SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

30    C
...

बहुप्रतिक्षित गारगाई धरणाच्या कामाला गती; तब्बल १.२ मेगावॅटर वीज निर्मिती प्रकल्पही उभारणार

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाला आता गती देण्यात येणार असून या धरण प्रकल्पाच्या कामासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव आता स्थायी समितीच्या सभेपुढे प्रशासनाच्यावतीने मांडण्यात आला आहे. या धरणातून मुंबईला ४४० दशलक्ष लिटर एवढ्या पाण्याची वाढ होणार आहे. पुढील दोन वर्षांत या धरणाचे बांधकाम पूर्ण केले जाणे अपेक्षित आहे.या धरण प्रकल्पाची उभारणी करताना या प्रकल्पातून किमान १.२ मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे.मुंबई महापालिकेच्यावतीने मागील अनेक वर्षांपासून बहुप्रतिक्षेत असलेल्या गारगाई प्रकल्पासाठी सुमारे ६७ मीटर उंच आणि सुमारे ७०० मीटर लांबीचे रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट तंत्रज्ञानावर आधारित धरण उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. या धरणाचे बांधकाम २.२ मीटर व्यासाचा आणि सुमारे १.६ किलोमीटर लांबीचा जलवाहन बोगदा बांधण्यात येणार असून त्यामध्ये पाच रेडियल गेट्ससह स्पिलवे, स्टॉपलॉग, टर्बाइन तसेच अंतर्गत काँक्रीट रस्ते आणि पूल यांचा समावेश असेल. या प्रकल्पातून किमान १.२ मेगावॅट वीज निर्मिती करण्याची तरतूद करण्यात आली आहे.बांधकामाच्या काळात नदीचा प्रवाह वळविण्यासाठी दोन टप्प्यांत कॉफर डॅम उभारले जाणार आहेत. तसेच धरणाच्या भागात भूगर्भीय तपासणीसाठी किमान २० बोअरहोल घेऊन सविस्तर जिओटेक्निकल तपासणी करण्यात येणार आहे. भूजल पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी पीझोमेट्रिक ट्यूब बसविण्याचीही योजना आहे. याशिवाय प्रकल्प क्षेत्रात कंटूर सर्वेक्षण व टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्यात येणार आहे.प्रकल्पात नदीवरील स्लूइस, इन्टेक वेल, गाईड वॉल, डिव्हाईड वॉल, ग्लेसिस काँक्रीट, स्टिलिंग बेसिन, स्लोपिंग एप्रॉन, सबमर्सिबल बॉक्स गिर्डर ब्रिज यांसारख्या विविध बांधकाम होणार आहे. तसेच धरण परिसरात पाच मार्गिकांसह पूल, क्रॉस ड्रेनेज व्यवस्था आणि उतार स्थिरीकरणाची कामेही करण्यात येणार आहेत. तसेच या प्रकल्पात सुमारे ३.१० लाख झाडे बाधित होणार आहेत. या बाधित झाडांचे वृक्षरोपण तसेच पुनर्राेपण करण्याची जबाबदारी महापालिकेची असणार आहे.दरम्यान, प्रकल्पासाठी वन, पर्यावरण व वन्यजीव विषयक आवश्यक परवानग्या घेण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधला जाणार असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्राधिकरणांकडून आवश्यक मंजुरी घेऊनच प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे महापालिका जल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामध्ये धरण बांधकामासोबतच जलवाहन बोगदा, वीज निर्मिती व्यवस्था, पूल, रस्ते आणि इतर पूरक संरचनांची उभारणी करण्यात येणार आहे.या प्रकल्प कामासाठी महापालिकेच्यावतीने सोमा इंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली. महापालिकेच्या कार्यालयीन अंदाजापेक्षा दहा टक्के अधिक बोली लावणारी कंपनी पात्र ठरली असून या कामासाठी विविध करांसह ५४०० कोटी रुपये एवढा खर्च केला जाणार आहे.

फीड फीडबर्नर 10 Mar 2026 8:10 am

राज्यातील प्रलंबित मुद्रांक प्रकरणांचा निपटारा जलद; 'महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक २०२६'मंजूर

मुंबई: राज्यातील मुद्रांक शुल्क विभागातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी तसेच, प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेले 'महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक २०२६' आज विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले.स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या आर्थिक अधिकारात मोठी वाढ करण्यात आल्याने मुद्रांक शुल्काशी संबंधित प्रकरणांच्या निर्णयासाठी आता नोंदणी महानिरीक्षक (IGR) स्तरावर जाण्याची गरज पडणार नाही.सध्याच्या कायद्यातील कलम ५२ 'अ' मध्ये सुधारणा करून प्रशासकीय अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. यामुळे नोंदणी महानिरीक्षकांकडे (IGR) येणारा कामाचा ताण कमी होऊन स्थानिक स्तरावरच निर्णय होतील.सुधारित आर्थिक मर्यादा खालीलप्रमाणेजिल्हाधिकारी (मुद्रांक) - ५ लाख रुपये वाढ करुन २० लाख रुपये.नोंदणी उपमहानिरीक्षक (मुंबई वगळून) - २० लाख रुपये वाढ करून ५० लाख रुपये.अप्पर मुद्रांक नियंत्रक (मुंबई) - २० लाख रुपये वाढ करुन १ कोटी रुपये.मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी - २० लाख रुपये वाढवून १ कोटी रुपये.सामान्यांची 'तारीख पे तारीख' थांबणारविधेयकावर बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सध्या अनेक केसेस केवळ आर्थिक मर्यादा कमी असल्यामुळे राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांकडे प्रलंबित राहतात. यामुळे नागरिकांना मुंबईला चकरा माराव्या लागतात आणि मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. आता जिल्हाधिकारी आणि उपमहानिरीक्षक स्तरावरच मोठ्या रकमेच्या प्रकरणांचा निकाल लावता येईल. यामुळे पारदर्शकता येईल आणि प्रलंबित कामांचा डोंगर लवकर उपसला जाईल.हे विधेयक क्र. ९ (२०२६) विधानसभेत मांडण्यापूर्वीच विधान परिषदेनेही याला संमती दिली होती. आज विधानसभेत विधेयक खंडशः विचारात घेऊन ते बहुमताने संमत करण्यात आले. यासोबतच 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक २०२६' (विधेयक क्रमांक २) देखील सभागृहात मांडण्यात आले. या ऐतिहासिक सुधारणेमुळे महसूल विभागाच्या कामात गती येणार असून, मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारातील तांत्रिक अडचणी लवकर सुटण्यास मदत होणार आहे.

फीड फीडबर्नर 10 Mar 2026 7:10 am

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग; स्फोटानंतर आगीचा भडका होताच कामगार धावले

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये होणाऱ्या स्फोटावरुन सातत्याने येथील सुरक्षेचा आढावा घेतला जातो. परंतु, पुन्हा त्याची पुनरावृत्ती होतानाचे पाहायला मिळत आहे. अंबरनाथमधील आनंदनगर एमआयडीसीमध्ये आज केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटानंतर आगीचा भडका आणि धुराचे मोठ-मोठे लोट पसरल्याचंही दिसून आलं.स्फोटानंतर कंपनीतील केमिकल रस्त्यावर आल्याने रस्त्यावर देखील आगीचा भडका पाहायला मिळाला, धुराचेही लोटही दूरवर पसरले होते. स्फोट होताच कंपन्यांमधील कामगारांनी हातातील काम थांबवत जिवाच्या आकांताने धाव घेतली. कामगार रस्त्यावर सैरावैरा धावताना दिसून आले.दरम्यान, आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. मात्र, केमिकल कंपनीतील आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आणण्यात अडथळे येत आहेत. कंपनीत आगीमुळे मोठमोठे स्फोट होत असल्याने कामगारांची धावपळ पाहायला मिळत असून, कंपनीतील विविध केमिकलमुळे विविध ठिकाणी स्फोट होत आहेत.एमआयडीसीमधील गणेश केमिकल नावाच्या कंपनीला ही आग लागली आहे. आगीचा भडका इतक्या मोठ्या प्रमाणात उडाला की, शेजारी असलेल्या मिरॅकल केबल आणि क्लाउड नाईन या कंपन्यांनादेखील आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

फीड फीडबर्नर 10 Mar 2026 7:10 am

विक्रोळी,भांडुप-मुलुंडच्या एस अँड टी प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपच्या साक्षी दळवी

मुंबई: ‘एस आणि ‘टी' प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत चक्क पुन्हा एकदा उबाठाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार साक्षी दळवी यांनी नाट्यमय विजय मिळवला आहे. या प्रभागात समसमान सदस्य संख्या असल्याने ईश्वर चिठ्ठीवर अध्यक्ष ठरला जाणे अपेक्षित होते, तिथे उबाठाच्या दोन उमेदवारांची मते स्वाक्षरी चुकीच्या ठिकाणी झाल्यामुळे अवैध ठरल्यामुळे भाजपच्या उमेदवार साक्षी दळवी यांचा १० मतांनी विजय झाला आहे.एस आणि टी प्रभाग समितीमध्ये भाजप शिवसेना महायुतीचे १० सदस्य तर उबाठा, काँग्रेस आणि मनसेचे १० अशाप्रकारे समसमान सदस्य असल्यामुळे याठिकाणी अध्यक्षाची निवड ही ईश्वर चिठ्ठीवर होण्याची शक्यता होती. या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्यावतीने साक्षी दळवी आणि उबाठाच्यावतीने सुरेश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. सोमवारी झालेल्या प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये भाजपच्या साक्षी दळवी यांना दहा मते मिळाली तर उबाठाचे सुरेश शिंदे यांना ०८ मते मिळाली, तर निवडणुकीत उबाठाच्या दोन सदस्यांची मते अवैध ठरली गेली. या निवडणुकीत पिठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर संजय घाडी यांनी काम पाहिजे.या निवडणुकीत उबाठा, मनसे आणि काँग्रेसच्या दहा सदस्यांपैंकी दोन सदस्यांची मते अवैध ठरल्यामुळे विरोधी पक्षाकडून या अवैध मते कशी झाली याची माहिती मागण्याचा प्रयत्न केला. पंरतु महापालिकेच्या नियमानुसार मतदान हे गोपनीय असल्यामुळे ते दाखवता येत नाही तरीही विरोधी पक्षाकडून मागणी झाल्यानंतर पिठासीन अधिकारी संजय घाडी यांनी निवडणुकीत पारदर्शकता असल्यामुळे दाखवण्याचे निर्देश सचिव विभागाला दिले. यामध्ये स्वत: उमेदवार सुरेश शिंदे आणि दिपमाला बढे यांची स्वाक्षरी चुकल्यामुळे ती अवैध झाल्याचे दिसून आल्याचे बोलले जात आहे.या निवडणुकीच्या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, उप आयुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे, एस विभागाच्या सहायक आयुक्त समरीन सय्यद, टी विभागाच्या सहायक आयुक्त योगिता कोल्हे आणि महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे यांनी अध्यक्षपदी निवड झालेल्या साक्षी दळवी यांना शुभेच्छा दिल्या.एम पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदी एमआयएमच्या खैरनुसार अंसारीएस अँड टी प्रभाग समितीसह एल, एन, एम पूर्व आणि एम पश्चिम या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठीही निवडणूक पार पडली. यातील एम पूर्व प्रभाग समिती वगळता उर्वरीत सर्व प्रभाग समितीमध्ये बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडून महायुतीचे उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. एम पूर्व प्रभाग समितीमध्ये एमआयएमचे ०८ सदस्य असून उबाठाचा एक याप्रकारे ०९ सदस्य आहेत. तर सत्ताधारी पक्षाचे ०७ सदस्य होते. या निवडणुकीत एआयएमआयएमच्यावतीने खैरनुसा अकबर हुसेन या उमेदवार होत्या, तर शिवसेनेच्यावतीने प्रज्ञा सदाफुले यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीत एआयएमआयएमच्यावतीने खैरनुसा हुसेन या ८ मते मिळवून निवडून आल्या. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार प्रज्ञा सदाफुले यांना ५ मते मिळाली. अध्यक्ष पद निवडणूक प्रसंगी, अर्ज मागे घेण्याच्या विहित वेळेत कोणीही अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत उबाठाचे विठ्ठल लोकरे हे तटस्थ राहिले तर शिवसेनेच्या एका नगरसेवकाचे मत अवैध ठरल्यामुळे सदाफुले यांना सहा मतांऐवजी केवळ ५ मतेच मिळाली. या निवडणुकीत अध्यक्षांची निवड झाल्यानंतर सह आयुक्त (परिमंडळ ५) देवीदास क्षीरसागर, सहायक आयुक्त उज्ज्वल इंगोले आदींनी पुष्पगुच्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या.एल प्रभाग समिती अध्यक्षपदी शिवसेनेचे विजयेंद्र शिंदे‘एल’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे विजयेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी उपमहापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विजयेंद्र शिंदे यांचे सह आयुक्त (परिमंडळ ५) देवीदास क्षीरसागर, ‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.एम पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपच्या आशा मराठेएम पश्चिम प्रभाग समिती अध्‍यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या आशा मराठे यांची बिनविरोध निवड झाली आहे. एकमेव अर्ज आल्याने आशा मराठे यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले. या निवडणुकीत अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, सहायक आयुक्त शंकर भोसले यांनी आशा मराठे यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.एन प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपच्या अश्विनी मते‘ एन’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्याअश्विनी मते यांची बिनविरोध निवड झाली आहे. एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने पिठासीनी अधिकारी महापौर रितू तावडे यांनी मराठे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महापौर रितू तावडे, उप आयुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे, एन विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी पुष्पगुच्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या.

फीड फीडबर्नर 10 Mar 2026 7:10 am

PMC Budget 2026 : महापालिकेचं १३ हजार ९९५ कोटींचं ‘जम्बो’बजेट; विकासाची स्वप्न मोठी, पण खिशात खडखडाट?

PMC Budget 2026 : वेतन आणि प्रशासकीय खर्चाचा डोंगर वाढला; विकासकामांवरील खर्च वेतनापेक्षाही कमी असल्याने पुणेकरांच्या मूलभूत सुविधांवर मर्यादा येण्याची शक्यता.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 7:10 am

‘रॉकेट बनवण्याचे साहित्य’ घेऊन चीनमधून 2 जहाजे रवाना:जिनपिंग इराणला मदत का करत आहेत; अमेरिका त्यांना वाटेतच उडवू शकतो का

इराणच्या सरकारी शिपिंग कंपनीची दोन जहाजे चीनच्या गाओलान बंदरातून रवाना झाली आहेत. भीषण युद्धादरम्यान इराणच्या दिशेने जाणाऱ्या जहाजांमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अहवालानुसार, या जहाजांवर असे लष्करी रसायन लादले गेले असावे, जे रॉकेट बनवण्यासाठी वापरले जाईल. असे झाल्यास, इराणी हल्ले सुरू राहू शकतात आणि युद्ध लांबणीवर पडू शकते. या जहाजांमध्ये खरोखरच रॉकेट बनवण्याचे साहित्य आहे का, जिनपिंग इराणला मदत का करत आहेत आणि अमेरिका हे कंटेनर वाटेतच उडवू शकते का; भास्कर एक्सप्लेनरमध्ये 5 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे… प्रश्न-1: चीनमधून निघालेल्या इराणी जहाजांवर काय लादले आहे? उत्तर: इराणची सरकारी कंपनी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण शिपिंग लाईन्स म्हणजेच IRISL ची 2 जहाजे- शब्दीस आणि बर्जिन चीनच्या गाओलान बंदरातून रवाना झाली आहेत. उपग्रहांच्या छायाचित्रांवरून याची पुष्टी झाली… प्रश्न-2: अमेरिका या जहाजांना इराणपर्यंत पोहोचू देईल का? उत्तर: सध्या दोन्ही जहाजे दक्षिण चीन समुद्र ओलांडून मलक्काच्या सामुद्रधुनीजवळ पोहोचली आहेत… दोघांनाही इराणमध्ये पोहोचण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी पार करावी लागेल, जिथे अमेरिकन आणि इराणी नौदल तैनात आहेत. येथे हल्लेही होत आहेत. तसेच, चाबहार बंदरावरही हल्ले झाले आहेत. अलीकडेच बंदर अब्बासच्या आसपास काळ्या धुराचे लोट दिसले आहेत. याव्यतिरिक्त, 4 मार्च रोजी, अमेरिकन नौदलाच्या एका पाणबुडीने श्रीलंकेजवळ हिंदी महासागरात इराणच्या IRIS Dena या युद्धनौकेला Mk-48 टॉर्पेडोने बुडवले. हे फ्रिगेट युद्धभूमीपासून सुमारे 3 हजार किमी दूर होते आणि युद्धात सहभागीही नव्हते. तरीही असे घडले. अमेरिकन थिंकटँक सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजमधील एशिया मॅरिटाइम ट्रान्सपरन्सी इनिशिएटिव्हचे उपसंचालक हॅरिसन प्रेटॅट यांच्या मते, युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुझची सामुद्रधुनी (स्ट्रेट) जवळजवळ बंद आहे. पूर्वी दररोज सरासरी 153 जहाजे जात होती, परंतु 1 मार्चनंतर हा आकडा 13 वर आला आहे. चीनपर्यंतची डझनभर जहाजे पर्शियन गल्फमध्ये (फारसच्या आखातात) अडकली आहेत. म्हणजेच, जर शब्दीस आणि बर्जिन होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे सरकले, तर अमेरिकन नौदल त्यांच्यावर हल्ला करू शकते. या शक्यतेला दुर्लक्ष करता येणार नाही. तथापि, जर या जहाजांवर लादलेला माल इराणसाठी इतका महत्त्वाचा असेल, तर IRGC चे नौदल ताफा त्यांना एस्कॉर्ट करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, पुढील आठवड्यापर्यंत दोन्ही जहाजे इराणी बंदरांपर्यंत सुरक्षित पोहोचू शकतात. अलीकडेच बंदर अब्बास बंदराकडे जाणाऱ्या 3 इराणी जहाजांनी- हमूना, अबियान आणि अर्जिन यांनी मार्ग बदलला आहे. त्यांनी निश्चित मार्गांऐवजी खुले सागरी मार्ग वापरले. 7 मार्च रोजी ते इराणजवळ फिरताना दिसले. मात्र, या संदर्भात अमेरिकेच्या संरक्षण विभाग 'पेंटागॉन', ट्रेझरी विभाग आणि व्हाईट हाऊसने कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. प्रश्न-3: युद्धादरम्यान चीन इराणला सोडियम परक्लोरेट का देत आहे? उत्तर: युद्धादरम्यान चीनकडून सोडियम परक्लोरेटचा साठा इराणला पाठवण्यामागे 4 मोठी कारणे असू शकतात… अमेरिकन थिंकटँक वॉशिंग्टन इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ फेलो ग्रांट रमली यांचे मत आहे की चीनसाठी इराण केवळ ऊर्जा स्रोत नाही, तर एक रणनीतिक ढाल देखील आहे. जर इराणमधून तेलाचा पुरवठा थांबला, तर चीनची निर्भरता सौदी अरेबिया किंवा रशियावर वाढेल. असे चीनला नको आहे. प्रश्न-4: तर चीनने युद्धात उघडपणे इराणची बाजू घेतली आहे का? उत्तर: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा चीनने निषेध केला होता. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी युद्धविराम करण्याची आणि चर्चेतून प्रकरण सोडवण्याचे आवाहन केले होते. अशा परिस्थितीत, चिनी मालाची इराणसाठी रवानगी होणे हा प्रश्न निर्माण करतो की चीन उघडपणे इराणसोबत आहे का? अमेरिकन थिंकटँक कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीसमध्ये चायना स्टडीजचे वरिष्ठ फेलो आयझॅक कार्डन यांच्या मते, 'चीन ही जहाजे आणखी काही दिवस बंदरावर थांबवू शकला असता. त्यांच्या परत येण्यात प्रशासकीय विलंब करू शकला असता. पण त्याने तसे केले नाही. चीन सर्वांसमोर म्हणतो की त्याला शांतता हवी आहे, पण युद्धाच्या वेळी असे निर्णय घेत आहे.' ग्रांट रमली मानतात की चीनची ही भूमिका असामान्य आणि धाडसी आहे. कारण सध्या इराण आखाती देशांवर क्षेपणास्त्रे डागत आहे. अशा वेळी इराणला मदत केल्याने चीनचे अरब देशांशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता आहे. प्रश्न-5: अखेर चीनची मध्य-पूर्वेबाबत काय रणनीती आहे? उत्तर: इराणमधील सध्याची सत्ता कायम राहावी यात चीनला फारसा रस नाही. त्याला इराण आणि मध्य-पूर्वेतील आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवायची आहे. त्याचा ऊर्जा पुरवठा बाधित होऊ नये. चीनचे अर्धे तेल मध्यपूर्वेतून येते. तो सौदी अरेबिया, कुवेत, इराक, इराण आणि यूएईकडून तेल खरेदी करतो. इराण संपूर्ण मध्यपूर्वेत प्रादेशिक युद्ध सुरू करेल अशी चीनला चिंता आहे. यामुळे आखाती देशांमधून येणाऱ्या तेलावर परिणाम होईल. येथे चीनची मोठी गुंतवणूक आहे. इराणच्या हल्ल्यांमुळे त्यांनाही नुकसान होईल. याशिवाय, चीनने स्वतःला जगासमोर अमेरिकेचा पर्याय म्हणून सादर केले आहे. दोघांमधील संघर्ष कोणापासून लपलेला नाही. मध्यपूर्वेत चीनने इराणशी संबंध यासाठी प्रस्थापित केले कारण अमेरिकेचे इतर अरब देशांशी संबंध मजबूत आहेत आणि इराण त्याच्यासाठी सर्वात मोठी समस्या आहे. तरीही, चीन कधीही उघडपणे अमेरिकेचा निषेध करत नाही, उलट त्याच्याशी राजनैतिक संबंध कायम ठेवतो. पुढील महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनचा दौरा करणार आहेत. इराणमधील युद्धामुळे अमेरिकेचे सैन्य आणि निधी मध्यपूर्वेत स्थलांतरित झाले आहेत. चीनला हेच हवे आहे. ब्रिटिश थिंकटँक चॅथम हाऊसमध्ये मिडिल ईस्ट आणि नॉर्थ आफ्रिका प्रोग्रामचे असोसिएट फेलो अहमद अबूदू यांच्या मते, 'चीन इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोन रणनीती मजबूत करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान सामायिक करू शकतो. अमेरिका आणि चीनचे सध्याचे संबंध बिघडवल्याशिवाय त्याला इराणला मदत करायची आहे, जेणेकरून त्याची दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतील.'

दिव्यमराठी भास्कर 10 Mar 2026 7:00 am

आजचे एक्सप्लेनर:खामेनींच्या मुलाकडे इराणची कमान, एकेकाळी मुजतबाच्या मृत्यूसाठी प्रार्थना केली जात होती; वडिलांना सुप्रीम लीडर का बनवायचे नव्हते?

अयातुल्ला अली खामेनी यांचा दुसरा मुलगा मुजतबा आता इराणचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी 17 वर्षांच्या वयात युद्ध लढले, 30 वर्षांच्या वयात मदरसामध्ये शिक्षण घेतले आणि 56 वर्षांच्या वयात इराणचे सर्वोच्च नेते बनले. मुजतबा यांना अनेकदा इराणी राजकारणातील सर्वात रहस्यमय चेहरा म्हटले जाते. मुजतबा खामेनी यांची कहाणी काय आहे? त्यांना सर्वोच्च नेते म्हणून का निवडले गेले? अमेरिका त्यांचीही हत्या करण्याचा प्रयत्न करेल का? जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न-1: इराणचे नवीन सर्वोच्च नेते मुजतबा खामेनी यांची कहाणी काय आहे? उत्तर: मुजतबा हे इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या सहा मुलांपैकी दुसरे आहेत. खामेनी यांचे सर्व मुले मौलवी बनले होते, परंतु केवळ मुजतबा यांनी शिया इस्लाममधील सर्वोच्च धार्मिक पदापर्यंत शिक्षण घेतले होते... 10 वर्षांच्या वयात इस्लामिक क्रांती पाहिली, 17 वर्षांच्या वयात युद्ध लढले जेव्हा इराणमध्ये मुजतबाच्या मृत्यूसाठी घोषणा देण्यात आल्या युरोपमध्ये आलिशान बंगले आणि कोट्यवधींची मालमत्ता प्रश्न -2: मुजतबालाच सर्वोच्च नेता म्हणून का निवडले गेले? उत्तर: सर्वोच्च नेत्याची निवड करणाऱ्या तज्ञांच्या सभेने 3 मार्च रोजी सकाळी आणि संध्याकाळी दोन आभासी बैठका घेतल्या. सुरुवातीला कोम शहरात होणार होती, परंतु हल्ल्याच्या भीतीने ही बैठक ऑनलाइन हलवण्यात आली. IRGC चे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. ऑनलाइन मतदानात तज्ञांच्या सभेतील 88 शिया धर्मगुरूंनी अली खामेनी यांचा दुसरा मुलगा मुज्तबा खामेनी यांना नवीन सर्वोच्च नेता म्हणून निवडले. इराण सरकारने 9 मार्च रोजी सकाळी ही घोषणा केली. मुजतबा खामेनी यांना नवीन सर्वोच्च नेता निवडण्याची तीन कारणे आहेत... 1. कमांड चेन कायम ठेवणे 2. इराणी सरकारमध्ये मुजतबांची मजबूत पकड 3. अमेरिका आणि इस्रायलला उत्तर प्रश्न 3: अली खामेनी मुजतबाला सुप्रीम लीडर का बनवू इच्छित नव्हते? उत्तर: अमेरिकन वृत्तपत्र द न्यूयॉर्क टाइम्सने, असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सचा हवाला देत अहवाल दिला आहे की अली खामेनी त्यांच्या मुलाच्या सुप्रीम लीडर बनण्याच्या विरोधात होते. त्यांचे मत होते की यामुळे इस्लामिक शासनात राजेशाहीची रचना परत येईल. ही तीच राजेशाही आहे ज्याच्या विरोधात खामेनींनी इस्लामिक क्रांती सुरू केली होती. मुज्तबाने कधीही इस्लामिक सरकारमध्ये कोणतेही औपचारिक पद सांभाळले नव्हते. तथापि, त्यांनी IRGC मध्ये सेवा दिली होती आणि मदरसामध्ये धार्मिक कट्टरपंथीयांसोबत अभ्यास केला होता. त्यानंतर त्यांना हुज्जत अल-इस्लामचे पद मिळाले होते. अलीकडच्या दिवसांत मुजतबाच्या निवडणुकीविरोधात विरोध प्रदर्शनं झाली आहेत... प्रश्न 4: अमेरिका आणि इस्रायल देखील मुजतबाला मारण्याचा प्रयत्न करतील का? उत्तर: अमेरिका आणि इस्त्रायल दोघेही मुजतबाला नवीन सर्वोच्च नेता म्हणून स्वीकारत नाहीत... प्रश्न 5: नवीन सर्वोच्च नेत्याची नियुक्ती युद्धावर कसा परिणाम करेल? उत्तर: मुजतबाला सर्वोच्च नेते म्हणून नियुक्त करण्याबाबत इराणमध्ये मतभेद होते. कट्टरपंथी धर्मगुरू आणि बहुतेक IRGC अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या एका गटाने मुजतबाला पाठिंबा दिला होता. दुसऱ्या गटाला असे वाटत होते की अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर स्थापन झालेली अंतरिम नेतृत्व परिषद देशाचे कामकाज चालू ठेवावे. हे मतभेद तेव्हाही स्पष्ट झाले जेव्हा इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्किया यांनी सांगितले की, सैन्याला शेजारील देशांवर हल्ला न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कट्टरपंथी गटांनी या विधानावर टीका केली होती आणि हल्ले सुरूच राहिले. IRGC ने मुज्तबा खामेनी यांच्या नियुक्तीला एक नवीन पहाट आणि नवीन सुरुवात म्हटले आहे. अमेरिकेचे माजी राजदूत आणि इराण प्रकरणांचे तज्ज्ञ ॲलन आयर यांचे मत आहे की, मुज्तबा त्यांचे वडील अली खामेनी यांच्यापेक्षाही अधिक कट्टरपंथी आहेत आणि त्यांची विचारसरणी सूड घेण्याची असेल. चीनच्या फुदान विद्यापीठातील मध्य पूर्व अभ्यास केंद्राचे संचालक सुन देगांग यांच्या मते, मुज्तबाचे धोरण त्यांच्या कुटुंबाच्या मृत्यूचा बदला घेण्याने प्रभावित होईल. सध्या इराणमध्येही बदला घेण्याचे वातावरण आहे. यामुळे अमेरिका आणि इराणमधील संघर्षात वाढ होईल. अमेरिकन थिंक टँक मिडल ईस्ट इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ फेलो पॉल सालेम म्हणतात की, मुज्तबा असे व्यक्ती नाहीत जे अमेरिकेशी व्यवहार करतील किंवा राजनैतिक संबंध प्रस्थापित करतील. त्यांची निवड एक कठीण निर्णय आहे, जो सर्वात वाईट वेळी घेण्यात आला आहे. मिडल ईस्ट इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ फेलो ॲलेक्स वटांका यांच्या मते, इतक्या मोठ्या प्रमाणावर हल्ला करून 86 वर्षांच्या वृद्धाची हत्या करणे आणि नंतर त्याच्या कट्टरपंथी मुलाची नियुक्ती करणे हे अमेरिकेसाठी खूपच अपमानास्पद आहे. संशोधन सहकार्य: सोमेश शर्मा

दिव्यमराठी भास्कर 10 Mar 2026 6:50 am

Forest Department NOC : आता वन विभागाची एनओसी मिळवणं होणार कठीण; सरकारने नियम बदलले..पाहा

Forest Department NOC : कोंढवा बुद्रुक येथील राखीव वन क्षेत्राच्या वादामुळे वन विभागाची कार्यपद्धती बदलली; क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना परस्पर एनओसी देण्यास मनाई.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 6:45 am

मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती; मंत्री नितेश राणे यांची संकल्पना

मुंबई: आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती घडवण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. त्यानुसार, आता या विभागात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर आणखी वाढवला जाणार असून, त्याद्वारे मासेमारीचा डेटा आणि माहिती संकलित करून व्यवसायाला नवी दिशा दिली जाणार आहे.या संदर्भात सोमवारी मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत 'मार्वल' कंपनीकडून प्रगत प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले. राज्यातील मासेमारी क्षेत्रातील अचूक माहिती संकलित करणे, डेटाचे विश्लेषण करणे आणि त्याचा प्रभावी वापर करून मच्छिमारांना अधिक सक्षम करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यावेळी पदुमचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय सहआयुक्त ऋता दीक्षित, मार्वल कंपनीचे संचालक साईकृष्णा बुडमगंटा आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (ऑनलाईन) यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मत्स्य व्यवसायासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दळणवळण सुविधांच्या आधुनिकीकरणावरही बैठकीत भर देण्यात आला. जिल्ह्यातील कणकवली आणि तळेरे या महत्त्वाच्या बसस्थानकांचा सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर विकास केला जाणार आहे. या प्रस्तावाबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली विस्तृत चर्चा झाली.नव्या आराखड्यानुसार, ही बसस्थानके आधुनिक सुविधांनी सज्ज असतील. प्रवाशांसाठी अद्ययावत सोयी, परिसराचे सुयोग्य नियोजन आणि व्यावसायिक संधी लक्षात घेऊन ही उभारणी केली जाणार आहे. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर, बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक दिनेश महाजन व अन्य अभियांत्रिकी अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत तांत्रिक बाजू मांडल्या. या निर्णयामुळे कोकणातील प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

फीड फीडबर्नर 10 Mar 2026 6:30 am

Pune Crime : बंडगार्डन पोलीस ठाण्यात खळबळ! पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल..नेमकं प्रकरण काय?

Pune Crime : तक्रारदाराच्या वकिलासमोरच झाली मागणी; पडताळणीमध्ये लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने पुणे पोलीस दलात मोठी खळबळ.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 6:30 am

RTE Admission 2026 : आरटीई प्रवेशासाठी १ किलोमीटरची अट रद्द! उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका

RTE Admission 2026 : ऑनलाइन अर्जातील १ किलोमीटरची मर्यादा हटवण्याचे आदेश; १९ जुलै २०२४ चा निकाल डावलल्याबद्दल न्यायालयाने सरकारला फटकारले.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 6:15 am

अग्रलेख : आर्थिक संकटाची चाहूल

सध्या सुरू असलेल्या युद्धाचा भारतावर विपरीत आर्थिक परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल 110 डॉलरवर गेला आहे.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 6:00 am

LPG Shortage : पुण्यात गॅस संकट! व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा ठप्प; हॉटेल आणि रेस्टॉरंट्सवर टाळं लागणार?

LPG Shortage : युद्धाच्या भीतीने कंपन्यांकडून पुरवठ्याचा वेग मंदावला; चाकण आणि शिक्रापूर गॅस प्लांटमधील हालचालींनी व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 6:00 am

Pune University Flyover : विद्यापीठ चौकातील उड्डाण पुलाच्या कामात चुका; नगरसेवक सनी निम्हण यांचे गंभीर आरोप

Pune University Flyover : उड्डाणपुलाचे फोटो समोर आल्यानंतर खळबळ; नगरसेवक सनी निम्हण यांनी तांत्रिक अभ्यासाच्या आधारे कामाच्या गुणवत्तेवर घेतले आक्षेप.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 5:45 am

Indapur Panchayat Samiti : लासुर्णे-शेळगाव गणाचा दबदबा! इंदापूर पंचायत समितीच्या चाव्या ‘या’शिलेदारांच्या हाती

Indapur Panchayat Samiti : इंदापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी हर्षवर्धन मधुकर लोंढे तर उपसभापतीपदी जयकुमार गोपाळ कारंडे यांची बिनविरोध निवड झाली.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 5:30 am

Mulshi Panchayat Samiti : मुळशीत दोन्ही ‘राष्ट्रवादी’एकत्र! बहुमताचा सस्पेन्स संपला; मंदा शेळके सभापतीपदी

Mulshi Panchayat Samiti : मुळशी पंचायत समितीच्या सभापतीपदी मंदा शेळके तर उपसभापतीपदी दगडू करंजावणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 5:15 am

Baramati News : बारामतीचा ‘किरण’आता पंचायत समितीवर! सुनेत्रा पवारांनी असा साधला राजकीय समतोल

Baramati News : बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे आणि उपसभापतीपदी शुभांगी आगवणे यांची निवड करण्यात आली आहे.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 5:00 am

विशेष : स्त्री चळवळीच्या आद्य प्रणेत्या

‘सावित्रीबाई या महात्मा फुलेंच्या पत्नी आहेत एवढीच फक्त त्यांची ओळख नाही; महाराष्ट्रातल्या स्त्री-मुक्ती चळवळीतल्या त्या आद्य प्रणेत्या आहेत’ अशा शब्दांत प्रा. गं. बा. सरदार यांनी त्यांचा गौरव केलेला आहे.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 5:00 am

Ambegaon Panchayat Samiti : पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा! सभापती व उपसभापतीपदी ‘या’नेत्यांची वर्णी..पाहा

Ambegaon Panchayat Samiti : भीमाशंकर साखर कारखाना आणि राष्ट्रवादीच्या दिग्गज पदाधिकाऱ्यांची उपस्थिती; तालुक्यातील विकासकामांना गती देण्याचा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा निर्धार.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 4:45 am

Bhor Panchayat Samiti : भोरमध्ये नशिबाचा कौल राष्ट्रवादीला! ‘चिठ्ठी’ने ठरवला सभापती..पाहा कोणी मारली बाजी?

Bhor Panchayat Samiti : भोर पंचायत समितीच्या ८ जागांवर भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी ४ उमेदवार विजयी झाल्याने सत्तेचा पेच; अखेर चिठ्ठीद्वारे झाली निवड.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 4:30 am

Shirur Panchayat Samiti : शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा गुलाल! सभापती-उपसभापती निवडणूक बिनविरोध; भाजपने का घेतली माघार?

Shirur Panchayat Samiti : आमदार माऊली कटके आणि ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झाली नावे निश्चित, कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 4:15 am

Junnar News : वणवा लावताना रंगेहात पकडले! जुन्नरच्या जंगलात वनविभागाचा थरारक पाठलाग..पहा काय घडलं?

Junnar News : जुन्नर तालुक्यातील डोंगररांगांना जाणीवपूर्वक आग लावण्याचे प्रकार वाढले; वनविभागाच्या सतर्कतेमुळे मांगणेवाडीत दोन आरोपींना अटक.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 4:00 am

Alandi News : आळंदीत अनधिकृत बांधकामावर ‘नगरपरिषदेचा हातोडा’; भागीरथी नाल्यालगतचे बांधकाम जमीनदोस्त

Alandi News : शहरातील सार्वजनिक जागा आणि नाल्यांवरील अतिक्रमणांविरुद्ध आळंदी नगरपरिषदेची धडक मोहीम; बेकायदा बांधकामे वेळीच थांबवण्याचे आवाहन.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 3:30 am

Shikrapur Accident : पुणे-नगर महामार्ग बनतोय ‘डेथ ट्रॅप’; शिक्रापूर हद्दीत दोन भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

Shikrapur Accident : शिक्रापूर हद्दीतील कासारी फाटा आणि कोंढापुरी परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात; दोन दुचाकीस्वारांचा उपचारापूर्वीच मृत्यू.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 3:15 am

PCMC News : आरएमसी प्लांट चालकांनो सावधान! नियम धाब्यावर बसवले तर धंदा होणार बंद?

PCMC News : महापालिकेचा आरएमसी प्लांट आणि बांधकाम साहित्य पुरवठादारांना अल्टीमेटम; धूळ नियंत्रणाचे नियम न पाळल्यास आस्थापना होणार सील.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 3:00 am

PCMC News : नृत्य, संगीत अन् आरोग्य तपासणी; महापालिकेचा महिलांसाठी खास ‘वूमन्स डे’उपक्रम

PCMC News : जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्नेहमेळावा; समूह नृत्य आणि ऑर्केस्ट्राने कार्यक्रमात भरली रंगत.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 2:30 am

Alandi News : आळंदी नगरपरिषदेवर ‘कोटीं’चा बोजा! महेश लांडगे यांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

Alandi News : आळंदी नगरपरिषदेवर १.११ कोटींचा अतिरिक्त आर्थिक ताण, आमदार महेश लांडगे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 2:15 am

Khed Accident : तळेगाव रोडवर काळजाचा थरकाप! भरधाव टेम्पोच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Khed Accident : चाकण-तळेगाव रोडवरील वाहतुकीच्या वेगाने घेतला दोन बळी; भांबोली परिसरात हळहळ, महाळुंगे पोलिसांकडून अपघाताचा सखोल तपास सुरू.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 2:00 am

Khopoli Police : खोपोली पोलीस स्टेशनचा कारभार महिलांच्या हाती; जागतिक महिला दिनी अनोखा सन्मान

Khopoli Police : जागतिक महिला दिनानिमित्त खोपोली पोलीस ठाण्याचे प्रभारी पद PSI पूजा चव्हाण यांच्याकडे सुपूर्द; पोलीस प्रशासनाचा महिला सक्षमीकरणासाठी मोठा संदेश.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 1:45 am

AI impact on jobs : आयटी नगरीत ‘सायलंट ले-ऑफ’चे सावट! हजारो आयटीयन्सच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार..पाहा

AI impact on jobs : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ४ ते ५ लाख कर्मचाऱ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण; एआय आधारित तंत्रज्ञानामुळे पारंपरिक कौशल्यांच्या नोकऱ्या धोक्यात.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 1:30 am

Shani Shingnapur Railway : शनिभक्तांसाठी गुड न्यूज! राहुरी-शनि शिंगणापूर रेल्वेला मंजुरी; पाहा कसा आहे मार्ग

Shani Shingnapur Railway : शनि शिंगणापूरच्या पर्यटनाला मिळणार नवी झळाळी; रेल्वे प्रकल्पामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी उर्जितावस्था येण्याची शक्यता, अधिसूचना प्रसिद्ध.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 1:00 am

Nevasa Crime : नेवाशात थरार! गो-तस्करांच्या संशयातून टेम्पोचा पाठलाग; दोन तरुणांना चिरडण्याचा प्रयत्न

Nevasa Crime : घोडेगाव शिवारातील मारमोडी पुलाजवळील धक्कादायक घटना; जखमी तरुणांवर अहिल्यानगरमध्ये उपचार, सोनई पोलिसांकडून फरार चालकाचा शोध सुरू.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 12:45 am

Aundh News : २५ वर्षांची सेवा अन् आता उद्योगांचे स्वप्न; गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींनी मांडली भविष्यातील दिशा

Aundh News : गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचा औंध येथे राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे गौरव; महिला सक्षमीकरणासाठी उद्योग उभारणीची दिली ग्वाही.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 12:30 am

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १० मार्च २०२६

पंचांगआज मिती फाल्गुन कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग हर्षण. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर १९ फाल्गुन शके १९४७-४८. मंगळवार दिनांक १० मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.५१ मुंबईचा चंद्रोदय ००.५२ उद्याची मुंबईचा सूर्यास्त ०६.४६ मुंबईचा चंद्रास्त ११.०१ एएम राहू काळ ०३.४७ ते ०५.१७ .भद्रा वर्जदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

फीड फीडबर्नर 10 Mar 2026 12:30 am

Lonand News : लोणंदमध्ये RTE प्रवेशाचा ‘मोठा’खेळ? बोगस कागदपत्रांच्या जोरावर नामांकित शाळांमध्ये डल्ला

Lonand News : लोणंद परिसरातील नामांकित इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बनावट रहिवासी दाखल्यांचा वापर; खऱ्या गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा पालकांचा आरोप.

दैनिक प्रभात 10 Mar 2026 12:15 am

ICC Trophy Comparison : टीम इंडिया ‘वर्ल्ड चॅम्पियन’बनूनही कांगारूंच्या मागेच! कोणाकडे अन् किती आहेत ICC ट्रॉफी? जाणून घ्या आकडेवारी

ICC Trophy Comparison : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नुकताच टी-२० विश्वचषक जिंकला असला, तरी ऑस्ट्रेलियाची बरोबरी करण्यासाठी भारताला अजून थोडा पल्ला गाठायचा आहे.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 10:56 pm

Stock Market Crash: आखाती युद्धाचा जगभर थरकाप! चीन, जपान, कोरिया, अमेरिका…सगळे शेअर बाजार कोसळले

Stock Market Crash: अमेरिकेने इराणविरोधात हल्ला करूनही अमेरिकन शेअर बाजाराचे आतापर्यंत जास्त नुकसान झाले नव्हते. मात्र आता युद्ध जास्त चिघळण्याची शक्यता वाढल्यामुळे अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यासह इतर कंपन्यांच्या शेअरची विक्री वाढून अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक ही कमी झाले.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 10:54 pm

Oil Crisis: 1939 सारखा काळ पुन्हा येतोय का? दुसऱ्या महायुद्धाशी आजच्या तेल संकटाच्या भयावह समानता

Oil Crisis: भारताने १९७३, १९७९ आणि १९९१ च्या प्रत्येक तेल संकटात मंदीला सामोरे जावे लागले होते. या वेळी परिस्थिती वेगळी असण्याचे कोणतेही ठोस कारण दिसत नाही. १ मार्चपूर्वी केलेले सर्व अर्थसंकल्पीय अंदाज आणि व्यापार समतोलाचे अंदाज आता नव्याने तपासावे लागणार आहेत. हे सगळे पाहता दुसऱ्या महायुद्धाशी साम्य अधिकच गडद होत चालले आहे.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 10:26 pm

Donald Trump : मैदानावरचं धाडस जीवावर बेतणार? इराणच्या महिला टीमसाठी ट्रम्प यांचं मोठं पाऊल; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांकडे केली ‘ही’मागणी

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या महिला खेळाडूंच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 10:25 pm

Latur News : लातूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; काय घडलं नेमकं?

महानगरपालिकेत (Latur News) पक्षाने दुसऱ्या नेत्याला नामनिर्देशित नगरसेवक म्हणून निवडल्याबद्दल निराश होऊन लातूर जिल्ह्यातील एका भाजप पदाधिकाऱ्याने सोमवारी डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला

दैनिक प्रभात 9 Mar 2026 10:12 pm

Politics: ‘पीएम संसदेतून पळाले!’; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, पश्चिम आशिया चर्चेच्या मागणीवरून लोकसभेत गोंधळ, कामकाज तहकूब

Politics: राहुल गांधी यांनी पश्चिम आशियाशी संबंधित इंधन दर आणि आर्थिक संकट हे लोकांचे महत्त्वाचे प्रश्न असल्याचे अधोरेखित केले. इंधनाचे दर, आर्थिक उद्ध्वस्तपणा हे महत्त्वाचे नाही का? हे जनतेचे प्रश्न आहेत आणि आम्हाला हे आवश्यक वाटते.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 9:55 pm

Congress Mla : काँग्रेसच्या बड्या नेत्याची आमदारकी रद्द; राज्याच्या राजकारणात खळबळ

Congress Mla : ग्वाल्हेर उच्च न्यायालयाने काँग्रेस आमदार मुकेश मल्होत्रा यांची निवडणूक अवैध ठरवली आहे.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 9:32 pm

India Politics: विरोधकांनी एकाच वेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि CEC ज्ञानेश कुमार यांना घेरले, सरकार अडचणीत?

India Politics: काही दिवसांपूर्वी TMC ने काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना सांगितले होते की, जर ते CEC ज्ञानेश कुमार यांच्या महाभियोगाला पाठिंबा देतील तर TMC लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना हटविण्याच्या ठरावाला पाठिंबा देईल.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 9:31 pm

Crude Oil : देशात क्रूड ऑइलचा पुरेसा साठा असल्याने तूर्तास दरवाढ नाही; सरकारने केले स्पष्ट

पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशातील क्रूड ऑइल (Crude Oil) साठ्याबाबतची चिंता दूर केली आहे. देशाकडे पुढील 7 ते 8 आठवड्यांसाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 9:14 pm

Babar Azam : हातात संत्री अन् डोळ्यात माणुसकी! बाबर आझमच्या व्हायरल फोटोमागचं खरं कारण काय? जाणून घ्या

Babar Azam : बाबर आझमचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो लोकांना फळे वाटताना दिसत आहे

दैनिक प्रभात 9 Mar 2026 9:04 pm

Taranjit Singh Sandhu : तरनजीत सिंग संधू यांची दिल्लीच्या राज्यपालपदी नियुक्ती; ‘या’दिवशी पार पडणार शपथविधी

दिल्लीला नवीन नायब राज्यपाल मिळाले असून, तरनजीत सिंग संधू (Taranjit Singh Sandhu) हे दिल्लीचे २३ वे नायब राज्यपाल म्हणून बुधवारी, ११ मार्च रोजी शपथ घेणार आहेत.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 8:50 pm

Gary Kirsten : टी-२० विश्वचषक संपताच नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा, ६४ शतके ठोकणाऱ्या अनुभवी खेळाडूकडे सोपवण्यात आली धुरा

Gary Kirsten : १५ एप्रिलपासून आपल्या पदाची सूत्रे स्वीकारतील आणि त्यांचा हा करार दोन वर्षांसाठी असेल.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 8:26 pm

LPG Gas Booking : सर्वसामान्यांची चिंता वाढणार ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

इंधन पुरवठ्यातील अनिश्चिततेमुळे देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची मागणी (LPG Gas Booking) वाढली आहे.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 8:12 pm

Sanju Samson Post : ‘जगासाठी मी कोणीही असलो, तरी तू मला…’, विश्वविजेतेपदानंतर संजू सॅमसनने पत्नीसाठी लिहिली ह्रदयस्पर्शी पोस्ट

Sanju Samson Post : या ऐतिहासिक यशानंतर संजूने आपल्या यशाचे श्रेय पत्नी चारुलता हिला दिले आहे.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 7:53 pm

MNS News : जोरदार कमबॅक ! ‘या’पंचायत समितीवर पहिल्यांदाच फडकला मनसेचा झेंडा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रायगडावर जाऊन आपल्या पक्षाचा 20 वा वर्धापन दिन साजरा केला. तसेच, वर्धापनदिनी आज मनसेची (MNS News) जोरदार नोंदणीही सुरू आहे.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 7:41 pm

New Rent Rules Viral : सोशल मीडियावर व्हायरल ‘नवीन भाडे नियम 2026’खरे आहेत का? जाणून घ्या संपूर्ण सत्य

New Rent Rules Viral : व्हायरल पोस्टनुसार नव्या नियमांमध्ये पुढील बदल झाल्याचे सांगितले जात आहे. सर्व भाडे करारांची डिजिटल नोंदणी करारावर स्वाक्षरी झाल्यापासून ६० दिवसांत ऑनलाइन करणे बंधनकारक असेल.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 7:35 pm

कंत्राटदारांकडून वेळेत बस न मिळाल्याने मुंबईत 'बेस्ट'चा तुटवडा

राज्यमंत्र्यांची कबुली; स्क्रॅपिंग पॉलिसीचाही बेस्टला मोठा फटकामुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या 'बेस्ट' बसची सेवा सध्या व्हेंटिलेटरवर आहे, असा आरोप करीत मुंबईतील आमदारांनी सोमवारी विधान परिषदेत प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर, कंत्राटदारांकडून वेळेत बस न मिळाल्याने मुंबईत 'बेस्ट' बसचा तुटवडा असल्याची कबुली नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार सुनील शिंदे यांनी बेस्टच्या खालावलेल्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर झालेल्या चर्चेत प्रवीण दरेकर आणि सचिन अहिर यांनीही उपप्रश्न विचारून प्रशासकीय दिरंगाईवर बोट ठेवले. त्यावर राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, मुंबईची वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता शहराला किमान १० हजार बसची आवश्यकता आहे. बेस्टने विविध कंत्राटदारांना ६ हजार ५५५ बस पुरवठ्यासाठी कार्यादेश (वर्क ऑर्डर) दिले होते. मात्र, कंत्राटदारांकडून बस वेळेत उपलब्ध होऊ न शकल्याने अपेक्षित प्रमाणात बससेवा वाढवता आली नाही. मार्च २०२३ पर्यंत १,३०० बस उपलब्ध होणे अपेक्षित होते, मात्र सध्या केवळ ६८५ बस उपलब्ध झाल्या आहेत.स्क्रॅपिंग पॉलिसीनुसार १५ वर्षांनंतर बस स्क्रॅप केल्या जात असल्याने बेस्टच्या मालकीच्या बसची संख्या कमी झाली आहे. पूर्वी बेस्टकडे १ हजार ८८२ मालकीच्या बस होत्या, मात्र सध्या ही संख्या २४९ इतकी राहिली आहे. उर्वरित बस भाडेतत्त्वावर घेतल्या असून सध्या २ हजार ५५८ भाडेतत्त्वावरील बस उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुंबईतील बेस्ट बससेवेबाबत अनेक तक्रारी येत असून, यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकरच मुंबईतील सर्व स्थानिक आमदार आणि परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली जाईल, असे आश्वासन मिसाळ यांनी यावेळी दिले.

फीड फीडबर्नर 9 Mar 2026 7:30 pm

महाराष्ट्रात दोन अर्ज बाद ठरल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होणारी निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली आहे. गुरुवारी दाखल झालेल्या नऊ अर्जांपैकी दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद ठरल्याने सात जागांसाठी सातच उमेदवार रिंगणात उरले. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह सातही नेत्यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.या निवडणुकीत संख्याबळानुसार भाजपला ४, तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. उमेश म्हात्रे आणि कांते सायन्ना या दोन अपक्ष उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यांच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदकांच्या सह्या नसल्याने छाननीमध्ये हे दोन्ही अर्ज बाद ठरवण्यात आले. त्यामुळे ही निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली.भाजपने यंदा राज्यसभेत राज्यातील महत्त्वाच्या समाजघटकांना प्रतिनिधीत्व दिले आहे. नागपूरच्या माजी महापौर राहिलेल्या माया इवनाते या भाजपचा राज्यातील महत्त्वाचा आदिवासी चेहरा आहेत. त्या अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाच्या सदस्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या निवडीतून भाजपने विदर्भातील आदिवासी मतांचे समीकरण साधले आहे. तर, धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे रामराव वडकुते यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. विधान परिषदेचा अनुभव गाठीशी असलेल्या वडकुते यांच्या रूपाने भाजपने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील धनगर समाजाला साद घातली आहे.आठवलेंची हॅट्ट्रिकपक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणारे विनोद तावडे यांना अपेक्षेप्रमाणे राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) प्रमुख रामदास आठवले यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आठवले हे सलग तीनवेळा राज्यसभेवर पोहोचले आहेत.

फीड फीडबर्नर 9 Mar 2026 7:30 pm

Marriage Problem: तरुणांना लग्नासाठी द्यावा लागतोय हुंडा; एकाच मुलीचे चार-चार विवाह लावून फसवणूक, आमदार सोळंकेंनी विधानसभेत मांडली व्यथा

Marriage Problem: आमदार सोळंके म्हणाले, मी ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करतो आणि तिथली परिस्थिती अत्यंत भयावह आहे. आज प्रत्येक लहान-मोठ्या खेडेगावात २५ ते ३० वयोगटातील किमान ५० ते १०० तरुण असे आहेत, ज्यांचे वय उलटून गेले तरी लग्न झालेले नाही.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 7:22 pm

KRA Jewellers : महिला दिनानिमित्त केआरए ज्वेलर्सतर्फे अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्ससह विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान

KRA Jewellers : या उपक्रमात प्रामुख्याने समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण करणाऱ्या, मात्र अनेकदा प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 7:15 pm

Rohit Ritika Video : रोहित शर्माच्या नाराजीचं कारण काय? अहमदाबादमध्ये रितिकाने पतीचा हात हातात घेऊन नेमकं काय सांगितलं?

Rohit Ritika Video : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा सीमारेषेबाहेर उभा असून रितिका बॅरेकेट्सच्या पलीकडे उभी आहे.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 7:14 pm

Gyanesh Kumar : बिर्लांनंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार विरोधकांच्या निशाण्यावर; लवकरच मांडणार ‘हा’ठराव

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या पाठोपाठ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारा ठराव मांडण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 7:10 pm

इंधन तुटवड्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गांधी परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी देशाची बदनामी थांबवावीमुंबई : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार तेल आणि गॅसबाबत काळजी घेत आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तरीही कुठेही तुटवडा पडू नये, यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना सुरु आहेत. कुणीही अफवा पसरवू नये आणि कुणीही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अफवांवर विश्वास ठेवून इंधनाचा साठा केल्यास परिस्थिती खराब होईल. त्यातून मागणी आणि पुरवठा ही साखळी तुटेल. त्यामुळे कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, माध्यमांनी पुरावा नसलेल्या गोष्टी दाखवून लोकांमध्ये भीती तयार करू नये. केंद्र सरकार याबाबत उचित काळजी घेत आहे, असेही ते म्हणाले.काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांचे आयुष्य एका परिवाराची गुलामी करण्यात गेले, त्यांना देश कसा चालवला जातो, देश कसा सार्वभौम ठेवायचा? याबाबत काहीही माहिती नाही. आज मोदीजींनी ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित केली आहे. अन्यथा, भारताची काय परिस्थिती असती, हे आपल्याला माहिती आहे. ज्यावेळी टॅरिफ वॉर झाला, तेव्हाही भारत झुकला नाही तर, त्याचा सामना केला. भारताने अनेक देशांसोबत टॅरिफ करार केले, त्यामुळे ज्यांनी टॅरिफ वॉर केला, त्यांनादेखील मागे हटावे लागले. त्यामुळे एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी असे भाष्य करणे हास्यास्पद आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.विरोधकांना तोंड दाखवायला जागा नाहीशेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर केलेल्या आंदोलनावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, आता विरोधकांना तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. गिरे तो भी टांग उपर असे विरोधकांचे सुरु आहे. जनता विरोधकांसोबत नाही. महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जनतेने विरोधकांना जमीन दाखवली आहे. आम्ही निवडणुका जिंकण्याकरिता नाही तर, निवडणूका जिंकल्यानंतर कर्जमाफी केली आहे. त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. विरोधकांनी कितीही आंदोलन केले तरी, जनता त्यांच्यासोबत नाही, असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

फीड फीडबर्नर 9 Mar 2026 7:10 pm

आयएएस अधिकारी देवेंद्र सिंह यांचे निलंबन मागे

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी आयएएस अधिकारी देवेंद्र सिंह यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी ब्रीफिंगसाठी वारंवार बोलावूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी याबाबतचे पुरावे सादर केल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात येत असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत दिली.चंद्रपूरमधील आमदारांनी पर्यावरणासंदर्भात मागील गुरुवारी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री पंकजा मुंडे यांना तत्काळ उत्तर देता आले नाही. त्यांनी सभागृहात सांगितले की, संबंधित अधिकाऱ्याला याबाबत पूर्वकल्पना देऊन ब्रीफिंगसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांनी ब्रीफिंग दिले नाही आणि वारंवार बोलावूनही ते उपस्थित राहिले नाहीत. तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी या बाबीची गंभीर दखल घेत तत्काळ निलंबनाचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी सामान्य प्रशासन विभागाकडून अतिरिक्त सचिव व्ही. राधा यांच्या सहीने आदेश जारी करण्यात आला. अखिल भारतीय सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६९ मधील नियम ३(१)(a) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. मात्र, याबाबत सिंह यांनी अनुपस्थिती बाबतचे पुरावे सादर केल्यानंतर निलंबन मागे घेण्यात आले आहे.संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत याचबाबतची माहिती देताना सांगितले की, आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी पुरावे सादर करत घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन तत्काळ मागे घेण्यात यावे आणि त्यांच्या पदावर त्यांना रुजू करण्यात यावे, असा प्रस्ताव मांडत आहे.

फीड फीडबर्नर 9 Mar 2026 7:10 pm

K.N.Panikkar : ज्येष्ठ इतिहासकार के. एन. पणिक्कर यांचे निधन

भारतीय इतिहासलेखन क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, प्रख्यात विचारवंत आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी प्राध्यापक के.एन.पणिक्कर (K.N.Panikkar) यांचे सोमवारी वृद्धापकाळामुळे खासगी रुग्णालयात निधन झाले.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 6:54 pm

Shoaib Akhtar Criticizes : “भारताने क्रिकेटचं वाटोळं केलं!”टीम इंडियाच्या विजयानंतर अख्तरचा जळफळाट; आमिरनेही ओकली गरळ

Shoaib Akhtar Criticizes : ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर कौतुकांचा वर्षाव होत असताना, दुसरीकडे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतावर टीका केली आहे.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 6:23 pm

Weather Update : राज्यात उष्णतेची लाट येणार; तापमान 40 अंशांच्या पुढे, शेतकऱ्यांची चिंता वाढली

weather update : राज्यात तापमानात झपाट्याने वाढ होत असून मुंबईत ११ मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 6:19 pm

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी अभ्यंगस्नान करून घरासमोर गुढी म्हणजेच ब्रह्मध्वज उभारण्याची परंपरा आहे. नवीन वर्षासाठी संकल्प करून शुभ कार्याची सुरुवात करण्याचा हा दिवस मानला जातो.यंदा १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. या दिवशी नवीन वर्षाच्या पंचांगाची पूजा करून वर्षभर त्याचा वापर करण्याची प्रथा आहे.गुढीपाडव्याचे धार्मिक महत्त्वपुराणानुसार सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी केली असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस सृष्टीचा वाढदिवस मानून गुढी उभारून साजरा केला जातो.दुसऱ्या कथेनुसार पैठणचे राजा शालिवाहन यांनी अत्याचारी शकांचा पराभव करून जनतेची मुक्तता केली. त्या विजयाच्या स्मरणार्थ शालिवाहन शक सुरू झाला आणि त्यानंतर चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नूतन वर्ष साजरे करण्याची परंपरा सुरू झाली.तिसऱ्या मान्यतेनुसार विष्णू यांचा अवतार असलेल्या राम अवताराने रावणाचा पराभव केला. यानंतर राम अयोध्येत परत येत होते त्यावेळी नागरिकांनी गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले. त्या दिवसाच्या स्मरणार्थ गुढीपाडवा साजरा केला जातो.गुढीपाडव्याची पूजा कशी करावी ?गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करावी आणि अंगाला सुगंधी तेल लावून अभ्यंगस्नान करावे. घराच्या दारासमोर सुंदर रांगोळी काढून नवीन कपडे परिधान करावेत.दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. बांबूची काठी स्वच्छ करून तिच्या टोकाला तांबडे किंवा पिवळे कापड, फुलांची माळ आणि त्यावर उलटा कलश ठेवून गुढी उभारावी. काही ठिकाणी गुढीला बत्ताशांची माळही घातली जाते. या गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणतात.यानंतर गुढीची पूजा करावी. कडुनिंबाची कोवळी पाने, जिरे, मिरी, हिंग, सैंधव मीठ आणि ओवा यांचे मिश्रण करून ते थोडेसे खाण्याची प्रथा आहे. वर्षाच्या सुरुवातीला कडुनिंब खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते, असे मानले जाते.त्यानंतर नवीन वर्षाच्या पंचांगाची पूजा करून त्यातील वर्षफळ वाचले जाते. गोड पदार्थ खाऊन हा नूतन वर्षाचा दिवस आनंदात साजरा केला जातो. सूर्यास्तापूर्वी गुढीला नमस्कार करून ती खाली उतरवण्याची प्रथा आहे.या दिवशी काय करतात?गुढीपाडव्याच्या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणे, नवीन कामाची सुरुवात करणे आणि शुभ कार्याचा आरंभ करणे अत्यंत मंगल मानले जाते. त्यामुळे महाराष्ट्रात हा सण मोठ्या आनंदात आणि श्रद्धेने साजरा केला जातो.

फीड फीडबर्नर 9 Mar 2026 6:10 pm

लवकरच बाजारात येणार Apple iPhone 18 Pro Max; जाणून घ्या 'या'नवीन फीचर्स बद्दल

मुंबई : Apple iPhone 17e नंतर आता Apple च्या पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची चर्चा सुरू झाली आहे. कंपनी लवकरच Apple iPhone 18 Pro बाजारात लवकरच आणणार आहे. लॉन्चला अजून वेळ असला तरी काही रिपोर्ट्समधून या फोनच्या डिझाइन, कॅमेरा, बॅटरी आणि हार्डवेअरबद्दल काही माहिती समोर आली आहे.फ्रंट डिझाइनमध्ये मोठा बदलरिपोर्टनुसार, यावेळी सर्वात मोठा बदल फोनच्या फ्रंट डिझाइनमध्ये दिसू शकतो. Face ID साठी लागणारे सेन्सर आणि हार्डवेअर डिस्प्लेच्या खाली बसवले जाऊ शकतात. जर असे झाले तर iPhone मध्ये सध्या दिसणारा Dynamic Island हटवला जाऊ शकतो.त्याऐवजी सेल्फी कॅमेरा स्क्रीनच्या वर डाव्या बाजूला छोट्या होल-पंच स्वरूपात दिसू शकतो. त्यामुळे स्क्रीन अधिक स्वच्छ आणि मोठी वाटेल.एकूण डिझाइनमध्ये फारसा बदल नाहीकाही रिपोर्ट्सनुसार फोनचा एकूण डिझाइन साधारण Apple iPhone 17 Pro सीरीजसारखाच असू शकतो. म्हणजेच बॉडी, मटेरियल आणि कॅमेरा मॉड्यूलच्या डिझाइनमध्ये मोठे बदल नसतील.कॅमेरा आणि नवीन कलर ऑप्शनफोनच्या मागील बाजूला कंपनी पूर्वीसारखाच ट्रिपल कॅमेरा सेटअप देऊ शकते, जो थोडा उभ्या कॅमेरा प्लॅटफॉर्मवर असेल.याशिवाय Apple प्रो मॉडेल्ससाठी काही नवीन रंगांवरही काम करत असल्याचे सांगितले जाते. त्यामध्ये डीप पर्पल, बर्गंडी आणि कॉफी ब्राउन सारखे आपल्याला Apple iPhone 18 Pro मध्ये मिळू शकतात.कंपनीने अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. सध्या ही सर्व माहिती लीक रिपोर्ट्सवर आधारित असल्यामुळे या फीचर्सची खरी माहिती फोनच्या अधिकृत लॉन्चवेळीच समोर येईल.

फीड फीडबर्नर 9 Mar 2026 6:10 pm

Pankaj Bhoyar : राज्यात हुंडा संबंधित गुन्ह्यांमध्ये घट; मंत्री पंकज भोयर यांची विधानसभेत माहीती

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात हुंडा संबंधित गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे, अशी माहीती मंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी दिली आहे.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 5:57 pm

Rajya Sabha Election : उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना का पाठिंबा दिला? ‘या’नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे गटावर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) गंभीर आरोप केले आहेत.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 5:31 pm

MS Dhoni Post : ‘नेहमी गंभीर राहणारा गौतम हसल्यानंतर माहीला राहवलं नाही!’विजयानंतर धोनीची ‘ती’पोस्ट अन् गंभीरचं प्रत्युत्तर चर्चेत

MS Dhoni Post : विजयानंतर धोनीने सोशल मीडियावर टीम इंडियाचे कौतुक करतानाच गौतम गंभीरसाठी लिहिलेली खास ओळ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 5:30 pm

BMW Accident: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; शकुन ग्रुपचे MD वल्लभ माहेश्वरी यांचे निधन

BMW Accident: माहेश्वरी हे ८ मार्चच्या सायंकाळी आपल्या चालकासह जयपूरहून मथुरेला धार्मिक यात्रेसाठी निघाले होते. अलवारजवळ दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर त्यांची BMW कार अचानक नियंत्रण सुटल्याने महामार्गाचे बॅरिकेडिंग तोडून मधल्या विभाजकावरून गेली आणि एका कल्व्हर्टच्या भिंतीला जाऊन धडकली.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 5:22 pm

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करणार

-- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; पत्रकारांच्या समस्यांवर व्यापक बैठक घेणारमुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सरकारने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची कार्यवाही पुढील अधिवेशनाच्या आत करण्यात येईल, तसेच पत्रकारांच्या विविध विषयांवर पत्रकार संघटना, शासनातील विविध विभाग, संबंधित लोकप्रतिनिधी यांची एक व्यापक बैठक लवकरच घेण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री अशी शेलार यांनी सोमवारी (९ मार्च) विधान परिषदेत दिली.आमदार श्रीकांत भारतीय यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करून पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. या लक्षवेधीमध्ये त्यांनी पत्रकार आणि वृत्तपत्र विद्यार्थ्यांसाठी सरकारने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, कोरोनानंतर वृत्तपत्र क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी, त्यातून निर्माण झालेला रोजगाराचा प्रश्न, बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने असलेल्या त्यांचे योजनेचे प्रस्ताव रखडणे, वर्तमानपत्र खरेदी करणारे वाचकांना आयकरात सूट देणे, पत्रकारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी महामंडळातर्फे मदतीची आवश्यकता, गृहनिर्माण योजनेअंतर्गत पत्रकारांना घरे देणे, जाहिरातीवरील जीएसटी रद्द करणे, अशा विविध विषयांकडे लक्ष वेधले होते.मुख्यमंत्र्यांच्यावतीने उत्तर देताना मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, दोन्ही महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय मंत्री मंडळाने १० आक्टोबर २०२४ ला घेतला असून विविध खात्यांशी या विषयांचा समन्वय करायचा असल्याने ती प्रक्रिया सुरु असून पुढील अधिवेशनाच्या आत याबाबत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन ही महामंडळे स्थापन करण्यात येतील, अशी ग्वाही दिली. तसेच वर्तमानपत्रांचे आपल्या. लोकशाही प्रक्रियेत महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच चौथा स्तंभ म्हणून आपण स्थान दिले आहे. कोरोना काळात या क्षेत्रासमोर अनेक अडचणी निर्माण झाली तशीच काही नवीन आव्हाने सुध्दा उभी राहिली. त्यामुळे यातून मार्ग काढून या क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी शासन जे जे प्रयत्न करते आहे तेही त्यांनी आपल्या उत्तरात विषद केले.दरम्यान, या चर्चेत आमदार सतेज पाटील आणि अन्य सदस्यांनी ही भाग घेऊन बाळशास्त्री जांभेकर पेन्शन योजनेतील विलंब व काही अटी शर्तींबाबत प्रश्न उपस्थित केले. तर पत्रकार सुरक्षा कायदा या विषयाकडे लक्ष वेधले. दरम्यान, हे विषय विविध खात्यांशी संबंधित असल्याने याबाबत एक सर्व विभागांची संयुक्त बैठक येत्या अधिवेशनाच्या आत घेण्यात येईल. त्यामध्ये या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करू, असे मंत्री शेलार यांनी आश्वस्त केले.

फीड फीडबर्नर 9 Mar 2026 5:10 pm

बोर्डाच्या परीक्षेसाठी AI चा वापर करून शिक्षकांनीच पुरवल्या कॉपी; तब्बल इतके शिक्षक निलंबित

मुंबई : महाराष्ट्रात दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सहभागी असल्याचे आढळल्यानंतर राज्यातील तब्बल ८१ शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेदरम्यान काही ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून उत्तरं मिळवली जात होती. यासाठी विशेषतः ChatGPT सारख्या साधनांचा वापर करून कॉपी केल्याचे समोर आले आहे.या प्रकरणात बीड जिल्ह्यात सर्वाधिक कारवाई करण्यात आली. बीडमधील चौसाळा परीक्षा केंद्रात अनेक शिक्षक यात सहभागी असल्याचे तपासात उघड झाले. काही ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संगनमत केले होते. तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तरं पुरवली जात होती.मंडळाने केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर संबंधित शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणात पुढील शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. परीक्षेची पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर थांबवण्यासाठी मंडळाने ही कठोर कारवाई केल्याचे सांगितले आहे.

फीड फीडबर्नर 9 Mar 2026 5:10 pm

Auto Rickshaw Permits: राज्य सरकारचा मोठा निर्णय! नवीन रिक्षा परमिट बंद, ‘त्या’परमिटचीही चौकशी सुरू

Auto Rickshaw Permits: अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत सुमारे १४ लाख रिक्षा परमिट वितरित करण्यात आले आहेत. रस्त्यांवरील रिक्षांची संख्या वर्षागणिक मोठ्या प्रमाणात वाढत असून यामुळे आधीच कोंडीत सापडलेल्या रस्त्यांवर आणखी ताण येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 5:08 pm

T20 World Cup : भारताने T20 वर्ल्ड कप जिंकताच ‘या’भाजप नेत्याने केली अजब पोस्ट; सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाने रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या ICC मेन्स T20 वर्ल्ड कप २०२६ च्या (T20 World Cup) फायनलमध्ये न्यूझीलंडचा ९६ धावांनी दणदणीत पराभव करून इतिहास रचला आहे.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 4:57 pm

Stock Market: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 1352 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 8.49 लाख कोटी बुडाले

Stock Market: जागतिक बाजारांमधून आलेले कमकुवत संकेत आणि रुपया नव्या नीचांकी पातळीवर पोहोचल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला. त्यामुळे आज बाजारात सर्वत्र मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली. मात्र अखेरच्या तासात निचांकी पातळीवर खरेदी झाल्याने बाजाराने किंचित सावरण्याचा प्रयत्न केला.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 4:53 pm

S. Jaishankar : पश्चिम आशियातील संघर्षावर भारताने स्पष्ट केली भूमिका; परराष्ट्रमंत्री म्हणाले…

भारत हा शांतता, संवाद आणि मुत्सद्देगिरीचा पुरस्कर्ता असून, या भागात त्वरित तणाव कमी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी सोमवारी राज्यसभेत केले.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 4:35 pm

Hyundai Verna: गाडी नाही, चालते-फिरते लक्झरी घर! ह्युंदाई व्हेरनाचे नवीन मॉडेल लाँच; 25 हून अधिक बदल आणि 7 एअरबॅग्ज!

Hyundai Verna: नव्या Verna मध्ये ब्लॅक क्रोम रेडिएटर ग्रिल, ड्युअल LED प्रोजेक्टर हेडलाइट्स, नव्याने डिझाइन केलेले बंपर आणि R16 डायमंड-कट अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 4:35 pm

बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपनीचा तात्पुरता परवाना रद्द..-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : मुंबई व आसपासच्या भागात वाढत असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सी सेवेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर कारवाईचा इशारा दिला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच संबंधित कंपन्यांचे तात्पुरते परवाने रद्द करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री यांनी विधानपरिषदेत केली.विधानपरिषदेत नियम ९३ अंतर्गत सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या सूचनेवर उत्तर देताना परिवहन मंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या मोटार वाहन अ‍ॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्वे २०२० नुसार महाराष्ट्रात ई-बाईक (दुचाकी) टॅक्सी वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने ७ ऑगस्ट २०२४ रोजी मान्यता दिली असून राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यानुसार “ महाराष्ट्र ई-बाईक-टॅक्सी नियम, २०२४ ” अधिसूचित करण्यात आले असून या नियमांनुसार बाईक टॅक्सी शंभर टक्के इलेक्ट्रिक असणे बंधनकारक आहे. तसेच सर्व अटी व नियमांची पूर्तता करण्यासाठी अर्जदारांना ठराविक कालावधी देण्यात आला आहे.या प्रक्रियेनुसार उबर इंडिया सिस्टिम्स प्रा. लि., रोपेडो ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. आणि ॲनी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (ओला) या कंपन्यांना मुंबई महानगर क्षेत्रात ३० दिवसांसाठी तात्पुरता परवाना (Provisional Licence) देण्यात आला होता. या कालावधीत सर्व आवश्यक अटींची पूर्तता करून अंतिम परवाना घेणे अपेक्षित होते.मात्र काही कंपन्यांनी नियमांची पूर्तता न करता बेकायदा वाहतूक सुरू केल्याचे निदर्शनास आले. तसेच काही ठिकाणी बाईक टॅक्सी चालकांकडून अपघात व महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे संबंधित कंपन्यांना परिवहन विभागाने नोटिसा बजावल्या असून काही प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.परिवहन विभागाने राज्यभरातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना बेकायदा बाईक टॅक्सी वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पथकांमार्फत तपासणी करून दोषी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत १३० दुचाकी वाहनांवर कारवाई करून सुमारे ३३ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला असल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली.राज्य सरकारने बाईक टॅक्सी सेवा नियमानुसार आणि सुरक्षित पद्धतीनेच सुरू राहील यासाठी कठोर उपाययोजना केल्या असून नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फीड फीडबर्नर 9 Mar 2026 4:30 pm

Rihanna : सुप्रसिद्ध गायिका रिहानाच्या घरावर गोळीबार, संशयित महिलेला अटक

मनोरंजन जगतातील सुप्रसिद्ध गायिका रिहाना हिच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेने रिहानाच्या घराच्या दिशेने वारंवार गोळीबार केला. या घटनेत कुणीही जखमी झाले नसून गोळीबार करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.लॉस एंजेलिस पोलिस विभागाने याची पुष्टी करत सांगितले की, रविवारी ८ मार्च रोजी रिहानाच्या घराजवळ गोळीबाराची घटना घडली. या वेळी ५ ते ७ गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या घराच्या गेटला लागल्या, मात्र घराच्या आत पोहोचल्या नाहीत. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. त्या वेळी घरात लोक उपस्थित होते. पोलिसांनी सांगितले की या प्रकरणात ३० वर्षाच्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे.हल्ल्यानंतर पोलिसांनी एका गाडीचा माग काढला. ही पांढऱ्या रंगाची टेस्ला कार होती. ती रिहानाच्या घराच्या जवळ एका ठिकाणी आढळून आली आणि त्या ठिकाणाहून संशयित महिलेला अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी अद्याप त्या महिलेची ओळख किंवा गोळीबारामागील हेतू जाहीर केलेला नाही. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.BREAKING: Police are on scene after several gunshots were fired toward a home belonging to @rihanna in Beverly Hills.Officers with the Los Angeles Police Department say one woman has been arrested in connection with the shooting. pic.twitter.com/LCsIliYAfk— Matthew Seedorff (@MattSeedorff) March 9, 2026माहितीनुसार ३८ वर्षांची रिहाना आपल्या पार्टनर रॅपर एएसएपी रॉकी आणि त्यांच्या तीन मुलांसोबत बेव्हर्ली हिल्स येथील घरात राहते. या प्रकरणावर रिहानाच्या प्रतिनिधींनी अद्याप सार्वजनिकरीत्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.रॉबिन रिहाना फेंटी ही जगातील सर्वात प्रभावशाली गायिका आणि उद्योजिका आहे. आपल्या संगीत कारकिर्दीव्यतिरिक्त तिने स्वतःच्या ब्रँडच्या माध्यमातून फॅशन, कॉस्मेटिक्स आणि ब्युटी क्षेत्रात मोठे जागतिक व्यवसाय साम्राज्य उभे केले आहे.

फीड फीडबर्नर 9 Mar 2026 4:30 pm

Raj Thackeray : रायगडावरून राज ठाकरेंची गर्जना ! 19 तारखेला करणार मोठी घोषणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या (Raj Thackeray) आज स्थापनेला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक वर्धापनदिनानिमित्त रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी एक खास कार्यक्रम पार पडला.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 4:15 pm

Maharashtra HPV vaccination: महाराष्ट्रात एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू; 9.84 लाख मुलींना मिळणार सर्व्हायकल कॅन्सरपासून संरक्षण

Maharashtra HPV vaccination: ही राज्यस्तरीय मोहीम केंद्र सरकारने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरात सुरू केलेल्या राष्ट्रीय एचपीव्ही लसीकरण उपक्रमाचाच भाग आहे. डिसेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्राने गार्डासिल-४ (Gardasil 4) या क्वाड्रिव्हॅलेंट एचपीव्ही लसीचे ९,४७,३८० डोस खरेदी केले होते.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 4:14 pm

मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती? जंगलात सापडली जळालेली हाडं, माजी सरपंचासोबत नेमकं काय घडलं?

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर ७ जानेवारीपासून बेपत्ता आहेत.

दैनिक प्रभात 9 Mar 2026 4:10 pm

Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे स्थान सातत्याने उंचावत आहे. गेल्या दोन वर्षांत भारताने सहा विश्वविजेतेपदे आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. भारताने क्रिकेटच्या विविध फॉरमॅटमध्ये ही कामगिरी सुरू ठेवली आहे. या काळात युवा क्रिकेटपटूंनीही क्रिकेटमध्ये भारताचे भविष्य उज्वल असल्याचे दाखवून दिले आहे. तर वरिष्ठ पुरुष संघाने सातत्याने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.पुरुषांचा टी-२० विश्वचषक (२०२४) जिंकला :रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला हतै. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला होता. आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा भारताचा दुष्काळ त्याने या निमित्ताने संपवला होता. भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक आपलं नाव कोरंल होतं. अंतिम सामन्यात, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, भारताने २० षटकांत सात विकेट्स गमावून १७६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत आठ विकेट्स गमावून केवळ १६९ धावा करता आल्या.रोहितच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली (२०२५) :रोहित शर्माच्याच नेतृत्वाखाली भारताने २०२५ च्या सुरुवातीला न्यूझीलंडला मात देत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. न्यूझीलंडसमोर ५० षटकांत २५२ धावांचे लक्ष्य होते, जे भारतीय संघाने चार विकेट्स शिल्लक असताना साध्य केले. कर्णधार रोहित शर्माच्या ८३ चेंडूत ७६ धावांच्या खेळीमुळे भारताने ४९ षटकांत सहा विकेट्सच्या मोबदल्यात २५४ धावा करून विजय मिळवला.भारतीय महिला अंडर-१९ संघाने ताकद दाखवली :भारतीय महिला अंडर-१९ संघाने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत फक्त ८२ धावा करता आल्या. भारतीय महिला संघाने ११.२ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ८४ धावा करून विजेतेपद पटकावले होते.महिला संघ पहिल्यांदाच विश्वविजेता (२०२५) :२०२५ हे वर्ष भारतासाठी खरोखरच संस्मरणीय होते. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक जिंकला. महिला क्रिकेटमधील ही भारताची पहिली आयसीसी ट्रॉफी होती. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ७ बाद २९८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ २४६ धावांवर आटोपला. दीप्ती शर्माने पाच विकेट्स घेत भारताच्या या विश्वचषक विजयात निर्णाय भूमिका बजावली.भारतीय महिला अंध संघाने पटकावला टी२० विश्वचषक (२०२५) :भारतीय महिला अंध संघाने २०२५ चा टी२० विश्वचषकही जिंकला. कोलंबोमधील पी. सारा ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने नेपाळचा सात विकेट्सने पराभव केला. ही स्पर्धा पहिल्यांदाच होत होती आणि भारताला ही जागतिक स्पर्धा जिंकण्यात यश आले. भारताने नेपाळला पाच विकेट्सवर ११४ धावांवर रोखले. भारतीय संघाने १२ षटकांत तीन विकेट्स गमावक ११७ धावा करून लक्ष्य गाठले.सहाव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला (२०२६) :भारतीय १९ वर्षांखालील संघाने या वर्षाच्या सुरुवातीला सहाव्यांदा विश्वविजेतेपद मिळवून इतिहास रचला. भारत या स्पर्धेत सर्वाधिक विजय मिळवणारा संघ आहे. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला. भारताने इंग्लंडसमोर ४१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, इंग्लंड संघ ४०.२ षटकांत ३११ धावांवर आटोपला. टीम इंडियासाठी वैभव सूर्यवंशी अंतिम सामन्याचा स्टार होता. त्याने ८० चेंडूत १७५ धावांची धमाकेदार खेळी केली. दरम्यान, इंग्लंडकडून कॅलेब फॉकनरने शतक झळकावले, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. फॉकनरने ६७ चेंडूत ११५ धावांची खेळी केली.वरिष्ठ पुरुष संघाने टी-२० विजेतेपद कायम राखले (२०२६) :सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने टी-२० क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवत टी-२० विश्वचषक विजेतेपद यशस्वीरित्या राखले आहे. या स्पर्धेत एखाद्या संघाने प्रथमच विजेतेपद राखले आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, भारताच्या २५५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १९ षटकांत १५९ धावांवर आटोपला. टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी, २००७ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आणि २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती. सूर्यकुमार यादवचाही जागतिक विजय मिळवणाऱ्या कर्णधारांमध्ये आता सामील झाला आहे. अहमदाबादमध्ये २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. पण आता टीम इंडियाने इतिहासाची पुनरावृत्ती करत नवा इतिहास रचला आहे.

फीड फीडबर्नर 9 Mar 2026 4:10 pm

Anil Ambani : अनिल अंबानींवर फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल; सीबीआयची कारवाई

केंद्रीय तपास ब्युरो (सीबीआय) ने अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) च्या इतर संचालकांविरुद्ध फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) च्या तक्रारीवरून करण्यात आली असून २०१३ ते २०१७ या कालावधीत बँकेसोबत सुमारे १,०८५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) आणि १२०बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.पीएनबीचे व्यवस्थापक संतोषकृष्ण अन्नवरपु यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अनिल अंबानी आणि कंपनीच्या इतर संचालकांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या निधीचा कथित गैरवापर केला. एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, या प्रकरणात पीएनबीला सुमारे ६२१.३९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, तर युनायटेड बँक ऑफ इंडिया (जिचे नंतर पीएनबीमध्ये विलीनीकरण झाले) ला ४६३.८० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, कंपनीने घेतलेले कर्ज अशा ठिकाणी गुंतवले किंवा वळवले ज्याची माहिती बँकेला देण्यात आली नव्हती.दरम्यान, यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही सीबीआयने अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सविरोधात आणखी एका बँक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात २०१३ ते २०१७ या काळात बँक ऑफ बडोदा सोबत २,२२० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे.याच प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने अनिल अंबानी यांच्या अनेक मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. मुंबईतील त्यांचा ‘एबोड’ नावाचा आलिशान बंगला जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजित किंमत सुमारे ३,७१६ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. तसेच दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई, कांचीपुरम आणि पूर्व गोदावरी या शहरांमध्ये असलेल्या निवासी घरे, कार्यालयीन जागा आणि जमिनींचाही यात समावेश आहे.मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत आतापर्यंत सुमारे १५ हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सद्वारे झालेल्या कथित बँक फसवणुकीच्या प्रकरणात अनिल अंबानी यांच्यावर एकूण सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सुरू असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले आहे.

फीड फीडबर्नर 9 Mar 2026 4:10 pm

इस्रायलचा लेबनॉनवर केमिकल अॅटॅक, ह्युमन राइट्स वॉचचा गंभीर आरोप

योहमोर : इस्रायलने लेबनॉनमधील योहमोर गावात हिझुबल्लाह या अतिरेकी संघटनेच्या तळावर हल्ला करण्याच्या निमित्ताने एक केमिकल अॅटॅक अर्थात रासायनिक हल्ला केल्याचा आरोप ह्युमन राइट्स वॉच नावाच्या संस्थेने केला आहे. ह्युमन राइट्स वॉच ही एक मानवाधिकारांसाठी लढणारी संस्था आहे.ह्युमन राइट्स वॉचच्या आरोपानुसार इस्रायलने योहमोर गावावर पांढऱ्या फॉस्फरसचा मारा केला. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या आंतरराष्ट्रीय करारानुसार कोणताही देश दुसऱ्या देशाविरुद्ध अथवा तिथल्या एका प्रदेशाला लक्ष्य करून रासायनिक (केमिकल्स) किंवा जैविक (बायॉलॉजिकल) हल्ला (अॅटॅक) करू शकत नाही. पण इस्रायलने योहमोर गावावर पांढऱ्या फॉस्फरसचा मारा केला आहे. दक्षिण लेबनॉनमधील योहमोर गावात निवासी भागाला लक्ष्य करून इस्रायलने तोफखाना आणि पांढरा फॉस्फरस वापरला. इस्रायली सैन्याने गावकऱ्यांना आणि दक्षिण लेबनॉनमधील डझनभर इतर रहिवाशांना स्थलांतर करण्याचा इशारा दिल्यानंतर हा हल्ला केला.पांढरा फॉस्फरस हा एक धोकादायक रासायनिक पदार्थ आहे. तो मेणासारखा पिवळा किंवा पांढरा दिसतो आणि त्याला लसणासारखा वास येतो. हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर तो आपोआप जळतो, ज्यामुळे ८१५ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान निर्माण होते. शरीर पांढऱ्या फॉस्फरसच्या संपर्कात आल्यास जळू लागते. त्वचा आणि हाडे जळायला सुरुवात होते. या हल्ल्यातून वाचलेल्यांना गंभीर स्वरुपाच्या व्याधी, त्वचारोग, श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची आग होणे, हृदयक्रिया मंदावणे किंवा बंद पडणे, मृत्यू येणे अशा स्वरुपाचे त्रास होऊ शकतात. निवासी वस्तीत पांढरा फॉस्फरस मोठी आग लावू शकतो. यामुळेच पांढरा फॉस्फरस वापरून हल्ला करणे हे घातक आणि मानवतेच्या विरुद्ध असल्याचा आरोप ह्युमन राइट्स वॉचने केला आहे.इस्रायलने युद्धाच्या निमित्ताने पांढऱ्या फॉस्फरसचा बेकायदेशीर वापर करणे ही चिंता वाढवणारी बाब आहे. याचे नागरिकांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. युद्ध आणखी घातक होऊ शकते; अशी भीती ह्युमन राइट्स वॉचने व्यक्त केली आहे. पण इस्रायलने पांढऱ्या फॉस्फरसचा बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप फेटाळला आहे. शत्रूविरोधात धुराचा पडदा तयार करण्यासाठी पांढऱ्या फॉस्फरसचा वापर केल्याचा दावा इस्रायलने केला आहे.पांढरा फॉस्फरस फॉस्फेट खडकांमधून काढला जातो आणि तो लष्करी उद्देशांसाठी कवच, बॉम्ब किंवा रॉकेटमध्ये वापरला जातो. जाळल्यावर, तो फॉस्फरस पेंटॉक्साइडपासून बनलेला जाड पांढरा धूर निर्माण करतो. युद्धात, याचा वापर धुराचा पडदा तयार करण्यासाठी केला जातो जेणेकरून शत्रूला दाट धुरात काहीही दिसू नये.रात्रीच्या वेळी रणांगण प्रकाशित करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. शत्रूच्या जागा, वाहने किंवा साहित्य जाळण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. नागरी भागात किंवा नागरिकांजवळ आग लावणारे शस्त्र म्हणून त्याचा वापर करण्यास मनाई आहे, कारण त्यामुळे अंदाधुंद नुकसान होते. लष्करी कारवायांदरम्यान वापरल्यास ते बेकायदेशीर मानले जाते परंतु त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण होतो.लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २ मार्च २०२६ ते ८ मार्च २०२६ दरम्यान इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये एकूण ४०० जणांचा मृत्यू झाला. यात ८३ मुले, ४२ महिला, ९ बचाव कर्मचारी यांचा समावेश आहे. तसेच २५४ मुले आणि २७४ महिलांसह १,१३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

फीड फीडबर्नर 9 Mar 2026 4:10 pm

Miss India Earth 2019 : आतिफशी लग्न, मग धर्म परिवर्तन, आणि पुन्हा हिंदू धर्म.... या मिस इंडियाने पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

मुंबई : ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ किताब जिंकलेली सायली सुर्वे सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सायली सुर्वे ही मराठी आणि मूळची पुण्याची परंतु तिने आतिफ या इसमाची २०१९ मध्ये घरच्यांचा विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. आतिफ याच्याशी प्रेमविवाहानंतर तिच्यावर जबरदस्तीने तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला आणि तिला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला, असा आरोप तिने केला.सायलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन मीरा-भाईंदरमधील व्यावसायिक आतिफ तासे याच्याशी लग्न केले होते. लग्नानंतर काही काळाने परिस्थिती बदलली आणि तिला धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला.चार मुलांच्या भविष्यासाठी तिने बराच काळ हे सहन केले. मात्र परिस्थिती गंभीर होत गेल्याने तिने या सर्वाबद्दल उघडपणे बोलण्याचा निर्णय घेतला.यानंतर हिंदू संघटनांच्या मदतीने तिने वैदिक पद्धतीने पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. निकाहनंतर तिचे नाव ‘अतेजा तासे’ ठेवले गेले होते, पण घरवापसीनंतर तिने पुन्हा आपले नाव बदलून आद्या सुर्वे असे ठेवले आहे.सायलीने सांगितले की, आतिफ तासेशी लग्न करण्याचा निर्णय हा तिच्या आयुष्यातील मोठा चुकीचा निर्णय होता आणि आता पुन्हा आपल्या मूळ धर्मात परतल्याने तिला समाधान मिळाले आहे.

फीड फीडबर्नर 9 Mar 2026 4:10 pm