मुंबईतील ९ विधानसभांमध्ये उबाठाचे 'शून्य'नगरसेवक
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा उबाठा ठरला असला तरी प्रत्यक्षात मुंबईतील ०९ विधानसभेत या पक्षाला नगरसेवकांचे खातेच उघडता आलेले नाही. त्यामुळे मुंबईतील ३६ विधानसभेच्या तुलनेत उबाठाला केवळ २७ विधानसभांमध्ये आपले नगरसेवक निवडून आणता आले आहेत. मुंबई पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ८९ आणि उबाठाचे ६५ नगरसेवक निवडून आले आहेत. तर शिवसेनेचे २९ आणि काँग्रेसचे २४ नगरसेवक निवडून आले. मात्र, मुंबईत ८९ नगरसेवक निवडून आलेल्या भाजपला मुंबईतील ३६ पैंकी ०५ विधानसभांमध्ये आपले खाते खोलता आलेले नाही. कलिना, वांद्रे पूर्व, धारावी, वरळी आणि शिवडी या पाच विधानसभांमध्ये मागील वेळेसह भाजपला खाते खोलता आले नव्हते. आणि आताही खाते त्यांना खोलता आलेले नाही. या पाचही विधानसभांमध्ये यंदा भाजपने कमळ फुलवण्याचा निर्धार केला होता. परंतु त्यांना यापैंकी एकाही विधानसभेत आपला नगरसेवक निवडून आणत कमळ फुलवता आलेले नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. तर या पाचही विधानसभांमध्ये उबाठा आणि काँग्रेसचे आमदार असल्याने त्यांना यंदाही नगरसेवक निवडून आणण्याचे स्वप्न साकारता आलेले नाही.तर महापालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक उबाठाचे आहेत. मुंबईत उबाठाचे १० नगरसेवक आहेत. परंतु उबाठाला यंदाच्या निवडणुकीत ०९ विधानसभांमध्ये आपला एकही नगरसेवक निवडून आणता आलेला नाही. अणुशक्ती नगर, मुलुंड, शीव कोळीवाडा, घाटकोपर पूर्व, दहिसर, बोरीवली, चारकोप, मलबारहिल आणि कुलाबा या विधानसभांमध्ये उबाठाचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. मुंबईत ठाकरे बंधूंची युती, मराठीचा मुद्दा हाती घेवून उबाठाला या दहाही विधानसभांमध्ये महायुतीने खाते खोलायला दिलेले नाही.शिवसेनेचे मुंबईत सहा आमदार आहेत. पण या पक्षाचे २९ नगरसेवक निवडून आलेले आहेत. परंतु या पक्षाला संपूर्ण मुंबईतील १४ विधानसभांमध्ये एकही नगरसेवक निवडून आणता आलेला नाही. शिवसेना फुटल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असून मुंबईत ठाकरेंच वर्चस्व असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यनेते असलेल्या शिवसेनेला भाजपसोबतच्या युतीमध्ये किती जागा मिळतात आणि कुठल्या विधानसभांमध्ये त्यांचे वर्चस्व राहते याकडे लक्ष होते. परंतु त्यांना मुंबईतील ३६ पैंकी१४ विधानसभांमध्ये खातेही उघडता आलेले नसल्याचे दिसून येत आहे.कोणत्या विधानसभांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाला उघडता आले नाही खातेभाजप : ०५ विधानसभाविधानसभा : कलिना, वांद्रे पूर्व, धारावी, वरळी, शिवडीउबाठा : ०९ विधानसभाविधानसभा : दहिसर, बोरीवली,चारकोप, मुुलुंड, अणुशक्ती नगर, घाटकोपर पूर्व, मलबार हिल, कुलाबा, शीव कोळीवाडाशिवसेना : १४ विधानसभाविधानसभा : कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, मुलुंड, भांडुप, घाटकाेपर पश्चिम, कांदिवली, चारकोप, मालाड, माहिम, शिवडी, मलबारहिल, मुंंबादेवी, कुलाबा
Top 10 news : एकीकडे राज्यातील आरक्षणाच्या मुद्यावरून जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुका लांबणीवर गेल्या.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींंना दिलासा? जानेवारी महिन्याच्या हप्ता संदर्भात अपडेट समोर
Ladki Bahin Yojana : जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न लाभार्थी महिलांना पडला होता. आता त्या संदर्भात अपडेट समोर आली आहे.
खा. नारायण राणे यांच्यापुढे कुठचेही पद माझ्यासाठी मोठे नाही : मनीष दळवी
वेंगुर्ले : माझे नेते खा.नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा मी लहान कार्यकर्ता आहे. त्यांच्या पुढे जिल्हा परिषद सदस्य पदच काय कुठचेही पद माझ्यासाठी मोठे नाही. त्यांच्या स्वाभिमानासाठी पदच काय वेळ पडल्यास मान कापून देण्याची ही तयारी आहे. धनशक्तीच्या जोरावर काहींनी मला रोखण्याचा प्रयत्न केला तरी ते माझ्या बाजूने असलेल्या लोकशक्ती पुढे टिकू शकत नाहीत. वेंगुर्ले तालुक्यात महायुतीचे जिल्हा परिषदेचे पाच आणि पंचायत समितीचे दहा ही उमेदवार आणण्याचा निर्धार करुया. त्यासाठी माझा एकट्याचा राजकीय बळी गेला असे मी समजेन. पण झुकणार नाही. वेंगुर्ले तालुक्याच्या विकासासाठी यापुढे अजून जोमाने कामाला लागेन सर्वांनी असेच प्रेम कायम ठेवा. सात तारीख ला विजयाचा गुलाल आपल्यालाच उधळायचा आहे यासाठी एक संगमने काम करूया असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे. दरम्यान मधल्या काळात घडलेल्या सर्व घटना सविस्तर नावांसह ८ तारखेला जाहीर करणार अशी स्पष्ट भूमिका मनीष दळवी यांनी मांडली आहे.मनीष दळवी यांनी आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी अचानक मागे घेतला. त्यामुळे विविध चर्चा सुरू होत्या. म्हणूनच वेतोरे येथील गोगटे मंगल कार्यालयात आज सायंकाळी मनीष दळवी यांच्या मित्र परिवाराकडून त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी सभा आयोजित केली होती. यावेळी व्यासपीठावर महायुतीच्या आडली जिल्हा परिषद उमेदवार समिधा नाईक, आडेली पंचायत समिती उमेदवार नितीन मांजरेकर, वायंगणी पंचायत समिती उमेदवार शितल राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा राऊत, शिवसेना पक्षनिरीक्षक राजेश मोरे, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, वसंत तांडेल, निलेश सामंत, प्रितेश राऊळ, दाजी परब, बोवलेकर, रवी खानोलकर, पाटकर, प्रशांत खानोलकर, सर्व गावचे सरपंच, नगरसेवक महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेंगुर्ले तालुक्यात महायुतीचे सर्व उमेदवार आपल्याला निवडून आणायचे आहेत. मला येथे गुंतून ठेवून अन्य चार ठिकाणी महायुती मध्ये बिघाडी करून उमेदवारांना पराभूत करणे यासाठी काही जण प्रयत्न करत होते. परंतु त्यांचा डाव आम्ही उलटून लावला. यासाठी मला माझी उमेदवारी मागे घ्यावी लागली. याबाबत मी बरोबरच्या कुणाही पदाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली नाही. मात्र आमचे नेते आणि मार्गदर्शक यांच्याशी चर्चा करून राणे साहेबांच्या आदेशाने हा निर्णय घेतला. त्याबाबत आता चर्चा करून वेळ दवडण्यात अर्थ नाही. आम्ही सर्वांनी योग्य उत्तर तुमच्या सर्वांच्या साथीने नक्की देणार. आता फक्त उर्वरित पाच दिवसात जोमाने प्रचार करून आपल्या महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणणे हे आपले ध्येय आहे. कोणी कितीही धनशक्तीचा दबाव आणला तरी आपल्याला विजयाचा गुलाल उधळायचा आहे. त्यामुळे एकजुटीने आणि एक संघपणे प्रचार करू या. माहितीच्या अधिकृत सर्व उमेदवारांना निवडून आणू या आणि आपली एकजूट ताकद दाखवून देऊया असेही मनीष दळवी यांनी सांगितले.
मंडणगडमध्ये दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढतीचे चित्र
मंडणगड :गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांना ६-० असा व्हाईट वॉश देण्याकरिता मैदानात उतरलेल्या शिवसेनेसमोर तालुक्यात चार पक्षांची झालेली महाआघाडी मोठे आव्हान उभे करणार असे वाटत आहे. भाजप व काँग्रेस या पक्षाचे निवडणुकांमधील स्वतंत्र अस्तित्व व महाआघाडीतील राष्ट्रवादी व उबाठा या दोन प्रमुख पक्षांची जागा वाटपाची धुसफूस कोणाच्या पथ्यावर पडणार याबद्दल तालुक्यात अंदाज बांधणे सुरु झाले आहे.महायुतीतून बाहेर पडलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट)ने सेनेच्या विरोधात असलेल्या सर्व मतप्रवाहांना एकत्र करण्याचे प्रयत्न केले. या प्रयत्नांना पूर्णपणे यश आले नाही. अगदी महाआघाडीची घोषणा करुनही भिंगळोली पंचायत समिती गणात जागावाटपाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे या संर्घषाला मैत्रीपूर्ण लढतीचे गोंडस रुप देत या गणात दोन्ही पक्षांनी उमेदवार अधिकृतपणे उतरवले आहेत. भिंगळोली जिल्हा परिषद गटाचा विचार करता शिवसेना, उबाठा,काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार असून माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे व अस्मिता केंद्रे यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. बाणकोट जिल्हा परिषद गटांचे निवडणुकांचा विचार करता या गटात शिवसेना,राष्ट्रवादी,बसपा अशी तिरंगी लढत होत आहे. या गटात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण यांची अनेक वर्षांची राजकीय प्रतिष्ठापणाला लागली.पंचायत समिती गणाचा विचार करता इस्लामपूर पंचायत समिती गणात उबाठा, भाजप, शिवसेना अशी तिरंगी लढत होणार आहे. या लढतीत माजी सभापती प्रणाली चिले यांच्याकडे सर्वांचे लक्ष आहे. भिंगळोली पंचायत समिती गणात शिवसेना, राष्ट्रवादी, उबाठा, काँग्रेस अशी चौरंगी लढत होणार आहे. या गणात राष्ट्रवादी व उबाठा यांची उमेदवारी असतानाही दोघांनीही स्वतंत्रपणे उमेदवार उतरवले. मतांचे विभाजन झाल्यास त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसणार आहे. बाणकोट पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरुद्ध शिवसेना अशी दुरंगी लढत होणार आहे आहे. तुळशी पंचायत समिती गणात शिवसेना, भाजप, वंचीत, शिवसेना उबाठा अशी चौरंगी लढत होणार असल्याने ती लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
वेंगुर्ले :रेडी जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रीतेश राऊळ यांना अपक्ष उमेदवार केरवाडी येथील काशिनाथ नार्वेकर यांनी पाठिंबा जाहीर केला.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका महायुती म्हणून लढविल्या जात आहेत. यातच वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेचे नार्वेकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीही त्यांनी आपला अर्ज मागे घेतला नव्हता. दरम्यान शिवसेनेचे नेते, आमदार दीपक केसरकर यांच्या बरोबर बोलणे झाल्यानंतर त्यांच्या शब्दाचा मान ठेवत आपण महायुतीचे उमेदवार प्रितेश राऊळ यांना जाहीर पाठिंबा दिला आहे, असे जाहीर केले. यामुळे रेडी मतदारसंघातील राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळाले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत शिवसेना जिल्हा समन्वयक सचिव वालावलकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी महत्त्वाची भूमिका बजावत यशस्वी मध्यस्थी केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे पक्षांतर्गत समन्वय साधला गेला आणि महायुतीची ताकद अधिक बळकट झाली. महायुतीच्या या निर्णयामुळे रेडी मतदारसंघात शिवसेना, भाजप व मित्र पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले असून या निवडणुकीत महायुतीला याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. स्थानिक पातळीवर या घडामोडींची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला वेग आला आहे.
योजना केवळ कागदांवर न राहता थेट नागरिकांच्या जीवनात पोहोचाव्यात
अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी घेतला विकासाचा आढावानवी दिल्ली : जरी सध्या देशाचे लक्ष अर्थसंकल्पाकडे केंद्रित असले तरी, या सरकारची ओळख नेहमीच रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म अशी राहिली आहे. देश आता ‘रिफॉर्म एक्सप्रेस’वर वेगाने पुढे जात असून, संसद सदस्यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे सुधारणा अधिक गतीने राबवल्या जात आहेत. सरकारने लास्ट-माईल डिलिव्हरीवर विशेष लक्ष केंद्रित केले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. योजना केवळ कागदांवर न राहता थेट नागरिकांच्या जीवनात पोहोचाव्यात, हा सरकारचा प्रयत्न आहे. आगामी काळात नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्सच्या माध्यमातून ही सुधारणा प्रक्रिया अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यात येईल, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. संसदचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके, मोठे आर्थिक निर्णय तसेच सरकार आणि विरोधकांमधील तीव्र चर्चा पाहायला मिळणार आहे. १ फेब्रुवारी रोजी सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प आणि संसदेत मांडले जाणारे आर्थिक सर्वेक्षण २०२६-२७ यामुळे हे अधिवेशन अधिकच महत्त्वाचे ठरले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून १४० कोटी देशवासीयांचा आत्मविश्वास, परिश्रम आणि आकांक्षा प्रभावीपणे मांडण्यात आल्या. विशेषतः युवकांच्या अपेक्षा आणि भविष्यासंबंधीचा दृष्टिकोन अतिशय अचूक शब्दांत मांडण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रपतींनी संसद सदस्यांसमोर मांडलेल्या अपेक्षा आणि मार्गदर्शक सूचना सर्व खासदारांनी गांभीर्याने घेतल्या असतील, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, २१व्या शतकाचा एक चतुर्थांश काळ पूर्ण झाला असून आता दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी पुढील २५ वर्षे अत्यंत महत्त्वाची असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. हा अर्थसंकल्प या शतकाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला अर्थसंकल्प असून, तो देशाच्या भविष्याची दिशा ठरवणारा ठरेल.
शिवसेना आमदार निलेश राणे यांच्याकडून पवार कुटुंबीयांचे सांत्वन
पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट देत पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले.महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे, तर असंख्य कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राणे परिवार आणि पवार परिवार यांचे नाते हे राजकारणापलीकडचे, आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे होते. जे शब्दांत मांडणे अशक्य आहे. स्व. अजितदादा हे केवळ एक नेते नव्हते, तर दिवसरात्र जनतेसाठी झटणारे, कामातून आपली ओळख निर्माण करणारे आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबीयांसह आम्हा सर्वांसाठी निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे, अशी शोकप्रतिक्रिया आमदार निलेश राणे यांनी यावेळी व्यक्त करत या दुःखद प्रसंगातून सावरण्यासाठी पवार कुटुंबीयांना धीर दिला. ईश्वर स्व. अजितदादांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि पवार कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना आमदार निलेश राणे यांनी यावेळी केली.
E-Governance Awards : १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पुण्याचे यश; तक्रार निवारण आणि ऑनलाईन सेवांमध्ये पारदर्शकता आणल्याने मिळाला बहुमान.
भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील 'मदर ऑफ ऑल डील्स'मुळे अमेरिका संतापला आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट म्हणाले की, युरोपसाठी युक्रेन युद्धापेक्षा व्यापार अधिक महत्त्वाचा आहे. तो आपल्या विरोधात युद्धाला निधी पुरवत आहे. बेसेंट म्हणाले की, या करारामुळे भारताला अधिक फायदा होईल. भारत-EU च्या करारामुळे अमेरिका इतका अस्वस्थ का आहे, या करारामुळे भारताला खरोखरच जास्त फायदा होईल का आणि ट्रम्पच्या शुल्काचा (टॅरिफ) परिणाम कमी होईल का; जाणून घेऊया… प्रश्न-1: भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील 'मदर ऑफ ऑल डील' काय आहे? उत्तरः जेव्हा दोन किंवा अधिक देश एकमेकांच्या वस्तू आणि सेवांवरील कर, निर्बंध आणि अडथळे कमी किंवा रद्द करण्याचे ठरवतात, तेव्हा त्याला मुक्त व्यापार करार (फ्री ट्रेड एग्रीमेंट) म्हणजेच FTA म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, FTA हा व्यापाराचा 'टोल फ्री महामार्ग' आहे. भारताने 27 जानेवारी रोजी युरोपियन युनियनसोबत FTA (मुक्त व्यापार करार) जाहीर केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर यांनी या कराराला 'मदर ऑफ ऑल डील्स' असे म्हटले आहे… प्रश्न-२: यामुळे संतप्त अमेरिका आपला राग कसा व्यक्त करत आहे? उत्तरः भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात व्यापार करार झाल्यानंतर ट्रम्प सरकारचे मंत्री या करारावर टीका करत आहेत… प्रश्न-3: या करारामुळे भारताला खरोखरच जास्त फायदा होईल का? उत्तरः भारताने 2025 मध्ये युरोपला 6.8 लाख कोटी रुपयांचा माल विकला. तर युरोपियन युनियनकडून 5.5 लाख कोटी रुपयांचा माल खरेदी केला. म्हणजेच, दोन्ही देशांमधील व्यापारात भारताकडे आधीच 1.3 लाख कोटी रुपयांची आघाडी आहे. याला तांत्रिक भाषेत 'ट्रेड सरप्लस' (व्यापार अधिशेष) असेही म्हणतात. या करारानुसार, भारताने युरोपमधून येणाऱ्या सुमारे 96.6% वस्तूंवरील शुल्क पूर्णपणे काढून टाकले आहे किंवा खूप कमी केले आहे. त्याचप्रमाणे, युरोपनेही भारतातून येणाऱ्या 99.5% वस्तूंवरील शुल्क रद्द केले आहे किंवा कमी केले आहे. करारानंतर, युरोपियन युनियनने भारतावर लादलेले सरासरी शुल्क 3.8% वरून 0.1% पर्यंत कमी झाले आहे. भारत-युरोपियन युनियन व्यापार करारामुळे भारताच्या या क्षेत्रांना सर्वाधिक फायदा होईल… युरोपमध्ये भारतीय कपड्यांची विक्री वाढेल फार्मा आणि केमिकल व्यापार 20% नी वाढू शकतो भारतात युरोपचे संरक्षण कारखाने स्थापन होऊ शकतात भारतातील चामड्याच्या कारागिरांचा व्यवसाय वाढेल याशिवाय, भारताच्या सर्व प्रकारच्या दागिन्यांवरील शुल्क रद्द होईल किंवा खूप कमी होईल. भारतातील लोकांना युरोपियन दारू, युरोपियन गाड्या आणि औद्योगिक उत्पादने स्वस्त मिळतील, कारण त्यांच्यावरील प्रीमियम शुल्क कमी होईल. या करारामुळे भारताला फायदा होताना दिसत आहे, परंतु भारताला जास्त फायदा होईल असे म्हणणे सध्या घाईचे ठरेल. चायनीज ॲकॅडमी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशनचे वरिष्ठ संशोधक झोऊ मी यांच्या मते, अमेरिकेला असे वाटते की संपूर्ण जग त्याच्या तर्कानुसार चालेल. यात जरी त्याच्या भागीदारांचे नुकसान झाले तरी. आता अमेरिकेचे भागीदार त्याच्यानुसार चालत नाहीत, म्हणून तो अशी विधाने करत आहे. प्रश्न-४: युरोपियन युनियनला या करारातून काय मिळेल? उत्तरः भारताने युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या ४९.६% वस्तूंवरील शुल्क तात्काळ रद्द केले आहे. उर्वरित ३९.५% वस्तूंवरील शुल्क ५ ते १० वर्षांत संपुष्टात येईल. युरोपियन युनियनच्या व्यापार करारामुळे युरोपियन युनियनच्या या क्षेत्रांना सर्वाधिक फायदा होईल… भारतात युरोपीय दारू आणि वाईनचा वापर वाढेल भारतात युरोपीय गाड्यांची मागणी वाढेल याव्यतिरिक्त, मशिनरीवर 44%, रसायनांवर 22% आणि फार्मा क्षेत्रावर 11% लागणारे शुल्क (टॅरिफ) देखील येत्या काही वर्षांत पूर्णपणे रद्द होईल. युरोपमधील आयटी, अभियांत्रिकी, व्यवसाय सेवा आणि दूरसंचार यांसारख्या उच्च-मूल्याच्या सेवा क्षेत्रांनाही भारतात अधिक संधी मिळतील. कारण या क्षेत्रांमध्ये इतर देशांच्या तुलनेत शुल्क (टॅरिफ) कमी लागेल. प्रश्न-५: हा करार ट्रम्पच्या शुल्कांना निष्प्रभ करेल का? उत्तरः ट्रम्पने सध्या भारताच्या वस्तूंवर ५०% शुल्क (टॅरिफ) लावले आहे, जे त्यांच्या सत्तेत येण्यापूर्वी १०% पेक्षाही कमी होते. यामुळे भारताच्या निर्यातीवर खूप नकारात्मक परिणाम झाला आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव (GTRI) नुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये भारताने सुमारे ३ लाख कोटी रुपयांच्या वस्तूंची निर्यात केली. हे वर्ष २०२४ पेक्षा ११% कमी होते. फक्त अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीत २८.५% घट झाली. मे २०२५ मध्ये भारताने अमेरिकेला सुमारे ८० हजार कोटी रुपयांची निर्यात केली होती. ऑक्टोबरमध्ये हे ५६ हजार कोटी रुपयांपर्यंत खाली आले. GTRI नुसार, भारतातून अमेरिकेला होणारी निर्यात २०२४-२५ मध्ये ८६.५ अब्ज डॉलर होती. ही २०२५-२६ मध्ये सुमारे ५० अब्ज डॉलरपर्यंत कमी होऊ शकते. म्हणजेच, भारतीय देशांतर्गत बाजाराला ३ लाख कोटी रुपयांचे नुकसान होईल. सर्वाधिक परिणाम वस्त्रोद्योग, दागिने, कोळंबी (श्रिंप) आणि गालिचे यांच्या निर्यातीवर होईल. अशी भीती आहे की या क्षेत्रांमध्ये निर्यात सुमारे 70% पर्यंत कमी होईल, ज्यामुळे लाखो नोकऱ्यांवर गंडांतर येऊ शकते. व्यापार करारानंतर युरोपियन युनियनने निर्यातीसाठी भारतातील काही सीफूड प्रक्रिया सुविधांनाही मान्यता दिली आहे. यामुळे शिपमेंट्स वाढू शकतील, विशेषतः अशा वेळी जेव्हा अनेक उत्पादकांना अमेरिकेच्या शुल्कामुळे दबाव सहन करावा लागत आहे. अमेरिकेला होणाऱ्या या निर्यातीवर वाढलेल्या शुल्काचा परिणाम प्रत्यक्षात दिसू लागला आहे. सुरतसारख्या प्रमुख केंद्रातून येणाऱ्या अहवालानुसार हिऱ्यांच्या उत्पादनात कपात सुरू झाली आहे. सुरतमधील हिरे पॉलिशिंग उद्योग 12 लाख लोकांना रोजगार देतो. अर्थशास्त्रज्ञ शरद कोहली म्हणतात की, व्यापार करारामुळे भारतीय वस्तू चीनइतक्या स्वस्त होऊ शकतात, ज्यामुळे युरोपमध्ये त्यांची मागणी वाढेल. ट्रम्पच्या शुल्कामुळे भारताला हिरे आणि रत्नांमध्ये जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई युरोपमधून होऊ शकते. तथापि, पूर्ण भरपाईबद्दल सांगणे शक्य नाही. परंतु 3 ते 4 वर्षांत EU-भारतातील व्यापार सुमारे 22 लाख कोटींपर्यंत जाऊ शकतो. प्रश्न-6: या करारामुळे अमेरिकेला कोणत्या गोष्टीची भीती वाटत आहे? उत्तरः EU आणि भारत जवळ आल्याने अमेरिकेसाठी अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात… सर्वात मोठा व्यापार भागीदार गमावू शकतो भारतावरील टॅरिफचा दबाव निष्प्रभ भारत-युरोपीय संघ यांच्यातील FTA म्हणजे दोन मोठ्या आर्थिक खेळाडूंचे एकत्र येणे आहे. हा अमेरिकेसाठी एक संकेत आहे की दोन्ही देश त्यांच्या अजेंड्यावर पुढे जाण्यास तयार आहेत. जगभरातील देश अमेरिकेचा पर्याय शोधत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे JNU चे प्राध्यापक स्वर्ण सिंह म्हणतात, ‘या घटनांमुळे EU ला NATO व्यतिरिक्त इतर भागीदारी शोधण्याची इच्छा अधिक बळकट झाली आहे. त्यामुळे EU-India FTA केवळ आर्थिक धोरणापुरते मर्यादित न राहता, अमेरिकेविरुद्ध EU साठी एक भू-राजकीय विमा म्हणून समोर येतो.’
UGC च्या नवीन नियमांचा दोन आठवड्यांपासून विरोध करणाऱ्या सवर्ण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने नवीन नियमांवर स्थगिती देत सरकारला पुन्हा मसुदा तयार करण्यास सांगितले आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने सांगितले की UGC चे नवीन नियम स्पष्ट नाहीत आणि त्यांच्या गैरवापराचा धोका आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 19 मार्च रोजी होईल. सर्वोच्च न्यायालयात UGC च्या नवीन नियमांवर काय चर्चा झाली, स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले, सरकार या मुद्द्यावर का ठाम आहे आणि आता पुढे काय होईल; हे आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया... प्रश्न-1: UGC च्या नवीन नियमांवर सर्वोच्च न्यायालयात काय चर्चा झाली? उत्तर: सर्वोच्च न्यायालयात UGC ने जाती-आधारित भेदभाव रोखण्यासाठी बनवलेल्या नवीन नियमांविरुद्ध तीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिका मृत्युंजय तिवारी, विनीत जिंदल आणि राहुल दिवाण यांनी दाखल केल्या होत्या. 29 जानेवारी रोजी मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी याचिकाकर्त्यांच्या वतीने अधिवक्ता विष्णू शंकर जैन आणि विनीत जिंदल युक्तिवाद करत होते, तर इंदिरा जय सिंह UGC च्या नियमांच्या बचावासाठी युक्तिवाद करत होत्या. दुसरीकडे, केंद्र सरकार आणि UGC च्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता देखील उपस्थित होते. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी तीन मुख्य मुद्दे उपस्थित केले... वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, 'UGC च्या नियम 3(1)(c) नुसार, UGC च्या जातीय भेदभावाच्या व्याख्येत केवळ SC/ST आणि OBC विरुद्ध त्यांच्या जातीच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाचा समावेश करण्यात आला आहे. जनरल कॅटेगरीच्या लोकांविरुद्धच्या भेदभावाचा या व्याख्येत समावेश करण्यात आलेला नाही.' ॲडव्होकेट जैन म्हणाले, 'UGC च्या जुन्या नियमन 3(1)(e) मध्ये भेदभावाची व्याख्या दिली आहे. ते प्रत्येक प्रकारच्या भेदभावाला आणि प्रत्येकाच्या विरोधातील भेदभावाला समाविष्ट करते. तर मग जाती-आधारित भेदभावाची वेगळी व्याख्या देण्याची काही गरज नाही. या नियमाचा भेदभाव रोखण्याचा जो उद्देश आहे, त्याच्याशी कोणताही तार्किक संबंध नाही. जेव्हा कलम 3(1)(e) आधीपासूनच लागू आहे, तर 3(1)(c) ची काय गरज आहे? कलम 3(1)(e) संविधानाच्या कलम 14 अंतर्गत येते, त्यामुळे ते लागू करावे आणि 3(1)(c) हटवावे.' खरं तर, संविधानाचे कलम 14 प्रत्येकाला कायद्याचे समान संरक्षण मिळवण्याचा अधिकार देते. त्यात म्हटले आहे की राज्य, सर्व नागरिकांना कायद्याच्या दृष्टीने समान मानेल आणि प्रत्येकाला समान कायदेशीर संरक्षण देईल. यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी विचारले की, नियम 3(1)(e) सर्व प्रकारच्या भेदभावांना कव्हर करतो का? त्यांनी एक उदाहरण देऊन विचारले, 'समजा, दक्षिण भारतातील एखादा विद्यार्थी उत्तर भारतातील एखाद्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतो आणि त्याच्याविरुद्ध काही अपमानजनक टिप्पणी केली जाते, तर 3(1)(e) तेव्हाही या समस्येचे निराकरण करू शकतो का, जेव्हा पीडित विद्यार्थी आणि आरोपीची जातीय ओळख माहीत नसेल?' याच्या उत्तरात ॲडव्होकेट जैन यांनी सांगितले की, 3(1)(e) सर्व प्रकारच्या भेदभावांना कव्हर करतो. याशिवाय, आणखी एका वकिलाने कॉलेजमधील रॅगिंगचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, एका जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला SC कॅटेगरीच्या एका सीनियर विद्यार्थ्याच्या चिथावणीवर रॅगिंग सहन करावे लागले. सध्याच्या नियमांमध्ये याचा सामना करण्याचा कोणताही मार्ग नाही. इतकेच काय, जर त्या विद्यार्थ्याने रॅगिंगचा विरोध केला आणि तक्रार करण्याची हिंमत केली, तर UGC च्या नवीन नियमांनुसार त्याच्याविरुद्ध उलट खटला चालवला जाऊ शकतो. यावर CJI ने विचारले की, UGC च्या नवीन नियमांमध्ये रॅगिंगचा समावेश नाही का? यावर वकिलांनी सांगितले, 'UGC च्या नवीन नियमांमध्ये रॅगिंगचा समावेश नाही. असे का आहे आणि असे का मानले जाते की भेदभाव केवळ जातीच्या आधारावर होतो. ज्युनियर-सिनियरच्या आधारावर सर्वत्र विभागणी आहे आणि बहुतेक छळ याच आधारावर होतो.' ज्येष्ठ वकील इंदिरा जय सिंह यांनीच जातीय छळामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थी रोहित वेमुला आणि पायल तडवी यांच्या कुटुंबाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात UGC चे नियम अधिक कठोर करण्याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर युक्तिवाद केला होता, ज्यानंतर UGC ने हे नवीन नियम (रेग्युलेशन) बनवले आहेत. इंदिरा जय सिंह यांनी UGC च्या नियमांचे समर्थन केले, परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे युक्तिवाद फेटाळून लावत नियमांवर स्थगिती देण्याचा निर्णय दिला. प्रश्न-2: न्यायालयाने कोणत्या आधारावर UGC च्या नियमांना स्थगिती देण्याचा निर्णय दिला? उत्तर: सर्वोच्च न्यायालयाने UGC च्या नवीन नियमांवर बंदी घालताना 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या... 1. सुधारणांऐवजी मागे खेचणारे नियम बनवू नयेत 2. SC/ST ला विशेष कायद्याचा अधिकार, परंतु आधीच बनवलेला नियम हटवणे आवश्यक नाही 3. नवीन नियम समाजाला विभाजित करणारे आहेत प्रश्न-3: या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होऊ शकते? उत्तर: CJI सूर्यकांत यांनी केंद्र सरकार आणि UGC ला नोटीस बजावून 19 मार्च रोजी पुढील सुनावणीत आपले उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकार आणि UGC च्या वतीने ही नोटीस स्वीकारली. न्यायालयाने मेहता यांना नवीन नियमांचा मसुदा पुन्हा तयार करण्यासाठी काही कायदेशीर आणि सामाजिक मुद्द्यांच्या तज्ञांची एक समिती देखील स्थापन करण्यास सांगितले आहे. 'न्यू क्रिमिनल लॉज क्रिमिनल मॅन्युअल' या पुस्तकाचे लेखक आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील विराग गुप्ता म्हणतात की, सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पक्ष आणि विरोधकांकडून नवीन याचिका दाखल केल्या जाऊ शकतात, यामुळे संसदेत या संपूर्ण प्रकरणावर चर्चा वाढू शकते. विराग गुप्ता म्हणतात पुढील सुनावणीत 3 मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते... प्रश्न-4: UGC च्या नवीन नियमांवर सरकार अडकले आहे का? उत्तर: राजकीय विश्लेषक विजय त्रिवेदी म्हणतात, 'सवर्ण भाजपचे पारंपरिक मतदार आहेत, भाजप दलित आणि ओबीसी वर्गात आपली पकड मजबूत करू इच्छितो. दुसरीकडे, काँग्रेस कर्नाटक, तेलंगणासारख्या राज्यांमधील महाविद्यालयांमध्ये SC/ST आणि OBC विद्यार्थ्यांवरील जातीय भेदभावाला रोखण्यासाठी असाच एक कायदा आणणार आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी UGC चे नवीन नियम आणले गेले होते. केंद्र सरकारला असा अंदाज नव्हता की त्यांचे पारंपरिक सवर्ण मतदार या नियमांना इतका तीव्र विरोध करतील आणि सरकारविरुद्ध उघडपणे उभे राहतील. अशा स्थितीत सरकारसाठी द्विधा मनःस्थिती निर्माण झाली.' विजय त्रिवेदी म्हणतात, 'आता सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश आल्याने सरकारला या द्विधा मनःस्थितीतून बऱ्याच अंशी दिलासा मिळेल. दलित आणि ओबीसी वर्गात असा संदेश जाईल की नवीन नियमांवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे, तर सरकार त्याच्या बाजूने होते. तर सवर्णही याला विजयासारखे पाहतील.' सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले होते की, 'यूजीसीचे नियम जनरल कॅटेगरीच्या विरोधात नाहीत, तर ते सर्वांना लागू होतात आणि भेदभाव होऊ देणार नाहीत.' निर्णय आल्यानंतर निशिकांत दुबे म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालयाने तेच केले जे मी सांगितले होते. पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवा, देशाचे कायदे संविधानाच्या कलम 14 आणि 15 नुसारच चालतील.' विजय त्रिवेदी म्हणतात, 'जेव्हा पक्ष आपल्या पारंपरिक मतदारांना 'फॉर ग्रांटेड' समजू लागतात, तेव्हा त्यांना नुकसान सहन करावे लागते. काँग्रेसने दलित आणि मुस्लिम मतदारांसोबत असेच केले होते आणि हे मतदार त्यांच्यापासून दूर गेले. बीएसपीसोबतही असेच घडले. आता भाजपनेही तीच चूक केली आहे.' प्रश्न-5: UGC ने जातीय भेदभावाचे नवीन नियम का आणले होते? उत्तर: 17 डिसेंबर 2012 पासून UGC मान्यताप्राप्त सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये जातीय भेदभाव रोखण्यासाठी काही नियम लागू करण्यात आले होते. 'प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन्स' नावाचे हे नियम केवळ सूचना आणि जनजागृतीसाठी होते. त्यात कोणतीही शिक्षा किंवा सक्ती नव्हती. 17 जानेवारी 2016 रोजी हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी रोहित वेमुलाने जातीय छळामुळे आत्महत्या केली होती. त्याचप्रमाणे 22 मे 2019 रोजी महाराष्ट्रात दलित डॉक्टर पायल तडवीनेही आत्महत्या केली होती. 29 ऑगस्ट 2019 रोजी रोहित वेमुला आणि पायल तडवी यांच्या कुटुंबीयांनी महाविद्यालयांमध्ये जातीय भेदभावाचे नियम अधिक कठोर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. जानेवारी 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने UGC ला जातीय भेदभावाबाबत नवीन नियम बनवण्याचे निर्देश दिले. फेब्रुवारी 2025 मध्ये अभिप्राय घेण्यासाठी या नवीन नियमांचा एक मसुदा जाहीर केला. ‘ऑल इंडिया ओबीसी स्टुडंट युनियन’चे म्हणणे होते की, मसुद्यानुसार विद्यापीठांमध्ये जातीय भेदभावाच्या व्याख्येत ओबीसींना समाविष्ट केले नाही, त्याचबरोबर महाविद्यालयांमध्ये भेदभावाच्या प्रकरणांवर कारवाईसाठी जी समानता समिती (Equality Committee) स्थापन करायची आहे, त्यातही ओबीसी सदस्यांना समाविष्ट करण्याची तरतूद नाही. मसुद्यात जातीय भेदभावाची खोटी तक्रार केल्यास दंडाची तरतूद होती. याबाबत असे म्हटले गेले की, यामुळे भेदभावाला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तक्रार करण्यास भीती वाटेल. मसुद्यात जातीय भेदभावाची कोणतीही स्पष्ट व्याख्याही नव्हती. संसदेच्या शिक्षण, महिला, बाल आणि युवा संबंधित संसदीय समितीने मसुद्याचे पुनरावलोकन केल्यानंतर यूजीसीला आपल्या शिफारसी दिल्या. त्यानंतर यूजीसीने मसुद्यात अनेक बदल करून 13 जानेवारी 2026 रोजी नवीन नियम अधिसूचित केले. प्रश्न-6: या नियमांमध्ये असं काय बदललं, ज्यामुळे वाद निर्माण झाला? उत्तर: प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन्स 2026 मध्ये 3 मोठे बदल झाले आहेत... 1. जातीय भेदभावाची व्याख्या देण्यात आली 2. व्याख्येत OBC ला देखील समाविष्ट केले 3. खोटी तक्रार केल्यास शिक्षेची तरतूद हटवण्यात आली प्रश्न-7: विरोध करणाऱ्या सवर्ण जातीच्या लोकांचे काय तर्क होते? उत्तर: UGC च्या या नवीन नियमांच्या विरोधात सोशल मीडियावर #UGCRollback आणि #ShameOnUGC सारखे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. विरोध करणारे लोक नियमांमध्ये 4 प्रकारच्या त्रुटी सांगत आहेत... 1. भेदभावाची व्याख्या सवर्ण विद्यार्थ्यांविरुद्ध 2. खोटी तक्रार केल्यास कोणतीही शिक्षा नाही 3. इक्विटी समितीमध्ये (Equity Committee) जनरल कॅटेगरीचा (General Category) कोणताही सदस्य नाही 4. संस्था कारवाईच्या भीतीने योग्य निर्णय घेऊ शकणार नाहीत
PMC News : सिग्नलवरील चिमुकल्यांचे बालपण वाचणार; महापालिकेच्या समाज विकास विभागाचा पुढाकार
PMC News :
PMRDA News : ई-गव्हर्नन्स सुधारणेमध्ये पीएमआरडीए तृतीय क्रमांकावर; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
PMRDA News : राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कृती आराखड्यात पीएमआरडीएची चमकदार कामगिरी; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली विजेत्या कार्यालयांची घोषणा.
Editorial : समाज आधुनिक झाला आहे असे आपण म्हणतो. डिजिटल साक्षर झाला आहे असेही मानतो. हे मानताना जातीच्या आधारावर भेदभाव करण्याचा आजार आजही कायम आहे याकडे दुर्लक्ष करतो. पूर्वीइतके त्याचे प्रमाण जास्त नसेल किंवा आपल्याला
श्रद्धांजली : विषण्ण करणारी एक्झिट
महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि राज्याच्या राजकारणातील रोखठोक-कार्यतत्पर लोकनेता म्हणून लाखो नागरिकांचे अत्यंत जवळचे असणारे अजितदादा पवार यांचे अपघाती निधन अत्यंत क्लेशदायी आहे.
Ajit Pawar : काँग्रेस-राष्ट्रवादी असो वा महायुती, पुण्याचा पालकमंत्री म्हणजे 'अजित पवार' हे समीकरण सुटलं; आता जिल्ह्याची सूत्रे कोणाच्या हाती जाणार?
विशेष : थोर महात्मे होऊन गेले…
आजचा समाज झपाट्याने बदलतो आहे. या बदलाच्या वेगात अस्वस्थता वाढते आहे, अशा प्रसंगी 30 जानेवारी हा दिवस महात्मा गांधींची (Mahatma Gandhi) आठवण करून देतो.
NEET PG 2026 : देशभरातील केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने होणार नीट परीक्षा; एमडीएस आणि पीजी अभ्यासक्रमांसाठी एनबीईकडून संभाव्य तारखांची घोषणा.
Leopard News : जंगल वाचलं तरच बिबट्या जंगलात राहील; आळेफाटा परिसरात बिबट्या आढळल्यास काय करावे आणि काय टाळावे? वन विभागाने दिले स्पष्ट निर्देश.
Ajit Pawar : राजकीय मतभेद विसरून भोर एकवटले; काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वाहिली सामूहिक श्रद्धांजली.
ST Bus Accident : एसटी चालकाचा निष्काळजीपणा अन् कारमधील तिघांचा करुण अंत; तांबवे गावाच्या हद्दीत विटभट्टीजवळ घडला थरारक अपघात.
Ajit Pawar : नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील नियोजित विकासकामे अधांतरी; हक्काचा माणूस गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण.
Ajit Pawar : “आता रडायचे नाही, लढायचे!”माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
Ajit Pawar : पक्षभेद विसरून राजगुरुनगर एकवटले; शिवसेना, भाजप, मनसे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जागवल्या दादांच्या आठवणी.
Satara ZP Election : कोयना भागात यात्रेचा उत्साह अन् निवडणुकीचा ज्वर; ‘चाकरमानी’ठरणार किंगमेकर
Satara ZP Election : भजन-कीर्तनासोबतच चहाच्या टपरीवर रंगल्या निवडणुकीच्या गप्पा; उमेदवारांकडून यात्रेच्या गर्दीचा प्रचारासाठी 'स्मार्ट' वापर.
Ajit Pawar : दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीची सत्ता आणू; कडूसमधील शोकसभेत कार्यकर्त्यांनी घेतली शपथ.
Ajit Pawar : तळेगाव ढमढेरे आणि श्रीक्षेत्र टाकळी भिमा परिसरात स्वयंस्फूर्त बंद; प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर अजितदादांच्या कार्याला उजाळा.
Ajit Pawar : तिकीट हुकलं पण निष्ठा फळाला आली; अजितदादांच्या शब्दाची किंमत आणि एका सामान्य कार्यकर्त्याचा स्वीकृत नगरसेवक होईपर्यंतचा प्रवास.
Koregaon Crime : कोरेगाव पोलिसांनी आरोपी अजय मानेला बेड्या ठोकल्या; हत्येचे गुपित उलगडण्यासाठी ५ दिवसांचा मिळाला पोलीस रिमांड.
Swachh Survekshan 2026 : शेकडो सफाई सेवक आणि अत्याधुनिक मशीन्सच्या जोरावर पिंपरी-चिंचवड पालिकेची 'स्वच्छ सर्वेक्षण २०२६' कडे वाटचाल; रात्रपाळीत रस्ते धुण्याचे काम युद्धपातळीवर.
Ajit Pawar : कोणीही बंदची हाक दिली नाही... कोणीही बंद करा असे सांगायलाही आले नाही... कुठलेही आंदोलन अथवा भय नाही... तरीही संपूर्ण शहर थांबलेले होते.
अजित पवारांचा पाच दिवसांपूर्वी मराठवाड्याचा शेवटचा दौरा
डॉ. अभयकुमार दांडगे२५ जानेवारी रोजीच सायंकाळी साडेपाच वाजता ते नांदेडच्या विमानतळावरून मुंबईला रवाना झाले. पाच दिवसांपूर्वीच नांदेडला आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीजवळ एका विमान दुर्घटनेत अशा प्रकारे मृत्यूला सामोरे जातील, असे कोणाला स्वप्नातही वाटले नाही.महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाच दिवसांपूर्वीच मराठवाडा दौऱ्यावर आले होते. हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदी समागम कार्यक्रमासाठी २५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता अजित पवार नांदेडच्या विमानतळावर दाखल झाले होते. मुख्यमंत्र्यांना येण्यासाठी वेळ असल्याने विमानतळावरील स्वागत स्वीकारून उपमुख्यमंत्री अजित पवार हे नांदेडच्या शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाले. तेथून दुपारी अडीच वाजता त्यांनी नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेतले. त्या ठिकाणी त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला. कार्यकर्ते व भाविकांशी चर्चा करून ते नांदेड येथील मोदी मैदान येथील कार्यक्रमाकडे रवाना झाले. त्या ठिकाणी त्यांनी १६ मिनिटे मराठी व हिंदीतून भाषण केले. श्री गुरुतेग बहादूर यांच्या बलिदानाचा वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख करून त्यांनी अभ्यासपूर्ण भाषण केले. विशेष म्हणजे निवेदकांच्यावतीने त्यांना भाषणाअगोदरच मराठी आणि हिंदीतून या दोन्ही भाषेतून मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तो शब्द पाळत १६ मिनिटांचे भाषण केले. मराठवाड्यासाठी त्यांचा हा दौरा शेवटचा दौरा ठरला. २५ जानेवारी रोजीच सायंकाळी साडेपाच वाजता ते नांदेडच्या विमानतळावरून मुंबईला रवाना झाले. पाच दिवसांपूर्वीच नांदेडला आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीजवळ एका विमान दुर्घटनेत अशा प्रकारे मृत्यूला सामोरे जातील, असे कोणाला स्वप्नातही वाटले नाही. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच संपूर्ण मराठवाडा हळहळला. विशेष म्हणजे मागील चार महिन्यांत त्यांचे मराठवाड्यात पाच दौरे झाले होते. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील तेर हे गाव अजित पवार यांची सासरवाडी. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच धाराशिव जिल्ह्यात बंद पाळून अजितदादांना आदरांजली वाहण्यात आली.नगरपालिका व पंचायत समिती निवडणूक प्रचारानिमित्त दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यात चांगलीच पकड निर्माण केली. या निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मराठवाड्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी प्रवेश केला. अजित पवार यांची कार्यशैली अलीकडच्या काळात मराठवाड्यात चांगलीच गाजली. राज्याच्या तिजोरीची चावी आपल्याकडे आहे. विकासासाठी मी कधीही तयार आहे, असे सांगून त्यांनी मराठवाड्यातील अनेक नेते तसेच पदाधिकाऱ्यांना दिलासा दिला होता. मराठवाड्यातील धाराशिव तसेच परभणी जिल्ह्यात ते जिल्हा परिषद निवडणूक प्रचारानिमित्त काही दिवसांत येणार होते. मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनातच होते. परंतु अजित पवार यांच्या अकाली निधनाचे वृत्त कळताच छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, हिंगोली,बीड, परभणी तसेच धाराशिव जिल्ह्यात शोककळा पसरली. राज्याच्या राजकारणातील एक अनुभवी तसेच नि:स्पृह नेता गेल्याने मराठवाडा हळहळला. बीडचे पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य संपूर्ण मराठवाड्याला कायमस्वरूपी लक्षात राहण्याजोगे आहे.१ जानेवारी २०२६ रोजी वर्षाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये एकाच वेळी १३६३ विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करून प्रशासनालाही अवाक् केले होते. केवळ इमारतीच नव्हे तर निसर्गाशी नाते जोडलेले राहावे या उद्देशातून तीस लाखांहून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. बीडच्या विकासाची ग्वाही त्यांनी वारंवार दिली होती. त्यामुळे बीडच्या जनतेनेही त्यांना भरपूर प्रेम दिले. १७ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्यानगर - बीड रेल्वे मार्गाचे उद्घाटन झाले. या प्रकल्पासाठी दोन हजार कोटींपेक्षा जास्त निधी आणि ऐनवेळी दिलेले १५० कोटी रुपये हे अजित दादांनी अर्थमंत्री म्हणून मंजूर केले होते. राज्याचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे, आमदार राणा जगजीतसिंह पाटील, आमदार विक्रम काळे तसेच नांदेड जिल्ह्यातील लोह्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोली जिल्ह्यातील वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे, परभणीचे आमदार राजेश विटेकर यांना अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त कळताच मोठा धक्का बसला. या आमदारांना अश्रू अनावर झाले. तसेच त्यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी देखील धाय मोकलून रडत होते. मराठवाड्यातील धाराशिव येथील तेर गावचे अजित पवार हे जावई होत. राज्याचे उपमुख्यमंत्री अचानक गेल्याने धाराशिव जिल्ह्यात प्रचंड शोककळा पसरली. तेर येथे हळहळ व्यक्त करून बाजारपेठ बंद करण्यात आली. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांची बहीण तथा राज्यसभेच्या खासदार सुनेत्राताई पवार या अजित पवार यांच्या धर्मपत्नी. अजित पवार यांचे तेरवासीयांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. राजकारणामध्येही माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार राणा जगजीतसिंह पाटील व अजित पवार यांची एकमेकांना साथ होती. दोन्ही कुटुंबांचे नातेसंबंध दृढ असल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात धाराशिवची एक वेगळीच ओळख होती. अजित पवार यांनी अलीकडच्या काळात मराठवाड्यात चांगलाच जम बसविला होता. विशेष म्हणजे अजित पवारांनी मराठवाड्यातील राजकारणात नगर परिषद तसेच नगरपंचायत निवडणूक काळापासून अधिक रस घेण्यात सुरुवात देखील केली होती. मराठवाड्याच्या दौऱ्याप्रसंगी दिलेली वेळ व ठरलेली तारीख अजित दादांनी कधीही चुकविली नाही. त्यामुळे वेळ पाळणारा नेता असा अवेळी निघून जाईल, असे मराठवाड्याला कदापी वाटले नव्हते; परंतु शेवटी ईश्वराचा न्याय हा अन्याय करणाराच ठरला अशीच प्रतिक्रिया मराठवाड्यातून उमटत आहे.
यूजीसी कायदा विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकताच लागू केला असला तरी आंदोलनकर्त्यांनी रोष केंद्र सरकारवर ठेवला होता. खुल्या वर्गातील विद्यार्थी या आंदोलनात उतरल्यामुळे नेमके या कायद्यात काय आहे; विरोध का होत आहे, याबद्दल सर्वसामान्य नागरिकांना उत्सुकता निर्माण झाली.यूजीसी कायद्यातील नवीन नियम लागू करण्याच्या निर्णयाला विरोध करत, उत्तर प्रदेशसह काही राज्यात तरुण रस्त्यांवर उतरले. विद्यापीठ निगडित हा कायदा जानेवारी महिन्यातच देशभर लागू झाला असला तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले नसले तरीही, आंदोलनाचे लोळ कधीही आपल्यापर्यंत पोहोचू शकतात, अशी स्थिती निर्माण झाली होती. खरे तर हा कायदा विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकताच लागू केला असला तरी आंदोलनकर्त्यांनी रोष केंद्र सरकारवर ठेवला होता. खुल्या वर्गातील विद्यार्थी या आंदोलनात उतरल्यामुळे नेमके या कायद्यात काय आहे; विरोध का होत आहे, याबद्दल सर्वसामान्य नागरिकांना उत्सुकता निर्माण झाली. विद्यापीठ परिसर, महाविद्यालयाच्या आवारापुरता मर्यादित असणाऱ्या यूजीसी कायद्यातील नियमाचा विरोध करण्यासाठी विद्यार्थी नव्हे तर पालकसंघटना, उच्चवर्णीय समाजातील नेते मंडळींनी मोर्चे काढले. ९०च्या दशकात मंडल आयोगाच्या शिफारसीवरून उच्चवर्गीय, ओबीसी समाजात निर्माण झालेल्या वादाची पुनर्रावृत्ती होते का, असे वातावरण निर्माण झाले होते. दुसऱ्या बाजूला दलित विद्यार्थी संघटनांकडून या नव्या नियमांची अंमलबजावणी व्हावी यासाठी रस्त्यावर उतरून दबाव गट करण्यात येत होता. त्यामुळे, दोन्ही बाजूने केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला. यूजीसी कायद्याच्या नव्या नियमांना आव्हान देणारे प्रकरण सर्वोच्च न्यायायलात पोहोचले. मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी या नियमांना आव्हान देताना जो युक्तिवाद केला,' त्यात ते मनमानी, भेदभाव करणारे आणि संविधान आणि विद्यापीठ अनुदान आयोग कायदा, १९५६चे उल्लंघन करणारे आहेत,' असे मुद्दे मांडण्यात आले. प्रथमदर्शनी हे मुद्दे खंडपीठाला पटले. 'नवीन नियम अस्पष्ट आहेत आणि नवीन यूजीसी नियमांचा गैरवापर होऊ शकतो', अशी कडक टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. त्यानंतर पुढील आदेशापर्यंत नवीन यूजीसी नियमांना स्थगिती देण्याचा निर्णय खंडपीठाने घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे, एका अर्थाने चांगले झाले, कारण रस्त्यावरील आंदोलनाची धग शांत होणार आहे.यूजीसीतील नवीन नियम काय आणि त्यातून खरेच खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार होता का हे तटस्थपणे पाहण्याची गरज आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, दिव्यांग आणि महिलांच्या संरक्षणार्थ विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) एक नवा नियम जारी केला. या वर्गांच्या संरक्षणासाठी प्रत्येक विद्यापीठात आणि महाविद्यालयात एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. शैक्षणिक परिसरात समानतेचा पुरस्कार करणे हे महाविद्यालय, संबंधित संस्थांना बंधनकारक असणार आहे, असा हा नवीन नियम सांगतो. जाती आधारित भेदभावाच्या तक्रारी वाढल्याच्या तक्रारी सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर, त्यावर नवीन नियम करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने या पूर्वीच्या आदेशात दिले होते. यूजीसीने केंद्र सरकारच्या संसदीय समितीकडे एक अहवाल सादर केला होता. या समितीत काँग्रेस, भाजपसह सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे खासदार होते. तो अहवाल पुन्हा दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. त्या अहवालातील आकडेवारीनुसार, देशभरातील विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये जाती आधारित भेदभावाच्या तक्रारींमध्ये गेल्या ५ वर्षांत ११८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे यूजीसीने कायद्यातील नवीन नियमांमध्ये, ओबीसी, महिला आणि दिव्यांग या वर्गाचा अंतर्भाव केला गेला. नव्या नियमातील या तरतुदींना खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा विरोध आहे. या नियमाचा गैरवापर झाला तर त्यावर काय करायचे याची कोणतीही तरतूद नसल्याचा आरोप केला गेला.मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान उपस्थित केलेले प्रश्न हे समाजातील अस्वस्थतेला कोण जबाबदार हे अधोरेखित करते. आपण जातविरहित समाजाकडे वाटचाल करावी की आपण मागे 'जात' आहोत. आपण विरुद्ध दिशेने वाटचाल करत आहोत का? असे ते प्रश्न समाजातील सर्व घटकांना विचार करायला लावणारे आहेत. यूजीसीच्या नव्या नियमानुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये ‘इक्विटी’ म्हणजे समानता सिद्ध करण्यावर भर देण्यात आला. महाविद्यालयात धर्म, जाती, लिंग या आधारे होणारे भेदभाव मुळापासून नष्ट करणे हा उद्देश आहे. या अंतर्गत विद्यापीठात एक तक्रार सेल स्थापन केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, यापुढे प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्याही भीतीशिवाय पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. यूजीसीच्या मते जुने कायदे आता कालबाह्य झाल्याने त्यांना अधिक कठोर आणि सोपे बनवले. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थांना समान संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे याआधी २०१२ साली अशाच प्रकारची नियमावली जारी करण्यात आली होती; परंतु ती बंधनकारक नव्हती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानंतर ही नवीन नियमावली जारी करण्यात आल्याने त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होईल, असे यूजीसीला वाटते. तसेच कुठली संस्था या नियमांचे पालन करणार नाही तर त्यांची मान्यता रद्द करण्याचा अधिकार विद्यापीठाला असल्याने संस्थांना अडचणीचे वाटत आहे. त्याचप्रमाणे जे कुणी जातीभेद करतील त्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची तरतुदीसह शैक्षणिक संस्थांना मिळणारे आर्थिक फंडही रोखले जाईल, असे या नियमामध्ये असल्याने ही भीती विद्यार्थ्यांपेक्षा कोणाला आहे हे सांगायला नको. परंतु, नव्या नियमाचा सखोल अभ्यास न करता, खुला वर्ग आणि आरक्षित समाजातील विद्यार्थी यांच्यात तेढ निर्माण करण्याचा कोण प्रयत्न करत आहे, हे पाहिले पाहिजे. समाजात दुही निर्माण करून केंद्र सरकारवर खापर फोडण्याची संधी कोण बघत आहे? केंद्रातील भाजप एनडीए सरकारची प्रतिमा मलिन करण्याचे मनसुबे गेल्या दहा वर्षांत रचले गेले आहेत. यूजीसी कायद्याच्या पडद्याआडून खुल्या वर्गातील व्यक्तींना कोणी भडकावत नाही, याचा विचार करण्याची गरज आहे.
दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ३० जानेवारी २०२६
पंचांगआज मिती माघ शुद्ध द्वादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र आद्रा. योग वैधृती.चंद्र राशी मिथुन,भारतीय सौर १० माघ शके १९४७.शुक्रवार दिनांक ३० जानेवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.१४ , मुंबईचा सूर्यास्त ०६.३० मुंबईचा चंद्रोदय ०३.५० , मुंबईचा चंद्रास्त ०५.४७ उद्याची राहू काळ ११.२७ ते १२.५१ १७;०० नंतर चांगलादैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : ठरवलेल्या कामांना प्राधान्य द्या.वृषभ : आपल्या कामाचा उरक वाढणार आहे.मिथुन : कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.कर्क : एखादे आडून राहिलेले काम पूर्ण होणार आहे.सिंह : महत्वाच्या कामात थोडे अडथळे येण्याची शक्यता आहे.कन्या : अपेक्षित लाभ मिळतील.तूळ : कलाकारांना व खेळाडूंना नवीन संधी प्राप्त होतील.वृश्चिक : विविध प्रकारच्या कामांना गती मिळणार आहे.धनू : घरातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.मकर : व्यापार व्यवसायातील कामे मार्गी लागणार आहे.कुंभ : नोकरीमध्ये प्रगती होईल.मीन : जीवनसाथीशी थोडासा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
Maval News : प्रचार थांबला, घोषणा विरल्या…लाडक्या अजितदादांच्या निधनाने मावळात भयाण शांतता
Maval News : निवडणुकीच्या प्रचाराने तापलेला मावळ तालुका बुधवारपासून अचानक शांत झाला. परवापर्यंत सभा, रॅली, गाड्यांचा ताफा, ढोल-ताशे आणि घोषणांनी गजबजलेले वातावरण आज मात्र स्तब्ध झाले होते.
Pimpri Chinchwad Crime : मध्यरात्री भरचौकात पोलिसांचा छापा; १५ लाखांच्या अंमली पदार्थांसह तिघे गजाआड
Pimpri Chinchwad Crime – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने १५ लाख १२ हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन ड्रग्ससह (एमडी) तिघांना अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (२७ जानेवारी) रात्री चिंचवड येथील बिजलीनगर चौक परिसरात करण्यात आली.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गोविंद डोके यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किशना सैतानराम देवासी (२५, बिजलीनगर), मेकाराम […]
RCB Reaches Final : आरसीबी यंदाच्या हंगामात फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.
Ajit Pawar : धक्कादायक! अजित पवारांच्या कट्टर कार्यकर्त्याचे हार्ट अटॅकने निधन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बारामती येथील भीषण विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य शोकाकुल झाले आहे. या धक्कादायक बातमीचा परिणाम इतका तीव्र होता की, त्यांचे कट्टर समर्थक
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पूर्व उपनगरातील पूर्व व पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाचे बांधकाम येत्या ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.पुलाच्या पूर्व बाजूकडील सर्व कामे येत्या २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील. तसेच, पुलाच्या पश्चिम बाजूकडील बाधित निवासी व वाणिज्य बांधकामे हटविणे तसेच रस्तारेषा नव्याने निश्चित करण्याची प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे.मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागाच्या हद्दीत पूर्व व पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत आहे. या उड्डाणपुलाचे बांधकाम वेगाने प्रगतिपथावर आहे. या उड्डाणपुलाच्या कामाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते यावेळी उपस्थित होतेया पूल प्रकल्पाचे संपूर्ण कामकाज २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पुलाच्या पूर्व बाजूकडील सर्व कामे २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील. तसेच, पुलाच्या पश्चिम बाजूकडील बाधित निवासी व वाणिज्य बांधकामे हटविणे तसेच रस्तारेषा नव्याने निश्चित करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून उड्डाणपूलाच्या कामाला गती द्यावी. येऊ घातलेल्या पावसाळ्याचा विचार करता, पुलाची सर्व आवश्यक कामे ३१ मे २०२६ पूर्वी पूर्णत्वास नेण्याचे नियोजन करावे. कामांचे सूक्ष्म नियोजन करून त्याची काटेकाेरपणे अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडण्यासाठी विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या रुळावरून जाणारा हा उड्डाणपूल आहे.हा उड्डाणपूल एकूण दोन मार्गिकांचा आहे. उड्डाणपुलाच्या पूर्व बाजूकडील कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत.पूर्व बाजूचा पोहोच मार्ग पूर्ण करणे तसेच पुलाच्या संपूर्ण भागाचे पृष्ठीकरण यासह सर्व कामे २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.पश्चिम बाजूकडे आतापर्यंत सहा खांबांची उभारणी पूर्ण झाली असून उर्वरित चार खांबांची उभारणी, पुलाचा आडवा अंतरभाग (स्पॅन), पोहोच मार्ग आदी कामे प्रलंबित आहेत.पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यांची कामे प्रथम पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर पुलाच्या उर्वरित कामांमध्ये बाधित निवासी व वाणिज्य बांधकामे हटविणे
Economic Survey 2026: मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या अहवालात भारताच्या भविष्यातील आर्थिक धोरणांची दिशा स्पष्ट करण्यात आली आहे.
Sameer Wankhede : समीर वानखेडेंना न्यायालयाचा दणका ! आर्यन खानविरोधतील ‘ती’याचिका फेटाळली
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. आर्यन खान दिग्दर्शित बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सीरिजवर त्यांची प्रतिमा खराब
PAK vs AUS : पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या ८ वर्षांपासून विजयाची असलेली प्रतीक्षा संपवली आहे
Economic Survey 2026
१० फेब्रुवारी १२वी, २० फेब्रुवारी ला १०वीची परीक्षा
सुभाष म्हात्रे, अलिबाग : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी रायगड जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असून, मंगळवारी १० फेब्रुवारीस बारावीची परीक्षा, तर शुक्रवारी २० फेब्रुवारीस दहावीची परीक्षा होणार आहे. या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी जिल्हा पोलिस यंत्रणेसह जिल्हा प्रशासन सज्ज झाले. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यावेळी उपस्थित होत्या.परीक्षा काळात रायगड जिल्ह्यात १५+१ परिरक्षण केंद्रांची संख्या राहणार, उच्च माध्यमिक परीक्षेसाठी ५२, तर माध्यमिक परीक्षेसाठी ७५ परिक्षा केंद्र आहे. बारावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३३ हजार १२१, तर दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३७ हजार ५७९ एवढी आहे. प्रत्येक तालुक्यासाठी तालुका स्तरावर एक पथक नियुक्त करण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यात एकूण नऊ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली असून, यामध्ये विभागस्तर, जिल्हास्तर, विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथामिक), शिक्षणाधिकारी (योजना), उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), विशेष महिला भरारी पथकाचा समावेश आहे.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समिती गठित करण्यात आली असून, जिल्ह्यातील प्रत्येक परीक्षा केंद्राच्या ५० मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तींना प्रवेश नसेल. शंभर टक्के विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र प्रवेशावेळी शाळेतील कर्मचाऱ्यांमार्फत झडती होणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर मुलींच्या कॉपी तपासणीसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा शाळेच्या महिला कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर व्हिडीओ रेकॉडींग करण्याच्या सुचनाही केंद्र संचालकांना देण्यात आल्या. संवेदनशील केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक असून, परिक्षा केंद्रावर परीक्षेआधी एक तास व परीक्षेनंतर एक तास हे बैठे पथक असेल. कोणीही कॉपी करताना आढळल्यास विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली जाणार. तोतया विदयार्थी परीक्षेस बसल्याचे आढळल्यास त्यास पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येण्याबरोबरच फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येणार. परीक्षार्थ्यांने परिक्षेपूर्वी अगर ऐनवेळी खोटे प्रतिज्ञापत्र, हमीपत्र, अपघाताचा, अपंगत्वाचा वैदयकिय दाखला केंद्र संचालकांकडे सादर करुन सवलत घेतल्यास किंवा केंद्र बदलून प्रविष्ठ झाल्यास परीक्षेस बसण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. दरम्यान, सर्व पालकांनी 'कॉपीमुक्त अभियान' बाबतची नोंद घेऊन आपल्या मुलांना समुपदेशन करण्याबरोबरच सर्व विदयार्थ्यांनी परिक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होण्यापूर्वी एक तास आधी पोहचायचे आहे. जिल्हयातील पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, जिल्हा परिषद यांनी एकत्र येऊन हे 'कॉपीमुक्त अभियान' सफल करायचे असून, या अभियानामध्ये पालकांनीही सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी जावळे यांनी पालकांना केले आहे.
सोशल मीडिया वापरासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना निर्बंध, फेसबुक-एक्सवर पोस्ट कर्मचाऱ्यांना महागात पडणार
मुंबई : राज्य शासनाचे कर्मचारी आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवर गणवेशातील फोटो, कार्यालयाचे लोगो, पदनाम, तसेच सरकारी मालमत्तेचे फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करू शकणार नाहीत, असा स्पष्ट आदेश राज्य सरकारने सोमवारी काढलेल्या परिपत्रकात दिला आहे.या परिपत्रकात सोशल मीडियाच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या असून, केवळ महाराष्ट्र सरकार नव्हे, तर केंद्र किंवा इतर कोणत्याही राज्य सरकारविरोधात सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.सोशल मीडियाचा वापर करताना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने आणि काळजीपूर्वक वागावे, असा सल्ला या परिपत्रकात देण्यात आला आहे.राज्य शासनाच्या विभागांशी, स्थानिक स्वराज्य संस्थांशी, महामंडळांशी आणि सार्वजनिक उपक्रमांशी संलग्न अधिकारी व कर्मचारी केंद्र किंवा राज्य सरकारने बंदी घातलेले कोणतेही ॲप वापरणार नाहीत. त्यांनी वैयक्तिक आणि शासकीय सोशल मीडिया खाती वेगळी ठेवावीत. राज्य शासनाच्या योजना किंवा निर्णयांचा प्रचार करायचा असल्यास संबंधित विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच तो करता येईल. व्हॉट्सॲप, टेलिग्राम यांसारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर अधिकृत कामासाठी संपर्क आणि समन्वय साधण्यासाठी करता येईल, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य विभागाच्या यशस्वी कार्यक्रमासाठी केलेल्या टीमच्या प्रयत्नांबद्दल लिहिता येईल, परंतु स्वतःची प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करता येणार नाही. एखादा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांबाबत माहिती देता येईल, मात्र वैयक्तिक प्रसिद्धीसाठी त्याचा वापर करता येणार नाही. सध्या डिजीटल युगात माहितीचे आदान-प्रदान करणे, समन्वय व संवाद साधणे, तसेच लोकसहभाग वाढविण्यासाठी सोशल मीडियाचा समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्यास कारवाईराज्य कर्मचारी कोणताही आक्षेपार्ह, द्वेष पसरवणारा किंवा समाजात फूट पाडणारा मजकूर फॉरवर्ड, शेअर किंवा अपलोड करणार नाहीत. परवानगीशिवाय कोणतेही शासकीय दस्तावेज संपूर्ण किंवा अंशतः शेअर अथवा फॉरवर्ड करता येणार नाहीत. मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्यास, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस नियम, १९७९ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा परिपत्रकात देण्यात आला आहे.
Panjab Police : अमृतसरमध्ये शस्त्रास्त्रांसह ड्रग्ज जप्त; पाकिस्तानी तस्करांचा मोठा कट उधळला
चंदीगढ : पंजाब पोलिसांनी बीएसएफच्या मदतीने फाजिल्का जिल्ह्यातील एका सीमा चौकीजवळ सीमेपलीकडील तस्करीचा एक मोठा प्रयत्न हाणून पाडला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि अंमली पदार्थ जप्त केले आहेत
US-Pakistan: ट्रम्प यांचा शाहबाज-मुनीर यांना एका महिन्यात दुसरा धक्का, पाकिस्तानबाबत केली मोठी घोषणा
US-Pakistan: ट्रम्प प्रशासनाने गुरुवारी (२९ जानेवारी) पाकिस्तानबाबत एक मोठी घोषणा करत आपल्या नागरिकांना पाकिस्तानात प्रवास करण्यापूर्वी पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
सफाळे आणि केळवे रोड दरम्यान ब्लॉकमुळे रेल्वेसेवेवर होणार परिणाम
ठाणे : गर्डर काढण्याच्या कामामुळे येत्या शनिवारी ३१ जानेवारी रोजी सफाळे आणि केळवे रोड दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप मार्गावर २:१५ ते ३:१५ वाजेपर्यंत आणि डाउन मार्गावर १:४५ ते ५:४५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. रविवार १ फेब्रुवारी रोजी, अप मार्गावर ००:३० ते ४:३० वाजेपर्यंत आणि डाउन मार्गावर ००:३० ते ४:०० वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. या ब्लॉक दरम्यान शनिवारी सकाळी ७ ची डहाणू रोड – विरार मेमू, व सकाळी ०४:५० ची विरार – डहाणू रोड मेमू या दोन गाड्या रद्द राहतील. विरार – सुरत मेमू ३० मिनिटांनी थांबवण्यात येईल. बरौनी – वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस १ तास ३० मिनिटांनी, ओखा–मुंबई सेंट्रल मेल एक्सप्रेस ३० मिनिटांनी आणि शनिवारी ३१ जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या प्रवासासाठी १ तास १० मिनिटांनी थांबवण्यात येईल. भुज – वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस १ तास ३० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. भुसावळ – दादर स्पेशल, शनिवारी ५० मिनिटांसाठी तर अहमदाबाद – वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस शनिवारी ४५ मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक १९१०१ विरार – भरूच एक्सप्रेस, जी ३१ जानेवारी रोजी सुरू होईल, ती पालघर येथून सुरू होईल. त्यामुळे, ही गाडी विरार आणि पालघर स्थानकांदरम्यान अंशतः रद्द राहील.
दादरमधील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येवर महापालिकेचा तोडगा
मुंबई : दादर पश्चिममधील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येबाबत वारंवार तक्रारी होत असतानाच आता मुंबई महापालिकेने यासाठी अनोख्या पध्दतीने पादचारी तथा नागरिकांची यातून सुटका करण्याचा निर्धार केला आहे. रेल्वे स्थानकामध्ये जाण्यासाठी तथा स्थानकातून बाहेर पडण्यासाठी केशवसूत उड्डाणपूलाखालील गाळ्यांमध्ये स्टिलचे बोलार्ड बसवले जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर गाळा क्रमांक एकमध्ये हे बोलार्ड बसवण्याचे काम सुरु असून त्यानंतर नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता अशाप्रकारची व्यवस्था सर्वच गाळ्यांमध्ये केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.दादर पश्चिम रेल्वे स्थानकाशेजारी सेनापती बापट मार्गावरुन जाणाऱ्या केशवसूत उड्डाणपुलाखालील गाळ्यांमध्ये बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे रेल्वे प्रवाशी तथा नागरिकांना चालताना अडचणी येत आहेत. रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या जागेवर फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकासह मंदिर, न्यायालय, शाळा कॉलेज तसेच मंडई आदींच्या परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास पूर्णपणे बंदी आहे. तरीही दादर रेल्वे स्थानकासह सर्व रेल्वे स्थानकांना फेरीवाल्यांनी विळखा घातलेला आहे. मागील काही दिवसांपूर्वी कुर्ला येथील फेरीवाल्यांकडून भाजपच्या पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर वाढत्या फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे दादर पश्चिम येथील वाढत्या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आता महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने केशव सूत उड्डाणपूलाखालील गाळा क्रमांक १ म्हणजे सुविधासमोरील आणि पोलिस चौकी असलेल्या गाळ्यामध्ये स्टिलचे बोलार्ड बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या याचे काम सुरु असून याअंतर्गत पोलिस चौकी इथून हटवून नागरिकांना रांगेतून ये जा करण्यासाठी अशाप्रकारचे बोलार्ड बसवले जात आहे. या बोलार्डमुळे फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नसून त्याठिकाणी फेरीवाल्यांचे साहित्य असल्यास अथवा फेरीवाला व्यवसाय करत असल्याचे दिसून आल्यास त्यांचे साहित्य जप्त केले जाणार आहे. सध्या या गाळ्यांमध्ये फेरीवाल्यांचे साहित्य असले तरी जप्त होत नसले तरी बोलार्ड बसवल्यानंतर महापालिकेच्यावतीने तिथे साहित्यही ठेवता येणार नसून त्यामुळे नागरिकांच्या मार्गावर हे साहित्य असल्याने ते जप्त करण्याचे अधिकार पूर्णपणे महापालिका आणि पोलिसांना असणार आहेत.दादरमधील वाढत्या फेरीवाल्याची समस्या लक्षात घेता पादचाऱ्यांना विना अडथळा चालता यावा याकरता केशवसूत उड्डाणपूलाखाली बोलार्ड बसवण्यात येत आहेत. केशवसूत उड्डाणपूलाखालील गाळा क्रमांक ०१मध्ये बोलार्ड बसवले जात आहेत. हे काम प्रायोगिक तत्वावर करण्यात होत आहे. याला मिळणारा प्रतिसाद पाहून अन्य गाळ्यांमध्ये अशाप्रकारची व्यवस्था करण्यात येणार आहे. - विनायक विसपुते, सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग)
कोकणातील कोळीवाड्यांच्या जमिनी अधिकृत होणार!
सीमांकनासाठी समिती गठीत; तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देशमुंबई : कोकण किनारपट्टीवरील पिढ्यानपिढ्या अस्तित्वात असलेल्या कोळीवाड्यांच्या जमिनी अधिकृत करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील कोळीवाड्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि सीमांकन करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करणारी समिती गठीत करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. या समितीला तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.महाराष्ट्राला सुमारे ७२० किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली असून या भागात अनेक कोळीवाडे पिढ्यानपिढ्या वसलेले आहेत. मात्र, या कोळीवाड्यांच्या सीमा गावठाणांप्रमाणे भूमी अभिलेख दप्तरी नोंद नसल्याने मालकी आणि हक्कांबाबत अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतुदीनुसार सीमांकनाची कार्यवाही करण्यासाठी कार्यपद्धती ठरविण्याची गरज निर्माण झाली होती.मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून उर्वरित ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील कोळीवाड्यांसाठी ही समिती कार्यरत राहणार आहे. तालुकानिहाय कोळीवाडे असलेल्या गावांची यादी तयार करणे, समुद्राच्या भरतीची उच्चतम सीमारेषा, महाराष्ट्र सागरी मंडळाकडील सीमारेषा तसेच कांदळवनांची सीमारेषा निश्चितीसाठी जिल्हास्तरीय समित्यांचे गठन करणे, कोळीवाड्यांचे सीमांकन करण्याची कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना निश्चित करणे आणि जिल्हाधिकाऱ्यांना कालबद्ध कार्यक्रमासह मार्गदर्शन करणे आदी कामे या समितीमार्फत केली जाणार आहेत.समितीत कोण?कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीत संबंधित पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, नगररचना विभाग, भूमी अभिलेख विभाग, वन विभाग, महाराष्ट्र सागरी मंडळ, मत्स्यव्यवसाय विभाग तसेच महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी सदस्य म्हणून असणार आहेत. अपर आयुक्त (महसूल), कोकण विभाग हे समितीचे सदस्य सचिव असतील.या समितीने जमीन महसूल संहिता, सीमांकन व गावठाण घोषित करण्यासंबंधीचे नियम व धोरणांचा अभ्यास करून तीन महिन्यांच्या आत अहवाल शासनास सादर करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे कोकणातील कोळीवाड्यांच्या जमिनी अधिकृत होण्याचा मार्ग मोकळा होणार असून, कोळी समाजाला दीर्घकालीन दिलासा मिळणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमात बदल
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणीमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल.राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.मा. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील. आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील.
आठ तासांच्या शिफ्टबाबत दीपिका पादुकोणच्या समर्थनात आशुतोष राणा; म्हणाले, “आठ तास पुरेसे आहेत”
वर्क शेड्यूलवर मोठी चर्चा: दीपिका पादुकोणच्या बाजूने आशुतोष राणा यांनी मांडले आपले मतगेल्या वर्षी दीपिका पादुकोण यांनी आठ तासांच्या कामाच्या शिफ्टची केलेली मागणी चित्रपटसृष्टीत एक महत्त्वाची आणि उघड चर्चा सुरू करणारी ठरली. सुरुवातीला वैयक्तिक मत म्हणून मांडलेली ही भूमिका लवकरच संपूर्ण चित्रपटविश्वात प्रतिध्वनित झाली. अनेक अभिनेते, दिग्दर्शक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सेटवर निश्चित आणि संतुलित कामाच्या तासांची गरज असल्याचे मत उघडपणे व्यक्त केले. अनेकांचे मत होते की सर्जनशीलतेवर परिणाम न करता कलाकारांचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य यांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने हा निर्णय फार काळापासून आवश्यक होता.ही चर्चा पुढे जात असताना आता ज्येष्ठ अभिनेते आशुतोष राणा यांनीही दीपिकाच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. एका प्रकाशनाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आठ तासांच्या वर्क फॉर्म्युलाचे समर्थन करताना सांगितले की, कलाकारांवर त्यांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेपेक्षा अधिक ताण दिल्यास सर्जनशीलता, अभिनयाची गुणवत्ता आणि व्यावसायिक प्रामाणिकतेवर विपरीत परिणाम होतो.आठ तासांपेक्षा अधिक काम का करू नये, याबाबत बोलताना राणा म्हणाले,, “माझ्या मते सर्जनशील काम आठ तासांपलीकडे जाऊ नये. जर सर्वोत्तम परिणाम अपेक्षित असतील, तर हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. आठ तासांचा कालावधी पुरेसा असतो आणि काम त्या वेळेत पूर्ण होऊ शकते. प्री-प्रोडक्शन मजबूत असेल, सर्व गोष्टी व्यवस्थित ठरलेल्या असतील आणि काय शूट करायचे आहे याची स्पष्टता असेल, तर आठ तासांतही उत्कृष्ट काम करता येते.”ते पुढे म्हणाले की, दीर्घकाळ काम केल्यास त्याचा थेट परिणाम अभिनयावर होतो, कारण ऊर्जा ही मर्यादित असते. राणा म्हणाले, “आठ तासांपेक्षा जास्त वेळ काम केल्यास कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. हे संपूर्ण गणित ऊर्जा आणि क्षमतेचे आहे. प्रत्येक व्यक्तीकडे वीस तास काम करून उर्वरित चार तासांत स्वतःला पुन्हा ताजेतवाने करण्याची क्षमता नसते. एखाद-दोन दिवस थोडे अधिक काम करणे ठीक असू शकते, पण तेच जर सवय बनले, तर कामाच्या सादरीकरणावर परिणाम होणारच. म्हणूनच आठ तासांच्या वेळेचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.”तयारीचे महत्त्व अधोरेखित करताना राणा यांनी सांगितले की अनेकदा गरज नसतानाही केवळ नियोजनाच्या अभावामुळे कामाचे तास वाढतात. ते म्हणाले,“स्क्रिप्ट, सीन ब्लॉकिंग आणि नियोजनासंबंधी सर्व चर्चा कार्यालयातच व्हायला हव्यात. सेटवर पोहोचल्यानंतर ‘हा सीन तर होता नाही, तो बदलूया’ असे म्हणणे योग्य नाही. जहाजाचा कॅप्टन जर स्पष्ट असेल, तर आठ तासांपेक्षा जास्त काम करण्याची गरजच भासत नाही.”आधीच चित्रपटसृष्टीतील अनेकांनी दीपिका पादुकोण यांच्या संतुलित कामाच्या वेळापत्रकाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. त्यात आता आशुतोष राणा यांचा पाठिंबा मिळाल्याने ही चर्चा अधिक बळकट होत असून, शाश्वत आणि आरोग्यदायी चित्रपट निर्मितीवर लक्ष केंद्रीत होत आहे. दुसरीकडे, दीपिका पादुकोण शाहरुख खानच्या किंग आणि दिग्दर्शक अॅटली यांच्या आगामी भव्य चित्रपटासह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये व्यस्त असून, शिस्तबद्ध कामसंस्कृती आणि मोठ्या प्रमाणावरचे सिनेमा हे एकत्र नांदू शकतात, हेच यातून स्पष्ट होते.
आर्थर रोड कारागृहात कैद्याचा पोलिसावर हल्ला
मुंबई : आर्थर रोड कारागृह हे देशातील सर्वाधिक सुरक्षित कारागृहांपैकी एक म्हणून ओळखले जाते. याच कारागृहात पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला ठेवले होते. पण ताज्या घटनेमुळे हे कारागृह खरंच एवढे सुरक्षित आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ताज्या वृत्तानुसार मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात कैद्याने पोलिसावर हल्ला केला आहे.लोकेंद्र उदयसिंग रावत हा कैदी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत आहे. याच कैद्याने जेलच्या मुख्य दाराजवळ मोकळ्या जागेत कर्तव्यावर असलेल्या अर्थात ड्युटी करत असलेल्या पोलिसांकडे बघत शिव्या देण्यास सुरुवात केली. वाघ नावाच्या पोलीस शिपायाने लोकेंद्रला गप्प बसण्यासाठी दरडावून बघितले तर लोकेंद्रने वाघ यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस शिपाई वाघ गंभीर जखमी झाले.कैदी लोकेंद्र उदयसिंग रावत हा पोलीस शिपाई वाघ यांच्यावर हल्ला करत असल्याचे बघून इतर पोलीस घटनास्थळी धावले, त्यांनी लोकेंद्रला चोप दिला आणि ताळ्यावर आणले. यानंतर कैदी लोकेंद्र उदयसिंग रावत याच्या विरोधात पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणण्याबाबतचा गुन्हा नोंदवला. जखमी झालेल्या पोलीस शिपाई वाघ यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण ताज्या घटनेमुळे मुंबईचे आर्थर रोड कारागृह आता सुरक्षित आहे का ? असा प्रश्न उपस्थित झा
अंत्यसंस्कारावेळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात सुप्रिया सुळे ((Supriya Sule Video) कुटुंबाला आधार देताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळे सुनैत्रा पवार यांचा हात
Delhi U23 Cricketers : दिल्लीच्या २३ वर्षांखालील क्रिकेटपटूंवर १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा छळ केल्याचा आरोप आहे.
Pawar Family Politics : अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र पोरका झाला असून, आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 'एकच दादा, अजित दादा' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
Abhishek Sharma : जूचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अभिषेक शर्मा स्वतः स्ट्राईकवर गेला आणि पहिल्याच चेंडूवर बाद झाला.
VP Music Academy : 96 तासांत नॉन स्टॉप 1,111 गाणी! पुण्याच्या व्हिपी म्युझिक अकॅडमीचा विश्वविक्रम
संगीत क्षेत्रात भारताचे नाव जागतिक पातळीवर उजळवणारा एक ऐतिहासिक क्षण व्हिपी म्युझिक अकॅडमीने (VP Music Academy) घडवून आणला आहे. इंग्लंडच्या प्रतिष्ठित वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स संस्थेकडे सलग ९६ तासांत १,१११ गाणी सादर करण्याचा अनोखा विश्वविक्रम नोंदवण्यात आला
पुणे : महाराष्ट्राचे लाडके अजित दादा आज अनंतात विलीन झाले. बुधवारी २८ जानेवारी रोजी अजित दादांचा बारामती धावपट्टी शेजारी दुर्दैवी विमान अपघात झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल झाला. अजित पवारांसह त्यांच्यासोबाबत प्रवास करणाऱ्या त्यांच्या अंगरक्षकाचा आणि एक क्रू मेंबर, वैमानिक आणि सहवैमानिक यांचाही मृत्यू झाला.दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यायचंय सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका अनुभवी वैमानिकाच्या कारकिर्दीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कॅप्टन सुमित याबद्दल खुलासेया घटनेशी संबंधित वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांचा उड्डाणाचा अनुभव मोठा असला, तरी यापूर्वी दोन वेळा १३ ,मार्च २०१० मध्ये एका देशांतर्गत उड्डाणापूर्वी, दिल्ली विमानतळावर, दिल्ली-बंगळूरु (S२ - २३१ ) या उड्डाणापूर्वी ते ब्रेथ अॅनालायझर (BA) चाचणीत मद्यप्राशन स्थितीत कर्तव्यावर आढळल्याची अधिकृत नोंद असल्याचे समोर आpilotsले आहे. नागरी विमान वाहतूक यंत्रणांच्या अहवालानुसार, दिल्ली विमानतळावर तसेच २०१७ मध्ये पुन्हा एका उड्डाणादरम्यान नियमभंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.दुसऱ्या प्रकरणानंतर नागरी उड्डाण महासंचालनालयाने कठोर निर्णय घेत तीन वर्षांसाठी वैमानिक परवाना निलंबित केला होता. विमान वाहतूक क्षेत्रात ही कारवाई अत्यंत गंभीर मानली जाते. मात्र, निलंबन कालावधी संपल्यानंतर संबंधित वैमानिक पुन्हा सेवेत दाखल झाल्याची माहिती आहे.दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रवासासाठी खासगी ऑपरेटरकडून या वैमानिकाची नियुक्ती कशी करण्यात आली, यावरही चौकशीची सुई वळली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या व्हीआयपी उड्डाणांसाठी वैमानिकांची निवड करताना पार्श्वभूमी तपासणीचे निकष पाळले गेले होते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.बारामती येथे झालेल्या घटनेत विमानाने पहिल्या प्रयत्नात लँडिंग न केल्याने ‘गो-अराउंड’ घेण्यात आला आणि त्यानंतर अपघात घडला. प्राथमिक अंदाजानुसार, तांत्रिक कारणांबरोबरच मानवी चुकांची शक्यताही तपास यंत्रणा पडताळून पाहत आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे व्हीआयपी विमानसेवांमधील सुरक्षेच्या यंत्रणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतरच नेमकं जबाबदार कोण हे स्पष्ट होणार आहे
अल्पवयीन वर्षीय अभिनेत्रीचा तसला सीन प्रसारित; प्रेक्षकांकडून थेट कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी
मुंबई : हिंदी टीव्हीवरील एका लोकप्रिय मालिकेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. मालिकेत अल्पवयीन अभिनेत्रीला प्रौढ कलाकारासोबत दाखवण्यात आलेल्या दृश्यांमुळे प्रेक्षकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणानंतर संबंधित कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.वादग्रस्त ठरलेली हिंदी' मालिका ‘रिमझिम’ असून, अलीकडे प्रसारित झालेल्या एका भागातील दृश्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. या दृश्यांमध्ये प्रमुख भूमिकेत असलेली अभिनेत्री वयाने अल्प असल्याचा दावा करण्यात येत असून, प्रौढ अभिनेत्यासोबत तसले सीन दाखवण्यात आल्याचा आरोप प्रेक्षक करत आहेत.प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारचा आशय लहान वयाच्या कलाकारांसाठी योग्य नाहीच शिवाय अश्या मालिका टीव्हीवर दाखवणे ही योग्य नाही ,अश्या मागण्या सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेतशिवाय सोशल मीडियावर अनेकांनी निर्माते आणि वाहिनीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सेन्सॉर व प्रसारण मानकांची तपासणी झाली होती का, अशी विचारणा केली जात आहे. या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रातील बालकलाकारांच्या सुरक्षेचा आणि जबाबदारीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.. यशिका ही अल्पवयीन असताना तिला अश्या प्रकारच्या भूमिकांमध्ये पाहून प्रेक्षकांनी तिच्यावर आक्षेप घेतला आहे.
Shashikant Shinde : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे सूचक विधान
Shashikant Shinde : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात या पक्षाची दिशा आणि राजकीय रणनिती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Silver Rates Today: आज 32 हजार रूपयांनी वाढली चांदी; एक किलोचा भाव पाहून फिरतील डोळे…
Silver Rates Today: गेल्या अवघ्या १० दिवसांत चांदीच्या दरात तब्बल १ लाख रुपयांपेक्षा वाढ झाली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहक दोन्ही अवाक झाले आहेत.
IND vs PAK : १ फेब्रुवारी रोजी होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना ग्रुप-२ मधील सर्वात मोठा आणि निर्णायक सामना ठरणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात अधिकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित शोक सभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सेवाकाळात नेहमी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने शासकीय कर्तव्य पार पाडले. त्यांच्या निधनाने राज्य शासनाने एक कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले आहे, अशी भावना अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी उपस्थितांच्या वतीने यावेळी व्यक्त केली.याप्रसंगी मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. इकबालसिंह चहल, मनीषा म्हैसकर, अश्विनी भिडे, असिम कुमार गुप्ता, विकासचंद्र रस्तोगी, वेणुगोपाल रेड्डी, अनुपकुमार सिंग, राधिका रस्तोगी, एकनाथ डवले, सौरभ विजय, डॉ. हर्षदीप कांबळे, अतुल पाटणे, संजय खंदारे, एस.चोक्कलिंगम, रणजितसिंह देओल, वीरेंद्र सिंह, गणेश पाटील, संतोष कुमार, दिलीप घुमरे, जयश्री भोज, अंशु सिन्हा, राजेश गवांदे, विजय वाघमारे, मकरंद देशमुख यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात येऊन त्यांना हे दु:ख सहन करण्याचे बळ लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली.यावेळी मंत्रालयातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.
Todays TOP 10 News : वाचा आजच्या राज्य देश-विदेशातील सर्व क्षेत्रातील बातम्या थोडक्यात
कालबद्धरितीने चौकशी पूर्ण करणारमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली असून, या दुर्घटनेच्या कारणांची सखोल व पारदर्शी चौकशी केली जाईल, असे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.बुधवारी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच नियंत्रण सुटले आणि ते थेट जमिनीवर आदळले. या दुर्घटनेनंतर मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, गुरुवारी बारामतीत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक गावांमध्ये बंद पाळून नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.https://prahaar.in/2026/01/29/parth-and-jay-pawar-lit-the-funeral-pyre-ajit-dada-was-laid-to-rest-with-state-honours/या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी व्हावी आणि भविष्यात अशा घटना टळाव्यात, यासाठी तातडीची पावले उचलावीत, अशी मागणी करत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू यांना पत्र पाठवले होते. अजित पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यासह इतर चार जणांचा मृत्यू हा अत्यंत गंभीर प्रकार असून, अपघात नेमका कशामुळे झाला याचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले होते.दरम्यान, या पत्राला उत्तर देताना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू यांनी विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) कडून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून, नियमांनुसार सर्वंकष तपास केला जात आहे. तांत्रिक नोंदी, ऑपरेशनल तपशील आणि घटनास्थळावरील सर्व तथ्यांची पडताळणी करण्यात येत असून, ही चौकशी पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत, या दृष्टीने राज्य सरकारच्या सूचनेची मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून, चौकशी अहवाल प्राप्त होताच आवश्यक उपाययोजना केल्या जातील. या प्रक्रियेत महाराष्ट्र सरकारचे सहकार्य महत्त्वाचे असून, स्थानिक प्रशासनाची मदतही अपेक्षित असल्याचे नायडू यांनी नमूद केले. संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
चिमुकल्या मुलीवर गँगरेप; रक्तबंबाळ अवस्थेत घरी आली मुलगी, शेजाऱ्यानेच......
दिल्ली : सामूहिक बलात्काराच्या घटनेने दिल्ली पुन्हा हादरली. चिमुकल्या मुलीला नूडल्स देण्याच्या बहाण्याने तिच्यासोबाबत अल्पवयीन मुलांनीच गँगरेप करण्याचा भयंकर प्रकार घडला आहे.नेमकं काय घडलं?दिल्लीतील भजनपूर भागात ही घटना घडली असून. १०, १३, आणि १४ वर्षाच्या मुलांनी ६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे. घटनेच्या काही तासांपूर्वी पीडित मुलीला तिच्या वडिलांनी चॉकलेट देऊन घराबाहेर सोडले होते. त्यानंतर त्या ठिकाणाहून तीन आरोपींनीं मुलीला नूडल्स देण्याचे आमिष दाखवत एका बिल्डिंगमध्ये सामूहिक बलात्कार केला. आरोपीनी पीडित मुलीचे हात बांधून आणि तोंड दाबून तिच्यावर हा धक्कादायक प्रकार केला. पीडित मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत घरी पोचली. तिची ती अवस्था बघून कुटुंबीय घाबरले.आरोपीचा शोधमुलीला विश्वासात घेऊन कुटुंबीयांनी विचारले असता तिच्या शेजारी राहणाऱ्या मुलानेच हा प्रकार केल्याचे कळले.मुलीची अवस्थामेडिकल रिपोर्ट मधून समोर आले की मुलगी आता चालू शकत नाही, मुलीच्या आईनेही सांगितले की मुलगी उठली किंवा बसली तर तिला प्रचंड त्रास होतोच शिवाय रक्तस्त्राव ही होत आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं तर तिसऱ्याच शोध सुरु आहे
IND W vs AUS W : २०२६ मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघांसाठी तयारीची मोठी संधी मानली जात आहे.
Ajit Pawar : अजित पवारांच्या अपघाताबाबत सर्वात मोठा खुलासा
मुंबईहून बारामतीकडे येत असताना लँडिंगच्या प्रयत्नात हे विमान धावपट्टीजवळ कोसळले आणि आग लागली. या अपघातात अजित पवारांसह (Ajit Pawar) विमानातील इतर चार जणांचाही मृत्यू झाला.
Washington Sundar : २६ वर्षीय वॉशिंग्टन सुंदरने २८ जानेवारी रोजी नेट्समध्ये सुमारे ३० मिनिटे फलंदाजी केली आहे.
Wagholi News : मद्यधुंद स्कूल बस चालकाची अनेक वाहनांना धडक; वाघोलीमधील बाईफ रोड वादाच्या भोवऱ्यात
पुणे जिल्ह्यातील वाघोली (Wagholi News) परिसरात काल दुपारी अडीच ते पावणे तीन वाजण्याच्या सुमारास एक भीषण आणि धक्कादायक अपघात घडला. इंडो स्कॉट ग्लोबल स्कूलची (बायफ रोडवरील) स्कूल बस चालवताना बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता.
एसटी चालकांच्या मद्यपानाविरुद्ध कडक पावले; मुख्यालयाकडून कठोर निर्देश
मुंबई : २५ जानेवारी रोजी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे परळ बसस्थानकाला भेट दिली. त्यावेळी चालक -वाहक विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या . तसेच काही कर्मचारी मद्यपान केल्याचे देखील आढळून आले. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आगारात कर्तव्यावर जाण्यापूर्वी चालकांची ब्रेथ आणलायझर चाचणी अनिवार्य करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. त्यानुसार कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटी चालकांविरुद्ध कठोर आणि तातडीची कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाकडून देण्यात आले आहेत.प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ही मोहीम अधिक काटेकोरपणे राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यंत्र अभियंता (चालन) विभागामार्फत सर्व विभाग नियंत्रक, विभागीय कार्यशाळा तसेच संबंधित अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांनुसार, कर्तव्यावर जाण्यापूर्वी चालकाने मद्यपान केले नसल्याची खात्री करणे आता अधिक सक्तीचे करण्यात आले आहे.तपासणी अधिक कडक१)कर्तव्यावर जाणाऱ्या चालकांनी मद्यपान केले नसल्याची खात्री करूनच त्यांना ड्युटीवर पाठविण्यात यावे.२)ज्या चालकाला विशिष्ट वाहनावर कर्तव्य देण्यात येणार आहे, त्या वाहनासोबतच त्याची अल्कोहोल तपासणी (ब्रिथ अॅनालायझर चाचणी) करण्यात यावी.३)वाहन परीक्षकांनी चालकाची तपासणी न करता वाहन बाहेर जाऊ देऊ नये.४)मद्यपान केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित चालकाला तत्काळ कर्तव्यातून दूर ठेवून त्याची माहिती आगार व्यवस्थापकांना द्यावी.आगार व्यवस्थापकांवर जबाबदारीआगार व्यवस्थापकांनी अशा प्रकरणांची स्वतः खात्री करून संबंधित चालकांविरुद्ध नियमानुसार तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच, मुख्यालयाकडून अचानक तपासण्या (सरप्राइज चेक) घेण्यात येणार असल्याने सर्व आगारांनी या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.प्रवासी सुरक्षेला प्राधान्यएसटी ही राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे चालकांची शारीरिक व मानसिक स्थिती उत्तम असणे अत्यावश्यक आहे. मद्यपान करून वाहन चालविणे ही गंभीर बाब मानून महामंडळाने शून्य सहनशीलता (Zero Tolerance) धोरण अवलंबले असल्याचे या परिपत्रकातून स्पष्ट झाले आहे.या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत अधिक वाढ होणार असून एसटी सेवेत शिस्त आणि जबाबदारी अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली जात आहे.
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख आणि प्रतिभावान अभिनेता आदित्य रावल हे नेहमीच सोप्या व वरवरच्या भूमिका टाळून आव्हानात्मक भूमिका निवडण्यासाठी ओळखले जातात. प्राइम व्हिडिओवरील आगामी वेब सीरिज दलदल मध्ये त्यांच्या याच विचारांची खरी कसोटी लागली आहे. या मानसशास्त्रीय क्राइम थ्रिलरमध्ये आदित्य साजिद ही भूमिका साकारताना दिसणार आहेत—एक असा माणूस जो व्यसन आणि विनाशाच्या गर्तेत अडकलेला आहे, आणि ज्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या हिंसक घटना अनेक प्रश्न निर्माण करतात. *दलदल*च्या प्रदर्शनाआधी आदित्य यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण भूमिकांपैकी एक स्वीकारताना आलेली द्विधा मनःस्थिती आणि अनुभव शेअर केला.आदित्य रावल म्हणाले की सुरुवातीला वाटलेली हिचकिच हीच या भूमिकेचे योग्य असणे दर्शवणारी सर्वात मोठी खूण ठरली. ते म्हणाले, “खरं सांगायचं तर सुरुवातीला थोडी हिचकिच होती. दलदल खूप डार्क आहे, अस्वस्थ करणारी आहे आणि भावनिकदृष्ट्या खूपच आव्हानात्मक आहे. मला सुरुवातीला वाटलं नव्हतं की मी इतक्या खोलवर जाण्यासाठी तयार आहे. पण जेव्हा अमृतने मला ही कथा सांगितली, तेव्हा ती माझ्या मनात रुतून बसली. घरी गेल्यावरही मी तेच विचार करत राहिलो की अशा संधी वारंवार मिळत नाहीत—जिथे एखादं पात्र तुम्हाला घाबरवतं आणि तुम्हाला जगाच्या त्या पैलूंना समजून घ्यायला भाग पाडतं, जे तुम्ही याआधी कधी पाहिले नसतील.ही आतापर्यंतची माझी सर्वात कठीण भूमिका होती, पण त्याच वेळी सर्वात समाधानकारकही. मला स्क्रिप्ट खूप आवडली, दिग्दर्शकावर पूर्ण विश्वास होता आणि मला वाटलं की ही भूमिका मला व्यसन, कमजोरी आणि मानवी नाजूकपणाबद्दल काहीतरी नवीन शिकवेल. तेव्हा निर्णय सोपा झाला—मला चांगल्या लोकांसोबत चांगलं काम करायचं होतं आणि बाकी सगळ्या गोष्टी आपोआप योग्य ठिकाणी बसू द्यायच्या होत्या. त्याच भावनेने मला दलदल पर्यंत आणलं आणि मला आनंद आहे की मी त्या भावनेवर विश्वास ठेवला.”विश धामीजा यांच्या भेंडी बाजार या पुस्तकावर आधारित दलदलचे दिग्दर्शन अमृत राज गुप्ता यांनी केले आहे, तर या सीरिजची निर्मिती विक्रम मल्होत्रा आणि सुरेश त्रिवेणी यांनी अबंडन्टिया एंटरटेनमेंट (Abundantia Entertainment) या बॅनरखाली केली आहे. या सीरिजमध्ये भूमी साटिश पेडणेकर मुंबई क्राइम ब्रँचच्या नव्या डीसीपीच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर आदित्य रावल आणि समारा तिजोरी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. दलदल 30 जानेवारीपासून प्राइम व्हिडिओवर भारतासह जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये एक्सक्लुझिव्ह स्वरूपात स्ट्रीम होणार आहे.
Sadhvi Prem Baisa Death :
Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कोण करणार सादर? ‘या’ 3 नेत्यांची नावे चर्चेत
येत्या 23 फेब्रुवारीपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget) सुरू होणार आहे. महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या देशातील आघाडीचे राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
R Ashwin clarify : आर अश्विनने या सर्व अफवांना पूर्णविराम देत खुद्द विराट कोहलीला फोन केल्याचे जाहीर केले आहे.
Stock Market: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी; ‘या’कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ
Stock Market: सेन्सेक्स २२२ अंकांनी वधारला; टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये मोठी उसळी
वरळी कोस्टल रोडवर उभारणार मुंबईतील तिसरा हेलिपॅड; जाणून घ्या सविस्तर
मुंबई : वरळीत मुंबईच्या कोस्टल रोडवर लवकरच हेलिपॅडची सुविधा उभारण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर लँडिंगसाठी राजभवन, महालक्ष्मी रेसकोर्स आणि आता कोस्टल रोड हा एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे.वरळी येथे उभारण्यात आलेल्या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक हेलिपॅडचे संचालन आणि देखभालसाठी महापालिकेने कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी २ फेब्रुवारीपर्यंत निविदा सादर केली जाणार आहे.वरळीमध्ये समुद्रात १०० मीटर अंतरावर असलेल्या जेट्टीवर हे अत्याधुनिक हेलिपॅड उभारण्यात येणार आहे. हे हेलिपॅड दक्षिण मुंबईतील पहिलेच सरकारी मालकीचे सार्वजनिक हेलिपॅड असणार आहे.हेलिपॅड चालवण्याचे कंत्राट सुरवातीला पाच वर्षांच्या कालावधीसाठी दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कंत्राटदाराने पालिकेला ठराविक मासिक परवाना शुल्क आणि प्रत्येक लँडिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही हिस्सा द्यावा लागेल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.हेलिपॅडचे वैशिठ्येया हेलिपॅड चे वैशिष्ठ्ये म्हणजे, आपत्कालीन काळात रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी या हेलिपॅडचा वापर प्राधान्याने केला जाणार आहे. तसेच किनारपट्टीची सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनेसाठी कोस्टल पोलीस व सुरक्षा दलांना हे केंद्र फायदेशीर ठरणार आहे. सरकारी तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी देखील याचा फायदा होणार आहे.
मद्यधुंध वाहनचालकाची धडक अन् ३० ते ४० विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला
पुणे : हल्ली वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्यामुळे अनेक रस्ते अपघाताच्या घटना या घडत आहे. असाच एक धक्कादायक आणि निष्काळजीपणाचा कळस असलेला प्रकार पुण्यातून उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे चक्क ३० ते ४० विद्यार्थ्यांचे जीव हे टांगणीला लागले होते.नेमकं घडलं काय?सोमवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास वाघोली रोडवर ही घटना घडली. बायफ रोडवरील इंडो स्कॉट ग्लोबल शाळेच्या मद्यधुंद बस चालकाने चार दुचाकी आणि एका कार ला धडक जोरदार धडक दिली . बस चालकाने काही अंतरावर वाहन फरफटतही नेली.मिळलेल्या माहितीनुसार बत्ता बसंत रसाळ (वय ५० ) असे अटक केलेल्या बस चालकाचे नाव आहे. या भयंकर अपघातानंतर नागरिकांनी शाळेच्या बसचा पाठलाग केला आणि बस थांबवली. या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी बस चालकाला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून विद्यार्थ्यांचे जीव थोडक्यात बचावले.
Shashi Tharoor: काॅंग्रेस नेते शशी थरूर यांची नाराजी दूर? दोन तासांच्या बैठकीत काय झाली चर्चा?
Shashi Tharoor:
Republic Day 2026 : प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ देशात सर्वोत्कृष्ट
नवी दिल्ली, २९ : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे सादरीकरण सर्वोत्कृष्ट ठरले आहे. यंदाच्या संचलनामध्ये राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारकडून या निकालांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, या गटात जम्मू-काश्मीर आणि केरळ या राज्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे.यंदा महाराष्ट्राने 'गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला होता. या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, गणेशोत्सवाचा सामाजिक वारसा आणि त्यातून मिळणारा आर्थिक रोजगार व आत्मनिर्भरतेचा संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला होता. चित्ररथावरील भव्य गणेशमूर्ती, पारंपरिक ढोल-ताशा पथक आणि लेझीम खेळणाऱ्या कलाकारांच्या उत्साहाने कर्तव्यपथ दुमदुमून गेला होता. याच प्रभावी सादरीकरणामुळे परीक्षकांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या गटातून महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथ म्हणून निवडले आहे.केवळ राज्यांच्या श्रेणीतच नव्हे, तर इतर विभागांतही चुरस पाहायला मिळाली. यामध्ये सेना दलातून 'भारतीय नौदल' तर निमलष्करी दलातून 'दिल्ली पोलीस' यांच्या संचलन पथकाला सर्वोत्कृष्ट म्हणून गौरवण्यात आले. केंद्रीय मंत्रालयांच्या गटामध्ये सांस्कृतिक मंत्रालयाच्या चित्ररथाने बाजी मारली, तर केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि 'वंदे मातरम्' नृत्य समूहाला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा - मंत्री नरहरी झिरवाळ
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांना वेग आला असतानाच मंत्री नरहरी झिरवाळ यांनी महत्त्वाची मागणी पुढे केली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे, अशी भूमिका त्यांनी गुरुवारी मांडली.अजित पवार यांच्या निधनानंतर गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढे काय होणार, नेतृत्व कोणाकडे जाणार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का किंवा पक्षात अंतर्गत स्पर्धा वाढणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केली. “सगळ्यांचीच मागणी आहे की वहिनींना मंत्रिपदी आणावे. ही जनतेची प्रामाणिक इच्छा आहे. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून तसा निर्णय घ्यावा, अशी विनंती करणार आहे,” असे झिरवाळ यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केल्यास ती अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल, तसेच पवार कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे चालू राहील, असेही त्यांनी नमूद केले.राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणाकडे?- अजित पवार यांच्यासारखा सर्वमान्य आणि प्रभावी नेता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसल्याने पक्षाचे नेतृत्व कोणी करावे, हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. अशा परिस्थितीत नेतृत्वासाठी स्पर्धा होण्याची शक्यता असून, पवार कुटुंबातीलच कुणी पुढे येणार की पक्षातील अन्य वरिष्ठ नेते धुरा सांभाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.- सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभा खासदार आहेत. त्या राज्याच्या सक्रिय राजकारणात परत येणार का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. याचबरोबर अजित पवार यांची मुले पार्थ आणि जय यांना भविष्यात पक्षाची जबाबदारी दिली जाणार का, यावरही चर्चा सुरू आहे.- अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कोणता निर्णय घेतात आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला किती पाठिंबा मिळतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनिल तटकरे यांची भूमिका काय असेल, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मोहित सोमण: सुरुवातीच्या कलात सावधगिरीचा फटका बसल्याने गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटीचे नुकसान झाले. मात्र पुन्हा एकदा संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर करताना ईयु एफटीएनंतर आता युएस भारत यांच्यातील संभाव्य कराराच्या बातम्यानंतर शेअर बाजारात सरतेशेवटी शेअर बाजारात सकारात्मक प्रतिसाद दिला. परिणामी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाल्याने अखेरच्या सत्रात सेन्सेक्स २२१.६९ अंकाने उसळत ८२५६६.३७ व निफ्टी ७६.१० अंकाने उसळत २५४१८.९ पातळीवर स्थिरावला आहे. प्रामुख्याने बँक निर्देशांकाने सकाळच्या घसरणीला मजबूत फंडामेंटल व तिमाही निकालानंतर तेजीत बदलल्याने बाजाराला सपोर्ट लेवल अंतिम क्षणी मिळण्यास मदत झाल्याने शेअर बाजारात रिकवरी मोड मिळण्यास मदत झाली. दुसरीकडे व्यापक निर्देशांकात मिडकॅप व स्मॉलकॅप सकाळी घसरलेले मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्येही गुंतवणूकदारांनी खरेदी वाढल्याने तेजीचे संकेत अंतिमतः मिळाले. सकाळी ६% पेक्षा अधिक उसळलेला अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा अखेरच्या क्षणी १.४०% कोसळला ज्याचा फायदा बाजारात दिसत आहे. दुसरीकडे निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात मेटल, रिअल्टी, तेल व गॅस, प्रायव्हेट बँक, मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली होती तर सर्वाधिक घसरण हेल्थकेअर, एफएमसीजी, आयटी, फार्मा, पीएसयु बँक निर्देशांकात झाली.अर्थातच दिवसभरात तेजी व मंदीचे संमिश्र सूर असले तरी जागतिक अस्थिरतेचा फटका क्षेत्रीय मजबूतीने ओझरला असताना आणखी आगामी काळातील अर्थसंकल्प बाजारात नवी दिशा देऊ शकतो. आज शेअर बाजारासह कमकुवत डॉलरमुळे कमोडिटी बाजारासह कच्च्या तेलाच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली ज्यामध्ये आजही परदेशी गुंतवणूकदारांनी आपली विक्री वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. दुसरीकडे घरगुती गुंतवणूकदारांनी आज आपल्या गुंतवणूकीत नफा बुकिंगसाठी वाढ केले असल्याने बाजार हिरव्या रंगात बंद झाला आहे. अखेरच्या सत्रात आशियाई बाजारात तैवान वेटेड, जकार्ता कंपोझिट, सेट कंपोझिट निर्देशांकात वगळता उर्वरित निर्देशांकात वाढ झाली असून सर्वाधिक वाढ कोसपी, गिफ्ट निफ्टी, स्ट्रेट टाईम्स निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स, नासडाक कंपोझिट निर्देशांकात वाढ झाली असून केवळ एस अँड पी ५०० निर्देशांकात अगदी किरकोळ घसरण झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ हिंदुस्थान कॉपर (२०%), जीएमडीसी (१०.०७%), जीई व्हर्नोवा (८.७१%), एबीबी (८.५४%), एमआरपीएल (७.९१%), जिलेट इंडिया (५.५०%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण फाईव स्टार बसेस (११.५२%), केपीआर मिल्स (६.८५%), जेपी पॉवर वेंचर (६%), कॅनरा बँक (४.७१%), एशियन पेंटस (३.८१%), टीबीओ टेक (३.२३%) समभागात झाली आहे.
भारताचा विकास दर ७% राहणार - मुख्य आर्थिक सल्लागार
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी संसदेत अर्थसंकल्पपूर्व सर्वेक्षण २०२५-२६ सादर केले आहे. ज्यावर आधारित भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची संभाव्य ७% पातळीवर पोहोचला असे म्हटले आहे. मुख्य आर्थिक सल्लागार डॉ व्ही अनंत नागेश्वरन यांनी अर्थसंकल्प पूर्व भाषणत संबोधित करताना अधोरेखित केले आहे की, 'भारताचा संभाव्य विकास दर तीन वर्षांपूर्वीच्या ६.५% वरून वाढून ७% पर्यंत पोहोचला आहे. नवी दिल्लीत आर्थिक सर्वेक्षण २०२५-२०२६ संदर्भात माध्यमांशी बोलताना नागेश्वरन म्हणाले की, कोविड-पूर्व काळात वास्तविक जीडीपी वाढ ६.४ टक्के होती, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ती ६.५% होती आणि या वर्षी ती ७.४% राहण्याचा अंदाज आहे. त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या वर्षीच्या ७.२% च्या वाढीनंतर या वर्षी खाजगी अंतिम उपभोग खर्चात ७% वाढ झाली आहे. याशिवाय नागेश्वरन म्हणाले की, अत्यंत मध्यम महागाईच्या वातावरणातही देश उच्च विकास दर (High Growth Rate), उपभोग (Consumption) आणि गुंतवणुकीवरील खर्च यशस्वीपणे साध्य करत आहे.संसदेत सादर केलेल्या अहवालात भारताचा विकास दर ७% संभाव्य दरात पोहोचेल असे म्हटले होते. तर रिअल जीडीपी दर ७.४% प्रस्तावित असेल असे सर्वेक्षणात नमूद केले होते. रविवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर संसदेत सादर करणार आहेत. कालपासूनच राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्प सत्राची सुरुवात झाली होती. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा पुढील महिन्याच्या १३ तारखेपर्यंत चालणार आहे. दुसरा टप्पा ९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एकूण ३० बैठका होणार आहेत.
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरला अंतिम ११ मध्ये स्थान न दिल्याने क्रिकेट विश्वात वादाला तोंड फुटले आहे.
Madhav Kumar Nepal : नेपाळचे माजी पंतप्रधान माधव कुमार रुग्णालयात दाखल
नेपाळचे माजी पंतप्रधान माधव कुमार नेपाळ (Madhav Kumar Nepal) यांना हृदयविकाराशी संबंधित तक्रारींमुळे काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती
सोन्याचांदीचा तर 'कहर'सोने प्रति ग्रॅम ११७७ रूपयांनी उसळत चांदी तर ४ लाख पार 'हे'आहेत आजचे नवे दर
मोहित सोमण: आज जागतिक अस्थिरतेच्या तोंडावर युएस अर्थकारणातील अनिश्चितता व आगामी युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील अपेक्षित निर्णयाची प्रतिक्षा, कमकुवत डॉलर व युएस व इराण यांच्यातील वाढलेला तणाव यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात सोने चांदी उसळले असून आणखी एक नवा विक्रम या दोन्ही कमोडिटीने केला आहे. आज तर सोन्याने १७००० रूपयांचा टप्पा पार केला असून चांदीनेही ४००००० लाखांची पातळी पार केली. गुड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात थेट ११७७, २२ कॅरेट प्रति ग्रॅम दरात १०८०, १८ कॅरेट प्रति ग्रॅम दरात ८८३ रूपयांची वाढ झाल्याने प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १७८८५, २२ कॅरेटसाठी १६३९५, १८ कॅरेटसाठी १३४१४ रूपयांवर पोहोचले आहेत. तर संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ११७७०, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १०८००, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ८८३० रूपयांनी वाढ झाली. त्यामुळे आता प्रति तोळा दर आज २४ कॅरेटसाठी १७८८५०, २२ कॅरेटसाठी १६३९५०, १८ कॅरेटसाठी १३४१४० रूपयांवर पोहोचले आहेत.मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर आज २४ कॅरेटसाठी १७८८५, २२ कॅरेटसाठी १६३९५, १८ कॅरेटसाठी १३४१४ रुपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात दुपारपर्यंत ५.७८% वाढ झाल्याने दरपातळी १७५४९९ रूपयांवर पोहोचली. जागतिक स्तरावर सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात दुपारपर्यंत थेट ३.९७% वाढ कायम राहिल्याने त्याचा फटका भारतीय बाजारातही होताना दिसत आहे.आज एकूणच युएस गोल्ड स्पॉट सोन्याच्या दरात २.१% वाढ होऊन तो प्रति औंस ५५११.७९ प्रति डॉलर या विक्रमी स्तरावर पोहोचला असून दिवसाच्या सुरुवातीला त्याने ५५९१.६१ प्रति डॉलर या विक्रमी पातळीला स्पर्श केला. सोन्याचा भाव सोमवारी प्रथमच ५००० डॉलरचा टप्पा ओलांडून पुढे गेला होता. जागतिक अहवालानुसार सोन्याच्या दरात फक्त आठवड्यात आतापर्यंत त्यात १०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.२०२५ मध्ये ६४% वाढ झाल्यानंतर, या वर्षी सोन्याच्या दरात २७% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.चांदीचा दर ४ लाख पार !चांदीच्या दरानेही आज विक्रमी स्तर ओलांडला आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ३० रूपये, प्रति किलो दरात तब्बल ३०००० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे चांदीचे दर प्रति ग्रॅमसाठी ४१०, प्रति किलोसाठी ४१०००० रूपयांवर पोहोचले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर ४१००, प्रति किलो दर ४१०००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात दुपारपर्यंत थेट ५.५८% वाढ झाल्याने दरपातळी ४०६८७७ रूपयांवर पोहोचली आहे. आज स्पॉट चांदीच्या दरात १.३% वाढ होऊन तो ११८.०६१ डॉलर प्रति औंसवर पोहोचला, यापूर्वी चांदीच्या दरानेही $११९.३४ या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला होता. सोन्याला स्वस्त पर्याय शोधणाऱ्या गुंतवणूकदारांकडून असलेली मागणी, तसेच वाढलेल्या मागणीच्या तुलनेत घसरलेला पुरवठा, तसेच प्रमाणाबाहेर वाढलेली वैयक्तिक व औद्योगिक मागणी या कारणांमुळे चांदीच्या दराला सातत्याने आधार मिळत आहे. याचा परिणाम म्हणून आजही चांदीच्या दरात दिवसभरात तुफान वाढ झाली आहे. आतापर्यंत चांदीच्या दरात या वर्षी आतापर्यंत ६०% पेक्षा जास्त वाढ झाली असून मौल्यवान धातूंच्या किमतींमधील ही वाढ सुरक्षित गुंतवणुकीची वाढलेली जोरदार मागणी, मध्यवर्ती बँकांची मजबूत खरेदी आणि कमकुवत डॉलर यामुळे झाली आहे.
Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्यसंस्काराला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते.
Shriya Saran : “दृश्यमला वेगळे बनवणारी गोष्ट…”; दृश्यम ३ विषयी श्रिया सिरनने व्यक्त केली भावना
Shriya Saran : अभिनेत्री श्रिया सरनने हिने दृश्यम ३ चित्रपटाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Ajit Pawar : सोशल मिडियावरून पुन्हा व्हायरल होतोय अजितदादांचा मिश्किल, विनोदी अंदाज
महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धडाडीच्या आणि शिस्तप्रिय पर्वाचा आज बारामतीच्या मातीत शेवट झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी जड अंतःकरणाने आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थितांचा काळजाचा ठोका चुकला आणि संपूर्ण विद्या प्रतिष्ठान परिसर शोकसागरात बुडाला.याच पार्श्वभूमीवर राज्यातील जनता सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. अशातच अजित दादांच्या आठवणींना उजाळा देणारा एक जूना व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.अजित पवार हे दिलखुलास व्यक्तिमत्व होतं. ते अनेकदा जाहिर सभांमध्ये आपल्याच कार्यकर्त्यांची सुद्धा फिरकी घ्यायचे. अशाच एका सभेतील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये ते रोहित पवारांपासून ते थेट जयंत पाटील यांच्यापर्यंत सर्वांनाच रोस्ट करताना दिसत आहेत.
मोहित सोमण: हिंदुस्थान कॉपर (Hindustan Copper) शेअर आज थेट २०% उसळला आहे. दुपारी २.४४ वाजता शेअर ७६०.०५ रूपयांवर व्यवहार करत होता. आज ही झालेली मोठी वाढ असून हा शेअर सर्वाधिक उच्चांकी पातळीवर (All time High) पोहोचला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये १९२% वाढ झाली असून आज शेअरने 'बंपर' कामगिरी केल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण काही प्रमाणात शाबूत राहिले. जागतिक अस्थिरतेत तांब्यात (Copper) मध्ये अत्यंत मोठ्या संख्येने जागतिक पातळीवर वाढ होत आहे. सातत्याने मेटल शेअर्समध्ये वाढ होत असताना या धातूत मोठी मागणी निर्माण झाल्याने तांब्याला महत्व प्राप्त झाले. असे असताना ईव्ही, अक्षय उर्जा, एआय, व विविध तांत्रिक व औद्योगिक उत्पादनात तांब्याच्या मागणीमुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात हिंदुस्थान कॉपर शेअरला पाठिंबा दिला आहे. सत्राच्या सुरुवातीलाच शेअर १६% उसळत नव्या पातळीवर शेअर पोहोचला होता.त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक उच्चांकी पातळी (All time High) वर वाढ झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार सत्रादरम्यान, हिंदुस्तान कॉपरच्या शेअर्सने ७६०.०५ रुपयांची दिवसातील उच्चांकी पातळी आणि ६६२ रुपयांची नीचांकी पातळी गाठली, ज्यामुळे ५२ आठवड्यांचा आणि सर्वकालीन उच्चांक आज नोंदवला गेला. कंपनीचे सध्याचे बाजार बाजार भांडवल (Market Capitalisation) आता अंदाजे ७३०.६ अब्ज रुपये झाले आहे.ब्रोकरेज तज्ञांच्या मते, 'हा स्टॉक सध्या सुमारे १२८ पट प्राइस-टू-अर्निंग्स (P/E) गुणोत्तरावर व्यवहार करत आहे, ज्याचा प्रति शेअर उत्पन्न (Earning per share EPS) ५.९ रुपये आहे. तांत्रिकदृष्ट्या, ही तेजी सुस्थितीत असल्याचे दिसते. ५०-दिवसांची मूव्हिंग ॲव्हरेज ४४८.६४ रुपयांवर आहे,तर २०० दिवसांची मूव्हिंग ॲव्हरेज त्याहून खूपच कमी म्हणजे ३१७.०८ रुपयांवर आहे. ५२-आठवड्यांची नीचांकी पातळी १८३.८२ रुपये होती, ज्यामुळे अलीकडील वाढ अधिकच लक्षणीय ठरते. कंपनीने १५.७३% रिटर्न ऑन इक्विटी (ROE) ३९.०६% निव्वळ विक्री वाढ आणि २६.४१% ऑपरेटिंग नफ्यात वाढ नोंदवली आहे.'गेल्या ५ दिवसांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये ३९.४०% वाढ झाली आहे तर महिन्यात ५५.९२%, वर्षभरात २३२.७४% वाढ झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) कंपनीच्या शेअर्समध्ये ४५.७२% वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये खरेदी विक्रीत वाढ केल्याने मोठ्या व्हॉल्यूमवर या शेअरचा व्यापार बाजारात झाल्याचे स्पष्ट झाले होते.

27 C