Pune News : काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा फरासखाना पोलिसांत ठिय्या; धीरज घाटे आणि महापौरांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.
Harishchandragad Accident : जुन्नर दरवाज्याकडील कठीण पायवाटेने खाली उतरताना कड्यावरून सैल दगड डोक्यावर कोसळला; घोडेगावच्या ३८ वर्षीय तरुणाने गमावला जीव.
दखल : स्वच्छ पाण्यासाठी संघर्ष
श्रीमंत गटातील ग्राहकांत आरोग्य आणि चवीवरून वाढलेली जागरुकता पाहता प्रीमियम वॉटरची मागणी वाढत आहे. त्याचवेळी परकी ब्रँडस देखील भारताकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहत आहेत.
Indapur News : पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि आकर्षक रोषणाईत इंद्रेश्वर महादेवाची भव्य रथयात्रा; इंदापूरकरांनी जपली संस्कृती.
Sunetra Pawar : बारामतीतील नेतृत्व बदललं पण विश्वास तोच; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कार्यशैलीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांचे शिक्कामोर्तब.
Alandi News : इंद्रायणी घाटावर आता ‘तिसरा डोळा’! सुरक्षिततेसाठी नगरपरिषदेचा मोठा निर्णय; काय बदलणार?
Alandi News : नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखालील पहिल्याच सभेत १११ कामांना मंजुरी; ऐतिहासिक कुंडांच्या सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा.
Indapur News : कळसमध्ये पाझर तलाव कोरडाठाक! विहिरींनी तळ गाठला; आता खडकवासला कालवाच शेवटचा आधार?
Indapur News : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर! पाझर तलाव आटल्याने कळस गावच्या पाणीपुरवठा योजनेवर परिणाम; आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरतेय.
Dattatray Bharne : जिल्हा नियोजन मंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून उजनीसाठी २ कोटींची तरतूद; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मत्स्यबीज संचयन सोहळा संपन्न.
Bhimashankar : देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या हस्ते विधीवत पूजा संपन्न; विकासाचा घेतला आढावा.
Bhuleshwar Temple : भुलेश्वर गडावर भक्तीचा महासागर! २ लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन
Bhuleshwar Temple : पार्थ पवार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांची उपस्थिती; माळशिरस ग्रामपंचायतीकडून भाविकांना थंड पाणी व महाप्रसादाचे नियोजन.
Shirur News : रात्रभर शिवनामाचा जप आणि कीर्तनाचे आयोजन; मंदिर समितीकडून पिण्याचे पाणी, महाप्रसाद आणि आरोग्य सुविधेचे उत्कृष्ट नियोजन.
Mahashivratri : मावळात ‘हर हर महादेव’चा जयघोष! घोरावडेश्वर ते कोंडेश्वर; शिवालयांत भक्तांचा महापूर
Mahashivratri : घोरावडेश्वर आणि कोंडेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी रांगा; मंदिर प्रशासनाकडून चोख बंदोबस्त आणि सुविधा.
Chakan Murder Case : जुण्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी तरुणाचा बळी; चाकणगाव हद्दीतील नेहरू चौकाजवळ शनिवारी दुपारी घडला थरार.
Pimple Nilakh Accident : देहुगावच्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल; विशालनगर परिसरातील वाहतूक कोंडी आणि वेगाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.
PCMC News : निवडणूक संपली तरी पीसीएमसीला कायमस्वरूपी आयुक्त मिळेना; प्रलंबित नागरी समस्यांमुळे नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये संतापाची लाट.
PCMC News : स्थायी समिती सदस्य निवडीपूर्वीच भाजपची फिल्डिंग; अपक्ष नगरसेवकाच्या एन्ट्रीने राष्ट्रवादीच्या एका सदस्याची संधी हुकली.
Wai Crime : पाचवडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; सीसीटीव्हीमध्ये चेहरा कैद, पण पोलीस अजूनही अंधारात?
Wai Crime : वाई तालुक्यातील पाचवड बाजारपेठेत सीसीटीव्ही असूनही चोरट्यांचा बिनदिक्कत धुमाकूळ; पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह.
दैनंदिन राशीभविष्य, सोमवार , १६ फेब्रुवारी २०२६
पंचांगआज मिती माघ कृष्ण चतुर्दशी १७.३३ पर्यंत नंतर अमावस्या शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग वरियान चंद्र राशी मकर.भारतीय सौर २६ माघ शके १९४७. सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२६.मुंबईचा सूर्योदय ०७.०६, मुंबईचा सूर्यास्त ०६.३८, मुंबईचा चंद्रोदय ०६.५६ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०५.४१ , राहू काळ ०८.३३ ते ०९.५९. सोमवती अमावास्या-प्रारंभ-सायंकाळी-०५;३५,चथुर्दशी वर्जदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
ISRO Study Tour : शिक्षणाचा वारसा नसलेल्या कुटुंबातील चार हिऱ्यांची चमक; महाराष्ट्र शासनाच्या विशेष अभियानांतर्गत 'इस्रो' अभ्यास सहलीसाठी निवड.
पाकिस्तान विरोधात भारताचा विजय, सुपर 8 मध्ये दिमाखात एन्ट्री
कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धचा साखळी सामना भारताने ६१ धावांनी जिंकला. या विजयामुळे अ गटातून पुढील फेरीसाठी (सुपर एट) भारत पात्र झाला आहे. भारताने अमेरिका, नामिबिया आणि पाकिस्तान या तिन्ही संघांविरूद्धचे साखळी सामने जिंकले. आता भारताचा बुधवार १८ फेब्रुवारी रोजी नेदरलँड विरुद्ध साखळी सामना आहे. पण या सामन्याआधीच भारत सुपर एट फेरीसाठी पात्र झाला आहे.प्रेमदासा स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताने २० षटकांत सात बाद १७५ धावा केल्या. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानचा डाव १८ षटकांत ११४ धावांवर आटोपला. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात ४० चेंडूत ३ षटकार आणि १० चौकार मारत ७७ धावा करणारा ईशान किशन सामनावीर झाला. त्याने यंदाच्या वर्ल्डकपमधील सलग दुसरे अर्धशतक केले. याआधी ईशानने नामिबिया विरूद्धच्या सामन्यात ६१ धावांचे योगदान दिले होते.पाकिस्तानची फलंदाजीभारताने दिलेल्या १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने शून्य, सईम अयुबने ६, सलमान आगाने ४, बाबर आझमने ५, उस्मान खानने ४४, शादाब खानने १४, मोहम्मद नवाजने ४, फहीम अशरफने १०, शाहीन आफ्रिदीने नाबाद २३, अबरार अहमदने शून्य आणि उस्मान तारिकने शून्य धावांचे योगदान दिले. भारताकडून हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर कुलदीप यादव आणि तिलक वर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.भारताची फलंदाजीपाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यामुळे भारतच प्रथम फलंदाजीसाठी आला. भारताकडून ईशान किशनने सर्वाधिक ७७, अभिषेक शर्माने शून्य, तिलक वर्माने २५, सूर्यकुमार यादवने ३२, हार्दिक पंड्याने शून्य, शिवम दुबेने (धावबाद) २७, रिंकू सिंगने नाबाद ११, अक्षर पटेलने नाबाद शून्य धावा केल्या. पाकिस्तानकडून सईम अयुबने तीन तर सलमान आगा, उस्मान तारिक आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी एक विकेट घेतली.'ई'शान शो!ईशान किशनने फलंदाजीतील शानदार शो दाखवून दिला. त्याने दबावात तुफान फटकेबाचीचा नजराणा पेश करत अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक झळकावले. ईशान किशनचे या टी ट्वेंटी विश्वचषकातील हे दुसरे अर्धशतक होते. त्याची ही खेळी भारतासाठी मोठा दिलासा देणारी आणि पाकिस्तानी गोलंदाजांचे खांदे पाडणारी अशी आहे. या खेळीसह त्याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. एवढेच नाही तर भारत-पाकिस्तान यांच्यातील टी-२० सामन्यात त्याच्या भात्यातून तिसरे जलद अर्धशतक पाहायला मिळाले. भारतीय संघाने पहिल्या षटकात पहिली विकेट गमावल्यावरही ईशान किशन याने आपल्या नैसर्गिक धाटणीत तुफान फटकेबाजी करत पाकिस्तानी गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. तो शतकी खेळीसह मोठा धमाका करेल, असे चित्र निर्माण झाले असताना भारताच्या डावातील ९ व्या षटकात सईम अयूबच्या चौथ्या चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. ८८ धावांवर भारताने ही विकेट गमावली. त्याने ४० चेंडूत ७७ धावा केल्या.ईशान किशन टी वर्ल्डकप २०२६ मधील कामगिरी ७ फेब्रुवारी विरुद्ध अमेरिका - २० धावा १२ फेब्रुवारी विरुद्ध नामिबिया - ६१ धावा १५ फेब्रुवारी विरुद्ध पाकिस्तान - ७७ धावा
छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्यातील काम समकक्ष आहे असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी संताप व्यक्त केला आहे.
IND vs PAK : टी-२० विश्वचषक २०२६ मधील या महामुकाबल्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवला.
Satara News : महाबळेश्वरमध्ये महाशिवरात्री भक्तिमय वातावरणात साजरी
महाबळेश्वर तालुक्यात (Satara News) महाशिवरात्रीचा उत्सव यंदा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तालुक्यातील विविध शिवमंदिरां मध्ये पहाटेपासूनच “हर हर महादेव”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
IND vs PAK : टीम इंडियाने रचला इतिहास! पाकिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषकात नोंदवला ‘हा’खास पराक्रम
IND vs PAK : टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध भारताने नोंदवलेली ही (१७५) आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे.
Aashna roy : एक हेअरकट आणि २५ लाखांचा धक्का; प्रसिद्ध मॉडेलसोबत नेमकं काय घडलं?
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी हॉटेलला २५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. आशना रॉय असे या महिलेचे नाव आहे.
Renuka Chowdhury : काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांना हक्क भंगाची नोटीस
संसदेच्या आवारात एका श्वानाला आणल्याबद्दल आणि खासदारांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रेणुका चौधरी (Renuka Chowdhury) यांना हक्क भंगाची नोटीस बजावण्यात आली आहे.
Ishan Kishan Record : इशान किशनने रॉबिन उथप्पा, गौतम गंभीर आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गज फलंदाजांच्या 'एलिट' यादीत दिमाखात प्रवेश केला आहे.
भर लग्नसमारंभात जीवघेणा हल्ला; बुलढाण्यात तरुण......
बुलढाणा : आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या विवाह सोहळ्याला अचानक हिंसाचाराचे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. तालुक्यातील कोलवड गावात झालेल्या या प्रकारात एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. संपूर्ण प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत आहे.जेवणावळीतील वाद थेट हल्ल्यापर्यंतमिळालेल्या माहितीनुसार, गौरव गजानन जाधव हा युवक लग्नासाठी उपस्थित होता. समारंभानंतर जेवणाची व्यवस्था सुरू असताना त्याचा गावातीलच नितीन सपकाळ याच्याशी वाद झाला. क्षुल्लक बोलाचालीने काही क्षणांत उग्र रूप धारण केले. संतापाच्या भरात नितीनने मयुरेश दसरकर याच्याकडील चाकू काढून गौरववर वार केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात गौरव गंभीर जखमी झाला.जुन्या वादाची पार्श्वभूमीप्राथमिक चौकशीत काही दिवसांपूर्वी झालेल्या कावड यात्रेदरम्यान दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचाच राग मनात ठेवून हा प्रकार घडवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हल्ल्यात जखमी गौरववर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भांडण आवरण्यासाठी पुढे आलेल्या अरुण सुभाष जाधव यांनाही झटापटीत दुखापत झाली. त्यांना किरकोळ जखमा झाल्याचे समजते. या घटनेमुळे लग्नस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.पोलिसांची कारवाईघटनेची माहिती मिळताच बुलढाणा पोलीस यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पीडिताच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून ते सध्या फरार आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, आनंदाचा सोहळा काही क्षणांत रक्तरंजित संघर्षात बदलल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
ईशान, सूर्या, शिवम, तिलक, रिंकूमुळे भारताने पाकिस्तानपुढे ठेवले मोठे लक्ष्य
कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताने ईशान, सूर्या, शिवम, तिलक, रिंकूमुळे पाकिस्तानपुढे मोठे लक्ष्य ठेवले आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने २० षटकांत सात बाद १७५ धावा केल्या आणि पाकिस्तानला २० षटकांत १७६ धावा करण्याचे लक्ष्य दिले.भारताकडून ईशान किशनने सर्वाधिक ७७ धावा केल्या. त्याने ४० चेंडूत ३ षटकार आणि १० चौकार मारत ही कामगिरी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवने २९ चेंडूत ३२ धावा केल्या. शिवम दुबेने (धावबाद) १७ चेंडूत २७ तर तिलक वर्माने २४ चेंडूत २५ धावा केल्या. रिंकु सिंगने फक्त ४ चेंडू खेळून एक षटकार आणि एक चौकार मारत नाबाद ११ धावा केल्या.आजारपणातून उठल्यानंतर थेट पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरलेल्या अभिषेक शर्माला पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने शाहीन आफ्रिदीकरवी शून्यावर झेलबाद केले. हार्दिक पंड्याही शून्य धावा करून परतला. त्याला सईम अयुबच्या चेंडूवर बाबर आझमने झेलबाद केले. अक्षर पटेल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर सईम अयुबकडे झेल देऊन परतला. भारताचे सात पैकी तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. पाकिस्तानकडून सईम अयुबने तीन तर सलमान आगा, उस्मान तारिक आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
वेस्ट इंडीजचे मिशन 'सुपर-८'फत्ते, नेपाळचे स्वप्न भंग
मुंबई : यजमान वेस्ट इंडीजने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत टी-२० विश्वचषकात विजयाची हॅट्ट्रीक साजरी केली आहे. रविवारी मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात वेस्ट इंडीजने नेपाळचा ९ गडी राखून धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासह वेस्ट इंडीज संघ चालू विश्वचषकाच्या 'सुपर-८' फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ बनला आहे.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेपाळची सुरुवात अत्यंत खराब झाली. अनुभवी जेसन होल्डरने (४/२७) आपल्या धारदार गोलंदाजीने नेपाळच्या वरच्या फळीचे कंबरडे मोडले. नेपाळची अवस्था ५ बाद ४६ अशी असताना दिपेंद्र सिंह ऐरीने (५८ धावा) एकाकी झुंज देत संघाला १३३ धावांपर्यंत पोहोचवले. मात्र, वानखेडेच्या फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर हे आव्हान वेस्ट इंडीजला रोखण्यासाठी पुरेसे नव्हते.१३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. कर्णधार साई होप (नाबाद ६१ धावा) याने फॉर्मात परतत ५ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांची आतषबाजी केली. त्याला शिमरॉन हेटमायर (नाबाद ४६ धावा) याने मोलाची साथ दिली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची अभेद्य भागीदारी करत केवळ १५.२ षटकांत विजयावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, ५९ चेंडू आणि २८ चेंडू राखून मिळवलेला हा विजय वेस्ट इंडीजचा आत्मविश्वास वाढवणारा ठरला.सामन्याची वैशिष्ट्ये:सुपर-८ मध्ये प्रवेश: वेस्ट इंडीज सलग ३ विजय मिळवून गट क मध्ये अव्वल स्थानी.मॅन ऑफ द मॅच: ४ बळी घेणारा जेसन होल्डर विजयाचा शिल्पकार.नेपाळचा संघर्ष: वानखेडेवर नेपाळी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती, मात्र अनुभवी गोलंदाजांपुढे नेपाळचे फलंदाज अपयशी ठरले.विक्रम: नेपाळने या विश्वचषकातील पॉवरप्लेमधील सर्वात निचांकी (२२ धावा) धावसंख्या नोंदवली.पुढील लक्ष्य: वेस्ट इंडीजचा संघ आता सुपर-८ मध्ये अधिक जोमाने उतरणार आहे, तर दुसरीकडे नेपाळच्या आव्हानासाठी आता इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
संजय कृष्णमूर्तीच्या वादळापुढे नामिबियाची शरणागती, अमेरिकेची 'सुपर'गर्जना
दुबई : टी-२० विश्वचषकात अमेरिका संघाने आपला विजयाचा धडाका कायम राखत नामिबियाचा ३१ धावांनी पराभव केला आहे. संजय कृष्णमूर्तीची स्फोटक फलंदाजी आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्याच्या जोरावर अमेरिकेने १९९ धावांचा डोंगर उभा केला आणि नामिबियाला १६८ धावांत रोखले.प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेची सुरुवात दमदार झाली. कर्णधार मोनांक पटेलने (५२ धावा) आक्रमक अर्धशतक ठोकत पाया रचला. मात्र, खऱ्या अर्थाने सामन्याचा नूर पालटला तो संजय कृष्णमूर्ती याच्या फलंदाजीने. संजयने केवळ ३३ चेंडूंत ६ षटकार आणि ४ चौकार ठोकत नाबाद ६८ धावांची 'बिलीझ' खेळी केली. त्याच्या २०६ च्या स्ट्राईक रेटमुळे अमेरिकेने निर्धारित २० षटकांत ४ बाद १९९ अशी भक्कम धावसंख्या उभारली.२०० धावांच्या मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना नामिबियाकडून लॉरेन स्टीनकॅम्पने (५८ धावा) झुंज दिली, पण इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. अमेरिकेच्या शॅडली व्हॅन शॉकविकने (२/३०) महत्त्वाचे बळी घेत नामिबियाच्या डावाला खिळ लावली. सौरभ नेत्रावळकर आणि अली खान यांनीही किफायतशीर गोलंदाजी करत नामिबियाला १८ षटकांत ६ बाद १६८ धावांवर रोखले.सामन्याचे प्रमुख आकर्षण:संजय कृष्णमूर्ती: ३३ चेंडूत नाबाद ६८ धावा (मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार).मोनांक पटेल: कर्णधारी खेळी करत ३० चेंडूत ५२ धावा केल्या.नामिबियाची हतबलता: २०० धावांचे लक्ष्य पार करताना नामिबियाच्या मधल्या फळीला वेग राखता आला नाही.या विजयाचे महत्त्व: या विजयामुळे अमेरिकेने आपल्या गटात भक्कम स्थान निर्माण केले असून, 'जायंट किलर' ही आपली ओळख पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
दिल्ली येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आराखड्याची होणार मांडणी
मुंबई : दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ मध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्वसमावेशक आराखडा मांडला जाणार आहे. राष्ट्रीय महिला आयोग (NCW), आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना (ITU) आणि संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण व संशोधन संस्था (UNITAR) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे सत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील संधी, कौशल्यविकास, डिजिटल उद्योजकता आणि आर्थिक स्वावलंबन या विषयांवर विशेष भर देण्यात येणार आहे. हे सत्र १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता भारत मंडपम, कक्ष क्रमांक नऊ येथे होणार आहे.या समिटमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, युनिटारच्या संचालिका (समृद्धी विभाग) मिहोको कुमामोटो, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या (आयटीयू) प्रादेशिक संचालिका (आशिया-पॅसिफिक) अत्सुको ओकुदा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संगीतकार निर्माता कार्तिक शाह यांच्यासह उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि महिला उद्योजिका सहभागी होणार असून महिलांच्या नेतृत्वाखालील आर्थिक प्रगतीस चालना देण्यासाठी ठोस उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत. विशेषतः ग्रामीण व वंचित घटकांतील महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करण्यावर भर राहणार आहे.या चर्चासत्राचे उद्घाटन एआय विषयावरील विशेष व्हिडिओ सादरीकरणद्वारे होणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या “आर्थिक शक्ती: सामायिक समृद्धीसाठी राष्ट्रीय अपरिहार्यता” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. युनिटारच्या संचालिका मिहोको कुमामोटो “समावेशक आणि समृद्ध भविष्यासाठी स्थानिक क्षमता विकास” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या (आयटीयू) प्रादेशिक संचालिका अत्सुको ओकुदा या “लैंगिक डिजिटल दरी कमी करण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण” या विषयावर उद्बोधन करणार आहेत. पॅनल चर्चेमध्ये विजया रहाटकर ह्या महानगरांबाहेरील महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्राधान्यक्रम, कौशल्यविकास, वित्तपुरवठा व सुरक्षिततेवरील भूमिका या विषयावर तर अत्सुको ओकुदा ह्या आशिया-पॅसिफिक अनुभवातून डिजिटल दरी कमी करण्याच्या उपाययोजना या विषयावर चर्चा करतील. तसेच ब्रिजेश सिंह हे “महिला वापरकर्त्यांसाठी सायबर धोके व सुरक्षिततेतील पोकळी” या विषयावर तर कार्तिक शाह हे “सर्जनशील क्षेत्रातील एआय संधी व आव्हाने” या विषयावर भूमिका मांडणार आहेत. परिसंवादानंतर उपस्थितांसोबत प्रश्नोत्तर सत्र होणार आहे.या चर्चासत्रात महानगरांपलीकडील महिलांना एआयच्या माध्यमातून आर्थिक सक्षमता कशी मिळवून देता येईल, महिला उद्योजिकांसाठी सायबर सुरक्षिततेतील कोणत्या त्रुटी तातडीने दूर करणे आवश्यक आहे, तसेच सर्जनशील अर्थव्यवस्थेत एआयमुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हानांचा कसा सामना करावा, या मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे.
दीड वर्षाच्या बलात्कार पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला पुढाकारनायर रुग्णालयातील डॉक्टरांना चिमुकलीवर तातडीने उपचार करण्याचे निर्देशशिवसेनेच्या शायना एनसी यांच्या मागणीची तातडीने घेतली दखलमुंबई : समाजाच्या काळ्याकुट्ट बाजूचे दर्शन घडवणारी एक हृदयद्रावक घटना दहिसर रेल्वे स्थानकाजवळ १० फेब्रुवारीच्या पहाटे घडली. दीड वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला. रस्त्यावर फुले विकून उदरनिर्वाह करणारे आणि जवळच्याच फूटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील ही मुलगी अज्ञात व्यक्तीने पळवून नेली, तिच्यावर अत्याचार करून तिला स्थानिक मासळी बाजाराजवळील कचऱ्याच्या गटारात फेकून दिले.त्या सकाळी कुटुंबाने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दहिसर येथील एमएचबी पोलीस ठाण्यात सकाळी ११ वाजता नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून दुपारी ३ वाजता गंभीर जखमी अवस्थेत मुलीचा शोध लावला. तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी मुंबई सेंट्रल येथील बीएमसी संचलित नायर रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती अजूनही अतिदक्षता विभागात उपचाराधीन आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तत्पर कारवाईही दुर्दैवी घटना एका सामाजिक कार्यकर्त्यामार्फत कळताच शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी तात्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्वरित दखल घेत पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यांनी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांशी समन्वय साधून मुलीला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत याची काळजी घेतली तसेच पोलीस आयुक्तांशी संवाद साधून तिच्या सुरक्षिततेला आणि तपासाला प्राधान्य देण्यास सांगितले.“आपल्या समाजात काही विकृत प्रवृत्तीचे लोक सर्वात असुरक्षितांवर अत्याचार करून सुटतील असे समजतात, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” असे शायना एनसी यांनी सांगितले. “परंतु यावेळी आपण सर्वजण एकत्र येऊन लढा देऊ. या निरपराध दीड वर्षांच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी तात्काळ हस्तक्षेप केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार.”संबंधित यंत्रणांनी तपासाला गती द्यावी, पीडितेला सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे. आम्ही पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे शायना एन सी यांनी स्पष्ट केले.
Ishan Kishan Record : पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात इशानने केवळ चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील पाकिस्तानविरुद्धचे सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे.
AI Summit Delhi 2026 : ‘एआय’परिषदेसाठी अनेक देशांचे वरिष्ठ अधिकारी भारतात येणार; वाचा संपूर्ण यादी…
नवी दिल्लीत होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेसाठी अनेक देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे भारतात आगमन होत आहे.
Rahul Gandhi : भारतीय शेतकऱ्यांचा विश्वासघात; भारत-अमेरिका करारावरून राहुल गांधींची टीका
भारत-अमेरिका यांच्यात अंतरिम व्यापार करार करण्यात आला असून या कराराच्या नावाखाली भारतीय शेतकऱ्यांसोबत विश्वासघात होत आहे. तसेच हा मुद्दा देशाच्या कृषी क्षेत्राच्या भवितव्याशी संबंधित आहे, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
Alexei Navalny : नवालनी यांच्या हत्येसाठी बेडकाच्या विषाचा वापर; ब्रिटनची रशियावर टीका
रशियातील प्रमुख राजकीय विरोधी नेते ऍलेक्सी नवालनी (Alexei Navalny) यांच्याविरोधात रशियाने अत्यंत घृणास्पद विषारी बेडकाच्या विषाचा वापर केल्याबद्दल ब्रिटनने रशियावर टीका केली आहे.
IND vs PAK : नाणेफेकीच्या वेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हस्तांदोलन न करता 'नो हँडशेक' धोरण कायम ठेवले आहे.
India vs Pakistan : पाकिस्तानचा गोलंदाजीचा निर्णय
कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये आज म्हणजेच रविवार १५ फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजल्यापासून हाय व्होल्टेज भारत - पाकिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता झाली. नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला. पाकिस्तानने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.श्रीलंकेत कोलंबो येथे आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत - पाकिस्तान सामना होणार आहे. प्रेमदासाची खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे. त्यामुळे या सामन्यात भारत किती मोठी धावसंख्या उभारणार यावरून तर्कवितर्क सुरू आहेत.हस्तांदोलन नाहीचपाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी कारवायांचा निषेध म्हणून भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणे टाळले.अंतिम ११ खेळाडू :भारत : अभिषेक शर्मा , इशान किशन (यष्टीरक्षक) , तिलक वर्मा , सूर्यकुमार यादव (कर्णधार) , हार्दिक पांड्या , शिवम दुबे , रिंकू सिंग , अक्षर पटेल , कुलदीप यादव , वरुण चक्रवर्ती , जसप्रीत बुमराहपाकिस्तान : सईम अयुब , साहिबजादा फरहान , सलमान आगा (कर्णधार) , बाबर आझम , उस्मान खान (यष्टीरक्षक) , शादाब खान , मोहम्मद नवाज , फहीम अशरफ , शाहीन आफ्रिदी , अबरार अहमद , उस्मान तारिक
वैभव सूर्यवंशी देणार १० वीची परीक्षा देणार ?
मुंबई : भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख खेळाडू आणि अवघ्या १४ व्या वर्षी चर्चेत आलेला वैभव सूर्यवंशी याच्याबाबत एक बातमी समोर आली आहे. शैक्षणिक वर्षअखेर होणारी (CBSE) दहावीची परीक्षा तो यंदा देणार की नाही याविषयी त्याच्या वडिलांनी उत्तर दिलं आहे.सोशल मीडियावर हॉलतिकीट व्हायरलकाही दिवसांपासून एक हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परीक्षा केंद्रावर सुरक्षेची तयारी वाढवल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, शाळा प्रशासनाने कोणतीही विशेष सवलत दिली जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.बिहारमधील ताजपूर येथे राहणारा वैभव ताजपूर येथील मॉडेस्टी स्कूलचा विद्यार्थी आहे परीक्षेचा अर्जही त्याने भरला होता. परंतु तो सध्या सराव शिबिरे, राष्ट्रीय स्तरावरील सामने आणि विविध स्पर्धांमध्ये गुंतलेला आहे. सलग सामने आणि प्रवासामुळे त्याला अभ्यासाला पुरेसा वेळ देता आला नाही, अशी माहिती समोर आली आहे. कुटुंबीय आणि शाळा व्यवस्थापन यांच्यातील चर्चेनंतरच त्याने यंदा बोर्ड परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.अंडर-१९ विश्वचषकातील दमदार कामगिरी२०२६ मधील आयसीसी अंडर १९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत त्याने भारतीय संघासाठी उल्लेखनीय योगदान दिले. सात सामन्यांत ६२.७१ च्या सरासरीने ४३९ धावा करत तो सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अग्रक्रमावर राहिला. अंतिम सामन्यात इंग्लंड अंडर १९ क्रिकेट संघ विरुद्ध साकारलेली १७५ धावांची खेळी विशेष गाजली. १६९ पेक्षा अधिक स्ट्राईक रेटसह त्याने आक्रमक फलंदाजीचे दर्शन घडवले.
भोपाळमध्ये पत्नीने प्रेयसीला विकला पती, जुदाई सिनेमाची पुनरावृत्ती
भोपाळ : श्रीदेवी, उर्मिला मातोंडकर आणि अनिल कपूर यांचा जुदाई हा हिंदी सिनेमा ९० च्या दशकात प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या कथेशी मिळतीजुळती अशी घटना वास्तवात अलीकडेच मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये घडली.भोपाळमध्ये ४२ वर्षांचा सरकारी अधिकारी त्याचे काम व्यवस्थित करत होता. या अधिकाऱ्याच्या विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या ५४ वर्षीय महिलेला हा अधिकारी आवडू लागला. हळू हळू दोघांमधील जवळीक वाढली. कामाच्या निमित्ताने झालेल्या ओळखीचे रुपांतर आधी मैत्रीत नंतर प्रेमात झाले. या प्रेमापोटी सरकारी अधिकारी स्वतःच्या घरी कमी वेळ देऊ लागला. यातून घरी वाद वाढले. परिस्थिती बिघडत गेली. अखेर अधिकाऱ्याच्या १६ आणि १२ वर्षांच्या मुलींपैकी मोठ्या मुलीने न्यायालयात दाद मागितली.न्यायालयात सुनावणी सुरू झाली त्यावेळी ४२ वर्षीय अधिकाऱ्याने आपले कार्यालयातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यावर प्रेम असल्याची कबुली दिली तसेच पत्नीसोबत राहण्याची इच्छा नाही असेही सांगितले. त्याचवेळी मुलींवर प्रेम आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी आवश्यक ते सर्व काही करण्याची तयारी दाखवली. अधिकाऱ्याच्या प्रेमात असलेल्या महिलेनेही नात्याची कबुली दिली आणि प्रियकराने मुलींच्या भविष्यासाठी नियोजन केल्यास हरकत घेणार नसल्याचे स्पष्ट केले. अखेर अधिकाऱ्याच्या पत्नीने स्वतःच्या आणि मुलींच्या भविष्याचा विचार करून तडजोड केली. पत्नीने घटस्फोट घेण्याच्या बदल्यात स्वतःसाठी आणि पोटच्या दोन मुलींसाठी एक डुप्लेक्स फ्लॅट आणि २७ लाखांची रोख रक्कम अशा एकूण दीड कोटी रुपयांची मागणी केली. पतीच्या प्रेयसीने ही किंमत मोजण्याची तयारी दाखवली. यानंतर परस्पर सहमतीने घटस्फोट झाला.लग्नानंतरच्या प्रेमातून निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी भोपाळमध्ये दीड कोटी रुपयांत झालेला हा पहिलाच घटस्फोट आहे. यामुळे पत्नीने दीड कोटी रुपयांत प्रेयसीला पती विकल्याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे.श्रीदेवी, उर्मिला मातोंडकर आणि अनिल कपूर यांच्या जुदाई सिनेमात पैशांच्या लालसेतून श्रीदेवी पतीला दूर करते आणि नंतर तिला चुकीची जाणीव होते असे दाखवले होते. भोपाळच्या घटनेत पती आणि पत्नी यांच्या जुदाईचे कारण पती आणि त्याची प्रेयसी यांच्यातील नाते आहे. भोपाळच्या महिलेने वास्तवाचे भान राखून स्वतःच्या आणि मुलीच्या भविष्याच्या विचार करून घटस्फोट घेतला आहे. पण या घटनेच्या निमित्ताने बदलत्या कौटुंबिक नातेसंबंधांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
Kedarnath : केदारनाथचे दरवाजे २२ एप्रिलला उघडणार तर, १९ एप्रिलला निघणार पंचमुखी डोली
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील प्रसिद्ध केदारनाथ मंदिराचे दरवाजे यंदा २२ एप्रिल रोजी भाविकांसाठी उघडले जाणार आहेत.
Amit Patkar : गोवा फॉरवर्ड पक्षाशी कॉंग्रेस करणार हातमिळवणी; अमित पाटकर यांचे मोठे विधान
भाजपची सत्ता असणाऱ्या गोव्यातील विधानसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्या रणसंग्रामासाठी कॉंग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षाकडे (जीएफपी) मैत्रीचा हात पुढे केला आहे.
IND vs AUS : डकवर्थ लुईस नियमानुसार ५.१ षटकांत भारताला विजयासाठी केवळ २९ धावांची गरज होती, मात्र, भारताने ५० धावा केल्या असल्याने २१ धावांनी भारताला विजयी घोषित करण्यात आले.
Harshwardhan Sapkal : प्रत्येक बाबतीत जात-धर्म आणणे भाजपचा फंडा; हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रत्युत्तर
महापुरुषांच्या नावावर राजकारण सुरू आहे. समाजात द्वेष पसरवला जात आहे. तसेच माध्यमांनी विचारला त्यासंबंधानी मी दिलेल्या उत्तराचा भाजपकडून ध चा मा करण्यात आला. जाती, धर्मावरुन राजकारण करण्याचा देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा हा जुनाच फंडा आहे.
Newasa News : महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले त्रिवेणीश्वर महादेवाचे दर्शन
महाशिवरात्रीच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव आणि सुरेशनगर यांच्या मध्यभागी वसलेल्या स्वयंभू श्री त्रिवेणीश्वर महादेव संस्थान येथे भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा झाला.
दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित
मुंबई :‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या चित्रपटात राम चरण आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असून, जगपति बाबू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.‘पेड्डी’च्या निर्मात्यांनी आपल्या दिग्दर्शक बुची बाबू सना यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर एक प्रभावी संदेश शेअर करत टीमने या दूरदर्शी चित्रपट निर्मात्याविषयीचा आदर व्यक्त केला आहे. निर्मात्यांनी शेअर केलेली ही विशेष पोस्ट आगामी चित्रपटाच्या भव्यतेची आणि मोठ्या दृष्टीकोनाची साक्ष देते.वाढदिवसानिमित्तची ही पोस्ट केवळ दिग्दर्शकांचा गौरव करत नाही, तर ‘पेड्डी’भोवती निर्माण झालेल्या चर्चेलाही अधिक उधाण देते. हा चित्रपट भव्य प्रमाणात साकारला जात असून, प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. आपल्या मातीतल्या कथा आणि भावनिक मांडणीसाठी ओळखले जाणारे बुची बाबू सना यांनी इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘पेड्डी’च्या माध्यमातून ते आपल्या मर्यादा आणखी विस्तारताना दिसत आहेत. हा चित्रपट रफ-अँड-टफ ड्रामासह जबरदस्त तीव्रता आणि मोठ्या स्केलचा अनुभव देण्याचे आश्वासन देतो.चित्रपटाची घोषणा झाल्यापासून पोस्टर्स आणि गाणी प्रदर्शित होताच कथेबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. ‘पेड्डी’मधील ‘चिकीरी’ हे गाणे, ज्यामध्ये राम चरण दिसतात, आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज पार करत मोठे यश मिळवले आहे.बुची बाबू सना लिखित व दिग्दर्शित ‘पेड्डी’मध्ये राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्या सोबत शिवा राजकुमार, जान्हवी कपूर, दिव्येंदू शर्मा आणि जगपति बाबू यांसारखे कलाकार झळकणार आहेत. वेंकट सतीश किलारू यांनी ‘वृद्धी सिनेमाज’ या बॅनरखाली आणि ‘मायथ्री मूव्ही मेकर्स’च्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 30 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
केव्हा मिळणार पीएम किसानचा २२वा हप्ता? केंद्राकडून अधिकृत घोषणा पण शेतकरी प्रतीक्षेत
नवी दिल्ली : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणाऱ्या प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये तीन टप्प्यांत थेट बँक खात्यात वर्ग केले जातात. आतापर्यंत २१ हप्त्यांचे वितरण पूर्ण झाले असून, आता २२व्या हप्त्याची उत्सुकता वाढली आहे. मागील रक्कम नोव्हेंबर २०२५ मध्ये जमा झाली होती.संभाव्य तारीख समोरप्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील हप्ता २४ फेब्रुवारी २०२६ रोजी खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, यासंदर्भात केंद्र सरकारकडून अधिकृत जाहीर वक्तव्य झालेले नाही. अधिकृत अधिसूचना आल्यानंतरच अंतिम तारीख स्पष्ट होणार आहे.योजनेची पार्श्वभूमी२०१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिची अंमलबजावणी सुरू झाली. थेट लाभ हस्तांतरण पद्धतीमुळे ही योजना जगातील मोठ्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर उपक्रमांपैकी एक मानली जाते.हप्ता मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया२२वा हप्ता खात्यात सुरळीत जमा व्हावा यासाठी लाभार्थ्यांनी खालील बाबी पूर्ण केलेल्या असाव्यात :ई-केवायसीची पडताळणी पूर्ण असणेजमीन नोंदणीची माहिती अद्ययावत असणेबँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणेखाते क्रमांक व IFSC तपशील अचूक नोंदवलेले असणेवरीलपैकी कोणतीही माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्यास रक्कम प्रलंबित राहू शकते.कोणाला लाभ मिळणार नाही?ज्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे, जमीन तपशीलात त्रुटी आहेत किंवा बँक व आधार माहितीमध्ये विसंगती आहे, अशा लाभार्थ्यांना पुढील हप्ता मिळण्यात अडथळे येऊ शकतात. संबंधित चुका दुरुस्त केल्याशिवाय निधी वर्ग होणार नाही.‘फार्मर आयडी’ अनिवार्यतेकडे पावलेउत्तर प्रदेश , बिहार , मध्य प्रदेश , महाराष्ट्र , राजस्थान , गुजरात , तामिळनाडू आणि तेलंगणा यांसह काही राज्यांत ‘Farmer ID’ नोंदणीसाठी मोहीम राबवली जात आहे. सेवा केंद्रे व शिबिरांच्या माध्यमातून ओळख क्रमांक तयार केला जात असून, तो नसल्यास योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.हप्त्याची स्थिती कशी पाहावी?लाभार्थी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘Know Your Status’ किंवा ‘Farmer Corner’ पर्यायातून आधार किंवा खाते क्रमांकाच्या आधारे आपली पेमेंट स्थिती तपासू शकतात. केंद्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यानंतरच २२व्या हप्त्याची निश्चित तारीख स्पष्ट होईल. तोपर्यंत शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे व तपशील अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे.
Mahashivratri : महादेवाचं गाणं गाऊन त्याने रचला विक्रम…पण अभिनेत्याचा अंत झाला खूपच दुर्दैवी !
देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिभावाने साजरा होत असताना मंदिरांमध्ये आणि सोशल मीडियावर भगवान शंकरावरील गाणी घुमताना दिसत आहेत.
Bangladesh PM Oath : तारिक रहमान यांच्या शपथविधीला भारताचा ‘हा’बडा नेता राहणार उपस्थित
बांगलादेशच्या १३व्या संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी)ने दणदणीत बहुमत मिळवले आहे. बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान हे नवनिर्वाचित पंतप्रधान (Bangladesh PM Oath) म्हणून १७ फेब्रुवारी २०२६ रोजी शपथ घेणार आहेत.
IND vs PAK : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली याने पावसासाठी केलेली प्रार्थना सध्या चर्चेचा आणि थट्टेचा विषय ठरली आहे.
‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती
मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व हल्ल्यांतून तावून सुलाखून सोमनाथ मंदिर आजही उभे आहे. वारंवार जीर्णोद्धार झाला पण सोमनाथावरील भाविकांची श्रद्धा तसूभरही कमी झाली नाही. सोमनाथावरील पहिल्या हल्ल्याला एक हजार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन झाले होते. याप्रसंगी पंतप्रधानांनी उपस्थितांना हिंदू धर्माचे महात्म्य आणि सोमनाथचा इतिहास याविषयी सोप्या भाषेत सविस्तर सांगितले होते. या पार्श्वभूमीवर आता बॉलिवूड एकटवटले आहे. सोमनाथ मंदिराचा इतिहास लवकरच हिंदी चित्रपटाच्या रुपाने मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. नियोजनानुसार हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.जय सोमनाथ या हिंदी चित्रपटासाठी लार्जन चॅन लाईफ चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून लोकप्रिय असलेल्या संजय लील भन्साळीनं माहितीपर क्षेत्रातील (डॉक्युमेंटरी) दिग्गज केतन मेहतांसोबत युती केली आहे. भारतीय सिनेसृष्टीतील दोन प्रभावशाली आणि सर्जनशील दिग्दर्शक – संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता हे दोघे संयुक्तपणे 'य सोमनाथ'वर काम करणार आहेत.‘जय सोमनाथ’ची कथा प्रेक्षकांना इ.स. १०२५ - १०२६ या कालखंडात घेऊन जाणार आहे. त्या वेळी गझनीच्या महमूदने गुजरातमधील सोमनाथ मंदिरावर आक्रमण करून त्याची लूट केली होती. भारतीय इतिहासातील हा प्रसंग विनाशानंतर पुन्हा उभे राहण्याच्या जिद्दीचे प्रतीक मानला जातो. विशेष म्हणजे या घटनेला यंदा एक हजार वर्षे पूर्ण होत आहेत. अशा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट प्रथमच मोठ्या पडद्यावर साकारला जात आहे.या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे भन्साळी आणि मेहता यांची सर्जनशील भागीदारी. भव्य सेट्स, नेत्रदीपक दृश्यरचना आणि भावनिक कथनशैलीसाठी ओळखले जाणारे भन्साळी, तर ऐतिहासिक दृष्टिकोन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले केतन मेहता – या दोघांची सांगड ‘जय सोमनाथ’मध्ये पाहायला मिळणार आहे. दोन्ही दिग्दर्शकांचा गुजरातशी असलेला संबंध लक्षात घेता, या कथेत वास्तव आणि भावनांचा प्रभावी संगम दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.‘जय सोमनाथ’ची निर्मिती भन्साळी प्रोडक्शन्स आणि केतन मेहता यांच्या माया मूव्हीज या बॅनरखाली होत आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी केतन मेहता स्वतः सांभाळणार आहेत. हा भव्य ऐतिहासिक चित्रपट २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
कुणकेश्वरच्या विकासासाठी कटीबद्ध ; अधिकाधिक निधी देणार -पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही
सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रवासात कुणकेश्वराचा मोठा आशीर्वाद मिळाल्याची भावनामुंबई : आज महाशिवरात्री निमित्त कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्राचीन व ऐतिहासिक श्री देव कुणकेश्वर मंदिर येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी विधिवत दर्शन घेऊन भगवान श्री महादेवांची मनोभावे पूजा केली.यावेळी बोलताना ते म्हणाले, श्री देव कुणकेश्वराच्या यात्रेला मी गेली अनेक वर्षांपासून नियमित दर्शनासाठी येत असून कुणकेश्वराचे दर्शन माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कुणकेश्वर हे केवळ धार्मिक स्थळ नसून कोकणाच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. या परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करणे ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी शासनाच्या मार्फत मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन यावेळी केले. यावेळी कुणकेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त, प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.कुणकेश्वर यात्रेसाठी राबविण्यात आलेल्या ‘प्लास्टिक मुक्त यात्रा’ या अभिनव उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला आहे. यात्रेदरम्यान प्लास्टिकचा वापर टाळून स्वच्छ, सुंदर आणि हरित कुणकेश्वर घडवण्याचा संकल्प प्रशासनाने कृतीतून दाखवला. भाविकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करत यात्रा यशस्वी व शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन व प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. पर्यावरण रक्षण आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन यांचा सुंदर समन्वय साधत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
Shrikant Shinde : वडिलांना नडणाऱ्या गणेश नाईकांना श्रीकांत शिंदेंनी दिले ओपन चॅलेंज; म्हणाले…
सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भूमिका घेत त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनमंत्री गणेश नाईक यांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी थेट खुले आव्हान दिले आहे.
IND vs PAK : जर पावसामुळे भारत-पाक सामना रद्द झाला तर काय होणार? 'रिझर्व्ह डे'ची तरतूद आहे का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
नवी मुंबई : “अमेरिकेत मुलं जन्माला घालता, पण मुंबईत स्वतःच्या रक्ताला नाव द्यायला तुमची ‘फाटते’? ज्याला बापाचं कर्तव्य निभावता येत नाही, त्याने दुसऱ्याचं अस्तित्व मिटवण्याच्या वल्गना करू नयेत!” अशा अत्यंत बोचऱ्या शब्दांत शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी गणेश नाईकांवर निशाणा साधला. तसेच “शिंदे साहेबांचे कपडे जितके स्वच्छ, तितकंच त्यांचं राजकारण पारदर्शक आहे. जास्त बोलाल तर नवी मुंबईत येऊन तुमचा बाजार उठवला जाईल!” असा सज्जड दमही त्यांनी दिला. या वक्तव्यामुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर गणेश नाईक यांना उत्तर देताना वाघमारे यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली. नवी मुंबईच्या राजकारणात स्वतःला ‘किंग’ समजणाऱ्यांचा मुखवटा आता उतरवण्याची वेळ आली असल्याचे सांगत त्यांनी “कुत्र्याचं शेपूट १२ महिने नळीत घातलं तरी वाकडं ते वाकडंच राहते. तीच अवस्था नाईकांची आहे,” असा टोला लगावला.पुढे बोलताना त्यांनी नाईकांना भूतकाळाची आठवण करून दिली. मंदा म्हात्रे यांनी तुमचा पराभव करून तुम्हाला ‘माजी’ केलं होतं, हे विसरलात का? तुमच्यासारखे छप्पन आले आणि गेले, पण शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याची एक वीटही ढासळू शकली नाही,” असे त्या म्हणाल्या.वाघमारे यांनी पुढे गंभीर आरोप करत “तुमचं घर वाईट आहे पण तुमचे धंदे ब्लॅक आहेत,” असा थेट हल्लाही चढवला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा इशारा देत नाईकांना आव्हान दिले की, शिंदे यांच्या नेतृत्वावर वारंवार टीका सहन केली जाणार नाही.शेवटी त्यांनी इंग्रजी घोषणेद्वारे हल्लाबोल अधिक तीव्र करत म्हणाल्या, “If You Are Bad, Eknath Shinde Is Your DAD!” गणेश नाईक यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर टीका केल्यानंतर त्याला दिलेले हे सर्वात आक्रमक उत्तर मानले जात आहे. नवी मुंबईत आता दोन्ही गटांतील राजकीय संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे दिसत असून पुढील प्रतिक्रिया काय येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Jaish-e-Mohammed : जैश-ए-मुहम्मदच्या निशाण्यावर शहरी महिला; महिला विंगची स्थापना करणार
पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनांनी आता आपला विस्तार करण्यासाठी नवनव्या संकल्पाना अंमलात आणत आहे.
Sunetra Pawar : वेळ पडल्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मदतील जाऊ; ‘या’नेत्याचे मोठे वक्तव्य
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या (Sunetra Pawar) चर्चांना उधाण आले होते. अजित पवार हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणासाठी आग्रही होते.
Elephant Stampede : हजारीबागमध्ये हत्तींचा धुमाकूळ सुरुच; दोघांचा मृत्यू, आठ जण जखमी
झारखंडच्या हजारीबाग (Elephant Stampede) जिल्ह्यातील चर्ही व्हॅली येथे शनिवारी संध्याकाळी उशिरा झालेल्या रस्ते अपघातात पश्चिम बंगालमधील बांकुरा येथील क्विक रिस्पॉन्स टीमचे दोन सदस्य ठार झाले आणि आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
IND vs PAK : दोन्ही संघांनी स्पर्धेची सुरुवात सलग दोन विजयांनी केल्यामुळे आजच्या सामन्यात कोणाचं पारडं जड ठरणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू'गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज
मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत या गाण्याने १ मिलियनहून अधिक व्ह्यूजचा टप्पा पार करत सोशल मीडियावर ट्रेंड पकडला आहे. या गाण्यात ‘बिग बॉस’मधून ओळख मिळवलेला अभिनेता आयुष संजीव आणि अभिनेत्री हेमल इंगळे यांची जोडी झळकत आहे. सई गोडबोले, निहार शेंबेकर आणि शार्क यांच्या आवाजात हे गाणे चित्रित केले गेले आहे.गीतलेखन विकास साटम यांचे असून दिग्दर्शन तेजस नेरुरकर यांनी केले असून, संगीताची जबाबदारी निहार शेंबेकर, सई गोडबोले आणि शार्क यांनी सांभाळली होती, तर नृत्यदिग्दर्शन पूजा काळे यांनी केले. साईरत्न एंटरटेनमेंट प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.वेगळ्या धाटणीचा प्रयोगगायक व संगीतकार निहार शेंबेकर याने या मराठी गाण्यात प्रथमच आफ्रिकन रीदमवरील ‘बायले फंक’ शैलीचा वापर केला आहे. त्यामुळे गाण्याला आंतरराष्ट्रीय धाटणीची झलक मिळाली आहे. अभिनेत्री हेमल इंगळेनेही प्रेक्षकांचे आभार मानत गाण्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर या गाण्यावर रील्स आणि शॉर्ट व्हिडिओंचा ट्रेंडही पाहायला मिळत आहे. व्ह्यूजमुळे संगीतात काहीतरी नवीन करण्याचा प्रयोग निहार आणि संपूर्ण टीमचा यशस्वी झाल्याचा दिसत आहे.
Mulund Metro Slab Collapse: मुलुंडमधील मेट्रो दुर्घटनेत एमएमआरडीएची मोठी कारवाई; थेट पाच जणांना अटक
मुलुंड पश्चिम येथे शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी बांधकाम सुरू असलेल्या सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळला. रस्त्याने जाणाऱ्या रिक्षा आणि एका कारवर हा स्लॅब पडल्याने या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून एकाच मृत्यू झाला आहे. या घटनेवर मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी हा १०० टक्के निष्काळजीपणा आहे, दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी प्रतिकिया दिली. रितू तावडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.अशातच आता मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एमएमआरडीएने मोठी कारवाई केली आहे. एमएमआरडीएने कार्यकारी अभियंत्याला निलंबित केले असून उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. त्याच बरोबर मुलुंड पोलिसांनी कंत्राटदार आणि सल्लागार कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना अटक केली आहे. शनिवारी दुपारी मुलुंड येथील एलबीएस रोडवर मेट्रोच्या कामादरम्यान झालेल्या अपघाताप्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या चौकशी समितीच्या अहवालानंतर दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गावर मुलुंड येथे शनिवारी झालेल्या दुर्घटने प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत.अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतानाच जखमींच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीए करणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.एमएमआरडीए प्रशासनाकडून दुर्घटनेची माहिती घेतानाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सार्वजनिक सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. या दुर्घटनेची दखल घेत त्यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांचे निलंबनाचे निर्देश दिले. तसेच मेट्रो ब्रीज मार्गाचे सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ॲाडिट करण्याचे आदेश शिंदेंनी दिले आहेत.
अंबरनाथ : भाजपाचे गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. गणेश नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यामुळे ते काहीही टीका करत आहेत. तर गणेश नाईक यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये. नागरिकांनी त्यांना अनेकदा माजी केलं आहे याचे त्यांनी भान ठेवावे. आणि जर एवढीच खुमखुमी असेल तर पुढील लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा अथवा हवे तिथून आमच्या समोर येऊन निवडणूक लढवावी. असे थेट खुले आव्हान देखील यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिले.
Dr. J. B. Shinde : प्रबोधनाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. जे. बी. शिंदे यांचे निधन
आदरणीय जे. बी. शिंदे यांचे १२ फेब्रुवारी २०२६ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. संत साहित्याचे गाढे अभ्यासक तसेच चळवळीचे खंदे आधारस्तंभ असलेले शिंदे सर यांच्या जाण्याने चळवळीची खूप मोठी हानी झाली आहे.
Manipur News : मणिपूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई ! दोन महिलांसह तीन दहशतवाद्यांना अटक
मणिपूरच्या (Manipur News) दोन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित दोन महिलांसह तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी रविवारी सांगितले.
IND vs PAK : महिला रायझिंग स्टार्स आशिया चषकात भारत 'अ' संघाने पाकिस्तान 'अ' संघाचा ८ गडी राखून दणदणीत पराभव केला.
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची चिंता वाढली; चिरंजीव ३ दिवसांपासून रुग्णालयात
उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या मुलाची प्रकृती बिघडली असून गेल्या ३ दिवसांपासून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.उद्धव ठाकरे यांचं शेंडेफळ तेजस ठाकरे यांची अचानक तब्येत बिघाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे. त्याच्यावर मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.सध्या रुग्णालयात तेजस ठाकरे यांची काळजी घेण्यासाठी रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. तसेच ठाकरे कुटुंबातील इतर सदस्यांनीही तेजस ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतलीआहे.कोण आहेत तेजस ठाकरे ?- तेजस ठाकरे वन्यजीव संशोधक आहेत.- फेब्रुवारी २०१६ मध्ये ठाकरे यांनी गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या ५ नवीन प्रजाती शोधून काढल्या.- त्यापैकी एकाला त्यांच्या आडनावावरून नाव देण्यात आले.- सप्टेंबर २०१९ मध्ये, महाराष्ट्रातील पश्चिम घाटात सापांची एक नवीन प्रजाती शोधली.
Ayesha Khan : “…प्लीज असं काही करु नका”; अभिनेत्री आयेशा खान पापाराझींवर संतापली
Ayesha Khan : ‘धुरंधर’ सिनेमात ‘शरारत’ गाण्यावर भन्नाट डान्स करत अभिनेत्री आयेशा खानने अनेकांची मनं जिंकली. मात्र सध्या एका आयशा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आयेशा पापाराझींवर संतापल्याचे दिसत आहे. शनाया कपूर आणि अभिनेता आदर्श गौरव यांच्या ‘तू या मैं’ सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी आयेशा पोहोचली होती.. सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी आलेली आयेशा पापाराझींना पोज देत […]
Manipur: मणिपूरमध्ये वेगवेगळ्या कारवाईत १० दहशतवाद्यांना अटक
गेल्या २४ तासांत मणिपूरच्या विविध भागात पोलिस आणि सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत दोन महिलांसह दहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आणि जप्त केलेले आयईडी नष्ट करण्यात आले.मणिपूर पोलिस मुख्यालयाने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षा दलांनी गेल्या शनिवारी आरपीएफ/पीएलएच्या दोन सक्रिय दहशतवाद्यांना अटक केली. त्यांची ओळख वैरोकपम सनाहल मैतेई उर्फ नोंगदंबा (४६) आणि स्वयंघोषित लेफ्टनंट मयंगलंबम किरण सिंह उर्फ शांति उर्फ बोइपु (४७) अशी झाली. दोघांनाही थौबल जिल्ह्यात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन आणि चार सिम कार्ड जप्त करण्यात आले.दरम्यान, सुरक्षा दलांनी तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह पोलिस स्टेशन परिसरातील सनराइज ग्राउंड आणि गेट क्रमांक २, मोरेह दरम्यान भारत-म्यानमार सीमा जनरल क्षेत्रातून दोन सक्रिय महिला पीएलए कार्यकर्त्यांना अटक केली. त्यांची ओळख अकोइजाम सखेनबी (२३) आणि चोंगथम हेम्बाबी (१७) अशी झाली.दुसऱ्या एका कारवाईत, सुरक्षा दलांनी इंफाळ पूर्व जिल्ह्यातील सेजांग मखा लीकाई येथून सक्रिय प्रेपाक (प्रो) कॅडर इंगुडम इंगोचा सिंह (५०), उर्फ बोरोबी याला अटक केली. तिच्या ताब्यातून पाच जिवंत काडतुसे भरलेली .३२ बोरची पिस्तूल, १० प्रेपाक (प्रो) व्हिजिटिंग कार्ड, एक होंडा अॅक्टिव्हा स्कूटर, ६०० रुपये रोख आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला.सुरक्षा दलांनी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील खाबाम लामखाई भागातून खंडणीत सहभागी असलेल्या प्रेपाक (प्रो) चा सक्रिय कॅडर सोरोखैबाम रणजित सिंह (४१) याला अटक केली. त्याच्याकडून दोन मोबाईल हँडसेट आणि एक आधार कार्ड जप्त करण्यात आले.दुसऱ्या एका कारवाईत, सुरक्षा दलांनी केसीपी (अपुंबा) चा सक्रिय कॅडर खेतीक्स थोंगबाम (१९) याला अटक केली. त्याला इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील इंफाळ पोलिस स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक मोबाईल फोन आणि आधार कार्ड जप्त करण्यात आले.सुरक्षा दलांनी केलेल्या शोध मोहिमेत, इंफाळ पूर्व जिल्ह्यातून एका सक्रिय प्रीपाक कॅडरला अटक करण्यात आली. त्याचे नाव इरेंगबाम सरतकुमार मेईतेई (२१), उर्फ अचौबा असे आहे. त्याच्याकडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला.दरम्यान, चुराचंदपूर जिल्ह्यातील एका कारवाईदरम्यान, चुराचंदपूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या टी. ल्हांगकिचोई गावातील सक्रिय यूकेएनए कॅडर आणि खंडणीखोर लुंजकाई वैफेई (२०) याला मतिजंग गावातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक देशी बनावटीची ९ मिमी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत, केवायकेएलचा सक्रिय कॅडर खुमानथेम संतोष मेईतेई (३६), उर्फ कांता याला थौबल जिल्ह्यात अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन सिम कार्डसह एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. चुराचंदपूर जिल्ह्यातील चुराचंदपूर पोलिस स्टेशन हद्दीतील नागा गाव परिसरात सुरक्षा दलांनी एक आयईडी (दंडगोलाकार, दाब यंत्रणा, १० किलो स्फोटक) जप्त केले. बॉम्ब निकामी पथकाने लष्कर आणि चुराचंदपूर पोलिसांच्या उपस्थितीत आयईडी सुरक्षितपणे नष्ट केला.
Asim Munir: जर्मनीमध्ये पाकिस्तानची लाज निघाली ; सुरक्षारक्षकाने मागितले असीम मुनीर यांना ओळखपत्र
Asim Munir: जर्मनीतील म्युनिक सुरक्षा परिषदेदरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना लाज वाटली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रवेश करताना त्यांचे ओळखपत्र दाखवण्यास सांगितले.
टिपूचे उदात्तीकरण कराल तर... नितेश राणेंचा निर्वाणीचा इशारा
मुंबई : टिप्या ची बरोबरी शिवरायांशी करणे यालाच जिहादी मानसिकता बोलतात... ज्या टिप्याने लाखो हिंदूचे धर्मांतर केले.. मंदिरं तोडली.. फक्त इस्लाम वाढवण्याकडे लक्ष दिले..तो आमच्या शिवरायांच्या जवळपास पण येऊ शकत नाही ! काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आपल्या कार्यालयात शिवरायांचे फोटो काढून टिप्याचे फोटो लावून दाखवावे मग बघू... शिवरायांचे मावळे त्यांना महाराष्ट्र कसे फिरू देतात ? हर हर महादेव! अशी एक्स पोस्ट मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. धर्मांध क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे उदात्तीकरण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणे यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. एक्स पोस्ट करून नितेश राणेंनी हा इशारा दिला आहे.मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर समाजवादी पक्षाच्या निहाल अहमद यांनी त्यांच्या दालनातील छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांचे फोटो काढून धर्मांध क्रूरकर्मा टिपू सुलतान याचा फोटो लावला. यावरून झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल यांनी टिपूचे उदात्तीकरण केले. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. भाजपनेही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या भाष्याचा निषेध केला. आता मंत्री नितेश राणे यांनी तर टिपूचे उदात्तीकरण करणाऱ्यांना निर्वाणीचा इशाराच दिला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना खपवून घेतली जाणार नाही. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे अतिशय निंदनीय आहे. कॉंग्रेसला लाज वाटायला पाहिजे. जोडे चाटण्याची ही पद्धत जन्मात पाहिली नाही. छत्रपती शिवरायांनी मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त केले. त्याचवेळी हजारो, लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतानची तुलना करून दोघांनाही सारखाच सन्मान देणे म्हणणे म्हणजे जोडे चाटणे या जन्मात बघितले नाही. हे खपवून घेतले जाणार नाही. या तुलनेसाठी सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर हिंदुद्वेषी आणि क्रूर टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करून काँग्रेसने आपली ‘मुघली विचारधारा’ महाराष्ट्राला पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. निष्पाप हिंदूंची कत्तल करणाऱ्या आणि हिंदू स्त्रियांचा छळ करणाऱ्या टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी केली पाहिजे, असे विधान काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केले आहे. गेल्याच आठवड्यात तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर बुलडोझर फिरवला होता. पंडित नेहरूंपासून आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष करण्याची मुघली परंपरा काँग्रेस पुढे नेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात, टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणाऱ्या औरंगजेबप्रेमी काँग्रेसला जनता नक्कीच धडा शिकवणार, अशी टीका भाजपने केली आहे. पाठोपाठ मंत्री नितेश राणे यांनी टिपूचे उदात्तीकरण करणाऱ्यांना सुनावले आहे.टिपूने शेकडो निष्पाप ब्राह्मणांना फासावर लटकवले. हजारो हिंदू मंदिरांचा विध्वंस करून तिथे मशिदी उभारल्या. लाखो हिंदूंचे सक्तीने धर्मांतर केले. हिंदू स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करून त्यांना आपल्या जनानखान्यात डांबले. अशा 'हिंदुद्वेषी' आक्रमकाचे उदात्तीकरण करून काँग्रेसने महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घातल्याची भावना जनसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर टिपूचे उदात्तीकरण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणे यांनी समजेल अशा भाषेत निर्वाणीचा इशारा दिला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो काढून टिप्याचे फोटो लावून दाखवा मग बघा शिवरायांचे मावळे त्यांना महाराष्ट्र कसे फिरू देतात ? असे सांगत मंत्री नितेश राणे यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.
Ananya Panday : अनन्या पांडे पुन्हा प्रेमात? सोशल मिडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चांना उधाण
Ananya Panday : बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आपल्या चित्रपटांशिवाय वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. विशेषतः अनन्याच्या रिलेशनशिपबद्दल अनेक चर्चा होत असतात. यातच आता अनन्याने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिच्या प्रेमाची कबूली दिल्याचे म्हंटले जात आहे. अनन्या पांडे एका विदेशी मॉडेलला डेट करत असल्याची चर्चा आहे. तिने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केल्याने या चर्चांना उधाण आले […]
Salman Khurshid: भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार करारामुळे राष्ट्रीय राजकारण तापले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर काँग्रेसने केंद्र सरकारकडून पुरावे मागितले होते, तसेच आता ते व्यापार कराराचे पुरावे मागत आहे.
मुंबई: महाशिवरात्री पूजा संपताच मनात विचार येतो की, पूजेत वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे काय करावे? ते कचऱ्यात फेकून द्यावे की झाडावर ठेवावे? सर्वप्रथम, हे जाणून घ्या की पूजेत वापरले जाणारे कोणतेही साहित्य कधीही कचऱ्यात टाकू नये कारण असे करणे पाप मानले जाते. शास्त्रांमध्ये या साहित्याचे विसर्जन करण्याची योग्य पद्धत आणि नियम दिले आहेत. जर तुम्ही या नियमांचे पालन केले तर तुम्हाला महाशिवरात्री पूजेचा पूर्ण लाभ मिळेल आणि कोणत्याही पापाचा दोष तुम्हाला दिला जाणार नाही. शिवरात्री पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे विसर्जन करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊयात.महाशिवरात्रीच्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे विसर्जन कसे करावे?
Sarah Arjuna :इंन्स्टाग्रामवरून धुरंधर फेम अभिनेत्रीने चाहत्यांसाठी खास संदेश लिहिला आहे.
School Gardening Competition: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत उत्कृष्ट शालेय परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात गारवडी जिल्हा परिवद शाळेचा खटाव तालुक्यात प्रथम, तर सातारा जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीमुळे गारवडी गावचा नावलौकिक झाला आहे. दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खटाव तालुक्यातील गारवडी या छोट्याशा गावाने पुन्हा एकदा जिल्ह्याच्या नकाशावर आपले वेगळेपण […]
Hingoli News : बम बम भोले!!! महाशिवरात्रीच्या निमित्ताने औंढा नागनाथ येथे भाविकांची मोठी गर्दी
Hingoli News: बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी केली गर्दी
Vinod Bansal: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आयसीसी विश्वचषक सामन्यापूर्वी राजकीय वक्तृत्व तीव्र झाले आहे. विश्व हिंदू परिषद (VHP) चे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी या सामन्याबाबत पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.
हाय व्होल्टेज भारत - पाकिस्तान सामन्यात कोण कोण खेळणार ?
कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये आज म्हणजेच रविवार १५ फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजल्यापासून हाय व्होल्टेज भारत - पाकिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे. या सामन्यात दोन्ही देशांकडून कोणकोणते खेळाडू मैदानात उतरणार यावरून चर्चेला उधाण आले आहे.https://prahaar.in/2026/02/15/t20-world-cup-2026-ind-vs-pak-suryakumar-yadav-imitates-usman-tariq-video-goes-viral/भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा बरा झाला आहे. त्याने शनिवार १४ नोव्हेंबर रोजी सराव केला. यामुळे पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी अभिषेकचा विचार होण्याची शक्यता आहे. याआधी नामिबिया विरूद्धच्या सामन्यात तब्येत बरी नसल्यामुळे अभिषक शर्मा खेळला नव्हता.https://prahaar.in/2026/02/15/india-vs-pakistan-series-match-in-colombo-who-will-score-a-hat-trick-of-victory/अभिषेकचे पुनरागमन झाल्यास संजू सॅमसनला पुन्हा एकदा वगळले जाण्याची शक्यता आहे. या संदर्भातला अंतिम निर्णय भारताचे संघ व्यवस्थापन संध्याकाळीच जाहीर करण्याची शक्यता आहे.श्रीलंकेत कोलंबो येथे आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत - पाकिस्तान सामना होणार आहे. प्रेमदासाची खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात चायनामन कुलदीप यादवलाही मैदानात उतरवू शकतो . संघात तीन फिरकीपटूंना संधी मिळू शकते. तीन फिरकीपटूंना खेळवण्यासाठी अर्शदीपला वगळले जाण्याची शक्यता आहे. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबेचा विचार वेगवान गोलंदाजीसाठी होऊ शकतो. नवा चेंडू हाताळण्याची जबाबदारी हार्दिक आणि जसप्रीतकडे दिली जाण्याची शक्यता आहे.https://prahaar.in/2026/02/15/suryakumar-yadav-will-abhishek-sharma-play-in-the-india-vs-pakistan-match-or-not-important-information-about-suryakumar-yadav-in-the-press-conference/पाकिस्तान भारताविरोधात पाच फिरकीटूंना खेळवण्याचा विचार करू शकतो. शादाब खान, उस्मान तारिक, अबरार अहमद, सईम अयुब आणि मोहम्मद नवाज या फिरकीपटूंना खेळवले जाण्याची शक्यता आहे. सईम अयुबचाही गोलंदाज म्हणून विचार होऊ शकतो. उस्मान तारिक हा किती यशस्वी होणार यावर पाकिस्तानचे यश अवलंबून असेल.संभाव्य अकरा खेळाडूभारत : अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.पाकिस्तान : सॅम अयुब, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा (कर्णधार), बाबर आझम, उस्मान खान (यष्टीरक्षक), शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, उस्मान तारिक आणि अबरार अहमद
Nishikant Dubey on Rahul Gandhi: झारखंडमधील गोड्डामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभा खासदार निशिकांत दुबे यांच्या भाषणानंतर मोठा गोंधळ झाला. त्यांनी आणलेल्या वादग्रस्त पुस्तकांमुळे वातावरण आणखी तापले.
T20 World Cup 2026 IND vs PAK: सूर्यकुमार यादवने केली उस्मान तारिकची नक्कल; व्हिडीओ वायरल
कोलंबो: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. हा यंदाच्या वर्ल्डकपमधील २७ वा साखळी सामना असेल. क्रिकेटप्रेमींचे लक्ष असलेल्या या हायव्होल्टेज सामन्याआधीच एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट घोंगावत आहे. यामुळे क्रिकेटप्रेमी चिंतेत आहेत.पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज उस्मान तारीक त्याच्या स्टाईलमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. मात्र, टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं त्याचा दबाव झुगारून दिला आहे. इतकंच नव्हे, तर त्याने उस्मान तारीकच्या स्टाईलची कॉपी करत नेट प्रॅक्टिसही केली. आजच्या सामन्यापूर्वी फलंदाजांना सराव मिळावा म्हणून सूर्यकुमारने स्वतः तारिकसारखी 'स्लिंगी' ॲक्शन करून गोलंदाजी केली. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.SuryaKumar Yadav Giving India practice of how usman tariq bowls #INDVPAK #T20WorldCup #T20WorldCup2026 pic.twitter.com/rqZP4ofpGf— MESSI MB (@3166WR) February 15, 2026तारिकची गोलंदाजी करण्याची पद्धत अतिशय वेगळी असून ती आयसीसीने मंजूर केली आहे. तो चेंडू टाकताना मध्येच काही काळ थांबतो आणि त्याची चेंडू फेकण्याची पद्धत 'राउंड-आर्म' स्वरूपाची आहे, ज्यामुळे फलंदाजांना चेंडू ओळखणे कठीण जाते. सूर्याने तारिकच्या गोलंदाजीचे वर्णन 'आउट ऑफ सिलॅबस' (अभ्यासक्रमाबाहेरील) असे केले आहे. त्याने स्पष्ट केले की, परीक्षेत कधीकधी असे कठीण प्रश्न येतात, पण म्हणून आपण ते सोडून देत नाही, तर त्याचा सामना करतो. भारतीय संघ अशा आव्हानासमोर हार मानणार नाही, असेही त्याने नमूद केले.पाकिस्तान का तारिक उस्मान रुककर गेंदबाजी करता है, उसके लिए प्रैक्टिस चल रही।ऐसे ही एक मोहम्मद इरफान आया था, 7.1 फिट का लंबा। भारतीय टीम के खिलाड़ियों को उससे निपटने के लिए कुर्सी पर चढ़कर गेंदबाजी करते हुए प्रैक्टिस करवाई गई थी। pic.twitter.com/T611CX2TBc— Rajesh Sahu (@askrajeshsahu) February 15, 2026भारतीय संघाने यापूर्वीही अशा विशिष्ट गोलंदाजांचा सामना करण्यासाठी अनोख्या पद्धती वापरल्या आहेत. २०१६च्या आशिया चषकात ७ फूट उंच मोहम्मद इरफानचा सराव करण्यासाठी भारतीय फलंदाजांनी स्टूल आणि खुर्च्यांवर उभे राहून 'थ्रो-डाउन' घेतले होते. माजी फिरकीपटू हरभजन सिंगच्या मते, उस्मान तारिक हा एक कठीण गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे अनेक वैविध्यपूर्ण चेंडू आहेत. मात्र, भारतीय संघ त्याचा सामना करू शकतो, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
Tejas Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
Rinku Rajguru : अथांग समुद्र अन्…; ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त रिंकू राजगुरूचा लाल साडीतील खास अंदाज
Rinku Rajguru : व्हिडिओमध्ये सूर्यास्तावेळी समुद्रकिनारी रिंकु राजगुरू लाल साडीत धावत असल्याचे दिसते.
US Attack in Syria: अमेरिकेने सीरियामध्ये इस्लामिक स्टेट (ISIS) च्या लक्ष्यांविरुद्ध लष्करी कारवाई तीव्र केली आहे. यूएस सेंट्रल कमांड (CENTCOM) ने ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक अंतर्गत सुरू असलेल्या ऑपरेशनची नवीन व्हिडिओ आणि माहिती जारी केली आहे.
तरुण नोकरी मागायला आला आणि बंदूक असलेली बॅग विसरला, आमदार केनेकरांच्या केबिनमध्ये सत्य उघड
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्याकडे एक तरुण नोकरी मागायला गेला आणि त्यांच्या कार्यालयातच एअरगन असलेली बॅग विसरला, हे पोलिसांच्या चौकशीनंतर समोर आले. याच घटनेची शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली.शनिवारी दुपारी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात पिस्तूल असलेली एक बाग सापडल्याने गोंधळ उडाला होता. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कंत्राटी नोकरीसाठी भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात शिफारसपत्र मागायला गेलेला तरुण बॅगसह त्यातील एअरगनही तेथेच विसरला. शनिवारी केनेकर यांचे सहकारी कार्यालयात गेल्यानंतर पिस्तूल पाहताच एकच गोंधळ उडाला.पोलिसांच्या तपासणीत ती एअरगन असल्याचे समोर आले. त्यानंतर क्रांतीचौक पोलिसांनी रितेश संतोष होळकर याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. रितेश बीएस्सीच्या तृतीय वर्षात आहे. काही दिवसांपासून तो नोकरीच्या शोधात होता. महानगरपालिकेत कंत्राटी नोकरी मिळवण्यासाठी त्याला एकाने केनेकर यांच्याकडून शिफारसपत्र घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. तो शुक्रवारी सायंकाळी तेथे गेला. सहा महिन्यांपूर्वी त्याने ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरून एअरगन हौस म्हणून खरेदी केली होती. क्रांती चौक पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.नेमकं प्रकरण काय?भाजप आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात एअर गन आढळून आल्याने खळबळ उडाली होती. रात्री भेटीसाठी आलेल्या एका व्यक्तीची बॅग कार्यालयातच विसरली गेली होती. त्या बॅगेत एअर गन सापडली. या घटनेनंतर आमदार केनेकर यांच्या घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. भेटीसाठी आलेल्या व्यक्तीच्या बॅगेत बंदूक आढळल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांच्या तपासात घटनेचे सत्य समोर आले आहे.
बंजारा समाजाला न्याय मिळणार; समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन - उपमुख्यमंत्री शिंदे
वाशीम: बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने आयोग स्थापन केला असून लवकरच समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आयोजित संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संत सेवालाल महाराजांसह सर्व संतांना वंदन केले तसेच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतींनाही अभिवादन केले.अलीकडील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद घटनेमुळे कार्यक्रम साधेपणाने घेतल्याचे सांगत त्यांनी देशभरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या बंजारा समाजाचे स्वागत केले व समाजाची एकजूट हीच खरी ताकद असल्याचे नमूद केले. तसेच यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शुभहस्ते बंजारा समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना 'सेवा पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.पोहरादेवी ही संत सेवालाल महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून येथे आल्यावर वेगळी आध्यात्मिक ऊर्जा मिळते, असे सांगताना त्यांनी हा संपूर्ण परिसर मोठे आध्यात्मिक व पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री असताना या विकास आराखड्यास ७२४ कोटी रुपयांची मंजुरी दिल्याची आठवण करून देत सेवालाल महाराज स्मारकासह सर्व कामे वेगाने पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथे विरासत संग्रहालयाचे उद्घाटन झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला. हे स्मारक भविष्यात समाजाला व कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा देणारे ठरेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.बंजारा समाजाचे आद्यदैवत, थोर तत्वज्ञ, महान विचारवंत, समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन...#SantSevalalMaharaj #संत_सेवालाल_महाराज pic.twitter.com/SsMXrmtoM1— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 15, 2026बंजारा समाज हा निसर्गपूजक, मातीत इमान राखणारा आणि राष्ट्रभक्त समाज असून इतिहासात या समाजाने देव, देश आणि धर्मासाठी बलिदान दिले आहे, असे ते म्हणाले.अन्यायाविरुद्ध उभा राहणारा आणि एकजुटीने लढणारा समाज म्हणून बंजारा समाजाची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.रामराव महाराजांच्या प्रसंगाचा उल्लेख करत मानवसमता व अहिंसेचा संदेश या परंपरेत असल्याचेही त्यांनी नमूद केले. समाजाने शिक्षण घ्यावे, एकत्र राहावे व आपली संस्कृती जपावी, असे आवाहन त्यांनी केले.सरकार सर्वसामान्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुलींचे उच्च शिक्षण मोफत, शेतकरी सन्मान व विमा योजना तसेच अतिवृष्टी मदत अशा निर्णयांचा त्यांनी उल्लेख केला. उद्योगनिर्मिती व रोजगारासाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी असून मुंबईत बंजारा समाज भवनासाठी जागा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन झाल्याने लवकरच सकारात्मक मार्ग निघेल व समाजाला न्याय मिळेल, असा पुनरुच्चार करत मेहनत, एकजूट आणि स्वाभिमान कायम ठेवण्याचे आवाहन करून त्यांनी ‘जय सेवालाल महाराज’च्या घोषणांनी भाषणाची सांगता केली.या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्याचे पालक मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, खासदार संजय देशमुख,जितेंद्र महाराज, सुनील महाराज, यशवंत महाराज, शेखर महाराज, रायजिंग महाराज, गोपाल महाराज यांच्यासह बंजारा समाजातील अन्य मान्यवर पदाधिकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sanjay Raut :संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंना सामनाच्या रोखठोक या सदरातून फटकारल्याची चर्चा रंगली असून, यावर त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.
Ajit Pawar: छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशनतर्फे लंडन येथे अजित पवार यांच्या स्मरणार्थ शोकसभा
लंडन: छत्रपती शिवाजी महाराज युवक संघठना तर्फे आज लंडन येथे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमात त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा तसेच महाराष्ट्र भवन, लंडनसाठी जाहीर करण्यात आलेल्या ५ कोटी रुपयांच्या मदतीचाही उल्लेख करण्यात आला. त्यांच्या कार्याचा आढावा घेताना उपस्थितांनी विविध आठवणींना उजाळा दिला.या कार्यक्रमाला लंडन व परिसरातील मराठी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहिली.मौनानंतर असोसिएशनचे अध्यक्ष धीरजसिंह तौर यांनी अजित पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदान, विकासकामांबद्दलची बांधिलकी तसेच समाजासाठी केलेल्या कार्याची आठवण करून दिली.या कार्यक्रमाच्या आयोजनात धीरजसिंह तौर, सुनिल पाटील, स्वराज मोहिते, आशुतोष धमले, स्वप्नील गावडे, पवन खरात, कौस्तुभ रमेकऱ, यशवंत गुरव, यश सुतार यांसह संघटनेतील सदस्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच मराठी समाजातील अनेक मान्यवर व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम शांत, भावनिक आणि आदरपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ घडली धक्कादायक घटना, बघून अनेकजण हादरले
चंद्रपूर : रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ एक धक्कादायक घटना घडली. ही घटना बघून अनेकजण हादरले. एका तरुणाने विजेच्या खांबाच्या आधाराने गळफास घेतला. ही धक्कादायक घटना राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातल्या भांदक येथे रेल्वेच्या हद्दीत घडली. रेल्वे गेट क्रमांक ३६ जवळ १८ वर्षांच्या दुर्गेश प्रसाद मसरामने विजेच्या खांबाच्या आधाराने गळफास घेतला.दुर्गेश मूळचा मध्य प्रदेशमधील कोको येथील रहिवासी होता. तो कुटुंबासह मोलमजुरीसाठी भांदक येथे आला होता. पण ऐन तारुण्यात दुर्गेशने असे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजलेले नाही. दुर्गेशच्या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रावती रेल्वे स्थानक परिसरात वर्धा-बल्लारशाह रेल्वे मार्ग आणि सायडिंगचे काम प्रगतीपथावर आहे. या कामासाठी आलेल्या मजुरांची वस्ती याच परिसरात आहे. दुर्गेश त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह याच भागात वास्तव्यास होता.पहाटेच्या सुमारास दुर्गेश घरात नसल्याचे कुटुंबातील इतर सदस्यांच्या लक्षात आले. त्यांनी शोधाशोध सुरू केली. ही शोधाशोध सुरू असताना रेल्वे पोलिसांना रेल्वे गेट क्रमांक ३६ जवळील एका वीज खांबाला लटकून तरुणाने आत्महत्या केल्याचे समजले. घटनास्थळी पोलीस आणि दुर्गेशच्या कुटुंबातील सदस्य पोहोचले तेव्हा दुर्गेशने आत्महत्या केल्याचे लक्षात आले. या प्रकरणी तपास सुरू आहे.
Sanjay Raut: टिपू सुलतानाला नायक आणि महान योद्धा मानणाऱ्या पाकिस्तासोबत भारत क्रिकेट खेळण्याचा धिक्कार का करत नाहीत, संजय राऊतांचा सवाल

26 C