SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

26    C
...

UPSC Final Result 2026 : यूपीएससी निकालात महाराष्ट्राचा डंका! राज्यातील ५० हून अधिक उमेदवार यशस्वी..पाहा

UPSC Final Result 2026 : ऑगस्ट २०२५ ची मुख्य परीक्षा आणि फेब्रुवारी २०२६ पर्यंत चाललेल्या मुलाखतींचा निकाल जाहीर; एकूण ९५८ उमेदवारांची शिफारस.

दैनिक प्रभात 7 Mar 2026 6:00 am

महिला दिन विशेष:मैत्रिणींनी 858 हून अधिक महिलांना दिला स्वावलंबनाचा आधार; छत्रपती संभाजीनगरच्या नवदुर्गांच्या ‘तारिणी फाउंडेशन’चा प्रेरणादायी प्रवास!

असं म्हणतात की स्त्रीच स्त्रीची खूप मोठी शत्रू असते. तिला दुसरीचं चांगलं झालेलं बघवत नाही. त्यामुळं क्लेश होतो. सासू सुनेला छळते आणि नंतर तीच सून तिच्या सुनेला छळते. मात्र, या सगळ्या अफवा आहेत आणि जेव्हा स्त्रिया एकत्र येतात तेव्हा नवदुर्गा होतात. असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण याच उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील नऊ मैत्रिणींनी मिळून निर्माण केलेली 'तारिणी फाउंडेशन'. महिला दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊयात या नवदुर्गांचा हा अनोखा प्रवास... छत्रपती संभाजीनगरच्या बायपास भागात एका क्लीनिकमध्ये सुरू केलेली तारिणी आधी पंखुडी म्हणून ओळखली जात होती. गेली 4 वर्ष या नऊ मैत्रिणी एकत्र येऊन महिला सक्षमीणीकरणाचे धडे देतात. तारिणी म्हणजे प्रत्येक संकटावर मात करणारी आणि प्रत्येक संकटापासून इतरांना वाचवणारी स्त्री. या नऊ जणी अगदी तशाच आहेत. आधी एकमेकींना आधार देत, एकमेकींचे स्वप्न, त्यांचे कौशल्य, त्यांची जिद्द ओळखून चार भिंतीत गुंतलेले त्यांचं आयुष्य एका मोठ्या महालासारखं करून टाकलं. ज्याप्रमाणे सोनार दागिना बनवण्यासाठी त्याला घडवतो अगदी तसंच या तारिणी एकमेकींना घडवण्यात मग्न असतात. त्यांना नवशक्ती म्हणले तर वावगे ठरणार नाही. तारिणी म्हणजे फक्त एक फाउंडेशन नाही… ती आहे नात्यांची वीण, विश्वासाची शपथ आणि एकमेकींसाठी जगण्याची नव्याने घेतलेली प्रतिज्ञा. जेव्हा समाजाने त्यांना मर्यादा दाखवल्या, तेव्हा त्यांनी एकमेकींना पंख दिले. जेव्हा घराच्या चार भिंतींनी स्वप्नांना अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या नवदुर्गांनी त्या भिंतींनाच आधार बनवलं. एकीला पडताना पाहिलं की दुसरीने हात दिला... एकीच्या डोळ्यात पाणी आलं की दुसरी तिच्या पाठीशी खंबीर उभी राहिली आणि एकीने यश मिळवलं की सगळ्यांनी मिळून तो आनंद साजरा केला...तारिणीने केवळ महिलांना सक्षमीकरणाचे धडे दिले नाहीत, तर “मी एकटी नाही” ही जाणीव दिली...स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं…आपल्या कलेला, आपल्या आवाजाला आणि आपल्या अस्तित्वाला मान द्यायला शिकवलं. या नऊ तारिणी केवळ महिलांसाठी मनोरंजनाचेच काम करत नाही, तर त्यांना मासिक पाळी, आरोग्य, आहार, आधार कार्ड कसे काढायचे इथंपासून ते स्वतःच्या पायावर भक्कमपणे कसं उभं राहायचं इथपर्यंत त्या काम करतात. तारिणीच्या निर्मितीमागे एक मोठी कहाणी आहे. मैत्रीतून निर्माण झालेली ही संस्था आज अनेक महिलांसाठी आधार बनली आहे. पेशानं शिक्षिका असणाऱ्या सारिका जगताप यांनी त्यांच्या जवळच्या मैत्रिणीसोबत मिळून 'पंखुडी' फाउंडेशन सुरू केलं. काहीतरी जगावेगळं करण्याची त्यांची जिद्द आज त्यांना अनेक स्त्रियांच्या आयुष्यात प्रकाश टाकण्याचं काम करून घेत आहे. पंखुडीत असतानाच सारिका यांनी अनेक प्रोग्रॅम्स घेतले आणि ते यशस्वी देखील झाले. मात्र, ते म्हणतात ना काहीतरी चांगलं चालू असेन तर त्यात खोडा हा येतोच. त्याचप्रमाणे विचारांच्या तारा तुटल्यामुळे पंखुडीतुन बाहेर पडत त्यांनी स्वतंत्र काहीतरी करण्याचं ठरवलं. त्यानंतर १-२ वर्ष त्यांच्या फाउंडेशनच नाव त्यांनी पंखुडीच ठेवलं. मात्र, आपल्याला कोणाशी स्पर्धा करायची नाही. कार्याची ओळख स्वतःची असली पाहिजे. असा ध्यास मनात ठेवत त्यांनी आठ जणींना गोळा केलं आणि आज त्यांची 'तारिणी फाउंडेशन'च्या अध्यक्ष म्हणून ओळख आहे. जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करायची असते, तेव्हा देव देखील तुमच्या यशाचे दार तुम्हाला खुले करून देतो. याप्रमाणेच सारिका यांना ऐश्वर्या शिंदे भेटल्या. हा प्रसंग सांगताना त्या म्हणतात, 'मला पंखुडीच रजिस्ट्रेशन करायच होतं. त्यावेळी मला एका प्रोग्रॅममध्ये ऐश्वर्या शिंदे भेटली आणि आम्ही जणू काही साताजन्माच्या सोबती असल्याप्रमाणे आमच्यात मैत्री निर्माण झाली. त्यानंतर तिच्या ओळखीनं आम्ही आठजणी एकत्र आलो. मी शाळेत असल्यामुळं अनेक पालकांशी माझा संपर्क होता. मात्र, आपण म्हणतो की कामाला मजबूत करण्यासाठी ठोस काहीतरी करावं लागतं. त्याप्रमाणं देवानं मला या आठ जणींची भेट घडवली आणि आज आम्ही जे काही आहोत, ते आमच्या सर्वांच्या कष्टानं. तारिणीचा उद्देशच मुळात महिलांना सक्षम करणं आहे. तिला घरातून, त्या चार भिंतीतून बाहेर काढणं आहे. जिथे तिला अनेक प्रकारची आव्हान झेलायची आहेत. आणि आम्ही तिला मजबूत करण्याचं काम करतो.' 'आरोग्य, शिक्षण, समाजकारण, अन्यायाला वाचा फोडणे, मासिक पाळी बाबतचे गैरसमज दूर करणे या सारखे अनेक कार्यक्रम आम्ही घेतो. हे कार्यक्रम केवळ शहरापुरतेच मर्यादित नसून आम्ही सर्वजणी ग्रामीण भागात जाऊन तिथल्या महिलांना कस जागृत करता येईल हे बघतो. तसा आम्हाला त्यांचा प्रतिसादही खूप मिळतो. त्यामुळं आम्हाला केवळ शहरापुरतंच मर्यादित न राहता आम्हाला गाव, राज्य, देश पातळीपर्यंत पोहचून चार भिंतीत गुंतलेल्या महिलांना जग दाखवायचं आहे आणि आम्ही ते नक्की पूर्ण करणार. हा आमचा विश्वास आहे.' तारिणी या नावातच सगळा अर्थ दडला आहे. जी संकटावर मात करते ती तारिणी. जी अन्यायाला वाचा फोडते ती तारिणी. जी परिस्थितीवर मात करते ती तारिणी. म्हणून आमच्या फाउंडेशनच नाव आम्ही तारिणी ठेवलं असं फाउंडेशनच्या उपाध्यक्ष अर्चना चव्हाण म्हणतात. त्या पुढे म्हणतात 'तारिणी ही संस्था पूर्णपणे सारिकाची आहे. त्यात माझा काही एक वाटा नाही. तिने एक दिवस सांगितलं की, मला काहीतरी नवीन करायचं आहे. त्याप्रमाणे तिने आनंद नगरीचा कार्यक्रम केला. त्याला खूप यश मिळाल. त्यानंतर मग तिच्या डोक्यात आलं की, आता आपण महिलांसाठी एक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन घेऊयात आणि त्यांचं अँकरिंग मला करायला सांगितलं. त्यावेळी मी हो म्हंटले आणि तो कार्यक्रम खूप यशस्वी झाला. त्यानंतर आम्ही अनेक कार्यक्रम केले. जे की महिलांना आमच्याशी जोडणारे होते. नाही म्हणता म्हणता आमच्यासोबत ५०० महिला जोडल्या गेल्या. मी पेशाने एक अँकर आणि कार्टूनिस्ट आहे. पण त्यासोबतच मी आज एक तारिणीचा भाग आहे. आम्ही सर्वजणी शून्यातून वर आलो आहोत. विशेष म्हणजे आम्हा सर्वांना मुली आहेत. त्यामुळं आपल्या मुलीला या समाजाशी झगडता यावं. त्यासोबतच समाजातल्या प्रत्येक मुलीला, महिलेला स्वतःबरोबर समाज देखील सुधारता यावा. यासाठी आम्ही करतो.' आजच्या घडीला समाजात अनेक महिलांमध्ये कौशल्य आहे, जिद्द आहे, काहीतरी करण्याची इच्छा आहे. मात्र, संधींच्या अभावामुळं किंवा कुटुंबातील बंधनांमुळं त्या पुढे येऊ शकत नाहीत. अशा महिलांना एक व्यासपीठ मिळावं, त्यांना आत्मविश्वास मिळावा आणि त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, यासाठी तारिणी फाउंडेशन सातत्याने प्रयत्न करत आहे. महिला दिन, आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहीम, विविध स्पर्धा, सामाजिक उपक्रम अशा अनेक माध्यमांतून ही संस्था महिलांना एकत्र आणते. या कार्यक्रमांमुळं महिलांमध्ये केवळ जागरूकताच वाढत नाही, तर त्यांच्यातील सुप्त गुणांनाही वाव मिळतो. अनेक महिलांनी या माध्यमातून स्वतःची भीती बाजूला ठेवत समाजासमोर येण्याचं धाडस केलं आहे. महिलांनी घरापुरतं मर्यादित न राहता बाहेर पडून स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. त्यासाठी तारिणी फाउंडेशन महिलांसाठी स्पेशल ट्रीपचे आयोजन करते. यावर बोलताना फाउंडेशनच्या सचिव ऐश्वर्या शिंदे म्हणतात की, 'महिलांनी विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही नऊ जणी एकत्र आलो आहोत. आम्ही महिलांना मनोरंजनासाठी तसेच त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी काम करतो. अनेकजणी अशा असतात की, त्यांना बाहेर जाण्याची फार इच्छा असते, पण काही कुठे जायचं? काय करायच? हे माहित नसतं. त्यासाठी आम्ही स्पेशल ट्रिप आयोजित करतो आणि त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांच्या आयुष्यात रंग भरण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करतो. बऱ्याच बायका आम्हाला म्हणतात, आम्हाला स्वतःला एवढं महत्त्व घरी कधीच भेटत नाही. साधा स्वतःचा फोटो काढायचा म्हणलं तरी सतत मागे लागावं लागतं. पण तुम्ही आम्हाला बाहेर घेऊन आलात. त्यामुळं आम्हाला स्वतःची किंमत कळली. तसाच आम्ही एक वृक्षवल्ली म्हणून एक कॅम्प नेला होता. त्यालाही महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. सुरुवातीला असं वाटत होत की खूप कमी महिला येतील, पण जवळजवळ ८०-९० महिला एकत्र आल्या आणि आम्ही देखील खूप एन्जॉय केलं. या महिला जेव्हा स्वतः जगायला लागतात तेव्हा आम्हालाही आम्ही जिंकल्याचं आनंद होतो आणि आमचा तोच उद्देश आहे.' आज तारिणी फाउंडेशनसोबत जोडलेल्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संस्थेच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत आहे. एकमेकींना आधार देण्याची भावना वाढत आहे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याची उर्मीही निर्माण होत आहे. आगामी काळातही तारिणी फाउंडेशन अधिक व्यापक पातळीवर काम करण्याचा निर्धार करत आहे. ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचून त्यांना शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबनाच्या दिशेने मार्गदर्शन करण्याचा संस्थेचा मानस आहे. फाउंडेशनच्या सहसचिव शरयू राठोड त्यांचा अनुभव सांगताना म्हणतात की, 'मी एक डेंटिस्ट आहे. माझं ज्याप्रमाणे एक डॉक्टर रोज सकाळी उठून आपल्या क्लीनिकमध्ये जातो आणि घरी येतो. तसंच आयुष्य सुरू होतं. पण एक दिवस माझी मैत्रीण ऐश्वर्याने मला एकदिवस विचारलं की तू हेल्थ कॅम्प घेशील का ? तेव्हा मी हो म्हंटले आणि जेव्हा मी त्या लहान-लहान मुलांमध्ये आणि बाकी सगळ्यांशी बोलले, भेटले तेव्हा रिअलाइज झालं की आपणही केवळ चार भिंतीतच राहत होतो. खरं काम तर इथं आहे. त्यामुळं मी तारिणीचा एक भाग होण्याचं ठरवलं. माझ्या शिक्षणाचा योग्य वापर मी लोकांसाठी करते याचा मला अभिमान आहे. त्यामुळे मला असं वाटत की, ज्या महिलांना आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्यांनी मन न मारता बाहेर पडलं पाहिजे. त्यासाठी आम्ही तुम्हाला मदतही करू. जर मी करू शकते तर सगळेच करू शकतात.' पेशानं मॉडेल आणि डान्सर असलेल्या मेघा पवारही या तारिणीचा एक महत्वाचा भाग आहेत. त्या म्हणतात की, 'मी एक डान्सर आहे. त्यासोबतच एक मॉडेलदेखील आहे. मी माझ्या कामात पारंगत आहे. पण मलाही कुठेतरी नवीन गोष्ट करण्याची इच्छा होती. तेव्हा मला सारिका सारखी मैत्रीण भेटली आणि त्यांनी मला दाखवून दिल की तुझ्यात खूप टॅलेंट आहे तर मग तू बसून राहू नकोस. तुझ्या कलेची मदत घेऊन आपण अनेकजणींचे आयुष्य बदलू शकतो. त्या वाक्याने मी तारिणीशी जोडले गेले. मी आज अनेक प्रोग्रॅम्स घेते. मला त्याचा आनंद आहे की, माझ्या कलागुणांना वाव मिळण्यासोबतच त्याचा इतरांनाही फायदाही होतो.' याच गोष्टीला दुजोरा देत जयश्री चव्हाण म्हणतात की, 'मला सुरुवातीला असं वाटायचं एक स्त्री काहीच करू शकत नाही. मला घरून पूर्ण सपोर्ट होता. मात्र, मी कधी मनावर घेतलंच नव्हतं. दिवाळीच्यावेळी एक कार्यक्रम होता. त्यावेळी सगळ्या फराळाची मी पॅकिंग केली होती. ते बघून ऐश्वर्या मॅमने मला तारिणीसाठी विचारलं. तेव्हा मलाही वाटलं की आपण पण आपल्याला जे हवं ते करू शकतो. मला काहीही करून या सगळ्यांसोबत काम करायचं होत. त्यावेळी आम्हाला कुलदीप शिंदे सरांनी खूप आधार दिला. एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो. त्याप्रमाणेच हे सर पाठीशी राहिले. तारिणी फाऊंडेशन बद्दल बोलायचं झालं तर आम्ही गरजू व्यक्तींना, लहान मुलांना नवीन गोष्टी शिकवणे. त्याचबरोबर समाजाशी जोडलं जाणं हाच आमचा मूळ उद्देश आहे. महिला दिनाच्या निमित्तानं तुम्ही महिलांना काय सांगाल यावर या सर्वजणी म्हणतात की, 'सर्व महिलांमध्ये काहींना काहीतरी कौशल्य दडलेले असतं. ते त्यांनी ओळखले पाहिजे. मी खूप काही करू शकते यावर विश्वास पाहिजे. या जगात अशक्य असं काहीच नाही. तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकतात. त्यामुळं एकत्र या आणि नवीन- नवीन गोष्टी शिका. तुम्ही देखील एक तारिणी आहात. प्रत्येक महिलेने आपल्या गरज या कोणावरती अवलंबून न राहता स्वतः स्वतःचे स्वप्न पूर्ण केले पाहिजेत. ती धमक प्रत्येकीत असते. फक्त आपण समजला घाबरून शांत बसतो. त्यामुळं सगळ्या महिलांना हे सांगायचं आहे की, तुम्ही मागे न राहता पुढे या नाही आपल्यातले कलागुण जोपासा. तोच खरा महिला दिन असेन.' आज या नऊ मैत्रिणी फक्त एक संस्था चालवत नाहीत, तर अनेक स्त्रियांच्या आयुष्यात नवा उजेड पेटवत आहेत. त्या सांगतात स्त्री ही स्त्रीची शत्रू नसते, तर तीच तिची सर्वात मोठी ताकद असते. कारण जेव्हा स्त्रिया एकत्र येतात, तेव्हा त्या फक्त इतिहास घडवत नाहीत, तर भविष्य घडवतात.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 6:00 am

Rohit Pawar : सीआयडीवर रोहित पवारांचा नाराज! राहुल गांधींच्या नेतृत्वात चौकशी समिती नेमण्याची मागणी

Rohit Pawar : सीआयडी कार्यालयात पदाधिकाऱ्यांना प्रवेश नाकारल्याने रोहित पवार आक्रमक; डीजीसीए अहवालातील त्रुटींकडे वेधले लक्ष.

दैनिक प्रभात 7 Mar 2026 5:45 am

SPPU News : विद्यापीठाची प्रतिमा पणाला! निष्कलंक कुलसचिव हवा; जुनी निवड प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

SPPU News : दबावाखाली येऊन चुकीची नियुक्ती केल्यास विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल; प्रा. हर्ष गायकवाड यांनी दिला जनआंदोलनाचा इशारा.

दैनिक प्रभात 7 Mar 2026 5:30 am

PMC News : रात्री ८ नंतर बांधकामे बंद! महापालिकेचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास होणार कारवाई..वाचा सविस्तर

PMC News : सकाळी ८ ते रात्री ८ हीच असेल बांधकामाची वेळ; वायू प्रदूषण रोखण्यासाठी पुणे महापालिका आणि 'एमपीसीबी' कडून नवीन नियमावली जाहीर.

दैनिक प्रभात 7 Mar 2026 5:15 am

Baramati Crime : बारामतीत ‘प्रणव लॉज’वर पोलिसांचा छापा! देहविक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ६ जणांवर गुन्हा

Baramati Crime : बारामती तालुका पोलिसांची गुरुवारी सायंकाळी 'प्रणव लॉज'वर धडक कारवाई; आसाम आणि पश्चिम बंगालमधील ४ पीडित तरुणींची सुटका.

दैनिक प्रभात 7 Mar 2026 5:00 am

Leopard Attack : काळजाचा ठोका चुकला! समोर अचानक दोन बिबटे; जीव वाचवण्यासाठी शेतकरी थेट झाडावर

Leopard Attack : शेतमालक आणि ग्रामस्थांच्या आरडाओरड्यानंतर बिबटे उसाच्या शेतात पळाले; वन विभागाच्या कारभारावर ग्रामस्थांची टीका.

दैनिक प्रभात 7 Mar 2026 4:30 am

Pune Metro Fraud : पुणे मेट्रोच्या नावाने ३.७८ कोटींचा गंडा! मांजरीच्या दांपत्याची फसवणूक; दोघाविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Metro Fraud : नागार्जुन कन्स्ट्रक्शन'चे बनावट कंत्राट दाखवून जैन दांपत्याला जाळ्यात ओढले; मेट्रोला साहित्य पुरवठ्याचा केला होता बनाव.

दैनिक प्रभात 7 Mar 2026 4:15 am

Ujani Dam Bridge : उजनी जलाशयावर ८५० मीटरचा भव्य पूल! ३४० कोटी मंजूर; पुणे-सोलापूरचे अंतर ४० किमीने घटणार

Ujani Dam Bridge : चांडगाव (इंदापूर) ते पोमलवाडी (करमाळा) थेट जोडले जाणार; वेळ आणि इंधनाची मोठी बचत करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प.

दैनिक प्रभात 7 Mar 2026 4:00 am

Haveli News : हवेलीतील ‘कचरा’कोंडी फुटणार? ९ मार्च रोजी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

Haveli News : २७ फेब्रुवारीच्या भीषण आगीनंतर निर्माण झालेली स्फोटक स्थिती; पीएमआरडीए (PMRDA), प्रदूषण मंडळ आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी घेणार सहभाग.

दैनिक प्रभात 7 Mar 2026 3:45 am

Loni Kalbhor Accident : पुणे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात! भरधाव पिकअप उलटली; दोन होमगार्ड जखमी

Loni Kalbhor Accident : सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या पिकअपवरील ताबा सुटल्याने एमआयटी कॉर्नर येथे अपघात; ड्युटीवर असलेले दोन होमगार्ड जखमी झाले आहेत.

दैनिक प्रभात 7 Mar 2026 3:30 am

Loni Kalbhor News : पूर्व हवेलीत कचरा प्रश्न धगधगतोय! एमआयटी विद्यार्थ्यांचे आंदोलन; कचरा कोंडीने नागरिक हैराण

Loni Kalbhor News : पुणे-सोलापूर महामार्गावर ओढ्याशेजारी कचरा जाळण्याचे प्रकार वाढले; खाजगी जागा आणि गायरानात कचरा टाकल्याने ग्रामस्थांचा संताप.

दैनिक प्रभात 7 Mar 2026 3:15 am

PCMC News : नद्या की गटारगंगा? पिंपरी-चिंचवडच्या पाणी प्रश्नावर पालिकेचा मोठा निर्णय; नवा ‘प्लॅन’काय?

PCMC News : रावेतकडून दापोडीपर्यंत नद्यांच्या प्रदूषणाची नोंद होणार; दूषित पाणीपुरवठ्याच्या वाढत्या तक्रारींमुळे प्रशासनाचे मोठे पाऊल.

दैनिक प्रभात 7 Mar 2026 3:00 am

E-Challan Protest : इ-चलनचा ताप आणि परवाना रद्दची टांगती तलवार! रिक्षा-टॅक्सी संघटनांचा ‘संयुक्त लढ्याचा’इशारा

E-Challan Protest : इ-चलन प्रणालीतील तांत्रिक त्रुटी आणि अन्यायकारक दंड वसुलीविरोधात पुणे व पिंपरी-चिंचवडमधील संघटना एकवटल्या.

दैनिक प्रभात 7 Mar 2026 2:30 am

Share Market Fraud : ११ कोटींचा स्कॅम! पुणे-राजस्थानमधून ७ जणांना बेड्या; कोट्यवधींच्या फसवणुकीचा पर्दाफाश

Share Market Fraud : कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि राजस्थानमध्ये पोलिसांच्या धाडी; १ कोटी ८० लाख रुपयांची रोकड बँक खात्यातच गोठवली.

दैनिक प्रभात 7 Mar 2026 2:00 am

Maval News : एका मताने खेळ पलटला! मावळ खरेदी-विक्री संघात राष्ट्रवादीतच जुंपली; कुणाचे नशीब चमकले?

Maval News : मावळ खरेदी-विक्री संघात सत्तेसाठी काटाजोड लढत; अवघ्या एका मताच्या फरकाने सभापती पदाचा निकाल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.

दैनिक प्रभात 7 Mar 2026 1:45 am

Gudi Padwa 2026 : यंदा गुढीपाडव्याला ‘मिनी गुढी’चा जलवा; पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठेत नवा ट्रेंड..पाहा

Gudi Padwa 2026 : लाल, हिरव्या आणि केशरी रंगांच्या जरीच्या वस्त्रांसह पितळी कलशांनी सजलेली 'मिनी गुढी'; यंदा घरोघरी दिसणार नवा लुक.

दैनिक प्रभात 7 Mar 2026 1:30 am

Pimpri Chinchwad News : इराण-अमेरिका युद्धाचा उद्योगांना फटका! कच्चा माल महागला, निर्यात ठप्प; उद्योगनगरीत आर्थिक संकट?

Pimpri Chinchwad News : समुद्री मार्गाने होणारी आयात-निर्यात धोक्यात आल्याने पिंपरी-चिंचवडमधील इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला युद्धाची झळ बसत आहे.

दैनिक प्रभात 7 Mar 2026 1:15 am

Rajur Bandh : ६ दिवसांतून एकदा पाणी? राजूरमध्ये जनक्षोभ! ‘राजूर बंद’करत ग्रामस्थांनी प्रशासनाला घेरलं

Rajur Bandh : मागील १० महिन्यांपासून आठ-आठ दिवस पाणी नसल्याने राजूरकर संतप्त; भंडारदरा धरणातून कायमस्वरूपी पाईपलाईन योजनेसाठी भव्य रास्ता रोको आंदोलन.

दैनिक प्रभात 7 Mar 2026 1:00 am

Census 2027 : सातारकरांनो सज्ज व्हा! जिल्ह्यात जनगणना दोन टप्प्यांमध्ये होणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Census 2027 : सातारा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात ५,५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती; फेब्रुवारी २०२७ मध्ये पूर्ण होणार प्रत्यक्ष लोकसंख्या मोजणीचा दुसरा टप्पा.

दैनिक प्रभात 7 Mar 2026 12:45 am

Kalamma Devi Yatra : सह्याद्रीच्या कुशीत ‘बाजी’चा थरार; काळम्मादेवीच्या यात्रेला वाघ येतोच, अख्यायिकेला मिळाला पुरावा..पाहा

Kalamma Devi Yatra : चांदोली राष्ट्रीय उद्यानातील उदगिरी गावात मानव आणि वन्यजीव सहअस्तित्वाचे दर्शन; 'बाजी' नावाच्या नर वाघाचा मंदिर परिसरात वावर.

दैनिक प्रभात 7 Mar 2026 12:30 am

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०७ मार्च २०२६

पंचांगआज मिती फाल्गुन कृष्ण चतुर्थी शके १९४७-. चंद्र नक्षत्र चित्रा. योग ध्रुव . चंद्र राशी तुळ, भारतीय सौर १६ फाल्गुन शके १९४७-४८. शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ मुंबईचा सूर्योदय ०६.५३ मुंबईचा चंद्रोदय १०.१२ पीएम मुंबईचा सूर्यास्त ०६.४५ मुंबईचा चंद्रास्त ०९.०१ एएम राहू काळ ०९.५१ ते ११.२०,चांगला दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

फीड फीडबर्नर 7 Mar 2026 12:30 am

IND vs NZ Final : फायनलसाठी अंपायर्स-रेफरीची घोषणा! २०२४ च्या विजयाचे साक्षीदार पुन्हा अहमदाबादमध्ये; पाहा कोणाकडे आहे कमान?

IND vs NZ Final : या ऐतिहासिक सामन्यासाठी आयसीसीने अंपायर्स आणि मॅच रेफरी यांची घोषणा केली आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 10:47 pm

Gold-Silver Rates: युद्ध सुरू असतानाही सोने-चांदीच्या दरात घसरण; पाहा आजचे ताजे भाव

Gold-Silver Rates: दिल्ली सराफात सोन्याचा दर 1,100 रुपयांनी कमी होऊन 1 लाख 64 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. चांदीचा दरही शुक्रवारी 600 रुपयांनी कमी होऊन 2 लाख 71 हजार 700 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 10:31 pm

Russian oil : “अमेरिका-इराण युद्धात भारताची मोठी चाल! रशियन तेलाची जहाजे भारताच्या ताब्यात? पाहा काय आहे मोदी सरकारचा ‘मेगा प्लॅन’!”

Russian oil : युद्धाअगोदर रशियाचे बरेच तेल विविध देशाकडे जात होते. मात्र युद्धामुळे या जहाजांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत रशियाची बरीच जहाजे भारताजवळ आहेत.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 10:26 pm

IND vs ENG Semifinal : भारत-इंग्लंड सेमीफायनलने मोडला व्ह्यूअरशिपचा जागतिक विक्रम, तब्बल ‘इतक्या’लोकांनी पाहिला लाईव्ह सामना

IND vs NZ Semifinal : कोणत्याही क्रीडा प्रकारासाठी 'पीक कॉनकरन्सी'चा (एकाच वेळी पाहणारे प्रेक्षक) हा आतापर्यंतचा सर्वात मोठा जागतिक विक्रम आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 10:16 pm

Balen Shah Nepal’s next PM: रॅपर ते पंतप्रधान! नेपाळमध्ये 35 वर्षीय बालेन शाह यांचा धमाका; दिग्गज नेत्यांना घरचा रस्ता!

Balen Shah Nepal's next PM: १५० मतदारसंघांतील मतमोजणी सुरू असताना RSP ने दोन जागी विजय मिळवला असून आणखी १०६ जागांवर आघाडी घेतली आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 10:10 pm

Balen Shah Nepal’s next PM: रॅपर ते पंतप्रधान! नेपाळमध्ये ३५ वर्षीय बालेन शाह यांचा धमाका; दिग्गज नेत्यांना घरचा रस्ता!

Balen Shah Nepal's next PM: १५० मतदारसंघांतील मतमोजणी सुरू असताना RSP ने दोन जागी विजय मिळवला असून आणखी १०६ जागांवर आघाडी घेतली आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 10:08 pm

पुणे ते बेंगळुरू फक्त 4 तासात! नितीन गडकरींची मोठी घोषणा; 16 लेनचा नवा हायवे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा ताण करणार कमी!

Mumbai-Pune expressway: मुंबई ते बेंगळुरू प्रवास अवघ्या पाच तासांत करणे शक्य करणाऱ्या नव्या एक्सप्रेसवेचे काम लवकरच सुरू होणार आहे. केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात महामार्ग प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर ही माहिती दिली.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 9:38 pm

Lionel Messi : मेस्सी समोरच ट्रम्प यांनी गायले रोनाल्डोचे गुणगाण! व्हाइट हाऊसमध्ये चॅम्पियन मियामीचं स्वागत; ‘त्या’भेटीची सर्वत्र चर्चा

Lionel Messi : या भाषणादरम्यान त्यांनी मेस्सीची तुलना फुटबॉल सम्राट पेले यांच्याशी केली, तर मेस्सीच्या उपस्थितीतच त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डोचाही उल्लेख 'ग्रेट' म्हणून केला.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 9:00 pm

राज्य सरकारला मोठा धक्का! तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द

IAS Transfer News : केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (CAT) केरळमधील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश रद्द केले आहेत.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 8:41 pm

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड फायनल सामना रद्द झाल्यास, कोणाला विजेता घोषित केलं जाणार? जाणून घ्या ICCचा नियम

IND vs NZ : जर पावसाचा किंवा इतर कोणत्या कारणाने या महामुकाबल्यात व्यत्यय आला, तर नेमके काय होईल? चषकावर कोणाचं नाव कोरलं जाणार? जाणून घ्या

दैनिक प्रभात 6 Mar 2026 8:23 pm

Ban social media use by children: मुलांच्या हातातील मोबाईल आता जाणार? कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सरकारचा सर्वात मोठा निर्णय!

Ban social media use by children: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्य विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालण्याची घोषणा केली. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी ९० दिवसांत लागू करण्याचे जाहीर केले.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 8:09 pm

विद्यार्थी की दहशतवाद्यांचा प्रचारक? इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा भयंकर प्लॅन उघड; ‘एन्क्रिप्टेड’चॅट्समधून फुटलं बिंग

Mumbai ATS : महाराष्ट्र एटीएसने मुंबईत शोधमोहीम राबवून अयान शेख या विद्यार्थ्याला अटक केली आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 8:02 pm

Women’s Day: महिला दिनानिमित्त सूर्यदत्ततर्फे विनामूल्य कर्करोग तपासणी शिबिर

Women's Day: विनामूल्य नोंदणीसाठी आपले पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक ७२६२ ०११३३८ किंवा ७२६२ ०११७७४ या व्हाट्सअप क्रमांकांवर पाठवावा, असे आवाहन प्राचार्या डॉ. सिमी रेठरेकर यांनी केले आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 7:59 pm

Pune Metro: महिला दिनानिमित्त पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; महिलांसाठी 46, ज्येष्ठ नागरिकांसाठी 8 जागा राखीव

Pune Metro: पुणे मेट्रोच्या प्रत्येक गाडीत तीन डबे असून तिन्ही डब्यांमध्ये ही आसन व्यवस्था लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विशेषतः महिला आणि ज्येष्ठ प्रवाशांची सोय होणार आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 7:53 pm

Sunil Gavaskar Disappointment : ‘असं करण चुकीचं, हा वर्ल्डकप आहे!’बुमराहच्या गोलंदाजीदरम्यान घडलेल्या प्रकारावर गावस्कर संतापले

Sunil Gavaskar disappointment : सामन्यादरम्यान मैदानावरील 'डीजे' (DJ) आणि प्रेक्षकांच्या वर्तनावरून महान फलंदाज सुनील गावसकर यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 7:44 pm

RTE admissions: आरटीई प्रवेशासाठी 1 किलोमीटरची अट बेकायदेशीर? नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र सरकारला बजावली नोटीस

RTE admissions: न्यायमूर्ती राज वाकोडे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या खंडपीठाने ५ मार्च रोजी दिलेल्या आदेशात नोंदवले की याचिकाकर्ते अनुसूचित जमातीचे सदस्य असून त्यांनी आपल्या मुलाच्या RTE च्या २५ टक्के कोट्यांतर्गत प्रवेशासाठी अर्ज करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरापासून १ किलोमीटरच्या आत कोणतीही शाळा उपलब्ध नसल्याने ते अर्जच करू शकले नाहीत. या प्रकरणावर पुढील सुनावणी ९ मार्च रोजी होणार आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 7:43 pm

तरुणाईसाठी आनंदाची बातमी! आता महाराष्ट्रातच मिळणार जागतिक दर्जाचं शिक्षण; राज्य सरकारच्या मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2026 : राज्य सरकारने शिक्षणासाठी १० नवीन एज्युसिटी, स्टार्टअप्ससाठी महाफंड आणि परदेशी नोकरीसाठी 'महिमा' संस्थेची घोषणा केली आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 7:20 pm

Maharashtra Budget: महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27; सर्वसामान्यांसाठी 10 महत्त्वाचे निर्णय

Maharashtra Budget: मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची मोठी घोषणा केली. फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प एकूण चार स्तंभांवर आधारित आहे. त्यात प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासनावर भर दिला आहे. सर्वसामान्यांसाठी 10 महत्त्वाचे निर्णय वाचा...

दैनिक प्रभात 6 Mar 2026 7:17 pm

Maha Budget 2026 : राज्याचा ४० हजार ५५२ कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प

राजकोषीय तूट १ लाख ५० हजार ४९१ कोटींवर; महसूल वाढीचा वेग कायम असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावामुंबई : यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसरे मुख्यमंत्री ठरले. शुक्रवारी त्यांनी राज्याचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात ४० हजार ५५२ कोटी रुपयांची महसुली तूट अंदाजित करण्यात आली आहे. एकीकडे 'विकसित महाराष्ट्र २०४७' चे स्वप्न साकार करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी योजनांवर भर दिला जात असताना, राजकोषीय तूट १ लाख ५० हजार ४९१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मात्र, ही तूट मर्यादेत राखण्यात सरकारला यश आल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.देशाच्या एकूण वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात महाराष्ट्र आजही अग्रस्थानी आहे. राज्याचा महसूल वाढीचा दर देशाच्या सरासरीपेक्षा अधिक असून, कर दरांच्या पुनर्रचनेमुळे उत्पादन आणि उपभोग या दोन्ही क्षेत्रांत सकारात्मक वाढ दिसून आली आहे. सन २०२५-२६ मध्ये महसुली जमेचा सुधारित अंदाज ६ लाख १ हजार ४८९ कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे, असे फडणवीस म्हणाले.राज्याच्या एकूण खर्चातही मोठी वाढ झाली आहे. सन २०२५-२६ चा एकूण खर्च ७ लाख ५५ हजार ९२० कोटी रुपयांवर गेला असून, भांडवली आणि कल्याणकारी योजनांवरील खर्च वाढल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. आगामी वर्षासाठी (२०२६-२७) ७ लाख ६९ हजार ४६७ कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे जिल्हा वार्षिक योजना : २१ हजार ८६७ कोटी रुपयांची तरतूद (गेल्या वर्षीच्या तुलनेत १,७०२ कोटींची वाढ). कार्यक्रम खर्च : २ लाख ७५ हजार ६२६ कोटी रुपये. अनुसूचित जाती घटक कार्यक्रम : २३ हजार १५० कोटी रुपये. आदिवासी घटक कार्यक्रम : २१ हजार ७२३ कोटी रुपये.वित्तीय शिस्त राखली - मुख्यमंत्रीराजकोषीय तूट वाढलेली दिसत असली, तरी ती स्थूल राज्य उत्पन्नाच्या ३ टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्यात शासन यशस्वी झाले आहे. तसेच महसुली तूट सातत्याने १ टक्क्याच्या खाली राखल्याने राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन झालेले नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आले आहे.

फीड फीडबर्नर 6 Mar 2026 7:10 pm

Sanju Samson Reaction : ‘शतकं हुकल्याचं दुःख नाही!’संजू सॅमसनच्या ‘त्या’एका उत्तराने जिंकली चाहत्यांची मने; पाहा VIDEO

Sanju Samson Reaction : सलग दोन शतके हुकण्याबाबत विचारले असता संजूने अत्यंत सकारात्मक आणि मजेशीर उत्तर दिले.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 6:58 pm

मुंबईत २० लाख झोपड्यांचा पुनर्विकास, १० लाख परवडणारी घरे बांधणार - वडाळ्यात 'तिसरी मुंबई'आकाराला येणार

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर ; वडाळ्यात जागतिक दर्जाचे 'स्टार्टअप हब',मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पातून पायाभूत सुविधांचा धडाका लावला आहे. मुंबई आणि महानगरातील २० लाख झोपड्यांचा पुनर्विकास करण्यासह १० लाख परवडणारी घरे निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. यासोबतच वडाळा येथे जागतिक दर्जाचे 'स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब' उभारले जाणार असून, 'नो न्यू स्लम फ्रेमवर्क'द्वारे शहरात नवीन झोपडपट्ट्या होणार नाहीत, याची दक्षता घेतली जाणार आहे.मुंबईच्या वाहतुकीसाठी मेट्रो प्रकल्पांना मोठा निधी दिला जाणार आहे. यामध्ये वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया (मेट्रो ११) हा २३ हजार ४८७ कोटींचा संपूर्ण भूमिगत प्रकल्प धारावी आणि वांद्रेपर्यंत विस्तारला जाईल. तसेच, मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ (मेट्रो ८) आणि तळोजा ते खांदेश्वर अशा नवीन मार्गिका प्रस्तावित आहेत. शहरातील अंतर्गत प्रवास वेगवान करण्यासाठी 'ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह', 'गोरेगाव-मुलुंड' आणि 'ठाणे ते बोरीवली' यांसारखे महत्त्वाचे भुयारी मार्ग (टनेल) उभारले जाणार आहेत.अटलसेतूला जोडून २०० चौरस किमी क्षेत्रात 'तिसरी मुंबई' विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यात कर्नाळा, साई, चिरनेर आणि नवी मुंबई विमानतळ परिसरातील ग्रीनफिल्ड शहरांचा समावेश असेल. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची ठाणे ते तलासरी दरम्यानची तीन स्थानके फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 6 Mar 2026 6:30 pm

जुनी वाहने स्क्रॅप केल्यास नवीन वाहनावर ३० टक्क्यांपर्यंत सवलत

अर्थसंकल्पात घोषणा; प्रदुषणकारी वाहनांच्या 'पर्यावरण करा'त दुप्पट वाढमुंबई : वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासह जुनी, प्रदुषणकारी वाहने रस्त्यावरून हटवण्यासाठी राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जुनी वाहने स्क्रॅप करून नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना मोटार वाहन करात (रोड टॅक्स) ३० टक्क्यांपर्यंत घसघशीत सूट जाहीर करण्यात आली आहे. त्याचवेळी जुन्या खासगी वाहनांवर आकारल्या जाणाऱ्या 'पर्यावरण करा'त (ग्रीन टॅक्स) दुपटीने वाढ करण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार, बीएस-४ व त्यावरील वाहने मोडीत काढून नवीन वाहन घेतल्यास मोटार वाहन करात १६ टक्के सूट मिळेल. बीएस-३ आणि त्याखालील वाहने मोडीत काढल्यास नवीन वाहन खरेदीवर ३० टक्के इतकी सूट मिळणार आहे. तसेच, क्रेन आरोहित वाहनांसाठी वाहन किमतीच्या ७ टक्के करासह ३० लाख रुपयांची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.त्याशिवाय जुन्या खासगी (परिवहनेतर) वाहनांचा वापर कमी करण्यासाठी सरकारने पर्यावरण करात मोठी वाढ केली आहे. यामुळे जुन्या पेट्रोल-डिझेल गाड्यांचा मालकी हक्क महागणार आहे. दुचाकीसाठी २ हजार रुपयांवरून आता ४ हजार रुपये कर भरावा लागेल. तर, हलक्या मोटार वाहनांसाठी (पेट्रोल) ३ हजार रुपयांवरून ६ हजार रुपये वाढ प्रस्तावित आहे. डिझेल कारसाठी साडेतीन हजार रुपयांवरून ७ हजार रुपये कर प्रस्तावित करण्यात आला आहे.मुद्रांक शुल्कातील दंडात मोठी वाढकमी मुद्रांक शुल्कावर दस्तऐवज नोंदवण्याच्या प्रकारांना चाप लावण्यासाठी सरकारने दंडात्मक कारवाई कडक केली आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील विविध कलमान्वये होणाऱ्या शास्तीची (दंड) रक्कम ५ हजार रुपयांवरून थेट १ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.अर्थसंकल्पात दिलेल्या माहितीनुसार, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्याचा स्वतःचा कर महसूल ४ लाख ९ हजार ५९३ कोटी रुपये अंदाजित आहे. तर आगामी २०२६-२७ या वर्षासाठी हे उद्दिष्ट ४ लाख १५ हजार ६५३ कोटी रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 6 Mar 2026 6:30 pm

पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी तरतूद

पुणे : पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा, खडकवासला-स्वारगेट-हडपसर-लोणी काळभोर मार्ग आणि पुणे ते शिरूर ५३ किमीचा उन्नत मार्ग.विमानतळ विकास : नवी मुंबई विमानतळाचा दुसरा टप्पा, पुरंदर विमानतळासाठी विशेष निधी आणि राज्यातील इतर विमानतळांच्या विस्तारासाठी निधी.कनेक्टिव्हिटी : राज्यातील मेट्रो नेटवर्क १ हजार २०० किमीवर, तर द्रुतगती मार्गांचे जाळे ६ हजार किमीवर नेण्याचे उद्दिष्ट. कल्याण ते लातूर आणि शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन ग्रीनफिल्ड महामार्ग उभारले जाणार आहेत.महत्त्वाच्या घोषणा- उत्तन ते विरार सागरी सेतू ५८,७५४ कोटी रुपये खर्चून मुंबई ते वाढवण बंदर जोडणार.- बाळकुम ते गायमुख आणि उलवे किनारी मार्ग. अटलसेतूला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाशी जोडणार.- ऑरेंज गेट (पूर्व मुक्त मार्ग) ते मरीन ड्राईव्ह, गोरेगाव-मुलुंड, ठाणे ते बोरीवली, आणि खारघर ते तुर्भे भुयारी मार्ग . गायमुख जंक्शन ते फाऊंटेन हॉटेल ते भाईंदर (६ आणि ९ किमी लांबीचे मार्ग). वांद्रे-वरळी सागरी सेतू ते हायस्पीड रेल्वेस्थानक (बीकेसी) ते मुंबई विमानतळ.ग्रामीण रस्त्यांसाठी भरीव निधीमहाराष्ट्र अमृतकाल योजना : ६ हजार २७२ किमी द्रुतगती मार्ग आणि १४ हजार ९१९ किमीचे राज्य/जिल्हा मार्ग.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (टप्पा-३) : २३ हजार किमीचे रस्ते.काँक्रिटीकरण : १ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावे काँक्रिट रस्त्यांनी जोडणार (४ हजार ५०० कोटी).पर्यटन परिरथ : ५००० पेक्षा जास्त लोकसंख्येच्या वस्त्यांना ४ हजार २४७ किमीच्या 'पर्यटन मार्गा'ने जोडणार.

फीड फीडबर्नर 6 Mar 2026 6:30 pm

UPSC Result : भाजप नेत्याच्या मुलाचा देशात तिसरा क्रमांक; मुख्यमंत्र्यांकडून कौतुकाची थाप

UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) निकालात हरियाणातील भाजप नेते कृष्ण ढुल यांचा मुलगा एकांश ढुल याने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 6:29 pm

Maharashtra-Goa State Bar Council Election : राज्य वकील परिषद निवडणूकीत जिल्ह्यातील २५ जण रिंगण्यात; ‘या’दिवशी होणार मतदान

मागील वेळी संपूर्ण २५ जांगासाठी झालेल्या मतदानात जिल्ह्यातील ४ उमेदवार विजयी झाले होते.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 6:22 pm

Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी मोठी घोषणा; ‘मिशन लक्षवेध’अंतर्गत गावागावातून घडणार चॅम्पियन्स!

Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्रातील खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय पदकांच्या शर्यतीत जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी 'मिशन लक्षवेध'चा विस्तार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 6:19 pm

Hawker : पथविक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपाची जागा उपलब्ध करून देणार; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : मुंबईतील पथविक्रेत्यांच्या (हॉकर) प्रश्नासंदर्भात दाखल असलेल्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून उच्च न्यायालयाचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. मात्र हा निर्णय येईपर्यंत २०२४ च्या पात्र यादीप्रमाणे पथविक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपाची जागा (पिचेस) उपलब्ध करून देण्याचे महापालिकेला निर्देश देण्यात येतील अशी माहिती, मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.मुंबई शहरात पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत लक्षवेधी प्रश्न आमदार रईस शेख यांनी उपस्थित केले होते.यावर मंत्री सामंत म्हणाले की, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २०१४ मध्ये हॉकरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या वेळी १,२८,४४३ अर्ज वितरित करण्यात आले होते. त्यापैकी ९९,४३५ अर्ज महानगरपालिकेला प्राप्त झाले असून त्यातील ३२,४१५ पथविक्रेते अधिकृतपणे पात्र ठरले आहेत. हॉकरांच्या प्रश्नावर विविध संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. पथविक्रेत्यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कायमस्वरूपी हॉकर झोन निश्चित होईपर्यंत अनावश्यक निष्कासन करू नये तसेच आवश्यक असल्यास पुनर्वसनाची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले होते.मंत्री डॉ.सामंत म्हणाले की ,पथविक्रेता सर्वेक्षणाला पाच वर्षे पूर्ण झाल्यास नव्याने सर्वेक्षण करून योग्य-अयोग्य ठिकाणांची पडताळणी करावी. मुंबई महानगरपालिकेने केंद्र सरकारच्या पथविक्रेता कायद्यानुसार शहरात हॉकर झोन निश्चित करण्यासाठी नियोजन आराखडा तयार करावा आणि विक्री प्रमाणपत्रांची छाननी करून नवीन प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया राबवावी. दादर परिसरात पहाटे २ ते सकाळी १० वाजेपर्यंत भाजीपाला वाहून आणणाऱ्या ट्रकांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. या संदर्भात मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेने नागरिकांना त्रास होऊ नये तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असेही निर्देश देण्यात आले आहेत.विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर म्हणाले की,२०१४ जी पात्र हॉकर्स यादी अंतिम आहे. या हॉकर्सना रोजगारापासून वंचित ठेवता कामा नये. त्यानुषंगाने पात्र हॉकर्सना तात्पुरत्या स्वरूपाची जागा (पिचेस) देण्यात यावेत.ज्यावेळी कायमस्वरूपी पिचेस देणार आहात त्यावेळी तात्पुरते पिचेस काढून घेवू शकता असे निर्देश त्यांनी दिले.या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य अमिन पटेल,अमित साटम,अस्लम शेख यांनी सहभाग घेतला.

फीड फीडबर्नर 6 Mar 2026 6:10 pm

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी सिंधुरत्न समृद्ध २.० योजना - राज्यात १८ अतिविशाल औद्योगिक केंद्र उभारणार

प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग केंद्र उभारणारमुंबई : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना २.० राबविण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली. त्याशिवाय राज्यात १८ अतिविशाल औद्योगिक केंद्र उभारण्यासह प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग केंद्र उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.सिंधुरत्न समृद्ध योजना ही गेली तीन वर्षे सुरू होती. ती आणखी ३ वर्षासाठी राबविणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोकण विभागातील साकव बांधणी, दुरुस्तीसाठी विशेष कार्यक्रम राबविणार आहोत, असेही ते म्हणाले. त्याशिवाय इन्व्हेस्ट महाराष्ट्र या एकसंध डिजिटल व्यासपीठाची निर्मिती केली जाईल. राज्यात १८ अतिविशाल औद्योगिक केंद्र उभारण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग केंद्र स्थापन केली जाणार असून, यातून ५० लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.राज्यात सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग उपक्रम आयुक्तालय, तसेच सेवा आयुक्तालय असे दोन नवे आयुक्तालय निर्माण केले जाणार आहे. रत्ने आणि आभूषणे धोरणातून १ लाख कोटींची गुंतवणूक आणि ५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट आहे. बांबू विकास प्रकल्पांतर्गत ५० हजार कोटींची गुंतवणूक करून ५ लाख रोजगार निर्मिती करणार आहोत. औष्णिक विद्युत प्रकल्पात ५ ते ७ टक्के बांबू बायोमासच्या वापराचे उद्दिष्ट आहे. जीआयएस, एमआयएस, ब्लॉकचेन, ड्रोन इत्यादीतून बांबू मूल्यसाखळीचा विकास करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.५० अब्ज डॉलर्सचे मिडिया टेक आणि एव्हीजीसी केंद्रगडचिरोली स्टिल हब उभारताना, २ कोटी ६१ लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या माध्यमातून ७० हजार ८९५ रोजगार निर्मिती होणार आहे. त्याशिवाय जैवविविधता संवर्धनासाठी ५ कोटी वृक्षलागवड केली जाणार आहे, असे फडणवीस म्हणाले.- तसेच मुंबई आणि पुण्यात ५० अब्ज डॉलर्सचे मिडिया टेक आणि एव्हीजीसी केंद्र बनविणार, ३० लाखांहून अधिक रोजगार निर्मितीसाठी नवीन ४०० जीसीसी (जागतिक क्षमता केंद्र) तसेच नवउपक्रम शहरांची उभारणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

फीड फीडबर्नर 6 Mar 2026 6:10 pm

Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर.! मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार, काय म्हणाले? पाहा….

अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्र्यांनी 'विकसित महाराष्ट्र २०४७' चे व्हिजन डॉक्युमेंट जाहीर केले. २०२७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 6:02 pm

Maharashtra Health Budget 2026: आता 22 लाखांपर्यंत उपचार मोफत! फडणवीसांची मोठी घोषणा, तुमची चिंता मिटली

Maharashtra Health Budget 2026: महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत उपचारांची संख्या १,३५६ वरून २,३९९ वर नेण्यात येणार आहे. तसेच या योजनेत सहभागी रुग्णालयांची संख्या १,७९२ वरून ४,५३७ पर्यंत वाढविण्यात येईल. नऊ प्रकारच्या अवयव प्रत्यारोपण उपचारांसाठी आता २२ लाख रुपयांपर्यंतचा खर्च राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीतून करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 5:41 pm

Sanju Samson : कोण आहे ती मुलगी? भारत जिंकताच झाली व्हायरल; संजू सॅमसनशी काय आहे संबंध? पाहा VIDEO

Sanju Samson : सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीताच्या वेळी घडलेला एक खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याचा संदर्भ सॅमसन आणि सामन्याशी जोडला जात आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 5:33 pm

अर्थसंकल्पात ‘लाडकी बहीण’ योजनेवर शिक्कामोर्तब; योजना पुढेही...

मुंबई : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विकासकामांसाठी तरतुदी जाहीर केल्या. यावेळी राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.गेल्या काही दिवसांपासून ही योजना सुरू राहणार की बंद होणार, याबाबत विविध चर्चा रंगत होत्या. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी या चर्चांना पूर्णविराम देत योजना पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले.योजनेसाठी निधीची तरतूदमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना पुढेही आर्थिक सहाय्य मिळत राहणार आहे. मात्र या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याबाबत कोणतीही नवीन घोषणा करण्यात आलेली नाही.दरमहा आर्थिक मदतमहायुती सरकारच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेली ही योजना राज्यभरात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा सुमारे १५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.आर्थिक ताणया योजनेमुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर मोठा आर्थिक भार येत असल्याची चर्चा काही काळापासून सुरू होती. काही वेळा हप्ते उशिरा जमा झाल्याच्या घटनांमुळे योजना बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र नव्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर ही योजना पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून, लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे.

फीड फीडबर्नर 6 Mar 2026 5:30 pm

Women’s Day 2026: घर, मुलांचे शिक्षण, निवृत्ती…सगळ्यांसाठी एकच उत्तर! ‘या’ 7 स्मार्ट गुंतवणूक पर्यायांनी बदला तुमचं आर्थिक भविष्य

Women's Day 2026 : ८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, निवृत्ती, मुलांचे शिक्षण, घर खरेदी किंवा आणीबाणीच्या प्रसंगांसाठी महिलांनी कोणत्या ७ दीर्घकालीन गुंतवणूक पर्यायांचा विचार करावा, ते जाणून घेऊया. लक्षात ठेवा, जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तितका चक्रवाढ व्याजाचा (compounding) अधिक फायदा मिळेल.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 5:24 pm

Maharashtra Budget 2026 : शेतकऱ्यांची कर्ज माफी ते अजित दादांचे भव्य स्मारक उभारणार..; मुख्यमंत्र्यांच्या सर्वात मोठ्या घोषणा कोणत्या? वाचा….

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 5:23 pm

महत्त्वाची बातमी..! राज्यात उष्णतेची लाट; ‘या’जिल्ह्यातील शाळा –कॉलेजच्या वेळेत मोठा बदल, वाचा सविस्तर..

School Timings Change : जळगाव जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांच्या वेळेत बदल केला आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 5:16 pm

Maha Budget 2026 : मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला अर्थबळ

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना जाहीर; दरवर्षी १ हजार २४० कोटींची तरतूद करणारजलवाहतुकीचे जाळे ३४० किमीपर्यंत विस्तारणार, नवीन टर्मिनल्ससाठी ६ हजार ६०० कोटींची तरतूदमुंबई : मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास विभागाच्या माध्यमातून अव्वल कामगिरी करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून नवे अर्थबळ दिले. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या धर्तीवर राज्याची 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' जाहीर करीत दरवर्षी १ हजार २४० कोटींची तरतूद करणार असल्याचे स्पष्ट केले. अशी योजना जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत प्रतिवर्षी १ हजार २४० कोटी रुपये देण्यात येतील. राज्यातील २० हजार ५९४ मासेमारांना याचा लाभ होणार आहे. त्याशिवाय सध्याचे १२५ किमी जलमार्गांचे जाळे ३४० किमीपर्यंत विस्तारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. त्यासाठी विद्यमान २१ जलमार्गांवरील २० टर्मिनल्सचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. ११ नवीन जलमार्गांवर २४ नवीन टर्मिनल्स उभारले जातील. त्यासाठी ६ हजार ६०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याशिवाय मुंबईतील रेडिओ क्लब येथील नवीन जेट्टी डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली...................मरीन शिपयार्ड क्लस्टर विकसित करणारराज्यात मरीन शिपयार्ड क्लस्टर विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली. मासेमारांसाठी सातपाटी येथे अत्याधुनिक मत्स्यबंदर उभारण्यासह आसपासच्या ४४ गावांत कौशल्य विकासाचे उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई विकसित केली जाईल. लॉजिस्टीक्स आणि वेअर हाऊसिंगसाठी विकास केंद्रे निर्माण करणार आहोत. वाढवण बंदरामुळे १२ लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

फीड फीडबर्नर 6 Mar 2026 5:10 pm

Maha Budget 2026 : २५ लाख बहिणी होणार लखपती दिदी; महिला वर्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या घोषणा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा वर्ष २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मुख्यमत्री फडणवीस यांनी महिलांच्या कल्याणासाठीही मोठ्या घोषणा केली. लाडकी बहिण योजना पुढे सुरू ठेवण्यासोबतच, त्यांनी लखपती दिदी करण्यासंदर्भात, महिला स्वयंसहाय्यता समूहांसाठी आणि एकल महिलांसाठीही मोठ्या घोषणा केल्या आहेत.२५ लाख बहिणींना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट :अर्थसंकल्पावेळी महिला वर्गाशी संबंधित योजनांसंदर्भात भाष्य करताना, महाराष्ट्र ग्रामिण जीवनोन्नती अभियानांतर्गत आतापर्यंत सुमारे ३७ लाख 'लखपती दिदी' झाल्या आहेत. आता २०२६-२०२७ मध्ये आणखी २५ लाख बहिणींना 'लखपती दिदी' करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लाडकी बहिण' योजनाही पुढे चालू ठेवण्यासंदर्भात भाष्य केले.एकल महिलांच्या कल्याणासाठीही घोषणा :दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकल महिलांच्या कल्याणासाठीही मोठी घोषणा केली आहे. सध्या राज्यांतील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर, त्याचे योग्य विश्लेषण करून, एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आणले जाईल, असे फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारणीस मान्यता :महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या वस्तूंसंदर्भात आणि त्यांच्या विक्रीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या, महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या वस्तू आणि विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यांत १३ जिल्ह्यांमध्ये 'उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारणीस मान्यता देण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 6 Mar 2026 5:10 pm

UPSC Result: यूपीएससी निकालात महाराष्ट्राचे किती उमेदवार? जाणून घ्या सर्वांची नावे

UPSC Result: जाहीर निकालात ३४८ उमेदवारांची शिफारस सध्या तात्पुरत्या स्वरूपात असून २ उमेदवारांचे निकाल रोखून ठेवण्यात आले आहेत. शिफारस केलेल्या उमेदवारांनी केलेल्या आरक्षण दाव्यांची अंतिम पडताळणी संबंधित प्राधिकरणांकडून केली जाणार असल्याचे निकालाच्या अधिसूचनेत नमूद आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 4:54 pm

Jammu and Kashmir : शाळा, कॉलेजला सुट्टी, सर्व परीक्षा रद्द, इंटरनेट बंद.! अशांततेच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर सरकारचा मोठा निर्णय

Jammu and Kashmir : श्रीनगरमधील मध्यवर्ती भाग लाल चौक येथे असलेले ऐतिहासिक घंटा घर परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 4:50 pm

Sakshi Dhoni Video : ‘अगं शांत हो, तो आउट नाहीये’, साक्षीचा ‘तो’उत्साह पाहून धोनीलाही हसू अनावर, VIDEO होतोय व्हायरल

Sakshi Dhoni Video : या हाय-व्होल्टेज सामन्याचा आनंद घेण्यासाठी माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीसोबत व्हीआयपी बॉक्समध्ये उपस्थित होता

दैनिक प्रभात 6 Mar 2026 4:48 pm

UPSC Result: यूपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; अनुज अग्निहोत्री देशात प्रथम, पाहा यादी

UPSC Result: अनुज अग्निहोत्री यांनी ऑल इंडिया रँक १ पटकावत देशभरातील लाखो स्पर्धकांमध्ये बाजी मारली. AIIMS जोधपूरमधून MBBS पूर्ण केलेल्या या डॉक्टरने वैद्यकीय क्षेत्र सोडून नागरी सेवेत घेतलेल्या झेपाने अनेक युवा स्पर्धकांना प्रेरणा दिली आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 4:38 pm

Maha Budget 2026 : ग्रामीण महाराष्ट्राला विकासाची नवी गती; पायाभूत सुविधांसाठी मोठ्या घोषणा

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सादर केलेल्या २०२६–२७ च्या अर्थसंकल्पात ग्रामीण आणि शहरी विकासासाठी महत्त्वाच्या योजनांची घोषणा करण्यात आली. हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावाला आता थेट काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून गावागावांत विकासाला नवी चालना मिळणार आहे.महाराष्ट्राची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद :याशिवाय जलमार्ग आणि सौरऊर्जा क्षेत्रातही सरकारने मोठी उद्दिष्टे ठेवली आहेत. मुंबईतील जलमार्गांचे जाळे ३४० किलोमीटरपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली असून, त्यामुळे दरवर्षी सुमारे ७ कोटी प्रवासी या सेवांचा लाभ घेतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्राची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे. सौरऊर्जा प्रकल्पांसाठी यावर्षी तब्बल २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.२० लाख झोपड्यांच्या पुनर्विकास होणार :शहरी विकासासाठीही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मुंबईत १० लाख परवडणारी घरे बांधण्याचा आणि २० लाख झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मोठा आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील वाढवण परिसरात ‘चौथी मुंबई’ विकसित करण्याची योजनाही जाहीर करण्यात आली आहे.जलमाहिती केंद्र उभारण्याची घोषणा :याशिवाय नाशिकमध्ये राज्य जलमाहिती केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली असून पर्यटनवाढीसाठी दुबई आणि सिंगापूरमध्ये विशेष गुंतवणूक केली जाणार आहे. अनुसूचित जाती आणि जमातींच्या कल्याणासाठी ४४ हजार कोटी रुपयांहून अधिकची तरतूद करण्यात आली आहे.तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली. दिवंगत अजित पवार यांच्या स्मारक उभारणीचाही प्रस्ताव मांडण्यात आल्याने अर्थसंकल्पातील हा मुद्दा विशेष चर्चेत आला आहे.

फीड फीडबर्नर 6 Mar 2026 4:30 pm

Maharashtra Budget 2026 : राज्याचा अर्थसंकल्प सादर; मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा, काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या सविस्तर..

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 4:27 pm

Stock Market Today: शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटी मोठा धक्का; सेन्सेक्स 1079 अंकांनी गडगडला, निफ्टी 24,450 वर बंद

Stock Market Today: आजचे सत्र सुरुवातीपासूनच नकारात्मक राहिले. निफ्टी १०९ अंक घसरून २४,६५६ वर, तर सेन्सेक्स ३५६ अंकांनी खाली येत ७९,६५९ वर उघडला. रुपयाही डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी कमकुवत होऊन ९१.६५ च्या पातळीवर उघडला होता.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 4:24 pm

Maha Budget 2026 : राज्याच्या अर्थसंकल्पातून मुंबईला काय मिळाले ?

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा २०२६ - २७ आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबईच्या विकासासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या.जानेवारी २०२६ मध्ये प्रदीर्घ काळानंतर मुंबई महापालिकेत भारतीय जनता पार्टीचा महापौर झाला. त्यानंतर सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी भरीव तरतुदी आहेत.राज्याच्या २०२६ - २७ च्या अर्थसंकल्पातून मुंबईला काय मिळाले ? मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत १४० अब्ज डॉलर्सवरून ३०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेणार वडाळा येथे १३० एकर जमिनीवर जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब करणार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ठाणे तलासरी मार्गाचे काम २०२७ अखेरपर्यंत पूर्ण होणार अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई विकसित करणार वाढवण जिल्हा, पालघर येथे चौथी मुंबई विकसित करणार, चौथ्या मुंबईत लॉजिस्टिक आणि विकास केंद्रे निर्माण करणार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत मुंबईतील २० लाख घरांच्या पुनर्विकासासाठी तसेच भाडे तत्वावरील घरांसह १० लाख घरे विकसित करण्यासाठी बृहन्मुंबई आराखडा तयार करणार मुंबई महापालिका क्षेत्रात नवी झोपडपट्टी उभी राहणार नाही यासाठी GIS आधारे मॅपिंगचा वापर करून No New Slum Framework विकसित करणार वडाळा ते गेट ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका ११ यासाठी २३ हजार ४८७ कोटी किंमतीचा भूमिगत प्रकल्प उभारणार. या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्विकास प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरी स्थानक आणि वांद्रे टर्मिनसपर्यंत करण्याची योजना मुंबई ते नवी मुंबई विमानतळ जोडणारा मेट्रो ८ यासाठी २२ हजार ८६२ कोटी किंमतीचा प्रकल्प उभारणार पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या गोरेगाव मुलुंड भूयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात ठाणे ते बोरिवली या १८ हजार ८३८ कोटींच्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर, जून २०२८ पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल वांद्रे वरळी सागरी सेतू ते बुलेट ट्रेन स्थानक, वांद्रे कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भूयारी मार्गाने जोडण्यात येईल. अटल सेतू ते मुंबई कोस्टल मार्ग आणि वांद्रे वरळी सागरी मार्ग या रस्त्यावर सिग्नलविरहित वाहतुकीसाठी शिवडी-वरळी उन्नतमार्गाचे काम प्रगतीपथावर, सप्टेंबर २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होईल. अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रूतगती मार्ग जोडणारा १ हजार १०२ कोटी किंमतीचा उन्नत मार्ग फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करणार दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी थेट जोडण्यासाठी छेडा नगर ते आनंद नगर आणि आनंद नगर ते साकेत, ठाणे उन्नत मार्गाचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करणार वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतू या मार्गाचे चारही टप्प्यातील काम प्रगतीपथावर हा प्रकल्प मे २०२८ पर्यंत पूर्ण करणार वर्सोवा -दहिसर-भाईंदर या २२ हजार १६६ कोटी किंमतीच्या किनारी मार्ग प्रकल्प सुरू असून डिसेंबर २०२८ पर्यंत हा मार्ग पूर्ण करणार

फीड फीडबर्नर 6 Mar 2026 4:10 pm

Maha Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामधील महत्वाच्या घोषणा

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज म्हणजेच शुक्रवार ६ मार्च २०२६ रोजी दुपारी दोन वाजल्यापासून विधानसभेत सादर करत आहेत.विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठ्या महत्वाच्या घोषणा केल्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यानुसार आता ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून, या योजनेचे नामकरण 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' असे करण्यात आले आहे.All set to present the Maharashtra Budget 2026–27, outlining the roadmap for the state’s next phase of Viksit Maharashtra. @SunetraA_Pawar @Ashishjaisw3Adv#Maharashtra #Budget4ViksitMaharashtra pic.twitter.com/NxcDhyLrF8— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 6, 2026मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलेल्या महत्वाच्या घोषणा : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच राहणार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना २ लाख पर्यंत चे कर्ज माफ करण्यात आले आहे. मुख्यमंत्री बळीराजा योजना २०२७ मध्येही सुरू राहणार राज्य सरकारकडून ३०० कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील सौर कृषी पंप योजनेची गिनीज बुकात नोंद महाराष्ट्रातील सौर कृषी पंप योजनेची गिनीज बुकात नोंद. मागेल त्याला सौर कृषीपंप योजने अंतर्गत ६ लाखाहून अधिक पंप तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईसाठी अर्थसंकल्पात नियोजन अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई वाढवण परिसरात उभारणार आहे. पाच ज्योतिर्लिंगांचा विकासासाठी तरतूद अजित पवारांचं स्मारक उभारणार यंदाचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित एम्सच्या धर्तीवर महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूरात कार्यन्वित करण्यात येणार साताऱ्यातील दरे गाव परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारणार अहिल्याबाई होळकर यांच्या नावे कर्जमाफी योजना सुरु करणार १२ किल्ले संवर्धनासाठी विशेष निधी देणार कर्करोग, मधुमेह, हृद्यविकार याचे लवकर निदान करण्यासाठी ४५०० कोटीचीं योजना पुढील तीन वर्षाकरिता सिंधुदुर्ग, रत्नागिरीसाठी सिंधुरत्न समृद्धी योजना २.० प्रस्तावित

फीड फीडबर्नर 6 Mar 2026 4:10 pm

Pune News : “माझी पावर वापरून तुमच्या नोकऱ्या घालवतो…”; पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या तरुण-तरुणीवर गुन्हा दाखल

“मी आत्महत्या करून तुमच्या नावांचा उल्लेख करीन” तर युवराज परतानी याने “माझी पावर वापरून तुमच्या नोकऱ्या घालवतो” अशी धमकी दिली.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 4:07 pm

Maharashtra Budget 2026 : अजितदादांच्या विमान अपघातानंतर मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत अजित पवार यांना अर्थसंकल्प समर्पित केला.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 4:01 pm

Sanju Samson statement : “तो नसता तर मी आज इथे उभा नसतो…; फायनलमध्ये पोहोचल्यानंतर संजू सॅमसनचं काळजाला भिडणारं विधान!

Sanju Samson statement : या सामन्यात ८९ धावांची खेळी करणाऱ्या संजू सॅमसनला 'सामनावीर' घोषित करण्यात आले, मात्र त्याने या विजयाचे सर्व श्रेय जसप्रीत बुमराहला दिले आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 3:54 pm

Maharashtra Budget 2026: 4 लाख नोकऱ्या, 295 स्टुडिओ…फडणवीसांची ‘गेम चेंजर’घोषणा; मुंबई-पुणेकरांसाठी मोठी संधी

Maharashtra Budget 2026: महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६ सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अॅनिमेशन आणि गेमिंग क्षेत्राला मोठी चालना देण्याची घोषणा केली.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 3:53 pm

Maharashtra Budget 2026: मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुंबईत मेट्रो, विमानतळ जोडणी आणि किनारी रस्त्याची मोठी घोषणा

Maharashtra Budget 2026: महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६ सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि राज्यभरातील दळणवळण सुधारण्यासाठी अनेक मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा केली.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 3:30 pm

Maha Budget 2026 : बळीराजा सुखावला! पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना थेट दोन लाखांपर्यंत कर्जमाफी

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज म्हणजेच शुक्रवार ६ मार्च २०२६ रोजी दुपारी दोन वाजल्यापासून विधानसभेत सादर करत आहेत. अशातच शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे.विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यानुसार आता ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून, या योजनेचे नामकरण 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' असे करण्यात आले आहे.योजनेचे स्वरूप काय?दोन लाखांपर्यंत कर्जमाफी :ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत होते, अशा पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.नियमित कर्जदारांसाठी आनंदाची बातमीःजे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर आणि नियमितपणे भरत आहेत, अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५०,००० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, शेती व्यवसायाला पुन्हा उभारी मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

फीड फीडबर्नर 6 Mar 2026 3:30 pm

CM Devendra Fadnavis live : लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं गिफ्ट; केली ‘ही’सर्वात मोठी घोषणा…

राज्यातील लाडकी बहीण योजना ही अतिशय लोकप्रिय योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 3:21 pm

Maharashtra Budget 2026-27 : अजितदादांच्या नावे नागरी पुरस्कार ते महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान; वाचा अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2026-27 : राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात १० मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 3:19 pm

मोठी बातमी..! मुख्यमंत्र्यांकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा; कोणाला मिळणार लाभ? वाचा…

Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६: पात्र शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ होणार.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 3:15 pm

Nitin Gadkari: “मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ’ : पेट्रोलियम लॉबीविरोधात नितीन गडकरींची सडकून टीका

Nitin Gadkari: 'मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ', असे म्हणत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलियम लॉबीवर जोरदार टीका करत स्पष्ट शब्दांत इशारा दिला.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 3:10 pm

Maha Budget 2026 : जाणून घ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये आतापर्यंत झालेल्या महत्वाच्या घोषणा

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज म्हणजेच शुक्रवार ६ मार्च २०२६ रोजी दुपारी दोन वाजल्यापासून विधानसभेत सादर करणार आहेत.सलग पाचव्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कायम राहील असा अंदाज असून, चालू आर्थिक वर्षात ७.९ टक्के वाढ अपेक्षित आहे. सन २०२५-२६ च्या पूर्वानुमानानुसार, राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये सन २०२४-२५ च्या तुलनेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित आहे. सन २०२५-२६ मध्ये 'कृषि व संलग्न कार्ये', 'उद्योग' व 'सेवा' या क्षेत्रांच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धिमध्ये अनुक्रमे ३.४ टक्के, ५.७ टक्के व ९.० टक्के वाढ अपेक्षित आहे. पूर्वानुमानानुसार सन २०२५-२६ मध्ये सांकेतिक (चालू किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न ₹ ५१,००,५९७ कोटी अंदाजित असून वास्तविक (सन २०११-१२ च्या स्थिर किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न ₹ २८,८२,६९९ कोटी अंदाजित आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये आतापर्यंत झालेल्या घोषणा : महात्मा फुलेंच्या २०० व्या जयंती निमित्त राज्यात विशेष कार्यक्रम अर्थसंकल्पातून राज्याच्या विकासाची रुपरेखा मांडण्याचा प्रयत्न संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट उभारणार संत गाडगेबाब ग्राम सडक योजना राबवणार चवदार तळ्याच्या शताब्दी वर्षानिमित्त पायाभूत सुविधा उभारणार २०२६-२७ हे वर्ष सामाजिक समता समरसता वर्ष म्हणून साजरे करणार बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष योजना राबवणार अजित पवारांचे स्मारक उभारणार अजित पवारांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्कार देणार यंदाचा अर्थसंकल्प अजित पवारांच्या स्मृतींना समर्पित राज्याला गतिमान करण्यासाठी प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन असे चार टप्पे निश्चित केले आहे. त्यात १६ उपक्षेत्रे निश्चित केली आहेत. २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडविण्याचा मानस शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करणार राज्यातील चारही कृषी विद्यापीठात एआय आणि इन्क्युबेशन सेंटर्स स्थापन करणार मत्स्यव्यवसाय प्रतिवर्षी १ हजार ४०० कोटी भाराच्या मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेला मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेला मान्यता इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार ५० लाख रोजगार निर्मितीसाठी सेवा आणि उद्योग क्षेत्रासाठी आयुक्तालय स्थापन करण्याची घोषणा मुंबई, सिंगापूर आणि दुबईत पर्यटन कक्ष सुरू करणार सह्याद्री खोऱ्यातील वासोटा किल्ल्याजवळ रोप-वे उभारणार

फीड फीडबर्नर 6 Mar 2026 3:10 pm

Yami Gautam : एक ‘लाइक’मुळे झाला राडा.! क्रिती सनॉन आणि यामी गौतम मध्ये नेमकं काय झालं? स्वतः अभिनेत्रीने केला खुलासा…

सोशल मीडियावर कधी-कधी अगदी छोट्या गोष्टीवरूनही मोठा वाद निर्माण होतो. सध्या असाच एक वाद अभिनेत्री क्रिती सनॉन आणि अभिनेत्री यामी गौतम यांच्यात सुरु असल्याचं दिसून येत आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 3:04 pm

Reproductive Health: बदलती जीवनशैली ठरतेय धोकादायक; तरुणांमध्ये वाढतोय प्रजनन विकारांचा धोका

Reproductive Health आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सध्या प्रत्येक सहा दांपत्यांपैकी एका दांपत्याला गर्भधारणेत अडचणी येतात. ही समस्या केवळ महिलांमध्येच नसून पुरुषांमध्येही वाढताना दिसत आहे. हार्मोन्सचे असंतुलन, प्रजनन अवयवांतील समस्या, वाढते वय, काही आजार किंवा चुकीची जीवनशैली यांसारखी अनेक कारणे यामागे असू शकतात.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 2:57 pm

population management policy: तिसरे अपत्य होणाऱ्या दाम्पत्याला मिळणार २५ हजार रु. ; चंद्राबाबू नायडू यांची मोठी घोषणा

population management policy: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी राज्याच्या घटत्या प्रजनन दराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी विधानसभेत लोकसंख्या व्यवस्थापन धोरणाचा प्रस्तावही मांडला आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 2:53 pm

Kalki 2 : सिक्वलमध्ये भूमिका मोठी असणार; अभिनेत्री दिशा पटानीने सांगून टाकलं

Kalki 2 : दुसऱ्या भागात दिशा पटानी हिला जास्त स्क्रिन टाइम मिळणार असल्याचे तिने स्वतः सांगितले आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 2:46 pm

CM Devendra Fadnavis live : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा…पाहा VIDEO

CM Devendra Fadnavis live :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांची विधानसभेत उपस्थिती आहे.

दैनिक प्रभात 6 Mar 2026 2:41 pm