येत खराब होती. सर्दी-खोकला, अंगदुखीची औषधे घ्यायची होती. मी औषध आणायला गेले. आदर्श त्यावेळी दुकान बंद करत होता. मी औषधाचे नाव सांगितले, तेव्हा तो म्हणाला- काही औषधे आहेत. काही नाहीत... उद्या मागवून देईन. मी माझा पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आणि सांगितले की- ती माझ्या खोलीवर पोहोचवून द्यावीत. दुसऱ्या दिवशी आदर्श औषध घेऊन माझ्या खोलीवर आला. त्या दिवसापासून तो माझ्याशी अनेकदा बोलू लागला. त्यावेळी त्याला माहीत नव्हते की मी किन्नर आहे. सुमारे 6 महिन्यांनंतर आदर्शने एके दिवशी मला सांगितले की तो माझ्यावर प्रेम करतो. मी हसत म्हणाले- लोक असेच बोलतात. माझ्यासाठी ही काही नवीन गोष्ट नाही. साधारणपणे प्रत्येक मुलगा मला हेच म्हणतो. जेव्हा मी नाचायला जाते तेव्हा ते माझा फोन नंबर मागतात. म्हणतात की त्यांना माझ्याशी लग्न करायचे आहे. आदर्श लाजत म्हणाला- मी खरंच प्रेम करतो. मी त्याला माझ्या जवळ बसवले आणि समजावले- मी किन्नर आहे. मी सामान्य मुलगी नाही. मी कधीही आई होऊ शकत नाही. आदर्श ऐकताच म्हणाला- ... तू आई होऊ शकत नाहीस, तर काय झाले. आपण दोघे एकत्र राहू शकतो ना! मी त्याला रागावत म्हणाले- प्रत्येक मुलगा हेच म्हणतो. नंतर फसवून निघून जातो. मी नाचणारी आहे. किन्नर आहे. तुझे घरचे मला कधीच स्वीकारणार नाहीत. मी नाचते, ते फक्त पोटासाठी. जर तू खरंच माझ्यावर प्रेम करत असशील, तर तुझ्या घरच्यांना सांग. जगासमोर मला इज्जत द्यावी लागेल. आदर्श प्रत्येक गोष्टीसाठी तयार झाला. शेवटी आम्ही दोघांनी एकत्र एक व्हिडिओ बनवला, जो व्हायरल झाला. आदर्शच्या घरच्यांना कळले की तो एका किन्नरवर प्रेम करतो. त्याने आपल्या आईला सांगितले, तेव्हा आई रागावून म्हणाली- नाचणाऱ्या छक्क्याशी, हिजड्याशी लग्न करणार? वेडा झाला आहेस का? सुमारे दीड-दोन महिने हे सर्व चालले. त्याचे घरचे खूप त्रस्त होते. एके दिवशी आदर्शच्या वडिलांनी भर बाजारात लोकांसमोर त्याची खूप बेइज्जत केली. खूप मारले-बडवले. त्याचे केस कापून टाकले, जेणेकरून तो मला चांगला दिसू नये. पण तो मागे हटायला तयार झाला नाही. त्या दिवशी आदर्शच्या आईने त्याला समजावत म्हटले होते- तू घरात सर्वात मोठा आहेस. तू नचनिया, किन्नरशी लग्न करशील, तर बाकीच्या मुलांचं काय होईल? कुणी तुझ्या बहिणीशी लग्न करणार नाही. वडिलांनी वर्षानुवर्षे परदेशात नोकरी केली. सारी इज्जत मातीत मिळेल. पण आदर्शने काहीच ऐकले नाही. त्याने खाणे-पिणे सोडून दिले. त्याची आई काळजीत पडून मला फोन करून म्हणाली- मुलाने अजून जेवण केले नाहीये. तू बोलशील, तर तो खाईल. पण आदर्श हट्टाला पेटला होता. सुमारे दोन महिन्यांनंतर आदर्श मला म्हणाला- त्यालाही बंगालला यायचे आहे. शेवटी मी त्याला माझ्याकडे बोलावून घेतले. ज्या दिवशी तो माझ्या घरी आला, त्या दिवशी गावातील लोक माझ्या दारावर जमा झाले. म्हणू लागले- लग्नाशिवाय अनोळखी मुलगा एका मुलीसोबत कसे राहू शकते? आधी लग्न करावे लागेल, मगच तुम्ही दोघे एकत्र राहू शकाल. त्यानंतर सर्व रितीरिवाजांनुसार आम्ही दोघे जवळच्या एका मंदिरात गेलो आणि लग्न केले. काय सांगू. त्या दिवशी जेव्हा आदर्शने माझी मांग भरली, तेव्हा असे वाटले की आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या. मला आजही आठवतंय- जेव्हा पहिल्यांदा कळलं की मी किन्नर आहे, तेव्हा वाटलं होतं की आता मी कोणाची सून होऊ शकणार नाही, ना वधू. त्यावेळी कोणाच्या भांगात कुंकू पाहिलं की वाटायचं की, काश मी पण हे कुंकू, बिंदी मोठी झाल्यावर कोणाच्या नावाचं लावू शकले असते! अशा प्रकारे आदर्शसोबत माझं लग्न झालं होतं. आदर्शने एके दिवशी म्हटलं- तू ऑर्केस्ट्रामध्ये नाचणं सोडून दे. तू नाचतेस, तेव्हा मला आवडत नाही. मी त्याचं म्हणणं ऐकलं. आता आम्ही दोघे मिळून सोशल मीडियावर ब्लॉगिंग करतो. व्हिडिओ बनवतो. त्यातून चांगली कमाई झाली आहे. त्यातूनच आता मी माझं घर बांधणार आहे. आदर्श अजूनही त्याच्या गावी जातो. तो पटना येथून फिजिओथेरपीचे शिक्षण घेत आहे. तो अनेकदा खेद व्यक्त करतो की- माझा किन्नर म्हणून जन्म होणे हा गुन्हा होता का, ज्यामुळे या समाजाने किंवा त्याच्या घरच्यांनी मला स्वीकारले नाही? त्याला आजही भीती वाटते की जर मी त्याच्या घरी गेले, तर घरचे आणि गावकरी आम्हाला बाहेर काढतील. आदर्शच्या घरच्यांचे हेच म्हणणे आहे की माझ्याशी लग्न केल्यानंतर आता त्यांच्या मुलींची लग्ने होणार नाहीत. त्यांनी आम्हा दोघांना स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्याची आई म्हणते- जर तुम्ही लोक या घरात आलात, तर लोक आम्हाला गावातून बाहेर काढतील. त्याच्या गावातील लोक म्हणतात- किन्नरने निष्पाप मुलावर बंगालची काळी जादू केली आहे. कुठलीतरी हिजडी, आता किन्नरही लग्न करू लागल्या आहेत का, तेही एका सामान्य मुलाशी. पण त्यांना काय माहीत की आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो. पण विचार करते की शेवटी मी पण एक मुलगीच आहे ना. शरीर, आत्मा सगळं मुलीचं आहे. माझं पण इतरांसारखं आयुष्य आहे. फक्त आई होऊ शकत नाही. यासाठी पण मी डॉक्टरांना दाखवत आहे. जर आई नाही झाले तर काय झालं, एखादं बाळ दत्तक घेईन. नाहीतर IVF करून घेईन. आता लोक माझे पती आदर्श यांना विचारतात- किन्नरशी लग्न केलं आहे, आनंदी कसे राहता? त्यांना काय माहीत की जे संबंध एका मुलगी आणि मुलामध्ये असतात. तेच पती-पत्नीमध्ये पण असू शकतात. आमच्यात तसेच संबंध आहेत. आता तर मी लोकांना उत्तर देणं सोडूनच दिलं आहे…

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 11:34 am

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात एक नवी याचिका दाखल झाली आहे. या याचिकेचा निकाल आल्यानंतर राज्य निवडणूक आयोग १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे.राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात, अशी मागणी करणारी नवी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. पण ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदांच्या बाबतीत पेच निर्माण झाला आहे. नगरपालिका, नगरपंचायती आणि नागपूर-चंद्रपूर महापालिकांच्या निवडणुका ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली असली तरी, न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून घेण्यास परवानगी मिळाली आहे.केवळ ५० टक्के आरक्षणाची मर्यादा पाळणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. यामुळे राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात २८८ नगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या. आता राज्यातील सर्व म्हणजेच २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. उर्वरित २० जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जात असल्याने आयोगाने तिथे निवडणुका घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. यात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा येथील जिल्हा परिषदा आहे. याचिकेद्वारे नेमकी कोणती मागणी केली आहे ?सोलापूर जिल्ह्यातील कुडूवाडी येथील जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबर्स असोसिएशनचे पदाधिकारी कैलास जगन्नाथ गोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नगरपालिका आणि महापालिकांप्रमाणेच जिल्हा परिषदांनाही ५० टक्के आरक्षणाची अट शिथिल करून निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. केवळ १२ जिल्ह्यांत निवडणुका न घेता, राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका 'अंतिम न्यायालयीन निर्णयाच्या अधीन' राहून एकाच वेळी घेतल्या जाव्यात, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 11:10 am

दादरच्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची दूरवस्था

सत्ता काळात दुर्लक्ष, निवडणूक जवळ येताच उबाठाला झाली आठवणमुंबई (विशेष प्रतिनिधी) :स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील नेत्यांच्या आठवणी भावी पिढीला अवगत व्हाव्यात यासाठी महापालिकेच्यावतीने दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन बनवले . परंतु बाळासाहेबांनी तब्बल १५ वर्षांपूर्वी बनवलेल्या या स्मृतीदालनाकडे सत्ता असतानाही कधीही ढुंकूनही न पाहणाऱ्या उबाठाला आता निवडणूक आल्यावर आठवण झाली. या स्मृती दालनाची दुरवस्था झाल्याचे वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतरही दुर्लक्ष करणाऱ्या उबाठाने येणाऱ्या निवडणुकीच्या वचननाम्यात याचे नुतनीकरण करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्याचा प्रयत्न केला आहे.विशेष म्हणजे या स्मृती दालनाच्या वरील मजल्यावर उबाठा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काढलेल्या विहंग छायाचित्राचे प्रदर्शन कायमस्वरुपी भरवलेले आहे. त्यामुळे आपल्या छायाचित्रांची योग्य काळजी घेण्यासाठी याचे नुतनीकरण केले जाते की स्मृती दालनाची काळजी आहे म्हणून केली जाणार आहे असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे.छत्रपती शिवाजी पार्क येथील संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे नुतनीकरण करण्याचे आश्वासन देतानाच ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मुंबई आणि महाराष्ट्राचे योगदान अधोरेखित करणारे स्वातंत्र्य समर स्मृतीदालन उभारण्याची घोषणा केली. परंतु ज्यांना बाळासाहेबांनी पुढाकार घेवून बनवलेल्या स्मृती दालनाची काळजी आणि देखभाल करता आलेली नाही, त्यांना स्वातंत्र्य समर स्मृतीदालनाची उभारणी करून संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाप्रमाणे त्याची दुरवस्था करायची आहे का असा सवाल जनतेच्या मनात निर्माण व्हायला लागला आहे. .टेक्सटाईल म्युझियम नऊ वर्षांनंतरही खुले होईनामुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या काळात काळाचौकी येथे टेक्सटाईल म्युझियमचे काम हाती घेण्यात आले आहे . सर्व प्रकारच्या मंजुरीनंतर सन २०१७मध्ये या टेक्सटाईल म्युझियमच्या कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु आज साडेआठ ते नऊ वर्षे उलटत आली तरी या म्युझियमचे काम पूर्ण न झाल्याने अद्यापही पर्यटकांसाठी ते खुले होवू शकलेले नाही. दुसरीकडे कापड गिरण्या ते आय टी हब हा प्रवास तसेच मुंबईला घडवण्यात मोठा वाटा असलेल्या उद्योजकांच्या योगदानाचे दर्शन घडवणारे अत्याधुनिक मुंबई म्युझियमची घोषणा करून येणाऱ्या काळात सुरु होणाऱ्या टेक्स्टाईल म्युझियमनच्या नावाखाली आम्ही करून दाखवले असे सांगत मोकळे होणार आहेत.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 11:10 am

Pune News : प्रभाग क्रमांक १० मारणार विजयाचा चौकार –मोहोळ

प्रभात वृत्तसेवा पुणे : बावधन-भुसारी काॅलनी प्रभाग १० मध्ये भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी चौकार मारणार, असा विश्वास केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. भाजप-आरपीआय युतीचे अधिकृत उमेदवार किरण दगडे पाटील, रूपाली सचिन पवार, अल्पना गणेश वरपे, दिलीप वेडेपाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार […] The post Pune News : प्रभाग क्रमांक १० मारणार विजयाचा चौकार – मोहोळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 10:53 am

वाघोली : अष्टापुर येथे दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश

वाघोली : अष्टापूर तालुका हवेली येथील खोलशेत येथे दुसरा बिबट्या जेर बंद करण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. गेल्या ११ दिवसांमध्ये दुसरा बिबट्या जेर बंद करण्यात आला आहे. वन विभागाला यश गेल्या दोन दिवसांपूर्वी याच बिबट्याने अष्टापुर माळवाडी येथील बिरोबाचा माळ येथे चार मेंढ्या मारल्या होत्या. त्यामुळे मेंढपाळांनी बिबट्या जेरबंद केल्यामुळे समाधान व्यक्त केले […] The post वाघोली : अष्टापुर येथे दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 10:50 am

“पाकिस्तानी सैन्यच मला निमंत्रण…”, लष्करच्या दहशतवाद्याकडून असीम मुनीरचा पर्दाफाश

Pakistan Terrorism। पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) यांच्यातील संबंधांचे दीर्घकाळापासूनचे आरोप पुन्हा एकदा सिद्ध झाले आहेत. लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कथित सूत्रधार सैफुल्लाह कसुरी याने पाकिस्तानी सैन्याशी असलेले त्याचे जवळचे संबंध उघडपणे मान्य केले आहेत. एका व्हिडिओमध्ये कसुरीने दावा केला आहे की, पाकिस्तानी सैन्य त्याला नियमितपणे कार्यक्रमांना आमंत्रित करते आणि सैनिकांच्या अंत्यसंस्काराचे […] The post “पाकिस्तानी सैन्यच मला निमंत्रण…”, लष्करच्या दहशतवाद्याकडून असीम मुनीरचा पर्दाफाश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 10:38 am

अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; उद्धव ठाकरेंची टीका; आता तेजस्वी घोसाळकरांचे जोरदार प्रत्युत्तर

Tejasvee Ghosalkar : मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरले असून, उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध प्रभागांमध्ये ते भेटी देत आहेत. ठाकरेंचे अत्यंत विश्वासू दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या निधानंतर त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्या. मात्र, मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्या मुंबईतील वार्ड क्रमांक २ दहिसर येथून भाजपकडून […] The post अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; उद्धव ठाकरेंची टीका; आता तेजस्वी घोसाळकरांचे जोरदार प्रत्युत्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 10:23 am

मुंबईत मराठी टिकवण्यात ठाकरेंचा काय सहभाग? भाजपचा थेट सवाल, राजकारण तापणार..

BJP’s criticism of Thackeray brothers : मुंबईला महाराष्ट्रपासून वेगळे करण्याचा डाव सत्ताधाऱ्यांचा आहे, असा मोठा दावा ठाकरे बंधू करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपवर टीकेचे बाण सोडले जात आहेत. या टीकेला भाजपकडून देखील जशास तसे उत्तर दिले जात आहे. आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अवघे पाच […] The post मुंबईत मराठी टिकवण्यात ठाकरेंचा काय सहभाग? भाजपचा थेट सवाल, राजकारण तापणार.. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 9:58 am

हृदयद्रावक घटना! लेकीच्या जन्माआधीच वीर जवानाचा अपघाती मृत्यू; काही तासापूर्वीच जन्मलेल्या चिमुकलीने घेतले पित्याचे अंत्यदर्शन

Satara Accident | एक मन हेलावून टाकणारी घटना साताऱ्यात घडली आहे. भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान प्रमोद परशुराम जाधव हे पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टी घेऊन गावी आले होते. मात्र त्यांचा अपघाती मृत्यू झाला. एकीकडे पित्याचे निधन, तर दुसरीकडे नवजात बाळाचा जन्म अशी हृदयद्रावक घटना घडल्याने सर्वच जण स्तब्ध झालेत. वीर जवान प्रमोद परशुराम जाधव हे […] The post हृदयद्रावक घटना! लेकीच्या जन्माआधीच वीर जवानाचा अपघाती मृत्यू; काही तासापूर्वीच जन्मलेल्या चिमुकलीने घेतले पित्याचे अंत्यदर्शन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 9:49 am

जेमिमाला दिलेलं वचन सुनील गावस्कर यांनी पाळलं

मुंबई : भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी दिलेले एक खास वचन अखेर पूर्ण झाले आहे. भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यास जेमिमा रॉड्रिग्जच्या गिटारच्या साथीने गाणे गाईन, असे प्रॉमिस 'लिटील मास्टर'नी दिले होते. या वचनाची पूर्तता करण्यासाठी हे दोन स्टार खेळाडू नुकतेच एकत्र आले आणि सोशल मीडियावर या अनोख्या जुगलबंदीने धुमाकूळ घातला आहे. या भेटीचे खास आकर्षण ठरली ती गावस्करांनी जेमिमाला दिलेली भेट. सुनील गावस्कर यांनी जेमिमाला 'बॅटच्या आकाराची' एक अतिशय सुंदर गिटार भेट दिली. जेव्हा जेमिमाने त्यांना या गिटारचे अनावरण करण्यास सांगितले, तेव्हा गावसकर मिश्किलपणे म्हणाले, इथे मी सलामीचा फलंदाज नाही, तू आहेस! हे ऐकून जेमिमासह तिथे उपस्थित असलेले सर्वच जण हसून उमलले. भेटवस्तू दिल्यानंतर लगेचच या दोघांची मैफल रंगली. 'शोले' चित्रपटातील अजरामर गाणे 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे' गावसकरांनी आपल्या आवाजात गायले, तर जेमिमाने आपल्या नवीन बॅटरूपी गिटारवर त्याला सुरेल साथ दिली. या मैफलीनंतर दोघांनीही या अनोख्या गिटारसह फोटोशूटही केले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी एका मुलाखतीत गावसकर म्हणाले होते, जर भारताने विश्वचषक जिंकला, तर जेमिमा आणि मी पुन्हा एकदा एकत्र गाणे गाऊ.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 9:30 am

टी-२० विश्वचषकातून वगळल्यानंतर अखेर शुभमनचे मौन सुटले

बडोदरा : भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने २०२६ च्या टी-२० विश्वचषक संघातून वगळल्याबद्दल अखेर आपले मौन सोडले आहे. या निर्णयावर त्याने एक तात्त्विक भूमिका घेतली असून, निवड समितीच्या निर्णयाचा आदर करत असल्याचे म्हटले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला वडोदरा येथे पत्रकारांशी बोलताना गिल म्हणाला, मी जिथे असायला हवं, बरोबर तिथेच आहे.भारताचा वनडे कर्णधार शुभमन गिल एकेकाळी टी-२० संघाचा उपकर्णधार होता. सूर्यकुमार यादवनंतर आता गिल टी-२० संघासह तीनही फॉरमॅटचा कर्णधार होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र भारतात अवघ्या काही महिन्यात सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचा भारतीय संघ जाहीर झाला आणि शुभमन गिलसह सर्वांनाच धक्का बसला. १५ सदस्यांच्या संघात उपकर्णधार शुभमन गिललाच डच्चू देण्यात आला होता. उपकर्णधारपदावरून गिलला थेट संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्या टीम सिलेक्शनवर अनेक प्रश्नचिन्ह देखील उपस्थित झाले. संघ जाहीर झाला त्यावेळी गिल काही बोलला नव्हता. मात्र आता वन-डे मालिकेपूर्वी कर्णधार म्हणून प्रेस पत्रकारांशी बोलताना त्याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने टी-२० संघातून वगळ्याबद्दल त्याची काय भावना आहे याबाबत वक्त झाला. शुभमन गिलने निवडसमिती बाबत देखील आपले मत मांडले. त्यानं कोणतेही वादग्रस्त वक्तव्य न करत निवडसमितीचा निर्णय मान्य केला. तो म्हणाला, मी निवडसमितीच्या निर्णयाचा पूर्णपणे आदर करतो. मी टी-२० संघाला शुभेच्छा देतो. मला आशा आहे के वर्ल्डकप जिंकतील.' त्याचप्रमाणे गिलचे लक्ष आता फक्त संघावर आहे.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 9:30 am

जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर? सुप्रिम कोर्टातून आली मोठी अपडेट

Zilla Parishad Election : राज्यात सध्या २९ महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकांनतर राज्यातील ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे, त्या सोडून 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडणार […] The post जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर? सुप्रिम कोर्टातून आली मोठी अपडेट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 9:22 am

मेट्रो-९ मुळे अंधेरीतून थेट काशीगावपर्यंत प्रवास

दहिसर ते भाईंदर टप्प्यातील सुरक्षा तपासणीला सुरुवातमुंबई : दहिसर ते मिरारोड अंतर कमी करून या परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी १३.५ किमी लांबीच्या 'मेट्रो ९' मार्गिकेचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतले आहे. लवकरच ही मार्गिका सुरू होणार आहे. ही मार्गिका दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो- ७ मार्गिकेचा विस्तार आहे. मेट्रो-७ मार्गिकेच्या विस्तारामुळे मुंबईतील पश्चिम उपनगरे थेट मीरा- भाईंदर शहराशी जोडली जाणार आहेत. यामुळे अंधेरीतून थेट काशीगावपर्यंत प्रवास करता येणार आहे. या मार्गिकेत १० स्थानकांचा समावेश असून या मार्गिकेच्या बांधकामासाठी ६६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.'दहिसर ते भाईंदर मेट्रो ९' मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्प्यातील सुरक्षा तपासणीला मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) दिल्ली यांनी सुरुवात केली आहे. सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून मेट्रो संचलनाचा मार्ग मोकळा करण्यातील ही शेवटची आणि महत्त्वाची प्रक्रिया असून प्रक्रियेला सुरुवात झाल्याने आता लवकरच या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होईल. तर सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाणार आहे. महानगरपालिकाांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असून आचारसंहिता संपल्यानंतर जानेवारीअखेरीस वा फेब्रुवारीच्या सुरुवातीला दहिसर ते काशीगाव मेट्रो धावण्याची शक्यता आहे. पूर्णत: उन्नत मेट्रो मार्गिका असलेल्या या मार्गिकेची कारशेड उत्तन येथील डोंगरी परिसरात असणार आहे. तर या मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत केले जात आहे. दहिसर–काशीगाव आणि काशीगाव–डोंगरी असे हे दोन टप्पे असून सध्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर डिसेंबरअखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या अनुषंगाने एमएमआरडीएने काही महिन्यांपूर्वी सीएमआरएस चाचण्यांना सुरुवात केली. मात्र सीएमआरएस चाचण्यांची प्रक्रिया पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने डिसेंबरचा मुहूर्त चुकला. पण आता मात्र जानेवारीअखेरीस वा फेब्रुवारीच्या सुरुवातीला दहिसर–काशीगाव मेट्रो धावणार आहे. पहिल्या टप्प्यातील चाचण्या आता अंतिम टप्प्यात असून मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) दिल्ली हे मुंबईत दाखल झाले आहे. त्यांच्याकडून तपासणी सुरू आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांत पहिल्या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. मात्र आचारसंहिता लागू असल्याने सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याबरोबर मेट्रोचे संचलन करता येणार नाही. परिणामी, दहिसर–काशीगाव मेट्रो प्रवासासाठी प्रवाशांना काहीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 9:10 am

रायगड जिल्ह्याने रिचवली ४४ लाख लिटर दारू!

बिअरची विक्री सर्वाधिक; वाईनमध्ये घटअलिबाग : रायगड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात मद्यविक्रीने उच्चांक गाठला असून, तब्बल ४३ लाख २७ हजार ५२५ बल्क लिटर दारू तळीरामांनी रिचवली. यामध्ये बिअरची विक्री सर्वाधिक झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क रायगड विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. देशी व विदेशी दारूपेक्षा बिअरला मद्यपींची पसंती मिळाल्याने वाईनच्या विक्रीत मात्र लक्षणीय घट नोंदवली गेली.डिसेंबरमध्ये नाताळसह थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यात पर्यटक दाखल झाले होते. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, कॉटेज पर्यटकांनी फुल्ल होते. दहा लाखांहून अधिक पर्यटकांनी या कालावधीत जिल्ह्याला भेट दिल्याने मद्यविक्रीत प्रचंड वाढ झाली. अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यविक्रीचे परवानेही देण्यात आले. आकडेवारीनुसार, डिसेंबर महिन्यात ४३ लाख २७ हजार ५२५ बल्क लीटर इतकी दारु मद्यपींनी रिचवली असल्याची माहिती समोर आली. त्यामध्ये ९ लाख ५१ हजार ३८१ बल्क लीटर देशी दारु, ९ लाख १४ हजार ४२६ बल्क लिटर विदेशी दारू, २४ लाख ९६ हजार ९६० बल्क लीटर बिअर आणि ६४ हजार ७५८ वाईन विकली गेली. यावरुन बिअरची क्रेझ किती वाढली, हे स्पष्ट होते. विदेशी दारूच्या किमतीमध्ये तीस टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याने मद्यपींनी बिअरकडे मोर्चा वळवला. ६५० रुपयांची बाटली ९०० रुपयांपर्यंत गेली असून, प्रत्येक क्वॉर्टरमागे साठ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे यंदा विदेशी दारुपेक्षा बिअर पिण्याकडे मद्यपींचा कल अधिक दिसून आला. एकंदरीत वाढते पर्यटन, सण-समारंभ आणि महागलेली विदेशी दारू यांचा परिणाम म्हणून रायगड जिल्ह्यात डिसेंबरमध्ये बिअरची विक्री विक्रमी, तर वाईनची विक्रीत घट झाल्याचे समोर आलेे.दारू विक्री : देशी - ९ लाख ५१ हजार ३८१; विदेशी - लाख १४ हजार ४२६; बिअर - २४ लाख ९६ हजार ९६०; वाईन - ६४ हजार ७५८विदेशी दारूच्या विक्रीमध्ये भरमसाट वाढ करण्यात आली. १५० रुपयांना मिळणारी दारू २०० हून अधिक रुपयांनी बाजारात विकण्यात आली. त्यामुळे यंदा विदेशी दारूपेक्षा बिअरला विक्रीला मद्यपींना पसंती दर्शविली. त्याचा परिणाम विदेशी दारूच्या विक्रीवर झाला असल्याची माहिती समोर येत आहे. दारू पिण्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मद्यपींची संख्या वाढत आहे.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 9:10 am

महापौर ‘दोस्ती का महागठबंधना’चाच होणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी प्रथमच मराठी आणि सिंधी समाज एकत्र येत ‘दोस्ती का महागठबंधन’ उभे राहिले असून, याच आघाडीचा महापौर होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा ठाम विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.शहरातील गोलमैदान येथे आयोजित शिवसेना–टीओके (ओमी कलानी), साई पक्ष (जीवन इदनानी), रिपाइं आठवले गट, पीआरपी (प्रा. जोगेंद्र कवाडे) आणि रिपब्लिकन सेना (आनंदराज आंबेडकर) यांच्या ‘दोस्ती का गठबंधन’च्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. विकास हाच आमचा एकमेव अजेंडा असून, तो फास्टट्रॅकवर राबवला जाईल, असा निर्धारही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. सभेत शिंदे यांनी मराठी आणि सिंधी समाजातील सांस्कृतिक एकतेवर भाष्य करताना, “सिंधी बांधवांचा दाल-पक्वान आणि मराठी बांधवांचा वडापाव यांची युती झाली आहे,” असे म्हणत सभागृहात हास्यकल्लोळ निर्माण केला.आपल्या कार्यकाळाबाबत बोलताना शिंदे म्हणाले, “अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री काळात अडीच तासही शांत झोप घेतली नाही. कारण काहींच्या झोपा उडवण्यासाठीच मी काम करत होतो,” असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी विरोधकांना लगावला. उल्हासनगरमध्ये सध्या कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असून, आणखी अनेक योजना लवकरच राबवण्यात येणार आहेत. विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन देत, ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टर विकास योजना उल्हासनगरमध्ये राबविण्यात येणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली.या सभेला माजी आमदार पप्पू कलानी, साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी, टीओकेचे प्रमुख ओमी कलानी, उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख राजेंद्रसिंग भुल्लर, पीआरपीचे जयदीप कवाडे, माजी महापौर लीलाबाई आशान, आशा इदनानी, पंचम कलानी, टीओकेचे कमलेश निकम, मनोज लासी, जमनू पूरस्वानी, महेश सुखरामानी, प्रकाश माखिजा यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 9:10 am

गणेश नाईक यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान

भ्रष्टाचाराच्या आरोपांनी नाईक आक्रमकनवी मुंबई : आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी सभेत भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी आक्रमक भूमिका घेत थेट इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका सार्वजनिक सभेत बोलताना गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. “कोणी उन्माद केला, तर तो मोडून काढण्याची ताकद आमच्याकडे आहे,” असे म्हणत त्यांनी इशाराच दिला. पुढे बोलताना नाईक म्हणाले, “टांगा उलटेल आणि घोडे फरार होतील,” तसेच “वेळ आली तर घोडेच बेपत्ता होतील,” अशा टोकदार शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वक्तव्यामुळे महायुतीतील तणाव अधिकच स्पष्ट झाला आहे.निवडणुकीच्या तोंडावर संघर्ष तीव्र : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गट दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, जागावाटप, स्थानिक नेतृत्व आणि राजकीय वर्चस्वावरून गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये धुसफूस सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर नाईक समर्थक अस्वस्थ झाले असून, त्यातूनच हा संघर्ष उघडपणे समोर आल्याचे चित्र आहे.महायुतीसाठी डोकेदुखी : राजकीय विश्लेषकांच्या मते, हा वाद केवळ शाब्दिक मर्यादेत राहणारा नाही. नवी मुंबईत सत्तेत वर्चस्वासाठीची ही लढाई असून, गणेश नाईक यांचे वक्तव्य भाजपमधील त्यांच्या ताकदीचे दर्शन घडवते. शिंदे गटही शहरात राजकीय पकडीसाठी प्रयत्नशील आहे. संघर्षाचा फटका महायुतीच्या मतांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 9:10 am

आंबेडकर चौक ते नीलसृष्टी मार्ग महिनाभर बंद

पालघर : पालघर शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या आंबेडकर चौक ते नीलसृष्टी अपार्टमेंट दरम्यान सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या कामामुळे नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची सुसूत्रता राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष वाहतूक नियंत्रण अधिसूचना लागू केली आहे. ही सूचना ८ जानेवारी ते ५ फेब्रुवारी (रात्री १२ वाजेपर्यंत) अमलात राहणार आहे. या काळात सदर मार्गावरून सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू असताना अपघात टाळण्यासाठी आणि कामात व्यत्यय येऊ नये, यासाठी हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जड आणि हलकी अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांना या बंद मार्गावरून जाण्यास मनाई असून, नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग मार्ग १ : पालघर रेल्वे स्टेशन – जगदंबा हॉटेल – वीर सावरकर चौक (वळण चौक) मार्गे आंबेडकर चौक. मार्ग २ : पालघर रेल्वे स्टेशन – पृथ्वीराज चौक – शिवाजी महाराज चौक मार्गे आंबेडकर चौक.प्रशासनाचे आवाहनजिल्हा प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने ही नवीन व्यवस्था राबविली जात आहे. अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रवासाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घ्यावी आणि रस्ता कामासाठी प्रशासनास सहकार्य करावे. स्थानिक पातळीवर आणि ग्रामीण भागात या अधिसूचनेची व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 9:10 am

भारत विरुद्ध न्यूझीलंड ‘वन-डे’ची आजपासून रणधुमाळी

स्टार खेळाडूंचे पुनरागमन; जयस्वाल-पंत कट्ट्यावर?बडोदरा : भारतीय क्रिकेट संघ आपल्या पूर्ण ताकदीनिशी, रविवार (११ जानेवारी) सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या नव्या दमाच्या संघाशी भिडणार आहे. बडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल.या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे भारतीय संघात पुनरागमन. विजय हजारे ट्रॉफीमधील त्यांच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे संघाचे फलंदाजीचे पारडे जड झाले आहे. टी-२० विश्वचषकातून वगळल्यानंतर कर्णधार म्हणून पुनरागमन करणाऱ्या शुभमन गिलसाठी ही मालिका महत्त्वपूर्ण आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेत केवळ एक सामना खेळलेल्या गिलला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती, त्यामुळे त्याच्या फॉर्मवर निवड समितीची नजर असेल. सलामीला कर्णधार गिलसोबत अनुभवी रोहित शर्मा डावाची सुरुवात करेल हे जवळपास निश्चित आहे. ही जोडी स्थिर असल्याने फॉर्मात असलेल्या यशस्वी जयस्वालला पहिल्या सामन्यात डच्चू मिळण्याची शक्यता दाट आहे.तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीचे स्थान अढळ आहे. रोहित आणि विराट या दोघांनीही विजय हजारे करंडकात प्रत्येकी एक शतक झळकावून आपण फॉर्मात असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून या मालिकेतही दमदार सुरुवातीची अपेक्षा आहे. चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर फलंदाजीला येईल. दुखापतीतून सावरून पुनरागमन करणाऱ्या श्रेयसच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. यष्टिरक्षकाच्या जागेसाठी भारतीय संघात के. एल राहुल आणि ऋषभ पंत असे दोन तगडे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, ताज्या समीकरणानुसार राहुलला अंतिम ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत पंतला बॅक-अप कीपर म्हणून मैदानाबाहेर थांबावे लागू शकते.संघात समतोल राखण्यासाठी भारत तीन अष्टपैलू खेळाडूंना संधी देऊ शकतो. यामध्ये वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी यांचा समावेश असू शकतो. हे तिघेही फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात संघाला मजबूती देतील.वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांच्या खांद्यावर असेल. संघात हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा यांचाही समावेश आहे; परंतु सुंदर आणि जडेजा दोघेही खेळल्यास हर्षित राणाला संधी मिळणे कठीण दिसते. फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवला प्राधान्य दिले जाईल. मात्र, अंतिम ११ खेळाडूंची अधिकृत घोषणा ११ जानेवारीला दुपारी १ वाजता टॉसच्या वेळीच स्पष्ट होईल.तसेच न्यूझीलंड संघात काही बदल करण्यात आले आहे. मायकेल ब्रेसवेलच्या नेतृत्वात न्यूझीलंडचा संघ काही प्रमुख खेळाडू (रचिन रवींद्र, मिचेल सँटनर) यांच्याशिवाय मैदानात उतरणार आहे, ज्यामुळे त्यांच्या दुय्यम फळीतील खेळाडूंना संधी मिळेल....असा आहे भारताचा संभाव्य संघ : रोहित शर्मा (सलामीवीर) शुभमन गिल (कर्णधार आणि सलामीवीर) विराट कोहली (मध्य फळी) श्रेयस अय्यर (मध्य फळी) के. एल राहुल (यष्टिरक्षक-फलंदाज) - अनुभवामुळे ऋषभ पंतच्या आधी संधी मिळण्याची शक्यता. रवींद्र जडेजा (ऑलराउंडर) वॉशिंग्टन सुंदर (ऑलराउंडर) - हार्दिक आणि अक्षरच्या अनुपस्थितीत महत्त्वाचा. कुलदीप यादव (फिरकीपटू) मोहम्मद सिराज (वेगवान गोलंदाज) अर्शदीप सिंग (वेगवान गोलंदाज) प्रसिद्ध कृष्णा (वेगवान गोलंदाज)...असा आहे न्यूझीलंडचा संभाव्य संघ : डेव्हॉन कॉनवे (यष्टिरक्षक आणि सलामीवीर) विल यंग (सलामीवीर) हेन्री निकोल्स (मध्य फळी) डॅरिल मिचेल (ऑलराउंडर) ग्लेन फिलिप्स (मध्य फळी) मायकेल ब्रेसवेल (कर्णधार आणि ऑलराउंडर) जोश क्लार्कसन (ऑलराउंडर) काईल जेमिसन (वेगवान गोलंदाज) झॅक फोल्क्स (वेगवान गोलंदाज) जेकब डफी (वेगवान गोलंदाज) आदित्य अशोक (फिरकीपटू)सराव सत्र मस्तीचाच : भारतीय खेळाडू कसून सराव करत असताना या सराव सत्रात विराट कोहली मज्जा मस्करी करताना दिसला. भारतीय संघाची माजी कर्णधार रन अप करताना अर्शदीप सिंगकडे पाहत होता आणि तो जवळ येताच त्याने त्याच्यासारखे पळण्याची अॅक्शन केली. विराट नकल करत होता, तेव्हा रोहित शर्मा मागे उभं राहून खळखळून हसताना दिसला. विराट कोहलीने दोन वर्षानंतर त्याच्या इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले. भारताच्या सराव सत्रातील या फोटोमध्ये विराटसह लोकेश राहुल, यशस्वी जयस्वाल व हर्षित राणआ दिसत होता. विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्दच्या वन डे मालिकेत प्लेअर ऑफ दी सीरिज होता. त्याने त्या मालिकेत तीन सामन्यांत १५१ च्या सरासरीने ३०२ धावा केल्या. त्याने सलग दोन सामन्यांत शतक आणि नंतर अर्धशतक झळकावले.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 9:10 am

“अनेकांना निवडणुकीतच कंठ फुटतो!”, “हिंदूंनी एकत्र राहणं ही गरज”आणि अमेरिकेचा आयसिसवर हल्ला…वाचा टॉप १० बातम्या एका क्लिकवर

“अनेकांना निवडणुकीतच कंठ फुटतो!” पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील प्रचारात भाजप आमदार महेश लांडगे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातील वाद काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. महेश लांडगेंनी अजित पवारांचा एकेरी भाषेत उल्लेख करत त्यांना चॅलेंज दिलं होतं. आता, या दोघांच्या वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. तसेच, शेरो शायरीच्या माध्यमातून अजित पवारांवर […] The post “अनेकांना निवडणुकीतच कंठ फुटतो!”, “हिंदूंनी एकत्र राहणं ही गरज” आणि अमेरिकेचा आयसिसवर हल्ला…वाचा टॉप १० बातम्या एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 9:09 am

लाडक्या बहिणींच्या डिसेंबर-जानेवारीच्या हप्त्याला लागणार ब्रेक? महत्त्वाची अपडेट समोर

Ladki Bahin yojana | लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर आता उर्वरित डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3000 रुपये एकत्रितरित्या मकरसंक्रातीच्या दिवशी दिले जाणार असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दिले जाणारे ३ हजार रुपये निवडणुकीनंतरच वितरित करावे, अशी मागणी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे […] The post लाडक्या बहिणींच्या डिसेंबर-जानेवारीच्या हप्त्याला लागणार ब्रेक? महत्त्वाची अपडेट समोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 9:05 am

“इंजिनमध्ये बसून मुंबईतील विरोधकांना मशालीने जाळून टाकू”; सभेअगोदर राज ठाकरेंचे मोठं वक्तव्य

Mumbai Thackeray Brothers Sabha : नाशिक येथील जाहीर सभेनंतर आज ठाकरे बंधूंची (Thackeray brothers) मुंबई महापालिकेसाठी शिवाजी पार्कवर (Shivaji Park) संयुक्त जाहीर सभा होणार आहे. तब्बल २० वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एकाच मंचावर राजकीय युती करून येत असल्याने या सभेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शिवसैनिक आणि मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या […] The post “इंजिनमध्ये बसून मुंबईतील विरोधकांना मशालीने जाळून टाकू”; सभेअगोदर राज ठाकरेंचे मोठं वक्तव्य appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 8:55 am

सोमनाथ मंदिरावर गझनवीच्या हल्ल्याला 1000 वर्षे:मुस्लिम शासकांनी अनेक वेळा तोडले, स्वातंत्र्यानंतर सरदार पटेलांनी बांधले; वाचा संपूर्ण इतिहास

2026 हे गुजरातच्या सोमनाथ मंदिरासाठी 2 कारणांमुळे महत्त्वाचे आहे. सन 1026 मध्ये महमूद गझनवीने मंदिरावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले होते, ज्याला 1000 वर्षे पूर्ण होत आहेत. तर दुसरीकडे, 11 मे 1951 रोजी स्वतंत्र भारतात पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान मोदींनी याला 'सोमनाथ स्वाभिमान पर्व' असे नाव दिले आहे. मंदिर उद्ध्वस्त झाल्यापासून ते पुन्हा उभारणीपर्यंतच्या तारखा सोमनाथवरच हल्ले का झाले, 5 कारणे इतिहासकारांचे मत… रोमिला थापर लिहितात की, मंदिरावरील हल्ले धार्मिक नसून, राजकीय प्रतीक होते. आरसी मजुमदार लिहितात, मंदिरावर आक्रमणाचे सर्वात मोठे कारण त्याची संपत्ती होती. सतीश चंद्र यांनी लिहिले- सोमनाथवर ताबा म्हणजे व्यापार आणि शक्तीवर नियंत्रण. आरएस शर्मा लिहितात- जेव्हा शासक कमकुवत असतो, तेव्हा मंदिरे पहिले लक्ष्य बनतात. सोमनाथ मंदिराशी संबंधित 5 मान्यता; चंद्राशी संबंधित एकमेव तीर्थक्षेत्र, समुद्र स्पर्श करत नाही 1. चंद्रदेवाशी संबंधित एकमेव शिव तीर्थक्षेत्र अशी मान्यता आहे की चंद्रदेव (सोम) यांनी भगवान ब्रह्माचे पुत्र राजा दक्ष प्रजापती यांच्या 27 कन्यांशी विवाह केला होता, पण ते फक्त रोहिणीवर प्रेम करत होते. यामुळे दक्ष संतप्त झाले आणि त्यांनी त्यांना क्षयरोगाचा (टीबी) शाप दिला. देवता चंद्रदेवांना सोमनाथला घेऊन आले. येथे त्यांनी शिवाची कठोर तपस्या केली. भगवान शिवाने त्यांना आंशिक मुक्ती दिली. शिव येथे सोमनाथ म्हणजे सोम (चंद्र) चे नाथ म्हणून ओळखले जाऊ लागले. याच कारणामुळे हे मंदिर चंद्राशी संबंधित एकमेव शिव तीर्थक्षेत्र मानले जाते. 2. दक्षिणेला 6000 किमीपर्यंत कोणतीही जमीन नाही सोमनाथ मंदिर 20.89 N अक्षांश आणि 70.40 E रेखांशावर आहे. मंदिराचे शिखर ज्या दिशेला आहे, त्याला 'निष्कलंक अक्षांश' म्हणतात. सोमनाथपासून दक्षिणेकडे सुमारे 6000 किमीपर्यंत कोणतीही भूमी येत नाही. तथापि, पूर्व-पश्चिमेला लहान लहान बेटे नक्कीच आहेत. मंदिर परिसरातील बाणस्तंभावर संस्कृतमध्ये (आसमुद्रांत दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतिरमार्ग) आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजीमध्ये एक शिलालेख आहे. त्यावर लिहिले आहे - या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत कोणताही अडथळा नाही. 3. समुद्रकिनारी असूनही, गर्भगृहापर्यंत लाटा येत नाहीत सोमनाथ मंदिर अरबी समुद्राच्या काठी आहे, तरीही शतकानुशतके समुद्राच्या लाटा गर्भगृहाला कधीही स्पर्श करत नाहीत. ही शिवाची कृपा मानली जाते. स्थानिक पंडितांचे म्हणणे आहे की, समुद्र आजही महादेवाच्या मर्यादेचे उल्लंघन करत नाही. ४. प्रत्येक वेळी तुटले, प्रत्येक वेळी पुन्हा बनले ते पाडण्याबद्दल आणि पुन्हा बांधण्याबद्दलचे दावे वेगवेगळे आहेत. काही इतिहासकार ते ७ वेळा पाडल्याचे सांगतात तर काही १७ वेळा. पण ते प्रत्येक वेळी त्याच ठिकाणी पुन्हा बांधले गेले. म्हणूनच असे म्हटले जाते की, हे एकमेव मंदिर आहे जे प्रत्येक वेळी राखेमधून पुन्हा उभे राहिले. ५. लुटलेली दारे, इतिहासावर मतभेद गझनवीने सोमनाथ मंदिराची चंदनाची दारे लुटून गजनी (अफगाणिस्तान) येथे नेली आणि मशिदीत लावली. १९५१ मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या प्रयत्नांमुळे ती दारे भारतात परत आणली गेली आणि सोमनाथमध्ये स्थापित केली गेली. इतिहासकार रोमिला थापर यांनी लिहिले आहे की, दारे परत आणण्याचे जे प्रकरण समोर आले ते १८४२ चा ब्रिटिश प्रचार होता, १०२६ च्या लुटीचा खरा पुरावा नव्हता. ----------------------------- सामग्रीचा स्रोत: ASI – Guide to the Somnath Temple R.C. Majumdar- An Advanced History of India Romila Thapar- Somanatha: The Many Voices of a History Satish Chandra- Medieval India: From Sultanat to the Mughals Part I II Mohammad Nazim- Royal Asiatic Society Article

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 8:30 am

व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेचा ताबा

वॉशिंग्टन : जागतिक इंधन बाजारात मोठी उलथापालथ होत असून, अमेरिकेने व्हेनेझुएलावर प्रत्यक्ष ताबा मिळवल्यानंतर तेथील तेल व्यापाराची सूत्रे पूर्णपणे वॉशिंग्टनच्या हाती आली आहेत. या बदललेल्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीत भारताला पुन्हा एकदा व्हेनेझुएलाकडून कच्चे तेल खरेदी करण्याची संधी मिळू शकते, असे स्पष्ट संकेत ट्रम्प प्रशासनाने दिले आहेत. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे गेल्या काही वर्षांपासून ठप्प झालेला हा व्यापार आता नव्या अटींनुसार अंशतः सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.भारत हा ऐतिहासिकदृष्ट्या व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलाचा एक मोठा ग्राहक राहिला आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील अनेक भारतीय रिफायनरीज या जड आणि सल्फरयुक्त तेलावर प्रक्रिया करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यामुळे व्हेनेझुएलाकडून तेलपुरवठा सुरू झाल्यास भारताला तुलनेने स्वस्त दरात आणि विविध स्रोतांमधून तेल मिळण्याचा फायदा होऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे ऊर्जा सचिव क्रिस्टोफर राइट यांनी सर्व देशांना व्हेनेझुएलाचे तेल विकण्याची तयारी दर्शवली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारत या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो, मात्र या व्यवहाराचे सूक्ष्म नियम आणि अटी अद्याप अंतिम झालेले नाहीत.दरम्यान, माजी अध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलासाठी एक नवीन आर्थिक आराखडा जाहीर केला आहे. या ‘मेगा प्लॅन’अंतर्गत अमेरिका स्वतः सुमारे ५० दशलक्ष बॅरल कच्चे तेल शुद्ध करून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करणार आहे.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 8:30 am

हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणारकोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ (नेव्ही बेस) उभारणार असल्याची माहिती संरक्षण सूत्रांच्या अहवाल्याने दिली आहे. चीनच्या वाढत्या नौदल हालचाली तसेच बांगलादेश–पाकिस्तानशी संबंधित बदलत्या प्रादेशिक सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. यामुळे उत्तर बंगालच्या उपसागरात भारताची सागरी उपस्थिती अधिक मजबूत होणार आहे.हा तळ पूर्ण स्वरूपाचा नौदल कमांड नसून तो नेव्हल डिटॅचमेंट म्हणून कार्य करणार आहे. येथून लहान युद्धनौका आणि हायस्पीड बोटी तैनात केल्या जाणार आहेत. ज्यामुळे सागरी पाळत, गस्त आणि तत्काळ कारवाईची क्षमता वाढणार आहे. नौदल सध्या असलेल्या हल्दिया डॉक कॉम्प्लेक्सचा वापर करणार असल्याने कमी अतिरिक्त पायाभूत सुविधांमध्ये हा तळ लवकर कार्यान्वित करता येणार आहे. सुरुवातीला स्वतंत्र जेट्टी उभारली जाईल आणि आवश्यक सहायक सुविधा विकसित केल्या जातील.या तळावर सुमारे १०० अधिकारी आणि खलाशी तैनात असतील. हल्दिया हे कोलकातापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असून येथे थेट बंगालच्या उपसागरात प्रवेश मिळतो. त्यामुळे हुगळी नदीमार्गे होणारा वेळेचा अपव्यय टळणार असून नौदलाची प्रतिसाद क्षमता अधिक वेगवान होईल.हल्दिया तळावर फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट आणि ३०० टन वजनाची न्यू वॉटर जेट फास्ट अटॅक क्राफ्ट तैनात केली जाणार आहे. या बोटी ४० ते ४५ नॉट्स म्हणजेच सुमारे ८० किमी प्रतितास वेगाने धावू शकतात. या बोटींमधून १० ते १२ जवान वाहून नेले जाऊ शकतात. त्यांचा उपयोग किनारी गस्त, घुसखोरी रोखणे, बंदर सुरक्षेसह विशेष मोहिमांसाठी केला जाणार आहे.या नौकांवर CRN-९१ तोफा बसवण्यात येणार असून भविष्यात नागास्त्रसारख्या लोइटरिंग म्युनिशन सिस्टीम बसवण्याची शक्यता आहे. यामुळे अचूक हल्ला क्षमता आणि पाळत ठेवण्याची ताकद अधिक वाढणार आहे.हे पाऊल नौदलाच्या व्यापक आधुनिकीकरण आणि विस्तार कार्यक्रमाचा भाग आहे. २०२४ मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या डिफेन्स ॲक्विझिशन कौन्सिलच्या बैठकीत १२० फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट आणि ३१ NWJFAC खरेदीला मंजुरी देण्यात आली होती. हल्दियातील हा नवा तळ भारताच्या सागरी सुरक्षेला नवे बळ देणारा ठरणार आहे.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 8:30 am

उबाठा आणि काँग्रेसला मुंबई महापालिका कळलीच नाही!

२५ वर्षं सत्ता आणि विरोधी पक्षांत राहून दिली कामांची फक्त आश्वासनेमुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्यावतीने जाहीर करण्यात येणारा वचननामा हा महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्याकामांच्या संदर्भात असणे स्वाभाविक मानले जाते; परंतु २५ वर्षे महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या उबाठाला आणि २५ वर्षे विरोधी पक्षांत बसणाऱ्या काँग्रेस पक्षाला मुंबई महापालिकाच कळलेलीच नाही. मुंबई महापालिकेच्या अखत्यारित कोणतीह कामे येतात आणि कोणती कामे सरकारच्या अखत्यारित येतात याची माहितीच न झाल्याने दोन्ही पक्षांनी आपले वचननामे बनवतानाच महापालिकेशी तीळमात्र संबंध नसलेल्या कामांचा समावेश आपल्या वचननाम्यांमध्ये केल्याचे पाहायला मिळाले आहे.आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उबाठा आणि मनसे तसेच काँग्रेस आणि वंचितने जाहीर केलेला वचननाम्यातील निम्मी आश्वासने ही महापालिकेच्या अखत्यारित येत नसून राज्य सरकारच्या अखत्यारितील दिसून येत आहे. त्यामुळे उबाठा आणि मनसे तसेच काँग्रेस आणि वंचित हे नक्की महापालिकेची निवडणूक लढवायला चालले आहेत का? की विधानसभेच्या निवडणुकीतून अजून बाहेरच पडलेले नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे. युती आणि आघाडीने जाहीर केलेल्या वचननाम्यांमध्ये महापालिकेच्यावतीने केल्या जाणाऱ्या कामांचा समावेश असणे स्वाभाविक मानले जाते . परंतु दोन्ही पक्षांनी मांडलेल्या वचननाम्यांमध्ये सरकारच्या मदतीशिवाय आणि परवानगीशिवाय न होणाऱ्या कामांचा तथा सरकारच्यावतीने निर्णयानुसार केल्या जाणाऱ्या कामांचा समावेश करण्यात आला आहे . त्यामुळे एकप्रकारे मुंबईकरांची महापालिकेच्या कामांशी संबंध नसतानाही केवळ गाजरे दाखवून फसवणू करण्याचे काम करण्याचा प्रयत्न युती आणि आघाडीकडून केले जात आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. उबाठा आणि मनसेच्या वचननाम्यातील या आश्वासनांचाा महापालिकेशी काय संबंध? घरकाम करणाऱ्या महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये स्वाभिमान निधी देणार. कष्टकरी मुंबईकरांसाठी दहा रुपयांत नाश्ता आणि दुपारचं जेवण देणारी माँसाहेब किचन्स सुरू करणार. १ लाख तरुण तरुणींना प्रत्येकी २५ हजार ते १ लाख रुपयांचा स्वयंरोजगार सहाय्यता निधी देणार. २५ हजार गिग वर्कर्सना आणि डबेवाल्यांना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज देणार. महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डात यूपीएससी आणि एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी सी.डी. देशमुख प्रशिक्षण केंद्र सुरु करणार. दहावीनंतरची गळती रोखण्यासाठी महापालिका शाळा इमारतीत बारावीपर्यंतचे ज्युनिअर कॉलेज सुरू करणार. मुंबई महापालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशातील ग्रंथालय उभारलं जाईल.काँग्रेस आणि वंचितचा जाहीरनाम्याचा पालिकेशी काय संबंध? नवीन, आधुनिक बाजारपेठांची उभारणी करणार क्लस्टर पुनर्विकासासाठी ४ हजार चौरस मीटर ऐवजी ३ हजारचा पर्याय देणार कोळीवाडा व गावठाणांसाठी विशेष विकास धोरण आखणार मुंबईत अधिक अंगणवाड्या सुरू करणार औद्योगिक व व्यावसायिक धूर नियंत्रण करणार

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 8:30 am

PMC Election : प्रभाग ४१ मधील पाणीप्रश्न सोडविणार; भाजप पक्षाच्या उमेदवारांचे आश्वासन

हडपसर– जनतेच्या प्रश्नांसाठी गेली ३५ वर्षे आम्ही झगडत असून माझ्या प्रभागातील महमंदवाडी गाव व त्यालगतच्या बारा वाड्यावस्त्यांचा पाणीप्रश्न अत्यंत बिकट असून रात्री-आपरात्री नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, यावर आम्ही पाणीपुरवठा सुरळीत करणार आहोत. मागील २० वर्ष नगरसेवकांनी ही कामे केलेली नाहीत, असे भाजपचे उमेदवार जीवन बापू जाधव यांनी सांगितले. महमदवाडी-उंड्री प्रभाग ४१ मध्ये भाजपचे उमेदवार […] The post PMC Election : प्रभाग ४१ मधील पाणीप्रश्न सोडविणार; भाजप पक्षाच्या उमेदवारांचे आश्वासन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 8:23 am

PMC Election : सशक्त महिला, सक्षम समाज : ऐश्वर्या पठारे

विश्रांतवाडी– पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विमाननगर-लोहगाव प्रभाग क्र. ३ परिसरात कोपरा सभांना वेग आला आहे. भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांच्या लोहगाव येथील ग्रीन पार्क तसेच वाघोलीतील पूर्वरंग सोसायटी, फुलमळा रोड येथे कोपरा सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमेदवार डॉ. श्रेयस प्रितम खांदवे (अ गट), अनिल दिलीप सातव (ब गट), ऐश्वर्या सुरेंद्र पठारे […] The post PMC Election : सशक्त महिला, सक्षम समाज : ऐश्वर्या पठारे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 8:18 am

Pune District : आशिर्वाद पदयात्रेतून सूचनांतून संवाद ; रामभाऊ दाभाडे यांना नागरिकांचा पाठिंबा वाढल्याचा विश्वास

वाघोली :पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपच्या उमेदवारांनी सोमनाथनगर, शिवशंभो पार्क, सोपाननगर, काळभोर वस्ती, चंद्रभागा पार्क, पवार वस्ती, माळवाडी आदी परिसरात उत्साहात प्रचार दौरा झाला. विविध भागांत नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या समस्या, अपेक्षा व सूचना ऐकत विकासाभिमुख संवाद साधला. संवादातून केवळ आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष कामाचा विश्वास देणारा हा दौरा ठरला. प्रचार […] The post Pune District : आशिर्वाद पदयात्रेतून सूचनांतून संवाद ; रामभाऊ दाभाडे यांना नागरिकांचा पाठिंबा वाढल्याचा विश्वास appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 8:15 am

मतदानाच्या दिवशी सुट्टी नाकारणाऱ्या आस्थापनांवर कारवाई

तपासणीसाठी पालिकेच्यावतीने दक्षता पथकांची स्थापनामुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत गुरुवार,१५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होणार असून त्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग आणि उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांनी याबाबतचा अध्यादेश निर्गमित केला आहे. ही सार्वजनिक सुट्टी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहणार आहे. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणी होते किंवा नाही यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यांसाठी 'दक्षता पथक' स्थापन केले आहेत. हे पथक मतदानासाठी कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ सुट्टी किंवा सवलत दिली आहे किंवा नाही याची तपासणी करेल आणि मतदान करण्यास सुट्टी तथा सवलत न देणाऱ्यांवर दुकाने आणि आस्थापना खात्यामार्फत कारवाई केली जाणार आहे.मुंबईतील केंद्र व राज्य शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील. तसेच मुंबईतील मतदार जर शहराबाहेर कार्यरत असतील, तरी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यादेशात नमूद आहे. याबरोबरच उद्योग आणि कामगार विभागानेही सार्वजनिक सुट्टीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित केले आहेत. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खाजगी कंपन्यांतील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स , रिटेलर्स यांना सार्वजनिक सुट्टी लागू असेल.अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगारांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत द्यावी, असेही अध्यादेशात नमूद आहे.मुंबईतील दुकाने, कंपन्यांनी मतदानाच्यादिवशी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास दुकाने व आस्थापना खात्यामार्फत कार्यवाही करण्यात येते. यासाठी मुंबई शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे यांसाठी दक्षता पथकं नेमण्यात आली आहेत. नागरिकांनी दूरध्वनी क्रमांक – ९१२२-३१५३३१८७ यावर संपर्क साधावा, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.मतदानाचा हक्क बजावावा, महापालिका आयुक्तांचे आवाहनलोकशाही प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी कामाच्या कारणाने मतदार मतदानापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मतदारांनी सक्रियपणे मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवावा. गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ या सार्वजनिक सुटीच्या दिवशी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी केले आहे.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 8:10 am

मुंबईत उबाठाकडून ९ मुस्लीम चेहरे मैदानात

भाजपकडून एकही मुस्लीम उमेदवार नाहीमुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार आता टिपेला पोहोचला असून मराठी आणि हिंदुत्व यावरून प्रचाराचे लोळ उडताना पहायला मिळत आहे. मात्र, हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या भाजपकडून एकही मुस्लीम उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली नाही. याउलट मुंबई महापालिका निवडणुकीत उबाठाकडून ९ मुस्लीम चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. एरव्ही समाजवादी पक्ष आणि एमआयएम यासह काँग्रेसकडून मुस्लीम उमेदवाराला संधी देण्यात येत असली तरी भाजपने यंदाही एकाही उमेदवाराला संधी देत आपली हिंदुत्वाची भूमिका कायम ठेवली आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना संधी देत त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपकडून हिंदुत्वाचा पुरस्कार केला जात असल्याने भाजपाकडून मुस्लिमांना किती संधी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, भाजपने यंदा एकाही मुस्लीम उमेदवाराला संधी दिलेली नाही. या उलट उबाठा आणि शिवसेनेने प्रत्येकी ०९ मुस्लीम उमेदवाराला संधी दिली आहे. तर काँग्रेस पक्षाच्यावतीने ३३ मुस्लीम उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.समाजवादी पक्ष आणि एमआयएम हे पक्ष मुस्लिमांचे असल्याने या पक्षाकडून मुस्लीम उमेदवारांना सर्वाधिक उमेदवारी दिली जाते. त्यामुळे या पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या उमेदवारीची चर्चा नसली तरी त्याखालोखाल काँग्रेस पक्षाकडून मुस्लिमांना उमेदवारी दिली जाते.कोणत्या पक्षात मुस्लीम उमेदवार किती? भाजप : ०० काँग्रेस : ३३ राष्ट्रवादी काँग्रेस : ११ शिवसेना : ०९ उबाठा ०९ वंचित : ०० मनसे : ०२ राष्ट्रवादी काँग्रेस शप ०२

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 8:10 am

अटीतटीच्या लढतींतही महायुतीच पुढे

हवा दक्षिण मुंबईचीसुहास शेलार कुर्ला पश्चिमेला असलेल्या 'एल' महापालिका कार्यालयाअंतर्गत कुर्ला, चांदीवली आणि साकीनाका परिसरातील प्रभाग येतात. सुमारे ९ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेला हा परिसर मुंबईतील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रभाग आहे. त्यातील सुमारे ७० टक्के झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी आणि मुस्लीम मतदारांचे लक्षणीय प्रमाण, ही या प्रभागाची ओळख आहे. मीठी नदीमुळे दर पावसाळ्यात होणारा पूर, औद्योगिक युनिट्समुळे निर्माण झालेले प्रदूषण, तसेच सांताक्रूझ–चेंबूर लिंक रोडवरील वाहतूक कोंडी हे येथील नागरिकांचे दैनंदिन प्रश्न आहेत. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा संथ वेग हा देखील असंतोषाचा मुद्दा ठरत आहे. २९ रस्ते पूर्ण झाले असले तरी तितकेच अपूर्ण आणि काही अजून सुरूच न झाल्याने स्थानिक नाराजी वाढलेली आहे. २०१७च्या पालिका निवडणुकीत शिवसेनेची येथे भक्कम पकड होती. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर होणाऱ्या पहिल्या पालिका निवडणुकीत उबाठा आणि शिंदे गट यांच्यात थेट संघर्ष दिसत आहे. भाजप आणि महायुतीला काही भागांत पूरक वातावरण असले, तरी मुस्लीम मतदार निर्णायक ठरत असल्याने कोणताही प्रभाग सहज जिंकण्यासारखा नाही. प्रभाग १६० आणि १६६ मध्ये मागील निवडणुकीतील मताधिक्य हे फारच कमी होते. त्यामुळे यावेळी तुल्यबळ लढती अपेक्षित आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक १५८, १६४ आणि १७१ हे प्रभागही काटे की टक्कर होणार आहे. मुस्लीम मतदारांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक असताना, मराठी मतदारांतील विभागणीमुळे प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार आहे. चांदिवली विधानसभेतील प्रभाग १५७ मधील माजी नगरसेविका आकांक्षा शेट्ये यांचा प्रभाग बदलून भाजपने त्यांना प्रभाग १५८ मधून रिंगणात उतरवले आहे. त्यांचा सामना उबाठाच्या माजी नगरसेविका चित्रा सांगळे यांच्याशी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा तुळसकर मैदानात असल्याने तिरंगी संघर्ष आहे. प्रभाग १६१ मध्ये शिवसेनेचे विजय शिंदे, उबाठाचे इर्शाद सय्यद आणि मोहम्मद इम्रान अब्दुल यांच्यातील सामना मुस्लीम मतांचे विभाजन कितपत होते, यावर निकाल अवलंबून राहील. प्रभाग १६३ मध्ये आमदार दिलीप लांडे यांच्या पत्नी शैला लांडे आणि उबाठाच्या संगीता सावंत यांच्यात थेट लढत असून, प्रभाग १७१ मध्ये शिवसेनेच्या सान्वी तांडेल विरुद्ध उबाठाच्या राणी येरुणकर यांचातील सामना लक्षवेधी ठरत आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या खार पूर्व आणि सांताक्रूझ पूर्व व्यापणाऱ्या एच-पूर्व प्रभागात बीकेसीसारखा उच्चभ्रू व्यावसायिक परिसर आणि मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या असा विरोधाभास दिसतो. वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, मीठी नदीचा पूर आणि प्रदूषण हे मुद्दे येथेही केंद्रस्थानी आहेत. सुमारे ५५ ते ६० टक्के झोपडपट्ट्या असल्याने उबाठा गटाचा प्रभाव काही भागांत जाणवतो. २०१७ मध्ये शिवसेनेने ९ जागा जिंकल्या होत्या, पण यावेळी प्रभाग ८७, ८२, ९० आणि ९२ मध्ये तुल्यबळ लढती दिसत आहेत. प्रभाग ८७ मध्ये उबाठाच्या पूजा महाडेश्वर, भाजपचे कृष्णा (महेश) पारकर, काँग्रेसचे प्रमोद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे संदीप उधारकर यांच्यातील चौरंगी सामना संपूर्ण प्रभागाचे लक्ष वेधून घेत आहे. येथील प्रभाग ९५ मधील लढत ही केवळ राजकीयच नव्हे, तर पक्षांतर्गत संघर्षामुळेही हायव्होल्टेज ठरली आहे. भाजपचे सुहास आडिवरेकर, राष्ट्रवादीचे अमित पाटील, उबाठाचे हरी शास्त्री, अपक्ष उबाठा बंडखोर शेखर वायगंणकर यांच्यात बहुरंगी लढत आहे. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचा प्रभाव आहे, महायुतीमध्ये वांद्रे पश्चिम हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार हे येथून आमदार आहेत. यावेळच्या महापालिका निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात वांद्रे पश्चिममधील सर्वच्या सर्व प्रभागांत भाजप उमेदवार उभे करण्यात आले आहेत, ज्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा एकही उमेदवार या भागात नाही. भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी या भागात कंबर कसली आहे. कलिना मतदारसंघात उबाठाचे आमदार संजय पोतनीस असलेले तरी, या मतदारसंघातील विशेष म्हणजे प्रभाग क्र. ८९, ९१ आणि १६५ मध्ये चौरंगी किंवा तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे. कलिनासारख्या मराठीबहुल भागात उबाठा विरुद्ध शिवसेना या दोन्ही सेना आमनेसामने आहेत. भाजप उत्तर भारतीय मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी मनोज तिवारींसारख्या नेत्यांना प्रचारात उतरवत आहे, ज्याचा प्रभाव कलिनातील काही प्रभागांवर पडू शकतो. तिकीट वाटपामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरल्याने मुख्य पक्षांसमोर पेच निर्माण झाला आहे. चांदिवली मतदारसंघातील शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या पत्नी शैला लांडे प्रभाग क्रमांक १६३ मधून निवडणूक लढवित आहेत. काँग्रेसने त्यांच्या विरोधात स्थानिक प्रभावशाली व्यावसायिक कुटुंबातील सोनू जैन यांना उमेदवारी दिली आहे प्रभाग क्रमांक १६२ मध्ये माजी मंत्री आरिफ नसीम खान यांचे पुत्र अमीर खान निवडणूक रिंगणात आहेत. अमीर यांच्याविरोधात नसीम खान यांचे माजी सहकारी आणि माजी नगरसेवक वाजिद कुरेशी यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घेतली आहे. एस. अण्णामलाई यांना उबाठाने उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्रमांक १६१ मधून उबाठाने एका आयात उमेदवाराला संधी दिल्याने अंतर्गत नाराजी स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जाते. प्रभाग क्रमांक १६८ मधून अनुराधा पेडणेकर यांना भाजपने शेवटच्या क्षणी आपला उमेदवार बदलून अनुराधा पेडणेकर यांना संधी दिली आहे. त्या मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होत्या. पेडणेकर यांच्या विरोधात माजी नगरसेविका सईदा खान या राष्ट्रवादी (अजित पवार गट) लढवत आहेत. विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेच्या के-पूर्व आणि के-पश्चिम या प्रशासकीय विभागांमधील काही निवडणूक प्रभागांचा समावेश होतो. विलेपार्ले पूर्वचा भाग असलेल्या के-पूर्व प्रभागात व्यावसायिक आणि निवासी भागांचे मिश्रण आहे. वाहतूक कोंडी, हवा प्रदूषण आणि पाणीटंचाई हे येथील प्रमुख प्रश्न आहेत. २०१७ मध्ये सेना-भाजपचे वर्चस्व असले तरी यावेळी प्रभाग ७९, ८४ आणि ८६ मध्ये लढती क्लोज मानल्या जात आहेत. गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांचा मोठा पाठिंबा महायुतीकडे झुकलेला असल्याचे चित्र आहे. प्रभाग ८४ मध्ये भाजपच्या अंजली सामंत आणि मनसेच्या रूपाली दळवी यांच्यातील थेट सामना या भागात चर्चेचा विषय आहे.उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मुंबईतील सर्वाधिक गुंतागुंतीचा आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील भाग मानला जातो. एकाच मतदारसंघात झोपडपट्टी, मध्यमवर्गीय वसाहती, उच्चभ्रू टोलेजंग इमारती, मराठी, मुस्लीम-बहुल भाग, गुजराती-उत्तर भारतीय वस्त्या, अशी सरमिसळ दिसते. त्यामुळे पालिका निवडणुकीत येथे एकसुरी निकाल अपेक्षित न राहता, जवळपास प्रत्येक प्रभागात अटीतटीची लढत पाहायला मिळते. पाणी, रस्ते, ड्रेनेज, वाहतूक कोंडी, पूर नियंत्रण, प्रदूषण आणि झोपडपट्टी पुनर्वसन हे मुद्दे मतदानावर थेट परिणाम करणारे ठरत आहेत. या लोकसभा मतदारसंघात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कलिना असे विधानसभा मतदारसंघ येतात. उत्तर मध्य मुंबईत एकूणच महायुतीचा दबदबा जाणवतो, विशेषतः विलेपार्ले आणि वांद्रे पश्चिमसारख्या उच्चभ्रू भागांत कुर्ला आणि चांदिवलीत उबाठा गट मुस्लीम आणि झोपडपट्टी मतांवर अवलंबून आहे. काँग्रेस, मनसे आणि अपक्ष उमेदवारांमुळे अनेक प्रभागांत तिरंगी किंवा चौरंगी लढती होत असून, त्यामुळे निकाल शेवटच्या टप्प्यापर्यंत अनिश्चित राहण्याची शक्यता अधिक आहे.प्रमुख लढतीप्रभाग क्रमांक १५१ कशिश फुलवारिया - भाजप सानिया थोरात - उबाठा संगीता भालेराव - काँग्रेस वंदना सावळे - काँग्रेसप्रभाग क्रमाक १६५ अशरफ आझमी - काँग्रेस कॅप्टन मलिक - राष्ट्रवादी (अजित पवार गट) रुपेश नारायण पवार - भाजप अभिजीत कांबळे - उबाठाप्रभाग क्रमांक – ९५ भाजप - सुहास आडिवरेकर उबाठा - हरी शास्त्री अपक्ष - चंद्रशेखर वायंगणकर राष्ट्रवादी - अमित पाटीलप्रभाग क्रमांक ८७ भाजप - कृष्णा (महेश) पारकर उबाठा - पूजा महाडेश्वर, भाजपचे, काँग्रेस - प्रमोद नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेस - संदीप उधारकरप्रभाग क्रमांक – ८४ अंजली सामंत – भाजप, रूपाली दळवी – मनसेप्रभाग - १५८ आकांक्षा शेट्ये - भाजप चित्रा सांगळे - उबाठा वर्षा तुळस्कर - राष्ट्रवादी काँग्रेसप्रभाग - १६१ विजय शिंदे - शिवसेना इर्शाद सय्यद - उबाठा मोहम्मद इम्रान अब्दुल - काँग्रेसप्रभाग - १६३ शैला दिलीप लांडे - शिवसेना संगीता सावंत - उबाठाप्रभाग - १७१ सान्वी तांडेल - शिवसेना राणी येरुणकर - उबाठा

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 8:10 am

‘अल्मोंट-कीड’ बालसिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’

औषधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्हनवी दिल्ली : मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ‘अल्मोंट-कीड’ या बालसिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’ हे विषारी रसायन आढळल्यानंतर तेलंगणा औषध नियंत्रण प्रशासनाने (डीसीए) या सिरपच्या विक्रीवर तत्काळ बंदी घातली आहे. कोलकाता येथील केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या (CDSCO) प्रयोगशाळेच्या अहवालानंतर ही कठोर कारवाई करण्यात आली.या तपासणीत बिहारमधील ‘ट्रिडस रेमेडीज’ कंपनीने उत्पादित केलेल्या बॅच क्रमांक AL-२४००२ मधील सिरप भेसळयुक्त व जीवघेणा असल्याची समोर आले आहे. सामान्यतः ‘अल्मोंट-कीड’ सिरप मुलांमधील ॲलर्जी, हे फिव्हर, सर्दी, खोकला तसेच अस्थमाच्या उपचारासाठी डॉक्टरांकडून दिले जाते. मात्र, त्यामध्ये आढळलेले ‘इथिलीन ग्लायकॉल’ हे रसायन अत्यंत घातक असून, यामुळे किडनी निकामी होणे, मेंदूवर परिणाम होणे तसेच गंभीर विषबाधा होण्याचा धोका असतो. तेलंगणा डीसीएने राज्यातील सर्व औषध विक्रेत्यांना संबंधित बॅचचा साठा तत्काळ विक्रीतून काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पालकांनी आपल्या मुलांना हे औषध दिले असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. औषधांच्या सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.या घटनेमुळे औषधनिर्मिती व गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.प्रशासनाचे पाऊल आणि आवाहनराज्यातील सर्व औषध निरीक्षकांना मेडिकल स्टोअर्स, वितरक आणि रुग्णालयांतून या विशिष्ट बॅचचा साठा त्वरित जप्त करण्याचे आणि विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाने पालकांना आवाहन केले आहे की, जर त्यांच्याकडे 'अल्मोंट-कीड' सिरपचा बॅच नंबर AL-२४००२ असेल, तर त्याचा वापर अजिबात करू नका आणि त्वरित औषध नियंत्रण अधिकाऱ्यांना याची माहिती द्या.तपासणीत काय आढळले?तपासणीदरम्यान या सिरपमध्ये इथिलीन ग्लायकॉलचे प्रमाण ठरावीक मानकांपेक्षा खूप जास्त असल्याचे दिसून आले. तज्ज्ञांच्या मते, इथिलीन ग्लायकॉल हे एक औद्योगिक द्रावण आहे, ज्याचा वापर अँटी-फ्रीझ आणि कूलंट तयार करण्यासाठी केला जातो. हे केमिकल शरीरात गेल्यास किडनीचे नुकसान होऊ शकते, मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो आणि विशेषतः मुलांसाठी ते प्राणघातक ठरू शकते.कायदेशीर कारवाई सुरूभेसळयुक्त औषधांचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मुलांच्या औषधांमधील अशा प्रकारच्या भेसळीमुळे देशातील औषध नियामक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकांच्या सोयीसाठी प्रशासनाने एक टोल-फ्री क्रमांक देखील जारी केला आहे, संशयास्पद औषधाची माहिती त्वरित देता येईल.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 8:10 am

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

नव्या नियमांचा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडथळानवी दिल्ली : कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन इमिग्रेशन (स्थलांतर) नियम लागू केले असून, त्याचा मोठा परिणाम भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांवर होणार आहे. तात्पुरत्या रहिवाशांची संख्या कमी करणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट असून, याच आनुषंगाने स्टडी परमिट, व्हिसा योजना आणि नागरिकत्व नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.२०२६-२०२८ इमिग्रेशन लेव्हल्स प्लॅननुसार, २०२६ मध्ये सुमारे ४ लाख ८ हजार स्टडी परमिट जारी करण्यात येणार आहेत. यामध्ये १ लाख ५५ हजार नवीन विद्यार्थी आणि २ लाख ५३ हजार विद्यमान विद्यार्थ्यांच्या मुदतवाढीचे अर्ज असतील. ही संख्या मागील वर्षांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असल्याने भारतीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अधिक स्पर्धात्मक होण्याची शक्यता आहे. काही अहवालांनुसार भारतीय विद्यार्थ्यांचे स्टडी परमिट नाकारण्याचे प्रमाणही वाढले आहे.मात्र, मास्टर आणि डॉक्टरेट स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. १ जानेवारी २०२६ पासून पब्लिक डेसिग्नेटेड लर्निंग इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्यांना प्रोव्हिन्शियल किंवा टेरिटोरियल अटेस्टेशन लेटर (PAL/TAL) सादर करण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे अर्ज प्रक्रिया सुलभ होणार असून आर्थिक ओझेही कमी होणार आहे.कॅनडाने परदेशी उद्योजकांसाठी असलेला स्टार्ट-अप व्हिसा कार्यक्रम बंद केला आहे. ३१ डिसेंबर २०२५ नंतर नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. मात्र, २०२६ च्या अखेरीस उद्योजकांसाठी नवीन पायलट प्रोग्राम सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोग्य क्षेत्रात मनुष्यबळाची गरज लक्षात घेता आंतरराष्ट्रीय डॉक्टरांसाठी स्वतंत्र एक्स्प्रेस एन्ट्री कॅटेगरी सुरू केली जाणार आहे. किमान एक वर्षाचा कॅनडातील अनुभव असलेल्या डॉक्टरांना कायमस्वरूपी वास्तव्याचा मार्ग खुला होणार आहे.तसेच वरिष्ठ व्यवस्थापक, संशोधक आणि कुशल व्यावसायिकांसाठीही नवीन संधी निर्माण होत आहेत. भारतीय व्यवस्थापकांना कायमस्वरूपी निवास परवाना मिळण्याची शक्यता वाढली आहे.दरम्यान, ‘होम केअर वर्कर इमिग्रेशन प्रोग्राम’ स्थगित करण्यात आला असून, मार्च २०२६ मध्येही तो पुन्हा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे या क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांना फटका बसला आहे.नागरिकत्व कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणा अंतर्गत परदेशात जन्मलेल्या किंवा दत्तक घेतलेल्या कॅनेडियन नागरिकांना आता नागरिकत्व मिळणे अधिक सोपे होणार आहे. एकूणच, कॅनडाचे नवीन इमिग्रेशन नियम काही क्षेत्रांसाठी संधी निर्माण करणारे असले तरी, भारतीय विद्यार्थ्यांसाठी अधिक आव्हानात्मक ठरणार आहेत. त्यामुळे कॅनडात शिक्षण किंवा नोकरीसाठी जाण्याचे नियोजन करणाऱ्यांनी नवीन नियमांची सखोल माहिती घेणे आवश्यक आहे.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 8:10 am

PMC Election : प्रचाराचा वेग वाढवला! प्रभाग क्र. २० मध्ये भाजप–रिपाई युतीचा घरोघरी प्रचार करत साधला मतदारांशी संवाद

पुणे : पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० मध्ये भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युतीच्या उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. आज प्रभागात कार्यकर्त्यांसह भव्य प्रचार फेरी काढून घरोघरी संपर्क साधत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. या प्रचार रॅलीला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रचार फेरीत प्रभागातील भाजपाचे […] The post PMC Election : प्रचाराचा वेग वाढवला! प्रभाग क्र. २० मध्ये भाजप–रिपाई युतीचा घरोघरी प्रचार करत साधला मतदारांशी संवाद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 8:06 am

प्रभाग क्रमांक २० मध्ये राष्ट्रवादीची प्रचार रॅली, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष ताकदीने आपला प्रचार करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. शंकर महाराज मठ-बिबवेवाडी, प्रभाग क्रमांक २० मधील उमेदवारांच्या पॅनलचा प्रचार करण्यासाठी अजित पवार यांच्या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला मोठ्या […] The post प्रभाग क्रमांक २० मध्ये राष्ट्रवादीची प्रचार रॅली, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 8:02 am

PMC Election: सॅलिसबरी पार्क परिसरात भारतीय जनता पक्षाच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

महर्षीनगर – प्रभाग क्रमांक २१ मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क प्रभागातील इशा पॅलेस,एकता गार्डन ,संदेश सोसायटी,संभवनाथ जैन मंदिर,दर्शनी चौक,चिरंजीवी हनुमान हनुमान मित्र मंडळ, विघ्नहर्ता मित्र मंडळ,भिमाले कॉम्लेक्स, हिमगिरी सोसायटी,युनिटी बेकरी सॅलिसबरी पार्क परिसर येथे भारतीय जनता पक्षाच्या रॅलीला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. प्रभाग क्रमांक २१, मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क येथील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार […] The post PMC Election: सॅलिसबरी पार्क परिसरात भारतीय जनता पक्षाच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 8:01 am

दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात उद्यापासून बदल

सावंतवाडी (वार्ताहर) : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गाडी निर्धारीत वेळेत येण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेने दिवा-सावंतवाडी रोड-दिवा (दैनिक) एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, ट्रेन क्रमांक १०१०५ आणि १०१०६ या गाड्यांच्या वेळा ‘प्रीपोन’ म्हणजेच अधिक लवकर करण्यात आल्या आहेत. सुधारित वेळापत्रक १२ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे.दिवा ते सावंतवाडी रोड धावणारी ट्रेन क्रमांक १०१०५ ही सध्या रोहा स्थानकावर सकाळी ९ ते ९.५ या वेळेत थांबत होती. सुधारित वेळापत्रकानुसार हीच गाडी आता रोहा स्थानकावर सकाळी ८.५० ते ८.५५ या वेळेत थांबणार आहे. त्यामुळे सकाळच्या प्रवासात वेळेची बचत होऊन प्रवाशांना पुढील प्रवास अधिक सुकर होणार आहे.नव्या वेळापत्रकानुसार सावंतवाडी रोड ते दिवा मार्गावरील ट्रेन क्रमांक १०१०६ ही सध्या सायंकाळी ५.२० ते ५.२५ या वेळेत धावत होती. नव्या वेळापत्रकानुसार ही गाडी आता १७.५ ते ५.१० या वेळेत धावणार आहे. संध्याकाळच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकर गंतव्यस्थानी पोहोचणे शक्य होणार आहे. दरम्यान, या बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी प्रवासापूर्वी अद्ययावत वेळापत्रकाची माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.‘मुंबई-करमाळी’चा मडगावपर्यंत विस्तारप्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करता लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई)-करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही साप्ताहिक एक्स्प्रेस (गाडी क्रमांक २२११५/२२११६) मडगाव जंक्शनपर्यंत चालविण्याचा कालावधी रेल्वे प्रशासनाने पुढे वाढवला आहे. ही गाडी करमाळीऐवजी मडगाव जंक्शनपर्यंत धावण्याचा निर्णय आता १२ फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहे. कोकण व गोवा परिसरात पर्यटन, नोकरी, व्यवसाय तसेच वैयक्तिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. विस्तार केल्याने दक्षिण गोव्याच्या प्रवाशांना थेट फायदा होणार आहे.

फीड फीडबर्नर 11 Jan 2026 7:10 am

Harshvardhan Sapkal: “निवडणूक आयोगाचा सत्ताधाऱ्यांवर धाक उरला नाही”–हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

प्रभात वृत्तसेवा पुणे – विधानसभा निवडणुकीवेळी मतदार यादीत घोळ असल्याचे निवडणूक आयोगाने मान्य केले होते. दुबार मतदारांचे एकाच ठिकाणी मतदान होईल, असे जाहीर केले तरी तसे झाले नाही. महापालिका निवडणुकांमध्येही मतदार यादीतील घोळ कायम असून आयोगाचा सत्ताधाऱ्यांवर धाक राहिलेला नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कॉंग्रेस भवनमधील पत्रकार परिषदेवेळी केली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे […] The post Harshvardhan Sapkal: “निवडणूक आयोगाचा सत्ताधाऱ्यांवर धाक उरला नाही” – हर्षवर्धन सपकाळ यांची टीका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 7:08 am

PMC Election: वेगवान विकासासाठी राष्ट्रवादीच्या पाठिशी; माजी उपमहापौर दीपक मानकरांच्या कोपरा सभा

प्रभात वृत्तसेवा पुणे – स्वखर्चातून कचरा गाडी सुरू करून केळेवाडी, हनुमाननगर परिसर कचरामुक्त झाला. महिला व युवकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण वर्गातून रोजगाराच्या संधी मिळाली. यासह स्वच्छ, सुरक्षित आणि अद्ययावत सोयीसुविधातून परिसराचा विकास झाला. विकासकामाचा हा वेग कायम ठेवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन मानकर, तृप्ती शिंदे आणि कांता खिलारे यांच्या पाठीशी आहोत, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला. […] The post PMC Election: वेगवान विकासासाठी राष्ट्रवादीच्या पाठिशी; माजी उपमहापौर दीपक मानकरांच्या कोपरा सभा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 7:06 am

PMC Election: बावधन परिसराला टँकरमुक्त करू; राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे नागरिकांना आश्‍वासन

प्रभात वृत्तसेवा पुणे – गावांसह सोसायटीतील नागरिकांना मुबलक पाणी मिळणे, हा त्यांचा हक्क आहे. मात्र, विस्कळीत नियोजनामुळे मागील अनेक वर्षांपासून बावधनकरांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून पाण्यासाठी टँकरवर अवलंबून असलेल्या बावधन परिसराला टँकरमुक्त करण्याचा मानस आहे. योग्य नियोजन, लोकसंख्यावाढीचा विचार करून नवीन जलवाहिन्या टाकणे आणि साठवण टाक्यांची क्षमता वाढवून बावधनकरांना मुबलक पाणीपुरवठा करू, […] The post PMC Election: बावधन परिसराला टँकरमुक्त करू; राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे नागरिकांना आश्‍वासन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 7:05 am

PMC Election: पर्यावरण संरक्षणासाठी कृती आराखडा राबविणार; भाजपा उमेदवार डॉ. निवेदिता एकबोटे यांचा निर्धार

प्रभात वृत्तसेवा पुणे – शहराच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस, दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचा निर्धार प्रभाग क्रमांक १२ (ड) च्या भाजप-आरपीआय व मित्रपक्षाच्‍या उमेदवार प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांनी व्यक्त केला आहे.डॉ. एकबोटे यांनी शनिवारी वडारवाडी, मॉडेल कॉलनी, प्रभात रोड आणि डेक्कन जिमखाना परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी […] The post PMC Election: पर्यावरण संरक्षणासाठी कृती आराखडा राबविणार; भाजपा उमेदवार डॉ. निवेदिता एकबोटे यांचा निर्धार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 7:05 am

तलवारी वाटल्या, तुरुंगात गेले, म्हणाले- बाहेर आल्यावर पुन्हा वाटू:आरोपी गार्डची पत्नी म्हणाली- पती झोपले होते, हिंदू रक्षा दलाने जबरदस्ती तलवार दिली

21 सेकंदांचा एक व्हिडिओ आहे. यात दिसणाऱ्या लोकांच्या हातात तलवारी आणि फरसे आहेत. भारत माता की जय चा नारा देत सर्वजण एका घरासमोर थांबतात. घरातून बाहेर आलेल्या व्यक्तीला तलवार देतात आणि म्हणतात, ‘हे आपल्या बहिणी-मुलींच्या संरक्षणासाठी, जर बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण झाली, तर विधर्मींपासून आपल्या संरक्षणासाठी.’ तो व्यक्ती तलवार घेतो, कपाळाला लावतो. सर्वजण नारा देतात - जय श्री राम. हा व्हिडिओ 29 डिसेंबरचा आहे. ठिकाण गाझियाबादमधील शालीमार गार्डन परिसर. तलवारी वाटणारे हिंदू रक्षा दलाचे सदस्य होते. 6 जानेवारी रोजी पोलिसांनी या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भूपेंद्र उर्फ पिंकी चौधरी यांना मुलासह अटक केली. 10 आरोपी आधीच अटक करण्यात आले होते. संघटनेचे म्हणणे आहे की, सदस्यांना जामीन मिळाल्यास, ते पुन्हा तलवारी वाटतील. याशिवाय, ज्यांनी तलवारी घेतल्या, अशा लोकांचीही एक कथा आहे. हे लोकही ताब्यात आहेत. यांच्यापैकी एक सोसायटीचे गार्ड होते. त्यांच्या पत्नी सांगतात की, पती झोपले होते. संघटनेचे लोक आले, हातात तलवार दिली. पोलिसांनी त्यांनाही पकडून नेले. दैनिक भास्करने या प्रकरणी हिंदू रक्षा दलाचे राष्ट्रीय संयोजक संकेत कटारा यांच्याशी बोलणे केले. आम्ही त्या लोकांच्या कुटुंबीयांनाही भेटलो, ज्यांना तलवार घेतल्यामुळे तुरुंगात जावे लागले. लोक म्हणाले- अजाणतेपणी तलवार घेतली, पोलिसांनी पकडलेआम्ही गाझियाबादच्या शालीमार गार्डन परिसरात पोहोचलो. येथे बहुतेक लोक या मुद्द्यावर बोलणे टाळत होते. हिंदू रक्षा दलाने अनेक घरांमध्ये तलवारी वाटल्या होत्या, त्या पोलिसांनी जप्त केल्या. पोलिसांनी ज्या 10 लोकांना अटक केली आहे, त्यापैकी दोन कुटुंबांशी आम्ही बोललो. मात्र, त्यांना त्यांची ओळख उघड करायची नाही. म्हणून सर्वांची नावे बदलली आहेत. अटक केलेल्या लोकांपैकी एक व्यक्ती सोसायटीमध्ये गार्ड आहे. त्यांची पत्नी भावना म्हणते, ‘माझे पती कोणत्याही संघटनेशी संबंधित नाहीत. ते तर घरी झोपले होते. संघटनेचे लोक आले आणि त्यांनी आवाज दिला. पती गेटवर गेले, त्या लोकांनी अचानक हातात तलवार दिली आणि असे बोलायला सांगितले. माझ्या पतीने बोलले. आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. त्याच दिवशी संध्याकाळी पोलीस आले आणि पतीला घेऊन गेले. पोलिसांनी मला सांगितले की कोर्टात जाऊन बोला.’ आम्ही भावनाला विचारले की हिंदू रक्षा दलाचे लोक शस्त्रे वाटत आहेत, हे ती योग्य मानते की चुकीचे. भावना म्हणते, ‘आता भीतीचे वातावरण आहे. सर्वांकडे शस्त्रे असायलाच हवीत. बघा बांगलादेशात काय होत आहे. येथे आम्ही सुरक्षित नाही आहोत.’ ‘तलवार पकडणं एवढा मोठा गुन्हा आहे हे माहित नव्हतं’भावनाच्या घराशेजारी अमितचं दुकान आहे. पोलिसांनी त्यांच्या भावालाही अटक केली आहे. अमित कॅमेऱ्यासमोर येऊ इच्छित नव्हते. ते म्हणतात, ‘इथे तलवारी दिल्या जात होत्या. आजूबाजूचे काही लोक तिथे जाऊन उभे राहिले. माझा भाऊही दुकानाच्या बाहेर उभा होता. तेव्हाच त्याच्या हातात तलवार पकडायला दिली. त्यानेही ती पकडली. तेव्हाच कोणीतरी फोटो काढला. त्याला माहित नव्हतं की तलवार पकडणं एवढा मोठा गुन्हा आहे.’ अमित म्हणतात, ‘आमचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही. इथे सर्व ठीक आहे. आम्ही आमचं काम करणारे लोक आहोत. खरं सांगायचं तर आम्ही त्यांच्या (हिंदू रक्षा दल) गोष्टींकडे लक्षही देत नाही. फक्त एवढंच की हिंदू रक्षा दल आमच्या शेजारी आहे.' जर काही गुन्हा घडला, तर त्यासाठी प्रशासन आहे, आम्ही का शस्त्रे उचलू? हे भारत आहे. जर कुठे काही घडले असेल, तर याचा अर्थ असा नाही की प्रत्येक ठिकाणी तसेच घडेल. संघटनावाले चुकीचे करत आहेत. हिंदू-मुस्लिम, जातीची चर्चा व्हायला नको. स्थळ: हिंदू रक्षा दलाचे कार्यालयशालीमार गार्डन परिसरातच हिंदू रक्षा दलाचे कार्यालय आहे. आम्ही येथे पोहोचलो, तेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष पिंकी चौधरी फरार होते. नंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. कार्यालयात संघटनेचे राष्ट्रीय संयोजक संकेत कटारा भेटले. तलवार वाटपामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतरही संकेत कटारा याला चुकीचे मानत नाहीत. ते म्हणतात, ‘यामुळे कोणताही गुन्हा घडला नाही. शांतता भंग झाली नाही, कोणतेही नुकसान झाले नाही. संघटनेच्या सदस्यांना जामीन मिळाल्यास, पुढे यावर पुन्हा विचार करू.’ प्रश्न: तुम्ही तलवारी का वाटत आहात?उत्तर: बांगलादेशात 15 दिवसांत तीन हिंदू मुलांना मारण्यात आले. यामुळे आमचे कार्यकर्ते संतप्त होते. त्यांनी सांगितले की आम्ही एक कार्यक्रम करतो. शस्त्रपूजा करून घरांमध्ये तलवारी वाटू, जेणेकरून बहिणी-मुली त्यांच्या संरक्षणासाठी त्या तलवारीचा वापर करू शकतील. प्रश्न: देशात कायदा आहे, तर तलवारी वाटण्याची काय गरज आहे?उत्तर: देशाची व्यवस्था अशी आहे की, जमावाच्या दहशतीपुढे पोलीसही हतबल राहिले आहेत. हाच इतिहास लक्षात घेऊन आम्ही आत्मसंरक्षणासाठी तलवारी वाटल्या आहेत. आम्ही कोणालाही द्वेषाच्या नजरेने पाहिले नाही, आम्ही दंगा केला नाही, मला वाटत नाही की हा इतका मोठा गुन्हा असावा, जसा पोलिसांनी तो बनवला आहे. प्रश्न: तलवारी दाखवणे, वाटणे हा कायद्याचा भंग नाही का?उत्तर: आम्ही तर एक छोटेसे बेकायदेशीर पाऊल उचलले आहे. आपल्याच देशात जम्मू-काश्मीर असो वा बंगाल, तिथे खुलेआम शस्त्रे दिली जात आहेत. आम्ही आत्मसंरक्षणासाठी शस्त्रे दिली आहेत. आम्हाला माहीत होते की आमच्यावर गुन्हा दाखल होईल, पण पोलीस खोटा गुन्हा दाखल करतील हे माहीत नव्हते. सरकार शस्त्रांचे परवाने देते. जर परवाना असलेल्या शस्त्राने काही घडले, तर त्यासाठी सरकारच जबाबदार असेल ना? प्रश्न: तुमच्या संघटनेचे लोक एका समुदायासाठी द्वेष पसरवत आहेत, असे का?उत्तर: तुम्ही आमची जी काही भाषणे ऐकली असतील, ती क्रियेची प्रतिक्रिया आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये लव्ह जिहाद, गाय कापण्याच्या, हिंदूंना त्रास देण्याच्या घटना घडत आहेत. लोकांना त्यांच्या घरांवर लिहावे लागत आहे की हे घर विकणे आहे. अल्पसंख्याकांची लोकसंख्या जिथे जास्त झाली आहे, तिथे हिंदूंना त्रास दिला गेला आहे. तुम्ही चुकीची कामे सोडून द्या, तर आम्ही कोणाला पळवून लावत आहोत? प्रश्न: 2024 मध्ये हिंदू रक्षा दलाच्या सदस्यांनी बांगलादेशी ठरवून मुस्लिमांच्या झोपड्या का तोडल्या होत्या?उत्तर: आम्ही खूप भावूक लोक आहोत. त्यावेळी बांगलादेशातही हिंसाचार सुरू होता. जर कायद्यावर विश्वास नसता, तर आम्ही आणखी मोठे आंदोलन केले असते. आम्ही काही चुकीचे करत असलो तरी, कायदेशीर प्रक्रियेचाही आदर करतो. प्रश्न: एवढ्या तलवारी तुम्ही कुठून आणल्या?उत्तर: तुम्ही दिल्लीत कुठेही जा, तलवारी मिळतील. लोकांना पैसे खर्च करायचे नाहीत किंवा त्यांच्याकडे पैसे नाहीत. आम्ही अशाच लोकांना तलवारी वाटल्या आहेत, जेणेकरून ज्यांच्या घरात मुली आहेत, त्या त्यांच्या संरक्षणासाठी जागरूक राहतील. जिहादी प्रवृत्तीचे लोक भारतातही आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तानातही आहेत. ते इथेही अशाच प्रकारच्या हालचाली करतील, म्हणूनच आम्ही तलवारी वाटत आहोत. प्रश्न: जिहादी प्रवृत्ती म्हणजे तुमचा काय अर्थ आहे?उत्तर: जे लोक आमच्या धर्मातील मुलींकडे वाईट नजरेने पाहतात, त्यांना कट रचून नाव बदलून फसवतात, अशा लोकांना आम्ही जिहादी प्रवृत्तीचे म्हणतो. जर ते आमच्यासोबत असे काम करतील, तर बहिणी-मुलींना आत्मसंरक्षणासाठी तलवार उचलावी लागेल. प्रश्न: तलवारींसाठी पैसे कुठून येत आहेत?उत्तर: संस्थेचे एक लाखांहून अधिक कार्यकर्ते आहेत. हेच लोक संस्थेसाठी पैसे देतात. यामुळेच आमचे काम चालते. आमचा पैशाचा कोणताही वेगळा स्रोत नाही. संघटनेचे आणखी एक सदस्य ललित शर्मा म्हणतात, 'तलवारींसाठी परवान्याची गरज नसते. ऑनलाइन किंवा ऑफलाइन, दोन्ही प्रकारे त्या मिळतात. आम्ही कुठेही जातो, तेव्हा कार्यक्रमांमध्ये तलवारी मिळतात. गाझियाबादमध्ये सुमारे 15 लोकांना तलवारी वाटल्या होत्या. नंतर पोलिसांचा फोन आला, तेव्हा ते थांबवले. आम्ही विशेषतः त्या घरांमध्ये तलवारी दिल्या, जिथे मुले नाहीत. आमचा उद्देश कोणाला मारण्याचा नाही. आम्हाला हिंदूंना मजबूत करायचे आहे.' (शस्त्र अधिनियम 1959 नुसार, 9 इंचांपेक्षा लांब तलवार परवान्याशिवाय बाळगणे आणि तिचे सार्वजनिक प्रदर्शन करणे गुन्हा आहे. यासाठी 3 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.) पिंकी चौधरींची मुलगी म्हणाली- तलवारी वाटणे योग्यतलवारी वाटल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर हिंदू रक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पिंकी चौधरी फरार होते. याच दरम्यान, ३ जानेवारी रोजी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. यात ते म्हणत आहेत की, प्रशासनाने कितीही खटले दाखल केले तरी, मी परत आल्यावर सडेतोड उत्तर देईन. यापूर्वी, ३१ डिसेंबर रोजी त्यांनी व्हिडिओ जारी करून म्हटले होते की, आम्हाला जे हवे होते, ते करून दाखवले. दहशतवाद्यांना कळून चुकले आहे की, हिंदू आता शस्त्र उचलण्यास तयार आहेत. आम्ही मागे हटणार नाही, कितीही खटले झाले तरी. 5 जानेवारी रोजी पिंकी चौधरी यांची मुलगी करुणा चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला की, पोलिसांनी तिला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले आणि तासभर चौकशी केली. करुणाने तलवारी वाटप करण्याला योग्य ठरवले आणि म्हटले की, बहिणी-मुलींच्या सुरक्षेसाठी प्रत्येक घरात एक पिंकी चौधरी असायला पाहिजे. मुस्लिमांना मारहाण, चिथावणीखोर व्हिडिओ, हिंदू रक्षा दल यापूर्वीही वादात राहिला आहेहिंदू रक्षा दल जातीय घोषणा, मुस्लिमांवरील हल्ले आणि चिथावणीखोर विधानांमुळे यापूर्वीही वादात राहिला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संघटनेने व्हिडिओ जारी करून म्हटले होते की, देहरादूनमध्ये कुठेही काश्मिरी मुसलमान दिसल्यास, त्याला 'धडा शिकवला' जाईल. सकाळी 10 वाजल्यापासून हिंदू रक्षा दलाची टीम वेगवेगळ्या भागांमध्ये जाईल. आम्ही आता सरकारच्या भरवशावर बसणार नाही. ऑगस्ट 2024 मध्ये संघटनेचे अध्यक्ष पिंकी चौधरी आणि काही सदस्यांनी गाझियाबादमधील झोपडपट्टीत मुस्लिमांना बांगलादेशी ठरवून मारहाण केली. झोपड्यांची तोडफोड केली आणि जातीय घोषणा दिल्या होत्या. तेव्हा पोलिसांनी पिंकी चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. काही महिन्यांनंतर त्यांना जामीन मिळाला होता. ऑगस्ट 2021 मध्ये दिल्लीतील जंतर-मंतर येथे एका रॅलीत मुस्लिमांविरोधात उघडपणे घोषणाबाजी करण्यात आली होती. तेव्हाही पिंकी चौधरी यांनी चिथावणीखोर विधाने केली होती. त्यानंतर त्यांना अटक झाली, पण काही दिवसांतच ते बाहेर आले.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 6:56 am

Pune Crime: निवडणुकीपूर्वी ‘भाई-दादां’ना मोठा धक्का! प्रचारासाठी बाहेर येण्याचे सर्व मार्ग कोर्टाने रोखले

प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंभीर गुन्हे असलेले भाई, अण्णा, भाई, दादा बाहेर येण्याची धडपड करत असले तरी कोर्ट आणि प्रशासनाने ठाम भूमिका घेतली आहे. प्रचारासाठी प्रवेशबंदी उठविणे, पॅरोल किंवा जामीनसाठी वकिलांमार्फत अर्जांचा सपाटा लावला असला तरी निवडणुका भयमुक्त, पारदर्शक आणि लोकशाही मुल्यांनुसार व्हाव्यात, यावर कोर्ट, पोली ठाम असल्याने आरोपींचे अर्ज नामंजूर होत […] The post Pune Crime: निवडणुकीपूर्वी ‘भाई-दादां’ना मोठा धक्का! प्रचारासाठी बाहेर येण्याचे सर्व मार्ग कोर्टाने रोखले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 6:50 am

SSC HSC Exam: दहावी-बारावीच्या परीक्षेत आता सीसीटीव्ही आणि ड्रोनची नजर..वाचा सविस्तर

प्रभात वृत्तसेवा पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे. परीक्षा निकोप, गुणवत्तापूर्ण वातावरणात होण्यासाठी आता राज्यस्तरीय दक्षता समिती नियुक्त करण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय दक्षता समितीमध्ये राज्य मंडळाचे अध्यक्ष, सर्व परिक्षेत्रांचे विशेष पोलीस महानिरीक्षक, […] The post SSC HSC Exam: दहावी-बारावीच्या परीक्षेत आता सीसीटीव्ही आणि ड्रोनची नजर..वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 6:40 am

आजचे एक्सप्लेनर:खामेनीचे पोस्टर सिगारेटने पेटवत आहेत इराणी मुली, यावेळी बदल निश्चित? पळून जावे लागले तर सर्वोच्च नेते कुठे जातील?

इराणमध्ये महागाईविरोधात दोन आठवड्यांपूर्वी सुरू झालेले विरोध प्रदर्शन आता खामेनींच्या इस्लामिक सत्तेला आव्हान देत आहे. इराणी युवती पाश्चात्त्य कपडे घालून सर्वोच्च नेते खामेनींच्या पोस्टरला सिगारेटने पेटवत आहेत. आतापर्यंत 60 हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, जर आंदोलकांच्या हत्या थांबल्या नाहीत, तर अशा ठिकाणी हल्ला करू जिथे सर्वाधिक वेदना होतील. इराणमधून खामेनींना पळून जावे लागू शकते का? या आंदोलनाचा चेहरा बनलेले रझा पहलवी कोण आहेत आणि ट्रम्प इराणमध्ये व्हेनेझुएलासारखी कारवाई करतील का; जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये… प्रश्न-1: इराणमध्ये महागाईविरोधात सुरू झालेले आंदोलन कुठपर्यंत पसरले आहे? उत्तर: खरं तर, इराणमध्ये महागाई सातत्याने वाढत आहे. याबाबत राजधानी तेहरानमध्ये 28 डिसेंबर रोजी काही दुकानदारांनी सरकारविरोधात विरोध प्रदर्शन सुरू केले होते, जे आता एका मोठ्या राजकीय आंदोलनात रूपांतरित झाले आहे... या आंदोलनाला कोणताही नेता नाही, परंतु लोक इराणच्या शेवटच्या राजाच्या मुलाच्या समर्थनार्थ ‘रझा पहलवी जिंदाबाद’, 'लॉन्ग लिव्ह द शाह' आणि 'पहलवी परत येतील' अशा घोषणा देत आहेत. इराणी विद्यार्थी इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या विरोधात ‘तानाशाह मुर्दाबाद’ आणि ‘डेथ टू डिक्टेटर’ लिहिलेल्या पाट्या फडकावत आहेत आणि घोषणा देत आहेत. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे डबघाईला आलेल्या इराणी अर्थव्यवस्थेत नजीकच्या भविष्यात सुधारणा होण्याची कोणतीही आशा दिसत नाही, त्यामुळे असे म्हटले जात आहे की, विरोध प्रदर्शन आणखी तीव्र होईल आणि खामेनी यांना देश सोडावा लागू शकतो. प्रश्न-2: तर काय खरंच खामेनी इराण सोडून पळून जाणार आहेत? उत्तर: 5 जानेवारी रोजी खामेनी यांनी सांगितले होते की लोकांना विरोध प्रदर्शन करण्याचा हक्क आहे, परंतु दंगलखोरांना सोडले जाणार नाही. त्यानंतर गेल्या गुरुवारी ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा धमकी दिली होती की जर इराणी सुरक्षा दले प्रदर्शनकर्त्यांची हत्या करतील, तर अमेरिका इराणवर हल्ला करू शकते. यादरम्यान, ब्रिटिश वृत्तपत्र 'द टाइम्स' सह अनेक पाश्चात्त्य देशांच्या माध्यमांनी सांगितले की खामेनीने 'प्लॅन बी' तयार केला आहे. जर निदर्शने अधिक वाढली किंवा सैन्याने त्यांची साथ सोडली, तर ते तेहरानमधून पळून जाऊ शकतात. या योजनेनुसार खामेनी, त्यांचा मुलगा मोजतबा आणि इतर अंदाजे 20 लोक इराण सोडू शकतात. इस्त्रायली वृत्तपत्र जेरुसलेम पोस्टमध्ये इस्त्रायलचे माजी गुप्तचर अधिकारी बेनी सबती यांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, 'खामेनी रशियाला रवाना होतील, त्यांच्यासाठी दुसरी कोणतीही जागा नाही.' खामेनीच्या या योजनेची तुलना सीरियाचे माजी हुकूमशहा बशर अल-असद यांच्याशी केली जात आहे, जे नोव्हेंबर 2024 मध्ये सीरियातून पळून रशियाला गेले होते. मात्र, शुक्रवारी पहिल्यांदा टीव्हीवर दिसलेल्या खामेनीने सांगितले की ते माघार घेणार नाहीत. ते म्हणाले, 'इस्लामिक रिपब्लिक हजारो महान लोकांच्या रक्ताच्या जोरावर सत्तेत आले आहे. जे लोक आम्हाला संपवू इच्छितात, त्यांच्यासमोर इस्लामिक रिपब्लिक सरकार कधीही माघार घेणार नाही.' जून 2025 मध्ये इस्रायलच्या समर्थनार्थ अमेरिकेने इराणमध्ये B2 बॉम्बर विमानांनी बॉम्ब हल्ला केला होता. त्यावेळी अशी चर्चा होती की अमेरिका किंवा इस्रायल इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांची हत्या करू शकतात. त्यावेळी याला उत्तर देताना इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले होते की खामेनी माघार घेणार नाहीत, तर ते शहादत म्हणून स्वीकारतील. खामेनी यांचा दावा आहे की सध्याच्या निदर्शनांमागे अमेरिका आणि इस्रायलचे परदेशी एजंट आहेत. त्यांनी म्हटले, ‘काही उपद्रवी घटक देशात हिंसा भडकवत आहेत आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना खूश करू इच्छितात. इराणची एकजूट जनता आपल्या सर्व शत्रूंना हरवेल.’ प्रश्न-3: ट्रम्प इराणमध्ये व्हेनेझुएलाप्रमाणे सत्तापालट घडवून आणू शकतात का? उत्तर: ट्रम्पसाठी इराणमध्ये रातोरात खामेनी यांचा सत्तापालट करणे हे व्हेनेझुएलामधून मादुरो यांना उचलून आणण्याइतके सोपे काम नाही. दोन्ही देशांचे भू-राजकारण, सैन्य आणि शासन व्यवस्था एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहे... 1. खामेनी यांना सामान्य लोकांच्या मोठ्या लोकसंख्येचा पाठिंबा 2. इराणचे सैन्य व्हेनेझुएलाच्या तुलनेत मजबूत 3. इराणला बाहेरील देशांचा पाठिंबा आहे 4. इराणची शासन व्यवस्था मजबूत प्रश्न-4: रझा पहलवी कोण आहेत, जे इराणमध्ये विरोधाचा चेहरा बनले आहेत? उत्तर: 65 वर्षीय रझा पहलवी हे इराणचे शेवटचे राजे मोहम्मद रझा शाह पहलवी यांचे मोठे पुत्र आहेत. 1967 मध्ये मोहम्मद रझा शाह यांनी रझा पहलवी यांना इराणचे 'वली अहद' म्हणजेच क्राऊन प्रिन्स घोषित केले होते. ते इराणचे भावी शासक मानले जात होते. मात्र, 1979 मध्ये इस्लामिक क्रांतीनंतर शाह यांना कुटुंबासह इराण सोडावे लागले होते. सध्या रझा पहलवी अमेरिकेतील मेरीलँडमध्ये निर्वासित जीवन जगत आहेत. रझा पहलवी खामेनीच्या इस्लामिक सरकारला हुकूमशाही मानतात आणि इराणच्या लोकांना निवडणुकीद्वारे सरकार निवडण्याचे आवाहन करत आहेत. सध्या रझा पहलवी सतत आंदोलनाला तीव्र करण्याचे आवाहन करत आहेत… प्रश्न-5: तर काय खामेनीनंतर रझाला इराणची सत्ता मिळू शकते? उत्तर: अनेक तज्ञ आणि अहवालांनुसार, जर आंदोलकांनी खामेनीला सत्ता सोडण्यास भाग पाडले किंवा त्यांच्या हातून इराणचे नियंत्रण सुटले, तर 3 परिस्थिती निर्माण होऊ शकतात... 1. खामेनीच्या वारसदार कट्टर मौलवींना सत्ता हस्तांतरित जून 2025 मध्ये स्वतःच्या हत्येच्या भीतीमुळे खामेनीने 3 मौलवींची निवड केली होती. इराणी सैन्याच्या पाठिंब्याने खामेनी कोणा एकाला आपला वारसदार घोषित करू शकतात… 2. कमी कट्टरपंथी मौलवीला सत्ता हस्तांतरण 3. रझा पहलवी यांच्या नेतृत्वाखालील राजेशाही सरकार प्रश्न-6: सत्ता बदलल्याने इराणची परिस्थिती बदलेल का? उत्तर: गेल्या काही वर्षांपासून इराणची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे... आता जर इराणमध्ये अमेरिका-समर्थित सरकार आले, तर इराणवरील निर्बंध हटवले जाऊ शकतात. इराण आपले तेल विकू शकेल, ज्यामुळे देशात परकीय चलन येईल. निर्बंध हटल्यामुळे इराणी चलन 'रियाल' मजबूत होऊ शकते आणि महागाई कमी होऊ शकते. यापूर्वी जेव्हा 2015 मध्ये निर्बंध हटवण्यात आले होते, तेव्हा इराणचा GDP 12% ने वाढला होता. प्रश्न-7: इराणमधील सध्याची परिस्थिती आणि सत्ता बदलल्यास भारतावर काय परिणाम होईल? उत्तर: इराणच्या सध्याच्या परिस्थितीमुळे भारताच्या व्यापारावर थेट परिणाम होत आहे…

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 6:38 am

Chandrakant Patil: फाइल अडविणारे मोफत वाहतूक सेवा देणार कशी? चंद्रकांत पाटील यांची पवारांवर टीका

प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरू असतानाच; शनिवारी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या संयुक्त जाहीरनाम्यातील घोषणेवरून भाजपचे नेते उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे. राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत म्हणून मुलींच्या मोफत उच्चशिक्षणाची फाइल सहा महिने अडवून येणारे […] The post Chandrakant Patil: फाइल अडविणारे मोफत वाहतूक सेवा देणार कशी? चंद्रकांत पाटील यांची पवारांवर टीका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 6:30 am

Pune Winter: थंडीचा कडाका वाढला! सलग चौथ्या दिवशी पुणे ‘गारठलं’; पाहा वेधशाळेचा अंदाज

प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम असून, सलग चौथ्या दिवशी हुडहुडीने पुणेकर चांगलेच गारठले आहे. शहर परिसरातील एनडीए परिसरात सर्वात कमी ७.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पाषाण येथे ९.१ आणि शिवाजीनगरला ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मागील चार ते पाच दिवसांपासून किमान तापमानात झपाट्याने घट झाली असून थंडीचे […] The post Pune Winter: थंडीचा कडाका वाढला! सलग चौथ्या दिवशी पुणे ‘गारठलं’; पाहा वेधशाळेचा अंदाज appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 6:20 am

PMC Election: पुणेकरांना मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत; राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्‍वासन

प्रभात वृत्तसेवा पुणे – शहराची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी, तसेच नागरिकांना पेट्रोलवर जादा पैसे खर्च करावे लागू नयेत, यासाठी मेट्रोचा आणि बसचा प्रवास मोफत देणार असल्याचे आश्वासन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने जाहिरनाम्याद्वारे पुणेकरांना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आधीच तोट्यात असलेली पीएमपीएमएल आणि […] The post PMC Election: पुणेकरांना मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत; राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्‍वासन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 6:15 am

ZP Election: तळेगाव गटात लवकरच राजकीय भूकंप? निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

प्रभात वृत्तसेवा तळेगाव ढमढेरे – शिरूर तालुक्यातील राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गटात सध्या राजकीय हालचालींना उधाण आले असून निवडणुकीपूर्वीच मोठ्या राजकीय भूकंपाची चाहूल लागली आहे. या आठवड्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने पडद्यामागील राजकारण, गुप्त बैठकांचे सत्र आणि जुन्या वैरांना पुन्हा उजाळा मिळताना दिसत आहे. […] The post ZP Election: तळेगाव गटात लवकरच राजकीय भूकंप? निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 6:10 am

Shirur Crime: ‘पत्ता’विचारणं पडलं महागात! संभाषणात गुंगवून महिलांचे ४ तोळे सोने केले लंपास

प्रभात वृत्तसेवा शिरूर – सरदवाडी (ता. शिरूर) आणि शिरूर शहरातील जोशीवाडी परिसरात चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांना फसवून त्यांचे सोन्याचे दागिने लांबवल्याच्या दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. सायंकाळच्या सुमारास घरासमोर फेरफटका मारणाऱ्या महिलांना लक्ष्य करून दुचाकीस्वारांनी अंदाजे चार तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याने परिसरात घबराट पसरली आहे. पहिली घटना सरदवाडी येथील न्हावरा फाटा परिसरात घडली. […] The post Shirur Crime: ‘पत्ता’ विचारणं पडलं महागात! संभाषणात गुंगवून महिलांचे ४ तोळे सोने केले लंपास appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 6:00 am

Mulshi News: पौडला ग्रामपंचायत अधिकारी व माजी सरपंच दोषी; गटविकास अधिकारी यांची कारवाई

प्रभात वृत्तसेवा पौड – ग्रामपंचायत कामकाजामध्ये अनियमितता आढळून आल्यामुळे पौड (ता.मुळशी) ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी माधुरी प्रदीप झेंडे आणि सरपंच प्रशांत वाल्हेकर यांच्यावर गटविकास अधिकारी यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे. पौडचे सरपंच किरणकुमार आगनेन यांनी दोन जानेवारीला पौड पंचायत समितीसमोर ग्रामस्थासमवेत आंदोलन केले होते. तेव्हा गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी नऊ जानेवारीपर्यत दोघांनाही त्याचे म्हणणे […] The post Mulshi News: पौडला ग्रामपंचायत अधिकारी व माजी सरपंच दोषी; गटविकास अधिकारी यांची कारवाई appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 5:45 am

धुरंधर; अँटोनियो ग्राम्शी:तुरुंगाच्या 4 भिंतीत जग बदलण्याची शक्ती शोधणारा अन् वैचारिक क्रांती शस्त्रांपेक्षा वरचढ असल्याचे सांगणारा विचारवंत

भारतीय समाजातील शोषणाची रचना फक्त राजसत्तेपुरती मर्यादित नव्हती. ती जातीच्या भिती, शिक्षणाची मक्तेदारी व परंपरा म्हणून स्विकारलेल्या विचारांत अतिशय खोलवर रुजलेली होती. महात्मा फुलेंनी सर्वप्रथम शिक्षणाद्वारे या वर्चस्वाला धक्का दिला. त्यांनी ज्ञानावर मोजक्यांची असणारी मक्तेदारी मोडत समतेचा प्रश्न थेट समाजाच्या केंद्रस्थानी आणला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संघर्षाला अधिक स्पष्टता व कायदेशीर धार दिली. सत्ता, धर्म व समाजरचना याचे नाते उघड करत समतेला घटनात्मक अधिष्ठान दिले. याच वैचारिक प्रवाहात भौगोलिकदृष्ट्या दूर, पण विचाराने जवळ असणाऱ्या अँटोनियो ग्राम्शी या इटालियन विचारवंतांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. फुले, आंबेडकरांनी ज्या वर्चस्वाला आव्हान दिले, त्याच वर्चस्वाचे सैद्धांतिक विश्लेषण ग्राम्शीने केले. शोषण हे केवळ बळजबरीने नव्हे तर शिक्षण, धर्म, भाषा व माध्यमांतून रुजवले जाते, ही त्यांची मांडणी भारतीय वास्तवाशी थेट संवाद साधते. त्यामुळेच फुले - आंबेडकर - ग्राम्शी ही नावे वेगवेगळ्या देशांची असली तरी त्यांचा संघर्ष एकाच प्रश्नाभोवती फिरतो, तो म्हणजे, सत्ता कशी निर्माण होते व ती मोडून काढण्यासाठी विचारांच्या क्रांतीचे बीज कसे रोवावे? चला तर मग आज धुरंधरमध्ये समजून घेऊया अँटोनियो ग्राम्शीचा वैचारिक संघर्ष... कौटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षण व आजार अँटोनियो ग्राम्शी यांचा जन्म 22 जानेवारी 1891 रोजी इटलीच्या सार्डिनियातील कॅलिगरी प्रांतात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव फ्रान्चेस्को ग्राम्शी, तर आईचे नाव जियुसेप्पिना मार्सियास असे होते. या दाम्पत्याला 7 मुले होती. अँटोनिया चौथ्या क्रमांकाचे होते. त्यांचे कुटुंब फार श्रीमंत नव्हते, पण ते शिक्षणाला महत्त्व देणारे होते. यामुळे अँटोनियोमध्ये बालपणीच साहित्याची आवड निर्माण झाली. त्यांचा मोठा भाऊ जेन्नारो यांचा कल समाजवादाकडे होता. त्यामुळे साहजिकच ते ही समाजवादाकडेच ओढले गेले. त्यांच्या वडिलांना आर्थिक व राजकीय कारणांमुळे 1898 साली तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे फार हाल झाले. ग्राम्शी यांना लहानपणीच हंचबॅक नामक आजार झाला. यात त्यांच्या पाठीच्या कण्याला बाक येऊन, त्यांना कुबडेपणा आला. त्यांचे शरीर एखाद्या वृद्ध माणसासारखे पुढच्या बाजूला वाकले गेले. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्याच स्थितीत ट्युरिन विद्यापीठातून आपले उच्चशिक्षण पूर्ण केले. याच कालावधीत त्यांचा वैचारिक विकास झाला. 1923 साली त्यांचे ज्यूलिया शुच्त यांच्याशी लग्न झाले. त्यांना डेलियो (1924) व ज्युलियानो (1926) ही 2 मुले झाली. पण 1926 साली ग्राम्शींना अटक झाली आणि त्यानंतर 1928 साली त्यांना तब्बल 20 वर्षांहून अधिकच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. 1937 साली आजारपणामुळे त्याची सशर्त सुटका झाली. पण रोम येथील एका रुग्णालयात त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. अँटोनियो ग्राम्शीला शिक्षा देताना बेनिटो मुसोलिनी यांच्या नेतृत्वातील इटलीचे फॅसिस्टवादी कोर्ट म्हणाले होते, for twenty years we must stop this brain from working अर्थात आपण या मेंदूला किमान 20 वर्षे कार्य करण्यापासून रोखले पाहिजे. ग्राम्शीना अटक अन् सांस्कृतिक वर्चस्ववाद 1921 ते 1926 हा ग्राम्शी यांच्या जीवनातील सर्वात कठीण काळ होता. या काळात इटलीचा हुकूमशहा मुसोलिनी व त्यांचे विरोधक एकमेकांपुढे उभे टाकले होते. संपूर्ण देशात तणावपूर्ण स्थिती होती. त्यातच 31 ऑक्टोबर 1926 रोजी मुसोलिनीवर प्राणघातक हल्ला झाला. यामुळे संतापलेल्या मुसोलिनीने देशा आणीबाणी जाहीर केली. तसेच साम्यवादी पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांना तुरुंगात डांबले. ग्राम्शी यांना या कटकारस्थानाची कोणतीही खबरबात नव्हती. सरकारलाही याची जाणीव होती. पण त्यानंतरही 8 नोव्हेंबर 1926 रोजी सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली. ग्राम्शींना साम्यवादी पक्षाच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी अटक करण्यात आली होती. कारण, फॅसिस्टवादी सरकारला डाव्यांचे हे आंदोलन चिरडून टाकायचे होते. अटकेनंतर ग्राम्शींना रेजिना कोएली नामक तुरुंगात हलवण्यात आले. रोम स्थित हा तुरुंग सर्वात कुख्यात गुन्हेगारांना डांबण्यासाठी कुख्यात होता. त्यावेळी ग्राम्शीचे वय केवळ 35 वर्षे होते. त्यांचे शरीर विविध व्याधींनी खंगलेले होते. पण सरकारला त्यांच्या विचारांची धास्ती होती. त्यामुळे ग्राम्शीच्या अटकेवर भाष्य करताना मुसोलिनी म्हणाला होता - आपल्याला त्याच्या विचारांवर अंकुश मिळवावे लागेल. ग्राम्शी हे अत्यंत तल्लखु बुद्धीचे होते. त्यामुळे विरोधकांना त्यांची फार भिती वाटत होती. ग्राम्शींनी आपल्या डोक्याने चालू नये असे त्यांना वाटे. त्यामुळेच त्यांना दूरवरच्या तुरुंगात डांबण्यात आले तुरुंगातील वातावरणामुळे ग्राम्शीची विचार करण्याची क्षमता क्षीण होईल असे त्यांना वाटत होते. पण झाले उलटेच. ग्राम्शींना तुरुंगात विचार करण्यासाठी फार वेळ मिळाला. त्यांनी आपल्या वैचारिक संकल्पनांवर नव्याने काम केले. सांस्कृतिक वर्चस्ववाद हा भांडवालदारांच्या विकासासाठी कशा पोषक ठरतो? यावर त्यांनी सखोल अभ्यास केला. प्रिझन नोटबुक्सची निर्मिती ग्राम्शींना तुरुंगात लिहिण्याची परवानगी होती. पण किती? व काय लिहिणार? यावर निर्बंध होते. सेन्सॉरशिप असूनही ग्राम्शींनी 33 नोटबुकमध्ये (जवळपास 3 हजार पाने) हस्तलिखित नोट्स लिहिल्या. त्यांच्या लेखनातून सांस्कृतिक वर्चस्वाची क्रांतिकारी संकल्पना जन्माला आली. हे नोटबुक तुरुंगातून चोरून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांची मेहुणी तातियाना शुख्त यांनी ते व्यवस्थित करून प्रकाशित केले. ही एक प्रकारची तुरुंगातील क्रांतीच होती. आज सोशल मीडिया, टीआरपी व ट्रोलिंगच्या युगातही विचार बंद पाडण्याचे प्रयत्न होतात. पण ग्राम्शी सांगतात की, विचारांना कुलूप लावता येत नाही. मुलांसाठी तुरुंगातून लिहिल्या गोष्टी ग्राम्शींना डेलिओ व ज्युलियानो ही 2 मुले होती. ते सोव्हिएत युनियनमध्ये आपल्या आईसोबत राहत होते. ग्राम्शी त्यांना तुरुंगातून पत्र लिहायचे. त्यात त्यांनी स्वतःच्या बालपणीच्या सरदारिनीया गावच्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांनी मुलांसाठी बेडटाईम्स स्टोरीज अर्थात छान-छान गोष्टीही लिहून पाठवल्या. ते त्यांना व्हेल, हत्ती आदींची माहिती द्यायचे आणि पुस्तकांची यादी पाठवायचे. विशेषतः ते त्यांना प्रश्न विचारण्यास कायम प्रेरित करत होते. प्रश्न विचारणे म्हणजे विचार करणे त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारण्यास घाबरू नका, असे ते मुलांना सांगायचे. त्यातच एकदा त्यांच्या मुलांना आपले वडील तुरुंगात असल्याची गोष्ट कळली. यामुळे ग्राम्शी खूप दुखावले. कारण, त्यांच्याही बालपणी त्यांच्या वडिलांविषयी त्यांना खोटे सांगितले गेले होते. मी उदासीन लोकांचा द्वेष करतो ग्राम्शींनी एकेठिकाणी लिहिले, मी उदासीन लोकांचा द्वेष करतो. जीवन म्हणजे भाग घेणे. जो खरेच जगतो, तो उदासीन राहू शकत नाही. हे वाक्य त्यांच्या एका लेखातून आले आणि आजही ते अनेक आंदोलनांत वापरले जाते. ते म्हणायचे, उदासीनता हे मृत वजन आहे. ग्राम्शींचा जीवनपट फारच रंजक ग्राम्शीची जीवनकथा फारच रंजक व हृदयद्रावक आहे. एखादी व्यक्ती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही एवढ्या खोलवर चर्चा करू शकते हे आश्चर्यकारक आहे. बराच काळ जग त्यांच्या लिखाणाकडे दुर्लक्ष करत राहिले. पण त्यांचा पहिला ग्रंथ मॉडर्न प्रिन्स प्रकाशित झाला. त्यानंतर 1971 साली प्रिझन नोटबुक्स आले. भारतात 1980 नंतर त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. नामवर सिंह यांनी आपल्या 'दूसरी परंपरा की खोज' या पुस्तकात त्यांचा दाखला दिला. त्यामुळे ग्राम्शी वाचताना मला वारंवार फुले - आंबेडकरांची आठवण येते. ग्राम्शींनी केवळ आर्थिक शक्तीच नव्हे तर सांस्कृतिक वर्चस्वही जागतिक घडामोडींची दिशा निश्चित करते हे दाखवून दिले. बदल केवळ प्रयत्नांनीच होतो. आळसाने नाही. बदल केवळ औद्योगिक कामगार वर्गानेच नव्हे तर पारंपरिक कारागीर व शेतकरी वर्गानेही साध्य करता येऊ शकतो. ग्राम्शीचे हे विचार आजही जगभरात प्रासंगिक आहेत. भांडवलदार 'संमती'चेही उत्पादन करतात हिगेमनी अर्थात धुरीणत्वाचा सिद्धांत अँटोनियो ग्राम्शीचीच देणगी आहे. या सिद्धांतानुसार, वर्चस्व राखणाऱ्या गटाचे विचारप्रणालीविषयक वर्चस्व म्हणजे धुरीणत्व. पारंपरिक मार्क्सवादी विचारांमध्ये राज्य हे शोषणाचे व बळाचे एक साधन मानले जाते. या भूमिकेत ग्राम्शीने बदल घडवून आणला. भांडवलदार वर्गाने मिळवलेली संमती ही छळ, बळ किंवा मन वळवून मिळवलेली नसते, तर शोषितांच्या परवानगीनेच मिळवलेली असते असे त्यांनी दाखवून दिले. भांडवलदार संमतीचेही उत्पादन करतात, असे तो म्हणतो. नागरी समाज धुरीणत्वाचे उगमस्थान आहे, ही त्याची धारणा नागरी समाजाच्या उदारमतवादी प्रारुपाला छेद देते. उदारमतवादी प्रारुपानुसार नागरी समाज ही स्वातंत्र्याची मोकळीक आणि शोषणरहितता असलेली जागा असते. ग्राम्शीचे विचार मार्क्सच्या पाया व इमल्यात काही बदल घडवून आणतात. ग्राम्शीच्या मते, नागरी समाज हा सेंद्रियदृष्ट्या पायाशी जोडलेला असतो. त्यामुळे पायाच त्याला आकार देत असतो. त्यामुळे उदारमतवाद्यांनी सांगितल्यानुसार नागरी समाज कधीही तटस्थ असू शकत नाही. बदल घडवून आणायचा असेल तर केवळ पायाच बदलून भागणार नाही, तर वर्चस्वाच्या मार्गांचा व साधनांचाही नायनाट करावा लागेल असे ग्राम्शी म्हणतो. श्रमिकवर्गाने प्रतिधुरीणत्वाची साधने उभारायला हवीत, अशी सूचनाही तो या प्रकरणी करतो. वर्चस्व व धुरीणत्व यातील संबंध ग्राम्शीने वर्चस्व व धुरीणत्व यातील भेद स्पष्ट केला आहे. तो म्हणतो, अधिशास्ता वर्ग कठोरपणे दुसऱ्या वर्गावर गुलामगिरी लादतो व आपले अधिशासन स्थिर करतो. अशा वेळी तिथे वर्चस्व नांदत असते. दक्षिण आफ्रिकेत गोऱ्यांनी काळ्यांवर प्रस्थापित केलेले वर्चस्व हे या प्रकारात मोडते. पण जेव्हा वर्चस्व कठोरपणे व आदेशात्मक पद्धतीने न लादता चातुर्याने व सर्वसंमतीचे वातावरण निर्माण करून लादले जाते, तेव्हा तिथे धुरीणत्व असते. येथे गुलामगिरी लादली जात नाही, पण अप्रत्यक्षपणे संमती लादली जाते. धुरीणत्व कसे कार्य करते? ग्राम्शी म्हणतो - तत्त्वज्ञान, नीती, कला, कायदे हे सर्वांचे म्हणून मिरवले जात असले तरी ते वरिष्ठ वर्गाचे धुरीणत्व करतात. मंदिरे, मठ, विद्यापीठे, प्रतिष्ठाने यांचे समाजातील माहात्म्य वरिष्ठ वर्गाचे धुरीणत्व रुजवण्याची प्रक्रिया पार पाडतात. सामाजिक संस्था, पुराणे, मिथके, कला, साहित्य यांच्या माध्यमातून वरिष्ठ वर्गाची मूल्ये व विचारप्रणाली सर्व समाजाची मूल्ये व विचारप्रणाली म्हणून संपृक्त स्वरुपात कार्यरत होता. यातून राजकीय समाज व नागरी समाज यात सत्ता व संमतीचा परस्पर सामंजस्याचा समतोल निर्माण होतो. राज्य केवळ घटनेतील नियमांच्या आदेशानुसार चालत नाही, तर ते सत्ता व संमती यातील समतोलाने चालते हा ही विचार या संकल्पनेतून आला. ग्राम्शीने राज्यांची वर्गवारी पारदर्शक व अपारदर्शक अशी केली आहे. ग्राम्शीच्या मते, काही देशांमध्ये (उदा. ब्रिटन, अमेरिका) नागरी समाज अत्यंत मजबूत व गुंतागुंतीचा असल्यामुळे क्रांती 'war of position' (पदाचे युद्ध) स्वरूपाची असते. तर रशियासारख्या देशांत नागरी समाज तुलनेने दुर्बल असल्याने 'war of manoeuvre' (युक्तिची लढाई) शक्य असते. ग्राम्शी राजसत्तेविषयी काय म्हणतो? राजसत्ता ही राजकीय समाज व नागरी समाज यांच्यातील संतुलन आहे, असे म्हणणारा ग्राम्शी नंतर नागरी समाज व राज्य वास्तवात एकच आहेत असेही नमूद करतो. आर्थिक संरचना व आपल्या बलप्रयोगासह उभ्या असलेल्या राजसत्तेच्या तंतोतंतमअध्ये नागरिक उभा आहे. थोडक्यात, राजसत्ता हे असे साधन आहे की, जे नागरिकांना आर्थिक संररचनेच्या स्वरूपात बदलत असते किंवा त्या संरचनेच्या अनुरूप बनवीत असते. प्रचार व अनुनय या मार्गांचे अपयश किंवा मर्यादित यश अपरिहार्यपणे बलप्रयोग हा एकच पर्याय राजसत्तेपुढे शिल्लक ठेवतात. इमल्याचा (Superstructure) सिद्धांत ग्राम्सी हा इमल्याचा सिद्धांतकर्ता म्हणूनही ओळखला जातो. पारंपरिक विचारानुसार इमला हे पायाचे प्रतिबिंब मानले जात असल्याने त्याचा खास अभ्यास केला जात नसे. पण ग्राम्शीच्या लिखाणामुले इमल्याचा गंभीर विचार सुरू झाला. इमल्याच्या दोन उपरचना असतात असे ग्राम्शी म्हणतो. त्याच्या मते, पायाजवळची उपरचना म्हणजे नागरी समाज व दुसरी उपरचना म्हणजे राज्य. म्हणजेच राज्य नागरी समाज हा राज्य व पायाच्या मधोमध असतो. ग्राम्शीच्या या विचारांनी नवमार्क्सवादातील संरचनावादी पंथाचा पाया घातला गेला. ग्राम्शीच्या भाषेत शोषितांच्या गटाला स्थित्यंतरकारी (सबऑल्टर्न) अशी संज्ञा आहे. हा गट अस्तित्वात असलेल्या वर्चस्ववादी गटाला नामोहरम करू शकतो. हाच क्रांतीकारी गट असतो. लेनिनप्रमाणेच ग्राम्शीलाही श्रमिक वर्गाचा एक बौद्धिक गट असावा असे वाटते. इन्टेलेक्च्युअल्सची संकल्पना ग्राम्शी बुद्धिजीवी अर्थात इन्टलेक्च्युअल्सचे पारंपरिक व जैविक असे 2 गट मानतो. पारंपरिक बुद्धिजीवी (साहित्यिक, वैज्ञानिक) कोणत्याही गटाशी निष्ठेने बांधलेले नसतात. जैविक गटातील बुद्धिजीवींची कोणत्यातरी गटाशी सेंद्रिय जवळीक असते. जैविक बुद्धिजीवी स्थित्यंतरकारी गटासाठी प्रतिवर्चस्वाची सामग्री उभारू शकतात असे ग्राम्शीला वाटते. समाजातील जो घटक वर्गीय शक्तींच्या संघर्षात मध्यस्थाचे कार्य पार पाडत असतो. हा सजग घटक समाजातील तणाव कमी करत असतो. ग्राम्शी याच घटकाला बुद्धिजीवी म्हणतो. तुरुंगातील शेवटचे दिवस आणि मुक्ती अँटोनियो ग्राम्शी यांची प्रकृती 1937 साली खूप बिघडली. त्यांची सशर्त सुटका करण्याचा प्रस्ताव आला. पण त्यासाठी त्यांना राजकारण सोडण्याची अट घालण्यात आली. ग्राम्शींनी त्याला स्पष्ट नकार दिला. मी माझ्या विचारांचा त्याग करणार नाही, असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांना रोम येथील एका रुग्णालयात हलवण्यात आले. पण तिथे काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. असे सांगितले जाते की, ग्राम्शी मृत्यूपूर्वी शांत होते. अत्यंत आजारी अवस्थेतही ते म्हणाले होते, मी हरलो नाही. माझे विचार माझ्यानंतरही लढतील. तद्नुसार आजही त्यांचे विचार जगाला दिशा देण्याचे काम करतात. ग्राम्शी सांगतो की, सत्ता उखडून टाकायची असेल तर आधी ती सामान्य, नैसर्गिक आणि ‘अपरिहार्य’ वाटणे थांबवावे लागते. म्हणूनच ग्राम्शी वाचणे म्हणजे केवळ कम्युनिझम वाचणे नव्हे, तर समाज कसा विचार करतो याचे गुपित उलगडणे होय. धुरंधर मालिकेतील खालील स्टोरीज वाचा... धुरंधर-56; राणी गाइदिन्ल्यू:झाशीच्या राणीची गोष्ट माहिती असणाऱ्यांना इंग्रजांना आव्हान देणाऱ्या आदिवासी कन्येची गोष्ट माहिती आहे का? धुरंधर-55; पां. म. बापट:सशस्त्र क्रांतिकारक ते अहिंसक सत्याग्रहाचा सेनापती अन् अखेर झाडू उचलून ग्राम स्वच्छता करणारा सुधारक धुरंधर-54; नाना पाटील:म्हार, मांगांना लांब का ठेवता? ते घान कामं करत्यात म्हणून? तुमचा डावा हातही तेच करतो, असे सांगणारा क्रांतिसिंह धुरंधर-53; नेल्सन मंडेला:भारताला दुसरे घर मानणाऱ्या आफ्रिकन गांधींची कहाणी; 27 वर्षे कैद भोगूनही मनात कटूता न ठेवणारा मदिबा धुरंधर-52; शकुंतला देवी:शाळेचे तोंड न पाहता संगणकाची परीक्षा पाहणाऱ्या अन् गणिताला खेळ मानणाऱ्या कानडी महिलेची जादूई कहाणी धुरंधर-51; केशवराव जेधे:ब्राह्मणेतर चळवळीचा प्रमुख चेहरा अन् सामाजिक न्यायासाठी झगडणारा ठसकेबाज दृढनिश्चयी मराठी लढवय्या धुरंधर-50; डॉक्टर सलीम अली:पक्ष्यांच्या जगाचे रहस्य उलगडून मानवाला निसर्गाच्या दिशेने जाण्यास प्रेरित करणारा पक्ष्यांचा 'चालता फिरता विश्वकोश' धुरंधर-49; सर रोनाल्ड रॉस:'साला एक मच्छर'! मलेरिया अन् डास यांच्यातील परस्पर संबंध शोधून मानवतेची सेवा करणारा थोर वैज्ञानिक धुरंधर-48; होमी जहांगीर भाभा:दगडधोंड्यांच्या भारतात अणुज्योत पेटवून अज्ञानाचा अंधःकार दूर करणारा श्रीमंत घरातला बंडखोर तरुण धुरंधर-47; बिंदेश्वरी प्रसाद मंडल:ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या इमारतीचा सर्वात मजबूत पाया रचणाऱ्या बिहारच्या जमीनदाराची कथा धुरंधर-46; कार्ल बुशबी:ना ट्रेन ना प्लेन ना बाईक, तब्बल 27 वर्षांच्या अन् 58 हजार किलोमीटरच्या पदयात्रेची अनोखी कथा जी आजही सुरूय धुरंधर-45; जाईबाई चौधरी:स्त्री जीवन फुलवणारी अन् दलित महिलांना शैक्षणिक, सांस्कृतिक संजीवणी देणारी विदर्भातील थोर सेविका धुरंधर-44; ओशो रजनीश:पापाला पुण्याचे अन् हिंसेला अहिंसेचे कपडे घालावे लागतात असे सांगत ईश्वरापूर्वी स्वतःला शोधण्याचा सल्ला देणारा थोर दार्शनिक धुरंधर-43; अमृता प्रीतम:मैं तेनु फिर मिलांगी, कित्थे? किस तरह? पता नहीं; प्रेम, वेदना अन् स्वातंत्र्याचा सूर छेडत बाईचे जगणे मांडणारी लेखिका धुरंधर-42; दगडाबाई शेळके:स्वतःच्या नवऱ्याचे दुसरे लग्न लावून मराठवाडा मुक्तिसंग्रामात स्वतःला झोकून देणारी जालन्याची 'झाशीची राणी' धुरंधर-41; यशवंत घाडगे:दुसऱ्या महायुद्धात मर्दुमकी दाखवत ब्रिटिशांकडून इटलीच्या सैनिकांना कंठस्नान घालणारा मराठी सैनिक धुरंधर-40; शाहीर अमर शेख:धग, रग, आग, धुंदी अन् बेहोशीची जिवंत बेरीज असणारा तथा 'बर्फ पेटला हिमालयाला विझवायला चला' म्हणणारा शाहीर धुरंधर-39; टी. एन. शेषन:'नेत्यांना नाश्त्यात खाणारे' तथा EC ला अभूतपूर्व ताकद अन् प्रतिष्ठा मिळवून देणारे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त धुरंधर-38; डॉ. एम एस स्वामीनाथन:उपासमारीच्या सावटाखाली झुरणाऱ्या भारताला स्वावलंबनाचे स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवणारा शास्त्रज्ञ धुरंधर-37; मेजर शैतान सिंह:1962 च्या भारत - चीन युद्धात 120 जवानांच्या जोरावर शत्रूचा फडशा पाडणारा अन् पोट फाटले तरी मैदान न सोडणारा बहाद्दर धुरंधर-36; राणी वेलू नाचियार:महिलांची फौज तयार करून ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांना पहिल्यांदा धूळ चारणारी शिवगंगाची 'वीर मंगई' धुरंधर-35; अय्यनकाली:महिलांना छाती झाकण्याची परवानगी मिळवून देणारा अन् दलितांनी पिकवलेले धान्य चालते, मग ते का चालत नाहीत? असा प्रश्न करणारा सुधारक धुरंधर-34; जगन्नाथ शंकरशेठ:लोकांचा विश्वास जिंकणारी श्रीमंती गरिबांवर उधळणारा अन् परकियांनाही आपला वाटणारा मुंबईचा खरा शिल्पकार धुरंधर-33; अण्णाभाऊ साठे:दीड दिवस शाळेत जाऊन साहित्याचा सूर्य झालेला लोकशाहीर; जात, धन अन् धर्मदांडग्यांना आव्हान देणारा अण्णा धुरंधर-32; धीरूभाई अंबानी:गरिबीवर मात करत कोट्यवधी भारतीयांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे भारताचे एक अप्रतिम उद्योग रत्न धुरंधर-31; राजर्षी शाहू महाराज:अस्पृश्याला मानाचे पान अन् नांगरासाठी तोफा वितळवून लोखंड देणारे शाहू महाराज ग्रेट का होते? धुरंधर-30; चे गेव्हारा:अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द जागवून अवघ्या जगातील क्रांतीचा चेहरा बनलेला तुमच्या 'T शर्ट'वरील क्रांतिदूत धुरंधर-29; संत कबीर:पैशांच्या मागे पळणाऱ्यांचा देव कसा? असा परखड सवाल करत समस्त मानवतेला साधेपणाचा संदेश देणारा महानायक धुरंधर-28; राणी चेन्नम्मा:स्वकियांची फंदफितुरी जमिनीत गाडून 1857 च्या सशस्त्र उठावापूर्वी इंग्रजांना धूळ चारणारी 'कर्नाटकची लक्ष्मीबाई' धुरंधर-27; अहिल्याबाई होळकर:न्यायबुद्धीने स्वतःच्या नवऱ्याला धारेवर धरत चोराच्याही पोटाचा प्रश्न सोडवणाऱ्या दूरदृष्टीच्या शासक धुरंधर-26; डॉ. जयंत नारळीकर:ब्रह्मास्त्र होते तर रामाच्या राज्यात वीज होती का? असा झोंबणारा प्रश्न करणारा भारताचा मराठमोळा शास्त्रज्ञ धुरंधर-25; मुथुलक्ष्मी रेड्डी:महिला हक्क अन् आईचे 'देवदासी'पण पाहून त्याविरोधात लढा पुकारणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला आमदार धुरंधर-24; कुलदीपसिंग चांदपुरी:पाकच्या 2000 हून अधिक सैनिकांना 120 जवानांच्या बळावर धूळ चारणारा लढवय्या; '1971' ची अमर गाथा धुरंधर-23; चंद्रप्रभा सैकियानी:पडदा प्रथेवर लाथ घालून महिलांना आभाळ खुले करणारी आसामची हिरकणी; कुमारी माता झाली तरी डगमगली नाही धुरंधर-22; कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील:महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणाचा सूर्य पेरून उपेक्षितांच्या झोपडीत ज्ञानाचे पीक काढणारा खरा 'धुरंधर' धुरंधर-21; प्रबोधनकार ठाकरे:मराठी समाज मनात मोक्याच्या ठिकाणी पक्क्या गाठी मारून जातिभेदांच्या जखमांचा खोलवर शोध घेणारा बहुजन हिंदुत्त्ववादी धुरंधर-20; भीमराव रामजी आंबेडकर:चवदार तळ्याला ताळ्यावर आणणारा दलितोद्धारक अन् सामाजिक समरसतेचा खरा विवेकी शिल्पकार धुरंधर-19; जिगर मुरादाबादी:'शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ खुदा नहीं,' असे म्हणत मौलवींकडून टाळ्या पिटवून घेणारा सूफी शायर धुरंधर-18; आनंदीबाई जोशी:'पृथ्वीच्या पाठीवर हिंदुस्तान इतका दुसरा रानटी देश नाही', असे ठणकावून सांगणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर धुरंधर-17; भगतसिंग:'बॉम्ब अन् पिस्तुले क्रांती आणत नाहीत, क्रांती लोकांच्या मनात जन्मते', असे ठामपणे सांगणारा 'शहीद ए आझम' धुरंधर-16; शहाजीराजे भोसले:छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रेरणास्थान अन् बृहन्महाराष्ट्राची स्थापना करणारा धोरणी राजा धुरंधर-15; ई. व्ही. रामासामी:देव आहे हे सिद्ध करण्याचे आव्हान देत तर्कशुद्ध अन् निर्भय मतांद्वारे समाजात क्रांती घडवणारा भारताचा 'पेरियार' धुरंधर-14; कार्नेलिया सोराबजी:रूढी परंपरांना आव्हान देत शिक्षण, समानता अन् मानवी हक्कांसाठी अथक झगडणारी भारताची पहिली महिला बॅरिस्टर धुरंधर-13; खासेराव जाधव:बहुजन समाजाच्या खांद्यावरील निरक्षरतेचे 'जू' काढून त्यांना उच्च शिक्षणाच्या गंगेचे पाणी पाजणारा अवलिया धुरंधर-12; तंट्या भिल्ल:आदिवासींमध्ये राष्ट्रीयत्व जागवणारा 'रॉबिनहूड', थोर स्वातंत्र्यसैनिक; वाचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचे सोनेरी पान धुरंधर-11; विठ्ठल सखाराम पागे:उकिरड्याला खरकटे माहिती नसल्याच्या काळात 'भूकबळी'वर नामी उपाय शोधणारा राजकारणी धुरंधर-10; मोहन हिराबाई हिरालाल:विनोबा भावेंचे 'सर्वायतन' नक्षलग्रस्त गडचिरोलीत रुजवणारा अन् गरिबांना लक्ष्मीदर्शन घडवणारा अवलिया धुरंधर-9; फातिमा शेख:सावित्रीमाईंची मैत्रीण अन् भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका; फातिमा एक काल्पनिक पात्र होत्या का? तुम्हीच ठरवा धुरंधर-8; एकनाथ दगडू आवाड:बापाचा बुचडा कापून 'पोतराज' प्रथेवर घाव घालणारा पोरगा; कथित गुन्हेगारीने बदनाम झालेल्या बीडचा थोर माणूस धुरंधर-7; स्वामी विवेकानंद:मानवतेचा उत्कृष्ट प्रेमी, महान निधर्मी तत्ववेत्ता; नरेंद्रनाथ दत्त यांचे अखेरचे काही तास कसे होते? धुरंधर-6; कंदुकुरी वीरेशलिंगम पंथुलु:अंधश्रद्धेवर लाथ घालून विधवा पुनर्विवाह अन् ज्ञानाची वात पेटवणारा आंध्रचा 'लेखणी'सम्राट धुरंधर-5; भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड:दोन वेळा वाचवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राण धुरंधर-4; डॉ. विश्राम रामजी घोले:महिला उत्थानासाठी पेटून उठलेला सुधारक, ज्यांची 'बाहुली' ठरली स्त्री शिक्षणाची पहिली बळी धुरंधर-3; पार्वतीबाई आठवले:वैधव्य अन् परावलंबन दैवी भोग मानणारी, पण पोटच्या गोळ्याच्या काळजीने असामान्य झालेली एक निरक्षर स्त्री धुरंधर-2; बसव प्रेमानंद:अंधश्रद्धेच्या खाटेवर आजारी पडलेल्या समाजाला विज्ञानाचे औषध देऊन चमत्कारांची पुरती हवा काढणारा थोर दार्शनिक धुरंधर-1; नरहर अंबादास कुरुंदकर:विचारांची श्रीमंती वाढवणारा अन् आजच्या किर्र वैचारिक काळोखात प्रकाशवाट दाखवणारा थोर विचारवंत

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 5:30 am

बैलगाडा शर्यत! ३०९ गाड्यांची झुंज अन् लाखो रुपयांची बक्षिसं; पाहा कोण ठरलं फळीफोड?

प्रभात वृत्तसेवा महाळुंगे पडवळ – फुलेवाडी-महाळुगे पडवळ (ता.आंबेगाव) येथे श्री वेताळ महाराज यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत ३०९ बैलगाड्यांनी सहभाग घेतला. पवन विठ्ठल हगवणे व दादाभाऊ खंडू मनसुख यांचे बैलगाडे फळीफोड ठरले. शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.श्री वेताळ महाराज यात्रा उत्सवानिमित्त काकडा, हरिपाठ व भजन आदी कार्यक्रम संपन्न झाले. अखंड हरीनाम […] The post बैलगाडा शर्यत! ३०९ गाड्यांची झुंज अन् लाखो रुपयांची बक्षिसं; पाहा कोण ठरलं फळीफोड? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Jan 2026 5:15 am