SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

23    C
... ...View News by News Source

Chandrakant Patil : भंडारा डोंगराचा कायापालट होणार! चंद्रकांत पाटलांनी जाहीर केली ‘इतक्या’कोटींची देणगी

श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे मंदिर उभारण्यात येत आहे. मंदिराच्या अंतिम टप्प्यातील कामांसाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी

दैनिक प्रभात 25 Jan 2026 2:15 am

PCMC Dust Pollution : स्मार्ट सिटी की ‘डस्ट सिटी’? धुळीच्या प्रदूषणावरून मनसेचा आयुक्तांना अल्टिमेटम

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत वाढत चाललेल्या धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले असून, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

दैनिक प्रभात 25 Jan 2026 2:00 am

Maval Election News : निवडणुकीच्या रणधुमाळीत पोलीस अलर्ट! मावळच्या सीमांवर कडक नाकाबंदी

मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर कार्यरत आहे.

दैनिक प्रभात 25 Jan 2026 1:45 am

PCMC Mayor Election : पिंपरी चिंचवडचा नवा ‘कारभारी’कोण? ६ फेब्रुवारीला होणार फैसला; सभेची तारीख जाहीर

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या मुख्य

दैनिक प्रभात 25 Jan 2026 1:30 am

Koregaon Election News : भाजप आणि राष्ट्रवादीच्या ‘या’उमेदवारांनी घेतली माघार; राजकीय गणिते पूर्णपणे बदलली

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतून कोरेगाव तालुक्यातील पाच उमेदवारांनी शनिवारी माघार घेतली.

दैनिक प्रभात 25 Jan 2026 1:15 am

Satara ZP Election 2026 : ओझर्डे गटात दोन ‘लाडक्या बहिणीं’मध्ये काटे की टक्कर; मकरंद आबांचा बालेकिल्ला भाजप भेदणार का?

वाई तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ना. मकरंद पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या ओझर्डे जिल्हा परिषद गटात प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

दैनिक प्रभात 25 Jan 2026 1:00 am

Mahabaleshwar Election : महाबळेश्वरमध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार? नेत्यांच्या निर्णयाकडे लक्ष

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीने सध्या तालुक्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

दैनिक प्रभात 25 Jan 2026 12:30 am

Satara ZP Election 2026 : निवडणूक ड्युटीत चुकूनही ‘या’गोष्टी करू नका! कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाची नियमावली जाहीर

निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपले काम निष्पक्षपाती, निर्भय आणि पारदर्शक पद्धतीने करावे.

दैनिक प्रभात 25 Jan 2026 12:15 am

RCB vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा मोठा धमाका! आरसीबीच्या विजयरथाला ब्रेक लावत गुणतालिकेत घेतली मोठी झेप

RCB vs DC : दिल्ली कॅपिटल्सने आपला विजयाचा धडाका कायम राखत आरसीबीचा विजयरथ रोखला आहे.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 11:37 pm

“मुंब्रा को हरा बना देंगे” म्हणणाऱ्या सहर शेखचा माफीनामा

ठाणे : ‘कैसा हराया’ म्हणत मुंब्रा येथील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर युनूस शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला.तसेच शेख यांनी केलेले “हम मुंब्रा को हरा बना देंगे” हे विधान चांगलेच चर्चेत राहिले. या विधानाच्या निषेधार्थ भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आता सहर शेख यांनी माफी मागितली आहे. पोलिसांनी सहर शेख यांना पोलीस ठाण्यात बोलावून लेखी माफीनामा घेतला. ‘कुणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता’, असे सहर शेख यांनी माफीनाम्यात नमूद केले आहे.भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. मुंब्रा पोलिसांनी माझ्या तक्रारीनंतर सहर शेखला नोटीस पाठवली होती. मी आज पाठपुराव्यासाठी मुंब्रा पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळी ही माहिती मला लिखित स्वरूपात दिली” असे सोमय्या यांनी म्हटले आहे.सहर शेख यांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी माफीनामा लिहून दिला आहे. यामध्ये त्यांनी मुंब्रा येथे झालेल्या सभेत “हम मुंब्रा को हरा बना देंगे” असे भाषण केले होते. पण हे वाक्य पक्षाचा झेंडा आणि निशाणी संदर्भात बोलल्याचे सांगितले.“कोणाचंही मन दुखावण्याचा किंवा वातावरण खराब करण्याचा हेतू नव्हता. आम्ही तिरंग्यासाठी जगू आणि तिरंग्यासाठीच मरू. वक्तव्यामुळे कोणाचंही मन दुखावलं असेल तर मी जाहीरपणे माफी मागते” असे सहर शेख यांनी आपल्या लेखी जबाबात लिहून दिले आहे.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 11:10 pm

पंजाबमध्ये प्रजासत्ताक दिनापूर्वी रेल्वे रुळावर स्फोट

अमृतसर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर स्फोट झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. इंजिन जात असताना स्टेशनच्या आउटर लाईनवर हा स्फोट झाला. या घटनेत एका लोको पायलटला किरकोळ दुखापत झाली. जीआरपीने अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल)च्या पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. हा स्फोट दहशतवादी कटाचा भाग होता की तांत्रिक बिघाडामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. रोपड रेंजचे डीआयजी नानक सिंग यांनीही घटनास्थळी भेट दिली.पोलीस प्रशासनाच्या मते, इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळेही हा स्फोट झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वेचे तांत्रिक तज्ज्ञ याची स्वतंत्र चौकशी करत आहेत. स्फोटामुळे इंजिनच्या काचा फुटल्या असून रेल्वे रुळांचेही थोडे नुकसान झाले आहे. प्रजासत्ताक दिन जवळ असल्याने सुरक्षा यंत्रणा पूर्ण सतर्क आहेत.पोलिसांनी स्पष्ट केले आहे की,मालगाडीवरील सुरक्षा अधिकारी अनिल शर्मा (सेफ्टी ऑफिसर, डीएफसीसी) यांना अत्यंत किरकोळ दुखापत झाली असून ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. संबंधित रेल्वे मार्गावर केवळ मालगाड्यांचीच वाहतूक होते, त्यामुळे प्रवासी गाड्या किंवा सामान्य नागरिकांना कोणताही धोका नसल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.या घटनेनंतर राज्याच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग यांनी रेल्वे ट्रॅकजवळील स्फोट ही सामान्य घटना नसून, पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. तर शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत, राज्यातील ढासळती कायदा व सुव्यवस्था यासाठी सरकारला जबाबदार धरले आहे.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 11:10 pm

Shreyas Iyer : इशानपेक्षा ‘हा’खेळाडूच सर्वोत्तम! वरुण अ‍ॅरॉनने निवडला तिलक वर्माचा परफेक्ट रिप्लेसमेंट

Shreyas Iyer : माजी वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅरॉनने तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरच्या नावाला पसंती दिली आहे

दैनिक प्रभात 24 Jan 2026 11:09 pm

Shiv Sena UBT : उद्धव ठाकरेंना धक्का; माजी आमदाराने सोडली साथ

Shiv Sena UBT : औसा मतदारसंघाचे माजी आमदार दिनकर माने हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत

दैनिक प्रभात 24 Jan 2026 10:57 pm

Donald Trump: चीनसोबत व्यापार केल्यास कॅनडावर 100% टॅरिफ लावणार; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

Donald Trump: ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यावर निशाणा साधला.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 10:53 pm

Silver Prices: चांदी महागणार? आगामी अर्थसंकल्पात आयात शुल्क 15 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता

Silver Prices: आता चांदीवर किती आयात शुल्क लावले जाईल याबाबत व्यापार्‍यात चर्चा चालू आहे.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 10:43 pm

काँग्रेसला मोठा हादरा..! माजी मंत्र्यांनं पक्ष फोडला, एकाचवेळी २४ माजी आमदार अन् ७२ नेते फुटले

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून, त्यांच्यासोबत २४ माजी आमदारांनी पक्ष सोडला आहे.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 10:30 pm

पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसेला जोरदार धक्का

वैभववाडी : वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ओम गणेश बंगला या ठिकाणी हा प्रवेश पार पडला. कदम यांच्या प्रवेशाने वैभववाडीतील मनसे पूर्णता खिळखिळी बनली आहे. मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनसे कार्यकर्ते संजय चव्हाण, गणेश गुरव, चंदन पाटणे, बबन डकरे, राजेंद्र गुरव, संतोष गुरव, बबन शिंगरे, सुरेश कदम, शांताराम कोलते, अशोक कदम, अरुणा कोलते, अरुण कोलते अवनी कदम, राजन कदम, अमोल कोलते, वनिता लाड, सुगंधा पोवार, मनीषा मनवे आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.महेश उर्फ भैय्या कदम हे करुळ गावचे आहेत. त्यांनी उपसरपंच म्हणून काम केले आहे. गावच्या सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. शिवशभो संघटनेत कार्याध्यक्ष, वैभववाडी टेम्पो सघटनेत उपाध्यक्ष पदावर त्यांनी काम केले आहे. यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक माजी संचालक दिगंबर पाटील, शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश सावंत, सरपंच नरेंद्र कोलते, बूथ अध्यक्ष दीपक लाड व पदाधिकारी उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 10:30 pm

सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी; दृतगती मार्गासह, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांचा खोळंबा

मुंबई : सलग सुट्ट्यामुळे रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर शनिवारी दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मुंबई पुणे दृतगती महामार्गासह, मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पेण खोपोली आणि वडखळ अलिबाग मार्गावरील वाहतुकही द्रुतगतीने सुरू होती. तसेच,लोणावळा आणि खंडाळा घाट परिसरात वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे. लोणावळा, माथेरान आणि महाबळेश्वरकडे जाणाऱ्या गाडयांना या कोंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागला.मुंबईकर मौजमजा करण्यास बाहेर पडले त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच मुंबई पुणे दुतगती महामार्गावर वाहनांची संख्या वाढली होती. घाट परिसरात पुणे मार्गिकेवर वाहतुक अतिशय धिम्या गतीने सुरू होती. घाट परिसरात वाहनांच्या सात ते आठ किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या, घाटात वाहने बंद पडण्याच्या घटनाही घडत होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट झाली होती. वाहतुक पोलिसांकडून महामार्गावरील वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू होते. मात्र वाहनांची संख्या प्रचंड असल्याने वाहतुक नियमन करणे अवघड झाले होते. मुंबई मार्गावर छोटे ब्लॉक घेऊन पुणे मार्गावरील वाहतूक मंबई मार्गावर वळवून पुढे पाठवली जात होती.मुंबई गोवा महामार्गावरही वाहतुकीचा खोळंबा…मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. महामार्गावर इंदापूर माणगाव येथे प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. वाहन चालका लेनची शिस्त पाळत नसल्याने, वाहतुक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला होता. या परिसरात वाहनांच्या आठ ते नऊ किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. वाहतुक नियमन करतांना पोलीसांना कसरत करावी लागत होती. अलिबाग वडखळ महामार्गावरही सकाळपासून वाहनांची संख्या वाढली होती. वडखळ ते पोयनाड, पेझारी ते तिनवीरा आणि वाडगाव ते अलिबाग दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे अर्धा तासात जे अंतर पार करणे अपेक्षित होते दीड तास ते पावणे दोन तास लागत होते.मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात वाहतुक कोंडी होती. बोरघाट पोलीस आणि महामार्ग पोलीस यांना वाहतूक नियमनासाठी बरेच प्रयत्न करावे लागले होते. दुपारनंतर वाहनांची संख्या कमी होईन परिस्थिती नियंत्रणात येईल अशी आशा पोलीसांना होती. मात्र संध्याकाळी उशीरापर्यंत वाहतूक कोडी कायम होती.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 10:30 pm

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंगळवारी सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली : संसदेत आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारने राजकीय एकमत साधण्यासाठी तयारी सुरू केली आहे. बजेट सत्रापूर्वी, मंगळवारी २७ जानेवारीला सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे.या बैठकीत विधायी कार्यसूची आणि सत्रादरम्यान उभ्या राहणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल.अधिवेशनाची सुरुवात २८ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होणार आहे. केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वदलीय बैठक सकाळी ११ वाजता संसद भवन एनेक्सीतील मुख्य समिती कक्षात होईल. या बैठकीत सरकार आणि विरोधक सत्राच्या अजेंड्यावर आपापल्या सूचना मांडतील. केंद्रीय बजेट १ फेब्रुवारीला सादर होणार असून त्यादिवशी रविवार आहे, आणि हा संसदेत अत्यंत दुर्मिळ प्रसंग मानला जातो. वित्त मंत्री निर्मला सीतारमण सातव्या बजेटची मालिका सातत्याने सादर करत आहेत. बजेट सत्र २ एप्रिलपर्यंत चालणार आहे, ज्यामध्ये पहिला टप्पा १३ फेब्रुवारीला संपेल आणि दुसरा टप्पा ९ मार्चपासून सुरू होईल. सत्राच्या पार्श्वभूमीवर, विरोधी पक्ष काँग्रेस 'विकसित भारत-गारंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन (ग्रामीण) अधिनियम'च्या विरोधात देशव्यापी मोहिम राबवत आहे. काँग्रेसचा दावा आहे की हा कानून यूपीए काळातील मनरेगा व्यवस्थेची जागा घेतो, तर भाजपाही या नव्या कायद्यास सुधारात्मक मानत जुना कायदा सुधारण्यावर भर देत आहे. यामुळे सत्रात या विषयावर तीव्र चर्चा होण्याची शक्यता आहे.सध्या लोकसभेत ९ विधेयक मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहेत, ज्यात विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक २०२५, सिक्योरिटीज मार्केट्स कोड २०२५ आणि संविधानातील १२९ वा सुधारणा विधेयक २०२४ यांचा समावेश आहे. या विधेयकांवर संसदीय समितींच्या विचारणेत आहेत. सत्राच्या वेळापत्रकानुसार, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान चर्चा होईल, तर २८जानेवारी आणि १ फेब्रुवारीला शून्यकाल नसेल.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 10:30 pm

Stock Market: अदानी समूहाचे संकट आणि जागतिक घडामोडींचा बाजाराला फटका; 16 लाख कोटींचे नुकसान

Stock Market: सरलेल्या आठवड्यात शेअर निर्देशांकात अडीच टक्क्यांची घट

दैनिक प्रभात 24 Jan 2026 10:29 pm

Mohammed Shami : मोहम्मद शमीचा रणजी ट्रॉफीत कहर! ५ विकेट्स घेत सर्व्हिसेसचं मोडलं कंबरडं

Mohammed Shami : मोहम्मद शमीने सर्व्हिसेसविरुद्धच्या सामन्यात ५ विकेट्स घेत टीम इंडियात पुनरागमनासाठी पुन्हा दावा ठोकला आहे.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 10:29 pm

WEF: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठा करार; महाराष्ट्रात ‘स्मार्ट शेती’चे युग अवतरणार

WEF: या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रात आधुनिक, हवामान-संवेदनशील आणि तंत्रज्ञानाधारित स्मार्ट शेतीला चालना मिळणार आहे.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 10:22 pm

ZP Election : मोठी बातमी.. ! राष्ट्रवादीच्या युतीला पहिला सुरुंग; ३५ वर्षांचा निष्ठावंत मोहरा भाजपच्या गोटात

ZP Election : विलासराव वाघमोडे यांनी भाजपात प्रवेश करत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला

दैनिक प्रभात 24 Jan 2026 10:03 pm

Bank locker key: बँक लॉकरची किल्ली हरवलीय? घाबरू नका, जाणून घ्या RBI चे नियम

Bank locker key: लॉकर उघडण्याची नेमकी प्रक्रिया काय आणि त्यासाठी किती पैसे मोजावे लागतात?

दैनिक प्रभात 24 Jan 2026 9:59 pm

IND U19 vs NZ U19 : इंडियाच्या यंग ब्रिगेडने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत साधली विजयाची हॅट्ट्रिक! अम्ब्रीशच्या फिरकीने वेधलं लक्ष

IND U19 vs NZ U19 : भारताच्या अंडर-१९ संघाने न्यूझीलंडलाही धूळ चारत स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला आहे.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 9:54 pm

Imtiaz Jaleel: मुंब्र्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्र ‘हिरवा’करणार; सहर शेखच्या समर्थनार्थ इम्तियाज जलील यांची गर्जना

Imtiaz Jaleel: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'रंगांचे युद्ध' पेटले असून, एमआयएम (AIMIM) आणि सत्ताधारी महायुतीमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 9:39 pm

Flight Cancellations : जगभरातील विमान वाहतूक विस्कळीत, काय आहे कारण?

Flight Cancellations : हिमवादळाच्या शक्यतेने तब्बल ८ हजार विमानांची उड्डाणे रद्द

दैनिक प्रभात 24 Jan 2026 9:35 pm

कोकणात भाजप फॉर्मात, जाणून घ्या बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांची यादी

सिंधुदुर्ग : काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष असल्याचे दाखवून दिले. आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भारतीय जनता पार्टीच फॉर्मात असल्याचे चित्र आहे. राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि या जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी सात फेब्रुवारी रोजी होणार आहे. पण मतदान होण्याआधीच महायुतीचे ११ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यात भाजपच्या दहा आणि शिवसेनेच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजप - शिवसेना महायुती निवडणूक लढवत आहे. तसेच सिंधुदुर्ग अंतर्गत कणकवली तालुका पंचायत समिती, देवगड तालुका पंचायत आणि वैभववाडी तालुका पंचायत समिती येथे महायुती निवडणूक लढवत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या निवडणुकांमध्ये मतदान होण्याआधीच महायुतीचे ११ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा परिषद खारेपाटण जि.प.उमेदवार; प्राची इस्वलकर(भाजप) जाणवली जिल्हा प.रुहिता राजेश तांबे (शिवसेना) पडेल जिल्हा प.(देवगड)सुयोगी रवींद्र घाडी (भाजप) बापर्डे जिल्हा प. (देवगड)अवनी अमोल तेली (भाजप) बांदा जिल्हा प. उमेदवार प्रमोद कामत (भाजप)कणकवली तालुका पंचायत समिती बिडवाडी - संजना संतोष राणे (भाजप ) वरवडे - सोनू सावंत (भाजपा)देवगड तालुका पंचायत समिती पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप) नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप) बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)वैभववाडी तालुका पंचायत समिती कोकिसरे - साधना सुधीर नकाशे (भाजप)

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 9:30 pm

बांगलादेश क्रिकेट उद्ध्वस्त होईल का:ICC ने वर्ल्डकपमधून बाहेर काढले, करोडो रुपयांचे नुकसान, बंदीचाही धोका; आता पाकिस्तान काय करणार

बांगलादेश टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्याच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे म्हणणे आहे की आम्ही आता सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, जर त्यांनी नकार दिला तर आम्ही देखील स्पर्धेत खेळणार नाही. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली होणारा T20 विश्वचषक सुरू होण्यासाठी फक्त 2 आठवडे बाकी आहेत. अशा परिस्थितीत बांगलादेशला विश्वचषक न खेळल्याने काय नुकसान होईल, पाकिस्तान देखील सामना खेळणार नाही का आणि भारतावर काय परिणाम होईल…. प्रश्न-1: बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार का दिला? उत्तर: बांगलादेश क्रिकेट बोर्ड म्हणजेच BCB ने सुरक्षेचे कारण देत भारतात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. BCB ला त्याचे T20 विश्वचषक सामने श्रीलंकेत व्हावेत असे वाटत होते, परंतु ICC ने यास नकार दिला. बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नझरुल म्हणाले, ‘आम्हाला वर्ल्ड कप खेळायचा आहे, पण भारतात आमच्या खेळाडूंच्या आणि सपोर्ट स्टाफच्या सुरक्षेबाबत चिंता आहे.’ सुरक्षेशी संबंधित या कारणाव्यतिरिक्त, बांगलादेशी संघ भारतात न येण्याची आणखी 2 छुपी कारणे आहेत… 1. मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढणे आयपीएल संघ केकेआरने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला 9.2 कोटी रुपयांना विकत घेतले, पण भारतात याला विरोध होऊ लागला. बीसीसीआयने केकेआरला त्याला रिलीज करण्यास सांगितले. 3 जानेवारी रोजी केकेआरने तसे केले. बीसीबीने याला अपमान मानले आणि आयपीएलचे प्रक्षेपण (टेलिकास्ट) बंद केले. येथूनच हा वाद सुरू झाला. 2. भारत-बांगलादेशमधील बिघडलेली परिस्थिती आणि संबंध गेल्या काही महिन्यांत भारत आणि बांगलादेशचे राजनैतिक संबंध (डिप्लोमेटिक रिलेशंस) खूपच बिघडले आहेत. बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात हिंसाचार आणि हत्या झाल्यानंतर भारतात बांगलादेशी खेळाडू आणि कलाकारांच्या विरोधाची चर्चा सुरू झाली. बिघडलेल्या परिस्थितीचा हवाला देत बांगलादेश सरकारने संघ पाठवण्यास नकार दिला. तरीही, BCB चे अध्यक्ष अमीनुल इस्लाम बुलबुल यांनी सांगितले की, आम्ही आयसीसीशी पुन्हा एकदा बोलू आणि त्यांना आमच्या चिंतांकडे लक्ष देण्यास सांगू. बांगलादेश या मुद्द्यावर आपला संघर्ष सुरूच ठेवेल. बांगलादेशच्या बहिष्कार टाकण्याच्या निर्णयानंतर, आता त्याच्या जागी स्कॉटलंडचा संघ T20 विश्वचषकात खेळू शकतो. प्रश्न-2: विश्वचषक न खेळल्याने बांगलादेशला काय-काय नुकसान होईल? उत्तर: विश्वचषक न खेळल्याने बांगलादेश क्रिकेट बोर्डापासून ते बांगलादेशातील व्यवसायाला मोठे नुकसान होऊ शकते… सहभागिता शुल्क मिळणार नाही, बोर्डाचे नुकसान सामना जिंकल्यावरही शुल्क मिळते, याचे नुकसान प्रायोजक आणि व्यावसायिक नुकसान रँकिंगवर परिणाम दैनिक भास्कर डिजिटलचे स्पोर्ट्स एडिटर बिक्रम प्रताप सिंह यांच्या मते, बांगलादेशने पाकिस्तानच्या प्रभावाखाली येऊन वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, पण ICC मध्ये पाकिस्तानचे अजूनही वर्चस्व आहे. भारत-पाकिस्तान सामन्यातून संपूर्ण वर्ल्ड कपच्या 25% पर्यंत महसूल मिळतो, पण बांगलादेशच्या बाबतीत असे नाही. त्यांनी वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकून स्वतःचेच नुकसान केले आहे. मात्र, BCB च्या वित्त समितीचे प्रमुख आणि अंतरिम सरकारचे क्रीडा सल्लागार नजमुल हुसेन यांनी अलीकडेच म्हटले होते की, बांगलादेशने वर्ल्ड कप न खेळल्याने बोर्डाचे कोणतेही नुकसान होणार नाही. जे नुकसान होईल ते खेळाडूंचे होईल. प्रश्न-३: वर्ल्ड कप न खेळल्याने बांगलादेशच्या खेळाडूंचे काय नुकसान होईल? उत्तर: वर्ल्ड कप न खेळल्याने बांगलादेशी खेळाडूंच्या करिअर आणि आर्थिक स्थितीचे नुकसान होईल… प्रत्येक खेळाडूला साडेसात लाखांचे नुकसान रँकिंगवर परिणाम प्रायोजकांचे माघार घेणे प्रश्न-4: ICC बांगलादेश संघाविरुद्ध कोणती कारवाई करू शकते का? उत्तर: ICC ला कारवाई करण्याचा अधिकार आहे. ICC च्या नियमांनुसार, विश्वचषकावर बहिष्कार टाकणे हे सदस्य सहभाग कराराच्या विरोधात आहे. अशा प्रकरणांमध्ये, ICC आर्थिक दंडापासून ते सदस्यत्व निलंबनापर्यंतचा निर्णय घेऊ शकते. यापूर्वीही आयसीसीने कठोर पाऊले उचलली आहेत. 2019 मध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे झिम्बाब्वे क्रिकेटला निलंबित करण्यात आले होते, ज्यामुळे ते 2020 मध्ये कोणताही आयसीसी टूर्नामेंट खेळू शकले नाहीत. जर आयसीसीला असे वाटले की बांगलादेश क्रिकेट बोर्डाने राजकारण्यांच्या दबावाखाली निर्णय घेतला आहे, तर आयसीसी सदस्य म्हणून त्याच्या निलंबनाचा विचार केला जाऊ शकतो. जर बांगलादेश संघ स्पर्धेतून बाहेर पडला, तर आयसीसी त्याला गट टप्प्यात सहभागासाठी मिळणारे सुमारे 3 लाख डॉलर देखील देणार नाही. याव्यतिरिक्त, बोर्डाला आयसीसीकडून मिळणारा 30–40 दशलक्ष डॉलरचा वार्षिक वाटा देखील रोखला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, आयसीसी भविष्यात बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून मोठ्या स्पर्धांच्या यजमानपदाचा अधिकार देखील काढून घेऊ शकते. यामुळे आंतरराष्ट्रीय प्रायोजकत्वावर परिणाम होईल. प्रश्न-5: पाकिस्तानही विश्वचषकावर बहिष्कार टाकू शकतो का? उत्तर: पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची शक्यता कमी आहे, कारण त्याचे सामने भारतात होणार नाहीत हे आधीच निश्चित झाले आहे. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत नियोजित आहेत. मात्र, पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी म्हटले आहे की बांगलादेशसोबत चुकीचे झाले आहे. जर आमच्या सरकारने विश्वचषक खेळण्यास नकार दिला, तर आम्हीही संघ पाठवणार नाही. पण नकवी वारंवार आपली विधाने बदलत आहेत. काही दिवसांपूर्वी टेलिकॉम एशिया स्पोर्ट्सने पीसीबीच्या सूत्रांच्या हवाल्याने लिहिले होते की पाकिस्तान विश्वचषक न खेळण्यासारखे पाऊल उचलणार नाही. प्रश्न-6: बांगलादेशने बहिष्कार टाकल्यास भारतालाही काही नुकसान होऊ शकते का? उत्तर: बांगलादेशने वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकल्यास भारतापेक्षा बांगलादेशचेच जास्त नुकसान होईल. यामुळे भविष्यात आता भारतही बांगलादेशसोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यास नकार देऊ शकतो. जेव्हा भारत-बांगलादेशचे सामने होतात, तेव्हा बांगलादेशचे ब्रॉडकास्टर आणि स्पॉन्सर सर्वाधिक कमाई करतात. आयपीएलमधूनही ते कमाई करतात. भारतासोबतचे संबंध बिघडवून बीसीबी स्वतःचेच नुकसान करत आहे. तरीही सामन्याच्या तिकिटांमुळे आणि पर्यटन उद्योगातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे नुकसान भारताला सोसावे लागेल…

दिव्यमराठी भास्कर 24 Jan 2026 8:57 pm

यूट्युब बघून वजन कमी करण्यासाठी परस्पर औषधे घेतली अन्...

मदुराई : तामिळनाडूतील मदुराईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मदुराईत राहणाऱ्या एका तरुणीने यूट्युब बघून वजन कमी करण्यासाठी परस्पर औषधे घेतली. हा निर्णय तरुणीसाठी धोकादायक ठरलाय. डॉक्टरांच्या सल्ल्याविना केलेला औषधोपचार तरुणीसाठी जीवघेणा ठरला. चुकीची औषधे घेतल्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला.तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील सेलूर भागातील मीनांबलापूरम येथे राहणारी कलैयर्सी एका खासगी कॉलेजमध्ये पदवीच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. या तरुणीने वजन घटविण्यासाठी यूट्युब व्हिडीओ बघितले. या व्हिडीओंचा कलैयर्सीवर प्रचंड प्रभाव पडला. तिनं एका यूट्युब व्हिडीओवर विश्वास ठेवून स्थानिक मेडिकलमधून बोरॅक्स खरेदी केलं आणि त्याचं सेवन केलं.बोरॅक्स म्हणजेच सोडियम बोरेट. हे एक प्रकारचे किटकनाशक रसायन आहे. पांढऱ्या शिसाचा वापर करुन हे विषारी रसायन तयार केले जाते. बोरॅक्स मानवी शरीराला अपायकारक आहे. पण या वास्तवाची माहिती नसल्यामुळे यूट्युब व्हिडीओ बघून कलैयर्सीने बोरॅक्स खरेदी केले. खरेदी केलेल्या बोरॅक्सचे कलैयर्सीने घरी येताच सेवन केले. बोरॅक्स शरीरात जाताच कलैयर्सीला उलट्यांचा त्रास सुरू झाला. थोड्याच वेळात ती बेशुद्ध पडली. घरातल्यांनी कलैयर्सीला तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी उपचार करुन कलैयर्सीला घरी पाठवले. रात्री कलैयर्सीची प्रकृती पुन्हा बिघडली. यावेळी कलैयर्सीला राजाजी सरकारी रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सेलूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासात तरुणीने स्थानिक मेडिकलमधून बोरॅक्स खरेदी केल्याची माहिती मिळाली.डॉक्टरांच्या सल्ल्याविना कोणतेही औषध घेऊ नको असे वडिलांनी बजावले असूनही वजन कमी करण्याच्या मोहापोटी कलैयर्सीने चूक केल्याचे लक्षात आले.तोंडातील अल्सर कमी करण्यासाठी बाह्य औषध म्हणून मर्यादीत प्रमाणात बोरॅक्स वापरले जाते. पण बोरॅक्स वजन कमी करण्यासाठी वापरत नाहीत. वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायाम आणि योग्य आहार हा सुरक्षित आणि योग्य मार्ग आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कलैयर्सीने व्यवस्थित माहितीच घेतली नाही. कुठल्यातरी व्हिडीओवर आंधळा विश्वास ठेवून मोठी चूक केली.शिक्षण आणि संशोधन न करता काही जण तज्ज्ञ असल्याचा दावा करत यूट्यूबवर कुठलीही गोष्ट औषध किंवा आहार म्हणून सुचवत आहेत. या व्हिडीओंना आळा घालण्याची आवश्यकता या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 8:30 pm

BJP vs NCP : “राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडेच”; शरद पवारांच्या आमदाराचे भाजपला थेट आव्हान

BJP vs NCP : पंढरपूर आणि माढा तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांनी एकत्र येत, भाजप विरूद्ध निवडणूक रिंगणात उतरले

दैनिक प्रभात 24 Jan 2026 8:24 pm

Credit society scam: आळंदीच्या ‘अमृतानुभव’पतसंस्थेत 11 कोटींचा अपहार; सामान्य ठेवीदारांच्या पैशांवर दरोडा

Credit society scam: व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट सोने तारण कर्जाद्वारे फसवणूक

दैनिक प्रभात 24 Jan 2026 8:21 pm

MS Dhoni Practice : ‘थाला’इज बॅक! IPL 2026 साठी सज्ज; रांचीच्या मैदानात सुरू केला सराव, पाहा VIDEO

MS Dhoni Practice : सीएसकेचा दिग्गज खेळाडू एमएस धोनीने आयपीएल २०२६ ची तयारी सुरु केली आहे.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 8:14 pm

Nashik 400 Crore Cash Robbery : नाशिकमधील ४०० कोटींच्या कथित रोख लुटीने खळबळ, धक्कादायक खुलासा; ‘लूट झालीच नाही’

नाशिक : नाशिकमध्ये २००० रुपयांच्या नोटांनी भरलेला ट्रक लुटल्याच्या कथित घटनेने राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले असून, नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात संदीप पाटील नावाच्या व्यक्तीने याबाबत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिरादार आणि कमकेरी हे आपल्या पथकासह नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. कर्नाटक पोलिसांनी थेट नाशिकमध्ये येऊन तपास सुरू केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.या कथित लुटीप्रकरणी सध्या पाच संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ही लूट नेमकी कशी झाली, ट्रक कुठून निघाला आणि त्यामागे कोणती टोळी सक्रिय आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. नाशिक आणि बेळगाव पोलिसांमधील समन्वयातून सुरू असलेल्या तपासामुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे. संशयितांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मात्र, या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. बेळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. व्ही. हिरेमठ यांनी ४०० कोटी रुपयांच्या कंटेनर लुटीचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. चोर्ला घाट परिसरात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून यासंदर्भात एक पत्र प्राप्त झाले असून, त्याला अधिकृत उत्तर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे या प्रकरणातील गूढ अधिकच गडद झाले आहे.दरम्यान, या कथित लुटीमागे राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. ४०० कोटी रुपयांच्या नोटांमागे राजकीय क्षेत्रातील एका बड्या ‘साहेबांचा’ हात असल्याची कुजबूज सुरू आहे. या प्रकरणाची दखल मुंबई पोलीस मुख्यालयात वरिष्ठ स्तरावर घेण्यात आली असून, प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी अस्वस्थता पसरली आहे.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 8:10 pm

Shashi Tharoor: ‘चूक नसेल तर झुकायचे कशासाठी?’ थरूर यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस हायकमांडची डोकेदुखी वाढली

Shashi Tharoor: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकींमध्ये शशी थरूर यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 8:00 pm

Sharad Pawar : शरद पवारांना मोठा धक्का; ‘या’माजी आमदाराने सोडली साथ, शिवसेनेत केला प्रवेश

Sharad Pawar : शरद पवार गटाच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंचा आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश

दैनिक प्रभात 24 Jan 2026 7:39 pm

Newasa Traffic: नेवासा फाट्यावर वाहतूक कोंडी; वाहनांच्या दोन किलोमीटर लांब रांगा

Newasa Traffic: रस्ता दुरुस्ती आणि दुभाजक काढल्याने कोंडीत भर; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर संताप

दैनिक प्रभात 24 Jan 2026 7:37 pm

Border 2 Collection Day 1: सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’चा बॉक्स ऑफिसवर पहील्याच दिवशी धुमाकुळ

बॉर्डर २: सनी देवलच्या बॅार्डर २ या चित्रपटाने बॅाक्स ऑफिसवर आपली वेगळीच धमाल केली आहे.देशभक्ती, ॲक्शन आणि भावनिक कथानकाच्या जोरावर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवला आहे. भारतातील बॉक्स ऑफिसवर ‘बॉर्डर 2’ ने छप्परफाड ओपनिंग करत पहिल्या दिवशी तब्बल ३० कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे.देशांतर्गत बाजारपेठेत या चित्रपटाने आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ला मागे टाकले असले, तरी जागतिक स्तरावर मात्र ‘धुरंधर’चा पहिल्या दिवसाचा विक्रम मोडण्यात ‘बॉर्डर 2’ थोडक्यात अपयशी ठरला आहे. ‘धुरंधर’ने पहिल्या दिवशी जागतिक बॉक्स ऑफिसवर ४१.५ कोटींची कमाई केली होती, तर ‘बॉर्डर 2’चा जागतिक कलेक्शनचा आकडा ४१ कोटींवर स्थिरावला आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे ओव्हरसीज मार्केटमध्ये ‘बॉर्डर 2’ची मर्यादित कमाई. परदेशात या चित्रपटाने सुमारे ५ कोटींची कमाई केली, तर ‘धुरंधर’ने ७.७० कोटी रुपये कमावले होते.उत्तर भारतात आणि सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये सनी देओलच्या लोकप्रियतेचा मोठा फायदा ‘बॉर्डर 2’ला मिळताना दिसत आहे. २६ जानेवारीचा मोठा विकेंड समोर असल्याने, येत्या काही दिवसांत हा चित्रपट ‘धुरंधर’चा जागतिक विक्रम मोडेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.‘बॉर्डर 2’ची कथा १९७१ च्या भारत-पाक युद्धावर आधारित असून भारतीय भूदल, नौदल आणि वायुदलाच्या शौर्याची गाथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात सैनिकांच्या कुटुंबातील भावना दाखवण्यात आल्या आहेत, तर उत्तरार्धात थरारक युद्धदृश्ये पाहायला मिळतात. सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या अभिनयामुळे चित्रपट अधिक प्रभावी ठरतो. दिग्दर्शक अनुराग सिंग यांनी युद्धपटाला मानवी संवेदनांची जोड देत एक दमदार अनुभव प्रेक्षकांसमोर ठेवला आहे.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 7:30 pm

Agricultural exhibition: ‘कृषिक 2026’ला शेतकऱ्यांचा रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद; बारामतीत नाविन्यपूर्ण कृषी प्रदर्शनाचा समारोप

Agricultural exhibition: शेवटच्या दिवशी प्रदर्शनात शेतकऱ्यांची अलोट गर्दी पाहायला मिळाली.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 7:22 pm

Jamkhed: जामखेड शहरात ‘धूमस्टाईल’ चोरीचे सत्र; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

Jamkhed: एकाच दिवसात तीन महिलांना लक्ष्य करत ३ तोळ्यांचे दागिने लंपास; पोलीस प्रशासनासमोर गुन्हेगारांचे आव्हान

दैनिक प्रभात 24 Jan 2026 7:13 pm

ZP elections : मोठी बातमी..! जिल्हा परिषद निवडणुकांतही भाजपचा बिनविरोध ट्रेंड; ‘हे’तीन उमेदवार विजयी

ZP elections : जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत बिनविरोध पॅटर्न सुरू

दैनिक प्रभात 24 Jan 2026 6:54 pm

Russia-Ukraine war: रशियाने 370 ड्रोन आणि 21 क्षेपणास्त्रे डागली, युक्रेनचा 90% भाग अंधारात; तिसरे महायुद्ध सुरू होणार?

Russia-Ukraine war: अबू धाबीत शांतता वाटाघाटी सुरू असतानाच पुतिन यांचे 'मिसाईल' राजकारण; हजारो कुटुंबे विस्थापित.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 6:52 pm

Suryakumar Yadav Angry : ‘इशानचा खूप राग आला होता…!’विजयानंतर सूर्याचा खुलासा; मैदानात काय झालं? पाहा VIDEO

Suryakumar Yadav Angry : सूर्यकुमार यादवने विजयानंतर खुलासा केला की त्याला इशानचा राग आला होता.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 6:33 pm

आताची सर्वात मोठी बातमी: घर बसल्या प्रोविंडट फंडाचे पैसे युपीआयने काढता येणार! EPFO 3.0 कडून आमूलाग्र बदल प्रस्तावित

प्रतिनिधी:आता सर्वसामान्य व वेतनधारकांसाठी मोठी बातमी आहे. ईपीएफओ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना Employees' Provident Fund Organisation) संस्था आपल्या कार्यशैलीत मोठ्या प्रमाणात बदल करू शकते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. आता ईपीएफओ सदस्यांना बँकिग सुविधेप्रमाणेच भविष्य निर्वाह निधीचे पैसै थेट युपीआय (Unified Payments Interface) माध्यमातून काढता येऊ शकतात. यूपीआयद्वारे पैसे काढणे, सोप्या श्रेणी (Category) आणि जलद पैसे प्रदान करण्यासाठी या सुविधेचा फायदा होईल. या सुविधेमुळे सदस्यांना निधी जलद गतीने मिळण्याची शक्यता आहे आणि एटीएम प्रक्रियेद्वारे पैसे काढणे देखील शक्य होऊ शकते. आधीच्या ईपीएफओ २.० पेक्षा यावेळी मोठे तांत्रिक बदल करण्याच्या संस्था तयारीत असून तांत्रिकच नव्हे तर संकल्पनात्मक अनेक मोठे बदल केले जाणार आहे. कमीतकमी कागदी नियमांची पूर्तता, जास्तीत जास्त पारदर्शकता अवलंबून ही प्रकिया अधिक सोपी करण्याचा निर्णय प्रस्तावित केला जात आहे. अद्याप याला अंतिम मोहोर मिळाली नसली तरी हे संकेत दिले गेले आहेत. ईपीएफओ ३.० अंतर्गत, सदस्यांना आता समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्या 'जोडलेल्या' प्रादेशिक ईपीएफओ कार्यालयापुरते मर्यादित राहावे लागणार नाही.ते कुठल्याही नजीकच्या कार्यालयातून समस्यांचे निराकरण करु शकणार आहेत. तसेच नव्या बदलानुसार,नवीन वेबसाइटमध्ये एआय आधारित भाषांतरांचा समावेश करणे अपेक्षित आहे, ज्यामुळे युजर्सना त्यांच्या भाषेत इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, मराठी, तमिळ आणि इतर अनेक भारतीय भाषांमध्ये माहिती मिळू शकेल.सुधारणा कागदपत्रांची प्रक्रिया कमी करण्यासाठी, चुका कमी करण्यासाठी आणि ईपीएफओचे कामकाज बँकिग प्रमाणेच करून नव्या फिचर्ससाठी तयार करण्यात आले आहेत. विशेष यूपीआय वापरून पीएफ काढण्याची प्रस्तावित सुविधा असून आता भीम (BHIM) ॲपचाही त्यात समावेश आहे असा प्रस्ताव सादर केला गेला आहे. एप्रिल २०२६ पर्यंत सुरू होण्याची या नियमाची अंमलबजावणी सुरू होईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे देशभरातील कुठल्याही कार्यालयात ही नवीन प्रणाली सेवा मिळवणे अधिक सोपी होणार आहे.तसेच एकदा अंमलबजावणी झाल्यावर, कर्मचारी देशातील कोणत्याही ईपीएफओ कार्यालयातून पीएफ-संबंधित कामे करू शकणार आहेत, ज्यामुळे फिरतीची नोकरी असलेल्यांना या सुविधेचा लाभ होणार आहे.ईपीएफओ पोर्टलला अधिक सोपे आणि कार्यक्षम बनवण्यासाठी त्यांचेही अपडेट केले जाणार आहे.ईपीएफओने पैसे काढण्याचे नियमही सोपे केले आहेत. पूर्वी, पीएफ काढणे १३ वेगवेगळ्या कारणांद्वारे नियंत्रित केले जात होते, ज्यामुळे सदस्यांमध्ये गोंधळ निर्माण होत असे. आता, पैसे काढण्याचे फक्त तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. ज्यात आवश्यक गरजा (गंभीर आजार, शिक्षण, विवाह) घराच्या गरजा (घर खरेदी, बांधकाम, गृहकर्ज परतफेड), विशेष परिस्थिती (बेरोजगारी) यांचा समावेश असेल. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे सर्व श्रेणींमध्ये १२ महिन्यांच्या सेवेची एकसमान अट. सुधारित रचनेनुसार, शिक्षणासाठी पैसे काढण्याची परवानगी १० वेळा आणि विवाहासाठी ५ वेळा दिली जाऊ शकते. या सुधारणांमध्ये असाही प्रस्ताव आहे की सदस्य ७५% निधी त्वरित काढू शकतात, तर उर्वरित २५% रक्कम खात्यात राहील जेणेकरून व्याजाचे फायदे आणि सेवानिवृत्तीची सुरक्षा अबाधित राहील. जर एखादा सदस्य वर्षभर बेरोजगार राहिला, तर त्याला पीएफमधील १००% रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकते. याव्यतिरिक्त, ईपीएफओने सदस्यांना नाव, जन्मतारीख, पालकांची नावे आणि नोकरीच्या तारखांसारख्या सामान्य प्रोफाइलमधील चुका ऑनलाइन दुरुस्त करण्याची सुविधा दिली आहे, ज्यासाठी आता नियोक्ता किंवा ईपीएफओच्या मंजुरीची आवश्यकता नाही.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 6:10 pm

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरामुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वन-डे, टी-२० आणि कसोटी सामने खेळणार आहे. २०२५ वनडे वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय संघाचा हा पहिला परदेशी दौरा आहे. या दौऱ्यातील वन-डे आणि टी-२० मालिकेसाठी यापूर्वीच संघांची घोषणा करण्यात आली आहे. पण या संघात एक बदल झाला आहे. तसेच एकमेव कसोटी सामन्यासाठीही भारतीय महिला संघाची घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. या कसोटी संघाव्यतिरिक्त, बीसीसीआयने एसीसी राइजिंग स्टार्स आशिया कपसाठी इंडिया 'ए' संघाची देखील घोषणा केली आहे. १५ फेब्रुवारीपासून टी-२० मालिकेने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर ६ ते ९ मार्च रोजी पर्थमध्ये होणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्याने या दौऱ्याचा शेवट होईल. भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर सांभाळणार असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. याशिवाय कसोटी संघात शफाली वर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, दीप्ती शर्मा या अनुभवी खेळाडूंचाही समावेश आहे.याशिवाय २०२५ वर्ल्ड कपदरम्यान दुखापतग्रस्त झालेली प्रतिका रावलचाही कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ती या दौऱ्यातून भारतीय संघात पुनरागमन करू शकते.वनडे टी-२० संघात बदल :ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय महिला संघाची वनडे आणि टी२० मालिकांसाठी आधीच निवड झाली आहे. मात्र, यष्टीरक्षक फलंदाज गुनालन कमालिनी ही वूमन्स प्रीमयर लीग दरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने या संपूर्ण दौऱ्यातूनच बाहेर झाली आहे. त्यामुळे भारताच्या वनडे आणि टी२० संघात तिच्या जागेवर उमा छेत्रीला संधी देण्यात आली आहे.एलिसा हेलीचा शेवटचा सामना :पर्थमध्ये होणारा दिवस-रात्र कसोटी सामना एलिसा हिली हिच्यासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. ती या सामन्यानंतर क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.कसोटी संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, अमनजोत कौर, ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा चेत्री (यष्टीरक्षक), प्रतिका रावल, हर्लिन देओल, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग ठाकूर, स्नेह राणा, क्रांती गौड, वैष्णवी शर्मा, सायली सातघरे.वनडे संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), काशवी गौतम, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रीक्स, हर्लिन देओल.टी २० संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधा), शफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिक्स, भारती फुलमाली, श्रेयंका पाटील.इंडिया 'ए' (एसीसी राइजिंग स्टार्स आशिया कप) संघ: हुमैरा काझी, वृंदा दिनेश, अनुष्का शर्मा, दिया यादव, तेजल हसाब्नीस, नंदिनी कश्यप (यष्टिरक्षक), ममता एम (यष्टिरक्षक), सोनिया मेंढिया, मिन्नू मणी, तनुजा कंवर, प्रेमा रावत, सायमा ठाकर, जिंतिमणी कलिता, नंदिनी शर्मा.भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२६टी-२० मालिका१५ फेब्रुवारी - पहिला टी२० सामना, सिडनी (दु. १.३० वाजता)१९ फेब्रुवारी - दुसरा टी२० सामना, कॅनबरा (दु. १.३० वाजता)२१ फेब्रुवारी - तिसरा टी२० सामना, ऍडलेड, (दु. २.०० वाजता)वन-डे मालिका२४ फेब्रुवारी - पहिला वनडे सामना, ब्रिस्बेन (स. ९.०० वाजता)२७ फेब्रुवारी - दुसरा वनडे सामना, होबार्ट (स. ९.०० वाजता)१ मार्च - तिसरा वनडे सामना, होबार्ट (स. ९.०० वाजता)कसोटी सामना६ ते ९ मार्च - दिवस-रात्र कसोटी सामना (स. ११ वाजता)

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 6:10 pm

Video : धक्कादायक! पाच मुस्लिम मुलींनी हिंदू विद्यार्थिनीला घेरलं अन् बुरखा घालायला लावला; 'त्या'व्हिडिओने खळबळ

मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील बिलारी शहरात एका अल्पवयीन हिंदू विद्यार्थिनीसोबत घडलेल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. १२ वीत शिकणाऱ्या पीडितेच्याच पाच मुस्लिम मैत्रिणींनी तिला कोचिंग क्लासबाहेर घेरून जबरदस्तीने बुरखा परिधान करण्यास भाग पाडले. बुरख्यात तू सुंदर दिसशील आणि इस्लाम स्वीकारल्यास तुझे नशीब बदलेल, असे सांगून मुलींनी पीडितेवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. २० डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून, पीडितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पाचही आरोपी मुलींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.https://prahaar.in/2026/01/24/a-rare-viral-video-from-ranthambore-shows-a-tiger-cub-submitting-to-a-sloth-bear/मुरादाबाद प्रकरणातील पीडितेच्या भावाचा मोठा खुलासा...पीडित मुलीच्या भावाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या बहिणीचे पद्धतशीरपणे 'ब्रेनवॉशिंग' करण्यात आले असून, तिला कुटुंबापासून तोडण्याचा आणि धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा भावाने केला आहे. पीडित मुलगी शाहकुंज कॉलनीतील एका ट्यूटरकडे शिकवणीसाठी जात असे. तिच्यासोबतच परिसरातील ५ मुस्लिम मुलीही अकरावी-बारावीत शिकत होत्या. शेजारी आणि मैत्रिणी असल्याने त्या एकत्र शाळेत आणि कोचिंगला जात असत. मात्र, याच मैत्रीचा फायदा घेऊन आरोपी मुलींनी पीडितेच्या मनात तिच्या स्वतःच्या धर्माबद्दल द्वेष निर्माण करण्यास सुरुवात केली. तिला वारंवार इस्लाम धर्म स्वीकारण्याचे आमिष दाखवण्यात आले, ज्यामुळे ती घरातील लोकांचेही ऐकेनाशी झाली होती. २० डिसेंबर रोजी ट्यूशनवरून घरी परतत असताना या पाचही मुलींनी पीडितेला वाटेत अडवून तिला जबरदस्तीने बुरखा घालण्यास भाग पाडले. या प्रकरणावर भाष्य करताना पीडितेच्या भावाने सांगितले की, हा केवळ मुलींमधील वाद नसून यामागे एखादी मोठी इस्लामिक संघटना असू शकते. अल्पवयीन हिंदू मुलींना धर्मांतराच्या जाळ्यात ओढण्यासाठी विद्यार्थीनींचा वापर केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून यामागील सूत्रधाराला अटक करण्याची मागणी आता जोर धरत आहे.https://youtube.com/shorts/FdIVhd1V-WA?feature=shareमुरादाबादमध्ये धर्मांतराच्या प्रयत्नाने हिंदू संघटना आक्रमक!या प्रकारामुळे स्थानिक हिंदू संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू असलेला धर्मांतराचा हा छुपा खेळ तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. शाळा आणि कोचिंग क्लासेसना अशा धार्मिक वादांपासून आणि 'धर्मांतराच्या सावली'पासून वाचवण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, असा पवित्रा संघटनांनी घेतला आहे. एसपी ग्रामीण कुंवर आकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. तपासादरम्यान जे काही पुरावे हाती लागतील, त्यावरून पुढील ठोस पावले उचलली जातील. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, जर या पाचही मुली दोषी आढळल्या, तर त्यांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाईल. आरोपी मुली अल्पवयीन असल्याने त्यांना न्यायालयीन कोठडीत 'शांती निकेतन' किंवा 'बाल सुधारगृहात' पाठवले जाण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यासाठी कमाल ५ वर्षांचा कारावास आणि १५,००० रुपयांच्या दंडाची तरतूद कायद्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यांत सहसा अटक केली जात नाही. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य आणि सामाजिक संताप पाहता, पोलीस विशेष अधिकारांचा वापर करून या मुलींना अटक करण्याच्या विचारात आहेत.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 6:10 pm

राज्यात खळबळ..! 400 कोटींची रोकड असलेला कंटेनर चोरीला? घनदाट जंगलात घडलं तरी काय?

Nashik Crime News : कर्नाटकातील चोरली घाट परिसरात 400 कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा संशय

दैनिक प्रभात 24 Jan 2026 6:00 pm

Scotland Replaces Bangladesh : ICC चा बांगलादेशला दणका! थेट वर्ल्ड कपमधूनच केलं बाहेर; ‘या’संघाला मिळाली संधी

Scotland Replaces Bangladesh : आयसीसीने बांगलादेश टी-२० विश्वचषकातून बाहेर केलं असून त्याच्या स्कॉटलंडला संधी दिली आहे.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 5:43 pm

Viral Video : जोरदार सामना झाला अन् वाघ झुकला!

सवाई माधोपूर : राजस्थानमधील जगप्रसिद्ध रणथंभोर टायगर रिझर्व्हमध्ये शुक्रवारी संध्याकाळी निसर्गाचा एक अत्यंत दुर्मीळ आणि थक्क करणारा आविष्कार पाहायला मिळाला. जंगलाचा राजा समजला जाणारा वाघ आणि रागीट स्वभावाचे अस्वल जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकले, तेव्हा पर्यटकांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, या लढाईचा शेवट ज्या पद्धतीने झाला, ते पाहून निसर्गप्रेमी अवाक झाले आहेत.रणथंभोरमधील व्हायरल व्हिडिओमधली घटना

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 5:30 pm

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी गुवाहाटी येथील एसीसी बरसापारा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात दिमाखदार विजय मिळवून भारताने मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली असून, आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी सूर्यकुमार यादवचा संघ सज्ज झाला आहे.भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इशान किशनचे स्फोटक पुनरागमन आणि सूर्यकुमार यादवची फटकेबाजी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इशान किशनने केलेल्या धमाकेदार पुनरागमनामुळे संघातील सलामीवीराच्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. एकीकडे इशानने आपली दावेदारी मजबूत केली आहे, तर दुसरीकडे संजू सॅमसनचा खराब फॉर्म कायम आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारत दोन सामने शिल्लक असतानाच मालिका खिशात घालेल, ज्यामुळे आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी संघाचा आत्मविश्वास द्विगुणित होईल.दुसरीकडे, पाहुण्या न्यूझीलंड संघासाठी हा सामना अस्तित्वाची लढाई आहे. मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावाच लागेल. किवी फलंदाजांना भारताच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजीचा सामना करण्यासाठी विशेष रणनीती आखावी लागणार आहे.गुवाहाटीचे बरसापारा मैदान हे फलंदाजांसाठी नंदनवन मानले जाते. येथील खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडण्याची शक्यता असून, २०० हून अधिक धावांचे लक्ष्य गाठले जाऊ शकते. रात्रीच्या वेळी पडणारे दव महत्त्वाचे ठरणार असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याची शक्यता अधिक आहे.भारतीय संघाचे नियोजन सलामीची जोडी: संजू सॅमसनच्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर टांगती तलवार आहे. तरीही, मालिका अद्याप जिंकलेली नसल्याने संघ व्यवस्थापन त्याला शेवटची संधी देऊ शकते किंवा इशान किशनला सलामीला बढती देऊन मधल्या फळीत बदल करू शकते. आक्रमक पवित्रा: इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांचा फॉर्म पाहता भारत सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करून न्यूझीलंडला बॅकफूटवर ठेवण्याचे नियोजन करेल. गोलंदाजी: अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांच्यावर मधल्या षटकांत विकेट घेण्याची जबाबदारी असेल.न्यूझीलंड संघाचे नियोजन अस्तित्वाची लढाई: मालिका जिवंत ठेवण्यासाठी न्यूझीलंडला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. फिन ॲलनवर मदार: सलामीवीर फिन ॲलनला मोठी खेळी करावी लागेल. तसेच, मिचेल सँटनरला भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी फिरकीचे जाळे विणावे लागेल.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 5:30 pm

Ekta Sawant : डोंबिवलीतील शॉरमा विकणारी मराठी तरुणी कोण? राज ठाकरेंनीही घेतली दखल, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या…

Ekta Sawant : डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाला प्रश्न आणि मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

दैनिक प्रभात 24 Jan 2026 5:22 pm

भाजप नगरसेविका मृणाल कांबळेंच्या भावावर हल्ला, १५ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : भवानी पेठ परिसरात बॅनर लावण्यावरून झालेला वाद हाणामारीत रूपांतरित झाला. या घटनेत भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका मृणाल कांबळे यांचा भाऊ शंतनू उर्फ बापू यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. खडक पोलिसांनी १४ ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. शंतनू यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. गुरुवारी (२२ जाने.) दुपारी सुमारे ३.३० वाजता काशेवाडी परिसरात निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर कांबळे समर्थकांकडून मतदारांचे आभार मानण्यासाठी बॅनर लावण्याचे काम सुरू होते. त्यावेळी प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेविका अर्चना पाटील यांचे पती तुषार यांचे समर्थक घटनास्थळी आले व त्यांनी बॅनर लावू नये असे सांगितले. यावरून वाद वाढला आणि जमावाने शंतनू यांच्यावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, अशी तक्रार आहे. पुन्हा त्या भागात बॅनर लावल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कदम करत आहेत. संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाही नोंदवण्यात येत आहेत.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 5:10 pm

भारत पेट्रोलियमचा दमदार तिमाही निकाल नफ्यात ८९% वाढ 'इतका'लाभांशही जाहीर

मोहित सोमण: देशातील मोठी पीएसयु भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेडने आपला तिमाही निकाल जाहीर केला. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर करोत्तर नफा (Profit after tax PAT) गेल्या वर्षीच्या ४६४९ कोटी तुलनेत यंदा ७५४५ कोटींवर प्राप्त केला. म्हणजेच कंपनीच्या निव्वळ नफ्यात ८९% वाढ झाली असल्याचे सांगितले गेले. तसेच कंपनीच्या करपूर्व नफ्यात (Profit before tax PBT) इयर ऑन इयर बेसिसवर ६१७६ कोटींवरून १००९४ कोटींवर वाढ झाली. विशेष म्हणजे कंपनीच्या व्याजातील खर्चात (Interest Expense) इयर ऑन इयर बेसिसवर ४२९ कोटीवरून ३६१ कोटींवर घसरण झाली. तर व्याज उत्पन्न (Interest Income) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ३६९ कोटीवरून ३२२ कोटीवर घसरण झाली आहे.विशेष म्हणजे जागतिक स्तरावरील परदेशी चलन विनिमय (Foreign Exchange) मुळे कंपनीच्या नफ्यात परिणाम झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. कंपनीच्या आकडेवारीनुसार तो फरक २७३ कोटीवरून १६७ कोटींवर गेल्याचे म्हटले गेले. कंपनीच्या थकबाकीतही इयर ऑन इयर बेसिसवर १९६२२ वरून ५२९३ कोटीत घसरण झाली. जीआरएम (Gross Refining Margin) मध्ये मुंबईत ४.५० युएस अब्ज डॉलरवरून ११.४० इतकी मोठी वाढ झाली आहे तर कोची रिफायनरीत ५.४७ युएस अब्ज डॉलरवरून १२.७० अब्ज डॉलर व बिना रिफायनरीतून ७.७८ वरून १८.१७ अब्ज डॉलरवर ही वाढ गेली. तसेच निकालासह कंपनीने थेट १० रूपये लाभांश जाहीर केला आहे.संचालक मंडळाने शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १००% म्हणजेच १० रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरचा दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला. याविषयी बोलताना एक्सचेंज फायलिंगमध्ये कंपनीने,प्रति इक्विटी शेअरचा दुसरा इक्विटी शेअर १० रुपये इतका अंतरिम लाभांश रेकॉर्ड डेट बंद होताना म्हणजेच सोमवार, २ फेब्रुवारी २०२६ रोजी कंपनीचे इक्विटी शेअर्स असलेल्या भागधारकांना दिला जाईल असे स्पष्ट केले. काल बाजार बंद होताना कंपनीचा शेअर १.२६% कोसळला असून गेल्या ५ दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये ३.६८% घसरण झाली. गेल्या १ महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ४.४३% घसरण झाली असून वर्षभरात शेअर्समध्ये ३२.५६% वाढ झाली आहे तर इयर टू डेट बेसिसवर (YTD) ८.३४% वाढ झाली आहे.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 5:10 pm

Ajit Pawar : राजकारणात मोठी उलथापालथ होणार? अजित पवार महाविकास आघाडीत परतणार? ‘या’नेत्याच्या दाव्याने खळबळ

Ajit Pawar : अजित पवार पुन्हा महाविकास आघाडीत परततील, असा दावा संजय राऊत यांनी केला.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 4:36 pm

Navi Mumbai: महापे MIDC मध्ये अग्नितांडव, उंचच्या उंच उडाल्या आगीच्या ज्वाळा

नवी मुंबई : नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्र असलेल्या महापे एमआयडीसीमध्ये भीषण आगीची घटना घडली. येथील 'बिटाकेम'या केमिकल कंपनीला अचानक आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की आगाच्या ज्वाळा बहुमजली इमारतीपेक्षा मोठ्या दिसत होत्या. धुराचे लोळ लांबूनच दिसत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये बहीची वातावरण निर्माण झाले.मिळालेल्या माहितीनुसार, महापे एमआयडीसीमधील W-177 क्रमांकाच्या बिटाकेम या केमिकल कंपनीत ही आग लागली. कंपनीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक साठा असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरूघटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. केमिकल कंपनी असल्याने आग विझवताना विशेष खबरदारी घेतली जात आहे. अग्निशमन दलाच्या किमान ४ ते ५ गाड्या घटनास्थळी कार्यरत असून, पाण्याचा मारा सुरू आहे. सुदैवाने, या भीषण घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे . शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्यानंतर आणि पंचनामा केल्यानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील लोकांना बाहेर काढलं जात आहे. आजूबाजूच्या कंपन्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 4:30 pm

Border 2 Movie Review : बॉक्स ऑफिसवर 'बॉर्डर २'चा! २९ वर्षांनंतरही सनी देओलचा तोच दरारा; चाहत्यांच्या थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्या

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित युद्धावर आधारित चित्रपट 'बॉर्डर'चा वारसा २९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अवतरला आहे. १९९७ मध्ये जे.पी. दत्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या 'बॉर्डर'ने प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना जागृत केली होती. त्याच लोंगेवाला युद्धाची शौर्यगाथा आता ‘बॉर्डर २’ च्या रूपाने २३ जानेवारी २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाली आहे. या चित्रपटातून सनी देओल पुन्हा एकदा आपल्या करारी आवाजात शत्रूला आव्हान देताना दिसत असून, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, जे.पी. दत्ता आणि निधी दत्ता यांनी केली असून, दिग्दर्शनाची धुरा अनुराग सिंह यांनी सांभाळली आहे. पहिल्या 'बॉर्डर'ने ऑरिजिनलिटी आणि भावनेचा जो डोंगर उभा केला होता, तिथेच 'बॉर्डर २' कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा हिमालयाइतक्या उंचावल्या आहेत. तब्बल पाव शतकानंतर सनी देओलची तीच जादू पुन्हा अनुभवण्यासाठी चाहते थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. चित्रपटाचा भव्य कॅनव्हास आणि युद्धाचे प्रसंग जुन्या आठवणींना उजाळा देणारे ठरत आहेत.तांत्रिकदृष्ट्या भव्य असूनही प्रेक्षकांमध्ये संमिश्र सूरhttps://prahaar.in/2026/01/24/parle-g-factory-in-vile-parle-to-be-demolished-for-high-rise-commercial-complex-what-is-the-real-reason/चित्रपटात आजही तो जुना 'बॉर्डर'वाला खास फ्लेवर जपण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, अनेक हृदयस्पर्शी दृश्यांमध्ये प्रेक्षकांचे डोळे पाणावताना दिसत आहेत. मात्र, १९९७ च्या मूळ चित्रपटानं जे मातीचं सत्व आणि अस्सलता (Originality) जपली होती, त्या तुलनेत 'बॉर्डर २' चा प्रभाव थोडा कमी पडत असल्याची भावना चित्रपट रसिकांकडून व्यक्त केली जात आहे. चित्रपट तांत्रिकदृष्ट्या अत्यंत भव्य आणि आधुनिक आहे. युद्धाचे प्रसंग आणि सिनेमॅटोग्राफी प्रेक्षकांना थक्क करणारी आहे. तरीही, समीक्षकांच्या मते, पहिल्या भागात जो 'मातीचा सुगंध' आणि नैसर्गिक संवाद होते, त्यांची जागा आता तंत्रज्ञानाने घेतल्याचे जाणवते. भावनांच्या बाबतीत चित्रपट यशस्वी ठरला असला तरी, मूळ 'बॉर्डर'शी तुलना करताना हा चित्रपट काहीसा मागे पडताना दिसतो.५०० कोटींचा आकडा पार करण्याची शक्यता...एखाद्या ऐतिहासिक चित्रपटाचा सिक्वेल बनवणे ही निर्मात्यांसाठी 'अग्निपरीक्षा'च असते आणि 'बॉर्डर २'च्या बाबतीत निर्माते या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले आहेत. चित्रपटातील देशभक्तीचा जोश आणि मनाला भिडणारे संगीत पाहता, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ४०० ते ५०० कोटींची कमाई करून नवीन विक्रम प्रस्थापित करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून हा चित्रपट सुपरहिट ठरला असला तरी, १९९७ च्या मूळ 'बॉर्डर'ची जागा घेणे या चित्रपटाला शक्य नसल्याचे मत समीक्षकांनी व्यक्त केले आहे. निर्माते भूषण कुमार आणि जे.पी. दत्ता यांनी चित्रपटाच्या प्रत्येक विभागात घेतलेली मेहनत पडद्यावर स्पष्टपणे दिसते. मात्र, एक कटू सत्य असे की, सर्व तांत्रिक कुशलता असूनही पहिल्या चित्रपटातील ती नैसर्गिक 'जादू' आणि प्रेक्षकांशी असलेली आत्मिक जोडणी (Emotional Connection) यावेळी काहीशी फिकी पडल्याचे जाणवते. तरीही, सनी देओलचा स्क्रीन प्रेझेन्स आणि राष्ट्रभक्तीचा ज्वर यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरत आहे.चित्रपटाची कहाणी काय?'बॉर्डर २' बाबतची सर्वात महत्त्वाची आणि उत्सुकता वाढवणारी गोष्ट म्हणजे हा चित्रपट जुन्या भागाचा रिमेक नसून एक पूर्णपणे स्वतंत्र आणि खऱ्या घटनेवर आधारित शौर्यगाथा आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय लष्कर, वायूसेना आणि नौदलाने मिळून राबवलेल्या एका ऐतिहासिक 'संयुक्त मोहिमेचा' थरार या चित्रपटात मांडण्यात आला आहे. तिन्ही दलांच्या समन्वयातून शत्रूचा पराभव कसा केला जातो, याचे जिवंत चित्रण मोठ्या पडद्यावर करण्यात आले आहे. सनी देओल पुन्हा एकदा लेफ्टनंट कर्नल फतेह सिंह कलेर या करारी भूमिकेत असून, ते केवळ एक सैनिक नसून तिन्ही दलांच्या जवानांचे मार्गदर्शक (मेंटॉर) आहेत. मोहिमेच्या केंद्रस्थानी मेजर होशियार सिंह (वरुण धवन), एअरफोर्स ऑफिसर निर्मल जीत सिंह (दिलजीत दोसांझ) आणि नेव्ही कमांडर एम.एस. रावत (अहान शेट्टी) यांची जबरदस्त तुकडी आहे. केवळ युद्धच नाही, तर या चारही योद्ध्यांचा वैयक्तिक जीवनप्रवास, त्यांच्या कुटुंबांचे त्याग आणि सीमेवरील त्यांचा सामूहिक संघर्ष हा या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे.वरुण धवनने अभिनयाने दिली टीकाकारांना चपराक'बॉर्डर २' च्या कास्टिंगवरून सोशल मीडियावर अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या, मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. विशेषतः वरुण धवनच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना त्याने आपल्या दमदार अभिनयाने चकित केले आहे. दुसरीकडे, सनी देओलने २९ वर्षांनंतरही आपला तोच दरारा आणि करारीपणा कायम राखला असून, त्याचा वावर प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा थरारक अनुभव ठरला आहे. वरुण धवनने एका शिस्तबद्ध सैनिकाची भूमिका साकारताना कोठेही अतिरंजितपणा (Overacting) न करता संयमित अभिनय केला आहे. सैनिकाच्या अंतर्मनातील द्वंद्व त्याने ज्या पद्धतीने जिवंत केले, ते पाहून त्याने आपल्या टीकाकारांची बोलती बंद केली आहे. जेव्हा मोठ्या पडद्यावर 'गरजण्याची' वेळ येते, तेव्हा सनी देओलला आजही तोड नाही. चित्रपटात सनीचा स्क्रीन प्रेझेन्स इतका जबरदस्त आहे की, प्रत्येक वेळी तो पडद्यावर येताच प्रेक्षकांच्या अंगावर काटे येतात. २९ वर्षांपूर्वीच्या मूळ 'बॉर्डर'मधील तोच उत्साह सनीने आजही टिकवून ठेवल्याचे जाणवते.कुठे कमी पडला चित्रपट?'बॉर्डर २' हा तांत्रिकदृष्ट्या एक अत्यंत सक्षम चित्रपट असला तरी, १९९७ च्या मूळ 'बॉर्डर'शी तुलना करताना तो काहीसा फिका पडत असल्याचे जाणवत आहे. प्रांजळपणे विश्लेषण केल्यास, नवीन चित्रपट भव्य वाटतो, मात्र जुन्या 'बॉर्डर'मध्ये असलेली 'अस्सलता' आणि 'मातीचा सुगंध' यात कुठेेतरी हरवला आहे. जुन्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या काळजाला जो स्पर्श केला होता, तो अनुभव यावेळी तितक्या प्रभावीपणे घेता येत नसल्याचे मत सिने-समीक्षकांनी व्यक्त केले आहे. १९९७ च्या चित्रपटात मथुरा दास किंवा धर्मवीर यांसारखी छोटी पात्रेही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. त्या पात्रांमध्ये एक वेगळा 'आत्मा' होता. त्या तुलनेत 'बॉर्डर २' मधील पात्रे तांत्रिकदृष्ट्या मजबूत असूनही काही ठिकाणी कृत्रिम किंवा 'बनावट' वाटतात. जुन्या चित्रपटातील युद्धाचे प्रसंग नैसर्गिक वाटायचे, तर आजच्या काळात आधुनिक कॅमेरे आणि व्हीएफएक्स (VFX) असूनही त्यातील मूळ उत्साह आणि भावनांची खोली कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 4:30 pm

Chhattisgarh Bridge Stolen : छत्तीसगडमध्ये मध्य रात्री कॅनलवर बनलेला स्टीलचा पुल चोरीला, चोरांची अनोखी चोरी..!

छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये कोरबा शहरात एक विचीत्र चोरीची घटना समोर आली आहे. छत्तीसगड येथे हसदेव लेफ्ट कॅनालवर बांधलेला,सुमारे ४० वर्षे जुना आणि अंदाजे १० टन वजनाचा स्टील पूल रातोरात लंपास केला. हा पूल ढोडीपारा परिसरा मध्ये असून, तो प्रामुख्याने पादचाऱ्यांसाठी वापर केला जात होता.१८ जानेवारी रोजी तिथे राहत असलेल्या नागरिकांच्या लक्षात आले की पूल अचानक गायब झाला आहे. या घटने नंतर तेथील भागाचे नगरसेवक लक्ष्मण श्रीवास यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना आढळले की चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने पुलाचे लोखंडी रेलिंग आणि संपूर्ण रचना कापून वेगवेगळ्या भागांत विभागली आणि भंगार म्हणून विक्री करण्याच्या उद्देशाने चोरी केली. कोरबाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक लखन पाटले यांनी सांगितले की, तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. तांत्रिक तपास, गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि कसून चौकशीनंतर या गुन्ह्यात सुमारे १५ जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत लोचन केवट, जयसिंह राजपूत, मोती प्रजापती, सुमित साहू आणि केशवपुरी गोस्वामी उर्फ ‘पिक्चर’ या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.चौकशीत आरोपींनी पुलातील लोखंड स्क्रॅपमध्ये विकण्याचा कबुलीजबाब दिला आहे. मुख्य आरोपी मुकेश साहू आणि असलम खान यांच्यासह इतर १० आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी चोरीतील सुमारे सात टन स्टील नहरातून जप्त केले असून, चोरीसाठी वापरलेले वाहनही ताब्यात घेतले आहे. उर्वरित स्टील कुठे विकले गेले, याचा तपास सुरू आहे. पूल चोरी झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना नहर ओलांडण्यासाठी जवळील काँक्रीट पुलाचा वापर करावा लागत आहे.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 4:10 pm

Tamil Nadu: राज्यपालांचे सरकारच्या विरोधात काम सुरु –मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन

Tamil Nadu: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी विधानसभेत बोलताना राज्यपाल आर.एन. रवी यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 3:55 pm

कमल आर खानला २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी; मुंबईतील एका निवासी इमारतीवर झाडल्या गोळ्या

प्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खान याला ओशिवरा गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. १८ जानेवारी रोजी, अभिनेता-सोशल मीडिया सेलिब्रिटी कमाल रशीद खान यांना मुंबईतील अंधेरी येथील ओशिवरा येथील एका निवासी इमारतीत चार राउंड गोळीबार केल्याबद्दल अटक करण्यात आली.लेखक-दिग्दर्शक नीरज कुमार मिश्रा (४५) हे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात, तर मॉडेल प्रतीक बैद (२९) चौथ्या मजल्यावर राहतात.सुरुवातीला गोळीबार कोणी केला हे स्पष्ट झाले नव्हते. तथापि, आता तपासात असे समोर आले आहे की केआरकेनेच गोळीबार केला होता. त्यामुळे आता अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे.मुंबई पोलिसांच्या पथकाने चौकशी करताना कमाल आर खानने स्वतःच्या परवानाधारक बंदुकीने गोळीबार केल्याची कबुली दिली.बंदुकीचा परवाना कधी मिळाला?केआरकेने २००५ मध्ये उत्तर प्रदेश राज्यातून बंदुकीचा परवाना मिळवला. उत्तर प्रदेशातून बंदूक मिळाल्यानंतर त्याने तो मुंबईत आणला. गेल्या वीस वर्षांपासून त्याने ती बंदूक मुंबईतील त्याच्या घरी ठेवली होती. काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली, त्यानंतर त्याने त्याची परवाना असलेली बंदूक वर्सोवा पोलिस ठाण्यात जमा केली.आचारसंहिता संपल्यानंतर, कमाल खानने वर्सोवा पोलिस स्टेशनमधून बंदूक परत आणली. चार-पाच दिवसांनी, घरी बंदूक साफ करताना, त्याने त्याची कार्यक्षमता तपासण्यासाठी दोन गोळ्या झाडल्या. यावेळी, त्याने लोखंडवाला बॅकसाइड रोडवरील एका झाडावर गोळीबार केला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने, गोळी जवळच्या नालंदा इमारतीला लागली.यानंतर,ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांनी प्रकरणाचा तपास केला आणि अभिनेता कमाल आर खानला चौकशी केल्यानंतर अटक केली. केआरकेचा असा दावा आहे की त्याचा कोणालाही इजा करण्याचा हेतू नव्हता.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 3:30 pm

Ankita Walawalkar | “आमच्या आयुष्यात एक नवीन पाऊल पडलं”; अंकिता वालावलकरने खरेदी केली नवी कार

Ankita Walawalkar | अंकिता वालावलकरने दाखवली नव्या कारची झलक; दोन्ही कार म्हणजे आमच्या मेहनतीचं आणि प्रगतीचं प्रतीक असल्याचे म्हणत शेअर केली पोस्ट

दैनिक प्रभात 24 Jan 2026 3:14 pm

Border 2 Box Office : बॅार्डर २ चा धुव्वा…पहिल्याच दिवशी ‘धुरंधर’चा रेकॅार्ड मोडला! पाहा BOX OFFICE कलेक्शन

Border 2 Box Office : बॅार्डर २ चित्रपट प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने धुरंधरच्या ओपनिंग डे चे रेकॅार्ड मोडले आहे.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 3:05 pm

Sahar Sheikh Apology |“मुंब्रा को हरा बना देंगे”म्हणणाऱ्या सहर शेखचा माफीनामा; भाजप नेत्याने दिली माहिती

Sahar Sheikh Apology | नवनिर्वाचित नगरसेवक सहर युनूस शेख यांचे हम मुंब्रा को हरा बना देंगे हे विधान चांगलेच चर्चेत राहिले. मात्र वादानंतर आता सहर शेख यांनी माफी मागितली आहे.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 2:47 pm

Kareena Kapoor : बेबोचा कॅज्युअल लूक! मुंबई एअरपोर्टवर झाली स्पॅाट; व्हिडिओ व्हायरल

Kareena Kapoor ; अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या आगामी दायरा चित्रपटामुळे चर्चेत असून, या दरम्यान ती मुंबई विमानतळावर स्पॅाट झाली.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 2:40 pm

भाजपच्या खारेपाटण जि.प.उमेदवार प्राची इस्वालकर बिनविरोध

ठाकरे सेनेला आणखी धक्काउबाठा सेनेच्या खारेपाटण जि. प. च्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी घेतली माघारकणकवली : तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे सेनेला सलग धक्के दिले जात आहेत. सलग दुसऱ्या दिवशी खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील ठाकरे सेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे या मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार प्राची इस्वलकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत.या घडामोडींमुळे कणकवली तालुक्यात भाजपाकडून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या ३ झाली असून, कणकवली विधानसभा मतदारसंघात ही संख्या एकूण ४ पोहोचली आहे.पालकमंत्री . नितेश राणे यांचे ‘दे धक्का तंत्र’ सध्या केवळ मतदार संघातच नव्हे, तर राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. मीनल तळगावकर यांच्या माघारीच्या निर्णयामुळे ठाकरे सेनेला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.विशेष म्हणजे शनिवार असूनही निवडणूक प्रक्रियेमुळे निवडणूक कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत आणखी कोण उमेदवार माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कालच या मतदार संघातील अपक्ष उमेदवार उज्ज्वला चिके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर आज ठाकरे शिवसेनेच्या एकमेव विरोधी उमेदवार मीनल तळगावकर यांनीही माघार घेतल्याने प्राची इस्वलकर या या मतदार संघातील एकमेव उमेदवार राहिल्या. दरम्यान, ‘दे धक्का’ तंत्राचा मोठा फटका २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी बसण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 2:30 pm

जिओ फायनांशियल सर्विसेसकडून आपली उपकंपनी जिओ अल्टरनेटिव इन्व्हेसमेंट मॅनेजर लिमिटेडची नोंदणी

मोहित सोमण: जिओ फायनान्स लिमिटेड (Jio Finance Limited) कंपनीने आज आपली संपूर्ण मालकीची असलेली जिओ अल्टरनेटिव इन्व्हेसमेंट मॅनेजर (Jio Alternative Investment Manager) लिमिटेड कंपनी नोंदणीकृत करण्यात आली असल्याचे कंपनीने आज एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीत कंंपनी १० रूपये दर्शनी मूल्य (Face Value) प्रमाणे १० लाख शेअर माध्यमातून १ कोटींची प्रारंभिक गुंतवणूक करणार आहे. याविषयी एक्सचेंज फायलिंगमध्ये माहिती देताना,कंपनी जेएआयएमएलच्या प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याच्या १०००००० इक्विटी शेअर्सच्या प्रारंभिक वर्गणीसाठी १ कोटी रुपयांची गुंतवणूक करेल असे कंपनीने म्हटले. तसेच हा व्यवहार संबंधित पक्षांच्या व्यवहारांच्या कक्षेत येत नाही आणि कंपनीचे प्रवर्तक (Promoter) प्रवर्तक गट आणि समूह कंपन्यांपैकी कोणाचाही उपरोक्त व्यवहारात कोणताही हितसंबंध नाही. कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून, ईमेलद्वारे, २३ जानेवारी २०२६ रोजी प्राप्त झाले असे कंपनीने सांगितले.एआयएफ इन्व्हेसमेंट (Alternative Investment Fund AIF Investment) हा गुंतवणूकीचा एक आधुनिक प्रकार आहे. या माध्यमातून उच्च उत्पन्न, अथवा अति उच्च उत्पन्न असलेल्या गुंतवणूकदारांना इक्विटी, डेट, व म्युच्युअल फंड या पर्यायांव्यतिरिक्त एक वेगळा पर्यायी गुंतवणूकीचा मार्ग विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूकीसाठी खुला होता. हा पर्याय मोठ्या प्रमाणात परतावा देत असला तरी तुलनेने तो कमी सेबी नियंत्रित आहे आणि हा पर्याय गुंतवणूकदारांसाठी जोखमेचा पर्याय म्हणून ओळखला जातो. किमान १ कोटींची गुंतवणूक या उत्पादनात करणे आवश्यक असते.जिओ फायनांशियल सर्विसेस कंपनीने नुकताच आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीने मजबूत आर्थिक निकाल नोंदवला होता. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या उत्पन्नात इयर ऑन इयर बेसिसवर थेट १०१% वाढ झाली होती ज्यात उत्पन्न डिसेंबर पर्यंत ९०१ कोटीवरून वाढत १९०४९ कोटींवर पोहोचले होते. जिओ फायनांशियल सर्विसेह ही एक वित्तीय सेवा देणारी कंपनी असून कंपनीचा शेअर काल ३.५८% घसरत २५३.२९ रुपयांवर बंद झाला होता. गेल्या ५ दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये ९.३४% घसरण झाली आहे तर गेल्या महिन्यात शेअर्समध्ये १५.२९% घसरण झाली होती.तर वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये मात्र ३.५८% वाढ झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) शेअर्समध्ये १४.३७% घसरण झाली आहे.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 2:30 pm

Pune Mayor : मोठी बातमी! पुण्याचा कारभारी ‘या’दिवशी ठरणार; भाजप धक्कातंत्र देणार की…

Pune Mayor : पुणे महापालिकेच्या महापौर पदावरून मोठी रस्सीखेच होत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजप पुन्हा धक्कातंत्र देणार की चर्चेतल्याच नावाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 1:54 pm

Ashok Chaudhary on Bihar Bhawan | “कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात बिहार भवन बांधू, राज ठाकरे हे महाराष्ट्रातले राजा आहेत का?” 

Ashok Chaudhary on Bihar Bhawan |राज ठाकरे हे महाराष्ट्रातले राजा आहेत का? कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात बिहार भवन बांधू,बिहार सरकारमधील मंत्र्याचा थेट इशारा

दैनिक प्रभात 24 Jan 2026 1:26 pm

Iron Deficiency : महिलांच्या या रोजच्या चुकांमुळे वाढतोय एनीमियाचा धोका, वेळीच सावध व्हा

Iron Deficiency : महिलांमध्ये एनीमिया म्हणजेच रक्ताची कमतरता ही समस्या खूप सामान्य आहे. मात्र अनेक वेळा ही समस्या एखाद्या मोठ्या आजारामुळे नव्हे, तर रोजच्या जीवनातील छोट्या-छोट्या चुकीच्या सवयींमुळे वाढताना दिसते.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 1:24 pm

भिवंडीमध्ये मानवतेला काळीमा; कॅन्सरशी झुंज देणाऱ्या पत्नीवर हुंड्यासाठी ......, पतीसह सात आरोपींवर गुन्हा

भिवंडी : कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात उपचार सुरू असताना एका महिलेवर हुंड्याच्या हव्यासापोटी अमानुष छळ केल्याचा गंभीर प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. पीडितेच्या थेट तक्रारीनंतर पती आणि सासरच्या सदस्यांविरोधात महाराष्ट्रातील अंधश्रद्धा व अमानवी प्रथा प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.३६ वर्षीय पीडित महिला सध्या भिवंडीमध्ये वास्तव्यास असून ती जीवघेण्या आजाराशी लढा देत आहे. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, विवाहानंतर अनेक वर्षे हुंड्याच्या मागणीसाठी तिला शारीरिक तसेच मानसिक त्रास दिला जात होता. आजारपणालाच कारणीभूत धरत तिला अपशकुनी ठरवून अघोरी कृत केल्याचा आरोप तिने केला आहे.तक्रारीप्रमाणे, गंभीर आजाराचे निदान झाल्यानंतर उपचारासाठी मदत करण्याऐवजी छळ अधिक तीव्र करण्यात आला. डिसेंबर २०२५ मध्ये पतीने तिला अल्पवयीन मुलासह घराबाहेर काढले. यावेळी तिच्या बहिणी आणि मुलावर मारहाण झाल्याचेही समोर आले आहे.यानंतर जानेवारी २०२६ मध्ये पीडित महिला राहत असलेल्या घराबाहेर जादूटोणाशी संबंधित साहित्य ठेवण्यात आल्याची घटना घडली. हा प्रकार केवळ मानसिक दहशत निर्माण करण्यासाठी नव्हे, तर गंभीर धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने केल्याचा संशय पोलिसांनी नोंदवला आहे.या प्रकरणात पती योगेशकुमार केशरवानी याच्यासह त्याचे आई-वडील आणि इतर नातेवाइकांविरोधात भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमे तसेच महाराष्ट्र नरबळी व अमानुष, अनिष्ट प्रथा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निजामपूरा पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींच्या भूमिकेबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 1:10 pm

Dr. Maithili tambe : पहिल्याच बैठकीत धाडसी निर्णय! नगराध्यक्षा डॅा. मैथिली तांबे राबवणार उपत्न वाढीचा अजेंडा

Dr. Maithili tambe: संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष डॅा. मैथिली तांबे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाची चर्चा नाशिक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 1:06 pm

Terrorists Arrested : प्रजासत्ताक दिनापूर्वी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; ४ दहशतवाद्यांना अटक

Terrorists Arrested : प्रजासत्ताक दिनापूर्वी मोठा दहशतवादी कट उधळण्यास पंजाब पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत चार दहशतवाद्यांना अटक केली असून २.५ किलो आरडीएक्सने भरलेले आयईडी देखील जप्त करण्यात आले आहे.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 12:36 pm

Keerthy Suresh: कीर्ती सुरेशचा ‘डबिंग मॅरेथॉन’; सलग ९ तास काम, फोटो शेअर करत सांगितला अनुभव

Keerthy Suresh: दक्षिण चित्रपटसृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कीर्ती सुरेश आपल्या मेहनतीसाठी आणि प्रोफेशनल वृत्तीसाठी ओळखली जाते.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 12:35 pm

Georgia : जॅार्जियामध्ये गोळीबाराचा थरार….एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू; कौटुंबिक वादातून घडली घटना

Georgia :जॉर्जियातील लॉरेन्सव्हिल येथे गोळीबाराची घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून एका भारतीय नागरिकासह चार जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 12:27 pm

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम शिखर परिषदेची दावोस येथे सांगता, सकारात्मक आंतरदेशीय संबंधावर विकास अवलंबून असल्याचे अधोरेखित

दावोस: जागतिक अर्थकारणात महत्वाचे स्थान ग्रहण करणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथील परिषदेची अखेर सांगता झाली आहे. या परिषदेत जगभरातील अर्थकारणातील मान्यवर उपस्थित राहून विविध विषयांवर चर्चा करतात व आर्थिक करारही मंजूर करतात. या अत्यंत महत्वाच्या परिषदेची अखेर सांगता झाली असताना या ५६ व्या वार्षिक बैठकीने निर्णयकर्त्यांना (Decision Makers) व धोरणकर्त्यांना (Policymakers) एकत्र आणण्यासाठी एक महत्त्वाचे आणि अग्रगण्य व्यासपीठ म्हणून काम केले. या बैठकीत झालेल्या महत्त्वपूर्ण संवादाने आज जगासमोर असलेल्या सर्वात आव्हानात्मक समस्यांवर प्रगती साधण्यास मदत झाली. संस्थेनेच दिलेल्या माहितीनुसार १३० देशांमधील विविध प्रदेश, क्षेत्र आणि पिढ्यांमधील जवळपास ३००० औद्योगिक नेते एकत्र आले असून ज्यामध्ये विक्रमी ४०० सर्वोच्च राजकीय नेते, जवळपास ६५ राष्ट्राध्यक्ष आणि सरकार प्रमुख, जी७ देशांमधील बहुसंख्य नेते, जगातील जवळपास ८३० सर्वोच्च सीईओ आणि अध्यक्ष, आणि जवळपास ८० आघाडीच्या युनिकॉर्न कंपन्यांचे प्रतिनिधी व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्तींचा समावेश होता.यामध्ये आर्थिक व भूराजकीय अशा विविध विषयांवर विस्तृत चर्चा झाली आहे. तज्ञांनी नोव्हेंबरमधील व्यापार करारानंतर अमेरिका-चीन संबंधांच्या दिशेचे मूल्यांकन केले आणि एकूणच जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील जागतिक आर्थिक स्थिरता व भूराजकीय स्पर्धेवर होणाऱ्या परिणामांचा विचार केला गेला असे सांगण्यात येत आहे.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (WEF) माहितीनुसार, अर्थशास्त्रातील पाच नोबेल पारितोषिक विजेत्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेवरील त्यांचे नवीनतम संशोधन आणि अंतर्दृष्टीही यावेळी सादर केली.माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत हा अनिश्चिततेचा, पण संधींचाही क्षण आहे माघार घेण्याचा नाही, तर सहभागी होण्याचा क्षण आहे असे आणि सीईओ बोर्गे ब्रेंडे म्हणाले आहेत.जागतिक आर्थिक मंच सध्याच्या घटनांवर प्रतिक्रिया देण्यासाठी नाही, तर पुढे जाण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्याबद्दल आहे असे ब्रेंडे यांनी पुढे सांगितले.अस्थिरतेच्या काळातही अर्थव्यवस्थेची सापेक्ष लवचिकता अधोरेखित या परिषदेत अधोरेखित करण्यात आली आहेत. मालमत्ता मूल्यांकनातील अनिश्चितता, सार्वभौम कर्जाचे संकट आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेतील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) अंमलबजावणीच्या बाबत या परिषदेत चर्चा करण्यात आली. विशेषतः या परिषदेतील अधोरेखित मुद्दा म्हणजे एआय होती. या विषयावर बोलताना,' एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) ही श्रम बाजारावर आदळणारी त्सुनामी आहे आणि अगदी सर्वोत्तम तयारी असलेल्या देशांमध्येही मला वाटत नाही की आपण पुरेसे तयार आहोत' असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या.मी विकसनशील देशांना हा सल्ला देईन की, तुम्ही तुमची पायाभूत सुविधा विकसित करा, कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये (AI) सहभागी व्हा आणि हे ओळखा की एआय (AI) मुळे तंत्रज्ञानातील दरी कमी होण्याची शक्यता आहे असे एनव्हिडियाचे संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग म्हणाले आहेत. विविध उद्योगपती व्यवसायिक नेत्यांनी जागतिक व्यापारातील विशेषतः जगातील काही सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील वाढत्या फुटीबद्दल सावध केले असून आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या परस्पर फायदेशीर संबंधावर आपला कल असल्याचे या निमित्ताने स्पष्ट केले आहे.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 12:10 pm

सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी उद्या बोलावली तातडीची बैठक

प्रतिनिधी: एकीकडे आठव्या वेतन आयोगाची चर्चा जोरात असताना वेतन आयोगाच्या अहवालातील शिफारशी आयोग अध्यक्षा रंजना देसाई यांना सुपूर्द करण्यात आल्या होत्या. लवकरच सरकार यावर अंतिम निर्णय घेणार आहे. दरम्यान उपलब्ध माहितीनुसार, सरकार अंतिम चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या व निवृत्तीधारक कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळ प्रतिनिधींशी बैठक उद्या २५ जानेवारी रोजी घेणार आहे.कर्मचाऱ्यांच्या मागण्या व सूचनांची दखल घेण्यासाठी ही बैठक होणार असल्याचे समजते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, रेल्वे, संरक्षण, टपाल, आयकर आणि इतर केंद्र सरकारी सेवांमधील कर्मचारी आणि पेन्शनर संघटनांसह अनेक प्रमुख विभागांच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. नॅशनल काऊन्सिल (कर्मचारी) व संयुक्त सल्लागार मशिनरी (Joint Consultative Machinery NC JCM) यांच्या संयुक्त बैठकीतून सरकार वेतन आयोगात संबंधित ठोस निर्णय घेण्यासाठी विचार विनिमय करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता १३-सी, फिरोजशाह रोड, नवी दिल्ली येथे होणार आहे.एनसी-जेसीएमचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी मसुदा समितीच्या सदस्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वेतन आयोगाचे कार्यालय पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर, परिषदेला सेवा-संबंधित मुद्द्यांवर आपले निवेदन सादर करण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे. तसेच विविध मुद्द्यांवरील प्रस्तावांना अंतिम रूप देण्यासाठी सविस्तर चर्चा अपेक्षित असल्याने, सदस्यांना सुमारे एक आठवडा दिल्लीत थांबावे लागू शकते असेही पत्रात त्यांनी नमूद केले आहे.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 12:10 pm

Bollywood’s Richest Actress Daughter : आई ७,७९० कोटींची मालकीण; बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रीची लेक अभिनयापासून दूर

Bollywood's Richest Actress Daughter : बॉलीवूडमध्ये स्टारकिड्सची नेहमीच चर्चा असते. अनेक सेलिब्रिटींची मुलं आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण करतात.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 11:53 am

Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण; दोषमुक्त झाल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया समोर

Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन प्रकरणात आज न्यायालयाने आम्हाला दोषमुक्त केले आहे. सत्याचा आणि न्यायाचा विजय झाला आहे. अशी पहिली प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 11:48 am

अहिल्यानगरमधील खुनाचा उलगडा समोर, भाच्याने झोपेतच मामाला संपवलं; मामाच्या....

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये राहत्या घरी एका व्यक्तीचा खून झाला होता. शेवटी या घटनेचा उलगडा सुटला आहे. भाळावस्ती परिसरात घडलेल्या निर्घृण खुनाचा शेवटी आरोपी सापडला आहे. आर्थिक व्यवहार आणि सततच्या पैशाच्या मागणीतून भाच्यानेच आपल्या मामाचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास शिंदा येथील भाळावस्तीमध्ये हनुमंत गोरख घालमे ( वय ३५ ) हे आपल्या राहत्या घरात झोपले असताना अज्ञाताने त्यांच्या डोक्यात हत्याराने घाव घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. हा सगळा प्रकार रात्रीच्या अंधारात घडल्यामुळे कोणालाही याची कानोकान खबर लागली नाही, परंतु सकाळी घरातील हे चित्र पाहता संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणाची कर्जत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलाम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांच्या कसून तपास, नात्यातील रक्तरंजित कट उघडघटनेचे गांभीर्य लक्षात घेता अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी सूत्रे हाती घेतली. दोन स्वतंत्र पथके तयार करून तांत्रिक तपास, कौशल्यपूर्ण चौकशी आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत सलग १५ दिवस तपास करण्यात आला. तपासात धक्कादायक माहिती समोर आली. मयत हनुमंत घालमे यांच्यावर मोठे कर्ज होते. ते वेळोवेळी आपल्या भाचा तेजस अनभुलेकडे पैशाची मागणी करत होते. यापूर्वी तेजस व त्याच्या आई-वडिलांनी आर्थिक मदतही केली होती. मात्र, अलीकडेच घालमे यांनी थेट १० लाख रुपयांची मागणी केल्याने कुटुंबाने नकार दिला.पैशे देण्यास नकार दिल्यानंतर घालमे यांनी भाचा आणि त्याच्या आई-वडिलानं जीवे मारण्याची धमकी दिली होती. हे सर्व तपासात समोर आले. धमक्यांना आणि सततच्या सततच्या पैशाच्या मागणीला कंटाळून आरोपी तेजस अनभुले याचे संतापाच्या भरात मामाचं डोक्यात वार करून त्याचा खुन केल्याची कबुली पोलीस चौकीत दिली. आरोपीला अटक करण्यात आले आहे. पुढील तपासासाठी त्याला कर्जत पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं आहे.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 11:30 am

ठरलं! भारतावरील २५% टॅरिफ युएस काढण्यात तयारीत 'ही'आहे माहिती

दावोस: रशियन रिफायनरीतून तेल खरेदी लक्षणीय कमी पातळीवर कमी केल्याने भारतावरील अतिरिक्त २५% टॅरिफ काढण्याचा निर्णय घेण्यासाठी युएस विचार करत आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी येत्या काही दिवसांत भारतासाठी एक मोठी चांगली बातमी मिळण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत. दावोस २०२६ परिषदेत बोलताना रशियन तेल खरेदीमुळे भारताला सध्या सामोरे जाव्या लागत असलेल्या अतिरिक्त २५% शुल्कात डोनाल्ड ट्रम्प सरकार कपात करू शकते असे विधान केले. युएस व भारत यांच्यातील द्विपक्षीय करार जवळ पोहोचला असल्याचे सातत्याने दोन्ही बाजूने सांगण्यात येत असल्याने गुंतवणूकदार न निर्यातदारांसाठी ही मोठी बातमी ठरू शकते.विविध देशांच्या शिष्टमंडळाने दावोस येथील परिषदेला भेट दिलीत्यावेळी आम्ही रशियन तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर २५% शुल्क लावले होते, आणि त्यांच्या रिफायनरींनी केलेली भारतीय खरेदी पूर्णपणे थांबली आहे असे विधान युएसचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी स्वित्झर्लंडमधील यूएसए हाऊस, दावोस येथे केले आहे.युक्रेनमधील युद्ध असूनही रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांविरुद्ध ट्रम्प प्रशासनाने केलेल्या दंडात्मक उपायांमुळे भारताला अजूनही एकूण ५०% शुल्काचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दावोस २०२५ शिखर परिषदेत बेसेंट यांनी केलेले सूचक वक्तव्य भारतासह इतर दक्षिण आशियाई देशातील देशांच्या निर्यातदारांसाठी दिलासादायक ठरू शकतात.आणखी यावर बोलताना, हे एक यश आहे. २५% रशियन तेल शुल्क अजूनही लागू आहे. मला वाटते की आता ते शुल्क काढून टाकण्याचा मार्ग आहे. त्यामुळे ही एक निश्चित गोष्ट आणि मोठे यश आहे असे ते पुढे म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या विधानाचीच आता पुनरावृत्ती झाली आहे. यापूर्वी त्यांनी ट्रम्प यांनी लादलेल्या मोठ्या शुल्कामुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले असल्याचे नमूद केले होते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला बेसेंट म्हणाले होते की, युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर भारताने रशियन तेल खरेदी करण्यास सुरुवात केली होती, परंतु राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्यावर २५% शुल्क लावले आणि भारताने खरेदी कमी केली असून रशियन तेल खरेदी करणे थांबवले आहे.'परिणामी, त्यांनी सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी सादर केलेल्या विधेयकावरही भाष्य केले, ज्यात रशियन तेलाच्या दुय्यम खरेदी आणि पुनर्विक्रीवर ५००% शुल्क लावण्याचा प्रस्ताव होता. त्यावर त्यांनी ते विधेयक मंजूर होते की नाही हे आपण पाहू असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 11:30 am

Maharashtra Election News: सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Election News : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 11:15 am

जहाँ आरा बेगमची भूमिका आव्हानात्मक

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमललावण्यवती, सहजसुंदर अभिनयाची देणगी लाभलेली अभिनेत्री म्हणजे स्मिता शेवाळे. 'रणपती शिवराय स्वारी आग्रा' या आगामी चित्रपटात तिची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.स्मिताचे शालेय शिक्षण पुण्यातील लक्ष्मी रोडवरील हुजूरपागा शाळेत झाले. तिने शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता. तिला नाटकात काम करण्याची इच्छा असायची; परंतु तिला नृत्याच्या कार्यक्रमांमध्ये घेतले जायचे. ती शाळेबाहेरील गणेशोत्सवामध्ये नाटकात भाग घ्यायची. नृत्य बसवायची, सोलो परफॉर्मन्स करायची. ती भरतनाट्यम शिकली. एस. पी. कॉलेजमध्ये तिचे शिक्षण झाले. बारावी झाल्यानंतर यंदा कर्तव्य आहे हा तिला पहिला चित्रपट मिळाला. एकदा ती नाटक पाहायला गेली होती, तिथे शुभांगी गोखले नावाच्या कास्टिंग डायरेक्टर आल्या होत्या. त्यांनी स्मिताला सांगितले की रसिका जोशीने कथा लिहिली आहे आणि दिग्दर्शक केदार शिंदेना नवीन चेहरा हवा आहे. तू चित्रपटात काम करणार का? त्यानंतर स्मिताचे फोटो सेशन झाले. तिला यंदा कर्तव्य आहे हा चित्रपट मिळाला. जवळपास चार महिन्यांत चित्रपटाचे शूटिंग झाले. स्वाती नावाची व्यक्तिरेखा तिने साकारली होती. ‘आभास हा’ हे त्यातील गाणे गाजले होते. हा चित्रपट तिच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला.तिने १९ वर्षांमध्ये २६ चित्रपट केले आणि नऊ लीड मालिका केल्या. जवळपास दरवर्षी ती दोन मालिका करीत होती. या गोजिरवाण्या घरात, माहेरची साडी, सावित्री, चारचौघी, सप्तपदी, मांडला दोन घडीचा डाव, श्रीमंत पेशवा बाजीराव, तू माझा सांगाती या मालिका तिने केल्या. लाडी गोडी, आलटून पालटून, या गोल गोल डब्यातला, वन रूम किचन, यंदा कर्तव्य आहे, सुभेदार, संत ज्ञानेश्वराची मुक्ताई, अभंग तुकाराम हे चित्रपट तिने केले. अभंग तुकाराम चित्रपटामध्ये आवलीची भूमिका करताना तिला तिचे वजन वाढवावे लागले. आवलीसारखे दिसण्यासाठी तसा थोडा मेकअप करावा लागला. त्यानंतर तिने अभिनयातून आवली साकारली.दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटात या वेळी स्मिताला मुघलांच्या ग्रुपमध्ये घेण्यात आले आहे. जहाँ आरा या औरंगजेबाच्या बहिणीची भूमिका ती साकारीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, त्यामुळे जहाँ आरा खूप संतप्त झालेली असते आणि तिला या अपमानाचा सूड घ्यायचा असतो. ती आग्र्यामध्ये येऊन बसलेली असते. या भूमिकेसाठी तिला उर्दू भाषा बोलावी लागली होती. मुघलांच्या स्त्रियांचा पेहराव तिला करावा लागला होता. संपूर्णपणे निगेटिव्ह भूमिका तिला साकारावी लागली. प्रा. श्यामराव जोशी यांच्याकडून तिने उर्दू भाषा शिकून घेतली. कलाकार म्हणून ही भूमिका साकारणे तिला आव्हानात्मक वाटते.या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता असे विचारले असता ती म्हणाली की, दिगपाल अत्यंत अभ्यासू, मेहनती आणि उत्साहवर्धक आहे. तो आम्हाला इतके आव्हान देतो की त्याची आता आम्हाला सवय झाली आहे. आमच्या भूमिकेबद्दल डिटेल माहिती देतो. त्या भूमिकेशी संबंधित पुस्तकांची नावे सांगतो. त्यामुळे भूमिका साकारण्यास मदत होते.'मुक्ताई' नावाचे एकपात्री प्रयोग तिचे सुरू आहेत. त्यामध्ये यशोदा गोष्ट सांगते, ती श्लोक, ओव्या म्हणते. प्रेक्षकांना हा एकपात्री प्रयोग आवडेल अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. 'रणपती शिवराय स्वारी आग्रा' या चित्रपटासाठी व 'मुक्ताई' या एकपात्री प्रयोगासाठी हार्दिक शुभेच्छा !

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 11:10 am

77th Republic Day : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, संविधानातील नियमांचा रोजच्या जीवनातील महत्व आणि ताकद जाणून घ्या

मुंबई : २६ जानेवारी हा दिवस भारताच्या लोकशाही प्रवासातील निर्णायक टप्पा मानला जातो. १९५० साली याच दिवशी भारतीय संविधान अंमलात आले आणि देशाने प्रजासत्ताक म्हणून नव्या युगात प्रवेश केला. दरवर्षी हा दिवस राष्ट्रध्वज वंदन, संचलन आणि समारंभांपुरता मर्यादित राहतो. मात्र, संविधानाने सामान्य नागरिकांना दिलेले अधिकार आजही अनेकांना पूर्णपणे माहीत नसल्याचे वास्तव आहे. हेच अधिकार रोजच्या आयुष्यात नागरिकांचे संरक्षण करतात आणि त्यांना बळ देतात.संविधानातील मूलभूत अधिकार हे केवळ कायदेशीर शब्द नाहीत, तर सामान्य माणसाच्या दैनंदिन जगण्याचा आधार आहेत. रस्त्यावर चालण्यापासून ते मत मांडण्यापर्यंत, नोकरीच्या संधींपासून ते सुरक्षिततेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर हे अधिकार प्रभावी ठरतात.कायद्यापुढे सर्व समान असल्याचा सिद्धांत संविधानात स्पष्टपणे मांडण्यात आला आहे. सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय स्थिती काहीही असली तरी कायद्याच्या दृष्टीने प्रत्येक नागरिक समान असल्याची हमी या तरतुदीतून दिली जाते. त्यामुळे अन्याय, पक्षपात किंवा सत्तेचा गैरवापर यावर मर्यादा येतात.तसेच कोणत्याही नागरिकाशी धर्म, जात, लिंग, रंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका संविधान घेतो. सार्वजनिक ठिकाणी वावर, सेवा-सुविधा किंवा संधी मिळवताना समानतेचा हा अधिकार महत्त्वाची भूमिका बजावतो.सरकारी नोकऱ्यांबाबतही संविधानाने स्पष्ट धोरण आखले आहे. पात्रतेच्या आधारावर प्रत्येकाला समान संधी देणे ही राज्याची जबाबदारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे रोजगार प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय राखला जातो.स्वातंत्र्याशी संबंधित अधिकार नागरिकांना मुक्तपणे विचार मांडण्याची, देशभर फिरण्याची, व्यवसाय निवडण्याची आणि संघटना स्थापन करण्याची मुभा देतात. शांततेच्या मार्गाने एकत्र येण्याचा हक्कही याच चौकटीत येतो. लोकशाही व्यवस्थेचा हा कणा मानला जातो.जीवन आणि वैयक्तिक सुरक्षिततेचा अधिकार हा संविधानातील सर्वात व्यापक अधिकारांपैकी एक आहे. सन्मानाने जगणे, वैयक्तिक गोपनीयता जपली जाणे तसेच स्वच्छ पर्यावरणाचा लाभ मिळणे, या सर्व बाबींचा त्यात समावेश होतो. राज्य यंत्रणेवर नागरिकांच्या जीवनाचे संरक्षण करण्याची जबाबदारी या अधिकारातून निश्चित केली जाते.शिक्षणाबाबतही संविधानाने ठोस भूमिका घेतली आहे. ठरावीक वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे हे राज्याचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षणाला मूलभूत हक्काचा दर्जा दिल्याने सामाजिक प्रगतीला चालना मिळाली आहे.धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार भारताच्या विविधतेचे प्रतिबिंब आहे. प्रत्येक नागरिकाला आपली श्रद्धा जपण्याचा आणि आचरणात आणण्याचा हक्क संविधान संरक्षणाखाली देते. यामुळे देशाची धर्मनिरपेक्ष ओळख मजबूत होते.कोणताही मूलभूत अधिकार धोक्यात आला तर थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा संविधान देते. हा अधिकार नागरिकांना त्यांच्या हक्कांची अंमलबजावणी करून घेण्यासाठी महत्त्वाचे साधन ठरतो.२६ जानेवारीच्या निमित्ताने संविधानाकडे केवळ ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून न पाहता, रोजच्या जीवनात मार्गदर्शन करणारी शक्ती म्हणून पाहण्याची गरज आहे. हे अधिकार ओळखणे, समजून घेणे आणि गरज पडल्यास वापरणे, हीच खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक नागरिकाची ओळख आहे.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 11:10 am

ठाण्यात ‘वर्क फ्रॉम होम’च्या जाळ्यात अडकवून तब्बल इतक्या लाखांची फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल

ठाणे : ऑनलाईन गुंतवणूक आणि घरबसल्या कामाच्या आमिषातून फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून ठाणे शहरात असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरील जाहिरातीद्वारे संपर्क साधत एका गृहिणीकडून सुमारे आठ लाख रुपयांची रक्कम उकळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गृहिणीला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सोशल मीडियावर घरून काम करण्यासंबंधी जाहिरात दिसली. त्यावर प्रतिसाद दिल्यानंतर एका अनोळखी महिलेकडून व्हॉट्सॲपवर संपर्क साधण्यात आला. पुढे तिला टेलिग्राम ॲपवरील वेगवेगळ्या खात्यांशी जोडण्यात आले, जिथे ऑनलाईन काम आणि शेअर मार्केटसदृश गुंतवणुकीचे प्रस्ताव देण्यात आले.विश्वास बसावा यासाठी सुरुवातीला कमी रकमेवर नफा मिळाल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर हळूहळू अधिक रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त करत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले. काही दिवसांतच तक्रारदाराने जवळपास ७.९५ लाख रुपये ट्रान्सफर केले.ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोठा नफा झाल्याचे आकडे दाखवले गेले, मात्र प्रत्यक्षात ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता वेगवेगळ्या कारणांचा पाढा वाचवण्यात आला. उलट, आणखी गुंतवणूक करण्याचा दबाव टाकण्यात आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात संबंधित तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून वापरण्यात आलेली बँक खाती, मोबाईल क्रमांक आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मची माहिती गोळा केली जात आहे.दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडिया किंवा मेसेजिंग ॲपवरून येणाऱ्या गुंतवणूक व ‘वर्क फ्रॉम होम’ ऑफरबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अल्प कालावधीत मोठा नफा देण्याचे दावे करणाऱ्या ऑफरवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 11:10 am

Mumbai Vileparle : मुंबईकरांच्या पार्ले-जीचा सुगंध आता कायमचा हरवणार! ८७ वर्षांचा पार्ले-जीचा कारखाना होणार जमीनदोस्त; नेमकं कारण काय ?

मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले (पूर्व) परिसरातील ज्या कारखान्यामुळे या उपनगराला एक वेगळी ओळख मिळाली, तो पार्ले प्रॉडक्ट्सचा मूळ कारखाना आता कायमचा बंद होणार आहे. गेली ८७ वर्षे या परिसरात दरवळणारा पार्ले-जी बिस्किटांचा तो खास सुगंध आता लवकरच थांबणार असून, या जागेचा वापर आता नव्या स्वरूपात केला जाणार आहे. कंपनीने या मोक्याच्या जागेवर एक भव्य व्यावसायिक संकुल (Commercial Complex) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. १९३९ पासून सुरू झालेल्या या कारखान्याने अनेक पिढ्यांचे बालपण समृद्ध केले. मात्र, काळानुसार बदलताना कंपनीने आता या ऐतिहासिक जागेवर व्यावसायिक प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. विलेपार्ले रेल्वे स्थानकाजवळ असलेला हा कारखाना केवळ उत्पादनाचे केंद्र नसून मुंबईच्या औद्योगिक इतिहासाचा एक महत्त्वाचा वारसा होता. या निर्णयामुळे जुन्या मुंबईकरांमध्ये हळहळ व्यक्त होत असली, तरी या जागेवर आता आधुनिक काचेच्या इमारतींचे साम्राज्य पाहायला मिळणार आहे.https://prahaar.in/2026/01/24/in-thane-a-fraud-of-lakhs-of-rupees-was-committed-by-trapping-people-in-a-work-from-home-scam-a-case-has-been-registered-against-three-people/२१ जुन्या इमारतींच्या पाडकामाला सुरुवातविलेपार्ले (पूर्व) येथील पार्ले-जी बिस्किट कारखान्याच्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेला आता वेग आला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाने (SEIAA) ७ जानेवारी रोजी हिरवा कंदील दाखवला आहे. या मंजुरीनुसार, कारखान्याच्या परिसरातील २१ जुन्या वास्तू जमीनदोस्त करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सुमारे ३,९६१.३९ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारा हा प्रकल्प मुंबईतील सर्वात महागड्या व्यावसायिक प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प सुमारे १३.४५ एकर (५४,४३८.८० चौरस मीटर) इतक्या मोठ्या आणि मोक्याच्या भूखंडावर उभा राहत आहे. या जागेवर एकूण १,९०,३६०.५२ चौरस मीटर इतके अवाढव्य बांधकाम क्षेत्र विकसित करण्याचा मानस कंपनीने व्यक्त केला आहे. या प्रकल्पाच्या एफएसआय (FSI) गणिताचा विचार केल्यास, प्रस्तावित बांधकामापैकी १.२१ लाख चौरस मीटर क्षेत्र एफएसआयअंतर्गत असेल, तर ६८ हजार चौरस मीटर क्षेत्र नॉन-एफएसआय अंतर्गत विकसित केले जाणार आहे. या प्रकल्पाची प्रक्रिया २०२५ च्या मध्यावधीत सुरू झाली असून, कंपनीने मुंबई महापालिकेकडे सादर केलेल्या प्रस्तावाला आता पर्यावरण मंत्रालयाकडून अंशतः मंजुरी मिळाली आहे.विलेपार्लेत आकाराला येणारं चार इमारती, अत्याधुनिक पार्किंग टॉवर्स अन्...विलेपार्ले येथील पार्ले-जी कारखान्याच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या पुनर्विकास प्रकल्पाची रूपरेषा आता स्पष्ट झाली आहे. या भव्य संकुलात एकूण चार इमारती बांधण्यात येणार असून, यामध्ये व्यावसायिक कार्यालयांसह दोन स्वतंत्र पार्किंग टॉवर्सचा समावेश असेल. विमानतळाच्या जवळ असलेल्या या मोक्याच्या जागेवर बांधकामासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) उंचीचे नियम पाळून परवानगी दिली आहे. या नवीन प्रकल्पामुळे विलेपार्ले पूर्व परिसराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. वाढत्या गाड्यांची संख्या लक्षात घेता, प्रकल्पात तीन आणि सहा मजली असे दोन स्वतंत्र पार्किंग टॉवर्स असतील. तसेच प्रस्तावित चारही इमारतींना दोन स्तरांचे तळमजले (Basement) दिले जाणार आहेत. पहिल्या इमारतीच्या 'बी-विंग'मध्ये तळमजला, सातवा आणि आठवा मजला हा खास रिटेल दुकाने आणि कॉर्पोरेट कार्यालयांसाठी राखीव असेल. विमानतळाच्या 'एअर फनेल झोन'मध्ये हा भूखंड येत असल्याने, विमानतळ प्राधिकरणाने इमारतींची कमाल उंची ३०.४० मीटरपर्यंत मर्यादित ठेवली आहे. केवळ ऑफिसच नाही, तर नागरिकांच्या मनोरंजनासाठी या संकुलात मोठी किरकोळ दुकाने (Retail Shops), अलिशान रेस्टॉरंट्स आणि एक भव्य फूड कोर्ट देखील असणार आहे.'मियावाकी' पद्धतीने १,२०३ नवीन झाडे लावून वृक्षसंपदा वाढवण्यावर भरविलेपार्ले येथील पार्ले-जी कारखान्याचा पुनर्विकास केवळ सिमेंट-काँक्रीटपुरता मर्यादित नसून, तिथे हिरवाईचा मोठा पट्टा निर्माण केला जाणार आहे. राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाने (SEIAA) दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पात पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी जपानच्या प्रसिद्ध 'मियावाकी' तंत्रज्ञानाचा वापर करून १,२०३ नवीन झाडांची लागवड केली जाणार आहे. यामुळे कारखान्याचा परिसर भविष्यात अधिक प्रदूषणमुक्त आणि निसर्गरम्य होणार आहे. या परिसरात सध्या एकूण ५०८ झाडे आहेत. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी त्यापैकी ३११ झाडे मूळ जागेवरच जतन केली जातील, तर ६८ झाडांचे योग्य पद्धतीने स्थलांतर केले जाणार आहे. अपरिहार्य कारणास्तव १२९ झाडे तोडली जातील. 'मियावाकी' पद्धतीने १,२०३ नवीन झाडे लावून वृक्षसंपदा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील झाडांची एकूण संख्या ५०८ वरून थेट २,२३० वर पोहोचेल, ज्यामुळे हा भाग विलेपार्लेचे 'ऑक्सिजन हब' ठरू शकेल.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 11:10 am

Hasan Mushrif : “आम्हाला जे सोडून गेलेत त्यांची आणि…”; मुश्रीफांचा बंडखोरांना इशारा, समरजितसिंह घाटगे म्हणाले…

Hasan Mushrif : जिल्हा परिषदेमध्ये बंडखोरी करून आम्हाला जे सोडून गेलेत त्यांची आणि आमची भेट आता स्वर्गातच असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी बंडखोरी करणाऱ्यांना दिला आहे.

दैनिक प्रभात 24 Jan 2026 11:04 am

कार्यशाळा नव्हे; प्रयोगशाळा

भालचंद्र कुबल : पाचवा वेदया आठवड्यात पार पडलेल्या ४९ व्या बोधी नाट्यलेखन कार्यशाळेबद्दल आज लिहिणार आहे. या कार्यशाळेची पद्धत थोडी वेगळी आहे. इथे लेखन तंत्र शिकवले जात नाही. इथे शिकवण्याची पद्धत पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा एम. बी. ए.च्या वर्गात ज्या पद्धतीने एखादी ‘केस स्टडी’ अभ्यासली जाते, त्याच पद्धतीने एखादी संहिता तज्ज्ञ मंडळी लेखकाकडून वाचून घेतात आणि मग त्यावर यथोचित चर्चा केली जाते, ज्यामुळे ती संहिता परिपक्व तर बनतेच शिवाय प्रयोगक्षमही बनते. हा आजवरच्या बोधी नाट्यलेखन कार्यशाळेचा रोचक आणि रंजक अनुभव आहे.प्रेमानंद गज्वी, डाॅ. सुरेश मेश्राम, अशोक हंडोरे यांनी बोधी नाट्य परिषद स्थापन करून त्यामार्फत अखिल महाराष्ट्रात मराठी साहित्य व कलेशी निगडीत असलेले विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. त्यापैकीच नाट्यलेखन कार्यशाळा हा एक बहुचर्चित उपक्रम ठरला. ४९ वी बोधी नाट्यलेखन कार्यशाळा गाजली ती स्त्री लेखिकांच्या वाचन झालेल्या नव्या कोऱ्या संहितांमुळे. कनक रंगवाचा या त्रैमासिकाचा दीर्घांक विशेषांक हल्लीच कणकवलीहून संपादक वामन पंडित यांनी प्रकाशित केला आहे. त्याची दखल घेत बोधी नाट्य परिषदेने त्यातील चार स्त्री लेखिकांच्या दीर्घांकावर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व बोधी नाट्य परिषदेच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मराठी नाटक अधिक समृद्ध व्हावे या हेतूने गेली तेवीस वर्षे सातत्याने महाराष्ट्रभर बोधी नाट्य परिषद, मुंबई ‘नाट्य लेखन कार्यशाळा’ घेत आलेली आहे. या नाट्यलेखन कार्यशाळेत केवळ स्त्री नाटककारांनीच आपली नाटके वाचली. 'ही वाट दूर जाते', (डॉ. अनघा राजपूत, लातूर), 'आस्था', (ऋतुजा आरती बडवे, कोल्हापूर); ‘झुळूक', (मेधा देशमुख, पुणे), 'रेड डाॅट' (उर्मी, कल्याण) ही ती चार नाटके.स्त्री लेखिकांच्या सामाजिक लेखनामागे मुख्यतः स्वतःच्या अनुभवांमधील वेदना, अस्वस्थता आणि समाजातील अन्याय व्यक्त करण्याची इच्छा असते. मराठी नाट्यलेखनासंदर्भात, हिराबाई पेडणेकर, काशिबाई कानिटकर, शिरीष पै, सई परांजपे, ज्योती म्हापसेकर, सरीता पद्की यांसारख्या लेखिकांनी स्त्रीशिक्षण, लिंगभेद आणि कौटुंबिक मूल्ये यांसारख्या समस्या अधोरेखित करून सामाजिक जागरूकता निर्माण केली. या नाटककारांनी सामाजिक परंपरा, कौटुंबिक संघर्ष आणि स्त्रीस्वातंत्र्य यांसारख्या विषयांना केंद्रस्थानी ठेवून मराठी भाषेला नवे आयाम मिळवून दिले. त्यांच्या नाटकांमधून भारतीय संस्कृती, एकपात्री शैली आणि मुक्त नाट्यप्रयोग यांसारखे नवे तंत्र रूढ झाले, ज्यामुळे मराठी नाटक अधिक वैविध्यपूर्ण झाले. सोनाबाई केरकर ('छत्रपती संभाजी')सारख्या सुरुवातीच्या लेखिकांनी संगीत नाटकांना प्रेरणा दिली. स्त्री नाटककारांच्या अल्प संख्येनेही मराठी रंगभूमीला स्त्री-भावविश्वाची खोली मिळाली, जी पूर्वी पुरुषप्रधान होती. त्यांच्या कार्याने प्रायोगिक रंगभूमीला चालना मिळाली आणि आजच्या पिढीला, उदा. मनस्विनी लता रवींद्र, स्वरा मोकाशी, कल्याणी पाठारे, कविता मोरवणकर, वर्षा दांदळे, आदीना प्रेरणा मिळत आहे.कार्यशाळेत प्रथम वाचली गेलेली संहिता होती ‘ही वाट दूर जाते.’ यात माधवी या व्यक्तिरेखेची दोन रूपं पाहायला मिळतात. काहीशा फँटॅसीच्या सहाय्याने जाणारे कथाबीज हवी असलेली गोष्ट न मिळाल्याने नैराश्याच्या गर्तेत अडकू शकते आणि त्यावर उपायही आपणच असतो अशा वनलायनरची ही दीर्घांकिका. मुळात पुरुष पात्रांमुळे जीवनात आलेले अस्ताव्यस्त जगणे एखाद्या स्त्रीला, जो रुचेल तो निर्णय घ्यायला भाग पाडते असा एकंदर आशय या नाट्याकृतीतून सादर झाला. अनघा राजपूत या तशा उदयोन्मुख लेखिका; परंतु संवादावर असलेली त्यांची पकड नाट्यवाचन खुलवून गेली. नाटकातील माधवी हे पात्र भूतकाळातल्या माधवीशी संवाद करते तेव्हा वर्तमानातल्या माधवीला त्या घटना माहीत असणारच, या तांत्रिक मुद्यांवर चर्चकांमध्ये चर्चा घडून आली. नोंदवल्या गेलेल्या निरीक्षणांची लेखिकेने दखल घेऊन त्यात सुधारणा करू, अशी ग्वाही दिली.दुसरी संहिता ऋतुजा आरती बडवे या आताच्या पिढीची ‘आस्था’ या नावाची होती. एका नटीला कॅन्सर पिडीत रुग्णाची भूमिका वाट्याला येते. एका ठरावीक ऊंचीवर ती नेऊन ठेवावी ज्यामुळे प्रेक्षकांकडून वाहवा मिळावी या प्रयत्नात तो कॅन्सर तिच्या घरातच सापडतो. एका कलाकाराच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी अधोरेखित करणारे कथाबीज ऋतुजाने चांगले खुलवले, मुळातच ती कोल्हापूर विद्यापीठात नाट्यशास्त्राची विद्यार्थिनी असल्याने वाचिक अभिनयाची जोड तिच्या वाचनास मिळाली.तिसरी संहिता उर्मी. (अॅड. शिल्पा सावंत) या लेखिकेची ‘रेड डाॅट’ या नावाची स्त्रीयांच्या मासिकधर्माचे विवेचन करणारी होती. एखाद्या स्त्रीला मासिकधर्म सुरू न झाल्यास मनाची होणारी घालमेल, कुचंबणा, न्युनगंड अशा सर्व विवंचनेने ग्रासलेल्या नायिकेची कथा उर्मीने धाडसाने मांडली आहे. या निमित्ताने चर्चक म्हणून लाभलेले डाॅ. अनिल बांदिवडेकर, डाॅ. स्मिता दातार व डाॅ. अनघा राजपूत हे तिघेही व्यवसायाने मेडिकल प्रॅक्टीशिनर असल्याने या विषयावर सखोल चर्चा घडवून आणली गेली.चौथी संहिता ‘झुळूक’. पुण्याच्या मेधा देशमुखांची होती. संहिता ऐकल्यावर लेखकांवर असलेला पारंपरिकतेचा दिवाणखानी पगडा केव्हा दूर होणार? याबाबत प्रश्नचिन्हच निर्माण होते. पुरुष सत्ताक प्रवृत्तीचा नायक स्वतःच्या मनमानीने घरातल्या इतर घटकांवर करिअरच्या अानुषंगाने केलेली बळजबरी आणि त्याचा पश्चाताप म्हणजे झुळूक हा दीर्घांक. फारसा संघर्ष नसलेली, जुनाट लेखन संस्कारात मोडणारी ही संहिता बिल्कूल पकड घेऊ शकली नाही.स्त्री लेखिका, विशेषतः मराठी नाटककार आणि कवयित्री, पुरुष सत्ताक समाजव्यवस्था, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि रंगभूमी व्यवहाराच्या अडचणींमुळे गुरफटतात. नाटक हा परावलंबी प्रकार असल्याने प्रयोग उभा करण्यासाठी पुरुषप्रधान नेटवर्कची गरज भासते, ज्यात सामाजिक पूर्वग्रह आणि कमी संधी येतात. स्त्री-मुक्ती चळवळीनंतरही पुरुष सत्ताक मूल्ये त्यांच्या विचारांवर, भावनांवर नियंत्रण ठेवतात, ज्यामुळे व्यक्तिगत वेदना सार्वत्रिक संघर्षात रूपांतरित होते. या वेदनेचा निचरा व्हावा यासाठीच अशा कार्यशाळा, प्रयोगशाळा म्हणून अमलात आणल्यास स्त्री लेखिकांमधे एक वेगळीच क्रांती घडून येऊ शकेल, या बाबतीत दुमत नाही.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 10:30 am

वारसा मानांकने आणि स्फूर्तिकथांची पदचिन्हे...!

राजरंग : राज चिंचणकरमराठ्यांची शौर्यगाथा सांगणारे अनेक किल्ले महाराष्ट्रदेशी इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. महाराष्ट्रातल्या काही किल्ल्यांना अलीकडेच जागतिक वारसा मानांकने मिळाली आहेत आणि त्यात 'खांदेरी' या जलदुर्गाचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी तत्कालीन 'खांदेरी बेट' सागरी युद्धात इंग्रजांकडून जिंकून घेतले. 'खांदेरी' किल्ल्यासाठी सागराच्या रंगमंचावर मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली आणि ती इतिहासात कायमची नोंदवली गेली. मराठ्यांचा हाच पराक्रम सांगणारे 'दर्याभवानी' हे नाटक काही काळापूर्वी रंगभूमीवर आले आणि या नाटकाच्या माध्यमातून, जागतिक वारसा म्हणून ओळख लाभलेल्या 'खांदेरी'चा इतिहास रंगभूमीवर अवतरला. केवळ ही शौर्यगाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने 'दर्याभवानी' हे नाटक रंगमंचावर आणण्याचा घेतलेला ध्यास महत्त्वाचा आहे. हा सगळा इतिहास रंगमंचावर आणायचा म्हणजे त्यासाठी जिद्द, आवेश, धैर्य, आवड आदी गोष्टी अंगात असाव्या लागतात. गेली अनेक वर्षे नाट्यसृष्टीत कार्यरत असलेले निर्माते, लेखक व दिग्दर्शक संदीप विचारे यांनी हा इतिहास रंगभूमीवर आणण्यासाठी कंबर कसली आणि हे नाटक रंगभूमीवर आले. हा सगळा इतिहास भव्यतेने रंगमंचावर उभा करायचा म्हणजे मोठे दिव्यच आहे. साहजिकच, या 'दर्याभवानी'चे मोजकेच प्रयोग रंगभूमीवर होत आहेत. सध्या या नाटकाचे प्रयोग उत्साहात सुरू असतानाच, संदीप विचारे यांनी ऐतिहासिकतेचीच कास धरत पुन्हा एक नवीन प्रयोग करण्याचा घाट घातला आहे. या प्रयोगालाही खांदेरी जलदुर्गाचा संदर्भ आहे. हा प्रयोग मराठी अभिवाचनाचा असून, 'शेर शिवराज है' असे त्याचे शीर्षक आहे. या प्रयोगाच्या माध्यमातून, 'शिवस्पर्श' आणि 'यशोगाथा जलदुर्ग खांदेरीची' अशा दोन स्फूर्तिकथांची पदचिन्हे रंगमंचावर उमटली आहेत.ऐतिहासिक मूल्य लाभलेल्या अभिवाचनाच्या या कार्यक्रमात 'शिवस्पर्श' आणि 'यशोगाथा जलदुर्ग खांदेरीची' या दोन अपरिचित अशा कथांचे वाचन केले जाते. इंग्रज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यापारी धोरण, महाराजांची कूटनीती; तसेच 'खांदेरी' जलदुर्गाच्या उभारणीची रोमहर्षक संघर्षगाथा असे आकर्षक पैलू असलेल्या कथांचे सादरीकरण याद्वारे होत आहे. अभिजीत धोत्रे, अभय धुमाळ, दिग्विजय चव्हाण, कलिका विचारे, विनायक बागवे, प्रदीप जोशी, प्रसाद वैद्य, प्रकाश निमकर आदी कलाकारांचा यात सहभाग असतो. कार्यक्रमाचे संकलन व दिग्दर्शन संदीप विचारे यांचे आहे. संदीप विचारे हे नाट्यनिर्माते असले तरी शिवप्रेमी, दुर्ग व इतिहास अभ्यासक, ट्रेकर अशी त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांनी त्यांच्या गड भटकंतीला ऐंशी-नव्वदच्या दशकात सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी 'खांदेरी' जलदुर्गाबद्दल ऐकले होते. त्यांना या जलदुर्गावर जायचेही होते; परंतु तिथे जाण्यास परवानगी नव्हती. फक्त कोळी बांधव वेताळ देवाची पूजा करण्यासाठी 'खांदेरी'वर जात असत. मात्र एकदा योग जुळून आला आणि उरण येथील कोळी बांधवांच्या मदतीने त्यांच्या मच्छीमार होडीतून संदीप विचारे 'खांदेरी'वर जाऊन पोहोचले. साहजिकच त्यांच्या लेखन, दिग्दर्शनाला अभ्यासाची वास्तव किनार लाभलेली आहे.'शेर शिवराज है' या प्रयोगाच्या निमित्ताने संदीप विचारे यांना बोलते केले असता ते सांगतात, रायगड, राजगड, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी अशा महाराष्ट्रातल्या ११ किल्ल्यांचा समावेश 'युनेस्को'ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे. यावरून प्रेरित होऊन आम्ही 'शेर शिवराज है' या मराठी कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. या किल्ल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा हेतू या सादरीकरणाच्या मागे आहे. यातल्या एका कथेत, मानांकन मिळालेल्या 'खांदेरी'चा इतिहास आहे. श्री शिवछत्रपतींचे आत्तापर्यंत समोर न आलेले इंग्रजांबरोबरचे व्यापारी धूर्त धोरण आम्ही यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दिवंगत इतिहासकार निनाद बेडेकर यांचे व्याख्यान आणि दुर्गभ्रमणकार आप्पा परब यांच्या सुभेदार मायनाक भंडारी यांच्यावरचे पुस्तक, ही या कार्यक्रमाच्या मागची प्रेरणा आहे. या दोन्ही कथा अस्सल पुराव्यांवर आधारित आहेत. पण तरी त्या जास्त परिचित नसल्याने, त्यांना अधिक ऐतिहासिक महत्त्व आहे. जास्तीत जास्त इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमीपर्यंत हा कार्यक्रम पोहोचावा, यासाठी आम्ही हा कार्यक्रम विनामूल्य किंवा स्वेच्छा मूल्य तत्त्वावर करत आहोत. आमचे अभिवाचकही मानधनाची अपेक्षा न बाळगता हे अभिवाचन करत असतात. त्याचबरोबर, मानांकन मिळालेल्या किल्ल्यांचा प्रचार व्हावा; 'दर्याभवानी' नाटकाचाही प्रसार व्हावा; हा आमचा उद्देश आहे. 'उर्विजा थिएटर'तर्फे सादर होणाऱ्या या कार्यक्रमात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाविषयी फारशा परिचित नसलेल्या, पण ऐतिहासिक आधार असलेल्या कथा आम्ही सादर करत आहोत.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 10:30 am

युनेस्को दर्जाप्राप्त गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम

पर्यटन वाढीमुळे निर्माण झालेल्या कचऱ्यावर आळा मुंबई : युनेस्कोचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) विशेष स्वच्छता मोहीम हाती घेणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानुसार ही मोहीम लवकरच राबवली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.युनेस्कोने महाराष्ट्रातील रायगड, प्रतापगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, राजगड, पन्हाळा, साल्हेर, लोहगड, सुवर्णदुर्ग, शिवनेरी आणि खंदेरी या ११ किल्ल्यांना ऐतिहासिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. हा दर्जा कायम राखण्यासाठी स्वच्छता व पर्यावरण संवर्धन अत्यंत आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन ही विशेष मोहीम आखण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ला स्वच्छता व संवर्धन मोहीम’ राबवण्यात येणार असून, या मोहिमेचे ब्रीदवाक्य ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ असे असणार आहे. गडकिल्ल्यांच्या परिसरात कार्यरत सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जाणार आहे.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 10:10 am

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणारमुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच मैदानात आमनेसामने येणार असून, हा थरारक महासंग्राम ‘कुस्ती महादंगल २०२६’ च्या रूपाने साजरा होणार आहे.अर्जुन पुरस्कार विजेते, ऑलिम्पियन आणि सध्या मुंबई पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत असलेले नरसिंह यादव यांच्या संकल्पनेतून, नरसिंह फाऊंडेशन आणि नागरिक संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य एकदिवसीय कुस्ती स्पर्धा २६ जानेवारीला दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत विलासराव देशमुख मैदान, लोखंडवाला, कांदिवली (पूर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब ही देशातील कुस्तीची बलाढ्य राज्ये सहभागी होत असून प्रत्येक संघातून ५ पुरुष आणि २ महिला असे एकूण ७ पैलवान आपले कसब पणाला लावणार आहेत. विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.या ऐतिहासिक स्पर्धेला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार अतुल भातखळकर, आशिष शेलार आणि संजय उपाध्याय यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे. यावेळी हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी तसेच जागतिक स्तरावर चमकलेल्या कुस्तीपटूंचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.चार राज्यांची संघ पुढीलप्रमाणे :मराठा वॉरियर्स (महाराष्ट्र) :पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र केसरी, वर्ल्ड मेडलिस्ट),रविराज चव्हाण, आदर्श पाटील, सोनबा गोंगाणे, अक्षय ढेरे.महिला : अमृता पुजारी, सोनाली महाडिकशेर-ए-पंजाब (पंजाब):करणदीप (पंजाब केसरी), संदीप माने, रोहित प्रजापत, उदय शर्मा, अभिषेक यादव.महिला : प्रियंका सिकरवार, शिवानीहरियाणा शूर (हरियाणा):अंकुश, अमित, निवान, आकाश, सागर.महिला : कुसुम दहिया, मोनी गुर्जर.यूपी योद्धा (उत्तर प्रदेश):अभिनायक सिंह (यूपी केसरी), मुलायम यादव, तेजवीर यादव, आयुष चौधरी, विशाल सहानी.महिला : प्रियंका सिकरवार, फ्रीडम यादव.

फीड फीडबर्नर 24 Jan 2026 10:10 am