SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
... ...View News by News Source

समुद्राचे पाणी निळे का दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटीलरोजच्यासारखे सीता व नीता या दोघी बहिणींनी संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर आपला गृहपाठ आटोपला व मावशीजवळ जाऊन बोलू लागल्या.“मावशी आता आम्हाला साबणाच्या फुग्यांची माहिती सांग बरं.” निता म्हणाली.“आम्ही लक्षपूर्वक ऐकतो व आमच्या मैत्रिणींनासुद्धा सांगू.” दोघींनीही पुन्हा मावशीला एकसाथ सांगितले.“शाब्बास! म्हणजे तुम्ही ज्ञानपोट्या नाहीत तर.” मावशी म्हणाली.“मावशी! ज्ञानपोट्या म्हणजे काय गं?” सीताने विचारले.“ज्ञानपोट्या म्हणजे आपणास मिळालेल्या ज्ञानाने बेडकाप्रमाणे आपलेच पोट फुगवून ठेवणे. इतरांना काहीच न सांगणे.” मावशीने सांगितले.“नाही गं मावशी! आम्ही दोघीही आपल्या मैत्रिणींना सारं सांगतो. कारण आई नेहमीच म्हणते, “जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांना सांगावे।” नीता म्हणाली.“आणि शहाणे करूनी सोडावे। सकळ जन।।.” सीताने पुढील ओळ पूर्ण केली.“पुन्हा शाब्बास!” मावशी खूश होत म्हणाली, “म्हणजे तुम्ही ज्ञानपोट्या नसून ज्ञानवाट्या आहेत.”“आता हे ज्ञानवाट्या काय आहे गं मावशी?” नीताने प्रश्न केला व पुढे बोलली,“आम्हाला भांड्यांतील वाट्या माहीत आहेत.”“वाट्या म्हणजे भांड्यांतील वाट्या नाहीत, तर ज्ञानवाट्या म्हणजे ज्ञान वाटणाऱ्या. अशा उदार मनाच्या मुली आहात तुम्ही.” मावशी बोलली.“आणि मावशी आम्ही आमच्या मैत्रिणींजवळची माहितीसुद्धा त्यांना विचारून घेतो.” सीताने सांगितले.“छान! म्हणजे तुम्ही ज्ञान देणाऱ्या, घेणाऱ्या, ज्ञानदेत्याघेत्या पेट्या आहात तर! छान! छान! बंर माझ्या ज्ञानदेत्या, ज्ञानघेत्या मुली आहेत.“मावशी, आम्ही समुद्र, तर काही पाहिला नाही पण समुद्राचे पाणीही निळेच दिसते म्हणतात. ते खरे आहे का?” नीताने विचारले.“पण पाण्याला तर रंग नाही ना मावशी. मग समुद्राचे पाणी निळे का दिसते?” सीताने योग्य प्रश्न केला.“खरे पाहता शुद्ध पाण्याला रंगच नाही. सूर्यप्रकाश जेव्हा पाण्यावर पडतो तेव्हा त्यातील थोडासा प्रकाश पाण्यात शोषला जातो. थोडासा प्रकाश पाण्यावरून परावर्तित होतो. बाकीचा सारा प्रकाश हा पाण्यातून आरपार जातो. त्यामुळे पाण्याला रंगच नाही व त्यात जो रंग मिसळला त्याचा रंग त्याला येतो. पण समुद्राचे पाणी हे निळेच दिसते. त्याचे कारण असे आहे की, निळ्या आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात पडल्यामुळे आपणास तलावाचे वा कोणत्याही मोठ्या जलाशयाचे तसेच अथांग सागराचे पाणीसुद्धा निळे दिसते; परंतु आपल्या भारताचे नोबेल पारितोषिक विजेते जगप्रसिद्ध व सुप्रख्यात शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी प्रकाशकिरण समुद्राच्या पाण्यातून जात असतांना त्यांचेसुद्धा विकिरण होते म्हणून समुद्राचे पाणी निळे दिसते असे प्रतिपादन केले आहे.” मावशीने सांगितले.“पाण्यात कसे काय विकिरण होते?” मावशी. सीताने प्रश्न केला.“पाण्यातसुद्धा असंख्य विविध कण असतात. पाण्याचे रेणूही असतात. पाण्यात तरंगणाऱ्या विविध कणांमुळे आणि पाण्याच्या रेणूंमुळे प्रकाशाचे विकिरण होते. ते विकिरण वातावरणातील धूलिकणांसारखेच झाल्यास समुद्राचे पाणीही निळे दिसते.” मावशीने उत्तर दिले.“मावशी तुम्ही पाण्याच्या रंगांबद्दल सांगत होत्या ते सांगा ना.” नीताने म्हटले“हो तेच सांगते, आता बाळांनो.” मावशी पुढे म्हणाली, “तसेच बऱ्याचदा पाण्यातही विविध रंग दिसतात. प्रकाशाचे विकिरण हे पाण्याच्या रेणूंच्या आकारावर अवलंबून असते. प्रकाशाचे विकिरण हे ज्या रेणूंंवरून होते त्या रेणूंचा आकार जर प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा लहान असेल, तर पाण्यात निळ्या रंगाचा प्रकाश पसरतो; परंतु जर पाण्यातील कण, जलबिंदू व पाण्याचे रेणू एकत्रित झाले व त्यांचा आकार हा प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा मोठा झाला, तर इतर लांब तरंगलांबीचे तांबडा, पिवळा वगैरे इतर किरणसुद्धा विखुरतात. त्यामुळे कधी कधी पाण्यातसुद्धा छानपैकी विविध रंग दिसतात. जर पाण्यातील वेगवेगळ्या भागांतील वेगवेगळ्या रेणूंवरून एकाच वेळी वेगवेगळ्या रंगाच्या किरणांचे विकिरण जास्त झाल्यास पाण्यात सुंदरसे मिश्ररंगसुद्धा दिसतात.”एवढ्यात त्यांची आजी त्यांच्याजवळ येऊन बसली. ती मावशीशी बोलू लागली व त्यांची चर्चा थांबली.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 2:10 am

चिमणीची गोष्ट...

एक होती चिमणी ती एका झाडावर राहायची.तिचा शेजारी होता कावळा. तो होता थोडासा बावळा. काव काव करायचा अन् चिमणीला त्रास द्यायचा.चिमणी गेली कंटाळून, आली कावळ्याला दम देऊन, तरी कावळ्याच्या खोड्या चालूच. नको नको त्या करामती सुरूच.कधी चिमणीचं खाणं पळव, कधी तिचं घरटंच हलव, रोजच्या त्रासाला करायचं काय. कावळ्याचा बंदोबस्त करायलाच हवा.मग कावळ्याची तक्रार घेऊन चिमणी गेली गरुड राजाकडे. पक्षीराज गरुड बसले होते छान. कोकिळेचे सुरू होते तिथे गान. चिमणीला बघताच पोपट म्हणाला, चिमणे परवानगी घेऊन आत ये. तशी चिमणी पोपटावरच भडकली. म्हणाली पोपटा प्रधान झालास म्हणून इथं मजा करतोस. तिकडे कावळ्याने मला नको केलंय त्याचं तुम्हाला काय पडलंय अन् चिमणी हमसून रडू लागली. रडता रडता सांगू लागली. गरुड महाराज म्हणाले, चिमणे सांग तुझे गाऱ्हाणे योग्य तो न्याय तुला मिळेल. तुला त्रास देणारा शिक्षेस पात्र ठरेल.मग चिमणी म्हणाली, महाराज महाराज कावळ्याचा बंदोबस्त लगेच करा. तो नाही पाळत शेजारधर्म रोज करतो वाईट कर्म. काव काव करून हैराण करतो रोज, मोठेपणाचा आहे त्याला भरपूर माज. माझ्या घरट्याची करतो नासधूस, इतर पक्ष्यांना लावतो फूस.मग मी जगावे तरी कसे?माझ्या जीवनाचे झाले हसे.चिमणी पुन्हा रडू लागली,तिच् तोंड झालं खूपच कडू.हा सारा प्रकार बघूनपक्षीराज म्हणाले आणा कावळ्याला पकडून !मग चार-पाच सैनिक गेले पटकन कावळ्याला धरून आणले. चटकन चिमणी विरुद्ध कावळा राजवाड्यात सुरू झाला खटला.चिमणीने चिवचिव करीत आपली बाजू मांडली.कावळ्याने काव काव करून सारी सभा मोडली.कावळ्याच्या करामती बघून सारेच गेलेत थिजून,बिचारी चिमणी गेली दमून.मग राजाने निर्णय घेतला, कावळा आहे दोषी द्यावे त्याला फाशी.फाशीचे नाव ऐकताच कावळा घाबरला रडू लागला, जमिनीवर लोळू लागला. माफ करा, माफ करा असं म्हणू लागला.तसा सैनिकांनी त्याला चांगलाच धरला. कावळ्याला बघून चिमणीला आली दया, कावळ्याची गेली होती रया.चिमणी म्हणाली पक्षीराज कावळ्याला झालाय पश्चाताप, एवढी मोठी शिक्षा नको थोडी द्या त्याला समज.चिमणीचे मोठे मन बघून कावळ्याचे हृदय आले भरून.कावळा म्हणाला, चिऊताई तुझं मन केवढं मोठं माझं मन मात्र आहे किती छोटं!तू माझा जीव वाचवलास जरी मी तुला त्रास दिला, आता मीच तुझा भाऊ यापुढे आपण दोघे एकत्र राहू.सगळ्यांचे करू मनोरंजन मग राजाने चिमणीला दिली एक छान भेट, तिने ती दिली कावळ्याला थेट.तेव्हापासून कावळा चिमणी राहतात एकत्र छोट्या-छोट्या मुलांचे करतात रंजन.एक होती चिऊ आणि एक होता काऊ, संपली माझी गोष्ट आता मी जाऊ !

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 2:10 am

संतापजनक! ट्रॅफिकमध्ये अडकली ॲम्ब्युलन्स; मुळशी रोडवरच्या कोंडीने नागरिक संतप्त

प्रभात वृत्तसेवा पौड – चांदणी चौक- मुळशी- ताम्हिणी महामार्ग हा मुळशी तालुक्याची लाईफलाइन मानला जातो. मात्र, भूगाव गावाजवळ सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून स्थानिक नागरिकांसह प्रवाशांचे हाल होत आहेत.शनिवार आणि रविवार या दिवशी कोकणात जाणाऱ्या वाहनांची वाढलेली संख्या आणि पुलाचे सुरू असलेले काम यामुळे वाहतूक कोंडी अधिक तीव्र […] The post संतापजनक! ट्रॅफिकमध्ये अडकली ॲम्ब्युलन्स; मुळशी रोडवरच्या कोंडीने नागरिक संतप्त appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 2:00 am

थरारक! रात्री पिकाला पाणी देताना समोर साक्षात ‘काळ’; पिंगोरीत शेतकऱ्यासोबत घडला अंगावर काटा आणणारा प्रसंग

प्रभात वृत्तसेवा वाल्हे – पिंगोरी (ता. पुरंदर) येथील एका शेतकऱ्यांला शुक्रवारी रात्री जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. शेतामध्ये पिकांला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यांच्या समोर चक्क बिबट्या हजर झाला. शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले. समोर मृत्यू आहे असं वाटत असतानाच त्या शेतकऱ्याने हळूच शेतातून काढता पाय घेतला. बॅटरीच्या प्रकाशात बिबट्याने हल्ला केला नाही. मात्र, रात्रीच्या वेळी […] The post थरारक! रात्री पिकाला पाणी देताना समोर साक्षात ‘काळ’; पिंगोरीत शेतकऱ्यासोबत घडला अंगावर काटा आणणारा प्रसंग appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 1:45 am

Manchar Election : “निष्ठावंतांची चेष्टा आणि गद्दारांची वाहवा”; तिकीट वाटपावरून मंचरचे कार्यकर्ते नेत्यांवर भडकले

प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायत निवडणुकीत विविध पक्षांनी केलेल्या तिकीट वाटपावरून मोठी नाराजी उफाळून आली आहे. दीर्घकाळ पक्षावर निष्ठा ठेवणारे, प्रामाणिकपणे काम करणारे अनेक कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार यांना बाजूला सारून काही पक्षांमधून नुकतेच आयात झालेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप सर्वसामान्य कार्यकत्यांकडून मतदारांकडून ला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी वेळ, श्रम आणि […] The post Manchar Election : “निष्ठावंतांची चेष्टा आणि गद्दारांची वाहवा”; तिकीट वाटपावरून मंचरचे कार्यकर्ते नेत्यांवर भडकले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 1:30 am

Ranjangaon Crime : रांजणगाव एमआयडीसीत महिलेवर अत्याचारप्रकरणी आरोपी अटकेत

प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – एका महिलेला मारहाण करून जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केल्याप्रकरणी कंपनीतील सुपरवायझरवर रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली. पीडित महिला मूळ मध्य प्रदेशची असून सध्या रांजणगाव येथे वास्तव्यास आहे.ही घटना गुरूवारी (दि. २०) सकाळी दहा ते दुपारी बाराच्या दरम्यान घडली. आरोपी […] The post Ranjangaon Crime : रांजणगाव एमआयडीसीत महिलेवर अत्याचारप्रकरणी आरोपी अटकेत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 1:15 am

आता रासायनिक खतेही आवाक्याबाहेर! रब्बी हंगामात बळीराजा हवालदिल; १ नोव्हेंबरपासूनचे ‘हे’नवीन दर पाहिलेत का?

प्रभात वृत्तसेवा रांजणी – आधीच अतिवृष्टी झालेली. त्यात बाजारभावातील अनिश्चितता आणि आता रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे राहिले आहे. खतांमध्ये प्रतिबॅग 200 ते 300 रुपये दर वाढ झाली आहे. विविध मिश्र खतांचे दर तर गगनाला भिडले आहेत, अशातच लिंकिंग सुरू आहे. परंतु शेतमालाचे भाव अजूनही पाहिजे तसे वाढलेले नाहीत त्यामुळे आंबेगाव तालुक्यात रासायनिक […] The post आता रासायनिक खतेही आवाक्याबाहेर! रब्बी हंगामात बळीराजा हवालदिल; १ नोव्हेंबरपासूनचे ‘हे’ नवीन दर पाहिलेत का? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 1:00 am

Shirur News : बिबट्याची पिल्ले समजून कामगारांची पळापळ, पण समोर आलं वेगळंच सत्य! बुरुंजवाडीत नेमकं काय घडलं?

प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथे ऊसतोड सुरू असताना कामगारांना तीन बिबटसदृश प्राण्याची पिल्ले आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मात्र, ऊसाच्या फडात आढळलेली पिल्ले दुर्मिळ वाघाटी मांजराची असल्याचे नंतर निष्पन्न झाले आहे.माजी सरपंच विलास नळकांडे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना कामगारांना ही तीन पिल्ले दिसली. बिबट्याच्या पिल्लांच्या भीतीने कामगारांनी काम बंद केले. याबाबत […] The post Shirur News : बिबट्याची पिल्ले समजून कामगारांची पळापळ, पण समोर आलं वेगळंच सत्य! बुरुंजवाडीत नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 12:45 am

शिरूरमध्ये ४० दिवसांत जेरबंद झाले २० बिबटे; वनविभागाच्या कारवाईची ‘ही’आकडेवारी वाचून थक्क व्हाल

प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – सध्या शिरूर तालुका बिबट्यांच्या वेगवेगळ्या घडामोडींमुळे चर्चेत आलेला असताना, शिरूर वनविभागाच्या वतीने चाळीस दिवसांत तब्बल वीस बिबट्यांचे माणिकडोह बिबट निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आले आहे. अन्य बिबटे जेरबंद करण्यासाठी वनविभागाची रात्रंदिवस धडपड सुरू आहे. तालुक्यातील पिंपरखेड येथे १२ ऑक्टोबर रोजी शिवन्या बोंबे, २२ ऑक्टोबर रोजी जांबूत येथे भागुबाई जाधव आणि २ […] The post शिरूरमध्ये ४० दिवसांत जेरबंद झाले २० बिबटे; वनविभागाच्या कारवाईची ‘ही’ आकडेवारी वाचून थक्क व्हाल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 12:30 am

Shikrapur News : शिक्रापूरसाठी ‘फायर स्टेशन’तातडीने हवे! औद्योगिक वसाहतीची सुरक्षितता वाऱ्यावर?

प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – शिक्रापूर परिसरात औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात वाढत असून, शेजारील अनेक गावांमध्ये लहान-मोठ्या कंपन्यांचे जाळे निर्माण झाले आहे. मात्र, या परिसरात एकही अग्निशमक केंद्र उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शिक्रापूर औद्योगिक परिसरात तातडीने स्वतंत्र अग्निशमक केंद्र असणे काळाची गरज आहे. शिक्रापूर गावची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, सणसवाडी, कोरेगाव भीमा, वढू […] The post Shikrapur News : शिक्रापूरसाठी ‘फायर स्टेशन’ तातडीने हवे! औद्योगिक वसाहतीची सुरक्षितता वाऱ्यावर? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Nov 2025 12:15 am

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २३ नोव्हेंबर २०२५

पंचांगआज मिती मार्गशीर्ष शुद्ध तृतीया शके १९४७, चंद्र नक्षत्र मूळ, योग धृती भारतीय सौर २ पौष शके १९४७, रविवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.५०, मुंबईचा सूर्यास्त ५.५९ मुंबईचा चंद्रोदय ९.२२ एएम, मुंबईचा चंद्रास्त ८.१९ पीएम, राहू काळ ४.३५ ते ५.५९ . भागवत एकादशी, अयन करी दिन.दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : आज आपण अतिशय आनंदी असणार आहात.वृषभ : अनुकूल घटना घडतील.मिथुन : व्यवसायातून आर्थिक प्राप्ती होणार आहे.कर्क : आपणास कुटुंबाकडून सहकार्य चांगले मिळणार आहे.सिंह : कामामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारू नका.कन्या : व्यावसायिक कामे मनासारखी होणार आहेत.तूळ : महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. वृश्चिक : निर्णय अंदाज अचूक ठरणार आहेत.धनू : पैशाची गरज भागणार आहे.मकर : यशस्वीतेकडे वाटचाल होणार आहे.कुंभ : जास्त काम करावे लागण्याची शक्यता.मीन : आनंदी वातावरण असणार आहे.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 12:10 am

साप्ताहिक राशिभविष्य, २३ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, २३ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२५मित्रमंडळींच्या वर्तुळात प्रिय व्हालमेष : आपण केलेले कार्य नावाजले जाऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतरांवर असेल. सर्वत्र गौरव व प्रशंसेस पात्र ठराल. सामाजिक अथवा धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. त्यासाठी स्वतःचा वेळ व पैसा खर्च कराल. मित्रमंडळींच्या वर्तुळात प्रिय व्हाल. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती उत्तम राहील. सकारात्मक विचारांच्या व्यक्ती भेटतील. नवीन ओळखीतून चांगले लाभ होतील मात्र आपण स्वतः सकारात्मक राहून प्रतिसाद देणे गरजेचे ठरेल. व्यवसाय धंद्यातील आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. नवीन नियोजन करू शकाल अथवा व्यवसाय विस्ताराच्या बाबतीमध्ये विचार करू शकाल. बँकेची कामे होतील. महत्त्वाची कार्ये गतिमान होऊन ती पूर्ण होतील. चिंता मिटतीलवृषभ : आपण व्यवसाय-धंद्यातील तेजी अनुभवू शकाल. दीर्घकाळ रखडलेली व्यावसायिक येणे अचानक वसूल झाल्यामुळे आश्चर्य वाटेल. व्यवसाय-धंद्यात काही नवीन बदल करावेसे वाटतील, ते जरूर करा. व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून ते फायदेशीर ठरतील. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराचे म्हणणे ऐकून घ्या. त्याप्रमाणे निर्णय घ्या. व्यावसायिक प्रदर्शने व मुलाखती सफल राहतील. कुटुंबातील मुला-मुलींकडून सुवार्ता मिळतील. त्याचप्रमाणे कुटुंबात एखादे मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे. तरुण-तरुणींचे प्रश्न निकालात निघतील. नियोजन सफल राहील. नोकरीविषयक प्रश्न सुटतील. चिंता मिटतील. तणावमुक्त वातावरणाचा लाभ होईल. सामाजिक, धार्मिक कार्यात रस घ्याल.गैरसमज होण्याची शक्यतामिथुन : कुटुंबातील तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होण्यामधील अडीअडचणी अथवा समस्या दूर होऊन विवाह निश्चित होतील. काहींचे परिचयोत्तर विवाह ठरतील. तरुण-तरुणींना आपला आवडता जीवनसाथी निवडता येईल. प्रेमात यश संपादित करू शकाल. मात्र अति आत्मविश्वासाने कोणतेही कार्य करू नका. गैरसमज होण्याची शक्यता. कुटुंबातील सर्व सदस्यांचे अपेक्षित सहकार्य मिळत राहील. नोकरीतील परिस्थिती समाधानकारक राहील. व्यवसाय-धंद्यात काही नवीन संधी निर्माण होतील. त्याचा फायदा अवश्य घ्या. तसेच व्यावसायिक पद्धतीत बदल करावेसे वाटतील. भागीदारीच्या व्यवसायात आपले इतरांशी होणारे संभाषण मधुर ठेवा. उत्पन्नाचे नवे स्त्रोत दिसतीलकर्क : या सप्ताहात काही चांगल्या गोष्टींचा लाभ घेता येईल. नोकरीत मात्र वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. नोकरीत बदल संभवतो. धार्मिक कार्यात रस वाढेल. आपल्या बोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्या. उत्पन्नाचे नवे स्त्रोत दिसतील. महत्त्वाचे प्रश्न सुटल्यामुळे ताणतणावरहित वातावरणाचा लाभ मिळेल. कुटुंबातील मुलींकडून त्यांच्या प्रगतीपर बातम्या कानावर येतील. सभा-समारंभाची निमंत्रणे मिळतील. एखादे मानाचे स्थान किंवा पद मिळेल. सहकुटुंब सहपरिवार एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी भेट देण्याचे योग आहेत. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील.सुख-समाधान मिळेलसिंह : सदरील काळामध्ये कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास सुख समाधान मिळेल. कुटुंबातील प्रश्नांकडे अथवा समस्यांकडे लक्ष दिल्यास त्या लवकर सुटतील. व्यवसाय धंद्यामध्ये परिस्थिती समाधानकारक राहील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यवसायातील नवीन बदल पोषक ठरतील. स्थावर मालमत्ता विषयीचे प्रश्न सोडविता येतील. कोर्टकचेरीच्या कामात सफलता मिळेल. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. प्रवासाचे योग आहेत. मात्र प्रवास जपून करावेत. तसेच खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील.कार्यमग्न राहण्याची गरजकन्या : या आठवड्यात आपल्या कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. त्याचे सोने करणे आपल्याच हातात आहे हे लक्षात ठेवावे. प्रयत्न कमी पडून देऊ नयेत. सतत कार्यमग्न राहण्याची गरज. नोकरीमध्ये वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. तसेच काही नवीन संधी मिळू शकतील. त्या संधींकडे एक आव्हान म्हणून स्वीकारल्याचा फायदा होईल. आर्थिक आवक चांगली राहील. आर्थिक लहान-मोठे व्यवहार सावधानतेने करावेत. वाहने चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. वाद-विवाद टाळातूळ : दीर्घकाळ रखडलेले जमिनीविषयीचे अथवा स्थावरमालमत्तेच्या विषयीचे व्यवहार गतिशील होतील. ओळखी मध्यस्थीमुळे आर्थिक फायदा होऊ शकतो. तसेच वडिलोपार्जित संपत्तीविषयीचे वाद शमतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्यानुसार मार्ग निघेल. नोकरीतील वातावरण अनुकूल राहील. पदोन्नती घटना घडू शकतात. कुटुंब परिवारात अचानक काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. चर्चेने प्रश्न सुटू शकतात. इतरांच्या मताला प्राधान्य द्या. विद्यार्थ्यांचे परदेश गमन सफल होईल. प्रवासाचे योग आहेत.कुटुंबात सुवार्ता मिळतील.महत्त्वाकांक्षा अचानक पूर्ण होईलवृश्चिक : हा आठवडा सर्व बाबतीत आनंददायी व अनुकूल घटनांनी व्याप्त राहील.बरेच दिवस मनात घोळत असलेली एखादी महत्त्वाकांक्षा अचानक पूर्ण होईल. विशेषतः स्थावर व जमिनीविषयी असलेली कामे गतीमान होतील. कुटुंबात असलेले वाद-विवाद व मतभेद संपतील. नवीन नात्यास सुरुवात होईल. कुटुंबात व परिवारात मंगल कार्य घडेल. नोकरी- व्यवसायात तसेच धंद्यात अपेक्षित सर्व कामे होतील. जुनी येणी वसूल होतील. मात्र भागीदारी व्यवसायात आपल्या वर्चस्वाला नियंत्रणात ठेवा. व्यवसायासाठी बदल पोषक ठरतील. अनुकूल वार्ता कानावर येतीलधनु : या आठवड्यात आपण काही रखडलेले महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. कुटुंब परिवारातील समस्या त्यामुळे सुटतील. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. नोकरीविषयक अनुकूल वार्ता कानावर येतील. पूर्वी दिलेल्या मुलाखतीमधून नोकरीचे बोलावणे येऊ शकते. आप्तेष्ट नातेवाईक यांच्याशी संबंध सुधारतील. मंगल कार्याचे निमंत्रण मिळेल; परंतु आपल्या वर्तणुकीने रंगाचा बेरंग होऊ शकतो. हितकारक ठरेल. सदस्यांच्या प्रकृती बद्दल काळजी घ्या. पथ्ये पाळा.अडचणी येण्याची शक्यता आहेमकर : महत्त्वाच्या कामात या आठवड्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. थोडा संयम बाळगणे गरजेचे आहे. कामाचा ताण जाणवू शकतो. दगदग होईल. व्यवसाय-धंद्यात जबाबदारी वाढेल. केलेल्या नियोजनात अचानक बदल करावा लागल्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे. आपल्याला झेपतील अशी कामे स्वीकारा. प्रवास काळजीपूर्वक करा. प्रवासात खाण्यापिण्यावर नियंत्रण हवे, तसेच अति आत्मविश्वास घातक ठरू शकेल. स्पर्धा टाळा. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तसेच कुसंगतीपासून दूर राहा. नोकरीत चांगले योग आहेत. वरिष्ठांचे ऐका. राजकारण आणि गटबाजीपासून दूर राहा. मानसन्मान वाढेलकुंभ :सामाजिक तसेच धार्मिक कार्यात रस घ्यायला दानधर्म करावासा वाटेल. धार्मिक स्थळी सहकुटुंब सहपरिवार भेट देण्याचे नियोजन होईल. मानसन्मान वाढेल. काही चांगल्या घटना घडतील. त्यामुळे उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नोकरीतील बदल चांगला राहील. सरकारी स्वरूपाच्या नोकरीमध्ये अधिकारात वाढ होईल. अतिरिक्त कार्यभार सोपवला जाण्याची शक्यता मात्र लहान मोठ्या प्रलोभनांपासून दूर राहा. कुटुंब परिवारातील एखाद्या मंगल कार्यामुळे नातेवाईक आप्तेष्ट यांच्या भेटीगाठी होतील. मुलांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या. व्यवसाय धंद्यात नवीन उत्पन्न स्त्रोत मिळतील. प्रकृतीकडे लक्ष द्या. पथ्ये पाळा. पचनाच्या विकारापासून सावध राहा.कामे काळजीपूर्वक करामीन : पूर्वी केलेल्या नियोजनाद्वारे आपली कामे काळजीपूर्वक करा. लहान-मोठी कामे इतरांवर सोपवू नका. कार्यमग्न राहण्याची गरज प्रयत्नात कमी पडू देऊ नका. महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात. मनावरील ताण काही प्रमाणात निघून जाईल. अडचणी दूर होतील. व्यवसायात भरभराट होईल. नवीन कामे हातात मिळतील. व्यवसाय व काम-धंद्यानिमित्त प्रवास करावा लागेल. प्रवासामध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्यायला विसरू नका. तसेच खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायासाठी आवश्यक ती ऊर्जा मिळेल. प्रवासात नवीन ओळखी होऊ शकतात.

फीड फीडबर्नर 23 Nov 2025 12:10 am

Shubman Gill : शुबमन गिल वनडे मालिकेतून बाहेर? द. आफ्रिकेविरुद्ध कोण सांभाळणार टीम इंडियाची धुरा?

Shubman Gill ruled out ODI Series : युवा फलंदाज शुबमन गिल मानेच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर राहणार आहे. याबाबत बीसीसीआयच्या सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली. ३० नोव्हेंबरपासून ही मालिका सुरू होत आहे. ही केवळ मानेची साधी दुखापत नसून, गिलला विश्रांतीची गरज आहे आणि भारतीय टीम व्यवस्थापन त्याच्या पुनरागमनासाठी कोणतीही घाई […] The post Shubman Gill : शुबमन गिल वनडे मालिकेतून बाहेर? द. आफ्रिकेविरुद्ध कोण सांभाळणार टीम इंडियाची धुरा? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 10:45 pm

Pune Navale Bridge Speed Limit: कात्रज बाह्यवळण मार्गावर वेग मर्यादा 30 किमी/तास; उल्लंघन केल्यास कारवाई

Pune Navale Bridge Speed Limit : पुणे शहराच्या वाहतूक विभागाने कात्रज बाह्यवळण मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या मार्गावरील वाहनांच्या अति वेगामुळे वारंवार होणारे अपघात लक्षात घेऊन, रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी ही पाऊल उचलण्यात आले आहे. कात्रज बायपास मार्गावरील भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेवटपर्यंतच्या मार्गावर ही नवीन वेगमर्यादा […] The post Pune Navale Bridge Speed Limit: कात्रज बाह्यवळण मार्गावर वेग मर्यादा 30 किमी/तास; उल्लंघन केल्यास कारवाई appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 10:42 pm

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये दोन खुर्च्यांचं अंतर

Maharashtra Politics: महायुतीतील फोडाफोडीच्या नाराजी नाट्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील ‘अबोल्याचं’ चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. अमृता फडणवीस यांच्या ‘दिव्यज फाऊंडेशन’ आयोजित कार्यक्रमात दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते, मात्र त्यांच्यात संवाद झाला नाही. कार्यक्रमात फडणवीस आधीच स्थानापन्न झाले होते. त्यानंतर शिंदे आले. फडणवीसांनी उभे राहून त्यांना नमस्कार केला आणि […] The post Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये दोन खुर्च्यांचं अंतर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 10:32 pm

'स्थानिक'च्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जाहीर

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी जिल्हाप्रमुख जाहीर केले आहेत. प्रचारात समन्वय राखण्यासाठी शिवसेनेचे ३८ जिल्हाप्रमुख काम करतील. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी खासदार आणि आमदारही प्रचार करणार आहेत. निवडणुका होईपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे संपर्क प्रमुखांना शिवसेना नेतृत्वाने निर्देश दिले आहेत. खासदार नरेश म्हस्केंकडे ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. एकूण ४० ठिकाणी पक्षाकडून जिल्हा संपर्क प्रमुख पदांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरेंकडून याबाबतचे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे.शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख यादी1. सिंधुदुर्ग – 1) श्री. किरण पावसकर2) श्री. राजेश मोरे2. रत्नागिरी- श्री. यशवंत जाधव3. रायगड ग्रामीण- श्री. संजय घाडी4. नवी मुंबई शहर - श्री. नरेश म्हस्के5. पालघर - श्री. रवींद्र फाटक6. ठाणे ग्रामीण - श्री. प्रकाश पाटील7. ठाणे शहर - श्री. नरेश म्हस्के8. पुणे - श्री. नरेश म्हस्के9. पिंपरी चिंचवड शहर - श्री. सिद्धेश कदम10. पुणे ग्रामीण – 1) श्री. श्रीरंग आप्पा बारणे2) श्री. रामभाऊ रेपाळे11. सातारा - श्री. शरद कणसे12. सांगली - श्री. राजेश क्षीरसागर13. कोल्हापूर – 1) श्री. धैर्यशील माने2) श्री. संजय मंडलिक14. सोलापूर - श्री. संजय कदम15. नाशिक लोकसभा - श्री. रामभाऊ रेपाळे16. दिंडोरी लोकसभा - 1) श्री. रामभाऊ रेपाळे2) श्री. भाऊसाहेब चौधरी17. जळगाव - श्री. सुनिल चौधरी18. नंदुरबार - श्री. राजेंद्र गावित19. धुळे - श्री. मंजुळा गावित20. छत्रपती संभाजीनगर महानगर - श्री. विलास पारकर21. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण - श्री. अर्जुन खोतकर22. जालना - 1) श्री. अर्जुन खोतकर2) श्री. भास्कर आंबेकर23. बीड – 1) श्री. टी. पी मुंडे2) श्री. मनोज शिंदे24. धाराशीव - श्री. राजन साळवी25. नांदेड - श्री. सिद्धराम म्हेत्रे26. लातूर - श्री. किशोर दराडे27. बुलढाणा - श्री. हेमंत पाटील28. परभणी - श्री.आनंद जाधव29. नागपूर ग्रामीण- श्री. दिपक सावंत30. नागपूर शहर - श्री. दिपक सावंत31. गडचिरोली – 1) श्री. दिपक सावंत2) श्री.किरण पांडव32. भंडारा - श्री. गोपीकिशन बाजोरिया33. अमरावती - श्री. नरेंद्र भोंडेकर34. वर्धा - श्री. राजेंद्र साप्ते35. यवतमाळ - श्री. हेमंत गोडसे36. वाशिम - श्री. जगदीश गुप्ता37. हिंगोली - श्री. हेमंत पाटील38. अकोला - श्री. अभिजित अडसूळ39. चंद्रपूर - श्री. किरण पांडव

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 10:10 pm

हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना लागली घरघर, एकाचवेळी ३७ नक्षलवादी आले शरण

नवी दिल्ली : शरण या आणि नक्षलवाद्यांच्या भावी योजनांची तसेच तयारीची माहिती देऊन सरकारी योजनांचा लाभ घ्या अथवा सुरक्षा दलाच्या कारवाईत मरा असा निर्वाणीचा इशारा केंद्रीय गृहंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना दिला. त्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवण्याची घोषणा केली. यानंतर देशभर नक्षलवाद्यांविरोधात कठोर कारवाई सुरू झाली.सुरक्षा पथकांचा पवित्रा बघून नक्षलवादी शरण येऊ लागले. पण काही प्रमुख नक्षलवादी सरकार विरोधात सशस्त्र कारवाया सुरू ठेवण्याच्या प्रयत्नात होते. अखेर नक्षलवाद्यांचा मोठा नेता असलेला नक्षलवादी हिडमा हा सुरक्षा पथकाच्या कारवाईत ठार झाला. हिडमा चकमकीत ठार झाल्यानंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना मोठा धक्का बसला आहे. बंदी घातलेल्या भाकपा माओवादी नक्षलवाद्यांच्या गटातील ३७ नक्षलवाद्यांनी एकाचवेळी शरण येऊन शस्त्र त्याग केला आहे.शरण आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये हिडमाचा विश्वासू सहकारी कोय्याडा सम्बैयाह उर्फ आझाद याचाही समावेश आहे. आझाद हा मुलुगू जिल्ह्याचा रहिवासी असून तो ३१ वर्षे भूमिगत राहून सरकार विरोधात कारवाया करत होता. विशेष म्हणजे शरण आलेल्या ३७ जणांपैकी २५ नक्षलवादी या महिला आहेत. शरण आलेल्या नक्षलवाद्यांकडून सुरक्षा पथकाने आठ बंदुका, एक एके ४७ रायफल, मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि जिवंत काडतुसे जप्त केली. ही माहिती तेलंगणाचे पोलीस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांनी दिली.शरण आलेले तीन प्रमुख नक्षलवादीकोय्याडा सम्बैयाह उर्फ आजाद, अप्पासी नारायण उर्फ रमेश, मुचाकी सोमाडा उर्फ एर्रा हे तीन नक्षलवादी नेते आणि त्यांचे समर्थक आंध्र तेलंगणा सीमेवर बस्तरच्या दक्षिणेकडील भागात सक्रीय होते. या नक्षलवाद्यांनी आता शरण येऊन शस्त्र त्याग केला आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 10:10 pm

बांगलादेशला पुन्हा भूकंपाचा धक्का; मृतांची संख्या १० वर पोहोचली

ढाका : शनिवारी बांगलादेशच्या राजधानीजवळील एका उपनगराला ३.३ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. ढाका आणि देशाच्या अनेक भागांना हादरवून टाकणाऱ्या शुक्रवारी आलेल्या ५.७ तीव्रतेच्या भूकंपानंतर ढाकाच्या बाहेरील भागात असलेल्या आशुलिया येथील सावर येथे झालेल्या भूकंपाचा हा धक्का होता. सकाळी १०:३६ वाजता भूकंपाची नोंद झाली आणि त्याचे केंद्रबिंदू ढाका येथील आगरगाव येथील भूकंप मापन केंद्रापासून २९ किलोमीटर […] The post बांगलादेशला पुन्हा भूकंपाचा धक्का; मृतांची संख्या १० वर पोहोचली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 10:10 pm

G-20 Summit: भारत, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाची नवी युती; PM मोदींनी म्हटले ‘भविष्यातील पिढ्यांचे भविष्य’

G-20 Summit: दक्षिण आफ्रिकेतील जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासोबत एका महत्त्वाकांक्षी ‘त्रिपक्षीय तंत्रज्ञान आणि नवोपक्रम भागीदारी’ची घोषणा केली आहे. ही भागीदारी ‘आगामी पिढ्यांचे भविष्य’ असल्याचे मोदींनी नमूद केले. पंतप्रधान मोदींनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यासोबत भेट घेतल्यानंतर, ‘ऑस्ट्रेलिया-कॅनडा-भारत तंत्रज्ञान आणि नवोपक्रम (ACITI) भागीदारी’ स्थापन […] The post G-20 Summit: भारत, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाची नवी युती; PM मोदींनी म्हटले ‘भविष्यातील पिढ्यांचे भविष्य’ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 10:02 pm

Smriti Palash Wedding : विजयाची सवय कायम! लग्नापूर्वीच्या सामन्यातही स्मृतीने पलाशच्या संघाला चारली धूळ, पाहा VIDEO

Smriti Palash Wedding Cricket Match : विश्वचषक विजेती स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे. आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ जिंकून मंधानाला जणू विजयाची सवयच लागली आहे, जी तिने आपल्या लग्नाच्या कार्यक्रमांमध्येही कायम ठेवली आहे. महाराष्ट्रातील सांगली येथे उद्या (२३ नोव्हेंबर) हे दोघे सात फेरे घेऊन विवाहबंधनात अडकणार आहेत. […] The post Smriti Palash Wedding : विजयाची सवय कायम! लग्नापूर्वीच्या सामन्यातही स्मृतीने पलाशच्या संघाला चारली धूळ, पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 10:00 pm

Work from home: दिल्लीत 50 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्राॅम होम; का घेतला हा निर्णय जाणून घ्या..

नवी दिल्ली: राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे श्वास घेणेही कठीण झाले आहे. प्रदूषणाची गंभीर पातळी लक्षात घेऊन, ‘ग्रैप-3’ (GRAP-3) चे नियम तातडीने कडक करण्यात आले आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ला मंजुरी एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशन (CAQM) च्या निर्देशानुसार दिल्ली सरकारने खासगी कार्यालयांसाठी नवी सल्लागार सूचना जारी केली आहे. यानुसार, खासगी कार्यालयातील ५० टक्के कर्मचारी ऑन-साईट (कार्यालयात) […] The post Work from home: दिल्लीत 50 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्राॅम होम; का घेतला हा निर्णय जाणून घ्या.. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 9:53 pm

“माझ्या हातात तिजोरी, घड्याळाला साथ द्या तर बारामतीसारखं नळदुर्ग करू”; अजित पवारांचा थेट संदेश

नळदुर्ग : नळदुर्ग नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत मतदारांना संदेश दिला. “माझ्या हातात राज्याची तिजोरी आहे. तुम्ही माझ्या घड्याळ चिन्हाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, तर बारामतीप्रमाणेच नळदुर्गचं रूप पालटून टाकेन,” असा विश्वास त्यांनी दिला. अजित पवार पुढे म्हणाले, “मी बारामतीचा चेहरा-मोहरा बदलला, पिंपरी-चिंचवडचा चेहरा-मोहरा बदलला. आता नळदुर्गची वेळ […] The post “माझ्या हातात तिजोरी, घड्याळाला साथ द्या तर बारामतीसारखं नळदुर्ग करू”; अजित पवारांचा थेट संदेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 9:37 pm

ग्रॅच्युइटी आता फक्त १ वर्षात; कोट्यवधी कामगारांना आर्थिक सुरक्षा

मुंबई : देशातील कामगार व्यवस्थेला अधिक सुलभ आणि आधुनिक बनवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून कामगार कायद्यांचे नवे आराखडे आता देशभर लागू झाले आहेत. रोजगाराच्या बदलत्या स्वरूपाचा विचार करून कामगारांच्या हक्कांना बळकटी देण्याचे उद्दिष्ट या नव्या संहितेमागे असल्याचे केंद्रीय कामगार कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. खासकरून असंघटित क्षेत्रातील मजूर, गिग वर्कर्स, महिला कर्मचारी आणि स्थलांतरित मजूर यांना अधिक सुरक्षित वातावरण देण्याचा प्रयत्न या सुधारणांतून दिसून येतो.नव्या कामगार संहितेनुसार जुने २९ कायदे रद्द करून त्यांना केवळ चार व्यापक कायद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या बदलांमधील सर्वात चर्चित मुद्दा म्हणजे ग्रॅच्युइटीच्या नियमांमध्ये झालेली मोठी सुधारणा. आता फिक्स्ड-टर्म करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच वर्षे सेवा देण्याची आवश्यकता उरलेली नाही. त्यांनी केवळ एक वर्ष काम केले तरी ग्रॅच्युइटी मिळण्याचा हक्क त्यांना राहील. तसेच, या प्रकारच्या कामगारांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसारखेच वेतन, सुट्ट्या, वैद्यकीय सुविधा आणि सामाजिक सुरक्षा लाभ देणे बंधनकारक केले आहे. यामुळे कंत्राटी कामगारांच्या तुलनेत थेट भरतीची प्रक्रिया वाढण्यास मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे.ग्रॅच्युइटी ही कंपनीकडून कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेसाठी दिली जाणारी आर्थिक मदत असून पूर्वी ही सुविधा पाच वर्षांच्या सेवेनंतरच उपलब्ध होत असे. आता सेवा कालावधी केवळ एका वर्षावर आणल्यामुळे नोकरी वारंवार बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे मोठे आर्थिक बळ ठरणार आहे. कर्मचारी कंपनी सोडताना किंवा निवृत्त होताना ही रक्कम एकरकमी दिली जाते. देशातील कारखाने, खाणी, बंदरे, तेलक्षेत्रे आणि रेल्वे आदी सर्व ठिकाणी पेमेंट अँड ग्रॅच्युइटी कायदा लागू आहे.नव्या कामगार कायद्यात इतरही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला नियुक्तीपत्र देणे आता अनिवार्य झाले आहे. सर्व स्तरांवर किमान वेतनाची निश्चित आणि वेळेवर अंमलबजावणी करण्याची सक्ती करण्यात आली आहे. महिलांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी देताना त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत. गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सना ईपीएफ, विमा आणि निवृत्तीवेतनासारख्या सुरक्षिततेच्या योजनांचा लाभ मिळू शकणार आहे. तसेच सर्व कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणीची तरतूदही करण्यात आली आहे.नवीन संहितेच्या अधिसूचनेनंतर खासगी क्षेत्रातील लाखो कर्मचारी, विशेषतः आयटी, सेवा, स्टार्टअप, रिटेल आणि गिग उद्योगात काम करणारे युवा कर्मचारी, यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अल्पकाळात नोकरी बदलणाऱ्यांना आता ग्रॅच्युइटीसाठी पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार नाही, त्यामुळे त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेत वाढ होईल.पूर्वी ४ वर्षे ७ महिने एकाच कंपनीत सेवा दिल्यानंतर ग्रॅच्युइटी मिळत असे. मृत्यू किंवा अपंगत्वाच्या परिस्थितीत मात्र ही मर्यादा लागू नव्हती. आता नवीन नियम लागू झाल्याने अनेक दशकांपासून कायम असलेल्या जुन्या तरतुदीत मोठा बदल झाला असून भारतातील कामगारांसाठी हा निर्णय मोठी उपलब्धी मानला जात आहे.नव्या संहितेमुळे सर्व कामगारांना समान आणि वेळेवर किमान वेतन, नियुक्तीपत्राची हमी, महिलांना समान वेतन, एका वर्षानंतर ग्रॅच्युइटीचा हक्क, ४० वर्षांवरील व्यक्तींना मोफत आरोग्य तपासणी, ओव्हरटाइमसाठी दुप्पट वेतन, धोकादायक उद्योगांसाठी आरोग्य-सुरक्षा कवच आणि गिग वर्कर्ससाठी समावेशक सामाजिक सुरक्षा उपलब्ध होणार आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार न्याय्य आणि सुरक्षित कामगार बाजारपेठ निर्माण करण्याच्या दिशेने हे बदल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 9:30 pm

नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला गुजरात पोलिसांनी केली अटक

नंदुरबार : नवापूर नगरपालिकेतच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने नगराध्यक्षांसह पूर्ण पॅनल उभे केले आहे. यात अचानकपणे जिल्हा विकास आघाडीने नगराध्यक्षसह पूर्ण पॅनल उभे केले. मात्र नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणारे विश्वास बडोगे या अपक्ष उमेदवाराला गुजरात पोलिसांच्या विशेष पथकाने २० नोव्हेंबर २०२५ रोजी अटक केली.नवापूर पालिकेसाठी राष्ट्रवादीतर्फे जयंत जाधव, भाजपतर्फे अभिलाषा वसावे पाटील तर काँग्रेसतर्फे दिपचंद जयस्वाल यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आहे. दुसरीकडे जिल्हा विकास आघाडीतर्फे विश्वास बडोगे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल करत पूर्ण पॅनल निवडणूक रिंगणात उतरवले. माजी आमदार शरद गावित यांनी त्यांच्या पॅनलला पाठिंबा दिला. शक्तिप्रदर्शन करत जिल्हा विकास आघाडीने प्रचारफेरी काढली. प्रचाराला जोर चढू लागला असताना धक्कादायक घटना घडली. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा विकास आघाडीतर्फे अपक्ष लढणाऱ्या विश्वास बडोगे यांना गुजरात पोलिसांनी अटक केली.गुजसी टॉक अर्थात गुजरात दहशतवाद आणि संघटीत गुन्हे नियंत्रण कायदा (G.C.T.O.C.) कायदा २०१५ च्या कलम ३(१)(२) आणि कलम ३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. यानंतर गुजरात पोलिसांच्या गांधीनगर पथकाने विश्वास बडोगे यांना अटक केली आहे. माघार घेतली नाही म्हणून गुजरात पोलिसांकरवी विश्वास बडोगे यांना अटक करण्यात आल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे. दरम्यान बडोगेंना सुडबुद्धीनने अटक केली आहे. कॅप्टन आऊट झाला तरी कोच अजून रिंगणात आहे, त्यामुळे कोणीही निश्चिंत राहू नये असे माजी आमदार शरद गावित म्हणाले.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 9:10 pm

डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरकडून अनंत अंबानींच्या ‘वनतारा’संवर्धन प्रयत्नांची प्रशंसा

Donald Trump Jr visits Anant Ambani’s Vantara : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ज्येष्ठ पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांनी नुकतीच रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या ‘वनतारा’ (Vantara) वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्राला भेट दिली. जामनगर येथील या सुविधेचा दौरा करून त्यांनी अनंत अंबानींच्या प्राणी कल्याण आणि संवर्धनाच्या कामाचे कौतुक केले. […] The post डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरकडून अनंत अंबानींच्या ‘वनतारा’ संवर्धन प्रयत्नांची प्रशंसा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 9:00 pm

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन

मुंबई :विदर्भातील विविध विकास कामांबरोबरच तेथील जंगल संपदा राखण्यासाठी व त्याच्या वाढीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच आग्रही आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचा पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला झिरोधा कंपनी व रेन मॅटर फाऊंडेशन सामाजिक उत्तरदायित्वातून सहकार्य करणार आहेत.रिवाईल्डिंग म्हणजे जंगल, गवताळ प्रदेश किंवा जलक्षेत्रात मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून तेथील नैसर्गिक भूभाग, वन्यजीव आणि जैवविविधतेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन करणे होय. या संकल्पनेनुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील ८०० एकर क्षेत्राचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प ताडोबामध्ये राबविण्यात येणार असून यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाबरोबरच फार्मर्स फॉर फॉरेस्ट यांच्या सहकार्याने झिरोधा व रेनमॅटर फाऊंडेशन ही संस्था काम करणार आहे. यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांच्या झिरोधा रिवाइल्डिंग फंड हा विशेष निधी तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पासंदर्भातील औपचारिक घोषणा लवकरच होणार आहे.झिरोधा आणि ‘रेनमॅटर फाउंडेशन’ या संस्थांच्या माध्यमातून पर्यावरणीय व सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. रेनमॅटर फाउंडेशनमार्फत हवामान बदल व पर्यावरणीय ऱ्हास या समस्यांवर कामे करण्यात येतात. यासाठी झिरोधा ही कंपनी आपल्या नफ्यातील १० टक्के निधी सामाजिक उत्तरदायित्व व पर्यावरणीय कामांसाठी राखीव ठेवते. या राखीव निधीतून झिरोझाने संस्थेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त १०० कोटी रुपये गुंतवणुकीचा ‘झिरोधा रीवाइल्डिंग फंड’ जाहीर केला आहे. या उपक्रमांतर्गत देशातील पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या परिसरातील निसर्गाचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. त्यामध्ये देशात विविध ठिकाणी मोनोकल्चर वृक्षलागवडी ऐवजी जैवविविधता टिकवणाऱ्या पद्धतीने निसर्गाचा समतोल राखण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील ८०० एकरच्या प्रकल्पाचा समावेश आहे.विदर्भातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी रिवाइल्डिंग सारखे प्रकल्प उपयुक्त आहे. अशा कामांमध्ये झिरोधासारख्या कार्पोरेट कंपन्या सहभागी होत असून हा पर्यावरणपूरक उपक्रम केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशातील कॉर्पोरेट क्षेत्रासाठीही एक आदर्श ठरणार आहे. या उपक्रमाबद्दल अत्यंत उत्साही आहोत. महाराष्ट्र शासन आणि वन विभागासोबतचे हे सहकार्य फलदायी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 8:30 pm

AUS vs ENG : ट्रॅव्हिस हेडचा ऐतिहासिक तडाखा! १२३ वर्षांचा विक्रम मोडत रचले चार मोठे कीर्तिमान

Travis Head smashes 123-year-old record : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेव्हिस हेडने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ॲशेस कसोटीत पर्थ येथे वादळी खेळी करत इतिहास रचला. अवघ्या दोन दिवसांत संपलेल्या या सामन्यात, हेडने ८३ चेंडूत १६ चौकार आणि ४ षटकारांसह अविश्वसनीय १२३ धावांची तुफानी खेळी केली. त्याने केवळ ६९ चेंडूत शतक पूर्ण केले. यासह त्याने पाच मोठे विक्रम रचत १२३ […] The post AUS vs ENG : ट्रॅव्हिस हेडचा ऐतिहासिक तडाखा! १२३ वर्षांचा विक्रम मोडत रचले चार मोठे कीर्तिमान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 8:10 pm

नागपूरमध्ये अतिविशेषोपचार वैद्यकीय अभ्यासक्रमांसह ६१५ खाटांचे रुग्णालय

नागपूर : नागपूर येथे वैद्यकीय उपचाराच्या दर्जेदार सुविधा रुग्णांना उपलब्ध व्हाव्यात आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी नवे पदव्युत्तर आणि अतिविशेषोपचार अभ्यासक्रम सुरू व्हावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय विभागाला निर्देश दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता ६१५ खाटांच्या अद्ययावत रुग्णालयासह नवे पदव्युत्तर आणि अतिविशेषोपचार अभ्यासक्रम सुरू करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाशी संलग्न असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राची श्रेणीवाढ करुन तेथे ही व्यापक व्यवस्था उभारण्यात येणार आहे.वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने यासंदर्भात नुकताच शासन निर्णय निर्गमित केला आहे. शासन निर्णयानुसार या श्रेणीवर्धनाअंतर्गत १९ पदव्युत्तर, ११ अतिविशेषोपचार अशा एकूण ३० अभ्यासक्रमाची भर पडणार आहे. यामुळे पदव्युत्तरच्या ११० जागा व अतिविशेषोपचारच्या ४१ जागा निर्माण होतील. याशिवाय, रुग्णालयीन प्रशासन, व्यवस्थापन विभाग व दंत बाह्यरुग्ण विभाग तसेच अभ्यासक्रमांशी संबंधित ६१५ खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.या नव्या वैद्यकीय सुविधामुळे नागपूरमध्ये अतिविशेषोपचारांची अतिरिक्त सुविधा उपलब्ध होत आहे. याचबरोबर या संस्थेचे नामकरण “डॉ. बाबासाहेब आंबेडकर अतिविशेषोपचार, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था (Dr. Babasaheb Ambedkar Super Speciality Institute of Medical Education and Research (BASIMER))” असे करण्यात आले आहे.या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सुमारे ९८९.०३ कोटी रुपयांचा अनावर्ती खर्च तसेच पहिल्या तीन वर्षाचा १७६.६२ कोटी रुपयांचा आवर्ती खर्च राहणार आहे. या एकूण ११६५.६५ कोटी रुपयांच्या खर्चास तसेच त्यानंतर या संस्थेला दरवर्षी येणाऱ्या ७८.८० कोटी रुपयांच्या आवर्ती खर्चासही राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी येणाऱ्या एकूण ११६५.६५ कोटी रुपयांच्या खर्चाचे दायित्व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांनी अनुक्रमे ७५ टक्के आणि २५ टक्के या प्रमाणात विभागण्यात आले आहे. यापैकी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या दायित्व स्वीकृतीच्या प्रमाणातील (७५ टक्के) ८७४.२३ कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ‘अनुसूचित जाती घटक’ कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.प्रकल्पाच्या उभारणी खर्चाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे दायित्व संपुष्टात आल्यावर प्रकल्पासाठी आवश्यक असणारा अनावर्ती व आवर्ती खर्च वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग करणार आहे. प्रकल्पासाठी तातडीने पदनिर्मिती प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही प्रक्रिया तातडीने सुरू करुन ती वेळेत पूर्ण करण्याच्या आणि संस्थेच्या श्रेणीवर्धनात येणारे बांधकाम कालबद्धरित्या पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प अंशतः अथवा पूर्णतः सार्वजनिक- खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर उभारण्याची शक्यता पडताळून पाहण्यात येणार आहे. बांधकाम नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत होणार आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 8:10 pm

नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची भाजपच्या नेत्यांनी काळजी करू नये; शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे

सातारा : सुवर्णाताई पाटील यांना स्वगृही बोलवणे म्हणजे भाजपच्या नेत्यांना आमच्या उमेदवाराच्या विजयाची खात्री आहे का? तसे त्यांनी गृहीत धरले आहे का? त्यांना महाविकास आघाडीने न्याय दिला आहे. तुम्हाला निष्ठावान उमेदवाराची काळजी असती तर तुम्ही त्यांना वेळीच थांबवले असते. आमच्या उमेदवाराची काळजी करायचे सोडून द्या, असा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे […] The post नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची भाजपच्या नेत्यांनी काळजी करू नये; शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 8:02 pm

Jayakumar Gore : ‘टक्केवारी गोळा करणाऱ्यांना दुसरं काय दिसणार? जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

सोलापूर : जिल्हा नियोजन व विकास समिती निधीच्या वाटपावरून खासदार प्रणिती शिंदे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय खटके तापले आहेत. प्रणिती शिंदे यांनी गोरे यांच्यावर निधी केवळ ‘टक्केवारी’साठी दिला जात नसल्याचा आरोप केला असता, त्याला प्रत्युत्तर देताना गोरे यांनी शिंदे यांच्यावर पलटवार केला. “ज्यांनी आयुष्यभर फक्त टक्केवारी गोळा केली, त्यांना उठता-बसता फक्त टक्केवारीच दिसते. […] The post Jayakumar Gore : ‘टक्केवारी गोळा करणाऱ्यांना दुसरं काय दिसणार? जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 7:45 pm

AUS vs ENG : ‘तो ट्रेनसारखा धावत होता…’, ट्रॅव्हिस हेडच्या वादळी शतकावर बेन स्टोक्सची प्रतिक्रिया

Ben Stokes Statement on Travis Head : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर अवघ्या दोन दिवसांत संपला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेव्हिस हेडच्या तुफानी खेळीचे कौतुक करताना तो कसा ‘अविश्वसनीय’ होता, याबद्दल […] The post AUS vs ENG : ‘तो ट्रेनसारखा धावत होता…’, ट्रॅव्हिस हेडच्या वादळी शतकावर बेन स्टोक्सची प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 7:29 pm

उदयपूरमध्ये ‘हॉलिवूड-बॉलीवूड’चा जलवा! अमेरिकन अब्जाधीश राजू मन्तेना यांच्या लेकीचा शाही विवाह सोहळा

उदयपूर (राजस्थान): अमेरिकेतील प्रसिद्ध फार्मा उद्योजक राम राजू मन्तेना यांची कन्या नेत्रा मन्तेना आणि उद्योजक वम्सी गदिराजु यांचा शाही विवाह सोहळा सध्या ‘सिटी ऑफ लेक्स’ (सरोवरांचे शहर) उदयपूरमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. २१ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या चार दिवसीय सोहळ्यामुळे हे शहर आंतरराष्ट्रीय व्हीव्हीआयपी गेस्टसाठी एका ग्लॅमरस डेस्टिनेशनमध्ये बदलले आहे. या सोहळ्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड […] The post उदयपूरमध्ये ‘हॉलिवूड-बॉलीवूड’चा जलवा! अमेरिकन अब्जाधीश राजू मन्तेना यांच्या लेकीचा शाही विवाह सोहळा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 7:18 pm

अल्पवयीन मुले इसिसच्या रडारवर, ‘ऑपरेशन सिंदूर’चा नकाशा पाठविण्याचा आरोप

रायपूर (वृत्तसंस्था): छत्तीसगडमधील दहशतवादविरोधी पथकाने रायपूर आणि भिलाई येथून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. दहावी आणि अकरावीत शिकणारे हे दोन्ही उच्च माध्यमिक विद्यार्थी दहशतवादी संघटना ‘आयएसआयएस’(इसिस) हँडलर्सच्या थेट संपर्कात होते. त्यांना ऑनलाइन माध्यमातून कट्टरपंथी सामग्रीद्वारे पद्धतशीरपणे भडकावले जात होते.दोन्ही अल्पवयीन शस्त्रे उचलण्यास तयार होते आणि त्यांनी हँडलर्सना ‘ऑपरेशन सिंदूर’ संबंधित नकाशाची एक क्लिपिंग (नमुना) पाठवली होती. एटीएसने त्यांच्यावर अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज (प्रिव्हेन्शन) ॲक्ट (उप्पा), १९६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांच्या कारवायांची सखोल चौकशी सुरू आहे. अल्पवयीन मुलांचे कुटुंब तपास यंत्रणांना सहकार्य करत असून, त्यांच्या मानसिक पुनर्वसनासाठी पाऊले उचलली जात आहेत, असे छत्तीसगड एटीएसने स्पष्ट केले आहे.एटीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आक्षेपार्ह सोशल मीडियावरील तक्रारीनंतर हे प्रकरण समोर आले. देखरेखीदरम्यान अधिकाऱ्यांना आयएसआयएसशी जोडलेला एक गोपनीय इंस्टाग्राम ग्रुप आढळला. पाकिस्तानी हँडलर्स कट्टरपंथी सामग्री अपलोड करत होते. हे दोन भारतीय अल्पवयीन मुले या ग्रुपमध्ये सक्रिय सहभागी होते. गेल्या दीड वर्षांपासून एटीएसने या अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवले होते. डिजिटल देखरेख टाळण्यासाठी पाकिस्तानी हँडलर्स वारंवार ग्रुप्स बदलत असत. ग्रुपमध्ये जास्त ट्रॅफिक आढळले किंवा यंत्रणांची पाळत असल्याचा संशय आला, तर तो ग्रुप अचानक डिलीट केला जात असे.तणावाच्या काळात, पाकिस्तानी हँडलर्सनी संपर्क वाढवलाया अल्पवयीन मुलांना ‘डिजिटल मॉड्यूल’द्वारे प्रशिक्षण दिले जात होते. यामध्ये डार्क वेब, टीओआर, व्हीपीएन आणि बनावट आयपी ॲड्रेस यांसारख्या तंत्रांचा समावेश होता. ही सर्व तंत्रे कट्टरपंथी ऑनलाइनच्या माध्यमातून पुरवली जातहोती. कायदा अंमलबजावणी संस्थांना त्यांचा मागोवा घेणे शक्य होऊ नये यासाठी हे प्रशिक्षण दिले जात होते.भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या काळात, पाकिस्तानी हँडलर्सनी अल्पवयीन मुलांशी संपर्क वाढवला. याच दरम्यान, भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि दोन्ही देशांनी लादलेली ‘मीडिया ब्लॅकआऊट’ची परिस्थिती होती. या माहितीच्या दरीचा फायदा घेत हँडलर्सनी मुलांना सक्रिय केले आणि त्यांना हवाई हल्ल्यांच्या नकाशांच्या क्लिपिंग्स भारतीय वृत्तवाहिन्यांकडून मिळवून पाकिस्तानला पाठवण्याची सूचना केल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. छत्तीसगड एटीएसने अल्पवयीन मुलांच्या कुटुंबांना चॅट लॉग्स, स्क्रीनशॉट्स, हिंसक सामग्रीचे पुरावे आणि हँडलर्ससोबतच्या संवादाचे रेकॉर्ड दिले आहेत. आपले मुले एवढ्या मोठ्या प्रमाणात कट्टरपंथी कार्यात गुंतलेले आहेत हे पाहून कुटुंबांना धक्का बसला.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 7:10 pm

शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एसटीची हेल्पलाईन

धाराशिव (प्रतिनिधी) - शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी लवकरच एसटी महामंडळाची ‘हेल्पलाइन’ सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून मानव विकास निधी अंतर्गत राजाच्या दुर्गम व आदिवासीबहुल भागामध्ये शालेय विद्यार्थिनींना प्रवासी सेवा देण्यासाठी ‘मानव विकास बसेस’ उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या बसेस विशेषत: शालेय विद्यार्थिनींची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात याव्यात. अशा सक्त सूचना देण्यात आलेले असतात. परंतु अनेक आगारात या नियमाची पायमल्ली केलेली दिसून येते. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री सरनाईक यांनी धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली असता, तेथे उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनेक समस्या व तक्रारी सरनाईक यांच्यासमोर मांडल्या.अनेक शालेय बसेस वेळेवर न सुटणे, गर्दी असल्यामुळे थांब्यावर न थांबणे, बसेस उशिरा येणे अथवा अचानक रद्द होणे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार त्यातील काही विद्यार्थ्यांनी केल्या. संध्याकाळच्या वेळी शाळा -महाविद्यालय सुटल्यानंतर किमान एक तासात मुले आपल्या घरी जाणे अपेक्षित असते. याबाबत एसटीच्या स्थानिक प्रशासनाने अतिशय गांभीर्याने या गोष्टी घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनींना आपल्या घरातून शाळेत जात असताना अथवा शाळेतून घरी येत असताना बसेस उशिरा सुटणे, त्या अचानक रद्द होणे ,तांत्रिक बिघाडामुळे बस नादूरूस्त झाल्याने घरी पोहोचण्यास अडचण निर्माण झाल्यास त्यांनी तातडीने एसटीच्या हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क करून मदत घ्यावी या हेतूने लवकरच एक हेल्पलाइन क्रमांक प्रदर्शित करण्यात येईल.विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानीची जबाबदारी आगार व्यवस्थापकावरएसटी बसेस उशिरा सुटणे, अचानक रद्द होणे अथवा अन्य कारणामुळे शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींचे तास चुकतात किंवा परीक्षेला ते वेळेवर पोहोचू शकत नाहीत, काही वेळेला त्यांची परीक्षा बुडते . विद्यार्थ्यांच्या नुकसानीला संबंधित क्षेत्रातील आगार व्यवस्थापक व त्यांचे पर्यवेक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल. शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामूळे विद्यार्थ्यांचे जितक्या दिवसाचे शालेय नुकसान होईल, तितके दिवस यास जबाबदार असणारे पर्यवेक्षक अथवा अधिकाऱ्यांना निलंबित अथवा सक्तीचे रजेवर पाठवण्यात यावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापक (वाहतूक) यांना दिले आहेत.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 7:10 pm

‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते. २०१९-२०२४ दरम्यान वाटण्यात आलेल्या एकूण ४८.७६ कोटी लाडूंपैकी हे लाडू होते, अशी माहिती श्री वेंकटेश्वर मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी दिली आहे. ही आकडेवारी २०१९ ते २०२४ दरम्यान वाटण्यात आलेल्या प्रसादाच्या एकूण ४८७.६ दशलक्ष लाडूंपैकी २० कोटी लाडू हे भेसळयुक्त तुपाचा वापर करुन बनवले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.मंदिरात दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या, खरेदीची माहिती आणि उत्पादन आणि विक्रीचे आकडे यांचा विचार करून साध्या गणनेच्या आधारे हे आकडे काढण्यात आले आहेत. एसआयटीने अलीकडेच या प्रकरणासंदर्भात टीटीडीचे माजी अध्यक्ष आणि वायएसआरसीपी खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांची आठ तास चौकशी केली. प्रयोगशाळेने नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आली असूनही त्यांनी तूपाच्या टँकरना परवानगी का दिली असे विचारले असता, त्यांनी दावा केला की अहवाल त्यांच्यासमोर कधीही सादर करण्यात आला नाही. खरेदी तांत्रिक समितीच्या शिफारशींनुसार केली गेली.त्यांचे माजी सहाय्यक चिन्ना अप्पाना यांना अटक करण्यात आली आहे.एसआयटीने टीटीडीचे माजी कार्यकारी अधिकारी एव्ही धर्मा रेड्डी यांचीही चौकशी केली आहे. नेल्लोर येथील न्यायालयात त्यांनी आपले महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे, १५ डिसेंबरपर्यंत पुरवणी आरोपपत्र सादर होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, सूत्रांनी असे म्हटले आहे की, या पाच वर्षांत अंदाजे ११ कोटी भाविकांनी मंदिराला भेट दिली होती. मात्र भेसळयुक्त तुपापासून बनवलेले लाडू नेमके कोणी घेतले हे निश्चित करण्याचा कोणताही मार्ग नाही. तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्ट बोर्डाचे स्पष्ट केले आहे की, व्हीव्हीआयपी लाडू देखील वेगळे ओळखता येत नव्हते.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 7:10 pm

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या ६६ किमी परिक्रमा मार्गाला ‘हिरवा कंदील’

भूसंपादनासह रस्त्याच्या उभारणीकरिता सात हजार ९२२.११ कोटी रुपयांचा निधी मंजूरनाशिक (प्रतिनिधी): आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराभोवती ६६ किलोमीटर लांबीच्या परिक्रमा मार्गाला (बाह्य रिंगरोड) राज्य शासनाने ‘हिरवा कंदील’ दाखविला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भूसंपादनासह रस्त्याच्या उभारणीकरिता तब्बल ७ हजार ९२२.११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे सिंहस्थात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार असून, नाशिकच्या विकासाला आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे.निधीची आणि नियोजनाची स्थिती नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे वेध आता प्रशासनाला लागले आहेत. वर्षभरावर येऊन ठेपलेल्या या सोहळ्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली सुरू आहेत. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंहस्थाशी संबंधित ५ हजार ६०० कोटींच्या कामांचे भूमिपूजन पार पडले. त्यानंतर आता शासनाने प्रस्तावित रिंगरोडला मंजुरी देत निधीची उपलब्धता करून दिली आहे.भूसंपादनासाठी ३ हजार ६५९.४७ कोटी रुपये तर रस्ता उभारणीसाठी ४ हजार २६२.६४ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. रिंगरोडची गरज आणि पार्श्वभूमी शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा रिंगरोड उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याअनुषंगाने सर्वेक्षणही पूर्ण झाले होते; मात्र, निधीअभावी हा प्रस्ताव मागे पडला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिल्याने सिंहस्थापूर्वी हा मार्ग उभा राहणार आहे.केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षारिंगरोड उभारण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’ ची अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक आहे. विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला आठ दिवसांत मंजुरी देण्याची विनंती केली आहे. ही मंजुरी मिळताच कामाचा शुभारंभ होईल. दरम्यान, या रस्त्यावर टोल वसुली करायची झाल्यास, त्यासाठीही शासनाने तरतूद ठेवली आहे.असा असेल ६६ किमीचा मार्गडीआरडीओ जंक्शन (आडगाव) ते सिन्नर फाटा : डीआरडीओ जंक्शन -दिंडोरी रोड (ढकांबे शिवार) -राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८ (पेठ) -गवळवाडी -गंगापूर रोड -गोवर्धन -त्र्यंबक महामार्ग -बेळगाव ढगा -नाशिक-मुंबई महामार्ग -विल्होळी (रा.म.क्र. ६०) -सिन्नर फाटा -आडगाव.भूसंपादनासाठी प्रशासन सज्जप्रकल्पाच्या उभारणीत भूसंपादन हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी खास आठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यात भूसंपादनासाठी पाच स्वतंत्र अधिकारी तसेच नाशिक, निफाड व दिंडोरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 7:10 pm

मुंबईत राडा, काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने

मुंबई : काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यामुळे मुंबईत राडा झाला. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली. मागील काही दिवसांपासून काँग्रेस नेते अस्लम शेख आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. अलिकडेच भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी अस्लम शेख धमकावत असल्याचे नमूद करून कारवाईची मागणी केली. लोढा यांच्या मागणीला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. धमकी देणारे अस्लम शेख आणि त्यांच्या बेकायदा वर्तन करणाऱ्या समर्थकांवर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी तसेच अस्लम शेख यांनी मालाडमध्ये उभारलेली रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांची वस्ती पाडून घुसखोरांना त्यांच्या देशात परत पाठवून द्यावे, अशीही मागणी अमित साटम यांनी घेतली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईत आज म्हणजेच शनिवार २२ नोव्हेंबर २०२५ रोजी राडा झाला.अंधेरी पश्चिम येथील अमित साटम यांच्या कार्यालयावर काँग्रेसने मोर्चा नेला होता. यावेळी अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. काँग्रेसचा आक्रमक पवित्रा बघून भाजपचे कार्यकर्तेही पुढे सरसावले आणि त्यांनी अमित साटम आणि त्यांच्या ऑफिसला काहीही होऊ नये यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखून धरण्यासाठी आवश्यक हालचाली केल्या. या दरम्यान काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट संघर्ष झाला. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा आल्यामुळे तणाव वाढेल ही शक्यता गृहित धरुन पुरेशी खबरदारी घेतली होती. अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी बॅरिकेटिंग करुन बंदोबस्त ठेवला होता. यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.काय म्हणाले अमित साटम ?अस्लम शेख यांना सांगू इच्छितो, आपल्या सारख्या पाकिस्तानच्या औलादींना आम्ही अजिबात भीक घालत नाहीत. तुम्ही मालाडमध्ये ज्याप्रकारे मालवणी पॅर्टन चालवेला आहे तो उखडून फेकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत. येणाऱ्या काळात तुमच्यासारखी हिरवी पिलावळं या मुंबईत गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. त्यामुळे अशाप्रकारचे आरोप आणि वल्गना कदापी करु नये. कायद्याच्याआधीन राहून तुमच्यावर कारवाई होईल, असं अमित साटम म्हणाले होते.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 7:10 pm

भूगाव-भुकुम परिसरात वाहतूक कोंडी; रुग्णवाहिकाही अडकली, नागरिक संतप्त

पौड : चांदणी चौक-मुळशी-ताम्हिणी महामार्ग हा मुळशी तालुक्याची लाईफलाइन मानला जातो. मात्र भूगाव गावाजवळ सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून स्थानिक नागरिकांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. शनिवार-रविवार या दिवशी कोकणात जाणाऱ्या वाहनांची वाढलेली संख्या आणि पुलाचे सुरू असलेले काम यामुळे वाहतूक कोंडी अधिक तीव्र होते. भुकुम-माताळवाडी ते भूगाव […] The post भूगाव-भुकुम परिसरात वाहतूक कोंडी; रुग्णवाहिकाही अडकली, नागरिक संतप्त appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 6:54 pm

AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाने केला ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! इंग्लंडचा धुव्वा उडवत ‘या’मोठ्या विक्रमांची केली नोंद

Australia set fastest ever 200+ chase in Test history : ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ८ विकेट्सने पराभूत करत मालिकेत दमदार सुरुवात केली आहे. ज्या खेळपट्टीवर पहिल्याच दिवशी १९ विकेट्स पडल्या होत्या आणि फलंदाजांसाठी धावा करणे अत्यंत कठीण झाले होते, त्याच खेळपट्टीवर दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हिस हेडने आपल्या बॅटने धुमाकूळ घालत ऑस्ट्रेलियाला सहज लक्ष्य गाठून […] The post AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाने केला ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! इंग्लंडचा धुव्वा उडवत ‘या’ मोठ्या विक्रमांची केली नोंद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 6:42 pm

पश्चिम बंगालमध्ये महिला बूथ लेव्हल ऑफिसरने का केली आत्महत्या? कुटुंबियांचा धक्कादायक दावा

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विशेष सघन पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) चे काम सुरू असतानाच, कामाच्या कथित ताणामुळे एका महिला बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) ने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नदिया जिल्ह्यातील रिंकू तरफ़दार (Rinku Tarafdar) असे आत्महत्या केलेल्या बीएलओचे नाव आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी एसआयआरच्या कामाचा प्रचंड दबाव हेच आत्महत्येचे कारण असल्याचा दावा […] The post पश्चिम बंगालमध्ये महिला बूथ लेव्हल ऑफिसरने का केली आत्महत्या? कुटुंबियांचा धक्कादायक दावा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 6:40 pm

Palghar Leopard Attack |११ वर्षांच्या मुलाची बिबट्याशी झुंज; शाळेच्या बॅगेने जीव वाचवला

पालघर : एका ११ वर्षांच्या शाळकरी मुलाने त्याच्या मित्राच्या मदतीने एका बिबट्याशी धैर्य दाखवत झुंज दिली आहे. शुक्रवारी संध्याकाळी माला पडवीपाडा परिसरात शाळेतून परतत असताना एका बिबट्याने पाचवीच्या वर्गातील मयंक कुवरावर हल्ला केला. त्याने आणि दुसऱ्या मुलाने धाडसाने ओरडून त्या बिबट्याच्या दिशेने दगड फेकले. बिबट्याने मयंक कुवरावर जेव्हा झडप घातली तेव्हा, त्याची स्कूल बॅग संरक्षण […] The post Palghar Leopard Attack | ११ वर्षांच्या मुलाची बिबट्याशी झुंज; शाळेच्या बॅगेने जीव वाचवला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 6:35 pm

पहिल्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिका ६ बाद २४७

गुवाहाटी (वृत्तसंस्था): गुवाहाटीतील एसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट नियंत्रण व अचूकतेच्या बळावर पहिल्याच दिवशी सामना आपल्या पकडीत आणला. दक्षिण आफ्रिकेनं पहिला दिवस संपेपर्यंत २४७ धावांवर सहा गडी गमावले असून भारताला स्पष्टपणे वरचष्मा मिळवून दिला आहे.मैदानावरील पीच जरी फलंदाजांसाठी अडचणीची नव्हती, तरी खेळपट्टीवर टिकून राहण्यासाठी संयम आणि शिस्त आवश्यक होती. जसप्रीत बुमराह (१/३८) आणि कुलदीप यादव (३/४८) यांनी त्या दिशेने कसून मारा केला. रवींद्र जडेजाने (१/३०)ही आपापल्या स्पेलमध्ये कर्णधार तेंबा बावुमा याचे महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले.द. आफ्रिकेने सावध सुरुवात करत १६६/२ अशी मजबूत स्थिती मिळवली होती. बावुमा (४१) आणि ट्रिस्टन स्टब्स (४९) या जोडीने ८४ धावांची भागीदारी करत डाव उभा केला होता. पण बावुमाने लोफ्टेड ड्राइव्ह करण्याचा चुकीचा प्रयत्न केल्यानंतर खेळ पलटला. यशस्वी जैस्वालने झेल टिपत तो परतला, आणि त्यानंतर लगेचच स्टब्सही कुलदीपच्या चतुराईला बळी पडला. सलग दोन विकेटीनंतर वियान मुल्डरही (१३) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात माघारी परतला आणि एका टप्प्यावर स्थिर वाटणारा आफ्रिकी डाव २०१/५ असा ढासळला.शेवटच्या सत्रात मोहम्मद सिराजनं टोनी डे झोर्जी (२८) याला मागे झुकणाऱ्या सुंदर चेंडूवर बाद करत भारताला दिवसअखेरी जिंकून दिला. यापूर्वी बुमराहच्या लयबद्ध सुरुवातीच्या स्पेलनं एइडन मार्करम (३८) याला वारंवार त्रास दिला होता. मार्करमनं संयम दाखवला असला तरी चहापानाआधी अनावश्यक ड्राइव्ह करत तो बाद झाला. रायन रिक्लेटन (३५) यानाही कुलदीपनं दोन चेंडूंमध्येच बाद करत भारताच्या यशाची मालिका कायम ठेवली.कर्णधार ऋषभ पंतच्या अचूक क्षेत्ररचना आणि वेळेवर केलेल्या गोलंदाजांच्या बदलांचं विशेष कौतुक करावं लागेल. पहिल्या सत्रात बुमराहची धार, नंतर स्पिनचा प्रभाव – भारतीय संघाने गोलंदाजीमध्ये सतत दबाव ठेवत धावा रोखल्या.एकूणच, दक्षिण आफ्रिकेच्या शीर्ष सहा फलंदाजांनी ८० पेक्षा जास्त चेंडू खेळूनही मोठ्या धावा उभारण्यात अपयश आल्याने त्यांना त्याची किंमत मोजावी लागू शकते. पिचवर अजून झीज दिसत नसली तरी अधूनमधून चेंडू हालचाल करत आहे, त्यामुळे भारताला दुसऱ्या दिवशी लवकर आफ्रिकी डाव गुंडाळण्याची मोठी संधी आहे.खेळ थांबला तेव्हा सेनुरान मुथुसामी २५ आणि काइल व्हेर्रेन १ धावांवर नाबाद होते. दक्षिण आफ्रिकेच्या डावात १७ अतिरिक्त धावा (८ बाय, ६ लेगबाय आणि २ नो-बॉल) मिळाल्या. त्यांच्या डावातील ८१.५ षटकांत २४७ धावा झाल्या असून आतापर्यंत त्यांच्या ६ विकेट पडल्या आहेत. विकेट्स पडण्याचा क्रम अनुक्रमे – ८२, ८२, १६६, १८७, २०१ आणि २४६ असा होता.भारताच्या गोलंदाजांमध्ये कुलदीप यादवने १७ षटकांत ४८ धावांत ३ बळी घेत सर्वाधिक प्रभाव टाकला. बुमराहने १ बळी घेताना १७ षटकांत फक्त ३८च धावा दिल्या. मोहम्मद सिराजने ५९ धावांत १, तर जडेजाने ३० धावांत १ विकेट घेत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला अधूनमधून धक्का दिला. वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डीला मात्र यश मिळाले नाही.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 6:30 pm

रायगडमध्ये भाजप - राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी रंगणार लढत, थंडीत रंगणार मित्रपक्षांचा सामना

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांमधील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. बहुतांश नगरपालिकेत भाजप अजित पवार राष्ट्रवादी युती विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढत होत आहे. अलिबाग, रोहा, कर्जत आणि माथेरान या चार नगर परिषदांमध्ये दुरंगी, तर मुरुड व पेण नगरपरिषदेत तिरंगी लढती होणार आहेत. उरण आणि श्रीवर्धन नगर परिषदांमध्ये चौरंगी, महाड नगर परिषदेत पंचरंगी, तर खोपोली नगर परिषदेत बहुरंगी सामने होत असले, तरी खरा सामना हा युतीतील मित्र पक्षात असणार आहे.अलिबाग नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. कविता प्रविण ठाकूर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. परिणामी नगराध्यक्ष पदासाठी आता शेकाप, काँग्रेस, मनसे आघाडीच्या उमेदवार अक्षया प्रशांत नाईक आणि भाजपा, शिंदे शिवसेनेच्या उमेदवार तनुजा पेरेकर यांच्यात थेट दुरंगी लढत होणार आहे. नगरसेवकांच्या २० जागांपैकी एका जागी शेकापचे प्रशांत नाईक बिनविरोध विजयी झाल्याने आता १९ जागांकरिता ४१ उमेदवार रिंगणात आहेत.रोहा अष्टमी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वनश्री शेडगे विरुद्ध शिवसेना पक्षाच्या शिल्पा धोत्रे अशी थेट लढत होणार आहे. नगरसेवक पदाच्या २० उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने नगरसेवक पदाच्या १९ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक २ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र जैन हे बिनविरोध आले आहेत. नगरसेवक पदाच्या १९ जागेसाठी विविध पक्षाच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांमध्ये शिवसेना १३, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी १९, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी ५, शिवसेना ४, भारतीय जनता पार्टी ३, अपक्ष ६ हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.महाड नगर परिषदेत चेतन उर्फ बंटी गजानन पोटफोडे शिवसेना उबाठा गट, सुदेश शंकर कलमकर राष्ट्रवादी काँग्रेस, सुनील वसंत कविस्कर शिवसेना व अन्य दोन अपक्ष उमेदवार अशी पंचरंगी लढत होणार आहे, तर नगरसेवक पदाच्या २० पदांकरिता ४८ उमेदवार रिंगणात आहेत.माथेरान नगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्येच खरी लढाई असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले असून, अंतर्गत तिकीट नाकारलेल्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अधिकृत उमेदवारांना त्याचा थेट फटका काही प्रभागांमध्ये बसणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट व आरपीआय राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे शिवराष्ट्र पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गट, भाजपा आरपीआय पक्षाचा एक गट अशी महायुती या निवडणुकी सामोरे जाणार आहे. नगराध्यक्ष पदाकरिता महायुतीकडून चंद्रकांत चौधरी, तर शिवराष्ट्र पॅनलकडून अजय सावंत यांच्यामध्ये ही निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. नगरसेवक पदाच्या २० जागांकरिता ४६ उमेदवार रिंगणात आहेत.कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गट यांच्या महापरिवर्तन विकास आघाडीच्या पुष्पा दगडे आणि भाजपा, भाजप शिवसेना पक्ष या युतीच्या डॉ. स्वाती लाड यांच्यात थेट लढत होणार आहे. नगरसेवक पदाच्या २१ जागांकरिता ४२ उमेदवार रिंगणात आहेत.पेणमध्ये भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध पेणकर आघाडी पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीच्या प्रितम पाटील, पेणकर आघाडीच्या रिया धारकर आणि काँग्रेसच्या नंदा म्हात्रे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. भाजप-राष्ट्रवादी एकत्र येत असताना शिवसेना शिंदे गट स्वतंत्र लढत आहे. पेण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच सहा नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. हे सहाही नगरसेवक भाजप आणि राष्ट्रवादी युतीचे आहेत. यामुळे आता १८ नगरसेवक पदासाठी ४६ उमेदवार रिगंणात आहेत.मुरुडमध्ये थेट नगराध्यक्षा पदासाठी शिंदे शिवसेना पक्षांच्या कल्पना पाटील, शेकापच्या अंकिता माळी आणि अजित पवार राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आराधना दांडेकर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. नगरसेवक पदाच्या २० जागांकरिता ५८ उमेदवार आता रिंगणात आहेत.श्रीवर्धनमध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र सातनाक, भाजप शिवसेना पक्षाच्या अक्षता श्रीवर्धनकर, शिवसेना उबाठा पक्षाचे अतुल चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रविंद्र चौलकर अशी चौरंगी लढत होणार आहे, तर नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात आहेत.उरण नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून शोभा कोळी, महाविकास आघाडीकडून भावना घाणेकर, भाजप शिवसेना पक्षाकडून रुपाली ठाकूर, तर अपक्ष शेख नसरीन इसरार अशी चौरंगी लढत होणार आहे. नगरसेवक पदाच्या २१ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात आहेत. येथे भाजपा आमदार महेश बालदी यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे.खोपोली नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजपा विरुद्ध शिवसेना (शिंदे) पक्ष अशी लढत होत आहे. येथे राष्ट्रवादीचे सुनील पाटील आणि भाजप शिवसेना पक्षाचे कुलदीप शिंदे यांच्यात खरी लढत होणार आहे. अन्य सात अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. नगरसेवक पदाच्या ३१ जागांकरिता १५४ उमेदवार रिंगणात आहेत.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 6:30 pm

New labour codes: नवीन कामगार कायद्यांना संघटना का करत आहेत विरोध? जाणून घ्या सर्वकाही

New labour codes: भारत सरकारने सुमारे २९ जुन्या कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून त्याऐवजी चार नवीन लेबर कोड्स लागू केले आहेत. केंद्र सरकार या बदलांना कामगार आणि मजुरांच्या हितासाठी केलेले महत्त्वपूर्ण आणि ‘प्रगतिशील सुधार’ मानत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कोड्सना “स्वातंत्र्यानंतरच्या मजुरांसाठीचे सर्वात मोठे आणि प्रगतिशील सुधारणांपैकी एक” असे म्हटले आहे. सरकारच्या मते, यामुळे […] The post New labour codes: नवीन कामगार कायद्यांना संघटना का करत आहेत विरोध? जाणून घ्या सर्वकाही appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 6:22 pm

‘रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक…’; एकनाथ शिंदेंची भाजपवर नाव न घेता टीका

पालघर: पक्ष फोडाफोडीच्या कथित नाराजीनाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरमधील डहाणू नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात भाजपवर पहिल्यांदाच नाव न घेता प्रहार केल्याचं दिसून आलं आहे. डहाणूमध्ये “आपण अहंकाराविरोधात एकत्र आलो आहोत, रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक झाली होती,” असे सूचक विधान करून शिंदे यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. डहाणू नगरपरिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत […] The post ‘रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक…’; एकनाथ शिंदेंची भाजपवर नाव न घेता टीका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 6:06 pm

मोठी बातमी.. ! बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या गाडीने शनिवारी बीड जिल्ह्यात मोटारसायकलला धडक दिल्याने एक जोडपे आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुली जखमी झाल्या आहेत. ही घटना धारूर तहसीलमधील तेलगाव-धारूर रोडवर सकाळी ११.३० वाजता घडली. उपमुख्यमंत्री पवार परभणीहून धारूरकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या गाडीने त्या जोडप्यासह त्यांच्या दोन मुली जात असलेल्या मोटारसायकलला […] The post मोठी बातमी.. ! बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 5:56 pm

IND vs SA : कुलदीपची जादू अन् भारताचा जबरदस्त पलटवार! पहिल्या दिवसाखेर द. आफ्रिका २४७/६

IND vs SA 2nd Test Day 1 Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस अत्यंत चुरशीचा ठरला. गुवाहाटी येथे सुरू असलेल्या या सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर ६ बाद २४७ धावा केल्या आहेत. सुरुवातीच्या दोन सत्रांमध्ये आफ्रिकेच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवले असले, तरी अंतिम सत्रात भारतीय गोलंदाजांनी जोरदार मुसंडी […] The post IND vs SA : कुलदीपची जादू अन् भारताचा जबरदस्त पलटवार! पहिल्या दिवसाखेर द. आफ्रिका २४७/६ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 5:53 pm

New Labour Code: पीएफ, ग्रॅच्युइटी वाढणार, मग हातात येणारा पगार कमी होणार का? जाणून घ्या सर्वकाही…

New Labour Code: केंद्र सरकारने नवीन कामगार संहिता (New Labour Code) लागू करण्याची घोषणा केली असून, याचा थेट परिणाम कोट्यवधी नोकरदारांच्या वेतन रचनेवर (Salary Structure), कपातीवर आणि भविष्यातील फायद्यांवर होणार आहे. हा बदल तुमच्या हातात येणाऱ्या पगाराच्या गणिताला कसे बदलेल, याबद्दल कर्मचारी वर्गात मोठी चर्चा आहे. बेसिक सॅलरीचा नवा नियम आणि पगारावर परिणाम – नवीन […] The post New Labour Code: पीएफ, ग्रॅच्युइटी वाढणार, मग हातात येणारा पगार कमी होणार का? जाणून घ्या सर्वकाही… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 5:38 pm

गवईंच्या कार्यकाळात २१ मागासवर्गीय न्यायाधीशांची नियुक्ती; अनुसूचित जातींमधून १०, तर १५ महिलांची नियुक्ती

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या सुमारे सहा महिन्यांच्या कार्यकाळात देशाच्या विविध उच्च न्यायालयांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील दहा, इतर मागासवर्गीय आणि मागासवर्गीय प्रवर्गातील अकरा न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. देशाचे पहिले बौद्ध आणि दुसरे दलित सरन्यायाधीश असलेले न्यायमूर्ती गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय मंडळाचे नेतृत्व केले. या मंडळाने अर्थात कॉलेजीयमने विविध उच्च न्यायालयांचे […] The post गवईंच्या कार्यकाळात २१ मागासवर्गीय न्यायाधीशांची नियुक्ती; अनुसूचित जातींमधून १०, तर १५ महिलांची नियुक्ती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 5:31 pm

तळेगाव दाभाडेमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीत राडा; कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

मावळ : तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. याच वेळी नगरपरिषद कार्यालयात अनपेक्षितरित्या तणाव वाढला आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीची घटना घडली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली, मात्र शहरातील काही भागांत तणावाचे वातावरण दिसून आले.तळेगाव नगरपरिषदेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जात असली तरी भाजप–राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमधील मतभेद आता उघडपणे समोर येत आहेत. नेतृत्वपातळीवर दोन्ही पक्षांनी युती कायम ठेवली असली तरी स्थानिक पातळीवर उमेदवारी वाटप, प्रभाग रचना आणि पक्षांतर्गत गटबाजी यामुळे नाराजीत भर पडली आहे.https://youtube.com/shorts/VVpXM48oJzo?si=FnJGJMqlu3fqAja4तळेगावमध्ये तब्बल १९ उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची स्थिती निर्माण झाली असून त्यात राष्ट्रवादीचे १० आणि भाजपचे ९ उमेदवारांचा समावेश आहे. बिनविरोध निवडणुकीनंतरही उर्वरित जागांवर तणाव कायम असल्याचे चित्र दिसत आहे.अर्ज मागे घेण्याच्या दिवशी झालेली धक्काबुक्की ही किरकोळ चकमक नसून युतीतील विसंवाद आणखी वाढत असल्याचा इशारा असल्याचे स्थानिकांचे मत आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याचेही समजते. पोलिसांनी वेळेत कारवाई केल्याने परिस्थिती बिघडली नाही, परंतु पुढील टप्प्यांत हा अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होतो का, की समन्वय साधून महायुती निवडणुकीत एकत्रितपणे लढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 5:30 pm

अदानी समुहाकडून आणखी एक कंपनी १००% खरेदी 'ही'मोठी माहिती समोर

प्रतिनिधी: मूलभूत पायाभूत सुविधा उभारणी व डेटा सेंटर विस्तृत करण्यासाठी अदानी समुहाने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. अदानी समुहाची मुख्य कंपनी अदानी एंटरप्राईजेस व ऐजकॉनेक्स (EdgeConneX) यांच्यातील भागीदारी असलेल्या 'अदानी ऐजकॉनेक्स' या कंपनीचे संपूर्णपणे १००% भागभांडवल अदानी समुहाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. किंबहुना तो व्यवहारही पूर्ण केलेला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत समुहाने या अधिग्रहणाबाबत म्हटले आहे. मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर निर्मितीसाठी अदानी समुहाने हे अधिग्रहण केले आहे.आपल्या डेटा इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी कंपनीने ही योजना आखली होती अखेर याची अंमलबजावणी झाली आहे. हैद्राबाद, पुणे, नवी मुंबई यासह इतर शहरातही कंपनी आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवणार आहे. कंपनीने हे देखील म्हटले आहे की, सध्या अस्तित्वात असलेले ट्रेडकॅसेल पार्क (Trade Castle Park) ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू होणार होते मात्र ते आता सुरू होऊ शकते. हे अद्याप ऑपरेशनल झाले नसले तरी लवकरच या प्रकल्पाची सुरूवात होऊ शकते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात गौतम अदानी यांचे पुत्र व अदानी सेझ कंपनीचे संचालक करण अदानी यांनी केलेल्या घोषणेत गुगलच्या सहाय्याने जगातील सर्वात मोठ्या ग्रीन डेटा सेंटरपैकी एक सेंटर उभे करणार आहेत.अदानी एंटरप्रायझेसचा संयुक्त उपक्रम (Joint Venture) 'अदानी ऐजकॉनेक्सने २३१.३४ कोटींना ट्रेड कॅसल टेक पार्क विकत घेऊन त्यांच्या पायाभूत सुविधा विस्तार धोरणात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. हे संपादन तंत्रज्ञान पायाभूत सुविधा क्षेत्रातील क्षमता वाढवण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांमध्ये एक उल्लेखनीय पाऊल आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 5:30 pm

G20 परिषदेत PM मोदींनी मांडले 3 महत्त्वाचे प्रस्ताव; अमली पदार्थ-दहशतवाद, कौशल्य वृद्धीवर लक्ष

जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका): जी-२० परिषदेत सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी महत्त्वपूर्ण समस्यांवर चर्चा करत असतात. नोव्हेंबर महिन्यात सर्व राष्ट्रांचे प्रमुख वार्षिक शिखर परिषदेसाठी भेटतात. यावर्षी आफ्रिकेत आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन नवीन महत्त्वपूर्ण उपक्रम/प्रस्तावांची रूपरेषा मांडली, ज्यामुळे जागतिक स्तरावर विविध समस्यांवर उपाय शोधले जातील. या प्रस्तावांमध्ये प्रामुख्याने अमली पदार्थ आणि […] The post G20 परिषदेत PM मोदींनी मांडले 3 महत्त्वाचे प्रस्ताव; अमली पदार्थ-दहशतवाद, कौशल्य वृद्धीवर लक्ष appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 5:25 pm

पुण्यातील कचरावेचक कामगार अंजू माने यांनी १० लाखांची बॅग परत करून दिला मानवतेचा संदेश

पुणे : जिथे दैनंदिन जीवनात पैशासाठी लोक अनेकदा अनैतिक मार्ग स्वीकारताना दिसतात, तिथे पुण्यातील एका मेहनती महिलेने समाजासमोर प्रामाणिकतेचे उत्तम उदाहरण ठेवले आहे. कचरावेचक कामगार अंजू माने यांनी दाखवलेली सचोटी खरोखर प्रेरणादायी आहे. रोजच्या जगण्यासाठी कष्ट करणाऱ्या या महिलेला कचरा वेचताना १० लाखांहून अधिक रक्कम असलेली बॅग सापडली, तरीही पैशाच्या मोहापुढे झुकण्याऐवजी त्यांनी ती बॅग तिच्या मूळ मालकाकडे सुरक्षितरित्या परत केली.अंजू माने या स्वच्छ संस्थेत कचरावेचक म्हणून काम करतात. त्यांच्या तीन पिढ्या हेच काम करत आल्या असून, स्वतः अंजू गेली तब्बल २० वर्षं पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात कचरा गोळा करण्याचे काम करत आहेत. नेहमीप्रमाणे त्या सकाळी सात वाजता दारोदार कचरा गोळा करत होत्या. आठच्या सुमारास फिडर पॉइंटकडे कचरा नेत असताना रस्त्याच्या कडेला एक मोठी पिशवी पडलेली त्यांना दिसली. परिसरात औषधांची दुकाने असल्याने अशा पिशव्या आधीही मिळाल्याचा अनुभव त्यांना होता. म्हणून मालक परत येईल या विश्वासाने त्यांनी ती पिशवी सुरक्षित ठेवली. नंतर त्यात औषधांसोबत मोठी रोकड असल्याचे दिसताच त्यांनी तातडीने परिसरातील लोकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.त्या परिसरात अनेक वर्षं काम केल्यामुळे अंजू सर्वांना ओळखतात. शोध घेत असताना एक डिलिव्हरी बॉय अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत काहीतरी शोधताना दिसला. चौकशी केल्यानंतर तीच बॅग त्याची असल्याची खात्री झाली आणि अंजूंनी क्षणाचाही विलंब न करता ती बॅग त्याला परत केली. अत्यंत मौल्यवान रक्कम परत मिळाल्याने त्याला दिलासा मिळाला आणि त्याने कृतज्ञतेच्या भावनेतून अंजूंना ६०० रुपये बक्षीस दिले.अंजूताई म्हणाल्या, “आपल्याकडचे काहीशे रुपये हरवले तरी मनातून जात नाही. इथे दहा लाखांची रक्कम होती. ती व्यक्ती किती चिंतेत असेल, याचाच विचार माझ्या मनात होता.”अंजू माने यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. तिन्ही मुलींना त्यांनी शिक्षण दिले असून मुलगा वैद्यकीय क्षेत्रात काम करतो. पती बाळासाहेब मानेही त्यांना कामात मदत करतात. हातात फक्त आठ हजार रुपयांचे मासिक उत्पन्न असतानाही पैशांचा लालच न ठेवता अंजू माने यांनी दाखवलेली निस्वार्थ भावना आज सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 5:10 pm

Colliers survey insights: जागतिक रिअल इस्टेट बाजारात जबरदस्त आत्मविश्वास भारतात भांडवल प्रवाह स्थिर

मुंबई: नुकताच कॉलियर्सने त्यांचा २०२६ चा 'ग्लोबल इन्व्हेस्टर आउटलुक 'अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यातील निरीक्षणातील माहितीनुसार, गुंतवणूकदार जागतिक रिअल इस्टेट बाजारपेठेत आत्मविश्वासाने पुन्हा प्रवेश करत आहेत, विविध क्षेत्रांमध्ये आणि विभागांमध्ये विविधीकरणाचा (Diversification) साठी विशेष प्रयत्न करत आहेत. कॉलियर्सच्या मालकीच्या संशोधन आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या जागतिक सर्वेक्षणावर आधारित अहवालात असे आढळून आले आहे की बाजारातील फंडामेंटल(मूलभूत) तत्त्वे सुधारत आहेत. आवश्यक असलेली तरलता (Liqudity) बाजारात परतत आहे आणि विशेष म्हणजे किंमतींच्या अपेक्षा सामान्य होत आहेत. खर्चाचा दबाव आणि भूराजकीय जोखीम कायम असतानाही, हे ट्रेंड २०२६ साठी आशावाद निर्माण करत आहेत असे संस्थेने आपल्या अहवालात म्हटले.कॉलियर्सचा २०२६ कॉलियर्स ग्लोबल इन्व्हेस्टर आउटलुकनुसार एशिया पॅसिफिक इनसाइट्स जागतिक भांडवलात आशिया पॅसिफिक (APAC) कडे निर्णायक बदल दिसून येतो. गुंतवणूकदार जागतिक नवे उपक्रम आणि संपत्ती निर्मितीसाठी विविधीकरण करत आहेत.गुंतवणूकदार वाढीच्या क्षमतेवर भर देत असल्याने भांडवल आशिया पॅसिफिककडे-PERE नुसार, आर्थिक वर्ष २०२४ पासून आशिया पॅसिफिक-केंद्रित भांडवल उभारणीत १३०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे आणि आता आर्थिक २०२५ च्या पहिल्या-तिसाव्या तिमाहीत जागतिक निधी उभारणीत ११% ची भर पडली आहे. जागतिक गुंतवणूकदार आशिया पॅसिफिककडे वाटप करत आहेत, जे या प्रदेशाच्या गतिमान वाढीमुळे, मध्यमवर्गाच्या विस्तारामुळे आणि नवोन्मेषाच्या (Innovation)क्षमतेमुळे आकर्षित झाले आहेत असे अहवालातील निरीक्षण सांगते.जपान, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर सारख्या स्थापित बाजारपेठा लोकप्रिय राहिल्या तरी, उदयोन्मुख बाजारपेठा विशेषतः भारत उच्च परताव्यासाठी (High Returns) लक्ष वेधत आहेत.देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार अधिक सक्रिय होत असताना, २०२६ हे वर्ष आशिया पॅसिफिकमध्ये वाढत्या स्पर्धा आणि उच्च व्यवहारांच्या प्रमाणात येण्याचे वर्ष अहवालानुसार ठरले आहे. हा प्रदेश गुंतवणूकदारांसाठी विविध संधी प्रदान करतो.भारतातील गुंतवणूकीचा दृष्टीकोन: वाढत्या संधींमध्ये भांडवल प्रवाह स्थिर राहील - अहवालजागतिक गुंतवणूकदार भारताला आशिया पॅसिफिकमधील सर्वात आशादायक रिअल इस्टेट गंतव्यस्थानांपैकी एक म्हणून पाहतात. अनुकूल लोकसंख्याशास्त्र, स्थिर धोरणात्मक वातावरण आणि सकारात्मक आर्थिक दृष्टिकोन यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास भारतात उंचावत आहे.इक्विटी मार्केट्स REITs आणि IPOs द्वारे तरलता वाढवत आहेत आणि पर्यायी गुंतवणूक संधी निर्माण करत आहेत, ज्यामुळे भारतीय रिअल इस्टेटमध्ये सीमापार सहभाग वाढला आहे. एकूणच गुंतवणूकदार मुख्य आणि उदयोन्मुख मालमत्ता वर्गांमध्ये सक्रियपणे भांडवलाचे मूल्यांकन आणि वापर करत आहेत, संस्थात्मक-श्रेणीतील स्टॉक वाढत असताना हा ट्रेंड वाढण्याची शक्यता आहे.याविषयी बोलताना,' भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकींनी उल्लेखनीय लवचिकता दर्शविली आहे, जी बाजारपेठेची खोली आणि वाढत्या गुंतवणूकदारांच्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे. परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या संतुलित परस्परसंवादामुळे २०२५ आणि २०२६ मध्ये प्रत्येकी ५-७ अब्ज अमेरिकन डॉलर्सची वार्षिक गुंतवणूक अपेक्षित आहे. मजबूत देशांतर्गत आर्थिक वाढ, वाढती शहरीकरण, पायाभूत सुविधांमध्ये वाढ आणि वाढती वापर पातळी यासारख्या संरचनात्मक मागणीच्या घटकांचा भारतीय रिअल इस्टेटला फायदा होत आहे. गुंतवणूकदार भारताच्या दीर्घकालीन विकास कथेशी अधिकाधिक जुळत असल्याने, येत्या तिमाहीत देशांतर्गत आणि ऑफशोअर भांडवलाला आणखी गती मिळण्याची अपेक्षा आहे. एकूण गुंतवणूक भावना आशावादी आहे, विशेषत: अमेरिका आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशांमधून परदेशी गुंतवणूकदारांच्या सहभागात वाढ होत आहे, जी उच्च-क्षमता असलेल्या, लवचिक रिअल इस्टेट बाजारपेठ म्हणून भारताचे सतत आकर्षण प्रतिबिंबित करते' असे बादल याज्ञिक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, कॉलियर्स इंडिया म्हणाल्या आहेत.माहितीनुसार, भारतीय रिअल इस्टेटमधील संस्थात्मक गुंतवणूक लवचिक राहिली आहे, २०२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांत एकूण ४.३ अब्ज अमेरिकन डॉलर्सची झाली आहे, ज्याला पहिल्या तीन तिमाहींमध्ये स्थिर गती मिळाली आहे. गुंतवणूकदारांच्या सततच्या विश्वासामुळे, वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत व्यवहार बंद होण्याच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे, विशेषतः ऑफिस आणि निवासी विभागांमध्ये. एकत्रितपणे, हे दोन्ही विभाग वर्षाच्या एकूण गुंतवणुकीपैकी जवळजवळ ६०% योगदान देण्याची शक्यता आहे‌ एकूणच, 2025 साठी गुंतवणूकीचे प्रमाण सुमारे ५-७ अब्ज डॉलर असण्याचा अंदाज आहे, जो जागतिक व्यापारातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवरही देशांतर्गत बाजाराची खोली आणि स्थिरता दर्शवितो.'आर्थिक वर्ष २०२५ च्या गतीवर आधारित, भारतातील रिअल इस्टेट गुंतवणूक क्षेत्र २०२६ साठी अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे ज्याला मुख्य मालमत्तेमध्ये वाढणारी मागणी आणि संस्थात्मक दर्जाच्या पुरवठ्याची वाढती पाइपलाइन आधार देते. कार्यालयीन आणि निवासी विभाग गुंतवणुकीवर वर्चस्व गाजवत राहतील, ज्यामुळे एकूण आवक (Inflow) अर्ध्याहून अधिक होईल, तर औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स विभागाला नवीन गती मिळेल. पर्यायी मालमत्तेमध्ये डिजिटल पायाभूत सुविधांच्या जलद विस्तारामुळे आणि हायपरस्केल मागणीमुळे डेटा सेंटर्समध्ये वाढलेली गुंतवणूक दिसून येईल. सीमापार भांडवल हे एक महत्त्वाचे चालक राहील, कारण भारत एशिया पॅसिफिक प्रदेशात स्थिर, दीर्घकालीन रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी उदयोन्मुख ठिकाणांपैकी एक म्हणून आपले स्थान मजबूत करत आहे' असे विमल नादर, राष्ट्रीय संचालक आणि संशोधन प्रमुख, कॉलियर्स इंडिया म्हणाले आहेत.सर्वेक्षणानुसार, ६४% प्रादेशिक गुंतवणूकदार पुढील वर्षी आर्थिक वाढीमुळे वाढ होण्याची अपेक्षा करतात आणि जवळजवळ ६०% गुंतवणूकदार तरलता आणि भाडेवाढीबद्दल सकारात्मक आहेत. कुटुंब कार्यालये आणि एचएन‌आय (उच्च-निव्वळ संपत्ती High Net Worth Individual)असलेल्या व्यक्ती, विशेषतः हाँगकाँग आणि ऑस्ट्रेलियामध्ये, अधिक सक्रिय आहेत व अद्वितीय किंमत संधींचा फायदा घेत आहेत.भारताबाबत अहवालात काय म्हटले?भारत: भारत त्याच्या स्थिर कामगिरी, मजबूत मागणी-पुरवठा गती (Demand and Supply Speed) आणि लक्षणीय दीर्घकालीन क्षमतेमुळे मुख्य मालमत्ता तसेच पर्यायांसाठी एक आकर्षक गुंतवणूक गंतव्यस्थान म्हणून उदयास येत आहे.औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स: आय अँड एल विभाग गुंतवणूकदारांसाठी सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे, ऑस्ट्रेलियामध्ये व्यवहार वाढत आहेत आणि ई-कॉमर्समध्ये सतत वाढ झाल्यामुळे.भारत आणि जपानमध्ये मागणी वाढत आहे. सर्वेक्षणातील प्रतिसादक र्त्यांनी 'मोठ्या बॉक्स' वेअरहाऊसिंग (२७%) आणि लास्ट माईल लॉजिस्टिक्स (२०%) हे गुंतवणूकीच्या प्रमुख संधी म्हणून हायलाइट केले आहे, तर कोल्ड स्टोरेज लॉजिस्टिक्समध्ये रस वर्षानुवर्षे २% ने वाढून १५% झाला आहे.डेटा सेंटर्स: आम्हाला सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि भारतात मजबूत वाढ दिसून येते, ज्यामध्ये सीमापार भांडवलात मोठी रस आहे - सर्वेक्षणातील ११% प्रतिसादकर्ते (Respondent) एपीएसीमधील या विभागात भांडवल तैनात करण्याची योजना आखत आहेत, जे अमेरिकेपेक्षा थोडे १४% मागे आहेनिवासी: खाजगी इक्विटी निधीमुळे २०२६ मध्ये निवासी क्षेत्रातही जास्त गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. बहुतेक गुंतवणूकदार (आशिया पॅसिफिक) या प्रदेशातील मोठ्या शहरांवर लक्ष केंद्रित करत आहेत, ८७% प्रतिसादकर्ते प्रमुख शहरांच्या ठिकाणांना प्राधान्य देत आहेत.आदरातिथ्य आणि विद्यार्थी गृहनिर्माण (Hospitality and Housing) - पर्यटनातील मजबूत पुनर्प्राप्तीचा हॉस्पिटॅलिटी विभागाला फायदा होत आहे, एअरलाइन्स एपीएसीमध्ये मार्गांचा विस्तार करत आहेत आणि ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड सारख्या बाजारपेठा मुख्य लाभार्थी आहेत. विद्यार्थी गृहनिर्माण वाढत्या प्रमाणात भांडवल आकर्षित करत आहे.२०२६ कॉलियर्स ग्लोबल इन्व्हेस्टर आउटलुकची आशिया पॅसिफिक आवृत्ती संपूर्ण प्रदेशातील वरिष्ठ कॉलियर्स तज्ञांच्या मतांवर आधारित आहे, तसेच कॉलियर्सच्या उद्योग-अग्रणी संशोधन पथकाने विश्लेषण केलेल्या जवळजवळ १४०० प्रादेशिक आणि जागतिक गुंतवणूकदार प्राधान्ये आणि धोरणांच्या व्यापक सर्वेक्षणाचे निकाल आहेत असे रिसर्च संस्थेने यावेळी म्हटले.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 5:10 pm

AUS vs ENG : १०४ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडलं असं! दोन दिवसांतच ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला चारली धूळ

AUS vs ENG 1st Test Highlights : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस मालिकेतील पहिली कसोटी अत्यंत थरारक आणि ऐतिहासिक ठरली आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे, हा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत संपला. ॲशेसच्या इतिहासात १९२१ नंतर, म्हणजेच तब्बल १०४ वर्षांनंतर असे पहिल्यांदाच घडले आहे, जेव्हा कसोटी सामन्याचा निकाल केवळ […] The post AUS vs ENG : १०४ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडलं असं! दोन दिवसांतच ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला चारली धूळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 5:05 pm

New labour code: आता एक वर्षाच्या सेवेनंतर ग्रॅच्युइटी: निश्चित कालावधीच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन नियम कधी लागू होणार?

New labour code: केंद्र सरकारने जाहीर केलेल्या चार नवीन कामगार संहिता (लेबर कोड्स) २१ नोव्हेंबरपासून प्रभावी झाल्या आहेत. या व्यापक कामगार सुधारणांमध्ये अनेक महत्त्वाचे आणि दूरगामी बदल करण्यात आले आहेत. यातील एक उल्लेखनीय बदल म्हणजे ग्रॅच्युइटी मिळण्यासाठी असलेल्या सेवेच्या कालावधीत झालेली कपात. या बदलामुळे, आता कर्मचाऱ्यांना केवळ एका वर्षानंतरच ग्रॅच्युइटीचा लाभ मिळणार आहे, जो आजवर […] The post New labour code: आता एक वर्षाच्या सेवेनंतर ग्रॅच्युइटी: निश्चित कालावधीच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन नियम कधी लागू होणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 5:00 pm

निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का; रवींद्र चव्हाण यांचा जवळ नेता फोडला

मुंबई : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभर पक्षफोडीचे राजकारण तापले असून, भाजपमध्ये इनकमिंगचा धडाका सुरू असला तरी आता आऊटगोइंगचीही सुरुवात झाली आहे. डोंबिवली-कल्याण परिसरात भाजपला मोठा धक्का बसला असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय व माजी नगरसेवक सुरेश भोईर यांनी भाजपची साथ सोडून शिवसेना (ठाकरे गट) […] The post निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का; रवींद्र चव्हाण यांचा जवळ नेता फोडला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 4:50 pm

बुडत्याचा पाय खोलात! युएस न्यायालयाचा BYJUs सर्वेसर्वा रविंद्रन यांच्या विरोधात धक्कादायक निकाल एडटेक कंपनीचे अस्तित्त्वच धोक्यात?

प्रतिनिधी: बायजूज (BYJUs) कंपनीचे सर्वेसर्वा व संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी बायजूज रविंद्रन यांना युएस न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. निकालातील माहितीनुसार न्यायमूर्तींनी रविंद्रन यांना १ अब्ज डॉलर कर्जदात्या परत करण्याचे आदेश दिले आहेत. युएस स्थित GLAS Trust Company LLC व Alpha BYJUs या दोन्ही कंपन्यांनी याचिका दाखल केली होती. त्यावरील आपल्या निष्कर्षात युएस न्यायालयाने कंपन्यांच्या बाजूने निकाल देत रविंद्रन यांना मोठा धक्का दिला आहे.'न्यायालय प्रतिवादी (Defendant) रवींद्रन विरुद्ध $५३३०००००० $ रकमेचा आणि अंक II,V आणि VI वर ५४०६४७१०९.२९ $रकमेचा निर्णय देईल' असे निकालात म्हटले गेले आहे. २० नोव्हेंबर २०२५ च्या निकालानुसार, डेलावेअर दिवाळखोरी (Bankruptcy) न्यायालयाला असे आढळून आले की रवींद्रन त्यांच्या शोध आदेशाचे पालन करण्यात अयशस्वी ठरले आहेत आणि अनेक वेळा त्यांनी तरतूदीसाठी टाळाटाळ केली.यापूर्वी युएस दिवाळखोरी न्यायालयाने रविंद्रन यांना अनेकदा अल्फा (BYJUs) कंपनीच्या ताळेजमा खात्याच्या अकाऊंटची माहिती उघड करण्यास आहे. रविंद्रन यांनी मुख्य कंपनी असलेल्या थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड (Think and Learn Private Limited) कंपनी BYJUs नावाखाली आपला ब्रँड चालवत होते. कंपनीने युएस करदात्यांकडून १ अब्ज डॉलरचे मुदत कर्ज (Term Loan) घेतले होते. असे सांगण्यात येत आहे की टीएलपीएल या अमेरिकेतील कर्जदारांकडून $1 अब्ज टर्म लोन बी मिळवले होते. कर्जदारांनी नंतर आरोप केला होता की BYJUs च्या अल्फाने कर्जाच्या अटींचे उल्लंघन केले असून एकूण कर्जापैकी ५३३ दशलक्ष डॉलर्स बेकायदेशीरपणे अमेरिकेतून बाहेर काढले आहेत. गेल्या वर्षी कंपनीवर याच प्रकरणात फेमा (Foreign Exchange Management Act FEMA) कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. पुन्हा ग्लास ट्रस्टने डेलावेअर न्यायालयात धाव घेतली आणि BYJU च्या अल्फाचे नियंत्रण घेण्यासाठी अनुकूल आदेश मिळाला आहे. BYJU च्या अल्फा आणि ग्लास ट्रस्ट दोघांनीही ५३३ दशलक्ष डॉलर्स आणि संबंधित व्यवहारांच्या शोधासाठी डेलावेअर दिवाळखोरी न्यायालयात धाव घेतली होती.२० नोव्हेंबर रोजीच्या ताज्या निकालानुसार, न्यायालयाने असे आढळून आले की रवींद्रनला डिस्कव्हरी ऑर्डरची माहिती होती परंतु त्यांनी त्याचे पालन करण्यास नकार दिला न्यायालयाने या प्रकरणात अवमान आदेश देखील जारी केला होता परंतु रवींद्रन डिस्कव्हरी विनंत्यांना प्रतिसाद देण्यास किंवा त्याच्यावर लादलेल्या निर्बंधांची भरपाई करण्यास नकार देत असल्याचे नमूद केले. 'या प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थिती दर्शवितात की रवींद्रन यांनी शोध विनंत्यानंतरही योग्य प्रतिसाद देण्यात सातत्याने अपयशी ठरणे हा रवींद्रन यांचा स्वतःचा वैयक्तिक निर्णय आहे' असे निकालात नमूद केले आहे. न्यायालयाने रवींद्रन यांचा युक्तिवाद फेटाळून लावला की GLAS ट्रस्टला BYJU'S Alpha च्या पुस्तकांमधून ज्या माहितीची आवश्यकता आहे त्यावरील कागदपत्रे उपलब्ध आहेत. GLAS ला संबंधित कागदपत्रे उपलब्ध आहेत या दाव्याला समर्थन देण्यासाठी रेकॉर्डमध्ये काहीही नाही असे नमूद केले आहे.न्यायालयाने आधीच ठरवले आहे की रवींद्रन मागील आदेशांचा सातत्याने अवमान करत आहेत आणि जोपर्यंत तो त्याचा अवमान पूर्ण करत नाही तोपर्यंत त्यांना दररोज १०००० डॉलरचे निर्बंध लादले आहेत. रवींद्रन परदेशात राहतात आणि त्यांचा आर्थिक दंड पूर्ण करण्याचा किंवा शोध आदेशांचे पालन करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे दिसून येते. त्यानुसार आर्थिक निर्बंधांनी प्रभावी उपाय प्रदान केलेला नाही, ज्यामुळे या प्रकरणात डिफॉल्ट निर्णयासारख्या कठोर शिक्षेला योग्य बनवले आहे असे निकालात म्हटले आहे.आर्थिक वर्ष २०२३ नोव्हेंबरच्या महिन्यात एकूण कर्जातील ५३३ डॉलरचा हप्ता अद्याप मिळालेला नाही असे युएस कंपनीने स्पष्ट केले होते. एप्रिल २०२४ मध्ये रविंद्रन यांच्याच कंपनी अल्फा व युएस स्थित कर्ज देणारी कंपनी जीएलएएस (GLAS) यांनी रविंद्रन व इतर काहींवर चोरी आणि फसवणूकीचा आरोप करत खटला दाखल केला होता.न्यायालयीन दाखल्यांमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की ५३३ दशलक्ष डॉलर्स रवींद्रन आणि त्यांच्या सहयोगींना अनाधिकृत राउंड-ट्रिप (वळवण्यात) करण्यात आले होते परंतु रविंद्रन आणि सहकारी यांनी संबंधित कंपनीच्या दाव्याचे खंडन करते म्हटले होते की हे पैसे कायदेशीर व्यावसायिक खर्चासाठी होते. हस्तांतरणात वापरल्या जाणाऱ्या ओसीआय लिमिटेड या कंपनीच्या प्रमुखांनी दिलेल्या शपथपत्रात हे स्पष्ट केले आहे की निधी वेगवेगळ्या संस्थांमधून कसा हलवला गेला आणि रवींद्रनशी जोडलेल्या सिंगापूरच्या एका संस्थेकडे कसा गेला. बायजू'ज आणि रवींद्रन यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत, असा दावा केला आहे की हा निधी मूळ कंपनी, थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड (टीएलपीएल) साठीच वापरला गेला. १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रकमेच्या निकालामुळे रवींद्रन वैयक्तिकरित्या जबाबदार आहेत, कर्जदार आता त्यांच्याकडे असलेल्या अधिकारक्षेत्रात अंमलबजावणी कारवाई करू शकतात.प्रत्युत्तरात, रवींद्रन यांनी या निर्णयाला अपील करण्याचा आपला हेतू व्यक्त केला, निकाल हा घाईघाईने केलेले आणि अन्याय्यकारक असल्याचे म्हटले आणि बचाव सादर करण्याचा अधिकार आपल्याला नाकारण्यात आला असा युक्तिवाद केला आहे दरम्यान त्यांनी कर्जदारांविरुद्ध स्वतंत्र खटला चालवण्याची योजना देखील दर्शविली आहे अशी माहिती मिळाली आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 4:30 pm

शरद पवारांचे ठाकरेसेनेशी युतीचे संकेत; काँग्रेससोबत जाण्यास नकार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस(शप) पक्षाने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी युती करण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईत शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. युतीसाठी शिवसेना (उबाठा) शी चर्चा करण्याचा एकमताने घेण्यात निर्णय आला. भाजप सोडून इतरांसोबत युती करण्यास हरकत नाही. समाजवादी पक्ष किंवा […] The post शरद पवारांचे ठाकरेसेनेशी युतीचे संकेत; काँग्रेससोबत जाण्यास नकार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 4:20 pm

AUS vs ENG : ट्रॅव्हिस हेडच्या तुफानी खेळीने इंग्लंडचा उडवला धुव्वा, ६९ चेंडूत शतक झळकावत लावली विक्रमाची रांग

Travis Head smashed fastest Test century in AUS vs ENG 1st Test : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठेच्या ॲशेस २०२५-२६ मालिकेची सुरुवात अतिशय थरारक झाली आहे. पर्थ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयात मिचेल स्टार्क आणि ट्रॅव्हिस हेडने महत्त्वाची भूमिका बजावली. यासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० […] The post AUS vs ENG : ट्रॅव्हिस हेडच्या तुफानी खेळीने इंग्लंडचा उडवला धुव्वा, ६९ चेंडूत शतक झळकावत लावली विक्रमाची रांग appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 4:12 pm

मोठी बातमी: या हिवाळी अधिवेशनात सरकार जुन्या पुराण्या १२० कायद्यांना तिलांजली देणार अनेक आर्थिक सुधारणावादी 'ही'बिले मांडणार

प्रतिनिधी:संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरु होत आहे. ज्यामध्ये महत्वाच्या विषयावर चर्चा अपेक्षित आहे. खासकरून हे हिवाळी अधिवेशन आर्थिक घडामोडीसाठी महत्वाचे सत्र असेल. या सत्रात बहुप्रतिक्षित अणुऊर्जा विधेयक, २०२५, मार्केट्स कोड बिल आणि विमा कायदा सुधारणा विधेयक (Atomic Energy Bill 2025, Market Code Bill, Insurance Law Amendment Bill) ही विधेयके सादर (Tabled) केली जातील त्यावर महत्वाची चर्चाही अपेक्षित आहे. माहितीनुसार या कालावधीत अनेक इतर बील सादर केली जाऊ शकतात. याशिवाय सरकार १२० पेक्षा अधिक जुन्या पुराण्या कायद्यांना तिलांजली देणार असून हे कालबाह्य कायदे काढून टाकण्यासाठी एक रद्द आणि सुधारणा विधेयक देखील मांडणार आहे अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.उदाहरणार्थ यंदा प्रलंबित सिक्युरिटीज मार्केट कोड बील (SMC 2025) सादर केले जाणार आहे. २०२१-२२ मधील अर्थसंकल्पात यांचा गोषवारा प्रसिद्ध झाला होता. मात्र यावर अद्याप सरकारने मंजूरी दिली नव्हती. किंबहुना सरकारने यात पुन्हा फेरबदल करत यांचे नवीन विधेयक प्रस्तुत केले जाईल. विमा क्षेत्रातील नियमांवरही या सत्रात भाष्य केले जाईल व बहुपर्यायी वस्तुनिष्ठ चर्चा होऊन विमा कायदे (सुधारणा) विधेयक २०२५ सादर केले जाईल. याखेरीज विमा क्षेत्र मजबूत करताना त्यातील अडचणी, विस्तार, इज ऑफ डुईंग बिझनेस या कारणासाठी नव्या सुधारणा सुचवल्या जाणार आहेत.तसेच वित्तीय क्षेत्रातील अर्थात भांडवली बाजारात नवे बदल अपेक्षित आहे. सेबी १९९२ नंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात नियमनात बदल करणार आहे. त्याप्रमाणे सेबी बिल १९९२, डिपोझिटरी अँक्ट १९९६, सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन अँक्ट १९५६ हे कायदे सोपे व अत्याधुनिक व कठोर होऊ शकतात.पायाभूत सुविधा आणि वाद निवारण सुधारणा (Infrastructure and Dispute Resolution Reform) देखील दिसून येतात. राष्ट्रीय महामार्ग (सुधारणा) विधेयकाचे उद्दिष्ट रस्ते प्रकल्पांसाठी भूसंपादनाला गती देणे आहे, तर लवाद आणि सामंजस्य (सुधारणा) (Arbitration and Conciliation Amendment Bill) विधेयक १९२६ च्या चौकटीला अद्ययावत करण्याचा आणि लवाद परिसंस्था (Arbitration Ecosystem) मजबूत करण्याचा प्रयत्न करते.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 4:10 pm

T20 World Cup 2026: संभाव्य गट जाहीर होण्याआधीच माहिती लीक; भारत–पाकिस्तान पुन्हा एकाच गटात

मुंबई : टी२० विश्वचषक २०२६ ची तयारी जोरात सुरू असून, अधिकृत गटवाटप २५ नोव्हेंबरला जाहीर होणार असले तरी संभाव्य गटांची प्राथमिक माहिती आधीच समोर आली आहे. भारत आणि श्रीलंका संयुक्त यजमान म्हणून स्पर्धा आयोजित करत आहेत. ही स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू होऊन ८ मार्चला अंतिम सामन्याने संपणार आहे. या वेळच्या विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी होत असून प्रत्येक गटात पाच संघ ठेवण्याची योजना आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील या चार गटांपैकी भारताचा गट तुलनेने सोपा मानला जात आहे. तर श्रीलंकेचा गट अत्यंत आव्हानात्मक ठरू शकतो अशी माहिती समोर आली आहे.भारतातील संभाव्य गटात पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्स या संघांचा समावेश असेल. दोन कसोटीयोग्य संघांव्यतिरिक्त इतर तीन संघ तुलनेने कमी अनुभवी असल्याने भारत आणि पाकिस्तान या दोघांसाठी सुपर एट फेरीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा असू शकतो. भारताचा पहिला सामना ८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्ध अहमदाबादमध्ये खेळवला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर १२ फेब्रुवारीला दिल्लीमध्ये नामिबिया, १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये पाकिस्तान आणि १८ फेब्रुवारीला मुंबईत नेदरलँड्सविरुद्ध भारताचे सामने होतील. भारत-पाकिस्तानचा सामना नेहमीप्रमाणेच सर्वाधिक चर्चेचा असून तो कोलंबोमध्ये खेळवला जाऊ शकतो.दुसरीकडे, श्रीलंका अत्यंत आव्हानात्मक गटात सामील होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या गटात ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि ओमान यांसारखे प्रतिस्पर्धी संघ असू शकतात. उर्वरित गटही तितकेच ताकदवान आणि स्पर्धात्मक आहेत. इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ आणि इटली यांचा समावेश असलेला गट, तसेच दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, यूएई आणि कॅनडा असलेला गट, हे दोन्ही गट प्राथमिक फेरीत चुरशीचे आणि थरारक सामने घडवून आणतील, असे स्पष्ट दिसते.भारत आणि श्रीलंका मिळून या स्पर्धेसाठी आठ शहरांत सामने आयोजित करतील. भारतातील मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली आणि अहमदाबाद ही प्रमुख शहरे असतील, तर श्रीलंकेत कोलंबो आणि कँडी येथील मैदानांचा वापर केला जाईल. अंतिम सामना अहमदाबादमध्ये खेळला जाण्याची शक्यता आहे; मात्र पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचल्यास हा सामना श्रीलंकेत हलवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच उपांत्य फेरीसाठी मुंबई, कोलकाता आणि कोलंबो या स्थळांची निवड संघांच्या प्रगतीनुसार केली जाणार आहे.स्पर्धेच्या स्वरूपानुसार प्रत्येक गटातील पहिले दोन संघ सुपर एट फेरी गाठतील. त्यानंतरच्या टप्प्यातून उपांत्य फेरी निश्चित होईल आणि अखेर विजेतेपदासाठी दोन संघ ८ मार्च रोजी अंतिम लढत देतील. अधिकृत गटवाटपाची घोषणा ICC २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत करणार असून त्यानंतर संपूर्ण वेळापत्रक आणि स्थळांची अंतिम यादी समोर येईल.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 4:10 pm

भेंडा-कुकाणा परिसरात लंम्पी नियंत्रणासाठी खासगी डॉक्टरांचा गौरव

नेवासा : नेवासे तालुक्यातील भेंडा-कुकाणा परिसरात लंम्पी आजाराने थैमान घातलेल्या सुमारे दोन हजार जनावरांवर यशस्वी नियंत्रण मिळविल्याबद्दल परिसरातील खासगी पशुवैद्यकांचा सन्मान करण्यात आला. पशुवैद्यकीय दवाखाना कुकाणा अंतर्गत कार्यरत असणारे डॉ. मनोज शिंदे (एम.व्ही.एस्सी) यांनी या संकटात पुढाकार घेतला. त्यांनी स्वखर्चाने औषधे तयार करून आणि उपचारपद्धतीचे मार्गदर्शन करून जवळपास ३० ते ४० खासगी डॉक्टरांना मोफत औषधांचे […] The post भेंडा-कुकाणा परिसरात लंम्पी नियंत्रणासाठी खासगी डॉक्टरांचा गौरव appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 4:00 pm

मालेगाव अत्याचार प्रकरण: ‘या’मागणीसाठी सकल मराठा समाजाचे नेवासे फाट्यावर तीव्र आंदोलन

नेवासा: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील डोंगराळे गावात एका चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमास तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा आरोपीस समाजाच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी नेवासे तालुका सकल मराठा समाजाने शनिवार (दि. २२) रोजी नेवासे फाटा येथील राजमुद्रा चौकात तीव्र आंदोलन केले. अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सकाळी ११ वाजता झालेल्या या आंदोलनात […] The post मालेगाव अत्याचार प्रकरण: ‘या’ मागणीसाठी सकल मराठा समाजाचे नेवासे फाट्यावर तीव्र आंदोलन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 3:55 pm

Solapur Accident : सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर भीषण अपघात; टायर फुटल्याने क्रुझर पलटी, ५ भाविक ठार

Solapur-Hyderabad highway tyre burst accident full report : सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर अणदुर गावाजवळ शनिवारी सकाळी देवदर्शनाला जात असलेल्या भाविकांच्या क्रुझर गाडीचा भीषण अपघात झाला. गाडीचा पुढचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि क्रुझर रस्त्यावर पलटी झाली. यावेळी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक बसल्याने अपघाताची तीव्रता वाढली. या दुर्दैवी अपघातात पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला, […] The post Solapur Accident : सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर भीषण अपघात; टायर फुटल्याने क्रुझर पलटी, ५ भाविक ठार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 3:45 pm

शिरूर नगरपरिषद निवडणूक : अलका खांडरे यांना महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी

शिरूर – शिरूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने अनुभवी नेत्या अलका सुरेश खांडरे यांच्या नावावर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. दोन वेळा नगरसेविका आणि दोन वेळा उपनगराध्यक्ष म्हणून कार्य केलेल्या अलका यांनी शहराचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. त्यांची ओळख सर्वसमावेशक नेतृत्व करणारी संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून आहे. स्व. रसिकभाऊ धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली […] The post शिरूर नगरपरिषद निवडणूक : अलका खांडरे यांना महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 3:34 pm

एलियन्स पृथ्वीवर येणार, एआय अनियंत्रित होणार, जगात विनाशकारी युद्ध होणार आणि बरंच काही... काय सांगते बाबा वेंगांची भविष्यवाणी

यावर्षाचा उत्तर काळ सुरू झाला असून नवीन वर्षाच्या स्वागताला काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे २०२६ वर्ष कसे असेल? यावर्षात काय होणार? याबद्दल सर्वांनाच उत्सूकता लागली आहे. भविष्य वर्तवणाऱ्या व्यक्तीसुद्धा आता यावर अभ्यास करत आहेत. प्रसिद्ध भविष्य वर्तवणाऱ्या व्यक्तींच्या नावात बल्गेरियन महिला बाबा वेंगा अव्वल स्थानावर आहे. बाबा वेंगाचे निधन झाले असले तरी २०२६ मध्ये काय होणार याबद्दल त्यांनी भविष्य वर्तवले आहे. ज्यात त्यांनी सांगितले होते की, मनुष्य पहिल्यांदाच थेट एलियन्सला भेटणार आहे. जाणून घेऊया बाबा वेंगांच्या भविष्यवाणीबद्दल सविस्तर...बाबा वेंगांच्या भविष्यवाणीनुसार, २०२६ सालासाठी सर्वात महत्त्वाच्या भाकितांपैकी एक म्हणजे जगाच्या पूर्व भागात एक मोठे आणि विनाशकारी युद्ध सुरू होईल. जे हळूहळू संपूर्ण जगात पसरून यामध्ये जगाचा पश्चिम भाग सर्वाधिक प्रभावित होईल. या युद्धामुळे संपूर्ण जागतिक सत्ता परिवर्तन आणि व्यापक जीवितहानी होऊ शकते. तसेच रशियाचा एक शक्तिशाली नेता संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवू शकतो. त्याला एक वैश्विक देव मानले जाऊ शकते.बाबा वेंगांनी नैसर्गिक आपत्तीबाबतही भाकीत केले आहे. २०२६ मध्ये लोकांना अनेक गंभीर नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागू शकतो. एका अहवालानुसार, तिने असा दावाही केला आहे की २०२६ हे वर्ष भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तींचे वर्ष असेल, ज्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल..सध्या एआयचा वापर एवढा वाढला आहे की, भविष्यातील एआयचे धोकेसुद्धा बाबा वेंगांनी सांगितले आहेत. भविष्यात एआय इतके शक्तिशाली होईल की मानवांना त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल, असे भाकित वांगा यांनी केले आहे. एआय स्वतःहून मोठे निर्णय घेण्यास सुरुवात करेल, ज्याचा आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर थेट परिणाम होईल. एआयचे हे एक पाऊल मानवी निर्मिती, यंत्र स्वायत्तता आणि सर्व नैतिक जबाबदाऱ्यांमधील रेषा पुसून टाकणारे असेल. हे भाकित सध्याच्या काळात एआयच्या वेगाने होणाऱ्या वाढीच्या चिंतेशी अगदी साम्य असल्याचे दिसते.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 3:30 pm

Mahim Station Fire : हार्बर लाईन सेवा ठप्प! माहिम रेल्वेस्थानकाजवळ नवरंग कंपाऊंडमध्ये मोठी आग; लोकल वाहतुकीवर परिणाम, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात आज, २२ नोव्हेंबर रोजी माहिम रेल्वे स्थानकाजवळ एक मोठी आग लागल्याची गंभीर घटना घडली आहे. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी ही आग लागल्याची माहिती मिळाली. ही आग एका तळमजला अधिक एक मजली (Ground plus one) झोपडीवजा घरात लागली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल (Mumbai Fire Brigade), रुग्णवाहिका (Ambulance) आणि बीएमसीचे वॉर्ड कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, आग लागलेल्या ठिकाणी किमान दोन मोठे स्फोट ऐकू आल्याने परिसरामध्ये मोठी घबराट पसरली होती. आग रेल्वे ट्रॅकच्या जवळ असल्याने, याचा परिणाम तात्काळ रेल्वेच्या वाहतुकीवर झाला. पश्चिम रेल्वे नियंत्रण कक्षाने (Western Railway Control Room) दिलेल्या माहितीनुसार, आगीच्या घटनेमुळे हार्बर लाईनवरील सीएसटी (CST) कडे जाणारी रेल्वे वाहतूक दुपारी १२ वाजून ४३ मिनिटांपासून थांबवण्यात आली आहे. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले असून, अग्निशमन दलाचे जवान आग पूर्णपणे विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सध्या या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 3:10 pm

‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री निमरत कौरची एन्ट्री; भूमिकेला मिळालेल्या प्रतिसादावर म्हणाली…

Actress Nimrat Kaur : गेल्या काही दिवसांपासून द फॅमिली मॅन सीझन ३ ची जोरदार चर्चा होती. अखेर या वेबसिरीजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नव्या सीझनमध्ये अभिनेत्री निमरत कौर प्रमुख भूमिकेत असून, तिने एका मुलाखीत आपल्या भूमिकेबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. तिच्या मते, ‘द फॅमिली मॅन’च्या नवीन सीझनमध्ये मीराची भूमिका साकारणे ही […] The post ‘द फॅमिली मॅन’ च्या तिसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री निमरत कौरची एन्ट्री; भूमिकेला मिळालेल्या प्रतिसादावर म्हणाली… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 3:05 pm

पाकमधून पाठवलेला शस्त्रसाठा दिल्लीत जप्त; तुर्की-चीनी बनावटीची शस्त्रे भारतात पुरवण्याचे मोठं रॅकेट उघड

Delhi Crimes | दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी जोडलेल्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे आणि चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख अजय, मनदीप, दलविंदर आणि रोहन अशी झाली आहे. ही टोळी पाकिस्तानमार्गे तुर्की आणि चीनमध्ये बनवलेल्या अत्याधुनिक पिस्तूल भारतात पुरवण्यासाठी रॅकेट चालवत होती. पोलिसांच्या मते, […] The post पाकमधून पाठवलेला शस्त्रसाठा दिल्लीत जप्त; तुर्की-चीनी बनावटीची शस्त्रे भारतात पुरवण्याचे मोठं रॅकेट उघड appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 3:02 pm

Pune : सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने महिलांकडून दागिन्यांची चोरी

पुणे– खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरलेल्या महिलांनी दागिने चोरून नेल्याची घटना बंडगार्डन रस्ता, तसेच कोंढवा भागात घडल्या. याप्रकरणी कोेरेगाव पार्क आणि कोंढवा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सराफी पेढीत चोरी करणाऱ्या महिलांनी बुरखा परिधान केल्याचे चित्रीकरणात आढळून आले. बंडगार्डन स्त्यावरील एका प्रसिद्ध सराफी पेढीत शिरलेल्या महिलांनी खरेदीच्या बहाण्याने पावणेपाच लाख रुपयांचे सोन्याचे […] The post Pune : सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने महिलांकडून दागिन्यांची चोरी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 2:53 pm

पुतणीसाठी चुलतीची माघार; अवघ्या २१ व्या वर्षी महाराष्ट्राला मिळाली सर्वात तरुण नगरसेविका, कोण आहे स्नेहा तमशेट्टे?

Sneha Tamashette : राज्यातील २४६ नगपरिषदा आणि ४२ नगरपंचायत निवडणुका होण्याअगोदरच अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली आहे. अशातच आता नांदेड जिल्ह्यातील मुखेड नगरपरिषद निवडणुकीतून एका तरुणीची नगरसेवक पदी अवघ्या २१ व्या वर्षी बिनविरोध निवड झाली आहे. या तरुणीचे नाव स्नेहा तमशेट्टे असून तिने नगरसेवक पदी झालेल्या बिनविरोध निवडणुकीची जोरदार चर्चा जिल्ह्यात होत आहे. या निवडणुका […] The post पुतणीसाठी चुलतीची माघार; अवघ्या २१ व्या वर्षी महाराष्ट्राला मिळाली सर्वात तरुण नगरसेविका, कोण आहे स्नेहा तमशेट्टे? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 2:44 pm

Dharashiv Accident : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर क्रुझरचा भीषण अपघात; धाराशिवमध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू

धाराशिव : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव जिल्ह्यात आज शनिवारी (२२ नोव्हेंबर २०२५) सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, काहीजण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ही क्रुझर जीप सोलापूरहून नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी निघाली होती. क्रुझर गाडी सोलापूर-हैदराबाद (Solapur Hyderabad Highway) महामार्गावरून जात असताना, धाराशिवमधील (Dharashiv news) अणदूर परिसरामध्ये त्यांच्या जीपचे टायर्स अचानक फुटले. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेल्या या जीपने एका ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर ती रस्त्यावर पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय गाडीतील इतर काही प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तात्काळ उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टायर्स फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटणे हे या भीषण अपघाताचे प्राथमिक कारण मानले जात आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या प्रवाशांवर काळाने घाला घातल्याने अणदूर आणि सोलापूर परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.https://prahaar.in/2025/11/22/nashik-ring-road-approved-8000-crore-project-to-end-city-traffic-woes-before-2027-kumbh-mela/भीषण अपघातात तीन महिलांसह ५ जणांचा मृत्यूसोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील धाराशिवजवळ झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसराला हादरवून सोडले आहे. या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, ज्यात तीन महिलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत सात ते आठ जण गंभीर जखमी झाले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सोलापूरहून नळदुर्ग येथील देवदर्शनासाठी निघालेली ही क्रुझर जीप टायर्स फुटल्यामुळे अनियंत्रित झाली आणि तिने रस्त्यावरील एका ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, क्रुझर गाडीच्या एका भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघाताच्या वेळी गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून बसवले होते, ज्यामुळे अपघाताची तीव्रता वाढली आणि जीवितहानी अधिक झाली. अपघात होताच आजूबाजूचे नागरिक तातडीने मदतीसाठी धावले. त्यांनी जीवावर उदार होऊन जोर लावून क्रुझर गाडी सरळ केली आणि आत अडकलेले मृतदेह व जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. अपघातातील सर्व जखमींना तातडीने पुढील उपचारांसाठी सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृत आणि जखमी झालेले सर्व प्रवासी हे दक्षिण उळे सोलापूर येथील रहिवासी असल्याचे समजते. सध्या अपघातस्थळी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य आणि पंचनामा सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने झालेली ही मोठी दुर्घटना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 2:30 pm

Special Stock Market Outlook: गेल्या आठवड्यात बाजारात सकारात्मकत आठवड्यात काय काय घडले? पुढील आठवड्यात काय निरिक्षण महत्वाचे जाणून घ्या एका क्लिकवर

मोहित सोमण: शेअर बाजारात सकारात्मकता कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सलग दुसऱ्यांदा शेअर बाजारात निर्देशांकात वाढ झाली असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले. जागतिक अस्थिरता, शेवटच्या दोन दिवशी वाढलेली परदेशी गुंतवणूकदारांची विक्री, तिमाही निकालातील अस्थिरता असे अनेक घटक असूनही एकूणच पाहिल्यास तरीही निर्देशांकात सुधारणा कायम आहे. आकडेवारीनुसार, सेन्सेक्स आठवड्यात ०.५०% व निफ्टी ०.३९% वाढला आहे. प्रामुख्याने चांगल्या बँकिग, फायनांशियल सर्विसेस, आयटी, एफएमसीजी या शेअर्सच्या जोरावर निर्देशांकाने तेजी दर्शविली आहे. दरम्यान प्रायव्हेट बँक,ऑटो, मेटल, रिअल्टी, कंज्यूमर ड्युरेबल्स, केमिकल्स या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा फटकाही बाजारात बसला. प्रामुख्याने या निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली रोख गुंतवणूक सुरूवातीला काढून घेतली होती. आठवड्याच्या मध्यात पुन्हा गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक वाढवली दरम्यान घरगुती गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक आठवड्यातील अखेर वगळता कायम राखली आहे. अद्याप भारताबद्दल युएस टॅरिफ शुल्काबाबत अनिश्चितता, तसेच मध्यपूर्वेतील, रशिया युक्रेन संघर्ष व त्यातून कच्च्या तेलाचा वाद अशा आव्हानांचाही बाजारात सामना करावा लागला आहे. एकूणच पाहता बाजारात सकारात्मकता भावना कायम होत्या. विशेषतः सत्राच्या अखेरीस गुंतवणूकदारांनी आठवड्यात मोठा प्रतिसाद दिला.तत्पूर्वी अमेरिकेतील महागाई, रोजगाराची आकडेवारी खराब आली असली तरी फेड व्याजदरात कपातीवरील अनिश्चितेमुळे व युएस शटडाऊनमुळे आकडेवारी पुढे ढकलली गेली. परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या विना शेती (Non Farm) पेरोल रोजगार आकडेवारी जाहीर झाल्याने पुन्हा एकदा डिसेंबर व्याजदरकपातीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर सोन्याच्या चांदीच्या दरात मोठी अस्थिरता कायम राहिली. तर रशिया युक्रेन समेट घडवण्यासाठी युएस प्रयत्नशील असल्याने कच्च्या तेलाच्या किंमती नियंत्रित राहून किंबहुना मोठ्या प्रमाणात घसरल्या. भारतीय बाजारात रुपया मात्र डॉलरच्या मागणीमुळे सातत्याने घसरत आहे. आरबीआयच्या हस्तक्षेप भूमिकेनंतर त्यात आता सकारात्मक बदल होऊ शकतो परंतु परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतल्याने एकूण निर्देशांकात तयणख फटका बसला. परवा निफ्टीने २६२०० पातळी पार केली असली तरी पुन्हा एकदा ती २६१०० पातळीपेक्षा खाली आली होती. सेन्सेक्सनेही परवा ४४६.२१ अंकांने उसळत ८५६३२ आकडा पार केला होता. प्रोविजनल आकडेवारीनुसार, काल घरगुती गुंतवणूकदारांनी (Domestic Institutional Investors) १४९०८ कोटींची गुंतवणूक केली असून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १४५८५ कोटींची विक्री केली. त्यामुळे रोख विक्री घरगुती गुंतवणूकदारांकडून ३१६१ कोटींची झाली असून रोख विक्री परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १७६६ कोटींची झाली आहे.या आठवड्यातील एफआयआय गुंतवणूकीबाबत आम्हाला प्रतिक्रिया देताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'नोव्हेंबरमध्ये काही दिवसांतच एफआयआयने मोठी विक्री कमी केली आणि खरेदीदारही झाले असले तरी एफआयआयच्या क्रियामध्ये कोणताही स्पष्ट ट्रेंड नाही. २२ नोव्हेंबरपर्यंत एकूण एफआयआय विक्रीचा आकडा १५२४३ कोटी रुपये होता.नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत ११४५४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह प्राथमिक बाजारपेठेतून एफआयआय खरेदी/गुंतवणूक करण्याचा दीर्घकालीन ट्रेंड सुरू आहे. २०२५ साठी आतापर्यंत एक्सचेंजेसद्वारे एकूण एफआयआय विक्रीचा आकडा २०९४४४ कोटी रुपये आहे. आणि प्राथमिक बाजारपेठेसाठी एकूण खरेदीचा आकडा ६५७४७ कोटी रुपये आहे. (सर्व डेटासाठी स्रोत: एनएसडीएल) इतर बाजारपेठांच्या तुलनेत भारताच्या कमी कामगिरीमुळे भारतातील विक्री व्यापार आणि इतर बाजारपेठांमध्ये खरेदी व्यापाराला गती मिळाली, विशेषतः अमेरिका, चीन, तैवान आणि दक्षिण कोरिया यासारख्या बाजारपेठांमध्ये, ज्यांना सध्या सुरू असलेल्या एआय व्यापाराचे लाभार्थी मानले जाते. तथापि, नॅस्डॅकमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या तीव्र सुधारणा, विशेषतः एआय-संबंधित स्टॉकमध्ये, एआय स्टॉकमधील बबल चिंतेला बळकटी मिळाली आहे.पुढे जाऊन, एफआयआय एआय ट्रेड कमी होत चालल्याने आणि भारतीय इक्विटीजच्या सुधारत्या शक्यतांमुळे विक्री कमी होण्याची शक्यता आहे. भारतातील कॉर्पोरेट कमाईला तिसऱ्या तिमाहीच्या निकालांच्या हंगामात गती मिळण्याची आणि २०२६ मध्ये वेग येण्याची शक्यता आहे. या घटकांच्या संयोजनामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) ची जावक (Outflow) उलटण्याची क्षमता आहे. निफ्टी लवकरच नवीन उच्चांक गाठेल आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा भारतीय बाजारात येऊ शकतात.'भारतातील अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले होते. उदाहरणार्थ अमेरिकेने ५०% कर लादला असला तरी आयएमएफच्या अहवालात भारताच्या आर्थिक वर्ष २६ च्या जीडीपी वाढीचा अंदाज ६.४% वरून ६.६% पर्यंत वाढवला होता. तसेच देशांतर्गत चलनवाढ ०.२५% च्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरली आहे हे देखील सकारात्मकतेचे लक्षण आहे.मात्र त्या तुलनेत युएस एप्रिलच्या नीचांकी पातळीपेक्षा अमेरिकन बाजार २५-३०% पेक्षा जास्त चढताना आपण पाहिले आहे आणि भारताने विकसित बाजारपेठांपेक्षा कमी कामगिरी केली असली तरी मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित होत आहे. व्यापारी गरजा, मोठी संधी, उदयोन्मुख बाजारपेठ परवडणारे मूल्यांकन अशा अनेक कारणांमुळे भारताचे बाजारपेठ वाढत आहे. आकर्षक मूल्यांकन, मजबूत कमाई आणि एफआयआयच्या परताव्याने निर्देशांकातील मजबूत बदल दर्शवते यांचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या एका अहवालातील माहितीनुसार भारतातील सेन्सेक्समध्ये आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. 'इंडिया स्ट्रॅटेजी' या नव्या अहवालात मॉर्गन स्टॅनले जागतिक गुंतवणूक रिसर्च संस्थेने म्हटले आहे. सेन्सेक्स डिसेंबर २०२६ पर्यंत १०७००० पातळी पार करेल व बेस लाईन टार्गेट किमान ९५००० पातळी असेल असे अहवालात म्हटले गेले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२८ या कालावधीत कंपाऊंड ग्रोथ (वाढ) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १९% वाढेल असेही अहवालात म्हटले गेले होते. निफ्टीतही मोठी वाढ अपेक्षित आहे.सध्या युएस बाजारातील मोठी हालचाल आयटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेअर्समध्ये सुरु आहे. मोठ्या प्रमाणात या तंत्रज्ञान शेअर्समध्ये वाढ झाल्याने युएस बाजारातील वाढ होत असली तरी अनिश्चिततेमुळे तितक्यात वेगाने घसरणही झाली आहे. गुंतवणूकदार आता या क्षेत्रातील अनिश्चितता आणि संभाव्य अतिमूल्यांकनामुळे पैसे गुंतवण्याबद्दल चिंतेत आहेत ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत चिंतेचे वातावरण आहे तथापि मोतीलाल ओसवालने आपल्या अहवालात म्हटले होते की,'भारतीय बाजारपेठांसाठी, कोणत्याही एआयला चिंतेचे कारण म्हणून पाहू नये कारण जर आपण नोव्हेंबर महिन्यात आपल्या बाजाराच्या कामगिरीकडे पाहिले तर ते चांगले कामगिरी करत आहे परंतु वर्षभर आपण कमी कामगिरी करत आहोत कारण आपण एआय थीम चुकवली आहे तर इतर सर्व बाजारांनी चांगली कामगिरी केली आहे परंतु आता आपल्याला भीती आणि अतिमूल्यांकनाची चिन्हे दिसत असल्याने, ते आपल्यासाठी सकारात्मक असू शकते.'तथापि, गुंतवणूकदार उत्साहित नाहीत कारण पोर्टफोलिओ तितके चांगले काम करत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून निवडक ब्लू चिप स्टॉकमध्येच तेजी असली तरी एकूण हेवी वेट शेअरमध्ये हालचाल पास्ता व्यापक बाजारात स्मॉल आणि मिडकॅप स्टॉक चालू असलेल्या रॅलीमध्ये भागीदार नव्हते. परंतु तरीही तिमाही कमाई, जीएसटी कपातीमुळे मागणी आणि धोरण स्थिरतेतील आणखी परिवर्तन या पार्श्वभूमीवर मोतीलाल ओसवाल रिसर्च मते, गुंतवणूकदारांचा दृष्टीकोन सकारात्मक राहतो. जोपर्यंत निफ्टी २५७००/२५८०० पातळीपेक्षा जास्त राहतो, तोपर्यंत डिप्सवर खरेदी करण्याची रणनीती नाकारता येत नाही. यासह मी तुम्हाला आमचा साप्ताहिक पोर्टफोलिओ आढावा सादर करतो.पुढील आठवड्यात बाजारात काय महत्वाचे?कमाईचा हंगाम संपल्यानंतर खास ट्रिगर नसताता. असतात जे बाजाराच्या कामगिरीवर परिणाम करतात. सध्या विशेष ट्रिगर नसले तरी सुध्दा नवीन घडामोडींचा बाजारात परिणाम होईल विशेषतः सर्वाधिक परिणाम भूराजकीय कारणांमुळे होऊ शकतो. पीएमआयची किरकोळ घसरणीची आकडेवारी असली तरी अद्याप अनेक रिपोर्ट येणे व डिसेंबरची दरकपात, आरबीआयचे रेपो दर कपातीबाबत नवे भाष्य यावर अद्याप नवा कल स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे आताच बाजाराचा मूड स्पष्ट करणे संयुक्तिक ठरणार नाही.पहिल्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था ७.८% ने वाढली ती पाच तिमाहींमधील ती सर्वात वेगवान ठरली होती. ती अपेक्षेपेक्षाही वाढली होती परंतु बाजार करेक्शनसह नवे ट्रिगर नसल्याने तिमाहीच्या दुसऱ्या तिमाहीत आता वाढ मंदावण्याची अपेक्षा आहे परंतु ती तज्ञांच्या अजूनही ७% पातळीच्यावर राहण्याची शक्यता आहे जी सकारात्मक ठरू शकते. एचएसबीसी कंपोझिट (एकत्र)उत्पादन,सेवा पीएमआय,परकीय चलन साठा, औद्योगिक उत्पादन, बँककर्ज वाढ आणि पायाभूत सुविधा उत्पादन यासारख्या इतर डेटा रिलीझवर बारकाईने बाजार लक्ष ठेवणार आहे.फेडचे अधिकृत भाषण, एस अँड पी ग्लोबल कंपोझिट/मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय, रिटेल सेल्स, प्रोड्यूसर प्राइस इंडेक्स, हाऊसिंग प्राइस इंडेक्स, पर्सनल कंझम्प्शन एक्सपेंडिचर बेरोजगारीचे दावे या जागतिक आकडेवारीचे निकाल इत्यादी ट्रिगरही बाजारातील चाचपणीसाठी मूलभूत ठरतील.नुकतेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सकारात्मक घडामोडींचे संकेत दिले आहेत. संतुलित दृष्टिकोन सिद्ध झाल्यानंतर लवकरच चांगली बातमी येईल असे ते म्हणाले होते.मार्चपासून आतापर्यंत वाटाघाटीच्या सहा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. अद्याप निकाल स्पष्ट झालेला नाही.मोठी अपडेट म्हणजे युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियासोबत शांतता योजनेवर काम करण्यास सहमती दर्शविल्याने ब्रेंट क्रूड ऑइलमध्ये आठवड्यात सर्वात मोठी घसरण झाली होती .बाजारात कुठल्या निर्देशांकात लक्षपुर्वक पाहणे महत्त्वाचे!इतर ट्रिगरसह आयटी, तेल व गॅस, एफएमसीजी, बँक व फायनांशियल सर्विसेस क्षेत्रीय शेअर्समध्ये लक्ष घालणे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरेल.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 2:10 pm

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; मध्य प्रदेशातील शस्त्र बनविणाऱ्या ५० भट्टयांवर बुलडोझर

पुणे : पुणे शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारीविरोधात मोठी मोहीम राबवत आंतरराज्य पातळीवरील अवैध शस्त्रउद्योगाचा पर्दाफाश केला आहे. शहरातील विविध भागातून २१ अवैध पिस्तुले आणि दारूगोळा जप्त करण्यात आला असून, पुढील तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्यप्रदेशात छापा टाकून ३६ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मागील तीन आठवड्यांपासून विमानतळ, काळेपडळ, गुन्हे शखा आणि एईसी पथकांनी केलेल्या धडक […] The post पुणे पोलिसांची मोठी कारवाई; मध्य प्रदेशातील शस्त्र बनविणाऱ्या ५० भट्टयांवर बुलडोझर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 1:46 pm

श्रद्धा कपूरला ‘ईठा’सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दुखापत; नेमकं काय घडलं?

Shraddha Kapoor injured | अभिनेत्री श्रद्धा कपूर लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘ईठा’ सिनेमात लवकरच पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध लावणी आणि तमाशा कलाकार विठाबाई नारायणगांवकर यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे. मात्र या चित्रपटाच्या शुटिंगवेळी श्रद्धाला दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या ‘ईठा’ सिनेमाचं शूट सध्या नाशिकजवळील एका गावात सुरु आहे. मात्र तिला फ्रॅक्चर झाल्यामुळे आता […] The post श्रद्धा कपूरला ‘ईठा’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दुखापत; नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 1:41 pm

Nashik Ring Road : नाशिककरांना 'ट्रॅफिक जॅम'मधून मुक्ती! ६६ किमी लांबीचा रिंग रोड कसा असेल? ८,००० कोटींचा प्रोजेक्ट पूर्ण आराखडा!

नाशिक : नाशिक शहराचा जसजसा विकास झाला, तसतशी शहरात वाहतूककोंडीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई नाका, द्वारका, संभाजीनगर रोड, पुणे रोड यांसारख्या प्रमुख भागांत नाशिककरांना वाहतूककोंडीचा तीव्र सामना करावा लागत आहे. केवळ १० मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा तास ते एक तास वेळ लागत असल्याने नाशिककर अक्षरशः वैतागले आहेत. नजीकच्या काळात नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या काळात देशभरातील लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होतात, ज्यामुळे वाहतूककोंडीची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने मोठे आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वाढत्या वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांची सोय व्यवस्थित व्हावी यासाठी सरकारने नाशिकमध्ये ६६ किलोमीटर लांबीचा रिंग रोड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अंदाजे ८ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा रिंग रोड केवळ सध्याची वाहतूककोंडीच कमी करणार नाही, तर तो भविष्यातल्या नाशिकच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सरकारने या रिंग रोडसाठी मास्टरप्लॅन तयार केला असून, २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी हा रिंग रोड पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामुळे नाशिकची वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि शहराच्या विकासाला नवी गती मिळेल.https://prahaar.in/2025/11/22/dondaicha-nagar-parishad-election-unopposed-for-first-time-in-73-year-history-all-bjp-candidate-wins-jaykumar-rawal-politics-dhule/एमएसआरडीसी नाही, तर एमएसआयडीसी करणार कामनाशिकमधील वाहतूककोंडी आणि २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या ६६.१५ किलोमीटर लांबीच्या रिंग रोड प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता मोठी गती मिळाली आहे. ₹८,००० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी: अंदाजे ८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाला नुकतीच सरकारने मान्यता दिली आहे. या प्रकल्पातील महत्त्वाचा अडथळा दूर करण्यासाठी राज्य पायाभूत सुविधा विषयक मंत्रिमंडळ समितीने मोठे पाऊल उचलले आहे. या समितीने रिंग रोडसाठी लागणाऱ्या भूसंपादन खर्चाला मंजुरी दिली आहे. भूसंपादनासाठी सुमारे ₹३,६५९.४७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, ज्याला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.भूसंपादनासाठी लागणारा हा निधी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत उपलब्ध करून दिला जाईल. रिंग रोडच्या अंदाजे ₹४,२६२.६४ कोटी रुपयांच्या बांधकाम खर्चाबाबत सध्या केंद्र सरकारसोबत, म्हणजेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाशी (MoRTH) चर्चा सुरू आहे. ही चर्चा पूर्ण झाल्यानंतर, राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात सामंजस्य करार (MoU) होणार आहे, ज्यामुळे या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होईल. या प्रकल्पाची अंमलबजावणी एमएसआरडीसी (MSRDC) ऐवजी एमएसआयडीसी (MSIDC) मार्फत केली जाणार आहे. भूसंपादन खर्चाला मान्यता मिळाल्यामुळे, नाशिक रिंग रोडचे काम आता वेगात सुरू होण्याची चिन्हे आहेत, ज्यामुळे नाशिककरांना वाहतूककोंडीतून मोठा दिलासा मिळेल.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 1:30 pm

Smruti Mandhana : स्मृती मंधानाच्या लग्नसराईला भारतीय महिला संघाची हजेरी! सोशल मीडीयावर मज्जा मस्तीचे व्हिडीओ व्हायरल

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि पलाश यांच्या विवाहसोहळ्याची धामधूम सध्या जोरात सुरू आहे. नुकताच भारतीय महिला संघाने वनडे विश्वचषक जिंकल्यानंतर हा उत्साह आणखी वाढला असून सांगलीत तिच्या माहेरी क्रिकेटपटूंचा मेळा जमला आहे.लग्नापूर्वी हळदीच्या विधीचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत असून त्यातील आनंदाचे क्षण चाहत्यांसाठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. स्मृतीच्या सहकाऱ्यांनी हळदीत दिलेल्या डान्स परफॉर्मन्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होत आहे.स्मृती मंधानाच्या घरी जमीन रॉड्रिग्स, रेणुका सिंह, अरुंधती रेड्डी, शफाली वर्मा, राधा यादव यांसह यांच्यासह स्टार वऱ्हाडी मंडळींनी हजेरी लावली आहे. संपूर्ण टीमने लग्नसोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी कोणतीही कसर न ठेवता धमालमस्ती करत आहेत . स्मृती आणि पलाशचा विवाह २३ नोव्हेंबर रोजी पार पडणार असून चाहते या सोहळ्यातील पुढील क्षण पाहण्यासाठी चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या नात्याबाबत चर्चाही रंगल्या होत्या. पण त्यांनी त्यावळेस कोणालाही काहीही माहिती दिली नव्हती . पण २ नोव्हेंबरला भारतीय महिला संघाने वनडे वर्ल्डकप स्पर्धेवर नाव कोरलं, मैदानात स्मृती आणि पालाश ने केलेल्या सेलिब्रेशनवरून त्यांच्या डेट च्या चर्चांना आणखी उधाण आले. आणि त्यांच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं. आणि याच दिवसाचं औचित्य साधत पलाशने डीवाय पाटील स्टेडियममध्ये स्मृतीच्या बोटात अंगठी घालून लग्नाची मागणी घातली. त्याला स्मृतीनेही होकार दिला.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 1:30 pm

शरद पवारांनी ‘असं’काय केलं? मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसकडून मोठं विधान; पडद्यामागच्या राजकारणाची जोरदार चर्चा

Vijay Vadettiwar : राजकारणात कोणी कुणाचा कायमच शत्रू किंवा मित्र नसतो अशी जुनी म्हण आहे. त्यामुळेच निवडणुकीत राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात. सध्या राज्यात नगपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेत. मात्र, ही निवडणूक स्थानिकची असल्याने विचित्र प्रकाराच्या युती आघाड्या झाल्याचे दिसत आहे. यानंतर लागणाऱ्या […] The post शरद पवारांनी ‘असं’ काय केलं? मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसकडून मोठं विधान; पडद्यामागच्या राजकारणाची जोरदार चर्चा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 1:22 pm

मुलाच्या एअर-शोचे व्हिडीओ YouTube वर शोधत असताना निधनाचे वृत्त समोर; कोण होते विंग कमांडर नमांश सियाल?

Tejas Crash In Dubai | दुबई एअर शो मध्ये हवाई कसरती दाखवताना तेजस फायटर जेटचा अपघात होऊन 34 वर्षीय विंग कमांडर नमांश सियाल शहीद झाले. उड्डाण करताना तेजसचं हवाई कौशल्य दाखवत असताना त्यांचं विमान कोसळलं. शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी २:१० वाजता तेजस विमान कोसळले. नमांश स्याल हे मूळचे हिमाचल प्रदेशचे होते. या बातमीनंतर हिमाचल प्रदेशमधील […] The post मुलाच्या एअर-शोचे व्हिडीओ YouTube वर शोधत असताना निधनाचे वृत्त समोर; कोण होते विंग कमांडर नमांश सियाल? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 1:17 pm

कालच्या रुपयांच्या ८८.६३ निच्चांकी पातळीवरून आज केवळ १ पैशाने वाढ 'या'परिस्थितीजन्य अर्थशास्त्रीय कारणांमुळे

मोहित सोमण: कालच्या डॉलरच्या निर्देशांकात व मागणीत मोठी वाढ झाल्याने रुपयांत निच्चांकी पातळीवर (All time Low) घसरण झाली होती. काल थेट रूपया प्रति डॉलर ८८.६३ रुपयांवर युएस बाजारातील सुरूवातीच्या सत्रात व्यवहार करत होता मात्र सकाळी रूपयाने रिकव्हरी प्राप्त केली आहे. एक पैशांनी रूपयात सुधारणा झाल्याने आज सकाळच्या सत्रात रूपया प्रति डॉलर ८९.६४ पातळीवर व्यवहार करत आहे. प्रामुख्याने जगभरातील अस्थिरतेचा फटका इतर करन्सी बास्केटला बसत आहे व सातत्याने डॉलरच्या मागणीत वाढ होत असल्याने त्याचा आर्थिक फटका व्यापारांसह शेअर बाजारात देखील काल बसला होता. मात्र आज नवीन कुठला ट्रिगर नसला तरी डॉलरच्या मागणीत कुठलीही विशेष कपात झाली नसल्याने रूपया केवळ १ पैशाने वधारला असला तरी निचांकी स्तरावर कायम आहे.काल डॉलर निर्देशांक (Dollar Index DXY) १०० पेक्षा अधिक पातळीवर व्यवहार करत होता. तर आशियाई बाजारातील चलन ०.१ ते ०.३% घसरून व्यवहार करत होते त्याचा वास्तविक चलनी व्यवहारात मोठा फटका बसल्याने आज बाजारात रूपयात फारशी सुधारणा झालेली नाही. किंबहुना युएस फेडरल रिझर्व्ह बँकेच्या मिनिटमधील माहितीनुसार काही फेड सदस्यांनी विरोध केल्याने अद्याप बाजारातील धोरणाबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे अनिश्चितता अधिक प्रमाणात वाढल्याने डॉलरमध्येही वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील माहितीनुसार, कालपर्यंत मनी मार्केटमध्ये ५०% वरून ३०% व्याजदरातील शक्यता वर्तवली जात आहे. असे असताना रुपया कमकुवत झाल्याने आजही तो 'डाऊन' साईड व्यवहारात कायम आहे. भारतीय सेंट्रल बँकेने डॉलरची विक्री वाढवल्यामुळे गुंतवणूक वाढली होती. अमेरिकेशी व्यापार करार करण्यास विलंब, इराणी तेल खरेदीवरून काही भारतीय कंपन्यांवर निर्बंध आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता कमी होत चालल्याने रुपया आणखी कमकुवत झाला.तज्ञांच्या मते, काल शेवटच्या व्यापारी तासात चलनाने ८९.५/$ चा टप्पा ओलांडला होता. चलनाचे रक्षण करण्यात मध्यवर्ती बँकेची अनुपस्थिती यामुळे 'शॉर्ट स्क्विज' निर्माण झाली होती असेही तज्ञांनी आपल्या निरीक्षणात म्हटले आहे. ज्यामुळे घसरण आणखी वाढली. रुपयाच्या घसरणीनंतर बाँडच्या किमतीही घसरल्या, १० वर्षांच्या बेंचमार्क सरकारी पेपरवरील उत्पन्न मागील बंदपेक्षा ४ बेसिस पूर्णांकाने अधिक बंद झाले.एका डीलर्सनी सांगितले की, सेंट्रल बँकेने प्रति डॉलर ८८.८० चा टप्पा ओलांडल्यानंतर साईड लाईन्सवर राहण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे स्टॉप लॉस झाला आणि चलन दिवसाच्या नीचांकी पातळीवर घसरले होते. आज मात्र किरकोळ स्थिरतेने रूपया १ पैशाने स्थिरावला असला तरी अद्याप स्थिती बदललेली नाही.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 1:10 pm

छापेमारी करत वणीमध्ये मिश्रित कोळसा बनवणाऱ्या माफियांवर मोठी कारवाई

यवतमाळ : वणी परिसरातील लालपुलिया भागात निकृष्ट आणि प्रदूषणकारक कोळशाची खुलेआम विक्री करणाऱ्या कोळसा माफियांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. केंद्र सरकारच्या कोळसा मंत्रालयाच्या निर्देशानुसार, यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने १९ नोव्हेंबरला अचानक छापा टाकत अनेक डेपोंची तपासणी केली आणि गुणवत्ता तपासणीसाठी नमुने जप्त केले. या कारवाईमुळे स्थानिक कोळसा व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधून अत्यंत स्वस्त दरात खरेदी केलेला निकृष्ट दर्जाचा कोळसा चांगल्या प्रतीच्या कोळशात मिसळून तो बाजारात उच्च दरात विकला जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. मंत्रालयाच्या नियमांनुसार अशा कोळशाची विक्री केवळ निश्चित ‘एंड यूजर’लाच करण्याची परवानगी असताना काही व्यापाऱ्यांनी हे नियम धाब्यावर बसवून हा बेकायदेशीर प्रकार सुरु ठेवला होता.या गंभीर गैरव्यवहाराची दखल घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी विशेष पथकाला तत्काळ कारवाईचे आदेश दिले. तर गुणवत्ता अहवाल आल्यानंतर संबंधितांवर अतिशय कठोर पाऊले उचलली जातील, असा अंदाज वर्तवला जात आहे.या रॅकेटचे धागेदोरे नागपूर आणि चंद्रपूरमधील काही मोठ्या कोळसा व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. छत्तीसगडमधून येणाऱ्या कोळशात वणीमध्ये भेसळ करून तो विविध ठिकाणी रवाना केला जात असल्याचा संशय होता. मात्र तपासाचा वेग आणि मिळणारे पुरावे यावरून लवकरच या रॅकेटमध्ये असणाऱ्या बड्या व्यापारांची नावे उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रशासनाने उशिरा या होईना पण या रॅकेटवर कारवाई केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 1:10 pm

Dondaicha Nagar parishad Election : ७३ वर्षांचा इतिहास मोडला! दोंडाईचा नगर परिषद पहिल्यांदाच बिनविरोध; रावल यांनी कोणते 'गुप्त राजकारण'केले?

धुळे : राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी धुळे (Dhule News) जिल्ह्यातील राजकारणात एक नवा इतिहास रचला आहे. जवळपास ७० हजार लोकसंख्या असलेल्या दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेची निवडणूक त्यांनी पूर्णतः बिनविरोध करण्यात यश मिळवले आहे. या नगरपरिषदेत नगराध्यक्षांसह एकूण १३ प्रभागांतील सर्व २६ जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. १९५२ साली स्थापन झालेल्या दोंडाईचा नगरपरिषदेच्या इतिहासात ही निवडणूक प्रथमच बिनविरोध पार पडली आहे. हे भाजपचे १००% बिनविरोध यश मंत्री जयकुमार रावल यांच्या राजकीय कौशल्याची पोचपावती मानली जात आहे. या निवडणुकीत भाजपसमोर शिवसेना (उबाठा गट), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट), एम.आय.एम., समाजवादी पार्टी आणि अनेक अपक्ष उमेदवारांनी आव्हान उभे केले होते. मात्र, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वच विरोधी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सामुहिक प्रयत्नांमुळे ही सर्व जागांवर बिनविरोध निवड झाली असून, यामुळे भाजपचे संघटन बळ पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या ऐतिहासिक विजयामुळे धुळे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणावर भाजपची पकड आणखी मजबूत झाली आहे.https://prahaar.in/2025/11/22/find-out-exactly-what-are-the-fundamental-and-revolutionary-changes-made-by-the-modi-government-in-new-labour-laws/रावल यांनी ४० वर्षांचा तिढा सोडवलाधुळे जिल्ह्यातील दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांना जे यश मिळाले आहे, त्यामागे त्यांची कुशल राजकीय रणनीती (Masterstroke Strategy) आणि दोन गटांना एकत्र आणण्याचे कौशल्य कारणीभूत ठरले आहे. या विजयातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे दोंडाईचा नगरपरिषदेत गेली चार दशके भाजपचा कट्टर विरोधक मानला जाणारा डॉ. हेमंत देशमुख यांचा गट भाजपमध्ये सामील करण्यात मंत्री रावल यांना यश आले. रावल यांच्या नेतृत्वाखाली आणि पक्षाच्या उच्चस्तरीय नेत्यांच्या चर्चेनंतर हा ऐतिहासिक राजकीय तिढा अखेर सुटला. या महत्त्वपूर्ण बदलामुळे दोंडाईचातील दीर्घकाळ चाललेला राजकीय संघर्ष संपुष्टात आला. डॉ. देशमुख गटाला भाजपवासी केल्यानंतर, मंत्री रावल यांनी रणनिती आखून निवडणूक बिनविरोध करण्याच्या दिशेने पाऊल उचलले. सुरुवातीलाच नगराध्यक्ष नयनकुंवरताई रावल यांच्यासह ७ जागा बिनविरोध निवडून आणण्यात यश मिळाले. त्यानंतर माघारीच्या शेवटच्या दिवशी उर्वरित सर्व १९ जागांवरही भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामुळे दोंडाईचा नगरपरिषदेची निवडणूक प्रथमच पूर्णतः बिनविरोध पार पडली आणि भाजपची 'बिनविरोध सेंच्युरी' मजबूत झाली. जयकुमार रावल यांच्या या नेतृत्वाने राजकीय स्थैर्य आणि बिनविरोध निवडणूक प्रक्रियेचा मजबूत पाया घातल्याचे बोलले जात आहे.रावल यांचा करिष्मा की महाविकास आघाडीची माघार?धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषदेची निवडणूक मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली असली तरी, या अभूतपूर्व यशामागे राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगली आहे. एका बाजूला मंत्री रावल यांच्या राजकीय कौशल्याचा करिष्मा दिसत असला तरी, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीसह (MVA) सर्व विरोधी पक्षांच्या कार्यपद्धतीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. सर्वांत मोठा प्रश्न असा आहे की, मंत्री जयकुमार रावल यांनी अशी नेमकी कोणती राजकीय समीकरणे फिरवली, ज्यामुळे महाविकास आघाडीतील पक्ष (शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) तसेच एमआयएम आणि समाजवादी पार्टीसारख्या सर्वच विरोधी पक्षांच्या उमेदवारांना शेवटच्या क्षणी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागले? विरोधी पक्षांचा दबाव कमी? एकीकडे डॉ. हेमंत देशमुख यांच्या कट्टर विरोधी गटाला भाजपमध्ये सामील करून रावल यांनी जुना संघर्ष संपवला. पण दुसरीकडे, स्थानिक पातळीवर मजबूत मानले जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि त्यांच्या उमेदवारांनी एकत्रितपणे लढण्याऐवजी अर्ज मागे घेण्याचा निर्णय का घेतला? राजकीय जाणकारांच्या मते, रावल यांनी केवळ सामंजस्य करारच नाही, तर प्रभावी राजकीय दबावतंत्राचा वापर केला असावा, ज्यामुळे विरोधकांना बिनविरोध प्रक्रियेत सहभागी होणे भाग पडले.धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने इतिहास रचला असून, नगराध्यक्षांसह सर्व २६ जागांवर आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपला हे ऐतिहासिक १००% यश मिळाले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, नगराध्यक्ष पदासाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री श्रीमती सी. नयनकुंवरताई रावल यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोंडाईचा नगरपरिषदेच्या १३ प्रभागातून बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांची नावे पुढीलप्रमाणे आहेतनगराध्यक्षा पदासाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या आई सी. नयनकुंवरताई रावल, प्रभाग क्र.१ मध्ये मुकेश गणसिंग देवरे, रविना महेशकुमार कुकरेजा, प्रभाग क्र.२ मध्ये सरलाबाई छोटू सोनवणे व शेख शिबान अहमद रियाज अहमद, प्रभाग क्र.३ मध्ये अक्षय वसंत चव्हाण, सुपौयाबी मेहमुद बागवान, प्रभाग क्र.४ मध्ये कल्पनाबाई गोपाल नगराळे, पिंजारी शेख नबु शेख बशिर, प्रभाग क्र.५ मध्येविजय जिजाबराव पाटील व भारती विजय मराठे, प्रभाग क्र.६ मध्ये वैशाली शरद कागणे व सुभाष कांतीलाल धनगर, प्रभाग क्र.७ मध्ये देवयानी संजोग रामोळे व चतूर जिभाऊ पाटील, प्रभाग क्र.८ मध्ये नरेंद्र नथ्थुसिंग गिरासे व राणी राकेश अग्रवाल, प्रभाग क्र.९ मध्ये वैशाली प्रवीण महाजन व निखीलकुमार रविंद्रसिंग जाधव, प्रभाग क्र.१० मध्ये अपूर्वा चिरंजीवी चौधरी व जितेंद्र धनसिंग गिरासे, प्रभाग क्र.११ मध्ये भावना हितेंद्र महाले व रविंद्र भास्कर देशमुख, प्रभाग क्र.१२ मध्ये सरजू वेडू भिल व सुवर्णा युवराज बागुल, प्रभाग क्र.१३ मध्ये भरतरी पुंडलिक ठाकुर व ललिता जितेंद्र गिरासे आदी नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडुन आले आहेत.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 1:10 pm

दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार आरोपींना अटक केली आहे. तुर्की आणि चीनमध्ये बनवलेल्या उच्च दर्जाच्या पिस्तूल पाकिस्तानमार्गे भारतात पुरवठा करण्यासाठी ही टोळी काम करत होती. महत्त्वाचे म्हणजे ही शस्त्रे पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पंजाबमध्ये टाकली जात होती आणि नंतर पुन्हा विकली जात होती.याप्रकरणात अजय, मनदीप, दलविंदर आणि रोहन अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींपैकी दोघेजण पंजाबचे आहेत. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले तेव्हा १० महागड्या परदेशी पिस्तूल आणि ९२ जिवंत काडतुसे जप्त केली. ज्याचा पुरवठा दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमधील गुन्हेगार आणि गुंडांना केला जात होता.https://prahaar.in/2025/11/22/find-out-exactly-what-are-the-fundamental-and-revolutionary-changes-made-by-the-modi-government-in-new-labour-laws/गुन्हे शाखेचे म्हणणे आहे की, हे संपूर्ण नेटवर्क पाकिस्तानी आयएसआयशी संबंधित व्यक्तींच्या इशाऱ्यावर कार्यरत होते. शस्त्रे प्रथम पाकिस्तानात नेली जात होती आणि नंतर तेथून भारतात तस्करी केली जात होती. या व्यक्तींनी आतापर्यंत भारतात किती शस्त्रे विकली आहेत आणि कोणत्या टोळ्यांना किंवा व्यक्तींना ती मिळाली आहेत याचा तपास पोलिस करत आहेत. शस्त्रे शोधण्यासाठी तपास यंत्रणा मोबाईल फोन, बँक तपशील आणि सोशल मीडियाचा वापर करत आहेत.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 1:10 pm

India's Forex Reserves: भारताच्या परदेशी चलनसाठ्याचे मजबूत कमबॅक थेट ५.३२७ अब्ज डॉलरने 'इतक्या'वर वाढ

मुंबई: परदेशी चलन साठ्यात (Foreign Exchange Reserves) गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर या आठवड्यात जोरदार वाढ झाली आहे. आरबीआयने सोन्याच्या साठ्यात वाढवलेल्या साठ्यामुळे झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या वाढलेल्या किंमतीचा परिणामही सोन्याच्या आंतरराष्ट्रीय विक्रीत झाला. भारतातील मोठ्या प्रमाणात सोन्यात आगमन झाल्याने सोन्याच्या भांड्यातील मूल्यांकनात वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, भारताच्या सोन्याच्या साठ्यात ५.३२७ अब्ज डॉलरने वाढ झाल्याने एकूण सोन्याचा साठा १०६.८५७ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात हा साठा २.६९९ अब्ज डॉलरने घसरून ६८७.०३४ अब्ज डॉलरवर घसरला होता. प्रामुख्याने एफसीए (Foreign Currency Assets FCA) हा सोन्याच्या साठ्यातील प्रमुख घटक आहे. तो १५२ दशलक्ष डॉलर्सने वाढला आहे. त्यामुळे तो साठा आता ५६२.२९ अब्ज डॉलरवर पोहोचला. एसडीआर (Special Drawing Rights SDRs) हे ५६ दशलक्ष डॉलर्सने वाढत १८.६५ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. तर आकडेवारीनुसार, १४ नोव्हेंबरपर्यंत आयएमएफकडील भारताचा राखीव साठा अथवा ठेव ८ दशलक्ष डॉलर्सने वाढत ४.७७९ अब्ज डॉलरवर पोहोचला.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 1:10 pm

Yoga For Dry Skin: हिवाळ्यात त्वचा होतेय कोरडी? हे योगासन देतील नैसर्गिक ओलावा आणि ग्लो

Yoga For Dry Skin: हिवाळा सुरू झाला की थंड हवा त्वचेची सर्वात जास्त परीक्षा पाहते. कितीही मॉइश्चरायझर लावलं तरी चेहऱ्यावरचा कोरडेपणा, पापुद्रे आणि निस्तेजपणा जात नाही. अशा वेळी केवळ स्किनकेअर नव्हे, तर योगासनसुद्धा त्वचेला आतून पोषण देतात. योगामुळे रक्तसंचार वाढतो, शरीर-मन शांत होतं आणि नैसर्गिक ग्लो त्वचेवर परत येतो. योग हा तात्काळ चमत्कार नसला, तरी […] The post Yoga For Dry Skin: हिवाळ्यात त्वचा होतेय कोरडी? हे योगासन देतील नैसर्गिक ओलावा आणि ग्लो appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 12:42 pm

“तुम्ही काट मारली तर…”; अजित पवारांच्या वक्तव्याचा विरोधकांनी घेतला समाचार: वडेट्टीवार, दानवे म्हणाले…

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी त्यांच्या रोखठोक विधानांमुळे अडचणीत सापडतात. त्यांनी केलेली विधानांची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात होत असते. आता पुन्हा एकदा अजित पवार हे एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या विधानाचा समाचार विरोधी पक्षातील नेत्यांनी घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ बारामतीमधील माळेगावातून काल शुक्रवारी २१ नोव्हेंबर २०२५ […] The post “तुम्ही काट मारली तर…”; अजित पवारांच्या वक्तव्याचा विरोधकांनी घेतला समाचार: वडेट्टीवार, दानवे म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 12:38 pm

कामगार कायद्यात मोदी सरकारकडून मुलभूत व क्रांतीकारक बदल नक्की काय बदल जाणून घ्या...

प्रतिनिधी: सरकारने १९३० पासून पुढे सुरू असलेल्या कामगार कायद्यात बदल केले आहेत. त्यामुळे नव्या विस्तृत मांडणीसह काही नवे कायदे व काही जुन्या कायद्यात बदल करत सरकारने नव्या कामगार कायद्यावर अंतिम मोहोर उमटवली आहे. प्रस्तावित कायद्यासाठी संसदेत पाच वर्षांपूर्वीच विधेयक पारित करण्यात आले होते. आज त्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी 'श्रमेव जयते' म्हणत बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. नव्या कायद्यातील तरतुदीनुसार आता अनेक मोठे बदल केले गेले आहेत. प्रामुख्याने कामगार आणि रोजगार मंत्रालयाने शुक्रवारी चार स्वतंत्र राजपत्र अधिसूचना जारी करून चार कामगार संहिता लागू केल्या त्या वेतन संहिता (२०१९), औद्योगिक संबंध संहिता (२०२०), सामाजिक सुरक्षा संहिता (२०२०) आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती संहिता (२०२०) असतील. कामगारांच्या दृष्टीने हिताचे सामाजिक आर्थिक सुरक्षितता व मालक अथवा नियोक्ता (Employer) यांच्यासाठी 'इज ऑफ डुईंग बिझनेस' फ्रेमवर्क अशा गोष्टी धान्यात ठेवून मोठे बदल करण्यात आले आहेत. तसेच यांची अंमलबजावणीही काटेकोरपणे होणार आहे.नव्या न्याय तरतुदीनुसार आता मालकांना आपल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देणे बंधनकारक असणार आहे जे पूर्वी आवश्यक नव्हते. वेळेवर पगार, सामाजिक सुरक्षितता, न्याय वागणूक, कामाच्या ठिकाणी समानता, स्त्री पुरूष एका पदासाठी समान वेतन, एक वर्षानंतर अथवा विशिष्ट कालावधीनंतर ग्रॅच्युटी पेमंट, ४० वर्षावरील कामगारांना वर्षातून एकदा फ्री चेकअप, ओव्हरटाईम केल्यास डबल वेतन असे मूलभूत बदल केले गेले आहेत. केंद्रीय कामगार व श्रममंत्री मनसुख मंडाविया यांनी यावर आपले स्पष्टीकरण देत वरील निर्णयांची घोषणा केली आहे.तसेच विशेष म्हणजे औद्योगिक क्षेत्रातील क्षेत्रीय रचना या निर्णयात मूलभूत म्हणून स्विकारण्यात आली आहे. उदाहरणार्थ गिग वर्कर्स, टेक वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स अशी स्पष्ट रचना कामगार विभागणी व्याख्येत करण्यात आली आहे. त्यामुळे मूलरचनेतील सामाजिक न्याय व हक्क कायदे तसेच ठेवता त्या क्षेत्रातील मागण्या, गरजा, स्वरूप लक्षात घेता त्यानुसार नियमावली या क्षेत्रातील कामगारांसाठी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता या टेक अथवा प्लॅटफॉर्म व गिग वर्कर्स (कामगारांसाठी) कायद्यात बदल झाले आहेत. जुने कायदे स्वातंत्र्य काळातील अथवा स्वातंत्र्यपूर्व काळात तयार झालेले आहेत. त्यामुळे काळानुरूप केंद्र सरकारने यात बदल केले आहेत.कामगार अर्थशास्त्रज्ञ श्याम सुंदर यांच्या मते, 'कामगारांपर्यंत हे फायदे पोहोचवणे हे मोठे आव्हान आहे, ज्यासाठी त्यांच्या अंमलबजावणीला सुलभ करणाऱ्या संस्थात्मक संरचनांची आवश्यकता असेल. उदाहरणार्थ, बांधकाम कामगार गेल्या दोन दशकांपासून इमारत आणि बांधकाम कामगार उपकर निधीचा प्रभावीपणे लाभ घेऊ शकले नाहीत कारण ते नोंदणीकृत होऊ शकले नाहीत.' केंद्र सरकारने मात्र या कायद्याला नवे ऐतिहासिक बदल म्हटले आहे. या कायद्यांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा कामगार नियमप्रणालीत व औद्योगिक क्षेत्रात होणार आहेत.सरकारच्या मते 'भारत या विखुरलेल्या चौकटीखाली काम करत राहिला, ज्यामध्ये अनेक दशकांपासून परस्परावलंबी अनुपालन, कालबाह्य प्रक्रिया आणि कामगारांसाठी मर्यादित संरक्षण होते, विशेषतः औपचारिक क्षेत्राबाहेरील कामगारांसाठी कायदे होते.चार कामगार संहिता पॅचवर्क जागा आता एकसमान, आधुनिक कायदेशीर प्रणालीकडे घेण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. सरकार म्हणते हे एक असे कार्यबल तयार करेल जे संरक्षित, उत्पादक आणि कामाच्या विकसित होत असलेल्या जगाशी सुसंगत असणार आहे ‌जे अधिक लवचिक, स्पर्धात्मक आणि स्वावलंबी राष्ट्रासाठी मार्ग मोकळा करेल' असे त्यात म्हटले आहे.किंबहुना भारताच्या नवीन कामगार संहितेच्या अंमलबजावणीबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या एक्स पोस्टमध्ये 'श्रमेव जयते!' असे लिहून आज आमच्या सरकारने चार कामगार संहिता लागू केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात व्यापक आणि प्रगतीशील कामगार-केंद्रित सुधारणांपैकी ही एक आहे. ते आमच्या कामगारांना मोठ्या प्रमाणात सक्षम करते. ते अनुपालन लक्षणीयरीत्या सोपे करते आणि 'व्यवसाय सुलभते'ला प्रोत्साहन देते.' असे म्हटले.नव्या कायद्यानुसार आता ईएसआयसी (Employees State Insurance Corporation ESIC) कव्हरेज संबंधित क्षेत्रातील मर्यादित असलेले सगळ्याच क्षेत्रांना लागू केले गेले आहे. दहा कामगार अथवा कर्मचाऱ्यांपेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कंपन्यांना देखील हे फायदे कामगारांकडे पोहोचवणे बंधनकारक केले आहे. याशिवाय कोड १ - पेमेंट ऑफ वेजेस अँक्ट १९३६, मिनिमम वेजेस अँक्ट १९४८, इक्वल रेमुनरेशन अँक्ट १९७६ या कायद्यांमध्ये सोपे सरल बदल करण्यात आले आहेत. कोड २ - इंडस्ट्रीयल रिलेशन कोड २०२०, इंडस्ट्रीयल एम्प्लॉयमेंट डिसफ्युट अँक्ट १९४७, कोड ३ - कोड ऑफ सोशल सिक्युरिटी २०२०, कोड ४(ऑक्यूपेशनल सेफ्टी हेल्थ वर्किंग कंडिशन २०२० या न्याय संहितेत विस्तृत बदल करण्यात आले आहेत.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 12:30 pm

परळीमध्ये महायुतीचा गुलाल! शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांची बिनविरोध निवड

परळी: राज्यभरात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी निवडणूकीसाठी भरलेला अर्ज मागे घेण्याची मुदतसुद्धा आता संपली आहे. त्यामुळे आता कोणते उमेदवार कोणत्या प्रभागातून उभे राहणार याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. तर काही ठिकाणी विरोधकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. ज्यात भाजप अव्वल स्थानावर आहे. मात्र भाजपसाठी महत्त्वाच्या असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषद निवडणुकीत भाजपसोडून महायुतीतील इतर दोन मित्रपक्षांचे उमेदवार विजयी झाले आहे.बीडमधली परळी नगरपरिषद निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामुळे निवडणूक होण्यापूर्वीच महायुतीच्या दोन नगरसेवकांना गुलाल लागला आहे. ज्यात राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक १३ मधील रेश्मा बळवंत आणि प्रभाग क्रमांक ११ मधील शिवसेनेच्या जयश्री गीते या दोघींची नावे नगरसेवक पदासाठी बिनविरोध जाहीर झाले आहेत.https://prahaar.in/2025/11/22/battle-will-be-fought-between-ubatha-and-shiv-sena-in-byculla-in-which-seats-will-it-be-whose-address-will-be-cut-off-find-out/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकूण तीन टप्प्यांमध्ये होणार आहेत. ज्यातील पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार असून लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल लागणार आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकांना सुरूवात होईल.

फीड फीडबर्नर 22 Nov 2025 12:30 pm

घटस्फोटानंतर ‘संगीत देवबाभळी’ फेम अभिनेत्रीची नवी सुरुवात; केळवणाचा शेअर केला व्हिडिओ

Shubhangi Sadavarte | ‘संगीत देवबाभळी’ फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्ते दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहे. नुकतेच तिने होणाऱ्या पतीबरोबरचा केळवणाचा व्हिडीओ समोर तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शुभांगी सदावर्तेने सप्टेंबर, २०२५ मध्ये प्रसिद्ध संगीतकार आनंद ओकसोबत विभक्त होत असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं होतं. लग्नाच्या पाच वर्षांतच त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र […] The post घटस्फोटानंतर ‘संगीत देवबाभळी’ फेम अभिनेत्रीची नवी सुरुवात; केळवणाचा शेअर केला व्हिडिओ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 22 Nov 2025 12:29 pm