Smartphone Safety Features: अडचणीच्या वेळी जीव वाचवू शकतात मोबाईलमधले हे ५ सेफ्टी फीचर्स
आपण नेहमी बाहेर जाताना सावध राहण्याबद्दल बोलतो, पण आपल्या खिशात असलेला स्मार्टफोन हा केवळ कॉल किंवा सोशल मीडियासाठी नाही, तर संकटाच्या वेळी जीव वाचवणारे साधनही ठरू शकतो, हे अनेकदा विसरतो.
Shaukat Ali: उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाचे एआयएमआयएमचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष शौकत अली यांनी लोकसंख्येबाबत एक मोठे विधान केले.
Sharad Pawar: शरद पवार यांची प्रकृती खालावली; बारामतीतून पुण्याच्या दिशेने रवाना
Sharad Pawar: ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. बारामतीतील निवासस्थान असलेल्या गोविंद बागेतून ते पुणे शहराच्या दिशेने निघाले आहेत. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना तपासणीसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांना खोकला, कफ आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. […]
मुंबई: समाज माध्यमावर प्रचंड फेमस असणाऱ्या शिरुर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना यंदाच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. निर्मला नवले या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर पंचायत समितीच्या कारेगाव कान्हूर मेसाई गण येथून निवडणुकीला उभ्या होत्या. निर्मला नवले या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. आजवर त्यांचे अनेक रिल्स आणि व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. परंतु, यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली आहे. भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी निर्मला नवले यांना ३०० मतांनी पराभूत केले.पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले या कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. निर्मला नवले या राजकारणी असल्या तरी इन्स्टाग्रामवर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. निर्मला नवले यांनी आयटी इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केले आहे. काही वर्षांपूर्वी निर्मला नवले यांची कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. तेव्हापासून त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढत गेली. उच्चशिक्षित आणि लोकप्रिय चेहरा म्हणून निर्मला नवले या कायम चर्चेत असायच्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत निर्मला नवले यांची जादू चालू शकली नाही.दरम्यान पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण २९९ जागांपैकी ७३ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपचे २०, शिवसेनेचे ७, राष्ट्रवादी काँग्रेसचे २७, ठाकरे गटाचे २ आणि शरद पवार गटाचे ३ उमेदवार विजयी झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार पूर्णपणे थंडावला होता. पुण्यात एकही मोठी सभा झाली नव्हती. अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सहानुभूती मिळताना दिसत आहे.
जिल्हा परिषदेत उबाठा हाती भोपळा, आजवरचा सर्वात मानहानीकारक पराभव
मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजप आणि महायुतीने निर्णायक विजय मिळवला असला, तरी उबाठा गटाला जिल्हा परिषदेत एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे आजवरचा हा त्यांचा सर्वात मानहानीकारक पराभव ठरला असून, ग्रामीण भागातील जनतेने उबाठा गटाला स्पष्ट नाकारले, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.उबाठा गटाला जिल्हा परिषदेत एकही जागा जिंकता आली नाही. तर, पंचायत समितीतही त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. या निवडणुकीत भाजप राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला असून, भाजपची ग्रामीण भागातील पकड किती खोलवर रुजली आहे, हे निकालातून स्पष्ट झाले आहे. भाजपनंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सरस कामगिरी केली आहे.राज्यातील १२ जिल्हा परिषदांपैकी सात जिल्हा परिषदांवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. शिवसेनेला दोन जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळाली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही दोन जिल्हा परिषदांमध्ये यश मिळाले आहे. काँग्रेसने एका ठिकाणी सत्ता मिळवली. मात्र उद्धव उबाठा गटाला जिल्हा परिषदेत खातेही उघडता आलेले नाही.या पराभवामागे उबाठा गटाच्या वरिष्ठ नेतृत्वाची निष्क्रियता कारणीभूत ठरल्याचे मत व्यक्त केले जात आहे. उबाठाच्या एकाही बड्या नेत्याने या निवडणुकीत सक्रिय प्रचार केला नाही किंवा कार्यकर्त्यांना बळ दिले नाही. याचाच परिणाम निकालात दिसून आल्याचा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
ZP Election Result 2026: वळसे पाटील, तानाजी सावंत, भरत गोगावलेंनी गड राखले
मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक ठिकाणी प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबीयांनी आपला दबदबा कायम ठेवत विजय मिळवला. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, तानाजी सावंत आणि मंत्री भरत गोगावले यांच्या कुटुंबीयांनी गड राखत राजकीय वारसा पुढे नेला, तर काही ठिकाणी मतदारांनी घराणेशाहीला स्पष्ट नकार दिल्याचेही चित्र पाहायला मिळाले.आंबेगाव मतदारसंघात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी पारगाव जरकवाडी गटातून २ हजार १३० मतांची निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला. पुरंदर तालुक्यात माजी आमदार बापूसाहेब पठारे यांची कन्या रूपाली झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर विजय मिळवला. विशेष म्हणजे, पुरंदर तालुक्यातील दोन्ही पंचायत समिती सदस्यही राष्ट्रवादी काँग्रेसचेच निवडून आल्याने तालुक्यावर पक्षाची पकड अधिक मजबूत झाली आहे.सोलापूर जिल्ह्यातील हाय-व्होल्टेज लढतींमध्येही प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबीयांनी बाजी मारली आहे. माढा तालुक्यातील मानेगाव गटातून माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांनी भाजपच्या तिकिटावर ६ हजार ८०० मतांच्या विक्रमी मताधिक्याने प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. याच जिल्ह्यात भाजप नेते राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी दहिगाव गटातून विजय मिळवत राजकीय क्षेत्रात यशस्वी प्रवेश केला आहे.दुसरीकडे, रायगड जिल्ह्यात आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला.परभणीत घराणेशाही नाकारली:दरम्यान, परभणी जिल्ह्यात मतदारांनी घराणेशाहीला स्पष्ट नकार दिल्याचे चित्र समोर आले आहे. माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, त्यांच्या कुटुंबातील पाच उमेदवारांपैकी केवळ एकालाच विजय मिळवता आला आहे. वरपुडकर यांचा मुलगा, मुलगी, सून आणि एक पुतणा या चौघांना पराभवाला सामोरे जावे लागले असून, या निकालाने जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Zilla Parishad Election Result 2026 : निर्मला नवले यांचे इन्स्टाग्रामवर 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांनी आयटी इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केले आहे.
अदितीने सांगितलं की, कामाचे तास ठरवण्याचा अधिकार कलाकाराला असायला हवा. एखाद्या कलाकाराला ठराविक वेळेत काम करायचं असेल, तर तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. तसंच, कुणी वेगळ्या पद्धतीने काम करायचं ठरवलं, तरी तोही त्याचा हक्क आहे, असं ती म्हणाली.
Gold & Silver Price: चांदीने मारली मोठी उडी ! १३००० रुपयांनी महागली ; सोनेही ३००० रुपयांनी वधारले
Gold & Silver Price: आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली. ही वाढ अशा वेळी झाली आहे, जेव्हा अमेरिकन डॉलर सतत कमकुवत होत आहे
ZP Election Result 2026: भाजप राज्यातला सर्वात मोठा पक्ष; जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप शंभरी पार
मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ७३१ जिल्हा परिषद जागांपैकी पहिल्या २०० जागांचे कल हाती आले असून, यामध्ये सत्ताधारी महायुतीने स्पष्ट वर्चस्व मिळवल्याचे दिसून येत आहे. शनिवारी पार पडलेल्या या मतदानामध्ये ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत भाजप शंभरी पार गेला.दुपरी १ वाजेपर्यंतची आकडेवारी:छत्रपती संभाजी नगर :भाजप- १६, शिवसेना- १८, राष्ट्रवादी काँग्रेस- ४धाराशिव:भाजप- ६, शिवसेना- ४, राष्ट्रवादी काँग्रेस- २कोल्हापूर:भाजप- १०, शिवसेना- ८, राष्ट्रवादी काँग्रेस- १०लातूर:भाजप- ८, शिवसेना- ०, राष्ट्रवादी काँग्रेस- २परभणी:भाजप- १७, शिवसेना- ३, राष्ट्रवादी काँग्रेस- ६पुणे:भाजप- २०, शिवसेना- ७, राष्ट्रवादी काँग्रेस- २७रायगड:भाजप- ६, शिवसेना- १३, राष्ट्रवादी काँग्रेस- १०रत्नागिरी:भाजप- २, शिवसेना- २६, राष्ट्रवादी काँग्रेस- २सांगली:भाजप- ८, शिवसेना- ५, राष्ट्रवादी काँग्रेस- ३सातारा:भाजप- ३२, शिवसेना- १०, राष्ट्रवादी काँग्रेस- १७सिंधुदुर्ग:भाजप- १९, शिवसेना- ७, राष्ट्रवादी काँग्रेस- ०सोलापूर:भाजप- २१, शिवसेना- ४, राष्ट्रवादी काँग्रेस- ९
Solapur: मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी
सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेतील निकालाचे अपडेट हाती येत असून माळशिरस तालुक्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना भाजपने धक्का दिला आहे. तसेच, आमदार उत्तम जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर यांचाही पराभव झाला आहे.हाय व्होल्टेज ड्रामा रंगलेल्या दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये भाजपने मुसंडी मारली. आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती यांनी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळला. दहिगाव जिल्हा परिषद गटातील दोन्ही पंचायत समिती देखील भाजपने जिंकल्या आहेत. माळशिरसमधील गुरसाळे गणातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे भाजपने मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात गुलाल उधळला.
मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ७३१ जिल्हा परिषद जागांपैकी पहिल्या २०० जागांचे कल हाती आले असून, यामध्ये सत्ताधारी महायुतीने स्पष्ट वर्चस्व मिळवल्याचे दिसून येत आहे. शनिवारी पार पडलेल्या या मतदानामध्ये ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. सुरुवातीच्या कलानुसार, भारतीय जनता पक्षाने ७० जागांवर आघाडी घेत आपले पहिले स्थान कायम राखले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (३८ जागा) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (४३ जागा) मोलाची साथ दिली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीसाठी सुरुवातीचे कल चिंतेचे ठरणार असे दिसत आहे. यामध्ये काँग्रेस २१ जागांवर आघाडीवर असून, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) अनुक्रमे ६ आणि ३ जागांवर मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. रायगड, पुणे, कोल्हापूर आणि छत्रसकाळी ११ वाजेपर्यंतची आकडेवारीभाजप- ७०शिवसेना शिंदे गट- ३८राष्ट्रवादी अजित पवार गट- ४३काँग्रेस- २१शिवसेना ठाकरे गट- १४राष्ट्रवादी शरद पवार गट- ३इतर- ११https://prahaar.in/2026/02/09/zp-and-panchayat-samiti-election-result-2026-bjps-rajesh-jadhav-won/कोकणात महायुतीचा ‘डंका’महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत कोकण पट्ट्यात महायुतीने विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. प्रत्यक्ष मतमोजणी पूर्ण होण्याआधीच महायुतीच्या तब्बल २७ उमेदवारांनी बिनविरोध विजय संपादन करत विजयाचे खाते उघडले आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील ५० सदस्यीय जिल्हा परिषदेत भाजपचे ७ आणि शिंदे गटाचा १ असे एकूण ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पंचायत समितीमध्ये तर महायुतीने मोठी मजल मारली असून, १०० पैकी १७ जागा आधीच खिशात घातल्या आहेत. यात भाजपचे १६ सदस्य बिनविरोध निवडून आले असून शिंदे गटाला १ जागा मिळाली आहे. सिंधुदुर्गाप्रमाणेच रायगड आणि रत्नागिरीतही शिवसेनेने (शिंदे गट) बाजी मारली आहे. रायगडच्या महाडमधील सवाने धामणे गणातून अनिल जाधव यांच्याविरोधातील उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांचा विजय सुकर झाला. रत्नागिरीमध्ये नाणीज पंचायत समिती गणातून डॉ. पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधकांनी माघार घेतल्याने आणि महायुतीची भक्कम रणनीती यामुळे मतदानापूर्वीच कोकणात महायुतीने विजयाचा गुलाल उधळला आहे.
Pune Mayor Election 2026: पुण्यात महापौर, उपमहापौर पदासाठी बिनविरोध निवडणूक
पुणे: भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची पुण्याच्या महापौर पदी, तर भाजप-रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर यांची उपमहापौर पदी आज म्हणजेच सोमवार ९ फेब्रुवारी रोजी बिनविरोध निवड झाली आहे.कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार पुणे महापालिकेत सकाळी सव्वा अकरा वाजता महापौर आणि उपमहापौर निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते यांना केली.दरम्यान, साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उमपहौर पदाच्या निवडीसाठीची प्रक्रिया सुरू झाली. काँग्रेसकडून साहिल केदारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दत्ता बहिरट, तर भाजपकडून परशुराम वाडेकर यांचे अर्ज वैध ठरले. त्यानंतर बहिरट व केदारी यांनी उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे उपमहापौर पदी भाजप रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर वाडेकर यांची उपमहापौर म्हणून निवड करण्यात आली.केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नागपुरे व वाडेकर यांची सभागृहात उपस्थित राहून अभिनंदन केले.
Lok Sabha Speaker: विरोधी पक्ष आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणू शकतात. समोर आलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षांनी यासाठी आधीच तयारी सुरू केली आहे.
Healthy Relationships: प्रेमाची संकुचित व्याख्या आणि बदलता समाज
खरं सांगायचं तर ‘प्रेम’ म्हटलं की ऊर्जा, उत्साह, समाधान, आनंद असे शब्द आज आपल्या मनात येतात का? जसं ‘राग’ ही भावना आयुष्याचा भाग आहे, तसंच किंबहुना त्याहूनही अधिक प्रेम ही प्रत्येकाच्या आयुष्यातील मूलभूत भावना आहे. प्रेमाशिवाय कोणाचंही आयुष्य पूर्ण होऊ शकत नाही.
Online Games: ऑनलाइन गेमिंगमुळे काही दिवसापूर्वी सख्या तीन बहिणींनी स्वतः ला संपवलं, ही घटना ताजी असतानाच मेरठमधील दिल्ली गेट पोलिस स्टेशन परिसरात आणखी एक दुःखद घटना समोर आली आहे.
Zilla Parishad Election Result 2026 : भाजप उमेदवार निहाल काझी यांचा अवघ्या एका मताने पराभव
ZP and Panchayat Samiti Election Result 2026: कोकणात भाजपच्या विजयाचा 'श्रीगणेशा'
मुंबई: महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. मतमोजणी (सोमवार ९ फेब्रुवारी २०२६) आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली आहे.अशातच मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आला आहे. भाजपच्या राजेश जाधव यांच्या विजयाने कोकणात भाजपने विजयाचा श्रीगणेशा केला आहे.- कणकवली तालुक्यात खारेपाटण पंचायत समिती निवडणुकीचा अखेर निकाल जाहीर झाला आहे. भाजप – शिवसेना महायुतीचे उमेदवार १७९ मतांनी विजयी झाले आहेत. गुरुप्रसाद शिंदे यांना एकूण १५०६ मते मिळाली. उबाठाचे रामचंद्र राऊत यांना २८९ मते मिळाली.- तळेरे पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेश जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला. राजेश जाधव यांना एकूण १,९६० मते मिळाली असून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रवीण वरूनकर यांचा ९४८ मतांनी पराभव केला.टपाली मतांची मोजणी सुरू आहे...
Breast Cancer : स्तनाच्या कर्करोगापासून कसा कराल बचाव?
पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतीय महिलांमध्ये या आजाराचे निदान उशिरा होते, ही मोठी चिंतेची बाब आहे. वेळेवर तपासणी न झाल्यामुळे अनेक वेळा आजार गंभीर अवस्थेत पोहोचतो. त्यामुळे या आजाराबाबत योग्य माहिती असणे फार महत्त्वाचे आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील महायुतीच्या तब्बल 27 जागा बिनविरोध, संपूर्ण यादी...
मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यात कोणाची सत्ता येणार, कोण गुलाल उधळणार, कोण बाजी मारणार याचा निर्णय आज होईल. १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समिती निवडणुकीची आज मतमोजणी सुरु झाली आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला झाली आहे. १२ जिल्हा परिषदेच्या ७३१ तर आणि पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी शनिवारी मतदान झालं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण ७ हजार ४३८ इतके उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीआधीच महायुतीच्या २५ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.कोकणात महायुतीच्या तब्बल २७ जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ८, तर पंचायत समितीच्या १७ जागा महायुतीने बिनविरोध जिंकल्या आहेत. ५० सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे ७ आणि शिंदे गटाचा १ सदस्य बिनविरोध विजयी झाला आहे. तर 100 सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये भाजपचे 16 आणि शिंदे शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झाल्याचं समोर आलं आहे. रायगड आणि रत्नागिरीतून शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोध जिंकले आहेत. महाड पंचायत समिती निवडणुकीत सवाने धामणे पंचायत समिती गणातून उभे असलेले अनिल जाधव यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघारी घेतल्याने अनिल जाधव हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज पंचायत समिती गणातून शिंदे शिवसेनेच्या उमेदवार डॉ. पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.महायुतीच्या बिनविरोध विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी-
Satara ZP Election 2026: सातारा जिल्ह्यातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी
Satara ZP Election 2026: सातारा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये एकूण ६५ निवडणूक विभाग आहेत.
Epstein Files: एपस्टाईन फाइल्सने जगभरात खळबळ माजवली आहे. कुख्यात गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनशी संबंधित फाईल्स उघड झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. त्याचा परिणाम राजकीय वर्तुळातही उमटला आहे.
LIVE : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मतमोजणी सुरू, बघा कोण आघाडीवर ?
मुंबई : महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. मतमोजणी (सोमवार ९ फेब्रुवारी २०२६) आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली आहे. LIVE UPDATES...टपाली मतांची मोजणी सुरू
India-Canada Meeting: भारत आणि कॅनडाने राष्ट्रीय सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणीच्या मुद्द्यांवर परस्पर सहकार्यासाठी एक योजना विकसित केली आहे. ते ड्रग्ज तस्करी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कशी लढण्यासाठी अधिकारी देखील नियुक्त करतील.
Pune ZP election results 2026 : पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर
Pune ZP election results 2026 : पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी २९९ तर १३ पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ५२८ उमदेवार रिंगणात होते.
IND vs PAK : आयसीसीचा पाकिस्तानला थेट इशारा; पाकिस्तान माघार घेणार?
लाहोर: रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल, परंतु १५ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेत होणारा भारताविरुद्धचा सामना खेळणार नाही. तेव्हापासून हा मुद्दा चर्चेत आहे. मात्र आता पाकिस्तान माघार घेण्याच्या तयारीत आहे. किंबहुना आयसीसीने त्यांना माघार घेण्यास भाग पाडले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (८ फेब्रुवारी) गद्दाफी स्टेडियममध्ये पाकिस्तान सोबत झालेल्या बैठकीत आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी पीसीबीला (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) बहिष्काराचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. अशातच काल लाहौरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक जवळपास १३० मिनिटं चालली.लाहौरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये बैठक:लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये आयसीसीचे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यात बैठक पार पडली. नक्वी यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) चे प्रमुख अमिनुल इस्लाम बुलबुल यांचीही भेट घेतली.पीसीबीने केल्या तीन मागण्या केल्या:रविवारी लाहोरमध्ये आयसीसी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पीसीबीने तीन मागण्या केल्या आहेत. बांगलादेशला वाढीव भरपाई देण्यात यावी, टी-ट्वेंटी विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतरही बांगलादेशचे सहभाग शुल्क दिसलं जावं आणि भविष्यात आयसीसी स्पर्धेचे आयोजन करण्याचा अधिकार मिळाला, असं पीसीबीने बैठकीत मुद्दा मांडला आहे.दरम्यान, पीसीबीचे प्रमुख मोहसीन नक्वी सोमवारी पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेऊन अंतिम निर्णय घेतील. दोन आठवड्यांतील ही त्यांची दुसरी अधिकृत बैठक असेल. १५ फेब्रुवारीची अंतिम तारीख जवळ येत असताना परिस्थितीचे गांभीर्य यावरून दिसून येते.पाकिस्तान यू-टर्न घेईल:भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना पाकिस्तान यू-टर्न घेईल असे वाटते. मात्र तरीही पाकिस्तानने १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकला तर आयसीसीने त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी असे आवाहन देखील गावस्कर यांनी केले आहे.
भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील सर्वात विश्वासार्ह रॉकेट PSLV चे सलग 2 मिशन अयशस्वी झाले आहेत. तेही अवघ्या 9 महिन्यांत. यामुळेच NSA अजित डोभाल यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटरला गुप्त भेट दिली. 2 दिवस त्यांनी शास्त्रज्ञांसोबत बैठका घेतल्या. असे म्हटले जात आहे की डोभाल यांनी PSLV मिशनच्या सबोटाज म्हणजे जाणूनबुजून मिशन अयशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून माहिती गोळा केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून NSA ने ही भेट दिली. अखेर PSLV इतके विश्वासार्ह कसे आहे, सबोटाजचा (घातपाताचा) धोका आहे का आणि यापूर्वीही असे काही घडले आहे का; जाणून घेऊया मंडे मेगा स्टोरीमध्ये… अनेक सुरक्षा उपाययोजना आणि पाळत ठेवूनही, भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये शास्त्रज्ञांचे संशयास्पद मृत्यू, खून, हेरगिरी, हनीट्रॅप इत्यादी प्रकरणे समोर आली आहेत...
Amrita Singh: पहिल्याच चित्रपटातून स्टारडम, 12 वर्षांनी लहान अभिनेत्याशी लग्न, आणि नंतर घटस्फोट
१९८३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बेताब’ या चित्रपटात त्यांनी सनी देओलसोबत काम केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि अमृता सिंग रातोरात स्टार बनल्या. त्यानंतर त्यांच्या वाट्याला एकामागोमाग एक चित्रपट आले.
ZP Election Result 2026: जिल्हा परिषदांच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये कोणाची आघाडी?
ZP Election Result 2026: सकाळी 10.30 वाजेपर्यंतच्या पहिल्या कलानूसार, महायुतीने बाजी मारल्याचे दिसून आले आहे.
Japan Election: जपानमध्ये पुन्हा एकदा साने ताकाची यांचेच सरकार ; निवडणुकीत विक्रमी विजय
Japan Election: जपानमध्ये पंतप्रधान साने ताकाची यांच्या नेतृत्वाखालील लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) विक्रमी विजयासह सत्तेत परतत आहे. रविवारी झालेल्या संसदीय निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने दोन तृतीयांश बहुमत मिळवले,
INC High Profile Meeting: काँग्रेसची ८ राज्यांसोबत मोठी बैठक ; बैठकीत ‘या’मुद्द्यांवर लक्ष केंद्रित
INC High Profile Meeting: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि सध्याच्या राजकीय मुद्द्यांवर रणनीती आखण्यासाठी आठ राज्यांच्या नेत्याशी बैठक करणार आहेत.
जम्मू आणि हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता, हवामान खात्याने 'या'राज्यांना दिला इशारा
दिल्ली: हवामान खात्याने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने म्हटले की, पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे, ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दाट धुक्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात ऑरेंज अलर्ट आणि उत्तराखंडमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागातही दाट धुके दिसू शकते. पुढील ७ दिवसांत देशाच्या उर्वरित भागात कोणताही महत्त्वपूर्ण हवामान बदल होणार नाही.पुढील दोन दिवसांत वायव्य भारतातील किमान तापमानात हळूहळू २ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, पुढील दोन दिवसांत ते सुमारे २ अंश सेल्सिअसने कमी होईल आणि त्यानंतर पुढील तीन दिवसांत कोणताही महत्त्वपूर्ण बदल होणार नाही.
Top 10 news: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी पार पडलेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर होणार आहे.
Ajit Pawars plane crash : दादा येतील आणि भेटतील असं सर्वांना वाटतं. हा प्रसंग अत्यंत दुःखाचा आहे, अशी भावना खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केली.
चित्रपटातील ‘शरारत’ हे गाणे विशेष चर्चेत राहिले. हे गाणे अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ फेम आयशा खान तसेच क्रिस्टल डिसूजा यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. दोघींच्या डान्स मूव्ह्सना प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली. जसलीन स्कॅंडल आणि मधुबंती बागची यांनी हे गाणे गायले असून ते चार्टबस्टर ठरले होते.
Dombivali: मानकोली उड्डाणपूल बनला रेसिंगचा अड्डा, नागरिकांच्या जीवाला धोका
डोंबिवली : डोंबिवलीमधील ठाणे आणि डोंबिवलीला जोडणारा मोठा गाव मानकोली उड्डाणपूल चार चाकी वाहनांच्या रेसिंगच्या अड्डा बनला आहे. चारचाकी चालकांच्या या जीवघेण्या शर्यतीमुळे अन्य वाहन चालक आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबतीत कारवाईची मागणी भाजपचे दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.डोंबिवलीमधील ठाणे - डोंबिवली प्रवास कमी वेळात व्हावा यासाठी कल्याण खाडीवर कोट्यवधी रुपये खर्च करून मोठा गाव मानकोली उड्डाणपूल तयार करण्यात आला. हजारोंच्या संख्येने ज्या उड्डाणपुलावर लोक दुचाकीने प्रवास करतात. हाच पूल मद्यपी आणि स्टंटबाज तरुणांचा अड्डा झाला आहे. स्टंटबाज तरुण या पुलावर हैदोस घालत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या पुलावर दारू पार्टी तर सुरूच होती. मात्र आता या पुलावर चार चाकी गाड्यांच्या रेसिंग देखील सुरू झाली आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.एवढंच नाही तर मद्यधुंद अवस्थेत तरुणांकडून प्रवास करणाऱ्या तरुणींची छेड काढली जाते. याबाबत वारंवार कारवाईची मागणी केली जात आहे. परंतु याकडे पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाजपाचे दीपेश म्हात्रे यांनी केला आहे.म्हात्रे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष ठोंबरे यांना यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय दीपेश म्हात्रे यांनी रेसिंग करणाऱ्या स्टंट बाज तरुणांचा व्हिडिओ समाज माध्यमावर शेअर केला आहे. आता पोलीस कारवाई कधी करणार? करणार की नाही करणार हे देखील पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra Elections 2026 : प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली असून, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबई: सरकारी हॉस्पिटलमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. सगळ्या नियमांना तोडून एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एका नर्सिंग ऑफिसरने अधिकृत डॉक्टरांच्या परवानगीशिवाय हा अवैध प्रकार केला. त्यासाठी १६ हजार रुपयांची लाच घेतल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील छतरपूरमधला हा खळबळजनक प्रकार आहे.या प्रकरणाचा खुलासा तांत्रिक देखरेख आणि सखोल तपासणीनंतर झाला आहे. नर्सिंग ऑफिसर प्रीती दुबे यांनी हा गर्भपात केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नियमानुसार गर्भपात केवळ अधिकृत डॉक्टरांच्या देखरेखीखालीच होऊ शकतो. पण येथे एमटीपी (MTP) कायद्याच्या सर्व तरतुदींचे उल्लंघन करण्यात आले. नर्सिंग ऑफिसर प्रीती दुबे यांनी सुरुवातीला हा गुन्हा नाकारला होता. पण, डॉक्टर एस. प्रजापती आणि डॉक्टर सुरेखा खरे यांच्या समितीने केलेल्या चौकशीत सत्य बाहेर आलं आहे.आरोग्य विभागाने नेमलेल्या तपास समितीने अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना कोणतीही माहिती न देता आणि बनावट संदर्भांचा वापर करून हा गर्भपात उरकला गेला. भोपाळ स्तरावरून झालेल्या पुनरावलोकनानंतर आता संबंधित नर्सिंग ऑफिसरवर कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत.तपास पथकासमोर साक्षीदारांनी स्पष्ट केले की, नर्सनेच 'सफाई' करण्याच्या नावाखाली पैसे घेतले होते. इतकेच नाही तर दुसऱ्या डॉक्टरांच्या नावाची बनावट स्लिपही तयार करण्यात आली होती. अल्पवयीन मुलीच्या भविष्याशी खेळणाऱ्या या नर्सिंग ऑफिसरला आता दोषी ठरवण्यात आले आहे. भोपाळच्या आरोग्य संचालकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून लवकरच अटकेची किंवा निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले तौरल इंडिया-सुपा प्लांटचे उदघाटन
अहिल्यानगर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पारनेर, अहिल्यानगर येथे 'तौरल इंडिया-सुपा प्लांटचे' उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून तंत्रज्ञान व उत्पादन क्षेत्र या प्रगतीला गती देत आहे. तसेच भारताच्या औद्योगिक प्रगतीत महाराष्ट्र दमदार पाऊल टाकत आहे. तौरल इंडिया–सुपा प्लांट प्रकल्प हा महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचा उत्सव आहे.आपल्या सरकारने दावोसमधून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे ५० हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात ११,५१९ कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे १८ हजार रोजगार निर्माण होतील, तर उत्तर महाराष्ट्रात जवळपास ७५ हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच, महाराष्ट्र शासन प्रत्येक उद्योजकाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा संदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, खासदार भागवत कराड, तौरल इंडियाचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते, ह.भ.प. नामदेवशास्त्री महाराज, ह.भ.प. शिवाजी महाराज व इतर मान्यवर उपस्थित होते.
बांगलादेशात सत्तापालटानंतर 12 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका आहेत. विद्यार्थी आंदोलनानंतर सत्तेतून बाहेर काढल्या गेलेल्या शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीग निवडणुकीचा भाग नाही. तर 2014 आणि 2024च्या निवडणुकीत सहभागी न झालेले बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी पक्ष जोरदारपणे निवडणूक लढवत आहेत. बांगलादेशमध्ये सत्तापालटानंतर हिंदूंविरोधी वातावरण आहे. शरिया कायद्याची वकिली करणाऱ्या जमातची प्रतिमा नेहमीच कट्टरपंथी पक्षाची राहिली आहे. मात्र, यावेळी जमातने पहिल्यांदाच निवडणुकीत हिंदू उमेदवार उभा केला आहे. अशा परिस्थितीत जमातसाठी निवडणुकीत हिंदूंना सुरक्षा देणे किती मोठा मुद्दा आहे, हे समजून घेण्यासाठी दैनिक भास्करची टीम पक्षाच्या निवडणूक रॅलीत पोहोचली. आम्ही खुलना जिल्ह्यातील त्याच दाकोप मतदारसंघात पोहोचलो, जिथून पक्षाचे पहिले आणि एकमेव हिंदू उमेदवार कृष्णा नंदी निवडणूक लढवत आहेत. ते दावा करतात की जमात बांगलादेशात शरिया आणणार नाही. मात्र, त्यांच्या रॅलीत महिला पडद्यामागे बसलेल्या दिसल्या. नंदी रॅलीत मतदारांना उघडपणे रोख रक्कम वाटताना कॅमेऱ्यात कैद झाले. हे सर्व रिपोर्ट करत असताना आम्हाला केवळ धमकावण्यात आले नाही, तर व्हिडिओ डिलीट करण्यासाठीही दबाव टाकण्यात आला. जमातच्या रॅलीत आणखी काय घडले, पक्षाचे पहिले हिंदू उमेदवार काय दावे करत आहेत आणि रॅलीत आलेल्या समर्थकांचे काय म्हणणे आहे. या रिपोर्टमध्ये वाचा... जमातच्या रॅलीत महिलांना पडद्यामागे बसवलेभारताच्या सीमेवर असलेल्या खुलना जिल्ह्यातील दाकोपमध्ये 55% हिंदू लोकसंख्या आहे. हा परिसर गंगा डेल्टा आणि सुंदरबनजवळ आहे. या छोट्या-छोट्या बेटांच्या परिसरात पोहोचण्यासाठी आम्हाला नदी पार करावी लागली. त्यामुळे, आधी आम्ही फेरीने नदी पार केली. मग काही अंतर पायी चाललो आणि येथून बाइकवर स्वार होऊन खडबडीत रस्त्याने दाकोपला पोहोचलो. येथे 1 फेब्रुवारी रोजी जमातचे उमेदवार कृष्णा नंदी यांची निवडणूक रॅली होती. कृष्णा व्यवसायाने व्यापारी आहेत आणि परिसरात त्यांचा दबदबा आहे. जेव्हा आम्ही रॅलीत पोहोचलो, तेव्हा गावात धार्मिक घोषणांसह यात्रा काढली जात होती. तसे, दाकोप हा हिंदू बहुल परिसर आहे, पण रॅलीत बहुतेक मुस्लिमच दिसले. या रॅलीतील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे महिलांना स्टेजच्या बाजूला पडदा लावून बसवले होते. जेणेकरून पुरुष आणि महिलांना वेगळे ठेवता येईल. रॅलीत बहुतेक मुस्लिम महिलाच पोहोचल्या होत्या. जमात शरिया आणणार नाही, सर्वांना सोबत घेऊन जाऊदाकोपचे उमेदवार कृष्णा नंदी यांच्याशी बोलून आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला की, शेवटी हिंदू समुदायाचे असूनही ते इस्लामिक कट्टरपंथी पक्षातून निवडणूक का लढत आहेत? यावर नंदी म्हणतात, ‘मी जमातच्या विचारसरणीशी सहमत आहे. हा प्रामाणिकपणा, सत्य आणि न्यायासाठी लढणारा पक्ष आहे. म्हणून मी जमातमध्ये सामील झालो.‘ ते पुढे म्हणतात, 'दाकोप, हिंदू लोकसंख्या असलेला परिसर आहे. मी येथे सर्व लोकांसाठी काम करू इच्छितो. मी लोकांना वचन दिले आहे की हिंदूंना समान आदर दिला जाईल. आमच्याकडे सर्व धर्माचे लोक एकत्र राहतात. येथे लोकांना खंडणी आणि प्रोटेक्शन मनीच्या धमक्यांपासून स्वातंत्र्य हवे आहे. मी वचन दिले आहे की मी याविरुद्ध लढेन.' जमात इस्लामिक कायदा आणू इच्छितो का? नंदी म्हणतात, 'नाही, जमात शरिया आणणार नाही. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालू.' मग तुमच्या रॅलीत महिलांना वेगळे का बसवले आहे? आम्ही यापूर्वी कोणत्याही रॅलीत असे पाहिले नाही. तुम्ही स्वतः हिंदू असून हे कसे स्वीकारत आहात? यावर नंदी म्हणतात, 'जमातच्या राजवटीत महिला सन्मान आणि प्रतिष्ठेने राहतील. असे नाही की महिला-पुरुष रॅलीत एकत्र सहभागी होऊ शकत नाहीत. आम्ही एकत्र महिलांना सुरक्षा देऊ. आम्ही महिलांना बसण्यासाठी वेगळा विभागही तयार केला आहे.' आमचाही हाच प्रश्न आहे की, वेगळे बसवण्याची काय गरज आहे, महिला एकत्र बसू शकत नाहीत का? ‘आम्हाला इथल्या समाजाच्या हिशोबाने व्यवस्था करावी लागते.’ असे म्हणून नंदी बोलणे टाळू लागले. ते म्हणतात की, जर जमातचे सरकार आले तर भारतासोबत चांगले संबंध निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. जमात उमेदवाराने प्रचारादरम्यान रोख रक्कम वाटलीआमच्या बोलण्यानंतर अवघ्या 10 मिनिटांतच, प्रामाणिकपणाचे दावे करणारे जमातचे उमेदवार कृष्णा नंदी एका मतदाराला रोख रक्कम वाटताना आमच्या कॅमेऱ्यात कैद झाले. खरं तर, पक्षाच्या लोकांनी कृष्णा नंदी यांना घेरले होते आणि आम्ही काही अंतरावरून त्यांचे व्हिडिओ शूट करत होतो. याच दरम्यान एक महिला आली आणि तिने नंदी यांना एक फोटो दाखवला. नंदी यांनी नोटा काढल्या आणि सुमारे एक हजार टका त्या महिलेला दिले. कॅमेरा पाहताच जमात समर्थक घाबरले. त्यांनी उमेदवार कृष्णा नंदी यांना इशारा केला की कॅमेऱ्यात सर्व काही शूट होत आहे. नंदी यांना जेव्हा या सगळ्याची जाणीव झाली तेव्हा तेही सतर्क झाले. यानंतर जमात समर्थकांनी आम्हाला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला. एकाने आम्हाला धमकावण्याच्या सुरात विचारले- भारतातून आहात का? तुमचा नंबर द्या? आमच्यावर व्हिडिओ डिलीट करण्यासाठी दबावही टाकण्यात आला. रोख रक्कम घेणारी महिला म्हणाली- जमातसोबत आम्ही जास्त सुरक्षित या सगळ्यामध्ये आम्ही त्या महिलेला शोधले, जिला कृष्णा नंदी रोख रक्कम वाटत होते. महिलेचे नाव माधवी महालदार आहे. जमातबद्दल विचारल्यावर त्या म्हणतात, ‘मला वाटते की येथे महिला पुरुषांपेक्षा जास्त सुरक्षित आहेत. आम्ही जमातसोबत सुरक्षित अनुभवतो. आम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय जगायचे आहे, त्यामुळे मला वाटते की जमातच शांततेने देश चालवेल.’ जमातच्या रॅलीत पोहोचलेल्या सुष्मिता मंडल म्हणतात, ‘आम्हाला येथे कोणतीही अडचण नाही. जमातच्या लोकांचे बोलणे, वर्तन ज्या प्रकारचे आहे, ते चांगले आहे. मी एका चांगल्या देशाचे स्वप्न पाहते. मला जमातवर पूर्ण विश्वास आहे.’ आम्ही हिंदू उमेदवार उभा केला, जेणेकरून तो समाजाच्या समस्या समजून घेईल या रॅलीत दाकोपचेच एक शेतकरी जीएम नईम आले होते. ते जमातचे कट्टर समर्थक आहेत. नईम म्हणतात, ‘जमात जातीय सलोख्याच्या आधारावर देशाला पुन्हा घडवण्याचा प्रयत्न करत आहे. हे यावरून दिसून येते की आम्ही येथून निवडणुकीत हिंदू उमेदवार उभा केला आहे. माझे मत आहे की, आमच्या हिंदू बहुल भागातील मुद्दे, हिंदू उमेदवार संसदेत चांगल्या प्रकारे मांडू शकतो.’ आम्ही नईमला विचारले की मग महिलांना वेगळे बसण्याची व्यवस्था का केली आहे? ते म्हणतात, ‘आम्हाला महिलांची सुरक्षा हवी आहे, म्हणूनच त्यांच्या बसण्यासाठी उत्तम व्यवस्था केली आहे. सध्या आपल्या देशात अशी परिस्थिती नाही की पुरुष आणि महिला प्रत्येक ठिकाणी एकत्र बसू शकतील.’ आम्ही कट्टरपंथी मार्ग सोडला, आम्ही महिलांचे समर्थक आहोतजमातच्या रॅलीत पोहोचलेले चलना म्युनिसिपल कमिटीचे अध्यक्ष नजरूल इस्लाम म्हणतात, ‘जमात धर्माच्या आधारावर बनलेला पक्ष आहे पण आमचं मत आहे की आम्ही प्रत्येक धर्माचे लोक मिळून मिसळून राहू शकतो. आम्ही कट्टरपंथी मार्ग सोडून दिला आहे. याचा पुरावा हाच आहे की आम्ही या जागेवरून हिंदू उमेदवाराला तिकीट दिलं आहे. आमच्यासोबत सर्व प्रकारचे लोक आहेत. आम्ही अजिबात कट्टरपंथी नाही आहोत.‘ महिलांना वेगळं बसवण्याच्या प्रश्नावर नजरूल म्हणतात, ‘महिलांना राजकारण करण्यासाठी जमात कोणतीही अडचण करत नाही.’ तरीही रॅलीचे वार्तांकन करत असताना आम्ही जमातच्या लक्ष्यावर आलो. पक्षाचे उमेदवार कृष्णा नंदी यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याने वार्तांकनासंदर्भात आमच्या कॅमेरा सहकाऱ्याला बोलावले आणि एकांतात खोलीत बोलले. त्याला सांगण्यात आले की, तुझ्यासोबत जो भारतीय आला आहे, साहेबांनी त्याचा पासपोर्ट आणि व्हिसा मागवला आहे, तो पाठवून दे. आम्ही समजलो होतो की, आता या नदीच्या बेटावर थांबणे सुरक्षित नाही. आम्ही तत्काळ रॅलीतून बाहेर पडलो आणि बोट घेऊन परत निघालो. आम्ही तिथून निघालो खरे, पण वाटेत वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे फोन येत राहिले. एका पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला फोन करून विचारले की, बांगलादेशात कधी आलात, कुठून आलात आणि कधी परत जाणार? नंतर आणखी एका अधिकाऱ्याचा फोन आला, त्याने स्वतःला लष्करी गुप्तचर विभागाचा अधिकारी सांगितले. त्यानेही आम्हाला अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. सुमारे 1 तास आम्हाला सतत फोन येत राहिले. कथेतील सहकार्य: बांगलादेशमधून अरिफुल शब्बीर इस्लाम
UGC News : विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा कवच: वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी 'एकसमान धोरण'; आता कॉलेजमध्येच मिळणार मानसोपचार तज्ज्ञांची मदत.
Pune ZP Election : आज ठरणार जिल्ह्याचे कारभारी! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज मतमोजणी
Pune ZP Election : जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि प्रतिबंधात्मक आदेश लागू; निकालाचा जल्लोष करताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन.
MSRTC New Bus : राजमाता जिजाऊंच्या स्मरणार्थ नव्या कोऱ्या बसचे नामकरण; महाराष्ट्राच्या परंपरेचे आणि अभिमानाचे प्रतीक ठरणार.
Baramati By-Election : राजकीय पक्षांसोबत बैठकांचे सत्र सुरू; मतदारयादी पारदर्शक आणि अचूक ठेवण्यासाठी प्रशासनाचे नियोजन.
EVM Security : ईव्हीएम ‘स्ट्राँग रूम’मध्ये सील! 24 तास सीसीटीव्हीचा पहारा अन् कडेकोट पोलीस बंदोबस्त
EVM Security : नोडल अधिकारी सचिन आखाडे यांच्याकडून तांत्रिक व्यवस्थापन; सील प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण आणि नोंदींचे काटेकोर पालन.
तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमानाला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाल्यानंतर गेल्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये राजकारणात बर्यापैकी उलथापालथ झाली असली तरी या अपघातानंतर जे विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत, त्यांना वेळीच उत्तरे दिली नाहीत तर या निमित्ताने निर्माण झालेले संशयाचे धुके अधिकच गडद होणार आहे.
लक्षवेधी : रशिया की व्हेनेझुएला?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतावरील टेरिफ शुल्क 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आणल्याचे जाहीर केले आहे. तथापि, भारत रशियाकडून तेलखरेदी बंद करून व्हेनेझुएलाकडून तेल घेणार असल्याचे म्हटले आहे
शिक्षण रोजगाराभिमुख करण्याचा प्रयत्न जरी यंदाच्या अर्थसंकल्पात केलेला दिसून येत असला, तरी अर्थसंकल्पाच्या एकूण अपेक्षित खर्चाच्या 2.6 टक्केच निधी शिक्षणासाठी देण्यात आला आहे, तो 6 टक्के तरी असावा, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.
Pune ZP Election : भोर तालुक्यातील ४ गट आणि ८ गणांसाठी आज निकाल; ७५.६२% मतदानाचा टक्का कोणाचे राजकीय भवितव्य ठरवणार?
Bogus Voting : केसनंदमध्ये बोगस मतदानाचं ‘रॅकेट’उघड! बनावट आधारकार्डसह ६ जण जाळ्यात..वाचा सविस्तर
Bogus Voting : ग्रामस्थांनी पुरावे देऊनही गुन्हा दाखल करण्यास उशीर; वाघोली पोलिसांच्या कार्यपद्धतीवर माजी सरपंचांचा गंभीर आरोप.
Alandi News : द्रायणी पुलावरील जीवघेण्या खड्यांमुळे प्रशासनाचा निर्णय; चाकणकडून येणाऱ्या वाहनांनी 'या' मार्गांचा वापर करण्याचे आवाहन.
Baramati Crime : जैनकवाडी फाट्यावर प्रवाशांना लुटून पळणाऱ्या टोळीचा सुपा रोडवर थरारक पाठलाग; दोन आरोपींना जाळ्यात ओढले, तिघे अंधाराचा फायदा घेऊन पळाले.
Attack on Sarpanch : उरुळी कांचन पोलिसांनी पाच जणांवर केला गुन्हा दाखल; सरपंच सुरज चौधरींच्या तक्रारीनंतर हवेलीच्या राजकारणात खळबळ.
Chikhali Accident : कुदळवाडीत भरधाव मिक्सरने दुचाकीला चिरडले; २२ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू
Chikhali Accident : जड वाहनांना प्रवेश बंदी असलेल्या रस्त्यावर मिक्सर चालकाचा हैदोस; डायमंड चौकात सकाळी ११ च्या सुमारास घडली भीषण घटना.
Mayor Ravi Landge : निगडी सेक्टर २३ केंद्राचा ११४ वरून ५५० एमएलडीपर्यंतचा प्रवास; ७५ टक्के शहराची तहान भागवणाऱ्या केंद्राचे महापौरांकडून सविस्तर ऑडिट.
ZP Election Result : मावळचा कौल कोणाला? ७७ टक्क्यांच्या मतदानाने उमेदवारांची धाकधूक वाढली; आज फैसला
ZP Election Result : अजित पवारांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; भावनिक आवाहन विरुद्ध विकासकामांचा प्रचार, आज दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार.
दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०९ फेब्रुवारी २०२६
पंचांगआज मिती माघ कृष्ण अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र विशाखा. योग वृद्धी.चंद्र राशी तूळ.भारतीय सौर १९ माघ शके १९४७.सोमवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ .मुंबईचा सूर्योदय ०७.१०, मुंबईचा सूर्यास्त ०६.३५, मुंबईचा चंद्रोदय ०१.१५ उद्याची , मुंबईचा चंद्रास्त ११.४३ , राहू काळ ०८.३५ ते १०.०१.कालाष्टमी,विशाखा वर्जदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
Maval Election वडगावमध्ये मतमोजणीची जय्यत तयारी; १७ फेऱ्या अन् २५ पथके, कोणाचं नशीब उघडणार?
Maval Election : वडगाव येथील नवीन प्रशासकीय इमारतीत सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात; ईव्हीएमच्या २० टेबल्सवर होणार 'काऊंटडाऊन'.
Satara Election : जावळीचा गड कोण राखणार? मतदानाची टक्केवारी घटल्याने ‘या’नेत्यांची धडधड वाढली
Satara Election : सर्वपक्षीय युती विरुद्ध भाजप अशा अटीतटीच्या लढतीत जावळीकरांनी कोणाला पसंती दिली, हे आज कळणार.
श्रीलंकेच्या फिरकीपुढे आयर्लंडची शरणागती
२० धावांनी थरारक विजय मिळवत यजमान संघ सरसकोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ च्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात यजमान श्रीलंकेने आयर्लंडचा २० धावांनी पराभव करत विजयाची मोहोर उमटवली. श्रीलंकेच्या फिरकी जोडीने — वानिंदू हसरंगा आणि महेश तीक्षणा — केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आयर्लंडला १४३ धावांत रोखण्यात यश आले.नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेने २० षटकात १६३ धावांचे सन्मानजनक आव्हान उभे केले. यष्टीरक्षक कुशल मेंडिसने ४३ चेंडूंत संयमी ५६ धावांची नाबाद खेळी केली. तर डावाच्या अखेरीस कामिंदू मेंडिसने अवघ्या १९ चेंडूंत ४४ धावांची वादळी खेळी करत संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. नंतर१६४ धावांचा पाठलाग करताना आयर्लंडने ८ व्या षटकापर्यंत ५६ धावा करत चांगली सुरुवात केली होती. मात्र, श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी सामन्याचे चित्र बदलले.वानिंदू हसरंगाने ४ षटकात २५ धावा देत ३ महत्त्वाचे बळी घेतले. त्याने स्थिरावलेल्या हॅरी टेक्टरला (४०) बाद करत आयर्लंडचे कंबरडे मोडले. महेश तीक्षणाने ४ षटकात केवळ २३ धावा देत ३ फलंदाजांना तंबूत धाडले. तसेच मथीशा पाथिरानाने अंतिम षटकात भेदक मारा करत २ बळी घेतले आणि आयर्लंडचा डाव १९.५ षटकात १४३ धावांवर संपुष्टात आणला. आयर्लंडकडून रॉस अडायर (३४) आणि हॅरी टेक्टर (४०) यांनी लढा दिला, पण मधली फळी एकापाठोपाठ एक कोसळल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. १०५/३ वरून आयर्लंडचा संघ १४३ धावांत सर्वबाद झाला.सामन्याचा धावता आढावा:श्रीलंका: १६३/६ (२० षटके) - कुशल मेंडिस ५६, कामिंदू मेंडिस ४४.आयर्लंड: १४३/१० (१९.५ षटके) - हॅरी टेक्टर ४०, रॉस अडायर ३४.निकाल: श्रीलंका २० धावांनी विजयी.
येत्या १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या एआय समिटसाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) भारत दौऱ्यावर येणार आहेत. मात्र त्याआधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेची (डीएसी) फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बैठक होणार आहे.
Sayaji Shinde : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अभिनेते सयाजी शिंदे यांनी शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.
मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई
राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीतमुंबई : मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान राखीव मतदान यंत्र सुरक्षा कक्षात वेळेत जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि मोहोळ येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली गेलेली नाहीत. ती राखीव स्वरूपातील होती. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत कोणतीही अनियमितता किंवा गैरप्रकार आढळून आलेला नाही. तरीसुद्धा ही मतदान यंत्र वेळेत सुरक्षा कक्षात जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे.मोहोळ तालुक्यातील २२० मतदान केंद्रांवर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदानानंतर काही राखीव मतदान यंत्र तात्काळ सुरक्षा कक्षात जमा न झाल्याने संभ्रम निर्माण झाला. कुरूल (५५) गटातील काही मतदान केंद्रांसाठी नियुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडील ०२ कंट्रोल युनिट व ०२ बॅलेट युनिट यासंदर्भात हा प्रकार घडला.दरम्यान, ही मतदान यंत्रे एका वाहनातून खासगी ठिकाणी नेण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिक व राजकीय प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. घटनेची माहिती मिळताच निवडणूक प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सर्व उपस्थितांच्या साक्षीने पंचनामा करण्यात आला व ही मतदान यंत्रे राखीव स्वरूपातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सदर मतदान यंत्रे शासनाच्या सुरक्षा कक्षात सीलबंद करण्यात आली आहेत.
Bigg Boss Marathi : “बिग बॉस मराठीच्या घरातून ओमकार राऊतची EXIT !
'बिग बॉस मराठी – भाऊचा धक्का’च्या एपिसोडमध्ये (Bigg Boss Marathi) घरात मोठा धक्का बसला. डेंजर झोनमध्ये आयुष - ओमकार आले आणि ओमकार राऊत घराबाहेर गेला. रितेश भाऊंच्या उपस्थितीत झालेल्या या निर्णायक क्षणाने सदस्यांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडलं.
बांगलादेशातील इन्किलाब मंचचा नेता शरिफ उस्मान हादी याच्या हत्येच्या निष्पक्ष आणि पारदर्शक तपासासाठी बांगलादेशातील डॉ. मुहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारने संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क विषयक कार्यालयाला सहकार्याचे आवाहन केले आहे.
Praful Patel : प्रफुल पटेल यांनी दिल्लीत मोदी-शहा आणि नाशिकमध्ये फडणवीस यांची घेतलेली भेट नव्या राजकीय समीकरणांचे संकेत देत आहे.
नवख्या वाटणाऱ्या संघांनी अनुभवी संघांना रडवले
मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत पाच सामने झाले असून सहावा श्रीलंका विरुद्ध आयर्लंड हा सामना सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांचे निकाल बघितले तर नवख्या वाटणाऱ्या संघांनी अनुभवी संघांना रडवले असेच म्हणावे लागेल.नेदरलँड आणि पाकिस्तान यांच्यात झालेला सामना शेवटच्या म्हणजेच विसाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूपर्यंत रंगला. हा सामना पाकिस्तानने तीन विकेट राखून जिंकला. पण या सामन्यात नेदरलँडने १९.५ षटकांत सर्वबाद १४७ तर पाकिस्तानने १९.३ षटकांत ७ बाद १४८ धावा केल्या.अमेरिका आणि भारत यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने २० षटकांत ९ बाद १६१ धावा केल्या. अमेरिकेने २० षटकांत आठ बाद १३२ धावा केल्या. अमेरिकेच्या फलंदाजांनी सुरुवातीला चौफेर फटकेबाजी केली. अमेरिकेसारख्या भारताच्या तुलनेत नवख्या असलेल्या संघाने खूप चांगली कामगिरी केली. यामुळे २९ धावांनी विजय मिळाला तरी सामन्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत भारतीय संघ दबावात होता, असेच मत अनेक क्रिकेटतज्ज्ञांनी व्यक्त केले.रविवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्धचा सामना न्यूझीलंडने पाच विकेट राखून जिंकला. पण इंग्लंडची नेपाळविरुद्ध जिंकताना पुरती दमछाक झाली. इंग्लंडने २० षटकांत ७ बाद १८४ धावा केल्या तर नेपाळने २० षटकांत ६ बाद १८० धावा केल्या. अखेर इंग्लंडने नेपाळ विरुद्धचा सामना चार धावांनी जिंकला.आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक २०२६ नेदरलँड्स १४७ (१९.५) आणि पाकिस्तान १४८-७ (१९.३) - पाकिस्तान ३ विकेटनी जिंकला वेस्ट इंडीज १८२-५ (२०) आणि स्कॉटलंड १४७ (१८.५) - वेस्ट इंडिज ३५ धावांनी जिंकला भारत १६१-९ (२०) आणि अमेरिका १३२-८ (२०) - भारत २९ धावांनी जिंकला अफगाणिस्तान १८२-६ (२०) आणि न्यूझीलंड १८३-५ (१७.५) - न्यूझीलंड ५ विकेटनी जिंकला इंग्लंड १८४-७ (२०) आणि नेपाळ १८०-६ (२०) - इंग्लंड ४ धावांनी जिंकला
Jack Lang : फ्रान्सचे माजी सांस्कृतिक मंत्री जॅक लँग यांचा राजीनामा
एपस्टीन फाइल्समध्ये उल्लेख आढळल्यामुळे फ्रान्सचे माजी सांस्कृतिक मंत्री जॅक लँग (Jack Lang) यांनी पॅरिस कल्चरल सेंटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. अरब वर्ल्ड इन्स्टिट्युटवर फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देखरेख केली जात असते.
टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये शाकिब अव्वलस्थानी
मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. स्पर्धा सुरू होताच विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची चर्चा सुरू झाली आहे. आकडेवारीनुसार आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये पहिल्या पाच जणांत एकही भारतीय नाही.बांगलादेशचा शाकिब अल हसन पहिल्या, पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी दुसऱ्या, अफगाणिस्तानचा राशिद खान तिसऱ्या, श्रीलंकेचा लसिथ मलिंगा चौथ्या, श्रीलंकेचाच पिन्नदुवागे वानिंदु हसरंगा डी सिल्वा पाचव्या स्थानावर आहे.शाकिब अल हसनने आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकात २००७ ते २०२४ दरम्यान ४३ सामन्यांत ५० बळी घेतले आहेत. शाहिद आफ्रिदीने ३४ सामन्यांत ३९, राशिद खानने २४ सामन्यांत ३८, लसिथ मलिंगाने ३१ सामन्यांत ३८, पिन्नदुवागे वानिंदु हसरंगा डी सिल्वाने २० सामन्यांत ३७ बळी घेतले आहेत.
मतदानाचा ‘पोर’खेळ नडला..! मुलाला ईव्हीएमचं बटण दाबायला लावणं मोहिते पाटलांना महागात
Arjun Singh Mohite Patil : उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या अल्पवयीन मुलाकडून मतदान करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी एसटी प्रशासन झाले सज्ज, जादा १३५ बसेसचे नियोजन
कणकवली : कोकणची काशी म्हणून ओळखली जाणारी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातून विविध मार्गावर जादा १३५ एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. १० फेब्रुवारी पर्यंत ही व्यवस्था करण्यात आली आहे. यात कुडाळ - आंगणेवाडी १५, वेंगुर्ला आगारासाठी कुडाळ - आंगणेवाडी १०, कसाल - हिवाळे - आंगणेवाडी ४, कसाल - खोटले - आंगणेवाडी ५, निरुखे - पांग्रड आंगणेवाडी ३, पणदूर - ओरोस आंगणेवाडी १ अशा कुडाळ आगारातून ३८ बसेस सोडण्यात येणार आहेत.मालवण आगारातून मालवण - आंगणेवाडी १०, सावंतवाडी आगारासाठी मालवण - आंगणेवाडी १३, देवबाग तारकर्ली - आंगणेवाडी २, आनंदव्हाळ आंगणेवाडी, डांगमोडे - आंगणेवाडी, सर्जेकोट - आंगणेवाडी, मालोंड - आंगणेवाडी, देवली - वायरी - आंगणेवाडी, वराड - आंगणेवाडी, तळगाव - सुकळवाड - आंगणेवाडी, तिरवडे आंगणेवाडी, कट्टा आंगणेवाडी, धामापूर - आंगणेवाडी अशी प्रत्येकी एक बस, मसुरे आंगणेवाडी ४, चौके आंगणेवाडी २ अशा मालवण आगारातून ४१ बसेस सोडण्यात येतील.कणकवली आगारातून २६, विजयदुर्ग आगारासाठी ५, सावंतवाडी आगारासाठी १०, असगणी - असरोंडी - आंगणेवाडी २ अशा ४३ बसेस कणकवली आगारातून सोडण्यात येणार आहेत.देवगड आगारातून देवगड - आंगणेवाडी, हिंदळे - मुणगे - आंगणेवाडी प्रत्येकी २, आचरा - आंगणेवाडी ३, तोंडवली - तळाशील - आंगणेवाडी, कुडोपी आंगणेवाडी, आरे आंगणेवाडी, आचरा चिंदर बांदिवडे - आंगणेवाडी अशी प्रत्येकी १ अशा ११ बसेस देवगड आगारातून, तर पाट - परूळे - आंगणेवाडी आडारीमार्गे २ अशा वेंगुर्ला आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
मुंबई विमानतळावर 'विश्वविजेत्या'युवा सेनेचे शाही स्वागत, स्वागताला चाहत्यांची अलोट गर्दी
मुंबई : हरारेच्या मैदानावर तिरंगा फडकवून सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरणारा भारताचा युवा संघ आज मायदेशात दाखल झाला. दुपारी मुंबई विमानतळावर विमानाने लँडिंग करताच खेळाडूंचे जंगी आणि शाही स्वागत करण्यात आले. हरारेमध्ये इंग्लंडला १०० धावांनी धूळ चारून विश्वविजेतेपदाचा मुकुट परिधान करणाऱ्या या 'यंग ब्रिगेड'ला पाहण्यासाठी मुंबईकरांनी विमानतळाबाहेर एकच गर्दी केली होती.कर्णधार आयुष म्हात्रे आणि फलंदाजीतील नवा तारा वैभव सूर्यवंशी विमानतळाबाहेर येताच 'इंडिया-इंडिया'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात खेळाडूंचे स्वागत झाले. चाहत्यांचे हे अफाट प्रेम पाहून कर्णधार आयुष म्हात्रे भारावून गेला होता. खेळाडूंनी चाहत्यांचे अभिवादन स्वीकारत आणि सेल्फी देत आपला मार्ग काढला. कुटुंबियांच्या भेटीने खेळाडूंचे डोळेही पाणावले होते. यावेळी कर्णधार आयुष म्हात्रे याच्या वडिलांनी, योगेश कमलाकर म्हात्रे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आयुषने विश्वचषक जिंकून आणला आणि संपूर्ण राष्ट्राला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे, असे म्हणत त्यांनी आपल्या मुलाच्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.भारताने यापूर्वी २०००, २००८, २०१२, २०२८ आणि २०२२ या वर्षी १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आता झिम्बाब्बे आणि नामिबिया येथे झालेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा भारतीय संघाने जिंकला. भारत या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. तसेच या सामन्यात अंतिम सामन्यात भारताने ५० षटकात विक्रमी ९ बाद ४११ धावा उभारल्या होत्या. यामध्ये एकट्या वैभव सूर्यवंशीने ८० चेंडूत १५ चौकार आणि १५ षटकारांसह १७५ धावा केल्या होत्या. आयुष म्हात्रेने ५३ धावांची खेळी केली होती. याशिवाय संघातील इतर खेळाडूंनीही चांगले योगदान दिले होते. त्यानंतर ४१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३११ धावांवरच सर्वबाद झाला. भारताकडून गोलंदाजीत आरएस आंब्रिश, दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांनी मोलाचे योगदान दिले होते.
मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा
नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या 'कॅसानूर फॉरेस्ट डिसीज' अर्थात 'मंकी फिव्हर'वर भारतीय संशोधकांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने या गंभीर आजारावर पूर्णतः स्वदेशी बनावटीची, सुधारित आणि अधिक प्रभावी लस विकसित केली असून, या लसीच्या मानवी वैद्यकीय चाचणीच्या पहिल्या टप्प्याला आता अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. या संशोधनामुळे विशेषतः महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.काय आहे मंकी फिव्हर आणि त्याचा धोका?कॅसानूर फॉरेस्ट डिसीज हा प्रामुख्याने 'टिक-बॉर्न' म्हणजेच गोचीडजन्य विषाणूमुळे होणारा आजार आहे. १९५७ मध्ये कर्नाटकच्या कॅसानूर जंगलात या विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता, म्हणून याला ' केएफडी' असे नाव पडले. हा विषाणू प्रामुख्याने 'हेमाफिसालिस स्पिनिगेरा' या प्रकारच्या गोचिडांमार्फत पसरतो. हे गोचीड बाधित माकडे आणि उंदरांना चावल्यानंतर जेव्हा मानवाला चावतात, तेव्हा या विषाणूचा संसर्ग होतो. माकडांच्या मृत्यूशी या आजाराचा थेट संबंध असल्याने याला स्थानिक भाषेत 'मंकी फिव्हर' किंवा 'मंकी डिसीज' म्हटले जाते. या आजारात अचानक तीव्र ताप येणे, उलट्या, जुलाब आणि गंभीर प्रकरणांमध्ये शरीरातून रक्तस्राव होणे अशी लक्षणे दिसतात. धक्कादायक बाब म्हणजे, बाधित रुग्णांपैकी ५ ते १० टक्के रुग्णांचा यात मृत्यू होतो आणि यावर अद्याप कोणताही ठोस औषधी उपचार उपलब्ध नाही.महाराष्ट्रातील पश्चिम घाटासाठी 'कवच'महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये काम करणारे वन कर्मचारी, शेतकरी आणि लाकूडतोडे यांना या आजाराचा सर्वाधिक धोका असतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला, म्हणजेच जानेवारी ते एप्रिल या काळात या आजाराचा प्रादुर्भाव शिखरावर असतो. या पार्श्वभूमीवर, आयसीएमआरच्या अखत्यारीतील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि भारतीय रोगप्रतिकारशास्त्र संस्था यांनी संयुक्तपणे ही 'अॅडज्युव्हांटेड इनएक्टिव्हेटेड' लस विकसित केली आहे. ही लस शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अधिक सक्षमपणे जागृत करण्यास मदत करते. ही दोन मात्रांची लस असून, २८ दिवसांच्या अंतराने तिचे दोन डोस दिले जातील.
अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह
भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली.केंद्रीय कृषी मंत्री चौहान रविवारी त्यांच्या भोपाळ निवासस्थानी भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार कराराबाबत पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, हा व्यापार करार संतुलित रणनीती आणि सकारात्मक संवादातून झाला आहे. या व्यापार करारात भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्व चिंता दूर करण्यात आल्या आहेत. हा करार आपल्या कृषी उत्पादनांसाठी नवीन संधी प्रदान करतो.ते म्हणाले की, भारतीय शेती आणि शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यूपीए सरकारच्या काळात भारताची कृषी अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती आणि आता आपण वेगाने तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आपल्या शेतकऱ्यांचे मुख्य बळ असलेल्या आपल्या सर्व कृषी उत्पादनांना या करारातून वगळण्यात आले आहे. ते म्हणाले की भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार ऐतिहासिक आणि स्वतःमध्ये अभूतपूर्व आहे. तो भारतीय अर्थव्यवस्थेला नवीन उंचीवर नेईल आणि ती गतिमान करेल. हा करार केवळ एक व्यापार करार नाही तर भारताच्या वाढत्या जागतिक प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. ते म्हणाले की, हा व्यापार करार राजनैतिक, विकास आणि प्रतिष्ठेचे एक उत्तम उदाहरण आहे. हा व्यापार करार केवळ आपल्या शेतकऱ्यांचे पूर्णपणे संरक्षण करत नाही तर आपल्या कृषी उत्पादनांसाठी नवीन संधी देखील प्रदान करतो.चौहान म्हणाले की शेती आणि कृषी उत्पादनांकडे पाहता, भारतीय शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवणारे कोणतेही उत्पादन समाविष्ट केलेले नाही. अशा सर्व वस्तू करारातून वगळण्यात आल्या आहेत. सोयाबीन, कॉर्न, तांदूळ, गहू, साखर, भरड धान्य, कुक्कुटपालन, दुग्धजन्य पदार्थ, केळी, स्ट्रॉबेरी, चेरी, लिंबूवर्गीय फळे, हिरवे वाटाणे, हरभरा, मूग, तेलबिया, इथेनॉल आणि तंबाखू यासारख्या उत्पादनांवर कोणत्याही प्रकारच्या शुल्कात सूट देण्यात आलेली नाही. आमची प्राथमिक चिंता ही होती की, आमचे मुख्य धान्य संरक्षित राहिले पाहिजे आणि ते सर्व संरक्षित केले गेले आहेत. मुख्य धान्ये, फळे किंवा दुग्धजन्य पदार्थांसाठी अमेरिकेसाठी कोणतेही दरवाजे उघडलेले नाहीत. केंद्रीय कृषीमंत्र्यांनी व्यापार करारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवरही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, अमेरिका आणि भारत यांच्यातील करारानंतर विरोधी पक्ष व्हेंटिलेटरवर गेला आहे. विरोधी पक्षाला भीती होती की, करारानंतर त्यांना गोंधळ घालण्याची संधी मिळेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीमुळे ते व्हेंटिलेटरवर आहेत.
T20 World Cup 2026 : हलक्यात नाही घ्यायचं ! इंग्लंडचा थरारक विजय; नेपाळने शेवटपर्यंत झुंजवलं
वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या (T20 World Cup 2026) ग्रुप सीतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने नवख्या नेपाळविरुद्ध अवघ्या ४ धावांनी रोमांचक विजय मिळवला.
अखंड भारताचा उदय होईल, भारत तोडण्याची भाषा करणारेच तुटतील : डॉ. मोहन भागवत
मुंबई : भारत तोडण्याचा विचार करणारे स्वतःच तुटतील; हा १९४७ चा भारत राहिलेला नाही. आगामी २०४७ मध्ये अखंड भारताच्या उदयाची कल्पना आपण सर्वांनी करायला हवी, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. संघाच्या स्थापनेच्या १०० वर्षांच्या निमित्ताने मुंबईत आयोजित ‘नवे क्षितिज’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते.डॉ.भागवत यांनी समाज, राष्ट्रीय एकात्मता, आरक्षण, लोकसंख्या संतुलन, भ्रष्टाचार, तंत्रज्ञान, शेती आणि अर्थव्यवस्था या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. गुंडगिरी ही संपूर्ण समाजाची चूक नसून समाज सजग राहिल्यास विध्वंसक प्रवृत्ती आटोक्यात आणता येतात, असे त्यांनी सांगितले. हिंदू आणि शीख समाजातील नातेसंबंधांवर बोलताना त्यांनी दोन्ही समाजांमध्ये रक्तसंबंध तसेच रोटी-बेटीचे नाते असल्याचे नमूद केले. श्री गुरु ग्रंथसाहिबमध्ये संपूर्ण देशातील संतांची वाणी असल्याचे सांगत हिंदू-शीख वेगळे असल्याचा विचार चुकीचा असून आपण सर्व एकच आहोत, असे ते म्हणाले.आरक्षणाबाबत बोलताना त्यांनी संविधानानुसार असलेल्या सर्व आरक्षणांना संघाचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. जातीय भेदभाव पूर्णपणे नष्ट व्हायला हवा, असे सांगत, ज्यांनी हजारो वर्षे विषमता सहन केली त्यांच्यासाठी काही काळ सहन करणे हा स्वस्त सौदा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आजची राजकीय व्यवस्था ही मतांसाठी चालते, अशी टीकाही त्यांनी केली.भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर केवळ कायदे आणि शिक्षांमुळे भ्रष्टाचार संपणार नाही; संस्कारांमुळेच तो नष्ट होईल, असे ते म्हणाले. लोकसंख्या संतुलनाबाबत विवाह हा संस्कार असून तो जबाबदारीने निभावला पाहिजे, असे सांगत जबरदस्तीचे धर्मांतर आणि घुसखोरी ही असंतुलनाची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वेच्छेने होणाऱ्या धर्मांतराला विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नवीन तंत्रज्ञान आणि एआयच्या युगात रोजगाराच्या संधी कमी होऊ नयेत, यासाठी योग्य धोरणांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. हाताने काम करणाऱ्यांचा सन्मान वाढवणे आणि अर्थव्यवस्थेचे विकेंद्रीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.शेतीबाबत बोलताना सेंद्रिय शेतीमुळे खर्च कमी होतो, असे सांगत साठवणूक व प्रक्रिया सुविधांमुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळू शकतील, यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये अनन्या पांडे, करण जोहर, अभिनेता जॅकी श्रॉफ तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी मिलिंद म्हैस्कर आणि मनीषा म्हैस्कर यांचा समावेश होता.
सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले
गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी तब्बल ४४ नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या महापालिकेच्या बालेकिल्ल्यात प्रबळ विरोधक म्हणून तरी आता भाजपचे नाव घेतले जात आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीचे शासन महापालिकेत असावे, आणि ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून वसई-विरारचा विकास व्हावा, असा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला. मात्र बहुजन विकास आघाडीच्या शिट्टीने भाजपचे तिसरे इंजिन रोखले. असे असले तरी ४४ नगरसेवकांचा मोठा डबा मात्र भाजपने डबल इंजिनच्या जोरावर काम करण्यासाठी वसई-विरारच्या राजकारणात पहिल्यांदा आपल्या इंजिनसोबत जोडून घेतला आहे.आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळख असलेल्या पालघर जिल्ह्याची मोठी राजकीय ओळख म्हणजे माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा बहुजन विकास आघाडी हा पक्ष. अनेक ग्रामपंचायती, पंचायत समिती, नगरपरिषद राजकारणात गेली ३५ वर्ष बहुजन विकास आघाडीचेच एकहाती वर्चस्व आहे. वसई-विरार महापालिका झाल्यानंतर दोन्ही वेळा महापालिकेवर बहुजन विकास आघाडीचा झेंडा राहिला. बोईसर, नालासोपारा आणि वसई या तीन विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचेच आमदार अशी राजकीय आणि संघटनशक्ती असलेल्या बहुजन विकास आघाडीला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र मोठा हादरा बसला. बहुजन विकास आघाडीचे विधानसभेचे तीनही गड महायुतीच्या उमेदवारांनी जिंकले. त्यानंतर १३- १४ महिन्यातच झालेल्या वसई-विरार महापालिका निवडणुकीत २०१५ च्या तुलनेत नगरसेवकांची संख्या घटली असली तरी बहुजन विकास आघाडीने ७१ नगरसेवकांच्या माध्यमातून तिसऱ्यांदा महापालिकेवर आपला झेंडा फडकवला. या निकालाने २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत बहुजन विकास आघाडीच्या समर्थकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, तर दुसरीकडे सतत १० वर्ष महापालिकेच्या सभागृहात केवळ एक नगरसेवक राहिलेल्या भाजपला ४४ असा मोठा आकडा असलेले नगरसेवक निवडून आणण्यात यश आल्याने भाजपच्या गोटातही सत्ता मिळाली नाही याचे एवढे दुःख नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काही भागात अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे असे संकेत या निकालाने दिले आहेत.सर्वांगीण विकासासाठी समन्वय महत्वाचा : महापालिकेत आता बहुजन विकास आघाडी आणि राज्य आणि केंद्र शासनात महायुतीची सत्ता आहे. नवनिर्वाचित महापौर अजीव पाटील हे पदावर विराजमान होताच त्यांनी सर्वांना सोबत घेऊन वसई-विरारचा विकास करण्याची ग्वाही दिली आहे. महापालिका क्षेत्रात तीन आमदार येतात. त्यामुळे विकासकामांसाठी आमदार आणि महापौर यांच्यामधील समन्वय महत्वाचा राहणार आहे. अतिक्रमित मालमत्ता धारकांना शास्ती, ओसी धोरण, झोपडपट्टी पुनर्विकास, शहराच्या कानाकोपऱ्यात पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी, फेरीवाला धोरण, पालिका कर्मचाऱ्यांना नियमित करणे आणि उत्पन्न वाढ अशा अनेक बाबी महापालिकेला भविष्यात कराव्या लागणार आहेत. त्यामुळे या सर्व कामांसाठी कोणाची काय भूमिका राहणार हे तर येणारा काळच सांगणार आहे. पक्ष संघटन वाढविण्यासाठी दोन्ही राजकीय पक्षांनी खुशाल प्रयत्न करावेत, मात्र वसई-विरारच्या नागरिकांसाठी मतभेद न करता विकासाचे इंजिन सुसाट पळवावे, अशी अपेक्षा मतदारांकडून केली जात आहे.
ऑडिटमध्ये एक दिवस उशीर झाल्यास ७५हजारांचा दंड, १ एप्रिलपासून नवीन नियम
मुंबई : केंद्र सरकारने वित्त विधेयक २०२६ द्वारे कर नियम आणखी कडक करण्याचे संकेत दिले आहेत. विशेषतः ऑडिटशी संबंधित बाबींमध्ये निष्काळजीपणा आता महागात पडू शकतो. नवीन प्रस्तावानुसार, ऑडिट अहवाल किंवा अकाउंटंटचे अहवाल वेळेवर सादर न केल्यास मोठा दंड आकारला जाईल. सरकारने विवेकाधीन दंड प्रणालीऐवजी निश्चित आणि ग्रेडेड फी प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन नियम १ एप्रिल २०२६ पासून लागू होतील आणि २०२६-२७ कर वर्षापासून लागू होतील.वित्त विधेयकात प्रस्तावित कलम ४२८ आणि कलम ६३ अंतर्गत, ऑडिट अनुपालनाला प्राधान्य देण्यात आले आहे. करदात्याने त्यांचे खाते ऑडिट केले नाही किंवा निर्धारित वेळेत ऑडिट अहवाल दाखल केला नाही तर त्यांना किमान ७५,००० रुपये दंड आकारला जाईल. विशेष म्हणजे, फक्त एका दिवसाच्या विलंबामुळे देखील ७५,००० रुपये शुल्क आकारले जाईल. विलंब ३० दिवसांपेक्षा जास्त काळ राहिला तर दंडाची रक्कम वाढून १५०,००० रुपये होईल. दुसरीकडे, कलम १७२ ने अकाउंटंट रिपोर्ट वेळेवर सादर न केल्याबद्दल दंड देखील कडक केला आहे. करदात्याने अकाउंटंटचा अहवाल सादर केला नाही तर पहिल्या महिन्यासाठी ५०,००० रुपये शुल्क आकारले जाईल. विलंब सुरू राहिला तर ही रक्कम १००,००० रुपयांपर्यंत वाढेल. सरकारचा स्पष्ट संदेश असा आहे की ऑडिट आणि व्यावसायिक अहवाल हलक्यात घेण्याची सवय सोडून दिली पाहिजे. मात्र, सामान्य करदात्यांनाही काही सवलत देण्यात आली आहे. आयकर रिटर्न भरण्यास विलंब झाल्यास शुल्क मर्यादित करण्यात आले आहे. ५ लाखांपर्यंत एकूण उत्पन्न असलेल्यांसाठी हे शुल्क कमाल १,००० रुपये असेल. इतर प्रकरणांमध्ये कमाल शुल्क ५,००० रुपये इतके निश्चित केले आहे. सरकारचे म्हणणे आहे की ही नवीन प्रणाली करदात्यांना नियमांची स्पष्ट समज प्रदान करेल.
'कीवीं'चा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय, टिम सायफर्ट आणि ग्लेन फिलिप्सची वादळी खेळी
चेन्नई : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मधील एका अत्यंत चुरशीच्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचे १८३ धावांचे आव्हान १७.५ षटकांतच पूर्ण करत ५ गड्यांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानच्या गुलबदिन नैबने झुंजार अर्धशतक झळकावूनही न्यूझीलंडच्या आक्रमक फलंदाजीपुढे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषकातील सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळवला गेला. अफगाणिस्तानने गोलंदाजी-फलंदाजी विभागात चांगली कामगिरी केली, पण संघ विजय मात्र मिळवू शकला नाही. न्यूझीलंडने यासह टी-२० विश्वचषक २०२४ मधील पराभवाचा बदला घेतला आहे. त्या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडला फक्त ७५ धावांवर सर्वबाद केले होते. पण आता किवी संघाने २०२६च्या विश्वचषकात विजय मिळवत बदला घेतला.अफगाणिस्तानने दिलेल्या १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सेफर्ट व फिलिप्सने शानदार खेळी केली. मुजीबने दुसऱ्या षटकात फिन एलन व रचिन रवींद्र यांना क्लीन बोल्ड केलं. पण फिलिप्स सेफर्टच्या ७४ धावांच्या भागीदारीने संघाला सामन्यात कायम ठेवले. टिम सायफर्टने ४२ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६५ धावा तर ग्लेन फिलिप्सने २५ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ४२ धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी महत्त्वाची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. तर मार्क चॅपमनने २८ धावांचे योगदान दिले. तर अखेरीस सँटरन व डॅरिल मिचेल यांनी संघाला विजय मिळवून दिला.अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रहमानुल्ला गुरबाज २७ धावा करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. गुरबाज झाद्रान फर्ग्युसनच्या एका षटकात झेलबाद झाले. यानंतर गुलबदिन नायबने वादळी खेळी केली. गुलबदिनने ३५ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ६३ धावा केल्या. तर सदिकउल्ला अटलने २९ धावांचं योगदान दिलं. तर दारविश रसूलीने १३ चेंडूत २० धावा केल्या. तर ओमरझाईने १४ धावा आणि नबीने १० धावांचे योगदान दिले. यासह अफगाणिस्तानचा संघ २० षटकांत ६ बाद १८२ धावा करण्यात यशस्वी ठरला. फिरकीसाठी अनुकूल असलेल्या चेपॉकच्या खेळपट्टीवर न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर मॅट हेन्री, जेकब डफी, रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.सामन्याची थोडक्यात गुणतालिका:अफगाणिस्तान: १८२/६ (२० षटके) - गुलबदिन नैब ६३, फर्ग्युसन २/४०.न्यूझीलंड: १८३/५ (१७.५ षटके) - टिम सायफर्ट ६५, मुजीब उर रहमान २/३१.
इंग्लंडचा ४ धावांनी निसटता विजय, नेपाळची झुंज अपयशी
मुंबई : टी-२० विश्वचषकातील एका अत्यंत चुरशीच्या सामन्यात इंग्लंडने नेपाळचा ४ धावांनी पराभव केला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात नेपाळने १८५ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडला घाम फोडला होता, मात्र अनुभवाच्या जोरावर इंग्लंडने बाजी मारली.नेपाळने आसिफ शेखला झटपट गमावले. त्यानंतर कुशल भुर्टेल आणि रोहित पौडेल यांनी वेगवान भागीदारी केली. भुर्टेल १७ चेंडूत २९ धावांची खेळी करून बाद झाला. यानंतर रोहितला देवेंद्र सिंग एरीची साथ मिळाली. ३४ चेंडूत ३९ धावांची खेळी करून रोहित बाद झाला. देवेंद्रने सूत्रं हाती घेतली. २९ धावांत ६ चौकार आणि एका षटकारांसह ४४ धावांची खेळी केली. धावगतीचं आव्हान वाढत असताना लोकेश बामने चौकार, षटकारांची पखरण करत सामना नेपाळच्या बाजूने फिरवला. जोफ्रा आर्चरच्या चौथ्या षटकात नेपाळने २२ धावा चोपून काढल्या.प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने जेकब बेथेल आणि कर्णधार हॅरी ब्रूक यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर १८४ धावांची मजल मारली. भरवशाचा अनुभवी जोस बटलर २६ धावा करून तंबूत परतला. फिल सॉल्ट झटपट बाद झाला. टॉम बॅन्टनचा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न अंगलट आला. ब्रूक आणि बेथेल यांनी चांगली भागीदारी केली. बेथेलने ३५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५५ धावांची खेळी केली.बेथेल बाद झाल्यानंतर ब्रूकने सूत्रे हाती घेतली. नेपाळने नियमित अंतरात विकेट्स घेतल्या. विल जॅक्सने १८ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारासह नाबाद ३९ धावांची खेळी केली. ब्रूकने ३२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. नेपाळतर्फे दिपेंद्र सिंग एरी आणि नंदन यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच १८ चेंडूत ३९ धावांची खेळी करणाऱ्या विल जॅक्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.लियाम डॉसनची फिरकी ठरली निर्णायकइंग्लंडच्या विजयात फिरकीपटू लियाम डॉसन चमकला. त्याने ४ षटकांत केवळ २१ धावा देत २ महत्त्वाचे बळी टिपले आणि नेपाळच्या धावगतीला लगाम घातला. त्याला विल जॅक्स आणि सॅम करन यांनी प्रत्येकी १ बळी घेत चांगली साथ दिली.
Assembly Election 2026 : आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा मार्च २०२६ च्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता
Wagholi News : जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान करणाऱ्या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान करणाऱ्या सहा जणांना पकडले. त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड जप्त करण्यात आले. नगर रस्त्यावरील केसनंद भागात असलेल्या एका मतदान केंद्रावर ही घटना घडली.
India-US Agreement : भारत-अमेरिका कराराच्या निषेधार्थ शेतकरी संघटनांकडून भारत बंदची हाक
भारत-अमेरिका व्यापार कराराला (India-US Agreement) शेतकरी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. अमेरिकन शेती उत्पादनांवरील कर कमी केल्याने किंवा पूर्णपणे हटवल्याने भारतीय शेतकऱ्यांवर नकारात्मक परिणाम होईल, अशी भीती संयुक्त किसान मोर्चाने व्यक्त केली आहे.
मोहम्मद खान अन्सारीने शिक्षिकेला केली मारहाण
बडोदा (वडोदरा) : बारावीच्या परीक्षेसाठी २० मिनिटे उशिराने आलेल्या मोहम्मद खान अन्सारीला शिक्षिकेने जाब विचारला. शिक्षिकेने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी मोहम्मद खान अन्सारीने शिक्षिकेला मारहाण केली. घरात मला कोणीही उलट प्रश्न विचारत नाही मग तू मला विचारणारी कोण ? अशी उद्दाम बडबड करत मोहम्मद खान अन्सारीने धुमाकूळ घातला. या प्रकरणात गुजरात पोलिसांनी मोहम्मद खान अन्सारीला अटक केली.गुजरातमध्ये बारावीची परीक्षा सुरू आहे. पेपर लिहिण्यासाठी मोहम्मद खान अन्सारी वर्गात २० मिनिटे उशिरा पोहोचला. परीक्षेच्यावेळी एवढा उशिरा पोहोचल्यामुळे वर्गात ड्युटीवर असलेल्या शिक्षिकेने मोहम्मद खान अन्सारीला जाब विचारला. यावर उत्तर देण्याऐवजी घरात मला कोणीही उलट प्रश्न विचारत नाही मग तू मला विचारणारी कोण ? अशी उद्दाम बडबड करत मोहम्मद खान अन्सारीने शिक्षिकेलाच मारहाण सुरू केली. काही विद्यार्थ्यांनी मध्यस्थी केल्यामुळे शिक्षिका वाचली. या प्रकरणात पेपर झाल्यानंतर शिक्षिका पोलिसांकडे लेखी तक्रार नोंदवणार याची जाणीव मोहम्मद खान अन्सारीला झाली. त्याने परीक्षा झाल्यानंतर वडिलांसह मोठा जमाव आणून शिक्षिकेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण शिक्षिका डगमगली नाही. तिने पोलिसांकडे लेखी तक्रार दिली.पोलिसांनी तक्रारीआधारे तपास सुरू केला आहे. शाळेतीली सीसीटीव्ही फूटेज तपासले. अखेर शिक्षिकेला मारहाण केल्याप्रकरणी मोहम्मद खान अन्सारीला पोलिसांनी पकडले. शाळेतील घटनेचे सीसीटीव्ही फूटेज आता व्हायरल होत आहे.
'राडो'ची तीन स्पेशल-एडिशन घड्याळे लॉन्च
मुंबई : अनोखा, आकर्षक, आयकॉनिक हे तीन शब्द ले कॉर्बुसियर यांच्या कामाचे वर्णन करतात. स्वित्झर्लंडमध्ये जन्मलेले हे डिझाइन व्हिजनरी, ज्यांच्या आर्किटेक्चरच्या अनोख्या आणि प्रभावी शैलीला आता स्पेशल-एडिशन राडो घड्याळांच्या नवीन कलेक्शनमध्ये साकारले गेले आहे ज्यांना ह्याच तीन शब्दांतही वर्णन करता येते.ही नवीन घड्याळे राडो आणि लेस कुलेर्स सुइस यांच्यातील दीर्घकाळ चाललेल्या सहकार्याचे ताजे फळ आहेत. मास्टर ऑफ मटेरियल्स म्हणून ओळखला जाणारा राडो, ले कॉर्बुसियर यांच्या धाडसी डिझाइन, आधुनिक साहित्य आणि स्टेटमेंट रंगांचा वापर आपल्या घड्याळनिर्मितीच्या पद्धतीशी आणि नवकल्पनांच्या भुकेशी जोडतो. आतापर्यंत या भागीदारीत १२ राडो घड्याळे लॉन्च झाली आहेत, ज्यांनी आधुनिक आर्किटेक्चरमधील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला ज्याने त्या काळात उदयास आलेल्या ब्रूटलिस्ट शैलीची पायाभरणी केली ज्यात प्रत्येक घड्याळ त्यांच्या सर्वात उल्लेखनीय प्रकल्पांपैकी एकाचे दर्शन घडवते.पहिले घड्याळ ला सिटे रेडियूज ला श्रद्धांजली अर्पण करते. फ्रान्समधील मार्सेल येथे असलेली ही विशाल काँक्रीट अपार्टमेंट बिल्डिंग 1952 मध्ये पूर्ण झाली होती आणि आधुनिक शहरी जीवनाला नव्याने परिभाषित केले होते. या स्पेशल एडिशनमध्ये इमारतीच्या रफ-कास्ट, बोर्ड-फॉर्म्ड काँक्रीट बेटन-ब्रूट चे एक अमूर्त प्रेरणास्थान आहे, जे हाय-टेक सिरॅमिक डायलवर लेझरने कोरले गेले आहे. हे काँक्रीटच्या आतील टेक्सचरची अत्यंत गुंतागुंतीची व्याख्या देते, ज्यात प्रत्येक सूक्ष्म तपशील प्रकाशाला आकर्षक पद्धतीने प्रतिबिंबित करतो.दुसरे घड्याळ अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स राज्यातील केम्ब्रिज येथील कारपेंटर सेंटर फॉर द विज़ुअल आर्ट्स ला आदरांजली अर्पण करते. अमेरिकन इतिहासाशी इतक्या जवळून जोडलेल्या या परिसरात, सेंटरचे धाडसी सौंदर्यशास्त्र हार्वर्ड विद्यापीठाच्या हिरव्यागार चौकांपासून आणि जॉर्जियन आर्किटेक्चरपासून पूर्णपणे वेगळे होते. ही ले कॉर्बुसियर यांनी उत्तर अमेरिकेत डिझाइन केलेली एकमेव इमारत होती आणि त्यांच्या शेवटच्या कामांपैकी एक, जी १९६३ मध्ये पूर्ण झाली आणि आता ती देशाच्या सांस्कृतिक वारशाचा भाग आहे.मालिकेतील शेवटचे घड्याळ भारतातील चंदीगडसाठी ले कॉर्बुसियर यांच्या दूरदर्शी योजनेद्वारे त्यांच्या खरोखरच मोठ्या प्रमाणावर विचार करण्याच्या क्षमतेचा उत्सव साजरा करते. पंजाबसाठी पूर्णपणे नवीन राजधानी म्हणून कल्पना केलेल्या या शहरात त्यांनी अधिक तर्कसंगत, कार्यक्षम शहराची कल्पना केली होती, ज्यामध्ये भूमितीय ‘ग्रिड’ लेआउट, वास्तुशिल्प डिझाइनसाठी सामायिक तत्त्वे आणि निसर्गाचे काळजीपूर्वक एकीकरण होते — एक अशी डिझाइन वारसा ज्याने २०व्या शतकाच्या उर्वरित काळात शहरी नियोजनाला आकार दिला.तीनही घड्याळांच्या मागील बाजूस ६३ डिजिटलरी प्रिंट केलेल्या रंगांच्या पट्ट्या आहेत ज्या पॉलीक्रोमी आर्किटेक्चरल चा संपूर्ण स्पेक्ट्रम दाखवतात. या पट्ट्या आतल्या राडो कैलिबर आर७६३ ऑटोमैटिक मूवमेंट च्या दृश्याला वेढतात, ज्याला मध्यभागी ले कॉर्बुसियर यांचे लोगो असलेल्या सपाट नीलम क्रिस्टलमधून पाहता येते. या रंगांच्या पट्ट्या त्या प्रेझेंटेशन बॉक्सलाही सजवतात ज्यामध्ये प्रत्येक घड्याळ दिले जाते.मनगटावर, घड्याळाचे हाय-टेक सिरॅमिक बांधकाम अत्यंत हलके आणि आरामदायक वाटते हे साहित्य शरीराच्या तापमानाशी पटकन जुळते तर त्याच्या आकर्षक वैशिष्ट्ये अत्यंत मोहक आहेत. हाय-टेक सिरॅमिकची जवळजवळ स्क्रॅच-प्रूफ खासियत त्याला बेजोड टिकाऊपणा देते, अगदी ले कॉर्बुसियर यांच्या आवडत्या काँक्रीटप्रमाणेच. त्याचबरोबर राडो कैलिबर आर७६३ ऑटोमैटिक मूवमेंटचे ८० तासांचे पॉवर रिझर्व्ह आणि ५ बार (५० मीटर) पर्यंत वॉटर रेसिस्टन्स — त्याला उत्कृष्ट व्यवहार्यता प्रदान करतात.आर्किटेक्चरने प्रेरित हा कलेक्शन, आधुनिकतेच्या जनकाला राडो मास्टर ऑफ मटेरियल्स यांच्या वॉचमेकिंग व्हिजनशी जोडतो, ज्यामुळे स्विस डिझाइनच्या कथेत एक भावपूर्ण नवा अध्याय लिहिला जातो.
मुंबईच्या लोकलचा कायापालट होणार
मुंबई : गेल्या १०० वर्षात मुंबई आणि मुंबईकरांच्या लाडक्या लाईफलाइनमध्ये म्हणेजच लोकलमध्ये अनेक बदल झाले. जलदगतीने मुंबईत रेल्वेचं जाळं तयार झालं त्यामुळे मुंबईकरांचा तसेच पर्यटकांचा प्रवास हा सुखकर झाला. आता मुंबईच्या लोकलचा आणखी कायापालट होणार आहे.कशी असेल वंदे मेट्रो लोकल सेवा ?मुंबईच्या लोकलचा चेहरा बदलण्यात वंदे मेट्रोची साथ मिळणार असल्याने वंदे मेट्रो लोकल या नावाने ती लोकल ओळखण्यात येणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ याने मुंबईच्या उपनगरीय नेटवर्कसाठी २,८५६ वंदे मेट्रो डब्यांची खरेदी करणार आहे . यामुळे मुंबईकरांचा प्रवास हा आता आणखी सुसाट आणि आधुनिक आणि सुरक्षित होणार आहे.मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) टप्पा ३ आणि ३-A अंतर्गत एकूण २३८ वंदे मेट्रो एसी लोकल गाड्या घेतल्या जातील. प्रत्येक गाडी १२ डब्यांची असेल. या गाड्यांमध्ये 'वॉक-थ्रू' डिझाइन असेल, ज्यामुळे प्रवासी एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाऊ शकतील आणि गर्दीचे विभाजन होईल. तसेच आरामदायी कुशन सीट्स, दिव्यांगांसाठी विशेष जागा आणि मोठ्या खिडक्या असतील.स्वयंचलित दरवाजे, सीसीटीव्ही कॅमेरे, धूर आणि आग शोधणारी यंत्रणा आणि आपत्कालीन टॉक - बॅक सिस्टिम असेल. मुंबईच्या हवामानाचा आणि पावसामुळे खोळंबा होणाऱ्या रेल्वेसेवांचा विचार करता वंदे मेट्रो लोकल वॉटरप्रूफ आणि गंज - रोधक बनवल्या जाणार आहेत.अत्याधुनिक सोयीसुविधा, यात कशाचा समावेश असेल ?यूएसबी चार्जिंग पॉईंट, वाय-फाय सुविधा, डिजिटल रूट मॅप यांसारख्या अत्याधुनिक सुविधा असणार आहेत.मुंबईकरांना या सेवेचा लाभ केव्हापर्यंत मिळणार ?मिळालेल्या माहितीनुसार अडीच वर्षात पहिली 'प्रोटोटाइप' गाडी येण्याची शक्यता आहे, आणखी काही यशस्वी चाचण्या झाल्यांनतर ४ ते ६ वर्षात पूर्ण गाड्यांचा पुरवठा केला जाणार आहे.मेक इन इंडिया या मोहिमेचा मुंबई लोकल ही एक भाग असून वंदे मेट्रो गाड्यांमुळे मुंबईतील लोकल प्रवासाचा दर्जा हा वाढणार असून प्रवाशांना आत जागतिक दर्जाचा अनुभव मिळणार आहे.
CM Helicopter Missing : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हेलिकॉप्टरचे रायचूरमध्ये ऐनवेळी लँडिंग चुकल्याने मोठा गोंधळ उडाला.
Congress : कॉंग्रेसने 24 तासांत दलित समुदायाची माफी मागावी,अन्यथा…; आपच्या नेत्यांनी दिला इशारा
पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस (Congress) नेते प्रताप सिंग बाजवा यांनी पंजाबचे कॅबिनेट मंत्री हरभजन सिंग यांच्याबद्दल केलेल्याआक्षेपार्ह वक्तव्याचा आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तीव्र निषेध केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी आज नेवासा न्यायालय (Newasa News) परिसरात झालेल्या या इमारतीच्या भूमिपूजन समारंभात बोलताना सांगितले की, बांधकामाच्या दर्जा आणि गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नाही.
Nashik Namokar Teerth : णमोकार तीर्थावर फडणवीस, पटेल यांची उपस्थिती
Nashik Namokar Teerth : नाशिकच्या चांदवड येथील मालसाणे येथे सुरू असलेल्या जैन पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल पटेल यांनी हजेरी लावली.

30 C