मुंबई: भारत दौऱ्यावर आलेल्या इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मुंबई येथील ताज महल पॅलेस येथे २६/११ दहशतवादी हल्ल्यांतील पीडितांना श्रद्धांजली अर्पण केली आणि सांगितले की दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात फ्रान्स भारतासोबत ठामपणे उभा आहे.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत त्यांनी लिहिले, “मुंबईतील ताज महल पॅलेस येथे आम्ही २००८ च्या हल्ल्यांतील पीडितांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांसाठी, प्रियजनांसाठी आणि भारतासाठी — फ्रान्स तुमच्या सोबत आहे. दहशतवादाविरुद्ध आम्ही एकता आणि दृढ निश्चयाने उभे आहोत.”फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि एलिसी पॅलेस यांच्या अधिकृत खात्यावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मॅक्रॉन स्मारकस्थळी फुले अर्पण करताना दिसले. त्यांनी पीडितांच्या स्मरणार्थ काही क्षण मौन पाळले. मॅक्रॉन मंगळवारी भारताच्या तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर मुंबईत पोहोचले. त्यांच्या या भेटीतून भारतातील जनतेसोबत फ्रान्सची एकात्मता दिसून आली. मुंबई आणि जगाला हादरवून टाकणाऱ्या हल्ल्यांनंतर ताज महल पॅलेस हॉटेल हे आजही धैर्य आणि पुनर्बांधणीचे प्रतीक मानले जाते.At the Taj Mahal Palace in Mumbai, we paid tribute to the victims of the 2008 attacks. To their families and loved ones, and to India: France stands with you. In the face of terrorism, unity and determination. pic.twitter.com/rcQ5fb93ZC— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) February 17, 2026दरम्यान, आज मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. या चर्चेत भारत–फ्रान्स सामरिक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेणे तसेच संरक्षण, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि डिजिटल विकास या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्याच्या उपायांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
Nitesh Rane : मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन!
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणीमहापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादरमुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री.नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर श्रीमती रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यावेळी महापौर पदावर निवड झाल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी महापौर रितू तावडे यांचे अभिनंदनही केले आहे.मंत्री नितेश राणे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, मुंबईच्या जडणघडणीत व दैदीप्यमान वाटचालीत स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे मोठे योगदान राहिले आहे. मुंबई आणि कोकणी माणूस हे एक अतूट समीकरण असून आज मुंबईत वास्तव्यास असलेला मोठा वर्ग हा मूळचा कोकणातील आहे.https://prahaar.in/2026/02/17/now-cars-will-be-driven-by-voice-high-tech-features-will-be-introduced-to-prevent-accidents-and-theft/कोकणातील नागरिकांनी मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्याने तसेच मुंबई हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शहर असल्याने कोकणातील तरुण मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण, वैद्यकीय उपचार व रोजगारासाठी मुंबईत येत असतात. मात्र मुंबईत येणाऱ्या कोकणवासीयांसाठी आजतागायत कोणताही हक्काचा निवारा उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी नमूद केले आहे.कोकणातील कला, साहित्य, इतिहास व सामाजिक उपक्रमांचे जतन व संवर्धन करण्यासाठी एक स्वतंत्र सांस्कृतिक कला-केंद्र उभारणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मुंबईत उच्च शिक्षण व वैद्यकीय कारणासाठी येणाऱ्या कोकणवासीयांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.
Pakistan News:
Today Top 10 News: महाराष्ट्र, देश-विदेश सह विविध क्षेत्रातील टाॅप बातम्या वाचा थोडक्यात...
AI Impact Summit 2026 : स्टेअरिंगला विसरा, आता आवाजावर धावणार कार! पाहा AI चे भन्नाट फीचर्स
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत नुकत्याच संपन्न झालेल्या ‘एआय समिट’ (AI Summit) मध्ये मानवी जगणे सोपे करणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यात आले. या प्रदर्शनात विशेषतः ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रगत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्रणालीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या प्रगत तंत्रज्ञानामुळे येणाऱ्या काळातील कार केवळ प्रवासाचे साधन न राहता, ती चालकाचा एक 'स्मार्ट सोबती' (Smart Companion) म्हणून काम करेल, असे चित्र या समिटमधून स्पष्ट झाले आहे.https://prahaar.in/2026/02/17/congress-harshwardhan-sapkal-apology-regarding-statement-tipu-sultan-and-shivaji-maharaj/तुमच्या आवाजावर धावणार कारदिल्लीतील एआय समिटमध्ये सादर करण्यात आलेल्या ‘व्हॉइस-कंट्रोल्ड ड्रायव्हिंग सिस्टम’ने सर्वांनाच थक्क केले आहे. आतापर्यंत कार नियंत्रित करण्यासाठी स्टेअरिंग आणि ब्रेकचा वापर अनिवार्य होता, मात्र नवीन एआय प्रणालीमुळे आता कार केवळ तुमच्या तोंडी सूचनांनुसार (Voice Commands) रस्ता कापणार आहे. चालकाने केवळ डावीकडे वळा किंवा वेग वाढवा असे आदेश दिले की कार त्या सूचनेचे पालन करेल. हे तंत्रज्ञान शारीरिक व्याधी असलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, त्यांना कोणाच्याही मदतीशिवाय स्वतः वाहन चालवणे शक्य होईल. लांबच्या प्रवासात थकवा टाळण्यासाठी आणि ड्रायव्हिंग अधिक सोयीचे करण्यासाठी हे तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल. केवळ आवाजाच्या जोरावर वाहन नियंत्रित करण्याच्या या अद्भुत तंत्रज्ञानामुळे ऑटोमोबाईल क्षेत्राची संपूर्ण व्याख्याच बदलणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.अपघातांना लगाम घालणारी नवी ‘AI फॉग अलर्ट सिस्टम’ लाँचहिवाळ्याच्या दिवसांत दाट धुक्यामुळे होणारे भीषण अपघात आता भूतकाळ ठरणार आहेत. एआय समिटमध्ये सादर करण्यात आलेल्या प्रगत ‘फॉग अलर्ट सिस्टम’मुळे (Fog Alert System) कमी दृश्यमानतेच्या (Visibility) समस्येवर कायमस्वरूपी मात करणे शक्य झाले आहे. हे तंत्रज्ञान मानवी डोळ्यांना जे दिसत नाही, ते शोधून काढण्याचे काम करते. हे तंत्रज्ञान प्रगत सेन्सर्स आणि 'एआय' विश्लेषणाच्या आधारे रस्त्यावरील वाहनांचा वेध घेते. समोरचे काहीही दिसत नसतानाही, तुमच्या वाहनासमोर किती गाड्या आहेत आणि त्या किती अंतरावर आहेत, याची रिअल-टाइम माहिती ही यंत्रणा चालकाला देते. संभाव्य धोक्याची वेळेत चेतावणी देऊन ही प्रणाली ड्रायव्हरला सावध करते, ज्यामुळे महामार्गावरील साखळी अपघात टाळता येतील. वाहतुकीच्या सुरक्षेसाठी हे तंत्रज्ञान एक ‘सुरक्षा कवच’ म्हणून ओळखले जात असून, यामुळे हिवाळ्यातील प्रवास अधिक निर्धोक होणार आहे.ड्रायव्हरला डुलकी लागताच वाजणार अलार्म...लांबच्या प्रवासात थकव्यामुळे वाहन चालकाचा डोळा लागणे आणि त्यातून होणारे जीवघेणे अपघात ही एक गंभीर समस्या आहे. यावर रामबाण उपाय म्हणून एआय समिटमध्ये प्रगत ‘फेसिअल रिकग्निशन’ (चेहरा ओळखणारी प्रणाली) तंत्रज्ञान सादर करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान ड्रायव्हरच्या प्रत्येक हालचालीवर 'तिसऱ्या डोळ्या'प्रमाणे लक्ष ठेवणार आहे. ही प्रणाली ड्रायव्हरच्या डोळ्यांच्या हालचाली आणि चेहऱ्यावरील थकव्याचे सतत निरीक्षण करते. ड्रायव्हरला झोप येत असल्याचे जाणवताच ही यंत्रणा मोठा अलार्म वाजवून त्याला सावध करते. जर ड्रायव्हरने अलार्मला प्रतिसाद दिला नाही, तर ही एआय प्रणाली कारचे नियंत्रण स्वतःकडे घेऊन वाहन आपोआप सुरक्षित ठिकाणी नेऊन पार्क करते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत क्रांतिकारी ठरणार असून, यामुळे मानवी चुकीमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यास मदत होणार आहे.आता कार चोरी करणं तर विसरूनच जा...वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना कायमचा लगाम घालण्यासाठी आता अत्याधुनिक ‘बायोमॅट्रिक सिक्युरिटी सिस्टम’ (Biometric Security System) सज्ज झाली आहे. दिल्लीतील 'एआय समिट'मध्ये सादर करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानामुळे कारची सुरक्षा आता तुमच्या स्मार्टफोनप्रमाणेच अभेद्य होणार आहे. या सिस्टीममुळे आता कार सुरू करण्यासाठी केवळ चावी असून चालणार नाही, तर ड्रायव्हरला फिंगरप्रिंट (ठसे) किंवा आयरीस स्कॅन (डोळ्यांची बाहुली) यांसारख्या बायोमॅट्रिक चाचणीतून जावे लागेल. केवळ मालक किंवा अधिकृत व्यक्तीची ओळख पटल्याशिवाय कार इंजिन सुरूच होणार नाही, त्यामुळे अनधिकृत व्यक्तीला वाहन चोरणे जवळपास अशक्य होईल. ही प्रगत प्रणाली केवळ एक चैनीची वस्तू नसून, मानवी सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. थोडक्यात, 'एआय समिट'मधील या नव्या तंत्रज्ञानामुळे भविष्यातील भारतीय रस्ते अधिक स्मार्ट आणि सुरक्षित होणार असून, वाहनधारकांची 'चोरी'ची चिंता आता कायमची मिटणार आहे.
नितेश राणे यांची केरला स्टोरी 2 – गोज बियॉन्ड या ट्रेलरवर प्रतिक्रिया, चित्रपटाला जाहीर पाठिंबा
इंस्टाग्रामवर ट्रेलर शेअर करत पाहण्याचे केले आवाहनमुंबई : आजच ‘केरला स्टोरी २ – गोज बियॉन्ड या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर ट्रेलरची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून अनेकांनी चित्रपटाविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या केरला स्टोरी या गाजलेल्या चित्रपटाचा हा पुढील भाग असल्याने प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.नितेश राणे यांचा चित्रपटाला खुला पाठिंबाभारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे यांनी ‘केरला स्टोरी’ या चित्रपटाला खुला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत प्रेक्षकांना तो पाहण्याचे आवाहन केले. नितेश राणे यांनी ट्रेलर शेअर करताना आपल्या पोस्टमध्ये चित्रपटातील विषय महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. समाजासमोर वास्तव मांडणाऱ्या आणि संवेदनशील मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या कलाकृतींना पाठिंबा देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे समर्थकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत चित्रपटाला समर्थन दर्शवले आहे.https://x.com/i/status/2023643068990456185https://www.instagram.com/reel/DU2ZIsmDLmx/?igsh=aXdwNGtybDdzcnJ5विपुल अमृतलाल शाह निर्मित सिक्वेलची दमदार मांडणीविपुल अमृतलाल शाह आणि त्यांच्या बॅनर Sunshine Pictures यांच्या पाठिंब्याने तयार झालेल्या ‘द केरळ स्टोरी 2 – गोज बियॉन्ड’चा दमदार ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या चित्रपटांपैकी एकाच्या पुनरागमनाचा हा संकेत मानला जात आहे. २०२२ मधील केरला स्टोरी या चित्रपटाचा हा पुढील भाग असून, आधीपेक्षा अधिक गडद आणि व्यापक कथा मांडण्याचे आश्वासन देतो. अनेक राज्ये आणि वैयक्तिक शोकांतिकांना समेटणारी ही कथा अधिक तीव्र स्वरूपात समोर येणार आहे.कामाख्या नारायण सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट तीन हिंदू मुली — उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा — यांच्या धक्कादायक कथेला पडद्यावर आणतो. त्यांच्या आयुष्याला भीषण वळण तेव्हा मिळते, जेव्हा त्या तीन मुस्लिम तरुणांच्या प्रेमात पडतात आणि त्या नात्यांमागे धर्मांतराचा कथित अजेंडा असल्याचे उघड होते.‘द केरळ स्टोरी’च्या जबरदस्त प्रभावानंतर, ज्याने आपल्या ठळक मांडणीमुळे देशभरात चर्चा निर्माण केली होती, हा सिक्वेल अधिक पुढे जाण्याचे आश्वासन देतो. विपुल अमृतलाल शाह निर्मित आणि आशिन ए. शाह सहनिर्मित ‘द केरळ स्टोरी २ – गोज बियॉन्ड’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
डिसेंबर २०२६ पर्यंत दोन मार्गिका सुरू होणारमुंबई : मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी आता मेट्रोप्रमाणे जलवाहतुकीवर भर दिला जाणार आहे. कोचीच्या धर्तीवर मुंबईसह महानगरात 'वॉटर मेट्रो' सुरू करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात डिसेंबर २०२६ पर्यंत दोन मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, अशी घोषणा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली.यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, ज्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मेट्रोचे जाळे यशस्वीपणे उभारले, त्याचप्रमाणे जलवाहतुकीचे जाळे निर्माण करणे हा आमचा 'ड्रीम प्रोजेक्ट' आहे. मागील दीड वर्षांपासून आम्ही या प्रकल्पावर काम करीत आहोत. मुंबई महानगरात एकूण ७ ते ८ मार्ग निश्चित करण्यात आले असून, प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे. या महिनाअखेरीस हा अहवाल प्राप्त झाल्यावर तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाईल.मुंबईत जशी मेट्रो, लोकल, रिक्षा, टॅक्सी अशी प्रवासाची साधने आहेत, त्याप्रकारे आम्ही 'मुंबई वॉटर मेट्रो' ही सुविधा मुंबईकरांच्या सेवेत आणत आहोत. त्यासाठी एकात्मिक तिकीट प्रणाली देखील असेल. यापैकी दोन मार्गिक डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू करण्याचा मानस असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले. मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी आणि सुखकर प्रवासासाठी 'मुंबई वॉटर मेट्रो' हा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वासही नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.'कँडेला' कंपनीसोबत लवकरच करार:पत्रकार परिषदेपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी वॉटर मेट्रोसाठी स्वीडनमधील जगप्रसिद्ध 'कँडेला' कंपनीसोबत मंत्रालयात महत्त्वाची बैठक घेतली. या प्रकल्पात 'हायड्रोफॉईल' या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. विदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून या बोटी तयार करण्यासंदर्भात कंपनीचे संस्थापक आणि सीईओ गुस्ताव हॅसेल्सकोग यांच्यासह सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला नकुल विराट, अंशुल दवानी, अंबर आयदे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:१) एकात्मिक तिकीट प्रणाली : मेट्रो, लोकल बेस्टप्रमाणेच वॉटर मेट्रोसाठीही एकात्मिक तिकीट प्रणाली असेल.२) प्रदूषणमुक्त प्रवास : अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही वाहतूक पर्यावरणपूरक आणि वेगवान असेल.३) पहिला टप्पा : एमएमआर क्षेत्रात डिसेंबर २०२६ पर्यंत दोन मार्ग सुरू करण्याचे नियोजन.४) कनेक्टिव्हिटी : मुंबईतील विविध किनारपट्ट्यांना जोडण्यावर विशेष भर.
S Jaishankar : “भारताचे प्रभावीपणे संबंधवाढीसाठी प्रयत्न”–एस जयशंकर
अलिकडील व्यापार करारांमुळे देशाच्या वाढत्या आर्थिक प्रभावाचे ते पुरावे आहेत. असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे.
Rohit Sharma : हास्यजत्रेच्या कलाकारांनी घेतली रोहित शर्माची भेट; नेमका त्यांच्यात काय झाला संवाद?
भारताचा स्टार सलामीवीर आणि माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा चाहतावर्ग देशभरात आणि जगभरात प्रचंड मोठा आहे. चाहते त्यांची एक छोटीशी झलक पाहण्यासाठीही नेहमीच आतुर असतात.
टी-20 विश्व कप २०२६ (T20 World Cup 2026) मध्ये सुपर ८ ची शर्यत आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. न्यूझीलंडने आज कॅनडाचा पराभव करून सुपर ८ साठी क्वालिफाय केले आहे. यामुळे सुपर ८ मध्ये प्रवेश करणाऱ्या संघांची संख्या आता सहा झाली आहे.
(The Kerala Story 2 Trailer) ट्रेलरनंतर या चित्रपटाबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. पहिल्या भागाप्रमाणेच हा सीक्वलही बॉक्स ऑफिसवर आणि सार्वजनिक चर्चेत किती प्रभाव टाकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Emmanuel Macron India Visit: पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चेला सुरुवात
मुंबई: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सोमवारी रात्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर प्रथम महिला ब्रिजिट मॅक्रॉन यांच्यासह मुंबईत दाखल झाले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विमानतळावर फ्रान्सचे अध्यक्ष आणि प्रथम महिला यांचे स्वागत केले.त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्यातील भेटीचे फोटोही समोर आले आहेत. दोन्ही नेते एकमेकांना हात मिळवताना आणि फोटोशूटसाठी पोझ देताना दिसत आहेत. आज संध्याकाळी, दोन्ही नेते भारत-फ्रान्स इनोव्हेशन इयर २०२६ चे उद्घाटन करतील. यावेळी मोदी आणि मॅक्रॉन उद्योगपती, स्टार्टअप संस्थापक, संशोधन तज्ञ आणि नवोन्मेषी नेत्यांना संबोधित करतील. मॅक्रॉन दिल्ली येथे होणाऱ्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये देखील सहभागी होतील.अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याकडून २६/११ हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली :पंतप्रधान मोदींची भेट घेण्याआधी अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मुंबईतील ताजमहाल पॅलेसमध्ये २६/११ हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली वाहिली. तर दुसरीकडे, पंतप्रधान मोदींनी एक्स वरून अध्यक्ष मॅक्रॉन यांचे स्वागत केले आणि लिहिले, भारत तुमच्या भेटीसाठी आणि भारत - फ्रान्स यांच्यातील परस्पर संबंध नवीन उंचीवर नेण्यास मी उत्सुक आहे. मला विश्वास आहे की आपल्या चर्चेमुळे सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य आणखी मजबूत होईल आणि जागतिक प्रगतीला हातभार लागेल.#WATCH मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने लोक भवन में फ्रांस के राष्ट्रपति इमैनुएल मैक्रों के साथ द्विपक्षीय बैठक की।(सोर्स: DD) pic.twitter.com/CU0jRhSVbw— ANI_HindiNews (@AHindinews) February 17, 2026फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा हा चौथा भारत दौरा आहे. यापूर्वी ते २०१८, २०२३ आणि २०२४ मध्ये भारत दौऱ्यावर आले होते.भारत आणि फ्रान्समध्ये १९९८ पासून धोरणात्मक भागीदारी आहे आणि दोन्ही देश संरक्षण, तंत्रज्ञान, अवकाश आणि ऊर्जा यासारख्या क्षेत्रात एकत्र काम करत आहेत. या सहकार्याला आणखी बळकटी देण्यासाठीही ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) मते, पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्यातील चर्चेत भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी अंतर्गत झालेल्या प्रगतीचा व्यापक आढावा घेतला जाईल.
Bangladesh New PM: तारिक रहमान बनले बांगलादेशचे पंतप्रधान, ‘या’नेत्यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
Bangladesh New PM: बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) चे प्रमुख तारिक रहमान यांनी मंगळवारी बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
टी-20 विश्व कप २०२६ चालू असताना भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांना आयपीएलमध्ये परतण्याची एक मोठी आणि आकर्षक ऑफर मिळाली आहे.
T20 World Cup 2026 NZ vs Can: कॅनडाला हरवत न्यूझीलंड संघाचा दिमाखात 'सुपर ८'मध्ये प्रवेश
चेन्नई: आज १७ फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध कॅनडा या मॅचमध्ये ग्लेन फिलिप्सने न्यूझीलंडसाठी टी-२० विश्वचषक इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावत कॅनडावर आठ विकेट्सने विजय मिळवला आणि ग्रुप डी मधून सुपर ८ मध्ये आपले स्थान देखील निश्चित केले.दोन्ही संघांसाठी जिंकणे आवश्यक असलेल्या या सामन्यात, कॅनडाने फलंदाजीचा निर्णय घेतला. युवराज समर आपल्या विक्रमी ११० धावांच्या खेळीमुळे टी२० विश्वचषक इतिहासातील सर्वात तरुण शतक करणारा खेळाडू ठरला. कॅनडाने दिलेले १७४ धावांचे लक्ष न्यूझीलंड संघाने १५.१ ओवरमध्ये पूर्ण करत सुपर ८ मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. या सामन्यात ग्लेन फिलिप्सने ३६ चेंडूंमध्ये ७६ धावा करून 'प्लेअर ऑफ द मॅच' चा किताब पटकावला.या सामन्यात कॅनडाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती. त्यांचा सलामीवीर युवराज समराने शतकी खेळी केली. त्याने ६५ चेंडूत ११० धावा केल्या. त्यामुळे कॅनडाने २० षटकात ४ विकेट्स गमावत १७३ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात वाईट झाली. टीम सीफर्ट ६ धावा करत बाद झाला. त्यानंतर पाठोपाठच फॉर्ममध्ये असणारा फिन ऍलनही २१ धावा करत बाद झाला. त्याने ८ चेंडूत २ चौकार आणि एक षटकार मारले. यामुळे ३.१ षटकात न्यूझीलंडची स्थिती ३० धावा आणि २ विकेट्स अशी झाली. पुन्हा एकदा मोठा उलटफेर दिसतो की काय असे वाटत असताना रचिन रविंद्र आणि ग्लेन फिलिप्स यांनी ताबडतोब फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.New Zealand seal their #T20WorldCup Super 8 spot with a comfortable win against Canada in Chennai : https://t.co/meUw66ZU1j pic.twitter.com/xBKjYSNwaR— ICC (@ICC) February 17, 2026रविंद्र आणि फिलिप्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७२ चेंडूत १४६ धावांची भागीदारी केली. ही न्यूझीलंडची टी२० विश्वचषकातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. पहिल्या स्थानावर सीफर्ट ऍलनने याच स्पर्धेत केलेली नाबाद १७५ धावांची भागीदारी आहे.यावेळी रविंद्र ३९ चेंडूत ५९ धावा करत नाबाद राहिला. यामध्ये त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. तसेच फिलिप्सने २२ चेडूतच ५० धावा पूर्ण केल्या. यामुळे तो टी२० विश्वचषकात न्यूझीलंडकडून सर्वात जलद अर्धशतकी खेळी करणारा फलंदाज ठरला.न्यूझीलंडच्या या विजयामुळे अफगाणिस्तान, कॅनडा आणि युएई हे संघ स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. त्यामुळे ग्रुप डी मधून आता दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे दोन संघ सुपर ८ मध्ये पोहोचले आहेत.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करण्याच्या धाडसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना अखेर नमते घ्यावे लागले आहे. भारतीय जनता पक्षाने पुकारलेल्या राज्यव्यापी एल्गारानंतर आणि शिवप्रेमींच्या तीव्र आंदोलनासमोर सपकाळ यांनी हात जोडत आपली दिलगिरी व्यक्त केली. ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्यांच्याप्रती मी दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत सपकाळ यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.https://prahaar.in/2026/02/17/pune-news-u-turn-near-pune-university-is-dangerous-accidents-increase-due-to-violation-of-rules/भाजपचा आक्रमक पवित्रा आणि सपकाळांची सारवासारवकाँग्रेसने नेहमीच तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप भाजपने केला आहे. टिपू सुलतानसारख्या वादग्रस्त व्यक्तीचा आदर्श छत्रपती शिवरायांशी जोडणे, हा केवळ महाराजांचा अपमान नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेवर केलेला घाला आहे, अशी भूमिका भाजपने मांडली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आणि इतर शहरांत रस्त्यावर उतरून सपकाळ यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. या वाढत्या दबावामुळे सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिले की, मी तुलना केलीच नव्हती, माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला. मात्र, भाजपने याला काँग्रेसची नेहमीची 'यु-टर्न' घेण्याची पद्धत म्हटले आहे.टिपू सुलतानांचे उदात्तीकरण खपवून घेणार नाहीसपकाळ यांनी आपल्या स्पष्टीकरणात टिपू सुलतानांचा उल्लेख संविधानातील प्रतिमेचा दाखला देत केला आणि त्यांना शिवरायांकडून प्रेरणा घेणारे म्हटले. यावर भाजप नेत्यांनी पलटवार केला आहे. हिंदूंचे दमन करणाऱ्या टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करण्यासाठी शिवरायांच्या नावाचा आधार घेणे हे काँग्रेसचे दिवाळखोर वैचारिक धोरण आहे, अशी टीका भाजपकडून करण्यात आली. धर्मांतराचे आणि अत्याचाराचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीची तुलना स्वराज्याच्या संस्थापकांशी करणे ही शिवद्रोहाचीच कृती असल्याचे भाजपने ठामपणे सांगितले.धार्मिक तेढ निर्माण करण्याचा काँग्रेसचा डाव?सपकाळ यांनी उलट भाजपवरच धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप केला असला, तरी भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. लोकांच्या भावना भडकवणारी वक्तव्ये काँग्रेसचे नेते करतात आणि जेव्हा जनता जाब विचारते, तेव्हा भाजपवर खापर फोडतात, असा टोला भाजप प्रवक्त्यांनी लगावला. अखेर जनरेटा आणि शिवप्रेमींचा रोष पाहता सपकाळ यांना माफी मागावी लागली, हा भाजपच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आणि शिवरायांच्या सन्मानाचा विजय असल्याचे मानले जात आहे.
Wagholi News : पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी घेतले वाघेश्वराचे दर्शन
पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी वाघोली (Wagholi News) येथे वाघेश्वराचे दर्शन घेतले. वाघोली येथील ऐतिहासिक श्री वाघेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास उपस्थिती दर्शवली.
Bhupen Kumar Borah : काँग्रेस आता धर्मनिरपेक्ष उरली नाही; भूपेन बोरा यांचा पक्षाला घरचा आहेर
आसाम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेन बोरा (Bhupen Kumar Borah) यांच्या राजीनाम्याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. हायकमांड म्हणत आहे की, त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. परंतु बोरा त्यांच्या भूमिकेपासून मागे हटलेले नाहीत.
मुंबई आणि महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) आपला यंदाचा वार्षिक अर्थसंकल्प जाहीर केला आहे. मुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या १६० व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत ४८ हजार कोटी रुपयांच्या भव्य अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, गेल्या नऊ वर्षांच्या तूट सोसल्यानंतर प्राधिकरणाने प्रथमच १७ लाख रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर करून आर्थिक शिस्तीचे दर्शन घडवले आहे. या अर्थसंकल्पातील तब्बल ७५ टक्के रक्कम ही पायाभूत सुविधांवर खर्च केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो प्रकल्प, उड्डाणपूल, बोगदे, बाह्य वळण रस्ते आणि महत्त्वाच्या उड्डाणपुलांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. एमएमआर परिसरात भविष्यात उद्भवणाऱ्या पाण्याची गरज ओळखून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी नियोजनासाठी विशेष तरतूद आणि ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि वेगवान करण्यासाठी मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार करण्यावर मोठा भर देण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेशाला वाहतूक कोंडीतून मुक्त करणे आणि नागरिकांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या मोठ्या गुंतवणुकीमुळे आगामी काळात मुंबई आणि उपनगरातील पायाभूत सुविधांच्या कामांना मोठी गती मिळण्याची चिन्हे आहेत.https://prahaar.in/2026/02/17/salman-khan-father-salim-khan-hospitalized-in-lilavati-hospital-mumbai/बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे एमएमआर क्षेत्रातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी युद्धपातळीवर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. प्रदेशातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ‘पोशीर' आणि 'शिलार' या दोन्ही धरणांच्या कामांना तातडीने गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करण्यात आली आहे. एमएमआर क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ३३७ किलोमीटर मेट्रो जाळ्यासोबत पॉड टॅक्सी, बोट टॅक्सी, मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी, फ्लायओव्हर, अंडरग्राउंड रस्ते आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांचा एकत्रित आराखडा राबवण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मेट्रो नेटवर्कसाठी १३ हजार ८३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मेट्रो मार्ग ४,६,५,२ ब आणि मार्ग १२ या प्रकल्पांना वेग द्यावा असे सांगितले. एमएमआर क्षेत्रातील सर्व प्रमुख मनपांचा मिळून नीती आयोगाच्या मदतीने एक 'बृहद आराखडा' तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशहीउपमुख्यमंत्र्यांनी दिले. लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी बीकेसीमध्ये पॉड टॅक्सी सेवा तर ठाणे व मीरा-भाईंदर येथे बोट टॅक्सीचा प्रयोग केला जाणार आहे. मेट्रो-बस-जलवाहतूक यांची एकत्रित जोडणी करून प्रवास अधिक जलद करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी डबल डेकर फ्लायओव्हर, अंडरग्राउंड टनेलिंग प्रकल्प, कोस्टल रोड आणि भिवंडी-नाशिक मार्गावरील पर्यायी रस्ते उभारले जात आहेत. ट्रॅफिक ब्लॅकस्पॉट ओळखण्यासाठी स्वतंत्र अभ्यासही करण्यात येणार आहे. मुंबईतील एलफिन्स्टन पुलाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे आणि घोडबंदर रोडवरील रस्ता रुंदीकरणाचे काम महिनाभरात पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले. मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असून एमएमआरडीएच्या माध्यमातून रमाबाई आंबेडकर नगर येथील १७ हजार घरांच्या प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी एसआरएकडून नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. मुंबईत १७ प्रकल्पांची यादी तयार असून ठाण्यात पाच इमारतींच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. रस्ते, मेट्रो, धरण यासोबतच एमएमारडीएच्या माध्यमातून चांगली घरे देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई : राज्यात सध्या अक्षय ऊर्जेची क्षमता झपाट्याने वाढवली जात असून, २०३० पर्यंत एकूण वीज निर्मितीत हरित ऊर्जेचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. यासाठी ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहतूक आणि शाश्वत पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.देशातील पहिल्या 'मुंबई क्लायमेट वीक'चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड सेंटर येथे झाले. यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि जागतिक पर्यावरणातील मान्यवर उपस्थित होते. हवामान कृतीकडे आम्ही केवळ नियमांचे पालन म्हणून पाहत नाही, तर ती गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीची एक मोठी संधी मानतो. जे राज्य हे बदल वेगाने स्वीकारेल, तेच जागतिक भांडवल आणि कौशल्य आकर्षित करू शकेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.हवामान बदलाचे संकट हे केवळ पर्यावरणीय आव्हान नसून, भविष्यातील आर्थिक स्पर्धात्मकतेची ती एक 'किल्ली' आहे. या बदलाचा फटका मुंबईसारख्या किनारी शहरांना आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. त्यामुळे हवामान बदलावरील कृती कार्यक्रमाचे जागतिक नेतृत्व करण्यास महाराष्ट्र आता पूर्णपणे सज्ज आहे, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.महाराष्ट्राला अतिरिक्त १ लाख सौर पंप'पीएम कुसुम' योजनेत महाराष्ट्राने देशात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्याचे कौतुक केले. या यशाची दखल घेत त्यांनी महाराष्ट्रासाठी आणखी १ लाख सौर कृषी पंप मंजूर करण्याची घोषणा यावेळी केली. भारत आर्थिक विकास आणि उत्सर्जन कपात यांची सांगड घालून जगासमोर आदर्श निर्माण करत आहे, असे जोशी म्हणाले.जागतिक करारांवर स्वाक्षरीया परिषदेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दोन महत्त्वाचे सामंजस्य करार केले. संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम आणि 'सी-४० सिटीज' या जागतिक संस्थांच्या सोबतीने मुंबईचा 'हवामान अनुकूल आराखडा' तयार केला जाणार आहे.
Nagpur Accident: कबड्डीपटूंना बुलेट स्टंटबाजी नडली, भर रस्त्यात करुण अंत
नागपूर: नागपूर शहरातील दोन तरुण कबड्डीपटूंना बुलेट वरून स्टंटबाजी करणं महागात पडलं आहे. या स्टंटबाजीमुळे दोन्ही खेळाडूंना जागीच आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे शहरात सध्या सर्वत्र काळजी आणि संतापाचं वातावरण आहे.वर्धा मार्गावरील जनता चौक ते बजाजनगर चौक दरम्यान ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, काल रात्री (१६ फेब्रुवारी) सुमारे ११ ते १२ च्या दरम्यान जीटी बुलेटवर स्वार असलेले दोन युवक वारंवार चौकातून वेगात फेऱ्या मारताना दिसत होते. सिग्नलचे पालन न करता त्यांनी दोन वेळा जनता चौक ते बजाजनगर या मार्गावरून सतत स्टंटबाजी केली. विष्णूजी की रसोईसमोरून जात असताना त्यांनी एका महिला दुचाकीस्वाराला कट मारला आणि त्यांचा बुलेटवरील ताबा सुटला आणि बुलेट रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या पिलरवर आदळली.या अपघातात १९ वर्षीय युग विशाल चनकापूरे आणि १९ वर्षीय रुद्र शशिकांत सोमकुंवर, दोघेही रा. काचीपुरा, गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तत्काळ त्यांना रामदासपेठ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेनंतर नागरिकांनी वर्धा मार्गावर रात्रीच्या वेळी विशेष वाहतूक मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.
Pune News : पुणे विद्यापीठाजवळील यू-टर्न धोकादायक; नियमभंगामुळे अपघातांत वाढ
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील ब्रेमेन चौक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळील कॉसमॉस बँक येथील यू-टर्न वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. या परिसरात दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने वाहनचालकांना प्रचंड मन:स्ताप होतो. त्यामुळे अपघातप्रवण आणि सतत कोंडी होणाऱ्या ठिकाणी पुरेसे वाहतूक पोलिस नेमण्याची, तसेच गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.गणेशखिंड रस्ता, ब्रेमेन चौक आणि एनसीएल परिसरात सकाळी आणि सायंकाळी वाहनांची मोठी वर्दळ असते. विशेषतः कॉसमॉस बँकेजवळील यू-टर्नवरून सेनापती बापट रस्त्याकडे वळताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. या ठिकाणी दुचाकी, चारचाकी आणि सार्वजनिक वाहतुकीची वाहने एकाच वेळी वळण घेत असल्याने गोंधळ निर्माण होतो. अनेक चालक घाईत वळण घेत असल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. काही वाहनचालक विरुद्ध दिशेने येत असल्याने पादचाऱ्यांसाठीही हा परिसर अधिकच धोकादायक ठरत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
Cyberattacks in India २०२५ मध्ये सायबर हल्ल्यांची तीव्रता आणि वेग दोन्ही वाढले आहेत. पूर्वी हल्ले प्रामुख्याने मॅन्युअल पद्धतीने केले जात होते. आता मात्र हल्लेखोर ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करत आहेत.
धक्राकादायक! १५ वर्षाच्या भाच्याकडून आत्याचा खून
वसई : वसई परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रागाच्या भरात एका १५ वर्षीय मुलाने आपल्या आत्याचा खून केल्याची घटना सोमवारी (१६ फेब्रुवारी) मध्यरात्री घडली. ६० वर्षीय महिलेच्या खुनाची बातमी समोर येताच केवळ दोन तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. माणिकपूर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत तपास पूर्ण करत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.नेमकं प्रकरण काय ?बऱ्हाणपूर उमेळमान गावातील ‘भीमाई’ नावाच्या बंगल्यात दुर्गा संजय बनसोडे या एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा वालीव येथे राहत असून, सोमवारी दिवसभर संपर्क न झाल्याने आईची काळजी वाटली म्हणून आईला भेटण्यासाठी तो रात्री घरी आला आणि त्याला घरात हॉलमध्ये रक्ताचे डाग दिसले. त्यानंतर तातडीने त्याने पोलिसांना कळवलं.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. तेव्हा त्यांना डरूममध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. बेडरूम मधील बेडवरची गादी बाजूला काढण्यात आली होती तसेच खोलीच्या दरवाजाला बाहेरून स्क्रूड्रायव्हर लावण्यात आल्याचे दिसून आले. यावरून गुन्हा पूर्वनियोजित असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला .कौटुंबिक रागातून गुन्हा?मृत महिलेने काही कारणावरून ओरडल्याचा राग मनात धरून आरोपीने आपल्या १६ वर्षीय मित्राच्या मदतीने हे टोकाचे उचलल्याचे पोलिसांनी संगितले. आरोपी मुलगा हा महिलेच्या भावाचा मुलगा असून त्या महिलेच्या घराच्या जवळच राहत होता.कौटुंबिक वादातून घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे वसई परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अल्पवयीन मुलांकडून घडलेल्या या गुन्ह्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यावर शोककळा पसरलेली असताना, मंत्रालयातील अल्पसंख्याक विभागाने ७५ शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र देण्याचा प्रताप केला. त्याची राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यामध्ये मंत्रालयातील एका उपसचिवाचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ज्यांनी कोणी या प्रक्रियेत अनियमितता किंवा गडबड केली असेल, त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दिला.२८ जानेवारी रोजी अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. संपूर्ण राज्य या धक्क्यातून सावरत असतानाच, अल्पसंख्याक विकास विभागाने मागील ऑगस्टपासून प्रलंबित असलेली ७५ प्रमाणपत्रे अवघ्या काही तासांत वितरित केली. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने मुख्यमंत्र्यांनी या प्रमाणपत्रांना तात्काळ स्थगिती दिली असून दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.हवामान बदलाचा सामना करण्यासाठी 'मुंबई सज्ज'मुंबईत मंगळवारपासून देशातील पहिली ‘मुंबई क्लायमेट वीक’ परिषद जिओ वर्ल्ड सेंटर येथे सुरू झाली. महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की, हवामान बदलाचा (क्लायमेट चेंज) सामना करताना हवेची आणि पाण्याची गुणवत्ता सुधारून 'लाईफ क्वालिटी' उत्तम करणे हे आमचे लक्ष्य आहे. ही परिषद दरवर्षी मुंबईत आयोजित केली जाईल. या परिषदेसाठी ३५ देशांतील प्रतिनिधी उपस्थित आहेत.‘ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन’चा शुभारंभशेती क्षेत्रावर होणारा हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी काही प्रभावी मॉडेल्स आणि स्टार्टअप्स या परिषदेत पुढे आले आहेत. याचा राज्यातील बळीराजाला मोठा फायदा होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. दरम्यान, मुंबईत ‘ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन’ या तीन दिवसीय शिखर परिषदेचाही प्रारंभ झाला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि नव्या पुरवठा साखळ्या निर्माण करण्याच्या दृष्टीने ही परिषद अत्यंत महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. जगभरातील मान्यवर नेते या मंचावरून पुढील तीन दिवस विचारमंथन करणार आहेत.
Imran Khan: सध्या तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बिघडत्या प्रकृतीबाबत चौदा माजी पाकिस्तानी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला पत्र लिहिले आहे.
नवी दिल्ली: महाराष्ट्राची लाडकी आणि भारताची सुपरस्टार उपकर्णधार स्मृती मानधना हीचा बीबीसी कडून मोठा सन्मान करण्यात आला आहे. स्मृतीला २०२५ साठी बीबीसी 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.भारतीय महिला संघाने २०२५ साली एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. भारतीय संघाच्या या विजयात स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने महत्त्वाची अशी कामगिरी बजावली होती. त्यामुळेच स्मृती मानधना ही 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर' पुरस्काराची मानकरी ठरली. सोमवारी (१६ फेब्रुवारी) दिल्लीत पार पडलेल्या भव्य सोहळ्यात बीबीसी पुरस्काराच्या मानकऱ्यांना गौरवण्यात आले आहे.A year to remember. An honour to match. 2025 belonged to Smriti Mandhana. Runs, records, leadership, silverware… she did it all. A year written in . ❤️ #PlayBold #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/hBLf7eObNA— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 17, 2026स्मृती मानधना ही सध्या भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. परदेशात असल्यामुळे ती कालच्या या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकली नाही. मात्र तिने एका व्हिडिओच्या माध्यमातून पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल बीबीसीचे आभार मानले. भारतीय महिला क्रिकेटसाठी २०२५ हे वर्ष खूपच खास राहिले. भारतीय संघाच्या विश्वचषक विजयात मी योगदान देऊ शकले, याचा मला आनंद असल्याची भावना स्मृती मानधना हिने यावेळी बोलून दाखवली.स्मृती सोबतच बीबीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द ईयर (उदयोन्मुख खेळाडू) म्हणून बुद्धिबळ ग्रँडमास्टर दिव्या देशमुख, बीबीसी पॅरा-स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर म्हणून पॅरा-अॅथलीट प्रीती पाल आणि बीबीसी लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड म्हणून नेमबाज अंजली भागवत यांना गौरण्यात आले.
मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज पटकथालेखक आणि अभिनेता सलमान खानचे (Salman Khan) वडील सलीम खान (Saleem Khan) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील वांद्रे येथील लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर आयसीयू (ICU) मध्ये उपचार सुरू आहेत. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच सोशल मीडियावर पापाराझी विरल भयानीने रुग्णालयाबाहेरील एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये रुग्णालयाबाहेरील हालचाली दिसून येत आहेत. वडिलांच्या प्रकृतीची माहिती मिळताच अभिनेता सलमान खान आपले सर्व काम सोडून तडकाफडकी लीलावती रुग्णालयात पोहोचला. यावेळी सलमानच्या चेहऱ्यावर वडिलांच्या प्रकृतीबद्दलची चिंता स्पष्टपणे जाणवत होती. सलीम खान यांना नेमका कोणता त्रास होत आहे, याबाबत खान कुटुंबीयांकडून किंवा डॉक्टरांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यांचे निवासस्थान असलेल्या 'गॅलेक्सी अपार्टमेंट'पासून जवळच हे रुग्णालय असल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळणे सोपे झाले आहे. सध्या संपूर्ण सिनेसृष्टी आणि त्यांचे चाहते सलीम खान यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत असून, कुटुंबीयांकडून हेल्थ अपडेटची प्रतीक्षा केली जात आहे.https://prahaar.in/2026/02/17/the-kerala-story-2-goes-beyond-trailer-hard-hitting-sequel-that-refuses-to-stay-silent/नुकताच साजरा केला होता ९० वा वाढदिवसभारतीय चित्रपटसृष्टीला 'शोले', 'जंजीर' आणि 'दीवार'सारखे अजरामर चित्रपट देणारे प्रसिद्ध पटकथालेखक सलीम खान सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. बॉलिवूडमध्ये 'सलीम-जावेद' या जोडीने जो इतिहास रचला, त्याचे सलीम खान हे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. गेल्या काही काळापासून ते कौटुंबिक सोहळ्यांमध्ये आनंदाने सहभागी होताना दिसत होते. विशेष म्हणजे, नुकताच त्यांनी आपल्या लग्नाचा ६१ वा वाढदिवस उत्साहात साजरा केला होता, परंतु आता त्यांच्या प्रकृतीची बातमी आल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सलीम खान यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच चर्चेत राहिले आहे. १९६४ मध्ये त्यांनी सलमा खान यांच्याशी विवाह केला, ज्यांच्यापासून त्यांना सलमान, अरबाज, सोहैल आणि अलवीरा ही चार मुले आहेत. त्यानंतर १९८१ मध्ये त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरे लग्न केले आणि अर्पिताला दत्तक घेऊन आपल्या कुटुंबाचा विस्तार केला. गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी सलीम खान यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केली. मात्र, त्यांच्या या वाढदिवसाला दु:खाची किनार होती, कारण नेमक्या त्याच दिवशी त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले होते. सध्या सलीम खान यांना नेमका काय त्रास होत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खान कुटुंबाने याबद्दल कमालीची गुप्तता पाळली असून, चाहते आता अधिकृत 'हेल्थ अपडेट'ची प्रतीक्षा करत आहेत. वडीलधाऱ्या सलीम खान यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, यासाठी सोशल मीडियावर प्रार्थनांचा ओघ सुरू झाला आहे.
Nashik: नाशिक-कळवण मार्गावर दोन कारची धडक; सात जण गंभीर जखमी
नाशिक: सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी वणीगडाकडे जाणाऱ्या भाविकांच्या कारला नाशिक-कळवण मार्गावर भीषण अपघाताचा सामना करावा लागला आहे. दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांतील ६ ते ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गाड्यांमध्ये अडकलेल्या जखमींना नागरिकांनी मोठ्या शर्थीने बाहेर काढले.जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भररस्त्यात दोन गाड्या एकमेकांना धडकल्याने नाशिक-कळवण मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजूला सारली आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले.सध्या वणीगडावर भाविकांची मोठी गर्दी होत असून, घाटातील आणि महामार्गावरील वाहतूक वाढली आहे. अशा वेळी वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वळणांवर सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Ajit Pawar Plane Accident: विमान वाहतूक मंत्रालयाने दिली मोठी अपडेट; घेणार परदेशी तज्ज्ञांची मदत
मुंबई: बुधवार २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर गुरुवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात झालेल्या अंत्यसंस्कारावेळी त्यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांनी पार्थिवाला मुखाग्नि दिला. ‘अजित दादा अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज २० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्याप या प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. अशातच विमान वाहतूक मंत्रालयाकडून मोठी अपडेट समोर आली आहे. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी आता परदेशी तज्ज्ञांची मदत घेणार असल्याचे विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले आहे.दोन्ही रेकॉर्डरचे आगीत नुकसान, परदेशी तज्ज्ञांची घेणार मदत:अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स सापडला होता. मात्र आगीत हा ब्लॅक बॉक्स जास्तच जळाल्याचे समोर आले. आता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पहिल्यांदाच या अपघाताविषयी अधिकृत माहिती दिली आहे. विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर होते, ज्यात एक डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) आणि एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) यांचा समावेश आहे. अपघातादरम्यान दोन्ही रेकॉर्डर दीर्घकाळ उच्च तापमानात होती आणि आगीमुळे त्यांचे खूप नुकसान झाले असं त्यांनी माहिती दिली. त्यामुळे डेटा रिकव्हरी करण्यासाठी दुसऱ्या देशाची मदत घेतली जाणार असल्याचे विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले आहे.
Ravi river dam:
Mrunal Thakur मृणाल म्हणाली की, संधी तिच्याकडे सहजपणे आल्या नाहीत. “मला कामासाठी प्रयत्न करावे लागले. दिग्दर्शकांच्या लक्षात राहण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागला,” असे ती म्हणाली.
नवी दिल्ली: दिल्ली येथे आयोजित पाच दिवसीय इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६च्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की या शिखर परिषदेचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर सर्वांच्या हितासाठी कसा करता येईल हे शोधणे आहे.पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये लिहिले, “बुद्धिमत्ता, तर्कशुद्धता आणि निर्णयक्षमता विज्ञान व तंत्रज्ञानाला जनतेसाठी उपयुक्त बनवतात. इंडिया एआय इम्पॅक्ट समिटचा उद्देश एआयचा उपयोग सर्वांच्या फायद्यासाठी कसा करता येईल हे शोधणे हा देखील आहे.”अनेक मान्यवर एकाच व्यासपीठावर उपस्थित होणार:१६ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रप्रमुख, सरकारप्रमुख, मंत्री, जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते, प्रख्यात संशोधक, बहुपक्षीय संस्थांचे प्रतिनिधी आणि उद्योगक्षेत्रातील हितधारक एकाच व्यासपीठावर आले आहेत. समावेशक विकासाला चालना देणे, सार्वजनिक यंत्रणा बळकट करणे आणि शाश्वत विकासाला गती देण्यासाठी एआयची भूमिका काय असू शकते यावर चर्चा करणे हा यामागील उद्देश आहे. या विषयावर इतक्या मोठ्या प्रमाणात जागतिक परिषद ‘ग्लोबल साऊथ’मध्ये आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.India AI Impact Expo 2026 was a powerful convergence of ideas, innovation and intent.It showcased the extraordinary potential of Indian talent in shaping the future of Artificial Intelligence for global good.Above all, it reaffirmed our commitment to harnessing AI… pic.twitter.com/jfVWCP4BHh— Narendra Modi (@narendramodi) February 17, 2026१०० हून अधिक सरकारी प्रतिनिधींचा सहभाग:२० फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या पाच दिवसीय परिषदेत १०० हून अधिक सरकारी प्रतिनिधी सहभागी झाले आहेत, ज्यामध्ये २० पेक्षा जास्त राष्ट्रप्रमुख तसेच ६० मंत्री व उपमंत्री यांचा समावेश आहे. याशिवाय सीईओ, संस्थापक, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, सीटीओ आणि परोपकारी संस्थांचे प्रतिनिधी अशा ५०० हून अधिक जागतिक एआय क्षेत्रातील नेत्यांनी सहभाग नोंदवला आहे. १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनपर भाषण देणार असून ते जागतिक सहकार्याची दिशा निश्चित करतील आणि एआयबाबत भारताचा दृष्टिकोन मांडतील.
Bhandup Railway Station: भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना येण्यास बंदी; प्रवाशांची धावपळ होणार
मुंबई: दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बेस्ट बस अपघातानंतर भांडुप रेल्वे स्थानक परिसरात प्रशासनाने वाहतूक नियंत्रणासाठी महत्त्वाच्या उपाययोजना अमलात आणल्या आहेत. अपघातानंतर स्थानकाबाहेरील वाढती गर्दी आणि तीव्र वाहतूक कोंडी लक्षात घेता रिक्षांना थेट स्टेशन प्रवेशद्वारापर्यंत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस ठराविक अंतरावर सीमारेषा आखण्यात आली असून ती ओलांडणाऱ्या रिक्षाचालकांकडून १ हजार ५०० रुपयांचा दंड आकारला जात आहे. या निर्णयामुळे रिक्षांच्या अनियंत्रित गर्दीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळाल्याचे दिसून येत आहे.अपघातापूर्वी स्थानक परिसर फेरीवाल्यांनी व्यापलेला होता. त्यामुळे पादचारी आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघातानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत फेरीवाल्यांवर कारवाई केली आणि रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी रिक्षांची अनियंत्रित वर्दळ ही मुख्य समस्या कायम होती. नव्या बंदीनंतर मात्र वाहतूक कोंडीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.दरम्यान, बेस्ट बसचे स्थानकाबाहेरील धोकादायक वळण हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. बस प्रवाशांच्या रांगेजवळील फुटपाथलगत वळण घेत असल्याचे चित्र आजही दिसून येते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक रहिवाशांनी रिक्षा बंदीचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत रिक्षाचालकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
२० वर्षीय फार्मसीच्या मुलाची आत्महत्या; चिट्ठीत केले असे काही भयानक खुलासे
मुंबई : आजकालची मुलं अपमान अगदी सहजरित्या सहन नाही करू शकत, कोणी त्या अपमानाला सडेतोड उत्तर देत तर कोणी आपलं जीवनच संपवत, आपल्या इज्जतीसमोर आत्महत्या हा पर्याय मुलांना खूप सोप्पा वाटतो.. अश्याच एक अपमानातून आणि नैराश्यातून एका मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.नेमकं घडलं काय ?श्याम पाटील हा विद्यार्थी जळगाव येथील गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिकत होता. काही दिवसांपूर्वी प्राचार्य यांनी त्याला मारहाण केली होती. त्यामुळे तो नैराश्यात होता. संपूर्ण वर्गामोर आपल्याला सरांनी मारल्याने त्याला लाज वाटत होती आणि याच गोष्टीमुळे त्याने आत्महत्येसारखं टोकच पाऊल उचललं.काय लिहिलंय त्या नोटमध्येश्यामने त्याच्या पप्पांना उद्देशून लिहिलंय की त्याची यात काही चूक नव्हती, मित्रांचे भांडण सोडवताना एकाने माझी कॉलर पकडली, त्याला मीही कानाखाली मारली, आणखी भांडण वाढायला नको म्हणून प्राचार्यांकडे गेलो असतो संपूर्ण स्टाफसमोर आणि मित्रांसमोर त्यांनी पीव्हीसी पाईपाने मारले. आणि दुसऱ्या मुलाला हातही लावला नाही. याआधीही अनेक वेळा असे झाले होते माझी काही चूक नसताना मी सरांचा आणि मित्रांचा खूप मार खाल्ला होता. माझी काहीच चूक नाही तुम्ही सीसीटीव्ही नक्की चेक करा. माझ्याकडून हे आणखी सहन होत नाही म्हणत २० वर्षाच्या श्याम पाटील ने गळफास घेत आत्महत्या केली.
Pinaka Rocket System: भारत आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. आज, भारत केवळ शस्त्रे खरेदी करणारा देश राहिलेला नाही, तर तो स्वदेशी शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या शस्त्रांचा निर्यातदारही बनला आहे.
Salim Khan : सलमान खानच्या वडिलांची तब्येत बिघडली; सलीम खान तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल
Salim Khan : सलमान खानचे वडिल ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Natural Brain Boost: स्मरणशक्ती नैसर्गिकरित्या वाढवायची आहे का? जाणून घ्या ५ जपानी उपाय!
Natural Brain Boost स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मोठे बदल करण्याची गरज नाही. छोट्या सवयी, नियमित ध्यान, निसर्गात वेळ घालवणे आणि संतुलित आहार या गोष्टी मेंदूला नैसर्गिकरित्या मजबूत करतात. सातत्य ठेवल्यास काही आठवड्यांतच फरक जाणवू शकतो.
Ajit Pawar plane accident : अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एअर एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरोने महत्वाची माहिती दिली आहे.
Iran Ships Capture: अमेरिकेने बंदी घातलेली ३ जहाजे भारताकडून जप्त ; इराणशी संबंध असल्याचा दावा
Iran Ships Capture: अमेरिकेने निर्बंध लादलेली इराणशी संबंधित तीन तेलवाहू जहाजे भारताकडून मुंबईच्या जवळ जप्त करण्यात आली आहेत. अवैध व्यापार रोखण्यासाठी भारताने केलेली ही कारवाई मोठी मानली जात आहे.
एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; नवीन सीसीटीव्ही प्रकल्पातून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण
मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) एक महत्त्वाकांक्षी ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांवर डिजिटल नजरेचे अभेद्य जाळे उभारले जाणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.मंत्री सरनाईक म्हणाले की, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी तब्बल १११ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या सहाय्याने एसटीच्या बसस्थानके, आगार, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये तसेच मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी यांसारख्या संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण ६३३ ठिकाणी तब्बल ७०३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, यामुळे एसटीच्या प्रत्येक हालचालीवर सतत डिजिटल नजर राहणार आहे.या अत्याधुनिक प्रकल्पाची जबाबदारी ई-निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (TCIL) या अनुभवी संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने आणि प्रभावीपणे सुरू असून, या प्रकल्पाचा एकूण कालावधी १ वर्ष निश्चित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा मुख्य कणा ठरणारे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष मुंबई येथे उभारण्यात आले असून, त्याची वापरकर्ता स्वीकृती चाचणी (UAT) यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या नियंत्रण कक्षातून राज्यभरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर केंद्रीकृत पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे कोणतीही संशयास्पद हालचाल तात्काळ ओळखून आवश्यक ती कार्यवाही करता येणार आहे.प्रकल्पाच्या पायलट टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील ६४ महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही प्रणाली यशस्वीरित्या बसविण्यात आली आहे, ज्यामुळे सुरक्षेची नवी दिशा निश्चित झाली आहे. उर्वरित २७ विभाग, तसेच विविध कार्यशाळा आणि कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची पुढील कार्यवाही सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे एसटीच्या बसस्थानकांवर आणि कार्यालयांमध्ये सुरक्षिततेचे नवे पर्व सुरू होणार आहे. प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होणार असून, कोणत्याही अनुचित घटनांवर त्वरित नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हा केवळ कॅमेरे बसविण्याचा उपक्रम नसून, तो एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच देणारा आणि प्रवाशांच्या विश्वासाला नवे बळ देणारा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. यामुळे ‘लालपरी’ चा प्रवास आता केवळ वेगवानच नव्हे, तर अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानसज्ज होणार आहे. हीच या प्रकल्पाची खरी यशोगाथा ठरणार आहे. असे मत मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले.
डोंबिवलीत बंद फ्लॅटवर चोरट्यांची नजर; लाखो रुपयांचा ऐवज गायब
डोंबिवली : शहरात अलीकडे घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. भरवस्तीतील बंद घरांवर लक्ष ठेवून चोरट्यांकडून हात साफ केला जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशाच प्रकारची एक गंभीर घटना देसलेपाडा परिसरात उघडकीस आली असून, लग्नासाठी गावी गेलेल्या कुटुंबाच्या फ्लॅटमध्ये मोठी चोरी झाल्याचे समोर आले आहे.देसलेपाडा येथील आर.पी. रेसीडेन्सीमध्ये राहणारे अशिष रामधनी यादव हे आपल्या कुटुंबासह उत्तर प्रदेशातील मूळ गावी विवाह सोहळ्यासाठी गेले होते. घर सुरक्षित राहावे यासाठी त्यांनी फ्लॅटची चावी आपल्या बहिणीकडे सोपवली होती. ९ फेब्रुवारी रोजी घरात कीटकनाशक फवारणीचे काम पूर्ण करण्यात आले होते आणि त्यानंतर घर व्यवस्थित बंद करण्यात आले होते.दरम्यान, १५ फेब्रुवारी रोजी वॉटर फिल्टरच्या दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ येणार असल्याने यादव यांच्या बहिणी मायादेवी आणि त्यांचे पती दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास फ्लॅटवर पोहोचले. मात्र तेथे पोहोचताच सेफ्टी डोअर तसेच मुख्य दरवाजाची कडी तुटलेल्या अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात प्रवेश केल्यावर दोन्ही शयनकक्षांतील कपाटे उघडी आढळली. लॉकर फोडण्यात आले होते आणि घरातील साहित्य विस्कळीत अवस्थेत पडलेले होते.या प्रकाराची माहिती तातडीने अशिष यादव यांना देण्यात आली. प्राथमिक तपासानुसार, कपाटात ठेवलेले सुमारे ४० तोळे सोन्याचे दागिने तसेच अंदाजे ५० हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या धाडसी घरफोडीमुळे परिसरात अस्वस्थता निर्माण झाली आहे.गुन्हा दाखल; सीसीटीव्ही तपास सुरूघटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. अज्ञात व्यक्तींविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून संशयितांचा माग काढण्यासाठी पथके कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.लग्नसराई आणि सुट्ट्यांच्या काळात अनेक कुटुंबे बाहेरगावी जात असल्याने बंद घरांवर चोरट्यांची नजर असते. त्यामुळे नागरिकांनी घर सुरक्षिततेसाठी अतिरिक्त खबरदारी घ्यावी आणि मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवाव्यात, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
२०२३ मध्ये बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण करणाऱ्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटानंतर आता निर्मात्यांनी याच्या सीक्वेलची घोषणा केली आहे. ‘द केरळ स्टोरी २’ (The Kerala Story 2) चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, यात कथेची आणखी एक भीषण आणि गडद बाजू मांडण्यात आली आहे. चित्रपटाची कथा सत्य घटनांपासून प्रेरित असल्याचे निर्मात्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. विविध राज्यांमधील हिंदू मुलींना लक्ष्य करून त्यांचे होणारे शोषण आणि सक्तीने केले जाणारे धर्मांतर, हा या सीक्वेलचा मुख्य विषय आहे. या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा पुन्हा एकदा या संवेदनशील विषयात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या भागावर झालेल्या टीकेनंतरही या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे आता या दुसऱ्या भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
AI Summit:भारतात ऐतिहासिक पहिले एआय समिट आयोजित करण्यात आले आहे. जगातील अनेक टेक कंपन्या या समिटमध्ये सहभागी आहेत.
Amit Thackeray post :मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुलुंड दुर्घटनेप्रकरणी पोस्टद्वारे संताप व्यक्त केला आहे.
मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन; मंत्री नितेश राणेंची महापौरांकडे मागणी
मुंबई: राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री.नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर श्रीमती रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यावेळी मुंबईच्या महापौर पदावर निवड झाल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी महापौर रितू तावडे यांचे अभिनंदनही केले आहे.मंत्री नितेश राणे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, मुंबईच्या जडणघडणीत व दैदीप्यमान वाटचालीत स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे मोठे योगदान राहिले आहे. मुंबई आणि कोकणी माणूस हे एक अतूट समीकरण असून आज मुंबईत वास्तव्यास असलेला मोठा वर्ग हा मूळचा कोकणातील आहे.कोकणातील नागरिकांनी मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्याने तसेच मुंबई हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शहर असल्याने कोकणातील तरुण मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण, वैद्यकीय उपचार व रोजगारासाठी मुंबईत येत असतात. मात्र मुंबईत येणाऱ्या कोकणवासीयांसाठी आजतागायत कोणताही हक्काचा निवारा उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी नमूद केले आहे.कोकणातील कला, साहित्य, इतिहास व सामाजिक उपक्रमांचे जतन व संवर्धन करण्यासाठी एक स्वतंत्र सांस्कृतिक कला-केंद्र उभारणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मुंबईत उच्च शिक्षण व वैद्यकीय कारणासाठी येणाऱ्या कोकणवासीयांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.
Narhari Zirwal :मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणावर मंत्री नरहरी झिरवळ यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केले आहे.
Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज ; ग्रहण काळाची वेळ आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या
Surya Grahan 2026: २०२६ सालचे पहिले सूर्यग्रहण आज होत आहे. सूर्यग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे, जी विज्ञान आणि ज्योतिष दोन्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून समजतात.
Pineapple benefits : आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या अननसाचे हे सात फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
Pineapple benefits : अननस हे नाव ब्राझीलमधून आले असून, त्याचा आकार पाइन वृक्षाच्या शंकूसारखा (Pine Cone) असल्याने त्याला इंग्रजीत 'पाइनॅपल' असे म्हणतात. भारतात १५४८ साली अननसाची लागवड सुरू झाली. आज आसाम, बिहार, केरळ आणि प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. साधारणतः फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान याला फुले येतात आणि जुलै ते सप्टेंबर या काळात फळे पिकतात.
Pineapple: चवीला गोड आणि आरोग्यासाठी गुणकारी ‘सुपरफ्रूट’
अननस हे नाव ब्राझीलमधून आले असून, त्याचा आकार पाइन वृक्षाच्या शंकूसारखा (Pine Cone) असल्याने त्याला इंग्रजीत 'पाइनॅपल' असे म्हणतात. भारतात १५४८ साली अननसाची लागवड सुरू झाली. आज आसाम, बिहार, केरळ आणि प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. साधारणतः फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान याला फुले येतात आणि जुलै ते सप्टेंबर या काळात फळे पिकतात.
Supriya Sule : “आपल्याच घरात आपण…”; मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणावर सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
Supriya Sule : लाचखोरी प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून, शंका उपस्थित करत तीन महत्वाचे प्रश्न विचारले आहेत.
NA परवानगी रद्द; महसूल कायद्यात मोठा ऐतिहासिक बदल
मुंबई : राज्य शासनाने शेतजमिनीचा निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक वापर करण्यासाठी आवश्यक असलेली ना परवानगीची अट रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिक, गृहनिर्माण संस्था आणि जमीनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.नव्या नियमानुसार विकास आराखड्याशी सुसंगत असलेल्या जमिनींसाठी स्थानिक नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम परवानगी हीच अकृषिक परवानगी म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र मंजुरी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. याशिवाय वार्षिक बिनशेती कराची अटही रद्द करण्यात आली आहे.बांधकाम नकाशा कुठे मिळणार?राज्यात घर किंवा इमारत उभारण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगररचना विभागाकडून अधिकृत बांधकाम नकाशा मंजुरी घेणे बंधनकारक राहील. संबंधित स्थानिक प्राधिकरणाकडेच अर्ज करावा लागणार आहे.अर्ज कसा कराल?बांधकाम मंजुरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज सादर झाल्यानंतर महसूल विभागाच्या संगणकीय प्रणालीद्वारे सातबारा उताऱ्यात आवश्यक नोंद आपोआप होणार आहे.फक्त बांधकाम परवानगी मिळाल्यामुळे भोगवटादार वर्ग दोनमध्ये आपोआप बदल होणार नाही. तर ७/१२ उताऱ्यात आपोआप फेरफार नोंद घेतली जाईल, त्यासाठी आवश्यक शुल्क स्वतंत्रपणे भरावे लागेल. अर्जानंतर छाननी शुल्कही ऑनलाईन भरावे लागेल.नोंदणीकृत वास्तुविशारद नियमानुसार नकाशा तयार करून तो अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करतात. त्यानंतर नगररचना विभागाकडून तांत्रिक पडताळणी केली जाते. सर्व अटी पूर्ण झाल्यास डिजिटल स्वाक्षरीसह मंजुरी प्रमाणपत्र दिले जाते.आवश्यक कागदपत्रांची यादीसातबारा उतारा किंवा मालमत्ता पत्रिकाभूमी अभिलेख विभागाचा मोजणी नकाशानोंदणीकृत वास्तुविशारद परवान्याची प्रतचालू वर्षाचा घरपट्टी किंवा मालमत्ता कर भरल्याची पावतीअग्निशमन, पर्यावरण विभाग, विमानतळ प्राधिकरण यांसारख्या संबंधित यंत्रणांची ना हरकत प्रमाणपत्रेराज्य सरकारच्या या निर्णयामुळे बांधकाम परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र स्थानिक प्राधिकरणाच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य राहणार आहे.
Vasai Crime: वसईत महिलेला घरात घुसून संपवलं; नेमकं घडलं काय?
वसई: वसईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईत एका ६० वर्षांच्या महिलेची राहत्या घरात हत्या करण्यात आली आहे. वसईच्या बऱ्हाणपूर उमेळमान गावातील ही घटना आहे. भिमाई या बंगल्यात दुर्गा संजयराव बनसोडे ही ६० वर्षीय महिला एकटी राहत होती. तिचा मुलगा वालीव येथे राहत होता. अज्ञात व्यक्तीने घरात घुसून तिची हत्या केली आहे. हत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे. सोमवारी सकाळपासून दुर्गा या फोन उचलत नसल्याने मुलाने रात्री येवून, बघितल्यावर हॅालच्या आत रक्ताचे डाग दिसले, त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर ही घटना उजेडात आली. मृतदेह बेडरूममध्ये होता आणि बेडवरील गादी काढून बेड उघडण्यात आला होता. तसेच बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून स्क्रूड्रायव्हर लावण्यात आले होते. सध्या पोलिसांनी पंचनामा करुन, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घरात काही चोरी झाली का? याबाबत घरच्यांनी पडताळणी केल्यानंतर माहिती मिळेल.घरात घुसून महिलेची हत्याअज्ञात व्यक्तीने घरात घुसून दुर्गा नामक महिलेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. माहितीनुसार, सोमवारी सकाळपासून दुर्गा या फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे संशय आल्याने त्यांचा मुलगा रात्री घरी आला. घरात प्रवेश केल्यानंतर हॉलमध्ये रक्ताचे डाग आढळून आले. त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता ही घटना उघडकीस आली. मृतदेह बेडरूममध्ये आढळून आला. बेडवरील गादी काढून बेड उघडलेला होता. तसेच बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून स्क्रूड्रायव्हर लावण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे. यावरून गुन्हा नियोजनपूर्वक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घरातून काही चोरी झाली आहे का, याबाबत कुटुंबीयांकडून पडताळणी सुरू असून त्यानंतरच अधिक माहिती स्पष्ट होणार आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमती आज पुन्हा घसरल्या; चांदी ४,००० रुपयांनी घसरली
Gold Silver Price Today: देशांतर्गत वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून येत आहे.
ठाणे : आज सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना ठाणे-बेलापूर मार्गावर प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. एका भीषण अपघातामुळे या मार्गावरील वाहतुकीचे तीन-तेरा वाजले असून, कळवा नाक्यापासून ते थेट ऐरोलीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. रस्त्यावर झालेल्या या अपघातामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, रस्ता मोकळा करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या कोंडीमुळे ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा 'लेटमार्क' लागण्याची शक्यता आहे. जर तुम्ही या मार्गावरून प्रवास करणार असाल, तर पर्यायी मार्गाचा वापर करणे किंवा प्रवासाचे नियोजन बदलणे हिताचे ठरेल.https://prahaar.in/2026/02/17/bangladesh-pm-oath-tariq-rahman-to-take-oath-as-prime-minister-of-bangladesh-today-these-countries-invited-to-the-swearing-in-ceremony/नेमकं काय घडलं ?ऐन सकाळी कामावर जाण्याच्या धावपळीत ऐरोली-कळवा मार्गावर एका भरधाव कंटेनरने दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात इतका गंभीर होता की, कंटेनर रस्त्याच्या मधोमध अडकल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. ऐरोली ते दिघी गाव दरम्यानचा मुख्य मार्गावर सकाळी साधारण ७:४५ वाजता घडला. कंटेनर रस्त्यातच अडकल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र या घटनेमुळे सकाळी ७:४५ पासून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोलीस आणि संबंधित यंत्रणा कंटेनर बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.कळवा-ऐरोली पट्ट्यात वाहतुकीचा खोळंबाकळवा नाका, खारेगाव आणि ऐरोलीकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांची प्रचंड कोंडी झाली असून, सकाळी ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तासनतास खोळंबा झाला आहे. ऐन पीक अवरमध्ये (Peak Hours) अडकलेल्या वाहनचालकांनी सोशल मीडियावरून आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेकडो वाहने एकाच जागी अडकल्याने प्रवाशांचा 'लेटमार्क' निश्चित झाला असून मनस्ताप वाढला आहे. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणा 'युद्धपातळीवर' कामाला लागल्या असून अडकलेला कंटेनर बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांनी शक्य असल्यास या मार्गावर येण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.रस्ता मोकळा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरूस्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले आहे. अपघातग्रस्त कंटेनर रस्त्यातून हटवण्यासाठी क्रेन पाचारण करण्यात आली असून, काम वेगाने सुरू आहे. कोंडीची तीव्रता पाहता, वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी किमान पुढील १ ते २ तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रस्ते मार्गावरील खोळंबा टाळण्यासाठी ठाणे स्टेशनवरून ऐरोलीकडे जाण्यासाठी **'लोकल रेल्वे'**चा पर्याय निवडणे सध्या अधिक सोयीचे आणि जलद ठरेल. घरातून बाहेर पडण्यापूर्वी **'गुगल मॅप्स'**वर ट्रॅफिकची सद्यस्थिती तपासूनच आपला मार्ग निवडावा, जेणेकरून वेळेचा अपव्यय टाळता येईल.
Shaan E Hind :मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतानच्या फोटोवरून निर्माण झालेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Ameesha Patel: अमीषा पटेल अडचणीत; मुरादाबाद न्यायालयाकडून गैरजामिनपात्र वॉरंट जारी
मिळालेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने अमीषा यांना लग्नात नृत्य सादर करण्यासाठी बोलावले होते. कंपनीचे मालक पवन कुमार वर्मा यांनी त्यांना १४ लाख ५० हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यापैकी ११ लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून देण्यात आल्याचा आरोप आहे.
Stock Market Today: शेअर बाजार पुन्हा घसरला ; सेन्सेक्स २७४ अंकांनी घसरला, निफ्टीतही घट
Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराने आज व्यापाराच्या दिवसाची सुरुवात नकारात्मकतेने केली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५०, लाल रंगात उघडले.
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
आयटी क्षेत्रासाठी यंदाचा अर्थसंकल्प सकारात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण ठरतो. कर सुलभीकरण, डिजिटल पायाभूत सुविधांवरील भर, एआय आणि नवोन्मेषाला चालना यामुळे हे क्षेत्र भारताच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनामध्ये आणखी महत्त्वाची भूमिका बजावेल.भारतात आयटी क्षेत्राचा विस्तार वेगाने झाला. भारतातील या क्षेत्राची गेल्या पंचवीस वर्षांमधली प्रगती जुन्या-जाणत्यांनाही चकीत करणारी आहे. या क्षेत्राने दिलेल्या संधींचा फायदा घेत भारतीय तरुणाईने यशाची नवी शिखरे सर केलीच, पण समृद्धीही मिळवली. आज हे भारताच्या प्रगतीच्या प्रवासातले महत्त्वाचे क्षेत्र ठरते आहे. देशाच्या अर्थकारणात या क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे. कोणतेही उत्पादन न देता सेवेच्या बळावर हे क्षेत्र प्रगती करत आहे. अर्थात हार्डवेअर क्षेत्राचाही या ना त्या प्रकारे संबंध येत असल्याने एकूणच आयटी आणि संगणक क्षेत्र देशात हातात हात घालून प्रगती करत आहेत. त्यामुळेच या क्षेत्रातील घडामोडी, बदलत्या सरकारी तरतुदी, अमेरिकेसारख्या भल्या मोठ्या देशाचा या क्षेत्राच्या अर्थकारणात असणारा सहभाग महत्वाचा ठरतो. किंबहुना, अमेरिकेत सर्दी झाली तरी भारतात हुडहुडी भरते, असा प्रकार अनुभवायला मिळतो. असे अनेक घटक तपासत, समजून घेत आणि त्यांचा प्रभाव अनुभवत भारत या क्षेत्रातील वाटचाल सूकर करत असतो. गेले काही दिवस अमेरिका आणि भारताचे सातत्याने बदलत, वर-खाली होत असलेले संबंध आयटी क्षेत्रात तरंग उमटवत आहेत. कदाचित म्हणूनच व्हिसा किंवा नागरिकत्व देण्याच्या अमेरिकेच्या धोरणाबरोबरच भारतातील आर्थिक धुरीण या क्षेत्राच्या प्रगतीकडे कसे बघतात, त्याच्या समोर असलेल्या आव्हानांचा मागोवा कसा घेतात हे बघणे महत्वाचे ठरते. अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून हे क्षेत्र काही विक्षिप्त निर्णयांना आणि तरतुदींना सामोरे जात आहेच, पण सातत्यपूर्ण बदलही अनुभवत आहे. त्याचेच प्रतिबिंब ताज्या अर्थसंकल्पामध्ये पहायला मिळाले.केंद्रीय अर्थसंकल्प भारताच्या आर्थिक धोरणाचे प्रतीक असतो. माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्र हे भारताच्या जीडीपीमध्ये मोठे योगदान देणारे क्षेत्र असल्याने आयटीशी संबंधितांच्या अर्थमंत्र्यांकडून नेहमीच मोठ्या अपेक्षा असतात. भारताची अर्थव्यवस्था वेगाने बदलत असताना माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्र त्या बदलाचे प्रमुख इंजिन ठरले आहे. १९९०च्या दशकात सुरू झालेला संगणकीकरणाचा प्रवास आज कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, डेटा ॲनॅलिटिक्स आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांपर्यंत पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर २०२६-२७ साठी सादर करण्यात आलेले केंद्रीय अंदाजपत्रक आयटी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. हे अंदाजपत्रक केवळ आर्थिक आकड्यांपुरते मर्यादित न राहता भारताच्या डिजिटल भवितव्याची दिशा ठरवणारे आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये. २०२६ च्या अंदाजपत्रकाचा मूलभूत उद्देश ‘विकसित भारत’ या संकल्पनेभोवती फिरतो. आर्थिक वाढ, रोजगारनिर्मिती, गुंतवणूक वाढवणे आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रशासन अधिक कार्यक्षम करणे हे या अंदाजपत्रकाचे प्रमुख स्तंभ आहेत. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आयटी क्षेत्र या सर्व उद्दिष्टांचा केंद्रबिंदू असल्याने धोरणात्मक पातळीवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या अंदाजपत्रकातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे आयटी आणि आयटी-संबंधित सेवांचे एकत्रीकरण. सॉफ्टवेअर सेवा, आयटी-एनेबल्ड सर्व्हिसेस, ज्ञानाधारित प्रक्रिया सेवा आणि कराराधारित संशोधन या सर्व सेवा एका एकसमान ‘माहिती तंत्रज्ञान सेवा’ या वर्गाखाली आणण्यात आल्या आहेत. यामुळे कर नियमांमध्ये स्पष्टता येते, कंपन्यांवरील अनुपालनाचा ताण कमी होतो आणि उद्योगासाठी एक स्थिर, पूर्वानुमान करता येणारे वातावरण निर्माण होते. विशेषतः लहान आणि मध्यम आयटी कंपन्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.ताज्या अर्थसंकल्पामध्ये डिजिटल पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. डेटा सेंटर्स, क्लाउड सेवा आणि उच्च क्षमतेचे नेटवर्क हा आधुनिक डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परदेशी क्लाउड कंपन्यांना भारतातील डेटा सेंटर्स वापरून जागतिक ग्राहकांना सेवा देण्यासाठी २०४७ पर्यंत ‘टॅक्स हॉलिडे’ जाहीर करण्यात आला आहे; भारतीय ग्राहकांसाठी स्थानिक रिसेलरद्वारे सेवा द्यावी लागेल. संबंधित डेटा सेंटर प्रदात्यांसाठी १५ टक्के खर्चावर सेफ हार्बर मार्जिन उपलब्ध आहे. भारताला जागतिक डेटा हब बनवण्याच्या दृष्टीने डेटा सेंटर्ससाठी करसवलती, दीर्घकालीन धोरणात्मक पाठबळ आणि गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या अंदाजपत्रकात दिसून येतो. यामुळे परदेशी तसेच देशांतर्गत गुंतवणूक वाढून आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान हा अंदाजपत्रकाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. एआय, मशीन लर्निंग, रोबोटिक्स आणि सायबर सुरक्षेसारख्या क्षेत्रांमध्ये संशोधन, नवोन्मेष आणि कौशल्य विकासासाठी सरकारी पाठबळ देण्याचे संकेत मिळतात. आयटी क्षेत्र आता केवळ सेवा पुरवठादार न राहता नवकल्पनांचा स्रोत बनत आहे. स्टार्टअप्स, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्यातील सहकार्यामुळे भारत जागतिक स्तरावर तंत्रज्ञानातील नेतृत्व भूमिका बजावू शकतो. मानव संसाधन विकास हा आयटी क्षेत्राचा कणा आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये डिजिटल कौशल्य विकासावर दिलेला भर विशेष उल्लेखनीय आहे.आयटी क्षेत्राचा प्रभाव केवळ आर्थिक मर्यादेत न राहता प्रशासन, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक समावेशनापर्यंत विस्तारला आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, ई-गव्हर्नन्स, ऑनलाइन शिक्षण आणि टेलिमेडिसिन यासारख्या उपक्रमांमुळे सामान्य नागरिकांचे जीवन सुलभ होत आहे. अंदाजपत्रक २०२६ या डिजिटल परिवर्तनाला गती देण्याचा प्रयत्न करते. यामुळे पारदर्शकता, कार्यक्षमता आणि समावेशक विकास साध्य होऊ शकतो. तथापि, या संधींसोबतच काही आव्हानेही आहेत. जागतिक आर्थिक अनिश्चितता, तंत्रज्ञानात झपाट्याने होणारे बदल आणि कौशल्यातील तफावत यांचा सामना आयटी क्षेत्राला करावा लागणार आहे. अंदाजपत्रकाने दिशा दिली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी, धोरणांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी आणि उद्योग-शिक्षण-संशोधन यांच्यातील समन्वय अत्यावश्यक आहे. एकूणच, यंदाचा अर्थसंकल्प आयटी क्षेत्रासाठी सकारात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण ठरतो. कर सुलभीकरण, डिजिटल पायाभूत सुविधांवरील भर, एआय आणि नवोन्मेषाला चालना तसेच कौशल्य विकासावर लक्ष यामुळे आयटी क्षेत्र भारताच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनात आणखी महत्त्वाची भूमिका बजावेल. योग्य अंमलबजावणी आणि सातत्यपूर्ण धोरणात्मक पाठबळ मिळाल्यास आयटी क्षेत्र भारताला ‘विकसित राष्ट्र’ बनवण्याच्या प्रवासात निर्णायक योगदान देईल, अशी आशा बाळगता येते.डॉ. दीपक शिकारपूर
आशय : वीणा सानेकरज्ञानपीठ पारितोषिक विजेते विनोदकुमार शुक्ल यांनी दोनेक महिन्यांपूर्वी जगाचा निरोप घेतला. कवीची कविता त्याच्या जाण्यानंतर जगात उरते. महाविद्यालयीन जीवनात डॉ अनंतराम त्रिपाठी, डॉ बंशीधर पंडा यांच्यासारखे शिक्षक लाभले आणि हिंदी साहित्याचाही लळा लागला. ‘जे न देखे रवी ते देखे कवी”, असे म्हणतात नि ते खरेच आहे. शुक्ल यांच्या कवितेतून जाणवते की स्वतःच्या प्रतिभेची खिडकी खुली असणारा कवीच जग समजून घेऊ शकतो. हे जग कवी भोवतालचे असतेच पण त्यापलीकडले पाहण्याची त्याची धडपड असते.‘वाचवून ठेवायला हवी हवाश्वास घेण्यासाठी !’ ही त्यांची कविता आयुष्याचा जमाखर्च मांडणारी नि म्हणून प्रश्न विचारत राहणारी आहे.“घटत घटत आयुष्य इतकेच उरले आहे.आयुष्यभर लढण्यासाठीआयुष्य किती आणि कसं वाचवलं पाहिजे…?”जे जे नैसर्गिक आदिम आहे, ते ते वाचवणे, टिकवून ठेवणे, जपणे कवीला मौल्यवान वाटते. यातूनच जंगलाशी नाते जुळलेले आदिवासी आणि त्यांच्या आयुष्यातले कारुण्य कवीचे अंतःकरण हलवून टाकते. ‘जंगल के उजाड में’ नावाची त्यांची कविता अशी आहे:ओसाड जंगलातकांदा खोदता खोदता भुकेने बेशुद्ध पडलेल्या आदिवासींकरता कोण डॉक्टरला बोलवणार ?त्याला इस्पितळात न्यायला हवे की स्वयंपाकघरात!इथे दूरपर्यंत कुठलेइस्पितळ नाहीदूर -दूरपर्यंत अशीझोपडी नाही,जिथे चूल पेटते.भुकेने बेशुद्ध पडलेल्या माणसाला कोणते प्राथमिक उपचार करायला हवेत ?बेशुद्ध अवस्थेत वाटेल की आता झोपला आहे आणि त्याला झोपू दे.बेशुद्धीत मेला तर कसे समजेल की मेला आहे आणि आता काही नाही होऊ शकत.जर तो मेला तर मडक्यात त्याच्या वाट्याचा जरासाही भात नव्हता, जो दुसऱ्यासाठी उरेल.दूर एखाद्या झाडाखाली किंवा झोपडीतत्याची बायको आणि तीन मुले भुकेने मरणाऱ्या त्या माणसाची वाट पाहत असतील की तो कांदे खोदून आणेल कधीतरी… ..… मग एकदा तीही भुकेनेमरून जातील.काही दिवसांपासून ऐकिवात असलेली ही एक आदिवासी कथा आहे की खूप वर्षांपासूनजंगलात खूपसे आदिवासी भुकेने मरून जातात !ही कविता वाचताना जंगले नि वनांचे राखणदार असणारे खरे भूमिपुत्र भुकेच्या आगीत होरपळून मरण्याचे दुःखद वास्तव खूप अस्वस्थ करते.आदिवासींप्रमाणेच मजूरही त्यांच्या वाट्याला आलेले दुःख सोसत राहतात. त्यांच्या ‘मजदूरो, उस तरफ चलो’ या कवितेत मजुरांच्या आयुष्याचे वास्तव चित्रित झाले आहे. ना त्या मजुरांच्या खिशात पगार मिळाला की नाही अजून ? हे विचारणारी आणि आपल्या दुःखांचे वर्णन करणारी पत्रे आहेत. ना त्यांच्या हातात रिकामी झोळी आहे. विडी माचिसही नाही त्यांच्या उलट्या केलेल्या खिशांत. असलेले पाच पन्नास पैसेही त्यांनी देऊन टाकले आहेत, त्या दुकानदारांना, ज्यांची उधारी बाकी होती कधीपासून. हत्यारबंद पोलिसांच्या दिशेने चाललेल्या या निःशस्त्र मजुरांना कोणत्याही अपराधाविना गोळ्या झेलाव्या लागणार आहेत.सर्वांना सर्व काही समान मिळावे, ही गोष्ट समाजात विविध टप्प्यांवर दुर्मीळ होत गेली. त्यांच्या एका कवितेत समाजातील भेदाभेदांच्या भिंतींचा स्पष्ट उद्गार उमटला आहे . “अपने हिस्से में लोग आकाश देखते हैं” या कवितेचा आशय समजून घेताना त्याचे पैलू अनेक वाटांनी मनाला भिडत राहिले. विनोदकुमार शुक्ल या कवितेत म्हणतात,“लोक आपल्या वाट्याचे आकाश पाहतात आणि पूर्ण आकाश पाहतात. आपल्या वाट्याचा चंद्र पाहतात आणि पूर्ण चंद्र पाहतात. सगळ्यांच्या वाट्याचा कसा -बसा श्वास सगळेच घेतात.. घरातल्या बागेत वर्तमानपत्र वाचणारा आणि घाण आणि दुर्गंधीने भरलेल्या वातावरणात जिवंत असलेलाही! पण सर्वांच्या वाट्याला समान हवा येत नाही. आपल्या वाट्याची भूक शमवायला प्रत्येकाला त्याच्या वाट्याचे सगळे धान्य मिळत नाही.”या कवितेचा शेवट अक्षरशः स्तब्ध करतो. “ जी सगळ्यांच्या घड्याळात दिसते, ती वेळ सगळ्यांच्या वाट्याची नसते.”कवी काळाची स्पंदने आपल्या शब्दांतून पकडतो. काळाच्या आवाजाने कवितेचा गाभारा भारून टाकतो. प्रत्येक काळात त्याची कविता जिवंत राहते, फक्त तिचा आशय वाचण्याचा लोलक आपल्याला वेळेवर सापडायला हवा.
नात्यांचे नवीन प्रकार : कारणे आणि परिणाम
मीनाक्षी जगदाळेआजच्या वेगवान आणि डिजिटल युगात मानवी नातेसंबंधांची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी लग्न किंवा मैत्री फारफार तर प्रेम प्रकरण या मुख्य चौकटी असायच्या, मात्र आता 'जेन-झी' (Gen-Z) १९९८ ते २०१२ च्या दरम्यान जन्माला आलेल्या मुलांना आपण जेन-झी म्हणतो आणि 'मिलेनियल्स' (Millennials) म्हणजेच ज्या मुलांचा जन्म १९८३ ते १९९८ या दरम्यान झाला आहे ती पिढी. या पिढीने नात्यांना अनेक नवनवीन पैलू दिले आहेत. आजच्या काळात प्रचलित असलेल्या नात्यांच्या काही नवीन संकल्पना या लेखामार्फत जाणून घेणार आहोत.सद्या प्रचलित असलेले नात्याचं एक नाव म्हणजे सिच्युएशनशिप. हे सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेले नाते आहे. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये मैत्रीपेक्षा जास्त पण प्रेमाच्या अधिकृत कबुलीपेक्षा कमी असं नातं असतं, त्याला 'सिच्युएशनशिप' म्हणतात. या नात्याचं वैशिष्ट्य म्हणजे यात फिरणं, गप्पा मारणं आणि शारीरिक जवळीक असते, पण आपण नक्की एकमेकांचे कोण आहोत? याचे स्पष्ट उत्तर नसते. यात कोणतीही कमिटमेंट नसते. कोणतेही वचन किंवा एकमेकांसाठी काही करण्याची बांधिलकी नसते. सगळ्यांना हा प्रकार आरामदायी वाटतो कारण जबाबदारीचं ओझं नसतं.दुसरा प्रकार म्हणजे लिव्ह-इन रिलेशनशिप. खरंतर लग्नाआधी एकमेकांना पूर्णपणे समजून घेण्यासाठी एकत्र राहणे म्हणजे लिव्ह-इन. अनेकदा दोघांचीही लग्न झालेली असून, एकाचच लग्न झालेले असून, दोघेही घटस्फोटीत असून, किंवा दोघेही विधवा किंवा विधुर असून एकमेकांच्या मानसिक, भावनिक, शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी जर एकत्र राहत असतील तर त्याला लिव्ह इन रिलेशन शिप म्हटले जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे यात जोडीदार एकाच घरात राहतात, घरखर्च शेअर करतात, दोघे नोकरी व्यवसाय आपल्या पसंतीने करतात आणि पती-पत्नीप्रमाणे आयुष्य जगतात. यामुळे विवाहा आधी असे राहिल्यास भविष्यात लग्न करायचे की नाही, याचा निर्णय घेणे सोपे जाते, एकमेकांना ओळखायला मदत होते. अनेकदा आपल्या लग्न केलेल्या पती अथवा पत्नीला सोडून दुसऱ्याबरोबर एन्जॉय करण्यासाठी पण हा पर्याय निवडला जातो. पती-पत्नी विभक्त आहेत पण घटस्फोट होईपर्यंत दुसऱ्या जीवनसाथी सोबत राहण्यासाठी पण हा पर्याय निवडला जातो. काहीजण तर स्वतःचे वैवाहिक आयुष्य सुरु असतानाही दुसऱ्या स्त्री अथवा पुरुषासोबत विवाह बाह्य संबंध ठेवून लिव्ह इन रिलेशन शिपमध्ये राहतात.तिसरा प्रकार म्हणजे ओपन रिलेशनशिप. या नात्यात दोन व्यक्ती एकमेकांवर प्रेम तर करतात, पण त्यांनी परस्परांना इतर व्यक्तींशी शारीरिक किंवा भावनिक संबंध ठेवण्याची मुभा दिलेली असते. यात प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो. जोडीदाराला लपवून काहीही केले जात नाही, सर्व काही सहमतीने घडते. गर्ल फ्रेंड बॉयफ्रेंड, अफेअरमध्ये असणारे जोडपे किंवा अगदी पती पत्नी सुद्धा आजकाल ओपन रिलेशन शिपला प्राधान्य देतात. लग्नानंतर होणारे वैवाहिक वाद , मुलांवर होणारे परिणाम टाळण्यासाठी, समाजातील प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी, घटस्फोट अथवा द्वितीय विवाह टाळण्यासाठी आजकाल अनेक जोडपी आपल्या जोडीदाराला त्याला जिथे वाटेल तिथे शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी देतात. या मध्ये दोघांना पण माहिती असते की आपला जोडीदार कोणाबरोबर आहे, का आहे आणि त्यांच्यात कोणत्या पातळीपर्यंत संबंध आहेत. समजून उमजून ठरवून या पद्धतीने वैवाहिक नातेसंबंध टिकवले जातात.हुक-अप कल्चर : आजकालच्या डेटिंग ॲप्समुळे हे प्रमाण वाढले आहे. यात केवळ शारीरिक आकर्षणापोटी किंवा आनंदासाठी दोन व्यक्ती एकत्र येतात. यात कोणत्याही प्रकारची भावनिक गुंतवणूक किंवा भविष्यातील बंधने नसतात. केवळ शारीरिक गरज भागविण्याच्या हेतूने, बदल अथवा मजा म्हणून हे संबंध ठेवलेले असतात. यात दोघांना एकमेकांशी पुरेशी ओळख सुद्धा नसते अथवा परत भेटू की नाही हे ही निश्चित नसतं.प्लॅटॉनिक रिलेशनशिप : असे नाते जिथे दोन व्यक्तींमध्ये खूप प्रेम आणि ओढ असते, पण त्यात शारीरिक संबंधांना स्थान नसते. हे नाते पूर्णपणे मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर असते. यात निखळ मैत्री आणि एकमेकांबद्दल आदर असतो. अनेकदा विशिष्ट अध्यात्मिक संप्रदाय, समूह यातील सदस्य शिष्य या नात्याने म्हणजेच आत्मिक आणि अंतर्मनाच मिलन होऊन एकत्र आलेले दिसतात. त्यांच्यात असलेल्या नात्याला, आपुलकीला प्लॅटॉनिक नाते म्हणतात.ब्रेडक्रंबिंग आणि घोस्टिंग: नातेसंबंधातील काही नकारात्मक प्रकार आहेत. ब्रेडक्रंबिंग म्हणजे समोरच्या व्यक्तीला फक्त अधूनमधून मेसेजअथवा फोन करून आशा दाखवणे, कधीतरी भेटणे पण प्रत्यक्षात नातं पुढे न नेणे. थोडक्यात त्याला आपला होकार, नकार, प्रतिसादाचा प्रकार यावर काहीच तर्क लावता आला नाही पाहिजे असे वागवले जाते.घोस्टिंग म्हणजे कोणतंही कारण न देता अचानक बोलणं बंद करणे आणि संपर्कातून गायब होणे. अनेकदा आपल्याशी नियमित बोलणारी, भेटणारी व्यक्ती आपल्याला टाळायला लागते, आपल्या मेसेज ला फोन ला उत्तर देणे बंद करते. आपल्याला त्या व्यक्ती कडून असे वागण्याचा काहीही अर्थ सांगितला जातं नाही अथवा कोणतेही समर्थन दिले जातं नाही. घोस्टिंग करणाऱ्या व्यक्तीला आपण कितीही आणि कोणत्याही माध्यमातून संपर्क करायचा प्रयत्न केला तरी आपल्याला कोणताही प्रतिसाद, समर्थन अथवा उत्तर मिळत नाही.डिंक कपल संकल्पना ही अजून ऐक पद्धत सध्या तरुण पिढीमध्ये फोफावताना दिसते. डिंक कपल म्हणजे लग्न करायचं, एकत्र नांदायचं, भरपूर पगाराच्या नोकऱ्या करायच्या पण मुलबाळ होवू द्यायचे नाही. हे डिंक कपल स्वतःला कोणत्याही जबाबदारी मध्ये अडकवू इच्छित नसतात. आपण कामावलेल्या पैशावर आयुष्य एन्जॉय करायचं, मुक्त जगायचं या भावनेतून डिंक कपल संकल्पना उदयाला आलेली आहे.आपल्या आजपर्यंत चालत आलेल्या पारंपरिक नातेसंबंध मधील या बदलांची कारणे काय? यावर विचार करणे अभिप्रेत आहे. सगळ्यांना उपलब्ध असलेले वैयक्तिक स्वातंत्र्य जसे की, आजची पिढी स्वतःच्या करिअरला आणि स्वातंत्र्याला जास्त महत्त्व देते. अगदी लग्नानंतर सुद्धा जास्त अपेक्षा, बंधन लोकांना नको आहेत. मोठ्या प्रमाणात झालेली डिजीटल क्रांती टिंडर, बंबल यांसारख्या ॲप्समुळे जोडीदार शोधणे आणि बदलणे सोपे झाले आहे. वैवाहिक नात्यांमध्ये वाढत असलेला तणाव, लैंगिक तथा शारीरिक सुखं आणि समाधानाच्या अफाट कल्पना आणि अपेक्षा, उद्योग व्यवसाय नौकरी शिक्षण यामुळे घराबाहेर, आपल्या गावा आणि शहराबाहेर राहावे लागण्याची परिस्थिती यातून आलेला एकटेपणा, योग्य वयात लग्न जमू न शकणे, शारीरिक गरजा आणि लग्नाचे वाढत चाललेले वय या सारख्या अनेक कारणांमुळे आजकाल नाते, भावना, एकनिष्ठपणा याची कमी झालेली किंमत, चगळवाद यामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसते.जबाबदारीची भीती, अपेक्षांचे ओझे नको असणे, आयुष्य भरासाठी जोखीम स्वीकारायला मन तयार नसणे, यामुळे लग्नासारख्या मोठ्या जबाबदारीत अडकण्यापूर्वी लोक अनेक पर्याय पडताळून पाहू इच्छितात अथवा लग्नानंतर पण खूप तडजोड करत बसण्यापेक्षा मिळेल तो मार्ग स्वीकारून मूव्ह ऑन होतात.आर्थिक स्वावलंबन हा देखील खूप मोठा घटक आहे ज्यामुळे नात्यांची समीकरण बदलत चालली आहेत. मुले आणि मुली दोघेही कमावते असल्याने कोणावरही अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही.आपला पैसा कसा, कोणावर, किती आणि कोठे खर्च करायचा याचा निर्णय अत्यंत कमी वयात घेण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे युवा पिढी अधिक मोकळी सुटलेली दिसते.नात्यांच्या या बदलत्या स्वरूपात एकीकडे स्वातंत्र्य आहे, तर दुसरीकडे भावनिक असुरक्षितता देखील आहे. जुन्या पिढीसाठी हे प्रकार धक्कादायक वाटू शकतात, मात्र नवीन पिढीसाठी हे त्यांच्या बदलत्या जीवनशैलीचा एक भाग आहेत. शेवटी नातं कोणत्याही नावाचं असो, त्यात विश्वास आणि संवाद असणं महत्वाचे आहे. इथून पुढे आपल्याला घरोघरी या प्रकारच्या विविध संकल्पना पाहायला मिळाल्या तरी त्या स्वीकारणे अपरिहार्य असणार आहे.
स्त्रीस्वभाव : कोमलतेत दडलेली भावविश्वाची समृद्धी
निशा वर्तक“स्त्री”हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर अनेक भावना उभ्या राहतात — माया, प्रेम, संवेदनशीलता, जिव्हाळा, काळजी आणि त्याचबरोबर थोडासा हट्ट, रुसवा-फुगवा आणि भावनांचा ओलावा. स्त्री आणि पुरुष हे दोघेही समान मानवी अस्तित्व असले तरी त्यांच्या स्वभावातील काही वैशिष्ट्ये त्यांना वेगळेपण देतात. हे वेगळेपण श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवणारे नसून जीवन अधिक रंगतदार आणि संतुलित करणारे आहे.स्त्रियांच्या स्वभावातील सर्वात ठळक गुण म्हणजे भावनाशीलता. अनेकदा छोट्याशा प्रसंगानेही त्यांच्या डोळ्यात पाणी येते. एखाद्या मालिकेतील भावनिक प्रसंग, मुलाचे यश, जवळच्या व्यक्तीचे दुःख किंवा एखादी आठवण — या गोष्टी त्यांना सहज स्पर्श करून जातात. काहींना हे हळवेपण कमजोरी वाटते; पण प्रत्यक्षात हीच संवेदनशीलता त्यांना दुसऱ्यांच्या वेदना समजून घेण्याची ताकद देते. घरातील एखादा सदस्य निराश असेल तर त्याची अवस्था लगेच ओळखणारी व्यक्ती बहुतेक वेळा घरातील स्त्रीच असते.स्त्रियांबद्दल विनोदाने म्हटले जाते की “त्यांच्या पोटात गुपित राहत नाही.” यामागेही एक मानसिक बाजू आहे. स्त्रिया संवादप्रिय असतात. त्या भावना व्यक्त करून हलक्या होतात. मैत्रिणींमध्ये गप्पा मारताना त्या मन मोकळे करतात. उदाहरणार्थ, एखाद्या गृहिणीला दिवसभराचा ताण असतो; संध्याकाळी शेजारणीशी दोन शब्द बोलल्यावर तिचा ताण कमी झालेला दिसतो. संवाद हा त्यांच्यासाठी मानसिक आधार असतो. मात्र कधी कधी याच स्वभावामुळे नकळत एखादी गोष्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचते आणि गैरसमज निर्माण होतात हा त्याचा तोटा म्हणावा लागेल.नटणे-सजणे हा स्त्रियांच्या स्वभावाचा आणखी एक रंगतदार पैलू आहे. सण-समारंभ असो किंवा साधा दिवस नवीन साडी, दागिने, मेहेंदी किंवा छोटासा बिंदीचा स्पर्श त्यांना आनंद देतो. हे केवळ बाह्य सौंदर्याचे आकर्षण नसते; तर स्वतःला सुंदर वाटण्याची आणि जीवन साजरे करण्याची एक पद्धत असते. उदाहरणार्थ, दिवाळीत घरातील स्त्री स्वतः सजतेच, पण घरालाही सजवते. तिच्या या सौंदर्यदृष्टीमुळे वातावरणात उत्साह निर्माण होतो.स्त्रिया स्वभावतः प्रेमळ आणि जपणूक करणाऱ्या असतात. आई, बहीण, पत्नी किंवा मैत्रीण - कोणतीही भूमिका असो, नात्यांमध्ये ऊब टिकवण्याचे काम त्या सहज करतात. घरातील प्रत्येकाच्या आवडी-निवडी लक्षात ठेवणे, आजारी पडल्यावर रात्रभर जागरण करणे किंवा छोट्या यशाचाही उत्सव साजरा करणे- या गोष्टी त्यांच्या प्रेमळ स्वभावाची साक्ष देतात. म्हणूनच अनेकदा घराला “घरपण” देण्याचे श्रेय स्त्रीला दिले जाते.मात्र स्त्रीस्वभाव केवळ गुणांनीच बनलेला नाही; काही मानवी दोषही त्यात असतात. मत्सर आणि तुलना हा त्यातील एक पैलू आहे. समाजाने स्त्रियांना अनेकदा एकमेकींशी तुलना करण्याची सवय लावली - कोणाची साडी सुंदर, कोणाचे घर अधिक व्यवस्थित, कोणाचे मूल अधिक हुशार. या तुलनेतून नकळत स्पर्धा आणि मत्सर निर्माण होतो. उदाहरणार्थ, शेजारीण नवीन वस्तू घेते तेव्हा काही वेळा आनंदापेक्षा तुलना जास्त होते. ही भावना स्त्रियांपुरती मर्यादित नसली तरी सामाजिक वातावरणामुळे ती अधिक प्रकर्षाने दिसून येते.तसेच कधी कधी रुसवा, राग किंवा मनातल्या भावना साठवून ठेवण्याची प्रवृत्तीही दिसते. एखादी गोष्ट मनाला लागली तर ती लगेच स्पष्ट न सांगता मनात ठेवली जाते आणि नंतर छोट्या कारणावरून भावनिक उद्रेक होतो. यामुळे नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. पण यामागेही भावनिक गुंतवणूकच कारणीभूत असते -जिथे अपेक्षा जास्त, तिथे दुखावले जाण्याची शक्यता अधिक असते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा हट्टीपणा. एखाद्या गोष्टीसाठी ती कधी कधी खूप हट्ट धरते जसे सीतेने कांचमृगासाठी केलेला हट्ट आणि त्यामुळेच घडलेले रामायण.स्त्रियांची आणखी एक विशेषता म्हणजे अनेक भूमिका एकाच वेळी निभावण्याची क्षमता. सकाळी आई, दिवसा कर्मचारी, संध्याकाळी मुलांची मार्गदर्शक आणि रात्री कुटुंबाची काळजी घेणारी — या सर्व भूमिका त्या सहज सांभाळतात. उदाहरणार्थ, नोकरी करणारी स्त्री ऑफिसमधील ताण सांभाळून घरी आल्यावर मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देते आणि घरातील वातावरणही आनंदी ठेवते. ही बहुपदरी क्षमता त्यांच्या मानसिक ताकदीचे उदाहरण आहे.आजच्या काळात स्त्री अधिक आत्मविश्वासाने स्वतःची ओळख घडवत आहे. तिच्यातील हळवेपणा, प्रेमळपणा, सजण्याची आवड किंवा संवादप्रियता — हे दोष नसून तिच्या व्यक्तिमत्त्वाचे रंग आहेत. त्याचवेळी मत्सर, राग किंवा भावनिक अतिरेक यांवर मात करण्याची जाणीवही वाढत आहे. खरं तर स्त्री आणि पुरुष यांच्यातील फरक हा स्पर्धेचा विषय नाही; तो परस्परपूरकतेचा आहे. स्त्रीच्या संवेदनशीलतेमुळे नात्यांना उब मिळते, तिच्या प्रेमामुळे कुटुंब टिकते आणि तिच्या सहनशक्तीमुळे संकटांवर मात करता येते. गुण-दोषांसह तिचे व्यक्तिमत्त्व पूर्ण होते आणि हाच मानवी स्वभावाचा खरा अर्थ आहे.
Tarique Rahman Oath Ceremony: बांगलादेशातील १३ व्या संसदीय निवडणुकीच्या निकालानंतर, नवीन सरकार स्थापन होणार आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चे नेते तारिक रहमान हे आज बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत.
सन २०२५-२६ पासून भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय या क्षेत्रात आपले स्थान मजबूत केले. केंद्रीय चौकट जी २०२५ मध्येच निश्चित करण्यात आली होती. तिला आता व्यापक स्वरूप देण्यात आले. दिल्लीच्या भारत मंडपम येथे परिषद भरत आहे. एआय तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ तंत्रज्ञान म्हणून न करता तिचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी आणि विकास करण्याचा उद्देश आहे.सुरुवातीला या एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी १०,३७१.९२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या द्वारे एआय संपूर्ण भारतासाठी कसे उपयुक्त ठरेल आणि मूलभूत मॉडेल्स आणि डेटा बेसेसाठी एआय तंत्रज्ञान कसे उपयुक्त ठरेल हे या परिषदेतून सांगितले जाईल. विषय सर्वसामान्यांना थोडा कळण्यास अवघ़ड आहे. पण यासाठीच परिषद आहे. एआयचा उपयोग करून सामान्यांचे जीवन कसे सुसह्य करता येईल. लोकसमूह, ग्रह आणि प्रगती ही ती सूत्रे आहेत. ज्यांच्या भोवती परिषदेत काम केले जाईल आणि ही सूत्रे समावेशकता, शाश्वत आणि मानवी केंद्रीत एआय या भोवती रचना तयार करण्यात आली.लोकसमूह याचा अर्थ मानव केंद्रित एआय असून मानवतावादाची सेवा मानवांचे हक्क आणि सार्वजनिक सेवांप्रती सर्व लोकांना अधिकार तसेच विश्वासाची बांधणी करून देता येतो यावर हे सूत्र आधारलेले आहे. एआय समावेशक आणि मानवी प्रतिष्ठा यांना आणि भारतातील सांस्कृतिक वैविध्याचा आदर राखून जपवणूक करेल असे दुसरे सूत्र आहे. आपला ग्रह पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत एआय पद्धतींना अनूकूल राहील असाही उद्देश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऊर्जा सक्षम तंत्रज्ञान आणि जबाबदारीने वापर करून हवामान कृतींना पाठिंबा देईल अशी लवचिकता प्रदान करेल असे तंत्रज्ञान उभारणे असा आहे. भारतात भरणाऱ्या परिषदेची व्याप्ती इतकी मोठी आहे, की भारत मंडपम येथे भरणाऱ्या परिषदेत २.५ लाख प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. यात परदेशातून फ्रान्सचे ईमॅन्युएल मॅक्रॉन, ब्राझिलचे लुला डासिल्व्हा, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सँचेझ आदींसह उपस्थित रहाणार आहेत आणि परदेशातून तज्ज्ञ या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यात सुंदर पिचाई, सेमी कंडक्टर आणि फाईव्ह जी तंत्रज्ञान राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले क्रिस्तियानो एमोन आदींचा समावेश आहे.नवी दिल्लीत सुरू होणारी परिषद ही भारतासाठी अशा प्रकारची पहिलीच परिषद आहे आणि एआय धोक्यांचे कसे व्यवस्थापन करायचे हे शिकवणारी आहे. तसेच नावीन्यपूर्ण संशोधनाला रुळावर व्यवस्थित कसे ठेवायचे याचाही विचार केला जाणार आहे. याची जी चौकट आखली आहे ती एआयचा वापर करताना पक्षपात आणि गैरवापराला आळा घालणे आणि तसे करतानाही भारताचे हेतू जबाबदार एआय व्यवस्थापन करणे यापुरते मर्यादित आहे. या परिषदेतून भारताचा हेतू हा स्पष्ट होतो, की जबाबदार एआय गव्हर्नन्सला आकार देण्याचा आहे. पण यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की एआयच्या मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत ती आरोग्य, शिक्षण, कृषी आणि वित्त यात कशी उपयोगात आणली जातील यावर विचार करण्याचा आहे. कठोर नियंत्रणाशिवाय चौकटीने सात व्यापक सूत्रे निश्चित केली आणि जी धोरणकर्ते आणि उद्योग या दोघांनाही मार्गदर्शन करतील. यामध्ये विश्वास हा पाया, पीपल फर्स्ट म्हणजे लोक सर्वोपरी, संशोधनापेक्षा संयम महत्त्वाचा आणि समानता आणि जबाबदारी यांचा समावेश आहे. या सूत्रांचा यावर भर आहे, की एआय सिस्टीमनी मानवी निर्णय प्रक्रियेला पाठिंबा दिला पाहिजे आणि तरीही ते पारदर्शक आणि कोणतेही पक्षपात टाळून साध्य करता आले पाहिजे. या परिषदेचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य हे आहे, की सध्याच्या कायद्यावरील अवलंबितता. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, की अनेक एआयशी संबंधित धोके हे सध्याच्या कायदेशीर चौकटीत समाविष्ट आहेत आणि त्यात आयटी नियमावली आणि गुन्हेगारी कायदे यांचा समावेश आहे. या मार्गदर्शक तत्वांत असे सांगितले आहे, की एआय डेव्हलपर्स आणि डिप्लॉयर्सकडून काय अपेक्षा आहे. संशोधनाला प्राधान्य देऊन सरकारने केवळ ते एआयचा प्रमुख वापर करणारे नाही तर जबाबदार आणि समावेशक कारभार जो भारताचा २०४७ साली साकार होणारा विकसित भारत दृष्टिकोन साध्य करणारा असेल असे सिद्ध करू पाहत आहे.एआयचा उपयोग विविध कारणांसाठी होतो आणि हेच या परिषदेचे सार आहे. रोजगार, भाषा, नवीन रोजगार मिळवणे, सार्वजनिक सेवा आणि सामान्य लोकांना लाभप्रद होतील अशा योजना राबवणे यासाठी एआयचा उपयोग कसा करता येईल या दृष्टीने या परिषदेत विचार केला जात आहे. ब्रिटनचे उपपंतप्रधान डेव्हीड लॅमी आणि एआय मंत्री कनिष्क नारायण हे भारतात आलेल्या शिष्ट मंडळात आहेत. त्यांनी सांगितले, की एआयचा उपयोग करून रोजच्या जीवनात कसा सामान्याना लाभ करून देता येईल आणि जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात एआयचा उपयोग करून डॉक्टर त्वरीत रोगनिदान करतील, शिक्षक शिकवण्यात नवनवीन पद्धती आणतील आणि परिषदा सेवा झटपट देऊन उद्योग नवीन जनरेशनचे रोजगार तयार करतील हे पहाण्यासाठी एआयचा वापर केला जाईल. एआय हे अभूतपूर्व वचन देते की जागतिक आव्हानांना जसे की सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षण आणि शेतीत उत्पादकता वाढवणे आणि त्यासोबतच मानवी हक्कांचा आदर करणे याबाबत क्रांतिकारी आहे. एआय पद्धतींचा वापर जर उपयोगकर्ते आणि विकासक यांच्यामार्फत झाला तर समाजाला त्याचा शेवटी प्रचंड लाभ होऊ शकतो. जगात सर्वात जास्त लोकसंख्या असूनही भारतात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि डिजिटल बाजारपेठांपैकी ती सर्वात वेगाने वाढणारी आहे. मानवता, समावेशक वाढ आणि शाश्वत विकासासाठी एआयचा उपयोग केला पाहिजे असे जे भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले ते अगदीच योग्य आहे. ही शिखर परिषद राष्ट्रीय क्षमता, आर्थिक लवचिकता आणि दीर्घकालीन क्षमतांचा सक्षम देश म्हणून भारताची ओळख निश्चित करेल. अत्यंत झपाट्याने बदलत असलेल्या एआयचे जग समजण्यासाठी आणि एआयचा उद्देश्य सामान्य जनांपर्यंत पोहोचवणे हा या परिषदेचा हेतू आहे. भारत भरवत असलेल्या या परिषदेची संकल्पना आहे. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. हा हेतू सर्व काही सांगून जाणारा आहे. यावेळी परिषदेचा हेतू एआयपासून धोका हा केवळ नाही तर एआयपासून सामान्य लोकांना होणारा फायदा हाही आहे.
मिनी विधानसभेनिमित्ताने मोठी घुसळण
वार्तापत्र : दक्षिण महाराष्ट्रदक्षिण महाराष्ट्रातील (कोल्हापूर-सांगली) स्थानिक राजकारणात, विशेषतः सहकारी संस्था आणि पंचायत समित्यांमध्ये मोठी उलथापालथ होत आहे. स्थानिक नेत्यांचे गट बदलणे, नवीन आघाडी तयार होणे यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया अत्यंत चुरशीची बनली आहे. सत्तासंघर्षात बाजी मारण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्राच्या राजकारणात नवी उलथापालथ सुरू झाली आहे. आता अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू असून, प्रत्येक जिल्ह्यात पक्षीय आकडेवारी, आरक्षण आणि गुप्त चर्चा यांचा मेळ घालून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील खेळीमेळी, फुटीर गट आणि स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा यामुळे तीनही जिल्हे ‘मिनी विधानसभे’सारखे वाटत आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता स्थापनेसाठी चुरस वाढली आहे. उलथापालथ: दिग्गज नेत्यांच्या निर्णयामुळे समीकरणे बदलत असून अनेक ठिकाणी नवीन गट (आघाडी) तयार होत आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी बैठका आणि गुप्त चर्चांचा वेग वाढला आहे. सत्ता टिकवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळत आहे. या उलथापालथीत कोणता गट बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सांगली: त्रिशंकू परिस्थिती, जयंत पाटलांचा दबदबासांगली जिल्हा परिषदेच्या ६१ जागांपैकी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत (३१) मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १८ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर भाजपला १६ जागा मिळाल्या. काँग्रेसचे ११ उमेदवार विजयी झाले. वाळवा तालुक्यात जयंत पाटलांनी बालेकिल्ला राखला, तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनंतरही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. दहा पंचायत समित्यांपैकी भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (शरद), राष्ट्रवादी (अजित) आणि काँग्रेस यांना प्रत्येकी दोन समित्यांवर सत्ता मिळाली. अध्यक्षपदासाठी आता पोस्ट-पोल आघाडीची चर्चा सुरू आहे. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस व अन्य छोट्या गटांसोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे भाजप महायुतीच्या साथीने बहुमत गोळा करण्याचा दावा करत आहे. सांगली ही पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची ‘बारोमीटर’ मानली जाते. येथील अध्यक्ष निवड आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.सातारा: भाजपचा दावा, ओबीसी महिला आरक्षणाचा ट्विस्टसातारा जिल्हा परिषदेच्या ६५ जागांपैकी भाजप २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला २० आणि शिवसेनेला १५ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी (अजित पवार गट) ची कामगिरी चांगली दिसली, परंतु स्पष्ट बहुमत (३३) कोणालाही नाही. अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने ९ ओबीसी महिला सदस्यांमधून एकाची निवड होणार आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले की, “साताऱ्यात भाजपचाच अध्यक्ष होईल.” शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने रणनीती आखली आहे. शंभूराज देसाई (शिवसेना) यांच्यासोबत ‘पॅचअप’ करून बहुमत गोळा करण्याची शक्यता आहे. अर्थात शंभूराज देसाई यांच्या अटी शर्तीवर ते ठरेल. राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीला बहुमत असतानाही दावा न करता भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. सातारा जिल्हा परिषदेत प्रथमच भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, तीन पंचायत समित्यांवरही त्यांची सत्ता आली आहे. यामुळे स्थानिक नेतृत्व बळकट होण्याची शक्यता आहे.कोल्हापूर: महायुतीचे बहुमत, राष्ट्रवादीचा दावाकोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६८ जागांपैकी महायुतीला ५१ जागा मिळून स्पष्ट बहुमत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २० जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर काँग्रेस १४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर. हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने उच्चांकी कामगिरी केली. अध्यक्षपद शाहूवाडी तालुक्यासाठी राखीव असल्याचे संकेत मिळत आहेत. राजकुंवर गायकवाड यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. महायुतीत अध्यक्षपद वाटपाची चर्चा सुरू आहे – प्रथम राष्ट्रवादी, नंतर भाजप किंवा शिवसेना अशी वाटणी होईल. महानगरपालिकेप्रमाणे सव्वा वर्षाचा रोटेशन फॉर्म्युला येथेही लागू होण्याची शक्यता aahe. काँग्रेसचे सतेज पाटील यांनी महायुतीतील गोंधळ हेरून दुरावलेल्या नेत्यांशी संपर्क साधला असल्याचेही बोलले जाते. कोल्हापूर जिल्हा परिषदेत आतापर्यंत २० अध्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे होते; यंदा महायुती ही परंपरा मोडण्याच्या तयारीत आहे.प्रादेशिक परिणाम आणि भविष्यातील चित्रतीनही जिल्ह्यांतील अध्यक्ष निवडीचा फैसला केवळ स्थानिक सत्तेसाठी नाही, तर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे ठरवेल. सांगलीत जयंत पाटलांचा प्रभाव, साताऱ्यात गोरे-भोसले यांची रणनीती आणि कोल्हापुरात मुश्रीफ-महायुती यांचा खेळ यामुळे मविआ आणि महायुती यांच्यातील संघर्ष तीव्र होणार आहे. ओबीसी आरक्षण, महिला प्रतिनिधित्व आणि स्थानिक नेत्यांच्या मेळ घालणे नेत्यांसमोर आव्हान आहे. दक्षिण महाराष्ट्र हा राज्याच्या राजकारणाचा ‘स्विंग’ विभाग मानला जातो. येथील निकाल २०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी संकेत देणारे ठरतील. सध्या चर्चा, बैठका आणि गुप्त सौदे यांचा काळ सुरू आहे. अंतिम निकाल येताच दक्षिण महाराष्ट्राचे राजकीय चित्र स्पष्ट होईल.
Top 10 news: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी चौकशी समितीकडून क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
Nafisa Begum Abdul Sattar : आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसाबेगम यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे.
दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयानंतर, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) चे अध्यक्ष तारिक रहमान मंगळवारी पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. शपथविधी सोहळा पारंपारिक स्थळ बंगघवनाऐवजी राष्ट्रीय संसदेच्या दक्षिण प्लाझा येथे होणार आहे.राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन हे संध्याकाळी ४ वाजता नवीन मंत्रिमंडळाची शपथ घेणार आहेत. सकाळी मुख्य निवडणूक आयुक्त एएमएम नासिर उद्दीन हे सर्व २९७ नवनिर्वाचित खासदारांना शपथ देणार आहेत.यानंतर, बीएनपी संसदीय पक्षाच्या बैठकीत अधिकृतपणे आपला नेता निवडेल आणि त्यानंतर अध्यक्ष त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतील. बीएनपीने २९७ पैकी २०९ जागा जिंकल्या, तर जमात-ए-इस्लामीने ६८ जागा जिंकल्या.शेख हसीना यांच्या अवामी लीगला सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेण्याची परवानगी नव्हती. आता, तारिक रहमान पहिल्यांदाच पंतप्रधान म्हणून काम पाहतील, ते अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या जागी येतील.तारिक रहमान यांचे दोन प्रमुख आव्हानांवर लक्ष
Pune Land Scam :पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणाचा खारगे समितीचा अहवाल समोर आला असून, पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई: खगोलीय घटनांच्या दृष्टीने २०२६ हे वर्ष विशेष ठरणार आहे. या वर्षात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण लागणार आहेत. वर्षातील पहिले सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी २०२६ रोजी लागणार आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल. कंकणाकृती ग्रहणात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही, तर सूर्याची कडा अंगठीसारखा (रिंगसारखा) दिसते. याच दिवशी माघ महिन्यातील अमावस्या असल्याने ग्रहणाच्या वेळी अमावस्येची पूजा करता येईल का? याबद्दल जाणून घेऊयात...सूर्यग्रहण २०२६ची वेळवर्षाचे पहिले सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३:२६ वाजता (IST) सुरू होईल आणि संध्याकाळी ७:५७ वाजता समाप्त होईल. सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे ४ तास ३२ मिनिटांचा असेल. पण हे ग्रहण भारतात दिसणार नाही.माघ अमावस्या आणि ग्रहणाचा योगमाघ अमावस्या १६ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५:३५ वाजता सुरू होईल आणि १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३१ वाजता समाप्त होईल. उदया तिथीनुसार अमावस्या १७ फेब्रुवारीलाच मानली जाईल. म्हणजेच अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी येत आहेत.ग्रहणाच्या वेळी पूजा करू शकतो का?धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा ग्रहण भारतात दृश्यमान असते तेव्हाच सूतक काळ लागू होतो. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सूतक काळ लागू होणार नाही. त्यामुळे माघ अमावस्येच्या व्रताचे पालन करता येईल आणि पूजा-पाठही करता येईल. कोणत्याही शुभ कार्यात अडथळा मानला जाणार नाही.माघ अमावस्येचे महत्त्वअमावस्या हा दिवस पितरांना समर्पित मानला जातो. या दिवशी पवित्र नदीत स्नान, दान आणि तर्पण करणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे, त्यांनी या दिवशी तर्पण अवश्य करावे. पितरांना संतुष्ट केल्यास घरात सुख-शांती आणि समृद्धी येते. रखडलेली कामेही पूर्ण होऊ लागतात, असे मानले जाते.ग्रहणाच्या वेळी काय खावे, काय टाळावे?सूर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण, कोणत्याही ग्रहणाच्या काळात शिजवलेले अन्न, तामसिक पदार्थ जसे मांस, मासे, कांदा, लसूण आणि पचनास जड अन्नपदार्थ खाणे टाळावे, अशी मान्यता आहे. कारण हे पदार्थ अशुद्ध आणि नकारात्मक ऊर्जेने प्रभावित होतात, असे म्हणतात. उत्तम आरोग्यासाठी ग्रहणाच्या वेळी उपवास करणे चांगले मानले जाते. काही खाणे आवश्यक असल्यास त्यात तुळशीपत्र ठेवावे आणि द्रवयुक्त पदार्थांचे सेवन करावे. तसेच पचनास हलके आणि सात्त्विक अन्नाचे सेवन करावे.
Mumbai Municipal Corporation :मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीनंतर आता विविध समित्यांवरील सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
दिल्ली: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सोमवारी रात्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर प्रथम महिला ब्रिजिट मॅक्रॉन यांच्यासह मुंबईत दाखल झाले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विमानतळावर फ्रान्सचे अध्यक्ष आणि प्रथम महिला यांचे स्वागत केले.या भेटीदरम्यान, मॅक्रॉन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. तसेचच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि धोरणात्मक सहकार्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे. हेलिकॉप्टर आणि हॅमर प्रिसिजन-मार्गदर्शित क्षेपणास्त्रांच्या संयुक्त निर्मितीसह द्विपक्षीय संरक्षण सहकार्यासाठी नवीन प्रोत्साहन देणे हे मुख्य लक्ष केंद्रित केले जाईल.उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून मॅक्रॉन यांचा हा चौथा देश दौरा आहे, जो भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीमध्ये सातत्यपूर्ण गती दर्शवितो, ज्यामध्ये विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सहकार्य आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले जाईल.मुख्यमंत्री फडणवीसांकडून फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागतराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि प्रथम महिला यांचे स्वागत केले आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, मुंबईला दोन वर्षे पूर्ण! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष महामहिम इमॅन्युएल मॅक्रॉन आणि प्रथम महिला ब्रिजिट मॅक्रॉन यांचे मुंबईत आगमन झाल्यावर त्यांचे हार्दिक स्वागत!महाराष्ट्र तुमचे स्वागत करतो! माननीय राष्ट्रपती मॅक्रॉन आणि संपूर्ण फ्रेंच शिष्टमंडळाला आनंददायी वास्तव्य आणि यशस्वी भेटीसाठी शुभेच्छा! माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत जी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मंत्री, अधिकारी देखील स्वागतासाठी उपस्थित होते. Bienvenue Mumbai!A very warm welcome to the President of France, H.E. Emmanuel Macron and First Lady Brigitte Macron as they arrive in Mumbai!Maharashtra welcomes you!Wishing Hon President Macron and the entire French delegation a pleasant stay and a successful… pic.twitter.com/h0CrOc90OG— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 16, 2026मुंबई विमानतळावर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत
16 जानेवारी 2026 रोजी, हरिद्वारमधील गंगा घाटांवर जागोजागी फलक लावण्यात आले होते. त्यावर लिहिले होते- ‘हर की पौडीवर गैर-हिंदूंना प्रवेश निषिद्ध आहे.’ फलकावर कोणत्याही संस्थेचे नाव नव्हते. खाली फक्त एवढेच लिहिले होते की, हरिद्वार म्युनिसिपल ॲक्टच्या आदेशानुसार. त्यानंतर उत्तराखंडमध्ये केदारनाथ, बद्रीनाथसह 47 तीर्थक्षेत्रांवर गैर-हिंदूंना प्रवेशबंदी करण्याच्या मागणीने जोर धरला. यासाठी प्रस्ताव आणला जात आहे. हर की पौडीची जबाबदारी सांभाळणाऱ्या श्री गंगा सभेने गंगा घाटांवर फलक लावून याची सुरुवात केली. चारधाममध्येही लवकरच असे फलक दिसणार आहेत. चारधाम बोर्ड किंवा समित्यांनीच नव्हे, तर सरकारनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी सांगितले आहे की, चारधामच्या समित्या, संत समाज आणि तीर्थक्षेत्रांसाठी जबाबदार असलेले लोक जे काही सांगतील, तेच आम्ही करू. यासाठी 1916 च्या हरिद्वार म्युनिसिपल ॲक्ट/बाय-लॉजवर अभ्यासही सुरू आहे. प्रश्न असा आहे की, हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांवर गैर-हिंदू जातात का किंवा त्यांच्याशी किती गैर-हिंदूंची रोजीरोटी जोडलेली आहे? दैनिक भास्करच्या टीमने या प्रश्नांची उत्तरे, बंदीच्या मागणीचे कारण आणि गरज समजून घेण्यासाठी गंगा सभेचे अध्यक्ष नितीन गौतम आणि बद्रीनाथ-केदारनाथ समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांच्याशी संवाद साधला. 'बंदी घातली नसती तर काय देवांच्या भूमीला इस्लामचे घर बनताना पाहिले असते का?' हरिद्वारमधील सर्व तीर्थक्षेत्रांवर गैर-हिंदूंना प्रवेशबंदी घालण्याची मागणी केली जात आहे. हर की पैडी येथे फलकही लावण्यात आला आहे. आता इतर ठिकाणच्या धार्मिक समित्याही लवकरच औपचारिकपणे याची घोषणा करणार आहेत. आम्ही हरिद्वारमधील सर्वात जुनी धार्मिक संस्था आणि हर की पौडीची जबाबदारी सांभाळणारी संस्था श्री गंगा सभेचे अध्यक्ष नितीन गौतम यांना विचारले की बंदी घालण्याची मागणी करण्याची गरज का पडली? नितीन म्हणतात, 'ही नवीन मागणी नाही. हा त्या कायद्याबद्दल आहे, जो याच ठिकाणासाठी बनवला होता. तो लागूही आहे, फक्त त्याचे पालन होत नाहीये. आम्ही त्या कायद्यानुसार हिंदूंच्या तीर्थस्थळांवर गैर-हिंदूंना बंदी घालू इच्छितो. हर की पौडीमध्ये हे झाले आहे. आता इतर ठिकाणीही होईल.' नितीन गौतम पुढे म्हणतात, 'सर्वात मोठा धोका कोण आहे, हे सर्वजण जाणतात. कुराणमध्ये लिहिले आहे - आधी दारुल अमन करा, मग दारुल हरम आणि नंतर दारुल इस्लाम. म्हणजे जिथे ही समुदाय (मुस्लिम) खूप कमी संख्येत असेल, तिथे बंधुत्वाची गोष्ट करा, गंगा-जमुनी संस्कृती दाखवा. लोकसंख्या वाढल्यास दारुल हरम म्हणजे दंगल-फसाद करा.' 'यानंतर दारुल इस्लाम हे अंतिम उद्दिष्ट पूर्ण करा. म्हणजे त्या जागेला-जमिनीला इस्लामचे घर बनवा. हरिद्वारच नाही, तर उत्तराखंडमध्ये जिथे पाहाल तिथे मुस्लिम दंगल-फसाद करत आहेत. ते दारुल हरमच्या स्थितीपर्यंत पोहोचले आहेत.' दावा- मुस्लिमांमुळे हरिद्वारमध्ये गुन्हे वाढलेया मागणीवर सरकारची भूमिका काय आहे? नितीन गौतम सांगतात, 'मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचे विधान तुम्ही ऐकले असेल. त्यांनी सांगितले की, संत समाज आणि तीर्थक्षेत्रांशी संबंधित समित्या या प्रकरणांमध्ये निर्णय घेतील. सरकारची टीम 1916 च्या हरिद्वार म्युनिसिपल ॲक्ट किंवा बायलॉजचा गांभीर्याने अभ्यास करत आहे.' गैर-हिंदू देखील हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांवर येतात का? 'ते तीर्थयात्री म्हणून येत नाहीत, पण पैसे कमवण्यासाठी येतात. हर की पैडी किंवा मंदिरांच्या आसपास चहाची दुकाने, सलून आणि फळांची दुकाने यांचीच असतात. ते तात्पुरते ठिकाण तर बनवतातच.' ‘गेल्या काही वर्षांत हरिद्वारमध्ये यांच्यामुळे अचानक गुन्हेगारी वाढली आहे. जर यांना थांबवले नाही, तर हे लोक याला इस्लामचे घर म्हणजेच दारुल इस्लाम बनवूनच सोडतील, म्हणूनच हे आवश्यक आहे.’ कुंभ क्षेत्रातही गैर-हिंदूंना प्रवेशबंदी आहे का? यावर नितीन म्हणतात, 'सध्या अधिकृतपणे नाही, पण तिथेही बंदी असेल. हे रुद्रप्रयागपासून हरिद्वारपर्यंतचे सुमारे 75-80 किलोमीटरचे क्षेत्र आहे. येथेही तोच कायदा लागू आहे, जो इतर तीर्थक्षेत्रांवर आहे. म्हणून येथेही बंदी असेल.' बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यापूर्वी गैर-हिंदूंना प्रवेशबंदीचार धामांपैकी दोन धाम बद्रीनाथ-केदारनाथ आहेत. हर की पैडी आणि कुंभ क्षेत्रात गैर-हिंदूंना प्रवेशबंदीचे फलक लावल्यानंतर, येथेही याची मागणी वाढत आहे. आम्ही बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांच्याशी बोललो. ते उत्तराखंड सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. ते स्पष्टपणे म्हणतात, ‘गैर-हिंदूंना बंदी घालणे हा मुद्दाच बनू नये, कारण ही हिंदूंसाठी तीर्थक्षेत्रे आहेत, पर्यटन स्थळे नाहीत. येथे फक्त हिंदूच येतील. आम्ही प्रस्ताव तयार केला आहे. सर्वांची सहमतीही आहे. बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख येताच, त्यापूर्वी आम्ही बोर्डाची बैठक घेऊ आणि यावर शिक्कामोर्तब होईल.’ ते पुढे म्हणतात, 'येथे आदि शंकराचार्यांनी स्थापित केलेल्या वैदिक सनातन परंपरेनुसार, पूजा पद्धती आणि नियम आहेत. त्यांची पवित्रता आणि प्राचीनता टिकवून ठेवणे हा आमचा धर्म आहे. परदेशी आणि गैर-आस्था असलेल्या लोकांच्या प्रवेशाचा येथे कधीच नियम नव्हता.' तर या वर्षी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यापूर्वी हरिद्वार म्युनिसिपल ॲक्ट कठोरपणे लागू होईल का? उत्तर मिळाले, 'होय, नक्कीच.' ‘परिसर प्रतिबंधित, तरीही दर्गे बांधले गेले, नमाज पठण सुरू झाले’ बद्रीनाथ आणि केदारनाथसारख्या प्रमुख मंदिरांमध्येही गैर-हिंदू येतात का? हेमंत उत्तर देताना म्हणतात, 'येथे सातत्याने अनेक अवैध दर्गे बांधले गेले आहेत, त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की हे लोक येथे येतात. त्यांचा येथे येण्याचा उद्देश तो नाही, जो आमचा आहे, म्हणून त्यांच्यापासून धोकाही आहे.' बद्रीनाथ किंवा केदारनाथ धामच्या आसपासही नवीन दर्गे बांधले गेले आहेत का? उत्तरादाखल ते म्हणतात, 'होय, दोन वर्षांपूर्वीपासून हे लोक येथे नमाज पठण करू लागले, जो परिसर प्रतिबंधित आहे. नंतर हर की पौडीमध्येही असेच प्रकरण समोर आले, त्यामुळे त्यांना थांबवावेच लागेल.' सरकार याला सहमत आहे का? हेमंत म्हणाले, 'सरकारच्या सहमती किंवा असहमतीचा प्रश्नच का, राज्य तर कायद्याने चालते. हरिद्वार म्युनिसिपल ॲक्ट तेच सांगतो, जे आम्ही म्हणत आहोत. हा ॲक्ट अजूनही लागू आहे, आम्ही फक्त याची आठवण करून देत आहोत.' गैर-हिंदूंमध्ये जैन, शीख आणि बौद्ध नाहीत तर मग कोण?राज्यमंत्री हेमंत द्विवेदी यांना आम्ही विचारले की तुमच्या मते हिंदू कोण आहे? ते म्हणतात, 'संविधानाच्या कलम-25 मध्ये स्पष्ट लिहिले आहे - शीख, जैन, बौद्ध हे हिंदू आहेत.' ख्रिश्चन आणि मुस्लिमांसाठी बंदीचा प्रस्ताव सरकारनेही मान्य केला आहे का? उत्तर मिळाले- 'अशा मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उज्जैन महाकालच्या गर्भगृहात प्रवेशाचे एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते, परंतु न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की हा मंदिर समितीचा विषय आहे. कोण जाईल आणि कोण नाही हे ती (समिती) ठरवेल. येथेही तीच परिस्थिती आहे. तीर्थक्षेत्रे, मंदिरांबद्दल जे काही ठरवायचे आहे, ते समितीच ठरवेल. हे सरकारही मान्य करते.' 2027 चा अर्धकुंभ मुस्लिम-ख्रिश्चनांसाठी प्रतिबंधित असेल का? हेमंत द्विवेदी यांना विचारण्यात आले की, यावेळी 2027 चा अर्धकुंभ गैर-हिंदूंसाठी म्हणजेच मुस्लिम आणि ख्रिश्चनांसाठी प्रतिबंधित असेल का, तेव्हा त्यांचे उत्तर होते, 'नक्कीच असेल. नियम नेहमीच सर्वांसाठी असतात.' मग काय आर्थिक घडामोडींमध्येही मुस्लिमांचा सहभाग संपेल का? उत्तर मिळालं- 'तसं नाहीये. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर जे काही करायचं असेल ते करा, पण आत येण्याची परवानगी नसेल.' वक्फ बोर्ड म्हणाला- यात चुकीचं काय, मक्कामध्येही गैर-मुस्लिमांना बंदी आहे उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्सही या बंदीचे समर्थन करतात. ते म्हणतात, 'तुम्ही कधी मक्का येथे गेला आहात का, गेला नसाल. जर तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला असता, तरी जाऊ शकला नसता. तिथे हिंदूंना जाता येत नाही. ते मुस्लिमांचे सर्वात मोठे धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे जर उत्तराखंडमधील तीर्थक्षेत्रांमध्ये गैर-हिंदूंना बंदी घातली जात असेल, तर यात मला काहीही गैर दिसत नाही.' ‘जर कोणाला हिंदू धर्मात इतकी रुची असेल, तर तो धर्म बदलून या तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकतो. देशात अशी अनेक प्रकरणे आली, जसे की- गर्भगृहात प्रवेशाचे असो किंवा कोणत्या मंदिरात प्रवेशाचे, जवळपास सर्वच ठिकाणी धार्मिक समित्यांची बाजू कोर्टाने स्वीकारली. येथेही आपण दुसऱ्याच्या धर्माच्या श्रद्धा आणि नियमांचा आदर केला पाहिजे.’ बंदी घातल्यास, गैर-मुस्लिमांच्या कामावर परिणाम होईल का? उत्तराखंडमधील चारधाम तीर्थक्षेत्रात यात्रेदरम्यान लाखो लोक काम करतात. यात 10 ते 12 हजारांहून अधिक लोक थेट जोडलेले आहेत. यात घोडा-खेचर चालक, हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कर्मचारी, वाहतुकीशी संबंधित लोक आणि सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश आहे. एकट्या गौरीकुंडसारख्या परिसरात 350 हून अधिक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि तंबू निवासस्थानं आहेत. त्याचबरोबर, प्रवासादरम्यान भाविकांना चढाईसाठी घोडे, खेचर, पालखी किंवा डांडी-कंडीची गरज भासते. केदारनाथमध्येच जवळपास 8,000 हून अधिक डांडी-कंडी, टट्टू आणि घोडे-खेचर ऑपरेटर नोंदणीकृत आहेत. काही कुटुंबांमध्ये असे खेचर आणि कंडीवाले आहेत, जे नोंदणीकृत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांची खरी संख्या 12 ते 15 हजार दरम्यान असू शकते. यामध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांची मोठी संख्या आहे. जर बंदी घातली तर त्यांच्या रोजगारावर थेट परिणाम होईल. त्याचबरोबर चार धामच्या यात्रा मार्गावर असलेल्या हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये काम करणारेही 2 हजारांहून अधिक आहेत, यामध्येही बरेच मुस्लिम लोक आहेत. त्यांचे कामही प्रभावित होईल.
MD Drugs Seized : खराडीत गस्तीदरम्यान सापडला तपासाचा धागा; १ किलो ९६० ग्रॅम एमडी आणि कारसह ४ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त.
Pune Police : आता ‘या’ठिकाणी आंदोलनांवर बंदी! काँग्रेस भवन राड्यानंतर पोलीस आयुक्तांचा कडक निर्णय
Pune Police : भाजप-काँग्रेस शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे; पोलीस आयुक्तांनी फेटाळले पक्षपातीपणाचे सर्व आरोप.
सुमारे 1.76 लाख रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकानंतर सोन्याची किंमत सतत चढ-उतार होत आहे. किंमत 1 लाख रुपयांच्या खाली येऊ शकते असा अंदाज बांधला जात आहे. सोन्याच्या दरातील ही घट रशियाने अमेरिकेला दिलेल्या ऑफरमुळे असल्याचे मानले जाते. जर हा करार अमेरिका आणि रशिया यांच्यात अंतिम झाला, तर त्यामुळे बाजारात मोठे बदल होऊ शकतात. अखेर रशिया-अमेरिका करार काय आहे, तो सोन्याच्या दरात कशी घट करेल आणि कधी? आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया... प्रश्न 1: रशिया अमेरिकेशी कोणता करार करणार आहे?उत्तर: रशिया लवकरच व्यापारासाठी अमेरिकन डॉलरचा वापर पुन्हा सुरू करू शकतो. ब्लूमबर्गनुसार, रशिया-युक्रेन युद्धाच्या समाप्तीनंतर रशियाने अमेरिकेशी करार करण्यासाठी वाटाघाटी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यात सात मुद्दे आहेत ज्यावर रशिया आणि अमेरिका सहमत होऊ शकतात. यापैकी एक आहे - डॉलरचा वापर पुन्हा सुरू करणे. रशिया, जो भागीदार देशांसोबत डॉलरऐवजी स्थानिक चलनात व्यापार करतो, तो आता डॉलर सेटलमेंट प्रणालीमध्ये परत येण्याचा विचार करत आहे. यात तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करण्यासाठी डॉलरचा वापर करण्याचाही समावेश असेल. हा प्रस्ताव वरिष्ठ रशियन अधिकाऱ्यांमध्ये सामायिक करण्यात आला आहे. रशिया तेल आणि गॅसचा व्यापार पुन्हा डॉलरमध्ये सुरू करेल प्रश्न 3: रशियाद्वारे डॉलरचा वापर डी-डॉलरकरणवर कसा परिणाम करेल?उत्तर: डी-डॉलरकरण म्हणजे जागतिक व्यवसायासाठी डॉलरऐवजी पर्यायी चलनांचा वापर करणे. अमेरिकेने रशियाचे 300 अब्ज डॉलर जप्त करणे हा संपूर्ण जगासाठी एक मोठा धक्का होता. तेव्हापासून अनेक देशांनी डी-डॉलरकरणावर भर देण्यास सुरुवात केली आहे... रशियाच्या पुढाकाराने जगभरात डॉलरमुक्तीला गती मिळाली होती. आता, जर रशिया स्वतः डॉलरचा वापर सुरू करेल, तर डॉलरमुक्तीची गती मंदावू शकते. मात्र, रशियाची सरकारी वृत्तसंस्था TASS सोबतच्या एका मुलाखतीत क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय व्यापारात डॉलरचा वापर केल्याने रशियाच्या व्यापारात स्थानिक चलनांना प्रोत्साहन देण्याच्या तत्त्वावर कोणताही परिणाम होणार नाही. पेस्कोव्ह यांच्या मते, रशियाचे आपल्या भागीदार देशांसोबत स्थानिक चलनांमध्ये व्यापार करण्याचे धोरण कायम राहील. जर डॉलर फायदेशीर ठरला, तर त्याचा वापर पुन्हा सुरू होईल, परंतु केवळ इतर चलनांच्या संयोगानेच. केवळ डॉलरमध्येच व्यवसाय होईल असे नाही. प्रश्न 4: जर रशियाने डॉलरचा वापर केला तर सोन्याच्या दरात घट होईल का? जर होय, तर कसे? उत्तर: डॉलरवरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी जगभरातील अनेक देश, विशेषतः ब्रिक्स देश, त्यांच्या गंगाजळीतून डॉलर कमी करत आहेत आणि सोन्याचा साठा वाढवत आहेत. 2005 मध्ये भारताचे परकीय चलन साठा (फॉरेन रिझर्व्ह) फक्त 4.3% सोने होते. ते 2025 पर्यंत वाढून 15% झाले आहे. 2000 ते 2025 दरम्यान चीनचा सोन्याचा साठा 483% वाढला. ब्राझीलने 2025 मध्ये 16 टन सोने खरेदी केले होते, मागील चार वर्षांत कोणतेही सोने खरेदी केले नव्हते. गेल्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांच्या टॅरिफमुळे जगभरात आर्थिक अस्थिरतेची भीती आहे. अनेक देशांच्या केंद्रीय बँकांनी अधिक सोने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः ब्रिक्स देशांकडे आता जगातील 20% सोन्याचा साठा आहे. असेट मॅनेजमेंट कंपनी पेस 360 चे संस्थापक अमित गोयल यांच्या मते, रशियाचा निर्णय डी-डॉलरकरण प्रक्रियेत मोठा बदल घडवून आणेल. जगभरातील केंद्रीय बँका घाबरून त्यांच्या सोन्याच्या साठ्यात वेगाने घट करू शकतात. यामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा वाढेल. जेव्हा एखाद्या वस्तूचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त होतो, तेव्हा त्याची किंमत कमी होऊ लागते. येत्या काळात सोन्यासोबतही असेच काहीसे होऊ शकते. एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सीचे प्रमुख अनुज गुप्ता म्हणतात, जगभरातील केंद्रीय बँका सोन्याची खरेदी कमी करू शकतात. यामुळे सोन्याच्या दरात लक्षणीय घट होऊ शकते. शक्य आहे की केंद्रीय बँका बाजारात त्यांचे सोने विकायला सुरुवात करू शकतात. अनुज गुप्ता म्हणतात की, जर रशिया डॉलरकडे परतला, तर सोन्याच्या गुंतवणुकीच्या प्रतिमेवर परिणाम होईल. यामुळे सोन्याची मागणी कमी होईल आणि डॉलरमधील गुंतवणूक वाढू शकते. प्रश्न 5: तर, सोने खरोखरच 1 लाख रुपयांपेक्षा खाली जाईल का?उत्तर: अमित गोयल यांच्या मते, भारतात सोन्याचे दर त्यांच्या सर्वकालीन उच्चांकावरून आधीच 15% कमी झाले आहेत आणि ते आणखी कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ते प्रति औंस 3,000 डॉलरपर्यंत पोहोचू शकते. दरम्यान, भारतात सोन्याचे दर प्रति किलोग्राम 1 लाख रुपयांपेक्षा खाली येऊ शकतात. 2027 पर्यंत भारतात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 90 हजार ते 1 लाख रुपयांच्या दरम्यान स्थिर होऊ शकतात. अनुज गुप्ता सोन्याच्या दरातील चढ-उतारासाठी इतर शक्यता देखील स्पष्ट करतात: सोन्याच्या दरातील घट लोकांना त्यांच्या दीर्घकालीन गुंतवणुकीत वाढ करण्यास प्रवृत्त करू शकते. अमेरिका आणि इराण यांच्यातील अणुशस्त्रांचा मुद्दा अजूनही अनुत्तरित आहे. हे घटक सोन्याच्या दरावरही दबाव आणू शकतात. अमेरिकेच्या येल विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक नौरिएल रुबिनी यांचे मत आहे की सध्याच्या परिस्थितीत डॉलरची घसरण स्वाभाविक आहे. जरी त्याच्या घसरणीची गती खूपच कमी असली तरी, डॉलरचा पर्याय निश्चितपणे कधीतरी उदयास येईल. प्रश्न 6: 2026 मध्ये आतापर्यंत सोन्याच्या दरात कशी चढ-उतार झाली आहे?उत्तर: इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार 1 जानेवारी 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव ₹76,162 होता, जो त्यावेळी भारतात सर्वकालीन उच्चांक होता. वर्षाच्या अखेरीस सोन्याचे दर ₹1.33 लाखांवर पोहोचले होते. सोन्याच्या दरातील ही वाढ 2026 मध्येही सुरू राहिली. 29 जानेवारी रोजी सोने ₹1,76,121 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते. परंतु, अवघ्या तीन दिवसांनंतर 1 फेब्रुवारी रोजी ते घसरून ₹1,48,697 झाले. 12 फेब्रुवारी रोजी रशिया-अमेरिका करार झाल्याच्या बातमीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 3% नी घसरले. दुसऱ्या दिवशी भारतीय बाजारातही सोन्याचे भाव ₹2,885 नी घसरून ₹1,52,765 प्रति 10 ग्रॅम झाले. मात्र, 16 जानेवारी रोजी जेव्हा बाजार उघडला, तेव्हा सोन्याचे भाव 1,315 रुपयांनी वाढून 1,54,080 रुपयांवर पोहोचले. डिसक्लेमर : ही बातमी केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी स्वतः विश्लेषण करावे आणि तज्ञांचा सल्ला घ्यावा.
Baramati Plane Crash : विमान अपघातापूर्वी ‘मेडे कॉल’का दिला नाही? तपासाची सुई आता ‘या’दिशेला
Baramati Plane Crash : नागरी उड्डाण मंत्रालयाच्या 'AAIC' कडून तांत्रिक चौकशी सुरू; विमानात बिघाड होता की मानवी चूक? अहवालाकडे सर्वांचे लक्ष.
Pune Water Crisis : मंजूर कोट्यापेक्षा ८.८४ टीएमसी अतिरिक्त पाणीवापर; दंडामुळे थकबाकीचा आकडा गेला ९०० कोटींच्या पार.
MPSC Result : ९ नोव्हेंबरला झाली परीक्षा, पण अंतिम निकालाचा पत्ता नाही; मुख्य परीक्षेसाठी केवळ ४० दिवस उरल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट.
Pune News : मोठी बातमी! बारामतीला मिळणार अपर जिल्हाधिकारी, तर चाकणला अपर तहसील कार्यालय
Pune News : पुणे जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार अन् कामाचा डोंगर; ग्रामीण जनतेची पायपीट थांबवण्यासाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय.
Pimpri Chinchwad Power Cut :
PMC Action : महापालिकेचा दणका! सोसायटीला दूषित पाणी; नामांकित बिल्डरला १ लाखाचा दंड
PMC Action : पाणीपुरवठा यंत्रणा नसताना दूषित पाणी का पाजले? म्हाळुंगे येथील गृहनिर्माण प्रकल्पातील गंभीर प्रकार उघड.
विकसित भारताच्या गप्पा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहेत. आणि हे लक्ष्य आता नजरेच्या टप्प्यात आल्याचेही दावे केले जात आहेत, पण हे सगळे दावे वस्तुस्थितीच्या पातळीवर तद्दन बोगस ठरत असल्याचे लक्षात येते आहे
Kalakar Katta Pune : पुण्याची वैचारिक आणि सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी 'कलाकार कट्टा' आहे त्याच ठिकाणी ठेवावा; कार्यकर्त्यांची भावना.
लक्षवेधी : महागाईचे नवे मोजमाप
महागाईची मोजणी करण्याच्या पद्धतीत बदल झाल्यामुळे, अर्थव्यवस्थेतील बदलांचे अधिक ठळक प्रतिबिंब पडेल. धोरणविषयक प्रतिसादात त्यामुळे अचूकता येण्याची शक्यता आहे.
PMC News : स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये अंतर्गत हालचालींना वेग; ज्येष्ठ नगरसेवकाच्या नावाची मोठी चर्चा.
Pune Congress : पुणे पोलीस भाजपधार्जिणे? काँग्रेस पोलीस आयुक्तालयावर काढणार मोर्चा..वाचा सविस्तर
Pune Congress : आंदोलनाला परवानगी दिलीच कशी? पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस हायकोर्टात जाणार.
दखल : चाबहारमधून माघार की विराम?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026-2027 वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात खटकण्यासारखी एक बाब होती. ती बाब म्हणजे अर्थसंकल्पात इराणमधील चाबहार बंदरासाठी एका रुपयाचीही तरतूद केलेली नाही.
Saswad News : पुरंदरच्या विकासाचा नवा ‘रोडमॅप’; नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सासवडमध्ये सत्कार
Saswad News : पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख निर्णयावर भर; जालींदर कामठे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिल्या शुभेच्छा.

30 C