नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत एक नवा इतिहास रचला आहे. सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री ठरल्या आहेत. यापूर्वी असा विक्रम कोणाच्याही नावावर नव्हता. विशेष म्हणजे, तब्बल २६ वर्षांनंतर प्रथमच देशाचा अर्थसंकल्प रविवारी सादर केला जात आहे, ज्यामुळे आजच्या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी १९९९ मध्ये अर्थसंकल्पाचा दिवस रविवारी आला होता, मात्र तेव्हा तो शनिवारीच सादर करण्यात आला होता. यंदा मात्र रविवारीही संसदेचे कामकाज सुरू ठेवून हा ऐतिहासिक पायंडा पाडण्यात आला आहे. या अर्थसंकल्पातून प्राप्तिकर (Income Tax), रेल्वे विकास आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणत्या मोठ्या घोषणा होतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार की नवीन योजनांची घोषणा होणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात 'या'तीन कर्तव्यांवर भर
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही निर्मला सीतारमन यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.यावर्षीचा अर्थसंकल्पामधून तीन मुख्य कर्तव्यांवर भर देण्यात आला आहे. तसेच यावर्षीचा बजेट हा युवकांना केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.बजेटमध्ये भर देण्यात आलेले तीन कर्तव्य :१. पहिले कर्तव्य - आर्थिक विकासाला वेग देणे आणि स्थायी आर्थिक विकास करणे :आर्थिक विकासाचा वेग वाढवणं आणि तो कायम ठेवणं. यासाठी उत्पादकता आणि स्पर्धा वाढवणं. तसेच जागतिक स्तराच्या सुविधा उपलब्ध करणं.२. दुसरे कर्तव्य - नागरिकांच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करणे:आपल्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं आणि त्यांचं कौशल्य तसेच क्षमता वाढवणं. तसेच भारताच्या प्रगतीत त्यांचा समावेश करून घेणं.३. तिसरे कर्तव्य - सबका साथ सबका विकास या विकास या धोरणाला अनुकूल निर्णय घेणार:सबका साथ - सबका विकास या तत्वावर आधारित विकास साध्य करणं. यातून प्रत्येक समाज, कुटुंब, प्रदेश यांना साधन-संपत्ती, सुविधा आणि संधी समप्रमाणात उपलब्ध असतील.
Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमन संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांनी, देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढली आहे.
Union Budget 2026: कर्करोग आणि मधुमेहाची औषधे स्वस्त होणार; निर्मला सीतारमण यांची घोषणा
Union Budget 2026: पुढील पाच वर्षांत 10 हजार कोटींची बायोफार्मा पॉवर तयार करण्याचा प्रस्ताव
Amol Mitkari Post : अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी अमोल मिटकरी यांनी एक्सवरून पोस्ट शेअर करत पाच प्रश्न उपस्थित केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Nirmala Sitharaman Speech: अर्थमंत्री निर्मला सीतारमन संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांनी, देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढली आहे, ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली आहे.
Budget 2026 : केंद्रीय मंत्रिमंडळाकडून बजेटला मंजुरी; लवकरच सादर होणार अर्थसंकल्प
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामण अगदी काही वेळातच संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरूवात झाली असून या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाकडून बजेटला मंजुरी मिळाली आहे. थोड्यावेळातच अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या त्या टॅब मध्ये नक्की काय दडलं आहे हे समजेल.अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सलग नव्यांदा देशाचा बजेट सादर करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्थमंत्री सितारमण यांना आपल्या हाताने दही - साखर भरवून शुभेच्छा दिल्या आहेत. कुढल्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण दही साखर खाऊन करतो. म्हणूनच दही - साखर भरवून राष्ट्रपती यांनी निर्मला सीतारमण यांना शुभेच्छा दिल्या.सोने आणि चांदीच्या किमतीत प्रचंड घसरण :अर्थसंकल्पाच्या काही तास आधीच सराफा बाजारातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत प्रचंड घसरण झाली असून गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शनिवारी चांदीच्या दरात तब्बल १९ टक्क्यांची विक्रमी घट झाली, ज्यामुळे चांदीचे दर ३ लाख १२ हजार रुपये प्रति किलोवर आले आहेत. सोन्याच्या दरातही सुमारे २ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून, १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ६५ हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. जागतिक स्तरावर मौल्यवान धातूंच्या मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे ही स्थिती ओढवली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या ग्राहकांना या घसरणीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.सराफा बाजारामध्ये चांदीच्या किमतींनी आजवरची सर्वात मोठी घसरण अनुभवली आहे. गेल्या आठवड्यात उच्चांकी पातळीवर असलेल्या चांदीच्या दरात शनिवारी १९ टक्क्यांची मोठी घट झाली. अवघ्या दोन दिवसांत चांदीचे भाव कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले असून, बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. मागील गुरुवारी चांदीचे दर ४ लाख ४० हजार ५०० रुपये प्रति किलो या ऐतिहासिक पातळीवर होते. मात्र, त्यानंतर सलग दोन दिवस दरवाढ रोखली जाऊन किमतीत मोठी घट झाली. एकाच दिवसात चांदी ७२ हजार ५०० रुपयांनी स्वस्त झाल्याने आता प्रति किलोचा दर ३ लाख १२ हजार रुपयांवर येऊन पोहोचला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला झालेली सर्व दरवाढ शेवटच्या दोन दिवसांत पुसली गेल्याने गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
एलेना रायबाकिनाने ऑस्ट्रेलियन ओपनवर कोरले नाव
सबालेन्काचा धुव्वा उडवत पटकावले विजेतेपदमेलबर्न : एलेना रायबाकिनाने आपल्या कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. शनिवारी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या महिला एकेरीच्या चित्तथरारक अंतिम सामन्यात रायबाकिनाने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अरिना सबालेन्काचा ६-४, ४-६, ६-४ असा पराभव करत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले.२०२३ च्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमध्ये सबालेन्काने रायबाकिनाला हरवले होते. तब्बल तीन वर्षांनंतर त्याच मैदानात रायबाकिनाने सबालेन्काला पराभूत करून त्या पराभवाचा गोड वचपा काढला आहे. रायबाकिनाचे हे एकूण दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. २ तास १८ मिनिटे चाललेल्या या सामन्यात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये रायबाकिना ०-३ अशा पिछाडीवर होती. सबालेन्का सहज जिंकेल असे वाटत असतानाच रायबाकिनाने विलोभनीय खेळ केला. तिने शेवटच्या ६ गेम्सपैकी ५ गेम्स जिंकत साबालेंकाचे विजयाचे स्वप्न उधळून लावले.सबालेन्काची सलग दुसरी हारदुसरीकडे, सबालेन्कासाठी हा पराभव धक्कादायक ठरला. २०२५ मध्ये मॅडिसन कीजकडून पराभूत झाल्यानंतर, सबालेन्काची ही सलग दुसऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यामध्ये हारली आहे. विजयाची वैशिष्ट्ये : क्रमवारीतील झेप : या विजयानंतर एलेना रायबाकिना जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचणार आहे. नंबर १ विरुद्ध वर्चस्व: जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या खेळाडूंविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम (६०% यश) आता रायबाकिनाच्या नावावर झाला आहे. सर्व्हिसचा जोर : सामन्याच्या शेवटच्या पॉइंटवर 'एस' मारून रायबाकिनाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज अर्थमंत्र्यांकडून मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या आहेत. निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. २०२७ च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात संरक्षण, पायाभूत सुविधा, भांडवली खर्च, वीज आणि परवडणाऱ्या घरांमध्ये उच्च वाढीला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.यंदाच्या अर्थसंकल्पातील १० महत्त्वाच्या गोष्टीयंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प ७५ वर्षांची परंपरा मोडून एक नवीन अर्थसंकल्प तयार करणार आहे. आतापर्यंत, बहुतेक मजकूर अर्थसंकल्पीय भाषणाच्या भाग अ मध्ये होता, तर भाग ब कर आणि धोरणात्मक घोषणांवर केंद्रित होता. मात्र, यंदा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून रणनीतीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे आणि पूर्णपणे भाग ब वर लक्ष केंद्रित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग ब विकसित भारतासाठी व्हिजन २०४७ वर लक्ष केंद्रित करेल. जागतिक पुरवठा साखळींमध्ये भागीदारी, कौशल्ये, रोजगार आणि दीर्घकालीन आर्थिक धोरणे यांचा समावेश असेल.अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या भाग २ मध्ये भारतासाठी अल्पकालीन प्राधान्यक्रम आणि दीर्घकालीन उद्दिष्टे दोन्ही मांडण्याची अपेक्षा आहे. देशाची ताकद आणि जागतिक महत्त्वाकांक्षा यावर भर दिला जाईल.भारताच्या अर्थव्यवस्थेने आतापर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या दंडात्मक अमेरिकी शुल्काचा सामना केला आहे. ३१ मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षात विकास दर ७.४ टक्के राहण्याचा अंदाज आहे. उत्पन्न आणि ग्राहक करामधील कपातीमुळे ग्राहक खर्च वाढला आहे.
Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमन संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांनी, देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढली आहे, ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली आहे. सरकारनं लोकप्रियतेपेक्षा सामान्य लोकांना प्राधान्य दिलंय.
Budget 2026: संत रविदासांचे नाव घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भाषणाला सुरुवात
Budget 2026:
Union Budget 2026: प्रियंका गांधी यांच्यासह अखिलेश यादव यांनी देखील अर्थसंकल्पापूर्वी दिली प्रतिक्रिया
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाचा ऐतिहासिक नववा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र, अर्थसंकल्पाच्या काही तास आधीच सराफा बाजारातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत प्रचंड घसरण झाली असून गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शनिवारी चांदीच्या दरात तब्बल १९ टक्क्यांची विक्रमी घट झाली, ज्यामुळे चांदीचे दर ३ लाख १२ हजार रुपये प्रति किलोवर आले आहेत. सोन्याच्या दरातही सुमारे २ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून, १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ६५ हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. जागतिक स्तरावर मौल्यवान धातूंच्या मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे ही स्थिती ओढवली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या ग्राहकांना या घसरणीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.https://prahaar.in/2026/02/01/nirmala-sitharaman-dons-a-handwoven-purple-kattam-kancheevaram-silk-saree/दोनच दिवसांत तब्बल ७२ हजार ५०० रुपयांची मोठी घसरणसराफा बाजारामध्ये चांदीच्या किमतींनी आजवरची सर्वात मोठी घसरण अनुभवली आहे. गेल्या आठवड्यात उच्चांकी पातळीवर असलेल्या चांदीच्या दरात शनिवारी १९ टक्क्यांची मोठी घट झाली. अवघ्या दोन दिवसांत चांदीचे भाव कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले असून, बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. मागील गुरुवारी चांदीचे दर ४ लाख ४० हजार ५०० रुपये प्रति किलो या ऐतिहासिक पातळीवर होते. मात्र, त्यानंतर सलग दोन दिवस दरवाढ रोखली जाऊन किमतीत मोठी घट झाली. एकाच दिवसात चांदी ७२ हजार ५०० रुपयांनी स्वस्त झाल्याने आता प्रति किलोचा दर ३ लाख १२ हजार रुपयांवर येऊन पोहोचला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला झालेली सर्व दरवाढ शेवटच्या दोन दिवसांत पुसली गेल्याने गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.सोन्याच्या दरात घसरणचांदीपाठोपाठ आता सोन्याच्या दरातही मोठी घट झाल्याने सराफा बाजारात खळबळ उडाली आहे. शनिवारी सोन्याच्या किमतीत ३,५०० रुपयांची (२.०७ टक्के) घट नोंदवण्यात आली, ज्यामुळे सोन्याचा भाव आता १ लाख ६५ हजार ५०० रुपये प्रति १० ग्रॅम या स्तरावर खाली आला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी सोन्याने १ लाख ८३ हजार रुपयांचा उच्चांकी टप्पा गाठला होता. मात्र, जागतिक बाजारपेठेतील विक्रीच्या दबावामुळे आठवडाभराची सर्व दरवाढ अवघ्या काही दिवसांत संपुष्टात आली आहे. किमती पुन्हा एखादा जुन्या पातळीवर आल्याने गुंतवणूकदारांमध्येव चिंतेचे वातावरण असून, येत्या काळात सोन्याचे दार आणखी खाली जातील का अशी भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
भारतातील मलेरिया रुग्णसंख्येत लक्षणीय घट
मुंबई : मलेरिया हा आजार एकेकाळी भारतातील सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठे आव्हान मानला जात होता. मात्र गेल्या दशकात राबवण्यात आलेल्या लक्ष केंद्रीत उपाययोजनांमुळे या आजाराच्या प्रसारात लक्षणीय घट झाली आहे. २०१६ मध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन आराखड्यानुसार (२०१६–२०३०) भारताने २०३० पर्यंत मलेरियाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याआधी, म्हणजे २०२७ पर्यंत देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्थानिक मलेरिया प्रसार खंडित करण्याचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. मात्र यात किती यश आले आहे हा कळीचा मुद्दा असून याचे ऑडिट होणे गरजेचे असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अलीकडील माहितीनुसार, २०२२ ते २०२४ या कालावधीत देशातील २३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील १६० जिल्ह्यांमध्ये एकही स्थानिक मलेरिया रुग्ण आढळलेला नाही. मलेरिया नियंत्रणाच्या दिशेने ही बाब महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे. विशेषतः पूर्व आणि मध्य भारतातील आदिवासीबहुल, दुर्गम जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे ही प्रगती शक्य झाली आहे.आकडेवारीनुसार, २०१५ ते २०२३ या कालावधीत भारतातील मलेरिया रुग्णसंख्येत सुमारे ८० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. याच काळात मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात घट नोंदवण्यात आली आहे. परिणामी, जागतिक पातळीवर मलेरिया नियंत्रणात भारताची प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे. राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन आराखड्यात जिल्ह्यांचे वर्गीकरण मलेरियाच्या तीव्रतेनुसार करण्यात आले आहे. ज्या भागांत आजाराचा धोका अधिक आहे, तेथे विशेष लक्ष देण्यात येते. या आराखड्याचे प्रमुख घटक म्हणजे तापाच्या रुग्णांचे सक्रीय व निष्क्रिय सर्वेक्षण, वेळेत तपासणी व संपूर्ण औषधोपचार, डास नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणी व मच्छरजाळ्यांचे वितरण, डिजिटल माध्यमातून रुग्णनोंद व निरीक्षण, स्थानिक समुदायाचा सहभाग आणि जनजागृती या उपाययोजनांमुळे मलेरियाचा प्रसार रोखण्यात मदत झाली आहे.मलेरियाचा प्रादुर्भाव मोजण्यासाठी वार्षिक परजीवी घटना दर (एपीआय) हा निर्देशांक वापरला जातो. एका वर्षात प्रति हजार लोकसंख्येमागे किती मलेरिया रुग्ण आढळले, यावरून एपीआय ठरवला जातो. याशिवाय रुग्ण शोध दर, मृत्यूदर आणि प्रयोगशाळा तपासणीचा डेटा वापरून परिस्थितीचे मूल्यांकन केले जाते.
Budget 2026 : बजेटपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरु; त्या 'टॅब'मध्ये नक्की दडलंय काय?
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामण अगदी काही वेळातच संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. थोड्यावेळातच अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या त्या टॅब मध्ये नक्की काय दडलं आहे हे समजेल.अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सलग नव्यांदा देशाचा बजेट सादर करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्थमंत्री सितारमण यांना आपल्या हाताने दही - साखर भरवून शुभेच्छा दिल्या आहेत. कुढल्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण दही साखर खाऊन करतो. म्हणूनच दही - साखर भरवून राष्ट्रपती यांनी निर्मला सीतारमण यांना शुभेच्छा दिल्या.राष्ट्रपतींनी दहीसाखर भरवून अर्थमंत्र्यांना बजेट सादर करण्यासाठी दिल्या शुभेच्छा..#prahaarnewsline #MarathiNews #NirmalaSitharaman #DropadiMurmu #Budget2026 pic.twitter.com/fn5LBhzkhA— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) February 1, 2026अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत जाण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी बजेट सादर करण्यासाठी त्यांनी एक आकर्षक कांजीवरम साडी निवडली आहे. ही साडी तामिळनाडूमधून आली आहे.एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ :अर्थसंकल्पापूर्वी, तेल विपणन कंपन्यांनी रविवारी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करून एलपीजी ग्राहकांना धक्का दिला आहे. मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नसल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
तिरुवनंतपुरममध्ये किवींचा धुव्वा
भारताने मालिका विजयावर उमटवला शिक्कातिरुवनंतपुरम : टी-२० वर्ल्डकपच्या रणधुमाळीपूर्वी भारतीय संघाने आपली तयारी पूर्ण केल्याचे संकेत दिले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवत मालिकेवर वर्चस्व गाजवले. तिरुवनंतपुरम येथे झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताने पाहुण्या संघाचा ४६ धावांनी धुव्वा उडवला.भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली होती. अभिषेकने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळण्यास सुरुवात केली होती.मात्र सॅमसन तिसऱ्याच षटकात ६ धावांवर बाद झाला. त्यानंतर अभिषेकही चांगल्या सुरुवातीनंतर ५ व्या षटकात बाद झाला. त्याने १६ चेंडूंतच ३० धावांची खेळी केली. दोघांनाही लॉकी फर्ग्युसनने बाद केले. या दोन विकेट्सनंतर मात्र इशान किशनचे वादळ न्यूझीलंडवर घोंगावले. त्याला कर्णधार सूर्यकुमार यादवची साथ मिळाली. इशान किशन अत्यंत आक्रमक खेळत होता. त्याने २८ चेंडूतच अर्धशतक केले. तसेच १२ व्या षटकांत इश सोधीविरुद्ध २९ धावाही चोपल्या. त्याच्यासोबत सूर्यकुमारही चांगला खेळत होता. त्यानेही २६ चेंडूंत अर्धशतक केले. पण अर्धशतकानंतर तो १५ व्या षटकात बाद झाला. त्याला मिचेल सँटेनरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक टीम सिफर्टने यष्टीचीत केले. सूर्यकुमारने ३० चेंडूंत ४ चौकार आणि ६ षटकारांसह ६३ धावा केल्या. पण असे असले तरी इशान मात्र त्याच्या लयीत खेळत होता. त्याने ४२ चेंडूंत त्याचे शतक पूर्ण केले. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह यांने आपल्या ४ षटकांमध्ये पाच बळी घेतले.न्यूझीलंडचा डाव २२५ धावांवर आटोपलासलामीवीर टीम सेफर्ट स्वस्तात बाद झाला. सेफर्टला अवघ्या ५ धावांवर अर्शदीप सिंगने माघारी धाडले. त्यानंतर फिन अॅलनने आक्रमक फलंदाजी करत न्यूझीलंडला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. अॅलनने सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने केवळ २२ चेंडूंत अर्धशतक झळकावले. अॅलन शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता, मात्र अक्षर पटेलने त्याची झंझावाती खेळी थांबवली. अॅलनने ६ षटकार आणि ८ चौकारांसह ३० चेंडूंत ८० धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर कोणी मोठी कामगिरी केली नाही आणि संपूर्ण न्यूझीलंडचा संघ २२५ धावांवर मर्यादित राहिला आणि भारताने ४६ धावांनी हा सामना जिंकून मालिकेचा शेवट दिमाखात केला.
पुणे : पुणे शहराच्या सीमांचा विस्तार आणि झपाट्याने वाढणारी लोकसंख्या पाहता, पुणे पोलीस दलावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आता प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली पोलीस भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागणार असून, रिक्त पदे भरण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. पुणे पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी गृह विभागाने हिरवा कंदील दिला आहे. या भरती प्रक्रियेसाठीची संभाव्य तारीख प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली असून, लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. या निर्णयामुळे वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुण-तरुणींना मोठा दिलासा मिळाला असून, पुणे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला यामुळे अधिक बळकटी मिळणार आहे.https://prahaar.in/2026/02/01/one-day-before-the-budget-big-fall-in-gold-and-silver-prices-silver-cheaper-by-72-thousand-gold-prices-also-falling-will-todays-budget-have-an-impact/निम्म्या मनुष्यबळावर शहराची सुरक्षापुणे शहराची सुरक्षा सध्या केवळ निम्म्या पोलीस बळावर अवलंबून असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहराची वाढती व्याप्ती आणि लोकसंख्या पाहता पुणे पोलीस दलात किमान २१ हजार कर्मचाऱ्यांची गरज असताना, प्रत्यक्षात केवळ १० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या ५० टक्के मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कार्यरत पोलिसांना २४-२४ तास सलग कर्तव्य बजवावे लागत असून, त्याचा गंभीर परिणाम त्यांच्या मानसिक आणि कौटुंबिक आरोग्यावर होत आहे. गेल्या वर्षी शहरात सुरक्षेसाठी पाच नवीन पोलीस ठाणी सुरू करण्यात आली, मात्र आवश्यक पदभरती न झाल्याने ही चणचण अधिकच तीव्र झाली आहे. नव्या ठाण्यांमुळे कामाची व्याप्ती वाढली असली तरी कर्मचारी मात्र तेवढेच आहेत. यामुळे पुणे पोलिसांवरील ताण असह्य झाला असून, रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी आता जोर धरत आहे.फेब्रुवारीपासून मैदानी चाचणीचे संकेतवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भातील नियोजनाचे संकेत दिले असून, पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी अंदाजे १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. या शारीरिक चाचणीसाठी पुणे शहरासह राज्यभरातून हजारो तरुण-तरुणी पुण्यात दाखल होण्याची चिन्हे आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या उमेदवारांची राहण्याची व्यवस्था, मैदानांची सज्जता आणि पारदर्शक चाचणी प्रक्रियेसाठी पुणे पोलीस प्रशासनाने आतापासूनच कंबर कसली आहे. मैदानी चाचणीच्या माध्यमातून पात्र उमेदवारांची निवड करून पोलीस दलातील मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय स्तरावर युद्धपातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे.ही भरती का महत्वाची ?या भरतीमुळे प्रामुख्याने तीन स्तरावर मोठे बदल अपेक्षित आहेत. प्रथम, कामाचा ताण कमी होईल; नवीन कर्मचारी आल्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या पोलिसांना हक्काच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि कामाचे निश्चित तास मिळणे शक्य होईल. दुसरे म्हणजे, गुन्हेगारीवर वचक निर्माण होईल; शहरात नव्याने सुरू झालेल्या पोलीस ठाण्यांना पुरेसे संख्याबळ मिळाल्यास गस्त आणि गुन्ह्यांच्या तपासाला वेग येईल. तिसरे आणि महत्त्वाचे म्हणजे, खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांना रोजगाराची सुवर्णसं
नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण देशाचे लक्ष संसदेकडे लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी ११ वाजता लोकसभेत २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडून निर्मला सीतारामन एक नवा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित करणार आहेत.अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे 'कर्तव्य भवन' येथे आगमन झाले आहे. एनडीए (NDA) सरकारने १ फेब्रुवारी रोजीच अर्थसंकल्प मांडण्याची सुरू केलेली परंपरा यावर्षीही कायम राखण्यात आली आहे. या अर्थसंकल्पातून शेतकरी, मध्यमवर्गीय आणि उद्योजकांसाठी कोणत्या मोठ्या घोषणा होतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. थोड्याच वेळात संसदेच्या अधिवेशनात अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात होणार असून, भारताच्या भविष्यातील आर्थिक वाटचालीचा आराखडा आज मांडला जाईल.
Ankita Walawalkar Post : “कधी कधी जबाबदारी स्वीकारणं हेच…”; अंकिता वालावलकरची पोस्ट चर्चेत
Ankita Walawalkar Post : राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर अंकिता वालावलकर हिने लक्ष वेधून घेणारी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे.
Union Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण जेव्हा जेव्हा अर्थसंकल्प सादर करतात तेव्हा लोकांचे लक्ष केवळ अर्थसंकल्पीय घोषणांवरच नाही तर त्यांच्या साडीवरही असते.
Gold-Silver Crash: आज सकाळी ९:२५ च्या सुमारास मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीच्या दरात तब्बल २६,२७३ रुपयांची (९%) मोठी घसरण झाली. यामुळे मार्चच्या कॉन्ट्रॅक्ट डिलिव्हरीची चांदी २,६५,६५२ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
तळमावले – अनेक जण जिंकल्यानंतर गुलालामध्ये सामील होतात. परंतु, संघर्षाच्या काळामध्ये जे कोणी आपल्याबरोबर असतात तेच निष्ठावंत असतात. गेले दहा वर्षापासून बनपुरी ग्रामस्थ संघर्ष करत आहेत आणि या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी मंद्रुळ कोळे गट व गणांमधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन […]
Budget 2026 : दही - साखर भरवून राष्ट्रपती मुर्मू यांनी दिल्या अर्थमंत्री सीतारमण यांना शुभेच्छा
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सलग नव्यांदा देशाचा बजेट सादर करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्थमंत्री सितारमण यांना आपल्या हाताने दही - साखर भरवून शुभेच्छा दिल्या आहेत. कुढल्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण दही साखर खाऊन करतो. म्हणूनच दही - साखर भरवून राष्ट्रपती यांनी निर्मला सीतारमण यांना शुभेच्छा दिल्या.अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत जाण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी बजेट सादर करण्यासाठी त्यांनी एक आकर्षक कांजीवरम साडी निवडली आहे. ही साडी तामिळनाडूमधून आली आहे. लवकरच तामिळनाडू येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत.यंदाचे बजेट तयार करणारी टीम..#prahaarnewsline #MarathiNews #Budget2026 #NirmalaSitharaman #FinanceMinistry pic.twitter.com/bRCr3LaPPZ— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) February 1, 2026एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ :अर्थसंकल्पापूर्वी, तेल विपणन कंपन्यांनी रविवारी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करून एलपीजी ग्राहकांना धक्का दिला आहे. मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नसल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.रेस्टोरंट्समधील खाद्य पदार्थांचे दर वाढणार :व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा वापर प्रामुख्याने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, रस्त्यावरील ढाबे आणि इतर व्यावसायिक ठिकाणी केला जातो. त्यामुळे हॉटेल्स-रेस्टोरंट्समधील खाद्य पदार्थांचे दर वाढण्याची शक्यता आहे. सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये सुधारणा करतात. जानेवारीमध्ये, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १११ रुपयांनी वाढवण्यात आली होती.
Union Budget 2026 : अर्थसंकल्प सादर करताच निर्मला सीतारमण नावावर करणार नवा रेकॉर्ड
Union Budget 2026 : सर्वात दीर्घकाळ सातत्याने अर्थमंत्री राहण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर नोंदवला जाईल
Devendra Fadnavis : सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Budget 2026 Live: अर्थमंत्री सीतारमण आज, १ फेब्रुवारी रोजी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. हा अर्थसंकल्प एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या आर्थिक वर्षासाठी असणार आहे.
Budget 2026 Live: अर्थमंत्री सीतारमण आज, १ फेब्रुवारी रोजी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. हा अर्थसंकल्प एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या आर्थिक वर्षासाठी असणार आहे.
Stock Market Budget 2026: अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार कोसळले ; संरक्षण क्षेत्रातील शेअर्स वाढले
Stock Market Budget 2026: अर्थसंकल्पाच्या आधी शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स १०० अंकांनी घसरला, तर निफ्टी ६२.७० अंकांनी घसरला. वेदांत, हिंदुस्तान झिंक आणि हिंदुस्तान कॉपरमध्ये लक्षणीय घसरण दिसून येत आहे.
नवी दिल्ली : आज १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आपला सलग नवा अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचला आहे. माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचा विक्रम मोडीत काढत त्यांनी हा बहुमान मिळवला. मात्र, या ऐतिहासिक आकडेवारीसोबतच अर्थमंत्र्यांच्या पेहरावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी परिधान केलेली तामिळनाडूच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी गडद जांभळ्या रंगाची 'कट्टम' कांजीवरम सिल्क साडी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. अर्थमंत्र्यांनी नेहमीप्रमाणेच 'लोकल टू व्होकल'चा संदेश देत भारतीय हस्तकलेचा सन्मान केला. या साडीवरील 'कट्टम' म्हणजेच वैशिष्ट्यपूर्ण चौकटींची (Checks) नक्षी आणि तिला असलेली आकर्षक सोनेरी झरी बॉर्डर भारतीय विणकाम कौशल्याचा उत्कृष्ट नमुना ठरली. दरवर्षी बजेटच्या दिवशी अर्थमंत्र्यांची साडी ही केवळ फॅशन नसून भारतीय विणकरांच्या कष्टाला दिलेली एक मानवंदना असते, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.https://prahaar.in/2026/02/01/shocking-gunfire-reported-outside-director-rohit-shetty-juhu-residence-police-probe/अर्थमंत्र्यांनी नेसलेल्या साडीची अंदाजे किंमत किती ?
Union Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी सलग नवव्यांदा पूर्णवेळ अर्थसंकल्प सादर करणार आहेत. इतिहासात दुसऱ्यांदा रविवारी अर्थसंकल्प सादर केला जात आहे.
Budget 2026 Farmers Expectation: केंद्र सरकारकडून कृषी क्षेत्रासाठीच्या तरतुदींमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महायुती एक आणि एकच राहणार! महायुतीला गालबोट लावू देणार नाही
जिल्ह्यात पन्नास जागा जिंकण्याचा आ. निलेश राणे यांचा निर्धारवेंगुर्ले : महायुतीचे सर्व उमेदवार कसे निवडून येतील याबाबत आमची चर्चा होती. जशी आम्ही महायुतीबाबत खबरदारी घेतो तशी भाजपने सुद्धा घ्यायला हवी. याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष व पालकमंत्री यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. जिल्ह्यात पन्नासही जागा महायुती जिंकू शकते अशी परिस्थिती आहे. मात्र, काही उमेदवारांची धाकधूक माझ्या कानावर आली आहे. तुमची कुठे अडचण होईल, असे आम्ही होऊ देणार नाही, याचा बंदोबस्त आम्ही करू. महायुती एक आणि एकच राहणार. जर कुठे गालबोट लागत असेल, तर त्याचा बंदोबस्त करू. आमदार केसरकर ज्येष्ठ आहेत. ते त्यांचे काम करीत आहेत. जी काय गडबड सुरू आहे ती माझ्या कानावर आली आहे आणि त्यावर उपायही मी सांगितले आहेत. त्यामुळे तुम्ही निवडणुकीवर लक्ष ठेवा. निवडून या, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी वेंगुर्ला येथे केले.वेंगुर्लेत शनिवारी शिंदेसेनेच्या कार्यालयात आमदार निलेश राणे यांनी जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार व प्रमुख पदाधिकारी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी बंद खोलीत झालेल्या चर्चेत उमेदवारांनी आपल्याला येत असलेल्या अडचणींबाबत आमदार राणे यांच्याकडे व्यथा मांडली. यानंतर उपस्थित उमेदवार व पदाधिकारी यांना आ. निलेश राणे यांनी संबोधित करीत नवी ऊर्जा दिली. यावेळी शिंदेसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, प्रभारी तालुकाप्रमुख सचिन देसाई, युवासेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, बाळा दळवी, सुनील मोरजकर, काशिनाथ नार्वेकर, शितल साळगांवकर यांच्यासहीत तालुक्यातील शिवसेनेचे उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, आज या निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीला चांगले वातावरण आहे. ज्याप्रमाणे वेंगुर्ला तालुक्यातील उमेदवारांना आमदार राणे यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सावंतवाडी व दोडामार्ग याठिकाणी सुद्धा आपला वेळ द्यावा. महायुतीच्या विरोधात तिसऱ्या शक्तीने उभे केलेले अपक्ष उमेदवार हे पडले पाहिजेत यासाठी काम करा असे आवाहन त्यांनी केले.
भीक मागण्याची लाज वाटते, शरमेने मान खाली जाते
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुलीइस्लामाबाद : कर्जबाजारी पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. देशातील जनता महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, पायाभूत सुविधांची कमतरता यात भरडत असताना सरकार मदतीसाठी कधी चीन तर कधी ‘आयएमएफ’कडे हात पसरत आहे. खुद्द पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आता लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्याबरोबर आर्थिक मदत मागण्यासाठी परदेशात गेल्याची कबुली दिली. या हतबलतेची लाज वाटत असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.इस्लामाबाद येथे देशातील व्यावसायिकांशी शाहबाज यांनी संवाद साधला. यावेळी शाहबाज यांनी देशाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याचे मान्य केले. यामुळे काही कठीण निर्णय घ्यावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. देशाचा परकीय चलनसाठा जवळपास दुप्पट झाला; परंतु या साठ्यामध्ये मित्र देशांकडून घेतलेल्या कर्जाचा समावेश असल्याचेही त्यांनी नमूद केले. देशाचा परकीय चलन साठा दुप्पट झालाय पण, यात मित्र देशांकडून घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे. कर्ज घ्यायला गेलेल्या माणसाचं डोकं झुकलेलं असतं, असे शाहबाज यावेळी बोलताना म्हणाले.परदेशात जाऊन आर्थिक मदत मागणे किती शरमेची बाब आहे, याचा उल्लेखदेखील शाहबाज यांनी केला. लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर आणि मी परदेशात पैशांची भीक मागण्यासाठी जातो तेव्हा लाज वाटते. कर्ज घेणं आत्मसन्मानावर मोठं दडपण असतं. आमची मान शरमेने खाली झुकलेली असते. समोरून मागणी केल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींना आम्ही नाही म्हणू शकत नाही, अशी व्यथा पंतप्रधान शाहबाज यांनी व्यापाऱ्यांसमोर मांडली. देशाची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबरोबर सक्रिय चर्चा करत आहे. यासाठी पाकिस्तान काही कठोर धोरणं लागू करण्याचा विचारही करत आहे. अशा काळात पंतप्रधान शाहबाज यांनी केलेल्या वक्तव्याचे विविध अर्थ लावले जात आहे. आर्थिक मदत मागण्यासाठी परदेशात फिरल्याने राष्ट्रीय आत्मसन्मानाला धक्का पोहोचतो, असे मत त्यांनी मांडले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांनी यावेळी चीनचा ‘चांगला मित्र’ म्हणून उल्लेख केला. देशाच्या कठीण काळात पाठिंबा दिल्याबद्दल सौदी अरेबिया, यूएई आणि कतारचेही त्यांनी आभार मानले. हे देश परकीय चलन साठा स्थिर ठेवण्यास आणि इतर आर्थिक संकट टाळण्यास मदत करतात, असा उल्लेख त्यांनी भाषणात केला. शरीफ यांनी देशात गरिबी, बेरोजगारी वाढल्याचे त्यांनी मान्य केले. पाकिस्तानमध्ये गरिबीचे प्रमाण सुमारे ४५ टक्के असून, त्यापैकी १६.५ टक्के लोक अत्यंत गरिबीत जगत असल्याचे त्यांनी सांगितले. देशात बेरोजगारीचा दर ७.१ टक्के असून, आठ दशलक्षांहून अधिक लोक बेरोजगार आहेत. देशावर सार्वजनिक कर्ज ७६,००० अब्ज रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. पाकिस्तान अजूनही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे योजना आणि परदेशी कर्ज यांच्यावर अवलंबून आहे, असे शाहबाज यांनी सांगितले.
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठी आव्हाने असून, त्या आव्हानांचा सामना त्यांना करावा लागणार आहे.
Rule Change 1st February: LPG… FASTag ते पान मसाल्यापर्यंत, आजपासून देशात हे ५ मोठे बदल लागू
Rule Change 1st February: आजपासून फेब्रुवारी सुरू होत आहे आणि देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प पहिल्या तारखेला सादर होणार असताना, देशभरात अनेक मोठे बदल देखील लागू होणार आहेत.
LPG Price Hike : अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकांना मोठा धक्का; एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ
LPG Price Hike :देशातील सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी हे दर जारी केले आहे.
इस्त्रोचे २०२७ मध्ये गगनयान मिशन सुरू होणार
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अध्यक्ष वी. नारायणन यांनी सांगितले की, इस्रो २०२७ मध्ये गगनयान मिशन सुरू करण्याच्या तयारीत आहे. गगनयान हा भारताचा पहिला मानवी अंतराळ प्रवास कार्यक्रम असून त्याअंतर्गत तीन सदस्यीय दलाला तीन दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी पाठवून सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्याचे उद्दिष्ट आहे.नुकतेच अध्यक्ष वी. नारायणन यांनी स्पष्ट केले की, गगनयान मिशन सुरू करण्यापूर्वी तीन मानवरहित मिशन यांची योजना आखण्यात आली आहे. सध्या इस्रोचे वैज्ञानिक या पहिल्या मानवरहित मिशनसाठी विविध चाचण्या आणि तयारीत व्यस्त आहेत. त्यांनी सांगितले की, सध्याच्या काळात वैज्ञानिक गगनयान मिशनच्या यशासाठी आवश्यक असलेल्या सर्व चाचण्या पार पाडत आहेत. गगनयात्रेची सुरक्षा महत्त्वाची आहे, त्यामुळे प्रत्येक प्रणालीची गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे. इस्रो अध्यक्षांनी पुढे नमूद केले की, रॉकेट प्रणालीत शंभर टक्के यश मिळवणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आमचा लक्ष्य गगनयानच्या यशस्वीतेकडे नेणे आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, नारायणन यांनी सांगितले.पीएसएलव्ही-सी६२ मिशनाच्या गगनयान मिशन संदर्भात ते म्हणाले की, मिशनदरम्यान घडलेल्या तांत्रिक अडचणींचा सखोल अभ्यास केला जात आहे. १२ जानेवारी रोजी प्रक्षेपणानंतर रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्यात काही गडबडी आढळल्यामुळे वैज्ञानिकांनी या मिशनचे तपशीलवार विश्लेषण सुरू केले आहे. नारायणन यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक घटक आणि प्रणालीचे बारकाईने परीक्षण करूनच पुढील चरणात काम केले जाईल. इस्रोच्या गगनयान मोहिमेने भारतीय अंतराळ क्षेत्राला नवचैतन्य मिळवून दिले असून, २०२७ पर्यंत या मिशनची तयारी सुरू असून, देशासाठी हा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.
व्हेनेझुएलाच्या तेल खरेदीसाठी भारताला ऑफर
वॉशिग्टन : गेल्या वर्षी अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेल खरेदीसाठी भारतावर शुल्क लादले होते. आता, अमेरिका पुन्हा एकदा भारताला व्हेनेझुएलाचे तेल विकण्याचा आग्रह करत आहे, कारण अमेरिका भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याऐवजी पर्याय देऊ इच्छित आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने भारताला सांगितले आहे की ते रशियन तेल आयात बदलण्यास मदत करू शकते. भारत व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी पुन्हा सुरू करू शकतो. भारत रशियाकडून तेल खरेदी कमी करत आहे. रॉयटर्सना मिळालेल्या सूत्रांनुसार, अमेरिकेने शुल्क वाढवण्याची धमकी दिल्यानंतर भारताने रशियन कच्च्या तेलाची खरेदी कमी करण्याचे आश्वासन दिले होते.अमेरिकेने अलीकडेच अनेक वेळा दावा केला आहे की, भारत येत्या काही महिन्यात रशियन तेल आयात दररोज अनेक दशलक्ष बॅरलने कमी करण्याच्या मार्गावर आहे. भारताने जानेवारीमध्ये रशियाकडून दररोज सुमारे १.२ दशलक्ष बॅरल तेल खरेदी केले होते आणि फेब्रुवारीमध्ये ते दररोज अंदाजे १ दशलक्ष बॅरल आणि मार्चमध्ये दररोज ८००,००० बॅरलपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. व्हेनेझुएलाच्या तेल रशियाकडून होणारी ही तेल आयात कमी होऊ शकते. यामुळे भारताला अमेरिकेसोबत व्यापार करार करण्यास मदत होईल.भारत व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करेल का?रशियाकडून होणाऱ्या खरेदीत कपातीला प्रतिसाद म्हणून, अमेरिका व्हेनेझुएलासोबत तेल पुरवठ्यासाठी व्यापार करण्यास मान्यता देत आहे. यामागील कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे तेल आपली मालमत्ता मानतात. अमेरिकन लष्कराने २ आणि ३ जानेवारीच्या रात्री व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली. तेव्हापासून अमेरिका व्हेनेझुएलाच्या तेलावर मालकी हक्क सांगत आहे.
Devendra Fadnavis post : सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
Rohit Shetty House Firing : धक्कादायक! दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर गोळीबार
Rohit Shetty House Firing : शनिवारी रात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या या गोळीबारानंतर बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार
सामान्य माणसापासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांच्या नजरा अर्थसंकल्पावरनवी दिल्ली : २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प रविवार, १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. पारंपरिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर केला जाईल. हे सादरीकरण ऐतिहासिक आहे. कारण रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प पहिल्यांदाच सादर केला जाणार आहे. २०२६ चा अर्थसंकल्प हा सीतारामन यांचा सलग नववा अर्थसंकल्प असेल, ज्यामुळे त्या सलग अनेक अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सर्वात जास्त काळ अर्थमंत्री राहतील.संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यांत होण्याची अपेक्षा आहे. पहिला टप्पा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान चालेल, तर दुसरा टप्पा ९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान होणार आहे. लोक संसद टीव्हीवर केंद्रीय अर्थसंकल्प थेट पाहू शकतात, जो त्यांच्या वेबसाइट sansadtv.nic.in वर पाहता येईल. ते संसद टीव्हीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर कार्यवाही पाहू शकतात. दूरदर्शन देखील कार्यवाही थेट प्रक्षेपित करेल. केंद्रीय अर्थसंकल्प हा भारतीय संविधानाच्या कलम ११२ अंतर्गत सादर केला जाणारा वार्षिक आर्थिक विवरणपत्र आहे. त्यात आगामी आर्थिक वर्षासाठी सरकारच्या अंदाजे उत्पन्न आणि खर्चाची रूपरेषा दिली जाते. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि कल्याण यांसारख्या क्षेत्रांमधील प्रमुख धोरणात्मक निर्णय, कर बदल, सुधारणा आणि खर्चाच्या प्राधान्यांची घोषणा देखील केली जाते.सीतारामन यांचा सलग नववा अर्थसंकल्प: गेल्या१५ वर्षांतील आकडेवारी पाहता, बजेटच्या दिवशी शेअर बाजाराची स्थिती फारशी चांगली नसते; मात्र त्यानंतरच्या आठवड्यात मोठी तेजी पाहायला मिळते. जुनी आकडेवारी सांगते की, प्री-बजेट आठवड्यात निफ्टी सरासरी ०.५२ टक्क्यांनी खाली येतो, तर बजेटच्या दिवशी ‘निफ्टी बँक’मध्ये सरासरी तेजी दिसून येते.अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे आणि अपेक्षासामान्य माणसापासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांच्या नजरा या अर्थसंकल्पावर खिळल्या आहेत. सरकार आगामी एका वर्षात काय करणार आहे, याचा अंदाज बजेटवरून येतो, म्हणूनच याची प्रतिक्रिया शेअर बाजारावरही उमटते. यावेळेस पुन्हा एकदा सरकारचे लक्ष ‘कॅपिटल एक्स्पेंडिचर’वर (भांडवली खर्च) असू शकते. इन्कम टॅक्स नवी सवलत मिळण्याची शक्यता कमी आहे. सध्याच्या परिस्थितीत सरकार लोकप्रिय घोषणा करण्याऐवजी अर्थव्यवस्थेवर जास्त भर देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रमित झवेरी यांचा सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्त पदाचा राजीनामा
मुंबई : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे विश्वासू सहकारी मानले जाणारे प्रमित झवेरी यांनी ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’च्या विश्वस्त पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. झवेरी यांचा कार्यकाळ ११ फेब्रुवारी २०२६ रोजी संपत असून, त्यांनी फेरनियुक्तीस नकार दिला आहे.झवेरी यांनी टाटा ट्रस्ट्सचे विद्यमान अध्यक्ष नोएल टाटा यांना ३१ जानेवारी रोजी औपचारिक पत्र लिहून निर्णयाची माहिती दिली. ‘माझा कार्यकाळ ११ फेब्रुवारी २०२६ रोजी संपत आहे व त्यानंतर मी पुन्हा विश्वस्त म्हणून काम पाहू इच्छित नाही,’ असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या संदर्भात त्यांनी नोएल टाटांशी आधीच चर्चा केली होती. झवेरी हे सिटी बँकेचे माजी प्रमुख आहेत. ते आर्थिक सल्लागार म्हणून ट्रस्टमध्ये कार्यरत आहेत.
मोमो फॅक्टरीत कोणाचे पैसे जमा होते?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ममता बॅनर्जींवर टीकानवी दिल्ली : आनंदपूरची ही आग ही केवळ एक अपघात नाही तर ममता बॅनर्जी सरकारमधील भ्रष्टाचाराचे उघड प्रदर्शन आहे. मोमो कारखान्यात कोणाचे पैसे साठवले गेले होते? कारखाना मालक कोणाबरोबर परदेशात गेला होता? मालकाला अद्याप अटक का करण्यात आली नाही?, असा प्रश्न विचारत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.कोलकाताजवळील आनंदपूर मोमो फॅक्ट्रीच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेवरून प्रशासकीय निष्काळजीपणाचा मुद्दा उपस्थित करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजप कार्यकर्ता संमेलनात गर्दीला संबोधित करताना शहा यांनी सर्वप्रथम आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर उत्तर २४ परगणा येथील भाजप कार्यकर्ता संमेलनाला संबोधित करताना अमित शहा यांनी प्रश्न मोमो कारखाना प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली.शहा यांनी या घटनेवर राज्य सरकारच्या प्रतिसादावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कामगारांच्या आक्रोशाच्या ३२ तासांनंतरही सरकार गप्प असल्याचे त्यांनी उपहासात्मकपणे सांगितले. ते म्हणाले, २५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि २७ अजूनही बेपत्ता आहेत. हे भारतीय नागरिक होते; परंतु मुख्यमंत्री ३२ तासांनंतर घटनास्थळी पोहोचल्या. हे लज्जास्पद आहे.पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अत्याचार केल्याचा आरोपही त्यांनी केला. अमित शहा म्हणाले की, ‘वंदे मातरम’ या गाण्याचे जन्मस्थान असलेल्या बंगालमध्ये ‘वंदे मातरम’ या ओळखीवर हल्ला होत आहे. तसेच शहा यांनी प्रश्न केला की, ‘वंदे मातरमच्या १५० व्या वर्षांत, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी संसदेत त्याचा विरोध केला. ममता बॅनर्जी मतपेढीच्या राजकारणासाठी बंगालच्या ओळखीच्या विरोधात उभ्या आहेत. बंगालचे लोक हे सहन करतील का?’ असा सवालही केला.याचबरोबर बेकायदेशीर घुसखोरीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करताना अमित शहा यांनी याला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले. सीमा सुरक्षा दलाला सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात राज्य सरकारने सहकार्य केले नाही, या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाचा हवाला देत ते म्हणाले की, सध्याच्या सरकारने सहकार्य करो अथवा ना करो, मात्र भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर ३५ दिवसांच्या आत सीमेवर कुंपण घालण्याचे काम पूर्ण केले जाईल.लवकरच पश्चिम बंगलामध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून या निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी भाजपने गेल्या काही महिन्यांपासून कंबर कसली आहे. अमित शहा यांनी स्वत: ही जबाबदारी स्वीकारली असून त्यांचा आक्रमकपणे प्रचारही सुरू झाला आहे.
वाढत्या वायुप्रदूषणाचा डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम
१८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांमध्ये या तक्रारींचे प्रमाण अधिकमुंबई : मुंबईतील वाढते वायुप्रदूषण आता केवळ श्वसनसंस्था किंवा हृदयविकारांपुरते मर्यादित राहिले नसून, त्याचा थेट आणि गंभीर परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होत असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. महानगरातील हवेतील सूक्ष्म प्रदूषणकण, विशेषतः पीएम २.५, पीएम १० आणि ऑझोनसारखे घातक वायू, डोळ्यांच्या पृष्ठभागावर सातत्याने परिणाम करत असल्याने मुंबईकरांमध्ये विविध नेत्रविकारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.अलीकडेच करण्यात आलेल्या एका स्थानिक आरोग्य सर्वेक्षणानुसार सुमारे ४४ टक्के मुंबईकरांनी प्रदूषणामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, लालसरपणा, खाज, कोरडेपणा किंवा सतत पाणी येणे यांसारख्या तक्रारी असल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे, १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांमध्ये या तक्रारींचे प्रमाण अधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. दीर्घकाळ घराबाहेर राहणारे कर्मचारी, वाहनचालक आणि बांधकाम क्षेत्रातील कामगार यांना या समस्यांचा सर्वाधिक सामना करावा लागत असल्याचेही आढळून आले आहे.वैज्ञानिक अभ्यासांनुसार पीएम २.५, पीएम १० हे अतिसूक्ष्म प्रदूषणकण थेट डोळ्यांच्या पृष्ठभागावर साचतात. हे कण डोळ्यांच्या नैसर्गिक अश्रुपटलाला नुकसान पोहोचवतात. परिणामी ‘ड्राय आय सिंड्रोम’, कंजंक्टिव्हायटिस, सततची खाज, लालसरपणा आणि डोळ्यांतून पाणी येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. तज्ज्ञांच्या मते, प्रदूषणामुळे निर्माण होणारा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि दीर्घकालीन दाह डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो.नेत्ररोग तज्ज्ञांच्या मते, प्रदूषणाचा हा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. घराबाहेर जाताना संरक्षक चष्म्यांचा वापर, डोळे वारंवार स्वच्छ पाण्याने धुणे, डॉक्टरांच्या सल्ल्याने लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स वापरणे आणि प्रदूषण जास्त असलेल्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळणे गरजेचे आहे.तज्ज्ञांचे असेही मत आहे की, जर प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात आल्या नाहीत, तर येत्या काळात मुंबईत डोळ्यांच्या आजारांचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वैयक्तिक खबरदारीसोबतच प्रशासनाकडूनही ठोस पावले उचलली जाणे अत्यावश्यक असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोणीही पाटील चालेल, पण पटेल नको
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मतमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी सुरू असून आज दिवंगत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा आज उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही, असं मत राज ठाकरेंनी मांडलं आहे.अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत आहे. प्रफुल्ल पटेल हे सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. अशातच सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची धुरा आल्याने पक्षसंघटनेला त्या कितपत वेळ देऊ शकतील, असा मुद्दा पुढे करत प्रफुल्ल पटेल यांच्याकडून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर दावा सांगितला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीर राज ठाकरेंनी रोखठोक भूमिका मांडली आहे. राज ठाकरे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही. दरम्यान, राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय घडामोडी घडतात, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा पुढे जाते का, पक्षाला नवं नेतृत्व मिळणार की प्रफुल्ल पटेल हेच राष्ट्रवादीचं अध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणण्यात यशस्वी होणार, हे सगळं पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
बलुचिस्तानमध्ये एकाच वेळी १२ ठिकाणी हल्ले
१२ सुरक्षा कर्मचारी, तर ३७ दहशतवादी ठारबलुचिस्तान : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात शनिवारी बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए)ने एकाच वेळी १२ पेक्षा अधिक ठिकाणी समन्वयित हल्ले करून देशाच्या सुरक्षेला मोठे आव्हान दिले. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये किमान १२ सुरक्षा कर्मचारी ठार झाले असून प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या कारवाईत ३७ दहशतवादी मारले गेले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण बलुचिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी क्वेटा, पसनी, मस्तुंग, नुश्की आणि ग्वादर जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हल्ले करण्यात आले. राजधानी क्वेटामध्येच किमान चार पोलीस कर्मचारी ठार झाले. मात्र, हे चार पोलीस कर्मचारी एकूण १० मृतांमध्ये समाविष्ट आहेत की नाही, याबाबत अजूनही माहिती मिळू शकलेली नाही. क्वेटातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दहशतवाद्यांनी नुश्की जिल्ह्याचे उपआयुक्त (डिप्टी कमिशनर) यांचे अपहरण केल्याची माहिती दिली आहे.बीएलएने या संपूर्ण मोहिमेला ‘ऑपरेशन हेरोफ’ असे नाव दिले आहे. संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात लष्करी तळ, पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, लष्करी हालचालींमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी काही प्रमुख महामार्ग बंद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.क्वेटा शहरात अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. संपूर्ण शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून मुख्य रस्ते निर्मनुष्य झाले होते आणि बाजारपेठा बंद राहिल्या. ३८ वर्षांचे खासगी कर्मचारी अब्दुल वली यांनी सांगितले, “सकाळपासून सतत स्फोट होत आहेत. माझी आई रुग्णालयात दाखल आहे, तिला रक्ताची गरज आहे. मात्र पोलीस आम्हाला परत पाठवतात आणि पुढे गेल्यास गोळी घालण्याची धमकी देतात. अशा परिस्थितीत आम्ही काय करावे?”या हल्ल्यांपूर्वीच एक दिवस आधी पाकिस्तानी सैन्याने दावा केला होता की, बलुचिस्तानमध्ये दोन वेगवेगळ्या मोहिमांमध्ये ४१ बंडखोरांना ठार करण्यात आले आहे. त्यानंतर झालेल्या या समन्वयित हल्ल्यांमुळे सुरक्षा यंत्रणांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात गरीब प्रांत मानला जातो. नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असूनही शिक्षण, रोजगार आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत हा प्रांत देशातील इतर भागांपेक्षा मागे आहे. अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेला लागून असलेला हा प्रदेश दीर्घकाळापासून हिंसाचार आणि बंडखोरीने ग्रासलेला आहे. बलुच फुटीरतावादी संघटना, विशेषतः बीएलए, सरकारी सैन्य, परदेशी नागरिक आणि इतर प्रांतांतील मजुरांना लक्ष्य करत आहेत. त्यांच्या मते, बलुचिस्तानच्या संसाधनांचे शोषण होत असून स्थानिक लोकांचे हक्क डावलले जात आहेत.ग्लोबल टेररिझम इंडेक्स २०२५ नुसार, बुर्किना फासो नंतर पाकिस्तान जगातील दुसरा सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश ठरला आहे. २०२४ मध्ये पाकिस्तान चौथ्या स्थानावर होता. अहवालानुसार, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या हल्ल्यांमध्ये ९० टक्के वाढ झाली असून बीएलएच्या हल्ल्यांमध्ये सुमारे ६० टक्के वाढ झाली आहे. खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान हे पाकिस्तानमधील सर्वाधिक दहशतवादग्रस्त प्रदेश असून देशातील एकूण दहशतवादी घटनांपैकी ९० टक्के याच भागात घडत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Union Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी सलग नवव्यांदा पूर्णवेळ अर्थसंकल्प सादर करणार आहेत. इतिहासात दुसऱ्यांदा रविवारी अर्थसंकल्प सादर केला जात आहे.
वयाच्या १८ व्या वर्षी पोलिसांनी माझ्यावर खुनाचा आरोप लावला. मी स्वतःचा खटला लढवला आणि १२ वर्षांनी सन्मानाने निर्दोष मुक्त झालो. मी माझा खटला लढण्यासाठी कायद्याचा अभ्यास केला आणि आता मी वकील अमित चौधरी आहे. मी मेरठ बार असोसिएशनचा सदस्य देखील आहे. माझ्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट लवकरच बनवला जात आहे, जो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. मी उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील किर्थल गावचा रहिवासी आहे. माझ्या वडिलांना शेतीतून कुटुंबाचा खर्च भागवायचा होता. पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतेक तरुणांप्रमाणे मलाही सैन्यात भरती व्हायचे होते. मी काळजीपूर्वक तयारी केली. या कठोर परिश्रमामुळे मी बीए करत असताना 'सी' एनसीसी प्रमाणपत्र मिळवले. १२ ऑक्टोबर २०११ ची ती काळोखी रात्र अजूनही माझ्या आठवणीत कोरली गेली आहे. त्यावेळी मी १८ वर्षे आणि दोन महिन्यांचा होतो. माझ्या वडिलांनी मला एका महत्त्वाच्या कामासाठी शामली येथील माझ्या बहिणीच्या घरी पाठवले. त्याच रात्री, माझ्या बहिणीच्या गावापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर, एक घटना घडली. काही गुन्हेगारांनी दोन पोलिसांवर हल्ला केला आणि त्यांच्या रायफल हिसकावून घेतल्या. त्यानंतर झालेल्या चकमकीत, एक हवालदार ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी संशयावरून सुमारे १०० लोकांना ताब्यात घेतले. त्यात माझे वडीलही होते. माझ्या वडिलांच्या अटकेनंतर आमच्या गावात दहशत पसरली. माझी आई घाबरली. तिने मला सरूरपूर येथील माझ्या आजीच्या घरी पाठवले. माझ्या आजीच्या आईवडिलांच्या घरी राहून मी अकरा दिवस झाले होते. २४ ऑक्टोबर रोजी रात्रीचे ८ वाजले होते. मी माझ्या कुटुंबासह अंगणात जेवत होतो तेव्हा मला काही लोकांचा आवाज आला. ते पायऱ्या चढून टेरेसकडे जात होते. मी छताकडे पाहिले आणि मला एके-४७ घेऊन उभे असलेले पोलिस दिसले. सर्वांनी बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते. संपूर्ण घर पोलिस छावणी बनले होते. माझ्या एका नातेवाईकाची, ज्याची रजा त्या दिवशी रद्द करण्यात आली होती, तो देखील या कारवाईत सहभागी होता. छतावरून एका पोलिसाने कडक आवाजात विचारले – अमित कुठे आहे? कुटुंबातील एका महिलेने हात जोडून म्हटले, साहेब, अमितने काहीही चूक केलेली नाही. पोलीस तोच प्रश्न विचारत राहिले: आधी अमित कुठे आहे ते आम्हाला सांगा. तो कुठेही असेल तर त्याला आमच्या स्वाधीन करा. माझ्या हातात ब्रेडचा तुकडा होता, पण मी तो प्लेटमध्येच ठेवला. मी उभा राहून म्हणालो, मी अमित आहे. मला पाहताच पोलिसांनी त्यांच्या बंदुका खाली केल्या. एक अधिकारी हसून म्हणाला, अरे, तू अमित आहेस का? खरंतर, ते काही उंच, धोकादायक गुन्हेगाराच्या शोधात होते, पण त्यांच्या समोर एक पातळ, सामान्य १८ वर्षांचा मुलगा उभा होता. आमच्या नातेवाईकांनी पोलिसांना विनंती केली, पण त्यांनी मला अटक केली आणि बोलेरो जीपमध्ये घेऊन गेले. हे मुझफ्फरनगर पोलिस होते. दरम्यान, बागपत पोलिसही माझा शोध घेत होते. जेव्हा त्यांना कळले की मुझफ्फरनगर पोलिसांनी मला अटक केली आहे, तेव्हा त्यांची जीप आमच्या मागे लागली. मुझफ्फरनगर पोलिसांची जीप शामलीत येईपर्यंत त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू ठेवला. वाटेत, पोलिस त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगत होते, जय हिंद, साहेब, अमितला पकडण्यात आले आहे. ते असे बोलत होते जणू काही त्यांनी एखाद्या धोकादायक दहशतवाद्याला पकडले आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या की शामली मुख्यालयात मोठ्या संख्येने माध्यम प्रतिनिधी उपस्थित राहावेत, म्हणून अमितला शामली पोलिस ठाण्यात घेऊन जा. त्यानंतर, एक तासानंतर, त्याला मुझफ्फरनगर सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात घेऊन जा. पोलिसांनी अगदी तेच केले. एक तासानंतर, मला मुझफ्फरनगर सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये बंद करण्यात आले. मला लॉकअपमध्ये टाकताच पोलिसांनी माझ्या वडिलांना सोडले. लॉकअपच्या अगदी शेजारीच क्राइम ब्रांच ऑफिस होते. त्यांच्या अधिकाऱ्यांनी मला दिवसा ११ दिवस, ३ नोव्हेंबरपर्यंत, ताब्यात ठेवले आणि दररोज माझी चौकशी केली, रात्री मला लॉकअपमध्ये ठेवले. वकील अमित चौधरी मेरठ येथील त्यांच्या कार्यालयात. आता मी तुम्हाला लॉकअपमधील परिस्थितीबद्दल सांगतो. पहिल्या दिवशी मला बटाट्याची करी आणि ब्रेड देण्यात आली. मी खाण्यास नकार दिला. एका पोलिसाने म्हटले, आधी त्याला मार, मग तो खाईल. मग एका पोलिसाने म्हटले, तुमचा हात उलटा करा आणि पुढे करा. मी माझा हात पुढे केला तेव्हा त्याने त्याच्या काठीने मला इतका जोरात मारले की माझ्या हाताचे मांस फाटले. मग त्याने माझ्या कंबरेवर ठोसा मारला. तो विचारत राहिला, मला सांग, रायफल कुठे आहे? मी म्हणत राहिलो, मला काहीही माहित नाही. पोलिस मला दररोज निर्दयीपणे मारहाण करायचे. फक्त मारहाण करण्याची पद्धत बदलायची आणि ते तोच प्रश्न पुन्हा पुन्हा करायचे: मला सांग, रायफल कुठे आहे? माझे उत्तर नेहमीच एकच असायचे: मला माहित नाही. एके दिवशी, पोलिसांनी मला जमिनीवर झोपवलं, माझे पाय बांधले आणि भिंतीला लटकवले. मला तासन्तास असेच लटकवले गेले आणि मी ओरडत राहिलो. त्याचप्रमाणे, एके दिवशी त्यांनी माझी पँट काढल्यानंतर मला तासन्तास उभे केले. नंतर, त्यांनी मला जमिनीवर बसवले आणि माझे दोन्ही पाय ३६० अंश ताणले. वेदना इतक्या तीव्र होत्या की मला चालताही येत नव्हते. दरम्यान, सहारनपूरमध्ये काही गुन्हेगारांनी पोलिसांची रायफल हिसकावून घेतली. पोलिसांना संशय आला की हे एकाच टोळीचे काम आहे. या घटनेबद्दल पोलिसांनी त्यांचा राग माझ्यावरही काढला. त्या दिवशी, लॉकअपमध्ये एका गुन्हेगाराची चौकशी करत असताना, पोलिसांनी त्याच्या गुप्तांगांना एक वीट बांधली. मी हे पाहिले तेव्हा पोलिसांनी म्हटले, आता तुमची पाळी आहे. मग त्यांनी माझे कपडे काढायला लावले आणि माझ्या गुप्तांगांनाही एक वीट बांधली. त्या ताणामुळे पोटात तीव्र वेदना होत होत्या. मला असं वाटत होतं की मी मरणार आहे. माझी प्रकृती बिकट होत असताना, एका पोलिस अधिकाऱ्याने मला वीट काढायला सांगितले, नाहीतर मी मरेन. त्यानंतरच त्यांनी ती काढली. मग मला आणखी एक शिक्षा देण्यात आली. माझे डोके एका तोफाच्या खुर्चीत ठेवण्यात आले आणि मला उलटे लटकवण्यात आले. मी माझे डोके डावीकडे किंवा उजवीकडे हलवू शकत नव्हतो. माझ्या डोळ्यांत आणि नाकात साबणाचे पाणी ओतण्यात आले. मी वेदनेने ओरडलो. दरम्यान, पोलिसांनी माझ्या पायांवर काठ्यांनी मला इतके मारहाण केली की आजही माझे गुडघे वाकडे आहेत. मी नीट उभे राहू शकत नाही. ४ नोव्हेंबर हा माझा त्या पोलिस स्टेशनमधील शेवटचा दिवस होता. त्या दिवशी मला सर्वात जास्त मारहाण करण्यात आली. मला लॉकअप गेटसमोर जमिनीवर बसवण्यात आले. मी झोपी जाताच, मला काठीने जोरदार मारहाण करण्यात आली आणि घाणेरडे शिवीगाळ करण्यात आली. पोलिसांची आश्चर्यकारक युक्ती पहा: माझ्या अटकेची यादी ३ नोव्हेंबर रोजी होती. त्यात असे लिहिले होते की मी गुन्हेगारांसोबत गोळीबाराची योजना आखत असताना जंगलात पकडला गेला. सत्य हे होते की २४ ऑक्टोबरपासून पोलिस कोठडीत होते. अहवाल तयार केल्यानंतर, पोलिस मला शामली मुख्यालयात घेऊन गेले. त्यांनी मला मीडियासमोर एक रायफल आणि काही इतर शस्त्रे दाखवली. त्यांनी दावा केला की त्यांनी माझ्याकडून ती जप्त केली आहेत. मीडियाशी बोलल्यानंतरही मला सोडण्यात आले नाही. पोलिस स्टेशनच्या व्हरांड्यात माझी पॅन्ट काढली गेली आणि नंतर मला काठ्यांनी मारहाण करण्यात आली. त्या दिवशी माझी संपूर्ण पॅन्ट रक्ताने माखली होती. अमित न्यायालयीन प्रक्रियेसाठी जात आहे. ४ नोव्हेंबर रोजी मला न्यायालयात हजर करायचे होते. वैद्यकीय तपासणीपूर्वी पोलिसांनी मला पुन्हा मारहाण केली. माझे कान इतके जोरात घासले गेले की मी वेदनेने ओरडलो. मारहाणीचे ठसे माझ्या संपूर्ण शरीरावर स्पष्ट दिसत होते. तथापि, डॉक्टरांनी त्यांच्या अहवालात मला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले. पोलिस मला जीपमधून कोर्टात घेऊन जात होते. त्या दिवशी धुके होते. जीप गाडीशी टक्कर होण्यापासून थोडक्यात वाचली. त्यांनी मला मारहाण करून त्यांचा राग बाहेर काढला. न्यायाधीशांसमोर हजर करताना, पोलिसांनी हुशारीने मला कंबरेपर्यंत झाकले जेणेकरून न्यायाधीशांना माझ्या पँटवरील रक्त दिसू नये. न्यायाधीशांनी मला तिथे पाहिले. त्यानंतर वाचकाने मला एका कागदावर सही करायला लावली आणि पोलिसांसह तुरुंगात पाठवले. तिथे मला तुरुंगाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक माणूस आला आणि म्हणाला, तुम्हाला लसीकरण केले जाईल. मी विचारले, तुम्ही डॉक्टर आहात का? तो म्हणाला, नाही, मी कैदी आहे, पण मला हे कसे करायचे ते माहित आहे. हे ऐकून मी घाबरलो. काही काळानंतर, मला रुग्णालयातून सोडण्यात आले आणि एका बॅरेकमध्ये पाठवण्यात आले. तिथे एक पुजारी होता. माझी त्याच्याशी मैत्री झाली. मला लंगडताना पाहून त्याने मला सर्व काही विचारले. मी त्याला सर्व काही सांगितले. तेव्हापासून तो माझी काळजी घेऊ लागला. तुरुंगात फक्त पाण्यासारखी डाळ मिळत असे. मी त्या डाळीत रुमाल भिजवून माझ्या जखमांवर लावायचो. मी १५ दिवस तुरुंगात होतो. एके दिवशी माझ्या वडिलांचे नाव पुकारण्यात आले. मला खूप आनंद झाला. ते मला भेटायला आले होते. त्या दिवशी आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहत होतो. त्या दिवशी पंडितजी म्हणाले होते, बाबांना तुमची रक्ताने माखलेली पँट दिसणार नाही याची खात्री करा, नाहीतर ते खूप दुःखी होतील. मी ते लपवण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या संभाषणादरम्यान त्यांना पँट दिसली. त्यांना रडू कोसळले. मी कसे तरी त्यांना शांत केले. निघताना ते म्हणाले, काय झाले अमित? आपण कुठे आलो आहोत? तेव्हापासून, माझे वडील दर महिन्याला मला भेटायला यायचे. मी त्यांना नेहमी सांगायचो की माझी शाळा चुकली आहे. ते म्हणायचे, ठीक आहे, फक्त स्वतःला बारावी पास समजा, पण माझे मन मान्य नव्हते. तुरुंगात दररोज शंभराहून अधिक कैदी एकाच पाण्याच्या पाईपने आंघोळ करत असत. संध्याकाळ झाली की सर्वांना एकाच ठिकाणी उभे केले जायचे. गुन्हे, शिक्षा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कायद्याच्या चर्चा तिथे होत असत. मला असे वाटायचे की हे तुरुंग नसून फिरते न्यायालय आहे. दररोज, एक नवीन कैदी बॅरेकमध्ये येत असे, ज्यामुळे कायद्यावर एक नवीन चर्चा सुरू होत असे. माझे व्यावहारिक कायदेशीर शिक्षण तिथून सुरू झाले. पश्चिम उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंडांनाही त्याच तुरुंगात कैद करण्यात आले होते. ते मला दररोज भेटायचे आणि त्यांच्या टोळीत सामील होण्यासाठी आमंत्रित करायचे. त्यांनी असे गृहीत धरले की मी पोलिसांची शस्त्रे चोरली असल्याने मी धोकादायक आणि सुशिक्षित दोन्ही आहे. खरंतर, त्यांना टोळीचा हिशेब, लूटमार, जमिनीच्या नोंदी आणि इतर कागदपत्रे मी हाताळावीत अशी त्यांची इच्छा होती. तथापि, पंडितजींनी स्पष्ट केले होते की येथे प्रत्येकाने सर्वांशी सहमत असणे आवश्यक आहे. मी तेच करत राहिलो. माझ्या बॅरेकमध्ये एक वरिष्ठ अधिकारीही होता. मी त्याचे नाव सांगू शकत नाही. तो मला पत्रे आणि अर्ज लिहून द्यायचा. त्याच्यासोबत राहिल्याने मला कायदेशीर गुंतागुंत आणि कायदेशीर भाषेची सखोल समज निर्माण झाली. एके दिवशी, एक गावचा सरपंच आला. त्याच्या मदतीने मी एका वकिलाशी बोललो. त्यानंतर माझा जामीन अर्ज अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला. ७ फेब्रुवारी २०१४ रोजी मला जामीन मंजूर झाला. इथेच माझ्या कथेला एक नवीन वळण मिळाले. ज्या दिवशी मी तुरुंगातून सुटलो, त्या दिवशी जवळजवळ सर्व कैदी मला गेटवर सोडायला आले. तुरुंगात दोन टोळ्या कार्यरत होत्या. दोन्ही टोळ्यांमधील कैदी मला सोडायला आले होते. जेलरलाही आश्चर्य वाटले. त्याने विचारले, आज कोणाची सुटका होत आहे, की दोन प्रतिस्पर्धी टोळ्या एकाच वेळी त्याला सोडायला आल्या आहेत? कारण सोपे होते: मी त्यांच्याकडे क्लर्क म्हणून काम करायचो. तुरुंगातून बाहेर येताच मी माझ्या वडिलांसोबत घरी गेलो. त्या दिवशी माझ्या आईने माझा आवडता मटर पुलाव बनवला होता. मी तुरुंगात गेल्यापासून त्यांनी किती सहन केले आहे हे माझ्या कुटुंबाने मला सांगितले. लोकांनी उघडपणे माझा सामाजिक बहिष्कार केला नाही, पण माझ्या पाठीमागे ते म्हणाले, कोणाला माहिती, त्यांच्या मुलाने खून केला असेल. हे सर्व ऐकून माझी आई नेहमीच काळजीत असायची. तिला भीती असायची की कोणीतरी मला इजा करेल. तिला मी गाव सोडावे असे वाटत होते. ती म्हणायची, बेटा, तू जामिनावर आहेस, आता आमच्या डोक्यावरून या केसचा कलंक पुसून टाक. काही दिवसांनी तो गाव सोडून गुडगावला गेला. तो तिथे एका मित्रासोबत राहत होता. उदरनिर्वाहासाठी तो कॅलेंडर विकायचा. तो एका वकिलाकडे महिन्याला तीन हजार रुपये पगारावर लिपिक म्हणूनही काम करायचा. मी २२ नोव्हेंबर २०१५ रोजी गुडगावहून मेरठला राहायला आलो. तिथे मी एलएलबीला प्रवेश घेतला. माझ्या मित्रांनी माझी शिकवणी फी भरण्यास मदत केली. ते मला प्रत्येक कोर्ट डेटसाठी ५०० रुपये उधार द्यायचे, जे मी छोटी-मोठी कामे करून परत करायचो. मी २०१८ मध्ये माझे एलएलबी पूर्ण केले. त्यानंतर मी २०२० मध्ये चौधरी चरणसिंग विद्यापीठातून एलएलएम केले. माझा संशोधन विषय कैद्यांच्या हक्कांचा आणि भारतातील तुरुंग व्यवस्थेचा विश्लेषणात्मक अभ्यास होता. उत्तर प्रदेशातील एका पीसीएस अधिकाऱ्याने माझे एलएलएम शुल्क भरले. त्यांचे प्रेम आणि पाठिंबा आजही माझ्यासोबत आहे. पदवी मिळाल्यानंतर माझा खरा संघर्ष सुरू झाला. मी न्यायालयात स्वतःची बाजू मांडण्यासाठी अर्ज केला, जो स्वीकारण्यात आला. मी न्यायालयासमोर पहिला महत्त्वाचा पुरावा सादर केला: घटनेत जखमी झालेल्या एका पोलिसाने त्याच्या जबाबात स्पष्टपणे सांगितले की मी या घटनेत सहभागी नव्हतो. त्यानंतर मी आणखी एक महत्त्वाची गोष्ट उघड केली: ही घटना १२ ऑक्टोबर रोजी घडली, तर मला २४ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. तथापि, तपास अधिकाऱ्याने १२ नोव्हेंबर रोजी जखमी पोलिस अधिकाऱ्याची चौकशी केली. माझा प्रश्न सोपा होता: जखमी पोलिसाचा जबाब न घेता मला कसे अटक करण्यात आली? शिवाय, पोलिसांनी ३ नोव्हेंबर रोजी माझी अटक बनावट चकमक म्हणून नोंदवली, जरी मी २४ ऑक्टोबरपासून पोलिस कोठडीत होतो. मी हे सत्य न्यायालयात सिद्ध करू शकलो. अखेर २७ सप्टेंबर २०२३ रोजी न्यायालयाने मला सन्मानपूर्वक निर्दोष मुक्त केले. अमित चौधरी त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. (अॅडव्होकेट अमित चौधरी यांनी भास्कर रिपोर्टर मनीषा भल्ला यांच्याशी या भावना शेअर केल्या) ------------------------------------------
PMC News : महापालिकेत ‘खांदेपालटा’चा हायव्होल्टेज ड्रामा; आयुक्तांवर नेमका कुणाचा दबाव?
PMC News : घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी ३ ते ४ अधिकाऱ्यांची फिल्डिंग; शासनाकडून आलेले अधिकारी आणि पालिकेतील जुन्या फळीत जुंपण्याची शक्यता.
Onion Market Update : दक्षिण भारतासह इतर राज्यांतही कांदा बंपर; निर्यातीत घट आणि पोषक हवामानामुळे उत्पादनात वाढ झाल्याने दराचा पेच वाढला.
Sahitya Parishad Election : विदर्भात गडकरींनी भूमिका मांडली, आता फडणवीस काय करणार? साहित्य परिषदेच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेपावरून वाद पेटला.
Education department GR 2026 : शाळा व्यवस्थापनांकडून वैयक्तिक मान्यतेसाठी सादर होणाऱ्या प्रस्तावांची आता 'इन-डेप्थ' चौकशी; बनावटगिरी आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश.
PMC News : महापालिकेत रिपाइंचा पत्ता कट? भाजपने विभागीय आयुक्तांकडे केलेल्या ‘त्या’नोंदणीमुळे खळबळ
PMC News : पुणे शहराला गतिमान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध; गणेश बिडकरांची सलग तिसऱ्यांदा गटनेतेपदी निवड, मात्र मित्रपक्ष रिपाइंची नाराजी वाढण्याची शक्यता.
नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात चांदीची किंमत 65% पर्यंत वाढली होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 1 जानेवारी रोजी चांदी 2.29 लाख रुपये प्रति किलो होती, जी 29 जानेवारी रोजी सर्वकालीन उच्चांक 3.79 लाख रुपयांवर पोहोचली, परंतु 30 जानेवारी रोजी एकाच दिवसात तिचे भाव 10.7% नी घसरून 3,39,350 रुपयांवर आले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर तर चांदी 1 लाखांहून अधिक घसरून 2 लाख 93 हजार रुपये प्रति किलो झाली. इतक्या वेगाने वर गेल्यानंतर चांदी अचानक खाली कशी पडली, यापूर्वी असे कधी घडले आहे का आणि चांदीचे भाव अजून कमी होतील का; जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न-1: गेल्या एका वर्षात चांदीच्या दराचा कल कसा राहिला आहे?उत्तर: इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच IBJA नुसार, 1 जानेवारी 2025 रोजी 1 किलो चांदीची किंमत 86,017 रुपये होती, जी भारतात सर्वकालीन उच्चांक होती. त्यानंतर एका महिन्याने 3 फेब्रुवारी रोजी चांदी 7,516 रुपयांनी वाढून 93,533 रुपयांपेक्षा जास्त झाली. 2025 च्या अखेरपर्यंत चांदी 170% नी वाढली होती. त्यानंतर 29 जानेवारी 2026 रोजी चांदी 3.79 लाख आणि दुसऱ्याच दिवशी अंदाजे 40 हजार रुपयांनी घसरून 3.39 लाखांवर बंद झाली. प्रश्न-2: अचानक एका दिवसात चांदी 1 लाखांहून अधिक का घसरली?उत्तर: आंतरराष्ट्रीय बाजारात 29 जानेवारी रोजी चांदीची किंमत 115.8 डॉलर प्रति औंस होती. एकाच दिवसात 31% नी घसरून 30 जानेवारी रोजी चांदीचा दर 84.63 डॉलर प्रति औंस झाला. 1 औंसमध्ये 28.35 ग्रॅम असतात. या एका दिवसात चांदी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर देखील 27% म्हणजेच 1.10 लाख रुपयांनी घसरली. 29 जानेवारी रोजी MCX वर चांदीचा दर 4.01 लाख रुपये प्रति किलो होता, जो 30 जानेवारी रोजी घसरून 2.91 लाख रुपये झाला. एका दिवसात अचानक चांदीचे भाव 1 लाखांहून अधिक घसरण्यामागे 3 प्रमुख कारणे आहेत... 1. ट्रम्प यांनी केविन वॉर्श यांना फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष बनवले30 जानेवारी 2026 रोजी, डोनाल्ड ट्रम्प यांनी केविन वॉर्श यांना अमेरिकन सेंट्रल बँक म्हणजेच फेडरल रिझर्व्हचे नवीन अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली. ते जेरोम पॉवेल यांची जागा घेतील. वॉर्श यांना 'हॉकिश' म्हणजेच कठोर आर्थिक धोरणांचे समर्थक मानले जाते. यामुळे गुंतवणूकदारांना वाटले की महागाई नियंत्रणात आणण्यासाठी वॉर्श व्याजदरात आणखी कपात करणार नाहीत आणि डॉलर मजबूत होईल. यामुळे गुंतवणूकदारांनी चांदी-सोन्यासारख्या वस्तूंऐवजी डॉलरमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि चांदीची विक्री सुरू झाली. चांदीची विक्री वाढल्याने तिच्या किमती झपाट्याने कमी झाल्या. खरं तर, कोणत्याही देशात महागाई वाढल्यास तेथील बँका आपले व्याजदर कमी करतात. म्हणजेच बँकांमध्ये पैसे जमा केल्यास परतावा कमी मिळतो. अशा परिस्थितीत लोक चांदी आणि सोन्याकडे वळतात. फेडरल बँकेने 2025 मध्ये तीन वेळा कपात केली. यामुळे डॉलर कमकुवत झाला आणि सोने-चांदीला सुरक्षित गुंतवणूक मानून लोकांनी खरेदी वाढवली होती. फोर्ब्स मॅगझिननुसार, ट्रम्प यांच्या घोषणेनंतर डॉलरमध्ये तेजी दिसून आली आणि आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 33% तर सोने 12% नी घसरले. अमेरिकन फर्म 'सिटीझन वेल्थ' चे मुख्य गुंतवणूक अधिकारी मायकल हेन्स यांच्या मते, 'ट्रम्प यांनी वॉर्श यांची निवड केल्यानंतर बाजारात डॉलर मजबूत झाला आणि मौल्यवान धातूंची विक्री सुरू झाली.' 2. चार लाखांच्या पुढे गेल्यावर लोकांनी चांदीतून नफा काढायला सुरुवात केली29 जानेवारी रोजी वायदा बाजारात चांदीची किंमत सलग पाचव्या दिवशी वाढून 4 लाखांच्या पुढे गेली. 21 जानेवारी रोजी 3.18 लाख रुपये प्रति किलो झाल्यानंतर, अवघ्या 8 दिवसांत चांदीच्या किमतीत अंदाजे 29% म्हणजेच एक लाख रुपयांची वाढ झाली. त्यानंतर गुंतवणूकदारांनी आपला नफा सुरक्षित करण्याची योग्य वेळ मानून चांदी विकायला सुरुवात केली आणि तिची किंमत अचानक कमी होऊ लागली. खरं तर, जेव्हा एखाद्या कमोडिटीचे भाव त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचतात आणि किमती सतत वाढत जातात, तेव्हा गुंतवणूकदारांना वाटते की आता किमती कमी होणार आहेत. म्हणून, आपला नफा सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतवणूकदार ती कमोडिटी विकू लागतात. याला 'प्रॉफिट बुकिंग' किंवा नफाखोरी म्हणतात. 3. अमेरिकेत शटडाऊन टळल्याने डॉलरमधील गुंतवणूक वाढलीअमेरिकेत सरकारी खर्चात कपात करण्यासाठी बऱ्याच काळापासून व्यापक शटडाऊनची अटकळ होती. यात सरकारी निधी थांबवल्याने सरकारी विभाग बंद पडतात. यामुळे अर्थव्यवस्थेत भीती पसरते आणि लोक डॉलरला सुरक्षित गुंतवणूक मानत नाहीत. 29 जानेवारी रोजी ट्रम्प प्रशासन आणि सिनेट डेमोक्रॅट्स यांच्यात एक करार झाला की, होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंट वगळता इतर सर्व सरकारी विभागांना सप्टेंबरपर्यंत निधी मिळत राहील.या निर्णयामुळे डॉलरवर सकारात्मक परिणाम झाला. डॉलर इंडेक्स 1% ने वाढून 97 पर्यंत पोहोचला आणि लोकांनी सोने, चांदीतून पैसे काढून डॉलरमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि चांदीचे भाव घसरले. प्रश्न-3: 2025 मध्ये चांदीचे भाव सातत्याने का वाढले होते?उत्तर: गेल्या वर्षी चांदीचे भाव एकूण 170% नी वाढले होते. इन्व्हेस्टमेंट फर्म 'केडिया ॲडव्हायझरी'चे संचालक अजय केडिया आणि इन्व्हेस्टमेंट फर्म 'या वेल्थ रिसर्च अँड ॲडव्हायझरी'चे संचालक अनुज गुप्ता यांच्या मते, त्याची 4 प्रमुख कारणे आहेत... 1. जगात अनेक युद्धे झाल्यामुळे लोकांनी सोने-चांदी खरेदी करण्यास सुरुवात केली: गेल्या एका वर्षापासून इस्रायल, इराण, रशिया-युक्रेनसह जगातील अंदाजे 30 देशांमध्ये युद्ध किंवा संघर्षजन्य परिस्थिती आहे. यामुळे चांदीच्या किमतीत वाढ झाली. खरं तर, चांदी सोन्याप्रमाणे सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. राजकीय तणावाच्या स्थितीत गुंतवणूकदार सोने आणि चांदीमध्ये अधिक गुंतवणूक करू लागतात. 2. ट्रम्पच्या टॅरिफ धोरणामुळे चांदी महाग झाली: ट्रम्पने मेक्सिको, कॅनडा आणि युरोपीय देशांवर 30-50% टॅरिफ लावला. मेक्सिको हा जगातील चांदीचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. 2024 मध्ये मेक्सिकोने जगातील अंदाजे 23% चांदीचे उत्पादन केले होते. टॅरिफ वाढल्यामुळे मेक्सिकोकडून चांदीच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आणि चांदीच्या किमती वाढत गेल्या. 3. चांदीची औद्योगिक मागणी वाढली: जगातील चांदीचा 59% वापर उद्योगांमध्ये होतो. उद्योगांमध्ये उत्पादन वाढल्यास चांदीची मागणीही वाढते. सिल्व्हर इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार, 2023-25 मध्ये चांदीची मागणी 20% वाढली. चांदीचा सर्वाधिक वापर सौर पॅनेल बनवण्यासाठी होतो. जगभरात सौर ऊर्जेची मागणी वाढत आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरीज, EV गाड्या आणि औषधांमध्येही चांदीचा वापर होतो. 4. अमेरिकन सेंट्रल बँकेच्या दर कपातीमुळे चांदीमध्ये गुंतवणूक वाढली: अमेरिकेची सेंट्रल बँक म्हणजेच फेडरल रिझर्व्हने 2025 मध्ये व्याजदरांमध्ये 3 वेळा एकूण 0.75% ची कपात केली. यामुळे डॉलर कमकुवत झाला आणि चांदीची मागणी वाढली. खरं तर, डॉलरची किंमत कमी होते, तेव्हा चांदी खरेदी करणे स्वस्त होते. डॉलर कमकुवत झाल्यावर गुंतवणूकदारही डॉलरऐवजी अधिक चांदी खरेदी करू लागतात. प्रश्न-4: 2026 मध्ये चांदीचे भाव अजूनही कमी होऊ शकतात का?उत्तर: वेल्थ अँड फायनान्स फर्म पेस 360 चे चीफ ग्लोबल स्ट्रॅटेजिस्ट अमित गोयल यांच्यासह अनेक तज्ञांनुसार, 2027 पर्यंत चांदीची किंमत अंदाजे 60% पर्यंत कमी होऊ शकते. यामागे 3 मोठी कारणे आहेत… 1. प्रॉफिट बुकिंगमुळे चांदीच्या किमतीत घट होईल: गुंतवणूकदारांना भीती आहे की चांदीची वाढलेली किंमत जास्त दिवस टिकणार नाही. याला ट्रेडच्या भाषेत 'अनसस्टेनेबल रॅली' म्हणतात. त्यामुळे 2026 मध्ये गुंतवणूकदार आपला चांदीचा साठा विकून 'प्रॉफिट बुकिंग' करत आहेत. जर प्रॉफिट बुकिंग सुरू राहिले, तर चांदीची किंमत 65 औंस प्रति डॉलरपर्यंत घसरू शकते. तज्ञांनुसार, मार्च 2027 पर्यंत ही किंमत 35 ते 40 डॉलरपर्यंत खाली येऊ शकते. 2. उद्योगधंद्यांमध्ये चांदीऐवजी इतर धातूकडे कल: कच्च्या मालाची किंमत खूप वाढल्यास कारखाने तो सोडून कोणताही स्वस्त पर्याय शोधतात. चांदीच्या वाढलेल्या किमतींमुळे उद्योगांनी चांदीच्या पर्यायांकडे वळायला सुरुवात केली आहे. अलीकडे, इस्रायल, तैवान, ऑस्ट्रेलिया आणि चीनमधील सौर उद्योग आणि सॉलिड-स्टेट बॅटरीजमध्ये स्वस्त असल्यामुळे चांदीऐवजी तांब्याचा वापर केला जात आहे. यामुळे चांदीची मागणी कमी होईल आणि किंमतही कमी होईल. 3. 'गोल्ड-सिल्व्हर रेशो' मुळे चांदीच्या मागणीवर परिणाम: गोल्ड-सिल्व्हर रेशो म्हणजे सोन्याच्या आणि चांदीच्या किमतींचे गुणोत्तर. सोप्या भाषेत सांगायचे तर, एक औंस सोने खरेदी करण्यासाठी जितके औंस चांदीची आवश्यकता असेल, तोच त्यावेळेचा गोल्ड-सिल्व्हर रेशो असेल. हा रेशो सामान्यतः 80 पर्यंत असतो. जर चांदीची किंमत वाढली, तर रेशो खूप कमी होतो. 2025 मध्ये हा 35 ते 40 पर्यंत खाली आला होता. अशा परिस्थितीत चांदी 'ओव्हरव्हॅल्यूड' मानली जाते. गुंतवणूकदार चांदी विकून सोने खरेदी करू लागतात, ज्यामुळे चांदीची किंमत कमी होऊ लागते. प्रश्न-5: चांदीच्या भावातील इतक्या घसरणीमुळे कोणाला फायदा आणि कोणाला नुकसान?उत्तर: चांदीचे भाव कमी झाल्यामुळे ज्वेलर्स, इंडस्ट्रीज आणि नवीन गुंतवणूकदारांना फायदा होईल.. चांदीचे भाव कमी झाल्यामुळे जुन्या गुंतवणूकदारांना आणि फ्युचर ट्रेडिंग करणाऱ्यांना नुकसानीचा धोका असू शकतो… प्रश्न-6: चांदीचे भाव यापूर्वीही वेगाने वाढल्यानंतर कमी झाले आहेत का?उत्तर: चांदीच्या किमतींमध्ये इतक्या मोठ्या वाढीनंतर तितक्याच वेगाने घट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 1980 आणि 2011 मध्येही विक्रमी वाढीनंतर किमती वेगाने कमी झाल्या होत्या… 1980: हंट बंधूंनी चांदीची किंमत 700% वाढवली, नंतर 90% नी घटले भावदोन अमेरिकन अब्जाधीश बंधूंनी, नेल्सन बंकर हंट आणि विल्यम हर्बर्ट हंट यांनी जगातील एकूण पुरवठ्याचा तिसरा भाग खरेदी केला होता. 1979 मध्ये चांदी 6 डॉलर होती, जी 1980 मध्ये 50 डॉलरवर पोहोचली (713% वाढ). परंतु एक्सचेंजने नियम कडक केल्याने 27 मार्च 1980 ('सिल्व्हर थर्सडे') रोजी किमती 50% पेक्षा जास्त घसरल्या आणि शेवटी 90% नी कमी होऊन 4.90 डॉलरपर्यंत पोहोचल्या. दोन्ही भाऊ दिवाळखोर झाले. 2011: आर्थिक संकटानंतर चांदी 5 पट महाग झाली, नंतर 70% नी घटले भाव2008 च्या आर्थिक संकटानंतर गुंतवणूकदार चांदीकडे वळले. एप्रिल 2011 मध्ये चांदी 48.7 डॉलर प्रति औंसवर पोहोचली होती. तथापि, त्यानंतर डॉलर मजबूत झाल्याने आणि मार्जिन वाढवल्याने 2011 च्या अखेरीस चांदी 28.18 डॉलरपर्यंत घसरली. अस्वीकरण: ही स्टोरी केवळ शैक्षणिक हेतूसाठी लिहिलेली आहे. गुंतवणूकदारांना आमचा सल्ला आहे की त्यांनी गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Teacher Election Duty : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा आणि सी-टीईटी परीक्षेचा पेच सुटला; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मागवली शिक्षकांची यादी.
PMC News : पुणे ग्रँड सायकल टूरसाठी काढलेले ८४ स्पीड ब्रेकर पुन्हा बसवणार; आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार विकसित केलेल्या ७५ किमी रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग मंदावण्याची शक्यता.
Shankar Mandekar : रिंगरोडला अजित पवारांचे नाव? आमदार मांडेकरांची मोठी घोषणा; पाहा नेमकं काय म्हणाले
Shankar Mandekar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिप्रत्यर्थ मुळशीत सर्वपक्षीय शोकसभा; विकास कामांचा डोंगर उभा करणारा नेता हरपला, मान्यवरांची भावूक श्रद्धांजली.
भारतीय शास्त्रीय संगीतात तंतू वाद्यांचे खास वैशिष्ट्ये आहे. यातील सतार या वाद्याचा आवाज म्हणजे जणू श्रावणातील रिमझिम किंवा पहाटेच्या शांततेत उमटलेला एक सोनेरी किरण.. सतारीवर जेव्हा मींड घेतली जाते म्हणजे एका स्वरावरून दुसऱ्या स्वराकडे घसरत जाणे, तेव्हा ऐकणाऱ्याला रेशमी लहरीचा भास होतो. सतारीचा झंकार वातावरणात एक प्रकारची गूढता आणि आध्यात्मिक शांतता निर्माण करतो. तिचा आवाज नाजूकही आहे आणि तितकाच सामर्थ्यशालीही. विरहाची आर्तता असो किंवा मिलनाची ओढ, सतारीच्या प्रत्येक छेडलेल्या तारेतून मानवी भावनांचे अचूक प्रतिबिंब उमटते... सतार म्हटले की डोळ्यासमोर येतात कुरुळ्या केसांचे, कानाच्या खालीपर्यंत आलेले कल्ले, काटक शरीराचे, असे जगविख्यात पंडित रविशंकर जी.. आजच्या 'रागदारबार'च्या भागात आपण पंडित रविशंकर यांच्या जीवनाविषयी आणि त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतातच नव्हे तर जागतिक संगीतात दिलेल्या योगदानाविषयी जाणून घेणार आहोत. पंडित रविशंकर यांचा जन्म 7 एप्रिल 1920 साली वाराणसी येथे एका बंगाली कुटुंबात झाला. त्यांचे मुळ नाव रवींद्र शंकर चौधरी असे होते. परंतु कालांतराने रविशंकर याच नावाने ते प्रसिद्ध झाले. त्यांचे वडील श्यामशंकर चौधरी ब्रिटिशांच्या काळात बॅरिस्टर म्हणून काम करत होते. त्यानंतर ते वकील म्हणून काम करण्यासाठी लंडनला गेले. बाळ रविशंकर यांचे संगोपन त्यांच्या आईने हेमांगिनी देवी यांनी केले. वयाच्या 8 व्या वर्षी रविशंकर हे पहिल्यांदा आपल्या वडिलांना भेटले. पंडित रविशंकर यांचे बालपण संगीतातच गेले. वयाच्या 10 व्या वर्षी 1930 साली ते एका संगीत मंडळाचा भाग होण्यासाठी पॅरिसला गेले आणि त्यानंतर त्यांचे भाऊ उदयशंकर यांच्या नृत्य मंडळात सामील झाले. उदयशंकर हे त्याकाळी इंग्लंडमध्ये नृत्य व संगीत मंडळ चालवत होते. फार कामी लोकांना माहित असेल की सुरुवातीला रविशंकर यांनी नृत्याचे सादरीकरण केले आहे. रविशंकर हे भारतात फारसे राहिले नाहीत, त्यांनी परदेशातच जास्त वेळ घालवला. याविषयी त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, खरंतर, माझी सुरुवात पॅरिसमध्ये झाली. जेव्हा दादांनी (उदयशंकर) पाब्लो पावलोवाच्या मंडळातून वेगळे होऊन स्वतःचे मंडळ स्थापन केले तेव्हा त्यांनी मला आणि माझे दोन भाऊ देवेंद्र आणि राजेंद्रशंकर यांनाही सामील केले. माझी आईही आमच्यासोबत होती. आम्ही थेट वाराणसीहून पॅरिसला आलो. मी त्यांच्या पथकात संगीत सांभाळले आणि तोपर्यंत मला जवळजवळ प्रत्येक वाद्याबद्दल थोडेसे माहिती झाले होते. मी नृत्यही करत असे. आम्ही संपूर्ण युरोपमध्ये प्रवास केला आणि दादांनी प्रत्येक देशात सादरीकरण केले. लहानपणापासूनच मला पंचतारांकित हॉटेल्स आणि प्रवास आणि राहणीमानाच्या लक्झरीची सवय झाली. लहानपणीच जेव्हा तुम्हाला अशी जीवनशैली अनुभवायला मिळते तेव्हा सवयी बिघडतात. माझ्यावर खूप टीकाही झाली. पण माझ्याकडे प्रतिभा होती आणि मी दादांच्या मंडळात माझ्या संगीत पथकाचे नेतृत्व केले. सतार शिकण्यासाठी गुरूंनी ठेवली होती अट तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की रविशंकर आणि सतारचा संबंध फार नंतर आला. सुरुवातीला ते नृत्य कलाकार म्हणून कार्यक्रम करत होते. रविशंकर जेव्हा 18 वर्षांचे झाले तेव्हा त्यांचा खरा संबंध सतार या वाद्याशी आला. 1938 साली प्रसिद्ध दरबारी संगीतकार उस्ताद अल्लाउद्दीन खान यांच्याकडून सतार शिकण्यासाठी रविशंकर यांना नृत्य सोडावे लागले होते. रविशंकर यांनी एकदा मैहर दरबारातील प्रमुख संगीतकार अल्लाउदीन खान यांचे सतार वादन ऐकले होते. रविशंकर यांनी त्यांच्याकडे सतार वादन शिकण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा अल्लाउद्दीन खान यांनी एका अटीवर त्यांना शिकवण्याचे ठरवले, ते म्हणाले रविशंकर यांनी नृत्य सोडून पूर्ण वेळ सतारसाठी द्यावा. त्यानुसार रविशंकर यांनी नृत्य सोडले आणि अशा पद्धतीने सतार वादन शिकवण्यास खान साहेब तयार झाले. जागतिक युद्ध सुरू झाल्यानंतर रविशंकर व त्यांचे संपूर्ण कुटुंब भारतात परतले होते. भारतात आल्यानंतर रविशंकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला आता पूर्ण वेळ देण्याचे ठरवले. तसेच त्यांना लागलेल्या वाईट सवयी मोडण्यासाठी त्यांनी स्वतःवर खूप मेहनत घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. रविशंकर म्हणतात, मी म्हटल्याप्रमाणे, वयाच्या 17-18 व्या वर्षी मी खूपच बिघडलो होतो. वाईट सवयींना बळी पडलो होतो. दुसऱ्या महायुद्धामुळे आम्हाला भारतात परतावे लागले हे नशीबच म्हणावे लागेल. दादांनी पॅरिसमधील त्यांचे सेटअप बंद केले आणि अल्मोडा येथे स्वतःचे केंद्र उघडण्यासाठी भारतात परतले. तेव्हाच मी बनारसला परत जाऊन शास्त्रीय संगीत शिकण्याचा निर्णय घेतला. मी परतलो आणि बाबांच्या (उस्ताद अलाउद्दीन खान) घराशेजारी राहू लागलो. इतक्या वर्षांची माझी जीवनशैली बदलण्यासाठी, मी एका खाटेवर झोपायचो. तेव्हा डास खूप चावायचे आणि रात्रीच्या वेळी मला खूप भीती सुद्धा वाटायची. पण मला संगीताची आवड होती, म्हणून मी जवळजवळ 6 महिने या कठीण परिस्थितीत त्यांच्याकडून संगीत शिकत राहिलो. बाबांनी मला सामान्य जीवन जगायला शिकवले आणि माझी पाश्चात्य जीवनशैली बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी मला संगीताचे बारकावे शिकवले, सुरुवातीला मला गत शिकवली, नंतर मला सूरबहार कसे वाजवायचे ते शिकवले आणि नंतर शास्त्रीय रागांची गुंतागुंत समजावून सांगितली. मी तीनतालपासून झालापर्यंत सर्व काही शिकलो. त्यांच्याकडून मी सर्वात मोठी गोष्ट शिकलो ती म्हणजे मानवता. त्याच्याकडे असलेला संयम अद्भुत होता. बीटल्स बॅन्डचे गिटार वादक जॉर्ज हॅरिसन रविशंकरांचे होते फॅन अलाउद्दीन खान यांच्याकडून सतार वादानाचे धडे घेतल्यानंतर रविशंकर मुंबईला आले. इथे त्यांनी इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्ये काम केले. 1946 पर्यंत इथे त्यांनी बॅलेसाठी संगीत तयार करण्याचे काम केले. त्यानंतर रविशंकर नवी दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रावर रुजू झाले. आकाशवाणीमध्ये असताना त्यांनी ऑर्केस्ट्रासाठी रचना केल्या, ज्यात सतार आणि इतर भारतीय वाद्ये शास्त्रीय पाश्चात्य वाद्यांसह एकत्रित करत फ्यूजन सुरू केले. या काळात त्यांनी अमेरिकन वंशाच्या वॉयलिन वादक येहुदी मेनुहिन यांच्यासोबत संगीत सादर करणे आणि लिहिणे सुरू केले. येहुदी मेनुहिन यांच्यामुळे खऱ्या अर्थाने रविशंकर यांचे सतार वादन देशाच्या बाहेर गेले असे म्हटले तर वावगे ठरू नये. भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख रविशंकर यांनी पाश्चात्य देशांना करून दिली आणि त्यानंतर रविशंकर यांचे चाहते संपूर्ण जगभर पसरण्यास सुरू झाले. त्यांच्या चाहत्यांमध्ये त्या काळच्या प्रसिद्ध अशा बीटल्स बॅन्डचे गिटार वादक जॉर्ज हॅरिसन देखील होते. 'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा' गाण्याची धून पंडित रविशंकर यांनी चित्रपटांना देखील संगीत देण्याचे काम केले आहे. विशेष म्हणजे 'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा' या प्रसिद्ध देशभक्तीपर गीताची धून ही रविशंकर यांनीच बनवली आहे. चित्रपटातील संगीताविषयी बोलताना रविशंकर यांनी सांगितले की, मी इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्ये तसा सहभागी नव्हतो, पण 1945 मध्ये मी मुंबईत आलो आणि तिथे पहिल्यांदाच सादरीकरण केले. त्याच सुमारास ख्वाजा अहमद अब्बास 'धर्ती के लाल' हा चित्रपट बनवत होते... मला त्याचे संगीत तयार करावे लागले. या काळात मला आयपीटीएच्या कार्यालयात जावे लागले. तेथील वातावरण देशभक्तीपर आणि क्रांतिकारी गाण्यांनी भरलेले होते. त्या काळात आम्ही इक्बालच्या प्रसिद्ध गझल 'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा' साठी धून तयार केली. पुढे रविशंकार सांगतात, त्याच वेळी चेतन आनंद 'नीचा नगर' हा चित्रपट देखील बनवत होते. मला त्याचे संगीत देखील तयार करावे लागले. त्यात एक गाणे होते, 'हम रुकेंगे नही, हम झुकेंगे नही.' ते गाण्यासाठी एका नवीन मुलाला संपर्क साधण्यात आला होता, परंतु त्याच्या आवाजात उत्साह नव्हता, म्हणून आम्ही त्याला कास्ट केले नाही. नंतर, तोच मुलगा मोठा गायक मोहम्मद रफी म्हणून प्रसिद्ध झाला. जॉर्ज हॅरिसन सतार शिकण्यासाठी वेश भदलून भारतात आले 1960 च्या दशकापर्यंत रविशंकर हे एक जागतिक नाव बनले होते. प्रसिद्ध बीटल्स देखील त्यांच्या संगीताचे चाहते होते. बँडचे गिटार वादक जॉर्ज हॅरिसन हे त्यांच्या सतार वादनाने खूप प्रभावित झाले होते. त्यांच्याकडून सतार शिकण्यासाठी ते भारतात आले. या प्रवासासाठी रविशंकर यांनी त्यांना लोक त्यांना ओळखू नये म्हणून स्वतःचे वेश बदलण्याचा सल्ला दिला. त्यांना संगीत शिकवण्यासाठी रविशंकर यांनी हॅरिसनला श्रीनगरला नेले, जिथे ते एका हाऊसबोटमध्ये राहून सतार वादन शिकवायचे. यानंतर पंडित रविशंकर यांनी बीटल्ससोबत अनेक कार्यक्रमही केले. 1971 मध्ये त्यांनी बांगलादेशमध्ये हॅरिसनसोबत एक चॅरिटी शो देखील आयोजित केला होता. पंडित रविशंकर हे ऑल इंडिया रेडिओशी जोडले होतेच. महात्मा गांधींचे निधन झाले तेव्हा रविशंकर यांना त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सतार वाजवण्यास सांगण्यात आले. त्यानंतर रविशंकर यांनी ग, नी, धा या स्वरसमूहांनी एक राग वाजवला. यासाठी त्यांनी तिसरे, सातवे आणि सहावे स्वर वापरले. गांधींच्या नावाचे स्वर या रागापासून बनलेले असल्याने त्यांनी या रागाला 'मोहनकौन्स' असे नाव दिले. तसेच रविशंकर यांनीच दूरदर्शनची सिग्नेचर ट्यून देखील तयार केली आहे. मैफिलीत श्रोत्यांची बेफिकीर वृत्ती कधीही सहन झाली नाही पंडित रविशंकार यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा चित्रपट, रेडिओ आणि विविध जागतिक व्यासपीठांच्या माध्यमातून विस्तार करतानाच या कलेचे पावित्र्य आणि गांभीर्य कसोशीने जपले. संगीताच्या मैफिलीत श्रोत्यांची बेफिकीर वृत्ती त्यांना कधीही सहन होत नसे. विशेषतः परदेशात वादन करताना मद्यपान, धूम्रपान, आपापसातील गप्पा, मध्येच उठून जाणे किंवा खाद्यपदार्थांचे सेवन या गोष्टींना त्यांचा ठाम विरोध असे. श्रोत्यांच्या अशा कृत्यांना ते केवळ शिस्तीचा भंग न समजता थेट 'संगीताचा अपमान' मानत असत, कारण त्यांच्या दृष्टीने संगीत हे केवळ मनोरंजन नसून एक अत्यंत पवित्र आणि शिस्तबद्ध साधना होती. याविषयी देखील पंडित रविशंकार यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, खरं तर, आपल्या देशात संगीत नेहमीच राजे, महाराजे आणि श्रीमंत लोकांसाठी एक गोष्ट मानली गेली आहे. मला ही दरबारी मानसिकता, जबरदस्तीने टाळ्या वाजवणे किंवा संगीताचा वापर व्यभिचार म्हणून कधीच आवडला नाही. येथील लोक वेळेवर येत नाहीत. काही जण एका वेळी येत आहेत, तर काही दुसऱ्या वेळी निघून जात आहेत. काही जण संगीत मैफिलीत गप्पा मारत आहेत, तर महिला स्वेटर विणत आहेत, किंवा एखादा विक्रेता शेंगदाणे विकत आहे. मी वाजवत असताना हे सर्व माझे लक्ष विचलित करते आणि मी नेहमीच त्यावर उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे. यासाठी, मला 'वेस्टर्न अॅटीट्यूड' असलेला सुद्धा म्हटले गेले आहे. जपानी महिलेने रक्ताने लिहिलेले पत्र पाठवले... पंडित रविशंकर जेव्हा पहिल्यांदा जपानला जात होते तेव्हा त्यांच्या मनात काहीशी शंका होती. मात्र, तिथल्या रसिकांनी भारतीय शास्त्रीय संगीताला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे त्या शंकांचे पूर्णतः निरसन झाले. यावेळी रविशंकर यांच्यासोबत एक वेगळाच किस्सा घडला. जपानच्या कार्यक्रमानंतर तिथल्या एका जपानी महिलेने रविशंकर यांना एक पत्र पाठवले होते. या पत्रातील शाई वेगळीच वाटली. धड निळीही नव्हती आणि लालही. रविशंकर यांनी त्या पत्रातील एक एक ओळ वाचली. त्यात लिहिले होते की रविशंकर यांचे वादन किती खोलवर मनात पोहोचते. त्यांचे संगीत थेट आत्म्याला भिडते. शेवटची ओळ वाचल्यावर मात्र रविशंकर यांना धक्काच बसला. त्यात त्या महिलेने लिहिले होते की, 'तुमचे संगीत माझ्या मनात खोलवर पोचले आहे, म्हणून हे पत्र मी माझ्या रक्ताने लिहिते आहे.' या हृदयस्पर्शी अनुभवामुळे जपानशी त्यांचे एक अतुट नाते निर्माण झाले. रविशंकरांच्या मते, जपानी श्रोते जरी वरकरणी शांत वाटत असले आणि उघडपणे आपली दाद व्यक्त करत नसले, तरी ते जगभरातील संगीताचे अत्यंत डोळस आणि मनापासून आस्वाद घेणारे रसिक आहेत, म्हणूनच जपानी जनमाणसाने त्यांच्या हृदयात कायमचे एक जिव्हाळ्याचे स्थान मिळवले. बर्लिन चित्रपट महोत्सवात 'सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी एका मोठ्या संगीत विभागाची धुरा सांभाळताना पंडित रविशंकर यांनी 'भारतीय राष्ट्रीय वाद्यवृंदा'ची स्थापना करून शास्त्रीय संगीताला राष्ट्रीय स्तरावर एक नवी उंची मिळवून दिली. केवळ मैफिली गाजवण्यापुरते मर्यादित न राहता, कसदार चित्रपट संगीताकडे ते कायमच आकर्षित झाले, ज्याचा अत्युच्च आविष्कार सत्यजित राय यांच्या 'पथेर पांचाली' या अजरामर चित्रपटात पाहायला मिळतो. बंगाली चित्रपटसृष्टीतील अनेक दर्जेदार कलाकृतींना आपल्या संगीताने सजवणाऱ्या रविशंकरांच्या या अद्वितीय प्रतिभेचा गौरव 1957 च्या बर्लिन चित्रपट महोत्सवात 'सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक' म्हणून करण्यात आला. सतार वादन सुरू करण्यापूर्वीच टाळ्यांचा गडगडाट! पंडित रविशंकर यांच्या सतार वादनाने संपूर्ण जगाला वेड लावले होते. याचा प्रत्यय आला तेव्हा, जेव्हा मॅडीसन स्क्वेर सारख्या सर्वात मोठ्या अशा ठिकाणी रविशंकर यांचा कार्यक्रम होता तेव्हा. पंडित रविशंकर स्टेजवर आले आणि त्यांनी त्यांचा सतार ट्यून करण्यास सुरू केले. कुठलेही वाद्य वाजवण्यास सुरू करण्यापूर्वी त्या वाद्याला स्केलमध्ये म्हणजे ट्यून केले जाते. तसे रविशंकर सतार ट्यून करत होते आणि हे करत असतानाच समोर उपस्थित हजारोंच्या संख्येतील प्रेक्षकांनी टाळ्यांचा गडगडाट केला. विशेष म्हणजे अजून तर खऱ्या वादनाला सुरुवात करायची होती. ते दृश्य बघून रविशंकर एकदम आश्चर्यचकित झाले होते. या उदाहरणावरूनच समजले असेल त्यांच्या सतार वादनाची जादू काय असेल ते... प्रसिद्धीसोबतच टीकेलाही रविशंकर यांना सामोरे जावे लागले आहे. पंडित रविशंकर हे भारतीय शास्त्रीय संगीत नाही तर पाश्चात्य म्युझिक वाजवतात, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. रविशंकर हे जास्त करून विदेशातच असायचे, त्यामुळे त्यांच्यावर ही टीका करण्यात येत होती. तसेच त्या काळातील प्रसिद्ध बॅन्ड बीटल्ससोबत रविशंकर यांनी अनेक कार्यक्रम केले. त्यामुळे देखील रविशंकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीताची पाश्चात्य संगीतासोबत सरमिसळ केली असे देखील म्हटले गेले. परंतु, हे सर्व आरोप रविशंकर यांनी वेळोवेळी फेटाळून लावले आहेत. पंडित रविशंकर यांची लव्ह स्टोरी पंडित रविशंकर उस्ताद अल्लाउद्दीन खान यांच्याकडून सतार शिकण्यासाठी मैहरला गेले. तिथून पंडितजींचे सतारशी असलेले नाते इतके घट्ट झाले की सतार आणि पंडित रविशंकर हे समानार्थी बनले. इथेच त्यांना त्यांची जीवनसाथी अन्नपूर्णा मिळाली. पंडितजींनी 1941 मध्ये त्यांच्या गुरूंची मुलगी अन्नपूर्णा देवीशी लग्न केले. या लग्नापासून त्यांना एक मुलगा झाला, जो आता हयात नाही. जवळजवळ 20 वर्षे एकत्र राहिल्यानंतर ते अन्नपूर्णापासून वेगळे झाले. पंडितजी संगीत जगतात एक प्रमुख व्यक्ती राहिले, परंतु अन्नपूर्णा देवी देखील काही कमी नव्हत्या. त्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रसिद्ध भारतीय सूरबहार वादक होत्या. अन्नपूर्णा देवी त्यांच्या वडिलांच्या शिष्या होत्या. असे म्हटले जाते की एकेकाळी संगीत जगात अन्नपूर्णा देवींची प्रतिष्ठा त्यांचे पती रविशंकर यांच्यापेक्षा जास्त होती. यामुळे त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला असे म्हटले जाते. पहिल्या पत्नीपासून वेगळे झालेल्या रविशंकर यांच्या आयुष्यात शास्त्रीय नृत्यांगना कमला देवी यांचा प्रवेश झाला. नृत्यांगना कमला देवी यांच्या संपर्कात आलेले रविशंकर बराच काळ त्यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले. काही काळानंतर कमला देवींसोबतचे त्यांचे सर्व संबंध तुटले. कमला देवींनंतर, स्यू जोन्स रविशंकर यांच्या आयुष्यात आल्या. कमला देवींपासून वेगळे झाल्यानंतर, पंडितजी न्यू यॉर्कस्थित कॉन्सर्ट निर्मात्या स्यू जोन्स यांच्या संपर्कात आले. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना, स्यू यांनी 1979 मध्ये नोरा जोन्स नावाच्या मुलीला जन्म दिला. नोरा ही एक गायिका आणि सितार वादक देखील आहे. स्यू जोन्सपासून वेगळे झाल्यानंतर, रविशंकर 1981 मध्ये सुकन्या राजनला भेटले. रविशंकरसोबत राहत असताना, सुकन्याने त्यांची मुलगी अनुष्काला जन्म दिला. त्यांच्या जन्मानंतर त्यांनी 1989 मध्ये लग्न केले. पंडितजींच्या दोन मुली, अनुष्का शंकर आणि नोरा जोन्स, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा संगीताचा वारसा पुढे चालवत आहेत. संध्याकाळी सुरू झालेला कार्यक्रम पहाटेपर्यंत चालला.. 1976 मध्ये पाश्चिमात्य देशांतील त्यांच्या एकल वादनाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त न्यूयॉर्कच्या 'कॅथेड्रल ऑफ सेंट जॉन डिव्हाइन' मध्ये एका अविस्मरणीय मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळपासून पहाटेपर्यंत चाललेल्या या प्रदीर्घ सोहळ्यात 6 हजार श्रोते मंत्रमुग्ध झाले होते आणि रविशंकरांच्या त्या अलौकिक वादनाने वातावरण अक्षरशः भारून गेले होते. केवळ सादरीकरणावर न थांबता, नवीन पिढीला कलेचे रीतसर शिक्षण मिळावे आणि भारतीय कलेला व्यापक पाठबळ लाभावे, या उदात्त हेतूने त्यांनी 'रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर म्युझिक अँड परफॉर्मिंग आर्ट्स'ची स्थापना केली, ज्याद्वारे पुढे त्यांचे 'रागमाला' हे गाजलेले पुस्तकही प्रकाशित झाले. 1980 च्या दशकात इटलीतील मिलान येथील एका दौऱ्यादरम्यान त्यांच्या प्रिय सतारीचे विमान प्रवासात दोन तुकडे झाल्याची हृदयद्रावक घटना घडली, ज्यामुळे रविशंकर पूर्णतः कोलमडून गेले होते. सुरक्षेच्या जाचक नियमांमुळे एरव्ही स्वतःच्या शेजारी सीटवर ठेवली जाणारी सतार यावेळी पहिल्यांदाच वेगळ्या बॉक्समध्ये पाठवल्याने हा अपघात घडला, परिणामी तो कार्यक्रम रद्द करावा लागला. रविशंकर हे नेहमीच परदेश दौऱ्यावर जात असताना सतारीसाठी देखील वेगळे तिकीट काढून बाजूच्या सीटवर ठेवायचे. आपल्या कलेचा जीव की प्राण असलेल्या सतारीची ही अवस्था नोडू मल्लिक (रविशंकर यांच्यासाठी खास सतार बनवून देणारे) यांना सांगण्याचे धैर्य त्यांना झाले नाही. त्यांनी ती दुरुस्त करून घेतली तरी त्यातील मूळ झंकार मात्र पुन्हा कधीच परतला नाही. या कटू अनुभवातून धडा घेत, रविशंकरांनी पुढे प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी खबरदारी म्हणून दोन सतारी सोबत ठेवण्याचा परिपाठ कायमचा अंगीकारला. पंडित रविशंकर यांना मिळालेले पुरस्कार पंडित रविशंकर यांना अनेक मोठे पुरस्कार मिळाले आहेत. भारतातील सर्वोच्च मानले गेलेले पुरस्कार म्हणजे भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण हे तीन पुरस्कार रविशंकर यांना मिळाले आहेत. तसेच त्यांना पाच वेळा संगीतातील सर्वोच्च मानला गेलेला पुरस्कार ग्रॅमी पुरस्कार हा तब्बल 5 वेळा मिळाला आहे. त्यानंतर संगीत नाटक अकादमी पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. जगातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांच्या मिळून अकरा मानद डॉक्टरेट, भारतामध्ये इंडियन आर्मी स्पेशल अॅवॉर्ड, राजीव गांधी एक्सलेन्स अॅवॉर्ड, भोपालचा कालिदास सन्मान पुरस्कार एस. टी. उद्योगाकडून दिला जाणारा ‘स्पिरीट ऑफ फ्रीडम पुरस्कार’, असे भारतातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. शिवाय स्वीडनचा ‘पोलर म्युझिक प्राइज’, जपानचा ‘प्रीमियम इंपिरीयल’, फ्रान्समधला सर्वोच्च नागरी फ्रेंच सन्मान, रेमन मॅगसेसे पुरस्कार आणि अजून किती तरी पुरस्कारांची मालिकाच त्यांच्या नावे आहे. भारतीय शास्त्रीय संगीताला खऱ्या अर्थाने जगभरात पोहोचवणारे पंडित रविशंकर यांचा अखेर 11 डिसेंबर 2012 साली लॉस एंजिलीस येथे मृत्यू झाला. आज रविशंकर आपल्यात नसले तरी त्यांच्या सताराच्या रविरूपी स्वरकिरणातून त्यांचा प्रकाश जगभर निरंतर उजळत राहील...
Maharashtra Sahitya Parishad : २६ जानेवारीच्या ऑनलाईन बैठकीचा व्हिडिओ ठरला वादाचे मूळ; पुण्यात घेतलेली पत्रकार परिषद विनोद कुलकर्णींच्या अंगलट येण्याची शक्यता.
आकाशाचा किंवा समुद्राच्या पाण्याचा रंग दुरुन कसा दिसतो? असा प्रश्न आपल्याला कुणी केला तर आपण चटकन निळा असे उत्तर देतो. पण या दोन्हीचा रंग निळाच का? असा प्रश्न आपल्याला कुणी विचारला, तर मात्र आपली दांडी गूल होऊ शकते. पण डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रामन या भारतीय पदार्थ वैज्ञानिकाने मात्र जगात पहिल्यांदा आकाशाचा व समुद्राचा रंग निळा भासण्याचे शास्त्रोक्त कारण समजावून सांगितले. हा निळा रंग हवेतील कणांद्वारे होणाऱ्या विकिरणांमुळे प्राप्त होतो. चला तर मग आज धुरंधरमध्ये पाहूया थोर वैज्ञानिक सी व्ही रामन यांचा जीवनपट, पण थोडक्यात..! बालपण व शिक्षण सी व्ही रामन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तामिळनाडूच्या त्रिची शहरालगतच्या एका गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आर. चंद्रशेखर अय्यर, तर आईचे नाव पार्वती अम्मल असे होते. त्यांच्या वडिलांना भारतीय संगीतात विशेष रुची होती. कालांतराने चंद्रशेखर आपल्या कुटुंबीयांसोबत विशाखापट्टणम शहरात स्थायिक झाले. तिथेच त्यांच्या वडिलांना एका खासगी संस्थेत प्राध्यापक म्हणून नोकरी लागली. त्यावेळी चंद्रशेखर अवघ्या 3 वर्षांचे होते. रामन बालपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार होते. त्यांची बुद्धी कुशाग्र होती. विज्ञान हा त्यांच्या आवडीचा विषय होता. त्यांची बौद्धिक क्षमता पाहून त्यांचे शिक्षकही चकीत होत. अत्यंत चिकित्सक वृत्तीच्या रामन यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे त्यांच्या शिक्षकांनाही अवघड जात. परिणामी, त्यांना सलग 3 वेळा वरच्या वर्गात टाकण्यात आले. रामन यांनी 12 व्या वर्षी उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण केली. 18 व्या वर्षी ते पदव्युत्तर पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत पहिल्या क्रमांकाने पास झाले. त्यांची परदेशात जाऊन संशोधन करण्याची इच्छा होती. पण बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. रामन यांचे 1907 मध्ये लोकसुंदरी अम्माल नामक तरुणीशी लग्न झाले. या दाम्पत्याला दोन मुले झाली. पैकी धाकटा व्यंकटरामन राधाकृष्णन हा रेडिओ खगोलशास्त्रज्ञ होता. व्यंकटरामन राधाकृष्णन प्रदिर्घकाळ रामन रिसर्च इन्स्टिट्यूट बंगळुरू येथे कार्यरत होते. त्यांना रॅड म्हणूनही ओळखले जायचे. दुसऱ्या महायुद्धानंत 1950 च्या दशकात रेडिओ खगोलशास्त्राच्या विकासात ते सक्रीय होते. त्यांनी अंतराळातील रेडिओ लहरींच्या ध्रुवीकरणावर प्रारंभिक व महतत्त्वपूर्ण संशोधन केले. पल्सर संशोधन हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध क्षेत्र होते. वेला पल्सरच्या ध्रुवीकरण मापनांमुळे मॅग्नेटाइज्ड रोटेटिंग न्यूट्रॉन स्टारची प्रतिमा स्थापित करण्यात मदत झाली. त्यांनी सी व्ही रामन यांच्यावर श्रीमती अॅनी बेझंट यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यातून त्यांनी अनेक धर्मग्रंथ भराभर वाचून काढले. त्यांनी धार्मिक विषयावर लिखाणसुद्धा केले. त्यांच्या एका निबंधाला पुरस्कारही प्राप्त झाला होता. अॅनी बेझंट यांच्या प्रभावामुळे एफ.ए.च्या परीक्षेत त्यांनी प्रथम विज्ञान विषयही सोडून दिला होता. पण नंतर त्यांना त्यांची चूक लक्षात आली. त्यामुळे त्यांनी पुन्हा विज्ञान विषय घेऊन आपली घोडदौड सुरू केली. प्रकाशाचे गुणधर्म सांगणारा रामन इफेक्ट प्रकाशाच्या गुणधर्मांनी शास्त्रज्ञांना नेहमीच कोडी घातली आहेत. 1900 च्या सुरुवातीला शास्त्रज्ञांना प्रश्न पडले होते - प्रकाश हा तरंगांसारखा व अविरत आहे का? की तो ऊर्जेच्या सुस्पष्ट दिसणाऱ्या पुंजकणांपासून (फोटोन्स) बनलेला असतो? भारतातील इतर काही शास्त्रज्ञांप्रमाणे सी व्ही रामन हे ही या प्रश्नांचा अभ्यास करत होते. प्रयोगशाळेत आपल्या सहकाऱ्यांसोबत काम करत असताना त्यांना एक आश्चर्यकारक गोष्ट आढळून आली. त्यांनी एका काचेच्या भांड्यातील द्रवातून रंगीत प्रकाश - उदाहरणार्थ व्हॉयलेट - सोडला तेव्हा त्यातून बाहेर पडणाऱ्या किरणात इतर रंगांचीही पुसटती झाक आढळून आली. त्यावर 6 वर्षे संशोधन केल्यावर 1928 मध्ये त्यांनी निष्कर्ष काढला की, प्रकाशाची पाण्यावर ज्या प्रकारे परस्परक्रिया घडली त्यामुळे हे घडले. प्रकाश जर अविरत लोळ व तरंग असता तर रंगातील हा बदल घडला नसता. जलरेणूंवर पडणारा प्रकाश हा ऊर्जेच्या लहान - लहान लक्षावधी पुंजकणांचा फोटोन्स बनलेला असेल तरच हा बदल घडू शकतो. जे फोटोन्स रेणूंवर आदळतात ते रेणूंमधील ऊर्जा काही प्रमाणात शोषून घेतात व फोटोन्सच्या रंगात बदल होतो. ज्या फोटोन्समध्ये ऊर्जेचा दल होत नाही त्यांचा रंग मूळचाच म्हणजे या ठिकाणी व्हॉयलेटस राहतो. पाण्यातून उद्भवणाऱ्या प्रकाशाच्या रंगातील बदल यातून स्पष्ट होतात. या शोधामुळे आधुनिक दृकशास्त्राच्या विज्ञानासाठी मार्ग उपलब्ध झाला. वायूंपासून रसायनांपर्यंत अनेक तत्त्वांच्या रचनेचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर रामन यांचे प्रकाशाचे प्रकी्णन हे आज महत्त्वाचे साधन बनले आहे. सुरक्षेसाठी व वैद्यकीय तपासण्यांसाठी वापरण्यात येणारे विविध प्रकारचे स्कॅनर्स हा या शोधाचा सर्रास वापरला जाणारा प्रकार म्हणता येईल. 'रामन इफेक्ट'ची रंजक गोष्ट भौतिकशास्त्रात अजरामर ठरलेल्या रामन इफेक्टच्या शोधाची गोष्ट फारच रंजक आहे. भौतिकशास्त्राचे प्राध्यापक या नात्याने रामन परदेशातील एका कार्यशाळेसाठी जहाजाने जात होते. प्रवासात वेळ जावा म्हणून त्यांनी नेहमीप्रमाणे निकोल प्रिझम व पॉकेट स्पेक्ट्रोस्कोप आदी उपकरणे सोबत घेतली होती. प्रयोग सुरू असताना रामन यांच्या लक्षात आले की, समुद्राच्या निळ्या रंगाच्या मागे पाण्याच्या थेंबाद्वारे सूर्यप्रकाशाचे विकिरणच कारणीभूत आहे. कलकत्त्याला (कोलकाता) परतल्यानंतर रामन यांनी त्यावर सखोल संशोधन केले. तब्बल 4 वर्षांच्या कठोर संशोधनानंतर रामन इफेक्टचा शोध केला. त्यानंतर 1928 साली इंडियन जर्नल ऑफ फिजिक्समध्ये यासंबंधीचा शोधनिबंध प्रकाशित झाला. त्यानंतर या संशोधनाला जगभर मान्यता मिळाली. भारतात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण, याच दिवशी चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी रामन इफेक्टचा शोध लावला होता. त्याकाळी रामन इफेक्टचा शोध लावण्यासाठी रामन यांना केवळ 200 रुपयांचे साहित्य लागले होते. याऊलट सध्या या इफेक्टचा शोध घेण्यासाठी लक्षावधी रुपयांच्या साधन संपत्तीचा वापर होत आहे. रामन यांनी पाऱ्यापासून निघालेल्या प्रकाशाचा वापर करून तो एकाच रंगाचा प्रकाश एका भांड्यात असलेल्या बॅझीन व टोल्युन या निरनिराळ्या द्रवांमधून पाठवला. प्रकाशाचे विकिरण झालेल्या पतन रंगीन रेषेच्या दोन्ही बाजूंना नवीन रेषा रंगपटलावर आढळल्या. याच रेषेला आपण रामन लाईन्स असे संबोधतो. रामन इफेक्टची सर्वत्र उपयोगिता रामन इफेक्टच्या शोधाचे विज्ञान क्षेत्रात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. रामन इफेक्टचा वापर वेगवेगळ्या मूलद्रव्यांचा गुणधर्म माहिती करून घेण्यास केला जातो. त्यामुळे रामन इफेक्ट हा मूलतः प्रकाश ऊर्जा व पदार्थ यामधील एक दुवा ठरला. रामन इफेक्टच्या शोधामुळे अणू-रेणूमधील इलेक्ट्रॉन्सच्या ऊर्जा स्थितीची माहिती मिळवता येऊ शकली. रामन इफेक्ट ही निसर्गाची मूलभूत पद्धती असून, त्याचा अभ्यास सूर्य प्रकाशाव्यतिरिक्त क्ष-किरण किंवा गॅमा किरणांद्वारेसुद्धा करता येणे शक्य आहे. ज्या किरणांची वारंवारता सूर्यप्रकाशापेक्षा कमी आहे, असा मायक्रोव्हेव, रेडिओ व्हेव यांच्यासाठीही रामन इफेक्ट लागू होतो. एकंदरीत रान इफेक्टची उपयोगिता सर्वत्र अनुभवता येते. 'रामन इफेक्ट'साठी नोबेल पुरस्कार सी व्ही रामन यांना त्यांच्या रामन इफेक्टसाठी 1930 सालचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर त्यांना परदेशातून भरपूर वेतनाच्या नोकरीचे प्रस्ताव मिळाले. पण त्यांना पैसे व सत्तेचा कोणताही मोह नव्हता. त्यामुळे त्यांनी ते प्रस्ताव नाकारले. या भूमिकेतील खरे कारण म्हणजे त्यांच्या मनात असणारे भारत प्रेम. जागतिक पातळीवरील संशोधक झाल्यानंतरही रामन यांच्या राहणीमानात कोणताही बदल झाला नाही. नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्यानंतरही रामन यांच्या डोक्यावर पगडी, अंगात कोट व त्यावर टाय बांधत. तर फुलपँट ऐवजी ते दक्षिण भारतीय पोषाख म्हणून पांढरी स्वच्छ लुंगी परिधान करतील. 1954 साली भारत सरकारने रामन यांचा भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान केला. नोबेल पुरस्कार सेरेमनीचा किस्सा रामन यांना नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर खूप आनंद झाला. या समारंभातच त्यांनी अल्कोहोलचे उदाहरम देऊन रामन इफेक्टचे प्रात्यक्षिक दाखवले. सत्कार समारंभानंतर झालेल्या भोजनावेळी पाहुण्यांना मद्य अर्थात अल्कोहोल देण्यात आले. तेव्हा त्यांचे सहकारी गंमतीने म्हणाले, तुम्ही आम्हाला अल्कोहोलमध्ये रामन इफेक्ट दाखवला, आता रामन यांच्यावर अल्कोहोलचा काय परिणाम होतो ते पाहूया. पण आयुष्यभर मद्यपान न करणाऱ्या रामन यांनी त्यांची ही ऑफर नम्रपणे नाकारली. नेहरूंसोबतचा ‘कॉपर-गोल्ड’ किस्सा रामन यांचा नेहरू सरकार व त्यांच्या धोरणांवर काहीसा आक्षेप होता. एकदा नेहरू रामन रिसर्च इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी आले. रामन यांनी लॅबमध्ये फक्त अल्ट्राव्हायोलेट (UV) लाइट चालू केली आणि नेहरूंसमोर एक तुकडा कॉपरचा दुसरा तुकडा गोल्डचा ठेवला. UV लाइटमध्ये कॉपर जास्त चमकत होते, त्यामुळे नेहरूंना तेच सोने असल्याचे वाटले. त्यावर रामन हसत म्हणाले, ‘मिस्टर प्राइम मिनिस्टर, सर्व चकाकणारे सोने नसते!’ (Everything that glitters is not gold.) 1954 मध्ये भारत सरकारने रामन यांना भारतरत्न पुरस्कार दिला. त्यांनी मेडल घेतल्यानंतर त्याचे हातोड्याने तुकडे केले. त्यानंतर ते म्हणाले, ‘मी याला प्लॅटिनममध्ये रूपांतरित केले!’ काही स्रोतांनुसार, हा किस्सा त्यांच्या नातवाने सांगितला आहे. तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्म झाला का? रामन नेहमी हेडबँड घालायचे. एकदा त्यांना त्याचे कारण विचारण्यात आले. तेव्हा ते मस्करी करत म्हणाले, माझ्या प्रिय मित्रा, या हेडबँडशिवाय माझे डोके आतापर्यंत फुटले असते. तुझ्या सततच्या स्तुतीमुळे ते इतके फुगले आहे की, हा हेडबँडच त्याला आवरून ठेवू शकतो. एकदा कुणीतरी त्यांना विचारले की, त्यांचा जन्म तोंडात चांदीचा चमचा घेऊन झाला होता का? त्यालाही रामन यांनी अत्यंत चपखल उत्तर दिले. ते म्हणाले, माझा जन्म चांदीचा, सोन्याचा किंवा साधा चमचाही सोबत घेऊन झाला नाही. कारण, त्यावेळी माझ्या वडिलांचा पगार दरमहा केवळ 3 रुपये एवढा होता. रामन यांना क्रिस्टल्सचे खूप आकर्षण होते. त्यांच्याकडे त्यांचा एक मोठा संग्रह होता. यात विजेमुळे वितळलेली वाळू, इंद्रधनुषी रंगाचे ज्वालामुखीचे खडक, माणिक, नीलम व हिरे यासारख्या दुर्मिळ नमुन्याचा समावेश होता. परदेश प्रवासात अतिरिक्त सामानासाठी लागणारे शुल्क परवडत नसल्यामुळे अनेकदा विमानतळावर त्यांना आपले मौल्यवान क्रिस्टल सोबत नेण्यासाठी आपले सामान मागे ठेवावे लागले. विशेषतः त्यांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांपुढे प्रकाशाचे दिमाखदार प्रदर्शन तयार करण्यासाठी रामन या क्रीस्टल्समधून प्रकाश किरणे सोडत. पॅरीस दौऱ्यात एका दुकानाच्या खिडकीत असलेल्या दोन निळ्या पंखांच्या फुलपाखरांनी त्यांचे मन मोहून घेतले. त्यांनी ती फुलपाखरे विकत घेतली. त्यानंतर त्यांनी फुलपाखरांचाही एक मोठा संग्रह तयार केला. रात्रंदिवस संशोधन कार्यात मग्न कलकत्ता येथे वित्तीय अधिकाऱ्याच्या सेवेत असताना रामन भल्या पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत भौतिकशास्त्रातील एलिमेंट ऑफ म्युझिकल स्केलवर संशोधन करून घरी फक्त जेवणासाठी येत. जेवण आटोपल्यानंतर सकाळी 10 वा. ते पुन्हा आपल्या सेवेला रुजू होत. सायंकाळी 5 पर्यंत कार्यालयात नोकरी केल्यानंतर रात्री 10 पर्यंत पुन्हा विज्ञानाच्या संशोधनकार्यात व्यस्त होत. सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवारी व रविवारी सुद्धा ते आपला वेळ संशोधनकार्यातच व्यतीत करत असत. आकाश व समुद्राच्या पाण्याचा रंग निळा का? आपणास कुणी असा प्रश्न केला की, आकाशात किंवा समुद्राच्या पाण्याचा दुरून दिसणारा रंग कसा असतो? तर आपण निश्चितपणे उत्तर द्याल की, आकाशाता तथा समुद्राचा रंग निळा असतो. पण समुद्र किंवा आकाशाच्या निळ्या भासण्याचे शास्त्रोक्त कारण या जगात सर्वप्रथम कुणी शोधून काढले? असा प्रश्न केला तर बहुतांश वाचक गोंधळतील, यात शंका नाही. रामन यांनी जगात पहिल्यांदा आकाश व समुद्राचा रंग निळा भासण्यामागेच विज्ञान समजावून सांगितले. त्यांच्या मते, हा निळा रंग सूर्यप्रकाशाच्या पाण्याच्या थेंबाद्वारे किंवा हवेतील कणांद्वारे होणाऱ्या विकिरणांमुळे प्राप्त होतो. रामन यांच्या मते, ज्या अणू - रेणूंची तरंगलांबी ही प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा कमी असते, अशा वातावरणातील सूक्ष्म अशा अणू-रेणूंवर प्रकाशकिरणे आदळतात, तेव्हा प्रकाशकिरणांचे विकिरण होते व त्यामुळे आपल्याला समुद्र किंवा आकाश हे निळे भासते. या परिणामालाच रामन परिणाम अर्थात रामन इफेक्ट असे म्हणतात. हे शास्त्रोक्त सत्य शोधून काढल्यामुळेच सी व्ही रामन यांचे नाव जगात अजरामर झाले. डॉ. सी व्ही रामन यांचे विश्वावर प्रेम होते. विज्ञानावर प्रेम होते. त्यांना लहान मुलांशी बोलायला आवडे. ते उत्तम वक्ते होते. लोकांना प्रश्न विचारायला व त्यांची उत्तरे शोधायला ते प्रोत्साहित करत. हृदयविकाराच्या झटक्याने निधन 1933 साली सी व्ही रामन यांनी कलकत्ता येथील आपले कार्य आटोपून भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू या संस्थेचे पहिले भारतीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला. 1937 साली या संस्थेच्या चालकांशी वाद झाल्यामुळे त्यांनी आपले पद सोडले. पण पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी बंगळुरू येथील विज्ञान संस्थेत 1948 पर्यंत कार्य केले. रामन यांनी कलकत्त्यासारखेच बंगळुरूलाही रामन संशोधन केंद्राची निर्मिती केली. अखेर 21 नोव्हेंबर 1970 रोजी वयाच्या 82 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. धुरंधर मालिकेतील खालील स्टोरीज वाचा... धुरंधर-60; अलेक्झांडर कनिंगहॅम:काशी लगत स्वर्गात जाणाऱ्या पायऱ्यांचा शोध लावणारा अन् बुद्धांचा भारत शोधणारा इंग्रजी लष्करी अधिकारी धुरंधर-59; संत बंका:देव आमचाही असेल तर मंदिर का नाही? असा प्रश्न करणारे मोठ्या ग्रंथांचे नव्हे, तर मोठ्या प्रश्नांचे संत! धुरंधर-58; अँटोनियो ग्राम्शी:तुरुंगाच्या 4 भिंतीत जग बदलण्याची शक्ती शोधणारा अन् वैचारिक क्रांती शस्त्रांपेक्षा वरचढ असल्याचे सांगणारा विचारवंत धुरंधर-57; डॉ. श्रीराम लागू:'देवाचे अस्तित्व हीच मोठी अंधश्रद्धा' असल्याचे ठणकावून सांगत समाजाला अस्वस्थ करणारा बुद्धिवादी माणूस धुरंधर-56; राणी गाइदिन्ल्यू:झाशीच्या राणीची गोष्ट माहिती असणाऱ्यांना इंग्रजांना आव्हान देणाऱ्या आदिवासी कन्येची गोष्ट माहिती आहे का? धुरंधर-55; पां. म. बापट:सशस्त्र क्रांतिकारक ते अहिंसक सत्याग्रहाचा सेनापती अन् अखेर झाडू उचलून ग्राम स्वच्छता करणारा सुधारक धुरंधर-54; नाना पाटील:म्हार, मांगांना लांब का ठेवता? ते घान कामं करत्यात म्हणून? तुमचा डावा हातही तेच करतो, असे सांगणारा क्रांतिसिंह धुरंधर-53; नेल्सन मंडेला:भारताला दुसरे घर मानणाऱ्या आफ्रिकन गांधींची कहाणी; 27 वर्षे कैद भोगूनही मनात कटूता न ठेवणारा मदिबा धुरंधर-52; शकुंतला देवी:शाळेचे तोंड न पाहता संगणकाची परीक्षा पाहणाऱ्या अन् गणिताला खेळ मानणाऱ्या कानडी महिलेची जादूई कहाणी धुरंधर-51; केशवराव जेधे:ब्राह्मणेतर चळवळीचा प्रमुख चेहरा अन् सामाजिक न्यायासाठी झगडणारा ठसकेबाज दृढनिश्चयी मराठी लढवय्या धुरंधर-50; डॉक्टर सलीम अली:पक्ष्यांच्या जगाचे रहस्य उलगडून मानवाला निसर्गाच्या दिशेने जाण्यास प्रेरित करणारा पक्ष्यांचा 'चालता फिरता विश्वकोश' धुरंधर-49; सर रोनाल्ड रॉस:'साला एक मच्छर'! मलेरिया अन् डास यांच्यातील परस्पर संबंध शोधून मानवतेची सेवा करणारा थोर वैज्ञानिक धुरंधर-48; होमी जहांगीर भाभा:दगडधोंड्यांच्या भारतात अणुज्योत पेटवून अज्ञानाचा अंधःकार दूर करणारा श्रीमंत घरातला बंडखोर तरुण धुरंधर-47; बिंदेश्वरी प्रसाद मंडल:ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या इमारतीचा सर्वात मजबूत पाया रचणाऱ्या बिहारच्या जमीनदाराची कथा धुरंधर-46; कार्ल बुशबी:ना ट्रेन ना प्लेन ना बाईक, तब्बल 27 वर्षांच्या अन् 58 हजार किलोमीटरच्या पदयात्रेची अनोखी कथा जी आजही सुरूय धुरंधर-45; जाईबाई चौधरी:स्त्री जीवन फुलवणारी अन् दलित महिलांना शैक्षणिक, सांस्कृतिक संजीवणी देणारी विदर्भातील थोर सेविका धुरंधर-44; ओशो रजनीश:पापाला पुण्याचे अन् हिंसेला अहिंसेचे कपडे घालावे लागतात असे सांगत ईश्वरापूर्वी स्वतःला शोधण्याचा सल्ला देणारा थोर दार्शनिक धुरंधर-43; अमृता प्रीतम:मैं तेनु फिर मिलांगी, कित्थे? किस तरह? पता नहीं; प्रेम, वेदना अन् स्वातंत्र्याचा सूर छेडत बाईचे जगणे मांडणारी लेखिका धुरंधर-42; दगडाबाई शेळके:स्वतःच्या नवऱ्याचे दुसरे लग्न लावून मराठवाडा मुक्तिसंग्रामात स्वतःला झोकून देणारी जालन्याची 'झाशीची राणी' धुरंधर-41; यशवंत घाडगे:दुसऱ्या महायुद्धात मर्दुमकी दाखवत ब्रिटिशांकडून इटलीच्या सैनिकांना कंठस्नान घालणारा मराठी सैनिक धुरंधर-40; शाहीर अमर शेख:धग, रग, आग, धुंदी अन् बेहोशीची जिवंत बेरीज असणारा तथा 'बर्फ पेटला हिमालयाला विझवायला चला' म्हणणारा शाहीर धुरंधर-39; टी. एन. शेषन:'नेत्यांना नाश्त्यात खाणारे' तथा EC ला अभूतपूर्व ताकद अन् प्रतिष्ठा मिळवून देणारे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त धुरंधर-38; डॉ. एम एस स्वामीनाथन:उपासमारीच्या सावटाखाली झुरणाऱ्या भारताला स्वावलंबनाचे स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवणारा शास्त्रज्ञ धुरंधर-37; मेजर शैतान सिंह:1962 च्या भारत - चीन युद्धात 120 जवानांच्या जोरावर शत्रूचा फडशा पाडणारा अन् पोट फाटले तरी मैदान न सोडणारा बहाद्दर धुरंधर-36; राणी वेलू नाचियार:महिलांची फौज तयार करून ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांना पहिल्यांदा धूळ चारणारी शिवगंगाची 'वीर मंगई' धुरंधर-35; अय्यनकाली:महिलांना छाती झाकण्याची परवानगी मिळवून देणारा अन् दलितांनी पिकवलेले धान्य चालते, मग ते का चालत नाहीत? असा प्रश्न करणारा सुधारक धुरंधर-34; जगन्नाथ शंकरशेठ:लोकांचा विश्वास जिंकणारी श्रीमंती गरिबांवर उधळणारा अन् परकियांनाही आपला वाटणारा मुंबईचा खरा शिल्पकार धुरंधर-33; अण्णाभाऊ साठे:दीड दिवस शाळेत जाऊन साहित्याचा सूर्य झालेला लोकशाहीर; जात, धन अन् धर्मदांडग्यांना आव्हान देणारा अण्णा धुरंधर-32; धीरूभाई अंबानी:गरिबीवर मात करत कोट्यवधी भारतीयांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे भारताचे एक अप्रतिम उद्योग रत्न धुरंधर-31; राजर्षी शाहू महाराज:अस्पृश्याला मानाचे पान अन् नांगरासाठी तोफा वितळवून लोखंड देणारे शाहू महाराज ग्रेट का होते? धुरंधर-30; चे गेव्हारा:अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द जागवून अवघ्या जगातील क्रांतीचा चेहरा बनलेला तुमच्या 'T शर्ट'वरील क्रांतिदूत धुरंधर-29; संत कबीर:पैशांच्या मागे पळणाऱ्यांचा देव कसा? असा परखड सवाल करत समस्त मानवतेला साधेपणाचा संदेश देणारा महानायक धुरंधर-28; राणी चेन्नम्मा:स्वकियांची फंदफितुरी जमिनीत गाडून 1857 च्या सशस्त्र उठावापूर्वी इंग्रजांना धूळ चारणारी 'कर्नाटकची लक्ष्मीबाई' धुरंधर-27; अहिल्याबाई होळकर:न्यायबुद्धीने स्वतःच्या नवऱ्याला धारेवर धरत चोराच्याही पोटाचा प्रश्न सोडवणाऱ्या दूरदृष्टीच्या शासक धुरंधर-26; डॉ. जयंत नारळीकर:ब्रह्मास्त्र होते तर रामाच्या राज्यात वीज होती का? असा झोंबणारा प्रश्न करणारा भारताचा मराठमोळा शास्त्रज्ञ धुरंधर-25; मुथुलक्ष्मी रेड्डी:महिला हक्क अन् आईचे 'देवदासी'पण पाहून त्याविरोधात लढा पुकारणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला आमदार धुरंधर-24; कुलदीपसिंग चांदपुरी:पाकच्या 2000 हून अधिक सैनिकांना 120 जवानांच्या बळावर धूळ चारणारा लढवय्या; '1971' ची अमर गाथा धुरंधर-23; चंद्रप्रभा सैकियानी:पडदा प्रथेवर लाथ घालून महिलांना आभाळ खुले करणारी आसामची हिरकणी; कुमारी माता झाली तरी डगमगली नाही धुरंधर-22; कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील:महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणाचा सूर्य पेरून उपेक्षितांच्या झोपडीत ज्ञानाचे पीक काढणारा खरा 'धुरंधर' धुरंधर-21; प्रबोधनकार ठाकरे:मराठी समाज मनात मोक्याच्या ठिकाणी पक्क्या गाठी मारून जातिभेदांच्या जखमांचा खोलवर शोध घेणारा बहुजन हिंदुत्त्ववादी धुरंधर-20; भीमराव रामजी आंबेडकर:चवदार तळ्याला ताळ्यावर आणणारा दलितोद्धारक अन् सामाजिक समरसतेचा खरा विवेकी शिल्पकार धुरंधर-19; जिगर मुरादाबादी:'शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ खुदा नहीं,' असे म्हणत मौलवींकडून टाळ्या पिटवून घेणारा सूफी शायर धुरंधर-18; आनंदीबाई जोशी:'पृथ्वीच्या पाठीवर हिंदुस्तान इतका दुसरा रानटी देश नाही', असे ठणकावून सांगणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर धुरंधर-17; भगतसिंग:'बॉम्ब अन् पिस्तुले क्रांती आणत नाहीत, क्रांती लोकांच्या मनात जन्मते', असे ठामपणे सांगणारा 'शहीद ए आझम' धुरंधर-16; शहाजीराजे भोसले:छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रेरणास्थान अन् बृहन्महाराष्ट्राची स्थापना करणारा धोरणी राजा धुरंधर-15; ई. व्ही. रामासामी:देव आहे हे सिद्ध करण्याचे आव्हान देत तर्कशुद्ध अन् निर्भय मतांद्वारे समाजात क्रांती घडवणारा भारताचा 'पेरियार' धुरंधर-14; कार्नेलिया सोराबजी:रूढी परंपरांना आव्हान देत शिक्षण, समानता अन् मानवी हक्कांसाठी अथक झगडणारी भारताची पहिली महिला बॅरिस्टर धुरंधर-13; खासेराव जाधव:बहुजन समाजाच्या खांद्यावरील निरक्षरतेचे 'जू' काढून त्यांना उच्च शिक्षणाच्या गंगेचे पाणी पाजणारा अवलिया धुरंधर-12; तंट्या भिल्ल:आदिवासींमध्ये राष्ट्रीयत्व जागवणारा 'रॉबिनहूड', थोर स्वातंत्र्यसैनिक; वाचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचे सोनेरी पान धुरंधर-11; विठ्ठल सखाराम पागे:उकिरड्याला खरकटे माहिती नसल्याच्या काळात 'भूकबळी'वर नामी उपाय शोधणारा राजकारणी धुरंधर-10; मोहन हिराबाई हिरालाल:विनोबा भावेंचे 'सर्वायतन' नक्षलग्रस्त गडचिरोलीत रुजवणारा अन् गरिबांना लक्ष्मीदर्शन घडवणारा अवलिया धुरंधर-9; फातिमा शेख:सावित्रीमाईंची मैत्रीण अन् भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका; फातिमा एक काल्पनिक पात्र होत्या का? तुम्हीच ठरवा धुरंधर-8; एकनाथ दगडू आवाड:बापाचा बुचडा कापून 'पोतराज' प्रथेवर घाव घालणारा पोरगा; कथित गुन्हेगारीने बदनाम झालेल्या बीडचा थोर माणूस धुरंधर-7; स्वामी विवेकानंद:मानवतेचा उत्कृष्ट प्रेमी, महान निधर्मी तत्ववेत्ता; नरेंद्रनाथ दत्त यांचे अखेरचे काही तास कसे होते? धुरंधर-6; कंदुकुरी वीरेशलिंगम पंथुलु:अंधश्रद्धेवर लाथ घालून विधवा पुनर्विवाह अन् ज्ञानाची वात पेटवणारा आंध्रचा 'लेखणी'सम्राट धुरंधर-5; भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड:दोन वेळा वाचवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राण धुरंधर-4; डॉ. विश्राम रामजी घोले:महिला उत्थानासाठी पेटून उठलेला सुधारक, ज्यांची 'बाहुली' ठरली स्त्री शिक्षणाची पहिली बळी धुरंधर-3; पार्वतीबाई आठवले:वैधव्य अन् परावलंबन दैवी भोग मानणारी, पण पोटच्या गोळ्याच्या काळजीने असामान्य झालेली एक निरक्षर स्त्री धुरंधर-2; बसव प्रेमानंद:अंधश्रद्धेच्या खाटेवर आजारी पडलेल्या समाजाला विज्ञानाचे औषध देऊन चमत्कारांची पुरती हवा काढणारा थोर दार्शनिक धुरंधर-1; नरहर अंबादास कुरुंदकर:विचारांची श्रीमंती वाढवणारा अन् आजच्या किर्र वैचारिक काळोखात प्रकाशवाट दाखवणारा थोर विचारवंत
NCP Shirur : शिरूर तालुक्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून स्वतंत्र बैठकांचे सत्र; वरिष्ठ नेत्यांच्या 'समन्वय' दाव्याला स्थानिक पातळीवर हरताळ.
महाराष्ट्राच्या राजकारणावर वेगळा ठसा उमटवणारा नेता अशी अजितदादांची ओळख होती. मोठ्या झाडाखाली छोटी झाडे तगत नाहीत; परंतु अजितदादा त्याला अपवाद होते. राज्याच्या प्रश्नांची खडानखडा माहिती आणि दूरदृष्टीने निर्णय घेणारा झुंजार नेता म्हणून त्यांची ओळख होती. विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. मुख्यमंत्री व्हायचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही, ही रूखरूख महाराष्ट्राला राहील.उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजकीय वारसा लाभला असला, तरी ते त्या माध्यमातून राजकारणात आले नाहीत. राजकारणी अजितदादा सर्वांना माहीत आहेत; परंतु त्या पलीकडचे अजितदादा अनेकांना माहीत नाहीत. नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरामध्ये त्यांचा जन्म झाला. अण्णा पाटील कदम हे त्यांचे मामा. दादा राजकारणात कुठेही असले, तरी त्यांनी नातेसंबंध कटाक्षाने जपले. नगर जिल्ह्यात आले, की ते आजोळी जायचे. वेळात वेळ काढून त्यांना भेटायचे. विचारपूस करायचे. विरोधी पक्षात असले, तरी अजितदादांनी राजकारण आणि नातेसंबंध वेगळे ठेवले. अन्य कुणाशी नातेसंबंध असले, तरी त्यांच्याही भेटी अजितदादा घेत. अजितदादा राजकारण्यापेक्षा माणूस म्हणून मोठे होते. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीकडे पाहता येईल. प्रचारासाठी जात असताना त्यांनी एक अपघात पाहिला तेव्हा तिथे थांबून अपघातातील जखमीला तातडीने रुग्णालयात पाठवले. हे अपवादात्मक उदाहरण नाही. नगर जिल्ह्यात एका अपघातातील जखमीसाठी स्वतःची गाडी थांबवली. त्या गाडीतच रुग्णाला दवाखान्यात पाठवून उपचाराची व्यवस्था केली आणि दादा दुसऱ्याच्या गाडीत पुढे निघून गेले. दादा असे माणुसकी जपणारे होते.दादा उपमुख्यमंत्रीपदी असताना वाढदिवसादिवशी त्यांच्या मुंबईच्या बंगल्यावर जाण्याचा योग आला. सकाळी साडेसहा वाजता तिथे पोहोचलो, तर दादा एका बैठकीत होते. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आमच्यासोबत विदर्भातील काही कार्यकर्तेही आले होते. त्यांची काही सार्वजनिक कामे होती. दादांनी त्यांच्या आमदाराकडून ती जाणून घेतली आणि आमदारालाच खडसावले. या लोकांना घेऊन इतक्या लांब येण्याची काय गरज होती, त्यांना किती त्रास झाला. त्यांची कामे तिथेच व्हायला हवी होती. त्यानंतर त्यांनी या कार्यकर्त्यांची आस्थेने चौकशी केली. त्यांना नाष्टा दिला. ते कसे आले, याची माहिती घेतली. पैसे आहेत का, हे विचारले. आलाच आहात, तर आता मुंबई पाहा आणि गावी जाईपर्यंत तुमचे काम झालेले असेल, असा शब्द दिला. आमदाराला बोलावून संबंधित कार्यकर्त्यांचा खर्च तुम्ही करा, असे बजावले. पैसे नसल्यास माझ्याकडून घ्या, असे सांगायला ते विसरले नाहीत. हे कार्यकर्ते मुंबईहून विदर्भात पोहोचण्याअगोदरच काम झाले होते. पवार कुटुंबाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वेळ चोख पाळणे. अजितदादा त्या परंपरेत बसणारे. अजितदादा दिलेल्या सभांना वेळेवर उपस्थित राहत. अजितदादा स्पष्टवक्ते होते. काम होणार असेल, तरच ‘हो’ म्हणत. होणार नसेल तर तसे स्पष्ट सांगणार. नियमात बसत असेल, तरच काम करणार. नसेल होत तर तसे सांगणार. राजकारणी नेत्यांमध्ये अपवादाने आढळणारा हा गुण अजितदादांकडे होता.आज त्यांची आठवण काढताना अनेक वर्षे मागे जायला होते. कोल्हापूर येथून शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर अजितदादांनी काटेवाडीमध्ये शेती करायला सुरुवात केली. प्रारंभी त्यांनी टोमॅटोची लागवड केली. टोमॅटोचे हे पीक पाहण्यासाठी दुरून शेतकरी येत असत. त्यानंतर दादांनी शेती क्षेत्रात विविध प्रयोग केले. दुधाचा व्यवसाय केला. जनावरांची खरेदी केली. त्या वेळी ते जनावरांसाठी बाजारातून स्वतः कडबा खरेदी करत. याशिवाय त्यांनी कुक्कुटपालन व्यवसायही केला. हे सगळे उद्योग करताना सगळी कामे ते स्वतः करत. दादांनी काटेवाडी ते कन्हेरी परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले. लोकांना मदत करण्याची त्यांची भूमिका आधीपासूनच पाहायला मिळालेली. लोकांनी मांडलेले प्रश्न, अडीअडचणी घेऊन ते शरद पवार यांच्याकडे जात. तिथे प्रश्न मार्गी लावत असत. अशा पद्धतीने समाजकारण करता करता अजितदादा राजकारणाच्या वाटेवर येऊन उभे राहिले. वेगवेगळी खाती सांभाळताना अजितदादांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. दादांचा राजकारणापर्यंतचा प्रवास एक प्रगतशील शेतकरी, लघुउद्योजक, संचालक, अध्यक्ष, उपमंत्री, मंत्री आणि उपमुख्यमंत्री असा टप्याटप्याने झाला. प्रत्येक पदावर उत्तम काम केल्यामुळे त्यांना पुढची संधी मिळत गेली. प्रत्येक पदाची जबाबदारी सांभाळताना दादांनी त्यांची योग्यता, गुणवत्ता सिद्ध केली. म्हणूनच वारसा म्हणून दादा राजकारणात आले किंवा त्यांना पदं मिळाली असे अजिबात झाले नाही.अजितदादा आणि कार्यकर्ते हे समीकरण महाराष्ट्राला नव्याने सांगायची गरज नाही. एखादा कार्यकर्ता दादांशी जोडला गेला, तर मग जीव गेला तर बेहत्तर; पण दादांसाठी वाट्टेल ते करण्याची कार्यकर्त्यांची तयारी असे. कार्यकर्त्यांची कानउघाडणी करताना दादांचा उद्देश कधीच चुकीचा नसायचा. लोकांची कामे व्हावीत, पक्ष पुढे जावा हेच दादांना अभिप्रेत असायचे. दादा अहोरात्र काम करून जनतेच्या प्रश्नांना महत्त्व देत. कार्यकर्त्यांची पदावरून भांडणे दादांना पटायची नाहीत. म्हणनूच ते थोडा कठोर पवित्रा घेऊन कार्यकर्त्यांना तंबी देत. दादांच्या चिडण्यामागे लोकांची विधायक कामे पूर्ण होण्यासाठीची तळमळ असते, हे कार्यकर्त्यांना चांगलेच ठाऊक असायचे. अजितदादांनी जलसंपदा मंत्री या पदाची धुरा सांभाळताना, कार्यभार पाहताना महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा अत्यंत बारकाईने आणि गांभीर्याने अभ्यास केला होता. यातून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत होणारी घट आणि त्यातच राहणारी पावसाची अनियमितता यांसारखे अनेक प्रश्न समोर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. यावर तोडगा म्हणून धरण बांधकामाची सुरुवात, कॅनॉल, कालवे इत्यादी कामे त्यांनी प्राधान्याने पूर्णत्वाला नेली. याशिवाय ‘पाणी साठवण योजने’यासारख्या योजना राबवल्या. यामुळे पाण्याची अडचण दूर झाली. दादा जितके कठोर, तितकेच मिश्कील होते. फिरक्या घ्यायला ते कमी करत नसत. गोदावरी खोऱ्याच्या पाण्यावरून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष सुरू असताना नाशिक-नगरच्या नेत्यांना ते हसत सांगायचे, की मराठवाड्याला पाणी देऊ द्या. तिथे माझी सासुरवाडी आहे. घरच्यांचं मन जपायला तेवढं तरी करू द्या!महाराष्ट्रातील विविध पाटबंधारे योजनांना गती देताना ठिबक आणि अनेक नव्या तंत्रज्ञानाच्या बीज प्रक्रियांचे निर्णय त्यांनी घेतले. खोरेनिहाय धरण, पाटबंधारे, पाणलोट यासंदर्भात सर्वांगीण विचार करताना दादांनी धडक कामे मार्गी लावली. अजितदादांच्या राजकारणाचा मोठा भाग हा लोकांच्या आयुष्याशी निगडित होता. तिथे इतर नेत्यांसारखा गरळ ओकण्याचा विषय नसतो. दादा नेहमीच महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी रात्रंदिवस एक करत असत. सत्ता असो वा नसो; दादा अविरत काम करत असत, हे महाराष्ट्राला माहीतच आहे. दादा आणि बळीराजा यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे नाते होते. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीमध्ये बळीराजाला प्रचंड कष्ट सोसावे लागतात. बळीराजाची ही अवस्था पाहून दादा दुष्काळातील जनतेला दिलासा देण्यासाठी उन्हातान्हात फिरत. त्यातून दुष्काळग्रस्त शेतकरी, पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा फिरणाऱ्या माता-भगिनी, पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे चिंतेत असणारे छोटे कारखानदार यांना दुष्काळाच्या दुष्टचक्रातून निश्चितच काहीसा आश्चर्यकारक दिलासा देणारा निर्णय दादा तळमळीतून घेत. महिला शिकून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यास कुटुंबाला उभे करते. त्यामुळे महिला सबलीकरण हा विषय अजितदादांच्या अजेंड्यावर होता. महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ५० टक्के राखीव जागांचा निर्णय दादांच्या पुढाकारातून झाला. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा खूप मोठा निर्णय होता.बळीराजा, महिला, युवक, दलित, आदिवासी यांचा विकास हा दादांच्या राजकारणाचा गाभा होता. दादांनी या उपेक्षित वर्गासाठी घेतलेले निर्णय त्यांना या वर्गाचा तारणहार म्हणून सिद्ध करतात. दादा स्वतः शेतकरीपुत्र होते. त्यांना शेतकऱ्यांचे दुःख समजत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ते नेहमीच आक्रमक भूमिका घेताना दिसले. कर्जमाफी, नुकसानभरपाई, पीक विमा योजना अशा विषयांवर त्यांनी वेळोवेळी सरकारवर दबाव आणला. त्यामुळे ग्रामीण भागात त्यांची कायम लोकप्रियता राहिली. राजकारणात अनेकदा नेते संभ्रमात राहतात; मात्र अजित पवार यांनी नेहमीच स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली. नेतृत्व म्हणजे सर्वांनाच खूश करणे नसते, तर योग्य वाटणारा मार्ग निवडणे असते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले होते. सरकारी फाईलींचा ढीग न करता निर्णय त्वरित घेणे, अधिकाऱ्यांकडून वेळेत काम करून घेणे हा त्यांचा स्वभाव होता. काही वक्तव्ये, काही निर्णय आणि सत्तासंघर्ष यामुळे ते टीकेचे धनी झाले होते; मात्र त्यांनी कधीही टीकेमुळे काम थांबवले नाही. लोकशाहीमध्ये टीका अपरिहार्य असते. त्यातून शिकत पुढे जाणे, हीच परिपक्व नेतृत्वाची खूण असते. अजित पवार यांनी स्वतःला वेळोवेळी बदलत, सुधारत पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता. मोठ्या पदावर असूनही त्यांनी जनतेशी असलेला संपर्क तुटू दिला नाही. त्यांच्या वाटचालीत चढ-उतार आले, वाद झाले, टीका झाली; पण काम करण्याची जिद्द मात्र कायम राहिली. आजच्या राजकारणात केवळ घोषणांची गर्दी दिसते. प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवणारे नेते दुर्मीळ होत चालले आहेत. त्यात अजित पवार होते. दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत.
Velhe News : मुलभूत सुविधांचा अभाव असूनही ग्रामस्थांची निष्ठेने भक्ती; ४२ लाखांचा रस्ता झाला, मात्र आरोग्य सुविधा आणि नेटवर्कअभावी जनजीवन विस्कळीत.
NCP Merger : शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात तासभर सकारात्मक चर्चा; 'अजितदादांचे स्वप्न' पूर्ण करण्यासाठी दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या हालचालींना वेग.
महाभारतातील मोतीकण,भालचंद्र ठोंबरेपूराणात देवदेवतांच्या तसेच राक्षसांच्या विविध कथा आहेत. राक्षसांच्या क्रौयाच्या विविध कथा आहेत. राक्षस देव, ऋषीमुनी व मानवांना विविध प्रकारे त्रास देत असत. अशाच प्रकारे त्रास देणाऱ्या दोन राक्षस बंधूंची कथा महाभारतातील वनपर्वातील तीर्थपर्वात आहे. महाभारतातील कथेनुसार एका नगरात आतापी (याचाच काही ठिकाणी ईलवल म्हणूनही उल्लेख केला आहे) व वातापी नावाचे दोन क्रूर व मायावी राक्षस बंधू राहत होते. वातापीला कोणतेही लहान-मोठे रूप धारण करण्याची कला होती. त्या दोन्ही बंधूंनी वाटसरूंना तसेच अनेक तीर्थयात्रींना लुबाडून असंख्य धन जमा केले होते. लोकांना ठार मारण्याची त्यांची एक अभिनव पद्धत होती. आतापी लोकांना अथवा वाटसरूंना, ऋषीमुनींना अथवा तीर्थयात्रींना मोठ्या आदराने भोजनाला बोलावीत असे. वातापी एखाद्या प्राण्याचे अथवा कोणत्याही खाद्यपदार्थाचे रूप घेत असे. आतापी त्या प्राणी रूपी अथवा खाद्यरूपी वातापीला ठार करून अथवा कापून त्याचे स्वादिष्ट भोजन बनवून अतिथीला पोटभर जेवू घालत असे. एवढेच नव्हे, तर वर अतिथीला दक्षिणाही देत असे. अतिथी बाहेर गेल्यानंतर आतापी वातापीला ‘वातापी ये’ म्हणून हाक देत असे व वातापी त्या व्यक्तीचे पोट फाडून आपल्या मूळ रूपात परत येत असे. अशा प्रकारे ते वाटसरू, तीर्थयात्री व ऋषीमुनींची हत्या करीत असत, तसेच त्यांच्याजवळ असलेले धनही लुटत व त्यांचे मांसही भक्षण करीत असत. अशा प्रकारे त्यांनी अगणित संपत्ती गोळा केली होती.एके दिवशी महर्षी अगस्ती ऋषी वाटेने जात असता या दोघांनी त्यांना नाटकी आदराने बोलावून भोजनास आमंत्रित केले. अगस्ती ऋषी सर्वज्ञ असल्याने त्यांनी राक्षस बंधूंच्या मनातील हेतू ओळखला व त्यांनीही राक्षस बंधूंना अद्दल घडविण्याचे ठरवले; परंतु वरकरणी तसे भासू न देता ते भोजनाला गेले. नेहमी प्रमाणे वातापीने आपले रूप बदलले. आतापीने त्यापासून स्वादिष्ट भोजन बनविले व अगस्ती ऋषींना वाढले. अगस्त्य ऋषींनीही पोटभर जेवण केले. हात धुऊन त्यांनी ‘वातापीचे पचन हो’असे म्हणून पोटावरून हात फिरविला. त्याबरोबर वातापी अगस्तींच्या पोटातच मरून गेला; परंतु याची कल्पना नसलेल्या आतापीने ‘वातापी ये’ म्हणून हाक दिली. मात्र अगस्ती ऋषींनी त्याला वातापी आता माझ्या पोटातच जीरला आहे तो परत येणार नाही. असे सांगताच आतापी घाबरून गेला. आपला कट असफल झाल्याचे व अगस्ती ऋषींनी वातापीला पोटातच नष्ट केल्याचे पाहून आतापी पळू लागला; परंतु महर्षी अगस्तीने त्यालाही मंत्राद्वारे ठार केले. अशा प्रकारे महर्षी अगस्तींनी जनतेला आतापी व वातापीच्या जाचातून मुक्त केले.तात्पर्य : समाजामध्ये सतप्रवृत्तीप्रमाणेच दुष्ट प्रवृत्तीचे लोकही असतात. जे गोड बोलून इतरांचा घात करतात, तेव्हा अशा लोकांपासूनसावध असावे.
तंत्रवेध,डॉ. दीपक शिकारपूरडिजिटल ट्विन तंत्रज्ञान एखादी भौतिक वस्तू किंवा प्रक्रियेचे तपशीलवार आभासी प्रतिनिधित्व तयार करते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे डिजिटल क्षेत्र आणि वास्तविक जगाचे एकत्रिकरण होऊन डिजिटल ट्विन तंत्रज्ञान एक अपरिहार्य साधन म्हणून उदयाला आले आहे. या तंत्रज्ञानामुळे उद्योगांना आकार मिळत असून व्यवहारांमध्येही क्रांती घडते आहे. आभासी जग आणि भौतिक वास्तवासाठीही हे तंत्रज्ञान वापरात येणार आहे.सयामी जुळे वा जुळ्या व्यक्तीबद्दल आपण जाणतो. साधारण एकमेकांसारखेच दिसणारे आणि काही वेळा एकसारखाच विचार करणारे ते एक व्यक्तिमत्त्व असते. अनेक वेळा जुळे इतके सारखे दिसतात की कोण कुठला हेही ठरवणे अवघड जाते. हे झाले भौतिक विश्वाबद्दल. आता घटकाभर कल्पना करा की आपली एक प्रतिकृती डिजिटली तयार झाली तर? या प्रतिकृतीला डिजिटल ट्विन (जुळे) असे म्हटले जाते. एखाद्या वस्तूचा डिजिटल ट्विन म्हणजे तिची आभासी प्रतिकृती. ही प्रतिकृती मूळ वस्तू/व्यक्तीची इत्यंभूत माहिती मिळवून पूर्ण जीवनचक्राचे सदृशीकरण (सिम्युलेशन) करते. डिजिटल ट्विन हे एखाद्या वास्तविक वस्तूचे, प्रणालीचे किंवा प्रक्रियेचे अत्यंत तपशीलवार आभासी प्रतिबिंब असते. हे प्रतिबिंब सॉफ्टवेअरच्या सहाय्याने तयार केले जाते आणि वास्तविक वस्तूच्या सर्व वैशिष्ट्यांचे अनुकरण करते.डिजिटल ट्विन हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, जे एखाद्या भौतिक वस्तू, प्रणाली किंवा प्रक्रियेचे अत्यंत तपशीलवार आभासी प्रतिनिधित्व तयार करते. या आभासी प्रतिनिधित्वालाच डिजिटल ट्विन म्हणतात. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे डिजिटल क्षेत्र आणि वास्तविक जगाचे एकत्रिकरण झाले आहे. यामुळे डिजिटल ट्विन तंत्रज्ञान एक अपरिहार्य साधन म्हणून उदयाला आले आहे. या तंत्रज्ञानामुळे उद्योगांना आकार मिळतो आहे, व्यवहारांमध्येही क्रांती घडते आहे. सुरुवातीच्या काळात फक्त उत्पादनाच्या स्तरावर याची कल्पना केली होती. पण आता आभासी जगात आणि भौतिक वास्तवांसाठीही हे डिजिटल तंत्रज्ञान वापरात येणार आहे. डिजिटल ट्विन हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा मिशिगन विद्यापीठात डॉ. मायकेल ग्रीव्हस यांनी २००२ मध्ये सादर केला होता. सुरुवातीच्या काळात उत्पादन क्षेत्रात ही संकल्पना मांडण्यात आली होती. त्यानंतर ही कल्पना मोठ्या प्रमाणात ॲप्लिकेशन्सचा समावेश करण्यासाठी विकसित झाली. डिजिटल ट्विनमध्ये विविध परिस्थितींचे अनुकरण करून आणि डेटाचे विश्लेषण करून भविष्यसूचक देखभाल, परिपूर्ण व्यवहार आणि उत्पादन विकासामध्ये नावीन्य आणले जाते. भौतिक मालमत्ता आणि प्रक्रियांच्या कामगिरीचे परीक्षण, विश्लेषण आणि त्याची क्षमता वाढवण्यासाठी उत्पादन, आरोग्यसेवा, वाहतूक आणि शहरी नियोजन यांसारख्या विविध उद्योगांमध्ये डिजिटल ट्विन्सचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या परिस्थितींची पडताळणी करू शकते, त्याच्या परिणामांचा अंदाजलावू शकते आणि निर्णय घेण्यासाठीही मदत करू शकते.मेटाव्हर्समध्ये एक आभासी जागा तयार केली जाते. यामध्ये वापरकर्ते डिजिटल वातावरणाशी आणि एकमेकांशी संवाद साधतात आणि डिजिटल ट्विनिंगला अनेक प्रकारे छेदतात. मेटाव्हर्स विकसित होत असताना समग्र आणि एकमेकांशी जोडलेले आभासी जग तयार करण्यासाठी डिजिटल ट्विन कणा म्हणून काम करू शकतात. हे तंत्रज्ञान वापरकर्त्यांना मेटाव्हर्समध्ये स्वतःचे अत्यंत तपशीलवार आणि अचूक प्रतिनिधित्व तयार करण्यास सक्षम बनवू शकते. यामुळे वैयक्तिक स्वरूपाचे आणि खरे असल्यासारखे अनुभव घेता येतात. उदाहरणार्थ, व्हर्च्युअल शॉपिंगमध्ये उत्पादनांचे डिजिटल ट्विन्स खरेदीचे निर्णय घेण्यासाठी वापरकर्त्यांना मदत करू शकतात. शिवाय डिजिटल ट्विन्स मेटाव्हर्समधील विविध मंच आणि यंत्रणांमधील देवाण-घेवाण सुलभ करतात. तसेच विविध आभासी वातावरणांमध्ये अखंड संवाद आणि परस्पर संवादही घडवून आणतात. या देवाण-घेवाणीमुळे परस्परसंबंधित अनुभव घेता येतात आणि जागतिक स्तरावर सहयोग आणि नवकल्पना वाढीला लागते. डिजिटल ट्विन्स विविध क्षेत्रांमध्ये खोली, समृद्धता आणि कार्यक्षमता वाढवून मेटाव्हर्सचा लक्षणीय विस्तार करू शकतात. याव्यतिरिक्त स्मार्ट शहरे, औद्योगिक संयंत्रे किंवा नैसर्गिक वातावरण यांसारख्या संपूर्ण इकोसिस्टीमचा समावेश करण्याच्या उद्देशाने डिजिटल ट्विन वैयक्तिक प्रतिनिधित्वाच्या पलीकडे विस्तारू शकतात. रिअल-टाइम डेटा आणि सिम्युलेशन एकत्र करून हे तंत्रज्ञान बहुआयामी आणि प्रतिसादात्मक आभासी जग आणखी सक्षम करते. यामुळे त्यांच्या भौतिक समकक्षांना जवळून प्रतिबिंबित करता येते.डिजिटल जुळे डेटा स्त्रोतांशी जोडलेले असतात. परिधान केलेल्या एका छोट्या उपकरणाद्वारे आपले डिजिटल विश्व साठवले जाते, आपण भेटलेल्या व्यक्ती, त्यांचे सोशल प्रोफाइल्स, झालेले संभाषण, व्यवहार या सर्व बाबींचा त्यात अंतर्भाव असतो. अनेक वर्षांच्या साठवणुकीनंतर या माहितीचे एआय तंत्राद्वारे पृथक्करण करून काही विशिष्ट साचे, वर्तणुकीचे प्रकार तयार केले जातात. या संकल्पनेचा उपयोग आपल्याला स्मरण केलेल्या गोष्टी साठवण्यासाठी करता येऊ शकतो. मानवी मेंदूमध्ये ही अफाट क्षमता आहे. पण कालानुरूप त्यात त्रुटी निर्माण होतात. अनेकांना विस्मरण होते, एखादी व्यक्ती समोर येते पण नाव आठवत नाही. कधी कधी नाव आठवते, पण व्यक्ती डोळ्यांसमोर येत नाही. इथे आपला डिजिटल जुळा आपल्याला मदत करू शकतो. एआयमधील प्रेडिक्टिव्ह अनॅलिटिक्स तंत्रामुळे आपण एखाद्या व्यक्तीला वा एखाद्या ठिकाणी जायच्या आधी त्यासंबंधी माहितीची खातरजमा, उजळणी आधीच करू शकतो. काही टूल्स तुम्हाला हवी तेव्हा रिअलटाइम अर्थात मदत करू शकतात. आपला घसा बसला असेल तर, आपल्या वतीने संभाषणही करू शकतात. यात आपल्या आवाजाचे, लकबींचे पृथक्करण केले असते. फक्त यासाठी आपले संभाषण (अनेक वर्षांचे) रेकॉर्ड केले जाते. यासाठी वेअरेबल (परिधान केलेले संगणकीय उपकरण) वापरले जाते. ‘प्लॉड’ या एआय उद्योगाने नोट नावाचा एक स्लिम सक्षम ऑडिओ रेकॉर्डर विकसित केला आहे.हा ऑडियो तुमच्या फोनच्या मागील बाजूस अडकवला जाऊ शकतो किंवा तुमचे संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी, हावभाव रेकॉर्ड करण्यासाठी आणि सारांशित करण्यासाठी शर्टच्या खिशात ठेवला जातो. हे तंत्र नेहमी तुमचे संभाषण ऐकते आणि कालांतराने तुमचे व्यक्तिमत्त्व, तुमचा प्राधान्यक्रम, संवाद जाणून घेत काही वर्षांत तुमचे डिजिटल जुळे तयार करते. या तंत्रात आणि चॅटजीपीटीसारख्या जनरेटिव्ह एआय टूल्समध्ये बराच फरक आहे. चॅटजीपीटी सार्वत्रिक डिजिटल माहितीसंग्रहाचे पृथक्करण करते आणि माहिती निर्माण करते. इथे तसे नाही, फक्त आपला डिजिटल ट्विन आपल्याशी संबंधित माहितीचे पृथक्करण करतो आणि गरज पडल्यास आपली जागादेखील घेतो. यामुळे आपल्या मानवी मेंदूच्या क्षमता कमी होतील असे काहीजणांना वाटते. गुगल मॅप वापरून आपण दिशा शोधतो. इच्छित स्थळ शोधतो. पूर्वी आपण स्मरणशक्तीला ताण देऊन विचारत विचारत एखादा पत्ता शोधत असू. एकदा कष्टाने पत्ता शोधला की कायम लक्षात राहत असे. आता हेच तंत्र सर्वत्र हातपाय पसरू लागले आहे. यामुळे भविष्यात माणसाचे आयुष्य नक्कीच सुसह्य होणार आहे. फक्त एक मोठा धोका आहे तो सुरक्षेचा. आपल्याबद्दल सर्व माहिती सायबर गुन्हेगारांनी चोरली तर ते दुरुपयोग करू शकतात. सर्वच तंत्रांना असा धोका असतोच. त्यामुळे जास्त काळजी घेतली पाहिजे हे वास्तव आहे. तंत्रज्ञान चहुदिशांनी विस्तारत असून प्रगतीची नवनवी कवाडे उघड होत आहेत. त्यातून नित्यनेमाने नवे तंत्रज्ञान जुन्या तंत्रज्ञानाची जागा घेत आहे. यातूनच मानवी विकासाला नवी दिशा मिळत आहे. त्याचा सगळ्यात मोठा फायदा उद्योग आणि सेवाजगत घेत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र अशाने भराऱ्या घेत राहणार आहे. त्यात तगण्यासाठी आणि स्वविकास साधण्यासाठी तंत्रज्ञाबरोबरच सामान्यांना आणि युवा पिढीला सतत तयारीत राहावे लागणार आहे.
Paud Panchayat Samiti Election : मुळशी तालुक्यातील ११ गावांमध्ये कोमल वाशिवले यांचा झंझावाती दौरा; रस्ते, पाणी आणि आरोग्याच्या मुद्द्यांवर मतदारांशी थेट संवाद.
नॉस्टॅल्जिया,श्रीनिवास बेलसरे‘नील कमल’ नावाचा केदार शर्मा यांचा एक सिनेमा आला होता १९४७ साली. राज कपूर आणि मधुबाला यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाचे कथानक म्हणजे एक रोमांटिक प्रेमकथा होती.त्यानंतर २१ वर्षांनी दुसरा ‘नील कमल’ आला १९६८ साली. दिग्दर्शक होते राम माहेश्वरी, कथा एकेकाळचे अत्यंत लोकप्रिय कादंबरीकार गुलशन नंदा यांची! त्यांच्या कादंबऱ्या मिळण्याचे खात्रीचे ठिकाण म्हणजे रेल्वेस्टेशनवरचा ए. एच. व्हीलर यांचा स्टॉल! सुंदर रंगीत चित्रमय कव्हर असलेल्या त्यांच्या कादंबऱ्या प्रचंड खपत. अनेकजण गाडीची वाट पाहताना स्टॉलवर जाऊन त्या कादंबऱ्या विकत घेता येत नसतील तरी हाताळून बघत इतकी त्यांची कव्हर्स आकर्षक असायची!‘अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांचे लोकप्रिय दिग्दर्शक असलेल्या फणी मुझुमदार यांनी नील कमल’ची पटकथा लिहिली होती. प्रमुख भूमिकेत वहिदा रेहमान, मनोजकुमार आणि राजकुमार होते. सोबत होते बलराज सहानी, ललिता पवार, मेहमूद आणि शशिकला.सिनेमा चांगला चालला. त्यावर्षीच्या सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सिनेमात त्याचा क्रमांक तिसरा होता. ‘बिनाका गीतमाला’च्या गाण्यांच्या लोकप्रियतेच्या वर्गवारीत ‘नील कमल’च्या एका गाण्याला २३ वा क्रमांक मिळाला होता. याशिवाय नील कमलला ‘सर्वोत्कृष्ट सिनेमा’चा पन्नालाल माहेश्वरी यांना,‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनचा’ राम माहेश्वरींना, सहाय्यक अभिनेता म्हणून राजकुमारला, सहाय्यक अभिनेत्री म्हणून शशिकलाला, विनोदी अभिनेता म्हणून मेहमूदला, सर्वोत्तम गायकाचा महंमद रफीला आणि सर्वोत्तम कथालेखनाचा गुलशन नंदांना अशी तब्बल ७ फिल्मफेयर नामांकने मिळाली होती. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे त्यावर्षीचे फिल्मफेयर पारितोषिक मात्र पटकाविले वहिदा रहमानने!जुन्या अनेक सिनेमाप्रमाणे कथा होती अपुऱ्या राहून गेलेल्या प्रेमिकांच्या पुनर्जन्माची. कॉलेजच्या ट्रीपला गेलेल्या सीताला (वहिदा) झोपेत चालण्याची सवय असते. ती चुकून धावत्या रेल्वेखाली येणार इतक्यात तिला राम (मनोजकुमार) वाचवतो. त्यामुळे सीताचे वडील आपल्या मुलीचा जीव वाचवणाऱ्याशी तिचे लग्न लावून देतात. दोघांचे एकमेकावर निस्सीम प्रेम असते.परंतु प्रत्यक्षात सीताचा हा जन्म म्हणजे एक पुनर्जन्म असतो आणि ती मागच्या जन्मी राजकन्या ‘नील कमल’ असते. मागच्या जन्मी ‘चित्रसेन’ (राजकुमार) नावाच्या मूर्तीकाराचे तिच्यावर जीवापाड प्रेम असते. तिची हुबेहूब मूर्ती बनवल्याबद्दल खूश होऊन राजा जेंव्हा ‘तुला काय बक्षीस देऊ?’ असे त्याला विचारतो तेंव्हा तो राजकन्येशी लग्नाची इच्छा व्यक्त करतो. त्या विचित्र मागणीने संतापून जाऊन राजाने त्याला भिंतीत जिवंत चिणण्याची शिक्षा दिलेली असते.सीताच्या झोपेत चालण्याच्या सवयीचा संबंध या पूर्वजन्मातील नात्याशी असतो. रोज रात्री तिला एक गाणे ऐकू येते कारण भिंतीत चिणलेला चित्रसेनचा आत्माच तिला एका ‘हॉण्टिंग गाण्याच्या’ माध्यमातून जिथे त्याला चिणले गेले तिथे बोलावत असतो. एक दिवस नकळत सीता तिकडे ओढली जाते आणि चित्रसेनाच्या आत्माशी संवाद होऊन तिला मागच्या जन्मीची सगळी शोकांतिका समजते. तिला त्या प्रेमाची आठवण होऊन ती त्याला म्हणते मीही माझा जीव द्यायला तयार आहे म्हणजे आपण पुन्हा एकत्र येऊ शकू. मात्र फक्त तिच्यापासून राजाने लपवलेले सत्य तिला कळावे आणि तिच्या प्रेमाची पावती मिळावी एवढीच त्याची अपेक्षा असते. चित्रसेनाचा त्याच जन्मात अडकलेला आत्मा प्रेमासाठी त्यागाची भूमिका घेऊन मुक्त होतो. त्यावेळी मनोजकुमार तिथे पोहोचतो आणि सीताचा आत्मा या जन्मात येऊन दोघांची परस्पर प्रेमाची स्मृती जागृत होऊन कथेचे रूपांतर सुखांतिकेत होते.नील कमलमधील बिनाका गीतमालात लोकप्रियतेचा २३ वा क्रमांक मिळवणारे गाणे तसे मुलीच्या पाठवणीच्या वेळी प्रत्येकच भारतीय पित्याच्या मनात होणाऱ्या या घालमेलीचा सुंदर अविष्कार होते. बलराज सहानी वहिदाला सासरी पाठवताना या गाण्यातून आपल्या भावना व्यक्त करतात असा सीन होता. साहीरजींचे ते वत्सल शब्द होते -‘बाबुलकी दुआएँ लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले.मैकेकी कभी न याद आए, ससुरालमें इतना प्यार मिले.’प्रत्येक पित्याला वाटत असते की, मुलीला सासरी सर्व सुखे मिळावीत. तिने पतीबरोबर, त्यांच्या कुटुंबांबरोबर इतके सुखी व्हावे की तिला माहेरची आठवणही येऊ नये; परंतु मुलीच्या निरोपाच्या वेळी पित्याला तिच्या लहानपणाच्या आठवणी घेरून टाकतात. आपली कन्या तान्हे बाळ असताना आपण तिची काळजी घेतली, कसे तिला हळुवारपणे हातातच झुलवले, एखाद्या नाजूक फुलासारखे सांभाळले ती दृश्ये आईसारखीच बापाच्या डोळ्यांसमोरही तरळलात. त्याचेही डोळे पाणावतात पण तो आईसारखे मोकळेपणे रडू शकत नसतो. तशा मन:स्थितीतही आई-वडील स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून ‘तुझा संसार सतत फुलत राहो’ असाच आशीर्वाद मुलीला देतात -‘नाज़ोंसे तुझे पाला मैंने, कलियोंकी तरह फूलोंकी तरह,बचपनमें झुलाया है तुझको, बाँहोंने मेरी झुलोंकी तरह,मेरे बागकी ऐ नाजुक डाली, तुझे हरपल नई बहार मिले.’पित्याला वाटते आपल्या मुलीचे स्थान तिच्या घरात महत्त्वाचे राहावे. तिच्या सासरी तिचेच राज्य चालावे. बिचाऱ्यांना भविष्यात काय होणार ते माहीत नसल्याने दोघे जणू देवाकडे प्रार्थनाच करत असतात की ‘देवा, तिच्या चेहऱ्यावर सतत स्मित हास्य झळकत राहू दे, तिच्यावर सर्व सुखांचा वर्षाव होत राहो. तिचे रूप तिच्या पतीला कायम प्रेमाने बांधून ठेवेल इतके सुंदर राहु दे.’‘जिस घरसे बंधे हैं भाग तेरे, उस घरमें सदा तेरा राज रहे,होठोंपे हँसीकी धूप खिले, माथेपे खुशीका ताज रहे.कभी जिसकी ज्योत न हो फीकी, तुझे ऐसा रूप-सिंगार मिले.’पिताचे मन प्रार्थना करत राहते ‘माझ्या मुलीला नेहमी सुखमय जीवन लाभो, तिला कोणत्याही संकटाचा सामना करावा लागू नये. जीवनपथावर तिला कधी एखादा काटाही न टोचो. केवळ तिच्याच नाही तर तिच्या सर्वच नात्यांना सुख लाभो, सर्व दु:खे त्यांच्यापासून दूर राहोत.’‘बीतें तेरे जीवनकी घड़ियां आरामकी ठंडी छाँवमें,काँटा भी न चुभने पाए कभी, मेरी लाडली तेरे पाँवमें,उस द्वारसे भी दुख दूर रहे, जिस द्वारसे तेरा द्वार मिले.’खरे तर साहीरसाहेबांनी या गाण्यात ज्या सुंदर, वत्सल भावनांचे चित्रण केले तो काळ ५७ वर्षांपूर्वीचा! आता चित्र बदलले आहे. फक्त सुख साजरे करण्याच्या अतिरेकी सोसाशिवाय सर्वच मानवी भावना सुकून चालल्या आहेत. लग्नातच काय, स्मशानातही लोक ‘नॉर्मल’ असतात, रडतबिडत नाहीत. त्यामुळे रसरशीत मनस्वीपण अनुभवायचे असेल, तर अशा जुन्या गाण्यांना पर्याय नाही हेच खरे!
संवाद ,निशा वर्तकजूबाजूला माणसांची गर्दी आहे. घरात तर आजूबाजूला अनेक चेहरे आहेत पण मोबाईलमध्येच व्यस्त आहेत. मोबाईलवर सतत संदेश येतात, सोशल मीडियावर “कनेक्टेड” असल्याचा भास आहे. तरीही अनेक जण रात्री उशीवर डोकं टेकवताना एकच प्रश्न स्वतःलाच विचारतात-“माझं खरंच कुणी आहे का?”हा प्रश्नच सांगून जातो की, आजचा सर्वात मोठा आजार कोणता आहे. गर्दीतही जाणवणारा एकटेपणा.खरं तर माणूस जन्माला येतो तो एकटाच येतो आणि जातो तेव्हाही एकटाच जातो, पण जगण्यासाठी त्याला आपलं कुणीतरी सोबत हवेच असतं! मला तर वाटतं ही तर प्रत्येक जीवाची गरज असते. बघा ना दोन चिमण्या किती आनंदी दिसतात, दोन कुठलेही पक्षी, दोन मांजरीची पिल्ले, दोन कुत्र्यांची पिल्ले किती छान खेळत असतात! पण एकटा पक्षी किंवा एकटा प्राणीही उदासवाणाच दिसतो. माणसांचेही तसेच आहे. माणूस हा तर समाजशील प्राणी आहे.पण हा एकटेपणा आवाज करत नाही. तो हळूच मनात घर करतो आणि जेव्हा लक्षात येतं, तेव्हा आतून माणूस मोडलेला असतो, मिटून जातो.घर सांभाळताना, संसार उभारताना स्त्री स्वतःला मागे ठेवते. मुलं लहान असताना ती गरजेची असते; पण मुलं मोठी झाली की तिची उपस्थिती गृहित धरली जाते. मुलं आपापल्या आयुष्यात गुंततात, नातवंडांची जबाबदारी किंवा “तुझं काम संपलं” अशी अपेक्षा तिच्यावर येते. नवरा अनेकदा तिच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो. “तुला काय काम आहे?”, “उगाच विचार करू नकोस” ही वाक्यं तिच्या वाट्याला येतात.या टप्प्यावर ती स्त्री गर्दीत असूनही एकटी होते. तिचं दुःख कुणाला सांगता येत नाही, सांगितलं तरी गांभीर्याने घेतलं जात नाही. हळूहळू तिचं बोलणं कमी होतं, हसू मावळतं. नैराश्य, रक्तदाब, थायरॉईड, झोपेच्या तक्रारी हे सगळं केवळ शारीरिक आजार नसतात, तर भावनिक एकटेपणाची लक्षणं असतात.एकटेपणा म्हणजे फक्त मोठ्यांचा प्रश्न नाही. आज अनेक घरांत लहान मुलंदेखील एकटी आहेत. आई-वडील दोघंही नोकरीत, वेळेची कमतरता. मुलाच्या हातात मोबाईल, टीव्ही, गेम्स देऊन “तो अडत नाही” यावर समाधान मानलं जातं. पण या मुलाच्या मनात साठत असलेले प्रश्न कुणी ऐकत नाही. त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात, पण ते अनुत्तरीतच राहतात कारण प्रश्नांची उत्तरे द्यायला कुणाला वेळच नसतो.शाळेत होणारा दबाव, मित्रांकडून होणारी चेष्टा, अभ्यासाची भीती, शरीरातील बदल हे सगळं त्याच्या मनात चालू असतं. पण घरात कुणाशी मोकळं बोलायचं? या एकटेपणातून काही मुलं आतल्या आत खचतात, काही आक्रमक होतात, तर काही व्यसनांच्या दिशेने वळतात. आत्महत्यांचे वाढते प्रमाण हे या न ऐकलेल्या एकटेपणाचं भीषण रूप आहे.प्रेमभंग, घटस्फोट आणि जोडीदार गमावल्यावरचा एकटेपणा तर भयंकर असतो.ज्याच्यासोबत आयुष्य घालवायचं ठरवलं, तोच माणूस अचानक निघून जातो. प्रेमभंगामुळे, घटस्फोटामुळे किंवा मृत्यूमुळे. मग घरात माणसं असली तरी रिकामेपणा भरून न निघणारा असतो. सकाळी उठल्यावर कुणाशी बोलायचं नाही, रात्री कुणासाठी वाट पाहायची नाही ही शांतता खूप बोचरी असते.वृद्ध माणसांबद्दल बोलायचे तर ती खरोखर बिचारी झालीत आताच्या जगात. कुणीच बोलायला किंवा त्यांची नुसती चौकशी करायलाही कुणाला वेळ नसतो. आता नाईलाजाने आजी-आजोबांचा सुद्धा मोबाईल हाच दोस्त झालेला दिसतो. त्यांनाही संवादाची भूक असते आणि म्हातारपणी तर ती अधिक असते पण ती भूक भागवायला ना नातवंड असतात ना मुले ना सुना!माणसाला संवादाबरोबर स्पर्शाची भूक सुद्धा असते. प्रेमाच्या, लाडाच्या स्पर्शासाठीही माणूस आसुसलेला असतो. एक अनुभव सांगते... मला एकदा माझ्या एकट्याच राहणाऱ्या मैत्रिणीकडे एक रात्र राहण्याचा योग आला होता. तिचा नवरा जाऊन चार-पाच वर्षे झाली होती. तिची मुले दुसरीकडे राहत होती, सर्व ठीक होते आर्थिक परिस्थितीही चांगली होती. वयाची पासष्टी ओलांडली होती, पण एकटीच राहत होती. आता तिला सवय झाली होती एकटी राहण्याची. पण त्या दिवशी रात्री मी गप्पा मारता मारता तिच्या शेजारीच झोपले आणि रात्री झोपेत मी माझा हात तिच्या अंगावर टाकला आणि तिला जवळ घेतले! तिने माझा हात तसाच घट्ट धरला आणि मला जाग आली तर ती घळघळा रडू लागली आणि म्हणाली ‘किती दिवसांनी मला हा प्रेमळ मानवी स्पर्श मिळाला गं! किती वर्षात मला कुणी प्रेमाने जवळ घेतले नाही.’ बघा किती एकटं वाटत होते तिला, प्रेमाच्या स्पर्शाची भूक होती तिला. रोज एकटेपणात जगत होती ती, सवय करून घेतली होती तिने एकटेपणाची.सुरकुतलेल्या चेहऱ्याची आजीही नातवंडांच्या स्पर्शासाठी भुकेली असते. कधी आजीला जवळ घेऊन तिचे सुरकुतलेले गाल थोडे लाडात ओढून तिला जर म्हंटल ‘आजी तू किती गोड आहेस!’ तर बघा तिचा चेहरा कसा फुलेल.अनेक जण स्वतःलाच दोष देत राहतात “माझ्यातच काहीतरी कमी होतं”. समाजाची कुजबुज, नातलगांचे सल्ले, सहानुभूतीच्या नावाखाली टोमणे हे सगळं एकटेपणा अधिक तीव्र करतं. काही जण आयुष्याला कंटाळतात, तर काही जिवंत असूनही आतून मेलेले असतात.एकटेपणा हा फक्त भावना नाही, तो आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे. दीर्घकाळ एकटे राहिल्यामुळे नैराश्य, चिंता, स्मरणशक्ती कमी होणे, चिडचिड, आत्महत्येचे विचार निर्माण होतात. संशोधन सांगतं की दीर्घकालीन एकटेपणा हा धूम्रपानाइतकाच आरोग्यास घातक आहे. पण तरीही आपण याकडे दुर्लक्ष करतो.सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन मोकळं करणं. कुणीतरी आपलं ऐकून घेणं आणि आपण कुणाचं ऐकून घेणं ही देवाण-घेवाण गरजेची आहे. स्त्रियांनी स्वतःच्या भावना दाबून न ठेवता व्यक्त करणं, स्वतःसाठी वेळ काढणं, आवडी जोपासणं महत्त्वाचं आहे.पालकांनी मुलांसाठी वेळ काढणं नाही, तर देणं गरजेचं आहे. दररोज थोडा वेळ तरी मोबाईल बाजूला ठेवून मुलांशी संवाद साधणं, त्यांना न ऐकता समजून घेणं आवश्यक आहे.प्रेमभंग किंवा जोडीदार गमावल्यावर समुपदेशन घेणं, आधारगटांमध्ये सहभागी होणं, सामाजिक कामात स्वतःला गुंतवणं हे एकटेपणावर औषध ठरू शकतं. ध्यान, व्यायाम, लेखन, वाचन, संगीत या गोष्टी मनाला आधार देतात.गर्दी वाढते आहे, पण माणुसकी कमी होते आहे. अशा काळात एखाद्याला “तू कसा आहेस?” असा मनापासून विचारलेला प्रश्नही औषध ठरू शकतो. कारण एकटेपणा अनेकदा माणसाला मारत नाही, पण हळूहळू जगण्याची इच्छा संपवतो. एकमेकांना ऐकू या, समजून घेऊ या. कारण गर्दीतही एकटं असणं ही आजची सर्वात मोठी वेदना आहे.
ZP Election Pune : केसनंद-वाडेबोल्हाई परिसरात राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार; विकासाचा 'रथ' पुढे नेण्यासाठी सुरेखा हरगुडे यांचे आवाहन.
Shirur Crime : जातेगाव बुद्रुक साखर कारखान्यासमोरील घटना; पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून मालकाचा ट्रॅक्टर पळवला.
टीनेज मुलांशी वागण्याच्या प्रभावी स्ट्रॅटेजी
आनंदी पालकत्व,डाॅ. स्वाती गानूआपली आजकालची Gen Z अर्थात entitled teen म्हणजेच ज्यांना असं वाटतं की आम्ही सगळ्यात श्रेष्ठ आहोत आणि आमच्या इच्छा आणि गरजा यांना सगळ्यात आधी प्राधान्य द्यायला हवं. इतरांच्या प्रयत्नांची, कष्टांची त्यांना जाणीव नसते. ते समजतात इतर लोक जणू आपली सेवा करण्यासाठीच आहेत. बाहेर ते अतिशय जबाबदारीने आणि छान वागतात, पण घरात मात्र परिस्थितीचा फायदा घेण्यात ते हुशार आणि तरबेज असतात. हा आपला हक्कच आहे असं वाटून घेण्याची मानसिकता या मुलांची असेल, तर त्या मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. मुलांना निराशा, एकटेपण जाणवते. त्यातूनच मग खोलीत स्वतःला जणू कोंडून घेणं सुरू होतं. कारण आपल्या गरजा कशा पूर्ण कराव्यात हे त्यांना कळत नाही आणि इतरांच्या अपेक्षा मुलं पूर्ण करू शकत नाही. यातूनच इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न मुलं करू लागतात, कारण मनातून ते जणू रिकामे झालेले असतात. पालकांनो याचाच अर्थ असा आहे की, आपण आपल्या मुलांबाबत ओव्हर पॅरेंटिंग करतोय आणि या जगातील आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांना पूर्णपणे तयार करत नाही आहोत.मुलं जेव्हा हा आमचा हक्कच आहे असं समजतात तेव्हा हा माईंडसेट धोकादायक ठरू शकतो. अशा माईंडसेटचे टीनेजर्स तयार करायचे नसतील तर या गोष्टी लक्षात ठेवू या१) मुलांना स्वतः कमाई करण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यांना वस्तूची किंमत कळायला हवी असे जर तुम्हाला वाटत असेल, तर एखादा आठवडा मुलांना घराची छोटीशी का होईना आर्थिक जबाबदारी सोपवू शकता. मुलांना पुढील महिन्यात घेऊ इच्छिणाऱ्या आवडत्या वस्तूच्या खरेदीसाठी किमान २५% रकमेची बचत करायला सांगू शकता. आपण मुलांना वारेमाप खेळणी, गॅजेट्स, वस्तू घेऊन देत असू, तर मग हळूहळू त्यांना हा आपला हक्कच आहे असे वाटू शकते. यासाठीच मुलं टीनेजमधील असल्याने सुट्ट्यांमध्ये माफक प्रमाणात काम व कमाई करू देत म्हणजे कामाचे कष्ट आणि पैशाची कमाई याचे महत्त्व मुलांना कळेल.२) मुलांना अपयशी होऊ द्या.खूप पालकांना हे वाक्य ऐकायला आणि पचवायला जड जाईल. पण या जगात कसं जगलं पाहिजे, नाही तर कोणते परिणाम होऊ शकतात, या गोष्टींची जाणीव मुलांना व्हायलाच हवी. याशिवाय परिस्थितीशी जुळवून कसे घ्यायचे याचं भान त्यांना येणार नाही. जेव्हा तुम्हाला हे दिसू लागेल की ते परिस्थितीशी झटापट करत आहेत तेव्हा जरूर तुम्ही त्यात उडी घ्या, त्यांना मदत करा. उदाहरणार्थ अभ्यासातील ग्रेड्स मिळवण्यासाठीच्या अडचणी किंवा वागण्याचे प्रश्न याबाबत तुम्ही त्यांना मदत करू शकता. पण अपयश आले तर काय परिणाम होतात तेही त्यांना कळूच दे. कारण सतत मदत करण्याने आपण त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी अडथळे तयार करत असतो हे लक्षात ठेवा.अपयश हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मुलांना तयार करणारा एक असा मार्ग आहे जो त्यांच्या कृतीच्या, वागण्याच्या परिणामांची जाणीव मुलांना देतो. म्हणून अपयशाकडे सकारात्मक पद्धतीने बघा. आपण प्रयत्न केले नाहीत, योग्य तो सराव केला नाही तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे कळले की मग मुलं योग्य त्या पद्धतीने रोज अभ्यास करू लागतील. अपेक्षित वागणं का आवश्यक आहे हे त्यांना लक्षात येईल.वही विसरणं, प्रोजेक्ट अपूर्ण ठेवणं, पुरेसा अभ्यास न केल्याने टेस्टमध्ये नापास होणे यातून हे परिणाम त्यांच्या लक्षात येतील आणि त्यांना कळेल की, आपण जबाबदारी नीट पार पाडली नाही, तर दुसऱ्यावर ब्लेम करून उपयोग नाही. यामुळे आपण फेल्युअर ठरणार आहोत. मुलं अपयशी व्हावीत किंवा झाली, तर यासाठी तुम्ही जबाबदार नाही पालकांनो. तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांना प्रॉब्लेम सोडवायला मदत करायला उपलब्ध नसणार आहात. तुम्ही फक्त फॅसिलिटेटर अर्थात त्यांना प्रेरणा देऊ शकता. अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकता. अपयश आले की मुले अंतर्मुख होऊन विचार करू लागतील आणि त्यामुळे मुलं स्वतःमधील गुणवैशिष्ट्ये, ताकद आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता शोधू आणि वापरू शकतील.३) घरातील जबाबदाऱ्या आणि मुलांची सेल्फ सफिशियन्सी मुलांवर सोपवायला हवी. यासाठी मुलांना उत्तेजन द्यायला हवं. या वयातील मुलं स्वतःहून मोटिवेट होत नाहीत. कधी कधी तर ती आपल्याला चक्क आळशी वाटतात. काही वर्षांनंतर तुमची ही पाखरे आपल्या घरट्यातून दूर उडून जाणार आहेत. तत्पूर्वीच आपण त्यांना स्वतंत्र जगात जगण्याची कौशल्ये शिकवणं आवश्यक आहे. मगच ते पुढे आत्मविश्वासाने जाऊ शकतील. स्वतःची काळजी घेऊ शकतील. आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीबाबत आपण अकाउंटेबल आहोत याची जाणीव त्यांना द्या. एवढंच नव्हे तर या गोष्टींची जबाबदारी न घेतल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव द्या. एका विशिष्ट वयानंतर किंबहुना वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांना कामं सोपायलाच हवीत. मुलं आळशीपणा करतात, कामचुकारपणाने वागतात म्हणून त्यांच्या मागेही लागावं लागतं. पण किती दिवस आपण मुलांचे काम करणार आहोत. सगळं आयतं हातात देणं, रूम सर्विस देणं ताबडतोब बंद करा. तुमच्या मुलांकडून असणाऱ्या अपेक्षा स्पष्टपणे त्यांना सांगा. होमवर्क आणि इतर कामांचा बहाणा करून ते कामे टाळतात. पुढे ढकलतात पण तुम्ही ठाम राहा. काम पूर्ण न झाल्यास मुलांना दिल्या जाणाऱ्या सुख-सुविधांमध्ये कपात करा. याचा अर्थ सारख्या सूचना द्या, मागे लागा असा नाही पण एकदा स्पष्ट शब्दात सूचना द्या.४) मुलांसाठी बाउंड्रीज आखा.मुलांच्या चुकीच्या वागण्याला प्रतिबंध करण्यासाठी नियम तयार करून पाळायला लावणे, बाउंड्री चाकण जबाबदाऱ्या टाकणं हे यासाठी अँटी डॉट्स आहेत. मुलांना जसा आपला मालकी हक्क समजतो, तर तशी जबाबदारीही त्यांनी घ्यायला हवी. टीनेजर मुलांना त्यांचं सोशल मीडियावर अकाउंट नसेल तर जणू आयुष्य संपून गेल्यासारखं वाटतं. किंवा एखाद्या कॉन्सर्टला जाता आलं नाही, रात्री उशीरापर्यंत थांबता आलं नाही, फॅशनेबल कपडे घालता आले नाहीत की आयुष्यात काही आनंद नाही असं त्यांना वाटतं. या गोष्टींसाठी त्यांना परवानगी मिळावी म्हणून ते मागे लागतील. स्वतःची बाजू मांडतील आणि या गोष्टींचा उपयोग होत नाही हे लक्षात आलं, की मग तुम्हाला मुद्दामच टाकून बोलतील. इमोशनल ब्लॅकमेल करतील.खरं म्हणजे तुम्ही पालक म्हणून आतापर्यंत मुलांना चांगले संस्कार दिलेले असतात. पण या वयात मात्र मुलांना या जगात टिकण्यासाठी तयार करणे हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. पालकांनी त्यामुळे अशावेळी जेव्हा मुलं तुमच्याकडे हट्ट करतात तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करतात तेव्हा ग्रेसफुली तरीही प्रेमाने मुलांसाठी मर्यादा हव्यात. एकदा नाही म्हणालात, तर त्यावर ठाम राहा. आपलं मत बदलू नका. मुलांबरोबर संघर्ष टळावा म्हणून नाहीला थोड्या वेळाने हो म्हणू नका.५) मुलांमध्ये कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना निर्माण करा.टीनेजर वयातील मुलं बहुधा छोट्या-छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करत नाहीत. या गोष्टी त्यांना फार महत्त्वाच्या वाटत नाहीत. बाकीचे लोक जणू त्यांच्यासाठी काम करायलाच आहेत असं त्यांना वाटतं. मात्र त्यांना स्वतःला ताबडतोब ग्रॅटिफिकेशन हवे असते, म्हणूनच मुलांना कृतज्ञता व्यक्त करायला त्यांच्या मनात तसा एटीट्यूड तयार करायला हवा. जगात किती माणसे दुःख, वेदना सहन करून आपल्या आयुष्यात संघर्ष करत असतात याची जाणीव त्यांना द्यायलाच हवी. यासाठी अशा डॉक्युमेंटरी, पुस्तकं मुलांना बघायला आणि वाचायला प्रवृत्त करा. आपण समाजाचं काही देणं लागतो हे त्यांच्याशी तुम्ही बोलताना जरूर मांडा. तुमच्या स्वतःच्या वागण्यातून मुलांसमोर आदर्श ठेवा. तुमची पहिली नोकरी तुमचा पगार तुम्ही केलेला संघर्ष याबद्दल बोला. संध्याकाळी किंवा रात्री जेवणानंतर त्यांना फिरायला घेऊन जा. चालता चालता त्यांच्याशी या गप्पा जरूर मारा. म्हणूनच पालकांनो हे सारं मला मिळालंच पाहिजे, हे माझ्या मालकीचे आहे असा भाव मनात पोसणारी मुलं आपल्याला मोठी करायची नाहीत, तर एक असा माणूस याच्यावर तुम्ही प्रेम कराल, तो तुम्हाला आवडेल, त्याचा आदर कराल असं मूल तुम्हाला घडवायचं आहे. अजूनही उशीर झाला नाही. प्रेम द्या, पण थोडं कणखरपणेच. विश्वास ठेवा पालकांनो, आज हे सारं मुलांना आवडलं नाही तरी ते जेव्हा मोठे होतील, तेव्हा तुम्ही त्यांना ज्या पद्धतीने मोठं केलं त्याबद्दल ते तुम्हाला नक्कीच एप्रिशिएट करतील.
Shirur Crime : युरिया खरेदीच्या बहाण्याने ७ लाखांची फसवणूक; गुजरातच्या भामट्याने घातला गंडा
Shirur Crime : खत कंपनीचे बनावट फोटो आणि कागदपत्रे दाखवून आर्थिक गंडा; गाडी भाड्याच्या नावाखालीही उकळले हजारो रुपये.
Shikrapur Crime : कोरेगाव भीमा बस प्रवासात दोन महिला चोरट्यांची हातसफाई; वृद्ध महिलेचे एक तोळ्याचे सोन्याचे दागिने पिशवीतून लांबवले.
Ajit Pawar : खोपोलीकरांचे डोळे पाणावले! लाडक्या ‘अजितदादांना’सर्वपक्षीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे खोपोलीत सर्वपक्षीय शोकसभा; नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या पुढाकाराने दादांच्या आठवणींना उजाळा.
Ajit Pawar : “वडिलांनंतर तेच माझे आधार होते..”अजितदादांच्या आठवणीने आमदार सुनील शेळके भरसभेत गहिवरले
Ajit Pawar : माजी मंत्री मदन बाफनांसह दिग्गजांची उपस्थिती; अजितदादांच्या निधनानंतर मावळ राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या प्रचाराबाबत नवीन नियमावली जाहीर.
BRT Route : रावेत ते भोसरीपर्यंत बीआरटी नियमांची सर्रास पायमल्ली; खासगी वाहनांच्या घुसखोरीमुळे बसचालकांना आपत्कालीन ब्रेक लावण्याची वेळ.
PCMC BJP Group Leader : राष्ट्रवादीतून आलेल्या प्रशांत शितोळेंकडे भाजपच्या गटनेतेपदाची धुरा; जुन्या जाणत्या नगरसेवकांच्या नाराजीमुळे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंच्या भूमिकेकडे लक्ष.
Dehu News : श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात अखंड हरीनाम सप्ताह; केशव महाराज नामदास यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध.
PCPC Police : पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठे फेरबदल! १० पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या
PCPC Police : प्रशासकीय कामाला गती देण्यासाठी पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय; १० पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी.
Satara ZP Election : जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा लागणार? नामदार जयकुमार गोरेंचा मोठा दावा
Satara ZP Election : कराड ते फलटणपर्यंत भाजपची मुसंडी; दिग्गज नेत्यांच्या एकजुटीमुळे जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांसमोर कडवे आव्हान.
साप्ताहिक राशिभविष्य, १ ते ७ फेब्रुवारी २०२६
साप्ताहिक राशिभविष्य, १ ते ७ फेब्रुवारी २०२६भौतिक लाभात वाढ होईलमेष : प्रगतीत वाढ होण्यासाठी प्रयत्नशील राहाल; परंतु जास्त कष्टाची आवश्यकता भासेल. निरनिराळ्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्याशी संबंध सुधारतील. मित्र-मंडळींंच्या वर्तुळात प्रिय व्हाल. हितशत्रू व गुप्त शत्रूंचा पराभव करणे शक्य होईल. जवळच्या लोकांचे सहकार्य प्राप्त होईल. कुटुंबातील व्यक्तींच्या संबंधांकडे लक्ष देण्याची गरज राहील. आपल्या वर्तनाने किंवा बोलण्याने इतर व्यक्ती दुखावणार नाहीत अथवा दुरावणार नाहीत याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. जवळचे तसेच लांबचे प्रवास यशस्वी होतील. प्रगती व उन्नतीवर जास्त जोर वाढेल. भौतिक लाभात वाढ होईल. प्रलंबित राहिलेली एखादी इच्छा पूर्ण होईल. अडलेले प्रश्न मार्गस्थ होतील. कुटुंबातील तरुण-तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न सुटतील. नोकरी मिळेल. नवीन संधींचा लाभ करून घेता येईल. धनलाभाचे योगवृषभ : दीर्घकालीन रखडलेली अथवा प्रलंबित असलेली कामे मार्गी लागून पूर्णत्वाकडे प्रवास कराल. विशेषतः जमीन-जुमला, स्थावर मिळकत, वडिलोपार्जित संपत्ती या विषयी असलेले प्रश्न मार्गी लागतील. धनलाभाचे योग. राहत्या घराविषयीचा प्रश्न सुटेल. बरेच दिवस उराशी बाळगलेले स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल मात्र त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. तरुण-तरुणी आपल्या कारकिर्दीस एक वेगळे रूप देऊ शकतील. नवीन संधींचा लाभ मिळेल, त्या संधीचे सोने करणे आपल्याच हातात आहे, हे लक्षात ठेवा. खेळाडू व कलाकार यांना नवीन नवीन लाभ मिळेल. त्याचप्रमाणे उत्पन्नात वाढ होईल. प्रसिद्धी मिळेल. नवीन व्यावसायिक अनुबंध जुळतीलमिथुन : नवीन निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होऊन आपण धाडसी निर्णय घ्याल. पुढील भविष्यात ते फायदेशीर ठरतील. व्यवसायात किंवा घरगुती कामात सुद्धा प्रसारमाध्यमांचा चांगला उपयोग होईल. व्यवसायिक नव्या ओळखीतून फायदा संभवतो. व्यवसायात प्रगती करण्याच्या संधी मिळतील. कामानिमित्त जवळचे तसेच लांबचे प्रवास घडतील. कुटुंबातील मुलींकडून चांगल्या बातम्या येतील. मित्रमंडळीत व कुटुंबात आपला वेळ आनंदात व्यतीत होईल. उत्पन्न वाढेल. सामाजिक कार्यात रस घ्यावासा वाटेल. धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. राहते घर शोभिवंत करण्यासाठी व घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता खर्च कराल. अनपेक्षित फायदेकर्क : नोकरी, व्यवसाय, धंदा यांमधून काहीवेळेस अनपेक्षित फायदे मिळाल्यामुळे आश्चर्यचकित होण्याची वेळ येईल. आपल्या कार्यक्षेत्राची कक्षा रुंदावेल. समाजातील प्रतिष्ठित अथवा मोठ्या व्यक्तींचे आपल्याला सहकार्य लाभून त्यांच्या सहवासात राहता येईल. मार्गदर्शन मिळेल. व्यावसायिक प्रगती होईल. समाजातील आपल्या प्रतिमेबाबत जागृत राहाल. त्याचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न कराल. त्यासाठी वेळ, पैसा खर्च करण्याची प्रवृत्ती बळावेल. मानसिक स्तर उंचावलेला असल्यामुळे आपण उत्साही आणि आनंदी राहाल. कार्यमग्न राहून व्यवसाय तसेच कौटुंबिक विषयात व्यग्र राहाल.भविष्यातील योजना तयार होतीलसिंह : आपली बरीचशी कामे मार्गस्थ होतील. मागील काही दिवसांत ताणतणाव जो निर्माण झाला होता तो आता निवळेल, तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षेतून चांगले यश मिळेल. नोकरीसाठी अथवा अन्य कारणांसाठी दिलेल्या मुलाखती यशस्वी ठरून कामे होतील. बरेच दिवस रेंगाळलेली कामे मार्गी लावू शकाल. रोजच्या नेहमीच्या कामात बदल होतील. व्यवसायिक गाठीभेटी होतील. त्यातूनच व्यवसायासंबंधी भविष्यातील योजना तयार होतील. त्यामध्ये व्यस्त राहाल. प्रेमप्रकरणात जरा जपून पावले उचला. नवीन मित्र-मैत्रिणी जोडण्याची इच्छा होईल. कुटुंबातील मुलांचे प्रश्न संपुष्टात येतील आपल्या कार्यात काही अडथळे येणार असल्याचे जाणवेल. भाग्यसंकेत मिळतीलकन्या : कामात सुसहाय्यता येणार आहे. सकारात्मकतेमध्ये वृद्धी होऊन अनुकूल परिणाम मिळतील. त्याचा आपल्याला रोजच्या जीवनात अनुभव येईल. लहान-मोठी कामे विनासायास पार पडतील. आपले बुद्धिचातुर्य व आत्मविश्वास, अंदाज यामध्ये द्वंद राहील. शांततेने मार्ग निघतील. आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील, त्यामुळे भाग्याचे संकेतच मिळतील. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. पती अथवा पत्नीचा भाग्योदय होऊन उत्कर्ष होईल. नेहमीच्या उत्पन्नाच्या मार्गाव्यतिरिक्त इतर मार्गांनी सुद्धा आपले उत्पन्न वाढू शकते. व्यवसाय धंद्यात उत्कर्ष अथवा प्रगती करु शकाल. वादग्रस्त असलेले प्रश्न सुटतीलतूळ : प्रिय व्यक्तीची चिंता संपुष्टात येईल. कोर्टविषयक समस्या संपतील. दीर्घकालीन रखडलेले अथवा वादग्रस्त असलेले प्रश्न सुटतील. कुटुंब परिवारात शुभवार्ता मिळतील. तरुण-तरुणींच्या समस्या संपुष्टात येतील. नोकरीविषयक कामे होतील. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सदरचा कालावधी अनुकूल आहे; परंतु अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केल्यास अपेक्षित यश सहज मिळवता येईल. भौतिक लाभात वाढ होईल. भागीदारीच्या व्यवसायात विशेष फायदा संभवतो. मान्यवरांच्या गाठीभेटी सफल होऊन कामे मार्गी लागतील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावृश्चिक : व्यवसाय-धंद्यामधील उधारी वसूल होईल, जुनी येणी येतील; परंतु ही वसुली होताना शांतपणे संवाद साधण्याची गरज आहे. व्यवसाय-धंद्यामध्ये कामगारांचे प्रश्न अचानक समोर येऊ शकतात. त्यांच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तसेच यंत्रसामग्रीच्या देखभालीच्या खर्चावर जास्तीचा खर्च करावा लागेल. सरकारी स्वरूपाचे काम मार्गी लागू शकेल. त्यामध्ये आपल्याला इतरांची मदत मिळू शकते; परंतु कोणत्याही कामात जास्त जोखीम घेणे टाळलेले बरे. व्यवसायातील आर्थिक गरज पूर्ण होऊ शकत ते कर्ज प्रकरणे मान्य होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी कुसंगतीपासून अलिप्त राहावे, नवीन उत्साह-उमेद वाढेलधनु : दीर्घकालीन रखडलेली जमीन-जुमला, स्थावर मिळकत याबाबतची कामे गतिमान होऊन मार्गी लागतील. एखादे महत्त्वाचे काम होईल. कोर्टकचेरीतील कामे आपल्या मनाप्रमाणे झाल्यामुळे आपल्याला समाधान व आनंद होईल. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न अथवा समस्या संपुष्टात येतील. नोकरीविषयक कामे होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखतीतून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते.कलाकार, खेळाडू यांना नवीन नवीन संधी मिळतील. आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी चालून येतील; परंतु या संधीचे सोने करणे आपल्याच हातात आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. संयम बाळगा.शुभ घटनांचे पर्वमकर : आपल्या जीवनात काही सकारात्मक बदल झाल्यामुळे आपला दिनक्रम सुद्धा बदलेल. काही सुखद घटना घडतील. त्यामुळे आपले जीवन बदलून जाईल. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून नफ्याच्या प्रमाणात वाढ झालेली अनुभवता येईल. व्यवसाय विस्ताराच्या योजना करू शकाल. पूर्वी केलेले नियोजन सफल होईल. इतरांच्या मागण्यांना प्राधान्य दिले ते आपल्या हिताचे ठरू शकते. विशेषतः भागीदारीच्या व्यवसायांमध्ये भागीदाराच्या म्हणण्याला अथवा मताला उचित प्राधान्य द्या, ते व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक ठरेल. नोकरीमध्ये अपेक्षित घटना घडून पदोन्नती, वेतन वृद्धीसारख्या घटना घडतील. सामाजिक मानसन्मानाचे योग. एखाद्या समारंभात मानाचे स्थान मिळेल.वास्तुयोगकुंभ : आजपर्यंत एखादे महत्त्वाचे काम जे रखडलेले होते अशा स्वरूपाचे कार्य अचानक पूर्ण झाल्यामुळे आश्चर्य वाटेल. दीर्घकाळ प्रलंबित असलेले स्थावर मालमत्तेचे व्यवहार तसेच जमीन-जुमला संबंधित व्यवहार ओळखी मध्यस्थीमुळे गतीमान होतील. आर्थिक फायदा मिळू शकतो. काहींना वास्तुयोग. आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते; परंतु त्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. प्रयत्न सफल होतील तसेच आर्थिक सहाय्य मिळेल. कुटुंब परिवारात आपल्या जीवनसाथीचे सहकार्य आपल्याला मिळत राहील. भावंडांविषयी सावध राहणे गरजेचे आहे. त्यांच्याशी शक्यतो वादविवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. जाणीवपूर्वक लहान-मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. धनलाभाचे योग.उत्तम पर्याय मिळतीलमीन : अनेकानेक नवीन संधी मिळतील. आपले कर्तृत्व सिद्ध करता येईल. परदेशगमन होऊ शकते. भाग्योदय होईल. मानसन्मान प्राप्त होऊन अर्थार्जन वाढेल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. सरकारी स्वरूपाची मदत सुद्धा मिळू शकते. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. पदोन्नती, वेतन वृद्धी मिळू शकते. आपण पूर्वी केलेल्या कामाचे चीज होईल. वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. त्याचप्रमाणे हाताखालील सहकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. मात्र बदलीची शक्यता. कामाच्या स्वरूपात बदल होऊन स्थानबदल सुद्धा होऊ शकतो. नवीन आव्हाने स्वीकारा. व्यवसाय तसेच नोकरीत नवीन अनेक उत्तम पर्याय आपल्या समोर येतील.
Satara ZP Election : अजित पवारांच्या निधनानंतर जिल्ह्याच्या राजकारणात सहानुभूतीची लाट; मकरंद पाटील आणि नितीन पाटलांपुढे राष्ट्रवादीचे अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान.
Kaas Pathar : कास पठाराचा लूक बदलणार! ७ लाख पर्यटकांच्या प्रतिसादानंतर वन विभागाचा ‘हा’मास्टर प्लॅन
Kaas Pathar : २ कोटी २३ लाखांचा विक्रमी महसूल आणि ७ लाख पर्यटक; सातारा वन विभागातर्फे कास पठारावर सुविधांचे जाळे विणण्यास सुरुवात.
दैनंदिन राशीभविष्य,रविवार ०१, फेब्रुवारी २०२६
पंचांगआज मिती माघ पौर्णिमा शके१९४७.चंद्र नक्षत्र पुष्य, योग प्रीती चंद्रराशी कर्क,भारतीय सौर १२ माघ शके १९४७. रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१३, मुंबईचा सूर्यास्त १८.३०, मुंबईचा चंद्रोदय ०६.०३pm, मुंबईचा चंद्रास्त नाहि उद्याची, राहू काळ ०५.०६ ते १८.३१,पौर्णिमा प्रारंभ-पहाटे-०५;५३,समाप्ती-उत्तर रात्री-०३;३९,१७ नंतर चांगला.दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : निरनिराळ्या सोयी-सुविधा उपलब्ध होतीलवृषभ : हितशत्रू व गुप्त शत्रूंचा पराभव करणे शक्य होईलमिथुन : घरामध्ये अचानक पाहुण्यांचे आगमन होऊ शकते.कर्क : महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.सिंह : नव नवीन कल्पना सुचतील.कन्या : एखादी अनामिक भीती मनात घर करून राहील.तूळ : आपली मते इतरांना पटवून देण्यात यश मिळेलवृश्चिक : व्यवसाय-धंद्यात- नोकरीत प्रगती कारक घटना घडतील.धनू : लहान-मोठा निर्णय घेताना विचार करा. खरेदी करू शकाल.मकर : एखाद्या माहित नसलेल्या गोष्टीत स्वारस्य घेऊ नका.कुंभ : विवाह ठरण्यात यश मिळेल वाटाघाटी यशस्वी होतील.मीन : खर्चामध्ये अचानक झालेली वाढ आश्चर्यचकित करेल
मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक
नवी मुंबई (वार्ताहर) : मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक प्रामुख्याने रेल्वे रुळांची देखभाल आणि तांत्रिक कामांसाठी घेण्यात येत असून, यामुळे सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे.मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान आज सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० या कालावधीत मेगा ब्लॉक असेल. या पाच तासांच्या काळात अप आणि डाऊन दोन्ही जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत राहील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटणाऱ्या सर्व डाऊन जलद मार्गावरील लोकल गाड्या ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून चालवल्या जातील. या गाड्या आपल्या निर्धारित थांब्यांव्यतिरिक्त सर्व स्थानकांवर थांबतील, ज्यामुळे त्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे. कल्याणहून सीएसएमटीकडे येणाऱ्या अप जलद गाड्या देखील धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी आजचा रविवार अत्यंत कठीण जाणार आहे. कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात सीएसएमटी ते वाशी, बेलापूर आणि पनवेल दरम्यानच्या सर्व अप आणि डाऊन फेऱ्या पूर्णतः बंद राहतील.प्रवाशांसाठी विशेष लोकलची सोय : प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने काही विशेष व्यवस्था केली आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी या टप्प्यात विशेष उपनगरीय लोकल सेवा चालवल्या जातील. तसेच, हार्बरच्या प्रवाशांना ट्रान्स-हार्बर मार्गावरून म्हणजे ठाणे – वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची विशेष परवानगी देण्यात आली आहे.
मोठी बातमी..! ८ मजली निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली, देशात खळबळ
Iran Blast : इराणच्या दक्षिणेकडील महत्त्वपूर्ण बंदर शहर असलेल्या बंदर अब्बासमध्ये आज एका आठ मजली इमारतीत भीषण स्फोट झाला.
IND vs NZ : इशानचे शतक अन् अर्शदीपचा ‘फायफर’; भारताने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत मालिका ४-१ ने जिंकली
IND vs NZ : इशान किशनचे वादळी शतक आणि अर्शदीप सिंगच्या पाच विकेट्सच्या जोरावर भारताने पाचव्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ४६ धावांनी धुव्वा उडवला.
Ariel Seidman : दक्षिण आफ्रिकेकडून इस्रायलचे उपराजदूत एरियल सीडमन यांची हकालपट्टी
दक्षिण आफ्रिकेने इस्रायलचे उपराजदूत एरियल सीडमन (Ariel Seidman)यांची हकालपट्टी केली आहे आणि त्यांना ७२ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. उपराजदूत सीडमन यांनी इस्रायली सोशल मीडिया पोस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांचा वारंवार अपमान केला
Suryakumar Yadav Record : सूर्यकुमार यादव टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वात कमी चेंडूत ३००० धावांचा पराक्रम करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

28 C