SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

27    C
...

Share Market Updates : सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारावर दबाव असूनही सेन्सेक्स-निफ्टीमध्ये सुधारणेचा कल

नवी दिल्ली : आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर देशांतर्गत शेअर बाजार नीचांकी पातळीवरून सावरत असल्याचे दिसत आहे. आजच्या व्यवहाराची सुरुवातही कमजोर झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये मोठी घसरण झाली. तथापि, थोड्याच वेळात खरेदीदारांनी पुन्हा खरेदी सुरू केल्याने दोन्ही निर्देशांकांच्या कामगिरीत सुधारणा झाली. सकाळी १० वाजेपर्यंत, सेन्सेक्स ०.२८ टक्क्यांनी, तर निफ्टी ०.३७ टक्क्यांनी घसरून व्यवहार करत होता.शेअर बाजारातील दिग्गज कंपन्यांमध्ये, हिंडाल्को इंडस्ट्रीज, विप्रो, ओएनजीसी, बजाज फायनान्स आणि कोल इंडिया यांचे शेअर्स ३.२८ टक्के ते ०.७२ टक्क्यांपर्यंतच्या वाढीसह व्यवहार करत होते. दुसरीकडे, मॅक्स हेल्थकेअर, इंटरग्लोब एव्हिएशन, इटरनल, महिंद्रा अँड महिंद्रा आणि आयशर मोटर्सचे शेअर्स २.६५% ते १.८६% पर्यंतच्या तोट्यासह व्यवहार करत होते.आजच्या व्यवहारानुसार, शेअर बाजारात २,६४९ स्टॉक्सचा सक्रिय व्यवहार सुरू होता. यापैकी १,३८७ स्टॉक्स नफ्यात व्यवहार करत होते, तर १,२६२ स्टॉक्स तोट्यात व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे, सेन्सेक्समधील ३० स्टॉक्सपैकी ११ स्टॉक्स खरेदीच्या पाठिंब्याने नफ्यात व्यवहार करत होते. दुसरीकडे, विक्रीच्या दबावामुळे १९ स्टॉक्स तोट्यात व्यवहार करत होते. निफ्टीमधील ५० स्टॉक्सपैकी १४ स्टॉक्स नफ्यात व्यवहार करत होते, तर ३६ स्टॉक्स तोट्यात व्यवहार करत होते.बीएसई सेन्सेक्स आज ३७२.४९ अंकांच्या घसरणीसह ७५,७३४.३६ अंकांवर उघडला. व्यवहाराच्या सुरुवातीला, निर्देशांक ८२४.४४ अंकांनी घसरून ७३,२८२.४१ अंकांवर आला. त्यानंतर लगेचच, खरेदीदारांनी खरेदी सुरू केल्याने निर्देशांकाच्या हालचालीत सुधारणा झाली. बाजारात सुरू असलेल्या खरेदी-विक्रीच्या दरम्यान, सकाळी १० वाजता सेन्सेक्स २०४.२७ अंकांनी घसरून ७३,९०२.५८ अंकांवर व्यवहार करत होता.सेन्सेक्सप्रमाणेच, एनएसई निफ्टी देखील १२९.५५ अंकांनी घसरून २२,८३८.७० अंकांवर आला. बाजार उघडताच, निर्देशांक २४८.९५ अंकांनी घसरून २२,७१९.३० अंकांवर आला होता. त्यानंतर खरेदीदारांनी पुन्हा खरेदी सुरू केल्याने निर्देशांकात सुधारणा झाली. बाजारात सुरू असलेल्या खरेदी-विक्रीनंतर, सकाळी १० वाजेपर्यंतच्या व्यवहारानंतर, निफ्टी ८४.८० अंकांच्या घसरणीसह २२,८८३.४५ अंकांवर व्यवहार करत होता.तत्पूर्वी सोमवारी, अगोदरच्या दिवशी सेन्सेक्स ७८७.३० अंकांनी किंवा १.०७ टक्क्यांनी वाढून ७४,१०६.८५ अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी २५५.१५ अंकांनी किंवा १.१२ टक्क्यांनी वाढून २२,९६८.२५ अंकांवर बंद झाला होता.

फीड फीडबर्नर 7 Apr 2026 1:10 pm

Pune News : नराधम माता! स्वार्थासाठी आईनेच संपवला ११ महिन्यांचा पोटचा गोळा; कारण ऐकून बसेल धक्का...

शिरूर : आईच्या प्रेमाला कलंक लावणारी एक अतिशय संतापजनक घटना शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथे उघडकीस आली आहे. एका निष्ठुर मातेने आपल्या केवळ ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा बळी घेतल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पूजा रवींद्र पवार असे या आरोपी महिलेचे नाव असून, तिने स्वतःच्या स्वार्थापोटी 'यश' नावाच्या आपल्या निष्पाप मुलाची निर्घृण हत्या केली. केवळ हत्या करूनच ही माता थांबली नाही, तर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी तिने चिमुकल्याचा मृतदेह जवळच असलेल्या एका विहिरीत फेकून दिला. आईच्या कुशीत सुरक्षित वाटणाऱ्या यशचा अशा प्रकारे अंत झाल्याचे समजताच परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या क्रूर कृत्यामागचे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू केला आहे.दुसरं लग्न करायचंय, मुलगा नकोय' ...पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत आरोपी पूजा पवार हिने आपला गुन्हा कबूल केला. मला दुसरे लग्न करायचे होते, पण लहान मुलगा सोबत असेल तर लग्न होण्यात अडचणी येतील, अशा अत्यंत विकृत आणि निष्ठुर विचारातून तिने यशला संपवण्याचा कट रचल्याची कबुली दिली आहे. एका मातेच्या स्वार्थापायी निष्पाप जीवाचा अंत झाल्याने तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. कोकणातील मुरुड येथून फिरून आल्यानंतर मुलगा यश सतत रडत होता. याचा राग मनात धरून तिने हे अमानुष पाऊल उचलले.https://prahaar.in/2026/04/07/gas-cylinder-relief-government-doubles-supply-of-5-kg-lpg-cylinders-migrants-students-to-benefit-from-govt-move/पुरावा नष्ट करण्यासाठी मातेचा भयंकर कटआपल्या ११ महिन्यांच्या मुलाला मार्गातून हटवण्यासाठी या मातेने अमानुषतेचा कळस गाठला. पूजाने यशचे डोके घरासमोरील सिमेंटच्या ओट्यावर जोराने आपटून त्याला जागीच संपवले. हत्या केल्यानंतर कोणताही पुरावा मागे राहू नये, यासाठी पूजाने अत्यंत नियोजनबद्ध रितीने रक्ताचे डाग पाण्याने धुवून काढले. एवढेच नव्हे तर, मुलाचा मृतदेह एका कपड्याच्या बॅगेत कोंबून ती बॅग जड करण्यासाठी त्यात मोठे दगड भरले. ही बॅग पाण्यावर तरंगू नये म्हणून तिने ती शेतातील एका खोल विहिरीत फेकून दिली. गुन्हा केल्यावर कोणताही पश्चात्ताप न होता पूजाने या सर्व गोष्टी अत्यंत शांतपणे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, तिच्या या निर्दयी वागण्यामुळे शिरूर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.पोटच्या गोळ्याची हत्या करणाऱ्या आईला बेड्यासुरुवातीला मुलगा बेपत्ता असल्याचे नाटक करणाऱ्या आणि अपघाताचा बनाव रचणाऱ्या पूजा पवार या मातेचा बुरखा अखेर पोलिसांनी फाडला आहे. वडील रवींद्र अशोक पवार यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयावरून पूजाची चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या पूजाने पोलिसांच्या कडक तपासणीसमोर गुडघे टेकले आणि आपल्या पोटच्या गोळ्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत शेतातील विहिरीतून ११ महिन्यांच्या यशचा मृतदेह बाहेर काढला असून तो उत्तरीय तपासणीसाठी (Post-mortem) पाठवण्यात आला आहे. आपल्याच मुलाचा जीव घेऊन गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या घटनेमुळे भांबर्डे गावासह संपूर्ण शिरूर तालुका हादरला असून, एका निष्पाप जिवाचा बळी घेणाऱ्या या मातेला कठोर फाशीची शिक्षा व्हावी, अशी संतप्त मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.

फीड फीडबर्नर 7 Apr 2026 1:10 pm

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात नवीन ट्विस्ट ; IAS पाठोपाठ दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा

नाशिक : नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पदर उलगडू लागले आहेत. पोलीस कोठडीत असलेल्या खरातची कसून चौकशी सुरू असतानाच, या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट प्रशासकीय वर्तुळापर्यंत पोहोचले आहेत. अशातच आता या प्रकरणात अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. IAS पाठोपाठ दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी अशोक खरातला मिळालेल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे. यामुळे फक्त नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालीये.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील आयएएस (IAS) अधिकाऱ्यापाठोपाठ दोन महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या. खरातच्या संपर्कात असलेल्या या महिला अधिकाऱ्यांपैकी एक डीसीपी (DCP) तर दुसरी एसीपी (ACP) दर्जाची अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. या दोन महिला पोलीस अधिकारी कोण? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.हवी तिथे पोस्टिंग मिळावी म्हणून ...वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या या महिला अधिकाऱ्यांचे नाव खरातसोबत जोडले गेल्याने तपास यंत्रणांनी नव्या मार्गाने तपास सुरू केला आहे. आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी बाबाकडे धाव घेतली होती का? असा सवाल देखील विचारला जात आहे. अशोक खरात प्रकरणात भोंदू बाबासोबत काही आर्थिक व्यवहारही झाले का? याबाबत तपास होण्याची शक्यता असल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल :अशोक खरातवर (Ashok Kharat) केवळ लैंगिक अत्याचाराचेच नव्हे, तर फसवणुकीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती उभी केल्याचे आरोपही आहेत. नाशिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा सखोल तपास सुरू केला आहे. पोलिसांनी जमा केलेली महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या ताब्यात देण्यात आली असून, खरातचे आर्थिक साम्राज्य नेमके कसे उभे राहिले, याचा तपास सुरू आहे.

फीड फीडबर्नर 7 Apr 2026 1:10 pm

Pratap Sarnaik : शालेय सहलींतून एसटीच्या तिजोरीत १२७ कोटींची भर

महसुलात मोठी वाढ; सुरक्षित प्रवासाला पालकांची पसंतीमुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यातील ‘लाल परी’ने शालेय सहलींच्या माध्यमातून यंदा यशाचे नवे शिखर गाठले आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात एसटीने २५ हजार ५५८ बस फेऱ्यांच्या माध्यमातून तब्बल १२७ कोटी १८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविले असून, मागील वर्षाच्या तुलनेत महसुलात ३३ कोटी २९ लाखांची मोठी वाढ झाली आहे. सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी आजही ‘एसटी’च विद्यार्थ्यांची पहिली पसंती असल्याचे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, शालेय सहल हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटन स्थळांची ही मुशाफिरी सुरक्षित असावी, याकडे शासनाचा कटाक्ष आहे. या शैक्षणिक वर्षात लाखो विद्यार्थ्यांनी एसटीच्या माध्यमातून सुखकर प्रवास केला असून, सुरक्षिततेच्या बाबतीत एसटीला पर्याय नाही, यावर या उत्पन्नाने शिक्कामोर्तब केले आहे.शाळा आणि महाविद्यालयांनी एसटीच्या माध्यमातून सहलींचे आयोजन केल्यास विद्यार्थ्यांना प्रवासी भाड्यात शासनाकडून ५० टक्के सवलत दिली जाते. यामुळेच विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांना एसटीचा आधार मोठा वाटतो. खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत माफक दर आणि विश्वासार्हता ही एसटीची बलस्थाने ठरली आहेत.नव्या बसेसमुळे प्रवास झाला सुखकरयंदा बहुतांश सहलींसाठी महामंडळाने नव्या आणि अद्ययावत बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास केवळ सुरक्षितच नाही, तर अत्यंत आरामदायी आणि समाधानकारक झाला. राज्यभरातून मिळालेल्या २५ हजार ५५८ बस फेऱ्यांच्या मागणीवरून एसटीवरील जनतेचा विश्वास अधोरेखित झाला आहे.शालेय सहलींसाठी एसटीने नेहमीच पुढाकार घेतला आहे. आगामी काळातही शाळा-महाविद्यालयांनी खासगी बसेसच्या मागे न लागता एसटीच्या सुरक्षित प्रवासालाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन मी करतो.

फीड फीडबर्नर 7 Apr 2026 1:10 pm

Pooja Sawant : “संसारासाठी मी काही वेळ काम सोडून ऑस्ट्रेलियाला गेले पण…”; पूजा सावंतने केला खुलासा

Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंत सालबर्डी सिनेमामुळे चर्चेत असून तिने नुकत्याच एका मुलाखतीत खाजगी आयुष्यावर विचारलेल्या प्रश्नांवर मनमोकळीपणाने उत्तर दिली.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 12:57 pm

Tamil Nadu news: देशात पहिल्यांदाच 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा ; पोलिस कोठडीत बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय

Tamil Nadu news: पोलिस कोठडीत झालेल्या बेदम मारहाणीमुळे बाप-लेकाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात मदुराई जिल्हा न्यायालयाने मोठा निर्णय देत 9 पोलिस कर्मचाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 12:46 pm

Chetak Screen Awards 2026 : धर्मेंद्र यांचा लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार स्वीकारताना बॉबी देओलला अश्रु अनावर

Chetak Screen Awards 2026 : जावेद अख्तर, रमेश सिप्पी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार बॉबी देओलने स्वीकारला.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 12:39 pm

Nanded News : खेळता खेळता चेंडू आणायला छतावर गेला अन् क्षणात...नांदेड हादरलं!

नांदेड : सुट्ट्यांचा आनंद घेत मित्रांसोबत क्रिकेट खेळणाऱ्या एका लहान मुलावर काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खेळता खेळता चेंडू घराच्या छतावर गेला, जो आणण्यासाठी हा मुलगा उत्साहाने वर चढला. मात्र, तिथे असलेल्या विजेच्या उच्च दाबाच्या तारेचा त्याला भीषण स्पर्श झाला. विजेचा धक्का इतका जोरदार होता की, क्षणात मुलाच्या अंगातील कपड्यांनी पेट घेतला आणि तो छतावरून खाली कोसळला. भररस्त्यात मुलाच्या शरीरातून धूर निघत असताना आणि तो वेदनेने धडपडत असताना पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. विजेचा प्रवाह शरीरात असण्याच्या भीतीने सुरुवातीला कोणाचेही पुढे जाण्याचे धाडस झाले नाही. काही क्षणांपूर्वी मैदानावर उमटणारे हास्य एका भीषण किंकाळीत बदलले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि चिंतेचे सावट पसरले आहे. चिमुकल्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.छतावर चेंडू आणायला गेला आणि...मित्रांसोबत खेळात दंग असलेला अरमान खान हा मुलगा एका भीषण अपघाताचा बळी ठरला. उत्साहाने चौकार-षटकार मारणाऱ्या या मुलांचा खेळ सुरू असताना अचानक चेंडू जवळच असलेल्या एका दुकानाच्या लोखंडी पत्र्यावर गेला आणि सर्वच चित्र बदलले. चेंडू आणण्यासाठी अरमान उत्साहाने पत्र्याच्या छतावर चढला, मात्र तिथेच मृत्यू दबा धरून बसला होता. छताच्या अगदी जवळून विजेच्या हायव्होल्टेज तारा गेल्या होत्या. चेंडू उचलण्याच्या प्रयत्नात असताना अरमानचा हात उघड्या तारेला लागला. लोखंडी पत्रा आणि उच्च दाबाचा वीजप्रवाह यामुळे प्रचंड मोठा स्फोट झाला. हा झटका इतका भीषण होता की, अरमानचा जागीच कोळसा झाला. क्षणात हसतं-खेळतं वातावरण आक्रोशात बदलले असून या घटनेने संपूर्ण कुंडलवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.नांदेडमधील घटनेने पालकांमध्ये भीतीचं वातावरणबिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथे घडलेल्या त्या भीषण वीज अपघातानंतर परिसरात अद्यापही दहशतीचे वातावरण आहे. डोळ्यादेखत मित्राला आगीच्या विळख्यात पाहिल्यानंतर सोबत खेळणाऱ्या इतर लहान मुलांची अक्षरशः बोबडी वळाली. हायव्होल्टेज तारेच्या धक्क्याने अरमान गंभीररीत्या भाजला असून, त्याला तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अरमानवर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. हसत-खेळत घराबाहेर पडलेला मुलगा थेट मृत्यूच्या दारात पोहोचल्याने खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने एक गंभीर प्रश्न उपस्थित केला असून, उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळणाऱ्या मुलांवर पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे किती गरजेचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अरमानच्या जिवासाठी सध्या संपूर्ण जिल्हा प्रार्थना करत असून डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

फीड फीडबर्नर 7 Apr 2026 12:30 pm

Iran Israel War: मुदतीपूर्वीच इराणवर हल्ला ; अमेरिकेने IRGCच्या भूमिगत मुख्यालयावर बंकर-बस्टर बॉम्बहल्ला

Iran Israel War: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने इराणला मोठा धक्का दिला आहे.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 12:25 pm

Newasa News : वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड संभाजी काळे; उपाध्यक्षपदी अॅड. राजू इनामदार यांची निवड

Newasa News : वकील संघाच्या झालेल्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड जी. एम निकम व अँड ए. जी करडक यांनी काम पाहिले.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 12:21 pm

Operation NoVoice: ‘ऑपरेशन नोव्हॉइस’चा धोका! प्ले स्टोअरवरील अॅप्समधून फोन हॅक; डिलीट केल्यानंतरही व्हायरस कायम

Operation NoVoice हे अॅप्स दिसायला पूर्णपणे सामान्य आणि विश्वासार्ह वाटत होते. फोटो एडिटिंग, गेम्स किंवा युटिलिटी अॅप्सच्या नावाखाली हे उपलब्ध होते. त्यामुळे वापरकर्त्यांना संशय न येता त्यांनी हे अॅप्स सहज डाउनलोड केले. पण प्रत्यक्षात या अॅप्समध्ये अत्यंत धोकादायक मॅलवेअर लपलेले होते.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 12:16 pm

LPG Gas Cylinder : मोठी बातमी! आता ५ किलोचे गॅस सिलिंडर मिळणार 'डबल'; LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट ओढवले असून, याचे पडसाद भारतातही उमटताना दिसत आहेत. एलपीजी गॅसच्या वाढत्या तुटवड्यामुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच, केंद्र सरकारने एक दिलासादायक पाऊल उचलले आहे. विशेषतः विद्यार्थी आणि स्थलांतरित कामगारांची सोय लक्षात घेऊन सरकारने ५ किलोच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा आता दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक संकटामुळे उद्भवलेल्या टंचाईवर मात करण्यासाठी सरकारने हा 'डबल सिलिंडर'चा कोटा लागू केला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा रोजंदारीवर काम करणारे मजूर, शहरात राहणारे विद्यार्थी आणि नोकरीनिमित्त स्थलांतर करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. गॅस तुटवड्यामुळे निर्माण झालेली ओढाताण कमी करण्यासाठी आणि गरजूंपर्यंत इंधन पोहोचवण्यासाठी सरकारने ही यंत्रणा अधिक गतीमान केली आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा आधार मिळाला आहे.https://prahaar.in/2026/04/07/sangli-crime-news-disputes-at-a-tamasha-alcohol-and-romantic-relationships-a-deadly-end-three-consecutive-murders-in-sangli-within-24-hours-create-a-sensation/५ किलो सिलिंडरचा कोटा दुप्पटराज्यांमध्ये निर्माण झालेली सिलिंडरची पळापळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने ५ किलोच्या छोट्या गॅस सिलिंडरचा कोटा दुप्पट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सर्व राज्य सरकारांना तातडीने पत्र पाठवण्यात आले असून, सिलिंडरचे दैनंदिन वाटप वाढवण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे आता सामान्य नागरिकांना सिलिंडरसाठी वणवण करावी लागणार नाही.स्थलांतरित आणि विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णयआता स्थलांतरित कामगार, मजूर आणि विद्यार्थ्यांना गॅस कनेक्शनसाठी पत्त्याच्या पुराव्याची (Address Proof) अट राहणार नाही. केवळ आपले ओळखपत्र दाखवून ५ किलोचा 'एफटीएल' (FTL) सिलिंडर सहज खरेदी करता येणार आहे, ज्यामुळे कागदपत्रांच्या कटकटीतून त्यांची मुक्तता झाली आहे. या योजनेतंर्गत, केंद्र सरकार राज्य सरकारांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत या छोट्या सिलिंडरचा साठा उपलब्ध करून देत आहे. तेल विपणन कंपन्यांमार्फत थेट वितरण केले जाणार असल्याने, रोजंदारीवर काम करणाऱ्यांना आणि बाहेरगावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हा गॅस वेळेवर मिळणे सोपे होणार आहे. जागतिक संघर्षाचा फटका सर्वसामान्यांच्या चुलीला बसू नये, यासाठी सरकारने वितरणाची ही नवीन आणि सोपी व्यवस्था तातडीने कार्यान्वित केली आहे.

फीड फीडबर्नर 7 Apr 2026 12:10 pm

Thane News: उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ 10 ते 12 वाहनांची तोडफोड; स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

Thane News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराजवळ ही घटना घडल्यामुळे सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 12:07 pm

Share Market: तीन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार कोसळला ; सेन्सेक्स-निफ्टी १% नी घसरले, जाणून घ्या घसरणीची प्रमुख कारणे

Share Market: गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजारात दिसत असलेली तेजी आज ओसरली आहे

दैनिक प्रभात 7 Apr 2026 12:03 pm

LPG Crisis in India: इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारची मोठी घोषणा : आता नागरिकांना मिळणार डबल सिलिंडर, वाचा कोणाला होणार फायदा?

LPG Crisis in India: इराण युद्धानंतर भारतासह जगभरातील अनेक देशांना एलपीजीच्या संकटाचा सामना करावा लागला.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 11:45 am

Alia Bhatt: मोगऱ्याच्या फुलांनी सजलेली साडी; आलिया भट्टचा देसी ग्लॅमर आणि बॉस लेडी लुक ठरला चर्चेचा विषय!

Alia Bhatt या अवॉर्ड सोहळ्यासाठी आलियाने पहिल्यांदाच होस्टिंग केली. रेड कार्पेटवर तिचा देसी लुक सर्वांना भावला, तर स्टेजवर तिने बॉस लेडी अवतारात एंट्री घेतली. दोन्ही लुक्समध्ये ती कमाल दिसली, पण तिच्या मोगऱ्याच्या फुलांनी सजवलेल्या साडीने खास लक्ष वेधलं.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 11:40 am

Karuna Munde :  ….म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला; बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर करुणा मुंडेंची प्रतिक्रिया समोर

Karuna Munde :बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 11:29 am

Hinjewadi IT Park area : हिंजवडी माण आयटी पार्क परिसरात २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित; रहिवाशांचे तीव्र आंदोलन

Hinjewadi IT Park area : प्रत्यक्षात वीजपुरवठा केव्हा सुरू होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण

दैनिक प्रभात 7 Apr 2026 11:29 am

Sambhajiraje Chhatrapati : “निवडणुका दर पाच वर्षांनी येतच राहतील, पण…”; बारामती पोटनिवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपतींचे आवाहन  

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत सर्व पक्षांनी व नेतेमंडळींनी एक भावनिक आवाहन केले आहे.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 11:12 am

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे. त्यामुळे मीरा भाईंदर वासियांचा प्रवास आता लवकरच गारेगार आणि जलद , सुलभ होण्याची शक्यता आहे. तसेच पॉड टॅक्सिचे देखील भूमिपूजन करण्यात येणार आहे.मेट्रो ९ चे महत्व आणि कनेक्टिव्हिटीमेट्रो लाईन ९ ही मुंबई मेट्रो प्रकल्पातील महत्त्वाची मेट्रो लाईन मानली जात आहे. दहिसर ते काशिगाव दरम्यान धावणारी ही लाईन मेट्रो लाईन ७ शी जोडली गेल्यामुळे प्रवाशांना थेट अंधेरीपर्यंत प्रवास करता येणार आहे. यामुळे उपनगर आणि शहर यांतील अंतर कमी होऊन रोजच्या प्रवासाला मोठी गती मिळणार आहे.मार्ग आणि स्थानकांची माहितीया मेट्रो मार्गावर दहिसर, पांडुरंग वाडी, मीरा गाव आणि काशिगाव अशी प्रमुख स्थानके असणार आहेत. या स्थानकांमुळे मीरा-भाईंदर परिसरातील रहिवाशांना सहजपणे मेट्रो सेवा उपलब्ध होईल.मेट्रोमधील सुविधाही संपूर्ण लाईन एलिव्हेटेड स्वरूपात असून, प्रवाशांसाठी आधुनिक वातानुकूलित डबे उपलब्ध असतील. याशिवाय स्मार्ट कार्ड आणि QR कोड तिकीट सुविधा देण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली असून, प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.लाईन ७ आणि लाईन ९ संयुक्त कॉरिडॉरमेट्रो लाईन ७ आणि लाईन ९ या एकत्रितपणे कार्यरत राहणार असून, गुंदवली ते काशिगाव असा संयुक्त कॉरिडॉर तयार झाला आहे. यामुळे अंधेरी पूर्व ते मीरा-भाईंदर दरम्यान थेट प्रवास शक्य होणार आहे. लाईन ७ आता विस्तारित स्वरूपात अधिक प्रभावीपणे चालवली जाणार आहे.वेळापत्रक आणि सेवामेट्रो ची पहिली गाडी : ५.५० वाजता सुटणारशेवटची गाडी : रात्री ११ वाजेपर्यंत धावेलगर्दीच्या वेळेत ५ ते ६ मिनिटांच्या अंतराने गाड्या उपलब्ध असतीलइतर वेळेत ८ ते १० मिनिटांचा फरक असेलआठवड्याच्या दिवसांत २७६ फेऱ्या, शनिवारी २२३ आणि रविवारी २०५ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.प्रवास वेळेत मोठी बचतसध्या दहिसर ते काशिगाव हा प्रवास रस्त्याने साधारण ३० ते ४५ मिनिटांचा होतो. मात्र मेट्रो सुरू झाल्यानंतर हा प्रवास केवळ १० ते १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून दिलासा मिळून प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.पर्यावरण आणि विकासावर परिणामया प्रकल्पामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होऊन प्रदूषणात घट होण्याची अपेक्षा आहे. तसेच मीरा-भाईंदर परिसरातील विकासाला चालना मिळून रोजगार, शिक्षण आणि व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

फीड फीडबर्नर 7 Apr 2026 11:10 am

Sangli Crime News : तमाशातील वाद, दारू प्रेमसंबंधांचा शेवट; २४ तासांत सांगलीत सलग तीन खुनांनी खळबळ

सांगली : सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या खुनांच्या घटनांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कवलापूर आणि कुपवाड परिसरात घडलेल्या या घटनांमागे किरकोळ वाद, दारूचे नशेत झालेले भांडण आणि प्रेमसंबंधातील तणाव अशी विविध कारणे समोर आली आहेत.कवलापूरमध्ये तमाशा कार्यक्रमात वादातून खूनकवलापूर येथे यात्रेनिमित्त आयोजित तमाशा कार्यक्रमात पहिली घटना घडली. विश्वास कल्लाप्पा सुतार (वय ३२) हा तरुण कार्यक्रम पाहण्यासाठी आला होता. त्याचवेळी रोहित उर्फ नवनाथ नाईक हा देखील तेथे उपस्थित होता. गर्दीत झालेल्या धक्काबुक्कीमुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. दोघेही दारूच्या नशेत असल्याने वाद अधिक चिघळला. या वादातून रोहित उर्फ नवनाथ याने विश्वासच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.कुपवाडमध्ये दारू पिताना वाद; एकाचा खूनदुसरी घटना कुपवाड शहरात घडली. सचिन माने हा दारू पिण्यासाठी दुकानात गेला असताना त्याच्यासोबत पूर्वीपासून वाद असलेले दोन जण तेथे आले. त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. या घटनेत दोघांनी सचिन माने याच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केला. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.प्रेमसंबंधातून पत्नीनेच पतीचा घेतला जीवतिसरी घटना कुपवाड एमआयडीसी परिसरात समोर आली. दगडू केंगार या बांधकाम कामगाराचा खून त्याच्या पत्नीने केल्याचे उघड झाले आहे. संबंधित महिलेला पोलिसांनी अटक केली असून, तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या नात्याला पतीचा विरोध असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. अखेर या तणावातूनच पत्नीने पतीचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे.पोलिस तपास आणि परिसरातील तणावसलग तीन खुनांच्या घटनांमुळे सांगली जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सर्व घटनांचा सखोल तपास सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.छोट्याश्या कारणांवरून घडलेल्या या गंभीर घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पुढील काळात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सांगली पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

फीड फीडबर्नर 7 Apr 2026 11:10 am

Abhijeet Sawant and Priyanka Chopra: एअरपोर्टवर प्रियांका चोप्राची भेट; “तू आमच्यापेक्षा जास्त फेमस” म्हणाली, अभिजीत सावंतचा मजेशीर किस्सा!

Abhijeet Sawant and Priyanka Chopra अभिजीत सावंत हा भारताचा पहिला ‘इंडियन आयडल’ विजेता ठरला होता. त्या काळात त्याची लोकप्रियता खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती. देशभरात त्याची क्रेझ होती आणि त्याचा प्रभाव बॉलीवूड स्टार्सपर्यंत पोहोचला होता. याच काळातील एक अनुभव त्याने सांगितला आहे.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 11:05 am

Nana Patole : पार्थ पवार यांच्या ‘डाऊनफॉल’ विधानावर नाना पटोलेंची एकाच वाक्यात प्रतिक्रिया; विषयचं संपवला म्हणाले…

Nana Patole : पार्थ पवार यांनी काँग्रेसविषयी केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण तापले असून, आता पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 10:44 am

Dacoit Movie: ‘डकैत’ १० एप्रिलला थिएटरमध्ये; ओपनिंग कलेक्शन ‘एवढ्या’कोटींच्या घरात राहण्याची शक्यता!

Dacoit Movie ट्रेड तज्ज्ञांच्या मते, ‘डकैत’ चित्रपट पहिल्या दिवशी साधारण २ ते ४ कोटी रुपयांची कमाई करू शकतो. ही ओपनिंग मध्यम स्वरूपाची मानली जात आहे. त्यामुळे २०२६ मधील टॉप ३ तेलुगू ओपनर्समध्ये स्थान मिळवणे या चित्रपटासाठी कठीण दिसत आहे.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 10:32 am

Iran War: होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून इराणची अमेरिकेला धमकी ; युद्धविरामासाठी १०-कलमी योजना प्रसिद्ध 

Iran War: इजिप्त, पाकिस्तान आणि तुर्कीये या देशांनी मध्यस्थी करत शस्त्रसंधीचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र तो प्रस्ताव इराणने काल औपचारिकपणे फेटाळून लावला आहे.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 10:31 am

Amol Mitkari Baramati : “बारामतीत तुम्ही नाही म्हणजे पंढरीत विठ्ठल नाही”; शेवटचा पत्रव्यवहार करत मिटकरींनी घेतली दादांना न्याय मिळवून देण्याची हमी

Amol Mitkari Baramati : अमोल मिटकरी यांनी ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, त्या गोजुबावी ‌या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 10:24 am

Tabu Akshay Friendship : बॉलिवूडची जुनी मैत्री चर्चेत! अक्षय कुमार-तब्बू यांनी आठवणींना दिला उजाळा

Tabu Akshay Friendship : अक्षय कुमार आणि तब्बू यांची मैत्री आजही घट्ट आहे. भूत बंगला सिनेमाच्या ट्रेलर लॅान्चला दोघांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 9:34 am

US-Israel Iran War : “एका रात्रीत संपूर्ण इराण नष्ट करू ”म्हणणाऱ्या ट्रम्पला इराणचे सडेतोड उत्तर ; म्हणाले,”आम्ही पराभवाच्या भीतीने”

US-Israel Iran War : मध्य पूर्वेतील युद्ध अधिक तीव्र होत आहे. सोमवारीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली की, जर मंगळवार रात्रीपर्यंत करार झाला नाही, तर तेहरानला चार तासांत उद्ध्वस्त केले जाईल.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 9:26 am

Baramati byelection 2026 : “कुटुंबीयांच्या पूर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने…”;’त्या’टीकेवर काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर

Baramati byelection 2026 : पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात असल्याची टिप्पणी केली होती.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 9:12 am

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी करत आहे. मंदिरातील धार्मिक उपक्रम, देणग्या आणि त्यामागील आर्थिक व्यवहार यांची साखळी उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खरातसह मंदिराशी संबंधित व्यक्तींना समक्ष बसवून विचारपूस करण्यात आली असून, तपासाला नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पोलीस कोठडी आणि तपासाची दिशाया प्रकरणात अशोक खरात याला न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात तपास यंत्रणा त्याच्याकडून विविध बाबींवर सखोल माहिती घेत आहेत. केवळ धार्मिक उपक्रमांपुरता हा तपास मर्यादित न राहता आर्थिक आणि इतर गंभीर आरोपांच्या दिशेनेही तपास केला जात आहे.पुजारी आणि कर्मचाऱ्यांची समक्ष चौकशीतपासादरम्यान ईशान्येश्वर मंदिरातील पुजारी आणि एका कर्मचाऱ्याला पुन्हा एकदा समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. या प्रकारच्या चौकशीत वेगवेगळ्या जबाबांतील विसंगती तपासून सत्यस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. संबंधितांकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी करत तपास पथक पुढील धागेदोरे जोडत आहे.मंदिरातील देणग्या आणि आर्थिक प्रवाहाचा मागोवामंदिरात होणाऱ्या पूजा, विशेष विधी आणि त्यासाठी येणाऱ्या देणग्या यांचा तपशीलवार तपासला जात असून, दानरूपात मिळणारी रक्कम नेमकी कोणत्या खात्यांमध्ये जमा होत होती, ती रक्कम कशी वापरली जात होती, तसेच कॅश व्यवहार किती प्रमाणात होत होते याबाबत माहिती गोळा करण्यात येत आहे. या आर्थिक प्रवाहातून काही अनियमितता समोर येण्याची शक्यता तपासली जात आहे. मंदिरात आयोजित केल्या जाणाऱ्या महापूजा आणि विशेष धार्मिक विधींवरही तपास पथकाने लक्ष केंद्रीत केले आहे. या पूजा कोणाच्या मार्गदर्शनाखाली पार पडत होत्या, त्यासाठी कोणती व्यवस्था केली जात होती आणि त्या निमित्ताने आर्थिक व्यवहार झाले का, याचा सखोल तपास सुरू आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला जात होता का, याचाही शोध घेतला जात आहे.बँक खात्यांची मोठ्या प्रमाणावर छाननीअशोक खरात यांच्याशी संबंधित सुमारे 130 हून अधिक बँक खात्यांमधील व्यवहारांची तपासणी सुरू आहे. या खात्यांमधून सुमारे 63 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. काही खात्यांमध्ये खरात यांचे नाव नॉमिनी म्हणून आढळत असून, ती खाती त्यांच्या संपर्क क्रमांकावर चालवली जात असल्याचा अंदाज तपासातून समोर येत आहे. तपासादरम्यान पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील उच्च मूल्याच्या मालमत्तांकडेही लक्ष वेधले गेले आहे. या मालमत्ता त्याच्या चार्टर्ड अकाउंटंट प्रकाश पोफळे याच्या नावावर असल्याची माहिती समोर आली असून, 2024 मध्ये पोफळे यांनी 18 रो-हाऊस आणि सुमारे 49 गुंठे जमीन खरेदी केल्याची नोंद आहे. अधिकृत किमत 19.56 कोटी रुपये असली तरी बाजारमूल्य 100 कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.. अधिकृत किमतीपेक्षा बाजारमूल्य जास्त असल्याने काळा पैसा आणि कर फसवेगिरी केल्याचा संशय आहे.जमिनी आणि परदेशी आर्थिक दुव्यांचा तपासनाशिक, सिन्नर आणि शिर्डी परिसरातील 52 हून अधिक जमिनींची चौकशी करण्याची तयारी सुरू आहे. याशिवाय हवाला व्यवहार आणि परदेशातील आर्थिक दुवे, विशेषतः यूएईपर्यंत पोहोचणाऱ्या व्यवहारांचा तपासही पुढील टप्प्यात होण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रकरणाचा व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे.या प्रकरणात केवळ SITच नव्हे, तर अंमलबजावणी संचालनालय (ED) देखील तपासात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्थिक गैरव्यवहार, बेनामी मालमत्ता आणि हवाला व्यवहार या सर्व बाबींचा एकत्रित तपास होण्याची शक्यता असल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.एकूणच, अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी विविध अंगांनी चौकशीचा वेग वाढवला असून, आर्थिक व्यवहारांपासून धार्मिक उपक्रमांपर्यंत सर्व बाबींची सखोल तपासणी सुरू आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणातून आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फीड फीडबर्नर 7 Apr 2026 9:10 am

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का! बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्ते हाती धनुष्यबाण घेणार

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांना कोकणात मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 9:07 am

Curd Benefits: दररोज दही खा आणि मिळवा नैसर्गिक ग्लो; तरुण, सुंदर त्वचेसाठी सोपा उपाय!

Curd Benefits दही हे फक्त चविष्ट अन्न नसून ते पोषणमूल्यांनी भरलेले एक सुपरफूड आहे. आयुर्वेदानुसार, दही शरीराला आतून निरोगी ठेवते आणि त्याचा सकारात्मक परिणाम त्वचेवरही दिसून येतो. दररोज दही खाल्ल्याने त्वचा स्वच्छ, मऊ आणि तजेलदार दिसू लागते.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 9:00 am

Ravindra Chavan : आपल्याला सावध राहायची गरज; रविंद्र चव्हाणांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, म्हणाले “2024 ला आपला…”

Ravindra Chavan :भारतीय जनता पार्टीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 8:48 am

Chand Mera Dil Release Date: अनन्या पांडे-लक्ष्य लालवानीची ‘चांद मेरा दिल’ ‘या’तारखेला होणार रिलीज; रोमँटिक केमिस्ट्रीने वाढवली उत्सुकता!

Chand Mera Dil Release Date या चित्रपटात अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता लक्ष्य लालवानी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे, ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. करण जोहर यांनी शेअर केलेल्या पोस्टर्समध्ये दोघांची रोमँटिक केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येते.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 8:46 am

Top 10 News : सुनेत्रा पवारांविरोधात ५५ उमेदवार रिंगणात, “कुटुंबीयांच्या पूर्वपुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने…”आणि सुरज चव्हाण होणार बाबा?, वाचा अशा टॉप १० बातम्या

Top 10 News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 8:46 am

Nandita Patkar : ‘एलिझाबेथ एकादशी’फेम अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; साध्या पारंपरिक लुकने वेधलं सर्वांच लक्ष

Nandita Patkar : नंदिता ‘स्टार प्रवाह’वरील ‘सहकुटुंब सहपरिपार’ या मालिकेतून घराघरात पोहचली.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 8:29 am

Ashok Kharat Case : मोठी बातमी! अखेर अशोक खरातने दिली गुन्ह्याची कबुली; SIT प्रमुख पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती

Ashok Kharat Case : अखेर एसआयटीच्या चौकशीत अशोक खरातने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती मिळत आहे.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 8:16 am

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर सोमवारी महापालिकेच्या पी पूर्व विभागाच्या वतीने हल्लेखोर लोकांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चढवून ती बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. यात पान पट्टीच्या दुकानांसह काही कच्च्या बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला.गोरेगाव पूर्व संतोषनगर परिसरात दोन वेगवेगळ्या समुदायातील तरुणांमध्ये शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. याचे रूपांतर काही वेळातच मोठ्या भांडणात झाले. दोन्ही बाजूंकडून दगडफेक आणि घोषणाबाजी करण्यात आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले आणि परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला. यावेळी मुस्लिम जमावाकडून तलवारी काढून हल्ला करण्यात आला. यात दोन तरुण जखमी झाले होते.या राड्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेने या भागातील अनधिकृत अतिक्रमणांची गंभीर दखल घेतली. पालिकेच्या पी-पूर्व विभागाने पोलीस संरक्षणात सोमवारी संतोषनगरमधील अरुंद रस्ते आणि सार्वजनिक जागेवर उभारलेली अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त केली आहे. महापालिकेने केलेल्या या कारवाईत अनेक कच्चे-पक्के शेड आणि भिंतीचे बांधकाम पाडून रस्त्यात अडथळा ठरणारी बांधकामे हटवण्यात आली.अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,भविष्यात असे राडे झाल्यास पोलीस गाड्यांना फिरणे सोपे व्हावे, यासाठी रस्ते मोकळे करण्यात आले.तसेच या हाणामारीत सहभागी असलेल्या समाजकंटकांच्या बेकायदेशीर मालमत्तांचीही पालिका प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे.परिसरात शांततेचे आवाहनदरम्यान ,सध्या संतोषनगरमध्ये वातावरण शांत झाले असले तरी राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तरी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अनधिकृत बांधकामे हटवल्यामुळे काही प्रमाणात रोष व्यक्त केला जात असला तरी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

फीड फीडबर्नर 7 Apr 2026 8:10 am

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचारमुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली आहे. याबाबत स्थायी समिती अध्यक्षांनी आपल्या भाषणात केलेल्या सूचनेची दखल घेत मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी त्यांचा समाचार घेतला. रस्ते कामांमध्ये सध्या कोणता कोणता धोरणात्मक बदल झाला आहे,असा सवाल करत किल्लेदार यांनी आपण डांबरी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करत आहात, हा धोरणात्मक बदल आहे का? किंबहुना हे सिमेंट काँक्रीट चे जुने रस्ते होते ते तोडून पुन्हा सिमेंट काँक्रीटचे बनवतोय हा धोरणात्मक बदल आहेत का अशी विचारणा केली. मुंबईतील जे रस्ते १९८९ पासून जे आपण सिमेंट काँक्रीटचे बनवले होते. त्यांना तीस वर्षानंतर कुठे भेगा पडल्या आहेत ते दाखवा, पण आता आपण जे नवीन रस्ते बनवले जात आहेत, त्यातील बहुतांशी रस्त्यांवर भेगा पडलेल्या आहेत. मग टिकाऊ रस्त्याचं कोणतं असा धोरणात्मक बदल झालाय तो तर सवाल करत रस्ते कामांच्या दर्जाबाबत जोरदार टिका केली.मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पावर भाषण करताना मनसे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या भाषणावर प्रश्नचिन्ह उपस्थित घेत प्रशासनाच्या कारभाराचा समाचार घेतला. किल्लेदार यांनी असे कामगारांची रिक्त पदे आणि भरतीबाबत बोलतांना स्थायी समितीच्या अखत्यारित येणाऱ्या महापालिका सचिव आणि लेखा परिक्षण विभागातील रिक्तपदे भरण्यासाठी अध्यक्षांनी आपल्या स्तरावर निर्णय घेऊन भरती करावी. त्यानंतर आपण प्रशासनाला इतर खात्यांसंदर्भात भरती करण्याबाबत सांगू शकतात,असे त्यांनी सांगितले.आपण मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि मराठी शाळा वाढवण्यासाठी काही ठोस उपाययोजना करून प्रशासनाला या माध्यमातून निर्देश दिले असते, तर आम्हाला ते बरे वाटले असते. पण इथे आमची उपेक्षा झालेली आहे. किमान मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी ठोस कार्यक्रम जाहीर कराल आणि यासाठी पुढाकार घ्याल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.अनधिकृत बांधकामांचा समाचार घेताना अनधिकृत बांधकामे आहेत ती हटवण्याबाबत प्रशासनाने ठोस पाऊल टाकायलाच हवे. आपल्या हाती महापालिकेची सत्ता दिली आणि प्रशासन आपल्या हाती आहे. नाल्याच्या शेजारी असलेली अनधिकृत बांधकामे हटवणं किंबहुना मुंबईतील इतर बांधकाम हटवणं या सर्व बाबी महापालिकेच्या नित्यनेमानी येणाऱ्या कामकाजाचा भाग आहे . त्या हटवल्या गेल्याच पाहिजे,असे त्यांनी सांगितले.मुंबईतील सर्व मार्केटचा पुनर्विकास जेव्हा होईल, तेव्हा होईल किंबहुना त्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या सर्वप्रथम सोडवून सध्या जे गाळेधारक आहेत आणि जे तिथे व्यवसाय करत आहेत. त्यांना सुविधा देणे हे आपलं बंधनकारक कर्तव्य आहे. त्यामुळे या सर्व मार्केटच्या तात्पुरत्या स्वरूपात का होईना दुरुस्ती करा अशी मागणी किल्लेदार यांनी केली. यासाठी जो निधी लागेल तो खर्च करा. तसेच जर एखादी वास्तु पुनर्विकासासाठी गेली असेल आणि त्यांचा विकास रखडला नसेल तर त्या वास्तूवरील होणारा खर्च संबंधित विकासकाकडून वसूल करावा,अशीही सूचनाही किल्लेदार यांनी केली.मुंबई महापालिकेची फेरीवाल्यांवरील कारवाई एका सूडबुद्धीने चालली आहे, असे सांगत किल्लेदार यांनी आम्ही फेरीवाल्यांवर कारवाई करू नका असे मुळीच म्हणत नाही. पण जे फेरीवाले तीन ते चार पिढ्या परंपरागत व्यवसाय करतात. त्यांना तरी कुठेतरी संरक्षण द्या, हीच आमची मागणी आहे. तसेच आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकापासून १५० मीटरच्या परिसरात जे फेरीवाले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यास कुणीच रोखत नाही, पण त्यापुढील फेरीवाल्यांना का त्रास दिला जातो असाही सवाल किल्लेदार यांनी केला.

फीड फीडबर्नर 7 Apr 2026 8:10 am

वडिलांच्या मृतदेहाचे डोके कापून दफन करतो मुलगा:लग्नापूर्वी 3 महिने गर्भवती असणे आवश्यक; शिकारी जमात वांचोची कथा

एका टेकडीवर सकाळी 8 वाजताची वेळ होती. एका वृद्धाचा मृतदेह पडलेला आहे. तो पूर्णपणे काळा पडला आहे. मृतदेहाशेजारी 24-25 वर्षांचा एक तरुण गुडघ्यावर बसलेला आहे. तो ढसाढसा रडत आहे. तेव्हा काही महिला आल्या आणि मृतदेहाजवळ बसल्या. एका विशिष्ट प्रकारच्या झाडाच्या पानांनी त्या मृतदेहाचा चेहरा साफ करू लागल्या. त्यापैकी एका महिलेने दूर उभ्या असलेल्या वृद्धाला काहीतरी इशारा केला. वृद्धाने त्या मुलाकडे एक धारदार छोटी तलवार पुढे केली. मुलाने थरथरत्या हातांनी तलवार पकडली आणि हळूहळू मृतदेहाचे गळे कापायला सुरुवात केली. थोड्याच वेळात मृतदेहाचे डोके धडापासून वेगळे झाले. हा मृतदेह मुलाच्या वडिलांचा आहे, जो दीड महिन्यापासून या टेकडीवर पडलेला होता. खरं तर, हा मुलगा आपल्या वडिलांचा अंत्यसंस्कार करत आहे. दिव्य मराठीच्या 'हम लोग' या मालिकेत मी मनीषा भल्ला यावेळी वांचो जमातीची कथा घेऊन आले आहे. अरुणाचल प्रदेशातील लोंगडिंग परिसरात वसलेल्या या जमातीची लोकसंख्या फक्त 40 हजार आहे… अंत्यसंस्काराच्या प्रथेवर परत येऊया… म्हाताऱ्याच्या मृतदेहाचे शीर कापले जाताच दोन व्यक्ती मातीच्या मडक्यासारखे भांडे घेऊन आले. त्यांनी कापलेले शीर हातात घेतले आणि ते काळजीपूर्वक पाहू लागले, जणू काही ते मोजत असावेत. मग मातीचे भांडे उलटे करून ते काळजीपूर्वक दगडाने तोडू लागले, जेणेकरून शीर त्यात मावेल. मग त्याच भांड्यात शीर घालून मुलाच्या हातात दिले. धड तसेच तिथेच पडले राहिले. सर्व लोक शीर घेऊन टेकडीच्या दुसऱ्या बाजूला निघाले. तिथे जागोजागी मातीचे छोटे-छोटे ओटे बनवलेले आहेत. सर्वांवर तसेच मडके ठेवलेले आहेत जसे मडक्यात शीर आहे. मुलगा एका रिकाम्या ओट्याकडे सरकला आणि मडके ठेवले. मग मडक्यावर दगड ठेवला. गर्दीतून एक व्यक्ती दारूची बाटली आणि जेवण घेऊन आला आणि मुलाकडे सरकला. मुलाने काहीतरी पुटपुटत दारू आणि जेवण याच ओट्यावर अर्पण केले. तिकडे, शिराशिवायचा मृतदेह तिथेच पडलेला राहिला. हळूहळू सर्व लोक आपापल्या गावी परतले. वांचो लोकांमध्ये नैसर्गिक मृत्यू झाल्यास, मृतदेह अशाच प्रकारे दीड महिन्यांसाठी टेकडीवर सोडून देतात. कोणताही प्राणी मृतदेह खाऊ नये म्हणून लोक आळीपाळीने पहारा देतात. नंतर डोके कापून अंत्यसंस्कार केले जातात. विशेष बाब अशी आहे की, अशा प्रकारे अंत्यसंस्कार फक्त नैसर्गिक मृत्यू झाल्यासच करतात. अपघात किंवा हत्या झाल्यास, हे लोक मृतदेह टेकडीवरच फेकून देतात, ज्याला प्राणी ओरबाडून खातात. खरं तर, त्यांचे असे मानणे आहे की आत्मा डोक्यात वास करते. म्हणून डोके सुरक्षित ठेवले जाते, जेणेकरून पूर्वजांचे दर्शन होत राहावे. जेव्हा एखादी व्यक्ती अप्राकृतिक मृत्यू मरते, तेव्हा तिची आत्मा त्याच क्षणी निघून जाते. वांचो लोक ज्या तलवारीने मृतदेहाचे डोके कापतात, तिला 'चंग' म्हणतात. जिथे मृतदेहाचे धड पडलेले असते, त्याला 'जुकथो' म्हणतात. ज्या ठिकाणी मातीचा प्लॅटफॉर्म बनवून डोके ठेवले जाते, ती 'जालो' आहे. वांचो लोक अरुणाचल प्रदेशातील पटकाईच्या टेकड्यांमध्ये राहतात. हे ठिकाण लोंगडिंग जिल्ह्यात येते, जे गुवाहाटीपासून 350 किलोमीटर दूर आहे. त्यांना जाणून घेण्यासाठी मी पटकाईच्या टेकड्यांवर पोहोचले आहे. माझ्यासोबत या समुदायाला ओळखणारे मानववंशशास्त्रज्ञ नोट्‌टोई वांगसाहम आहेत, जे लोंगडिंगमधूनच सोबत आले आहेत. दुपारचे 12 वाजले होते. आम्ही टेकडीवरून पायीच गावाकडे निघालो. वाटेत नोट्‌टोईने सांगितले की- ‘वांचो लोकांमध्ये आजही राजाचे राज्य आहे. त्यांना भेटण्यासाठी राजाची परवानगी आवश्यक आहे. म्हणून, आम्हाला सर्वात आधी राजासमोर जाऊन हजेरी लावावी लागेल. तेव्हाच वस्तीत प्रवेश करता येईल.’ ‘इथले राजा कोण आहेत?’ मी विचारले ‘आधी जितवंग वाहम इथले राजा होते, पण चार वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. आता राणीचे राज्य आहे.’ ‘मग राजाऐवजी राणीकडून परवानगी घ्यावी लागते?’ ‘हो, सध्या राणीच सर्व काही पाहते, पण तिच्या मुलाला आता लोक राजा म्हणू लागले आहेत.’ आतापर्यंत आम्ही 5 किलोमीटर चाललो होतो. थोड्याच अंतरावर बांबूची घरे दिसू लागली. काहींची पत्र्याची छत चमकत होती तर काहींची छत येथील स्थानिक झाड टोको लीफपासून बनलेली होती. येथे फक्त एकच घर असे दिसले जे अर्धे सिमेंट आणि अर्धे बांबूचे बनलेले होते. हे घर खूप मोठे आहे. नॉटोईने सांगितले की ‘हेच राणीचे घर आहे.’ राणीच्या घरासमोर पोहोचताच, एका महिलेने आम्हाला आत नेले. नजर फिरवून पाहिले तर भिंतींवर प्राण्यांची कातडी आणि कवटी लटकलेल्या होत्या. मी नॉटोईला खुणेने विचारले तेव्हा तो म्हणाला- ‘पूर्वीच्या काळी वांचो जंगली प्राण्यांची शिकार करत असत. ही अशाच शिकार केलेल्या प्राण्यांची कातडी आहेत. नोट्टोई सांगतात की, ‘वांचो लोक आपल्या जमातीची शान वाढवण्यासाठी शत्रूंची डोकी, बाहू आणि पाय कापून आणत असत. प्रत्येक वांचो वस्तीत संग्रहालयासारखी एक जागा असे, ज्याला ‘साउतुंग’ म्हणत. येथेच शत्रूंची कापलेली डोकी सजवली जात. वर्षातून एकदा त्यांना दारू आणि अन्न अर्पण करून पूजाही केली जात असे. आता येथील लोक ख्रिश्चन धर्म मानू लागले आहेत. त्यामुळे हळूहळू हे सर्व बंद झाले आणि साउतुंगही संपले. आता फक्त प्राण्यांची डोकी आणि कातडी शिल्लक आहेत.’ आम्ही ड्रॉईंग रूममधील सोफ्यावर बसून राणी सेंगम् वांग्चा वांचो यांची वाट पाहू लागलो. भिंतीवर चित्त्याची कातडी टांगलेली आहे. जवळच बंदुका आणि रानडुकरांची डोकीही आहेत. तेव्हा एक महिला खोलीत येते, पांढऱ्या रंगाची शॉर्ट कुर्ती आणि निळ्या रंगाची शालनुमा लांब स्कर्ट परिधान केलेली. गळ्यात चांदीच्या नाण्यांची माळ आणि कपाळावर रंगीबेरंगी मोत्यांची पट्टी घातलेली. वेशभूषेवरून कळत होते की हीच राणी आहे. मी राणीला सर्वात आधी तिच्या कपड्यांबद्दल विचारले, ती सांगू लागली की- ‘ही शालसारखी स्कर्ट आमची पारंपरिक वेशभूषा आहे. याला नीथो म्हणतात.’ मी भिंतीवर टांगलेले रानडुकराचे डोके पाहून विचारले, ‘याची शिकार राजाने केली होती?’ राणी सांगते की- ‘वस्तीत जेव्हाही कोणी रानडुकराची शिकार करतो, तेव्हा त्याचे डोके आणि पाठीच्या कण्याजवळचे मांस आमच्या घरी पाठवतात. बाकीच्या प्राण्यांचे फक्त डोकेच राजाच्या घरी पाठवतात. त्यानंतरच ते स्वतः खाऊ शकतात. जर कोणी असे केले नाही तर त्याला वस्तीतून बाहेर काढले जाते.’ ‘पाठीच्या कण्याचे मांस?’ ‘होय, हे आम्ही घरात लटकवून वाळवतो आणि जेव्हा इच्छा होते तेव्हा शिजवतो.’ असे म्हणत राणी मला स्वयंपाकघरात घेऊन गेली. येथे एका लाकडी आधाराने छतावरून मांसाचे लांब आणि सपाट तुकडे लटकत होते. काही अगदी ताजे होते पण काही वाळलेले होते. येथेच नोट्टोई सांगतात की ‘वांचोच्या प्रत्येक वस्तीचा एक राजा असतो. वस्त्यांचे राजे मिळून एक प्रमुख निवडतात, जो वांचो लोकांशी संबंधित सर्व महत्त्वाचे निर्णय घेतो.’ शेवटी राणीकडून वस्तीत जाण्याची परवानगी घेऊन आम्ही येथून निघालो. पत्र्याच्या छताच्या घराबाहेर एक व्यक्ती बसली आहे. त्याने गळ्यात मोत्यांची माळ आणि एखाद्या प्राण्याच्या कवटीसारखे काहीतरी घातले आहे. नोट्टोई त्यांना भेटायला घेऊन गेले. त्या व्यक्तीचे नाव एल जेवंग वांगसू आहे. मी सर्वात आधी त्यांच्या पेहरावाबद्दल विचारले, ते म्हणाले- ‘हे माकडाचे डोके आहे. याची कवटी लाकडाची बनलेली आहे, पण यावर चढवलेली कातडी खऱ्या माकडाची आहे. याशिवाय माळेत प्राण्यांची नखे आणि दातही ओवलेले आहेत. डोक्यावर जे घातले आहे ते अस्वलाच्या केसांपासून बनवले आहे. याला खोहम म्हणतात.’ जेवंगची पत्नी मंगखाऊ वांगसू आत येण्यासाठी सांगते. आत शिरताच मासे शिजण्याचा वास येऊ लागला. नजर फिरवून पाहिले तर जमिनीपासून भिंतींपर्यंत सर्व काही बांबूचे बनलेले आहे. छतावरून मांसाचे लांब, चपटे तुकडे लटकत आहेत. खोलीच्या एका कोपऱ्यात साडीचा झोका बांधलेला आहे. महिलांच्या शरीरावर गोंदलेल्या टॅटूवरून कळते वय मंगखाऊच्या पायाच्या खालच्या भागावर बनवलेला टॅटू पाहून मी तिचा अर्थ विचारला. ती म्हणाली- ‘टॅटू ही आम्हा वांचो महिलांची ओळख आहे. यावरून महिलांचे वय कळते. जेव्हा मुलगी किशोरावस्थेत येते, तेव्हा तिच्या बेंबीजवळ टॅटू बनवला जातो. पायाच्या खालच्या भागावरील टॅटूचा अर्थ ती तरुण झाली आहे, म्हणजेच ती रजस्वला झाली आहे. मांडीवर बनवलेल्या टॅटूचा अर्थ असा आहे की आता मुलगी आपला जीवनसाथी निवडू शकते. महिलांच्या छातीवर बनवलेल्या टॅटूचा अर्थ त्या विवाहित आहेत.’ ‘मुली आपला जीवनसाथी कसा निवडतात?’ मी विचारले. ती सांगू लागली- ‘बहुतेक प्रेमविवाह होतात. मुलीला जेव्हा एखादा मुलगा आवडतो, तेव्हा ती त्याला एक झुमका देते. ज्याला ‘माएपो’ म्हणतात. हाच विवाहाचा प्रस्ताव मानला जातो. यानंतर मुलाकडचे लोक मुलीच्या घरी जातात. त्यांना पान, तंबाखू आणि स्थानिक झाडाची साल ‘पेनखोन’ आणि ‘केकखोन’ देतात. यामुळे ओठ लाल होतात. मग मुलगा-मुलगी एकमेकांना माळा घालतात. ही रस्म ‘हिंगहो एलाई’ म्हणून ओळखली जाते.’ मुलीच्या आईला घरी बोलावून दारू देतात मुलाकडचे लोक जेवांग सांगतात की, ‘काही दिवसांनी मुलाकडचे लोक मुलीच्या आईला घरी बोलावतात. त्यांचे आदरातिथ्य करतात. तिथे आमची खास दारू म्हणजे ‘जू’ सोबत मासे आणि विविध प्रकारच्या प्राण्यांचे मांस वाढले जाते. मुलीची आई घरी परत जाऊन मुलीचे लग्न ठरल्याची घोषणा करते. नंतर मुलाच्या आईला बोलावून मुलीकडचे लोक हीच रीत पाळतात.’ मध्येच जेवांगची पत्नी मंगखाऊ चहा घेऊन आली. हा लाल रंगाचा आहे. दूध नसलेला. हा औषधी वनस्पतींपासून बनवला जातो, याला खलप म्हणतात. चव थोडी कडवट आहे, ब्लॅक टी सारखी. संबंध निश्चित झाल्यावर मुलगा-मुलगी संबंध ठेवू शकतात जेवांग लग्नाच्या परंपरेबद्दल सांगतात- ‘जेव्हा दोन्ही बाजूंनी संबंध निश्चित झाल्याची घोषणा होते, तेव्हा ‘टोईकट’ परंपरा पाळली जाते. यात मुलाकडचे लोक मुलगी आणि तिच्या मैत्रिणींना घरी बोलावतात. मुलगा सगळ्यांना आपली शेतं दाखवायला घेऊन जातो. तिथे नाच-गाणेही होते. नंतर मुलगा सर्व मुलींना कपडे आणि दागिने भेट म्हणून देतो. यानंतर मुलगा-मुलगी जेव्हा हवे तेव्हा भेटू शकतात. एकमेकांच्या घरी जाऊ शकतात. जर घरी भेटणे शक्य नसेल, तर वस्तीतील कम्युनिटी हॉलमध्येही जाऊ शकतात. याला ‘जिप्सम नायलो’ म्हणतात. येथे जोडपी जेव्हा हवे तेव्हा येऊ शकतात आणि संबंधही ठेवू शकतात. गर्भवती झाल्यानंतर सुनेचा दर्जा मिळतो जेव्हा मुलगी गर्भवती होते, तेव्हा तिसऱ्या महिन्यात मुलाच्या घरी जाते. तेव्हा खोकमची रस्म होते, म्हणजे मुलीच्या छातीच्या मध्यभागी ‘खाहू’ नावाचा टॅटू बनवला जातो. त्यानंतर पूजा होते, ज्यात अंडे, आले आणि दारू अर्पण केली जाते. या रस्मनंतर पुजारी घोषणा करतो की ‘ही मुलगी आजपासून मुलाच्या कुटुंबाचा भाग आहे.’ यानंतर म्हैस किंवा मोठे डुक्कर कापले जाते. जनावराच्या कातडीचे छोटे-छोटे तुकडे स्वच्छ करून मुलीच्या घरी पाठवले जातात. जे संपूर्ण गावात वाटले जातात, जसे लग्नानंतर मिठाई वाटली जाते. खोकमनंतर नाते तोडणे सोपे नसते. जर पती किंवा पत्नीपैकी कोणाला वेगळे व्हायचे असेल, तर त्याला/तिला किंमत चुकवावी लागते - कधी डुक्कर देऊन तर कधी जमीन देऊन.’ लाकडी तलवारीने कापली जाते बाळाची नाळ माझे सहकारी नोट्टोई बाळाच्या जन्माशी संबंधित परंपरेबद्दल सांगतात की- बाळाच्या जन्माच्या वेळी एका वृद्ध महिलेला बोलावले जाते. ती बांबूने बनवलेल्या चाकूने नाळ कापते, नंतर ती ओनोक नावाच्या झाडाला बांधते. मोठ्या मुलीला दागिने आणि मोठ्या मुलाला मिळते जमीन-जुमला वांचो लोकांमध्ये घराची सूत्रे महिलांच्या हातात असतात. आईचे दागिने सर्वात मोठ्या मुलीला मिळतात. जमीन-जुमला सर्वात मोठ्या मुलाच्या वाट्याला येतो. इतर मुलांना काहीही दिले जात नाही. होय, जर कुटुंब थोडे संपन्न असेल, तर त्यांनाही थोडाफार हिस्सा दिला जातो. येथे आजही शिकारीची परंपरा आहे. लोक कधी समूहात, तर कधी एकटे शिकारीला निघतात. शिकारीनंतर प्राण्याची पूजा केली जाते. मग त्याचे डोके राजाला दिले जाते आणि बाकीचे मांस संपूर्ण वस्तीत वाटले जाते. येथून निघून आम्ही दुसऱ्या वांचो वस्तीकडे गेलो. येथे एका खास प्रकारच्या वेशभूषेत काही पुरुष उभे आहेत. सर्वांच्या डोक्यावर बांबूची टोपी आहे. ही हॉर्नबिल पक्ष्याच्या पंखांनी सजलेली आहे. यात अस्वल, माकड, बकरीचे केस लावलेले आहेत. गळ्यात मोत्यांची माळ आहे, ज्यात रानडुक्कराचे दात, अस्वलाचे नख, सिंहाचे दात किंवा माकडाच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तू लावलेल्या आहेत. शरीराच्या खालच्या भागात लंगोटसारखे काहीतरी घातलेले आहे, ज्यामुळे फक्त खाजगी भाग झाकलेला आहे. अडचणी दूर करण्यासाठी पुजारी बळी देतो वांचो लोक आत्म्यांवर विश्वास ठेवतात. जर कोणासोबत काही वाईट घडले तर ते पुजाऱ्याला सांगतात. मग तो स्वप्न पाहून समस्येचे कारण सांगतो. अनेकदा पुजाऱ्याला घरीही बोलावले जाते. वाटेत त्याला दारू पाजली जाते. अडचणी दूर करण्यासाठी कुत्रा, बकरी किंवा कोंबडा-कोंबडीचा बळी दिला जातो. वांचो लोकांकडे शेतीशिवाय उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. हे लोक भाताव्यतिरिक्त अनेक प्रकारच्या बाजरीची (मिलेटची) लागवड करतात. जसे की - मीखा, कामई, पोलोम, कच्चू, मनसा, जोक, विक्वप, विकुअत, बाह आणि शिनेई. मुलांसाठी प्राथमिक शाळा गावातच आहे, पण पुढील शिक्षणासाठी लोंगडिंगला जावे लागते. त्यांची बहुतेक मुले सरकारी नोकरीत आहेत. अनेक घरांमधील मुले सैन्यातही आहेत. या मालिकेत पुढील आठवड्यात अशाच अनोख्या मैतेई लोकांची कहाणी वाचा….

दिव्यमराठी भास्कर 7 Apr 2026 7:02 am

QR Code On Hoardings : होर्डिंगवर आता ‘क्यूआर कोड’सक्तीचा! पीएमआरडीएची मोठी कारवाई; एजन्सींचे धाबे दणाणले

QR Code On Hoardings : मुळशी, हवेलीसह ५ तालुक्यांतील बेकायदा होर्डिंगवर पीएमआरडीएची धडक मोहीम; नियम धाब्यावर बसवणाऱ्या होर्डिंगधारकांना महानगर आयुक्तांचा शेवटचा इशारा.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 7:00 am

420 मृत्यू, उद्ध्वस्त वस्त्या; वायनाडमधून राहुल-प्रियांका गायब:भूस्खलनग्रस्तांनी सांगितले- मत फक्त काँग्रेसला, 7 पैकी 5 जागांवर आघाडी

केरळमध्ये 2 दिवसांनी मतदान आहे, पण वायनाडच्या लोकांना त्यांच्या खासदार प्रियांका गांधींची प्रतीक्षा आहे. 2024 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत 4.1 लाख मतांनी विजयी झालेल्या प्रियांका गांधी निवडणुकीत कमी सक्रिय दिसल्या आहेत. पहिली रॅली 2 एप्रिल रोजी तिरुवनंतपुरममध्ये केली होती. त्यानंतर 6 एप्रिल रोजी कन्नूरला पोहोचल्या. दोन वेळा खासदार राहिलेले राहुल गांधी केरळमध्ये प्रचार करत आहेत, पण वायनाडला गेले नाहीत. वायनाडमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या भूस्खलनात मुंडक्कई, चूरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा ही चार गावे उद्ध्वस्त झाली होती. 420 लोक मरण पावले. 118 लोकांचा पत्ताच लागला नाही. त्यावेळी खासदार असलेल्या राहुल गांधींनी पीडितांना 100 घरे देण्याचे वचन दिले होते. 19 महिने झाले, अजून त्यांची पायाभरणीही झाली नाही. या दुर्घटनेत चूरलमाला येथील सुनेराच्या कुटुंबातील 6 लोक मरण पावले होते. सुनेरा सांगतात की, सरकारकडून पैशांची मदत मिळाली, पण आमचे नाव घर मिळणाऱ्यांच्या यादीत नाही. राहुल आणि प्रियंका गांधी आले होते. घर मिळवून देण्याचे वचन दिले होते, पण मिळाले नाही. तरीही आम्ही काँग्रेसलाच मतदान करू. केरळमधील १४० विधानसभा जागांवर ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. घर देण्याच्या आश्वासनावरून काँग्रेस आणि सीपीएम आमनेसामने आहेत. वायनाड लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या ७ जागा आहेत. २०२१ मध्ये काँग्रेसच्या यूडीएफ आघाडीला ४ आणि डाव्यांच्या एलडीएफ आघाडीला ३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी यूडीएफ ५ जागांवर आघाडीवर दिसत आहे. भूस्खलनाने प्रभावित झालेले भाग कलपेट्टा विधानसभा मतदारसंघात येतात. येथे एलडीएफने मित्रपक्ष आरजेडीला तिकीट दिले आहे. काँग्रेसकडून विद्यमान आमदार टी. सिद्दीकी निवडणूक लढवत आहेत. 2009 पासून वायनाडमध्ये काँग्रेस कधीच हरली नाही, खासदार प्रियंका आसामच्या प्रभारी प्रियंका गांधी यांच्याकडे काँग्रेसने आसाम निवडणुकीची सूत्रे सोपवली आहेत. आसाममध्ये केरळसोबत 9 एप्रिल रोजीच मतदान होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार बृजेश कुमार यांच्या मते, वायनाडमध्ये अशी चर्चा आहे की राहुल आणि प्रियंका येथे खूप कमी येतात. ते याचा सुरक्षित ठिकाण म्हणून वापर करतात. तरीही वायनाडमध्ये काँग्रेसचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे ती या सर्व गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही. वायनाड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस 2009 नंतर कोणतीही निवडणूक हरली नाही. 2019 मध्ये राहुल गांधी येथे 4.3 लाख मतांनी जिंकले. 2024 मध्ये सुमारे 3.6 लाख मतांनी विजय मिळाला. त्यांनी जागा सोडल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींनी पहिली निवडणूक येथूनच लढवली. विजयाचे अंतर 4.1 लाख होते, म्हणजे राहुलच्या मागील विजयापेक्षा जास्त. राहुलने वायनाड सोडल्यानंतर येथील लोकांसाठी पत्र लिहिले होते. त्यांनी लिहिले होते की, तुम्ही माझ्या कुटुंबाचा भाग आहात. मी तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध राहीन. मात्र, सध्या ते वायनाडपासून दूर आहेत. 2 वर्षांनंतरही वायनाड दुर्घटनेतून सावरला नाही, सर्वत्र विध्वंसाची चिन्हे वायनाड 2 वर्षांपूर्वी झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेतून अजूनही सावरलेला नाही. बाधित कुटुंबांना पुन्हा वसवण्याचे काम सुरू आहे. भूस्खलनानंतर काँग्रेसने पीडितांसाठी निधी गोळा केला होता. सरकार चालवणारे LDF युती या निधीच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सनी जोसेफ यांच्या मते, निधीसाठी उघडलेल्या खात्यात सुमारे 5.38 कोटी रुपये जमा झाले आहेत. या निधीतून पीडितांसाठी घरे बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्यात आली आहे. कलपेट्टापासून सुमारे २२ किमी दूर असलेल्या चुरळमालामध्ये प्रवेश करताच एक होर्डिंग दिसते. यावर भूस्खलनात मरण पावलेल्या लोकांचे फोटो लावले आहेत. भूस्खलनामुळे सर्वाधिक विध्वंस चुरळमालामध्येच झाला होता. काही पावले पुढे जाताच भूस्खलनामुळे झालेल्या विध्वंसाची चिन्हे दिसू लागतात. इथून पुढे गाड्या घेऊन जाता येत नाहीत. एका बाजूला बांधकामाचे काम सुरू आहे. भूस्खलन झालेल्या ठिकाणी सामान्य लोकांना प्रवेश निषिद्ध आहे. येथे जागोजागी लाल झेंडे लावले आहेत. धोक्यामुळे पुढे जाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. चुरळमालामध्ये पर्यटक पुन्हा येऊ लागले आहेत. ते दुर्घटनेच्या वेळी सैन्याने बांधलेल्या पुलावर फोटो काढतात. या भागातील काचेचा पूल पुन्हा उघडला आहे. तिथे जाण्यासाठी खाजगी जीप बुक करावी लागते. गावात जागोजागी बुकिंग सेंटर्स उघडली आहेत. आसपासच्या चहाच्या बागांमध्ये लगबग दिसू लागली आहे. पर्यटन पूर्वपदावर येत असले तरी, लोक अजूनही तो अपघात विसरलेले नाहीत. बळी 1 : सुनीश‘पत्नी अजूनही धक्क्यात आहे, पाऊस पडताच घाबरते’सुनीश चुरलमाला येथील आपले उद्ध्वस्त झालेले घर पाहण्यासाठी आले होते. ते आम्हाला घराच्या आत एका खोलीत घेऊन गेले. ते म्हणाले की मी इथेच झोपलो होतो. एक दिवसापूर्वी वाटले होते की जोरदार पाऊस येणार आहे. रात्री असा प्रलय येईल, याचा विचार केला नव्हता. बघा घराची काय अवस्था झाली आहे. सुनीश सांगतात, ‘आम्ही घर मजबूत बांधले होते, त्यामुळे ते वाहून जाण्यापासून वाचले. झोप उघडली तेव्हा पहिली मजला बुडाली होती. आम्ही दुसऱ्या मजल्यावर गेलो. आमच्यासमोर आजूबाजूची घरे कोसळत होती. लोक आणि सामान वाहून जात होते.’ सुनीशशी बोलत असतानाच हलका पाऊस सुरू झाला. ते म्हणाले, ‘मला घरी जावे लागेल. पत्नी अजूनही धक्क्यात आहे. पाऊस पडल्यावर ती घाबरते. अनेकदा मध्यरात्री उठते. आम्ही कलपेट्टा येथे भाड्याच्या घरात राहतो. सरकार भाड्यासाठी 6 हजार रुपये देते. मदतीच्या स्वरूपात दरमहा 19 हजार रुपये आणखी मिळतात.’ पीडित 2: सुनेरा आणि नासिर‘कुटुंब आणि नातेवाईक मिळून 31 लोक मरण पावले, राहुलने म्हटले होते- घर मिळवून देऊ’चुरलमाला येथे राहणारे सुनेरा आणि नासिर केळीचे वेफर्स विकतात. दुर्घटनेच्या रात्री डोंगरावर दुसऱ्या बाजूने चढून जीव वाचवला होता. सुनेरा सांगतात, ‘कुटुंबातील 6 लोक मरण पावले होते. दोघांचा तर पत्ताच लागला नाही. संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईकांना मिळवले तर 31 लोकांचा जीव गेला. अजूनही बेघर आहोत. राहुल-प्रियंकाने घर मिळवून देऊ असे म्हटले होते, पण आतापर्यंत पायाभरणीही झाली नसल्याचे समजले आहे.’ सरकार पीडितांसाठी टाऊनशिप बांधत आहे, 178 घरे सुपूर्द केलीराज्य सरकार कलपेट्टा येथे पीडितांसाठी टाऊनशिप बांधत आहे. हे ठिकाण भूस्खलन झालेल्या ठिकाणापासून सुमारे 30 किमी दूर आहे. येथे 159 एकर जमिनीवर 410 घरे, एक वैद्यकीय केंद्र आणि उद्यान बांधले जात आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी 1 मार्च रोजी 178 लोकांना घरे सुपूर्द केली आहेत. 26 फेब्रुवारी रोजी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वायनाडला आले होते. त्यांनी दुर्घटनेच्या ठिकाणापासून सुमारे 11 किमी दूर असलेल्या मेप्पडी पंचायतच्या कुन्नमपेटा येथे घरांची पायाभरणी केली. ही घरे अंदाजे 1100 चौरस फुटांची असतील. ‘सीपीएम सरकारने लोकांना घरे दिली, प्रियांका उत्तरापासून वाचण्यासाठी येत नाहीत’ एलडीएफकडून निवडणूक लढवणारे आरजेडी उमेदवार पीके अनिल कुमार म्हणतात, ‘तेजस्वी यादव आल्यापासून आमची मोहीम वेगाने सुरू आहे. सरकारने चुरलमाला येथील लोकांना घरे बांधून दिली आहेत. बोगदा बांधत आहेत. भूस्खलनानंतर सरकार लोकांना भाडे देत आहे. मोदीजी आले, पण फोटो काढून निघून गेले.’ ‘काँग्रेस अध्यक्षांनी सांगितले की, आमच्याकडे घरे बांधण्यासाठी पैसे नाहीत. प्रियांका गांधी अजूनपर्यंत आल्या नाहीत. त्यांनी घरे देण्याचे वचन दिले होते. दिले नाहीत तर उत्तर द्यावे लागेल. कदाचित त्यामुळेच त्या येत नसतील.’ तज्ज्ञांचे मत: सरकारविरोधात सत्ताविरोधी लाट, UDF ला फायदा होईलसेंटर फॉर पब्लिक पॉलिसी रिसर्चचे संचालक डॉ. धनुराज सांगतात की, ‘सर्वेक्षणे दर्शवत आहेत की यावेळी अल्पसंख्याक एकत्र येऊन UDF ला मतदान करू शकतात. मागील वेळी असे झाले नव्हते. त्यांनी LDF ला मतदान केले होते. येथे सत्ताविरोधी लाट आहे, पण अटीतटीची लढतही आहे. ‘येथे CPM चे कार्यकर्ते सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. अनेक भागांमध्ये नेतृत्वात झालेल्या बदलांमुळे कार्यकर्ते नाराज आहेत. तथापि, UDF देखील कमकुवत संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांच्या कमतरतेमुळे झगडत आहे. ते सरकारच्या अपयशांना उघड करण्यात अपयशी ठरले आहेत.’ ज्येष्ठ पत्रकार नीनू मोहन म्हणतात की वायनाडमधील बहुतेक जागांवर UDF चे वर्चस्व आहे. येथे अल्पसंख्याक आणि एसटी-एससी लोकसंख्या जास्त आहे. हे नेहमीच काँग्रेसचे मतपेढी राहिले आहेत. वायनाड जिल्ह्यातील तीनपैकी दोन जागांवर काँग्रेस सातत्याने विजय मिळवत आहे. गेल्या वेळी एक जागा CPM ने जिंकली होती. वायनाड लोकसभा मतदारसंघातील काही जागा कोझिकोड आणि मल्लपुरम जिल्ह्यात आहेत. तेथे मुस्लिम लीग आणि काँग्रेस या दोघांचेही वर्चस्व आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Apr 2026 6:47 am

जेव्हा आसामी अतिरेक्यांना खंडणी देण्यात टाटा टी अडकली:प्रसिद्ध उद्योगपतींचे टेप्स लीक झाले; आजही 45 जागांवर चहाच्या मळ्यांचा प्रभाव

वर्ष 1997 आणि महिना जूनचा. ठिकाण होते नवी दिल्लीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ. एक विमान उतरले, ज्यावर 'रॉयल भूतान एअरलाईन्स' असे लिहिले होते. हे विमान भूतानची राजधानी थिंपू येथून आले होते. विमानातून 3 लोक उतरले - एक गर्भवती महिला, तिची मैत्रीण आणि एक माणूस, जो लष्करी अधिकाऱ्यासारखा दिसत होता. विमानतळावर टॅक्सी त्यांची वाट पाहत होती. तिघेही टॅक्सीत बसून एका हॉटेलमध्ये पोहोचले. तेथे बोंटी बरुआ यांच्या नावावर त्यांच्यासाठी एक खोली आरक्षित होती. काही वेळ खोलीत आराम केल्यानंतर तिघेही बाजार फिरायला निघाले. बाजारात त्यांना एक व्यक्ती भेटली. त्याने या तिघांना सांगितले, 'तुमच्या मुंबईला जाण्याची व्यवस्था झाली आहे. तेथील जसलोक रुग्णालयात उपचारासाठी बोलणे झाले आहे.' जेव्हा चौघे आपापसात बोलत होते, तेव्हा एक पाचवी व्यक्ती ऐकत होती. तो होता - एक पोलीस अधिकारी, जो साध्या वेशात गर्भवती महिला आणि तिच्या साथीदारांचा पाठलाग करत होता. ही गर्भवती महिला दुसरी कोणी नसून, एक उग्रवादी होती, जी युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम, म्हणजेच ULFA ची सदस्य होती. नाव होते - प्रणती डेका. ULFA ही एक दहशतवादी संघटना होती, जी बंदुकीच्या जोरावर आसाममधून बंगाली आणि हिंदी भाषिक लोकांना हाकलून लावत होती. आसामला स्वतंत्र करण्यासाठी तिने शेकडो लोकांची हत्या केली होती. तेव्हा आसाममधील परिस्थितीही दहशतवाद सहन करणाऱ्या पंजाबसारखी झाली होती. त्यांच्या दहशतीचे प्रमाण असे होते की, आसाममधील लोकांना सरकारव्यतिरिक्त ULFA ला देखील कर द्यावा लागत होता. खरं तर, दहशतवादी प्रणती तिच्या दोन साथीदारांसह उपचार घेण्यासाठी दिल्लीला पोहोचली होती. बाजारात त्यांना भेटलेला माणूस टाटा टी कंपनीचे वरिष्ठ कल्याण अधिकारी डॉ. ब्रोजेन गोगोई होते. त्यांनी टाटा टी कंपनीतर्फे महिलेच्या उपचाराची, विमानाची आणि राहण्याची संपूर्ण व्यवस्था केली होती. तेव्हा प्रश्न निर्माण झाला की, आसाममध्ये दहशत पसरवणाऱ्या आणि शेकडो लोकांची हत्या करणाऱ्या संघटनेच्या दहशतवाद्यांसाठी टाटासारखी देशातील मोठी कॉर्पोरेट कंपनी व्हीआयपी व्यवस्था का करत होती? दोन दिवसांनी, म्हणजे 9 एप्रिल रोजी आसाममध्ये मतदान आहे. आजही आसाममधील 126 पैकी 45 जागांवर याच चहाच्या बागांचा प्रभाव आहे. आज कथा दहशतवादी संघटना ULFA आणि टाटा टी कंपनीसोबतच्या तिच्या संबंधांची… ULFA चा उद्देश- आसामचे स्वातंत्र्य आणि बाहेरच्यांना हाकलून लावा वर्ष 1971… पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांगलादेशची निर्मिती झाली. लाखो निर्वासित आसाममध्ये घुसले. आसामी बोलणाऱ्यांना भीती होती की त्यांची लोकसंख्या अल्पसंख्याक होईल. 1905 च्या बंगाल फाळणीमुळे आणि 1947 च्या भारत-पाकिस्तान फाळणीमुळे आसाममध्ये आधीच मोठ्या संख्येने निर्वासित होते. हे थांबवण्यासाठी एप्रिल 1979 मध्ये आसाममधील शिवसागर जिल्ह्यात काही विद्यार्थ्यांनी एक सशस्त्र संघटना सुरू केली. नाव ठेवले- युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम, म्हणजेच ULFA. सुरुवातीला त्यांनी कसेबसे शस्त्रे जमा केली, पण 1990 च्या दशकापर्यंत संपूर्ण आसाममध्ये दहशत पसरली. उल्फाची घोषणा होती- 'आझाद आसाम' आणि 'बाहेरच्यांना हाकला'. उल्फाची दहशत तिनसुकियापासून दिब्रुगढपर्यंत पसरली होती. हे पूर्वेकडील असे भाग आहेत, जिथून आसामच्या चहाच्या बागांची सुरुवात होते आणि पश्चिमेकडे जातात. उल्फाचे लोक उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेल्या हिंदी भाषिक मजुरांना रांगेत उभे करून मारून टाकत होते. अशा प्रकारे सुमारे 300 लोक मारले गेले होते. आसामला उर्वरित देशाशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 37 वरून जाणाऱ्या ट्रकांमधून उल्फा पैसे वसूल करत असे. जो पैसे देत नसे, त्याचा ट्रक जाळला जात असे किंवा चालक गायब होत असे. एकंदरीत, उल्फा आसाममध्ये समांतर सरकार चालवत होता. पुढे जाऊन ULFA ला शस्त्रे आणि पैशांची गरज भासू लागली. अशा परिस्थितीत ULFA ने पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक किलो चहावर एक रुपया खंडणी द्यावी आणि असे न करणारा परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे, असा फतवा काढला. खरं तर, त्यावेळी जगातील १७% चहा आसाममध्ये पिकत होता. ULFA च्या दहशतीमुळे आसाममधील लहान चहा कंपन्या खंडणी देण्यास तयार झाल्या. पण टाटा टी ने खंडणी देण्यास नकार दिला. त्याऐवजी, त्यांनी रुग्णालये, शाळा इत्यादी बांधण्याची ऑफर दिली. संघर्षातूनही कसेबसे काम सुरू राहिले. व्यवस्थापकाच्या अपहरणांनंतर टाटा टीने नमते घेतले साल 1993… टाटा टीचे प्रादेशिक व्यवस्थापक बोलिन बोर्डोलोई यांचे अपहरण झाले. जवळपास एक वर्ष त्यांची सुटका होऊ शकली नाही. हे काम ULFA चे नव्हते, तर नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड म्हणजेच NDFB चे होते. ही संघटना 1986 मध्ये आसाममधील बोडो जमातीचे संरक्षण करण्यासाठी स्थापन झाली होती, परंतु हळूहळू तिनेही दहशत पसरवायला सुरुवात केली होती. NDFB ने टाटा टीकडून बोलिनच्या सुटकेसाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. टाटा टीने आपल्या व्यवस्थापकाला वाचवण्यासाठी तसे केलेही. पण यामुळे ULFA भडकला. त्याने टाटावर दबाव टाकला आणि विचारले की, NDFB ला पैसे देत असाल, तर आम्हाला का देत नाही? कंपनीने पुन्हा तीच ऑफर दिली आणि सांगितले की, दिब्रुगड जिल्ह्यातील चाबुआ येथे चहाच्या मळ्यातील कर्मचाऱ्यांसाठी आम्ही एक रुग्णालय बांधू. पण ULFA सहमत झाला नाही. 1995 मध्ये ULFA चे सह-संस्थापक परेश बरुआ यांनी टाटा टीचे व्यवस्थापकीय संचालक आरके कृष्ण कुमार यांना एक पत्र लिहिले आणि मागणी केली - ‘आम्हाला 100 वॉकी-टॉकी पाहिजेत.’ पुढच्या वर्षी आसाममध्ये विधानसभा निवडणुका होणार होत्या. कंपनीला वाटत होते की आसाम गण परिषद म्हणजेच AGP निवडणूक जिंकू शकते आणि हा पक्षही आसामला निर्वासितांपासून वाचवण्यासाठीच बनला आहे. यापूर्वीही 1985-90 पर्यंत AGP चेच सरकार होते. ज्येष्ठ पत्रकार राजीव भट्टाचार्य त्यांच्या ‘ULFA-द मिराज ऑफ डॉन’ या पुस्तकात लिहितात, ‘एजीपी (AGP) सरकारच्या काळात उल्फासारख्या (ULFA) अतिरेकी गटांची मुळे खोलवर रुजली होती. टाटा टीला वाटत होते की एजीपी सरकारची उल्फाबाबतची भूमिका मवाळ असू शकते आणि त्यांच्यावरील बंदीही उठवली जाऊ शकते. अशा परिस्थितीत उल्फाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.’ याशिवाय, टाटा टीचा बहुतेक चहाचा व्यवसाय आसाममधूनच चालत होता. येथे त्यांचे 70 हून अधिक चहाचे मळे होते. 150 वर्षांहून जुनी चहा व्यवसायाची परिसंस्था येथे होती. अशा परिस्थितीत टाटा टी इतरत्र जाऊ शकत नव्हती. याच कारणांमुळे टाटा टी राज्य सरकारकडे मदतीसाठी पोहोचली. कंपनीने उल्फाची पत्रे आसाम सरकारला दिली. तत्कालीन मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांनी कंपनीला उल्फापासून दूर राहण्यास सांगितले, पण तेवढ्यात निवडणुका आल्या. कंपनीची भीती खरी ठरली. 1996 मध्ये सरकार बदलले आणि प्रफुल्ल कुमार महंत यांचा एजीपी पक्ष सत्तेवर आला. टाटाने बँकॉक येथे उल्फासोबत बैठक घेतली एजीपीचे सरकार स्थापन झाल्यानंतर उल्फाचे सह-संस्थापक परेश बरुआ यांनी टाटा टी कंपनीला बँकॉक येथे बैठकीसाठी निमंत्रण पाठवले. कंपनी बैठकीसाठी तयार झाली, पण त्याच्या तयारीला एक वर्ष लागले. खरं तर, डिसेंबर 1995 मध्ये उल्फाने टाटा टी कंपनीकडे 100 वॉकी-टॉकीच्या जोड्यांची मागणी केली. कंपनीने यापूर्वीच उल्फावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले होते. अशा परिस्थितीत आता कंपनीने आसामच्या गृह सचिवांना एक पत्र लिहिले आणि संपूर्ण माहिती दिली, पण सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. तेव्हा कंपनीने दिल्लीतील इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्याची मदत घेतली. आयबीचे अतिरिक्त संचालक रतन सहगल आणि टाटा टी कंपनीची बैठक झाली. रतन सहगल यांनी कंपनीला बँकॉक येथे उल्फासोबत बैठक घेण्यास सांगितले. त्याचबरोबर त्यांनी असा सल्लाही दिला की, उल्फाला रोख रक्कम किंवा कोणतेही उपकरण देऊ नये. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांनी याची माहिती राज्य सरकारलाही देऊ नये. 25-26 मे 1997 रोजी बँकॉक येथे बैठक झाली. या बैठकीत कंपनीकडून चार अधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये वरिष्ठ कल्याण अधिकारी डॉ. ब्रोजेन गोगोई यांचाही समावेश होता. कंपनीने उल्फाच्या 6 मागण्या मान्य केल्या, जसे की - रुग्णालय बांधणे, तरुणांना प्रशिक्षण देणे आणि उल्फाच्या लोकांच्या आसामबाहेर उपचाराची व्यवस्था करणे. एका गुप्त माहितीमुळे टाटा आणि ULFA च्या खेळाचा खुलासा झाला आता आपण त्या कथेवर परत येऊ, ज्याचा उल्लेख आम्ही सुरुवातीला केला आहे. बँकॉकच्या बैठकीनंतर लगेच, मे 1997 ची गोष्ट आहे. भूतानची राजधानी थिंपूमध्ये एक बैठक झाली. यात ठरले की ULFA चे फायनान्स सेक्रेटरी चित्रबान हजारिका यांच्या पत्नी प्रणती यांचा उपचार दिल्ली आणि मुंबईमध्ये केला जाईल. याची जबाबदारी ULFA च्या फणिंद्र मेधी यांना देण्यात आली. सैन्य अधिकाऱ्यासारखा दिसणारा मेधी, प्रणती आणि तिची सहकारी मृदुला चांगमाई यांना घेऊन दिल्लीला पोहोचला. तिघेही हॉटेलमध्ये थांबले, जिथे टाटा कंपनीकडून डॉ. ब्रोजेन गोगोई त्यांना भेटायला आले. गोगोई म्हणाले की, मुंबईत उपचाराची व्यवस्था करण्यासाठी काही वेळ लागेल. प्रणती, मेधी आणि मृदुला उत्तम नगरमध्ये एक घर भाड्याने घेऊन राहू लागले. काही दिवसांनी गोगोई त्यांना पुन्हा भेटले. गोगोईंनी सांगितले की, मुंबईला जाण्याची व्यवस्था झाली आहे. मग तिघेही विमानाने मुंबईला रवाना झाले. गोगोईंनीच त्यांना घेतले आणि जसलोक रुग्णालयात घेऊन गेले. पहिल्या तपासणीनंतर दोन महिन्यांनी त्यांना पुन्हा बोलावण्यात आले. यानंतर ते दिल्लीला परतले. पुढील दोन महिने तिघेही दिल्लीत भाड्याच्या घरात राहिले. यादरम्यान मेधी एका दिवसासाठी गुवाहाटीला आला. तो उल्फाचा सदस्य मुन्ना मिश्राला भेटला. गप्पांमध्ये मेधीने मुन्नाला सांगितले की, तो भूतानमधून दिल्ली आणि मुंबईचा प्रवास का करत होता. मेधीकडून इथेच चूक झाली. खरं तर, काही महिन्यांपूर्वी मुन्ना आसाम पोलिसांचा खबऱ्या बनला होता आणि ही गोष्ट मेधीला माहीत नव्हती. जोपर्यंत मेधी दिल्लीला परतला, तोपर्यंत मुन्नाने पोलिसांना सर्व काही सांगितले होते. पोलिसांनी दिल्लीतील हॉटेल, उत्तम नगरमधील घर ते मुंबईतील जसलोक रुग्णालयापर्यंत नजर ठेवण्यास सुरुवात केली. गोगोई देखील त्यांच्या निगराणीखाली आले. ऑगस्ट महिन्यात प्रणतीने एका मुलाला जन्म दिला. 23 ऑगस्ट रोजी मुलासोबत ते तिघे मुंबईतील सांताक्रूझ विमानतळावर दिल्लीची फ्लाईट पकडण्यासाठी पोहोचले. त्यांना कल्पनाही नव्हती की पोलीस त्यांची वाट पाहत होते. पोलिसांनी संधी मिळताच त्यांना अटक केली आणि चौकशीसाठी गुवाहाटीला घेऊन आले. हळूहळू पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केले. टाटाच्या खर्चाचा हिशेब, हॉटेल्स आणि रुग्णालयांना लिहिलेली पत्रे जमा केली. टाटा टीच्या 3 अधिकाऱ्यांचीही चौकशी केली. तर डॉ. ब्रोजेन गोगोई फरार होते. खरं तर, मुन्ना मिश्राच्या माहिती देण्यापूर्वीच आसाम पोलिसांना बँकॉक येथे झालेल्या बैठकीची माहिती मिळाली होती. तर, आसामचे मुख्यमंत्री प्रफुल्ल कुमार महंत यांना खंत होती की टाटा ग्रुपने निवडणुकीत पुरेसा निधी दिला नाही, उलट ते ULFA चा खर्च उचलत राहिले. 7 सप्टेंबर 1997 रोजी आसामचे पोलीस महासंचालक, के. ऋषिकेशन यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी दावा केला की टाटा ग्रुपची कंपनी ‘टाटा टी’ ULFA ला निधी पुरवत होती. या बातमीनंतर आसामपासून दिल्ली-मुंबईपर्यंत खळबळ उडाली. टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटांपासून ते केंद्रातील इंद्र कुमार गुजराल सरकारपर्यंत सर्वजण थक्क झाले. टाटा टेप्स लीक झाले, तरीही प्रकरण दाबले गेले 12 सप्टेंबर 1997 रोजी टाटा ग्रुपने प्रेस नोट जारी करून सर्व आरोप फेटाळून लावले. टाटाने सांगितले की त्यांनी आयबी (IB) संचालकांना उल्फा (ULFA) सोबतच्या कराराबद्दल सर्व काही सांगितले होते. 'ULFA-द मिराज ऑफ डॉन' या पुस्तकानुसार, आसामच्या डीजीपींना केंद्रातून गृह सचिवांचा फोन आला की त्यांनी या प्रकरणाला जास्त महत्त्व देऊ नये. टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनीही दिल्लीत मुख्यमंत्री महंत यांची भेट घेतली आणि सांगितले की प्रणतीचे प्रकरण स्थानिक स्तरावरील चुकीशिवाय दुसरे काहीही नाही. ऑक्टोबर 1997 मध्ये, काही कॉलिंग टेप्स माध्यमांमध्ये जशाच्या तशा छापल्या गेल्या. यामध्ये कॉर्पोरेट जगतातील दिग्गजांचे फोनवरील संभाषण होते. बॉम्बे डाइंगचे अध्यक्ष नुस्ली वाडिया यांचा फोन त्यावेळी टॅप करण्यात आला होता. या कॉलिंग टेप्समध्ये वाडिया टाटा टीला वाचवण्यासाठी अनेक लोकांशी बोलताना पकडले गेले, ज्यात रतन टाटा, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष केशब महिंद्रा, खासदार आणि उद्योगपती जयंत मल्होत्रा ​​आणि फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांसारख्या नावांचा समावेश होता. माध्यमांमध्ये हे प्रकरण 'टाटा टेप्स' नावाने प्रसिद्ध झाले आणि यातूनच टाटा ग्रुपला या कराराबद्दल माहिती होती हे समोर आले. रतन टाटा यांनी स्वतः गृहमंत्री इंद्रजीत गुप्ता आणि गृहसचिव पद्मनाभैया यांच्याशी बोलणे केले. माजी पंतप्रधान चंद्रशेखर आणि एच.डी. देवेगौडा यांच्याकडे आसाम सरकारसोबत सलोखा घडवून आणण्यासाठी मदत मागितली. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू देखील गुवाहाटीला पोहोचले. ‘ULFA-द मिराज ऑफ डॉन’ या पुस्तकानुसार, मुख्यमंत्री महंत यांना संदेश पोहोचला की त्यांनी टाटा टी विरुद्ध विजय मिळवला आहे आणि आता त्यांनी हा मुद्दा सोडून द्यावा. महंत यांनाही ही लढाई जास्त दिवस लढायची नव्हती. यामुळे डॉ. ब्रोजेन गोगोई यांच्या विरोधात कोणतेही आरोपपत्र सादर करण्यात आले नाही. तीन महिन्यांच्या तुरुंगवासानंतर त्यांना सोडून देण्यात आले. संपूर्ण प्रकरण दाबले गेले. ULFA च्या खात्मा करण्यासाठी सरकारने 'सुल्फा' सुरू केले ‘आसामी विरुद्ध बाहेरील’ आजही मुद्दा आहे, 45 जागांवर चहाच्या बागांचा परिणाम आसामच्या राजकारणाचे जवळून निरीक्षण करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार शिखा मुखर्जी सांगतात, ‘उल्फाची विचारसरणी आजही आसामच्या राजकारणावर परिणाम करते. ‘आसामी विरुद्ध बाहेरील’ या मुद्द्याचा निवडणुकीवर परिणाम होतो. कारण आसामी लोकांना वाटते की बाहेरच्यांच्या आगमनामुळे त्यांची ओळख आणि संस्कृती धोक्यात येते.’ ***** संदर्भ… उल्फा: द मिराज ऑफ डॉन- राजीव भट्टाचार्य

दिव्यमराठी भास्कर 7 Apr 2026 6:35 am

MD Drugs Case : ड्रग्ज घेणाऱ्यांची खैर नाही! सरपंचासह ३ महिला पोलिसांच्या जाळ्यात; ३५० जणांची ‘हिट लिस्ट’तयार

MD Drugs Case : पुणे पोलिसांची एमडी ड्रग्ज ओढणाऱ्यांविरुद्ध मोठी मोहीम; गुन्हे शाखेकडून सरपंचासह महिलांची चौकशी, तर साडेतीनशे सेवन करणाऱ्यांचा शोध सुरू.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 6:30 am

आजचे एक्सप्लेनर:INS अरिदमनच्या समावेशामुळे भारताची न्यूक्लियर ट्रायड मजबूत झाली, 24 न्यूक्लियर क्षेपणास्त्रे सोडू शकते, अजूनही चीनपेक्षा भारत किती मागे?

भारतीय नौदलाला आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली अणु पाणबुडी INS अरिदमन मिळाली आहे. आता भारत वर्षाचे 12 महिने समुद्रातून अणु क्षेपणास्त्रे सोडू शकतो. तथापि, भारत सध्या अणु स्पर्धेत चीनपेक्षा खूप मागे आहे. चीनने पाकिस्तानी नौदलाला अनेक पाणबुड्या पुरवल्या असल्या तरी, भारताची अणु प्रतिबंधक क्षमता या दोन शेजारील देशांचा थेट सामना करते. INS अरिदमनला इतके खास काय बनवते, आणि आपण चीनपेक्षा का मागे आहोत? जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न-1 : INS अरिदमनमध्ये असे काय खास आहे, जी देशाची सर्वात शक्तिशाली पाणबुडी आहे?उत्तर : INS अरिदमन ही भारताची तिसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (SSBN) आहे. यापूर्वी अरिहंत क्लासच्या दोन इतर SSBN नौदलात सामील करण्यात आल्या होत्या: INS अरिहंत 2016 मध्ये आणि INS अरिघात 2024 मध्ये. INS अरिदमन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी व्हेसल (ATV) प्रकल्पांतर्गत विशाखापट्टणम येथील शिपबिल्डिंग सेंटरमध्ये तयार करण्यात आली होती. यात 70% स्वदेशी उपकरणे आहेत. ती नोव्हेंबर 2021 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. समुद्री चाचण्या 2022 मध्ये सुरू झाल्या होत्या आणि तिच्या शस्त्रे व अणुभट्टीची चाचणी डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण झाली होती. INS अरिदमन दीर्घकाळ पाण्याखाली गस्त घालू शकते. पाण्याखाली तिला शोधणे कठीण आहे. अणु पाणबुडी जी अणुभट्टीच्या ऊर्जेवर चालते, तिच्यातून निघणाऱ्या आवाजामुळे शत्रूला पाण्याखाली पाणबुडीच्या अस्तित्वाची माहिती मिळते. 83 MW कॉम्पॅक्ट लाइट वॉटर रिअॅक्टर (CLWR) च्या प्रगत आवृत्तीचा वापर अरिदमनमध्ये करण्यात आला आहे, ज्यामुळे तिचा आवाज खूप कमी होतो. INS अरिहंत आणि INS अरिघातकडे फक्त चार वर्टिकल लॉन्च सिस्टिम्स आहेत. अरिदमनकडे दुप्पट संख्या आहे.याव्यतिरिक्त, INS अरिदमनमध्ये K-5 बॅलिस्टिक मिसाईल देखील बसवता येऊ शकते, ज्याची रेंज 5,000 किमी आहे. हे मिसाईल सध्या चाचणी टप्प्यात आहे. प्रश्न-2 : INS अरिदमनमुळे भारताची न्यूक्लियर ट्रायड मजबूत होईल का?उत्तर : न्यूक्लियर ट्रायडचा अर्थ असा आहे की - कोणत्याही देशाची हवा, जमीन आणि पाणी, या तिन्ही ठिकाणी अणुबॉम्ब हल्ला करण्याची क्षमता. भारतानेही ही क्षमता प्राप्त केली आहे… INS अरिदमनच्या समावेशामुळे न्यूक्लियर ट्रायड मजबूत होईल, कारण भारतात आता वर्षभर तीन अणु पाणबुड्या तैनात राहतील. एक पाणबुडी दोन ते तीन महिने समुद्रात पाण्याखाली गस्त घालते. या काळात दुसऱ्या पाणबुडीची देखभाल केली जाते, ज्याला आठवडे आणि कधीकधी महिनेही लागू शकतात. परिणामी दुसऱ्या पाणबुडीला समुद्रात पोहोचायला जास्त वेळ लागतो. INS अरिदमनच्या आगमनामुळे एक पाणबुडी पाण्याखाली राहील, दुसऱ्याची देखभाल केली जाईल आणि तिसरी सागरी कार्यांसाठी तैनात राहील. भारत पुढील वर्षापर्यंत दुसरी अरिहंत-श्रेणीची अणुपाणबुडी कार्यरत करण्याची तयारी करत आहे. ही पाणबुडी सध्या चाचणी टप्प्यात आहे. प्रश्न-3 : चीनच्या पाणबुडी शक्तीच्या तुलनेत भारत कुठे आहे? उत्तर : चीन जगातील सर्वात शक्तिशाली नौदलांपैकी एक आहे. चीनकडे 61 पाणबुड्या आहेत, ज्यात 12 ते 14 अणुबॉम्ब हल्ला करणाऱ्या पाणबुड्यांचा समावेश आहे. चीनकडे पाणबुडीतून प्रक्षेपित होणारी JL-3 क्षेपणास्त्र आहे, जी 10,000 किमी पर्यंत अणुबॉम्ब हल्ला करू शकते. दुसरीकडे, भारताकडे एकूण 19 पाणबुड्या आहेत, ज्यात तीन अणुबॉम्ब पाणबुड्यांचा समावेश आहे. यात सहा जुन्या रशियन किलो-क्लास पाणबुड्या आणि चार जर्मन HDW पाणबुड्यांचा समावेश आहे. चीन पाणबुडी स्पर्धेत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर भारत आठव्या क्रमांकावर आहे. निवृत्त नौदल अधिकारी चित्रपू उदय भास्कर यांच्या मते, भारताला त्याच्या पाणबुडी तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमता दोन्हीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. सध्या ही क्षमता सरासरीपेक्षा कमी आहे. चीन आपल्या स्ट्रिंग ऑफ पर्ल्स रणनीतीद्वारे समुद्रात भारताला वेढत आहे. ते भारताच्या आसपासच्या देशांमध्ये बंदरे विकसित करत आहे, भाड्याने देत आहे किंवा त्यावर आपले वर्चस्व वाढवत आहे. यात पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, कंबोडिया आणि मालदीवच्या बंदरांचा समावेश आहे. हिंद महासागर सुरक्षित ठेवण्यासाठी भारताला चीनच्या नौदल क्षमतेशी स्पर्धा करावी लागेल. भारत यासाठी जी रणनीती अवलंबत आहे तिला नेकलेस ऑफ डायमंड रणनीती म्हणतात. या रणनीती अंतर्गत भारत सिंगापूर, इंडोनेशिया, सेशेल्स, ओमान, इराण, जपान आणि व्हिएतनामसारख्या देशांमध्ये आपली नौदल उपस्थिती वाढवत आहे. भारतासाठी एक आव्हान म्हणजे पाकिस्तानला चीनचा नौदल पाठिंबा आहे. एका करारानुसार, पाकिस्तानला 2028 पर्यंत चीनकडून आठ प्रगत डिझेल हँगोर-क्लास पाणबुड्या मिळतील. मात्र, या अणुपाणबुड्या नाहीत. पाकिस्तानकडे सध्या कोणतीही अणुपाणबुडी नाही. काही अहवालांमध्ये असे म्हटले आहे की पाकिस्तान अणुपाणबुड्या विकसित करण्यासाठी चीनकडून तांत्रिक मदत मागत आहे. प्रश्न-4 : भारत आपली पाणबुडी शक्ती वाढवण्यासाठी काय करत आहे?उत्तर : भारत तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी नौदलाची शक्ती मजबूत करणे आवश्यक आहे. सप्टेंबर 2025 मध्ये संरक्षण मंत्रालयाने पुढील 15 वर्षांसाठी लष्करी आधुनिकीकरण योजना सादर केली. यात भारतीय नौदलासाठी पाणबुडी विकास कार्यक्रमाचा समावेश आहे... प्रोजेक्ट-77 प्रकल्प 75I पुढील वर्षी चौथी SSBN तयार होईल गेल्या वर्षी बातमी आली होती की भारत रशियाकडून 2 अब्ज डॉलरमध्ये 10 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर अणु पाणबुडी घेत आहे, परंतु भारत सरकारने हे अहवाल फेटाळून लावले होते. प्रश्न-5 : तर काय भारताचे पाणबुडी प्रकल्प ठरलेल्या वेळेपेक्षा मागे पडले आहेत?उत्तर : भारताचे पाणबुडी प्रकल्प किती उशिरा आहेत हे समजून घेण्यासाठी, आपल्याला आधी भारताच्या पाणबुड्यांचा संक्षिप्त इतिहास जाणून घ्यावा लागेल... भारताने 1967 ते 1974 दरम्यान सोव्हिएत रशियाकडून आठ फॉक्सट्रॉट क्लासच्या पाणबुड्या मिळवल्या होत्या. त्यानंतर 1981 मध्ये जर्मनीच्या HDW कंपनीकडून चार हंटर-किलर पाणबुड्या विकत घेण्यात आल्या होत्या. यापैकी दोन जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून माझगाव डॉक लिमिटेड (MDL) येथे बनवण्यात आल्या होत्या. आणखी दोन पाणबुड्या बनवण्यासाठी चर्चा सुरू होती, परंतु या करारामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे MDL ला काम थांबवावे लागले होते. जून 1999 मध्ये प्रोजेक्ट 75 मंजूर झाल्यानंतर, 2030 पर्यंत 18 पारंपरिक आणि 6 अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्यांसह एकूण 24 पाणबुड्या बनवायच्या होत्या. या प्रकल्पाचे दोन टप्पे होते: प्रोजेक्ट 75 आणि प्रोजेक्ट 75 इंडिया. 2005 मध्ये फ्रेंच कंपनी DCNS, जी आता नेव्हल ग्रुप म्हणून ओळखली जाते, आणि माझगाव डॉक लिमिटेड (MDL) यांच्यात एक करार झाला होता, ज्याच्या परिणामी 2024 पर्यंत 19 वर्षांत सहा स्कॉर्पीन-क्लास पाणबुड्या पूर्ण झाल्या. याचा अर्थ असा की एक पाणबुडी बनवण्यासाठी सरासरी चार वर्षांपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. या कराराच्या वेळी संरक्षण मंत्रालयाने सांगितले होते की 2017 पर्यंत सहा पाणबुड्या कार्यान्वित केल्या जातील आणि प्रोजेक्ट 75- 2017 मध्ये पूर्ण होईल. चीनने 2008 ते 2023 या 15 वर्षांत 12 अणुशक्तीवर चालणाऱ्या हल्ला करणाऱ्या पाणबुड्या आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे बनवली. किंग्ज कॉलेज लंडन येथील आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक वॉल्टर लोडिंग यांच्या मते, आधुनिकीकरणाच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतरही, भारतीय नौदलाची पाणबुडी क्षमता अपुरी राहिली आहे. भारत नवीन पाणबुड्या मिळवण्यात दिरंगाई करत आहे. अनेक प्रकल्प त्यांच्या स्थापनेनंतर एक दशकाने पाणबुड्या वितरित करतात. 'प्रोजेक्ट 75 इंडिया' देखील थांबला आहे, याचा अर्थ 2030 पूर्वी पाणबुड्यांची डिलिव्हरी सुरू होणार नाही. भारतीय थिंक टँक ORF येथील स्ट्रॅटेजिक स्टडीजचे असोसिएट फेलो सायंतन हळदर यांच्या मते, भारताव्यतिरिक्त, फक्त पाच देशांकडे SSBN आहेत. भारत आपली सागरी शक्ती वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवत आहे, ज्यापैकी अनेकांचा उद्देश पाणबुडी उत्पादन वाढवणे हा आहे. सध्याची युद्धाची परिस्थिती आणि पाकिस्तान व चीनने निर्माण केलेल्या आव्हानांचा विचार करता, हे कार्यक्रम भारताच्या क्षमतांमध्ये वाढ करतील. प्रश्न-6 : भारताच्या अणुप्रकल्पाला उशीर होण्याचे कारण काय आहे?उत्तर : प्रकल्प 75 मध्ये 2007-08 पासूनच समस्या निर्माण होऊ लागल्या. इंजिन आणि जनरेटरसारख्या आवश्यक भागांची खरेदी, तसेच स्टीलसारख्या कच्च्या मालाची खरेदी या करारामध्ये समाविष्ट नव्हती. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर प्रकल्पासाठी ₹1,900 कोटी मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर 2011 मध्ये पुरामुळे MDL डॉकयार्डचा मोठा भाग पाण्याखाली गेला, ज्यामुळे प्रकल्प थांबवावा लागला. मे 2016 मध्ये पाणबुडीवर 98 ब्लॅक शार्क हेवीवेट टॉर्पेडो (HWT) बसवायचे होते. ज्या इटालियन कंपनीकडून हे खरेदी करायचे होते, त्या कंपनीला भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जावे लागले. त्यामुळे, जर्मनीकडून 1980 च्या दशकातील SUT टॉर्पेडो नंतर स्थापित करण्यात आले. अहवालानुसार, भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांचे मत होते की हे HWTs चा योग्य पर्याय नाही. यानंतर 2019 मध्ये सरकारने दोन युरोपीय कंपन्यांकडून HWTs खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू केले. या अडचणींमुळे प्रोजेक्ट 75 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात आला. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र द हेराल्ड आणि वीकली टाइम्स मध्ये प्रकाशित 22,408 पानांच्या अहवालात या स्कॉर्पियन पाणबुडीच्या आवाज, डायव्हिंग क्षमता आणि सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सुरुवातीला नौदलाने हा दावा फेटाळून लावला होता. प्रोजेक्ट 75 इंडिया अंतर्गत AIP तंत्रज्ञानासह सहा पाणबुड्या बनवायच्या होत्या. 2019 मध्ये निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील डिफेन्स इक्विझिशन कौन्सिलने स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मॉडेल अंतर्गत या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. या मॉडेल अंतर्गत MDL आणि LT (लार्सन अँड टुब्रो) हे धोरणात्मक भागीदार होते. त्यांना पाच परदेशी कंपन्या, जसे की ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEMs) यांच्या सहकार्याने पाणबुड्या बनवायच्या होत्या. या कंपन्यांमध्ये फ्रान्सचे नेव्हल ग्रुप, जर्मनीचे थिसेनक्रुप मरीन सिस्टम्स, रशियाचे ROE, दक्षिण कोरियाचे डेवू आणि स्पेनचे नावंशिया यांचा समावेश होता. इंडियन एक्सप्रेसनुसार, 2019-20 मध्ये नौदलाने सांगितले होते की प्रकल्पाला विलंब झाला होता. सामरिक भागीदार आणि OEM साठी अंतिम बोलीला वेळ लागत होता. नंतर एप्रिल 2022 मध्ये फ्रान्सचे नेव्हल ग्रुप प्रकल्पातून बाहेर पडले आणि रशियन व स्पॅनिश कंपन्यांनीही माघार घेतली. नेव्हल ग्रुपने सांगितले होते की या करारासाठी AIP तंत्रज्ञानाच्या पूर्व-पुराव्याची आवश्यकता आहे. तथापि, फ्रान्सचे स्वतःचे नौदल सध्या या प्रोपल्शन प्रणालीचा वापर करत नाही, ज्यामुळे त्याची चाचणी करणे आवश्यक आहे. दुसरी समस्या तंत्रज्ञान हस्तांतरणाची होती. परदेशी कंपन्या त्यांचे तंत्रज्ञान सामायिक करण्यास इच्छुक नव्हत्या, जे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मॉडेल अंतर्गत आवश्यक होते. भारताचे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) कलवरी क्लासच्या स्कॉर्पीन पाणबुड्यांना स्वदेशी AIP तंत्रज्ञानाने सुसज्ज करू इच्छिते. याला काही वर्षे लागू शकतात. सुमारे 10 देशांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे आणि आतापर्यंत सुमारे 20 देशांकडे AIP पाणबुड्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 7 Apr 2026 6:26 am

LPG Shortage : नरेंदर कब मिलेगा सिलिंडर? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर पिठलं- भाकरी आंदोलन

LPG Shortage : गॅसच्या तीव्र टंचाईमुळे सामान्य नागरिकांचे हाल; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर स्वयंपाक करून निषेध आंदोलन.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 6:15 am

Pay and Park : फ्री पार्किंगचे दिवस संपले! शहरातील ‘या’५ ठिकाणी ‘पे अँड पार्क’; महापालिकेचा मोठा निर्णय

Pay and Park : पार्किंग शुल्काच्या सात वर्ष जुन्या प्रस्तावावर अखेर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; प्रशासनाकडे ८ निविदा प्राप्त, राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे पुणेकरांचे लक्ष.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 6:00 am

Chandrashekhar Bawankule : पुण्यातील बांधकाम परवानग्यांचा खोळंबा संपणार! बावनकुळेंचा मोठा निर्णय, ८ दिवसांत तोडगा

Chandrashekhar Bawankule : तात्पुरते रेखांकन वादावर तोडगा काढण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 5:45 am

Pune News : पीएमआरडीए की महापालिका? समाविष्ट गावांतील बांधकाम परवानगीचा तिढा सुटला..वाचा

Pune News : अधिसूचना निघूनही कागदपत्रांची अडवणूक करणाऱ्या पीएमआरडीएला दणका; नगरविकास विभागाच्या नव्या आदेशामुळे बांधकाम आणि टीडीआर प्रस्तावांना मिळणार गती.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 5:30 am

लक्षवेधी : युद्धाच्या आर्थिक झळा

आखातातील युद्ध (War) एक एक दिवस पुढे सरकत असून अद्यापही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. अशा स्थितीत युद्धाच्या आर्थिक झळा इतर देशांप्रमाणेच भारतालाही सहन कराव्या लागणार आहेत

दैनिक प्रभात 7 Apr 2026 5:30 am

Agriculture Inflation : युद्धाची धग थेट शिवारात! १५ दिवसांत शेती साहित्याचे भाव गगनाला; बळीराजा कोलमडला

Agriculture Inflation : आखाती युद्धामुळे प्लास्टिक आणि रसायनांचा पुरवठा विस्कळीत; ठिबक सिंचन, पीव्हीसी पाईप आणि खतांच्या किमतीत १५ ते १५० टक्क्यांची विक्रमी वाढ.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 5:15 am

Wagholi Fire Incident : वाघोलीत मध्यरात्री दुकानाला भीषण आग, झोपलेल्या तरुणाचा गुदमरून मृत्यू

Wagholi Fire Incident : वाघोली येथील आव्हाळवाडी फाट्यावर रेडियम बोर्डाच्या दुकानाला मध्यरात्री लागली आग; धुरामुळे गुदमरून नांदेडच्या २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 5:00 am

विशेष : टुगेदर फॉर हेल्थ…

आज 7 एप्रिल रोजी ‘जागतिक आरोग्य दिन’ (World Health Day) जगभरात साजरा होत आहे. लोकांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता निर्माण करणे, निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांकडे लक्ष वेधणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 5:00 am

Nira River Pollution : नीरा नदी प्रदूषणाला सोमेश्वर कारखाना जबाबदार? व्यवस्थापनाने दिलं ‘हे’स्पष्टीकरण

Nira River Pollution : नीरा नदीतील केमिकल युक्त पाण्यावरून कोऱ्हाळे खुर्द परिसरात संताप; कारखान्याने फेटाळले आरोप, प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 4:45 am

Beef Seized : जुन्नर शहरात ८०० किलो गोमांस जप्त! माई मोहल्ला परिसरात पोलिसांची मोठी कारवाई

Beef Seized : जुन्नर शहरातील माई मोहल्ला परिसरात आरसीपी पथकासह पोलिसांचा छापा; ८०० किलो गोमांसासह पत्राशेड मालक अटकेत.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 4:15 am

Junnar News : जुन्नरमधील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ६१ गावांचे पंचनामे पूर्ण; मदतीचा आकडा आला समोर

Junnar News : जुन्नर तालुक्यातील ६१ गावांमध्ये अवकाळी पाऊसामुळे पिकांचे कोट्यवधींचे नुकसान; महसूल व कृषी विभागातर्फे मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 4:00 am

Shrirang Barne : मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधांवर भर द्या! खासदार श्रीरंग बारणे यांचा आयुक्तांना सल्ला

Shrirang Barne : शहरात नवीन प्रकल्पांची स्वप्ने दाखवण्यापेक्षा पाणी, स्वच्छता आणि आरोग्यासारख्या मूलभूत गरजांकडे लक्ष द्या; खासदार श्रीरंग बारणे यांचा आयुक्तांना सल्ला.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 3:30 am

School Bus Fees : खासगी शाळांकडून पालकांची लूट! स्कूलबसचे १२ महिन्यांचे भाडे वसूल; प्रत्यक्षात शाळा आठ महिनेच सुरू

School Bus Fees : देखभाल आणि कर्जाचे कारण पुढे करत कंत्राटदारांकडून वसुली; शिक्षण विभागाने नियमावली स्पष्ट करण्याची पालकांची मागणी.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 3:00 am

Rahatni Accident : काळजाचा थरकाप! ‘नो एन्ट्री’तून दुचाकी घुसवली अन् बसला धडकली; तरुणाचा जागीच मृत्यू

Rahatni Accident : शिवार चौकातील धक्कादायक घटना; बीआरटी लेनमध्ये चुकीच्या बाजूने दुचाकी चालवल्याने ओढवला भीषण प्रसंग.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 2:30 am

D Mart Girl Suicide : डी-मार्टमध्ये काम तरुणीने केले विष प्राशन; प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल

D Mart Girl Suicide : कामावर असताना गुपचूप विष प्राशन केले; दुसऱ्या दिवशी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 2:00 am

PCMC News : आयुक्तांचे आदेश धाब्यावर! स्मार्ट सिटीचे हस्तांतरण रखडले; नेत्यांना ‘संचालक’पदाचा मोह?

PCMC News : महापालिकेचा हिस्सा आणि वाढीव खर्चाचा बोजा; यंत्रणा कालबाह्य झाल्याने कोटींच्या प्रकल्पांचे भवितव्य अंधारात.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 1:30 am

Koyna Dam Accident : पोहण्याचा मोह जीवावर बोतला! कोयना धरणात तरुणाचा बुडून मृत्यू; नेमकं काय घडलं?

Koyna Dam Accident : महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित; कोयना जलाशयाजवळ पर्यटनासाठी आलेल्या तरुणावर काळाचा घाला.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 1:00 am

Shivendrasinhraje Bhosale : एमआयडीसी विस्तारासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे सरसावले; ‘हे’गाव होणार इंडस्ट्रियल हब

Shivendrasinhraje Bhosale : 'मास'च्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते धैर्यशील भोसले यांना नियुक्तीपत्र.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 12:30 am

Wai News : वाईत राजकीय भूकंप! शिंदे दाम्पत्याविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार; थेट निवासस्थानावर धडकला मोर्चा

Wai News : जिल्हा परिषद सभापती निवडीत भाजपला साथ दिल्याचा आरोप; पुतळा दहन करत व्यक्त केला तीव्र निषेध.

दैनिक प्रभात 7 Apr 2026 12:15 am

KKR vs PBKS : ईडन गार्डन्सवर पावसाने मारली बाजी! पंजाब-कोलकाताला संघांना मिळाला प्रत्येकी १-१ पॉईंट

KKR vs PBKS : केकेआरसाठी हा पाऊस जणू 'वरदान' , तर पंजाबसाठी शाप ठरला.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 11:33 pm

KKR vs PBKS : यष्टीरक्षकाने स्टंप सोडून गोलंदाजालाच मारलाच चेंडू, नेमकं काय घडलं, पाहा VIDEO

KKR vs PBKS : पावसाच्या व्यत्ययापूर्वी पंजाबचा वेगवान गोलंदाज झेव्हियर बार्टलेटने आपल्या एकाच षटकात केकेआरच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 11:03 pm

Riyaz Ganji : फॅशन डिझायनर रियाझ गांजीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

प्रसिद्ध लिबास ब्रँडचे फॅशन डिझायनर रियाझ गांजी (Riyaz Ganji) यांच्याविरुद्ध मालमत्तेची माहिती उघड न केल्याचा आणि देणी थकवल्याचा आरोप करणाऱ्या एका अवमान याचिकेच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 10:50 pm

Maharashtra Crime : महाराष्ट्र हादरला..! ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्याला संपवलं; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Crime : नांदेडमध्ये ठाकरे सेनेचे युवा नेते सोनू कल्याणकर यांची हत्या करण्यात आली आहे.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 10:40 pm

Gold-Silver Rates: सोने-चांदी दरात जोरदार वाढ !

Gold-Silver Rates: दिल्ली सराफात सोन्याचा दर 2,300 रुपयांनी म्हणजे 1.52 टक्क्यांनी वाढवून 1 लाख 53 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. चांदीचा दर...

दैनिक प्रभात 6 Apr 2026 10:39 pm

RBI MPC Meeting: तेलदरवाढीचा महागाईवर दबाव; व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याची शक्यता

RBI MPC Meeting: खनिज तेलाचे दर 70 डॉलर वरून 110 डॉलर पर्यंत वाढले आहेत.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 10:32 pm

दिल्ली वार्ता : राघव चढ्ढा विरुद्ध आप

Raghav Chadha : केंद्र सरकारविरूद्ध उगारलेली तलवार राघव चढ्ढा यांनी म्यान केली म्हणून पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली. मात्र, चढ्ढा यांनी अशी मवाळ भूमिका का घेतली? हा खरा संशोधनाचा विषय आहे.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 10:30 pm

मुंबईतील रेलिंगचे वाढीव दराने कंत्राट कुणाच्या दबावाखाली दिले; शिवसेना अमेय घोले यांचा उबाठाला सवाल

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने संभाव्य कंत्राट कामांच्या निविदा भाजपने पारदर्शी कारभाराची चुणूक दाखवून रद्द करण्यास भाग पाडले. परंतु या सर्व निविदा महायुतीच्या वतीने रद्द करण्यात आल्या असून जेम पोर्टलवर निविदा मागवण्याचा आग्रह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा आहे. त्यामुळे यातील रेलिंगचे कंत्राट हे सन २०२१मध्ये कुणाच्यातरी दबावानुसार दिले होते. त्यामुळे त्याच कंपनीला पुन्हा देण्याचा घाट घालण्यात आला होता,त्यामुळे ही निविदाच रद्द करण्यात आल्याचे सांगत शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी अप्रत्यक्षपणे उबाठाचे नेते आदित्य ठाकरेंच्या आशिर्वादामुळे कामे मिळवणाऱ्या कंपनीला बाहेरचा रस्ता दाखवल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही निविदा रद्द करत एकप्रकारे आदित्य ठाकरेंना धक्का दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुंबई महापालिकेच्यावतीने पदपाथ रेलिंग, लेन मार्किंग, विस्तारीत प्राणिसंग्रहालय तसेच शालेय वस्तूंची खरेदी आदींच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत सभागृहनेते गणेश खणकर आणि शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेवून या चारही प्रस्तावित कामांच्या निविदा या महायुतीच्यावतीने मागणी करून रद्द करण्यास प्रशासनाला भाग पाडले आहे. महापालिकेत भाजप म्हणून नव्हेतर महायुती म्हणूनच निर्णय घेतले जातात असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही निविदा जेम पोर्टलवर काढल्या जाव्यात याबाबत महायुतीचे एकमत असून पारदर्शक कामकाजाच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला जात आहे. यामुळे महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांची बचत केली जात आहे.विस्तारीत प्राणिसंग्रहालयचा खर्च वाढीव असल्यामुळे तसेच लेन मार्किंगचा समावेश रस्ते कंत्राटांमध्ये करण्यासाठी रद्द करण्यात आली आहे. तर शालेय वस्तूंच्या खरेदीमध्ये पादर्शकता आणण्यासाठी जेम पोर्टलद्वारे निविदा मागवण्यासाठी रद्द करण्यात आले. तर रस्ते लगतच्या रेलिंगचे काम यापूर्वी शांतीनाथ रोडवेज या कंपनीला देण्यात आले होते. हे काम सन २०२१मध्ये तत्कालिन सहआयुक्त आशुतोष सलिल यांना स्वाक्षरी करायची नव्हती तरी देत देण्यात आले. त्यावर आशुतोष सलिल यांच्यावर कुणाचा दबाव होता असे सांगत एकप्रकारे उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर उंगली निर्देश केला. त्यामुळे पुन्हा त्याच कंपनीला वाढीव दराने कंत्राट देण्याचा प्रयत्न झाल्यामुळे हे कंत्राट रद्द करायला भाग पाडले. यामध्ये नक्की कुणाला धक्का दिला हे आता टिका करणाऱ्या उबाठाने आणि त्यांच्या मुखपत्राच्या संपादकाने ठरवावे असे अमेय घोले आणि भाजपचे सभागृहनेते गणेश खणकर यांचा समाचार घेतला.

फीड फीडबर्नर 6 Apr 2026 10:30 pm

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत निधीची अदलाबदल करत या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या रकमेशी समतुल्य राखत या अंतर्गत निधीचा फेरफार करण्यात आला असून आता नगरसेवकांनी सूचवलेल्या कामांसाठी या ८०० कोटी रुपयांच्या निधींची तरतूद केली जाणार आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या स्तरावर किती आणि महापालिका स्तरावर किती कोटी रुपयांची तरतूद केली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.मुंबई महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सन २०२६-२७ या वर्षांकरता तब्बल ८०,९५२.५६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना सादर केला होता. तब्बल ८९.८४ कोटी रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्पांवर मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. एकूण ६ तास ४७ मिनिटे चर्चा झालेल्या अर्थसंकल्पावर १६ सदस्यांनी भाग घेतला. त्यामुळे प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या एकूण आकाराच्या ८०० कोटी रुपयांच्या निधीची अंतर्गत फेरबदल करत नगरसेवकांनी सूचवलेल्या कामांसाठी तरतूद केली जाणार आहे. यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत अर्थसंकल्पाच्या अ आणि ब करता केलेल्या निधीपैंकी ८००कोटी रुपये अंतर्गत वळते करण्यात आले आहे तर अर्थसंकल्प ग अंतर्गत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता स्थायी समितीच्या सभेत ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारांतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीचे वाटप स्थायी समिती आणि महापालिका स्तरावर महापौरांच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे आता स्थायी समितीच्या स्तरावर सुमारे ६५० कोटी रुपये आणि महापालिका स्तरावर १५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद नगरसेवकांनी सूचवलेल्या कामांसाठी केली जाणार आहे.महापालिका स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी याबाबत बोलतांना स्पष्ट केले आहे की, अर्थसंकल्पात ८०० कोटी रुपयांची वाढ केली असून ज्या ज्या नगरसेवकांनी आपल्या विभागातील विकासकामांसाठी निधीची मागणीची पत्रे दिली आहे त्या पत्रांचा विचार केला जाईल. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनाही निधी देण्याचा विचार केला जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या नगरसेवकांना ६० लाख रुपयांचा नगरसेवक निधी मिळतो आणि प्रभाग समिती निहाय १ कोटी रुपयांची तरतूद स्थायी समितीच्या माध्यमातून अर्थसंकल्प मंजूर करताना केली जाते. त्यामुळे या व्यतिरिक्त सत्ताधारी पक्षाला आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सूचवलेल्या विकासकामांसाइी किती कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

फीड फीडबर्नर 6 Apr 2026 10:30 pm

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत आढावा घेतला. तसेच शाळेतील विविध प्रयोगशाळांनाही भेट दिली. यावेळी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना आकाशगंगा , सांकेतिक भाषा , कृत्रिम बुद्धिमत्ता याबाबत परिपूर्ण माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अवगत केलेल्या गुणांचे कौतुक यावेळी आयुक्त भिडे यांनी केले. तसेच प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य पाहून आयुक्तांनी त्यांचीही कौतुकाने पाठ थोपटली.मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमधील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पूर्व प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशोत्सव सोहळा सोमवारी ६ एप्रिल रोजी उत्साहात पार पडला. राजावाडी (घाटकोपर) येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विक्रोळी येथील हरियाली व्हिलेज सीबीएसई शाळेत शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या. दादर (पश्चिम) येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी गुलाबपुष्प, पेन्सिल आणि चॉकलेट भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तर गोवंडी येथील नटवर पारेख शाळेत अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी भेट दिली.दादर येथील शाळेत उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, उपशिक्षणाधिकारी श्रीमती ममता राव उपस्थित होते.तर, घाटकोपर येथे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किर्तीवर्धन किरतकुडवे, उपशिक्षणाधिकारी (पूर्व उपनगरे) सायली सुर्वे आदींसह शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राजावाडी शाळेतील प्रवेशोत्सवावेळी लेझीम हाती घेऊन, लेझीम पथकामध्ये स्वतः सहभागी होत महापौरांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यानंतर, महापौर रितू तावडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांचा उत्साह वाढवला. विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा सुविधा, शैक्षणिक उपक्रम आदींची शिक्षक वृंदाकडून त्यांनी माहिती घेतली.मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने मिशन ॲडमिशन, मिशन मेरिट असे उपक्रम हाती घेतले आहेत. तसेच, विद्यार्थ्यांमध्ये गणित आणि विज्ञान विषयांबाबत अधिक आवड निर्माण व्हावी, यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ‘गणित गुरुवार’ उपक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून महानगरपालिकेने खान अकादमीसोबत सामंजस्य करार केला. याबाबत उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी माहिती दिली. दादर येथील संगणकीय प्रयोगशाळेत अभ्यास करणाऱ्या अंश पाटील, नील बद्री, आरुष वंगारी (इयत्ता दहावी), अविघ्न शिंदे, श्रीराम चिकुला (इयत्त आठवी) या विद्यार्थ्यांनी महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना आकाशगंगा , सांकेतिक भाषा , कृत्रिम बुद्धिमत्ता याबाबत परिपूर्ण माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अवगत केलेल्या गुणांचे आयुक्त भिडे यांनी कौतुक केले. तसेच प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य पाहून आयुक्तांनी त्यांची पाठ थोपटली.राजावाडी (घाटकोपर) या शाळेमध्ये पूर्व प्राथमिक वर्गाचे एकूण ३६० विद्यार्थी आहेत. तसचे इयत्ता पहिली ते दहावीचे ७०० असे एकूण १०६० विद्यार्थी सीबीएसई मंडळाचे शिक्षण घेत आहेत. तर दादर येथील भवानी शंकर मार्ग शाळेत पूर्व प्राथमिक वर्गाचे एकूण २७० विद्यार्थी आहेत. यासह महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १९ शाळा आहेत. या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्गाच्या एकूण १४२ तुकड्या असून, यामध्ये ५ हजार ५७३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच प्राथमिक शाळांच्या एकूण २७९ तुकड्या असून त्यात १० हजार ७८७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

फीड फीडबर्नर 6 Apr 2026 10:30 pm

Rupee: रिझर्व्ह बँकेच्या उपायांनी रुपयाला आधार; डॉलरसमोर 93.04 वर मजबुती

Rupee: रुपयाचे मूल्य गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला कोसळून 95 रुपये प्रति डॉलर इतक्या निचांंकी पातळीवर गेल्यानंतर रिझर्व्ह बँकेने रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना वाढविल्या.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 10:24 pm

Bank Nifty: बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी; बँक निफ्टी 1,060 अंकांनी उसळला

Bank Nifty: बँक ऑफ बडोदाचा शेअर सर्वात जास्त म्हणजे 4.38 टक्क्यांनी वाढला.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 10:10 pm

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून २०२९ चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि विकासाची गंगा सर्वांपर्यंत पोहोचवावी, त्यासाठी सक्रिय कार्यकर्त्यांने कामाला लावावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी केले. पक्षाच्या ४६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सक्रिय कार्यकर्ता मेळाव्यात चव्हाण बोलत होते.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीचा आणि आगामी कार्यक्रमाचा व्यापक आढावा घेतला. पक्षाच्या कार्यपद्धतीचा सकारात्मक परिणाम समाजावर कसा होईल याचा सर्वांगीण विचार पक्ष नेहमीच करत असतो. कार्यकर्त्यानेही तसाच विचार करावा, असेही ते म्हणाले. सेवा आणि समर्पण भावनेतून पक्षाचा कार्यकर्ता काम करत राहिला, त्यामुळेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सेवेची संधी प्राप्त झाली. भाजपला अनेक निवडणुकांमध्ये मिळालेले यश प्रचंड आहे. महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या पोषक समीकरण तयार करून प्रत्येक बूथची जबाबदारी घेणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी पुढच्या स्थापना दिनाआधी भक्कम करू या, असे आवाहनही त्यांनी केले.आपली क्षमता, कार्यकर्त्यांच्या ताकद काय आहे, याची आपल्याला कल्पना आहे, त्यामुळे २०२९ ला जे अपेक्षित आहे, ते ध्येय यामुळे सोपे होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीची वेगवान वाटचाल करत आहे. त्यांची भूमिका स्पष्ट आहे. कार्यकर्त्यांनी केवळ कागदावर किंवा कार्डावर पदाधिकारी म्हणून न राहता सतर्क राहून कार्यपद्धतीची शक्ती सक्रिय ठेवत आपली भूमिका ओळखून कामाला लागले पाहिजे, असे ते म्हणाले.स्वातंत्र्यानंतरचे मोदी सरकार हे एकमेव सरकार असे आहे, जे जगाच्या पाठीवर कोठेही भारतावरील संकटात असेल त्याच्या मदतीसाठी ते धावून जाते. आता देशासमोर जेव्हा संकटे उभी राहतात, तेव्हा देश मदतीसाठी संयुक्त राष्ट्रसंघांकडे पाहात नाही, आता ‘घुसेगा और मारेगा’ ही मोदी सरकारची नीती आहे. कोविडकाळात जगात मोठी लसीकरण मोहीम भारताची होती. जगाच्या पाठीवरील ९२ देशांमध्ये भारतीय कोविड लस पाठवून संकटाशी सामूहिक संघर्ष करण्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घेतला, व ‘वसुधैव कुटुम्बकम’ ही शिकवण सार्थ केली, असे प्रातिपादन मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केले. आपण आता जगातील तिसरी सर्वात अर्थव्यवस्था होत आहोत. आपला पक्ष हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे, आणि विश्वगुरूचे स्थान मिळेल अशा पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत ही अभिमानास्पद बाब आहे. हा कार्यकर्ता पदासाठी नव्हे, तर समाजाच्या सेवेसाठी काम करतो, असे ते म्हणाले.काही राजकीय पक्ष रशियाची विचारसरणी मानतात, काही राजकीय पक्ष केवळ विरोधाच्या राजकारणासाठी निर्माण झाले. महाराष्ट्रात वाटेकरी पक्ष निर्माण होऊन भावकीच्या वाटणीचे राजकारण करू लागले. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष हा वेगळा आणि राष्ट्रीय विचारसरणीतून राष्ट्रासानठी समर्पित असलेला पक्ष आहे, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता हा ‘राष्ट्राय स्वाहा’ या भावनेने काम करतो, प्रसंगी घरादारावर तुळशीपत्र ठेवून पक्षाच्या प्रतिकूल परिस्थितीत योद्धा म्हणून काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे, याचा आम्हाला अभिमान आहे, अशा शब्दांत राज्याचे मंत्री आशीष शेलार यांनी भावना व्यक्त केल्या. छत्रपती शिवराय हे आमचे आदर्श आहेत, आणि छत्रपतींचा विचार हा आमचा संस्कार, आचार आहे. भारतीय जनता पक्ष हा मुंबईच्या मातीत जन्म झालेला पक्ष हे, जगभरात हिंदुत्वाचा डंका वाजविणारा आमचा पक्ष आहे, असे ते म्हणाले.प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या स्थापनाप्रसंगी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी व्यक्त केलेल्या स्वप्नाचा अभिमानास्पद उल्लेख केला. या नेत्यांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आगामी काळात पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाचा विचार आणि संस्कार घेऊन पुढे जात राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.पक्षाचे असंख्य सक्रिय कार्यकर्ते, नेते, मंत्री, आमदार, नगरसेवकांच्या उत्साही उपस्थितीत साजऱ्या झालेल्या या समारंभात प्रारंभी पक्षाच्या उभारणीसाठी समर्पित भावनेने काम करणारे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ नेते मधु चव्हाण, लद्धारामजी नागवाणी, दिलीप हजारे, अरुण मोरसावाला, शरद चव्हाण, श्रीपाद मुसळे, अविनाश दलाल आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. समारंभाच्या प्रारंभी पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या चित्रफितीद्वारे जनसंघ ते भाजपा या वाटचालीतील राष्ट्रसमर्पित कार्याचा पट प्रदर्शित करण्यात आला.

फीड फीडबर्नर 6 Apr 2026 10:10 pm

KKR vs PBKS सामन्याचा ‘कटऑफ टाईम’काय? ५-५ षटकांच्या सामन्यासाठी किती वाजता सुरूवात होणे आवश्यक? जाणून घ्या

KKR vs PBKS : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर सुरू झाला, मात्र पावसाने या सामन्यात व्यत्यय आणला आहे.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 9:55 pm

Government Job : ‘सरकारी भरतीत नियम सर्वांसाठी सारखेच’; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

एखादा उमेदवार पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीला गैरहजर राहिल्‍यास तो उमेदवार ही चाचणी पुन्हा घेण्याची मागणी करू शकत नाही.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 9:55 pm

Sangli Politics : महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा करेक्ट कार्यक्रम होणार; भाजप नेत्याचा इशारा

Sangli Politics : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत खासदार विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 9:54 pm

Mumbai-Vijaydurg : मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा तात्पुरती स्थगित; नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान (Mumbai-Vijaydurg) आशियातील सर्वात जलद एम-टू-एम रो-रो जलवाहतूक सेवा दि. 1 मार्च 2026 पासून सुरू करण्यात आली आहे.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 9:40 pm

Iran US Israel War Update: जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यावर हल्ला; इराण-इस्त्रायल तणाव वाढला

Iran US Israel War Update: हा हल्ला केवळ लष्करी कारवाई नसून जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठीही मोठा इशारा मानला जात आहे.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 9:34 pm

RR vs MI : गुवाहाटीत रंगणार ‘महायुद्ध’! राजस्थान विजयाची हॅट्ट्रिक साधणार की मुंबई करणार पलटवार? पाहा ‘हेड-टू-हेड रेकॉर्ड

RR vs MI : मंगळवारी ७ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स (RR) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात हंगामातील १३ वा सामना रंगणार आहे.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 9:31 pm

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या विकासामुळेच देशाच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने बळ मिळणार आहे, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी रविवारी व्यक्त केला. अंधेरी येथील भारतरत्नम सभागृहात आयोजित ६३ व्या 'राष्ट्रीय सागरी दिन' आणि 'मर्चंट नेव्ही सप्ताहा'च्या सांगता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावर्षीचा सागरी सप्ताह 'सागरी भारत, प्रगतीला बळ' या संकल्पनेवर आधारित होता. या सप्ताहाचा प्रारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समारंभपूर्वक 'लॅपेल पिन' लावून करण्यात आला होता. रविवारी झालेल्या सांगता समारंभात मंत्री राणे यांनी सागरी क्षेत्राच्या राष्ट्रीय महत्त्वावर प्रकाश टाकला. व्यापार सुलभता आणि आर्थिक वृद्धीसाठी सागरी क्षेत्र हे कणा आहे. भारताला जागतिक स्तरावर अग्रगण्य सागरी राष्ट्र बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे राणे यावेळी म्हणाले.सागरी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. नाविन्यपूर्ण प्रयोग आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी विशेष अतिथी म्हणून केंद्र सरकारचे माजी सचिव तथा नौवहन विभागाचे माजी महासंचालक दीपक शेट्टी उपस्थित होते. या सप्ताहादरम्यान देशभरात विविध परिषदा, रक्तदान शिबिरे आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांची सांगता या दिमाखदार सोहळ्याने झाली. या सोहळ्याला नौवहन महासंचालक श्याम जगन्नाथन, अतिरिक्त महासंचालक सुशील मानसिंग खोपडे, तसेच 'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बी. के. त्यागी यांच्यासह सागरी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 6 Apr 2026 9:30 pm

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.या प्रकल्पाची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष बीपीसीएल फाउंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात हा त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराद्वारे सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय राखला जाईल आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती मिळणार आहे तसेच, प्रस्तावात नमूद केलेल्या कार्यक्षेत्र आणि जबाबदाऱ्यांना सर्व संबंधितांनी मान्यता दिली असून, अंतिम सामंजस्य कराराध्ये ठरविण्यात येणाऱ्या अटी व शर्तींचे पालन करण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली आहे.लवकर निदान, परवडणारे उपचार आणि जागरूकता आवश्यकया सामंजस्य करारासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुलांचे संरक्षण हे राज्याचे कर्तव्य आहे. कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी लवकर निदान , परवडणारे उपचार आणि जागरूकता आवश्यक आहे. शासन आणि समाज दोघांनी मिळून हे काम करणे गरजेचे आहे. टाटा मेमोरियल सेंटर यांनी बालक कर्करोग रुग्णांच्या ऑपरेशनच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्चाची मागणी केली होती. यासाठी विविध संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये बीपीसीएल फाऊंडेशने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आपला सहभाग नोंदवला आहे. त्यानुसार बीपीसीएल फाऊंडेशन टाटा मेमोरियल सेंटरमध्ये कर्करोगाचे उपचार घेणाऱ्या बालक रुग्णांच्या सहाय्यासाठी योगदान देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.या करारामुळे बालकांच्या कर्करोग उपचारांतील आर्थिक अडथळे कमीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सामाजिक दायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत बीपीसीएल फाऊंडेशन यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी बीपीसीएल फाऊंडेशनकडून विशेष निधी सामाजिक दायित्वमध्ये देणार आहे. अशा या सामंजस्य करारामुळे बालकांच्या कर्करोग उपचारांतील आर्थिक अडथळे कमी होतात. गुणवत्तापूर्ण उपचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असतात. महाराष्ट्रात आरोग्यसेवांचा दर्जा उंचावत आहे. कर्करोगाशी झुंज देणाऱ्या बालकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी या करारामुळे मोठी मदत होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.मुले हे देशाचे भविष्य आहेत, त्यामुळे त्यांना कर्करोगासारख्या आजाराशी लढण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. या हेतूने प्रेरित होउन मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जेवढी मदत करणे शक्य आहे तेवढी मदत करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.सामंजस्य करार घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी महत्वाचे योगदान दिले असून मुख्यतः गरीब व गरजू नागरिकांना, विशेषतः रुग्णांना, तातडीची आर्थिक मदत मिळवून देणे आणि संपूर्ण प्रणाली कार्यक्षम बनवणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती कक्षामार्फत देण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 6 Apr 2026 9:30 pm

Family Court Pune : मुलांच्या शिक्षणासह घरखर्चाची जबाबदारी दोघांची; कौटुंबिक न्यायालयाचे आदेश

दोन्ही मुलांच्या अर्ध्या शिक्षण खर्चाबरोबरच अर्धा घरखर्च करण्याचा आदेश कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश शाम रुक्मे यांनी दिला आहे.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 9:30 pm

Pune News : राज्य वकिल परिषदेच्या मतमोजणीला ब्रेक; उमेद्‌वारांनी आक्षेप घेतल्यानंतर मतमोजणी थांबविली

महाराष्ट्र आणि गोवा राज्य परिषदेच्या मतमोजणीदरम्यान उमेद्‌वार प्रतिनीधींनी आक्षेप घेतल्याने पहिल्याच दिवशी मतमोजणी थांबविण्यात आली.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 9:23 pm

Supreme Court : मतदार यादीतून वगळलेल्या नावावर तातडीने निर्णय घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतून वगळण्यात आलेल्या सुमारे ६० लाख मतदारांच्या भवितव्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निकाल दिला.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 9:17 pm