SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
... ...View News by News Source

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री…! कोण आहेत सुनेत्रा पवार?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर काल (शुक्रवारी, ता. ३०) खासदार सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आज त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून, सामाजिक कार्यातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता सत्तेच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचला आहे. परंतु, अजित पवार यांच्या पत्नी आणि पवार कुटुंबियांची सून, ही ओळख वगळता सुनेत्रा यांचा राजकीय प्रवास नेमका कसा आहे, ते जाणून घेऊयात...सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी तेर (जि. धाराशिव) येथे झाला. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण असून, त्यांना मोठा राजकीय वारसा लाभला. १९८५ मध्ये अजित पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर काटेवाडी (ता. बारामती) येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली.काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ रोवण्याचे श्रेय सुनेत्रा पवार यांना जाते. पहाटेपासून स्वतः हातात खराटा घेऊन कामाला सुरुवात करत त्यांनी संपूर्ण गावाला या अभियानात सहभागी करून घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली काटेवाडीने ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या कामाची दखल घेत देश-विदेशातील अभ्यासकांनी काटेवाडीला भेट दिली. याच कार्यामुळे त्यांना सार्क देशांच्या 'साकोसान' परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या सामाजिक कार्याची दखल व्यापक पातळीवर घेतली गेली.बारामतीमध्ये ‘एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण तसेच महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती असे विविध उपक्रम त्यांनी राबवले. या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय व नेतृत्वात्मक सहभाग राहिला. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.लग्नानंतर शेतकाम, पोल्ट्री व्यवसाय, गाईगुरे सांभाळणे आणि दूध काढणे अशी कामे त्यांनी आवडीने केली. अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीत घर सांभाळणे, नातेसंबंध जपणे, सामाजिक कार्य करणे तसेच कठीण प्रसंगी त्यांना साथ व सल्ला देणे, ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम नोंदवला जाणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला. त्यापूर्वी त्या पवार कुटुंबातील प्रत्येक निवडणुकीत सक्रिय प्रचार करत असत आणि बारामतीतील अनेक विक्रमी विजयांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. पक्षफुटीनंतर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली; मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तरीही त्या खचल्या नाहीत आणि जनसेवेत सक्रिय राहिल्या.यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. राज्यसभा खासदार म्हणून काम करत असतानाच त्यांच्याकडे तालिका सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या आसनावर विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला. आता अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 11:30 am

धक्कादायक! आयटीचे छापे पडताच बंगळुरुतील प्रसिद्ध बिल्डरने संपवलं स्वतःचं आयुष्य

बंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारकॉन्फिडंट ग्रुपचे अध्यक्ष सी जे रॉय यांनी स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली. नुकताच आयकर विभागाने त्यांच्या अनेक कंपन्यांवर छापे टाकले होते. त्यानंतर शुक्रवार ३० जानेवरी रोजी सी जे रॉय यांनी आपल्या कार्यालयातडोक्यात गोळी झाडून आपलं आयुष्य संपवून घेतलं. ते ५७ वर्षांचे होते.गुरुवारी (२९ जानेवरी) सकाळी, आयकर विभागाने त्याच्याशी संबंधित अनेक कंपन्यांवर छापे टाकले होते. या छाप्यांमध्ये, त्यांच्याकडे त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचे उघड झाले.पोलिसांनी पुढे सांगितले की; अशोका नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत, गोळीबाराची घटना घडली. प्रथमदर्शनी असे दिसते की कॉन्फिडंट ग्रुपचे अध्यक्ष आणि संस्थापक सी जे रॉय यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र त्यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी एचएसआर लेआउटमधील नारायण रुग्णालयात आहे. पोलिस आयुक्तांनी पुढे सांगितले की, ही घटना दुपारी ३ ते ३.३० च्या दरम्यान घडली.#WATCH | Confident Group Chairman C.J. Roy suicide case | In Bengaluru, CJ Babu, brother of C.J. Roy says, ...I have to meet the family to discuss about the cremation.When asked if he has any other kind of suspicion, he says, No other...Other than Income Tax issue, he had… pic.twitter.com/NQI0Ikx7nR— ANI (@ANI) January 31, 2026या प्रकरणाला आत्महत्येस प्रवृत्त करणे म्हणून पाहिले जाऊ शकते का असे विचारले असता, सध्या, आयकर अधिकारी येथे नाहीत. आम्ही त्यांच्याशी बोलू त्यानुसार पुढच्या तपासाला सुरुवात होईल, असे पोलिसांनी सांगितले.आयकर विभागाच्या पथकाकडून गेल्या दोन तीन दिवसांपासून छापेमारी आणि चौकशी सुरु होती. सीजे रॉय यांच्या भारताबाहेर असलेल्या कुटुंबीयांच्या संपर्कात पोलीस असल्याची माहिती आहे. कॉन्फिडंट ग्रुप कर्नाटक आणि केरळमध्ये कार्यरत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आयकर विभागाच्या छाप्यांमुळं सीजे रॉय अस्वस्थ झाले होते.सीजे रॉय हे मूळचे केरळचे असून कोची येथील रहिवासी आहेत. सीजे रॉय हे मल्याळम चित्रपटांचे निर्माते देखील आहेत. मोहनलाल यांचा बिगबजेट सिनेमा कॅसानोवा याचा समावेश आहे.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 11:30 am

Sharad Pawar : अजितदादांची 'ती'शेवटची इच्छा पूर्ण करणार; विलीनीकरणाचा निर्णय अंतिम टप्प्यात होता, पण...शरद पवार स्पष्टचं बोलले!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अवघ्या ७२ तासांत महाराष्ट्राच्या राजकारणाने एक अनपेक्षित वळण घेतले आहे. शुक्रवारी दिवसभर चाललेल्या वेगवान घडामोडींनंतर आता सुनेत्रा पवार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी ५ वाजता राजभवनावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. काल दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीतच सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे, एकीकडे शरद पवार हे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचे संकेत देत असताना, दुसरीकडे मात्र या मोठ्या निर्णयाबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला या प्रक्रियेत बाजूला ठेवले गेले की त्यांना मुद्दाम अंधारात ठेवले गेले? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यानच झालेली ही नाट्यमय निवड राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फोडणार की सत्तासंघर्षाला पूर्णविराम देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.https://prahaar.in/2026/01/31/sunetra-pawar-oath-to-the-decision-regarding-sunetra-pawar-was-taken-in-a-hurry-know-what-exactly-happened/विलीनीकरणाचा 'मुहूर्त' ठरला होता, पण...महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका बाजूला सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची तयारी सुरू असतानाच, दुसरीकडे शरद पवार यांनी केलेल्या एका खळबळजनक विधानामुळे खळबळ उडाली आहे. येत्या १२ तारखेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृतपणे विलीनीकरण होणार होते, असा मोठा खुलासा शरद पवार यांनी केला आहे. गेल्या चार महिन्यांपासून अजित पवार आणि जयंत पाटील या विलीनीकरणासाठी सातत्याने चर्चा करत होते आणि हा निर्णय आता अंतिम टप्प्यात आला होता, असेही पवारांनी स्पष्ट केले. दोन्ही गट एकत्र यावेत ही खुद्द अजितदादांची मनापासून इच्छा होती आणि त्यांच्या या शेवटच्या इच्छेचा आम्ही मान राखू इच्छितो, असे म्हणत शरद पवारांनी विलीनीकरणाला थेट हिरवा कंदील दिला आहे. मात्र, या विलीनीकरणाच्या प्रक्रियेला अजित पवार गटातील काही बड्या नेत्यांचा तीव्र विरोध असल्याचे समजते. हे विलीनीकरण झाल्यास आपले राजकीय महत्त्व कमी होईल, अशी भीती या नेत्यांना वाटत आहे. याच विरोधामुळे शरद पवारांना अंधारात ठेवून आणि विलीनीकरणाची प्रक्रिया लांबणीवर टाकण्यासाठीच घाईघाईने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेण्यात आला का? अशा चर्चांना आता उधाण आले आहे. इतकंच नव्हे तर अजित पवारांनी १४ बैठका घेतल्या होत्या. विलीनीकरणाबाबत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात बैठका झाल्या होत्या. बैठकीत सहभागी झालेले नेते विलीनीकरणावर सकारात्मक होते. त्या बैठकीत विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 11:30 am

Alia Bhatt: “आधीसारखं राहणं शक्य नाही…” मातृत्वावर आलिया भट्टचं मनमोकळं बोलणं, सोशल मीडिया सोडण्याचीही इच्छा व्यक्त

Alia Bhatt: बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट आज अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणली जाते. वैयक्तिक आयुष्यात ती अभिनेता रणबीर कपूरची पत्नी आणि लाडकी मुलगी राहाची आई आहे.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 11:29 am

Yugendra Pawar Post : “प्रिय अजितकाका, तुम्हाला बघत-बघत,…”; युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट चर्चेत

Yugendra Pawar Post : अजित पवार यांच्या निधानानंतर पुतण्या युगेंद्र पवार यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 11:20 am

स्वामीराजने जिंकला रघुनाथ महोत्सव

भालचंद्र कुबल : पाचवा वेदरघ्या गेला. नाटकाची शीर कापून एक्झिट घेता झाला. नाटक रक्तासारखं वहायचं त्याच्या नसानसातून. बऱ्याच आदरयुक्त संबोधनानी म्हणजे काका, सर, रघुभाऊ, कंडम, खिडम्या अशा नावांनी ओळखला जाणारा हा माणूस माझ्यासाठी रघ्या होता. साहित्य संघात हरीष तुळसुलकरच्या ‘कडी-कपारी’तली त्याची रांगत रांगत घेतलेली एक्झिट आमच्या दोघांची ओळख करून गेली. रघ्या १९८१ चा आय.एन.टी. स्टार होता. आजपर्यंत एक्झिटला स्टँडिंग ओव्हेशन मी त्यानंतर कधीही बघितलेलं नाही. नसीर, ओम पुरी, सारख्या सर्वसामान्य हिरो वठवणाऱ्या जमान्यातला रघ्या, मराठी रंगभूमी गाजवेल असं वाटलं होतं पण त्याच्या नोकरीने त्याला हिरो बनू दिलं नाही. पण म्हणून मग त्यानं नाटक देखील सोडलं नाही. व्ही.आर.एस. घेऊन देवगडात २५-३० कलमांची बाग घेऊन वर्षाकाठचे एकदाच कमवून बाकी दिवस नाटक करत राहिला. कणकवलीतील विजय चव्हाणांची अक्षरसिंधू आणि वामन पंडितांचे आचरेकर प्रतिष्ठान ही त्याची दोन होम ग्राऊंड होती. दोन्ही होम ग्राऊंडवर त्याने तुफान बॅटिंग केली. मी त्याचा फॅन होतो. पुढल्या काळात लेखक झाल्यावर माझ्या दोन एकांकिका करुन त्याने नंबरातही आणल्या. ‘ही संगीत शिवपंचायतनाची दुसरी बाजू’मधील सटवाई रघ्यामुळे तीव्र झाली आणि ‘अळीचा अजगर’ मधले दोघे बाप इतके ‘कोमल’ असू शकतात याचा अंदाज रघ्यानेच आणून दिला. मग काही काळाने त्याला परीक्षक म्हणूनही भेटलो. ‘झाला सोहळा अनुपम’मधे पुन्हा एकदा त्याला बेस्ट अॅक्टर द्यावे लागले. ‘आगाशे पाटील गायकवाड’ आणि ‘एक दिवस मठाकडे’ या दोनही नाट्याकृती फ्लॉप झालेल्याही मी परीक्षक म्हणून पहाव्या लागल्या. रात्रीचे ९ वाजले की ईप्कोने दात घासणारा रघ्या कुणालाही सामोरा जायचा. विशेष म्हणजे समोरच्याचे ऐकून घ्यायचा आणि नाही पटले तर खरखरणाऱ्या वर खाली होणाऱ्या पट्टीत भच्या भाषेत शिव्याही घालायचा. अशाच एका संध्याकाळी उंबरठा स्पर्धेला मी परीक्षक म्हणून रहाण्याचं नाकारलं आणि शेवटपर्यंत बोललो नाही.याच रघुनाथ कदमला रजनीश राणे आणि अशोक परब यांनी त्याच्या स्मृतींचा जागर स्वामीराज महोत्सवातून १७ व १८ जानेवारीला जागवला. स्वामीराज महोत्सव हा स्वामीराज प्रकाशन संस्थेचा वार्षिक नाट्यमहोत्सव आहे, जो मराठी प्रायोगिक रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आला. स्वामीराज प्रकाशन ही मुंबईतील अग्रगण्य प्रकाशन संस्था आहे, जी नवीन रंगकर्मींना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे आणि मराठी रंगभूमीवरील प्रायोगिक नाट्यप्रयोगांना ऊर्जा देण्यासाठी ओळखली जाते. महोत्सवाचा उद्देश हा नवीन नाटकांना सादर करण्यासाठी कायम स्वरूपी प्लॅटफॉर्म मिळावा यासाठीच आयोजित केला जातो. उदाहरणार्थ, यंदाच्या म्हणजेच २०२६ च्या आवृत्तीत दोनदिवसीय कार्यक्रमात अनेक नाटके झाली. यशवंत नाट्यमंदिरातील साळगावकर सभागृह नव्या जुन्या रंगकर्मीनी भरुन गेले होते. रघुनाथ कदमला आठवताना विक्रम भागवत, विजय चव्हाण, राजीव जोशी, वामन पंडित, मुकुंद सावंत व सुषमा राऊत यांनी आपापल्या वाट्याला आलेला रघ्या सांगितला. रघुनाथने दिग्दर्शित केलेली ‘युगेन् युगे तुच’ हे लेखक अजय कांडर यांचे, ‘साठा उत्तराची कहाणी’ हे विक्रम भागवत यांचे आणि जयंत पवारांचे ‘जन्म... एक व्याधी’ ह्या तीन नाट्याकृती सादर झाल्या. स्वामीराज प्रकाशन नाट्यकर्मींचा पुरस्कार देऊन सन्मानित करते हे इथे प्रकर्षाने नमूद करायला हवं. अतुल परचुरे रंगस्मृती पुरस्कार यंदा चेतन दळवी यांना, सेवाव्रती पुरस्कार जयवंत देसाई यांना, तर भाऊ कोरगावकरांचा प्रयोगघर पुरस्कार अमर हिंद मंडळास प्रदान करण्यात आला. डॉ. अनिल बांदिवडेकर, अनिल गवस आणि ज्ञानेश महाराव यांनी सांगता सोहळ्याचा समारोप वरील पुरस्कार देऊन केला. उद्घाटन सोहळ्याला सुद्धा जनार्दन लवंगारे, अरुण नलावडे आणि ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या उपस्थितीने महोत्सव यशस्वी होणार याचे जणू भाकीत वर्तवले होते. रघ्याचा लोअर परळ ते कणकवली व्हाया देवगड हा प्रवास अचंबित करुन टाकणारा आहे. अमोल मुझुमदारला पाहिलं की करीयरची तुलना म्हणून मांडायची झाल्यास दोघेही स्थानिक प्रदेशातच अफलातून खेळले. टेस्टमॅच किंवा मेन स्ट्रीम व्यावसायिक नाटक दोघांच्याही नशिबात नव्हतं. पण एकाने महिला वर्ल्ड कप जिंकून दिला आणि एकाने स्वामीराज महोत्सव...!

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 11:10 am

सुंदर स्वप्नातल्या बंगल्यातील मृण्मयीचं एक नातं असंही

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमलबालकलाकार ते अभिनेत्री असा सुयश प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी सुपल. व्यावसायिक रंगभूमीवर पहिलं पाऊल टाकणाऱ्या मृणामयीचं ‘एक नातं असंही’ या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग आज पनवेलमध्ये आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये होणार आहे.मृण्मयीचे शालेय शिक्षण वांद्रेच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत झाले. जेव्हा ती शिशू वर्गात होती, तेव्हाच तिने ऑडिशन देण्यास सुरुवात केली. तिने मिराकल्स अॅकॅडमीमधून मॉडेलिंगचा कोर्स केला होता. जेव्हा ती तिसरीत होती तेव्हा तिला बालाजी प्रॉडक्शनची स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘हे बंध रेशमाचे’ ही मालिका मिळाली होती. ती चौथीत होती तेव्हा, तिला कलर्स वाहिनीवरील ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतील छोट्या ईश्वरीची भूमिका मिळाली. तिला यातील भूमिकेसाठी म. टा. सन्मान अॅवॉर्ड मिळाले. या भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. अगदी अमेरिकेतून फॅन्स तिला भेटायला भारतात आले. ही मालिका व ईश्वरीची भूमिका तिच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरली.ती पाचवीत असताना तिला ‘तू माझा सांगाती’ ही मालिका मिळाली. त्यामध्ये चिन्मय मांडलेकर होते, छोट्या आवलीची भूमिका तिने साकारली होती. संत तुकारामांची संसार गाथा व आवली यावर ही मालिका होती. त्यानंतर ती सहावीत असताना तिला संजय लीला भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी’ या हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये गोपिकाबाईची भूमिका तिने साकारली होती. त्या चित्रपटातील दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली. नंतर 'रेडू' हा चित्रपट तिने केला. अमेझॉनची पेनाची जाहिरात तिने केली. तृतीयपंथ गौरव सावंतवरची एक डॉक्युमेंटरी होती, त्यामध्ये तिने गौरव सावंतच्या गायत्री नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. पोलिओची जाहिरात केली. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडेसोबत ‘ब्लॅक बोर्ड’ नावाचा चित्रपट केला. 'अँब्रो' नावाची एक शॉर्ट फिल्म तिने केली. त्यासाठी तिला इंटरनॅशनल बेस्ट चाईल्ड अॅक्ट्रेसचा अॅवॉर्ड मिळाला. 'भाकर,' 'बाजार','बंपर लॉटरी' हे चित्रपट तिने केले. नंतर तिने शिक्षणासाठी थोडा ब्रेक घेतला.त्यानंतर तिने कीर्ती कॉलेजला पुढील शिक्षण घेतले. तेथील सांस्कृतिक कार्यक्रमात तिने भाग घेतला होता. युथ फेस्टिवलमध्ये तिने भाग घेतला होता. अकरावीत असताना तिला स्टार प्रवाह वाहिनीवरील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेतील छोट्या रमाबाईची भूमिका मिळाली. ती भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे.खूप दिवसांपासून तिला नाटकात काम करण्याची इच्छा होती. तो योग जुळून आला. ' रेडू' चित्रपट करीत असताना निकिताने 'एक नातं असं’ही या नाटकवाल्यांकडे तिचे नाव सुचविले. या नाटकामध्ये तिची काव्या या मुलीची भूमिका आहे. ती केवळ कणखर मुलगी नसून, प्रेमळ बहीण आहे. ती अल्लड, खोडकर, समजूतदार स्वार्थी अशी सर्व गुणसंपन्न आहे. आजच्या काळातील ती मुलगी आहे.आजच्या धावपळीच्या जगात नातेसंबंध दुरावलेले आहेत. भाऊ व बहिणीमधील दुरावा वाढत चाललेला आहे. रक्षाबंधन, भाऊबीज हे सण साजरे करण्यासाठी आपल्याकडे भाऊ, बहीण नसेल याची चिंता तिने व्यक्त केली. भाऊ-बहिणीच्या महत्त्वाच्या नात्यावर हे नाटक भाष्य करीत आहे. या नाटकानंतर बहीण-भावामधील वितुष्ट मिटेल असा आशावाद तिने व्यक्त केला.'एक नातं असंही' हे नाटक नात्यातील गुंतागुंत, सद्यस्थितीवर भाष्य करणारं, थोडसं हसा पिकवणारं, सामाजिक विषय गांभीर्याने घेणारं असं हे नाटक आहे. कार्तिक आणि काव्या या भाऊ-बहिणीच्या नात्यावर या नाटकाची कथा आहे. कार्तिकला गायक व्हायचे असते; परंतु परिस्थितीमुळे तो हतबल होतो. बहिणीचे शिक्षण व्हावे म्हणून तो एका कंपनीत नोकरी करतो. पुढे काव्याच्या आयुष्यात एक मुलगा येतो, त्याच्या येण्याने कार्तिक आणि काव्याच्या नात्यात दुरावा निर्माण होतो की संबंध दृढ होतात? एका भावाने बहिणीसाठी केलेल्या त्यागाची जाणीव बहिणीला राहते का? या साऱ्या प्रश्नाची उकल या नाटकातून होणार आहे. या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग पनवेलच्या आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ३१ जानेवारीला संध्याकाळी ४.३० वाजता होणार आहे. या नाटकाचे लेखन विस्मय दीपक कासार यांनी केले असून दिग्दर्शन दर्शन सिद्धार्थ घोलप यांनी केले आहे. या नाटकाची निर्मिती शिवाय मेघा या निर्मिती संस्थेने केले असून अभिजित भालेराव हे या नाटकाचे निर्माते आहेत.माणसाने कितीही आधुनिक प्रगती केली तरी, आपसातील नाते जपणे खूप आवश्यक आहे. ‘एक नातं असंही’ हे नाटक एका सामान्य नात्याची असामान्य गोष्ट सांगणार आहे.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 11:10 am

Sunetra Pawar Oath : म्हणून सुनेत्रा पवारांबाबतचा निर्णय घाईघाईत घेण्यात आला; जाणून घ्या नेमकं काय घडलं

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली गेली आहे. आज म्हणजेच शनिवार ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी होणार असून, त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या काही तासांपासून घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमताने अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे वृत्त आहे. आज विधिमंडळ गटनेता निवडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची मुंबईत होणाऱ्या महत्वाच्या बैठकीनंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.मात्र शपथविधीची घाई कशासाठी असा सवाल उपस्थित होत असतानाच विश्वसनीय सूत्रांकडून याचं उत्तर समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,सुनेत्रा पवार यांना इतक्या लवकर तात्काळ गट नेते निवड आणि उपमुख्यमंत्री पदावर निवड हा अंतिम निर्णय एनसीपी कोअर टीमचाच आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाची चर्चा मुद्दाम काही जण घडवू पाहत असल्यानेच इतक्या घाईत सुनेत्रा पवार यांची निवड करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. एनसीपी कोअर टीम आणि सुनेत्रा पवार यांच्या सहमतीनेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शपथविधी लवकर करण्याची भूमिका एनसीपी कोअर टीमने घेतली. सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करणे आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष करणे ही भूमिका प्रफुल पटेल, सुनीव तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्याच भूमिकेतून मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी शुक्रवारी (३० जानेवरी) सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री या पदासाठी होकार दिल्याचे कळते.त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे : शरद पवारदरम्यान शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की; सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही. आजचा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मला याबाबत काही माहिती नाही. अजित पवार यांचे निधन हा राज्यासाठी मोठा आघात आहे. राष्ट्रवादीने काय करावे, हे त्यांच्या पक्षातील नेते ठरवतील. भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. विलिनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. पण आता खंड पडला.त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे.शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आले आहे.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 11:10 am

Sharad Pawar : ‘दादांची इच्छा पूर्ण व्हावी, असेच वाटते’; सुनेच्या शपविधीपूर्वी शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar: सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही - शरद पवार

दैनिक प्रभात 31 Jan 2026 11:05 am

Sharad Pawar : अजित पवार सत्तेमधून बाहेर पडणार होते? शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट अन् राजकीय वर्तुळात खळबळ

Sharad Pawar : अजित पवार यांच्या निधानानंतर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेतून मोठे गौप्यस्फोट केले आहे.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 10:45 am

Stress & Obesity: स्ट्रेसमुळे वजन का वाढतं? जाणून घ्या इमोशनल ईटिंगमागचं संपूर्ण शास्त्र

Stress & Obesity: आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव (स्ट्रेस), चिंता आणि नैराश्य या समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहेत. मानसिक आरोग्याच्या या अडचणी केवळ मनापुरत्याच मर्यादित राहत नाहीत, तर त्यांचा थेट परिणाम शरीरावरही होतो, असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 10:41 am

उपमुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीच्या निर्णयाला भाजपचा पाठिंबा; अर्थसंकल्प कोणी मांडायचा हे चर्चेतून ठरवू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : उपमुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो काही निर्णय घेईल, त्याला भाजप आणि राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा राहील, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मांडली. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याबाबत चर्चा सुरू आहे. उद्या, शनिवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होणार असून, त्यात गटनेत्याची निवड केली जाणार आहे. तसेच अजित पवार यांच्या जागी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिले जाईल, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अजितदादांचे कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस जे काही निर्णय घेईल, त्याला भाजप पक्ष आणि सरकारचा पूर्ण पाठिंबा असेल. राष्ट्रवादीचे नेते दोन वेळा माझ्याशी चर्चा करून गेले असून, या चर्चेत त्यांनी पक्षाची कार्यपद्धती, उपलब्ध पर्याय आणि पुढील वाटचाल याबाबत माहिती दिली आहे. मात्र अंतिम निर्णय हा संबंधित पक्षाचाच असतो, त्यामुळे त्या निर्णयावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.अर्थसंकल्प कोण सादर करणार?राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अर्थसंकल्पाची संपूर्ण तयारी अजितदादांनीच केली होती. आता मी स्वतः यात लक्ष घालून अर्थसंकल्पाशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करून घेणार आहे. त्यानंतर अर्थसंकल्प कोणी सादर करायचा, याबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.मुंबईच्या महापौर पदाबाबत दोन दिवसांत निर्णयमहापौर पदाच्या निवडणुकांबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महायुतीतील संबंधित पक्षांमध्ये चर्चा झाली आहे. मुंबई तसेच इतर शहरांतील महापौर पदासाठी जी नावे पुढे आली आहेत, त्यावर येत्या एक-दोन दिवसांत चर्चा केली जाईल. त्यानंतर अंतिम नावे निश्चित केली जातील. संबंधित महानगरांचे अध्यक्ष आणि आमदार योग्य तो निर्णय घेतील. नागपूरच्या महापौर पदासंदर्भातही एकूण चर्चा झाली असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 10:30 am

निवडणुका पुढे ढकलल्याने शिक्षक संभ्रमात

परीक्षा आणि निवडणूक ड्युटी एकाच वेळी; शिक्षकांच्या अडचणीत वाढ मुंबई : महाराष्ट्रात १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे तारखांमध्ये बदल झाल्याने शिक्षक अडचणीत आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाला असून, त्याचा थेट परिणाम सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्याने शिक्षकांना आता एक मोठा संभ्रम उभा राहिला आहे.सध्या शिक्षकांचे प्रमुख दडपण म्हणजे ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी देशव्यापी होणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा. या परीक्षेसाठी अनेक शिक्षक आधीच बसले आहेत. दुसरीकडे, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे त्यांना निवडणूक ड्युटीही करावी लागणार आहे. परीक्षा आणि निवडणूक ड्युटी एकाच वेळी येत असल्यामुळे शिक्षक संभ्रमात पडले आहेत परीक्षा द्यायची की निवडणूक ड्युटी करायची? हा प्रश्न त्यांना सतावत आहे.मागील काही दिवसांत महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीनंतर लगेचच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे टप्पे जाहीर झाले होते. यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सतत निवडणूक ड्युटीमध्ये व्यस्त होते. आता या निवडणुका पुढे ढकलल्याने त्यांची धावपळ आणखी वाढली आहे. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होईल, तर मतमोजणी ७ फेब्रुवारीऐवजी ९ फेब्रुवारी रोजी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.शिक्षकांच्या दडपणामध्ये आणखी भर पडली आहे. कारण दोन्ही घटनांमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या कर्तव्याशी जुळत असल्याने मानसिक ताण वाढत आहे. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य यावरही नकारात्मक परिणाम होत आहे.केंद्रप्रमुख परीक्षा ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे, तर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ७ व ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता सुरू होईल. दोन्ही परीक्षा जिल्ह्याबाहेरच्या केंद्रांवर होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना फक्त परीक्षा देण्यापुरतेच नव्हे, तर निवडणूक ड्युटीची जबाबदारीही पार पाडावी लागणार आहे. शिक्षकांमध्ये आता अशा परिस्थितीत कारवाईची भीती आहे, कारण निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या टप्प्यात बदल केला तरीही त्यांची ड्युटी रद्द होईल की नाही, याबाबत स्पष्टता नाही.राज्यातील शिक्षक संघटनांनीदेखील या परिस्थितीवर लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. शिक्षकांनी सांगितले की, “दोन्ही कर्तव्य अत्यावश्यक असून त्यात प्राधान्य ठरवणे कठीण झाले आहे. आयोगाकडून योग्य निर्णय अपेक्षित आहे.”एकूणच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आणि निवडणूक आयोगाच्या तारखेतील बदलांमुळे शिक्षकांच्या कामाचा ताण आणि मानसिक दडपण वाढले आहे. राज्यातील शिक्षण संस्थांना आणि निवडणूक व्यवस्थापनाला आता या परिस्थितीचा विचार करून शिक्षकांना न्याय्य मार्गाने सोडवावे लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 10:30 am

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहतूक बंद

मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याची कामे सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरू आहेत. या कामासाठी सातत्याने महामार्गावर टप्प्याटप्प्यात वाहतूक ब्लॉक घेतला जात आहे. त्यानुसार ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान १४ टप्प्यांत वर्धा आणि नागपूर दरम्यानच्या भागातील महामार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी बंद राहणार आहे.वर्धा येथील साखळी क्रमांक ५८.९ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक ३१ जानेवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील. वर्धा येथील साखळी क्रमांक ५९.६ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक ३१ जानेवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील. वर्धा येथील साखळी क्रमांक ६५.४ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक ३१ जानेवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील. सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक ३१.५ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक १ फेब्रुवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील. सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक ३७.७ येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक १ फेब्रुवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील. सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक ३७.७ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक १ फेब्रुवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील. सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक ४५.४ येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक १ फेब्रुवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील. हिंगणा, नागपूर येथील साखळी क्रमांक ८.६ येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक २ फेब्रुवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील. हिंगणा, नागपूर येथील साखळी क्रमांक ८.६ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक २ फेब्रुवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 10:30 am

तिरुवनंतपुरममध्ये आज भारत-न्यूझीलंड मालिकेचा समाराेप

होम ग्राऊंडवर संजूसाठी शेवटची संधी? इशानच्या एन्ट्रीने वाढला दबावतिरुवनंतपुरम : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील निर्णायक आणि शेवटचा सामना शनिवारी खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने ही मालिका वर्ल्ड कपच्या तयारीसाठी महत्त्वाची मानली असली तरी, यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनसाठी हा सामना अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. संजू आपल्या घरच्या मैदानावर पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असला, तरी त्याच्या खराब फॉर्ममुळे 'प्लेइंग इलेव्हन'मधील त्याच्या स्थानावर टांगती तलवार आहे.चौथ्या सामन्याला मुकलेला इशान किशन पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे दिसत असून तो सरावासाठी मैदानात उतरला आहे. फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, इशान खेळण्याची शक्यता जास्त आहे, मात्र अंतिम निर्णय फिजिओ घेतील. इशानच्या पुनरागमनामुळे संजू सॅमसनला संघातून डच्चू मिळणार की संघ व्यवस्थापन त्याला घरच्या मैदानावर शेवटची संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.संजू सॅमसन या मालिकेतील चारही सामन्यांत अपयशी ठरला आहे. वर्ल्ड कपपूर्वी फॉर्म मिळवण्यासाठी ही मालिका सुवर्णसंधी होती, मात्र संजूला त्याचा फायदा उठवता आला नाही. खेळाडूंना अधिक संधी देणे गरजेचे आहे, मात्र वर्ल्ड कपमध्ये जाताना आत्मविश्वास आणि फॉर्म दोन्ही महत्त्वाचे आहेत, असे म्हणत कोटक यांनी संजूच्या कामगिरीवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले आहे.प्रशिक्षक कोटक यांनी तरुण फलंदाज अभिषेक शर्माचे विशेष कौतुक केले. अभिषेकने कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या खेळात मोठी सुधारणा केली असल्याचे त्यांनी नमूद केले.न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संजू अपयशी ठरलेला दिसतो आहे. त्याला मागील चार सामन्यांत १०, ६, ०, २४ अशाच धावा करता आल्या आहेत. संजू सॅमसनचा फॉर्मवर विचारलेल्या प्रश्नावर कोटक म्हणाले, त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या धावा सध्या दिसत नाही. त्याला त्याची स्पेस, मोकळीस देण्याचे आमचे काम आहे.सामन्यापूर्वी खेळाडूंनी मंदिरात टेकवला माथानिर्णायक सामना ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे सर्व खेळाडू तिरुवनंतपुरममधील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचाही समावेश होता. खेळाडू मंदिरात पोहोचल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये खेळाडूंनी दर्शनासाठी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्याचे पाहायला मिळते.जसप्रीत बुमराहला विश्रांतीभारताने ही मालिका ३-१ अशी आधीच जिंकली आहे आणि त्यामुळे पाचव्या सामन्यात काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. जसप्रीत बुमराह व हार्दिक पांड्या यांना आजच्या लढतीत विश्रांती दिल्यास आश्चर्य वाटायला नको. तिसऱ्या सामन्यातही त्यांना विश्रांती दिली गेली होती. संजू सॅमसनला आणखी एक संधी मिळेल हे निश्चित आहे.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 10:30 am

ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात ‘जनरेशन वॉर’

जोकोविच विरुद्ध अल्काराझ यांच्यात लढतमेलबर्न : मेलबर्न पार्कच्या रॉड लेव्हर एरिनावर झालेल्या दोन थरारक उपांत्य फेरीच्या सामन्यांनंतर, ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत टेनिस विश्वातील दोन सर्वात मोठे खेळाडू आमने-सामने उभे ठाकले आहेत. एकीकडे विक्रमादित्य नोव्हाक जोकोविच आहे, तर दुसरीकडे युवा आणि तडफदार जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला कार्लोस अल्काराझ.३८ वर्षीय नोव्हाक जोकोविचने (जागतिक क्रमवारीत चौथे स्थान) विद्यमान दुहेरी विजेत्या जानिक सिनरला पाच सेटच्या महाकाव्य लढतीत पराभूत करून ११ व्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमध्ये प्रवेश केला. जोकोविचने सिनरवर ३-६, ६-३, ४-६, ६-४, ६-४ असा विजय मिळवला.आता अंतिम फेरीत नोवाक जोकोविचचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या कार्लोस अल्काराझशी होईल, ज्याने पहिल्या उपांत्य फेरीत अलेक्झांडर झ्वेरेवला पाच सेटच्या सामन्यात पराभूत केलं होतं. कार्लोस अल्काराझचा सामना सुमारे पाच तास आणि २७ मिनिटे चालला, ज्यामुळे तो स्पर्धेच्या इतिहासातील तिसरा सर्वात मोठा सामना ठरला. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कार्लोस अल्काराझचा हा पहिलाच अंतिम सामना असेल. जर हा सामना त्याने जिंकला, तर तो करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण करणारा सर्वात तरुण पुरुष खेळाडू बनेल. ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी खेळवला जाईल. दिग्गज खेळाडू की नवा तरुण खेळाडू कोण बाजी मारणार, यावर सर्वांच्या नजरा असतील. टेनिस जगत या ऐतिहासिक अंतिम फेरीची आतुरतेने वाट पाहत आहे, जिथे जोकोविचचा २५ वा ग्रँड स्लॅम आणि अल्काराझचा पहिला ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदाचा सामना असणार आहे.अंतिम सामन्याची पार्श्वभूमी रविवार होणाऱ्या अंतिम सामन्याकडे संपूर्ण टेनिस विश्वाचे लक्ष लागले आहे. जोकोविच २४ ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या मार्गारेट कोर्टच्या विक्रमापासून केवळ एक पाऊल दूर आहे. फायनलमध्ये त्याचा १००% (१०-०) जिंकण्याचा रेकॉर्ड आहे. हा सामना अनुभवी जोकोविच आणि २२ वर्षीय अल्काराझ यांच्यातील 'पिढ्यांची लढाई' म्हणून पाहिला जात आहे. त्यांच्या मागील सामन्यांमध्ये, जोकोविच ५-४ असा अल्काराझच्या पुढे आहे. २०२४ पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्येही जोकोविचनेच बाजी मारली होती.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 10:30 am

रायगड जिल्ह्यात १४७ जणांचे मरणोत्तर नेत्रदान

४१ अंधांना मिळाली नवी दृष्टीअलिबाग : मरणानंतरही दुसऱ्यासाठी जगण्याची आस रायगड जिल्ह्यातील नागरिक मरणोत्तर नेत्रदानातून पूर्ण करीत आहेत. अशा नेत्रदात्यांमुळे १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२५ या पावणेपाच वर्षाच्या कालावधीत ४१ दृष्टिहिनांना सृष्टीचे नितांतसुंदर दर्शन घडले.माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे नेत्र काही तास जिवंत असतात. मृत्यूनंतर काही तासात काढलेल्या नेत्रांचा अंधत्व आलेल्यांना फायदा होऊ शकतो आणि हे जग त्यांना पाहता येऊ शकते. नेत्ररोपण यशस्वी झालेल्या व्यक्तीला ६० टक्के दिसू शकते. नेत्रदानासाठी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरिरातून सहा तासांच्या आत डोळ्यातील नेत्रपटल काढून घेणे आवश्यक असते. या डोळ्यांचे दोन ते तीन दिवसांमध्ये रोपण होणेही आवश्यक असते. नेत्ररोपणामध्ये बुबुळाच्या पाठीमागे असलेल्या 'कॉनिर्या' या भागाचे रोपण केले जाते.रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नेत्रदानाबद्दल चांगली जनजागृती होत आहे. वर्षाला सुमारे ३०० नागरिक मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करीत आहेत. त्यामुळे अशा नेत्रदानाचे प्रमाणही वाढले आहे. १ एप्रिल २०२१ ते डिसेंबर २०२५ या पावणेपाच वर्षात जिल्ह्यात १४७ जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. यामधून ४१ अंधांवर बुबुळ रोपण शस्त्रक्रिया करून नवी दृष्टी देण्यात आली, तर उर्वरित जणांचे नेत्रपटल संशोधनासाठी पाठविण्यात आले आहेत.असे झाले नेत्रदान१ एप्रिल २१ ते ३१ डिसेंबर २५ या कालावधीत रायगड जिल्ह्यात १४७ जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले. (२९४ नेत्र बुबुळांचे संकलन) जिल्हा रुग्णालयात ८८ नेत्र बुबुळे संकलन (४४ जणांचे नेत्रदान), शंकर आय बँक १६ नेत्र बुबुळे संकलन (८ नेत्रदान), लक्ष्मी आय बँक १९० नेत्र बुबुळे संकलन (८० जणांचे नेत्रदान), शस्त्रक्रिया ४१, संशोधन ११६, इतर संस्थेत पाठवलेले नेत्र बुबुळ ६.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 10:10 am

Shard Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यावर पक्षातील नेत्यांचे एकमत झाले आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाची धुरा देखील पवार कुटुंबाकडेच राहावी, अशी भूमिका वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षपदही सुनेत्रा पवारांकडेच दिले जाणार आहे. या सर्व परिस्थितीवर शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही. अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे :शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की; सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही. आजचा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मला याबाबत काही माहिती नाही. अजित पवार यांचे निधन हा राज्यासाठी मोठा आघात आहे. राष्ट्रवादीने काय करावे, हे त्यांच्या पक्षातील नेते ठरवतील. भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. विलिनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. पण आता खंड पडला.त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे.शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आले आहे.उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी :सुनेत्रा पवार यांचा आज म्हणजेच शनिवार ३१ जानेवरी रोजी संध्याकाळी ५ वाजता शपथविधी होणार आहे. याचपार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या बारामतीहून मुंबईकडे रवाना झाल्या असून, त्यांच्यासोबत पुत्र पार्थ आणि जय पवार, तसेच अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा हे देखील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक शनिवारी दुपारी २ वाजता विधानभवनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडेल, अशी माहिती पक्ष सूत्रांनी दिली आहे.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 10:10 am

वसई-विरार महापालिकेत महापौर पदासाठी ७ अर्ज

उपमहापौर पदासाठी ५ अर्जविरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आले. बहुजन विकास आघाडी आणि भाजप या दोनही राजकीय पक्षाकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महापौर पदासाठी एकूण ४ जणांचे ७ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये बहुजन विकास आघाडीच्या तीन नगरसेवकांनी आणि भाजप तर्फे एका सदस्याने अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौर पदासाठी एकूण ३ जणांचे ५ अर्ज दाखल झाले आहेत. यात बविआतर्फे २ तर भाजपच्या एका नगरसेवकाने अर्ज दाखल केला आहे.वसई-विरार महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला बहुमत मिळाले आहे. ११५ पैकी ७१ सदस्य त्यांचे निवडून आले असून त्यातील एका काँग्रेसच्या सदस्याला बविआचा पाठिंबा होता. तर भाजप- शिवसेना महायुतीचे ४४ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचा महापौर आणि उपमहापौर होणार हे निश्चित आहे. महानगरपालिकेच्या महापौर पदासाठीची आरक्षण देखील नुकताच जाहीर झाले असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी हे आरक्षण निघाले आहे. दरम्यान, शुक्रवारी महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. बहुजन विकास आघाडीतर्फे अजीव पाटील, प्रफुल्ल साने, निषाद चोरघे यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. या तिघांनीही प्रत्येकी २ अर्ज दाखल करण्यात आले. तर भाजपतर्फे ॲड. दर्शना त्रिपाठी यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एकूण ७ अर्ज पालिकेकडे दाखल झाले आहेत.तर दुसरीकडे उपमहापौर पदासाठी बविआतर्फे मार्शल लोपीस, कन्हैया भोईर यांनी प्रत्येकी २ अर्ज दाखल केले आहेत. तर भाजपतर्फे नारायण मांजरेकर यांनी एक अर्ज दाखल केला असून एकूण ५ अर्ज सादर करण्यात आले आहेत. ३ फेब्रुवारी रोजी बविआतर्फे कोण अर्ज मागे घेणार आणि कोण महापौर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच महायुतीने सदर निवडणूक अविरोध होऊ नये यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, की आणखी काही चमत्कारिक घडणार आहे हे ३ फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार आहे.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 10:10 am

महापौरांना ७५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता

उपमहापौरांना ६५ हजार, तर विरोधी पक्षनेत्याला ५० हजारविरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना नियमानुसार विविध सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत. महापौर यांना वाहन प्रतिपूर्ती भत्ता म्हणून दर महिन्याला ७५ हजार रुपये दिल्या जातील. तसेच उपमहापौर यांना ६५ हजार, स्थायी समिती सभापती ५५ हजार, विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेत्याला ५० हजार, तर इतर सर्व सभापतींना वाहन प्रतिपूर्ती भत्ता म्हणून प्रत्येक महिन्याला ४५ हजार रुपये दिले जाणार आहेत.स्थानिक स्वराज्य सस्थांमध्ये ग्रामपंचायत सरपंचांपासून, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर अशा सर्व लोकप्रतिनिधींना त्यांच्या अडीच किंवा पाच वर्षांच्या कालावधीत मानधन तसेच विविध सोयी सुविधा देण्यात येतात. अनेक शहरांमध्ये महापौर,उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता यांच्यासाठी शासकीय निवासस्थान देखील आहेत. वसई-विरारमध्ये पदाधिकाऱ्यांसाठी अद्याप शासकीय निवासस्थान उपलब्ध नाही. या ठिकाणी प्रशस्त अशी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाचे कामकाज सुरू आहे. मात्र नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना या इमारतीत बसण्याची संधी ३ फेब्रुवारीपासून मिळणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व पदाधिकाऱ्यांचे दालन सज्ज केले आहेत. दरम्यान, वसई-विरार महापालिकेत २०१६ पूर्वी महापौर यांना ४५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता देण्यात येत होता. तर उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांना ४० हजार आणि विरोधी पक्षनेता यांना ३७ हजार अशा प्रकारे वाहन भत्ता देण्यात येत होता. २०१६ पासून प्रतिपूर्ती भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता ९ प्रभाग समिती सभापतीसह, महिला व बालकल्याण समिती सभापती, वैद्यकीय आरोग्य साहाय समिती सभापती,परिवहन समिती सभापती, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, स्थायी समिती सभापती, उपमहापौर आणि महापौर यांना वाढीव दरानुसार वाहन प्रतिपूर्ती भत्ता देण्यात येणार आहे.१२५ सदस्यांना १० हजार रुपये मानधनमहापालिकेच्या वर्गवारीनुसार तेथील नगरसेवकांना मानधन दिले जाते. राज्यातील २९ महापालिकांपैकी चार महापालिका क वर्गात समाविष्ट आहेत. यामध्ये वसई-विरार महापालिकेचा समावेश आहे. त्यामुळे येथील नगरसेवकांना दरमहा १० हजार रुपये मानधन महापालिकेकडून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. पालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या ११५ नगरसेवकांसह स्वीकृत १० नगरसेवकांना सुद्धा सदर मानधन देण्यात येणार आहे. यासाठी पालिकेचा नगरसेवकांच्या मानधनावर प्रत्येक महिन्याला १२ लाख ५० हजार एवढा खर्च होणार आहे.आयुक्तांनाही महापौरांप्रमाणे वाहन भत्तामहापालिकेच्या आयुक्तांना सुद्धा महापौर यांच्या प्रमाणेच ७५ हजार वाहन प्रतिपूर्ती भत्ता देण्यात येतो. तसेच अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपसंचालक नगररचना, सहायक आयुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि विभाग प्रमुखांना सुद्धा ४० ते ४५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता प्रत्येक महिन्यात दिल्या जातो.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 10:10 am

‘नोटा घेऊन या, बँकेच्या गाडीत बदलून देईन’:2 हजारच्या नोटा हातोहात बदलल्या जात आहेत, 50 कोटींच्या व्यवहारात 22 कोटी कमिशन

‘बँकेची रोकड आणण्या-घेऊन जाण्याचे काम ज्या गाडीत होते, त्याच गाडीत तुमच्या दोन हजारांच्या नोटा बदलून देऊ. 50 कोटींच्या नोटा असल्या तरी अडचण नाही. 40 टक्के कमिशन आमचे असेल.’ हा खुलासा 2 हजारच्या नोटा बदलणाऱ्या माफियांनी भास्करच्या कॅमेऱ्यावर केला. चार्टर्ड अकाउंटंट फर्मच्या नावाखाली माफिया नोटा बदलण्याचा व्यवसाय चालवत आहेत. हे नेक्सस उघड करण्यासाठी आम्ही ब्रोकर बनून तीन माफियांना भेटलो. तिघांनी नोटा बदलण्याचे वेगवेगळे मार्ग सांगितले. तीन दलालांशी रिपोर्टरची भेट. सविस्तर अहवाल वाचा…।पहिली भेट : गजेंद्र यादव ठिकाण : जयपूरिया मॉल, इंदिरापुरम काय पद्धत सांगितली : बँकेच्या गाडीत बदलून देऊ आधी 5 कोटी 2 स्लॉटमध्ये… आम्ही गजेंद्रला सांगितले की, आमच्याकडे 50 कोटी रुपयांच्या दोन हजारच्या नोटा आहेत आणि त्या बदलून घ्यायच्या आहेत. गजेंद्र: 5 कोटींच्या स्लॉटमधून करून घ्यारिपोर्टर: ठीक आहेगजेंद्र: कॅश तुमच्याकडे आहे ?रिपोर्टर: होय, आमच्याकडे, म्हणजे पार्टीकडे गजेंद्र: किती रिपोर्टर: तुम्ही सांगा टक्केवारी कशी ठरवायची आहे. 50 कोटींच्या सर्व नोटा 2 हजारच्या आहेत गजेंद्र: 45 टक्के. यात 5% आमच्या मध्यस्थाचे राहतील. त्यांचे 40 चे आकडे आहेत.रिपोर्टर: ठीक आहेगजेंद्र: 5 आमचे वाचतील, अडीच तुम्ही घ्या, अडीच आम्ही घेऊरिपोर्टर: ठीक आहे गजेंद्र: सध्या आमचे सीए साहेब नाहीत. तेच सर्व करतील.रिपोर्टर: ठीक आहे गजेंद्र: गाडी येईल आणि गाडीतूनच घेऊन जातील.रिपोर्टर: कोणाची गाडी?गजेंद्र: त्यांची सिस्टीम.उदित: CMSगजेंद्र: बँकेच्या रोख रकमेची सीएमएस (गाडी) मिळेल.रिपोर्टर: सीएमएसची गाडी येईल?गजेंद्र: हो. गजेंद्रने सांगितले की, या कामात त्याच्यासोबत देवेंद्र वर्मा नावाचा एक चार्टर्ड अकाउंटंटही सामील आहे, ज्याची नोएडा येथे भागीदारीत चालणारी एक सीए फर्म आहे. सीए देवेंद्र वर्मा यांच्याशी आमची भेट नोएडा सेक्टर-18 मधील एका रेस्टॉरंटमध्ये झाली. रिपोर्टर आणि देवेंद्र यांच्यातील संभाषण देवेंद्र: सांगा मग काय आहे रिपोर्टर: 2 हजारच्या नोटांचे 50 कोटी बदलायचे आहेत देवेंद्र: 50-50 मध्ये बोलणे झाले आहे रिपोर्टर: होगजेंद्र: 5 आम्ही ठेवू, 40 देऊरिपोर्टर: म्हणजे पार्टीला 50गजेंद्र : पार्टीला 50 जातील. तुमच्या पार्टीला 40 जातील. बाकीचे जे 10 उरले, त्यातून 5-5 आम्ही ठेवूदेवेंद्र: ठीक आहे, कधी कराल? टप्प्याटप्प्याने?रिपोर्टर: टप्प्याटप्प्यानेच समजदारी आहे देवेंद्र: जसे दुसऱ्या शहरातून आणायचे आहे, नोएडा मध्ये एका ठिकाणी ठेवले, त्यातून अडीच आणले, मग एका तासानंतर अडीच आणले…रिपोर्टर: नाही, असे होणार नाही. जसे बोलणे झाले आहे, 5 कोटींचा स्लॉट, तर 5 कोटी मी तुमच्याकडे घेऊन येईन.देवेंद्र: अडीच देऊन टाकू.रिपोर्टर: तुम्ही मला अडीच द्याल, 500-500 च्या नोटांमध्ये. देवेंद्र: म्हणाल तर 100-100 च्या देऊन टाकू, पण मग खूप जास्त होईल. रिपोर्टर: कुली करावा लागेल.देवेंद्र: हो, 500-500 ठीक राहील. एक दिवस निश्चित करा. त्या दिवशी तुम्ही घेऊन या.रिपोर्टर: ठीक आहे, एकदा लोकेशन (जागा) सांगून द्या कुठे आणायचे आहे.देवेंद्र: ते मी सांगून देईन. देवेंद्र वर्मा आणि गजेंद्र यादव यांच्या दाव्यांवरून हे दिसून येते की दिल्ली एनसीआरमध्ये 2 हजारच्या नोटा बदलण्याची प्रणाली सक्रिय आहे. तपासादरम्यान आमची पुढची भेट अबरार नावाच्या व्यक्तीशी झाली. अबरारचे संपर्क जुन्या दिल्लीतील अनेक हवाला एजंट्सशी असल्याचे सांगितले गेले. अबरारने सांगितले की, तो सय्यद केसी नावाच्या एका व्यक्तीला ओळखतो, जो 2 हजारच्या नोटांची कितीही मोठी रक्कम बदलून देऊ शकतो. अबरारच्या मते, सय्यद चांदनी चौकातील एक मोठा हवाला एजंट आहे. दुसरी भेट : सय्यद केसी ठिकाण : जाफराबाद, दिल्ली कोणती पद्धत सांगितली : बँक कामकाजाच्या दिवशी बदलले जातील रिपोर्टर आणि सय्यद यांच्यातील संभाषण… सैयद: अंदाजे किती आहेरिपोर्टर: 50 कोटींच्या आसपास सैयद: तुम्हाला हवे तेवढे आणारिपोर्टर: 10 कोटी पण होतील ?सैयद: काही अडचण नाही. तुम्ही बँक वर्किंग डेला आणारिपोर्टर: बँकसैयद: हो, बँक वर्किंग डेला, सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंतरिपोर्टर: तर बँकेत असेलसैयद: बँकेत नाही. आम्ही आमच्याकडे ठेवू, तुम्ही काढाल. तुम्हाला बँक वर्किंग डेला आणायचे आहेरिपोर्टर: म्हणजे बँक वर्किंग डेलाचसैयद: हो, आम्ही काढून देऊ. समोर बँक आहे, काही अडचण नाहीरिपोर्टर: 5 कोटी निघतीलसैयद: हो, सर्व व्यवस्था करूरिपोर्टर: पैसे कसे देणार, सिस्टम काय असेलसैयद: गाडी घेऊन या, तिथेच हँडओव्हर करूरिपोर्टर: गाडीत देणारसैयद: होयरिपोर्टर: आधी पैसेसैयद: आधी तपासणी करू, मग लगेच देऊ. वेळ लागणार नाहीरिपोर्टर: कमिशन किती राहीलसैयद: 35–65, 65 तुम्हाला देऊ, 35 ते ठेवतील रिपोर्टर: म्हणजे 1 कोटीत 65 लाख तुम्हालासैयद: होय, थेट रोख. 500 च्या नोटांमध्येरिपोर्टर: 2000 च्या नोटा बँकेत जमा होतीलसैयद: होय, बँकिंग चॅनेलद्वारेसैयद: आमच्याकडे CMS गाडीची परवानगी आहे. मोठ्या नोटांच्या हालचालीची व्यवस्था असते रिपोर्टर: किती रक्कम नेहमी असतेसैयद: 20–25 कोटी. बाहेरून हस्तांतरण झाल्यास लगेच सैयद केसीने दावा केला की, जुन्या दिल्लीतील आडते, म्हणजेच हवाला व्यावसायिक, 35 टक्के कमिशनवर 2 हजारच्या नोटा बदलण्याच्या या संपूर्ण खेळाला अंजाम देतील. त्याच्या मते, या लोकांची बँकांमध्ये सेटिंग आहे. सीएमएसच्या गाडीतून पैसे येतील आणि तिथेच मोजणी व तपासणीनंतर हातोहात 2 हजारच्या बदल्यात नवीन नोटा दिल्या जातील. त्याचा दावा होता की, संपूर्ण व्यवहार गाडीच्या आतच पूर्ण केला जाईल. नोटा बदलणाऱ्या 2 माफियांशी भेटल्यानंतर आमची चौकशी आणखी पुढे सरकली. सूत्रांकडून असे समजले की, हा खेळ केवळ हवाला नेटवर्कपुरता मर्यादित नाही. इंटरनेटवरही असे अनेक लोक आणि ग्रुप सक्रिय आहेत, जे क्रेडिट कॅश करून देण्याचा किंवा डिजिटल व्यवहाराच्या नावाखाली 2 हजारच्या नोटा बदलवून देण्याचा दावा करतात. गुगलवर शोधल्यावर आम्हाला 'कॅश अगेन्स्ट क्रेडिट कार्ड' नावाच्या एका वेबसाइट मिळाली. वेबसाइटवर दिलेल्या नंबरवर आम्ही थेट कॉल केला. फोन संतोष नावाच्या व्यक्तीने उचलला. आम्ही कोणताही आडपडदा न ठेवता थेट 2 हजारच्या नोटा बदलवून देण्याबद्दल सांगितले. थोड्याच वेळात बोलणे भेटीची वेळ निश्चित करण्यापर्यंत पोहोचले. जागा आणि वेळही निश्चित झाली. तिसरी भेट : संतोष कुमार ठिकाण : कनॉट प्लेस, नवी दिल्ली काय पद्धत सांगितली : 30 टक्केच परतावा मिळेल रिपोर्टर आणि संतोष यांच्यातील संभाषण… संतोष: पूर्ण रक्कम एकाच वेळी होऊ शकत नाही, भागांमध्ये करावी लागेल. रिपोर्टर: हो संतोष: सुरुवातीला किती रकमेने सुरुवात होऊ शकते? रिपोर्टर: 50 लाखांपासून सुरुवात करूया. संतोष: सुरुवातीसाठी थोडे जास्त आहे, तरीही बोलून सांगेन. रिपोर्टर: नोट अगदी नवीन आहेत, वापरलेले नाहीत. ज्यांच्याशी देवाणघेवाण होईल, ती दिल्लीबाहेरची पार्टी आहे का? संतोष: हो, बाहेरची पार्टी आहे. रिपोर्टर: सध्या बँका घेत नाहीत, फक्त RBI घेत आहे. संतोष: होय, आता प्रक्रिया RBI चॅनलमधूनच आहे. औपचारिकता आणि कागदपत्रे समजून घ्यावी लागतील. रिपोर्टर: इथे तर थेट रोख व्यवहाराची चर्चा होत आहे. संतोष: मोठ्या रकमेवर प्रश्न उपस्थित होतात, त्यामुळे प्रक्रिया काळजीपूर्वक करावी लागेल. रिपोर्टर: काम नक्की आहे? संतोष: होय, निश्चित आहे. रिपोर्टर: कमिशन किती? संतोष: 30% परत मिळेल, 70% तिकडे राहील. संतोष: आधी वेळ असता तर चांगली किंमत मिळाली असती, आता परिस्थिती कमकुवत आहे. नोट बदलण्याचे नियम काय आहेत : नोंदीशिवाय बदलणे बेकायदेशीर RBI ने स्पष्ट केले आहे की, 2 हजार रुपयांची नोट अजूनही वैध चलन आहे. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीकडे 2 हजार रुपयांची नोट असल्यास तो कोणताही गुन्हा नाही, परंतु या नोटा RBI मध्ये जमा करणे आवश्यक आहे. देशभरात RBI ची 19 इश्यू कार्यालये आहेत, जिथे नोटा बदलता येतात. आरबीआयनुसार, 2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा बँक खात्यात जमा करण्यासाठी कोणतेही नवीन दस्तऐवज आवश्यक नाहीत, परंतु प्रक्रिया केवायसी नियमांनुसार होते. सामान्यतः, 20 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलताना कागदपत्रे मागितली जात नाहीत, तथापि, संशय आल्यास किंवा वारंवार व्यवहार केल्यास ओळख विचारली जाऊ शकते. बँकेत जमा करताना केवायसी (KYC) अनिवार्य आहे. आधार/पॅनची मागणी केली जाऊ शकते. मोठ्या रकमेवर पॅनसोबत पैशाच्या स्रोताचीही चौकशी होते. इंडिया पोस्टद्वारे पाठवतानाही ओळख आणि बँक तपशील देणे आवश्यक आहे. आरबीआय स्पष्ट करते की रेकॉर्ड किंवा सेटिंगशिवाय 2 हजार रुपयांच्या नोटा बदलणे नियमांच्या विरोधात आहे. निष्कर्ष : सरकारने काळ्या पैशांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने 2 हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या, परंतु नोट माफिया त्यांच्या नेटवर्कद्वारे काळ्या पैशाला पांढरे करत आहेत. प्रश्न असा निर्माण होतो की आतापर्यंत किती काळ्या पैशावाल्यांनी आपले पैसे सुरक्षित केले असतील. हे प्रकरण केवळ नियमांच्या उल्लंघनाचे नाही, तर संपूर्ण आर्थिक प्रणालीच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते. टीप : भास्करने या संपूर्ण प्रकरणावर RBI, दिल्ली पोलीस, आयकर विभाग आणि ED यांना ईमेल केला आहे. उत्तर मिळताच बातमीत अपडेट करू.

दिव्यमराठी भास्कर 31 Jan 2026 10:04 am

India- US Trade Agreement : अमेरिकेने भारताला दिली मोठी ऑफर; व्यापार कराराचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता

India- US Trade Agreement : व्हेनेझुएलाच्या तेलावर पूर्णपणे अमेरिकेचे नियंत्रण असल्याने आता भारताने व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करावे, असा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 9:35 am

ठाण्यात शिवसेना-भाजपची बिनविरोध सत्तास्थापना

महापौर आणि उपमहापौर दोघांचीही बिनविरोध निवड ठाणे : महापालिकेच्या महापौरपदी शिंदेसेनेच्या कोपरीमधील नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, तर दोन वर्षांसाठी महापौर पद मिळावे अन्यथा विरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपने आपली भूमिका बदलत सत्तेत राहणे पसंत करत उपमहापौरपदी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून कृष्णा पाटील यांनी नामनिर्देशन दाखल केले. विरोधात कोणीही अर्ज दाखल केले नसल्याने महापौर आणि उपमहापौर या दोघांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.महापौर पदासाठी शिवसेनेतून ७ नगरसेवकांची नावे पुढे आली होती. यात विमल भोईर, पद्मा भगत, दीपक जाधव, गणेश कांबळे, आरती गायकवाड, वनिता घोगरे आणि दर्शना जानकर यांची नावे आघाडीवर होती. मात्र अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा कोपरीवर विश्वास टाकत येथील सलग दोन वेळा निवडून आलेल्या शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांच्यावर विश्वास टाकत त्यांना महापौर पदाची संधी दिली आहे. त्या कोपरी येथील प्रभाग क्रमांक २० मधून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.दुसरीकडे महापौर पदावर दावा करणाऱ्या भाजपने अखेर उपमहापौर पदावर समाधान मानले आहे. त्यानुसार शुक्रवारी प्रभाग क्रमांक ११ मधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. विरोधी गटाकडून कोणीही नामनिर्देशन पत्र दाखल न केल्याने महापौर आणि उपमहापौर पदाची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. त्यानुसार येत्या ३ फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा केली जाणार आहे.सव्वा वर्ष असणार महापौर आणि उपमहापौर पदमहापौर आणि उपमहापौरपदाचा फाॅर्म्युला निश्चित झाला असून पहिले सव्वा वर्ष महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर आणि त्यानंतर सव्वा वर्षाने शिवसेनेचा महापौर विराजमान होणार आहे. तसेच भाजपकडून देखील उपमहापौर पद हे सव्वा वर्षँसाठी असणार आहे. त्यानंतर पुन्हा सव्वा वर्षाने उपमहापौर पद ही बदलले जाणार आहे. त्या ठिकाणी दुसरा चेहरा दिला जाणार आहे. असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. महापौर पद शिवसेनेकडेच आणि उपमहापौर पद हे भाजपकडेच राहणार आहे.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 9:30 am

चार नगरसेवकांविरोधात उबाठा गट आक्रमक

बेपत्ता नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरूकल्याण : पक्षाचा आदेश न मानणाऱ्या ठाकरे गटातील चार नगरसेवकांविरोधात उबाठा गट आक्रमक झाला असून, बेपत्ता ४ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती उबाठा पक्षाचे शहर प्रमुख बाळा परब, गटनेते उमेश बोरगावकर आणि पक्ष प्रतोद संकेश भोईर यांनी दिली. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील त्या चार प्रभागांत पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत उबाठा गटाचे ११ नगरसेवक निवडून आले. मात्र निवडून आल्यापासून कल्याणमधील मनसेतून ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक राहुल कोट आणि नगरसेविका स्वप्नाली केणे या नॉटरिचेबल आहेत, तर शिवसेना शिंदे गटातील ठाकरे गटातून निवडून आलेले मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे नगरसेवक देखील बेपत्ता आहेत. याबाबत उबाठा गटाच्या वतीने त्यांना पक्षाच्या बैठकीला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र या बैठकीला आणि कोकण विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणीला देखील हे चारही नगरसेवक गैरहजर राहिल्याने उबाठा गटाने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.याबाबत शुक्रवारी कल्याणच्या शिवसेना शहर शाखेमध्ये नगरसेवक आणि शहर प्रमुख यांच्यासोबत बैठक पार पडली. जे चार नगरसेवक मशाल चिन्हावर निवडून आले आहेत मात्र त्यांना व्हीप मान्य नाही अशा चारही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केले असल्याची माहिती दिली.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 9:30 am

कल्याण-डोंबिवलीत महापौर-उपमहापौर बिनविरोध

महापालिका सभागृहात महायुतीचे वर्चस्वकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून महापौर पद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे. या महापौर पदासाठी शिवसेनेच्या वतीने नगरसेविका हर्षाली चौधरी थवील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर उपमहापौर पदासाठी भाजपच्या वतीने नगरसेवक राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात पालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे हे दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, मनसेचे माजी आमदार राजू पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष नंदू परब, नरेंद्र सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. मात्र दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराचे अर्ज दाखल झाल्याने, या महत्त्वाच्या पदांवरील निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेतील निवडणूक प्रक्रिया ही केवळ औपचारिकता ठरणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून असून, नव्या महापौर आणि उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.कडोंमपा निवडणुकीमधून नवनिर्वाचित झालेल्या सदस्यांपैकी एकाची महापौर पदी, तर दुसऱ्याची उपमहापौरपदी निवड करण्यासाठी विभागीय आयुक्त कोकण भवन यांनी जिल्हा अधिकारी मुंबई शहर आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 9:30 am

मीरा-भाईंदरमध्ये डिंपल मेहता महापौर, तर ध्रुवकिशोर पाटील उपमहापौर पदी निश्चित

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवत विजयी झालेल्या भाजपने ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी डिंपल मेहता आणि ध्रुवकिशोर पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडे प्रचंड बहुमत असल्याने महापौर पदी डिंपल मेहता आणि उपमहापौर पदी ध्रुवकिशोर पाटील यांचा विजय निश्चित आहे.मीरा-भाईंदर महापालिकेच्या ९५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने ७८ जागांवर विजय मिळवला आहे, तर काँग्रेसने १३ आणि शिवसेनेने ३ जागांवर विजय मिळवला होता, तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता त्यानी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता भाजपची संख्या ७९ झाली आहे. शुक्रवारी महापौर पदासाठी डिंपल मेहता यांनी तर उपमहापौर पदासाठी ध्रुवकिशोर पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. डिंपल मेहता यांच्यासाठी नगरसेविका शानू गोहिल आणि स्नेहा पांडे सूचक व अनुमोदक आहेत, तर ध्रुवकिशोर पाटील यांच्यासाठी नगरसेवक संजय थेराडे आणि भगवती शर्मा सूचक व अनुमोदक आहेत.काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन मीरा-भाईंदर शहर विकास आघाडी स्थापन करून त्यांच्यावतीने काँग्रेसच्या रुबीना शेख यांनी महापौर पदासाठी तर शिवसेनेच्या वंदना विकास पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. ७९ विरुद्ध १६ अशी लढत असल्याने मीरा-भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहता आणि उपमहापौर पदी ध्रुवकिशोर पाटील यांचा विजय निश्चित आहे. डिंपल मेहता यापूर्वी २०१७ मध्ये महापौर होत्या, तर ध्रुवकिशोर पाटील हे १९९९ पासून नियमित नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. सभागृहात ते ज्येष्ठ नगरसेवक आहेत.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 9:30 am

केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालयातर्फे घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्या नियमांची अधिसूचना

प्रदूषण करणाऱ्यांवरच नुकसानभरपाईची जबाबदारी १ एप्रिलपासून होणार अंमलबजावणी अलिबाग : घनकचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असून, त्यातच घनकचरा व्यवस्थापनाबाबत असलेल्या कायदे आणि नियमांच्या सर्रास होणाऱ्या उल्लंघनामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचण्याच्या वाढलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अत्यंत गांभीर्याने दखल घेत घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्या नियमांची अधिसूचना काढली आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०२६ पासून करण्यात येणार आहे.नव्या अधिसुचनेत अनेक महत्वाचे बदल लागू करण्यात आले असून, त्यात घनकचऱ्याच्या उगमस्थानीच चार भागांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण अनिवार्य करण्यात आले आहे, तर प्रदूषण करणाऱ्यावरच नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी राहाणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ अधिसूचित केले आहे. ते घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ ची जागा घेतील. हे नियम पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ अंतर्गत अधिसूचित करण्यात आले असून, ते १ एप्रिल २०२६ पासून पूर्णपणे लागू होतील. सुधारित नियमांमध्ये कार्यक्षम कचरा वर्गीकरण आणि व्यवस्थापनावर विशेष लक्ष केंद्रित करून चक्राकार अर्थव्यवस्था आणि कचरा उत्पादकांचे विस्तारित उत्तरदायित्व या तत्वांचा समावेश करण्यात आला आहे.राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरणीय नुकसानभरपाई निश्चित करणार : नवीन नियमांमध्ये नोंदणीशिवाय काम करणे, खोटे अहवाल देणे, बनावट कागदपत्रे सादर करणे किंवा अयोग्य घनकचरा व्यवस्थापन पद्धतीसह नियमांचे पालन न केल्यास प्रदूषण करणाराच नुकसानभरपाई देईल, या तत्वावर आधारित पर्यावरणीय नुकसानभरपाई आकारण्याची तरतूद आहे. या अंतर्गत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ संबंधित मार्गदर्शक तत्वे तयार करणार आहे. तर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रदूषण नियंत्रण समित्या पर्यावरणीय नुकसानभरपाई निश्चित करतील.लँडफिलच्या कामगिरीवर देखरेख ठेवण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे जबाबदारीनव्या नियमांतर्गत लँडफिलिंगवरील अर्थात कचराभूमीवर कचरा टाकण्याशी संबंधित निर्बंध अधिक कठोर केले गेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी विलगीकरण न केलेला कचरा सॅनिटरी लँडफिलमध्ये पाठविल्यास यासाठी त्यांच्यावर अधिक शुल्क आकारण्याची तरतूद या नियमांमध्ये करण्यात आली आहे. विलगीकरण न केलेल्या कचऱ्यासाठीचे हे शुल्क कचरा विलगीकरण, वाहतूक आणि प्रक्रियेच्या खचपिक्षा जास्त असेल, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनिवार्यपणे लँडफिलचे वार्षिक लेखापरीक्षण अर्थात ऑडिट करणे या नियमांतर्गत बंधनकारक केले गेले आहे, तर लँडफिलच्या कामगिरीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.उगमस्थानीय घनकचऱ्याचे चार भागांमध्ये वर्गीकरणघनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ अंतर्गत, घनकचऱ्याच्या उगमस्थानीच कचऱ्याचे ओला कचरा, सुका कचरा, मॅनिटरी कचरा आणि विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असलेला कचरा, अशा चार भागांमध्ये वर्गीकरण करणे आवश्यक आहे. ओल्या कचऱ्यामध्ये स्वयंपाक घरातील कचरा, भाज्या, फळांची साले, मांस, फुले इत्यादींचा समावेश असून, त्यावर स्थळाच्या सुविधेमध्ये कंपोस्ट खत तयार करून अथवा बायो-निमेशनद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे. सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, कागद, धातू, काच, लाकूड आणि रबर इत्यादींचा समावेश असून, तो वर्गीकरण आणि पुनर्वापरासाठी मटेरियल रिकव्हरी फैसिलिटीजमध्ये पाठवला जाणार आहे. सॅनिटरी कचऱ्यामध्ये वापरलेले हायपर, सॅनिटरी टॉवेल्स, टॅम्पोन आणि कंडोम इत्यादींचा समावेश असून, तो सुरक्षितपणे गुंडाळला जाईल आणि स्वतंत्रपणे साठविला जाईल. विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असलेल्या कचऱ्यामध्ये रंगाचे डबे, बल्ब, पारा असलेले थर्मामीटर आणि औषधे इत्यादींचा समावेश असून, तो अधिकृत संस्थाद्वारे गोळा केला जाणार आहे, अथवा निर्धारित संकलन केंद्रांवर जमा केला जाणार आहे.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 9:30 am

राजिप निवडणुकीत शिवसेनेचे ४०, शेकापचे १९ उमेदवार निवडणूक रिंगणात

अलिबाग : रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी युती-आघाडीच्या राजकारणात सर्वच पक्षांच्या वाट्याला कमी अधिक जागा आलेल्या असल्या, तरी जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेचे सर्वाधिक ४० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दुसरीकडे अनेक वर्षे शिवतीर्थावर राज्य करणारा आणि मागील निवडणुकीत २३ जागा जिंकणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे यावेळी केवळ १९ उमेदवारच निवडणूक रिंगणात आहेत.रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी निवडणूक होत असून, त्यासाठी १७३ उमेदवार रिंगणात आहेत. आता पक्षनिहाय लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून, जिल्ह्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे केल्याने यंदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे महायुतीतील घटक पक्षांचे उमेदवार काही ठिकाणी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने उत्तर रायगडात भाजपबरोबर आघाडी केली आहे. तरीही शिंदेंच्या शिवसेनेने सर्वाधिक ४० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेपाठोपाठ भाजपने ३० मतदारसंघांत आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. दक्षिण रायगडात भाजपबरोबर युती करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या निवडणुकीत २९ जागांवर, तर शेकाप आणि शिवसेना ठाकरे गट यांनी प्रत्येकी १९ मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत.काँग्रेस पक्षाने ९ जागांवर उमेदवार दिले असून, मनसेने ३ मतदारसंघांत आपली उपस्थिती नोंदवली आहे. वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आणि भाकप यांनी केवळ एका जागेवर उमेदवार उभे केल्याने या पक्षांची भूमिका मर्यादित स्वरूपाची राहिली आहे, तर २१ अपक्ष उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. दरम्यान, राजिपवर सातत्याने सत्तेत राहणाऱ्या शेकापची यावेळी उमेदवार उभे करण्यात देखील पिछेहाट झाल्याचे दिसून येत आहे. मागील निवडणुकीत २३ जागा जिंकत शेकाप सत्तेतील प्रमुख घटक पक्ष बनला होता. यावेळी शेकापचे अनेक नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून अन्य पक्षात सामील झाले. त्यामुळे यावेळी शेकापने नवीन तरुण उमेदवारांना संधी दिली आहे.अपक्षांना संधीरायगड जिल्ह्यात सक्रिय असलेल्या प्रमुख राजकीय पक्षांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अपक्षांना येथील निवडणुकांमध्ये फारसा वाव मिळताना दिसत नाही. मात्र यावेळच्या निवडणुकीत २१ अपक्ष उमेदवार उभे आहेत. यात राजकीय पक्षांच्या बंडखोर उमेदवारांचाही समावेश आहे. हे अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकतात. त्यातच जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी ३१ चा मॅजिक फिगर गाठण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची चढाओढ सुरू आहे. अशावेळी सत्तासंघर्षात अपक्षांचाही भाव वाढण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 9:30 am

राज्यातील ‘आयटीआय’ होणार ‘स्किल डेव्हलमपेंट हब’

मंत्री मंगलप्रभात लोढा; पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्याचा समावेशमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शाश्वत विकासाच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या ‘पीएम-सेतू’ योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आधुनिक ‘स्किल डेव्हलमपेंट हब’ म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. उद्योगांची संख्या कमी असलेल्या भागांत सेवा क्षेत्र, बहुकौशल्य अभ्यासक्रम आणि उपजीविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, यामुळे राज्यातील तरुणांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाच्या दर्जेदार संधी उपलब्ध होतील, अशी माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेच्या पहिल्या टप्प्यास मान्यता देण्यात आली. या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून, पुढील टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांचाही समावेश केला जाणार आहे. कुशल मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा यांतील तफावत दूर करण्यासाठी आयटीआयचे आधुनिकीकरण करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.केंद्र आणि राज्य सरकार करणार २४२ कोटींचा खर्चपीएम-सेतू योजनेंतर्गत आयटीआयचे आधुनिकीकरण ‘हब अॅण्ड स्पोक’ प्रारूपात करण्यात येणार आहे. या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकार मिळून सुमारे २४२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये केंद्र सरकारचा ५० टक्के, राज्य सरकारचा ३३ टक्के आणि उद्योग क्षेत्राचा १७ टक्के असा निधी वाटा असेल. एका क्लस्टरसाठी (एक हब आयटीआय व चार स्पोक आयटीआय) पाच वर्षांसाठी अंदाजे २४१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यापैकी केंद्र सरकारचा ११२ कोटी, राज्य शासनाचा ९८ कोटी आणि उद्योग क्षेत्राचा ३१ कोटी रुपयांचा सहभाग असेल. राज्य शासनाकडून पाच वर्षांसाठी करावयाच्या ९८ कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली आहे. नवीन अभ्यासक्रम सुरू करणारएका हब आयटीआयमध्ये सरासरी चार नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, दहा विद्यमान अभ्यासक्रमांची श्रेणीसुधारणा केली जाईल. स्पोक आयटीआयमध्ये दोन नवीन अभ्यासक्रम सुरू केले जातील आणि आठ विद्यमान अभ्यासक्रमांची श्रेणी सुधारणा करण्यात येणार आहे. उद्योगांची संख्या कमी असलेल्या भागांत सेवा क्षेत्र, बहुकौशल्य आणि उपजीविका आधारित अभ्यासक्रमांवर विशेष भर देण्यात येणार आहे. भारताची गुरुकुल परंपरा, नालंदासारखी विद्यापीठे आणि आर्यभट्टांसारखे विद्वान यांमुळे देश ज्ञानार्जनाचे जागतिक केंद्र ठरला होता. त्याच ज्ञानपरंपरेला आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची जोड देत आयटीआयच्या माध्यमातून ‘नवा भारत’ घडवण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करत आहेत, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 9:10 am

भाजपच्या नगरसेवकांची सोमवारी कोकण भवनमध्ये नोंदणी

गटाऐवजी भाजप स्वतंत्रपणे नगरसेवकांची करणार नोंदणीमुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर तीन दिवसांचा दुखवटा संपल्यानंतर येत्या सोमवारी भाजप नगरसेवकांची नोंदणी विभागीय कोकण आयुक्तांकडे केली जाणार आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील गटनोंदणीची चर्चा असतानाच सोमवारी भाजपच्यावतीने स्वतंत्र नोंदणीची प्रक्रिया केली जाणार आहे. त्याचवेळी शिवसेना एकत्र नोंदणी करते की स्वतंत्रपणे नोंदणी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ८९ नगरसेवक निवडून आले असून शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत. आतापर्यंत काँग्रेस, एमआयएम, मनसे तसेच उबाठाच्या नगरसेवकांची नोंदणी कोकण भवनमध्ये झाल्यानंतर पुढील नोंदणीची औपचारिकता महापालिका सचिव विभागातही पार पडली आहे; परंतु भाजप आणि शिवसेनेची कोकण भवनमधील नोंदणी अद्याप झालेली नाही. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यामुळे तीन दिवसांच्या दुखवट्यामुळे ही नोंदणी लांबणीवर पडली होती.भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची एकत्रपणे गटनोंदणीची चर्चा सुरु असतानाच सोमवारी केवळ भाजप नगरसेवकांचीच गटनोंदणी होणार आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे नगरसेवक एकत्रपणे असतील किंवा नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून आपल्या नगरसेवकांची नोंदणी आणि पक्षाची नोंदणी करत गटनेते पदाची निवड केली जाईल, अशी माहिती मिळत आहे. आतापर्यंत समाजवादी पक्षाच्या एका नगरसेवकाची नोंदणी झालेली असून एका नगरसेवकाची नोंदणी शिल्लक आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवक हे महायुतीतील घटक पक्ष म्हणून स्वतंत्र न गट म्हणून न राहता शिवसेनेसोबत गट म्हणून नोंदणी करु शकतील, असेही बोलले जात आहे.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 9:10 am

विदर्भात सत्ता स्थापनेचा खेळ

अकोल्यात भारतीय जनता पक्षाच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी निवड झाली, तर नागपूरमध्ये भाजपची पकड मजबूत असताना अमरावतीत सत्ता निश्चित होत आहे, मात्र चंद्रपूरमध्ये राजकीय संघर्षाने चित्र अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.वार्तापत्र उत्तर महाराष्ट्र अविनाश पाठकमहाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचे निकाल लागून आता दोन आठवडे उलटलेले आहेत. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या चारही महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल असे चित्र सुरुवातीला वाटत होते. त्यानुसार अकोल्यात भारतीय जनता पक्षाच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी निवड झाली आहे, तर नागपूरमध्ये ६ फेब्रुवारीला भारतीय जनता पक्षाचाच महापौर निवडला जाईल हे नक्की आहे. मात्र अमरावती आणि चंद्रपूर येथे आजही परिस्थिती काहीशी अनिश्चित वाटत आहे. त्यातही अमरावतीत आता परिस्थिती आटोक्यात आली असल्यासारखे दिसते आहे मात्र चंद्रपुरात अजूनही मारामारी सुरूच आहे.नागपूरमध्ये १५१ जागांपैकी भाजपने १०२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांना कोणाच्याही मदतीची गरज नाही. ते स्वबळावरच सर्व पदांवर दावा सांगू शकतात. मात्र शिंदे सेनेला ते एखादी तरी जागा देतील अशी शक्यता बोलली जात आहे. त्याचप्रमाणे रिपब्लिकन आठवले गटाला सुद्धा ते सत्तेत सहभागी करतील हे देखील निश्चित आहे. कारण नागपुरात रिपब्लिकन मतांचा जो जोर असलेला भाग आहे, तिथे हा भाग भविष्यातही भाजपसोबतच यावा यासाठी ही रणनीती असेल असे बोलले जाते.याचवेळी नागपुरात भारतीय जनता पक्षाने कठोर आत्मपरीक्षण करण्याची देखील गरज राजकीय विश्लेषक बोलून दाखवत आहेत. २०१७ मध्ये नागपुरात भाजपला १०८ जागांवर विजय मिळाला होता. मात्र यावेळी ती संख्या १०२ वर घसरलेली आहे. नागपुरातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच भाजप नेते निवडणुकीपूर्वी आम्ही १२० जागा जिंकू असा दावा करत होते. मात्र शून्याची जागा बदलली असल्यामुळे १२० चे १०२ झाले आहेत. हे बघता भाजपची रणनीती कुठेतरी चुकली असेही बोलले जाते आहे.भाजपच्या जागा कमी होण्यामागे विदर्भात नागपुरात एमआयएमचे जे काही प्रस्थ वाढले ते देखील लक्षात घेणे गरजेचे झाले आहे. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या मुस्लीमबहुल भागात दंगल झाली आणि ती इकडे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचली होती. त्यावेळी त्या काही घटना घडल्या त्याचेच पर्यावसान एमआयएमचे वर्चस्व वाढवण्यात झाले असल्याचे बोलले जात आहे. या दंगलीच्या प्रमुख सूत्रधार म्हणून त्याला अटक झाली होती त्याची पत्नीच एका प्रभागातून विजयी झाली आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षात जागा वाटपामध्ये जे काही गोंधळ झाले त्यामुळे देखील पक्षाला काही जागांचा फटका बसला हे निश्चित आहे. उमेदवार निवडताना काही ठिकाणी बाहेरच्या पक्षातून आलेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देत जुन्या जाणत्यांना अंगठा दाखवला गेला. त्याचप्रमाणे बाहेरच्या प्रभागातील उमेदवारांना भलत्याच प्रभागात लादले गेले. अखेरच्या क्षणापर्यंत याद्या जाहीर केल्या नाहीत आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांना बोलावून बी फॉर्म दिले गेले. त्यामुळे जो काही गोंधळ झाला त्याचा परिणाम मतदारांवर देखील झाला आहे.त्याचबरोबर काँग्रेसमध्ये नवे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी जो नियोजनबद्ध प्रचार केला आणि योग्य असे उमेदवार निवडले त्याचाही फटका भाजपला बसल्याचे बोलले जात आहे. विकास ठाकरे हे धडाकेबाज नेते म्हणून ओळखले जातात त्याचाच फायदा काँग्रेसला झाल्याचे बोलले जात आहे.अमरावतीत जरी भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नसले तरी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाने त्यांना निर्विवाद पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजप राणांचा पक्ष आणि काही अपक्ष म्हणून अमरावतीत भाजपची सत्ता येईल हे आता निश्चित झाले आहे. ६ फेब्रुवारीला अमरावतीत महापौर, उपमहापौरांची निवडणूक होणार आहे त्या दिवशी चित्र स्पष्ट होईल.चंद्रपूरमध्ये मात्र आज काय होईल हे सांगणे कठीण आहे. तिथे भाजपमध्ये आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार सुधीर मुनगंटीवार या दोघांच्या भांडणामुळे आणि शहराध्यक्षांनी ऐनवेळी उमेदवार यादी बदलल्यामुळे भाजपला जागा कमी मिळाल्या आणि काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना उबाठा गटाच्या मदतीने काँग्रेस तिथे सत्ता मिळवू शकेल असे चित्र होते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उबाठा पक्षाने तिथे अवघ्या सहा जागांच्या जोरावर पहिली अडीच वर्षे महापौरपद मागितले आहे, तर २७ जागा घेणाऱ्या काँग्रेसमध्ये शिवसेनेला महापौर पद देऊ नये असा मतप्रवाह आहे. त्यामुळे परिस्थिती डामाडौल आहे.त्याचवेळी काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातला संघर्ष उफाळून आला आहे. दोघांनीही नगरसेवकांचे वेगवेगळे गट तयार केले असून एका गटाने सर्व सदस्यांची नोंदणी करून टाकली आहे. त्यामुळे जास्तच गोंधळाची परिस्थिती झाली आहे. त्यात वडेट्टीवार गटाचे नगरसेवक बसने जात असताना त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आणि ही घटना धानोरकर गटाने घडवून आणल्याचा दावा केला जात आहे. त्यातील एक हल्लेखोर पकडला गेला असून त्याच्याकडून ही माहिती मिळाल्याचे सांगितले जात आहे.इथे काँग्रेसवासी असलेले विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर हे दोघेही मूळ शिवसैनिकच आहेत. विजय वडेट्टीवार २००५-६ या दरम्यान नेते नारायण राणे यांच्या समवेत शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमध्येच वाढत वाढत ते आता विरोधी पक्षनेते पदापर्यंत पोहोचण्याच्या तयारीत आहेत. प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर हे २०१९ पर्यंत शिवसैनिकच होते. त्यावेळी ते शिवसेनेचे आमदार होते आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी हवी होती.मात्र ही जागा युतीमध्ये भाजपसाठी सोडलेली असल्यामुळे त्यांनी शिवसेना पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसची उमेदवारी घेऊन भाजपचे उमेदवार आणि तत्कालीन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभव करत ते खासदार म्हणून निवडून आले. नंतर बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यावर प्रतिभा धानोरकर यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि त्या विद्यमान खासदार आहेत. मात्र वडेट्टीवार आणि धानोरकर या दोघांमध्ये विस्तवही जात नाही. त्यामुळे आता महापौर कोणत्या गटाचा करायचा यावर वाद सुरू असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन्ही गटांना एकत्र बसवून तडजोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून काहीही साध्य झाले नाही. परिणामी दोघांमध्ये चांगलेच भांडण सुरू आहे. याच दरम्यान भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील नेते सुधीर मुनगंटीवार हे मात्र महापौर आमचाच होणार असा दावा करीत आहेत. त्यांना या दोन दिग्गजांच्या भांडणाचा कितपत फायदा मिळेल त्यावरच चंद्रपूरचा महापौर कोणाचा होणार हे भविष्य ठरणार आहे.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 9:10 am

भयमुक्त परीक्षा

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा सुरू होत आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांना भयमुक्त व आत्मविश्वासपूर्ण वातावरण मिळणे गरजेचे आहे. अभ्यास, योग्य मार्गदर्शन, पालक-शिक्षकांचा सकारात्मक सहभाग आणि मानसिक स्वास्थ्य यांचा समतोल साधल्यास विद्यार्थी निर्धास्तपणे परीक्षेला सामोरे जाऊन यश संपादन करतील.रवींद्र तांबेमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ या दरम्यान तर इयत्ता दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी शिक्षण मंडळाने संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. तसेच दक्षता समिती व भरारी पथकांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. असे असले तरी परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा देणे गरजेचे आहे. त्यासाठी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांचा उत्साह वाढवायला हवा. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.भयमुक्त म्हणजे विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जातील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्षभरातील केलेला अभ्यास अतिशय महत्त्वाचा असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शाळेत नियमित जाऊन नियमितपणे अभ्यास केलेला असेल त्यांना परीक्षेचे भय वाटणार नाही. असे विद्यार्थी आनंदाने परीक्षेला सामोरे जातात. जे विद्यार्थी अभ्यासात चुकारपणा करतात असे विद्यार्थी जसजशी परीक्षेची तारीख जवळ येते तसतसे तणावाखाली येत असतात. त्यामुळे त्यांना परीक्षेला जाताना भय वाटत असते. याला कारणं सुद्धा अनेक असतील. मात्र विद्यार्थ्यांना आपले ध्येय गाठायचे असेल तर अभ्यास महत्त्वाचा असतो. शाळा सुरू झाल्यापासून विद्यालयामध्ये जसा अभ्यास शिकवून झालेला असेल त्याप्रमाणे वेळेचे नियोजन करून अभ्यास करावा. विद्यार्थ्यांनी अभ्यास एके अभ्यास जरी केला तरी आपण एक विद्यार्थी आहोत, आपल्यासाठी कोणीतरी परिश्रम करीत आहेत याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांचे विचार शिक्षणाशी निगडित असावेत. शिक्षणामुळेच आपण मोठे होऊ शकतो याची जाणीव त्यांच्यात निर्माण व्हायली हवी. महत्त्वाची बाब म्हणजे, विद्यार्थ्यांनी दररोज आपल्या आवडीचे वेळेवर जेवण घ्यावे. व्यायाम करावा, खेळ व पुरेशी झोप घ्यावी. मात्र अति विचार टाळावेत. अनाठायी वेळ वाया घालवू नये. त्यात मध्ये टी. व्ही.वरील कार्यक्रम व बातम्या पाहाव्यात यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडत असते. असे नियमित करायला हवे. हीच खरी यशाची गुरुकिल्ली असते. परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी मन शांत ठेवणे गरजेचे असते. मन शांत ठेवल्याने अभ्यासामध्ये मन रमते. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती आपोआप निघून जाते. खोडकर मित्रांचा नाद सोडून चांगल्या मित्रांच्या सहवासात राहावे. मोबाईलला चार हात दूर ठेवावे. आवश्यक कामासाठी मोबाईलचा वापर करावा. याचा परिणाम परीक्षेची तयारी झाल्याने विद्यार्थी हसत हसत आनंदाने परीक्षेला जातात. बरेच विद्यार्थी अभ्यासात चुकारपणा केल्याने परीक्षेच्या कालावधीत मानसिक तणावाखाली दिसतात. याचा परिणाम आपण काय करावे काय करू नये याचा विचार करीत विद्यार्थी असतात. अशावेळी त्यांच्या मनातील भीती घालविण्यासाठी किंवा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्याला तसेच त्यांच्या पालकांना समुपदेशन करणे गरजेचे आहे. परीक्षेपूर्वी प्रत्येक विद्यालयांनी किंवा एकत्रितपणे मानसोपचार तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आयोजित करण्यात यावेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर होते.दहावी आणि बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असतात. या दोन्ही परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या भयातून मुक्त करायला हवे. हेच विद्यार्थी देशाचे सुजाण नागरिक बनणार आहेत. वर्ष, महिने आणि आता काही दिवस परीक्षेला शिल्लक राहिले आहेत. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे महत्त्व आजही कमी झालेले नाही. विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची दिशा या परीक्षांवर अवलंबून असते. आता बारावीच्या परीक्षेला १० दिवस आणि दहावीच्या परीक्षेला २० दिवस आहेत. वर्षभर आपण काय केले? किती तास अभ्यास केला? मार्गदर्शक कोण होते? गंमती जंमती काय केल्या? हे सर्व बाजूला ठेवावे. विद्यार्थ्यांनी आपल्या भवितव्याचा विचार करून परीक्षेचे वेळापत्रक डोळ्यांसमोर ठेवून अभ्यासाची उजळणी करावी. त्याचप्रमाणे लिहिण्याचा सरावही नियमित करावा. आतापर्यंत आपल्याला प्रत्येक विषयात किती गुण मिळाले याची चर्चा करू नये. आता एकच लक्ष अंतिम परीक्षा. दिलेल्या वेळेत विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे लिहिणे. ती सुद्धा उत्तरपत्रिकेत खाडाखोड न करता. मनामध्ये कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता. प्रश्नाच्या उत्तराच्या महत्त्वाच्या वाक्याखाली लाईन मारणे. प्रश्न नवीन पानावर सोडविणे. याची पूर्व सूचना शाळा सुरू झाल्यावर प्रश्नाचे उत्तर कसे लिहावे. प्रश्नपत्रिका कशी सोडवावी याविषयी अध्यापकांनी ज्या सूचना दिल्या असतील त्याचे काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही प्रकारचे दडपण घेऊ नये. मन प्रसन्न ठेवून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेल्या वेळेत लिहून पूर्ण करावीत. परीक्षेच्या कालावधीत भीतीविरहित विद्यार्थ्यांच्या मनात वातावरण निर्माण केले पाहिजे. यासाठी परीक्षेच्या कार्यकाळात वातावरण निर्मिती अतिशय महत्त्वाची असते. तरच विद्यार्थी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला भयमुक्त परीक्षेला सामोरे जाऊन परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करू शकतात.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 9:10 am

Sunetra Pawar : सामाजिक कार्य ते राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; असा आहे सुनेत्रा पवारांचा प्रेरणादायी प्रवास

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांनी सामाजिक कार्यात स्वतः झोकून देऊन काम केले. २०२४ ची बारामती लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती. पण त्यांच्या वाट्याला पराभव आला.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 8:54 am

Preity Zinta: प्रीती झिंटाची लव्हस्टोरी: नेस वाडियासोबतच्या अफेअरपासून अमेरिकेतल्या गुप्त लग्नापर्यंतचा प्रवास

Preity Zinta: बॉलीवूडची बिंदास आणि नेहमी हसतमुख असलेली अभिनेत्री प्रीती झिंटा आज आपला ५१वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणा आणि आत्मविश्वासामुळे प्रीतीने नेहमीच चाहत्यांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली. तिचं वैयक्तिक आयुष्यही कायम चर्चेत राहिलं आहे विशेषतः तिच्या प्रेमसंबंधांमुळे.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 8:53 am

Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार होणार विराजमान; आज होणार शपथविधी

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. यामुळे येथे पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 8:35 am

मतमोजणी व आंगणेवाडी जत्रा एकाच दिवशी

प्रशासनाला सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहनसिंधुदुर्गनगरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मतदान आणि मतमोजणीच्या तारखामध्ये बदल करण्यात आला आहे. झालेल्या बदलानुसार ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; तर ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.मतमोजणीच्या दिवशीच म्हणजे ९ फेब्रुवारी रोजी कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव देखील असणार आहे. मतमोजणी आणि श्री देवी आंगणेवाडी जत्रा याच दिवशी येत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. लोकशाहीचा उत्सव आणि श्रद्धेचा महोत्सव एकाच दिवशी साजरा होत असताना, संयम, शिस्त आणि सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी संयुक्त निवेदनाव्दारे केले आहे.मतमोजणी प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरक्षा, वाहतूक आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन आवश्यक असते. त्याचबरोबर आंगणेवाडी जत्रेसाठी राज्याच्या विविध भागांतून तसेच जिल्ह्याबाहेरून लाखो भाविक सिंधुदुर्गात दाखल होतात. त्यामुळे रस्ते, वाहतूक मार्ग, सार्वजनिक सेवा आणि सुरक्षेवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांनी आणि भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा, पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. मतमोजणी केंद्रांच्या परिसरात अनधिकृत गर्दी करू नये, कोणत्याही अफवा किंवा अपप्रचाराला बळी पडू नये. प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे नागरिकांनी पालन करावे. नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास मतमोजणी प्रक्रीया आणि आंगणेवाडी जत्रेचे नियोजन शांततेत आणि सुरळीत पार पडेल, असा विश्वासही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला आहे.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 8:30 am

गुहागरात युती विरुद्ध उबाठा लढत रंगणार

आशिष कारेकर गुहागर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुहागर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद व १० पंचायत समिती गणासाठी निवडणूक होत आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणी युती विरुद्ध उबाठा लढत रंगणार असल्याचे चित्र आहे. गुहागर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका भाजप -शिवसेना हे युतीच्या माध्यमातून लढत आहेत. तर महायुतीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील एकत्र असल्याचे दिसून येत नाही.महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी शरद पवार गट या निवडणुकीत फारसा सक्रिय नाही तर काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. तर उबाठा व मनसे हे एकत्र निवडणूक लढवत आहेत. यामध्ये देखील मनसे केवळ एका जागेवर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे इतर सर्व ठिकाणी उबाठाने आपले उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी युती विरुद्ध उबाठा अशीच लढत होणार आहे.यात असगोली जिल्हा परिषद गटात युतीकडून संतोष जैतापकर व उबाठाकडून आ. भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांच्यात टक्कर होणार आहे. शृंगारतळी जिल्हा परिषद गटातून युतीकडून डॉ. राजेंद्र पवार व मनसेचे प्रमोद गांधी, कोंडकारूळ जिल्हा परिषद गटातून युतीकडून अपूर्वा बारगोडे व उबाठाकडून मानसी घाणेकर, वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून युतीकडून नेत्रा ठाकूर व उबाठाकडून सिद्धी रामगडे, पडवे जिल्हा परिषद गटातून युतीकडून महेश नाटेकर व उबाठाकडून सचिन बाईत अशी लढत रंगणार आहे. पंचायत समितीचा विचार करता अंजनवेल पंचायत समिती गणातून उबाठाकडून प्राजक्ता जांभारकर व युतीकडून सारिका दाभोळकर, असगोली पंचायत समिती गणातून उबाठाकडून उर्वी खैर व युतीकडून पूनम रावणंग, तळवली पंचायत समिती गणातून उबाठाकडून संदीप धनावडे व युतीकडून मंगेश जोशी, शृंगारतळी पंचायत समिती गणातून उबाठाकडून संजय पवार व युतीकडून गौरव वेल्हाळ, मळण पंचायत समिती गणातून उबाठाकडून साक्षी चव्हाण व युतीकडून मानसी रांगळे, कोंडकारूळ पंचायत समिती गणातून उबाठाकडून महेश गोवळकर व युतीकडून प्रणव पोळेकर, वेळणेश्वर पंचायत समिती गणातून उबाठाकडून सचिन जाधव व युतीकडून संदीप गोरीवले, शीर पंचायत समिती गणातून उबाठाकडून ज्योत्स्ना काताळकर व युतीकडून स्नेहा शिगवण, पडवे पंचायत समिती गणातून उबाठाकडून रवींद्र आंबेकर व युतीकडून निलेश सुर्वे तर पाचेरी सडा पंचायत समिती गणातून उबाठाकडून शशिकला मोरे व युतीकडून सुचिता घाणेकर यांच्यात खरी लढत रंगणार आहे. त्यामुळे एकंदरीत गुहागरमधील ५ जिल्हा परिषद व १० पंचायत समिती गणाचा विचार करता बहुतांश ठिकाणी युती विरुद्ध उबाठा अशीच लढत होणार आहे हे चित्र स्पष्ट आहे.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 8:30 am

सीटीईटी परीक्षार्थी शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्याची मागणी

खेड : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड यांच्यावतीने ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सीटीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले.मूळतः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही निवडणूक पुढे ढकलून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. या अचानक झालेल्या तारखेतील बदलामुळे खेड तालुक्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक अडचणीत सापडले आहेत. ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्र शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) नियोजित असून या परीक्षेसाठी अनेक शिक्षक परीक्षार्थी आहेत. मात्र त्याच कालावधीत त्यांना निवडणूक कर्तव्य देण्यात आल्याने या शिक्षकांना अत्यंत महत्त्वाच्या सीटीईटी परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी बोलताना अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी सांगितले की, सीटीईटी ही शिक्षकांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा असून निवडणूक प्रक्रियेमुळे कोणत्याही शिक्षकाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. त्यामुळे तहसीलदार यांनी या विशेष परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ७ व ८ फेब्रुवारी रोजी ज्यांची सीटीईटी परीक्षा आहे, अशा शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली. निवेदन देते वेळी सचिव धर्मपाल तांबे, संघटना प्रवक्ता शैलेश पराडकर, सल्लागार परशुराम पेवेकर यांच्यासह शिक्षक समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 8:30 am

शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालय आणि सॅनिटरी पॅड अनिवार्य

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आदेशअन्यथा शाळांची मान्यता होणार रद्दनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांना मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटणे बंधनकारक करण्याचे निर्देश दिले. मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधली पाहिजेत. ज्या शाळांनी असे केले नाही त्यांना मान्यता रद्द करावी लागेल. न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रत्येक शाळेत अपंगांसाठी अनुकूल शौचालये बांधण्याचे निर्देश दिले. केंद्र सरकारच्या मासिक पाळी स्वच्छता धोरणाची देशभर अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या जया ठाकूर यांनी २०२४ मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. सर्व सरकारांना तीन महिन्यांत त्याचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, संविधानाच्या कलम २१ अंतर्गत जगण्याच्या अधिकारात मासिक पाळीच्या आरोग्याचा अधिकार समाविष्ट आहे. या महत्त्वाच्या निरीक्षणासोबतच, न्यायालयाने आपल्या आदेशात इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. हा निर्णय केवळ व्यवस्थेतील लोकांसाठी नाही तर अशा वर्गखोल्यांसाठी देखील आहे जिथे मुली मदत घेण्यास कचरतात. हे शिक्षकांसाठी देखील आहे जे मदत करू इच्छितात; परंतु संसाधनांच्या कमतरतेमुळे ते करू शकत नाहीत.सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, हा आदेश अशा पालकांसाठी देखील आहे ज्यांना त्यांच्या मौनाचा परिणाम कळत नाही आणि संपूर्ण समाजासाठी हे दाखवून देण्यासाठी आहे की प्रगती आपण सर्वात असुरक्षित लोकांचे संरक्षण कसे करतो यावरून मोजली जाते.तीन महिन्यांच्या आत अंमलबजावणी सक्तीचीजनहित याचिकेत मुलींच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्तसामाजिक कार्यकर्त्या जया ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आणि मुलींच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली. याचिकेत म्हटले आहे की, अनेक मुली त्यांच्या मासिक पाळीच्या वेळी येणाऱ्या समस्यांमुळे शाळा सोडतात, कारण त्यांच्या कुटुंबांकडे पॅडसाठी पैसे नसतात आणि त्या दिवसांत कापड वापरून शाळेत जाणे हे एक आव्हान आहे. शाळांमध्ये मुलींसाठी मोफत पॅडची कमतरता आहे, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. शिवाय, शाळांमध्ये वापरलेले पॅड विल्हेवाट लावण्याची सुविधा नाही, ज्यामुळे मुलींना मासिक पाळीच्या वेळी शाळेत जाता येत नाही.सरकारी, खासगी शाळेत सुविधा हवीच!सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रत्येक सरकारी किंवा खासगी शाळेत लिंग-विभाजनित शौचालये आणि पाण्याची सुविधा असल्याची खात्री करावी. सर्व नवीन शाळांमध्ये, अपंग शाळांसह, गोपनीयता सुनिश्चित केली पाहिजे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रत्येक शाळेच्या शौचालय परिसरात बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध असल्याची खात्री करावी. मासिक पाळीच्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अतिरिक्त गणवेश आणि इतर आवश्यक साहित्याने सुसज्ज मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन केंद्रे स्थापन करावीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 8:10 am

अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढली

पुजाऱ्यांना तीन पाळ्यांमध्ये काम करावे लागणारनवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतासह जगभरातून कोट्यवधी भाविक रामचरणी नतमस्तक झाले. अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रामललाचे दर्शन घेण्याची आस आजही भाविकांमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता राम मंदिरात सेवा करणारे पुजारी आता तीन पाळ्यांमध्ये काम करणार असल्याचे म्हटले जात आहे.अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते राम मंदिरावर धर्म ध्वजारोहण करण्यात आले. राम मंदिर परिसरात अनेक अन्य मंदिरही स्थापन करण्यात आली आहेत. राम मंदिर पूर्ण झाल्यावरही लाखो भाविक प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत येत आहेत. रामनगरी अयोध्येत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. राम मंदिर आणि हनुमानगढी येथे भाविकांची वाढलेली संख्या लक्षात घेता, प्रशासनाला दर्शन व्यवस्थेत बदल करावे लागले आहेत. राम मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे प्रत्येक भाविकाला सहज, सुलभ आणि सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी नवीन व्यवस्था लागू केल्या आहेत.दर्शन घेण्यासाठी पाच रांगेतून भाविक दर्शन घेत होते. आता ही संख्या सात करण्यात आली आहे. राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर भाविकांच्या सोयीसाठी ही संख्या नऊ असणार आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि दर्शन प्रक्रिया सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.राम मंदिरामुळे अयोध्येचा कायापालट झाला असून स्थानिकांच्या अर्थकारणातही कायापालट झाला आहे. उद्योग व्यवसाय व रोजगारालाही चालना मिळाली आहे.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 8:10 am

रायबरेलीत राहुल, सोनिया, प्रियंका गांधींविरुद्ध तक्रार

रायबरेली : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमध्ये न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये राहुल गांधींसोबत सोनिया गांधी व प्रियंका गांधी यांचेही नाव आहे. सरकारी जमिनीचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.पाजा फाउंडेशन या संस्थेने हा खटला दाखल केला आहे. सरकारी जमीन व तलावाच्या जागेवर चुकीच्या पद्धतीने इमारत बांधण्यात आली, असा दावा त्यांनी केला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे एका शाळेसाठी मान्यता घेतल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात गांधी कुटुंबाने मदत केल्याचे याचिकेत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने पोलिसांकडे सविस्तर अहवाल मागवला आहे.या प्रकरणात गांधी कुटुंबासोबत जिल्हाधिकाऱ्यांसह ४५ लोकांनी मिळून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. आता ९ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून सर्व गांधी परिवार अडचणीत सापडला आहे.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 8:10 am

मनीषा म्हैसकर गृह विभागाच्या नव्या अपर मुख्य सचिव

मुंबई : महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर यांची अपर मुख्य सचिव (गृह) पदी नियुक्ती केली आहे. सध्याचे अपर मुख्य सचिव (गृह) इक्बालसिंग चहल हे शनिवारी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सामान्य प्रशासन विभागाने याबाबत अधिकृत आदेश जारी केला असून, गृह विभागातील अपर मुख्य सचिव पदाचा कार्यभार मनीषा म्हैसकर यांनी शुक्रवारी दुपारी स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. बांधकाम विभागाचा कार्यभार मिलींद म्हैसकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.इक्बालसिंग चहल यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या पदावर मनीषा म्हैसकर यांची शासनाने नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच, त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यभार संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून गृह विभागाचा पदभार स्वीकारावा, असेही शासनाने आदेशात नमूद करण्यात आले आहे.प्रशासनातील अनुभव, कडक शिस्त व निर्णयक्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मनीषा म्हैसकर यांच्यावर आता राज्याच्या कायदा व सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा आणि गृह प्रशासनाची जबाबदारी असणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे गृह विभागाच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 8:10 am

उपमुख्यमंत्री पदासह राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षपदही सुनेत्रा पवारांकडेच

मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारीही सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यावर पक्षातील नेत्यांचे एकमत झाल्यानंतर, आता राष्ट्रवादीची धुरा देखील पवार कुटुंबाकडेच राहावी, अशी भूमिका वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षपदही सुनेत्रा पवारांकडेच दिले जाणार आहे.या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या बारामतीहून मुंबईकडे रवाना झाल्या असून, त्यांच्यासोबत पुत्र पार्थ आणि जय पवार, तसेच अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा हेही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक शनिवारी दुपारी २ वाजता विधानभवनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडेल, अशी माहिती पक्ष सूत्रांनी दिली.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी दोनवेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. त्यानंतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी विचारविनिमय करून शनिवारी दुपारी आमदारांची संयुक्त बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत विधानसभेतील आणि विधानपरिषदेतील सर्व आमदार उपस्थित राहणार असून, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 7:30 am

Ajit Pawar : भरणे मामांना मंत्री करणारे ‘किंगमेकर’हरपले; इंदापूर नगरपालिकेतून लाडक्या नेत्याला अखेरचा सलाम

Ajit Pawar : इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, इंदापूर नगरपरिषदेच्या प्रांगणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 7:29 am

अजित-शरद पवार यांच्या NCP चे एकीकरण निश्चित, भाजपही सहमत:शरद पवार गटाचे 8 खासदार मोदी सरकारला पाठिंबा देतील, पक्षाच्या नियंत्रणावर ओढाताण

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन मोठे प्रश्न आहेत. पहिला म्हणजे त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कोण सांभाळणार आणि दुसरा म्हणजे तीन वर्षांपूर्वी वेगळे झालेले अजित पवार गट आणि शरद पवार गट आता पुन्हा एकत्र येतील का. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे - होय. सूत्रांनुसार, दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अजित पवार यांनी स्वतः याचा रोडमॅप तयार केला होता. ते या मुद्द्यावर सातत्याने बैठका घेत होते. त्यांच्या निधनानंतरही दोनदा बैठका झाल्या आहेत. आता 9 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची घोषणा होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार आणि भाजप हायकमांड यावर सहमत आहेत. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महायुतीचा भाग राहील, यामुळे केंद्रात NDA ला शरद पवार गटाच्या 8 खासदारांची साथही मिळेल. पक्षाची कमान सांभाळण्यासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांना पुढे करण्यात आले आहे. मात्र, प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्यामुळे काही प्रमाणात ओढाताण निर्माण होत आहे. विलय निश्चित, पण परिस्थिती थोडी बदलली NCP (शरद गट) मधील आमच्या सूत्रांनी दावा केला आहे की दोन्ही पक्षांनी विलीनीकरणाचा आराखडा तयार केला आहे. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर परिस्थिती थोडी बदलली आहे. सूत्रांनी सांगितले, ‘28 जानेवारी रोजी अजित दादांचे निधन झाले. त्यांच्या निधनापूर्वीच दोन्ही गटांनी विलीनीकरणासाठी 9 फेब्रुवारीची तारीख निश्चित केली होती. आता काही गोष्टी बदलल्या आहेत, पण विलीनीकरण अजूनही निश्चित आहे.’ 9 तारीखच का ठरवण्यात आली? सूत्रांनी यावर उत्तर दिले आहे, ‘यामागे शरद पवारांचेच डोकं आहे. एक महिन्यापूर्वी माध्यमांमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. शरद पवार आधी परिस्थितीचा अंदाज घेत होते. त्यांनी अशा बातम्या चालू दिल्या. प्रतिसाद चांगला आल्यावर त्यांनी चर्चा पुढे नेली.’ ‘5 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. 7 फेब्रुवारी रोजी निकाल लागणार होता. रणनीती अशी होती की, आधी निवडणुका संपू द्याव्यात, कारण पुणे जिल्हा परिषद अजित पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे. बैठकीत ठरले होते की, शरद गटाचे उमेदवारही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'घड्याळ' या चिन्हावरच निवडणूक लढवतील. आता दोन्ही पवार एकत्र येत आहेत, असा संदेश दिला जाईल. त्यानंतरच घोषणा होईल. आता त्याआधीच परिस्थिती बदलली आहे.’ नेत्यांच्या विधानांवरून संकेत, दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेतराष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दावा केला आहे की, अजित पवारांनी महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर दोन्ही गटांच्या विलीनीकरणावर एकत्र बसून निर्णय घेण्याबाबत सांगितले होते. शिंदे म्हणाले, ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांच्या युतीसाठी आम्ही भेटलो होतो. तेव्हा त्यांनी (अजित पवार) सांगितले होते की, 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर आम्ही बसून चर्चा करू.’ अजित पवारांचे 40 वर्षांहून अधिक काळ सहकारी असलेले किरण गुर्जर यांनीही हेच सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, अजित पवारांनी अपघाताच्या पाच दिवसांपूर्वी सांगितले होते की त्यांना दोन्ही गटांचे विलीनीकरण हवे आहे. प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि पुढील काही दिवसांत विलीनीकरण होणार आहे. 30 जानेवारी रोजी शरद गटाचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितले की, अजित पवारांची शेवटची इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र यावेत. ही इच्छा पूर्ण केली पाहिजे. तर, पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विलीनीकरणावर बैठक झाल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, अजित पवार या मुद्द्यावर सकारात्मक होते. त्यांनी सांगितले होते की, आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती करून लढवाव्यात, निवडणुकीनंतर विलीनीकरणावर निर्णय घेऊ. आमच्या सूत्रांनी अशा 4 ते 5 बैठका झाल्याचे मान्य केले आहे. ते दावा करतात, ‘विलीनीकरणाचा प्रस्ताव शरद गटाकडून आला होता. अजित दादा यावर आनंदी होते. ते आपल्या पक्षाच्या वतीने पुढे येऊन बैठका घेत होते. शरद गटातून जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि रोहित पवार बैठकीत सहभागी झाले होते.’ विलयमुळे भाजपलाही फायदा, हाय कमांडची संमतीसूत्रांनी दावा केला आहे की अजित पवारांना भाजप हायकमांडकडून हिरवा कंदील मिळाला होता. भाजपलाही दोन्ही पक्ष एकत्र यावेत असे वाटते, त्यामुळे ते यात अडथळा आणत नाहीत. महाराष्ट्रात भाजप सरकार मजबूत आहे, परंतु लोकसभेत त्यांना शरद पवार गटाच्या 8 खासदारांची गरज आहे. अजित पवारांकडे फक्त एक खासदार आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली, तर केंद्रात भाजपला 9 खासदारांचा पाठिंबा मिळेल, जो एक मोठा आकडा आहे. सूत्रांनुसार, भाजपला शरद पवारांसोबत काम करणे सोयीचे नाही. म्हणूनच एक योजना तयार करण्यात आली होती. शरद पवारांनी आधीच संकेत दिले होते की मार्चमध्ये राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर ते राजकारणात सक्रिय राहणार नाहीत. योजना अशी होती की शरद पवारांनी सन्मानपूर्वक बाहेर पडावे, त्यानंतर सुप्रिया सुळे दिल्ली आणि अजित पवार राज्य सांभाळतील. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना आणि भाजपलाही फायदा होता. महापालिका निवडणुकीतून एकत्र येण्याची सुरुवातमहापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही गटांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये युती केली होती. हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या दिशेने पहिले पाऊल होते. उमेदवारांना शरद पवार गटाच्या 'तुतारी' या निवडणूक चिन्हाऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'घड्याळ' या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढण्यास सांगण्यात आले. तरीही युतीचा फायदा झाला नाही. पुणे महानगरपालिकेच्या 165 जागांपैकी भाजपने 119 जागा जिंकल्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 27 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा मिळाल्या. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 128 जागांपैकी भाजपला 84 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 37 जागा मिळाल्या. कुटुंब आणि पक्षाने सुनेत्रा पवारांना पुढे केले, त्या उपमुख्यमंत्री बनतीलराष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) च्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 'पवार कुटुंबाने मिळून ठरवले आहे की आता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना पुढे केले जाईल. अजित दादांच्या दोन्ही मुलांकडे राजकीय अनुभवाची कमतरता आहे. सुनेत्रा पवार राज्यसभा खासदार आहेत आणि त्यांच्या नावावर कुटुंब किंवा आमदारांमध्ये कोणताही विरोध नाही.' आज म्हणजेच 31 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. यामध्ये सुनेत्रा यांना नेत्या म्हणून निवडले जाईल. महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्यात आली आहे. त्यांना 31 जानेवारी रोजीच उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी समारंभाला कोणताही आक्षेप नाही. अजित पवार यांच्या निधनामुळे त्यांची बारामतीची जागा रिक्त झाली आहे. सुनेत्रा तेथून निवडणूक लढवू शकतात. अजित पवार यांच्यानंतर पक्षाच्या नियंत्रणावर ओढाताणशरद गटातील आमच्या सूत्रांनी दावा केला आहे की, दोन्ही गट एकत्र आल्यास, अजित पवार यांनी महाराष्ट्रात पक्षाची धुरा सांभाळल्यास आणि सुप्रिया सुळे दिल्लीत राहिल्यास प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारखे नेते बाजूला पडले असते. प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांच्या सर्वात जवळच्या व्यक्तींपैकी एक होते. पक्ष फुटण्यापूर्वी शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर त्यांना प्राधान्य देऊन पक्षाचे कार्याध्यक्ष बनवले होते. सूत्रे पुढे म्हणतात, ‘प्रफुल्ल पटेल यांची भाजपशी जवळीक आहे. अजित पवार यांनाही ही गोष्ट माहीत होती. त्यांच्या निधनानंतर आता शरद पवार स्वतः सूत्रे हाती घेऊ इच्छितात जेणेकरून पक्षावर कुटुंबाचे नियंत्रण राहील आणि पूर्वीसारखी समज कायम राहील.’ ‘शरद पवार जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांसारख्या आपल्या निष्ठावान नेत्यांना राज्याच्या राजकारणात प्रस्थापित करू इच्छितात. मात्र, प्रफुल्ल पटेल यांना बाजूला सारणे सोपे नाही. पक्षाचे कार्याध्यक्ष असल्याने ते स्वतःला उत्तराधिकारी मानत आहेत. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना पक्षावर आपले वर्चस्व राहावे असे वाटते.’ सूत्रांनुसार, प्रफुल्ल पटेल भाजपला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की अजित पवार यांना तेच घेऊन आले होते. अशा परिस्थितीत, पक्ष त्यांच्या हातात राहिल्यासच भाजपचा फायदा आहे. भाजपच्या हातात विलीनीकरणाची चावीसूत्रांचे म्हणणे आहे की या राजकीय विलीनीकरणावर अंतिम निर्णय भाजपलाच घ्यायचा आहे. पक्ष या संपूर्ण प्रकरणाकडे 2029 च्या दृष्टिकोनातून पाहत आहे. भाजपला भीती आहे की जर शरद पवारांच्या हातात पूर्ण ताकद गेली, तर ते पक्षाला पुन्हा मजबूत करतील. यामुळे भविष्यात भाजपचे नुकसान होऊ शकते. सध्या 3 वर्षांच्या परस्पर सामंजस्यावर चर्चा सुरू आहे की मंत्र्यांचे पोर्टफोलिओ तसेच राहावे आणि सुनेत्रा पवार यांना अध्यक्ष किंवा उपमुख्यमंत्री पद देऊन मधला मार्ग काढला जावा.’ सूत्रांनी सांगितले- अजित पवारांच्या निधनानंतर कुटुंबाची एक बैठक झाली. यातही पुढील योजनेवर चर्चा झाली. 29 जानेवारी रोजी सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा यांच्या घरी जाऊन चर्चा केली आहे. येत्या काही दिवसांत पक्षाध्यक्षांचा तिढा सुटेल. तज्ज्ञ म्हणाले- भाजपलाही दोन्ही गट एकत्र यावेत असे वाटतेराष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीवर आम्ही बारामतीचे ज्येष्ठ पत्रकार ओंकार वाबळे यांच्याशी बोललो. ते म्हणतात, ‘दोन्ही पक्ष एकत्र आल्याने कार्यकर्ते, मतदार आणि कुटुंब एकत्र राहील. महाराष्ट्राच्या राजकारणात सरकार कोणाचेही असो, मराठा समाज नेहमीच सत्तेच्या जवळ असतो. भाजपला माहीत आहे की मराठा त्यांच्याशी पूर्णपणे जोडले गेलेले नाहीत, त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसला तोडून किंवा सोबत घेऊन आपला आधार निर्माण करू इच्छितात.’ ओंकार यामध्ये एकनाथ शिंदे यांनाही महत्त्वाचे मानतात. ते म्हणतात, 'राज्यात भाजप स्वबळावर सत्तेच्या जवळ पोहोचला आहे. पक्षाकडे 133 आमदार आहेत, तर बहुमतासाठी 145 आमदार लागतात. अशा परिस्थितीत भाजपला पूर्ण नियंत्रण हवे आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे लवचिकता नाही. ते प्रत्येक गोष्टीसाठी अमित शाह यांच्याकडे जातात. अजित पवार खूप लवचिक होते. त्यामुळे भाजपसाठी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत ठेवणे सोपे आहे.’

दिव्यमराठी भास्कर 31 Jan 2026 7:28 am

Ajit Pawar : प्रशासकीय शिस्तीचा धडाका अन् दूरदृष्टीचा नेता हरपला! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अजितदादांना श्रद्धांजली

Ajit Pawar : महाराष्ट्र एका कर्तृत्ववान राजकारण्याला मुकला आहे, अशा शब्दांत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. सुरेश गोसावी यांनी भावना व्‍यक्‍त केल्‍या.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 7:15 am

आजचे एक्सप्लेनर:ट्रम्प यांना 10 दिवसांत 6 मोठे धक्के बसले, सर्व डाव कसे उलटत आहेत; अमेरिकेला किती नुकसान सोसावे लागेल?

20 जानेवारी 2026 म्हणजे आजपासून बरोबर 10 दिवसांपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी दावोसमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात जाहीरपणे बिगुल फुंकले. ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून आम्ही अमेरिकन वर्चस्वाचा फायदा घेतला, पण आता त्यापासून दूर होण्याची वेळ आली आहे. त्यानंतर भारत, चीन, कॅनडा, ब्रिटन, सौदी अरेबिया यांसारख्या देशांकडून ट्रम्प यांच्यासाठी सतत वाईट बातम्या येत आहेत. गेल्या 10 दिवसांत ट्रम्प यांना कोणते 6 मोठे धक्के बसले आणि आता ते आपले पाऊल मागे घेतील का; जाणून घ्या आजच्या एक्सप्लेनरमध्ये... पहिला धक्काः कॅनडाने गल्फस्ट्रीम जेट विमानांचे सर्टिफिकेशन रद्द केले अमेरिकेची प्रतिक्रिया: 29 जानेवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की कॅनडाने 'चुकीच्या आणि बेकायदेशीरपणे' आमच्या विमानांचे प्रमाणीकरण थांबवले आहे. अमेरिका देखील कॅनडामध्ये बनवलेल्या सर्व विमानांचे प्रमाणीकरण रद्द करेल. दुसरा धक्का: 8 वर्षांनंतर चीनमध्ये पोहोचले ब्रिटिश पंतप्रधान, अनेक करार केले ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर 28 जानेवारी रोजी 3 दिवसांच्या चीन दौऱ्यावर पोहोचले. गेल्या 8 वर्षांत कोणत्याही ब्रिटिश पंतप्रधानांची ही पहिली भेट आहे. दोन्ही देशांनी संबंध पुन्हा नव्याने सुरू करत अनेक मोठे करार केले. अलीकडेच ब्रिटनने लंडनमध्ये नवीन चीनी दूतावासाच्या बांधकामालाही मंजुरी दिली होती. चीनला रवाना होण्यापूर्वी स्टार्मर यांनी माध्यमांना सांगितले होते की, 'ब्रिटनला अमेरिका आणि चीनपैकी एकाची निवड करण्याची गरज नाही. अमेरिकेशी संबंध सुरू राहतील, परंतु चीनकडे दुर्लक्ष करता येणार नाही.' अमेरिकेची प्रतिक्रिया: 29 जानेवारी रोजी वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा पत्रकारांनी ट्रम्प यांना ब्रिटन-चीन कराराबद्दल विचारले, तेव्हा ते म्हणाले- 'ब्रिटनसाठी असे करणे खूप धोकादायक आहे.' ट्रम्प प्रशासनाने असेही म्हटले आहे की ब्रिटन एकाच वेळी दोन बोटींवर स्वार होऊ शकत नाही. तिसरा धक्काः भारत आणि EU दरम्यान 'मदर ऑफ ऑल डील' भारताने 27 जानेवारी रोजी युरोपियन युनियनसोबत मुक्त व्यापार करार (FTA) जाहीर केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी या कराराला 'मदर ऑफ ऑल डील्स' असे म्हटले आहे… अमेरिकेची प्रतिक्रिया: अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट म्हणाले, 'युरोप स्वतःच आपल्या विरोधात सुरू असलेल्या युद्धाला निधी पुरवत आहे.' अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीन म्हणाले की, या करारामुळे भारताला अधिक फायदा होईल. चौथा धक्का: इराणवर हल्ला करण्यासाठी एअरस्पेस देण्यास नकार अमेरिकेची प्रतिक्रिया: अमेरिकेने यावर कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नाही. मात्र ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याची गोष्ट पुन्हा सांगत म्हटले- 'वेळ संपत आहे... एक करार करा! नाहीतर पुढील हल्ला अधिक वाईट असेल!' पाचवा धक्का: बोर्ड ऑफ पीसमध्ये 60 देशांना आमंत्रण, दोन-तृतीयांश सहभागी झाले नाहीत अमेरिकेची प्रतिक्रिया: अमेरिकन प्रशासन देशांवर बोर्डात सामील होण्यासाठी दबाव आणत आहे. कॅनडावर नाराज झालेल्या ट्रम्प यांनी तर बोर्डात सामील होण्याचे आमंत्रणच मागे घेतले. सहावा धक्का: दक्षिण कोरियाने व्यापार करार स्वीकारला नाही अमेरिकेची प्रतिक्रिया: अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि यूएस ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी सांगितले आहे की, जोपर्यंत दक्षिण कोरिया मान्यता देत नाही, तोपर्यंत कोणताही व्यापार करार नाही. 29 जानेवारी रोजी वॉशिंग्टनमध्ये पहिल्या दिवसाची चर्चा कोणत्याही कराराशिवाय संपली. गेल्या काही दिवसांत ट्रम्पसाठी दोन चांगल्या बातम्याही आल्या. जसे की… सततच्या धक्क्यानंतर, ट्रम्प आता आपले पाऊल मागे घेतील का? JNU मधील आंतरराष्ट्रीय अभ्यास विभागाचे प्रा. डॉ. राजन कुमार यांच्या मते, आता जगभरातील देशांनाही समजले आहे की अमेरिकेवर अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे ते अमेरिकेवरील अवलंबित्व संपवत आहेत. जर अमेरिका अजूनही मागे हटले नाही, तर ते एकटे पडेल. तथापि, ट्रम्प पाऊल मागे घेतील याची शक्यता खूप कमी आहे. व्हाईट हाऊस कव्हर करत असलेल्या अमेरिकन पत्रकार वॉन हिलियर्ड यांच्या मते, 'ट्रम्प यांच्या ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या धमकीमुळे युरोपला आता अमेरिकेव्यतिरिक्त इतरही युती शोधण्यास भाग पाडले आहे. ते चीन आणि इतर आशियाई बाजारांकडे वळू लागले आहेत.' ORF मधील स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामचे तज्ज्ञ विवेक मिश्रा म्हणतात, 'ट्रम्प यांना हे समजून घ्यावे लागेल की दबाव टाकल्याने इतर देश त्यांच्यानुसार वागणार नाहीत, तर दबावापासून वाचण्यासाठी आपली रणनीती बदलतील. ते अमेरिकेपासून दूर होत जातील, ज्यामुळे अमेरिकेलाच नुकसान सोसावे लागेल. अशा परिस्थितीत ट्रम्प यांना आपली रणनीती बदलावी लागेल.' तरीही तज्ञांचे असेही मत आहे की ट्रम्प खूपच अनपेक्षित आहेत, म्हणजे त्यांची पुढील पायरी काय असेल याचा अंदाज लावता येत नाही. त्याचबरोबर अमेरिकेच्या डॉलरचा आणि त्याच्या अर्थव्यवस्थेचा दबदबा संपूर्ण जगावर आहे, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जे नुकसान होत आहे, त्यातून अमेरिका सावरू शकेल का? ट्रम्प यांची धोरणे अल्पकाळात महागाई आणि अनिश्चितता वाढवत आहेत, तर दीर्घकाळात अमेरिकेची वाढ, नवोपक्रम आणि जागतिक नेतृत्व कमकुवत करत आहेत. प्रा. राजन कुमार यांच्या मते, 'जर अमेरिकेने अजूनही आपल्या धोरणांमध्ये बदल केला नाही, तर त्याला खूप अडचणींचा सामना करावा लागेल. ट्रम्प हे मान्य करत नसले तरी, रिपब्लिकन पक्ष आणि अमेरिकन तज्ञ आता म्हणू लागले आहेत की ट्रम्प यांच्या धोरणांचा थेट परिणाम अमेरिकेवर होत आहे. जगभरात अमेरिकेची विश्वासार्हता कमी होत आहे.' विवेक मिश्रा यांच्या मते, 'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकेला झालेल्या नुकसानीची भरपाई करणे अत्यंत कठीण असेल. अमेरिकेवर आधीच सुमारे 40 ट्रिलियन डॉलरचे कर्ज आहे. जर जगातील इतर देशांचा अमेरिकेवरील विश्वास उडाला, तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढेल. मात्र, अमेरिका इतकी मोठी अर्थव्यवस्था आहे की कोणताही देश तिला पूर्णपणे दुर्लक्षित करू शकत नाही. फक्त तिच्यावरील अवलंबित्व थोडे कमी केले जाऊ शकते.'

दिव्यमराठी भास्कर 31 Jan 2026 6:49 am

Pune Mayor Election : पुण्याचा नवा महापौर कोण? ३ फेब्रुवारीला ठरणार नाव, तर ९ फेब्रुवारीला होणार अधिकृत घोषणा

Pune Mayor Election : शहराचे नवे महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ६ फेब्रुवारी रोजी होणारी ही निवडणूक आता सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 6:45 am

Kharadi Accident : दुर्दैवी! पिकअपच्या चाकाखाली सापडून दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू; पोलिसांनी चालकाला घेतलं ताब्यात.

Kharadi Accident : सायंकाळच्या वेळी घरासमोर खेळत असताना घडली घटना; वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी केली घटनास्थळाची पाहणी.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 6:15 am

Pune Congress : सतेज पाटलांच्या उपस्थितीत काँग्रेसचा मोठा निर्णय! ‘या’नगरसेवकाची गटनेतेपदी एकमताने निवड

Pune Congress : सतेज पाटील आणि अरविंद शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक; सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा 'कदम' यांच्या नावासाठी एकमुखी पाठिंबा.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 6:00 am

अग्रलेख : आशावाद

संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 मध्ये जागतिक आव्हानांचा सामना करताना भारतीय अर्थव्यवस्थेला अधिक लवचिक आणि गतिशील बनवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. हा अहवाल अशा अनेक आव्हानांकडे निर्देश करतो ज्यासाठी भविष्यात अत्यंत सावधगिरीने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक ठरणार आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा नावलौकिक कायम असून चालू आर्थिक वर्षात […]

दैनिक प्रभात 31 Jan 2026 6:00 am

Ganesh Bidkar : महापौरपद हुकलं तरी ‘किंगमेकर’कायम; गणेश बिडकर यांची गटनेतेपदी पुन्हा निवड

Ganesh Bidkar : स्थायी समिती अध्यक्ष ते सभागृहनेता; अनुभवी गणेश बिडकर यांच्याकडे पुणे महापालिकेतील ११९ शिलेदारांची जबाबदारी.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 5:45 am

Pune ZP Election 2026 : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ३,६९३ EVM मशिन सज्ज; पाहा तुमच्या भागात किती मशिनवर होणार मतदान?

Pune ZP Election 2026 : जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांसाठी उमेदवारांची निश्चिती झाल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने मतदान यंत्र आणि कंट्रोल युनिटची संख्या अंतिम केली आहे.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 5:30 am

Pune Bar Association : पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीत ऐनवेळी मोठा बदल! मतदानाची तारीख बदलली; काय आहे नेमकं कारण?

Pune Bar Association : महिला आरक्षणासह यंदाची निवडणूक ऐतिहासिक; कार्यकारिणी सदस्यांची बिनविरोध निवड, पण मुख्य पदांसाठी चुरस वाढली.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 5:15 am

Ajit Pawar : शब्दाचा पक्का अन् कामात वाघ’असलेला नेता गेला; अजितदादांच्या शोकसभेत राजगडवासियांचे अश्रू अनावर

Ajit Pawar : कोंढवळे येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात सर्वपक्षीय शोकसभा; राष्ट्रगीताने सुरुवात करत दादांच्या 'शिस्तीला' दिला अखेरचा सलाम.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 4:30 am

Ranjangaon Crime : दोन गटातील भांडण सोडवायला गेला अन् जीवावर बेतलं; १८ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार

Ranjangaon Crime : तरुणाच्या हाताच्या महत्त्वाच्या नसा तुटल्या, अंगठ्याचे हाडही मोडले; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 4:15 am

Praful Patel : प्रफुल पटेलांचा वळसे पाटलांना तातडीचा फोन; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणावर होणार चर्चा?

Praful Patel : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत मुंबईत महत्त्वाची बैठक; वळसे पाटलांकडून आंबेगावचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 4:00 am

Agriculture News : आंबा मोहरावर निसर्गाचा घाला! हिरडस मावळात आंब्याचं पीक धोक्यात; शेतकरी हवालदिल

Agriculture News : गेल्या १५ दिवसांपासून बदललेल्या हवामानाचा आंबा पिकाला मोठा फटका; महागड्या औषधांची फवारणी करूनही मोहोर वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 3:30 am

Pune ZP Election 2026 : झेडपीच्या निवडणुकांचे गणित बदलणार; अजित पवार यांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट? वाचा सविस्तर

Pune ZP Election 2026 : अजितदादांच्या निधनामुळे पूर्व हवेलीत भावनिक वातावरण; मतदारांची सहानुभूती राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पथ्यावर पडणार?

दैनिक प्रभात 31 Jan 2026 3:15 am

Agriculture News : आंब्याचा मोहर गळतोय? ‘या’खताची आणि औषधाची करा फवारणी; कृषी तज्ज्ञांनी सुचवल्या उपाययोजना

Agriculture News : आंबा फळे काढणीपूर्वी एक महिना आधी पाणी देणे बंद करा; कृषी विभागाकडून पाणी व्यवस्थापनाचे नवे वेळापत्रक जाहीर.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 3:00 am

Pune Crime : उरुळी कांचन हादरलं! ५५ लाखांच्या मुद्दलावर ६० लाखांचं व्याज, तरीही बंदुकीच्या धाकावर बळकावली जमीन

Pune Crime : हडपसर आणि उरुळी कांचनमधील सावकारांची दहशत; १० टक्के व्याजासाठी व्यावसायिकाचे १२ जुन्या चारचाकी गाड्यांसह ३ गुंठे जमीन बळकावली.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 2:45 am

PCMC Mayor Election : महापौर निवडीच्या घडामोडीला वेग! स्थायी समितीच्या जागांचं गणित ठरलं; ‘या’पक्षाला बसणार मोठा फटका

PCMC Mayor Election : विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणीसाठी पक्षांची धाव; सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्याच्या नावांची उत्सुकता शिगेला.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 2:15 am

Lawrence Bishnoi Gang : ५ कोटी द्या, नाहीतर ‘बाबा सिद्दीकी’करू; पिंपरीच्या ‘गोल्डमॅन’ला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी?

Lawrence Bishnoi Gang : सनी नाना वाघचौरे यांना ५ कोटींची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी; बिश्नोई गँगच्या नावाने आंतरराष्ट्रीय कॉल आल्याचा दावा.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 1:45 am

PMPML Bus Vs Rickshaw : पिंपरी-चिंचवडमध्ये अजब प्रकार! रिक्षाचालकाने PMPML बसची ‘चावी ‘काढली अन् पसार झाला

PMPML Bus Vs Rickshaw : निगडीच्या यमुना नगरमध्ये बस आणि रिक्षामध्ये जोरदार वादावादी; नुकसानभरपाईसाठी रिक्षाचालकाचा 'अजब' पवित्रा.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 1:30 am

Pavana River Road : चिंचवडकरांना मोठा दिलासा! पवना नदीकाठच्या १८ मीटर रस्त्याचा अडथळा अखेर दूर

Pavana River Road : बाजारभावापेक्षा कमी मोबदला असूनही लोकहितासाठी जमीन देण्याचा गावडे कुटुंबाचा निर्णय; टीडीआरच्या माध्यमातून होणार तडजोड.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 1:15 am

Maval News : मावळात पहिल्यांदाच असा प्रचार! ना घोषणा, ना रॅली; अजितदादांच्या निधनानंतर निवडणुकीचं चित्रच पालटलं

Maval News : राजकीय पक्षांनी पाळला संयम: झेंडे खाली, लाऊडस्पीकर बंद; शांततेत सुरू असलेल्या प्रचाराने मावळवासीयांचे लक्ष वेधले.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 1:00 am

Satara Municipal Budget : ९ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडणार ‘असं’काही; सातारा पालिकेच्या बजेटबाबत मोठी अपडेट

Satara Municipal Budget : खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या चर्चेनंतरच सभापतींची नावे होणार फायनल; इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 12:45 am

Ajit Pawar : अजितदादांच्या निधनाने राजकारणात मोठी पोकळी; खटावमध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली

Ajit Pawar : शिस्तबद्ध आणि स्पष्टवक्ता नेता हरपला; खटावच्या विकासकामातील अजितदादांचे योगदान आठवून कार्यकर्त्यांना अश्रू अनावर.

दैनिक प्रभात 31 Jan 2026 12:30 am

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार,३१ जानेवारी २०२६.

पंचांगआज मिती माघ शुद्ध त्रयोदशी ०८.२८ पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग विषकंभ चंद्र राशी मिथुन ०८.०२ नंतर कर्क. भारतीय सौर११ माघ शके १९४७. शनिवार दिनांक ३१ जानेवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.१३ मुंबईचा चंद्रोदय ०४.५७ , मुंबईचा सूर्यास्त ०६.३० मुंबईचा चंद्रास्त ०६.४१ उद्याची राहू काळ १०.०२ ते ११.२७.क्षय तिथीदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : आजचा दिवस आपल्याला अनेक दृष्टीने अनुकूल ठरेल.वृषभ : आरोग्य चांगले राहून आर्थिक लाभ संभवतो.मिथुन : परिवारातून आनंददायक वार्ता मिळतील.कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल.सिंह : रोजची दैनंदिन कामे सुरळीत होतील.कन्या : कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.तूळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील.वृश्चिक : कार्यात गतिशीलता असेल.धनू : कार्यात गतिशीलता असेल.मकर : जुन्या आठवणीत रमून जाल.कुंभ : खर्चावर नियंत्रण आवश्यक.मीन : प्रिय जनांचा सहवास लाभेल.

फीड फीडबर्नर 31 Jan 2026 12:10 am

मराठी शाळांबाबतच्या धोरणाविषयी काय म्हणाली मुंबई महापालिका ?

मराठी शाळांबाबत चुकीची माहिती; महापालिका प्रशासनाने मराठी अभ्यास केंद्राच्या शिष्टमंडळासमोर मांडली भूमिकामुंबई (विशेष प्रतिनिधी) :बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मराठी अभ्यास केंद्राच्या शिष्टमंडळाशी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेची भूमिका शिष्टमंडळासमोर मांडण्यात आली. शिष्टमंडळाने सादर केलेल्या मुद्देनिहाय तसेच ऐनवेळी चर्चेला गेलेल्या विषयांवर सविस्तर आणि सांगोपांग अशी चर्चा केली गेली. दरम्यान,मुंबई महानगरपालिका मराठी शाळांबाबत चुकीचे धोरण राबवित असल्याचे जे आभासी चित्र निर्माण केले जात आहे, ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.मुंबईतील मराठी माध्यमांच्या शाळांच्या मुद्द्यांवर मुंबई महानगरपालिका प्रशासन संवेदनशील आहे.मुंबईतील मराठीसह इतरही माध्यमांच्या शाळा आणि विद्यार्थी संख्या वाढावी, शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी महानगरपालिका प्रशासन साततत्याने विविध उपक्रम, योजना राबवित असते. महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत असते. एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये हेच आमचं ध्येय आहे. यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून पालकांचेही समुपदेशन करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मार्च २०२५ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत महानगरपालिकेच्या मराठी शाळांचा ९५ टक्के इतका निकाल लागला. महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीत ९७ टक्के इतके गुण पटकावले आहेत. यासोबतच गुणवत्ता वाढ, सराव परीक्षा असे उपक्रम राबविण्यात येतात. महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही स्वरूपाचे फी घेतली जात नाही. विद्यार्थ्यांना २७ प्रकारच्या शैक्षणिक वस्तूंचे मोफत वाटप केले जाते. महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांमध्ये शालेय गुणवत्तेसोबत क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविण्यासाठी उपलब्ध जागेमध्ये क्रीडाची प्रशिक्षण दिले जाते.खान अकॅडमीच्या माध्यमातून गणित व विज्ञान विषयाचा अतिरिक्त सराव विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क उपलब्ध करुन दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीत उत्तम परिणाम दिसून येत आहे. महानगरपालिका विद्यार्थी खासगी शाळेपेक्षाही अधिक गुणसंपन्न आणि त्याच्याकडे विविध शैक्षणिक सुविधा असाव्यात, यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत असते. महानगरपालिकेने फाऊंडेशनल लिटरसी व न्यूमरसी (एफएलएन) निपूण भारत अंतर्गत महानगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळे तिसऱ्या इयत्तेतील प्रत्येक माध्यमाचा विद्यार्थी उत्तमप्रकारे वाचू शकतो. तसेच, त्या-त्या स्तरावरील गणिताचे ज्ञानही त्याला उत्तमरित्या अवगत होत आहे. यासाठी महानगरपालिकेने विशेष प्रयत्न केले असून याच चांगले परिणाम दिसून येत आहे.मुंबईतील मराठी शाळा आणि शिक्षण हा सामजिक आणि शैक्षणिक मुद्दा आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून कोणत्याही माध्यमांच्या शाळांचे खासगीकरण करण्यात आलेले नाही.मुंबई महानगरपालिकेच्यावतीने संचालित मराठी माध्यमांच्या सर्व शाळा प्रभावीपणे चालविण्यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्वीपासूनच गांभीर्याने नियोजन व कार्यवाही करीत आहे. महानगरपालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होऊ नये, किंबहुना ही संख्या वाढावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मागील १० ते १५ वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. एवढेच नव्हे तर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अभिनव उपक्रमही राबवले जात असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने मराठी अभ्यास केंद्राच्या शिष्टमंडळाला बैठकीत दिली.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 11:10 pm

USA Squad Announce : अमेरिकेच्या संघात ‘मुंबईकर’खेळाडूची एन्ट्री! ७ फेब्रुवारीला भारताशी भिडणार; पाहा अमेरिकेचा १५ सदस्यीय संघ

USA Squad Announce : या संघात मुंबईकडून घरगुती क्रिकेट खेळलेल्या शुभम रांजणेला संधी देऊन अमेरिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 11:06 pm

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना; उद्या सायंकाळी उपमुख्यमंत्री शपथविधीची शक्यता

Sunetra Pawar : जित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 10:52 pm

India -Chile trade agreement : भारत आणि चिलीमध्ये लवकरच मोठा व्यापार करार! मिळणार दुर्मिळ खनिजांचा खजिना

India -Chile trade agreement : भारत आणि चिलीदरम्यान मुक्त व्यापार कराराची बोलणी लवकरच संपणार आहेत.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 10:35 pm

Mohammad Shayan Injury : भारत-पाक सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! स्टार खेळाडू नाकाला दुखापत झाल्याने वर्ल्ड कपमधून बाहेर

Mohammad Shayan Injury : पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शायान हा दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 10:35 pm

RSS च्या शताब्दीनिमित्त ‘शतक : संघाचे 100 वर्ष’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेच्या शंभर वर्षांच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या ‘शतक : संघाचे १०० वर्ष’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. संघाची शंभर वर्षांची वाटचाल, त्यांची विचारधारा आणि सामाजिक योगदान असलेला हा चित्रपट आहे.२०२५ मध्ये RSS ने आपल्या स्थापनेची शताब्दी पूर्ण केली. या ऐतिहासिक टप्प्याच्या पार्श्वभूमीवर ‘शतक’ हा चित्रपट साकारण्यात आला आहे. देशाच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर खोलवर प्रभाव टाकणाऱ्या संघाच्या दीर्घ प्रवासाची कथा हा चित्रपट मांडत आहे. अलीकडेच दिल्लीतील RSSच्या केशव कुंज कार्यालयात या चित्रपटातील ‘भगवा है अपनी पहचान’ या गीताचे लोकार्पण सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. हे गीत प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह यांनी गायले आहे. देशभक्तीने ओतप्रोत भरलेले हे गीत चित्रपटाची भावना आणि मूलभूत विचार प्रभावीपणे व्यक्त करते.https://www.youtube.com/watch?v=AWn1uw0gSoAटीझरमधून पहायला मिळते की, हा चित्रपट संघाबाबत अनेक वर्षांपासून असलेल्या गैरसमजांवर आणि भ्रमांवरही प्रकाश टाकतो. केवळ चर्चा किंवा वादांपुरते मर्यादित न राहता, इतिहास, विचारधारा आणि संघटनात्मक विकास योग्य संदर्भासह मांडणे हा चित्रपटाचा उद्देश आहे. स्वातंत्र्यलढ्यातील RSSचे योगदान, विविध काळात लादलेली बंदी आणि आणीबाणी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांची झलकही यात पाहायला मिळते.चित्रपटाचे दिग्दर्शक आशीष मल्ल म्हणाले, “हा चित्रपट माझ्यासाठी एका वैयक्तिक प्रवासासारखा आहे. संशोधनादरम्यान संघाशी संबंधित असे अनेक पैलू समोर आले, ज्यांवर सहसा चर्चा होत नाही. समाजात पसरलेल्या गैरसमजांना प्रामाणिकपणे समोर आणणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट होते.”चित्रपटाचे निर्माते वीर कपूर यांनी सांगितले, “हा चित्रपट पुस्तके, आणि उपलब्ध साहित्याच्या आधारे तयार करण्यात आला आहे. संघाच्या वैचारिक परंपरेला एकत्र गुंफून ती सिनेमाई भाषेत मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. १८७५ ते १९५० या काळात सुरू झालेल्या अनेक चळवळींपैकी संघ ही एकमेव संघटना आहे जी अखंडपणे पुढे जात राहिली. हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. ‘ना रुके, ना थके, ना झुके’ ही चित्रपटाची टॅगलाईन याच भावनेचे प्रतीक आहे.”या चित्रपटाचे सह-निर्माते आशीष तिवारी असून, तो ADA 360 डिग्री एलएलपी सादर करत आहे. अनिल डी. अग्रवाल यांच्या संकल्पनेवर आधारित आणि आशीष मॉल दिग्दर्शित हा चित्रपट 19 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 10:30 pm

Cosmos Bank: कॉसमॉस बँकेचा स्तुत्य उपक्रम; पहिल्यांदाच 4 अंध व्यक्तींची बँकेत नियुक्ती!

Cosmos Bank: अंध व्यक्तींना नियुक्तीची पत्रं बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रल्हाद कोकरे यांच्या हस्ते तसेच समारंभाचे प्रमुख पाहुणे सीए दिलीप सातभाई यांच्या उपस्थितीत देण्यात आली.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 10:29 pm

Pakistan : पाकमध्ये २४ तासात ५२ दहशतवादी मारले; सुरक्षा दलाची मोठी कारवाई

पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत तीन प्रांतांमध्ये केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत ५२ दहशतवाद्यांना ठार मारले.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 10:26 pm

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवर पुन्हा मोठी जबाबदारी?; अवघ्या 24 तासांत लॉटरी

Dhananjay Munde : अजित पवार यांच्या निधनानंतर धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात परतण्याची शक्यता आहे

दैनिक प्रभात 30 Jan 2026 10:21 pm

शीव उड्डाणपूल येत्या पावसाळ्यात होणार वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शीव (सायन) उड्डाणपुलाच्या कामांना अपेक्षित गती प्राप्त होत आहे. पादचा-यांना पूर्व - पश्चिम आवागमनासाठी पादचारी पूल कार्यान्वित करण्‍यात आला आहे. दोन भूयारी पादचारी मार्गांपैकी एक भूयारी पादचारी मार्ग पूर्ण झाला आहे. येत्‍या पंधरवड्यात तो कार्यान्वित करण्‍यात येईल. याच पद्धतीने महानगरपालिका आणि रेल्‍वे प्रशासनामार्फत केली जाणारी कामे अधिकाधिक समांतरपद्धतीने करावीत. प्रकल्‍पाच्‍या कालमर्यादेचे पालन करावे. यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रेल्वे प्रशासनासमवेत उच्‍च प्रतीचा समन्वय साधावा. कामाचे सुयोग्य व सुक्ष्‍म नियोजन करावे, अभियंत्यांनी दररोज कार्यस्थळी उपस्थित राहावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले आहेत. १५ जुलै २०२६ पर्यंत शीव उड्डाणपुलाची सर्व कामे पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असेही बांगर यांनी स्पष्‍ट केले.शीव पूर्व - पश्चिम भागांना जोडणा-या शीव (सायन) रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणी प्रकल्‍प स्‍थळाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी २९ जानेवारी २०२६ रोजी पाहणी केली. त्यावेळी बांगर यांनी हे निर्देश दिले. या पाहणी दौऱ्यात प्रकल्प कामाची सद्यस्थिती, उर्वरित कामाचे टप्पे आणि त्यांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (शहर) राजेश मुळ्ये तसेच मध्य रेल्वेचे उप मुख्य अभियंता (निर्माण) रोहित मेहला यांच्यासह संबंधित अभियंते उपस्थित होतेशीव पुलाचे रेल्वे हद्दीतील काम रेल्वे विभाग आणि पोहोच मार्ग , दोन पादचारी भुयारी मार्ग आदींचे काम बृहन्मुंबई महानगरपालिका करत आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. हा भुयारी पादचारी मार्ग कार्यान्वित झाल्‍यानंतर रेल्‍वे पुलाच्‍या पश्चिमेकडील पादचारी वाहतुकीची फेरआखणी करावी. पश्चिमेकडील अधिकाधिक भाग कामासाठी उपलब्‍ध व्‍हावा, असे नियोजन करावे. पश्चिमेकडील कामाचे ४ टप्‍पे असून या चारही टप्‍प्‍यांच्‍या पूर्णत्‍वाचे सूक्ष्‍म नियोजन करण्‍यात आले. तसेच, त्‍यांची कालमर्यादा निश्चित करण्‍यात आली. एकंदरीतच, पश्चिम बाजूची सर्व कामे ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील. रेल्‍वे प्रशासनाकडून ३१ मे २०२६ पर्यंत पूर्व बाजूचा पोहोच रस्‍त्‍याचा ताबा महानगरपालिकेला मिळणे अपेक्षित असल्‍याने उर्वरित कामे पूर्ण करण्‍यासाठी त्‍यानंतर आणखी काही कालावधी आवश्‍यक आहे. त्‍याचा विचार करता या पुलाची सर्व कामे १५ जुलै २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील व पूल वाहतुकीस खुला केला जाईल, असेही बांगर यांनी नमूद केले.धारावी बाजूकडील दुस-या भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. रेल्वे रूळावरील जुन्‍या पुलाच्‍या उत्‍तरेकडील भागाचे निष्‍कासन करण्‍यात आले आहे. आता दक्षिणेकडील भागाचे पाडकाम सुरू आहे. उत्तर दिशेच्या अर्ध्या बाजूवर तुळया स्थापित केल्यावर पूर्व बाजूचा अर्धा पोहोच रस्ता महानगरपालिकेच्या ताब्यात येईल. रेल्वे प्रशासनामार्फत शेवटची तुळई स्थापित करण्याची कार्यवाही ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल. तोपर्यंत महानगरपालिकेमार्फत पश्चिम बाजूची सर्व कामे केली जातील. मात्र, पूर्व बाजूची कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे ३० ते ४५ दिवसांचा कालावधी लागेल. म्हणजेच १५ जुलै २०२६ पूर्वी या उड्डाणपुलाची सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. अभियंते, अधिकारी यांनी दररोज कार्यस्थळी उपस्थित राहावे. उद्भवणाऱ्या अडीअडचणींचा त्याच वेळी, त्याच ठिकाणी निपटारा करावा, असे निर्देश बांगर यांनी यावेळी दिले.या संपूर्ण कार्यवाहीमध्ये ठरविलेल्या कालमर्यादेत तुळया कार्यस्थळी उपलब्ध होणे महत्वाचे आहे. एकंदरीत, मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने परस्पर समन्वय साधून प्रामाणिकपणे काम करावे, जेणेकरून नागरिकांची असुविधा लवकरात लवकर दूर होईल, असेही बांगर यांनी नमूद केले.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 10:10 pm

काय सांगता ? सोन्याचांदीच्या दरात झाली घसरण ?

मुंबई : मागील काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात वाढ होत आहे. पण आज म्हणजेच शुक्रवार ३० जानेवारी २०२६ रोजी सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे. घसरण झाली तरी सोन्याचांदीचे सध्याचे दर हे मध्यमवर्गीयांच्या खिशावर ताण निर्माण करणारे असेच आहे. यामुळे गुंतवणुकीसाठी सोन्याचांदीची खरेदी करायची असल्यास हाती मोठी रक्कम बाळगण्याशिवाय पर्याय नाही.ट्रम्पचे सतत बदलणारे धोरण, डॉलरच्या मूल्यात वेगाने होत असलेले बदल यामुळे मागील काही दिवसांत जगाचा सोन्याचांदीकडे असलेला ओढा वाढू लागला आहे. यामुळेच मुंबईत गुरुवार २९ जानेवारी २०२६ रोजी २४ कॅरेट शुद्ध असलेल्या एक तोळा अर्थात दहा ग्रॅम सोन्याचा दर हा एक लाख ७८ हजार ८५० रुपये होता. पण आज म्हणजेच शुक्रवार ३० जानेवारी २०२६ रोजी दरात घसरण झाली आणि २४ कॅरेट शुद्ध असलेल्या एक तोळा अर्थात दहा ग्रॅम सोन्याचा दर हा एक लाख ६९ हजार २०० रुपये झाला. सोन्याच्या दरात नऊ हजार ६५० रुपयांची घसरण झाली.सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठा चढउतार दिसून आला. मुंबईत गुरुवार २९ जानेवारी २०२६ रोजी एक किलो चांदीचा दर चार लाख दहा हजार रुपये होता. पण आज म्हणजेच शुक्रवार ३० जानेवारी २०२६ रोजी दरात घसरण झाली आणि एक किलो चांदीचा दर तीन लाख ९५ हजार रुपये झाला. चांदीच्या दरात पंधरा हजार रुपयांची घसरण झाली.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 10:10 pm

Novak DJokovic : मेलबर्नमध्ये अनुभवाचा विजय! ४ तासांच्या थरारात जोकोविच सिनरवर मात करत फायनलमध्ये दाखल

Novak DJokovic : टेनिस जगताचा सम्राट नोव्हाक जोकोविच याने यानिक सिनरचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 9:56 pm

Devendra Fadnavis : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली ‘ही’प्रतिक्रिया

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीत झालेल्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात(Devendra Fadnavis) मोठी उलथापालथ सुरू झाली आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 9:48 pm

Budget 2026: शेअर बाजारात येणार मोठी तेजी? गेल्या 15 वर्षांचा इतिहास देतोय ‘हे’संकेत!

Union Budget 2026: बजेटपूर्वी बाजार जरी घसरला असला, तरी बजेटनंतर शेअर बाजाराने नेहमीच जोरदार 'कमबॅक' केल्याचे दिसून आले आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 9:46 pm

Breaking news : वर्षा बंगल्‍यावर मोठी खलबते.! फडणवीस यांच्‍यासोबत ‘या’नेत्यांची रंगली चर्चा

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणांना वेग आला असून वर्षा बंगल्‍यावर खलबते सुरू आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 9:33 pm

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी जवळपास निश्चित; पक्षप्रमुख अन् अर्थखातं कोणाकडे, मोठी माहिती समोर

Sunetra Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार शनिवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 9:32 pm

Income Tax Slab: 20 लाखांचा पगार अन् टॅक्स ‘झिरो’! अर्थसंकल्पात ‘या’ 5 सवलती मिळाल्यास मध्यमवर्गीयांची चांदी

Income Tax Slab: तज्ज्ञांच्या मते, जर सरकारने 'न्यू टॅक्स रिजीम'मध्ये जुन्या व्यवस्थेतील काही निवडक वजावटींचा (Deductions) समावेश केला, तर वर्षाला २० लाख रुपये कमवणारा व्यक्तीही 'टॅक्स फ्री' होऊ शकतो.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 9:24 pm

Manipur Violence : मणिपूरमधील सरकार स्थापनेविषयी अदयाप अस्पष्टता; राष्ट्रपती राजवटीला पुढील महिन्यात वर्षपूर्ती

मणिपूरमधील (Manipur Violence) राष्ट्रपती राजवटीला पुढील महिन्यात एक वर्षाचा कालावधी पूर्ण होईल. मात्र, अद्याप त्या राज्यात पुन्हा सरकार स्थापन होण्याविषयी अस्पष्टता आहे. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये १३ फेब्रुवारी २०२५ यादिवशी राष्ट्रपती राजवट लागू झाली.

दैनिक प्रभात 30 Jan 2026 9:15 pm

सुनेत्रा पवार शनिवारी सायंकाळी ५ वाजता घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ, सूत्रांची माहिती

मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली जाणार असल्याचे समजते. उद्या, शनिवारी सायंकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी होणार असून, त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.https://www.youtube.com/watch?v=VhSiYjD1NZ8राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या काही तासांपासून घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे वृत्त आहे. शनिवारी विधिमंडळ गटनेता निवडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार असल्याचे समजते. या बैठकीनंतर सायंकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी शुक्रवारी सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री या पदासाठी होकार दिल्याचे कळते.

फीड फीडबर्नर 30 Jan 2026 9:10 pm