SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

27    C
... ...View News by News Source

Bangladesh James Show : बांगलादेश हादरलं! 'भीगी भीगी'फेम गायक जेम्सच्या कॉन्सर्टवर दगडफेक; १५-२० विद्यार्थी जखमी, कार्यक्रम रद्

ढाका : बांगलादेशातील प्रसिद्ध रॉक स्टार आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक जेम्स (फारूक महफूज अनम) याच्या संगीत कार्यक्रमात भीषण हिंसाचार झाला आहे. फरीदपूर जिल्हा शाळेच्या १८५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या मैफिलीवर जमावाने विटा आणि दगडांनी हल्ला केला. या गोंधळात १५ ते २० विद्यार्थ्यांसह किमान २५ जण जखमी झाले असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव हा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला.https://prahaar.in/2025/12/27/over-50-vehicles-collide-on-an-expressway-in-japan-one-dead-26-injured/नेमकं काय घडलं?On Friday, 26 December, James, the iconic voice of Bangladeshi rock was scheduled to headline the 185th anniversary concert of Faridpur Zilla School. What should have been a celebration turned into chaos when an extremist group attacked the venue, vandalized property, and forced… pic.twitter.com/htpsEdxQys— Dipanwita Rumi(দীপান্বিতা রুমী) (@dipanwitarumi) December 26, 2025फरीदपूर जिल्हा शाळेच्या दोन दिवसीय उत्सवाच्या शेवटच्या दिवशी रात्री ९ वाजता जेम्सचा परफॉर्मन्स होणार होता. सर्व तयारी पूर्ण झाली होती आणि प्रेक्षक जेम्सची वाट पाहत होते. मात्र, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच काही 'बाहेरच्या' लोकांनी विनापरवाना आत शिरण्याचा प्रयत्न केला. आयोजकांनी त्यांना रोखल्यामुळे संतापलेल्या या जमावाने थेट मंचाच्या (Stage) दिशेने विटा आणि दगड भिरकावण्यास सुरुवात केली.विद्यार्थी रक्ताळले, आयोजकही चक्रावलेजमावाच्या या हल्ल्याला विद्यार्थ्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र या चकमकीत १५ ते २० विद्यार्थी जखमी झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून फरीदपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार रात्री १० वाजता हा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. आम्ही सर्व तयारी केली होती, पण हा हल्ला कोणी आणि का केला हे समजू शकलेले नाही, असे प्रसिद्धी समितीचे प्रमुख राजीबुल हसन खान यांनी सांगितले.तस्लिमा नसरीन यांनी व्यक्त केली चिंताया घटनेवर प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी चिंता व्यक्त करत बांगलादेशातील सांस्कृतिक अधोगतीवर भाष्य केले आहे. त्यांनी ट्विटरवर (X) लिहिले की, मैहर घराण्याचे कलाकार सिराज अली खान ढाका येथे आले होते, पण कार्यक्रमापूर्वीच तोडफोड झाल्याने ते न सादरीकरण करताच भारतात परतले. त्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत कलाकार आणि सांस्कृतिक संस्था सुरक्षित नाहीत, तोपर्यंत ते बांगलादेशात पाय ठेवणार नाहीत. तसेच उस्ताद रशीद खान यांचा मुलगा अरमान खान यानेही सुरक्षेच्या कारणास्तव ढाका येथील आमंत्रण नाकारले आहे. नसरीन यांनी पुढे असेही नमूद केले की, बांगलादेशातील धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी जाणीव जोपासणारे 'छायानौत' (Chhayanaut) हे सांस्कृतिक केंद्रही जाळण्यात आले आहे. संगीत, नाटक आणि लोककलेचा प्रचार करणाऱ्या संस्थांवर होणारे हे हल्ले देशातील कट्टरतावादाचे दर्शन घडवत आहेत.कोण आहे गायक 'जेम्स'?'नगर बाऊल' या रॉक बँडचा मुख्य गायक जेम्स हा बांगलादेशातील संगीताचा आयकॉन मानला जातो. भारतात त्याला 'गँगस्टर' चित्रपटातील भीगी भीगी या सुपरहिट गाण्यामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. त्याच्याच कार्यक्रमावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने जगभरातील संगीत प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 12:10 pm

शरद पवारांची अजित पवारांसोबत आघाडी फिस्कटली, मविआसोबत जाण्याची तयारी

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांनी एकत्रित लढण्यावर शिक्कामोर्तब केले असले तरी जागावाटपावरून अद्याप पेच कायम आहे. तर दुसरीकडे पुण्याच्या राजकारणातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांची स्थानिक युती चर्चेत होती. मात्र शरद पवारांनी मविआसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यात चिन्हावरून मतभेद झाल्यामुळे आघाडीची बोलणी अयशस्वी झाल्याचा अंदाज आहे. अजित पवारांनी शरद पवारांना अवघ्या तीस ते पस्तीस जागा आणि घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढण्याची अट घातली असल्याची माहिती समोर आली होती. या अटीवर शरद पवार गटाचे नेते आणि माजी महापौर अंकुश काकडे व माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती होस्टेलवर काल (२६ डिसेंबर) रात्री भेट घेतली. यावेळी शरद पवार गट तुतारी चिन्हासाठी ठाम असल्याने आणि ३५ जागा देण्याचा प्रस्तावही अमान्य असल्याने आघाडीची चर्चा फिस्कटल्याचे समोर आले आहे.https://prahaar.in/2025/12/27/concert-attack-in-bangladesh-james-show-cancelled-after-bricks-hurled/दरम्यान, याबाबत शरद पवार आणि अजित पवार यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केली नसून पक्षातील नेते माहित देत आहेत.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 12:10 pm

प्रिमियम घरांच्या किंमतीत १ वर्षात ३६% वाढ

सॅविल्स इंडिया अहवालात स्पष्टमुंबई: प्रामुख्याने भारतातील महत्वाच्या प्रमुख शहरात इयर ऑन इयर बेसिसवर प्रिमियम श्रेणीतील घरांच्या किंमतीत ३६% वाढ झाल्याचे सॅविल्स इंडियाने (Savills India) अहवालात म्हटले गेले आहे. मुख्यतः बांधकाम सुरु असलेल्या अंडर कन्स्ट्रक्शन निवासी मालमत्तेला मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने हे दर आणखी महागले असल्याचे महत्वाचे निरिक्षण अहवालाने मांडले आहे. यासह तयार असलेल्या निवासी युनिट्स मागणीत झालेली वाढ, घरांच्या निर्मिती बांधकामातील वाढलेला खर्च यामुळे असलेला मर्यादित निवासी पुरवठा हा देखील घरांच्या किंमतीतील वाढीला कारणीभूत असल्याचे अहवालाने म्हटले. 'रेडी टू होम' या श्रेणीतील मालमत्तेला वाढीव मागणीमुळे लोकांचा कल अंडर कन्स्ट्रक्शन निवासी प्रकल्पात अधिक ओढला गेल्याने निवासी मालमत्तेतील किंमतीत आणखी वाढ होत असल्याचे संस्थेने म्हटले.मुंबईच्या बाबतीत तर २०% तुलनेत इयर ऑन इयर बेसिसवर ३०% वाढ किंमतीत झाली आहे. तर गुरूग्राम येथे २ ते १९%, नोएडा येथे ९ ते ३६%, बंगलोर येथे १३ ते १५% वाढ केवळ एका वर्षात झाली आहे असे अहवालात म्हटले गेले. लक्झरी श्रेणीतील तयार घरांच्या मागणीत व किंमतीत स्थिर वाढ (Steady Growth) कायम आहे. या श्रेणीतील किंमतीत २०% पर्यंत पातळीवर वाढ विविध शहरांमध्ये झाली. उदाहरणार्थ बंगलोर येथे अहवालानुसार १२ ते १४%, दिल्ली येथे १० ते १८%, गुरूग्राम येथे ५ ते ९%, मुंबईत ४ ते ७% वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याखेरीज तयार घरांच्या मर्यादित पुरवठ्यामुळे तयार घरांच्याही किंमतीत आणखी वाढ झाल्याचे अहवालाने आकडेवारीत म्हटले आहे.अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२५ सालात संपूर्ण भारतातील प्रीमियम आणि लक्झरी गृहनिर्माण बाजारपेठ अत्यंत मजबूत राहिली. यावरून हे दिसून येते की, निवडण्यासाठी फारसे पर्याय उपलब्ध नसतानाही लोकांना घरे खरेदी करण्याची तीव्र इच्छा होती. तज्ञांना अपेक्षा आहे की भविष्यात किमतींमध्ये सातत्याने वाढ होत राहील. असे होण्याची शक्यता आहे कारण प्रकल्प वेळेवर पूर्ण होत आहेत आणि नवीन पायाभूत सुविधांची निर्मिती केली जात आहे, न की लोक केवळ नफा मिळवण्यासाठी घरे खरेदी करून नंतर विकत आहेत.याविषयी बोलताना सॅव्हिल्स इंडियाच्या निवासी सेवांच्या व्यवस्थापकीय संचालक श्वेता जैन म्हणाल्या आहेत की,'२०२५ मध्ये, आर्थिकदृष्ट्या सक्षम अंतिम-वापरकर्त्यांची मागणी, मर्यादित तयार घरे आणि उच्च उत्पन्न गटाच्या वाढत्या संपत्तीमुळे, भारतातील प्रीमियम निवासी विभाग गृहनिर्माण बाजाराचे प्रमुख वाढीचे इंजिन म्हणून उदयास आला. चांगल्या ठिकाणी असलेल्या, नामांकित आणि सुविधांनी परिपूर्ण घरांना असलेली तीव्र पसंती, तसेच विकासकांचा गुणवत्ता आणि शाश्वततेवर असलेला भर, यामुळे किमतींमध्ये जोरदार वाढ झाली आणि खरेदीदारांचा आत्मविश्वास वाढला.'जैन यांनी सांगितले की, २०२६ सालाचा विचार करता, वाढती देशांतर्गत आणि परदेशी संपत्ती तसेच सुधारलेली नियामक पारदर्शकता यामुळे हा विभाग उत्साही राहील अशी अपेक्षा आहे, आणि शिस्तबद्ध किंमत निर्धारण व नियंत्रित पुरवठा हे दीर्घकालीन बाजाराच्या स्थिरतेसाठी महत्त्वाचे ठरतील.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 12:10 pm

कुख्यात गुंड अरुण गवळीच्या लेकी निवडणुकीच्या रिंगणात; दोन्ही लेकींनी दाखल केले उमेदवारी अर्ज

BMC Election 2026 | आगामी महापालिका निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. याशिवाय ठाकरे बंधुच्या युतीच्या घोषणेनंतर राजकारणात एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. यातच आता महापालिका निवडणुकीत मुंबईचा डॉन अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी आणि योगिता गवळी निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. दोघींनीही अखिल भारतीय […] The post कुख्यात गुंड अरुण गवळीच्या लेकी निवडणुकीच्या रिंगणात; दोन्ही लेकींनी दाखल केले उमेदवारी अर्ज appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 12:04 pm

सलमान खानच्या 60व्या वाढदिवसाचा जल्लोष; बर्थडे पार्टीसाठी अनेक सेलिब्रिटींची हजेरी

Salman Khan 60th Birthday | बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान 60 वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त रात्री पनवेलच्या फार्महाऊसवर जंगी सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी बॉलीवूडच्या अनेक कलाकरांनी हजेरी लावली होती. ज्याचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. सलमान खानने आपल्या 60 व्या बर्थडेची पार्टी पनवेल येथे ठेवली होती. त्याने कुटुंब, मित्रमंडळी, बॉलिवूडमधील काही कलाकारांना […] The post सलमान खानच्या 60व्या वाढदिवसाचा जल्लोष; बर्थडे पार्टीसाठी अनेक सेलिब्रिटींची हजेरी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 11:36 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनमुळे इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात '६ पट', निर्यातीत '८ पट'वाढ-अश्विनी वैष्णव

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक करत इलेक्ट्रॉनिक उत्पादनात ६ पटीने, तर निर्यातीत ८ पटीने वाढ झाल्याचे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या नव्या एक्स पोस्टमध्ये नमूद केले आहे. आर्थिक वर्ष १४-१५ मध्ये इलेक्ट्रिक उत्पादन १.९ लाख कोटी होत ते २०२४-२५ पर्यंत ११.३ लाख कोटी झाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच निर्यातीत याच १० वर्षाच्या कालावधीत ०.३८ लाख कोटीवरून ३.३ लाख कोटीवर वाढ झाल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीत या वाढीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन व केंद्र सरकारच्या पीएलआय (Production Linked Incentive PLI Scheme) योजनेचेही योगदान असल्याचेही ते म्हणाले आहेत. प्रामुख्याने या योजनेसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचे उत्पादनही १.९ लाख कोटीवरून या १० वर्षात ११.३ लाख कोटींवर वाढल्याचेही ते म्हणाले आहेत.1/11) India’s growth story in electronics manufacturing is PM @narendramodi Ji's vision of developing a comprehensive ecosystem. pic.twitter.com/2fHfqqXewi— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) December 27, 2025मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी (Large Scale Electronic Manufacturing LESM) १३४७५ कोटीची गुंतवणूक देशात झाली असून ९.८ लाख कोटीचे उत्पादन साध्य करण्यात भारत यशस्वी झाल्याचेही आकडेवारी दिसून आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर कृतज्ञता व्यक्त करताना,' भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील वाढीचे श्रेय पंतप्रधान मोदींच्या सर्वसमावेशक परिसंस्था विकसित करण्याच्या दूरदृष्टीला जाते. गेल्या दशकात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात २५ लाख नोकऱ्या निर्माण झाल्या. हीच तळागाळातील खरी आर्थिक वाढ आहे. जसजसे आपण सेमीकंडक्टर आणि घटक उत्पादनाचा विस्तार करू, तसतशी रोजगार निर्मितीला गती मिळेल' असे एका एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.'मोबाइल फोनचे उत्पादन ०.१८ लाख कोटींवरून ५.५ लाख कोटींपर्यंत वाढले तर त्याची निर्यात नगण्य ०.०१ लाख कोटींवरून २ लाख कोटींपर्यंत वाढली, जे 'मेक इन इंडिया' उपक्रमाचे प्रतिबिंब आहे. सरकारचा सुरुवातीचा भर तयार उत्पादनांवर होता.आता आम्ही मॉड्यूल्स, घटक, सब-मॉड्यूल्स, कच्चा माल आणि ते बनवणारी यंत्रे यासाठी क्षमता निर्माण करत आहोत' असेही वैष्णव यांनी त्यांच्या एका 'एक्स' पोस्टमध्ये लिहिले आहे. याशिवाय वाढलेल्या मोबाइल उत्पादनावर भाष्य करताना,'मोबाइल फोनचे उत्पादन ०.१८ लाख कोटींवरून ५.५ लाख कोटींपर्यंत वाढले, तर त्याची निर्यात नगण्य ०.०१ लाख कोटींवरून २ लाख कोटींपर्यंत वाढली, जे 'मेक इन इंडिया' उपक्रमाचे प्रतिबिंब आहे. सरकारचा सुरुवातीचा भर तयार उत्पादनांवर होता. आता आम्ही मॉड्यूल्स, घटक, सब-मॉड्यूल्स, कच्चा माल आणि ते बनवणारी यंत्रे यासाठी क्षमता निर्माण करत आहोत' असे त्यांनी यापूर्व 'एक्स' पोस्टमध्ये लिहिले होते.पीएलआय योजनेबाबतीत आतापर्यंत सरकारी आकडेवारीनुसार, एकूण २४९ अर्जांमध्ये १.१५ लाख कोटींची गुंतवणूक, १०.३४ लाख कोटींचे उत्पादन आणि १.४२ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे. या वाढलेल्या गुंतवणूकीबाबत त्यांनी ही भारतातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणुकीची वचनबद्धता असल्याचे नमूद केले त्यांच्या 'एक्स' पोस्टमध्ये त्यांनी आतापर्यंत मंजूर झालेल्या दहा सेमीकंडक्टर युनिट्सचाही उल्लेख केला. यापैकी तीन युनिट्स आधीच प्रायोगिक किंवा सुरुवातीच्या उत्पादनाच्या टप्प्यात आहेत. भारतातील फॅब्स आणि एटीएमपी लवकरच फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांना चिप्स पुरवतील अशी माहिती त्यांनी 'एक्स' पोस्टमध्ये दिली आहे. त्यांच्या मते, तयार उत्पादनांपासून ते घटकांपर्यंत, भारतातील उत्पादन वाढत आहे आणि निर्यातही वाढत आहे. जागतिक कंपन्या आत्मविश्वासाने गुंतवणूक करत आहेत. भारतीय कंपन्या स्पर्धात्मक आहेत. नोकऱ्या निर्माण होत आहेत.हीच 'मेक इन इंडिया'च्या प्रभावाची कहाणी आहे! असे मंत्री वैष्णव यांनी आपल्या निवेदनात अंतिमतः म्हटले आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 11:30 am

पहिल्याच दिवशी मेलबर्नमध्ये ७५ षटकांत २० बळी

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडीनवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस मालिकेतील चौथी कसोटी मेलबर्नमध्ये खेळली जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात १५२ धावांवर सर्वबाद झाला, तर इंग्लंडचा संघ ११० धावाच करू शकला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ४२ धावांची आघाडी मिळाली.बॉक्सिंग डे कसोटीत इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकत कांगारुंना प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. यानंतर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ट्रॅव्हिस हेड आणि जेक वेदरल्ड १२ आणि १० धावांवर बाद झाले, तर मार्नस लाबुशेननं फक्त सहा आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने फक्त नऊ धावा केल्या. उस्मान ख्वाजा चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवू शकला नाही आणि २९ धावांवर बाद झाला. अॅलेक्स कॅरीला फक्त २० धावा करता आल्या, तर कॅमेरॉन ग्रीनला फक्त १७ धावा करता आल्या. मायकेल नेसरने खालच्या फळीत शानदार फलंदाजी केली आणि त्याने नाबाद ३५ धावा केल्या. जोश टँगविरुद्ध कांगारु फलंदाज पूर्णपणे असहाय्य होते आणि संपूर्ण संघ फक्त १५२ धावांवरच गारद झाला. टँगने ४५ धावांत ५ बळी घेत कहर केला.पहिल्या दिवशी २० विकेटपहिल्या दिवशी एकूण २० फलंदाज बाद झाले, त्यातील सर्व फलंदाज जलद गोलंदाजांनी बाद केले. सुमारे १२४ वर्षांनंतर अॅशेस कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा हा पहिला दिवस होता. यापूर्वी, जानेवारी १९०२ मध्ये याच मैदानावर २५ विकेट्स पडल्या होत्या. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी गमावलेल्या विकेट्सची ही सर्वाधिक संख्या होती. मेलबर्न क्रिकेट मैदानावर कसोटी सामन्याच्या एकाच दिवशी २० किंवा त्याहून अधिक विकेट्स पडण्याची ही चौथी वेळ होती.इंग्लंडची फलंदाजी सपशेल अपयशीकांगारूंच्या १५२ धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजी करायला आलेल्या इंग्लंडची स्थिती ऑस्ट्रेलियापेक्षाही वाईट होती. कांगारू गोलंदाजांसमोर इंग्लिश फलंदाजांनी एकप्रकारे शरणागती पत्करली आणि संपूर्ण संघ फक्त ११० धावांतच तंबूत परतला. संघाकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक ४१ धावा केल्या, तर गस अॅटकिन्सनने २८ धावांचे योगदान दिले. पहिल्या डावात इंग्लंडचे आठ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. मायकेल नेसरने शानदार गोलंदाजी करत ४ बळी घेतले, तर बोलँडने ३ बळी घेतले. दिवसाच्या खेळाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने त्यांच्या दुसऱ्या डावात एकही बळी न गमावता ४ धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाकडे आता ४६ धावांची आघाडी आहे. मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकून कांगारूमनी आधीच मालिका आपल्या नावावर केली आहे.कमिन्स आणि लायन बाहेरइंग्लंडकडून जोश टंगने ५ बळी घेतले. जोश टंगच्या चेंडूवर स्टीव स्मिथ बोल्ड झाला. टंगचा चेंडू थेट मधल्या स्टंपला लागला, स्वतः स्मिथही बाद झाल्याने आश्चर्यचकित झाला होता. स्टीव स्मिथ ३१ चेंडूंत ९ धावा काढून बाद झाला. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ॲशेस मालिका जिंकली आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवला आहे. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाची मालिकेत ३-० अशी अभेद्य आघाडी आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स तिसरा कसोटी सामना खेळल्यानंतर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ पुन्हा एकदा संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. तर अनुभवी फिरकीपटू नॅथन लायन देखील दुखापतीमुळे बाहेर पडला आहे आणि त्याची शस्त्रक्रिया झाली आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 11:10 am

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणीमुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णमाचारी श्रीकांत यांनी बीसीसीआयला वैभव सूर्यवंशी या तरुण प्रतिभेला लवकरात लवकर वरिष्ठ संघात स्थान देण्याची जोरदार मागणी केली आहे. सचिन तेंडुलकरच्या करिअरचे उदाहरण देत श्रीकांत यांनी सांगितले की, सचिनने अवघ्या १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते व वैभवलाही त्याच प्रकारे संधी देण्याची वेळ आली आहे.टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली असली तरी श्रीकांत यांचे मत आहे की, निवडकर्ते आता तरी वैभवच्या कामगिरीकडे गांभीर्याने लक्ष देऊ शकतात व त्याला विश्वचषक संघात समाविष्ट करण्याचा विचार करू शकतात. ते म्हणाले, या तरुण खेळाडूला संधी देणे शक्य आहे. वैभव सूर्यवंशीने वयोगट क्रिकेट तसेच स्थानिक स्पर्धांमध्ये अतिशय जलद प्रगती केली आहे. त्याचे तंत्रज्ञान आणि धावांसाठी असलेली तळमळ इतरांपेक्षा वेगळे आहे, असे श्रीकांत यांचे निरीक्षण आहे. वैभवने वरिष्ठ खेळाडूंसमोरही क्षमता सिद्ध केली असून तो उच्चस्तरीय क्रिकेटमध्ये सहज जुळवून घेऊ शकतो.विजय हजारे ट्रॉफीमध्ये बिहारचे प्रतिनिधित्व करताना वैभवने इतिहास रचला. पहिल्याच लिस्ट ए सामन्यात त्याने फक्त ८४ चेंडूंमध्ये १९० धावा फटकावल्या आणि अवघ्या ३६ चेंडूत शतक झळकावले. तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला. श्रीकांत यांना वैभवच्या सातत्यपूर्ण कामगिरीने विशेष प्रभावित केले आहे.प्रतीक्षा न करता संधी देण्याची गरज : श्रीकांत पुढे म्हणाले, मी गेल्या वर्षीच सांगितले होते की त्याला टी-२० विश्वचषकासाठी संधी द्यावी. आता बराच उशीर झाला असेल, तरीही निवडकर्ते त्याला संघात घेऊ शकतात. या मुलामध्ये प्रचंड प्रतिभा आहे आणि त्याला लवकरात लवकर भारतीय संघात आणले पाहिजे. लोक त्याला आणखी वेळ द्या, आणखी खेळू द्या असे म्हणतात, पण सचिन तेंडुलकरनेही लहान वयातच पदार्पण केले होते, याकडे लक्ष वेधत श्रीकांत यांनी स्पष्ट केले की, क्रिकेटमध्ये वैभवसाठीही असाच मार्ग अवलंबता येईल. प्रत्येक स्तरावर शतके करणाऱ्या या तरुणाला आता प्रतीक्षा न करता संधी देण्याची गरज आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 11:10 am

सेबीकडून लाखो गुंतवणूकदारांना मोठा दिलासा आता डुप्लिकेट प्रमाणपत्र घेणे झाले सोपे!

मुंबई: सेबीकडून एक महत्वाचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. बाजार नियामक सेबीने (Security Exchange Board of India SEBI) ५ लाखांपर्यंत सिक्युरिटीज पोर्टफोलिओ असलेल्या कागदपत्रांची पूर्तता सोपी व सुटसुटीत केली होती त्याची मर्यादा आता १० लाखांपर्यंत केल्याचे आपल्या अधिनियमात स्पष्ट केले आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या सिक्युरिटीज डुप्लिकेट प्रमाणपत्र (Security Duplicate Certificate) मागणी केल्यास त्यांना त्वरित सोप्या सुटसुटीत प्रकियेतून जावे लागणार आहे. आधीच्या क्लिष्ट पद्धतीतून गुंतवणूकदारांना सुटका होईल. महत्वाची बाब म्हणजे १० लाखांपर्यंत सिक्युरिटीज असलेल्या गुंतवणूकदारांना ही सुट दिली असून सेबीने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी निर्णयापूर्वीच अर्ज केला आहे त्यांनाही ही तरतूद लागू होणार आहे.त्यामुळे डिमटेरियलायझेशन (Dematerialisation) प्रक्रियेत गुंतवणूकदारांचा वेळ, खर्च दोन्ही वाचणार आहे. सेबीने आपल्या नवीन धोरणात्मक प्रकियेत हा नवा निर्णय घेतल्याचे कळवले आहे. खास बाब म्हणजे नोटरायझेशन (Notarisation) बाबतीतही छोट्या गुंतवणूकदारांची आता सुटका होणार आहे. म्हणजेच १०००० रूपयांपर्यंत बाँड खरेदी केलेल्या गुंतवणुकदारांना आता नोटरी करण्याची गरज नसल्याचेही सेबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. २५ मे २०२२ रोजी सेबीने हे परिपत्रक काढले होते. त्यांची त्वरीत अंमलबजावणी करण्याचा सेबीने हा निर्णय घेतला आहे.केवळ गुंतवणूकदारांना नाही तर सगळ्या सूचीबद्ध कंपन्यांना (Listed Companies) डिमटरेलायझेशनचे सगळे नवे नियम लगेच प्रकियेत लागू करण्याचेही निर्देश दिले आहेत. ज्यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केला असेल त्यांना पुन्हा कागदपत्रे नव्या नियमानुसार मागू नका असेही आदेश आरटीए (Registar and Transfer Agents RTAs) दिले असल्याचेही सेबीने नमूद केले आहे. त्यामुळे सेबीने घेतलेल्या निर्णयामुळे लाखो गुंतवणूकदारांना यांचा फायदा होणार आहे. प्रामुख्याने प्रशासकीय कामकाजात यात सुधारणा आल्याने अनेक भौतिक कागदपत्रे अथवा प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात वेगात जतन होणार आहेत. याविषयी नमूद करताना सेबीने म्हटले आहे की की,'जारी केल्या जाणाऱ्या डुप्लिकेट सिक्युरिटीज मूलतः डिमटेरियलाइज्ड स्वरूपात असल्याने ही पावले बाजार प्रणालीमध्ये डिमटेरियलायझेशन वाढविण्यातही योगदान देतील.'हे सुधारित फ्रेमवर्क सेबीच्या २५ मे २०२२ रोजीच्या पूर्वीच्या परिपत्रकानुसार आहे असेही सेबीने अंतिमतः स्पष्ट केले आहे. त्या पूर्वीच्या परिपत्रकात डुप्लिकेट सिक्युरिटीज प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या आणि कार्यपद्धतीच्या आवश्यकता तसेच मर्यादा विहित केल्या होत्या. ही प्रक्रिया आणखी सुलभ करण्यासाठी, सेबीने विद्यमान नियमांचे पुनरावलोकन (Review) केला असून सुधारित मर्यादा व कागदपत्रांच्या नव्या नियमाची प्रस्तुती यानिमित्ताने केली आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 11:10 am

बीसीसीआयकडून धोनीला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन

मुंबई : १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही धोनीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ‘कॅप्टन कूल’ला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन देण्यात येत आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या माजी खेळाडूंच्या सन्मानार्थ व त्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी पेन्शन योजना राबवते. २०२२ मध्ये या योजनेत मोठी सुधारणा करण्यात आली, ज्यामुळे पेन्शनच्या रकमेत वाढ झाली आहे. २५ पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन मिळते. माजी कसोटी क्रिकेटपटूला दरमहा ६० हजार रुपये, प्रथम श्रेणी क्रिकेटपटू दरमहा ३० हजार रुपये व महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटुला दरमहा ५२ हजार ५०० रुपये पेन्शन दिली जाते. धोनीने कारकिर्दीत ९० कसोटी सामने, ३५० एकदिवसीय सामने व ९८ टी-२० सामने खेळले आहेत. नियमांनुसार, ज्या खेळाडूंनी २५ पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत, त्यांना सर्वोच्च पेन्शन मिळते. या निकषानुसार, बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला ७० हजार रुपये पेन्शन देते.धोनीची संपत्ती १ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. आयपीएल २०२५ मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून ‘अनकॅप्ड’ खेळाडू म्हणून खेळला, ज्यासाठी त्याला ४ कोटी रुपयांचा करार मिळाला आहे. कसोटी सामने, एकदिवसीय सामने तसेच क्रिकेटमधील योगदानाबद्दल मिळणारा हा पेन्शनचा निधी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या सन्मानाचे प्रतीक मानला जातो.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 11:10 am

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतल्यानंतर शहरातील अनेक ठिकाणचे कबुतरखाने बंद करण्यात आले. यामध्ये दादर येथील कबुतरखाना जास्त वादग्रस्त ठरला. कबुतरखान्यावरील बंदी उठण्यासाठी अनेक आंदोलनदेखील करण्यात आली. धार्मिक भावना दुखावल्यामुळे जैन समाजही आक्रमक झाला. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी कोणताही दिलासा दिला नाही. याप्रकरणाला दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी काही जण दादरच्या कबुतरखान्याजवळ येऊन दाणे टाकत होते. या प्रकारावर पालिकेने कारवाई करण्यासाठी एका व्यक्तीला दंड ठोठावला आहे.दादर परिसरात राहणारे व्यापारी नितीन शेठ कबुतरखान्याजवळ दाणे टाकत असल्यामुळे पालिकेने त्यांची दखल घेतली. यामध्ये न्यायालयानेही त्यांना दोषी ठरवले आणि दंड ठोठावला. कबुतरांना दाणे टाकल्यामुळे झालेली शिक्षा, अशाप्रकारची ही देशातील पहिली घटना असल्याचे सांगितले जात आहे. नितीन शेठ हे दादर परिसरातील व्यापारी असून स्थायिक आहेत. दादर परिसरातील कबुतरखाना बंद करण्यात आल्यानंतरही त्यांनी कबुतरांना दाणे टाकले. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. नितीन यांनीसुद्धा आपली चूक कबूल केली. पोलिसांनी सांगितले की हा व्यापारी सार्वजनिक ठिकाणी बंदी घातलेली असतानाही कबुतरांना दाणा टाकत होता. तक्रारी आधारे या व्यापाऱ्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्यामुळे त्यांच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली.https://prahaar.in/2025/12/27/state-public-service-commissions-mega-recruitment-drive-find-out-the-last-date-to-apply-eligibility-criteria-and-vacancies/याप्रकरणी कोर्टाने नितीन यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी. वाय. मिसाळ यांनी हा निकाल दिला. भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ (ब) अंतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली. व्यापाऱ्याने लोकांचे आरोग्य, जीवन आणि सुरक्षेला धोका पोहचवल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय बीएनएसचे कलम २७१ अंतर्गत आरोग्याला घातक आजार पसरवल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला.या निकालपत्रात कोर्टाने हे स्पष्ट केले आहे की अशा प्रकारची शिक्षा पहिल्यांदाच देण्यात येत आहे. हे एक उदाहरण आहे. त्यामुळे लोकांनी भविष्यात असे कृत्य करु नये असे मत न्यायालयाने निकालपत्रात स्पष्ट केले. बृहन्मुंबई महानगरपालिकाने यापूर्वीच कबुतरांना दाणे टाकण्यावर प्रतिबंध घातला आहे. ऑगस्ट महिन्यात याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातही सुनावणी झाली होती. हायकोर्टाने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्याचा प्रतिबंध कायम ठेवला आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 11:10 am

Japan : जपानमध्ये ५० वाहनांचा थरारक साखळी अपघात! एक्स्प्रेस वेवर वाहनांचे जळते लोळ; एका महिलेचा मृत्यू, २६ प्रवासी जखमी

टोकियो : नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच जपानमध्ये एका भीषण अपघाताने शोककळा पसरली आहे. जपानमधील एका मुख्य महामार्गावर खराब हवामान आणि जोरदार बर्फवृष्टीमुळे अनेक वाहने एकमेकांवर आदळली. या विचित्र अपघातानंतर वाहनांना भीषण आग लागली, ज्यामध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला, तर २६ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जपानमध्ये सध्या वर्षा अखेरच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. यामुळे मोठ्या संख्येने नागरिक आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी आणि घरी जाण्यासाठी बाहेर पडले होते. परिणामी, महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, अचानक झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे रस्ते निसरडे झाले आणि वेगवान वाहने चालकांचा ताबा सुटून एकमेकांवर आदळली. या धडकेनंतर काही क्षणातच गाड्यांनी पेट घेतला आणि महामार्गावर आगीचे लोळ दिसू लागले.मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरील बर्फामुळे वाहने घसरून हा साखळी अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, अग्निशमन दल पोहोचेपर्यंत अनेक वाहने जळून खाक झाली होती. या दुर्घटनेत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला असून, जखमी झालेल्या २६ प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या अपघातामुळे महामार्गावर कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रशासनाकडून तातडीने रस्ता रिकामा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस बर्फवृष्टीचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला असून, नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे. सुट्ट्यांच्या उत्साहात झालेल्या या अपघातामुळे संपूर्ण जपानमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.७७ वर्षीय महिलेचा मृत्यू, २६ प्रवासी जखमी関越で事故に巻き込まれ明日のスノボが pic.twitter.com/pmHpODSo0G— りく (@Lc2BESpn5JG0MTk) December 26, 2025जपानची राजधानी टोकियोपासून १६० किलोमीटर अंतरावर असलेल्या गुन्मा प्रांतातील प्रीफेक्चरमधील कान-एत्सु एक्सप्रेसवेवर शुक्रवारी रात्री मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. निसरडा रस्ता आणि खराब हवामानामुळे तब्बल ५० हून अधिक वाहने एकमेकांवर आदळली. या भीषण टकरीनंतर गाड्यांनी पेट घेतल्याने संपूर्ण महामार्गावर आगीचे साम्राज्य पसरले होते. या दुर्घटनेत एका ७७ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला असून २६ जण जखमी झाले आहेत.एकामागून एक ५० गाड्या आदळल्या; महामार्गावर अग्नितांडवमुसळधार बर्फवृष्टीमुळे एक्स्प्रेस वेवर दृश्यमानता कमी झाली होती. सुरुवातीला काही ट्रकची एकमेकांना जोरदार धडक बसली, मात्र रस्ता निसरडा असल्याने मागून येणाऱ्या वेगवान गाड्यांना नियंत्रण मिळवता आले नाही. पाहता पाहता ५० हून अधिक वाहने एकावर एक आदळली. या धडकेनंतर भीषण आग लागली, ज्यामुळे अनेक वाहनांचा कोळसा झाला. पाच जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जपानी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला प्रचंड कसरत करावी लागली. तब्बल सात तासांच्या थरारानंतर आग विझवण्यात यश आले. आश्चर्याची बाब म्हणजे, वाहने पूर्णपणे जळून खाक झाली असली तरी, सुदैवाने आगीत होरपळून अधिक जीवितहानी झाली नाही. मात्र, या साखळी अपघाताने एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 11:10 am

जपानच्या एक्सप्रेसवेवर भीषण अपघात ; ५० हून अधिक वाहनांची एकमेकांना धडक

Japan Road Accident। वर्षाची सांगता होत असताना जपानला एका भयानक रस्ते अपघाताने हादरवून टाकले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा बर्फाच्छादित एक्सप्रेसवेवर वाहनांची एक लांब रांग लागली होती. याच वाहनांची एकमेकांवर जोरदार टक्कर झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आणि डझनभर जण जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या […] The post जपानच्या एक्सप्रेसवेवर भीषण अपघात ; ५० हून अधिक वाहनांची एकमेकांना धडक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 11:02 am

शरद पवार गटासोबतची चर्चा फिसकटताच अजित पवार ‘नॉट रिचेबल’; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Ajit Pawar Not Reachable | आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये मुक्कामी असताना अचानक कुणालाही न सांगता, पोलिसाचा ताफा न घेता एकटेच निघून गेले. त्यामुळे अजित पवार नेमकं कुठे गेले? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित […] The post शरद पवार गटासोबतची चर्चा फिसकटताच अजित पवार ‘नॉट रिचेबल’; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 10:59 am

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे'१० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. हे बदल केवळ प्रशासकीय नसून त्यांचा थेट संबंध तुमच्या खिशाशी, मासिक बजेटशी आणि पाकीटाशी असणार आहे. बँकिंग सवयींपासून ते सोशल मीडियाच्या वापरापर्यंत सर्वच क्षेत्रात नवीन वर्षात मोठी क्रांती पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षात बँकिंग क्षेत्रातील नियमांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी रिझर्व्ह बँक काही महत्त्वाचे बदल लागू करू शकते. यामध्ये डिजिटल पेमेंटवरील सुरक्षा मानके (Security Standards) आणि ऑनलाइन ट्रांजॅक्शनवरील शुल्कात सुधारणा होण्याची शक्यता आहे. यूपीआय (UPI) व्यवहारांबाबतचे काही नवीन तांत्रिक बदल सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर परिणाम करू शकतात. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घेणे अनिवार्य ठरेल. केवळ शहरी जीवनच नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेतही बदलांचे वारे वाहणार आहेत. शेतकरी वर्गासाठी विविध योजनांच्या लाभ हस्तांतरणाचे (DBT) नियम अधिक कडक आणि सुटसुटीत केले जाणार आहेत. दुसरीकडे, सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे युजर्सच्या सुरक्षेसाठी आणि डेटा प्रायव्हसीसाठी कडक कायदे अमलात येतील. फेक न्यूज आणि सायबर फसवणुकीला लगाम घालण्यासाठी नवीन वर्ष २०२६ हे निर्णायक ठरणार आहे.https://prahaar.in/2025/12/27/this-is-a-blow-to-the-basic-structure-of-the-constitution/१ जानेवारी २०२६ पासून 'हे' १० बदल होणार१. डिजिटल रेशन कार्ड: हेलपाटे आता बंद!रेशन कार्डशी संबंधित सर्व कामे आता पूर्णपणे ऑनलाइन होणार आहेत. नवीन नाव नोंदवणे असो किंवा दुरुस्ती, आता सरकारी कार्यालयांत चकरा मारण्याची गरज उरणार नाही. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा मोठा दिलासा आहे.२. शेतकरी मित्रांसाठी 'फारमर आयडी' सक्तीचीशेतकऱ्यांसाठी आता 'युनिक फारमर आयडी' बंधनकारक करण्यात आली आहे. ही आयडी नसल्यास 'पीएम किसान' योजनेचा हप्ता अडकू शकतो. आनंदाची बातमी म्हणजे, आता वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई सुद्धा पीक विमा योजनेत (PMFBY) समाविष्ट करण्यात आली आहे.३. बँकिंग आणि क्रेडिट स्कोर: वेगवान अपडेटआता तुमचा क्रेडिट स्कोर (CIBIL) अपडेट होण्यासाठी १५ दिवस वाट पाहावी लागणार नाही, तर तो अवघ्या ७ दिवसांत अपडेट होईल. तसेच, SBI सह इतर बँकांचे नवीन व्याजदर लागू झाल्यामुळे तुमच्या EMI मध्ये बदल होऊ शकतो.४. शाळांमध्ये 'डिजिटल अटेंडन्स'शिक्षण क्षेत्रात शिस्त आणण्यासाठी आता सरकारी शाळांमध्ये शिक्षकांसाठी डिजिटल हजेरी सक्तीची होणार आहे. यामुळे शिक्षकांच्या उपस्थितीवर थेट नजर ठेवली जाईल आणि पारदर्शकता वाढेल.५. मुलांसाठी सोशल मीडियाचे नियम कडकसायबर सुरक्षा लक्षात घेता, १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत सरकार नवीन कडक नियमावली (Age Verification) आणण्याची शक्यता आहे. यामुळे पालकांना मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर नियंत्रण ठेवता येईल.६. गॅस सिलिंडरच्या दरात दिलासा?दर महिन्याच्या १ तारखेप्रमाणे, १ जानेवारीला गॅसचे नवीन दर जाहीर होतील. व्यावसायिक सिलिंडरपाठोपाठ घरगुती गॅस (LPG) सिलिंडरच्या किमतीतही कपात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.७. केंद्रीय कर्मचाऱ्यांची 'लॉटरी': ८ वा वेतन आयोग!१ जानेवारी २०२६ ही तारीख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरू शकते. या दिवसापासून ८ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची चर्चा आहे, ज्यामुळे पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होऊ शकते.८. सीएनजी आणि पीएनजी होणार स्वस्तसरकारच्या नवीन 'टॅक्स झोन सिस्टम' मुळे १ जानेवारीपासून सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG) च्या किमती कमी होऊ शकतात. यामुळे तुमचा प्रवास आणि घरातील स्वयंपाक दोन्ही स्वस्त होण्याची चिन्हे आहेत.९. पॅन-आधार लिंकिंगची 'डेडलाईन'जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल, तर १ जानेवारीपासून तुमचे पॅन कार्ड 'निष्क्रिय' होऊ शकते. यामुळे बँक खाते उघडणे, आयटी रिटर्न भरणे किंवा मोठे व्यवहार करणे कठीण होईल.१०. सायबर फसवणुकीला बसणार लगामडिजिटल फसवणूक रोखण्यासाठी UPI आणि सिम कार्ड पडताळणीचे नियम अधिक कडक होणार आहेत. संशयास्पद बँक खात्यांवर आणि मोबाईल नंबरवर विशेष नजर ठेवली जाईल, ज्यामुळे ऑनलाइन आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित होतील.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:30 am

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंदनवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक 'टर्निंग पॉइंट' ठरले आहे. नाममात्र जीडीपीनुसार भारताने जपानला मागे सारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान पटकावला आहे. याच काळात देशातील जॉब मार्केटमध्येही अभूतपूर्व तेजी पाहायला मिळाली असून, एका वर्षात तब्बल ९ कोटींहून अधिक नोकरीचे अर्ज प्राप्त झाले आहेत.'अपना.को' यांच्या 'इंडिया अॅट वर्क २०२५' अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत नोकरीसाठी येणाऱ्या अर्जांमध्ये २९ टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीमागे मेट्रो शहरांपलीकडे वाढलेली सेवा क्षेत्रे, महिलांचा वाढता सहभाग आणि डिजिटल रिक्रूटमेंट टूल्सचा वापर ही प्रमुख कारणे आहेत.या वर्षात नोकरी शोधणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. विशेषतः फायनान्स, प्रशासन, आरोग्यसेवा आणि कस्टमर एक्सपिरियन्स यांसारख्या क्षेत्रांत महिलांकडून येणाऱ्या अर्जांमध्ये ३६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. 'पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे'नुसार, अधिकाधिक महिला आता औपचारिक आणि संरचित करिअर मार्गाकडे वळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.भारताची युवाशक्ती रोजगार बाजारपेठेत आपले वर्चस्व सिद्ध करत आहे. सेवा आणि तंत्रज्ञान आधारित उद्योगांमध्ये तरुणांकडून येणाऱ्या अर्जांमध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दरवर्षी जवळपास १ कोटी तरुण नवीन नोकरीच्या शोधात कार्यबलात सामील होत असून, त्यांच्यामुळे भरती प्रक्रियेला मोठी गती मिळत आहे.महत्त्वाचे मुद्दे :अर्थव्यवस्था : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली.एकूण अर्ज: ९ कोटींहून अधिक (२९% वार्षिक वाढ).महिला सहभाग: ३६% अर्जांमध्ये वाढ.तरुण शक्ती: दरवर्षी १ कोटी नवीन तरुण रोजगाराच्या प्रवाहात.या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, भारत केवळ आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करत नसून, रोजगाराच्या बाबतीतही एक सक्षम आणि प्रगत राष्ट्र म्हणून उभे राहत आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:30 am

राज्य सेवा आयोगाची मेगाभरती! जाणून घ्या, अर्जाची शेवटची तारीख, पात्रता आणि जागा

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत चर्चा सुरू असुन भरतीच्या बातम्यांबाबत उत्सुकता असते. तुम्ही जर आयोगाच्या भरतीसाठी उत्सुक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ आणि गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे राज्य सेवा (सामान्य प्रशासन विभाग) आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा (महसूल व वन विभाग) यांमध्ये एकूण ८७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२५ ते २० जानेवारी २०२६ पर्यंत आहे.या भरती प्रक्रियेत एकूण ८७ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यामध्ये राज्य सेवेतील ७९ आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवेतील ८ जागांचा समावेश आहे. अर्जदार ३१ डिसेंबर २०२५ पासून २० जानेवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतील. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ऑनलाईनसाठी २० जानेवारी २०२६ असून, एसबीआय चलनद्वारे ऑफलाईन शुल्क २३ जानेवारी २०२६ पर्यंत भरता येईल. या भरतीमध्ये खेळाडू, दिव्यांग आणि अनाथ आरक्षणाचाही समावेश आहे. आयोगाने सादर केलेल्या जाहिरातीनुसार, भरती प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे. पूर्व परीक्षा, लेखी मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे असतील. ज्यात पूर्व परीक्षेचे गुण केवळ मुख्य परीक्षेसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी वापरले जाणार असून अंतिम निकालात त्यांचा समावेश नसेल.https://prahaar.in/2025/12/27/new-year-2026-news-10-rules-many-rules-changing-from-the-new-year/राज्य सेवेत भरल्या जाणाऱ्या जागेमध्ये उप मुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी) गट-अ पदासाठी १३ जागा, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ साठी ३२ जागा, सहायक गट विकास अधिकारी गट-ब साठी ३० जागा, उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब साठी ४ जागा आणि पशुवैद्यकीय अधिकारी गट-अ साठी ८ जागा भरल्या जातील. उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब या पदासाठी अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान पदवी किंवा विज्ञान शाखेची पदवी आवश्यक आहे.शैक्षणिक पात्रतेनुसार, राज्य सेवा परीक्षेसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे. सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ या पदासाठी वाणिज्य शाखेची पदवी (किमान ५५% गुणांसह), सनदी लेखापाल (CA) अंतिम परीक्षा उत्तीर्ण, परिव्यय लेखाशास्त्र अंतिम परीक्षा उत्तीर्ण, वाणिज्य पदव्युत्तर पदवी किंवा वित्त व्यवसाय प्रशासन (MBA) पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षेसाठी, पशुवैद्यकीय अधिकारी, गट-अ या पदाकरिता पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन स्नातक पदवी आवश्यक असून, महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, १९७१ नुसार नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:30 am

भारतीय महिलांचा श्रीलंकेवर एकतर्फी मालिका विजय

शफाली वर्माची ७९ धावांची वादळी खेळीनवी दिल्ली : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा सामना ८ विकेट्सने जिंकत एकतर्फी मालिका विजय नोंदवला आहे. तिसऱ्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांसह शफाली वर्माने वादळी कामगिरी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. शफाली वर्मा अर्धशतकी खेळी करत श्रीलंकेच्या संघाला एकटीच भारी पडली. यासह पाच सामन्यांची टी-२० मालिका भारतीय संघाने ३-० च्या फरकाने जिंकली आहे.दोन सामने विशाखापट्टणममध्ये खेळवल्यानंतर तिसरा सामना तिरुअनंतपुरम खेळवला गेला व या सामन्यातही भारतीय संघाने आपला दबदबा कायम ठेवला. हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत श्रीलंकेच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यासह श्रीलंकेचा संघ ११२ धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १३.२ षटकांत सामना जिंकला.श्रीलंकेने दिलेल्या ११३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती-शफाली फलंदाजीला उतरल्या. स्मृती मानधना तिसऱ्या सामन्यातही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली व १ धाव करत पायचीत होत बाद झाली. तर शफाली वर्माने गेल्या सामन्यातील फॉर्म कायम ठेवत २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. जेमिमा रॉड्रीग्ज ९ धावा करत बाद झाली. शफाली वर्माने या सामन्यात ४२ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७९ धावांची वादळी खेळी केली. शफाली वर्माला कर्णधार हरमनप्रीत कौरने चांगली साथ दिली. हरमनप्रीतने २१ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाने दणदणीत विजय मिळवला.प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने सुरुवात चांगली केली, पण मोठी धावसंख्या पुन्हा एकदा अपयशी ठरली. कर्णधार चमारी अट्टापटू लवकर बाद झाली. तर हसीनी परेराने २५ धावांची चांगली खेळी केली. तर इमेशा दुलानी २७ व कविशा दिल्हारी यांनी २० धावांची खेळी केली. कौशिनीने १९ धावांचे योगदान दिले. एकही खेळाडू अर्धशतक करू शकला. तर भारताकडून रेणुका सिंग ठाकूर व दीप्ती शर्माने उत्कृष्टगोलंदाजी केली. रेणुका सिंगने ४ षटकांत २१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.दीप्ती शर्माने ३ विकेट्स घेतल्या. यासह दीप्ती शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १५१ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:30 am

२००० कोटीपेक्षा अधिक मोठा घोटाळा पंजाब नॅशनल बँकेकडून उघड

मोहित सोमण: पंजाब नॅशनल बँकेने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये मोठा घोटाळा उघड केला आहे. दोन कंपन्यांच्या प्रवर्तकांनी २००० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचा घोटाळा केल्याचे स्पष्ट केले आहे. शुक्रवारी उशीरा एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत पीएनबी (Punjab National Bank) म्हटले आहे की, सेबीच्या कलम ३० एलओडीआर (LODR Act 2015) कायद्याच्या पूर्ततेनुसार बँकेने आरबीआयला संबंधित प्रवर्तकांनी केलेल्या घोटाळ्याची माहिती दिली आहे.' असे म्हटले आहे. एसईएफएल (SREI Equipment Finance SEFL) व एसआरईआय (SREI Infrastructure Finance Limited) या दोन कंपनीच्या प्रवर्तकांनी अनुक्रमे १२४०.९४ व ११९३.०६ कोटींच्या केलेल्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी एनसीएलटीने यावर यापूर्वीच कार्यवाही सुरू केली होती. बँकेने त्याची माहिती आरबीआयच्या पूर्ततेसाठी दिली असल्याचे एक्सचेंजला कळवले आहे.दोन्ही कंपन्यांनी २०२१ वर्षाच्या सुमारास संबंधित रक्कमेचे कर्ज काढले होते. परंतु दोन्ही प्रवर्तकांनी ही १००% रक्कम अद्याप भरली नसल्याचे बँकेने म्हटले. यानंतर एसआरईआय (SREI Infrastructure Finance Limited) कंपनीच्या दिवाळखोरीनंतर एनसीएलटीने (National Company Law Tribunal NCLT) दिवाळखोरी प्रस्तावावर काही यशस्वी ठराव मांडला होता. त्यानंतर कंपनीच्या पुनर्वसनासाठी एनएआरसीएल (National Asset Reconstruction Co NARCAL) कंपनीने आपल्या दिलेल्या माहितीनुसार, या यशस्वी प्रस्तावानुसार जुने संचालक मंडळ बरखास्त करून नवे संचालक मंडळ बनवले गेले आहे.उपलब्ध माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२१ मध्ये आरबीआयने प्रवर्तकांविरोधात दिवाळखोरीची प्रकिया सुरू केली होती. त्यानंतर २८००० कोटींच्या प्रलंबित थकबाकीवर कार्यवाही करण्यापूर्वी आरबीआयने दोन्ही कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. दुसऱ्या तिमाही दरम्यान बँकेचे एनपीए (Non Performing Assets NPA) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ४७५८२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ४०३४३ कोटींवर घसरले होते. असे असले तरी बँकेने ६४८ कोटींची राखीव तरतूद (Provision) नफापूर्व पातळीवर केली होती. दरम्यान पहिल्या तिमाहीत बँकेने ३९०९ कोटींची वसूली केली होती.पीएनबी भारतातील पहिल्या तीन सरकारी पीएसयु बँकापैकी एक बँक ओळखली जाते. सध्या बँकेच्या १०२२८ पेक्षा अधिक स्थानिक शाखा व २ आंतरराष्ट्रीय शाखा कार्यरत आहेत. बँकेच्या मुख्य शाखांची अधिक संख्या ग्रामीण व निमशहरी भागात तब्बल ६३.३% आहे. काल बँकेच्या शेअर्समध्ये ०.५% घसरण झाली असून बँकेचा शेअर १२०.३५ रुपये प्रति शेअरवर बंद झाला.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:30 am

ठाण्यात भाजप-शिवसेना युतीवर आजची डेडलाईन

भाजप स्वबळावर जाण्यास तयारठाणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर ठाण्यात भाजप आणि शिवसेना युती होणार की नाही, असा प्रश्न चर्चेत आहे. भाजपकडून शिवसेनेला उद्याची डेडलाईन देण्यात आली आहे. उद्यापर्यंत चर्चा झाली नाही तर परवा पासून भाजप स्वबळावर लढण्यास मोकळे असल्याचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी स्पष्ट केले. ठाण्यात युती विना किंवा युतीसह भाजप दोन्हीसाठी तयार असल्याचे मत आ.केळकर यांनी व्यक्त केले. आतापर्यंत झालेल्या चर्चेत काहीही निष्पन्न झाले नाही. शिवसेना उद्या तरी चर्चेला जाणार का? यावर ठाण्यातील युतीचे भविष्य अवलंबून आहे. युतीच्या दोन बैठका झाल्या आहेत. त्याच्यातून फारसे काहीही निष्पन्न झालेले नाही. उद्याची डेडलाईन आम्ही दिलेली आहे असे केळकर यांनी स्पष्ट केले.दरम्यान, भाजपने ठाण्यात घरोघरी प्रचार सुरू केला आहे. ''युतीसाठीचा फॉर्म्युला आम्ही पक्षश्रेष्ठींना दिलेला आहे. आजच आमची बैठक झाली आहे. प्रदेश अध्यक्षांकडे ज्या काही फॉर्म्युल्याच्या गोष्टी आहेत. जे काही भाजपाला युतीसंदर्भातील तपशील आहे तो त्यांना दिलेला आहे. आम्ही त्यांना सांगितले आहे की, उद्यापर्यंत निर्णय घ्यावा. ठाण्यात लोकांना युतीसह किंवा स्वतंत्रपणे लढण्याची सवय आहे. २०१७ ला स्वतंत्रपणे लढले होते. त्याआधी दोन वेळेला स्वतंत्रपणे लढले, तीन वेळा युतीसह लढले. त्याच्यामुळे मला असे वाटत नाही की ही स्फोटक अशी गोष्ट नाही. दोन्हींसाठी लोकांना सवय आहे. त्यामुळे आम्ही या दोन्ही पर्यायांसाठी सज्ज आहोत.''असे आ. केळकर म्हणाले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट झाली होती. मात्र, आ.केळकरांनी सूचक वक्तव्य केल्याने ठाण्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होणार का नाही? हे चित्र स्पष्ट होणे गरजेचे आहे. ठाण्यात भाजप-शिवसेना युती होईल की स्वतंत्र लढणार, हे उद्याच्या चर्चेनंतरच स्पष्ट होणार आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:10 am

मीरा-भाईंदरमध्ये आम्ही ८७ जागा लढवू !

भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या अटी; महायुतीत खळबळभाईंदर : मीरा–भाईंदर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाले असून भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेसमोर कठोर अटी ठेवल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या अटी मान्य न झाल्यास भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल, असा थेट इशाराच मेहता यांनी दिल्याने मीरा–भाईंदरमधील भाजप–शिवसेना युती धोक्यात आल्याचे चित्र आहे. पत्रकार परिषदेत मेहता यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप करत गेल्या महिनाभरात भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांना फोडण्यात आल्याचा दावा केला. शिवसेनेने पक्षात घेतलेले भाजपचे सर्व कार्यकर्ते तात्काळ सन्मानपूर्वक परत करावेत, ही पहिली आणि महत्त्वाची अट त्यांनी मांडली. युती टिकवायची असेल, तर कार्यकर्त्यांची पळवापळवी थांबली पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.शिवार गार्डनच्या जागेवरून वाद : दुसरी अट मीरा–भाईंदरमधील शिवार गार्डनच्या जागेशी संबंधित आहे. ही जागा शिंदे गटाच्या एका स्थानिक नेत्याने महापालिकेकडून भाडेतत्त्वावर घेतल्याचा आरोप मेहता यांनी केला. ही जागा तात्काळ महापालिकेला परत देऊन तेथे नागरिकांसाठी सार्वजनिक टाउन पार्क विकसित करावे, अशी मागणी त्यांनी केली. या मुद्द्यावरून भाजप–शिवसेना संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.जागावाटपावरून तणाव: जागावाटपावर बोलताना मेहता यांनी भाजपची ताकद अधोरेखित केली. भाजपने ६६ जागा स्वतःसाठी निश्चित केल्या असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ८ जागा देण्याचे ठरले आहे. उर्वरित २१ जागांपैकी शिवसेनेला केवळ १० ते १२ जागा देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. मात्र, शिवसेनेला ही संख्या मान्य होण्याची शक्यता कमी आहे. अटी मान्य न झाल्यास भाजप सर्व ८७ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवेल, असा अंतिम इशाराही मेहता यांनी दिला.सरनाईक–मेहता बैठकीकडे लक्ष : या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यात होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत अटींवर तोडगा निघतो की महायुतीचा तिढा अधिकच वाढतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:10 am

हेटवणे प्रकल्प : २९ डिसेंबरला सिडकोचा पहिलाच टनेल ब्रेकथ्रू

नवी मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्याला चालना मिळणारनवी मुंबई : नवी मुंबईला सातत्यपूर्ण आणि सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी राबवण्यात येणारा हेटवणे पाणीपुरवठा वाढीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २९ डिसेंबर रोजी महत्त्वाचा टप्पा गाठणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र राज्य रस्ते व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) पहिल्यांदाच टनेल ब्रेकथ्रू साध्य करणार असून, वॉटर टनेल पॅकेज-१ अंतर्गत वहाळ गावातील शाफ्ट-४ येथे हा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होणार आहे.नवी मुंबई तसेच सिडको विकसित परिसरातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडून राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पात १३.२५ किमी लांबीचा कच्च्या पाण्याचा टनेल आणि १५.४ किमी लांबीचा प्रक्रिया केलेल्या पाण्याचा टनेल उभारण्यात येत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिडकोची सध्याची १२० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणीपुरवठा क्षमता वाढून तब्बल २७० एमएलडी होणार आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिडकोकडून प्रथमच टनेल प्रकल्प राबवण्यात येत आहे. या पहिल्या टनेल ब्रेकथ्रूमुळे उर्वरित कामाला गती मिळणार असून, भविष्यात नवी मुंबईसाठी दीर्घकालीन पाणी सुरक्षेच्यादृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पॅकेज-१ अंतर्गत ८.७ किमी लांबीचा प्रक्रिया केलेल्या पाण्याचा टनेल उभारण्यात येत असून, त्यापैकी आतापर्यंत ५.५२ किमी खोदकाम पूर्ण झाले आहे. हा टनेल जमिनीखाली सुमारे १०० मीटर खोलीवरून जात आहे. डेक्कन सह्याद्री भागातील कठीण खडक, कामाच्या ठिकाणी मर्यादित जागा आणि साहित्य बाहेर काढण्यातील आव्हाने यामुळे प्रकल्पात अडचणी आल्या. सिडकोचे अभियंते आणि ठेकेदार कंपनीच्या पथकातील सातत समन्वयामुळे काम यशस्वीपणे पुढे सरकले. टनेल ब्रेकथ्रू नवी मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला नवे बळ देणारा ठरणार. शहराच्या विकासाला आवश्यक असलेली पाण्याची गरज भागवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:10 am

श्रीवर्धन नगर परिषदेत ‘गड आला, पण सिंह गेला’

नगरध्यक्षपदी उबाठाचा नगराध्यक्ष; राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ नगरसेवकश्रीवर्धन निवडणूक चित्ररामचंद्र घोडमोडे श्रीवर्धन : श्रीवर्धन नगर परिषद निवडणुकीच्या चुरशीच्या निव़डणुकीत ‘गड आला पण सिंह गेला’ अशी स्थिती युतीची झाली. उबाठाचे रायगडमधील अस्तित्व संपले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच मनसेच्या पाठिंब्यावर उबाठाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अतुल चौगुले यांनी बाजी मारीत ते नगराध्यक्ष पदी निवडून आले. त्यामुळे येथील राजकीय समीकरण बदलले असून, या निवडणुकीत युतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १५, भारतीय जनता पक्षाचे २, तर स्वतंत्र शिवसेना शिंदे गटाचे ३ उमेदवार निवडून आले आहेत.या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होती, तर शिवसेना उबाठा गटाने राष्ट्रीय काँग्रेसला सोबत घेत निवडणूक लढवली होती. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने येथे स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. पैकी शिंदे गटाला तीन जागा मिळाल्या, तर शरद पवार गटाला एकही जागा मिळाली नाही. श्रीवर्धन नगर परिषदेच्या मागील राजकीय इतिहासाकडे पाहता, याआधी प्रामुख्याने राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार निवडून येत होते. मात्र यंदा काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून न आल्याने काँग्रेस पूर्णतः बाहेर फेकली गेली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी श्रीवर्धन नगर परिषदेत भाजपचा एकही नगरसेवक निवडून येत नव्हता, मात्र यंदा भाजपचे दोन उमेदवार निवडून आल्याने ‘भाजप इन’ झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले. या निकालानंतर श्रीवर्धन नगर परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगराध्यक्ष, तर सत्तास्थानी राष्ट्रवादी काँग्रेस–भाजप व विरोधी बाकावर शिंदे गटाचे समीकरण राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, उबाठा गटाने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अतुल चौगुले निवडून आल्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, स्वतः नगराध्यक्ष अतुल चौगुले यांनी या चर्चांना पूर्णविराम देत कोणताही पक्षप्रवेश होणार नसल्याचे ठामपणे जाहीर केले आहे.नगराध्यक्ष अतुल चौगुले यांनी नगर परिषदेत यापुढे पारदर्शक कारभार केला जाईल, निकृष्ट दर्जाच्या कामांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. सर्वपक्षीय नगरसेवकांना विश्वासात घेऊनच शहराच्या विकासाची कामे केली जातील, असे स्पष्ट करतानाच निवडणुकी दरम्यान सोबत राहिलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांचे, राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे, तसेच जाहीरपणे पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही त्यांनी जाहीर आभार मानले.त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांचेही आभार मानले असून, हे कार्यकर्ते कोण हा मोठा विषय रंगत असून, खासदार सुनील तटकरे यांनाच आव्हान देणाऱ्या या कार्यकर्त्यांचा पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विचार होईल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. श्रीवर्धनच्या राजकारणात यंदाच्या निवडणुकीमुळे नवे समीकरण उदयास आले असून, आगामी काळात नगर परिषदेत सत्तेचा खेळ अधिक रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:10 am

उरण नगर परिषद नगराध्यक्ष निवडीत भाजपला धक्का

उरण निवडणूक चित्रविशाल सावंत उरण : उरण नगर परिषद निवडणुकीत झालेल्या चुरशीच्या निवडीत भाजपची स्थिती ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली आहे. या नगर परिषदेवर महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर या नगराध्यक्ष पदी निवडून आल्याने भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा शाह यांना पराभवाचा धक्का बसला.या नगर परिषदेत एक हाती भाजपची सत्ता होती. मात्र यावेळच्या उरण नगर परिषदेच्या चुरशीच्या निवडीत भाजपकडून ही नगरपालिका निसटली आहे. तेथे भाजपला २१ पैकी १२, तर महाविकास आघाडीला नऊ जागा मिळाल्या आहेत. उरणमध्ये महाविकास आघाडीने जोर लावल्याने महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या भावना घाणेकर या नगराध्यक्ष पदी निवडून आल्याने भाजप आमदार महेश बालदी यांना मोठा धक्का बसला आहे. उरण तालुक्यात भूमिपुत्रांचा रोष हा भाजप आमदार महेश बालदी आणि त्यांनी भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उभ्या केलेल्या उमेदवार शोभा शाह यांना मतदारांनी साफ नाकारले आणि या अटीतटीच्या चुरशीच्या लढतीत शोभा शाह यांना पराभवाला सामोरे जावे लागलेले, असले, तरी या नगर परिषदेत भाजपचे १२ नगरसेवक निवडून आले. ही संख्या सत्ता स्थापनेसाठी भाजपकडे पुरेशी असल्याची चर्चा भाजपत सुरू आहे.या निवडणुकीदरम्यान भाजप आणि महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. खासदार बाळ्या मामा असो किंवा जितेंद्र आव्हाड असो, स्वतः या नेत्यांनी या निवडणुकीत थेट सहभाग घेतला होता. दुसरीकडे आमदार महेश बालदी यांनी पूर्णपणे जोर लावला असतानाही भाजपला आपले नगराध्यक्ष पद गमवावे लागले. खरे तर या निवडणुकीत विकासाचे मुद्दे होतेच; परंतु येथे जातीचे, प्रांतवादाचे मुद्देही निर्णायक ठरले, तर दुसरीकडे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांनाही भाजपने विचारात न घेता, भाजप या निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरला होता. त्याचा परिणाम म्हणून बंडखोर उमेदवार यांनी भाजपची मते आपल्याकडे खेचल्याचे बोलले जाते. गेली १५ ते २० वर्षांची भाजपची सत्ता उलथून एक महिला षंडू ठोकून उभी राहिली आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी नगराध्यक्षा पदाचा पदभार स्वीकारला.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:10 am

स्वीकृत सदस्यत्वासाठी आतापासूनच ‘फिल्डिंग’

चार ठिकाणी १० नगरसेवकांना संधीगणेश पाटील पालघर : जिल्ह्यातील तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत ४ नगराध्यक्षांसह ९४ नवे नगरसेवक निवडून आले आहेत. आणि आता याच नगर परिषद, नगरपंचायतीमध्ये स्वीकृत १० सदस्यांची ( नगरसेवक) निवड केली जाणार आहे. त्यामुळे थेट निवडणुकीतून नाही जमले, मात्र स्वीकृत सदस्य म्हणून तरी पालिकेत जाता यावे यासाठी, अनेकांनी आपापल्या राजकीय नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये नामनिर्देशित सदस्य निवडण्याबाबत त्यांची पात्रता आणि नियुक्त्या करण्याची पद्धत शासनाने ठरवून दिली आहे. त्यानुसार नगर परिषदेमध्ये निवडून आलेल्या सदस्य संख्येच्या दहा टक्के किंवा ५ यापैकी जी संख्या कमी असेल तितके स्वीकृत सदस्य नगर परिषद किंवा नगरपंचायतीमध्ये निवडल्या जातात. या नियमानुसार पालघर नगर परिषदेच्या ३० नगरसेवकांच्या संख्येनुसार या ठिकाणी ३ स्वीकृत सदस्य निवडल्या जातील. डहाणू नगर परिषदेमध्ये एकूण २७ नगरसेवकांच्या संख्येनुसार दहा टक्के हे प्रमाण २.७ येते.दरम्यान, एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के ही संख्या पॉइंट ५ पेक्षा जास्त आल्यास त्याठिकाणी पूर्ण संख्या विचारात घेण्यात येते. त्यामुळे डहाणू नगर परिषदेमध्ये सुद्धा ३ स्वीकृत सदस्य निवडल्या जाणार आहेत. असेच गणित वाडा नगरपंचायतीला लागू पडते. परिणामी वाडा नगरपंचायतीमध्ये १७ नगरसेवक असल्याने येथे सुद्धा २ स्वीकृत सदस्य निवडावे लागणार आहेत. जव्हार नगर परिषदेच्या नगरसेवकांची संख्या २० असल्याने या ठिकाणी २ स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. नव्या नगराध्यक्षासह नगरसेवकांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर २५ दिवसांच्या आत पहिली सर्वसाधारण सभा घ्यावी लागते. याच सभेत नगर परिषद उपाध्यक्षांची निवड करावी लागते. तसेच स्वीकृत सदस्यांची नावे देखील याच सभेत जाहीर केल्या जातात. तथापि, येत्या दोन-तीन दिवसांमध्ये नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगराध्यक्षांची नावे राजपत्रात प्रसिद्ध होणार आहेत. त्यानंतर २५ दिवसाच्या आत पहिली सर्वसाधारण सभा होणार आहे. पहिल्या सर्वसाधारण सभेची तारीख निश्चित झाल्यानंतर त्या सभेच्या २४ तास पूर्वी राजकीय पक्ष, आघाडी किंवा गटाकडून स्वीकृत सदस्याचे नाव नामनिर्देशित करावे लागणार आहे. संबंधित नावांची छाननी जिल्हाधिकाऱ्यांकडून केली जाते. आणि पात्र नावे सभेचे पिठासीन अधिकारी म्हणजेच नगराध्यक्षांकडे पाठविले जातात. या अनुषंगाने नरसेवक होण्याची इच्छा असणाऱ्यांनी स्वीकृत सदस्य म्हणून पालिकेत जाण्यासाठी आपल्या नेत्यांकडे 'फील्डिंग' लावायला सुरुवात केली आहे.स्वीकृत सदस्य निवडीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्तीतीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्य निवड प्रक्रिया करण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी चार अधिकाऱ्यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पालघर नगर परिषदेसाठी पालघरचे उपविभागीय अधिकारी शाम मदनुरकर, डहाणू करिता सहा. जिल्हाधिकारी विशाल खत्री, जव्हार करिता सहा.जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर आणि वाडा नगरपंचायतीसाठी वाडा उपविभागीय अधिकारी संदीप चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर स्वीकृत सदस्यांचे नामनिर्देशन स्वीकारण्यासाठी जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम पोशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:10 am

पास्थळ महोत्सव २०२५

'जाणता राजा फाऊंडेशन'चा २७-२८ डिसेंबरला महोत्सव पालघर : पालघर तालुक्यातील पास्थळ येथील 'जाणता राजा फाऊंडेशन' आणि मीडिया पार्टनर 'दैनिक प्रहार'च्या संयुक्त विद्यमाने यंदा पालघरमध्ये मनोरंजनाचा आणि बक्षिसांचा महाकुंभ होणार आहे. पास्थळ व परिसरातील नागरिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी येत्या २७ आणि २८ डिसेंबर रोजी पास्थळच्या आंबटगोड मैदानावर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यंदाच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे 'दैनिक प्रहार पुरस्कृत' दोन विशेष भव्य स्पर्धा! यामध्ये महिलांसाठी 'खेळ पैठणीचा' आणि तरुणाईसाठी 'लोकधारा नृत्य स्पर्धा' रंगणार असून, पैठणी साडी, रोख रकमा आणि घरगुती उपकरणांच्या रूपात बक्षिसांची मोठी लूट करण्याची सुवर्णसंधी नागरिकांना मिळणार आहे.सहभागाचे आवाहन : जाणता राजा फाउंडेशन वर्षभर सामाजिक आणि क्रीडा कार्यात अग्रेसर असते. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश भरत, सचिव हितेश राऊत, खजिनदार निपुल घरत, सहसचिव जितेश घरत आणि सह-खजिनदार सौरभ घरत यांच्यासह सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत. तरी या महोत्सवाचा पास्थळ आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.२७ डिसेंबर : चिमुकल्यांचा उत्साह आणि सुरेल सायंकाळमहोत्सवाचा शुभारंभ शनिवार, २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. पहिल्या दिवशी प्रामुख्याने बालकांसाठी विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रंगभरण स्पर्धा : ४ ते ७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी. वेशभूषा स्पर्धा : ५ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांच्या कल्पकतेला व्यासपीठ मिळणार आहे. लाईव्ह आर्केस्ट्रा : सायंकाळी सुरेल गाण्यांच्या कार्यक्रमात नागरिक मंत्रमुग्ध होतील.२८ डिसेंबर : 'दैनिक प्रहार' पुरस्कृत भव्य स्पर्धां आणि आकर्षक बक्षिसेमहोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, २८ डिसेंबर रोजी स्पर्धांचा खरा थरार अनुभवायला मिळेल. 'दैनिक प्रहार' पुरस्कृत दोन मोठ्या स्पर्धा यावेळी आकर्षण ठरणार आहेत.१. खेळ पैठणीचा (सायंकाळी ४:३० वा.)घरातील कर्तृत्ववान महिलांसाठी 'खेळ पैठणीचा' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये तब्बल पाच आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे :१. प्रथम क्रमांक : सुंदर पैठणी साडी२. द्वितीय क्रमांक : डिनर सेट३. तृतीय क्रमांक : फ्राय पॅन४. चौथा क्रमांक : स्टायलिश पर्स५. पाचवा क्रमांक : सुवर्णदीप२. भव्य महाराष्ट्र लोकधारा (फोक डान्स) स्पर्धा (सायंकाळी ६.३० वा.)आपली संस्कृती आणि ऊर्जा दाखवण्यासाठी ही मोठी संधी आहे. विजेत्यांना खालीलप्रमाणे रोख पारितोषिके व ट्रॉफी प्रदान करण्यात येतील. प्रथम क्रमांक : ७,५०० रुपये + आकर्षक ट्रॉफी द्वितीय क्रमांक : ५,००० रुपये + आकर्षक ट्रॉफी तृतीय क्रमांक : ३,००० रुपये + आकर्षक ट्रॉफी

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:10 am

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भरनवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र सरकारने दुपारच्या भोजनासोबत सकाळचा सकस नाश्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात आणि कर्नाटक या राज्यांत यशस्वीपणे राबविलेल्या या उपक्रमानंतर आता देशातील इतर राज्यांनाही ही योजना अमलात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी दोन्ही राज्यांचे नियोजन व अंमलबजावणीचे मॉडेल सर्व राज्यांशी शेअर करण्यात आले असून, पीएम-पोषण योजनेच्या बैठकीत यासंदर्भातील स्वतंत्र कृतीआराखडा मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सकाळचा नाश्ता देण्याची ही संकल्पना नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणातील (एनईपी) शिफारशींनंतर पुढे आली आहे. विविध अभ्यासांचा दाखला देत एनईपीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, सकस नाश्ता मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते आणि काही तासांपर्यंत अवघड विषय आत्मसात करण्याची क्षमता सुधारते. देशातील अनेक विद्यार्थी सकाळी उपाशीपोटीच शाळेत येतात, ही बाब लक्षात घेऊन ही शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर गुजरात व कर्नाटक या राज्यांनी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला आहे.गुजरातमध्ये ‘सीएम-पौष्टिक अल्पाहार योजना’अंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज सुमारे २०० किलो कॅलरी ऊर्जा व ६ ग्रॅम प्रथिने मिळतील, असा नाश्ता दिला जातो. यात दूध व बाजरीसारख्या भरड धान्यांपासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये विद्यार्थ्यांना रागी हेल्थ मिक्स व दूध देण्यात येते, तसेच आठवड्यातून चार ते पाच दिवस अंडी व केळीही दिली जातात. मंत्रालयाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या दोन्ही राज्यांतील नाश्त्याच्या पद्धतींचा अभ्यास करण्यात आला असून, इतर राज्येही हा उपक्रम सहज राबवू शकतील. सध्या देशात सुमारे २५ कोटी शालेय विद्यार्थी असून, सकाळच्या नाश्त्याच्या योजनेमुळे त्यांच्या आरोग्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेतही सकारात्मक बदल अपेक्षित आहे.गुजरात, कर्नाटकातील मुलांना नाश्ता गुजरातमध्ये, मुलांना नाश्त्यात दररोज सरासरी २०० किलोकॅलरीज आणि ६ ग्रॅम प्रथिने देण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये दूध आणि बाजरीसारखे संपूर्ण धान्य समाविष्ट आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री-पोषक स्नॅक्स योजना सुरू केली आहे, जी शाळांमध्ये नाश्त्याच्या वेळी दिली जाते. कर्नाटकमध्ये, मुलांना नाश्त्यात नाचणीचे आरोग्य मिश्रण आणि दूध देखील दिले जाते. आठवड्यातून चार ते पाच दिवस अंडी आणि केल देखील दिले जातात. हा कार्यक्रम राज्य सरकार, अझीम प्रेमजी फाऊंडेशन आणि श्री सत्य साई अन्नपूर्णा ट्रस्ट यांच्या सहकार्याने चालवला जात आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:10 am

कोल्हापूरात काँग्रेसचं ठरलं! उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी?

Congress First List | कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या पहिल्या यादीमध्ये 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर राजेश लाटकर यांच्यासह अनेक दिग्गज माजी नगरसेवकांच्या नावाचा या यादीत समावेश आहे. या यादीत २९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच […] The post कोल्हापूरात काँग्रेसचं ठरलं! उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 9:55 am

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा फिस्कटण्यापासून ते कैलास खेरच्या लाईव्ह शोपर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा फिस्कटली दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र येत असल्याची चर्चा सुरू असताना आता त्यामध्ये ट्विस्ट आला आहे. दोन्ही राष्ट्रवादीची संभाव्य युती आता जवळपास फिस्कटल्याची माहिती आहे. घड्याळ की तुतारी, कोणत्या चिन्हावर लढायचं यावरुन ही युती फिस्कटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तातडीने महाविकास आघाडीच्या बैठकीत उपस्थिती लावत चर्चाही सुरू […] The post पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा फिस्कटण्यापासून ते कैलास खेरच्या लाईव्ह शोपर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 9:49 am

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची दखल घेत आता ही प्रक्रियाच ऑनलाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार आता पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने सदनिकांचे वाटप केले जाणार आहे. या नव्या प्रणालीनुसार ऑनलाइन पद्धतीत सदनिका ठरल्यानंतर अर्जदाराने ती स्वीकारायची की नाही, याबाबत केवळ पाच दिवसांच्या आत निर्णय कळवावा लागणार आहे. तसे न केल्यास ती सदनिका अन्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.शासकीय निवासस्थानांसाठी कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. यावर तोडगा म्हणून सामान्य प्रशासन विभागाने मुंबईतील शासकीय निवासस्थानांच्या वाटपाचे सुधारित धोरण निश्चित केले. अर्जदारांना आता https://ggms.maharashtra.gov.in या पोर्टलवरून सदनिकेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज सादर केल्यानंतर संबंधितांची नावे प्रतीक्षा यादीत घेतली जातील. प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना सदनिका उपलब्ध झाल्यानंतर एसएमएस किंवा ई-मेलद्वारे सूचना देण्यात येईल. संकेतस्थळ सुरू होण्यापूर्वी लेखी अर्ज केलेल्यांनाही या प्रणालीवर नोंदणी करावी लागेल; मात्र त्यांची प्रतीक्षा वरिष्ठता कायम राहणार आहे.अर्जदारांना त्यांच्या पात्रतेनुसार किमान एक आणि कमाल दहा प्राधान्यक्रम पोर्टलवर भरावे लागणार आहेत. तसेच प्राधान्यक्रम भरण्यासाठी प्रत्येक महिन्यात २० दिवसांचा निश्चित कालावधी दिला जाईल. या कालावधीच्या अखेरीस सामान्य प्रशासन विभाग अर्जदाराची माहिती पडताळून पाहणार आहे. त्यानंतर सदनिका वाटपाचा प्रस्ताव तयार करून अर्जदाराला कळविण्यात येईल. सदनिका स्वीकारणाऱ्या अर्जदारांची प्रकरणे सक्षम प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवली जातील, असे याविषयीच्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 9:30 am

महायुतीचे मुंबईतील जागावाटप ठरले

आता उमेदवार अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू ; बावनकुळेमुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अंतिम झाले असून, आता उमेदवारांच्या नावांची अंतिम यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिली.बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र बसून महायुतीच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली आहे. तिढा जवळपास सुटला आहे. आमच्या जागांवर आम्ही उमेदवार अंतिम करत आहोत. ज्या ठिकाणी वाद असतील ते चर्चेने सोडवले जातील. पण ९० ते ९५ टक्के जागांवर कोणतीही अडचण नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.भाजपची मुंबईत १३ मित्रपक्षांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. रिपाई, नागपुरातील जोगेंद्र कवडे आणि जयदीप कवडे यांच्याशीही संवाद सुरू आहे. त्या-त्या पातळीवर, त्या-त्या ठिकाणी, त्या-त्या पक्षाची क्षमता पाहून चर्चा सुरू आहे. या पक्षांना भाजप किंवा शिवसेनेच्या कोट्यातून जागा दिल्या जातील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.शरद पवार एनडीएत येणार का? या प्रश्नावर बावनकुळे यांनी भाष्य करण्यास नकार दिला. ते म्हणाले, एनडीएचे निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. हा अधिकार केंद्रीय भाजपला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी. नड्डा याविषयी ठरवतील. महाराष्ट्रात आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप-सेना महायुती म्हणून लढत आहोत. स्थानिक पातळीवर युती ठरत आहेत. त्याचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 9:30 am

भिवंडीसाठी ठाकरे बंधूंचे ठरले

पहिल्यांदाच सर्व ९० जागा लढणार, भाजप-शिवसेनेला आव्हानभिवंडी : भिवंडी महापालिकेत ठाकरेंची शिवसेना-मनसे एकत्र आल्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. तर काँग्रेस-पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. उबाठा आणि मनसेची युती निश्चित झाली आहे. या युतीच्या माध्यमातून ठाकरे बंधूंनी पहिल्यांदाच भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व ९० जागा लढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आतापर्यंत शिवसेनेने भिवंडीत कधीही सर्व जागा लढवल्या नव्हत्या. त्यामुळे हा निर्णय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडीनंतर भिवंडीचा राजकीय आखाडा तापताना दिसत आहे. २०१७ च्या भिवंडी महापालिका सभागृहातील १२ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मनसेसोबत युती करत सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्धार केला आहे.युतीच्या अंतिम सूत्रानुसार, शिवसेना उद्धव ठाकरे गट ८० जागांवर, तर मनसे १० जागांवर निवडणूक लढवणार आहे. सुरुवातीला मनसेकडून २० जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र ठाणे आणि भिवंडी येथे झालेल्या बैठकीनंतर चर्चेअंती १० जागांवर एकमत झाल्याने जागावाटपाचा तिढा पूर्णपणे सुटला आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना-मनसे युतीकडून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी निवडणूक तयारीला वेग दिला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी भिवंडी महापालिका निवडणूक एकत्रित लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची वरिष्ठ पातळीवर युती घोषित झाली आहे; परंतु स्थानिक पातळीवर स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे यावेळी भिवंडी महापालिका निवडणूक बहुरंगी आणि अत्यंत चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांची युती झाल्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजपसमोर मोठं राजकीय आव्हान उभं ठाकणार आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भिवंडीत नवे राजकीय समीकरण तयार झाले आहे. त्यामुळे भिवंडीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागल्याचं दिसंतय.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 9:30 am

Breaking : तुतारीला ‘राम कृष्ण हरी’करत काँग्रेसचा हात धरलेल्या प्रशांत जगतापांची उमेदवारी अडचणीत ?

Prashant Jagtap | तुतारीला ‘राम कृष्ण हरी’ करत काँग्रेसचा हात धरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची काँग्रेसकडून उमेदवारी अडचणीत आली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत २०१७ मध्ये निवडून आलेल्या प्रभाग प्रभाग क्रमांक २५ मधील दोन्ही जागांवर पवार गटाने दावा केला आहे. तसेच या जागांचा निर्णय स्वतः सुप्रिया सुळे घेतील असेही काँग्रेस […] The post Breaking : तुतारीला ‘राम कृष्ण हरी’ करत काँग्रेसचा हात धरलेल्या प्रशांत जगतापांची उमेदवारी अडचणीत ? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 9:22 am

चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णयनवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी दोन ऐतिहासिक निर्णय घेतले. एकीकडे चीनमधून होणाऱ्या स्वस्त आयातीला रोखण्यासाठी 'अँटी-डंपिंग' शुल्क लागू करण्यात आले आहे, तर दुसरीकडे कोळसा आणि लिग्नाइट खाणी सुरू करण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत केली आहे.चीनकडून होणाऱ्या स्वस्त आणि अयोग्य आयातीमुळे भारतीय उत्पादकांचे मोठे नुकसान होत होते. यावर लगाम लावण्यासाठी वित्त मंत्रालयाने चीनच्या दोन प्रमुख उत्पादनांवर पुढील पाच वर्षांसाठी अँटी-डंपिंग शुल्क लागू केले आहे.कोळसा खाणींसाठी ‘लालफितीचा कारभार’ संपणारकेंद्र सरकारने ‘कोलियरी कंट्रोल रूल्स, २००४’ च्या नियम ९ मध्ये सुधारणा केली आहे. या बदलामुळे कोळसा आणि लिग्नाइट खाणी सुरू करणे अधिक सोपे होणार आहे. यापूर्वी खाण सुरू करण्यासाठी किंवा १८० दिवसांहून अधिक काळ बंद असलेली खाण सुरू करण्यासाठी ‘कोळसा नियंत्रक संघटनेची’ पूर्वपरवानगी अनिवार्य होती. आता ही अट रद्द करण्यात आली.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 9:10 am

खोपोलीत शिवसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या

खोपोली : खोपोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची शुक्रवारी सकाळी अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. या हल्ल्यानंतर खोपोली शहरात खळबळ उडाली. काळोखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ खोपोलीत बंद पाळण्यात आला. हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, मयत मंगेश काळोखे यांचा पुतण्या राज काळोखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अजित पवार पक्षाचे रवींद्र देवकर यांची दोन मुले दर्शन आणि धनेश व त्यांचे अंगरक्षक तसेच खुनाच्या कटाला सहकार्य केल्याप्रकरणी अजित पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ता भरत भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगेश काळोखे हे सकाळी सात वाजता, त्यांच्या मुलांना शाळेत सोडून घरी परतत होते. यावेळी एका वाहनातून चार ते पाच अज्ञात इसम तिथे आले. त्यांनी धारदार शस्त्रांनी काळोखे यांच्यावर हल्ला चढवला. ज्यात काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे खोपोली परिसरात एकच खळबळ उडाली. सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना कार्यकर्ते म्हणून मंगेश काळोखे सुपरिचीत होते.काळोखे यांच्या पत्नी नुकत्याच पार पडलेल्या खोपोली नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमधून शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवली होती. त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यामुळे राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेनंतर खोपोलीत कडकडीत बंद पाळण्यात आला. आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामाकरून मृतदेह शासकीय रुग्णालयात आणला. शवविच्छेदनानंतर या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आरोपी पोलिसांना सापडले नसल्यामुळे महिलांनी आक्रोश केला असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान फरार झालेल्या आरोपींचा शोध पोलीस तपास करत आहेत. या घटनेनंतर खोपोली परिसरात वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी खोपोलीत दाखल झाले असून, त्यांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 9:10 am

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हातीनवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून, हीचे मुले भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 'वीर बाल दिवसा'निमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात भाषण केले. वीर बाल दिवस हा गुरू गोविंद सिंग यांच्या साहिबजादे-जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या अद्वितीय बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपण त्या शूर साहिबजादांचे स्मरण करत आहोत, जे आपल्या भारताचा अभिमान आहेत. ते भारताच्या धैर्याचे आणि शौर्याचे प्रतीक आहेत. वय आणि परिस्थितीच्या सीमा तोडणारे हे शूरवीर आहेत. ज्या राष्ट्राचा इतका गौरवशाली भूतकाळ आहे, ज्यांच्या तरुण पिढीला अशी प्रेरणा वारशाने मिळाली आहे.माझ्या देशाची तरुण पिढी आज या कार्यक्रमात आहे. एका अर्थाने, तुम्ही सर्व 'जेन-झी' आहात. काही 'जेन-अल्फा' देखील आहात. तुमची पिढी भारताला विकसित भारताच्या ध्येयाकडे घेऊन जाईल. मला प्रामाणिकपणे वाटते की, केवळ वयाने कोणीही लहान किंवा मोठा होत नाही. प्रत्येकाचे कर्तृत्व त्याला लहान-मोठा बनवत असते. तुम्ही तुमच्या कामातून आणि कामगिरीतून महान बनता. अगदी लहान वयातही तुम्ही अशी कामे करू शकता की इतर लोक तुमच्याकडून प्रेरणा घेऊ शकतात. तुम्ही भारताचे भविष्य आहात, असा मोलाचा संदेश मोदी यांनी युवांना दिला.पंतप्रधानांनी संस्कृतमधील एका श्लोकाचा उल्लेख करत सांगितले की, एखादे लहान मूल जर ज्ञानाची गोष्ट सांगत असेल, तर ती स्वीकारली पाहिजे. त्यांनी तरुण वयात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. “तुम्ही कमी वयात मोठी कामे करू शकता, आणि तुम्ही ते करून दाखवले आहे. मात्र, या यशाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. तुमची स्वप्ने आकाशापर्यंत न्या. देश ठाम निर्धाराने तुमच्या पाठीशी उभा आहे,” असे त्यांनी सांगितले.भूतकाळातील निराशेची आजच्या संधींशी तुलना करताना पंतप्रधान म्हणाले की, पूर्वी तरुण स्वप्ने पाहण्यास घाबरत होते, कारण जुन्या व्यवस्थेमुळे निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता देश प्रतिभेचा शोध घेत आहे आणि १४० कोटी नागरिकांच्या ताकदीवर आधारित भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. त्यांनी इंटरनेट, स्टार्टअप मिशन आणि लक्षीत विकासासाठी उभारलेल्या विविध प्लॅटफॉर्म्सचा उल्लेख केला.पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी)वर विशेष भर दिला. हे धोरण पाठांतराऐवजी व्यावहारिक शिक्षण, चिकित्सक विचारसरणी आणि प्रश्न विचारण्याला प्राधान्य देते, असे त्यांनी सांगितले. पहिल्यांदाच सरकार नव्या शिकण्याच्या आणि विचार करण्याच्या प्रक्रियेच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी नमूद केले. नवकल्पना आणि डिझाइन थिंकिंगला चालना देण्यासाठी अटल टिंकरिंग लॅब्सच्या भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 9:10 am

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हालमुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य लोकलच्या वेळापत्रकावर अवलंबून असते. मात्र येत्या शनिवार–रविवारच्या ब्लॉकमुळे मुंबईकरांसह पर्यटकांची मोठी गैरसोय होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी शनिवारी (दि. २७) रोजी तब्बल ३०० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी (दि. २८) रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कांदिवली–बोरिवलीदरम्यान पायाभूत कामे सुरू असून यासाठी २० डिसेंबरपासून पुढील ३० दिवसांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक १८ जानेवारी २०२६ पर्यंत असणार आहे. या कालावधीत शुक्रवार, दि. २६ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून शनिवारी सकाळी ७ वाजेपर्यंत अप व डाऊन मार्गिका बंद राहणार आहेत.या ब्लॉकदरम्यान कांदिवली ते दहिसरदरम्यान डाऊन जलद मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी पश्चिम रेल्वेवरील अप, डाऊन, जलद व धीम्या अशा सुमारे ३०० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. बोरिवलीपर्यंत धावणाऱ्या १४ लोकल फेऱ्या गोरेगावपर्यंतच चालवण्यात येतील. तसेच अंधेरीहून सुटणाऱ्या काही लोकल सेवा फक्त गोरेगावपर्यंतच धावणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे. पश्चिम रेल्वेवर दररोज सुमारे १,४०६ लोकल फेऱ्या चालतात. त्यापैकी ब्लॉक काळात सुमारे २० टक्के फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. नववर्षानिमित्त बाहेरगावी जाणारे प्रवासी आणि मुंबईत पर्यटनासाठी येणाऱ्यांनाही या ब्लॉकचा फटका बसणार आहे.दरम्यान, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान सकाळी ११.५ ते दुपारी ३.४५ या वेळेत जलद लोकल सेवांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. सीएसएमटीहून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच ठाण्याहून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या सर्व स्थानकांवर थांबतील.हार्बर मार्गावर सीएसएमटी–चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० या वेळेत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. सीएसएमटीहून वाशी/बेलापूर/पनवेल तसेच वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या आणि त्या दिशेने येणाऱ्या अनेक लोकल सेवा रद्द राहतील. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी प्रवास व्यवस्था व वेळापत्रक लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.प्रवाशांसाठी दिलासा आणि पर्यायी व्यवस्था विशेष लोकल: ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल चालवल्या जातील. प्रवासाची मुभा: हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.प्रशासनाचे आवाहन : पायाभूत सुविधांच्या मजबुतीकरणासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी हे ब्लॉक अत्यंत आवश्यक आहेत. प्रवाशांनी होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 9:10 am

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती फिस्कटल्याची माहिती समोर; काय आहे नेमकं कारण?

NCP Alliance Update | गेल्या काही दिवसांपासून पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. याबाबत दोन्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठकही पार पडली. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्येही दोन्ही राष्ट्रवादीच्या […] The post पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती फिस्कटल्याची माहिती समोर; काय आहे नेमकं कारण? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 9:02 am

‘हा तर संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का’

एअर प्युरिफायरवरील जीएसटी कपातीच्या हायकोर्टाच्या सूचनेवर केंद्र सरकारचा आक्षेपनवी दिल्ली : जीएसटी कमी करण्याच्या सूचनेमुळे न्यायालय कायदेविषयक क्षेत्रात हस्तक्षेप करत असून यामुळे ‘सेपरेशन ऑफ पॉवर्स’ संविधानाच्या या मूलभूत रचनेचे उल्लंघन होत असल्याचे शुक्रवारी केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले. राजधानी दिल्लीत वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर एअर प्युरिफायरचे वर्गीकरण वैद्यकीय उपकरणात करून त्याच्यावरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्यासाठीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली होती. २४ डिसेंबर रोजी या याचिकेवर सुनावणी झाली असता उच्च न्यायालयाने एअर प्युरिफायरवरील जीएसटी कमी करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर केद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली.या याचिकेची दखल घेतली गेली तर पुढे अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागेल. संविधानाच्या दृष्टिकोनातून संसदेसाठी हा काळजीचा विषय आहे, असे विधान केंद्र सरकारची बाजू मांडणाऱ्या महाधिवक्ताएन. वेंकटरमण यांनी केले. जीएसटीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संसदेच्या स्थायी समितीमध्ये तसा प्रस्ताव तयार करावा लागतो, त्यानंतर तो प्रस्ताव जीएसटी परिषदेच्या बैठकीत मंजुरीसाठी द्यावा लागतो. एवढी प्रक्रिया केवळ न्यायालयाच्या निर्देशामुळे खंडित कशी करता येईल? असा प्रश्न महाधिवक्ता यांनी उपस्थित केला.दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेला विरोध करत असताना महाधिवक्त्यांनी याचिकेचा हेतू आणि प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “ही जनहित याचिका बिलकूल वाटत नाही. जीएसटी हे फक्त डावपेचाचे कारण आहे. मात्र यामुळे पेंडोरा बॉक्स उघडण्याची भीती आहे. याचिका दाखल करून त्या माध्यमातून जीएसटी परिषदेला हे किंवा ते सांगणारा आदेशा मिळवला जात आहे. घटनात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास केंद्र सरकारला यात चिंता वाटते.”केंद्राच्या अधिकारावर गदा नको“संविधानाने सेपरेशन ऑफ पॉवर अंतर्गत प्रत्येक संस्थेचे अधिकार निश्चित केले आहेत. जीएसटी परिषदेला आपण निश्चित तारीख देऊ शकत नाही. आम्हाला यात एक अजेंडा दिसतो. जर एअर प्युरिफायरला वैद्यकीय उपकरण म्हणून वर्गीकृत केले तर परवाना आणि इतर बाबींबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतील. याचे नियमन करण्यासाठी एक यंत्रणा तयार केलेली आहे. न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे या प्रक्रियेला कसे काय खंडित करता येईल?”, असाही प्रश्न महाधिवक्त्यांनी केंद्र सरकारतर्फे उपस्थित केला.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 8:30 am

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णयमुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी पुरस्कार उपाधी नाहीत असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे, ते एखाद्या व्यक्तीच्या नावापूर्वी किंवा नंतर वापरता येत नाहीत. न्यायालयाने एका याचिकेच्या केस शीर्षकात ‘पद्मश्री’ शब्दाच्या वापराबद्दल हे निरीक्षण नोंदवले. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी सुरू होती. २००४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकर हे देखील एक पक्ष होते. त्यांचे नाव केस शीर्षकात ‘पद्मश्री डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकर’ असे सूचीबद्ध केले होते. न्यायाधीशांनी यावर आक्षेप घेत म्हटले की, हे कायद्यानुसार बेकायदेशीर आहे, असे स्पष्ट केले.उच्च न्यायालयाने १९९५ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयाचा हवाला दिला. त्या निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले होते की पद्म पुरस्कार आणि भारतरत्न ही उपाधी नाही आणि नावापूर्वी किंवा नंतर वापरली जाऊ नयेत. न्यायमूर्ती सुंदरेसन यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय संविधानाच्या कलम १४१ अंतर्गत सर्वांना लागू आहे आणि त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. पुढील कायदेशीर कार्यवाहीमध्ये सर्व पक्ष आणि न्यायालये या नियमाचे पालन करतील, असे निर्देश त्यांनी दिले.पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातातदेशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. हे पुरस्कार कला, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय, उद्योग, वैद्यक, साहित्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेसाठी दिले जातात. २०२५ मध्ये एकूण १३९ व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. ७ पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्रींचा समावेश होता.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 8:30 am

भाईजानचे साठीत पदार्पण! वाढदिवसानिमित्त वांद्रे-वरळी सिलिंक खास रोषणाई

मुंबई: बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानने साठीमध्ये पदार्पण केले आहे. सलमान आज त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करणार आहे. सलमानच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांमध्येही वेगळाच उत्साह दिसून येत आहे. सलमानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी झाला असून आज ६०व्या वयात ही सिनेसृष्टीत तो तेवढाच सक्रिय आणि 'फिट' आहे, जेवढा तो त्याच्या तारुण्यात होता. मुळात भाईजान आता साठीचा झाला आहे हे त्याच्या दिसण्यावरून जाणवतही नाही. आजच्या वाढदिवसाची एक खास गोष्ट म्हणजे, ६०व्या वाढदिवसानिमित्त वांद्रे-वरळी सिलिंक वर सलमानची प्रतिमा असलेली रोषणाई करत त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.सिनेसृष्टीत गेल्या तीन दशकांपासून बॉक्स ऑफिसवर राज्य करणाऱ्या सलमानचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत रंजक आणि चढ-उतारांचा राहिला आहे. सलमानने १९८८ मध्ये 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून एका साहाय्यक भूमिकेद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, खऱ्या अर्थाने त्याला ओळख मिळवून दिली ती १९८९ मध्ये आलेल्या 'मैने प्यार किया' या चित्रपटाने. या सिनेमासाठी त्याला सुरुवातीला केवळ ३१,००० रुपये मानधन मिळाले होते, जे नंतर वाढवून ७५,००० रुपये करण्यात आले. या चित्रपटाने सलमानला रातोरात 'स्टार' बनवले.गाजलेले चित्रपटसलमानच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले, पण त्याने प्रत्येक वेळी कमबॅक केले. ९० च्या दशकात त्याचे साजन, हम आपके हैं कौन, करण अर्जुन, हम दिल दे चुके सनम हे सिनेमे गाजले तर.२००९ नंतर वॉन्टेड, दबंग, बॉडीगार्ड, एक था टायगर, अशा काही सिनेमांनी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. तर बजरंगी भाईजान, सुलतान, टायगर जिंदा है या सिनेमांनी कोट्यावधींची कमाई करत त्याला पुन्हा सुपरस्टार केले. अशाप्रकार भाईजानने आजवर विविध साहसी, प्रेमळ भुमिकांनी चाहत्यांचे मन जिंकले आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 8:10 am

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाईमुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १० डिसेंबर रोजी या कायद्याच्या मसुद्याला मान्यता दिली. त्यानंतर, महाराष्ट्र शासनाने याबाबतचे अध्यादेश जारी केले आहेत. गेल्या काही वर्षांत नक्षलवादी संघटनांनी जंगलातील लढ्याऐवजी शहरांमध्ये शिरकाव करून आपली रणनीती बदलली आहे. विशेषतः विद्यापीठे, संशोधन संस्था आणि बुद्धिजीवी वर्तुळांमधून सामाजिक अस्थिरतेचे बीज रोवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे ‘अर्बन नक्षल’ हिंसेपेक्षा व्यवस्थेला आतून कमकुवत करण्यावर भर देतात. अशा अदृश्य शक्तींविरोधात कठोर कारवाईसाठी फडणवीस सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.या कायद्यात 'बेकायदेशीर कृत्य' याची अत्यंत स्पष्ट आणि विस्तृत व्याख्या देण्यात आली आहे. सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता किंवा प्रशांतता यांना धोका निर्माण करणे. न्यायदानात किंवा कायद्याद्वारे स्थापित संस्थांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये हस्तक्षेप करणे. लोकसेवकाला कायदेशीर अधिकारांचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी बळाचा वापर करणे किंवा दहशत निर्माण करणे. हिंसाचार, विध्वंसक कृती किंवा लोकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या कृतींमध्ये सामील असणे किंवा त्यांचा प्रचार करणे. अग्निशस्त्रे, स्फोटके किंवा इतर साधनांचा वापर करणे किंवा त्याला प्रोत्साहन देणे. रेल्वे, रस्ते, हवाई किंवा जलमार्गाद्वारे होणाऱ्या दळणवळणामध्ये व्यत्यय आणणे. प्रस्थापित कायद्याची आणि कायद्याद्वारे स्थापित संस्थांची अवज्ञा करण्यास प्रोत्साहन देणे, प्रशासनाविरोधातील खुले आव्हान इत्यादी कृतीही या व्याख्येत येतात.‘हे’ कारवाईस पात्र ठरणार बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्या व्यक्ती आणि संघटना : ज्या व्यक्ती किंवा संघटना सार्वजनिक सुरक्षा, शांतता किंवा कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारी कृत्ये करतात. संबंधित किंवा संलग्न बाबींमध्ये सामील व्यक्ती/गट : जे वरील बेकायदेशीर कृत्यांशी संबंधित आहेत किंवा त्यांना प्रोत्साहन देतात, मदत करतात किंवा सहाय्य करतात.बेकायदेशीर संघटनेचा सदस्य असणे, बैठकांमध्ये भाग घेणे, देणगी देणे किंवा स्वीकारणे : अशा व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल.काय शिक्षा होणार बेकायदेशीर कृतीत सहभागी व्यक्ती/गट → ७ वर्षांपर्यंत कारावास + ५ लाखांपर्यंत दंड. बेकायदेशीर संघटनेचे सदस्य/सहयोगी → ३ वर्षांपर्यंत कारावास + ३ लाखांपर्यंत दंड. अशा संघटनेच्या बैठकीत सहभागी वा आर्थिक मदत करणारे → तीन वर्षांपर्यंत शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही. गुन्हे अजामीनपात्र व दखलपात्र असतील. पोलिसांना वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 8:10 am

अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही !

भारताचा बांगलादेशला गंभीर इशारासुमारे तीन हजार हल्ल्यांचा पुरावानवी दिल्ली : बांगलादेशातील ढासळती कायदा-सुव्यवस्था आणि अल्पसंख्याक हिंदू समाजावर होणारे हल्ले यावर भारत सरकारने शुक्रवारी तीव्र चिंता व्यक्त केली. बांगलादेशात दीपू चंद्र दास या हिंदू युवकाची करण्यात आलेली निर्घृण हत्या अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत, भारत सरकारने बांगलादेशातील अंतरिम सरकारला या प्रकरणी तातडीने न्याय देण्याचे आवाहन केले आहे.भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी पत्रकार परिषदेत एका धक्कादायक आकडेवारी दिली. बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या कार्यकाळात हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या सुमारे तीन हजार घटनांची नोंद आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 8:10 am

‘कुलदीप सेंगर आम्हाला 5 हजार किमी दूरून मारून टाकेल’:रेप पीडितेने सांगितले- त्याची मुलगी CBI अधिकाऱ्याला भेटली, बृजभूषणने शिक्षा निलंबित केली

‘5 किमी काय, 5 हजार किमी सुद्धा त्याच्यासाठी काहीच नाही. तो आम्हाला कुठेही मारू शकतो. माझ्यासाठी आयुष्यभराचा धोका आहे. तो मेल्यानंतरही धोका राहील, कारण त्याच्या लोकांना माझा चेहरा आठवेल की याच मुलीने आमच्या आमदाराला तुरुंगात पाठवले होते.’ उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी हे बोलताना भावुक होते. 23 डिसेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात भाजपचे माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर यांची शिक्षा निलंबित केली. सेंगरला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. न्यायालयाने जामीन देताना ही अट ठेवली की कुलदीप सेंगरने पीडितेपासून 5 किमी दूर राहावे. पीडितेचे म्हणणे आहे की या निर्णयाने आमच्या आशा तोडल्या आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर दैनिक भास्करने पीडितेशी आणि तिच्या आईशी संवाद साधला. त्यांनी CBI आणि भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांच्यावर सेंगरला मदत केल्याचा आरोप केला. आम्ही पीडितेच्या वकिलांकडून आणि कायदेतज्ञांकडूनही समजून घेतले की कुलदीप सेंगरची शिक्षा निलंबित होण्याचे काय अर्थ आहेत. तरीही, शिक्षा निलंबित होऊनही कुलदीप सेंगरला तुरुंगातच राहावे लागेल, कारण 2020 मध्ये पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी त्याला 10 वर्षांची शिक्षा झाली आहे. या निर्णयाविरुद्धही कुलदीप सेंगरने दिल्ली उच्च न्यायालयात अपील केली आहे. ‘लोक धमकी देऊन जातात की जास्त दिवस जगात राहणार नाहीस’पीडितेवर 4 जून 2017 रोजी बलात्कार झाला होता. आरोप आमदार कुलदीप सेंगरवर होता, त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले. पीडितेने पोलीस ठाण्यात सुनावणी न झाल्याने मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर कुलदीप सेंगरला 13 एप्रिल 2018 रोजी अटक करण्यात आली. पीडित आणि त्यांचे कुटुंब दिल्लीत राहत आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी CRPF चे 9 जवान तैनात असतात. पीडित म्हणतात, 'न्यायालयाच्या निर्णयामुळे बहिणी-मुलींचे धैर्य कमी झाले आहे. माझ्यावर अन्याय होत आहे. न्यायाधीश मला म्हणायचे की तुम्ही काही बोलू शकत नाही. तुमचे वकील बोलतील. माझीच केस, माझ्यावर बलात्कार झाला आणि मलाच बोलण्यापासून रोखण्यात आले.' पीडितेचा दावा आहे की त्यांना आजही धमक्या मिळतात. त्या म्हणतात, 'लोक बाजूने जाताना म्हणतात की जास्त दिवस जगात राहू शकणार नाहीस. असे बोलतात की CRPF वालेही समजू शकत नाहीत. माहित नाही, मला कधी मारले जाईल.' 'CBI ने व्यवस्थित युक्तिवाद केला असता तर जामीन मिळाला नसता'न्यायालयाच्या निर्णयानंतर पीडितेने आपल्या आईसोबत आणि महिला हक्क कार्यकर्त्या योगिता भयाना यांच्यासोबत इंडिया गेटवर आंदोलन केले होते. यावर त्या म्हणतात, 'मी धरणे देण्यासाठी गेले होते. मला सांगण्यात आले की याला परवानगी नाही. मग बलात्कार करायला परवानगी आहे का, बहिणी-मुलींना छेडायला परवानगी आहे का.' ‘सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे की कुत्र्यांना रस्त्यांवरून हटवावे. कुत्र्यांना न हटवता बलात्काराच्या दोषींना हटवावे, जेणेकरून बहिणी-मुलींना न्याय मिळू शकेल. कुत्रे राहिले तर किमान मुलींना बाहेर पडल्यावर सुरक्षा मिळेल. हा निर्णय पाहता असे वाटते की महिलांना न्याय मिळणे कठीण आहे.’ पीडित आरोप करते की कुलदीप सेंगरला जामीन मिळवून देण्यात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा हात आहे. सरकार त्यांना घाबरते. त्यांनीही कुस्तीपटू मुलींसोबत चुकीचे केले होते. CBI वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्या म्हणतात, 'जर CBI ने व्यवस्थित युक्तिवाद केला असता, तर त्याला जामीन मिळाला नसता. कुलदीप सेंगरची मुलगी युक्तिवादादरम्यान कोर्टात येत असे. ती मागून येऊन CBI च्या तपास अधिकाऱ्याला भेटत असे. मी हे कोर्टात पाहिले आहे.' आई म्हणाली- ज्याला फाशी व्हायला पाहिजे होती, त्याला जामीन मिळालापीडितेची आई देखील त्यांच्यासोबत आहे. त्या म्हणतात, 'कोर्टाने चांगले केले नाही. कुलदीप सेंगरला जामीन मिळणे चुकीचे आहे. त्याला तर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. आम्ही आठ वर्षे लढा दिला आहे. माझ्या पतीला उन्नावमध्ये मारहाण करून ठार मारण्यात आले. मुलांना अनाथ केले.' ‘सरकारने कुलदीप सेंगरचा जामीन रद्द करावा. जोपर्यंत असे होत नाही, तोपर्यंत आम्ही धरणे-प्रदर्शन करणे बंद करणार नाही. माझी मुले भरकटत आहेत. हा कसला न्याय आहे. माझ्या कुटुंबाची सुरक्षा कमी केली आहे. उन्नावमध्ये साक्षीदार आहेत, त्यांची सुरक्षा काढून टाकली आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितले होते की, त्यांना सुरक्षेची गरज आहे. कुलदीप सेंगरला मोठे नेते वाचवत आहेत.’ कुलदीप सेंगरची शिक्षा कोणत्या आधारावर निलंबित झाली?शिक्षा निलंबित करणे हे जामिनासारखेच आहे. शिक्षा झालेल्या व्यक्तीला शिक्षेविरुद्ध अपील करण्याचा अधिकार असतो. उच्च न्यायालयाला शिक्षा निलंबित करून जामीन देण्याचा अधिकार आहे. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथन यांच्या खंडपीठाने कुलदीप सेंगरची शिक्षा निलंबित केली आहे. आमदाराला 'लोकसेवक' न मानण्याचा युक्तिवाद न्यायालयाने स्वीकारत हा निर्णय दिला. हे निलंबन अपीलावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत राहील. बलात्कार प्रकरणात दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने IPC आणि POCSO च्या कलमांखाली कुलदीप सेंगरला दोषी ठरवले होते. 20 डिसेंबर 2019 रोजी कनिष्ठ न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सेंगरच्या वकिलांनी 2020 मध्ये याला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. POCSO च्या कलम-5 मध्ये गंभीर लैंगिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. कलम-5(C) हे अल्पवयीन मुलींसोबत लोकसेवकाने केलेल्या गंभीर लैंगिक हिंसाचाराबद्दल आहे. त्याचप्रमाणे, IPC च्या कलम 376 (2) मध्ये देखील लोकसेवकाने केलेल्या बलात्कारावर शिक्षेची तरतूद आहे. उच्च न्यायालयात आमदाराला लोकसेवक न मानण्याची विनंती करण्यात आली होती. न्यायालयासमोर प्रश्न हाच होता की कुलदीप सेंगरला लोकसेवक मानले जावे की नाही. सेंगरच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता की, ट्रायल कोर्टाने 1997 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाच्या आधारावर दोषीला 'पब्लिक सर्व्हंट' (लोकसेवक) मानले होते. त्या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपी आमदाराला 'पब्लिक सर्व्हंट' मानले गेले होते. पॉक्सो (POCSO) कायद्याच्या कलम-2 (2) मध्ये 'पब्लिक सर्व्हंट'ची व्याख्या आयपीसी (IPC) च्या कलम-21 मधून घेण्यात आली आहे. यानुसार आमदाराला 'पब्लिक सर्व्हंट' मानले जात नाही. ‘सर्वोच्च न्यायालयाने आमदार-खासदारांना लोकसेवक मानले, उच्च न्यायालयाने नाही’हा प्रश्न आम्ही ज्येष्ठ वकील आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष दुष्यंत दवे यांना विचारला. ते म्हणतात की एका आमदाराला लोकसेवक न म्हणणे, दुर्दैवी आहे. आमदार संविधानानुसार शपथ घेतो. विधानसभेचा सदस्य बनतो आणि जनतेची कामे करण्यासाठी निवडला जातो. आमदारांना भत्ते मिळतात, तर यांना लोकसेवक न म्हणणे आश्चर्यकारक आहे. प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ॲक्ट अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आमदार आणि खासदार सार्वजनिक सेवक आहेत, पॉक्सो (POCSO) तर आणखी कठोर कायदा आहे. यात उच्च न्यायालयाने आमदारांना सार्वजनिक सेवक न मानणे हा अन्याय आहे. दवे पुढे म्हणतात, ‘पॉक्सो (POCSO) अल्पवयीन मुलांविरुद्ध, विशेषतः मुलींविरुद्ध होणारे गुन्हे रोखण्यासाठी आणला गेला होता. उच्च न्यायालयाने या कायद्याचा अर्थ उदारपणे लावायला हवा होता. याचा अर्थ असा लावला पाहिजे की त्याचा फायदा पीडितेला मिळावा, दोषीला नाही.’ ‘न्यायालयाने कायद्याचे कलम-४ देखील पाहिले असते, ज्यात सामान्य लोकांना जन्मठेपेपर्यंतची शिक्षा दिली जाऊ शकते. पीडितेवर बलात्कार झाला, तिच्या वडिलांना मारण्यात आले, तिच्या वकिलाचा मृत्यू झाला. या सर्व गोष्टी उच्च न्यायालयाने विचारात घ्यायला हव्या होत्या. फक्त सार्वजनिक सेवकाच्या तांत्रिक बाजूचा विचार करून निर्णय देणे बेजबाबदारपणाचे आहे. कायद्यामागील उद्देश काय आहे, हे पाहून जामीन मंजूर करायला नको होता.’ दवे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे की न्यायाधीशांनी ट्रायल कोर्टाचे निष्कर्ष योग्यरित्या वाचले नाहीत. त्याची योग्य प्रकारे तपासणी केली नाही. तो दोषी व्यक्ती आहे. हा कोणताही प्रलंबित खटला नव्हता. वकील म्हणाले- उच्च न्यायालयाने दोषीवर दया केली, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊपीडितेचे वकील महमूद प्राचा म्हणतात, ‘न्यायालयाने कुलदीप सेंगरला दयेचा पात्र मानले, पीडित मुलीला नाही. न्यायालयाला आणखी थोड्या सखोलतेने जाण्याची गरज होती. निलंबनाच्या प्रकरणांमध्ये अति-तांत्रिक गोष्टींमध्ये जाण्यास मनाई आहे. हे सर्वोच्च न्यायालयानेच म्हटले आहे.’ प्राचा म्हणतात की, जे आधार सांगितले आहेत, त्यावर शिक्षेचे निलंबन होऊ नये. त्याच आधारावर आम्ही या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. ते सीबीआयवरही आरोप करतात की, तपास यंत्रणा पहिल्या दिवसापासून कुलदीप सेंगरला मदत करण्याचा आणि त्याला निर्दोष सोडवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, सेंगरविरुद्ध इतके पुरावे होते की, कनिष्ठ न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली होती.

दिव्यमराठी भास्कर 27 Dec 2025 7:40 am

थंडीचा पारा चढला! राज्यातील लाट ओसरली; जाणून घ्या शहराचं तापमान

प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्यातील किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाल्यामुळे मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील थंडीची लाट ओसरत आहे. तर अहिल्यानगर, पुणे, नाशिक, मालेगाव आणि विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान ९ अंशापर्यंत खाली नोंदविल्यामुळे गारठा चांगलाच जाणवत आहे. तर अन्य जिल्ह्यातील थंडीचा पारा १० ते ११ अंशाच्या पुढे गेला आहे.राज्यातील मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांश […] The post थंडीचा पारा चढला! राज्यातील लाट ओसरली; जाणून घ्या शहराचं तापमान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 7:30 am

MHADA Lottery: म्हाडाच्या ४ हजार घरांचा ‘लकी ड्रॉ’अडकला; आचारसंहितेचा फटका की मिळणार परवानगी?

प्रभात वृत्तसेवा पुणे – म्हाडा पुणे विभागाने 4 हजार 186 घरांसाठी सोडत घेण्यासाठी परवानगी देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या माध्यमातून दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील सोडतीमध्ये संपूर्ण राज्यातून नागरिकांचे एकूण २ […] The post MHADA Lottery: म्हाडाच्या ४ हजार घरांचा ‘लकी ड्रॉ’ अडकला; आचारसंहितेचा फटका की मिळणार परवानगी? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 7:25 am

Pune Shivsena: डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या बंगल्यासमोर आंदोलन; शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याआधीच जागावटपावरून शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहे. मात्र, वादाची ठिणगी पेटवणारा कोण? पक्षात कोण शिवसैनिकांची डोकी भडकवत आहे, गटा-तटाचे राजकरण कोण करते, यावर पक्षाने गांभीर्याने लक्ष देऊन लगाम लावणे आवश्यक असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. भाजप केवळ १५ जागा देऊन आमची चेष्टा करत […] The post Pune Shivsena: डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या बंगल्यासमोर आंदोलन; शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 7:15 am

भाजपची फिल्डिंग तयार! १४५ उमेदवारांची यादी फायनल; पहिली यादी रविवारी येणार?

प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिका निवडणुकीसाठी सर्वाधिक इच्छुक असलेल्या भाजपने महायुतीच्या जागा वगळता इतर १४० ते १४५ उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. ही यादी आता जाहीर केल्यास मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता असल्याने भाजप पहिली यादी रविवारी तर नंतर बाकीच्या दोन याद्या जाहीर करण्याची शक्यता आहे. बंडखोरी टाळण्यासाठी तीन टप्प्यात यादी जाहीर करण्याची खेळी केली […] The post भाजपची फिल्डिंग तयार! १४५ उमेदवारांची यादी फायनल; पहिली यादी रविवारी येणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 7:15 am

SPPU News: आरटीआय आदेशांवर पुणे विद्यापीठाची पळवाट? शासनाच्या पारदर्शकतेच्या निर्णयाला हरताळ

प्रभात वृत्तसेवा पुणे – माहिती अधिकार कायद्यांतर्गत दर सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत नागरिकांना कागदपत्रे पाहण्यासाठी खुली ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याबाबत संदिग्ध भूमिका घेतली आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्वतंत्र आदेश दिले नसल्याची तांत्रिक पळवाट काढत विद्यापीठाने शासनाच्या आदेशालाच हरताळ फासल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष […] The post SPPU News: आरटीआय आदेशांवर पुणे विद्यापीठाची पळवाट? शासनाच्या पारदर्शकतेच्या निर्णयाला हरताळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 7:10 am

Pune Railway: ख्रिसमस-नववर्ष गर्दीसाठी रेल्वे सज्ज! पुणे-नागपूरसह ३ मार्गांवर विशेष गाड्या

प्रभात वृत्तसेवा पुणे – हिवाळा आणि ख्रिसमस, नव वर्षाच्या स्वागतामुळे रेल्वेला मोठी गर्दी होत असल्याने मध्य रेल्वेने पश्चिम मध्य रेल्वेशी समन्वय साधून नागपूर – हडपसर, पुणे – नागपूर आणि राणी कमलापती – हडपसर दरम्यान विशेष शुल्कासह रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-हडपसर मार्गावर विशेष रेल्वेच्या चार, राणी कमलापती-हडपसर-राणी कमलापती रेल्वेच्या प्रत्येकी तीन तर पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक […] The post Pune Railway: ख्रिसमस-नववर्ष गर्दीसाठी रेल्वे सज्ज! पुणे-नागपूरसह ३ मार्गांवर विशेष गाड्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 7:05 am

महापालिकेचा दणका! निवडणूक कर्तव्यात कसूर, कनिष्ठ अभियंत्याचं थेट निलंबन

प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महापालिका निवडणूक विषयककामासाठी हजर न झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली. कोंढवा- येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडील निवडणूकविषयक कर्तव्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता अस्मिता गाडीवडर यांची नियुक्ती केलेली असताना त्या कर्तव्यावर हजर झालेल्या नाहीत. त्यामुळे तात्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर गव्हाड […] The post महापालिकेचा दणका! निवडणूक कर्तव्यात कसूर, कनिष्ठ अभियंत्याचं थेट निलंबन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 7:00 am

इच्छुकांचा महापूर! महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी झुंबड; पालिकेची दमछाक

प्रभात वृत्तसेवा पुणे : काहीही झाले तरी महापालिका निवडणूक लढवायचीच, असा चंग बांधलेल्या इच्छुकांनी गेल्या तीन दिवसांत तब्बल ९ हजार १०१ उमेदवारी अर्ज खरेदी केले आहे. त्यामुळे आतापर्यंत प्रत्येक जागेसाठी सरासरी ५५ अर्जांची विक्री झाली आहे. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढया मोठया प्रमाणात अर्ज विक्री झाली असून अर्ज देताना पालिकेची चांगलीच दमछाक होत आहे. महापालिका निवडणुका […] The post इच्छुकांचा महापूर! महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी झुंबड; पालिकेची दमछाक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 7:00 am

‘4500 टका दिले, एजंटने भारतात पोहोचवले’:बांगलादेशातून आलेले घुसखोर, पोलिसात शिपाई; SIR नंतरही मतदार यादीत नाव

दलालांच्या माध्यमातून भारतात आले. आधार कार्डपासून ते मतदार ओळखपत्रापर्यंत सर्व काही बनवून घेतले. एक जण तर पश्चिम बंगाल पोलिसांत शिपाई बनला. ही कथा त्या बांगलादेशींची आहे, जे बेकायदेशीरपणे भारतात घुसले आहेत. स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) मध्ये पश्चिम बंगालमधून सुमारे 58 लाख लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी ओळखली गेली आहेत. परंतु दिव्य मराठीच्या तपासणीत असे उघड झाले की, अनेक बांगलादेशींची नावे अजूनही मतदार यादीत आहेत. अनेक बांगलादेशींकडे दोन्ही देशांचे पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे आहेत. जमिनीवरील सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी, रिपोर्टरने स्वतःला SIR मध्ये सुधारणांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेचा सदस्य असल्याचे सांगून पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा येथील पाच उपविभागांमध्ये तपासणी केली. या पाच उपविभागांमध्ये विधानसभेच्या 33 जागा येतात. या लोकांशी झालेले संभाषण हिडन कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले. क्रमवार पद्धतीने वाचा आणि संपूर्ण अहवाल पहा…। केस : १ ४५०० टका, नदी पार… SIR नंतरही नाव कायम कोणाला भेटले : बिस्वजीत पॉल ठिकाण : उत्तर २४ परगणा येथील हाबरा बिस्वजीत गेल्या वर्षी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून बांगलादेशातून भारतात आला. त्याने जमीन, घर, आधार, पॅन आणि ओळखपत्रही बनवून घेतले. रिपोर्टर आणि बिस्वजीत यांच्यातील संभाषण रिपोर्टर : बांगलादेशातून कधी आलात? बिस्वजीत : शेख हसीना यांच्यावर जेव्हा हल्ला झाला होता, तेव्हा. रिपोर्टर : कोणत्या सीमेवरून आलात? बिस्वजीत : गोजाडांगाहून आलो. पासपोर्ट नाही, म्हणून दलालाने प्रवेश करून दिला. रिपोर्टर : दलालाने किती पैसे घेतले? बिस्वजीत : 4 लोक आलो होतो, 4500 टका घेतले. रिपोर्टर : नदी पार करून आलात का? बिस्वजीत : हो, नावेने. रिपोर्टर : BSF ने थांबवले नाही? बिस्वजीत : नाही, रात्री आलो. रिपोर्टर : इथले आधार, पॅनकार्ड, रेशन कार्ड बनवून घेतले? बिस्वजीत : हो, दलालाने सर्व बनवून दिले. रिपोर्टर : SIR चा फॉर्म भरला? बिस्वजीत : हो. उत्तर 24 परगणा जिल्ह्यात सुमारे 8 लाख बोगस मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. आम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर बिस्वाजित पालचा EPIC क्रमांक तपासला, तेव्हा त्याचे मतदार ओळखपत्र सक्रिय दिसले. म्हणजे SIR नंतरही त्याचे नाव मतदार यादीतून काढण्यात आले नाही. तर बिस्वाजित पालने स्वतः सांगितले की, तो कुटुंबासोबत गेल्या वर्षीच दलालाला पैसे देऊन सीमा ओलांडून भारतात आला आहे. प्रकरण : 2 बांगलादेशचा पासपोर्ट आहे, भारताचीही कागदपत्रे कोणाला भेटले : जॉय बाला ठिकाण : बनगावचे श्रीमंतपुरा–दुर्गापूर श्रीमंतपुरा-दुर्गापूर परिसरात दोन बांगलादेशी भावंडं भाड्याच्या घरात राहत आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या दिव्य मराठी रिपोर्टरची त्यांच्याशी भेट झाली. रिपोर्टर : तुमचे पालक बांगलादेशातच आहेत का? जॉय : हो रिपोर्टर : भारतात किती वर्षांपासून आहात? जॉय : 2014 मध्ये मी आणि बहीण आलो होतो. रिपोर्टर : आधार आणि सर्व कागदपत्रं बनले आहेत का? जॉय : हो रिपोर्टर : बांगलादेशचा पासपोर्ट आहे का? जॉय : हो (जॉयने रिपोर्टरला सर्व कागदपत्रे दाखवली) जॉय बाला नावाच्या या बांगलादेशी तरुणाने भारतीय कागदपत्रांमध्ये आपल्या वडिलांचे नावही नोंदवले आहे, तर त्याच्याकडे बांगलादेशचा पासपोर्टही आहे. आम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जॉय बालाचा मतदार ओळखपत्र क्रमांक तपासला, तेव्हा त्याचे निवडणूक कार्ड सक्रिय दिसले. केस 3 : कोणाला भेटले : अखिल मुंडा ठिकाण : दुर्गापूर तपासणीदरम्यान असे समोर आले की, आणखी एक तरुण 4-5 वर्षांपूर्वी बांगलादेशातून आला होता. त्याने दुर्गापूर गावात राहताना आधी 'उकील बिस्वास' या नावाने आधार कार्ड बनवले, ज्यात वडिलांचे नाव कालीपाडा बिस्वास होते. जेव्हा मतदार कार्ड बनवता आले नाही, तेव्हा त्याने गावात आपल्या ओळखीच्या आधारावर एका वृद्धाला वडील सांगून सर्व कागदपत्रे तयार करून घेतली. त्या वृद्धाचे आडनाव 'मुंडा' असल्यामुळे तरुणाने नाव बदलून 'अखिल मुंडा' असे केले, तर त्याचे खरे आई-वडील आजही बांगलादेशात राहतात. SIR मुळे अखिल घरातून गायब होता. त्याच्या मानलेल्या वहिनीशी भेट झाली. रिपोर्टर : अखिल बिस्वास आहे की अखिल मुंडा महिला : अखिल मुंडा रिपोर्टर : अखिल बांगलादेशातून कधी आला होता? महिला : 5–6 वर्षे झाली. अखिल मुंडा यांचा मतदार ओळखपत्र क्रमांक निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर तपासला असता, अखिलचे मतदार कार्ड सक्रिय असल्याचे दिसले. केस 4 : कोणाला भेटलो : रत्ना पॉल ठिकाण : उत्तर 24 परगणा येथील मसलंदपूर ​ उत्तर 24 परगणा येथील मसलंदपूर परिसरात बांगलादेशातून बेकायदेशीरपणे आलेले एक कुटुंब राहत आहे, जे काही वर्षांपूर्वी येथे येऊन स्थायिक झाले होते. पत्ता शोधत आम्ही त्या घरापर्यंत पोहोचलो, जिथे ते कुटुंब राहत होते. येथे कुटुंबातील रत्ना पॉल यांच्याशी बोलणे झाले. रिपोर्टर : मतदार कार्ड–निवडणूक कार्ड बनले का? रतना : हो, सर्व आहे. रिपोर्टर : कोणत्या सीमेवरून आले होते? रतना : गोजाडांगा सीमा. रिपोर्टर : दलालाने इथे आणण्यासाठी किती घेतले? रतना : 10 हजार. या मुलाने जे बांगलादेशी आणि भारतीय पासपोर्ट दाखवले, त्यात सुसांता पॉल त्याचे वडील आहेत आणि सोबत बसलेले वृद्ध नारायण पॉल त्याचे आजोबा आहेत. पासपोर्टवरील व्हिसावरून स्पष्ट होते की हे लोक अनेक वेळा भारतात आले आणि नंतर बांगलादेशात परतले. त्यावेळी सुसांता पॉल घरी उपस्थित नव्हता, पण त्याची पत्नी रतना पॉलने सांगितले की, कुटुंबातील महिला आणि मुले दलालांच्या माध्यमातून सीमा ओलांडून भारतात आले होते, तर बाकीचे लोक पासपोर्टद्वारे आले. रत्नाने हे देखील सांगितले की, तिचे स्वतःचे मतदार कार्ड अजून बनलेले नाही, जरी इतर भारतीय कागदपत्रे तयार झाली आहेत. तर, तिचा पती सुसांता पॉलचे मतदार कार्ड बनले आहे. आम्ही सुसांता पॉल आणि त्याच्या धाकट्या भावाची पत्नी रत्ना पॉल यांचा EPIC क्रमांक निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर पडताळला. तपासात असे समोर आले की, सुसांता पॉलचे मतदार ओळखपत्र सक्रिय दिसत आहे, तर रत्ना पॉलच्या EPIC क्रमांकावर “No Record Found” असे लिहिले आले. म्हणजेच, SIR प्रक्रियेनंतर रत्ना पॉलचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले, तर सुसांता पॉलचे नाव अजूनही यादीत कायम आहे. केस 5 : कोणाला भेटले : रिंकू मंडल ठिकाण : बदूरिया मसलंदपूरपासून काही अंतरावर बदूरिया हा परिसर आहे. येथे रिंकू मंडल नावाच्या एका महिलेबद्दल माहिती मिळाली, जी बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगितले जाते आणि भारतात येऊन तिने सुब्रतो मंडल नावाच्या व्यक्तीशी लग्न केले. दिव्य मराठीकडे तिचे भारतीय ओळखपत्र आणि बांगलादेशच्या जन्म प्रमाणपत्राच्या प्रती उपलब्ध आहेत. दिव्य मराठी टीम दिलेल्या पत्त्यावर पोहोचली तेव्हा घराला कुलूप लावलेले दिसले. आजूबाजूला चौकशी केली असता असे समजले की SIR सुरू झाल्यापासून रिंकू मंडल आणि तिचा पती सुब्रतो मंडल घराला कुलूप लावून दुसरीकडे राहायला गेले आहेत. आम्ही रिंकू मंडलचा मतदार ओळखपत्र क्रमांक निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर पडताळला, तेव्हा येथेही रिंकू मंडलचे मतदार ओळखपत्र सक्रिय दिसले. केस 6 : कोणाला भेटले : कलाल बालाची पत्नी ठिकाण : बनगावचे चूहाटी आमची पुढील तपासणी बनगावच्या चूहाटी परिसरात झाली, जिथे दोन बांगलादेशींबद्दल माहिती मिळाली, जे काही वर्षांपूर्वी येऊन स्थायिक झाले होते. यापैकी एक कलाल बाला पश्चिम बंगाल पोलिसात काम करतो. दुसरा हृदय रॉय कुटुंबासह बांगलादेशातून येऊन येथे भाड्याच्या घरात राहत आहे. कलाल बालाच्या घरी पोहोचल्यावर आमची भेट त्याच्या पत्नीशी झाली. ती म्हणाली की कलाल बाला येथे नाही, तर कोलकातामध्ये आहे. कलाल बाला बांगलादेशी असल्याच्या प्रश्नावर ती महिला घाबरली आणि 'सर' हे नाव ऐकताच आत गेली आणि तिने पुन्हा दरवाजा बंद करून घेतला. येथे बहुतेक बांगलादेशी राहतात... मग आम्ही शेजारीच असलेल्या हृदय रॉयच्या घरी पोहोचलो. हृदय येथे कुटुंबासह भाड्याने राहत होता. घराला कुलूप होते. घरासमोर बसलेल्या मणिशंकरने सांगितले की, येथे बहुतेक बांगलादेशी स्थायिक झाले आहेत. रिपोर्टरने विचारले की, कलाल बालाने सातवीपर्यंतचे शिक्षण बांगलादेशातून घेतले आहे, अशा परिस्थितीत त्याला पश्चिम बंगाल पोलिसात नोकरी कशी मिळाली? यावर मणिशंकरने सांगितले की, 'ती तर DIB व्हेरिफिकेशन होऊनच मिळाली आहे. हे DIB सुद्धा यात सामील असतात. दोन-चार हजारात करून देतात. जर योग्य DIB व्हेरिफिकेशन झाले असते, तर तो पोलिसात जाऊ शकला नसता.' मणिशंकरने सांगितले की, 'हृदयचे मतदार ओळखपत्र बनले आहे, आणि त्याने नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA अंतर्गत नागरिकत्वासाठी अर्जही केला आहे.' 'जेव्हा नागरिकत्वाची प्रक्रिया अजून पूर्ण झाली नाही, तर मतदार ओळखपत्र कसे बनले? तसेच, कलाल बाला तर बंगाल पोलिसात नोकरी करत आहे.' तपासात समोर आले की, बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून आलेल्या बांगलादेशींनी केवळ भारतीय ओळखपत्रेच बनवून घेतली नाहीत, तर घरेही घेतली आणि काही प्रकरणांमध्ये सरकारी नोकरीही मिळवली. स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) नंतरही त्यांची नावे मतदार यादीतून काढली गेली नाहीत. आमच्याकडे कलाल बालाच्या बांगलादेशात सातवीपर्यंतच्या शिक्षणाचे प्रमाणपत्र आहे, तसेच हृदय रॉय आणि त्याच्या कुटुंबाचे जन्म प्रमाणपत्रही उपलब्ध आहे. टीएमसी रॅकेट चालवत आहे, हा बॉर्डर इकॉनॉमीचा भाग आहे या प्रकरणी भाजप प्रवक्ते तरुण ज्योती तिवारी म्हणतात की, 'हा मुद्दा सरकारला माहीत आहे. कारण हे सर्व करण्यासाठी चार-सहा हजार रुपये शुल्क लागते.' 'बांगलादेशातून कोणी इथे आले तर, सर्वात आधी त्याचे जन्म प्रमाणपत्र बनवले जाते. मग नगरसेवक आणि पंचायत सदस्याचे एक प्रमाणपत्र की, हो, तो इथला रहिवासी आहे.' 'मग परवाना, पॅन कार्ड बनवून त्याद्वारे मतदार ओळखपत्र बनवले जाते. हा सीमा अर्थव्यवस्थेचा भाग आहे. हे टीएमसी चालवते.' 'बीएसएफने कोणाला पकडले तरी, ते त्याला पोलिसांच्या ताब्यात देतात. कार्यवाही करण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही.' 'बंगालमध्ये 560 किलोमीटर सीमा आहे, जिथे कुंपण घालणे शक्य झाले नाही. प्रत्येक मीटरवर बीएसएफचा जवान उभा राहणे शक्य नाही. जिथे कुंपण नाही, तिथूनच इकडे-तिकडेचे काम चालते. सर्वजण यात सामील आहेत. स्थानिक पोलीस सामील आहेत.' कोण-कसे घुसखोरी करत आहे, पकडू का शकत नाहीत तर, टीएमसीचे प्रवक्ते प्रदीप्तो मुखर्जी म्हणतात की, 'इथे बनावट मतदान होत असेल तर मग 2024 मध्ये भाजपचे 12 खासदार कसे जिंकले? 2019 मध्येही बनावट मतदान झाले होते का?' 'बॉर्डर डेव्हलपमेंट प्रोग्रामचा सध्या तिसरा टप्पा सुरू आहे. त्या तिसऱ्या टप्प्यात तुम्ही इतके पैसे टाकत आहात, त्यात कोण कसे घुसखोरी करत आहे हे तुम्ही कसे शोधू शकत नाही?' 'भारतात जर घुसखोरी केली, तर तो केवळ बंगालमध्येच घुसखोरी करत नाहीये, तो आसाममध्येही घुसखोरी करत आहे, तो त्रिपुरामध्येही घुसखोरी करत आहे, तो मेघालयमध्येही घुसखोरी करत आहे, तो मिझोराममध्येही घुसखोरी करत आहे.' अवैध स्थलांतरिताचे नाव जोडणे कायद्याचे उल्लंघन सर्वोच्च न्यायालयाचे वकील अभिषेक कृष्ण म्हणतात, 'जर एखाद्या अवैध स्थलांतरिताचे नाव वैध नागरिकत्वाच्या पुराव्याशिवाय मतदार यादीत जोडले गेले असेल, तर हे थेट कायद्याचे उल्लंघन आहे.' 'अशा प्रकरणांमध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट, 1950 अंतर्गत कारवाईची तरतूद आहे, ज्यात तुरुंगवास किंवा दंड दोन्ही होऊ शकतात.' 'घरोघरी जाऊन पडताळणी करण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) ने अनेक ठिकाणी योग्य तपासणी केली नाही.' 'यानंतर, सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO) यांनी त्याच अपूर्ण आणि संशयास्पद माहितीच्या आधारे मतदार यादीच्या मसुद्याला मंजुरी दिली आणि निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) यांनी सखोल तपासणी न करता अंतिम आदेश जारी केला.' 'जर तपासणीत हे सिद्ध झाले की या अधिकाऱ्यांनी संगनमताने काम केले, तर त्यांच्याविरुद्ध निवडणूक कायद्यातील भ्रष्टाचाराशी संबंधित कलमे आणि भारतीय न्याय संहितेनुसार फसवणूक व पदाचा गैरवापर केल्याचे गुन्हे दाखल होऊ शकतात.' निष्कर्ष : तपासणीतून हे स्पष्ट झाले आहे की, कोट्यवधी रुपये खर्च करून विशेष सखोल पुनरावृत्ती (SIR) करूनही अनेक बेकायदेशीर बांगलादेशींची नावे मतदार यादीतून वगळली गेली नाहीत, जे SIR च्या संपूर्ण प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते. प्रश्न हा देखील आहे की, इतक्या सहजपणे भारतीय कागदपत्रे कशी तयार होत आहेत. याचे कारण सरकारी विभागांमध्ये पसरलेला भ्रष्टाचार आहे का, की मग सिस्टीममध्ये अशा त्रुटी (लूपहोल्स) आहेत, ज्याचा फायदा घेऊन काही लोक ही कागदपत्रे बनवून घेत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 27 Dec 2025 6:52 am

PMC Election: घड्याळ की तुतारी? चिन्हावरून चर्चा फिस्कटली ; दोन्ही राष्ट्रवादी आता समोरासमोर

प्रभात वृत्तसेवा पुणे – दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्र येण्याचे गणित जमेचिना अशी स्थिती असताना आता दोन्ही पक्षांमधील चर्चा निष्फळ ठरल्याचे दिसते. यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून(मविआ) निवडणूक लढवणार असल्याचे पक्के झाले आहे.राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचे (राशप)प्रवक्ते अंकुश काकडे, विशाल तांबे, प्रकाश म्हस्के आणि आमदार बापू पठारे यांनी बारामती हाॅस्टेलवर राष्ट्र्वादी काॅंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार […] The post PMC Election: घड्याळ की तुतारी? चिन्हावरून चर्चा फिस्कटली ; दोन्ही राष्ट्रवादी आता समोरासमोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 6:45 am

Baramati AI Center: गौतम अदानींच्या हस्ते होणार देशातील सर्वात मोठ्या ‘एआय’केंद्राचं उद्घाटन

प्रभात वृत्तसेवा बारामती – देशातील सर्वात अत्याधुनिक व ग्रामीण जीवनाचा चेहरामोहरा बदलू शकणा-या विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे उद्घाटन रविवारी (दि. २८) रोजी होत आहे. अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सकाळी […] The post Baramati AI Center: गौतम अदानींच्या हस्ते होणार देशातील सर्वात मोठ्या ‘एआय’ केंद्राचं उद्घाटन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 6:30 am

ZP Elections: झेडपी निवडणुकीचा मुहूर्त पुन्हा हुकला? प्रशासकीय हालचालींनी वाढवला सस्पेन्स

प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी होणे अपेक्षित असतानाही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. प्रशासकीय पातळीवरील हालचाली पाहता या निवडणुका दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर, म्हणजेच एप्रिल-मे महिन्यात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. […] The post ZP Elections: झेडपी निवडणुकीचा मुहूर्त पुन्हा हुकला? प्रशासकीय हालचालींनी वाढवला सस्पेन्स appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 6:20 am

अग्रलेख : न्याय मिळाला पाहिजे

2017 मधील उन्नाव बलात्कार प्रकरणात न्यायालयाने आरोपी माजी आमदाराला केवळ जामीन मंजूर केला नाही, तर त्याची शिक्षाही निलंबित केली. कुलदीप सेंगर हे त्याचे नाव आहे. या धक्कादायक निर्णयाच्या निषेधार्थ न्यायालयाबाहेर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. सरकारच्या विरोधात, एखाद्या व्यक्तीच्या विरोधात अथवा एखाद्या संस्थेच्या विरोधात निदर्शने होणे सामान्य बाब आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात निदर्शने केली जाणे ही […] The post अग्रलेख : न्याय मिळाला पाहिजे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 6:14 am

Narayangaon News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नारायणगावात ५० एकरवर सजणार ग्लोबल कृषी प्रदर्शन

प्रभात वृत्तसेवा नारायणगाव – कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या ग्लोबल कृषी प्रदर्शन 2026च्या तयारीला वेग आला असून, प्रदर्शनासाठी उभारण्यात येणार्‍या महामंडपाचे भूमिपूजन चेअरमन कृषिरत्न अनिल मेहेर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे, उपाध्यक्ष शशिकांत वाजगे, पदाधिकारी रवींद्र पारगावकर, प्रकाश पाटे, मोनिका मेहेर, डॉ. आनंद कुलकर्णी, सोमजीभाई पटेल, डॉ. संदीप […] The post Narayangaon News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नारायणगावात ५० एकरवर सजणार ग्लोबल कृषी प्रदर्शन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 6:10 am

Manchar News: मंचरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध; नगराध्यक्षा राजश्री गांजाळे यांची ग्वाही

प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर शहराच्या विकासाकरिता आम्ही नगरसेवक कटिबद्ध राहू.शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.अशी ग्वाही नगराध्यक्षा राजश्री गांजाळे यांनी दिली.मंचर (ता.आंबेगाव) येथील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सन २०२६ ची दिनदर्शिका प्रकाशन व मंचर नगरपंचायत नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा संस्थेचे अध्यक्ष सीताराम लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमप्रसंगी नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा […] The post Manchar News: मंचरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध; नगराध्यक्षा राजश्री गांजाळे यांची ग्वाही appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 6:00 am

Pherne Phata: विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडा –डॉ. हर्षदीप कांबळे यांचे आवाहन

प्रभात वृत्तसेवा लोणीकंद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुतेच्या मूल्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत व शिस्तबद्धरीत्या पार पाडणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी प्रशासन, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी परस्पर समन्वय साधत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान […] The post Pherne Phata: विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडा – डॉ. हर्षदीप कांबळे यांचे आवाहन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 5:45 am

Jejuri News: अजित पवारांची ‘विजयी सभा’ रंगणार; जयदीप बारभाईसह १७ नगरसेवकांचे नियुक्तीपत्र स्वीकार

प्रभात वृत्तसेवा जेजुरी – नुकत्याच पार पडलेल्या जेजुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निर्विवाद बहुमताने विजयी झालेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांच्यासह सुमारे १७ नगरसेवक, नगरसेविकांनी शुक्रवारी (दि.२६) नगरपरिषद कार्यालयात दाखल होत नियुक्ती पत्र स्वीकारले. लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विजयी सभेचे आयोजन करणार असल्याचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी यावेळी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी […] The post Jejuri News: अजित पवारांची ‘विजयी सभा’ रंगणार; जयदीप बारभाईसह १७ नगरसेवकांचे नियुक्तीपत्र स्वीकार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 5:30 am

Rajgurunagar News: हुतात्मा राजगुरु महाविद्यालयातील प्राध्यापक बेपत्ता; दुसऱ्या दिवशी धक्कादायक उलगडा

प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – हुतात्मा राजगुरु महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागात सायन्स (जीवशास्त्र) विषयाचे प्राध्यापक डॉ. भानुदास मोतीलाल परदेशी (वय 52) यांचे निधन झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे.खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात गेली 23 वर्षे अध्यापन करणारे प्रा. डॉ. परदेशी हे शांत, संयमी, सुस्वभावी व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित होते. मात्र गुरुवारी (दि. […] The post Rajgurunagar News: हुतात्मा राजगुरु महाविद्यालयातील प्राध्यापक बेपत्ता; दुसऱ्या दिवशी धक्कादायक उलगडा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 5:15 am

Koregaon Bhima Accident: पोलीस भरतीसाठी निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – पोलीस भरती प्रक्रियेसाठी दुचाकीवरून जात असलेल्या दोन मित्रांना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक युवक ठार, तर एक युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पुणे-नगर महामार्गावरील वाडागाव फाटा परिसरात घडला. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला […] The post Koregaon Bhima Accident: पोलीस भरतीसाठी निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 4:45 am

Ranjangaon Crime: पोलिसांनी लावला ६८ लाखांच्या चोरीचा छडा; मुद्देमाल पाहून अधिकारीही झाले अवाक

प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – रांजणगाव एमआयडीसी परिसरातील चमाडिया गोडाऊन येथून तब्बल 68 लाख रुपयांची सिगारेट व इतर वस्तूंची चोरी झाल्याचा गुन्हा अवघ्या 72 तासांत उघडकीस आणण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून एक आरोपी अटकेत आहे. अन्य दोन आरोपींचा शोध […] The post Ranjangaon Crime: पोलिसांनी लावला ६८ लाखांच्या चोरीचा छडा; मुद्देमाल पाहून अधिकारीही झाले अवाक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 4:30 am

नारायणगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाला अर्बन बँकेचा राज्यात डंका, मिळाला ‘हा’प्रतिष्ठेचा पुरस्कार

प्रभात वृत्तसेवा नारायणगाव – लाला अर्बन बँकेस ‘ग्रीन वर्ल्ड को प्राईड 2025’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले यांनी दिली. सन 2024-2025 या आर्थिक वर्षात कर्ज वितरणामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन व कॉसमॉस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सहकार मंथन 2025’ कार्यक्रमात पुणे येथे प्रदान करण्यात आला. […] The post नारायणगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाला अर्बन बँकेचा राज्यात डंका, मिळाला ‘हा’ प्रतिष्ठेचा पुरस्कार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 4:15 am

Alandi News: नळाला तोटी न लावल्यास कनेक्शन कापणार; आळंदी नगरपरिषदेचा इशारा

प्रभात वृत्तसेवा आळंदी – शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, ज्या घरगुती नळ जोडणीला तोट्या (टॅप) नाहीत, त्यांच्यावर आळंदी नगरपरिषदेने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या पाहणीत अनेक ठिकाणी तोट्या नसल्याने किंवा त्या नादुरुस्त असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याचे समोर आले आहे. येणारा उन्हाळा लक्षात घेता पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना त्वरित चांगल्या […] The post Alandi News: नळाला तोटी न लावल्यास कनेक्शन कापणार; आळंदी नगरपरिषदेचा इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 4:00 am

Mulshi News: मुळशीकरांची तहान भागणार का? आमदार मांडेकर यांनी टाटा धरणाबाबत केली ‘ही’मोठी मागणी

प्रभात वृत्तसेवा पिरंगुट – मुळशी तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेती सिंचनासाठी टाटा कंपनीच्या मुळशी धरणातून २ टीएमसी वाढीव पाणी मंजूर करावे, अशी ठाम मागणी भोर–राजगड–मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमत गुणोले यांची सिंचन भवन, पुणे येथे भेट घेऊन शिष्टमंडळासह निवेदन सादर करण्यात […] The post Mulshi News: मुळशीकरांची तहान भागणार का? आमदार मांडेकर यांनी टाटा धरणाबाबत केली ‘ही’ मोठी मागणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 3:45 am

Cyber Crime: स्क्रीनवर ५ कोटींचा नफा, पण बँक खातं रिकामं; वाकडमध्ये ९५ लाखांचा डिजिटल दरोडा

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला बनावट ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक करायला लावून ९५ लाख २० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. ही घटना २५ सप्टेंबर ते २६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान अपेक्स अथिना सोसायटी, वाकड येथे घडली.या प्रकरणी राकेश कुमार तिवारी (वय ४६, रा. अपेक्स अथिना सोसायटी, वाकड) यांनी गुरुवारी (दि. २५) सायबर […] The post Cyber Crime: स्क्रीनवर ५ कोटींचा नफा, पण बँक खातं रिकामं; वाकडमध्ये ९५ लाखांचा डिजिटल दरोडा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 3:30 am

Khopoli Murder Case: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर गंभीर आरोप; शिंदे गटाच्या नेत्याच्या हत्येमागे ‘मास्टरमाइंड’कोण?

प्रभात वृत्तसेवा खालापूर – शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि नुकत्‍याच निवडून आलेल्‍या नगरसेविकेचे पती मंगेश सदाशिव काळोखे (वय ४५, रा. साईबाबानगर, खोपोली) यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २६) सकाळी सुमारे ६.४५ वाजताच्या सुमारास खोपोलीतील विहारी चौकात घडली. कुऱ्हाड, कोयता आणि तलवारीने डोक्यावर वार करून काळोखे यांची जागीच हत्या करण्यात आली. या […] The post Khopoli Murder Case: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर गंभीर आरोप; शिंदे गटाच्या नेत्याच्या हत्येमागे ‘मास्टरमाइंड’ कोण? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 3:15 am

Pimpri Crime: २९ लाखांचे दागिने आणि ३ पिस्तुले; रावेत-हिंजवडीत धुमाकूळ घालणारी टोळी अखेर गजाआड

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा, युनिट दोनच्‍या पथकाने घरफोडी आणि जबरी चोरीच्या गुन्‍ह्यांमधील सराईत टोळीला कारवाई करी५त जेरबंद केले होते. या टोळीकडून २९ लाख ४४ हजार ७०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व शस्त्रे जप्त केली आहेत. तसेच १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत.सनीसिंग पापासिंग दुधानी, जलसिंग रजपुतसिंग दुधानी व मनिष बाबूलाल कुशवाह अशी अटक […] The post Pimpri Crime: २९ लाखांचे दागिने आणि ३ पिस्तुले; रावेत-हिंजवडीत धुमाकूळ घालणारी टोळी अखेर गजाआड appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 3:00 am

PCMC Election: भाजप, काँग्रेस की शिवसेना? उमेदवारी अर्ज भरण्यात कोणाची आघाडी? वाचा सविस्तर

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २३) अर्ज वाटप आणि स्वीकृतीला सुरूवात झाली आहे. अर्ज वाटपाच्या पहिल्याच दिवशी शहरातील ३२ प्रभागांतून तब्बल ८७५ उमेदवारांनी २ हजार २१२ इतके अर्ज नेले होते. तर शुक्रवारी (दि. २६) दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल १ हजार ९४२ उमेदवारांनी ४ हजार ७२५ अर्ज घेतले आहेत. महापालिका […] The post PCMC Election: भाजप, काँग्रेस की शिवसेना? उमेदवारी अर्ज भरण्यात कोणाची आघाडी? वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 2:30 am

PCMC Election: आमच्या प्रभागात बाहेरचा कशासाठी? उमेदवारीवरून स्थानिक विरुद्ध उपरे संघर्ष पेटणार

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभागनिहाय उमेदवारीचे नवे राजकारण आकार घेताना दिसत आहे. ज्या प्रभागातच वास्तव नाही, स्थानिक संपर्क मर्यादित आहेत, अशा ठिकाणांहून ‘इथूनच लढायचे’ असे स्पष्ट संकेत काही इच्छुकांना देण्यात येत असल्याची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग […] The post PCMC Election: आमच्या प्रभागात बाहेरचा कशासाठी? उमेदवारीवरून स्थानिक विरुद्ध उपरे संघर्ष पेटणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 2:15 am

देवाच्या नावाखाली गंडा! श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या भक्ती दर्शनचा प्रताप; ११ लाखांना लावला चुना

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – हेलिकॉप्टरने चारधाम यात्रा स्वस्तात घडवून आणण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची ११ लाख ८५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना ३० नोव्हेंबर २०२३ ते २५ डिसेंबर २०२५ दरम्यान आनंद हास्य क्लब, बाळासाहेब कुंजीर स्टेडियम, पिंपळे सौदागर येथे घडली.या प्रकरणी राजेंद्रनाथ हजारीराम जस्वाल (रा. काटे वस्ती, पिंपळे सौदागर) यांनी गुरुवारी (दि. […] The post देवाच्या नावाखाली गंडा! श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या भक्ती दर्शनचा प्रताप; ११ लाखांना लावला चुना appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 2:00 am

PCMC Election: कोण आहेत हे ‘अचानक’उगवलेले नेते? पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज नव्या चेहऱ्यांचा सुळसुळाट

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणूक घोषित झाल्‍यानंतर आपल्‍यालाच उमेदवार मिळणार, असे गृहित धरून सर्वच पक्षातील इच्‍छुकांनी घरोघरी प्रचार करण्‍यास सुरूवात केली आहे. एकीकडे शहरात थंडी कायम असताना निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर शहरात प्रचाराचे तापमान वाढत आहे. घरोघरी पोहोचणाऱ्या प्रचारपत्रकांचा अक्षरशः वर्षाव सुरू आहे. दररोज नवे उमेदवार, नवी आश्वासने आणि नवी पत्रके मतदारांच्या हातात पडत असल्याने […] The post PCMC Election: कोण आहेत हे ‘अचानक’ उगवलेले नेते? पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज नव्या चेहऱ्यांचा सुळसुळाट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 1:45 am

Mhaswad News: म्हसवडमध्ये विजयाचा जल्लोष! पूजा विरकर आणि २१ शिलेदारांचा मंत्री गोरेंच्या हस्ते सत्कार

प्रभात वृत्तसेवा म्हसवड – भारतीय जनता पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. पूजा विरकर तसेच विजयी नगरसेवक व नगरसेविकांचा नागरी सत्कार सोहळा म्हसवड नगरपरिषद सभागृहात उत्साहात झाला. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरवसोहळा झाला.कार्यक्रमात लोकनियुक्त नगराध्यक्षा पूजा विरकर, नवनियुक्त नगरसेवक विजय धट, चैताली शिंदे, सतीश मासाळ, सविता मासाळ, लखण लोखंडे, दिपाली […] The post Mhaswad News: म्हसवडमध्ये विजयाचा जल्लोष! पूजा विरकर आणि २१ शिलेदारांचा मंत्री गोरेंच्या हस्ते सत्कार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 1:30 am

Rahimatpur Municipal: बहुमत असूनही राष्ट्रवादीला धाकधूक का? पालिकेत फोडाफोडीचे राजकारण रंगणार?

प्रभात वृत्तसेवा रहिमतपूर – रहिमतपूर नगरपालिकेची निवडणूक होऊन नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ. वैशाली निलेश माने यांची निवड झाली आहे. वीस नगरसेवक असलेल्या पालिकेत भाजपचे ९ नगरसेवक निवडून आले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युतीचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत. संख्याबळानुसार उपनगराध्यक्षपद हे राष्ट्रवादीच्याच पारड्यात जाणार आहे. परंतु नगराध्यक्षपदाबरोबरच उपनगराध्यक्ष पद सुद्धा भाजपकडेच राहावे यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात […] The post Rahimatpur Municipal: बहुमत असूनही राष्ट्रवादीला धाकधूक का? पालिकेत फोडाफोडीचे राजकारण रंगणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 1:15 am

तरुण तुर्क : तोरडमल ते तोडणकर...

राज चिंचणकर, राजरंगज्येष्ठ नाटककार व रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल यांनी त्यांच्या नाटकांतून भूमिकाही रंगवल्या आणि रसिकांनी त्यांना उदंड प्रतिसादही दिला. त्यांच्या अशाच काही नाटकांपैकी एक सदाबहार नाटक म्हणजे 'तरुण तुर्क म्हातारे अर्क'...! सन १९७२ मध्ये रंगभूमीवर पहिल्यांदा आलेल्या या नाटकात त्यांनी प्रोफेसर बारटक्के ही भूमिका अशा काही नजाकतीने उभी केली की नाट्यरसिकांच्या तीन पिढ्या त्यांचा हा प्रोफेसर बारटक्के विसरू शकलेला नाही. या नाटकाच्या लेखनाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या नाटकात त्यांनी वापरलेली 'ह' या अक्षराची बाराखडी...! या बाराखडीवरून निर्माण होणारा हंशा आणि टाळ्यांचा वर्षाव या नाटकासाठी फायदेशीर ठरला. प्रा. मधुकर तोरडमल यांनी ही भूमिका प्रचंड गाजवली आणि रसिकांनीही त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले. हेच नाटक आता पुन्हा एकदा नव्या रंगात आणि नव्या ढंगात रंगभूमीवर येत आहे.आता नव्याने या नाटकाचा पडदा वर जात असताना, प्रा. मधुकर तोरडमल यांनी या नाटकात रंगवलेल्या प्रोफेसर बारटक्के या भूमिकेचे आव्हान कोणता रंगकर्मी स्वीकारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरते. तर नव्या संचात येत असलेल्या या नाटकात ही भूमिका करण्याचे भाग्य अभिनेता अतुल तोडणकर याला लाभले आहे. आता अतुल तोडणकर प्रमुख भूमिकेत असल्याने, थेट तोरडमल ते तोडणकर असा यातल्या प्रोफेसर बारटक्के या भूमिकेचा प्रवास होत आहे. अतुल तोडणकर याच्यासह अभिजीत चव्हाण व नीता पेंडसे यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका असून चिंतन लांबे, सोहन नांदुर्डीकर, स्वानंद देसाई, नीलेश देशपांडे, श्रुती पाटील हे कलाकारही यात भूमिका साकारत आहेत. एका मोठ्या आजारपणातून बाहेर पडल्यानंतर अतुल तोडणकर या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर पुनरागमन करत आहे. या नाटकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, या नाटकाच्या मागे चक्क पाच महिला निर्मात्या ठामपणे उभ्या आहेत. प्रियांका पेडणेकर, मधुरा पेडणेकर, योगिता गोवेकर, प्राची पारकर व विजया राणे यांनी या नाटकाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.प्रा. मधुकर तोरडमल लिखित या नाटकाचे दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केले आहे. 'अनामिका' व 'कौटुंबिक कट्टा' निर्मित आणि 'साईसाक्षी' प्रकाशित या नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे, पार्श्वसंगीत तुषार देवल आणि प्रकाशयोजना श्याम चव्हाण यांची आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांनी केली आहे. या नाटकाचे सूत्रधार अशोक मुळ्ये व दिनू पेडणेकर आहेत. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ३० डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये होणार आहे. त्यानंतर ३१ डिसेंबरला रात्री काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे आणि १ जानेवारीला दुपारी श्री शिवाजी मंदिर, दादर येथे या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग रंगणार आहेत.या नाटकात प्रोफेसर बारटक्के ही मध्यवर्ती भूमिका रंगवणारा अतुल तोडणकर याविषयी बोलताना म्हणतो, हे नाटक लेखनातच उत्तम जमून आले आहे. हे नाटक कालातीत आहे. दुसरे म्हणजे त्याला 'टाईम बाउंड्रीज' नाहीत. त्या काळात ते झाले होते; आता तसे चालणार नाही वगैरे काही मुद्दाच इथे निर्माण होत नाही. मामांनी (मधुकर तोरडमल) यांनी ती भूमिकाच खूप सुंदर केली होती. आता बऱ्याच गोष्टी त्यांच्यासारख्या न करता आपल्याला काही वेगळे करता येईल का, याकडे मी लक्ष देत आहे. पण हे करताना, मामांनी केलेल्या त्या व्यक्तिरेखेला कुठेही धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने मी ही भूमिका करण्याचा प्रयत्न करत आहे. ही भूमिका नव्याने करण्यातही मजा आहे आणि हे आव्हान स्वीकारण्यातही मजा आहे. ही भूमिका साकारताना धडधड होत होती; पण आम्ही जसजशा रिहर्सल्स करत आहोत, तसतशी ही धडधड कमी होत आहे. अशा पद्धतीची भूमिका करताना तुलना होणारच; पण मला तुलना होण्याची भीती वाटत नाही. मामांनी जे करून ठेवले आहे; ते तर अजरामरच आहे. मी मुळात हे नाटक का करत आहे; तर मी अशा एका नाटकाच्या शोधात होतो, ज्याने मला छान रिस्टार्ट करता येईल. दुसरे म्हणजे, या नाटकाचा जो स्पीड आहे, तो मला रिस्टार्ट करताना हवा होता. तो इथे उत्तम जुळून आला आहे. मी एक गोष्ट पहिल्यापासून करतोय आणि ती म्हणजे मी कमरेखालचे विनोद कधीच केले नाहीत; परंतु या नाटकात या संदर्भाने पुसटशी अशी सीमारेषा आहे; मात्र ती रेषा मी कधीच पार करणार नाही. भूमिकेची तुलना होणार, ही भीती म्हणून न घेता चॅलेंज म्हणून मी स्वीकारले आहे.नव्या संचात रंगभूमीवर येत असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे यांच्याशी याबाबत संवाद साधला असता ते सांगतात, सन १९७२ मध्ये हे नाटक आले होते. हे नाटक लोकांना इतके माहीत आहे आणि गाजलेले आहे की अगदी आत्तापर्यंत त्याचे प्रयोग होत होते. युट्यूबवरही ते उपलब्ध आहे. प्रा. मधुकर तोरडमल यांची एक विशेष इमेज या नाटकामुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांना हे नाटक माहीत आहे. आता हे नाटक करताना मला सध्याच्या पिढीची ऊर्जा देणे गरजेचे होते. मला पूर्वीपेक्षाही अधिक एनर्जेटिक प्रयोग करणे गरजेचे होते. आता प्रत्येक दिग्दर्शक जेव्हा नाटक बसवतो, तेव्हा त्यात नवनवीन काहीतरी करत असतो. मूळ नाटकात १९७० चा जो काळ आहे, तो मात्र आम्ही १९८०-८५ इतका पुढे आणला आहे. बाकी गोष्ट तीच आहे आणि संदर्भही तेच आहेत. मुळात ते नाटक किंवा वाक्याला त्यात जे विनोद आहेत आणि ते इतके सुंदर लिहिले गेलेले आहेत की संहिता म्हणून त्यात काही बदल करण्याची आवश्यकताच नाही. अभिजीत चव्हाण, अतुल तोडणकर व नीता पेंडसे यांच्यासह आमच्या नाटकातले नवीन कलाकार खूप मेहनती आहेत. अभिजीत व अतुलसोबत मी खूप काम केले आहे. त्यामुळे ते काय करू शकतात, याची मला कल्पना आहे. अतुलबाबत सांगायचे तर त्याची ही तशी पहिलीच भूमिका आहे की जिथे तो मुख्य भूमिकेत आहे. आजारपणानंतर तो नाटकात पुन्हा येत आहे आणि त्याचे पुनरागमन अशा एका नाटकातून होत आहे की जे रंगभूमीवर इतके गाजलेले आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 1:10 am

शॉर्टमध्ये सांगितलेली बेकेट थिअरी

भालचंद्र कुबल, पाचवा वेदहल्ली अँटीसिपेटेड कथानकांचा एवढा कंटाळा आलाय ना की समजा नाटक बघताना तुमच्या बाजूच्या सीटवर दोन बायका शेजारी शेजारी बसलेल्या असतील तर पुढलं कथानक तुम्हाला बघण्याची गरज नसते, ते आधीच ऐकायला येतं. बरं गम्मत म्हणजे तुम्हालाही तेच वाटत असतं जे त्या दोघींना वाटतंय... आणि हाईट म्हणजे लेखकालाही तेच सांगायचं असतं जे तुम्हा तिघांनाही अपेक्षित आहे. १९८० ते २००० च्या द्विदशकात अनेक इंग्रजी चित्रपट बेकेट थिअरीवर आधारलेले बघायला मिळत होते. बेकेट थिअरी म्हणजे जॉं आनुई या फ्रेंच नाटककाराने लिहिलेल्या दोन व्यक्तिरेखांच्या संघर्षाची, नात्यांची, नैतिक-अनैतिक स्वभाव वैशिष्ये मांडणारा स्टोरी प्लॉट. वेटिंग फॉर गोदो वाल्या सॅम्युअल बेकेट आणि त्याच्या 'थिएटर ऑफ द अॅब्सर्ड'चा काहीही संबंध इथे नाही. दोन्ही संदर्भ पाश्चात्त्य नाटकाशी संबंधित आहेत म्हणून फक्त नमूद करतोय कारण बेकेट या नावात साधर्म्य आहे. तर या बेकेट थिअरीमधे दोन भिन्न तत्त्व मांडणाऱ्या व्यक्तिरेखा परस्परांच्या विरोधात लेखकाने उभ्या केल्या की पहावा लागणारा संघर्ष जाम इंटरेस्टिंग असतो. जागतिक करमणूक इंडस्ट्री आजवर या बेकेट थिअरीवरच उभी आहे असं माझं मत आहे. अगदी पट्कन आठवतील अशी उदाहरणं म्हणजे सामना, नमक हराम, शक्ती, मशाल अगदी माहेरची साडी सारखे चित्रपट तर अश्रूंची झाली फुले, बेईमान सारखी मराठी नाटके हीच थिअरी कॅरी करतात. स्टर क्रेझी (१९८०), 'ट्रेडींग प्लेसेस'(१९८३), 'दर्टी राॅटन स्काऊंड्रल्स'(१९८८), प्लेन-ट्रेन्स-अँड ऑटोमोबिल्स (१९८७), विकेंड अॅट बर्नी (१९८९), डंब अॅंड डंबर (१९९४), टॉमी बॉय (१९९६), व्हाईट मेन कांट जम्प (१९९२), रश अवर (१९९८) असे कित्येक इंग्रजी चित्रपट विविध विषयांना घेऊन या वीस वर्षांच्या कालावधीत निर्माण झाले आणि बऱ्यापैकी हिट झाले. पुढे कथानकातील दोन परस्पर विरोधी व्यक्तिरेखांचा एक फाॅर्म्युला बनला आणि त्या अानुषंगाने जी थिअरी समोर आली त्यालाच बेकेट थिअरी म्हणावे लागेल. भारतीय नाट्यलेखन शैली मात्र एककेंद्री किंवा समाजकेंद्री व्यक्तिरेखेभोवती व्यक्त होत राहिली. अर्थात त्याला कारणीभूत असलेल्या रामायण, महाभारत या महाकाव्याचा, वेद-उपनिषदांचा जबरदस्त पगडा होय. त्यामुळे व्यक्ती-व्यक्तींमधील समांतर एक-प्रतलीय संघर्ष आपल्या नाट्यशैलीत क्वचितच आढळून येतो. अर्थातच दोन प्रोटॅगोनिस्टना एकमेकांविरुद्ध खेळवणारी कथानके ही उधार उसनवारी केल्याप्रमाणे मराठी नाटक-सिनेमांमधून पहायला मिळतात. नाटककाराने कितीही ठासून सांगितलं नाही हे माझं अभिनव लेखन आहे तरी त्याची पाळमुळं बेकेट थिअरीच्या संदर्भांमधेच सापडतात. नुकतेच प्रदर्शित झालेलं शंकर जयकिशन हे नाटक या थिअरीमध्ये चपखल बसते म्हणूनच हे नमनाला घडाभर तेल. नाटकाबाबत लिहिताना, वाचकांना वरवरची स्टोरी सांगा आणि मुळात हे नाटक बघायचे की नाही, ते सांगा, एवढ्याच काय ते, या कंटेटचे (लेखांचे) महत्त्व 'समीक्षा' म्हणून उरलंय. तेंव्हा हा मजकूर पुढे न वाचताही शंकर जयकिशन डोळे झाकून पाहायला काहीच हरकत नाही. दोन सशक्त अभिनेते या नाटकाच्या निमित्ताने समोरा समोर उभे ठाकतात आणि अख्ख्या थिएटरला आपल्या कवेत सामावून घेतात. महेश मांजरेकरांना बऱ्याच वर्षांनी म्हणजे 'डॉक्टर तुम्हीसुद्धा' मधे बघताना जो फ्रेशनेस जाणवायचा, अजूनही तोच आणि तस्साच टिकून आहे. पोट मात्र बरंच सुटलंय परंतु वेशभूषेने ते शिताफीने लपवलंय. भरत जाधवना हल्लीच अस्तित्व या त्यांच्याच प्रॉडक्शनमधे बघितलं होतं त्यामुळे ते आऊट ऑफ साईट झालेले नाहीत मात्र मांजरेकरांना जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे २९ वर्षांनी पहाणं खरंच एन्टरटेनिंग आहे. नाटकाच्या नावात असलेल्या शंकर जयकिशन या संगीतकाराचा आणि कथानकाचा सुतराम संबंथ नाही. भरत जाधवानी रंगवलेल्या महादेव या व्यक्तिरेखेच्या आवडीचा संगीतकार, एवढाच काय तो शंकर जयकिशनचा संबंध...! आणि मग तो संबंध एस्टॅब्लिश व्हावा यासाठी मधे मधे पेरलेली सिच्युएशनल गाणी म्हणजे ठिकै असं मनातल्या मनात दुर्लक्ष करत, भरत आणि महेश यांच्या अभिनयावर अधिक लक्ष केंद्रित करायला लावणारी ही वेल फॅब्रिकेटेड कॉमेडी आहे. नाच मेरी जान या मेहमूदच्या मै सुंदर हूँ या चित्रपटातल्या गीताने मात्र थोडेफार हास्यफवारे उडवण्याचे काम चोख केलंय. मला आपलं एक सहज नेपथ्याबाबत वाटून गेलं होतं की शंकर जयकिशनचा डायहार्ड फॅन असलेला महादेव, संगम, झुक गया आसमान, आँखो आँखो में, मैं सुंदर हूँ किंवा नाटकाच्या कथानकाशी टायटल जुळणार्या एखाद्या चित्रपटाचे पोस्टर, आपल्या ड्रॉईंग हॉलमध्ये का लावणार नाही? महादेवचे परंपरांना, आठवणींना घट्ट धरुन ठेवणारे स्वभाव वैशिष्ट्य अधिक अधोरेखित झाले असते, असे काहीसे वाटून जाते. कायैना... बाप-मुलीमध्ये असलेल्या वादाचा तिढा, बापाच्या कधी काळच्या मित्राने येऊन सोडवण्याच्या कथानकाचे हे नाटक, इतका साधा सरळ स्टोरी प्लॉट..! तो देखील एक्स्पेक्टेड आणि अॅंटीसिपेटेड प्रसंगानी ठासून भरलेला. फक्त मुव्हर्स आणि पॅकर्स या नव्या एलिमेंटचा वापर करून घेतल्याने दिग्दर्शकीय परिभाषा थोडी आधुनिक वाटते. उदा. कोरोगेटेड बॉक्समधून भरत जाधवांची एन्ट्री, रिकाम्या हॉलमध्ये घुमणारा आवाज, सतत मधे मधे येणारा व्हास जो महादेवच्या बायकोचे अस्तित्व दाखवत रहातो ह्या मुव्हमेंट्समधून नव्या पिढीच्या दिग्दर्शकांचा संहितेकडे बघण्याचा दृष्टिकोण स्पष्ट होतो मात्र वरच्या मजल्यावरुन खाली येणारे जोगदंडबाईंचे परकर व साड्या, 'बाहुमुद्रा' या आंगिक अभिनयशैलीने चिंगीशी केलेला संवाद अशा अनेक दिग्दर्शकीय क्लृप्त्यांची प्रेक्षकांना आता सवय झालीय. त्यात काहीच नावीन्य राहिलेले नाही. बाहुमुद्रा अभिनयशैली म्हणजे दोन नटांनी मागेपुढे उभे राहून मागच्या नटाने पुढल्याच्या काखेत हात घालून संवादानुरुप हातवाऱ्यांनी व्यक्त होणे. चार्ली चॅप्लीन यांनी तब्बल चार चित्रपटातून 'बाहुमुद्रा'चा वापर केला होता. असो, परंतु यामुळे नाटक उलट खुसखुशीत होण्यासच मदत होते. पहिला अंक तर इतका क्रिस्पी आणि वेगवान झालाय की तो 'संपला?' असे विचारावेसे वाटते. बऱ्याच ठिकाणी, दोन दिग्गजांची जुगलबंदी असं नाटकाच्या प्रमोशनमधे वाचायला, ऐकायला, बघायला मिळतंय पण जाधवांना चान्स असून, प्रसंग असून देखील मांजरेकर प्रभावी ठरतात. गाणी गातात. मधल्या एक-दोन गाण्यांना टाळ्या देखील घेतात. फक्त वर उल्लेखिल्याप्रमाणे डोळे झाकून मांजरेकरांचा अभिनय 'पाहिल्यास' जड-घोगऱ्या आवाजाचा मकरंद अनासपुरे बोलतोय की काय? असा भास होतो. संजय पेठेकडे जेव्हा मी या नाटकाचे फोटो मागितले तेव्हा शाम चव्हाणांच्या प्रकाशयोजनेला त्याने सुंदर काॅम्प्लिमेंट दिली. केवळ प्रकाश योजनेतल्या लाईट इंटेन्सिटीमुळे छान फोटो आलेत. प्रकाश योजनेला फारसा वाव या नाटकात नाही तरीही आपले अस्तित्व यात शाम चव्हाणांनी दाखवून दिले आहे. संगीतकार अजित परब यांचे योगदान सुद्धा विसरून चालणार नाही कारण शंकर जयकिशन यांच्या म्युझिकल ट्रॅक्सना रिअरेंज करणे सोपे नाही. काही काही इमोशनल प्रसंगात ते ट्रॅक्स वाजतात आणि ते लक्षात आणून देतात की तुम्ही पहात आहात शंकर जयकिशन. या सर्व दिग्गजांच्या गदारोळात संयत अभिनयाने लक्ष वेधून घेते ती शिवानी रांगोळे. भरत जाधवांसोबत इमोशनल सीन असो वा महेश मांजरेकरांसोबतचा थट्टा मस्करीचा, शिवानी कुठेही कमी पडत नाही. थोडक्यात 'शॉट' मध्ये सांगायचं झाल्यास या वर्षातली एक वेल रिहर्सड मेजवानी भरत जाधव एन्टरटेनमेंट या नाट्यसंस्थेने रसिक प्रेक्षकांना दिली आहे. जरूर पाहा...!

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 1:10 am

विदर्भातले बोधप्रद निवडणूक निकाल

अविनाश पाठकआठवड्याच्या सुरुवातीलाच पार पडलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीने विदर्भातील राजकीय चित्र स्पष्ट केले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक नगराध्यक्षपदे जिंकत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले, तर काँग्रेसनेही ग्रामीण भागात आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निकालातून राज्यातील दिग्गज नेत्यांची ताकद, काहींचा प्रभाव कमी झाल्याचे संकेत, तसेच घराणेशाहीविरोधात मतदारांचा बदलता कल ठळकपणे समोर आला आहे. विदर्भातील हे निकाल सर्वच पक्षांसाठी दिशादर्शक ठरणारे आहेत.आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे रविवारी महाराष्ट्रात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी पार पडली. विदर्भात देखील नगर परिषद आणि नगरपंचायती मिळून शंभर ठिकाणी मतमोजणी झाली. त्यात सर्वात अधिक ५२ ठिकाणी आपले नगराध्यक्ष निवडून आणून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला. दुसऱ्या क्रमांकावर २१ जागा घेत काँग्रेसने बाजी मारली आहे. तिसऱ्या क्रमांकावर शिंदे यांची शिवसेना आठ जागा, त्या खालोखाल अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस चार जागा घेऊन थांबली आहे. उबाठा सेनेला देखील चार नगराध्यक्ष पदे मिळाली, तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांचाही प्रत्येकी एक नगराध्यक्ष निवडून आला. अपक्ष आणि अन्य आठ जागी नगराध्यक्ष विजयी झाले आहेत.याशिवाय नगरसेवक निवडीत देखील भारतीय जनता पक्षानेच आघाडी घेतलेली दिसत आहे. अनेक ठिकाणी तर अध्यक्ष जरी काँग्रेसचा असला, तरी सदस्य भाजपच्याच बहुमतात आहेत, असेही चित्र दिसत आहे. विदर्भात भारतीय जनता पक्षाचा आजही चांगलाच जोर आहे हे चित्र स्पष्ट झाले आहे. नगर परिषद निवडणुका या जरी स्थानिक स्तरावरील असल्या तरी त्यात अनेक राज्यस्तरीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसून येत होती. विदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशीष जयस्वाल, परिणय फुके, विजय वडेट्टीवार इत्यादी नेते आपली बाजी राखण्यात यशस्वी झाले आहेत, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्जरोखे घोटाळा प्रकरणात आमदारकी गमवावी लागणारे माजी मंत्री सुनील केदार, माजी विधानसभा अध्यक्ष आणि माजी काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, राज्यमंत्री पंकज भोयर, माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल तसेच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना अपयशाचा सामना करावा लागला आहे. शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे आपल्या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या पत्नीचा पराभव देखील टाळू शकलेले नाहीत. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना देखील मतदारांनी नाकारलेले दिसत आहे.महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात १५ नगर परिषद आणि १२ नगरपंचायतींपैकी २२ ठिकाणी भाजपनेच आपला झेंडा रोवला आहे. रामटेक आणि पारशिवनीत आशीष जयस्वाल यांच्या शिवसेनेने देखील आपले खाते उघडले आहे. नागपूर जिल्ह्यात मोहोपा वगळता काँग्रेसला कुठेही जागा मिळाली नाही. भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी आपले परंपरागत वैरी सुनील केदार यांच्या सर्वच उमेदवारांना धूळ चारली आहे. रामटेक लोकसभा क्षेत्रातील खासदार श्याम कुमार बर्वे यांच्या उमेदवारांचाही पराभवच झालेला दिसतो आहे. हिंगण्यातील भाजप आमदार समीर मेघे यांच्या क्षेत्रातील नगर परिषदांमध्ये देखील भाजपचा जोर राहिलेला दिसत आहे.वर्ध्यात भाजप शिवसेना युती आणि काँग्रेसप्रणीत आघाडी यांनी अर्ध्या जागा वाटून घेतल्याप्रमाणे दिसत आहे. गेल्या वेळेच्या तुलनेत भाजपला वर्धा जिल्ह्यात तीन नगराध्यक्षपदावर पाणी सोडावे लागले. वर्धा आणि देवळी येथे जरी नगराध्यक्षपद गेले तरी नगरसेवकांचे बहुमत आहे. यावेळी हिंगणघाट, आर्वी, सिंधी रेल्वे येथे नगराध्यक्षपदी भाजप उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसने वर्धा पुलगाव येथे आपले नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत. विशेष म्हणजे भाजप नेते आणि माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नीला देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे.चंद्रपूरमध्ये भाजपने जोर मारला होता मात्र काँग्रेसने तब्बल सात नगर परिषदांवर आपले वर्चस्व कायम राखले आहे. दोन जागा शिवसेना शिंदे गटाला तर भाजपला फक्त एका नगर परिषदेत आपला अध्यक्ष निवडून आणता आला आहे. इथे काँग्रेसच्या सर्व निवडणुकांचे नियोजन विधानसभेतील काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. त्यामुळे यशाचे मानकरी तेच ठरले आहेत. भाजपचे सुधीर मुनगंटीवार, देवराव भोंगळे, किशोर जोरगेवार, करण देवतळे असे चार आमदार असतानाही हा अपयशाचा सामना करावा लागला आहे. या अपयशाबाबत माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पक्ष नेतृत्वावरच टीका केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही नगर परिषदांवर भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. चंद्रपूरचे गडचिरोलीचे पालकमंत्री असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. गोंदिया जिल्ह्यात गोंदिया तिरोडा नगर परिषद आणि सालेकसा व गोरेगाव नगरपंचायतीत सत्ताधारी भाजपला केवळ एक जागा रिक्त झाली, तर काँग्रेसने तीन जागा जिंकल्या. गोंदिया नगर परिषदेत प्रफुल्ल पटेल, भाजपचे आमदार विनोद अग्रवाल आणि गोपालदास अग्रवाल यांनी पूर्ण ताकद लावली होती. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही. भंडारा जिल्ह्यात भंडारा तुमसर पवनी आणि साकोली या चार नगर परिषदांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची इथे चांगलीच पिछेहाट झाली आणि शिंदे सेनेला देखील इथे यश मिळवता आले नाही. अमरावती जिल्ह्यात दहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायतींचा निकाल भाजपला चांगलाच धक्का देणारा ठरला आहे. भाजपला सहा नगराध्यक्षपदे, काँग्रेसला दोन, प्रहार, उबाठा, शिंदे सेना आणि अपक्ष प्रत्येकी एक असे नगराध्यक्ष निवडून आले आहेत.यावेळी ग्रामीण भागात काँग्रेसने बऱ्यापैकी जोर मारल्याचे दिसून आले आहे. चिखलदरा येथे काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पंधरा ठिकाणी निवडणुका झाल्या. त्यात राष्ट्रवादी पक्षाचे इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक या पुसदमध्ये विजयी झाल्या. यवतमाळमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या प्रियदर्शनी उईके या विजयी झाल्या आहेत. उमरखेडमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील दारव्हा व नेर नवापूर नगर परिषदांवर सेनेचा भगवा फडकला आहे. दिग्रस नगर परिषद अध्यक्षपदी उबाठा सेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. वाशिम जिल्ह्यात चार नगर परिषद आणि एक नगरपंचायत निवडणुकीत माजी आमदारांसह विद्यमान आमदार अमित झनक यांनाही मतदारांनी धक्का दिला आहे. रिसोड नगर परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचा तर मालेगावात शिंदे सेनेचा उमेदवार विजयी झाला. कारंजा नगर परिषदेत एमआयएमचा नगराध्यक्ष विजयी झाल्याने भाजप आमदार सई डहाके यांच्यासाठी तो धक्काच ठरला आहे. या मतदारसंघात नेत्यांच्या नातेवाइकांना देखील मतदारांनी नाकारलेले दिसून आले आहे.अकोला जिल्ह्यातही नेत्यांच्या नातेवाइकांना मतदारांनी नाकारलेले दिसून आले आहे. भाजप आमदार हरीश पिंपळे यांचे भाऊ मूर्तिजापूर नगर परिषदेत पराभूत झाले. बाळापूर नगर परिषदेत माजी आमदार नातेपुते यांच्या पत्नी रजिया बेगम यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. अकोल्यातही काँग्रेसचे नेते दीपक बोडखे यांच्या पत्नींचाही पराभव झाला. एकूणच अकोल्यात मतदारांनी आता घराणेशाही थांबवा हा संदेश दिल्याचे दिसून आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात भाजपचे चार, तर काँग्रेसचे तीन नगराध्यक्ष विजयी झाले. चिखली खामगाव नांदुरा आणि जळगाव जामोद येथे भाजपचे, तर लोणार-मलकापूर आणि शेगावमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले. शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, शरद पवार गट आणि उबाठासेना प्रत्येकी एका ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणू शकले आहेत. मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराव शिंदे यांच्या उमेदवारांना देखील फटका बसलेला दिसून आला आहे.एकूणच विदर्भाचे सर्व निकाल बघता इथे भाजपने आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केलेले दिसून आले आहे. भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपले अस्तित्व कायम राखले आहे. एका काळात विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अजूनही ग्रामीण विदर्भात काँग्रेसचे नेटवर्क कायम आहे, हे या निकालातून दिसून आले आहे. त्यातही भाजपमध्ये काही ठिकाणी असलेला अंतर्गत संघर्ष त्यांना अडचणीचा ठरला आहे. अन्यथा भाजप काँग्रेसला देखील रोखू शकला असता अशी परिस्थिती होती मात्र चंद्रपुरात मुनगंटीवार, जोरगेवार आणि हंसराज जाहीर यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे चंद्रपूरमध्ये भाजपचे असे पानिपत झालेले दिसून आले आहे. आता विदर्भात चार महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. या निकालातून सर्वच पक्षांनी घ्यायचा तो बोध घेऊन वाटचाल करायची आहे. त्यावरच सर्व पक्षांचे महापालिका निवडणुकातील यशापयश ठरणार आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 1:10 am

Shambhuraj Desai: जिल्हा वार्षिक योजनेची कामे तात्काळ पूर्ण करुन निधी खर्च करा –ना. शंभूराज देसाई

प्रभात वृत्तसेवा सातारा – जिल्हा वार्षिक योजनेच्या मंजूर निधीतील कामे सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी लवकरात लवकर पूर्ण करुन तात्काळ निधी खर्च करावा. विकास कामे वेळेत न पूर्ण झाल्यास व निधी खर्च न झाल्यास सबंधित कार्यान्वयीन यंत्रणांच्या प्रमुखावर जबाबदारी निश्चीत करावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेच्या चालू आर्थिक […] The post Shambhuraj Desai: जिल्हा वार्षिक योजनेची कामे तात्काळ पूर्ण करुन निधी खर्च करा – ना. शंभूराज देसाई appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 1:00 am

Satara Crime: वडूज पोलिसांची मोठी कामगिरी; ५ वर्षांपासून फरार आरोपीच्या घरात घुसून आवळल्या मुसक्या

प्रभात वृत्तसेवा वडूज – गेल्या पाच वर्षापासून परागंदा असलेल्या आरोपीस वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.रणजित लाला चव्हाण वय 32, रा. पळशी, ता. खटाव असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत वडूज पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, दि. 4 नोव्हेंबर रोजी रात्री 11 […] The post Satara Crime: वडूज पोलिसांची मोठी कामगिरी; ५ वर्षांपासून फरार आरोपीच्या घरात घुसून आवळल्या मुसक्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 12:45 am

Satara News: उस नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

प्रभात वृत्तसेवा सातारा – जिल्ह्यातील एकूण 17 साखर कारखाने चालू गळीत हंगामात ऊस गाळप करूनही मागील दोन महिन्यांपासून शेतकर्‍यांची बिले मुद्दाम थकवून ठेवत आहेत. काहींंनी अद्याप ऊस दरही जाहीर केलेले नाहीत. ऊस नियंत्रण कायद्यानुसार 14 दिवसांत ऊस बिले अदा करणे कायदेशीर बंधनकारक असताना, संबंधित कारखाने या कायद्याला जुमानत नाहीत. या कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करा, […] The post Satara News: उस नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 12:30 am

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार २७ डिसेंबर २०२५

पंचांगआज मिती पौष शुद्ध सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग व्यतिपात .चंद्र राशी मीन ,भारतीय सौर ०६ पौष शके १९४७. शनिवार दिनांक २७ डिसेंबर २०२५ .मुंबईचा सूर्योदय ०७.०९ मुंबईचा सूर्यास्त ०६.०९ मुंबईचा चंद्रोदय १२.०७ मुंबईचा चंद्रास्त ००.३७ उद्याची, राहू काळ ०९.५४ ते ११.५६.गुरु गोविंदसिंग जयंती,शुभ दिवस-दुपारी-१२;२१ ते ०१;०९ पर्यन्तदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : गृहसौख्य चांगले राहील.वृषभ : प्रगतीच्या दृष्टीने मनासारखी कामे होतील.मिथुन : नोकरी व्यवसायात अनुकूल घटना घडतील. कर्क : आर्थिक स्थिती चांगली राहील.सिंह : अनेक महत्त्वाचे प्रश्न सुटतील. कन्या : विविध मार्गांनी धनलाभ होऊ शकतो. तूळ : महत्त्वाच्या कामांसाठी वेळ द्याल.वृश्चिक : आर्थिक प्राप्ती चांगली राहील.धनू : रागावर नियंत्रण आवश्यक.मकर : वस्तुस्थितीचा विचार करूनच निर्णय घ्या.कुंभ : कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळू शकते.मीन : काही गैरसमज होण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 12:30 am

मराठी शाळा टिकल्या पाहिजेत

युवराज अवसरमल क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम ' हा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दिवसेंदिवस मराठी भाषेच्या शाळा बंद होत आहेत. त्या टिकविण्यासाठी काय करता येईल यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी एक अभिनेत्री आहे, ती म्हणजे कादंबरी कदम होय.कादंबरीचे शालेय शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. गोरेगाव पश्चिमेला विद्यावर्धिनी संचालित विद्यामंदिर शाळेत तिचे शालेय शिक्षण झाले. शाळांमधून कुमार कला केंद्राच्या आंतरशालेय अभिनयाच्या स्पर्धा होत होत्या. त्यामधील एकपात्री प्रयोगांमध्ये तिने काम केले होते. वक्तृत्व स्पर्धेत तिने भाग घेतला. त्यानंतर तिने विलेपार्लेच्या साठ्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी तिने आंतरमहाविद्यालयीन एकांकिकेमध्ये सहभाग घेतला. तिने फिलॉसॉफीमध्ये ग्रॅज्युएशन केले. कॉलेजच्या पदवीपर्यंतचे शिक्षण संपण्याअगोदर तिला मालिकेमध्ये काम मिळाले होते. 'दीपस्तंभ' या प्रभात चॅनेलवरील मालिकेमध्ये ती काम करू लागली. त्यानंतर 'इंद्रधनुष्य' ही मालिका तिला मिळाली. अल्फा चॅनेलवर ती मालिका दाखवली जात होती. अभिनेत्री आशा काळे यांच्या सहा मुली दाखविल्या होत्या. त्यात सर्वात धाकट्या मुलीची भूमिका तिने साकारली होती. त्यानंतर काही काळ तिला कामे मिळाली नाहीत, तेव्हा तिने छोटी नोकरी देखील केली. त्यानंतर तिला एकामागून एक कामे मिळत गेली.'ही पोरगी कुणाची' हा चित्रपट तिला मिळाला. ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंतसोबत काम करण्याचीही संधी तिला मिळाली. हा चित्रपट तिचा टर्निंग पॉइंट आहे. 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेमध्ये तिने दिग्दर्शक गिरीश मोहिते सोबत काम केले होते. त्यांनी तिला 'ही पोरगी कुणाची' या चित्रपटात प्रथम नायिकेची संधी दिली. त्यानंतर 'क्षणभर विश्रांती' हा चित्रपट तिला मिळाला. त्या चित्रपटामध्ये हेमंत ढोमेसोबत तिची जोडी होती. त्यामध्ये इतर कलाकारांमध्ये सचित पाटील, सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत, भरत जाधव, शुभांगी गोखले यांचा समावेश होता. हेमंत सोबत 'क्षणभर विश्रांती' चित्रपटासाठी अलिबागला तिने शूटिंग केले होते आणि परत 'क्रांति ज्योती विद्यालय - मराठी माध्यम ' चित्रपटासाठी अलिबागला शूटिंग केले. चंद्रकांत कुलकर्णीं दिग्दर्शित 'चारचौघी' या नाटकाचे तिने दोन वर्षांत तीनशे पस्तीस प्रयोग केले. प्रेक्षकांना हे नाटक खूप आवडले होते.मराठी शाळा वाचविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना बोलाविले जाते. त्या माजी विद्यार्थ्यांपैकी एक कादंबरी असते. ती दुबईला राहत असते. आता ती नवऱ्यासोबत भारतात आलेली असते. ती व तिचा नवरा दोघेही त्या शाळेत शिकले आहेत. सुमन भोईर नावाची व्यक्तिरेखा तिने साकारली आहे. त्यांना शाळेबद्दल खूप आस्था असते व त्या शाळेसाठी ते काय काय करतात, हे सारे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना हसवतो व तितकाच रडवतो. ज्या ज्या लोकांचे मराठी माध्यमातून शिक्षण झाले आहे, त्यांना हा चित्रपट पाहताना त्यांच्या शाळेची नक्कीच आठवण येणार आहे.या चित्रपटातील कलाकारांसोबत काम करण्याविषयी विचारले असता कादंबरी म्हणाली की, सचिन खेडेकरांसोबत मी पहिल्यांदाच काम करीत आहे. मी कॉलेजला होते तेव्हा त्यांची रवी राय दिग्दर्शित 'सैलाब' मालिका यायची. ती मालिका पाहून मला वाटायचे की केव्हा मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल. आता या चित्रपटासाठी मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. क्षितीसोबत मला काम करण्याची खूप दिवसापासून इच्छा होती. ती इच्छा या चित्रपटात तिच्या सोबत काम केल्याने पूर्ण झाली. या चित्रपटात एकापेक्षा एक कलाकार आहेत, त्यांच्यासोबत काम केल्याने मला अगदी कृतज्ञ वाटले. मी या सिनेमाचा भाग आहे याचा मला अभिमान वाटतो.या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्यासोबत काम करताना कसे वाटले असे विचारले असता ती म्हणाली की या अगोदर मी हेमंत सोबत सहकलाकार म्हणून काम केलेले आहे आणि आता जवळपास पंधरा वर्षांनी आम्ही या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम केले आहे. आता हेमंतला पाहिल्यावर समजले की त्याला काय पाहिजे हे जाणणारा तो दिग्दर्शक आहे. एक संवेदनशील दिग्दर्शक आहे. मला फार बरे वाटले त्याच्या सोबत काम करताना. इंग्रजी भाषेला तिचा विरोध नाही, परंतु प्रत्येकाने आपली मातृभाषा जपावी असे तिला वाटते. मुले इंग्रजी माध्यमात शिकत असली तरी पालक म्हणून आपण त्याच्या मराठी भाषेकडे लक्ष दिले पाहिजे. त्याला मराठी भाषा लिहिता व वाचता आली पाहिजे. मराठी भाषेत त्याने आईला हाक मारली पाहिजे. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत असे तिला वाटते.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 12:30 am

Satara News: जिल्ह्यातून निघणार साहित्य प्रेरणा ज्योती; संमेलनस्थळी 1 जानेवारीला होणार स्वागत

प्रभात वृत्तसेवा पुणे – सातारा येथे होत असलेले 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरावे म्हणून संयोजन समितीच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. सातारा जिल्ह्याला साहित्यिकांची समृद्ध परंपरा लाभली आहे. या साहित्यिकांच्या स्मृती जागवण्यासाठी गुरुवार, दि. 1 जानेवारी 2026 रोजी जिल्ह्यातील दिवंगत साहित्यिकांच्या निवासस्थानापासून संमेलनस्थळापर्यंत ‘साहित्य प्रेरणा ज्योत’ […] The post Satara News: जिल्ह्यातून निघणार साहित्य प्रेरणा ज्योती; संमेलनस्थळी 1 जानेवारीला होणार स्वागत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 12:15 am

शत्रुत्वाची भावना

बांगलादेशमधील अराजकता आणि सतत वाढणाऱ्या हिंसाचारामुळे तिथल्या हिंदू अल्पसंख्याक समुदायाचे जीवन संकटात सापडले आहे. गेल्या आठवड्यातील एका घटनेचे पडसाद भारतातही उमटले. बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यातील भालुका येथे घडलेली ही घटना. दीपूचंद्र दास नावाच्या हिंदू तरुणाची जमावाने क्रूरपणे हत्या केली. मृत्यूनंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवून जाळून टाकण्यात आला. या घडलेल्या घटनेनंतर भारतातील हिंदूमध्येही संतापाची लाट पसरली. मुंबई, दिल्लीसह देशातील अनेक भागांत बांगलादेश सरकारविरोधात निदर्शने झाली. पण, हे कधी थांबेल? या आशेवर बांगलादेशातील अल्पसंख्याक समाज जीव मुठीत घेऊन जगत आहे. अलीकडेच ढाका येथे शेख हसीना गटाचे कट्टर विरोधक 'इन्किलाब मंच'चे नेते शरीफ उस्मान हादी यांची अज्ञात लोकांनी हत्या केल्यानंतर भीषण हिंसाचार उसळला. या हिंसाचारात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांना लक्ष्य केले गेले. लुटमार, त्यांच्या घरांची जाळपोळ आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे हिंदू समाज भयभीत झाला. तसे पाहू गेल्यास बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांची जी आकडेवारी समोर आली, ती तिथल्या अल्पसंख्याक समाजाची चिंता वाढवणारी आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत अल्पसंख्याक; विशेषत: हिंदू महिलांवरील बलात्काराचे ३४२ गुन्हे नोंदवले गेले. मैमनसिंगमधील दीपू दास याच्या घृणास्पद हत्येच्या घटनेनंतर भारत सरकारने गंभीर दखल घेत बांगलादेश सरकारला सुनावले. रणधीर जयस्वाल यांनी एका धक्कादायक आकडेवारीचा दाखला दिला. बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या कार्यकाळात हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या तब्बल तीन हजारांहून अधिक घटनांची नोंद झाली, असे जयस्वाल यांनी सांगितले. बांगलादेशात अल्पसंख्याकांविरुद्ध पसरलेली शत्रुत्वाची भावना आणि हिंसाचार हा केवळ चिंतेचा विषय नसून तो गंभीर आंतरराष्ट्रीय प्रश्न बनत चालला आहे, हे यावरून दिसून येते.बांगलादेशाच्या निर्मितीला भारत कारणीभूत असल्याने गेल्या ५० वर्षांपासून भारताचे बांगलादेशसोबत मैत्रीचे संबंध होते. भारताला पूरक असलेली शेख हसीना यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी बांगलादेशातील आंदोलकांना चीनकडून छुप्या पद्धतीने रसद पुरवली गेली होती, याचे पुरावे आता समोर येत आहेत. त्यामुळे, विद्यमान सरकारच्या पदराआडून चीनच्या कुरघोड्या सुरू आहेत, हे उघड आहे. भारताबद्दल सहानुभूती बाळगणारा मोहम्मद युनूस यांच्यासारखा नेता सध्या बांगलादेशचा हंगामी पंतप्रधान आहे, असा समज सुरुवातीला होता. पण, शेख हसीना सरकारचे पतन झाल्यापासूनच दोन्ही देशांतील संबंधात कटुता येणे सुरू झाले होते. पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' मोहीम यशस्वीरीत्या राबवली. परंतु, शेजारी असलेल्या बांगलादेशाने भारतासोबत व्यापार युद्ध सुरू केले. भारतात आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर शुल्क लावण्याची घोषणा करून बांगलादेशानेच या व्यापार युद्धाची सुरुवात केली. भारताने त्याला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशात निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर निर्यातशुल्क लावण्याची घोषणा केली. बांगलादेशाचे एवढ्यात समाधान झाले नाही म्हणून की काय, भारताशी झालेला १८० कोटींचा संरक्षण करार रद्द केला. त्यामुळे, बांगलादेशातील बहुसंख्याक मुस्लीम समाजाचाच नव्हे; तर सरकारचा भारतविरोधी द्वेष जगासमोर आला आहे.बांगलादेशच्या २०२२ च्या जनगणनेनुसार, बांगलादेशात हिंदू धर्मीय हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धर्मीय आहेत. बांगलादेशातील ६४ पैकी ६१ जिल्ह्यांमध्ये हिंदू धर्मीय राहतात. बांगलादेशातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे ७.९५ टक्के लोक हिंदू आहेत. भारत आणि नेपाळनंतर बांगलादेशमध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाची हिंदू लोकसंख्या असल्याचे मानले जाते. बांगलादेशात पसरलेल्या अत्याचारांच्या सर्वाधिक बळी अल्पसंख्याक हिंदू महिला आहेत. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्यापूर्वी, हिंदूसह धार्मिक अल्पसंख्याकांना जिवंत जाळण्यासारखे भयानक प्रकार वारंवार घडत आहेत, हा चिंतेचा विषय आहे. बांगलादेशातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था हेसुद्धा त्यातील एक कारण आहे. हसीना यांनी भारतात आश्रय घेतला असल्याचा राग म्हणून बांगलादेशातील हिंदूंना टार्गेट केले जात आहे का? या मुद्द्यावर मतांतरे असू शकतात; परंतु, हसीना यांच्याविरोधातील मुख्य राजकीय पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे कार्यवाहक अध्यक्ष तारिक रहमान यांनी ‘हिंदू-मुस्लीम करू नका, ते सगळे बांगलादेशचे नागरिक आहेत,’ असे केलेले वक्तव्य आशादायक आहे. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे रहमान हे ज्येष्ठ पुत्र असून १७ वर्षांनी लंडनहून मायदेशी परतले आहेत. 'हा देश डोंगराळ आणि मैदानी भागातील लोकांचा, मुस्लीम, हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चनांचा आहे. आम्हाला एक सुरक्षित बांगलादेश निर्माण करायचा आहे; जिथे प्रत्येक महिला, पुरुष आणि मूल घराबाहेर पडू शकेल आणि सुरक्षितपणे परत येऊ शकेल', असे रहमान यांचे बांगलादेशी नागरिकांना संबोधून केलेले भाषण चर्चेचा विषय ठरला आहे. बांगलादेशींच्या मनात भारताविरोधातील आणि हिंदू धर्मीयाविरोधातील शत्रुत्वाचा वाढलेला भाव ते कितीपत कमी करतात, हे येणाऱ्या काळात दिसून येईल. बांगलादेशातील हिंसाचाराच्या घटनांना केवळ माध्यमाची अतिशयोक्ती किंवा राजकीय हिंसा म्हणून दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही, हे बांगलादेशाला पुन्हा ठणकाणून सांगण्याची हीच वेळ आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 12:10 am

NCP Political Crisis : शरद पवारांनंतर आता अजित पवारांना हादरा; प्रशांत जगतापानंतर आणखी एक बडा नेता बंडाच्या तयारीत?

Maharashtra Politics : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या (१५ जानेवारी) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (दोन्ही गट) मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी गट (शरद पवार आणि अजित पवार) यांच्यात पुणे-पिंपरी-चिंचवडसाठी युतीची चर्चा जोर धरत असताना, दुसरीकडे दोन्ही गटांमध्ये नाराजी आणि बंडखोरीच्या बातम्या समोर येत आहेत. प्रशांत जगताप यांचा राजीनामा शरद पवार गटाचे (NCP-SP) पुणे शहराध्यक्ष […] The post NCP Political Crisis : शरद पवारांनंतर आता अजित पवारांना हादरा; प्रशांत जगतापानंतर आणखी एक बडा नेता बंडाच्या तयारीत? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 26 Dec 2025 10:38 pm

31 डिसेंबरपूर्वी रेशन कार्डाचे e-KYC पूर्ण करा, अन्यथा 1 जानेवारीपासून धान्य बंद होणार, घरबसल्या चेक करा स्टेटस

नवी दिल्ली: जर तुम्ही रेशन कार्डाद्वारे मिळणाऱ्या मोफत धान्याचा लाभ घेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी रेशन कार्डाची e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही मुदत पाळली नाही, तर १ जानेवारी २०२६ पासून तुम्हाला मिळणारे मोफत रेशन बंद होऊ शकते. अनेक लाभार्थ्यांना अद्याप त्यांचे e-KYC झाले […] The post 31 डिसेंबरपूर्वी रेशन कार्डाचे e-KYC पूर्ण करा, अन्यथा 1 जानेवारीपासून धान्य बंद होणार, घरबसल्या चेक करा स्टेटस appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 26 Dec 2025 10:34 pm

मुंबईकरांच्या आरोग्याला महापालिका निवडणुकांचा फटका !

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी दरम्यान, शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर संकटाचे ढग दाटून येत आहेत. महापालिका आरोग्य विभागाचे सुमारे ८० टक्के कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर तैनात असल्याने, अत्यावश्यक नागरी आरोग्य सेवांवर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, आरोग्य विभागाच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांपासून ते आशा वर्कर्स, नर्सिंग स्टाफ आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना निवडणूक कामासाठी तैनात करण्यात आले आहे. यामुळे महापालिका दवाखाने व आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे.जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे देणे, मुले व गर्भवती महिलांना लसीकरण करणे आणि मलेरिया निर्मूलन मोहिमा यासारख्या नियमित परंतु अत्यंत महत्त्वाच्या कामांमध्ये गंभीर अडथळे येत आहेत.आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे माता व बाल आरोग्य सेवांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. याव्यतिरिक्त, क्षयरोग, डेंग्यू आणि मलेरिया सारख्या आजारांच्या प्रतिबंध आणि नियंत्रणाशी संबंधित कार्यक्रम मंदावले आहेत. अनेक वॉर्डांमध्ये क्षेत्रीय स्तरावरील देखरेख आणि जागरूकता मोहिमा जवळजवळ थांबल्या आहेत. या परिस्थितीमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरत आहे.नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना एका कर्मचाऱ्याने सांगितले की, आधीच मर्यादित संसाधनांचा वापर केला जात आहे. ८० टक्के कर्मचाऱ्यांना निवडणूक कामावर पाठवणे सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. फयाज आलम शेख यांनी या निर्णयावर तीव्र चिंता व्यक्त केली. लोकशाहीसाठी निवडणुका आवश्यक आहेत; परंतु सार्वजनिक आरोग्य त्याहूनही महत्त्वाचे आहे.

फीड फीडबर्नर 26 Dec 2025 10:30 pm

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी

मागील ११ वर्षांत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ११० हून अधिक मराठी शाळांना टाळेमुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचा शिक्षण विभाग गुणवत्तावाढीसाठी विविध प्रयत्न करीत असला तरीही अनेक शाळांचे प्रश्न प्रलंबित आहेत. मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचे घटते प्रमाण, पुनर्बांधणीसाठी तोडलेल्या शाळांचे रखडलेले बांधकाम, समायोजित विद्यार्थ्यांची दूरच्या शाळेत पायपीट, इंग्रजी माध्यमांना तुलनेने अधिक प्राधान्य, अपुरा शिक्षक वृंद आदी विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी होऊ लागली आहे. याबाबत शैक्षणिक कार्यकर्ते, विविध संघटनांनी वारंवार पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.मुंबई महापालिकेच्या शाळांचा दर्जा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागातर्फे विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र, तरीही पालिकेच्या अनेक शाळांमध्ये मूलभूत सोयी – सुविधा पुरविण्यात पालिकेला यश आलेले नाही. शिक्षण विभागासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणाऱ्या महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुलभ सुविधा मिळणे अपेक्षित असले तरीही बहुतांश शाळांमधील वास्तव निराशाजनक आहे.वर्ष २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात मुंबई महापालिका मराठी माध्यमाच्या ३६८ शाळा चालवत होती. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शाळांची संख्या २५४ इतकी झाली आहे. म्हणजे ११ वर्षांत ११० हून अधिक शाळा बंद झाल्या आहेत. शिक्षकांअभावी पासपोली शाळा क्र. २ जुलैमध्ये कायमस्वरूपी बंद करण्यात आली. त्यापूर्वी २०१८ मध्ये पासपोली शाळा क्र. ३ बंद झाली होती. दुरुस्ती आणि डागडुजीअभावी खिंडीपाडा शाळेलाही टाळे लागले. गेल्या वर्षात पालिकेच्या एकूण ८ मराठी शाळा बंद झाल्या. परिणामी मराठी शाळांचे भविष्य टांगणीला लागले आहे. गेल्या तीन वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संख्येत ६ ने भर पडली. मराठी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यासाठी मुंबई शहर व उपनगरातील विविध पक्षांमध्ये कार्यरत असणारे मराठी राजकीय घटकही उदासीनता दाखवत आहेत. या उदासीनतेमुळेच मुंबई महापालिका क्षेत्रातील मराठी शाळांना घरघर लागली असून शाळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे चित्र कायम राहिल्यास सर्वच मराठी शाळांना कायमचेच टाळे लागण्याची भीती आहे.शिक्षकांची अपुरी संख्याअनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांना अध्यापनात अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेक शाळांमध्ये तीन ते चार इयत्तांमधील विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवून शिकवण्याची नामुष्की पालिकेच्या शिक्षण विभागावर ओढवली आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया रखडल्यामुळे उपलब्ध शिक्षकांवर प्रचंड ताण येत असून शिक्षकांअभावी शाळा बंद पडल्याची उदाहरणे यापूर्वी मुंबईत घडली आहेत. दरम्यान, वर्ष २०२१ – २२ मध्ये पालिकेच्या शिक्षण विभागात एकूण ९७५५ शिक्षक होते. त्यात घट होऊन २०२४ – २५ मध्ये सेवेत ८६३० शिक्षक आहेत.समायोजनात नियोजन नाहीशाळा बंद पडल्यानंतर किंवा शाळेचे पाडकाम केल्यांनतर तेथील विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन केले जाते. घरापासून १ किलोमीटरच्या परिघात शाळा असावी, असा नियम असतानाही विद्यार्थ्यांना दूरपर्यंत पायपीट करावी लागते. मोरी रोड शाळा, न्यू माहीम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले असून विद्यार्थ्यांना दूरच्या शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना धारावीतून कापड बाजार येथील पालिकेच्या शाळेतील येण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे ते १ तास पायी चालावे लागते. चेंबूरनाका येथेही अशीच स्थिती आहे.विद्यार्थी संख्येत वाढपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या निकालाचा आलेख, व शैक्षणिक गुणवत्तेमुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. वर्ष २१-२२ मध्ये पालिका शाळेत २ लाख ९२ हजार ८२५ विद्यार्थी शिक्षण घेत होते. पालिका शाळांमध्ये २३-२४ मध्ये ३ लाख २८ हजार ६०२ विद्यार्थी, २४-२५ मध्ये ३ लाख १० हजार ४२६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

फीड फीडबर्नर 26 Dec 2025 10:30 pm