SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

26    C
... ...View News by News Source

महाराष्ट्राला लॉटरी

मुंबई, पुणे आणि नागपूर ही महाराष्ट्राची महत्त्वाची शहरे आणि येथेच सर्वाधिक प्रकल्प येत आहेत. त्यामुळे या केंद्रांना आर्थिक मदत दरवर्षी म्हणजे या केंद्रांची उर्जितावस्था आणून महाराष्ट्राला आणखी उंचीवर नेऊन ठेवण्यासारखे आहे.केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला कर विनियोजनातून राज्याला ९८ हजार ३०६ कोटी रुपये मिळतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, हे यासाठी महत्त्वाचे आहे. कारण आदित्य ठाकरे आणि विरोधी पक्षांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही असे रडगाणे लावले. त्याला उत्तर म्हणून फडणवीस यांचे विधान आणि संबंधित आकडेवारी महत्त्वाची आहे. ही रक्कम २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातून मिळणाऱ्या रकमेपेक्षा २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तरीही आदित्य ठाकरे म्हणतात त्यामागे केवळ भाजपचा द्वेष आणि स्वतःला सत्ता मिळाली नाही ही खंत आहे, दुसरे काही नाही. महाराष्ट्राला इतकेच नव्हे, तर पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये जे १२.२ लाख कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत त्यामध्येही महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर येथील प्रस्तावित विकासकेंद्रांना पुढील पाच वर्षांत ५ हजार कोटी रुपये मिळणार. मुंबई, पुणे आणि नागपूर हे महाराष्ट्राची महत्त्वाची शहरे आणि येथेच सर्वाधिक आस्थापना आणि विविध प्रकल्प येत आहेत. त्यामुळे या केंद्रांना आर्थिक मदत दरवर्षी म्हणजे या केंद्रांची उर्जितावस्था आणून महाराष्ट्राला आणखी उंचीवर नेऊन ठेवण्यासारखे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे म्हणतात महाराष्ट्राला खूप काही दिले आहे हे सत्य आहे. फडणवीस यानी सांगितले त्याप्रमाणे मुंबई, पुणे आणि हैदराबाद या हायस्पीड कॉरिडॉरमुळे महाराष्ट्राच्या विकासाला तर चालना मिळेलच, पण मराठवाडा आणि इतर जे मागास भाग आहेत त्यांच्या विकासाला हातभार लागणार आहे. हायस्पीड रेल्वेमुळे १७० किमीचा प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होणार.काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना म्हटले, की सुधारणांपेक्षा देखाव्याला प्राधान्य दिले. पण विरोधक म्हणून त्यांची टीकेत काही तथ्य नाही. कारण केंद्राने महाराष्ट्राला आणि देशाला भरपूर काही दिले. महाराष्ट्राला केवळ हायस्पीड रेल्वेच नव्हे, तर अर्थसंकल्पीय तरतुदीमुळेही लाभ होणार आहे. त्यातून महाराष्ट्राचा विकास साध्य होईल. उदाहरणार्थ ग्रामीण रस्त्यांसाठी ३७८ कोटी रुपये मिळणार आहेत, तर इकॉनॉमिक क्लस्टरसाठी २८३ कोटी रुपये आणि पाटबंधारे कामांसाठी २०७ कोटी रुपये. नियोजित शहरीकरण आणि उद्योग तसेच उद्योजकतेला प्राधान्य या द्वारे हा अर्थसंकल्प राज्याच्या शाश्वत विकासासाठी पाया मजबूत करत आहे. विरोधी पक्षांनी राज्याला या अर्थसंकल्पातून काय मिळाले असा सवाल केला. पण त्यांच्या माहितीसाठी ही आकडेवारी सांगणे आवश्यक आहे, की ९८ हजार ३०६ कोटी रुपये मिळाले. यातून महाराष्ट्राची वाटचाल आणखी गतिमान होईल यात शंका नाही. विकसित भारत बनवण्याचे जे पंतप्रधान मोदी यांचे लक्ष्य आहे त्या दिशेने जाणारा हा अर्थसंकल्प भक्कम आहे. उद्योगांना प्रोत्साहन आणि गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यांना अर्थसंकल्पात देण्यात आलेले महत्त्व हे शाश्वत वाढीसाठी ठोस पाया आहे. पायाभूत क्षेत्रासाठी १२ लाख कोटी रुपयांची तरतूद ही महाराष्ट्राला मिळालेली भेट. त्याशिवाय कृषी, मत्स्य उत्पादनासाठी ५०० तलाव आणि पशुसंवर्धन यासाठी भरीव तरतुदी यामुळे ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र नक्कीच पालटेल. एकूण महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून एक लाख कोटी रुपयांचा लाभ मिळणार आणि यामुळे विरोधकांचे विशेषतः आदित्य ठाकरे यांचे म्हणणे आहे, की महाराष्ट्राला काही मिळाले नाही ते असत्य आहे आणि विरोधक डोके शहामृगासारखे वाळूत खूपसून बसत आहेत असे दिसते. महाराष्ट्रावर टीका होत आहे. कारण महाराष्ट्र राष्ट्रीय खजिन्यात जास्तीत जास्त भर टाकतो आणि तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते ही टीका सर्वथा गैरलागू आहे. शेतकऱ्यांना पुरेसा पाठिंबा नाही अशी टीका होते, पण अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नारळ, काजू आणि इतर पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी बरेच काही आहे. शेतकऱ्यांसाठी काही नाही असे म्हटले तर मत्स्य तलाव, इतर पिकांसाठी अनुदान वगैरे तरतुदी आहे. हा अर्थसंकल्प पूर्ण महाराष्ट्रविरोधी आहे ही उबाठाच्या खासदाराने केलेली टीका ही अत्यंत चुकीची म्हणून विचारात न घेण्याजोगी आहे.विदर्भ आणि मराठवाड्याला अर्थसंकल्पात झुकते माप देण्यात आले नसले तरीही त्या भागाचा कायापालट व्हावा अशी हायस्पीड योजना दिली, पण सर्वात कहर म्हणजे एमएसएमई क्षेत्राला प्रचंड तरतूद करूनही विरोधक त्या क्षेत्राला काही नाही म्हणून बोंब ठोकत आहेत, ही बाब निश्चितच लांच्छनास्पद आहे. खरे तर हा अर्थसंकल्प विकसित भारताकडे पाऊल टाकणारा दमदार अर्थसंकल्प आहे असे फडणवीस म्हणाले. पण विरोधक म्हणतात ते खरे मानले तरीही या अर्थसंकल्पात १२ लाख कोटींची गुंतवणूक शेती, पशुपालन आणि मत्स्य शेती या क्षेत्रांत होणार आहे हे सत्य आहे. हे कसे नाकारता येईल. औद्योगिक सवलतींमुळे मराठवाडा आणि विदर्भ यांसारखे भाग विकासाच्या मार्गावर चालणार. ग्रोथ हबसाठी ५ हजार कोटी रुपये आणि प्रत्येक पाच वर्षांत ही योजना ही अत्यंत महत्त्वाची आहे. हा अर्थसंकल्प शेती आणि ग्रामीण विकासाला सर्वात महत्त्व देणारा आहे. जेथे ५९ टक्के ग्रामीण रोजगार आणि ४० टक्के सकल मूल्यवर्धित शेतीतून येते, तेथे कोणतेही सरकार शेतीकडे दुर्लक्ष करू शकणार नाही. देशांतर्गत आकडेवारीशिवाय महाराष्ट्राची आकडेवारीही अर्थसंकल्पात महाराष्ट्राला खूप काही देऊन गेली. काही अभ्यासकांचे आक्षेप बरोबर आहेत. एक म्हणजे शेतीसाठी त्यातल्या त्यात कमी तरतुदी आहेत आणि घर बांधणीसाठी फारसे काही मिळालेले नाही. करव्यवस्था जुनीच ठेवली. पण त्यापेक्षा महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही हा आक्षेप बरोबर नाही. महाराष्ट्राला अर्थसंकल्पाने बरेच काही दिले.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 9:30 am

दक्षिण महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाला पुन्हा उभारीचे स्वप्न

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वस्त्रोद्योग क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर आणि जागतिक स्पर्धेत भारताला पुढे नेण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या. या योजनांच्या माध्यमातून उत्पादन क्षमता वाढवणे, रोजगार निर्मिती करणे आणि निर्यातीला चालना देण्यावर भर देण्यात आला आहे. महात्मा गांधी ग्राम स्वराज योजनेअंतर्गत खादी, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राला विशेष प्रोत्साहन देण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे भारतीय पारंपरिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश सुलभ होणार असून, ग्रामीण भागातील कारागिरांना मोठा फायदा होणार.वार्तापत्र दक्षिण महाराष्ट्रगतवर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट म्हणजेच १० हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद, पाच टप्प्यांतील (५ एफ) एकात्मिक कार्यक्रम, हातमाग-हस्तकला प्रोत्साहन, राष्ट्रीय धागा धोरण, टेक्स्ट-इको युनिव्हर्सिटी आणि शाश्वत वस्त्रोद्योगासाठी नव्या योजना अशा महत्त्वाच्या घोषणांमुळे यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे दक्षिण महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग क्षेत्रातून स्वागत होत आहे. अमेरिकेच्या कर धोरणांमुळे अडचणीत सापडलेल्या भारतीय वस्त्रोद्योगाला या उपाययोजनांमुळे नवी दिशा मिळेल आणि निर्यातीचे दालन अधिक खुले होईल, अशी अपेक्षा उद्योगजगताकडून व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यामध्ये वस्त्रोद्योगाचे केंद्राच्या धोरणावर अवलंबून असणारे भवितव्य त्याच्या अर्थसंकल्पाने थोडे उजळ दिसू लागले आहे. अमेरिकेच्या टॅरीफ धोरणाबरोबरच अनेक स्थानिक मुद्द्यांमुळे सुद्धा या व्यवसायाला घरघर लागली आहे. इथल्या उद्योजक व्यावसायिक कामगार आणि इतर घटकांनीच केवळ विचार करून या क्षेत्राचे भले होणार नव्हते. पण, याबाबत अधिकची पावले तोपर्यंत त्याला भवितव्य दिसत नव्हते. देशातील वस्त्रोद्योग हा जागतिक बाजारपेठेतील चढ-उतार, कच्च्या मालाच्या किमती, आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणे आणि देशांतर्गत खर्चवाढ अशा अनेक कारणांमुळे दबावाखाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून विविध वस्त्रोद्योग संघटनांनी लावून धरली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या मागण्यांची दखल घेतल्याचे स्पष्ट दिसते. मागील वर्षी सुमारे साडेपाच हजार कोटींची तरतूद असताना यंदा ती थेट १० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे रोजगारनिर्मिती, निर्यातवाढ आणि उद्योगातील गुंतवणूक वाढीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.वस्त्रोद्योगात गुंतवणूक वाढावी आणि संपूर्ण मूल्यसाखळी सक्षम व्हावी यासाठी ‘५ एफ’ धोरण जाहीर करण्यात आले आहे. कापूस ते धागा, धागा ते कारखाना, कारखाना ते फॅशन, फॅशन ते विदेश आणि विदेशातील बाजारपेठ असा हा पाच टप्प्यांचा एकात्मिक कार्यक्रम आहे. कृषी उत्पादनापासून थेट आंतरराष्ट्रीय विक्रीपर्यंतची साखळी मजबूत करण्याचे उद्दिष्ट या धोरणामागे आहे. दक्षिण महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी, सूतगिरण्या, यंत्रमाग, प्रोसेसिंग युनिट्स आणि रेडिमेड वस्त्र उद्योगाला याचा थेट फायदा होण्याची शक्यता आहे. रेशीम, लोकर, ताग, मानवनिर्मित तंतू आणि नव्या काळातील आधुनिक तंतू या सर्वांमध्ये स्वावलंबन साधण्यासाठी ‘राष्ट्रीय धागा योजना’ जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून त्यामुळे आधुनिक पायाभूत सुविधा, मोठी गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. ग्रामीण भागात खोलवर रुजलेल्या राष्ट्रीय हातमाग व हस्तकला क्षेत्राला महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रमाच्या एकात्मिक प्रणालीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याने विणकर व कारागिरांना मोठा दिलासा मिळणार आहे. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक व शाश्वत वस्त्रनिर्मितीसाठी ‘टेक्स-इको इनिशिएटिव्ह’ सुरू करण्याची घोषणा हीदेखील भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. वस्त्रोद्योग विस्तार व रोजगार योजनेअंतर्गत क्लस्टर आधुनिकीकरण, तंत्रज्ञान सुधारणा आणि सामायिक चाचणी सुविधा उभारल्यास उत्पादनक्षमता वाढून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असे मत राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी व्यक्त केले आहे. मात्र, त्याचबरोबर विकेंद्रित यंत्रमाग, सूतगिरण्या, सायझिंग, प्रोसेसिंग युनिट्स आणि गारमेंट हाऊस यांच्यासाठी स्वतंत्र व लक्ष केंद्रीत धोरणाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. दक्षिण महाराष्ट्रात ही विकेंद्रित यंत्रणा मोठ्या प्रमाणात असल्याने त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, असे उद्योगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. वस्त्रोद्योगासाठी जाहीर करण्यात आलेल्या पंचसूत्री कार्यक्रमामुळे उद्योगवाढीला आणि निर्यातीला नवी गती मिळेल, असा विश्वास इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.विस्तार योजना आणि तंत्रज्ञान सुधारणा यामुळे उद्योजकांना आधुनिकीकरणाच्या मार्गावर नेण्यास मदत होणार असल्याने अर्थसंकल्पाचे स्वागत केले जात आहे. एकूणच, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, सोलापूर आदी दक्षिण महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग केंद्रांना या अर्थसंकल्पातून पुन्हा उभारी मिळण्याचे स्वप्न दिसू लागले आहे. योग्य अंमलबजावणी आणि विकेंद्रित क्षेत्रालाही समान न्याय मिळाल्यास हा परिसर पुन्हा एकदा देशातील वस्त्रोद्योगाचा कणा ठरेल, अशी आशा व्यक्त होत आहे. दक्षिण महाराष्ट्राला मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हाय-स्पीड रेल्वे, शहर आर्थिक क्षेत्र, १ लाख कोटी शहरी आव्हान निधी, एमएसएमई प्रोत्साहन, गिग वर्कर्स सुरक्षा अशा प्रकारे लाभ मिळेल.या भागातील अनेक गाव आणि शहरांचा समावेश होत आहे. लक्षात घेता दक्षिण महाराष्ट्राला अधिक वेगवान बनवणारे ठरत आहेत. गोव्याला आणि कोकणाला आयआयटी विस्तार, वैद्यकीय पर्यटन, नारळ योजना, मत्स्यव्यवसाय प्रोत्साहन. बेळगावला कृषी योजना, रेल्वे प्रकल्प. कोकण व पश्चिम महाराष्ट्राला बंदर जोडणी, काजू-कोको योजना, जलमार्ग विकास यांचा फायदा होईल आणि त्याचा प्रभाव दक्षिण महाराष्ट्रावर आपोआप पडेल. एकूणच या भागात पायाभूत सुविधा, रोजगार, कृषी वृद्धीला चालना मिळेल.- प्रतिनिधी

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 9:30 am

ग्रीनलँडकडे नजर फक्त खनिजांसाठी?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा वैश्विक आर्थिक मंचावर बदलली असली आणि त्यांचे स्वर थोडे नरम झाले असले, तरी ग्रीनलँडचा ताबा घेण्यावर ते ठाम आहेत. हवामानबदलामुळे बर्फ वितळत असताना आर्क्टिकमध्ये नवीन समुद्री मार्ग उघडत आहेत. त्यामुळे लपलेले खनिज साठे उघड होत आहेत. रशिया आणि चीन आधीच तेथे कार्यरत असल्याने ट्रम्प यांना या प्रदेशावर आपले नियंत्रण हवे आहे. प्रा. जयसिंग यादवअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ग्रीनलँड खरेदी करण्याची इच्छा केवळ रिअल इस्टेट व्यावसायिकाची आहे, की ५०० ट्रिलियन डॉलर्सच्या खजिन्याशी संबंधित जाणूनबुजून केलेला कट आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. इतिहासाकडे वळून पाहताना लक्षात येते, की अमेरिकेने १९६०च्या दशकात ‘प्रोजेक्ट आइसवर्म’ नावाची एक अत्यंत गुप्त आणि भयानक मोहीम सुरू केली. त्याचा उद्देश बर्फाच्या चादरीखाली चार हजार किलोमीटरचे बोगदे बांधणे आणि तेथे ६०० अणुक्षेपणास्त्रे तैनात करणे हा होता. अमेरिका सोव्हिएत महासंघाच्या सीमेजवळ इतक्या जवळून हल्ला करू इच्छित होती, की त्यांना सावरण्याची संधीच मिळणार नाही; पण निसर्गाने ही अणू योजना उधळून लावली. हिमनद्या इतक्या वेगाने मागे हटल्या, की हा प्रकल्प सोडून द्यावा लागला आणि अमेरिका पळून गेली; आज जागतिक तापमानवाढीमुळे बर्फ वितळत असताना अमेरिकेसह अन्य देश विष समुद्रात सोडण्यास तयार आहेत. प्रश्न असा आहे, की ट्रम्प यांना ग्रीनलँडमध्ये या ऐतिहासिक पापाचे पुरावे गाडायचे आहेत का, की ते भविष्यातील युद्धाची तयारी करत आहेत? ग्रीनलँड केवळ बर्फासाठीच नाही, तर ‘पांढऱ्या सोन्या’साठी ओळखले जाते. अमेरिकन प्रशासनाला माहीत आहे, की भविष्यात तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवायचे असेल, तर त्यांना ग्रीनलँडच्या खाणींवर नियंत्रण ठेवावे लागेल. त्यामुळेच ट्रम्प आता ग्रीनलँडबाबत कोणत्याही राजनैतिक शिष्टाचाराचे पालन करण्याच्या मनःस्थितीत नाही. अमेरिकन प्रशासन आता थेट ग्रीनलँडच्या सामान्य नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रीनलँडमधील प्रत्येक रहिवाशाला दहा हजार ते एक लाख डॉलरपर्यंत देण्याचा पर्याय विचारात घेतला जात आहे. शिष्टाचाराचे उल्लंघन करणाऱ्या ट्रम्प यांनी नॉर्वेजियन पंतप्रधान जोनास यांना एक पत्र लिहिले. ते आंतरराष्ट्रीय राजकारणात अणुबॉम्बसारखे स्फोट घडवून आणत आहे.ट्रम्प यांनी डेन्मार्कच्या ग्रीनलँडवरील मालकी हक्कांना आव्हान दिले. आपल्या इच्छेविरुद्ध जाणाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचे सौजन्य दाखवण्यास किंवा आंतरराष्ट्रीय राजनैतिक नियमांचे पालन करण्यास तयार नाही. ग्रीनलँडच्या अभिमानी लोकांनी स्पष्ट केले, की ते विकले जाणार नाही किंवा शरण जाणार नाही. ग्रीनलँडचे ज्येष्ठ राजकारणी टिली मार्टिनुसेन यांनी अमेरिकेची ऑफर नाकारत म्हटले, की आम्हाला अमेरिकनांसारखे श्रीमंत व्हायचे नाही. आम्ही पाहतो, की ते किती लोभी आहेत. आमच्या मित्रांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. अलास्काचे उदाहरण देत मार्टिनुसेन यांनी इशारा दिला, की अमेरिकेने तेथील आदिवासी लोकांकडून जमीन हिसकावून घेतली. ट्रम्प यांचा विश्वास आहे, की ‘नाटो’ गेल्या २० वर्षांपासून डेन्मार्कला रशियन धोक्याबद्दल इशारा देत आहे; ट्रम्प यांनी ‘सोशल मीडिया’वर जाहीर केले, की हा प्रदेश ताब्यात घेण्याची वेळ आली. ट्रम्प यांचे विधान ‘नाटो’ एकतेवर थेट हल्ला आहे. डेन्मार्कने ग्रीनलँडमध्ये आपले सैन्य वाढवले आहे. त्यामुळे युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.ग्रीनलँडबद्दल इतकी चिंता का आहे, हे समजून घेण्यासाठी, नकाशावरील ‘जीआययूके गॅप’ पाहण्याची आवश्यकता आहे. ‘जी’ म्हणजे ग्रीनलँड, ‘आय’ म्हणजे आइसलँड आणि ‘यूके’ म्हणजे युनायटेड किंग्डम. ‘जीआययूके गॅप’ हा महासागराच्या मध्यभागी एक अरुंद आणि गुप्त मार्ग आहे, जो उत्तर अटलांटिक महासागरातून जातो. तो अमेरिकेला उर्वरित जगाशी जोडतो. लष्करी रणनीतीकारांच्या भाषेत, तो ‘जगाचा गळा’ आहे. रशियन अणू पाणबुड्या अमेरिकेच्या किनाऱ्यावर पोहोचायच्या असतील, तर त्यांना या ‘जीआययूके गॅप’मधून जावे लागेल. शिवाय, जगातील ९० टक्के इंटरनेट डेटा वाहून नेणाऱ्या समुद्राखालील केबल्सदेखील याच मार्गाने जातात. ग्रीनलँडमध्ये शत्रूचा प्रभाव वाढल्यास ते केवळ अमेरिकेला वेढू शकत नाही, तर एका झटक्यात अर्ध्या जगासाठी इंटरनेट आणि डिजिटल संप्रेषणदेखील बंद करू शकतात. म्हणूनच ट्रम्प कोणत्याही किमतीत ग्रीनलँडला डेन्मार्क किंवा चीनच्या दयेवर सोडले जाऊ शकत नाही, असे सांगतात. ग्रीनलँडमधील हा खजिना जगासाठी संपन्नता आणेल का, की महासत्तांच्या अण्वस्त्रांच्या आणि लोभाच्या दरम्यान तो ‘नशिबाचा तारा’ ठरेल, हे फक्त काळच सांगेल. शेवटी, प्रश्न उद्भवतो, की ग्रीनलँड फक्त जमिनीचा तुकडा आहे का, की तो मानवतेच्या भविष्याचा यज्ञवेदी बनणार आहे? एका बाजूला ट्रम्प यांना ग्रीनलँडचा तुकडा हवा आहे, दुसऱ्या बाजूला चीनला त्यावर कब्जा करायचा आहे. तिसऱ्या बाजूला ग्रीनलँडचे लोक त्यांची संस्कृती जपू इच्छितात. येणारी वर्षे ग्रीनलँड हे जगासाठी एक नवीन संसाधन केंद्र बनेल की महासत्तांच्या अहंकारांमधील नवीन युद्धभूमी बनेल हे पाहावे लागेल. स्टॉक आणि बाँड मार्केटमधील मोठ्या प्रमाणातील गोंधळामुळे ट्रम्प यांना आपली भूमिका बदलण्यास भाग पाडले आहे. त्यांनी ग्रीनलँडचा ताबा बळजबरीने घेणार नाही, असे एकीकडे सांगितले असताना ग्रीनलँडचा ताबा घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही म्हटले आहे.दरम्यान, ‘नाटो’ सदस्य देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी एका करारावर चर्चा केली आहे. या करारांतर्गत डेन्मार्क लष्करी तळ बांधण्यासाठी ग्रीनलँडच्या एका छोट्या भागावर अमेरिकेला सार्वभौमत्व देईल. ट्रम्प यांनी स्पष्ट केले, की ग्रीनलँडचा वापर सबब म्हणून करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही. त्यांनी असेही सांगितले, की ग्रीनलँड करारात गोल्डन डोम आणि खनिज अधिकार समाविष्ट आहेत. करारानुसार, अमेरिका आता ग्रीनलँडवर ‘गोल्डन डोम’ बसवेल, जेणेकरून रशिया किंवा इतर देशांकडून हल्ला झाल्यास अमेरिकेपर्यंत पोहोचण्यापूर्वीच क्षेपणास्त्रे पाडता येतील. दरम्यान, ‘नाटो’च्या प्रवक्त्याने सांगितले, की अमेरिकेच्या जवळ असलेल्या या बेटावर चीन आणि रशियाचा आर्थिक किंवा लष्करी प्रभाव वाढण्यापासून रोखण्यासाठी अमेरिका, ग्रीनलँड आणि डेन्मार्कमध्ये चर्चा सुरू आहे. ट्रम्प ग्रीनलँडला आपल्याशी जोडण्याच्या प्रयत्नात कोणत्याही थराला जाण्यास तयार आहेत. ट्रम्प यांनी स्वित्झर्लंडच्या दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचावर जगासमोर आपले हेतू स्पष्टपणे सांगितले. ट्रम्प यांच्या ग्रीनलँडबाबतच्या घोषणेनंतर ग्रीनलँडमध्ये सैन्य पाठवणारे आठ ‘नाटो’ सदस्य देश अधिक सक्रिय झाले आहेत. चीन आणि रशियादेखील सक्रिय झाले आहेत.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 9:30 am

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला ईदगाह परिसरात खेळताना श्वानाने हल्ला करून जखमी केले होते. रेबिजची लस देण्यात आली होती. ३१ जानेवारीला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल केले. २८ जानेवारी रोजी पुन्हा दाखल करण्यात आले आणि कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले. आमदार रईस शेख यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत, वेळेत व योग्य उपचार न झाल्यामुळे मुलाचा जीव गेल्याचा दावा करत दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. रुग्णालय प्रशासनाने हमीदला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला होता; मात्र कुटुंबीयांनी त्याला घरी नेले. नंतर उशिरा तो गंभीर अवस्थेत परत आला. उपचार करण्यात आले, त्याचा मृत्यू झाला, असे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 9:30 am

अलिबाग पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-शेकाप लढत

१४ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणातअलिबाग : अलिबाग पंचायत समिती निवडणुकीसाठी १४ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत. २०१७ साली झालेल्या निवडणुकीत शेकापने अलिबाग पंचायत समितीवर वर्चस्व ठेवले होते. २०२६ च्या अलिबाग पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांची युती झाली नसल्याने ते वेगवेगळे लढत आहेत. अनेक गणातून तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले असले, तरी अलिबाग पंचायत समितीची खरी लढत ही शिवसेना आणि शेकाप या दोन पक्षात होणार आहे. त्यामुळे अलिबाग पंचायत समिती शेकाप राखणार की शिवसेना खेचून आणणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.अलिबाग पंचायत समितीच्या १४ गणांसाठी निवडणूक होत आहे. महायुती घटक पक्ष हे वेगवेगळे लढत आहेत. शेकाप, उबाठा आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीतून लढत आहेत. शिवसेनेने १४, शेकाप १३, भाजप ८, राष्ट्रवादी (अजित पवार) २, उबाठा गट १, काँग्रेसने १ जागेवर उमेदवार उभे केले आहेत. तीन अपक्षही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. १४ जागांसाठी ४२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.वैजाळी, शहापूर, आंबेपूर, रुईशेत भोमोली, आवास, किहीम, थळ, वरसोली, चेंढरे, आक्षी, रेवदंडा, चौल, कावीर आणि रामराज असे १४ पंचायत समिती गण आहेत. अलिबाग पंचायत समितीवर झेंडा फडकविण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. उमेदवारांच्या गणांत जोरदार प्रचार सुरू आहे. प्रत्यक्ष मतदार भेटीवर उमेदवारांचा जोर आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रियदर्शनी पाटील यंदा चेंढरे गणातून भाजपतर्फे लढत आहेत, तर इतर उमेदवार हे नवखे आहेत. महेश गुरव हे २०१७ मध्ये आक्षी गणातून पराभूत झाले होते. ते पुन्हा तेथून उबाठा गटाकडून रिंगणात उतरले आहेत. रेवदंडा गणातून २०१७ साली विजयी झालेले भाजपचे उदय काठे यंदाही निवडणुकीला सामोरे जात आहेत.अलिबाग पंचायत समिती गणांमध्ये आरपारची लढाई : वैजाळी - शिवसेना राष्ट्रवादी (अजित पवार) भाजप शेकाप. शहापूर - शिवसेना राष्ट्रवादी (अजित पवार) भाजप शेकाप. आक्षी - शिवसेना राष्ट्रवादी (अजित पवार) भाजप शेकाप. आंबेपूर - भाजप शिवसेना शेकाप. रुईशेत - भोमोली - भाजप शिवसेना शेकाप. चेंढरे – शिवसेना भाजप शेकाप. रेवदंडा - भाजप शिवसेना शेकाप चौल - भाजप शिवसेना शेकाप. कावीर - भाजप शिवसेना शेकाप. आवास - शिवसेना शेकाप किहीम - शिवसेना शेकाप थळ - शिवसेना शेकाप वरसोली - शिवसेना शेकाप रामराज - शिवसेना शेकापनिवडणुकीतील पक्षीय बलाबल : शिवसेना – १४ शेकाप -१३ भाजप - ८ अपक्ष – ३ राष्ट्रवादी (अजित पवार गट) – ३ उबाठा – १ कॉग्रेस - १

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 9:30 am

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची कसोटी

१४ माजी सदस्य रिंगणात; ५९ जागांसाठी रंगतदार लढाई अलिबाग : उमेदवारी अर्ज माघारीनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी रंगतदार लढाई होत असून, २०१७ साली झालेली निवडणूक लढवून विजयी झालेले १४ सदस्य यंदा पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. मागच्यावेळी पती निवडून आलेल्या तीन जागांवर पत्नी निवडणूक लढत असून, पत्नी निवडून आलेल्या सहा जागांवर यंदा पती निवडणूक लढवत आहेत.रायगड जिल्हा परिषदेच्या २०१७ साली विजयी झालेल्या सात सदस्यांनी यंदा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे उर्वरित माजी सदस्यांना मतदार पुन्हा संधी देणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मतदान व मतमोजणी तारीख बदलेली असून, मतदान व मतमोजणी दोन दिवस पुढे गेली आहे. ७ फेब्रुवारीला मतदान, तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे दोन दिवस उमेदवारांना प्रचारासाठी अधिकचे मिळाले आहेत. जिल्ह्यात सोयीनुसार युती, आघाडी करण्यात आलेली असून, रायगड जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याने जिल्हा परिषदेवर कोण आपले वर्चस्व प्रस्तापित करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.रायगड जिल्हा परिषद २०१७ च्या निवडणुकीत शेकापचे २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी काँग्रेस १२, भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी ३ असे ५९ सदस्य निवडून गेले होते. मात्र नऊ वर्षांत राजकीय परिस्थिती बदललेली आहे. ‘शेकाप’चे आलेले २३ सदस्य हे सध्या इतर पक्षात गेल्याने शेकापला नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागली आहे. या नवतरुण उमेदवारांना मतदार स्वीकारतात का हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. मागच्यावेळी निवडून आलेले सुधाकर घारे, मोतीराम ठोंबरे, नरेश पाटील, रवींद्र देशमुख, सुरेश खैरे, आस्वाद पाटील, बबन मनवे हे यंदाच्या निवडणुकीपासून लांब राहिले आहेत. यंदाच्या निवडणुकीत मागच्यावेळी निवडून आलेले १४ जण पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत आहेत. त्यामुळे मतदार त्यांना पुन्हा संधी देणार का, हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.मागील निवडणुकीतील पक्षीय बलाबलशेकाप - २३शिवसेना – १८राष्ट्रवादी काँग्रेस – १२भाजप - ३काँग्रेस - ३माजी सदस्य पुन्हा आजमावणार नशीबनारायण डामसे, नीलिमा पाटील, प्रभाकर म्हात्रे, रिना घरत, सुश्रूता पाटील, चित्रा पाटील, दिलीप भोईर, मानसी दळवी, सुरेंद्र म्हात्रे, राजश्री मिसाळ, किशोर जैन, गीता जाधव, स्वाती नवगणे, चंद्रकांत कळंबे हे पुन्हा नशीब आजमावत आहेत.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 9:30 am

मनसेच्या अनेक उमेदवारांचा उबाठामुळे पराभव?

राज ठाकरेंसमोर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून 'उबाठा'बाबत तक्रारींचा पाढामुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसेच्या अंतर्गत असंतोषाला उघडपणे वाट मोकळी करून देणारी महत्त्वाची बैठक सोमवारी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पार पडली. या बैठकीत पराभूत उमेदवार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर ‘उबाठा’ गटाबाबतच्या तक्रारी मांडत, अपेक्षित सहकार्य न मिळाल्याचा आरोप केला.बैठकीत उपस्थित उमेदवारांनी सांगितले की, मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये उबाठा गटाची मते मनसेकडे वळली नाहीत. निवडणुकीदरम्यान उबाठा गटाने प्रत्यक्ष प्रचारात सक्रिय सहभाग न घेतल्यामुळे मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचा दावा करण्यात आला. अनेक मतदारसंघांमध्ये मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले असून, थोड्या फरकाने विजय हुकल्याची खंत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर राज ठाकरे यांनी उमेदवारांनाच सवाल करत, युती असली तरी स्थानिक पातळीवर तुमची स्वतःची तयारी किती होती, असा थेट प्रश्न उपस्थित केला. केवळ युतीवर अवलंबून राहून निवडणूक जिंकता येत नाही, असेही ते म्हणाल्याचे समजते.बैठकीत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही आपली भूमिका मांडली. जागावाटपाच्या वेळी मनसेला ताकदीचे वॉर्ड मिळाले नसल्याचा परिणाम निकालांवर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या वॉर्डांमध्ये मनसेची पकड भक्कम होती, त्या वॉर्डांऐवजी तुलनेने कमजोर मतदारसंघ देण्यात आल्यामुळे उमेदवारांना मोठा संघर्ष करावा लागल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.माध्यमांशी बोलणे टाळले : बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. मात्र, मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार नाही, एवढे स्पष्ट करत ते निघून गेले. तर, मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही बैठक पूर्णतः अंतर्गत असल्याचे सांगितले. बैठकीतील चर्चेचा तपशील कॅमेऱ्यासमोर सांगता येणार नाही, असे म्हणत त्यांनी उबाठा गटाबाबत प्रतिक्रिया देणे टाळले.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 9:10 am

वाहन पार्किंगमुळे अग्निशमन वाहनांना होतो अडथळा

अनधिकृत वाहने उभी करणाऱ्यांविरोधात होणार एफआयआरमुंबई : मुंबईतील नागरिकांच्या जीवित संरक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाच्या बचाव कार्यात अनधिकृत वाहन पार्किंगमुळे अडथळे निर्माण होत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर, आगीच्या किंवा आपत्तीच्या घटनास्थळी शीघ्र प्रतिसाद देण्यात अडथळा निर्माण झाल्यास संबंधित वाहनमालकांवर पोलिस स्थानकात थेट प्रथम खबरी अहवाल अर्थात एफआयआर (फर्स्ट इन्फर्मेशन रिपोर्ट) नोंदविण्यात येणार आहेत.मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांनी संबंधित कारवाईबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. याबाबत महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात झालेल्या चर्चेनंतर हे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल हे मुंबईतील नागरिकांसह, प्राणी, पक्ष्यांच्या जीविताचे तसेच वित्ताचे आगीच्या दुर्घटना तसेच अन्य नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीपासून संरक्षण करण्याचे कर्तव्य बजावत असते. मात्र, हे काम करत असताना मागील काही वर्षापासून असे अनुभवास येत आहे की, मुंबई महानगरात रस्त्यांच्या कडेला नागरिकांद्वारे अनेक प्रकारची वाहने अनधिकृतरित्या उभी (पार्क) केलेली असतात. अशाप्रकारच्या वाहनांमुळे प्रत्यक्ष दुर्घटनास्थळी शीघ्र प्रतिसाद देण्यास किंवा पोहोचण्यासाठी येणाऱ्या अडथळ्यांमुळे अग्निशमन व विमोचनाचे कार्य करतांना अनेक अडचणी येतात व ते कार्य प्रभावीपणे राबविता न आल्याने जीवित व वित्त हानीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढू शकते. ही बाब अतिशय गंभीर आहे.मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कडेला नागरिकांकडून अनधिकृतरित्या वाहने उभी (पार्क) केली जातात. जेव्हा एखादा आपत्तीप्रसंग उद्भवतो तेव्हा मुंबई अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी वेळेत पोहोचणे अथवा प्रत्यक्ष कार्यवाही करताना अडचणी येतात. परिणामी जीवित व वित्तहानीचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.याप्रकाराची मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी प्रखरतेने गंभीर दखल घेतली आहे. आगीच्या किंवा आपत्तीच्या ठिकाणी जीवितहानी, वित्तहानी अथवा जखमींचे प्रमाण लक्षणीय असेल आणि अनधिकृतरित्या उभ्या (पार्क) केलेल्या वाहनांमुळे अग्निशमन व विमोचन कार्यात विलंब झाल्याचे आढळून आल्यास, संबंधित अग्निशमन वाहनावरील अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने अग्निशमनाचे कार्य पूर्णपणे संपल्यानंतर बचावकार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनाचे नोंदणी क्रमांकासह छायाचित्रे काढून वरिष्ठांच्या परवानगीने संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार प्रथम खबरी अहवाल अर्थात एफआयआर (फर्स्ट इन्फर्मेशन रिपोर्ट) नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे अनधिकृतरित्या वाहन पार्क करण्यास प्रतिबंध होवून नागरिकांमध्ये जागृती निर्माण होईल व दुर्घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलास शीघ्र प्रतिसाद देता येईल. मदत कार्यातील विलंब टळेल. तसेच मुंबई अग्निशमन दलास विमोचन कार्य प्रभावीपणे राबविता येईल.तक्रार आल्यास पोलिसांकडे वर्ग करणारमुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या या कारवाईमुळे मुंबईतील नागरिकांकडूनही अनधिकृत पार्किंगबाबत मुंबई अग्निशमन दलाकडे तक्रार येण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कार्यप्रणाली ठरविली आहे. अशाप्रकारच्या अनधिकृत पार्किंगबाबत जर नागरिकांनी तक्रार केली, तर संभाव्य तक्रार संबंधित पोलिस ठाणे, वाहतूक पोलिस विभाग व संबंधित विभाग कार्यालयाकडे योग्य कारवाईसाठी वर्ग करून तक्रारदारास माहिती देण्याचे निर्देशही मुंबई अग्निशमन दलास देण्यात आले आहेत.रवींद्र अंबुलगेकर, प्रमुख अग्निशमन अधिकारी

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 9:10 am

महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक येत्या ११ फेब्रुवारीला?

मुंबई : मुंबईचा महापौर कोण होणार? महापौरपदाची निवडणूक कधी होणार याबाबत उत्सुकता असताना ही निवडणूक येत्या ११ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी येत्या शुक्रवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत असेल.मुंबई महापालिकेच्या भाजप, शिवसेना आणि समाजवादी पक्षांच्या नगरसेवकांची कोकण भवनातील नोंदणी प्रक्रिया सोमवारी पार पडलेली असून पुढील नोंदणीची प्रक्रियाची महापालिका सचिव विभागात पार पडणार आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी सचिव कार्यालयात नगरसेवकांची उर्वरीत नोंदणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर मंगळवारी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम प्रसिध्दीला दिला जाणार आहे. त्यानुसार निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना या निवडणुकीचा कार्यक्रम त्यांच्या घरी पाठवला जाणार आहे. त्यामुळे बुधवारी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर येत्या ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. मात्र, आंगणेवाडीच्या जत्रेकरता बहुसंख्य नगरसेवक जात असल्यामुळे जर ११ तारखेला निवडणुकीची तारीख निश्चित झाल्यास येत्या शुक्रवारी ०६ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांचे अर्ज सादर करण्याची मुदत असेल. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज सादर झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी १५ मिनिटे आधी अर्ज मागे घेण्याची संधी उमेदवाराला दिली जाणार आहे.महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक ही आवाजी पध्दतीने हात उंचावून केली जाणार आहे. या महापौर आणि उपमहापौर पदासाठी पिठासीन अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे कामकाज सांभाळणार आहेत.आंगणेवाडी जत्रेला नगरसेवक मुकणार?महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यास सर्व पक्षांकडून आपल्या नगरसेवकांना मुंबई न सोडण्याचा व्हिप लागू होण्याची शक्यता आहे. परंतु आंगणेवाडीच्या जत्रेला बहुतांशी नगरसेवक जात असल्यामुळे त्यांना या व्हिपमुळे जाता येणार नाही. त्यामुळे या निवडणुकीसाठी जर पक्षाने अशाप्रकारचा व्हिप काढल्यास नवनिर्वाचित नगरसेवकांना आंगणेवाडीच्या जत्रेला मुकावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 9:10 am

महाराष्ट्रासाठी रेल्वेची २३ हजार कोटी रुपयांची विक्रमी अर्थसंकल्पीय तरतूद

मुंबई : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत सोमवारी माहिती देताना सांगितले की, सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी २३ हजार ९२६ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे.ही रक्कम २०१४-१५ ते २०१९-२० या काळात महाराष्ट्राला दरवर्षी दिलेल्या सरासरी १,१७१ कोटी रुपयांच्या तरतुदीपेक्षा जवळपास २० पट जास्त आहे. अर्थसंकल्पात सात हाय-स्पीड रेल प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे, त्यापैकी २ नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉर महाराष्ट्रात आहेत. मुंबई-पुणे: ४८ मिनिटे, पुणे-हैदराबाद: १ तास ५५ मिनिटे (२ तासांच्या आत) यांचा समावेश आहे.पायाभूत सुविधांमध्ये १ लाख ७० हजार ०५८ कोटी रुपयांची एकूण कामे प्रगतीपथावर आहेत. या मोठ्या गुंतवणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वे मार्ग निर्मिती, स्थानकांचा पुनर्विकास आणि सुरक्षा वाढवण्याच्या कामांचा समावेश आहे. अमृत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १३२ स्थानकांचा संपूर्ण पुनर्विकासासाठी निवड करण्यात आली आहे.प्रीमियम ट्रेन सेवांच्या संचालनामुळे राज्यातील प्रवासाची कार्यक्षमता नवीन उंचीवर पोहोचली असून वंदे भारत एक्सप्रेस(१२ जोड्या),अमृत भारत एक्सप्रेस(५ जोड्या) यांचा समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये रेल्वे जाळ्याचा वेगाने विस्तार झाला आहे. सन २०१४ पासून, अंदाजे २,४०० किमी लांबीचे रेल्वे मार्ग बांधण्यात आले आहेत. हे मलेशियाच्या संपूर्ण रेल्वे जाळ्यापेक्षा जास्त आहे.रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी १,२२८ उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधले आहेत. ४९७१ आरकेएम मार्गावर कवच प्रणाली मंजूर आहे, त्यापैकी ५७६ आरकेएमवर ती आधीच कार्यान्वित करण्यात आली आहे आणि ३६१७ आरकेएमचे काम/निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती वैष्णव यांनी दिली.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 9:10 am

मेट्रो- ४ मार्गिकेच्या कामाला गती

भांडुप येथे ३२५ मेट्रिक टनचे तीन स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या स्थापितमुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कामातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. या मार्गिकेच्या कामाअंतर्गत भांडुप पश्चिम येथे एकूण ३२५ मेट्रीक टन वजनाचे तीन भव्य स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या स्थापित करण्यात आले आहेत. या कामामुळे मेट्रो ४ मार्गिकेच्या कामाला आता गती येणार आहे.मुंबई रात्रीच्या अंधारात विसावलेली असतानाच मेट्रो मार्गिका ४ ने एक महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पार केला. भांडुप पश्चिम येथे एकूण ३२५ मेट्रिक टन वजनाचे ३ भव्य स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या लॉन्च करण्यात आले. ८ हेवी ड्युटी क्रेन्स आणि १२ मल्टी-अॅक्सल वाहनांच्या सहाय्याने हे स्टील स्पॅन्स अत्यंत अचूकपणे आणि कौशल्याने बसवण्यात आले. या कामासाठी महानगरपालिका (बीएमसी), बेस्ट, भांडुप वाहतूक पोलीस, भांडुप पोलीस तसेच परिसरातील रहिवासी व दुकानदार यांच्यासोबत एमएमआरडीएने उत्कृष्ट समन्वय साधला. उत्कृष्ट नियोजन आणि समन्वयामुळे चार रात्री लागणारे हे काम अवघ्या दोन रात्रींमध्ये पूर्ण करण्यात यश आले, अशी माहिती एमएमआरडीएने दिली.या कामासाठी ३५ अभियंते, १०० हून अधिक कुशल कामगार, ७० वाहतूक वाॅर्डन आणि २५ हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात होते. योग्य नियोजनामुळे भव्य असे तीन स्टील स्पॅन्स यशस्वीरित्या स्थापित करण्याचे आव्हान या पथकामुळे पेलता आले. या कामाच्या अनुषंगाने आता मेट्रो ४ मार्गिकेतील कामाला गती मिळणार आहे. गायमुख ते कॅडबरी जंक्शन पहिल्या टप्प्यानंतर पुढील टप्पे वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 9:10 am

Ladki Bahin Yojana : “लाडकी बहिण योजनेला अजितदादांचे नाव द्या”; अमोल मिटकरींची मागणी

Ladki Bahin Yojana : दुसरीकडे, कात्रज दूध संघाला 'अजितदादा पवार' नाव देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 9:08 am

Top 10 news : अजित पवारांची ओळख घड्याळामुळे नव्हे तर ‘या’गोष्टीमुळे पटली, राज्यातील गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, अशा टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर

Top 10 news : गरीब शेतकऱ्यांची सरकारकडून कर्जमाफी केली जाणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल,

दैनिक प्रभात 3 Feb 2026 9:05 am

Skincare Tips: तुळशीच्या पानांत दडले आहे सौंदर्याचं रहस्य; ७ दिवसांत कमी होतील मुरुमे आणि डाग

Skincare Tips: स्वच्छ, तेजस्वी आणि निरोगी त्वचा ही सगळ्यांचीच इच्छा असते. मात्र प्रदूषण, ताणतणाव आणि बदलती जीवनशैली यामुळे मुरुम, डाग-धब्बे आणि त्वचेचा निस्तेजपणा वाढतो. अशा वेळी आपण एक घरगुती, स्वस्त आणि सुरक्षित उपाय वापरू शकतो तो म्हणजे तुळस.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 8:59 am

Jay Pawar on Ajit Pawar : ‘डॅड…काश वेळ थांबली असती’; जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावुक पोस्ट

Jay Pawar on Ajit Pawar : अजित दादांचे सुपुत्र जय पवार यांनी सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 8:38 am

मेट्रो-२ बी वरील मंडाले-चेंबूर टप्पा एप्रिलपासून सुरू

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जाहीर केले आहे की, मेट्रो लाईन २ बी वरील मंडाले-चेंबूर या मार्गावर मेट्रो सेवा एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईतील पूर्व-पश्चिम मेट्रो कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले जाणार आहे.सध्या मेट्रो लाईन २ बी वरील सेवा मांडळे-डायमंड गार्डन या टप्प्यापुरती मर्यादित आहे. चेंबूर मेट्रो स्थानकाचा समावेश झाल्यानंतर हा मार्ग वाढवण्यात येणार आहे. मंडाले (मानखुर्द) ते चेंबूर दरम्यान थेट मेट्रो धावणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या टप्प्यासोबतच चेंबूर स्थानक सुरू करता यावे यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चेंबूर स्थानकाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित बांधकाम, चाचण्या आणि आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र प्रक्रिया एप्रिलपूर्वी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सर्व मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गावर प्रवासी सेवा सुरू केली जाईल.प्रवाशांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी मेट्रो लाईन २ बी टप्प्याटप्प्याने सुरू केली जात आहे. तर उर्वरित मार्गांवरील काम सुरूच राहणार आहे. ही मेट्रो लाईन मुंबईच्या पूर्व उपनगरांतील प्रमुख निवासी आणि व्यावसायिक भागांमधील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल. तसेच रस्ते वाहतूक आणि उपनगरी रेल्वेवरील ताणही कमी करेल. अधिकाऱ्यांच्या मते, टप्प्याटप्प्याने मेट्रो सुरू करण्याच्या धोरणामुळे, उर्वरित काम सुरू असतानाच नागरिकांना मेट्रो नेटवर्कचा लाभ मिळू शकणार आहे.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 8:30 am

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या २०ते २३ फेब्रुवारीला?

महापालिका प्रशासनाला नव्या स्थायी समिती अध्यक्षांची प्रतीक्षामुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा अर्थसंकल्प यंदा पाच फेब्रुवारी रोजी मांडला जाणार नसून यंदा हा अर्थसंकल्प येत्या २० ते २३ फेब्रुवारी रोजी मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी हे नवनियुक्त स्थायी समिती अध्यक्षांना महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करतील,अशी माहिती मिळत आहे.मुंबई महापालिकेचा सन २०२५-२६चा ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प यापूर्वी प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी मांडला होता. परंतु आता महापालिका निवडणूक प्रक्रिया पार पडून नगरसेवकांची निवड झाली आहे. त्यामुळे नगरसेवक निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्षात महापौरपदाची निवडणूक लांबल्याने स्थायी समिती अध्यक्षांचीही निवड लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आजवरच्या परंपरेनुसार ५ फेब्रुवारीपूर्वी महापालिकेचा आगामी अर्थसंकल्प सादर होणे आवश्यक असते, त्यानुसार आगामी सन २०२६-२७चा अर्थसंकल्प कुणाला सादर करावा यावरून निर्माण झालेल्या तिढ्यावर महापालिका प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी याबाबत अधिनियमांमध्ये कुठेही स्पष्टता नसल्याने स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतरच अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार येत्या ५ फेब्रुवारीपूर्वी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार नसून स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतरच म्हणजे येत्या २० ते २३ फेब्रुवारी दरम्यान कधीही अर्थसंकल्प सादर केला जावू शकतो,अशी माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा आकडा ७४,४२७ कोटी रुपयांपर्यंत असला तरी भविष्यात याचा कितीही काटकसर केली तरी वाढलाच जाण्याची शक्यता आहे. महापालिकेने सुमारे २ लाख ३३ हजार कोटींहून अधिक विकास प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत. ही कामे सुरु असून त्यातील काही कामे पूर्णत्वास तर काही प्रगतीपथावर असल्याने यासाठी होणारा खर्च लक्षात घेता या आकार वाढला जाण्याची शक्यता आहे. मात्र, हा खर्च वाढला जाणार असला तरी भविष्यात महसूलाच्या दृष्टीकोनातून अधिक विचार होण्याचीही शक्यता असल्याने महापालिकेच्यावतीने करवाढ आणि दरवाढीचा तसेच अन्य मार्गाने महसूल वाढण्याचा विचार महापालिका प्रशासनाला करावा लागणार असल्याचेही समजते.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 8:30 am

मुंबई महापालिकेने अखेर हिंमत दाखवली

मोहमद अली मार्गावरील अनधिकृत फेरीवाल्यांसह पदपथावरील वाढीव बांधकामांवर हातोडामुंबई : मुंबईतील अलेक भागांमधील फेरीवाल्यांसह अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आल्यानंतर हिंमत असेल तर भेंडीबाजार, मोहमद अली रोडवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून दाखवा असे महापालिकेला सुनावणाऱ्या मुंबईकरांना आज महापालिकेने तिथेही कारवाई करून आम्ही मनात आणले तर कुठेही कारवाई करू शकतो हे दाखवून दिले आहे. मुंबई महापालिकेच्या बी विभागाच्यावतीने अत्यंत गजबजलेले व्यापारी रस्ते म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या मोहम्मद अली मार्ग आणि इब्राहिम मर्चंट मार्ग परिसरातील पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकामांवर सोमवारी २ फेब्रुवारी रोजी कारवाई करण्यात आली.मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार तसेच परिमंडळ एकच्या उपायुक्त पदी नियुक्त झालेल्या चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बी विभागाच्या सहायक आयुक्त योगेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.मोहम्मद अली मार्ग हा भेंडीबाजार, मशीद बंदर आणि भायखळा परिसराला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. इब्राहिम मर्चंट मार्ग हा रस्ता नागदेवी आणि मांडवी परिसराच्या जवळ आहे. हे दोन्ही रस्ते व्यापारी दृष्टीने आणि रहदारीच्या दृष्टिने खूप महत्त्वाचे आहेत. या दोन्‍ही मार्गावरील पदपथांवर अनधिकृत वाढीव बांधकामे आढळून आली होती. तसेच, या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनीही दुकाने उभी केल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे, वाहनचालकांना मार्गक्रमण करण्यास तसेच पादचाऱयांना पदपथांवर चालण्यास अडथळा निर्माण होत होता.याच पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेच्या ‘बी’ प्रशासकीय विभागाकडून निष्कासनाची मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत, या परिसरातील अनधिकृत फेरीवाले, पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकामांचे निष्कासन करण्यात आले. ७ अनधिकृत दुकाने हटविण्‍यात आली. तसेच, १२ ओटे, पत्र्याचे लोखंडी शेड, १० बोलार्ड, २ बेवारस वाहनांवर कारवाई करण्‍यात आली. अतिक्रमण निर्मूलनाची ०४ वाहने, ०२ जेसीबी आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने हटवण्यात आले. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे ४० अधिकारी - कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता. या कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळातही अनधिकृत / वाढीव बांधकामांविरोधात नियमितपणे कारवाई सुरूच राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 8:30 am

Chandrashekhar Bawankule : शेतकरी कर्जमाफीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान; ‘या’शेतकऱ्यांना मिळणार लाभ? नेमकं काय म्हणाले?

Chandrashekhar Bawankule : धाराशिव येथील आयोजित एका सभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफीवर भाष्य करताना मोठी घोषणा केली आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 8:12 am

वैभववाडी तालुक्यात उबाठाला खिंडार

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थित कोकिसरे येथील असंख्या कार्यकर्ते भाजपमध्ये दाखलवैभववाडी : कोकिसरे येथील उबाठाचे पदाधिकारी दत्ताराम गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत वैभववाडी येथे हा पक्षप्रवेश पार पडला. दत्ताराम गुरव व कार्यकर्त्यांचा प्रवेश उबाठासाठी मोठा धक्का मानला जात आहे. नितेश राणे यांनी सर्व प्रवेश करणाऱ्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.प्रवेश करणाऱ्यांमध्ये कोकिसरे माजी ग्रामपंचायत सदस्य मोहन पोरलेकर, कुंभारवाडीचे अध्यक्ष सदानंद खेडेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिता कुडाळकर, दीपक निळेकर, तुकाराम गुरव, सखाराम गुरव, संदीप सावंत, रमेश कुडाळकर, विठोबा कुडाळकर, संतोष कुडाळकर, मंगेश कुडाळकर, प्रकाश कुडाळकर, अनंत पेडकलकर, संजय पेडकलकर, सूर्यकांत खेडेकर, अशोक निळेकर, अनंत खेडेकर, प्रकाश राऊत, नारायण कोरलेकर, सुशांत सांगवेकर, सुरेखा खेडेकर, रोहिणी खेडेकर, वैशाली पेडकलकर, सविता गुरव, चैत्राली गुरव, निकिता कोरलेकर, माधवी पेंडकलकर, शुभांगी कुडाळकर, दिव्या गुरव, अंजनी खेडेकर, वनिता कुडाळकर, शैलेंद्र गायकवाड, शांताराम खेडेकर, संदीप समजिसकर, प्रतिक्षा समजिसकर, रवींद्र कोरलेकर, रेखा पोरलेकर, कृष्णा सावेकर, योगिता सावेकर, वनिता सावेकर, नम्रता खेडेकर, भूपेंद्र लिंगायत व असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.वैभववाडी भाजपा कार्यालय समोरील पटांगणावर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांची सभा पार पडली. याप्रसंगी हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, शारदा काबळे, प्राची तावडे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 8:10 am

संगमेश्वर तालुक्यात तीन जि. प. गटांत होणार हायहोल्टेज लढती

साडवली गटात माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांची प्रतिष्ठा पणालानीलेश जाधव देवरूख : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. संगमेश्वर तालुक्यातही या निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. तालुक्यातील तीन जि. प. गटांत हायहोल्टेज लढती होणार आहेत. यामध्ये कोसुंब, कसबा आणि साडवली या जि. प. गटात काँटे की टक्कर होणार आहे. साडवली गटात माजी राज्यमंत्री रवींद्र माने व माजी जि. प. अध्यक्षा रश्मी कदम, कोसुंब गटात माजी आमदार सुभाष बने व कसबा गटात शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.तालुक्यात सात जिल्हा परिषद गट आहेत. यामध्ये साडवली, कोसुंब, कसबा, कडवई, दाभोळे, मुचरी, धामपूरतर्फे संगमेश्वर यांचा समावेश आहे. साडवली गटातून उबाठाच्या नेहा रवींद्र माने व भाजपच्या रूपाली रूपेश कदम, कोसुंब गटातून भाजपचे प्रमोद अधटराव, शिवसेनेचे रोहन सुभाष बने व उबाठाच्या मुग्धा जागुष्टे, कसबा गटातून शिवसेनेच्या रचना राजेंद्र महाडिक व उबाठाच्या विशाखा कुवळेकर, कडवई गटातून भाजपचे विनोद म्हस्के व उबाठाचे संतोष थेराडे, दाभोळे गटातून शिवसेनेचे विलास चाळके व वंचितच्या विरश्री बेटकर, मुचरी गटातून शिवसेनेच्या माधवी गीते, उबाठाच्या ललिता तांबे, धामापूरतर्फे संगमेश्वर गटातून राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे सुशिल भायजे व उबाठाचे सहदेव द बेटकर यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होणार आहे. या सात गटापैकी साडवली, कोसुंब व कसबा या तीन गटांमध्ये हायहोल्टेज लढत होणार आहे. साडवली गटातील उमेदवार नेहा माने या माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी आहेत. तसेच त्या यापूर्वी जि. प. सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 8:10 am

शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले

मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी तरुण आणि अभ्यासू नगरसेवक अमेय घोले यांची निवड करण्यात आली. महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत अमेय घोले यांचे नाव गटनेतेपदासाठी जाहीर करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला जे २९ नगरसेवक निवडून येत जे यश लाभले त्यासाठी या बैठकीत ठराव मांडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर दुपारी कोंकण आयुक्तांकडे शिवसेनेकडून कायदेशीर बाबींची पूर्तता करून गट नोंदणी करण्यात येणार असल्याचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.अमेय घोले हे वडाळा येथील प्रभाग क्रमांक १७८ मधून निवडून आले असून त्यांनी यापूर्वी महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. तसेच इतर समित्यांचेही सदस्यत्व भूषवलेले आहे. एकेकाळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय होते आणि तत्कालिन शिवसेनेच्या युवा सेनेचे कोअर कमिटीचे ते खजिनदार होते. युवा सेनेच्या जडणघडणीत त्यांचा मोठा हातभार होता. तसेच तरुण आणि अभ्यासू नगरसेवक असल्याने महापालिकेतील त्यांच्या पक्षाची भूमिका ते समर्थपण मांडू शकतील या भावनेने त्यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवलेली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या २९ नगरसेवकांची नोंदणी कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात पार पडली असून शिवसेनेला सहयोगी गट म्हणून राष्ट्र्वादी काँग्रेसच्या तिन्ही नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सहयोगी गट म्हणून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 8:10 am

Shankar Mandekar : “हा भाग पुन्हा ‘राष्ट्रवादीमय’होणार!”- आमदार शंकर मांडेकरांचा विरोधकांना थेट इशारा

Shankar Mandekar : कासारसाई ते हिंजवडी... राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मांडेकरांचा दौरा; सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 7:17 am

Child Labor : सावधान! आता बालमजुरी महागात पडणार; मालकांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हा आणि मोठा दंड

Child Labor : बालमजुरी कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासन सज्ज; मुक्त केलेल्या बालकांचे होणार पुनर्वसन आणि शिक्षण.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 7:10 am

Pune News : संचेती चौकातील कोंडी फुटणार; महापालिकेचा मास्टर प्लॅन तयार; ‘हा’नवा पूल बदलणार चित्र

Pune News : महापालिकेकडून गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या रस्त्यावर पुणे विद्यापीठ चौकात बहुमजली उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 7:00 am

इलेक्शन कव्हर करण्यासाठी बांगलादेशात पोहोचले दिव्य मराठी:इस्रायल, लेबनॉन, सीरियानंतर आता बांगलादेशातून विशेष बातम्या, वाचा आणि पाहा उद्यापासून, म्हणजेच 4 फेब्रुवारीपासून

बांगलादेशमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर 18 महिन्यांनी निवडणुका होणार आहेत. 12 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. या निवडणुका हिंदूंवरील सततचे हल्ले आणि भारतविरोधी भावनांच्या छायेत होत आहेत. इस्लामिक कट्टरपंथी पक्ष जमात-ए-इस्लामी आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी यांच्यात ही लढाई आहे. बांगलादेशातील परिस्थिती सांगण्यासाठी दिव्य मराठीचे रिपोर्टर वैभव पळणीटकर राजधानी ढाका येथे आहेत. यापूर्वी दिव्य मराठीने इस्रायल, लेबनॉन, सीरिया आणि नेपाळमध्ये जाऊन कव्हरेज केले आहे. उद्या, म्हणजेच 4 फेब्रुवारीपासून तुम्हाला बांगलादेशातील ग्राउंड झीरोमधून विशेष अहवाल, सत्तेचा दावेदार कोण आहे, अल्पसंख्याकांची परिस्थिती आणि राजकारणातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती मिळतील. तर, वाचत आणि पाहत राहा दिव्य मराठी ॲप…

दिव्यमराठी भास्कर 3 Feb 2026 6:59 am

‘बजरंग दलामुळे घाबरले कुटुंब, मुलीची शाळा सुटली’:मुस्लिम दुकानदाराला पाठिंबा देणारे ‘मोहम्मद’ दीपकचे जिम बंद, बजरंग दलाने म्हटले- टार्गेटवर आहेस

उत्तराखंडमधील कोटद्वार येथे राहणारे जिम ट्रेनर दीपक कुमार गेल्या एका आठवड्यापासून दहशतीत जगत आहेत. दीपकचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ते एका वृद्ध दुकानदारासाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांशी भिडले होते. हा व्हिडिओ 26 जानेवारीचा आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नाव विचारले, तेव्हा दीपकने नाव सांगितले - मोहम्मद दीपक. यानंतर दीपकच्या जिमबाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. व्हिडिओ बनवून दीपकला धमकी देण्यात आली. याचे व्हिडिओही समोर आले आहेत. यापैकी एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती म्हणत आहे की, दीपक कुमार, तू टार्गेटवर आहेस. दीपक म्हणतात, ‘त्या घटनेनंतर कुटुंब घाबरले आहे. भीती तर आहेच. सर्वात आधी कुटुंबच घाबरते. मुलगी LKG मध्ये शिकते, ती शाळेत जाऊ शकत नाहीये. माझी तब्येत ठीक नाहीये. जिमही चालत नाहीये. घरात आई आणि पत्नी आहेत. काम तर करावेच लागेल, पण परिस्थिती ठीक नाहीये.’ दीपक कोटद्वारमध्येच जिम चालवतात. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राहुल गांधी आणि असदुद्दीन ओवैसी त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. राहुल गांधींनी सोशल मीडियावर लिहिले की, उत्तराखंडचे दीपक भारताचे हिरो आहेत. दीपक संविधान आणि माणुसकीसाठी लढत आहेत. त्या संविधानासाठी, ज्याला भाजप आणि संघ परिवार रोज पायदळी तुडवण्याचा कट रचत आहेत. यावर दीपक म्हणतात, ‘यावेळी मला खूप अस्वस्थ वाटत आहे. घाबरण्यासारखे काही नाही, देवाचे भय असावे, पण जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिने कुटुंबाला त्रास दिला आहे.’ दीपकला लोकांचा पाठिंबा मिळत असल्याबद्दल आनंद आहे. तो म्हणतो, 'बहुतेक लोक माझ्या बाजूने आहेत. मी काही चुकीचं काम केलं नाही, त्यामुळे लोक पाठिंबा देत आहेत. बाजार आणि जिमशी संबंधित लोकही माझ्यासोबत उभे आहेत.' 26 जानेवारीला काय घडलं होतं?कोटद्वारमधील पटेल मार्गावरील मार्केटमध्ये 'बाबा स्कूल ड्रेस' नावाचं दुकान आहे. हे दुकान 70 वर्षांच्या वकील अहमद यांचं आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, स्वतःला बजरंग दलाचे कार्यकर्ते म्हणवणारे काही लोक दुकानात घुसतात. ते वकील अहमद यांना दुकानाच्या नावातील 'बाबा' हा शब्द काढायला सांगतात. या लोकांचा दावा होता की 'बाबा' या शब्दामुळे कोटद्वारमधील प्रसिद्ध सिद्धबली बाबा मंदिराबाबत गैरसमज निर्माण होत आहे. दीपक कुमार सांगतात की हे सर्व घडत असताना, मी तिथेच जवळ माझ्या एका मित्राच्या दुकानावर होतो. माझे जिम देखील तिथेच आहे. गर्दी पाहून मी तिथे पोहोचलो. मी वृद्ध दुकानदाराची बाजू घेतली. गर्दीने माझे नाव विचारले, तेव्हा मी माझे नाव मोहम्मद दीपक सांगितले. मी एकजूटता दाखवण्यासाठी हे नाव सांगितले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर 31 जानेवारी रोजी बजरंग दल आणि हिंदूवादी संघटनांच्या सदस्यांनी दीपकच्या जिमबाहेर आंदोलन केले. आरोप आहे की आंदोलनादरम्यान जातीय घोषणा दिल्या गेल्या. जिमबाहेर पोलिसांसमोरच दीपक आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. व्हिडिओमध्ये पोलीसवाले आधी दीपकला समजावताना दिसत आहेत. नंतर गर्दीतून काही तरुण दीपकच्या जिमच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पोलिसांनी त्यांना थांबवले. यानंतर परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस दल तैनात करण्यात आले. या परिसरात फ्लॅग मार्चही काढण्यात आला. बजरंग दलाची मोहीम - ज्याचे काम, त्याचेच नावदीपकच्या जिमबाहेर झालेल्या आंदोलनात देहरादूनहून बजरंग दलाचे कार्यकर्ते पोहोचले होते. यापैकीच एक देहरादूनचे जिल्हा संयोजक अमन स्वेदिया देखील होते. ते देखील आंदोलनानंतरच्या एका व्हिडिओमध्ये दीपक कुमारला आव्हान देताना दिसत आहेत. आम्ही यावर अमन स्वेडिया यांच्याशी बोललो. अमन २६ जानेवारीच्या घटनेला एका मोहिमेचा भाग सांगतात. ते म्हणतात की बजरंग दल गेल्या ६ महिन्यांपासून संपूर्ण उत्तराखंडमध्ये 'ज्याचे काम, त्याचेच नाव' ही मोहीम राबवत आहे. अमन या मोहिमेबद्दल म्हणतात, तुम्ही व्यापार करा, आम्हाला काही हरकत नाही, पण तुमची ओळख लपवू नका. तुम्ही मुस्लिम असून हिंदू नावाने किंवा बाबा सिद्धबलीच्या नावाने दुकान का चालवत आहात? हा हिंदुत्वाच्या ओळखीचा गैरवापर आहे. तुम्ही तुमच्या नावाने दुकान चालवा, ज्याला यायचे असेल तो येईल. नावावरून वादाचे हे बजरंग दलाशी संबंधित पहिले प्रकरण नाही. यापूर्वी डिसेंबर २०२५ मध्ये डेहराडूनमधील लकी हेअर सलून नावाच्या दुकानात तोडफोड करून पोस्टर फाडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसेच, एका शाळेत प्रार्थनेला विरोध करतानाचा व्हिडिओही आला होता. अमन दावा करतात की हे सर्व व्हिडिओ 'ज्याचं काम, त्याचं नाव' या मोहिमेला जोडलेले आहेत. बजरंग दलावर कायदा हातात घेतल्याचे आरोप होतात, पण अमन दावा करतात की जेव्हा बोर्ड काढण्याची किंवा ओळख उघड करण्याची वेळ येते, तेव्हा पोलीस सोबतच असतात. पोलिसांच्या उपस्थितीत सर्व काही होते. दीपकने माफी मागावी यावर बजरंग दल ठाम 26 जानेवारीच्या घटनेवर अमन दावा करतात की याची माहिती आधीच बजरंग दलाच्या ग्रुपमध्ये शेअर केली होती. तेव्हाही बाबा स्कूल ड्रेसचे नाव बदलवण्यासाठी बजरंग दलाचे कार्यकर्ते पोहोचले होते. अमन मोहम्मद दीपकवर संघटनेच्या कार्यकर्त्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करतात. ते म्हणतात, ‘त्या दिवशी आमचे काही कार्यकर्ते दुकानावर नाव बदलवण्याची विनंती करायला गेले होते. तिथे आमचे 75 वर्षांचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते होते. मोहम्मद दीपकने त्यांच्याशी गैरवर्तन केले, त्यांना धक्का दिला आणि लाथ मारली. आम्ही शालीनतेने बोललो होतो, पण त्यांनी मारामारी करून स्वतःला हिरो दाखवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला आशा आहे की प्रशासन आम्हाला न्याय मिळवून देईल.’ दीपकविरुद्धही एफआयआर दाखलसध्या या प्रकरणात पोलिसांनी तीन एफआयआर दाखल केले आहेत. पहिला एफआयआर दुकानदार वकील अहमद यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे. यामध्ये वकील अहमद यांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते गौरव कश्यप, शक्ती सिंग आणि इतरांविरुद्ध नावानिशी तक्रार केली आहे. या सर्वांवर दुकानात घुसून धमकी दिल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. दुसरा एफआयआर दीपक कुमार यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. बजरंग दलाचे कार्यकर्ते कमल पाल आणि गौरव कश्यप यांच्या तक्रारीवरून दीपक कुमार आणि त्यांचे साथीदार विजय रावत यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर मारहाण, लुटमार, घड्याळ आणि पैसे हिसकावून घेणे आणि जातीयवाचक शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे. तिसरी एफआयआर पोलिसांनी स्वतःहून दाखल केली आहे. यात 30-40 अज्ञात लोकांविरुद्ध चक्काजाम करणे, जातीय सलोखा बिघडवणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व धर्मांची बैठक घेतली, परिसरात आता शांतता - पोलीस26 जानेवारीच्या घटनेबाबत सीओ तुषार बोरा दावा करतात की, हे प्रकरण सोशल मीडियावर वाढवून दाखवले जात आहे. संपूर्ण परिसरात शांतता आहे. तरीही खबरदारी म्हणून पोलीस तैनात आहेत. पोलिसांनी सर्व धर्मांच्या लोकांसोबत 1 फेब्रुवारी रोजी बैठकही घेतली. दीपकवर अजून कोणतीही कारवाई नाहीदीपक कुमारने एक व्हिडिओ जारी करून जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. जमीयत उलेमा-ए-हिंद, उत्तराखंडने या प्रकरणी डीजीपींना पत्र लिहिले आहे. यात दीपक कुमारला सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. पत्रात म्हटले आहे की, दीपक कुमारने 26 जानेवारी रोजी एका मुस्लिम दुकानदारावर झालेल्या हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करून व्यापाऱ्याचा जीव वाचवला. आता त्यांना जीवाला धोका निर्माण झाला आहे. मात्र, पोलीस अशा कोणत्याही धोक्याचा इन्कार करत आहेत. सीओ तुषार बोरा म्हणतात, ‘अनेक ठिकाणी अशी अफवा पसरवली गेली की दीपकला खूप मारहाण झाली आहे. दीपकने स्वतः व्हिडिओ जारी केला आहे, ज्यात तो पूर्णपणे ठीक दिसत आहे. तरीही पोलीस पूर्णपणे सतर्क आहेत. गस्त सुरू आहे आणि आम्ही प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहोत.’ दीपकविरुद्धच्या एफआयआरवर सीओ तुषार बोरा स्पष्टीकरण देतात की, कोणाविरुद्ध एफआयआर दाखल होणे आणि चौकशी होणे यात मोठा फरक असतो. सध्या चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान जे पुरावे समोर येतील, त्याच आधारावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. धमकी देणाऱ्यांवर एफआयआर का नाही? 31 जानेवारी रोजी झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी सुमारे 40 अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. जिमबाहेरून व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते दीपकला धमकी देताना दिसत आहेत. यावर सीओ तुषार बोरा म्हणतात, ‘पोलिसांनी स्वतःहून रस्ता अडवणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. व्हिडिओमध्ये जे लोक दिसत आहेत, मग ते कोणत्याही संघटना किंवा पक्षाशी संबंधित असल्याचा दावा करत असले तरी, त्यांची ओळख पटवली जात आहे. व्हिडिओच्या आधारावर सर्वांवर कारवाई केली जाईल.’

दिव्यमराठी भास्कर 3 Feb 2026 6:53 am

Pune News : महालक्ष्मी चरणी सोन्या-चांदीचे अर्पण! भाविकांच्या सोबतीने पार पडला वर्धापनदिन सोहळा

Pune News : राजस्थानच्या जगद्गुरूंच्या हस्ते सोन्या-चांदीची फुले अर्पण; श्री महालक्ष्मी मंदिर संस्थानच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 6:45 am

PMC News : अभियांत्रिकी संवर्गात खांदेपालट! महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे आदेश

PMC News : अनिरुद्ध पावसकर यांची शहर अभियंतापदी बढती; पथ विभाग आणि वाहतूक नियोजनाची धुरा आता राजेश बनकर यांच्याकडे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 6:30 am

आजचे एक्सप्लेनर:बलुच दहशतवाद्यांचा पाकिस्तानात सर्वात मोठा हल्ला, महिलांना आत्मघाती बॉम्बर का बनवत आहेत, चीन-अमेरिकेवरही त्याचा परिणाम

बलुचिस्तानमधील परिस्थिती पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर जात आहे. 31 जानेवारी रोजी ‘बलुच लिबरेशन आर्मी’च्या दहशतवाद्यांनी बलुचिस्तानमधील 12 जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानी सरकारी कार्यालये आणि लष्करी तळांवर सर्वात मोठा लक्ष्यित हल्ला केला होता. यात BLA च्या फिदायीन महिलांचाही समावेश आहे. BLA चे म्हणणे आहे की जोपर्यंत बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत हल्ले सुरू राहतील. सोशल मीडियावर ‘बलुचिस्तान रिपब्लिक’ आणि ‘बलुचिस्तान इंडिपेंडन्स’ सारखे कीवर्ड ट्रेंड करत आहेत. अखेर बलुचिस्तानचे लोक पाकिस्तानपासून स्वातंत्र्य का घेऊ इच्छितात, पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताबा मिळवला होता का, या संघर्षामुळे चीन आणि अमेरिकेसाठी काय चिंता आहे; आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया… प्रश्न-1: बलुच लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तान सेना यांच्यात काय संघर्ष सुरू आहे? उत्तर: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात 31 जानेवारीपासून बलुच लिबरेशन आर्मी म्हणजेच BLA च्या दहशतवाद्यांनी ऑपरेशन 'हॅरोफ'चा दुसरा टप्पा सुरू केला. बलुची भाषेत हॅरोफचा अर्थ 'काळे वादळ' असा होतो. यादरम्यान पोलीस स्टेशन, चेक पॉइंट, लष्कराचे प्रशिक्षण तळ, बँक, बाजारपेठ, सरकारी कार्यालये आणि इमारतींवर बॉम्ब आणि गोळ्यांनी एकाच वेळी हल्ले करण्यात आले. साऊथ एशिया टेररिझम पोर्टलनुसार, बलुच दहशतवाद्यांनी क्वेटा, ग्वादर, मस्तुंग, नोशकी, दलबांदिन, खारान, पंजगुर, तुम्प आणि पसनी यांसारख्या 12 जिल्ह्यांमध्ये 48 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले. 30 हून अधिक सरकारी इमारतींवर लक्ष्यित हल्ले करण्यात आले. सुमारे 20 वाहनांना आग लावण्यात आली. BLA नुसार, या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सेना, पोलीस आणि गुप्तचर संस्थांचे 84 जवान मारले गेले आणि 18 जणांना ओलीस ठेवण्यात आले. या हल्ल्यांमध्ये अनेक महिलांनीही बंदूक घेऊन लढा दिला होता. BLA ने याचे व्हिडिओदेखील जारी केले आहेत. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान आर्मीने 40 तासांचे ऑपरेशन चालवले. बलुचिस्तान प्रांताचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी सांगितले की, या दरम्यान सैन्याने सुमारे 145 दहशतवाद्यांना ठार केले. BLA च्या दाव्याच्या उलट, बुगती यांनी सांगितले की, हल्ल्यांमध्ये पोलीस आणि आर्मीचे 17 जवान आणि 31 सामान्य नागरिक मारले गेले. या भागात अजूनही आर्मी आणि पोलिसांचे जवान तैनात आहेत. मात्र, BLA चे प्रवक्ते जियांद बलोच यांनी बुगतीचे दावे फेटाळून लावत सांगितले की, हल्ल्यात BLA चे केवळ 7 दहशतवादी मारले गेले, ज्यात 4 असे दहशतवादी होते ज्यांनी पाकिस्तानच्या लष्करी तळांमध्ये घुसून आत्मघाती हल्ले केले होते. BLA ने 2024 मध्ये ‘हॅरोफ फेज-1’ सुरू केले होते, तेव्हा बहुतेक लक्ष्य पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांचे तळ होते, आता फेज-2 मध्ये हल्ल्याची व्याप्ती वाढली आहे. BLA चा दावा आहे की 2025 मध्ये त्यांनी पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांच्या ठिकाणांवर एकूण 521 हल्ले केले आहेत. 11 मार्च रोजी BLA ने पाकिस्तानची जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक केली होती. BLA ने 200 हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ओलीस ठेवल्याचा दावा केला होता. दुसरीकडे, 14 मे रोजी बलुचिस्तानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये डझनभर ठिकाणी लक्ष्यित हल्ले करण्यात आले होते. प्रश्न-2: बलोच आर्मीकडून आत्मघाती हल्ला करणाऱ्या महिला कोण आहेत? उत्तर: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या म्हणण्यानुसार, बलुचिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यांपैकी दोन हल्ल्यांमध्ये महिलांचाही समावेश होता. BLA ने ऑपरेशन हेरोफ फेज-2 मध्ये सहभागी असलेल्या दोन महिला दहशतवाद्यांचे फोटोही प्रसिद्ध केले आहेत. या दोन्ही फिदायीन हल्लेखोर म्हणजेच आत्मघाती हल्लेखोर होत्या... 21 व्या वाढदिवशी BLA मध्ये सामील झालेली आसिफा पाकिस्तान सैन्याला भित्री म्हणणारी हवा बलोच प्रश्न-3: पाकिस्तान या हल्ल्यांबाबत भारतावर काय आरोप करत आहे? उत्तर: मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी क्वेट्टा येथे पत्रकारांशी बोलताना बलुचिस्तानवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ‘फितना-अल-हिंदुस्तान’ असे संबोधले. पाकिस्तान सरकार या शब्दाचा वापर पाकिस्तानातील ‘भारत-समर्थित दहशतवादा’साठी करते. पाकिस्तानी लष्करानेही निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘क्वेट्टा, ग्वादर, मस्तुंग आणि नोशकी जिल्ह्यांमध्ये जवळपास एकाच वेळी झालेले हल्ले भारत-समर्थित दहशतवाद्यांनी केले आहेत. पाकिस्तानचे म्हणणे आहे की या कारवायांचा उद्देश मोठ्या प्रमाणावर अस्थिरता पसरवणे हा होता.’ बुगतीने असाही दावा केला की मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह सुरक्षा यंत्रणांकडे आहेत आणि त्यात काही अफगाण नागरिकही सामील आहेत. ‘भारत-समर्थित दहशतवादी’ सुरक्षा दलांना ओलीस ठेवून क्वेटा शहराच्या मध्यभागी पोहोचण्याची योजना आखत होते, पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत.’ तथापि, भारताने हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, ‘भारत, पाकिस्तानचे सर्व आरोप पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन मानून फेटाळून लावतो. भारतावर अशा प्रकारचे आरोप करणे ही पाकिस्तानची जुनी रणनीती आहे, जेणेकरून ते आपल्या अंतर्गत अपयशांवरून आणि समस्यांवरून लक्ष विचलित करू शकेल.’ जयस्वाल पुढे म्हणाले की पाकिस्तानने आरोप करण्याऐवजी बलुचिस्तानच्या लोकांच्या जुन्या मागण्यांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांनी पाकिस्तानच्या दमन आणि क्रूरतेच्या रेकॉर्डचा उल्लेख केला आणि म्हणाले की हे कोणापासून लपलेले नाही. प्रश्न-4: बलुचांच्या लढाईचा चीन-अमेरिकेवर काय परिणाम? उत्तर: बलुचिस्तानमध्ये वाढता संघर्ष चीन आणि अमेरिकेची चिंता वाढवत आहे, कारण येथे दोन्ही देशांची मोठी गुंतवणूक अडकलेली आहे... अमेरिकेने बलुचिस्तानमध्ये 11 हजार कोटी रुपये गुंतवले बलुचिस्तानमधून जातो चीनचा CPEC प्रकल्प परराष्ट्र धोरण तज्ज्ञ मायकल कुगेलमन यांच्या मते, ‘या हल्ल्यामुळे असा संदेश जातो की बलुचिस्तानच्या नैसर्गिक संसाधनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे, ज्यात व्हाईट हाऊसचे अधिकारी देखील समाविष्ट आहेत. BLA च्या मुख्य तक्रारींपैकी एक ही आहे की स्थानिक संसाधनांचे बाहेरील लोकांकडून शोषण केले जात आहे.’ प्रश्न-5: पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांच्यातील संघर्षाची कहाणी काय आहे? उत्तर: बलुचिस्तानचा मोठा भाग थंड वाळवंट आहे. सध्याचे बलुचिस्तान तीन देशांमध्ये पसरलेले आहे. यात पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत, इराणचा सिस्तान-बलुचिस्तान प्रांत आणि एक छोटा भाग अफगाणिस्तानात आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील बलुचिस्तानचा पाकिस्तानसोबतचा संघर्ष 1947 मध्ये भारत-पाक फाळणीच्या वेळीच सुरू झाला होता... बलुचिस्तान आज पाकिस्तानमधील सर्वात मोठे राज्य आहे आणि 44 टक्के भूभाग व्यापतो. असे असूनही येथे संपूर्ण पाकिस्तानच्या केवळ 6% लोकसंख्या राहते. बलुचिस्तान तेल, सोने, तांबे आणि इतर खाणींनी समृद्ध आहे. या संसाधनांचा वापर करून पाकिस्तान आपल्या गरजा पूर्ण करतो. असे असूनही हा प्रदेश सर्वात मागासलेला आहे. BLA ने आतापर्यंत बलुचिस्तानच्या परिसरात शेकडो हल्ले केले आहेत. त्यांची मागणी आहे की बलुचिस्तानला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळावा. पाकिस्तानने या भागातून आपले सैन्य मागे घ्यावे आणि बलुचिस्तानच्या संसाधनांवरील त्याचे नियंत्रण संपुष्टात यावे. BLA चे म्हणणे आहे की पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI आणि सैन्य, दहशतवादी संघटना ISIS प्रमाणे बलुच लोकांवर क्रूर हल्ले करतात. व्हॉइस फॉर बलुच मिसिंग पर्सन्स (BVMP) नुसार, गेल्या 15 वर्षांत पाकिस्तानी सैन्याने 7,000 हून अधिक बलुच लोकांना गायब केले आहे. त्यांना मारण्यात आले आहे किंवा त्यांना अशा ठिकाणी कैद केले आहे, ज्याची कोणालाही माहिती नाही. प्रश्न-6: पाकिस्तान भारतावर बलुच लोकांना मदत केल्याचा आरोप का करतो? उत्तर: थेटपणे भारत, बलुचिस्तानच्या बाबतीत कोणताही हस्तक्षेप करत नाही. मात्र, बलुच नेते पाकिस्तानविरुद्धच्या त्यांच्या लढाईत भारताचे समर्थन आणि मदत इच्छितात. भारत-पाक यांच्यातील जुन्या तणावामुळे BLA भारताला एक मित्र म्हणून पाहते. बलुच नेते असे म्हणत आले आहेत की जर भारताने पाकिस्तानवर निर्णायक हल्ला केला, तर BLA पश्चिम सीमेवरून पाकिस्तानवर हल्ला करेल. बलुच नेते मीर यार बलुच यांनी अनेकदा पाकिस्तानपासून स्वातंत्र्याच्या लढाईत भारताकडे मदत मागितली आहे. अलीकडील संघर्षादरम्यान, मीर यांनी सोशल मीडियावर लिहिले, 'बलुचिस्तानमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. हा त्यांचा राष्ट्रीय निर्णय आहे की बलुचिस्तान पाकिस्तान नाही. जग आता शांत राहू शकत नाही. आम्ही 11 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी या प्रदेशातून माघार घेतल्यावरच आमच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती.' मीर यांनी भारतीयांना आवाहन करत म्हटले की, 'भारतीय बुद्धिजीवींना विनंती आहे की बलुचांना पाकिस्तानचे लोक म्हणू नका. आम्ही पाकिस्तानी नाही तर बलुचिस्तानी आहोत.' मीर यार PoK बाबत भारताच्या भूमिकेचेही समर्थन करतात. मीर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, 'जगाने पाकिस्तानला सांगितले पाहिजे की त्याने तत्काळ PoK सोडावे, जेणेकरून ढाकामध्ये त्याच्या 93 हजार सैनिकांनी केलेल्या आत्मसमर्पणाप्रमाणे त्याला पुन्हा एकदा लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागू नये.' दुसरीकडे, भारत थेट स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीचे समर्थन करत नाही, परंतु तो म्हणतो की पाकिस्तानने बलुचिस्तानच्या लोकांच्या मागण्या ऐकल्या पाहिजेत. अनेक परदेशी मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की भारत बलुचिस्तानच्या लोकांना आर्थिक मदत करतो.

दिव्यमराठी भास्कर 3 Feb 2026 6:26 am

अग्रलेख : नवे वादंग नवा पेच

देशात अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आणि त्याच्या बर्‍या वाईट परिणामावर चर्चा सुरू असतानाच आज संसदेत एक नवीनच वादंग उभे राहिले आणि त्यातून सरकार आणि राहुल गांधी यांच्यात नवीन संघर्ष उभा राहिलेला पाहायला मिळाला.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 6:00 am

PMC Tax Proposal : महापालिकेचा धक्कादायक प्रस्ताव; २५० कोटींच्या उत्पन्नासाठी लाखो नागरिकांवर बोजा

PMC Tax Proposal : प्रशासकीय खर्चावर नियंत्रण ठेवा, प्रामाणिक करदात्यांना लुटू नका; नाना भानगिरे यांची आयुक्तांकडे मागणी.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 5:50 am

दखल : चिनी पुरवठासाखळीचे चक्र

चीनने जगाला त्याच्या पुरवठासाखळीच्या जाळ्यात अडकवले आहे. 2025 मधेच चीनने जगाशी एक ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त व्यापारी सरप्लस कमावला. जगाने कितीही प्रयत्न केले, तरी या सापळ्यातून सुटका होत नाही.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 5:30 am

PMC Mayor Election : महापौर बिनविरोध की निवडणूक? निवड प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष

PMC Mayor Election : भाजपकडे ११९ जागांचे स्पष्ट बहुमत; तरीही महापौर आणि उपमहापौर पदासाठी विरोधकांच्या हालचालींना वेग.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 5:30 am

Mundhwa Land Scam : तब्बल १ हजार ८८६ पानांचे दोषारोपपत्र; शीतल तेजवानीच्या अडचणीत मोठी वाढ

Mundhwa Land Scam : मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीविरोधात पुरावे गोळा; आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केले हजारो पानांचे दोषारोपपत्र.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 5:15 am

लक्षवेधी : बँकांमध्ये कोणते बदल होणार?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 2026-27 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र या अर्थसंकल्पामुळे शेअर बाजाराची निराशा झाली आहे. यापूर्वी अनेकदा शेअर बाजाराची अशाप्रकारे निराशा होऊन बाजार कोसळला आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 5:00 am

Electric Shock Death : काळजाचा थरकाप! घोडनदीवर वीजपंप सुरू करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Electric Shock Death : वीजपंप सुरू करण्यासाठी घोडनदीवर गेलेल्या शेतकरी तरुणाचा वीज वाहक खांबाच्या तारेला विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 5:00 am

Pune ZP Election : पाबळ-केंदूर गटात भाजपची मोर्चेबांधणी! विकास गायकवाड यांच्या विकासकामांवर मतदारांचा विश्वास

Pune ZP Election : दुष्काळात स्वखर्चाने टँकर आणि कोरोनात रेशन; पाबळ-केंदूर गटात विकास गायकवाडांचा वैयक्तिक जनसंग्रह भाजपच्या पथ्यावर पडणार?

दैनिक प्रभात 3 Feb 2026 4:45 am

Paud Panchayat Samiti : कोमल वाशिवले यांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Paud Panchayat Samiti : गेल्या नऊ वर्षांच्या कामाची शिदोरी आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा निर्धार; कोमल वाशिवले निवडणूक मैदानात सज्ज.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 4:00 am

Shankar Mandekar : अजितदादांनी दिलेल्या उमेदवाराला विजयी करा; आमदार शंकर मांडेकरांचे आवाहन

Shankar Mandekar : विक्रम खुटवड आणि तृप्ती खुटवड यांच्या प्रचारासाठी जोगवडीत जनसागर; आमदार शंकर मांडेकरांनी मांडले विकासाचे व्हिजन.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 3:30 am

Somatane Phata Accident : सोमटणे फाट्यावर भीषण अपघात! कंटेनरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

Somatane Phata Accident : तळेगाव दाभाडे परिसरात अपघातांचे सत्र सुरूच; सोमटणे फाट्यावर दुचाकीस्वाराचा भीषण अंत झाल्याने परिसरात शोककळा.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 3:15 am

PCMC Mayor : रवी लांडगे पिंपरी चिंचवडचे नवे महापौर! बिनविरोध निवड, पण उपमहापौर पदासाठी रंगणार निवडणूक

PCMC Mayor : पिंपरी पालिकेत भाजपची एकहाती सत्ता, पण उपमहापौर पदासाठी पेच; वैशाली काळभोर विरुद्ध शर्मिला बाबर असा होणार सामना.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 3:00 am

Money Power in Elections : निवडणूक की पैशांचा बाजार? मावळात मतांसाठी उमेदवारांनी काढली चक्क बँकांचे कर्ज..पाहा

Money Power in Elections : दशकाभरापूर्वीच्या निस्पृह प्रचाराची जागा आता कोट्यवधींच्या उधळणीने घेतली; निवडणूक आयोगाच्या खर्चाच्या मर्यादेला केराची टोपली.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 2:30 am

Charholi Suicide Case : पत्नीवर गुन्‍हा दाखल झाला अन् पतीचे टोकाचे पाऊल; चऱ्होलीतील धक्कादायक घटना..वाचा सविस्तर

Charholi Suicide Case : रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या पत्नीवर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने पती-पत्नीत तीव्र वाद झाले. या तणावातून ३९ वर्षीय कुमार ऐश्वर्य यांनी विष प्राशन केले.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 1:45 am

PCMC Mayor : भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर; महापौर पदावरून शहराध्यक्षांची दांडी, महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा

PCMC Mayor : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेचा सोपान चढताना भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 1:30 am

Pimpri Chinchwad Crime : गाडी गायब, सुटे भाग शिल्लक! काळेवाडी पोलिसांकडून ‘गाड्या ‘चोरणाऱ्या’टोळीचा पर्दाफाश

Pimpri Chinchwad Crime : मोई येथील स्क्रॅप सेंटरमध्ये चालत होता वाहने तोडण्याचा 'खेळ'; एका आरोपीला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 1:15 am

Mahabaleshwar Election : महाबळेश्वरचा गड कोण राखणार? मकरंद पाटील विरुद्ध एकनाथ शिंदे; महायुतीतच ‘कांटे की टक्कर’

Mahabaleshwar Election : महायुतीमधील तिन्ही पक्षांचा एकमेकांविरोधात शड्डू; मकरंद पाटलांची सत्ता टिकवण्याची धडपड तर शिंदे गटाचा सुरुंग लावण्याचा प्रयत्न.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 12:45 am

Shashikant Shinde : पोलीस ठाण्यात शशिकांत शिंदेंचा ठिय्या; पोलीस निरीक्षकांविरुद्ध संताप, नेमकं प्रकरण काय?

Shashikant Shinde : कोरेगाव पोलीस निरीक्षकांच्या पक्षपाती कारभाराविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 12:30 am

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार ०३ फेब्रुवारी २०२६

पंचांगआज मिती माघ कृष्ण द्वितीय शके १९४७. चंद्र नक्षत्र मघा. योग शोभन,चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४ माघ शके १९४७.मंगळवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२६.मुंबईचा सूर्योदय ०७:१२, मुंबईचा सूर्यास्त १८:३२, मुंबईचा चंद्रोदय ०८.०३ मुंबईचा चंद्रास्त ०८.०९ , राहू काळ ०३.४२ ते ०५.०७.चांगला दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

फीड फीडबर्नर 3 Feb 2026 12:30 am

Satara ZP Election : औंध गटात राष्ट्रवादी काँग्रेसचा गड अभेद्य ठेवावा; मनिषाताई फडतरे यांचे आवाहन

Satara ZP Election : गाव तिथे हायटेक शाळा आणि वाडी तिथे आरोग्य सुविधा; मनिषाताईंनी व्यक्त केला भविष्यातील कामांचा संकल्प.

दैनिक प्रभात 3 Feb 2026 12:15 am

गर्दी कमी होणार? मुंबई लोकलमध्ये एसी ट्रेन वाढणार ; लवकरच धावणार १५ डब्ब्यांची लोकल

मुंबई : मुंबई लोकलमधील प्रचंड गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मोठी आणि ठोस पाऊले उचलली आहेत. येत्या काही वर्षांत मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक होणार असून, सन २०२९ पर्यंत तब्बल २३८ वातानुकूलित लोकल ट्रेन सेवेत दाखल होणार आहेत. त्याचबरोबर १५ डब्यांच्या लोकल ट्रेन येत्या जून महिन्यापासून धावण्याची शक्यता आहे.मुंबई लोकल ही शहराची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, दररोज वाढणारी प्रवासी संख्या, अपघात आणि असुविधांमुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने रेल्वे पायाभूत सुविधांवर भर देण्याचा निर्णय घेतला असून, नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्कसाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.जूनपर्यंत १५ डब्यांच्या लोकल रुळांवरप्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आणि क्षमतेत वाढ करण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेसाठी आवश्यक असलेले फलाट वाढवण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मुंबई विभागातील ३४ रेल्वे स्थानकांवर फलाटांचे विस्तारीकरण केले जात असून, जून महिन्यापर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.मार्चपासून सेफ्टी डोअर लोकलची चाचणीप्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत, दोन सेफ्टी डोअर असलेल्या लोकल ट्रेन मार्च महिन्यापर्यंत ट्रायल बेसिसवर सुरू केल्या जाणार आहेत. या उपक्रमामुळे धावत्या लोकलमधून पडण्याच्या घटना रोखण्यास मदत होईल, असा रेल्वे प्रशासनाचा विश्वास आहे.२०२९ पर्यंत २३८ एसी लोकलमुंबईकरांच्या प्रवासाला गारवा देण्यासाठी २०२९ पर्यंत २३८ एसी लोकल ट्रेन सेवेत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे गर्दीच्या वेळेतही प्रवास अधिक सुखकर होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, पूर्व आणि पश्चिम रेल्वे मार्गांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी विशेष कॉरिडॉर विकसित केला जाणार असून, मालवाहतुकीलाही चालना मिळणार आहे

फीड फीडबर्नर 2 Feb 2026 11:30 pm

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या प्राणप्रतिष्ठा विधीनंतर हे मंदिर सर्वसामान्य भक्तांसाठी दर्शनासाठी खुले झाले असून, ठाण्यातील नवे अध्यात्मिक केंद्र म्हणून या मंदिराकडे पाहिले जात आहे. मुंबई महानगर प्रदेशातील हे सर्वात मोठे त्रिमंदिर मानले जात आहे.ठाणे पश्चिमेकडील बाळकूम–साकेत रोड परिसरात सुमारे १.५ एकर क्षेत्रफळावर या त्रिमंदिराची उभारणी करण्यात आली आहे. महावीर जैन ट्रस्ट आणि दादा भगवान फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून हे मंदिर साकारले असून, धार्मिक समन्वय आणि सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.या त्रिमंदिरात एकाच व्यासपीठावर विविध धर्मांचे आराध्य दैवत विराजमान करण्यात आले आहेत. यामध्ये *जैन धर्माचे श्री सीमांधर स्वामी, शैव धर्माचे भगवान शिव, तसेच वैष्णव परंपरेतील भगवान कृष्ण यांच्यासह एकूण २५ पूजनीय देवतांची स्थापना करण्यात आली आहे. विविध धर्मांमधील निपक्षपातीपणा आणि समतेची भावना जपण्याचा प्रयत्न या मंदिररचनेतून दिसून येतो.मंदिराच्या स्थापत्यशैलीकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. हे मंदिर जयपूर येथून आणलेल्या पांढऱ्या संगमरवरी दगडापासून बांधण्यात आले असून, त्याची कलात्मक रचना भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. मंदिरातील प्रमुख आकर्षण असलेल्या श्री सीमांधर स्वामी यांच्या मूर्तीची उंची सुमारे १३ फूट असून, तिचे वजन अंदाजे १८ हजार किलो असल्याची माहिती देण्यात आली आहे.हे त्रिमंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नसून सामाजिक समता, धार्मिक सलोखा आणि अध्यात्मिक शांततेचे प्रतीक आहे. मंदिर सुरू झाल्याने ठाणे शहरातील भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, पुढील काळात हे ठिकाण अध्यात्मिक पर्यटनाचेही महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.

फीड फीडबर्नर 2 Feb 2026 11:10 pm

४ दशकांची प्रतीक्षा संपणार; कोल्हापूर–कोकण रेल्वेने जोडले जाणार

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला थेट रेल्वेने जोडणाऱ्या कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे मार्गाचा मार्ग अखेर मोकळा होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक दशकांपासून चर्चेत असलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या टप्प्यावर पोहोचला असून, २०२७ पासून कामाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर कोल्हापूरसह कोकणातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सुलभ होणार आहे.केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आली असून, त्यातील लक्षणीय निधी महाराष्ट्रासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या निधीतून कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. राज्य सरकारही आपल्या वाट्याचा निधी देण्यास तयार असल्यामुळे, भूसंपादन प्रक्रियेला लवकरच गती मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.कोल्हापूरला कोकण रेल्वेशी जोडण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने करण्यात येत होती. या प्रकल्पाला पूर्वीच तत्त्वतः मान्यता मिळाली असून' सर्वेक्षण, सविस्तर प्रकल्प अहवाल आणि प्रशासकीय मंजुरी अशा टप्प्यांतून हा प्रस्ताव पुढेही गेला होता. मात्र विविध कारणांमुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीला विलंब होत गेला.येणारा रेल्वे मार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यांतून जात कोकणातील वैभववाडीपर्यंत पोहोचणार आहे. या मार्गाची एकूण लांबी सुमारे 108 किलोमीटर इतकी असेल. प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादन करावे लागणार असून, त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येणार आहे.या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ६,३०० कोटी रुपये इतका आहे. केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्के खर्च उचलणार आहेत.या मार्गावर डोंगराळ भागातून रेल्वे नेण्यासाठी अनेक अभियांत्रिकी कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने बोगदे, उड्डाणपूल तसेच छोटे-मोठे पूल उभारले जाणार आहेत. सर्वात लांब बोगद्याची लांबी काही किलोमीटरची असणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गावर एकूण दहा रेल्वे स्थानके उभारण्याचा प्रस्ताव आहे.हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर कमी होणार असून, वाहतूक वेळ व खर्चात बचत होण्याची शक्यता आहे. यासोबतच व्यापार, पर्यटन, कृषी वाहतूक आणि स्थानिक उद्योगांना चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे साडेचार ते पाच वर्षांचा कालावधी लागेल, असे नियोजन करण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 2 Feb 2026 11:10 pm

Sunil Gavaskar Statement : पाकिस्तानवर कठोर कारवाई व्हायलाच हवी!”पळपुटेपणावर सुनील गावस्कर संतापले; ICC ला दिला ‘हा’सल्ला

Sunil Gavaskar Statement : पाकिस्तानच्या भारत बहिष्कारावर भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर संतापले असून आयसीसीला कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे.

दैनिक प्रभात 2 Feb 2026 11:05 pm

Manoj Tiwari : भाजप खासदार मनोज तिवारींच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात; 5 जण जखमी

भाजपाचे खासदार मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांच्या ताफ्यातील पोलिस एस्कॉर्ट वाहनाने एका रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षातील पाच प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले

दैनिक प्रभात 2 Feb 2026 10:51 pm

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रासह १२ राज्यांना नोटिसा, काय आहे प्रकरण?

Supreme Court : धर्मांतरविरोधी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेवर आता सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी होणार आहे.

दैनिक प्रभात 2 Feb 2026 10:43 pm

Piyush Goyal: गुंतवणूकदारांची नाराजी दूर करण्यासाठी पियुष गोयल मैदानात; शेअर बाजार प्रमुखांसोबत महत्त्वाची बैठक

Piyush Goyal: स्थूल अर्थव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच नव्या संधी उपलब्ध होण्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

दैनिक प्रभात 2 Feb 2026 10:32 pm

Sri Lanka Squad : टी-२० विश्वचषकासाठी श्रीलंकेचा संघ जाहीर! दासुन शनाकाकडे नेतृत्व, तर दुखापतग्रस्त ‘या’खेळाडूलाही मिळाली संधी

Sri Lanka Squad : यजमान श्रीलंकेने सर्वात शेवटी आपल्या १५ सदस्यीय फौजेची घोषणा केली आहे.

दैनिक प्रभात 2 Feb 2026 10:23 pm

Stock Market: फ्युचर्स आणि ऑप्शन्स व्यवहार महागले; छोट्या गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसाठी सरकारचा निर्णय

Stock Market: अर्थसंकल्पात ऑप्शनच्या व्यवहारावरील सिक्युरिटीज ट्रांझेक्शन टॅक्स 0.1% वरून 0.15% इतका करण्यात आला आहे.

दैनिक प्रभात 2 Feb 2026 10:22 pm

बदलापूरमध्ये अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर; ४०० हून अधिक बांधकामे हटवणार

बदलापूर : नगरपालिका निवडणुकांनंतर बदलापूर शहरात प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून, अनधिकृत बांधकामांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली आहे. अंबरनाथ–बदलापूर महामार्ग आणि पनवेल महामार्गालगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारती व व्यावसायिक गाळ्यांवर आज नगरपालिकेने बुलडोझर चालवला. या अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.गेल्या काही वर्षांत बदलापूरच्या झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे अनधिकृत बांधकामांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. विशेषतः मुख्य रस्त्यालगत उभारलेली दुकाने, गाळे आणि तात्पुरत्या स्वरूपातील बांधकामांमुळे वाहतूक, सौंदर्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर आता नगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे.पालिकेच्या माहितीनुसार, ही कारवाई पुढील ८ ते १० दिवस सलग सुरू राहणार असून, शहरातील सुमारे ४०० पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे हटवण्याचा* निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.पालिकेचे मुख्याधिकारी *मारुती गायकवाड* यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई राबवली जात आहे. “अनधिकृत बांधकामांमुळे शहराचा नियोजित विकास खुंटतो. त्यामुळे नियमबाह्य बांधकामांवर कठोर कारवाई केली जाणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, या कारवाईचे शहरातील अनेक नागरिकांनी स्वागत केले आहे. अनधिकृत बांधकामांमुळे सार्वजनिक जागा अडवल्या जात होत्या, तसेच वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढत होता, अशी नागरिकांची तक्रार होती. मात्र, काही नागरिकांनी ही कारवाई सातत्याने सुरू राहावी आणि भविष्यात पुन्हा अशी बांधकामे उभी राहू नयेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.यापूर्वी अनेक वेळा कारवाईनंतर काही महिन्यांतच त्याच ठिकाणी पुन्हा अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे यावेळी प्रशासन ही मोहीम कितपत प्रभावीपणे राबवते, याकडे संपूर्ण बदलापूरचे लक्ष लागले आहे.

फीड फीडबर्नर 2 Feb 2026 10:10 pm

GDP Growth: 2026च्या जीडीपी वाढीमध्ये भारताने अमेरिकेला टाकले मागे, एलोन मस्क म्हणतात, ‘हे सत्तेच्या संतुलनात बदल’

GDP Growth: आगामी २०२६ सालापर्यंत जागतिक जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) वाढीमध्ये भारताचे योगदान अमेरिकेपेक्षा अधिक असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) वर्तवला आहे.

दैनिक प्रभात 2 Feb 2026 10:06 pm

Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भूखंड वाटप घोटाळ्याप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा

Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत मोठी भर पडली असून, बहुचर्चित ‘पूर्वांचल भूखंड वाटप घोटाळ्या’प्रकरणी ढाका येथील विशेष न्यायालयाने त्यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सध्या भारतात आश्रयाला असलेल्या शेख हसीना यांना न्यायालयाने ‘फरारी’ घोषित केले असून, त्यांच्या अनुपस्थितीतच हा ऐतिहासिक निकाल देण्यात आला. एकेकाळी बांगलादेशच्या राजकारणातील ‘आयर्न लेडी’ मानल्या जाणाऱ्या […]

दैनिक प्रभात 2 Feb 2026 9:47 pm

IND A vs USA : इंडिया ए’चा अमेरिकेवर दणदणीत विजय! जगदीशनचे शतक अन् तिलक वर्माचे अष्टपैलू पुनरागमन

IND A vs USA : सोमवारी झालेल्या पहिल्या सराव सामन्यात इंडिया ए संघाने अमेरिकेचा (USA) ३८ धावांनी पराभव केला.

दैनिक प्रभात 2 Feb 2026 9:39 pm

Amol Mitkari : …तेव्हा अजित पवारांच्या हातावर घड्याळ नव्हतंच; अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा

Amol Mitkari : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमान अपघातातील दुर्दैवी निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून सातत्याने शंका आणि आक्षेप व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक आमदार खासगीत 'दादांच्या' मृत्यूबाबत संशय व्यक्त करत असताना

दैनिक प्रभात 2 Feb 2026 9:15 pm

Paid Holiday : राज्यातील ‘या’कर्मचाऱ्यांना ७ फेब्रुवारीला पगारी सुट्टी

Paid Holiday : ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राज्य सरकारने मतदारांना मोठा दिलासा दिला आहे.

दैनिक प्रभात 2 Feb 2026 9:13 pm

Ajit Pawar ashes: लोकनेते अजितदादा पवार यांच्या अस्थींचे प्रवरासंगम येथे विसर्जन

Ajit Pawar ashes: बारामतीहून आलेल्या या अस्थींचे अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण पूजन करण्यात आले.

दैनिक प्रभात 2 Feb 2026 9:10 pm

Ajit Pawar : अजित पवारांच्या मृत्यूवर भुजबळांनाही व्यक्त केली शंका; म्हणाले…

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाजवळ हा अपघात झाला

दैनिक प्रभात 2 Feb 2026 8:38 pm

अजित पवार यांचे मंत्रालयातील दालन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे कायम

मुंबई : नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मंत्रालयातील अजित पवार यांच्या वापरातील दालने कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला.अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक आणि औकाफ ही खाती सोपविण्यात आली आहेत. त्यानंतर मंत्रालयातील कार्यालयीन व्यवस्थेबाबत निर्णय घेण्यात आला.सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील सहाव्या मजल्यावरील उत्तर बाजूची कार्यालयीन जागा, सातव्या मजल्यावरील पूर्व बाजूची दालने तसेच दालन क्रमांक ७१७ मधील निधी कक्षातून आत प्रवेश केल्यानंतरचा कक्ष, दालन क्रमांक ७२२ व ७२३, तसेच पाचव्या मजल्यावरील उत्तर बाजूचे दालन क्रमांक ५०३ हे कार्यालयीन दालन म्हणून वापरण्यास देण्यात आले आहे. ही सर्व दालने यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वापरात होती.दरम्यान, मलबार हिल येथील ‘देवगिरी’ हा शासकीय बंगला देखील सुनेत्रा पवार यांच्याकडे कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते असताना अजित पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून या बंगल्यात वास्तव्यास होते. आता नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही हाच बंगला अधिकृत निवासस्थान म्हणून देण्यात येणार आहे.

फीड फीडबर्नर 2 Feb 2026 8:30 pm

मुंबईकरांसाठी सुवर्णसंधी म्हाडाकडून मुंबईत १२० घरांची विक्री; या तारखेपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया होणार सुरु

मुंबई : मुंबईत घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळामार्फत विविध वसाहतींमधील एकूण १२० सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही विक्री ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर होणार असून, त्यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे.म्हाडाच्या माहितीनुसार, यामध्ये यापूर्वी सोडतीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या, मात्र काही कारणांमुळे रिक्त राहिलेल्या सदनिकांचा समावेश आहे. इच्छुक नागरिकांना म्हाडाच्या अधिकृत Book My Home पोर्टलवर अर्ज सादर करता येणार आहे.अर्ज प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखाअर्ज करण्यासाठी नागरिकांना सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरून सदनिका निवडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. सदनिका निवड झाल्यानंतर संबंधित विक्री किमतीच्या १० टक्के रकमेचा भरणा ४८ तासांच्या आत करणे बंधनकारक असेल. ही रक्कम वेळेत न भरल्यास सदनिकेवरील हक्क आपोआप रद्द होणार आहे.कोणत्या भागात घरे उपलब्ध‘पहिला येईल त्याला प्राधान्य’ या योजनेअंतर्गत कांदिवली (शिंपोली व चारकोप), अँटॉप हिल-वडाळा, पवई, मानखुर्द, मालाड आदी भागांतील एकूण ८४ सदनिका उपलब्ध आहेत. तसेच विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत प्राप्त झालेल्या घरे घाटकोपर पूर्व, विक्रोळी, भायखळा, ताडदेव, लोअर परळ, सायन आणि अंधेरी पश्चिम (जेव्हीपीडी) परिसरात असून अशा एकूण ३६ सदनिका विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.पात्रतेच्या अटीअर्जदाराचे वय अर्जाच्या दिवशी किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदार भारतीय नागरिक असावा. अविवाहित, विवाहित किंवा घटस्फोटित अर्जदारांसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. आरक्षण प्रवर्गातील अर्जदारांसाठी जात प्रमाणपत्र किंवा पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असेल. आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक आणि वैध ई-मेल आयडी अनिवार्य करण्यात आला आहे.पेमेंट व सदनिका निश्चितीअनामत रक्कम भरल्यानंतर अर्जदाराला उपलब्ध सदनिकांची यादी पाहता येईल. पसंतीची सदनिका निवडल्यावर अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. सदनिका निश्चितीनंतर १० टक्के रक्कम भरल्यावर तात्पुरते देकारपत्र देण्यात येईल. उर्वरित रक्कम ९० दिवसांच्या आत भरणे आवश्यक असून, उशीर झाल्यास व्याज आकारले जाणार आहे.दलालांपासून सावध राहण्याचे आवाहनम्हाडाने स्पष्ट केले आहे की या प्रक्रियेसाठी कोणत्याही एजंट किंवा दलालाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडून फसवणूक झाल्यास म्हाडा जबाबदार राहणार नाही. नागरिकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळ व अधिकृत संपर्क क्रमांकांवरूनच माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. एकूणच, मुंबईत घर घेण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असून, मर्यादित सदनिकांमुळे अर्जदारांमध्ये मोठी स्पर्धा रंगणार आहे.

फीड फीडबर्नर 2 Feb 2026 8:30 pm

T20 World Cup 2026 : T२० विश्वचषक २०२६ चा बिगुल वाजला! १९ देशांचे अंतिम संघ जाहीर; पाहा सर्व संघांची संपूर्ण यादी

दुबई : आगामी ICC पुरुष T२० विश्वचषक २०२६ साठी क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून सहभागी होणाऱ्या २० पैकी १९ देशांनी आपले अंतिम संघ जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या नावांवर शिक्कामोर्तब केले असून केवळ श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अद्याप आपला अधिकृत संघ सार्वजनिक केलेला नाही. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी तरुण आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण असलेले संघ मैदानात उतरवले आहेत.भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडेभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अपेक्षेप्रमाणे सूर्यकुमार यादव याच्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. भारतीय संघात अभिषेक शर्मा, टिळक वर्मा आणि रिंकू सिंह यांसारख्या आक्रमक फलंदाजांना स्थान मिळाले आहे, तर यष्टीरक्षणाची जबाबदारी संजू सॅमसन आणि ईशान किशन यांच्यावर असेल. हार्दिक पंड्या अष्टपैलू खेळाडू म्हणून कणा असेल, तर गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव सांभाळतील.ऑस्ट्रेलियाला दुखापतीचा फटकाअंतिम संघ जाहीर करण्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू पॅट कमिन्स आणि मॅथ्यू शॉर्ट हे दुखापतीमुळे या विश्वचषकातून बाहेर पडले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाला आपली रणनीती बदलावी लागणार आहे.T२० विश्वचषक २०२६: 'गट अ'आगामी विश्वचषकासाठी 'गट अ' मधील भारत, पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्स या देशांनी आपले अंतिम १५ खेळाडू निश्चित केले आहेत.१. भारत (India)भारतीय संघाचे नेतृत्व आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवकडे देण्यात आले आहे. संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल राखण्यात आला आहे.संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, ईशान किशन, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.२. पाकिस्तान (Pakistan)पाकिस्तानने या स्पर्धेसाठी सलमान अली आगावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.संघ: सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा नाफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सायम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान, उस्मान तारिक.३. अमेरिका (USA)यजमान अमेरिकेच्या संघात भारतीय वंशाच्या खेळाडूंचा मोठा भरणा आहे.संघ: मोनांक पटेल (कर्णधार), जेसी सिंग, अँड्रिज गॉस, शेहान जयसूर्या, मिलिंद कुमार, शयन जहांगीर, साईतेजा मुक्कामला, संजय कृष्णमूर्ती, हरमीत सिंग, नोस्थुश केंजिगे, शेडली व्हॅन शॉकविक, सौरभ नेत्रावळकर, अली खान, मोहम्मद मोहसीन, शुभम रांजणे.४. नेदरलँड्स (Netherlands)स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वाखालील नेदरलँड्सचा संघ अनुभवी खेळाडूंसह मैदानात उतरेल.संघ: स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन अकरमन, नोह क्रोस, बास डी लीडे, आर्यन दत्त, फ्रेड क्लासेन, काइल क्लेन, मायकेल लेविट, झॅक लायन-कॅशेट, मॅक्स ओ'डॉड, लोगान व्हॅन बीक, टिम व्हॅन डर गुगटेन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, पॉल व्हॅन मीकरेन, साकिब झुल्फिकार.५. नामिबिया (Namibia)नामिबियाचा संघ अष्टपैलू खेळाडूंच्या जोरावर स्पर्धेत आव्हान निर्माण करण्यास सज्ज आहे.संघ: गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), झेन ग्रीन, बर्नार्ड शोल्ट्झ, रुबेन ट्रम्पलमन, जेजे स्मित, जॅन फ्रायलिंक, लोरेन स्टीनकाम्प, मालन क्रुगर, निकोल लोफ्टी-ईटन, जॅक ब्रासेल, बेन शिकोंगो, जेसी बाल्ट, डायलन लीचर, डब्ल्यूपी मायबर्ग, मॅक्स हिंगो. (राखीव खेळाडू: अलेक्झांडर वोल्शेनक)T२० विश्वचषक २०२६: 'गट ब''गट ब' मध्ये ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि ओमान या संघांनी आपले खेळाडू जाहीर केले आहेत, तर श्रीलंकेच्या अधिकृत संघाची प्रतीक्षा अजून कायम आहे.१. ऑस्ट्रेलिया (Australia)पॅट कमिन्सच्या दुखापतीनंतर मिचेल मार्श याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. संघात मॅक्सवेल, हेड आणि स्टॉइनिस यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे.संघ: मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, टिम डेव्हिड, बेन ड्वार्शुइस, कॅमेरून ग्रीन, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू रेनशॉ, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झॅम्पा.२. झिम्बाब्वे (Zimbabwe)अनुभवी सिकंदर रझा झिम्बाब्वेचे नेतृत्व करणार असून संघात ब्रेंडन टेलरचे पुनरागमन झाल्याचे दिसत आहे.संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, ग्रॅमी क्रेमर, ब्रॅडली इव्हान्स, क्लाइव्ह मडांडे, टिनोटेन्डा मापोसा, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाकादझा, टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुझाराबानी, डियॉन मायर्स, रिचर्ड एनगारावा, ब्रेंडन टेलर.३. आयर्लंड (Ireland)आयर्लंडची धुरा अनुभवी फलंदाज पॉल स्टर्लिंग याच्या खांद्यावर आहे.संघ: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, रॉस अडायर, बेन कॅलिट्झ, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, मॅथ्यू हम्फ्रेस, जोश लिटल, बॅरी मॅकार्थी, हॅरी टेक्टर, टिम टेक्टर, लॉर्कन टकर, बेन व्हाईट, क्रेग यंग.४. ओमान (Oman)ओमानच्या संघात भारतीय वंशाच्या अनेक खेळाडूंचा समावेश असून जतिंदर सिंग संघाचे नेतृत्व करेल.संघ: जतिंदर सिंग (कर्णधार), विनायक शुक्ला, मोहम्मद नदीम, शकील अहमद, हम्माद मिर्झा, वसीम अली, करण सोनावणे, शाह फैजल, नदीम खान, सुफयान महमूद, जय ओडेद्रा, शफीक जान, आशिष ओडेदरा, जितेन रामानंदी, आमिर कलीम.५. श्रीलंका (Sri Lanka)श्रीलंकेच्या अंतिम संघाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.T२० विश्वचषक २०२६: 'गट क''गट क' मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या माजी विजेत्यांसह इटली, नेपाळ आणि स्कॉटलंड या संघांच्या अंतिम नावांची घोषणा करण्यात आली आहे.१. इंग्लंड (England)इंग्लंडने या स्पर्धेसाठी हॅरी ब्रूक याच्याकडे कर्णधारपद सोपवून सर्वांना चकित केले आहे. संघात जोफ्रा आर्चरचे पुनरागमन झाले असून जोस बटलर हा अनुभवी खेळाडू म्हणून संघात असेल.संघ: हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, सॅम कुरन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जोश टंग, ल्यूक वुड.२. वेस्ट इंडिज (West Indies)यजमान वेस्ट इंडिजच्या संघाचे नेतृत्व शाई होप करणार आहे. संघात शिमरॉन हेटमायर आणि जेसन होल्डर यांसारख्या स्फोटक खेळाडूंचा समावेश आहे.संघ: शाई होप (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जेसन होल्डर, अकेल होसेन, शामर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोटी, रोव्हमन पॉवेल, शेर्फेन रदरफोर्ड, क्विंटन सॅम्पसन, जयडेन सील्स, रोमारियो शेफर्ड.३. इटली (Italy)इटलीच्या संघात अनेक अनुभवी परदेशी वंशाच्या खेळाडूंचा समावेश असून वेन मॅडसेन संघाचे नेतृत्व करेल.संघ: वेन मॅडसेन (कर्णधार), मार्कस कॅम्पोपियानो, जियान पिएरो मीड, झैन अली, अली हसन, क्रिशन जॉर्ज कालुगामगे, हॅरी मॅनेन्टी, अँथनी मोस्का, ज्युस्टिन मोस्का, सय्यद नकवी, बेंजामिन मॅनेन्टी, जसप्रीत सिंग, जेजे स्मट्स, ग्रँट स्टुअर्ट, थॉमस ड्राका.४. नेपाळ (Nepal)नेपाळची धुरा युवा रोहित पौडेल याच्याकडे असून संदीप लामिछाने हा त्यांच्या गोलंदाजीचा मुख्य कणा असेल.संघ: रोहित पौडेल (कर्णधार), दीपेंद्र सिंग ऐरी, संदीप लामिछाने, कुशल भुर्टेल, आसिफ शेख, संदीप जोरा, आरिफ शेख, बासिर अहमद, सोमपाल कामी, करण केसी, नंदन यादव, गुलशन झा, ललित राजबंशी, शेर मल्ला, लोकेश बम.५. स्कॉटलंड (Scotland)रिची बेरिंग्टन यांच्या नेतृत्वाखालील स्कॉटलंडचा संघ अनुभवी आहे. त्यांनी काही राखीव खेळाडूंचीही निवड केली आहे.संघ: रिची बेरिंग्टन (कर्णधार), टॉम ब्रुस, मॅथ्यू क्रॉस, ब्रॅडली करी, ऑलिव्हर डेव्हिडसन, ख्रिस ग्रीव्ह्स, झैनुल्ला इहसान, मायकेल जोन्स, मायकेल लीस्क, फिनले मॅकक्रेथ, ब्रँडन मॅकमुलन, जॉर्ज मुन्से, सफयान शरीफ, मार्क वॅट, ब्रॅडली व्हील.राखीव खेळाडू: जॅस्पर डेव्हिडसन, जॅक जार्विस (प्रवास करणारे); मॅकेन्झी जोन्स, ख्रिस मॅकब्राइड, चार्ली टीअर.T२० विश्वचषक २०२६: 'गट ड'विश्वचषकाच्या साखळी फेरीतील सर्वात आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या 'गट ड' मध्ये दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांसारख्या बलाढ्य संघांचा समावेश आहे.१. दक्षिण आफ्रिका (South Africa)दक्षिण आफ्रिकेने एडन मार्करम याच्या नेतृत्वाखाली अतिशय संतुलित संघ निवडला आहे. संघात क्विंटन डी कॉक आणि डेव्हिड मिलर यांसारख्या अनुभवी फलंदाजांसह क्वेना मफाका या युवा गोलंदाजालाही संधी मिळाली आहे.संघ: एडन मार्करम (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक, मार्को यानसेन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना मफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स.२. न्यूझीलंड (New Zealand)न्यूझीलंडची धुरा फिरकीपटू मिचेल सँटनर याच्याकडे सोपवण्यात आली आहे. संघात रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेल यांसारख्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंचा समावेश आहे.संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, काइल जेमिसन, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम सायफर्ट, ईश सोढी.३. अफगाणिस्तान (Afghanistan)जागतिक दर्जाचा फिरकीपटू राशिद खान अफगाणिस्तानचे नेतृत्व करणार आहे. त्यांच्या संघात फिरकी आणि वेगवान गोलंदाजीचा उत्तम समतोल आहे.संघ: राशिद खान (कर्णधार), नूर अहमद, अब्दुल्ला अहमदझाई, सिद्दिकीउल्लाह अटल, फजल हक फारुकी, रहमानउल्ला गुरबाज, नवीन उल हक, मोहम्मद इशाक रहीमी, शाहिदउल्ला कमाल, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मुजीब उर रहमान, दरविश रसूली, इब्राहिम झाद्रान.राखीव खेळाडू: एएम गझनफर, इजाज अहमद अहमदझाई, झिया उर रहमान शरीफी.४. कॅनडा (Canada)कॅनडाच्या संघात दिलप्रीत बाजवा याच्याकडे कर्णधारपद असून संघात भारतीय वंशाच्या अनेक खेळाडूंचा समावेश आहे.संघ: दिलप्रीत बाजवा (कर्णधार), अजयवीर हुंदल, अंश पटेल, डिलन हेलीगर, हर्ष ठाकर, जसकरणदीप बुट्टर, कलीम सना, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, निकोलस किर्टन, रविंदरपाल सिंग, साद बिन झफर, शिवम शर्मा, श्रेयस मोव्वा, युवराज सामरा.५. संयुक्त अरब अमिराती (UAE)युएईच्या संघाचे नेतृत्व मुहम्मद वसीम करणार असून त्यांच्या संघातही अनेक अनुभवी स्थानिक खेळाडूंना स्थान मिळाले आहे.संघ: मुहम्मद वसीम (कर्णधार), अलीशान शराफू, आर्यांश शर्मा, ध्रुव पराशर, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मयंक कुमार, मुहम्मद अरफान, मुहम्मद फारूक, मुहम्मद जवादुल्लाह, मुहम्मद जोहेब, रोहिद खान, सोहेब खान, सिमरणजीत सिंग.

फीड फीडबर्नर 2 Feb 2026 8:10 pm

Maharashtra IAS Transfer : राज्यातील ४ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पहा कोणाची कुठे बदली..

Maharashtra IAS Transfer : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यापासून दर १०-१५ दिवसांनी बदल्यांचा निर्णय घेतला असून, प्रशासन 'ॲक्टिव्ह' मोडवर ठेवण्यावर त्यांचा भर आहे.

दैनिक प्रभात 2 Feb 2026 7:59 pm

IND vs PAK Match : भारत-पाक सामना रद्द झाल्यास ४,५०० कोटींचे होणार नुकसान! कोणाला बसणार सर्वाधिक फटका? पाहा आकडेवारी

IND vs PAK Match : टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द झाला तर क्रिकेटच्या व्यावसायिक परिसंस्थेला ४,५०० कोटी रुपयांचा प्रचंड फटका बसणार आहे.

दैनिक प्रभात 2 Feb 2026 7:59 pm

Sanjay Raut : अजित पवारांच्या विमान अपघातावेळी ‘ती’ फाईल त्यांच्याबरोबरच होती? राऊतांचा खळबळजनक दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाबाबत राज्यातून आणि संसदेतून वेगवेगळ्या शंका उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)

दैनिक प्रभात 2 Feb 2026 7:33 pm

राष्ट्रवादीच्या मुंबई पदाधिकाऱ्यांकडून 'दादांच्या'अस्थींचे विधीपूर्वक विसर्जन...

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज विधीपूर्वक बाणगंगा तलाव वाळकेश्वर येथे करण्यात आले.अमर रहे...अमर रहे... अजितदादा अमर रहे... अशा घोषणा देत अजितदादांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, आमदार सना मलिक शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी,प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, मुंबई उपाध्यक्ष कप्तान मलिक, प्रदेश सरचिटणीस नरेंद्र राणे, जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, अजय विचारे,इंद्रपाल सिंग, सुरेश भालेराव,महिला अध्यक्षा आरती साळवी , कार्याध्यक्षा मनिषा तुपे, ओबीसी सेलचे मुंबई अध्यक्ष बबन मदने, सहकार सेलचे मुंबई अध्यक्ष नंदकुमार काटकर, मुंबई सरचिटणीस दिपक पारडीवाला आदींसह सर्व तालुकाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्षा, महिला तालुकाध्यक्षा,पक्षाचे प्रदेश, मुंबई पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 2 Feb 2026 7:30 pm

Accident News : कोंडाईबारी घाटात लालपरीचा भीषण अपघात, दोन कंटेनरमध्ये बसचा अक्षरशः चुराडा, १५ प्रवाशांचा जीव...

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात आज एका भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. विसरवाडी पोलीस चौकी परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी उभी असलेल्या नवापूर आगाराच्या एसटी बसला एका सुसाट कंटेनरने मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बसमधील चालक आणि वाहकासह एकूण १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे दृश्य पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारे आले, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे घाटातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.https://prahaar.in/2026/02/02/ncps-mumbai-office-bearers-perform-the-ritualistic-immersion-of-dadas-ashes/कंटेनरच्या धडकेत एसटी बसचा चक्काचूर अन्...सुरत-धुळे महामार्गावर १ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास एक थरारक अपघात घडला. नवापूर आगाराची पुणे-नवापूर बस (MH 14 BT 1957) महामार्गावर उभी असताना, मागून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने तिला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बस समोर असलेल्या ट्रक आणि मागचा कंटेनर यांच्यामध्ये अक्षरशः चिरडली गेली. समोरच्या ट्रकचा लोखंडी अँगल बसच्या केबिनमध्ये घुसल्याने बसच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातात बस चालक महेंद्र लाजा गावित हे केबिनमध्ये अडकून पडले होते, तर वाहक संतोष बारसू सोंडे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर चालकाला केबिनमधून सुखरूप बाहेर काढले. जखमींवर सध्या उपचार सुरू असून, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.१५ प्रवाशांचा जीव...जामनपाडा येथील मनोहर जयवंत गावित यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे जखमींना वेळेवर उपचार मिळणे शक्य झाले. त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवत आपल्या खाजगी वाहनातून गंभीर जखमींना तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलवले. बसमध्ये एकूण १५ प्रवासी होते, ज्यात नवापूर, साक्री, सुरत आणि सटाणा येथील नागरिकांचा समावेश होता. सुदैवाने, या भीषण अपघातात बहुतांश प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले. आपत्कालीन सेवांच्या मदतीने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

फीड फीडबर्नर 2 Feb 2026 7:30 pm

हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशवृक्ष लागवड मोहिमेत स्टार्टअपचा सहभाग घ्यावारोप निर्मितीसाठी खासगी नर्सरी व बचतगटांचा सहभाग घ्यावामुंबई : पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ३०० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात या क्षेत्रातील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था याच्याबरोबरच स्टार्टअपचा सहभाग घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.प्रस्तावित हरित प्राधिकरण - ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवास्थानी आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील वनक्षेत्र ३३ टक्के करण्यासाठी मिशन मोडवर हा कार्यक्रम हाती घ्यावा. या कार्यक्रमाच्या समन्वयासाठी हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा. शासकीय विभाग, विविध संस्थाबरोबरच या विषयातील स्टार्टअपचा सहभाग या मोहिमेसाठी घ्यावा.स्टार्टअपची इकोसिस्टीम तयार करून रोजगार निर्मिती करता येईल.मराठावाड्यासारख्या कमी वृक्षाच्छादन असलेल्या भागात हा कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यात यावा. हरित महाराष्ट्र उपक्रमांतर्गत रोप उपलब्धतेनुसार पहिल्या वर्षात सुमारे २० कोटीपर्यंत वृक्ष लागवड हाती घ्यावी. यामध्ये बांबू, साग लागवड करण्यात यावी. यासाठी लागणारी रोपे तयार करण्यासाठी शासकीय नर्सरी बरोबरच खासगी नर्सरी, बचतगट यांचाही सहभाग घ्यावा. या कार्यक्रमातील सर्व शासकीय विभागाबरोबरच वन विभाग, नर्सरी यांना उद्दिष्टे ठरवून द्यावीत, ग्रामीण भागात शेतकरी, युवा, महिलांचा सहभाग घ्यावा. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.यावेळी ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी या उपक्रमांचे सादरीकरण केले. या मिशन अंतर्गत राज्यातील विविध कृषी-हवामान पट्ट्यांनुसार स्थानिक परिसंस्थेला अनुरूप प्रजातींचीच लागवड करण्यात येणार असून, गवताळ प्रदेश व दलदलींमध्ये वृक्ष लागवड न करता त्यांचे पुनर्संचयितीकरण केले जाणार आहे. या मिशनची अंमलबजावणी डिजिटल व उपग्रह-आधारित रिअल-टाईम निरीक्षण प्रणालीद्वारे होणार असून, लागवड आणि वृक्ष जगण्याचा दर पारदर्शकपणे नोंदवला जाणार आहे. झाडे जिवंत असण्याचा दर, जंगलाची निर्मिती आणि रोपांच्या वाढीची नियमित तपासणी करण्यात येणार आहे.मनरेगा, कॅम्पा, कृषी विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांद्वारे तीन ते पाच वर्षांची निगा सुनिश्चित करण्यात आली आहे. तथापी वृक्ष जगण्यासाठी हा कालावधी १० वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमातून भूजल पुनर्भरण, मातीची सुपीकता, जैवविविधता वाढीसोबतच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे वरिष्ठ आर्थिक सल्लागार तथा मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगरविकास (२) विभागाचे अपर मुख्य सचिव के. एच गोविंदराज, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, मृद व जलसंधारण सचिव गणेश पाटील, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वन संरक्षक (सामाजिक वनीकरण) विवेक खांडेकर, महाराष्ट्र रिमोट सेन्सिग अप्लिकेशन सेंटरचे (एमआरएसएसी) चे संचालक श्री. कोलते आदी उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 2 Feb 2026 7:30 pm

Hair Health: आता डाय न करताच केस पुन्हा होतील काळे! शास्त्रज्ञांनी शोधला अत्यंत सोपा मार्ग

Hair Health: शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, पांढरे झालेले केस पुन्हा नैसर्गिकरित्या काळे करणे आता शक्य होऊ शकते. या संशोधनाने केस गळती आणि पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त असलेल्यांना एक आशेचा किरण दाखवला आहे.

दैनिक प्रभात 2 Feb 2026 7:21 pm

Schools Timing : ‘या’शाळांच्या वेळा बदलणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

Schools Timing : कर्नाटक सरकारने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील रमजान महिन्याचा विचार करून राज्यातील सर्व सरकारी आणि अनुदानित उर्दू शाळांच्या वेळेत बदल केला आहे

दैनिक प्रभात 2 Feb 2026 7:16 pm

BCCI Rajeev Shukla : पाकिस्तानच्या ‘आडमुठेपणा’वर BCCIची पहिली प्रतिक्रिया! राजीव शुक्ला यांनी दिला थेट इशारा; पाहा काय म्हणाले?

BCCI Rajeev Shukla : बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या प्रकरणावर भाष्य करताना पाकिस्तानच्या भूमिकेचा निषेध केला आहे.

दैनिक प्रभात 2 Feb 2026 7:13 pm

पुण्यात मेट्रोच्या विस्ताराला गती, हिंजवडी पिंपरी पासून .. कुठून कसा असेल मार्ग? जाणून घ्या...

पुणे : पुणेकरांचा प्रवास आता लवकरच आरामदायी होणार आहे. कारण पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन लवकरच सुरू होणार असून प्रवासाचा वेळ हा कमी होणार आहे. रेल्वे प्रमाणे आता मेट्रोही आपले जाळे देशभरात विणत चालली आहे. मेट्रो ही काळाची गरज आहे. त्यामुळे मेट्रोचा विस्तार हा झपाटयाने होत आहे.पुणेकरांच्या वेळेची होणार बचत हिंजवडी ते शिवाजी नगरपर्यंत प्रवास करायला सध्या २ तास लागतात. हाच वेळ सरळ अर्ध्या तासावर येणार आहे. त्यासोबतच काळ जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात पुण्यातील मेट्रो मार्गिकेचा विस्तार करण्यासाठी ५१७ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली गेली आहे.मेट्रो ३ चे मार्चमध्ये होणार उदघाटन पुणेकरांसाठी हि सेवा मार्च मध्ये सुरु होणार असून उन्हाच्या तडाख्यात पुणेकरांना गारेगार प्रवास करायला मिळणार आहे. हिंजवडी ते शिवाजी नगर या चाचणी फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून पुणे मेट्रो ३ उदघाटनासाठी सज्ज झाली आहे.मेट्रोमुळे पुणेकरांना मिळणार वाहतूक कोंडीतून सुटका या मेट्रोचे कनेक्शन थेट पुण्याच्या आयटी सेक्टरशी जोडले जाणार आहे. या मार्गावर आयटी कर्मचाऱ्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही लवकरच संपणार आहे. त्यामुळे तब्बल २ लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.विद्यापीठ चौकात या मेट्रोवरती डबल डेकर वाहतूक मार्ग उभारणार आहेत. यामुळे सर्वाधिक वाहतूक कोंडी असल्या भागातील कोंडी फोडण्यात यश मिळणार आहे. यामध्ये सर्वात खालच्या स्थरावर स्थानिक वाहनांची वाहतूक त्यावरील उड्डाणपुलावर आणखी एक वाहतूक मार्ग आणि त्यावरती मेट्रो मार्गिका असणार आहे.कोणत्या स्थानकांचा होणार समावेश काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात महा मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार करण्याबाबत माहिती देण्यात आली. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन मार्गिका सुरु असून, तिसरी प्रवाशांसाठी लवकरच सुरु होईल. तसेच, २०२७ पर्यंत पिंपरी- निगडी अशी ४.५ किमी लांब मेट्रोचं काम पूर्ण होण्याची शक्यात आहे. या मार्गिकेच ५० टक्के काम सध्या पूर्ण झाले आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात विस्तारामध्ये खडकवासला- स्वारगेट- खराडी , रामवाडी- वाघोली-विठ्ठलवाडी, वनाज - चांदणी चौक आणि नल स्टॉप- वारजे या प्रमुख मार्गांचा समावेश आहे.

फीड फीडबर्नर 2 Feb 2026 7:10 pm

मराठवाड्यातील ‘दुष्काळ’ पुसून टाकणार, वॉटर ग्रीड पुन्हा सुरू, कन्नडचा बॅकलॉग भरून काढण्याचा शिंदेंचा निर्धार

देवगाव रंगारीतील जाहीर सभेला प्रचंड प्रतिसादजिल्हा परिषदवर विकासाचा भगवा फडकवण्याचे शिंदेंचे आवाहनछत्रपती संभाजीनगर : मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आधीच्या सरकारने बासनात गुंडाळून ठेवला होता, मात्र आमच्या सरकारने तो पुन्हा सुरू केला असून मराठवाड्यातील “दुष्काळ” हा शब्द कायमचा पुसून टाकण्याचा आमचा निर्धार आहे. यासाठी निधीची कमतरता कधीही भासू दिली जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कन्नड तालुक्याला आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे विकास निधी मिळाला नसल्याचे मान्य करत, येत्या काळात कन्नडचा विकास बॅकलॉग भरून काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या सभेला प्रचंड गर्दीचा महापूर लोटला होता.यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार संजना जाधव, आमदार प्रा.रमेश भोरनारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, उमेदवार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सभेला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत शिंदे म्हणाले की, राज्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे दुःखाचे सावट आहे. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी या कठीण काळातही निवडणुका टाळता येत नसल्याने प्रचार सभा घ्याव्या लागत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे ते म्हणाले. कन्नड, वैजापूर आणि गंगापूर या तीन तालुक्यांतील सर्व पदाधिकारी, उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. शिंदे यांनी आपल्या भाषणात महिलांच्या सहभागावर विशेष भर दिला. “ज्या उमेदवारांच्या पाठीशी लाडक्या बहिणी उभ्या असतात, त्यांचा विजय निश्चित असतो,” असा अनुभव विधानसभेपासून नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकांपर्यंत घेतल्याचे त्यांनी सांगितले.आपल्या जीवनप्रवासाचा उल्लेख करत ते म्हणाले की, आपणही शेतकऱ्याचा मुलगा असून गरिबी, आईची तगमग आणि पत्नीची काटकसर जवळून पाहिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वप्रथम “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” सुरू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेवर विरोध झाला, न्यायालयात आव्हाने दिली गेली, मात्र आज या योजनेमुळे लाखो महिलांना आधार मिळाल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.या योजनेवर वर्षाला सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च होत असल्याचा उल्लेख करत, हा खर्च अर्थव्यवस्थेला चालना देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक महिलांनी या रकमेतून लहान व्यवसाय सुरू केले, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय उपचार आणि घरखर्चाला हातभार लावला असल्याच्या यशकथा त्यांनी उदाहरणांसह मांडल्या.शिंदे यांनी शिक्षण धोरणाविषयी बोलताना एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेचा उल्लेख केला. त्या घटनेनंतर उच्च शिक्षणासाठी ५० टक्क्यांऐवजी १०० टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. “राज्य हे सर्वसामान्यांचे आहे. शिक्षणासाठी कोणालाही आत्महत्या करावी लागू नये, ही आमची भूमिका आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी पीक विमा योजना, नुकसान भरपाई, सततच्या पावसामुळे झालेल्या हानीसाठी 32 हजार कोटींचे पॅकेज आणि शेतकरी कर्जमाफीचा निर्णय महायुती सरकारने घेतल्याचे सांगितले.मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांवर भर देत ते म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प पुन्हा सुरू करून दुष्काळ कायमचा संपवण्याचा संकल्प सरकारचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्या कार्यकाळात ७० ते ८० हजार रुग्णांना सुमारे ४५० कोटी रुपयांची मदत देण्यात आली. “हे पैसे जनतेचे आहेत, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आहेत, साठवण्यासाठी नाहीत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.कन्नड तालुक्याच्या विकासाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, आतापर्यंत कमी निधी मिळाल्याचा बॅकलॉग आता भरून काढला जाईल. रस्ते, पाणी, उद्योग, पर्यटन आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून विकासाला गती दिली जाईल, असे आश्वासन दिले.महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक हे सरकारचे केंद्रबिंदू असल्याचे सांगत, “जे बोलतो ते करून दाखवतो, हा आमचा स्वभाव आहे,” असे त्यांनी नमूद केले. शिंदे यांनी विरोधकांवर नाव न घेता टीका करताना म्हटले की, काही लोक फक्त आरोप करतात, घोषणा करतात आणि निवडणुकीपुरते आश्वासन देतात. मात्र आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, हा आमचा स्वभाव आहे. कामातून उत्तर देण्याची आमची परंपरा असून सत्ता येते आणि जाते, पण दिलेला शब्द पाळणारे नेते जनतेच्या मनात कायम राहतात, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. भाषणाच्या शेवटी येत्या ७ तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन शिंदे यांनी मतदारांना केले.“संभाजीनगर हे ऐतिहासिक शहर आहे. जिल्हा परिषदवर विकासाचा भगवा फडकवायचा असेल, तर सर्व उमेदवारांना निवडून द्या. निधी कधीही कमी पडू देणार नाही, हा शब्द मी देतो,” असे सांगत त्यांनी भाषणाची सांगता केली.

फीड फीडबर्नर 2 Feb 2026 7:10 pm

5G Internet Slow Problem: 5G नेटवर्क असूनही इंटरनेट स्लो चालतंय? ‘या’सोप्या सेटिंग्ज बदलून वाढवा डेटाचा वेग

5G Internet Slow Problem: जर तुमच्याही स्मार्टफोनमध्ये ५जी असून इंटरनेट नीट चालत नसेल, तर काही साध्या सेटिंग्ज बदलून तुम्ही ही समस्या घरबसल्या सोडवू शकता.

दैनिक प्रभात 2 Feb 2026 6:58 pm

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाजपची संमती गरजेची; छगन भुजबळांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पक्षाच्या विलीनीकरणावर महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

दैनिक प्रभात 2 Feb 2026 6:47 pm

Prince Andrew: ब्रिटीश राजघराण्यात पुन्हा भूंकप; एपस्टीन प्रकरणात दुसऱ्या महिलेचे खळबळजनक आरोप; प्रिन्स अँड्र्यू अडचणीत

Prince Andrew: एका फोटोमध्ये प्रिन्स अँड्र्यू जमिनीवर झोपलेल्या एका महिलेवर गुडघे टेकून बसल्याचे दिसत आहेत.

दैनिक प्रभात 2 Feb 2026 6:40 pm

Mumbai Mayor : अखेर तारीख ठरली ! ‘या’दिवशी ठरणार मुंबईचा महापौर

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीची (Mumbai Mayor) चर्चा जोरात सुरू होती. राज्यभरातील २९ महापालिकांसाठी झालेल्या या निवडणुकीत मुंबईची बृहन्मुंबई महानगरपालिका केंद्रस्थानी होती

दैनिक प्रभात 2 Feb 2026 6:33 pm

Nishida Sliding Apology : चेंडू चुकून महिला जजला लागला अन् खेळाडूने जे केलं ते पाहून जग थक्क! जपानी संस्कृतीचं जगभर कौतुक

Nishida sliding Apology : २६ वर्षीय स्टार खेळाडू निशिदा याने एका चुकीसाठी मागितलेली माफी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दैनिक प्रभात 2 Feb 2026 6:26 pm

Today Top 10 News: शरद पवारांचे फडणवीसांना सडेतोड उत्तर ते सोने-चांदीत पुन्हा मोठी घसरण…वाचा आजच्या टाॅप बातम्या

Today Top 10 News: वाचा आजच्या राज्य, देश-विदेशसह टाॅप बातम्या...

दैनिक प्रभात 2 Feb 2026 6:26 pm