वार्षिक ३० लाखांपेक्षा अधिक कमावत्या करदात्यांच्या संख्येत २३.३४% वाढ
प्रतिनिधी: गेल्या काही दिवसांपासून आलेल्या आकडेवारीनुसार भारताच्या करदात्यात वाढ झाल्याचे आपण पाहिले होते. त्याआधारे आकडेवारीनुसार आता भारतातील चांगल्या पातळीवर असलेल्या पगारदार वर्गाची संख्या वेगाने वाढत आहे. वेगाने वाढत आहे. आकडेवारीनुसार वार्षिक ३० लाख रुपयांपेक्षा जास्त कमावणाऱ्या अत्योच्च पगारदार करदात्यांचा वाटा आर्थिक वर्ष २०२४ मधील १८.४% २०२५ मध्ये २३.३४% पर्यंत वाढला आहे असे असे एका नवीन अहवालात बुधवारी म्हटले गेले आहे. क्लियरटॅक्सने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, हे मध्यम आणि उच्च-मध्यम वर्गामध्ये झालेली आर्थिक प्रगती सूचित करत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.हे निष्कर्ष क्लियरटॅक्सच्या 'हाऊ इंडिया फाइल्ड इन २०२५' या वार्षिक अहवालाचा भाग आहेत ज्यामध्ये भारतीय लोक कसे कमावतात, गुंतवणूक करतात आणि संपत्ती निर्माण करतात हे समजून घेण्यासाठी लाखो आयकर विवरणपत्रांचे विश्लेषण करण्यात आले.उत्पन्नाची वाढलेली वर्षे स्पष्टपणे निष्कर्षात दिसून येतात. उपलब्ध माहितीनुसार,४०-५० वयोगटातील जवळपास ३८% पगारदार करदाते वार्षिक ३० लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतात, ज्यामुळे हा गट देशातील सर्वाधिक कमाई करणारा आणि कर-योगदान देणारा घटक बनला आहे. करिअरच्या मधल्या वर्षांमध्ये अनुभव आणि करिअरमधील स्थिरता अधिक पगारात कशी रूपांतरित होते याचे विस्तृत विवेचन या अहवालात करण्यात आले आहे. त्याच वेळी भारतीय लोक आपले उत्पन्न कसे मिळवतात यात एक मोठा बदल झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. करदाते आता केवळ पगारावर अवलंबून नाहीत. ITR-3 आणि ITR-2 दाखल करण्याच्या संख्येत झालेली मोठी वाढ दर्शवते की अधिक लोक व्यवसाय, व्यापार आणि गुंतवणुकीतून कमाई करत आहेत. त्यामुळे व्यवसायाकडे असलेला कलही या अहवालातून स्पष्ट करण्यात आला आहे.एकाच उत्पन्नाच्या करिअरपासून विविध उत्पन्न स्रोतांकडे होत असलेल्या बदलाचे संकेत आहे.२५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये आरटीआर दाखल करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि अनेक प्रथमच विवरणपत्र दाखल करणाऱ्यांनी आधीच भांडवली नफा नोंदवला आहे असा दावा अहवालाने केला. वय वर्ष २५ ते ३५ वयोगटातील मिलेनियल्स या बदलात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आण्टी एका निष्कर्षानुसार सक्रिय गुंतवणूक, व्यापार आणि अनेक उत्पन्न स्रोतांमुळे क्लिष्ट आयटीआर दाखल करणाऱ्यांमध्ये त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे हा भाग अर्थव्यवस्थेतील दृष्टीने महत्वाचा आहे. हा अहवाल असेही नमूद करतो की क्रिप्टो मालमत्ता ही मुख्य प्रवाहातील गुंतवणूक न राहता एक वाढलेल्या जोखमीची अतिरिक्त बाबही बाजारात अस्तित्वात आहे.गुंतवणूक करणे ही आता एक विशेष कृती न राहता एक सामान्य आर्थिक सवय बनली आहे. ITR-3 दाखल करणाऱ्या बहुसंख्य करदात्यांनी भांडवली नफा नोंदवला आहे असे अहवालात म्हटले गेले आहे. त्यातूनच इक्विटी बाजार आणि व्यापार आता अनेक भारतीयांच्या नियमित आर्थिक नियोजनाचा भाग बनले आहेत. तरुण भारतीय गुंतवणूकदारांच्या मानसिकतेने कार्यक्षेत्रात मोठ्या संख्येने भाग घेत असल्याचेही अहवालात म्हटले गेले आहे.
ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना हादरा; शिवसेनेच्या उमेदवारांवरच केला हल्ला, पोटात….
मुंबई : यंदाच्या महानगरपालिका निवडणुकांना गालबोट लागल्याचं चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांवर हल्ल्यांच्या घटना घडत असून, मुंबईतही गंभीर प्रकार समोर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सलीम कुरेशी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मुंबईतील वांद्रे परिसरातील ज्ञानेश्वर नगर येथे प्रचारासाठी गेले असताना अज्ञात हल्लेखोराने हाजी सलीम कुरेशी यांच्या […] The post ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना हादरा; शिवसेनेच्या उमेदवारांवरच केला हल्ला, पोटात…. appeared first on Dainik Prabhat .
Harshwardhan Sapkal : पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारीत वाढ; प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा आरोप
अमरावती : महाराष्ट्रात पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचा थेट परिणाम कायदा-सुव्यवस्थेवर झाला असून गुन्हेगारी वाढली आहे, असा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी केला. अकोल्यात काँग्रेस नेते हिदायतुल्ला पटेल यांच्या हत्येप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा देण्याची त्यांनी मागणी केली. येथील पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी पटेल यांना श्रद्धांजली वाहून हल्ल्याचा तीव्र निषेध केला. हिंसक गुन्हे, अंमली पदार्थांची […] The post Harshwardhan Sapkal : पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारीत वाढ; प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा आरोप appeared first on Dainik Prabhat .
महाबळेश्वरमध्ये नगराध्यक्षांसह नगरसेवकही ॲक्शन मोडमध्ये; छत्रपती शिवाजी महाराज चौक घेणार मोकळा श्वास
महाबळेश्वर : महाबळेश्वर नगरीतील विस्कटलेली स्वच्छतेची घडी पुन्हा बसवण्यासाठी नगराध्यक्षांनी सहकारी नगरसेवकांसह थेटग्राउंड लेव्हलवर उतरत कारवाईला सुरुवात केली आहे. या मोहिमेची सुरुवात शहरातील महत्त्वाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून करण्यात आली असून, अनेक दिवसांपासून बकाल अवस्थेत असलेला हा एकमेव प्रशस्त चौक आता पुन्हा एकदा उजळणार आहे. या चौकातील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासोबतच नव्याने उभारलेल्या अनधिकृत टपऱ्या तसेच […] The post महाबळेश्वरमध्ये नगराध्यक्षांसह नगरसेवकही ॲक्शन मोडमध्ये; छत्रपती शिवाजी महाराज चौक घेणार मोकळा श्वास appeared first on Dainik Prabhat .
कुत्रा कधी कोणाला चावेल हे सांगणे अशक्य; सुनावणीच्या वेळी खंडपीठाची टिप्पणी
नवी दिल्ली : कुत्र्याच्या मनात नेमके काय चालले आहे आणि तो कधी एखाद्याला चावू शकतो हे सांगणे अशक्य आहे असे भटक्या कुत्र्यांच्या विषयावरील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने शाळा, रुग्णालये, क्रीडा संकुल, […] The post कुत्रा कधी कोणाला चावेल हे सांगणे अशक्य; सुनावणीच्या वेळी खंडपीठाची टिप्पणी appeared first on Dainik Prabhat .
“एकनाथ शिंदे म्हणजे भगव्या आड लपलेला सैतान..”; गुवाहाटीवरुन परतलेल्या नेत्यानेच केला शिंदेंवर हल्ला
Eknath Shinde : राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पुण्यात महायुती अंतर्गत रस्सीखेच सुरू असताना आणि मुंबईत ‘ठाकरे विरुद्ध भाजप-शिंदे’ असा सामना रंगलेला असतानाच, अकोल्यात मात्र प्रचाराची पातळी खालवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत विखारी […] The post “एकनाथ शिंदे म्हणजे भगव्या आड लपलेला सैतान..”; गुवाहाटीवरुन परतलेल्या नेत्यानेच केला शिंदेंवर हल्ला appeared first on Dainik Prabhat .
Vaibhav Suryavanshi Century : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम यूथ वनडे सामन्यात भारताच्या युवा संघाने दमदार कामगिरी केली आहे. भारतीय अंडर-19 संघाचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या बॅटिंगने पुन्हा सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, त्याने दक्षिण आफ्रिका ‘ए’ विरुद्ध केवळ ७४ चेंडूत १२७ धावांची स्फोटक खेळी साकारली. या खेळीत त्याने ९ चौकार आणि १० उत्तुंग […] The post Vaibhav Suryavanshi Century : वर्ल्ड कपपूर्वी वैभवचे वादळ; द. आफ्रिकेविरुद्ध अवघ्या ६३ चेंडूत ठोकले स्फोटक शतक! appeared first on Dainik Prabhat .
बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी काही दिवसांपूर्वी गोंडस बाळाला जन्म दिला होता. आता नुकताच कतरिनाने सोशल मीडियावर एक अतिशय भावूक पोस्ट शेअर करत आपल्या लेकाचे नाव 'विहान कौशल' (Vihaan Kaushal) असल्याचे जाहीर केले आहे.https://prahaar.in/2026/01/07/shocking-incident-papa-im-on-my-period-fathers-heart-remained-unmoved-handed-over-his-beloved-daughter/प्रार्थनांना मिळालं फळ
बँक ऑफ महाराष्ट्राची व्यवसाय आकडेवारी जाहीर तुम्ही हा शेअर खरेदी करावा का? वाचा
मोहित सोमण: बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) बँकेने आपल्या व्यवसायाची आकडेवारी जाहीर केली आहे. मजबूत आकडेवारीनंतर आता जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडने कंपनीच्या शेअरला बाय कॉल (खरेदीचा सल्ला) दिला आहे. बँकेने आपल्या व्यवसायात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १७.२४% वाढ झाल्याचे स्पष्ट केले होते. डिसेंबर २४ मधील ५०७६५० कोटी तुलनेत डिसेंबर २५ मध्ये ५९५१७१ कोटींवर वाढ नोंदवली होती. प्रोविजनल (तात्पुरत्या) आकडेवारीनुसार, बँकेच्या एकूण ठेवीत (Total Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर १५.३०% वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातील २७९००७ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ३२१६९५ कोटींवर वाढ झाली आहे.कासा ठेवीतही (CASA Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर १५.९३% वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट करण्यात आले होते. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या १३७४९४ कोटी तुलनेत या डिसेंबर महिन्यात १५९३९७ कोटींवर वाढ झाली होती. बँकेच्या अँडव्हान्स/कर्ज पुरवठ्यातही वाढ झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये जुळून २२८६४२ तुलनेत या डिसेंबरमध्ये २७३४७६ कोटींवर वाढ नोंदवली आहे.बँकेच्या चांगल्या आकडेवारीनंतर आता जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेड ब्रोकरेजने बँकेच्या शेअरला बाय कॉल दिला आहे. ५४ रूपये रेकोर्ड प्राईज तुलनेत ब्रोकरेजच्या मते शेअरला १९% अपसाईड वाढ मिळू शकते. म्हणजेच जिओजित इन्व्हेसमेंट कंपनीने बँकेच्या शेअरला ६८ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत (Target Price TP) निश्चित केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने आज (७ जानेवारी) रोजी जाहीर केले की, संचालक मंडळाने (Board of Diretors) २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीची संचालक मंडळाची बैठक मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या निवेदनात ही माहिती बँकेने स्पष्ट केली.याविषयी अधिक माहिती देताना,'आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की, बँकेच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे' असे कंपनीने आपल्या फाइलिंगद्वारे स्टॉक एक्सचेंजला कळवले.बँक ऑफ महाराष्ट्रचे संचालक मंडळ या बैठकीत २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे बँकेचे आर्थिक निकाल विचारात घेऊन लाभांश व इतर आर्थिक निर्णयांना मंजुरी देईल असे सांगितले जाते. त्याचवेळी संचालक मंडळ २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अंतरिम लाभांश जारी करण्याच्या प्रस्तावावर विचार करून त्याला मंजुरी देईल जेव्हा ते शेअर बाजारात एक्सचेंज फायलिंगमध्येदेखील स्पष्ट करण्यात येणार आहे.गेल्या पाच दिवसांत बँकेच्या शेअर्समध्ये २.४८% वाढ झाली असून एक महिन्यात १२.६३% वाढ झाली आहे. एक वर्षात बँकेच्या शेअर्समध्ये २३.५५% वाढ झाली आहे तर बँकेच्या शेअर्समध्ये इयर टू डेट बेसिसवर (YTD) २.४८% वाढ झाली आहे. सध्या बँकेचे बाजार भांडवल (Market Capitalisation) हे ४८७८७.५३ कोटी रूपये आहे. जानेवारी २०२६ पर्यंत बँकेचा इंट्राडे उच्चांक ६५.९७ रुपये असून निचांक एप्रिल २०२५ मध्ये ४२ रूपये प्रति शेअर होता.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर कुलाबा परिसरातील वॉर्ड क्रमांक 226 मधील ठाकरे गटाच्या उमेदवार तेजल पवार आणि त्यांच्या कुटुंबाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल नार्वेकर यांनी धमकावून उमेदवारी मागे घेण्याचा दबाव टाकला, तसेच पैशांची ऑफर दिल्याचा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. तेजल पवार आणि त्यांचे […] The post ‘उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं’; राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप appeared first on Dainik Prabhat .
तीव्र वळण ठरले काळ! दुचाकी रस्त्याखाली कोसळल्याने खांडवी येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू
कर्जत : कोंभळी-घोगरगाव रस्त्यावरील कोंभळी पाझर तलावाजवळ असलेल्या तीव्र वळणावर दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात खांडवी (ता. कर्जत) येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे खांडवी परिसरात शोककळा पसरली आहे. सागर तापकीर (वय ३३) आणि सचिन गिरमकर (वय ३७) अशी अपघातात मृत्यू झालेल्या […] The post तीव्र वळण ठरले काळ! दुचाकी रस्त्याखाली कोसळल्याने खांडवी येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
वर्षाअखेर रियल इस्टेट गुंतवणूक ८.५ अब्ज डॉलरवर अर्धा वाटा बंगळूर आणि मुंबईचा!
कोलियर्स इंडिया अहवालातील माहितीमहत्वाचे मुद्दे -देशांतर्गत गुंतवणुकीत दुप्पट वाढ होऊन ती ४.८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली, ज्यामुळे २०२५ मधील संस्थात्मक गुंतवणुकीपैकी ५७% वाटा राहिला.ऑफिस मालमत्तांमधील गुंतवणूक दुप्पट होऊन ४.५ अब्ज डॉलर्स झाली, जी एकूण गुंतवणुकीच्या निम्म्याहून अधिक आहे.२०२५ मध्ये रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीपैकी सुमारे अर्धा वाटा बंगळूर आणि मुंबईचा मिळून आहे.तिमाही भांडवली गुंतवणुकीचा ओघ २०२५ वर्षाच्या चौथ्या तिमाहीत ४.२ अब्ज डॉलर्सवर पोहोचला, जो वार्षिक तुलनेत दुप्पटपेक्षा जास्त वाढ दर्शवतो.गुरुग्राम: भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात संस्थात्मक गुंतवणुकीने २०२५ मध्ये ८.५ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसह एक सर्वकालीन उच्चांक गाठल्याचे कोलियर्स इंडियाने आपल्या अहवालात म्हटले आहे. इयर ऑन इयर बेसिसवर ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत २९% वाढ दर्शवते असे संस्थेने आपल्या रिसर्चमध्ये म्हटले आहे. अहवालातील निष्कर्षानुसार, जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था अधिक चांगल्या स्थितीत आहे अशा वेळी ही वाढ झाली आहे. सध्याच्या अतिरिक्त शुल्क (Tariff) वाटाघाटींच्या पार्श्वभूमीवरही व्यापारात सामान्य स्थितीची चिन्हे दिसत आहेत. याव्यतिरिक्त अहवालाने आपल्या निरिक्षणात नोंदवले आहे की,भारताच्या वाढीच्या शक्यता आणि विस्तारणारी गुंतवणुकीचा परिघ, तसेच भारताच्या रिअल इस्टेटसह सर्व आर्थिक क्षेत्रांमध्ये जागतिक भांडवलासाठी एक प्रमुख गंतव्यस्थान म्हणून भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित होत आहे.रिअल इस्टेट क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक (Capital Expenditures) वाढत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात घर व जागांच्या मागणीत वाढ होत असल्याचे आपण विविध अहवालात पाहिले होते. याच आधारावर आर्थिक वर्ष २०२५ मध्ये देशांतर्गत संस्थात्मक भांडवल हे रिअल इस्टेट गुंतवणुकीचे मुख्य चालक (Growth Driver) म्हणून उदयास आले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे ज्यात गुंतवणुकीचा ओघ वार्षिक तुलनेत दुप्पट होऊन ४.८ अब्ज डॉलर्सवर पोहोचला असून जो वर्षातील एकूण गुंतवणुकीच्या ५७% होता असेही अहवालात म्हटले गेले.आणखी एक महत्वाचे निरीक्षण म्हणजे देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या सहभागातील ही वाढ भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांमधील वाढता आत्मविश्वास सातत्याने वाढवत आहे. मालमत्तेची सुधारलेली गुणवत्ता, स्थिर परतावा आणि अधिक बाजार पारदर्शकतेचा आधार मिळाला असल्याने रियल इस्टेट स्तरावर मोठी वाढ होत आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये परदेशी भांडवलाची गुंतवणूक वार्षिक तुलनेत १६% कमी होऊन ३.७ अब्ज डॉलर्स झाली असली तरी शेवटच्या तिमाहीत आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीत सुधारणेची चिन्हे दिसली, जी जागतिक गुंतवणूकदारांच्या भावनांमध्ये हळूहळू सुधारणा दर्शवते.आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारतीय रिअल इस्टेटमधील प्रायव्हेट इक्विटी गुंतवणुकीने ८.५ अब्ज डॉलर्सच्या एकूण गुंतवणुकीसह एक नवीन उच्चांक गाठला, ज्याला वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत झालेल्या विक्रमी भांडवली गुंतवणुकीचा आधार मिळाला. केवळ २०२५ वर्षाच्या चौथ्या तिमाहीत ४.२ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली, जी कोणत्याही तिमाहीतील आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक आहे आणि या क्षेत्रातील संभाव्य सकारात्मक वाढीचे संकेत देते.जर कार्यालयीन मालमत्तेचा परिघ पाहिल्यास या वर्षात, कार्यालयीन मालमत्तांनी गुंतवणुकीचा मोठा वाटा आकर्षित करणे सुरूच ठेवले असल्याचे अहवालातील आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. उदाहरणार्थ यावर्षी वार्षिक गुंतवणुकीत इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ५४% वाढ झाली असून यानंतर निवासी आणि औद्योगिक व वेअरहाउसिंग मालमत्तांचा क्रमांक लागल्याचे अहवाल सांगतो. भविष्यात, वाढत्या देशांतर्गत भांडवल, जागतिक जोखीम घेण्याच्या वृत्तीत सुधारणा आणि भारताच्या मजबूत आर्थिक मूलभूत तत्त्वांमुळे संस्थात्मक गुंतवणूक आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे.याविषयी अधिक बोलताना, 'कोलिअर्स इंडिया'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक बादल याज्ञिक म्हणाले, मुख्य उत्पन्न-निर्माण करणाऱ्या मालमत्ता, विशेषतः कार्यालये, औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क आणि निवासी विभाग, २०२६ मध्ये गुंतवणूकदारांसाठी प्राधान्याचे क्षेत्र राहतील.'२०२५ मध्ये गुंतवणुकीत कार्यालयीन विभागाचा ५४% वाटा राहिला, त्यानंतर निवासी मालमत्तांचा क्रमांक लागतो. भारतीय कार्यालयीन बाजारपेठेत विक्रमी गुंतवणूक झाली, २०२५ मध्ये ४.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित झाली, जी २०२४ च्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. याला देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या वाढत्या सहभागाचा आधार मिळाला. विशेष म्हणजे, केवळ शेवटच्या तिमाहीत वार्षिक भांडवली गुंतवणुकीच्या जवळपास दोन-तृतीयांश गुंतवणूक झाली आणि त्याच वेळी देशातील प्रमुख कार्यालयीन बाजारपेठांमध्ये 'ग्रेड ए' जागेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली.निवासी विभागाने कार्यालयीन विभागाचे अनुसरण केले असून २०२५ मध्ये १.६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली, ज्यात वार्षिक ३६% वाढ नोंदवली गेली आणि एकूण गुंतवणुकीत १८% वाटा राहिला.या विभागातील भांडवली गुंतवणुकीला मजबूत दीर्घकालीन मागणीच्या मूलभूत तत्त्वांचा आधार मिळत आहे, ज्यात अनुकूल लोकसंख्याशास्त्र, वाढते उत्पन्न आणि संयुक्त-उद्यमी मंचांद्वारे टियर II शहरांमध्ये विकासकांचा वाढता विस्तार यांचा समावेश आहे, ज्यामुळे देशांतर्गत आणि परदेशी दोन्ही गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. दरम्यान, मिश्र वापर, किरकोळ विक्री आणि पर्यायी मालमत्तांमध्येही लक्षणीय वाढ दिसून आली, ज्यांची एकूण रक्कम सुमारे १.५ अब्ज डॉलर्स होती आणि २०२५ मधील एकूण गुंतवणुकीपैकी जवळपास १७% वाटा होता. या क्षेत्रांमधील गुंतवणूकदारांची आवड पोर्टफोलिओ डायव्हरसिफिकेशन आणि ऐंड युजर (वापरकर्त्यांच्या) मागणीवर आधारित मालमत्तांवर वाढत्या लक्षामुळे प्रेरित आहे असे अहवाल सांगतो. खासकरून डेटा सेंटर्स, को-लिव्हिंग, सेकंड होम्स इत्यादी जागांच्या मागणीत व्यापक वाढत सातत्याने होत आहे.याशिवाय या व्याप्तीवर भाष्य करताना भारतीय कार्यालयीन बाजारपेठेने २०२५ मध्ये नवीन उच्चांक गाठला आहे ज्यामुळे संस्थात्मक गुंतवणुकीच्या रूपात विक्रमी ४.५ अब्ज डॉलर्स आकर्षित झाले आहेत. विशेष म्हणजे, या वाढीसोबतच, या वर्षात चौथ्या कार्यालय-केंद्रित REIT ची सूची आणि जुन्या REITs द्वारे लक्षणीय अधिग्रहणे झाली आहेत जी उत्कृष्ट भाडेकरू गुणवत्ता, आणि मजबूत भाडेवाढीने वैशिष्ट्यीकृत होती. गुंतवणुकीला मिळणारा प्रतिसाद मजबूत परिचालन कामगिरी आणि गेल्या ३-४ वर्षांतील सलग विक्रमी ग्रेड ए जागेच्या मागणीमुळे समर्थित आहे. पुढे पाहता, ३७० दशलक्ष चौरस फुटांपेक्षा जास्त विद्यमान कार्यालयीन जागा भविष्यातील REITs मध्ये समाविष्ट होण्याची क्षमता असल्याने, आम्हाला पुढील काही वर्षांत सीमापार भांडवली प्रवाहाद्वारे समर्थित संस्थात्मीकरण आणि एकत्रीकरणाची मोठी पातळी अपेक्षित आहे' असे कोलियर्स इंडियाचे राष्ट्रीय संचालक आणि संशोधन प्रमुख विमल नाडर म्हणाले.२०२५ मध्ये बंगळूर आणि मुंबई मिळून रिअल इस्टेटमधील जवळपास अर्ध्या गुंतवणुकीला चालना देतीलअहवालातील माहितीनुसार, मोठ्या कार्यालयीन व्यवहारांच्या नेतृत्वाखाली, बंगळूर आणि मुंबईने २०२५ मध्ये एकूण गुंतवणुकीपैकी जवळपास अर्धा वाटा आकर्षित केला, ज्यात अनुक्रमे सुमारे २.२ अब्ज डॉलर्स आणि १.८ अब्ज डॉलर्सचा निधी ओघ आला. या शहरांमधील एकूण ४.० अब्ज डॉलर्सच्या निधी ओघापैकी, कार्यालयीन मालमत्तांनी गुंतवणुकीच्या जवळपास तीन-चतुर्थांश भागाला चालना दिली. विशेष म्हणजे,सात प्रमुख भारतीय शहरांपैकी पाच शहरांमध्ये २०२५ मध्ये भांडवली ओघात वार्षिक वाढ दिसून आली. दरम्यान, २०२५ दरम्यान झालेल्या २.३ अब्ज डॉलर्सची विविध शहरातील गुंतवणुकीपैकी, ४०% पेक्षा जास्त गुंतवणूक निवासी मालमत्तांमध्ये होती असे निरिक्षण अहवालाने नोंदवले आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील निवासी प्रकल्पांमध्ये गुंतवणूकदारांची वाढती आवड आणि उदयोन्मुख टियर II/III शहरांसह नवीन निवासी बाजारपेठांमधील विस्ताराचे प्रतिबिंब दर्शवते असेही अहवालाने अंतिमतः स्पष्ट केले.
चिक्कमगलुरु : समाजात वडिलांना मुलीचे संरक्षक मानले जाते, मात्र कर्नाटकातील चिक्कमगलुरु जिल्ह्यातून पितृत्वाला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधम पित्याने पैशांच्या हव्यासापोटी आपल्या अल्पवयीन मुलीचा सौदा करून तिला वेश्यावृत्तीच्या विळख्यात ढकलले. विशेष म्हणजे, या घृणास्पद गुन्ह्यात मुलीच्या सख्ख्या आजीनेही सैतानाला साथ दिल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी या प्रकरणी वडील आणि आजीसह एकूण १२ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.शिक्षणाची ओढ, पण नियतीचा क्रूर खेळपीडित मुलगी बिरूर येथील रहिवासी असून, काही दिवसांपूर्वीच तिच्या आईचे निधन झाले होते. आईच्या पश्चात ती आपल्या नातेवाईकांकडे राहून जिद्दीने शिक्षण घेत होती. पीयूसी (१२ वी) पूर्ण केल्यानंतर, वडिलांचा आधार मिळेल या आशेने ती आपल्या घरी परतली. मात्र, ज्या घराकडून तिला संरक्षणाची अपेक्षा होती, तिथेच तिच्या शोषणाचा कट रचला जात होता. तिच्या स्वतःच्या वडिलांनी आणि जवळच्या नातेवाईकांनी मिळून तिला वेश्यावृत्तीच्या व्यवसायात ढकलले. या नराधम पित्याने मुलीला अमानवीय कृत्ये करण्यास भाग पाडले. मुलीने वारंवार नकार दिला, रडून विनवणी केली, मात्र पैशांच्या मोहात आंधळ्या झालेल्या पित्याने पोटच्या मुलीचा टाहो ऐकला नाही. अखेर या अत्याचाराची माहिती समोर येताच पोलिसांनी तपास चक्रे फिरवून या 'सॅक्स रॅकेट'चा पर्दाफाश केला. पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांना अटक केली असून, या घटनेमुळे संपूर्ण कर्नाटक राज्यात संतापाची लाट उसळली आहे.https://prahaar.in/2026/01/07/alarm-bells-in-the-bay-of-bengal-china-pakistan-and-bangladesh-are-making-moves-against-india/फक्त ५ हजारांसाठी पित्याने मुलीला विकलंडिसेंबर महिन्याचा तो काळ पीडित मुलीसाठी काळरात्र ठरला. तिचे वडील तिला घेऊन आजीकडे गेले होते. दोन दिवस तिथे राहून पुन्हा घरी परतायचं असं मुलीला वाटलं होतं. पण त्या दोन दिवसांच्या मुक्कामात आजी आणि वडिलांनी मिळून तिच्या आयुष्याचा सौदा आधीच पक्का केला होता. तिथेच त्यांची भेट भरत शेट्टी नावाच्या एका दलालाशी झाली. त्याने बापाला पैशांचं अमिष दाखवलं आणि तिथूनच या मुलीच्या छळाला सुरुवात झाली. भरत शेट्टीने वडिलांना असं पटवून दिलं की, जर तुझी मुलगी या धंद्यात आली, तर ती दररोज ५ हजार रुपये सहज कमवेल. पैशांच्या आकड्यांनी या बापाचे डोळे इतके दिपले की, त्याला आपल्या लेकीचा चेहराही दिसला नाही. पोटच्या पोरीच्या सन्मानापेक्षा त्याला तो '५ हजार रुपयांचा रोज' मोठा वाटला.मंगळुरु नेले आणि दोन दिवस नको ते घडलंआरोपी वडील आपल्या मुलीसह भरत शेट्टीसोबत मंगळुरुला गेले. रस्त्यात मुलीने वडिलांना सांगितले की ती मासिक पाळीमध्ये (Periods) आहे आणि आजारी आहे. पण लालची वडिलांचे हृदय पाझरले नाही. दुसऱ्या दिवशी भरत शेट्टीने मुलीला धमकावले की काही लोक येतील आणि तिला त्यांच्यासोबत संबंध ठेवावे लागतील.पीडितेने पोलिसांना काय-काय सांगितले? २० ते ४५ वर्षे वयाच्या चार पुरुषांनी तिच्यासोबत वारंवार बलात्कार केला. जेव्हा मुलीने विरोध केला आणि आपले वय सांगून सोडण्याची भीक मागितली, तेव्हा आरोपींनी तिचे एकही ऐकले नाही. आरोपी भरत शेट्टीला पैसे देऊन ते सतत दोन दिवस पीडितेचा लैंगिक शोषण करत राहिले.हिम्मत गोळा करून अल्पवयीनने पोलिसांत तक्रार दाखल केली, ज्यानंतर पोलिसात खळबळ उडाली. पोलिसांनी जलद कारवाई करत पीडितेचे वडील, आजी आणि मुख्य आरोपी भरत शेट्टीसह एकूण १२ लोकांना अटक केली आहे. तपासात समोर आले आहे की भरत शेट्टी दक्षिण कन्नड जिल्ह्यात देह व्यापाराचे मोठे नेटवर्क चालवतो. भारत शेट्टीवर मंगळुरु आणि उडुपीमध्ये यापूर्वीच वेश्यावृत्तीचे ८ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. पोलिस आता या टोळीशी संबंधित इतर लोकांच्या शोधात छापेमारी करत आहेत.
Nanded Crime :“नांदेड गुन्हा: पत्नी दूर गेल्याने पती निराश; बालकासह आत्मघाताचा प्रकार”
नांदेड :आजकाल दिवसेंदिवस राज्यभर आत्महत्येचे प्रकार वाढताणा दिसत आहेत..कोणी नैराश्यातून जीवन संपवतयं तर कोणी वाद विवादामधून जीवन संपवतयं तसाच काही नांदेडमध्ये हा प्रकार घडला आहे..पत्नी माहेरी एकटी रहायला गेल्यामुळे सोबत न राहत असल्यामुळे पतीने त्याच्या दोन मुलांसह विहीरीत उडी मारत आपल जीवन संपवल. नांदायला येत नसल्यानं पतीने टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. विक्रम सुरेश मारशेटवार (वय ३०) आणि शिवाजी विक्रम मारशेटवार (वय २ वर्ष) असं मयत पिता-पुत्राचं नाव आहे. यादरम्याण या घटनेमुळे आजुबाजुच्या परिसरात वेगळीच खळबळ उडली आहेमंगळवारी सकाळी घटना उघडकीससोमवारपासून दोघेही बेपत्ता असल्याने कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. मंगळवारी सकाळी गावातील काही नागरिक शेताकडे गेले असता, त्यांना विहिरीच्या पाण्यात दोन मृतदेह तरंगताना दिसले. ही माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच सिंदखेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पोलीस तपास सुरू..!पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह विहिरीबाहेर काढले. त्यानंतर दहेली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून, गावात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, ठाणेदार रमेश जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत.पत्नीच्या विरहामुळे एका हसत्याखेळत्या संसाराचा असा करुण अंत झाल्याने दहेली गावावर शोककळा पसरली आहे.
Ajit Pawar : असले 56 अजित पवार मी खिशात घेऊन फिरतो; ‘या’नेत्याची जहरी टीका
Ajit Pawar : एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत जोरदार भाषण केले. या सभेत त्यांनी पक्षातील नाराजी, प्रदेश कार्याध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या राजीनाम्याचा मुद्दा, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह सत्ताधारी नेत्यांवर तीव्र टीका केली. एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष फारूक शाब्दी यांनी अलीकडे पक्षाचा राजीनामा दिला आहे. […] The post Ajit Pawar : असले 56 अजित पवार मी खिशात घेऊन फिरतो; ‘या’ नेत्याची जहरी टीका appeared first on Dainik Prabhat .
Car Loan: नवीन वर्षात स्वतःची कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. २०२६ च्या सुरुवातीलाच बँकिंग क्षेत्रात कार लोनसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळत असून, काही नामांकित सरकारी बँका अवघ्या ७.४० टक्के इतक्या अत्यल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देत आहेत. खाजगी बँकांच्या तुलनेत सरकारी बँकांनी ग्राहकांना स्वस्त कर्जाचा पर्याय दिल्याने ग्राहकांची मोठी बचत होणार […] The post Car Loan: नवीन कार घेताय? फक्त 7.40% व्याजाने मिळवा कार लोन; 10 लाखांच्या कर्जावर किती असेल EMI? वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .
Stock Market: भारतीय शेअर बाजारातील घसरणीचे सत्र आज बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिले. जागतिक बाजारातून मिळणारे कमकुवत संकेत आणि गुंतवणूकदारांनी केलेली नफेखोरी यामुळे बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज १०२.२० अंकांनी म्हणजेच ०.१२ टक्क्यांनी घसरून ८४,९६१.१४ अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्येही ३७.९५ अंकांची म्हणजेच ०.१४ […] The post Stock Market: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशीही घसरण सुरूच, आज ‘या’ शेअर्समुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान appeared first on Dainik Prabhat .
BJP Congress Alliance : भाजपशी हातमिळवणी भोवली; काँग्रेसचे 12 नगरसेवक निलंबित, नेमकं काय घडलं?
BJP Congress Alliance : अंबरनाथ नगरपरिषदेत सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाशी युती करणे काँग्रेसच्या नगरसेवकांना चांगलेच महागात पडले आहे. पक्षविरोधी कारवाया आणि भाजपशी हातमिळवणी केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने अंबरनाथमधील सर्व 12 नगरसेवकांना तात्काळ निलंबित केले आहे. यासोबतच स्थानिक ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली असून, या कठोर निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नेमकं […] The post BJP Congress Alliance : भाजपशी हातमिळवणी भोवली; काँग्रेसचे 12 नगरसेवक निलंबित, नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. यशवंत वर्मा यांनी लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्याविरुद्ध स्थापन केलेल्या चौकशी समितीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. न्या. वर्मा यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, न्यायाधीश (चौकशी) कायदा, १९६८ अंतर्गत, जर एखाद्या न्यायाधीशाविरुद्ध महाभियोग प्रस्ताव […] The post Yashwant Varma : लोकसभा अध्यक्षांची चौकशी समिती बेकायदा; न्या. यशवंत वर्मा यांचा सर्वोच्च न्यायालयात दावा appeared first on Dainik Prabhat .
छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदारांच्या गाडीवर हल्ला; जलील यांनी ‘या’दोघांची घेतली नावं
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडालेला असतानाच, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज बायजीपुरा-जिन्सी भागात घडली. संतप्त जमावाने धावत्या वाहनातून जलील यांना बाहेर काढून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर लाठीमार केला आहे. […] The post छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदारांच्या गाडीवर हल्ला; जलील यांनी ‘या’ दोघांची घेतली नावं appeared first on Dainik Prabhat .
शेअर बाजारात 'Buy on Dips'? अस्थिरतेमुळे सेन्सेक्स १०.२० अंकाने व निफ्टी ३७.९५ अंकाने कोसळला
मोहित सोमण: अखेर आज सलग सहाव्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स १०.२० अंकाने घसरत ८४९६१.१४ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी ३७.९५ अंकाने घसरत २६१४० पातळीवर स्थिरावला आहे. बँक निर्देशांकातही आज घसरण झाली आहे. आजही बाजारात गुंतवणूकदारांनी खरेदीत आपला कल वाढवला असल्याने दुसरीकडे बाजारातील सेल ऑफ वाढल्याचे स्पष्ट झाले. फंडामेंटली बाजारात स्थिरता असली तरी तांत्रिकदृष्ट्या बाजारात कंपनीच्या तिमाही निकाला दरम्यान अस्थिरता किरकोळ प्रमाणात वाढल्याने बाजार सपाट पातळीपेक्षा किरकोळ वाढीने घसरले आहे. अखेरच्या सत्रातही बँक,ऑटो, रिअल्टी, पीएसयु बँक, तेल व गॅस या शेअर्समध्ये घसरण झाली असली तरीही आयटी, केमिकल्स, मिड स्मॉल आयटी टेलिकॉम, कंज्यूमर ड्युरेबल्स, फार्मा या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे बाजारातील निर्देशांकात घसरण मर्यादित राहिली आहे. नफा बुकिंग होत असताना विशेषतः लार्जकॅप शेअरसह मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये खरेदी वाढल्याचे तेजीच्या निर्देशांकावरून स्पष्ट झाले. युएस व्हेनेझुएला यांच्यातील परिणाम म्हणून बाजार आजही अस्थिरता कायम होती. गेल्या दोन दिवसात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली विक्री सुरूच ठेवल्याने बाजारातील कंसोलिडेशन सुरु राहू शकते असे दिसते.आतापर्यंत जानेवारी महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) ३१२२.७० कोटींची विक्री केली असून घरगुती गुंतवणूकदारांनी ५६१६ कोटींची खरेदी केली आहे. आजही विक्री कायम राहिल्याने बाजारातील सपोर्ट लेवलला धक्का बसला आहे. अखेरच्या सत्रात कमोडिटीतील चढउतार मोठ्या प्रमाणात होत असताना रूपया बाबतीत डॉलरच्या तुलनेत १६ पैशांनी पुनरागमन केल्याने बाजारात काहीसा आधार मिळाला खासकरून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली विक्री मर्यादित ठेवली होती. आशियाई बाजारातही अखेरच्या सत्रात अस्थिरतेचा संमिश्र कल कायम राहिला आहे.आशियाई बाजारात गिफ्ट निफ्टीसह निकेयी २२५, हेगसेंग, तैवान वेटेड अशा बाजारातील निर्देशांकात घसरण झाली असली तरी कोसपी,स्ट्रेट टाईम्स, जकार्ता कंपोझिट, सेट कंपोझिट या बाजारातील निर्देशांकात वाढ झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात तिन्ही बाजारात तेलाच्या सकारात्मकतेमुळे वाढ झाल्याचे दिसते. केएसबी (४०१.९३%), टाटा इलेक्सी (९.५०%), सारेगामा इंडिया (६.७६%), सोनाटा सॉफ्टवेअर (६.०३%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण सिप्ला (४.११%), एम अँड एम फायनांशियल सर्विसेस (३.८३%), सन टीव्ही नेटवर्क (३.४४%), ओला इलेक्ट्रिक (२.९१%), मारूती सुझुकी (२.७९%), झेड एफ कर्मशिअल (२.७३%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,' दैनंदिन चार्टवर निर्णायक घसरत्या ट्रेंडलाइनचा ब्रेकआउट दिल्यानंतर, निर्देशांक सध्या उच्च स्तरांवर स्थिरावत आहे. मोमेंटम इंडिकेटर्स (गती निर्देशक) अनुकूल आहेत, आणि RSI मध्ये तेजीचा क्रॉसओवर दिसून येत आहे. तासाभराच्या चार्टवर, निर्देशांक त्याच्या ५० SMA (Simple Moving Average SMA) पातळीच्या वर टिकून आहे, जो एक मजबूत आधार क्षेत्र (Strong Support Zone) म्हणून काम करत आहे. एकूणच, चार्टची रचना तेजीचा कल दर्शवते.जोपर्यंत निर्देशांक ५९३०० पातळीच्या पातळीच्या वर टिकून राहतो, तोपर्यंत 'घसरणीच्या वेळी खरेदी करा' (बाय-ऑन-डिप्स) ही रणनीती अवलंबली जाऊ शकते. निर्देशांकासाठी तात्काळ आधार ५९७०० पातळीवर आहे, तर प्रतिकार ६०५०० च्या पातळीजवळ दिसून येत आहे.'आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक दिलीप परमार म्हणाले आहेत की,'भारतीय रुपयाने डिसेंबरच्या मध्यापासूनची सर्वात मोठी एका सत्रातील वाढ नोंदवली आणि डॉलरच्या मागणी-पुरवठ्यातील असंतुलन असूनही तो प्रादेशिक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारा ठरला. ही तेजी प्रामुख्याने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या धोरणात्मक हस्तक्षेपाने प्रेरित झाली होती, कारण आरबीआयने परदेशी भांडवलाच्या सततच्या बहिर्वाहाचा परिणाम निष्प्रभ करण्यासाठी आक्रमक पावले उचलली.अमेरिका-भारत शुल्क करारांमध्ये होत असलेल्या विलंबामुळे बाजारातील भावना संवेदनशील राहिल्या आहेत, ज्यामुळे देशांतर्गत रुपयावर सतत दबाव येत आहे. तथापि, गेल्या दोन दिवसांत आरबीआयने चलनाचे केलेले सक्रिय संरक्षणामुळे, मजबूत होत असलेल्या डॉलरच्या तुलनेत रुपयाला आवश्यक आधार मिळाला आहे.तांत्रिक दृष्टिकोनातून, स्पॉट USDINR साठी ८९.४० रूपयांवर आधार आणि ९०.३० रूपयांवर प्रतिरोध (Resistance) आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,२६ च्या तिसऱ्या तिमाहीतील उत्पन्न आणि अमेरिकेतील महत्त्वाच्या नोकऱ्यांच्या आकडेवारीपूर्वी जोखीम-ऑफच्या प्रभावामुळे देशांतर्गत बाजारातील भावना सावध राहते. तिमाहीतील कॉर्पोरेट उत्पन्नात सुधारणा होण्याची अपेक्षा असताना, जागतिक व्यापार अनिश्चिततेमध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs) अजूनही जोखीम घेण्यास तयार नाहीत. ऑटो आणि वित्तीय क्षेत्रातील नफा-बुकिंग निर्देशांकांना वजन देते, जरी आयटी, फार्मा आणि मिडकॅप्समध्ये निवडक खरेदीने काही प्रमाणात मदत केली. जागतिक गुंतागुंतीत भर घालत, दुर्मिळ पृथ्वीवरील चीनच्या निर्यात निर्बंधांमुळे पुरवठा साखळीतील जोखीम वाढतात. या मॅक्रो पार्श्वभूमीवर, इक्विटीज श्रेणीबद्ध राहण्याची शक्यता आहे. लार्ज-कॅप थीमवर लक्ष केंद्रित केलेली बाय-ऑन-डिप्स रणनीती विवेकपूर्ण दिसते.'
समंथाचे पुन्हा कमबॅक! अॅक्शन चित्रपटाचे दमदार पोस्टर समोर
Samantha : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने ‘सिटाडेल हनी बनी’ आणि ‘फॅमिली मॅन २’ या लोकप्रिय वेबमालिकेत आपल्या अभिनयाची चूनक दाखविल्यानंतर ती आता एका अॅक्शन चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. “माँ इंती बंगाराम” या चित्रपटात समंथा झळकणार असून, चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. या पोस्टरमधून अभिनेत्री समंथाच्या पात्राची झलक दाखविण्यात आली आहे. समंथा रुथ प्रभू […] The post समंथाचे पुन्हा कमबॅक! अॅक्शन चित्रपटाचे दमदार पोस्टर समोर appeared first on Dainik Prabhat .
बंगालच्या खाडीत धोक्याची घंटा; चीन, पाकिस्तान, बांग्लादेशची भारताविरोधात हालचाल
नवी दिल्ली : सध्याच्या बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे भारताच्या सुरक्षिततेसमोर नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. पाकिस्तानसोबत भारताचे संबंध कायमच तणावपूर्ण राहिले असून, चीनसोबतही सीमारेषेवर वेळोवेळी संघर्षाची स्थिती निर्माण होतच असते. अमेरिकेने चीनवर लादलेल्या टॅरिफनंतर भारत-चीन संबंधांमध्ये काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचे काही का दिसले होते. मात्र, ही सुधारणा केवळ राजनैतिक चर्चांपुरतीच मर्यादित राहिल्याचे आता स्पष्टपणे दिसून येत आहे.सीमेवर भारतावर दबाव कायम ठेवण्याची रणनीती चीनकडून सुरूच असून, आता त्याचे प्रतिबिंब सागरी क्षेत्रातही दिसू लागले आहे. बंगालच्या खाडीत आजवर भारताचे वर्चस्व राहिले असले, तरी चीन आणि पाकिस्तान एकत्र येऊन घुसखोरी करून या भागात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. चीनकडून सातत्याने बंगालच्या उपसागरात युद्धनौका पाठवल्या जात असून, पाकिस्तानलाही चीनकडून पाठिंबा मिळत आहे. त्यातच आता बांगलादेशही या समीकरणात सक्रिय होत असल्याने भारताची चिंता आणखीणच वाढली आहे.मागील काही काळापासून चीनने बंगालच्या उपसागरात आपला प्रभाव वाढवण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. या भागात चिनी नौदलाची सर्वेक्षण जहाजे, गुप्तचर जहाजे तसेच पाणबुड्यांची सतत वर्दळ दिसून येत आहे. फ्रान्समधील गुप्तचर संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, एक चिनी संशोधन जहाज भारतीय सागरी हद्दीजवळ बंगालच्या उपसागरात सक्रिय असल्याचे आढळून आले.यामुळे संरक्षण यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.चीनच्या वाढत्या हेरगिरीमुळे सागरी सुरक्षेबाबत भारताची चिंता वाढतच चालली आहे. फ्रिगेट आणि सहाय्यक जहाजांसह पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीची जहाजे अंदमान समुद्रातून पुढे सरकत असल्याचे निरीक्षणात आले आहे. याशिवाय चीनने बांगलादेश नौदलाला आधीच दोन पाणबुड्या पुरवल्या असून, बंगालच्या उपसागरातील चिनी रणनीतीत बांगलादेश महत्त्वाचा घटक ठरत आहे. हे निश्चितया सर्व घडामोडींवर भारत सरकार आणि संरक्षण यंत्रणांचे बारकाईने लक्ष आहे. भारत शांतपणे परिस्थितीकडे पाहत नसून, संभाव्य धोक्यांचा सखोल आढावा घेत तयारीही करत आहे. याच पार्श्वभूमीवर २३ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय नौदलाने बंगालच्या उपसागरात अणुशक्तीवर चालणाऱ्या आयएनएस अरिहंत पाणबुडीतून के-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती.तसंच भारतीय नौदल पश्चिम बंगालमधील बांगलादेश सीमेजवळ असलेल्या हल्दिया येथे नवीन सागरी तळ उभारण्याच्या तयारीत आहे. या पायाभूत सुविधांमुळे पूर्व किनाऱ्यावरील भारताची सागरी क्षमता अधिकच मजबूत होणार आहे.एकीकडे चीनकडून सातत्याने कुरापती सुरू असताना, दुसरीकडे भारतही कोणतीही तडजोड न करता सज्ज होत असल्याचे चित्र आहे. बंगालच्या खाडीत सध्या घडामोडींना वेग आला असून, येत्या काळात या सागरी पट्ट्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागण्याची शक्यता आहे.
धुरंधर पार्ट २ लवकरच होणार रिलीज; अखेर तो दिसणार की नाही?
Dhurandhar 2 Big Entry : धुरंधर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटाने तूफान कामगिरी करत केली असून अनेक रेकॉर्डस तोडलेत. ३३ व्या दिवशी चित्रपाटने ४ कोटींचा बिझनेस केला आहे.आणि आता प्रेक्षकवर्ग हा या चित्रपटाच्या पार्ट २ ची वाट पहात आहे. या चित्रपाटाचा पार्ट २ हा १९ मार्चला रिलीज होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकवर्ग खूप उत्सुक आहे.रणवीर सिंहच्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १२४० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने भारतात आतापर्यंत ७८१ कोटींची कमाई केली आहे.पाचव्या मंगळवारी, चित्रपटाने ४.७५ कोटी कमावले. याच दरम्यान आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.रणवीर सिंगच्या धुरंधर या चित्रपटाचा दुसरा भाग १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.चित्रपटाची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. पहिल्या भागात शानदार अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणारा अक्षय खन्ना मातर या चित्रपटात दिसणार नाहीय पहिल्या भागत रेहमान डकैतचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यत आलं होतं. त्यामुळे त्याची भूमिका तिथेच संपली.पण सिक्वेलमध्ये एक अशी नवीन एन्ट्री आहे जी पाहून तुम्हीही खुश व्हाल. हाच तो माणूस आहे ज्याने अक्षय खन्नाला चमकवले.या चित्रपटाची कथा आणि कलाकारांव्यतिरिक्त,इंटरनेटवर आता सर्वात जास्त लोकप्रिय असलेल्या गोष्टी म्हणजे त्यातले संवाद आणि गाणीही.धुरंधरचित्रपटात अक्षय खन्नाचवर शूट झालेलं Fa9la हे गाणं जाम गाजतंय,प्रत्येकाच्या तोंडी त्याची धून आहे. लोकांनी त्यावर अनेक व्हिडीओही बनवले आहे, हे गाणं खूप ट्रेडिंगमध्ये आहे. आता याचा गाण्याच्या क्रिएटरने तगडी हिंट दिली आहे.चित्रपटात अक्षय खन्नावर जे गाणं शूट झालं,ते Fa9la गाणं बहरीन गायक -प्रोड्युसर फ्लिपेराची याने गायलं होतं. त्याचं खरं नाव हुसाम असीम आहे. Fa9la ला जो रिस्पॉन्स मिळाला,त्याने तो खूप आनंदी आहे.आणि हे गाणं धुरंधर २ मध्ये परत वाजू शकतं. हे गाणं Fa9la चित्रपटात दिसल्यापासून त्याचं आयुष्य बदलल्याचं त्याने सांगितलं.खरं सांगायचं तर,ते अद्भुत आहे.मला दररोज हजारो मेसेज येतात.हे खूप शानदार आहे अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.'धुरंधर'च्या दुसरा पार्ट येण्याची आधीच घोषणा झाली असताना इतर कोणतं गाण पिक्चरमध्ये असेल का असा सवाल फ्लिपेराची याला विचारण्यात आला. तेव्हा त्याने स्पष्ट उत्तर दिलं नाही.पण त्याने ती शक्यता नाकारली देखील नाही. तो म्हणाला - खरंतर काहीही घडू शकतं ना. मी याबद्दल सरप्राईज ठेवणार होतो,पण असं काही घडू शकतं.त्यामुळे धुरंधर पार्ट २ मध्ये फ्लिपराचीचं दुसरं एखादं गाणं येतं का,ते कोणाच्या एंट्रीसाठी वाजेल,अशी उत्सुकता चाहत्यांच्या मनात आहे. या चित्रपटाची लोकं आतुरतेने वाट पहात आहेत.
Kartik Aaryan: बॅालीवुडमधील आपल्या भन्नाट अभिनयामुळे ओळखला जाणारा अभिनेता कार्तिक आर्यन आणि सोनु की टिटु की स्विटी या चित्रपटामुळे तो सर्वाधीक जास्त प्रसिध्द झाला.पण हाच अभिनेता नुकताच सोशल मिडीयावर चर्चेत आलाय.कारण असं की अभिनेता कार्तिक आर्यनचा गोवा मधील फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यानंतर त्याला एका “मिस्ट्री गर्ल” शी जोडून चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेने इंटरनेटवर जोरदार उत्सुकता निर्माण केली, परंतु आता मिस्ट्री गर्ल करिना नावाची तरुणी आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये स्पष्टपणे म्हणाली की ती कार्तिकची गर्लफ्रेंड नाही.अनेक युझर्सनी फोटोचे विश्लेषण करून दाखवले की, दोन्ही फोटोंमध्ये समुद्रकिनाऱ्यावरील लाउंजर्स, टॉवेल पॅटर्न आणि व्हॉलीबॉल कोर्ट सारखे बॅकग्राउंड साम्य आढळले. रेडिट थ्रेडवर स्क्रीनशॉट व्हायरल झाले आणि अनेकांनी असा दावा केला की कार्तिक आणि करिना एकत्र सुट्टीवर आहेत.कारिनाने इंस्टाग्राम बायो अपडेट करून स्पष्ट केले, “मी कार्तिकला ओळखत नाही, मी त्याची गर्लफ्रेंड नाही, मी माझ्या कुटुंबासह सुट्टीवर आहे.” या स्पष्टीकरणानंतर ऑनलाइन चर्चेला थांबवण्याचा प्रयत्न झाला.सोशल मीडियावर कार्तिकशी नाव जोडल्यामुळे करिनाचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ५ जानेवारीला तिचे फॉलोअर्स १,९२६ होते, तर ७ जानेवारी २०२६ रोजी हे १३ हजारांवर पोहोचले आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टवर आता मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.विशेष म्हणजे, करिना १७ वर्षांची असून, कार्तिकशी तिचे वयाचे अंतर सुमारे १७-१८ वर्ष आहे. कार्तिकने अद्याप या चर्चेला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, परंतु सोशल मीडियावर त्यांचे नाव जोडल्यामुळे करिनाची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे.या घटनेमुळे कार्तिक आर्यन आणि करिनाच्या फोटोंभोवती सोशल मीडियावर खळबळ उडाली असून, चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळाचिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात एकमेकांचा किती आदर करतात, याची प्रचिती नुकतीच चिपळूणमध्ये आली. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांची प्रकृती एका कार्यक्रमात बिघडल्यानंतर, त्यांचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि सध्याचे प्रखर विरोधक आमदार भास्कर जाधव यांनी राणे साहेबांबद्दल अत्यंत भावूक वक्तव्य केलं आहे. राजकीय मतभेद असले तरी आमच्यातील जुना जिव्हाळा आजही कायम आहे, असे म्हणत जाधवांनी राणे साहेबांच्या कर्तृत्वाला सलाम केला.https://prahaar.in/2026/01/07/devendra-fadnavis-on-mim-and-congress-alliance-akot-nagarparishad-ambernath-nagarparishad-asaduddin-owaisi-maharashtra-politics/राणे साहेबांचा तो उत्साह आणि धावपळीचे जीवनचिपळूणमधील एका कार्यक्रमात भाषण करत असताना राणे साहेबांना अचानक भोवळ आली. प्रकृती साथ देत नसतानाही, केवळ लोकांसाठी व्यासपीठावर उभे राहण्याच्या त्यांच्या दांडग्या उत्साहाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, राजकारण्यांना २४ तास काम करावे लागते, सण-उत्सव नसतात आणि ९९ टक्के नेत्यांना वेळेवर जेवणही मिळत नाही. राणे साहेबांनी आयुष्यभर जनतेसाठी जी धावपळ केली, त्याचाच हा परिणाम आहे.मनातील जुने ऋणानुबंध कधीही...भास्कर जाधव यांनी राणे साहेबांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. मी आणि राणे साहेबांनी अनेक वर्षे खांद्याला खांदा लावून काम केले आहे. आमचे केवळ राजकीयच नाही, तर घनिष्ठ कौटुंबिक संबंध होते. माझं बेधडक वागणं आणि स्पष्टपणे बोलणं राणे साहेबांना नेहमीच आवडत असे. आमच्या वयात केवळ ५-६ वर्षांचे अंतर आहे. राजकीय प्रवासात काही वळणांवर आमच्यात अंतर पडले, बोलण्यात कटुता आली, तरीही मनातील जुने ऋणानुबंध कधीही पुसले जाऊ शकत नाहीत, असे सांगताना जाधव काहीसे भावूक झाले होते.
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. विशेष म्हणजे, हा हल्ला केवळ दगडफेक नव्हता, तर जलील यांच्या वाहनावर धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, या घटनेमुळे शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आजचे Top Stock Picks- मजबूत रिटर्न्ससाठी 'हे'४ शेअर गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरणार?
प्रतिनिधी: आज मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस व जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज लिमिटेड (JMFL) ब्रोकरेज कंपन्यांनी नवे शेअर चांगल्या परताव्यासाठी सूचवले आहेत. जाणून घेऊयात कुठले शेअर खरेदीसाठी फायदेशीर गुंतवणुकदारांना ठरतील?मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस -१) Adani Ports and SEZ - कंपनीला मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस या ब्रोकरेज कंपनीने या शेअरला बाय कॉल दिला असून सीएमपी (सामान्य खरेदी किंमत CMP) १४७३ रूपये निश्चित केली असून ब्रोकरेजने २२% अपसाईड वाढीसह १८०० रुपये प्रति शेअर लक्ष्य किंमत (Target Price) निश्चित केली आहे.जेएमएफल (जेएम फायनांशियल सर्विसेस)-२) Bharat Heavy Electricals- जेएमएफएल या ब्रोकरेज कंपनीने शेअरला बाय कॉल दिला असून कंपनीने लक्ष्य किंमत ३६३ रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे .३) Dixon Technologies- डिक्सन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १३८०० रुपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.४) Indian Energy Exchange IEE- ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून १६० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.
Dharashiv News : पत्नी ने प्रियकराच्या मदतीने अपल्याच पतीला संपवल;दगडाने ठेचून हत्या..!
धाराशिव :उमरगा शहर बायपासजवळील कोरेगाववाडी येथील रस्त्यावर एका ३५ वर्षीय तरुणाची धारदार धारदार हत्यार आणि दगडाने मारहाण करून हत्या करण्यात आली. मृताचे नाव शाहूराज महादू सूर्यवंशी (वय ३५) असून, ही घटना रविवारी समोर आली. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत हत्या करणाऱ्या दोन आरोपींचा शोध लावला. तपासात समोर आले की, या घटनेमागे अनैतिक संबंध होते.रविवारी सकाळी नागरिकांना कोरेगाववाडी येथे रस्त्यावरच मृतदेह दिसला आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी उपविभागीय अधिकारी शेलार आणि पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला.दगडाने चेहरा ठेचल्यामुळे मृताचे चेहरा विद्रुप झाला होता.. ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी शेजारील शेतकरी आणि नागरिकांशी संपर्क साधला, आणि चार तासांच्या प्रयत्नानंतर मृताची ओळख पटवण्यात यश आले.हत्येच्या शोधासाठी श्वान पथक तैनात करण्यात आले, तर फॉरेन्सिक टीमसुद्धा घटनास्थळी उपस्थित होती. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल रेकॉर्डचा अभ्यास केल्यावर पोलिसांनी आरोपी शिवाजी दत्तू दूधनाळे आणि मृताची पत्नी गौरी शाहूराज सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले. यादरम्यान चौकशीत आरोपींनी गुन्हा कबूल केला.पोलीसांनी सांगितले की, मृताची पत्नी गौरी आणि आरोपी शिवाजी यांच्यात अनैतिक संबंध होते. यामुळे शाहूराज आणि त्याची पत्नी सतत भांडत असत, आणि या संबंधात अडथळा असल्याने त्यांनी संगनमताने हत्या करण्याचा कट रचला. आरोपींनी रविवारी पहाटे दारू प्यायला दिली आणि रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बायपास जवळील रस्त्यावर शाहूराजच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याला पाडले. नंतर हंटर आणि दगडाने जबर मारहाण करून शाहुराज सुर्यवंशी याला संपवण्यात आलं
रणवीर सिंग भारतीय सिनेमातील एकमेव अभिनेता ठरला, ज्यांनी एका भाषेत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट दिला!
नव्या सम्राटाचा उदय: रणवीर सिंगने इतिहास रचला, ‘पुष्पा 2’ ला मागे टाकत ‘धुरंधर’ ठरला बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा हिटज्या उद्योगात यश मोजले जाते आकड्यांमध्ये, तिथे फारच क्वचित असे क्षण येतात जेव्हा हे आकडेच इतिहास घडवतात. धुरंधरच्या माध्यमातून रणवीर यांनी असाच एक ऐतिहासिक क्षण निर्माण केला आहे. एका एकमेव भाषेत — हिंदी — आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचे नेतृत्व त्यांनी केले आहे.ही कामगिरी केवळ तिच्या भव्यतेमुळे नव्हे, तर तिच्या प्रवासामुळेही खास ठरते. धुरंधरने क्षणिक उसळीवर अवलंबून न राहता हळूहळू आपली ताकद वाढवली, आपली पकड कायम ठेवली आणि आठवड्यानुवारी सातत्याने दमदार कामगिरी केली. चित्रपटाने आपल्या पाचव्या मंगळवारी (३३व्या दिवशी) भारतात ₹८३१.४० कोटींची नेट कमाई करत हिंदी चित्रपटसृष्टीत एक नवा मैलाचा दगड गाठला.या अभूतपूर्व यशाच्या केंद्रस्थानी रणवीर सिंग यांचा प्रभावी अभिनय आहे. भव्य पडद्यावर उभ्या राहिलेल्या या भूमिकेत त्यांनी संयम, खोली आणि स्पष्टतेने प्राण फुंकले आहेत. त्यांची उपस्थिती संतुलित असूनही अत्यंत प्रभावी आहे, जी कथेला भव्यतेसोबत भावनिक उंचीही देते. हाच समतोल चित्रपटाला सर्व प्रकारच्या प्रेक्षकांशी जोडतो आणि त्याची गती कायम ठेवतो.व्यापार विश्लेषक आणि प्रेक्षक — दोघांकडूनही चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. सातत्याने मिळणारी मजबूत कमाई हे दर्शवते की प्रेक्षक रणवीर सिंग यांच्यावर किती विश्वास ठेवतात — केवळ एक सुपरस्टार म्हणूनच नव्हे, तर प्रत्येक भूमिकेत प्रामाणिकपणा आणि ताकद आणणारा कलाकार म्हणूनही. त्यांच्या साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी आणि चित्रपटाने दिलेल्या अनुभवासाठी, विशेषतः त्याच्या दमदार कथेसाठी, प्रेक्षक पुन्हा पुन्हा चित्रपटगृहांकडे वळले.आकड्यांपलीकडे जाऊन, “हम्झा” ही व्यक्तिरेखा एक सांस्कृतिक ओळख बनली आहे. ही भूमिका दैनंदिन चर्चेचा भाग बनली असून, तिने प्रेक्षकांवर किती खोलवर प्रभाव टाकला आहे हे यावरून स्पष्ट होते. जेव्हा एखादी व्यक्तिरेखा पडद्याबाहेर जाऊन लोकांच्या आयुष्यात स्थान मिळवते, तेव्हा तो अभिनयाच्या दीर्घकालीन प्रभावाचा पुरावा असतो.धुरंधर सोबत रणवीर सिंग यांनी आपल्या कारकिर्दीत एक निर्णायक अध्याय जोडला आहे. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सिंगल-लँग्वेज हिंदी चित्रपटाचे नेतृत्व करत त्यांनी हिंदी सिनेमासाठी एक नवा मापदंड उभा केला आहे. हा क्षण समर्पण, कला आणि प्रेक्षकांशी असलेल्या गहिऱ्या नात्याचे प्रतीक आहे — एक असा विक्रम जो हिंदी सिनेमाच्या इतिहासात कायम लक्षात राहील.
Supreme Court on Street Dogs। सर्वोच्च न्यायालयाने आज भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणाची पुन्हा एकदा सुनावणी केली. न्यायालयाने मागील सुनावणीपासूनची आपली भूमिका कायम ठेवली. न्यायालयाने म्हटले आहे की कुत्रा कधी चावेल हे ठरवण्यासाठी त्याचे मन वाचू शकत नाही. न्यायालयाने स्पष्ट केले की ज्या राज्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. भटक्या कुत्र्यांबद्दलच्या मागील निर्णयात, न्यायालयाने […] The post “कुत्रा कधी चावेल हे तुम्ही सांगू शकता का?” ; भटक्या कुत्र्यांच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाचा सवाल appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: चांदीतील चढउतार शिगेला पोहोचला आहे. भारतीय बाजारात सकाळच्या सत्रापासून विक्रमी वाढ झाली असताना पुन्हा एकदा एमसीएक्स कमोडिटी बाजारात सोने ५००० रूपयांनी कोसळल्याचे रिपोर्टिंग माध्यमांनी केले आहे. दरम्यान 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात दुपारपर्यंत आज १० रुपयांनी वाढ झाली असून प्रति किलो दरात थेट १०००० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २६३ रुपये, व प्रति किलो दर २६३००० रुपयांवर पोहोचले आहेत. संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति १० ग्रॅम सरासरी दर मुख्य शहरात २६३० रूपये, व प्रति किलो दर २६३००० रुपयांवर पोहोचला आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) चांदीचे दर मात्र दुपारी २.०२ वाजेपर्यंत थेट १.३१% कोसळल्याने एमसीएक्स अथवा (कॉमेक्स Comex) दर २५५४२६ रूपयांवर पोहोचले आहेत. तरीही चांदी ५००० रूपयांनी कमोडिटी कोसळली असून बाजारातील अस्थिरता (Volatility) आणखी वाढली आहे.युएस व्हेनेझुएला यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर युएसने व्हेनेझुएला राष्ट्रावर कब्जा मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात क्रूड व सोनेचांदीत चढउतार वाढली होती. आजही याचा कित्ता गिरवला असताना अचानक अस्थिरता व रूपयातील वाढीमुळे चांदी थेट ५००० रुपयांनी इंट्राडे कोसळली. सकाळी चांदी ८२.५४८ प्रति डॉलर औस या नव्या उच्चांकावर पोहोचली होती. त्यामुळे ही वाढ २५९३२२ रूपये प्रति किलोवर झाल्याचे रिपोर्टिंग प्रसारमाध्यमांनी केले.चांदीतील मागणीत घट झाल्यानंतर रूपयात वाढ झाल्याने दरपातळीत आज दुपारपर्यंत घसरण झाली आहे. तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे दिवसभरात हा अस्थिरतेचा ट्रेड कायम राहू शकतो. याविषयी बोलताना तज्ञांनी म्हटले आहे की,' अमेरिका-व्हेनेझुएला यांच्यातील सध्याच्या संकटामुळे चांदीच्या किमती अस्थिर राहण्याची शक्यता आहे, कारण या संकटामुळे पेरू, चाड, मेक्सिको आणि इतर लॅटिन अमेरिकन राष्ट्रांमधून होणाऱ्या चांदीच्या निर्यातीत व्यत्यय येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पुरवठ्याबाबतची चिंता वाढेल.'जागतिक स्तरावर चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात दुपारपर्यंत थेट १.४८% घसरण झाली आहे. त्यामुळे ही पातळी ७९.७५ प्रति औंसवर गेली आहे. मागील सत्रात चांदीमध्ये मोठी वाढ नोंदवली गेल्यानंतर सकाळच्या सत्रात चांदीने मोठी वाढ नोंदवली होती. थेट १ ते २% पातळीवर चांदी व्यवहार करत असताना अखेर अस्थिरतेने सपोर्ट लेवल घसरल्याने चांदीत ५००० रुपयांपर्यंत घसरण झाली असली तरी देखील पुन्हा एकदा चांदीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.अर्थातच भूराजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढल्याने चांदीचा भाव ५.१४% नी वाढून २५८८११ पातळीवर सकाळनंतर स्थिरावला. व्हेनेझुएलामधील अमेरिकेच्या लष्करी कारवाईने आणि राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्याने जागतिक बाजारपेठेत नवीन अनिश्चितता निर्माण झाली असून युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या हल्ल्याची धमकी दिल्याच्या वृत्तांमुळे जोखीम टाळण्याची प्रवृत्ती वाढली ज्यामध्ये चांदीचा पुरवठा अनिश्चितत झाला आहे. अपेक्षेपेक्षा कमकुवत अमेरिकन उत्पादन क्षेत्राची आकडेवारी आणि फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांच्या नव्या नकारात्मक विधानांमुळे बाजारातील भावनांना आणखी पाठिंबा मिळाला आहे. तरीही गुंतवणूकदार आगामी फेड बैठकीत व्याजदर स्थिर राहण्याची शक्यता ८०% पेक्षा जास्त गुंतवणूकदार अपेक्षित करत आहेत.मूलभूतपणे, चांदीला पुरवठ्याची मर्यादित संख्या आणि वाढलेला औद्योगिक वापर आणि औद्योगिक मागणी तसेच गुंतवणुकीच्या प्रवाहातून मिळणाऱ्या मजबूत मागणीमुळे सातत्याने बळ मिळत आहे. ऑक्टोबरमध्ये ६६० टनांपेक्षा जास्त विक्रमी निर्यातीनंतर चिनी साठा दशकातील नीचांकी पातळीवर पोहोचला होता. त्यामुळे आजही चांदीतील अस्थिरता आज कायम असल्याचे अधिक प्रमाणात दिसून आले.
सेबी रियल टाईम डेटा नियमात बदल करणार 'कन्सल्टेशन पेपर'बाजारात दाखल
मोहित सोमण: सेबी (Security Exchange Board of India SEBI) या भांडवली बाजारातील नियामक मंडळाने आणखी एक महत्वाचा कन्सल्टेशन पेपर बाजारात आणला आहे. नव्या नियमानुसार, आता आगामी काळात सेबीने गुंतवणूकदारांच्या ग्राहक संरक्षणासाठी नवा कायदा आणणार आहेत. कंपन्यांच्या टाईम लाईन डेटातील बदल यामध्ये सूचवले जाणार आहेत. नवीन नियमावली आखण्यापूर्वी सेबीने गुंतवणूकदार व नागरिकांकडून प्रतिक्रिया मागितल्या आहेत. २७ जानेवारीपर्यंत गुंतवणूकदार आपल्या प्रतिक्रिया अथवा अभिप्राय सेबीकडे नोंदवू शकतील.नव्या नियमावलीत काय असू शकते?नव्या नियमात, कंपनीचा लाईव डेटा केवळ एक्सचेंज शेअर करू शकतील अर्थातच तो ट्रेडिंग व संबंधित कारणासाठी असावा.नव्या नियमानुसार, ज्ञानवर्धनसाठी अथवा शिकण्यासाठी १ दिवसाच्या अंतराने असावा. त्वरीत डेटा शेअर करण्यास संस्थांना मनाई असेल.यापूर्वी जानेवारी २०२५ मधील सेबी पत्रकानुसार केवळ ३ महिन्यांच्या कालावधीनंतर हा डेटा शेअर करता येईल असे म्हणण्यात आले होते. तत्पूर्वी में २०२४ मध्ये सेबीच्या परिपत्रकानुसार, केवळ १ दिवसाच्या कालावधीनंतर शेअर करण्याची मुभा होती. त्यामुळे दोन्ही परिपत्रकाचा उदेश वेगळा होता असे सेबीने स्पष्ट केले. त्यामुळे मे २०२४ च्या परिपत्रकाने एक्सचेंजेसना शैक्षणिक उद्देशांसाठी एक दिवसाच्या विलंबाने अथवा नंतर डेटा सामायिक करण्याची परवानगी दिली होती असे सेबीने नव्या सूचनेत म्हटले आहे. तर जानेवारी २०२५ चे परिपत्रक त्यानंतर लागू होते आणि त्यात केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी किती जुना डेटा वापरला जाऊ शकतो हे नमूद केले आहे आणि त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे असेही पुढे सेबीने म्हटले.त्यामुळे नव्या पेपरनुसार दोन्ही अधिसूचनेत सामायिकता आणून भागभांडवलधारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी (विशेषतः गुंतवणूक व अभयासासाठी) आणल्याचे सेबीने म्हटले.यासह मे २०२४ च्या परिपत्रकाने एक्सचेंजेसना शैक्षणिक उद्देशांसाठी एक दिवसाच्या विलंबाने डेटा सामायिक करण्याची परवानगी दिली असून तर जानेवारी २०२५ चे परिपत्रक त्यानंतर लागू होते आणि त्यात केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी किती जुना डेटा वापरला जाऊ शकतो हे नमूद केले आहे आणि त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.नव्या लिस्टेड कंपन्यांच्या रिअल टाइम किमतीच्या डेटाचा वापर करणाऱ्या ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म, ॲप्स, वेबसाइट्स इत्यादींच्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी सेबीने २४ मे २०२४ रोजीच्या परिपत्रकाद्वारे 'थर्ड पार्टी रिअल टाइम किमतीचा डेटा सामायिक करण्यासंबंधीचे नियम प्रसिद्ध केले होते. या नियमांनुसार, कोणत्याही थर्ड पार्टीसह विविध प्लॅटफॉर्मसह, रिअल टाइम किमतीचा डेटा सामायिक केला जाणार नाही. केवळ जिथे सिक्युरिटीज बाजाराच्या सुव्यवस्थित कामकाजासाठी किंवा नियामक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अशी माहिती सामायिक करणे आवश्यक आहे या अशाच प्रकरणांचा अपवाद असेल असे सेबीने म्हटले आहे.गुंतवणूकदार शिक्षण आणि सल्ला/शिफारस यांमध्ये फरक करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे बाजाराचा डेटा, ज्यावर आधारित शैक्षणिक सामग्री विकसित केली जाते. शैक्षणिक उद्देशांसाठी थेट डेटा वापरणे हे शुद्ध शैक्षणिक कार्यांच्या व्याप्तीच्या बाहेर आहे कारण यामध्ये भविष्यातील किमतींचा अंदाज लावण्यासाठी सध्याच्या डेटाचे विश्लेषण करणे समाविष्ट आहे जे गुंतवणूक सल्लागार (Investment Advisors)/संशोधन विश्लेषक (Research Advisors) कार्यांच्या व्याख्येत येते असे सेबीने पुढे म्हटले.आणखी सेबीने काय म्हटले?शैक्षणिक उद्देशांसाठी किमतीचा डेटा प्रदान करण्यासाठी एक दिवसाचा विलंब हा MIIs (Market Infrastructure Institutions) आणि बाजार मध्यस्थांनी पाळायचा किमान तांत्रिक विलंब आहे. तर तीन महिन्यांच्या विलंबाचा निकष ही एक सामग्री आधारित अट आहे जी शिक्षकांनी पाळणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांची सामग्री पूर्णपणे शैक्षणिक मानली जाईल असेही सेबीने म्हटले.SEBI ला भागधारकांकडून एक दिवसाचा विलंब खूप कमी असल्याबद्दल आणि एक दिवसाच्या विलंबाच्या डेटाचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याबद्दल टिप्पण्या प्राप्त झाल्या ज्यामुळे विलंब कालावधी वाढवण्याची गरज निर्माण झाली. अंतर्गत स्तरावर, तीन महिन्यांचा विलंब खूप जास्त आहे आणि जर हा कालावधी कमी केला तर शैक्षणिक माहिती अधिक प्रभावी होऊ शकते, यावरही विचारविनिमय करण्यात आला. त्यामुळे यातून मध्यम मार्ग काढण्याचा सेबी प्रयत्न करत असल्याचे दिसते.
Delcy Rodriguez। व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर, लॅटिन अमेरिकन देश आणि अमेरिकेतील संबंध आणखी बिघडले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ते स्वतः व्हेनेझुएलाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी असा इशाराही दिला आहे की जर देशाच्या अंतरिम सरकारचे कार्यकारी अध्यक्ष त्यांना सहकार्य करत नसतील तर अमेरिका दुसऱ्या फेरीच्या कारवाईपासून मागे हटणार नाही. व्हेनेझुएलाच्या कार्यकारी […] The post “व्हेनेझुएला कोणत्याही बाह्य शक्तीच्या नियंत्रणाखाली नाही” ; ट्रम्पच्या इशाऱ्याने अंतरिम अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्जचा संताप appeared first on Dainik Prabhat .
लग्नाबद्दलच्या ‘त्या’प्रश्नावर श्रद्धा कपूरने दिले खास उत्तर
Shraddha Kapoor | अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. याद्वारे ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कातही राहते. नुकतेच तिला लग्नाबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने दिलेल्या उत्तराची चांगलीच चर्चा रंगली आहे. सध्या श्रद्धा राहुल मोदीला डेट करत असून अनेकदा दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियाद्वारे समोर आले आहेत. अलीकडेच श्रद्धाने तिच्या ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनसाठी […] The post लग्नाबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर श्रद्धा कपूरने दिले खास उत्तर appeared first on Dainik Prabhat .
Crime News :दोस्तानेच दोस्ताचा गळा कापला;मृत्यदेह डोंगराळ भागात फेकुन दिला
छ.संभाजीनगर : मित्रच बनाला मित्राचा दुश्मन..संभाजी नगरमध्ये मोबाईल आणि पैशांच्या वादातुन एक सराईत गुन्हेगारानी मित्राने दुसऱ्या साथीदारासह आपल्या स्वताच्याच मित्राला संपवल्याची घटना घडली आहे..छावणी परिसरात एका २० वर्षीय तरुणाची अत्यंत गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जटवाडा येथील डोंगराळ भागात फेकून देण्यात आला होता.यानंतर या घटनेमुळे तेथील परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.शकील अरेफ शेख (वय) २० असं मृत्य युवकाच नाव आहे.असं माहितीतुन स्पष्ट झालं आहे..या घटने अगोदर बळी गेलेल्या शकील अरेफ शेख यांच्या आईला ही सराईत गुन्हेगार सय्यद सिराज अली यांने धमकवल्याच माहितीतून समोर आलं आहे...बेपत्ता होण्यापूर्वी मुख्य आरोपी सिराज याने शकीलच्या आईला फोन करून मोबाईल आणि पैसे परत न केल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी दिली होती. ४ जानेवारीच्या रात्री शकील हा सिराजसोबत घराबाहेर पडला अन् त्यानंतर त्याचा संपर्क तुटला.ते काल मंगळवारी सकाळी मिटमिटा परिसरातील डोंगर भागात नागरिकांना पडलेला एक मृतदेह आढळला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तपास केला असता, तो मृतदेह शकीलचा असल्याचं समजले..या घटनेने परिसरात दहशत पसरली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी सुरक्षिततेसंदर्भात खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे आणि आरोपींच्या ताब्यातील इतर गुन्हेगारांना लवकर पकडण्याची प्रक्रिया सुरू आहे.या घटनेने मोबाईल आणि पैशांच्या वादातून मित्रांमध्ये होणाऱ्या संघर्षाची गंभीरता पुन्हा एकदा दाखवली आहे.
टायटन्सने जबरदस्त तिमाही निकाल नोंदवल्यानंतर शेअर दे दणादण!
मोहित सोमण: टाटा एंटरप्राईजेस समुहाची फ्लॅगशिप कंपनी टायटन (Titan) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आज नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. सकाळी सत्राच्या सुरुवातीलाच शेअर ४% पेक्षा अधिक पातळीवर उसळला होता. आज दुपारी १२.४४ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी ४.५१% वाढ झाल्याने कंपनीचा शेअर ४.५१% उसळला असून ४२९७.१० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. कंपनीने आपल्या तिसऱ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली. यातील माहितीनुसार, इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ४०% वाढ महसूलात नोंदवली आहे. विविध व्यवसायांची वर्गवारी केल्यास घरगुती व्यवसायात (Domestic Business) मध्ये ज्वेलरीत ३८%, तनिष्क मिया, झोया, बीयोन या व्यवसायांत ४०%, कार्टलेन ४२%, घड्याळे १३%, आय केअर १६%, इमर्जिंग बिझनेस १४% वाढ झाली आहे. तर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एकूण स्टोअर्समध्ये अथवा दालनात ज्वेलरीत ५४, तनिष्क २३, कार्टलेन २४, घड्याळ २२, आयकेअर १७, इमर्जिंग बिझनेस दालनात २ दालनाने वाढ झाली आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एकूणच वाढलेल्या मागणीमुळे, तसेच सणाच्या कालावधीत वाढलेल्या वाढीमुळे, तसेच एएसपी (Average Selling Prices ASP) वाढ झाल्याने कंपनीच्या ज्वेलरी व्यवसाय महसूलात अंतिमतः वाढ झाल्याचे कंपनीने यावेळी स्पष्ट केले. घड्याळाच्या व्यवसायात इयर बेसिसवर १३% वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. यावेळी या कंपनीने दोन अंकी वाढ नोंदवली असून कंपनीच्या सोनाटा, फास्टट्रॅक या प्रोडक्ट उत्पादनातील विक्रीतील वाढीचा कंपनीला झाला. या कंपनीच्या तिमाही बेसिसवर १७% वाढ इयर ऑन इयर झाली आहे. आयकेअर बाबतीत कंपनीने १६% वाढ एकूण घरगुती व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढलेल्या प्रोडक्ट लाईन मुळे झाली असल्याचे म्हटले. तर उदयोन्मुख बाजारपेठेत (Emerging Business) मध्ये कंपनीने इयर ऑन इयर बेसिसवर २२% वाढ नोंदवली आहे. दरम्यान कंपनीच्याच तनीरा (Taneria) बाबतीत विक्रीत इयर ऑन इयर बेसिसवर ६% घसरण झाली आहे. त्यामुळे एकूणच आकडेवारीवर यांचा काही परिणाम झाल्याचे कंपनीने नमूद केले होते. आंतरराष्ट्रीय ज्वेलरी व्यवसायात (Tanishq, Mia, Cartlane) इयर बेसिसवर तब्बल ८१% वाढ झाली असल्याने अंतिमतः कंपनीने चांगले प्रदर्शन नोंदवले आहे. यामुळेच शेअर्समध्ये आज मोठी वाढ झाली आहे.कंपनीने चांगला निकाल नोंदवल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ४ ते ५% वाढ झाली होती. कंपनीच्या शेअरने ४३१२.१० रूपये प्रति शेअर ही इंट्राडे उच्चांक पातळी गाठली होती. गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये ५.९२% वाढ झाली असून महिन्यात शेअर्समध्ये १३.९७% वाढ तर संपूर्ण वर्षभरात शेअर्समध्ये २२.४९% वाढ झाली आहे. तर इयर टू डेट बेसिसवर (YTD) बेसिसवर शेअर्समध्ये ५.९२% वाढ झाली आहे.
Gemini AI: आता न्यू इयर रिझोल्यूशन फेल होणार नाहीत, जेमिनी बनेल तुमचा पर्सनल कोच
Gemini AI: नवं वर्ष सुरू होताच अनेकजण फिटनेस, करिअर, बचत किंवा नवीन कौशल्य शिकण्याचे संकल्प करतात. पण योग्य नियोजन नसल्यामुळे हे संकल्प काही आठवड्यांतच अपयशी ठरतात. मात्र २०२६ मध्ये Google Gemini AI या समस्येवर उपाय घेऊन आला आहे. गुगलने १० प्रभावी प्रॉम्प्ट्स दिले आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे न्यू इयर रिझोल्यूशन नीट प्लान करू शकता, […] The post Gemini AI: आता न्यू इयर रिझोल्यूशन फेल होणार नाहीत, जेमिनी बनेल तुमचा पर्सनल कोच appeared first on Dainik Prabhat .
शनिदेवाच्या दर्शनाआधीच काळाने डाव साधला; मिनी बसच्या धडकेत तीन मित्रांचा जागीच मृत्यू
अहिल्यानगर : इगतपूरीजवळील गिरणारे येथील काही तरुण पालखी घेऊन शिर्डीला गेले होते. त्यापैकी काही तरुण शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी रिक्षाने निघाले होते. मात्र, दर्शनाआधीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. राहुरीहून भरधाव वेगात येणाऱ्या मिनी बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर मिनी बस रस्त्याच्या कडेला उलटली.राहुरी–शनीशिंगणापूर मार्गावर उंबेरे गावाजवळ भरधाव मिनी बस आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात इगतपुरी तालुक्यातील गिरणारे गावातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, इगतपूरीजवळील गिरणारे येथील काही तरुण पालखी घेऊन शिर्डीला गेले होते. त्यापैकी काही तरुण शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी रिक्षाने निघाले होते. मात्र, दर्शनाआधीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. राहुरीहून भरधाव वेगात येणाऱ्या मिनी बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर मिनी बस रस्त्याच्या कडेला उलटली.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, रिक्षातील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या अपघातात दीपक जगन डावखर (२२), आकाश मनोहर डावखर (२२) आणि दीपक विजय जाधव (२२) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिघेही नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी तालुक्यातील गिरणारे गावचे रहिवासी होते.दरम्यान, या अपघातात रूपेश गणेश भगत (१९) आणि रोशन गंगाधर डावखरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला?, मिनी बसचा वेग किती होता? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
बुधवार विशेष: भारतीय अर्थव्यवस्थेपुढील वास्तविक संधी व आव्हाने
मोहित सोमणभारतीय अर्थव्यवस्था सुधरूढ स्थितीत असली तरी निश्चितच काही आव्हाने कायम आहेत. भारतात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती होत असली अजून शाश्वत विकास बाकी आहे. आताच आपण जपानला मागे टाकत ४ ट्रिलियन रूपयांची अर्थव्यवस्था झालो आहोत. हे मान्य आहे. पण निश्चितच निमशहरी भागात अद्याप खूप काम करणे बाकी यावर दुमत नाही. गेल्या वर्षभरात सेमीकंडक्टर, आयटी, इन्फ्रास्ट्रक्चर, इतर सेवा क्षेत्रातील रोजगार निर्मितीत वाढ झाली. आरबीआयच्या माहितीप्रमाणे, किमान ४० मिलियन (४० दशलक्ष) नोकऱ्यांची निर्मिती झाली स्पष्टच आहे. किंबहुना भारताला २०४८ पर्यंत विकसित भारत बनवायचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. त्यादृष्टीने अर्थव्यवस्थेतील आव्हाने पाहता फेब्रुवारीतील अर्थसंकल्प अत्यंत वास्तववादी बनवणे क्रमप्राप्त असेल. सध्या सगळ्याच राजकीय पक्षांची लोकप्रिय घोषणेची अगतिकता आहे हे आपण समजू शकतो. याचा सर्वाधिक फटका अर्थव्यवस्थेला बसतो. प्रामुख्याने भारतातील करदात्यांच्या पैशाला महत्व आहे. प्रामुख्याने या अर्थसंकल्पात मुख्य बाब आवश्यक म्हणजे कृषी क्षेत्राशिवाय इतर क्षेत्रांना प्राधान्य देणे.वास्तविक आजही जीडीपीतील ६०% पेक्षा जास्त योगदान केंद्रित असलेल्या शहरांकडून जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागात नव्या रोजगार संधीची कवाडे उघडी करणे गरजेचे आहे ते होतही आहे. परंतु त्याची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे.सेवा क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात ग्रामीण व निमशहरी भागात विस्तारले गेल्यास त्यांचा शहराकडील ओढा कमी होईल. मोठ्या प्रमाणात स्थलांतर थांबेल आज कित्येक प्रमाणात शेतीला निसर्गाची कृपादृष्टी नाही. प्रामुख्याने वेळेवर पाऊस न पडणे, वाढलेली जमीनीची धूप, घसरलेली उत्पादकता अशा कारणांमुळे ही रोजगार संधी व व्यवसायाच्या संधी लोकसंख्येच्या दृष्टीने अपुऱ्या पडत आहे. सरकारने अर्थातच सरकारने मध्यंतरी प्रतिदिनी रक्कम मनरेगा योजनेतंर्गत ३७० रुपयांवर वाढवली असली तरी ती विशिष्ट काळापर्यंत मर्यादित असते. उर्वरित वर्षभर शेतकऱ्यांना शेती व कुक्कुटपालनावर अवलंबून रहावे लागते. सध्या दुष्काळात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असताना शिकलीसवरलेली लोके शहराकडे वळू लागली आहेत व गावे ओस पडली आहेत.आजही ६५% भारत ग्रामीण भागात राहतो. तरीही त्यातून रोजगार निर्मितीच्या संधी पुरेशा नाहीत. केवळ कृषी क्षेत्रावर अवलंबून न राहता या क्षेत्राशी संलग्न असलेल्या एफएमसीजी (Fast Moving Consumer Goods FMCG), कंज्यूमर ड्युरेबल्स (ग्राहक उपयोगी वस्तू), आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इ कॉमर्स अशा कित्येक क्षेत्राची दारे मोठ्या व्यापक पातळीवर उघडली पाहिजेत. गेल्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात सरकारने आपले प्राधान्य एमएसएमई (MSME), एआय (Artificial Intelligence), ई कॉमर्स, शेती तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, अक्षय उर्जा निर्मिती यावर अधिक प्रमाणात दिला. मात्र या नव्या युएसने लादलेल्या अतिरिक्त शुल्काचा फटका या संवेदनशील क्षेत्रात बसला. वास्तविक पाहता देशात खूप मोठ्या प्रमाणात वस्तूंच्या उपभोगात वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रातील मागणी वाढत आहे. असे असले तरी वास्तविकपणे छोट्या शहारत विविध कारणांमुळे गुंतवणूकदार आजही गुंतवणूक करण्यास कचरतात. त्यामुळे मोठ्या उद्योजकांचे प्राधान्य मोठी शहरांना असल्याने ग्रामीण भागातील क्वालिटी बँक लाईफ सुधारण्याचे आव्हान आजही कायम आहे.जर आपण अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास जगभरातील तज्ञ व आर्थिक सेवा क्षेत्रातील संस्थेकडून भारताच्या अर्थव्यवस्थेचे कौतुक होत आहे. भारताला मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करताना आपल्या वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यास यश मिळाले आहे. केवळ गेल्या २०२५-२६ आर्थिक वर्षाचा विचार केल्यास मोदी सरकारने ६.८१ लाख कोटींची भांडवली गुंतवणूक केली ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधेत वाढ होणे अपेक्षित आहेच पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मिती होण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र अपुऱ्या सुविधा, अथवा अपुऱ्या कौशल्य विकासामुळे जगभरात वेगाने वाढलेल्या तंत्रज्ञानाबरोबर सामावून घेण्यासाठी ग्रामीण तरुणांना पुरेश्या संधी उपलब्ध नाहीत. निश्चितच मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात स्कील डेव्हलपमेंट प्रोगाम अंतर्गत या संधी निर्माण केल्या. याशिवाय प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, पीएम विश्वकर्मा योजना यांसारख्या एकाहून एक सरस योजना आणल्या ज्याचा प्रचंड लाभ तरूणांना होत आहे.परंतु जागतिकीकरणात नंतर परिस्थिती अत्यंत वेगाने बदलत आहे. एकच तंत्रज्ञान ६ महिन्याच्यावर राहत नाही. सातत्याने त्यात डेव्हलपमेंट होते. नवीन तंत्रज्ञान बाजारात येते त्यानुसार काळानुरूप सुसंगत असे बदल करणे यावर देशाचे लक्ष केंद्रित झाले पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सनंतर आता ब्लॉकचेन, फिनटेक, मशिन लर्निंग या क्षेत्रात अफाट संधी उपलब्ध आहेत. भारतातील या क्षेत्रातील गुंतवणूक १ लाख कोटीहून एका वर्षात येण्याची शक्यता असताना मोठ्या प्रमाणात शहरात जागांची, कौशल्य असलेल्या व्यक्तींची कमी आहे. शाश्वत विकासाच्या अंतर्गत शहरासोबत ग्रामीण भागातील लोकांना यांचे प्रशिक्षण दिल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती वाढू शकते. वाढत असलेल्या पायाभूत सुविधा, बांधकामांचा वापर केल्यास मोठी आयटी पार्क उभारण्यासाठी पुरेशी जागा खेडोपाडी उपलब्ध आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार निर्मितीचा फायदा होऊ शकतो. हेल्थकेअर क्षेत्रातही मोठ्या संधी बाजारात आहेत. मोठ्या प्रमाणात भारत व काही देशात द्विपक्षीय करार झाल्याने मोठ्या प्रमाणात निर्यातीच्या संधी विशेषतः अगदी आदिवासी क्षेत्रापासून निमशहरी भागापर्यंत आहे. त्यांचा लाभ करुन देणे यावरही उद्योजकांनी लक्ष लागणे गरजेचे आहे. निश्चितच भूराजकीय अस्थिरतेच्या काळात संकटे येतात नफा कमी होतो परंतु युएस वगळता इतर देशातील आपल्या निर्यातीत वाढ होणे शक्य होणार आहे. देश बदलत आहे अर्थात आव्हाने कायम आहे.संधी आव्हान ही कायम असतात पुढेही राहतील पण या कराच्या पैशाचा विनिमय जर निवडणूक व राजकारणापेक्षा उत्पादकतेवर वाढवल्यास त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा अर्थकारणात होईल त्यानंतर लोकप्रिय योजनांची घोषणा क्रमप्राप्त होणार नाही. कारण या लोकप्रिय योजनेतून अनेकदा पैशाचा अपव्यय होतो. त्यापेक्षा उत्पादकता वाढवल्यास शेतकरी व व्यापारी, अथवा कष्टकरी माणसाला झळ बसणार नाही. वित्तीय तूटही गेल्या दहा वर्षांत नियंत्रणात आली असली तरी सरकारने योजनात्मक विकास व भांडवली खर्चात वाढ केल्याने निश्चितच क्रेडिट वाढ होत असताना त्याचा भार अर्थव्यवस्थेवर पडतो. त्यामुळे सरकारलाही वित्तीय तूट विकास व जगभरातील अर्थव्यवस्था या तिन्ही मुद्यावर संतुलित भूमिका घेणे आवश्यक असेल स्वाभाविकपणे निती आयोग यावर आपले पुढील धोरण स्पष्ट करेल. तत्पूर्वी मोठ्या प्रमाणात कॉपोर्रेट कर संकलनात व उत्पन्नात वाढ होत असताना वैयक्तिक कर संकलनात घसरण होत आहे ही देखील चिंतेची बाब आहे. लोकांनीही प्रामाणिकपणे कर भरणे हे क्रमप्राप्त असले तरी समाजाच्या बाजूनेही या तरतूदीचे संपूर्ण अवलंबन दिसत नाही. दोन्ही बाजूने हातात हात घालून ही विकासाची यात्रा सुरु करावी लागेल. नव्या अर्थसंकल्पाकडून खूप आशा आकांक्षा लोकांच्या आहेत. निश्चितच यामध्ये मूलभूत सुविधा व मूलभूत विकासावरही लक्ष केंद्रित ह़ोऊ शकेल अशी आशा करूयात. दरम्यान हे असताना रूपयांचे अवमूल्यन रोखणे हे देखील आरबीआयच्या प्राधान्यक्रमाचा भाग असणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच सहकार्य शाश्वत विकास विकसित भारत करण्यासाठी वेगाने करावा लागेल असे दिसते.
वर्षा उसगांवकर यांनी आपल्या आईबद्दल केला मोठा खुलासा, मी माझ्या आईला घेऊन...
मुंबई : मराठी चित्रपटविश्वात अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ गाजवला. अगदी कमी वयात आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरु करून वर्षा उसगावकर यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटात देखील आपली अभिनयाची छाप पाडली. अगदी उतार वयातही त्यांनी मालिकेत आपले काम सुरु ठेवलेच आहे. मागच्या वर्षीच बिग बॉस सीझन ५ मधेही वर्ष उसगावकर यांनी सहभाग घेतला होता. वर्ष उसगावकर यांचा चाहता वर्गही जास्त आहे. आजही त्यांचे चित्रपट अगदी आवडीने पाहिलेही जातात. वर्षा उसगावकर यांच्या खासगी आयुष्यापेक्षा त्यांचे कामच जास्त चर्चेत राहिले आहे.आता त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास वर्ष उसगावकर यांचे सासरे म्हणजेच प्रसिद्ध संगीतकार रवी शंकर शर्मा. यांनी वर्षा यांच्यासोबतच त्यांच्या मुलालाही संपत्तीतून बाहेरचा रस्ता दाखवला बेखल केले.आणि आपली संपूर्ण संपत्ती आपल्या मुलींच्या नावावर केली.वर्षा उसगांवकर यांचा मातोश्रीच्या शेजारी बंगला आहे. त्यामुळे'बाळासाहेब ठाकरे वर्षा उसगांवकर यांचे शेजारी होते. नुकताच एका वर्षा उसगांकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक किस्सा सांगत आपल्या आठवणी ताज्या केल्या आहेत.वर्षा उसगांवकर या म्हणाल्या की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे घर शेजारी होते. त्यामुळे मला छान २४ तास पोलिस संरक्षण असायचे. मला कधीही कलानगरमध्ये जानाता भीती वाटली नाही. रात्रीचे कितीही वाजूदेत पोलिस संरक्षण कायम. मला ते घरीबोलावून गोष्टी सांगायचे. कितीतरी जोक्स सांगायचे. त्यांचा स्वभाव खूप जास्त खेळकर होता. मला नेहमी म्हणायचे की, काय गं… गोव्याची मुलगी कसं काय गोव्याहून इथं आलीस.गोव्याची मुलगी दामूकडे राहतेस.. असे ते कायम बोलायचे. एकदा माझी आई आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला खूप जोक्स वगैरे सांगितले.. ते बोलायचे की, मी बियर पितो.. दुपारी पण ही कॅलरीशिवाय बिअर आहे. मी त्यावेळी म्हटले बापरे हे बियर पितात आणि असे सांगतात पण… म्हणजे असा गमतीशीर त्यांचा स्वभाव होता. मग ते मिथूनला फोन लावणार याला फोन लावणार.. मग त्यांच्याशी आमचे बोलणे करून देणार, असा त्यांचा स्वभाव होता खूप जास्त छान.. त्यांचे मार्मिक बोलणे मला कायम आवडायचे.
अकोला : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काहीही घडू शकते' याची प्रचिती अकोट आणि अंबरनाथ नगरपरिषदेच्या निमित्ताने आली आहे. विचारधारेच्या पलीकडे जाऊन सत्तेसाठी परस्परविरोधी पक्ष एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेषतः अकोट नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाने थेट 'एमआयएम'ला सोबत घेतल्याने आणि अंबरनाथमध्ये काँग्रेसशी हातमिळवणी केल्याने भाजपच्या 'काँग्रेसमुक्त भारत' आणि विचारधारेच्या घोषणेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अकोट नगरपरिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने एक नवा प्रयोग केला आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 'अकोट विकास मंच' स्थापन करण्यात आला असून, यामध्ये भाजप आणि एमआयएम (MIM) एकत्र आले आहेत. या मंचाची विशेष बाब म्हणजे यामध्ये शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती हे सर्वच एकमेकांचे विरोधक सहभागी झाले आहेत. दुसरीकडे, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेतही धक्कादायक समीकरण समोर आले आहे. येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने थेट काँग्रेसशी युती केली आहे. राज्याच्या राजकारणात भाजप आणि शिंदे गट एकत्र असताना, स्थानिक पातळीवर मात्र सत्तेसाठी भाजपने काँग्रेसचा हात धरल्याने एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.https://prahaar.in/2026/01/07/the-increasing-number-of-illegal-immigrants-poses-a-threat-of-widespread-social-crises-concerns-expressed-by-prominent-experts/देवेंद्र फडणवीस यांचा स्थानिक नेत्यांना सज्जड इशाराया सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अकोटमध्ये भाजपची एमआयएमसोबत आणि अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत झालेली हातमिळवणी ही पक्षाच्या विचारधारेला धरून नसून, अशा प्रकारच्या युतीला भाजपमध्ये कोणतेही स्थान नाही, अशा कडक शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला. काँग्रेस आणि एमआयएम या दोन पक्षांसोबत भाजपची युती होणे कधीही शक्य नाही. स्थानिक पातळीवर जर अशा हालचाली झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. पक्षाची विचारधारा गहाण ठेवून केलेली कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. केवळ नाराजी व्यक्त करून न थांबता, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ज्या कुणीही स्थानिक नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेतृत्वाला अंधारात ठेवून ही युती केली आहे, त्यांची चौकशी केली जाईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. यामुळे अकोट आणि अंबरनाथमधील भाजप नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.नेमकं काय घडलं अकोट नगरपरिषदेत?अकोट नगरपरिषदेच्या ३५ सदस्यीय सभागृहात भाजपने ११ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा मान मिळवला आणि माया धुळे या थेट नगराध्यक्षपदी निवडून आल्या. मात्र, सभागृहात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेले बहुमत (१८ पेक्षा जास्त सदस्य) भाजपकडे नव्हते. हे बहुमत जुळवण्यासाठी भाजपने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एमआयएम (५ जागा) आणि इतर मित्रपक्षांना सोबत घेऊन 'अकोट विकास मंच'ची स्थापना केली आहे. भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर यांची या आघाडीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या नव्या आघाडीमुळे एक विलक्षण तांत्रिक बदल झाला आहे. एमआयएमच्या नगरसेवकांना आता भाजपचे गटनेते रवी ठाकूर यांनी काढलेला 'व्हिप' (आदेश) पाळावा लागणार आहे. आगामी १३ जानेवारी रोजी होत असलेल्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीत ही आघाडी आपली ताकद दाखवणार आहे. या दिवशी मंचातील सर्व सदस्य एकत्रितपणे मतदान करतील, ज्यामुळे भाजपचा उपनगराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजप आणि एमआयएम हे दोन परस्परविरोधी विचारधारेचे पक्ष सत्तेसाठी एकत्र आल्याने अकोटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.हा तर शिवसेनेचा घात...नगरपरिषदेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने थेट काँग्रेसचा हात धरला आहे. या 'अकल्पनीय' युतीमुळे अंबरनाथमध्ये भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होणार असला तरी, राज्याच्या राजकारणात मात्र या 'अभद्र' युतीवरून वादाचे काहूर माजले आहे.अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले यांनी नगराध्यक्षपदी बाजी मारली. मात्र, नगरपरिषदेत बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. सभागृहात भाजपचे १६, काँग्रेसचे १२ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ४ असे एकूण ३२ नगरसेवक एकत्र आल्याने बहुमताचा आकडा पूर्ण झाला आहे. विशेष म्हणजे, २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने आपल्या पारंपरिक कट्टर विरोधकाशी (काँग्रेस) घरोबा केला आहे. या युतीवर शिंदे गटाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. एकीकडे देशपातळीवर 'काँग्रेसमुक्त भारत'च्या गर्जना करणाऱ्या भाजपने स्थानिक पातळीवर सत्तेसाठी शिवसेनेचा घात केला आहे, अशी टीका शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी केली आहे. ही युती केवळ 'तडजोड' नसून शिवसेनेच्या पाठीत खुपसलेला खंजीर असल्याची भावना शिंदे समर्थकांमध्ये आहे. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातच असा पेच निर्माण झाल्याने हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Krantijyoti Marathi Medium School Film : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२६ रोजी हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतीज्योतीविद्यालय-मराठीमाध्यम‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॅाक्स अॅाफिसवर चांगली कामगिरी केली असून, तब्बल ३ .९ १ कोटी रुपये कमावले आहेत. ही मराठी चित्रपटासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. अजूनही प्रेक्षकांकडून उत्तम प्रदिसाद चित्रपटाला मिळताना दिसत आहे. मराठी […] The post मराठी चित्रपटाची सुरुवात दणक्यात! ‘क्रांतीज्योती मराठी-माध्यम’ चित्रपटाची प्रेक्षकांना भुरळ; पाच दिवसात… appeared first on Dainik Prabhat .
काँग्रेस आणि एमआयएमसोबत झालेल्या युतीवर फडणविसांची प्रतिक्रिया; थेट कारवाईचा दिला इशारा
Devendra Fadnavis | भाजपने अकोट नगरपरिषदेत बहुमतासाठी चक्क एमआयएम पक्षासोबत युती केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. भाजपने एमआयएमसह इतर सर्व प्रमुख पक्षांना सोबत घेत अकोट विकास मंच स्थापन केला आहे. या नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तर दुसरीकडे अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेसची युती झाली. यावरुन भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होण्यास […] The post काँग्रेस आणि एमआयएमसोबत झालेल्या युतीवर फडणविसांची प्रतिक्रिया; थेट कारवाईचा दिला इशारा appeared first on Dainik Prabhat .
8th Pay Commission। आठव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या आधीही राज्य कर्मचाऱ्यांसाठी आठव्या राज्य वेतन आयोगाची स्थापना करण्याची घोषणा करणारे आसाम हे देशातील पहिले राज्य बनले आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा लवकर आठव्या वेतन आयोगाचे फायदे मिळतील का? याविषयी सध्या चर्चा सुरु आहे. आसाम सरकारचा प्रमुख उपक्रम 8th […] The post राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या आधी मिळणार आठवा वेतन आयोग ? ; वाचा सविस्तर माहिती appeared first on Dainik Prabhat .
Nashik Accident : भरधाव वाहनाची मागून दुचकीला जोरदार धडक! नवरा बायकोचा जागीच मृत्यु; थरारक अपघात
नाशिक : महाराष्ट्रामध्ये वाहनांच्या अपघातांची मालीका सुरुच.. काल मंगळवारी साक्री-शिर्डी राष्टिय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ढोलबारे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात नवापूर तालुक्यातील आमलीपाडा (जि. नंदुरबार) येथील नवरा बायकोचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संदीप दासू गावित (वय ३५) व त्यांची पत्नी आशा संदीप गावित (वय ३२) अशी मृतांची नावे आहेत. समोर आलेल्या माहितीतून समजलं आहे.. हे दांपत्य नवापूरहून येवला येथे आपल्या मुलांना भेटण्यासाठी दुचाकीवरून प्रवास करत होते. सकाळी ७.३० सुमारास ढोलबारे गावाजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली.या धडकेनंतर दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती समोरून येणाऱ्या पिकअप वाहनावर आदळली. या भीषण अपघातात संदीप आणि आशा गावित यांचा जागीच मृत्यू झाला. क्षणात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दोन चिमुकल्या मुलांचे आई-वडील कायमचे हिरावले गेले आहेत.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. साक्री–शिर्डी महामार्गावरील अपूर्ण काम, दिशादर्शक फलकांचा अभाव, दुभाजक नसणे आणि धोकादायक वळणे यामुळेच अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप स्थानिकांनी केले आहेत..
Crime News : जुन्नर येथील खून प्रकरणातील फरार आरोपी वारजे पोलीसांकडून अटक
ओझर : जुन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत नोंद असलेल्या गुन्हा दाखल असलेल्या खून प्रकरणातील फरार आरोपीस वारजे पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या अटक केली आहे. सदर गुन्ह्यात फिर्यादी शरद निंबा साबळे (वय ४२ वर्षे, व्यवसाय – शेती, रा. निमगिरी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि ५ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता, मौजे निमगिरी, ता. […] The post Crime News : जुन्नर येथील खून प्रकरणातील फरार आरोपी वारजे पोलीसांकडून अटक appeared first on Dainik Prabhat .
संंजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट! तीन नेत्यांची नाव घेत केला ‘हा’मोठा दावा म्हणाले…
Sanjay Raut : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे भाजपवर सडकून टीका केली होती. भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यांनी केलेल्या आरोपांनंतर राजकारण चांगले तापले होते. त्यानंतर अजित पवार आणि भाजपच्या नेत्यांमध्ये वार पलवावर सुरू झाले असून राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. या सगळ्या घडामोडींवर उबाठा […] The post संंजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट! तीन नेत्यांची नाव घेत केला ‘हा’ मोठा दावा म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .
Amit Deshmukh | भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुखांसंदर्भात केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. ‘भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, ‘असं रवींद्र चव्हाण यांनी भाष्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसकडून निषेध व्यक्त केला जात आहे. याच दरम्यान, लातूरमधील विविध सामाजिक संघटना आणि […] The post “भाजपच्या चुकीमुळे लातूरच्या जनतेला नाहक त्रास होऊ नये, येत्या काळात उत्तर देऊ”; लातुर बंदची हाक देताच अमित देशमुखांचे आवाहन appeared first on Dainik Prabhat .
निर्माता मंदार देवस्थळीने शशांक केतकर नंतर 'या'अभिनेत्रीनेचेही थकवले ३ लाख
मुंबई : हे मन बावरे, होणार सून मी या घरची यासारख्या प्रसिद्ध मालिकांमधला प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर हा नेहमी सोशल मिडीयावर कायम सक्रिय असतो. त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील तो ओळखला जातो. सोशल मीडियाद्वारे तो दैनंदीन जीवनातील विविध गोष्टींवर, समस्यांवर आपली मत मांडत असतो.या अभिनेत्याने नुकतच 'हे मन बावरे' या सीरिअलच्या निर्मात्यावर म्हणेजच मंदार देवस्थळी वर पैसे थकवण्याचे गंभीर आरोप केले होते. हे मन बावरे ही सीरिअल संपून जवळपास ७ वर्ष झाली तरी माझे ५ लाख काही मला मिळाले नाही. मंदारने सतत तारखा दिल्या तसेच पैसे देण्याच्या थापा मारल्या. अशी वक्तव्य करत, याबद्दलचे सर्व पुरावे त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून चाहत्यांसोबत शेअर ही केले होते.
सरकारी लाडक्या बहिणींकडून वसूली, शासकीय कर्मचाऱ्यांनी लाटले प्रती महिना १५ हजार
मुंबई : लाडकी बहीण योजनाचा लाभ घेण्यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहे. या नियमांत बसणाऱ्या महिलांनाच लाभ मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. तरीही अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.बुलढण्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला योजनेचा लाभमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाकडून महिला व बालकल्याण विभागाला विविध विभागात कार्यरत असलेल्या १९६ कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली होती. या योजनेचा १९६ महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्या प्रकरणी चौकशी केली असता १९० कर्मचारी हे अर्धवेळ आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे आढळल्याने ते पात्र ठरत आहेत.उरलेल्या ६ शासकीय कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत प्रत्येकी १६ हजार असे एकूण १९ हजार रुपये रक्कम वसूल करण्यात आले. या महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे. लवकरच त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे या कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे.
Shefali Shah: अभिनेत्री शेफाली शाह सध्या तिच्या अभिनयामुळे यशाच्या शिखरावर आहे. मात्र वैयक्तिक आयुष्यात तिला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शेफालीने तिच्या पहिल्या लग्नातील त्रासदायक अनुभवांबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे. शेफाली शाहने अभिनेता हर्ष छाया यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र काही वर्षांतच हे नातं तुटलं आणि दोघांचा घटस्फोट झाला. या नात्यात […] The post Shefali Shah: शेफाली शाहचा खुलासा; पहिल्या लग्नात सहन केला भावनिक छळ, माजी पतीसोबतचं नातं होतं वेदनादायक appeared first on Dainik Prabhat .
supreme court on UPSC। सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या मुद्द्यावर एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालय यूपीएससी परीक्षेशी संबंधित एका याचिकेवर सुनावणी करत आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, एकदा अर्जदाराने यूपीएससी परीक्षेत आरक्षणाचा लाभ घेतला की, तो सामान्य श्रेणीतील जागांवर नियुक्तीसाठी पात्र नाही. हे निरीक्षण सामान्य श्रेणीसाठी महत्त्वाचे मानले जाते. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध […] The post “…तर मग सर्वसाधारण जागांवर अधिकार नाही” ; UPSC प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द appeared first on Dainik Prabhat .
“ठाकरे ब्रँड फक्त बाळासाहेब होते, आता सगळे संपलेत”; निलेश राणेंची बोचरी टीका
Nilesh Rane : ऐन थंडीच्या दिवसांमध्ये मुंबईतील पारा राजकारणामुळे चांगलाच तापला आहे. येत्या काही दिवसांवर पालिका निवडणूक येऊन ठेपलेली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. मुंबईसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षाने देखील कंबर कसली असून, रणनिती आखण्यात आली आहे. शिवसेना शिंदे यांच्या पक्षाने मुंबई महापालिकेसाठी दिग्गज नेत्यांवर प्रचाराची धुरा सोपवली आहे. त्यानुसार […] The post “ठाकरे ब्रँड फक्त बाळासाहेब होते, आता सगळे संपलेत”; निलेश राणेंची बोचरी टीका appeared first on Dainik Prabhat .
‘आमच्या नजरा…’; व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या कारवाईवर भारताचे मोठे विधान
S Jaishankar on Venezuela। जगभरातील देश व्हेनेझुएलाच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. चीनसह अनेक देशांनी अमेरिकेच्या कृतींचा तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी याविषयी बोलताना, “व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या लष्करी कारवाई आणि राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरोसह त्यांच्या पत्नीच्या अटकेमुळे उद्भवलेल्या संकटादरम्यान भारताची सर्वात मोठी चिंता व्हेनेझुएलाच्या जनतेची सुरक्षा आहे.” असे त्यांनी म्हटले आहे. जयशंकर लक्झेंबर्गमध्ये […] The post ‘आमच्या नजरा…’; व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या कारवाईवर भारताचे मोठे विधान appeared first on Dainik Prabhat .
Reena Roy: पडद्यावरील पहिली ‘नागिन’ जिने प्रेक्षकांची मने जिंकली
Reena Roy: बॉलीवूडमध्ये काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी प्रत्येक भूमिकेला ताकद, आत्मविश्वास आणि वेगळी छाप दिली. दिग्गज अभिनेत्री रीना रॉय यांचा आज वाढदिवस आहे. १९७० आणि १९८० च्या दशकात ‘नागिन’, ‘कालीचरण’सारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सुरुवातीचं आयुष्य रीना रॉय यांचा जन्म ७ जानेवारी १९५७ रोजी मुंबईत झाला. त्यांचं मूळ नाव सायरा अली […] The post Reena Roy: पडद्यावरील पहिली ‘नागिन’ जिने प्रेक्षकांची मने जिंकली appeared first on Dainik Prabhat .
मांजरी: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नवीन प्रभागात चांगल्या पद्धतीने विकासाचे नियोजन करण्याची जाण शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये आहे. त्यामुळे मतदारांनी त्यांना पालिकेत पाठवावे,” असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपआण्णा घुले यांनी केले. प्रभाग क्रमांक १५ मधील शिवसेना उमेदवार राजश्री विकी माने, संदीप मारुतराव लोणकर, सीमा सुधीर घुले व निलेश दिलीप घुले यांच्या […] The post PMC Election : विकासाची जाण असलेल्या शिवसेना उमेदवारांना पालिकेत पाठवा; माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप आण्णा घुले यांचे आवाहन appeared first on Dainik Prabhat .
Pune : जनता आमच्या पाठीशी उभी- मारुती आबा तुपे
हडपसर : “कोणी कितीही आरोप केले तरी आमचे कामच त्याचे उत्तर आहे. आम्ही समाजासाठी प्रामाणिक आणि सच्चे कार्यकर्ते म्हणून काम करत असल्यामुळे जनता आमच्या पाठीशी उभी राहते आणि प्रभागातून विजय निश्चित आहे,” असा विश्वास स्थायी समितीचे माजी सदस्य मारुती आबा तुपे यांनी व्यक्त केला. हडपसर-सातववाडी प्रभाग क्रमांक १६ मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मारुती आबा […] The post Pune : जनता आमच्या पाठीशी उभी- मारुती आबा तुपे appeared first on Dainik Prabhat .
सत्ता मिळवण्यासाठी भाजपची चक्क एमआयएमसोबत युती; अनोख्या राजकीय प्रयोगाची सर्वत्र चर्चा
Akot Nagar Panchayat | भाजपने सत्तेसाठी आपली तत्व बाजूला ठेवून एक मोठा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. अकोटच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपने एक अनोखा राजकीय प्रयोग केला आहे. एमआयएमसह इतर सर्व प्रमुख पक्षांना सोबत घेत अकोट विकास मंच स्थापन केला आहे. अकोटमध्ये सत्तेसाठी चक्क एमआयएमसोबत आघाडी केल्याने राज्यभरात जोरदार चर्चा सुरु झाली. याआधी अंबरनाथमध्येही भाजपने स्थानिक […] The post सत्ता मिळवण्यासाठी भाजपची चक्क एमआयएमसोबत युती; अनोख्या राजकीय प्रयोगाची सर्वत्र चर्चा appeared first on Dainik Prabhat .
प्रचारात निष्काळजीपणा! फटाके लावले अन् उडाला आगीचा भडका; पळ काढणाऱ्यांवर 'ही'अभिनेत्री चिडली
मुंबई : सध्या महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक उमेदवार आपल्या पक्षाचा, आपल्या चिन्हाचा प्रचार हा जोरात करताना दिसत आहे. यंदा २९ महापालिकांमध्ये निवडणुकांसाठी एकाच दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. तर एकाच दिवशी सर्वच महापालिकांचे निकाल देखील जाहीर होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवार हा कंबर कसून प्रचाराला लागला आहे. कुठे मोठमोठ्या रॅली, तर कुठे प्रचार सभांचे आयोजन आणि तेवढ्याच उत्साहाने उमेदवारांचे कार्यकर्ते सुद्धा प्रचाराच्या कामाला लागले आहेत.मात्र काही वेळेस अतिउत्साह होतो आणि होत्याच नव्हतं होऊन बसत. असाच काहीसा प्रकार मुंबईत घडला आहे. एका उमेदवाराच्या कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे मोठा अनर्थ घडला आहे. हा प्रकार एका बॉलीवूड अभिनेत्रींच्या आसपासच्या परिसरात घडल्याने या प्रकारविरोधात आता बॉलिवूड अभिनेत्रीन संताप व्यक्त केला आहे.अभिनेत्री डेझी शाह हीच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये तिने प्रचंड संताप व्यक्त केला असून , घडलेला प्रकार किती भयानक होता याबद्दल सांगितले आहे.
भारतीय घरात २५००० टन सोन्याच्या अनुत्पादक साठा 'ही'अहवालातील धक्कादायक माहिती समोर
मोहित सोमण: सध्या भारतात मोठ्या प्रमाणात भूराजकीय अस्थिरतेचा परिणाम विशेषतः कमोडिटीत जाणवत असताना आयआयएफएल कॅपिटलच्या 'आउटलूक २०२६' धक्कादायक माहिती समोर आणली आहे. या नव्या अहवालानुसार भारतातील घरांमध्ये असलेला सुमारे सोन्याचा साठा सुमारे २५००० टन असून सध्याच्या अस्थिरतेतील परिस्थितीत तो घसरणीचा अथवा अस्थिरतेचा अंडकरंट पचवत आहे. सध्या भूराजकीय अस्थिरतेच्या काळात व जागतिक अनिश्चिततेच्या काळात चलनातील स्थिरता,आर्थिक लवचिकता (Economical Flexibility) आणि उपभोगाला (Consumption) आधार देत, देशाच्या सर्वात महत्त्वाच्या मॅक्रोइकॉनॉमिक शॉक ॲब्सॉर्बरपैकी एक म्हणून शांतपणे उदयास आला असे अहवालाने नमूद केले आहे. या नव्या आयआयएफएल कॅपिटलच्या 'आउटलूक २०२६' अहवालानुसार, घरातील सोन्याचे अंदाजे बाजारमूल्य आता भारताच्या जीडीपीच्या जवळपास ८०% आहे. ही वाढ सोन्यात नागरिकांनी अथवा गुंतवणूकदारांनी केलेली दीर्घकालीन संचय आणि गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतींमध्ये झालेल्या तीव्र वाढीमुळे झाली असल्याचेही अहवालात म्हटले गेले आहे.अहवालात पुढे म्हटले आहे की, घरातील सोन्यापैकी केवळ एक छोटासा भाग तारण म्हणून वापरला जातो ज्यामुळे सोन्याच्या तारणावर आधारित कर्जवाटपात वाढीसाठी मोठा वाव मिळतो. एकीकडे बँका आणि एनबीएफसी सुरक्षित कर्जवाटप वाढवत असताना या साठ्याचा धोका न वाढवता हा साठा पतवाढीला आधार देतो असे अहवालाने म्हटले आहे. एकीकडे असुरक्षित कर्ज वितरणात वाढ झाली असताना तणावाची चिन्हे दिसत असताना एनपीए नियंत्रित करण्यास बँकेसमोर आव्हाने आहेत.सप्टेंबर महिन्यात जीएसटीचे तर्कसंगतीकरण झाले होते. त्यानंतर केवळ ५ व १८% हे दोनच पर्याय ठेवण्यात आले होते. ग्राहक उपयोगी वस्तूत मोठ्या प्रमाणात दरकपात झाल्याने व बाजारातील खरेदी वाढल्याने वैयक्तिक उपभोगही (Personal Consumption) वाढले. यावर आधारित निरिक्षण नोंदवताना अहवालाने म्हटले आहे की,'कर कपातीमुळे उपभोगाला चालना मिळाली आहे. वाढ सामान्य पातळीवर परत येईल,उपभोगाला चालना देणे सहसा खूप कठीण असत. भारतीय कुटुंबांकडे सुमारे २५००० टन सोने आहे आणि त्यापैकी तारण म्हणून वापरल्या जाणाऱ्या सोन्याचे प्रमाण खूप कमी आहे'. त्यामुळे अद्याप मोठ्या प्रमाणातील सोन्याचा साठा बाहेर आलेला नाही असे अहवालाचा निष्कर्ष आहे.याशिवाय अहवालात अधोरेखित केले आहे की, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये जागतिक सोन्याच्या किमतींमध्ये तीव्र वाढ होत असतानाच, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सोन्याची खरेदी वाढवली होती. या संयोजनामुळे घरातील सोने आणि आरबीआयची खरेदी रुपयाच्या अवमूल्यनाचा प्रभाव कमी करण्यास मदत झाली आणि ज्या वेळी परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीवर दबाव होता, त्या वेळी भारताचा बाह्य ताळेबंद (Fiscal Accountibility) मजबूत झाला, असेही त्यात म्हटले गेले.एकीकडे विदेशी चलनाचे चांगले व्यवस्थापन केल्याने मोठ्या प्रमाणातील परकीय चलन साठा मोठ्या प्रमाणात आरबीआयच्या साठ्यात वाढला होता. त्यामुळे समाधानकारक साठा असल्याने व एकूणच मालमत्तेमध्ये सोन्याचा वाटा वाढत असल्याने, धोरणकर्त्यांना आता चलनातील अस्थिरता व्यवस्थापित करण्यासाठी अधिक लवचिकता मिळाली असल्याचे अहवालात म्हटले आहे. गेल्या वित्तीय पतधोरण समिती बैठकीत आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी परकीय चलन मुबलक प्रमाणात असल्याचे स्पष्ट करत ट्रेडिंग व आयातीत देय दिल्यानंतरही ११ महिने बॅलन्स ऑफ पेमेंटसाठी परकीय चलन उरेल असे म्हटले होते. यावरच अहवालाने एक प्रकारे शिक्कामोर्तब केले.हे उपभोगासाठीही महत्त्वाचे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. सोन्याच्या तारणावरील कर्ज कुटुंबांना उत्पन्नाची वाढ मंदावल्यावर उच्च-किमतीच्या कर्जाचा अवलंब न करता मंदीच्या काळात खर्च सुलभ करण्यास अनुमती देते, ज्यामुळे मागणी स्थिर होण्यास मदत होते. याविषयी बोलताना अहवालात,'कर्जवाटप संपूर्ण अर्थव्यवस्थेला नसून कुटुंबांना केले जाते, मोठ्या प्रमाणातील सोन्याचे तारण भारतात सुरक्षित कर्जवाटप वाढीसाठी आणि कौटुंबिक उपभोगासाठी मजबूत संधी निर्माण करते. तारण म्हणून ठेवलेल्या सोन्याचे प्रमाण एकूण मालकीच्या सोन्याच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे सोन्यावरील कर्जवाटप वाढू शकते' असे म्हटले. दरम्यान हे सोन्याचे कवच सुप्त भांडवल म्हणून काम करून या सामर्थ्याला आधार देते तसेच तणावाच्या काळात उपलब्ध असले तरी तेजीच्या काळात पूर्णपणे वापरले जात नाही ज्यामध्ये अनुत्पादकतेचाही मुद्दा अहवालाने यावेळी उपस्थित केला.
राज्यात पुन्हा थंडी वाढणार! तापमानाचा पारा घसरला; पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका कायम
मुंबई : नववर्षाच्या दुसऱ्याच आठवड्यात राज्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. उत्तर भारतात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली असून तापमानचा पारा ही घसरत चाला आहे, याचा मोठा परिमाण हा महाराष्ट्रावर होताना दिसत आहे. पंजाब, चंदीगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरियाणा, झारखंडसह उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये नवीन थंडीची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच उत्तरेकडील थंडीचा परिणाम विदर्भात जाणवू लागला असून विदर्भात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.गोंदियामध्ये या हंगामातील सर्वात कमी तापमान ७ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. तसंच धुळे आणि नागपूरमध्येही तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत थंडीचा कडाका राहण्याची शक्यता आहे.दुसरीकडे पुण्यात मागील तीन दिवसांत किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यात थंडीपासून काहीसा दिलासा पुणेकरांना मिळाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस पुण्यातील हवामानाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रातील काही भागात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.याखेरीज वर्धा येथे ८.४ अंश सेल्सिअस, अमरावती येथे ९.३ अंश सेल्सिअस, ब्रह्मपुरी येथे९.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात सर्वाधिक किमान तापमान बुलढाणा व यवतमाळ येथे प्रत्येकी १५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. मागील काही दिवसांपासून विदर्भात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रात्रीच्या तापमानात वाढ होऊन किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.हवामान खात्यानुसार पुढील काही दिवस विदर्भात किमान तापमान कमीच राहण्याची शक्यता आहे.
India US Relations। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी असलेल्या संबंधांवर चर्चा केली आहे. ट्रम्प यांनी यावेळी बोलताना,”दोघांमध्ये चांगले संबंध आहेत, परंतु रशियाचे तेल खरेदी करण्यासाठी भारतावर लादलेल्या मोठ्या शुल्कामुळे पंतप्रधान मोदी नाराज आहेत” असे म्हटले आहे. हाऊस रिपब्लिकन सदस्यांच्या रिट्रीट दरम्यान पंतप्रधान मोदींशी झालेल्या त्यांच्या संभाषणाचा संदर्भ देत ट्रम्प म्हणाले […] The post ट्रम्प यांना त्यांची चूक कळली, म्हणाले,”पंतप्रधान मोदी माझ्यावर खूश …” ; भारतासोबतच्या संबंधांबद्दल केले ‘हे’ विधान ? appeared first on Dainik Prabhat .
काँग्रेस नेत्यावर मशिदीबाहेर धारदार शस्त्रांनी वार; उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर ताब्यात
Hidayat Patel | काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर राजकीय वादातून 6 जानेवारी रोजी जीवघेणा चाकू हल्ला झाला होता. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अकोट तालुक्यातील मोहाळा गावात हल्लेखोराने त्यांच्यावर हा हल्ला केला होता. हल्ला केल्यानंतर मारेकरी फरार झाले होते. मात्र संशयित आरोपी उबेद पटेलला रात्री ताब्यात घेण्यात आले आहे. उबेद पटेल हा 24 […] The post काँग्रेस नेत्यावर मशिदीबाहेर धारदार शस्त्रांनी वार; उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर ताब्यात appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार एमसीडी अर्थात दिल्ली मनपाने तुर्कमान गेट परिसरातील अनधिकृत मशिद आणि इतर बेकायदा बांधकाम पाडले. मोठ्या पोलीस बंदोबस्तात मनपाने कारवाई केली. कारवाई सुरू असताना मुसलमानांनी दगडफेक करुन शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी बळाचा वापर करुन परिस्थितीवर लगेच नियंत्रण मिळवले.अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी दिल्ली मनपाने दहा बुलडोझर, १५ जेसीबी, ७० डंपर यांचा वापर केला. मनपाच्या कारवाईवेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच एक हजार पोलीस जवानांचा बंदोबस्त घटनास्थळी होता. मशिदीकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेटिंग लावून बंद करण्यात आले होते.दगडफेक आणि पोलिसांचा लाठीमारकारवाई सुरू असतानाच स्थानिक लोक आणि बाहेरून आलेल्या नागरिकांनी विरोध करत जमावाने बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या आणि गॅस बुलेट्सचा वापर केला. पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले होते.अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली आहे. ज्यांनी दगडफेक आणि हिंसाचार केला, त्यांची ओळख सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे केली जाईल. कोणत्याही उपद्रवी व्यक्तीला सोडले जाणार नाही.न्यायालयाचा आदेश काय होता ?डिसेंबर महिन्यात एमसीडीने रामलीला मैदानातील अवैध अतिक्रमण आणि अनधिकृत व्यावसायिक उद्योग थांबवण्याचे आदेश दिले होते. तपासात असे आढळले की, सरकारी जमिनीचा वापर नकाशात नसलेल्या मोठ्या बांधकामासाठी आणि लग्नाचा हॉल याचा वापर खासगी कार्यक्रमांसाठी केला जात होता. दिल्ली उच्च न्यायालयाने मशिदीला लागून असलेला दवाखाना बेकायदा घोषित केला होता.
कल्याण ज्वेलर्सच्या तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ४% वाढ
मोहित सोमण: देशातील मोठ्या प्रमाणात ज्वेलरी ब्रँड चेनपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने (Kalyan Jewellers) आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ज्वेलर्सला पहिल्या तिमाहीतील एकूण महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३१% वाढ नोंदवली आहे. तर कंपनीच्या एकूण परदेशी कामकाजातील महसूलात (International Operations) इयर ऑन इयर बेसिसवर ३१% वाढ झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ज्वेलर्सच्या मध्यपूर्वेतील व्यवसायात पहिल्या तिमाहीत इयर ऑन इयर बेसिसवर २६% वाढ झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले. याशिवाय जागतिक व्यवसायात गेल्या तिमाहीतील तुलनेत १५% एकत्रित महसूल (Consolidated Revenue) वाढला आहे. कल्याण ज्वेलर्सने दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात अक्षय तृतीया, इतर सण, व लग्नाच्या हंगाम या कारणामुळे गेल्या तिमाहीत मोठी वाढ झाली आहे.संपलेल्या तिमाहीत कल्याण ज्वेलर्सने भारतात नवी १० दालने (Showroom) उघडली आहेत. तर युएसमध्ये १ व इतर ठिकाणी ८ दालने उघडली आहेत. मोठ्या प्रमाणात कंपनीची व्हर्टिकल व हॉरिझोंटल वाढ झाल्याने कंपनीच्या महसूलात व विस्तारात वाढ झाली आहे. कंपनीच्या मते, ज्वेलरीचा विक्रीतही वाढ झाली असल्यासह वाढत्या मागणीमुळे कंपनीने आपली वाढ नोंदवली आहे. सध्या कंपनीची भारत व मध्यपूर्वेतील मिळून एकूण ४०५ दालने आहेत.कंपनीने यापूर्वी कॅन्डेरे नावाचा ब्रँड लाँच केला होता. एकूणच बाजारातील वाढ झाल्यानंतर कल्याण ज्वेलर्सने आपल्या निवेदनात,:आमच्या कॅन्डेरे या डिजिटल-फर्स्ट दागिन्यांच्या प्लॅटफॉर्मने, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत, नुकत्याच संपलेल्या तिमाहीत अंदाजे ६७% महसूल वाढ नोंदवली. कॅन्डेरेने मे २०२५ च्या उत्तरार्धात आपली ब्रँड मोहीम सुरू केली. ब्रँड मोहीम सुरू झाल्यानंतरच्या कालावधीत, मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत, शोरूममधील ग्राहकांची उपस्थिती, वेब ट्रॅफिक आणि महसूल वाढीमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण सुधारणेमुळे आम्ही उत्साहित आहोत.' असे म्हटले आहे.सकाळच्या सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये थेट ४% वाढ झाली आहे. सकाळी १० वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ३.७३% वड झाल्याने शेअर ५१८.७० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. सध्या कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ५१६९५ कोटी रुपये आहे. गेल्या एक आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ७.५९% वाढ झाली असून संपूर्ण वर्षभरात मात्र -२७.७७% घसरण झाली आहे. इयर टू डेट (YTD) बेसिसवर ७.७५% वाढ झाली आहे. दिवसभरात कंपनीने ५२०.५५ रूपये प्रति शेअरवर इंट्राडे उच्चांक नोंदवला आहे.
पुणे : पुणे शहर आणि परिसरातील दैनंदिन वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या नागरिकांसाठी २०२६ हे वर्ष 'दिलासादायक' ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (MSIDC) पुणे जिल्ह्यातील दोन अत्यंत महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, २०२५ मध्ये या प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी मिळाली होती आणि आता प्रत्यक्ष जमिनीवर कामाला सुरुवात झाल्याने पुणेकरांच्या प्रवासाचा वेग वाढणार आहे. पुणे शहराच्या अंतर्गत भागात आणि उपनगरांना जोडणाऱ्या रस्त्यांवरील वाहनांचा प्रचंड ताण लक्षात घेऊन हे दोन प्रकल्प आराखड्यात समाविष्ट करण्यात आले होते. MSIDC तर्फे राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पांमुळे पुण्यातील महत्त्वाचे जंक्शन्स आणि कनेक्टिव्हिटी पॉईंट्स सुलभ होणार आहेत. यामुळे शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच शहराबाहेर जाणारा प्रवासही कमी वेळेत पूर्ण होईल. २०२५ हे वर्ष या प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया आणि मंजुरीमध्ये गेले. मात्र, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व तांत्रिक अडथळे दूर करून प्रत्यक्ष यंत्रणा कामाला लागली आहे. हे दोन्ही मार्ग पुण्यातील दळणवळणाच्या दृष्टीने 'लाईफलाईन' ठरणार असल्याचे बोलले जात आहे. या कामाच्या नियोजित वेळापत्रकामुळे आगामी काळात पुणेकरांना खड्डेमुक्त आणि सिग्नलमुक्त प्रवासाचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे.https://prahaar.in/2026/01/07/thane-metro-opening-date-revealed-by-pratap-sarnaik-will-connect-mumbai-to-thane-seamlessly/हडपसर ते यवत प्रवासाचे चित्र बदलणार!नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मंजुरीनंतर, हडपसर-यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या दोन मेगा प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कामाला आता गती मिळणार आहे. तब्बल ५,२६२ कोटी रुपये खर्चून उभारला जाणारा हडपसर-यवत उड्डाणपूल पुणे-सोलापूर हायवेवरील कोंडी कायमची संपवण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. हडपसरमधील भैरोबा नाळा ते यवत दरम्यान होणाऱ्या या सहा पदरी उड्डाणपुलामुळे सोलापूरकडे जाणारी वाहतूक आता विनाअडथळा पार पडणार आहे. जून २०२५ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती, मात्र आता त्याच्या लांबीत सुमारे ४.५ किलोमीटरची वाढ करण्यात आल्याने हा मार्ग अधिक सुटसुटीत होणार आहे. या विस्तारामुळे स्थानिक वाहतूक आणि हायवेची लांब पल्ल्याची वाहतूक वेगळी होऊन प्रवासाचा वेळ अर्ध्यावर येईल.तळेगाव-चाकण-शिक्रापूर: ५४८-डी महामार्गाचा कायापालटपुणे जिल्ह्यातील औद्योगिक पट्ट्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर (राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी) च्या बांधकामालाही याच वर्षात मुहूर्त मिळणार आहे. एकूण ५३.२ किलोमीटर लांबीच्या या मार्गाचे काम दोन टप्प्यांत केले जाईल. विशेष म्हणजे, यातील २४.२ किलोमीटरचा रस्ता हा 'एलिव्हेटेड' (उन्नत) मार्ग असणार आहे, ज्यामुळे चाकण परिसरातील अवजड मालवाहतुकीचा आणि कामगारांच्या प्रवासाचा प्रश्न सुटेल. हे दोन्ही प्रकल्प केवळ रस्ते नसून पुण्याच्या आर्थिक विकासाचे महामार्ग ठरणार आहेत. हडपसर-यवत पुलामुळे सोलापूर-पुणे कनेक्टिव्हिटी सुधारेल, तर तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग हा ऑटोमोबाईल आणि लॉजिस्टिक हबला मोठी चालना देईल. या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असून, पुढील काही वर्षांत पुणेकरांना वाहतूक कोंडीमुक्त प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.'या' कंपनीकडे सोपवली जबाबदारीया दोन्ही महत्त्वाच्या मार्गांच्या बांधकामासाठी 'मोंटेकार्लो लिमिटेड' या नामांकित कंपनीची निवड करण्यात आली आहे. तांत्रिक आणि आर्थिक निकषांवर पात्र ठरल्यानंतर या कंपनीला कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. सध्या या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल आणि कंत्राटाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. मंत्रालयातून हिरवा कंदील मिळताच यंत्रसामग्री आणि कामगार प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी दाखल होतील. MSIDC मधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन महिन्यांच्या आत हडपसर–यवत आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर या दोन्ही मार्गांचे काम सुरू होण्याचे दाट संकेत आहेत.
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ; आता धावणार १८ डब्ब्यांची उपनगरीय रेल्वे
मुंबई : मुंबईकरांसाठी नव्यावर्षातील मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईकरांची रोजची तारे वरची कसरत बघता रेल्वेने १८ डब्ब्यांची लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे येत्या १४ आणि १५ जानेवारी रोजी विरार-डहाणू मार्गावर १८ डब्ब्यांच्या उपनगरीय गाड्यांची चाचणी करणार आहे. भारतीय रेल्वेकडून इतक्या लांब लोकल गाड्यांची ही पहिलीच चाचणी असेल.सध्या मुंबईकरांच्या सेवेत १२ आणि १५ डब्ब्यांच्या लोकल गाड्या आहेत. त्यामुळे त्यांच्या फेऱ्या ही वाढल्या आहेत. परिणामी मुंबई लोकलची गर्दी ही दिवसेंदिवेस वाढत चालली आहे. वाढली गर्दी , लोकलवरचा वाढता ताण लक्षात घेत. रेल्वेनी १८ डब्ब्यांची उपनगरीय लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.कश्या असतील १८ डब्ब्यांच्या रेल्वे ?एका ट्रेनमध्ये बॉम्बार्डियरची इलेक्ट्रिक सिस्टम असेल तर, दुसऱ्या ट्रेनमध्ये मेधाची इलेक्ट्रिक सिस्टम असेल. दोन्ही ट्रेनमध्ये अनिवार्य सुरक्षा चाचण्या घेतल्या जटिल. या चाचण्यांमध्ये दोन महत्वाच्या सुरक्षा चाचण्यांचा समावेश असेल. आपत्कालीन ब्रेकिंग डिस्टन्स , ज्यामद्धे आपत्कालीन काळात ट्रेन किती दूरवर जाऊ शकते हे तपासल जाईल. दुसरी म्हणजे कपलर फोर्स चाचणी असेल, ज्या चाचणीत ब्रेकिंग दरम्यान कोचना पडणाऱ्या दाबाचे मूल्यांकन केल जाईल.
शेअर बाजार पुन्हा कोसळला ! सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला तर निफ्टी २६,११७ च्या खाली
Stock Market Today। भारतीय शेअर बाजाराने आज आठवड्याच्या तिसऱ्या सत्रात, व्यापार दिवसाची सुरुवात नकारात्मकतेने केली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५०, लाल रंगात उघडले. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक ४४२.९४ अंकांनी म्हणजेच ०.५२ टक्क्यांनी घसरून ८४,६२०.४० वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी ५० ३५.६० अंकांनी म्हणजेच ०.१४ टक्क्यांनी घसरून २६,१४३.१० वर उघडला. […] The post शेअर बाजार पुन्हा कोसळला ! सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला तर निफ्टी २६,११७ च्या खाली appeared first on Dainik Prabhat .
हरमनप्रीतची झेप; दीप्तीचे अव्वल स्थान निसटले!
आयसीसी टी-२० क्रमवारी जाहीरदुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीनुसार भारतीय संघाच्या क्रमवारीत काही महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौरने फलंदाजीच्या क्रमवारीत दोन स्थानांनी प्रगती केली आहे, तर अष्टपैलू दीप्ती शर्माला गोलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान गमवावे लागले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेतील अंतिम सामन्यात हरमनप्रीतने ४३ चेंडूंत ६८ धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली होती. याच उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर ती फलंदाजांच्या क्रमवारीत दोन स्थानांनी वर चढली असून, आता ती १३व्या स्थानावर पोहोचली आहे. दीप्ती शर्मासाठी मात्र ही क्रमवारी निराशाजनक ठरली. तिला ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँडने मागे टाकले आहे. दीप्ती आता टी-२० गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. सदरलँडकडे आता ७३६ रेटिंग पॉइंट्स आहेत, तर दीप्ती तिच्यापासून केवळ एक पॉइंट मागे आहे. तरीही दीप्ती अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर कायम आहे.या ताज्या क्रमवारीनुसार भारतीय संघाच्या काही प्रमुख खेळाडूंना पुढील सामन्यांमध्ये कामगिरी सुधारण्याचे आव्हान असणार आहे.इतर भारतीय खेळाडूंची स्थितीस्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी फलंदाजीच्या क्रमवारीत अनुक्रमे तिसरे आणि सहावे स्थान कायम राखले आहे.जेमिमा रॉड्रिग्ज टॉप-१० मधून बाहेर पडली असून १२व्या स्थानावर गेली आहे.जलद गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर पाच स्थानांनी घसरली असून, ती देखील आता टॉप-१० गोलंदाजांच्या यादीत नाही.
ॲशेस मालिका : सिडनीच्या मैदानात स्टीव्ह स्मिथची बॅट तळपली
'द वॉल' द्रविडचा विक्रम मोडीत काढून ३७ वे कसोटी शतक पूर्णसिडनी : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आपल्या बॅटची जादू पुन्हा एकदा दाखवली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या ॲशेस कसोटीच्या तिसऱ्या दिवशी स्मिथने झंझावाती फलंदाजी करत आपल्या कारकिर्दीतील ३७ वे कसोटी शतक पूर्ण केले. या शतकामुळे त्याने भारताचे दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांचा विक्रम मागे टाकत जागतिक क्रिकेटमध्ये एक नवा मैलाचा दगड प्रस्थापित कला आहे. या शतकासह स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्यांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. त्याने राहुल द्रविड (३६ शतके) यांना मागे टाकले असून, तो आता सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या जागतिक यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता त्याच्या पुढे फक्त कुमार संगकारा (३८), रिकी पाँटिंग (४१), जो रूट (४१), जॅक कॅलिस (४५) आणि सचिन तेंडुलकर (५१) हे खेळाडू आहेत.ॲशेस मालिकेच्या इतिहासात स्मिथने आपले १३ वे शतक झळकावले आहे. त्याचप्रमाणे अॅशेसमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या अनेक फलंदाजांच्या यादीत त्याने जॅक हॉब्स यांना मागे सारून दुसरे स्थान पटकावले आहे. आता केवळ सर डॉन ब्रॅडमन (१९ शतके) हे स्मिथच्या पुढे आहेत. स्मिथच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली असून, क्रिकेट विश्वात त्याच्या फलंदाजीची आणि विक्रमांची जोरदार चर्चा सुरू आहे.ऑस्ट्रेलियाची सामन्यावर पकडस्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड (१६३ धावा) यांच्यातील जबरदस्त भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने पाचव्या कसोटीत इंग्लंडवर वर्चस्व मिळवले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने मोठ्या धावसंख्येकडे कूच केली असून, इंग्लंडचा संघ दबावाखाली दिसून येत आहे.सर्वाधिक कसोटी शतके (२०२६ पर्यंतची स्थिती):क्रमांक खेळाडू कालावधी सामने शतके१ सचिन तेंडुलकर १९८९-२०१३ २०० ५१२ जॅक कॅलिस १९९५-२०१३ १६६ ४५३ रिकी पॉन्टिंग १९९५-२०१२ १६८ ४१४ जो रूट २०१२-२०२६ १६३ ४१५ कुमार संगकारा २०००-२०१५ १३४ ३८६ स्टीव्ह स्मिथ २०१०-२०२६ १२३ ३७७ राहुल द्रविड १९९६-२०१२ १६४ ३६
मोहित सोमण: आजही पाचव्या सत्रात घसरण कायम आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाल्याने सेन्सेक्स १२९.५४ व निफ्टी ४१.०५ अंकाने घसरला आहे. आज युएस व्हेनेझुएला यांच्यातील द्वंद्व कायम असताना पुन्हा एका भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी आपले सेल ऑफ नफा बुकिंग सुरू ठेवल्याने बाजारात अस्थिरता कायम राहिली आहे. सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही बँक निर्देशांकात पुन्हा एकदा घसरण झाल्याने बाजारातील आधारपातळी निर्देशांकात राखता आली नाही. आगामी कंपन्यांच्या तिमाही निकालावर देखील गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. दरम्यान क्षेत्रीय निर्देशांकातील आयटी, मेटल, कंज्यूमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे घसरण मर्यादित राहिली आहे. तर ऑटो, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक, प्रायव्हेट बँक निर्देशांकात मोठी घसरण झाली. सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ केएसबी (३९६.२७%), जेबीएम ऑटो (५.०७%), टाटा टेक्नॉलॉजी (४.२१%), टायटन इलेक्सी (३.२२%), इन्फोऐज इंडिया (३.२१%), एमसीएक्स (२.५४%) समभागात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण इंडियन हॉटेल्स (२.७३%), मेट्रोपॉलिस हेल्थ (२.७०%), सिप्ला (२.३१%), टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल (१.९५%), टीबीओ टेक (१.७८%), आरबीएल बँक (१.५६%) समभागात झाली आहे.
ठाणे : मुंबई आणि ठाणे या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) आणि ४-ए (कासारवडवली-गायमख) बाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो सेवा २०२६ मध्ये प्रवाशांसाठी खुली होणार असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकल्पामुळे ठाणेकरांचा मुंबईचा प्रवास सुसाट आणि प्रदूषणमुक्त होणार आहे. ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदारसंघाचा प्रगती अहवाल सादर करताना मंत्री सरनाईक यांनी या मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर आढावा दिला. ते म्हणाले की, या संपूर्ण मेट्रो मार्गिकेचे काम एकूण तीन मुख्य टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे. तांत्रिक सोय आणि प्रवाशांची निकड लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण केले जाणार असून, २०२६ पर्यंत प्रत्यक्ष मेट्रो सेवा सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पाला झालेल्या विलंबाबाबत बोलताना सरनाईक यांनी स्पष्ट केले की, महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे प्रशासकीय स्तरावर काही कामांना विलंब झाला होता. मात्र, आता आचारसंहितेचा अडथळा दूर झाल्याने प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आली आहे. वडाळा, विक्रोळी ते थेट कासारवडवली असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मार्गिका संजीवनी ठरणार आहे.https://prahaar.in/2026/01/07/a-whirlwind-of-election-rallies-by-minister-nitesh-rane-in-nalasopara/ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत प्रताप सरनाईक यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांची माहिती दिली. यावेळी त्यांनी ठाणे मेट्रोच्या कामात स्वतः सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. २०२६ मध्ये ही मेट्रो रुळावर धावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाबाबत मुंबई आणि ठाणेकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.मार्ग कसा असणार?प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोचा सर्वात पहिला टप्पा ठाणे शहरांतर्गत असेल. कॅडबरी जंक्शन ते गायमुख हा १०.५ किलोमीटर लांबीचा मार्ग मार्च २०२६ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये कासारवडवली ते गायमुख या २.७ किलोमीटरच्या मेट्रो लाईन ४-ए विस्ताराचाही समावेश असेल. हा टप्पा सुरू झाल्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची मोठी सुटका होणार आहे. पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत, म्हणजेच २०२६ च्या अखेरीस, दुसरा टप्पा सुरू करण्याचे नियोजन आहे. हा टप्पा गायमुखपासून विक्रोळीतील गांधी नगरपर्यंत असेल, ज्याची लांबी सुमारे १० किलोमीटर आहे. या टप्प्यामुळे ठाणे आणि मुंबईच्या उपनगरांमधील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. मेट्रो लाईन ४ चा शेवटचा टप्पा जो विक्रोळी ते वडाळ्यापर्यंत आहे, तो २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. वडाळ्यापर्यंतचा मार्ग पूर्ण झाल्यावर ठाणे ते दक्षिण मुंबई असा प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करणे शक्य होईल. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदारसंघाचा प्रगती अहवाल सादर करताना सरनाईक यांनी ही माहिती दिली. यावेळी युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वश सरनाईक देखील उपस्थित होते. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असून, विकासाच्या माध्यमातून जनतेची सेवा करत आहोत, असा दावाही त्यांनी यावेळी केला. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सादर केलेला हा विकास अहवाल आणि मेट्रोची डेडलाईन ठाणेकरांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
‘तो’निर्णय अन् ऐन निवडणुकीच्या काळात भाजपला धक्का! राज्य निवडणूक आयोगाने…
Mumbai Municipal Corporation Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी खूप कमी दिवस शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचारात कोणतीही कसर सोडली जात नसून, जोरात प्रचार सुरू आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून थंडी सुरू असली तरी निवडणुकीमुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपकडून मुंबई निवडणुकीसाठी रणनिती आखण्यात आली असून त्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. मात्र, […] The post ‘तो’ निर्णय अन् ऐन निवडणुकीच्या काळात भाजपला धक्का! राज्य निवडणूक आयोगाने… appeared first on Dainik Prabhat .
K. Kavitha। तेलंगणाच्या राजकारणातील एक महत्त्वाचा अध्याय अधिकृतपणे संपला आहे. भारत राष्ट्र समिती (BRS) च्या सदस्या कलवकुंतला कविता म्हणजेच के.कविता यांचा विधान परिषदेतील (MLC) राजीनामा अखेर स्वीकारण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी सभागृहात कविता यांच्या भावनिक भाषणानंतर परिषदेचे अध्यक्ष गुट्टा सुखेंद्र रेड्डी यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. विधिमंडळ सचिवांनी या संदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. […] The post के. कविता यांचा विधानपरिषदेचा राजीनामा स्वीकारला ; भावुक निरोप देत BRS शी तोडले नाते, नव्या राजकीय इनिंगची तयारी ? appeared first on Dainik Prabhat .
टीकास्त्रांच्या धुराळ्यात मुद्देच हरवले; मतदारांवर प्रचाराचा भडीमार
स्वप्निल काळे पिंपरी: शहरात निवडणुकीचे वारे सध्या जोरदार वाहत आहेत. उमेदवारांकडून पत्रक वाटप चौकाचौकांत बॅनर्स, सोशल मीडियावर जाहिराती आणि सभांमधून घोषणांचा भडीमार सुरू आहे. मात्र या साऱ्या गदारोळात विकासापेक्षा प्रतिमानिर्मिती आणि कामापेक्षा एकमेकांवरील टीकास्त्रांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचे चित्र ठळकपणे दिसून येत आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवार आपली चांगली प्रतिमा जनतेसमोर मांडण्याच्या प्रयत्नात आहे. आपण […] The post टीकास्त्रांच्या धुराळ्यात मुद्देच हरवले; मतदारांवर प्रचाराचा भडीमार appeared first on Dainik Prabhat .
Daisy Shah: घराजवळ आग लागल्यानंतर अभिनेत्री संतापली, म्हणाली…काही ‘बेवकूफ’ लोकांमुळे प्रकार घडला
Daisy Shah: बॉलीवूड अभिनेत्री डेजी शाह हिने मंगळवारी सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या घराजवळील इमारतीला आग लागल्याची घटना सांगितली असून, या प्रकारामागे फटाके फोडणाऱ्या लोकांची गैरजबाबदारी असल्याचा आरोप केला आहे. ही घटना मुंबईतील बांद्रा ईस्ट परिसरात घडली. मंगळवारी रात्री डेजी शाह तिच्या पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर गेली असताना […] The post Daisy Shah: घराजवळ आग लागल्यानंतर अभिनेत्री संतापली, म्हणाली… काही ‘बेवकूफ’ लोकांमुळे प्रकार घडला appeared first on Dainik Prabhat .
वसई-विरार निवडणूक रिंगणात कोट्यधीश उमेदवार
दोन उमेदवारांकडे अब्जावधींची संपत्तीविरार : वसई-विरार महापालिकेच्या मतदानाची तारीख जवळ जवळ येत असताना, उमेदवारांच्या प्रचाराला सुद्धा वेग आला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोप याबाबत चर्चा होत असल्या तरी सर्वाधिक चर्चा ही यनिवडणुकीतील उमेदवाराच्या संपत्तीची होत आहे. वसई-विरार मध्ये अनेक कोट्याधीश उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर दोन उमेदवार हे अब्जाधीश असल्याचे दिसून येत आहे. वार्षिक बजेट ४ हजार कोटी रुपये असलेल्या वसई-विरार महापालिकेचा समावेश राज्यातील चार क वर्गातील महापालिकेमध्ये होतो.सन २०११ च्या जनगणनेनुसार वसई-विरार शहराची लोकसंख्या १२ लाखांवर असली तरी, आज मात्र ही संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे या शहरासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून विविध योजनांसाठी कोट्यवधींचा निधी दिल्या जात आहे. दरम्यान, या पालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. ११ लाख रुपयांची खर्च मर्यादा उमेदवारांना देण्यात आल्याने उमेदवार सुद्धा निवडणुकीसाठी चांगले खर्च करीत आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात अनेक उमेदवार हे कोट्यधीश आहेत. तर दोन उमेदवार हे अब्जाधीश आहेत.बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव माजी नगरसेवक अजीव पाटील यांच्या उमेदवारी अर्ज मालमत्ता विवरणपत्रामध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांची एकूण मालमत्ता ही २ अब्ज ९१ कोटी ६५ लाख ६७ हजार एवढी दाखविण्यात आली आहे. त्यानंतर पंकज ठाकूर हे दुसरे अब्जाधीश उमेदवार आहेत. पंकज ठाकूर यांच्या कुटुंबीयांची एकूण मालमत्ता १ अब्ज ४३ कोटी ९ लाख ६७ हजार एवढी दाखविण्यात आली आहे. तर अनेक उमेदवार हे कोट्याधीश आहेत.जमीन, इमारती, गाळे, सदनिका, शेअर बाजारातील गुंतवणूक अत्याधुनिक वाहने, सोन्या चांदीचे दागिने आणि मोठी रोकड उमेदवारांनी दाखवलेल्या मालमत्तेच्या विवरण पत्रात नमूद आहे.
भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !
तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्ममुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये मोबाईल नेटवर्कची समस्या कायम आहे. मोबाईल नेटवर्क सुरू करण्याबाबत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसीएल) आणि दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही. मेट्रो स्थानकांतील पायाभूत सुविधांशी जोडणी करण्यासाठी ‘एसीईएस इंडिया’ या त्रयस्थ कंपनीकडून दूरसंचार कंपन्यांना अवाजवी दर आकारले जात असल्याचे बोलले जात आहे. या तिढ्याचा तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म असल्याने नियमित प्रवाशांची नेटवर्कअभावी गैरसोय होत आहे.आरे ते कफ परेडदरम्यान मेट्रो-३ मार्गिकेची भुयारी मेट्रो सेवा सुरू आहे. यातील वरळी ते कफ परेडपर्यंतचा शेवटचा टप्पा सुरू होऊन तीन महिने उलटून गेले असतानाही मोबाईल नेटवर्कचा प्रश्न कायम आहे. मेट्रो मार्गिकेच्या केवळ काही मर्यादित भागांमध्येच वोडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलचे नेटवर्क उपलब्ध आहे. प्रवासादरम्यान मोबाईलवरून बाहेरील संपर्क साधणे शक्य होत नाही. दररोज तिकिटासाठी ५० ते ७० रुपये मोजावे लागतात, तरीही एमएमआरसीएल प्रशासन प्रवाशांसाठी मोबाईल नेटवर्कची सुविधा उपलब्ध करण्यात इतके ढिम्म का? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. ‘अॅक्वा लाइन’साठी एमएमआरसीएलने एसीईएस इंडिया लिमिटेड या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. मात्र, टेलिकॉम कंपन्यांचा आरोप आहे, की एसीईएसकडून नेटवर्क उभारणीसाठी अवाजवी दर आकारले जात आहेत. अनेक बैठका होऊनही तोडगा न निघाल्यामुळे अद्याप काही मेट्रो प्रवाशांना नेटवर्क सुविधा मिळू शकलेली नाही. एका प्रमुख टेलिकॉम ऑपरेटरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसीईएसने ११८ कोटी रुपयांचा भांडवली खर्च असल्याचा दावा केला आहे. मात्र, टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या अंतर्गत अंदाजानुसार हा खर्च फक्त सुमारे ३० कोटी रुपयांपर्यंत असायला हवा.सूत्रांनी सांगितले की, सुरुवातीला मुंबई मेट्रो आणि त्यांच्या विक्रेत्याकडून प्रति स्टेशन १३ लाख रुपये मागितले जात होते. नंतर हे शुल्क कमी करून प्रति स्टेशन ५.५ लाख रुपये करण्यात आले. दुसरीकडे, टीपीएसच्या अंतर्गत गणनेनुसार प्रति स्टेशन दरमहा प्रत्येकी ३९,००० रुपये भांडवली खर्च आणि त्यावर १० टक्के व्यवस्थापन शुल्क देणे अपेक्षित आहे. याच आर्थिक वादामुळे भुयारी मेट्रो मधील नेटवर्क प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही आणि त्याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे.
श्रेयस अय्यर फिटनेस परीक्षेत उत्तीर्ण
विजय हजारे करंडक : मुंबई, कर्नाटक, सौराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत दाखलमुंबई : विजय हजारे करंडक २०२५-२६ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. या सामन्यांच्या निकालानंतर बाद फेरीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. सौराष्ट्र, कर्नाटक आणि मुंबई यांसारख्या बलाढ्य संघांनी मोठे विजय मिळवत आपला दबदबा कायम ठेवला, तर काही सामन्यांचे निकाल अत्यंत चुरशीचे लागले.या सामन्यात मुंबईने हिमाचल प्रदेशवर केवळ ७ धावांनी निसटता विजय मिळवला. हिमाचल प्रदेशने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. मुंबईकडून यशस्वी जयस्वाल आणि मुशीर खान यांनी डावाची सुरुवात केली. पण जयस्वाल १५ धावांवरच बाद झाला. त्यानंतर मुशीर खानला त्याचा भाऊ सर्फराज खान साथ देण्यासाठी आला. सर्फराजने आक्रमक फलंदाजी करताना १० चेंडूंत २१ धावांची आक्रमक खेळी केली. पण त्यानंतर तो बाद झाला. त्यामुळे श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. एकीकडे मुशीर आक्रमक खेळत असताना दुसरीकडे श्रेयस संयमी खेळ करत होता. या दोघांमध्ये ५४ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी झाली. यादरम्यान मुशीरने अर्धशतक पूर्ण केले. पण त्याला कुशल पलने बाद केले. त्याने ५१ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ७३ धावांची खेळी केली.त्यानंतर मात्र श्रेयस अय्यरने वादळी खेळ केला. त्याला सूर्यकुमार यादवने साथ दिली. सूर्यकुमार २४ धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस शतकही करेल, असं वाटत होते. मात्र २६ व्या षटकात तो कुशल पलविरुद्ध खेळताना अमनप्रीत व्ही सिंगकडे झेल देत बाद झाला. श्रेयसने ५३ चेंडूंत १० चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली. या खेळीमुळे मुंबईने २५ षटकातच २२० धावांचा टप्पा पार केला होता. दरम्यान पावसामुळे ३३ षटकांचा करण्यात आलेल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील मुंबईने हिमाचल प्रदेशवर केवळ ७ धावांनी विजय मिळवला.हैदराबादच्या अमन रावची द्विशतकी खेळीहैदराबादच्या २१ वर्षीय सलामीवीर अमन राव याने विजय हजारे ट्रॉफीत धुमाकूळ घातला. मोहम्मद शमी, आकाश दीप व मुकेश कुमार या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना त्याने चांगलाच चोप दिला. बंगालविरुद्ध त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून आपले द्विशतक पूर्ण केले. तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरलेल्या हैदराबादला अमन व राहुल सिंग गहलौत आश्वासक सुरुवात करून दिली. १६ व्या षटकात १०४ धावांची ही भागीदारी संपुष्टात आली आणि राहुलला ५४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६५ धावांवर माघारी जावे लागले. त्यानंतर कर्णधार तिलकसोबत दुसऱ्या विकेटसाठी अमनने ९७ चेंडूंत ८७ धावा जोडल्या. तिलक ४५ चेंडूंत ३४ धावांवर माघारी परतला. दरम्यान बंगालचा संघ लक्ष्याचा पाठलाग करताना निष्प्रभ ठरला.शुभमन गिल स्वस्तात बाद : धुक्यामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात गोव्याने प्रथम फलंदाजी करताना ३३.३ षटकांत सर्वबाद २११ धावा केल्या. सुयश प्रभुदेसाई (६६ धावा) आणि ललित यादव (५४ धावा) यांनी दिलेले योगदान वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. अर्जुन तेंडुलकर केवळ १ धाव काढून बाद झाला. २१२ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या पंजाब संघाची सुरुवात खराब झाली. पुनरागमन करणारा कर्णधार शुभमन गिल स्वस्तात (अवघ्या ७ धावांवर) बाद झाला, ज्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर सलामीवीर हरनूर सिंगने डावाची धुरा सांभाळली. त्याने नाबाद ९४ धावांची जबरदस्त खेळी करत पंजाबला विजय मिळवून दिला. पंजाबने २९ व्या षटकातच ४ गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे लक्ष्य पूर्ण केले.सौराष्ट्र विरुद्ध सर्विसेस: फलंदाजांचा झंझावातसौराष्ट्रने या सामन्यात आपल्या फलंदाजीच्या जोरावर वर्चस्व गाजवले. आक्रमक पवित्रा घेत सौराष्ट्रने ३४९ धावांचा डोंगर उभा केला आणि सर्विसेसचा १११ धावांनी मोठा पराभव केला. फलंदाजी करताना सौराष्ट्रच्या सलामीवीरांनी भक्कम सुरुवात करून दिली. मधल्या फळीतील फलंदाजांनी वेगवान धावा कुटल्यामुळे निर्धारीत ५० षटकांत त्यांनी ३४९/५ अशी मोठी धावसंख्या उभारली. यात चेतेश्वर पुजारा आणि अर्पित वसावडा यांच्या महत्त्वपूर्ण खेळींचा समावेश होता. ३५० धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना सर्विसेसच्या फलंदाजांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सौराष्ट्रच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. सर्विसेसचा डाव २३८ धावांत आटोपला.
Pimpri : अर्थव्यवस्थेला चालना देणारी निवडणूक; समाजाच्या प्रत्येक स्तराला मिळतेय उत्पन्नाची संधी
पिंपरी – भारतातील निवडणूक अर्थात जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा एक उत्सव असतो. 2024 पासून शहरात सातत्याने निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणूक पैशांवर जिंकल्या जात असल्याचे आरोप होत असले तरी निवडणूक स्थानिक पातळीवर अर्थव्यवस्थेला चालना देते, हे सत्य नाकारता येत नाही. समाजातील तळा-गाळापर्यंत विविध कामांच्या माध्यमातून पैसा पोहचू लागतो. अनेकांना तात्पुरता का होईना रोजगार मिळतो आणि अनेक […] The post Pimpri : अर्थव्यवस्थेला चालना देणारी निवडणूक; समाजाच्या प्रत्येक स्तराला मिळतेय उत्पन्नाची संधी appeared first on Dainik Prabhat .
Pimpri : विविध प्रभागात माजी नगरसेवकांमध्ये जोरदार फाइट; एका प्रभागात भाऊ-भाऊ रिंगणात
पिंपरी– पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वेगवेगळ्या एकूण १७ प्रभागांमध्ये माजी महापौर, माजी नगरसेवक, सत्तारूढ पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते हे एकमेकांसमोर निवडणूक रिंगणात आले आहेत. त्यामुळे सामन्यांची रंगत चांगलीच वाढली आहे. या ठिकाणी जोरदार फाईट होणार असून या लढतींकडे शहराचे लक्ष लागले आहे. भोसरीतील गव्हाणे वस्ती प्रभाग पाच ड मधून अनुराधा गोफणे विरुद्ध प्रियंका बारसे रिंगणात आहेत. […] The post Pimpri : विविध प्रभागात माजी नगरसेवकांमध्ये जोरदार फाइट; एका प्रभागात भाऊ-भाऊ रिंगणात appeared first on Dainik Prabhat .
Pune : आता क्राॅस व्होटिंगसाठी फिल्डिंग
पुणे– महापालिकेची प्रभाग रचना आणि त्यानंतर प्रारूप मतदार यादीत प्रभागांची मोडतोड झाल्यानंतर भाजप वगळता इतर जवळपास सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक लढविण्याची संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर आता उमेदवारी मिळाल्याने, तसेच भाजप मध्ये नाराजांची मोठी फळी असल्याने या फळीला सोबत घेऊन शहरातील अनेक प्रभागांमध्ये क्राॅस व्होटिंगसाठी फिल्डिंग लावली जात आहे. अनेक प्रभागांमध्ये चार सदस्यांमध्ये एक- […] The post Pune : आता क्राॅस व्होटिंगसाठी फिल्डिंग appeared first on Dainik Prabhat .
उबाठा मनसेचा वचननामा,आमचा पंचनामा
मुंबईत २२ वर्षांत रेन वॉटर हार्वेस्टींगचा नाही पत्ताइमारतींना ओसी, पण प्रत्यक्षात सत्ता काळात उबाठाला याची अंमलबजावणी करण्यात अपयशमुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उबाठा आणि मनसेच्या वतीने मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा जाहीर केला आहे. यामध्ये नवीन इमारतींमध्ये रेनवॉटर परकोलेशन पिट्स आणि मुंबईत काही ठराविक जागी रेन वॉटर होडींग टँकस साकारणार असल्याचे नमुद केले. विशेष नवीन इमारत बांधकामांमध्ये वर्षा संचयन प्रकल्पाची बंधनकारक असतानाही मागील २२ ते २३ वर्षांमध्ये याची परिणामकारक अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सत्ता काळात उबाठाला या रेन वॉटर हार्वेस्टींगची आठवण झाली नाही आणि सत्तेपासून दूर राहिल्यानंतर जनतेला पुन्हा एकदा रेन वॉटर हार्वेस्टींगचे स्वप्न दाखवले जात आहे.सन २००२मध्ये प्रारंभी १ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर वर्षा संचयन प्रकल्प राबवणे बंधनकारक केले होते. त्यानंतर २००७ मध्ये त्यात बदल करून ३०० चौरस मीटरवरील जागेवरही ही योजना राबवणे बंधनकारक केले होते. मात्र, सन २००७नंतर ३०० चौरस फुटांच्या जागेवर हजारो गृहनिर्माण प्रकल्प राबवले गेले, परंतु एकाही प्रकल्पांमध्ये याच अंमलबजावणी झालेली नाही. विशेष म्हणजे महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाच्यावतीने बांधकामांना ओसी प्रमाणपत्र देताना याची पाहणी करून हे प्रमाणपत्र दिले जाते. परंतु पुढे हा प्रकल्प कार्यान्वितच दिसत नाही.मागील २२ ते २३ वर्षांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्पाला तिलांजली दिली जात असून महापालिकेत सत्तेवर असलेल्या उबाठाला कधीही याची दखल घ्यावीशी वाटली नाही.समुद्राचे पाणी गोड्या पाण्यात रुपांतरीत करणारा नि:क्षारीकरण अर्थात डिसॅलिनेश प्रकल्प राबवून मुंबईकरांना सध्याच्या दरानेच मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार अशाप्रकारचे वचनही दिले आहे. परंतु सन २०१९मध्ये याबाबतची घोषणा शिवसेनेने केली. परंतु सन २०२५च्या शेवटच्या महिन्यात याची निविदा अंतिम होवून कंत्राटदाराची निवड केली आहे. त्यानुसार कामालाही सुरुवात झाली आहे. मात्र, मागील काही वर्षांमध्ये यासाठीचा कंत्राटदारही पुढे येत नव्हता. यासाठी आता साडेअकरा हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. हा प्रकल्प आता मार्गी लागला आहे.नालेसफाईची कामे ही वर्षाचे १२ महिने केली जातील आणि पुढील ५ वर्षांत नाल्यांवर संरक्षक जाळी बसवली जाईल.मुंबईतील विविध नाल्यांची सफाईचे काम महापालिकेच्यावतीने केली जात असून पावसाळ्यापूर्वी ८० टक्के आणि पावसाळ्याच्या काळात १० टक्के आणि नंतर १० टक्के अशाप्रकारे ही सफाई करणे बंधनकारक आहे. परंतु नाल्याची सफाई ही नेहमीच हातसफाई ठरत असून शिवसेनेच्या सत्ता काळात नालेसफाईच्या कामांमधील भ्रष्टाचाराप्रकरणी अनेकांना शिक्षाही झाली आहे. नाल्यांवर जाळ्या बसवण्याची प्रकिया यापूर्वीही महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली असून झोपडपट्टी वस्त्यांमध्ये अशाप्रकारच्या जाळ्या लावणे आणि नाले बंदिस्त करणे आदींची कामे यापूर्वीही हाती घेण्यात आली आहे. परंतु तांत्रिकदृष्ट्या जाळ्या बसवणे आणि बंदिस्त करणे हे शक्य होत नसल्याचे प्रशासनाने उबाठा शिवसेनेच्या काळात दिसून आले आहे. त्यामुळे आता नाल्यांवर संरक्षक जाळ्या बसवण्याची गाजरे का दाखवली जात आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.
उल्हासनगरमध्ये २० प्रभाग; ७८ जागांसाठी ४३२ उमेदवारांमध्ये सामना
पालिका निवडणुकीचा बहुरंगी महासंग्राम उल्हासनगर : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पुन्हा सुरू झाली आहे. शहरातील राजकारण तापले असून, यंदा भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची अपेक्षित युती न घडल्याने सत्तासंघर्ष अधिक रंगतदार ठरणार आहे. मतदारांसमोर अनेक पर्याय उपलब्ध असल्याने ही निवडणूक खऱ्या अर्थाने बहुरंगी ठरणार आहे. राष्ट्रीय पक्षांबरोबरच स्थानिक गटांनीही मैदानात जोरदार तयारी केली आहे.भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि उबाठा यांच्यातील समीकरणे ढवळून निघाल्याने राजकीय अनिश्चितता वाढली आहे. याशिवाय टीम ओमी कलानी, साई पक्ष, काँग्रेस, अजित पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आणि बसपा असे विविध पक्षही मैदानात उतरल्याने सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती लागणार याबाबत चर्चेला वेग आला आहे.तिकीट वाटपात अनेक दिग्गज उमेदवार डावलले गेले, त्यामुळे अपक्ष उमेदवारींचा वाद उफाळून आला. परिणामी, काही प्रभागांमध्ये त्रिकोणी, तर काही ठिकाणी चतुरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. शहरातील सत्ता, विकास आणि राजकीय वर्चस्वाचा फैसला १६ जानेवारीला मतपेटीतून होणार आहे. प्रचाराचा शेवटचा टप्पा अधिक आक्रमक आणि आरोप-प्रत्यारोपांनी भरलेला असणार आहे.निवडणूक प्रभागांचा आढावा२० प्रभागांतील ७८ जागांसाठी एकूण ७०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यापैकी ६१८ अर्ज वैध ठरले, तर १८६ उमेदवारांनी माघार घेतल्याने अखेर ४३२ उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. शहरात ४ लाख ३९ हजार ९१२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत (पुरुष : २ लाख ३२ हजार ७३६; महिला: २ लाख ७ हजार २२; इतर: १५४).
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण्यात
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ७ जानेवारीला ठाण्यात येत आहेत. शहराच्या विकासाबाबत नागरिकांच्या मनातील प्रश्न, अपेक्षा आणि ठाण्याच्या सर्वांगीण प्रगतीवर चर्चा करण्यासाठी राम गणेश गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ७ वाजता विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी याबाबत माहिती दिली.ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप–शिवसेना–रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) महायुतीच्या माध्यमातून लढत होत असून, केंद्र सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारने ठाण्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.या पार्श्वभूमीवर ठाण्याचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. या चर्चासत्रात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी केले आहे.
शिवसेनेच्या प्रचारात ‘नवी मुंबई, नवे सरकार’ची घोषणा
नवी मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील राजकारण चांगलेच तापले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रचाराची सुरुवात करताना ‘नवी मुंबई, नवे सरकार’ अशी ठळक घोषणा दिली आहे. शिवसेनेने (शिंदे गट) प्रचाराच्या केंद्रस्थानी उमेदवार निवडीत मूळ भाजप इच्छुकांना डावलण्यात आल्याचा मुद्दा आणल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत भाजप–शिंदेसेनेची युती असली, तरी नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या भूमिकेमुळे युती न झाल्याचे चित्र आहे. जागावाटपाबाबत झालेल्या चर्चांनंतर नाईक यांच्यामार्फत दिलेला प्रस्ताव शिवसेनेला (शिंदे गट) मान्य न झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये थेट संघर्ष सुरू झाला आहे.भाजपने नवी मुंबईत गणेश नाईक यांना पूर्ण अधिकार दिल्याने उमेदवार यादीत नाईक समर्थकांचा भरणा झाल्याचा आरोप होत आहे. यामुळे नाराज झालेल्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत उघडपणे नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) ‘नवी मुंबई, नवे सरकार’चा नारा देत ‘एकसंध लढूया’ असा संदेश दिला आहे. ही घोषणा संघ परिवाराला दिलेली साद असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले की, ''शिंदेसेनेने संघ परिवाराशी संबंधित उमेदवारांना संधी दिली असून भाजपच्या यादीत अशा उमेदवारांचा अभाव आहे.'' नवी मुंबईत ही लढाई शिवसेना–भाजप युतीची नसून ‘मूळ भाजपवासी विरुद्ध घराणेशाही’ अशी असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर शिंदेसेनेचा प्रचारही याच मुद्द्याभोवती केंद्रित झाल्याचे स्पष्ट होत आहे.
Petrol Diesel Price : गुड न्यूज! लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरणार; जाणून घ्या सविस्तर अपडेट
मुंबई : देशात सध्या महागाईचा आलेख सातत्याने उंचावत असून सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. जीवनावश्यक वस्तूंपासून ते इंधनापर्यंत अनेक गोष्टींचे भाव गगनाला भिडले असतानाच, आता सराफा बाजारातून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विक्रमी पातळीवर असलेल्या सोन्याच्या दरात आता घसरण होणार असून, यामुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एकीकडे सोन्याच्या दरात घसरण होत असताना, दुसरीकडे मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असूनही, भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची सर्वसामान्यांची अपेक्षा अजूनही पूर्ण झालेली नाही. इंधन दर कमी झाल्यास मालवाहतूक स्वस्त होऊन महागाईवर नियंत्रण मिळवता येईल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.https://prahaar.in/2026/01/07/ubatha-mnss-promise-our-panchnama/जूनपर्यंत पेट्रोल-डिझेल स्वस्त होणारवाढत्या इंधन दरामुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. २०२६ या वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर घसरण्याची शक्यता असून, परिणामी येत्या जून महिन्यापर्यंत भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) रिसर्च रिपोर्टमध्ये हा महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्टेट बँकेच्या अहवालानुसार, सध्या जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी पडझड पाहायला मिळत आहे. सौदी अरेबिया आणि रशियासह 'ओपेक प्लस' (OPEC+) देशांनी तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारपेठेत तेलाचा पुरवठा वाढल्यामुळे किमती कमी होत आहेत. सध्या भारतीय क्रूड बास्केटचे दर हे सुमारे ६२.२० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहेत, जे जून २०२६ पर्यंत ५० डॉलरपर्यंत खाली येऊ शकतात.इंधन दरात कपात झाल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा दिलासाजागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या बदलांचे थेट परिणाम आता भारतीय ग्राहकांच्या खिशावर दिसू लागणार आहेत. ताज्या आर्थिक अहवालानुसार, कच्च्या तेलाच्या किमतीत जर १४ टक्क्यांची मोठी घट झाली, तर त्याचे दूरगामी परिणाम देशातील महागाईवर होतील. यामुळे केवळ पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार नाही, तर देशाचा एकूण महागाई दर ३.४ टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आला आहे. हा सर्वसामान्यांसाठी खूप मोठा दिलासा मानला जात आहे.
भटक्या श्वानांचे होणार सर्वेक्षण
अशी असणार शिक्षकांवर जबाबदारीअलिबाग : आधीच अनेक अशैक्षणिक कामाचे ओझे असताना आता प्राथमिक शिक्षकांवर श्वान नियंत्रण कार्यक्रमाचा भाग म्हणून गावातील श्वान मोजण्याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांवर येऊन पडली आहे.या निर्णयामुळे जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी येत्या शुक्रवारी ९ जानेवारी रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, विभागांचे अधिकारी आणि प्रशासन यांच्यात चर्चा होणार आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या निर्णयाविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्याचा निर्णय काही शिक्षक संघटनांनी घेतला आहे. श्वानदंशाचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करीत असतानाच ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, पशुसंवर्धन विभाग किंवा स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावी अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेला विरोध दर्शविण्यात येत आहे.रायगड जिल्ह्यात दरवर्षी साधारणतः दोन हजारांहून अधिक नागरिकांना श्वानदंश होण्याच्या घटना घडत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मूळ अध्यापन कामांवर परिणाम श्वानगणनेमुळे शिक्षकांच्या होणार असल्याचा आक्षेप शिक्षक मूळ अध्यापन कार्यावर परिणाम संघटनांनी घेतला आहे.आम्ही शिक्षक आहोत, श्वानगणक नव्हे, अशी भूमिका अनेक संघटनांनी निवडणुका, जनगणना, विविध मांडली आहे. शिक्षणाशिवाय सर्वेक्षणे आणि आता श्वानगणना अशा अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे शिक्षकांवर ताण वाढत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.ग्रामीण भागात साधारणतः प्रत्येक घरात एकतरी श्वान पाळलेला असतो. पाळीव आणि भटके श्वान यामधील फरक ओळखणे, प्रत्येक घरातील श्वानांची नोंद घेणे, तसेच गावात, वाड्या-वस्त्यांमध्ये व गल्ल्यांमध्ये मुक्तपणे भटकणाऱ्या कुत्र्यांवर नजर ठेवणे, ही जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडली आहे. या कामात मुख्याध्यापकांना नोडल अधिकारी, तर सर्व्हेक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचे सरकारी आदेश आल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. श्वानगणनेची जबाबदारी थेट शिक्षकांवर टाकण्यात आली आहे.
ग्रीन सी प्रजातीच्या कासवाला दिले जीवदान
कोकण किनारपट्टीवर पहिल्यांदाच आढळले हिरवे नर कासवश्रीवर्धन : श्रीवधर्नच्या कोकण किनारपट्टीवर पहिल्यांदाच हिरवे कासव आढळले, असून त्यास जीवदान देण्यात आले. तालुक्यातील बागमांडला येथे नवीन फेरीबोट जेट्टीच्या बाजूला वाहून आले आणि अडकून पडलेल्या, ग्रीन सी प्रजातीच्या कासवाला वनविभाग आणि कासव संवर्धन प्रकल्पाच्या सदस्यांनी जीवदान दिले.कासवाला सुरक्षीतपणे पाण्यात सोडण्यात आले. कोकण किनारपट्टीवर ग्रीन सी प्रजातीचे नर कासव किनाऱ्याला वाहून येण्याची ही पहिलीच घटना असल्याने, वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या दरम्यान बाणकोट ते बागमांडला दरम्यान फेरीबोट चालवली जाते. श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला येथील नवीन फेरीबोट जेटीच्या बाजूला एक भले मोठे कासव वाहून आल्याचे आणि ते चिखलात अडकून पडल्याचे तिथे काम करणाऱ्या आकाश सुरेश पाडलेकर यांच्या निसर्दशनास आले. त्याने लागलीच ही माहीती कांदळवन विभाग अलिबागच्या वन अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी तातडीने कर्मचारी पाठवून कासवाची पहाणी केली असता. तिथे ग्रीन सी या प्रजातीचे नर कासव असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे कासव आकाराने खूपच मोठे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. १८९ सेंटीमेटर लांब ६२ सेंटीमीटर रुंद असे पूर्ण वाढ झालेले शेपटी असलेले नर कासव असल्याचे वनकर्मचाऱ्यांच्य लक्षात आले.शरीरावर कोणत्याही जखमा अथवा खुणा नव्हत्या. हे कासव पाण्याला ओहोटी लागल्यामुळे ते किनाऱ्यावर एका बाजूला वाहून आले असावे आणि नंतर तिथे पाणी नसल्याने अडकून पडले असावे असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पाण्यात सोडण्यापूर्वी कासवाच्या शरीरावर कोणतीही जखमा नाही ना अखवा त्याला कुठली इजा नाही याची खात्री करून घेतली आणि त्यानंतरच त्याला पाण्याजवळ नेऊन सोडण्यात आले. पाण्याजवळ ठेवले असता, काही क्षणातच कासव पाण्याखाली जात खोल समुद्रात निघून गेले. कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या माद्या प्रजनन काळात अंडी टाकण्यासाठी किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात येत असतात. क्वचित प्रसंगी ग्रीन टर्टल प्रजातीच्या माद्याही किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. पण ग्रीन टर्टल प्रजातीची कासवे त्यातही नर कासवे किनारट्टीवर फारशी येत नाहीत, त्यामुळे हे नर कासव किनाऱ्याला कसे लागले याबाबत आश्चर्य व्यक्त केलेजात आहे.

30 C