भारत-पाक सीमेवर 'प्रचंड'हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास
जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर ‘प्रचंड’मध्ये उड्डाण केले. भारत–पाकिस्तान सीमेच्या जवळ ‘प्रचंड’मध्ये सह-पायलट म्हणून उड्डाण करत त्यांनी इतिहास रचला. स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टरमध्ये सह-पायलट म्हणून उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.एलसीएच ‘प्रचंड’ने जैसलमेर येथील भारतीय वायुदल (आयएएफ) स्थानकावरून उड्डाण केले. उड्डाणापूर्वी कॅप्टनने राष्ट्रपतींना आवश्यक माहिती दिली. ऑलिव्ह-हिरव्या रंगाची गणवेश आणि हेल्मेट परिधान करून त्यांनी कॉकपिटमधून हात हलवून उपस्थितांना अभिवादन केले. भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर या नात्याने राष्ट्रपतींनी उड्डाणादरम्यान कॉकपिटमधून देशाला संदेशही दिला. त्या म्हणाल्या, “प्रचंड हेलिकॉप्टर आत्मनिर्भरतेचे प्रभावी प्रतीक आहे. सध्या मी जैसलमेर जिल्ह्यावरून उड्डाण करत आहे. आपल्या शूर सैनिकांना मी मनःपूर्वक शुभेच्छा आणि कृतज्ञता व्यक्त करते. तुम्हाला माझा सादर सलाम. जय हिंद, जय भारत.”हे उड्डाण सुमारे २५ मिनिटे चालले. हेलिकॉप्टर पोखरण फायरिंग रेंज वरून गेले, जिथे भारतीय वायुदल संध्याकाळी ‘वायु शक्ति’ या अग्निशक्ती प्रदर्शनाचे आयोजन करणार आहे. राष्ट्रपती मुर्मू दिवसा, संध्याकाळी आणि रात्री होणाऱ्या या प्रदर्शनाचे निरीक्षण करणार आहेत. यापूर्वी वायुदलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी जैसलमेर वायुदल स्थानकावर त्यांचे स्वागत केले.आजच्या उड्डाणासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आक्रमक हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण करणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरल्या आहेत. अग्रिम मोर्चावरील लष्करी प्लॅटफॉर्मशी उच्चस्तरीय सहभागाच्या मालिकेतील ही आणखी एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. त्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अंबाला येथील वायुदल स्थानकावर डसॉल्ट राफेल (राफेल लढाऊ विमान) मध्ये उड्डाण केले होते. त्यामुळे भारतीय वायुदलाच्या दोन वेगवेगळ्या लढाऊ विमानांत उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या. एप्रिल २०२३ मध्ये त्यांनी आसाम मधील तेजपूर वायुदल स्थानकावर सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानात सुमारे ३० मिनिटांचे उड्डाण केले होते. या दरम्यान त्यांनी ब्रह्मपुत्रा आणि तेजपूर खोऱ्यावरून उड्डाण करत हिमालयास चे विहंगम दृश्य अनुभवले.एलसीएच ‘प्रचंड’ हे भारताचे पहिले स्वदेशी डिझाइन आणि विकसित केलेले लढाऊ हेलिकॉप्टर आहे. याची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड – एचएएल यांनी केली आहे. प्रगत एव्हिऑनिक्स, स्टेल्थ वैशिष्ट्ये, रात्रीच्या हल्ल्याची क्षमता तसेच एअर-टू-ग्राउंड आणि एअर-टू-एअर क्षेपणास्त्रे, रॉकेट्स आणि २० मिमी तोफ यांसारख्या अत्याधुनिक शस्त्रसज्जतेमुळे एलसीएच भारतीय वायुदलाची युद्धक्षमता लक्षणीयरीत्या वाढवतो.
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा पुन्हा हल्ला; ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, परिसरात संताप
कल्याण : काही दिवसांपूर्वीच कुत्र्याच्या चाव्यानंतर भीतीतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने कल्याण शहर हादरले आहे. आणखी एक मुलगा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.मोहने गाळेगावमध्ये भीषण प्रकारमिळालेल्या माहितीनुसार, कल्याणजवळील मोहने गाळेगाव परिसरात रस्त्यावर खेळणाऱ्या दोन मुलांवर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही मुलं गंभीर जखमी झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान सात वर्षीय खुशील वाघे याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.महापालिकेकडे तातडीच्या कारवाईची मागणीघटनेनंतर स्थानिक प्रतिनिधींनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडे धाव घेतली. परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याचा मुद्दा उपस्थित करत लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेची मागणी करण्यात आली. सोसायट्यांच्या आवारातही हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे.पूर्वीची घटना अद्याप ताजीदरम्यान, २३ फेब्रुवारी रोजी कल्याण पूर्व भागात ३० वर्षीय आयश विश्वनाथ अमीन याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर आवश्यक उपचार पूर्ण न केल्यामुळे त्याला रेबिजची लक्षणे जाणवू लागली आणि भीती आणि त्रासामुळे आत्महत्या केली.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणसातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी ठोस आणि तातडीची उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत आवश्यक पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
१ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा
मुंबई : रविवार, १ मार्च २०२६ रोजी उपनगरीय रेल्वे सेवांवर मोठ्या प्रमाणात देखभाल आणि अभियांत्रिकी कामे हाती घेण्यात येणार आहेत. सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे या दोन्ही मार्गांवर जम्बो मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुख्य मार्ग (CSMT – विद्याविहार)सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ दरम्यान CSMT ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल.सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ दरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाउन धीम्या गाड्या विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला येथे थांबतील.घाटकोपरहून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील आणि कुर्ला ते भायखळा दरम्यानच्या स्थानकांवर थांबतील.हार्बर मार्ग (कुर्ला – वाशी)सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० या वेळेत अप आणि डाउन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल.सीएसएमटीहून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्याडाउन हार्बर मार्गावरील काही गाड्या रद्द राहतील.पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी १०.१७ ते दुपारी १५.४७ पर्यंत सीएसएमटीकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील काही सेवाही रद्द करण्यात येणार आहेत.ब्लॉकदरम्यान सीएसएमटी–कुर्ला आणि पनवेल–वाशी दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील.हार्बर प्रवाशांना ठाणे–वाशी/नेरुळ दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.रेल्वे प्रशासनाने सांगितले की, पायाभूत सुविधांची सुरक्षितता आणि देखभाल लक्षात घेऊन हा ब्लॉक आवश्यक आहे.पश्चिम रेल्वेवरील जंबो ब्लॉकरविवार, १ मार्च रोजी वेस्टर्न रेल्वे कडून चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.धीम्या मार्गावरील गाड्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान फास्ट मार्गावर चालवण्यात येतील.काही अप आणि डाउन उपनगरीय सेवा रद्द राहतील.चर्चगेटकडे जाणाऱ्या काही गाडयांना बांद्रा किंवा दादर हेच शेवटचे स्टेशन असेल.प्रभावित गाड्यांची माहिती संबंधित स्थानकांवर उपलब्ध असेल.प्रवाशांना आवाहनदोन्ही मार्गांवरील बदल लक्षात घेऊन प्रवाशांनी रविवारी प्रवासाचे नियोजन करावे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. देखभाल कामांमुळे काही गैरसोय होऊ शकते, मात्र सुरक्षित आणि सुरळीत सेवा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन नक्कीच सकारात्मक विचार करेल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.राज्यातील शासन मान्य विद्यापीठ व महाविद्यालयातील पदभरतीसाठी पवित्र पोर्टलप्रमाणे निर्माण करणार का असा विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नास उत्तर देताना ते बोलत होते.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, शासन मान्य विद्यापीठ व महाविद्यालयातील पदभरतीसाठी भरती प्रक्रिया करताना आठ सदस्यांचे मुलाखत पॅनल असते. या मुलाखत पॅनलमधील सदस्यांनी गुण द्यायचे असतात. यामध्ये संचालकाचा सहभाग ना हरकत देण्यापुरताच असतो. प्रत्येक पॅनलमधील दिलेल्या सदस्याचे गुण एकत्रित करून विद्यापीठाला कळविले जातात. विद्यापीठाने त्याला मान्यता द्यायची असती. मात्र तरीही शिक्षण विभागाप्रमाणे अथवा त्यापेक्षा सुधारित भरती प्रकिया करण्यासाठी सूचना आली आहे त्याच्यावर उच्च व तंत्रशिक्षण विभाग नक्की विचार करेल असे उत्तर त्यांनी दिले.
IAS M Devendra Singh Suspended : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग (IAS) यांना राज्य सरकारने निलंबित केले आहे.
New GDP series: नवीन जीडीपी मालिकेनुसार तिसऱ्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेत 7.8% वाढ
New GDP series: हे आकडे नव्या पद्धतीने मोजले गेले आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर, अर्थव्यवस्था किती वाढली हे मोजण्यासाठी एक 'तुलनेचा आधार वर्ष' ठरवावे लागते. आतापर्यंत २०११-१२ हे वर्ष आधार म्हणून वापरले जात होते. ते आता बदलून २०२२-२३ करण्यात आले आहे.
एक तासापेक्षा जास्त काळ चाललेल्या सुनावणीनंतर न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या एकल खंडपीठाने गर्दीने भरलेल्या न्यायालयात हा आदेश दिला.
माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता
मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तसेच या समितीची कार्यकक्षा नव्याने निश्चित करत वित्तीय मान्यतेची सुधारित मर्यादाही ठरविण्यात आली आहे.सामान्य प्रशासन विभागाच्या पाच ऑक्टोबर २००१ च्या शासन निर्णयानुसार मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन दशकांत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अमूलाग्र बदल झाले आहेत. वाढती महागाई, रुपयाचे अवमूल्यन, तांत्रिक प्रगती, सायबर सुरक्षा, ऑनलाईन सेवा वितरण, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वाढता वापर तसेच ई-गव्हर्नन्स प्रकल्पांची वाढलेली व्याप्ती व खर्च या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांचे स्वरूप आणि किंमत लक्षणीयरीत्या बदलली आहे.या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांचे प्रभावी नियोजन, अंमलबजावणी, समन्वय व नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी समितीचे पुनर्गठन आणि आर्थिक मर्यादा वाढविणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. यानुसार, मंत्रिमंडळाने उच्चाधिकार समितीची सुधारित रचना, कार्यकक्षा आणि वित्तीय मर्यादेला मान्यता दिली आहे. नव्या निर्णयानुसार, रु. पाच कोटींपेक्षा जास्त ते रु. 100 कोटींपर्यंतच्या माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांच्या खर्चास उच्चाधिकार समिती मान्यता देऊ शकेल.तसेच, रु. १०० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या माहिती तंत्रज्ञानविषयक खर्चाच्या सर्व प्रस्तावांना उच्चाधिकार समितीची शिफारस अनिवार्य राहील आणि त्यानंतरच त्या प्रस्तावांना मंत्रिमंडळाची अंतिम मान्यता घ्यावी लागणार आहे.या निर्णयामुळे राज्यातील आयटी व ई-गव्हर्नन्स प्रकल्पांना गती मिळणार असून, बदलत्या तांत्रिक गरजांनुसार जलद व परिणामकारक निर्णयप्रक्रिया शक्य होणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी कळविले आहे.
मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. या बैठकीत पुढील प्रमुख घाटमार्गांवर सविस्तर चर्चा करण्यात आली—अणुस्करा–गावडी (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) ते लांजा (जि. रत्नागिरी) येथील भांबेड–धनगरवाडी रस्ता.पावनखिंड–गजापूर–विशाळगड पायथा (ता. शाहूवाडी) ते संगमेश्वर तालुक्यातील देवडे–भोवडे जोडणारा नवीन घाटमार्ग.राष्ट्रीय महामार्ग १९३ पासून बाजारभगाव–किसरूळ–काळजवडे–पोंबरे–कोलीक–पडसाळी ते किजिडी घाटास जोडणारा रस्ता.बैठकीस आमदार विनायक कोरे, आमदार किरण सामंत, आमदार चंद्रदीप नरके, सचिव (रस्ते) संजय दशपुते, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) संतोष शेलार, मुख्य अभियंता (कोकण) शरद राजभोज, अधिक्षक अभियंता (कोल्हापूर) तुषार बुरूड, कार्यकारी अभियंता (विशेष प्रकल्प) चंद्रकांत आयरेकर, जिल्हा वन अधिकारी (कोल्हापूर) संजय वाघमोडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.कोल्हापूर–रत्नागिरी दरम्यानचे हे रस्ते देवडे–भोवडे ते विशाळगड घाट, काजिर्डा ते पडसाळी घाट आणि भांबेड ते गावडी घाट अशा तीन प्रमुख घाटांना जोडतात. सह्याद्री पर्वतरांगांतील लांजा व संगमेश्वर तालुक्यातील अनेक मुख्य गावांना हे मार्ग जोडत असल्याने दळणवळण सुलभ होईल, घाटमाथ्यावरील नागरिकांचे जीवनमान उंचावेल तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्हे थेट जोडले जातील, असे मंत्री भोसले यांनी सांगितले.वन विभागाच्या आवश्यक सर्व परवानग्या पूर्ण करून रस्त्यांच्या कामांतील अडथळे तातडीने दूर करावेत. आवश्यक ठिकाणी पूल, दिशादर्शक फलक बसवावेत, घाटमार्गांसाठी योग्य सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच या मार्गांवर एसटी बसेस नियमित धावतील अशा पद्धतीने रस्त्यांची आखणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
Andheri Subway : अंधेरी सबवेवरून विधानसभेत सत्ताधारी आमदार भडकले; सरकारला धरले धारेवर
Andheri Subway : अंधेरी सबवेच्या ५० वर्षे जुन्या प्रश्नावरून आमदार मुरजी पटेल आणि अमित साटम यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले.
Market This Week:
केरळ उच्च न्यायालयाने 'द केरळ स्टोरी २' या चित्रपटावर स्थगिती आणली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर २७ फेब्रुवारी रोजी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले.
मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर
मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पुण्यातील पासपोर्ट कार्यालय आणि मुंबईतील दहिसर परिसरातील एका नामांकित शाळेला लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.पुण्यात पासपोर्ट कार्यालयाला धमकीरिजनल पासपोर्ट ऑफिस पुणे येथील अधिकृत ई-मेल आयडीवर गुरुवारी सकाळी स्फोटकांच्या वापराचा उल्लेख असलेला संदेश प्राप्त झाला. बाणेर–पाषाण लिंक रोड परिसरातील या कार्यालयात RSX स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आल्याचे समजते.माहिती मिळताच पुणे पोलिसांनी यांनी तातडीने बॉम्बशोधक व नाशक पथकाला घटनास्थळी पाठवले. कार्यालय, पार्किंग तसेच आसपासच्या परिसराची सखोल तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान कोणतीही स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू आढळली नसल्याने प्रशासनाने दिलासा व्यक्त केला. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे.दहिसरमधील शाळेला ई-मेलदरम्यान, मुंबईतील JBNC इंटरनॅशनल शाळेलाही अशाच प्रकारचा धमकीचा संदेश प्राप्त झाला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शाळा प्रशासनाने तात्काळ सुट्टी जाहीर केली आणि संपूर्ण परिसर सील करण्यात आला. दरम्यान मुंबई उपनगरातील सुमारे २२ ते २५ शाळांना अशाच प्रकारचे धमकीचे ई मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई उपनगरातील सुमारे २२ ते २५ शाळांना अशाच प्रकारचे धमकीचे ई मेल पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे या सर्व ई- मेलचा एकमेकांशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.तपास यंत्रणा अलर्टवरगेल्या काही महिन्यांत महत्त्वाच्या सरकारी आणि शैक्षणिक संस्थांना अशा प्रकारचे ई-मेल येण्याच्या घटना वाढल्या आहेत. बहुतांश प्रकरणे अफवा ठरली असली तरी प्रत्येक घटनेकडे गंभीरतेने पाहिले जात आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि संशयास्पद बाब त्वरित कळवण्याचे आवाहन केले आहे.
RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे'नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा
नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत आहेत. या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आता कठोर पाऊले उचलली आहेत. याबाबत नितीन गडकरी यांनी अधिकृत घोषणा केली आहे.ड्रायव्हिंग लायसन्स बनेल ‘रिपोर्ट कार्ड’नव्या योजनेनुसार प्रत्येक चालकाच्या लायसन्सवर गुण प्रणाली (पॉइंट्स सिस्टिम) लागू केली जाणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित चालकाच्या लायसन्सवरील ठराविक गुण कमी केले जातील. जर हे गुण ठराविक मर्यादेपेक्षा खाली गेले, तर चालकाचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित केले जाईल. म्हणजेच त्या कालावधीत वाहन चालवण्यास बंदी असेल.वारंवार चुका केल्यास कायमस्वरूपी रद्दगंभीर नियमभंग किंवा वारंवार केलेल्या उल्लंघनांवर अधिक कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अशा प्रकरणांत संबंधित व्यक्तीचे लायसन्स कायमचे रद्द करण्याची तरतूदही असणार आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना पुन्हा परवाना मिळवणे कठीण होऊ शकते.या उल्लंघनांवर कारवाई ठरणार कठोरखालील प्रकारच्या चुका वाहनचालकांना महागात पडू शकतात:वेगमर्यादा ओलांडून वाहन चालवणेवाहन चालवताना मोबाईल फोनचा वापरचुकीच्या दिशेने (राँग साईड) वाहन चालवणेमद्यपान करून वाहन चालवणे
Loni Kalbhor News : मुळा-मुठा नदीपात्रात कचऱ्याला भीषण आग; विषारी धुरामुळे नागरिकांचा श्वास कोंडला
Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील मुळा-मुठा नदीपात्रात साचलेल्या कचऱ्याला भीषण आग लागली आहे. यामुळे परिसरात विषारी धुराचे लोट पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
Abhishek Sharma : झिम्बाब्वेविरुद्धच्या या खेळीनंतर मोहम्मद आमिरच्या सुरात बदल पाहायला मिळाला. पाकिस्तानमधील 'हसना मना है' या टीव्ही शोमध्ये बोलताना आमिर म्हणाला, अभिषेक फॉर्ममध्ये आला हे भारतासाठी चांगले आहे.
शरद पवारांसाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाचा नकार
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाने नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. राज्यसभेच्या जागेसाठी कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचा दावा सोडणार नाही, आमच्या पक्षातील आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर आपले मत मांडले आहे. २०२० मध्ये आम्ही फौजिया खान यांच्या उमेदवारीवेळी मदत केली होती. मात्र, आमचे उमेदवार संजय पवार हे संख्याबळ असताना सुद्धा पराभूत झाले. आता आमचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे जर आमचा खासदार कार्यकाळ पूर्ण करत असेल, तर आमच्याच पक्षाचा उमेदवार राज्यसभेसाठी जाईल, असे ते म्हणाले.राज्यातील राज्यसभेच्या सात जागांसाठी १६ मार्चला निवडणूक होत आहे. विद्यमान संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एक जागा येईल. या जागेवर शरद पवार यांनी पुन्हा जावे, अशी इच्छा राष्ट्रवादीकडून (शरदचंद्र पवार गट) व्यक्त केली जात असतानाच ठाकरे गटाने त्यास नकार दिला आहे. वरुण सरदेसाई यांनी यावेळी २०२० मधील निवडणुकीचा संदर्भ देत राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. २०२० मध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद लावली होती. मात्र, त्यानंतर आमच्याकडे संख्याबळ असतानाही संजय पवार यांचा पराभव झाला. त्या अनुभवातून आम्ही शिकलो आहोत. आता संख्याबळानुसार आमचाच दावा मोठा आहे, असे सरदेसाई म्हणाले.आदित्य ठाकरेंची बैठकीला 'दांडी'राज्यसभेच्या जागेवर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीने बोलावलेल्या दोन बैठकांना आमदार आदित्य ठाकरे यांनी दांडी मारली आहे. जागेच्या मुद्द्यावर तडजोड करण्यास उबाठा गटाचा विरोध असल्याचे समजते. विशेष म्हणजे विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागेवरही सरदेसाई यांनी हक्क सांगितला आहे. उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने रिक्त होणारी विधान परिषदेची जागा आमचीच असेल. राज्यसभा आणि विधान परिषद हे दोन्ही स्वतंत्र विषय असून दोन्ही जागांवर आमचाच उमेदवार असेल, असेही त्यांनी सांगितले.
Todays Top 10 News:
Rinku Singh Father Death : रिंकूचे वडील खानचंद सिंग यांचे शुक्रवारी सकाळी ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात निधन झाले.
Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट; हत्येचा उलगडा होणार?
Mahadev Munde Case : परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयितांच्या नार्को आणि ब्रेन मॅपिंगचा अहवाल प्राप्त झाला असून, तो न्यायालयात सादर केला जाणार आहे.
तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे प्रमुख विजय सध्या वैयक्तिक आयुष्यातील (Vijay - Sangeetha separation)घडामोडींमुळे चर्चेत आहेत.
बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश
मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत कडक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. शालेय मुलांची ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये अल्पवयीन मुलांचे शोषण रोखण्यासाठी आणि सुरक्षा मानकांचे पालन करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी तत्परतेने अटक केली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या गंभीर विषयावर चर्चा करताना सरकारने स्पष्ट केले की, शालेय वाहनांसाठी विशेष 'एसओपी' (Standard Operating Procedure) आधीच तयार करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांवर वाहतूक पोलिसांमार्फत कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः शालेय बसमध्ये महिला मदतनीस असणे अनिवार्य असून, ज्या ठिकाणी ही व्यवस्था नाही, तिथली माहिती घेण्याचे आदेश मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. शाळा प्रशासनाने आणि वाहन चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, यासाठी प्रशासकीय स्तरावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.सभागृहात झालेल्या चर्चेअंती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. संबंधित संस्था चालकांवर आणि दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन सरकारने दिले असून, या विषयावर भविष्यात सविस्तर लक्षवेधी चर्चा घडवून आणण्याचे संकेत सभापती राम शिंदे यांनी दिले आहेत. यामुळे आगामी काळात शाळांमधील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
मोठी बातमी..! रोहित पवारांना पक्षाचा ताबा हवाय; राष्ट्रवादी आमदाराच्या आरोपाने खळबळ
Rohit Pawar : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
Hingoli News : पुसेगावात दोन दिवसात दोन अल्पवयीन मुलांचा तापाने दुर्दैवी मृत्य
वाखान्यात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दोन्ही मुलांना अचानक तापाची लागण झाली होती.
Auqib Nabi Record : औकिब नबी दारने कर्नाटकविरुद्धच्या महत्त्वपूर्ण फायनलमध्ये ५ गडी बाद करत एक मोठा पराक्रम केला आहे.
मुंबई : मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्यांना पकडल्यानंतर पिंजऱ्यात त्यांना होणाऱ्या शारीरिक जखमा आणि त्यातून उद्भवणारा पुढील धोका रोखण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण तांत्रिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान, पिंजऱ्यातील बिबट्यांच्या सुळ्या दातांना होणारी इजा टाळण्यासाठी पिंजऱ्याच्या लोखंडी गजांना विशिष्ट प्रकारचे प्लास्टिक किंवा रबरी कोटिंग करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. या निर्णयामुळे जेरबंद केलेल्या बिबट्यांचे आरोग्य जपले जाणार असून, भविष्यातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यास मदत होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवाजीराव गर्जे यांनी विधान परिषदेत हा तांत्रिक पण अत्यंत संवेदनशील मुद्दा उपस्थित केला. बिबट्याला पिंजऱ्यात पकडल्यानंतर केवळ त्याची सुटका करणे पुरेसे नाही, तर त्याच्या आरोग्याची काळजी घेणे कसे गरजेचे आहे, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. जेव्हा बिबट्या पिंजऱ्यात असतो, तेव्हा आजूबाजूच्या लोकांचा गोंगाट आणि भीतीमुळे तो अत्यंत आक्रमक होतो. स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तो पिंजऱ्याचे लोखंडी गज जबड्यात धरून ओढण्याचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये त्याचे अत्यंत महत्त्वाचे असलेले सुळे दात तुटतात किंवा कमकुवत होतात, असे निरीक्षण आमदार गर्जे यांनी मांडले.चर्चेदरम्यान हे धक्कादायक वास्तव समोर आले की, एकदा का बिबट्याचे दात निकामी झाले, तर तो नैसर्गिक जंगलात शिकार करण्यास असमर्थ ठरतो. भूक भागवण्यासाठी असा बिबट्या मग सोप्या शिकारीकडे म्हणजेच मानवी वस्त्यांमधील लहान मुले आणि वृद्धांकडे वळतो. बिबट्यांच्या हल्ल्यातील ५०% बळी हे लहान मुले असण्यामागे दातांची ही इजा एक प्रमुख तांत्रिक कारण असल्याचे आमदार शिवाजीराव गर्जे यांनी सभागृहात स्पष्ट केले. यामुळे पिंजऱ्यात पकडलेला बिबट्या हा अनैसर्गिकरीत्या 'नरभक्षक' बनण्याची शक्यता अधिक असते.वनमंत्री गणेश नाईक यांची मोठी घोषणाआमदार शिवाजीराव गर्जे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले की, बिबट्यांचे दात सुरक्षित ठेवणे हे केवळ प्राण्यांच्या हिताचे नसून मानवी सुरक्षिततेसाठीही आवश्यक आहे. यापुढे वनविभागामार्फत वापरल्या जाणाऱ्या पिंजऱ्यांच्या गजांना अशा प्रकारचे विशेष कोटिंग केले जाईल, जेणेकरून बिबट्याने रागाच्या भरात गजांना चावा घेतला तरी त्याच्या दातांना कोणतीही इजा होणार नाही. यासंदर्भात वनविभागाला तातडीने मार्गदर्शक सूचना आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही मंत्र्यांनी यावेळी दिले.पुढे आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एका हृदयद्रावक घटनेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. एका सहा वर्षांच्या निष्पाप बालकाला बिबट्याने ओढून नेल्यामुळे झालेल्या मृत्यूचा संदर्भ देत त्यांनी प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवले. केवळ आर्थिक मदत देऊन कुटुंबाचे दुःख भरून निघणार नाही, तर अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे, असे त्यांनी ठामपणे मांडले. जंगलालगत असलेल्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत शिरकाव रोखण्यासाठी 'कंपाउंड वॉल' (संरक्षक भिंत) उभारणे किंवा खोल चर (Trench) खोदण्यासाठी सरकारने तातडीने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. यावर सकारात्मक उत्तर देताना सरकारने स्पष्ट केले की, मानवी जीव वाचवण्यासाठी आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जाईल आणि तातडीने प्रतिबंधात्मक पावले उचलली जातील.
विधिमंडळ हेही विनोदांना जन्म देणारे व्यासपीठ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात 'जावे विनोदाच्या गावा' विशेष कार्यक्रममुंबई : “विधिमंडळ हेही एकप्रकारे अनेक विनोदांना जन्म देणारे व्यासपीठ आहे. कारण, येथे तिथे घडणाऱ्या घटना, विनोद जर कमी केले, तर कदाचित मराठी नाटक-चित्रपट यांच्या कथानकांमध्ये ५० टक्के घट येईल, इतका मसाला आपण सगळे मिळून साहित्यिकांना देत असतो. त्यामुळे आपणदेखील साहित्याची निर्मिती करत असतो”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी केले.मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात आयोजित 'जावे विनोदाच्या गावा' या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी खास शैलीत केलेल्या कोट्यांमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.मुख्यमंत्री म्हणाले, “पूर्वी विधानमंडळात भाषणांमध्ये विनोद, कोट्या, व्यंग अशा अनेक छटा पाहायला मिळायच्या. अलिकडच्या २०-२५ वर्षांत विलासराव, गोपीनाथ मुंडे यांच्या भाषणांमध्ये एकमेकांवर केलेल्या कोट्या, त्यातून निर्माण होणारे विनोद असायचे. पण दुर्दैवाने अलिकडच्या काळात अनेकदा विनोदाला अस्मितेशी जोडले जाते. त्यामुळे त्या विनोदातले मर्म निघून जाते. माणूस हल्ली घाबरून-घाबरून विनोद करायला लागला आहे. आपण जे बोलतोय त्यातून काय अर्थ निघेल आणि दिवसभर माध्यमांमध्ये काय चालेल, त्यामुळे आपल्या भाषणांतला निखळ आनंद कमी झालेला आहे”, अशी खंत फडणवीस यांनी भाषणात बोलून दाखवली.भाषेमुळे मुंबईत आल्या अडचणीमुंबईत आल्यानंतर सुरुवातीच्या काळात आपल्याला मराठीमुळे फार अडचणींचा सामना करावा लागल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. “आपली मराठी भाषा दर ५-७ किलोमीटरवर बदलते. मी मुंबईत आलो तेव्हा सुरुवातीच्या काळात मला फार अडचणी आल्या होत्या. कारण शब्दाशब्दाला ‘का बे’, ‘साल्या’ असे ‘सांस्कृतिक’ मराठी मी बोलायचो. पण येथे आल्यावर मला लक्षात आले, की ही संस्कृती मुंबईला पटण्यासारखी नाही. पुण्यात तर आपल्याला बहिष्कृतच केले जाईल. त्यामुळे मी हळूहळू स्वत:ला उत्तम मराठी कसे बोलता येईल या दिशेने नेले. पण प्रत्येक भागातल्या मराठीचा आपला गोडवा आपल्याला कायम ठेवायचा आहे”, असेही ते म्हणाले.“आज आपण मराठीचा गौरव करत आहोत. यानिमित्ताने आपली भाषा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. लोकसाहित्य, लोककला, लोकनाट्य, लोकगीते आपल्याला जिवंत कशी ठेवता येतील हे बघावे लागेल. जगात इंग्रजी सर्वात मोठी भाषा आहे. कारण ती राज्यकर्त्यांची भाषा होती. राज्यकर्त्यांची भाषा ही जगाची भाषा होते. त्यामुळे आपणही आपल्या भाषेला ज्ञानभाषेत रुपांतरीत करायला हवे. मराठी बोलणाऱ्याला मराठीमुळे प्रगती करता येते, असा भाव आपण निर्माण करायला हवा”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार
मुंबई : आरक्षणाच्या पेचामुळे २२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या वगळता राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. आता राज्यात ११ हजार ४१ सहकारी संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. ग्रामीण भागातील अर्थकारणाच्या दृष्टीने या निवडणुका महत्त्वाच्या आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त अनिल कवडे यांनी दिले आहेत. आतापर्यंत जेवढी तयारी झाली आहे, तिथून पुढील तयारी तातडीने करावी. निवडणुकांची घोषणा लवकरच करायची असल्यामुळे नियोजन सुरू करा, अशा स्वरुपाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.राज्यातील ११ हजार ४१ सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने ग्रामीण भागातले राजकारण नव्याने ढवळून निघणार आहे. ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे, अशा संस्था वगळून इतर सर्व संस्थांची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबवण्यात आली होती, त्याच टप्प्यापासून ती पुन्हा सुरू केली जाईल. प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी याबाबतचे पत्रक जारी केले आहे.'अ' आणि 'ब' वर्गातील ज्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलला होता, त्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था समिती निवडणूक नियमांनुसार सुधारित कार्यक्रम तयार करून प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी पाठवायचा आहे. ज्या संस्थांवर सध्या प्रशासक किंवा प्रशासक मंडळ कार्यरत आहे, अशा संस्थांनाही आता निवडणूक प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्राधिकरणाने महत्त्वाचे निकष लावले आहेत. ज्या संस्थांनी अद्याप प्रारूप मतदार याद्या सादर केलेल्या नाहीत, त्यांच्यासाठी १ फेब्रुवारी २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. हा अर्हता दिनांक पुढील ३ महिन्यांसाठी वैध असेल.
The Epstein Files : डोनाल्ड ट्रम्पच्या आरोपांशी संबंधित रेकॉर्ड रोखल्याबद्दल एफबीआय चौकशी करणार
अमेरिकेचा न्याय विभाग जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित असलेली काही कागदपत्रे चुकवून सार्वजनिक होण्यापासून रोखली गेली का, याची पुनरावलोकनात्मक तपासणी करत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोंदींमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका महिलेने केलेल्या आरोपांशी संबंधित सर्व एफबीआय मुलाखत-सारांश (समरी) समाविष्ट नव्हते, असा दावा करण्यात आला होता. त्या महिलेने आरोप केला होता की १९८० च्या दशकात ती अल्पवयीन असताना तिच्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एपस्टीन या दोघांनीही लैंगिक अत्याचार केले. मात्र ट्रम्प यांनी या सर्व आरोपांचे सातत्याने खंडन केले आहे.न्याय विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले आहे की घिसलेन मॅक्सवेल हिच्या फौजदारी प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रे गायब असल्याचे सांगितले जात आहे आणि त्यांची तपासणी सुरू आहे. जर कोणतीही नोंद चुकीच्या पद्धतीने रोखून ठेवण्यात आल्याचे आढळले आणि ती कायद्यानुसार प्रसिद्ध करणे आवश्यक असेल, तर ती जाहीर केली जाईल.वृत्तानुसार, २०१९ मध्ये एफबीआयने संबंधित महिलेची चार वेळा चौकशी केली होती; मात्र सार्वजनिक फाईल्समध्ये केवळ एका मुलाखतीचा सारांश समाविष्ट करण्यात आला. हरवलेल्या नोंदींबाबतची बातमी सर्वप्रथम पत्रकार रोजर सोलेनबर्गर यांनी माध्यमावर प्रसिद्ध केली. त्यानंतर इतर वृत्तसंस्थांनीही या प्रकरणाचे दस्तऐवजीकरण केले.प्रतिनिधी सभेच्या देखरेख समितीचे (हाऊस ओव्हरसाइट कमिटी) वरिष्ठ डेमोक्रॅट सदस्य रॉबर्ट गार्सिया यांनी निवेदनात म्हटले की त्यांची समिती रोखून ठेवलेल्या नोंदींची चौकशी करणार आहे. त्यांनी असा आरोप केला की न्याय विभागाने कदाचित एफबीआय मुलाखतींशी संबंधित काही कागदपत्रे बेकायदेशीरपणे रोखून ठेवली असावीत.दरम्यान, न्याय विभागाने मागील महिन्यात एपस्टीन प्रकरणाशी संबंधित ३० लाखांहून अधिक पानांची कागदपत्रे प्रसिद्ध केली होती. मात्र त्यानंतर संपादकीय प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्या आणि अनेक पीडितांची खाजगी माहिती उघड झाल्याचे समोर आले. विभागाने स्पष्ट केले आहे की, जर कोणतेही कागदपत्र अनुचितपणे रोखले गेले असल्याचे आढळले, तर ते कायद्याच्या चौकटीत सार्वजनिक केले जाईल.
एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला 'सीताराम पेठ' प्रयोग आता संपूर्ण राज्यात राबवण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणारी जीवितहानी टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वदूर करावा, या दरेकरांच्या मागणीला वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.'आभासी भिंत' ठरणार वरदान; काय आहे प्रयोग?चंद्रपूर जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. यावर उपाय म्हणून ताडोबातील सीताराम पेठ गावात वनविभागाने ६ विशेष कॅमेरे लावून एक 'आभासी भिंत' (Virtual Wall) तयार केली आहे. एखादा हिंस्त्र प्राणी गावाच्या दिशेने येताच एआय तंत्रज्ञानाद्वारे वनविभागाला तात्काळ अलर्ट जातो आणि गावात सायरन (हूटर) वाजल्याने नागरिक सावध होतात. गेल्या वर्षी चंद्रपुरात ५० लोकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे, ही परिस्थिती पाहता सीताराम पेठसारखा यशस्वी प्रयोग राज्यात इतरत्र का राबवला जात नाही? असा सवाल आ. प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.दरेकर यांच्या प्रश्नावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले की, वन्यजीव संरक्षण आणि मानवी सुरक्षा यांचा समतोल राखणे सरकारचे कर्तव्य आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र सफारी आणि कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात बिबट सफारी सुरू करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे केवळ पर्यटन वाढणार नाही, तर प्राण्यांचा वावर नियंत्रित राहून संघर्ष कमी होण्यास मदत होईल. एआय तंत्रज्ञानाचा विस्तार करण्याबाबतही शासन सकारात्मक असून, त्यादृष्टीने पावले उचलली जातील, असे मंत्र्यांनी आश्वासित केले.मेंढपाळांच्यायाच चर्चेदरम्यान आमदार प्रवीण दरेकर यांनी धनगर समाजातील मेंढपाळांच्या प्रश्नांकडेही सरकारचे लक्ष वेधले. मेंढपाळांना वनामध्ये चराईसाठी जावे लागते, जिथे त्यांना अनेकदा दंडाला सामोरे जावे लागते. मेंढपाळांना दिलासा देण्यासाठी वनविभागाने स्वतंत्र 'चरई क्षेत्र' उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी दरेकरांनी केली. या मागणीशी वनमंत्री गणेश नाईक यांनी सहमती दर्शवत, याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे सूतोवाच केले. या महत्त्वपूर्ण विषयावरील चर्चेत आमदार अभिजीत वंजारी, परिणय फुके, शशिकांत शिंदे, भाई जगताप, शिवाजीराव गर्जे, सदाभाऊ खोत आणि सतेज पाटील या सदस्यांनीही सहभाग नोंदवून आपापल्या भागातील वन्यजीव समस्या मांडल्या. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील वनक्षेत्रालगत राहणाऱ्या लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय रेल्वे आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे एक नवीन सहकार्य आराखडा सुरू केला आहे.
राजकारणात मोठा भूकंप! तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या दिग्गज नेत्याचा सत्ताधारी पक्षात प्रवेश
Political News : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम (OPS) यांनी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सत्ताधारी द्रमुक (DMK) पक्षात प्रवेश केला आहे.
Sensex Crash: आयटी वगळता सर्व क्षेत्रे लाल; परदेशी गुंतवणूकदारांची विक्री, जागतिक अस्थिरता कारणीभूत
IND vs AUS : . या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने भारताचा ५ गडी राखून पराभव करत मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे.
Walmik Karad : वाल्मिक कराडचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
बीडमधील बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला (Walmik Karad )जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
liquor policy scam: मूळ गुन्हाच रद्द झाल्यास मनी लाँडरिंगचे प्रकरणही टिकू शकत नाही — सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
Arvind Kejriwal : “कायदेशीर प्रक्रिया अद्याप संपलेली नाही..”; भाजपचा अरविंद केजरीवालांवर निशाणा
दिल्लीतील कथित दारू घोटाळ्या प्रकरणात आम आदमी पक्षाचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व २३ आरोपींना दोषमुक्त केले आहे.
Malegaon Namaz Pathan : मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण, सात जणांवर गुन्हा दाखल
मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याचे सांगण्यात आले आहे.मागील काही दिवसापासून सातत्याने मालेगाव मध्ये वाद सुरू आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्ता स्थापनेत असलेल्या समाजवादी पक्षाच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी आपल्या कार्यालयामध्ये टिपू सुलतान चा फोटो लावला होता. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्यानंतर तो काढून घेण्यात आला मात्र काही दिवसानंतर तो परत लावला यावरून वाद सुरूच आहे. तर दुसरीकडे मालेगावच्या महानगरपालिका कार्यालयातील अधीक्षक अभियंता यांच्या कक्षामध्ये ते नसताना काही जणांनी नमाजाची वेळ झाल्याने कार्यालयामध्येच सार्वजनिक नमाज पठण केले यामुळे चांगलीच खळब उडाली.यावर उत्तर म्हणून भाजपच्या वतीने मालेगाव महानगरपालिका कार्यालयामध्ये हनुमान चालीसा पठण करण्यात आले. या सर्व प्रकारावर भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी संबंधितांवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.दरम्यान, महापालिकेतील विद्युत विभागातील कर्मचारी फिर्यादी महेंद्र रघुनाथ सावंत (वय ४३) हे वायरमन असून त्यांच्या फिर्यादीवरुन लुकमान, सलीम इक्का यांच्यासह आणखी चार ते पाच साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयात बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक उपद्रव केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भातीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम १३२, १८९(२), १९० आणि २९२ (सरकारी सेवकावर हल्ला, बेकायदेशीर सभा आणि संबंधित तरतुदी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ (१), ३७ (३) चे कमल १३५ अंतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कोलकातासह बंगालमधील अनेक जिल्ह्यांत भूकंपाचे जोरदार धक्के
Kolkata Earthquake : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातासह अनेक जिल्ह्यांत २७ फेब्रुवारी रोजी ५.४ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.
Pune News : पुण्यात आयसीयू बेडसाठी पुढील दहा वर्षांचा रोडमॅप
Pune Hospital News : पुणे शहरात आयसीयू बेडची भासणारी कमतरता दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढील १० वर्षांचा सविस्तर रोडमॅप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात सीबीआयच्या तपासाला मोठा धक्का बसला आहे. राउज एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व 23 आरोपींना निर्दोष मुक्त करताना म्हटले की, आरोपपत्रात लावलेले आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे नाहीत. कोर्टाने कोणत्या आधारांवर निर्णय दिला? सर्व प्रकरणातून दिलासा मिळाला आहे का? आणि याचा राजकारणावर काय परिणाम होईल? 6 प्रश्नांमध्ये समजून घेऊया… प्रश्न-1: दारू घोटाळ्याच्या प्रकरणात कोर्टाने केजरीवाल-सिसोदिया यांना कोणत्या आधारावर निर्दोष मुक्त केले? उत्तर: दिल्लीच्या राउज एव्हेन्यू कोर्टाने कथित दारू घोटाळ्याच्या प्रकरणात केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यासह सर्व 23 आरोपींना निर्दोष मुक्त केले. विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, आरोपपत्रात 'भ्रामक दावे' केले आहेत आणि ते सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत… कोर्टाने आरोपपत्रावर काय म्हटले कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल काय म्हटले न्यायालयाने मुख्य आरोपी कुलदीप सिंह यांच्याबद्दल काय म्हटले न्यायालयाने मनीष सिसोदिया यांच्याबद्दल काय म्हटले प्रश्न-२: कथित दारू घोटाळा नेमका काय आहे, या प्रकरणात आतापर्यंत काय-काय झाले? उत्तर: दिल्ली सरकारने 17 नोव्हेंबर 2021 रोजी दारू विक्रीशी संबंधित नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते. यामुळे दारूची दुकाने खासगी हातात गेली. तेव्हाच्या केजरीवाल सरकारचा दावा होता की, यामुळे माफिया राजवट संपेल आणि सरकारच्या महसुलात वाढ होईल. जुलै 2022 मध्ये दिल्लीच्या तत्कालीन मुख्य सचिवांनी उत्पादन शुल्क धोरणातील आर्थिक अनियमिततेबाबत एक अहवाल उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांना सादर केला होता. मुख्य सचिवांच्या अहवालाच्या आधारे उपराज्यपालांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. 17 ऑगस्ट 2022 रोजी सीबीआयने गुन्हा दाखल केला. यात मनीष सिसोदिया, 3 निवृत्त सरकारी अधिकारी, 9 व्यावसायिक आणि 2 कंपन्यांना आरोपी बनवण्यात आले. वाद वाढत असल्याचे पाहून, 28 जुलै 2022 रोजी दिल्ली सरकारने नवीन दारू धोरण रद्द केले. 22 ऑगस्ट 2022 रोजी ईडीनेही मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला. 28 फेब्रुवारी 2023 रोजी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. 4 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यसभा सदस्य संजय सिंह यांना चौकशीनंतर अटक करण्यात आली. नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 पर्यंत ईडीने केजरीवाल यांना 9 समन्स बजावले, केजरीवाल एकदाही हजर झाले नाहीत. 21 मार्च 2024 रोजी ईडीने त्यांना त्यांच्या घरातून अटक केली. 28 मार्च 2024 रोजी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांना 15 एप्रिल 2024 पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले. 10 मे 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना 21 दिवसांचा जामीन मिळाला. 2 जून रोजी त्यांना पुन्हा दिल्लीच्या तिहार तुरुंगात पाठवण्यात आले. 20 जून 2024 रोजी केजरीवाल यांना ट्रायल कोर्टातून जामीन मिळाला, परंतु उच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती दिली. सीबीआय प्रकरणात 13 सप्टेंबर 2024 रोजी जामीन मिळाल्यानंतरच ते तुरुंगातून बाहेर येऊ शकले. प्रश्न-3: केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यावर कोणते आरोप होते? उत्तर: अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यावर प्रामुख्याने दिल्लीच्या 2021-22 च्या उत्पादन शुल्क धोरणातील (एक्साईज पॉलिसी) अनियमिततेमुळे आरोप लावण्यात आले होते. हे धोरण आम आदमी पक्षाच्या सरकारने लागू केले होते. त्यांच्यावर ED आणि CBI ने दोन प्रकारचे आरोप लावले होते… ED चा मनी लॉन्ड्रिंगचा आरोप सीबीआयचा भ्रष्टाचाराचा आरोप प्रश्न-४: न्यायालयाच्या आदेशानंतर केजरीवाल सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त झाले का? उत्तर: न्यायालयाने भ्रष्टाचार आणि घोटाळ्याच्या ज्या प्रकरणात निकाल दिला आहे, ते प्रकरण CBI ने ऑगस्ट 2022 मध्ये नोंदवले होते. CBI ने 2022 मध्ये पहिले आरोपपत्र दाखल केले आणि नंतर अनेक पूरक आरोपपत्रे देखील दाखल केली. आजचा निकाल केवळ CBI च्या प्रकरणात आला आहे, ज्यात केजरीवाल यांच्यासह सर्व 23 आरोपी निर्दोष सुटले आहेत. मात्र, याच प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ED ने स्वतंत्रपणे गुन्हा दाखल करून दारू धोरणातील मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांची चौकशी करत होती. ED चे म्हणणे होते की, या नवीन दारू धोरणात घाऊक व्यवसायाने 12% कमिशन बुक केले, ज्यापैकी 6 टक्के आम आदमी पार्टीला देण्यात आले. ED ने असाही आरोप केला होता की, दारू धोरणात जाणूनबुजून असे लूपहोल्स (त्रुटी) ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून आम आदमी पार्टीला बॅकएंडमधून पैसे मिळत राहतील. केजरीवाल यांच्यावरही ईडीने PMLA म्हणजेच प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट अंतर्गत मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात केजरीवाल यांच्याशिवाय मंत्री मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांनाही तुरुंगात राहावे लागले होते. दोन्ही प्रकरणे स्वतंत्रपणे दाखल करण्यात आली असल्याने केजरीवाल यांना या दोन्ही प्रकरणांमध्ये स्वतंत्रपणे अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील विराग गुप्ता म्हणतात की, ईडी आणि सीबीआय या दोन्ही प्रकरणांची आणि त्यांच्या सुनावणीची प्रक्रिया वेगवेगळ्या पद्धतीने चालली. दोन्ही प्रकरणे वेगवेगळ्या कायद्यांनुसार वेगवेगळ्या तपास यंत्रणा हाताळत आहेत, त्यामुळे ती एकत्र केली जाऊ शकत नाहीत. सीबीआय प्रकरणात केजरीवाल निर्दोष सुटले आहेत, परंतु ईडी प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले आहे आणि केजरीवाल यांच्या अटकेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील सुनावणीत निर्णय दिला जाऊ शकतो. प्रश्न-5: सीबीआय न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देऊ शकते का? उत्तर: मीडिया रिपोर्ट्सनुसार सूत्रांनी सांगितले आहे की, CBI या प्रकरणात राऊस ॲव्हेन्यू कोर्टाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकते. विराग गुप्ता म्हणतात की, जर CBI उच्च न्यायालयात गेली, तर उच्च न्यायालय या प्रकरणात नव्याने सुनावणी सुरू करू शकते, किंवा राऊस ॲव्हेन्यू कोर्टाचा निर्णय कायम ठेवू शकते. प्रश्न-६: कोर्टाच्या निर्णयामुळे केजरीवाल आणि AAP च्या राजकारणावर काय परिणाम होईल? उत्तर: राजकीय तज्ज्ञ आदेश रावल यांच्या मते, केजरीवाल दिल्ली विधानसभा निवडणूक हरण्यामागे हे प्रकरण एक मोठे कारण होते. यापूर्वी कोळसा घोटाळा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा आणि कॉमनवेल्थ घोटाळ्यामुळे काँग्रेस निवडणूक हरली होती आणि आजपर्यंत सावरू शकली नाही. नंतर कोणालाही शिक्षा झाली नाही. या दोन्ही घटनांचा फायदा भाजपला झाला. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर मीडियाशी बोलताना केजरीवाल भावुक होऊन रडू लागले. यावेळी मनीष सिसोदिया त्यांना आधार देताना दिसले. केजरीवाल यांनी माध्यमांना सांगितले, भाजप आमच्यावर दारू घोटाळ्याचा आरोप करत होती. आज न्यायालयाने आम्हाला निर्दोष मुक्त केले. आम्ही नेहमी म्हणत होतो की सत्याचा विजय होतो. सत्याचा विजय झाला. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी हे सर्वात मोठे राजकीय षड्यंत्र रचले. आम आदमी पक्षाच्या टॉप 4 नेत्यांना तुरुंगात टाकले. आसीन मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले. 24 तास बातम्या दाखवल्या जात होत्या की केजरीवाल भ्रष्ट आहेत. मी आयुष्यात फक्त प्रामाणिकपणा कमावला. आता न्यायालयाच्या या निर्णयाला आम आदमी पक्ष आपला विजय म्हणून दाखवेल. जरी अजून ईडीच्या प्रकरणात निर्णय येणे बाकी असले तरी, जाणकारांचे मत आहे की या निर्णयामुळे 'आप'ला राजकीय फायदा होईल. 2026 मध्ये 5 राज्यांमध्ये - आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरीमध्ये निवडणुका आहेत. जरी या राज्यांमध्ये 'आप'ची उपस्थिती जवळपास नगण्य आहे. 2027 मध्ये पंजाब विधानसभा निवडणुका आहेत, जिथे सध्या 'आप'चे सरकार आहे. दिल्लीतील पराभवानंतर केजरीवाल सध्या पंजाबमध्ये जास्त वेळ देत आहेत. ते पंजाबमध्येही हा मुद्दा उपस्थित करतील आणि भाजपवर राजकीय कट रचल्याचा आरोप करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतील. न्यायालयाच्या निर्णयामुळे INDIA आघाडीच्या या आरोपालाही बळ मिळेल की, केंद्र सरकार विरोधी नेत्यांना ईडीसारख्या तपास यंत्रणांद्वारे लक्ष्य करते. म्हणजे, सुरुवातीलाच असा कोणताही ठोस पुरावा दिसला नाही, ज्यामुळे त्यांच्याविरुद्ध खटला तयार होतो असे वाटेल.
अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी १ मार्चपासून राज्यभर धडक मोहीम - परिवहन मंत्र्यांचे आदेश
- नियमोल्लंघन करणाऱ्या वाहनांवर होणार जप्तीची कारवाईमुंबई : राज्यभरात फोफावलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे विनापरवाना आणि नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध येत्या १ मार्चपासून राज्यव्यापी तीव्र मोहीम राबवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) दिले.विधानभवनात आयोजित विशेष बैठकीत परिवहन मंत्री बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अवैध वाहतुकीमुळे केवळ नियमांचे उल्लंघन होत नसून, प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. फिटनेस प्रमाणपत्र, विमा आणि परवाना नसलेली वाहने रस्त्यावर धावणे हे अपघातांना निमंत्रण देणारे आहे, असे सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.अवैध वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची भरती केली जाते. अशा वाहनांचा विमा नसल्याने अपघात झाल्यास पीडितांना कायदेशीर मदत किंवा नुकसानभरपाई मिळणे दुरापास्त होते. अनेकदा वाहन चालक किंवा मालक पसार होऊन जबाबदारी टाळतात, ज्यामुळे प्रवाशांचे कुटुंब उघड्यावर पडते, अशी भीती मंत्र्यांनी व्यक्त केली.एसटीला मोठा फटका :राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाला या अवैध वाहतुकीचा मोठा फटका बसत आहे. एसटीसमोर खासगी अवैध वाहतूकदारांनी आर्थिक आव्हान उभे केले आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर ताण पडत असून अधिकृत सेवा आर्थिक संकटात सापडल्या आहेत. प्रवासी संख्या घटल्याने अनेक मार्गांवरील एसटी फेऱ्यांच्या नियोजनावर विपरित परिणाम होत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.परिवहन मंत्र्यांनी दिले कठोर निर्देश :- अवैध वाहतुकीमुळे प्रवाशांची कोणतीही नोंद नसते. याचा फायदा घेऊन मानवी तस्करी किंवा लुटमारीसारखे गुन्हे घडू शकतात. तपासाच्या वेळी अशा वाहनांचा तपशील मिळत नसल्याने यंत्रणांपुढे अडथळे निर्माण होतात. त्यामुळे हा सामाजिक सुरक्षेचाही प्रश्न आहे, असे मतही सरनाईक यांनी मांडले.- रस्त्यावरील वाहतूक कोंडी, वाढते प्रदूषण आणि बेदरकार ड्रायव्हिंग रोखण्यासाठी मोटार परिवहन विभागाने केवळ दंड न आकारता कठोर कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ऑनलाइन आणि पारदर्शक परवाना प्रक्रिया राबवून कायदेशीर वाहतुकीला प्रोत्साहन देण्यावरही या बैठकीत भर देण्यात आला.- १ मार्चपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनीही स्वतःच्या सुरक्षेसाठी केवळ परवानाधारक आणि अधिकृत सेवांचाच वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीमांचलमधील घुसखोरीच्या प्रश्नावर कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले. ते बिहारमधील अररिया येथे एसएसबीच्या जवानांना संबोधित करताना बोलत होते. त्यांनी सांगितले की घुसखोरीमुळे या भागाच्या लोकसंख्यात्मक रचनेत बदल झाला असून तो कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही.जवानांना संबोधित करताना त्यांनी सीमा सुरक्षा मजबूत ठेवण्याबरोबरच अवैध तस्करी, अमली पदार्थांची तस्करी (नार्कोटिक्स) आणि इतर गुन्हेगारी कारवायांवर कडक नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या. यासाठी स्पष्ट एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली, जेणेकरून खालच्या स्तरापर्यंत तैनात असलेले जवान पूर्णपणे सतर्क राहतील. खुल्या सीमांची सुरक्षा ही मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी नमूद केले.Spent time with the brave personnel of the @SSB_INDIA today at the 'Leti' Border Outpost at Seemanchal in Bihar. pic.twitter.com/rJW8gufOjr— Amit Shah (@AmitShah) February 26, 2026अमित शाह म्हणाले की बिहारच्या जनतेशी निवडणुकीदरम्यान घुसखोरांना बाहेर काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते आणि ते केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नव्हते. प्रत्येक घुसखोराची ओळख पटवून त्याला भारताच्या भूमीतून बाहेर केले जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. सीमांचल भागात या संदर्भातील कारवाई लवकरच सुरू होणार आहे.यापूर्वी अमित शाह यांनी किशनगंज जिल्ह्यातील पूर्व पाली येथील हनुमान मंदिरात पूजा-अर्चना केली. या वेळी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी देखील त्यांच्या सोबत उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र कोकणात करा; आमदार प्रवीण दरेकरांची सरकारकडे मागणी
मुंबई : हिंगोली येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या धर्तीवर कोकणातही या केंद्राचे उपकेंद्र स्थापन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत केली. कोकणातील, विशेषतः राजापूरच्या हळदीला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी आणि स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.हिंगोलीच्या प्रकल्पाला गती देण्याची मागणीविधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सदस्य हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यातील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. हिंगोली जिल्हा हा हळद उत्पादनात अग्रेसर असून, तेथील संशोधन केंद्र अधिक सक्षम होणे आवश्यक असल्याचे मत सभागृहात व्यक्त करण्यात आले.या चर्चेत सहभागी होत आमदार प्रवीण दरेकर यांनी कोकणातील हळद उत्पादकांचे प्रश्न मांडले. दरेकर म्हणाले की, हिंगोलीत मोठ्या प्रमाणावर हळदीचे उत्पादन होते आणि तिथले केंद्र मजबूत झालेच पाहिजे. मात्र, त्याच वेळी कोकणातील राजापूरची हळद देखील अत्यंत प्रसिद्ध आणि गुणकारी मानली जाते. जर बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे एक उपकेंद्र कोकणात सुरू झाले, तर तिथल्या हळदीच्या उत्पादनाला शास्त्रीय जोड मिळेल आणि उत्पादनात मोठी वाढ होईल.मंत्री भरत गोगावले यांचे सकारात्मक आश्वासनआमदार दरेकर यांनी फलोत्पादन मंत्र्यांनी या उपकेंद्राची तातडीने घोषणा करावी, अशी मागणी सभागृहात लावून धरली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की, कोकणात हळद संशोधन उपकेंद्र सुरू करण्याच्या आमदार दरेकरांच्या मागणीचा सरकार निश्चितपणे विचार करेल. सरकारच्या या आश्वासनामुळे कोकणातील हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवेगाव-नागझिरा प्रकल्पाबाबत सरकारची सकारात्मक भूमिका; १८५ गावांतील नागरिकांचा संभ्रम दूर
- वनमंत्री गणेश नाईक यांची विधान परिषदेत ग्वाहीमुंबई : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्राच्या व्यवस्थापनावरून निर्माण झालेला संभ्रम राज्य सरकारने अत्यंत संवेदनशीलतेने दूर केला आहे. विधान परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान, आमदार डॉ. परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सरकारने स्पष्ट केले की, २६ डिसेंबर २०२५ च्या निर्णयाचा मूळ उद्देश स्थानिकांना त्रास देणे नसून, व्यवस्थापनात सुसूत्रता आणणे हा आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील १८५ गावांमधील नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी ठामपणे सांगण्यात आले.शेतकऱ्यांचे हक्क सुरक्षित; शेतीकामासाठी एनओसीची (NOC) गरज नाही :वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात मोठी ग्वाही दिली की, बफर झोनमधील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर शेती करताना किंवा विहीर खोदताना कोणत्याही नवीन अडचणी येणार नाहीत. खाजगी शेतीकामासाठी वन्यजीव विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची (NOC) सक्ती केली जाणार नाही. शेतकऱ्यांचे पारंपरिक चराई आणि निस्तार हक्क पूर्वीप्रमाणेच अबाधित राहतील. केवळ प्रशासकीय सुलभतेसाठी व्याघ्र प्रकल्पाचे नियंत्रण एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे देण्यात आले असून, यामुळे स्थानिकांच्या दैनंदिन जगण्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.गाव पुनर्वसनाचा कोणताही विचार नाही; सरकार लेखी हमी देण्यास तयार :बफर झोनमधील गावांचे पुनर्वसन केले जाईल, या अफवांवर मंत्र्यांनी पूर्णविराम लावला आहे. सरकारचा कोणत्याही गावाचे सक्तीने पुनर्वसन करण्याचा मानस नाही आणि तशी लेखी ग्वाही देण्यासही आम्ही तयार आहोत, असे मंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले. केवळ ज्या नागरिकांना गाभ्या क्षेत्रातून (Core Area) स्वेच्छेने बाहेर पडायचे आहे, त्यांच्यासाठीच सरकार आकर्षक मोबदला आणि जागेची तरतूद करेल. या आश्वासनामुळे हजारो गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.इको-सेन्सेटिव्ह झोनची व्याप्ती कमी करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा :भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील ५ ते १० किमीच्या इको-सेन्सेटिव्ह झोनमुळे रखडलेल्या विकासकामांची दखल सरकारने घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या १ किमी मर्यादेच्या निर्देशानुसार, देवरी आणि अर्जुनी मोरगाव येथील झोन कमी करण्यासाठीचा सुधारित प्रस्ताव येत्या ८ दिवसांत केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. या प्रक्रियेला गती देण्यासाठी एका विशेष 'नोडल अधिकाऱ्याची' नियुक्ती करण्याची घोषणाही सरकारने केली आहे, ज्यामुळे स्थानिक रोजगाराचे प्रश्न सुटण्यास मदत होईल.मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी 'बांबू वॉल'चा कल्पक प्रयोग :वाघांचा मानवी वस्तीतील वावर रोखण्यासाठी सरकार ताडोबा प्रकल्पाच्या धर्तीवर ५०० फूट रुंदीची 'बांबूची भिंत' (Bamboo Wall) उभारण्याचे नियोजन करत आहे. यामुळे गावकरी आणि शेतीचे संरक्षण होईल. तसेच, वन्यजीवांना जंगलातच पुरेसे खाद्य उपलब्ध व्हावे, यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातील. यामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी होऊन दोन्ही घटकांना सुरक्षित अधिवास मिळेल, अशी खात्री सरकारने दिली आहे.वनविभागाच्या विकासासाठी १२ हजार कोटींच्या संपत्तीचा विनियोग :वनविभागाची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी सरकारने एक अभिनव आर्थिक आराखडा मांडला आहे. महाराष्ट्र वन विकास महामंडळाकडे (FDCM) उपलब्ध असलेल्या १२,००० कोटी रुपयांच्या सागाच्या साठ्यावर ६,००० कोटींचे कर्ज घेऊन त्यातून कर्मचाऱ्यांचे पगार, भत्ते आणि पर्यटन विकासाची कामे मार्गी लावली जातील. या निधीमुळे वनक्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचे जाळे अधिक मजबूत होईल, ज्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल.दुर्गम वाड्या-वस्त्यांवरील रस्ते आणि सोयीसुविधांसाठी विशेष प्रयत्न :कोल्हापूर आणि इतर दुर्गम भागांतील धनगरवाड्यांमध्ये वनविभागाच्या नियमांमुळे रस्ते रखडल्याचा प्रश्न आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केला होता. यावर सरकारने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, अशा वस्त्यांचे शक्य असल्यास सुरक्षित स्थलांतर करणे किंवा त्यांना पर्यायी रस्ते उपलब्ध करून देणे यासाठी सरकार विशेष प्रयत्न करेल. जनतेची गैरसोय टाळण्यासाठी नियमांच्या चौकटीत राहून जास्तीत जास्त सवलती देण्याचे संकेतही सरकारने दिले आहेत.
Corruption In Maharashtra : राज्यात नाशिक अव्वल, पुणे दुसऱ्या स्थानी; मुंबईत कमी तक्रारींमागे 'वेळ हाच पैसा' ही मानसिकता — वरिष्ठ अधिकारी
Sharad Pawar : शरद पवारांची राज्यसभेची जागा धोक्यात? ठाकरेंच्या आमदाराने दंड थोपटले
Sharad Pawar : शरद पवार यांचा कार्यकाळ संपत असतानाच ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई यांनी या जागेवर दावा केला आहे.
- शासन निर्णय काढून कारवाईबाबत स्पष्टता आणणारमुंबई : राज्यातील लग्नसोहळे आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये वाढणारा कृत्रिम फुलांचा वापर पर्यावरणासह मानवी आरोग्यासाठी घातक ठरत असल्याने, अशा साहित्याचा वापर करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढून कारवाईबाबत स्पष्टता आणली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) विधानसभेत केली., कृत्रिम फुलांचा वापर करणाऱ्या डेकोरेटर्सवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे त्यांनी सांगितले.भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार जयंत पाटील यांनीही उपप्रश्नांद्वारे या समस्येचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. कृत्रिम फुले आणि प्लास्टिक सजावटीच्या या साहित्यातील रसायनांमुळे डोकेदुखी, त्वचाविकार, डोळ्यांची जळजळ आणि लहान मुलांमध्ये श्वसनाचे त्रास उद्भवतात. दीर्घकालीन संपर्कामुळे कर्करोगाचा धोकाही संशोधनातून समोर आला आहे, असे पाचपुते यांनी सांगितले.ही फुले नद्या किंवा जलस्रोतांत विसर्जित केल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. तसेच, ही फुले पाळीव प्राण्यांच्या पोटात गेल्याने त्यांच्या पचनसंस्थेवरही गंभीर परिणाम होतात. कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापरामुळे नैसर्गिक फुले पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचत आहे, असेही त्यांनी सांगितले.डेकोरेटर्सवरही होणार कारवाई :मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अनेकदा कृत्रिम फुलांचे साहित्य जलस्रोतांत टाकले जाते, जे अत्यंत घातक आहे. शासन निर्णय काढून कारवाईबाबत स्पष्ट तरतुदी केल्या जातील. जर लग्न समारंभात सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा वापर झाला, तर संबंधित डेकोरेटरवरही कठोर कारवाई केली जाईल. आपण सनातन परंपरा मानणारे आहोत, त्यामुळे धार्मिक कार्यात फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अशा वेळी मुंबई पालिकेने नैसर्गिक फुलांची बाजारपेठ बंद केली असेल, ते ती सुरू करण्याबाबत आजच आदेश दिले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Bigg Boss Marathi : राकेश बापटने तन्वीला केलं किस; राखी सावंत भडकली आणि ....
मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये राखी सावंत आल्यापासून रोज नवनवीन ड्रामा पाहायला मिळतो. राखी सावंतची एन्ट्री झाल्यानंतर अनेकांची हा शो पाहण्याची उत्सुकता वाढली होती पण आता घरात असं काही घडलं आहे की प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. बिग बॉसचा नवीन प्रोमो पाहून. नेटकऱ्यांनी संमिक्ष प्रतिक्रिया दिल्या आहेत.नेमकं काय झालं ?कलर्स मराठीने बिग बॉसचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये राकेश बापट आणि तन्वी कोलते डान्स करताना दिसत आहेत. या रोमॅंटिक डान्स दरम्यान राकेश तन्वीला गालावर किस करतो. त्यानंतर राखी तन्वीला विचारते हा कोणता डान्स आहे? त्यावर तन्वी राकेशला विचार असं सांगते.. तन्वी आणि राकेशचा डान्स सुरू असताना राखी डोळे बंद करते. येवढच नाही तर डान्स संपल्यानंतर राकेश पुन्हा एकदा तन्वीला किस करतो आणि राकेश हसतो, त्यानंतर राखी संतापते आणि तू याचे परिणाम बघ असं म्हणते.यानंतर राखी हातात कात्री घेऊन रागारागात स्वत:चे केस कापते. राखीच्या अशा वागणुकीमुळे घरातील इतर सदस्य चकित होतात. तिला प्रश्न विचारतात. राकेशही राखी तू हे काय करते आहे, असा प्रश्न विचारतो. त्यावर राखी म्हणते, ” राकेश, मी स्वत: ला शिक्षा देत आहे. मला कोणी हर्ट करू शकत नाही, फक्त मीच स्वत:ला हर्ट करू शकेत. असं म्हणत राखी रडू लागते.
Holi Special ST Buses : होळीसाठी धावणार एसटीच्या १९३ बस; महामंडळातर्फे विशेष सेवा जारी
मुंबई : राज्यभरात होळीच्या सणाची तयारी सुरु झालीये. देवांच्या पालख्या घरोघरी येऊ लागल्या आहेत, त्यामुळे राज्यभरातून चाकरमानी आपल्या गावी जाण्यास धावपळीत आहेत. या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने जादा बसची सोय केली आहे. मंडळाने तब्बल १९८ फेऱ्यांचे नियोजन केले असून त्यापैकी ८३ बस फुल्ल देखील झाल्या आहेत.होळीनिमित्त प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज लक्षात घेत २७ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत एसटी महामंडळाने विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. होळीच्या पूर्वसंध्येला गावी जाण्याच्या ओढीने प्रवाशांची संख्या शिगेला पोहोचते. यावर विशेष करत लक्ष केंद्रीत करत २८ फेब्रुवारी, १ ,मार्चला तब्बल १५० फेऱ्या नियोजित केल्या आहेत. त्यापैकी ७० बस फुल्ल झाल्या आहेत. याशिवाय इतर दिवसांसाठी १३ बसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. एकूण फेऱ्यांपैकी १४१ फेऱ्या नियमित आरक्षणासाठी, तर ५७ फेऱ्या ग्रुप बुकिंगसाठी राखीव ठेवल्या आहेत. यामुळे कुटुंब, मित्रमंडळी किंवा संस्थात्मक प्रवास करणाऱ्या प्रवाशानांही सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे.लालपरीच्या कमाईत भरसणासुदीच्या कालावधीत खासगी बसचे तिकीट साधारण २,५०० ते ४ हजार रुपये असते. त्यात एसटीचे तिकीट अधिक परवडणारे ठरणार आहे. त्यामुळे होळीच्या सणात वाढवलेल्या या फेऱ्यांमुळे लालपरीच्या कमाईत चांगलीच भर पडली आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबच गट आरक्षणाचे अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठांना व महिलांना ५० टक्के तिकीट दारात सवलत दिली जात आहे. ग्रुप बुकिंग केल्यामुळे चाकरमान्यांना मुंबईतून थेट गावी पोहोचता येणार आहे.
कृत्रिम फुले आणि खेळण्यांच्या रंगांमुळे कर्करोगाचा धोका; विक्रम पाचपुते यांचा इशारा
मुंबई: विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी एक गंभीर आरोग्य समस्या जगासमोर मांडली आहे. आपण सजावटीसाठी वापरत असलेली कृत्रिम फुले आणि लहान मुलांची स्वस्त खेळणी यांमधील घातक रंगांमुळे कर्करोग आणि फुफ्फुसांचे आजार बळावत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.नॅनो पार्टिकल्सद्वारे शरीरात शिरकावपाचपुते यांनी सांगितले की, कृत्रिम फुलांमधून रंग 'नॅनो पार्टिकल्स'च्या स्वरूपात बाहेर पडतात. हे कण श्वासोच्छवासाद्वारे आपल्या शरीरात जातात, ज्यामुळे श्वसनविकार आणि कर्करोगाचा मोठा धोका निर्माण होतो. त्यांनी एक प्रयोग सुचवला की, एखादा रंगीत फुगा किंवा खेळणे उन्हात ठेवल्यास एका दिवसात त्याचा रंग फिका पडतो. हा रंग हवेत मिसळून प्रदूषण वाढवतो आणि तीच हवा आपण श्वासाद्वारे आत घेतो.सरकारला विनंतीकायदे अनेक आहेत, परंतु जोपर्यंत दोषींना शिक्षा (Conviction) होत नाही, तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही, असे पाचपुते यांनी नमूद केले. शासकीय कार्यक्रम असोत किंवा घरगुती समारंभ, सर्वत्र कृत्रिम फुलांचा वापर वाढला आहे. यावर सरकारने कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा उत्पादनांवर नियंत्रण आणावे, अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे.चायनीज आणि मिठाईतील घातक रंगांमुळे कर्करोगाचा धोकाआपण जे अन्न खातोय, त्यातील भडक रंग आपल्या आरोग्यासाठी काळ ठरू शकतात, असा गंभीर इशारा भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी दिला आहे. स्वस्त चायनीज स्टॉल्स आणि मिठाईमध्ये वापरल्या जाणाऱ्या रासायनिक रंगांवर जोरदार प्रहार केला. पाचपुते यांनी सांगितले की, बुंदी, जिलेबी आणि विशेषतः स्वस्त चायनीज पदार्थांमध्ये (उदा. शेजवान चटणी किंवा राईस) 'सनसेट यलो' सारखे घातक पिगमेंट्स वापरले जातात. जर चायनीज खाल्ल्यानंतर केवळ काही सेकंदात तुमच्या हाताचा रंग निघत नसेल, तर विचार करा तुमच्या आतड्यांचे काय हाल होत असतील, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नैसर्गिक रंगांच्या तुलनेत हे कृत्रिम रंग अत्यंत स्वस्त असल्याने त्यांचा वापर सर्रास होतो, परंतु हे रंग थेट मानवी शरीरासाठी विषारी (Toxic) आहेत.तंबाखू न खाणाऱ्यांनाही कॅन्सर का?अनेक लोक तंबाखू, सुपारी किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन करत नाहीत, तरीही त्यांना कर्करोग (Cancer) होतो. याचे मुख्य कारण आपण नकळतपणे अन्नाद्वारे शरीरात घेतलेले हे घातक केमिकल्स आणि नॅनो पार्टिकल्स आहेत, असे मत पाचपुते यांनी व्यक्त केले.या प्रश्नावर शासनाने काय भूमिका घ्यावी, असे विचारले असता पाचपुते म्हणाले की, कायदा आहे, पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याकडे सक्षम यंत्रणा नसेल, तर अशा घातक वस्तूंवर थेट बंदी आणली पाहिजे. त्यांनी सरकारला विनंती केली की, नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या रंगांवर कठोर कारवाई करण्यात यावी.होळीसाठी पालकांना आवाहनयेत्या होळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पालकांना आवाहन केले की, मुलांसाठी खेळणी, पिचकाऱ्या किंवा रंग घेताना ते उन्हात ठेवून तपासा. जर त्यांचा रंग सहज निघत असेल, तर अशी खेळणी मुलांच्या हातात देऊ नका, कारण ती आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत. ही केवळ सरकारची जबाबदारी नसून ही एक 'सामाजिक जबाबदारी' (Social Responsibility) असल्याचे त्यांनी नमूद केले.
अजित पवार विमान अपघात प्रकरणी 'तो'अहवाल आज येणार! तांत्रिक बिघाड की मोठा घातपात ?
मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण होत आहे. या अत्यंत संवेदनशील प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेला 'प्राथमिक तपास अहवाल' (Preliminary Investigation Report) आज सायंकाळी प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) हा अहवाल नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडे (DGCA) सुपूर्द करणार असून, यातून अपघाताच्या नेमक्या कारणांवरून पडदा उठण्याची अपेक्षा आहे. गेल्या महिनाभरापासून संपूर्ण राज्याचे लक्ष या तपासाकडे लागले आहे, कारण हा तपास केवळ तांत्रिक स्वरूपाचा नसून गुन्हेगारी कोनातूनही केला जात आहे. या तपासाचा मुख्य आधार विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' असून, तो सुदैवाने सुरक्षित मिळाला आहे. त्यामध्ये रेकॉर्ड झालेले वैमानिकाचे शेवटच्या क्षणांचे संभाषण आणि विमानाचा तांत्रिक डेटा यातून विमानाचे इंजिन हवेत असतानाच निकामी झाले होते का, याचे उत्तर मिळणार आहे. याशिवाय, ज्या खासगी कंपनीकडे विमानाची जबाबदारी होती, त्या 'VSR व्हेंचर्स' ने विमानाची वेळेवर आणि योग्य प्रकारे देखभाल केली होती का? की यामागे काही तांत्रिक हलगर्जीपणा होता? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या अहवालातून समोर येतील. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेचा सत्य वृत्तांत समोर येण्यासाठी आता काही तासांचीच प्रतीक्षा उर्ती आहेआमदार रोहित पवार यांनी या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रकरणातील ठोस पुरावे समोर आणण्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, महाराष्ट्र सीआयडी (CID) या प्रकरणाचा समांतर तपास करत असून तांत्रिक बाबींची पडताळणी केली जात आहे. आज सायंकाळी येणाऱ्या तांत्रिक अहवालाच्या आधारावरच या प्रकरणात गुन्हेगारी स्वरूपाचा एफआयआर (FIR) दाखल करायचा की नाही, याचा अंतिम निर्णय सीआयडी घेणार आहे. त्यामुळे या तांत्रिक अहवालाकडे आता केवळ प्रशासनाचेच नव्हे, तर राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.VSR व्हेंचर्स'ला मोठा दणकाविमान अपघातानंतर केलेल्या विशेष ऑडिटमध्ये सुरक्षिततेच्या गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. याची तातडीने दखल घेत DGCA (नागरी विमान वाहतूक संचालनालय) ने संबंधित विमान कंपनीची उर्वरित पाचही विमाने तूर्तास 'ग्राऊंडेड' केली आहेत, म्हणजेच त्यांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. कंपनीच्या कामकाजातील या उणिवांमुळे संशयाची सुई आता व्यवस्थापनाकडे वळली आहे. अशा परिस्थितीत, आज सायंकाळी येणारा तांत्रिक तपास अहवाल हा केवळ अपघाताचे कारणच स्पष्ट करणार नाही, तर या कंपनीसाठी आणि संपूर्ण तपासासाठी एक 'टर्निंग पॉईंट' ठरणार आहे.
pakistan: अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील वाढत्या संघर्षादरम्यान, अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने एक महत्त्वाचा दावा केला आहे.
Raj Thackeray : अपघात हा धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा विमान अपघात प्रकरणी मोठा सवाल
Raj Thackeray : अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केले आहे.
अभिनेता सलमान खानचा कल्ट क्लासिक चित्रपट तेरे नाम दि. २७ फेब्रुवारी रोजी पीव्हीआर-आयएनएक्स थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला.
राष्ट्रपतींनी हेलिकॉप्टर 'प्रचंड'मधून केले उड्डाण
जैसलमेर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथून स्वदेशी विकसित लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) 'प्रचंड'मधून उड्डाण केले आणि एक फेरी मारली. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांच्यासोबत त्यांनी उड्डाण केले.भारताचे हवाई दल राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण परिसरात वायुशक्ती नावाने कवायती करत आहे. या मोहिमेत भारताचे हवाई दल सामर्थ्याची चाचपणी करणार आहे. या कवायतींच्या पाहणीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग पोखरणमध्ये आहेत.भारतीय हवाई दल राजस्थानमधील पोखरण येथे २७ फेब्रुवारी रोजी 'ऑपरेशन वायुशक्ती' अंतर्गत युद्धसराव अर्थात युद्धाभ्यास करणार आहे. हवाई दलाच्या या कवायतीत ७७ लढाऊ विमानं, ३४ हेलिकॉप्टर, ८ मालवाहक विमानं यांचा ताफा सहभागी होणार आहे. भारतीय हवाई दल करणार असलेल्या 'ऑपरेशन वायुशक्ती'मध्ये राफेल, सुखोई, मिराज-२०००, मिग-२९, जग्वार आणि तेजस आदी लढाऊ विमानांचा ताफा सहभागी होणार आहे. यंदाचे 'ऑपरेशन वायुशक्ती' हे ऑपरेशन सिंदूरच्या यशाला नव्याने उजाळा देणार आहे. हवाई वर्चस्व स्थापन करणे, लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा सुयोग्य वापर करणे, विविध संरक्षण दलांशी समन्वय राखून मर्मभेदी असा हल्ला हल्ला करणे आदी सराव या निमित्ताने होतील. भारतीय हवाई दल देशांतर्गत आणि परदेशातील संघर्षग्रस्त भागातून वेगाने लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याच्या कारवाईचाही सराव करणार आहे.
शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद
मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर तुमच्यासाठी ही अत्यंत बातमी महत्त्वाची आहे. कायम धावपळीत असणाऱ्या आपल्या आयुष्यात बँकेची कामं आपण अनेकदा शेवटच्या क्षणापर्यंत ढकलतो.जर तुमचं असं काही काम अडकलं असेल, तर आता उशीर करू नका. कारण उद्यापासून बँकांवर 'होळी' आणि 'विकेंड'चा असा काही रंग चढणार आहे की, सलग पाच दिवस बंद राहू शकतात.होळीनिमित्ताने पुन्हा एकदा आरबीआयने सुट्ट्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. शनिवार आणि रविवार शेवटचा असल्याने दोन दिवस बँक बंद राहतील. २ मार्च होलिका दहन असल्याने काही ठराविक राज्यात बँका बंद राहतील.३ मार्च धुलिवंदन आणि डोल जत्रा निमित्त मुंबई, दिल्ली, कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांत बँकांचे कामकाज होणार नाही. ४ मार्च होळीचा मुख्य सण असल्याने देशाच्या बहुतांश भागात बँकांना सुट्टी असेल.होळीच्या सणामुळे घराघरात आनंदाचं वातावरण असणार आहे, सलग सुट्ट्यांमुळे एटीएममध्ये खडखडाट जाणवण्याची शक्यता आहे.खिशात ऐनवेळी पैसे नसतील तर अडचणीत सापडू शकता. बँका बंद असल्या तरी ATM सेवा सुरू राहील, पण सलग सुट्ट्यांच्या काळात अनेकदा एटीएममधील कॅश संपण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे शक्य असल्यास आजच आवश्यक तितके पैसे काढून ठेवा.या कालावधीमध्ये यूपीआय (UPI) सेवा सुरळीत सुरू राहतील. त्यामुळे पैसे पाठवण्याचे व्यवहार तुम्ही करू शकता. फक्त चेक क्लिअरन्स किंवा बँकेत प्रत्यक्ष जाऊन करायची कामं असतील, तर मात्र तुम्हाला ४ मार्चपर्यंत वाट पाहावी लागेल. प्रत्येक शहरात स्थानिक सणानुसार सुट्ट्यांमध्ये बदल असू शकतो. त्यामुळे आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन किती दिवस आणि कशी सुट्टी असणार याची माहिती करून घ्या.
Yogi Adityanath : सिंगापूर - जापान दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांनी केले ₹९०,००० कोटींचे सामंजस्य करार
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सिंगापूर आणि जपानचा चार दिवसांचा दौरा पूर्ण केला. दोन्ही देशांच्या दौऱ्यादरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रतिष्ठित कंपन्यांच्या सीईओंची भेट घेतली. हा दौरा संपल्यानंतर मुख्यमंत्री योगी म्हणाले, जपानमध्ये आम्ही विविध कंपन्यांसोबत ₹९०,००० कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. दरम्यान, सिंगापूरमध्ये ₹६०,००० कोटींचे सामंजस्य करार झाले आहेत.मुख्यमंत्री योगी यांच्या दोन्ही देशांच्या चार दिवसांच्या दौऱ्यादरम्यान, २.५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झाले. शिवाय, उत्तर प्रदेशने जपानच्या यामानाशी प्रीफेक्चरसोबत ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानावर करार केला आहे. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये उच्चस्तरीय प्रशिक्षण मिळेल.जपान दौऱ्यात मोठे यश :जपानमधील गुंतवणूक परिषदेत राज्य सरकारला हजारो कोटी रुपयांचे MoU आणि गुंतवणुकीचे प्रस्ताव मिळाले, प्रमुख जपानी कंपन्यांमध्ये Kubota Corporation, Spark Minda (टोपो ठेन्सी सहकार्यनि), Japan Aviation Electronics Industry आणि Nagase & Co., Ltd. यांचा समावेश आहे.B2G बैठकीत Suzuki Motor Corporation, Honda Cars India Ltd., Konoike Transport Co., Ltd., Mitsui & Co., Ltd., Rapidus Corporation, Marubeni Corporation, Sumitomo Realty & Development Co., Ltd. आणि MUFG Bank यांनी सहभाग घेतला, गुंतवणुकीची प्रमुख क्षेत्रे कृषी यंत्रसामग्री, ऑटो ओईएम आणि घटकनिर्मिती, सेमीकंडक्टर, डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन, कंप्रेस्ड बायो गैस, लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंग अशी आहेत.ग्रीन हायड्रोजन (Green hydrogen) उत्कृष्टता केंद्र :जपान दौऱ्यात हरित ऊर्जा सहकार्यास चालना देत University of Yamanashi, Yamanashi Hydrogen Company, IIT Kanpur, Harcourt Butler Technical University, IIT BHU आणि Madan Mohan Malaviya University of Technology यांच्या सहकार्याने ग्रीन हायड्रोजन सेंटर ऑफ एक्सतन्स स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली.
मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वांत लाडकी जोडी, म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोडा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे अत्यंत शाही थाटात आणि पारंपरिक पद्धतीने या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. गेल्या सात वर्षांपासून ही जोडी एकमेकांना डेट करत होती, मात्र त्यांनी कधीही जाहीरपणे आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती अखेर लग्नाच्या अवघ्या दोन दिवस आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सुखद धक्का देत त्यांनी आपल्या लग्नाची बातमी शेअर केली केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, रश्मिका आणि विजय पडद्यावर लग्नबंधनात अडकण्याची ही पहिली वेळ नाही. २०१८ मध्ये 'गीता गोविंदम या सुपरहिट सिनेमाच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती. या सिनेमातील त्यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना वेड लावले होते. या सिनेमाचा शेवटचा सीन त्यांच्या लग्नावरच चित्रित करण्यात आला होता. मात्र, रंजक गोष्ट अशी की, त्यावेळी तो लग्नाचा सीन शूट करताना विजय देवरकोंडाला काहीसं विचित्र आणि दडपणाखाली असल्यासारखं वाटत होते. कोणाला माहीत होते की, पडद्यावरचं ते 'रील' लग्न एक दिवस उदयपूरच्या शाही थाटात 'रिअल' सम्मात रूपांतरित होईलमंगळसूत्राच्या तीन गाठी बांधताना भी प्रचंड घाबरलो होतो...उदयपूरच्या शाही विवाहसोहळ्ळ्यानंतर अभिनेता विजय देवरकोंडा याने आपल्या लग्नाचे अनुभव आणि रश्मिकाबद्दलच्या भावना अत्यंत मोकळेपणाने व्यक्त केल्या आहेत. विजयने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, 'गीता गोविंदम' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा तो पहिल्यांदा रश्मिकासोबत लग्नाचा सीन शूट करत होता, तेव्हा तो प्रचंड दडपणाखाली होता विजयच्या मते, मंडपात बसणे इथपर्यंत ठीक होते, पण जेव्हा रश्मिकाच्या गळ्यात मंगळसूत्राच्या तीन गाठी बांधायची वेळ आली, तेव्हा तो खरोखरच घाबरला होता. रश्मिका 'पाट्टी' साडीत आणि विजय 'पाट्टू पंचा या पारंपरिक वेशात असल्याने त्याला सर्व काही वास्तव वाटत होते. रश्मिकासाठी ते तिचं तिसरे ऑनस्क्रीन लग्न असल्याने तिला फारसं काही वाटत नव्हतं, पण विजय मात्र कमालीचा अस्वस्थ झाला होता आणि त्याने रश्मिकाला हे सर्व खूप 'विचित्र' वाटत असल्याचेही बोलून दाखवले होते. लग्नानंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना किल्यने रश्मिकासाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले की, एके दिवशी मला तिची इतकी तीव्र आठवण आली की मला जाणवले, जर ती माझ्यासोबत असती तर माझा तो दिवस अधिक सुंदर झाला असता जर ती जवळ असती तर माझ्या जेवणाची चव वाढली असती आणि माझे वर्कआऊटही अधिक जोमाने झाले असते. मला जीवनाच्या प्रत्येक क्षणी फक्त आणि फक्त तिचीच गरज आहे, हे उमजल्यामुळेच मी माझ्या सर्वात चांगल्या मैत्रिणीला आता माझी अर्धांगिनी बनवले आहे. विजयच्या या रोमँटिक पोस्टने चाहत्यांची मने जिंकली असून त्यांच्या या प्रवासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.रश्मिका हिने देखील भावूक पोस्ट शेअर केली आहे 'आता भेट करून देते माझ्या पतीसोबत.. श्री विजय देवरकोडा! अशी व्यक्ती ज्याने मला खरे प्रेम करणं शिकवलं आहे. असा व्यक्ती ज्याने मला शांतीचा अनुभव करुन दिला आहे. असा व्यक्ती ज्याने मला मोठे स्वप्न पाहण्यासाठी सांगितले आहे. ज्यामला मला स्वतःवर विश्वास ठेवण्यास सांगितलं आहे असं रश्मिका म्हणाली आहे. लग्नानंतर रश्मिका आणि विजय यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.
WhatsApp लॉगिन फेल, मेसेज मिळेनात! मेसेजिंग अॅपमध्ये तांत्रिक बिघाडामुळे कामं ठप्प
WhatsApp वेब वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यात लॉग-इन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. Downdetector या संकेतस्थळावर या बिघाडासंदर्भात २५ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यावरून ही समस्या सर्वत्र नसून काही ठराविक भागापुरती मर्यादित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ५६ टक्के वापरकर्त्यांनी वेबसाइटबाबत समस्या नोंदवल्या आहेत. ३९ टक्के वापरकर्त्यांनी अॅपबाबत अडचणी सांगितल्या आहेत, तर ६ टक्के वापरकर्त्यांना मेसेजिंगमध्ये अडथळे आले आहेत.दरम्यान, अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर इतरांनाही अशाच अडचणी येत आहेत का, याची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः आयफोन वापरकर्त्यांवर याचा अधिक परिणाम होत असल्याचे दिसत आहे, तर Android वापरकर्त्यांसाठी सेवा सुरळीत आहे.लॉग-इन त्रुटींमुळे X वर वापरकर्त्यांची तक्रार :काही वापरकर्त्यांनी त्यांच्या उपकरणांशी, विशेषतः iPhone शी, WhatsApp वेब लिंक करताना अडचणी येत असल्याची तक्रार X या प्लॅटफॉर्मवर केली.एका वापरकर्त्याने लिहिले, “सर्वांसाठी WhatsApp बंद आहे का?!!! iPhone आणि लिंक्ड डिव्हाइसेसवर लॉग-इन करण्याचा तासभर प्रयत्न करतोय.”दुसऱ्या वापरकर्त्याने पोस्ट केले, “iPhone वापरकर्त्यांसाठी WhatsApp Web बंद आहे का? सकाळपासून अनेक लोक तक्रारी करत आहेत.”आपली नाराजी व्यक्त करत आणखी एका वापरकर्त्याने म्हटले, “WHATSAPP WEB ERROR, मी काम करू शकत नाही @WhatsApp.”या पोस्टवरून अनेक वापरकर्त्यांना WhatsApp वेबवर लॉग-इन आणि कनेक्टिव्हिटीसंदर्भात समान अडचणी येत असल्याचे स्पष्ट होते.WhatsApp वेबमध्ये बिघाड कायम; Meta कडून अद्याप प्रतिसाद नाही :या बिघाडाबाबत Meta Platforms किंवा WhatsApp कडून तात्काळ कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही.
मुंबई : मराठी ही केवळ संस्कृतीची नव्हे तर अर्थकारण आणि रोजगाराचीही भाषा व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानमंडळ सभागृहात आयोजित ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठीच्या संवर्धनासाठी विश्वकोश निर्मिती, साहित्य संमेलनांचे आयोजन आणि शासकीय व्यवहारात मराठीचा वाढता वापर यांसारख्या ठोस धोरणात्मक पावलांचा त्यांनी उल्लेख केला.महाराष्ट्र विधानमंडळात झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे तसेच अण्णा बनसोडे, चंद्रकांत पाटील, उदय सामंत, आशुतोष काळे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन केदार शिंदे, ऋषिकेश जोशी, प्रभू देसाई, धनश्री दामले आणि त्यांच्या टीमने केले.उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठी भाषा ही हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा वाहून नेणारी पवित्र धारा आहे. “लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी” या ओळींचा उल्लेख करत त्यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना अभिवादन केले तसेच संत, कवी, लेखक, अभ्यासक, शिक्षक आणि संशोधक यांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार केला. मराठी ही महाराष्ट्राच्या नसा-नसांतून वाहणारी अस्मिता असल्याचे त्यांनी नमूद केले.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने सातत्याने पाठपुरावा केला, याची आठवण करून देताना शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. मराठीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून मातृभाषेत शिक्षण आणि अभ्यास यावर भर देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.मराठी ही व्यवहाराची भाषा म्हणून सर्व क्षेत्रांत प्रभावीपणे वापरली जावी, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठीतील उत्कृष्ट साहित्यकृतींचे इतर भाषांमध्ये अनुवाद व्हावेत, मराठीचा वापर प्रशासनात वाढावा आणि ती अर्थार्जनाची भाषा व्हावी, यासाठी धोरणात्मक पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. छोट्या-छोट्या प्रयत्नांतून यशाचा महासागर तयार होतो, तसेच मराठीचा महासागर उभा करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.तंत्रज्ञानाच्या युगात मराठीने कालसुसंगत बदल आत्मसात केले असून सोशल मीडियावरही मराठीची विविध रूपे दिसत आहेत. बोलीभाषांचे वैविध्य ही मराठीची ताकद असल्याचे सांगत खानदेशी, मालवणी, कोकणी, वऱ्हाडी आदी बोलीभाषांचा त्यांनी उल्लेख केला. उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर करून मराठीची कीर्ती वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले.शासनाच्यावतीने विश्वकोशातील नोंदी अद्ययावत करणे, बालकोश, कुमार कोश, ऑलिंपिक कोश निर्मिती तसेच विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर मराठीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरातील मराठी बांधवांना एकत्र आणण्याचे कार्य या संमेलनातून होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.विधानमंडळ अधिवेशनाच्या धावपळीत आयोजित ‘जावे विनोदाच्या गावा’ या कार्यक्रमातून मराठी विनोदाची परंपरा उजागर झाल्याचे सांगत शिंदे यांनी आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्या विनोदी शैलींचा उल्लेख केला. संकटातही विनोद शोधणारा मराठी माणूस हीच आपली ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.“माझ्या रक्तात मराठी, माझ्या श्वासात मराठी,” असे भावनिक उद्गार काढत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी भाषा गौरव दिनी माय मराठीचा वारसा अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकत ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन करून त्यांनी उपस्थितांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रकल्प स्मार्ट अंतर्गत मुंबई - अहमदाबाद उच्चगती रेल्वे स्थानक क्षेत्र विकासाला एमएमआरडीएची गती
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे मार्गिकेअंतर्गत स्थानक क्षेत्र विकासासाठी प्रकल्प – SMART (Station Area Development along the Mumbai–Ahmedabad High-Speed Rail Corridor) अंतर्गत उच्चस्तरीय कार्यशाळेचे आयोजन बांद्रा-कुर्ला संकुल येथील मुख्यालयात केले. ही कार्यशाळा भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) आणि जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्था (JICA) यांच्या तांत्रिक सहकार्याचा आराखडा बनवण्यासाठी आयोजित करण्यात आली.मुंबई – अहमदाबाद उच्चगती रेल्वे (MAHSR) मार्गिकेत एकूण १२ स्थानके असून त्यापैकी चार; बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर ही महाराष्ट्र राज्यात येतात. प्रकल्प – SMART अंतर्गत ठाणे व विरार या स्थानकांची प्राधान्याने निवड करण्यात आली असून उच्चगती रेल्वे पायाभूत सुविधा ही नियोजित व शाश्वत शहरी विकासासाठी उपयुक्त ठरेल, या उद्देशाने स्थानक क्षेत्र विकास आराखडे तयार करण्यात येत आहेत.कार्यशाळेदरम्यान जायका तज्ज्ञांनी जपानमधील ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट, जमीन मूल्य हस्तगत (Land Value Capture), एकात्मिक वाहतूक नियोजन, पर्यावरणीय शाश्वतता, हितधारक सहभाग आणि स्थानकाभोवती पुनरुत्थानात खाजगी क्षेत्राच्या सहभागासंबंधी आंतरराष्ट्रीय उत्तम पद्धती सादर केल्या. एमएमआरडीएच्या नगररचना पथकाने व जायका तज्ज्ञांनी ठाणे व विरार स्थानक क्षेत्र विकास आराखड्यांवर सविस्तर चर्चा करून नियोजन आराखडा , अंमलबजावणीचा कृती मार्गनकाशा व पुढील टप्प्यातील आंतरसंस्थात्मक समन्वय यावर विचारविनिमय केला.त्यानंतर डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांनी एमएमआरडीए, ठाणे, विरार येथील संबंधित अधिकारी तसेच, नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) आणि जायकाच्या अधिकाऱ्यांसह सविस्तर आढावा बैठक घेतली. त्यांनी उच्चगती रेल्वे विकास तत्त्वांशी सुसंगत असे एकात्मिक स्थानक क्षेत्र विकास आराखडे निश्चित कालमर्यादेत तयार करण्याचे निर्देश दिले तसेच ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट मानके, जमीन मूल्य हस्तगत धोरणे आणि अखंड बहुविध वाहतूक एकत्रीकरण यांचा अवलंब करण्यावर भर दिला. पुढे, बीकेसी व बोईसर उच्चगती रेल्वे स्थानकांनाही या अनुभवांचा विस्तार करून ही स्थानके मुंबई महानगर प्रदेशातील प्रमुख विकास केंद्रे म्हणून विकसित करण्याचे निर्देश दिले.“हा उपक्रम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक मानकांनुसार विकसित, शाश्वत व परिवहन-केंद्रित विकासाचे अग्रगण्य केंद्र म्हणून घडविण्याच्या दृढ वचनबद्धतेला अधिक बळकटी देणारा आहे.”
Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी चर्चा करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.
Holi Skincare: होळी खेळण्याआधी त्वचेची करा खास तयारी; रंगांपासून बचावासाठी या सोप्या टिप्स करा फॉलो
Holi Skincare रंग खेळण्याआधी त्वचेला पोषण देणे, तिला मॉइश्चरायझ ठेवणे आणि काही सोपे उपाय करणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेतली तर रंगांचा त्वचेवर होणारा वाईट परिणाम कमी होतो.
Raj Thackeray: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट, काय म्हणाले?
मुंबई: आज 'मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट लिहित मराठीजनांना, मराठी भाषा प्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. एरवी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आक्रमक होणाऱ्या राज ठाकरेंनी आज 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (AI) आणि 'डेटा' या आधुनिक शस्त्रांच्या जोरावर मराठी भाषेचे वर्चस्व जगभरात निर्माण करण्याबद्दल सांगितले आहे.राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत मार्मिक निरीक्षण नोंदवले आहे. ते म्हणतात, दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला तेव्हा जमीन महत्त्वाची होती, औद्योगिक क्रांतीत मशिन्स आले, आणि आता 'एआय'च्या युगात डेटा (विदा) हीच सर्वात मोठी शक्ती आहे. ज्या भाषेतून सर्वात जास्त डेटा तयार होईल, ती भाषा जगात शक्तिशाली ठरेल, असे राज ठाकरे यांनी म्हटले.एआयमुळे नोकऱ्या जातील अशी भीती व्यक्त केली जात असताना राज ठाकरेंनी सकारात्मक बाजू मांडली. मराठी माणसाने हे तंत्रज्ञान आत्मसात केले, तर तो स्वतःचे मोठे साम्राज्य उभे करू शकतो. जगातील बलाढ्य कंपन्या गेल्या २०-३० वर्षांतच उभ्या राहिल्या आहेत, ते मराठी तरुणांनाही शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.काय म्हणाले राज ठाकरे?आज मराठी भाषा गौरव दिवस. सर्वप्रथम सर्व मराठी भाषिकांना आणि जे मराठी भाषिक नाहीत पण जे मराठी भाषेचा इथे राहून आदर करतात आणि बोलतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना देखील मनःपूर्वक शुभेच्छा. आजच्या दिवसाची ही पोस्ट लिहिताना गेले काही दिवस सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल जी चर्चा सुरु आहे, त्याचे संदर्भ आहेत. त्यात दिल्लीत एआय परिषद झाली त्या सगळ्याचे संदर्भ पण डोक्यात घोळत होते. त्यातच अँथ्रोपिकच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने जगभरात जी घुसळण सुरु केली आहे. त्या अँथ्रोपिकचा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. राहुल पाटील ही मराठी व्यक्ती आहे ही पण बाब महत्वाची होतीच .या निमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली, त्यांचं म्हणणं समजवून घेतलं आणि त्यातून जे जाणवलं ते आज मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने मांडत आहे.आज फक्त मराठीच नाही तर जगातील सगळ्याच स्थानिक भाषा ज्यांना स्वतःची लिपी आहे अशा सगळ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे. मध्यंतरी मला काही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणाली दाखवल्या. त्या बघितल्यावर एक लक्षात आलं ते म्हणजे आता ज्ञान मिळवायला किंवा व्यक्त व्हायला किंवा अर्थार्जन करायला या प्रणालींचा हवा तसा वापर करणं शक्य आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही.दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला आणि त्यानंतर जमीन ही मोठी शक्ती ठरली. औद्योगिक क्रांतीनंतर मशिन्स ही मोठी शक्ती वाटायला लागली. जसं डिजिटल युग सुरु झालं तसा डेटा शक्तिवान ठरला आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात हा डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील. आणि म्हणूनच माझे महाराष्ट्र सैनिक असोत की इतर मराठी जनांनी, मराठी भाषेतून अतिप्रचंड पण उत्तम दर्जाचा डेटा तयार होईल हे बघितलं पाहिजे, अशा आशयाची पोस्ट राज यांनी केली आहे.
SUPREME COURT: ‘आयोग बंगाल SIR मधील न्यायाधीशांना प्रशिक्षण का देतंय?’; टीएमसीचा प्रशिक्षणावर आक्षेप
SUPREME COURT: पश्चिम बंगाल विशेष तपास पथक (SIR) मध्ये नियुक्त केलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवडणूक आयोगाच्या प्रशिक्षणाला आव्हान देणाऱ्या तृणमूल काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
Girish Oak : अभिनेते सचिन पिळगांवकर यांना ट्रोल करणाऱ्यांवर गिरिश ओक यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
अफगाण सैनिकांनी पाडले पाकिस्तानचे एफ-१६ फायटर-जेट
पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केल्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी युद्धाची घोषणा केली. दरम्यान, तालिबानने दावा केला आहे की त्यांनी पाकिस्तानचे अमेरिकन बनावटीचे एफ-१६ लढाऊ विमान पाडले आहे. अफगाणिस्तानने सोशल मीडियावर जळत असलेल्या एफ-१६ विमानाच्या अवशेषांचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये विमानाच्या मागील भागावर लहान पाकिस्तानी ध्वज दिसत असून त्यावर ‘८५५१०’ हा क्रमांकही स्पष्टपणे लिहिलेला आहे. मात्र, या व्हिडिओच्या सत्यतेची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.गेल्या काही वर्षांत भारतीय वायुसेनेने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या हवाई चकमकींमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक पाकिस्तानी एफ-१६ विमाने पाडल्याचा दावा करण्यात आला आहे. काही विश्लेषकांच्या मते, पाकिस्तानच्या शस्त्रसाठ्यातील महत्त्वाचा घटक मानले जाणारे एफ-१६ लढाऊ विमान प्रत्यक्षात तितकेसे प्रभावी नाही.
Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूरने तिची सासू प्रिया आहुजा यांना सोशल मीडियावरुन पोस्ट करत खास पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Taapsee Pannu दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘अस्सी’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. समीक्षकांकडून या चित्रपटाला चांगली प्रशंसा मिळत आहे. अनेक प्रेक्षकही चित्रपटाचे कौतुक करत आहेत. तरीदेखील बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची गती तुलनेने मंद असल्याचे दिसते.
सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहे. दरम्यान, दुसरीकडे भारताच्या कर्णबधिर संघाने पहिली आशिया कप टी-२० स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत भारतीय संघाने श्रीलंकेला सहा विकेट्सने एकतर्फी पराभव करून शानदार कामगिरी केली.भारतीय संघाने यापूर्वी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला चार विकेट्सने पराभूत करत विजयी सलामी दिली होती. त्यानंतर त्यांनी नेपाळवर १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवत आपला प्रवास सुरू ठेवला. श्रीलंकेने नेपाळविरुद्ध स्पर्धेतील तिसरा सामना सहा विकेट्सने जिंकला. त्यानंतर श्रीलंकेने नेपाळला १५७ धावांनी मात दिली. त्यामुळे भारताला एका धावेने विजय मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागले. पुढच्या सामन्यात भारताने नेपाळला नऊ विकेट्सने पराभूत करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.भारताच्या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार साई आकाश होता. त्याने अंतिम सामन्यात बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी केली. त्याने १४ चेंडूत २७ धावा केल्या आणि नंतर दोन विकेट्स घेतल्या. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंनी स्पर्धेचा सर्वोत्तम फलंदाज आणि सर्वोत्तम गोलंदाज पुरस्कार पटकावले.श्रीलंकेचा क्रिकेटपटू गिमाडो एल. मल्कमला १९६ धावा केल्याबद्दल सर्वोत्तम फलंदाज म्हणून निवडण्यात आले. त्याने सात विकेट्स घेतल्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. श्रीलंकेचा गिहान लासिडू डी सिल्वा हा देखील स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज होता, त्याने स्पर्धेत सर्वाधिक १० विकेट्स घेतल्या. ऐतिहासिक आशिया कप जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत आहे.
मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान तिकीट परताव्याच्या नियमात महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या या नवीन नियमांनुसार, प्रवाशांना आता तिकीट बुक केल्यानंतर ४८ तासांचा ‘लुक-इन' किंवा ‘लॉक-इन' कालावधी मिळेल. या कालावधीत प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता तिकीट रद्द किंवा दुरुस्त करता येईल.४८ तासात तिकीट रद्द किंवा दुरुस्ती करता येणारDGCA चे प्रमुख फैज अहमद किडवई यांनी स्पष्ट केले की, ही सुविधा अशा उड्डाणांसाठी असेल ज्यांचा प्रवास देशांतर्गत ७ दिवस आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर १५ दिवस आधी बुक केला आहे. तिकीट रद्द केल्यानंतर त्याचा परतावा १४ कामकाजाच्या दिवसांत मिळणे आता अनिवार्य असेल. विशेष म्हणजे, जर तिकीट ट्रॅव्हल एजंट किंवा पोर्टलवरून काढले असेल, तरीही परतावा देण्याची मुख्य जबाबदारी विमान कंपनीचीच असेल.याव्यतिरिक्त, नावामध्ये काही चूक झाली असल्यास आणि ती २४ तासांच्या आत निदर्शनास आणून दिल्यास, कोणताही दंड आकारला जाणार नाही. वैद्यकीय इमर्जन्सी प्रसंगी प्रवाशाला किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याला रुग्णालयात दाखल करावे लागल्यास, विमान कंपन्यांना परतावा किंवा 'क्रेडिट शेल' देणे आवश्यक आहे.१४ दिवसात मिळणार संपूर्ण रिफंडनागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गुरुवारपासून या रिफंडज नियमांमध्ये सुधारणा केली आहे आणि प्रवाशांसाठी अनुकूल उपाययोजना सुरू केल्या आहेत. ट्रॅव्हल एजंट/पोर्टलद्वारे तिकीट खरेदी केल्यास, परतफेडीची जबाबदारी एअरलाइन्सवर असेल कारण एजंट त्यांचे नियुक्त प्रतिनिधी असतात.एअरलाइन्सने खात्री करावी की परतफेड प्रक्रिया १४ कामकाजाच्या दिवसांत पूर्ण झाली आहे, असे DGCA चे प्रमुख फैज अहमद किदवाई यांनी जारी केलेल्या सुधारित नियमांमध्ये म्हटले आहे. वैद्यकीय आणीबाणीमुळे तिकीट रद्द झाल्यास, प्रवासादरम्यान प्रवासी किंवा त्याच पीएनआरमध्ये सूचीबद्ध असलेल्या कुटुंबातील सदस्याला प्रवेश/रुग्णालयात दाखल केले जाते, तर एअरलाइन्स परतावा किंवा क्रेडिट शेल देऊ शकतात.
इस्रायलच्या सहा देशांच्या आघाडीला पाकिस्तान घाबरला; या आघाडीला पाकिस्तान सिनेटकडून विरोध
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारतासह अनेक देशांसोबत ‘हेक्सागन ऑफ अलायन्सेस’ म्हणजेच सहा देशांचा आघाडी गठबंधन उभारण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर पाकिस्तानने त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. पाकिस्तानने या प्रस्तावाला ‘मुस्लिम उम्माविरोधी गट’ असे संबोधले आहे. या मुद्द्यावर पाकिस्तानच्या सिनेटने सर्वसंमतीने ठराव मंजूर करून नेतन्याहू यांच्या योजनेचा निषेध केला. ‘उम्मा’ हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ ‘समुदाय’ किंवा ‘राष्ट्र’ असा होतो.हा ठराव पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)च्या सिनेट सदस्य पलवाशा मोहम्मद जई खान यांनी सर्व राजकीय पक्षांच्या वतीने मांडला. पीपीपी ही शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारचा भाग आहे.सिनेटच्या ठरावात असे नमूद करण्यात आले की, कब्जाधीन फलस्तीन प्रदेश आणि पवित्र स्थळांच्या कायदेशीर किंवा ऐतिहासिक स्थितीत बदल करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना विरोध केला जाईल. अहवालानुसार, अशा प्रकारची विधाने प्रादेशिक स्थैर्य आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात असल्याचे सिनेटने म्हटले आहे. ठरावात नेतन्याहू यांच्या वक्तव्याला ‘मुस्लिम उम्माच्या एकता आणि अखंडतेला कमकुवत करण्याचा प्रयत्न’ असे संबोधण्यात आले.याशिवाय, इस्रायलने सोमालीलँडला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिल्याच्या वृत्तांनाही सिनेटने फेटाळून लावले. डिसेंबरमध्ये इस्रायलने सोमालीलँडला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून औपचारिक मान्यता दिली होती, ज्यावर अनेक मुस्लिम देशांनी आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने आक्षेप नोंदवला होता.भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तेल अवीव भेटीपूर्वी बेंजामिन नेतन्याहू यांनी जाहीर केले होते की, इस्रायल मध्यपूर्वेत ‘एक प्रकारचा सहा देशांचा गठबंधन’ उभारणार आहे. या गठबंधनात भारत, ग्रीस, ग्रीक सायप्रस प्रशासन तसेच काही इतर अरब, आफ्रिकी आणि आशियाई देशांचा समावेश असू शकतो, असे त्यांनी म्हटले होते.नेतन्याहू यांच्या मते, या आघाडीचा उद्देश समान आव्हाने आणि ध्येयांकडे एकसमान दृष्टीने पाहणाऱ्या देशांना एकत्र आणणे हा आहे. त्यांनी या प्रयत्नाला ‘कट्टर शिया धुरी’ आणि ‘उदयोन्मुख कट्टर सुन्नी धुरी’ यांच्या विरोधात संतुलन साधण्याचा प्रयत्न असे वर्णन केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, शिया धुरीचे नेतृत्व इराण करत असून त्यात हमास, हिज्बुल्लाह आणि हूती यांसारख्या संघटनांचा समावेश आहे. तर उदयोन्मुख सुन्नी धुरीचा संबंध आयएसआयएसच्या उरलेल्या घटकांशी जोडला जातो.
Raj Thackeray Post : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून पोस्ट करत हटके शुभेच्छा देत महत्वाचा सल्ला दिला आहे.
Arvind Kejriwal:देशात प्रसिद्ध झालेल्या दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने दिल्ली दारू धोरणाशी संबंधित वादग्रस्त सीबीआय प्रकरणात आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांनी निर्दोष मुक्तता झाली आहे.
Sunetra Pawar post :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या नावाची निवड झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर केली आहे.
नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस गुन्हा दाखल झाल्यानंतरही, आरोपींनी २१ फेब्रुवारीला गणिताचा पेपर फोडल्याचे पुढे आले आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ शिवलिंग पटवे यांनी याला दुजोरा दिला आहे. शिक्षण मंडळ पोलिसांशी समन्वय साधून असल्याचे डॉ शिवलिंग पटवे यांनी सांगितले.पेपर फोडल्याचे डिजिटल पुरावे समोर :दरम्यान, पेपरफुटी प्रकरणात अटकेतील आरोपींनी मोबाईल फॉरमॅट केला होता, पोलिसांनी तो डेटा रिकव्हर केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. १८ तारखेला हा प्रकार समोर आल्यानंतर गुन्हा दाखल झाला, काही आरोपीनी मोबाईल डेटा फॉरमॅट केला, तरीही २१ फेब्रुवारीला गणिताचा पेपर फुटल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांना मिळाले. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा सुद्धा पेपर फोडल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.पेपरफुटीचे रॅकेट ?दुसरीकडे, पाच सदस्यीय विशेष तपास पथककडून पेपर फुटी संदर्भात डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. रसायन, भौतिकसोबत गणिताचाही पेपर फुटल्याने पेपरफुटीचे रॅकेट असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.आरोपी गजाआड :पेपरफूट प्रकरणी पोलिसांनी (२३ फेब्रुवारी) सोमवारी आणखी २ आरोपींना अटक केली. जुनैद मोहम्मद अब्दुल जावेद (रा. हसनबाग) आणि मुस्तफा खान (रा. भानखेडा) अशा या आरोपींची नावे असून हे दोघेही ट्यूशन क्लास संचालक आहेत.यापूर्वी पोलिसांनी निशिकांत सुखदेव मून आणि फरहान अख्तर फहीम अख्तर यांना अटक केली होती. नागपूर विभागात सेंट उर्सुला शाळेत मिळालेल्या मुलीच्या मोबाईलवरून १६ फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि १८ ला भौतिकशास्त्रचा पेपर फुटल्याच समोर आले होते. या प्रकरणात शिक्षक निशिकांत मून, एक्सेलन्ट अकादमीचे मुस्तफा खान, जुनेद जावेद अटकेत आहे.
Epstein Files: बाल लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या जेफ्री एप्सटिनच्या फाईल्समधील खुलाशांचे परिणाम आता जनतेवर पडत आहेत. प्रथम प्रिन्स अँड्र्यू, नंतर पीटर मँडेलसन आणि आता बोर्गे ब्रेंडे आणि हिलरी क्लिंटन पुढे आले आहेत.
टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन
मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून वडील वेन्टिलेटरवर असल्याने घरी गेला होता. मात्र, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यासाठी तो देशसेवेवर परत आला. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी तर मिळाली नाही. पण तो फिल्डिंगसाठी उतरला होता. अशातच आता त्याच्या वडिलांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.रिंकू सिंगचे वडील खाचंद्र सिंग हे स्टेज 4 लिव्हर कॅन्सरशी झुंजत देत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावरी होती. त्यानंतर त्यांना मेकॅनिकल व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. त्यांना सतत रेनल रिप्लेसमेंट थेरपी दिली जात होती. मात्र, अखेर त्यांना जास्त वेळ झुंज देता आली नाही. अशातच रिंकु सिंग आता घरी परत गेला असून अंत्यविधी झाल्यानंतर तो संघात सामील होईल.भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात रिंकु सिंग वडिलांना सोडून पुन्हा टीम इंडियासाठी परत आला होता. मॅच झाल्यानंतर तो पुन्हा हॉस्पिटलला गेला मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. रिंकु सिंगला टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. पण तो फिल्डिंगला मैदानात उतरला. त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. त्यावेळी त्याने एक चूक देखील केली होती. त्याच्या हातातून एक कॅच देखील निसटला होता. मात्र, कॅप्टन सूर्या त्याला एका शब्दाने काहीही बोलला नाही.दरम्यान, रिंकू सिंग हा उत्तर प्रदेशातील अलिगडचा रहिवासी आहे. आयपीएलमध्ये यश दयालला एकाच ओव्हरमध्ये पाच सिक्स मारल्यानंतर तो प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. रिंकुने थेट टीम इंडियाची जर्सी घातली अन् भारताला देखील मोठमोठे सामने जिंकून दिले.
Rohit Pawar : अजित पवार विमान अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी एक्सवरून पोस्ट शेअर करत सांगितले आहे. त्यामुळे ते आता नेमके कोणते दावे करणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Share Market Crashed: भारतीय शेअर बाजाराने आठवड्याची सुरुवात नकारात्मक पद्धतीने केली, शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी, आठवड्याचा शेवटचा व्यवहार दिवस होता.
Morning Routine: लवकर उठलात तरच यश मिळतं का? विज्ञान सांगतं वेगळीच गोष्ट!
Morning Routine विज्ञान स्पष्ट सांगते की ७ ते ८ तासांची गाढ झोप ही कोणत्याही सकाळच्या रूटीनपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. जर तुम्ही सकाळी ५ वाजता उठण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागत असाल किंवा झोप कमी घेत असाल, तर त्याचा शरीरावर आणि मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो.
Sunetra Pawar : सर्व समाजाला सोबत घेऊन आपण पुढे जाणार - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा परिवार असून समाजातील कोणत्याही घटकाला मी वाऱ्यावर सोडणार नाही. सर्व समाजाला सोबत घेऊन आपण पुढे जाणार असल्याचे पक्षाच्या नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मुंबईत आयोजित बैठकीत सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर त्या बोलत होत्या.काय म्हणाल्या सुनेत्रा पवार :सुनेत्रा पवार म्हणाल्या की, आजचा प्रसंग माझ्यासाठी वेदनादायक आहे, हा क्षण माझ्यासाठी लाखो कार्यकर्त्यांची जबाबदारी स्वीकारणारा आहे. मी पक्षाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. आपल्या सर्वांचे लाडके नेते अजित दादा यांच्या अकाली जाण्याच्या अपार दुःखातून आपण अजूनही सावरलो नाहीत. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून ती भरून निघण्यासारखी नाही. अजित दादांना आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत राहिल्याचे मी पाहिलंय. त्यांचं स्वप्न अपूर्ण राहू देणार नाही, आपण सर्वजण ते पूर्ण करणार आहोत. समाजातील कोणत्याही मी घटकाला वाऱ्यावर सोडणार नाही. सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करतोच आहे. पुन्हा एकदा आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आपल्याला परत मिळवायचा आहे. आता आपल्याला शहरात देखील पक्षाचा विस्तार करायचा आहे.आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 'राष्ट्रीय अधिवेशन २०२६' यशस्वीरीत्या पार पडले. या अधिवेशनात मला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सर्वानुमते सोपवून सर्वांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला, त्याबद्दल मी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भगिनी-बंधू आणि… pic.twitter.com/HbbJosXvxb— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) February 26, 2026इथेच आपली जबाबदारी संपत नाही :पुढे बोलतांना सुनेत्रा पवार यांनी सांगितले की; सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे, पण इथेच आपली जबाबदारी संपत नाही. शेतकरी महत्वाचा घटक आहे. त्यामुळे, दादांनी शेतीसाठी एआय टेक्नॉलॉजी आणली होती, त्यावरही आपल्याला काम करायचं आहे. आता, सह्याद्री आपल्यासोबत राहिला नाही. मात्र, त्याने दिलेला विचार आणि शिकवण पुढे घेऊन जायची आहे. दादा अचानक गेले आणि मोठमोठ्या सगळ्या जबाबदारीचं ओझ ठेऊन गेले. सगळ्यांच्याच अपेक्षांचं ओझ आणि जाणीव मला आहे. यापुढे महाराष्ट्राचं कल्याण आणि जनतेचे भलं हेच आपलं लक्ष असणार आहे.
Rajya Sabha Election 2026 : राज्यसभेच्या एका जागेवरून मविआत जोरदार संधर्ष सुरु असून, ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
pakistan army air strike: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमेवरील लढाई तीव्र झाली आहे. आज सकाळी पाकिस्तानने त्यांच्या ऑपरेशन गजब लिल हक अंतर्गत अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह अनेक भागात हवाई हल्ले सुरू केले.
Bigg Boss Marathi 6: अनुश्रीचा प्लॅन फसला; बिग बॉसमधील कपल पुन्हा एकत्र
मुंबई : ' बिग बॉस मराठी ६ 'च्या २६ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये बिग बॉस कॅप्टन्सी टास्क घेतात. पहिल्या फेरीत विशाल तन्वी, दीपाली यांना कॅप्टन्सीच्या फेरीतून बाद करतो. दीपाली विशालला सुनावते. अनुश्री टोळीचे प्लॅन काटा ग्रुपला सांगते. दुसऱ्या फेरीत विशाल आणि राकेशमध्ये बाचाबाची होते. रुचिता दुसऱ्या फेरीत रुचिता बझर दाबते. अनुश्री विशालच्या विरोधात रुचिताचे कान भरते. दुसऱ्या फेरीत रुचिता, राकेश आणि रोशनला कॅप्टन्सीच्या रेसमधून बाद करते. दीपाली उगाच लाग लावण्याचा प्रयत्न करते. अनुश्रीला विशालला कॅप्टन्सीच्या रेसमधून काढायचं असतं.रुचिता म्हणते, 'विशाल आणि माझ्यामधून कोणाला काढायचं असेल तर मला काढा' त्यावर विशाल रुचिताला म्हणतो, 'मला माहितीये मी बाहेर गेलो तर जनतेच्या व्होटने जाईन, हे लोक मला नाही बाहेर काढू शकत' विशाल रुचिताला समजावतो. तिसऱ्या फेरीत रोशन बझर दाबतो. रोशन प्राजक्ता आणि विशालला कॅप्टन्सीच्या फेरीतून बाद करतो. अनुश्री, विशालच्या चुगलीबद्दल बोलते. अनुश्री, टोळी सोडते. विशाल आणि अनुश्रीमध्ये शाब्दिक चकमक होते. शेवटी, रुचिता कॅप्टन पदाची तिसरी उमेदवार होते. प्रभू, रुचिता आणि अनुश्री या तिघांमध्ये कॅप्टन्सी टास्क होणार, असं बिग बॉस सांगतात.अनुश्रीने सोडली टोळीअनुश्री सगळीकडे आग लावून मोठमोठ्याने आरडाओरडा करते. दीपाली आणि तन्वी अनुश्रीला समजावतात. रुचिता विशालला म्हणते, 'मला तुझ्याविरुद्ध नाही बोलायचं, मला तुझ्यासोबत राहायचंय. तुझ्याशिवाय न राहणं मला खटकलंय' रुचिता आणि विशालमध्ये सगळं नॉर्मल होतं. अनुश्री, टोळीतून बाहेर पडल्यामुळे दीपालीला खूप आनंद होतो. तन्वीला अनुश्रीवर संशय येतो.रुचिता, प्रभू आणि अनुश्रीमध्ये कॅप्टन्सी टास्कदुसऱ्यादिवशी सकाळी अनुश्री, सागर आणि प्राजक्ताला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते. तन्वी आणि राखीमध्ये शाब्दिक चकमक होते. राखी मुद्दाम राकेश आणि प्राजक्ताचं नाव एकमेकांसोबत जोडते. बिग बॉस अनुश्री, रुचिता आणि प्रभू यांच्यात कॅप्टन्सी टास्क घेतात.सदस्यांना जोड्यांमध्ये रील्स तयार करून कॅप्टन्सीचे दावेदार असलेल्या सदस्यांसोबत कॉलाबोरेट करायचे असतात. ज्यांचे रील्स जास्त व्हायरल होतील आणि ज्यांचे कॉलाबोरेशन्स जास्त असतील, तो सदस्य कॅप्टन होईल, असं बिग बॉस सांगतात. त्यामुळे आत उद्याच्या भागात कॅप्टन कोण होणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
Khawaja Asif on India: पाकिस्तान आणि तालिबानमध्ये रात्रभर भयंकर युद्ध सुरू आहे. तालिबानच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानातील अनेक ठिकाणी बॉम्बहल्ला केला.
Urvashi Rautela व्हिडिओमध्ये उर्वशी एका मोठ्या आणि आकर्षक केकसमोर उभी दिसते. केक सात थरांचा असून त्यावर चमचमणारे दागिने दिसत आहेत. व्हिडिओवर “जगातील सर्वात महाग ७-टियर केक” असा मजकूरही लिहिलेला आहे.
Ritu Tawde : मनगटावरील घड्याळाची किंमत एक कोटी असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्पष्टीकरण देत दावा करणाऱ्याला खडेबोल सुनावले आहेत.
Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सुनेत्रा पवार यांची निवड एकमुखानं करण्यात आली. याबद्दलची घोषणा पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी केली. पटेल यांनीच पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा राज्यसभेचे उमेदवार म्हणून केली. पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती.राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान होणार आहे. त्यासाठी ५ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. महायुतीचं संख्याबळ पाहता ७ पैकी ६ जागा सत्ताधाऱ्यांना जिंकता येतील. यातील ४ जागांवर भाजप उमेदवार देणार आहे. तर शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी १ जागा मिळेल. भाजप आणि शिंदेसेनेनं अद्याप तरी त्यांचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. पण राष्ट्रवादी काँग्रेसनं पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे.दुसरीकडे पार्थ पवार यांचे आजोबा, राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवारदेखील राज्यसभेवर जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण त्यांच्या पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नाही. राष्ट्रवादी शपकडे केवळ १० आमदारांचं बळ आहे. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी ३७ मतांची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शपला शिवसेना उबाठा आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवावा लागला. या दोन्ही पक्षांकडे मिळून ३६ मतं आहेत.शिवसेना उबाठा आणि काँग्रेस यांनीही राज्यसभेच्या जागेवर दावा सांगितला आहे. दोन्ही पक्ष राज्यसभेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे शरद पवारांची अडचण वाढली आहे. सध्या राष्ट्रवादी शपचे राज्यसभेत केवळ दोनच खासदार आहेत. त्यात खुद्द शरद पवार आणि फौजिया खान यांचा समावेश आहे. दोघांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. शरद पवार पुन्हा राज्यसभेवर न गेल्यास पक्षाचं वरिष्ठ सभागृहातील अस्तित्व संपुष्टात येईल.सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यांनी अद्याप तरी सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. पार्थ पवार त्यांच्या जागी राज्यसभेवर जातील, अशी चर्चा होती. सुनेत्रा पवार यांचा कार्यकाळ २०२८ मध्ये संपणार आहे. पण पार्थ पवार त्यांच्या जागी निवडून जाणार नाहीत. २ एप्रिलला ७ जणांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यातील १ जागा पार्थ पवार लढवणार आहेत. त्यामुळे पार्थ पवारांना २०३२ पर्यंतचा कार्यकाळ मिळेल.

27 C