Amol Mitkari : …तेव्हा अजित पवारांच्या हातावर घड्याळ नव्हतंच; अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा
Amol Mitkari : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमान अपघातातील दुर्दैवी निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून सातत्याने शंका आणि आक्षेप व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक आमदार खासगीत 'दादांच्या' मृत्यूबाबत संशय व्यक्त करत असताना
Paid Holiday : राज्यातील ‘या’कर्मचाऱ्यांना ७ फेब्रुवारीला पगारी सुट्टी
Paid Holiday : ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राज्य सरकारने मतदारांना मोठा दिलासा दिला आहे.
Ajit Pawar ashes: लोकनेते अजितदादा पवार यांच्या अस्थींचे प्रवरासंगम येथे विसर्जन
Ajit Pawar ashes: बारामतीहून आलेल्या या अस्थींचे अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण पूजन करण्यात आले.
Ajit Pawar : अजित पवारांच्या मृत्यूवर भुजबळांनाही व्यक्त केली शंका; म्हणाले…
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाजवळ हा अपघात झाला
अजित पवार यांचे मंत्रालयातील दालन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे कायम
मुंबई : नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मंत्रालयातील अजित पवार यांच्या वापरातील दालने कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला.अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक आणि औकाफ ही खाती सोपविण्यात आली आहेत. त्यानंतर मंत्रालयातील कार्यालयीन व्यवस्थेबाबत निर्णय घेण्यात आला.सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील सहाव्या मजल्यावरील उत्तर बाजूची कार्यालयीन जागा, सातव्या मजल्यावरील पूर्व बाजूची दालने तसेच दालन क्रमांक ७१७ मधील निधी कक्षातून आत प्रवेश केल्यानंतरचा कक्ष, दालन क्रमांक ७२२ व ७२३, तसेच पाचव्या मजल्यावरील उत्तर बाजूचे दालन क्रमांक ५०३ हे कार्यालयीन दालन म्हणून वापरण्यास देण्यात आले आहे. ही सर्व दालने यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वापरात होती.दरम्यान, मलबार हिल येथील ‘देवगिरी’ हा शासकीय बंगला देखील सुनेत्रा पवार यांच्याकडे कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते असताना अजित पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून या बंगल्यात वास्तव्यास होते. आता नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही हाच बंगला अधिकृत निवासस्थान म्हणून देण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबईत घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळामार्फत विविध वसाहतींमधील एकूण १२० सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही विक्री ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर होणार असून, त्यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे.म्हाडाच्या माहितीनुसार, यामध्ये यापूर्वी सोडतीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या, मात्र काही कारणांमुळे रिक्त राहिलेल्या सदनिकांचा समावेश आहे. इच्छुक नागरिकांना म्हाडाच्या अधिकृत Book My Home पोर्टलवर अर्ज सादर करता येणार आहे.अर्ज प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखाअर्ज करण्यासाठी नागरिकांना सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरून सदनिका निवडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. सदनिका निवड झाल्यानंतर संबंधित विक्री किमतीच्या १० टक्के रकमेचा भरणा ४८ तासांच्या आत करणे बंधनकारक असेल. ही रक्कम वेळेत न भरल्यास सदनिकेवरील हक्क आपोआप रद्द होणार आहे.कोणत्या भागात घरे उपलब्ध‘पहिला येईल त्याला प्राधान्य’ या योजनेअंतर्गत कांदिवली (शिंपोली व चारकोप), अँटॉप हिल-वडाळा, पवई, मानखुर्द, मालाड आदी भागांतील एकूण ८४ सदनिका उपलब्ध आहेत. तसेच विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत प्राप्त झालेल्या घरे घाटकोपर पूर्व, विक्रोळी, भायखळा, ताडदेव, लोअर परळ, सायन आणि अंधेरी पश्चिम (जेव्हीपीडी) परिसरात असून अशा एकूण ३६ सदनिका विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.पात्रतेच्या अटीअर्जदाराचे वय अर्जाच्या दिवशी किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदार भारतीय नागरिक असावा. अविवाहित, विवाहित किंवा घटस्फोटित अर्जदारांसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. आरक्षण प्रवर्गातील अर्जदारांसाठी जात प्रमाणपत्र किंवा पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असेल. आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक आणि वैध ई-मेल आयडी अनिवार्य करण्यात आला आहे.पेमेंट व सदनिका निश्चितीअनामत रक्कम भरल्यानंतर अर्जदाराला उपलब्ध सदनिकांची यादी पाहता येईल. पसंतीची सदनिका निवडल्यावर अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. सदनिका निश्चितीनंतर १० टक्के रक्कम भरल्यावर तात्पुरते देकारपत्र देण्यात येईल. उर्वरित रक्कम ९० दिवसांच्या आत भरणे आवश्यक असून, उशीर झाल्यास व्याज आकारले जाणार आहे.दलालांपासून सावध राहण्याचे आवाहनम्हाडाने स्पष्ट केले आहे की या प्रक्रियेसाठी कोणत्याही एजंट किंवा दलालाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडून फसवणूक झाल्यास म्हाडा जबाबदार राहणार नाही. नागरिकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळ व अधिकृत संपर्क क्रमांकांवरूनच माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. एकूणच, मुंबईत घर घेण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असून, मर्यादित सदनिकांमुळे अर्जदारांमध्ये मोठी स्पर्धा रंगणार आहे.
दुबई : आगामी ICC पुरुष T२० विश्वचषक २०२६ साठी क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून सहभागी होणाऱ्या २० पैकी १९ देशांनी आपले अंतिम संघ जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या नावांवर शिक्कामोर्तब केले असून केवळ श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अद्याप आपला अधिकृत संघ सार्वजनिक केलेला नाही. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी तरुण आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण असलेले संघ मैदानात उतरवले आहेत.भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडेभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अपेक्षेप्रमाणे सूर्यकुमार यादव याच्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. भारतीय संघात अभिषेक शर्मा, टिळक वर्मा आणि रिंकू सिंह यांसारख्या आक्रमक फलंदाजांना स्थान मिळाले आहे, तर यष्टीरक्षणाची जबाबदारी संजू सॅमसन आणि ईशान किशन यांच्यावर असेल. हार्दिक पंड्या अष्टपैलू खेळाडू म्हणून कणा असेल, तर गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव सांभाळतील.ऑस्ट्रेलियाला दुखापतीचा फटकाअंतिम संघ जाहीर करण्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू पॅट कमिन्स आणि मॅथ्यू शॉर्ट हे दुखापतीमुळे या विश्वचषकातून बाहेर पडले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाला आपली रणनीती बदलावी लागणार आहे.T२० विश्वचषक २०२६: 'गट अ'आगामी विश्वचषकासाठी 'गट अ' मधील भारत, पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्स या देशांनी आपले अंतिम १५ खेळाडू निश्चित केले आहेत.१. भारत (India)भारतीय संघाचे नेतृत्व आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवकडे देण्यात आले आहे. संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल राखण्यात आला आहे.संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, ईशान किशन, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.२. पाकिस्तान (Pakistan)पाकिस्तानने या स्पर्धेसाठी सलमान अली आगावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.संघ: सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा नाफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सायम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान, उस्मान तारिक.३. अमेरिका (USA)यजमान अमेरिकेच्या संघात भारतीय वंशाच्या खेळाडूंचा मोठा भरणा आहे.संघ: मोनांक पटेल (कर्णधार), जेसी सिंग, अँड्रिज गॉस, शेहान जयसूर्या, मिलिंद कुमार, शयन जहांगीर, साईतेजा मुक्कामला, संजय कृष्णमूर्ती, हरमीत सिंग, नोस्थुश केंजिगे, शेडली व्हॅन शॉकविक, सौरभ नेत्रावळकर, अली खान, मोहम्मद मोहसीन, शुभम रांजणे.४. नेदरलँड्स (Netherlands)स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वाखालील नेदरलँड्सचा संघ अनुभवी खेळाडूंसह मैदानात उतरेल.संघ: स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन अकरमन, नोह क्रोस, बास डी लीडे, आर्यन दत्त, फ्रेड क्लासेन, काइल क्लेन, मायकेल लेविट, झॅक लायन-कॅशेट, मॅक्स ओ'डॉड, लोगान व्हॅन बीक, टिम व्हॅन डर गुगटेन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, पॉल व्हॅन मीकरेन, साकिब झुल्फिकार.५. नामिबिया (Namibia)नामिबियाचा संघ अष्टपैलू खेळाडूंच्या जोरावर स्पर्धेत आव्हान निर्माण करण्यास सज्ज आहे.संघ: गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), झेन ग्रीन, बर्नार्ड शोल्ट्झ, रुबेन ट्रम्पलमन, जेजे स्मित, जॅन फ्रायलिंक, लोरेन स्टीनकाम्प, मालन क्रुगर, निकोल लोफ्टी-ईटन, जॅक ब्रासेल, बेन शिकोंगो, जेसी बाल्ट, डायलन लीचर, डब्ल्यूपी मायबर्ग, मॅक्स हिंगो. (राखीव खेळाडू: अलेक्झांडर वोल्शेनक)T२० विश्वचषक २०२६: 'गट ब''गट ब' मध्ये ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि ओमान या संघांनी आपले खेळाडू जाहीर केले आहेत, तर श्रीलंकेच्या अधिकृत संघाची प्रतीक्षा अजून कायम आहे.१. ऑस्ट्रेलिया (Australia)पॅट कमिन्सच्या दुखापतीनंतर मिचेल मार्श याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. संघात मॅक्सवेल, हेड आणि स्टॉइनिस यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे.संघ: मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, टिम डेव्हिड, बेन ड्वार्शुइस, कॅमेरून ग्रीन, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू रेनशॉ, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झॅम्पा.२. झिम्बाब्वे (Zimbabwe)अनुभवी सिकंदर रझा झिम्बाब्वेचे नेतृत्व करणार असून संघात ब्रेंडन टेलरचे पुनरागमन झाल्याचे दिसत आहे.संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, ग्रॅमी क्रेमर, ब्रॅडली इव्हान्स, क्लाइव्ह मडांडे, टिनोटेन्डा मापोसा, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाकादझा, टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुझाराबानी, डियॉन मायर्स, रिचर्ड एनगारावा, ब्रेंडन टेलर.३. आयर्लंड (Ireland)आयर्लंडची धुरा अनुभवी फलंदाज पॉल स्टर्लिंग याच्या खांद्यावर आहे.संघ: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, रॉस अडायर, बेन कॅलिट्झ, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, मॅथ्यू हम्फ्रेस, जोश लिटल, बॅरी मॅकार्थी, हॅरी टेक्टर, टिम टेक्टर, लॉर्कन टकर, बेन व्हाईट, क्रेग यंग.४. ओमान (Oman)ओमानच्या संघात भारतीय वंशाच्या अनेक खेळाडूंचा समावेश असून जतिंदर सिंग संघाचे नेतृत्व करेल.संघ: जतिंदर सिंग (कर्णधार), विनायक शुक्ला, मोहम्मद नदीम, शकील अहमद, हम्माद मिर्झा, वसीम अली, करण सोनावणे, शाह फैजल, नदीम खान, सुफयान महमूद, जय ओडेद्रा, शफीक जान, आशिष ओडेदरा, जितेन रामानंदी, आमिर कलीम.५. श्रीलंका (Sri Lanka)श्रीलंकेच्या अंतिम संघाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.T२० विश्वचषक २०२६: 'गट क''गट क' मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या माजी विजेत्यांसह इटली, नेपाळ आणि स्कॉटलंड या संघांच्या अंतिम नावांची घोषणा करण्यात आली आहे.१. इंग्लंड (England)इंग्लंडने या स्पर्धेसाठी हॅरी ब्रूक याच्याकडे कर्णधारपद सोपवून सर्वांना चकित केले आहे. संघात जोफ्रा आर्चरचे पुनरागमन झाले असून जोस बटलर हा अनुभवी खेळाडू म्हणून संघात असेल.संघ: हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, सॅम कुरन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जोश टंग, ल्यूक वुड.२. वेस्ट इंडिज (West Indies)यजमान वेस्ट इंडिजच्या संघाचे नेतृत्व शाई होप करणार आहे. संघात शिमरॉन हेटमायर आणि जेसन होल्डर यांसारख्या स्फोटक खेळाडूंचा समावेश आहे.संघ: शाई होप (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जेसन होल्डर, अकेल होसेन, शामर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोटी, रोव्हमन पॉवेल, शेर्फेन रदरफोर्ड, क्विंटन सॅम्पसन, जयडेन सील्स, रोमारियो शेफर्ड.३. इटली (Italy)इटलीच्या संघात अनेक अनुभवी परदेशी वंशाच्या खेळाडूंचा समावेश असून वेन मॅडसेन संघाचे नेतृत्व करेल.संघ: वेन मॅडसेन (कर्णधार), मार्कस कॅम्पोपियानो, जियान पिएरो मीड, झैन अली, अली हसन, क्रिशन जॉर्ज कालुगामगे, हॅरी मॅनेन्टी, अँथनी मोस्का, ज्युस्टिन मोस्का, सय्यद नकवी, बेंजामिन मॅनेन्टी, जसप्रीत सिंग, जेजे स्मट्स, ग्रँट स्टुअर्ट, थॉमस ड्राका.४. नेपाळ (Nepal)नेपाळची धुरा युवा रोहित पौडेल याच्याकडे असून संदीप लामिछाने हा त्यांच्या गोलंदाजीचा मुख्य कणा असेल.संघ: रोहित पौडेल (कर्णधार), दीपेंद्र सिंग ऐरी, संदीप लामिछाने, कुशल भुर्टेल, आसिफ शेख, संदीप जोरा, आरिफ शेख, बासिर अहमद, सोमपाल कामी, करण केसी, नंदन यादव, गुलशन झा, ललित राजबंशी, शेर मल्ला, लोकेश बम.५. स्कॉटलंड (Scotland)रिची बेरिंग्टन यांच्या नेतृत्वाखालील स्कॉटलंडचा संघ अनुभवी आहे. त्यांनी काही राखीव खेळाडूंचीही निवड केली आहे.संघ: रिची बेरिंग्टन (कर्णधार), टॉम ब्रुस, मॅथ्यू क्रॉस, ब्रॅडली करी, ऑलिव्हर डेव्हिडसन, ख्रिस ग्रीव्ह्स, झैनुल्ला इहसान, मायकेल जोन्स, मायकेल लीस्क, फिनले मॅकक्रेथ, ब्रँडन मॅकमुलन, जॉर्ज मुन्से, सफयान शरीफ, मार्क वॅट, ब्रॅडली व्हील.राखीव खेळाडू: जॅस्पर डेव्हिडसन, जॅक जार्विस (प्रवास करणारे); मॅकेन्झी जोन्स, ख्रिस मॅकब्राइड, चार्ली टीअर.T२० विश्वचषक २०२६: 'गट ड'विश्वचषकाच्या साखळी फेरीतील सर्वात आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या 'गट ड' मध्ये दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांसारख्या बलाढ्य संघांचा समावेश आहे.१. दक्षिण आफ्रिका (South Africa)दक्षिण आफ्रिकेने एडन मार्करम याच्या नेतृत्वाखाली अतिशय संतुलित संघ निवडला आहे. संघात क्विंटन डी कॉक आणि डेव्हिड मिलर यांसारख्या अनुभवी फलंदाजांसह क्वेना मफाका या युवा गोलंदाजालाही संधी मिळाली आहे.संघ: एडन मार्करम (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक, मार्को यानसेन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना मफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स.२. न्यूझीलंड (New Zealand)न्यूझीलंडची धुरा फिरकीपटू मिचेल सँटनर याच्याकडे सोपवण्यात आली आहे. संघात रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेल यांसारख्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंचा समावेश आहे.संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, काइल जेमिसन, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम सायफर्ट, ईश सोढी.३. अफगाणिस्तान (Afghanistan)जागतिक दर्जाचा फिरकीपटू राशिद खान अफगाणिस्तानचे नेतृत्व करणार आहे. त्यांच्या संघात फिरकी आणि वेगवान गोलंदाजीचा उत्तम समतोल आहे.संघ: राशिद खान (कर्णधार), नूर अहमद, अब्दुल्ला अहमदझाई, सिद्दिकीउल्लाह अटल, फजल हक फारुकी, रहमानउल्ला गुरबाज, नवीन उल हक, मोहम्मद इशाक रहीमी, शाहिदउल्ला कमाल, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मुजीब उर रहमान, दरविश रसूली, इब्राहिम झाद्रान.राखीव खेळाडू: एएम गझनफर, इजाज अहमद अहमदझाई, झिया उर रहमान शरीफी.४. कॅनडा (Canada)कॅनडाच्या संघात दिलप्रीत बाजवा याच्याकडे कर्णधारपद असून संघात भारतीय वंशाच्या अनेक खेळाडूंचा समावेश आहे.संघ: दिलप्रीत बाजवा (कर्णधार), अजयवीर हुंदल, अंश पटेल, डिलन हेलीगर, हर्ष ठाकर, जसकरणदीप बुट्टर, कलीम सना, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, निकोलस किर्टन, रविंदरपाल सिंग, साद बिन झफर, शिवम शर्मा, श्रेयस मोव्वा, युवराज सामरा.५. संयुक्त अरब अमिराती (UAE)युएईच्या संघाचे नेतृत्व मुहम्मद वसीम करणार असून त्यांच्या संघातही अनेक अनुभवी स्थानिक खेळाडूंना स्थान मिळाले आहे.संघ: मुहम्मद वसीम (कर्णधार), अलीशान शराफू, आर्यांश शर्मा, ध्रुव पराशर, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मयंक कुमार, मुहम्मद अरफान, मुहम्मद फारूक, मुहम्मद जवादुल्लाह, मुहम्मद जोहेब, रोहिद खान, सोहेब खान, सिमरणजीत सिंग.
Maharashtra IAS Transfer : राज्यातील ४ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पहा कोणाची कुठे बदली..
Maharashtra IAS Transfer : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यापासून दर १०-१५ दिवसांनी बदल्यांचा निर्णय घेतला असून, प्रशासन 'ॲक्टिव्ह' मोडवर ठेवण्यावर त्यांचा भर आहे.
IND vs PAK Match : टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द झाला तर क्रिकेटच्या व्यावसायिक परिसंस्थेला ४,५०० कोटी रुपयांचा प्रचंड फटका बसणार आहे.
Air India Flight Issue:
Sanjay Raut : अजित पवारांच्या विमान अपघातावेळी ‘ती’ फाईल त्यांच्याबरोबरच होती? राऊतांचा खळबळजनक दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाबाबत राज्यातून आणि संसदेतून वेगवेगळ्या शंका उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)
राष्ट्रवादीच्या मुंबई पदाधिकाऱ्यांकडून 'दादांच्या'अस्थींचे विधीपूर्वक विसर्जन...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज विधीपूर्वक बाणगंगा तलाव वाळकेश्वर येथे करण्यात आले.अमर रहे...अमर रहे... अजितदादा अमर रहे... अशा घोषणा देत अजितदादांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, आमदार सना मलिक शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी,प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, मुंबई उपाध्यक्ष कप्तान मलिक, प्रदेश सरचिटणीस नरेंद्र राणे, जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, अजय विचारे,इंद्रपाल सिंग, सुरेश भालेराव,महिला अध्यक्षा आरती साळवी , कार्याध्यक्षा मनिषा तुपे, ओबीसी सेलचे मुंबई अध्यक्ष बबन मदने, सहकार सेलचे मुंबई अध्यक्ष नंदकुमार काटकर, मुंबई सरचिटणीस दिपक पारडीवाला आदींसह सर्व तालुकाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्षा, महिला तालुकाध्यक्षा,पक्षाचे प्रदेश, मुंबई पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात आज एका भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. विसरवाडी पोलीस चौकी परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी उभी असलेल्या नवापूर आगाराच्या एसटी बसला एका सुसाट कंटेनरने मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बसमधील चालक आणि वाहकासह एकूण १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे दृश्य पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारे आले, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे घाटातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.https://prahaar.in/2026/02/02/ncps-mumbai-office-bearers-perform-the-ritualistic-immersion-of-dadas-ashes/कंटेनरच्या धडकेत एसटी बसचा चक्काचूर अन्...सुरत-धुळे महामार्गावर १ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास एक थरारक अपघात घडला. नवापूर आगाराची पुणे-नवापूर बस (MH 14 BT 1957) महामार्गावर उभी असताना, मागून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने तिला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बस समोर असलेल्या ट्रक आणि मागचा कंटेनर यांच्यामध्ये अक्षरशः चिरडली गेली. समोरच्या ट्रकचा लोखंडी अँगल बसच्या केबिनमध्ये घुसल्याने बसच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातात बस चालक महेंद्र लाजा गावित हे केबिनमध्ये अडकून पडले होते, तर वाहक संतोष बारसू सोंडे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर चालकाला केबिनमधून सुखरूप बाहेर काढले. जखमींवर सध्या उपचार सुरू असून, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.१५ प्रवाशांचा जीव...जामनपाडा येथील मनोहर जयवंत गावित यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे जखमींना वेळेवर उपचार मिळणे शक्य झाले. त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवत आपल्या खाजगी वाहनातून गंभीर जखमींना तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलवले. बसमध्ये एकूण १५ प्रवासी होते, ज्यात नवापूर, साक्री, सुरत आणि सटाणा येथील नागरिकांचा समावेश होता. सुदैवाने, या भीषण अपघातात बहुतांश प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले. आपत्कालीन सेवांच्या मदतीने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशवृक्ष लागवड मोहिमेत स्टार्टअपचा सहभाग घ्यावारोप निर्मितीसाठी खासगी नर्सरी व बचतगटांचा सहभाग घ्यावामुंबई : पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ३०० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात या क्षेत्रातील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था याच्याबरोबरच स्टार्टअपचा सहभाग घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.प्रस्तावित हरित प्राधिकरण - ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवास्थानी आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील वनक्षेत्र ३३ टक्के करण्यासाठी मिशन मोडवर हा कार्यक्रम हाती घ्यावा. या कार्यक्रमाच्या समन्वयासाठी हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा. शासकीय विभाग, विविध संस्थाबरोबरच या विषयातील स्टार्टअपचा सहभाग या मोहिमेसाठी घ्यावा.स्टार्टअपची इकोसिस्टीम तयार करून रोजगार निर्मिती करता येईल.मराठावाड्यासारख्या कमी वृक्षाच्छादन असलेल्या भागात हा कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यात यावा. हरित महाराष्ट्र उपक्रमांतर्गत रोप उपलब्धतेनुसार पहिल्या वर्षात सुमारे २० कोटीपर्यंत वृक्ष लागवड हाती घ्यावी. यामध्ये बांबू, साग लागवड करण्यात यावी. यासाठी लागणारी रोपे तयार करण्यासाठी शासकीय नर्सरी बरोबरच खासगी नर्सरी, बचतगट यांचाही सहभाग घ्यावा. या कार्यक्रमातील सर्व शासकीय विभागाबरोबरच वन विभाग, नर्सरी यांना उद्दिष्टे ठरवून द्यावीत, ग्रामीण भागात शेतकरी, युवा, महिलांचा सहभाग घ्यावा. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.यावेळी ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी या उपक्रमांचे सादरीकरण केले. या मिशन अंतर्गत राज्यातील विविध कृषी-हवामान पट्ट्यांनुसार स्थानिक परिसंस्थेला अनुरूप प्रजातींचीच लागवड करण्यात येणार असून, गवताळ प्रदेश व दलदलींमध्ये वृक्ष लागवड न करता त्यांचे पुनर्संचयितीकरण केले जाणार आहे. या मिशनची अंमलबजावणी डिजिटल व उपग्रह-आधारित रिअल-टाईम निरीक्षण प्रणालीद्वारे होणार असून, लागवड आणि वृक्ष जगण्याचा दर पारदर्शकपणे नोंदवला जाणार आहे. झाडे जिवंत असण्याचा दर, जंगलाची निर्मिती आणि रोपांच्या वाढीची नियमित तपासणी करण्यात येणार आहे.मनरेगा, कॅम्पा, कृषी विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांद्वारे तीन ते पाच वर्षांची निगा सुनिश्चित करण्यात आली आहे. तथापी वृक्ष जगण्यासाठी हा कालावधी १० वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमातून भूजल पुनर्भरण, मातीची सुपीकता, जैवविविधता वाढीसोबतच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे वरिष्ठ आर्थिक सल्लागार तथा मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगरविकास (२) विभागाचे अपर मुख्य सचिव के. एच गोविंदराज, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, मृद व जलसंधारण सचिव गणेश पाटील, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वन संरक्षक (सामाजिक वनीकरण) विवेक खांडेकर, महाराष्ट्र रिमोट सेन्सिग अप्लिकेशन सेंटरचे (एमआरएसएसी) चे संचालक श्री. कोलते आदी उपस्थित होते.
Hair Health: आता डाय न करताच केस पुन्हा होतील काळे! शास्त्रज्ञांनी शोधला अत्यंत सोपा मार्ग
Hair Health: शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, पांढरे झालेले केस पुन्हा नैसर्गिकरित्या काळे करणे आता शक्य होऊ शकते. या संशोधनाने केस गळती आणि पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त असलेल्यांना एक आशेचा किरण दाखवला आहे.
Schools Timing : ‘या’शाळांच्या वेळा बदलणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?
Schools Timing : कर्नाटक सरकारने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील रमजान महिन्याचा विचार करून राज्यातील सर्व सरकारी आणि अनुदानित उर्दू शाळांच्या वेळेत बदल केला आहे
BCCI Rajeev Shukla : बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या प्रकरणावर भाष्य करताना पाकिस्तानच्या भूमिकेचा निषेध केला आहे.
पुण्यात मेट्रोच्या विस्ताराला गती, हिंजवडी पिंपरी पासून .. कुठून कसा असेल मार्ग? जाणून घ्या...
पुणे : पुणेकरांचा प्रवास आता लवकरच आरामदायी होणार आहे. कारण पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन लवकरच सुरू होणार असून प्रवासाचा वेळ हा कमी होणार आहे. रेल्वे प्रमाणे आता मेट्रोही आपले जाळे देशभरात विणत चालली आहे. मेट्रो ही काळाची गरज आहे. त्यामुळे मेट्रोचा विस्तार हा झपाटयाने होत आहे.पुणेकरांच्या वेळेची होणार बचत हिंजवडी ते शिवाजी नगरपर्यंत प्रवास करायला सध्या २ तास लागतात. हाच वेळ सरळ अर्ध्या तासावर येणार आहे. त्यासोबतच काळ जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात पुण्यातील मेट्रो मार्गिकेचा विस्तार करण्यासाठी ५१७ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली गेली आहे.मेट्रो ३ चे मार्चमध्ये होणार उदघाटन पुणेकरांसाठी हि सेवा मार्च मध्ये सुरु होणार असून उन्हाच्या तडाख्यात पुणेकरांना गारेगार प्रवास करायला मिळणार आहे. हिंजवडी ते शिवाजी नगर या चाचणी फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून पुणे मेट्रो ३ उदघाटनासाठी सज्ज झाली आहे.मेट्रोमुळे पुणेकरांना मिळणार वाहतूक कोंडीतून सुटका या मेट्रोचे कनेक्शन थेट पुण्याच्या आयटी सेक्टरशी जोडले जाणार आहे. या मार्गावर आयटी कर्मचाऱ्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही लवकरच संपणार आहे. त्यामुळे तब्बल २ लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.विद्यापीठ चौकात या मेट्रोवरती डबल डेकर वाहतूक मार्ग उभारणार आहेत. यामुळे सर्वाधिक वाहतूक कोंडी असल्या भागातील कोंडी फोडण्यात यश मिळणार आहे. यामध्ये सर्वात खालच्या स्थरावर स्थानिक वाहनांची वाहतूक त्यावरील उड्डाणपुलावर आणखी एक वाहतूक मार्ग आणि त्यावरती मेट्रो मार्गिका असणार आहे.कोणत्या स्थानकांचा होणार समावेश काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात महा मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार करण्याबाबत माहिती देण्यात आली. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन मार्गिका सुरु असून, तिसरी प्रवाशांसाठी लवकरच सुरु होईल. तसेच, २०२७ पर्यंत पिंपरी- निगडी अशी ४.५ किमी लांब मेट्रोचं काम पूर्ण होण्याची शक्यात आहे. या मार्गिकेच ५० टक्के काम सध्या पूर्ण झाले आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात विस्तारामध्ये खडकवासला- स्वारगेट- खराडी , रामवाडी- वाघोली-विठ्ठलवाडी, वनाज - चांदणी चौक आणि नल स्टॉप- वारजे या प्रमुख मार्गांचा समावेश आहे.
देवगाव रंगारीतील जाहीर सभेला प्रचंड प्रतिसादजिल्हा परिषदवर विकासाचा भगवा फडकवण्याचे शिंदेंचे आवाहनछत्रपती संभाजीनगर : मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आधीच्या सरकारने बासनात गुंडाळून ठेवला होता, मात्र आमच्या सरकारने तो पुन्हा सुरू केला असून मराठवाड्यातील “दुष्काळ” हा शब्द कायमचा पुसून टाकण्याचा आमचा निर्धार आहे. यासाठी निधीची कमतरता कधीही भासू दिली जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कन्नड तालुक्याला आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे विकास निधी मिळाला नसल्याचे मान्य करत, येत्या काळात कन्नडचा विकास बॅकलॉग भरून काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या सभेला प्रचंड गर्दीचा महापूर लोटला होता.यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार संजना जाधव, आमदार प्रा.रमेश भोरनारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, उमेदवार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सभेला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत शिंदे म्हणाले की, राज्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे दुःखाचे सावट आहे. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी या कठीण काळातही निवडणुका टाळता येत नसल्याने प्रचार सभा घ्याव्या लागत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे ते म्हणाले. कन्नड, वैजापूर आणि गंगापूर या तीन तालुक्यांतील सर्व पदाधिकारी, उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. शिंदे यांनी आपल्या भाषणात महिलांच्या सहभागावर विशेष भर दिला. “ज्या उमेदवारांच्या पाठीशी लाडक्या बहिणी उभ्या असतात, त्यांचा विजय निश्चित असतो,” असा अनुभव विधानसभेपासून नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकांपर्यंत घेतल्याचे त्यांनी सांगितले.आपल्या जीवनप्रवासाचा उल्लेख करत ते म्हणाले की, आपणही शेतकऱ्याचा मुलगा असून गरिबी, आईची तगमग आणि पत्नीची काटकसर जवळून पाहिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वप्रथम “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” सुरू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेवर विरोध झाला, न्यायालयात आव्हाने दिली गेली, मात्र आज या योजनेमुळे लाखो महिलांना आधार मिळाल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.या योजनेवर वर्षाला सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च होत असल्याचा उल्लेख करत, हा खर्च अर्थव्यवस्थेला चालना देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक महिलांनी या रकमेतून लहान व्यवसाय सुरू केले, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय उपचार आणि घरखर्चाला हातभार लावला असल्याच्या यशकथा त्यांनी उदाहरणांसह मांडल्या.शिंदे यांनी शिक्षण धोरणाविषयी बोलताना एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेचा उल्लेख केला. त्या घटनेनंतर उच्च शिक्षणासाठी ५० टक्क्यांऐवजी १०० टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. “राज्य हे सर्वसामान्यांचे आहे. शिक्षणासाठी कोणालाही आत्महत्या करावी लागू नये, ही आमची भूमिका आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी पीक विमा योजना, नुकसान भरपाई, सततच्या पावसामुळे झालेल्या हानीसाठी 32 हजार कोटींचे पॅकेज आणि शेतकरी कर्जमाफीचा निर्णय महायुती सरकारने घेतल्याचे सांगितले.मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांवर भर देत ते म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प पुन्हा सुरू करून दुष्काळ कायमचा संपवण्याचा संकल्प सरकारचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्या कार्यकाळात ७० ते ८० हजार रुग्णांना सुमारे ४५० कोटी रुपयांची मदत देण्यात आली. “हे पैसे जनतेचे आहेत, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आहेत, साठवण्यासाठी नाहीत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.कन्नड तालुक्याच्या विकासाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, आतापर्यंत कमी निधी मिळाल्याचा बॅकलॉग आता भरून काढला जाईल. रस्ते, पाणी, उद्योग, पर्यटन आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून विकासाला गती दिली जाईल, असे आश्वासन दिले.महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक हे सरकारचे केंद्रबिंदू असल्याचे सांगत, “जे बोलतो ते करून दाखवतो, हा आमचा स्वभाव आहे,” असे त्यांनी नमूद केले. शिंदे यांनी विरोधकांवर नाव न घेता टीका करताना म्हटले की, काही लोक फक्त आरोप करतात, घोषणा करतात आणि निवडणुकीपुरते आश्वासन देतात. मात्र आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, हा आमचा स्वभाव आहे. कामातून उत्तर देण्याची आमची परंपरा असून सत्ता येते आणि जाते, पण दिलेला शब्द पाळणारे नेते जनतेच्या मनात कायम राहतात, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. भाषणाच्या शेवटी येत्या ७ तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन शिंदे यांनी मतदारांना केले.“संभाजीनगर हे ऐतिहासिक शहर आहे. जिल्हा परिषदवर विकासाचा भगवा फडकवायचा असेल, तर सर्व उमेदवारांना निवडून द्या. निधी कधीही कमी पडू देणार नाही, हा शब्द मी देतो,” असे सांगत त्यांनी भाषणाची सांगता केली.
5G Internet Slow Problem: जर तुमच्याही स्मार्टफोनमध्ये ५जी असून इंटरनेट नीट चालत नसेल, तर काही साध्या सेटिंग्ज बदलून तुम्ही ही समस्या घरबसल्या सोडवू शकता.
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पक्षाच्या विलीनीकरणावर महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
Plane Crash: रशियात प्रशिक्षणार्थी विमान कोसळून भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
Plane Crash:
Mumbai Mayor : अखेर तारीख ठरली ! ‘या’दिवशी ठरणार मुंबईचा महापौर
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीची (Mumbai Mayor) चर्चा जोरात सुरू होती. राज्यभरातील २९ महापालिकांसाठी झालेल्या या निवडणुकीत मुंबईची बृहन्मुंबई महानगरपालिका केंद्रस्थानी होती
Nishida sliding Apology : २६ वर्षीय स्टार खेळाडू निशिदा याने एका चुकीसाठी मागितलेली माफी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Today Top 10 News: वाचा आजच्या राज्य, देश-विदेशसह टाॅप बातम्या...
काळाघोडा कला महोत्सव २०२६ मधील 'ती'ची चौकट
“बाई आणि चौकट” हे स्त्री जीवनावर भाष्य करणारं प्रतिकात्मक वाक्य आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतं.चौकट म्हणजे चार कोनांमधली मर्यादा, चौकट म्हणजे समाजाने ठरवलेली स्त्रीची भूमिका, चौकट म्हणजे स्त्रीच्या वाटणीला आलेली प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सगळीच बंधनं.बाईच्या भोवती असते नात्यांची चौकट, सामाजिक चौकट, लग्न, संसार, मुलं- बाळांची चौकट, विचार, स्वातंत्र, इच्छा, मर्यादा यांचीही चौकट. इतकंच काय, तर ती रहात असलेलं घर आणि त्यातील कितीतरी गोष्टी चौकटीमधीलच असतात. घराच्या वेगवेगळ्या लांबी आणि रुंदीच्या पण चौकोनी भिंती, दारं- खिडक्यांची चौकट, स्वयंपाक घरातील ओटा, शेगडी, मायक्रोव्हेव, कपाटं, हात पुसायचे रुमाल, भिंतीवरील घडयाळ इतकंच काय तर ज्यात बाईपण मिरवता येते ती साडी आणि अदृश्य रूपात वावरणाऱ्या देवाचा देव्हारा ही चौकट साधूनच तयार केलेला असतो. ती समाजातच काय पण आपलं सर्वस्व म्हणजे घर या संकल्पनेत वावरत असली तरी ती चौकटीतच रहात असते मनाने आणि शरीरानेसुद्धा. जणू “स्त्री म्हणजे एक चौकटच.”पण मला वाटते या सगळ्या चौकटी मधून ही बाई आपलं आपलं जग जगत असते, आपली आपली एक गोष्ट साकारत असते, आपला सिनेमा लिहीत असते. ती तिच्या चौकटीत राहून चौकटी पलीकडील कार्य करत असते.हेच सगळं सांगणारं माझं हे इन्स्टॉलेशन काळाघोडा कला महोत्सव २०२६ यात लागलं आहे. यात चार वेगवेगळ्या वयातील आणि वेगवेगळ्या वर्गातील स्त्रिया दाखवल्या आहेत. त्यापैकी एकीच्या हातात कॅमेरा आहे तर एकीच्या हातात रीळ आहे. एकीच्या हातात आपलं यश दाखवणारी ट्रॉफी आहे तर एक आपण लिहिलेली गोष्ट वाचत आहे. एकूण काय, प्रत्येक स्त्री आपली आपली गोष्ट सादर करताना दाखवली आहे.माझं हे इन्स्टॉलेशन अश्या सगळ्या महिला ॲक्टर्स, डिरेक्टर्स, रायटर्स, एडिटर्स, डीओपीनां समर्पित आहे ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या फिल्म्समध्ये काम करत आहेत. आपलं महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे जे मुंबई फिल्मसिटीमध्ये काम करणाऱ्या महिला दिग्दर्शकांना अनुदान देऊन त्यांना प्रोत्साहीत करतात.हे इन्स्टॉलेशन करण्याचं दुसरं कारण म्हणजे, मी अश्या बऱ्याच महिला ॲक्टर्स, डिरेक्टर्स, रायटर्स, एडिटर्स, डीओपी बरोबर व्यवसायिक अनेक कामं केली आहेत. काही नावं नमूद करायला मला नक्कीच आवडतील. विद्याताई पटवर्धन, स्मिता तळवलकर, सुलेखा तळवलकर, मनवा नाईक, प्रतिमा कुलकर्णी, भाग्यश्री जाधव, सारिका ढेरंगे, अक्षता आचार्य, अर्चना बोराडे, प्राजक्ता सापते, अश्विनी परांजपे, शैली शर्मा, अपूर्वा मोतीवाला, अंकिता तावडे त्याच बरोबर, गेले अनेक वर्ष सुरवातीपासून आतापर्यंत सातत्याने काळाघोडा कला महोत्सवाच्या मुख्य ब्रिंदा मिलर आणि फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक,धडाडीच्या महिला IAS अधिकारी श्रीमती स्वाती म्हसे पाटील या सगळ्यांची ओळख सामान्य माणसांपर्यंत पोहचावी या हेतूने आणि या सगळ्यां बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी हे इंस्टालेशन केलं आहे.
Ganesh Khankar : भाजपकडून मुंबई महापालिकेच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची निवड
तीन टर्मचे अनुभवी नगरसेवक आणि महापालिकेच्या कामकाजाचे सखोल ज्ञान असलेले गणेश खणकर (Ganesh Khankar) यांची मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी गटनेतेपदी नियुक्तीची घोषणा केली आहे.
Sharad Pawar :
Mumbai Squad : ६ फेब्रुवारीपासून कर्नाटकविरुद्ध सुरू होणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यासाठी मुंबई संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत.
Manoj Jarange : अमोल खुणेचा मनोज जरांगेबाबत खळबळजनक दावा; केली ‘ही’मोठी मागणी
मराठा आरक्षण आंदोलक आणि प्रमुख नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याबाबत त्यांचे जुने सहकारी अमोल खुणे याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. अमोल खुणे हा मनोज जरांगे यांचा जवळचा सहकारी असून, नुकत्याच घडलेल्या मनोज जरांगे घातपाताचा प्रयत्न प्रकरणातील संशयित आरोपी आहे.
Maruti Suzuki: जानेवारी महिन्यात मारुती सुझुकीने विक्रीचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला असून एकूण २,३६,९६३ वाहनांची विक्री केली आहे.
T20 World Cup 2026: टी २० वर्ल्ड कपआधी भारताची 'A'टीम जाहीर; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. ७ फेब्रुवारी पासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून आजपासून म्हणजेच २ फेब्रुवारी पासून सराव सामने होणार सुरु होणार आहेत. या सराव सामन्यात अफगाणिस्तानचा पहिला सामना स्कॉटलंडशी होणार आहे.याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अधिकृतपणे भारत 'A' संघाची घोषणा केली आहे. १५ सदस्यांच्या संघात आयपीएलचे सर्व नवोदित खेळाडू आहेत. हे खेळाडू इतर खेळाडूंना सरावात मदत करतील. युवा आयुष बडोनी या टीमचं नेतृत्व करेल.Presenting India A squad for the warm-up matches ahead of the ICC Men’s T20 World Cup 2026. India A will play two warm-up matches against USA and Namibia. Note: Tilak Varma will feature in one warm-up match before joining #TeamIndia for the #T20WorldCup pic.twitter.com/LIVpMvI6v6— BCCI (@BCCI) February 2, 2026तसेच तिलक वर्मा याचंही या टीममध्ये कमबॅक झालं आहे. तिलकला रणजी ट्रॉफी स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे न्यूझीलंड विरूद्धच्या टी २० मालिकेला मुकावं लागलं होतं. मात्र आता तिलकची वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या मुख्य संघात निवड करण्यात आली आहे.वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामन्यांसाठी इंडिया ए टीम :आयुष बडोनी (कर्णधार), तिलक वर्मा, रियान पराग, रवी बिश्नोई, नमन धीर, आशुतोष शर्मा, प्रियांश आर्या, एन जगदीशन (विकेटकीपर), उर्विल पटेल (विकेटकीपर), मानव सुथार, अशोक शर्मा, गुरजपनीत सिंह, विपरज निगम, खलील अहमद आणि मयंक यादव.
Thackeray Group BJP Alliance : अखेर ठाकरेंच्या शिवसेनेची अन् भाजपची युती? घडामोडींचा वेग
Thackeray Group BJP Alliance : चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू असतानाच ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
Gold-Silver Price Crash: चांदी 4 दिवसांत 2 लाख रुपयांनी झाली स्वस्त; पुढे भाव वाढणार की घसरणार?
Gold-Silver Price Crash: गेल्या काही दिवसांत ज्या वेगाने चांदीचे दर गगनाला भिडले होते, त्याहून अधिक वेगाने ते आता जमिनीवर आले आहेत.
महापौर पदावरून पिंपरी चिंचवडमध्ये नाट्यमय घडामोडी
भाजप राष्ट्रवादी एकत्रित सत्ता स्थापन करणार? पिंपरी –पिंपरी चिंचवड महापालिका महापौर पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. भाजपच्या वतीने बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवी लांडगे यांना महापौर पदावर संधी देण्यात आली आहे. तर उपमहापौर पदासाठी शितल उर्फ विजय शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मात्र शितल शिंदे यांनी पद स्वीकारण्यास नकार दिला असून त्रागा […]
ICC Walkover Rules : टी-२० वर्ल्ड कपमधील वॉकओव्हरसाठी आयसीसी नियम काय आहेत? जाणून घ्या
Raj Thackeray : मुंबई महापालिकेत मनसे भाजपला पाठिंबा देणार? राज ठाकरेंनी केले स्पष्ट
मुंबई महानगरपालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Raj Thackeray) भाजपला पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी 'लवचिक राजकारण' करण्याचे संकेत दिले होते
ज्यांना सोबत यायचे आहे, त्यांनी 'एनडीए'बाबत भूमिका स्पष्ट करावी!
सुनील तटकरे यांचे शरद पवार गटाला प्रत्युत्तर; विलीनीकरणाविषयी केले सविस्तर भाष्यमुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत दोन्ही गटातील नेतेमंडळींमध्ये दावे-प्रतिदावे सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर भाष्य केले असून, ज्यांना सोबत यायचे आहे, त्यांनी 'एनडीए'बाबत भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.माध्यमांशी संवाद साधताना तटकरे म्हणाले की, आम्ही भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) आहोत आणि सत्तेत सहभागी आहोत. महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी आणि देशाला गतिमान करण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला होता. ही भूमिका सामूहिक आहे आणि ती पुढे नेणे हे आमचे कर्तव्य आहे. ज्यांना आमच्यासोबत यायचे आहे, त्यांनी एनडीएमध्ये येण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ही भूमिका पूर्वीपासून ठरलेली असून, त्याच भूमिकेवर निवडणुकीला सामोरे जाऊन यशही मिळाले, असे तटकरे यांनी सांगितले.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासाठी सुनेत्रा पवार पुढाकार घेणार का, या प्रश्नावर उत्तर देताना तटकरे म्हणाले की, अजित पवार हयात असतानाच आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो होतो आणि भाजपासोबत सत्तेत आहोत. या निर्णयाशी जे सहमत आहेत, त्यांनी तो स्वीकारावा. त्यावरून कोणालाही वेगळ्या अपेक्षा ठेवण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.वडेट्टीवार यांना सुनावलेदरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नयेत यासाठी कट रचला जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर पलटवार करताना तटकरे म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर कोणाचा होणार, याकडे लक्ष द्यावे. काँग्रेसमध्ये अंतर्गत पळवापळवी सुरू असताना आमच्यावर टीका करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. आधी आपल्या पक्षातील परिस्थिती सांभाळावी, नंतर आमच्याकडे पाहावे, असा टोला त्यांनी लगावला.विलीनीकरण कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात होणार?दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत शरद पवार यांनी केलेल्या भाष्यावर प्रतिक्रिया देण्यास तटकरे यांनी टाळाटाळ केली. श्रद्धेय शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर मी काही बोलणार नाही, असे स्पष्ट करत, इतर काही प्रतिक्रिया अंत्यसंस्कार सुरू होण्यापूर्वीच आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विलीनीकरण कुठल्या पक्षाचे कुठल्या पक्षात होणार, हे स्पष्ट झाले तरच त्यावर बोलता येईल, असे ते म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निर्धारपूर्वक एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, राज्यातील १३ कोटी जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे एनडीएमधील आमची भूमिका स्पष्ट आणि ठाम आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने टीका-टिप्पणी करत असतो, पण आमचा निर्णय बदलणार नाही, असे सुनील तटकरे यांनी नमूद केले.
Share Market: बजेटच्या धक्क्यातून सावरला बाजार; सेन्सेक्स 944 अंकांनी वधारला, निफ्टी 25,100 च्या जवळ
Share Market: व्यवहाराच्या शेवटच्या तासात रिलायन्स इंडस्ट्रीज, अदाणी पोर्ट्स आणि एचडीएफसी बँकेसारख्या बड्या शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजाराने मुसंडी मारली.
Parth Pawar : पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना दिलासा
Parth Pawar : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) अखेर १८८६ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर
Chandrapur Congress : चंद्रपूरच्या महापौरपदाचा तिढा ‘हाय कमांड’सोडवणार; हालचालींना वेग
चंद्रपूर महानगरपालिकेत (Chandrapur Congress) महापौरपदाची निवड प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने महापौर पद काँग्रेसकडेच राहावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, पक्षातील दोन गटांमधील मतभेद आणि अंतर्गत लाथाळ्यांमुळे निर्णय प्रक्रिया रखडली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीस मतदान
उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टीमुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांमध्ये शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक आहे, असे परिपत्रक उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे.यानुसार, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर, ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू असेल. यात खासगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, माल्स, रिटेलर्स आदींना हे आदेश लागू राहणार आहेत.अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये रायगड (पंचायत समित्या - पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, पेण, उरण, अलिबाग, मुरुड. रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर); रत्नागिरी (मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर); सिंधुदुर्ग (वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी दोडामार्ग); पुणे (जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड, मावळ, मुळशी, हवेली, दौंड, पुरंदर, वेल्हे, भोर, बारामती, इंदापूर); सातारा (खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, जावळी, सातारा, पाटण, कराड); सांगली (आटपाडी, जत, खानापूर (विटा), कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा-ईश्वरपूर, शिराळा, मिरज); सोलापूर (करमाळा, माढा, बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट); कोल्हापूर (शाहुवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज, चंदगड); छत्रपती संभाजीनगर (सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण); परभणी (जिंतूर, परभणी, मानवत, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा, पालम, गंगाखेड); धाराशीव (परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशीव, तुळजापूर, लोहारा, उमरगा) आणि लातूर (पंचायत समित्या - अहमदपूर, जळकोट, उदगीर, चाकूर, रेणापूर, लातूर, शिरूर (अनंतपाळ), देवणी, औसा, निलंगा) यांचा समावेश आहे.
India EU Trade Deal: 'मदर ऑफ ऑल डील्स'ची पाकिस्तानाला भीती; पाकिस्तानातील नोकऱ्या संकटात येणार ?
पाकिस्तानचे माजी वाणिज्य मंत्री गोहर एजाज (Gohar Ejaz) यांनी सोशल मीडियावर पाकिस्तानमधील नोकऱ्या धोक्यात असल्याचे संकेत दिले आहेत. तब्बल १ कोटी नोकऱ्या संकटात आहेत आणि त्याला भारत-युरोपीयन यूनियन करार (India EU Trade Deal) कारणीभूत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.भारत-युरोपीयन यूनियन करारासोबत म्हणजेच EU सोबत पाकिस्तानचा ‘झीरो-टॅरिफ हनिमून’ संपला आहे आणि सुमारे एक कोटी नोकऱ्या धोक्यात आहेत. सरकारने उद्योगांना स्वस्त वीज, कमी कर आणि सुलभ कर्ज द्यावे, जेणेकरून ते इतर देशांतील उद्योगांशी स्पर्धा करू शकतील, अशी पोस्ट गोहर एजाज यांनी केली आहे.मदर ऑफ ऑल डिल्समुळे १४० कोटी भारतीयांचा होणार फायदा:भारत आणि युरोपियन युनियनने मंगळवार, २७ जानेवारी रोजी ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराची म्हणजेच एफटीएची घोषणा केली. या एफटीएच्या माध्यमातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टैरिफ धोरणांमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी दोन्ही देश सर्वसमावेशक दृष्टीकोन तयार करतील अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. भारत आणि युरोपियन युनियनमध्ये होणाऱ्या कराराबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, हा करार जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील समन्वयाचे एक उत्तम उदाहरण आहे. हा करार जागतिक जीडीपीच्या जवळपास २५ टक्के आणि जागतिक व्यापाराच्या जवळपास एक तृतीयांश भागाचे प्रतिनिधित्व करतो. जगभरातील लोक या कराराची चर्चा मदर ऑफ ऑल डिल्स (Mother of all deals) म्हणून करत आहेत. हा करार १४० कोटी भारतीयांसाठी तसेच युरोपातील अनेक नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे.पाकिस्तान या करारामुळे चिंतेत:पाकिस्तान या करारामुळे चिंतेत आहे, कारण दीर्घकाळापासून त्याला युरोपीय बाजारपेठेत भारतावर आघाडी मिळाली होती. याचे कारण युरोपीय संघाची (EU) GSP प्लस योजना होती. या योजनेअंतर्गत पाकिस्तानला आपली सुमारे ६६% उत्पादने करमुक्त युरोपमध्ये पाठवण्याची सुविधा मिळाली होती. यात कापड आणि तयार कपड्यांसारख्या वस्तूंचा समावेश होता. तर भारताला अशाच वस्तूंवर ९ ते १२% पर्यंत कर भरावा लागत होता. यामुळे पाकिस्तानची वस्त्रोद्योग निर्यात ६.२ अब्ज डॉलर होती, तर भारताची वस्त्रोद्योग निर्यात ५.६ अब्ज डॉलर होती.The EU Zero Tariff Cushion!The $9 billion Exports Last Year to EU With Market Access at zero-tariff honeymoon is over as same Zero Tariffs to EU are now Applicable on All Main Regional competitors.The Government of Pakistan must enable industry to compete in the region… pic.twitter.com/MWDK8jLd75— Dr Gohar Ejaz (@Gohar_Ejaz1) January 28, 2026आता भारत आणि EU यांच्यात झालेला हा मुक्त व्यापार करार, ज्याला ‘मदर ऑफ ऑल डील्स’ म्हटले जात आहे, भारताला युरोपमध्ये करमुक्त मोठा बाजारपेठ देतो. यामुळे पाकिस्तानचा तो फायदा जवळजवळ संपुष्टात येतो. यासोबतच, पाकिस्तानची GSP प्लस सुविधा त्याला २०१४ मध्ये मिळाली असून ती सुविधा डिसेंबर २०२७ मध्ये संपणार आहे. जर ती पुढे वाढवली नाही, तर पाकिस्तानला युरोपमध्ये मिळणारी ही विशेष व्यापार सुविधा पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते.युरोपीयन यूनियन ही पाकिस्तानची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तानच्या व्यावसायिक वर्गाला भीती आहे की, ‘मदर ऑफ ऑल डील्स’ या करारानंतर ते युरोपीय बाजारपेठेतील आपली जागा गमावून बसतील आणि इतर देशांशी स्पर्धा करणे त्यांना अधिक कठीण होईल. त्यामुळे पाकिस्तानातील नोकऱ्या धोक्यात येतील.
Sitara Ghattamaneni : महेश बाबूची लेक सिताराचा जलवा; खास फॅशन करत रॅम्प वॉकने वेधले साऱ्यांचे लक्ष
Sitara Ghattamaneni : साउथ सुपरस्टार महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची मुलगी सितारा घट्टामनेनी पुन्हा एकदा तिच्या सुंदर लुकमुळे चर्चेत आली आहे. सिताराला आता फॅशन आयकॉन म्हणून ओळखले जात आहे. सध्या तिचा ज्वेलरी एक्झिबिशनमधील एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यात ती रॅम्प वॉक करताना दिसत आहे. एका लक्झरी ज्वेलरी प्रदर्शनाच्या लॉन्च इव्हेंटमध्ये १३ वर्षांच्या सिताराने […]
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्यामाचा मास्टरमाइंड भाजपच
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा झालेला शपथविधी आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
Raj Thackeray: राज ठाकरेंसमोर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वाचला 'उबाठा'बाबत तक्रारींचा पाढा
- मुंबई पालिका निवडणुकीत मनसेच्या वॉर्डात 'उबाठा'ची मते फिरली?मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसेच्या अंतर्गत असंतोषाला उघडपणे वाट मोकळी करून देणारी महत्त्वाची बैठक सोमवारी (२ फेब्रुवारी) वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पार पडली. या बैठकीत पराभूत उमेदवार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर ‘उबाठा’ गटाबाबतच्या तक्रारी मांडत, अपेक्षित सहकार्य न मिळाल्याचा आरोप केला.बैठकीत उपस्थित उमेदवारांनी सांगितले की, मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये उबाठा गटाची मते मनसेकडे वळली नाहीत. निवडणुकीदरम्यान उबाठा गटाने प्रत्यक्ष प्रचारात सक्रिय सहभाग न घेतल्यामुळे मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचा दावा करण्यात आला. अनेक मतदारसंघांमध्ये मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले असून, थोड्या फरकाने विजय हुकल्याची खंत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर राज ठाकरे यांनी उमेदवारांनाच सवाल करत, युती असली तरी स्थानिक पातळीवर तुमची स्वतःची तयारी किती होती, असा थेट प्रश्न उपस्थित केला. केवळ युतीवर अवलंबून राहून निवडणूक जिंकता येत नाही, असेही ते म्हणाल्याचे समजते.बैठकीत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही आपली भूमिका मांडली. जागावाटपाच्या वेळी मनसेला ताकदीचे वॉर्ड मिळाले नसल्याचा परिणाम निकालांवर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या वॉर्डांमध्ये मनसेची पकड भक्कम होती, त्या वॉर्डांऐवजी तुलनेने कमजोर मतदारसंघ देण्यात आल्यामुळे उमेदवारांना मोठा संघर्ष करावा लागल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.माध्यमांशी बोलणे टाळलेबैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. मात्र, मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार नाही, एवढे स्पष्ट करत ते निघून गेले. तर, मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही बैठक पूर्णतः अंतर्गत असल्याचे सांगितले. बैठकीतील चर्चेचा तपशील कॅमेऱ्यासमोर सांगता येणार नाही, असे म्हणत त्यांनी उबाठा गटाबाबत प्रतिक्रिया देणे टाळले.
Kalpana Iyer dance: ज्येष्ठ अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना कल्पना अय्यर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. एका कौटुंबिक लग्नसमारंभात त्यांनी त्यांच्या लोकप्रिय ‘रंबा हो हो हो’ या गाण्यावर केलेला डान्स पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
Baramati News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दि.२८ रोजी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामती येथे महाराष्ट्रातुन मोठ्या प्रमाणात नेते, नागरिक, कार्यकर्ते व महिला भगिनींची तुफान गर्दी झाली होती.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली स्वर्गीय विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट
सातारा: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःचे वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत विदीप जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
Rahul Gandhi in Parliament: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान आज लोकसभेत प्रचंड गोंधळ झाला.
गोल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिक मदाना व अभिनेता विजय देवरकोंडा या दोघांच्या लग्नाबद्दल चर्चानां उधान आलं आहे. या दोघांच लग्न २ फेब्रुवारी रोजी होणार आहे अशी सर्वत्र बातमी पसरत आहे. मात्र यावर अभिनेत्री रश्मिकांने लग्नांच्या अफवांनवर आपली प्रतिक्रिया देत अफवांना ब्रेक दिला आहे.अभिनात्री रश्मिका मंदान्ना व विजय देवरकोंडा याच्या दोघांचा चाहते वर्गामध्ये नेहमी चर्चेचा विषय राहीला आहे.२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या गीता गोविंदम या चित्रपटातून दोघांनीही चाहत्यांमध्ये आपली वेगळीच छाप सोडली आहे. बहुतांश चाहंत्याना असं वाटत की रिल लाईफ कपल प्रत्यक्षात रिअल लाईफ मध्ये जोडीदार व्हावे. अलीकडेच सोशल मीडियावर एका इन्फ्लुएंसरने दावा केला होता की रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा २ फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील उदयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये शाही विवाह करणार आहेत. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आणि अनेकांनी या बातमीवर विश्वासही ठेवला. मात्र, ही बातमी आता पूर्णपणे अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.एका मुलाखतीदरम्यान रश्मिका मंदान्ना यांनी स्वतः या लग्नाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली असून, २ फेब्रुवारी रोजी लग्न होणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत रश्मिकाने या अफवांना पूर्णविराम दिला असून, सध्या अशा कोणत्याही लग्नाची तयारी नसल्याचे सांगितले आहे.तरीदेखील, सोशल मीडियावर आता २६ फेब्रुवारी या नवीन तारखेबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. काही इन्फ्लुएंसरच्या म्हणण्यानुसार उदयपूरमध्ये एका सेलिब्रिटीच्या लग्नाची तयारी सुरू असून, ते लग्न रश्मिका आणि विजयचेच असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप दोघांकडूनही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.एकंदरीत, रश्मिका मंदान्ना यांनी स्वतः लग्नाच्या बातम्यांना अफवा ठरवले असून, चाहत्यांनी अधिकृत घोषणेची वाट पाहणेच योग्य ठरेल. तोपर्यंत, या चर्चांकडे केवळ अफवा म्हणून पाहावे, असेच चित्र सध्या दिसत आहे.
शिवसेनेच्या मुंबई महापालिका गटनेतेपदी अमेय घोले
मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी तरुण नगरसेवक आणि एकेकाळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळ असलेले अमेय घोले यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे महापालिकेत २९ नगरसेवक निवडून आलेले असून हे दोन्ही पक्ष आपल्या पक्षाची नोंदणी एकत्रपणे करतात की स्वतंत्र याबाबत चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने आपला गटनेता निवडून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.मुंबई महापालिकेत भाजपच्या गटनेते पदी गणेश खणकर यांची निवड करण्यात आल्यानंतर शिवसेनेने आपला गटनेता निवडला. शिवसेनेतील सर्वात तरुण आणि अभ्यासू अशी त्यांची ख्याती आहेत. भाजपचे ८९ तर शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आलेले असून यासर्व नगरसेवकांची कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यालयात नोंदणी झाली नवहती. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक आणि वैधानिक तसेच विशेष समित्यांमध्ये संख्याबळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही पक्ष गट करून एकत्र नोंदणी करतील अशी चर्चा होती. पण दोन्ही पक्षाचे स्वतंत्र गटनेते निवडले गेले आहेत.अमेय घोले हे प्रभाग १७८मधून निवडून आले असून त्यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर पक्षाच्या सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे,पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी त्यांचे अभिनंदन केले. गटनेते निवडीनंतर भाजप आणि शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, माजी खासदार मनोज कोटक आदी नेते उपस्थित होते. त्यानंतर भाजपसोबतच सोमवारी शिवसेना नगरसेवकांची नोंदणी केली जात आहे.
भारतीय अर्थव्यवस्था आणि उत्पादन क्षेत्रासाठी जानेवारी २०२६ हा महिना संमिश्र पण काहीसा दिलासादायक ठरला आहे. गेल्या दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवरून सावरत भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राने पुन्हा एकदा प्रगतीचा टप्पा गाठला असून, नवसंजीवनी मिळवल्याचे संकेत दिले आहेत. ताज्या प्रसिद्ध झालेल्या 'एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स' (PMI) नुसार, डिसेंबरमध्ये ५५ पर्यंत घसरलेला हा निर्देशांक जानेवारीत ५५.४ वर पोहोचला आहे. नवीन ऑर्डर्समध्ये झालेली वेगवान वाढ आणि प्रत्यक्ष उत्पादनातील सुधारणा ही या सकारात्मक बदलाची मुख्य कारणे मानली जात आहेत. एचएसबीसीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी स्पष्ट केले की, बाजारपेठेतील मागणीचा उत्साह आणि तंत्रज्ञानातील वाढती गुंतवणूक यामुळे उत्पादनाला मोठी मदत झाली आहे. विशेष म्हणजे, या विक्रीला मुख्य चालना भारताच्या देशांतर्गत बाजारपेठेतून मिळाली असून, आशिया, युरोप, कॅनडा आणि मध्यपूर्वेकडील देशांतूनही नवीन निर्यातीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या सकारात्मक वातावरणामुळे कंपन्यांनी कर्मचारी भरतीचा वेग कायम ठेवला असून, गेल्या तीन महिन्यांतील हा रोजगाराचा सर्वाधिक वेगवान दर ठरला आहे.https://prahaar.in/2026/02/02/finally-the-bjps-group-leader-has-been-decided-ganesh-khankar-has-been-appointed/मात्र, या अहवालात एक चिंतेची बाब देखील अधोरेखित करण्यात आली आहे. देशातील उत्पादक आणि उद्योजकांचा भविष्यातील 'व्यावसायिक आत्मविश्वास' (Business Confidence) गेल्या साडेतीन वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर घसरला आहे. सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, केवळ १५% कंपन्यांना येणाऱ्या वर्षात उत्पादनात वाढ होण्याची आशा आहे, तर तब्बल ८३% कंपन्यांना परिस्थितीत कोणताही मोठा बदल होईल असे वाटत नाही. खर्चाच्या बाजूचा विचार करता, कच्च्या मालाच्या किमतीत गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. तरीही, बाजारपेठेतील तीव्र स्पर्धा आणि कार्यक्षम खर्च नियोजनामुळे कंपन्यांनी या वाढीव खर्चाचा बोजा ग्राहकांवर फारसा टाकलेला नाही. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या मालाच्या किमतीतील वाढ २२ महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर राहिली आहे, जो ग्राहकांसाठी मोठा दिलासा आहे. एकंदरीत, नवीन ऑर्डर्स आणि रोजगाराच्या आघाडीवर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राने उल्लेखनीय प्रगती केली असली, तरी कच्च्या मालाचे वाढते दर आणि भविष्यातील अनिश्चिततेमुळे उद्योजकांमध्ये अद्यापही सावधगिरीचे वातावरण आहे.
बुलढाण्यात बिबट्याची दहशत.. घराबाहेर आला अन् थेट व्हायरल व्हिडीओने खळबळ
बुलढाणा : गेले काही महिने बिबट्याने महाराष्ट्रभर उच्छाद मांडला आहे. शांततेच्या ठिकाणी दिसणार बिबट्या आता सर्रास वर्दळीच्या ठिकाणीही दिसून येत आहे. बिबट्या आपल्याला अंगणात, शेतात, गोठ्यात दर्शन देतोय एकूणच बिबटयाचा वावर काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे.बुलढाण्यात वर्दळीच्या ठिकाणी बिबट्याचा वावरबुलढाण्यामधील मिर्झा नगर येथील रहिवासी आणि एसटी मेकॅनिक गुलाम हुसेन यांच्या घरासमोर शनिवारी रात्री ९.३० सुमारास हा थरार घडला आहे. गुलाल हुसेन यांचा मुलगा घराबाहेर असताना त्याला घराच्या अगदी समोर बिबट्या उभा असलेला दिसला. रात्रीची वेळ असूनही परिसरात काही प्रमाणात वर्दळ असताना बिबट्या इतक्या धीटपणे मानवी वस्तीत शिरल्याने आश्चर्य आणि भीती व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार मिर्झानगरमध्ये कायम बिबट्याचा वावर हा आढळून आला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात बिबट्याची भीती ही कायम आहे. या भागात असलेल्या झाडाझुडपांमुळे बिबट्यानं राहण्यास जागा उपलब्ध आहे त्यामुळे ते जवळच असलेल्या मानवी वस्तीत सहज शिरकावं करत आहेत. वनविभागाने गस्त घालण्याचे आश्वासन दिले असतांनाही ठोस पाऊले उचलली गेली नसल्याने बिबट्यांचा वावर वाढला आहे.
नवव्या अर्थसंकल्पात स्थैर्य, वृद्धी, अर्थव्यवस्थेला दिशा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणाच्या रचनेतही बदलनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी संसदेत सलग ९ वा अर्थसंकल्प सादर केला. १ तास २५ मिनिटांच्या या भाषणाने केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा स्पष्ट केली नाही, तर ७५ वर्षांपासून चालत आलेली एक मोठी संसदीय परंपराही मोडीत काढली. भारताचा आर्थिक प्रवास स्थैर्य, वृद्धी आणि मध्यम महागाईच्या मार्गावर असल्याचे सांगत, सीतारामन यांनी यंदा आपल्या भाषणाच्या रचनेत ऐतिहासिक बदल केला आहे. 'पार्ट बी' बनला केंद्रबिंदू भारतीय अर्थसंकल्पाच्या इतिहासात सहसा ‘पार्ट ए’मध्ये धोरणात्मक घोषणा असतात आणि ‘पार्ट बी’मध्ये केवळ कर प्रस्ताव आणि तांत्रिक बाबी असतात. मात्र, यंदा निर्मला सीतारामन यांनी हा पायंडा मोडला. त्यांनी ‘पार्ट बी’ला केवळ कर प्रस्तावांपुरते मर्यादित न ठेवता, भारताच्या भविष्यातील आर्थिक रणनीतीचा मुख्य आधार बनवले. देशाच्या विकासाचा ‘रोड मॅप’ मांडण्यासाठी त्यांनी या भागाचा प्रभावी वापर केला, जे तज्ज्ञांच्या मते भारतीय अर्थसंकल्पातील एक मोठे स्थित्यंतर आहे.नऊ अर्थसंकल्पांचा प्रवासनिर्मला सीतारामन यांच्या नावावर भारतीय संसदेतील सर्वात प्रदीर्घ भाषणाचा विक्रम आहे. त्यांच्या भाषणाचा प्रवास रंजक राहिला आहे.२०१९ चा प्रवास : त्यांच्या पहिल्याच पूर्णवेळ अर्थसंकल्पाचे भाषण २ तास १७ मिनिटे चालले होते.२०२० चा ऐतिहासिक विक्रम : सीतारामन यांनी २ तास ४२ मिनिटे भाषण देऊन विक्रम प्रस्थापित केला होता. त्यावेळी त्यांची प्रकृती काहीशी खालावल्याने अखेरची दोन पाने लोकसभा अध्यक्षांना वाचावी लागली होती.२०२४ चा 'शॉर्ट' टच : २०२४ चा अंतरिम अर्थसंकल्प हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात लहान (५६ मिनिटे) ठरला होता.आजची स्थिती (२०२६) : यंदाचे भाषण १ तास २५ मिनिटे चालले, जे गेल्या वर्षीच्या (१ तास १४ मिनिटे) भाषणापेक्षा थोडे लांब होते.सर्वात लहान आणि शब्दांनी मोठे भाषणसर्वात कमी शब्दांचे भाषण : १९७७-७८ मध्ये मोरारजी देसाई सरकारमधील अर्थमंत्री हिरूभाई एम. पटेल यांनी केवळ ८०० शब्दांचे सर्वात लहान भाषण दिले होते.शब्दांच्या बाबतीत सर्वात मोठे : १९९१ मध्ये मनमोहन सिंग यांनी दिलेले १८,६५० शब्दांचे भाषण आजही 'वर्ड काउंट'च्या बाबतीत अव्वल आहे.अरुण जेटलींची नोंद : २०१८ मध्ये माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १८,६०४ शब्दांचे दुसरे सर्वात मोठे भाषण दिले होते.
US Iran Tension: इराण आणि अमेरिका यांच्यातील परिस्थिती युद्धाच्या स्थितीत असतानाच, शब्दयुद्धही चांगलेच पेटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध टाळण्यासाठी इराणला अणु कराराची ऑफर दिली आहे.
Pune Porsche Crash Case : मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलणाऱ्या तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
Tejashwi Yadav: बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना व्हीलचेअरवरून विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये नेण्यात आले.
Rohit Shetty: गोळीबार प्रकरणानंतर रोहित शेट्टीने घेतला 'हा'महत्वाचा निर्णय
मुंबई: बॉलीवूडचे 'ॲक्शन किंग' म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर शनिवारी (३१ जानेवारी) रात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. मुंबई गुन्हे शाखाने या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाकडून या चारही आरोपींना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी शुभम लोणकर याला या प्रकरणात फरार आरोपी घोषित केले आहे.या सर्व पार्श्वभूमीवर दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार त्यांनी त्यांचे पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच त्यांच्या जवळच्या मित्रांना आणि फिल्म इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांना पुढील ४८ तास घरी येऊ नये, अशी विनंती केली आहे.नेमकं काय घडलं?दुचाकीवरून आला अन्...शनिवारी रात्री उशिरा एका अज्ञात तरुणाने हा गोळीबार केला असून, यामध्ये रोहित शेट्टी यांच्या बंगल्याच्या खिडक्यांचे नुकसान झाले आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत एक तरुण दुचाकीवरून रोहित शेट्टीच्या बंगल्याबाहेर आला. आपली ओळख लपवण्यासाठी त्याने 'हुडी' घातली होती. बंगल्याजवळ थांबताच त्याने अचानक बंदूक काढून थेट घराच्या दिशेने ४ गोळ्या झाडल्या. या गोळीबारात खिडकीच्या काचा फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे कृत्य केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच तो तरुण दुचाकीवरून वेगाने पसार झाला.सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल :गोळीबारानंतर रोहित शेट्टी यांच्या बंगल्याबाहेर असलेल्या पोलिसांच्या ताफ्याचा आणि तणावपूर्ण वातावरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Vijay Wadettiwar : दोन पक्ष एकत्र येऊ नये म्हणून हा कट शिजला आणि त्यातून ही ठिणगी पडल्याचे वडेट्टीवारांनी व्यक्त केले मत
Gold Silver Price: सोने-चांदीच्या किमतीत घसरण सुरूच ; वाचा सोने-चांदी कितीने झालं स्वस्त ?
Gold Silver Price: मागच्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच जर तुम्ही अजूनही सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करत असाल, तर आजच खरेदी करण्याचा विचार करा.
Mirzapur The Film: लोकप्रिय वेबसीरिज ‘मिर्जापूर’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘मिर्जापूर: द फिल्म’ या चित्रपटाचं शूटिंग अधिकृतपणे पूर्ण झालं आहे. याची माहिती अभिनेत्री श्रिया पिलगांवकर हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या खास पोस्टमधून दिली आहे.
भारतीय विद्यार्थ्यांचा परदेशी शिक्षणाकडे कल
स्टडी इन इंडिया मात्र दुर्लक्षितमुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. लिबरलाईज्ड रेमिटन्स स्कीम अंतर्गत शिक्षणासाठी परदेशी पाठवण्यात येणाऱ्या रकमेवरील कर (टीसीएस) कमी करून १० लाख रुपयांवर २% कर लागू करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे परदेशी विद्यापीठांमध्ये शुल्क भरण्याचा भार घटेल. तसेच, भारतात परदेशी विद्यापीठांसाठी पाच नव्या शैक्षणिक केंद्रांची घोषणा झाली आहे. गुजरातमधील गिफ्टसिटी आणि नवी मुंबईतील एज्युकेशन सिटीसारखी केंद्रे औद्योगिक क्षेत्राजवळ उभारली जाणार आहेत, ज्यामुळे देशातील विद्यार्थ्यांना परदेशी दर्जाचे शिक्षण घरबसल्या घेण्याची संधी मिळेल.नीती आयोगाची उद्दिष्टपूर्ती लांबणीवर1.भारतीय विद्यार्थ्यांचा परदेशी शिक्षण घेण्याकडे असलेला ओघ आणि परदेशातील शिक्षणावर होणारा भारतीयांचा खर्च यावर दोन महिन्यांपूर्वी नीती आयोगाने एक अहवाल सादर केला होता. त्यानुसार २०२४ मध्ये १३ लाख ३६ हजार भारतीय विद्यार्थी परदेशी गेले. विविध खासगी संस्थांच्या अभ्यासानुसार ६ लाख कोटी रुपये भारतातून परदेशी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च झाले.2. या पार्श्वभूमीवर परदेशी विद्यार्थ्यांनी भारतात शिक्षणासाठी यावे यासाठी स्वतंत्र धोरण आखण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. त्यानुसार २०३५ पर्यंत साडेतीन लाख परदेशी विद्यार्थ्यांनी भारतात शिक्षणासाठी यावे असे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.3. मात्र, त्यादृष्टीने काही ठोस तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. आयआयटीची प्रवेश क्षमता साडेसहा हजारांनी वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र जुन्या आयआयटीपेक्षा २०१४ नंतर स्थापन झालेल्या संस्थांसाठी प्रामुख्याने तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून रखडलेला पाणीपट्टी वाढीचा निर्णय आता प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच पाणीपट्टीत वाढ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा लेखा विभागाने तयार केला असून तो लवकरच महापालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमुळे तसेच महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून गेल्या दोन वर्षांपासून पाणीपट्टी वाढीचा निर्णय वारंवार पुढे ढकलण्यात आला होता. दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकांनंतर पाणीपट्टी वाढ होणार असल्याचे संकेत होते; मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय स्थगित ठेवण्यात आला. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यासने आणि पुढील चार वर्षांत कोणतीही मोठी निवडणूक नसल्यामुळे पाणीपट्टी वाढीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.जल अभियंता खात्याचा आस्थापना खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते, प्रशासकीय खर्च, प्रचालन व परिरक्षण खर्च, विद्युत खर्च तसेच भातसा व अप्पर वैतरणा धरणांतून उपसा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या पाणीपट्टीचा सविस्तर आढावा घेऊन ही वाढ सुचवण्यात आली आहे. प्रस्तावित वाढ सरासरी ६ ते ७ टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे घरगुती पाणीपट्टीत प्रति हजार लिटरमागे सरासरी एक रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे, तर व्यावसायिक वापरासाठी तीन ते चार रुपयांपर्यंत वाढ अपेक्षित आहे. याशिवाय एकूण पाणीबिलाच्या ७० टक्के मलनि:सारण आकार वसूल केला जाणार आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पानंतर या प्रस्तावाला मंजुरी देऊन पुढील आर्थिक वर्षापासून पाणीपट्टी वाढीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
Dalai Lama-Grammy Award: जगातील सर्वोच्च तिबेटी आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांना त्यांचा पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.
Sunetra Pawar : अजित पवार अनेकदा महत्त्वाच्या क्षणी कराडच्या प्रीतीसंगम येथील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेत
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार नाही. पाकिस्तान सरकारने रविवारी संध्याकाळी या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. दोन्ही संघ 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये एकमेकांशी भिडणार होते. यापूर्वी बांगलादेश संघाने भारतात खेळण्यास नकार दिला होता, त्यानंतर ICC ने त्याला वर्ल्डकपमधूनच बाहेर काढले होते. अखेर पाकिस्तानने सामना खेळण्यास का नकार दिला, आता पाकिस्तानलाही बाहेर काढले जाऊ शकते का, यामुळे ICC चे किती नुकसान होईल; दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया.. प्रश्न-1: पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतावर बहिष्कार का टाकला?उत्तर: बांगलादेशला टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर काढल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने भारतासोबत सामना खेळण्यास नकार दिला आहे… नकवी यांनी २६ जानेवारी रोजीच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली होती. या बैठकीत पाकिस्तानच्या विश्वचषक सहभागाबद्दल आणि भारतासोबतच्या सामन्याबद्दल चर्चा झाली. यानंतर बातम्या आल्या की, संपूर्ण विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याऐवजी, या दोन पर्यायांवर विचार केला जात आहे - बांगलादेशशी एकजूटता दाखवण्यासाठी पाकिस्तानी खेळाडू काळी पट्टी घालून खेळायला उतरतील. किंवा पाकिस्तान फक्त भारतासोबतचे सामने खेळण्यास नकार देईल. यानंतर १ फेब्रुवारी रोजी उशिरा संध्याकाळी पाकिस्तान सरकारने एका X पोस्टमध्ये भारतासोबतचा सामना न खेळण्याची घोषणा केली. त्यात लिहिले होते, ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे सरकार, पाकिस्तान क्रिकेट संघाला ICC वर्ल्ड T20 2026 मध्ये भाग घेण्यास मान्यता देते. तथापि, पाकिस्तान क्रिकेट संघ १५ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतासोबत होणाऱ्या सामन्यात मैदानात उतरणार नाही.’ पाकिस्तानच्या घोषणेनंतर, आयसीसीने एक निवेदन जारी करून सांगितले आहे की ते अजूनही पीसीबीसोबत औपचारिक चर्चेची वाट पाहत आहेत. निवेदनात म्हटले आहे की, सरकारांच्या राष्ट्रीय धोरणांचा आदर करतो, परंतु निवडक सामने खेळणे हे खेळाच्या मूलभूत विचारांच्या आणि त्याच्या पवित्रतेच्या विरोधात आहे. हा निर्णय जागतिक क्रिकेट आणि जगभरातील चाहते, विशेषतः पाकिस्तानी चाहत्यांच्या हिताचा नाही. यामुळे पाकिस्तान क्रिकेट आणि संपूर्ण क्रिकेट व्यवस्थेवर परिणाम होईल. पीसीबी यावर विचार करेल अशी अपेक्षा आहे. प्रश्न-2: पाकिस्तान-भारत सामना न झाल्याने दोन्ही संघांपैकी कोणाला फायदा?उत्तर: भारत आणि पाकिस्तानचे संघ वर्ल्ड कपच्या ग्रुप-A मध्ये आहेत. चारही ग्रुपमध्ये 5-5 संघ आहेत, त्यापैकी 2-2 संघ सुपर-8 स्टेजमध्ये जातील. पाकिस्तान-भारत सामना होणार नसल्यामुळे, दोन्ही संघ ग्रुप स्टेजमध्ये 3-3 सामनेच खेळतील. पाकिस्तान 7 फेब्रुवारीला नेदरलँड्स, 10 फेब्रुवारीला अमेरिका आणि 18 फेब्रुवारीला नामिबियाशी भिडेल. तर टीम इंडिया 7 फेब्रुवारीला अमेरिका, 12 फेब्रुवारीला नामिबिया आणि 18 फेब्रुवारीला नेदरलँड्सशी सामना करेल. ICC च्या प्लेइंग कंडिशननुसार, जर एखादा संघ सामना खेळण्यास नकार देतो, तर त्या संघाकडून सामना ‘कंसीडेड’ मानला जातो, तसेच दुसऱ्या संघाला सामना ‘अवार्डेड’ दिला जातो. म्हणजेच दुसरा संघ एकप्रकारे सामना न खेळताच जिंकतो. प्लेइंग कंडिशनच्या क्लॉज 16.10.7 नुसार, सामना खेळण्यास नकार देणाऱ्या संघाच्या संपूर्ण ओव्हरमध्ये शून्य धावा मानल्या जातात. पाकिस्तानच्या बहिष्काराचा अर्थ असा होईल की 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या सामन्याचे 2 गुण भारताला मिळतील आणि भारताचा सुपर-8 मध्ये पोहोचण्याचा मार्ग खूप सोपा होईल. तर, पाकिस्तानने सामना न खेळल्यास पाकिस्तानचा रन रेट खराब होईल. त्याचबरोबर भारताचा रन रेट चांगला होईल, कारण भारताचे एकही षटक मोजले जाणार नाही. पाकिस्तानचा रन रेट नकारात्मकही होऊ शकतो. गट-ए मध्ये भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त नामिबिया, नेदरलँड्स आणि अमेरिकेचे संघ आहेत. तथापि, पाकिस्तान उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करूनही या स्थितीत सुपर-8 मध्ये पोहोचू शकतो. जर भारताने गटातून टॉप-2 मध्ये स्थान मिळवले, तर सुपर-8 मध्ये त्याचे 3 सामने असतील. सुपर-8 मधून टॉप-2 मध्ये पोहोचल्यावर उपांत्य फेरी आणि नंतर जिंकल्यास अंतिम सामना होईल. म्हणजेच भारताचे किमान 3 आणि कमाल 8 सामने असतील. त्याचप्रमाणे, जर पाकिस्तानही सुपर-8 मध्ये पोहोचला, तर त्याचा भारताशी सामना होऊ शकतो. यापुढे गेल्यास आणखी सामनेही होऊ शकतात. तथापि, नॉकआउटमध्ये भारत समोर आल्यास पाकिस्तान सामना खेळेल की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. प्रश्न-३: आयसीसी पाकिस्तानला विश्वचषकातून वगळू शकते का?उत्तर: सामान्यतः, एखाद्या ठिकाणी सामना खेळण्यास नकार दिल्यास संपूर्ण स्पर्धेतून बाहेर काढले जात नाही. यापूर्वी, आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात अनेकदा संघांनी सुरक्षा कारणांचा हवाला देत एखाद्या संघासोबत सामना खेळण्यास नकार दिला, तेव्हा सामने 'फॉरफिट' घोषित करण्यात आले, म्हणजेच प्रतिस्पर्धी संघाला त्या सामन्यात विजेता घोषित करण्यात आले. १९९६ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजने श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला, तेव्हा दोन्ही सामने 'फॉरफिट' झाले आणि त्यांचे गुण श्रीलंकेला मिळाले. तर, २००३ च्या विश्वचषकात इंग्लंड आणि न्यूझीलंडने अनुक्रमे झिम्बाब्वे आणि केन्यामध्ये खेळण्यास नकार दिला. हे दोन्ही सामनेही 'फॉरफिट' घोषित करण्यात आले. या प्रकरणात आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात औपचारिक चर्चेनंतरच आयसीसीची पुढील भूमिका स्पष्ट होईल. जर आयसीसीने याला सदस्यत्वाच्या जबाबदाऱ्या किंवा आचारसंहितेचे उल्लंघन मानले, तर पाकिस्तान संघावर आणखी काही निर्बंध लादले जाऊ शकतात. यात विश्वचषकातून बाहेर काढणे, पुढील आयसीसी स्पर्धा खेळण्यावर किंवा पाकिस्तानच्या पीएसएलसारख्या देशांतर्गत लीगमध्ये परदेशी खेळाडूंच्या सहभागावर बंदी घालणे यांचा समावेश असू शकतो.क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी X वर लिहिले आहे, 'आता आयसीसी काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे आहे. तरीही, जर आयसीसीने प्रसारणातून होणाऱ्या कमाईच्या नुकसानीची भरपाई पाकिस्तानकडून केली, तर मला आश्चर्य वाटणार नाही. जर भारत-पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होणार असेल, तर काय होईल?' प्रश्न-४: जर पाकिस्तान बाहेर पडला, तर त्याला काय नुकसान होऊ शकते?उत्तर: जर पाकिस्तानला वर्ल्ड कपमधून बाहेर काढले, तर त्याला ५ मोठे नुकसान सोसावे लागतील... १. आयसीसीकडून मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नावर बंदी २. सहभाग शुल्क आणि बक्षीस रकमेचे थेट नुकसान 3. सुमारे 18 कोटी रुपयांचा दंड 4. द्विपक्षीय मालिकांवर बंदी 5. पाकिस्तान सुपर लीग बंद होण्याचा धोका प्रश्न-5: भारत-पाकिस्तान सामना न झाल्याने ICC ला किती नुकसान होऊ शकते?उत्तर: वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना सर्वाधिक पाहिला जाणारा सामना असतो. अनेकदा या सामन्याची व्ह्यूअरशिप फायनलपेक्षाही जास्त असते. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तानचा सामना सुमारे 17 कोटी लोकांनी पाहिला होता. या टी-20 विश्वचषकात दोन्ही देशांचे सामने न झाल्यामुळे जिओ हॉटस्टारसारख्या ब्रॉडकास्टरला सर्वाधिक नुकसान होईल. ब्रॉडकास्टरने सामन्याचे सर्व जाहिरात स्लॉट आधीच विकले आहेत. अहवालानुसार, प्री-सोल्ड जाहिरात इन्व्हेंटरी, प्रायोजकत्व आणि प्राइम ब्रॉडकास्ट स्लॉट्स मिळून ब्रॉडकास्टरला सुमारे 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान होईल. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान 10 सेकंदांच्या जाहिरातीची किंमत सुमारे 25 ते 40 लाख रुपये असते. अनेक अहवालानुसार, विश्वचषकात भारत-पाकिस्तानच्या एका सामन्यातून होणारी कमाई संपूर्ण विश्वचषकाच्या कमाईच्या सुमारे 8 ते 10% पर्यंत असते. आयसीसीला थेट नुकसान नाही कारण त्यांनी आधीच मीडिया हक्क विकले आहेत. तथापि, हा सामना न झाल्यामुळे ब्रॉडकास्टर आयसीसीकडे नुकसानीची भरपाई मागू शकतात. तर आयसीसी, नुकसानीची भरपाई, आयसीसीकडून पाकिस्तानला मिळणाऱ्या महसुलातून कापून घेऊ शकते. प्रश्न-६: भारतासोबत सामना न खेळता पाकिस्तान कोणता राजकीय संदेश देऊ इच्छितो?उत्तर: पाकिस्तान तीन मोठ्या राजकीय कारणांमुळे भारतासोबतच्या सामन्यावर बहिष्कार टाकत आहे... १. दोन्ही देशांमधील राजकीय तणाव २. भारताचा विरोध पाकिस्तानी राजकारणाचा महत्त्वाचा भाग 3. भारताच्या विरोधात बांगलादेशसोबत एकजूटता
Gold-Silver Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर
मुंबई: रविवार १ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यावेळी सोने आणि चांदीबाबत कोणतीही मोठी थेट घोषणा करण्यात आली नसली तरीही; अर्थसंकल्पानंतर कमोडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण सुरूच:आज, २ फेब्रुवारी रोजी सकाळी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम साठी १ लाख ६० हजार ७२० रुपयांवर आला. तर मुंबईत हा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ६० हजार ५७० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण (Gold Silver Price Crash) सुरूच आहे.सोन्याप्रमाणेच चांदीच्या घसरणीचा कलही कायम आहे. २ फेब्रुवारी रोजी सकाळी चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम ३,४९,९०० रुपयांपर्यंत घसरली. एका आठवड्यात किंमत १५ हजार रुपयांनी वाढली आहे.सोन्याचे दर :मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यात सोन्याचे दर: सध्या मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,४७,१९० रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅमसाठी १,६०,५७० रुपये इतका आहे.
मराठी शाळा व संस्कृती वाचवणार कोण?
मराठी शाळा टिकण्यासाठी आता हवी फक्त पालकांची इच्छाशक्ती व मानसिकतेत होणारा बदल आता मराठी शाळा टिकवू शकतात असं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.अल्पेश म्हात्रे,काही वर्षांपूर्वीची गोष्ट, मुंबईतील मराठमोळ्या ग्रँट रोड परिसरात राहणारे माझे मित्र किस्सा सांगत होते. मराठी भाषेचा अभिमान म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीला ग्रँट रोड येथील एका नामांकित मराठी शाळेत प्रवेश घेतला. काही वर्षे गेल्यानंतर अचानक एक दिवस त्या शाळा व्यवस्थापनाने मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला व तसे पालकांना कळवले. माझे मित्र धडाडीचे कार्यकर्ते होते. ग्रँट रोड सारख्या मराठमोळ्या विभागातील नामांकित मराठी शाळा बंद पडते म्हणून त्यांनी थेट तेथील कार्यकर्त्यांना हाताशी धरले व शाळा व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी शाळेत पोहोचले. प्रथम वादावादी झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने नमती भूमिका घेतली व सुचवले की आम्ही मराठी शाळा सुरू ठेवण्यास तयार आहोत,फक्त तुमची जबाबदारी विद्यार्थी आणून देण्याची राहील, ते झाले तरच आम्ही शाळा सुरू करू शकतो, हे सांगताच सर्वच विषयावर पडदा टाकावा लागला. कारण त्यावर ना पालकांकडे उत्तर होते ना शाळा व्यवस्थापकांकडे. या सर्वाला जबाबदार होती ती पालकांची द्विधा मानसिकता. असो. विषय असा, की मराठी शाळा असो किंवा मराठी संस्कृती असो ती टिकवायची कोणी त्याचे खापर प्रशासनावर फोडायचे, की त्याची सर्वस्वी जबाबदारी आपण जनतेने घ्यावी का? याला नेमके जबाबदार कोण? घरात मराठी हवी मात्र बाहेर पडल्यावर हिंदी अथवा इंग्रजीतच बोलावे ही सध्याची मानसिकता. मग आपण प्रशासनाकडे का बोट दाखवायचे. त्यातही आपल्या आजूबाजूला मराठीसाठी व मराठी संस्कृती टिकण्यासाठी झटणारे बरेच असतात त्यातलंच एक मराठी अभ्यास केंद्र. आजच विषय का काढावा लागला कारण मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार, अभिनेत्री आणि मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमीत हे मराठी अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते. यांनी नुकतीच पालिका आयुक्तांची भेट घेतली. कारण होते मराठी शाळा बंद पडण्याच्या विषयावर मुंबई महापालिका आयुक्तांची भूमिका काय? विषयाला चांगली सुरुवात झाली असताना मात्र आयुक्तांनी घुमजाव केले असा या मराठी अभ्यास केंद्राचा आरोप आहे. पालिकेच्या सहा शाळांचा खासगीकरणाचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला. त्यात पालिकेच्या शाळा फक्त सीबीएससी व आयसीएससी का? यामुळे प्रादेशिक माध्यमांच्या शाळा बंद पडतील असा धोकाही व्यक्त करण्यात आला. यावर पालिका आयुक्त गगराणी यांच्या मते या सहा शाळांचा विषय म्हणजे शाळांचे खासगीकरण नाही तर भूखंडाचे खासगीकरण आहे. या चुकीच्या बातम्या असल्याचा त्यांनी उल्लेख केला. त्याबाबतचे सादरीकरण त्यांच्या माध्यमातून केले गेले. पालिकेकडे पडलेले भूखंड चटईक्षेत्र निर्देशानुसार बदल्यात जे उपलब्ध होतात तो हा विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण मराठी शाळांचा आग्रह धरू नये का? असा प्रश्न विचारला तेव्हा गगराणी यांनी हा आग्रह आम्हाला धरायचा नाही असे स्पष्ट म्हटले व हा धोरणात्मक निर्णय असल्याचे सांगितले .गगराणी यांनी मुंबईतील कुठलीही इमारत जीर्ण व धोकादायक झाली असल्यास त्याच काय करायचं हे महापालिकेचे धोरण आहे असे म्हटले. परंतु, शाळांची इमारत वर्षानुवर्षे पूर्ण होत नाही ही वस्तुस्तिथी आयुक्तांना पटली. पाडकाम करणाऱ्या शाळांच्या बाबतीत पालकांना विश्वासात घेतले जात नाही अशी भूमिका मांडली गेली असता गगराणी यांनी ही भूमिका बरोबर असल्याचे मान्य करत पालकांसोबत चर्चा करण्याचे निर्देश दिले. सगळी मुलं विस्थापित झाल्यानंतर महापालिकेने कारवाई करायला सुरुवात केली. दीड वर्षे मुलांची फरपट झाली ही भूमिका स्पष्टपणे मांडली. गगराणी यांनी समन्वयाचा अभाव असल्याबाबत मान्य केले. यानंतर समन्वयाचा अभाव राहणार नाही त्याबाबत काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.मुंबई पब्लिक स्कूलचा जो प्रयोग मुंबई महानगरपालिका करत आहे तो थांबवण्याबाबत महानगरपालिकेने पुढाकार घ्यायला हवा. सीबीएससी किंवा इतर मंडळाच्या ज्या शाळा आहेत त्या मराठी माध्यमाच्या सुरू करण्याबाबत याबाबत भूमिका मांडली व त्या काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा याबाबत चर्चा झाली. मराठी भाषा संवर्धन समिती स्थापन करण्याबाबत भूमिका मांडली गेली. अंगणवाड्यांसोबत जोडून घेऊन मराठी अभ्यास केंद्राला काम करता येईल का, याबाबत विचारणा करण्यात आली व प्रस्ताव ठेवण्यात आला. मुंबई महानगरपालिका मराठीसाठी जे काही काम करते त्याचे सादरीकरण करण्यात आले. त्याचं असं म्हणणं होतं की मुंबई महानगरपालिका मराठी शाळांसाठी काहीच करत नाही, असं जे चित्र उभं केलं आहे ते चुकीचं आहे. पालिका मराठीसाठी काय काय करतं याची जंत्रीच पालिका आयुक्तांनी मांडली. तर मुंबई महानगरपालिका परिपत्रक आदेश मराठी काढतात, विविध दिन साजरे करतात, विविध प्रकाशने काढतात, मराठीचा वापर, अभिनय स्पर्धा घेतात, साहित्य संमेलनाला मदत करतात, कर्मचाऱ्यांच्या विविध परीक्षा घेतात, प्रत्येक खात्यात मराठी भाषा अधिकारी नियुक्त केला आहे, पुस्तके विक्री करतात, नाट्यगृहामध्ये मराठी नाटकांना ५० टक्के सूट देतात, कर्मचाऱ्यांसाठी अभिनय स्पर्धा राबवतात गगराणी यांनी खासगी संस्थांच्या शाळा सुद्धा बंद पडत आहेत असं म्हटलं आहे. त्यांनाही तुम्ही विचारलं पाहिजे असं सुचवलं. मराठी शाळा का बंद पडत आहे.हा सामाजिक प्रश्न आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. फक्त आमच्या शाळेची संख्या कमी होत आहे असे नाही, तर इतर खासगी शाळा सुद्धा बंद पडत आहेत. गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मार्च २०२५ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत महानगरपालिकेच्या मराठी शाळांचा ९५ टक्के इतका निकाल लागला. महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीत ९७ टक्के इतके गुण पटकावले आहेत. यासोबतच गुणवत्ता वाढ, सराव परीक्षा असे उपक्रम राबविण्यात येतात. महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही स्वरूपाचे फी घेतली जात नाही. विद्यार्थ्यांना २७ प्रकारच्या शैक्षणिक वस्तूंचे मोफत वाटप केले जाते. महानगरपालिकेचा विद्यार्थी खासगी शाळेपेक्षाही अधिक गुणसंपन्न आणि त्याच्याकडे विविध शैक्षणिक सुविधा असाव्यात, यासाठी महानगरपालिका प्रयत्न करते. पालिकेने फाऊंडेशनल लिटरसी व न्यूमरसी निपूण भारतअंतर्गत महानगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळे तिसऱ्या इयत्तेतील प्रत्येक माध्यमाचा विद्यार्थी उत्तम प्रकारे वाचू शकतो. तसेच, त्या-त्या स्तरावरील गणिताचे ज्ञानही त्याला उत्तमरीत्या अवगत होत आहे. यासाठी महानगरपालिकेने विशेष प्रयत्न केले असून याच चांगले परिणाम दिसून येत आहे. मुंबईतील मराठी शाळा आणि शिक्षण हा सामजिक आणि शैक्षणिक मुद्दा आहे. पालिका प्रशासनाकडून कोणत्याही माध्यमांच्या शाळांचे खासगीकरण करण्यात आले नाही, असा दावा केला. तरीही मुंबई उपनगरातील मराठी शाळा बंद पडत आहेत ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. मराठी शाळा टिकण्यासाठी आता हवी फक्त पालकांची इच्छाशक्ती व मानसिकतेत होणारा बदल आता मराठी शाळा टिकवू शकतात अन्यथा आज पालिका आयुक्तांनी मराठी शाळेबाबत व सर्वस्वी मराठीबाबत आपले भूमिका मांडली. येणाऱ्या काळात ती मांडण्याची संधी मुंबईकरांना मिळणार नाही हे निश्चित.
Lifestyle: शॅम्पू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केस चिपचिपे होतात? या चुका कारणीभूत असू शकतात
Lifestyle: शॅम्पू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केस ऑयली, चिकट आणि मळलेले दिसू लागतात का? असं होत असेल, तर यामागे फक्त हार्मोन्स नाहीत, तर आपल्या काही रोजच्या सवयी आणि चुकाही कारणीभूत असू शकतात.
Gautam Adani Meets Sharad Pawar : गौतम अदानी आणि पवार कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे, कौटुंबिक संबंध
मोदी सरकारचा अल्पसंख्याक कल्याणावर भर
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाच्या अर्थसंकल्प २०२६-२७ संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात अल्पसंख्याक कार्य मंत्रालयासाठी ₹३,४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम मागील आर्थिक वर्षातील ३ हजार३९५ कोटींच्या तुलनेत ४.३८ कोटींनी अधिक आहे. या तरतुदीतून सरकारचा संदेश स्पष्ट आहे की अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला सातत्याने प्राधान्य दिले जाणार आहे.अल्पसंख्याक मंत्रालयाची तरतूद२०२६-२७ साठी तरतूद : ३ हजार ४०० कोटी२०२५-२६ मध्ये : ३ हजार३९५ कोटीकेंद्रीय योजना आणि कार्यक्रमांना प्राधान्यअल्पसंख्याक मंत्रालयाच्या एकूण बजेटपैकी केंद्रीय क्षेत्र योजनांसाठी १८४.४५ कोटी (२०२५ मध्ये १८०.०७ कोटी होते), मुख्य योजनांसाठी सुमारे २ हजार कोटी आणि प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमासाठी १ हजार १९७ कोटी रुपयांची तरतूद असेल. या निधीतून शिक्षण, आरोग्य, निवास आणि सामुदायिक पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे.शिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर विशेष लक्षप्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम अंतर्गत शाळा, वसतिगृहे, आरोग्य केंद्रे आणि सामुदायिक इमारतींचा विकास आणि दुर्बल व मागास घटकांना थेट लाभ मिळेल. तर, महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमधून नेतृत्व क्षमता विकास, आर्थिक साक्षरता आणि आत्मविश्वास वाढीसाठी प्रशिक्षण...या योजनांचा लाभ मुस्लिम समाजातील महिलांनाही मोठ्या प्रमाणात मिळत असून, महिलांचे आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू आहे.
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. विकसित देशाच्या दृष्टीने त्यात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा आहेत. देशातील अर्थव्यवस्थेचा कणा ज्याला म्हटले जाते त्या एमएसएमई क्षेत्रासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रावधान आहेत. हा अर्थसंकल्प एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प. ट्रम्प यांच्या टॅरिफच्या सावटाखाली आणि निर्यातीच्या बाबतीत काहीशी सुस्ती आली असतानाच्या काळात सादर केला गेला.जागतिक अस्थिरता आणि व्यापारी तणाव यांच्या पार्श्वभूमीवर सादर केलेला अर्थसंकल्प म्हणून या अर्थसंकल्पाकडे पाहिले गेले. तरीही मोदी सरकारने आपली देशातील लोकांप्रती असलेली वचनबद्धता आणि 'सबका साथ सबका विकास' हे घोषवाक्य सोडलेले नाही हे लक्षात येते. निर्मला सीतारामन यांनी मजबूत आणि विकसित रोड मॅप तयार केला. सेमी कंडक्टर मिशन २.० लागू करण्याची घोषणा केली. कर स्लॅबमध्ये नवीन काहीही बदल करण्यात आला नाही. व्यक्तिगत आयातीवर टॅरिफ घटवून तो १० टक्के केला. यापूर्वी तो २० टक्के होता. सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी सात हाय स्पीड रेल्वे कॉरिडोरची घोषणा केली. देशातील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत आणि विकसित करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते. अर्थसंकल्पात अनेक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आणि त्यामुळे पायाभूत सुविधा, उद्योग आणि रोजगारांना चालना मिळेल असे मानण्यात येते. पायाभूत सुविधा वाढवण्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असून २ टियर आणि ३ टियर म्हणजे ५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये या सुविधा वाढवल्या जातील. केवळ मुंबई, दिल्ली किंवा महानगरांमध्ये सुविधा वाढवून खरा विकास होणार नाही. सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे ते वाहतूक व्यवस्थेत मूलभूत सुधारणा घडवण्याचे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत २० नवे राष्ट्रीय जलमार्ग सुरू करण्याची योजना सरकारची आहे.सरकार कोणत्याच घटकाकडे दुर्लक्ष करत नाही आणि यासाठीच सरकारने आपल्या अर्थसंकल्पात नारळ ते चंदनासारख्या उच्च मूल्याच्या पिकाचे उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त करून त्यांचे शेतीचे उत्पन्न वाढवण्याचे ठरवले. २०२६-२७च्या अर्थसंकल्पात कृषीला प्राधान्य देण्याचे सरकार विसरले नाही. त्यामुळे नारळ, काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. याचा अर्थ काजूला आता ब्रँड बनवणार. सरकार मत्स्यशेतीला चालना देण्यासाठी ५०० अमृत सरोवरे विकसित करणार असून हा कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा आहे. पशुपालन क्षेत्रात उद्यमशीलतेच्या संधी वाढवण्यासाठी रोजगार अवसर वाढवणार ही अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा. अर्थमंत्र्यानी आणखी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला तो म्हणजे आता उत्पन्न लपवले नाही, तर जेल होणार नाही, तर फक्त दंड होईल. शिवाय कर भरणा करण्यासाठी आता अधिक वेळ मिळणार आहे. जास्तीत जास्त लोक टॅक्सच्या जाळ्याखाली आणून त्यांच्याकडून कर वसूल करण्यासाठी हा उपाय योजण्यात आला. त्याशिवाय काही घोषणा मुलींसाठी आहेत. त्यातील एक म्हणजे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एक वसतिगृहाची योजना याचा समावेश आहे. शहरात बाहेरगावाहून आलेल्या मुलींचे राहण्याचे हाल होतात आणि त्यांना संरक्षण नसते. त्यामुळे या योजनेचे महत्त्व त्या मुलींना जास्त आहे. हायस्पीड रेल कोरिडोरमुळे देशाच्या जीडीपीत मोठी वाढ होईल असा अंदाज आहे. त्यामुळे ही घोषणा महत्त्वाची आहे. वैद्यकीयबाबतही अर्थमंत्र्यांनी काही घोषणा केल्या आणि त्यात कर्करोगाशी संबंधित सात औषधांना सवलती दिल्या. हा कर्करोग रुग्णांना फार मोठा दिलासा आहे. आयुर्वेदाकडे सरकारने दुर्लक्ष केलेले नाही.अर्थमंत्र्यांनी सांगितले की, योग आणि आयुर्वेदाच्या प्राचीन पद्धतींवर भर दिला जाईल आणि तीन नवीन अखिल भारतीय स्तरावर आयुर्वेद संस्था स्थापन केल्या जातील. हा अर्थसंकल्प विकसित भारत हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून केलेला आहे. त्यामुळे २०४७ पर्यंत परदेशी कंपन्या जर डेटा सेंटर बांधतील, तर त्यांना सवलती मिळतील असे निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले. सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे राज्यांना केंद्रीय करांतून किती वाटा मिळणार. अर्थमंत्र्यांनी जाहीर केले, की २०२६-२७ मध्ये राज्यांना १.४ लाख कोटी रुपये देणार. यातून ग्रामीण आणि शहरी भागांचा विकास साधला जाईल. त्यामुळे राजकारण करण्यास फारसा वाव राहणार नाही. सरकारने स्वावलंबी भारतासाठी २००० कोटी रुपयांची घोषणा केली. लखपतीदीदी ही योजना अत्यंत यशस्वी झाली. त्या धर्तीवर अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. देशात तीन नवीन अखिल भारतीय विज्ञान संस्था बांधण्याची घोषणा केली आहे. तर वस्त्र उद्योगासाठी मेगा टेक्स्टाईल पार्क उभारण्याची सरकारची योजना आहे. सरकार महात्मा गांधी ग्राम स्वराज्य योजनेची घोषणाही त्यानी केली. पण त्यातील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे लघू आणि मध्यम उद्योगांसाठी १० हजार कोटी रुपये देणार ही आहे. त्यामुळे लघू आणि मध्यम उद्योगांना चालना मिळणार. सीतारामन यांच्या अर्थसंकल्पमामुळे देशाच्या कृषी क्षेत्रात एआय टूलचे वारे वाहू लागले आहे हे स्पष्ट झाले. भारत एआय विस्तार टूल सुरू करण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा याचेच द्योतक आहे.या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी देशाच्या नागरिकांसाठी एक सोपा संदेश दिला. त्यांनी लोकांचे राहणीमान सुधारले आहे आणि आयटी रिटर्न भरणे सोपे झाले. परदेशी सुट्टीवर जाणाऱ्यांना अर्थमंत्र्यांनी टीसीएस कमी करून दिलासा दिला. तर त्याचवेळेला आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरकारने बायो फार्मा आणि सेमीकंडक्टर आणि इतर अनेक योजना आणल्या आहेत. सर्वात लाभ एमएसएमई क्षेत्राचा झाला आणि लघू आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार इक्विटी सपोर्ट आणि क्रेडिट गॅरंटी देत आहे. यामुळे एमएसएम ई क्षेत्र यापुढे फायद्याचे म्हणून पाहिले जाईल. एकूण हा अर्थसंकल्प विकासाभिमुख असाच आहे आणि विरोधकांनी कितीही म्हटले, कितीही टीका केली तरीही ती गैरलागू आहे हे निसंशय. काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि जयराम रमेश यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली असली तरी त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य राहील. एक कबूल करणे भाग आहे ते म्हणजे या अर्थसंकल्पात स्वस्त घरे मिळण्यासाठी काहीही उपाय नाही. क्रेडाईनेही तशी टीका केली ती रास्त आहे. पण एकूण सरकारने लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून केला आहे असे म्हणता येईल.
सोलापूर: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आणि मोहिते पाटील गटातील वाद आता जाहीर सभांच्या माध्यमातून उफाळून येऊ लागला आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे झालेल्या जाहीर सभेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं आहे.सभेत बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडचणीच्या काळात मोहिते पाटील यांना छत दिलं. संपत चाललेल्या पश्चिम महाराष्ट्रातील एका घराण्याला ताकद दिली. आणि आज तेच मोहिते पाटील त्यांच्या विरोधात बोलत आहेत, नाचत आहेत, अशा शब्दांत त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसांनी छत काढले तर कारखान्याच्या गव्हाण बंद पडतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.काय म्हणाले गोरे?हत्ती बाजारातून जाताना कुत्री भुंकत असतात. हत्ती त्याकडे लक्ष देत नाही. पण हत्तीने एकदा सोंड फिरवली, तर काय होईल याचा विचार करा, असा सूचक इशारा जयकुमार गोरे यांनी दिला.'अनेकांचे संसार देशोधडीला लावले, बँका बुडवल्या'गोरे यांनी म्हटले की, अनेकांचे संसार देशोधडीला लावले, बँका बुडवल्या, इतकी पापं केली आहेत. पण तुमच्यावर टीका करून आम्हाला निवडणूक जिंकायची नाही. आमच्याकडे विकासकामांचा अजेंडा आहे. पण तुम्ही मर्यादेत रहा.दरम्यान सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील आणि भाजप यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विविध सभांमधून भाजपचा सुपडा साफ करू अशी भाषा वापरल्याने राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या वक्तव्यांवर जयकुमार गोरे यांनी कासेगावच्या सभेत प्रत्युत्तर दिले आहे.
BMC Election 2026: भाजप - शिवसेनेची स्वतंत्र गटनोंदणी होणार
मुंबई: आज म्हणजेच सोमवार २ फेब्रुवारी रोजी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात एकत्र येणार आहेत. तेथून सर्व नगरसेवक गटनोंदणीसाठी कोकण भवनाकडे रवाना होतील. यावेळी भाजप - शिवसेनेची स्वतंत्र गटनोंदणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.मुंबई महापालिकेच्या महापौरपदाबाबतची उत्सुकात शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेना गटाकडून युवा सेनेचे माजी नेते आणि महापालिकेच्या राजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या अमेय घोले यांची मुंबई महानगरपालिकेतील गटनेते पदासाठी निवड करण्यात आली आहे. अमेय घोले यांच्या निवडीमुळे पालिकेत प्रशासनावर पकड मिळवणे शिवसेना शिंदे गटाला सोपे जाईल, असे मानले जात आहे.८९ नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी :सोमवार २ फेब्रुवारी रोजी कोकण भवनात भाजपच्या एकूण ८९ नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी होणार आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची एकत्र गटनोंदणी केली जाणार आहे. त्यामुळे महायुतीच्या नगरसेवकांची एकूण संख्या १२१ वर पोहोचली आहे.
राजकारणात ‘बिनविरोध’चा नवा पॅटर्न
आठ वर्षांनंतर होणाऱ्या या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कोकणात जिल्हा परिषद, पंचायत समितीत आपलीच सत्ता यायला हवी यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती; परंतु तसे काहीच घडलं नाही. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप मजबुतीने निवडणुकीत आहेत. महाराष्ट्राचे मत्स्य उद्योग व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बिनविरोधाचा राबविलेला पॅटर्न महाविकास आघाडीला डोकेदुखी ठरला. कोकणात निवडणूक निकालापूर्वीच महायुतीकडे सत्तेच्या चाव्या येण्याचा मार्ग अधिक सुकर झाला.जकारणातील बदलाचे वारे महाराष्ट्रात जसे वाहत आहेत तसेच ते कोकणातही आपोआपच येतात. सध्या राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या राज्यातील १२ जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील १२ जिल्हा परिषद, पंचायत समितीत कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा समावेश आहे. महिन्याभरापूर्वी मुंबईसह राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध नगरसेवक निवडीचा प्रारंभ झाला. एक-दोन नव्हे तर तब्बल पाच-पन्नास नगरसेवक महानगरपालिकेत निवडणुकीला सामोरे जात निवडले गेले. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असली तरीही मुंबई महानगराचे कोकणशी एक वेगळेच नाते आहे. त्यामुळे मुंबईत घडतंय म्हटल्यावर बिनविरोध निवडीचा हा पॅटर्न सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या बिनविरोध सदस्य निवडले गेले आहेत. कोकणात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी सर्वसाधारणपणे निवडणुकीतील लढत अपेक्षित होती. मात्र अशी काही लढत कुठेच दिसली नाही.कोकणातील राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, आरपीआय यातल्या कुठल्याच पक्षाकडे राजकारणाची योग्य दिशा नाही. संघटन नाही. लढण्यासाठी नेतृत्व नाही की कार्यकर्त्यांना लढ म्हणायला पाठबळ नाही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारच नाही. जर काही ठरावीक जागांवर उमेदवार उभे झाले असले तरीही कोणतही पाठबळ नसल्याने त्या उमेदवारांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतून सपशेल माघार घेतल्याचं चित्र कोकणात काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. कोणतीही निवडणुक लढविण्यासाठी कार्यकर्त्याला पक्षाचं पाठबळ लागतं. लढ म्हणताना सर्वच बाबतीत त्या-त्या पक्षामध्ये नेतृत्व करणाऱ्याने निवडणुकीत उमेदवारांच्या सोबत असल्याची आवश्यकता असते. परंतु उबाठाकडून उमेदवारी अर्ज भर म्हणून सांगणारे नेते निवडणुकीत मात्र उमेदवारांना मार्गदर्शन करायला फिरकलेही नाहीत. साहजिकच सोबत कोण आहेत हा प्रश्न घेऊनच उमेदवार फिरताना दिसत होते. त्यामुळेच काही ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांनीच माघार घेतल्याचे चित्र कोकणात तरी काही ठिकाणी दिसत आहे.कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे नेतृत्व भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जात आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातही खा. नारायण राणे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली या निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्वायत्त संस्थांमध्ये गेली आठ वर्षे प्रशासकीय कारभार सुरू आहे. आठ वर्षांनंतर होणाऱ्या या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कोकणात जिल्हा परिषद, पंचायत समितीत आपलीच सत्ता यायला हवी यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती; परंतु तसे काहीच घडलेलं नाही आणि दिसलही नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय महायुती समोर महाविकास आघाडी संघटित शक्ती उभी करून लढताना कुठे दिसली नाही. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष मजबुतीने निवडणुकीत आहे. रायगड जिल्ह्यातही निवडणुकीत शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस बऱ्याच ठिकाणी जरी आमने-सामने निवडणूक लढवत असली तरीही महायुतीचा एक वेगळाच फॉर्म्युला इथेही समोर येत आहे. राज्यातील राजकारण आणि त्यात सतत घडत जाणारा बदल हा होतच असतो. तसा तो बदल निवडणुकांमध्येही होत गेलेला दिसेल. पूर्वीची निवडणुकीतील प्रचार पद्धती आणि आजची बदललेली प्रचार पद्धती यात कमालीचा बदल अगदी झपाट्याने होत गेला. निवडणुकीत पूर्वीच्याकाळी जाहीर सभांना फार महत्त्व असायचे. सर्वसामान्यजनही या जाहीर सभेला त्या-त्या पक्षातील नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक असायचे. निवडणुकीतील जाहीरनाम्यातील जे सांगितले जायचे त्यावर जनतेचाही विश्वास असायचा. कोणत्याही पक्षाने जाहीरनाम्यात जे सांगितलंय ते करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले जातील असे जनतेला वाटायचे; परंतु गेल्याकाही वर्षांतील राजकीय, सामाजिक बदलांमध्ये जाहीरनाम्याच रूपांतर जरी वचननाम्यात झाला असला आणि शब्द जरी बदलले असले तरीही वचननाम्यातील वचन हे मोडण्यासाठीच आहे, असा सर्वसामान्यांचा ठाम विश्वासच बळावत चालला आहे. त्यामुळे बदलते राजकारण आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये होत जाणारे झपाटणारे बदल या ससर्वाचा परिपाक लोकांनी हे बदलही स्वीकारले आहेत. कोकणात जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य निवडीतील बिनविरोध निवडीचा फॉर्म्युला महाराष्ट्राचे मत्स्य उद्योग व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी राबविला आहे. नितेश राणे यांनी बिनविरोधाचा हा राबविलेला पॅटर्न महाविकास आघाडीला डोकेदुखी ठरला आहे. कोकणात निवडणूक निकालापूर्वीच महायुतीकडे सत्तेच्या चाव्या येण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
Ali Daoud Amich: लेबनॉनमध्ये इस्रायलच्या मोठ्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा ‘मास्टरमाइंड’ठार
Ali Daoud Amich: इस्रायली लष्कराने (आयडीएफ) केलेल्या हल्ल्यात हिज्बुल्लाह दहशतवादी अली दाऊद अमिचला ठार मारल्याचा दावा केला आहे. अली दाऊद अमिचला संपवणे हे इस्रायलसाठी एक मोठे यश मानले जाते.
Sanjay Raut : आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर स्वरूपाचे - संजय राऊत
Moringa Chutney Recipe: पौष्टिक मोरिंगा चटणी एकदा बनवा आणि महिनाभर वापरा
Moringa Chutney Recipe: मोरिंगा म्हणजेच शेवग्याच्या शेंगा पोषणमूल्यांचा खजिना आहेत, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण यासोबतच शेवग्याची पानं देखील आरोग्यासाठी तितकीच फायदेशीर ठरतात. ही पानं रोजच्या आहारात संतुलित पद्धतीने समाविष्ट करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मोरिंगा चटणी.
स्थानिक पर्यटकांना जागतिक दर्जाचा अनुभव देणार
देशातील २० लोकप्रिय पर्यटन स्थळांची निवडनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२६ सादर करताना पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा केली. देशातील २० अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळांची निवड केली जाईल. या स्थळांवरील १० हजार मार्गदर्शकांना आधुनिक तंत्रज्ञान, परकीय भाषा आणि आदरातिथ्य विषयांचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. देशातील युवकांना संधी, रोजगारनिर्मिती आणि भारताची जागतिक ओळख अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या दोन्ही क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. परदेशी आणि स्थानिक पर्यटकांना जागतिक दर्जाचा अनुभव देणे आणि स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण करणे, यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. पर्यटन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी या संस्थेची स्थापना करण्यात येणार असून, यामुळे पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रातील कौशल्य विकासाला चालना मिळेल. देशातील २० लोकप्रिय पर्यटन स्थळांवर १० हजार पर्यटक मार्गदर्शकांचे कौशल्य वाढवण्याची योजना राबवली जाणार आहे. यासोबतच पर्यटनाशी संबंधित माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय डेस्टिनेशन डिजिटल नॉलेज ग्रिड स्थापन करण्यात येईल. भारताला जागतिक ट्रेकिंग आणि हायकिंगचे केंद्र बनवण्याच्या उद्देशाने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि अराकू व्हॅली येथे पर्वतीय ट्रेल्स विकसित केले जाणार आहेत. तसेच पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी ओडिशा, कर्नाटक आणि केरळमध्ये कासवांसाठी विशेष ट्रेल्स उभारण्यात येणार आहेत.सांस्कृतिक वारशाचे जतनदेशाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी धोलावीरा सारख्या १५ पुरातत्वीय स्थळांना सांस्कृतिक स्थळे म्हणून विकसित केले जाईल. यामुळे देशांतर्गत आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यास मदत होणार आहे.
भारतातील प्रमुख नद्या होणार महामार्ग!
२० नव्या जलमार्गांची घोषणानवी दिल्ली : यंदाच्या अर्थसंकल्पात महामार्ग, हायस्पीड रेल्वेसह अनेक मोठ्या पायाभूत सेवासुविधांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. त्यात २० नव्या जलमार्गांची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत भारतातील नद्या महामार्ग होणार आहेत. दळवळणाचा नवा स्त्रोत निर्माण होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान घोषणा केली की पाच वर्षांत २० नवीन जलमार्ग सुरू केले जातील. वाराणसी आणि पाटणा येथे जहाज दुरुस्ती सुविधा स्थापन केल्या जातील. सीप्लेन व्हीजीएफ योजना सुरू केली जाईल. अंतर्देशीय जलमार्गांना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. गंगा नदीतून जाणारी जहाजे आणि क्रूझ जहाजांना देखभालीसाठी आता इतर राज्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. अर्थमंत्र्यांनी घोषणा केली आहे की वाराणसी आणि पाटणा येथे आधुनिक जहाज दुरुस्ती केंद्रे स्थापन केली जातील. यामुळे केवळ पर्यटन आणि मालवाहतुकीला चालना मिळणार नाही तर स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील. या उपक्रमामुळे केवळ जलवाहतुकीला सक्षमता मिळणार नाही तर स्थानिक अर्थव्यवस्था देखील बळकट होईल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकल्पाचे उद्दिष्ट अंतर्देशीय जलमार्गांच्या विकासाला चालना देणे आहे.
BMC Election 2026 : शिंदेंचा मास्टर स्ट्रोक; 'या'विश्वासू नगरसेवकाची गटनेते पदी निवड
मुंबई: शिंदेंच्या शिवसेना गटाकडून युवा सेनेचे माजी नेते आणि महापालिकेच्या राजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या अमेय घोले यांची मुंबई महानगरपालिकेतील गटनेते पदासाठी निवड करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुंबईतील २९ नगरसेवकांची आज गट नोंदणी केली जाणार आहे.अमेय घोले यांच्या निवडीमुळे पालिकेत प्रशासनावर पकड मिळवणे शिवसेना शिंदे गटाला सोपे जाईल, असे मानले जात आहे. या घडामोडींमुळे मुंबई महानगरपालिकेत आता शिवसेना शिंदे गट हा भाजपसोबत अत्यंत प्रबळ स्थितीत आला आहे.महापालिकेत शिंदे सेनेची ताकद वाढली:मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक आता जवळ येऊन ठेपल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय मोठी मास्टर खेळी आहे. महापालिकेत आपला प्रभाव वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना खिंडार पाडले. एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या एकूण ४ नगरसेवकांना आपल्या गटात खेचण्यात यश मिळवले आहे. या राजकीय भूकंपामुळे महापालिकेत शिंदे सेनेची ताकद वाढली असून महायुतीचा सत्तेचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.शिवसेना शिंदे गटाकडे २९ नगरसेवक होते मात्र आता ही संख्या ३३ वर पोहोचली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांचे एकत्रित संख्याबळ आता १२२ इतके झाले असून ते बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११४ च्या आकड्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.
अर्थसंकल्पात संरक्षण, पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रावर भर
नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सादर झालेल्या पहिल्या केंद्रीय अर्थसंकल्पात जागतिक भू-राजकीय परिस्थिती व आव्हानांचा उल्लेख करत देशाचा संरक्षण अर्थसंकल्प ६.८१ लाख कोटी रुपयांवरून वाढवून ७.८५ लाख कोटी रुपये करण्यात आला आहे. यामध्ये १५.२ टक्क्यांची वाढ झाली असून, शस्त्रास्त्र खरेदी व सैन्य आधुनिकीकरणासाठीचा भांडवली खर्च १.८० लाख कोटींवरून २.१९ लाख कोटी रुपये करण्यात आला आहे, म्हणजेच २२ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या निर्मितीसाठी आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर मूलभूत सीमाशुल्क माफ करण्याचाही प्रस्ताव अर्थसंकल्पात आहे.ऊर्जा क्षेत्रात, लिथियम-आयन बॅटरी व बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिमसाठी लागणाऱ्या भांडवली वस्तूंवरील सीमाशुल्क सवलत वाढवण्यात आली आहे. सोलर ग्लास निर्मितीसाठी लागणाऱ्या सोडियम अँटिमोनेटच्या आयातीवरही सीमाशुल्कातून सूट देण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये सार्वजनिक भांडवली खर्च १२.२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.भारताला वैद्यकीय पर्यटनाचे केंद्र बनवण्यासाठी देशभरात ५ प्रादेशिक हब उभारण्याची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. एमएसएमई क्षेत्रासाठी १० हजार कोटी रुपयांचा ‘एमएसएमई ग्रोथ फंड’ स्थापन करण्याचा प्रस्ताव असून, रेअर अर्थ खनिजांसाठी ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश व तमिळनाडूमध्ये विशेष कॉरिडॉर विकसित करण्यात येणार आहेत.पायाभूत सुविधांवर भर देत ५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या टियर-२ व टियर-३ शहरांमध्ये विकासकामे सुरू ठेवण्याचे जाहीर करण्यात आले. वस्त्रोद्योगासाठी मेगा टेक्सटाइल पार्क, तसेच खादी व हातमाग उद्योगासाठी ‘महात्मा गांधी ग्राम स्वराज’ उपक्रम राबवण्यात येणार आहे.
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्याप्रमाणेच कामाचा धडाका सुरू केला आहे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार या आज म्हणजेच सोमवार २ फेब्रुवारी रोजी कराड आणि फलटणच्या दाैऱ्यावर आहेत. सुनेत्रा पवार आज सकाळीच साताऱ्याकडे रवाना झाल्या. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांचा हा पहिलाच शासकीय दौरा आहे.कराड येथे सुनेत्रा पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर फलटण तालुक्यातील तरडगाव येथे जात अजित पवारांचे सुरक्षारक्षक स्वर्गीय विदीप जाधव यांच्या घरी त्या सांत्वनपर भेट देतील. त्यानंतर त्या बारामतीकडे रवाना होतील.सुनेत्रा पवारांकडे तीन खात्यांची धुराराज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते. शपथविधीनंतर झालेल्या खातेवाटपात सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास या तीन खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजित दादांकडे असलेले महत्त्वाचे 'अर्थ व नियोजन' खाते मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे. या निर्णयामुळे राज्याचा २०२६-२७ चा आगामी अर्थसंकल्प मांडण्याचा मान फडणवीसांना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय करातून महाराष्ट्राच्या वाट्याला ९८ हजार कोटी रुपये
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा ९८ हजार ३०६ कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, १२ हजार ३५५ कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे एक लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजनाशहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात १२ लाख कोटींची गुंतवणूक सरकार करणार आहे, पूर्वी जी केवळ १ लाख कोटी असायची. ५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील विकासाचा विचार करुन शहरीकरणाच्या एकात्मिक विचार करण्यात आला आहे. यातून विविध क्षेत्रांना दिशा, गती आणि निधी प्राप्त होणार आहे. याचा मोठा लाभ महाराष्ट्राला होणार आहे.शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणार्या मुलींसाठी वसतीगृहांची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल. मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. पुणे-हैदराबाद कॉरिडॉरचा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला मोठा लाभ होईल. ग्रोथहबसाठी ५ हजार कोटी प्रत्येकी ५ वर्षांत प्राप्त होणार आहेत, याचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथहबला होणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी काय?1 महाराष्ट्र ग्रामीण रस्ते प्रकल्प : ३७८.३८ कोटी2 महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस प्रकल्प : १६७.२८ कोटी3 सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : २८३.७७ कोटी4 महाराष्ट्र टर्शरी केअर आणि वैद्यकीय शिक्षण विकास कार्यक्रम : ३८५.७८ कोटी5 उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण : २०७.१० कोटी6 शेती आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प : ६४६.२४ कोटी7 मानवी विकासासाठी कौशल्य आणि अप्लाईड नॉलेज प्रकल्प : ३१३.६५ कोटी8 जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमतावृद्धीसाठी : २४०.९० कोटी9 मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉर : ६१०३ कोटी10 मुंबई मेट्रो : १७०२ कोटी11 एमयूटीपी ३ : ४६२ कोटी12 एमएमआरमध्ये ग्रीन मोबिलिटी : १५५.३२ कोटी13 समृद्धी महामार्गावर आयटीएस : ६८०.७९ कोटी14 पुणे मेट्रो : ५१७.७४ कोटी
'कणखर नेत्यामागे दडलेला हळवा माणूस अनुभवला', लांडगेनंतर आणखी एक नेता दादांसाठी भावूक
मुंबई: अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघातानंतर अवघा महाराष्ट्र हादरुन गेला. अजित पवारांच्या जाण्यामुळे फक्त त्यांच्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दु:ख झालं नाही तर विरोधकांनाही झालं. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत अजित पवार विरुद्ध महेश लांडगे वाद टोकाला गेला होता. मात्र अजित पवारांच्या मृत्यूनंतर महेश लांडगेंनी भावूक होत दादांची माफी मागितली. आता लांडगे यांच्यानंतर प्रशांत जगताप भावुक झाले आहेत.प्रशांत जगताप हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. तेव्हा शेवटच्या क्षणी प्रशांत यांनी अजित पवारांची साथ सोडली. विचारांशी तडजोड करणार नाही. भाजपासोबत जाणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे त्यांनी शरद पवारांसोबत राहणे पसंत केले. पण अलीकडेच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत दोन्ही गट एकत्र येत असल्यामुळे प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते निवडूनही आले.दरम्यान आता बारामतीत जाऊन प्रशांत जगताप यांनी अजित पवारांवर अत्यंविधी झालेल्या ठिकाणी भेट दिली. यावेळी जगतापांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर भावूक होत अजित दादांच्या आठवणी सांगितल्या. ज्यावेळी प्रशांत जगताप यांना पॅरालाईज झाला होता, त्यावेळी अजित पवारांनी त्यांची मायेने विचारपूस केली होती. तसेच आपल्या डॉक्टरला कॉल करून योग्य ते उपचार करण्याचे आदेश दिले होते, अशी आठवण प्रशांत जगतापांनी सांगितली.जगतापांनी काय सांगितले?अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना प्रशांत जगताप म्हणाले, जून 2022 मध्ये माझा चेहरा पॅरालाईज झाला होता. तेव्हा जवळपास 15 दिवस मी ही गोष्ट जगापासून लपवून ठेवली. 15 दिवस मी चेहऱ्याला मास्क आणि गॉगल लावूनच होतो. अखेर मोठ्या धैर्याने मी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून ही बाब जगासमोर मांडली. सायंकाळी 7 वाजता मी हे फेसबूक लाईव्ह केलं आणि रात्री साडेअकरा वाजता मला अजितदादांचा देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून कॉल आला. प्रशांत... हे तू चुकीचं केलंस, तू माझ्यापासून हे का लपवलं? असं म्हणून दादांनी मला सुनावलं. त्यांच्या या रागवण्यामागील आपुलकीची आणि आपलेपणाची भावना तेव्हाही माझ्या मनाला स्पर्श करून गेली. काळजी घे आणि उद्याच सकाळी मुंबईला ये असा दादांनी दिलेला आदेश दिला. तो आदेश मी पाळला.पुढे बोलताना, दुसऱ्या दिवशी सकाळीच मी मुंबईत अजितदादांच्या भेटीसाठी पोहोचलो. तेव्हा आतमध्ये अजितदादा आणि एकनाथ खडसे यांची बैठक चालू होती. त्यामुळे मी बाहेरच बसलो, हे दादांना कळताच दादांनी मला आत बोलावून घेतले. त्यावेळी सुद्धा माझ्या चेहऱ्यावर मास्क होता. प्रशांत मास्क काढ, मला बघू दे चेहरा असं दादांनी म्हणतच मी मास्क काढला. माझा चेहरा पाहताच दादांनी अतिशय काळजीच्या स्वरात मला रागवण्यास सुरुवात केली, तू पक्षाचा शहराध्यक्ष जरी असलास तरी माझा जवळचा माणूस आहेस, स्वतःची तब्येत बरी नसताना तू मला काहीही न सांगता पक्षाचं काम करतोय, बैठका घेतोय हे काही बरोबर नाही असं दादांनी नाराजीच्या स्वरात सांगितलं. पुढच्याच मिनिटाला दादांनी त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरून त्यांच्या फॅमिली डॉक्टरला फोन केला, प्रशांत माझा घरातला माणूस आहे, त्याच्यावर सर्वोत्तम औषधोपचार करा पण काहीही करून त्याला बर करा असं दादांनी फोनवरुन डॉक्टरांना सांगितलं. यानंतर तातडीने मला डॉक्टरांकडे जायला सांगून स्वतःच्या PA ना माझ्यासोबत पाठवलं. माझ्या कणखर नेत्याच्या आत दडलेला एक हळवा माणूस त्यावेळी मी अनुभवला, अशा शब्दांत प्रशांत जगतापांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Tamil Selvan News : सायन कोळीवाडा ते माटुंगा येथील ऐतिहासिक मुरुगन मंदिरापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन
Tamanna Bhatia: तमन्ना भाटियाचा मुंबईत ज्वेलरी स्टोअरचा भव्य शुभारंभ
Tamanna Bhatia: लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने अभिनयासोबतच आता लक्झरी ज्वेलरी व्यवसायातही पाऊल टाकलं आहे. शनिवारी तिने मुंबईतील जुहू परिसरात ‘तमन्ना स्टोअर’ या आपल्या फाइन ज्वेलरी बुटीकचं अधिकृत उद्घाटन केलं.
Stock market: शेअर बाजाराचा मूड बदलला… ; बजेटच्या दिवशी झालेल्या घसरणीनंतर अचानक तेजी
Stock market: मंदावलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टी अर्थसंकल्पीय धक्क्यातून सोमवारी शेअर बाजार सावरला आणि अचानक तेजीत आले.
देशात लवकरच ७ हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर
नवी दिल्ली : देशात लवकरच ७ नवे हाय-स्पीड रेल कॉरिडोर उभारले जाणार आहेत, अशी माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वेविषयक महत्त्वाची घोषणा केली. महाराष्ट्रासाठी देखील मोठी तरतूद करण्यात आली असून मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी ४ हजार ३ कोटी रुपये, मुंबई मेट्रोसाठी १६७३ कोटी ४१ लाख रुपये, पुणे मेट्रोसाठी ८३७ कोटी रुपये, एमयूटीपी-३ प्रकल्पासाठी १४६५ कोटी ३३ लाख रुपये निधी मिळाला आहे. या हाय-स्पीड रेल प्रकल्पांमुळे देशातील आर्थिक, औद्योगिक, आयटी आणि धार्मिक केंद्रांमधील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. अर्थमंत्र्यांच्या मते, हे हाय-स्पीड रेल कॉरिडोर स्वतंत्रपणे विकसित केले जाणार असून त्यामागचा उद्देश म्हणजे रस्ते आणि पारंपरिक रेल्वे नेटवर्कवरील वाढता ताण कमी करणे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून व्यापार, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. आजच्या अर्थसंकल्पातून रेल्वेसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून, रेल्वेच्या सक्षमीकरणासाठी २ लाख ५५ हजार ४४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये १.१६ लाख कोटी रुपये सुरक्षा जाळ्याला बळकटी देण्यासाठी, २०० वंदे भारत ट्रेन, १०० अमृत भारत ट्रेन, ५० नमो भारत ट्रेन, १३०० नवीन रेल्वे स्टेशन, १ हजार अंडर पास आणि उड्डाणपुल बांधणे, ७ हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधणे यांचा समावेश आहे. पर्यावरणपूरक प्रवासी व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी ७ हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील. यात मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बेंगळुरू,हैदराबाद ते चेन्नई,चेन्नई ते बंगळूरु, दिल्ली ते वाराणसी, वाराणसी ते सिलिगुडी असे हे कॉरिडॉर असतील. अहमदाबाद-मुंबई कॉरिडॉरच्या पलीकडे हायस्पीड कॉरिडॉर बांधण्याची ही योजना आहे. याशिवाय सध्याचे कॉरिडॉर हायस्पीडमध्ये रूपांतरित करण्याची योजना आहे, जेणेकरून वंदे भारत एक्स्प्रेससारख्या गाड्या यादरम्यान चालवता येतील.काही महत्त्वाचे मुद्दे :1 रेल्वे सुरक्षेला बळकटी देण्यासाठी १.१६ लाख कोटी रुपये2 नवीन ट्रेन : २०० वंदे भारत ट्रेन, १०० अमृत भारत ट्रेन, ५० नमो भारत ट्रेन3 नवीन १३०० नवीन रेल्वे स्टेशन बांधले जातीलकोणती शहरे जोडणार या ७ हाय-स्पीड रेल कॉरिडोरद्वारे देशातील एकूण ८ महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, वाराणसी आणि सिलीगुडी या शहरांचा समावेश आहे. हे कॉरिडोर देशातील फायनान्शियल सेंटर, आयटी हब, मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि धार्मिक केंद्रांना एकमेकांशी जोडतील, असा सरकारचा दावा आहे.विमान उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सीमाशुल्क सवलतीकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नागरी आणि संरक्षण विमान उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाच्या सीमाशुल्क सवलती जाहीर केल्या. नागरी प्रशिक्षण विमाने तसेच इतर विमानांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या घटक व सुट्या भागांवरील मूलभूत सीमाशुल्क माफ करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच संरक्षण क्षेत्रातील देखभाल, दुरुस्ती व ओव्हरहॉलसाठी विमानांचे भाग तयार करण्यासाठी आयात होणाऱ्या कच्च्या मालालाही सीमाशुल्क सूट देण्यात येणार आहे. यामुळे देशातील विमान उद्योगाला बळ मिळेल, खर्च कमी होईल आणि स्वदेशीकरणाला चालना मिळेल.रोजगार हमीवर विशेष भरया अर्थसंकल्पात रोजगार हमीवर विशेष भर देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात व्हीबी-जी राम जी (पूर्वीचे नाव मनरेगा) या योजनेसाठी तब्बल ९५,६९२.३१ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, प्रोग्राम कंपोनंटसाठी स्वतंत्रपणे ३०,००० कोटी रुपये देखील राखून ठेवण्यात आले आहेत. या निधीचा थेट फायदा ग्रामीण मजूर आणि बेरोजगार कुटुंबांना होईल. या निधीतून ग्रामीण भागांतील रस्ते, तलाव आणि कालव्यांची कामे पूर्ण केली जातील. यामुळे व्हीबी-जी राम जी ही या अर्थसंकल्पातील पहिल्या क्रमांकाची योजना ठरली. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरलेल्या ‘पीएम किसान’ योजनेसाठीही ६३ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही मदत अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरेल. आरोग्य क्षेत्राचा विचार करता, ‘आयुष्मान भारत’ योजनेसाठी तब्बल ९ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबांना महागडे उपचार सहजपणे घेता येतील. वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या काळात ही योजना गरीब कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

28 C