आनंदाची बातमी, पावसाळ्याआधी हे उड्डाणपूल सुरू होणार, मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार
मुंबई : राज्याच्या राजधानीतील वाहतूक कोंडीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबईतील सात उड्डाणपुलांचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. यंदाच्या पावसाळ्याआधी विद्याविहार, सायन आणि गोरेगाव येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले होतील. यामुळे वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. प्रवाशांच्या वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. इंधन वाचणार असल्यामुळे इंधनावरील खर्चातही बचत होणार आहे.मुंबईच्या पूर्व उपनगरांपैकी एक असलेल्या विद्याविहारच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. हा पूल लाल बहादूर शास्त्री मार्ग अर्थात एलबीएस मार्ग आणि चेंबूर मार्ग यांना जोडतो. या उड्डाणपुलामुळे रेल्वे स्थानकावर पोहोचणे प्रवाशांसाठी अधिक सोपे होणार आहे. हा पूल २५ जून २०२६ किंवा त्याआधी पूर्ण होण्याची शक्यता आहे.विद्याविहार प्रमाणेच सायनचा उड्डाणपूल हा महत्त्वाचा आहे. सायनचा उड्डाणपूल मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणार असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. हा पूल १५ जुलै २०२६ किंवा त्याआधी पूर्ण होण्याची शक्यता आहे.महालक्ष्मी रेल्वे स्टेशनजवळ तयार होत असलेला महालक्ष्मी केबल स्टेड पूल हा रेल्वे मार्गावरील अशा प्रकारचा पहिलाच पूल आहे. हा पूल २०२६ च्या दिवाळी पर्यंत मुंबईकरांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे.मुंबईच्या पश्चिम उपनगरांत गोरेगाव ते दिंडोशी दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. हा पूल ३१ मे २०२६ किंवा त्याआधी पूर्ण होण्याची शक्यता आहे.मुंबईच्या वरळी परिसरातील वाहतुकीच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी नेहरू तारांगण येथे नवीन उड्डाणपूल बांधण्याबाबत विचार सुरू आहे. सध्या या प्रस्तावाचा तांत्रिक अभ्यास सुरू आहे. लवकरच या पुलाबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.उड्डाणपुलांमुळे मुंबईतल्या वाहतुकीचा वेग वाढण्यास, इंधनाची पर्यायाने पैशांची बचत होण्यास तसेच वेळ वाचवण्यास मदत होणार आहे.
Tukaram Mundhe Mother Passed Away : IAS तुकाराम मुंढे यांना मातृशोक
ज्येष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे (Tukaram Mundhe Mother Passed Away) यांचे पुण्यात निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे.
LSG vs DC : मैदानात खेळाडूंचा थरार सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमध्ये चाहत्यांमध्ये जोरदार राडा झाला, ज्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
नवी मुंबई : ऐरोली पालिका रुग्णालयाच्या ICU मध्ये शंखनाद अन् पूजा; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ
नवी मुंबई : नियमांची कडक अंमलबजावणी होणे अपेक्षित असलेल्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) चक्क पूजा आणि शंखनाद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील रुग्णालयात हा प्रकार घडला असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा आणि वैद्यकीय प्रोटोकॉलवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महाराष्ट्रात ई वाहनांना चालना देण्यासाठी कोट्यवधींच्या निधीचे वितरण
मुंबई : राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२५ अंतर्गत विविध घटकांना प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.शासकीय निर्णयानुसार, ई-वाहनांच्या मागणीला चालना देण्यासाठी उत्पादक कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्यात आले आहे. यात Bajaj Auto Ltd., Mahindra Electric Mobility Ltd. आणि Euler Motors Pvt. Ltd. यांना तीन चाकी वाहनांसाठी एकूण ₹२.५१ कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, राज्यातील प्रमुख शहरी वाहतूक उपक्रमांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. BEST (मुंबई), नागपूर महानगरपालिका (NMT), पुणे महानगरपालिका (PMPL), कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका (NMMT) आणि ठाणे महानगरपालिका (TMT) या सहा उपक्रमांना मिळून ₹४.५५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. यामुळे शहरांमध्ये सार्वजनिक ई-वाहतूक अधिक सक्षम होणार आहे. याशिवाय, Ather Energy Pvt. Ltd., TVS Motor Co., Chetak Technology आणि इतर कंपन्यांना ई-दुचाकी व ई-तीनचाकी वाहनांसाठी एकूण ₹४.४५ कोटींपेक्षा अधिक प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात येणार आहे. हा निधी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच सन. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी २४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील ई-वाहन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, प्रदूषण कमी करण्यास मदत होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
कॅलिफोर्निया : जर तुम्ही १५-२० वर्षांपूर्वी एखादा ईमेल आयडी बनवला असेल आणि आज तो वापरताना तुम्हाला संकोच वाटत असेल, तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. गुगलने अखेर आपल्या युजर्सची तब्बल २२ वर्षांची मागणी मान्य केली असून, आता युजर्सना त्यांचा मूळ Gmail ID (Email Address) बदलता येणार आहे. गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी सोशल मीडियाद्वारे या ऐतिहासिक बदलाचे संकेत दिले आहेत.नेमकी समस्या काय होती?जीमेलची सुरुवात २००४ मध्ये झाली. तेव्हा अनेक युजर्सनी आवडीने किंवा गंमत म्हणून coolboy123, sweetangel, किंवा rockstar.rahul सारखे ईमेल आयडी तयार केले होते. मात्र, आता कॉर्पोरेट जगात किंवा प्रोफेशनल कामासाठी असे आयडी वापरणे अडथळ्याचे ठरत होते. आतापर्यंत जीमेलमध्ये नाव बदलण्याची सोय होती, पण मूळ ईमेल ॲड्रेस बदलता येत नव्हता. तो बदलायचा असल्यास नवीन अकाऊंट उघडावे लागायचे, ज्यामुळे जुने कॉन्टॅक्ट्स आणि ईमेल्स गमवावे लागत असत.सुंदर पिचाई यांच्या 'X' पोस्ट मध्ये काय ?2004 was a good year, but your Gmail address doesn't need to be stuck in it.To say goodbye to v0t3f0rp3dr02004@gmail.com or mrbrightside416@gmail.com (or whatever you were into at the time), go to your Google Account settings and choose any name available. You'll keep your old…— Sundar Pichai (@sundarpichai) March 31, 2026सुंदर पिचाई यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही युजर्सच्या भावना समजतो. तंत्रज्ञान बदलत आहे आणि त्यासोबत युजर्सची ओळखही बदलणे आवश्यक आहे. लवकरच जीमेल युजर्सना त्यांचे जुने ईमेल्स आणि डेटा न गमावता नवीन ईमेल आयडी निवडता येईल. गुगलने जाहीर केलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे कोट्यवधी युजर्सना आपल्या 'डिजिटल ओळखी'मध्ये बदल करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या बदलाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमची 'प्रोफेशनल इमेज' सुधारणे शक्य होईल. अनेक वर्षांपूर्वी तयार केलेले बालिश किंवा रटाळ ईमेल आयडी आता बदलता येणार असल्यामुळे, नोकरी किंवा व्यवसायासाठी तुम्हाला एक सुटसुटीत आणि गंभीर नाव निवडता येईल. विशेष म्हणजे, हा बदल करताना तुमचा जुना डेटा, गुगल ड्राईव्हमधील महत्त्वाच्या फाईल्स आणि गुगल फोटोजमधील आठवणी पूर्णपणे सुरक्षित राहतील; त्या आपोआप नवीन आयडीवर ट्रान्सफर केल्या जातील. यामुळे नवीन अकाऊंट उघडण्याचा आणि जुना डेटा हलवण्याचा ताण पूर्णपणे संपणार आहे. बँकिंग किंवा सरकारी कामांसाठी वारंवार ईमेल बदलण्याची कटकट आता उरणार नाही. या प्रक्रियेबद्दल बोलायचे झाले तर, गुगलच्या सूत्रांनुसार ही सुविधा अतिशय सोप्या पद्धतीने 'Settings' मधील 'Account Information' विभागात उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये युजर्सना दोन महत्त्वाचे पर्याय मिळण्याची शक्यता आहे: पहिला म्हणजे आपल्या मूळ आयडीला पूर्णपणे 'रिनेम' (Rename) करणे आणि दुसरा म्हणजे एक 'Alias' (टोपणनाव) सेट करणे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, तुम्ही नवीन आयडी स्वीकारला तरी जुन्या ईमेलवर येणारे सर्व मेल्स आपोआप नवीन आयडीवर 'Forward' केले जातील. यामुळे जुन्या ओळखीच्या लोकांनी पाठवलेले महत्त्वाचे मेल्स मिस होण्याची भीती राहणार नाही. थोडक्यात, डेटाची सुरक्षितता आणि वापरकर्त्याची सोय या दोन्ही गोष्टींचा विचार करून गुगलने ही क्रांती घडवून आणली आहे.कधीपासून लागू होणार?सुंदर पिचाई यांच्या घोषणेनंतर, हा बदल टप्प्याटप्प्याने जागतिक स्तरावर रोल-आउट केला जाईल. सुरुवातीला काही 'बीटा' (Beta) युजर्ससाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आणि त्यानंतर सर्व सामान्य युजर्सना याचा लाभ घेता येईल.
New Zealand Signs Defence Pact : न्यूझीलंड-कुक आयलंड्समध्ये ऐतिहासिक संरक्षण करार
न्यूझीलंड आणि कुक आयलंड्स या दोन्ही देशांनी गुरुवारी एका महत्त्वपूर्ण संरक्षण आणि सुरक्षा करारावर (New Zealand Signs Defence Pact) स्वाक्षरी केली.
Pune News : पुण्यातून धक्कादायक घटना.! कंपनीसमोरून लाडक्या ‘नन्या’चे अपहरण
‘नन्या’ हा कंपनीतील कर्मचाऱ्यांचा अत्यंत लाडका व प्रेमळ कुत्रा होता. तो नियमित लसीकरण झालेला असल्याने कोणालाही धोका नव्हता.
Ind vs ZIM : बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर
मुंबई : भारतीय संघ यावर्षी जुलैमध्ये झिम्बाब्वेचा दौरा करणार असून, यजमान संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने बुधवारी (१ एप्रिल) भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याला दुजोरा देत वेळापत्रक जाहीर केले. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात २३ ते २६ जुलै दरम्यान तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. तिन्ही सामने हरारे येथे खेळले जाणार आहेत.भारतीय संघाचे बहुतेक क्रिकेटपटू सध्या आयपीएल २०२६ मध्ये व्यस्त आहेत आणि त्यानंतरही त्यांना विश्रांतीसाठी वेळ मिळणार नाही. लीग संपल्यानंतर संघाला आंतरराष्ट्रीय मालिकांची मालिका खेळावी लागेल. अफगाणिस्तानविरुद्धची मायदेशातील मालिका आणि इंग्लंड आणि आयर्लंडच्या परदेश दौऱ्यानंतर, भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे.गेल्या चार वर्षांतील भारताचा हा झिम्बाब्वेचा तिसरा दौरा असेल. यापूर्वी, संघाने २०२२ मध्ये तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आणि त्यानंतर २०२४ मध्ये पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा केला होता. जुलैमध्ये होणाऱ्या टी-२० मालिकेनंतर काही महिन्यांनी, भारताच्या यजमानपदाखाली दोन्ही देशांमध्ये एकदिवसीय मालिका खेळली जाईल. २००२ नंतर दोन्ही देश भारतात मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल.आयपीएल संपताच, भारतीय संघ मायदेशात खेळल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेची तयारी सुरू करेल. दोन्ही संघ एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळतील. यानंतर, संघ इंग्लंडला जाईल, जिथे ते तीन एकदिवसीय आणि एक टी-२० मालिका खेळतील. या दौऱ्यादरम्यान, भारतीय संघ झिम्बाब्वेला जाण्यापूर्वी एका टी-२० मालिकेसाठी आयर्लंडलाही जाईल.भारताचा झिम्बाब्वे दौरा२३ जुलै, पहिला टी२० सामना, हरारे२५ जुलै, दुसरा टी२० सामना, हरारे२६ जुलै, तिसरा टी२० सामना, हरारे
अवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी कडक भूमिका घेणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : राज्यातील वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मोटार परिवहन विभाग व एसटी महामंडळाची उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सद्यस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली असून, तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले.बैठकीत सादर करण्यात आलेल्या १ महिन्याच्या अहवालानुसार, राज्यात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे निदर्शनास आले. अपेक्षित प्रमाणात कारवाई होत नसल्याची नोंद करण्यात आली असून, त्यामागील प्रमुख कारणे म्हणजे स्थानिक स्तरावर आदेशांची प्रभावी अंमलबजावणी न होणे, तसेच एसटी व आर.टी.ओ. विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले.विशेषतः, एसटीकडून कारवाईसाठी उपलब्ध करून दिलेल्या वाहनांचा काही ठिकाणी गैरवापर होत असल्याचे गंभीर निरीक्षण नोंदविण्यात आले. काही ठिकाणी या वाहनांचा वैयक्तिक वापर केल्याच्या तक्रारीही समोर आल्या. याशिवाय, राज्यातील ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांपैकी केवळ २० कार्यालयांना एसटी कडून आवश्यक वाहन व मनुष्यबळ उपलब्ध असल्याचे आढळून आले.दर १० दिवसांनी कारवाई अहवाल सादर करण्याचे निर्देश असतानाही अनेक ठिकाणी त्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. काही भागांत केवळ दिखाऊ कारवाई होत असल्याची नोंद करण्यात आली असून, आर.टी.ओ. अधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली.यावेळी मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, अवैध वाहतूक रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करणे अत्यावश्यक आहे. एसटीकडून उपलब्ध करून दिलेल्या वाहनांचा वापर केवळ कारवाईसाठीच करण्यात यावा आणि त्याचा कोणताही गैरवापर सहन केला जाणार नाही. तसेच, आर.टी.ओ.च्या सर्व ५९ कार्यालयांना आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी एसटीने तातडीने कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले. प्रत्येक संयुक्त कारवाईचा फोटो व लेखी अहवाल मुख्य कार्यालयात सादर करणे बंधनकारक करण्यात आले असून, निष्क्रिय व जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.याशिवाय, एसटीने बेकायदेशीर मार्ग व वाहनांची माहिती नियमितपणे संकलित करून आर.टी.ओ. विभागास देणे, संगनमत व गैरप्रकारांविरोधात स्वतंत्र चौकशी समिती नेमणे, तसेच GPS व फोटो रिपोर्टिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून कारवाई अधिक पारदर्शक करण्याचे निर्देशही देण्यात आले.ही बैठक राज्यातील अवैध प्रवासी वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.
Raghav Chadha: राघव चड्ढा यांच्यावर पक्षाकडून ‘या’३ कारणांसाठी कारवाई ; आता खासदार करणार?
Raghav Chadha:
Walking Benefits: अर्धा तास चालाल तर, आयुष्यभर निरोगी राहाल!
Walking Benefits दररोज केवळ 30 मिनिटे चालण्याची सवय लावली, तर वेगळा व्यायाम करण्याची गरजही भासत नाही. चालणे हा असा व्यायाम आहे, जो कोणत्याही वयातील व्यक्ती सहज करू शकते. अगदी वयाच्या नव्वदीतही, आपल्या क्षमतेनुसार चालण्याचा व्यायाम सुरू ठेवता येतो.
International Booker Prize : अंतिम सहा पुस्तकांमध्ये स्थान : मानांकनात महिलांचे एकतर्फी वर्चस्व
Pune News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ओसडी असल्याचे भासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, पुणे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Headache Relief: गोळ्या नकोत, घरगुती उपाय करा; डोकेदुखीवर सोपा आणि परिणामकारक मार्ग
Headache Relief डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. अपुरी झोप, ताणतणाव, सायनस, पचनाचे त्रास किंवा शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे डोकेदुखी उद्भवते. त्यामुळे प्रथम कारण ओळखणे आणि त्यावर उपाय करणे गरजेचे आहे.
मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) नुकताच पुतण्याचा लग्नातील डानसमुळे चर्चेत आला होता. हृतिक डान्स आणि अभिनयासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही सतत चर्चेत असतो. त्याच्या आणि सुझान खानच्या (Sussanne Khan) नात्याविषयी कायम चर्चा रंगलेली असते. विशेष म्हणजे दोघांच्या घटस्फोट याविषयी अनेकदा बोललं जातं.१४ वर्षांच्या संसारानंतर ऋतिक आणि सुझान विभक्त झाले होते. मात्र, अजूनही त्यांच्यातील मैत्री कायम आहे. आपल्या मुलांच्या संगोपनासाठी ते कायम एकत्र येताना दिसतात. ऋतिकनं घटस्फोट दिला तेव्हा त्याच्या चाहत्यांसह मनोरंजन विश्वात सगळ्यांनाच धक्का बसला होता. आता जायेद खाननं दोघांच्या घटस्फोटावर खुलासा केला आहे.सुझानचा भाऊ जायेद खाननं नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत दोघांच्या घटस्फोटाचं कारण सांगितलंय. याबाबत बोलताना जायेद म्हणाला एकत्र राहणं त्यांच्या नशिबात लिहिलं नसावं. तर एखादी गोष्ट टिकणार नसते, त्याला ओढून ताणून धरण्याचा प्रयत्न करणं फार वाईट असतं. यामुळे दोन्ही व्यक्तींना त्रास होतो. हे सगळं कशासाठी ? अखेर तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करायचा असतो, त्यांच्या आयुष्याचा तुम्ही भाग असता, तुम्हाला त्यांना लहानाचं मोठं होताना पाहायचं असतं. ऋतिक आणि सुझानच्या नात्यात असंच झालं. आणि दोघांचा उद्देश मुलांवर लक्ष केंद्रित करणं हा बनला.'पुढे जायेद म्हणाला ' जे झालं ते झालं. आता सगळं संपलंय. आता तुम्ही तुमच्या भविष्यावर लक्ष द्या. स्वतःचा आनंद शोधा, असा विचार आमच्या कुटुंबानं केला आहे. आम्ही समाजाच्या दबावाखाली जगणारं कुटुंब नाही. आम्ही काही गोष्टींबाबत खूप जागरूक आणि सुशिक्षित आहोत. अनेकांना असं वागणं विचित्र वाटतं, मला माहित आहे . बरेचजण याबद्दल नाराजी व्यक्त करतात. पण ठीक आहे. आम्हाला त्याची काहीही अडचण नाही.यावेळी जायेद ऋतिकच्या नव्या गर्लफ्रेंड विषयी बोलताना म्हणाला ' दोघांनाही खूप चांगले जोडीदार मिळाले असून सबा खूप चांगली आहे. तर सुजानचा बॉयफ्रेंड अर्सलान माझा धाकट्या भावाप्रमाणे आहे. ज्या परिस्थितीतून या दोघांना जावं लागलं ते मी शब्दात मांडू शकत नाही. ज्या पद्धतीनं त्यांनी ही परिस्थिती हाताळली, आपापल्या आयुष्यात प्रगती केली आणि पुन्हा एकदा प्रेमात पडले त्याबद्दल त्यांचा मला आदर वाटतो. कारण ही गोष्ट सोपी नाही.महत्त्वाचं काय आहे ? तर तुमच्याकडे अशी एखादी व्यक्ती असावी जिच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता. जर ही व्यक्ती खंबीर नसेल तर या जगात वावरणं खूप कठीण आहे. प्रेम हा खूप व्यापक शब्द आहे. ऋतिक आणि सुजानला एकमेकांबद्दल वाटणारा आदर आणि काळजीही प्रेमापेक्षा जास्त अर्थपूर्ण आहे . असं यावेळी बोलताना सुझानचा भाऊ अभिनेता जायेद खाननं स्पष्ट केलं आहे.
The Final Question Teaser : संजय दत्त एका वेगळ्या भूमिकेत! ‘आखरी सवाल’सिनेमाचा दमदार टीझर रिलीज
The Final Question Teaser : आखरी सवाल या सिनेमातून अभिनेता संजय दत्त एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Ladaki Bahin Yojna E Kyc : ई-केवायसी न केल्याने लाडकी बहीण योजनेतील ६८ लाख खाती बंद
मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण योजना’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अनिवार्य ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे सुमारे ६८ लाख खाती बंद करण्यात आली आहेत, ज्यामुळे योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत मोठा बदल दिसून आला आहे.सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एकूण २.४३ कोटी खात्यांपैकी ६८ लाख खाती निर्धारित कालमर्यादेत ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे निष्क्रिय करण्यात आली. यानंतर आता सक्रिय खात्यांची संख्या घटून सुमारे १.७५ कोटींवर आली आहे. मात्र, लाभार्थ्यांना दिलासा देत सरकारने ई-केवायसीची अंतिम तारीख ३१ मार्चवरून वाढवून ३० एप्रिलपर्यंत केली आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, नव्या मुदतीत माहिती अद्ययावत करणाऱ्या लाभार्थ्यांची खाती पुन्हा सक्रिय केली जाऊ शकतात.या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्य सरकार या योजनेसाठी दर महिन्याला सुमारे ३७०० कोटी रुपये खर्च करते. तपासादरम्यान असे समोर आले की अनेक अपात्र व्यक्ती — ज्यामध्ये पुरुष आणि सरकारी कर्मचारी यांचाही समावेश होता — या योजनेचा लाभ घेत होते. याच कारणामुळे सरकारने मोठ्या प्रमाणावर पडताळणी मोहीम राबवली.सरकारचे मत आहे की या निर्णयामुळे योजनेत पारदर्शकता वाढेल आणि बनावट किंवा निष्क्रिय खाती हटवता येतील. ज्या लाभार्थ्यांची खाती बंद झाली आहेत, त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे, जेणेकरून त्यांना योजनेचा लाभ सुरू राहील. ही योजना २०२४ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू करण्यात आली होती आणि राज्यातील महिलांसाठी एक मोठा दिलासा मानली जाते. आता, नवीन ई-केवायसी मुदतीमुळे, किती लाभार्थी या योजनेत पुन्हा सामील होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Saktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाचा आराखडा बदलला; विरोधानंतर मार्ग बदलत आता साताऱ्याचा समावेश
Saktipeeth Highway : सुधारित आराखड्यानुसार आता हा मार्ग १३ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांमधून जाऊन २१ धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत.
Bhabanipur Raodshow:केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघात भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या समर्थनार्थ एक भव्य रोडशो आयोजित केला.
Ramayana Movie Teaser या चित्रपटात अभिनेता रवि दुबे लक्ष्मणची भूमिका साकारणार आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या रवि दुबे यांचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लक्ष्मणसारखा महत्त्वाचा पौराणिक पात्र साकारताना रवि दुबे कसे दिसतील, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
Nitish Kumar's Rajya Sabha Oath:बिहारमधील नितीशकुमार युगाचा आता शेवट होतआहे. नुकतेच, नितीश कुमार यांनी बिहार विधान परिषदेचा राजीनामा दिला.
मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू सौरव गांगुलीच्या जीवनावर आधारित ‘दादा’ या बहुप्रतीक्षित बायोपिक सिनेमाचं चित्रीकरण सुरू झालं आहे. दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांच्या दिग्दर्शनाखाली हा सिनेमा तयार होत असून, या सिनेमात सौरव गांगुलीच्या भूमिकेत अभिनेता 'राजकुमार राव' झळकणार आहे.या सिनेमाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्स या बॅनरखाली होत आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर क्लॅपरबोर्डचा फोटो शेअर करत “लाईट्स, कॅमेरा, क्रिकेट! ‘दादा’चं चित्रिकरण सुरू झालंय,” अशी घोषणा केली आहे.दिग्दर्शक मोटवानेंनीही त्यांच्या सोशल मीडियावर ईडन गार्डन्स इथं सौरव गांगुली स्टँडचा फोटो शेअर करत “आसनस्थ व्हा” असं कॅप्शन दिलं. दरम्यान, राजकुमार राव यांनी “सुरुवात झाली आहे… एकमेवाद्वितीय #दादा” असं म्हणत या प्रवासाची सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे.
Hasan Mushrif : खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sonali Kulkarni : न्यायालयाने अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयानी कोठडी सुनावली आहे.
UPI: यूपीआयचा नवा विक्रम! वर्षभरात ३०८ लाख कोटींचे व्यवहार; तर मार्चमध्ये दररोज १ लाख कोटींची उलाढाल
UPI विशेष म्हणजे मार्च २०२६ महिन्यात यूपीआयने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. या महिन्यात एकूण व्यवहारांची किंमत जवळपास २९.५३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. म्हणजेच ३० लाख कोटींच्या आकड्याला स्पर्श करण्याच्या अगदी जवळ पोहोचले. याच काळात दररोज सरासरी १ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले, जे अत्यंत मोठे प्रमाण आहे.
CJI Surya Kant: पश्चिम बंगालमधील मालदामध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) कामात गुंतलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांवर झालेल्या दगडफेक आणि लाठीचार्जच्या घटनेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे.
BlinkIt : आता मुंबई विमानतळावरही मिळणार ब्लिंकइटची सुविधा
- ब्लिंकइटकडून भारतातील पहिली इन-टर्मिनल क्विक कॉमर्स सेवा सुरूमुंबई : क्विक कॉमर्स कंपनी ब्लिंकइटने विमानतळावर एक अनोखी सेवा सुरू केली आहे. अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्ज लिमिटेड (एएएचएल) च्या भागीदारीत, ब्लिंकइटने महाराष्ट्रातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (सीएसएमआयए) टर्मिनल २ मध्ये भारतातील पहिली इन-टर्मिनल क्विक कॉमर्स सेवा सुरू केली आहे. विमानतळाच्या आत दिली जाणारी ही जगातील पहिलीच अशी सेवा आहे.ब्लिंकइटने सांगितले की, या नवीन सेवेद्वारे टर्मिनल २ मधील प्रवासी फोन चार्जर, पुस्तके, भेटवस्तू, स्नॅक्स आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंसह २५०० हून अधिक उत्पादने ऑर्डर करू शकतात. कंपनीने सांगितले की, जागतिक स्तरावर विमानतळाच्या आत सुरू झालेली ही पहिलीच जलद वितरण सुविधा आहे. प्रवासी ब्लिंकइट ॲपद्वारे गरजेच्या वस्तू ऑर्डर करू शकतात आणि त्या टर्मिनलमधील त्यांच्या ठिकाणी, जसे की बोर्डिंग गेट्स, लाउंज, फूड कोर्ट आणि निवडक पार्टनर आउटलेट्सवर पोहोचवू शकतात.डिलिव्हरीची जबाबदारी स्थानिक कर्मचाऱ्यांवर आहे, ज्यामुळे प्रवासाच्या वेळापत्रकात कोणताही व्यत्यय न आणता एक अखंड आणि सुरक्षित अनुभव मिळतो.कंपनीने सांगितले की, ही सेवा विमानतळावरील खरेदीमध्ये एक नवीन स्तरावरील सुलभता आणि परवडणारी किंमत आणते, ज्यामुळे प्रवाशांना वेळ आणि जागेच्या नेहमीच्या मर्यादांशिवाय अधिक पर्याय मिळतात. याचा अर्थ असा की, प्रवासी आता त्यांच्या फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी काही मिनिटांतच त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू ऑर्डर करू शकतात. घाईत असलेल्या प्रवाशांसाठी, विसरलेला चार्जर, एक हलकासा नाश्ता किंवा पाण्याची बाटलीसुद्धा आता फक्त एका टॅपवर उपलब्ध होऊ शकते.
Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या दोन खासदारांनी डिनर डिप्लोमसिला हजेरी लावल्याने पुन्हा एकदा अॅापरेशन टायगरची चर्चा होत आहे.
Ramayana Teaser Release : हनुमान जयंती निमित्त 'श्री रामा'ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई : हनुमान जयंतीनिमित्त आज म्हणजेच गुरुवार २ एप्रिल २०२६ रोजी नितेश तिवारी दिग्दर्शित, नमित मल्होत्रा यांचं 'रामायण'मधील दोन भागांतील भव्य चित्रपटमालिका असलेल्या, रामाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर 'श्री रामा'ची भूमिका साकारत असून प्राइम फोकस स्टुडिओज निर्मित, आठ वेळा अकादमी पुरस्कार विजेता व्हिज्युअल इफेक्ट्स स्टुडिओ डीएनईजी आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सच्या सहकार्यानं हा चित्रपट साकारला आहे.२ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जयंती निमित्त रामायणचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरद्वारे प्रेक्षकांना रणबीर कपूरचा 'राम' म्हणून पहिला लूक पाहायला मिळाला असून हजारो वर्षांपासून जपली गेलेली ही कथा नव्या रूपात मांडण्यात आली आहे. ही कथा ऐकून जे मोठे झालेत त्यांच्यासाठी ही कथा नव्यानं अनुभवण्याची संधी आहे. तर इतरांसाठी ही पहिल्यांदाच अशा भव्यतेनं रामायण कथा अनुभवण्याची संधी आहे.प्राइम फोकस स्टुडिओज हे जागतिक स्तरावर नाविन्यपूर्ण चित्रपट आणि विविध प्रकारचे कंटेंट निर्माण करणारे स्टुडिओ आहे.मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स ही यश यांनी स्थापन केलेली निर्मिती संस्था आहे, जी नवे आणि प्रभावी कंटेंट निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करते.'राम' हा असा नायक आहे जो, आजच्या काळात क्वचितच पाहायला मिळतो. जो इच्छेपेक्षा कर्तव्याची निवड करतो. योग्य असल्यास सत्तेपासून दूर जातो. आवश्यक ते करतो, जरी त्यासाठी सर्व काही गमवावं लागलं तरी. ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हणून पूजला जाणारा राम आदर्श मानवी आचरणाचे एक प्रतीक आहे. सन्मान, करुणा आणि नैतिक स्पष्टतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राम आहे.रामायणाबद्दल बोलताना दिग्दर्शक नितेश तिवारी म्हणतात, रामायण ची महानता तिच्या भावनिक गाभ्यात आहे. ही फक्त चांगले-वाईट यांच्यातील लढाई नाही, तर निर्णय, परिणाम आणि योग्य गोष्ट करण्याच्या ओझ्याची कथा आहे. रामाचा प्रवास अत्यंत मानवी आहे आणि आम्ही त्याच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे.”रणबीर कपूर रामाच्या भूमिकेबद्दल म्हणतात, “मी रामाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नाही, तर त्याच्याकडून शिकण्यासाठी येथे आहे. त्याच्यातील साधेपणा आणि शुद्धता अत्यंत दुर्मिळ आहे, आणि ते समजून घेण्याचा प्रवास माझ्यासाठी नम्र करणारा अनुभव आहे.”निर्माते नमित मल्होत्रा म्हणतात, “रामाच्या कथेची ताकद त्याने काय जिंकले यात नाही, तर त्याने काय त्यागले यात आहे. तो कर्तव्य, सत्य आणि त्यागाची निवड करतो, म्हणूनच ही कथा हजारो वर्षे टिकून आहे.”नमित मल्होत्रा यांच्या रामायणाचं परिचयरामायण: भाग १ हा जगातील सर्वात प्रसिद्ध महाकाव्यावर आधारित दोन भागांचा भव्य चित्रपट आहे. सृष्टीच्या सुरुवातीपासून त्रिमूर्ती -ब्रह्मा (निर्माता), विष्णू (संरक्षक) आणि शिव (संहारक) - तीन लोकांवर राज्य करतात. जेव्हा विश्व अस्थिरतेकडे झुकते, तेव्हा विष्णू पृथ्वीवर अवतार घेतात, यावेळी राम (रणबीर कपूर). त्याच्या विरोधात उभा आहे रावण (यश) - अत्यंत शक्तिशाली आणि अभिमानी राक्षस राजा. राम, अयोध्येचा प्रिय युवराज, आपल्या पत्नी सीता (साई पल्लवी) आणि भाऊ लक्ष्मण (रवी दुबे) यांच्यासह शांत जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, पण, नियती त्याला वनवासात ढकलते आणि रावणाशी भव्य युद्धाकडे घेऊन जाते.या चित्रपटात भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी महत्वाच्या भूमिकेत झळकणार असून अभिनेत्री साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार असून अभिनेता सनी देओल हनुमानच्या भूमिकेत तर अभिनेता रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात हान्स झिमर आणि ए. आर. रहमान यांचं संगीत असणार आहे.रामायण भाग १ जागतिक स्तरावर दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर भाग २ दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रामायण ही केवळ कथा नसून एक जिवंत सांस्कृतिक शक्ती आहे. रामाच्या अयोध्येला परतण्याचा क्षण दिवाळी म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाचा अंधारावर आणि चांगुलपणाचा वाईटावर विजय दर्शवणारा.रामायणच्या जगभरात ३०० पेक्षा अधिक आवृत्त्या असून अयोध्या हे जगातील सर्वाधिक भेट दिले जाणारे आध्यात्मिक स्थळ बनले आहे. २०२४ मध्ये राम मंदिराचं उद्घाटन सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं ठरलं.
नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावामुळे आणि त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या व्यत्ययाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने एक मोठा दिलासादायक उपाय योजला आहे. सरकारने अनेक अत्यावश्यक पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या आयातीवरील सीमा शुल्क तात्पुरते रद्द केले आहे. हा निर्णय ३० जूनपर्यंत लागू राहील आणि त्याचा उद्योग व ग्राहक या दोघांनाही थेट फायदा होईल.पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. विशेषतः रसायने, खते आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. देशांतर्गत अत्यावश्यक कच्च्या मालाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.कोणत्या उत्पादनांवर सूट मिळाली?सरकारने ज्या पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्क हटवले आहे, त्यांमध्ये मिथेनॉल, निर्जल अमोनिया, टोल्युइन, स्टायरिन, डायक्लोरोमिथेन, विनाइल क्लोराइड मोनोमर, पॉलीब्युटाडाइन, स्टायरिन ब्युटाडाइन आणि असंतृप्त पॉलिस्टर रेझिन्स यांचा समावेश आहे. ही सर्व उत्पादने अनेक उद्योगांसाठी अत्यावश्यक कच्चा माल आहेत. या निर्णयाचा थेट फायदा प्लॅस्टिक, पॅकेजिंग, वस्त्रोद्योग, औषधनिर्माण, ऑटोमोबाईल आणि रासायनिक क्षेत्रांना होईल. या उद्योगांमधील खर्च कमी होईल, ज्यामुळे उत्पादन स्वस्त होईल आणि अंतिम उत्पादनांच्या किमतींवर खालील दिशेने दबाव येईल.सर्वसामान्य लोकांना कसा फायदा होईल?जेव्हा कंपन्यांचा खर्च कमी होतो, तेव्हा त्याचा परिणाम बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या किमतींवरही होतो. याचा अर्थ असा की, प्लास्टिकच्या वस्तू, औषधे, पॅकेजिंग आणि इतर दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होऊ शकतात, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर जागतिक कच्च्या तेलाच्या किमती जवळपास ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळे भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांची चिंता वाढली आहे.वाढत्या किमतींचा सामना करण्यासाठी सरकारने अलीकडेच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १० रुपयांनी कमी केले आहे. डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) वर निर्यात शुल्कही आकारण्यात आले आहे.
ऑपरेशन टायगर? : शिवसेनेच्या मेजवानीला ‘उबाठा’च्या खासदारांची हजेरी
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, बुधवारी रात्री राजधानी दिल्लीत त्या दिशेने घडामोडी घडताना दिसल्या. 'उबाठा' गटाचे दोन खासदार चक्क शिवसेनेच्या मेजवानीत सहभागी झाले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या या स्नेहभोजनाला खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख यांनी लावलेल्या हजेरीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.उबाठाच्या खासदारांना गळाला लावण्यासाठी शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर सुरू असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर या दोन खासदारांनी पक्षीय सीमा ओलांडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या पाहुणचाराचा आस्वाद घेतल्याने मातोश्रीची धाकधूक वाढली आहे. कौटुंबिक स्नेहभोजनासाठी ही भेट असल्याचे दावे केले जात असले तरी, राजकारणात अशा भेटींचे टायमिंग अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी हे स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. या मेजवानीला महायुतीचे खासदार उपस्थित होतेच. मात्र, उबाठा गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.सुप्त अस्वस्थताविधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर उबाठा गटातील काही लोकप्रतिनिधींमध्ये सुप्त अस्वस्थता असल्याची चर्चा आहेत. त्या पार्श्वभूमीवर आष्टीकर आणि देशमुख यांनी थेट शिवसेनेच्या मेजवानीला हजेरी लावल्याने त्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. दिल्लीतील या ‘डीनर डिप्लोमसी’चे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Zee Marathi Serial : लोकप्रिय अभिनेत्याचे १२ वर्षांनी कमबॅक; ‘या’मालिकेतील पहिली झलक समोर
Zee Marathi Serial : अभिनेता ‘सनई चौघडे’ मालिकेत पुन्हा एकदा सत्यजित ही भूमिका साकारणार आहे.
Government On Fertilizer Industry: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Salman Khan Maatrubhumi Release Date या चित्रपटाचे नाव सुरुवातीला ‘बॅटल ऑफ गलवान’ असे ठेवण्यात आले होते. मात्र नंतर ते बदलून ‘मातृभूमी’ असे करण्यात आले. नाव बदलल्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. देशभक्तीवर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना नक्कीच भावेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Pune News : Lotus Landmarks कलादालन फाउंडेशनच्या वतीने रक्तदान व मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न
Pune News : कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालिका स्मिता सत्यप्रभा गिरी तसेच चेअरमन दातार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीसह शिंदे गटातील तितकेच आमदार, म्हणजे 25 -25 आमदार हे भाजपमध्ये जातील'
नालंदा येथील मघडा शीतला माता मंदिरात मंगळवारी २५ हजार भाविक जमण्याची अपेक्षा होती. मंदिराचे पुजारी दिलीप पांडे यांनी २४ तासांसाठी ९० हजार रुपयांना मिथिलेश पांडे यांना मंदिराचे कंत्राट दिले. भाविकांकडून एका दिवसात ३ लाख रुपये कमावण्याचे लक्ष्य होते. यासाठी मंदिराचे बाहेर पडण्याचे दरवाजेही बंद करण्यात आले आणि भाविकांचा जीव धोक्यात घातला गेला. हा खुलासा दैनिक भास्करच्या तपासात झाला आहे. भास्करच्या तपासात वाचा आणि जाणून घ्या की मंदिराच्या आत अचानक असे काय घडले की चेंगराचेंगरी झाली? मंदिराच्या पुजाऱ्यांकडून अशी कोणती चूक झाली, ज्यामुळे ९ लोकांचा जीव गेला. मंगळवारी सकाळी ९:३० वाजता नालंदा येथील शीतला माता मंदिरात चेंगराचेंगरी झाली, ज्यात ८ महिलांसह ९ लोकांचा मृत्यू झाला. चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्यामुळे भाविकांची गर्दी खूप जास्त होती. दैनिक भास्करच्या तपासणीत उघड झाले आहे की मंदिरातील पुजाऱ्यांनी भाविकांकडून 3 लाख रुपये कमावण्याचे लक्ष्य ठेवले होते. यासाठी पुजारी पैसे घेऊन मागच्या दाराने भाविकांना प्रवेश देत होते. गर्दी सतत वाढत होती, पण पुजारी पैसे गोळा करण्यात व्यस्त होते. व्हीआयपी प्रवेशासाठी 500 ते 1000 रुपयांची मागणी सर्वात आधी रिपोर्टर मंदिराच्या त्या ठिकाणी पोहोचला, जिथे चेंगराचेंगरी झाली होती आणि लोकांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळ मंदिर परिसरापासून सुमारे एक फूट खोल होते. रिपोर्टरने प्रत्यक्षदर्शींना भेटून चेंगराचेंगरी कशी सुरू झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित संतोष कुशवाहा यांनी सांगितले की, भाविकांना थांबवण्यासाठी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बांबूने वेढले होते. बांबू नारळाच्या दोरीने बांधले होते. तेथे मंदिराचे स्वयंसेवक अनुज पांडे आणि अवधेश पांडे उभे होते. दोन्ही स्वयंसेवक बांबू बाजूला करून एका वेळी 20-25 भाविकांना गर्भगृहात प्रवेश देत होते. दुसरीकडे, मंदिराच्या मागील दारातून पुजारी 500-1000 रुपये घेऊन व्हीआयपी प्रवेश देत होते. यामुळे मंदिरासमोर लांबच लांब रांग लागत गेली. जेव्हाही स्वयंसेवक बांबू बाजूला करून भाविकांना आत जाऊ देत, तेव्हा रांगेतील इतर लोक धक्काबुक्की करत आत घुसण्याचा प्रयत्न करू लागत होते. जिथे बांबू बांधले होते, ती जागा सुमारे एक फूट खोल होती. याच कारणामुळे धक्काबुक्कीदरम्यान अनेक भाविक तोल जाऊन खाली पडू लागले, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. गर्दीच्या दाबामुळे दोरी तुटली, एकानंतर एक भाविक पडू लागले गर्भगृहात मागच्या दाराने प्रवेश दिल्यामुळे मुख्य रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना बराच वेळ आपल्या पाळीची वाट पाहावी लागत होती. जे भाविक गर्भगृहात पोहोचत होते, त्यांनाही पैसे घेतल्याशिवाय पुजारी पूजा करू देत नव्हते. अशा परिस्थितीत आतून बाहेर पडायलाही जास्त वेळ लागत होता. बाहेर रांगेत उभे असलेले भाविक सतत धक्काबुक्की करून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे बांबूवर सतत दबाव येत होता. वारंवार दबाव आल्याने बांबूला बांधलेली दोरी तुटली. दोरी तुटताच रांगेत उभे असलेले हजारो भाविक एकाच वेळी गर्भगृहाकडे सरकले. यामुळे अनेक महिला असंतुलित होऊन पडल्या. मागून येणारी गर्दी त्यांच्यावर चढत गेली, ज्यामुळे सुमारे दीड डझन महिला आणि पुरुष दबले गेले. इकडे मंदिराच्या दोन्ही बाहेर पडण्याच्या दरवाजांवर (एक्झिट गेट) इतर पुजारी पैसे घेऊन व्हीआयपी प्रवेश देण्यात व्यस्त होते. गर्भगृहाचे दोन्ही दरवाजे बंद होते, ज्यामुळे गर्भगृहात असलेल्या लोकांना बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला नाही. गोंधळात लोक एकमेकांवर पडत गेले. जे खाली दबले गेले, त्यांना उठण्याची संधी मिळाली नाही. रामसूरत सिंह यांनी सांगितले की, मंदिरात गर्दी अनियंत्रित होत होती. याच दरम्यान तेथे उपस्थित स्वयंसेवक भाविकांवर लाठ्या उगारू लागले. यामुळे गर्दी आणखीनच अनियंत्रित झाली आणि लोक एकमेकांवर पडू लागले. मंदिराच्या बाहेर पडण्याच्या दारावरही मोठी गर्दी जमली होती, ज्यामुळे गर्भगृहात असलेले भाविक आतच अडकले होते. तपासादरम्यान हे समोर आले की, मंदिराच्या पुजाऱ्यांनी दोन्ही बाहेर पडण्याचे दरवाजे सामान्य भाविकांसाठी बंद केले होते. यामुळे सामान्य भाविकांची रांग सतत वाढत गेली. ही रांग सुमारे 1 किलोमीटरपर्यंत पोहोचली होती, ज्यात जवळपास 5 हजार लोक आपल्या पाळीची वाट पाहत होते. पैसे न घेता पुजारी पूजाही करू देत नाहीत मंदिरात घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या गुड्डू पासवान यांनी सांगितले, 'प्रवेश तर सोडाच, मंदिरातील पुजारी पैसे न घेता ना पूजा करू देतात, ना देवीचे दर्शन करू देतात. पुजारी प्रत्येक भाविकाकडून पैसे मागत होते, त्यामुळे पुजाऱ्यांशी अनेक भाविकांचा वाद झाला. याच दरम्यान बांबूच्या बाहेर उभ्या असलेल्या लोकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात बांबूची दोरी अचानक तुटली. गर्दीत पुढे उभे असलेले भाविक गर्भगृहाच्या पायऱ्यांवर कोसळले आणि मागून येणारी गर्दीने त्यांना तुडवत पुढे सरकली. गोंधळात गर्दी पांगली, तेव्हा जागोजागी मृतदेह विखुरलेले होते. ते दृश्य अत्यंत भयानक आणि भयावह होते.' स्थानिक रहिवासी पूजा देवी यांचे म्हणणे आहे की, पैसे घेतल्याशिवाय नारळ फोडू दिले जात नाहीत. एक नारळ फोडण्यासाठी 100 रुपये घेतले जातात. नारळ फोडण्यासाठी गर्भगृहात मोठी गर्दी होती. चेंगराचेंगरीबाबत वेगवेगळ्या चर्चा दररोज वेगवेगळे पुजारी पूजा करतात, दर निश्चित आता प्रश्न असा होता की मंदिराचे पुजारी मागच्या दाराने प्रवेश का देत होते आणि पैसे घेतल्याशिवाय पूजा का करत नव्हते. या मुद्द्यावर जेव्हा भास्करने तपास केला तेव्हा असे समजले की मंदिराला दररोज वेगवेगळ्या लोकांना पैशांवर कंत्राट दिले जाते. पुजारी या प्रयत्नात असतात की कंत्राटात लावलेले पैसे एकाच दिवसात वसूल केले जावेत. यामुळेच दररोज वेगवेगळ्या पुजाऱ्यांची पाळी असते. मंगळवारी दिलीप पांडे यांची पूजा करण्याची पाळी होती. जेव्हा दिलीप पांडे यांच्याशी बोलणे झाले, तेव्हा त्यांनी सांगितले की हे मंदिर खूप जुने आहे. गावात सुमारे 60 ब्राह्मण कुटुंबे आहेत, जे या मंदिरात पूजा करतात. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या कुटुंबांची पाळी असते. आधी ही जबाबदारी एकाच कुटुंबाकडे होती, पण जसजसे कुटुंब वाढत गेले, तसतसे आपापसात सहमतीने वेगवेगळ्या दिवसांचे वाटप करण्यात आले. मंदिरासमोर दुकान चालवणाऱ्या अजय यांच्या मते, या पंडितांमध्ये आपापसात बोलीही लागते. जो सर्वात जास्त बोली लावतो, त्याला त्या दिवसाचा अधिकार मिळतो. यानंतर तो अधिक कमाईच्या लालसेपोटी पैसे घेतल्याशिवाय कोणत्याही भाविकाला पूजा करू देत नाही. या प्रकरणाबाबत आम्ही मंदिर प्रशासनाशीही बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यापासून समितीचे लोक फरार आहेत. चेंगराचेंगरीत 8 महिलांच्या मृत्यूचा व्हिडिओ समोर आला इकडे, या चेंगराचेंगरीत 8 महिलांच्या मृत्यूचा व्हिडिओही समोर आला आहे. यात मोठ्या संख्येने महिला जमिनीवर पडलेल्या दिसत आहेत. लोक त्यांना उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी काही लोक भाविकांना पुढे ढकलताना दिसत आहेत. काही महिला बांबूच्या बॅरिकेडिंगला धरून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांच्या ओरडण्याचा आवाज येत आहे. लोक म्हणत आहेत, घाबरू नका, या, हात द्या. घाबरू नका. अरे, तिला आधी वाचवा. मंदिर अध्यक्ष, सचिव-कोषाध्यक्ष यांच्यासह 40 जणांवर FIR दरम्यान, दीपनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी मौसमी कुमारी यांच्या लेखी अर्जावरून मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष यांच्यासह 20 नामनिर्देशित आणि 20 अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेजवरून अज्ञात आरोपींची ओळख पटवत आहेत. घटनेनंतर पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे. आरोप आहे की या लोकांनी बेकायदेशीर वसुली करता यावी यासाठी गर्भगृहाजवळ जाणूनबुजून अडथळा निर्माण केला. गर्दी नियंत्रित करण्याऐवजी भाविकांना मारहाण करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात नामनिर्देशित पुजारी अनुज कुमार पांडे, अवधेश कुमार मिश्रा, विवेकानंद पांडे, निरंजन कुमार पांडे यांना अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपींच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत.
Bitter Gourd: कडू पण गुणकारी! उन्हाळ्यात कारल्याचे ५ जबरदस्त फायदे; वजन कमी ते रक्तशुद्धीपर्यंत लाभ
Bitter Gourd कारले हे पोषक घटकांनी समृद्ध आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, बीटा कॅरोटीन यांसारखे महत्त्वाचे घटक असतात. तसेच आयर्न, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखी खनिजेही यात मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि उष्णतेमुळे वाढलेली शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि प्रशासकीय सुधारणा करणारा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ पासून होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र यांसाठी दोन वेगळे कागदपत्रे सांभाळावी लागणार नाहीत. मंडळाने हे दोन्ही दस्तऐवज एकत्रित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, आता विद्यार्थ्यांना एकच 'कॉम्बो' दस्तऐवज दिले जाणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची धावपळ थांबणार असून, पुढील प्रवेश प्रक्रियेतही मोठी सुलभता येणार आहे. शैक्षणिक कागदपत्रांचे ओझे कमी करण्याच्या दिशेने बोर्डाने उचललेले हे एक स्वागतार्ह पाऊल मानले जात आहे.बोर्डाचा मोठा बदलबोर्डाचे सचिव दीपक माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रावर नावाचा क्रम बदलण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली 'आडनाव प्रथम' ही पद्धत आता बंद होणार आहे. नवीन नियमानुसार, विद्यार्थ्यांच्या नावाचे स्वरूप विद्यार्थ्याचे स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव असं असणार आहे. हा बदल अधिक सुसंगत, स्पष्ट आणि आधुनिक असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. विद्यार्थ्यांची ओळख पटवणे अधिक सोपे व्हावे आणि नावाचा गोंधळ टाळावा, या उद्देशाने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. २०२६ च्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना ही बदललेली नावे आपल्या प्रमाणपत्रावर पाहायला मिळणार आहेत.फोटो आता बदलता येणार!दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रात (Hall Ticket) कोणतीही चूक राहू नये, यासाठी राज्य शिक्षण मंडळाने कडक पावले उचलली आहेत. बोर्डाच्या रेकॉर्डवर किंवा हॉल तिकीटावर विद्यार्थ्याचा फोटो अस्पष्ट असल्यास, तो त्वरित बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. मुख्याध्यापकांना त्यांच्या स्तरावर हे फोटो बदलून ते साक्षांकित (Attested) करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे नाव आणि फोटोंची पडताळणी करण्याचे काम सध्या 'मिशन मोड' वर सुरू असून, मुख्याध्यापकांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश बोर्डाने दिले आहेत. परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांची ओळख पटवताना कोणताही अडथळा येऊ नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.बोर्ड सचिवांचे विद्यार्थ्यांना महत्त्वाचे आवाहनदहावी-बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले हॉल तिकीट (प्रवेशपत्र) अत्यंत बारकाईने तपासावे, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी केले आहे. अंतिम प्रमाणपत्रावर कोणत्याही चुका येऊ नयेत, यासाठी विद्यार्थ्यांनी आत्ताच सतर्क राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हॉल तिकीटावरील नावाचे स्पेलिंग, स्वतःचे नाव, वडिलांचे नाव किंवा फोटो यामध्ये काहीही त्रुटी आढळल्यास, विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता तातडीने आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा. मुख्याध्यापकांच्या माध्यमातून या चुका वेळेत दुरुस्त करून घेता येतील. एकदा का निकाल जाहीर झाला की दुरुस्तीची प्रक्रिया कठीण होते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही पडताळणी 'लास्ट मिनिट' पर्यंत न थांबवता आत्ताच पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.प्रवेश आणि नोकरीची प्रक्रिया होणार जलदबोर्डाच्या गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र एकत्र करण्याच्या निर्णयामुळे केवळ विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला नसून, भविष्यातील प्रशासकीय प्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे. दोन स्वतंत्र कागदपत्रे सांभाळण्याऐवजी आता एकाच दस्तऐवजात सर्व माहिती उपलब्ध होणार असल्याने पडताळणीची (Verification) प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना किंवा नोकरीच्या अर्जावेळी अनेकदा दोन वेगवेगळ्या प्रमाणपत्रांची तपासणी करावी लागत असे. मात्र, आता 'सिंगल डॉक्युमेंट' धोरणामुळे ही पडताळणी अत्यंत वेगाने पूर्ण होईल. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून कागदपत्रे गहाळ होण्याची भीतीही उरणार नाही. डिजीटल युगाशी सुसंगत असा हा बदल शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
चंदीगडमध्ये भाजपच्या पंजाब मुख्यालयाबाहेर बुधवारी (१ एप्रिल) संध्याकाळी ५ वाजता स्फोट झाला. स्फोटानंतर तेथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. भाजप कार्यालयाच्या भिंतीवर ७० ते ८० छऱ्यांसारख्या खुणा झाल्या आहेत. अशातच आता खलिस्तानी दहशतवादी सुखजिंदर सिंग बब्बर याच्याकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. एक पोस्ट करत त्याने याची माहिती दिली.खालिस्तानी दहशतवाद्याच्या पोस्टमध्ये काय?या हल्ल्याची जबाबदारी एका खालिस्तानी दहशतवाद्याने घेतली आहे. त्याच्या वतीने असे लिहिले आहे की – सुखजिंदर सिंग बब्बर १ एप्रिल २०२६ रोजी चंदीगड सेक्टर-३७ मध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्याची जबाबदारी घेतो. आम्ही भारतीय व्यवस्थेला सांगू इच्छितो की, पंजाबमधील शीख तरुणांना संपवण्यासाठी तुम्ही कितीही युक्त्या वापरल्या तरी, दशमेश पित्याचा खालसा पंथ याला सडेतोड उत्तर देईल. पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे- गुरदासपूरमध्ये रणजीत सिंगच्या मारेकऱ्यालाही सोडले जाणार नाही. पंजाबची भूमी खालसाची भूमी आहे. पंजाबमध्ये खलिस्तान बनेल. खलिस्तान जिंदाबाद. खालसा राज्य करेल.नेमकं प्रकरण काय ?चंदिगडच्या सेक्टर ३७ मध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटाची माहिती कळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी १ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी साडेचार - पाचच्या सुमारास चंदिगडच्या सेक्टर ३७ मध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे परिसरात दहशत पसरली. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.पोलिसांकडून नागरिकांना अफवा पसरवू नका असे आवाहन करण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. खबरींचीही मदत घेतली जात आहे.रणजीत सिंग कोण आहे?२२ फेब्रुवारी २०२४ रोजी गुरदासपूरमधील एका गावात एका एएसआय आणि एका होमगार्ड जवानाची हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणात रणजीत सिंग नावाच्या तरुणाला पकडले. पोलिसांनी सांगितले होते की, त्यानेच दोघांची हत्या केली. त्याचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय हँडलर्सशी संबंध आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी रोजी रणजीतला हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त करण्यासाठी नेले जात असताना, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो मारला गेला. कुटुंबाचा आरोप होता की हा बनावट एन्काउंटर आहे. १२ दिवसांपर्यंत कुटुंबाने अंत्यसंस्कार केले नव्हते. या प्रकरणाची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दखल घेतली होती.
Nitish Kumar: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही झेड+ सुरक्षा राहणार; नेमकं कारण काय?
नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही नितीश कुमार यांना 'झेड-प्लस' सुरक्षा मिळत राहील. गृह विभागाच्या विशेष शाखेने याबाबत एक आदेश जारी केला आहे. या आदेशात म्हटले आहे की, नितीश कुमार हे बिहार विशेष सुरक्षा कायदा, २००० अंतर्गत सुरक्षेसाठी पात्र आहेत.१० एनएसजी जवानांसह ५५ सुरक्षा कर्मचारी तैनातबिहार सरकारच्या गृह विभागाने या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत नितीश कुमार येत्या काही दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचाही उल्लेख आहे. या आदेशातून हेही स्पष्ट होते की, नितीश कुमार लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील. त्यांच्या राजीनाम्याच्या प्रसंगी सुरक्षेत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी मजबूत 'झेड-प्लस' श्रेणीची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याअंतर्गत, त्यांच्या परिघीय क्षेत्रात १० पेक्षा जास्त एनएसजी (राष्ट्रीय सुरक्षा रक्षक) कमांडोंसह ५५ सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातील.पोलीस महासंचालकांना लिहिलेले पत्रपोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नितीश कुमार यांना बिहार विशेष सुरक्षा कायदा, २००० अंतर्गत सुरक्षा पुरवण्यात येईल. नितीश कुमार राज्यसभेवर निवडून आले आहेत. नजीकच्या काळात ते बिहार विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राज्यसभेत जातील. अधिसूचनेत म्हटले आहे की, नितीश कुमार यांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर त्यांना 'झेड+' श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला.लवकरच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणारया महिन्याच्या सुरुवातीला राज्यसभेवर निवडून आलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी बिहार विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी बिहार विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या निर्णयानंतर, राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांबाबतच्या चर्चांणा उधाण आले आहे. नितीश कुमार यांचे निकटवर्ती काही काळापासून असे संकेत देत आहेत की, विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे सदस्यपद सोडल्यानंतरही एखादी व्यक्ती सहा महिन्यांपर्यंत मुख्यमंत्रीपदावर राहू शकते, अशा घटनात्मक तरतुदींचा हवाला दिला जात आहे.
Iran-US-Israel War : इराणवर आणखी कठोर हल्ले केले जातील - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात सुरू असलेल्या युद्धाबाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की अमेरिका आपल्या रणनीतिक उद्दिष्टांच्या अत्यंत जवळ पोहोचला असून हे युद्ध लवकरच समाप्त केले जाईल. तसेच, कोणत्याही परिस्थितीत आपल्या सहयोगी देशांना नुकसान होऊ दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.राष्ट्राला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की अमेरिका आणि इस्रायल यांच्या संयुक्त मोहिमेमुळे इराणला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यांनी दावा केला की इराणची नौदल शक्ती जवळपास संपुष्टात आली आहे, त्यांची वायुसेना कमकुवत झाली आहे आणि अनेक मोठे नेते मारले गेले आहेत. तसेच इराणला “पाषाण युगात” पाठवण्याचा इशाराही त्यांनी दिला. या मोहिमेचा उद्देश इराणची लष्करी ताकद संपवणे हा होता आणि तो आता जवळपास पूर्ण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.ट्रम्प यांनी विश्वास व्यक्त केला की अमेरिका लवकरच आपली सर्व उद्दिष्टे साध्य करेल. सध्या अमेरिका या युद्धात पूर्वीपेक्षा अधिक मजबूत स्थितीत असून शत्रू सतत कमकुवत होत असल्याचा दावा त्यांनी केला. येत्या २ ते ३ आठवड्यांत इराणवर आणखी कठोर हल्ले केले जातील आणि मिशन “अतिशय लवकर” पूर्ण होईल, असे त्यांनी म्हटले. तसेच, विशेषतः इस्रायलसह आपल्या सहयोगी देशांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ दिले जाणार नाही, याची त्यांनी पुनरुच्चार केला.ते म्हणाले की चर्चा यशस्वी न झाल्यास अमेरिका इराणमधील वीज प्रकल्प आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करू शकते. याशिवाय त्यांनी इतर देशांना स्ट्रेट ऑफ होर्मुजसारख्या महत्त्वाच्या समुद्री मार्गांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः घेण्याचे आवाहन केले.ट्रम्प यांनी म्हटले की हे युद्ध अमेरिका आणि जगाच्या सुरक्षेसाठी आवश्यक होते. त्यांच्या मते, इराण दीर्घकाळापासून दहशतवादाला पाठिंबा देत असून तो अण्वस्त्र निर्मितीच्या अत्यंत जवळ पोहोचला होता. अमेरिका कोणत्याही परिस्थितीत इराणला अण्वस्त्र मिळवू देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, कूटनीती हा अमेरिकेचा पहिला पर्याय होता; मात्र इराणने सर्व प्रस्ताव नाकारले. तसेच, याआधीच्या हल्ल्यांमध्ये इराणच्या अणुस्थळांना मोठे नुकसान झाल्याचा दावाही त्यांनी केला.ट्रम्प यांनी सांगितले की अलीकडील काळात तेलाच्या किंमती वाढण्यास इराण जबाबदार आहे. त्यांनी आरोप केला की इराणने तेलवाहू जहाजांवर हल्ले करून जागतिक पुरवठ्यावर परिणाम केला आहे.ते पुढे म्हणाले की अमेरिका जगातील सर्वात मोठा तेल आणि वायू उत्पादक देश असून या संकटाला सामोरे जाण्याची त्यांची पूर्ण क्षमता आहे. तसेच त्यांनी सौदी अरेबिया, कतार, यूएई, कुवैत आणि बहरीन यांसारख्या प्रादेशिक सहयोगी देशांचे कौतुकही केले.
Gold Silver Price Today: देशांतर्गत वायदे बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होत आहे.
Adv. Asim Sarode : अॅड. असीम सरोदे यांनी अशोक खरात प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Stock Market : शेअर बाजारात खळबळ ! सेन्सेक्स १४१७ अंकांनी कोसळला ; निफ्टीही लाल रंगात
Stock Market: आज आठवड्याच्या चौथ्या व्यापार दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली.
Chahaava 2 : आता 'या'नव्या भूमिकेत झळकणार विक्की कौशल, 'छावा 2'प्रेक्षकांच्या भेटीला येणार ?
मुंबई : बॉलिवूडमध्ये गाजलेला आणि प्रेक्षकांची मनं जिंकणारा २०२५ मधील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनगाथेवर आधारित असणारा छावा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विक्की कौशल स्टारर 'छावा' सिनेमा आपल्या धमाकेदार यशानंतर पुन्हा एकदा ही जोडी इतिहास घडवण्यासाठी एकत्र येणार असल्याची चर्चा होत आहे.छावा सिनेमानं प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर तब्बल ८०७ कोटींची दमदार कमाई केली. या विक्रमी यशानंतर आता छावा सिनेमाचे निर्माते लवकरच छावा २ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. मराठा साम्राज्यातील आणखी एका महान व्यक्तिमत्त्वाची कथा या पुढील भागात दाखवली जाणार असल्याच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava Movie)चा सिक्वेल बनवण्याच्या तयारीत असून 'छावा'मध्ये संभाजी महाराजांच्या शौर्याची कथा दाखवण्यात आली होती, तर या सिनेमाच्या सीक्वेलमध्ये त्यांचे सुपुत्र 'शाहू महाराज' यांच्या जीवनावर आणि त्यांच्या संघर्षांवर आधारित कथा मांडली जाणार असल्याची माहिती आहे.विक्की कौशलनं या कथेबद्दल विशेष रस दाखवला असून तो पुन्हा एकदा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्यास उत्सुक आहे. सध्या हा प्रोजेक्ट सुरुवातीच्या टप्प्यात असून सर्व काही सुरळीत झालं, तर पुढच्या वर्षी किंवा २०२८ च्या सुरुवातीला या सिनेमाचं शुटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.या नव्या सिनेमाची चर्चा सुरु असली तरी विक्की आणि लक्ष्मण उतेकर सध्या त्यांच्या इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असून लक्ष्मण उतेकर सध्या 'ईथा' या सिनेमाच्या दिग्दर्शनात गुंतले असून त्यात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा पूर्ण केल्यानंतरच ते शाहू महाराजांच्या कथेची तयारी सुरु करणार आहेत.
Indonesia: इंडोनेशियामध्ये भूकंप, त्सुनामीचा इशारा
नवी दिल्ली: पूर्व इंडोनेशियामध्ये गुरुवारी सकाळी मोठा भूकंप झाला, ज्यामुळे भीती पसरली. रिश्टर स्केलवर ७.४ तीव्रतेच्या या शक्तिशाली भूकंपामुळे सर्वत्र घबराट पसरली आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू मोलुक्का समुद्रात सुमारे ३५ किलोमीटर खोलीवर होता. तीव्र भूकंपाच्या धक्क्यांनंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपामुळे मालमत्तेचे आणि जीवितहानीचे किती नुकसान झाले आहे, हे अद्याप समजलेले नाही.धोकादायक त्सुनामी लाटेचा इशाराअमेरिकेच्या त्सुनामी इशारा प्रणालीनुसार, भूकंपानंतर त्सुनामीच्या लाटा शेजारील देशांना धडक देऊ शकतात. पूर्व इंडोनेशियातील टर्नाटे शहराच्या किनाऱ्याजवळ उत्तर मोलुक्का समुद्रात झालेल्या भूकंपानंतर जवळच्या बेटांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. अमेरिकेच्या त्सुनामी इशारा प्रणालीनुसार, भूकंपाच्या केंद्रापासून १ हजार किलोमीटरच्या त्रिज्येतील इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि मलेशियाच्या किनाऱ्यांवर धोकादायक त्सुनामी लाटा धडकण्याची शक्यता आहे.लडाखमधील लेहला भूकंपाचे धक्केगुरुवारी सकाळी लडाख या केंद्रशासित प्रदेशातील लेह परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) आकडेवारीनुसार, आज पहाटे भूकंप झाला.उत्तर दिल्लीत भूकंपाचे धक्केदरम्यान, आज सकाळी राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या उत्तर भागात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, त्याची तीव्रता कमी असल्यामुळे बहुतेक लोकांना तो जाणवला नाही. या भूकंपात कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे समोर आले नाही.
Donald Trump Speech: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला उद्देशून एक महत्त्वपूर्ण भाषण केलं.
Ramayana Teaser Launch या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी करत आहेत, तर निर्मिती नमित मल्होत्रा यांनी केली आहे. टीझर लॉन्चसाठी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. मंच सज्ज होता आणि चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती.
Vidhan Parishad Election 2026 : विधीमंडळाच्या शेवटच्या अधिवेशनात निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप देण्यात आला.
Luthra Brothers : गोवा नाईट क्लब अग्नितांडव प्रकरणी लुथरा बंधूंना जामीन मंजूर
उत्तर गोव्यातील नाईटक्लब आगीच्या दुर्घटनेशी संबंधित प्रकरणात एक मोठे वळण आले आहे. अंजुनाजवळील 'बर्च बाय रोमियो लेन' क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या प्रकरणात क्लब मालक गौरव आणि सौरभ लुथरा यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. म्हापसा येथील जेएमएफसी न्यायालयाने दोन्ही भावांना सशर्त जामीन मंजूर केला असून, त्यामुळे त्यांच्या तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.या प्रकरणात गंभीर निष्काळजीपणाच्या आरोपाखाली लुथरा बंधूंना अटक करण्यात आली होती आणि ते सध्या कोलवाळे मध्यवर्ती कारागृहात होते. न्यायालयाने त्यांना ५०,००० रुपयांच्या जामिनावर आणि काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. पण, जामिनामागील सविस्तर कारण न्यायालयाचा लेखी आदेश जारी झाल्यानंतर स्पष्ट होईल.हे संपूर्ण प्रकरण ६ डिसेंबर २०२५ रोजी आरपोरा येथील एका नाईटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीशी संबंधित आहे. या दुःखद घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला आणि पन्नासहून अधिक जण जखमी झाले होते. ज्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. आगीनंतर, दोन्ही आरोपी थायलंडला पळून गेले आणि १७ डिसेंबर रोजी त्यांना भारतात परत आणण्यात आले. तेव्हापासून त्यांना उत्तर गोव्यातील कोलवाळ तुरुंगात ठेवण्यात आले आहे.तपासात असे उघड झाले की क्लबमध्ये सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. असा आरोप आहे की, क्लब आवश्यक नियमांशिवाय चालवला जात होता आणि बनावट ना हरकत प्रमाणपत्राद्वारे (NOC) परवाना मिळवण्यात आला होता. पोलिसांनी असाही दावा केला आहे की, घटनेनंतर लुथरा बंधू देश सोडून थायलंडला पळून गेले, जिथून त्यांना नंतर भारतात परत आणून अटक करण्यात आली.दोन्ही भावांचा अटकपूर्व जामीन यापूर्वीच फेटाळण्यात आला होता. शिवाय, सत्र न्यायालयाने अलीकडेच बनावट ना हरकत प्रमाणपत्राशी संबंधित एका वेगळ्या प्रकरणात त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आगीच्या दुर्घटनेच्या प्रकरणात त्यांना आता जामीन मंजूर झाला असला तरी, फसवणूक आणि परवाना घोटाळ्याशी संबंधित प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. त्या प्रकरणात लुथरा बंधूंच्या कायदेशीर अडचणी सुरूच असल्याचे दिसते आणि पुढील कार्यवाही सुरू राहील.
मुंबई (विशेष प्रतिनिधी)स्थायी समितीने फेरविचारासाठी पाठवून दिलेला गारगाई पाणी प्रकल्पाला अखेर स्थायी समितीने मंजुरी दिली. या प्रकल्प कामांसाठी आकारला गेलेला जास्त दर आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने स्थायी समितीने अंदाजित दरातच हे काम करण्याची मागणी करत हा प्रस्ताव फेटाळला होता. पण त्यानंतर प्रशासनाने तब्बल ७ टक्के दर कमी करत तसेच सुमारे २६९ कोटी रुपयांची सूट कंत्राटदाराकडून मिळवून घेतली. त्यामुळे महापालिकेची तब्बल कोट्यवधी रुपये वाचवण्यात आले. त्यामुळे स्थायी समितीमध्ये अखेर याप्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे एकप्रकारे महापालिकेत भाजपची आत्ता आल्यानंतर उधळपट्टीला लगाम करत तिजोरीतील होणाऱ्या खर्चाची बचत केली.गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित करत हा प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवल्यानंतर अखेर कंत्राटदार कंपनी वरमली. ज्या कंत्राटदार कंपनीने तीन वेळा वाटाघाटींमध्ये केवळ ५७. ७३ कोटी रुपयांची सूट देत हे काम ९ टक्क्यांमध्ये करण्याची तयारी दर्शवली हाती, तिथे स्थायी समितीच्या मागणीनंतर संबंधित कंत्राटदाराने गारगाई धरणाचे काम १.९० टक्क्यांमध्ये करण्याची तयार दर्शवली आहे. त्यामुळे अखेर पुन्हा एकदा गारगाई धरणाचा सुधारीत प्रस्ताव स्थायी समितीला सादर झाला आहे. फेरविचारानंतर प्रशासनाने पुन्हा सादर केलेल्या या प्रस्तावात महापालिकेच्या निव्वळ कंत्राट रकमेत २६९ कोटी रुपयांनी तर विविध करांसहच्या कंत्राटात ३४४ कोटी रुपयांची बचत झाली आहे. त्यामुळे उबाठाच्या काळात अव्वाच्या सव्वा दरात कंत्राटे मंजूर करून महापालिकेच्या निधीची उधळपट्टी केली जात होती, तिथे भाजप शिवसेना महायुतीच्या काळात कंत्राटदाराला दर कमी करायला लावून कोट्यवधी रुपयांचा निधी वाचवला जात आहे.. याबाबत प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेत आला असता विविध प्रकारची चर्चा करत अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी याला मंजुरी दिली.यावेळी झालेल्या चर्चेत भाजपचे प्रकाश दरेकर यांनी कंत्राट दर कमी करण्यात यश आल्याने स्थायी समिती अध्यक्षांचे अभिनंदन केले. आपल्या यापूर्वीच्या निर्णयामुळे महापालिकेचे सुमारे २७०कोटी रुपयांची बचत झाली असल्याचे सांगत सर्वांचे धन्यवाद मानले. तर मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी भविष्यात या कंपनीला कोणत्याही प्रकारचा फेरफार करता येणार नाही आणि वाढीव खर्चाचा प्रस्ताव सादर केला जावू अशी उपसूचना मांडलीतर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी जर महापालिकेच्या अंदाजित दराशी समतुल्य दर असावा अशी जर आपली मागणी होती, तर अजुनही कंत्राट कंपनीचा दर दोन टक्के जास्त आहे. मग आपल्याला हे मान्य आहे असा सवाल करत कंत्राट कामांबाबत शंका उपस्थित केली. तर भाजपच्या शितल गंभीर यांनी सभागृहनेते गणेश खणकर यांनी मांडलेल्या उपसूचनेनुसार हा प्रस्ताव मागे पाठवल्यानंतर ७ टक्के दर कमी केला आहे. सुमारे २५० कोटी रुपयांची बचत होणार असल्याने स्थायी समिती अध्यक्षांचे अभिनंदन त्यांनी केले. तर उबाठाचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी हा प्रस्ताव दप्तरी दाखल करावा अशी मागणी करत समुद्राचे पाणी गोेडे करणे आणि सांडपाणी पाणी प्रक्रिया केंद्रातून मिळणारे १२००दशलक्ष लिटर अशाप्रकारे पाणी मिळणार असल्याने या प्रकल्पाची गरज काय ? जर वाटाघाटीनंतर ३०० कोटी रुपये जर या कंत्राटदाराने कमी केले असतील तर हे कंत्राट आधीच वाढवून घेण्याचा प्रयत्न झाला असेल अशी शंका उपस्थित करत हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची मागणी केली.याला सभागृहनेते गणेश खणकर यांनी चोख उत्तर देत हा प्रस्ताव जेव्हा मंजुरीला आला होता, तेव्हा जास्त दराने होत्या म्हणून आम्ही तो परत पाठवून लावला.त्यानंतर प्रशासनाने याचे सादरीकरण केल्यानंतर आणि त्यांनी ७ टक्के दर कमी केल्यानंतर कुठेही हा प्रकल्प होणे आवश्यक आहे. त्यामुळे अखेर मनसेचे किल्लेदार आणि उबाठाचे यशोधर फणसे यांची उपसूचना बहुमताच्या जोरावर फेटाळून लावत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी याला मंजुरी दिली. त्यामुळे मुंबईकरांना ४४० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टीकोनातून मार्ग मोकळा झाला आहे.
BMC News : मुंबईतील सर्व ऑक्सिजन प्लांटचे ऑडीट करा; स्थायी समितीने दिले निर्देश
मुंबई (विशेष प्रतिनिधी)कोविड काळात मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये तसेच कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले होते. मात्र, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत भविष्याची ही गरज ओळखून हे प्लांट सुुरु केले असले तरी प्रत्यक्षात प्लांट रुग्णालयात आहेत का असा सवाल करत स्थायी समितीने यापूर्वी बसवलेल्या ऑक्सिजन प्लांटचे ऑडीट करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार स्थायी समितीने प्रशासनाला याबाबतचे निर्देश दिले आहेत.मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयात द्रवरुप मेडिकल ऑक्सिजन वायूचा पुरवठा करण्याचा प्रस्ताव मंजुरीला असता काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी २०२०-२१ पासून ऑक्सिजन वायूचा पुरवठा केला जात असून आतापर्यंत हा पुरवठा सुरु आहे, मग वारंवार या कंपनीला मुदतवाढ का दिली जाते असा सवाल केला. कोविड काळात प्रत्येक ठिकाणी सुमारे ५० कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट उभारले त्याची आजची स्थिती काय आहे. त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी करत आझमी यांनी केली. यावर भाजपच्या शितल गंभीर यांनी सन २०२१ पासून सन २०२५ पर्यंत हे कंत्राट वाढवून देण्यात येत आहे. पण यातील जानेवारी ते मे २०२५ या कालावधीमध्ये केईएम, शीव आणि नायरमध्ये अतिरिक्त पुरवठा करावा लागला. त्यामुळे या अतिरिक्त वापराचे कारण काय याचा खुलासा करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ सईदा खान यांनी कोविड काळात ऑक्सिजन प्लांट होते, त्यांचे काय झाले आणि आज त्यांचे काय झाले अशी विचारणा यासर्व ऑक्सिजन प्लांटचे ऑडीट करण्याची मागणी केली.तर एमआयएमचे जमीर कुरेशी यांनी काही तांत्रिक बाबींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आणि अमेय घोले यांनी रेसकोर्सवरील कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांटचा विषय गंभीर आहे. त्यामुळे याचे ऑडीट व्हायलाच हवे. ऑक्सिजन प्लांटसाठी किती प्रावधान आहेत आणि किती ऑक्सिजन प्लांट आहे, हे सर्व प्रथम समोर यायला हवे असे सांगितले.त्यामुळे सदस्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात यावी असे निर्देश देत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.
Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामुळे दुःख व्यक्त केले जात असून, अपघाताचे नेमके कारण समोर आले आहे.
Divya Dutta : अभिनेत्री दिव्या दत्ताच्या करिअरला वीर झरा या सिनेमाने कलाटणी दिली. त्यानंतर तिला तब्बल 20 सिनेमांच्या अॅाफर्स आल्या होत्या.
मुंबई: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने पुन्हा एकदा विमान भाड्यात वाढ केली आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीनंतर, देशातील तेल विपणन कंपन्यांनी एटीएफच्या (ATF) किमती वाढवल्या आहेत. एटीएफच्या किमतीतील वाढीमुळे, इंडिगोने इंधन अधिभारात (फ्यूल सरचार्ज) सुधारणा करून तो १० हजार रुपयांपर्यंत वाढवला आहे. इंडिगोचा हा नवीन इंधन अधिभार २ एप्रिलपासून बुक केलेल्या प्रत्येक सीटवर लागू होईल. अनुसूचित विमान कंपन्यांसाठी एटीएफच्या किमतीत ८.५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे, तर गैर-अनुसूचित कंपन्यांसाठी या किमतीत सुमारे ११५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.दिल्लीत एटीएफचा दर प्रति किलोलिटर १,०४,९२७ रुपयांपर्यंत वाढलाएटीएफच्या दरात झालेल्या ताज्या वाढीनंतर, दिल्लीतील अनुसूचित विमान कंपन्यांसाठी एटीएफची किंमत ९६ हजार ६३८.१४ रुपयांवरून १ लाख ०४ हजार ९२७ रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. तर, गैर-अनुसूचित विमान कंपन्यांसाठी, दिल्लीत १ किलोलिटर एटीएफची किंमत ९६ हजार ६३८.१४ रुपयांवरून २ लाख ०७ हजार ३४१.२२ रुपये झाली आहे. भारतात एटीएफच्या किमतींनी २ लाख रुपयांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोणत्याही विमान कंपनीसाठी एटीएफच्या किमतीतील अगदी छोटी वाढ देखील खूप महत्त्वपूर्ण असते. विमान कंपनीच्या एकूण खर्चापैकी ४० टक्के खर्च एटीएफवर होतो.इंडिगोच्या प्रवाशांना आता किती इंधन अधिभार भरावा लागेल?इंडिगोने बुधवारी जाहीर केले की, एटीएफच्या दरात झालेल्या वाढीनंतर, देशांतर्गत विमानसेवेसाठी प्रति सीट २७५ ते ९५० रुपयांपर्यंत इंधन अधिभार आकारला जाईल. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी, हा इंधन अधिभार प्रति सीट ९०० ते १०,००० रुपयांपर्यंत असेल. मध्य-पूर्वेत युद्ध सुरू झाल्यानंतर इंडिगोने १४ मार्चपासून इंधन अधिभार आकारण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी, इंडिगोने सर्व देशांतर्गत विमानसेवेसाठी ४२५ रुपयांचा इंधन अधिभार निश्चित केला होता, जो आता अंतरावर अवलंबून २७५ ते ९५० रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, मार्चमध्ये इंडिगोने आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी अंतरावर अवलंबून ४२५ ते २३०० रुपयांपर्यंतच्या इंधन अधिभाराची घोषणा केली होती, जो आता ९०० ते १० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
Assam Assembly Election 2026 : आसाममध्ये भाजप विजयाची हॅट्रिक करणार - पंतप्रधान मोदी
- गोगामुखच्या निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधानांचा दावाआसाममध्ये गेल्या १० वर्षांत भाजपने चांगली विकास कामे केली आहेत. भाजपच्या कार्यकाळात राज्य प्रगतीपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत (Assam Assembly Election 2026) भाजप विजयाची हॅट्रिक करेल असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra MOdi) यांनी केला. राज्यातील गोगामुख येथे बुधवार, १ एप्रिल रोजी निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, मागील दशकात भाजप सरकारने आसाममध्ये ‘सेवा’ आणि ‘सुशासन’ यांचा नवा अध्याय सुरू केला आहे. या काळात २२ लाखांहून अधिक गरीब कुटुंबांना पक्की घरे देण्यात आली आहेत. तसेच, समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आणि आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करण्यावर भर दिला. सुबनसिरी जलविद्युत प्रकल्पामुळे राज्यातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल, असेही त्यांनी सांगितले. आसाममध्ये आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याची क्षमता फक्त भाजप-नेतृत्वाखालील एनडीएकडे आहे. निवडणुकीनंतरची ही त्यांची पहिली सभा असून, मोठ्या प्रमाणात जमलेल्या जनसमुदायावरून भाजपच्या विजयाची खात्री असल्याचे त्यांनी नमूद केले. जनतेच्या आशीर्वादामुळे त्यांना पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. तसेच आसाममध्ये देखील घडेल. इथे देखील भाजप सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पूर्वी सर्वानंद सोनवाल आणि सध्या हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली असममध्ये विकास आणि सुशासनाचा नवा काळ सुरू झाला आहे. पूर्वी काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत होती. परंतु, त्यांनी आसामच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. ब्रह्मपुत्र नदीवर कमी पूल बांधले गेले, तसेच समाजात विभागणी निर्माण केली, असा आरोप मोदींनी केला. काँग्रेसवर ‘कम्युनल व्हायोलन्स’ कायद्याच्या माध्यमातून मतपेटीचे राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. हा कायदा बहुसंख्यांकांवर अन्याय करणारा होता, असे मोदी म्हणाले. आसामला नैसर्गिक संसाधनांची मोठी देणगी मिळाली आहे आणि आता राज्याला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही मोठे स्थान मिळणार आहे. लवकरच असममध्ये सेमीकंडक्टर प्लांट सुरू होईल, ज्यामुळे राज्य आधुनिक तंत्रज्ञानाचे केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच ‘विकसित असम ते विकसित भारत’ हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भाजपला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
Chhaava 2 Film : ‘छावा’चा सिक्वेल येणार? विकी कौशल पुन्हा झळकणार एका महत्त्वाच्या भूमिकेत
Chhaava 2 Film :
Top 10 News :
Late Night Eating: उशीरा जेवणाची सवय ठरते धोकादायक; आयुर्वेद सांगतो आरोग्य बिघडण्यामागचं खरं कारण!
Late Night Eating आयुर्वेदात पचनशक्तीला ‘अग्नी’ असे म्हटले जाते. सूर्य उगवल्यानंतर आणि दिवसभरात ही पचनशक्ती सर्वाधिक सक्रिय असते. त्यामुळे दिवसाच्या वेळेत घेतलेले अन्न सहज पचते. मात्र सूर्यास्तानंतर शरीराची पचनशक्ती कमी होत जाते.
Kangana Ranaut Queen 2: ‘क्वीन 2’मधून कंगना रनौतची ग्रँड एंट्री; नव्या अवतारात आत्मशोधाची नवी गोष्ट!
Kangana Ranaut Queen 2 ‘क्वीन 2’मध्ये मात्र कंगनाचा अंदाज पूर्णपणे वेगळा असणार आहे. या वेळी ती एका मॉडर्न, शहरी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. आत्मविश्वासपूर्ण, स्वतंत्र आणि स्मार्ट असा तिचा स्वभाव असेल. जरी पात्र बदलले असले, तरी कथेमध्ये आत्मशोधाचा धागा कायम ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा भावनिक प्रवास अनुभवायला मिळणार आहे.
Samruddhi Mahamarg Accident : अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येणार.
‘दीड महिन्यापासून मला ‘महाराजा’ शिक्षा दिली जात होती, ज्यात डोक्यावर दीड-दीड तास उभे राहावे लागत असे. एक दिवस मी बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत होतो. तेव्हाच एक जोरदार ठोसा माझ्या डोक्यावर लागला आणि मी खाली पडलो. अधिकाऱ्यांनी ओरडून सांगितले- चेतन, उठ आणि लढ. मी म्हणालो- आता लढू शकणार नाही, सर. पण ते म्हणाले- नाही चेतन, तुला लढावेच लागेल. शेवटी मी इच्छा नसतानाही उठलो आणि प्रशिक्षण पूर्ण केले. सैन्याचे प्रशिक्षण असेच असते. परिस्थिती खूपच बिघडली होती. प्रशिक्षण संपवून परत येत असताना अचानक डोळ्यासमोर अंधार पसरला आणि मी जमिनीवर कोसळलो. त्यानंतर मला काही आठवत नाही. 8 महिने कोमात होतो. जेव्हा शुद्धीवर आलो, तेव्हा स्वतःला रुग्णालयात पाहिले. माझे अर्धे शरीर पक्षाघाताने निकामी झाले होते. त्यानंतर मला नोकरीतून काढून टाकण्यात आले. माझ्यासारखेच प्रशिक्षणादरम्यान जखमी झालेले आतापर्यंत सुमारे 450 लोक सैन्यातून बाहेर काढले गेले आहेत, ज्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.’, चेतन चौधरी सांगतात. 'ब्लॅकबोर्ड' या गडद कथांच्या मालिकेत यावेळी त्या लष्करी जवानांची कथा आहे, ज्यांना प्रशिक्षणादरम्यान दुखापत झाली आणि अवयव निकामी झाल्यामुळे नोकरीतून काढून टाकण्यात आले. चेतन आपल्या कुटुंबासोबत गाझियाबादमध्ये राहतात. सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांचे प्रशिक्षण बिहारमधील पाटणा येथे सुरू होते, जिथे त्यांना डोक्याला दुखापत झाली आणि त्यांचे अर्धे शरीर अर्धांगवायूने ग्रस्त झाले. यानंतर त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले. चार महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले आहे. चेतनला भेटायला मी जेव्हा त्याच्या घरी पोहोचलो, तेव्हा तो म्हणाला, 'सॉरी सर, मी तुमचे नाव विसरलो. तुम्ही येण्यापूर्वी काय नाव सांगितले होते?' संकोच करत 27 वर्षांचा चेतन चौधरी हात मिळवत मला विचारतो. मी पुन्हा नाव सांगतो, तेव्हा तो म्हणतो- अरे, हो आठवले! तुम्ही येण्यापूर्वी काही वेळ आधीपर्यंत मला आठवत होते, पण अचानक विसरलो. डोक्याला दुखापत झाल्यामुळे मी कोमात गेलो होतो. तेव्हापासून माझी शॉर्ट-टर्म मेमरी म्हणजे स्मरणशक्ती कमकुवत झाली आहे. आता काही वेळापूर्वी सांगितलेल्या गोष्टी विसरून जातो.' इतकेच काय, डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे माझ्या डोळ्यांची दृष्टीही कमकुवत झाली आहे. त्यामुळे तुमचा चेहरा कसा आहे, हे मला नीट दिसत नाहीये. तुमच्याशी बोलण्यासाठी मी डोळे फिरवून तुमच्या दिशेने स्थिर केले आहेत, तेव्हा मला तुम्हाला थोडे नीट पाहता येत आहे. पण अजूनही तुमच्या दोन प्रतिमा दिसत आहेत. एका प्रतिमेत तुम्ही समोर बसलेले दिसत आहात, तर दुसऱ्या प्रतिमेत त्याच चित्राच्या अगदी डाव्या बाजूला. खरं तर, आर्मीच्या प्रशिक्षणादरम्यान एका अपघातात मी 8 महिने कोमात होतो. डोक्याला दुखापत झाल्यामुळे शरीराचा उजवा भाग आणि डावा पाय पॅरालाईज्ड झाला. डाव्या पायाने चालता येत नाही. निरुपयोगी झाल्यामुळे मला नोकरीतून काढून टाकण्यात आले. मी विचारले- काय झाले होते, आठवते का? चेतन म्हणतात- मी बिहारमधील गया येथील ओटीए- म्हणजे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत होतो. सुमारे चार महिने झाले होते. 26 एप्रिल 2015 ची गोष्ट आहे. सकाळी सुमारे 8 वाजले होते. त्या दिवशी बॉक्सिंगचे प्रशिक्षण सुरू होते. मी त्यापूर्वी कधीही बॉक्सिंग केली नव्हती. तेव्हा एक ठोसा माझ्या डोक्याच्या डाव्या बाजूला लागला. डोळ्यासमोर अंधार पसरला. मी खाली पडलो. मी अधिकाऱ्यांना सांगितले- आता मी बॉक्सिंग करू शकणार नाही, सर. अधिकारी दबाव टाकत म्हणत होते- ‘चेतन, दिस इज माय ऑर्डर, यू हॅव टू फॉलो’. म्हणजे हा माझा आदेश आहे, तुला तो पाळावा लागेल. मी उठलो आणि कसेतरी प्रशिक्षण पूर्ण केले. यापूर्वी सुमारे दीड महिना मला ‘महाराजा’ शिक्षा दिली जात होती- म्हणजे रोज दीड-दीड तास डोक्यावर उभे राहावे लागत होते. याला प्रशिक्षणाचा सामान्य भाग मानले जाते. बॉक्सिंग संपल्यानंतर मी परत येत असताना अचानक चक्कर आली आणि मी ओरडत जमिनीवर पडलो. सोबत चाललेल्या मित्र हर्षला सांगितले- ‘हर्ष, मी मेलो… काही दिसत नाहीये’. त्यानंतर मला काही आठवत नाही. जेव्हा शुद्धीवर आलो, तेव्हा तीन दिवसांपूर्वीची कोणतीही गोष्ट आठवत नव्हती. इकडे, 27 एप्रिल रोजी घरी फोन आला की तुमच्या मुलाची तब्येत खराब आहे, तुम्ही पटनाला या. तो एका खाजगी रुग्णालयात दाखल आहे. सर्वात आधी माझे आजोबा (आईचे वडील) विमानाने पोहोचले, नंतर आई-वडीलही पोहोचले. मी व्हेंटिलेटरवर होतो. आई माझी अवस्था पाहून जमिनीवर कोसळली. थोड्या वेळाने तिला शुद्ध आली. डॉक्टरांनी सांगितले की, गंभीर दुखापतीमुळे डोक्याच्या एका भागात रक्त गोठले होते, जे ऑपरेशन करून काढण्यात आले आहे. ते म्हणाले - जर गयामध्ये 12 तासांच्या आत ऑपरेशन झाले असते, तर वाचण्याची शक्यता जास्त होती. आता 14 तासांनंतर ऑपरेशन झाले आहे, त्यामुळे 24 ते 48 तासांत शुद्ध आली तर ठीक, नाहीतर तुमचा मुलगा वाचणार नाही. त्यांच्या शरीराचा वरचा उजवा भाग आणि खालचा डावा भाग अर्धांगवायूने ग्रस्त झाला आहे. हे ऐकून कुटुंबासाठी प्रत्येक क्षण काढणे कठीण झाले. मी घरातला एकुलता एक मुलगा होतो. आई तिथे उपस्थित लष्करी अधिकाऱ्यांना म्हणत होती - आम्ही 6 फुटांचा धट्टाकट्टा 17 वर्षांचा मुलगा दिला होता, तुम्ही त्याला अपंग बनवले? आता हा पूर्ण आयुष्य कसे जगणार? सीमेवर शहीद झाला असता, तर तिरंग्यात गुंडाळून घरी आला असता, पण हा तर जिवंतपणीच मेला? सुमारे 2 महिने पटनाच्या त्या रुग्णालयात दाखल होतो. लघवी-शौचालय सर्व बेडवरच करत होतो. पाईपच्या साहाय्याने पातळ अन्न आत टाकले जात होते. त्यानंतर मला दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले, जिथे मी 6 महिने राहिलो. अशा प्रकारे एकूण 8 महिने कोमात राहिलो. ऑक्टोबर महिना होता. मी व्हीलचेअरवर होतो. अचानक मी कोमातून बाहेर आलो. इकडे-तिकडे पाहून, विचार करू लागलो - मी तर अकॅडमीत होतो, इथे हॉस्पिटलमध्ये कसा आलो? जखमी होण्यापूर्वी तीन दिवसांपूर्वीच्या गोष्टीच आठवत होत्या. मला अस्वस्थ पाहून बाबा म्हणाले - बेटा, तुला खूप ताप आला होता. म्हणून इथे आणले आहे, पण मी समजलो होतो - नक्कीच काहीतरी मोठी घटना घडली आहे. नंतर हळूहळू सर्व काही कळले. त्या काळात मला दररोज चार-चार इंजेक्शन दिले जात होते. एका इंजेक्शनची किंमत अडीच लाख होती. तरीही, सर्व पैसे आर्मीच खर्च करत होती. पण 26 ऑक्टोबर 2016 रोजी आर्मीने मला 100 टक्के अपंग मानले. नोकरीतून काढून टाकले. त्याऐवजी 45 हजार रुपये देत होती. त्यावेळी वाटले की - माझ्या जीवाची किंमत फक्त 45 हजार रुपये लावली गेली आहे. त्यानंतर दीड वर्ष अंथरुणावरच होतो. या काळात फक्त 34 किलोचा झालो होतो. हाडांचा सापळा दिसत होतो. आई मला अंथरुणावरच शौच आणि लघवी करायला मदत करत असे. मला लाज वाटायची, पण ती म्हणायची - तू समज की मला 3 वर्षांचा दुसरा मुलगा झाला आहे. मी त्याची शी-शू करत आहे. विचार करा, आई अशीच असते. ती आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी काहीतरी निमित्त शोधून काढते. हे बोलता बोलता चेतनचे डोळे पाणावतात. तो म्हणतो - आई-वडील माझ्यासमोर कधीच रडले नाहीत, पण लपून अनेकदा रडायचे. चेतन आपल्या डोक्याचा डावा भाग दाखवू लागतो, जो ऑपरेशनमुळे नारळाच्या कवचासारखा दोन भागांत दिसत आहे. तो म्हणतो - सैन्यात अधिकारी होण्यासाठी गेलो होतो, पण अपंग होऊन परत आलो. माझ्या चार पिढ्या सैन्यात होत्या. वडीलही सैन्यात होते. लहानपणापासून वर्दी बघत मोठा झालो होतो. वडिलांना वाटत होते की मी डॉक्टर व्हावे, पण माझे स्वप्न सैन्यात जाण्याचे होते. 12वीनंतर SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा फॉर्म भरला आणि माझी निवड झाली होती. मला माहीत नव्हते की अशा प्रकारे मी त्या स्वप्नाला फक्त स्पर्श करून परत येईन. या संवादादरम्यान माझी नजर चेतनच्या ड्रॉईंग रूमच्या भिंतींवर गेली, जिथे त्याच्या वर्दीतील अनेक फोटो दिसले. चेतन म्हणतो, ‘हे फोटो तेव्हाचे आहेत, जेव्हा माझे घरचे आणि सर्वजण मानले होते की मी आता सैन्यात अधिकारी झालो आहे. संपूर्ण कुटुंब आनंदी होते. जेव्हा मी थोडा बरा झालो आणि हॉस्पिटलमधून घरी आलो, तेव्हा झोपून विचार करत होतो - आता आयुष्यात काय उरले आहे? आत्महत्या करून हे सर्व संपवून टाकू का! पण आई-वडिलांचा चेहरा पाहून थांबून जायचो. घरी नातेवाईक मला भेटायला आले की म्हणायचे - सैन्यात भरती झाल्यावर तिथून कोणी बाहेर कसे येऊ शकते? नोकरीतून काढले जाऊ शकत नाही. पण सत्य हे आहे की, प्रशिक्षणादरम्यान अशा प्रकारे मध्येच पॅरालाईज्ड झाल्यास सैन्यात कोणतीही जागा उरत नाही. आम्हाला माशीसारखे काढून फेकले जाते. आता माझी जी अवस्था आहे, त्याला कोणीतरी जबाबदार असेलच. जखमी झाल्यानंतर 12 तासांच्या आत जर माझी शस्त्रक्रिया झाली असती, तर मी कदाचित इतका निरुपयोगी झालो नसतो, असे म्हणताना चेतनचा घसा कोरडा पडू लागतो. समोर ठेवलेली पाण्याची बाटली मी लगेच त्यांच्याकडे सरकवतो. पाणी पिऊन ते म्हणतात- जास्त बोलल्याने घसा कोरडा पडतो. घशाची शस्त्रक्रिया झाली आहे. तुम्हाला मानेत एक छिद्र दिसत असेल. याची नस काम करत नव्हती. इतकंच नाही, अपघातानंतर माझे हातही खूप थरथरत होते. ते माझ्या शरीराचा भागच नाहीत असे वाटत होते. थेरपी आणि व्यायामामुळे खूप सुधारणा झाली, पण डाव्या पायाने अजूनही चालता येत नाही. रोज थेरपी घेतो. गुडघ्यात सपोर्ट सिस्टिम लावतो, तेव्हा या पायाने थोडे चालता येते. सैन्याचा सर्व पैसा माझ्या शरीराच्या उपचारांवर खर्च होत आहे. मी थोडा भाग्यवान आहे की निदान माझी अशी अवस्था तरी आहे, नाहीतर प्रशिक्षणादरम्यान असे लोकही काढले गेले आहेत, ज्यांचे संपूर्ण आयुष्य व्हीलचेअरवर गेले आहे. मी अभ्यासात हुशार होतो, त्यामुळे स्मरणशक्ती कमी झाल्यावरही अभ्यास सुरू केला. दोन वर्षांपूर्वीच माझी संरक्षण मंत्रालयात नोकरी लागली आहे. आता कुठे पैशांची अडचण दूर झाली आहे. पण आजही मी दररोज रात्री सैन्याच्या गणवेशातील हा फोटो पाहतो. या फोटोशी बोलतो की- चेतन, तुला पुन्हा ठीक होऊन असंच दिसायचं आहे. त्यानंतर झोपतो. लग्नात काय अडचणी आल्या? मी तर विचार केला होता की लग्न करणार नाही. जेव्हा अर्धांगवायू झालेला भाग थोडा बरा झाला, नोकरी लागली, तेव्हा काही स्थळे आली. जो कोणी बघायला यायचा, तो लग्नाला नकार द्यायचा. शेवटी माझ्या बहिणीने एक स्थळ निश्चित केले. चेतनला भेटल्यानंतर मी दिल्लीतील नारायणा विहार येथे पोहोचलो. व्यवस्थापनाच्या अभ्यासासाठी कॅटची तयारी करणाऱ्या आशिषकडे. आशिष उत्तर प्रदेशातील मथुरेचा रहिवासी आहे. तो म्हणतो- एप्रिल २०२२ मध्ये मी एनडीएची परीक्षा उत्तीर्ण करून सैन्यात भरती झालो होतो. वडीलही सैन्यात होते. जेव्हा मी नोकरी स्वीकारली, तेव्हा वाटले की आता आयुष्य स्थिर झाले आहे. वडिलांना सांगितले- आता तुम्हाला नोकरी करण्याची गरज नाही. तुम्ही १८ वर्षे नोकरी केली आहे. व्हीआरएस घेऊन आता घरी रहा. माझे ऐकून त्यांनी व्हीआरएस घेतली आणि घरी राहू लागले. पण जुलै 2022 येईपर्यंत सर्व काही बदलले होते. मी पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेत होतो. लष्कर भरती होऊन अवघे 4 महिने झाले होते. त्या दिवशी 10 मीटर पोहण्याचे प्रशिक्षण सुरू होते. मी पाण्यात उडी मारताच. पाण्याच्या दाबामुळे माझ्या उजव्या खांद्याची नस वर सरकली. मी गंभीर जखमी झालो. मला पाण्यातून बाहेर काढून तत्काळ पुण्यातील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी घरचे फोन करायचे, तेव्हा मी म्हणायचो - सर्व ठीक आहे. हलकी दुखापत झाली आहे, लवकर बरा होईन. बरं, तिथे डॉक्टरांनी खांद्याची शस्त्रक्रिया केली. अशा प्रकारे मी ऑक्टोबरपर्यंत अकॅडमीमध्ये राहिलो. एके दिवशी लष्कराच्या लोकांनी सांगितले की मला प्रशिक्षणातून काढले जात आहे. त्यानंतर मी घरच्यांना सांगितले. मी तर नैराश्यात गेलो. मी विचार करत होतो की हे काय झाले. प्रशिक्षणादरम्यान लष्कराचे लोक भले आम्हाला आपले मानत नसतील, पण आम्ही स्वतःला लष्कराचेच माणूस मानतो. पण सत्य हे आहे की प्रशिक्षण पूर्ण केल्याशिवाय कोणीही लष्कराचा नसतो. अशा प्रकारे मला लष्कराच्या नोकरीतून काढून टाकण्यात आले. संपूर्ण घर चिंतेत होते. त्याच काळात गावातील एक मुलगा लेफ्टनंट बनून आला. लोकांनी हार-फुलांनी त्याचे स्वागत केले. त्या दिवशी मला पाहून माझी आई खूप रडली होती. माझा खांदा आता असा झाला आहे की, थोडा जरी जोर पडला तरी तो सरकतो. मी चेंडू फेकू शकत नाही. ना कोणतेही जड काम करू शकतो. आता हे नेहमी असेच राहील. फक्त एका गोष्टीने समाधान मानतो की, चला बाकीचे शरीर तर ठीक आहे ना. अशा प्रकारे आर्मीची स्वप्ने पाहता पाहता माझे 3 वर्षे वाया गेले. तिथून आल्यानंतर 2025 मध्ये दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यासोबतच कॅट परीक्षेची तयारी करत आहे. चेतन आणि आशीषला भेटल्यानंतर मी दिल्लीतील करोल बाग येथे पोहोचलो. येथे यूपीएससीची तयारी करत असलेल्या यश्मित कौशिक यांची भेट झाली. यश्मित हरियाणातील बहादुरगडचे रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वी जेव्हा त्यांच्या गावी येऊन भेटण्याची चर्चा झाली होती, तेव्हा त्यांनी नकार दिला होता. यश्मित म्हणतात, ‘खरं तर, गावात आई-वडिलांसमोर या सर्व गोष्टींबद्दल बोलायचं नव्हतं. माझ्या घरात तर कोणी सैन्यात नव्हतं. वडील शिक्षक होते. मला पायलट व्हायचं होतं, पण कमी दिसत असल्यामुळे मी पायलट होऊ शकलो नाही. ‘लक्ष्य’ सारखे देशभक्तीपर चित्रपट पाहिले होते, तेव्हापासून सैन्यात जाण्याची इच्छा झाली होती. 2021 सालची गोष्ट आहे. मी NDA ची परीक्षा पास केली आणि नोकरीला लागलो. दोन वर्षे झाली. अडीच किलोमीटरच्या एका धावण्याच्या वेळी माझ्या पायाला फ्रॅक्चर झाले. खुब्याला लागून असलेले पायाचे हाड तुटले. सुरुवातीला हेअरलाइन फ्रॅक्चर होते. म्हणजे, हलकीशी तडा गेली होती. मी जास्त लक्ष दिले नाही. मग हळूहळू ती तडा इतकी वाढली की हाड तुटले. मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक महिने मी व्हीलचेअरवर होतो. नंतर मला सैन्यातून काढून टाकण्यात आले. माझे स्वप्न तसेच राहिले. वडील वारंवार समजावतात. काही हरकत नाही, निदान तू तरी सुखरूप आहेस. दुसरे काहीतरी कर. मी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत मोठा झालो होतो. सध्या, मी आता दिल्लीत यूपीएससीची तयारी करत आहे. सध्या सैन्यात जो नियम आहे, त्यानुसार 4 वर्षांच्या प्रशिक्षणादरम्यान जर एखाद्या जवानाचा अवयव गंभीरपणे खराब झाला किंवा त्याचा मृत्यू झाला, तर त्याला नुकसानभरपाई म्हणून काही रुपये देऊन प्रशिक्षणादरम्यानच नोकरीतून काढून टाकले जाते. तो सैन्याचा भाग मानला जात नाही. आणि कोणतीही सुविधा मिळत नाही. अशा प्रकारे आतापर्यंत सुमारे 450 लोकांना बोर्डआउट म्हणजे प्रशिक्षणादरम्यान बाहेर काढण्यात आले आहे. असे अनेक उमेदवार आहेत, जे पूर्णपणे अपंग झाले आहेत. याबाबत प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. तेथे आम्हा सर्वांची मागणी आहे की, आम्हाला सैन्याकडून एकतर माजी सैनिकाचा दर्जा दिला जावा किंवा सैन्यातच कोणतीतरी टेबल जॉब. म्हणजे हलक्या-फुलक्या मेहनतीची नोकरी.
नवी दिल्ली: अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. इराणने बहरीनमधील क्लाउड सेवा पुरवठादार कंपनी ॲमेझॉनच्या डेटा सेंटरवर हल्ला केला आहे. ॲमेझॉनच्या डेटा सेंटरजवळ झालेल्या या स्फोटामुळे कंपनीचे कामकाज विस्कळीत झाले आहे. मध्य-पूर्वेतील युद्धसदृश परिस्थिती पाहता, असा अंदाज वर्तवला जात आहे की, जर इराणने गूगल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲपलसारख्या अमेरिकन टेक कंपन्यांच्या डेटा सेंटर्सना लक्ष्य केले, तर संपूर्ण जगाच्या इंटरनेट सेवेवर परिणाम होऊ शकतो.१८ कंपन्यांच्या डेटा सेंटर्सना लक्ष्यबहरीनने प्रसिद्ध केलेल्या एका एक्स पोस्टमध्ये या हल्ल्याची पुष्टी करण्यात आली. मात्र, त्यात ॲमेझॉनच्या डेटा सेंटरवरील हल्ल्याचा उल्लेख नव्हता. इराणने म्हटले आहे की ते मेटा, गूगल, ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट या अमेरिकन टेक कंपन्यांच्या डेटाबेसवर हल्ला करण्याची तयारी करत आहे. अहवालानुसार, इराण १८ अमेरिकन टेक कंपन्यांच्या डेटा सेंटर्सना लक्ष्य करत आहे. याचा परिणाम जगभरातील इंटरनेट सेवेवर होईल आणि अनेक वेबसाइट्स क्रॅश होतील.लाखो वापरकर्त्यांच्या माहितीवर परिणाम होईल का?एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अनेक वापरकर्त्यांनी असा दावा केला आहे की ॲमेझॉनच्या डेटा सेंटरवर हल्ला झाला आहे. या डेटा सेंटरमध्ये लाखो ॲमेझॉन वापरकर्त्यांचा डेटा आहे, ज्यावर परिणाम होऊ शकतो. ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस जगभरातील अनेक वेबसाइट्सना क्लाउड स्टोरेज पुरवते. त्याच्या डेटा सेंटरवर हल्ला झाल्यास या वेबसाइट्स क्रॅश होऊ शकतात.इराण मध्य पूर्वेतील अमेरिकन कंपन्यांच्या मालकीच्या डेटा सेंटर्स आणि इतर सुविधांचे नुकसान करू शकतो. हल्ला झाल्यास, जगभरातील इंटरनेट सेवा आणि डिजिटल सेवा विस्कळीत होतील. लोकांना पेमेंट करण्यापासून ते सोशल मीडिया वापरण्यापर्यंत, ऑनलाइन उपलब्ध असलेल्या अनेक सेवा वापरता येणार नाहीत.
Ashok Kharat Case : भोंदू बाबा अशोक खरातची केस लढवण्यास सरकारी वकिलाचा नकार
मुंबई : भोंदू बाबा खरात प्रकरणात सरकारी वकील म्हणून कार्य करणारे अजय मिसर यांनी वाढत्या कामाच्या ताणामुळे खरात यांचा खटला लढविण्यास नकार दिला आहे. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणात मिसर यांनी अशी भूमिका का घेतली याबाबत उलट सुलट चर्चा सुरू असून त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का अशी चर्चा सध्या नाशिकच्या प्रशासकीय आणि न्यायालयीन वर्तुळात सुरू आहे.महाराष्ट्राला हादरवणाऱ्या आणि अनेक बड्या राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या भोंदूबाबा अशोक प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. सरकारी वकील अजय मिसर यांनी अशोक खरातविरोधात एसआयटीची केस लढण्यास असमर्थता दाखवली आहे. एसआयटीने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना ही केस चालवण्यासाठी लेखी पत्राद्वारे विनंती केली होती. मात्र सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिला आहे.२०११ मुंबई साखळी बॉम्ब स्फोट खटला, रवी पुजारी प्रकरणातील महाराष्ट्रातील सर्व खटले तसेच अन्य महत्वाच्या खटल्याच्या न्यायालयीन चौकशीच्या कामामुळे या प्रकरणाला वेळ व न्याय देता येणार नसल्याने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. अजय मिसर यांनी नकार दिल्याने सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे हेच युक्तिवाद करणार आहेत.दरम्यान, शिर्डी येथील गुन्ह्याच्या तपासात अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात हिला चौकशीसाठी एसआयटी बोलविण्याच्या तयारीत असताना ती फरार झाली. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यासह पाच जणांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कल्पना खरातला अटक करण्यासाठी एसआयटी पथक खरातच्या घरी पोहोचले. पण, कल्पना खरात फरार झाल्याने पथकाने अशोक खरात याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे.
ही गोष्ट जुलै-ऑगस्ट 1959ची आहे. स्थळ होते दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थान आणि सकाळची वेळ. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, त्यांची मुलगी इंदिरा गांधी आणि जावई फिरोज गांधी नाश्ता करत होते. नेहरू थोडे अस्वस्थ दिसत होते. फिरोज यांच्या चेहऱ्यावरही तणाव होता, पण त्यावेळच्या काँग्रेस अध्यक्षा इंदिरा रागात होत्या. फिरोज यांनी इंदिराजींकडे बोट दाखवत म्हटले- ‘हे अजिबात योग्य नाही. तुम्ही लोकांना घाबरवत आहात. तुम्ही फॅसिस्ट आहात.’ हे ऐकताच इंदिरा संतापल्या. त्या म्हणाल्या- ‘तुम्ही मला फॅसिस्ट म्हणत आहात. मी हे सहन करणार नाही.’ त्या उठून खोलीतून बाहेर निघून गेल्या. या घटनेचा उल्लेख स्वीडिश लेखक आणि पत्रकार बर्टिल फाक यांनी त्यांच्या ‘फिरोज द फॉरगॉटन गांधी’ या पुस्तकात केला आहे. खरं तर, तेव्हा नाश्त्याच्या टेबलावर केरळ, म्हणजे आताच्या केरळममधील राजकीय परिस्थितीवर चर्चा सुरू होती. केरळममधील डाव्या विचारसरणीचे सरकार बरखास्त करण्यात आले होते. फिरोज या निर्णयाच्या विरोधात होते. त्यांना वाटत होते की, इंदिरांनी आपल्या हट्टापायी डाव्या सरकारला बरखास्त केले आहे. हे जगातील कम्युनिस्टांचे पहिले निवडून आलेले सरकार होते आणि आता 67 वर्षांनंतर देशात एकमेव केरळच असे राज्य आहे, जिथे डाव्यांचे सरकार टिकून आहे. पश्चिम बंगालमध्ये सलग 34 वर्षे राज्य करणाऱ्या डाव्या पक्षाचा ना कोणताही खासदार आहे, ना आमदार. त्रिपुरामध्ये 25 वर्षे सत्तेत राहिलेला डावा पक्ष आज मुख्य विरोधी पक्षही राहिलेला नाही. या इलेक्शन एक्सप्लेनरमध्ये आपण जाणून घेऊया की डावे पक्ष केरळमध्येच का टिकून आहेत… भारतात डाव्या पक्षांच्या जन्मापासून सुरुवात करूया… 17 ऑक्टोबर 1920 रोजी उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे अमेरिकन आणि रशियन कम्युनिस्टांनी पहिल्यांदा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) स्थापन करण्याची घोषणा केली. तेव्हा पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटनने मुस्लिमांच्या ऑटोमन साम्राज्याचे तुकडे केले होते. तुर्कस्तानचा खलिफा, म्हणजेच मुस्लिमांची सर्वात मोठी धार्मिक आणि राजकीय सत्ता संपुष्टात आली होती. भारतात खलिफाच्या समर्थनार्थ खिलाफत आंदोलन सुरू होते. जसे सीपीआय (CPI) स्थापन करण्याची घोषणा झाली, तसे खिलाफत आंदोलनाशी संबंधित तरुण मोठ्या संख्येने त्यात सामील झाले. तरीही, भारतीय कम्युनिस्टांचे म्हणणे होते की पक्ष परदेशात स्थापन झाला आहे, त्यामुळे सामान्य लोक त्यात सामील होत नाहीत. परिणामी, 1925 मध्ये कानपूरमध्ये पुन्हा एकदा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI) स्थापन करण्याची घोषणा झाली. लवकरच गरीब आणि मजूर त्यात सामील झाले आणि ब्रिटिशांविरुद्ध निदर्शने सुरू झाली. संतप्त ब्रिटिशांनी 1934 मध्ये यावर बंदी घातली. 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू झाले, पण कम्युनिस्ट त्यात सामील झाले नाहीत. त्या बदल्यात ब्रिटिशांनी कम्युनिस्ट संघटनांवरील बंदी उठवली. खरं तर, तेव्हा दुसऱ्या महायुद्धात कम्युनिस्टांचा गड, म्हणजेच सोव्हिएत संघ, ब्रिटनसोबत मिळून हिटलरशी लढत होता, त्यामुळे कम्युनिस्ट ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन करू इच्छित नव्हते. आता केरळबद्दल… 1956 मध्ये त्रावणकोर, कोचीन आणि मलबार यांना एकत्र करून केरळ हे नवीन राज्य तयार झाले. मार्च 1957 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुका झाल्या. 126 जागांच्या विधानसभेत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच CPI ला 60 जागा मिळाल्या. 5 अपक्षांना सोबत घेऊन त्यांनी सरकार स्थापन केले. हे जगातील डाव्यांचे पहिले निवडून आलेले सरकार होते. ईएमएस नंबुदिरीपाद यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर एका आठवड्यातच दोन मोठे कायदे लागू केले. पहिला- भूमी सुधारणा कायदा आणि दुसरा- शिक्षण सुधारणांशी संबंधित. भूमी सुधारणा कायद्यानंतर बटाईदार शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्याची मुभा मिळाली. जमीन धारण करण्यावर मर्यादा निश्चित करण्यात आली. तर, शिक्षण विधेयकाद्वारे खाजगी संस्थांना नियंत्रित करण्यासाठी कठोर नियम बनवण्यात आले. दोन्ही कायद्यांमुळे सामान्य लोकांचा एक मोठा वर्ग आनंदी होता, परंतु काँग्रेस आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगला ही विधेयके पसंत पडली नाहीत. केरळमधील चर्च आणि नायर समुदाय देखील विरोधात उतरले. दोघांकडे केरळमध्ये सर्वाधिक शाळा आणि धर्मादाय संस्था होत्या. याच दरम्यान केरळमधील शाळा-महाविद्यालयांमधून गांधींचे चित्र हटवून माओ आणि स्टालिन यांची चित्रे लावण्यात येऊ लागली. नंबुदिरीपाद यांचे सरकार स्थापन करण्यासाठी कम्युनिस्ट देशांनी निधी पाठवला आहे, असे म्हटले जाऊ लागले. केरळचे गांधी म्हणून ओळखले जाणारे मन्नथ पिल्लई यांच्या नेतृत्वाखाली लाखो लोक रस्त्यावर उतरले. आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. हजारो लोकांना कारागृहात टाकण्यात आले. याच दरम्यान मासेमारी करणाऱ्या समाजातील एका गर्भवती महिलेचा पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला. आंदोलन आणखी भडकले. जागोजागी हिंसाचार होऊ लागला. इंदिरा गांधींसह काँग्रेसमधील अनेक लोक केरळमधील कम्युनिस्ट सरकार बरखास्त करू इच्छित होते. त्यांच्यासाठी हे आंदोलन एका संधीसारखे होते, पण पंतप्रधान नेहरू असे करण्यास तयार नव्हते. त्यांचे मत होते की निवडून आलेले सरकार बरखास्त केल्याने जगात चांगला संदेश जाणार नाही. 2 फेब्रुवारी 1959 रोजी इंदिरा गांधी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष बनल्या. त्यानंतर त्या केरळला गेल्या. तेथून परतल्यानंतर त्यांनी आपला अहवाल पंतप्रधान नेहरूंना सादर केला. 31 जुलै 1959 रोजी केरळ सरकार बरखास्त करण्यात आले. तेव्हा कम्युनिस्ट वृत्तपत्र न्यू एजने लिहिले होते- ‘जवाहरलाल नेहरू, तुम्हाला इतिहास कधीही माफ करणार नाही.’ 1960 मध्ये केरळमध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. काँग्रेसने इंडियन मुस्लिम लीगसोबत युती केली. फिरोज गांधी इंदिराच्या या निर्णयामुळे खूश नव्हते. त्यांनी काँग्रेस खासदारांच्या एका बैठकीत म्हटले- ‘काँग्रेस कुठे आहे? काँग्रेसची तत्त्वे कुठे आहेत? काँग्रेस इतकी खाली घसरली आहे का की आपण जातीयवादी घटक, जातिवादी नेते आणि लोकांमध्ये धार्मिक भावना भडकवणाऱ्या लोकांच्या इशाऱ्यावर चालू लागलो आहोत?’ तरीही, काँग्रेसने प्रजा सोशालिस्ट पार्टी आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगसोबत युती केली आणि निवडणुकीत 95 जागा जिंकल्या, तर डावे पक्ष 29 जागांवरच मर्यादित राहिले. प्रजा सोशालिस्टचे पी.ए. थानू पिल्लई मुख्यमंत्री बनले, पण दोन वर्षांनंतर काँग्रेसने थानू यांना राज्यपाल बनवून स्वतःचा मुख्यमंत्री नेमला. चीनच्या युद्धानंतर डावे पक्ष दोन गटांमध्ये विभागले गेले 1962 च्या युद्धात कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक नेत्यांना चीनला पाठिंबा दिल्याबद्दल तुरुंगात टाकण्यात आले. त्याच दरम्यान कम्युनिस्ट पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला. चीनच्या धोरणांना पाठिंबा देणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच CPI-M आणि सोव्हिएत संघाला पाठिंबा देणारे CPI कायम राहिले. तरीही, 1967 च्या निवडणुकीत डाव्यांनी पुन्हा सत्तेत पुनरागमन केले. तेव्हा CPI-M ला 52 आणि CPI ला 19 जागा मिळाल्या. CPI-M चे नंबुदिरीपाद दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 1970 आणि 1978 च्या निवडणुकीतही डाव्यांचे सरकार बनले. जानेवारी 1980 मध्ये डाव्यांनी सात पक्षांना एकत्र करून युती केली, ज्याला लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट म्हणजेच LDF असे म्हटले गेले. डाव्यांच्या धर्तीवर काँग्रेसनेही एक युती केली, ज्याला युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट म्हणजेच UDF असे म्हटले गेले. शेवटी डाव्यांचे वर्चस्व केरळमध्येच का टिकून आहे? 5 मोठी कारणे… 1. भूमी सुधार आंदोलन : भूमिहीन शेतकरी आणि मजूर डाव्यांकडे वळले ज्येष्ठ पत्रकार नवीन जोशी सांगतात- ‘डाव्या सरकारने गरीब आणि मजुरांना रेशनऐवजी जमिनीचा तुकडा दिला. कमाईचे साधन दिले. उत्पन्नाच्या साधनांवर भागीदारी दिली. यामुळे त्यांचा कल डाव्या पक्षांकडे वाढला आणि आजही ते त्यांच्याशी जोडलेले आहेत.’ 2. ट्रेड युनियन स्थापन करून डाव्या पक्षाने लाखो मजुरांना मतदार बनवले 3. विचारसरणीऐवजी सत्ता आणि पैशांच्या माध्यमातून राजकीय व्यवस्थापन केरळमचे ज्येष्ठ पत्रकार कैलाश यांच्या मते… ४. मोफत शिक्षण आणि खासगी शाळांनाही सरकारी निधी देणे 5. लेफ्ट आणि काँग्रेसमधील लढाई, तिसरा कोणताही पर्याय नाही राजकीय तज्ज्ञ आणि केरळम विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रोफेसर जयप्रसाद यांच्या मते… केरळमध्ये तिसरा मोर्चा म्हणजेच भाजप न येण्याचे एक कारण 30% लोकसंख्या असलेला मुस्लिम समुदाय देखील आहे. खरं तर, उत्तर भारताप्रमाणे केरळमध्ये मुस्लिम आक्रमक म्हणून आले नाहीत. ते येथे व्यापारी म्हणून आले होते. त्यामुळे येथे उत्तर भारताप्रमाणे हिंदू-मुस्लिम राजकारण होऊ शकत नाही. येथे ध्रुवीकरण करणे कठीण आहे. डाव्या पक्षांसाठी यावेळी निवडणूक कठीण का आहे? 3 मोठी कारणे… 1. लोकसभेनुसार 111 जागांवर UDF आघाडीवर, LDF ला केवळ 18 जागांवर आघाडी 2. स्थानिक निवडणुकांमध्ये डाव्या LDF ला 30-35% पर्यंत नुकसान 3. तिसऱ्या आघाडीच्या रूपात भाजपची वाढती घुसखोरी राजकीय तज्ज्ञ प्राध्यापक जयप्रसाद सांगतात- ‘आता काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे पारंपरिक स्वरूप कमकुवत होत आहे. कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते पक्ष सोडून भाजप आणि काँग्रेसमध्ये जात आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मुस्लिम अल्पसंख्याक काँग्रेसकडे जात आहेत. अशा परिस्थितीत, यावेळची निवडणूक डाव्या पक्षांसाठी खूप मोठे आव्हान ठरणार आहे.’
Property Registration 2026 : आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ४५ लाख ७८ हजार दस्तनोंदणी पूर्ण; गेल्या वर्षाच्या तुलनेत दस्तांच्या संख्येत मोठी वाढ, महसुलात ३ हजार कोटींची भर.
Masap Election 2026 : निवडणूक फेरमतमोजणीचा दावा ठरला खोटा? उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 'परिवर्तन गटा'ची रिट याचिका फेटाळून लावली.
20 जुलै 1969चा दिवस. चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांचा आवाज हेडसेटवर ऐकू आला- ‘हे माणसासाठी एक छोटे पाऊल आहे, पण मानवजातीसाठी एक मोठी झेप आहे.’ 1972 पर्यंत अमेरिकेने आणखी 10 अंतराळवीरांना चंद्रावर पाठवले. नंतर अचानक NASAची चंद्र मोहीम रद्द करण्यात आली. आता सुमारे 5 दशकांनंतर अमेरिका पुन्हा माणसाला चंद्रावर पाठवत आहे. आज NASAच्या आर्टेमिस मिशनचा दुसरा टप्पा लॉन्च होईल, ज्यात 4 अंतराळवीर उड्डाण करतील. मात्र, हे चंद्रावर उतरणार नाहीत, तर फक्त प्रदक्षिणा घालून परत येतील. शेवटी 50 वर्षांनंतर NASA पुन्हा हे मिशन का सुरू करत आहे, यामागे ट्रम्पचा काही मोठा प्लॅन आहे का, जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये… प्रश्न-1: चंद्रावर पुन्हा जाण्याचे आर्टेमिस मिशन काय आहे?उत्तर: अमेरिकन स्पेस एजन्सी NASA चे आर्टेमिस मिशन प्रत्यक्षात 3 टप्प्यांचे मिशन आहे... 'आर्टेमिस-I': या अंतर्गत 2022 मध्ये NASA ने स्पेस लॉन्च सिस्टम म्हणजेच SLS रॉकेटद्वारे एक मानवरहित स्पेसक्राफ्ट 'ओरियन' पाठवले होते. त्याने चंद्राच्या कक्षेत काही उपग्रह सोडले आणि नंतर स्वतः त्याच कक्षेत फिरू लागले. त्याला तिथून आवश्यक माहिती आणि डेटा पाठवायचा होता. 25 दिवस अंतराळात राहिल्यानंतर 'ओरियन' पृथ्वीवर परत आले. 'आर्टेमिस-II': अमेरिकेच्या केनेडी स्पेस सेंटरमधून 1 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:24 वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार 2 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजून 24 मिनिटांनी हे मिशन लॉन्च होईल. या अंतर्गत SLS रॉकेटद्वारे 'ओरियन' स्पेसक्राफ्ट पुन्हा पाठवले गेले. यावेळी यात 4 अंतराळवीर उपस्थित होते. 1972च्या शेवटच्या अपोलो मिशननंतर पहिल्यांदाच अमेरिकन स्पेस एजन्सी NASA अंतराळवीरांसह कोणतेही स्पेसक्राफ्ट चंद्राजवळ पाठवेल. हे एअरक्राफ्ट चंद्रावर उतरणार नाही, परंतु त्याच्या कक्षेत फिरून 10 दिवसांत परत येईल. या आगामी मिशन अंतर्गत अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्यासाठी आवश्यक डेटा आणि माहिती गोळा केली जाईल. म्हणजेच हे आगामी लँडिंग मिशनच्या तयारीचे मिशन आहे. 'आर्टेमिस-III': या मिशन अंतर्गत 2028 मध्ये 4 अंतराळवीर चंद्राच्या जमिनीवर उतरतील. हे अंतराळवीर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून तेथे पाणी आणि बर्फ शोधून त्यासंबंधी संशोधन करतील. खरं तर, आर्टेमिस-II स्पेसक्राफ्ट चंद्राच्या फार साइड म्हणजेच चंद्रापासून 6,500 किमी दूर त्याच्या कक्षेतील सर्वात दूरच्या बिंदूपर्यंत जाईल. यावेळी स्पेसक्राफ्ट पृथ्वीपासून सुमारे 4.5 लाख किमी दूर असेल. यापूर्वी कधीही कोणताही अंतराळ यात्री स्पेसमध्ये पृथ्वीपासून इतका दूर गेला नाही. म्हणजेच हा 1972 च्या ‘अपोलो 17’ मिशननंतरचा नवा विक्रम असेल… प्रश्न-2: जेव्हा 12 अंतराळवीरांना चंद्रावर पाठवले आहे, तर मग अमेरिका इतक्या विचारपूर्वक का काम करत आहे? उत्तर: गेल्या आठवड्यात नासाचे प्रशासक जेरेड आयझॅकमेन यांना विचारण्यात आले की, चंद्रावर आपण 56 वर्षांपूर्वीच जाऊन आलो आहोत. या मिशनमध्ये असे काय खास आहे. त्यांनी उत्तर दिले, 'यावेळी आमचे ध्येय चंद्रावर अमेरिकेचा झेंडा रोवणे किंवा अंतराळवीरांना तिथे पोहोचवणे नाही, तर तिथे टिकून राहणे आहे.' 24 मार्च रोजी नासाने आपल्या चंद्र मोहिमांबद्दल एका मोठ्या रोडमॅपची घोषणा केली आहे. या अंतर्गत नासा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाप्रमाणे 2030 पर्यंत चंद्रावर एक कायमस्वरूपी तळ (बेस) बनवू इच्छित आहे. जेरेड आयझॅकमेन यांच्या मते, 54 वर्षांनंतर पुन्हा चंद्रावर जाण्याचे मिशन पूर्वीपेक्षा अधिक प्रगत आहे. याची सुरुवात अपोलो मिशनप्रमाणे सुरुवातीच्या टप्प्यांऐवजी, थेट ऑर्बिटमध्ये अंतराळवीरांना पाठवण्यापासून होत आहे. मिशन पूर्ण झाल्यावर चंद्रावर जो बेस बनेल, त्यावर अंतराळवीर दीर्घकाळ राहू शकतील. याचा उपयोग अवकाशात चंद्राच्या पुढे जाण्यासाठी लॉन्च पॅडसारखा होईल, जिथून स्पेसक्राफ्ट लॉन्च करता येतील. अंतराळवीरांसाठी राहण्यायोग्य स्टेशन बनवण्यासाठी अनेक चंद्र मोहिमा काळजीपूर्वक कराव्या लागतील. मानवांव्यतिरिक्त रोबोट्स, इंधन आणि अनेक प्रकारचे अवजड उपकरणे घेऊन जावे लागतील. आर्टेमिस मोहिमांद्वारे हेच लक्ष्य पूर्ण करायचे आहे. कोणतीही चूक होऊ नये म्हणून NASA विचारपूर्वक पावले उचलत आहे. खरं तर, 1969 मध्ये रशियाला स्पेस वॉरमध्ये मागे टाकण्यासाठी अमेरिकेने खूप तयारी केली होती.. मात्र, असेही म्हटले जाते की अमेरिकेने नील आर्मस्ट्राँगच्या चंद्रावर जाण्याची खोटी कथा रचली होती. याचे कारण रशियासोबतच्या शीतयुद्धाच्या (कोल्ड वॉर) कारणामुळे अमेरिकेचे भू-राजकारण (जिओपॉलिटिक्स) होते. प्रश्न-3: काय 56 वर्षांपूर्वी नील आर्मस्ट्राँगचे मून लँडिंग चुकीचे होते का?उत्तर: खरं तर, अंतराळ युगाची सुरुवात पहिल्यांदा 1957 मध्ये सोव्हिएत रशियाच्या 'स्पुतनिक' उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून मानली जाते. हा अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा काळ होता. नंतर 1961 मध्ये रशियन अंतराळवीर युरी गागारिन पहिल्यांदा अंतराळात पोहोचले. हा अमेरिकेसाठी दुसरा मोठा धक्का होता. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांना वाटले की अंतराळात पुढील मोठे पाऊल चंद्रावर पोहोचणे असेल. यासाठी अमेरिकेने सुमारे 25 अब्ज डॉलरच्या बजेटसह नासाला अपोलो मिशनवर लावले. नील चंद्रावर पोहोचल्याचा देखावा रशियासह संपूर्ण जगाने पाहिला. मात्र, असेही म्हटले गेले की रशियाला कमी लेखण्यासाठी अमेरिकेने एक खोटी कथा रचली आणि पृथ्वीवरच नील चंद्रावर उतरल्याचा बनावट सीन चित्रित केला. यामागे 3 मोठे तर्क देण्यात आले… 1. जेव्हा चंद्रावर अमेरिकेचा झेंडा रोवण्यात आला, तेव्हा तो का फडकत होता, कारण चंद्रावर तर हवाच नाही.2. दगड आणि अंतराळवीरांच्या सावल्या वेगवेगळ्या दिशांना आहेत, तर तिथे तर अंधार आहे.3. व्हिडिओमध्ये अंतराळात कोणताही तारा का दिसत नाही. हे तिन्ही तर्क निराधार होते. नील आपल्यासोबत जो झेंडा घेऊन गेले होते, त्यात वर एक रॉड होती, जेणेकरून झेंडा सरळ राहील. रॉड पूर्णपणे उघडली नव्हती, त्यामुळे झेंडा थोडा वाकलेला आहे आणि तो तोपर्यंतच हलत आहे, जोपर्यंत तो अंतराळवीरांच्या हातात आहे. नंतर तो स्थिर दिसतो. जेव्हा नीलने चंद्रावर पाऊल ठेवले, तेव्हा तिथे दिवस होता, त्यामुळे तारे दिसत नाहीत, कारण तेव्हा आजच्यासारखे प्रगत कॅमेरे नव्हते. शिवाय, सूर्याव्यतिरिक्त चंद्राच्या पृष्ठभागावरूनही प्रकाश परावर्तित होत होता, त्यामुळे वस्तूंच्या सावल्या वेगवेगळ्या दिशांना आहेत. सोव्हिएत रशियाने स्वतः NASA च्या या मून लँडिंग मिशनला यशस्वी मानले होते. प्रश्न-4: अमेरिकेने चंद्रावर जाणे का थांबवले होते?उत्तर: नासाच्या इतिहासकार आणि इतर तज्ञांच्या मते, 1972 नंतर अमेरिकेने तीन अपोलो मिशनची योजना आखली होती, परंतु ती रद्द करण्यात आली. यामागे 3 प्रमुख कारणे होती… 1. रशियाला मागे टाकण्याचा उद्देश पूर्ण झालाNASA चे मुख्य इतिहासकार रॉजर लेनियस यांनी आपल्या 'स्पेसफ्लाइट अँड मिथ ऑफ प्रेसिडेन्शियल लीडरशिप' या पुस्तकात लिहिले आहे की अपोलो मिशन थांबले, कारण ते पूर्ण झाले होते. केनेडी यांनी सोव्हिएत रशियामुळे चंद्र अवतरणाला आपले धोरण बनवले होते. नीलच्या मोहिमेच्या यशामुळे सोव्हिएतला मागे टाकण्याचे मिशन पूर्ण झाले होते. 2. प्रचंड खर्चामुळे नासाच्या बजेटमध्ये कपातअपोलो मिशनवरील प्रचंड खर्चाला मोठा विरोध झाला होता. नासाचे प्रशासक थॉमस पेन यांनी सप्टेंबर 1970 मध्ये राष्ट्राध्यक्ष निक्सन यांना सांगितले होते की, मिशन रद्द करण्याचे सर्वात मोठे कारण निधीची कमतरता आहे. त्यावेळी नासाचे बजेट एकूण फेडरल बजेटच्या 4.5% होते, जे आता 0.5% पेक्षाही कमी झाले आहे. 1972 नंतर अमेरिकन काँग्रेसने नासाच्या निधीत मोठी कपात केली होती. 3. अंतराळवीरांच्या मृत्यूची भीतीयशस्वी मोहिमेनंतर नासाचे उप-प्रशासक जॉर्ज लो अंतराळवीरांचा जीव धोक्यात घालू इच्छित नव्हते. नासाच्या मानवी अंतराळयान केंद्राचे संचालक रॉबर्ट गिलरुथ यांनीही म्हटले होते, 'केनेडींचे लक्ष्य पूर्ण झाले आहे. आता थांबले पाहिजे, त्याआधी की आपण अधिक लोकांना गमावतो.’ याशिवाय अपोलो मोहिमेनंतर नासा, स्पेस शटल प्रोग्रामसारख्या इतर अंतराळ मोहिमांमध्ये रुची घेऊ लागले होते. अमेरिकन जनतेमध्येही चंद्र मोहिमेचा उत्साह कमी झाला होता. प्रश्न-5: अर्ध्या शतकानंतर अमेरिकेला चंद्रावर जाण्याची गरज का पडली?उत्तर: 50 वर्षांहून अधिक काळानंतर नासाने पुन्हा चंद्र मोहीम सुरू करण्यामागे 3 मोठी कारणे आहेत… चीनच्या अंतराळ कार्यक्रमाशी स्पर्धा चंद्रावर उपस्थित मौल्यवान खनिजे मिळवण्याची स्पर्धाNASA चे माजी प्रमुख शॉन ओ'कीफ यांच्या मते, चंद्रावर मोठ्या प्रमाणात हेलियम-3 उपस्थित आहे. 20 दशलक्ष डॉलर प्रति किलो किमतीच्या हेलियम-3 चा वापर न्यूक्लियर रिॲक्टरमध्ये होऊ शकतो. चंद्रावर बर्फाळ पाण्याचे साठे आहेत, ज्याचा वापर रॉकेट प्रोपल्शनमध्ये केला जाऊ शकतो. पृथ्वीवर फार कमी प्रमाणात आढळणारे दुर्मिळ मृदा धातू (रेअर अर्थ मेटल), सोने, लोह, लिथियम आणि प्लॅटिनमसारखे घटक चंद्रावर आहेत. पृथ्वीवर या घटकांच्या खाणकामात चीन पहिल्या क्रमांकावर आहे. ट्रम्प अंतराळातील विजयाद्वारे घरगुती दबावांना सामोरे जातील
Justice Ujjal Bhuyan : पुण्यातील एम.एम.एम. शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज ठरले राष्ट्रीय विजेते; विधी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी मूट कोर्टचे यशस्वी आयोजन.
Pune Ring Road : पुणे रिंगरोडचे भवितव्य अंधारात? महापालिका आणि पीएमआरडीएच्या वादात प्रकल्प जाम
Pune Ring Road : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात चेंडू; उच्चस्तरीय बैठकीनंतरच स्पष्ट होणार पीएमआरडीए रिंगरोडचे भवितव्य.
Ready Reckoner Rates : मुंबई, पुणे, नागपूरसह मोठ्या शहरांतील जमिनींचे मूल्यांकन होणार वास्तववादी; सुविधांनुसार रेडी रेकनरचे दर कमी-अधिक करण्याचे राज्य सरकारचे आदेश.
गेल्या काही वर्षांतील एका सर्वात मोठ्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय मोहिमेला 1 एप्रिल 2026 पासून सुरुवात झाली आहे. तब्बल 15 वर्षांनंतर देशामध्ये जनगणनेची (Census) मोहीम सुरू करण्यात आली आहे.
JM Road Firing Case : पिस्तुलातून गोळी न सुटल्याने वाचला होता जीव; मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीचा दोन वर्षांपासूनचा लपंडाव अखेर संपला.
लक्षवेधी : भारतीय ग्राहक गॅसवर
सरकारने व्यावसायिक व घरगुती गॅस सिलिंडरच्या (LPG Gas) किमती वाढवल्या असल्या, तरी पेट्रोल व डीझेलचे दर स्थिर आहेत. औद्योगिक वापरासाठीच्या डीझेलच्या किमतीत मात्र प्रतिलिटर 22 रुपयांची वाढ झाली आहे.
Pune Rain Update : कामावरून घरी परतणाऱ्या पुणेकरांची मोठी तारांबळ; अवघ्या अर्ध्या तासात सखल भागात साचले पाणी, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित.
Manchar News : मंचर बस स्थानकाचे भाग्य उजळले! ५ कोटींहून अधिक निधी मंजूर; पाहा कसा होणार कायापालट?
Manchar News : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; जिल्हा वार्षिक योजनेतून ५.३६ कोटींचा निधी मंचर बस स्थानकासाठी जाहीर.
विशेष : स्वमग्नता दिनाची नवी ओळख
2 एप्रिल हा दिवस ‘जागतिक स्वमग्नता जनजागृती दिन’ (World Autism Awareness Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे स्वरूप केवळ जनजागृतीपुरते मर्यादित राहिलेले नाही.
Indapur News : खाऱ्या जमिनीत पिकवलं ‘सोनं’! दोन एकरात ५१ क्विंटल गहू; इंदापूरच्या शेतकऱ्याची कमाल
Indapur News : शून्य मशागत आणि केवळ १-२ सिंचनात गव्हाची यशस्वी शेती; इंदापूरच्या माळवाडी येथील शेतकऱ्याने कृषी तज्ज्ञांनाही पाडले अचंबित.
Fake Bhandara Sale : खाण्यासाठी आणि त्वचेसाठी अयोग्य असलेल्या भंडाऱ्याची जेजुरीत सर्रास विक्री; अन्न व औषध प्रशासनाकडे कारवाईची मागणी.
Indapur News : इंदापूर नगरपरिषदेची अभय योजना ठरली सुपरहिट; पाहा नेमकी किती झाली वसुली?
Indapur News : शास्ती माफीच्या सवलतीमुळे मालमत्ता धारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; वाढलेल्या महसुलातून शहराच्या प्रलंबित विकासकामांना मिळणार मोठी गती.
Father Arrested : आईच्या अनुपस्थितीत घरातच मुलीवर बळजबरी; चाकण पोलिसांकडून पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल.
Shirur News : दौंड आणि आंबेगावला संधी मिळाली, मग शिरूरचा विचार कधी? जिल्हा परिषद सभापती निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे डोळे.
Illegal Gas Refilling : भोसे गावच्या हद्दीत इंडेन पार्किंगमध्ये सुरू होता जीवघेणा खेळ; पोलिसांनी छापा टाकून तिघांना बेड्या ठोकल्या, ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त.
Kukadi Canal Accident : पाण्याचा वेग आणि प्रशासकीय विलंबामुळे शोधकार्यात अडथळे; ग्रामस्थांच्या आग्रहानंतर कालव्याचे पाणी थांबवताच मृतदेह हाती.
Chakan Accident : तळेगाव-चाकण भीषण अपघाता! भरधाव टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू
Chakan Accident : भरधाव वेगात जाणाऱ्या आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला.
Summer Tourism : पश्चिम आशियातील तणावाचा आंतरराष्ट्रीय विमान सेवांवर परिणाम; सुरक्षिततेच्या कारणास्तव दुबईसह अनेक मार्ग पर्यटकांनी टाळले.
Bhosari Crime : पतीला घरी बोलावून दारू पाजली अन् प्रियकराच्या मदतीने…; पत्नीचे भयंकर कृत्य
Bhosari Crime : पतीने ओरडतानाचा व्हिडिओ पत्नीनेच केला रेकॉर्ड; कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ.

30 C