Baramati Election: बारामतीच्या या हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत बिचुकले काय चमत्कार घडवतात आणि त्यांच्या 'राजकीय बॉम्ब'मध्ये नेमके काय असणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Suryakumar Yadav React : सूर्यकुमार यादवने या पराभवानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, फलंदाजांच्या अपयशामुळेच हा सामना हातातून गेल्याचे त्याने कबूल केले आहे.
तुम्ही एसी आणि इंडक्शन एकाच वेळी वापरत असाल तर सावधान; तुम्हाला दंड होऊ शकतो
मुंबई: एलपीजी सिलिंडरच्या कमतरतेमुळे लोकांनी आपल्या घरात इंडक्शन कुकटॉप वापरायला सुरुवात केली आहे. उन्हाळ्यात एसीची सुद्धा गरज असते. जर तुम्ही एकाच वेळी एसी आणि इंडक्शन स्टोव्ह वापरत असाल, तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तुम्हाला वीज विभागाकडून मोठ्या दंडासह नोटीस सुद्धा मिळू शकते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे का होईल?वीज विभागाकडून नोटीस येईल का?घरासाठी वीज कनेक्शन घेताना लोक साधारणपणे १ किंवा २ किलोवॅटचा भार गृहीत धरतात. यामुळे तुम्हाला घरातील मूलभूत दिवे, पंखे, कुलर आणि एसी चालवता येतो. इंडक्शन आणि एसी दोन्ही एकाच वेळी चालवल्यास भार मर्यादा ओलांडली जाते, ज्यामुळे वीज विभागाकडून नोटीस येऊ शकते. शिवाय, तुमच्या घराचे वीज बिल वाढलेल्या भाराच्या आधारावर मोजले जाते.२००० किलोवॅटचा इंडक्शन स्टोव्ह वापरताना, तो साधारणपणे २ किलोवॅटचा भार घेतो. त्याच वेळी, जर तुम्ही घरी १.५ टनाचा एसी चालवत असाल, तर तो देखील सुमारे १ ते १.५ किलोवॅटचा भार घेईल. अशा प्रकारे, एकूण भार ३.५ किलोवॅट होईल. उन्हाळ्याच्या दिवसात तुमच्या घरात पंखे, कुलर किंवा इतर उपकरणे देखील चालवली जातात, ज्यामुळे एकूण भार ४ किलोवॅटपेक्षा जास्त होऊ शकतो. जर तुमचे २ किलोवॅटचे कनेक्शन असेल आणि तुम्ही ४ किलोवॅट वीज वापरत असाल, तर तुम्हाला नोटीस मिळू शकते. काहीवेळा, तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतो.हे कसे टाळावे?एलपीजीच्या तुटवड्यामुळे लोकांना इंडक्शन कुकर वापरणे भाग पडत आहे. त्यामुळे, इंडक्शन कुकर वापरताना तुम्ही तुमच्या एसीवर जास्त भार टाकणार नाही याची खात्री करा. यामुळे तुमच्या कनेक्शनसाठी निर्धारित केलेल्या मर्यादेत एकूण वीज भार राहील. याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या कनेक्शनचा भार वाढवण्यासाठी वीज विभागाकडे अर्ज करू शकता. तुम्ही तुमच्या कनेक्शनचा भार ५ किलोवॅटपर्यंत वाढवू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला अतिरिक्त भारवाढ शुल्क लागू शकते. एसी किंवा इंडक्शन चालू असताना, गरज नसताना घरातील इतर विद्युत उपकरणे बंद करावीत, जेणेकरून विजेचा भार कमी होईल आणि बिलही कमी येईल.
मी इराणला करार करण्यासाठी आणि होर्मूझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली होती.
Maharashtra Politics : शरद पवार गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला; चाकूने सपासप केले वार
Maharashtra Politics : मुंबईतील पवई परिसरात राष्ट्रवादी (शरद पवार गट) युवा जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे.
Raghav Chadha: राघव चड्ढा यांची ही कमेंट पाहताच चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला.
Accident News : महाराष्ट्रात अपघातांचे तांडव! नाशिकनंतर धुळ्यात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
Accident News : धुळे-सुरत महामार्गावर तामसवाडी फाट्याजवळ वऱ्हाड्यांच्या गाडीला अपघात होऊन ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
Payal Nag Gold Medal : पायल नागची कमाल! जागतिक विजेत्या शीतल देवीला नमवत पटकावलं सुवर्णपदक
Payal Nag Gold Medal : आर्चरी पॅरा सिरीज २०२६ मध्ये भारताच्या पायल नाग हिने महिला कंपाउंड प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
Mumbai Local News Update : पश्चिम रेल्वेवर धावणार १५ डब्याच्या लोकल ; वांद्रे स्थानकावरून....
मुंबई : मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता उपनगरी रेल्वे व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण होत आहे. विशेषतः ऑफिसच्या वेळेत लोकल गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी ही प्रवाशांसाठी मोठी समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून १५ डब्यांच्या लोकल गाड्यांचा विस्तार करण्याची तयारी सुरू आहे.गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊलसध्या पश्चिम रेल्वे मार्गावर अंधेरी ते विरार या दरम्यान काही प्रमाणात १५ डब्यांच्या लोकल गाड्या धावत आहेत. या गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, शिवाय या सेवेचा आणखी विस्तार व्हावा अशी मागणी नागरिक करत आहेत. विशेषतः वांद्रेपर्यंत या गाड्यांचा विस्तार केल्यास मुंबईच्या उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.पायाभूत कामांना वेग१५ डब्यांच्या लोकल गाड्या चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांवर सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. वांद्रे, खार रोड, सांताक्रूझ आणि विलेपार्ले या स्थानकांवर फलाटांचा विस्तार केला जात आहे. याशिवाय रुळांमध्ये सुधारणा, ओव्हरहेड वायरचे काम आणि सिग्नल प्रणाली अद्ययावत करण्याचे कामही सुरू आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच १५ डब्यांच्या लोकल गाड्या या मार्गावर नियमितपणे धावू शकतील.डिसेंबर २०२६पर्यंत काम होईल पूर्णरेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे सर्व काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर वांद्रे स्थानकावरून १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे प्रवाशांची गर्दी विभागण्यास मदत होईलप्रवाशांना दिलासा मिळणारया प्रकल्पामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. गर्दीच्या वेळेत होणारी चेंगराचेंगरी आणि असुविधा कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवास मुंबईकरांना करता येणार आहे.
‘महाराष्ट्र ज्ञान सभा-2026’राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटननागपूर : वैश्विक ज्ञानाचे भारतीयीकरण व भारतीय ज्ञानाचे वैश्विकरण करणे, हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. केवळ ऐतिहासिक बाबींचा गौरवपूर्ण उल्लेख करुन आम्ही महान होणार नाही, तर यासह वर्तमान आणि भविष्याची वैश्विक आव्हाने लक्षात घेऊन त्यानुसार आमच्या शैक्षणिक पद्धतीला दिशा द्यावी लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज येथे केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, विश्वेश्वरैया राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्था, आयआयएम नागपूर आणि शिक्षा संस्कृती उत्थान न्यास, नवी दिल्ली या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने व्हीएनआयटी येथे ‘महाराष्ट्र ज्ञान सभा-2026 : विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण’या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राचे विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय सचिव अतुल कोठारी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, आयआयएम नागपूरचे संचालक भीमराया मेत्री, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मनाली क्षीरसागर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु प्रशांत बोकारे, व्हीएनआयटीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष मदाभूशी मदन गोपाल, संचालक डॉ. प्रेमलाल पटेल, लघु उद्योग भारतीचे रवनीत खुराना या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज जग अत्यंत वेगाने पुढे जात आहे. पहिली औद्योगिक क्रांती 1760 मध्ये आली होती. त्यानंतरच्या आलेल्या तीन औद्योगिक क्रांतींचा काळ हा सुमारे अडीचशे वर्षांचा आहे. मात्र, मागील पंधरा वर्षांतच तीन औद्योगिक क्रांतींचा अनुभव जगाने घेतला आहे. बदलांची गती लक्षात घेतली नाही, तर आम्ही मागे राहू शकतो. या क्रांतीला गती देणारे ‘एआय’आणि ‘डीप टेक्नॉलॉजी’च्या विकासात भारतीयांचे अत्यंत मोलाचे योगदान राहिले आहे. आम्हाला शैक्षणिक धोरणातून असे मानव संसाधन घडवायचे आहे, ज्यात व्यक्तीमध्ये सर्वंकष विकासासह नैतिक व व्यावसायिक गुणांचे रोपणही अपेक्षित आहे. भौतिक, नैतिक, शारीरिक क्षमतेसह व्यावसायिक म्हणून ती व्यक्ती देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारीही ठरावी, अशी अपेक्षा आहे. जागतिक ज्ञान आणि भारतीय ज्ञान व्यवस्थेचा मेळ साधणारी आणि जागतिक आव्हानांचा सामना करणारी शिक्षण पद्धती आम्हाला विकसित करायची आहे, याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.मुख्यमंत्री म्हणाले, साठ टक्के नोकऱ्यांचे स्वरुप येत्या एक हजार दिवसांमध्येच बदलणार आहे. डीप टेक व एआय तंत्रज्ञान सर्व क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढेल, असा याचा अर्थ नाही. देशात संगणक क्रांती आली, त्यावेळीही अशीच चर्चा सुरु झाली होती. मात्र, आम्ही त्या क्षेत्रातही आमचा ठसा उमटविला होता. तंत्रज्ञान कधीच थांबत नाही. अशावेळी तंत्रज्ञानासोबत आपणही पुढे जाण्याची गरज आहे. विद्यापीठे तसेच शिक्षकांनी आजच्या काळात कुठले विषय सुसंगत व अनुरूप आहेत, याचाही विचार करण्याची गरज आहे. पंधरा वर्षात तीन औद्योगिक क्रांती येणार असतील, तर समाजात काहीही स्थायी राहू शकत नाही. प्रत्येकाला नव्या पद्धती स्विकाराव्या लागतील व शैक्षणिक क्षेत्र त्यासाठी अनुकूल करून घ्यावे लागेल आणि ज्ञानाचा प्रवाह पुढे न्यावा लागेल, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.विदेशी विद्यापीठांना आम्ही अनुकूल नव्हतो, असाही एक काळ होता. कारण त्यावेळी आम्ही त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नव्हतो. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. नवी मुंबईत आम्ही एज्युसिटी विकसित करत आहोत. त्यात अनेक विदेशी विद्यापीठाचे शिक्षण कमी खर्चात घेण्याची संधी आमच्या मुलांना उपलब्ध होणार आहे. आमच्या विद्यापीठांनीही या स्पर्धेत उतरून शिक्षणाचा तो स्तर गाठायला हवा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.याप्रसंगी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे ‘बेस्ट प्रॅक्टीसेस ऑफ गोंडवाना युनिव्हर्सिटी’ या पुस्तिकेचे प्रकाशनही याप्रसंगी पार पडले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मनाली क्षीरसागर यांनी आभार मानले. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशभरातील शिक्षण व उद्योग क्षेत्राशी निगडित तज्ज्ञ आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. नव्या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातून विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण या थीमवर आधारित महाराष्ट्र ज्ञान सभेचे हे आयोजन होत आहे.
Akola Crime News : अकोला हादरलं! 'धुरंधर'सिनेमा पाहून आले अन् दिवसाढवळ्या तिघांवर सपासप वार
अकोला : नांदेडमधील तिहेरी हत्याकांड ताजे असतानाच आता अकोला शहरातही तशीच धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील कौलखेड भागात 'धुरंधर २' हा चित्रपट पाहून आलेल्या नशेखोर तरुणांच्या एका टोळीने दिवसाढवळ्या धुमाकूळ घालत तिघांवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण अकोला शहरात भीतीचे सावट पसरले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, कौलखेडमधील श्रद्धानगर ३ परिसरात ही घटना घडली. नशेच्या धुंदीत असलेल्या या टोळीने हातात चाकू आणि लोखंडी पाईप घेऊन परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. अभिलाष अरविंद हिंगे (३२) यांच्यावर या टोळीने अमानुष हल्ला केला, ज्यात ते गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर या टोळीने आपला मोर्चा कौलखेड चौकाकडे वळवला आणि तिथे रवी उर्फ छोटू ठाकरे (२४) या तरुणावरही चाकूने हल्ला केला. या टोळीचा हैदोस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो थरार पाहून अंगावर काटा येतो.पोलिसांची कारवाई आणि संतापघटनेची माहिती मिळताच खदान पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र, खदान पोलिसांच्या दुर्लक्षित धोरणामुळेच गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. नांदेडमध्येही 'धुरंधर' चित्रपट पाहून आलेल्या तरुणांनी तिघांची हत्या केल्याची घटना घडली होती, त्याच धर्तीवर अकोल्यातही ही घटना घडल्याने या चित्रपटाचा तरुणांवर होणारा परिणाम चिंतेचा विषय ठरत आहे.
Volkswagen Taigun Facelift : व्होल्क्सवॅगन टायगुन फेसलिफ्ट ९ एप्रिलला होणार लॉन्च
मुंबई : व्होल्क्सवॅगन टायगुन फेसलिफ्ट ही एसयूव्ही भारतीय बाजारात लवकरच दाखल होणार असून कंपनीने तिची लॉन्च डेट ९ एप्रिल निश्चित केली आहे. लॉन्चपूर्वीच व्होल्क्सवॅगन इंडियाने या कारची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. साइड प्रोफाइलची धूसर प्रतिमा जरी समोर आली असली तरी त्यातून कारच्या डिझाइनमध्ये होणाऱ्या बदलांची चांगलीच कल्पना मिळत आहे.टिझर इमेजचा उजळलेला व्हर्जन पाहिल्यास नव्या टायगुनमध्ये अधिक शार्प आणि पत्तीच्या आकाराचे हेडलॅम्प दिसून येतात. हे डिझाइन कंपनीच्या ग्लोबल एसयूव्ही मॉडेल्सप्रमाणेच असल्याचे जाणवते. पुढील बंपरमध्येही बदल करण्यात आले असून तो अधिक स्पोर्टी आणि आकर्षक दिसतो. साइड प्रोफाइलमध्ये नवीन डिझाइनचे अलॉय व्हील देण्यात आले आहेत, ज्यामुळे कारला अधिक प्रीमियम लुक मिळतो. मागील बाजूस टेललॅम्पमध्ये नवीन एलईडी लाइट गाईड डिझाइन देण्यात आले असून कनेक्टेड लाइटिंगचा ट्रेंड कायम ठेवण्यात आला आहे. रिअर बंपरचाही डिझाइन अपडेट करण्यात येणार आहे.इंटरनेटवर समोर आलेल्या काही लीक इमेजमधून असे दिसते की या अपडेटेड एसयूव्हीचा फ्रंट-एंड डिझाइन कंपनीच्या जागतिक मॉडेल्सशी सुसंगत असेल. हेडलॅम्प्सदरम्यान एक स्लिम ग्रिल देण्यात येईल, तसेच ग्रिलच्या वरच्या भागावर एलईडी लाइटबार आणि मध्यभागी इल्यूमिनेटेड व्हीडब्ल्यू लोगो असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे कारचा लुक अधिक मॉडर्न आणि टेक-फ्रेंडली होणार आहे.कारच्या इंटेरियरमध्येही मोठे बदल अपेक्षित आहेत. फेसलिफ्टेड स्कोडा कुशाक प्रमाणेच टायगुनमध्ये १०.२५ इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अपडेटेड टचस्क्रीन सिस्टम, पॅनोरमिक सनरूफ आणि मागील सीटसाठी मसाज फंक्शनसारखे प्रीमियम फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही एसयूव्ही केवळ लुक्समध्येच नव्हे तर कम्फर्ट आणि टेक्नॉलॉजीमध्येही एक पाऊल पुढे जाणार आहे.इंजिनच्या बाबतीत मात्र कंपनी मोठे बदल करण्याची शक्यता कमी आहे. या फेसलिफ्टमध्ये १.० लिटर टीएसआय पेट्रोल आणि १.५ लिटर टीएसआय पेट्रोल इंजिन ऑप्शन कायम ठेवले जातील. मात्र १.० लिटर इंजिनसाठी सध्या मिळणाऱ्या ६-स्पीड ऑटोमॅटिकच्या जागी नवीन ८-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात येऊ शकतो. स्टँडर्ड ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स कायम राहील, तर १.५ लिटर इंजिनसोबत डीएसजी गिअरबॉक्सच मिळण्याची अपेक्षा आहे.एकूणच, व्होल्क्सवॅगन टायगुन फेसलिफ्टमध्ये डिझाइन, फीचर्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये महत्त्वाचे अपडेट्स देऊन कंपनी भारतीय ग्राहकांना अधिक प्रीमियम अनुभव देण्याच्या तयारीत आहे. ९ एप्रिलला लॉन्चनंतर या एसयूव्हीची किंमत आणि पूर्ण स्पेसिफिकेशन स्पष्ट होणार असून बाजारात तिची स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Uttar Pradesh: मेड असल्याचे सांगत महिलेने केले घर साफ; स्त्रीला बेशुद्ध करून...
उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडातील एका सोसायटीत वृद्ध महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्या घरात चोरी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला मोलकरीण म्हणून कामावर आली, तिने त्या वृद्ध महिलेला बेशुद्ध करुन तिचे मंगळसूत्र, रोकड आणि घरातील इतर वस्तू चोरून पसार झाली. ही घटना बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आम्रपाली किंग्स वूड गोल्ड होम्स सोसायटीमध्ये घडली, जिथे शांती मिश्रा नावाची महिला आपल्या सुनेसोबत राहते. असे सांगितले जात आहे की, तिची सून बऱ्याच काळापासून मोलकरणीच्या शोधात होती.नेमकं काय घडलं?एक स्त्री शुक्रवारी दुपारी शांती मिश्रा यांच्या फ्लॅटवर आली. जेव्हा शांती मिश्रा यांनी दरवाजा उघडला, तेव्हा त्या स्त्रीने सांगितले की ती मोलकरीण म्हणून कामावर आली आहे. त्यावेळी शांती मिश्रा यांनी तिला संध्याकाळी यायला सांगितले. तसेच त्यांची सून घरी नाही असेही सांगितले. त्याचवेळी, त्या स्त्रीने तिच्या हातात काहीतरी घेतले आणि शांती मिश्रा यांना त्याचा वास घ्यायला लावला, ज्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. शांती मिश्रा यांनी सांगितले की, त्यानंतर त्या स्त्रीने फ्लॅटमध्ये चोरी करण्यास सुरुवात केली. रोख रक्कम, त्यांचे मंगळसूत्र आणि इतर वस्तू चोरल्या.वृद्ध महिलेला बेशुद्ध करुन केली चोरीघटनेनंतर सुमारे तासाभराने त्या वृद्ध महिलेला शुद्ध आली. तेव्हा तिच्या लक्षात आले की घरातील सामान विखुरलेले होते आणि अनेक वस्तू चोरीला गेल्या होत्या. त्यानंतर तिने आपल्या शेजाऱ्यांना आणि नंतर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्या वृद्ध महिलेने त्यांना संपूर्ण घटना सांगितली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते जवळपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.बिसरख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेची सून घरकामात मदत करण्यासाठी मोलकरणीच्या शोधात होती. याच संदर्भात, एक महिला त्यांच्या फ्लॅटवर आली आणि तिने हा गुन्हा केला. गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने इराणी कच्च्या तेलाचा एक कार्गो पेमेंटशी संबंधित अडचणींमुळे गुजरातमधील वाडीनार येथून चीनकडे वळवण्यात आल्याच्या बातम्या तथ्यात्मकदृष्ट्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे सांगत फेटाळून लावल्या आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने शनिवारी एक्स पोस्टमध्ये त्या अलीकडील अहवालांना नाकारले, ज्यामध्ये असे म्हटले होते की पेमेंटशी संबंधित अडचणींमुळे इराणहून येणाऱ्या कच्च्या तेलाची एक खेप भारताऐवजी चीनकडे पाठवण्यात आली. मंत्रालयाने या दाव्यांना तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे असे म्हटले आणि देशाची ऊर्जा पुरवठा व्यवस्था पूर्णपणे सुरक्षित असल्याचा विश्वास व्यक्त केला.मंत्रालयाने सांगितले, “इराणी कच्च्या तेलाचा एक कार्गो ‘पेमेंटशी संबंधित अडचणीं’मुळे भारतातील वाडीनार येथून चीनकडे वळवण्यात आल्याच्या बातम्या आणि सोशल मीडिया पोस्ट तथ्यात्मकदृष्ट्या चुकीच्या आहेत.” मंत्रालयाने असेही सांगितले की इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियात निर्माण झालेल्या अडथळ्यांनंतरही भारतीय रिफायनरी कंपन्यांनी इराणकडून होणाऱ्या पुरवठ्यासह त्यांच्या कच्च्या तेलाच्या गरजा आधीच पूर्ण केल्या आहेत.कच्च्या तेलाच्या व्यापारात जहाजांचे मार्ग बदलणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. समुद्रात प्रवास करणारे कार्गो अनेकदा व्यापारातील अनुकूलता आणि कार्यप्रणालीतील लवचिकतेच्या आधारावर प्रवासादरम्यान आपले गंतव्य बदलतात. मंत्रालयाने स्पष्ट केले की इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पश्चिम आशियात निर्माण झालेल्या अडथळ्यांनंतरही भारतीय रिफायनरींनी त्यांच्या कच्च्या तेलाच्या गरजा आधीच पूर्ण केल्या आहेत, ज्यामध्ये इराणकडून होणारा पुरवठाही समाविष्ट आहे. मंत्रालयाने असेही सांगितले की इराणी कच्च्या तेलाच्या आयातीत पेमेंटसंबंधी कोणतीही अडचण नाही, जशी अफवा पसरवली जात आहे. तसेच भारत 40 पेक्षा अधिक देशांकडून कच्चे तेल आयात करतो आणि कंपन्यांना त्यांच्या व्यावसायिक गरजांनुसार स्त्रोत बदलण्याची पूर्ण मुभा आहे, असेही मंत्रालयाने नमूद केले.पेट्रोलियम मंत्रालयाचे हे स्पष्टीकरण या आठवड्याच्या सुरुवातीला आलेल्या त्या अहवालांनंतर आले आहे, ज्यामध्ये असे म्हटले होते की अमेरिकेने निर्बंध घातलेल्या ‘पिंग शुन’ या टँकरने, जो इराणी कच्चे तेल घेऊन जात होता, सुरुवातीला भारतातील वाडीनार बंदर हे आपले गंतव्य दर्शवले होते, परंतु नंतर त्याने चीनकडे मार्ग बदलला.याशिवाय, पेट्रोलियम मंत्रालयाने द्रवरूप पेट्रोलियम वायू (एलपीजी) पुरवठ्याशी संबंधित चिंतांवरही भाष्य केले आणि काही दावे चुकीचे असल्याचे सांगितले. मंत्रालयाने सांगितले की ‘सी बर्ड’ नावाचे एलपीजी जहाज, ज्यामध्ये सुमारे 44,000 टन इराणी एलपीजी भरलेले आहे, ते 2 एप्रिल रोजी मंगळुरू येथे पोहोचले असून सध्या माल उतरवण्याचे काम सुरू आहे.उल्लेखनीय आहे की कच्च्या तेलाच्या बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या केप्लर या संस्थेने दावा केला होता की इराणहून सुमारे 6 लाख बॅरल कच्चे तेल घेऊन भारताकडे येणारे एक जहाज अचानक आपला मार्ग बदलून चीनकडे निघाले. ‘पिंग शुन’ नावाचे हे जहाज गुरुवारी रात्रीपर्यंत अरबी समुद्रात भारताच्या दिशेने येत होते आणि गुजरातमधील वाडीनार बंदरात पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र गंतव्याजवळ पोहोचण्याआधीच त्याने आपली दिशा बदलली. एजन्सीने असे म्हटले होते की जहाजाने आता आपले घोषित गंतव्य भारताऐवजी चीनकडे बदलले आहे, ज्यामुळे या अचानक बदलाबाबत प्रश्न निर्माण झाले होते.
Nashik Accident: या घटनेने रस्ते बांधणी करताना सुरक्षेचे नियम पाळले जातात का? रस्त्याशेजारील उघड्या विहिरी मृत्यूचे सापळे बनत आहेत का? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी आता जोर धरत आहे.
Raghav chadha Video : घायल हूँ, इसलिए घातक हूँ.! आपच्या आरोपांना राघव चड्ढांचे जोरदार प्रत्युत्तर
संसदेत नेहमीच पंजाबचे पाणी, दिल्लीतील वायू प्रदूषण, सरकारी शाळांची दुरावस्था, रेल्वे प्रवाशांच्या समस्या, जीएसटी, महागाई आणि बेरोजगारी यांसारख्या सामान्य माणसाशी निगडित मुद्द्यांवर आवाज उठवला आहे.
DC vs MI : दिल्लीचा युवा फलंदाज सिमर रिझवी याने खेळलेल्या वादळी खेळीमुळे मुंबईच्या गोलंदाजांची दाणादाण उडाली आणि दिल्लीने सलग दुसरा विजय नोंदवला.
मुंबई : मुंबईतील जुन्या बांधकामाचे पुनरुज्जीवन करून मुंबई आता पूर्णपणे नव्याने उदयाला येत आहे. त्यात ब्रिटिशकालीन असलेले मुंबईतील अनेक इतिहासकालीन पुलांचे बांधकाम नव्याने केले जात आहे. ११३ वर्ष जुना असलेला प्रभादेवीचा पूल हा त्यातीलच एक...११३ वर्ष जुना आणि ऐतिहासिक एल्फिन्स्टन पूल १२ सप्टेंबर २०२५ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पाडकामाला सुरुवात करण्यात आली होती. आणि आता त्यानंतर आज ४ एप्रिल रोजी मध्यरात्रीपासून अंतिम पाडकाम मध्य रेल्वेकडून केले जाणार आहे.डबल डेकर पुलाचे नियोजनप्रभादेवीचा उड्डाणपूल हा वरळी- शिवडी प्रकल्पाचा भाग असलेला ब्रिटिशकालीन पूल आहे. हा पूल पाडून त्या जागी नवीन डबलडेकर पूल उभारण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( MMRDA ) यांनी केले आहे. शिवाय या कामाची जबाबदारी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याकडे आहे.लोकलवर होणारा परिणामप्रभादेवीच्या पुलाच्या कामामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवर परिणाम होणार आहे प्रभादेवीच्या पुलामुळे अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाडी दादर आणि भायखळा मार्गे जणार आहे. प्रभादेवी पुलाचे मध्य रेल्वे भागातील पॅनल काढण्यासाठी शनिवारी रात्री १०.३० वाजल्यापासून ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. शेवटचा आणि मुख्य ब्लॉक काढण्याचे काम शनिवारी रात्री ११.३० वाजता सुरु होणार असले तरी ओव्हर हेड वायर हटविण्यासाठी संपूर्ण मार्गिका १ तास आधी बंद ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे सीएसएमटी ते दादर रेल्वेस्थानक दरम्यानच्या उपनगरीय सेवा पूर्णपणे बंद राहतील.पूर्व आणि पश्चिम मुंबईत वाहतूक कोंडीमुंबईतील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा हा ११३ वर्ष जुना पूल पाडायला सुरुवात केल्यापासून नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पण हा पूल बांधला गेल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. हा पूल पाडून या ठिकाणी डबल-डेकर उड्डाणपूल उभारला जाणार आहे. जो शिवडी -वरळी कनेक्टर ला जोडला जाणार आहे. जुन्या पुलापेक्षा जास्त लांबीचा ४.५ किमी तसेच अत्याधुनिक डबल डेकर पूल बांधला जाणार आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईलमेल- एक्सप्रेस गाड्यांवर होणारा परिणाम पुलाच्या अंतिम पाडकामामुळे उपनगरीय आणि मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकानुसार परिणाम होणार असून गाड्या दादर/ भायखळा मार्गे वळवल्या जातील. नवीन पूल तयार झाल्यावर दक्षिण मुंबईतील प्रवाशांना वरळी आणि वांद्रे - वरळी सी लिंककडे जाणे सोपे होईल. वाहतूक कोंडी सुटायला देखील मदत होणार असून प्रभादेवीचा हा पूल आपल्याला लवकरच नव्या सुविधांसह, सुसज्ज सोयींसह लवकरच मिळणार आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा कहर
सोलापूर : यंदाच्यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट कहर केला असून, मार्च महिन्यातील पाच दिवस गारपीट आणि अवकाळी पाऊस पडला आहे. यात महसूल प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार 2439.05 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.द्राक्ष, गहू, आंबा, डाळिंब यासारख्या नगदी पिकांचा नुकसानीत समावेश आहे. सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा समस्या निर्माण झाल्याने वातावरणात सातत्याने बदलत आहे. कधी अधिवृष्टी तर कधी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने महापूर व अतिवृष्टी झाली. आता यंदाच्या वर्षी देखील गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकरी बेजार झाले आहेत. या गारपीटीचा फटका जिल्ह्यातील 170 गावांना बसला असून त्यातून 3423 शेतकरी बाधित झाले आहेत. यात 264.7 हेक्टर वरील जिरायती पिके तर 830.75 हेक्टर वरील बागायती पिकांची नुकसान झाली आहे.फळ पिकाच्या सर्वाधिक नुकसान झाले असून यात 1343.6 हेक्टर क्षेत्रावरील क्षेत्रावरील फळपिकांचा समावेश आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील आठ गावांना गारपिटीचा तडाका बसला असून, 429 शेतकरी बाधित झाले आहेत. त्यात द्राक्षे, आंबा, केळी, खरबूज, ढोबळी मिरची, ज्वारी हरभरा, गहू, डाळिंब यासारख्या 227.45 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नुकसान झाली आहे.
पाणी तुंबणाऱ्या २२७ पैकी १२० ठिकाणी सोमवारपासून कामे सुरू - पुणे महापौर
पुणे : पावसाने गुरुवारी पुणे शहर अक्षरशः तुंबले, रस्ते पाण्याखाली गेले. घरांत, दुकानात पाणी शिरले आणि एका ज्येष्ठ महिलेचा बळी गेला. त्यामुळे महापालिकेचे नियोजन कोलमडल्याचे चित्र समोर आले. त्यानंतर आज पुणे महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन विभागासह अन्य विभागांची तातडीची बैठक घेण्यात आली. कामात सुधारणा करण्यासाठी प्रशासनाला कंबर कसण्याचे आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिले आहेत.पाणी तुंबणाऱ्या २२७ पैकी १२० ठिकाणी सोमवारपासून कामे सुरू केली जाणार आहेत. धोकादायक झाडांच्या फांद्या कापण्यासाठी ४८ तासांच्या आत परवानगी द्या, प्रशासनाने स्वतःहूनही यात पुढाकार घ्यावा, असे आदेश दिले आहेत. दरम्यान, महापौरांनी दिरंगाईबाबत प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. सिंहगड रस्ता, कोथरूड, वारजे, कर्वेनगर, कोंढवा, कात्रज, पेठांसह सर्वच भागातील नाले तुडुंब भरले, रस्ते पाण्याखाली बुडाले, अनेक ठिकाणी कंबरेपर्यंत पाणी तुंबले होते.
मुंबई : मुलुंड येथील २१ वर्षीय गिर्यारोहक सानिका जिगर शाह एव्हरेस्ट सर करण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. ती ९ एप्रिल रोजी मुंबईहून काठमांडूसाठी रवाना होणार असून जगातील सर्वोच्च शिखर सर करण्याचा तिचा मानस आहे.शनिवारी भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी सानिकाला शुभेच्छा देत तिच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला. सानिकाचे शिखर सर करण्याचे स्वप्न पूर्ण होवो. ती केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशातील तरुणांसाठी एक आदर्श आहे, असे आमदार मिहीर कोटेचा म्हणाले.गेल्या साडेचार वर्षांत सानिकाने गिर्यारोहण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आपली ठळक छाप पाडली आहे. तिच्या जिद्द, सहनशक्ती आणि तांत्रिक कौशल्याचे आमदार मिहिर कोटेचा यांनी कौतुक केले. अल्पवयातच तिने नेपाळमधील हिमलुंग हिमाल (७,१२६ मीटर) सर करून पहिली भारतीय महिला तसेच सर्वात तरुण भारतीय होण्याचा मान मिळवला आहे, असे आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितले.सानिकाची गिर्यारोहणातील कामगिरीसानिकाने विविध खंडांतील अनेक आव्हानात्मक शिखरे सर केली आहेत. आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलिमांजारो (५,८९५ मीटर) आणि युरोपमधील सर्वोच्च शिखर एल्ब्रुस (५,६४२ मीटर) ही शिखरे सर करून तिने उत्तुंग यश मिळविले आहे.भारतामध्ये तिने लडाखमधील कांग यात्से II (६,२५० मीटर), फ्रेंडशिप पीक (५,२८९ मीटर) आणि पंगारचुल्ला पीक (४,५९० मीटर) ही आव्हानात्मक शिखरे सर केली आहेत. तसेच अन्नपूर्णा बेस कॅम्प आणि फुलारा रिज हे कठीण ट्रेक्सही तिने यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत.
Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक - कुंभमेळा विषयक विकास कामांची राजेश अग्रवाल यांच्याकडून पाहणी
वेळेत कामे पूर्ण करण्याच्या यंत्रणांना दिल्या सूचनानाशिक : सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि परिसरात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा विषयक कामांना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी भेटी दिल्या. पायाभूत सुविधांची कामे विहित वेळेत आणि दर्जेदार झाली पाहिजेत. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी काम करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.मुख्य सचिव . अग्रवाल यांनी आज कुंभमेळा विषयक रस्ता कामे तसेच रेल्वे विषयक विकास कामे, विमानतळ विस्तारीकरण, पार्किंग सुविधा आदी कामांना भेटी दिल्या. कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पुनीत अग्रवाल, कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ प्राधिकरण आणि एचएएलचे अधिकारी तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.मुख्य सचिव.अग्रवाल यांनी सुरुवातीला स्व. मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल येथे जाऊन पाहणी केली. तेथे सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत करावयाच्या पार्किंग सुविधा संदर्भातील नियोजनाची माहिती घेतली. मुख्य सचिव अग्रवाल यांनी ओढा रेल्वे स्टेशन येथे जाऊन तेथे होत असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पुनीत अग्रवाल आणि विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी माहिती दिली. नाशिक रोड रेल्वे स्थानकासह ओढा, कसबे सुकेणे, खेरवाडी, देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक परिसर विकास, प्रवाशांसाठी सोई सुविधा, येणाऱ्या भाविकांसाठी बस कनेक्टिव्हिटी आदींची माहिती मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी घेतली. ओढा येथे कुंभमेळा साठी बांधण्यात येत असलेल्या घाट कामांचीही त्यांनी पाहणी केली.त्यानंतर मुख्य सचिव अग्रवाल यांनी, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणामार्फत मुंबई धुळे महामार्गावरील नाशिक शहरातील विकास कामांची पाहणी केली. कामांची गती वाढविण्याच्या सूचना यावेळी त्यांनी यंत्रणेला केल्या. काम करताना प्रशासकीय आणि तांत्रिक पातळीवर काही अडचणी जाणवत असतील तर त्या तत्काळ निदर्शनास आणून द्याव्यात आणि कोणत्याही परिस्थितीत कामांना विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व यंत्रणांना केल्या.
Pune Railway Station : पुणे - रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट
पुणे : पुणे स्थानकाच्या मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डमध्ये सहा नवीन फलाट होणार आहेत. फलाट क्रमांक ७ ते १२ असे हे फलाट असतील. या फलाटावर प्रवाशांना येण्यासाठी जुना मालधक्का येथून प्रवाशांना प्रवेश दिला जाईल. हे स्थानकाचे तिसरे प्रवेशद्वार असणार आहे.शिवाय, सध्या असलेले फलाट व नवीन फलाट यांना जोडण्यासाठी पादचारी उड्डाण पूल (स्कायवॉक) बांधला जाणार असून, पार्सलच्या वाहतुकीसाठी भुयारी मार्ग (सबवे) असणार आहे. लवकरच याच्या कामाला सुरुवात होणार असून, दीड वर्षात काम संपणार आहे. यासाठी सुमारे ४०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुणे रेल्वे स्थानकाचा विकास करताना त्याची क्षमता देखील वाढविण्यात येणार आहे.यात मुंबईच्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार पुणे रेल्वे स्थानक हे देशातील सुवर्ण चतुष्कोण रेल्वे मार्गावरचे एक प्रमुख स्थानक आहे. व्यस्त रेल्वे मार्गावर पुणे स्थानक असल्याने येणाऱ्या काळात तिसरी आणि चौथी मार्गिकाने पुण्याला जोडले जाईल. सध्या पुणे ते वाडी दरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गिकाचा सर्वे सुरू आहे.
IPL 2026 Update, Pat Cummins : आयपीएल सोडून पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतला
मुंबई : सनरायझर्स हैदराबादचा नियमित कर्णधार, पॅट कमिन्स, आयपीएल २०२६ च्या मध्यातच संघ शिबिर सोडून आपल्या पाठीच्या अंतिम स्कॅनसाठी मायदेशी ऑस्ट्रेलियाला परतला आहे. हा स्कॅन पूर्वनियोजित होता आणि तो क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या देखरेखीखाली केला जाणार आहे. जर त्याचे अहवाल सकारात्मक आले, तर तो १७ एप्रिल रोजी संघात पुन्हा सामील होऊ शकतो.कमिन्सने आधीच सांगितले आहे की, सर्व काही ठीक झाल्यास, तो आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात आणि प्लेऑफमध्ये खेळेल. तो हंगामाच्या सुरुवातीला संघात सामील झाला होता आणि नेटमध्ये नियमितपणे गोलंदाजी करत होता, पण सुरुवातीचे सामने खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत, इशान किशन संघाचे नेतृत्व करत आहे आणि पुढेही करत राहील.कमिन्स गेल्या वर्षी जुलैपासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. डिसेंबरमध्ये खेळल्या गेलेल्या ॲशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना वगळता, तो फारसा स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. टी-२० विश्वचषकासाठी पुनरागमन करण्याची त्याला आशा होती. पण दुखापतीतून सावरण्यात आलेल्या एका किरकोळ गुंतागुंतीमुळे तो संघाबाहेर गेला. त्याच्या अनुपस्थितीत, हैदराबाद संघ आशान मलिंगा आणि डेव्हिड पेन या परदेशी वेगवान गोलंदाजांना संधी देत आहे. संघाचा पुढील सामना हैदराबादमध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे.
Congress: परराष्ट्र धोरण आणि ऊर्जा सुरक्षेच्या मुद्द्यावर काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे या विधानांवरून स्पष्ट होत आहे. जिथे राहुल गांधी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत, तिथेच अनुभवी नेते सरकारच्या पाठीशी उभे राहिलेले दिसत आहेत.
मुलाला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एरंडे याने विविध हॉटेल्समध्ये अनेकदा आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्या महिलेने तक्रारीत केला.
Maharashtra Politics : शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Rohit Sharma Trick : रोहितने आपल्या एका साध्या हालचालीने दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलला असे काही चकवले की, दिल्लीला आपला महत्त्वाचा 'रिव्ह्यू' गमवावा लागला.
मुंबई: नाशिकमधील म्हाडा गृहप्रकल्पात गरिबांच्या हक्काची घरे हडपण्याचे प्रकरण अत्यंत गंभीर असून, यात कितीही मोठा 'मासा' असला तरी त्याला सोडले जाणार नाही. गरिबांचे हक्क हिरावून घेणाऱ्या आणि त्यांचे रक्त पिणाऱ्या बिल्डरांना आम्ही सोडणार नाही, प्रसंगी या प्रकरणाचा तपास 'ईडी'कडे सोपवू, असा सज्जड दम राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिला. नाशिक दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हाडा घोटाळ्यावरून भूमाफियांना कडक इशारा दिला.बावनकुळे म्हणाले की, “गरिबांसाठी असलेली २० टक्के घरे बळकावली गेली आहेत. एकाच दिवसात जमिनीचे तुकडे पाडणे, नोंदी घेणे आणि नकाशे मंजूर करणे ही मोठी रिंग आहे. या प्रकरणासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून यात एक आयपीएस आणि दोन आयएएस अधिकारी आहेत. १५ दिवसांत अहवाल येईल. लाचलुचपत विभाग आणि भूमी अभिलेख विभागातून या घोटाळ्याची सुरुवात झाली असून, नाशिक विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. केवळ शिक्षा नाही, तर बिल्डरांकडून २० टक्के मालमत्ता रिकव्हर करून ती गरीबांना मिळवून देणार असेही ते म्हणाले.'माझी जाणीवपूर्वक बदनामी, दावे दाखल करणार'मागील दोन दिवसांत समाजमाध्यमांवर असलेल्या काही व्हीडिओबाबत बावनकुळे म्हणाले की, मी एवढंच म्हटलं होतं की ज्यांच्या फार्महाऊस आहेत. फार्महाऊससाठी कर्ज घेतले आहे. ज्यांनी मर्सिडीज गाड्या घेतल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागू नये. नार्मल गाडी शेतकरी घेतो, ट्रॅक्टर घेतो, चार चाकी वाहन घेतो याला कुणी म्हणणार नाही; पण कर्जमाफी मागताना धनदांडगे लोक आहेत. त्यांच्याकडे ऐपत आहे. तेवढेच जर पैसे आपण गरीब शेतकऱ्याला दिले तर शेतकऱ्यांच्या अधिक जास्त फायदा होऊ शकतो. गरीब शेतकर्याला कर्जमाफी मिळावी ही भावना होती. त्याचा आधार घेऊन अशा प्रकारचे खोटे व्हिडिओ तयार करणे आणि माझी समाजामध्ये प्रतिमा खराब करण्याचं काम सुरू आहे.“माझ्याकडे ८० एकर शेती असल्याचे खोटे आरोप केले जात आहेत. प्रत्यक्षात माझ्याकडे २८ एकरच जमीन आहे. जाणीवपूर्वक बदनामी केली जात असून याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संबंधितांविरोधात १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे,” या शब्दांत आपली भूमिका बावनकुळे यांनी स्पष्ट केली.'महसूल संदर्भातील पुरावे एसआयटीला द्या'अशोक खरात प्रकरणात १२ गुन्हे दाखल झाले असून यामध्ये एसआयटी तपास करत असून कोणीही सुटणार नाही. महसूल विभागातील अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते एसआयटीला द्यावेत असेही ते म्हणाले.दिंडोरी अपघात वेदनादायकदिंडोरी येथील दुर्दैवी अपघातात ६ मुलांसह ९ जणांचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित विहीर कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत दिली जाणार असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना केल्या जातील. राज्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ मोठ्या प्रमाणावर राबवले जात असून एप्रिलमध्ये १० तसेच १७ तारखेला तसेच पुढील महिन्यात शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. एनए अट रद्द करणे, तुकडेबंदी कायदा निरस्त करणे, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना यांसारखे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. पुढील तीन महिन्यांत सर्व लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचे नियोजन असून नाशिकमधील आडगाव येथे सुमारे १५ योजनांचा लाभ देण्यात येत आहे असेही त्यांनी सांगितले.बारामती निवडणूक बिनविरोध व्हावीबारामती निवडणुकीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, अजित दादांचा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रत्येक परिवाराशी संबंध आहे. त्यांचे सहवास आठवून ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी माझी भावना आहे. याबाबत नाना पटोले आणि इतर नेत्यांशी बोललो आहे. असेही त्यांनी नमूद केले.
Baramati By-Election: उद्धव ठाकरेंचा सुनेत्रा पवार यांना पाठिंबा ?
Baramati By-Election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
Nanded News : राज्यात गँगवॉरचा थरार; तिहेरी हत्याकांडाने शहरात खळबळ
Nanded News : नांदेडमध्ये टोळीयुद्धातून तिहेरी हत्याकांड घडले आहे. अर्जितसिंग चव्हाणच्या हत्येनंतर त्याच्या भावाने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन आरोपींची चाकूने वार करून हत्या केली.
पालघर : एसटी बसमधील प्रवाशांचे वाद नवे नाहीत, मात्र पालघरमधील सफाळे बस आगारात चक्क एक एसटी चालकच प्रवाशाशी भिडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवाशासोबत झालेल्या वादाचे पर्यवसान इतक्या टोकाच्या संतापात झाले की, संतापलेल्या चालकाने अंगावरील खाकी युनिफॉर्म काढून थेट आगारातच त्या प्रवाशाविरोधात दंड थोपटले. मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद पाहता-पाहता विकोपाला गेला. यावेळी रागाच्या भरात असलेल्या चालकाने आपल्या पदाची आणि गणवेशाची पर्वा न करता प्रवाशाला भिडण्याचे आव्हान दिले. हा सर्व राडा सुरू असताना बस स्थानकावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, 'लाल परी'च्या चालकाच्या या वर्तणुकीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत. शिस्तप्रिय मानल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या प्रतिमेला या घटनेमुळे धक्का बसला आहे.
नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील पुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. भारतीय ध्वज असलेले एलपीजी टँकर, ग्रीन सान्वीने, होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार केली असून ते भारताच्या दिशेने येत आहे. हे जहाज मोठ्या प्रमाणात एलपीजी घेऊन जात आहे, जे देशाच्या ऊर्जेच्या गरजांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे जहाज ६ एप्रिल रोजी मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.टँकरमध्ये किती एलपीजी आहे?अहवालानुसार, या टँकरमध्ये अंदाजे ४६,००० मेट्रिक टन एलपीजी आहे. एवढा मोठा साठा पुरवठा साखळी मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. ग्रीन सान्वी व्यतिरिक्त, भारताशी संबंधित इतर अनेक जहाजे आखाती प्रदेशातील होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी परवानगीची वाट पाहत आहेत. मध्य-पूर्व युद्धानंतर या मार्गावरून जाणारे ग्रीन सान्वी हे सातवे एलपीजी गॅस जहाज आहे. यापूर्वी, शिवालिक, नंदा देवी, जग बसंत, बीडब्ल्यू टायर, बीडब्ल्यू एल्म आणि पाईप गॅस हे सहा एलपीजी टँकर भारतीय किनाऱ्यावर पोहोचले आहेत.४६,००० मेट्रिक टन गॅस किती काळ पुरेल?किलोग्राममध्ये रूपांतरित केल्यास, हा ४६,००० मेट्रिक टन एलपीजी गॅस अंदाजे ४६ दशलक्ष किलोग्राम इतका होतो. घरगुती गॅस सिलिंडरच्या संदर्भात गणना केल्यास, या एका टँकरमधील गॅसने ३.२ दशलक्षाहून अधिक १४.२-किलोग्रामचे सिलिंडर भरता येतील. याचा अर्थ लाखो कुटुंबांना दिलासा मिळू शकेल. मात्र तज्ञांच्या मते, या टँकरमधील एलपीजी भारताच्या दैनंदिन वापराच्या अंदाजे निम्म्याइतका आहे. सध्याच्या परिस्थितीत वापर किंचित कमी झाला असला तरी, हा पुरवठा देशासाठी अजूनही महत्त्वपूर्ण मानला जातो.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको एन-६ परिसरातील साईनगर येथे काल रात्री उशिरा गोळीबाराची एक थरारक घटना घडली. ३१ वर्षीय समीर नाईक या तरुणाने राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गोळी कानाजवळून डोक्याच्या आरपार गेल्याने समीरची प्रकृती अत्यंत गंभीर असून, त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.नेमकी घटना काय?समीर नाईक हा आपल्या आई आणि लहान भावासोबत साईनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. तो व्यवसायाने पौरोहित्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. घटनेच्या दिवशी सायंकाळी समीरची आई बजरंग चौकातील आपल्या बांगड्यांच्या दुकानात गेली होती. घरात समीर एकटाच असताना हा धक्कादायक प्रकार घडला. रात्री उशिरा जेव्हा समीरचा लहान भाऊ घरी परतला, तेव्हा त्याला समीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता आणि शेजारीच एक पिस्तूल पडलेले आढळून आले.https://prahaar.in/2026/04/04/in-saphale-an-st-driver-took-off-his-uniform-flexed-his-muscles-and-issued-an-open-challenge-to-a-passenger-leading-to-a-massive-brawl-at-the-bus-depot/नैराशातून पाऊल उचलल्याचा संशयघटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानुसार, समीरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलिसांना दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि भांगेच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. ३१ वर्षांचा होऊनही अद्याप लग्न न झाल्यामुळे समीर गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता, अशी माहिती समोर येत आहे. याच नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.पोलीस तपास सुरूया घटनेबाबत माहिती देताना सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक पोहोचले असून तपास सुरू आहे. समीरने वापरलेले पिस्तूल बेकायदेशीर आहे की अधिकृत, तसेच यामागे अन्य काही कारण आहे का, याचा शोध घेतला जात आहे. समीरच्या या कृत्यामुळे परिसरात दहशतीचे आणि हळहळीचे वातावरण पसरले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, समीरची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून डॉक्टर त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
Rohit Sharma Record : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रोहितने एकाच वेळी दोन मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत.
Sunetra Pawar : बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या.! सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन
सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीसाठी ठाकरेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठिंब्याची मागणी केली आहे.
5kg LPG Cylinder: भाडेकरू आणि विद्यार्थ्यांसाठी दिलासा! फक्त आयडी दाखवा आणि मिळवा ‘छोटू’ गॅस सिलेंडर
5kg LPG Cylinder: LPG कनेक्शनच्या कटकटींपासून दूर राहून झटपट गॅसची सोय हवी असेल, तर ‘छोटू’ सिलेंडर हा सध्या सर्वात सोपा आणि जलद पर्याय ठरत आहे.
Maharashtra Accident : नाशिकच्या दिंडोरीत विहिरीत कार कोसळून ९ जणांचा, तर पंढरपूरच्या नीरा कालव्यात कार पडून ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
भोंदूबाबा अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा; कोणाकडे पुरावे असल्यास सादर करण्याचे आवाहनमुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी देशभरात खळबळ उडवून दिली आहे. खरातच्या संपर्कात असलेल्या दिग्गज नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची नावे 'सीडीआर'मधून समोर येत असतानाच, आता राज्य सरकारने या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर पवित्रा घेतला आहे. अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची केवळ बदली केली जाणार नाही, तर त्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.काही महसूल आणि पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी खरातला जमिनी हडपण्यासाठी किंवा अनैतिक कृत्य लपवण्यासाठी मदत केल्याचा संशय व्यक्त होत आहे. यावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले की, हे प्रकरण महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. एसआयटी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. तपासादरम्यान ज्या अधिकाऱ्यांची नावे समोर येतील, मग ते कोणत्याही खात्यातील असोत, त्यांना नोकरीवर ठेवले जाणार नाही. बदली करून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तर त्यांना थेट बडतर्फ केले जाईल.या प्रकरणातील दोषींना सोडले जाणार नाही, अशी ग्वाही देतानाच बावनकुळे यांनी आवाहन केले की, ज्यांच्याकडे या संदर्भात काहीही पुरावे असतील त्यांनी ते थेट एसआयटीकडे सुपूर्द करावेत. खरातच्या वास्तव्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जाणार असून, त्यात जे कोणी संशयास्पद आढळतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे खरातच्या सीडीआरची माहिती कशी पोहोचली, यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री कार्यालयावर शंका उपस्थित केली होती. या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री कार्यालय अशा प्रकारची संवेदनशील माहिती कधीही बाहेर लीक करत नाही. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने दमानिया यांनी त्यांच्याकडील सर्व माहिती एसआयटीला द्यावी, जेणेकरून तपास अधिक वेगवान होईल, असे आवाहन देखील महसूलमंत्री बावनकुळे यांनी केले.अशोक खरातला जमिनी आणि मालमत्ता जमा करण्यासाठी ज्यांनी मदत केली, ते सर्वजण रडारवर आहेत. नाशिक, शिर्डी किंवा अन्य कोणत्याही प्रकरणातील दुष्कृत्यांमध्ये जे अधिकारी सहभागी असतील, त्यांच्यावर मी स्वतः सुनावणी घेऊन कठोर निर्णय घेईन.
भारतीय कलाकारांच्या दुर्मिळ कलाकृतींची मागणी पुढील काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय कला बाजारासाठी हा लिलाव ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.
New District :महाराष्ट्राला 37वा जिल्हा मिळणार? राज्य सरकारचा मोठा निर्णय
New District : बुलढाणा जिल्ह्याचे विभाजन करून खामगाव जिल्हा बनवण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.
नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत इराणसोबतच्या युद्धात ऐतिहासिक नुकसान सोसल्यानंतर, अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणच्या वीज प्रकल्पावर आणि बुशेहर अणुकेंद्रावर एक अत्यंत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एक सुरक्षा रक्षक ठार झाला. इराणच्या बुशेहर प्रकल्पावर इस्रायल आणि अमेरिकेने केलेला हा चौथा मोठा हल्ला होता, जो अणुप्रकल्पाच्या कुंपणाजवळ करण्यात आला. मात्र, इराणच्या इर्ना (IRNA) वृत्तसंस्थेनुसार, या हल्ल्यानंतरही 'प्रकल्पाचे कामकाज अबाधितपणे सुरू आहे.'US/Israel strike KEY Iran power plant again, KILL security staff member — IRNA4th attack on Bushehr Plant 'struck near perimeter fence'‘Plant’s operation continues unaffected’ pic.twitter.com/B9xqpdleQS— RT (@RT_com) April 4, 2026इराणच्या हल्ल्यावर अमेरिका आणि इस्रायलची प्रतिक्रियाइराणच्या प्राणघातक हल्ल्याला इस्रायल आणि अमेरिकेने दिलेले हे प्रत्युत्तर होते. या हल्ल्यात इराणने अनेक अमेरिकी लढाऊ विमाने, विमानवाहू जहाजे आणि हल्ला करणारी हेलिकॉप्टर्स, तसेच एमक्यू-९ ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे. इराणच्या दाव्यानुसार, त्यांच्या या हल्ल्यामुळे गेल्या २४ तासांत अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी तेहरानची क्षेपणास्त्र डागण्याची आणि हवाई संरक्षण क्षमता जवळपास संपुष्टात आल्याचा दावा केला असतानाच, इराणने अमेरिकी लढाऊ विमानांवर हा हल्ला केला असल्याचे म्हटले जात आहे.IAEA: 'DEEP CONCERN' about latest attack on Iran’s Bushehr nuclear power plant that KILLED 1Building on site DAMAGED 'by shockwaves and fragments''NPP sites must NEVER be attacked' https://t.co/smzKj2L4nD pic.twitter.com/9X5fYeTY61— RT (@RT_com) April 4, 2026IAEA ने केला हल्ल्याचा तीव्र निषेधआंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) इराणच्या बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पावर झालेल्या हल्ल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. IAEA ने सांगितले की, अमेरिका आणि इस्रायलने बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पावर केलेल्या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाला आहे. स्फोटाच्या लाटेमुळे आणि तुकड्यांमुळे प्रकल्पातील इमारतीचे नुकसान झाले. अणुऊर्जा प्रकल्पांच्या स्थळांवर कधीही हल्ला करू नये.
Pune News : ७ वर्षीय चिमुरडीला खोलीत बोलावून...नराधमाचा 'तो'संतापजनक प्रकार पाहून आई अन् आत्याला...
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील (Pimpari Chinchwad) मोशी परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. विनायकनगर येथील शिवशंभो कॉलनीमध्ये एका ७ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर ४० वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. भोसरी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. रामु कुंजल निसाद (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चिमुरडीच्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, अशा विकृत प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.खिडकीतून दिसला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार...पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी सायंकाळी आरोपीने पीडित मुलीला आमिष दाखवून आपल्या खोलीत बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारीन, अशी धमकी देऊन त्याने चिमुरडीची वाचा बंद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या नराधमाची विकृती एवढ्यावरच थांबली नाही. दुसऱ्या दिवशी ३ एप्रिल रोजी सकाळी त्याने पुन्हा एकदा पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. नशिबाने, याच वेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्याने खिडकीतून हा धक्कादायक प्रकार प्रत्यक्ष पाहिला. घरच्यांनी तात्काळ सतर्कता दाखवल्यामुळे या नराधमाचे कुकृत्य उघड झाले. याप्रकरणी एम.आय.डी.सी. भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.नराधमावर पोक्सोसह 'बीएनएस'चे कठोर कलमेहा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच पीडितेच्या कुटुंबीयांनी विलंब न लावता एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या नराधमाविरुद्ध कायद्याचा बश बसवणारी कठोर कलमे लावली आहेत. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ (१), ६५ (२), ७४, ३५१ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (POCSO) कलम ४, ६, ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या अमानवी घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, अशा नराधमांना समाजात स्थान नसावे, त्यांना कठोरात कठोर शासन व्हावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पीडितेच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी पावले उचलली जात आहेत.
Clarification: भारताकडे येणारे इराणी तेलाचे जहाज चीनकडे का वळले? केंद्र सरकारने दिले उत्तर
Clarification: सरकारने काही माध्यमांतील पेमेंट अडचणींच्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे. मध्य पूर्वेतील तणाव असूनही भारताने इराणसह विविध देशांकडून आपल्या कच्च्या तेलाची गरज पूर्ण केली आहे. पुढील काही महिन्यांसाठीही भारताची तेलपुरवठा व्यवस्था सुरक्षित असल्याचा दावा मंत्रालयाने केला.
Virat Kohli : किंग' कोहलीने त्याला परदेशी खेळाडू म्हणून ट्रोल करणाऱ्यांना आपल्या खास शैलीत सडेतोड उत्तर दिले आहे.
Raghav Chadha : खासदार राघव चड्डा यांना मारहाण? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
Raghav Chadha : नवीन जयहिंद यांनी राघव चड्ढा यांना मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी लंडनला जाण्यामागे हेच कारण असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Water side effects : जास्त पाणी पिणं जीवघेणं ठरू शकतं; मग नेमकं किती पाणी प्यावं? वाचा…
प्रत्येक व्यक्तीची पाण्याची गरज वेगळी असते. वय, वजन, हवामान, शारीरिक हालचाल, जीवनशैली आणि आरोग्यस्थिती या घटकांवर दिवसाला किती पाणी प्यावे हे ठरते.
Nashik Accident : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत आणि राज्यातील उघड्या विहिरींच्या तपासणीचे आदेश दिले आहेत
MLC Election 2026: विधान परिषदेच्या निवडणूकीत शरद पवार करणार ‘परतफेड’!
MLC Election 2026: या निवडणुकीत कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर, शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे, अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राजेश राठोड यांचा समावेश आहे.
मुंबई: अशोक खरात यांच्या तपासासंदर्भात अंजली दमानिया यांना मिळत असलेला तपशील मुख्यमंत्री कार्यालयातून लिक होत असल्याचा आरोप चुकीचा आहे. तशी कोणतीही माहिती मुख्यमंत्री कार्यालय देत नसते. तसा आरोप करणाऱ्या संजय राऊत यांना उद्धव आणि आदित्य काय करताहेत, त्यांची भूमिका काय आहे याची धड माहिती नसते. नसती उठाठेव करण्यापेक्षा त्यांनी आधी आपल्या पक्षात काय चालले आहे याची माहिती घ्यावी, अशा शब्दात भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना खडसावले. भाजपा प्रदेश कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.अशोक खरात प्रकरणाच्या सध्या सुरु असलेल्या तपासातून कुणीतरी भाजपाच्या टार्गेटवर असल्याच्या राऊत यांच्या आरोपाबाबत बन म्हणाले की, भाजपाच्या टार्गेटवर कुणी नाही. मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत नक्कीच जनतेच्या टार्गेटवर आहेत. महायुती म्हणून आम्ही एक आहोत. मात्र जनतेने टार्गेट करून तुम्हाला घरी बसवले आहे. घरच्यांना टार्गेट करायचे ही उद्धव ठाकरे आणि उबाठाची परंपरा आहे. भाजपा मित्रांना सोबत घेऊन चालतो. अंजली दमानिया यांना माहिती नेमकी कुठून मिळत आहे, याचा तपास होणार असल्याचे बन यांनी स्पष्ट केले.ऑपरेशन टायगर होणार असल्याच्या संजय राऊत यांच्या भाकिताबद्दल बोलताना बन यांनी सुनावले की, डिनर डिप्लोमसी हा प्रकार दिल्लीतील राजकारणात नवा नाही. संजय राऊत यांना त्यांच्या पक्षाचे खासदार, आमदार आणि नगरसेवक कंटाळले आहेत. जेव्हा ४० आमदार सोडून गेले तेव्हा त्याचा थांगपत्ता उद्धवजींना लागला नाही, संजय राऊत यांना लागला नाही. अहंकाराची भाषा करायची, रोज उठून खोटे बोलायचे या सगळ्याला त्यांच्याच पक्षाचे लोक कंटाळले आहेत. त्यामुळे ऑपरेशन टायगर झाले तर त्याचा पत्ता संजय राऊत यांना अजिबात लागणार नाही.अजितदादा पवार यांचे निधन हा महाराष्ट्राला बसलेला धक्का आहे. अपघाती निधनाने निवडणूक झाली की ती बिनविरोध व्हावी असा महाराष्ट्रात प्रघात असतो. आर.आर. पाटील यांचे निधन झाले तेव्हाही पोटनिवडणूक बिनविरोध झाली होती. बारामती येथून सुनेत्राताई निवडणूक लढवणार आहेत. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात असा महायुतीचा प्रयत्न आहे आणि महायुतीचाच विजय होणार हे निश्चित असल्याचे ठामपणे सांगून बन म्हणाले की, काँग्रेसने महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांना न विचारता या निवडणुका लढवायची तयारी सुरु केली आहे. त्यातून आघाडीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेस आपली वेगळी चूल मांडत आहे. दुर्दैवाने काँग्रेसकडे आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांच्याकडे प्रगल्भता नाही. त्यातूनच ते असे वागत आहेत. मात्र त्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही.
Pratap Sarnaik : रिक्षा परवान्यांसाठी आता 'मराठी'सक्तीची
मागील १० वर्षांतील परवान्यांची होणार सखोल फेरतपासणी; १ मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देशमुंबई : रिक्षांच्या परवानेवितरण प्रक्रियेत होणारी अनियमितता आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाने लाटणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकारने आता कठोर पाऊले उचलली आहेत. रिक्षा परवाना हवा असेल, तर मराठी भाषा येणे अनिवार्य आहे, असे निर्देश देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मागील १० वर्षांत दिलेल्या सर्व रिक्षा परवान्यांची सखोल पुनर्तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. विशेषतः मीरा-भाईंदर क्षेत्रातील कथित घोटाळ्याची गंभीर दखल घेत, या मोहिमेची सुरुवात याच भागातून होणार आहे.वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राज्यातील परिवहन अधिकाऱ्यांच्या बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. यावेळी त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला खडे बोल सुनावत १ मे पर्यंत संपूर्ण चौकशी अहवाल सादर करण्याचे कठोर निर्देश दिले. मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भात पुराव्यांसह तक्रार केली होती. काही परदेशी नागरिकांनी (बांगलादेशी) स्थानिक प्रशासनाच्या संगनमताने बनावट रहिवासी दाखले मिळवून रिक्षा आणि टॅक्सी परवाने हस्तगत केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता.तक्रारीनुसार, डाचकुलपाडा आणि मांडवीपाडा येथील रहिवासी असल्याचे भासवण्यासाठी 'अदानी पॉवर'ची वीज बिले सादर करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात या भागात 'टाटा पॉवर'तर्फे वीज पुरवठा केला जातो, हे मेहता यांना पुराव्यासह समोर आणले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, मीरा-भाईंदर परिसरात एक विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. महिनाभराचा विशेष कॅम्प आयोजित करून प्रत्येक कागदपत्राची बारकाईने छाननी केली जाईल, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली....तर परवाना रद्द करणारमोटार परिवहन नियमांनुसार परवानाधारकाला मराठी येणे बंधनकारक आहे. ज्यांना मराठी येत नाही, त्यांचे परवाने रद्द होऊ शकतात. फेरतपासणीत रहिवासी दाखले आणि वीज बिलांची सत्यता पडताळली जाईल. चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यांचीही गय केली जाणार नाही, असे संकेत परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत. या मोहिमेसाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मीरा-भाईंदरनंतर ही तपासणी मोहीम राज्यभर राबविली जाण्याची शक्यता आहे.
भोंदूबाबा अशोक खरातने हवालाद्वारे पाच देशांत पाठवले हजारो कोटी?, रोहित पवारांचा गंभीर आरोप
मुंबई : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी कोठडीत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्याभोवतीचा चौकशीचा फास अधिक घट्ट होत चालला असून, आता या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय 'मनी लाँड्रिंग'चे वळण मिळाले आहे. अशोक खरातने ऑस्ट्रेलिया, दुबईसह पाच देशांमध्ये हवालामार्फत हजारो कोटी रुपये पाठवल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी केला आहे. हे प्रकरण एका भोंदूबाबापुरते मर्यादित नसून, ते एका मोठ्या 'नेक्सस'चा भाग असल्याने याची केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) केली जात आहे.रोहित पवार म्हणाले, अशोक खरात याने भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांचे हजारो कोटी रुपये हवालामार्फत परदेशात वळवले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दुबईसह अन्य चार-पाच देशांमध्ये हे पैसे पाठवण्यात आले असून, हे प्रकरण देशाच्या सुरक्षेला आव्हान देणारे आहे. राज्य सरकारकडे यासंदर्भात पुरेसे पुरावे आले असतील, तर गृह विभागाने या प्रकरणाचा वापर राजकीय गोळाबेरजेसाठी करू नये. उलट, राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न विचारात घेऊन याची सखोल चौकशी करावी. या प्रकरणात आता तरी ईडीसारख्या यंत्रणांना जाग येईल का? असा खोचक सवालही त्यांनी केला.
Shashi Tharoor : काँग्रेस खासदाराच्या कारवर हल्ला; गाडीतून बाहेर खेचत मारहाण
Shashi Tharoor : केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर वांडूर येथे हल्ला झाला.
Hardik Pandya Out : नाणेफेकीच्या वेळी मुंबईच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली असून नियमित कर्णधार हार्दिक पांड्या या सामन्यातून बाहेर झाला आहे.
नवी दिल्ली: आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या पाकिस्तानला आणखी एक विनाशकारी बातमी मिळाली आहे. संयुक्त अरब अमिरातीने (UAE) पाकिस्तानला दिलेल्या २ अब्ज डॉलर्स (सुमारे १६,५०० कोटी रुपये) कर्जाची तात्काळ परतफेड करण्याची मागणी केली आहे. मध्य पूर्वेत इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, UAE चा हा निर्णय पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही.पाकिस्तानचा परकीय चलन साठा वाढवण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीने (UAE) ही रक्कम स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमध्ये (SBP) सुरक्षित ठेव म्हणून ठेवली होती. आतापर्यंत, संयुक्त अरब अमिरातीने कर्जाची मुदत दरवर्षी वाढवली होती, ज्यामुळे पाकिस्तानला ही रक्कम त्वरित परत करावी लागत नव्हती. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, आखाती प्रदेशातील युद्धसदृश परिस्थितीमुळे, संयुक्त अरब अमिरातीने या महिन्याच्या अखेरपर्यंत आपली रक्कम परत करण्याची विनंती केली आहे.विशेष बाब म्हणजे, पाकिस्तान या ठेवीवर सुमारे ६ टक्के इतका मोठा व्याजदर देत होता. डिसेंबर २०२५ मध्ये मुदत संपणाऱ्या या कर्जाची मुदत सुरुवातीला एका महिन्याने आणि नंतर दोन महिन्यांनी, म्हणजेच १७ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती. आता, संयुक्त अरब अमिरातीने (UAE) ही मुदतवाढ देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. पाकिस्तानला या आर्थिक वर्षात एकूण १२ अब्ज डॉलर्सच्या परकीय कर्जाची मुदतवाढ करायची होती, ज्यामध्ये सौदी अरेबियाकडून घेतलेल्या ५ अब्ज डॉलर्स आणि चीनकडून घेतलेल्या ४ अब्ज डॉलर्सच्या कर्जाचा समावेश आहे.पाकिस्तानकडे सध्या अंदाजे २१ अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा आहे. तांत्रिकदृष्ट्या, पाकिस्तान हे २ अब्ज डॉलर्स परत करण्यास सक्षम आहे, परंतु एवढ्या मोठ्या रकमेच्या बहिर्वाहामुळे त्याचा खजिना रिकामा होण्याच्या उंबरठ्यावर येईल. येत्या काही महिन्यांत, आपल्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जुनी कर्जे फेडण्यासाठी पाकिस्तानला नवीन बाह्य गुंतवणूक मिळवावी लागेल किंवा पुन्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) वळावे लागेल.तज्ञांच्या मते, संयुक्त अरब अमिरातीच्या या निर्णयानंतर सौदी अरेबिया आणि चीनसारखे इतर कर्जदार देशही त्यांचे पैसे परत मागू शकतात. असे झाल्यास, पाकिस्तानकडे दिवाळखोर होण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. आता संपूर्ण जग शहबाज शरीफ सरकारकडे पाहत आहे की ते आपल्या देशाला या आर्थिक त्सुनामीतून कसे वाचवतात.
Shruti Haasan : श्रृती हासनची कातिलाना अदा; पिंक साडीमध्ये खुलले सौंदर्य
Shruti Haasan : श्रुतीचे गुलाबी साडीवरचे हे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करुन श्रुतीच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
Political News : राष्ट्रवादीत पुन्हा भूकंप! अजित पवार गटातील २० आमदार शरद पवारांच्या संपर्कात?
Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील १५ ते २० आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
मुंबई : सोनी मराठी वाहिनी नेहमीच दर्जेदार आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे मनोरंजन देत आली आहे. कुटुंबासह पाहता येतील असे विविध कार्यक्रम सादर करत, सोनी मराठीने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. याच वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय आणि विनोदी कार्यक्रम म्हणजे “महाराष्ट्राची हास्यजत्रा”.“महाराष्ट्राची हास्यजत्रा” ( Mahrashtrachi Hasayjatra) हा कार्यक्रम प्रेक्षकांना दर आठवड्याला खळखळून हसवतो. उत्कृष्ट लेखन, भन्नाट परफॉर्मन्स आणि कलाकारांची जबरदस्त टाइमिंग यामुळे हा शो प्रत्येक घरात आवडीने पाहिला जातो. हा कार्यक्रम दर सोमवार आणि मंगळवारी रात्री ९ वाजता सोनी मराठीवर प्रसारित होतो.या आठवड्याचा एपिसोड खास ठरणार आहे, कारण प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री निर्मिती सावंत एक भन्नाट स्किट सादर करताना दिसणार आहेत. मॅरेज फोटो अल्बम असे या स्किटचे नाव असून, या स्किटमध्ये निर्मिती सावंत यांच्यासोबत पृथ्विक प्रताप आणि वनिता खरात हे कलाकारही झळकणार आहेत. या तिघांनी मिळून या स्किटमध्ये अक्षरशः धमाल उडवली आहे.निर्मिती ताईंची स्टेजवरील उपस्थिती, त्यांची अफलातून कॉमिक टाइमिंग आणि सहज अभिनय प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालतो. त्यांच्या प्रत्येक एंट्रीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. मॅरेज फोटो अल्बम या स्किटमध्येही त्यांनी त्याच जादुई अंदाजात प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. हास्यजत्रेच्या मंचावर त्यांचा हा खास अंदाज पाहायला मिळणार आहे.मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत निर्मिती सावंत यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ज्या काळात विनोदी क्षेत्रात महिला कलाकारांची संख्या अत्यंत कमी होती, त्या काळात त्यांनी आपल्या दमदार अभिनय आणि टायमिंगच्या जोरावर एक वेगळी उंची गाठली. त्यांच्या कॉमेडीची शैली, संवादफेक आणि व्यक्तिमत्त्व आजही अनेक कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. त्या मराठीतील अग्रगण्य आणि अत्यंत मानाच्या विनोदी अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. या आठवड्यातील “महाराष्ट्राची हास्यजत्रा” चा हा विशेष भाग प्रेक्षकांसाठी नक्कीच हसण्याचा एक मोठा डोस घेऊन येणार आहे.
Bigg Boss Marathi 6 : आज विषय गंभीर! रितेश भाऊंचा 'धक्का'कोणाला बसणार? प्रोमो आला समोर!
मुंबई : कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय रियालिटी शो 'बिग बॉस मराठी सीझन ६' ( Bigg Boss Marathi Season 6) आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. जसजसा ग्रँड फिनाले जवळ येत आहे, तसतसा घरातील खेळाला वेग आला असून स्पर्धकांमधील स्पर्धा तीव्र झाली आहे. गेल्या काही दिवसांत अनपेक्षित एलिमिनेशनमुळे प्रेक्षक आणि घरातील सदस्य दोन्ही हादरले असतानाच, आता सर्वांच्या नजरा आज होणाऱ्या 'भाऊचा धक्का' या भागाकडे लागल्या आहेत. गेल्या संपूर्ण आठवड्यात घरामध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. विशेषतः नॉमिनेशन टास्क दरम्यान राकेश आणि विशाल यांच्यात झालेला वाद चर्चेचा विषय ठरला आहे. हा वाद केवळ खेळापुरता मर्यादित न राहता वैयक्तिक पातळीवर पोहोचला, ज्याचे रूपांतर एका मोठ्या खडाजंगीमध्ये झाले. दोघांमधील हाणामारीची परिस्थिती पाहून घरातील इतर सदस्यही चिंतेत पडले होते. या राड्यामुळे बिग बॉसच्या नियमांचे उल्लंघन झाले असून, आज रितेश देशमुख या प्रकरणावर काय भूमिका घेणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कलर्स मराठीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख अत्यंत गंभीर अवतारात दिसत आहेत. यावरून असे स्पष्ट होत आहे की, आज राकेश आणि विशाल या दोघांचीही रितेश भाऊंकडून कडक शब्दांत खरडपट्टी काढली जाणार आहे.https://prahaar.in/2026/04/04/stalled-redevelopment-projects-in-juhu-dahisar-and-andheri-set-to-get-back-on-track/नवीन प्रोमोमुळे प्रेक्षकांची धाकधूक वाढलीकलर्स मराठीने सोशल मीडियावर नुकताच 'भाऊचा धक्का' या विशेष भागाचा प्रोमो प्रदर्शित केला असून, या प्रोमोने इंटरनेटवर खळबळ माजवून दिली आहे. हा आठवडा राडे, एकमेकांचा केलेला पाणउतारा आणि टोकाची वादावादी यामुळे गाजला असून रितेश भाऊ आता कोणाची गय करणार नाहीत, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये आठवडाभरातील काही भयानक वादांच्या क्लिप्स दाखवण्यात आल्या आहेत. यात स्पर्धक एकमेकांच्या अंगावर धावून जाताना आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत. रितेश देशमुख जेव्हा मंचावर एन्ट्री घेतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील गांभीर्य सर्व काही सांगून जाते. घरातील वातावरण आज गंभीर आहे आणि आता या स्पर्धकांना काही मोठे धक्के देण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत रितेश यांनी घरातील सदस्यांना इशारा दिला आहे. यामुळे आजचा 'भाऊचा धक्का' नेहमीच्या मजा-मस्तीपेक्षा जास्त 'सिरियस' आणि कडक असणार असल्याचे प्रेक्षक म्हणत आहेत.'डबल एलिमिनेशन'नंतर आता कोणाचा नंबर?गेल्या आठवड्यात प्रेक्षकांना मोठा धक्का बसला, जेव्हा प्रभू शेळके आणि वाईल्ड कार्डद्वारे घरात आलेला संकेत पाठक या दोघांनाही एकाच वेळी घराबाहेर पडावे लागले. या 'डबल एलिमिनेशन'नंतर आता घरातील सदस्यांची संख्या केवळ आठवर येऊन ठेपली आहे. घराबाहेर पडल्यानंतर प्रभू शेळकेने तन्वी कोलते हीच या सीझनची विजेती व्हावी, अशी इच्छा व्यक्त करत घरातील समीकरणे अधिक रंजक केली आहेत. आता पुन्हा एकदा शनिवार-रविवार म्हणजेच 'भाऊचा धक्का' जवळ आला असून, प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न आहे - आज घरचा रस्ता कोण धरणार? या आठवड्यात घरात झालेले हाय-व्होल्टेज राडे आणि एकमेकांवर झालेली वैयक्तिक चिखलफेक पाहता, रितेश देशमुख कोणाची कडक शब्दांत शाळा घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री बावनकुळेंच्या नावावर बाराशे एकर जमीन असल्याचा दावा खोटा
सोशल मीडियावरील दिशाभूल महागात; खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखलमुंबई : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे तब्बल १ हजार १४७ एकर जमीन असल्याचा दावा करणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. बावनकुळे यांच्याबद्दल चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रशासकीय तपासात हा दावा पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.फेसबुकवर रामेश्वर दरेकर नावाच्या व्यक्तीने एक व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर १ हजार १४७ एकर जमीन असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला होता. दि. ३१ मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती, मात्र या माहितीमुळे समाजाची दिशाभूल होऊन बावनकुळे कुटुंबाची प्रतिमा मलीन झाल्याची तक्रार निखिल रामचंद्र इंगळे यांनी पोलिसांत दिली.या तक्रारीनंतर प्रशासकीय पातळीवर खातरजमा करण्यात आली. कामठी तहसीलदारांनी जारी केलेल्या अधिकृत प्रमाणपत्रानुसार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर विविध गावे व सर्वे क्रमांकांमध्ये मिळून एकूण २८.४४ एकर जमीन आहे. समाजमाध्यमांवर केला जाणारा १ हजार १४७ एकर जमिनीचा दावा हा वस्तुस्थितीला धरून नसून पूर्णपणे धादांत खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी ३ एप्रिल रोजी रात्री उशिरा गुन्ह्याची नोंद केली. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ७८(१)(ii) आणि ३५६(२) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.
Devendra Fadnavis: 'बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी'
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात राजकीय मतभेद बाजूला ठेवून बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मांडली. सुनेत्राताईंना सर्वच पक्षांनी पाठिंबा देऊन महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्याचे आवाहनही त्यांनी केले.पोटनिवडणुकीच्या संदर्भात माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, बारामती पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा द्यावा, अशी माझी विनंती आहे. ही निवडणूक बिनविरोध होणे महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसे ठरेल. यापूर्वीही आपण अशा निवडणुका बिनविरोध केल्या आहेत. माजी गृहमंत्री आर. आर. आबांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक भाजपने न लढण्याचा निर्णय घेतला होता. तोच मोठेपणा आताही सर्व पक्षांनी दाखवावा.रस्त्यांलगतच्या विहिरींचे 'ऑडिट' होणारनाशिकमधील दिंडोरी येथे झालेला अपघाताविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, दिंडोरीची घटना सर्वांना प्रचंड वेदना देणारी आहे. भिंत मोठी असती तर कदाचित जीव वाचू शकले असते. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आम्ही तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. रहदारीच्या रस्त्यांवर अशा प्रकारच्या विहिरी जिथे कुठे असतील, तिथे तत्काळ उपाययोजना कराव्यात. जर संरक्षक भिंतीची उंची वाढवणे आवश्यक असेल, तर ते काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीडित कुटुंबाला तातडीची मदत घोषित करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूकविषयी मोठं विधान केले आहे.
Kolkata News : सत्ताधारी तृणमूलने २०११ पासून मुख्य प्रतोद निर्मल घोष यांच्या माध्यमातून ही जागा आपल्या ताब्यात ठेवली होती.
Gulab Jamun history: “गुलाब जामुनचा गोड इतिहास: परदेशातून भारतात आलेली चवदार कहाणी”
Gulab Jamun history इतिहासकारांच्या मते, गुलाब जामुनचा उगम मध्यपूर्वेत झाला. फारसमध्ये “लुकमत-अल-कादी” नावाची एक गोड डिश बनवली जायची. ही डिश मैद्याच्या गोळ्यांना तळून त्यांना मधाच्या किंवा साखरेच्या पाकात भिजवून तयार केली जायची. याच डिशने पुढे भारतात येऊन “गुलाब जामुन”चे रूप घेतले.
Pravin Darekar : जुहू, दहिसर, अंधेरीतील रखडलेला पुनर्विकास मार्गी लागणार
दरेकर अभ्यासगटाच्या आणखी एका शिफारशीची अंमलबजावणीमुंबई : दरेकर अभ्यासगटाच्या एका महत्वपूर्ण शिफारशीची अंमलबजावणी होतेय, याचा विशेष आनंद आहे. यामुळे जुहू आणि डी.एन.नगर परिसरातील शेकडो इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल, अशी प्रतिक्रिया रखडलेल्या पुनर्विकासाबाबत शासनाने नेमलेल्या दरेकर अभ्यासगटाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समुह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली.विमानपत्तन प्राधिकरणाने १८ मार्चला एक परिपत्रक काढले असून दहिसर व डी.एन.नगर परिसरातील इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांचा मार्ग मोकळा केला आहे. विमानपत्तन प्राधिकरणाच्या ट्रान्समीटर व रिसीव्हर स्टेशन्सच्या परिघात असलेल्या इमारतींचा उंचीच्या निर्बंधांमुळे अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडला होता. विशेषकरुन स्वयंपुनर्विकास प्रकल्प आणि झोपु प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरत नव्हते. हे प्रकल्प व्यवहार्य ठरण्यासाठी दरेकर अभ्यासगटाने त्यांच्या अहवालातील प्रकरण २४ मध्ये रडार अन्यत्र स्थलांतरित करावेत, अशी महत्वपूर्ण शिफारस केली होती. आता हे रडार अन्यत्र स्थलांतरित करण्यात येणार आहेत. तसेच पुनर्विकास प्रस्तावांचा अभ्यास करुन उंचीचा निर्णय घेण्यासाठी समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे.दरेकर असेही म्हणाले की, जानेवारी २०२६ मध्येच केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी रडार अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आता त्याबाबतचे परिपत्रक आलेले आहे. दरेकर अभ्यासगटाने शासनाला अहवाल सादर केल्यानंतर सातत्याने यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. आता या महत्वपूर्ण शिफारशीची अंमलबजावणी प्रत्यक्षात जमिनीवर होईल, प्रकल्पांबाबत नेमलेली समिती शक्य तितक्या लवकर पुनर्विकास प्रकल्पांना मंजुरी देईल आणि या भागातील लोकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
Savni Ravindra : गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु; 'सावनी रेकॉर्डझ्'ची घोषणा
मुंबई : मराठी संगीतविश्वात आपल्या मधुर, भावस्पर्शी आणि ताकदीच्या आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र आता एका नव्या भूमिकेतून संगीतप्रेमींसमोर आली आहे. तिच्या आवाजातील गोडवा, अभिव्यक्तीची ताकद आणि प्रत्येक गाण्यातून जाणवणारी भावना यामुळे सावनीने रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे आणि आता हाच सुरेल प्रवास पुढे नेत ती स्वतःचं म्युझिक लेबल घेऊन सज्ज झाली आहे. 'सावनी रेकॉर्डझ्' या नावाने तिने आपल्या म्युझिक लेबलची अधिकृत घोषणा नुकत्याच पार पडलेल्या सोहळ्यात केली. मराठी संगीतविश्वातील दिग्गज गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या हस्ते या म्युझिक लेबलचे लाँच करण्यात आले. यावेळी संगीत सृष्टीतील अवधूत गुप्ते, अभिजीत सावंत, कौशल इनामदार, अविनाश - विश्वजीत, नंदेश उमप, ऋषिकेश कामेरकर, मंगेश बोरगावकर, निहार शेंबेकर यांच्यासह लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे ही उपस्थित होत्या. विशेष म्हणजे लेबल अंतर्गत तिचं पहिलं गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत सावनी रवींद्रने 'मुजरा शिवबाला' हे पहिले गाणे सादर केले आहे. वैभव देशमुख यांच्या ओजस्वी शब्दांना विजय नारायण गवंडे यांचे दमदार संगीत लाभले असून सावनीच्या आवाजाने या गाण्याला वेगळीच उंची मिळाली आहे. या गाण्यात सावनी रवींद्रने गायनासह लावणीही सादर केली आहे. हे गाणे लावण्यवतींनाही खूप भावले व या निमित्ताने सर्व लावण्यवतींचा सन्मान करण्यात आला.आजपर्यंत सावनीने संगीतामध्ये सातत्याने निरनिराळे प्रयोग केले आहेत. ‘सावनी ओरिजिनल्स’ या तिच्या यूट्यूबवरील सिरीजअंतर्गत तिने विविध भाषांमध्येही गायन केले आहे. चित्रपटांच्या गाण्यांबरोबरच ती तिच्या संगीतिक प्रयोगांसाठीही ओळखली जाते.या नव्या उपक्रमाबद्दल सावनी म्हणते, ''सर्व अडचणींवर मात करत कुटुंब आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले आहे. संगीत हेच माझं बळ आहे आणि त्याच बळावर स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. ‘सावनी रेकॉर्डझ्’ हे केवळ म्युझिक लेबल नसून ते माझं स्वप्न आहे. एक असं व्यासपीठ जिथे दर्जेदार, अर्थपूर्ण आणि मनाला भिडणारे संगीत साकारेल. जिथे पोहोचण्याचा विचारही अनेकांसाठी धाडसी वाटतो, त्या वाटेवर चालण्याची हिंमत मी केली आहे. कलेच्या प्रेमापोटी सावनी रेकॉर्ड ही मोठी पायरी मी चढते आहे. या निमित्ताने मी सांगू इच्छिते की माझी गाणी अर्थातच या लेबलवर प्रदर्शित होतील त्याचबरोबर संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित गायकांची व नवीन काही करू पाहाणाऱ्यांची गाणी प्रभावीपणे पोहोचवता येतील. पुढच्या काळात नव्या कलाकारांना संधी देत, संगीताच्या माध्यमातून काहीतरी वेगळं आणि अभिमानास्पद घडवण्याचा माझा प्रयत्न असेल.”सुरेश वाडकर म्हणतात, “सावनीने तिच्या ‘मुजरा शिवबाला’ या गाण्यातून खरंच आपल्याला जुन्या काळात नेलं. पूर्वी ज्या ताकदीने आणि ठसक्यात लावण्या सादर केल्या जायच्या, तोच अनुभव या गाण्यातून मिळतो. सावनीने लावणीची परंपरा अत्यंत सुंदरपणे जपली आहे. गाण्याची चाल, शब्द आणि एकूणच सादरीकरण खूपच प्रभावी आहे. विशेष म्हणजे तिने स्वतः गायन करतानाच या गाण्यात उत्कृष्ट परफॉर्मन्सही दिला आहे, त्यामुळे स्क्रीनवर तिचं काम खूप सहज आणि उठून दिसतं. सावनीला संगीताचा उत्तम वारसा लाभला आहे. तिच्या या नव्या म्युझिक लेबलसाठी आणि पुढील वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो.”‘सावनी रेकॉर्डझ्’चा लोगोही तितकाच अर्थपूर्ण आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या ओळखीचं प्रतीक असलेल्या ‘चंद्रकोर’ आणि व्हिनाइल रेकॉर्ड डिस्क यांचा सुंदर संगम या लोगोमध्ये पाहायला मिळतो. हा लोगो केवळ डिझाइन नसून जिंकण्याची वृत्ती, संगीताची परंपरा आणि भविष्यकालीन दर्जेदार कामाची हमी दर्शवतो. मराठी स्त्री गायिकांमध्ये स्वतःचे म्युझिक लेबल सुरू करून त्याअंतर्गत गाणी प्रदर्शित करण्याचं धाडस फार कमी जणी करताना दिसतात. अशा परिस्थितीत सावनी रवींद्रने घेतलेलं हे पाऊल अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
बाजारात बनावट आंब्यांचा सुळसुळाट; तब्बल २०० किलो बनावट आंबे जप्त
हैद्राबाद : उन्हाळा सुरु झाला की स्वागत केलं जात ते फळांचा राजा आंब्याचं, कारण वर्षभरातून फक्त उन्हळ्यातच आपल्याला या आंब्यांची चव चाखता येते, त्यामुळे संपूर्ण बाजार पिवळ्या आंब्यांची भरून जातो. पण हेच पिवळे धम्मक आंबे आपल्या आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकतात. असाच एक धक्कादायक प्रकार हैद्राबादमधून समोर आला आहे.हैद्राबादमध्ये प्रकार उघडकीस हैद्राबादच्या बाजारपेठेत बनावट आंब्याचा सुळसुळाट पसरला आहे, आणि आंबे खाल्ल्याने अनेक लोक आजारी पडत आहेत. या माहितीवरून पोलिसांनी अचानक धड टाकत एका फळ विक्रेत्याकडून तब्बल २०० किलो बनावट आंबे हे जप्त केले आहेत. हैद्राबाद पोलिसांनी कडक कारवाई करत एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.बनावट आंबे कसे पिकवले जातात? हाती आलेल्या माहितीनुसार हैद्राबाद खाद्य सुरक्षा अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्तपणे शहराच्या विविध भागात छापे टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला या कारवाईदरम्यान अनेक धक्कदायक प्रकार उघडकीस आले. ग्राहकांच्या शरीराशी खेळले जाणारे आंबे हे कॅल्शिअम कार्बोइडसारख्या घातक रसायनांचा वापर करून आंबे पिकवले जात होते. पोलिसांनी घटनास्थळावरून २०० किलो आंबे आणि रसायनांची पाकिटे जप्त केली आहेत.असे आंबे शरीरासाठी किती धोकादायक रसायनांचा अति प्रमाणात वापर करून आंबे बाजारात विकले जात होते. कॅल्शियम कार्बोइडने पिकवलेले आंबे खाल्ल्याने घास खवखवणे, पोटात दुखणे उलट्या आणि जुलाब यांसारखे त्रास होऊ शकतात. दीर्घकाळ अशा फळांचे सेवन केल्यास मज्जासंस्था आणि श्वसनाचा गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो.प्रशासनाचे आवाहन उन्हाळात आंब्यांची मागणी ही वाढत जाते. या वाढत्या मागणीचा फायदा घेऊन जास्त आणि लवकर पैसे कमवण्यासाठी फळ विक्रेते बनावट आंबे विकून ग्राहकांना फसवतात. आणि याचा परिणाम ग्राहकांच्या शरीराशी होतो. ग्राहकांनी फळे खरेदी करताना अधिक सावधगिरी बाळगावी काही संशयास्पद आढळ्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.ग्राहकांनी फळे खरेदी करताना अधिक सावधगिरी बाळगावी आणि संशयास्पद वाटल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच बाजारातील वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी व्यापारी अशा अनैतिक मार्गांचा अवलंब करत असल्याने कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
भारतीय जहाज ग्रीन सान्वी'४४,००० टन एलपीजी घेऊन होर्मुझहून रवाना
मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अनेक निर्बंध लादले आहेत, ज्यामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे संकट निर्माण झाले आहे. भारतात एलपीजीच्या खेपांसाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. दरम्यान, होर्मुझमधून भारतासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमी आली आहे.अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, इराणने अनेक भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली आहे. आणखी एका भारतीय ध्वज असलेल्या जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी पार केली आहे.पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू झाल्यापासून भारतात एलपीजी घेऊन जाणारी सहा जहाजे दाखल झाली आहेत. एका महिन्याच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणारे हे सातवे भारतीय जहाज आहे. हे जहाज ४४,००० मेट्रिक टनांहून अधिक एलपीजी घेऊन जात आहे. या जहाजाच्या आगमनामुळे लोकांना एलपीजीचा दिलासा मिळेल, अशी आशा आहे.जहाजाच्या ट्रॅकिंग डेटानुसार, पर्शियन आखातात नांगरलेला 'ग्रीन सान्वी' हा एलपीजी टँकर, इराणी सागरी मार्गाचा वापर करून शुक्रवारी संध्याकाळी होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पूर्व बाजूला पोहोचला. हा टँकर आता मुंबई बंदराच्या दिशेने जात आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या या जहाजाचे नाव 'ग्रीन सान्वी' आहे.पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या लढाईच्या पार्श्वभूमीवर, अनेक भारतीय तेल आणि वायू जहाजे सध्या इराणी परवानगीच्या प्रतीक्षेत होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकली आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला अडकलेल्या १७ भारतीय जहाजांपैकी, 'ग्रीन आशा' आणि 'जग विक्रम' ही दोन जहाजे एलपीजीने भरलेली आहेत.ही दोन जहाजेही लवकरच भारताच्या दिशेने रवाना होऊ शकतात. जर ही दोन एलपीजीने भरलेली जहाजे भारतात पोहोचली, तर एलपीजीच्या तुटवड्याचा सामना करणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळेल.
मार्च महिन्यात मारुती सुझुकीच्या विक्रीत वाढ; 2.25 लाख युनिट्सचा टप्पा पार
मुंबई : देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने मार्च 2026 महिन्यात विक्रीत उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2026 मध्ये एकूण 2,25,251 युनिट्सची विक्री झाली असून, मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या 1,92,984 युनिट्सच्या तुलनेत ही तब्बल 16.72 टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे कंपनीच्या विक्रीत सातत्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.देशांतर्गत विक्रीबाबतही कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. मार्च 2026 मध्ये कंपनीची देशांतर्गत विक्री 1,69,428 युनिट्स इतकी झाली असून, मार्च 2025 मधील 1,53,134 युनिट्सच्या तुलनेत यात 10.64 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ भारतीय बाजारपेठेत कंपनीच्या मजबूत उपस्थितीचे द्योतक मानली जात आहे.वित्त वर्ष 2025-26 साठीही कंपनीची कामगिरी सकारात्मक राहिली आहे. 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मारुती सुझुकीने एकूण 24,22,713 युनिट्सची विक्री केली आहे. हे प्रमाण वित्त वर्ष 2024-25 मधील 22,34,266 युनिट्सच्या तुलनेत 8.4 टक्क्यांनी अधिक आहे. याशिवाय, देशांतर्गत विक्रीतही वाढ झाली असून, ती 3.8 टक्क्यांनी वाढून 19,74,939 युनिट्सपर्यंत पोहोचली आहे.कंपनीच्या विविध सेगमेंट्समध्येही मिश्र चित्र पाहायला मिळाले आहे. मिनी सेगमेंटमध्ये अल्टो आणिएस-प्रेसो या कार्सचा समावेश असून, मार्च 2026 मध्ये या सेगमेंटमध्ये 11,741 युनिट्सची विक्री झाली आहे. ही विक्री मार्च 2025 मधील 11,655 युनिट्सच्या तुलनेत केवळ 0.7 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, संपूर्ण वित्त वर्षात या सेगमेंटमध्ये घसरण दिसून आली आहे. वित्त वर्ष 2025-26 मध्ये 1,12,291 युनिट्सची विक्री झाली असून, मागील वर्षाच्या 1,25,770 युनिट्सच्या तुलनेत ही 10.71 टक्क्यांनी कमी आहे.कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये मात्र कंपनीने चांगली प्रगती केली आहे. इग्निस,बालेनो, सेलेरियो, डिझायर, स्विफ्ट आणि वॅगनआर या लोकप्रिय मॉडेल्समुळे मार्च 2026 मध्ये या सेगमेंटची विक्री 71,789 युनिट्सवर पोहोचली आहे. ही विक्री मार्च 2025 मधील 61,097 युनिट्सच्या तुलनेत 17.5 टक्क्यांनी अधिक आहे. वार्षिक स्तरावरही या सेगमेंटमध्ये 4.84 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून, विक्रीचा आकडा 8,08,102 युनिट्सपर्यंत गेला आहे.युटिलिटी व्हेईकल्स सेगमेंटमध्ये कंपनीने सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. ब्रेझा, एर्टिगा, ग्रँड व्हिटारा, फ्रॉन्क्स, इनव्हिक्टो आणि एक्सएल६ यांसारख्या मॉडेल्समुळे मार्च 2026 मध्ये 71,356 युनिट्सची विक्री झाली आहे, जी मार्च 2025 मधील 61,097 युनिट्सच्या तुलनेत 16.7 टक्क्यांनी अधिक आहे. आर्थिक वर्षाच्या पातळीवरही या सेगमेंटमध्ये 5.67 टक्क्यांची वाढ झाली असून, विक्री 7,60,987 युनिट्सवर पोहोचली आहे.याशिवाय, निर्यातीतही कंपनीने भक्कम कामगिरी केली आहे. मार्च 2026 मध्ये निर्यात 47,040 युनिट्सपर्यंत पोहोचली असून, मार्च 2025 मधील 32,968 युनिट्सच्या तुलनेत सुमारे 34 टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे.एकूणच, मारुती सुझुकीसाठी मार्च 2026 आणि संपूर्ण वित्त वर्ष 2025-26 हे विक्रीच्या दृष्टीने सकारात्मक ठरले असून, विविध सेगमेंटमध्ये वाढती मागणी आणि निर्यातीत झालेली वाढ ही कंपनीसाठी भविष्यातील मजबूत संकेत मानली जात आहे.
Rohit Pawar : अशोक खरात प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी मोठी मागणी केली असून, त्यांचे ट्वीट चर्चेत आहे.
World Rat Day: लहानसा उंदीर, पण जगभर सत्ता! ‘वर्ल्ड रॅट डे’निमित्त जाणून घ्या भन्नाट गोष्टी!
World Rat Day शास्त्रज्ञांच्या मते उंदीर यांची उत्पत्ती मध्य किंवा उत्तर चीनमध्ये झाली. तिथून हळूहळू ते इतर भागांत पसरले. पण ते जगभर कसे पोहोचले, हा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर प्राचीन व्यापार आणि समुद्री प्रवासात दडलेले आहे.
Nashik Accident : दिंडोरी अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शालेय विद्यार्थ्यांचे एक वाहन विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, यात ६ विद्यार्थी आहेत. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केलं आहे. तसेच मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शालेय विद्यार्थ्यांचे एक वाहन विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, यात ६ विद्यार्थी आहेत. ही अतिशय दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारी ही घटना आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मंत्री गिरीष महाजन यांच्याशी मी चर्चा केली असून त्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि ते समन्वय साधून आहेत. तसेच मृतांच्या वारसांना ₹५ लाख आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.नेमकं प्रकरण काय ?नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शुक्रवारी (३ एप्रिल) रात्री शिवाजी नगर परिसरात भरधाव वेगात असलेली कार अचानक अनियंत्रित होऊन पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तब्बल ९ जणांचा, त्यात ७ ते १४ वयोगटातील सहा लहान मुलांचाही समावेश असून, दुर्दैवी मृत्यू झाला.नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शालेय विद्यार्थ्यांचे एक वाहन विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला, यात 6 विद्यार्थी आहेत. अतिशय दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारी ही घटना आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.मंत्री…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 4, 2026इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब एका स्नेहसंमेलनाहून परतत असताना रात्री सुमारे १० वाजता हा अपघात घडला. कारचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि वाहन थेट विहिरीत जाऊन बुडाले. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र अंधार आणि खोल पाण्यामुळे बचावकार्याला मोठा अडथळा आला.या घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि एनडीआरएफ (National Disaster Response Force) चे पथक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्यात आली, परंतु तोपर्यंत सर्वांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, अपघातामागील नेमके कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत.
Iran-US-Israel War : चर्चा थांबली, संघर्ष पेटला! इराणच्या दाव्यांमुळे जागतिक तणाव वाढला
अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यातील तणाव वाढला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अमेरिकेचे लष्करी विमान पाडल्याने इराणसोबतच्या वाटाघाटींवर परिणाम होणार नाही.अमेरिकन ए-१० विमान पाडल्याचा इराणचा दावा :इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ एक अमेरिकन ए-१० विमान पाडल्याचा दावा केला आहे. तथापि, या दाव्याची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. ए-१० हे एक लढाऊ विमान आहे, जे विशेषतः जमिनीवरील शत्रूच्या लक्ष्यांवर मारा करण्यासाठी वापरले जाते. दरम्यान, आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. दोन लोकांना घेऊन जाणारे एक अमेरिकन एफ-१५ ई स्ट्राइक ईगल लढाऊ विमानही इराणवर कोसळले. त्यातील एका क्रू सदस्याला अमेरिकन सैन्याने यशस्वीरित्या वाचवले आहे. त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. तथापि, दुसऱ्या क्रू सदस्याची प्रकृती अद्याप अस्पष्ट असून, त्याला शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. (Iran-US-Israel War)तब्बल २३ वर्षांनंतर शत्रूच्या प्रदेशात अमेरिकेचे लढाऊ विमान पडले :पेंटागॉनने अमेरिकी संसदेच्या सशस्त्र सेवा समितीला कळवले आहे की एका सैनिकाला सुखरूप वाचवण्यात आले आहे, पण दुसऱ्याच्या प्रकृतीबद्दल अद्याप काही समजू शकलेले नाही. याचा अर्थ असा की, अमेरिकेच्या संरक्षण विभागाला तो कुठे आहे किंवा त्याची प्रकृती कशी आहे हे माहीत नाही. दरम्यान, जेव्हा ट्रम्प यांना विचारण्यात आले की, जर इराणने बेपत्ता सैनिकाला इजा पोहोचवली तर अमेरिका काय करेल, तेव्हा त्यांनी या विषयावर कोणतीही टिप्पणी केली नाही. ते फक्त म्हणाले, आम्ही आशा करतो की असे होणार नाही. याचा अर्थ असा की, त्यांनी सर्वात वाईट परिस्थितीच्या शक्यतेवर स्पष्ट उत्तर देणे टाळले. ही घटना विशेष मानली जात आहे कारण बऱ्याच काळानंतर प्रथमच शत्रूच्या प्रदेशात अमेरिकेचे लढाऊ विमान पाडण्यात आले आहे. यापूर्वी अशी घटना २००३ मध्ये इराक युद्धादरम्यान घडली होती. (Iran-US-Israel War)चर्चेत सहभागी होण्याचा इराणचा नकार :सध्या सुरू असलेल्या संघर्षादरम्यान इराणवर अमेरिकन विमान पाडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या घटनेमुळे प्रदेशातील तणाव आणखी वाढला आहे. इराणी प्रसारमाध्यमांनी विमानाचे अवशेष दर्शवणारे फोटो प्रसिद्ध केले आहेत. दरम्यान, दोन्ही देशांमधील सुरू असलेली चर्चा जवळजवळ थांबली आहे. मात्र इराणने प्रस्तावित चर्चेत सहभागी होण्यास नकार दिल्याची माहिती आहे, ज्यामुळे शांततेच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. (Iran-US-Israel War)
Surbhi Jyoti Pregnancy News सध्या सुरभी तिच्या गरोदरपणाचा खास काळ एन्जॉय करत आहे. ती सोशल मीडियावर अधूनमधून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना अपडेट देत असते. काही दिवसांपूर्वी तिने एक खास फोटो शेअर करत आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती.
Naila Grrewal : अभिनेत्री नायला ग्रेवाल मामला लीगल है या वेबसिरीजमुळे चर्चेत असून, तिने '12th Fail' सिनेमाबद्दलचा एक खुलासा केला आहे.
R. Madhavan : ‘धुरंधर २’ची क्रेझ ! आर. माधवनने थिएटरमध्ये जाऊन पाहायला स्वत:चा चित्रपट
R. Madhavan : १९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने जगभरात एक हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे.
Lawrence Bishnoi: कॅनडात पुन्हा गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी…“हे फक्त ट्रेलर!”
Lawrence Bishnoi मिळालेल्या माहितीनुसार, ब्रॅम्पटनमधील ‘ऑटोविला कार सेल्स’ या शोरूमवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. या हल्ल्याची जबाबदारी मन्ना ब्रॅम्पटन नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर घेतल्याचे सांगितले जात आहे. त्याने एका पोस्टद्वारे आणि व्हिडिओद्वारे या घटनेची माहिती दिली.
Nitesh Rane : मुंब्र्याचे नाव 'मुंब्रादेवी'करणार! - मंत्री नितेश राणे
- मदरशांमध्ये डॉक्टर-इंजिनिअर नव्हे, दहशतवादी तयार होतातमुंबई : मुंब्रा-कळवा परिसर हिरवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, तुम्ही शंभर जन्म घेतले तरी तुमचे हे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत. हा कोणाच्या अब्बाचा मुंब्रा नाही, तर हे आमच्या हिंदू राष्ट्रातील 'मुंब्रादेवी'चे क्षेत्र आहे. ज्याप्रमाणे आम्ही इस्लामपूरचे 'ईश्वरपूर' केले, त्याचप्रमाणे लवकरच मुंब्र्याचे अधिकृत नाव 'मुंब्रादेवी' करून येथील हिंदू अस्मिता पुन्हा प्रस्थापित करू, असा वज्रनिर्धार राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.मुंब्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या रोखठोक भाषणातून जिहादी मानसिकता आणि हिंदूविरोधी शक्तींवर प्रहार केला. काही लोकप्रतिनिधींच्या चिथावणीखोर वक्तव्यांचा समाचार घेताना नितेश राणे म्हणाले की, अशी विखारी विचारधारा मदरशांमधूनच बाहेर येते. मदरशांमध्ये बसवून कोणाला डॉक्टर किंवा इंजिनिअर बनवले जात नाही, तिथे केवळ दहशतवादी तयार केले जातात. अशा सर्व मदरशांना कुलूप लावून या दहशतवाद्यांना बाहेर काढण्याची वेळ आली आहे. धर्मांतरविरोधी कायद्यानंतर आता पुढचा नंबर हा मदरशांचाच असेल, हे लक्षात ठेवा.मंत्री राणे म्हणाले, आम्ही लव्ह जिहादविरोधी कायदा आणला आहे. आता जर कोणत्या शाहरुख किंवा आमिरने आमच्या हिंदू बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर त्यांना सात वर्षे तुरुंगाची हवा खावी लागेल. तिथे त्यांना साधे साबण उचलण्याचीही मुभा मिळणार नाही. त्याचप्रमाणे 'जितुद्दीन'सारख्या नेत्यांना मी सकाळी नाश्त्याला खातो', असा हल्लाबोलही त्यांनी केला.हिंदूंची ताकद महत्त्वाची!मी कोणत्याही गोल टोपी किंवा दाढीवाल्यांच्या मतांनी आमदार-मंत्री झालेलो नाही. हिंदू समाजाने दिलेल्या आशीर्वादाच्या जोरावर मी इथे उभा आहे. आम्हाला त्यांच्या पाच मतांची चिंता नाही, कारण त्यांच्या पाच मतांच्या बदल्यात आमचा हिंदू समाज आम्हाला ५० मते देण्याची ताकद deveठेवतो, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.'देवाभाऊ'चा हा महाराष्ट्र आहे. इथे मस्ती चालणार नाही...#prahaarnewsline #MarathiNews #niteshrane #maharashtra #DevendraFadnavis #muslman #hindu pic.twitter.com/TzGGrZgCsW— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) April 4, 2026हा देवाभाऊंचा महाराष्ट्र आहे...मंत्री नितेश राणे म्हणाले, हिंदू समाजाला घाबरवण्याचे प्रयत्न करू नका. जर आमचा तिसरा डोळा उघडला, तर शुक्रवारी तुमचे 'सिलेंडर'सुद्धा वर येणार नाहीत, याची काळजी आम्ही घेऊ. हा देवाभाऊंचा महाराष्ट्र आहे, 'घुसेगा भी और मारेगा भी', असा इशाराही त्यांनी दिला.
Air India Airlines : एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची पश्चिम आशियातून ४२ विमानसेवा सुरु होणार
पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर, टाटाच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या पश्चिम आशिया प्रदेशातून ये-जा करणाऱ्या ४२ अनुसूचित आणि अनियोजित विमानसेवा संयुक्तपणे चालवणार आहेत.आज (शनिवार, ४ एप्रिल) जारी केलेल्या एका निवेदनात, एअरलाइन्सने म्हटले आहे की, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस ४ एप्रिल रोजी पश्चिम आशिया प्रदेशातून ये-जा करणाऱ्या ४२ अनुसूचित आणि अनियोजित विमानसेवा संयुक्तपणे चालवतील. यामध्ये संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधून ये-जा करणाऱ्या २६ अनियोजित विमानसेवांचा समावेश आहे, ज्या प्रस्थान स्थानकांवरील स्लॉटची उपलब्धता आणि इतर विद्यमान परिस्थितीच्या अधीन असतील. कंपनीने म्हटले आहे की, या विमानसेवा संबंधित भारतीय आणि यूएई मधील स्थानिक नियामक प्राधिकरणांकडून आवश्यक परवानग्या घेऊन चालवल्या जात आहेत. एअर इंडिया ग्रुपने म्हटले आहे की, ते बाधित प्रवाशांशी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधतील.एअरलाइनने प्रवाशांना त्यांचे संपर्क तपशील अद्ययावत करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून त्यांना पुनर्बुकिंगच्या ऑफर्स आणि कामकाजाच्या सूचना मिळू शकतील. एअरलाइनने म्हटले आहे की, उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि इतर प्रदेशांमधून ये-जा करणारी एअर इंडियाची सर्व विमाने नियोजित वेळेनुसार सुरू आहेत. ज्या प्रवाशांच्या नियोजित सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत, ते एअरलाइनच्या अधिकृत वेबसाइटवरून पुनर्बुकिंगसाठी किंवा पूर्ण परताव्यासाठी अर्ज करू शकतात.कंपनीने पुढे सांगितले की, ज्या मार्गांवर एअर इंडिया ग्रुपच्या नियोजित विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या आहेत, अशा कोणत्याही मार्गावर प्रवास बुक केलेल्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या तारखा बदलता येतील किंवा कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पूर्ण परतावा मिळवता येईल.एअर इंडियाने प्रवाशांना त्यांच्या पुनर्बुकिंग किंवा रद्द करण्याच्या विनंत्या एअरलाइनच्या वेबसाइट, https://airindia.com वरून सादर करण्याचा सल्ला दिला आहे. अधिक माहितीसाठी, कृपया +911169329333 किंवा +911169329999 या क्रमांकांवर २४x७ ग्राहक सहाय्यता लाईनशी संपर्क साधा.
Narhari Zirwal : ‘…तर ९ जीव वाचले असते’; मंत्री झिरवाळ दिंडोरीमधील अपघातस्थळी येताच स्थानिक आक्रमक
Narhari Zirwal : घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले. शेवटी क्रेनच्या साहाय्याने कार विहिरीबाहेर काढण्यात आली.
Nashik Accident : भरधाव कार थेट विहिरीत पडून ९ जणांचा हृदयद्रावक अंत
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शुक्रवारी (३ एप्रिल) रात्री शिवाजी नगर परिसरात भरधाव वेगात असलेली कार अचानक अनियंत्रित होऊन पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तब्बल ९ जणांचा, त्यात ७ ते १४ वयोगटातील सहा लहान मुलांचाही समावेश असून, दुर्दैवी मृत्यू झाला.इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब एका स्नेहसंमेलनाहून परतत असताना रात्री सुमारे १० वाजता हा अपघात घडला. कारचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि वाहन थेट विहिरीत जाऊन बुडाले. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र अंधार आणि खोल पाण्यामुळे बचावकार्याला मोठा अडथळा आला.
Akshardham Temple New Jersey: अमेरिकेतील भव्य अक्षरधाम मंदिर वादात; मजुरांच्या शोषणाचे गंभीर आरोप
Akshardham Temple New Jersey हे मंदिर बीएपीएस स्वामीनारायण संस्था यांनी उभारले आहे. मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानसह भारतातील अनेक भागांतून कारागीर आणि मजूर नेण्यात आले होते. त्यांनी सांगितले की, या कामासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागली.
sunetra pawar : राजकीय हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन; नेमकी काय चर्चा झाली?
sunetra pawar : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनद्वारे संवाद साधला आहे.
Top 10 News: आजच्या ताज्या घडामोडी...
Jamun Benefits: डायबिटीजपुरताच नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी जांभूळ ठरते रामबाण!
Jamun Benefits आयुर्वेदात जांभूळाच्या फळांबरोबरच त्याची पाने आणि फांद्या देखील औषध म्हणून वापरल्या जातात. जांभूळाची काडी दात घासण्यासाठी वापरल्यास तोंडाचे आरोग्य सुधारते आणि तोंडातील आजार कमी होतात.
Ajay Devgan : अभिनेता अजय देवगणला 'फूल और काँटे' सिनेमातून लोकप्रियता मिळाली; पण त्यानंतर तब्बल 10 सिनेमे फ्लॅाप ठरले होते.
IPL 2026 : पंजाबची चेन्नईवर ५ विकेट्सने मात; आयुष म्हात्रेची झुंजार खेळी व्यर्थ
- सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव; घरच्या मैदानावर नामुष्कीपंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला पाच गडी राखून पराभूत करत आयपीएल २०२६ मधील आपला सलग दुसरा सामना जिंकला. दरम्यान, सीएसकेला आपला सलग दुसरा सामना गमवावा लागला. चेपॉक येथे झालेल्या सामन्यात, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, आयुष म्हात्रे (७३) आणि शिवम दुबे (४५*) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईने २० षटकांत पाच गडी गमावून २०९ धावा केल्या. पंजाबने १८.४ षटकांत पाच गडी गमावून २१० धावा करत हा सामना जिंकला.आयपीएलच्या इतिहासातील पंजाब किंग्सचा हा दुसरा सर्वात मोठा यशस्वी रनचेस समान होता. यापूर्वी संघाने गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २६२ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पार केले होते.२१० धावांचे लक्ष्य गाठताना, पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. दरम्यान, प्रियांश आर्याने ३९ धावांची धडाकेबाज खेळी केली. पंजाबने दमदार सुरुवात केली. प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग यांनी शानदार फलंदाजी करत ४.२ षटकांत पहिल्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या. प्रियांशने केवळ ११ चेंडूंचा सामना करत ३५४ च्या स्ट्राईक रेटने ३९ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि चार षटकार मारले. प्रभसिमरनने ३४ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. कूपर कॉनॉलीने सहा चौकारांच्या मदतीने २२ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या. मात्र, नेहल वाढेराने आपल्या कामगिरीने निराशा केली आणि तो १० धावांवर मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर आऊट झाला.कर्णधार श्रेयस अय्यरने एक बाजू सांभाळत या मोसमातील आपले पहिले अर्धशतक झळकावले. अय्यर २९ चेंडूंमध्ये ५० धावांवर बाद झाला. या खेळीत अय्यरने चार चौकार आणि तीन षटकार मारले. अय्यर बाद झाल्यानंतर, शशांक सिंग आणि मार्कस स्टोइनिस यांनी पंजाब किंग्सला पुढील धक्का बसण्यापासून वाचवले. शशांक सहा चेंडूंमध्ये १४ धावांवर नाबाद राहिला आणि स्टोइनिस तीन चेंडूंमध्ये नऊ धावांवर नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला. गोलंदाजीमध्ये, चेन्नई सुपर किंग्सकडून मॅट हेन्री आणि अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी करत २०९ धावा केल्या. संजू सॅमसन फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला नाही, त्याने केवळ सात धावा केल्या. त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि आयुष म्हात्रे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९६ धावा जोडल्या. ऋतुराज २२ चेंडूंमध्ये २८ धावा करून बाद झाला. दरम्यान, आयुषने शानदार फलंदाजी करत ४३ चेंडूंमध्ये ७३ धावांची दमदार खेळी केली. कार्तिक शर्माने पुन्हा एकदा निराशा केली आणि केवळ एक धाव काढली. तर दुसरीकडे सरफराज खान उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने स्फोटक फलंदाजी करत अवघ्या १२ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या. दरम्यान, शिवम दुबेने अखेरच्या षटकांमध्ये अवघ्या २७ चेंडूंमध्ये नाबाद ४५ धावा केल्या. दुबेने आपल्या खेळीत पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश केला. पंजाब किंग्सकडून विजयकुमार वैशाकने दोन बळी घेतले.
Abhishek Bachchan on Marriage एका मुलाखतीत बोलताना अभिषेकने सांगितले की, मुलगी आराध्या झाल्यानंतर त्याच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. आराध्या खूप प्रश्न विचारते आणि तिच्या या सवयीमुळे त्याला अनेक गोष्टी नव्याने समजल्या.
CBSE : CBSE चा मोठा निर्णय! सहावीपासून तीन भाषा अनिवार्य; शिक्षण पद्धतीत मोठा बदल
CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमात मोठा बदल केला आहे.
Raj Thackeray : मनसेत मोठी उलटफेर! राज ठाकरेंनी लेकावर सोपवली मोठी जबाबदारी
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा संपर्क प्रमुखांची नावे जाहीर केली आहेत. यासोबतच पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

28 C