SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

32    C
...

Iran-US-Israel War : होर्मुज सामुद्रधुनी खुली न केल्यास तेल-वीज प्रकल्प आणि खार्ग बेट उद्ध्वस्त करू - डोनाल्ड ट्रम्प

इराणसोबत चर्चेचे दावे सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला (Iran-US-Israel War) त्याच्या तेलसाठ्यांवर आणि वीज प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणने होर्मुझ सामुद्रधुनी तात्काळ खुली करावी, अन्यथा अमेरिका इराणचे वीज निर्मिती प्रकल्प, तेलाचे विहिरी आणि खार्ग बेट उध्वस्त करून पूर्णपणे नष्ट करेल.ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले की, “अमेरिका इराणमधील (Iran-US-Israel War) आपले लष्करी अभियान समाप्त करण्यासाठी नव्या आणि अधिक शहाण्या शासनासोबत गंभीर चर्चा करत आहे. या चर्चेत लक्षणीय प्रगती झाली आहे. मात्र, कोणत्याही कारणामुळे लवकर करार झाला नाही जरी तो होण्याची शक्यता आहे आणि जर होर्मुझ सामुद्रधुनी तात्काळ व्यापारासाठी खुली करण्यात आली नाही, तर आम्ही इराणमधील आमची उपस्थिती त्यांच्या सर्व वीज निर्मिती केंद्रांवर, तेलाच्या विहिरींवर आणि खार्ग बेटावर हल्ले करून पूर्णतः संपवू.” ट्रम्प यांनी पुढे म्हटले, “हे आमच्या त्या अनेक सैनिकांचा आणि इतर लोकांचा बदला असेल, ज्यांची इराणने मागील ४७ वर्षांच्या तथाकथित दहशतीच्या राजवटीत निर्दयपणे हत्या केली.”दरम्यान, इराणने अमेरिकन आणि इस्रायली (Iran-US-Israel War) अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. इराणच्या संयुक्त लष्करी कमांडचे प्रवक्ते इब्राहिम झुल्फिकारी यांनी सांगितले की, अमेरिकन आणि इस्रायली अधिकाऱ्यांची घरे आता वैध लक्ष्य मानली जाऊ शकतात.अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यातील तणाव सतत वाढत असून हा संघर्ष आता ३१व्या दिवसात प्रवेश केला आहे. दोन्ही बाजूंपैकी कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. मात्र, ट्रम्प यांचा दावा आहे की इराणसोबत चर्चा सुरू असून लवकरच काही तोडगा निघू शकतो.इराणने (Iran-US-Israel War) स्पष्ट केले आहे की, ते अण्वस्त्रे मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत; मात्र अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचा (NPT) भाग राहण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा पर्याय ते तपासत आहेत. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई यांनी म्हटले की, “इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकाने कधीही अण्वस्त्रे मिळवण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही आणि असा कोणताही प्रयत्नही केलेला नाही.”

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 4:30 pm

IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंडे यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाची धुरा; राज्यात 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर

IAS Tukaram Mundhe: पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 4:26 pm

IAS Transfers: राज्यातील 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पहा संपूर्ण यादी कोणाची कुठे झाली बदली

IAS Transfers: या बदल्यांमुळे राज्यातील प्रशासकीय कामकाजात नव्या पातळीवर गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 4:16 pm

BCCI Brand Cast Engineer Death : खळबळजनक! BCCI च्या ब्रँड कास्ट इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू

बीसीसीआयच्या ब्रॉडकास्ट टीममधील एका ब्रिटिश नागरिकाचा मृतदेह (BCCI Brand Cast Engineer Death) मुंबईतील प्रसिद्ध ट्रायडंट हॉटेलच्या खोलीत सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 4:14 pm

iPhone 18 Pro : ‘आयफोन 18 प्रो’बद्दल सर्वात मोठी अपडेट आली समोर; होणार ‘हे’जबरदस्त बदल, कधी होणार लॉन्च पाहा…

ऍपल आपल्या आगामी 'आयफोन 18 प्रो' च्या डिस्प्ले डिझाइनमध्ये आणखी सुधारणा करण्याची तयारी करत आहे.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 4:12 pm

Pune: जयराज अँड कंपनीला ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ प्रमाणपत्र

Pune: जयराज अँड कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत विविधता व समावेशकतेसाठी सातत्याने उपक्रम राबवले जात असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 4:02 pm

Akhilesh Yadav : रुपयाप्रमाणेच भाजपची प्रतिमा घसरली.! भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचारावर अखिलेश यांचा टोला

भाजप नेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश असलेल्या कथित भ्रष्टाचार आणि गैरवर्तनाची प्रकरणे जसजशी समोर येत आहेत, तसतशी पक्षाची प्रतिमा अधिकच खालावत चालली आहे.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 3:50 pm

Maharashtra Politics : मोठी बातमी..! एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात ‘भाकरी’फिरवणार? अशोक खरात प्रकरणामुळे 2 मंत्र्यांची खुर्ची धोक्यात

Maharashtra Politics : नाशिकमधील अशोक खरात प्रकरण आणि जिल्हा परिषद निवडणुकांमधील कामगिरीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 3:48 pm

Iran-US-Israel War : इराणकडून पाकिस्तानच्या प्रस्तावाला केराची टोपली

पाकिस्तानने दावा केला होता की अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी थेट चर्चेचे आयोजन करण्यास तो तयार आहे. मात्र, पाकिस्तानचा हा प्रस्ताव इराणने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने सोमवारी (३० मार्च) स्पष्ट केले की अमेरिकेसोबत कोणतीही थेट चर्चा झालेली नाही. केवळ मध्यस्थांमार्फत अत्यंत जास्त आणि अवास्तव मागण्या पाठवण्यात आल्या आहेत.महावाणिज्य दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “अमेरिकेसोबत कोणतीही थेट चर्चा झालेली नाही. फक्त मध्यस्थांमार्फत अतिशय जास्त आणि अवास्तव मागण्या पाठवण्यात आल्या आहेत. अमेरिकेची कूटनीती सतत बदलत असते, मात्र आमची भूमिका स्पष्ट आणि ठाम आहे.” (Iran-US-Israel War)इराणच्या मंत्र्यांनी पुढे म्हटले, “पाकिस्तानने उपलब्ध करून दिलेले मंच हे त्यांचे स्वतःचे आहेत; आम्ही त्यात सहभागी झालो नाही. युद्ध समाप्त करण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रादेशिक आवाहनांचे आम्ही स्वागत करतो, परंतु हे युद्ध (Iran-US-Israel War) नेमके कोणी सुरू केले, हेही लक्षात ठेवले पाहिजे.”

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 3:30 pm

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात 'नंबर २'; कोकणच्या कोळंबीचा रुबाब सातासमुद्रापार!

मुंबई : भारताच्या नीलक्रांतीमध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून, मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीत राज्याने मोठी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या समुद्री उत्पादनांच्या निर्यातीत दुपटीने वाढ झाली असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्याने ७ हजार ३४३ कोटी ४० लाख रुपयांची विक्रमी निर्यात नोंदवली आहे. भारताच्या मत्स्य व्यवसायात महाराष्ट्राने मोठी झेप घेतली असून, गेल्या पाच वर्षांत राज्याच्या मत्स्य निर्यातीत कमालीची सुधारणा झाली आहे. २०२०-२१ मध्ये ३ हजार ६८४ कोटी रुपये असणारी ही निर्यात आता थेट दुप्पट होऊन २०२४-२५ या वर्षात ७ हजार ३४३ कोटी ४० लाख रुपयांवर पोहोचली आहे. केवळ आर्थिक उलाढालच नव्हे, तर निर्यातीच्या परिमाणातही मोठी वाढ झाली असून राज्याची वार्षिक निर्यात आता २.२७ लाख मेट्रिक टन इतकी झाली आहे. विशेषतः कोकण किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसायाने जागतिक बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. केंद्र सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, या प्रभावी कामगिरीमुळे महाराष्ट्र आता मत्स्य निर्यातीत देशात दुसऱ्या क्रमांकाचे अग्रगण्य राज्य बनले असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेला यातून मोठी चालना मिळाली आहे.https://prahaar.in/2026/03/31/kalyan-shaken-snake-scare-in-gandhari-area-three-stray-dogs-die-in-quick-succession/कोळंबीसह गोठवलेल्या मासळीचा निर्यातीत वाटामहाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील चविष्ट मासळीने आता जागतिक बाजारपेठ काबीज केली असून, प्रामुख्याने कोकणच्या कोळंबीला परदेशी खवय्यांची मोठी पसंती मिळत आहे. राज्यातून होणाऱ्या एकूण मत्स्य निर्यातीत कोळंबी आणि गोठवलेल्या मासळीचा (Frozen Fish) वाटा सर्वाधिक असून, अमेरिका आणि चीन यांसारख्या बलाढ्य देशांमध्ये महाराष्ट्रातील उत्पादनांची मोठी मक्तेदारी निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतींचे चढ-उतार आणि वाढता उत्पादन खर्च यांसारखी आव्हाने समोर असतानाही, महाराष्ट्राने गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या स्पर्धेत आपले स्थान भक्कम राखले आहे. भारताच्या एकूण निर्यातीचा विचार करता, अमेरिका (२२,७२३ कोटी रुपये) आणि युरोपियन युनियन (९,४२९ कोटी रुपये) या मुख्य बाजारपेठा ठरल्या आहेत. यामध्ये कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या कोळंबीला सर्वाधिक मागणी असून, या 'विदेशी पाहुण्यांच्या' पसंतीमुळे राज्याच्या मत्स्य व्यवसायाला सुवर्णकाळ आला आहे.भारतीय मासळीचा जगभर डंकाभारतीय सागरी उत्पादनांनी जागतिक बाजारपेठेत आपली मोहोर उमटवली असून अनेक देशांमध्ये भारतीय मासळीला विक्रमी मागणी मिळत आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीनुसार, भारतीय मत्स्य उत्पादनांसाठी अमेरिका ही सर्वात मोठी आणि फायदेशीर बाजारपेठ ठरली असून, एकट्या अमेरिकेला २२ हजार ७२३ कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. दुसरीकडे, परिमाणाच्या बाबतीत चीनने आघाडी घेतली असून ३.९६ लाख मेट्रिक टन मासळीची आयात केली आहे, ज्याचे मूल्य १० हजार ६६८ कोटी रुपये इतके आहे. केवळ अमेरिका किंवा चीनच नव्हे, तर युरोपियन युनियन (९,४२९.६ कोटी), दक्षिण-पूर्व आशिया (८,१७२.२ कोटी) आणि जपान (३,४५२.९ कोटी) यांसारख्या प्रमुख जागतिक बाजारपेठांमध्येही भारतीय मासळीने आपली चव पोहोचवली आहे. या वाढत्या मागणीमुळे भारतीय मत्स्यव्यवसाय क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी उभारी मिळाली आहे.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 3:30 pm

Dadar-Bhusaval Express : खान्देशी प्रवाशांसाठी आनंदवार्ता! दादर–भुसावळ एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी धावणार

मुंबई : जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेष गाडी म्हणून धावणारी दादर–भुसावळ एक्सप्रेस (Dadar-Bhusaval Express) आता कायमस्वरूपी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी आता नव्या १९०४७/४८ या क्रमांकाने नियमितपणे धावणार आहे. खासदार स्मिता वाघ यांनी याबाबत माहिती दिली.तिकिट दरात तब्बल २० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात :विशेष गाडी (Dadar-Bhusaval Express) असल्यामुळे प्रवाशांना आतापर्यंत अतिरिक्त भाडे मोजावे लागत होते. मात्र, आता नियमित गाडीचा दर्जा मिळाल्यामुळे तिकिट दरात तब्बल २० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता व्यक्त होत असून सामान्य प्रवाशांचा आर्थिक भार कमी होऊ शकतो. प्राप्त माहितीनुसार, या गाडीला प्रवाशांचा सातत्याने चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळेच तिला कायमस्वरूपी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवासी संख्या, मागणी आणि सोयी सुविधांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनीही या निर्णयाचे स्वागत करत खान्देशातील नागरिकांच्या दीर्घकाळापासून असलेल्या मागणीला न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे. या सुविधेमुळे प्रवास अधिक सुलभ, किफायतशीर आणि सुरक्षित होईल.पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून तूर्त (Dadar-Bhusaval Express) दादर–भुसावळ (०९०४९) आणि भुसावळ-दादर (०९०५०) दरम्यान आठवड्यातून एक दिवस दर शुक्रवारी धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी तीन एप्रिलपासून ३१ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. याशिवाय, दादर-भुसावळ (०९०५१) आणि भुसावळ–दादर (०९०५२) दरम्यान आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावणाऱ्या त्रिसाप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांचा कालावधी २९ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 3:30 pm

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एका गॅरेजमध्ये लपून बसलेल्या विषारी नागाने परिसरात दहशत निर्माण केली असून, या नागाच्या दंशामुळे तीन भटक्या कुत्र्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गांधारी परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, गांधारी परिसरातील एका गॅरेजमध्ये हा नाग गेल्या अनेक दिवसांपासून लपून होता. परिसरात वावरणाऱ्या तीन भटक्या कुत्र्यांवर या नागाने अचानक हल्ला चढवला. नागाने केलेल्या विषारी दंशामुळे या तिन्ही कुत्र्यांची प्रकृती खालावली आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. एकापाठोपाठ एक अशा तीन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आणि नागरिकांच्या लक्षात आले की परिसरात एखादा विषारी साप वावरत आहे. परिसरात नाग असल्याची खात्री पटताच स्थानिक नागरिकांनी तातडीने सर्पमित्र दत्ता बोंबे यांना पाचारण केले. दत्ता बोंबे यांनी घटनास्थळी धाव घेत अत्यंत कौशल्याने त्या नागाला पकडले. हा नाग प्रचंड विषारी असल्याची माहिती समोर आली आहे. नागाला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. पकडलेल्या नागाला सुरक्षितरीत्या वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात (जंगलात) सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.https://prahaar.in/2026/03/31/ravindra-waikar-extend-dadar-ratnagiri-passenger-train-to-dadar-station-in-mp-ravindra-waikar-demand/प्रशासनाचे आणि सर्पमित्रांचे आवाहनया घटनेमुळे गांधारी परिसरात भीतीचे सावट अजूनही कायम आहे. पावसाळा आणि वाढलेले गवत यामुळे सापांचा मानवी वस्तीत वावर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा, भंगार किंवा गॅरेज सारख्या ठिकाणी अंधारात जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन सर्पमित्र दत्ता बोंबे आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच साप आढळल्यास त्याला मारू नका, तर तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 3:10 pm

Leander Paes : प्रख्यात टेनिसपटू लिअँडर पेसचा भाजपमध्ये प्रवेश; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

भारतीय टेनिस दिग्गज लिअँडर पेसने (Leander Paes) भाजपमध्ये प्रवेश केला आहे .पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी उचललेले हे पाऊल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि भाजप नेते सुकांत मजुमदार यांच्या उपस्थितीत पेस यांचा पक्षप्रवेश झाला. पेस यांचे पक्षात सामील होणे पश्चिम बंगालच्या राजकारणात महत्त्वपूर्ण मानले जात आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे वातावरण तापत असून, सर्व राजकीय पक्ष आपली रणनीती मजबूत करण्यात व्यस्त आहेत.याप्रसंगी किरेन रिजिजू म्हणाले, लिअँडर पेस (Leander Paes) यांचे भाजप परिवारात सामील होणे ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने क्रीडा आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. लिअँडर यांनी हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असल्याचे म्हटले. ते म्हणाले, हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा दिवस आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि नितीन नवीन यांचे आभार मानायचे आहेत. क्रीडा आणि तरुणांची सेवा करण्याची ही माझ्यासाठी एक मोठी संधी आहे.लिअँडर पेसने (Leander Paes) भारतासाठी ऑलिम्पिक पदके आणि अनेक ग्रँडस्लॅम जिंकले आहेत आणि आता ते राजकारणात एक नवीन इनिंग सुरू करत आहे. त्यांचा भाजपमधील प्रवेश हे दर्शवतो की, क्रीडा जगतातील प्रमुख व्यक्तींना आपल्या पक्षात सामील करून पक्ष आपली पकड मजबूत करू पाहत आहे.आपल्या कारकिर्दीची (Leander Paes) आठवण करून देताना पेस म्हणाले की,ते आता नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार आहे. मी ४० वर्षे देशासाठी खेळलो आहे, आता तरुणांची सेवा करण्याची वेळ आली आहे. लिअँडर पेसने केंद्र सरकारच्या क्रीडा योजनांची प्रशंसाही केली. ते म्हणाला, खेलो इंडिया आणि टॉप्स योजना हे उत्कृष्ट उपक्रम आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंची कामगिरी सुनिश्चित करण्यासाठी किरेन रिजिजूजींनी किती मेहनत घेतली हे मी पाहिले आहे. पंतप्रधानांनी त्यांना दिलेली भूमिका त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पार पाडली.यावेळी त्यांनी (Leander Paes) बंगालमधील क्रीडा सुविधांच्या कमतरतेबद्दलही उघडपणे भाष्य केले. ते म्हणाले, भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. पुढील २०-२५ वर्षांत आपण क्रीडा शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. १९८६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये क्रीडा पायाभूत सुविधांची खूप कमतरता होती. आजही बंगालमध्ये इनडोअर टेनिस कोर्टची कमतरता आहे. बंगाल, तामिळनाडू आणि बिहार यापेक्षा चांगली कामगिरी करू शकतात, पण आपण क्रीडा शिक्षणाच्या माध्यमातून तरुणांना प्रेरणा देण्यावर आणि त्यांना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. भारतातील महिला सक्षमीकरणासाठी समान संधी शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू करणे हे माझे स्वप्न आहे.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 3:10 pm

Digestion Tips: पोटातील गॅस आणि बद्धकोष्ठतेपासून आराम हवा? तर दह्यात ‘हा’पदार्थ मिसळून खा; पचन होईल मजबूत

Digestion Tips उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर परिणाम होतो. पचन मंदावते आणि अन्न नीट पचत नाही. त्यामुळे गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्या निर्माण होतात. अशा वेळी दही आणि भाजलेले जिरे एकत्र खाल्ल्यास पचन सुधारण्यास मदत होते.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 2:49 pm

Global Energy Supply: “भारताप्रमाणे आम्हाला रशियन डिझेलवर सवलत द्या,” ; युद्धाच्या संकटात सापडलेल्या बांगलादेशची ट्रम्पला विनवणी 

Global Energy Supply:वाढत्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेशने रशियन डिझेल खरेदीवरील अमेरिकेच्या बंदीतून तात्पुरती सूट मागितली आहे.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 2:44 pm

Sushma Andhare : ‘नामकर्ण आवारे ही महत्वाची कडी’; भोंदू खरात प्रकरणात सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट; थेट भाजपच्या मंत्र्याचे नाव घेत म्हणाल्या…

Sushma Andhare : अशोक खरात प्रकरणात सुषमा अंधारेंनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राजकारण आणखी तापले आहे.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 2:41 pm

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरातील चेंगराचेंगरी प्रकरणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

नालंदा: बिहारमधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी, नालंदा जिल्ह्यातील दिपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माघरा गावातील शीतला मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. पूजेदरम्यान गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरी झाली. घटनेची माहिती मिळताच, दीपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले.मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीरमुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले. तसेच मुख्य सचिवांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आणि नुकसान भरपाईची घोषणाही केली.मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मुख्य सचिवांना चौकशीचे निर्देश देण्यात आले असून, पाटणा आयुक्तांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. नुकसान भरपाईची घोषणाही करण्यात आली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येकी ४ लाख रुपये आणि मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, पीएमएनआरएफतर्फे प्रत्येक मृताच्या कुटुंबाला २ लाख रुपयांची सानुग्रह रक्कमही दिली जाईल.पंतप्रधान मोदींकडूनही दुःख व्यक्तपंतप्रधान मोदींनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील अपघात अत्यंत दुःखद आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती मी माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. पीएमएनआरएफमधून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना ५० हजार रुपये दिले जातील.शीतला मंदिरात ही चेंगराचेंगरी झाली, ते बिहार शरीफमधील नालंदा जिल्ह्यातील माघरा येथे आहे. मंगळवारी, माघरा येथील शीतला मंदिरात हजारो लोक दर्शनासाठी जमले होते. दरवर्षी अशी गर्दी जमते, पण असा अपघात यापूर्वी कधीही घडला नव्हता. पोलीस आता या चेंगराचेंगरीचा आणि त्यामागे काही कट आहे का याचा तपास करत आहेत. मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणे अशक्य आहे.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 2:30 pm

मुंबईसह ठाणे लोकसभेची खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंवर जबाबदारी; शिवसेनेकडून राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या संपर्कप्रमुखांची घोषणा

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पक्षाने राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मुंबईत सहा लोकसभा मतदार संघ आणि ठाणे लोकसभेची जबाबदारी शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भिवंडी व कल्याण लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदी खासदार नरेश म्हस्केंची निवड करण्यात आली आहे.शिवसेनेकडून राज्यातील सर्व लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई व दक्षिण मुंबई या मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदार संघांच्या संपर्कप्रमुख पदाची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खासदार डॉ. शिंदेंसोबत मंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर मुंबईच्या लोकसभा मतदार संघांची जबाबदारी असेल. तसेच ठाणे लोकसभेचे संपर्कप्रमुखपद देखील खासदार डॉ. शिंदेंकडे सोपवण्यात आले आहे, असे पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.लोकसभा मतदार संघनिहाय संपर्कप्रमुख१) मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई व दक्षिण मुंबई – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे२) ठाणे – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे३) भिवंडी व कल्याण – खासदार नरेश म्हस्के४) नंदुरबार - माजी आमदार शिरीष चौधरी५) धुळे व दिंडोरी - शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी६) जळगाव - आमदार दिलीप लांडे७) रावेर - आमदार तुकाराम काते८) बुलढाणा - संजय सोनार९) अकोला - माजी आमदार राजन साळवी१०) अमरावती - आमदार किशोर अप्पा पाटील११) वर्धा - आमदार डॉ. मनीषा कायंदे१२) रामटेक - अनिल कोकीळ१३) नागपूर - माजी खासदार संजय निरुपम१४) भंडारा-गोंदिया - विलास चावरी१५) गडचिरोली- चिमूर - माजी मंत्री जगदीश गुप्ता१६) चंद्रपूर - आमदार कृपाल तुमाने१७) यवतमाळ - वाशिम - शिवसेना उपनेत्या प्रिती बंड१८) हिंगोली - शिवसेना उपनेते आनंदराव जाधव१९) नांदेड - दत्ता दळवी२०) परभणी - भास्कर आंबेकर२१) जालना – खासदार संदिपान भुमरे२२) छत्रपती संभाजी नगर - विलास पारकर२३) नाशिक – आमदार सुहास कांदे२४) पालघर – पांडुरंग पाटील२५) रायगड - अनिल नवघरे२६) कोल्हापूर, मावळ व पुणे लोकसभा - मंत्री उदय सामंत२७) बारामती – किरण लांडगे२८) शिरुर – आमदार शरद सोनवणे२९) अहिल्यानगर – शिवसेना सचिव राम रेपाळे३०) शिर्डी – खासदार डॉ. ज्योती वाघमारे३१) बीड – मनोज शिंदे३२) धाराशिव – माजी खासदार उन्मेष पाटील३३) लातूर – मंगेश कुडाळकर३४) सोलापूर – खासदार धैर्यशील माने३५) माढा – चंद्रहार पाटील३६) सांगली – योगेश जानकर३७) सातारा – शरद कणसे३८) रत्नागिरी – राजेश मोरे, नगरसेवक३९) सिंधूदुर्ग – बाळा चिंदरकर४०) हातकणंगले – आमदार सुहास बाबर

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 2:30 pm

Dadar-Ratnagiri passenger : दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल पुन्हा दादर स्थानकापर्यंत करा; खासदार रविंद्र वायकर यांची मागणी

- शक्य असल्यास ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तारित करा- रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे खासदार रविंद्र वायकर यांनी केली मागणीनवी दिल्ली : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या पसंतीची दादर-रत्नागिरी पॅसेंजर रेल (Dadar-Ratnagiri passenger) पुनश्च दादर स्थानकातून सुरु करण्यात यावी तसेच शक्य असल्यास ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पर्यंत विस्तारित करून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलास द्यावा, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी निवेदनाद्वारे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.मुंबईहून कोकणात जाणाऱ्या लाखो सामान्य नोकरदार, शेतकरी, विद्यार्थी आणि कुटुंबियांसाठी दादर–रत्नागिरी पॅसेंजर ही केवळ एक रेल्वे नव्हती, तर त्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग होती. मागील २५–३० वर्षांपासून ही गाडी नियमितपणे दादर स्थानकापर्यंत धावत होती. परंतु कोविड काळात ही सेवा बंद करण्यात आली आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेत ती फक्त दिवा स्थानकापर्यंतच मर्यादित केली. यामुळे दैनंदिन कामकाज उरकून मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना सोईस्कर ठरणाऱ्या या गाडीची सेवा दिवा पर्यंतच सीमित करण्यात आल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.दिवा स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना अतिरिक्त लोकल रेल्वेने प्रवास करावा लागतो, ज्यामुळे वेळ, खर्च आणि शारीरिक त्रास वाढतो. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रात्रीच्या वेळेत प्रवास करणाऱ्यांसाठी ही अडचण अधिक गंभीर ठरते. रस्त्याने प्रवास करायचा झाल्यास मुंबई–गोवा महामार्गाची स्थिती अनेक ठिकाणी अत्यंत खराब आहे, ज्यामुळे प्रवास कठीण आणि धोकादायक होतो. अशा परिस्थितीत ही पॅसेंजर रेल कोकणातील सामान्य नागरिकांसाठी एक विश्वासार्ह, सोयीस्कर वाहतूक व्यवस्था होती, असे खासदार यांनी रेल्वे मंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.खासदार वायकर यांनी दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी या विषयावर सविस्तर निवेदन रेल्वे मंत्री पाठवले होते. परंतु त्यानंतरही रेल्वे विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. रेल्वे प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी वाढत आहे. हा केवळ रेल्वेचा मुद्दा नसून कोकणातील जनतेच्या भावना आणि त्यांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित विषय असल्याने, यात लक्ष घालून दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल तात्काळ पूर्ववत दादर स्थानकापर्यंत सुरू करण्याचे आदेश द्यावेत. तसेच शक्य असल्यास प्रवाशांच्या सोयीसाठी ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पर्यंत वाढवावी, ज्यामुळे मुंबईतील अधिकाधिक प्रवाशांना थेट आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. यामुळे कोकणात जाणाऱ्या लाखो सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी विनंती खासदार वायकर यांनी रेल्वे मंत्री यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 2:30 pm

Huma Qureshi Zack Snyder: हॉलिवूड दिग्दर्शक जॅक स्नायडरकडून हुमा कुरेशीला खास सरप्राइज; अभिनेत्रीने दिलं गोड उत्तर

Huma Qureshi Zack Snyder जॅक स्नायडर आणि हुमा कुरेशी यांनी २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'आर्मी ऑफ द डेड' या हॉलिवूड चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर जवळपास पाच वर्षांनी जॅक स्नायडर यांनी पुन्हा एकदा या चित्रपटाची आठवण काढत एक पोस्ट शेअर केली.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 2:15 pm

Mumbai Local Mega block Update : मुंबईत अचानक 'इतक्या'लोकल फेऱ्या झाल्या रद्द, आता शेवटचीही गाडी सुटणार 'या'वेळेवर

मुंबई : मुंबईत सध्या लोकलचे वेळापत्रक हे बिघडलेलं दिसत आहे. अनेक लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत आणि बऱ्याच गाड्या या उशिराने येत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय उशिरा येणाऱ्या लोकलमुळे स्थानकावर प्रचंड गर्दी देखील वाढत आहे. त्यामुळे ट्रेनमध्येही गर्दी वाढलेली दिसत आहे.नेमकं कारण काय?मुंबईच्या प्रभादेवी उड्डाणपुलाच्या पाडकामामुळे मध्य रेल्वेवर रात्रीच्या वेळेत ब्लॉक घेतले जात आहेत, म्हणून अनेक लोकल गाड्या या उशिराने धावत आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलले गेले आहेत. त्यामुळे याचा त्रास हा थेट नोकरदार वर्गावर आणि प्रवाशांवर होत आहेबदल केव्हापासून आणि किती वाजता असेलप्रभादेवीचा उड्डाणपूल हा वरळी- शिवडी प्रकल्पाचा भाग असलेला ब्रिटिशकालीन पूल आहे. जो तब्बल ११३ वर्ष जुना आहे. हा पूल पाडून त्याजागी नवीन डबलडेकर पूल उभारण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( MMRDA ) यांनी केले आहे. शिवाय या कामाची जबाबदारी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याकडे आहे.ब्लॉक केव्हापासून होईल सुरुया पाडकामासाठी सोमवार पासून ( ३० मार्च पासून ) मध्य रेल्वेवर दररोज रात्री ब्लॉक हा घेतला जात आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री ११ : ४० ते पहाटे ३ : ४० या वेळेत सुमारे चार तासांचा हा ब्लॉक असणार आहे. या काळात अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील काही गाड्या पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. शनिवारी मात्र मध्यरात्रीनंतर सलग सहा तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार असून काम लवकरात लवकर आटोपण्याचे नियोजन आहे.लोकल फेऱ्यांमध्ये केले गेले हे बदलया ब्लॉकचा सर्वाधिक परिणाम सीएसएमटी, कुर्ला, आणि ठाणे दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्यांवर होणार आहे. काही लोकल गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहेत. तर काहींचे मार्ग बदलण्यात येणार आहेत. कल्याण, कसारा आणि खोपोलीकडून येणाऱ्या काही गाड्या कुर्ला, ठाणे, किंवा दादरपर्यंतच धावणार आहेत. काही गाड्या सीएसएमटी ऐवजी दादर स्थानकातूनच चालवण्यात येणार आहेत.याशिवाय, शेवटच्या लोकलच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. काही मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवरही या कामाचा परिणाम होण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.वाढत्या उन्हाचा तडाखा आणि बिघडलेले लोकलच वेळापत्रक, स्टेशनवर होणारी गर्दी त्यामुळे कामावर जाणाऱ्या आणि रात्री घरी परतणाऱ्या नोकरदारांची चांगलीच कसरत होणार आहे. काम पूर्ण होईपर्यंत काही काळ मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळ राखून नियोजन करावे.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 1:30 pm

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू, ८ जण जखमी

मुंबई: बिहारमधील नालंदा येथे एक मोठी घटना घडली आहे. शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.नेमकं प्रकरण काय?मंगळवारी, नालंदा जिल्ह्यातील दिपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माघरा गावातील शीतला मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. पूजेदरम्यान गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरी झाली.घटनेची माहिती मिळताच, दीपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले.प्रत्यक्षदर्शीने काय सांगितले?घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या एका तरुणाने सांगितले, आज सकाळपासून मंदिरात भाविकांची गर्दी होती. याच दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण मरण पावले आणि बरेच जण जखमी झाले. सर्व काही सुरळीत सुरू होते. अचानक चेंगराचेंगरी झाली आणि असे का घडले हे कळले नाही. लोक इकडेतिकडे धावू लागले. गर्दीच्या व्यवस्थापनासाठी बॅरिकेड आणि रांगा लावल्या होत्या. गर्दीच्या सुरक्षेसाठीही लोक उपस्थित होते. पण मला माहीत नाही की कोणी गोंधळ घातला आणि लोक इकडेतिकडे धावू लागले. ही जत्रा शतकानुशतके सुरू आहे. प्रत्येक वेळी सर्व काही सुरळीत पार पडते. यावेळी ही चेंगराचेंगरी कशी झाली हे मला माहीत नाही.ज्या शीतला मंदिरात ही चेंगराचेंगरी झाली, ते बिहार शरीफमधील नालंदा जिल्ह्यातील माघरा येथे आहे. मंगळवारी, माघरा येथील शीतला मंदिरात हजारो लोक दर्शनासाठी जमले होते. दरवर्षी गर्दी होते, पण असा अपघात यापूर्वी कधीही घडला नव्हता. पोलीस आता या चेंगराचेंगरीचा आणि त्यामागे काही कट आहे का याचा तपास करत आहेत.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 1:30 pm

William Langford : मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर BCCI च्या ब्रँड कास्ट इंजिनिअरचा रहस्यमयी मृत्यू, खोलीत आढळला मृतदेह

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ट्रायडन्ट हॉटेलमध्ये आयपीएल २०२६ निमित्त भारतात आलेल्या बीसीसीआयच्या ब्रॉडकास्ट इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यान विल्यम लेग्नफोर्ड असे मृत व्यक्तीचे नाव असून ते मूळचे ब्रिटिश नागरिक होते.माहितीनुसार, यान लेग्नफोर्ड हे २४ मार्चपासून आयपीएल हंगामासाठी मुंबईत वास्तव्यास होते. २९ मार्च रोजी वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यासाठी ते उपस्थित होते.सामना संपल्यानंतर ते आपल्या हॉटेलमधील २७१५ क्रमांकाच्या खोलीत परतले. मात्र, ३० मार्च रोजी सकाळी रिसेप्शनमधून वारंवार फोन करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी मास्टर कीच्या साहाय्याने दरवाजा उघडला असता, यान लेग्नफोर्ड हे खोलीत खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आले.तत्काळ हॉटेलच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले, मात्र त्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे मृत्यूची नोंद करण्यात आली असून, नेमकं मृत्यूचं कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 1:30 pm

Kubbra Sait : “शो जसा साकारला आहे, त्याचा मला खूप अभिमान”; फर्जी 2 साठी क्रुबा सैत उत्सुक, ‘ती’कडू आठवण केली शेअर

Kubbra Sait : अभिनेत्री कुब्रा सैत फर्जी 2 साठी खूप उत्सुक असून, तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिरीजवर सविस्तर भाष्य केले आहे.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 1:22 pm

Vijay Shivtare : बापासाठी लेक झाली ढाल! शिवतारेंना मुलीकडून किडनीदान; पती शिवदीप लांडेंकडून कौतुकाची थाप

Vijay Shivtare : गेल्या काही काळापासून विजय शिवतारे गंभीर किडनी आजाराने त्रस्त होते.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 1:18 pm

Summer Care: उन्हाळ्यात गॉगल घेताना घ्या योग्य काळजी; स्टाइलसोबत डोळ्यांचं संरक्षणही तितकंच महत्त्वाचं

Summer Care गॉगल घेताना सर्वात आधी त्याची गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे. गॉगल काचेचा आहे की प्लास्टिकचा, हे पाहावे. प्लास्टिक असल्यास त्याचा दर्जा चांगला आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे. गॉगलमधून पाहताना वस्तूचा आकार बदलल्यासारखा वाटू नये किंवा हालचाल दिसू नये, याची खात्री करून घ्यावी.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 1:14 pm

Pakistan Gas Pipeline Attack: दुष्काळात तेरावा महिना! पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांनी उडवली गॅस पाईपलाईन ; ५ महत्वाच्या जिल्ह्यांचा पुरवठा खंडित

Pakistan Gas Pipeline Attack:पाकिस्तान सध्या एका गंभीर ऊर्जा संकटाशी झुंजत आहे. एलपीजीच्या तुटवड्यामुळे लोक आधीच त्रस्त होते, पण आता एक नवीन समस्येची भर पडली आहे.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 1:13 pm

माजी खासदार राहुल शेवाळे बॉक्सिंगच्या रिंगणात; महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

मुंबई: बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय) च्या निरीक्षकांच्या उपस्थितीत मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत, माजी खासदार राहुल शेवाळे यांची महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात १ मार्च रोजी पार पडलेल्या निवडणुकीत राज्यभरातील २५ संघटनांच्या एकूण ५० प्रतिनिधींनी एकमताने शेवाळे यांच्यासह एकूण १३ पदाधिकाऱ्यांना बिनविरोध निवडून दिले होते. कायदेशीर बाबींची पूर्तता करून नियमानुसार, नुकतीच बीएफआयने या संघटनेला मान्यता दिली. या संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदी रणजीत सावरकर, सचिव पदी डॉ. राकेश तिवारी, कोषाध्यक्ष पदी मिलन वैद्य तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अनिल त्रिवेदी यांची निवड करण्यात आली आहे.तसेच अर्जुन पुरस्कार विजेते कॅप्टन गोपाळ देवांग आणि ओलंपियन मनोज पिंगळे यांचा देखील कार्यकारणीत समावेश आहे.राज्यभरातील एकूण २५ जिल्हास्तरीय बॉक्सिंग संघटनांची शिखर संस्था म्हणून बीएफआयशी समन्वय साधण्याची आणि राज्यभरातील बॉक्सिंगपटूंना हक्काचे व्यासपीठ देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या जुन्या कार्यकारिणीची मुदत २०२२ मध्ये संपुष्टात आली होती. त्यानंतर काही कारणास्तव २०२५ पर्यंत असोसिएशनची निवडणूक झालीच नाही. कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्याचा ठपका ठेवत,नोव्हेंबर २०२५ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीला बीएफआयने अवैध ठरवले होते. त्यानंतर राज्यभरातील २५ जिल्हास्तरीय संघटनांच्या सहकार्याने कंपनी ऍक्टच्या कलम ८ अंतर्गत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची नोंदणी करण्यात आली आणि निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात आली. बीएफआयचे नरेंद्रकुमार निरवाणा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या निवडणुकीत एकूण १३ पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून उर्वरित २ जागांसाठी (१ पुरुष खेळाडू आणि १ महिला खेळाडू) येत्या काळात निवडणूक घेतली जाणार आहे.महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन अध्यक्ष राहुल रमेश शेवाळे म्हणाले, राज्यभरातील संघटनांच्या प्रतिनिधींनी माझ्यासह संपूर्ण कार्यकारिणीवर दाखविलेल्या विश्वासबद्दल मी त्यांचे आभार मानतो. राज्यभरातील बॉक्सिंगपटूंना आवश्यक त्या सुविधा देऊन अव्वल खेळाडू घडविण्यासाठी बीएफआयच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करूमहाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन वरिष्ठ उपाध्यक्ष रणजीत सावरकर यांनी म्हटले की सुमारे १९२५ पासून भारतात खेळल्या जाणाऱ्या बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात महाराष्ट्रामध्ये आजवर अनेक अव्वल बॉक्सिंगपटू घडले. पद्मश्री पुरस्कारासह मेजर ध्यानचंद, अर्जुन, दादाजी कोंडदेव असे अनेक मानाचे पुरस्कार महाराष्ट्रातील बॉक्सिंगपटूंनी पटकावले आहेत. भविष्यात, या क्रीडा प्रकारात भारताची कामगिरी उंचावण्यासाठी आमच्या कार्यकारणीतील अनुभवी पदाधिकारी आणि खेळाडूंच्या साथीने आम्ही प्रयत्न करूमहाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन कार्यकारिणी अध्यक्षश्री. राहुल शेवाळे, माजी खासदार ( मुंबई )उपाध्यक्ष1) श्री. रणजित सावरकर, वरिष्ठ उपाध्यक्ष( ठाणे )2) कॅप्टन गोपाल देवांग ( अर्जुन अवार्डी, पुणे)3) श्री. अरुण बुटे ( राष्ट्रीय बॉक्सर, माजी बॉक्सिंग क्रिडा मार्गदर्शक, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी, नागपूर )4) कु. सविता बावनथडे ( अमरावती, माजी बॉक्सर )सचिवश्री. राकेश तिवारी ( राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी BFI , चंद्रपूर )सहसचिव1) श्री. मनोज पिंगळे ( ऑलम्पिअन, अर्जुन अवार्डी पुणे )2) श्री. योगेश मुंदडा ( क्रिडा संघटक, सातारा )3) श्री. धनंजय बनसोडे ( आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक परभणी )4) सौ. निलम पाटील ( राष्ट्रीय पंचाधिकारी, पालघर )कोषाध्यक्षश्री मिलन वैद्य ( राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी आणि माजी बॉक्सर , ठाणे )सदस्य1) कु. साक्षी गायधनी ( आंतरराष्ट्रीय बॉक्सर नासिक )2) श्री.विशाल खंडारे ( क्रिडा संघटक बॉक्सिंग बुलढाणा )तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अनिल त्रिवेदी ( मुंबई ) यांची निवड करण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 1:10 pm

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

- आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने (भाजप) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांविरोधात आचारसंहितेच्या कथित उल्लंघनाबद्दल निवडणूक आयोगाकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. पक्षाचा आरोप आहे की, निवडणूक सभांदरम्यान केलेल्या काही वक्तव्यांमधून लोकांना घाबरवण्याचा, चिथावणी देण्याचा आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.भाजपने सोमवारी (३० मार्च) पाठवलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर बंगालसह विविध निवडणूक सभांमध्ये केलेल्या भाषणांमध्ये अशी वक्तव्ये होती, जी मतदारांवर प्रभाव टाकू शकतात आणि तणाव निर्माण करू शकतात, ज्यामुळे मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांना धोका निर्माण होऊ शकतो.भाजपने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, २५ मार्च २०२६ रोजी मैनागुरी येथील एका सभेत मुख्यमंत्री म्हणाल्या होत्या की, निवडणुकांनंतर लोकांना त्यांच्या घराबाहेर लिहावे लागेल की ते भाजपला पाठिंबा देत नाहीत. भाजपने या वक्तव्याला राजकीय अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हटले आहे.या तक्रारीत त्याच दिवशी नक्षलबाडी येथील एका सभेत महिलांना घरात जे काही आहे ते बाहेर काढा असे केलेल्या आवाहनाचाही उल्लेख आहे. अशा वक्तव्यांमुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो, असा भाजपचा आरोप आहे. गेल्या २६ मार्च रोजी पांडवेश्वर येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी लोकांना मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी एकजूट होऊन आंदोलन करण्याचे आणि सतर्क राहण्याचे केलेल्या आवाहनाचा संदर्भ देत, भाजपने म्हटले आहे की, यातून निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.या तक्रारीत दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बसंती भागातील एका घटनेचाही उल्लेख आहे, ज्यात भाजप कार्यकर्त्यांवर कथितरित्या हल्ला झाला होता. अशा वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा परिणाम म्हणून ही घटना घडली असावी, असा भाजपचा दावा असून, राज्य पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोपही करण्यात आला आहे.भाजपने २८ मार्च रोजी कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केलेल्या एका वक्तव्याचाही उल्लेख केला आहे, ज्यात कथितरित्या प्रादेशिक तुलना करण्यात आली होती. अशा वक्तव्यांमुळे समाजात फूट पडू शकते, असे भाजपचे म्हणणे आहे.आपल्या तक्रारीत, भाजपने निवडणूक आचारसंहिता, लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ आणि भारतीय दंड संहिता, २०२३ च्या विविध कलमांचा हवाला देत कारवाईची मागणी केली आहे. या वक्तव्यांमुळे वेगवेगळ्या समुदायांमधील तणाव वाढू शकतो, जे कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन आहे, असे पक्षाचे म्हणणे आहे.राज्यात मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा आणि योग्य कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 1:10 pm

ShivSena : शिवसेनेकडून विभागीय संपर्कप्रमुखांची घोषणा

- तीन कॅबिनेट मंत्र्यांवर सोपवली महत्वाची जबाबदारीमुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्यातील विभागीय संपर्कप्रमुख आणि सह संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मंत्री भरत गोगावले, मंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री संजय राठोड, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार किरण सामंत यांच्यावर पक्षाने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. माजी आमदार दगडू सकपाळांची पश्चिम महाराष्ट्राच्या विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना विभागीय जिल्हा संपर्कप्रमुख आणि सह संपर्कप्रमुखांची घोषणा केल्याचे निवेदन पक्षाने जारी केले आहे. उत्तर कोकण विभागीय संपर्क प्रमुखपदी मंत्री भरत गोगावले यांची तर सह संपर्कप्रमुख पदी प्रदीप खाडे यांची नियुक्ती केली आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागीय संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी दगडू सकपाळ यांच्यावर तर सह संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी हनुमंत जगदाळे यांच्यावर सोपवली आहे. दक्षिण कोकण विभागीय संपर्कप्रमुख पदी आमदार किरण सामंत यांची नियुक्ती केल्याचे निवेदनात म्हटले आहे.मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यावर देण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांकरिता विभागीय संपर्क प्रमुख म्हणून माजी मंत्री दिपक सावंत यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर पूर्व विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हांकरिता विभागीय संपर्कप्रमुख पदी आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची निवड करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी मंत्री संजय राठोड यांची विभागीय संपर्कप्रमुख तर पराग पिंगळे यांची विभागीय सह संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 1:10 pm

Census 2027: देशात उद्यापासून जनगणनेला सुरुवात ; वैयक्तिक माहिती राहणार गुप्त तर लिव्ह इनचे जोडपे विवाहितांच्या यादीत ; वाचा आणखी मह्त्वाचे मुद्दे

Census 2027: जनगणनेचा पहिला टप्पा या बुधवारी म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे. हा टप्पा एप्रिलमध्येच पूर्ण होणे अपेक्षित आहे.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 12:42 pm

Relationship Advice: नातं टिकवायचं असेल तर ‘आदर’ महत्त्वाचा; समुपदेशनातून सावरलं ताणलेलं नातं

Relationship Advice एका तरुण दांपत्याचं लग्न होऊन साधारण वर्षभर झालं होतं. सुरुवातीचे काही महिने त्यांचं आयुष्य आनंदात चाललं होतं. पण नंतर छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद सुरू झाले. हे वाद हळूहळू वाढत गेले आणि परिस्थिती इतकी बिघडली की पत्नी त्रासून माहेरी परत गेली. तिला पुन्हा सासरी जाण्याची इच्छा उरली नव्हती.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 12:38 pm

CCTV Certification Rules: १ एप्रिलपासून अनेक चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विक्रीवर बंदी; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

मुंबई: भारतातील सीसीटीव्ही बाजारपेठेत मोठे बदल होणार आहेत. भारत इंटरनेट-कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीचे नियम अधिक कडक करण्याच्या तयारीत आहे. इकॉनॉमिक टाइम्समधील एका वृत्तानुसार, १ एप्रिलपासून हिकव्हिजन, डहुआ आणि टीपी-लिंक यांसारख्या अनेक चिनी ब्रँड्सकडून देशात विशिष्ट सीसीटीव्ही उपकरणे विकण्याची परवानगी काढून घेतली जाऊ शकते. अलीकडेच एक बातमी समोर आली आहे की, घरे आणि कार्यालयांमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून रेकॉर्ड केलेला डेटा, ज्यात प्रामुख्याने चिनी घटक होते, तो पाकिस्तानला पाठवला जात होता.या बंदी मागचे कारण अस्पष्ट आहे, कारण सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र अहवालानुसार, अधिक कठोर प्रमाणीकरण नियम लागू केले जात आहेत आणि सर्व कंपन्या त्यांचे पालन करत नाहीत. या नियमांनुसार, भारतात विक्री होण्यापूर्वी सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना किंवा उपकरणांना अनिवार्य प्रमाणीकरण प्रक्रियेतून जावे लागेल. हे प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने लागू केलेल्या राष्ट्रीय सुरक्षेवर केंद्रित नियमांशी संबंधित आहे. सुरक्षा यंत्रणांनी भारतात वापरल्या जाणाऱ्या चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती. अशा उपकरणांमध्ये दूरस्थपणे प्रवेश केला जाऊ शकतो आणि डेटा परदेशात पाठवला जाऊ शकतो.शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारीसरकारने या संदर्भात सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यासाठी कडक नियम लागू केले जात आहेत, ज्याअंतर्गत प्रत्येक उपकरणाच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा तपशील सरकारला देणे बंधनकारक असेल. या माहितीत कॅमेऱ्यामध्ये स्थापित चिप, फर्मवेअर आणि स्त्रोताचा तपशील समाविष्ट असेल, जेणेकरून कोणताही संशयास्पद स्त्रोत वापरला गेला आहे की नाही हे निश्चित करता येईल. याशिवाय, कोणत्याही सीसीटीव्हीमध्ये कोणताही बॅकडोअर नसावा, म्हणजेच, कॅमेऱ्याने रेकॉर्ड केलेला डेटा देशाबाहेर पाठवला जाऊ शकेल असा कोणताही मार्ग नसावा. भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी प्रमाणीकरण अनिवार्य आहे. यासाठी, सरकारी मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये चाचणी केली जाईल. चाचणीशिवाय भारतात कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा विकला जाणार नाही.उत्पादकांवर कसा परिणाम होईल?नियम लागू झाल्यानंतर, सीसीटीव्ही उत्पादकांना खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेलसीसीटीव्हीच्या मुख्य घटकांच्या मूळ देशाची स्पष्ट घोषणात्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की सीसीटीव्ही उपकरणांची सुरक्षा त्रुटींसाठी तपासणी केली जाईल.त्यांनी अनधिकृत दूरस्थ प्रवेशासारखे धोके टाळले पाहिजेत.जर एखादे उत्पादन या मानकांची पूर्तता करत नसेल, तर त्याला प्रमाणपत्र मिळणार नाही आणि त्याशिवाय त्याची विक्री करता येणार नाही.फक्त चिनी ब्रँड्सवरच परिणाम का झाला?या नियमाचा अनेक चिनी ब्रँड्सवर परिणाम होत आहे, कारण त्यांचे बहुतांश घटक चीनमधून आयात केले जातात आणि ते विशेषतः चिनी चिपसेट्सवर अवलंबून असतात. अहवालानुसार, हे चिनी घटक वापरणाऱ्या सीसीटीव्ही उपकरण उत्पादकांना नवीन प्रक्रियेअंतर्गत मंजुरी मिळवण्यात अडचणी येत आहेत. पुरवठा साखळीतील समस्यांमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या युनिट्सनाही प्रमाणपत्र मिळवण्यात अपयश येत आहे. परिणामी, सीसीटीव्ही कंपन्या एकतर त्यांच्या प्रणालींची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा विशिष्ट उत्पादन श्रेणींमधून पुरवठा मागे घेत आहेत.सर्वसामान्य ग्राहकांसाठी काय बदलणार?यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे आणि सीसीटीव्ही उत्पादनांच्या बाजारपेठेत सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध असलेले पर्याय बदलू शकतात. कालांतराने, तुम्हाला स्थानिक पातळीवर उत्पादित सीसीटीव्ही उपकरणांच्या संख्येत वाढ आणि डेटा सुरक्षा व गोपनीयतेवर अधिक लक्ष केंद्रित केलेले दिसेल. सीपी प्लस, क्यूबो आणि प्रामा यांसारखे ब्रँड्स आपला विस्तार करत असल्याने, या बदलाचे परिणाम दिसून येत आहेत. यापैकी अनेक कंपन्यांनी चिनी नसलेले घटक आणि स्थानिक पातळीवर मिळवलेल्या प्रणालींचा वापर करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे सरकारी नियमांचे पालन करणे सोपे झाले आहे.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 12:30 pm

Ashok Kharat Case : खरातच्या मुलीची लग्नपत्रिका समोर; शिंदे, पाटील, शेलार, चाकणकरांचा प्रमुख पाहुणे म्हणून उल्लेख

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातच्या मुलीची लग्नाची पत्रिका व्हायरल होत असून, त्यामध्ये मोठ्या राजकीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख असल्याचे दिसत आहे.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 12:27 pm

Middle East Conflict: अमेरिकेने इराणच्या इस्फहानवर टाकले बंकर-बस्टर बॉम्ब; ट्रम्प यांच्याकडून धक्कादायक व्हिडिओ शेअर

नवी दिल्ली: अमेरिकेच्या लष्कराने इराणमधील इस्फहान येथील एका मोठ्या दारूगोळ्याच्या गोदामाला लक्ष्य केले. या हल्ल्यात २,००० पौंड वजनाच्या बंकर-भेदी बॉम्बसह इतर अनेक धोकादायक बॉम्ब वापरण्यात आले. ट्रम्प यांनी 'ट्रुथसोशल'वर रात्रीच्या आकाशात प्रचंड स्फोट दाखवणारा एक व्हिडिओ पोस्ट केला. हा हल्ला ज्या क्षणी झाला, त्याच क्षणी या व्हिडिओमध्ये चित्रित झाला असल्याचे मानले जाते.वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार आणि एका अमेरिकी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणच्या इस्फहान शहरातील एका मोठ्या दारूगोळ्याच्या गोदामावर २,००० पौंडांचे बंकर-बस्टर बॉम्ब वापरले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनीही 'ट्रुथ सोशल'वर एक कॅप्शन नसलेला व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये रात्रीच्या आकाशात अनेक स्फोट होताना दिसत आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, हा व्हिडिओ प्रत्यक्ष हल्ला कसा झाला हे दाखवतो. वॉल स्ट्रीट जर्नलनुसार, या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात भेदक दारुगोळा वापरण्यात आला, ज्यामुळे भूमिगत आणि तटबंदी असलेल्या ठिकाणांचे मोठे नुकसान झाले.इस्फहान का महत्त्वाचे?इस्फहान हे मध्य इराणमधील एक प्रमुख शहर आहे, जे राजधानी तेहरानच्या दक्षिणेला झायंदेह नदीच्या काठावर वसलेले आहे. इराणने आपला सुमारे ५४० किलोग्रॅम अत्यंत संवर्धित युरेनियमचा काही भाग इस्फहान शहरातील भूमिगत सुविधांमध्ये हलवला असल्याचे म्हटले जाते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याची धमकी दिली. ज्यात देशाच्या क्षारविरहितीकरण प्रकल्पांचा समावेश आहे. अशा प्रकारच्या कृतींमुळे पाणीटंचाई असलेल्या मध्य-पूर्वेवर विनाशकारी परिणाम होऊ शकतात.ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, जर युद्ध संपवण्यासाठी लवकरच करार झाला नाही. तसेच ज्यामधून टँकरद्वारे मोठ्या प्रमाणात तेलाची वाहतूक होते ती होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ उघडली नाही, तर आम्ही इराणचे सर्व वीज प्रकल्प, तेल विहिरी आणि खारग बेटांना उडवून देऊन पूर्णपणे नष्ट करू. ज्यांना आम्ही अद्याप हात लावलेला नाही.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 12:10 pm

Shahrukh Khan's King Movie : आखाती देशातील युद्धाचा बॉलीवुडलाही फटका; शाहरुखच्या 'किंग'मधील ॲक्शन सीक्वेन्समध्ये बदल

- दुबईऐवजी मुंबईत होणार चित्रीकरणमुंबई : आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता चित्रपट सृष्टीवरही होताना दिसत आहे. नुकताच शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित 'किंग' चित्रपटाबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. त्या माहितीनुसार किंग चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्समध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. पूर्वे हे ॲक्शन सीक्वेन्स दुबईमध्ये चित्रित होणार होते, मात्र आता ते मुंबईमध्येच चित्रित होणार असल्याचे दिग्दर्शाने सांगितले आहे.मिळालेल्या वृत्तानुसार, सुहाना खान आणि अनिल कपूर अभिनीत चित्रपटातील एका भव्य ॲक्शन सीक्वेन्सचे चित्रीकरण दुबईमध्ये होणार होते. मात्र, पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे हे आंतरराष्ट्रीय चित्रीकरण रद्द करण्यात आले आहे. हे चित्रीकरण ९ एप्रिल रोजी सुरू होऊन आठवडाभर चालणार होते आणि त्यासाठी सर्व आवश्यक परवानग्याही घेण्यात आल्या होत्या.मात्र सध्याची परिस्थिती पाहता, निर्मात्यांनी कलाकार आणि तांत्रिक टीमच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन हा निर्णय घेतला आहे. आता एक्शन सिक्वेन्सचे चित्रीकरण मुंबईत केले जाईल. दुबईसारखे व्हिज्युअल इफेक्ट्स साधण्यासाठी विले पार्ले येथील एका स्टुडिओमध्ये वाळवंटासारखे वातावरण तयार केले जात आहे.'किंग' या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ आणि जयदीप अहलावत यांच्यासह इतर मोठे कलाकार दिसणार आहेत. भव्य निर्मिती असलेला हा चित्रपट २०२६ मधील सर्वाधिक चर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असेल अशी अपेक्षा आहे.डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डंकी'नंतर, हा शाहरुखचा पुढचा मोठा चित्रपट असेल आणि प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट ख्रिसमस २०२६ रोजी प्रदर्शित होईल. विशेष म्हणजे, सुहाना खान पहिल्यांदाच तिचे वडील शाहरुख खान यांच्यासोबत पडद्यावर दिसणार आहे.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 12:10 pm

Nalanda Stampede: बिहारच्या शीतला मंदिरात चेंगराचेंगरी ; ८ जणांचा मृत्यू तर १० ते १२ भाविक गंभीर जखमी

Nalanda Stampede: बिहारमधील नालंदा याठिकाणी आज एका मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत आठ महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 12:07 pm

UMANG App: आता ब्लडसाठी धावाधाव करावी लागणार नाही! मोबाईलवरच कळेल कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे ब्लड

UMANG App या अॅपमधील एक महत्त्वाची सेवा म्हणजे ई-रक्तकोश (e-RaktKosh). या प्लॅटफॉर्मच्या मदतीने देशभरातील विविध ब्लड बँकांचा लाइव्ह डेटा पाहता येतो. म्हणजेच, कोणत्या ब्लड बँकेत कोणत्या गटाचे (जसे A+, B+, O-) किती युनिट्स रक्त उपलब्ध आहे, याची अचूक माहिती मिळते.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 11:52 am

Mohammad Safa: इराणवर अणुबॉम्ब टाकला जाणार? ; UN च्या अधिकाऱ्याचे गंभीर आरोप ; १२ वर्षांची कारकीर्द लावली पणाला

Mohammad Safa: युद्धाच्या घडामोडीत संयुक्त राष्ट्रांचे राजनयिक आणि पॅट्रिऑटिक व्हिजन असोसिएशनचे संयुक्त राष्ट्रांमधील दीर्घकाळ प्रतिनिधी असलेल्या मोहम्मद सफा यांनी युद्धासंदर्भात एक गंभीर आरोप केला आहे.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 11:40 am

Anjali Damania on Rupali Chakankar : “नाशिकमध्ये जाऊन अशोक खरातचे पाय पदराने पुसले, आणि आता…”; चौकशीला हजर न राहिल्याने चाकणकरांवर दमानियांची टीका

Anjali Damania on Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांच्या भूमिकेमुळे खरात प्रकरणात अनेक सवाल उपस्थित

दैनिक प्रभात 31 Mar 2026 11:31 am

Corporator Tejinder Singh Tiwana : जनसेवेचा आदर्श! नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांचा मोठा निर्णय

- ५ वर्षांचे संपूर्ण वेतन महापौर निधीसाठीमुंबई : जनहितासाठी एक प्रेरणादायी पाऊल उचलत नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी आपल्या संपूर्ण वेतन आणि भत्ते जनसेवेसाठी समर्पित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये कौतुकाची लाट उसळली आहे.नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड ४७ मधून विजयी झालेल्या तिवाना यांनी आपल्या पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळातील संपूर्ण मानधन तसेच विविध समिती बैठकींसाठी मिळणारे सर्व भत्ते महापौर निधी मध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी महापौरांकडे अधिकृत निवेदनही सादर केले आहे.यावेळी बोलताना तिवाना म्हणाले, “नगरसेवक म्हणजे केवळ पद नाही, तर ती जबाबदारी आहे. जनतेची सेवा निस्वार्थ भावनेने व्हायला हवी. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणे हेच माझे पहिले कर्तव्य आहे. याच भावनेतून मी माझे संपूर्ण वेतन आणि भत्ते जनकल्याणासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.”तिवाना यांनी व्यक्त केलेला विश्वास असा की, ही रक्कम गरजू मुंबईकरांच्या मदतीसाठी आणि विविध जनकल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची ठरेल.दरम्यान, भारतीय जनता पक्ष यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये युवा उमेदवारांना संधी देत नव्या विचारसरणीला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईच्या विकासाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने तिवाना यांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.एकूणच, तेजिंदर सिंग तिवाना यांची ही पुढाकार केवळ त्यांच्या जनसेवेतील निष्ठेचे प्रतीक नसून, इतर जनप्रतिनिधींनाही प्रेरणा देणारे उदाहरण ठरत आहे.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 11:30 am

Jaish-e-Mohammed : दहशतवादी जगतात खळबळ! मसूद अझरच्या मोठ्या भावाचा गूढ मृत्यू

- जैश-ए-मोहम्मदचा कणा ढासळला?मुंबई : पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख चेहरा मसूद अझर याचा मोठा भाऊ ताहिर अन्वर याच्या आकस्मिक मृत्यूने दहशतवादी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट नसल्याने गूढ अधिकच वाढले आहे.अहवालांनुसार, ताहिर अन्वर हा केवळ एक सदस्य नव्हता, तर ‘जैश’च्या अनेक मोठ्या कारवायांच्या पडद्यामागील मुख्य सूत्रधार होता. तो मसूद अझरचा विश्वासू सल्लागार आणि संपर्क अधिकारी म्हणून काम करत होता. संघटनेच्या दहशतवादी योजना तयार करणे, त्यांची अंमलबजावणी आणि समन्वय साधणे ही महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर होती.११ भावंडांमध्ये सर्वात मोठा असलेला ताहिर सुरुवातीला पाकिस्तानात कुक्कुटपालन व्यवसाय करत होता. मात्र २००० नंतर त्याने दहशतवादाच्या मार्गावर पाऊल ठेवले. त्याच वर्षी त्याने आपल्या धाकट्या भावासोबत जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली आणि संघटनेच्या लष्करी कारवायांचे नेतृत्व केले.भरती, प्रशिक्षण आणि नवीन दहशतवादी शिबिरांची उभारणी या सर्व गोष्टींमध्ये ताहिरची महत्त्वाची भूमिका होती. मात्र, तो नेहमीच पडद्यामागे राहिला. मसूद अझर जिथे आघाडीवर दिसत होता, तिथे ताहिर शांतपणे संपूर्ण यंत्रणा सांभाळत होता. संघटनेच्या मुख्यालयातूनच तो या कारवाया नियंत्रित करत असे.मसूद अझर स्वतः ताहिरला संघटनेचा ‘कणा’ मानत होता. त्यामुळेच त्याच्या मृत्यूने ‘जैश’ची ताकद कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतकेच नव्हे, तर संघटनेत नेतृत्वासाठी अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.BREAKING: Pakistani Terror Organisation Jaish-e-Mohammed chief Masood Azhar's elder brother Mohammad Tahir Anwar dies under suspicious circumstancesThe mas was responsible for hundreds of death.#Pakistan #Terrorism #India #AsimMunir #Iran https://t.co/2j1bxYJvoo pic.twitter.com/AzpR0X4t5L— WWIII Monitor ⚠️ (@crichasee) March 30, 2026विशेष म्हणजे, काही अहवालांनुसार ऑपरेशन सिंदूरनंतर ताहिरच्या उपस्थितीत संघटनेच्या मुख्यालयातून ‘जमात-उन-मोमिनात’ या महिला दहशतवादी शाखेची स्थापना करण्यात आली होती. या शाखेच्या प्रशिक्षणामध्येही ताहिरची मोठी भूमिका होती.एकूणच, ताहिर अन्वरच्या मृत्यूमुळे जैश-ए-मोहम्मदसमोर मोठे नेतृत्व संकट उभे राहण्याची शक्यता असून, पुढील काळात या संघटनेतील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 11:30 am

Harshavardhan Sapkal : खरात प्रकरणामुळे संतापाची लाट; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची विचार करायला लावणारी पोस्ट, आदिती तटकरेंना चार सवाल

Harshavardhan Sapkal : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट आहे. खराताला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरु लागली आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यावर बोचरा निशाणा साधत चार सवाल उपस्थित केले आहेत.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 11:25 am

Ashok Kharat Case : शिक्षण विभागाच्या शालेय आयडी घोटाळ्यातही भोंदू बाबा खरातचा सहभाग, स्वतःच्या भावाला मिळवून दिले आयडी

मुंबई : भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या प्रकरणांमध्ये आता नवीन ट्विस्ट निर्माण झाला असून नाशिक शहरांमध्ये काही महिन्यापूर्वी दाखल झालेल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातही सहभाग असल्याचे समोर आले आहे यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.१८ मार्च रोजी अटक करण्यात आलेला भोंदू बाबा अशोक खरात चे कारनामे काहीही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये रोज नवीन कारनामे समोर येत आहे. २४ मार्चला खरातची कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यावेळी २९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली होती. आता १ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आलेली आहे. त्यामुळे एसआयटीच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.सर्वसाधारण नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला शालेय आयडी घोटाळा प्रकरणात नाशिक रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामध्ये माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी बच्छाव यांच्यासह काही जणांना अटक करण्यात आली आहे तर या सर्व प्रकरणांमध्ये सर्वसाधारण १५९ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे सहभागी असल्याचे समोर येत आहे त्यामुळे या प्रकरणात अजून काही मोठी कारवाई होण्याची शक्यता आधीपासूनच व्यक्त केली जात होती.या शालेय आयडी घोटाळ्याच्या तपास सुरू आहे आता या प्रकरणांमध्ये भोंदू बाबा अशोक खरात याचे देखील नाव समोर आलेले आहे. आता या प्रकरणाचा तपास एस आय टी मार्फत केला जाणार आहे. स्वतः खरात याने आपल्या भावासाठी देखील शालेय आयडी मिळून दिल्याचे समोर आले आहे, त्यामुळे या प्रकरणाला आता नवीन वळण मिळत आहे.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 11:10 am

Women's and Children's Health : महिला व बालकांच्या पोषणात मोठी सुधारणा करण्याचे लक्ष्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई - राज्यातील कुपोषणावर प्रभावी नियंत्रण मिळवून महिला व बालकांच्या आरोग्य (Women's and Children's Health) आणि पोषणात लक्षणीय सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. महिला व बाल विकास विभाग आणि चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन (CIFF) यांच्यात पाच वर्षांचा सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, या भागीदारीमुळे मातृ व बाल पोषण निर्देशांकात मोठी उंची गाठली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्या उपस्थितीत हा करार झाला. यावेळी चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक मंजुला सिंग, डायरेक्टर स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह्ज अँडपार्टनरशिप्स अखिल पाळीअथ आणि अन्य वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. या कराराअंतर्गत कुपोषणावर प्रभावी नियंत्रणासाठी विशेष भर देण्यात येणार आहे.प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMV) सारख्या थेट लाभहस्तांतरण योजनांचा लाभअधिकाधिक पात्र महिलांपर्यंत पोहोचवून त्यांचा प्रभावी वापर सुनिश्चित केला जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पालघर, जालना, नंदुरबार, गडचिरोली आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये सघन अंमलबजावणी करण्यात येणार असून, राज्यस्तरावरही तांत्रिक साहाय्य दिले जाणार आहे.तसेच, CIFF कडून पोषण व सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांची नियुक्ती करून प्रभावी जनजागृती आणि संदेशवहनाला चालना दिली जाणार आहे. गर्भधारणेपासून बालकाच्या आयुष्यातील पहिल्या१००० दिवसांदरम्यान योग्य पोषण आणि आरोग्य सवयी रुजवण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे.पुराव्यावर आधारित उपाययोजना, तांत्रिक साहाय्य आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकासाच्या माध्यमातून सेवा अधिक सक्षम केली जाईल. कार्यक्रमांचे रिअल-टाइम निरीक्षण, डेटाआधारित निर्णय प्रक्रिया आणि सक्षम मॉनिटरिंग प्रणालीमुळे योजनांची गुणवत्ता आणि परिणामकारकता वाढविण्यात येणार आहे.या भागीदारीमुळे सेवा वितरण यंत्रणा अधिक बळकट होऊन महिला व बाल विकास विभागाच्या योजनांची पोहोच आणि गुणवत्ता वाढेल. परिणामी, महाराष्ट्रातील माता व बालकांच्या आरोग्यपूर्ण आणि सक्षम भविष्यास नवी दिशा मिळणार आहे.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 11:10 am

Roti Pizza Recipe: उरलेल्या चपातींपासून १० मिनिटांत तयार करा टेस्टी ‘रोटी पिझ्झा’; मुलांसाठी हेल्दी आणि झटपट रेसिपी

Roti Pizza Recipe रोटी पिझ्झा बनवण्यासाठी कोणत्याही खास किंवा महागड्या साहित्याची गरज नसते. घरात सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून हा पिझ्झा तयार करता येतो.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 11:06 am

बिहार- नवीन सरकारमध्ये मंत्री बनण्यासाठी तांत्रिक पूजा:कॅमेऱ्यावर दावा- 27 आमदारांनी अनुष्ठान केले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री बनू इच्छितात

बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होणार आहे. मंत्री बनण्यासाठी आमदार तंत्र-मंत्राचा आधार घेत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापासून ते मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले २७ आमदार तांत्रिकांच्या संपर्कात आहेत. कोणाच्या घरी ग्रह-दोष निवारणाची पूजा सुरू आहे, तर कोणी तांत्रिकांकडून नवीन सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळवण्यासाठी अनुष्ठान करून घेत आहे. यात सध्याच्या सरकारमध्ये मोठी जबाबदारी सांभाळणारे नेतेही सामील आहेत. उपमुख्यमंत्र्यांपासून ते १२ हून अधिक मंत्र्यांच्या घरी तर नवरात्रीत ९ दिवसांपर्यंत तंत्र साधना सुरू असल्याची माहिती आहे. अशा माहितीनंतर भास्करची तपासणी टीम त्या तांत्रिकांपर्यंत आणि ज्योतिष्यांपर्यंत पोहोचली, ज्यांच्याकडून बिहारचे नेते पूजा-पाठ करून घेत आहेत. वाचा, बिहारमध्ये नितीश यांच्या राजीनाम्यादरम्यान नवीन सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळवण्यासाठी तांत्रिकांच्या आश्रयाला गेलेल्या नेत्यांची कहाणी… आधी तंत्र-मंत्राचे राजकीय संबंध जाणून घ्या बिहारच्या राजकारणात तंत्र-मंत्राचा मोठा संबंध राहिला आहे. बिहारमधील तंत्र साधक आणि ज्योतिष्यांचा दिल्लीतील नेत्यांशीही संबंध राहिला आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून ते दिल्लीतील अनेक मोठे नेते बिहारमधील तांत्रिक आणि ज्योतिष्यांच्या संपर्कात राहिले आहेत. मधुबनीचे ज्योतिषाचार्य एन. के. झा तर इंदिरा गांधींचे पुरोहित राहिले आहेत. अमित शाह आणि राजनाथ सिंह यांचाही बिहार आणि झारखंडमध्ये पूजेचा संबंध आहे. नीतीश कुमार, सम्राट चौधरी, विजय सिन्हा, अशोक चौधरी, नितीन नवीन, चिराग पासवान, राजू तिवारी, संजीव चौरसिया, रामकृपाल यादव यांच्यापासून ते असे अनेक नेते आहेत, जे पूजा-अर्चा करत असतात. बिहारमधील बहुतेक नेत्यांसाठी पूजा-अर्चा, विधी आणि धार्मिक श्रद्धा त्यांच्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनाचा भाग असतात. बिहारचे प्रमुख ज्योतिषी डॉक्टर श्रीपती त्रिपाठी यांच्या शिष्यांमध्ये राजकारणी जास्त आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापासून ते बिहारमधील प्रत्येक मोठा आणि प्रभावशाली नेता पंडित श्रीपती त्रिपाठी यांच्या संपर्कात असतो. बिहार आणि झारखंडमध्ये ज्योतिष साधनेमुळे चर्चेत असलेल्या श्रीपती त्रिपाठी यांच्याकडून नेत्यांच्या विधींबद्दल माहिती मिळाली. भास्करच्या रिपोर्टरने श्रीपती त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राजकीय शिष्यांसाठी विधी करत असल्याची बाब मान्य केली. पंडित डॉक्टर श्रीपती त्रिपाठी यांनी सांगितले की, बिहार आणि झारखंडमध्ये अनेक राजकीय लोक माझे शिष्य आहेत. ते लोक कोणताही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी माझ्याशी सल्लामसलत करतात. बिहारमध्ये पुन्हा एकदा नवीन सरकार स्थापनेसाठी समीकरणे तयार होत आहेत, अशा परिस्थितीत अनेक शिष्य आमच्याकडे आले आहेत. नवीन सरकारमध्ये शिष्य चांगल्या पदासाठी उपाययोजना करत आहेत. सरकारमध्ये मोठी जबाबदारी सांभाळावी, यासाठी त्यांच्या जन्मपत्रिकेवर विचार करून ग्रहांची स्थिती अनुकूल करण्यासाठीच्या उपायांवर मी काम केले आहे. राजकारणात मोठे यश आणि मोठे स्थान मिळावे, यासाठी काही पूजा-अर्चा आणि विधी सुरू आहेत. नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी संकल्प करून पूजा-अर्चा करण्यात आली आहे. नेपाळ सीमेवरील रक्सौल येथे असलेल्या काली न्यास मंदिरात 16 हून अधिक राजकारण्यांच्या पूजा विधीचे इनपुट मिळाले आहे. येथील तांत्रिक जगद्गुरू वामाचार्य सेवक संजय नाथ आहेत, जे तंत्रविद्येमुळे भारतातच नव्हे तर परदेशातही चर्चेत असतात. नेपाळच्या राजकारणातही ते अनेक प्रभावी नेत्यांसाठी पूजा विधी करत असतात. ते काली मंदिराच्या न्यासासाठी आणि दहा महाविद्यांच्या साधनेसाठी प्रसिद्ध आहेत. बिहारच्या नेत्यांच्या विधींच्या इनपुटनंतर भास्करच्या रिपोर्टरने सेवक संजय नाथ यांच्याशी संपर्क साधला. तांत्रिक संजय नाथ यांनी सांगितले की, बिहारमध्ये सत्ताधारी पक्षापासून ते विरोधी पक्षापर्यंतचे बहुतेक राजकारणी त्यांचे शिष्य आहेत, प्रत्येक लहान-मोठ्या कामापूर्वी ते संपर्क साधतात. कोणतेही मोठे मिशन असो किंवा मोठा प्लॅन असो, सुरुवात करण्यापूर्वी ते नक्कीच संपर्क साधतात. बिहारमध्ये नवीन सरकारबाबत अनेक राजकारण्यांनी आम्हाला त्यांची जन्मपत्रिका दिली आहे. अनेक राजकारण्यांनी त्यांची नवीन योजना शेअर केली आहे. त्यांची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी नवरात्रीमध्ये दस महाविद्या (देवीचे एक रूप) यांची आराधना करण्यात आली आहे. नेत्यांची इच्छा पूर्ण व्हावी, ते त्यांच्या नवीन योजनेत पूर्णपणे यशस्वी व्हावेत, यासाठी दस महाविद्या देवीची विधिवत उपासना करण्यात आली आहे. राजकीय उलथापालथीच्या काळातच नवरात्री आल्याचा चांगला योग जुळून आला. या विशेष योगात नेत्यांसाठी तांत्रिक अनुष्ठान करण्यात आले. 5 दिवसीय तांत्रिक अनुष्ठानासाठी बिहारमधील 6 आमदारांनी पटना येथील पंडित राकेश झा यांना कामाख्या येथे पाठवले होते. भास्करच्या तपासात समोर आले की, यामध्ये 2 आमदार असे आहेत, जे सध्याच्या सरकारमध्ये मोठ्या पदांवर आहेत. आता आणखी मोठी जबाबदारी स्वीकारण्यासाठी माँ कामाख्याच्या दरबारात अनुष्ठान केले आहे. पंडिताचा शोध घेतल्यानंतर भास्करच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नावेही सांगितली, पण ती सार्वजनिक न करण्याची विनंती केली. यामागे पंडित राकेश झा यांचा तर्क आहे की पूजा अनुष्ठान ही वैयक्तिक बाब आहे. तथापि, त्यांनी कबूल केले आहे की सध्या मोठ्या पदांवर असलेल्या 6 आमदारांसाठी त्यांनी कामाख्या येथे अनुष्ठान केले आहे. पंडित राकेश झा यांनी सांगितले की कामाख्या हे तंत्र पीठ आहे, येथे केलेली पूजा साधना कधीही व्यर्थ जात नाही. त्यांच्या संपर्कात अनेक असे राजकीय लोक आहेत, जे बिहार सरकारमध्ये खूप प्रभावी आहेत. अनेकदा पूजा अनुष्ठान त्यांच्या घरीही चालते. यावेळी काही विशेष इच्छेसाठी काही आमदारांची इच्छा होती की त्यांच्यासाठी कामाख्या येथे उपासना व्हावी. आमदारांनी कामाख्या येथे पंडितासाठी पूर्ण व्यवस्था केली होती. 5 दिवसांच्या तांत्रिक अनुष्ठानानंतर ते त्या नेत्यांच्या घरीही पोहोचले आणि घरी एक अनुष्ठान करण्यात आले. कामाख्या येथे साधना करणारे बिहारचे ज्योतिषाचार्य कृष्णकांत मिश्रा यांचेही बिहार-झारखंडमध्ये अनेक राजकीय शिष्य आहेत. माहिती मिळाल्यानंतर भास्करच्या रिपोर्टरने आचार्य कृष्णकांत मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता, बिहारमधील नवीन सरकारमध्ये मोठ्या इच्छेने अनेक नेत्यांनी त्यांना अनुष्ठान करण्यासाठी सांगितले होते, असे समजले. तांत्रिक अनुष्ठानासाठी नेत्यांकडून संकल्प घेऊन त्यांनी नैना देवी स्थानी ७ दिवसांचे अनुष्ठान केले आहे. त्यांनी सांगितले की, बिहार आणि यूपीमध्ये अनेक राजकीय व्यक्ती आहेत, जे त्यांच्यावर विश्वास ठेवतात. शिष्य म्हणून नेते नेहमी संपर्कात असतात. त्यांना कोणतीही समस्या आल्यास, ते मां कामाख्या देवीची प्रार्थना करून शिष्यांच्या मदतीसाठी पूजा-अनुष्ठान करण्यास तयार असतात. बिहारमध्ये नवीन राजकीय समीकरणासंदर्भात राजकीय लोकांनी संपर्क साधला आहे, त्यांच्यासाठी नैना देवी मंदिरात 7 दिवसांचे अनुष्ठान केले आहे. शिष्यांना काही उपाय सांगितले आहेत, ते करत आहेत. आईची कृपा शिष्यांवर होईल आणि ते बिहारच्या नवीन सरकारमध्ये आपले खास स्थान निर्माण करतील, असा पूर्ण विश्वास आहे. बंगालमधील तंत्रपीठ मां तारापीठ येथे बिहारच्या नेत्यांसाठी पूजा आणि तांत्रिक अनुष्ठानाची पडताळणी करण्यासाठी रिपोर्टरने बंगालच्या तांत्रिक तनुश्रीला फोन केला. आमदाराचा प्रतिनिधी बनून जेव्हा तांत्रिक तनुश्रीशी बोलणे झाले, तेव्हा त्यांनीही सांगितले की तंत्र साधनेने कोणाचेही राजकारणातील नशीब चमकवणे शक्य आहे, फक्त वेळ लागतो. रिपोर्टर - राधे-राधे तनुश्री - मी तुम्हाला सामान्य कॉल करायला सांगितले होते, कारण नेटवर्कची समस्या येत होती. रिपोर्टर - तुम्ही कुठून आहात? तनुश्री - मी कोलकाताहून आहे. रिपोर्टर - मी बिहारहून आहे, मी एका आमदारांचा पीए आहे, तुमचा नंबर आम्हाला गोलूकडून मिळाला आहे. आम्हाला साधना करायची आहे, जेणेकरून आमदारांना मंत्रिपद मिळू शकेल. सध्या इथे सरकारमध्ये बदलाची स्थिती सुरू आहे. यात किती खर्च येईल आणि काय प्रक्रिया असेल? तनुश्री - त्यांची सध्याची स्थिती कशी आहे? रिपोर्टर - स्थिती ठीक आहे, संपर्क (लाइजनिंग) पण चांगला आहे. तनुश्री - बघा, हे खूप मोठे काम असते. यात बराच वेळ लागतो, कधीकधी पूर्ण दिवस लागतो, पण सध्या माझ्याकडे वेळ नाही. मी 4 तारखेपर्यंत बाहेर जात आहे, नंतर 10 तारखेला परत येईन. त्यानंतर 18 तारखेला मी बंगळुरूला जाईन, मग 29 तारखेपर्यंत परत येईन. निवडणुकीच्या वेळीही मी व्यस्त असेन आणि 7 तारखेला परदेशातही जायचे आहे. त्यामुळे सध्या मी हे काम घेऊ शकणार नाही. तुम्ही दुसऱ्या तांत्रिकाशी संपर्क साधा. रिपोर्टर - ठीक आहे, मग कसे होईल. तनुश्री - तुम्ही इतर लोकांशी संपर्क साधा किंवा मी पंडित तांत्रिक विनय महाराजांचा नंबर पाठवते. तंत्र-मंत्रासाठी काही आमदार आणि नेत्यांनी कोलकाता येथे पूजा-अर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. तपासणीदरम्यान, आम्हाला बंगालच्या तांत्रिक तनुश्रीकडून विजय महाराजांची माहिती मिळाली. तनुश्रीकडून मोबाईल नंबर मिळाल्यानंतर, रिपोर्टरने आमदारचा प्रतिनिधी बनून पंडित विजय महाराजांना मंत्री बनण्यासाठी फोन केला. तांत्रिक पंडित विनय महाराजांनी दावा केला की बिहार-झारखंडमध्ये त्यांचे डझनभर राजकीय शिष्य आहेत. त्यांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शिबू सोरेन यांनाही आपले शिष्य सांगितले. तांत्रिकचा दावा आहे की संमोहनाच्या तांत्रिक क्रियेने ते कोणालाही ताब्यात घेऊन मोठे काम करून घेऊ शकतात. रिपोर्टर - प्रणाम गुरुदेव. विनय महाराज - हो, प्रणाम, बोला काय बातमी आहे. रिपोर्टर - मी बिहारमधून आहे, एका आमदारांसाठी अनुष्ठान करायचे आहे. विनय महाराज - कसे अनुष्ठान करायचे आहे, अनेक प्रकारचे पूजा-अनुष्ठान असतात. रिपोर्टर - बिहारमध्ये नवीन सरकार बनू शकते, त्यांची इच्छा आहे की मंत्रिमंडळात जागा मिळावी. हे शक्य होईल का? विनय महाराज - होय, यासाठी आधी आम्हाला त्यांची संपूर्ण माहिती पाहावी लागेल, त्यांचे नाव, फोटो आणि जन्माचे तपशील पाठवावे लागतील. त्या आधारावर आम्ही गणना करून सांगू की अनुष्ठान शक्य आहे की नाही. रिपोर्टर - हे अनुष्ठान कुठे होईल? विनय महाराज - हे अनुष्ठान तारापीठ म्हणजेच तंत्र पीठात केले जाईल. रिपोर्टर - यापूर्वीही अशा अनुष्ठानाने कोणाला फायदा झाला आहे का? विनय महाराज - आम्ही अशा प्रकारची अनेक कामे करतो, देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतून लोक येतात. बिहार-झारखंडमधील अनेक मोठे नेतेही आमच्याशी जोडले गेले आहेत, जसे की शिबू सोरेन आमचे खूप जवळचे राहिले आहेत. रिपोर्टर - याने खरंच फायदा होतो का? विनय महाराज - पाहा, फायदा 100% होतो, पण व्यक्तीमध्ये क्षमताही असायला हवी. कुणीही येऊन असे म्हणू शकत नाही की त्याला आमदार किंवा मंत्री बनवले जावे. आधी त्याची योग्यता आणि ग्रह-नक्षत्र पाहिले जातात. रिपोर्टर - याची प्रक्रिया आणि खर्च काय असेल? विनय महाराज - सर्वात आधी तपासणी गणना (कॅल्क्युलेशन) होते, ज्याचे शुल्क ३१०० रुपये आहे. जर अहवाल सकारात्मक आला, तरच पुढे अनुष्ठान केले जाते. अनुष्ठानाचा खर्च त्यानंतरच सांगितला जाईल. रिपोर्टर - ठीक आहे गुरुदेव, तुमची गोष्ट आम्ही आमदारजींशी बोलून तपशील पाठवून देऊ.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 10:50 am

Lara Dutta : अक्षय कुमार ठरला देवदुत! लारा दत्ताला मृत्यूच्या दाढेतून वाचवलं; अंदाज चित्रपटाच्या शूटिंगवेळी नेमकं काय घडलं होतं?

Lara Dutta : नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री लारा दत्ताने तिच्यासोबत घडलेल्या एका भयानक अपघाताविषयी सांगितले.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 10:47 am

Share Market Holiday: आज शेअर बाजार सुरु की बंद? ; ट्रेडिंगच्या बाबतीत आज संभ्रम

Share Market Holiday: आज महावीर जयंतीनिमित्त भारतीय शेअर बाजार बंद आहेत. हा दिवस जैन धर्माचे एक महत्त्वाचे आध्यात्मिक नेते भगवान महावीर यांची जयंती आहे.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 10:45 am

Ladki bahin Yojana: लाडक्या बहिणीनों…चूक दुरुस्त करण्यासाठी उरले फक्त काही तास; 71 लाख महिला योजनेतून बाहेर

Ladki bahin Yojana: विधानसभा निवडणुकीआधी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांच्या बँक खात्यावर दरमहिना १५०० रुपये निधी जमा करण्यात आला.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 10:42 am

Weather Update: राज्यात अवकाळीचा तडाखा, हवामान खात्याकडून 'या'जिल्ह्यांना तीन तासासाठी अलर्ट

मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. पुणे हवामान विभागाने मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' दिला आहे. दुसऱ्या बाजूला कृषी विभागाकडून मार्च महिन्यातील नुकसानीची प्राथमिक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन तासांत लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत हवामान बिघडण्याची शक्यता आहे. याठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.मार्चमध्ये झालेले नुकसानराज्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार, सुमारे ६२ हजार ९६९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांना या अस्मानी संकटाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका यासह द्राक्ष, आंबा आणि केळी या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.एप्रिल महिन्यात सुद्धा अवकाळी पाऊस सुरु राहण्याची शक्यता वर्तवली आहे. ही बाब शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची भीती आहे.हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी विजा चमकत असताना झाडाखाली किंवा उघड्यावर उभे राहू नका. वीज उपकरणांचा वापर टाळावा. जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधा. वादळी वारे वाहत असल्यास कच्च्या बांधकामांपासून दूर राहा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 10:30 am

Iran-US-Israel War : समुद्रात भीषण हल्ला! दुबईतील तेलवाहू जहाजावर इराणकडून मोठा हल्ला

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाने (Iran-US-Israel War) आता आणखी धोकादायक वळण घेतले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाला एक महिना उलटूनही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. उलट, या संघर्षामुळे जागतिक स्तरावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अमेरिकेकडून इराणला (Iran) स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जर युद्धबंदीचा प्रस्ताव मान्य केला नाही, तर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर थेट हल्ले केले जातील. त्याला प्रत्युत्तर देताना इराणनेही कठोर भूमिका घेतली असून, “आमच्या प्रकल्पांवर हल्ला झाला तर आम्हीही अमेरिकेशी संबंधित सर्व ऊर्जा केंद्रांवर हल्ले करू,” असा थेट इशारा दिला आहे.दरम्यान, या संघर्षामुळे कच्चे तेल आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. काही देशांमध्ये आणीबाणी किंवा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि गॅस सुविधांवर सतत हल्ले होत असल्याने जागतिक ऊर्जा संकट अधिकच गडद झाले आहे.गेल्या २४ तासांत इराणवर १०० हून अधिक हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. दुबई, सौदी अरेबिया, कतार आणि कुवेत यांसारख्या देशांनाही या संघर्षाचा मोठा फटका बसत आहे.याच पार्श्वभूमीवर दुबईजवळ (Dubai) समुद्रात मोठी घटना घडली. इराणकडून एका तेलवाहू जहाजावर (oil tanker) भीषण हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात तेल समुद्रात सांडले, ज्यामुळे पर्यावरणीय आणि आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या घटनेने आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे.यापूर्वीही इराणकडून दुबईतील तेल रिफायनरीवर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे या भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.दरम्यान, जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती आधीच उच्चांकी पातळीवर असताना या नव्या हल्ल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. इराणने काही दिवसांपूर्वीच दावा केला होता की, जागतिक तेलबाजारावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता फक्त त्यांच्याकडेच आहे.एकूणच, इराण-अमेरिका संघर्षामुळे (Iran-US-Israel War) जगासमोर मोठे ऊर्जा आणि आर्थिक संकट उभे राहिले असून पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 10:30 am

US-Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा युटर्न ! आधी इराणला संपवण्याची शपथ, आता होर्मुझच्या मुद्द्यावर युद्ध संपवण्याचा आग्रह

US-Iran War: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणसोबतचे युद्ध लांबवण्याच्या मनःस्थितीत दिसत नाहीत.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 10:27 am

शरीराच्या वरच्या भागावर कपडे घालत नाहीत बोंडा महिला:लग्न नाकारल्यावर मुलीकडच्यांचे घर तोडतात, मृत्युभोजात खातात गाईचे मांस

सकाळी साधारण 10 वाजण्याची वेळ. मातीने सारवलेले एक कच्चे घर. बाहेर डोके मुंडण केलेल्या दोन स्त्रिया बसल्या आहेत. वय साधारण 38-40 वर्षे. वरचे शरीर जवळजवळ उघडे. बाकी शरीरावर नाममात्र कपडे. छाती झाकण्यासाठी मोत्यांच्या आणि कवड्यांच्या माळा. गळ्यात ॲल्युमिनियमचे अनेक छल्लेही. हातात अंगठी आणि कानात दोन वेगवेगळ्या प्रकारची कर्णफुले. या आहेत बोंडा समुदायाच्या स्त्रिया. मी मनीषा भल्ला, दिव्य मराठीच्या खास 'हम लोग' मालिकेत याच बोंडा समुदायाची कहाणी घेऊन आले आहे. यासाठी मी दिल्लीपासून 1700 किलोमीटर दूर असलेल्या ओडिशातील बोंडा हिल्समध्ये पोहोचले… आता फक्त 9,200 बोंडा लोक उरले आहेत. त्यांना भेटण्यावर बंदी आहे. सरकारला भीती आहे की, मिसळल्याने बोंडा संस्कृती नष्ट होऊ नये. अत्यंत आवश्यक असल्यासच त्यांना भेटण्याची परवानगी मिळते. म्हणून मी बोंडा डेव्हलपमेंट एजन्सीच्या कार्यालयात पोहोचले. हे कार्यालय गावाच्या सुरुवातीलाच आहे. बोंडा प्रोजेक्ट हिल्सचे प्रोजेक्ट मॅनेजर शशिकांत सामंतारे यांना भेटले. त्यांनी लक्ष्मी नावाच्या एका व्यक्तीला माझ्यासोबत पाठवले. ते म्हणत होते की, लक्ष्मी मला मदत करेल, पण तो माझ्यावर लक्ष ठेवून होता. लक्ष्मी गावाकडे चालत असताना सांगतो की- ‘10 वर्षांपूर्वीपर्यंत बोंडा स्त्रिया कपड्यांशिवाय राहत होत्या. फक्त खासगी भाग एका लहान कपड्याने झाकत असत, ज्याला रिंगा म्हणतात. वरच्या भागावर फक्त मोत्यांची माळ घालत असत.’ आम्ही गावात शिरताच चिकणमातीची खेळणी बनवणारी मुले दिसू लागली. आम्हाला पाहताच ती हसू लागली. कदाचित त्यांना माझा पेहराव विचित्र वाटत असावा. मी कार्गो पॅन्ट आणि टी-शर्ट घातले होते. सकाळची वेळ होती, अनेक महिला घराबाहेर झाडू मारत होत्या. माझ्या साथीदार लक्ष्मीने एका कोपऱ्याकडे बोट दाखवले आणि म्हटले- 'काल रात्री इथेच गावातील मुली नाचत होत्या. मुले पाहत होती. यादरम्यान काही मुलांनी मुलींना पसंत केले. आमच्याकडे लग्नाची सुरुवात अशीच होते. नाचणाऱ्या मुलींना मुले पसंत करतात. आपली पसंती कुटुंबाला सांगतात. मग त्यांचे कुटुंब दारूची बाटली, बांगड्या आणि अंगठी घेऊन मुलीच्या घरी पोहोचते. लग्नाचा प्रस्ताव ठेवतात, पण मुलीकडचे नकार देतात. मुलाकडचे पुन्हा येतात. मुलीकडचे पुन्हा नकार देतात. हा सिलसिला दीड वर्षांपर्यंत चालतो. शेवटी एका दिवशी मुलाकडील लोक मुलीच्या घरी येतात आणि तिचं पूर्ण घर उद्ध्वस्त करतात. तेव्हा मुलीकडील लोक लग्नासाठी होकार देतात. ऐकायला हे थोडं विचित्र वाटत असेल, पण ही सर्व रीत आहे, कोणतीही दुश्मनी नाही. शेवटी मुलाकडील लोक, मुलीच्या कुटुंबाला कोंबडी, डुक्कर आणि बकरी देऊन नातं पक्कं करतात.’ ‘यानंतर लग्न कसं होतं?’ मी विचारलं ‘आमच्याकडे वरात नवरदेवाच्या घरच्या स्त्रिया घेऊन जातात, पुरुष नाही. गाणी गात, नाचत या स्त्रिया पायी मुलीच्या घरी पोहोचतात. मुलीला लग्नाचा पोशाख घालतात. हा पोशाखही मुलाकडील लोकांकडूनच येतो. मग या स्त्रिया मुलीला आपल्यासोबत घरी घेऊन येतात. जेव्हा मुलगी सासरच्या उंबरठ्यावर पोहोचते, तेव्हा पुरोहित त्याच उंबरठ्यावर कोंबडीचा बळी देतो. कोंबडीच्या रक्ताने पुरोहित मुलगी आणि मुलाला टिळा लावतो. येथेच मुलीची एक छोटीशी परीक्षा होते. तिला भात शिजवून संपूर्ण कुटुंबाला खाऊ घालावा लागतो. यानंतर वधू विवाहित मानली जाते आणि तिला सुनेचा दर्जा मिळतो.’ एका घराबाहेर एक महिला आणि पुरुष बसून बोलत आहेत. हावभावांवरून ते पती-पत्नी असावेत असे वाटत आहे. पत्नीचे वय जास्त आणि पतीचे वय कमी वाटत आहे. मी लक्ष्मीला त्यांना भेट घालून देण्याचा इशारा केला. त्या महिलेचे नाव सोगी आहे. मी सोगीला विचारले, ‘हे तुमचे पती आहेत का?’ उत्तर मिळाले ‘हो’ पण त्यांचे वय तुमच्यापेक्षा खूप कमी वाटत आहे? सोगी हसली आणि म्हणाली- ‘माझा नवरा माझ्यापेक्षा आठ वर्षांनी लहान आहे. आमच्याकडे 10 वर्षांच्या मुलाचे लग्न लावले जाते, पण मुलीचे वय कमीतकमी 18 वर्षे असते. प्रत्येक नात्यात मुलगी मुलापेक्षा मोठी असणे आवश्यक आहे. याचे कारण कोणालाही माहीत नाही, पण हाच नियम आहे. आजपर्यंत कोणीही तो मोडलेला नाही.’ बोंडा लोकांना हिंदी किंवा उडिया येत नाही. त्यांची भाषा रेमो आहे. त्यांना हिंदीमध्ये फक्त एकच वाक्य बोलता येते की, पैसे दे, पैसे दे. त्यांना कळले आहे की बाहेरचे लोक त्यांच्या गावात येऊन फोटो काढतात. आणि त्यातून पैसे कमावतात. म्हणून, फोटो काढण्यासाठी किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक बोंडाला पैसे द्यावे लागतात. गावात माती आणि गवताने बनवलेली एकूण 1900 घरे आहेत. सरकारी योजनेअंतर्गत यापैकी 1200 घरे पाडून नवीन पक्की घरे बांधली जात आहेत. यासाठी सरकारने प्रत्येकी दोन लाख रुपये दिले आहेत. जागोजागी ढिगारे आणि लाकडी खांब ठेवलेले आहेत. एका घराबाहेर एक महिला झाडू मारत आहे. मी त्यांना भेटायला पोहोचले तेव्हा त्यांनी मला घरात येण्यास सांगितले. त्या महिलेचे नाव आहे चुनकी धंधमाझी. त्या मला त्यांच्या स्वयंपाकघरात घेऊन गेल्या. पूर्णपणे मातीने सारवलेले, अगदी स्वच्छ स्वयंपाकघर. येथे मातीच्या अनेक चुली आहेत. दोन चुलींवर डाळ, भाजी आणि एका चुलीवर भात शिजत होता. जवळ फक्त तेल, मीठ आणि मिरची ठेवलेली होती. भिंतीवर काही पॉलिथीन टांगलेल्या होत्या. बोंडा समुदायाच्या घरांमध्ये अशा एका मोठ्या स्वयंपाकघराव्यतिरिक्त फक्त एकच खोली असते. त्यांच्या घरात अंथरूण-पांघरूण नसतात, कपडे आणि भांडीही मोजकीच असतात. चुनकीला मी बोंडा महिलांच्या पेहरावाबद्दल विचारले. त्या सांगू लागल्या की, ‘मोती आणि कवडीची जी माळ त्या घालतात तिला लुबैदक म्हणतात. ॲल्युमिनियमच्या कड्यासारख्या दागिन्याला उसुन्गु म्हणतात. चुनकी सांगतात की, ‘महिलांच्या अशा प्रकारे सजण्या-सवरण्यामागे असे म्हणतात की, एकदा माता सीता स्नान करत होत्या. बोंडा समुदायाचे लोक त्यांना पाहून हसू लागले. संतप्त सीतेने त्यांना नेहमी वस्त्रहीन राहण्याचा शाप दिला. हे ऐकताच बोंडा लोक माफी मागू लागले. तेव्हा माता सीतेने आपली धोती फाडून एक छोटा तुकडा महिलांना दिला. हा कपडा महिलांच्या कमरेखालील भाग झाकण्यासाठी होता, ज्याला हे लोक 'रिंगा' म्हणतात. बोलता बोलता चुनकी चुलीवर स्वयंपाक करत आहे. चुलीच्या अगदी वर लाकडी एक छोटा झोका टांगलेला आहे. यावर हे लोक मांस भाजतात. सध्या यावर घेवडा भाजला जात आहे. स्वयंपाकघरातून आतल्या बाजूला एक मोठी खोली आहे, ज्यात पलंगावर धान, छोटे टोमॅटो, कांदे, तांदूळ ठेवलेले आहेत. जवळच ॲल्युमिनियमच्या पातेल्यात भात म्हणजे शिजवलेला तांदूळ ठेवलेला आहे. एका मातीच्या मडक्यातही काहीतरी ठेवलेले आहे. विचारल्यावर चुनकी म्हणाली- 'यात मंडिया आहे.' चाखल्यावर ते अगदी आंबट दह्यासारखे लागले. खरं तर, मंडिया हे त्यांचे स्थानिक धान्य आहे, जे पाण्यात मीठ आणि हळद घालून शिजवले जाते. हे लोक ते भातासोबत खातात. चुनकी सांगतात की, भात, गाईचे मांस, डुकराचे मांस आणि घेवड्याची भाजी हे आमचे पारंपरिक अन्न आहे. इथून माझे सहकारी लक्ष्मी मला त्यांच्या घरी घेऊन गेले. पोहोचताच त्यांनी माझ्यासमोर दारू ठेवली. ते म्हणाले- ही आमची स्वतः बनवलेली दारू आहे. पाहुण्यांना हेच पाजतात. ही दारू एका खास प्रकारच्या भांड्यात दिली. हे भांडे वेलीवरच वाळलेल्या भोपळ्यापासून बनवले आहे. याची चव घेतली तेव्हा ती भाताच्या पेजेसारखी थोडी कडू आणि आंबट लागली. ही सलभ नावाच्या झाडाच्या पानांच्या रसापासून बनवली जाते. एकाच कुळात लग्न करणे पाप मानले जाते. जर कोणी आपल्याच कुळात लग्न केले, तर त्याला समाजातून बहिष्कृत केले जाते. दंडाच्या स्वरूपात एक गाय किंवा बैल आणि काही पैसेदेखील द्यावे लागतात. लग्नानंतर जर मुलीने एखाद्या मुलाला सोडले, तर तिच्या कुटुंबावर दंड आकारला जातो. मुलाने जर मुलीला सोडले, तर त्यालाही तीच शिक्षा दिली जाते. कुटुंबाच्या इच्छेशिवाय आपल्या जातीबाहेर लग्न केल्यास मुलगा-मुलीला समाजातून बाहेर काढले जाते. काही काळानंतर प्रकरण पुन्हा पाहून दंड आकारला जातो. त्यांना गावात मेजवानी द्यावी लागते. तेव्हाच त्यांना समाजात सामील करून घेतले जाते. तथापि, त्यांच्या हातून अन्न-पाणी घेतले जात नाही, फक्त सुके धान्यच स्वीकारले जाते. आता या परंपरा हळूहळू बदलत आहेत.' बोंडा समुदायाची स्वतःची न्यायालयीन व्यवस्था आहे. एका झाडाखाली दगडांनी बनवलेला एक व्यासपीठ आहे, जिथे ते स्थानिक वाद सोडवतात. लक्ष्मीच्या घरीच बोंडा समुदायाचे रघुनाथ सीसा भेटले. ते सांगतात की 'आमच्याकडे मृत्यूनंतर दहन करण्याची प्रथा आहे. मृत्यूनंतर एक किंवा दोन महिन्यांनंतर संपूर्ण गावाला मेजवानी दिली जाते, ज्यात भात आणि गोमांस खाऊ घातले जाते. याला एकोस्याह म्हणतात. बोंडा समुदायाचे सण येथील शोभा आहेत. पीक कापणीनंतर पौष महिन्यातील सण जानेवारीमध्ये येतो. त्या दिवशी नवीन कपडे खरेदी केले जातात. घेवड्याची भाजी, डोंगर आणि झाडांची पूजा केली जाते. पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची मूर्ती नसते. उलट, आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते. त्या दिवशी पारंपरिक 'मेमे' नृत्य देखील केले जाते. या सणाला 'अन्नूआल झातिमारा' असे म्हणतात. हा सण जुनी दुश्मनी संपवण्यासाठी साजरा केला जातो. सर्वात आधी गावाचा पुरोहित देवाला कोंबडीसह काही पक्ष्यांचा बळी देतो. धान्य आणि दारू अर्पण केली जाते. त्यानंतर लोक एकमेकांशी आपली दुश्मनी संपवतात. सर्वजण एकमेकांना 'सलभ' झाडाच्या फांदीने मारतात. इतके मारतात की मार खाणाऱ्याचे रक्त बाहेर येते आणि त्यांचा सर्व राग शांत होतो. राग निघून गेल्यानंतर एकमेकांना मिठी मारतात. मग स्त्रिया त्यांच्या जखमांवर हळद लावतात. हे लोक दरवर्षी पाठखंडा यात्रा काढतात. हा बोंडा समाजाचा सर्वात मोठा सण आहे. यात तलवारीची पूजा केली जाते. ही तलवार शंभर वर्षांपूर्वीची आहे. ती जुन्या वडाच्या झाडात लपवून ठेवली जाते, जेणेकरून कोणाला दिसू नये. दरवर्षी पुजारीच ती खाली उतरवतो. नंतर त्या तलवारीने बकऱ्याचा बळी दिला जातो आणि तलवारीची पूजा केली जाते. ही तलवार या लोकांच्या पूर्वजांची आहे. तलवारीच्या पूजेमध्ये नेहमी ओडिशाच्या जेपोर राजघराण्यातील लोक सहभागी होतात. असे मानले जाते की हे लोक जेपोरच्या राजाचे सैनिक होते. गेल्या वर्षी जेपोरचे राजा त्यांच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी आले होते. या दिवशी बोंडा समाजातील 12 गावांचे लोक एकत्र येतात. मेमे नृत्यदेखील केले जाते. त्याचप्रमाणे, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये डंगर पूजा होते, ज्यात कोंबडीचा बळी दिला जातो. दोन अंडी फोडली जातात. जर घरात कोणासोबत काही वाईट घडले तर डुमा पूजा करतात. यात घराच्या आत मातीची एक आकृती बनवली जाते. जी त्यांच्या एखाद्या पूर्वजाची असते. या आकृतीत आत्म्याला बोलावतात आणि त्याची पूजा करतात. आत्म्याला बीन्स, डुक्कर आणि गाईच्या मांसाचा नैवेद्य दाखवतात. बोंडा समुदायाचे हे लोक ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यापासून 85 किलोमीटर दूर बोंडा हिल्सवर राहतात. डोंगरांवर वसलेल्या या गावात हे लोक कांगो, काजू, स्ट्रॉबेरी, आंबा, बांबू, फुलझाडू, फणस आणि आवळा यांची शेती करतात. या मालिकेत पुढील आठवड्यात वाचा अशाच अनोख्या वांचू लोकांची कहाणी….

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 10:12 am

Shivsena : शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुखांची नावं जाहीर; पाहा संपूर्ण यादी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या लोकसभा संपर्क प्रमुखांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.संपूर्ण यादी :

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 10:10 am

Dhurandhar 2 Box Office Collection Day 12 : बॉक्स ऑफिसवर 'धुरंदर २ चं'वादळ! KGF २ च्या विक्रमांना लोळवत ९०० कोटींच्या उंबरठ्यावर!

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह सध्या आपल्या 'धुरंधर: द रिवेंज' (Dhurandhar 2) या चित्रपटामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी सुरू केली असून, अवघ्या ११ दिवसांत या सिनेमाने भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत. एका जबरदस्त 'स्पाय ॲक्शन थ्रिलर'च्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटाने जगभरात आपला दबदबा निर्माण केला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवत आपले इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतर केवळ ११ दिवसांच्या कालावधीत भारतात ८०० कोटी आणि जागतिक स्तरावर (Worldwide) १३०० कोटींपेक्षा जास्त कमाई करून 'धुरंधर २' ने नवा इतिहास रचला आहे. रिलीजच्या १२ व्या दिवशी, म्हणजेच दुसऱ्या सोमवारी, कामाच्या दिवसांमुळे (Working Day) कमाईत थोडीशी घट पाहायला मिळाली असली, तरी चित्रपटाचा वेग अद्याप कायम आहे. रणवीर सिंहचा वेगळा अंदाज आणि चित्रपटातील अंगावर काटा आणणारे ॲक्शन सीक्वेन्स प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून आणत आहेत. सोशल मीडियावरही या चित्रपटाची मोठी क्रेझ पाहायला मिळत असून, ट्रेड विश्लेषकांच्या मते हा चित्रपट लवकरच १५०० कोटींचा टप्पा देखील पार करेल.https://youtu.be/MsExZDWBW_g?si=OZWhCh2fmqo-FUwp'धुरंधर: द रिवेंज'ची बाराव्या दिवसाची तब्बल इतकी...भारतीय बॉक्स ऑफिसवर सध्या रणवीर सिंहच्या 'धुरंधर: द रिवेंज' (धुरंधर २) या स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचे निर्विवाद अधिराज्य पाहायला मिळत असून, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या १२ दिवसांत चित्रपटसृष्टीतील जाणकारांना थक्क करणारी कामगिरी केली आहे. या चित्रपटाने दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या 'KGF Chapter 2' चा भारतातील ८५९.७० कोटी रुपयांचा लाईफटाईम कलेक्शनचा विक्रम मोडीत काढला असून, १२ व्या दिवसापर्यंत धुरंधर २ ची एकूण कमाई ८७२.१७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यासह हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला असून, आता याच्या पुढे केवळ 'बाहुबली २' (१०३०.४२ कोटी) आणि 'पुष्पा २' (१२३४.१० कोटी) हे दोनच चित्रपट उरले आहेत. कमाईचा हा प्रवास अत्यंत वेगाने झाला असून, पहिल्या आठवड्यात ६७४.१७ कोटींचा डोंगर उभा केल्यानंतर दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाचा वेग कायम राहिला; ज्यात ९ व्या दिवशी ४१.७५ कोटी, १० व्या दिवशी ६२.८५ कोटी, ११ व्या दिवशी ६८.१० कोटी आणि १२ व्या दिवशी (दुसऱ्या सोमवारी) २५.३० कोटींची भर पडली आहे. सोमवारी कमाईत नैसर्गिक घट दिसून आली असली तरी २५ कोटींहून अधिकचा गल्ला जमवून चित्रपटाने आपली पकड मजबूत ठेवली आहे, ज्यामुळे हा चित्रपट लवकरच १००० कोटींचा टप्पा पार करून 'बाहुबली २' च्या विक्रमाला आव्हान देईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.९०० कोटींच्या उंबरठ्यावर 'धुरंधर २'हा चित्रपट लवकरच ९०० कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट दिसत असून, या भव्य आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी चित्रपटाला आता केवळ २८ कोटी रुपयांची गरज आहे. येत्या एक-दोन दिवसांत हा टप्पा पार होण्याची दाट शक्यता असून, असे झाल्यास ९०० कोटींचा आकडा गाठणारा हा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला बॉलिवूड (हिंदी) चित्रपट ठरेल. 'धुरंधर २' हा गेल्या वर्षी ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या सुपरहिट 'धुरंधर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात रणवीर सिंहने 'हमजा अली मजारी' नावाच्या एका धाडसी अंडरकव्हर भारतीय गुप्तचर एजंटची भूमिका साकारली आहे. पहिल्या भागात कराचीतील गुन्हेगारी विश्वाचे जाळे आणि पाकिस्तानच्या सत्ताकेंद्रांमधील घुसखोरी दाखवण्यात आली होती. मात्र, या सिक्वेलमध्ये हमजाच्या भूतकाळातील गुपिते उलगडण्यात आली आहेत. कराचीतील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या 'लियारी' भागात भारतावर मोठा हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या दहशतवादी नेटवर्कचा नायनाट करण्यासाठी हमजा कशा प्रकारे जिवाची बाजी लावतो, याचा थरार या चित्रपटात पाहायला मिळतो. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले कथानक, जबरदस्त ॲक्शन सीक्वेन्स आणि रणवीर सिंहचा कसदार अभिनय यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. ९०० कोटींच्या विक्रमाकडे लक्ष लागून असलेल्या या चित्रपटाने केवळ गल्लाच जमवला नाही, तर बॉलिवूडचा दबदबा पुन्हा एकदा जागतिक स्तरावर निर्माण केला आहे.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 10:10 am

Prajakta Mali: ‘लग्न कधी करणार?’चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीने दिलं सडेतोड उत्तर

Prajakta Mali : 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून प्राजक्ता माळी घराघरात पोहोचली होती. सध्या ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं सूत्रसंचालन करत आहे.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 9:33 am

Narhari Zirwal : नरहरी झिरवळ व्हिडिओ प्रकरणात पहिली कारवाई; ट्रान्सजेंडरच्या भावावर मुंबईत गुन्हा दाखल, मोठी माहिती समोर

मुंबई : राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ एका नवीन वादात सापडले आहेत. त्यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने आता कायदेशीर वळण घेतले असून, मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. एका ट्रान्सजेंडर व्यक्तीने याप्रकरणी पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीची दखल घेत कफ परेड पोलिसांनी संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.नेमके प्रकरण काय?मिळालेल्या माहितीनुसार, ट्रान्सजेंडरच्या भावविरोधातच कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.संबंधित ट्रान्सजेंडर व्यक्तीने नरहरी झिरवळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनात (FDA) नोकरी लावून देण्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न झाल्यास त्यांचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती, असा गंभीर आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मूळ स्वरूपात नसून तो जाणीवपूर्वक 'एडिट' करून किंवा त्यात तांत्रिक बदल करून पसरवण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कफ परेड पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७९ नुसार कोणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावून त्यांच्या गोपनीयतेचा भंग करणे आणि विनयभंग करणे, तसेच कलम ३५१(१) अंतर्गत गुन्हेगारी स्वरूपाची धमकी दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासोबतच, डिजिटल माध्यमांचा चुकीच्या पद्धतीने वापर करून बदनामीकारक मजकूर आणि छेडछाड केलेले व्हिडिओ पसरवल्याबद्दल माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) विविध कलमांचाही समावेश करण्यात आला आहे. तपासाअंती यातील दोषींवर कडक कारवाई होण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.व्हिडिओ एडिट करून बदनामीचा प्रयत्नया प्रकरणावर स्वतः नरहरी झिरवळ यांनी आपली बाजू मांडली आहे. हा व्हिडिओ मूळ स्वरूपात नसून दोन-तीन वेगळे व्हिडिओ एकत्र जोडून (Edit करून) माझी बदनामी करण्यासाठी तयार करण्यात आला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. हा व्हिडिओ बनावट असल्याचे त्यांचे म्हणणे असून, राजकीय हेतूने आपली प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, नरहरी झिरवळ यांनी हा व्हिडिओ बनावट असल्याचा आणि तो जाणीवपूर्वक जोडून तयार केल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओची तांत्रिक शहानिशा केली जाईल आणि त्याची सत्यता तपासली जाईल. जर हा व्हिडिओ खरा असल्याचे निष्पन्न झाले, तर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. मात्र, सत्य समोर आल्याशिवाय कोणताही घाईघाईने निर्णय घेतला जाणार नाही. सध्या या व्हिडिओची सत्यता अद्याप अधिकृतपणे सिद्ध झालेली नाही. कफ परेड पोलिसांनी यापूर्वीच या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने व्हिडिओची पडताळणी केली जात आहे. व्हिडिओ खरंच छेडछाड केलेला आहे की त्यामागे काही वेगळे तथ्य आहे, हे आता पोलीस तपासातच स्पष्ट होईल.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 9:30 am

रझाला हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...; शाहीन शाह आफ्रिदीला ठोठावला मोठा दंड

नवी दिल्ली: पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. या तिसऱ्या स्तरावरील स्पर्धेत पाकिस्तान व्यतिरिक्त इतर देशांचे फार कमी खेळाडू सहभागी होतात, पण जे होतात त्यांना निर्घृणपणे मारहाण केली जाते. आता सुरक्षेतील त्रुटींशी संबंधित एक विचित्र घटना समोर आली आहे. यावर कारवाई म्हणून, लाहोर कलंदर्सचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीवर मोठा दंड आकारण्यात आला आहे.पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी, पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्स संघाचेही कर्णधारपद भूषवतो. झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू सिकंदर रझा देखील याच संघाकडून खेळतो. अलीकडेच, स्पर्धा सुरू झाल्यानंतर एक घोटाळा उघडकीस आला. शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझा यांनी परवानगीशिवाय काही बाहेरील लोकांना टीम हॉटेलमध्ये घेऊन गेले होते. परवानगी मागण्यात आली होती, पण ती मिळाली नाही. लाहोर पोलिसांनी पीएसएलच्या अध्यक्षांना पत्र लिहिल्यावर हा घोटाळा उघडकीस आला.सर्वजण सुमारे दोन तास परवानगीशिवाय हॉटेलमध्ये...मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २८ मार्चच्या रात्री घडली. असे समजले आहे की, लाहोर कलंदर्सचा कर्णधार शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझा यांनी स्पर्धेदरम्यान हॉटेलच्या नियमांचे उल्लंघन केले. काही लोक सिकंदर रझाच्या नावाने हॉटेलमध्ये घुसले. जे आत घुसले ते सिकंदरचे कुटुंबीय आणि मित्र होते. ते परवानगीशिवाय सुमारे दोन तास हॉटेलमध्ये थांबले. तथापि, सिकंदरचा स्वतःचा दावा आहे की ते तिथे सुमारे ४० मिनिटे थांबले होते. ते रात्री सुमारे १:३० वाजेपर्यंत आत थांबले होते.जेव्हा प्रकरण वाढले, तेव्हा सिकंदर रझाने संपूर्ण जबाबदारी स्वीकारली, पण तरीही शाहीनचा गुन्हा कमी मानला गेला नाही. त्याला १,००,००० पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, जे अंदाजे १० लाख रुपये आहेत. पीएसएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. ही घटना नियमांचे उल्लंघन मानली गेली. हा दंड शाहीनच्या स्वतःच्या पीएसएल संघ, लाहोर कलंदर्सने लावला होता. दरम्यान, सिकंदर रझावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.दरम्यान, लाहोर कलंदर्सनेही म्हटले आहे की, या घटनेला अवाजवी महत्त्व देण्यात आले आहे. ही घटना अवाजवी महत्त्व देण्यासारखी नव्हती. अशा कृती पुन्हा घडू नयेत यासाठी संघाने आपल्या खेळाडूंना नव्याने इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत या घटनेबाबत काय घडते हे पाहणे बाकी आहे.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 9:30 am

Nishikant Dubey : ‘त्या’वक्तव्याप्रकरणी निशिकांत दुबेंच्या अडचणीत वाढ; न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

Nishikant Dubey : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना मराठी माणसांबद्दल केलेले एक वक्तव्य चांगलेच महागात पडले आहे. त्यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 7 एप्रिलला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 9:20 am

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; खडसेंसह मुलीवर गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?

Eknath Khadse: 2002 मध्ये मानपुर शिवारातील महार वतनाची गट क्रमांक 122 असलेली जमीन खरेदी करण्यात आली होती.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 8:59 am

Top 10 News : एकनाथ शिंदे दोन मंत्र्यांवर प्रचंड नाराज, एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार? आणि स्पेनचा अमेरिकेविरोधात मोठा निर्णय, वाचा अशा टॉप १० बातम्या

Top 10 News : उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाचे आमदार दीपक केसरकर यांच्यासह दोन मंत्र्यांवर नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 8:52 am

Eknath Shinde : शिंदेंच्या दोन मंत्र्यांना नारळ मिळणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Eknath Shinde : शिवसेना पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षातील दोन मंंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यानुसार लवकरच ते मोठा निर्णय घेऊ शकतात.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 8:50 am

1000 पासून सुरुवात, दरमहा 4 लाख रुपये कमाई:केरळमध्ये अशा 46 लाख कुडुंबश्री दीदी, डाव्यांच्या मतांमध्ये भाजप कशी घुसखोरी करेल

बिंदूच्या कथेपासून सुरुवात करूया. तिरुवनंतपुरममधील पल्लीचल गावात राहणाऱ्या बिंदूचे लग्न 16 व्या वर्षी झाले होते. सासरवाडीत खाण्याचेही वांधे होते. बिंदू शिकलेली होती. तिने मुलांना शिकवणी (ट्यूशन) द्यायला सुरुवात केली. पहिली कमाई 10 रुपये होती. हळूहळू कमाई वाढल्यावर, बिंदूने संस्कृतमधून पदवी (ग्रेजुएशन) मिळवायला सुरुवात केली. तेव्हाच तिच्या आचार्यांनी तिला आयुर्वेद व्यवसायाची कल्पना दिली. बिंदूने सासूकडून एक हजार रुपये उसने घेतले. केरळ सरकारच्या कुडुंबश्री योजनेतून मदत घेतली आणि काम सुरू केले. ही 2006 सालची गोष्ट आहे. आता बिंदू स्वतःची कंपनी चालवते. तिचा महिन्याचा व्यवसाय 3 ते 4 लाख रुपयांचा आहे. 40 हून अधिक देशांतील लोक तिच्याकडून व्यवसाय मॉडेल समजून घेण्यासाठी आले आहेत. सर्वजण तिला 'दीदी' म्हणून हाक मारतात. बिंदू मानते की तिचे आयुष्य कुडुंबश्रीने बदलले आहे. केरळ सरकारच्या या योजनेशी 46 लाखांहून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत, म्हणजेच राज्यातील प्रत्येक दुसऱ्या घरात एक कुडुंबश्री सदस्य आहे. या महिला व्यवसाय तर करतातच, पण त्यासोबत निवडणुकाही लढवतात आणि हार-जीतही ठरवतात. कुडुंबश्रीमध्ये डाव्यांचे वर्चस्व, विजयन यांना दुसऱ्यांदा सत्ता मिळवून दिली2021 मध्ये निवडणूक जिंकणाऱ्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (LDF) या आघाडीला 48% महिलांनी मतदान केले होते. हे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या सत्तेत परत येण्याचे मोठे कारण मानले गेले. नोव्हेंबर 2023 ते नोव्हेंबर 2025 या काळात देशातील 15 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. यापैकी 10 राज्यांमध्ये महिलांना पैसे देणाऱ्या रोख योजना लागू करण्यात आल्या किंवा त्यांचे आश्वासन देण्यात आले. 10 पैकी 9 राज्यांमध्ये योजना यशस्वी ठरली. मध्यप्रदेश, बिहार, हरियाणा, झारखंड, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा या राज्यांमध्ये महिलांसाठी दरमहा पैसे देणाऱ्या योजना आणणाऱ्या पक्षांना एकतर्फी विजय मिळाला. केरळमधील 140 जागांसाठी 9 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. येथे कुडुंबश्री गेमचेंजर ठरू शकते. आतापर्यंत या व्यावसायिक मॉडेलवर डाव्यांचे वर्चस्व होते, परंतु आता काँग्रेस आणि भाजपही त्यात शिरकाव करत आहेत. बिंदूच्या कथेतून कुडुंबश्रीचे महत्त्व समजून घ्याबिंदूची आयुराज इंडस्ट्री या नावाने आयुर्वेद कंपनी आहे. त्या 15 प्रकारची उत्पादने विकतात. 5 उत्पादने ब्राह्मीची आहेत, ज्यात हेअर ऑइल, फेसवॉश, मध, जॅम, मिक्स पॅक यांचा समावेश आहे. बिंदू केरळमध्ये आयुर्वेद आयकॉन बनल्या आहेत. कुडुंबश्रीशी संबंधित महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी त्या जातात. 2012, 2014, 2016 मध्ये त्यांना राज्य आणि केंद्र सरकारकडून सर्वोत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार मिळाला आहे. त्या आयुर्वेदावर पुस्तक लिहित आहेत. बिंदू सांगतात की, ‘पहिल्यांदा ब्राह्मी तेल बनवून मोफत शेजाऱ्यांना दिले होते. त्यांना फारसे आवडले नाही. तेव्हाच कळले की तिरुवनंतपुरममध्ये कुडुंबश्री मेळावा भरला आहे. तिथे स्टॉल लावला. २४ बाटल्या तेल तयार केले होते. २ तासांत सर्व विकले गेले. यामुळेच हिंमत वाढली. मी कुडुंबश्री मिशनशी जोडली गेली. तिथून कर्ज घेऊन घरात मशीन लावली. काम व्यवस्थित चालू लागले.’ 1998 मध्ये कुडुंबश्रीची सुरुवात, विजयन सरकारची सर्वात मोठी ताकदकेरळमध्ये बिंदूसारख्या लाखो कथा आहेत. याशी संबंधित महिलांचे व्यवसाय आहेत, त्या कॅन्टीन, ज्यूस प्लांट चालवतात. 17 मे 1998 रोजी सुरू झाले. तेव्हा LDF चे ई.के. नयनार मुख्यमंत्री होते. या योजनेची सुरुवात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी मल्लापुरम येथून केली होती. या योजनेचा उद्देश गरिबी संपवणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा होता. आता हे मिशन जगातील महिलांचा सर्वात मोठा गट बनले आहे. आता कुडुंबश्रीच्या कार्यालयात चला, तिथे काय होते ते बघाकुडुंबश्रीचे कार्यालय राजधानी तिरुवनंतपुरममध्ये आहे. पायऱ्या चढताच मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा फोटो आणि LDF चे पोस्टर दिसते. निवडणुकीच्या वातावरणात कुडुंबश्रीबद्दल चर्चा सुरू आहे. डिसेंबर, 2025 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ग्राम, ब्लॉक, जिल्हा पंचायत, नगरपालिका, कॉर्पोरेशन स्तरावर 17,082 कुडुंबश्री स्वयंसेवकांनी निवडणूक लढवली. यापैकी 7,210 विजयी झाल्या. कार्यालयात महिलांचा वर्ग सुरू आहे. संपूर्ण केरळमधून सुमारे 40 महिला आल्या होत्या, ज्यांनी एक-दोन वर्षांपूर्वीच व्यवसाय सुरू केला आहे. अधिकारी म्हणाले- जमिनीवर राजकारण आहे, बोललो तर मार खाईनआम्ही महिलांना प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्याशी बोललो. त्यांना आपली ओळख उघड करायची नाही. अधिकारी म्हणतात, ‘आम्ही प्रशिक्षण, देणगी आणि जास्तीत जास्त महिलांना मिशनशी जोडण्याबद्दल बोलतो. जर मी येथे राजकीय बोललो, तर मार खाईन.’ ‘वास्तविक सत्य हेच आहे की या महिला कोणत्या ना कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत. 10 वर्षांपासून LDF चे सरकार आहे, साहजिकच त्या सरकारमुळे प्रभावित झालेल्या महिला जास्त मिळतील. विजयन सरकारने गेल्या वर्षी चांगलाच अर्थसंकल्प दिला आहे.’ 10 लाख कर्ज घेऊन कॅन्टीन उघडले, दरमहा 7 लाख रुपये कमाई50 वर्षांच्या सुनीता तिरुवनंतपुरममध्ये कॅन्टीन चालवतात. त्या सांगतात, ‘मुलगा आणि पती बाहेर काम करतात. घरी मन लागत नव्हते, म्हणून मी 2024 मध्ये कॅन्टीन सुरू केले. कुडुंबश्रीशी जोडली गेली, 10 लाख रुपये कर्ज घेतले. आज कॅन्टीनमध्ये 21 महिला काम करत आहेत. त्यांना रोज 700 ते 1300 रुपये मजुरी देते. महिन्यात 6 ते 7 लाख रुपयांची कमाई होते.’ निवडणुकीवर सुनीता म्हणतात, यावेळी थोडे कठीण आहे. भाजप चांगली लढत देत आहे. तिरुवनंतपुरममध्ये तीन जागांवर मजबूत आहे. तथापि, कुडुंबश्रीच्या महिला LDF लाच मतदान करतील. कुटुंबश्रीच्या माध्यमातून राजकारणात आलेल्या महिलासिंधू शशी LDF शी संबंधित आहेत. त्या मल्याळममध्ये सांगतात, ‘मी 20 वर्षांपासून कुटुंबश्रीशी जोडलेली आहे. माझी टीम शिवणकाम-विणकाम करते. महानगरपालिका निवडणुकीत कुटुंबश्रीशी संबंधित 10 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यापैकी 5 जिंकल्या. बहुतेक LDF शी संबंधित आहेत. महिलांची इतकी प्रगती सध्याच्या सरकारमुळे झाली आहे, तर आम्ही त्यांना कसे सोडू शकतो?’ तज्ञांनी सांगितले- कुटुंबश्रीची मते LDF ला मिळतीलतिरुवनंतपुरमचे ज्येष्ठ पत्रकार अजय कुमार सांगतात की कुटुंबश्रीच्या सुरुवातीपासून बहुतांश वेळा LDF चे सरकार राहिले आहे. त्यांनी वेळोवेळी निधीही वाढवला आहे. अशा परिस्थितीत कुटुंबश्रीचा मोठा वर्ग LDF आणि विजयन सरकारलाच मतदान करेल. हे त्यांच्यासाठी फायदेशीर अभियान आहे. LDF कुटुंबश्रीचा वापर आपल्या राजकारणातही करतो. जन्मभूमी वृत्तपत्राचे संपादक प्रदीप सांगतात की सरकार चालवणाऱ्या CPI(M) पक्षाने कुटुंबश्रीचे स्वरूप बदलले आहे. कार्यकर्त्यांना त्यांच्या युनिटमध्ये नोकरी दिली आहे. कुटुंबश्रीला CPI(M) चे नेते मतपेढी म्हणून वापरतात. त्यांनी यात आपले राजकारण मिसळले आहे. त्यांचे युनियनही जमिनीवर कुटुंबश्रीसोबत मिळून काम करत आहे. कुटुंबश्रीवर भाजप-काँग्रेसची आश्वासने भाजप: राजकारणाचा हस्तक्षेप संपवू, बाजारपेठ उपलब्ध करून देऊभाजपने महिलांच्या बळावर मध्यप्रदेश, हरियाणा आणि बिहारमध्ये एकतर्फी विजय मिळवला. केरळमध्ये महिलांना आपल्या बाजूने वळवण्याचे आव्हान आहे. पक्षाने 11 मार्च रोजी जारी केलेल्या संकल्प पत्रात कुटुंबश्रीचाही समावेश केला आहे. यांच्या युनिटचा आवाका वाढवून त्यांना लघु उद्योगात रूपांतरित करण्याचे आश्वासन दिले आहे. निधी व्यवस्थापन पारदर्शक बनवू, जेणेकरून राजकीय हस्तक्षेप कमी होईल. कुटुंबश्रीने बनवलेली उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचवली जातील. याशिवाय, दारिद्र्यरेषेखालील महिलांना दरमहा पैसे देणे, वर्षाला 6 मोफत सिलेंडर, शिष्यवृत्ती आणि स्वस्त कर्ज यांसारखी आश्वासनेही आहेत. काँग्रेस: 5 लाख रुपयांचे व्याजमुक्त कर्जराहुल गांधी यांनी 25 मार्च रोजी कोची येथे UDF चे हमीपत्र (गॅरंटी कार्ड) जारी केले. यात कुडुंबश्रीच्या माध्यमातून मुलांसाठी नर्सरी आणि क्रेच चालवण्याची योजना आहे. याव्यतिरिक्त, महिलांना 5 लाख रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज देण्याचे आश्वासन दिले आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 8:45 am

नितीश यांच्या विधान परिषद सदस्यपदाच्या राजीनाम्यानंतर राजकीय खळबळ; कोण होणार मुख्यमंत्री?

नवी दिल्ली: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी ते राज्यसभेवर निवडून आले होते. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.नितीश कुमार यांचे निकटवर्ती काही काळापासून घटनात्मक तरतुदींचा हवाला देत असे संकेत देत आहेत की, विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे सदस्यपद सोडल्यानंतरही एखादी व्यक्ती सहा महिने मुख्यमंत्रीपदी राहू शकते. ज्येष्ठ मंत्री श्रवण कुमार यांच्यासारख्या नेत्यांच्या अशा विधानांमुळे या अटकळांना आणखी खतपाणी मिळाले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) मुख्यमंत्रीपदासाठी अंतर्गत संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपपेक्षा जेडीयूकडे केवळ चार आमदार कमी असल्याने, भाजप आपल्या मित्रपक्षाकडे नेतृत्व सहजपणे सोपवण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही.१४ एप्रिलनंतर नेतृत्वबदल होण्याची शक्यतामात्र, एनडीएच्या सूत्रांनुसार, पुढील महिन्याच्या सुरुवातीला राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेण्याची शक्यता असलेले नितीश कुमार जास्त काळ सत्तेत राहणार नाहीत. त्यांच्या मते, हिंदू पंचांगानुसार अशुभ मानल्या जाणाऱ्या खर्मस महिन्यानंतरच (१४ एप्रिलपर्यंत) नेतृत्वबदल शक्य आहे. भाजपच्या गोटात आपल्या पहिल्या मुख्यमंत्र्याच्या शक्यतेबद्दल उत्साहाचे वातावरण आहे.सम्राट चौधरी आणि नित्यानंद राय यांच्या नावांची चर्चाया प्रमुख हिंदी भाषिक राज्यात जवळपास दोन दशकांपासून सत्तेत भागीदार असूनही, भाजपला अद्याप मुख्यमंत्रीपद मिळवता आलेले नाही. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, ज्यांच्याकडे गृहखातेदेखील आहे, त्यांना मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य दावेदार म्हणून पाहिले जात आहे. चौधरी हे राज्यातील एक प्रभावशाली इतर मागासवर्गीय (ओबीसी) समुदाय असलेल्या कोइरी समाजाचे आहेत आणि ते आतापर्यंत कोणत्याही एका पक्षाशी कायमस्वरूपी संलग्न राहिलेले नाहीत. याउलट, यादव समाज लालू प्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा (आरजेडी) कट्टर समर्थक मानला जातो, तर कुर्मी समाज दीर्घकाळापासून नितीश कुमार यांना आपला नेता मानत आला आहे.सम्राट चौधरी यांच्या व्यतिरिक्त, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि सध्या केंद्रीय गृह राज्यमंत्री असलेले नित्यानंद राय यांच्या नावाचीही चर्चा होत आहे. त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पाठिंबा असल्याचे मानले जाते. काही वरिष्ठ भाजप नेत्यांच्या मते, सम्राट चौधरी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तितकासा पाठिंबा नसेल, कारण २०१७ मध्ये भाजपमध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी जवळपास दोन दशके राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि जनता दल (जेडीयू) मध्ये घालवली होती.आमदारांच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांची निवडपक्षाच्या सूत्रांनुसार, नवीन मुख्यमंत्र्यांची निवड आमदारांच्या बैठकीत केली जाईल, परंतु अंतिम निर्णय दिल्लीतील नेतृत्व घेईल. राजस्थानचे उदाहरण दिले जात आहे, जिथे पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली. दरम्यान, जेडीयूच्या सूत्रांनुसार, ते नवीन सरकारमध्ये 'न्याय्य वाटा' मिळण्यावर आग्रह धरतील. याशिवाय, नुकतेच पक्षात सामील झालेले नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्या नावाचा उपमुख्यमंत्रीपदासाठी विचार केला जाऊ शकतो.

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 8:30 am

Ashwini Bhide : मुंबई महापालिका आयुक्तपदी पहिल्यांदाच महिला; अश्विनी भिडे आज स्वीकारणार पदभार

Ashwini Bhide : एकीकडे मुंबईच्या महापौर रितू तावडे तर दुसरीकडे आयुक्त अश्विनी भिडे आल्याने महापालिकेत महिलाराज आल्याची चर्चा होत आहे.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 8:19 am

Weather alert : पुढील 24 तासात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता; कुठे येलो तर कुठे अॅारेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्याला कोणता इशारा? वाचा..

Weather alert : पुढील 24 तासांत पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 8:18 am

Main Actor Nahi Hoon Teaser: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘मैं एक्टर नहीं हूं’ चित्रपटाचा टीझर रिलीज; ‘या’दिवशी सिनेमागृहात होणार प्रदर्शित

Main Actor Nahi Hoon Teaser ‘मैं एक्टर नहीं हूं’ हा चित्रपट एका बँकरच्या आयुष्यावर आधारित आहे. हा बँकर भारत आणि जर्मनी या दोन देशांमध्ये राहत असतो. त्याच्या आयुष्यात एक टप्पा असा येतो, जेव्हा त्याला अभिनयाची आवड निर्माण होते.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 8:17 am

मेट्रो वूमन, कोस्टल वूमन ते पहिल्या मुंबई महापालिका आयुक्त

मुंबई: सनदी अधिकारी आश्विनी भिडे यांचे नाव उच्चारताच आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतात ते म्हणजे मेट्रो व्हूमन. अभियंता म्हणून त्यांनी कोणतेही शिक्षण घेतले नाही. परंतु प्रशासनाचा अनुभव गाठिशी असल्याने त्यांनी मुंबई मेट्रो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जो काही म्हणून प्रयत्न केला,त्याची इतिहासात नोंद असेल. कासवगतीने सुरु असलेल्या या प्रकल्पाला त्यांनी गतिशिलता प्राप्त करून दिली, त्यामुळे आश्विनी भिडे यांना माध्यमांनी नव्हेतर अधिकाऱ्यांसह जनतेनंही मेट्रो व्हूमन ही पदवी बहाल केली. आज आश्विनी भिडे यांची जशी मेट्रो व्हूमन अशी ओळख आहे तशीच आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे कोस्टल रोड व्हूमन. महापालिकेच्यावतीने हाती घेतलेल्या प्रिन्सेस स्ट्रिट ते वरळी या सागरी किनारा मार्ग प्रकल्प अर्थात कोस्टल रोडचे काम संथ गतीने सुरु होतं, तिथं आश्विनी भिडे यांनी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारली आणि मेट्रोच्या अनुभवाचा फायदा घेत मावळ्याच्या माध्यमातून भूमिगत कामाला गती दिली. त्यामुळे आज कोस्टल रोड नियोजित वेळेत लोकांसाठी खुला होवू शकला. विशेष म्हणजे हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मध्ये येणाऱ्यांना त्या आडनावाप्रमाणेच भिडल्या.आश्विनी भिडे हे एक असं व्यक्तीमत्व आहे की त्यांन पाणी पुरवठ्यापासून रस्ते बांधकामापर्यंत आणि शिक्षणापासून ते स्वच्छतेपर्यंत आणि मेट्रो रेल्वे पासून ते कोस्टल रोडपर्यंत काम करताना स्वत:ला सिध्दच केलं नाहीतर आजच्या काळात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही अशाप्रकारच्या प्रकल्पांची कामे लिलया पार पाडू शकतात हे दाखवून दिलं. त्यामुळे आश्विनी भिडे यांनी केलेले काम तमाम महिला वर्गांसाठी एक प्रेरणाच नाही तर आदर्श ठरणारं आहे.आश्विनी भिडे या १९९५च्या महाराष्ट्र कॅडरच्या सनदी अधिकारी आहेत. मूळ गाव सांगली असलेल्या भिडे यांची प्रशासकीय कारकिर्द ही कोल्हापूरपासून सुरुवात झाली. १९९७ ते ९९ या काळात त्या सहायक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची बदली झाली. त्यानंतर नागपूरमध्येही त्यांनी जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी-सीईओ म्हणून काम केलं. नागपूर जिल्हा परिषदेच्या सीईओ असताना त्यांनी ३१० गावांमध्ये ४३४ धरणे बांधून सात हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न केला होता. सन २००८ मध्ये आश्विनी भिडे या मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणात अर्थात एमएमआरडीत अतिरिक्त आयुक्त बदली झाल्यानंतर त्यांच्या देखरेखीखाली सध्याचा पूर्वमुक्त मार्ग अर्थात इस्टर्न फ्रि वे आणि सहार एलिव्हेटेड ऍक्सेसोड तसेच मिठी नदीची स्वच्छता अशा अनेक प्रकल्पांना दिशा देवून ती कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.त्याच मुळे जेव्हा राज्यात २०१४मध्ये महायुतीचे सरकार येवून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांनी आपले मेट्रो रेल्वेचे स्वप्न साकारण्यासाठी २०१५मध्ये भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्ती केली. एमएमआरडिएच्या अखत्यारित येणारा हा केवळ एक विभाग होता. जेव्हा भिडे यांनी या पदाचा भार स्वीकारला होता, तेव्हा याचे एक साधे स्वतंत्र कार्यालयही नव्हते. कार्यालयापासून याची सुरुवात होती. पुढे कार्यालयापासून ते पुढे प्रकल्पासाठी लागणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची निवड करत आज त्यांनी मुंबई मेट्रोची एक स्वतंत्र व्यवस्था तथा यंत्रणाचा उभी केली. भिडे नावारुपाला आल्या त्या मेट्रोच्या आरेमधील कारशेडच्या बांधकामावरून. मेट्रोचे कारशेड आरेमध्येच व्हावी यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली आणि यामध्ये बाधित होणाऱ्या झाडांची कापणी करून त्याऐवजी अन्यत्र झाडे लावणे आणि कापण्याजोगी नसतील ती झाडे पुनर्रोपणाच्या माध्यमातून जगवणे यासाठी त्यांचा प्रयत्न होता. परंतु आरेतील ही झाडे कापण्यास जोरदार विरोध झाला. राजकीय पक्षांनी विरोध केला, पर्यावरणवादी म्हणवणाऱ्या संस्थांनी विरोध केला. परंतु यात मोठे राजकारण होते आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा स्वप्नवत प्रकल्प ज्या सुसाट गतीने सुरु होता, त्याला कुठे तरी खिळ बसवायची याच हेतून हा सर्व विरोध होता. मेट्रोचे कारशेड कांजूरमार्गला हलवल्यास प्रकल्पाचा खर्चही वाढणार होता आणि कांजूरमधील जागेचा तिढा अधिक असल्याने ती जागा ताब्यात मिळण्यास अधिक विलंब होईल अशाप्रकारची भावना भिडे वारंवार बोलून दाखवायच्या. आरेतील झाडं तोडू देणार नाही अशी पर्यावरणवादी आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांची भूमिका असतानाच न्यायालयाच्या आदेशानंतर कारशेडच्या बांधकामातील बाधित झाडे रात्रीच्या अंधारात कापण्यात आली. तब्बल २ हजारांहून झाडं कापण्यात आली होती. त्यावेळी मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून भिडे यांच्यावर टिका झाली आणि या वादामुळे भिडे आणि उबाठा शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्यात जोरदार मतभेद झाले. आदित्य ठाकरे यांनी ही झाडे कापल्यानंतर अधिकारी किंवा सल्लागार यांना सुधारणा जमत नसतील तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, ज्या अधिकाऱ्यांचं मुंबईवर प्रेम आहे, मुंबईकरांचं ऐकून जर त्या पुढे जातील अशा अधिकाऱ्यांना प्रकल्पांवर नेमा असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला होता. परंतु यावर भिडे यांनी आरेतील कारशेडचे समर्थन करतानाच टेक्निकल ग्राऊंडवर कारशेडसाठी सर्वांत चांगली जागा आरेची आहे, म्हणून कारडेपो याठिकाणी होणे गरजेचं आहे. अनेक गैरसमज निर्माण झाले. काही जाणीवपूर्व केले गेले. काही लोकांच्या अज्ञानामुळे चुकीची माहिती पसरली,असे स्पष्टीकरण देत एकप्रकारे विरोध करणाऱ्यांवर शाब्दिक प्रतिहल्ला चढवला. त्यातच त्या पुढे ट्विटर वादातही कमी पडल्या नाहीत. त्यांनी ट्विटरवरील लोकांच्या आरोपावरही प्रत्युत्तर दिली. त्यात त्यांनी न्यायालयाने यासंदर्भातील याचिका फेटाळल्यानंरतही काही लोक स्वत:ला कोर्टापेक्षा मोठे समजतात,अशा शब्दांत विरोध करणाऱ्यांचा आणि पर्यायाने आदित्य ठाकरे यांचा समाचार घेतला. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि भिडे यांच्यावर वाद मग विकोपाला गेला आणि मग भिडेंवर त्या भाजपाची भाषा बोलताना असा हल्ला उबाठा शिवसेनेने चढवण्यास सुरुवात केला होता.परंतु जेव्हा सन २० १९ मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार आले आणि उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांनी भिडे यांची मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन त्यांची उचलबांगडी केली. परंतु मार्च २०२०मध्ये जेव्हा कोविडची लाट आली तेव्हा नियतीने ठाकरे सरकारला भिडे यांना मुंबई महापालिकेत कोविडसंदर्भातील समन्वय म्हणून पाठवण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर पुढे मे २०२० मध्ये महापालिकेत त्यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करून अपमानित करण्याचा ठाकरेंचा डाव होता आणि त्यानुसार त्यांनी त्यांच्याकडे कोणत्याही ठोस खात्यांची जबाबदारी न देता त्यांना वारंवार अपमानित करण्याचा प्रयत्न केला. त्यातच पुढे मग त्यांच्याकडे महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात येणाऱ्या कोस्टल रोडची जबाबदारी सोपवली. मेट्रो कामाच्या अनुभवाच्या आधारे दिली ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली होती आणि यातही ठाकरे यांचे स्वार्थ होते. त्यांना हटवून मेट्रोची गती कमी होती आणि आता कोस्टल रोडची गती वाढवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली. परंतु एक प्रशासकीय अधिकारी म्हणून भिडे यांनी कोस्टल रोडचे काम मेट्रोतील कामांप्रमाणेच अत्यंत मन लावून आणि तन्मयतेने तसेच आपले सर्वस्व पणाला केले. त्यामुळे आज कोस्टल रोड नियोजित वेळेत सर्वांसाठी खुला होवू शकला. भिडे यांनी मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी त्या प्रकल्पाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना राजकीय टिकाटिपण्णी करण्यात मुळीत स्वारस्य नव्हते. एखाद्या सनदी अधिकाऱ्यावर राजकीय पक्षाचा किंवा एखाद्या नेत्याचा शिक्का लावून त्यांना बदनाम करणे सोपे असते, परंतु त्या अधिकाऱ्याचे एकच ध्येय असतं ते म्हणजे, आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करणं. तेच काम आश्विनी भिडे या करत होत्या. त्या आपल्या कामांत प्रामाणिक होत्या. गिरगावमध्ये जेव्हा मेट्रोला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला होता, तेव्हा त्यांनी स्वत: तिथे जावून लोकांना प्रकल्पाचे महत्व पटवून सांगितले. त्यांनी हा प्रकल्प पूर्ण करताना एका कार्यालयात बसून निर्णय घेतलेले नाहीत, तर कधी लोकांमध्ये तर कधी प्रत्येक रेल्वे स्थानके आणि मार्गाची पाहणी करण्यासाठी भुयारी मार्गात शिरुन त्या काम करत होत्या.प्रत्येक कामांची माहिती त्या प्रत्यक्ष जागी जावून घेत असल्याने अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती खरी आणि किती खोटी याची त्यांना कल्पना असायची आणि त्यामुळेच अधिकारी कधीही खोटी माहिती देण्याची हिंमत करत नव्हत्या. हेच होते त्यांचे आपल्या कामांप्रती असलेले प्रेम आणि शंभर टक्के योगदान. त्यामुळे कुलाबा वांद्रे सिप्झ असा मेट्रो ३चा ३३ किलोमीटरचा मार्ग आणि ज्याच्या २७ रेल्वे स्थानकांपैंकी २६ रेल्वे स्थानके ही भूमिगत आहेत, ती मेट्रो रेल्वे सेवा आता पूर्ण क्षमतेने आपल्या मुंबईकरांच्या सेवेत आली आहे. त्यामुळे आज मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल ज्या मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोडमुळे होतोय, त्या प्रकल्पाला आकार देणारे हात हे आश्विनी भिडे यांचे होते आणि खऱ्या अर्थाने प्रसंगी त्यांनी सर्वांना शिंगावर घेतल्यानंतर, पण आज जेव्हा प्रकल्प साकारत आहेत, तेव्हा भिडे यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय अपूर्ण आहे. .राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडवणीस विराजमान झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिवपदी असलेल्या पदावर आश्विनी भिडे यांची नियुक्ती करून घेतली. कारण भिडे यांच्यासारखे अभ्यासू, प्रमाणिक आणि प्रसंगी प्रत्येक कामांची इत्यंभूत माहीती ठेवणाऱ्या असल्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाचा कारभार समर्थपणे त्या चालवत आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेला अशा खमक्या, प्रसंगी वरिष्ठांना स्पष्ट कारण सांगून त्याचा होकार किंवा नकार मिळवणे तसेच अभ्यासू असे व्यक्तिमत्व असणाऱ्या आयुक्तांची गरज होती. मुंबईकर त्यांना महापालिका आयुक्तांच्या रूपात त्यांना पाहत होते आणि प्रसंगी देवाकडे साकडेही घालत होते. ते मुंबईकरांचे स्वप्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त पदी त्यांची नेमणूक केली. मात्र, देवेंद्र फडणवीस साहेबांनी रश्मी शुक्ला यांची पोलिस संचालक पदी नियुक्ती करत पहिल्या महिला संचालक बनण्याचा मान बहाल केला. तसाच मान आश्विन भिडे यांना मुंबई महापालिका आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करून पहिल्या महिला आयुक्त बनण्याचा मान त्यांच्या ओटीत टाकला. हे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच करू शकतात. आणि ते त्यांनी करून दाखवले. मुंबईकरांची मनातील इच्छा ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी हा धाडसी निर्णय घेतला. कारण भिडे यांना महापालिकेत पाठवून मुख्यमंत्री कार्यालयाची बाजू कमजोर करून घेण्यासारखे होते. पण मुंबईच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस यांनी हे पाऊल उचलले. मुंबईकरांचे स्वप्न साकार झाले.आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आलेल्या मुंबई महापालिकेला खऱ्या अर्थाने दिशा दाखवण्यासाठी भविष्यात आश्विनी भिडे या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान व्हाव्यात ही तमाम मुंबईकरांची इच्छा होती , ती अखेर मुंबादेवी, श्री सिद्धिविनायक यांच्या कृपेने पूर्ण झाली. भविष्यात मुंबई महापालिका आर्थिक सक्षम बनवण्याचे कार्य त्यांच्या हातून घडो हीच प्रार्थना!

फीड फीडबर्नर 31 Mar 2026 7:10 am

Family Court Pune : बायको स्पर्धा परीक्षा देतेय? मग खर्चही द्यावाच लागेल! कौटुंबिक न्यायालयाचा पतीला मोठा दणका

Family Court Pune : राहणीमान, फी आणि अभ्यास साहित्याचा खर्च पतीलाच उचलावा लागणार; कौटुंबिक वादात सापडलेल्या पत्नीला मोठा दिलासा.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 7:00 am

आजचे एक्सप्लेनर:शेवटचा नक्षल कमांडर नेपाळला पळून गेला, एका नक्षलवाद्याची पत्नी सक्रिय; डेडलाईनपर्यंत नक्षलवाद पूर्णपणे संपेल का?

24 ऑगस्ट 2024 रोजी गृहमंत्री अमित शहा यांनी घोषणा केली होती- ‘डाव्या विचारसरणीचा उग्रवाद म्हणजेच नक्षलवाद निर्दयपणे संपवण्याची वेळ आली आहे. 31 मार्च 2026 पूर्वी नक्षलवाद देशातून पूर्णपणे संपवला जाईल.’ शहा यांची ही डेडलाईन उद्या पूर्ण होईल. गेल्या दोन वर्षांत नक्षलवाद्यांचा कसा खात्मा झाला, सध्या कोणत्या भागात आणि किती नक्षलवादी आहेत, डेडलाईनपर्यंत नक्षलवाद पूर्णपणे संपवता येईल का; जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न-1: गेल्या दोन वर्षांत नक्षलवाद्यांचा कसा खात्मा करण्यात आला? उत्तर: 2010 मध्ये माओवाद्यांनी दंतेवाडा येथे भीषण हल्ला केला होता. यात CRPF चे 76 जवान शहीद झाले होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नक्षलवादी-माओवादी चळवळीला देशासमोरील सर्वात मोठा अंतर्गत धोका म्हटले होते. 2014 मध्ये केंद्रात NDA सरकार आल्यानंतर नक्षलवादी भागात दोन आघाड्यांवर मोहीम राबवण्यात आली - या अंतर्गत नक्षलवाद्यांविरुद्ध सेना, CRPF, पोलीस आणि इतर सुरक्षा दलांची ऑपरेशन्स तीव्र करण्यात आली. त्याचबरोबर नक्षलग्रस्त भागात पायाभूत सुविधा वाढवून, शिक्षण, वीज आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारून नक्षल समर्थक आदिवासींना मुख्य प्रवाहात जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी 2017 मध्ये तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 8 कलमी योजना सादर केली होती. 24 ऑगस्ट 2024 रोजी छत्तीसगडमधील रायपूर येथे अमित शहा यांनी सांगितले होते की, डाव्या विचारसरणीच्या अतिरेकावर मजबूत रणनीतीसह शेवटचा हल्ला केला जाईल. त्यानंतर त्यांनी अनेकदा 31 मार्च 2026 पर्यंत देशाला नक्षलवादमुक्त करण्याची गोष्ट पुन्हा सांगितली होती. या डेडलाइननंतर सुरक्षा दलांनी 'ऑपरेशन कागार' सारखी अनेक अभियाने राबवून नक्षलवादी छावण्यांवर हल्ले तीव्र केले. यात नक्षलवाद्यांचे टॉप कमांडर, केंद्रीय समितीचे सदस्य आणि जिल्ह्यापासून ते खालच्या विभागापर्यंतचे नक्षलवादी सैनिक मारले गेले किंवा त्यांना अटक करण्यात आली... आत्मसमर्पण केलेल्या अनेक वरिष्ठ कमांडरांनी नंतर सांगितले की, दलांच्या जलद कारवाईमुळे माओवाद्यांना सशस्त्र संघर्ष सुरू ठेवणे कठीण झाले होते. ऑक्टोबरमध्ये आत्मसमर्पण केलेल्या वेणुगोपाल राव उर्फ ​​सोनू सारख्या माओवादी नेत्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले होते की, 'आजच्या परिस्थितीत सशस्त्र संघर्ष सुरू ठेवणे शक्य नाही. कॅडरने तात्पुरत्या स्वरूपात शस्त्रे सोडून जनतेमध्ये राहून काम केले पाहिजे.' सतीश उर्फ टी. वासुदेव राव यांनीही आत्मसमर्पणानंतर सांगितले होते की, ‘हा केवळ माझा निर्णय नव्हता. बसवा स्वतः सशस्त्र संघर्ष संपवून सरकारसोबत शांतता चर्चा करू इच्छित होते. आम्ही आमचे लोक आणि पक्षाला वाचवू इच्छित होतो. सशस्त्र संघर्षासाठी ही योग्य वेळ नाही.’ प्रश्न-2: तर काय डेडलाईन पूर्ण होण्यापूर्वी नक्षलवाद संपला आहे? उत्तर: 2024 मध्ये बस्तर, दंतेवाडा, गडचिरोली आणि सुकमा यांसारखे 18 जिल्हे नक्षल प्रभावित होते. 2025 च्या सुरुवातीला सरकारने सांगितले की आता फक्त 11 जिल्हेच LWE म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रिमिझमने प्रभावित आहेत. डिसेंबरमध्ये या जिल्ह्यांची संख्या कमी करून 7 करण्यात आली. यापैकी छत्तीसगडमधील तीन जिल्हे- विजापूर, नारायणपूर आणि सुकमा सर्वाधिक प्रभावित जिल्हे आहेत. याशिवाय कांकेर, दंतेवाडा, झारखंडमधील पश्चिम सिंहभूम आणि ओडिशातील कंधमाळ जिल्ह्यात नक्षलवादी कारवायांच्या बातम्या आहेत. ज्यात काही विखुरलेले कमांडर आणि त्यांच्यासोबत काही सशस्त्र कॅडर शिल्लक आहेत… दुसरीकडे, 29 मार्च रोजी उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी सांगितले आहे की छत्तीसगड आता पूर्णपणे नक्षलमुक्त आहे. ते म्हणाले, 'अमित शहा यांनी 2024 मध्ये जेव्हा ही घोषणा केली होती, तेव्हा आम्ही सर्वजण तिथे उपस्थित होतो. या मिशनसाठी सर्वांनी मिळून लढा दिला. आता मी सांगू शकतो की 2 वर्षांनंतर माझे राज्य सशस्त्र नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त आहे.' प्रश्न-3: डेडलाईन पूर्ण करण्यासाठी सध्या काय केले जात आहे? उत्तर: 31 मार्चची डेडलाईन जवळ येताच, सेना आणि पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले होते. 26 मार्च रोजी सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स (CAPF) च्या एका वरिष्ठ कमांडोने सांगितले, 'आमची योजना गृहमंत्री शहा यांच्या 31 मार्चच्या डेडलाईनपर्यंत सशस्त्र नक्षलवाद्यांचा खात्मा करण्याची आहे. उलट्या गणनेच्या या शेवटच्या 5-6 दिवसांत मोठी अभियाने राबवली जात आहेत.' बस्तरमध्ये CRPF, BSF आणि ITBP च्या टीम्स सक्रिय आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा आणि ओडिशाच्या सीमावर्ती भागांमध्येही अभियान सुरू आहे. दले CPI (माओवादी) च्या 2 सेंट्रल कमिटी मेंबर्स आणि अंदाजे 130 ते 150 सशस्त्र कॅडरच्या मागावर आहेत. यासाठी CRPF ची जवळपास चार कोब्रा युनिट्स झारखंडच्या सिंहभूम भागातील सारंडा जंगलात एका स्पेशल मिशनसाठी पाठवण्यात आली आहेत. 2 प्रमुख नक्षल नेते अजूनही दलांच्या पकडीपासून दूर आहेत, ज्यांची नावे आहेत - मुपल्ला लक्ष्मण राव उर्फ ​​गणपती आणि मिशिर बेसरा उर्फ ​​भास्कर. अहवालानुसार, 75 वर्षीय मुपल्ला लक्ष्मण राव उर्फ ​​गणपती सध्या तेलंगणामध्ये सक्रिय आहे. तो सेंट्रल कमिटीचा सल्लागार आहे. तो तेलंगणा पोलिसांच्या संपर्कात आहे आणि 31 मार्चपर्यंत आत्मसमर्पण करू शकतो. मात्र, त्याच्या नेपाळला पळून जाण्याच्या बातम्याही आहेत. दुसरीकडे, झारखंडमधील गिरीडीह येथील 63 वर्षीय भास्कर पोलित ब्युरो सदस्य आहे, ज्याच्यासोबत अंदाजे 40 लोकांची टीम आहे. तो देखील लवकरच आत्मसमर्पण करू शकतो. असे म्हटले जात आहे की या नेत्यांच्या आत्मसमर्पणानंतर, 31 मार्च रोजी अमित शहा उर्वरित सर्व LWE प्रभावित जिल्ह्यांना नक्षलमुक्त घोषित करू शकतात. प्रश्न-4: सर्व नक्षलवाद्यांच्या मृत्यूने किंवा आत्मसमर्पणाने नक्षलवाद पूर्णपणे संपेल का? उत्तर: छत्तीसगडचे वरिष्ठ पत्रकार नरेश मिश्रा म्हणतात, 'नक्षलवादासाठी हा सर्वात कठीण टप्पा आहे. आत्मसमर्पण करणारे नक्षलवादी यासाठी शस्त्रे खाली ठेवत आहेत कारण त्यांना माहीत आहे की ते ही लढाई सुरू ठेवू शकणार नाहीत.' तथापि, छत्तीसगडचे माजी डीजीपी आर.के. विजय यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, 'आम्ही नक्षलवादी क्षेत्रांवर नियंत्रण मिळवू शकतो, परंतु प्रत्येक नक्षलवाद्याला संपवता येत नाही. नक्षलवादी सुरक्षा दलांशी टक्कर घेऊ शकत नाहीत, त्यामुळे ते सीझफायर व्यतिरिक्त आपला नेता बदलूनही आपली चळवळ सुरू ठेवू शकतात.' छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी म्हटले होते की, बस्तरमधील 96% भाग नक्षलमुक्त झाला आहे. मात्र, सरकारसाठी सध्या नक्षलवादी आंदोलन आणि या विचारधारेबद्दल सहानुभूती बाळगणारे ग्रामीण आदिवासी लोक देखील एक मोठे आव्हान आहे. सशस्त्र नक्षलवाद्यांच्या सहकाऱ्यांना APC किंवा RPC सदस्य म्हणजेच रूरल पार्टी कमिटीचे सदस्य म्हटले जाते. त्यांच्याकडे शस्त्रे नसतात, परंतु ते नक्षलवाद्यांच्या विचारधारेने प्रेरित असतात. बस्तरमध्ये अशा सदस्यांना चिन्हांकित करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु ते एक पक्ष स्थापन करून खाणकाम (मायनिंग) सारख्या मुद्द्यांवर विरोध नोंदवत आहेत. त्यांची संख्या हजारोमध्ये आहे. पोलिसांसमोर आता हेच मोठे आव्हान आहे. ‘नक्षलबाडी अबुझमाड’ हे पुस्तक लिहिणारे ज्येष्ठ पत्रकार आलोक पुतुल म्हणतात, ‘1967 मध्ये सुरू झालेले नक्षलवादी आंदोलन 1973 पर्यंत जवळजवळ संपले होते, परंतु सुमारे 40 वर्षांनंतर ते पुन्हा उभे राहिले. नक्षलवाद्यांना संपवता येते, पण त्यांची विचारधारा नाही. नक्षलवाद एका नवीन मार्गाने, एका नवीन स्वरूपात पुन्हा वाढू शकतो. तो कमी हिंसक असो किंवा पूर्णपणे अहिंसक.’ उदाहरणार्थ, 3 महिन्यांपूर्वी मोहला मानपूरमध्ये दोन नक्षलवादी चकमकीत मारले गेले होते. त्यापैकी एक विजय रेड्डी होता. विजयच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी रुपी 7 साथीदारांसह कांकेरच्या परतापूर एरिया कमिटीमध्ये सक्रिय होती. मात्र, रुपी आत्मसमर्पण करणार असल्याची बातमी आहे. CPI (माओवादी) ही नक्षलवाद्यांची सर्वात मोठी संघटना आहे, परंतु त्याशिवायही लहान-लहान 17 माओवादी संघटना टिकून आहेत. इतिहासात यापूर्वीही जेव्हा नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवली, तेव्हा नक्षलवाद्यांची दुसरी एखादी संघटना त्याच्या प्रत्युत्तरादाखल सक्रिय झाली आणि पुन्हा शस्त्रे उचलली. 'नाईटमार्च: अमंग इंडियाज रिव्होल्यूशनरी गुरिल्ला' या पुस्तकाच्या लेखिका आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापिका अल्पा शाह दीड वर्षांपर्यंत नक्षलवाद्यांमध्ये राहिल्या आहेत. अल्पा यांच्या मते, 'सर्व अडचणी असूनही नक्षल आंदोलन सुरूच राहिले. जेव्हा जेव्हा सरकारने नक्षलवाद संपला असे मानले, तेव्हा तो पुन्हा उफाळून समोर आला.' नरेश मिश्रा देखील म्हणतात, 'माओवाद्यांशी संबंधित गावांमध्ये लोकांना सरकारवर पूर्ण विश्वास बसण्यास थोडा वेळ लागेल आणि असे झाल्यावरच नक्षलवाद पूर्णपणे संपेल.' प्रश्न-5: नक्षलवाद अखेर कसा सुरू झाला, तो देशासाठी कसा धोकादायक ठरला? उत्तर: नक्षलवाद हे भारतातील एक सशस्त्र बंडखोर आंदोलन आहे, जे CPI (M) सारख्या संघटना चालवतात. ते गरिबी, असमानता आणि आदिवासी शोषणाविरुद्ध संघर्षाचा दावा करतात, परंतु हिंसा आणि उग्रवाद ही त्यांची मुख्य पद्धत आहे. नक्षलवाद भारत सरकारला उलथवून टाकून साम्यवादी म्हणजेच कम्युनिस्ट व्यवस्था आणू इच्छितो. त्याची सुरुवात 1960 च्या दशकात झाली होती, जेव्हा आदिवासी भागांमध्ये गरिबी, बेरोजगारी आणि जमीनदारांचे शोषण वाढले होते.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 6:49 am

Kharadi Accident : खराडीत काळाचा घाला! भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Kharadi Accident : धडक देऊन चालक फरार; फॉरेस्ट पार्क सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरू.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 6:45 am

Pune Rain : पुणेकरांची दाणादाण! ४०°C तापमानानंतर थेट गारांचा पाऊस; १४ ठिकाणी झाडपडीने खळबळ

Pune Rain : अग्निशमन दलाची रात्रभर धावपळ; प्रभात रोडसह १० हून अधिक भागात झाडे कोसळली, घरांचेही नुकसान.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 6:30 am

Uday Samant : उद्योगांना मिळणार ३० वर्षांसाठी एमआयडीसीची जमीन; सौरऊर्जेसाठी उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : सौरऊर्जा प्रकल्पांसाठी ३० वर्षांचा दीर्घकालीन करार; उद्योगांना स्वयंपूर्ण ऊर्जाव्यवस्थेसाठी सरकारचे पाठबळ.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 6:15 am

Smart Toilet : ‘स्मार्ट टॉयलेट’चा फुगा फुटणार? योजनेच्या घोषणेनंतर तक्रारींचा महापूर; नगरसेवकांची लागली रांग

Smart Toilet : स्मार्ट टॉयलेटच्या नावाखाली जुनी स्वच्छतागृहे पाडण्याचा सपाटा; नगरसेवकांकडून महिला व बालकल्याण समितीत प्रस्तावांचा पाऊस.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 6:00 am

अग्रलेख : दिलासाजनक भूमिका

पश्चिम आशियात सुरू झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज देशापुढे अनेक प्रकारची संकटे (Editorial) उभी राहिली आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला मोठे चटके सहन करावे लागत आहेत.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 6:00 am

PMC News : महापालिकेचा अजब कारभार! पाऊस आला धावून, गाळ गेला वाहून; निविदांचा खेळ अजूनही सुरूच

PMC News : बालेवाडी ते हडपसरपर्यंत पावसाचे थैमान; नाल्यांमधील गाळ नदीपात्रात, आता ठेकेदार फक्त कागदोपत्री सफाई करणार?

दैनिक प्रभात 31 Mar 2026 5:45 am

Rishikesh Vaidya : भोंदू ऋषिकेश वैद्यचा कोठडीत ‘देवभक्ती’चा बनाव! न्यायालयाने दाखवला दणका; वाचा सविस्तर

Rishikesh Vaidya : खरात प्रकरणानंतर राज्यातील भोंदूगिरीचा दुसरा मोठा प्रकार; कोठडीत देवभक्तीचा आव आणणाऱ्या आरोपीला झटका.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 5:30 am

Orange Alert : पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे; ‘या’७ जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Orange Alert : जळगाव, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरला 'ऑरेंज अलर्ट'; ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 5:15 am

Jawai Pattern : जुन्नरचा बिबट्या प्रश्न सुटणार? विखे पाटील, वळसे पाटलांसह बड्या नेत्यांचा ‘जवाई’दौरा

Jawai Pattern : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि दिलीप वळसे पाटलांकडून जवाई पॅटर्नची पाहणी; जुन्नरसाठी नवा प्लॅन तयार.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 5:00 am

दखल : कुठे आहे संयुक्त राष्ट्रसंघ?

जगाच्या आकाशात युद्धाच्या ज्वाळा भडकत असताना एक प्रश्न सतत मनाला छळतो, कुठे आहे संयुक्त राष्ट्रसंघ? (United Nations) कुठे झोपलाय या जगाचा तथाकथित राखणदार?

दैनिक प्रभात 31 Mar 2026 5:00 am

Bhima Sugar Factory : भीमा साखर कारखान्यात अग्नीतांडव! बग्याससह ट्रक जळून खाक; नेमकं कारण काय?

Bhima Sugar Factory : वारंवार होणाऱ्या आगीच्या घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; निराणी ग्रुपच्या व्यवस्थापनावर टीका.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 4:45 am

Shirur Crime : मलठणमध्ये चोरांचा ‘हायटेक’डल्ला! ट्रॅक्टर, ट्रक अन् पोकलेनच्या बॅटऱ्या लंपास; नेमकं काय घडतंय?

Shirur Crime : केबल आणि शेतीपंपाच्या चोरीनंतर आता बॅटरी चोरांचा धुमाकूळ; शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 4:30 am

Junnar News : आणे पठारावर अवकाळीचा तडाखा! वाटाण्याचं ‘हब’गारपिटीने झोडपलं; बळीराजा पुन्हा संकटात

Junnar News : मका आडवी झाली, कांदाही बाधित; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर, आणे पठाराचे आर्थिक गणित कोलमडले.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 4:15 am

Kesnand Phata Accident : केसनंद फाट्यावर थरार! ट्रकने इको कारला फरफटत नेले; फिल्मी स्टाईल पाठलागाचा शेवट काय?

Kesnand Phata Accident : पुणे-नगर महामार्गावर थरारक घटना; मेवातच्या मुजोर ट्रकचालकावर वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 4:00 am

Pune Zilla Parishad : ई-गव्हर्नन्समध्ये पुणे जिल्हा परिषद अव्वल; प्रवीण मानेंकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सत्कार

Pune Zilla Parishad : ई-गव्हर्नन्समुळे पारदर्शकता आणि वेगवान सेवा; प्रवीण माने यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचा गौरव.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 3:45 am

Baramati News : मोरगाव परिसरात पाणीटंचाई! एप्रिल-मे आधीच विहिरींनी तळ गाठला; बळीराजा हतबल

Baramati News : उन्हाच्या तीव्रतेमुळे कूपनलिका आणि ओढे आटले; ऊस, मका आणि भाजीपाल्याची पिके करपून जाण्याच्या मार्गावर.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 3:30 am

Mobile Theft : राजगुरुनगर बाजारपेठेत मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिस कारवाईवर नागरिकांचा रोष

Mobile Theft : शुक्रवार आणि रविवारचा बाजार आता चोरीसाठी कुप्रसिद्ध; पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचा संताप अनावर.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 3:15 am

Girl Suicide : चाकण हादरलं! सोशल मीडियावरील प्रेम जिवावर बेतलं; प्रियकराच्या नकाराने तरुणीचा शेवट

Girl Suicide : सोशल मीडियावरून झालेली ओळख ठरली जीवघेणी; प्रियकराच्या नातेवाइकांच्या धमकावण्यामुळे तरुणीने पत्करले मरण, चाकण पोलिसांकडून तपास सुरू.

दैनिक प्रभात 31 Mar 2026 3:00 am