मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार
मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. यंदाचा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.बुधवारी दुसऱ्या दिवशी प्रामुख्याने धोरणात्मक असे सामंजस्य करार करण्यात आले. ज्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्निया, युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह -लंडन, आयसीसीआय-इटली, अँलाँग ट्युनिंग इन्स्टिट्यूट, नॉर्वेजीयन जीओ टेक्निकल इन्स्टिट्यूट, अर्बन प्लॅनिंगमधील सुबाना जुराँग – सिंगापूर यांच्यासोबत टेक्निकल सामंजय्स करार केले आहेत. यातून एक प्रकारे आम्ही केवळ गुंतवणूक नाही, तर ज्ञान आणि तंत्रज्ञान आणतो. यातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणता येतील, वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्यारितीने काम करता येईल. अर्बन प्लॅनिंग, ट्रान्सपोर्टशी संबंधित करारांमुळे प्रत्येक शहरातील वाहतूक सुविधांची सरंचना चांगल्या रितीने करता येणार आहे.शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहचविण्यासाठी मेडटेक सहकार्यराज्यातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सुविधा पोहचविण्याचा प्रय़त्न आहे. त्यादृष्टीने यंदा दावोसमध्ये मेडीकल-टेक्नॉलॉजीबाबत एका सत्रात चांगली आणि सकारात्मक चर्चा केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यातून राज्यातील आरोग्य सुविधांसाठीचा रोडमॅप निश्चित करण्यात आला. यातून आपल्याला राज्यात मेड-टेक स्टार्टअपची चांगली इकोसिस्टिम निर्माण करण्याचा प्रय़त्न. त्यासाठी जगातील अशी सुविधा उभ्या करणाऱ्या सर्वोत्तम कंपनीशी करार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, नवीन बिझनेस डिस्ट्रीक्टची निर्मिती- नवी मुंबई विमानतळापासून पंधरा ते वीस किलोमीटरवर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. त्याबाबत दावोसमध्ये घोषणा करण्यात आली. गेल्या तीन-चार वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळविण्यात येत होत्या. त्या मिळाल्यानंतर आज या तिसऱ्या मुंबईतील पहिल्या शहराची घोषणा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.- याठिकाणी प्लग अँण्ड प्ले या धर्तीवर रेडी टू स्टार्ट पद्धतीने संबंधित घटक लगेच कामकाज सुरु शकणार आहेत. ही देशातील पहिली कंपनी, यामध्ये खासगी – सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) प्रकल्प असणार आहे. यात शासन, एमएमआरडीए आणि खासगी घटक एकत्र येऊन काम करतील. याठिकाणी नवीन बिझनेस डीस्ट्रिक्ट तयार करतो आहोत. याठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या तसेच ग्लोबल कॅपिसीटी सेंटर्स, फिनटेकची इकोसिस्टम तयार होईल. बीकेसीच्या धर्तीवर याठिकाणी बिझनेस डिस्ट्रीक्ट स्थापन होईल. या शहराच्या घोषणेनंतर सुमारे एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार देखील झाल्या आहेत. यासाठी जगातील दिग्गज अशा कंपन्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामध्ये रिपब्लिक ऑफ कोरीयाचा हवाना ग्रुप, स्वित्झर्लंडमधून एसएसबी ग्रुप, एन्सार, फेडेक्स हे अमेरितील समूह, फिनलंडचा रिव्हर रिसायकल समूह, दुबईचा एमजीएसए समूह, सिंगापूरचा स्पेसेस होल्डिंग मेपल ट्री, जीनव्ही आणि इंडोस्पेस पार्क समूह, अमेरिकेतून ट्रिबेका डेव्हलपर्स. या विदेशी गुंतवणूकीतून एक खूप चांगले शहर तयार होईल. याठिकाणी वॉक टू वर्क अशा पद्धतीने सुविधा निर्माण होतील. अशा रितीने तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर आता प्रत्यक्षात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.जागतिक बँकेचे अध्यक्ष बंगा यांच्याशी चर्चामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्याशी चर्चा केली. यामध्ये महाराष्ट्रात हरित औद्योगीक पट्टा (ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर) विकसित करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक येऊ शकते. यातून एमएसएमई क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरण तसेच निर्यात क्षमतेला मोठा वाव मिळणार आहे. शासन आणि बँकेच्या सहकार्यातून महाराष्ट्रातील धोरणात्मक आणि प्रभावी औद्योगिक विकासाला चालना देता येणार आहे.बर्मुडाचे पंतप्रधान बर्ट यांच्याशी संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बर्मुडाचे पंतप्रधान डेव्हिड बर्ट यांची भेट झाली. या भेटीत उभयतांनी विविध विषयांवर चर्चा केली. सर्वसमावेशक विकास, लोकाभिमूखता आणि विकास क्षेत्रातील नाविन्यपूर्णता या अनुषंगाने धोरणात्मक चर्चा झाली. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी आणि जगभरातील विविध घटकांच्या दृष्टीने स्वागतशील भूमिका घेऊन सज्ज आहे. यातून पारदर्शक, विश्वासार्ह आणि दीर्घकालीन अशी व्यवस्था निर्माण होणे अपेक्षित आहे. अशा संवादातून एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील दृढ संबंध प्रस्थापित होतील. ह्युंदाईचे अध्यक्ष सुंग किम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्रात असणे हे आमच्यासाठी आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. राज्य सरकारने जाहीर केलेले ईव्ही धोरण अतिशय चांगले असून येणाऱ्या काळात 5 नवीन ईव्ही मॉडेल्स आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. ह्युंदाई सीएसआर क्षेत्रात सुद्धा मोठे काम करीत असून शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रात अधिक सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. ह्युंदाईच्या पुणे येथील प्रकल्पाच्या उद्घाटनाचे निमंत्रण सुद्धा यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले.२.५ बिलियन डॉलर्स टर्मिनल संधीचे सूतोवाच जेबीआयसीचे गव्हर्नर हयाशी नोबुमित्सू यांनी भारत–जपान सहकार्य संबंधात महाराष्ट्रासोबत ईव्ही बसेस, अर्बन मोबॅलिटी या क्षेत्रात एकप्रकारे हरित गुंतवणूकीच्या मोठ्या संधी असल्याचे नमूद केले. एपी मोलर मर्सेकचे सीईओ विन्सेंट क्लार्क यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत महाराष्ट्रात 2.5 बिलियन डॉलर्स टर्मिनल संधीचे सूतोवाच केले. भारत आणि युरोपियन युनियन सप्लाय चेन कॉरिडॉर याबाबत सुद्धा चर्चा केली. फिनलंडचे परराष्ट्र व्यापार व्यवहार आणि विकास मंत्री विले त्याविओ यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेत भारत आणि फिनलंडमधील सहकार्यांबाबत चर्चा चर्चा केली. मुंबई येथे मे-जून महिन्यात सर्क्युलर इकॉनॉमीसंदर्भात एक परिषद आयोजित करण्याबाबत सुद्धा यावेळी चर्चा झाली. इस्रायल इनोव्हेशन अथॉरिटीचे अध्यक्ष अलोन स्टोपेल यांच्याशी विविध नाविन्यपूर्ण संशोधन क्षेत्रात भागीदारीबाबत सविस्तर चर्चा झाली. हॅवलेट पॅकर्डच्या अध्यक्ष पॅट्रिका रुसो आणि वरिष्ठ उपाध्यक्ष भावना अग्रवाल यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. सुरक्षाविषयक बाबींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आणि डिजिटायझेशन इत्यादी बाबत अधिक सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अँटोरा एनर्जीचे सीईओ अँड्र्यू पॉनेक यांच्याशी थर्मल एनर्जी साठवणूक सोल्यूशन्स, झिरो कार्बन इंडस्ट्रियल हीट इत्यादींबाबत चर्चा झाली. एमआयटी मीडिया लॅबच्या कार्यकारी संचालक जेसिका रोसेनवर्सेल यांचीही त्यांनी भेट घेतली.
शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई..सापळा रचून दोन युवक गजाआड
पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर सणसवाडी परिसरात अमली पदार्थांच्या विरोधात शिक्रापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी दोन तरुण सणसवाडी भागात येणार असल्याची गोपनीय माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार दामोदर होळकर, राकेश मळेकर आणि मच्छिंद्र निचित यांच्या पथकाने महामार्गालगतच्या एका दुकानासमोर सापळा रचला.यावेळी दोन संशयित युवक दुचाकीसह तिथे आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.पोलिसांच्या या कारवाईत पुणे-नगर महामार्गावर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन युवकांना पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले . युवकांकडून गांजाचा साठा आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये किरण दत्तात्रय इंगळे (वय २३, रा. दहिवडी) याच्यासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. सुरुवातीला या दोघांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र त्यांच्या जवळील पिशवीची झडती घेतली असता पोलिसांना गांजाच्या पुड्या आढळून आल्या. पोलिसांनी आरोपींजवळील एमएच १२ वायपी ०२५३ क्रमांकाची दुचाकी, दोन मोबाईल फोन आणि गांजाचा साठा असा मुद्देमाल जप्त केला आहे.
Donald Trump on Iran। इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा एक जोरदार विधान केले आहे. एका मुलाखतीत ट्रम्प यांनी,”जर इराणमधील परिस्थिती अशीच राहिली तर “संपूर्ण देश उद्ध्वस्त होऊ शकतो.” असे त्यांनी म्हटले आहे. आता त्यांच्या विधानामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. इराणबाबत ट्रम्पचा नवा इशारा Donald Trump […] The post युद्धाची काऊंटडाऊन सुरु ! “मी त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकीन” ; इराणच्या प्रत्युत्तरानंतर ट्रम्प संतापले appeared first on Dainik Prabhat .
‘धुरंधर 2’मध्ये प्रसिध्द बॉलीवूड अभिनेत्याची दमदार एन्ट्री
Dhurandhar 2 | अभिनेता रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. या चित्रपटात रणवीरसोबत, अक्षय खन्ना आणि संजय दत्तच्या अभिनयाचे देखील खूप कौतुक करण्यात आले. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर ‘धुरंधर 2’ साठी आदित्य धरने वेगाने हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. यातच आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत एक अपडेट समोर आली आहे. अभिनेता विकी […] The post ‘धुरंधर 2’मध्ये प्रसिध्द बॉलीवूड अभिनेत्याची दमदार एन्ट्री appeared first on Dainik Prabhat .
Rakul Preet Singh: ए. आर. रहमाननंतर रकुल प्रीत सिंहचा मोठा खुलासा; बॉलिवूडबाबत केलं धक्कादायक विधान
Rakul Preet Singh: बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी अलीकडेच इंडस्ट्रीत काम कमी मिळत असल्याचं विधान केल्यानंतर आता अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिनंही हिंदी चित्रपटसृष्टीबाबत स्पष्ट आणि धक्कादायक मत मांडलं आहे. रकुलच्या या वक्तव्यामुळे बॉलिवूडमधील ‘आउटसाइडर’ कलाकारांच्या संघर्षावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. रकुल प्रीत सिंहचा जन्म १० ऑक्टोबर १९९० रोजी नवी दिल्लीत […] The post Rakul Preet Singh: ए. आर. रहमाननंतर रकुल प्रीत सिंहचा मोठा खुलासा; बॉलिवूडबाबत केलं धक्कादायक विधान appeared first on Dainik Prabhat .
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी शहराच्या राजकारणात बदल घडवून आणला. तब्बल नऊ वर्षांनंतर पार पडलेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा पुण्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. ही निवडणूक अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातील प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिली जात होती. अखेर ही लढत भाजपच्या पारड्यात गेली. पुण्यातील सत्तासमीकरणे बदलणारा हा कौल असून, भाजपसाठी हा विजय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरला.वार्तापत्र मध्य महाराष्ट्र प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांच्या आघाडीकडील पुणे महापालिकेची सत्ता भारतीय जनता पक्षाने २०१७ मध्ये हिसकावून घेतली, तेव्हा भाजपच्या यशाचे श्रेय काही वर्षांपूर्वी आलेल्या मोदी लाटेला देण्यात आले होते, मात्र त्यानंतर आता आठ वर्षे उलटल्यावर आणि दृश्य मोदी लाट नसतानाही भाजपने पुणे महापालिकेवर पुन्हा झेंडा फडकावला. तसेच उपनगरातही भाजपने जोरदार मुसंडी मारून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे राजकीय रणांगणात पुण्यात पुन्हा भाजपने विजय मिळवला. पुणे महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवून ‘विकासपर्वा’च्या दुसऱ्या अध्ययाला सुरुवात केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासाठी दाखविलेले ‘व्हिजन’ आणि अभूतपर्व विजयानंतर जबाबदारी नव्या लोकप्रतिनिधींना असावी, अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. भाजपला मिळालेले बहुमत केवळ प्रचाराचे नव्हे तर, अनेक महिन्यांपासून राबवलेल्या सूक्ष्म नियोजनाचे फलित ठरले. उमेदवार निवडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक लक्ष, स्पष्ट व्हिजन, मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील यांच्याशी साधलेला समन्वय अशा अनेक घटकांमुळे भाजपने सत्ता अधिक बळकट केली. मुरलीधर मोहोळ यांनी प्रचारयंत्रणेची सूत्रे स्वत:कडे घेत सौम्य, पण परिणामकारक भाषेत अजित पवार यांच्याशी थेट राजकीय सामना केला. भाजपने प्रचाराचे मायक्रो प्लॅनिंग केलेले. ज्या ठिकाणी उमेदवार विजयी होण्याची शक्यता कमी वाटली त्याठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभा घेण्यात आल्या. भाजपने या निवडणुकीत पक्षसंघटनेचा चांगला वापर करून घेतला. प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन भाजप उमेदवार पोहोचवण्यात पक्षनेत्यांना यश आले. यासाठी संघाच्या यंत्रणेचा देखील फायदा करून घेण्यात आला. मतदानाच्या दिवशी मतदान जास्त होईल याची काळजीही घेण्यात आली. जाहीररनाम्यात देखील पुढच्या ५० वर्षांच्या विकासाचे व्हिजन मांडण्यात आले याचा फायदाही पक्षाला झाला. प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली तेव्हा देखील योग्य रणनिती आखली. योग्य तेथे प्रभावी पक्षप्रवेश घडवून आणले. वडगाव शेरीत पठारे, वारजेमध्ये सचिन दोडके, सायली वांजळे, धनकवडीत बाळा धनवडे, यांचे पक्षप्रवेश भाजपसाठी निर्णायक ठरले. परिणामी जे प्रभाग भाजपसाठी कायम अवघड मानले जायचे त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आल्याने पक्षाची ताकद वाढली. अनेक माजी नगरसेवकांची नाराजी ओढवली पण, त्याचा विचार न करता सर्वाधिक महिलांना संधी देत विरोधकांना आव्हान दिले. भाजपच्या बहुतांश महिला उमेदवारांनी चांगली कामगिरी करत विजय मिळवला. विरोधकांच्या फुटीचाही भाजपला फायदा झाल्याचे पाहायला मिळाले. शहरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र निर्माण केले गेले त्यामुळे काही प्रभागात चौरंगी, पंचरंगी लढती झाल्या याचा फायदा भाजपला झालेला बघायला मिळाला. याउलट अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यातील पाया पक्का असतानाही त्या पक्षाला निवडणूक चांगल्या प्रकारे खेळता आली नाही, असेच म्हणावे लागेल. एकतर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होणे, हीच या पक्षांची फार मोठी जमेची बाजू होती. शरद पवार यांची सभा, समाजमेळावे, पत्रकार परिषद या आघाडीच्या भल्यासाठी आवश्यक होती. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थिती-अनुपस्थितीपेक्षा शरद पवार यांची अनुपस्थिती लक्ष वेधून घेणारी ठरली. त्यामुळे एकसंध राष्ट्रवादी निवडणुकीला सामोरी गेलीच नाही. निवडणुकीच्या निकालातील शिंदे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कामगिरीबाबत बोलण्यासारखे फारसे काही नाही. याचे कारण शिंदे सेनेची पुण्यात अजून संघटनात्मक बांधणी झालेली नाही. आयात उमेदवार तसेच नवे कार्यकर्ते यांच्या भरवशावर शिंदेसेनेने सव्वाशे जागा लढवल्या. त्यात संघटनावाढ झाली असण्याची शक्यता हाच फायदा झाला असेल. उबाठा आणि मनसेचे नेतृत्व मुंबईच्या महासंग्रामात गुंतलेले असल्याने त्यांचे पुण्याकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविकच होते. राज ठाकरे यांचा शेवटचा रोड शो वगळता त्या पक्षाने जाहीर प्रचारात फारसा ठसा उमटवला नाही.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुण्याकडे दुर्लक्ष केल्याने पुणे गमावले. स्थानिक पातळीवर त्या त्या उमेदवाराने केलेल्या प्रचाराने निवडणुकीच्या निकालावर मोठा परिणाम होईल, असा भाबडा आशावाद त्या पक्षालाही नव्हता. तुलनेने काँग्रेस या एकेकाळी पुण्यावर राज्य केलेल्या पक्षाने यावेळी दोन आकडी संख्या ओलांडावी आणि गेल्या वेळच्या ११ या जागांपेक्षा काही जागा अधिक मिळवाव्यात, ही त्या पक्षाच्या दृष्टीने समाधानकारक बाब ठरली. एक खासदार, सात आमदार आणि सलग दुसऱ्यांदा महापालिकेची सत्ता पुणेकरांनी मोठ्या विश्वासाने भाजपच्या हातात सोपविली आहे. पालिकेतील सत्तेच्या पहिल्या पर्वात काही विकासकामांना शुभारंभ झाला असला, तरी त्याला अपेक्षित वेग मिळाला नव्हता. दुसऱ्या टप्प्यात केवळ प्रभागापुरता मर्यादित विचार न करता संपूर्ण शहराचा विचार करून विकासकामांचा विस्तार झाला. तरच, नागरिकांच्या अनेक अपेक्षा पूर्ण होतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दावोसमधून मोठी घोषणा! रायगड-पेणमध्ये ग्रोथ सेंटर उभं राहणार
Chief Minister Devendra Fadnavis :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दावोस येथील World Economic Forum (WEF) 2026 मध्ये पहिल्याच दिवशी१४.५ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. हे करार १९ विविध कंपन्यांसोबत झाले असून यातून राज्यात १५ लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. अशातच आता दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा […] The post मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दावोसमधून मोठी घोषणा! रायगड-पेणमध्ये ग्रोथ सेंटर उभं राहणार appeared first on Dainik Prabhat .
Sunita Williams Retired। प्रसिद्ध नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स २७ वर्षांच्या दीर्घ आणि ऐतिहासिक सेवेनंतर एजन्सीमधून निवृत्त झाल्या आहेत. २७ डिसेंबर २०२५ पासून त्या निवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या कारकिर्दीत सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) तीन मोहिमा पूर्ण केल्या आणि मानवी अंतराळ उड्डाणात अनेक विक्रम प्रस्थापित केले. नासाच्या मते, सुनीता विल्यम्स यांनी एकूण ६०८ दिवस […] The post एका पर्वाचा पूर्णविराम ! अवकाशात ६०८ दिवस, ९ अंतराळयात्रा करणाऱ्या नासाच्या ‘आयर्न लेडी’ सुनीता विल्यम्स निवृत्त appeared first on Dainik Prabhat .
डॉ. कणव कुमारभारतामध्ये डोके व मान कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे. या कर्करोगांमध्ये तोंड, घसा (आवाजपेटी), थायरॉईड, सायनस, नाक तसेच लाळग्रंथी यांचा समावेश होतो. यापैकी आवाजपेटीचा कर्करोग हा तोंडाच्या कर्करोगानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अनेक वर्षे या कर्करोगावर संपूर्ण आवाजपेटी काढून टाकणे (टोटल लॅरिंजेक्टॉमी) हा सर्वोत्तम उपचार मानला जात होता. जरी यामुळे कर्करोग बरा होण्याचे प्रमाण चांगले होते, तरी रुग्णाचा आवाज कायमचा हरपायचा. मात्र आजच्या प्रगत तपासणी आणि उपचारांमुळे बहुतेक रुग्णांमध्ये आवाजपेटी जपण्यावर भर दिला जातो.धूम्रपान आणि मद्यपान ही आवाजपेटीच्या कर्करोगाची दोन प्रमुख कारणे आहेत. हा कर्करोग प्रामुख्याने ५० ते ७० वयोगटातील पुरुषांमध्ये अधिक आढळतो. सततचा घसा बसणे किंवा आवाजात बदल होणे हे याचे सुरुवातीचे आणि महत्त्वाचे लक्षण आहे.कर्करोग लवकर ओळखला गेला तर ट्रान्सओरल लेझर मायक्रोसर्जरी (टीएलएम) या आधुनिक पद्धतीने उपचार करता येतात. लेझरच्या साहाय्याने आवाजपेटीतील लहान गाठी काढल्या जातात. या उपचारामुळे सुमारे ९० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होतात, आवाज व गिळण्याची क्षमता टिकून राहते, खर्च तुलनेने कमी असतो आणि बहुतेक वेळा हा उपचार डे-केअर पद्धतीने केला जातो.मध्यम टप्प्यातील कर्करोगात रेडिएशन थेरपीसोबत केमोथेरपी दिली जाते. या उपचारपद्धतीमुळे अवयव जपण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांचा नैसर्गिक आवाज कायम राहतो.प्रगत अवस्थेतील रुग्णांना अजूनही संपूर्ण आवाजपेटी काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. मात्र आजच्या घडीला आवाज पुनर्वसनासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. व्हॉइस प्रोस्थेसिस, इलेक्ट्रॉनिक लॅरिंक्स किंवा अन्ननलिकेच्या सहाय्याने बोलण्याचे प्रशिक्षण. यामुळे अशा रुग्णांनाही पुन्हा संवाद साधता येतो.आधुनिक उपचार आणि समर्पित पुनर्वसनामुळे कर्करोगामुळे आवाज गमावणे आता अटळ राहिलेले नाही. आज बहुतेक रुग्ण आपला नैसर्गिक आवाज जपू शकतात आणि ज्यांना मोठी शस्त्रक्रिया करावी लागते, तेही योग्य प्रशिक्षणामुळे पुन्हा बोलू शकतात. वेळेवर तपासणी आणि योग्य उपचारांमुळे प्रत्येक रुग्णाला केवळ आपला आवाजच नव्हे, तर आत्मविश्वास आणि जीवनाचा दर्जाही पुन्हा मिळवण्याची संधी मिळू शकते.- सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, हेड अॅण्ड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड गाठला आहे. रायगड जिल्ह्यातील 'पेण ग्रोथ सेंटर' (Raigad Pen Growth Centre) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एमएमआरडीए (MMRDA) आणि जगातील विविध ११ अग्रगण्य कंपन्यांमध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या उपस्थितीत हे करार स्वाक्षरित करण्यात आले. 'तिसरी मुंबई' (Third Mumbai) म्हणून ओळखला जाणारा हा प्रकल्प तंत्रज्ञान, फिनटेक आणि डेटा सेंटर्सचे पुढील पिढीचे केंद्र ठरणार आहे.Had a wonderful and engaging discussion with Jessica Rosenworcel, Executive Director, MIT Media Lab, at #WEF26 in Davos. Our conversation focused on the transformative role of Digital Public Infrastructure in India and how it is enabling inclusive governance. We also discussed… pic.twitter.com/m08KAOPBTh— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 20, 2026https://prahaar.in/2026/01/21/badminton-player-saina-nehwal-retires/या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे भारताचा पहिला समर्पित 'ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर' (GCC) जिल्हा उभारला जाणार आहे. यामध्ये दक्षिण कोरियाचा हनव्हा ग्रुप (Hanwha Group), अमेरिकेची फेडएक्स (FedEx), स्वित्झर्लंडची SSB SAUERWEIN आणि सिंगापूरचा मॅपल ट्री (Maple Tree) यांसारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्यांचा समावेश आहे. या गुंतवणुकीमुळे रायगड जिल्हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर देशाचा नवीन आर्थिक कणा म्हणून उदयास येणार आहे. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक कंपन्यांना रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये गुंतवणूक करण्याचे खुले आवाहन केले. हा प्रकल्प पुढील पिढीच्या तंत्रज्ञानासाठी सज्ज आहे आणि जागतिक व्यवसायांसाठी हे एक सर्वोत्तम केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या करारामुळे राज्याच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असून हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
माेरपीस : पूजा काळेस्पर्श म्हणजे जाणीव जागृतींचा काही वेळेसाठी घडलेला सहवास. कळत नकळत होणारा हाताचा हाताशी समेट, शरीराने शरीराला हलकासा दिलेला झोका त्यातून मन पाखरू पाखरू शहारत गेलेला भावनिक गुंतागुंतीचा ओझरता मखमली स्पर्श जणू काही हर्षचं. स्पर्शाला जाणीव आसक्ती जडता भौतिक सुखाच्या मोहमयी ओलाव्याची संवेदनशील छाया असं देखील म्हणता येईल. गरम, मऊ, खरखरीत, ऊबदार या भौतिक संवेदनेत स्पर्शाची सुबक व्याख्या सापडेल. नितळ त्वचेला सुखावणारी संवेदना कधी हवा, पाणी, वस्तूंच्या स्पर्शातून, तर कधी आपुलकी विश्वासाच्या समेवर भावनिक सौम्य स्पर्शाची अनुभुती देईल. सौहार्द प्रेमातून आलेली भावना सहवासायोगे मनाला आधार देत जगण्याची उभारी घेईल. नाजूक शरीराची नाजूक त्वचा स्पर्श संवेदनेचं महत्वाचं अंग असल्याने वरचेवर ते जागृत होईल. मनाला मनाची, सुखाला सुखाची, शरीराला शरीराची कायम ओढ राहील. मानवासाठी स्पर्शाचा अर्था अर्थी संबंध इथून तिथून सारखाचं असल्याने स्पर्शाच्या पहिल्याच पायरीवर असलेला मातेचा उबदार स्पर्श आठवा, जो जगातल्या सर्वोत्तम वेदनेला आश्वासक ऊब देतो. प्रसूती वेदनेनंतर ममत्व जागृती स्पर्शाने आईस पान्हा फुटतो. बाळ जन्मल्यानंतर आईचा परीस स्पर्श झऱ्यागत वाहू लागतो. लोण्यागत मऊशार कुशीतली ऊब हवीहवीशी वाटू लागते. आई म्हणजे ममत्व. आई म्हणजे जगण्याचं एकमेव ठिकाण. विश्वासाचं हक्काचं पान, अशावेळी स्पर्शाची भावना जितकी नाजूक तितकीचं ती संवेदनशील होते. भाव भावनांचे विविधांगी पदर यात अनुभवास येतात. भावनेच्या अत्युच्य अविष्काराकडे मन ओढलं जात.आयुष्यातला दुसरा माऊली स्पर्श पंढरपूरी विठोबारायाच्या पद स्पर्शाची ओढ लावणारा, भक्तीपुरात दंग करणारा. चराचरात वसलेल्या पांडुरंगाची आस अंतरंग स्पर्शून जावी या प्रतीक्षेत भक्त असतो. ज्ञानामृताच्या स्पर्शासाठी तन मन धन सगळं विसरून जातो. त्यासमयी सोहळा पालखीचा नयनी साठवावा, माऊली पदस्पर्श आशीर्वाद घ्यावा म्हणत अख्खी पंढरी दुमदुमते.जगण्याच्या असंख्य वाटांवर अनेक स्पर्शांचे कळत नकळत आधार घेत आपण पुढे जात असतो. त्या त्या वेळी ते ते स्पर्श मोलाची कामगिरी करत असतात, जेणेकरून पुढे जाऊन वेदनाही सुखावह होते. वेदनेला उमजे, मायेचा पदर... स्पर्शाची भाषा, शब्दातीत सादर. बऱ्याचं अंशी हे स्पर्श आपण गृहीतचं धरून चालतो. परंतु त्यांना मुकल्यानंतर त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आयुष्यात जाणवू लागते आणि हलक्याशा भावभरल्या स्पर्शासाठी मन आसुसते. तेव्हा काय काय दाटून येतं ठाऊक आहे का? नात्यात पडलेली वजाबाकी आठवते. भाग काढून घातलेला विचित्र गुणाकार साठू लागतो आणि कळू लागत बेरजेचं गणित. स्पर्शाची दुनिया सारी, भावार्थ सांगून जाती, स्पर्शाभोवती हळवी, वसती नाजूक नाती... पुढे स्पर्शाच्या उतरंडीमध्ये वरच्या स्थानावर ज्याची वर्णी लागते तो म्हणजे पारदर्शी मैत्रीचा नितळ आरस्पानी स्पर्श होय. ज्याला स्त्री पुरुष भेदाभेद वय, प्रांत, भाषा अशी कोणतीही भिंत अडवू शकत नाही.मैत्री करून पाहावी आणि तेवढीचं निभवावी. दुर्बिणीतून न्याहाळावी तशी स्पर्शाची विविध रूपं समोर येऊ लागतात. स्पर्श नजरेचाही असतो. आश्वासक, आधार देणारा, जपणारा, जोजवणारा, आनंदयात्री, डोळ्यांत आसवं आणणारा, घाबरणारा, घाबरवणारा, किळसवाणा, ओंगळ नजरेचा स्पर्श प्रत्यक्ष शरीर स्पर्शापेक्षाही प्रभावी ठरतो. तान्ह्या बाळाचा स्पर्श हा पृथ्वीतलावरील सर्वात लडीवाळ मुलायम स्पर्श होय. मलिनतेच्या लाटांपासून दूर असलेला पवित्र निसर्गाचा स्पर्श. थंडीच्या दिवसात अंगाशी लगट करणारे बोचरे वारे आठवून पाहा. आठवून पाहा पावसाच्या पहिल्या थेंबाने रोमांचित झालेले मन...अख्खा श्रावण मनासह शरीर कार्यान्वित करतो. नेहमी वरच्या क्रमांकावर असलेला, दाटीवाटीच्या युगल मिठीत, लग्नगाठ बांधण्यासाठी सरसावलेला चोर स्पर्श. प्रेमाची भेट प्रेमाच्या गाठी ओलावा संपताच उरत नाहीत पाठी... आठवांचा खेळ उगा मागे उरतो, रागरूसव्यात जो तो गुदमरतो... त्याच्या-तिच्या सानिध्यातील आठवून पाहा संध्याकाळ... पहिली भेट, मावळतीचा सूर्य... बोचणारा वारा, नजर गुपित, घट्ट धरलेला हात! मनीची भाषा, अवगेल का त्याला? तूच माझी राणी, तो त्या दिवशी म्हणाला... हाती तुझा हात दे काहीतरी गुणगुणला... तू फक्त हो म्हण, तो हरपला... हीच माझी ओढ अन्, हाच खरा जिवलग... मी ही लाजून हो म्हंटल जरा! तो म्हणाला, भेटीत हवा विश्वास ज्याने वाढेल सहवास... सहवासावर रचू सुखाचा संसार... स्पर्श करता वेलीला येई आकार. तूच माझी राणी अन् मी तुझा सखा... सुखी जीवनात सहवासी स्पर्श हवा.निसर्गाने स्पर्शाची एक सुंदर देणगी आपल्याला बहाल केलेली आहे. स्पर्श म्हणजे अभिव्यक्तीचे एक सशक्त माध्यम. विशेष उल्लेखनीय म्हणजे घरातील, समाजातील, वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना कपडालत्ता, औषध, पैसा, अन्नपाणी या गोष्टी पलीकडे आसं असते मायेच्या संवादाची.आपले म्हणणे मांडण्याची, दुसऱ्याचे ऐकण्याची आणि सर्वांच्या पलीकडे एक खोल आस असते स्पर्शाची. घरातील ज्येष्ठांना असा स्पर्श आपण मागे कधी केलाय का? आठवून बघा. नसेल ना आठवत...! तर एक गोष्ट करा. त्यांच्याजवळ बसा. त्यांचा हात आपल्या हातात घ्या. डोक्यावरून मायेने हात फिरवा, आणि पहा साधे वाटणारे स्पर्श काय काय किमया करतात ते. निसटून गेलेल्या स्पर्शाचे सुरेख पैलू अनुभवून तर पहा. केवळ स्पर्शाने चमत्कार झाल्याची अनेक उदाहरणे देता येतील. विस्मृतीत गेलेल्या स्पर्श अनुभूतीच्या आठवणीत आपला दिवस गोड जावा म्हणून हाती घेतलेल्या मोरपंख ललितबंध लिखाणावरील दौतस्पर्श आपल्या सेवेशी सादर आहे.
शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर? काय आहे नेमकं कारण?
ShivSena-NCP Name-Symbol Hearing | शिवसेना पक्षामध्ये फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. मात्र शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाचं? हा वाद सध्या न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. शिवसेनेसह मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावर सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार होती. सर्वोच्च न्यायालयाने मागील तारखेला या प्रकरणातील युक्तिवादाचे वेळापत्रकही ठरवून दिले होते. […] The post शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर? काय आहे नेमकं कारण? appeared first on Dainik Prabhat .
Sushma Andhare : नुकत्याच राज्यात महापालिका निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईत ६५ आणि इतर महापालिकेत म्हणावे तितके यश मिळवता आलेले नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला परभणी महापालिका वगळता इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात यश मिळवता आलेले नाही. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी मुंबईवर अधिक लक्ष दिले होते. त्यामुळे ठाणे, छत्रपती संभाजीनगर […] The post ठाकरेंची रणरागिनी सांभाळणार आता ‘ही’ जबाबदारी! स्वतः पोस्ट करत दिली माहिती; म्हणाल्या “पक्षाला गतवैभव…” appeared first on Dainik Prabhat .
Avimukteshwarananda। ज्योतिर्पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी त्यांच्या वकिलामार्फत उत्तर प्रदेश सरकारला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये ,” जर १९ जानेवारीची निष्पक्ष प्रशासनाबाबतची नोटीस २४ तासांच्या आत मागे घेतली नाही तर सरकार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर न्यायालयाचा अवमान करण्यासह कायदेशीर कारवाई केली जाईल”असे स्पष्टपणे म्हटले आहे. कायदेशीर नोटीसनुसार, १९ जानेवारीची नोटीस स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची प्रतिष्ठा, […] The post शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्याकडून योगी सरकारला कायदेशीर नोटीस ; ‘या’साठी दिला २४ तासांचा अल्टिमेटम appeared first on Dainik Prabhat .
पुरुष आणि महिला ही जीवनाच्या वाहनाची दोन चाके आहेत. एका वाहनाला सुरळीत चालण्यासाठी फक्त दोन चाकेच आवश्यक नसतात, तर समान गुणही आवश्यक असतात. त्याचप्रमाणे, सामाजिक जीवनाचे वाहन सुरळीत चालण्यासाठी, पुरुष आणि महिला दोघांमध्येही समान संख्या आणि गुण असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने या वास्तवाची जाणीव अनेकांना नाही. अर्थात ही परिस्थितीही बदलत आहे.- प्रा. अशोक ढगेजगातील बहुतेक भागांनी मुला-मुलींमधील फरकाबद्दल शतकानुशतके रूढीवादी विचारसरणी सहन केली आहे; परंतु लोकांची विचारसरणी आता बदलत आहे, हे एक सुखद आणि दिलासादायक चित्र आहे. ‘मुलगाच हवा’ असा अट्टहास आता कमी होत आहे. मुलींनी सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्त्वाची चुणूक दाखवल्यानंतर आता जग अशा टप्प्यावर आले आहे, जिथे ते मुलींकडे समान स्वारस्याने पाहते. ‘गॅलप इंटरनॅशनल’ने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात हे चित्र मांडले आहे.४४ देशांमध्ये केलेले हे सर्वेक्षण वर्तमानाबद्दल समाधान आणि भविष्यासाठी आशा निर्माण करते. या देशांमध्ये, मुलाचे लिंग आता विचारात घेतले जात नाही आणि त्यांना मुलगा आहे, की मुलगी याचा कोणताही फरक पडत नाही. भारत, चीन, अमेरिका आणि अनेक युरोपीय देशांमधील पालक यात सहभागी आहेत. ही विचारसरणी आणि सुधारणा उपायांमुळे गेल्या २५ वर्षांमध्ये जागतिक स्तरावर ७० लाख मुलींचा मृत्यू रोखला गेला आहे. तथापि, या चित्राची दुसरी बाजू अशी आहे, की अजूनही दरवर्षी दहा लाखांहून अधिक मुलींना गर्भाशयातच मारले जात आहे. गेल्या ४५ वर्षांमध्ये गर्भाशयातच मारल्या जाणाऱ्या मुलींची संख्या पाच कोटींपेक्षा जास्त झाली आहे. यावरून दिसून येते, की लिंगभेदाचा कलंक कायमचा संपवण्यासाठी अजून बरेच काही करायचे आहे. हे भारतालाही लागू होते. विकसित देशांपेक्षा येथे आव्हाने आणि अडचणी जास्त आहेत. कमी शिक्षण, रूढीवादी पालकत्व, अंधश्रद्धा आणि गैरसमज येथे नेहमीच प्रचलित राहिले आहेत. अर्थात कालांतराने परिस्थिती सुधारते. असेच काही ताज्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाने दर्शवले आहे.ताज्या अभ्यासानुसार भारतात मुलींपेक्षा मुलेच हवीत, याबाबतची पसंती १९९९ मध्ये ३३ टक्क्यांवरून आता १५ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. हे खूप उत्साहवर्धक लक्षण आहे; परंतु हे समजून घेतले पाहिजे, की १५ टक्के प्रमाणदेखील खूप जास्त आहे. त्याचा परिणाम देशातील प्रति एक हजार मुलांमागे ९४३ मुलींच्या लिंग गुणोत्तरात दिसून येतो. वैद्यकीय आणि वैज्ञानिक अभ्यास दर्शवतात, की जागतिक स्तरावर जन्मलेल्या मुलांचे मुलींच्या तुलनेतील प्रमाण १०५:१०० आहे. आज काही बाह्यशक्ती निसर्गाशी छेडछाड करत आहेत. या बाह्यशक्तीवर नियंत्रण ठेवले जात नाही, तोपर्यंत मुला-मुलींमधील हे असंतुलन दूर होणार नाही. ५७ ही एक महत्त्वाची तफावत आहे. सध्याच्या सुधारणेच्या गतीने ही तफावत भरून काढण्यासाठी पंचवीस वर्षांहून अधिक काळ लागेल. या मुली जगात प्रवेश करून आनंदी आणि समृद्ध जीवन जगतील याची खात्री करण्यासाठी त्यांचे संरक्षण वाढवणे आवश्यक आहे. विश्वाच्या संतुलनासाठीही हे आवश्यक आहे. दुर्दैवाने, भारतीय लोकसंख्येतील महिलांचे प्रमाण कमी झाले आहे. वेळोवेळी होणाऱ्या जनगणनेवरून हे स्पष्ट होते. एक किंवा दोन वगळता भारतातील प्रत्येक राज्यात महिलांच्या संख्येत घट दिसून येते. यामुळे सामाजिक असमतोलाचा धोका निर्माण झाला आहे, जो कोणत्याही बाबतीत चांगला संकेत नाही. याकडे लक्ष न दिल्यास असमतोल वाढेल.गेल्या दशकांमध्ये केलेल्या जनगणनेचा आढावा घेतल्यास महिलांची संख्या आणि त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सातत्याने घट होत असल्याचे दिसून येते. हरियाणा आणि पंजाबसारख्या सुशिक्षित आणि समृद्ध राज्यांमध्ये महिलांची संख्या दर हजार पुरुषांमागे ८५० पेक्षा कमी झाली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे, की राज्य जितके अधिक शिक्षित आणि समृद्ध असेल तितके महिला लोकसंख्या प्रमाण कमी असेल. केरळ हा अपवाद आहे. तथाकथित मागासलेल्या ईशान्येकडील राज्यांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक समृद्ध राज्यांपेक्षा लक्षणीयरीत्या चांगले आहे. काही सुशिक्षित आणि समृद्ध राज्यांमध्ये विवाहयोग्य पुरुषांना महिला शोधण्यात बरीच अडचण येत आहे. या पुरुषांना आता अविवाहित राहण्याची समस्या भेडसावत आहे. यामुळे त्यांच्या पालकांना मुलांसाठी उपवर मुली शोधण्यासाठी इतर राज्यांकडे वळावे लागत आहे. ही एक सामाजिक समस्या आहे. ही समस्या काही बुद्धिजीवी, सामाजिक कार्यकर्ते आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी चिंतेचा विषय होती. तथापि, त्यांचे मुलगे अविवाहित राहतील आणि वंश नष्ट होईल, या भीतीने लोकांना या समस्येवर उपाय शोधण्यास भाग पाडले आहे. त्यांना त्याची कारणे विचारात घेण्यास भाग पाडले गेले आहे. प्राचीन काळापासून भारतीय समाजात मुलांना खूप महत्त्व दिले गेले आहे. पालकांचा विश्वास आहे, की मुलाने पिंडदान (अंतिम संस्कार) केल्याशिवाय त्यांना स्वर्ग मिळत नाही.महागाई कमी होती, तेव्हा लोक अनेक मुलांच्या संगोपन आणि शिक्षणाचा भार सहज पेलू शकत होते. तथापि, वाढत्या महागाईमुळे कुटुंबांना आपली मुले एक किंवा दोनपर्यंत मर्यादित ठेवावी लागली आहेत. लोक मुलगी नव्हे, तर मुलगा व्हावा यासाठी विविध युक्त्या वापरत आहेत. एके काळी भूतबाधा करणाऱ्या आणि जादूटोणा करणाऱ्यांची मदत घेणारे लोक आता गर्भाशयात लिंग निर्धारण चाचण्या करण्यासाठी वैज्ञानिक साधनांचा आधार घेत आहेत. पुरुषप्रधान समाजात महिलांना या घृणास्पद प्रथेमध्ये पुरुषांसोबत सामील होण्यास भाग पाडले जाते. महिला असूनही, त्या पुरुषांना स्त्रीभ्रूणहत्येमध्ये पाठिंबा देताना दिसतात. यामुळे जोडप्यांना स्त्रीभ्रूणहत्येपासून मुक्तता मिळू शकते; परंतु त्यांना या वाईट प्रथेच्या परिणामांची माहिती नसते. ते विसरतात, की पुढील काळात त्यांच्या मुलांना लग्न करण्यासाठी मुली उपलब्ध होणार नाहीत. या कृतीचा प्रतिकूल परिणाम म्हणजे सतत कमी होत जाणारी महिला लोकसंख्या. या समस्येचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे समाजाची पितृसत्ताक मानसिकता. ही मानसिकता मुला-मुलींच्या संगोपन, शिक्षण, वाढ आणि विकासाच्या संधींमध्ये दुहेरी मानके निर्माण करते. पालक अनेकदा मुलींच्या जन्मापासूनच त्यांचे संगोपन, काळजी आणि उपचार याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांच्या बाळांचा मृत्यू होतो किंवा त्यांचे आरोग्य बिघडते. मुलींचे शिक्षण आणि उच्च शिक्षण समाजात अनुकूलपणे पाहिले जात नाही आणि म्हणूनच त्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही.समाजात मुलींना ओझे मानले जाते. याचे कारण म्हणजे त्यांच्या लग्नाच्या वेळी हुंड्याची तरतूद. दुसरीकडे, मुलांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य दिले जाते. लहान वयात मुलींच्या आरोग्य आणि विकासाकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांचा अकाली मृत्यू होतो. यामुळे लिंग असमतोल वाढतो. मुलींच्या अकाली मृत्यूचा परिणाम लगेच दिसून येत नाही. त्याचे परिणाम दहा ते बारा वर्षांनी दिसून येतात, जेव्हा त्याचे गंभीर स्वरूप समाज आणि सरकारसाठी चिंतेचा विषय बनते. बुद्धिजीवी आणि सरकारी यंत्रणा नंतर उपायांवर विचार करू लागतात. ‘लाडली योजना’, ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ आणि ‘कन्या विद्याधन’ यासारख्या सरकारी योजना या दिशेने सरकारने उचललेले यशस्वी पाऊल आहे.याव्यतिरिक्त सरकार विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न करते. मुलीच्या जन्मासाठी पालकांना प्रोत्साहन देणे आणि मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत करणे ही या दिशेने उचललेली ठोस पावले आहेत. सरकारने लिंग निर्धारण चाचण्यांना गुन्हेगार ठरवून आणि लिंग निर्धारण चाचण्या करणाऱ्या डॉक्टरांना शिक्षा करण्यासाठी कायदेशीर तरतुदी लागू करून प्रशंसनीय प्रयत्न केले आहेत. यामुळे लोकांची मानसिकता बदलली आहे. घटते पुरुष-स्त्री प्रमाण कमी करण्यासाठी सरकारी प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे; विशेषतः मागास आणि दुर्गम भागात. सरकार हे त्याच्या प्रसिद्धीद्वारे करत आहे. खरे तर, लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे, जेणेकरून ते मुला-मुलींना समान वागणूक देतील. मुलींच्या जन्माला ओझे न मानता या जगात प्रवेश करण्याची संधी दिली पाहिजे.आज समाजातील लोकांनी याचे दुष्परिणाम काही प्रमाणात ओळखले आहेत. समाजात महिलांची कमतरता, सुनेची कमतरता याची भीती, सामाजिक गुन्ह्यांमध्ये वाढ आणि बिघडत चाललेला सामाजिक असमतोल यामुळे लोकांच्या विचारसरणीमध्ये बदल झाला आहे. यामुळे मुलींच्या संख्येत काही सुधारणा झाली आहे; परंतु या दिशेने अजूनही बरीच सुधारणा आवश्यक आहे. समाजाने आज या दिशेने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा, पुढील काही दशकांमध्ये कोणत्याही महिलेला द्रौपदी बनण्यास भाग पाडले जाईल. ही वेळ येण्याची वाट न पाहता, आपण जनजागरणाच्या दिशेने ठोस पावले उचलली पाहिजेत.
संघर्षातून नेतृत्वाकडे नौरोती देवीची प्रेरणादायी कहाणी
दी लेडी बॉस : अर्चना सोंडे“जीवनातील कठीण परिस्थितीतूनच खरे नायक घडतात,” असे म्हटले जाते. राजस्थानच्या ग्रामीण भागातील नौरोती देवी हिच्या आयुष्यात हे वाक्य अक्षरशः खरे ठरते. ऐतिहासिकदृष्ट्या महिलांना मर्यादित वाव असलेल्या समाजात जन्म घेऊनही, तिने अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धाडस दाखवले. स्वतःसह अनेक उपेक्षितांच्या आयुष्यात बदल घडवून आणला. एकेकाळी दगड फोडून ४ रुपये मजूरी कमावणारी नौरोती देवी संघर्ष करणाऱ्या महिलांसाठी प्रेरणादायी व्यक्ती बनली आहे. राजस्थानमधील किशनगड जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात नौरोती देवीचा जन्म झाला.अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या घरातून ती बऱ्यापैकी गरीबी असलेल्या लग्नानंतर घरात नांदायला आली. पोटापाण्यासाठी नौरोती दगड फोडण्याचं काम करत होती. कष्टाचे काम करूनही तिला आणि इतर महिला कामगारांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन दिले जात होते. पुरुषांना रोज ७ रुपये, तर महिलांना केवळ ४ रुपये वेतन मिळत होते. ‘उच्च वेतन दराच्या मानकांनुसार काम होत नाही’ या कारणाखाली हा भेदभाव केला जात होता. हा सरळ सरळ अन्याय होता. या अन्यायाने नौरोती देवी शांत बसली नाही. तिने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. महिला कामगारांना एकत्र केले आणि न्यायासाठी संघर्ष सुरू केला.या लढ्याची दखल एका स्वयंसेवी संस्थेने घेतली. त्यांच्या मदतीने नौरोती देवीने हा प्रश्न न्यायालयात नेला. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत ती लढली. अखेर तिच्या संघर्षाचा विजय झाला. नौरोती आणि तिच्या महिला कामगारांना न्याय मिळाला. हा विजय नौरोती देवीसाठी एक नैतिक आणि ऐतिहासिक विजय ठरला. या संघर्षाने तिला उपेक्षितांच्या सक्षमीकरणासाठी अधिक बळ दिले. दगडफोड कामगार असलेल्या नौरोती देवीला गावकऱ्यांनी गावाचे नेतृत्व करण्याची विनंती केली. पुढे ती हरमाडा ग्रामपंचायतीची सरपंच बनली. सर्व प्रतिकूल परिस्थितींवर मात करत अढळ धैर्य आणि प्रामाणिकपणाने तिने नेतृत्वाची भूमिका स्वीकारली.सरपंच झाल्यानंतर सर्वप्रथम तिने स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. बंकर रॉय यांनी स्थापन केलेल्या तिलोनिया येथील बेअरफूट महाविद्यालयामध्ये तिने सहा महिन्यांचा साक्षरता कार्यक्रम पूर्ण केला. हरमाडापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या या महाविद्यालयात ती नियमितपणे जायची. अभ्यासूवृत्ती असल्यामुळे तिने अभ्यासक्रम लवकर पूर्ण केला. अभ्यासक्रम पूर्ण होताच त्याच महाविद्यालयात तिने काम करण्यास सुरुवात केली. याच काळात तिने संगणक वापरण्याचे कौशल्य आत्मसात केले.सरपंच म्हणून तिने ग्रामीण राजस्थानमधील सामाजिक कुप्रथांविरुद्ध लढा उभारला. पंचायत सचिवांना संगणक वापरण्याचे प्रशिक्षण दिले आणि प्रशासनात पारदर्शकता आणली. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी जलकुंभ, हातपंप, शौचालये आणि घरे उभारण्याचे अनेक उपक्रम तिने आपल्या कार्यकाळात राबवले.दारू माफियांविरुद्ध आवाज उठवून नौरोती देवीने केवळ आपल्या गावातच नव्हे तर शेजारच्या गावांमध्ये देखील स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा सुधारल्या. आपल्या कार्यकाळाच्या अखेरीस, ग्रामपंचायतीच्या तिजोरीत १३ लाख रुपयांची शिल्लक ठेवून तिने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली.शिक्षणानंतर तिने महिला सक्षमीकरणासाठी “साथीन” म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गावोगावी जाऊन महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करणे, स्वतःची संघर्षकथा सांगून प्रेरणा देणे हे तिचे मुख्य कार्य ठरले. ज्यांना कधीच शाळेचे तोंड पाहता आले नाही अशा महिलांना रोजगार कौशल्ये, गणित आणि हिंदी भाषा शिकवण्याचे महत्वाचे कार्य देखील तिने केले. नौरोती देवी “मजदूर किसान शक्ती संघटना” या तळागाळातील सामाजिक चळवळीच्या सक्रिय सदस्य आहे. किमान वेतनाच्या मागणीसाठी आणि माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तिने १९८१ पासून चाललेल्या राजस्थानमधील आंदोलनात सहभाग घेतला. या लढ्याचे फलित म्हणजे २००५ मध्ये देशभर लागू झालेला माहिती अधिकार कायदा होय.नौरोतीची प्रेरणादायी कहाणी भारताबाहेरही पोहोचली. महिला सक्षमीकरण आणि संघर्षाचा अनुभव सांगण्यासाठी तिने चीन, जर्मनी आणि अमेरिकेचा दौरा केला. आजही ती नियमितपणे हिंदी वर्तमानपत्रे वाचते, संगणकावर काम करते आणि समाजातील घडामोडींवर सुद्धा लक्ष ठेवते.पुढच्या आठवड्यात आपला देश प्रजासत्ताक दिन साजरा करेल. नौरोती देवीसारख्या महिला सर्वार्थाने प्रजासत्ताक भारताचे फलित आहे. या महिलांनी हा देश लोकशाहीदृष्ट्या समृद्ध केला आहे. नौरोती देवीसारख्या महिलांनी प्रजासत्ताक शब्दाला परिपूर्ण केले आहे.
शेअर बाजाराची खराब सुरुवात ! सेन्सेक्स ११५ अंकांनी घसरला ; निफ्टीचीही लाल रंगात ओपनींग
Stock Market Today। भारतीय शेअर बाजाराने आज आठवड्यातील तिसऱ्या व्यापार सत्राची सुरुवात नकारात्मक व्यवहाराने केली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५०, लाल रंगात उघडले. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक ३८५.८२ अंकांनी म्हणजेच ०.४७ टक्क्यांनी घसरून ८१,७९४.६५ वर उघडला, तर एनएसई निफ्टी ५० २५,१४१.०० वर उघडला, ९१.५० अंकांनी म्हणजेच ०.३६ टक्क्यांनी घसरला. तथापि, […] The post शेअर बाजाराची खराब सुरुवात ! सेन्सेक्स ११५ अंकांनी घसरला ; निफ्टीचीही लाल रंगात ओपनींग appeared first on Dainik Prabhat .
भारत - यूएई करारांवर शिक्कामोर्तब
नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचा भारताचा अल्पकालीन महत्त्वपूर्ण दौरा सोमवारी सायंकाळी पार पडला. सायंकाळी ४.३० वाजता ते दिल्लीतील पालम विमानतळावर दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारून अभिवादन केले व एकाच वाहनातून पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.यानंतर लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी शेख नाहयान आणि त्यांच्या कुटुंबीयांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील नक्षीकाम केलेला लाकडी झुला आणि काश्मिरी पश्मीना शाल चांदीच्या डब्यातून भेट दिली, ज्यातून भारताची हस्तकला व हातमाग परंपरा अधोरेखित झाली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये दहशतवादविरोधी सहकार्य, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण आणि गुंतवणूक या मुद्द्यांवर चर्चा झाली. आखातातील भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.मी माझ्या भावाला घेण्यासाठी आलो होतो :पंतप्रधान मोदी पंतप्रधान मोदींनी विमानतळावरील स्वागताचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना अल नाहयान यांचा उल्लेख 'माझे भाऊ' असा केला. भारत आणि यूएई यांच्यातील अतुट मैत्रीला ते किती महत्त्व देतात, हे त्यांच्या या भेटीवरून स्पष्ट होते. त्यांच्याशी होणाऱ्या चर्चेसाठी मी उत्सुक आहे, अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींनी अरबी भाषेतही पोस्ट लिहून या भेटीचे महत्त्व अधोरेखित केले.
मोहित सोमण: एकीकडे युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आज शेअर बाजार पुन्हा सलग तिसऱ्यांदा कोसळले आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स ३८५.८२ अंकाने व निफ्टी ५५ अंकाने कोसळला आहे. दोन्ही बँक निर्देशांकात आज घसरण कायम राहिल्याने बाजाराचा स्तर आणखी खालावला आहे. ट्रम्प यांनी आपला मोर्चा आक्रमकपणे ग्रीनलँड कडे वळवल्याने युरोपियन युनियन व ग्रीनलँड यांनी त्यांना तीव्र विरोध नोंदविला आहे. असे असताना जागतिक गुंतवणूकदारांना युएसमधील गुंतवणूकीबाबत शाश्वती वाटत नाही. आधीच आर्थिकदृष्ट्या खालावलेल्या स्थितीत युएस असताना अमेरिकेचे विस्तारवादी धोरण जगाला पुन्हा एकदा जागतिक मंदीच्या विळख्यात नेत आहे.आज शेअर बाजारात निफ्टी व्यापक मिडकॅप व स्मॉलकॅप, मायक्रोकॅप २५०, स्मॉलकॅप २५० या निर्देशांकात अधिक घसरण झाली असून दुसरीकडे क्षेत्रीय निर्देशांकात मेटल, फार्मा, पीएसयु बँक, ऑटो, रिअल्टी,हेल्थकेअर निर्देशांकात मोठी वाढ झाली असून सर्वाधिक घसरण आयटी, फायनांशियल सर्विसेस २५/५०, प्रायव्हेट बँक, कंज्यूमर ड्युरेबल्स, मिडिया निर्देशांकात झाली आहे.सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ ईरीआयएस (८.०७%), सफायर फूडस (६.१९%), एबी रिअल इस्टेट (५.५३%), सम्मान कॅपिटल (५.१३%), इंडियामार्ट इंटरनॅशनल (५.०४%), अदानी एंटरप्राईजेस (४.३७%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण एयु स्मॉल फायनान्स बँक (६.१२%), भारती एअरटेल (५.४१%), एचडीएफसी बँक (४.९६%), डीसीएम श्रीराम (४.५३%), जेबी केमिकल्स (४.४७%), ब्रेनबीज सोलूशन (४.२४%), होनसा कंज्यूमर (४.१८%), इन्फोसिस (३.२५%), किर्लोस्कर ऑईल (३.२५%), झेन टेक्नॉलॉजी (३.०४%) समभागात झाली आहे.
जिल्ह्यात सुगंधी, आकर्षक जांभळी मंजिरी बहरली
निसर्गाचा सुगंधी आविष्कार; अभ्यासक व निसर्गप्रेमी सुखावलेअलिबाग : रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य शेतांमध्ये जांभळी मंजिरीची सुगंधी व आकर्षक फुले बहरली. निसर्गाचा हा आविष्कार पाहण्यासाठी अनेक अभ्यासक व निसर्गप्रेमींची रेलचेल पहायला मिळत असून, अनेकांना तर हा निसर्गाचा सुगंधी चमत्कार वाटत आहे.जांभळी मंजिरी ही पाण वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव `पोगोस्टेमॉन डेक्क्नेनसिस’असे आहे. कास पठारावर ही मुबलक प्रमाणात आढळते; परंतु फुलोरा मात्र सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात येतो, तर कोकणात आढळणारी जांभळी मंजिरी भात कापणी झाल्यावर रुजून येते व फुलोरा मात्र नोंव्हेबर व डिसेंबर असा येतो. हा बदल अधिवास वेगळा असल्याने होतो. जिल्ह्यातही सड्यावर होणारी मंजिरी लवकर फुलते असे जिल्ह्यातील प्रसिद्ध निसर्ग अभ्यासक प्रवीण कवळे यांनी सांगितले. संपूर्ण शेत किंवा शेताचा काही भागहर फुलेली ही मनमोहक फुले पाहून जणुकाही जांभळ्या रंगाची झालरच पांघरली आहे असे वाटते. आजूबाजूच्या परिसरातही मंजिरीचा सुवास दरवळत असतो. परिणामी ही मनमोहक व आकर्षक फुले अनेकांचे लक्ष वेधून घेतात. येथून जाणारे अनेक प्रवासी व वाटसरू मंजिरीची ही जांभळी झालर पाहण्यासाठी आवर्जून थांबतात. काहीजण तर येथे नियमित देखील येतात. जांभळ्या मंजिरीचा हा अद्भुत नजारा काही दिवसच पहायला मिळतो फेब्रुवारीनंतर हवामानात बदल होऊ लागला की, ही फुले व झुडपे सुकून जातात आणि पुढीलवर्षी पावसाळा सरल्यावर व हिवाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा जांभळी मंजिरी बहरते. बुटकी आणि झुडुपवजा असलेल्या या झाडांची पाने हिरव्या रंगाची असतात. यांना आकर्षक रंगाची जांभळी फुले तुऱ्यांप्रमाणे येतात. सकाळी धुक्याचे दवबिंदू या फुलांवर पडल्यावर ते अधिकच आकर्षक व खुलून दिसतात.जांभळ्या मंजिरीची झाडे सुगंधी द्रव्याने युक्त असतात. त्यामुळे यापासून वेगवेगळी सुगंधी तेल काढली जातात, तसेच सुगंधी द्रव्य बनविण्यासाठी देखील वापरले जाते. जिल्ह्यात जांभळी मंजिरीचे प्रमाण जास्त जाणवू लागले आहे. त्यांची दोन तीन कारणे आहेत. पहिले म्हणजे ती पूर्वीपासून आहेच, पण कासपठार प्रसिद्ध झाल्यापासून अनेकजण तिला आवर्जून बघायला लागले, तसेच दुसरे कारण म्हणजे जिल्ह्यात शेती करण्याच्या पद्धती बदलत चालल्या आहेत पूर्वी बहुतांश शेतकरी भातपीक घेतल्यानंतर दुबार पीक म्हणून वाल, हरभरा, चवळी किवा मुग वगैरेसारखी पिके घ्यायचे. त्यासाठी पुन्हा नांगरट करावी लागायची. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात मंजिरी नष्ट व्हायची. मात्र अलिकडे पडिक शेतीचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे मंजिरीचे क्षेत्र वाढत असल्याचे निसर्ग अभ्यासक प्रवीण कवळे यांनी सांगितले.हा निसर्गाचा एक मनमोहक आविष्कार आहे. ठरावीक कालावधीतच आणि विशिष्ट शेतांमध्येच जांभळी मंजिरी फुललेली दिसते. पर्यावरणाच्या साखळीमध्ये तिचेही काही योगदान आहे. जांभळ्या मंजिरीच्या प्रजातीचे संरक्षण होणे आवश्यक आहे. या हंगामात हमखास ही फुले पाहण्यासाठी या ठिकाणी येतो. शाळकरी मुलांनी देखील अशा ठिकाणी भेट देणे आवश्यक आहे.- अमित निंबाळकर (कृषी व वनस्पती अभ्यासक)
मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचे अधिकृत यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. प्रसिद्ध व्यक्तींच्या प्रेरणादायी संदेशांसह व्हिडीओंव्यतिरिक्त, चॅनेलमध्ये परीक्षेशी संबंधित विविध नियम व कायदे स्पष्ट करणारे माहितीपूर्ण व्हिडीओ असतील.बोर्डाच्या परीक्षांदरम्यान विद्यार्थी, शाळा व परीक्षा केंद्र कर्मचाऱ्यांमधील गोंधळ दूर करणे हा उद्देश आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अध्यक्षा त्रिगुणा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, सर्वात प्रभावी संवाद माध्यमाद्वारे पोहोचण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. परीक्षेचे नियम व कार्यपद्धतींमध्ये काहीही नवीन नाही. लेखी कागदपत्रांच्या वेगवेगळ्या अर्थांमुळे गोंधळ निर्माण होतो. या शंका दूर करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य मंडळाच्या नऊ विभागप्रमुखांना विविध विषय सोपवण्यात आले आहेत.
कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा
नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर सुरू होत आहे. हा सामना भारतीय क्रिकेटसाठी आणि विशेषतः कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. या सामन्यात मैदानावर उतरताच सूर्या आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील १०० वा सामना खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १०० सामन्यांचा टप्पा ओलांडणारा सूर्यकुमार हा केवळ चौथा भारतीय खेळाडू ठरेल. आतापर्यंत भारतासाठी सर्वाधिक टी-२० सामने खेळण्याचा मान रोहित शर्मा (१५९ सामने), विराट कोहली (१२५ सामने) आणि हार्दिक पांड्या (१२४ सामने) यांच्याकडे आहे. आजच्या सामन्यात हार्दिक पांड्यादेखील विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची शक्यता आहे. केवळ सामन्यांचेच शतक नव्हे, तर सूर्यकुमारला या मालिकेत षटकारांचे 'चौकार' ठोकण्याचीही मोठी संधी आहे. त्याने आतापर्यंत विविध टी-२० सामन्यांत ३९५ षटकार ठोकले आहेत. या मालिकेत त्याने आणखी ५ षटकार लगावल्यास, टी-२० क्रिकेटमध्ये ४०० षटकारांचा टप्पा ओलांडणारा तो रोहित शर्मा (५४७) आणि विराट कोहली (४३५) यांच्यानंतरचा तिसरा भारतीय ठरेल.
‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?
बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिका गमावल्याच्या धक्क्यातून भारतीय क्रिकेट चाहते सावरत असतानाच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय)निवड समितीने एक प्रस्ताव तयार केला आहे. कामगिरी आणि सर्व फॉरमॅटमधील उपलब्धतेचे कठोर निकष लावत, २०२५-२६ च्या वार्षिक करारातून (केंद्रीय करार) विराट कोहली, रोहित शर्मा आणि वेगवा न गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना सर्वोच्च 'ए+' श्रेणीतून खाली आणण्याची शिफारस करण्यात आली आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने बीसीसीआयकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार, सध्याची 'ए+' ही सर्वोच्च श्रेणी (वार्षिक ७ कोटी रुपये मानधन) पूर्णपणे रद्द करण्यात यावी, अशी शिफारस आहे. या श्रेणीतील खेळाडूंना नवीन निकषांनुसार खालच्या श्रेणींमध्ये वर्ग केले जाईल.रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे ते केवळ एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये उपलब्ध आहेत. बीसीसीआयच्या नव्या धोरणानुसार, तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या आणि उपलब्ध असलेल्या खेळाडूंनाच सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. याच कारणामुळे या दोन्ही माजी कर्णधारांना थेट 'बी' श्रेणीत (३ कोटी रुपये मानधन) ढकलले जाण्याची शक्यता आहे. बुमराहच्या बाबतीतही असेच घडण्याची चिन्हे आहेत. तो दुखापतींमुळे वारंवार संघाबाहेर राहिला असून, त्यालाही 'ए' श्रेणीत (५ कोटी रुपये मानधन) हलवले जाऊ शकते.सध्याची मानधन रचना (२०२४-२५):ग्रेड ए+ : ७ कोटी रुपयेग्रेड ए : ५ कोटी रुपयेग्रेड बी : ३ कोटी रुपयेग्रेड सी : १ कोटी रुपयेबीसीसीआयच्या अपेक्स कौन्सिलच्या आगामी बैठकीत या संपूर्ण प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतला जाईल. भारतीय क्रिकेटमधील या संभाव्य 'भूकंपा'मुळे संघातील अंतर्गत स्पर्धेत आणि मानधनाच्या रचनेत मोठे बदल अपेक्षित आहेत.इशान-अय्यरचे पुनरागमनगेल्या हंगामात शिस्तभंगाच्या कारवाईमुळे करारातून वगळण्यात आलेले मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि यष्टिरक्षक इशान किशन यांना पुन्हा एकदा कराराच्या यादीत समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.शुभमन गिलला 'बम्पर' लॉटरीया बदलांचा सर्वाधिक फायदा सध्याच्या भारतीय संघाच्या कर्णधाराला होताना दिसत आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या शुभमन गिलला त्याच्या अष्टपैलू उपलब्धतेमुळे थेट सर्वोच्च श्रेणीत पदोन्नती दिली जाण्याची शक्यता आहे.
सॅटिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडद्वारे क्यूट्रिनो लॅब्सचे अधिग्रहण घोषित शेअर १% उसळला
मोहित सोमण: सॅटिन क्रेडिटकेअर नेटवर्क लिमिटेडने आज आपल्याच मालकीची उपकंपनी (Subsidiary) सॅटिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (STL) ने १७ जानेवारी, २०२६ रोजी एक किंवा अधिक टप्प्यांमध्ये क्यूट्रिनो लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड (QTrino) चे ७६.४०% पर्यंत इक्विटी शेअर भांडवल अधिग्रहित करण्यासाठी शेअर सबस्क्रिप्शन-कम-शेअरहोल्डर्स करार केला असल्याचे एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे.त्यामुळे ही अधिग्रहण करण्यात आलेली क्यूट्रिनो लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड ही आय आयटी डीप-टेक सायबरसुरक्षा स्टार्टअप कंपनी आहे. कंपनी प्रामुख्याने उद्योग आणि सरकारी संस्थांसाठी किफायतशीर, अत्याधुनिक, क्वांटम-सुरक्षित सुरक्षा उपाय विकसित करते. आपला उत्पादनांच्या पोर्टफोलिओत विस्तार करण्यासाठी हे धोरण कंपनीने अवलंबिले असल्याचे स्पष्ट होते.उपलब्ध माहितीनुसार, क्यूट्रिनोमधील बहुसंख्य भागभांडवलाच्या प्रस्तावित अधिग्रहणामुळे कंपनीला (STL) प्रगत तंत्रज्ञान आणि सायबरसुरक्षा क्षेत्रांमध्ये आपला व्यवसाय विस्तारण्यास अपेक्षित पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी आपल्या उपाययोजना अधिक मजबूत करण्यास आणि सॅटिन समूहाची एकूण तांत्रिक लवचिकता वाढविण्यास मदत होईल. कंपनीने याविषयी अधिकृत विधान करताना,'हा व्यवहार पूर्ण झाल्यावर, क्यूट्रिनो एक उपकंपनी म्हणून समाविष्ट केली जाईल, जी तंत्रज्ञान-आधारित सायबरसुरक्षा व्यवसायांमध्ये समूहाच्या धोरणात्मक प्रवेशाचे प्रतीक आहे.' असे म्हटले.कंपनीच्या व्यवस्थापनाने दूरदृष्टीच्या तत्त्वज्ञानाने प्रेरणेने सॅटिन समूह जागतिक बदलांचा अंदाज घेत आहे. नावीन्याचे धोरण स्वीकारत आपल्या भविष्यातील क्षमता उंचावण्यासाठी गुंतवणूक वाढवत असल्याचे दिसून येते. याबाबत कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की,तंत्रज्ञान हे समूहाच्या धोरणाचा केंद्रबिंदू राहिले आहे ज्यामुळे अधिक स्मार्ट उपाय, वर्धित कार्यात्मक लवचिकता आणि शाश्वत वाढ शक्य झाली आहे. हे अधिग्रहण सॅटिनच्या या विश्वासाचे प्रतिबिंब आहे की नावीन्य आणि जबाबदार वाढ एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत, जे एक सर्वसमावेशक, लवचिक आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम भविष्य घडवतात.'या घडामोडीवर भाष्य करताना, क्यूट्रिनो लॅब्सचे संस्थापक आणि संचालक, प्रा. डॉ जवाहर सिंग म्हणाले आहेत की, सॅटिन समूहाचा मजबूत संस्थात्मक पाठिंबा, तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे आणि दीर्घकालीन दृष्टिकोन यामुळे, ही भागीदारी उद्योग आणि सरकारी संस्थांसाठी आमचे क्वांटम-सुरक्षित सुरक्षा उपाय पुढे नेण्यासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ प्रदान करते. एकत्रितपणे, आम्ही सायबर लवचिकता मजबूत करण्याचे, प्रभावी नावीन्य आणण्याचे आणि भारताच्या वाढत्या डिजिटल सुरक्षा परिसंस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे ध्येय ठेवतो.'तसेच या घडामोडीवर भाष्य करताना, सॅटिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रुपिंदर कालिया म्हणाले,'हे सॅटिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या प्रगत, तंत्रज्ञान क्षमता निर्माण करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. डिजिटलदृष्ट्या एकमेकांशी जोडलेल्या जगात सायबरसुरक्षा अधिकाधिक महत्त्वाची ठरत असताना, QTrino चे डीप-टेक आणि क्वांटम-सेफ सुरक्षा उपाय आमच्या धोरणात्मक दृष्टिकोनाला पूरक ठरतात.ही भागीदारी नावीन्यपूर्णतेला गती देण्यासाठी, सायबर लवचिकता वाढवण्यासाठी आणि उद्योग व सरकारी संस्थांसाठी स्केलेबल, किफायतशीर सुरक्षा उपाय तयार करण्यासाठी प्रचंड क्षमता बाळगते. यामुळे सॅटिन टेक्नॉलॉजीजला पुढील पिढीच्या सायबरसुरक्षेमध्ये आघाडीवर स्थान मिळते,त्याचबरोबर सॅटिन ग्रुपच्या संपूर्ण तंत्रज्ञान परिसंस्थेला बळकटी मिळते आणि शाश्वत दीर्घकालीन मूल्य निर्माण होते.'सॅटिन क्रेडिटकेअर नेटवर्क लिमिटेड (SCNL किंवा सॅटिन) ही देशातील एक मायक्रोफायनान्स संस्था (MFI) आहे, जी २६ राज्ये, ५ केंद्रशासित प्रदेश आणि १००००० पेक्षा जास्त गावांमध्ये कार्यरत आहे. या व्यतिरिक्त कंपनी नॉन-MFI सेगमेंटमध्ये विविध प्रकारची आर्थिक उत्पादने देखील देते, ज्यात MSME साठी कर्ज आणि परवडणाऱ्या घरांसाठी कर्जांचा समावेश आहे. एप्रिल २०१७ मध्ये, कंपनीने (SCNL) ने परवडणाऱ्या आणि सूक्ष्म-गृहनिर्माण क्षेत्रात कर्ज देण्यासाठी सॅटिन हाउसिंग फायनान्स लिमिटेड (SHFL) या पूर्ण मालकीच्या गृहनिर्माण वित्त उपकंपनीची स्थापना केली होती.जानेवारी २०१९ मध्ये, SCNL ला सॅटिन फिनसर्व्ह लिमिटेड (SFL) द्वारे MSME व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतंत्र NBFC परवाना मिळाला. ऑगस्ट २०२४ मध्ये, SCNL ने सॉफ्टवेअर सेवांसाठी सॅटिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (STL) या उपकंपनीची स्थापना केली जी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन नाविन्यपूर्ण, जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपाय विकसित करण्यासाठी समर्पित आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये, सेबीने (SEBI) नियमांनुसार श्रेणी II पर्यायी गुंतवणूक निधी (AIF) म्हणून काम करण्यासाठी सॅटिन ग्रोथ अल्टर्नेटिव्हज लिमिटेडची स्थापना करण्यात आली होती जेणेकरून प्रभाव आणि सक्षमीकरणाच्या कार्याला चालना मिळेल.कंपनीच्या मते ही कंपनी महिला उद्योजक आणि हरित उपक्रमांसाठी कार्यान्वित करण्यात आली होती. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत, सॅटिन ग्रुपच्या १६१६ शाखा होत्या आणि त्यात १६९५० कर्मचारी कार्यरत होते, जे ३३.३ लाख ग्राहकांना सेवा देतात. सकाळच्या सत्रात सॅटिन कंपनीच्या शेअर्समध्ये सुरुवातीला १% वाढ झाली आहे. सकाळी ९.४३ वाजता कंपनीच्या शेअर्समध्ये ०.३४% वाढ झाल्याने शेअर १४९.२२ रूपयांवर व्यवहार करत आहे.
बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती
गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराममुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून देणारी 'शटल क्वीन' सायना नेहवाल हिने अखेर व्यावसायिक बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सतावणाऱ्या गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे सायनाने हा भावनिक निर्णय घेतला असून, भारतीय बॅडमिंटनमधील एका देदीप्यमान युगाचा अंत झाला आहे.तसेच कोणत्याही सोशल मीडिया पोस्टऐवजी एका विशेष मुलाखतीत सायनाने आपल्या निवृत्तीचा खुलासा केला. तिने सांगितले की, माझ्या गुडघ्यातील 'कार्टिलेज' पूर्णपणे खराब झाले असून मला संधिवाताचा त्रास सुरू झाला आहे.त्याचप्रणामे पूर्वी मी दिवसाला ८ ते ९ तास सराव करायचे, पण आता माझे गुडघे एका तासातच उत्तर देतात आणि त्यांना सूज येते. जेव्हा शरीर साथ देत नाही, तेव्हा थांबणेच योग्य असते.\माझ्या अटींवर जगले, माझ्या अटींवर थांबले : निवृत्तीबाबत बोलताना सायना म्हणाली, मी माझ्या अटींवर खेळायला सुरुवात केली होती आणि आज माझ्याच अटींवर थांबले आहे. तिने आपली शेवटची व्यावसायिक स्पर्धा २०२३ मध्ये सिंगापूर ओपनमध्ये खेळली होती.देशाकडून सन्मान आणि कौतुक : सायनाच्या अतुलनीय कामगिरीबद्दल तिला अर्जुन पुरस्कार (२००९) आणि देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२०१०) देऊन गौरवण्यात आले आहे. सायनाच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत असून, तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार
मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान भरून काढण्याचा मार्ग शोधत असतानाच, गुगलने आयपीएलमध्ये प्रवेश केला आहे, ज्यामुळे बीसीसीआयला आता एकप्राकरे लॉटरीच लागणार असल्याचे दिसत आहे. कारण, यामुळे बोर्ड एकाच हंगामात करोडो रुपये कमवू शकणार आहे. बीसीसीआय लवकरच या भागीदारीची घोषणा करू शकते.एआय आता क्रिकेटच्या जगातही स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. म्हणूनच ते सर्वात मोठ्या क्रिकेट लीग आयपीएलमध्ये प्रवेश करू इच्छित आहे. गुगलचा प्रगत एआय प्लॅटफॉर्म 'जेमिनी' इंडियन प्रीमियर लीग चा अधिकृत भागीदार बनण्याची शक्यता आहे. ही भागीदारी २०२६ ते २०२८ या हंगामांकरिता असेल. या करारामुळे भारतीय क्रिकेटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होईल, ज्यामुळे चाहत्यांच्या अनुभवात बदल होण्याची शक्यता आहे. गुगलने या भागीदारीसाठी अंदाजे ₹२७० कोटी गुंतवले आहेत. यामध्ये प्रत्येक आयपीएल हंगामासाठी सुमारे रू.९० कोटींचा समावेश आहे. आयपीएलच्या लोकप्रियतेमुळे, 'जेमिनी' प्लॅटफॉर्म भारतातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. सामन्यादरम्यान एआय-आधारित आकडेवारी, खेळाडूंची कामगिरी आणि क्षणांचे विश्लेषण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण केले जाईल, ज्यामुळे संघांना धोरण ठरवण्यास मदत मिळेल. चाहत्यांच्या आवडीनुसार सामन्याचे हायलाइट्स आणि सामग्री तयार केली जाईल. एआय-आधारित गेम्स आणि अनुभवाद्वारे चाहत्यांना आयपीएलमध्ये सहभागी करून घेतले जाईल. याआधी ‘चॅट जीपीटी’ने वुमेन्स प्रीमियर लीग २०२६मध्ये भागीदारी केली होती. हा करार बोर्डाने दोन वर्षांसाठी १६ कोटी रुपयांना केला होता. ड्रीम ११ टीम इंडियाचे जर्सी स्पॉन्सर होते. त्यांनी माघार घेतल्यानंतर, अनेक कंपन्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेवटी हा करार शेवटी अपोलो टायर्सकडे गेला, ज्यांनी ५५४ कोटी दिले होते. अर्थात गुगल आणि आयपीएलची ही भागीदारी क्रीडा मनोरंजनाची दिशा ठरवणारी ठरू शकते.
वाहनधारकांंनो लक्ष द्या, टोलबाबत नियम केले आणखी कडक! केंद्राचा निर्णय, कारण काय? वाचा…
Toll rules :वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने टोलच्या नियमात काही महत्वाचे बदल केले असून, टोलसंंदर्भातील नियम आणखी कडक करण्यात आले आहेत. सरकारने फास्टॅग किंवा यूपीआयद्वारे टोल भरणे अनिवार्य करण्याचा निर्णय अगोदरच घेतला आहे. आता जर टोल चुकवायचा प्रयत्न केला किंवा टोल भरला नाही तर वाहनधारकांना मोठा फटका बसणार असून, मोठ्या समस्या त्यांच्यापुढे […] The post वाहनधारकांंनो लक्ष द्या, टोलबाबत नियम केले आणखी कडक! केंद्राचा निर्णय, कारण काय? वाचा… appeared first on Dainik Prabhat .
Amruta Khanwilkar: ‘धुरंधर’ सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास महिना उलटला असला, तरी या चित्रपटाची चर्चा अजूनही थांबलेली नाही. सिनेमातील संवाद, गाणी, नृत्य आणि कलाकारांचा अभिनय यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. विशेषतः अभिनेता अक्षय खन्ना याने साकारलेली रहमान डकैतची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी अक्षय खन्नाच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. […] The post Amruta Khanwilkar: ‘धुरंधर’पेक्षा अक्षय खन्नाच्या ‘या’ भूमिकेची फॅन आहे अमृता खानविलकर; म्हणाली, “एक महाराष्ट्रीय म्हणून…” appeared first on Dainik Prabhat .
ट्रम्प पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान युद्धावर बोलले ; म्हणाले, “माझ्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचले”
Trump on india-pakistan war। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दररोज असे काही ना काही करतात ज्यामुळे ते चर्चेत राहतात. सध्या त्यांचे संपूर्ण लक्ष नोबेल शांतता पुरस्कारावर आहे. ट्रम्प यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी नॉर्वेच्या पंतप्रधानांना पत्र लिहिले. त्या पत्रात त्यांनी म्हटले की नोबेल शांतता पुरस्कार नॉर्वे नियंत्रित करतो आणि ट्रम्प यांना हा सन्मान मिळाला पाहिजे” असेन ट्रम्प […] The post ट्रम्प पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान युद्धावर बोलले ; म्हणाले, “माझ्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचले” appeared first on Dainik Prabhat .
५९ जिल्हा परिषद, ११८ पंचायत समित्यांसाठी मंगळवारी २३ उमेदवारी अर्ज दाखल
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जिल्हा परिषद मतदारसंघ आणि ११८ पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी उमेदवारांमध्ये उत्साह दिसून आला. सोमवारी तिसऱ्या दिवशी अलिबाग, खालापूर, रोहा, माणगाव या चार तालुक्यांतून उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर उर्वरित अकरा तालुक्यांतून एकही अर्ज दाखल झाला नाही. आतापर्यंत २३ अर्ज दाखल झाले.जिल्हयातील सर्वच तालुक्यांतून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ८१६ व्यक्तींनी १५१६ कोरे उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे. रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील अलिबाग, खालापूर आणि माणगाव तालुक्यातून २३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. या तीन तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले अर्ज सादर केले. अलिबाग तालुक्यातील जि.प.साठी पाच अर्ज दाखल झाले असून, जिल्हा परिषदेच्या आवास मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप भोईर यांनी उमेदवरी अर्ज दाखल केला. जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपाच्या चित्रा पाटील यांनी आंबेपूर मतदारसंघातून उमदेवार अर्ज दाखल केला. चेंढरे मतदरासंघातून आदिती नाईक, थळ मतदारसंघात मानसी महेंद्र दळवी, काविरमधून शिवसेनेचे अनंत गोंधळी यांनी अर्ज भरले. काविर गणातून शिवसेनेचे संतोष निगड यांनी आपला उमदेवारी अर्ज दाखल केला. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून अलिबाग तालुक्यातील शहापूर, थळ आंबेपूर, आवास,, चेंढरे, कावीर या मतदारसंघांतून सहा, रोहा तालुक्यातील घोसाळे, माणगाव तालुक्यातून ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. १५ तालुक्यातील ५९ जिल्हा परिषद गटांसाठी ३४५ व्यक्तींनी ६३६ कोरे उमेदवारी अर्ज घेतले आहे. उरण तालुक्यातून सर्वाधिक कोरे अर्ज घेण्यात आले. जिल्हयात पंचायत समितीसाठी खालापूर तालुक्यातून दोन, अलिबागमधून दोन, माणगावमधून सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, तर पंचायत समितीच्या ११८ गणांसाठी ४७१ व्यक्तींनी ८८० कोरे उमेदवारी अर्ज घेतले आहे. पनवेल, पेण, रोहा, माणगाव येथून सर्वाधिक अर्ज घेण्यात आलेत.
वाडा-भिवंडी-मनोर महामार्गाची दुरवस्था
ओव्हरलोड वाहनांमुळे रस्ते खिळखिळे, प्रशासन सुस्तवाडा : वाडा-भिवंडी-मनोर या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या महामार्गावर नियमबाह्य वजन वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांनी उच्छाद मांडला आहे. क्षमतेपेक्षा तिप्पट-चौपट ओझे लादलेले ३० ते ४० टनांचे ट्रक आणि कंटेनर या मार्गावरून बेधडक धावत असल्याने सर्वसामान्यांचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. प्रशासनाच्या डोळ्यांदेखत सुरू असलेल्या या 'ओव्हरलोड' साम्राज्यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून नागरिक दहशतीच्या छायेखालीवावरत आहेत.हा महामार्ग प्रामुख्याने ग्रामीण भागातील दळणवळणासाठी असून त्याची क्षमता साधारण ८ ते १२ टन वजनासाठी आहे. मात्र, औद्योगिक क्षेत्रातील अवजड मालाची वाहतूक करणाऱ्या डंपर आणि कंटेनरनी या रस्त्याची वाट लावली आहे. सिमेंट काँक्रीटचा रस्ता असूनही सततच्या प्रचंड वजनामुळे रस्ता जागोजागी खचला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. अरुंद रस्ता आणि त्यात हे अवजड 'राक्षस' यामुळे दुचाकीस्वार आणि लहान वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अनेक वाहने केवळ क्षमतेपेक्षा जास्त वजनच भरत नाहीत, तर वेगमर्यादेचेही उल्लंघन करत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी बेकायदेशीर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रात्रीच्या अंधारात भरधाव वेगाने जाणाऱ्या या वाहनांमुळे अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. अपघात झाला की पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग धाव घेतात, काही वेळ तपासणीचे नाटक होते आणि पुन्हा परिस्थिती 'जैसे थे' होते, असा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. वाहतूक पोलीस आणि आरटीओ विभाग या ओव्हरलोड वाहनांवर ठोस कारवाई का करत नाही? असा सवाल आता विचारला जात आहे. कारवाई केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष रस्त्यावर दिसावी, अशी मागणी जोर धरत आहे. जर ओव्हरलोड वाहतुकीवर तातडीने नियंत्रण मिळवले नाही आणि रस्त्याची दुरुस्ती केली नाही, तर भविष्यात मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र
पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षाउत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्यामुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशातील सर्व शाळांमधील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्याने यंदा राज्यात सुमारे पावणेपाच लाख उमेदवारांनी परीक्षा दिल्याचा विक्रम झाला. डीएड/बीएड पदविकाधारकांसह कार्यरत शिक्षकांच्या संख्येमुळे यंदा निकालाचा टक्का ८.५३ टक्क्यांपर्यंत वाढला. आगामी काळात कार्यरत शिक्षक आणि डीएड पदविकाधारकांसाठी स्वतंत्र परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) अंतरिम निकाल जाहीर झाला आहे. परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबरला राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्यात आली. अंतरिम उत्तरसूची १९ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक १ आणि २ च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तरांसंदर्भातील त्रुटी, आक्षेप २७ डिसेंबरपर्यंत मागविण्यात आले होते. दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची १३ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर नुकताच अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.अंतरिम निकाल ऑनलाइन प्रणालीद्वारे उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निकालावर आक्षेप किंवा त्रुटी नोंदविण्यासाठी २१ जानेवारीपर्यंत मुदत आहे. उमेदवारांना त्यांच्या लॉगिनद्वारेच आक्षेप नोंदवता येणार आहेत. अन्य मार्गाने आलेल्या आक्षेपांचा किंवा अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.या परीक्षेसाठी ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख तीन हजार ३३४ उमेदवारांनी पेपर एकसाठी, तर २ लाख ७२ हजार ३३५ उमेदवारांनी पेपर दोनसाठी नोंदणी केली आहे. परीक्षा परिषदेने २०१३ पासून आठ वेळा टीईटी परीक्षा घेतली. परीक्षा दिलेल्या २९ लाख ७४ हजार ६०० उमेदवारांपैकी १ लाख ६ हजार ६६३ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यामुळे टीईटीमध्ये पात्र ठरण्याचे सरासरी प्रमाण ३.५ टक्के आहे. आतापर्यंत सर्वाधिक निकाल २०१८ मध्ये ५.१३ टक्के, त्यापूर्वी २-१३ मध्ये ५.०२ टक्के लागला होता. बाकी सर्व परीक्षांचा निकाल २.३ टक्के ते ३.७० टक्के या दरम्यान आहे.
‘राष्ट्रगीता’वरून तामिळनाडूत हाय व्होल्टेज ड्रामा
राज्यपालांचा सभागृहातून सभात्यागनवी दिल्ली : तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या सरकारमधील वाद आता टोकाला पोहोचला आहे. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा आरोप करत राज्यपालांनी थेट सभागृहातून बाहेर पडणे पसंत केले. तमिळ गीतासोबतच राष्ट्रगीतही वाजवले जावे, ही राज्यपालांची मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावल्याने हा पेच निर्माण झाला आहे.विधानसभेच्या सत्राची सुरुवात परंपरेनुसार तमिळ गीताने झाली. राज्यपालांनी आग्रही मागणी केली की तमिळ गीतासोबतच राष्ट्रगीतही वाजवले गेले पाहिजे. या मागणीवरून विधानसभा अध्यक्ष अप्पावू व राज्यपाल यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. अध्यक्षांनी ही मागणी मान्य करण्यास नकार दिल्यानंतर, संतापलेल्या राज्यपालांनी अभिभाषण न करताच सभागृहातून काढता पाय घेतला.सभागृहाबाहेर पडल्यानंतर राज्यपालांनी नाराजी उघडपणे बोलून दाखवली. ‘राष्ट्रगीताला योग्य सन्मान दिला जात नाही, याचे मला दुःख वाटते. माझ्या अभिभाषणात वारंवार अडथळे आणले गेले. मला माझ्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे, पण राष्ट्रगीताचा सन्मान हा असायला हवा,’ असे आर. एन. रवी यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, ‘बोलताना माझा माईक बंद करून माझा अपमान करण्यात आला,’ असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.सलग तिसऱ्या वर्षी बहिष्कारआर. एन. रवी यांनी तामिळनाडू विधानसभेच्या सत्रावर बहिष्कार टाकण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०२४ आणि २०२५ मध्येही त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांशी असहमती दर्शवत अभिभाषण देण्याचे टाळले होते. राजभवनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सरकारवर असहकार्याचा आरोप करण्यात आला आहे.विधानसभा अध्यक्षांचे प्रत्युत्तरराज्यपालांच्या आरोपांवर विधानसभा अध्यक्ष अप्पावू यांनी तत्काळ स्पष्टीकरण दिले. ‘विधानसभेत केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना त्यांचे विचार मांडण्याची मुभा असते. कोणीही आपल्या अटी सभागृहावर लादू शकत नाही. सरकारने राज्यपालांच्या भाषणाची सर्व तयारी केली होती, पण त्यांनी स्वतःच नकार दिला,’ असे अध्यक्षांनी ठणकावून सांगितले.
बस पुरवण्यासह चार्जिंग स्टेशनचे कामही पुरवठादाराकडून रखडले
ठोस कारवाई करण्यास एसटी महामंडळ धजावत नसल्याची चर्चामुंबई :राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ई-बस प्रकल्पाचा मोठा गाजावाजा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात चित्र निराशाजनक आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अपेक्षित एक हजार गाड्यांपैकी २५ टक्के गाड्या ताफ्यात दाखल झालेल्या नाहीत. पुरवठादाराकडून बस पुरवण्यासह चार्जिंग स्टेशनचे कामही रखडले आहे. वारंवार कालमर्यादा ओलांडलेल्या पुरवठादारांवर ठोस कारवाई करण्यास एसटी महामंडळ धजावत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.केंद्रीय अनुदानावर एसटी महामंडळाच्या ताफ्यातील ३० टक्के बसगाड्या विजेवर धावणाऱ्या करण्यासाठी पाच हजार १५० ई-बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. १३ फेब्रुवारी २०२४ पासून या ताफ्यात येण्यास सुरुवात झाली. वर्षभरानंतर केवळ २२२ गाड्या दिल्याने महामंडळाने पुरवठादाराला नाममात्र चार कोटी रुपयांचा दंड ठोठावला. एप्रिल २०२५ पासून दरमहा २०० गाड्या देण्याचे आश्वासन कंत्राटदाराने महामंडळाला दिले, मात्र डिसेंबरअखेर ५१५ गाड्यांची भर पडली.३१ डिसेंबर २०२५ अखेर ७३७ बसगाड्या एसटी ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यात नऊ मीटरच्या २६० व १२ मीटरच्या ४७७ अशा गाड्यांचा समावेश आहे. परिणामी, एसटी प्रवासी अन्य प्रवासी वाहनांकडे वळत आहेत. एसटीच्या वाहन स्थितीनुसार ३१ डिसेंबरपर्यंत एसटी ताफ्यात १५ हजार २२१ बसगाड्या आहेत. यातील निम्म्याहून अधिक आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे मार्गात बंद पडणे, नादुरुस्त असणे, गाड्यांची स्थिती बिकट असणे अशा तक्रारी वाढत आहेत.राज्यातील १७१ ठिकाणी उच्च क्षमतेचे चार्जिंग स्टेशन उभारणीचे कामदेखील याच बस-पुरवठादाराकडे आहे. डिसेंबरअखेर केवळ ३१ ठिकाणी अशी स्टेशन कार्यान्वित करण्यात आली आहेत.एसटी महामंडळाला बसची गरज : एसटी कर्मचाऱ्यांचा दोन वर्षांपूर्वी झालेल्या संपाची एसटी महामंडळाला मोठी झळ बसली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा २०२१ मध्ये झालेला संप सुमारे ५४ दिवस चालला होता, जो २८ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू झाला आणि २० डिसेंबर २०२१ रोजी संपला, ज्यात कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरण आणि पगारवाढीच्या मागण्यांसाठी आंदोलन केले होते. तब्बल दोन महिने बस जाग्यावरच उभ्या राहिल्याने अनेक बसवर परिणाम झाल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
शबरीमाला सोने चोरी प्रकरणात 'ईडी’कारवाई
तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारीनवी दिल्ली : केरळमधील पवित्र सबरीमाला अय्यप्पा मंदिराशी संबंधित सोने चोरी प्रकरण आता एका मोठ्या राजकीय आणि धार्मिक वादात सापडले आहे. मंदिराच्या द्वारपाल आणि इतर पवित्र वास्तूंवर सोन्याच्या मुलामा चढवण्यात अनियमिततेचे आरोप समोर आल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या प्रकरणात सक्रिय झाले आहे.ईडीने मनी लाँड्रिंगच्या दृष्टिकोनातून तपास अधिक तीव्र केला आहे आणि केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमधील सुमारे २१ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत केली जात आहे. केरळ पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने यापूर्वी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.केरळ उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक (एसआयटी) मंदिरातून सोन्याच्या कथित गैरव्यवहाराची फौजदारी चौकशी करत असताना हे छापे टाकण्यात आले आहेत. आतापर्यंत, एसआयटीने या प्रकरणात १३ जणांना अटक केली आहे, ज्यात मंदिराचे मुख्य पुजारी कंदारारू राजीवारू यांचा समावेश आहे. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.मुख्य आरोपीच्या जागेवरही छापे टाकण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी बंगळूरुमध्ये मुख्य आरोपी उन्नीकृष्णन पोटी आणि त्रावणकोर देवस्वोम बोर्ड (टीडीबी)चे माजी अध्यक्षए. पद्मकुमार यांच्याशी संबंधित जागेवरही छापे टाकत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे केरळ विधानसभेतही मोठा गोंधळ उडाला, ज्यामुळे सरकार, देवस्वोम बोर्ड आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वादविवाद सुरू झाले.
मुंबई पालिकेच्या शैक्षणिक इतिहासात नवा टप्पा
सीबीएसईच्या पहिल्या १० वीच्या बॅचसाठी ३६६ विद्यार्थी तयार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) संलग्न १८ शाळा सुरू आहेत. त्यातील १० शाळांमधील ३६६ विद्यार्थी प्रथमच दहावीच्या परीक्षेला सामोरे जात आहेत. या विद्यार्थ्यांकडून परीक्षेच्या दृष्टीने सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जात आहेत. याशिवाय काही खासगी शाळांच्या तज्ज्ञ शिक्षकांचेही विशेष सराव परीक्षेसाठी सहाय्य घेण्यात येत आहे.मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, तामिळ, तेलगू, कन्नड या आठ भाषांमध्ये शिक्षण दिलं जातं. तसेच एसएससी, सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी अशा चार मंडळाचे अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शाळा आहेत.विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महानगरपालिकेचा शिक्षण विभाग विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेत असतो. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेला सामोरे जात असताना त्यांच्यासाठी विशेष अभ्यास वर्ग घेणे, प्रश्नपत्रिकांचा संच सोडवून घेणे, तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन असे अनेक टप्प्यांवर महानगरपालिका शिक्षण विभाग सकारात्मक प्रयत्न करीत असते. गेली अनेक वर्षे माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या विद्यार्थ्यांना याचा उत्तम लाभ मिळत आहे आणि निकालाची टक्केवारी ९३ टक्के इतकी पोहोचली आहे.याच अनुषंगाने आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातून (सीबीएसई) इयत्ता दहावीच्या परीक्षेला जे विद्यार्थी सामोरे जाणार आहेत, त्यांच्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येत आहेत.१७ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक ११ मार्च २०२६ दरम्यान परीक्षा पार पडणार आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडविण्याविषयी विशेष मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. मुंबई महानगरपालिका शाळांमधील शिक्षक या विद्यार्थ्यांकडून सराव करून घेत आहेत. गणित, विज्ञान, सामाजिक शास्र, इंग्रजी, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान या विषयांवर अधिक लक्ष देण्यात येत आहे. यासोबतच काही खासगी सीबीएसई शाळांमधील तज्ज्ञ शिक्षकांचीही यासाठी मदत घेण्यात येत आहे. सदर तज्ज्ञ शिक्षकांचे उत्तरपत्रिका लिहिण्याविषयी विशेष मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
माघी श्रीगणेशोत्सव २०२६ करता कृत्रिम तलावांसह विविध सुविधा सज्ज
मुंबई : माघी श्रीगणेशोत्सव २२ जानेवारी २०२६ पासून साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात यावा, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून श्रीगणेशोत्सव मंडळांसाठी 'तात्पुरता मंडप उभारणी' परवानगीकरिता ऑफलाईन पद्धतीने एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच मंडप उभारणी परवानगीसाठी १०० रुपये इतके नाममात्र शुल्क आकारण्यात आले आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन नद्या,समुद्र,तलाव किंवा इतर नैसर्गिक पाणीसाठ्यांमध्ये न करता; महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावांमध्येच करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळे व भाविकांना पुन्हा एकदा करण्यात येत आहे.माघी श्रीगणेशोत्सवात श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सुरळीत पद्धतीने पार पडावे, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने सर्व आवश्यक उपाययोजना व अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ तसेच ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ’ यांनी जारी केलेल्या सुनिश्चित कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणीही सुयोग्य प्रकारे करण्यात येत आहे.६ फुटांपर्यंत उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार रंगीत रसायने, थर्माकोल, प्लास्टिक, कापड, फुले, हार, सजावटीचे साहित्य इत्यादी घटक पाण्यात विसर्जित करण्यास बंदी आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळांनी तसेच भाविकांनी निर्माल्य हे निर्माल्य कलशातच टाकावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
श्री सिद्धिविनायक मंदिरात ‘माघी गणेश जयंती महोत्सवा'स सुरुवात
गायन, वादन, शोभायात्रांसह आठवडाभर चालणार धार्मिक सोहळामुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात २२ जानेवारीला होणाऱ्या माघी गणेश जयंतीनिमित्त माघ श्री गणेश जयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे. सोमवारपासूनच या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. १९ जानेवारी ते रविवार, २५ जानेवारीपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील नामवंत कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत.या महोत्सवादरम्यान, श्री सिद्धिविनायक मंदिरात दररोज पहाटे सकाळी ५ ते ५.३० दरम्यान काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात होईल. त्यानंतर दिवसभर महानैवेद्य, नमस्कार, अभिषेक तसेच अन्य विधी पार पडतील. सायंकाळी लोकनृत्य, भजन, शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य आणि वाद्यसंगीत अशा विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.विविध कलाकारांचे सादरीकरण : सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध तालवादक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते शिवमणी यांचे सादरीकरण करण्यात आले. मंगळवारी बासरीवादनाचे ज्येष्ठ कलाकार पंडित राकेश चौरसिया यांची बासरी मैफल होईल. संध्याकाळी ओडिसी नृत्यप्रकाराचे सादरीकरणही होणार आहे. बुधवारी प्रसिद्ध सतारवादक पंडित निलाद्री कुमार यांचा सतारवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रघुनाथ फडके यांचे गीत रामायण सादरीकरणही होणार आहे.२२ तारखेला भव्य रथ शोभायात्रा : २२ जानेवारीला मुख्य माघी गणेशोत्सवाचा सोहळा पार पडणार आहे. यासाठी दुपारी ३ वाजता भव्य रथ शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी, २३ जानेवारी रोजी पद्मश्री पुरस्कार विजेते विजय घाटे यांचे तबलावादन होईल.
महापालिकेच्या अर्थसंकल्पाची औपचारिकता पूर्ण होणार
स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर आयुक्त मांडणार अर्थसंकल्पमुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा अर्थसंकल्प येत्या ३ फेब्रुवारी रोजी मांडला जाणार असून प्रत्यक्षात महापालिकेची निवडणूक होऊन नगरसेवक निवडून आले असले तरी स्थायी समिती अध्यक्षांची नेमणूक न झाल्यामुळे हा अर्थसंकल्प प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त डॉ.भूषण गगराणी हे नामधारी स्वीकारण्याची शक्यता आहे. हा अर्थसंकल्प नामधारी स्वीकारताना त्यातील विकासकामे तसेच योजना आदींची माहिती घोषित न करता बंद स्थितीत तो ठेवून दिला जाणार आहे. त्यामुळे त्यापुढील आठवड्यात स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर हा अर्थसंकल्प आयुक्त म्हणून गगराणी हे स्थायी समितीत मांडतील अशाप्रकारची माहिती मिळत आहे.अशाप्रकारे अर्थसंकल्प मांडल्यास नियमानुसार अर्थसंकल्प मांडलाही जाईल आणि स्थायी समितीपुढेही अर्थसंकल्प सादर करण्याचे उद्धिष्ट साध्य होणार आहे.मुंबई महापालिकेच्या आगामी सन २०२६-२७ करता अर्थसंकल्प येत्या फेब्रुवारी मांडला जाणार आहे. मात्र, हा अर्थसंकल्प यंदा कुणी कुणाला सादर केला जावा याकडे खलबत सुुर आहे. येत्या ३ फेब्रुवारी रोजी महापालिकेचा आगामी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.मात्र, यंदा निवडणुका पार पडल्यामुळे आणि नगरसेवक निवडून आल्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष हे अर्थसंकल्प स्वीकारतील अशाप्रकारची शक्यता होती; पंरतु महापौर आरक्षण विलंबाने पडल्याने तसेच स्थायी समिती अध्यक्षांची निवड न झाल्यामुळे मागील २०२३ पासून ज्याप्रमाणे प्रशासक हे महापौर व स्थायी समिती अध्यक्षांच्या भूमिकेत राहून अर्थसंकल्प स्वीकारत आहेत, त्याचप्रमाणे अधिनियमातील तरतुदीनुसार येत्या ४ फेब्रुवारी पूर्वी हा अर्थसंकल्प मांडला जाईल. आणि अर्थसंकल्प तात्पुरत्या स्वरुपात स्वीकारुन तो जशाचा तसा बंदिस्त ठेवेल आणि पुढील आठवड्यात स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर हा अर्थसंकल्प आयुक्त या नात्याने डॉ. भूषण गगराणी हे नवनिर्वाचित अध्यक्षांना सादर करतील. अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे.नियमानुसार ४ फेब्रुवारीपूर्वी अर्थसंकल्प मांडला जाणे आवश्यक आहे. त्यानुसार तो स्वीकारला जाईल आणि हा अर्थसंकल्प जसाचा तसा ठेवून तो अध्यक्षांची निवड झाल्यानंतर सादर करून यावर साधक बाधक चर्चा करून याला मंजुरी घेतली जाईल असे बोलले जात आहे. अर्थात अधिनियमातील तरतुदींचे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेणे प्रशासनावर बंधनकारक असेल, असेही बोलले जात आहे.
कडोंमपातील उबाठाचे ४ नगरसेवक फुटल्याची चर्चा
७ नगरसेवक गट नोंदणीसाठी हजरकल्याण : कल्याण-डोंबिवली महानरपालिकेच्या निकालानंतर स्थानिक राजकीय नाट्याची मालिका सुरू झाली आहे. एकापाठोपाठ धक्के मिळत असून भाजप-शिवसेनेने महापौरपदासाठी ताकद लावली आहे. कडोंमपा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या चार दिवसांतच उबाठा गटाला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.उबाठाच्या ११ पैकी केवळ ७ नगरसेवक गट नोंदणीसाठी कोकण भवनात उपस्थित राहिल्याने ४ नगरसेवक फुटल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गट नोंदणीवेळी मधूर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे चार नगरसेवक अनुपस्थित होते. यामुळे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली असून फोडाफोडीच्या राजकारणाला उधाण आले आहे. दरम्यान, उपस्थित ७ नगरसेवकांच्या बैठकीत उमेश बोरगावकर यांची गटनेतेपदी, तर संकेश भोईर यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप ५० तर एकनाथ शिंदेंची शिवसेनेला ५३ जागा मिळाल्या आहेत. तर उबाठाचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजप-शिवसेना युतीमध्ये लढले असून येथे युतीची सत्ता येणार आहे. सध्या दोन्ही पक्ष महापौरपदासाठी अडून बसले आहेत. शिवसेनेसह भाजपही नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्यास उत्सुक आहे.दरम्यान उबाठाने निवडून आलेल्या दोन्ही नगरसेवकांना अपात्रतेच्या कारवाईचा धाक दाखवला असून काल (२० जाने.) त्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. उबाठातील नगरसेवक ‘गेमचेंजर’ ठरत असल्याचे बोलले जात आहे. गैरहजर नगरसेवकांवर पक्षाकडून कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचे 'मिशन मुंबई महापालिका'
कडोंमपा, उल्हासनगरमध्ये भाजपला ‘चेकमेट’ करण्याचा डावठाणे/ कल्याण/ उल्हासनगर : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावरून भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या स्पर्धेचा परिणाम एमएमआरडीए क्षेत्रातील इतर महत्त्वाच्या महानगरपालिकांवरही दिसू लागला आहे. मुंबईचे महापौरपद मिळाले नाही, तर कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकांमध्ये शिवसेनेकडून भाजपला 'चेकमेट' करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे.ठाण्यातही महापौरपदावरून ताण:ठाणे महानगरपालिकेत शिंदे सेनेने ७५ जागा जिंकत एकहाती बहुमत मिळवले आहे, तर भाजपला केवळ २८ जागांवर समाधान मानावे लागले. तरीही भाजपकडून ठाण्यात किमान दोन वर्षांसाठी महापौरपदाची मागणी होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईनंतर आता ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमध्येही भाजप-शिवसेना यांच्यात महापौरपदावरून संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.कल्याण-डोंबिवलीत स्वतंत्र डावपेच?कडोंमपामध्ये एकूण १२२ नगरसेवक असून शिवसेनेचे ५३, तर भाजपचे ५० नगरसेवक निवडून आले आहेत. युतीत निवडणूक लढवूनही दोन्ही पक्षांतील संख्याबळात फारसा फरक नसल्याने भाजपकडून सत्तेत समसमान वाटपाची मागणी होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेना महापौरपद व प्रमुख पदे सोडण्यास तयार नसल्याचे समजते. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्याकडून इतर पक्षांच्या नगरसेवकांशी संपर्क वाढवण्यात येत असल्याची चर्चा असून, उबाठातील एका नगरसेवकाच्या भेटीने राजकीय वातावरण तापले आहे.उल्हासनगरमध्ये वंचितसोबत युतीची शक्यता :उल्हासनगर महानगरपालिकेत भाजपचे ३७, तर शिंदे गटाचे ३६ नगरसेवक निवडून आले आहेत. अंबरनाथप्रमाणे येथेही शिंदे गट भाजपला डावलून वेगळी सत्ता स्थापन करू शकतो. वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंब्याचे पत्र दिल्याची माहिती असून, त्यामुळे उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांवर सोपवली ‘ही’जबाबदारी
Ashish Shelar | Vinod Tawde | बिहार राज्यातील बांकीपूर मतदार संघातून चार वेळा आमदार राहिलेले आणि मंत्रिमंडळात विविध खात्यांचा कार्यभार सांभाळणारे तसेच पक्षातील विविध पदे भूषविणारे नितीन नबीन यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदांची सूत्रे हाती घेतली आहे. त्यांनी काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत पक्षातील बड्या नेत्यांसह राष्ट्रीय अध्यक्षाचा कार्यभार स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर […] The post भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांवर सोपवली ‘ही’ जबाबदारी appeared first on Dainik Prabhat .
Pune : मतदारांचा विश्वास तुटल्याने ‘नोटा’त वाढ
पुणे – महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी निवडीवरून सर्वच राजकीय पक्षांमध्ये झालेला गोंधळ, मोठ्या आकाराचे प्रभाग, मोठ्या संख्येने निवडणूक रिंगणात उतरलेले नवे उमेदवार आणि काहीही झाले तरी यंदा नगरसेवक व्हायचेच, या उद्देशाने मिळेल त्या पक्षाची उमेदवारी स्वीकारून लढणारे राजकीय कार्यकर्ते, या साऱ्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. त्याचे प्रतिबिंब मतदानात दिसून आले असून, तब्बल २ […] The post Pune : मतदारांचा विश्वास तुटल्याने ‘नोटा’त वाढ appeared first on Dainik Prabhat .
लाडकी बहीण योजनेसाठी साकारकडून महत्वाचा आदेश लाडकी बहीण योजनेसंबंधी राज्य सरकारने प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी काही कारणास्तव ई केवायसी प्रक्रिया करताना चुका झाल्या आहेत अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ज्यांनी ई केवायसी […] The post लाडकी बहीण योजनेसाठी साकारकडून महत्वाचा आदेश, गरिबांना उपाशी मरताना मोदींना पाहायचंय , अशा टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .
पुणे – महापालिकेकडून जाहिरात फलकांसाठी केलेली शुल्कवाढ योग्यच असल्याचा निकाल न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील जाहिरात फलकांचे परवाना शुल्क सुधारित करण्याचा निर्णय घेतला आहे. जाहिरात फलक नियमन व नियंत्रण नियमानुसार नवीन दर निश्चित केले आहेत. याबाबतचे तीन प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मुख्य सभेसमोर मांडले होते. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या प्रस्तावांना स्थायी समितीची मान्यता मिळाली होती. मात्र, […] The post Pune : शुल्कवाढीचा चेंडू नव्या कारभाऱ्यांच्या कोर्टात; जाहिरात फलक नियमन व नियंत्रण नियमानुसार नवीन दराचा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
Pune : पुणे शहरातील अनेक रस्ते आज बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
पुणे – पुणे जिल्हा प्रशासनाच्या विद्यमाने व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित बजाज पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहेत. ही स्पर्धा १९ ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान होत असून, शहरातून स्टेज २ आणि स्टेज ४ चे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या स्पर्धेदरम्यान स्पर्धा […] The post Pune : पुणे शहरातील अनेक रस्ते आज बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन appeared first on Dainik Prabhat .
Pune : ५७ देशांमध्ये पाहिला गेला पुण्याचा निकाल; महापालिकेचे संकेतस्थळ जगभर झाले हिट
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कतिक राजधानी असलेल्या पुण्यातील अनेक नागरिक जगभरात वेगवेगळया देशांमध्ये नोकरी तसेच कामानिमित्ताने स्थिरावलेले आहेत. कोठेही आणि कसेही असलेल्या पुणेकरांना महापालिकेच्या निकालाची उत्सुकता मोठ्या प्रमाणात असल्याचे निवडणूक निकालाच्या निमित्ताने दिसून आले. जगाच्या विविध भागातील तब्बल ५७ देशांमधील पुणेकरांनी महापालिकेच्या निकालाचे लाईव्ह अपडेट पाहिल्याचे समोर आले आहे. महापालिकेने यंदा पहिल्यांदाच पालिकेच्या संकेतस्थळावर […] The post Pune : ५७ देशांमध्ये पाहिला गेला पुण्याचा निकाल; महापालिकेचे संकेतस्थळ जगभर झाले हिट appeared first on Dainik Prabhat .
‘दावोस’च्या करारामधून महाराष्ट्रात १४ लाख ५० हजार कोटींची परकीय गुंतवणूक
पहिल्याच दिवशी १५ लाख रोजगार संधी, आयटी, डाटा सेंटर, हरित ऊर्जा क्षेत्रात सामंजस्य करारमुंबई : दावोस (स्वित्झर्लंड) येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक गुंतवणूक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार केले. भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान यानिमित्ताने खरे ठरले असून, या गुंतवणुकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत.यात हरित ऊर्जा, अन्न प्रक्रिया, पोलाद निर्मिती, आयटी-आयटीईस, डाटा सेंटर्सह ईव्ही-ऑटोमोबाईल, जहाज बांधणी, डिजिटल इन्फ्रा अशा विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीचा समावेश आहे. ही गुंतवणूक मुंबईसह राज्याच्या रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या भागात पोहोचणार असल्याने, तेथे उद्योग वाढीसह मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे प्रतिनिधी मंडळ दावोस येथे उपस्थित आहे. दावोसमधील पहिल्याच दिवसापासून जगभरातील विविध क्षेत्रातील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दर्शवणे सुरू केले. आहे.सामंजस्य करार पुढीलप्रमाणे१) महाराष्ट्र सरकार - काल्सबर्गक्षेत्र : अन्न प्रक्रिया आणि कृषीगुंतवणूक : ५०० कोटीरोजगार : ७५०२) महाराष्ट्र सरकार- योकी ग्रीन एनर्जी प्रा. लि.क्षेत्र: नविनिकरणीय ऊर्जागुंतवणूक : ४ हजार कोटीरोजगार : ६ हजारठिकाण: पालघर/एमएमआर३) महाराष्ट्र सरकार - बीएफएन फॉर्जिंग्सक्षेत्र : स्टीलगुंतवणूक : ५६५ कोटीरोजगार : ८४७ठिकाण: पालघर/एमएमआर४) एमएमआरडीए- सुमिटोमो रियालिटीगुंतवणूक : सुमारे ८ बिलियन डॉलर्सरोजगार : ८० हजार५) एमएमआरडीए-के. रहेजागुंतवणूक : सुमारे १० बिलियन डॉलर्सरोजगार : एक लाख६) एमएमआरडीए-अल्टा कॅपिटल/पंचशीलगुंतवणूक: सुमारे २५ बिलियन डॉलर्सरोजगार : २ लाख ५० हजार७) एमएमआरडीए- एसबीजी समूहक्षेत्र : लॉजिस्टिक्सगुंतवणूक : सुमारे २० बिलियन डॉलर्सरोजगार : ४ लाख ५० हजार.८) एमएमआरडीए-आयआयएसएम ग्लोबलगुंतवणूक : सुमारे ८ बिलियन डॉलर्सरोजगार : ८० हजार९) एमएमआरडीए-जायकाधोरण आणि स्ट्रॅटेजी पार्टनर११) एमएमआरडीए-सेम्बकॉर्प डेव्हलपमेंट लि. सिंगापूरएकीकृत इंडस्ट्रियल पार्कसाठी नॉलेज पार्टनर१२) एमएमआरडीए - टेक्निकल युनिव्हर्सिटी, मुनीच, जर्मनीशाश्वत नागरी वाहतूक प्रणाली१३) महाराष्ट्र सरकार - सुरजागड इस्पात. क्षेत्र: स्टीलगुंतवणूक : २० हजार कोटीरोजगार : ८ हजारठिकाण : गडचिरोली१४) महाराष्ट्र सरकार-लोढा डेव्हलपर्सक्षेत्र : आयटी, डेटा सेंटर्सगुंतवणूक : १ लाख कोटीरोजगार : १ लाख ५० हजार.पुढील दोन दिवसांत विक्रमी गुंतवणूक येणार येत्या दोन दिवसांत दावोसमध्ये एआय, क्वांटम कंम्प्युटिंग, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, यांसह फिनटेक, लॉजिस्टिक्स अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर, जहाज बांधणी, ईव्ही, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील काही उद्योग घटकांशीही गुंतवणुकीचे सामंजस्य करार होणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानुसार गतवर्षी स्थापन करण्यात आलेल्या उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा कक्ष या गुंतवणूक व उद्योग सुलभतेला प्रोत्साहन देणाऱ्या समर्पित संस्थात्मक व्यवस्थेमुळे यंदा गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्राचा महाराष्ट्राकडील ओघ वाढला आहे.
मुख्यमंत्री मुंबईत आल्यानंतरच महापौरपदाचा निर्णय
शिवसेनेने अडीच वर्षांकरिता महापौरपद मागितले ही अफवास्पष्ट जनादेशानंतर जनतेला वादविवाद आवडणार नाहीमुंबई : ‘शिवसेनेने अडीच वर्षांकरिता महापौरपद मागितल्याच्या चर्चा या अफवा आहेत. आमच्यात कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत. महायुतीने मुंबईत एकत्रित निवडणुका लढविल्या आहेत. दावोस येथील परिषदेनंतर जेव्हा मी मुंबईला जाईन, तेव्हा आम्ही एकत्र बसून महापौर पदाबाबत निर्णय घेऊ. कोण महापौर होणार किंवा कोणाला कोणते पद मिळणार, अशा विषयात महायुतीत कोणताही संघर्ष अथवा वाद नाही’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस शुक्रवारी (दि. २३) मुंबईत येत आहेत. महापौर पदावरून भाजप-शिवसेनेत आलबेल नसल्याची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोखठोक भाष्य केले आहे.जागतिक आर्थिक परिषदेच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी ते दावोसला रवाना झाले. महापालिका निकालांत विशेषतः मुंबईत भाजप व शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, निकालानंतर शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याने, महापौरपदासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दावोस येथे एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या महापौरपदाबाबत भाष्य केले.उद्धव ठाकरे व तुमच्यात चर्चा सुरू झाल्या आहेत का, या प्रश्नावर या सर्व वावड्या व अफवा आहेत. ठाकरेंसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आमची महायुती भक्कम आहे. महापौरपद किंवा इतर छोट्या-मोठ्या पदांसाठी भांडत बसणार नाही. जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिला आहे. असा जनादेश मिळाल्यानंतर पदांसाठी भांडत बसणे योग्य नाही, लोकांना ते आवडणार नाही. त्यामुळे आम्ही ते करणारही नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार : मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकीत जनतेने भाजप आणि महायुतीला मोठे यश दिले. त्यामुळे आता ट्रिपल इंजिनासोबत ट्रिपल जबाबदारी वाढल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलून दाखविली. जनतेचा विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी आता आमच्यावर आहे. स्वच्छ, पारदर्शक आणि कार्यक्षम कारभारातून हा विश्वास सार्थ करणार असल्याचा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.महापौरपदाबाबत दिल्लीत बैठक मुंबईच्या महापौरपदाबाबत सोमवारी सायंकाळी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दिल्लीत खल झाला. शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यात महाराष्ट्र सदनात बैठक झाली. या बैठकीत महापौरपदासह स्थायी समिती आणि इतर समित्यांबाबतही प्राथमिक चर्चा झाली. मुंबई पालिकेमध्ये सन्मानपूर्वक पदे मिळावीत, अशी भूमिका शिवसेनेने मांडल्याचे कळते. मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र सदनात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महापौर, स्थायी समिती, सुधार समिती, आरोग्य आणि शिक्षण समितीसह बेस्ट समितीत शिवसेनेला सन्मानजनक वाटा मिळावा, अशी अपेक्षा शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली. आता शिवसेनेच्या मागण्यांचा तपशील घेऊन अमित साटम आणि आशिष शेलार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन नवीन यांच्याशी चर्चा करतील. येत्या ३० जानेवारीला भाजपचा महापौर मुंबईत विराजमान व्हावा, अशी भाजप श्रेष्ठींची इच्छा असल्याचे अंतर्गत सूत्रांनी सांगितले.
निमंत्रण धुडकावल्याने २०० टक्के टॅरिफ लादणार
‘गाझा बोर्ड ऑफ पीस’वरून ट्रम्प यांची फ्रान्सला धमकीवॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ कार्ड प्रत्येक राष्ट्रावर वापरत चालल्याने त्यांचा टॅरिफचा पट्टा आता फ्रान्सच्या दिशेने वळला आहे. ट्रम्प यांच्या ‘गाझा बोर्ड ऑफ पीस’मध्ये सहभागी होण्यास फ्रान्सने नकार दिल्याने २०० टक्के टॅरिफ लादण्याची धमकी ट्रम्प यांनी फ्रान्सला दिली आहे.फ्रान्सने अमेरिकेचे निमंत्रण नाकारल्यानंतर ट्रम्प यांनी संताप व्यक्त करत फ्रान्सवर थेट २०० टक्के टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांची ‘गाझा बोर्ड ऑफ पीस’ ही महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते. या योजनेत सामील होण्यास फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी नकार दिल्याने ट्रम्प चांगलेच संतापले आहेत.इस्रायल व हमासमधील संघर्षामुळे गाझा पट्टीत काही महिन्यांपूर्वी हाहाकार सुरू होता. हा संघर्ष थांबवण्यासाठी ट्रम्प यांनी पुढाकार घेत शांतता निर्माण व्हावी यासाठी २० कलमी कार्यक्रम तयार केला होता. अमेरिकेच्या या २० कलमी कार्यक्रमाचा प्रस्ताव इस्रायल व हमासने स्वीकारला. त्यानंतर इस्रायल व हमासमधील संघर्ष कायमचा थांबण्यासाठी व गाझामध्ये कायमस्वरूपी शांतता स्थापित करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गाझा बोर्ड ऑफ पीस’ची स्थापना केली. ट्रम्प यांनी मॅक्रॉन यांच्यावर टीका केली आहे.
Pune District : शिवसेना (ठाकरे) पक्षाला खिंडार; माऊली खंडागळे यांचा उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र
नारायणगाव / आळेफाटा :खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या कार्यालयात सोमवारी (दि. १९) झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण न मिळाल्याने निर्माण झालेल्या नाराजीतून जुन्नर तालुक्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे तालुक्यातील राजकीय […] The post Pune District : शिवसेना (ठाकरे) पक्षाला खिंडार; माऊली खंडागळे यांचा उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र appeared first on Dainik Prabhat .
Pune District : दौंड तालुक्यात कुल-थोरातांची अग्निपरीक्षा
यवत : सध्या जिल्हाभर झेडपी पंचायत समितीचे वारे वेगाने वाहत आहेत. असेच दौंड तालुक्यातील वातावरण देखील उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच चांगलेच तापले आहे. फॉर्म भरण्याची दि. २१ ची शेवटची तारीख आहे. मात्र, अजूनही जिल्हा परिषदचे सात गट आणि पंचायत समितीचे १४ गणात उमेदवार अजूनही ठरले नाहीत. हालचाली जरी गतिमान झाल्या असल्या तरीदेखील उमेदवार फायनल करण्याची प्रक्रिया […] The post Pune District : दौंड तालुक्यात कुल-थोरातांची अग्निपरीक्षा appeared first on Dainik Prabhat .
लाडक्या बहीणींना मोठा दिलासा; e-KYCबाबत आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहिणींना eKYC करण्यास अनिवार्य करण्यात आले होते. त्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख दिली होती. मात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसलीमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने डिसेंबरचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील महिलांनी मोर्चे […] The post लाडक्या बहीणींना मोठा दिलासा; e-KYCबाबत आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती appeared first on Dainik Prabhat .
चाकण : येऊ घातलेल्या संभाव्य जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर, स्वगृही परतणे, नव्या पक्षात प्रवेश असे प्रकार जोमात सुरू असून, या ‘परतणी’ला येत्या काळात अधिक भव्य स्वरूप येण्याची चिन्हे दिसत आहेत. यात घराणेशाहीही मागे नाही, हे प्रकर्षाने जाणवत आहे. खेड तालुक्यात 8 […] The post Pune District : पक्षांतराची लाट की राजकीय ट्रेंड? इच्छुकांची हालचाल वाढली; स्वगृही परतण्या-प्रवेशांचा धडाका appeared first on Dainik Prabhat .
Pune District : खेड तालुक्यात उमेदवारी अर्जांचा धडाका
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आज (दि.20) रोजी जिल्हा परिषदेसाठी 25, तर पंचायत समिती गणासाठी 43 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत बेडसे यांनी दिली. राजगुरुनगर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिवसभर मोठी गर्दी झाली होती. अर्ज दाखल […] The post Pune District : खेड तालुक्यात उमेदवारी अर्जांचा धडाका appeared first on Dainik Prabhat .
Pune District : सावधान ! शिरूर शहरात भरवस्तीत बिबट्याचा वावर; वन विभागाची रात्रभर शोधमोहीम
शिरूर : शिरूर शहरातील जोशीवाडी परिसरात मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बिबट दिसल्याची माहिती मिळताच वन विभाग शिरूर यंत्रणा तत्काळ सक्रिय झाली. मानवी वस्ती असलेला हा भाग, अरुंद बोळी व दाट घरांमुळे बिबट्याचा ठावठिकाणा निश्चित करणे कठीण ठरत होते. मात्र, वन विभागाच्या रात्रभर चाललेल्या शोधमोहीमेमुळे अखेर सकाळी सहा वाजता बिबट्याला सुरक्षितपणे नदीच्या दिशेने हुसकावण्यात यश आले, […] The post Pune District : सावधान ! शिरूर शहरात भरवस्तीत बिबट्याचा वावर; वन विभागाची रात्रभर शोधमोहीम appeared first on Dainik Prabhat .
हुगळीच्या रत्नपूरची रहिवासी असलेली मोमिता 18 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या रॅलीसाठी सिंगूरला आली होती. मोमिताला आशा होती की पंतप्रधान टाटाच्या प्रकल्पाबद्दल काहीतरी बोलतील, पण त्यांनी याबद्दल काहीही सांगितले नाही. हा तोच सिंगूर आणि टाटाचा प्रकल्प आहे, ज्याच्या विरोधात 2008 मध्ये आंदोलन उभे करून ममता बॅनर्जी मुख्यमंत्री बनल्या होत्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी सिंगूरमध्ये टाटाला परत आणण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे असे मानले जात आहे की मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप हा मुद्दा उचलणार आहे. पंतप्रधान मोदी गेल्या एका महिन्यात दोनदा पश्चिम बंगालमध्ये आले आहेत. सिंगूरमध्ये जिथे रोजगार-विकासावर लक्ष केंद्रित केले गेले, तिथे मालदाच्या माध्यमातून उत्तर दिनाजपूर आणि मुर्शिदाबादपर्यंत घुसखोरी आणि हिंदुत्वाचा संदेश देण्यात आला. सिंगूर आणि मालदाच्या माध्यमातून भाजपने हुगळी, मालदा, मुर्शिदाबाद आणि उत्तर दिनाजपूरमधील 59 विधानसभा जागांवर डाव खेळला आहे. पंतप्रधान मोदींच्या जनसभेमुळे काय साध्य झाले, वाचा अहवाल… सिंगूरमध्ये टाटाचे जाणे आजही मुद्दा आहेसिंगूर हे पश्चिम बंगालची राजधानी कोलकातापासून सुमारे 40 किमी दूर आहे. 2006 मध्ये मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या सरकारने टाटा ग्रुपला नॅनो कार बनवण्यासाठी 1 हजार एकर जमीन दिली होती. याविरोधात शेतकऱ्यांनी विरोध केला. ममता बॅनर्जी तेव्हा विरोधी पक्षात होत्या. त्यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात 21 दिवसांचे उपोषण केले आणि आंदोलनाचा चेहरा बनल्या. दोन वर्षे चाललेल्या संघर्षानंतर 2008 मध्ये टाटा मोटर्सने आपला कारखाना सिंगूरमधून गुजरातच्या साणंदमध्ये हलवला. आता भाजपने सिंगूरमध्ये टाटाच्या परत येण्याचे आश्वासन देणे सुरू केले आहे. पक्षाचे पश्चिम बंगाल अध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी पंतप्रधानांच्या रॅलीनंतर दुसऱ्या दिवशी सिंगूरमधील एका जाहीर सभेत सांगितले, ‘सिंगूरमध्ये टाटाने कारखान्यासाठी जी जमीन घेतली होती, तिथेच ऑटोमोबाइल उद्योग उभारला जाईल.’ मोदींच्या रॅलीत चंद्रपूरहून सिंगूरला आलेल्या मोमिताला टाटाच्या विरोधाचा जुना काळ आठवतो. त्या पती आणि मुलीसोबत पंतप्रधानांना ऐकायला आल्या होत्या. त्यांना आशा आहे की भाजपचे सरकार आल्यास सिंगूरमध्ये उद्योग लागतील. यामुळे रोजगार मिळेल आणि व्यवसायही सुरू होईल. 2006 चा उल्लेख करत मोमिता म्हणतात, ‘येथे खूप दिवस धरणे आंदोलन चालले होते. यामुळे सिंगूरच्या लोकांचे खूप नुकसान झाले. प्लांट बनत होता, त्यामुळे अनेक लोक बाहेरून आले होते. आम्ही लोकांना घरे भाड्याने दिली होती. नॅनोचा प्रकल्प गेल्याने ते लोकही निघून गेले. आमची कमाई संपली. जर पुन्हा प्लांट सुरू झाला, तर कामधंदा वाढेल.’ ‘पंतप्रधानांनी संपूर्ण राज्यासाठी उद्योग सुरू करणे, रोजगार निर्माण करणे, भ्रष्टाचार आणि जंगलराज संपवण्याबद्दल सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, बंगालमध्ये उद्योग आणि गुंतवणूक तेव्हाच येईल, जेव्हा कायदा आणि सुव्यवस्था चांगली असेल. जर तुम्ही लोकांनी भाजपला मतदान केले, तर राज्यातून सिंडिकेट राजवट संपेल. मात्र, सिंगूरमध्ये कारखाना उभारण्याबद्दल ते काहीच बोलले नाहीत. यामुळे निराशा झाली आहे.’ ‘अपूर्ण आश्वासनांमुळे लोक ममतांच्या विरोधात संतप्त’ज्येष्ठ पत्रकार सुमन चट्टोपाध्याय म्हणतात, ‘भाजपने असे वातावरण निर्माण केले आहे की पंतप्रधान सिंगूरमध्ये उद्योग आणतील. पश्चिम बंगालच्या राजकारणात सिंगूरची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. लोकांनी आपल्या जमिनीसाठी आंदोलन केले, 34 वर्षांची सत्ता बदलली आणि त्यांना ममता बॅनर्जींमध्ये आशा दिसली.’ ‘मात्र, ममता बॅनर्जींची आश्वासने केवळ पोस्टरवरच राहिली. यामुळे लोक संतप्त आहेत. भाजपने कोणतेही आश्वासन दिले नाही, पण विकासाच्या गोष्टी केल्या आहेत. पंतप्रधानांनी सिंगूरजवळील धूनिया गावाचा उल्लेख केला, जिथे साड्या बनतात. त्यांनी ते जागतिक स्तरावर नेण्याबद्दल सांगितले. रोजगार हा येथे मोठा मुद्दा आहे. लोक यावर मतदान करतात.’ पंतप्रधानांचे भाषण ऐकायला आलेले संजय मित्रोही हेच सांगतात. टाटा प्रकल्पाचा उल्लेख नसतानाही, आशा व्यक्त करत ते म्हणतात- पंतप्रधानांनी सिंगूरच्या विकासाविषयी सांगितले आहे. यावरून स्पष्ट होते की टाटाचा प्रकल्प येथे पुन्हा येईल. यामुळे लोकांना रोजगार मिळेल. तर पिंकी मिश्रा म्हणतात, ‘जर पंतप्रधानांनी या जागेची सभेसाठी निवड केली असेल, तर यात नक्कीच काहीतरी खास असेल. आशा आहे की, ज्या प्रकल्पाला येथून हाकलून लावले होते, तो पुन्हा सुरू केला जाईल. ‘बंगालमध्ये बेरोजगारी, हाच संदेश देण्यासाठी पंतप्रधान सिंगूरला आले’ज्येष्ठ पत्रकार विश्वभर नेवर म्हणतात की, ममता बॅनर्जींच्या आंदोलनामुळे टाटाला आपले सर्व सामान घेऊन जावे लागले. सिंगूरमध्ये उद्योग उभा राहू शकला नाही. पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात टाटाचा उल्लेख करतील अशी लोकांना अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. भाजप बऱ्याच काळापासून प्रचार करत आहे की ममता बॅनर्जींनी टाटाला हाकलून लावले, त्यामुळे येथे कोणताही उद्योग उभा राहिला नाही.’ मात्र ज्येष्ठ पत्रकार विनय बिहारी सिंह यांचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. ते म्हणतात, 'पंतप्रधान मोदींनी टाटा प्रकल्पावर एक शब्दही बोलले नसले तरी, त्यांनी हे स्पष्ट केले की जर आपल्याला सत्ता मिळाली तर विकास नक्कीच होईल. म्हणून सिंगूरची निवड करण्यात आली, जेणेकरून लोकांपर्यंत स्पष्ट संदेश पोहोचू शकेल.' ज्येष्ठ पत्रकार अहमद हसन इमरान सिंगूरची निवड जनसभेसाठी करण्यावर म्हणतात, 'येथे मुस्लिम लोकसंख्या खूप कमी आहे. त्यामुळे हिंदुत्वाची राजकारण करता येत नाही. मोदींनी टाटा प्रकल्पाचा उल्लेख केला नसला तरी.' ‘सिंगूरमधून बंगालच्या लोकांना काम मिळेल’पंतप्रधानांच्या भाषणात सिंगूरमधील टाटा प्रकल्पाचा उल्लेख न झाल्याबद्दल भाजप प्रवक्ते देवजीत सरकार म्हणतात, ‘सिंगूर हे पश्चिम बंगालच्या राजकारणासाठी एक प्रतीकात्मक ठिकाण आहे. येथून राजकारणात बदल झाला आहे. पंतप्रधानांनी जनसभेदरम्यान अनेक प्रकल्पांचा उल्लेख केला. ट्रेन, पोर्ट योजनांचे भूमिपूजन केले. हे सर्व सिंगूरसाठीही आहेत. हे पूर्ण झाल्यावर बंगालच्या लोकांना काम मिळेल.’ मालदामध्ये मुस्लिम मते विभागली तर भाजपला फायदा होईलपंतप्रधान मोदींनी सिंगूर व्यतिरिक्त दुसरी सभा मालदामध्ये घेतली. आंब्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मालदामध्ये सुमारे 63% मुस्लिम मतदार आहेत. अनुसूचित जातीचे मतदार 29% आणि अनुसूचित जमातीचे मतदार 9.49% आहेत. मालदाची सीमा बांगलादेशला लागून आहे. हा टीएमसीचा बालेकिल्ला आहे आणि भाजप येथे आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदींनी मालदामध्ये घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, बंगालसमोर खूप मोठे आव्हान घुसखोरीचे आहे. पश्चिम बंगालमधून घुसखोरांना बाहेर काढणे खूप महत्त्वाचे आहे. हे लोक गरीब आणि कष्टकऱ्यांचे हक्क हिरावून घेत आहेत. ज्येष्ठ पत्रकार विश्वभर नेवर सांगतात, ‘मालदा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसचे अब्दुल गनी खां 1980 ते 2004 पर्यंत सलग 8 वेळा खासदार होते. त्यांच्या कुटुंबाचे 73 वर्षांपासून मालदामध्ये वर्चस्व आहे. गेल्या काही काळापासून मालदा आणि मुर्शिदाबादमधील मुस्लिम मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.’ ‘गेल्या काही दिवसांपूर्वी टीएमसीने भरतपूर मतदारसंघातील आमदार हुमायूं कबीर यांना पक्षातून काढून टाकले. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. दुसरीकडे असदुद्दीन ओवैसींचा एआयएमआयएम पक्षही येथे काम करत आहे. मुस्लिम मतांचे विभाजन झाले, तर त्याचा थेट फायदा भाजपला मिळेल.’ ‘मागील निकाल पाहिले तर 2016 मध्ये भाजप मालदा जिल्ह्यात एकही जागा जिंकू शकला नव्हता. 2021 मध्ये त्यांना राखीव जागांवर विजय मिळाला. येथे हिंदूंना एकत्र आणण्यासाठी भाजपने पंतप्रधानांची जाहीर सभा घेतली आहे. जर मुस्लिम मतांचे ओवैसी आणि हुमायूं कबीर यांच्या पक्षात विभाजन झाले, तर भाजपच्या जागा वाढू शकतात.’ मालदाच्या माध्यमातून मुर्शिदाबाद आणि दिनाजपूर यांनाही साधलेज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभा खासदार राहिलेले अहमद हसन इम्रान म्हणतात, ‘पंतप्रधानांच्या सभेसाठी मालदा निवडण्याचे कारण स्पष्ट आहे. मालदा हा मुस्लिम बहुल भाग आहेच, आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुर्शिदाबादमध्ये ७०% आणि उत्तर दिनाजपूरमध्ये ५१% मुस्लिम लोकसंख्या आहे. येथे भाजपला हिंदुत्वाची राजकारण करणे सोपे होईल. मालदाच्या आदिवासी आणि दलित लोकसंख्या असलेल्या भागात ते हिंदूंना एकत्र करू शकतील. मागील निवडणुकीतही भाजपने आदिवासी भागातील हबीबपूर जागा जिंकली होती.’ ते पुढे म्हणतात, ‘पंतप्रधान मोदींनी मालदामध्ये घुसखोरीवर भाष्य केले. मालदा, उत्तर दिनाजपूर आणि मुर्शिदाबाद जिल्हे सीमेला लागून आहेत. येथे घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करून हिंदू मतदारांना एकत्र केले जाऊ शकते. सततच्या घुसखोरीमुळे लोकसंख्याशास्त्र बदलत आहे. मालदा आणि मुर्शिदाबादमध्ये दंगलीही झाल्या आहेत. घुसखोरी हा पश्चिम बंगालसाठी खूप मोठा मुद्दा आहे. जगातील श्रीमंत देश घुसखोरांना हाकलून लावत आहेत. पश्चिम बंगालमध्येही अशाच धोरणाची गरज आहे.’
23 डिसेंबर 2025 रोजी, लखनऊमध्ये 50 हून अधिक ब्राह्मण आमदार आणि MLC जमले. कुशीनगरचे भाजप आमदार पीएन पाठक यांचे घर हे ठिकाण होते. ब्राह्मणांच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पण पक्षाचे हायकमांड नाराज झाले. यूपी प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनी याला बेशिस्त मानले आणि भविष्यात असे न करण्याची ताकीद दिली. तेव्हा दर महिन्याला भेटण्याचे ठरले होते, पण आतापर्यंत कोणतीही हालचाल नाही. महिने उलटून गेले आहेत. दिव्य मराठीने त्याच बैठकीत सहभागी झालेल्या 7 आमदारांशी संवाद साधला. तीन गोष्टी समजून आल्या- 1. आमदारांना वाटते की ब्राह्मण सध्या अस्पृश्य झाला आहे.2. सरकार सन्मान देत नाही आणि अधिकारी गैरवर्तन करत आहेत.3. केवळ आडनावावरून दोषी मानले जात आहे आणि SC-ST कायद्यांतर्गत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. आमदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर बोलले, कारण त्यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. आमदार 1: समाजातील लोकांसोबत बसणे गुन्हा कसा झाला प्रश्न: तुम्हाला काय वाटते, बैठकीवर प्रश्न का उपस्थित झाला?उत्तर: समाजातील लोकांसोबत बसणे गुन्हा कसा झाला? ही कसली बेशिस्त? आम्ही समाजाच्या चिंता घेऊन बसलो होतो. ही ना गुप्त बैठक होती, ना बंडाचे नियोजन. पुढच्या वेळी आम्ही बसत आहोत हे सांगू. मग कोणतीही हरकत नसेल ना? मला माहीत आहे की तरीही हरकत असेल, कारण ब्राह्मण सध्या सर्वात अस्पृश्य आहे. रोज उपेक्षा सहन करत आहोत. आम्हाला ओरडून गप्प केले गेले, पण ब्राह्मण लोकप्रतिनिधी, समाज आणि पक्षात जो अपमान सहन करत आहे, त्याचा राग आज नाही तर उद्या बाहेर पडेल. आम्ही बुद्धीबळात आणि संख्याबळात कमी नाही. आमदार २: बैठक होईल, पण लवकर नाही प्रश्न: पुढची बैठक होईल का?उत्तर: दर महिन्याला भेटण्याची योजना होती. समाजाबद्दल विचार करू आणि ब्राह्मण कार्यकर्त्याच्या अपमानावर एकत्र उभे राहू. सध्या तरी दुसरी बैठक होईल असे वाटत नाही. मात्र, आता बैठक होणारच नाही असेही नाही. आमदार ३: ज्यांना भीती वाटली, त्यांना नक्कीच भीती वाटायला पाहिजे प्रश्न: बैठकीत कोणताही राजकीय मुद्दा नव्हता, मग बैठक न घेण्याचा आदेश का?उत्तर: जर प्रशासनाला या बैठकीची भीती वाटली किंवा त्यांना काही आव्हान वाटले, तर ते वाटायलाच पाहिजे. राज्यात आम्ही सुमारे 12% आहोत. जर ब्राह्मण आमदार दुर्लक्षित झाल्यासारखे वाटत राहिले, तर नुकसान निश्चित आहे. यूपीमध्ये अधिकाऱ्यांकडे गेल्यावर असे वाटते की, जणू आमची काही किंमतच नाही. ज्या समाजाचे वर्चस्व आहे, त्यांच्यापेक्षा आम्ही संख्येने दुप्पट आहोत. वर बसलेल्या लोकांना वाटते की ब्राह्मण कुठे जाईल. तर तो जाणार नाही, पण घरी तर बसू शकतो. आमदार 4: बसण्याची संधी कशीबशी मिळाली प्रश्न: बैठक अचानक नियोजित केली होती की आधीपासून तयारी होती?उत्तर: हे अचानक झाले नाही. दीड-दोन वर्षांपासून चर्चा करत होतो, पण संधी मिळत नव्हती. 50-60 आमदारांना एकत्र येण्यात अडचण येत होती. कशीबशी आम्हाला एकत्र बसण्याची संधी मिळाली. प्रश्न: 17 आमदार आले नाहीत, ते बाहेर होते का?उत्तर: कदाचित भीती असेल की ते निशाण्यावर येतील. प्रश्न: तर ते तुमच्यासोबत नाहीत का?उत्तर: माहित नाही, पण आम्ही सगळ्यांबद्दल बोलत होतो, पुढेही बोलू. आमदार 5: ब्राह्मणांविरोधात वातावरण, त्यामुळे ही वेळ आली प्रश्न: बैठकीची कल्पना कोणाची होती?उत्तर: बघा, एकत्र बसणे गुन्हा नाही. क्षत्रिय, कुर्मी, दलित, कोणीही आपल्या समाजात बसू शकतो, तर ब्राह्मणांच्या बसण्यात काय चूक आहे? कल्पनेबद्दल बोलायचं झालं तर, ब्राह्मण आमदार आणि समाजाविरोधात तयार होत असलेल्या वातावरणामुळे हे घडलं. बैठक पीएन पाठक यांच्या घरी झाली, पण तेच याचे सूत्रधार आहेत असं नाही. अनेक लोकांना सारखंच वाटत होतं. संपर्कात आले आणि योजना बनली. प्रश्न: तुम्हाला असं का वाटतं की तुमचा अपमान होत आहे?उत्तर: ब्राह्मण लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. SC/ST कायद्याचे बळी सर्वाधिक याच समाजाला बनवले जात आहे. खोटे खटले दाखल होतात. माझ्या मतदारसंघात 80 वर्षांच्या वृद्धावर SC/ST कायदा लावला. सगळ्यांना माहीत आहे की त्याला फसवले आहे. पोलीस ठाण्यात जा, तर आडनावावरूनच अर्धा दोषी मानतात. अधिकारी आमचं ऐकत नाहीत, तर आम्ही जनतेचा आवाज कसे बनणार? सरकारला वाटत असेल की आम्हाला कोणीतरी भडकवलं आहे, तर ते चुकीचं आहे. क्षेत्रात आम्हालाच उत्तर द्यावं लागतं. आजकाल असं चाललं आहे की, ब्राह्मण पीडित असेल तर दुर्लक्ष करा आणि विरोधात तक्रार आली तर वाढवून-चढवून लिहा आणि बोला. आमदार 6: पत्रांचा भार नाही, याने बंडखोरी थांबत नाही प्रश्न: बैठकीवर प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांचा सल्ला योग्य आहे का?उत्तर: अजिबात नाही, पण ते नवीनच अध्यक्ष झाले आहेत. त्यांना वाटलं की काहीतरी मोठं होणार आहे. खरं तर, त्यांनी याला महत्त्व देण्याऐवजी काही आमदारांना बोलावून चर्चा केली असती तर बरं झालं असतं. ज्याला पक्षातून बंडखोरी करायची असते, तो अशा पत्रांचा भार घेत नाही. याने बंडखोरी थांबत नाही. आमदार ७: जेव्हा वाटेल तेव्हा पुन्हा बसू, ब्राह्मण एकत्र येण्यावर कर्फ्यू लागलेला नाहीबैठकीत सहभागी झालेल्या पूर्वांचलमधील एका आमदाराने सांगितले- 'आम्हाला शांत राहण्याचा आदेश मिळाला आहे. बैठक सोडून इतर काहीतरी बोला.' प्रश्न: पुन्हा बसणार की नाही?उत्तर: का नाही, जेव्हा वाटेल की बसायला पाहिजे, तेव्हा बसू. ब्राह्मण एकत्र येण्यावर काही कर्फ्यू लागला आहे का? प्रश्न: ही एकजूटता पुढेही कायम राहील का?उत्तर: मुंडे-मुंडे मतिर्भिन्ना. म्हणजे ब्राह्मण समाज असा आहे, ज्यात प्रत्येक व्यक्तीचे विचार खूप वेगळे आहेत. ते कळपात चालत नाहीत. आम्ही घाबरत राहतो की जर आम्ही आमच्या समाजासोबत उघडपणे आलो, तर आम्हाला अनैतिक म्हटले जाईल. तरीही, मी आता माझ्या समाजासाठी आवाज उठवेन. कुणी साथ देवो वा न देवो.‘ दिल्ली दरबारात आमदार-विधानपरिषद सदस्यांनी लावली होती हजेरीबैठकीत सहभागी झालेले 6 हून अधिक आमदार आणि विधानपरिषद सदस्य दिल्लीला जाऊन हजेरी लावून आले आहेत. सूत्रांनुसार, दिल्लीत या लोकांनी ते मुद्दे मांडले, ज्यावर बैठक झाली होती. उत्तर प्रदेशात कथितपणे एका समुदायाला पुढे आणणे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाची तक्रारही केली. बैठकीत प्रामुख्याने 4 मुद्द्यांवर चर्चा झाली 1. ब्राह्मण समाजासाठी निधीची व्यवस्थाना आरक्षण आहे ना सवलत. म्हणून 1-1 कोटी रुपये वर्गणी जमा करून निधी तयार केला जावा. यामुळे समाजातील लोकांना शिक्षण आणि उपचारात मदत केली जाईल. 2. दरमहा बैठकदरमहा बैठक व्हावी, ज्यात ब्राह्मणांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. 3. समान व्यासपीठ तयार व्हावेसमाजाचे मुद्दे पुढे नेण्यासाठी व्यासपीठ तयार व्हावे. एका आमदाराचे म्हणणे दाबले जाईल, एकत्र आल्यास सरकार ऐकेल. 4. अधिकाऱ्यांचे वर्तनअधिकाऱ्यांकडून ब्राह्मण आमदारांशी गैरवर्तन करणे सामान्य बाब झाली आहे. पुढील बैठकीत काय करायचे ते ठरवू. यूपीमध्ये 52 ब्राह्मण आमदार, सर्वाधिक 41 भाजपचे यूपी विधानसभेत एकूण 52 ब्राह्मण आमदार आहेत. यापैकी भाजपचे 41, भाजपसोबत युतीत असलेल्या निषाद पार्टीचे 4, अपना दल (S) चे 1, विरोधी समाजवादी पार्टीचे 5 आणि काँग्रेसचे 1 आमदार ब्राह्मण समाजातून येतात. CSDS-लोकनीतिच्या अंदाजित आकडेवारीनुसार, यूपीमध्ये ब्राह्मणांची लोकसंख्या 9% ते 11% च्या दरम्यान मानली जाते. ओबीसी 45% ते 50%, अनुसूचित जाती 21% ते 22%, अनुसूचित जाती 19% ते 20%, राजपूत 7% ते 8%, वैश्य 3% ते 4% आणि इतर 2% ते 3% आहेत.
दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २१ जानेवारी २०२६
पंचांगआज मिती माघ शुद्ध तृतीया शके १९४७. चंद्र नक्षत्र धनिष्ठा योग व्यतिपात चंद्र राशी कुंभ भारतीय सौर ०१ माघ शके १९४७. बुधवार दिनांक २१ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय ०८.५८ मुंबईचा सूर्यास्त ०६.२४ मुंबईचा चंद्रास्त ०८.४५ , राहू काळ १२.४९ ते ०२.१३ ,१९;००नंतर चांगलादैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : कुटुंबातून सुखद वार्ता मिळतील.वृषभ : आपल्या कार्यस्थळी आपल्या बुद्धी कौशल्याचे कौतुक होईल.मिथुन : नोकरीधंद्यात चांगली परिस्थिती राहील नवीन संधी मिळतील.कर्क : अनुकूल घटना घटित होतील कामात उत्साह राहील.सिंह : धनलाभाचे योग.कन्या : नोकरीत प्रगती होईल.तूळ : आर्थिक आवक चांगली राहील.वृश्चिक : जमीन जुमला स्थावर मिळकत याविषयीची कामे होतील.धनू : यशाच्या वार्ता कानावरती पडतील.मकर : अपेक्षेप्रमाणे कामे होणार नाहीत.कुंभ : नोकरीधंद्यात आपले वर्चस्व राहील.मीन : जीवनसाथीला समजून घ्या.
महापौर निवडणुकीसाठी अवधी कमी, सुट्टीच्या दिवशी करावी लागणार महापौरांची निवड
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक येत्या ३० जानेवारीला होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी प्रत्यक्षात एवढ्या कमी कालावधीमध्ये ही निवडणूक घेणे अशक्यच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या ३० जानेवारी रोजी महापौर पदाची निवडणूक होते की सुट्टीच्या दिवशी शनिवारी ३१ जानेवारी किंवा १ फेब्रुवारी की ०२ फेब्रुवारी रोजी होईल याबाबत तर्क लढवले जात आहे.मुंबईच्या महापौर पदासाठी येत्या २२ जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढली जात असल्याने भाजपच्या दिल्लीचा हवाल देत महापौर पदाची निवडणूक येत्या ३० जानेवारी रोजी होईल अशाप्रकारचे चित्र रंगवले जात आहे. परंतु २२ जानेवारी नंतर एकमेव शुक्रवारचा दिवस असून त्यानंतर सलग तीन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे याचे नोटीफिकेशन जाहीर करून त्यानुसार महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्याचा तसेच उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी गृहीत धरल्यास एवढ्या कमी अवधीमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे अशक्य आहे. खुद्द महापालिका सचिव विभागाला याबाबत कोणत्याही सूचना नाही. त्यातच सुट्ट्या येत असल्याने त्या वगळून हा कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही निवडणूक जरी घ्यायची झाल्यास शनिवारी किंवा रविवारी सुट्टीच्या दिवशी घ्यावी लागेल किंवा सोमवारी २ फेब्रुवारी रोजी घ्यावी लागेल अशाप्रकारचे चित्र आहे.त्यामुळे महापौर निवडणुकीबाबत कार्यक्रम जाहीर कशाप्रकारे होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
डोंबिवलीत गॅस गळती, बालकासह पाच जण जखमी
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेच्या नवनीत नगरमध्ये घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरमधून वायू गळती झाली. या गॅस गळतीमुळे केतन देढिया (३५), मेहुल वासाड (४०), विजय घोर (४५), हरिश लोढाया (५०) आणि हरिश यांचा मुलगा पार्श्व लोढाया (७) हे पाच जण जखमी झाले.केतन देढिया यांच्या घरात गॅस गळती झाली. गॅस गळतीमुळे केतन देढिया ५० टक्के भाजले. सध्या केतन देढिया यांच्यावर मुंबईत सायन येथे लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित किरकोळ जखमींना आवश्यक ते उपचार करुन घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.डोंबिवली पूर्वेकडे देसलेपाडा परिसरात असलेल्या नवनीतनगर गृहसंकुलातील डब्ल्यू व्ही च्या ५१० नंबरच्या फ्लॅटमध्ये राहणारे केतन देढिया यांच्या घरात गॅस गळती झाली. गळती सुरू असतानाच केतन यांनी घरातील दिवा लावला. यामुळे निर्माण झालेल्या उष्णतेमुळे स्फोट झाला. स्फोटात केतन देढिया यांच्या घराचे नुकसान झाले. केतन देढिया यांच्यासह एकूण पाच जण स्फोटामुळे जखमी झाले.स्फोटाचा आवाज आला पाठोपाठ केतन यांच्या घराची घराची खिडकी आणि ग्रील तुटून इमारतीच्या तळमजल्यावर कोसळली. हा ढिगारा अंगावर कोसळल्यामुळे हरिश लोढाया (५०) आणि हरिश यांचा मुलगा पार्श्व लोढाया (७) हे दोघे जखमी झाले. तर गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात केतन देढिया (३५), मेहुल वासाड (४०), विजय घोर (४५) हे ३ जण जखमी झाले.जखमी झालेल्या पाच जणांपैकी केतन देढिया ५० टक्के भाजले आहेत तर उर्वरित चौघे किरकोळ जखमी आहेत. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करुन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
ट्रम्पनी शेअर केला अमेरिकेचा नवा नकाशा, नकाशात कॅनडा आणि ग्रीनलँडचा समावेश
वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नकाशा शेअर केला आहे. या नकाशात ट्रम्प यांनी कॅनडा आणि ग्रीनलँडचा अमेरिकेची राज्य अशा स्वरुपात समावेश केला आहे. हा नकाशा ट्रम्प यांनी नाटो संघटनेचे सदस्य असलेल्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, इटलीच्या जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर, युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनाही दाखवला आहे. या नकाशामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.ट्रुथ सोशलच्या दुसऱ्या पोस्टमध्ये, ट्रम्प उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मॅक्रो रुबियो यांच्यासोबत ग्रीनलँडमध्ये अमेरिकेचा ध्वज फडकवताना दिसत आहेत. जवळच असलेल्या एका बोर्डवर लिहिले आहे : ग्रीनलँड, अमेरिकेचा भूभाग, २०२६ पासून...कॅनडा हे अमेरिकेचे ५१ वे राज्य बनले पाहिजे, असे ट्रम्प अनेकदा म्हणाले आहेत. कॅनडासोबतच्या व्यापारात सबसिडी अर्थात सवलत दिल्यामुळे अप्रत्यक्षपणे अमेरिकेचे दरवर्षी २०० अब्ज डॉलरचे नुकसान होते. ही स्थिती बघता कॅनडाला अमेरिकेचे राज्य करुन घेणे व्यावहारिक असल्याचे ट्रम्प वारंवार म्हणाले आहेत. त्यांची हीच भूमिका ताज्या कृतीमुळे पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.काही दिवसांपूर्वी अमेरिकेने कराकसवर हल्ला केला आणि व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण केले. यानंतर ट्रम्पने ग्रीनलँड हे अमेरिकेचे राज्य बनले पाहिजे, अशी जाहीर भूमिका घेतली आहे. आर्क्टिकमधील धोरणात्मक स्थान बळकट करण्यासाठी हे आवश्यक असल्याचे ट्रम्प म्हणाले. ताज्या कृतीने ग्रीनलँड बाबतची त्यांची भूमिका पुन्हा ठसठशीतपणे समोर आली आहे.
प्रयागराज माघ मेळ्यात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद आणि प्रशासन यांच्यातील वादाला मंगळवारी नवीन वळण मिळाले. प्रशासनाने तीन दिवसांपासून संपावर असलेल्या अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस बजावली आणि ज्योतिर्मठाचे शंकराचार्य म्हणून त्यांच्या दर्जाबाबत २४ तासांत उत्तर देण्याचे आदेश दिले. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा आरोप आहे की, १८ जानेवारी रोजी मेळा प्रशासनाने त्यांना गंगेत स्नान करण्यापासून रोखले आणि त्यांच्या शिष्यांवर हल्ला केला. नोटीसला उत्तर देताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, आम्ही शंकराचार्य आहोत की नाही हे प्रशासन ठरवेल का? शंकराचार्य शंकराचार्यांबद्दल निर्णय घेतील. स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि प्रशासनात मतभेद का आहेत? शंकराचार्य कोण आहेत, शंकराचार्य कसे बनतात आणि अविमुक्तेश्वरानंद यांच्याभोवतीचा वाद काय आहे? जाणून घेऊयात आजच्या एक्सप्लेनरमध्ये… प्रश्न १: स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि प्रशासनातील सध्याचा वाद कसा सुरू झाला? उत्तर: १८ जानेवारी रोजी मौनी अमावस्येला, ज्योतिर्पीठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सुमारे २०० शिष्यांसह गंगेत स्नान करण्यासाठी पालखीतून आले. गर्दी आणि सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने त्यांची पालखी संगमाजवळ पोहोचण्यापासून रोखली. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना पायी जाण्यास सांगितले गेले, परंतु त्यांनी नकार दिला. यामुळे पोलिस आणि त्यांच्या शिष्यांमध्ये संघर्ष झाला. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी आरोप केला की त्यांचा अपमान करण्यात आला आणि त्यांची छत्री तुटली. ते आंघोळ न करता परतले आणि निषेध केला. स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, मी तीन दिवसांपूर्वी प्रशासनाला कळवले होते की मी पालखीने येणार आहे. तरीही, प्रशासनाने मला थांबवले. हा मला आणि माझ्या शिष्यांना मारण्याचा कट होता. महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मी सरकारवर आरोप केले होते, ज्यामुळे सरकार संतप्त झाले. ते पुढे म्हणाले, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संतांवर हल्ला केला आणि ब्रह्मचारी आणि महिलांना मारहाण केली. हा खून करण्याचा प्रयत्न होता, परंतु नंतर तो चेंगराचेंगरी म्हणून घोषित करण्यात आला. साध्या वेशातील पोलिस पिस्तूल घेऊन गर्दीत घुसले. प्रश्न २: प्रशासनाने स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना शंकराचार्य म्हणून मान्यता का दिली नाही? उत्तर: प्रशासनाच्या कृतींमुळे संतप्त झालेले स्वामी अविमुक्तेश्वरानंद जवळजवळ ३६ तासांपासून धरणे आंदोलन करत आहेत. अविमुक्तेश्वरानंदांचा ज्योतिर्मठ प्रयागराज माघ मेळ्याच्या सेक्टर ४ मधील त्रिवेणी मार्गावर आहे. १८ जानेवारी रोजी पोलिसांशी झालेल्या संघर्षानंतर, प्रयागराज मेळा प्राधिकरणाने काल रात्री उशिरा स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस बजावली... प्राधिकरणाच्या उपाध्यक्षांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, १४ ऑक्टोबर २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ज्योतिर्पीठात धार्मिक नेत्याला शंकराचार्य पदावर नियुक्त करण्याबाबत स्पष्ट आदेश जारी केला. त्यात म्हटले आहे की अपिलांचा अंतिम निकाल लागेपर्यंत, ज्योतिर्पीठ बद्रीनाथ किंवा कोणतीही संस्था कोणत्याही व्यक्तीला शंकराचार्य म्हणून नियुक्त करू शकत नाही. अपील क्रमांक ३०११/२०२० मध्ये अद्याप कोणताही नवीन आदेश देण्यात आलेला नाही आणि हा विषय अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यावरून स्पष्ट होते की कोणताही धार्मिक नेता ज्योतिर्पीठाचा शंकराचार्य होऊ शकत नाही. असे असूनही, २०२५-२६ च्या माघ मेळा प्रयागराज दरम्यान, तुम्ही (स्वामी अविमुक्तेश्वरानंद) तुमच्या छावणीत लावलेल्या फलकावर स्वतःला ज्योतिर्पीठाचे शंकराचार्य म्हणून घोषित केले आहे. हे सर्वोच्च न्यायालयाचे उल्लंघन आहे. तुम्ही तुमच्या नावाआधी 'शंकराचार्य' हा शब्द का वापरत आहात किंवा तुम्ही स्वतःला 'शंकराचार्य' म्हणून कसे प्रसिद्ध करत आहात हे २४ तासांच्या आत स्पष्ट करावे. शिबिरात लावलेल्या फलकाचे फोटो देखील नोटीससोबत समाविष्ट आहेत. मेळा प्रशासनाच्या सेक्टर ४ कार्यालयात तैनात असलेले कायदा अधिकारी अनिल कुमार रात्री १२:१८ वाजता स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या छावणीत पोहोचले. तथापि, स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या समर्थकांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. समर्थकांनी सांगितले की, रात्री उशिरापर्यंत छावणीत कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता, त्यामुळे नोटीस मिळणे शक्य झाले नाही. प्रश्न ३: स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी नोटीसच्या उत्तरात काय म्हटले? उत्तर: पत्रकार परिषदेदरम्यान, स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, शंकराचार्य म्हणजे असा व्यक्ती ज्याला इतर तीन पीठे शंकराचार्य म्हणतात. दोन पीठे मला शंकराचार्य म्हणतात. गेल्या माघ मेळ्यात मी त्यांच्यासोबत स्नान केले आहे. आता कोणता पुरावा हवा आहे? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री निर्णय घेतील की भारताचे राष्ट्रपती? शंकराचार्य कोण असेल हे ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींनाही नाही. ते पुढे म्हणाले, पुरीच्या शंकराचार्यांनी माझ्याबद्दल काहीही सांगितले नाही. ते गप्प आहेत. मी निर्विवादपणे ज्योतिर्पीठाचा शंकराचार्य आहे. जर कोणी दावा केला की मी ज्योतिर्पीठाचा शंकराचार्य आहे, तर त्यांनी येऊन बोलले पाहिजे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद प्रशासन माफी मागत नाही, तोपर्यंत आश्रमात प्रवेश करणार नाही यावर ठाम आहेत. ते पत्रकार परिषदेत म्हणाले, मी प्रत्येक जत्रेसाठी प्रयागराजला येईन, पण मी रस्त्यावर राहीन, छावणीत नाही. प्रश्न ४: सर्वोच्च न्यायालयाने अविमुक्तेश्वरानंद यांना शंकराचार्य होण्यापासून का रोखले? उत्तर: प्रयागराज मेळा प्राधिकरणाने स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये ज्योतिर्पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती आणि स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांच्यातील जुन्या खटल्याचाही उल्लेख आहे. हा संपूर्ण वाद १९५३ मध्ये ज्योतिर्पीठाचे शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्या मृत्यूनंतर सुरू झाला. प्रश्न ५: शंकराचार्य होण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे? उत्तर: चार पीठांच्या शंकराचार्यांचे पद कधीही रिक्त राहू शकत नाही. साधारणपणे, शंकराचार्यांचा मृत्यू किंवा राजीनामा दिल्यानंतर, संत परंपरेत त्यांच्या शिष्यांपैकी एकाला नवीन शंकराचार्य म्हणून नियुक्त केले जाते. ही एक परंपरा आहे; शंकराचार्यांच्या इच्छेनुसार उत्तराधिकारी निवडण्याचा कोणताही नियम नाही. तथापि, भारतीय कायदा मठाच्या प्रमुखाला त्यांच्या शिष्यांमधून उत्तराधिकारी निवडण्याची परवानगी देतो. शंकराचार्य होण्यासाठी, धर्माचार्यकडे चार आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे: वाराणसीस्थित काशी विद्वत परिषद आणि भारत धर्म महामंडळ एका पात्र भिक्षूची निवड करतात आणि त्याला नवीन शंकराचार्य म्हणून नियुक्तीसाठी निवडतात. भिक्षू आणि मठांचे संघटन, अखिल भारतीय धर्म संघ, नंतर नवीन शंकराचार्यांच्या नावावर सहमती दर्शवितात. दशनामी आखाडा, नागा साधूंची संघटना आणि जुन आखाडा यासारख्या संघटना देखील त्यांची संमती देतात. एकमताने निवडून आलेल्या शंकराचार्यांचा नंतर सिंहासनावर पाणी, दूध, तूप आणि मधाने अभिषेक केला जातो. समारंभात, त्यांना छत्री, पंखा आणि चादर अशी चिन्हे दिली जातात. १२ सप्टेंबर २०२२ रोजी अविमुक्तेश्वरानंद यांनी स्वतःला ज्योतिर्पीठाचे शंकराचार्य घोषित केले आणि त्यांच्या समर्थकांनी दावा केला की, राज्याभिषेक आधीच झाला आहे. त्यांचे मीडिया प्रभारी शैलेंद्र योगीराज यांनी अलीकडेच सांगितले की, त्यांचा राज्याभिषेक सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशापूर्वीच झाला होता. प्रश्न ६: सनातन धर्मात शंकराचार्यांचे स्थान काय आहे? उत्तर: वैदिक सनातन धर्म परंपरेत, शंकराचार्यांचे स्थान सर्वात महत्वाचे मानले जाते. 'सनातन' हा शब्द वेदांमधून आला आहे, ज्याचा अर्थ शाश्वत आणि अनंत आहे, म्हणजे नेहमीच अस्तित्वात असलेला आणि नेहमीच अस्तित्वात राहणारा धार्मिक विचार. पुरी येथील गोवर्धन मठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती म्हणतात, आदी शंकराचार्यांनी सनातन धर्माला योग्य दिशा दिली. त्यांनी हरवलेले ज्ञान, तपस्या आणि आध्यात्मिक साधना पुन्हा स्थापित केली. त्यांनी विकृत ज्ञान शुद्ध केले आणि जटिल सूत्रे सोप्या पद्धतीने समाजासाठी उपलब्ध करून दिली. धर्मातील गोंधळ दूर करणे आणि धर्मराज्य (धार्मिक राज्य) स्थापित करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. ८ व्या शतकात, भारतात बौद्ध धर्माचा ऱ्हास होत होता आणि वैदिक धर्म शैव, वैष्णव आणि शाक्त धर्म अशा असंख्य पंथांमध्ये विभागला गेला होता. विविध पंथ, परंपरा आणि श्रद्धा यांच्यामध्ये, आदि शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे एकत्रीकरण करण्यास सुरुवात केली. त्यांनी अद्वैत वेदांत हा सिद्धांत मांडला, म्हणजेच आत्मा आणि परमात्मा हे दोन नसून एक आहेत. यामुळे वैदिक धर्माला स्पष्ट आणि मजबूत दिशा मिळाली. आदि शंकराचार्य संपूर्ण भारतभर प्रवास करत, प्रख्यात विद्वानांशी वादविवाद करत आणि विजयी झाले. यामुळे अद्वैत वेदांत देशभर पसरला. त्यांनी उपनिषद आणि ब्रह्मसूत्रांसारखे ग्रंथ लिहिले. शंकराचार्य यांनी षडमत आणि पंचायतन उपासनेची परंपरा देखील सुरू केली, म्हणजेच पाच देवतांची पूजा: शिव, विष्णू, देवी, गणेश आणि सूर्य. या अद्वैत वेदांत तत्वज्ञानाला पुढे नेण्यासाठी त्यांनी चार पीठे स्थापन केली आणि शंकराचार्य यांची परंपरा त्यांचे प्रमुख म्हणून स्थापित केली. आदि शंकराचार्य यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी केदारनाथमध्ये समाधी घेतली. प्रत्येक पंथाचे शंकराचार्य आदि शंकराचार्यांचे उत्तराधिकारी मानले जातात. उत्तरेला ज्योतिर्मठ किंवा ज्योतिर्मठ आहे, पूर्वेला पुरी, ओडिशातील गोवर्धन पीठ आहे; दक्षिणेला कर्नाटकातील श्रृंगेरी येथे श्रृंगेरी शारदा पीठ आहे; आणि पश्चिमेला द्वारका, गुजरातमध्ये द्वारका पीठ आहे. गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती आहेत, तर द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती आहेत. प्रश्न ७: स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सरकारवर कट रचल्याचा आरोप का केला? उत्तर: संतांचा अपमान असह्य असल्याचे सांगत अविमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याशी झालेल्या कथित गैरवर्तनाबद्दल काँग्रेस उत्तर प्रदेश सरकारविरुद्धही निषेध करत आहे. खरं तर, स्वामी अविमुक्तेश्वरानंद, त्यांचे गुरु स्वामी स्वरूपानंद यांच्याप्रमाणेच, काँग्रेसचे समर्थक मानले जातात. स्वामी स्वरूपानंद हे गांधी कुटुंबाचे जवळचे मानले जात होते आणि त्यांनी सोनिया गांधींच्या पंतप्रधानपदाच्या नियुक्तीला पाठिंबा दिला होता. अनेक प्रसंगी, स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्याविरुद्ध विधाने केली आहेत...
Gold Silver Prices : जागतिक बाजारपेठेतील वाढती अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावर दिसून येत आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे कल वाढल्याने मंगळवारी दोन्ही मौल्यवान धातूंनी ऐतिहासिक उच्चांक प्रस्थापित केला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या भावाने प्रथमच १.५ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला असून चांदीने ३.२७ लाख प्रति किलोचा टप्पा गाठून सर्वांनाच चकीत […] The post Gold-Silver Prices : सोन्याने ओलांडला दीड लाखाचा टप्पा, तर चांदी 3.27 लाखांवर, खरेदी करावे की विकावे? जाणून घ्या.. appeared first on Dainik Prabhat .
Pune : कॅन्टोनमेंट हद्दीतील शाळांना बुधवारी सुट्टी जाहीर
पुणे – जिल्ह्यात आयोजित ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यामुळे बुधवारी ( दि. २१ ) पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना पूर्ण वेळ सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. ग्रँड टूर दुसरा टप्पा […] The post Pune : कॅन्टोनमेंट हद्दीतील शाळांना बुधवारी सुट्टी जाहीर appeared first on Dainik Prabhat .
मुंबईच्या महापौर पदाबाबत भाजप-शिवसेना नेत्यांची दिल्लीत बैठक
मुंबई : मुंबईच्या महापौर पदाबाबत सोमवारी सायंकाळी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दिल्लीत खल झाला. शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यात महाराष्ट्र सदनात बैठक झाली. या बैठकीत महापौरपदासह स्थायी समिती आणि इतर समित्यांबाबतही प्राथमिक चर्चा झाली. मुंबई पालिकेमध्ये सन्मानपूर्वक पदे मिळावीत, अशी भूमिका शिवसेनेने मांडल्याचे कळते.मुंबई पालिकेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला आणखी २५ जागांची आवश्यकता आहे. शिवसेनेच्या साथीशिवाय बहुमत सिद्ध करणे कठीण असल्याने त्यांच्याकडून अडीच वर्षांच्या महापौर पदाची मागणी करण्यात आल्याच्या चर्चा आहे. त्यासाठीच त्यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये स्थलांतरित केल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या नेत्यांनी याविषयी दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार केली असून, त्यांनी मित्रपक्षांशी समन्वयाने तोडगा काढण्याची सूचना केल्याचे कळते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र सदनात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली.या बैठकीत महापौर, स्थायी समिती, सुधार समिती, आरोग्य आणि शिक्षण समितीसह बेस्ट समितीत शिवसेनेला सन्मानजनक वाटा मिळावा, अशी अपेक्षा शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली. आता शिवसेनेच्या मागण्यांचा तपशील घेऊन अमित साटम आणि आशिष शेलार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन नवीन यांच्याशी चर्चा करतील. दरम्यान, येत्या ३० जानेवारीला भाजपचा महापौर मुंबईत विराजमान व्हावा, अशी भाजप श्रेष्ठींची इच्छा असल्याचे अंतर्गत सूत्रांनी सांगितले.
नदी पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्राचे मोठे पाऊल
देशातील पहिल्या राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे मंत्री पंकजा मुंडे यांनी केले सादरीकरणनवी दिल्ली : महाराष्ट्रातील नद्यांना प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पुढाकार घेतला असून, यासाठी 'राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण' स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण संकल्पना मांडली होती. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन यासंदर्भातील देशातील पहिल्या प्रस्तावाचे सादरीकरण केले.या विशेष बैठकीत पंकजा मुंडे यांनी राज्यातील जल आणि पर्यावरण प्रकल्पांच्या सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा केली. नद्यांच्या स्वच्छतेसाठी केंद्र सरकारच्या मदतीसोबतच राज्याची स्वतःची एक स्वतंत्र यंत्रणा आणि नियोजन असणे काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. श्रीमती मुंडे यांनी देशातील अनेक नद्या विविध राज्यांतून प्रवाहित होतात. जर प्रत्येक राज्याने आपल्या भौगोलिक सीमेतील नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी आणि पुनरुज्जीवनासाठी स्थानिक पातळीवर प्रभावी व सुनियोजित योजनांची अंमलबजावणी केली, तर नद्यांचे पूर्णतः प्रदूषणमुक्त होण्याचे स्वप्न सत्यात उतरू शकेल असे सांगितले. या प्रक्रियेमुळे भविष्यात नद्यांचे पावित्र्य आणि त्यांची नैसर्गिक प्राकृतिकता टिकवून ठेवण्यात देशाला मोठे यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.या प्रस्तावावर केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्राने याबाबत घेतलेल्या पुढाकारबद्दल विशेष कौतुक केले आणि यासाठी सर्वोतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.या बैठकीस राष्ट्रीय नदी संरक्षण संचलनालयाचे (NRCD) संचालक राजेश कुमार, महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव श्रीमती जयश्री भोज यांसह केंद्र व राज्यातील इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेनेचा महापौर व्हावा अशी जनतेची इच्छा
एकनाथ शिंदे; शिवसेना जनादेशाच्या विरुद्ध कोणताही निर्णय घेणार नाहीमुंबई : “२३ जानेवारीपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे. या निमित्ताने मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर असावा, अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. मात्र शिवसेना असा कोणताही निर्णय घेणार नाही, जो जनादेशाच्या विरोधात असेल. मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना आणि भाजपने युतीत लढवली होती, त्यामुळे ज्या ठिकाणी युतीत निवडणूक लढवली आहे, तिथे महायुतीचाच महापौर होईल”, अशी भूमिका शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना मांडल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.दरम्यान, पालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना वांद्रेतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. सोमवारी सकाळी सर्व २९ नगरसेवक आपला गट स्थापन करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तालयात जाणार होते. त्यानुसार, त्यांना सकाळी १० वाजेपर्यंत हॉटेलमधून चेकआऊट करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, कोकण विभागीय आयुक्तालयाचा दौरा अचानक रद्द करण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या शपथविधीनिमित्त शिवसेनेचे प्रमुख नेते दिल्लीत असल्याने, हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.नगरसेवकांची मूळ कागदपत्रे पक्षाकडे जमागेल्या चार दिवसांपासून वांद्रेतील हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना मंगळवारी आपापल्या मतदारसंघात जाण्याची मुभा देण्यात आली. त्याचवेळी गटनोंदणीसाठी आवश्यक असलेले सर्व मूळ दस्तावेज त्यांच्याकडून घेण्यात आले आहेत. पक्षाने जी कागदपत्रे विजयी नगरसेवकांकडून घेतली आहेत त्यात १६ तारखेला निकालानंतर मिळालेल्या निवडीचे प्रमाणपत्राचाही समावेश आहे. त्याशिवाय सर्व नगरसेवकांचे आधार कार्डही पक्षाने घेतले आहे.
भाजप-ठाकरे गटात जवळीक? सत्तेसाठी भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला नवी ‘ऑफर’, गुप्त भेटींमुळे राजकीय खळबळ
अकोला : महापालिकांच्या निकालानंतर महापौरपदासाठी राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला असून, अकोला महानगरपालिकेत सत्तास्थापनेचा पेच अधिकच वाढला आहे. निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आता एकमेकांविरुद्ध लढलेले पक्षही सत्तेसाठी युतीच्या पर्यायांचा विचार करताना दिसत आहेत. ८० सदस्यांच्या अकोला महापालिकेत बहुमतासाठी ४१ नगरसेवकांची गरज आहे. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपने ३८ […] The post भाजप-ठाकरे गटात जवळीक? सत्तेसाठी भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला नवी ‘ऑफर’, गुप्त भेटींमुळे राजकीय खळबळ appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर नितीन नवीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोलाचा संदेश दिला. “आमच्यासाठी राजकारण ही सत्ता नसून साधना आहे आणि उपभोग नसून त्याग आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीचा […] The post भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर नितीन नबीन यांचे पहिले भाषण: पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत म्हणाले, ‘एखादी व्यक्ती लोकांच्या भावनांशी..’ appeared first on Dainik Prabhat .
Chinese Super Embassy : लंडनमध्ये चिनी ‘सुपर एम्बेसी’ला ब्रिटनकडून मंजुरी
लंडन : संसद सदस्य आणि मानवाधिकार प्रचारकांनी व्यक्त केलेल्या गंभीर सुरक्षा चिंतांकडे दुर्लक्ष करत ब्रिटन सरकारने लंडनच्या मध्यभागी उभारण्यात येणाऱ्या चीनच्या तथाकथित ‘सुपर एम्बेसी’ला मंगळवारी अधिकृत मंजुरी देण्यात आली. टॉवर ऑफ लंडनजवळील माजी रॉयल मिंट कोर्ट परिसरात प्रस्तावित या मेगा दूतावासाच्या बांधकामास राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकरणांतर्गत मंत्रिस्तरीय स्तरावर मान्यता देण्यात आली. ब्रिटनचे गृहनिर्माण आणि समुदाय सचिव […] The post Chinese Super Embassy : लंडनमध्ये चिनी ‘सुपर एम्बेसी’ला ब्रिटनकडून मंजुरी appeared first on Dainik Prabhat .
Bengal Election: पश्चिम बंगालमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे. बंगालमध्ये सत्तापरिवर्तन करण्यासाठी भाजपने एक मोठी रणनीती आखली असून, इतर राज्यांतील अनुभवी नेत्यांना ‘प्रवासी सदस्य’ म्हणून मैदानात उतरवले आहे. पक्षांतर्गत कलह मिटवणे आणि बूथ स्तरावर संघटना मजबूत करणे, ही मुख्य जबाबदारी या नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे. अनुभवी नेत्यांवर मोठी जबाबदारी बिहारमधील विजयाने […] The post Bengal Election: विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा मास्टरस्ट्रोक, बाहेरील राज्यांतील नेत्यांना बोलावले; कोणत्या जबाबदाऱ्या दिल्या ते जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
BMC Election : महापौर पदाविषयी कुठली तडजोड नको.! भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी स्पष्टच सांगितलं
BMC Election – भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुंबईतील पेचाची दखल घेतल्याची माहिती पुढे येत आहे. महापौर पदाविषयी कुठली तडजोड न करण्याची पक्ष नेतृत्वाची ठाम भूमिका असल्याचे समजते. संख्याबळात सर्वांत मोठा पक्ष ठरल्याने महापौर पदावर आपलाच हक्क आहे. ती बाब मित्रपक्षापर्यंत योग्य प्रकारे पोहचवा. मात्र, राजकीय कटूता टाळा, असा स्पष्ट संदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना दिल्याचे […] The post BMC Election : महापौर पदाविषयी कुठली तडजोड नको.! भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी स्पष्टच सांगितलं appeared first on Dainik Prabhat .
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील बेट भागात मंगळवारी (२० जानेवारी २०२६) मोठी राजकीय उलथापालथ घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र पोपटराव गावडे यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृत प्रवेश केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीकडून त्यांची […] The post Shirur News : तिकीट कापल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी; राजेंद्र पोपटराव गावडे अखेर भाजपात दाखल appeared first on Dainik Prabhat .
Haryana Government : कृपाण आणि मंगळसूत्र घालून देता येणार परीक्षा; हरियाणा सरकारचा आदेश
चंदीगड : हरियाणा सरकारने परीक्षा आणि मुलाखतींना बसताना उमेदवारांना कृपाण आणि मंगळसूत्र घालण्याची परवानगी देण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. मुख्य सचिव कार्यालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, परीक्षांना बसणाऱ्या शीख विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांना निर्धारित मर्यादेनुसार किरपाण घालण्याची आणि वाहून नेण्याची परवानगी असेल. कृपाणाची एकूण लांबी ९ इंचपेक्षा जास्त नसावी, तर ब्लेडची लांबी ६ इंचपेक्षा जास्त नसावी. अशा […] The post Haryana Government : कृपाण आणि मंगळसूत्र घालून देता येणार परीक्षा; हरियाणा सरकारचा आदेश appeared first on Dainik Prabhat .
जम्मू काश्मीरमध्ये आढळले दहशतवाद्यांचे बंकर; ‘या’वस्तू सापडल्या, पंजाबमधून पोहोचत होती मदत?
किश्तवाड: जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील १२,००० फूट उंचीवर असलेल्या दुर्गम आणि बर्फाच्छादित डोंगररांगांमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे एक मोठे कारस्थान उधळून लावले आहे. शोधमोहीमेदरम्यान जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे एक असे लपण्याचे ठिकाण (बंकर) सापडले आहे, जे पाहून सुरक्षा दलाचे जवानही थक्क झाले. हा एखाद्या सामान्य गुहेसारखा नसून, दगडांनी बनवलेल्या ‘मिनी किल्ल्या’प्रमाणे मजबूत बंकर होता. ‘कारगिल स्टाईल’ बंकर […] The post जम्मू काश्मीरमध्ये आढळले दहशतवाद्यांचे बंकर; ‘या’ वस्तू सापडल्या, पंजाबमधून पोहोचत होती मदत? appeared first on Dainik Prabhat .
शिवसेनेने अडीच वर्षांकरीता महापौरपद मागितले ही अफवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; स्पष्ट जनादेशानंतर वादविवाद जनतेला आवडणार नाहीमुंबई : मुंबईच्या महापौर पदावरून भाजप-शिवसेनेत आलबेल नसल्याची चर्चा सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर रोखठोक भाष्य केले आहे. “शिवसेनेने अडीच वर्षांकरीता महापौरपद मागितल्याच्या चर्चा या अफवा आहेत. आमच्यात कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत. महायुतीने मुंबईत एकत्रित निवडणुका लढविल्या आहेत. दावोस येथील परिषदेनंतर जेव्हा मी मुंबईला जाईन, तेव्हा आम्ही एकत्र बसून महापौर पदाबाबत निर्णय घेऊ. कोण महापौर होणार किंवा कोणाला कोणते पद मिळणार, अशा विषयात महायुतीत कोणताही संघर्ष अथवा वाद नाही”, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.जागतिक आर्थिक परिषदेच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी ते दावोसला रवाना झाले. महापालिका निकालांत विशेषतः मुंबईत भाजप आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, निकालानंतर शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याने, महापौर पदासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दावोस येथे एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या महापौर पदाबाबत भाष्य केले.उद्धव ठाकरे आणि तुमच्यात चर्चा सुरू झाल्या आहेत का, या प्रश्नावर या सर्व वावड्या आणि अफवा आहेत. ठाकरेंसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आमची महायुती भक्कम आहे. महापौर पद किंवा इतर छोट्यामोठ्या पदांसाठी भांडत बसणार नाही. जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिला आहे. असा जनादेश मिळाल्यानंतर पदांसाठी भांडत बसणे योग्य नाही, लोकांना ते आवडणार नाही. त्यामुळे आम्ही ते करणारही नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.जनतेचा विश्वास सार्थ ठरवणारमुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकीत जनतेने भाजप आणि महायुतीला मोठे यश दिले. त्यामुळे आता ट्रिपल इंजिनासोबत ट्रिपल जबाबदारी वाढल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलून दाखविली. जनतेचा विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी आता आमच्यावर आहे. स्वच्छ, पारदर्शक आणि कार्यक्षम कारभारातून हा विश्वास सार्थ करणार असल्याचा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई : महापालिका निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी विशेष रणनीती आखली आहे. मतविभागणी टाळण्यासाठी 'घड्याळ' आणि 'तुतारी' ही दोन्ही चिन्हे सोयीनुसार वापरण्याचा निर्णय घेण्यात आला असून, समन्वयाची जबाबदारी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर देण्यात आली आहे.पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार 'घड्याळ' चिन्हावर लढणार असून, या उमेदवारांची जबाबदारी तुतारी चिन्हावर खासदार म्हणून निवडून आलेले डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर असेल. मात्र, शेजारच्या आंबेगाव तालुक्यात मात्र दोन्ही चिन्हांवरील उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. पुणे जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही हीच रणनीती अवलंबली जाणार आहे. महापालिका निवडणुकांनंतर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे, रोहित पवार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.मात्र, शरद पवारांच्या पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी याला विरोध दर्शवला आहे. शरद पवारांचे विचार वेगळे आहेत, तर अजित पवार सत्तेसोबत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायच्या असतील, तर अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल आणि शरद पवारांच्या विचाराने पुढे जावे लागेल, असे जानकर म्हणाले. सध्याच्या परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखे होईल, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला....तर अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेलउत्तम जानकर म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात तुतारीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात आहे. काही ठिकाणी तिढा निर्माण झाला असला, तरी तडजोड करू. ग्रामीण भागात शरद पवारांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग आहे. ईव्हीएम तपासल्याशिवाय निवडणूक होऊ देणार नाही. अजित पवारांना निर्णय घ्यावा लागेल, एकतर सत्तेतून बाहेर पडावे लागेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
Pune News : भूकरमापक परिक्षेचा निकाल 30 जानेवारीला होणार प्रसिद्ध
पुणे : राज्य शासनाच्या भूमि अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गातील 903 पदांसाठी घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल 30 जानेवारी 2026 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. भूमि अभिलेख विभागाच्या महाभूमि या संकेतस्थळावर हा निकाल उमेदवारांना पाहता येणार आहे, अशी माहिती जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. भूकरमापक पदाच्या भरतीसाठी 34 हजार 532 उमेदवारांनी आॉनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी 30 […] The post Pune News : भूकरमापक परिक्षेचा निकाल 30 जानेवारीला होणार प्रसिद्ध appeared first on Dainik Prabhat .
Toll News: गाडीचा स्पीड 80 असतानाही टोल आपोआप कापला जाणार; जाणून घ्या काय आहे नवी MLFF यंत्रणा
कर्नाळ (हरियाणा): महामार्गावरील टोल नाक्यांवर लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि वेळखाऊ प्रक्रियेपासून प्रवाशांची आता कायमची सुटका होणार आहे. हरियाणाच्या कर्नाळ जिल्ह्यातील बसताडा टोल प्लाझा येथे ‘मल्टी लेन फ्री फ्लो’ (MLFF) ही अत्याधुनिक यंत्रणा लागू करण्यात येत आहे. या हायटेक प्रणालीमुळे वाहनचालकांना आता टोल भरण्यासाठी थांबावे लागणार नाही, तर ताशी ८० किमी वेगाने धावतानाही टोल […] The post Toll News: गाडीचा स्पीड 80 असतानाही टोल आपोआप कापला जाणार; जाणून घ्या काय आहे नवी MLFF यंत्रणा appeared first on Dainik Prabhat .
नवी मुंबईकरांना दिलासा; पनवेल, मुंबई, नवी मुंबई, ठाणेला जोडणारा रस्ता होणार लवकरच पूर्ण
नवी मुंबई : उरण पूर्व भागाचा पनवेल, मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याशी थेट संपर्क साधणारा गव्हाणफाटा ते चिरनेर दरम्यानचा रेल्वे पूल अखेर पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. अनेक अडचणींमुळे दीर्घकाळ रखडलेला हा प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून त्रस्त असलेल्या उरण परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.जेएनपीए बंदरातून होणारी कंटेनर वाहतूक वाढल्याने मालगाडी मार्गावर दुहेरी कंटेनर वाहतुकीची योजना आखण्यात आली होती. त्यासाठी जुन्या पुलाची उंची अपुरी ठरत असल्याने तो पूल तीन वर्षांपूर्वी हटवण्यात आला. नव्या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली असली, तरी तांत्रिक अडथळे, परवानग्यांचा विलंब आणि कामातील अडथळ्यांमुळे प्रकल्प अपेक्षित वेळेत पूर्ण होऊ शकला नाही.या पुलामुळे पूर्वी दररोज हजारो वाहने पनवेल, मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने थेट प्रवास करत होती. पूल हटवल्यानंतर ही सोय बंद झाली आणि वाहनचालकांना लांबचा वळसा घ्यावा लागत आहे. अतिरिक्त अंतरामुळे वेळ फुकट जात असल्याने शिवाय लागणारे जास्त इंधन आणि अपघातांचा धोका वाढल्याची तक्रार स्थानिकांकडून सातत्याने होत आहे.याशिवाय, होणाऱ्या पुलाच्या गैरसोयीमुले उरण तालुक्यातील काही गावांची बससेवा बंद झाली आहे. परिणामी नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून रोजच्या प्रवासाचा खर्च वाढला आहे. बाजारपेठ, नोकरी आणि शिक्षणासाठीचा प्रवास अधिकच किचकट झाला आहे.रेल्वे विभागाकडून सध्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून मार्च २०२६ पर्यंत हा पूल वाहतुकीस खुला करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, हा पूल लवकर सुरू व्हावा, अशी जोरदार मागणी उरण परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
US Visa Alert : अमेरिकेत जाणाऱ्यांना 12 लाख रुपयांचा ‘व्हिसा बाँड’भरावा लागेल, भारतासाठी काय संकेत?
US Visa Alert: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरित धोरणांबाबत (Immigration Policy) आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अवैध वास्तव्यास लगाम घालण्यासाठी आता अमेरिकेने ३८ देशांतील प्रवाशांसाठी तब्बल १५,००० डॉलर्स (सुमारे १२.५ लाख रुपये) ‘व्हिसा बॉण्ड’ अनिवार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. विशेष म्हणजे भारताचे शेजारील देश असलेल्या बांगलादेश, नेपाळ आणि भूटानचा या यादीत समावेश असल्याने […] The post US Visa Alert : अमेरिकेत जाणाऱ्यांना 12 लाख रुपयांचा ‘व्हिसा बाँड’ भरावा लागेल, भारतासाठी काय संकेत? appeared first on Dainik Prabhat .
‘निवडणूक कुठेय? हा तर बॉस-बॉसचा खेळ’; नितीन नवीन यांच्या निवडीवरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
BJP national president election: भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन यांची वर्णी लागल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. या निवडीवर काँग्रेसने बोचरी टीका केली आहे. “ही कसली निवडणूक? आधी अध्यक्षांचे नाव जाहीर केले जाते आणि मग निवडणुकीचा सोपस्कार पार पाडला जातो,” असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला असून भाजपमध्ये केवळ ‘बॉस-बॉस’चा खेळ सुरू असल्याचे […] The post ‘निवडणूक कुठेय? हा तर बॉस-बॉसचा खेळ’; नितीन नवीन यांच्या निवडीवरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल appeared first on Dainik Prabhat .
मोठी बातमी..! ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात! भाजपला बाहेर ठेवून शिवसेनेचा महापौर बसणार?
कल्याण : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महापालिकांमध्ये महापौरपदासाठी राजकीय गणिते आखली जात असून, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीतच स्पर्धा रंगताना दिसत आहे. त्यातच, सर्वाधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (केडीएमसी) नगरसेवकांची पळवापळवी सुरू असल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि शिंदेंची शिवसेना मिळून […] The post मोठी बातमी..! ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात! भाजपला बाहेर ठेवून शिवसेनेचा महापौर बसणार? appeared first on Dainik Prabhat .
दावोस : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाचे प्रतिनिधीमंडळ दावोस येथे उपस्थित आहे. दावोस मधील पहिल्याच दिवसापासून जगभरातील विविध क्षेत्रातील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दर्शवणे सुरु केले. भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्र राज्य हे गेटवे-ऑफ-इंडिया असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केले […] The post Devendra Fadnavis : महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास appeared first on Dainik Prabhat .
Bmc Election : महापौरपदाचा सस्पेन्स मुंबईत; तोडगा दिल्लीत?
मुंबई : महानगरी मुंबईतील महापौरपदाचा सस्पेन्स आणखी काही दिवस कायम राहण्याची चिन्हे आहेत. भाजप आणि शिंदेसेना या मित्रपक्षांमधील कथित रस्सीखेचीमुळे मुंबईचा महापौर कोण बनणार याविषयी राजकीय पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्या पेचावर दिल्लीत तोडगा काढला जाईल, असे संकेत मिळू लागले आहेत. यावेळी मुंबई जिंकण्याचे मिशन हाती घेऊन भाजप महापालिका निवडणुकीला सामोरा गेला. शिंदेसेनेला साथीला […] The post Bmc Election : महापौरपदाचा सस्पेन्स मुंबईत; तोडगा दिल्लीत? appeared first on Dainik Prabhat .
Tabu Shocking Statement: बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री तब्बू सध्या तिच्या ‘दे दे प्यार दे २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ५४ व्या वर्षात पदार्पण केलेल्या तब्बूने अद्याप लग्न केलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर सध्या तिच्या लग्नाशी संबंधित एक जुने विधान प्रचंड व्हायरल होत असून, त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. परंतु, या विधानामागील सत्य आता समोर आले आहे. […] The post Actress Tabu : ‘मला पुरुषाची फक्त बेडवर…’, अभिनेत्री तब्बूबाबतचे धक्कादायक विधान पुन्हा चर्चेत; व्हायरल दाव्यामागील सत्य काय? appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : भारताच्या कर्तव्य पाथ (प्रजासत्ताक दिन परेड) मध्ये यंदा देशाच्या संरक्षण आणि सामर्थ्याचे प्रदर्शन होणार आहे. पाकिस्तानसह कोणत्याही शत्रूला धडकी भरवणाऱ्या आधुनिक आणि स्वदेशी निर्मित शस्त्रसज्जा आणि लष्करी प्रणाली यावेळी परेडमध्ये प्रदर्शित होणार आहेत. या उपकरणांपैकी अनेकांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये आपला पराक्रम सिद्ध केला आहे.भारतीय लष्कर, डीआरडीओ आणि ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत विकसित केल्या गेलेल्या या उपकरणांची यादी पुढीलप्रमाणे आहे:1. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रभारत–रशिया संयुक्त प्रकल्पातून विकसित झालेलं हे क्रूझ क्षेपणास्त्र ३०० किमीपेक्षा जास्त अंतरावर अचूक मार सक्षम आहे. त्याची वेगवान गती (मॅक 3+), स्वयंचलित लक्ष्य शोधण्याची क्षमता आणि प्रचंड नाशक शक्ती यामुळे ही शस्त्रे शत्रूच्या हवाई आणि जमिनीवरील ठिकाणे नष्ट करण्यास सक्षम आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये याने पाकिस्तानच्या नूर खान हवाई तळावर यशस्वीरित्या लक्ष्य भेदलं होता.2. प्रगत Towed आर्टिलरी गन सिस्टमडीआरडीओ, टाटा, महिंद्रा आणि भारतफोर्ज यांनी संयुक्तपणे विकसित केलेला १५५ मिमी/५२ तोफखाना आता लष्करात सेट होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. ४८ किमीपर्यंतच्या श्रेणीसाठी हा तोफखाना सहज वाहून नेण्याजोगा असून तोफखान्याची मागणी आता मोठ्या प्रमाणावर पूर्ण करेल. पुढील वर्षात जवळपास 1,500 युनिट्स या प्रणालीने सज्ज होतील.3. ड्रोन शक्ती – ईगल प्रहारभारतीय लष्कराच्या नवीन ड्रोन नियंत्रण आणि प्रतिबंध प्रणालीत सहभागी असलेला ईगल प्रहार युद्धभूमीवर ड्रोनशी सामना करण्यास सक्षम केला आहे. स्क्वाड ड्रोन ऑपरेशन्स, ऑन-साईट ड्रोन दुरुस्ती, ट्रॅकिंग आणि नियंत्रण क्षमता यामुळे हे यंत्रणा भाऊक दृष्ट्या अत्याधुनिक मानली जाते. ज्यामुळे शत्रूच्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देणे सुलभ होणार आहे.4. मध्यम पल्ल्याचे SAM (MR-SAM)हवाई हल्ल्यांना त्वरित प्रत्युत्तर देणारे हे सुपरसॉनिक परावलंबी क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी विकसित आहे. विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन आणि अन्य हवाई लक्ष्ये यांचे प्रतिबंध करण्यास हे अत्यंत प्रभावी आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये त्याने यशस्वी भूमिका बजावली आणि पाकिस्तानी हवाई धोक्यांना प्रत्युत्तर दिले.5. आकाश क्षेपणास्त्र प्रणालीही मध्यम पल्ल्याची हवाई बचाव प्रणाली एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर प्रभावी कार्य करू शकते. स्वदेशी बनावट असल्यामुळे त्याचा भार कमी व नियोजन अधिक सक्षम आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यानही याने अनेक शत्रू हवाई तुकड्यांना रोखले.6. दिव्यास्त्र आणि शक्तीबान रेजिमेंटऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्यात मोठे बदल सुरू आहेत. प्रगत ड्रोन व क्षेपणास्त्र लक्ष्यांवर लक्ष ठेवणारी विशेष “दिव्यास्त्र बॅटरी” आणि ड्रोन युद्धासाठी विशेष “शक्तीबान रेजिमेंट” युनिट्स आता प्रत्येक इन्फंट्री बटालियनमध्ये असतील. हे यंत्रणा भविष्यातील युद्धात फायदेशीर ठरणार आहेत.7. रोबोटिक खेचरया अत्याधुनिक रोबोट्सना कुत्र्यासारखे रूप असून, ते शत्रू आढळताच झपाट्याने प्रतिसाद देऊ शकतात. ते साहित्य वाहून नेण्यास, नजर ठेवण्यास आणि जवानांसाठी धोक्याचे स्थान ओळखून मदत करण्यास सक्षम आहेत. डोंगराळ किंवा कठीण प्रदेशात ते विशेष उपयोगी ठरतील.या सर्व तंत्रज्ञानाद्वारे भारतीय सैन्याने “स्वावलंबी भारत”चं प्रतिक सादर करणार आहेत. ब्रह्मोस, आकाश, MR-SAM सारखी शस्त्रे ऑपरेशन सिंदूर सारख्या वास्तविक परिस्थितीत यशस्वी ठरली आहेत. याशिवाय २९ विमानांचा फ्लायपास्ट, भैरव कमांडो आणि विविध दलांच्या झांक्या देखील परेडसाठी सज्ज आहेत.या सगळ्या आधुनिक शस्त्रसज्जांचा प्रदर्शन भारताची सामर्थ्य, आत्मविश्वास आणि सुरक्षिततेबद्दलचा निर्धार व्यक्त करतो. यामुळे भारताच्या संरक्षण क्षमतेवर वाढलेला भर आणि समोरच्या संभाव्य धोके यावर परिणामकारक प्रत्युत्तर देण्याची तयारी स्पष्ट होते.
Karnatka | IPS Ramachandra Rao – सध्या संपूर्ण देशात एका व्हिडिओने चांगलीच खळबळ उडवली आहे. हा व्हिडिओ कर्नाटकचे पोलीस महासंचालक डॉ. रामचंद्र राव यांचा असून, यामध्ये ते महिलांसोबत गैरवर्तन करत असल्याचं दिसून येत आहे. शासकीय कार्यालयातच हा प्रकार घडल्याचा आरोप होत असून, या घटनेवर नागरिकांसह विविध स्तरांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची […] The post मुलगी सोनं तस्करीत तुरुंगात, बाप ऑफिसमध्ये मारतो महिलांना मिठी; कोण आहे IPS रामचंद्र राव? व्हिडिओचं प्रकरण काय? appeared first on Dainik Prabhat .
Narendra Modi : नितीन नवीन हे पक्षात माझे बॉस : नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नितीन नवीन यांच्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीबद्दल अभिनंदन करताना, पक्षाशी संबंधित बाबींमध्ये ते आपले बॉस असतील, असे स्पष्ट केले. दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात संघटन पर्वाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. मोदी म्हणाले की, ४५ वर्षीय नितीन नवीन हे मिलेनियल पिढीचे प्रतिनिधी असून, त्यांनी बदलत्या भारताचा प्रत्यक्ष अनुभव […] The post Narendra Modi : नितीन नवीन हे पक्षात माझे बॉस : नरेंद्र मोदी appeared first on Dainik Prabhat .

24 C