SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

24    C
... ...View News by News Source

PCMC Election: कमळाच्या चार पाकळ्यांनी प्रभाग १५ भारावला ! भाजपच्या प्रचार रॅलीने सेक्टर २८ मध्ये उत्साह

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – प्रभाग क्रमांक १५ मध्ये गुरूवारी (दि. ८) प्रचार रॅली काढण्यात आली. भाजपचे अधिकृत उमेदवार शैलजा मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ आणि अमित गावडे या कमळाच्या चार पाकळ्या एकत्र रस्त्यावर उतरल्या आणि सेक्टर २८ मध्ये प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जयहिंद चौकापासून सुरू झालेली ही रॅली म्हणजे केवळ प्रचार नव्हता, तर कार्यकर्त्यांचा […] The post PCMC Election: कमळाच्या चार पाकळ्यांनी प्रभाग १५ भारावला ! भाजपच्या प्रचार रॅलीने सेक्टर २८ मध्ये उत्साह appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Jan 2026 2:30 am

PCMC Election: प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाइक रॅली; नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या वतीने आयोजित बाइक रॅलीला नागरिकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. निकिता अर्जुन कदम, संदीप बाळकृष्ण वाघेरे, प्रियंका सुनील कुदळे आणि हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शेकडो कार्यकर्ते, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने या […] The post PCMC Election: प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाइक रॅली; नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Jan 2026 2:15 am

PCMC Election: प्रभाग क्रमांक २६ मध्ये पोस्टमननी घेतली रविराज काळेंची भेट

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पोस्टमन आले भेटायला या अभिनव उपक्रमामधून रविराज काळे यांनी प्रभागात आजपर्यंत केलेली कामे थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून घराघरात जाऊन कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठ्याच्या अडचणींवर केलेली कामे, ड्रेनेज लाइन दुरुस्ती, रस्त्यांचे डांबरीकरण, स्वच्छता मोहिमा तसेच नागरिकांच्या तक्रारींवर वेळेवर घेतलेली दखल याची सविस्तर माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे.पोस्टमन […] The post PCMC Election: प्रभाग क्रमांक २६ मध्ये पोस्टमननी घेतली रविराज काळेंची भेट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Jan 2026 2:00 am

पार्टी बेतली जीवावर! मित्राचा मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी जे केलं, ते ऐकून अंगावर येईल काटा

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पैज लावून अतिप्रमाणात दारू पाजल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेताची विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवार (दि. ३० डिसेंबर) दुपारी ३ वाजताच्या सुमारास मावळ तालुक्‍यातील नवलाख उंब्रे येथील एका शेतात घडली. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात यांनी बुधवारी (दि. ७) तळेगाव एमआयडीसी […] The post पार्टी बेतली जीवावर! मित्राचा मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी जे केलं, ते ऐकून अंगावर येईल काटा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Jan 2026 1:45 am

PCMC Election: दापोडीत भाजप उमेदवारांचा जनतेशी संवाद; संधी मिळाल्‍यास परिसराचा कायापालट करु

प्रभात वृत्तसेवा दापोडी – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३० मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय नाना काटे, उषा मुंढे, प्रतिभा जवळकर आणि चंद्रकांता सोनकांबळे यांनी जनसंपर्क अभियान तीव्र केले असून, नुकताच त्यांनी परिसरातील विविध चाळी आणि वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. उमेदवारांनी एसएमएस कॉलनी नंबर १, काळुराम काटे चाळ, पत्रा चाळ, कुलकर्णी […] The post PCMC Election: दापोडीत भाजप उमेदवारांचा जनतेशी संवाद; संधी मिळाल्‍यास परिसराचा कायापालट करु appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Jan 2026 1:30 am

NCP Pune District: पुणे ग्रामीण राष्ट्रवादीत मोठे फेरबदल; विठ्ठलराव शिंदेंच्या खांद्यावर जिल्ह्याची जबाबदारी

प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदी मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. या नियुक्तीमुळे मावळ तालुक्याला जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी शिंदे यांच्यावर पक्षातील निष्ठावंत आणि संयमी […] The post NCP Pune District: पुणे ग्रामीण राष्ट्रवादीत मोठे फेरबदल; विठ्ठलराव शिंदेंच्या खांद्यावर जिल्ह्याची जबाबदारी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Jan 2026 1:15 am

Sahyadri Tiger Reserve: तज्ज्ञांची नावे कशाला, कामाचे बोला! वन विभागाच्या ‘त्या’मागणीनंतर पर्यावरणप्रेमी आक्रमक

प्रभात वृत्तसेवा कोयनानगर – कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्प आणि महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ही दोन स्वतंत्र जंगल क्षेत्रे असून, त्यांना जोडणारा महत्त्वाचा नैसर्गिक व्याघ्र कॉरिडॉर सातारा जिल्ह्यातून जातो. या कॉरिडॉरमुळे वाघांसह इतर वन्यजीवांची सुरक्षित ये- जा व जनुकीय देवाणघेवाण होत असल्याने हा मार्ग पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा या कॉरिडॉरचा मध्यवर्ती […] The post Sahyadri Tiger Reserve: तज्ज्ञांची नावे कशाला, कामाचे बोला! वन विभागाच्या ‘त्या’ मागणीनंतर पर्यावरणप्रेमी आक्रमक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Jan 2026 1:00 am

Khatav News: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा मोठा डाव! प्रदीप विधातेंच्या निवडीने विरोधकांचे समीकरण बिघडणार?

प्रभात वृत्तसेवा खटाव – पुरोगामी विचारांचा खटाव तालुक्यात राष्ट्रवादीची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. हा तालुकाच राष्ट्रवादी विचारांचा आहे. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, ना. मकरंद पाटील आणि खा. नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांमध्ये आम्ही एकदिलाने काम करुन पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देवू, असा विश्वास खटाव तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना प्रदीप […] The post Khatav News: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा मोठा डाव! प्रदीप विधातेंच्या निवडीने विरोधकांचे समीकरण बिघडणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Jan 2026 12:45 am

मराठवाड्यातील मातब्बर गाजवताहेत प्रचाराचे आखाडे

डॉ. अभयकुमार दांडगे महानगरपालिका निवडणुकीत प्रचार पद्धतीत बदल दिसतोय. फेसबुक, व्हाॅट्सअॅप, इन्स्टाग्राम रील्स, यूट्यूब याद्वारे प्रचार होतोय. मनपाच्या या निवडणुकीत डिजिटल माध्यमांचा वापर होत आहे. मोबाईलच्या स्क्रीनद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तसेच गल्लीबोळातही प्रचाराची ओळख ठेवत उमेदवार व नेते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी मराठवाड्यातील महापालिका क्षेत्र पिंजून काढले. भाजपसह इतरही पक्षांच्या मातब्बर नेत्यांनी मराठवाड्यात प्रचाराचे आखाडे चांगलेच गाजविले. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर व नांदेड या पाच महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत आपापल्या पक्षाचे उमेदवार निवडून यावेत यासाठी भाजपसह शिंदेसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट, उबाठा, एमआयएम, रिपाइं या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली. राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी भाजप, शिंदेसेना व अजित पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांनी कंबर कसून मेहनत घेतली. उमेदवारी न मिळाल्याने अनेकांचे असमाधान झाले. त्यानंतर मात्र मराठवाड्यात सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्येच फाटाफूट झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्याच्या प्रचार सभांमध्ये नांदेड व जालना या दोन शहरांत औद्योगिक विस्तार करण्याचे आश्वासन दिले. ही दोन्ही शहरे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली, तर लातूर येथील प्रचार सभेतून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कार्य राज्यात चांगले होते,अशा शब्दात त्यांचे कौतुक केले. काँग्रेसच्या हाती सत्ता देऊन आजवर लातूरचा विकास न झाल्यामुळे यावेळेस भाजपच्या हातात सत्ता द्या, लातूरच्या विकासाची जबाबदारी माझी, असे आश्वासन फडणवीस यांनी लातूर येथील जाहीर सभेत दिले.लातूर मनपा निवडणूक प्रचारादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, असे उद्गार काढले. यामुळे लातूर मनपा निवडणुकीत भाजप विरोधी वातावरण तयार झाले होते; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरच्या प्रचार सभेत याबाबत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचे सांगून या प्रकरणावर पडदा टाकला. एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या लातूरमध्ये या वक्तव्याचा फटका भाजपला बसू शकतो, असे काहीसे चित्र निर्माण झाले होते; परंतु हळूहळू ते वातावरण बऱ्याच प्रमाणात निवळले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातुरातून पुसणारा अजून कोणी जन्माला आलेला नाही. हा अपमान लातूरकर कधीही सहन करणार नाही, अशा शब्दांत सपकाळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावर टीका केली. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तर शिवसेनेकडून संपर्कप्रमुख सिद्धराम म्हेत्रे तसेच काँग्रेस व वंचित आघाडीकडून वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्याही वादळी सभा पार पडल्या. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर तसेच नांदेड शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात झालेल्या विष्णुपुरी प्रकल्पानंतर कोणीही पाण्याची पुरेशी व्यवस्था करू शकले नाहीत. खुद्द त्यांचे सुपुत्र अशोक चव्हाण हे देखील मुख्यमंत्री असतानाही नांदेडच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. याबद्दलही नांदेडच्या मतदारांमध्ये अशोक चव्हाण यांच्याविषयी नेहमीच खदखद असते.मराठवाड्यातील पाण्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर एकाही नेत्याने आपले मत मांडलेले नाही. त्यामुळे जनतेला जे हवे आहे ते एकाही प्रचार सभेमधून ऐकावयास मिळाले नसल्याची तक्रार मतदार करीत आहेत. एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मराठवाड्यात लक्ष केंद्रित केले आहे. भाजपला तसेच काँग्रेसला मतदान न करता एमआयएम पक्षाच्याच उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन ते जाहीर सभेतून करत आहेत. छत्रपती संभाजीनगर तसेच नांदेड शहरातील महानगरपालिका निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाने सर्वाधिक उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे इम्तियाज जलील यांच्या वाहनावर मुस्लीम समाजातील काही नागरिकांनी हल्ला केला. तिकीट वाटप करत असताना एमआयएम पक्षाने पैसे घेऊन उमेदवारी बहाल केली, असा आरोप त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधून होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी देखील इच्छुक उमेदवारांचा तसेच त्यांच्या समर्थकांचा जनक्षोभ दिसून आला. मनपा निवडणुकीसाठी काही मोजकेच दिवस शिल्लक आहेत. हे लक्षात घेऊन सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मराठवाड्यातील पाच महानगरपालिका आपल्या ताब्यात याव्यात या दृष्टीने पक्षाचे नेते व पदाधिकारी तसेच इच्छुक नगरसेवक साम-दाम-दंड-भेद या नीतीने कामाला लागले आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ रोजी मतमोजणी होणार असून सायंकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर मराठवाड्यातील पाच महानगरपालिका कोणाच्या व कोणत्या पक्षाचा महापौर हे स्पष्ट होणार आहे. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत प्रचार पद्धतीत एक वेगळा बदल दिसून आला. फेसबुक, व्हाॅट्सअॅप, इन्स्टाग्राम रील्स, यूट्यूब याद्वारे सोशल मीडियाचा आधार घेत उमेदवारांनी प्रचार केला. अनेक उमेदवारांनी यावेळी देखील रस्त्यावरच्या प्रचारात पारंपरिक प्रचार साधनांचा वापर केला. रिक्षावर भोंगा लावून प्रचार करणे तसेच स्क्रीनवर स्वतःच्या व नेत्यांच्या कामाचा लेखाजोखा दाखविणे, अशा पद्धतीने प्रचाराचा हा टप्पा केंद्रित केला. मनपाच्या या निवडणुकीत डिजिटल माध्यमांचा वापरही होत आहे. परंतु जे काही उमेदवार निवडून येतील ते जनतेच्या कितपत सेवेसाठी तत्पर असतील हे येणारा काळच सांगेल.

फीड फीडबर्नर 9 Jan 2026 12:30 am

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार ०९ जानेवारी २०२६

पंचांगआज मिती पौष कृष्ण सप्तमी शके १९४७.चंद्र उत्तरा फाल्गुनी.योग शोभन.चंद्र राशी कन्या, भारतीय सौर १९ पौष १९४७. शुक्रवार दिनांक ९ जानेवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.१३ मुंबईचा सूर्यास्त ०६.१७ मुंबईचा चंद्रोदय ००.०० उद्याची मुंबईचा चंद्रास्त ११.२६ राहू काळ ११.२२ ते १२.४५ ,वृद्धी तिथीदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या संधी येतील. वृषभ : आपणाला ताणतणावातून आणि अडचणीतून दिलासा मिळेल. मिथुन : आपल्या मध्ये आत्मविश्वास भरपूर असणार आहे. कर्क : ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल.सिंह : नातेवाईकांना मदत करावी लागणार आहे. कन्या : नोकरीमध्ये चांगली स्थिती असणार आहे.तूळ : आज आपले मनोबल चांगले असणार आहे.वृश्चिक : काम जास्त करावे लागणार आहे.धनू : प्रतिष्ठित व्यक्तींकडून मदत मिळेल.मकर : आपल्या व्यवसायात चांगले यश मिळणार आहे. कुंभ : आपल्याकडून काही धार्मिक कार्य होऊ शकते.मीन : जोडीदाराकडून आर्थिक लाभ होऊ शकतात.

फीड फीडबर्नर 9 Jan 2026 12:30 am

Satara News: महिला बचत गटांसाठी ‘उमेद’चा मोठा आधार; साताऱ्यासह १३ जिल्ह्यांत उभे राहणार भव्य ‘उमेद मॉल’

प्रभात वृत्तसेवा सातारा – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी ३४ जिल्ह्यातील ३५१ तालुक्यांमध्ये करण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तु व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात १३ जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णयानुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात […] The post Satara News: महिला बचत गटांसाठी ‘उमेद’चा मोठा आधार; साताऱ्यासह १३ जिल्ह्यांत उभे राहणार भव्य ‘उमेद मॉल’ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Jan 2026 12:30 am

Satara News: साताऱ्यात बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘हा’इशारा वाचून उडेल झोप

प्रभात वृत्तसेवा सातारा – बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे रुग्णाचा जीव जावू शकतो. त्यामुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहिमेला गती द्यावी. बोगस डॉक्टर आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. या कामाच्या प्रगतीचा आढावा पुढील बैठकीत द्यावा. बोगस डॉक्टर शोध मोहिमेत हयगय झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात […] The post Satara News: साताऱ्यात बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘हा’ इशारा वाचून उडेल झोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Jan 2026 12:15 am

मी बाळासाहेबांचा मुंबईकर शिवसैनिक बोलतोय... भाग २

मिलिंद रघुनाथ पोतनीसशिवसेनेचं हिंदुत्व बावनकशी सोन्यासारखं झळाळून निघालं. आमचे साहेब अनभिषिक्त ‘हिंदुहृदयसम्राट’ झाले. भाजपवाले, विशेषतः प्रमोद महाजन युतीसाठी ‘मातोश्री’चे उंबरठे झिजवू लागले. साहेब तर माझ्या गळ्यातील ताईत झाले...वसंतदादा पाटील यांच्या एका वाक्याने मुंबई महापालिका शिवसेनेच्या पदरात पडली. पण पुन्हा एकदा आमचे कावेबाज विरोधक शिवसेनेला ‘वसंत सेना’ म्हणून हिणवू लागले. पण, मी त्यांना कधीच भीक घातली नाही.त्या निवडणुकीत फक्त २५% मतदान झालं होतं, त्याचा फायदा शिवसेनेला झाला. असले पोरकट आरोप करणाऱ्या दळभद्री विरोधकांना ‘बाकीच्या ७५% ना मतदान करण्यापासून आम्ही थांबवलं होतं का?’ असा रोखठोक प्रश्न विचारून मी आजही निरुत्तर करतो. त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ माझगाव मतदारसंघातून ‘मशाल’ चिन्हावर निवडून येऊन एकमेव आमदार झाले. कारण तोपर्यंत शिवसेनेला स्वतःचं अधिकृत असं चिन्ह नव्हतं. उमेदवारांची नोंद ‘अपक्ष’ अशीच व्हायची.पुढे १९९१ साली याच छगन भुजबळांनी चुकलो, ‘लखोबा लोखंडे’ने साहेबांशी आणि शिवसेनेशी गद्दारी करून आमच्या १८ आमदारांना बरोबर घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी माझी तळपायाची आग मस्तकाला गेली. ज्या साहेबांनी, ज्या शिवसेनेने तुम्हाला मुंबईचं महापौर केलं, आमदार म्हणून निवडून आणलं, त्या साहेबांशी आणि पक्षाशी गद्दारी करताना छगन भुजबळ यांना काहीच कसं वाटलं नाही? मनातल्या मनात मी त्यांच्या तोंडावर थुंकलो होतो. सत्ताधारी काँग्रेसमध्ये गेल्यामुळे शिवसैनिकांनी थोडं नमतं घेतलं नाहीतर आम्ही भुजबळांना आमच्या भुजातील बळ नक्की दाखवलं असतं. पुढे बराच काळ छगन भुजबळ यांचं ‘लखोबा लोखंडे’ हे टोपण नाव खूप प्रसिद्ध झालं होतं.साहेबांनी हिंदुत्वाचा वसा घेतल्यानंतर मात्र माझ्या शिवसेनेला सोन्याचे दिवस येऊ लागले. शिवसेनाप्रमुखांपासून नेते व उपनेते, सचिव, प्रवक्ते, शाखाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख, विभाग प्रमुख, विभाग उपप्रमुख, गटप्रमुख अशी श्रेणीबद्ध संघटनात्मक रचना सक्रिय करण्यात आली. एवढंच नव्हे, शिवसेनेची महिला आघाडीदेखील सक्रिय झाली. खूप मोठ्या संख्येने आमच्या माता- भगिनी शिवसेनेचं काम सक्रियतेने करू लागल्या. महाराष्ट्रात गावोगाव शिवसेनेच्या शाखा उघडू लागल्या. शिवसेनेचा भगवा आणि साहेबांची पोस्टर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातझळकू लागली. शिवसेना खऱ्या अर्थाने महाराष्ट्रव्यापी झाली!मात्र, १९८७ सालाने शिवसेनेच्या ‘हिंदुत्वा’ला सोन्याची झळाळी लाभली. १९८७ साली काँग्रेसचे विलेपार्ले येथील आमदार हंसराज भुग्रा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत काँग्रेसतर्फे दिग्गज प्रभाकर कुंटे यांना उमेदवारी दिली गेली. राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर शंकरराव चव्हाण यांच्यासारखे कडक हेडमास्तर होते. अब्दुल रहमान अंतुले यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील शिवसेना आणि काँग्रेसचे मधुर संबंध संपुष्टात आले होते. बाळासाहेबांनी काँग्रेसच्या थेट विरोधात भूमिका घेतली होती. पार्ले येथील या निवडणुकीसाठी साहेबांनी मुंबईचे महापौर असलेल्या रमेश प्रभू यांची निवड केली आणि निवडणूक घोषणा दिली ‘गर्व से कहो, हम हिंदू है’. साहेबांच्या भाषणाची सुरुवातच ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू, बंधू-भगिनी आणि मातांनो’ अशी व्हायची आणि सगळी सभा चैतन्याने भारून जायची. आता उत्तर प्रदेश, बिहारचे सगळे भय्ये आणि मद्रासी आमच्यासाठी ‘परप्रांतीय हिंदू’झाले होते.बाळासाहेबांच्या भगव्या कपड्यांनी, हातातल्या रुद्राक्षांनी, भारदस्त आवाजात मांडलेल्या कडव्या हिंदुत्वाने अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेवर गारुड केलं. भाजपचा पाठिंबा त्यावेळी धर्मनिरपेक्ष जनता पक्षाला होता. जनता पक्षाचे प्राणलाल व्होरा, काँग्रेसचे प्रभाकर कुंटे आणि शिवसेनेचे रमेश प्रभू अशी ही तिरंगी लढत होती. साहेब आणि रमेश प्रभू या दोघांनीही थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जाहीर सभांमधून मते मागितली होती. भाजपचा जनता पक्षाला पाठिंबा असला तरी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते या निवडणुकीत शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार करत होते. या सगळ्या झंझावातामुळे आमच्या रमेश प्रभू यांनी निवडणूक जिंकली. निवडणुकीच्या विरोधात प्रभाकर कुंटे यांनी उच्च न्यायालयात लोकप्रतिनिधी कायद्यान्वये दावा ठोकला कुंटे यांची बाजू उचलून धरताना प्रभू यांनी निवडणूक रद्दबातल झालीच, शिवाय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी धर्माच्या नावावर मतं मागितल्याने त्यांचा मतदानाचा अधिकार ६ वर्षांसाठी (१९९९ ते २००५) काढून घेतला गेला. दुसरीकडे रमेश प्रभू यांनाही ६ वर्षे निवडणूक लढविण्यावर बंदी आली. पण, शिवसेनेचं हिंदुत्व बावनकशी सोन्यासारखं झळाळून निघालं. आमचे साहेब अनभिषिक्त ‘हिंदुहृदयसम्राट’ झाले. भाजपवाले, विशेषतः प्रमोद महाजन युतीसाठी ‘मातोश्री’चे उंबरठे झिजवू लागले. साहेब तर माझ्या गळ्यातील ताईत झाले.आता आमची सेना महाराष्ट्रव्यापी पक्ष झाला आणि पक्षाला निवडणूक आयोगाकडून ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मिळालं. २३ जानेवारी १९८८ रोजी साहेबांनी ‘सामना’ नावाचं मुखपत्र सुरू केलं. आता शिवसैनिकांच्या तसेच मराठी माणसाच्या आवाजाला एक हक्काचं वर्तमानपत्रंच पाठबळ मिळालं होतं. त्यादिवशी मला कोण आनंद झाला. त्याहीपेक्षा आनंद तेव्हापासून आजपर्यंत एकही दिवस सामना वृत्तपत्र निघालं नाही, असं झालेलं नाही याचा होतो. याच ‘सामना’मुळे शिवसेनेला संजय राऊत नावाचा हिऱ्यासारखा प्रवक्ता मिळाला. त्यांच्या अभिजात मराठीतील आणि ठाकरे शैलीतील रोखठोक अग्रलेख आम्हाला अवर्णनीय आनंद मिळवून देऊ लागले. साहेबांनी पुढे संजय राऊतांनाराज्यसभेवर पाठवलं.शिवसेनेने अशी कात टाकल्यावर पुढच्याच वर्षी, १९८९ साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत शिवसेनेचे ३० नगरसेवक निवडून आले. दुसरीकडे कॉंग्रेसने स्थानिक पातळीवर आगरी सेनेसोबत युती केली. बहुमत शिवसेनेकडेच होतं. त्यामुळे शिवसेनेचा महापौर ठाणे महानगरपालिकेत येणार, असं स्पष्ट चित्र होतं. बाळासाहेबांनी या महापौरपदासाठी होणाऱ्या निवडणुकीची जबाबदारी सतीश प्रधान आणि आनंद दिघेंकडे दिली होती. प्रकाश परांजपे हे शिवसेनेकडून महापौरपदासाठी उमेदवार होते. मात्र महापौरपदासाठी निवडणूक झाली आणि अवघ्या एका मताने सेनेचं महापौरपद हुकलं. उपमहापौरपदासाठी देखील शिवसेनेला आपला उमेदवार विजयी करता आला नाही. सेनेच्या २ नगरसेवकांनी आपलं मत विरोधात टाकलं होतं... त्यामुळे ‘गद्दार कोण’, याची चर्चा ठाण्यात सुरू होती. ठाण्यातील वातावरण तणावाचं असतानाच या निवडणुकीच्या महिन्याभरातच भर दिवसा शिवसेनेचे ‘गद्दार’ नगरसेवक श्रीधर खोपकर यांची हत्या झाली. या हत्येने ठाण्यातच नव्हे, महाराष्ट्रभर खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी आनंद दिघे यांच्यासह ५२ शिवसैनिकांना अटक केली. आनंद दिघेंच्या अटकेच्या निषेधार्थ ‘ठाणे बंद’ करण्यात आला. या बंदला अभूतपूर्वप्रतिसाद मिळाला.या प्रकरणाने संपूर्ण शिवसेनेत एक कडक संदेश गेला. ‘पक्षाशी गद्दारी की एक ही सजा, सर तन से जुदा!’ मग तो मराठी, असो की हिंदू!. आमच्या दृष्टीने गद्दार म्हणजे ‘काफीर’च. आणि त्याची एकच शिक्षा. सर तन से जुदा. शिवसैनिकांचा हा स्वाभिमानी बाणा त्यावेळी मला खूप भावला होता. १९८९ साली झालेल्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीत साहेबांनी दूरदृष्टीने भाजपशी केलेल्या युतीचा निर्णय सेनेसाठी किती फायदेशीर होता याचा अनुभव आला. आपला पहिला हक्काचा खासदार मिळाला. उत्तर मध्य मुंबईतून सेनेचे विद्याधर गोखले सेनेच्या ‘धनुष्यबाणावर’ विजयी झाले. सेनेच्या हिंदुत्वाचा हुंकार देशाच्या संसदेत गरजला. त्यावेळी अवघ्या महाराष्ट्रातला शिवसैनिक मनोमन आनंदला होता. मागोमाग १९९० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युतीला पहिल्यांदा अभूतपूर्व यश लाभलं. शिवसेनेने पक्ष म्हणून आपल्या धनुष्यबाण चिन्हावर पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत १८३ जागा लढवून ५२ जागा जिंकल्या आणि आमच्यामुळे भाजपला १०४ जागा लढवून ४२ जागा मिळाल्या. अर्थात् आता युतीत आम्ही ‘मोठे भाऊ’ झालो होतो. (तुम्ही १८३ जागा लढवून ५२ जागा जिंकलात आणि आम्हाला १०४ दिल्यात. त्यात आम्ही ४२ जिंकल्या. टक्केवारी काढून बघ. असली फालतू बकवास करणाऱ्या आगाऊ भाजपवाल्यांना राजकारणात टक्केवारी चालत नाही फक्त जिंकलेल्या जागा बोलतात, हे कोण सांगणार?) शिवसेनेचे मनोहर जोशी विरोधी पक्षनेते झाले. भाजपवाल्यांसमोर आम्ही छाती पुढे काढून चालू लागलो. या ५२ आमदारांबरोबरच शिवसेनेचे वाघ राज्यसभेत पोहोचण्यासाठी दरवाजे खुले झाले होते. आता शिवसेना ‘सर्वव्यापी’ होऊ लागल्यामुळे आमचा आनंद गगनात मावत नव्हता. पाठोपाठ १९९१ साली परत लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या. सेना-भाजप युती आता आणखी घट्ट झाली. या निवडणुकीत आमच्या हिंमतीवर आमचे १ चे ४ वाघ झाले. आमच्यामुळे भाजपचे ५ उमेदवार निवडून आले. पण, हे नमकहराम भाजपवाले कधीच मान्य करत नाहीत. अल्पमतातील काँग्रेस सरकारचे नरसिंह राव पंतप्रधान झाले.एव्हांना साहेबांच्या हिंदुत्वाचा डंका गोदावरी ओलांडून थेट उत्तर प्रदेशातल्या गंगेच्या खोऱ्यात वाजत होता. १९९१ च्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आमचा पवन पांडे नावाचा वाघ आंबेडकरनगर जिल्ह्यातल्या अकबरपूर विधानसभा मतदारसंघातून सेनेचा भगवा घेऊन उत्तर प्रदेश विधानसभेत पोहोचला. मी तर अत्यानंदाने दोन-चार वेळा हळूच ‘जय हिंद -जय महाराष्ट्र -जय उत्तर प्रदेश’च्या घोषणापण दिल्या. पुढे या परप्रांतीयाने साहेबांशी गद्दारी केली. चक्क मायावतींच्या बहुजन समाज पार्टीत गेला. पण ४ वेळा विधानसभा आणि २ वेळा लोकसभा लढवून त्याला एकदाही विजय मिळवता आला नाही. साहेबांचे आणि शिवसैनिकांचे शाप त्याला बाधले असंच मी मानतो. ‘शेवटी भय्या तो भय्या, आपल्या जातीवर गेला’ म्हणून आम्ही शिवसैनिकांनी त्या पांड्याला खूप शिव्या घातल्या.१८ ऑक्टोबर १९९१ रोजी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. शिवसेनेच्या या मेळाव्यात साहेबांनी २८ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेला विरोध करून भारत-पाकिस्तान सामन्याच्यावेळी ‘मुंबई बंद’ करण्याचा इशारा दिला. त्याकाळी ‘मुंबई बंद’ फक्त दोघेच जण करू शकत असत. एकतर बाळासाहेबांची शिवसेना किंवा पाऊस. पण आमचे कट्टर सैनिक शिशिर शिंदे कुठे ऐकायला? शिशिर शिंदे हे काही कार्यकर्त्यांसह वानखेडे स्टेडियममध्ये घुसले आणि त्यांनी खेळपट्टी उखडून टाकली. ते यावरच थांबले नाहीत. त्यांनी खेळपट्टीवर इंजिन ऑईलही टाकलं. त्यामुळे सामनाच रद्द करावा लागला. त्यानंतर साहेबांनी शिशिर शिंदे यांना महापालिकेत नगरसेवक म्हणून पाठवलं. त्यांचं गाजलेलं आणखी एक आंदोलन म्हणजे १९९० च्या दशकात सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना तेल टंचाईचा सामना करावा लागला होता. शिशिर शिंदे यांनी थेट ‘धारा’ तेलाचे ट्रक अडवून त्याचं सर्वसामान्यांना वाटप केलं होतं.पुढे २००६ साली शिशिर शिंदे शिवसेनेशी गद्दारी करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सामील झाले. साहेबांनी पाठीवर हात ठेवलेले, मोठे केलेले शिवसैनिक पक्षाशी गद्दारी का करतात? कशी करू शकतात? हे मला आजपर्यंत न सुटलेलं कोडं आहे. १२ वर्षांनी आपली चूक कळल्यावर हेच शिशिर शिंदे २०१८ साली पुन्हा शिवसेनेत आले.असो... तोपर्यंत शिवसेनेच्या राजकीय आयुष्यातील एक सोनेरी पान असलेलं १९९२ वर्ष आलं. राम जन्मभूमी आंदोलनाचं. शिवसेना सुरुवातीपासूनच राम जन्मभूमी आंदोलनाची कट्टर समर्थक होती. अनेक शिवसैनिकांनी १९९२ मधील ‘कार सेवे’मध्ये भाग घेतला होता.६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हा बाळासाहेबांनी जाहीरपणे सांगितलं होतं,‘जर शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल, तर मला त्याचा अभिमान आहे.’ या भूमिकेमुळे शिवसेनेला सबंध देशात हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ठोस ओळख मिळाली. विशेषतः विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी घ्यायला तयार नसताना, आमच्या साहेबांनी दाखवलेला बाणेदारपणा हिंदू समाजाला खूप भावला. बाळासाहेब त्यांच्या भाषणात जाहीरपणे उघड उघड, मुस्लीम आतंकवाद, त्यांची जिहादी मानसिकता, त्यांचा देशद्रोह या सगळ्यावर प्रचंड घणाघात करत होते. आम्ही त्यावेळी प्रचंड जल्लोष करत असू. पाठोपाठ आल्या... १९९२/९३ च्या मुंबईतील हिंदू-मुस्लीम दंगली आणि बॉम्बस्फोट.बाबरी मशीद पाडल्याचं निमित्त साधून, मुंबईत हिंदू-मुस्लिमांच्या पूर्वनियोजित दंगली व बॉम्बस्फोट घडवण्यात आले. जोगेश्वरीच्या राधाबाई चाळीत ६, बहुतेक मराठी हिंदू माता, बंधू-भगिनींना मुसलमानांनी जिवंत जाळलं. मग मात्र मराठी हिंदू समाजाचा संयम सुटला. मुंबईत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आणि सुमारे ९०० लोक, मुख्यतः मुस्लीम, मारले गेले. त्यामुळे मुंबईत मोठा धार्मिक तणाव निर्माण झाला होता. मुंबईत देशद्रोही दाऊद इब्राहिमने १२ बॉम्बस्फोट घडवले. २५७ बहुतांशी निरपराध हिंदू नागरिक मारले गेले. हजारो निरपराध हिंदू जखमी आणि कायमचे अपंग झाले. शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता उद्ध्वस्त झाली. पण मुंबईकरांना एकच आधार होता. साहेब आहेत. आणि साहेबांची शिवसेना आहे.त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी तर खोटेपणाची हद्द केली होती. ‘मुस्लीम वस्तीत १३ वा बॉम्बस्फोट झाला आहे’, असं खोटंच जनतेला सांगितलं होतं. बाळासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या ‘नीच प्रवृत्ती’चा त्यांनी परिचय करून दिला होता. या दंगलींच्या चौकशीसाठी नेमलेल्या न्या. श्रीकृष्ण आयोगाने ‘८ जानेवारी १९९३ पासून शिवसेनेने आणि शिवसैनिकांनी मुस्लिमांवर आणि त्यांच्या मालमत्तांवर सुनियोजित हल्ले केले. शिवसेनेच्या शाखांनी स्थानिक कमांड सेंटर म्हणून काम केले आणि हल्लेखोरांनी मतदारांच्या याद्या घेऊन मुस्लिमांच्या मालमत्ता लक्ष्य केल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘अनुभवी सेनापतीप्रमाणे’ आपल्या निष्ठावान शिवसैनिकांना मुस्लिमांवर हल्ला करून ‘बदला’ घेण्याचे आदेश दिले,’ असे निरीक्षण नोंदवले होते.ही साहेबांच्या आणि शिवसैनिकांच्या कर्तबगारीची पोचपावती होती. साहेबांचा आदेश म्हणजे शिवसैनिकासाठी अंतिम शब्द असल्यामुळे त्यांनी दाखवलेल्या क्षात्रतेजाने मुंबईचा हिंदू वाचला, अशीच माझी व असंख्य मुंबईकर मराठी आणि परप्रांतीय हिंदूंची भावना झाली होती. विशेषतः हिंदू अल्पसंख्याक असलेल्या (म्हणजेच मुस्लीम बहुसंख्य असलेल्या) वस्त्यांमध्ये शिवसेना ही तिथल्या हिंदू माणसाला, समाजाला आधार ठरली. खरं म्हणजे, श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालानुसार साहेबांवर आणि शिवसेनेवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी होती. पण कोणत्याच काँग्रेसच्या सरकारची ती हिम्मतझाली नाही. हा होता आमच्या साहेबांचा रुबाब आणि दरारा!आता शिवसेना ही मुंबईकरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या समाजजीवनाचा अविभाज्य घटक बनली होती. मुंबईतील परप्रांतीय हिंदूंसाठी; विशेषतः हिंदी भाषिकांसाठी ‘दोपहर का सामना’ १९९३ मध्ये सुरू झाला. त्यामुळे, शिवसेनेला व्यापक जनसमर्थन मिळवता आलं. संजय निरूपम या परप्रांतीय हिंदू शिवसैनिकाचा चेहरा शिवसेनेला मिळाला. पुढे साहेबांनी या संजय निरूपमला राज्यसभेवरदेखील पाठवलं. पण, बहुधा २००५ साली परत राज्यसभेची खासदारकी न मिळाल्यामुळे हा हरामखोर बिहारी काँग्रेसमध्ये गेला. प्रबोधनकार ठाकरे यांचं एक पुस्तक दाखवून, त्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे; ठाकरे कुटुंब हे मूळ बिहारचं, ते बिहारहून महाराष्ट्रात आल्याचा दाखला देत फिरत होता. त्यावेळी भक्तांच्या टोमण्यांना तर ऊत आला होता. तो हरामखोर संजय निरुपम त्यांच्यासाठी हिरो झाला होता. आज ठाकरे कुटुंबाला ‘बिहारी’ म्हणणं याच्यासारखं दुसरं पाप नाही, अशीच आमच्या शिवसैनिकांची भावना होती.याच दरम्यान नरसिंह राव यांच्या अल्पमतात असलेल्या सरकारला ३ अविश्वासाच्या ठरावांना सामोरं जावं लागलं. त्यापैकी जुलै १९९३ मध्ये भाजपने आणलेल्या अविश्वासाच्या ठरावाच्यावेळी आमचे खासदार मोहन रावले यांनी पोट बिघडल्याचं कारण सांगितलं आणि मतदान चुकवल्याने सरकार अल्प मताने बचावलं. काही बदमाश विरोधकांनी मोहन रावले यांच्या घरासमोर लाऊड स्पीकर लावून, ‘पाणीच पाणी चहूकडे, गं बाई गेला मोहन कुणीकडे?’ हे गाणं लावलम होतं. मला मोहन रावले यांचा मनातून राग आला होता. पण, साहेबांना त्यांचा राग आला नाही म्हणून माझाही राग कुठच्या कुठे पळून गेला!१९९५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने शिवसेना-भाजप युतीच्या पारड्यात भरभरून मतं टाकली. सेना-भाजप युतीला १३८ जागा मिळाल्या. १६९ जागा लढवून आमचे ७३ आमदार निवडून आले, तर भाजपने ११६ जागा लढवल्या आणि त्यांचे ६५ आमदार निवडून आले. (यावेळी देखील मोठा भाऊ आम्हीच ठरलो. काही दळभद्री भाजपवाल्यांना हे अजूनही पटत नाही. आपलं अपयश झाकण्यासाठी ते स्ट्राईक रेट काढायला सांगतात) बहुमताला कमी पडणाऱ्या जागा अपक्षांच्या मदतीने आम्ही पूर्ण केल्या आणि ज्याचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री या न्यायाने शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी सरांनी शपथ घेतली. त्यांचा शपथविधी सोहळा १४ मार्च १९९५ रोजी जिथे दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो, त्या शिवाजी पार्क, दादर येथे आयोजित करण्यात आला होता. सर्वसामान्य शिवसैनिकालाही या सोहळ्यात सहभागी होता यावं, म्हणून शपथविधी राजभवनावर न करता शिवाजी पार्कात करण्यात आला. लाखो शिवसैनिकांनी या सोहळ्याला हजेरी लावली. तो सोहळा डोळे भरून बघितला. सोन्याला सुगंध यावा तसा हा सोहळा होता. थोडे दिवस माझ्यासह प्रत्येक शिवसैनिकाला आपणच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालो आहोत, असा भास होत होता. असे होते आमचे साहेब. शिवसैनिकावर जीवापाड प्रेम करणारे. त्यांची काळजी घेणारे. पण एवढे अफाट यश मिळूनही आपण स्वतः निवडणूक लढवावी, सत्तेत सहभागी व्हावं असं साहेबांना कधीच वाटलं नाही. ते नेहमी ‘किंग मेकर’च्या भूमिकेत राहिले. त्यामुळे त्यांच्याविषयीचा मला वाटणारा आदर शतगुणित झाला होता. माधुकरी मागणारा एक मुलगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवण्याची किमया फक्त आमचे बाळासाहेबच करू शकत होते. त्या मंत्रिमंडळात गृह आणि अर्थ यासारखी दोन महत्त्वाची खाती, आम्ही मोठा भाऊ असूनही धाकट्या भावाच्या, अर्थात भाजपच्या हातात दिल्याचं दुःख मला अजूनही होतं. विक्रम आणि वेताळातल्या गोष्टीतल्या वेताळासारखा हा भाजप सेनेच्या मानगुटीवर कायमचा बसला आहे, याचा मला संताप येत असे (मला तर काही वेळा प्रमोद महाजनांनी साहेबांवर वशीकरणाचा जादूटोणा करून त्यांना भारून टाकले होते का अशी शंका येते.) पण त्याचवेळी साहेबांच्या दिलदार वृत्तीचा दाखला देखील मिळतो. युती टिकवण्यासाठी आमच्या साहेबांनी केलेला हा त्याग होता. कद्रु वृत्तीच्या भाजपने कधी त्याची कदर केल्याचं मला आठवत नाही. तेव्हा महाराष्ट्रात भाजपला कोण विचारत होतं? शिवसेनेमुळे आणि साहेबांमुळे महाराष्ट्रात भाजप वाढला हे समीकरण आम्हां शिवसैनिकांच्या डोक्यात तेव्हापासून घट्ट बसलं ते कायमचंच. याच विधानसभा निवडणुकीत आमच्या ढाण्या वाघ बाळा नांदगावकरांनी ‘लखोबा लोखंडे’ला मुंबईच्या माझगाव मतदारसंघात आसमान दाखवलं. पुढे हेच बाळा नांदगावकर २००६ साली साहेबांशी आणि पक्षाशी गद्दारी करून साहेबांच्या डोळ्यांदेखत राज ठाकरे यांचा हात धरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेले. तेव्हा मी बाळा नांदगावकरला मनातल्या मनात अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली होती.पुढे १९९७ साली झालेल्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीत आमचे ६ खासदार निवडून आले, तर युतीधर्म पाळून आम्ही मित्र पक्षाचे म्हणजे भाजपचे चार खासदार निवडून आणले. कारण, मोठा भाऊ आम्ही होतो आणि युतीधर्म पाळणं ही आमची नैतिक जबाबदारी होती. ती आम्ही पाळलीदेखील. अवघ्या १३ दिवसांच्या पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या त्या अल्पकालीन सरकारमध्येदेखील भाजप सोडून अन्य पक्षाचा एकच मंत्री होता आणि तो होता शिवसेनेचा.. इंडस्ट्री मिनिस्टर सुरेश प्रभू आमच्या साहेबांचा रुबाब आणि दरारा त्यावरून सगळ्या देशाच्या लक्षात आला. मात्र हे सरकार अल्पकालीन ठरल्यामुळे एक शिवसैनिक केंद्रात कॅबिनेट मिनिस्टर झाल्याचा आमचा आनंद देखील १३ दिवसांसाठीच टिकला.१९९८ साली भाजपच्या पुढाकाराने अखिल भारतीय पातळीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) स्थापना झाली. रालोआमध्ये शिवसेना हा भाजपचा अत्यंत जवळचा आणि महत्त्वाचा सहकारी होता. कारण, आमची युती वैचारिक होती. व्यापक हिंदुत्वासाठी होती. काँग्रेसमुक्त महाराष्ट्रासाठी होती. सत्ता आहे किंवा नाही याचा विचार साहेबांनी कधी केला नाही. भाजपची कायम पाठराखण केली. ‘केंद्रात तुम्ही आणि राज्यात आम्ही’ हे अलिखित समीकरण भाजप आणि सेनेत रूढ झालं. म्हणजे केंद्रात मोठा भाऊ, तुम्ही आणि राज्यात मोठा भाऊ आम्ही... असा एका अर्थी परस्परांच्या संमतीने व स्वखुशीने केलेला तो ‘नियतीशी करार’ होता.१९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमचे ६ तर भाजपचे ४ उमेदवार आम्ही ‘मोठा भाऊ’ या नात्याने निवडून आणले. पण कोत्या मनाचे भाजपवाले हे कधीच मान्य करत नाहीत. असो, पण आमचे खासदार सुरेश प्रभू हे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले. पुढे २०१४ साली याच सुरेश प्रभूंनी शिवसेनेशी गद्दारी करून भाजपची वाट धरली आणि केंद्रात मंत्रीपद मिळवलं.शिवसैनिक सत्तेसाठी आमच्याशी गद्दारी करू शकतो ही कल्पनाच मला सहन होत नाही. हरामखोर लेकाचे.याच १९९८च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची गिरगावात एक सभा झाली. या सभेला बाळासाहेब, लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, उद्धव ठाकरे उपस्थित होते. याच सभेत बाळासाहेब भाषणाला उभे राहिल्यावर शिवसैनिकांनी फटाके फोडायला सुरुवात केली. खूप वेळ गेल्यानंतरही फटाक्यांचा आवाज काही शांत होईना. शेवटी कंटाळून बाळासाहेब दोन्ही पायांवर खाली उकीडवे स्टेजवर बसून राहिले. बाळासाहेबांचा हा मिश्कीलपणा पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. असे होते आमचे साहेब. मिश्कील. समयसूचक आणि हजरजबाबी!महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळामुळे आम्हाला राज्यसभेत खासदार निवडून देण्याची सुसंधी लाभली होती. जुलै १९९८ मध्ये शिवसेनेकडून प्रीतीश नंदी राज्यसभेवर निवडून गेले. प्रीतीश नंदी यांचा टाइम्स ऑफ इंडिया आणि इलस्ट्रेटेड विकली या इंग्रजी वृत्तपत्र समूहांशी असलेल्या संबंधांमुळे आणि त्यांच्या इंग्रजीवरील प्रभुत्वामुळे. रेम्या डोक्याचे भाजपवाले त्यांना ‘ब्रिटिश नंदी’ म्हणून ‘ते मराठी बोलतात का?’ असं खवचटपणे मला विचारायचे. त्यावर ‘हे तुमच्या बुद्धी बाहेरचे आहे’ असे सांगून मी त्यांना उडवून लावायचो. पण पुढे ‘ऑटो रायडर्स’चे मुकेश पटेल, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील राम जेठमलानी, व्हिडीओकॉनचे राजकुमार धूत शिवसेनेकडून राज्यसभेवर निवडून जाऊ लागले आणि भक्तगणांच्या टोमण्यांना ऊत आला. राम जेठमलानी यांनी कृष्णा देसाई खून खटल्यात शिवसैनिकांची बाजू मांडली होती आणि त्यांना फाशी होऊ दिली नव्हती. त्या उपकाराचे हे एका अर्थी ऋणमोचन होते. बाकीची नावं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी आयुष्यभर नररत्ने गोळा केली, तसेच आमचे साहेब करताहेत असे मार्मिक आणि खोचदार उत्तर मी देत असे. (तरीपण भक्तांचे कायम एकच तुणतुणं चालू असायचे. ‘मातोश्री’वर पेट्या पोचल्या असणार! अरे बिनडोकांनो, काहीतरी नवीन आरोप करा !)१९९९ च्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीत आमचे १५ वाघ तर आमच्यामुळे भाजपचे १३ खासदार निवडून आले. केंद्रात शिवसेनेचे कॅबिनेट आणि राज्यमंत्री आपापली खाती रुबाबात सांभाळू लागले. केंद्रातील मंत्रीपदामुळे शिवसेनेचा बोलबाला सबंध देशात होऊ लागला. सुरेश प्रभू अनंत गीतेंपासून आनंदराव अडसुळांपर्यंत सगळे मंत्री शिवसेनेचा डंका चौफेर वाजवू लागले. आमच्या साहेबांच्या शब्दांवर वाजपेयी सरकार डोलत होते. मात्र, त्यानंतर १९९९ सालीच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये दुर्दैवाने युतीची सत्ता गेली. १६१ जागा लढवून आमच्या ६९ वाघांनी डरकाळी फोडली तर कमळाबाईच्या ११७ पैकी ५६ उमेदवारांना आम्ही विजय मिळवून दिला. मोठ्या भावाचे कर्तव्य आम्ही चोखपणे बजावले. पण, धाकट्या भावाने कधी त्याची कदर केली नाही ही आमची कायमची सल आहे. काहीही असो... पण युतीची सत्ता गेली एव्हढं खरं. काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं. या निवडणुकीत साहेबांचा करिष्मा कमी पडला, की मराठी माणसाने आमच्याशी गद्दारी केली हेच मला कळेना. साहेबांचा करिष्मा कमी होणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मराठी मतदारच नमकहराम निघाला, अशी माझी खात्री पटली.पण, याच दरम्यान शिवसेनेला एक सर्वोच्च सन्मान आणि ओळख मिळाली. लोकसभेचे सभापती बालयोगी यांचं एका हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झालं आणि शिवसेनेचे मनोहर जोशीसर लोकसभेचे सभापती झाले. शिवसेनेचा डंका त्रिखंडात वाजू लागला. याच काळात शिवसेनेमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली. साहेबांचे थोरले सुपुत्र उद्धवजी ठाकरे यांनी आपली राजकीय कारकीर्द २००२ मध्ये बृहन् मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे प्रचार प्रभारी म्हणून सुरू केली. या निवडणुकीत शिवसेनेचे ९७ नगरसेवक त्यांनी निवडून आणले.(आधीच्या सभागृहात तुमचे १०३ नगरसेवक होते. उद्धव ठाकरेंनी प्रचार केला आणि त्यातले ६ कमी झाले या अधूमेंदूच्या भक्ताडांच्या तर्काला ‘उद्धवसाहेबांचा हा पहिलाच प्रयत्न असूनही त्यांनी देदीप्यमान यश मिळवले’ हे बिनतोड उत्तर मी देत असे.)२००२ च्या गोध्रा कांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री पदावरून काढण्याचा निर्णय जवळपास घेतला होता. पण, आमच्या साहेबांनी वाजपेयी- अडवाणींना ‘मोदी गया, तो समझो गुजरात गया’ म्हणून सज्जड दम भरला आणि मोदीजींची खुर्ची वाचली! आज मोदीजी बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे हे उपकार विसरले आहेत. इतिहास त्यांना माफ करणार नाही.जानेवारी २००३ मध्ये उद्धव साहेबांची शिवसेनेच्या महाबळेश्वरच्या अधिवेशनात बाळासाहेबांच्या अनुमतीने आणि राजसाहेब ठाकरे यांच्या अनुमोदनाने शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली. वाघाच्या पोटी वाघच जन्माला येणार, या न्यायाने उद्धव साहेब ठाकरे ही ठाकरे घराण्याची पुढची पिढी आता आमचे नेतृत्व करायला सज्ज होत होती. शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे नवे वारे वाहत होते. पण २००४ सालापासून शिवसेनेच्या चढत्या यशाला कोणाची तरी दृष्ट लागली.सत्ता म्हणून आणि पक्ष म्हणून आमची साडेसाती सुरू झाली. तो कोण अपशकुनी होता, तेच आम्हाला कळेना.२००४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अल्पमतात आली. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार गेले आणि सत्ताही गेली. काँग्रेसचे डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. मात्र जन्माने विदेशी महिला असलेल्या सोनिया गांधी यांना पंतप्रधान होण्यासाठी साहेबांनी केलेला कडाडून विरोध आम्हा शिवसैनिकांना आणि देशातील जनतेलासुद्धा चांगलाच भावला.या निवडणुकीत आम्ही भाजपचे १३ खासदार निवडून आणले. पण, आमचे मात्र १२च वाघ जिंकले. तरीही मोठा भाऊ म्हणून आमचा रुबाब कायम होता. आमचा एक खासदार कमी निवडून आला म्हणून काय झाले? आम्ही त्यांचे १३ खासदार निवडून आणले होते. राज्यात ‘मोठा भाऊ’ आम्हीच होतो. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पेक्षा आमची युती काकणभर सरसच ठरली होती. दिल्लीतली सत्ता गेली तरी महाराष्ट्रातील सत्ता आम्ही खेचून आणू असा आम्हाला विश्वास होता. पण दैवाचे फासे उलट पडले. त्याच वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १६३ जागा लढवून आमचे ६२, तर १११ जागा लढवून भाजपचे ५४ आमदार आम्ही निवडून आणले. मात्र, बहुमत काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारला मिळाले आणि आमची घोर निराशा झाली. आमच्यासाठी दळभद्री कमळाबाई असून नसल्यासारखी होती.(क्रमश:)

फीड फीडबर्नर 9 Jan 2026 12:10 am

पश्चिमघाटाचा संरक्षक

मिलिंद बेंडाळेपरदेशातील उच्च पदाच्या नोकऱ्या सोडून आपल्या ज्ञानाचा वापर देशासाठी करणाऱ्यांमध्ये माधव गाडगीळ यांचे नाव महत्त्वाचे. पश्चिम घाट संरक्षण-संवर्धनासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या पर्यावरणशास्त्रज्ञ माधवरावांनी अखेरचा निरोप घेतला. पश्चिम घाट संवर्धन आणि संरक्षण हीच त्यांना खरी आदरांजली.पश्चिम घाटांच्या संवर्धनासाठी दूरदर्शी दृष्टिकोनासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ पर्यावरणवादी माधव गाडगीळ यांचे पुण्यात निधन झाले. दीर्घकालीन आजाराशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. भारतात तळागाळातील पर्यावरण चळवळीला आकार देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. काही वर्षांपूर्वी त्यांनी पश्चिम घाटातील पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांमुळे गंभीर नैसर्गिक आपत्ती येतील, असा इशारा दिला होता. केरळमधील वायनाडसारख्या दुर्घटनांचा इशारा त्यांनी अगोदरच दिला होता. पश्चिम घाटात विकास, खाणी करताना आपल्याला काय किंमत मोजावी लागेल याची जाणीव त्यांनी फार अगोदरच करून दिली होती. गोव्यातील खाणी आणि पर्यावरण हा मुद्दा जेव्हा पुढे आला, तेव्हा त्यांनी खाणीतून संपत्ती मिळेल; परंतु गोव्याचे वायनाड व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा दिला होता. सरकार कुणाचे आहे आणि सत्तेत कोण आहे, याचा त्यांना कधीच फरक पडला नाही. त्यांनी कायम सामान्य माणूस आणि पर्यावरण रक्षणाची पताका उंचावली; परंतु माधवरावांना संयुक्त राष्ट्र संघाचा पर्यावरण क्षेत्रातला सन्मान जेव्हा मिळाला, तेव्हा त्यांच्याविषयी भारतातील अनेकांना समजले.२०११ मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या प्रशंसित गाडगीळ अहवालात उद्योग आणि हवामान संकटाच्या वाढत्या दबावादरम्यान पश्चिम घाट सारख्या पर्यावरणीयदृष्ट्या नाजूक प्रदेशांचे संरक्षण करण्याची शिफारस करण्यात आली होती. गाडगीळ समितीच्या अहवालातील बहुतेक शिफारशी अद्याप अमलात आणल्या गेलेल्या नाहीत; परंतु त्यानंतरच्या आपत्तींनी त्यांची दूरदृष्टी सिद्ध केली. गाडगीळ यांना २०२४ मध्ये संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी)कडून ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०२१ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत गाडगीळ म्हणाले होते, की पश्चिम घाट आणि हिमालयात वारंवार येणाऱ्या आपत्ती अभूतपूर्व नाहीत. जंगलतोड आणि पर्वत उतारांशी छेडछाड केल्यामुळे अशा घटना वाढल्या आहेत. पश्चिम घाटांपेक्षा हिमालय अधिक नाजूक असल्याचे सांगून त्यांनी भूस्खलन आणि धुपाच्या धोक्यांकडेही लक्ष वेधले. त्यांनी सात पुस्तके आणि किमान २२५ वैज्ञानिक पेपर्स लिहिले. एक संवेदनशील शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी समाजाची दिशा बदलण्यात योगदान दिले, त्याचे त्यांना समाधान होते. २०११ मध्ये, पश्चिम घाट पर्यावरणतज्ज्ञ पॅनेलचे अध्यक्ष म्हणून, गाडगीळ यांनी १ लाख २९ हजार ३७ चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्र पर्यावरण-संवेदनशील म्हणून घोषित करण्याची शिफारस केली. या शिफारशीला अनेक राज्यांनी खूप कठोर मानून विरोध केला. त्यानंतर कस्तुरीरंगन समितीने हे क्षेत्र ५० टक्क्यांपर्यंत कमी केले आणि कालांतराने त्यांच्या शिफारसी सौम्य केल्या गेल्या.पश्चिम घाटाच्या पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रांबाबत अंतिम अधिसूचना अद्याप जारी केलेली नाही. केरळमधील वायनाडसारखे क्षेत्र, जिथे २०२४ मध्ये भूस्खलनात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता, ते गाडगीळ पॅनेलच्या शिफारशींमध्ये समाविष्ट करण्यात आले. गाडगीळ यांनी केवळ पश्चिम घाट आणि सायलेंट व्हॅलीच्या संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावली नाही, तर भारतीय पर्यावरणीय विज्ञानाला एक नवीन दिशा दिली. गाडगीळ यांना लहानपणापासूनच निसर्ग आणि पक्ष्यांमध्ये खूप रस होता. पक्षीनिरीक्षक असलेले त्यांच्या वडिलांनी पर्यावरणशास्त्राबद्दल गाडगीळ यांच्या कुतूहलाला आणखी चालना दिली. विज्ञान हे केवळ शैक्षणिक प्रयोगशाळांसाठी नाही, तर समाजासाठी असले पाहिजे असा त्यांचा विश्वास होता. गाडगीळ यांनी भारतीय विज्ञान संस्थेत पर्यावरण विज्ञान केंद्राची स्थापना केली आणि आदिवासी, शेतकरी आणि मच्छीमारांच्या सहकार्याने काम केले. अनियंत्रित खाणकाम आणि जंगलतोडीमुळे भूस्खलन, पूर आणि दीर्घकालीन नुकसान होईल, असा इशारा गाडगीळ यांनी दिला होता. काही वर्षांनंतर केरळसह देशाच्या अनेक भागांत भूस्खलन आणि पूर आल्यावर त्यांचे भाकीत खरे ठरले.माधव गाडगीळ यांचे जीवन सिद्ध करते, की वैज्ञानिक विचार आणि धोरण बदलासाठी संयम आणि लोकसहभाग आवश्यक आहे. गाडगीळ केवळ एक शास्त्रज्ञ नव्हते, ते एक लेखक, शिक्षक, मार्गदर्शक आणि समाजसुधारकदेखील होते. आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक ज्ञान दोन्ही एकत्रित केले. गाडगीळ यांचे जीवन विज्ञान, शिक्षण आणि समाजसेवेसाठी समर्पित होते. त्यांनी त्यांच्या सहा दशकांच्या वैज्ञानिक कारकिर्दीत पर्यावरण संवर्धन क्षेत्रात असाधारण योगदान दिले. लहानपणी त्यांनी वडिलांसोबत जलविद्युत प्रकल्प आणि जंगलतोड यांसारख्या समस्या जवळून पाहिल्या. औद्योगिक विकासाची किंमत पर्यावरणीय विनाश आणि स्थानिक लोकांच्या दुःखाच्या स्वरूपात मोजावी का? असा प्रश्न ते कायम करीत. त्यामुळे त्यांना अनेकांनी विकासविरोधक ठरवले; आपल्या सिद्धांताला वैज्ञानिक आधार आहे आणि सामान्य लोकांचे कल्याण हाच आपल्या विचाराचा मूळ पाया आहे, यावर ते ठाम होते.भारताच्या पहिल्या ‘बायोस्फीअर रिझर्व्ह’च्या स्थापनेत गाडगीळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वनवासी, मच्छीमार आणि शेतकऱ्यांसोबत काम करून त्यांनी पर्यावरणीय संवर्धनासाठी एक मॉडेल विकसित केले. पुण्यात जन्मलेल्या गाडगीळ यांचे शिक्षण मुंबई आणि हार्वर्ड येथे झाले. तिथे त्यांनी पर्यावरणशास्त्रात पीएच.डी. मिळवली आणि नंतर ते अध्यापन करू लागले. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला, त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सुलोचना (ज्यांनी हार्वर्डमधून गणितात पीएच.डी. देखील मिळवली) यांनी अमेरिकेतील शास्त्रज्ञांना मिळणारे विशेषाधिकार आणि प्रतिष्ठा सोडून भारतात काम करण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा निर्णय घेतला. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे संचालक सतीश धवन यांनी त्यांची बुद्धिमत्ता आणि आवड ओळखली आणि त्यांना संस्थेच्या बंगळूरु कॅम्पसमध्ये दोन्ही पदे देऊ केली. तिथे सुलोचना यांनी वातावरणीय विज्ञान केंद्र स्थापन करण्यास मदत केली आणि पावसाळ्यावर काही उल्लेखनीय काम केले. माधवरावांनी पर्यावरण विज्ञान केंद्राची स्थापना केली. गणितीय पर्यावरण शास्त्रापासून पर्यावरणीय क्षेत्रकार्यात संक्रमण केले होते. त्यांनी बांदीपूर राष्ट्रीय उद्यानात हत्तींच्या वर्तनाचा अभ्यास केला. गाडगीळ समितीच्या अहवालात पश्चिम घाटातील संवेदनशील जंगले आणि डोंगर उतारांना खाणकाम आणि इतर विध्वंसक कारवायांपासून संरक्षण करण्याची शिफारस करण्यात आली होती आणि संबंधित बाबींवरील निर्णयांमध्ये स्थानिक लोक आणि पंचायतींनी सहभागी होण्याची गरज यावर भर देण्यात आला होता. कंत्राटदार, राजकारणी आणि नोकरशहा या कुप्रसिद्ध त्रिकुटांनी गाडगीळ अहवालाला जोरदार विरोध केला होता; जर तो अहवाल लागू केला असता, तर केरळ, कर्नाटक आणि गोवा यांसारखी राज्ये पुराच्या विध्वंसातून वाचली असती. गाडगीळ यांच्याकडे खोल सामाजिक जाणीव होती. त्यांचे वडील, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळ यांना मानवी हक्कांमध्ये खूप रस होता. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होते. माधवरावांच्या पत्नी, प्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ सुलोचना गाडगीळ यांचे पाच महिन्यांपूर्वीच निधन झाले. माधवरावांच्या निधनाने देशाने केवळ एक महान शास्त्रज्ञच नाही, तर पर्यावरण आणि समाज यांच्यात पूल बांधणारा एक शक्तिशाली आणि संवेदनशील आवाजही गमावला.

फीड फीडबर्नर 9 Jan 2026 12:10 am

Highcourt Navi Mumbai Prabhag 17 Election : नवी मुंबईतील प्रभाग १७ (अ) ची निवडणुकीला हायकोर्टाकडून हंगामी स्थगिती; हायकोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा धुरळा उडाला असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार असतानाच, नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ (अ) मधील निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे या प्रभागात नियोजित तारखेला मतदान होणार की नाही, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडून फेटाळण्यात आला होता. या निर्णयाविरोधात भोजने यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांच्या याचिकेची दखल घेत त्यांना मोठा दिलासा दिला असून, संबंधित प्रभागातील निवडणूक प्रक्रियेला तूर्तास स्थगिती दिली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी होणार असून, त्यानंतरच येथील मतदानाचे भवितव्य स्पष्ट होईल. दुसरीकडे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात सुमारे ७० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले असून, काही नेत्यांनी या प्रक्रियेविरोधात न्यायालयातही दाद मागितली आहे. प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असतानाच न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.https://prahaar.in/2026/01/08/donald-trump-russia-oil-tanker-seizure-world-war-3-risk/प्रभाग १७ (अ) ची निवडणूक तूर्तास स्थगितप्रभाग क्रमांक १७ (अ) मधील भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात महत्त्वपूर्ण हस्तक्षेप केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांचा हा निर्णय 'प्रथमदर्शनी बेकायदेशीर आणि मनमानी' असल्याचे ताशेरे ओढत, न्यायालयाने या प्रभागातील निवडणूक प्रक्रियेला पुढील आदेश येईपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे. निलेश भोजने यांच्या मालमत्तेवर अनधिकृत बांधकाम असल्याचा ठपका ठेवत, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन कायद्याच्या कलम १०(१ ड) नुसार त्यांचा अर्ज बाद करण्यात आला होता. शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख किशोर पाटकरांनी याविरोधात तक्रार केली होती. मात्र, हे कलम निवडून आलेल्या नगरसेवकांना लागू होते की उमेदवारांना, या कायदेशीर मुद्द्यावर भोजनेंनी न्यायालयात दाव केला. उच्च न्यायालयाने निलेश भोजने यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत, निवडणूक आयोगाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. निवडणुकीवर परिणाम या स्थगितीमुळे १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेत प्रभाग १७ (अ) साठी तूर्तास ब्रेक लागला आहे. न्यायालयाने निवडणूक आयोग, महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना या प्रभागातील निवडणूक प्रक्रिया पुढे न नेण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार असून, संपूर्ण नवी मुंबईचे लक्ष आता न्यायालयाच्या अंतिम निकालाकडे लागले आहे.दरम्यान, नवी मुंबईत भाजपच्या उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज बाद झाल्याने प्रभाग १७ अ मधील भाजपची उमेदवारी संकटात सापडली होती. मात्र, पक्षाने वेळ न दवडता रणनीती बदलत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दर्शन भोईर यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपने या प्रभागात आपला पॅनल उभा केला असून, थेट शिवसेना (शिंदे गट) यांच्या उमेदवारांविरोधात थेट लढत आहे. दर्शन भोईर यांनी भाजपातील पक्षप्रवेशानंतर भाजपच्या विचारधारेनुसार काम करून मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, या घडामोडीमुळे प्रभाग १७ अ मधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. मात्र, आता भोजने यांना न्यायालायने दिलासा दिल्याने आता पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

फीड फीडबर्नर 8 Jan 2026 11:10 pm

Nitesh Rane : वसई-विरारमध्ये नितेश राणेंची तोफ! वसई-विरारचा विकास फक्त भाजपच करू शकते मंत्री नितेश राणेंचं आश्वासन

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारमध्ये आज नालासोपारा (पूर्व) येथील अचोळे संकेश्वर नगर परिसरात भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली आणि सभा पार पडली. यावेळी प्रभाग क्रमांक १५ आणि २१ मधील उमेदवारांसाठी त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला.वसई-विरार महानगरपालिकेतील भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज अचोळे संकेश्वर नगर, नालासोपारा (पूर्व) येथील प्रभाग क्रमांक १५ आणि २१ मध्ये भव्य प्रचार सभा पार पडली. यावेळी परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त… pic.twitter.com/5DliiFCKzv— Nitesh Rane (@NiteshNRane) January 8, 2026रॅलीला जनसागराचा प्रतिसादhttps://prahaar.in/2026/01/08/navi-mumbai-election-high-court-grants-interim-stay-to-elections-in-ward-17-navi-mumbai-relief-to-bjp-candidate-nilesh-bhojane/नितेश राणे यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीला स्थानिक नागरिकांचा आणि भाजप कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. येणाऱ्या १५ जानेवारीला केवळ मतदान करायचे नाही, तर वसई-विरारच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला विजयी करायचे आहे, असे आवाहन राणे यांनी यावेळी केले. नालासोपाऱ्यातील रस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवरून त्यांनी स्थानिक विरोधकांवर निशाणा साधला.विकासाचे व्हिजन आणि हिंदुत्वाचा हुंकारसभेला संबोधित करताना नितेश राणे म्हणाले की, वसई-विरारला गुंडगिरी आणि भ्रष्टाचारापासून मुक्त करून खऱ्या अर्थाने विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. प्रभाग १५ आणि २१ मधील आमचे उमेदवार हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहेत. यावेळी त्यांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा देत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही उपस्थितांमध्ये उत्साह भरला. यावेळी व्यासपीठावर स्थानिक भाजप पदाधिकारी, महायुतीचे प्रमुख कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नितेश राणे यांच्या या झंझावती दौऱ्यामुळे नालासोपाऱ्यातील निवडणुकीत भाजपचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसत आहे.

फीड फीडबर्नर 8 Jan 2026 11:10 pm

PMC Election: औंध बोपोडी परिसरात भक्ती अजित गायकवाड यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

PMC Election 2026: पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ मधील औंध बोपोडी प्रभागातील उमेदवार भक्ती अजित गायकवाड यांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या प्रचार फेरीदरम्यान त्यांनी औंध बोपोडी मधील विविध भागांत घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. या प्रचार फेरीत स्थानिक […] The post PMC Election: औंध बोपोडी परिसरात भक्ती अजित गायकवाड यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 10:54 pm

D. K. Shivakumar : मुख्यमंत्री पदासाठी डी.के.शिवकुमार यांना करावी लागणार वेटिंग!

बंगळुरू : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्यावर कॉंग्रेसने आगामी आसाम विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे कर्नाटकात पुढील काही महिने तरी मुख्यमंत्री बदल होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातून बढतीची आकांक्षा बाळगणाऱ्या शिवकुमार यांना वेटिंगवर रहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले. कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या कर्नाटकमध्ये काही काळापासून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत. चालू महिन्यात नेतृत्वबदल होईल, असा […] The post D. K. Shivakumar : मुख्यमंत्री पदासाठी डी.के.शिवकुमार यांना करावी लागणार वेटिंग! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 10:52 pm

अमेरिकेने तीन भारतीयांना केली अटक, व्हेनेझुएलाशी काय आहे संबंध? जाणून घ्या

वॉशिंग्टन/नवी दिल्ली: उत्तर अटलांटिक महासागरात अमेरिकन नौदलाने एका मोठ्या कारवाईत रशियन ध्वज असलेला ‘मरिनेरा’ हा तेल टँकर जप्त केला आहे. वेनेझुएलावरील आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे उल्लंघन करून तेलाची अवैध तस्करी केल्याचा गंभीर ठपका या जहाजावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईत जहाजावरील २८ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यात ३ भारतीय नागरिकांचा समावेश असल्याने भारताचे या प्रकरणाकडे लक्ष […] The post अमेरिकेने तीन भारतीयांना केली अटक, व्हेनेझुएलाशी काय आहे संबंध? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 10:44 pm

Rinku Singh Marriage : रिंकू सिंगच्या लग्नाची तारीख फिक्स! खासदार प्रिया सरोजसोबत कधी बांधणार लग्नगाठ? जाणून घ्या

Rinku Singh Priya Saroj Marriage date confirm : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि ‘फिनिशर’ रिंकू सिंग (Rinku Singh) लवकरच आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू करणार आहे. रिंकू सिंग आणि मछली शहरच्या समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज (Priya Saroj) यांच्या लग्नाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. रिंकूच्या कुटुंबीयांनी अधिकृतपणे लग्नाच्या […] The post Rinku Singh Marriage : रिंकू सिंगच्या लग्नाची तारीख फिक्स! खासदार प्रिया सरोजसोबत कधी बांधणार लग्नगाठ? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 10:37 pm

Pakistan News: पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना अटक होणार? अटक वॉरंट जारी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Pakistan News: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून त्यांच्याविरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. बलुचिस्तानच्या निर्वासित सरकारने शरीफ यांच्यावर व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा आणि बलुचिस्तानच्या संप्रभुततेचा अवमान केल्याचा गंभीर ठपका ठेवला आहे. स्वातंत्र्यवादी नेते मीर यार बलोच यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर यासंदर्भात अधिकृत घोषणा केल्यामुळे आंतरराष्ट्रीय वर्तुळात […] The post Pakistan News: पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना अटक होणार? अटक वॉरंट जारी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 10:32 pm

Chandrashekhar Bawankule : भाजपमधील अंतर्गत असंतोष समोर; चंद्रपुरात बावनकुळेंच्या सभेत मोठा गोंधळ

चंद्रपूर : महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपमधील अंतर्गत असंतोष चंद्रपूरमध्ये उघडपणे समोर आला. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचारसभांदरम्यान तिकीट नाकारलेल्या इच्छुकांनी दोन ठिकाणी थेट हस्तक्षेप केल्याने सभास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनांमुळे भाजपमधील नाराजी अजूनही धगधगत असल्याचे स्पष्ट झाले. सपना टॉकीज चौकातील सभेत भाजपकडून तिकीट नाकारलेले राकेश बोमनवार हे बावनकुळे यांचे भाषण सुरू असतानाच […] The post Chandrashekhar Bawankule : भाजपमधील अंतर्गत असंतोष समोर; चंद्रपुरात बावनकुळेंच्या सभेत मोठा गोंधळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 10:22 pm

Donald Trump : ट्रम्पचा रशियाविरोधी कृत्यांमुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सत्तेत येताना युक्रेन युद्ध थांबवण्याचे आणि जगात शांतता प्रस्थापित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नवीन वर्ष सुरू होताच ट्रम्प प्रशासनाची पावले शांततेऐवजी जागतिक संघर्षाला खतपाणी घालणारी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे युक्रेनमधील युद्ध अद्याप सुरू असताना आणि मध्य पूर्वेतील तणाव कायम असतानाच, आता अमेरिका आणि रशियामध्ये थेट संघर्षाची ठिणगी पडली आहे. उत्तर अटलांटिक महासागरात अमेरिकेने रशियाचा तेल टँकर जप्त केल्याने तिसऱ्या महायुद्धाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.काय आहे नेमकी घटना?अमेरिकन तटरक्षक दल आणि लष्कराने एका संयुक्त मोहिमेअंतर्गत उत्तर अटलांटिक महासागरातून 'मरीनेरा' (Marinera) या रशियन ध्वजांकित तेल टँकरला ताब्यात घेतले आहे. अमेरिकेच्या दाव्यानुसार, हा टँकर आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे उल्लंघन करून व्हेनेझुएलाच्या तेलाची बेकायदेशीर वाहतूक करत होता. विशेष म्हणजे, या टँकरचे पूर्वीचे नाव 'बेला-१' (Bella-1) असे होते आणि २०२४ मध्येच अमेरिकेने यावर निर्बंध लादले होते. कारवाई टाळण्यासाठी टँकरचे नाव बदलून तो पुन्हा सक्रिय करण्यात आला होता, मात्र अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी तो शोधून काढला. जागतिक तणावात भर ट्रम्प यांच्या या आक्रमक कारवाईमुळे रशिया संतप्त होण्याची शक्यता असून, यामुळे दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने थेट रशियन मालमत्ता जप्त करणे, हे जागतिक शांततेसाठी धोकादायक मानले जात आहे. ट्रम्प यांचे हे पाऊल जगाला विनाशाच्या दिशेने घेऊन जात आहे की काय, असा प्रश्न आता आंतरराष्ट्रीय विश्लेषक उपस्थित करत आहेत.https://prahaar.in/2026/01/08/mumbai-local-train-fire-near-kurla-central-railway-disrupted-between-vidyavihar-to-csmt-slow-line/समुद्रात अमेरिकन 'गुंडगिरी' दिसलीही कारवाई एखाद्या चित्रपटाच्या दृश्यापेक्षा कमी नव्हती. समुद्रात तरंगणारा एक टँकर, त्याच्या वरती घिरट्या घालणारे एक हेलिकॉप्टर आणि दोरीचा वापर करून खाली उतरणारे अमेरिकन सैनिक. महत्त्वाचे म्हणजे, ही अमेरिकन कारवाई त्या भागात रशियन नौदल युद्धनौका आणि पाणबुड्या देखील उपस्थित असताना झाली. तथापि, जेव्हा अमेरिकन तटरक्षक दलाने टँकर ताब्यात घेतला तेव्हा जवळपास कोणतेही रशियन जहाज नव्हते. या कारवाईत ब्रिटनने अमेरिकेला पूर्ण पाठिंबा दिला. या कारवाईवर रशियाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रशियन सिनेटर आंद्रेई क्लिशास यांनी याला खोल समुद्रात उघड चाचेगिरी आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे थेट उल्लंघन म्हटले आहे. १९८२ च्या संयुक्त राष्ट्रांच्या समुद्र कायद्यावरील कराराचा हवाला देत, रशियाने म्हटले आहे की कोणत्याही देशाला दुसऱ्या देशाच्या रीतसर नोंदणीकृत जहाजावर बळाचा वापर करण्याचा अधिकार नाही. रशिया आता कसा प्रतिसाद देतो याकडे जगाचे लक्ष आहे. २४ तासांच्या आत दुसऱ्या मोठ्या कारवाईत, अमेरिकेने कॅरिबियन समुद्रात व्हेनेझुएलाचे तेल चीनला नेणारे आणखी एक तेल टँकर, एम/टी सोफिया, ताब्यात घेतले. यावरून ट्रम्प प्रशासनाचे तेल व्यापार आणि त्याच्या नियंत्रणाबाबत आक्रमक धोरण स्पष्ट होते.चीन आणि इराणला खुले आव्हानट्रम्प यांनी केवळ रशियाशी भांडण केले नाही तर व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण करून चीनच्या हितसंबंधांना थेट हानी पोहोचवली आहे. दरम्यान, ट्रम्प यांचे जवळचे सहकारी सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी इराणबाबत एक अतिशय धोकादायक विधान केले आहे. ग्रॅहम यांनी उघडपणे धमकी दिली आहे की जर इराणने निदर्शकांना मारणे थांबवले नाही तर अध्यक्ष ट्रम्प त्यांचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचे आदेश देऊ शकतात.युरोप आणि नाटोला ग्रीनलँडचा धोकाडोनाल्ड ट्रम्प आता ग्रीनलँडवर कब्जा करण्याचे ध्येय ठेवून आहेत. हे साध्य करण्यासाठी त्यांनी युरोपीय देशांना आणि नाटोला स्पष्टपणे सांगितले आहे की अमेरिकेशिवाय नाटो अस्तित्वात आहे. जेव्हा फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या कारवाईवर टीका केली तेव्हा ट्रम्प यांनी त्यांची जाहीरपणे खिल्ली उडवली आणि राजनैतिक नियमांचे उल्लंघन केले.संरक्षण बजेटमध्ये ऐतिहासिक वाढ आणि भारतावर दबावट्रम्प प्रशासन आपले संरक्षण बजेट १ ट्रिलियन डॉलर्सवरून १.५ ट्रिलियन डॉलर्स करण्याची तयारी करत आहे. तज्ञांना हे युद्धाची तयारी वाटते. त्याच वेळी, भारतासाठी अडचणी उद्भवू शकतात. जर भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली तर अमेरिका त्यावर ५०० टक्क्यांपर्यंत शुल्क लादण्याचा विचार करत आहे.

फीड फीडबर्नर 8 Jan 2026 10:10 pm

Tilak Varma Injury : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून अचानक पडला बाहेर

Tilak Varma ruled out after injury : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रिकेट युद्धाला ११ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मात्र, या मालिकेपूर्वीच भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा युवा स्टार फलंदाज तिलक वर्मा दुखापतीमुळे मालिकेतील पहिल्या तीन टी-२० सामन्यांमधून बाहेर पडला आहे. तिलकवर नुकतीच एक आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली असून, बीसीसीआयने (BCCI) अधिकृत […] The post Tilak Varma Injury : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून अचानक पडला बाहेर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 10:06 pm

PMC Election : वैयक्तिक भेटींवर सुजाता शेट्टींचा भर

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक २४ (ब) कसबा गणपती- कमला नेहरू हाॅस्पिटल- केईएमच्या उमेदवार सुजाता शेट्टी यांच्याकडून प्रभागात नागरिकांच्या वैयक्तिक भेटींवर भर दिला जात आहे. शेट्टी यांनी गुरुवारी प्रभागातील सदा आनंदनगर, कानिफनाथ मंदिर, मद्रासी गणपती, रास्तापेठ परिसरात घरोघरी जाऊन संपर्क साधला. या वेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी पुन्हा एकदा महापालिकेत संधी […] The post PMC Election : वैयक्तिक भेटींवर सुजाता शेट्टींचा भर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 10:02 pm

PMC Election : गुंडशाहिला सत्तेपासून दूर ठेवा सतेज पाटील यांची भाजपावर टीका

पुणे : तुम्ही अशा माणसाला निवडून द्या, ज्याच्या घरी किंवा ऑफिसला तुम्हाला जाता येईल. काँग्रेसला मत म्हणजे शांततेला मत असल्याचे मत माजी गृहराज्यमंत्री व काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केले. भाजपला मत देणे म्हणजे गुंडशाहीला मत देणे होय, अशी टीका त्यांनी भाजपवर केली. महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक २२ मधील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार […] The post PMC Election : गुंडशाहिला सत्तेपासून दूर ठेवा सतेज पाटील यांची भाजपावर टीका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 9:55 pm

PMC Election : कॉंग्रेसला मत म्हणजे शांततेला मत –सतेज पाटील

पुणे : तुम्ही अशा माणसाला निवडून द्या, ज्याच्या घरी किंवा ऑफिसला तुम्हाला जाता येईल. काँग्रेसला मत म्हणजे शांततेला मत असल्याचे मत माजी गृहराज्यमंत्री व काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केले. भाजपला मत देणे म्हणजे गुंडशाहीला मत देणे होय, अशी टीका त्यांनी भाजपवर केली. महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक २२ मधील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार […] The post PMC Election : कॉंग्रेसला मत म्हणजे शांततेला मत – सतेज पाटील appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 9:55 pm

PMC Election : “मतदार अर्चना पाटील यांच्या पाठीशी”–मुरलीधर मोहोळ

पुणे – पुणेकरांनी नेहमीच विकासाच्या बाजूने आपला कौल दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक २२ (क) काशेवाडी- डायलप्लाॅटमधील भाजपच्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांना मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा खासदार आणि केंद्रीय सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला. पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभागात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी […] The post PMC Election : “मतदार अर्चना पाटील यांच्या पाठीशी” – मुरलीधर मोहोळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 9:53 pm

PMC Election : ‘ऐतिहासिक वारसा जपत सर्वांगीण विकास साधणार’–कुणाल टिळक

पुणे – मध्यवर्ती भाग असलेल्या सदाशिव पेठेला असलेला ऐतिहासिक वारसा जपत प्रभागातील समस्या सोडविण्यावर आपला भर राहणार असून, या भागातील समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याची ग्वाही प्रभाग क्रमांक २५-ड मधील भाजपचे अधिकृत उमेदवार कुणाल शैलेश टिळक यांनी मतदारांशी बोलताना दिली. टिळक यांनी गुरुवारी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यांनी घरोघरी संपर्क अभियानाअंतर्गत सदाशिव पेठ परिसरात […] The post PMC Election : ‘ऐतिहासिक वारसा जपत सर्वांगीण विकास साधणार’ – कुणाल टिळक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 9:53 pm

PMC Election : नाना पेठ, रास्ता पेठेत गणेश बिडकरांचा घरोघरी संपर्क !

पुणे – कॅम्प भागातील मोदी कॉलनी, नाना पेठेतील पदमजी पार्क, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, तसेच कसबा आणि सोमवार पेठेतील विविध वस्त्या, सोसायट्या, वाडे अशा ठिकाणी प्रभाग क्रमांक २४ चे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गणेश बिडकर यांनी घरोघरी भेट देत प्रचार केला. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पदयात्रा न काढता प्रत्यक्ष भेटीवर भर दिल्याने त्यांचे कौतुक होते आहे. […] The post PMC Election : नाना पेठ, रास्ता पेठेत गणेश बिडकरांचा घरोघरी संपर्क ! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 9:53 pm

PMC Election : प्रचाराआधी आईच्या कामात मदत.! भाजप उमेदवार अमर आवळे यांचे लक्षवेधक काम

पुणे – महापालिकेची निवडणूक लढविणारे सगळेच उमेदवार सध्या धावपळीत आहेत. भेटीगाठी… पदयात्रा… प्रचारफेऱ्या यामध्ये दिवस कसा निघून जातो कळत नाही; पण यातून वेळ काढत काही उमेदवार आपले दैनंदिन कामही करत आहेत. प्रभाग क्रमांक २७ मधील भाजपचे उमेदवार महेश (ऊर्फ) अमर विलास आवळे हे प्रचाराच्या धावपळीतून वेळ काढत सकाळी लवकर आपल्या आईला मदत करत असल्याचे दृश्य […] The post PMC Election : प्रचाराआधी आईच्या कामात मदत.! भाजप उमेदवार अमर आवळे यांचे लक्षवेधक काम appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 9:53 pm

PMC Election: प्रभाग 21 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम जनाधार

पुणे : नागरिकांना देण्यात आलेल्या पायाभूत सुविधा, नागरी प्रश्नांची तात्काळ सोडवणूक आणि जनतेशी थेट संवाद या त्रिसूत्रीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभागात भक्कम जनाधार निर्माण झाला असल्याचा दावा उमेदवारांनी केला आहे. प्रचारादरम्यान सुगत (श्रीशैल) चंद्रशा दसाडे, शोभा संतोष नांगरे, श्वेता संग्राम होनर-कामठे आणि बाळासाहेब अटल यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विकासाची भूमिका मांडली. प्रभाग क्रमांक २१ अंतर्गत […] The post PMC Election: प्रभाग 21 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम जनाधार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 9:50 pm

PMC Election : प्रभाग एकमधूनच भाजपाच्या विजयाची मुहूर्तमेढ –मुरलीधर मोहोळ

पुणे : रस्ते, पाणीपुरवठा, मेट्रो, वाहतूक व्यवस्था अशा अनेक क्षेत्रांत भाजपने पुण्यात विकासकामे केली आहेत. याच विकासाच्या जोरावर नागरिक पुन्हा एकदा भाजपाच्या हाती शहराची सत्ता देतील, तसेच या विजयाची मुहूर्तमेढ ही प्रभाग क्र. १ मधूनच लागेल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र. १ चे उमेदवार अनिल (बॉबी) […] The post PMC Election : प्रभाग एकमधूनच भाजपाच्या विजयाची मुहूर्तमेढ – मुरलीधर मोहोळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 9:48 pm

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. २०२६ वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तामिळनाडू दौरा केला. त्यात भाजपा आणि एआयडिएमके दोन्ही पक्षात युती, जागावाटप आणि सत्ता फॉर्म्युल्याची चर्चा झाली. बुधवारी रात्री एआयडिएमकेचे महासचिव माजी मुख्यमंत्री एडप्पाडी पलानीस्वामी यांनी अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली.या बैठकीत अमित शहा यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली. भाजपाला राज्यात एकूण २३४ जागांपैकी ५६ जागा हव्या आहेत. त्याशिवाय राज्यात सरकार बनल्यानंतर ३ मंत्रिपदांची मागणीही शहा यांनी केली आहे. या ५६ जागांमध्येच भाजपा त्यांच्या सहकारी मित्रांनाही सामावून घेईल. ज्यात एआयडिएमकेचे बंडखोर नेते ओ पन्नीरसेल्वम आणि टी.टी.वी दिनाकरन यांच्या नेतृत्वातील गट सहभागी आहे. त्याशिवाय तामिळनाडूत भाजपाचे काही छोटे सहकारीही आहेत. पुथिया तमिलगमसारखे पक्ष हे एनडीएचा भाग आहेत.२०२१ च्या निवडणुकीत डिएमकेने १३३ तर एआयडिएमकेला ६६ जागा मिळाल्या होत्या. भाजपा केवळ ४ जागांवर विजयी झाली होती. एनडीएत सहभागी असणाऱ्या पीएमकेला ५ जागा मिळाल्या होत्या. डिएमकेचा सहकारी पक्ष काँग्रेसने १८ जागा जिंकल्या होत्या. एआयडिएमके पक्षातील सूत्रांनुसार, माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस पलानीस्वामी यांनी बैठकीत भाजपाला कुठलेही आश्वासन दिले नाही. पक्षात याबाबत सल्लामसलत करावी लागेल, असे त्यांनी शहा यांना म्हटले.दरम्यान, निवडणुकीच्या दृष्टीने अशाप्रकारे जागांचे संकेत देणे हे हानिकारक ठरू शकते, कारण राज्यातील जनता ते स्वीकारणार नाही. यामुळे अण्णा द्रमुकच्या विजयाचा अर्थ तामिळनाडूमध्ये भाजपाचे राज्य येईल, असा विरोधकांचा दावा बळकट होईल, असे एआयडिएमकेच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे. दिवंगत अभिनेते-राजकारणी विजयकांत यांची डीएमडीके पुन्हा एनडीएमध्ये सामील होऊ शकतात, अशा चर्चेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने एआयडिएमकेला ही ऑफर दिली आहे. ९ जानेवारी रोजी होणारी डीएमडीकेची बैठक ही घोषणा करण्यासाठी योग्य वेळ मानली जात आहे.

फीड फीडबर्नर 8 Jan 2026 9:30 pm

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२६ या काळात देशभरात होईल. या कामासाठी १५ दिवसांचा सेल्फ-डिक्लेरेशनचा पर्यायही असेल. प्रत्यक्ष जनगणना फेब्रुवारी २०२७ मध्ये सुरू होईल.गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशाने अधिसूचित केलेल्या वेळापत्रकानुसार, घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या गणनेच्या १५ दिवस आधीपासून स्वयं-गणनेची सुविधा उपलब्ध असेल. ही देशातील पहिली डिजिटल जनगणना असेल, ज्यामध्ये अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही आवृत्त्यांसाठी उपलब्ध असलेल्या मोबाईल ॲप्लिकेशन्सचा वापर करून डेटा गोळा केला जाईल. जनगणना कार्याचे संकलन, देखरेख आणि पर्यवेक्षणासाठी सुमारे ३० लाख क्षेत्रीय कर्मचारी, ज्यात प्रगणक, पर्यवेक्षक, मास्टर ट्रेनर, प्रभारी अधिकारी आणि प्रधान किंवा जिल्हा जनगणना अधिकाऱ्यांचा समावेश आहे, तैनात केले जातील.जनगणना दोन टप्प्यांत घेतली जाईल. पहिला टप्पा घरगणना आणि गृहनिर्माण जनगणनेचा असेल – जो एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान होईल, तर दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ मध्ये लोकसंख्या गणनेचा (पीई) असेल. लडाख केंद्रशासित प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांमधील बर्फाच्छादित गैर-समकालिक भागांसाठी, लोकसंख्या गणना या वर्षी सप्टेंबरमध्ये केली जाईल.

फीड फीडबर्नर 8 Jan 2026 9:30 pm

Harshwardhan Sapkal : भाजप स्वतःच काँग्रेसयुक्त झाली; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

जालना : अंबरनाथ आणि अकोटमधील घडामोडींमुळे भाजप पक्षाचे दुटप्पी धोरण जनतेसमोर उघड झाले आहे. यामुळे हे स्पष्ट होते की ते सत्तेसाठी आपल्या तत्त्वांशी तडजोड करू शकतात. देशाला काँग्रेसमुक्त करण्याच्या प्रयत्नात भाजप स्वतःच काँग्रेसयुक्त झाला आहे, असा टोला कॉंग्रेस प्रदेशाध्‍यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगाविला. हर्षवर्धन सपकाळ म्‍हणाले, अंबरनाथमधील काँग्रेसच्‍या नगरसेवकांनी पक्ष नेतृत्वाला न विचारता भाजप-प्रणित आघाडीत […] The post Harshwardhan Sapkal : भाजप स्वतःच काँग्रेसयुक्त झाली; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 9:27 pm

PMC Election : सर्वधर्म समभावाचा विचार घेऊनच भविष्यातही कार्यरत राहू –गणेश कल्याणकर

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मोमीनपुरा परिसरात भव्य पदयात्रा पार पडली. या पदयात्रेत विविध धर्म, समाज आणि घटकांतील नागरिकांनी एकत्र येत सर्वधर्म समभावाचा प्रभावी संदेश दिला. रॅलीदरम्यान बोलताना उमेदवार गणेश कल्याणकर म्हणाले की, प्रभाग क्रमांक २६ ड हा विविधतेत एकता जपणारा प्रभाग असून, सर्व समाजांना […] The post PMC Election : सर्वधर्म समभावाचा विचार घेऊनच भविष्यातही कार्यरत राहू – गणेश कल्याणकर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 9:18 pm

Thackeray Brothers : राज्यकर्त्यांचे प्रेम राज्यावर हवे,सत्तेवर नव्हे; ठाकरे बंधूंची टीका

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त मुलाखतीत सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: भाजपवर घणाघाती टीकास्त्र सोडले. राज्यकर्त्यांचे प्रेम राज्यावर हवे; सत्तेवर नव्हे. राज्यात राज्यकर्ते मराठी असतील; पण त्यांचे मालक दिल्लीत बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे काम करत आहेत. आम्ही हे कारस्थान उधळून लावू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच, महाराष्ट्र राज्य […] The post Thackeray Brothers : राज्यकर्त्यांचे प्रेम राज्यावर हवे,सत्तेवर नव्हे; ठाकरे बंधूंची टीका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 9:11 pm

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची मोठी भेट दिली आहे. ३२,६७९ शिपाई आणि समकक्ष पदांच्या थेट भरतीसाठी सरकारने सर्व प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ३ वर्षांची शिथिलता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वयोमर्यादा ओलांडल्यामुळे अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या उमेदवारांना आता पोलीस दलात सामील होण्याची पुन्हा एक संधी मिळणार आहे. ३१ जानेवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी राज्यातील तरुण वयोमर्यादा वाढवण्याची मागणी करत होते. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गृहविभागाला निर्देश दिले आणि ही सवलत ‘एक वेळची संधी’ म्हणून लागू करण्यात आली.

फीड फीडबर्नर 8 Jan 2026 9:10 pm

राज्यात १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी, शाळा-सरकारी कार्यालये राहणार बंद

मुंबई : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. १५ जानेवारी रोजी २९ महापालिकेसाठी मतदान होणार आहे. आयोगाकडून मतदान प्रक्रियेला वेग आला आहे. महापालिका निवडणुका सुलभ करण्यासाठी निगोटीबल इनस्ट्रूमेंटस अॅक्टअंतर्गत राज्य सरकारने महाराष्ट्रात १५ जानेवारी २०२६ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.मुंबई महापालिकाअंतर्गत येणाऱ्या मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील जिल्ह्यांसह पुणे आणि राज्यातील २९ महानगरपालिकेत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी महापालिकेचे मतदान होणार आहे, त्या सर्व ठिकाणी गुरूवारी शाळा, सरकारी कार्यलयाला सुट्टी देण्यात आली आहे.मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या सर्व महापालिकेचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येत आहे. ३० डिसेंबर २०२५ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवनागी होती. तर २ जनेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेता येत होता. मुंबई आणि इतर महापालिकेसाठी राज्यात प्रचार वेगात सुरू आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी भाजप-शिंदेसेना आणि ठाकरेसेना-मनसे यांच्यात चूरस पाहायला मिळत आहे. १६ जानेवारी रोजी राज्यात कोण कोणत्या महापालिकेवर कब्जा मिळवतो, हे निश्चित होणार आहे. सध्या प्रचार अंतिम टप्प्यात आहे.शेअर बाजार आणि बँका सुरुच राहणारसरकारने डिसेंबरमध्ये राज्य सरकारने २०२६ मधील २४ सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली होती. त्या यादीमध्ये १५ जानेवारीच्या सुट्टीचा समावेश नव्हता. सार्वजनिक सुट्टी फक्त महापालिका निवडणुका होत असलेल्या ठिकाणीच असेल, असे राज्य सरकारकडून एका प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे. दरम्यान, १५ जानेवारी रोजी बँका सुरू राहणार असल्याचे समजतेय. कारण, आरबीआयकडून अद्याप १५ जानेवारीच्या सुट्टीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे शेअर बाजार आणि बँका १५ जानेवारी रोजी सुरूच राहणार आहेत.

फीड फीडबर्नर 8 Jan 2026 9:10 pm

‘मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक अन् महापाप केलं तो महापौर!’; मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला ‘तो’मजेशीर किस्सा

नागपूर: “राजकारणात नगरसेवक आणि महापौर होणं हे वाटतं तितकं सोपं नसतं. मी गमतीने नेहमी म्हणतो की, ज्याने मागच्या जन्मी पाप केलं असेल तो नगरसेवक होतो आणि ज्याने महापाप केलं असेल तो महापौर होतो,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय प्रवासातील सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर असताना नागपूर […] The post ‘मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक अन् महापाप केलं तो महापौर!’; मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला ‘तो’ मजेशीर किस्सा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 9:05 pm

करडे-निमोणे रस्त्यावर ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; 60 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

न्हावरे : करडे गावातून निमोणेकडे दुचाकीवरुन निघालेल्या ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीला लंघेवाडी येथे दुपारच्या सुमारास भरधाव ट्रॅक्टरची जोरदार धडक बसली. त्यानंतर ट्रॅक्टर थेट अंगावरुनच गेल्याने कैलास मारुती गायकवाड (वय ६०, रा. निमोणे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघातानंतर गायकवाड रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन संघाचे दौलत शितोळे […] The post करडे-निमोणे रस्त्यावर ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; 60 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 8:42 pm

PMC Election: प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपा उमेदवारांच्या पदयात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद

PMC Election: विकसित पुणे शहराचा रोड मॅप असलेलं संकल्पपत्र गुरुवारी (दि.८) सकाळी प्रकाशित झाले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला अन् त्याचे पडसाद बिबवेवाडी शंकर महाराज मठ प्रभाग क्रमांक २० मध्ये उमटले. पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र यशवंत शिळीमकर, तन्वी प्रशांत दिवेकर, मानसी मनोज देशपांडे, महेंद्र माणिकचंद (मुथ्था) सुंदेचा यांच्या वतीने बिबवेवाडी परिसरात दिपक उर्फ बाबा […] The post PMC Election: प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपा उमेदवारांच्या पदयात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 8:05 pm

Election Commission : निवडणूक आयोगाचा कारनामा ! ओळख सिद्ध करण्यासाठी चक्क खासदारालाच बजावली नोटीस

पणजी : मतदार यादीत नाव कायम राखण्यासाठी (Election Commission) आपली ओळख सिद्ध करा आणि कागदपत्रे घेऊन उपस्थित राहा, असे निर्देश दक्षिण गोव्याचे काँग्रेस खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना निवडणूक आयोगाकडुन नोटीसद्वारे देण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी राहिलेल्या फर्नांडिस यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत, हा सामान्य मतदारांना मतदानापासून रोखण्याचा […] The post Election Commission : निवडणूक आयोगाचा कारनामा ! ओळख सिद्ध करण्यासाठी चक्क खासदारालाच बजावली नोटीस appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 8:04 pm

मोठी बातमी! 15 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; अधिसूचना प्रसिद्ध

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदान क्षेत्रात १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी […] The post मोठी बातमी! 15 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; अधिसूचना प्रसिद्ध appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 7:57 pm

फडणवीसांमुळे राजकीय संस्कृतीचा ऱ्हास –सुषमा अंधारे

पिंपरी, दि. ८ (प्रतिनिधी) – २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि राज्याच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास हाेण्यास सुरूवात झाली. फडणवीस हे मानसिकदृष्ट्या असुरक्षित असलेली व्यक्ती आहे. त्यामुळे ते जास्त आक्रमक हाेतात, भ्रष्टाचारावर टीका करून इतर पक्षातील सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्ये घेऊन त्यांच्याच मांडीला माडी लावून बसायचे, हा फडणवीस यांचा ढाेंगीपणा आहे. भाजपमध्ये हाेणारे पक्ष […] The post फडणवीसांमुळे राजकीय संस्कृतीचा ऱ्हास – सुषमा अंधारे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 7:56 pm

Agnivesh Agrawal: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या पुत्राचे निधन; 75 टक्के संपत्ती समाजकार्यासाठी देण्याचा पुनरुच्चार

नवी दिल्ली / न्यूयॉर्क : वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचे पुत्र अग्निवेश अग्रवाल (वय ४९) यांचे न्यूयॉर्क येथे निधन झाले. स्कीइंगदरम्यान झालेल्या अपघातात ते जखमी झाले होते. त्यांच्यावर न्यूयॉर्कमधील माउंट सायनाय रुग्णालयात उपचार सुरू असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने (कार्डियाक अरेस्ट) त्यांचे निधन झाले. या दु:खद घटनेमुळे उद्योगविश्वात शोककळा पसरली आहे. अनिल अग्रवाल यांनी सोशल […] The post Agnivesh Agrawal: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या पुत्राचे निधन; 75 टक्के संपत्ती समाजकार्यासाठी देण्याचा पुनरुच्चार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 7:49 pm

अजित पवारांचं टेन्शन वाढलं.! राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण एक वर्षासाठी हद्दपार; नेमकं प्रकरण काय?

Ajit Pawar | NCP candidate – सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी हद्दपारीची मोठी कारवाई केली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक 6 मधील सर्वसाधारण गटातील उमेदवार आझम काझीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. आझम काझीसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणातील टोळीतील आठ जणांवर हद्दपारीची कारवाई झाली. उद्या ( 9 जानेवारी) मिरजमध्ये अजित पवार यांची सभा होत […] The post अजित पवारांचं टेन्शन वाढलं.! राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण एक वर्षासाठी हद्दपार; नेमकं प्रकरण काय? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 7:42 pm

PMC Election : राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा स्थानिक सोसायट्यांकडे मोर्चा, प्रचारासोबत जाणून घेतल्या समस्या

बिबवेवाडी : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचाराला वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रचारासोबतच विविध सोसायट्यांमधील रहिवाशांच्या समस्या जाणून घेताना दिसत आहेत. शंकर महाराज मठ-बिबवेवाडी, प्रभाग क्रमांक २० मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गौरव घुले, प्रितम नागापुरे, अस्मिता शिंदे आणि रश्मी अमराळे यांनी विविध सोसायट्यांमध्ये प्रचार मोहीम राबवली. या उपक्रमात भाग्यश्री सोसायटी, अनिकेत सोसायटी, पारिजात […] The post PMC Election : राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा स्थानिक सोसायट्यांकडे मोर्चा, प्रचारासोबत जाणून घेतल्या समस्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 7:37 pm

मौजमजेसाठी चोरी करणारी सराईत टोळी पारगाव पोलिसांच्या जाळ्यात; 27 दुचाकी जप्त, 16 गुन्ह्यांची उकल

पारगाव (ता. आंबेगाव) : मौजमजा करण्यासाठी मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत टोळीला पारगाव पोलिसांनी जेरबंद करत मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २७ मोटरसायकली हस्तगत केल्या असून एकूण १६ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पारगाव पोलीस ठाण्याच्या या यशस्वी कारवाईचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. पारगाव पोलिसांनी सापळा रचून रितेश फकीरा रोकडे (वय १८, […] The post मौजमजेसाठी चोरी करणारी सराईत टोळी पारगाव पोलिसांच्या जाळ्यात; 27 दुचाकी जप्त, 16 गुन्ह्यांची उकल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 7:35 pm

पिंपरी चिंचवडमध्ये नवा केजीएफ

पिंपरी, दि. ८ (प्रतिनिधी) – काही दिवसांपूर्वी केजीएफ हा चित्रपट आला होता. त्यामध्ये एक गरुडा होता. त्याच्या खाणीमध्ये फक्त त्याचीच माणसं कामे करायची. या शहरात दोन गरूडा आहेत. एक दाढीवाला आणि एक बिना दाढीवाला आहे. त्यांनी या शहराला लुटून मलिदा खाल्ला असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या आमदारांवर केला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी […] The post पिंपरी चिंचवडमध्ये नवा केजीएफ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 7:34 pm

ईव्हीएम सुसज्ज करण्याच्या कामाची राज्य निवडणूक आयुक्तांकडून पाहणी

मुंबई : राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज विल्सन महाविद्यालयास भेट देऊन बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) सुसज्ज करण्याच्या कामाची पाहणी केली आणि उपस्थिती अधिकारी- कर्मचारी व उमेदवारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.बृहन्मंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी प्रभाग क्र. २०१४ ते २२२ चे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाघचौरे असून त्यांचे कार्यालय विल्सन महाविद्यालयात आहे. श्रीमती शीतल देसाई, श्रीमती यू. टी. मुल्ला, श्री. अमोल मेश्राम, श्री. प्रशांत पाठक आणि श्री. सचिन शिंदे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. या सर्व अधिकाऱ्यांसह विविध उमेदवारांचे प्रतिनिधीदेखील यावेळी उपस्थित होते. या सर्वांशी श्री. वाघमारे यांनी यावेळी चर्चा केली. प्रभाग क्र. २०१४ ते २२२ साठी एकूम ४६७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी एकूण ६१० ईव्हीएम सूसज्ज करण्यात येत आहेत.

फीड फीडबर्नर 8 Jan 2026 7:30 pm

Election 2026 : उमेदवारांच्या संपत्तीचा आलेख उंचावला.! कोणत्या पक्षाचा नेता आहे सर्वाधिक श्रीमंत, एकदा पाहाच…

Election 2026 – आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल केलेल्या संपत्तीच्या आकड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार, २०१७ च्या तुलनेत अनेक प्रमुख उमेदवारांच्या मालमत्तेत प्रचंड वाढ झाली असल्याचे दिसुन येत आहे. प्रस्थापित नेत्यांपासून ते नव्या दमाच्या उमेदवारांपर्यंत अनेकांची श्रीमंती कित्येक पटीने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना (उबाठा) नेत्या […] The post Election 2026 : उमेदवारांच्या संपत्तीचा आलेख उंचावला.! कोणत्या पक्षाचा नेता आहे सर्वाधिक श्रीमंत, एकदा पाहाच… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 7:27 pm

अर्ज बाद झालेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार? मुंबई उच्च न्यायालयात उद्या महत्त्वाची सुनावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच, उमेदवारी अर्ज बाद झालेल्या इच्छुकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अर्ज फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांच्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेत सुनावणी निश्चित केली असून ही सुनावणी उद्या, शुक्रवारी होणार आहे. त्यामुळे अर्ज बाद झालेल्या उमेदवारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. कोरोनानंतर प्रथमच होणाऱ्या […] The post अर्ज बाद झालेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार? मुंबई उच्च न्यायालयात उद्या महत्त्वाची सुनावणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 7:26 pm

12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; सपकाळांनी घेतला ‘हा’मोठा निर्णय, नगरसेवकांची धडधड वाढली

अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथ नगरपालिकेतील सत्तास्थापनेदरम्यान भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये झालेल्या युतीमुळे काँग्रेस पक्षात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भाजपसोबत हातमिळवणी करणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांवर कारवाईचा इशारा देण्यात आल्यानंतर, संबंधित १२ नगरसेवकांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या घटनेमुळे काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून पक्षाने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे. […] The post 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; सपकाळांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, नगरसेवकांची धडधड वाढली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 7:15 pm

Raj Thackeray : मनसेला धक्क्यावर धक्के ! संतोष धुरीनंतर ‘या’नेत्याचा राज ठाकरेंना जय महाराष्ट्र

Raj Thackeray : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार रंग चढलेला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) (Raj Thackeray) सलग धक्के बसत आहेत. माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सरचिटणीस राजा चौगुले आणि प्रवक्ते हेमंत कांबळे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. आता जोगेश्वरी भागात मनसेला आणखी एक मोठा झटका बसला आहे. मनसेचे विभाग प्रमुख आणि […] The post Raj Thackeray : मनसेला धक्क्यावर धक्के ! संतोष धुरीनंतर ‘या’ नेत्याचा राज ठाकरेंना जय महाराष्ट्र appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 7:09 pm

ईडी–आयपॅक संघर्ष चिघळला! छाप्यांनंतर तक्रारी, ममता बॅनर्जी आक्रमक; बंगालच्या राजकारणात खळबळ

कोलकाता : प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) गुरुवारी कोलकाता आणि दिल्ली येथे निवडणूक व्यवस्थापन कंपनी ‘आय-पॅक’शी संबंधित दहा ठिकाणी छापे टाकले. ही कंपनी प्रशांत किशोर यांनी सुरू केली असून सध्या ती तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक मोहिमेचे व्यवस्थापन करत आहे. याच वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने या कारवाईवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. वृत्तांनुसार, कोलकात्यात सहा […] The post ईडी–आयपॅक संघर्ष चिघळला! छाप्यांनंतर तक्रारी, ममता बॅनर्जी आक्रमक; बंगालच्या राजकारणात खळबळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 7:03 pm

संजय राऊत-एकनाथ शिंदे यांची खास भेट.! एकमेकांच्या तब्येतीची केली विचारपूस

Sanjay Raut | Eknath Shinde – राज्‍यातील महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सध्या शिंदेसेना विरुद्ध ठाकरेसेना असा टोकाचा संघर्ष सुरू असतानाच, राजकारणाच्या या रणधुमाळीत एक अत्यंत अनपेक्षित घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत हे एकमेकांसमोर आले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची यावेळी भेट घेतली. या दोन्ही कट्टर राजकीय शत्रूंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण […] The post संजय राऊत-एकनाथ शिंदे यांची खास भेट.! एकमेकांच्या तब्येतीची केली विचारपूस appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 6:36 pm

दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात नेमकं काय घडलं? 5 आरोपींच्या कोठडीत वाढ; अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

नवी दिल्ली : दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच प्रमुख आरोपींना आज न्यायालयातून कोणताही दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने या पाचही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १३ दिवसांची वाढ केली असून, त्यांच्या जामीन अर्जावर उद्या (शुक्रवारी) सुनावणी होणार आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार आणि बुधवारच्या दरम्यान तुर्कमान गेट […] The post दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात नेमकं काय घडलं? 5 आरोपींच्या कोठडीत वाढ; अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 6:32 pm

पाणंद रस्ते समितीत सह अध्यक्षांसह परिषद सदस्य अन पाच प्रगतशील शेतकरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णययोजना प्रभावी करण्याचे चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रयत्नमुंबई : 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेचे संचालन जलदगतीने होण्यासाठी आता विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये 'सहअध्यक्ष' आणि 'पाच प्रगतशील शेतकऱ्यांचा' समावेश करण्यात येणार आहे. तसेच, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमध्ये आता जिल्ह्यातील सर्व 'विधानपरिषद सदस्यांना' देखील सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेऊन यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीवर नियुक्त केल्या जाणाऱ्या सहअध्यक्षाची निवड करण्याचे अधिकार थेट महसूल मंत्र्यांना देण्यात आले आहेत. तसेच, समितीमध्ये सहभागी होणाऱ्या पाच प्रगतशील शेतकऱ्यांची निवड करताना पारदर्शकता राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून नावांची यादी मागवतील आणि त्यानंतर जिल्हाधिकारी या निवडीला अंतिम मंजुरी देतील. एका विधानसभा क्षेत्रात एकापेक्षा जास्त उपविभागीय अधिकारी असल्यास सदस्य सचिवाच्या नियुक्तीचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार असून, समिती गठीत करण्याचे संपूर्ण अधिकारही त्यांनाच प्रदान करण्यात आले आहेत.सुधारणा खालीलप्रमाणे :विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या कामकाजात मदतीसाठी एका सहअध्यक्षाची निवड महसूल मंत्री करतील.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या नावांतून समिती ५ प्रगतशील शेतकऱ्यांची निवड करेल व त्याला जिल्हाधिकारी मंजुरी देतील.जिल्हास्तरीय समितीमध्ये आता जिल्ह्यातील सर्व विधानपरिषद सदस्यांचा सदस्य म्हणून समावेश असेल.विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती गठीत करण्याचे आणि सदस्य सचिवांची नियुक्ती करण्याचे अंतिम अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.या योजनेमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे मजबूत होऊन शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळणे सुलभ होईल.जोपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर रस्ता पाणी आणि वीज जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा विकास होणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नवीन सहभागामुळे योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात यश येईल. चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री.

फीड फीडबर्नर 8 Jan 2026 6:30 pm

चलन निर्मितीत मोठा बदल; चलन कागदनिर्मिसाठी अत्याधुनिक तंत्र कार्यन्वयित

मुंबई : भारताच्या चलनात नाण्यांप्रमाणे कागदी नोटांनाही तितकेच महत्व आहे. पाचशे, दोन हजार यांसारख्या अनेक नोटा आज चलनात आहेत. याच नोटांच्या कागदांना भारत सरकार आता खास सुरक्षा आणि योजना पुरवणार आहे. भारताच्या पायाभूत सुविधंद्यांना बळकटी देण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी चाळणी नोटा छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या उच्च सुरक्षा कागदाचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने १,८०० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मध्य प्रदेशातील नर्मदापूरम येथील सिक्युरिटी पेपर मिलमध्ये हा कागद तयार केला जाणार आहे.देशातील चलन कागदनिर्मिती व्यवस्थेत मोठा बदल होणार असून, सिक्युरिटी पेपर मिलमध्ये नवीन अत्याधुनिक उत्पादन लाईन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही लाईन केवळ चलनी नोटांसाठीच नव्हे, तर नॉन-ज्युडिशिअल स्टॅम्प पेपर्स आणि पासपोर्टसाठी आवश्यक असलेल्या उच्च-सुरक्षा कागदाच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे.नवीन प्रस्तावित लाईन १९७० पासून कार्यरत असलेल्या तीन जुन्या उत्पादन युनिटपैकी दोनची जागा घेणार आहे. हा निर्णय सुविधेच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून, उत्पादन कार्यक्षमता आणि सुरक्षिततेत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.सिक्युरिटी पेपर मिल ही सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) अंतर्गत कार्यरत आहे. देशात चलन कागदाच्या निर्मितीची संपूर्ण जबाबदारी सध्या या संस्थेकडे असून, भारतातील या क्षेत्रातील मक्तेदारी कायम आहे. डिजिटल व्यवहारांचा वापर वाढत असतानाही देशात चलनाचे परिसंचरण सातत्याने वाढत असल्याने नोटांची मागणी अद्याप कमी झालेली नाही.तज्ज्ञांच्या मते, उच्च-सुरक्षा कागदामध्ये वॉटरमार्क, सुरक्षा धागे आणि विशेष तंतूंसारखी प्रगत वैशिष्ट्ये असतात, जी बनावट नोटा रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. नोटाबंदीनंतर चलनाच्या मागणीत झालेली वाढ पाहता, देशांतर्गत उत्पादन वाढवणे अपरिहार्य ठरले होते.या प्रकल्पामुळे परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या साहित्यावरील अवलंबित्व कमी होणार असून, मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे. हा उपक्रम केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ धोरणाशी सुसंगत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

फीड फीडबर्नर 8 Jan 2026 6:30 pm

BMC Election : शिंदेंचा उमेदवार प्रचारासाठी थेट मातोश्रीवर; नेमकं काय घडलं?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या (BMC Election) प्रचाराला जोरदार रंग चढलेला असताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने एक धाडसी पाऊल उचलले आहे. प्रभाग क्रमांक ९३ चे शिंदे सेनेचे उमेदवार सुमित वजाळे यांनी गुरुवारी थेट मातोश्रीच्या बाहेर जाऊन प्रचार केला. “ठाकरे कुटुंब आमचे मतदार आहेत, आम्हाला त्यांना भेटायचे आहे आणि आमचे मुद्दे त्यांच्यासमोर मांडायचे आहेत,” […] The post BMC Election : शिंदेंचा उमेदवार प्रचारासाठी थेट मातोश्रीवर; नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 6:25 pm

Today TOP 10 News: ‘ऑपरेशन लोटस’यशस्वी, नगरसेवकांच्या संपत्तीत वाढ, ‘लाडकी बहीण’, SBIचा इशारा ते EPFO पेन्शन वाढ…वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या

जुन्या नगरसेवकांच्या संपत्तीत मोठी वाढ; उमेदवारांच्या संपत्तीचा मुद्दा चांगलाच गाजतोय आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांच्या संपत्तीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार, अनेक माजी नगरसेवक आणि महापौरांच्या संपत्तीत गेल्या काही वर्षांत पाच पटीने वाढ झाली असून, लखपती असलेले नेते आता करोडपतींच्या यादीत आलेत. २२७ प्रभागांतील १७०० उमेदवारांपैकी जुन्या नगरसेवकांच्या मालमत्तेत मोठी वाढ […] The post Today TOP 10 News: ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी, नगरसेवकांच्या संपत्तीत वाढ, ‘लाडकी बहीण’, SBIचा इशारा ते EPFO पेन्शन वाढ… वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 6:11 pm

आताची सर्वांत मोठी बातमी: ३३ वर्षानंतर सेबीकडून स्टॉक ब्रोकर कायद्यात प्रथमच फेरबदल! आता ब्रोकर कायदा १९९२ ऐवजी २०२६ लागू होणार!

मोहित सोमण:आज सेबी (Security Exchange Board of India SEBI) नियामक मंडळानी भांडवली बाजारातील कारभार सुव्यवस्थित करण्यासाठी नवा निर्णय घेतला आहे.सेबीच्या (स्टॉक ब्रोकर्स) नियमन १९९२ (Stock Brokers Regultions 1992 Act) ची जागा सेबी (स्टॉक ब्रोकर्स) नियमन २०२६ (SB Regulatios 2026) ने घेतली आहे. सेबीने आपली क्लिष्ट भाषा वगळता सोपे नियमन करून आपली नियामक भाषा सोपी केली आहे. व्यवसाय वाढीसह इज ऑफ डुईंग बिझनेससाठी १९९२ नंतर प्रथमच प्रस्तुत बदल केले असून या बदलांनुसार ब्रोकर्सना इतर वित्तीय नियामकांच्या चौकटीअंतर्गत (Other Financial Regulator Framework) अंतर्गत काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे असे सेबीने आपल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. काळाशी सुसंगत नसलेल्या कालबाह्य तरतुदी व शब्द सेबीने काढून टाकले आहेछ असे सेबीने स्पष्ट केले आहे. सेबीने आपल्या तीन दशकांहून अधिक जुन्या स्टॉकब्रोकर नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. अनुपालनात (Compliance) मध्ये सुलभता आणली आहे.सुलभतेचे प्रमाण अधोरेखित करताना, सेबीने म्हटले होते की, वाचन आणि समजण्यास सुलभता वाढवण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे एकूण पानांची संख्या ५९ वरून २९ पर्यंत आणि शब्दांची संख्या १८८४६ वरून ९०७३ शब्दापर्यंत कमी झाली आहे.प्रथमच नव्या नियमानुसार, सेबीने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार 'एक स्टॉक ब्रोकर इतर वित्तीय क्षेत्रातील नियामक किंवा इतर कोणत्याही निर्दिष्ट प्राधिकरणाच्या नियामक चौकटीअंतर्गत, मंडळाने निर्दिष्ट (सूचित) केल्यानुसार, एखादे कार्य करू शकतो. असे कार्य संबंधित वित्तीय क्षेत्रातील नियामक किंवा प्राधिकरणाच्या अखत्यारीत येईल.' असे म्हटले आहे. तसेच एसबी नियमनांची (Stock Broker Regulations) रचना अकरा अध्यायांमध्ये करण्यात आली आहे ज्यात स्टॉकब्रोकर्ससाठीच्या नियामक प्रणालीच्या प्रमुख पैलूंचा सर्वसमावेशकपणे समावेश आहे असे म्हटले आहे. याशिवाय अनावश्यक तरतूदी यातून वगळण्यात आल्या आहेत.नव्या पुनर्रचनेचा भाग म्हणून सेबीने काही अनुसूची हटवल्या असून ज्यांची आता आवश्यकताच नाही अशा नियमावली हटवल्या आहे व पुनर्रचना करून संबंधित अनुसूची थेट नियमांमध्ये अध्याय म्हणून समाविष्ट केल्या आहेत जेणेकरून वाचनीयता आणि समज सुधारावी असे सेबीने आपल्या अधिनियमात म्हटले आहे. याव्यतिरिक्त, पुनरावृत्ती होणाऱ्या तरतुदी काढून टाकून आणि अंडररायटिंग,आचारसंहिता आणि स्टॉकब्रोकर्सना परवानगी असलेल्या इतर कार्यांशी संबंधित विभागांचे एकत्रीकरण आणि पुनर्रचना करून संपूर्ण रचना सुव्यवस्थित करण्यात आली आहे. अधिक स्पष्टता आणण्यासाठी सेबीने क्लिअरिंग सदस्य, व्यावसायिक क्लिअरिंग सदस्य, मालकी हक्काचा व्यापार करणारा सदस्य, मालकी हक्काचा व्यापार आणि नियुक्त संचालक यांच्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या व्याख्यांमध्ये सुधारणा केल्या आहेत असेही सेबीने यावेळी स्पष्ट केले.सयावेळी प्रतिक्रिया देताना सेबीने म्हटले आहे की,'मालकी हक्काचा व्यापार म्हणजे मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजच्या कोणत्याही सेगमेंटमध्ये स्टॉकब्रोकरने स्वतःच्या खात्यावर केलेला व्यापार, तर मालकी हक्काचा व्यापार करणारा सदस्य म्हणजे असा स्टॉकब्रोकर ज्याचे व्यवहार केवळ मालकी हक्काच्या व्यापाराच्या स्वरूपाचे असतात.'यासह 'मंडळ, मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, क्लिअरिंग कॉर्पोरेशन किंवा डिपॉझिटरी यांच्यासोबत, निर्दिष्ट केल्यानुसार स्टॉक ब्रोकर्सची संयुक्त तपासणी करू शकते... प्रत्येक स्टॉकब्रोकरने खात्यांची पुस्तके, नोंदी आणि कागदपत्रे ठेवण्याच्या ठिकाणाची माहिती ज्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजचा तो सदस्य आहे, त्याला कळवावी असे सेबीने म्हटले आहे. याव्यतिरिक्त, नियामकाने पात्र स्टॉकब्रोकर्सना ओळखण्यासाठीचे निकष सुलभ केले आहेत, ज्यामुळे मोठ्या संख्येने सक्रिय ग्राहक असलेल्या किंवा जास्त ट्रेडिंग व्हॉल्यूम असलेल्या संस्थांना वर्धित पर्यवेक्षण आणि अनुपालन आवश्यकतांच्या अंतर्गत आणले जाईल.नियामकाने अनुपालन सुलभ करण्यासाठी आणि व्यवसाय करण्याची सुलभता सुधारण्यासाठी काही तरतुदींमध्ये बदल केले आहेत आणि नवीन तरतुदी सादर केल्या आहेत. संयुक्त तपासणीला परवानगी देणे आणि खात्यांची पुस्तके इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवण्याची परवानगी देणे यांचाही त्यात नव्या तरतूदीचा समावेश असणार आहे. स्टॉक एक्सचेंजची नियामक म्हणून भूमिका लक्षात घेऊन, सेबीने अहवाल सादर करण्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये सुधारणा केली आहे. ज्यात नियमांचे पालन न केल्याचा अहवाल देणे, आयटीआर सादर करणे आणि खात्यांची पुस्तकांचे स्त्रोत अथवा ठिकाणाची माहिती देणे यांचा समावेश असल्याचा उल्लेख सेबीने केला आहे. त्याच वेळी, सेबीने (नियामकाने) शेअर्सची प्रत्यक्ष डिलिव्हरी, फॉरवर्ड मार्केट कमिशन आणि सब-ब्रोकर्सशी संबंधित अप्रचलित आणि गैरलागू असलेल्या तरतुदी काढून टाकल्या आहेत.डिसेंबरमध्ये सेबीच्या मंडळाने या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर ही सुधारणा करण्यात आली.

फीड फीडबर्नर 8 Jan 2026 6:10 pm

Onion Rate : कांद्याचे दर पुन्‍हा गडगडले; शेतकऱ्यांना मोठा फटका

लासलगाव : आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणा-या लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून, कांदा उत्पादक शेतक-यांचे सुमारे २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात सुमारे ६०० रुपयांची घसरण झाली असून, मागील पंधरा दिवसांत तब्बल १ हजार रुपयांनी बाजारभाव खाली आले आहेत. त्यामुळे कांदा […] The post Onion Rate : कांद्याचे दर पुन्‍हा गडगडले; शेतकऱ्यांना मोठा फटका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 5:58 pm

रोहित पवार करणार घड्याळाचा प्रचार; काका-पुतण्या एकाच मंचावरून विरोधकांवर साधणार निशाणा

Rohit Pawar | Ajit pawar : राज्यातील महापालिका निवडणुकांचा धुरळा उडू लागला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट आणि शरद पवार गट) वाढती जवळीक राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. “राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो,” असे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले असून, आजपासून रोहित पवार त्यांच्यासोबत प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. दोन्ही […] The post रोहित पवार करणार घड्याळाचा प्रचार; काका-पुतण्या एकाच मंचावरून विरोधकांवर साधणार निशाणा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 5:55 pm

Sandeep Deshpande : …तेव्हा मी वेगळा निर्णय घेईन; पक्षांतराच्या चर्चेवर संदीप देशपांडेंचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी (Sandeep Deshpande) एक असलेले संतोष धुरी यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मनसेकडून मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या धुरी यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले. संतोष धुरी हे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) […] The post Sandeep Deshpande : …तेव्हा मी वेगळा निर्णय घेईन; पक्षांतराच्या चर्चेवर संदीप देशपांडेंचं मोठं वक्तव्य appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 5:37 pm

Test Cricket Record : ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! इंग्लंडचा धुव्वा उडवत कसोटीत रचला सर्वात मोठा विक्रम

Test Cricket Record in AUS vs ENG Ashes : प्रतिष्ठित ‘ॲशेस‘ (Ashes) कसोटी मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने आपले वर्चस्व सिद्ध करत इंग्लंडचा ४-१ अशा फरकाने पराभव केला. सिडनी येथे झालेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवत कांगारूंनी मालिका खिशात घातली. विशेष म्हणजे, या मालिकेत दोन्ही संघांनी मिळून फलंदाजीचा असा काही वेग राखला की, कसोटी क्रिकेटच्या […] The post Test Cricket Record : ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! इंग्लंडचा धुव्वा उडवत कसोटीत रचला सर्वात मोठा विक्रम appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 5:31 pm

अंबरनाथ मध्ये काँग्रेसला धक्का १२ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेतील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी आज नवी मुंबई येथे भाजप मध्ये प्रवेश केला. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, संजीव नाईक ,दीपेश म्हात्रे आदी मान्यवरांच्या उपस्तीथत हा प्रवेश झाला. एकाच वेळी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी पक्षांतर केल्यामुळे अंबरनाथमध्ये भाजपाची राजकीय स्थिती अतिशय मजबूत झाली आहे.काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांची यादी१)प्रदीप नाना पाटील२) दर्शना उमेश पाटील३) अर्चना चरण पाटील४) हर्षदा पंकज पाटील५) तेजस्विनी मिलिंद पाटील६) विपुल प्रदीप पाटील७) मनीष म्हात्रे८) धनलक्ष्मी जयशंकर९) संजवणी राहुल देवडे१०) दिनेश गायकवाड११) किरण बद्रीनाथ राठोड१२) कबीर नरेश गायकवाडकाँग्रेसच्या या १२ नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे अंबरनाथमधील राजकारणाची दिशा बदलणार आहे. ज्या नगरसेवकांनी विरोधात निवडणूक लढवली, तेच आता भाजपच्या झेंड्याखाली येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर आता स्थानिक पातळीवर काँग्रेसची ताकद किती उरणार आणि भाजपला या नगरसेवकांच्या प्रवेशाने किती फायदा होणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

फीड फीडबर्नर 8 Jan 2026 5:30 pm

चांदीची 'घसरगुंडी'थेट ४% इंट्राडे कोसळले 'या'कारणामुळे वाचा आजचे दर

मोहित सोमण: या आर्थिक वर्षातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) या निर्देशांकातील नव्या पुनर्संतुलन (Rebalancing) प्रकियेसह आगामी भूराजकीय स्थितीतील अस्थिरता व आगामी युएस पेरोल रोजगार आकडेवारी पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावधगिरीची भूमिका बाळगल्याने चांदी सलग दुसऱ्यांदा कोसळली आहे. चांदी दिवसभरात थेट ४% कोसळली असल्याने कमोडिटीतील गुंतवणूकदारांना यांचा मोठा फटका बसला आहे. गुड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ५ रूपयांवर घसरण झाली असून प्रति किलो दरात ५००० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २५२ प्रति किलो दर २५२००० रूपयावर पोहोचले आहेत. काल १०००० रूपयांनी चांदी घसरल्यानंतर आज पुन्हा एकदा चांदी ५००० रुपयांनी घसरली आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर २५२० रूपये तर प्रति किलो दर २५२००० रुपयांवर पोहोचले आहेत.संकेतस्थळावरील माहितीनुसार, गेल्या ४ दिवसात चांदी १३००० रुपयांनी वाढली आहे. संपूर्ण वर्षभरात चांदीच्या दरात १४०% वाढ झाल्याने भौतिक व ईटीएफ (Exchange Traded Fund ETF) गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणात प्राधान्य मिळत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. युएससह जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेमुळे चांदी मोठ्या प्रमाणात अस्थिरत आहे. दरम्यान आगामी युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील अनिश्चितता, युएस पेरोल आकडेवारी यामुळे गुंतवणूकदारांनी नवी गुंतवणूक टाळली असून इंडेक्स पुर्व संतुलित केल्याने एकत्रित परिणाम म्हणून चांदी आणखी घसरली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) बाजारात चांदी ३ ते ४% दिवसभरात कोसळली. संध्याकाळपर्यंत चांदीच्या निर्देशांकात ३.३०% घसरण झाल्याने प्रति किलो दरपातळी २४२३२७ रुपयांवर व्यवहार करत आहे. जागतिक स्तरावरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.७४% घसरण झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ७५.४८ औंसवर पोहोचली आहे. जी परवा ७९.८९ या सर्वोच्च इंट्राडे उच्चांकावर पोहोचली होती.मागील सत्रात चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने आणि ते ३.१७% ने घसरून २५०६०५ पातळीवर स्थिरावले होते . आता गुंतवणूकदारांनी अस्थिरतेत मजबूत तेजीनंतर नफा बुक सुरु केले आहे. ईटीएफ होल्डिंगमध्ये सलग तिसऱ्या दिवशी ३.२ दशलक्ष औंसपेक्षा जास्त घट झाली असून अमेरिकेतील मिश्र आर्थिक संकेतांमुळे ही घसरण आणखी वाढली. एडीपी डेटानुसार डिसेंबरमध्ये खाजगी वेतनात केवळ ४१००० ने वाढ झाली, जी अपेक्षेपेक्षा कमी होती, तर अमेरिकेतील उत्पादित वस्तूंच्या ऑर्डरमध्ये महिन्या-दर-महिना (MoM) १.३% घट झाली, ज्यामुळे औद्योगिक दृष्टिकोनातील मृदूपणा दिसून आला आहे.

फीड फीडबर्नर 8 Jan 2026 5:30 pm

Breaking News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर किशोरी पेडणेकर सापडणार अडचणीत? ‘ती’माहिती लपवल्याचा मोठा आरोप, गुन्हा दाखल होणार?

Kishori Pednekar : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रलंबित गुन्ह्यांची माहिती लपवून पेडणेकर यांनी निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल करत कठोर कारवाईची मागणी केली […] The post Breaking News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर किशोरी पेडणेकर सापडणार अडचणीत? ‘ती’ माहिती लपवल्याचा मोठा आरोप, गुन्हा दाखल होणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 5:11 pm

Sarfaraz Khan Record : सर्फराझ खानने रचला इतिहास! ३१ वर्षांपूर्वीचा ‘हा’खास विक्रम मोडणारा भारताचा पहिलाच फलंदाज

Sarfaraz Khan broke fastest fifty record : भारतीय क्रिकेटमधील ‘रन मशीन’ म्हणून ओळखला जाणारा फलंदाज सर्फराझ खान सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. प्रामुख्याने कसोटीपटू मानल्या जाणाऱ्या सर्फराझने आता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही (वनडे) टी-२० च्या स्टाईलने फलंदाजी करत नवा इतिहास रचला आहे. गुरुवारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने ३१ वर्षांपूर्वीचा जुना विक्रम मोडीत काढला. भारतासाठी सर्वात […] The post Sarfaraz Khan Record : सर्फराझ खानने रचला इतिहास! ३१ वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम मोडणारा भारताचा पहिलाच फलंदाज appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 4:50 pm

Ajit Pawar : ‘हा’बडा नेता महायुतीमधून बाहेर; अजित पवारांसाठी सर्वात मोठा धक्का!

पुणे : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मोठा झटका बसला आहे. दलित मतदारांना (Ajit Pawar)आकर्षित करण्याच्या उद्देशाने आरपीआय (खरात गट) सोबत केलेली युती आता धोक्यात आली आहे. आरपीआय (खरात गट)चे प्रमुख सचिन खरात यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतून तडकाफडकी माघार घेतली आहे. त्याचबरोबर […] The post Ajit Pawar : ‘हा’ बडा नेता महायुतीमधून बाहेर; अजित पवारांसाठी सर्वात मोठा धक्का! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 4:49 pm

न्याय मिळवून द्यावा.! ‘धुरंधर’प्रकरणी निर्मात्यांचं थेट PM मोदींना पत्र, नेमकं प्रकरण काय?

PM Modi | Dhurandhar : आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ या सिनेमावरून सध्या चित्रपटसृष्टीत मोठे वादंग निर्माण झाले आहे. मध्य पूर्वेतील (Middle East) अनेक देशांनी या चित्रपटावर बंदी घातल्यामुळे, चित्रपट निर्मात्यांची संघटना असलेल्या ‘इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन’ने (IMPPA) आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धाव घेतली आहे. या प्रकरणात […] The post न्याय मिळवून द्यावा.! ‘धुरंधर’प्रकरणी निर्मात्यांचं थेट PM मोदींना पत्र, नेमकं प्रकरण काय? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 4:38 pm

Tata Harrier And Safari Petrol: टाटा सफारी आणि हॅरियर पेट्रोल मॉडेल्स लाँच, किंमत ₹12.89 लाखांपासून सुरू

Tata Harrier And Safari Petrol Variants Prices: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सने एसयूव्ही प्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. टाटाने आपल्या अत्यंत लोकप्रिय आणि शक्तिशाली एसयूव्ही, हॅरियर (Harrier) आणि सफारी (Safari) चे बहुप्रतिक्षित ‘हायपेरियन’ (Hyperion) टर्बो पेट्रोल व्हेरिएंट्स भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच केले आहेत. विशेष म्हणजे, टाटाने या गाड्यांची सुरुवातीची किंमत इतकी प्रभावी […] The post Tata Harrier And Safari Petrol: टाटा सफारी आणि हॅरियर पेट्रोल मॉडेल्स लाँच, किंमत ₹12.89 लाखांपासून सुरू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 4:36 pm

धक्कादायक! बापाचं संतापजनक कृत्य, चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलाला दिले....

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगाव येथे वडिलांनी आपल्याच मुलाना अमानुषपणे गरम सूरीने हातांना आणि पायांना चटके दिल्याची बातमी समोर आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.नेमकं काय घडलं?१० ते १५ डिसेंबर दरम्यान ही घटना घडली असून , मुलांच्या शाळेतून शिक्षकांचे पैसे चोरल्याचे तक्रारी येत होत्या तसेच, घरातीलही पैसे गायब होत होते. पैसे आपलीच मुलं चोरत आहेत. असा संशय मुलांच्या वडिलांना आला, म्हणून मुलांना शिक्षा देत. आरोपींने मुलांना गरम सुरीने हाताना आणि पायांना चटके दिल्याची अमानुष घटना समोर आली आहे.पोलीस तपासात आरोपीने हे कृत्य संतापाच्या भारत केल्याचे समोर आले आहे. मुलांच्या तक्रारींनंतर तसेच माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दाखल घेत आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. जखमी मुलांवर उपचार करण्यात येत असून पुढील तपास गोरेगाव पोलीस करत आहेत

फीड फीडबर्नर 8 Jan 2026 4:30 pm

भारतीय इक्विटी बाजाराची २०२६ मध्ये मजबूत देशांतर्गत पायावर सुरुवात, 'मजबूत पाया, पण कळस नाही'- मोतीलाल ओसवाल

मोहित सोमण: मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (MOFSL) ने आपला नवा इक्विटी बाजाराशी संबंधित 'Full Strategy 3QFY26 Preview'नावाचा अहवाल, 'मजबूत पाया, पण कळस नाही' या मथळ्याखाली प्रसिद्ध केला आहे. एकूणच इक्विटी बाजारातील सुधारलेली कमाईची गती, धोरणात्मक प्रोत्साहन आणि लवचिक देशांतर्गत तरलतेच्या पाठिंब्याने, आर्थिक वर्ष २०२६ कॅलेंडर वर्षात भारतीय इक्विटी बाजारासाठी सकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित करण्यात आला आहे.२०२५ मध्ये जागतिक बाजारांच्या तुलनेत कमी कामगिरी करूनही, भारतीय इक्विटी बाजाराची २०२६ मध्ये मजबूत देशांतर्गत पाठबळासह सुरुवात होत आहे. गेल्या वर्षी प्रमुख निर्देशांकांनी एक ते सुरुवातीची दोन अंकी वाढ नोंदवली. निफ्टी ११%, निफ्टी मिडकॅप ६% आणि निफ्टी५०० ७% वाढला असला तरी अहवालातील अभ्यासाच्यमाणे वाढती भूराजकीय अनिश्चितता आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या जावकीमुळे (FIIs Outflow) ते निर्देशांक जागतिक बाजारांपेक्षा मागे राहिले आहेत. २०२५ मध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FIIs) जवळपास १९ अब्ज डॉलर्सचा झाला झाली आहे ज्याचे मुख्य कारण अमेरिकेच्या असमान व्यापारी उपाययोजना (Tariff) होत्या, तरीही त्याला उत्तर म्हणून देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदार (DIIs) एक मजबूत प्रतिसंतुलन म्हणून पुढे आले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.कमाईतील सुधारणा, मूल्यांकन आणि प्रवाहMOFSL ने अधोरेखित केले आहे की कमाईतील घसरणीचे चक्र लक्षणीयरीत्या कमी झाले आहे, २QFY२६ मध्ये २% वाढ नोंदवली गेली आणि त्यानंतर निफ्टी ईपीएसमध्ये केवळ किरकोळ कपात झाली. FY२६ आणि FY२७ साठी निफ्टी ईपीएस अनुक्रमे १०८४ आणि १२६७ रूपये राहण्याचा अंदाज आहे. मूल्यांकन वाजवी पातळीवर आहे, निफ्टी २१.२ पट पीईवर व्यवहार करत आहे, जो त्याच्या दीर्घकालीन सरासरीच्या जवळ आहे आणि सातत्यपूर्ण कमाईच्या वाढीमुळे विस्ताराला वाव मिळत आहे.देशांतर्गत प्रवाह बाजारांना मजबूत आधार देत आहेत. DIIs ने CY२५ मध्ये अंदाजे ९० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली, ज्याला स्थिर एसआयपी (Systematic Investment Plan SIP) प्रवाहांचा पाठिंबा होता, ज्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs) विक्री आणि प्राथमिक बाजारातील मजबूत इश्यू दोन्ही पचवण्यास मदत झाली. अहवालाने पुढे म्हटले आहे की ऐतिहासिकदृष्ट्या, अगदी माफक परदेशी गुंतवणूक प्रवाहामुळेही बाजारात मोठी तेजी आली आहे तर देशांतर्गत सहभाग बाजारातील घसरणीचा धोका मर्यादित ठेवेल अशी अपेक्षा आहे.यासह MOFSL नमूद करते की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि सरकारने केलेल्या धोरणात्मक कृती महत्वाची होती. ज्यामध्ये एकत्रित व्याजदर कपात, तरलतेचे इंजेक्शन (Liquidity Inject) जीएसटी २.० मधील कपात आणि वैयक्तिक आयकर सवलती यांचा समावेश आहे. अर्थात आर्थिक वर्ष २०२६ पासून देशांतर्गत वाढीच्या प्रेरणांमध्ये पूर्णपणे प्रतिबिंबित होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर, ही फर्म भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराला (Billateral Trade Agreement BTA) एक महत्त्वाचा उत्प्रेरक (Catalyst) मानते जो FII सहभाग पुन्हा सुरू करू शकतो आणि बाजाराचे पुनर्मूल्यांकन घडवून आणू शकतो.कमाईचा दृष्टिकोन: आठ तिमाहीतील सर्वात मजबूत (Earning Outlook)अहवालानुसार, ३QFY२६ मधील कमाई आठ तिमाहीतील सर्वात मजबूत कामगिरी दर्शवेल, ज्यात MOFSL च्या विश्वातील कंपन्यांकडून वार्षिक १६% करोत्तर नफा (Profit after tax PAT) वाढ अपेक्षित आहे. अहवालानुसार, ते मार्केटिंग (विपणन) कंपन्यांना वगळल्यास, बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढ मंदावली असूनही, कमाईची वाढ वार्षिक १३% च्या निरोगी दराने अपेक्षित आहे असे निरिक्षण अहवालाने नोंदवले आहे. एकूण कमाईतील सुधारणा व्यापक झाली आहे. त्यातील एकूण २० क्षेत्रे दोनअंकी वाढ नोंदवण्याची शक्यता आहे, जे FY२५ मध्ये सुरू झालेल्या कमाईच्या मंदीच्या चक्राच्या समाप्तीचे संकेत देते. जीएसटी २.० कपात, सणासुदीची मागणी, सुलभ व्याजदर आणि वाढलेल्या खर्चयोग्य उत्पन्नामुळे विवेकाधीन उपभोगात लक्षणीय पुनरुज्जीवन दिसून आले आहे.प्रमुख क्षेत्रीय चालक घटक (Main Sectoral Growth Driver)तिमाही ३FY२६ मधील कमाईची वाढ तेल आणि वायू (+२५%), एनबीएफसी कर्जपुरवठा (+२६%), ऑटोमोबाईल्स (+२५%), धातू (+१५%), दूरसंचार (मागील वर्षाच्या तुलनेत २.६ पट नफा वाढ), स्थावर मालमत्ता (+६४%), भांडवली वस्तू (+२४%) आणि सिमेंट (+६६%) या क्षेत्रांमुळे होईल अशी अपेक्षा आहे. या क्षेत्रांचा इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) कमाईमध्ये जवळपास ७७% वाटा असेल असा अंदाज आहे, तर पायाभूत सुविधा (Infrastructure) आणि मिडिया क्षेत्र कमकुवत राहण्याची शक्यता आहे.CY२६ साठी भारताची रणनीती (Next Strategy)मोतीलाल ओसवाल (MOFSL) चा विश्वास आहे की मजबूत मॅक्रो मूलभूत घटकांच्या आधारावर, भारतीय इक्विटीज २०२६ मध्ये जागतिक स्तरावरील कमी कामगिरीची काही प्रमाणात भरपाई करण्यासाठी चांगल्या स्थितीत आहेत. जीडीपी वाढ मजबूत आहे, महागाई नियंत्रणात आहे, आणि FY२५-२७ दरम्यान MOFSL च्या विश्वासाठी कमाईचा सीएजीआर (Compound Annual Growth Rate CAGR) १५% आणि निफ्टीसाठी १२% राहण्याचा अंदाज आहे.फर्मच्या पसंतीच्या गुंतवणूक क्षेत्रांमध्ये ऑटो, विविध वित्तीय सेवा, औद्योगिक आणि ईएमएस, ग्राहक विवेकाधीन वस्तू आणि तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. टॉप निफ्टी-५० कल्पनांमध्ये SBI, Titan, M&M, Infosys आणि Eternal यांचा समावेश आहे. पसंतीच्या नॉन-निफ्टी स्टॉक्समध्ये Dixon Technologies, Indian Hotels, Groww, TVS Motors आणि Radico Khaitan यांचा समावेश आहे. 'देशांतर्गत विकासाचे घटक दृढपणे स्थापित झाल्यामुळे आणि कमाईची गती वाढत असल्याने, भारत २०२६ कॅलेंडर वर्षात अधिक मजबूत स्थितीत प्रवेश करेल. जागतिक अनिश्चितता कायम असली तरी, बाह्य भावनांमध्ये कोणतीही सुधारणा विशेषतः भारत-अमेरिका व्यापार कराराद्वारे बाजाराच्या महत्त्वपूर्ण पुनर्मूल्यांकनासाठी एक महत्त्वाचा पूरक घटक ठरू शकते' असेही अहवालात यावेळी नमूद करण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 8 Jan 2026 4:30 pm

Election : निवडणुकीच्या तोंडावर भाजपची सर्वात मोठी कारवाई; ‘एवढ्या’जणांचे केले निलंबन

सोलापूर : महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे (Election) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या थेट इशाऱ्यानंतरही उमेदवारी मागे न घेणाऱ्या 28 कार्यकर्त्यांवर (Election) पक्षाने निलंबनाची कठोर कारवाई केली आहे. यामध्ये एक माजी उपमहापौर आणि सहा माजी नगरसेवकांचा समावेश आहे. हे सर्वजण सोलापूर महानगरपालिकेच्या १०२ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत स्वतंत्रपणे रिंगणात उतरले आहेत, ज्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना धोका निर्माण […] The post Election : निवडणुकीच्या तोंडावर भाजपची सर्वात मोठी कारवाई; ‘एवढ्या’ जणांचे केले निलंबन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 4:29 pm

EPFO ची भव्य योजना, कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 5 पट वाढ होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ लवकरच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या किमान मासिक पेन्शनवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. वाढती महागाई आणि जीवनमानाचा वाढलेला खर्च लक्षात घेता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अधिक चांगली आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी सध्याची १,००० रुपयांची किमान पेन्शन वाढवून […] The post EPFO ची भव्य योजना, कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 5 पट वाढ होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 4:14 pm

Bihar Crime NEWS:ट्रान्सजेंडरसोबत प्रेम, लग्न झाले, पण नको ते घडले…धक्कादायक घटना !

बिहार :प्रेमामध्ये माणुस काहीही करू शकतो. असच एका युवकाने ट्रान्सजेंडरसोबत लग्न केलं पण तिच गोष्ट त्याच्या अंगलट आली. बिहार मधील लखीसराय जिल्ह्यातील किउल पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. आरोपी मयताची पत्नी गुंजा, जिने ट्रान्सजेंडर असल्याचे सांगितले जाते, आपल्या प्रेमी संतोष कुमारसोबत कट रचून पती विनोद साहची हत्या करण्यास उत्तरदायी आहे. गुंजाने आपल्या प्रेमीस एक लाख रुपयांची सुपारी दिली आणि पतीला मार्गातून हटवण्याचा कट रचला.घटना २४ डिसेंबर २०२५च्या संध्याकाळची असून, विनोद साहला पत्नीने आमिष दाखवून किउल नदीकाठी नेले. तिथे संतोष कुमार आणि त्याचे तीन साथीदार राज नारायण, मोहम्मद आफताब आणि अजीत कुमार घात टाकून बसले होते. विनोद साह घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी ब्लेडने त्याचा गळा रेतून गंभीर जखमी केले. त्याला कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची माहिती पोलीसांना दिली, ही सर्व माहिती पोलीसांकडुन समोर आली आहे.आणि रात्री उशिरा नदीकाठी जखमी अवस्थेत सापडले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर गुंजा ट्रान्सजेंडरने पोलिसांना गुमराह करण्यासाठी खोट्या तक्रारी केल्या, मात्र SIT च्या सखोल चौकशीत तिची सर्व भूमिका उघडकीस आली. पोलिसांनी गुंजा, संतोष कुमार आणि तिघा साथीदारांना अटक केली आहे. हत्येत वापरलेले ब्लेड आणि रक्ताने माखलेले कपडे जप्त करण्यात आले आहेत.पोलीस अधीक्षक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली SIT ने हा प्रकरण तपासून आरोपींना न्यायिक कोठडीत पाठवले आहे. ही घटना प्रेम, विश्वासघात आणि हत्येचा धक्कादायक संगम म्हणून परिसरात शोककळा पसरवणारी ठरली आहे.

फीड फीडबर्नर 8 Jan 2026 4:10 pm

बाजारात 'ट्रम्प बॉम्ब'सलग आठव्यांदा शेअर बाजार धीरगंभीर! 'व्हाईटवॉश'मुळे सेन्सेक्स ७८०.१८ व निफ्टी २६३.९० अंकाने कोसळला

मोहित सोमण: आजचे शेअर बाजार सत्र हे गुंतवणूकदारांसाठी धीरगंभीर राहिले आहे. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ७८०.१८ अंकांने घसरला असून ८४१८०.९६ पातळीवर स्थिरावला आहे तर निफ्टी २६३.९० अंकांने घसरत २५८७६.८५ पातळीवर स्थिरावला आहे. त्यामुळे सेन्सेक्स ८४२०० व निफ्टी २५९२० पातळीही गाठण्यास अयशस्वी ठरला आहे. जागतिक दबावाचा फटका आज शेअर बाजारात प्रभावीपणे बसल्याने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली. त्यामुळे सलग आठव्या सत्रात शेअर बाजार घसरले आहे. युएस कडून संभावित ५००% टॅरिफ, जागतिक भूराजकीय दबाव, कमोडिटीतील डॉलर रूपये अस्थिरता, युएस बाजारातील कमकुवत आकडेवारी, निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील सेल ऑफ दबाव, आणि मिड स्मॉल कॅप शेअर्समध्येही झालेली पडझड अशा विविध कारणांमुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग झाले आहे. बँक निर्देशांकानेही आपला कल घसरणीकडेच असल्याचे स्पष्ट केले.आयटी, मेटल, पीएसयु बँक, तेल व गॅस, ऑटो, कंज्यूमर ड्युरेबल्स या शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे बाजार लाल रंगातच बंद झाला आहे. खासकरून आज अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) ६.५८% उसळला असल्याने बाजारातील घसरणीचा अंडकरंट स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान बाजारातील घरगुती गुंतवणूकदारांनी आपली खरेदी वाढल्याची शक्यता असल्याने सलग तिसऱ्या दिवशी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतलेल्या धक्क्याला ही गुंतवणूक पचवेल असा कयास आहे. ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही आज मोठी घसरण झाली आहे ज्यामध्ये टीसीएस, हिंदाल्को, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स सारखे शेअर घसरले आहेत. दरम्यान आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक अशा शेअर्समध्ये किरकोळ वाढ झाल्याचा बाजारात आधार मिळाला.निफ्टी व्यापक निर्देशांकातील (Nifty Broader Indices) निफ्टी १००, निफ्टी २००,स्मॉलकॅप १००, स्मॉलकॅप २५० निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली आहे. त्यामुळे आज बाजारात 'व्हाईट वॉश' झाल्याचे अधिक स्पष्ट होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी आज सोशल मिडियावर पोस्ट करत ५००% अतिरिक्त शुल्क बीलाला ट्रम्प हे मान्य करु शकतात म्हटल्यावर मोठ्या प्रमाणात या घडामोडींचा दबाव निर्माण झाला. विशेषतः मेटल, आयटी, कंज्यूमर ड्युरेबल्स या शेअर्समध्ये तणाव वाढला. दुसरीकडे युएस व्हेनेझुएला यांच्यातील युद्ध सदृश्य परिस्थिती असताना गुंतवणूकदारांनी कमोडिटी बाजारातही संमिश्रित प्रतिसाद दिला आहे.डॉलरच्या तुलनेत रुपयाची आज किरकोळ घसरण झाली आहे. तर युएसने व्हेनेझुएलावर ताबा घेतलेला असताना कच्च्या तेलाच्या वाढत्या पुरवठ्याच्या संभाव्यतेमुळे कच्च्या तेलात घसरण सुरू होती. मात्र युएसकडून रशियावरील तेलाबाबत सुरु केलेल्या निर्बंधासह इतर भूराजकीय अस्थिरतेत किंमतीत १% वाढ झाली आहे. सोनेचांदीतही अस्थिरतेसह आगामी पेरोल डेटातील आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याने कमोडिटीतील किंमती तुरळक घसरल्या आहेत. या घडामोडीचा बाजारात परिणाम होत असताना गिफ्ट निफ्टी सह आशियाई बाजारातही मोठी घसरण झाली आहे. कोसपी वगळता इतर सगळ्या निर्देशांकात घसरण झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स, एस अँड पी ५०० बाजारात घसरण झाली असून नासडाक कंपोझिट निर्देशांकात किरकोळ वाढ झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ अल्काईल (४.५०%), इंडिया सिमेंट (४.३८%), निवा बुपा हेल्थ (४.१७%), ट्रायडंट (३.२२%), सोभा (२.६८%), आयडीएफसी फर्स्ट बँक (१.३८%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण भेल (१०.४८%), सिग्नेचर ग्लोबल (१०.२९%), टीआरआयएल (९.२५%), शिंडलर इलेक्ट्रॉनिक्स (७.४१%), हिन्दुस्तान झिंक (६.२३%), हिंदुस्थान कॉपर (५.३३%) समभागात झाली आहे.

फीड फीडबर्नर 8 Jan 2026 4:10 pm

फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा! महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड, ब्रँड सांगणाऱ्यांचाच बँड वाजवू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याच दरम्यान ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत प्रसारित झाली. या मुलाखतीआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्ष पण थेट शब्दांत निशाणा साधला आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात एकच ब्रँड होता आणि तो म्हणजे हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यानंतर महाराष्ट्रात कोणीही ब्रँड नाही.” तसेच, स्वतःला ब्रँड म्हणवणाऱ्यांचा आम्ही निवडणुकीत “बँड वाजवू”, असा इशाराही त्यांनी दिला. महायुतीमध्ये कोणीही स्वतःला ब्रँड समजून जनतेसमोर येत असेल, तर त्याचा राजकीय बँड वाजवल्याशिवाय थांबणार नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.दरम्यान, भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले. “अजित पवार हे महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे आका आहेत,” असा आरोप करत,“भ्रष्टाचार लपवण्यासाठीच ते भाजपसोबत आले का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, “१५ तारखेनंतर जनता ठरवेल कोण काय आहे.”आगामी काळात शिवतीर्थावर ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ऐतिहासिक सभा होणार असल्याचं चित्र आहे. तसेच, “उल्हासनगरमध्ये गुंडाराज चालणार नाही,” असा ठाम इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला

फीड फीडबर्नर 8 Jan 2026 4:10 pm

Ruturaj Gaikwad Record : ऋतुराजचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात २२ वर्ष कोणाला जमलं नाही, ते मराठमोळ्या गड्याने करून दाखवलं

Ruturaj Gaikwad Record List A Cricket : भारताचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडने क्रिकेट जगतात असा पराक्रम केला आहे, जो आतापर्यंत जगातील कोणत्याही फलंदाजाला जमलेला नाही. त्याने ‘लिस्ट-ए’ (List A) क्रिकेटमध्ये सर्वाधिक फलंदाजी सरासरीचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू माइकल बेवनला मागे टाकले आहे. त्याने गोव्याविरुद्ध शतक झळकावत २२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याचा पराक्रम […] The post Ruturaj Gaikwad Record : ऋतुराजचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात २२ वर्ष कोणाला जमलं नाही, ते मराठमोळ्या गड्याने करून दाखवलं appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 4:10 pm

Stock Market: ट्रम्प यांच्या 500% टॅरिफच्या इशाऱ्याने शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स 780 अंकांनी कोसळला

Stock Market: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका आक्रमक भूमिकेमुळे भारतीय शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी मोठी पडझड पाहायला मिळाली. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ५०० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ लावण्याच्या विधेयकाला ट्रम्प यांनी पाठिंबा दर्शवला आहे. या बातमीने बाजारात भीतीचे वातावरण पसरले आणि सत्राच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स […] The post Stock Market: ट्रम्प यांच्या 500% टॅरिफच्या इशाऱ्याने शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स 780 अंकांनी कोसळला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 4:02 pm

PMC Election : निवडणूक जनतेने हातात घेतली आहे, लोकांच्या प्रेमाने भारावून गेलो; अमोल बालवडकरांनी व्यक्त केल्या भावना

बालेवाडी : येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा पारंपरिक पॅटर्न बदलताना दिसत असून, “निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे. मी मतदारांच्या भेटीला जातोच, पण आता अनेक ठिकाणी मतदार स्वतःहून माझ्या भेटीसाठी पुढे येत आहेत. ही निवडणूक केवळ प्रचाराची नाही; हा विश्वासाचा जनआंदोलनासारखा प्रवास आहे,” अशी भावना उमेदवार अमोल बालवडकर यांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांत […] The post PMC Election : निवडणूक जनतेने हातात घेतली आहे, लोकांच्या प्रेमाने भारावून गेलो; अमोल बालवडकरांनी व्यक्त केल्या भावना appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 3:57 pm

अंबरनाथमध्ये भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’यशस्वी; काँग्रेसच्या 12 निलंबित नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. स्थानिक पातळीवर भाजपशी हातमिळवणी केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने ज्या १२ नवनिर्वाचित नगरसेवकांना निलंबित केले होते, त्यांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत हा सोहळा पार पडला. यामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेसला […] The post अंबरनाथमध्ये भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी; काँग्रेसच्या 12 निलंबित नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 3:49 pm

Russia-Ukraine war : ट्रम्प यांचा निर्बंध विधेयकाला हिरवा कंदील; युक्रेन युद्धावर निर्णायक वळण

Donald Trump | Russia-Ukraine war – युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या धोरणात महत्त्वाचा बदल दिसून येत आहे. रिपब्लिकन सेनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी स्पष्ट केले आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर कडक आर्थिक निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला आता हिरवा कंदील दिला आहे. या निर्बंधांचा उद्देश मॉस्कोला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणे असून, त्याच वेळी ट्रम्प प्रशासन युद्ध संपवण्यासाठी शांतता […] The post Russia-Ukraine war : ट्रम्प यांचा निर्बंध विधेयकाला हिरवा कंदील; युक्रेन युद्धावर निर्णायक वळण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 3:39 pm

वाहनचालकांनो लक्ष द्या! पुणे आणि सासवडला जोडणारा बोपदेव घाट 7 दिवस वाहतुकीसाठी बंद

Bopdev Ghat : पुणे आणि सासवडला जोडणाऱ्या बोपदेव घाटातील रस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणाच्या कामामुळे हा मार्ग गुरुवार, ८ जानेवारी ते १४ जानेवारी या सात दिवसांच्या कालावधीसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहितीनुसार, बोपदेव घाटात सध्या रस्त्याचे विस्तारीकरण आणि खडीकरणाचे काम सुरू आहे. कामाचा दर्जा आणि प्रवाशांची सुरक्षा […] The post वाहनचालकांनो लक्ष द्या! पुणे आणि सासवडला जोडणारा बोपदेव घाट 7 दिवस वाहतुकीसाठी बंद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 3:37 pm

Mamata Banerjee : सूडबुद्धीने ईडीकडून छापेमारी; ममता बॅनर्जी यांची टीका

कोलकता : सक्तीवसुली संचालनालयाने (ईडी) केवळ राजकीय सूडाच्या पोटी तृणमूल काँग्रेस आयटी प्रमुख प्रतीक जैन यांच्या घरावर छापा टाकला आहे. सर्व तपास यंत्रणा केंद्राच्या हातात असल्याने विरोधकांना या देशात जगणेही मुश्कील झाले आहे. मात्र आगामी निवडणुकीत मतदार अशा पक्षाच्या नेत्यांना नक्कीच घरी बसवतील, असे प्रतिपादन तृणमूल काॅंग्रेसच्या सर्वेसर्वा आण्इ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी […] The post Mamata Banerjee : सूडबुद्धीने ईडीकडून छापेमारी; ममता बॅनर्जी यांची टीका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 8 Jan 2026 3:35 pm

भेल कंपनीकडून गुड न्यूज तरीही थेट १०% शेअर कोसळला

मोहित सोमण: काही ब्रोकरेज कंपन्यांनी सरकारी मालकीची भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL) कंपनीच्या शेअर्समध्ये मार्चपर्यंत टेक्निकली बुलिश ट्रेंड अधोरेखित केला होता. तरीही भेल कंपनीच्या शेअर्समध्ये आज दिवसभरात १०% इंट्राडे उच्चांकावर घसरला आहे. दुपारी २.५२ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ९.२१% घसरण झाल्याने प्रति शेअर दर २७५.६० रूपये सुरू आहे. खर तर कंपनीने आज नव्या पुरवठ्याबाबत एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. भेलने वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रकल्पासाठी सेमी-हाय-स्पीड अंडरस्लंग ट्रॅक्शन कन्व्हर्टर्सचा पुरवठा सुरू केला असल्याचे कंपनीने आज स्पष्ट केले.भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) ने रेल्वे वाहतूक क्षेत्रासाठीच्या आपल्या 'मेक इन इंडिया' उपक्रमांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला असल्याचे कंपनीने आज म्हटले. आपल्या निवेदनात,' भेलच्या नेतृत्वाखालील टीआरएसएल (TRSL) सोबतच्या कन्सोर्टियमद्वारे राबवल्या जात असलेल्या प्रतिष्ठित वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रकल्पासाठी अंडरस्लंग ट्रॅक्शन कन्व्हर्टर्सचा पुरवठा सुरू केला आहे.' असे म्हटले. या निमित्ताने, आज भेलच्या बंगळूर येथील प्लांटमध्ये ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. भेलच्या संचालक (आयएस अँड पी), सुश्री बानी वर्मा यांनी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत,वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी खास डिझाइन केलेल्या सेमी-हाय-स्पीड अंडरस्लंग ट्रॅक्शन कन्व्हर्टर्सच्या पहिल्या संचाला हिरवा झेंडा दाखवला आहे असे कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनात स्पष्ट केले आहे. भेलचे संचालक (आर अँड डी), एस एम रामनाथन आणि टीआरएसएलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उमेश चौधरी या समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, यामुळे भेलने सेमी-हाय-स्पीड प्रोपल्शन सेगमेंटमध्ये धोरणात्मक प्रवेश केला आहे. हे ट्रॅक्शन कन्व्हर्टर्स वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या अंतिम असेंब्लीसाठी कोलकाता येथे पाठवले जात आहेत. याव्यतिरिक्त, या गाड्यांसाठी ट्रॅक्शन मोटर्स आणि ट्रान्सफॉर्मर्ससारखी इतर प्रमुख प्रोपल्शन उपकरणे भेलच्या भोपाळ आणि झांसी युनिट्सद्वारे विकसित आणि उत्पादित केली गेली आहेत.अत्याधुनिक आयजीबीटी आधारित ट्रॅक्शन कन्व्हर्टर्सने सुसज्ज असलेल्या या अंडरस्लंग डिझाइनमुळे प्रोपल्शन उपकरणे ट्रेनच्या डब्याखाली बसवली जातात, ज्यामुळे प्रवाशांच्या सुविधांसाठी डब्यात बरीच जागा मोकळी होते आणि ट्रेनची एकूण पेलोड क्षमता वाढते असेही कंपनीने म्हटले.या प्रोपल्शन प्रणालीच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये १७६ किमी प्रतितास डिझाइन गतीसह १६० किमी प्रतितास पर्यंतची गती आणि लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासादरम्यान विश्वसनीयता सुनिश्चित करण्यासाठी प्रगत थर्मल व्यवस्थापनाचा वापर करून उच्च दर्जाची कार्यक्षम ऊर्जा रूपांतरण यांचा समावेश आहे असेही कंपनीने म्हटले.ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील देशातील अग्रगण्य उत्पादन पीएसयु कंपनी भेल ऊर्जा,वाहतूक, संरक्षण आणि उद्योग क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम स्वदेशी उपाय ग्राहकांना प्रदान करते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लोकोमोटिव्ह आणि डिस्ट्रिब्युटेड पॉवर ट्रेन्ससाठी जटिल तंत्रज्ञानाचे यशस्वीपणे स्वदेशीकरण करून, भेल वाहतूक आणि रोलिंग स्टॉक क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने प्रवास करत आहे. ही मोठी अपडेट असतानाही कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली. शेअर बाजारातील अस्थिरतेचा व मागणीपेक्षा पुरवठा अधिक राहिल्याचा फटका शेअरला बसला होता.सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत, कंपनीचा निव्वळ नफा इयर ऑन इयर बेसिसवर ३०२.७% वाढून ३६०५ दशलक्ष रुपये झाला, जो मागील वर्षी याच तिमाहीत ८९५ दशलक्ष रुपये होता. या कालावधीत निव्वळ विक्री १४.१% वाढून ७५११८ दशलक्ष रुपये झाली, तर जुलै-सप्टेंबर २०२४ मध्ये ती ६५८४१ दशलक्ष रुपये होती.मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी, BHEL ने निव्वळ नफ्यात ८९.२% वाढ नोंदवली असून तो ५,३३९ दशलक्ष रुपये झाला आहे, तर आर्थिक वर्ष २४ मध्ये निव्वळ नफा २,८२२ दशलक्ष रुपये होता. वास्तविकता शेअर गेल्या ४ महिन्यात ४४% घसरले आहेत. काल कंपनीच्या शेअर्समध्ये ३% वाढ बीएसईत (Bombay Stock Exchange NSE) वाढ झाल्याने शेअर १७ आठवड्यातील सर्वाधिक पातळीवर म्हणजेच ३०५.८५ रूपये प्रति शेअरवर पोहोचले होते. तत्पूर्वी नोव्हेंबर २००७ मध्ये शेअर ३९० रुपये प्रति शेअर या नव्या उच्चांकावर पोहोचले होते. गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये ६.५२% घसरण व एक महिन्यात १.३०% वाढ झाली आहे. गेल्या १ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये २३.४१% वाढ झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) ६.२८% घसरण झाली आहे.

फीड फीडबर्नर 8 Jan 2026 3:30 pm