US-Iran ceasefire : इराण-अमेरिकेतील चर्चेसंदर्भातील चित्र अजूनही स्पष्ट नाही.
Genelia Deshmukh ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये एकाच वेळी तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. चित्रपटाची भव्यता आणि ऐतिहासिक विषय लक्षात घेता याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पहलगाम : २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस नागरिकांनी आपले प्राण गमावले. आज पहलगाम हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. पहलगाम हल्ल्याच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींनी प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिले, गेल्या वर्षी याच दिवशी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप लोकांचे स्मरण. त्यांना कधीही विसरले जाणार नाही. या दुःखाच्या प्रसंगी पीडितांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या संवेदना आहेत.एक राष्ट्र म्हणून, आपण दुःखात आणि निर्धारात एकजूट आहोत. भारत कोणत्याही स्वरूपातील दहशतवादापुढे कधीही झुकणार नाही. दहशतवाद्यांचे कुटील मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत.Remembering the innocent lives lost in the gruesome Pahalgam terror attack on this day last year. They will never be forgotten. My thoughts are also with the bereaved families as they cope with this loss.As a nation, we stand united in grief and resolve. India will never bow to…— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2026पंतप्रधान मोदींनी निःसंदिग्धपणे सांगितले की, भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला घाबरणार नाही. त्यांनी पुनरुच्चार केला की, दहशतवाद्यांचे कट कधीही यशस्वी होणार नाहीत आणि देश पूर्ण ताकदीनिशी त्यांचा सामना करेल.भारतीय लष्कराने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, भारतावर होणाऱ्या कोणत्याही आक्रमक कृत्याला निर्णायक आणि खंबीर प्रत्युत्तर दिले जाईल. लष्कराने ठामपणे सांगितले की, न्याय नेहमीच मिळेल आणि कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
Kedarnath Mandir : हर हर महादेवच्या गजरात उघडले केदारनाथ मंदिराचे द्वार
देहरादून : केदारनाथ धामाचे द्वार आज, बुधवारी सकाळी आठ वाजता शुभ मुहूर्तावर विधी-विधान आणि पूजा-अर्चना करून भाविकांसाठी खुले करण्यात आले. द्वार उघडताच मंदिर परिसर ‘हर हर महादेव’ आणि ‘जय बाबा केदार’च्या जयघोषांनी दुमदुमून गेला. हजारो भाविक या पवित्र क्षणाचे साक्षीदार ठरले. राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी धामात पोहोचून विशेष पूजा-अर्चना केली आणि राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.https://prahaar.in/2026/04/22/mallikarjun-kharge-called-modi-a-terrorist-did-kharges-tongue-truly-slip-or-was-it-a-political-ploy/बाबा केदार यांच्या धामाला सुमारे ५१ क्विंटल फुलांनी भव्य सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले. देश-विदेशातून हजारो भाविक आधीच धामात दाखल झाले होते आणि द्वार उघडण्याच्या या अद्भुत क्षणाचे साक्षीदार बनले.यापूर्वी बाबा केदार यांच्या पंचमुखी चल विग्रह उत्सव पालखीने मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता केदारनाथ धामात प्रवेश केला. ओंकारेश्वर मंदिर, उखीमठ येथून रवाना झालेली ही डोली १७ किलोमीटरची कठीण पायी यात्रा पूर्ण करत जंगलचट्टी, रामबाडा, लिनचोली आणि बेस कॅम्प मार्गे केदारपुरीत पोहोचली. धामात पोहोचताच भाविकांनी पुष्पवृष्टी करून डोलीचे भव्य स्वागत केले.https://prahaar.in/2026/04/21/kerala-massive-explosion-in-firecracker-warehouse-6-dead/पालखीने मंदिराची प्रदक्षिणा करून भंडारगृहात प्रवेश केला, जिथे विधिवत पूजा-अर्चना पार पडली. यावेळी ८वी सिखलाई रेजिमेंटच्या बँडच्या मधुर सुरांनी आणि डमरूच्या निनादाने संपूर्ण वातावरण शिवमय झाले.दरम्यान सुरक्षेचे कडक बंदोबस्त करण्यात आले होते आणि पोलीस तसेच आयटीबीपीचे जवान तैनात करण्यात आले होते. द्वार उघडताच केदारनाथ यात्रेचा विधिवत शुभारंभ झाला. देशाच्या विविध भागांतून आलेले भाविक बाबा केदार यांच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसून आले. या प्रसंगी अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
Harshvardhan Sapkal:
आयटी क्षेत्रातील अदृश्य बेड्या
प्रदेश सरचिटणीस - किरण मिलगीरभारताच्या आर्थिक प्रगतीचा कणा मानल्या जाणाऱ्या आयटी (Information Technology) क्षेत्रातून येणाऱ्या बातम्या अत्यंत चिंताजनक आहेत. नाशिक येथील टीसीसीमध्ये झालेल्या जबरदस्ती धर्मांतराच्या प्रयत्नांबरोबरच लैंगिक छळ आणि नोकरीतील असुरक्षितता ही केवळ गुन्हेगारी घटना नसून आधुनिक गुलामगिरी आणि सत्तेच्या गैरवापराचे भयावह रूप आहे.जेव्हा रक्षकच भक्षक बनतो कोणत्याही संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांच्या कल्याण व सुरक्षेची जबाबदारी एचआर विभागावर असते; परंतु नाशिकमध्ये या गंभीर गुन्ह्यांचे नेतृत्व स्वतः एचआर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले, ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. तेथे असे वातावरण निर्माण करण्यात आले की, कर्मचारी ना आपल्या श्रद्धेचे संरक्षण करू शकत होते, ना सन्मानाने काम करू शकत होते. नोकरी जाण्याची आणि करिअर उद्ध्वस्त होण्याची भीती दाखवून कर्मचाऱ्यांवर लैंगिक शोषण व धर्मांतरासाठी दबाव टाकणे हे लोकशाही देशासाठी लाजिरवाणे आहे.युनियनचा अभाव : शोषणाला खतपाणीआयटी क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मानवी हक्कांचे उल्लंघन का होत आहे? याचे मुख्य कारण म्हणजे या क्षेत्रात मजबूत कामगार संघटनांचा अभाव आहे.संघटित आवाजाचा अभाव : इतर क्षेत्रातील कामगारांकडे त्यांच्या समस्या मांडण्यासाठी सशक्त संघटना आहेत; परंतु आयटी कर्मचारी अनेकदा वैयक्तिक पातळीवर एकटे पडतात.तक्रार निवारण यंत्रणेचे अपयश :कंपन्यांमधील अंतर्गत तक्रार समित्या (आयसीसी) अनेकदा व्यवस्थापनाच्या हिताचे रक्षण करणारे साधन बनतात.भीतीचे वातावरण :नोकरी जाण्याच्या भीतीमुळे अनेकजण तक्रार करण्यास घाबरतात, कारण त्यामुळे त्यांचे करिअर धोक्यात येऊ शकते. नाशिकमध्ये घडलेली घटना ही एकट्या कंपनीपुरती मर्यादित नाही. जर तेथे मजबूत संघटना असती तर कर्मचारी अशा प्रकारच्या घटनांना सुरुवातीलाच आळा घालू शकले असते.व्यापक चौकशी आवश्यक : नाशिक प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे की, जिल्हा साधा एक बाब आहे. मात्र ही घटना केवळ एका कंपनीपूर्ती मर्यादित आहे का याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांमध्येही अशी प्रवृत्ती आहे का? याची चौकशी होणे आवश्यक आहे. सर्व विभागाच्या नेतृत्वाखाली आयटी कंपन्यांमध्ये आपक चौकशी आणि सोशल ऑडिट ही काळाची गरज आहे.भारतीय मजदूर संघाची भूमिकाभारतीय मजदूर संघ हा कामगारांच्या सन्मान व हक्कांच्या संरक्षणासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसमोरील अशा आव्हानांमध्ये त्यांच्यासोबत उभे राहून आवश्यक कायदेशीर मदत देण्यास बी. एम. एस. सज्ज आहे. नाशिक पिढीतांना न्याय मिळेपर्यंत आणि दोशींना योग्य शिक्षा होईपर्यंत बी एम. एस. चा लढा सुरूच राहील. हायटेक क्षेत्रातील चमकदार कार्यालयांमध्ये दडलेल्या काळ्या वास्तवाला समोर आणण्याची गरज आहे. प्रत्येक व्यवस्थापनाने हे समजून घ्यायला हवे की कामगार हे यंत्र नाहीत तर सन्मानाने जगणारे मानव आहेत.कार्यस्थळी सुरक्षितता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संघटित होण्याची हीच योग्य वेळ आहे, असे आवाहन भारतीय मजूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मुळे आणि प्रदेश सरचिटणीस किरण मिलगीर यांनी केले.
Jackfruit Pickle Recipe: उन्हाळ्यात करा खास फणसाचं लोणचं! एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल
Jackfruit Pickle Recipe लोणचं बनवण्यासाठी सर्वात आधी कच्चे फणस घ्यावे. तो आतून पांढरा आणि ताजा असावा. फणस स्वच्छ धुवून कोरडा पुसून घ्या. हाताला थोडं तेल लावून त्याची साल काढा आणि त्याचे छोटे-छोटे तुकडे करा. त्यानंतर हे तुकडे थोडे मऊ होईपर्यंत वाफवून घ्या.
थंडीच्या कुशीत वॉर्मीचं ऊबदार साम्राज्य
दी लेडी बॉस - अर्चना सोंडे२००९ साल. स्वित्झर्लंडमधील कडाक्याच्या थंडीत ‘ती’ आपल्या पती आणि मुलासोबत सुट्टीसाठी गेली होती. पण ती थंडी त्यांच्यासाठी बोचरी ठरली. बाहेर फिरण्याऐवजी त्यांना अनेकदा घरातच थांबावे लागत होते. त्याचवेळी एका कॅफेमध्ये बसलेल्या ‘ती’च्या मनात एक विचार चमकून गेला. “असं काही उत्पादन का नसावं, जे विजेशिवाय किंवा गरम पाण्याशिवाय लोकांना ऊबदार ठेवू शकेल?” हीच कल्पना पुढे ‘वॉर्मी’च्या रूपात साकार झाली. ही अनोखी कल्पना प्रत्यक्षात अवतरणारी ‘ती’ म्हणजे वॉर्मी’ (Warmee) या अनोख्या बॉडी वॉर्मर ब्रँडची सह-संस्थापिका भावना व्होरा.भावनाचे वडील आणि काका चारचाकी वाहनांच्या ॲक्सेसरीजचा व्यवसाय चालवत होते. त्यांची मुंबईभर सुमारे १७ दुकाने होती. मुंबईतील मालाड येथील पी. डी. लायन्स दालमिया कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर, भावनाने सुरुवातीला दुचाकी वाहनांचे डीलरशिप दुकान चालवले. या डीलरशिपचा विस्तार तिने मुंबईत पाच मल्टी-ब्रँड दुकानांपर्यंत केला. मात्र, तिने २००५ मध्ये व्यवसाय बंद केला. व्यवसायाची पार्श्वभूमी असल्याने, तिला उद्योजकतेची नेहमीच आवड होती. स्वतंत्र होण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन तिने लहान वयातच व्यवसाय सुरू केला. सिटीबँक आणि आयसीआयसीआय बँकेसाठी दुचाकींच्या बाबतीत मुंबईतील पहिली महिला डायरेक्ट सेलिंग एजंट म्हणून ती एक अग्रणी होती. वाहन वित्तपुरवठ्यासाठी तिने या बँकांचे प्रतिनिधित्व केले. मुलगा झाल्यावर, त्याला वेळ देण्यासाठी तिला व्यवसाय बंद करावा लागला. व्यवसाय बंद करेपर्यंत तिच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल सुमारे २ कोटी रुपये होती. डीलरशिप चालवणे थांबवले असले तरी भावनाने आपल्या मुलाचे संगोपन करत असताना स्वतःच्या शेअर गुंतवणुकीचे आणि ट्रेडिंगचे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या विश्लेषणात्मक कौशल्यांचा वापर सुरू ठेवला. याच काळात ती कुटुंब सहलीसाठी स्वित्झर्लंडला गेली आणि तिला कल्पना सुचली.भावनांचे पती केमिकल इंजिनिअर असल्याने त्यांनी या कल्पनेवर प्रयोग सुरू केले. विविध रसायनांवर संशोधन करत अखेर त्यांनी असे काही फॉर्म्युले विकसित केले, जे हवेच्या संपर्कात येताच उष्णता निर्माण करतात. २०१३ मध्ये त्यांनी वॉर्मी या उत्पादनांची अधिकृतपणे बाजारात सुरुवात केली. सुरुवातीला लोकांना ही संकल्पना समजावून सांगणे मोठे आव्हान होते, पण जसजसे लोकांनी याचा अनुभव घेतला, तसतशी त्याची लोकप्रियता वाढू लागली.‘वॉर्मी’ उत्पादने म्हणजे हँड वॉर्मर्स, बॉडी वॉर्मर्स, फूट वॉर्मर्स आहेत. ही सर्व उत्पादने विजेशिवाय काम करतात. हवेच्या संपर्कात येताच गरम होतात. सुमारे ८ तास उष्णता देतात. सहज बाळगता आणि वापरता येतात. आज ‘वॉर्मी’ केवळ एक उत्पादन नसून, प्रवास करणाऱ्या आणि थंड हवामानात राहणाऱ्या लोकांसाठी एक आवश्यक साधन बनले आहे. भावना आणि तिच्या पतीने पँथियन फार्मकेम’ अंतर्गत हा ब्रँड लाँच केला. वॉर्मी केवळ भारतात विकले जाते, जे थंड प्रदेशात राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या लोकांसाठी आहे. त्यांची बहुतेक विक्री मुंबई, बंगळूरु, चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि अहमदाबाद यांसारख्या शहरांमधून होते. ज्यांना थंड हवामानाची सवय नाही, पण सुट्टीमध्ये मौज करण्यासाठी, काम किंवा शिक्षणासाठी थंड प्रदेशात ज्यांना प्रवास करावा लागतो. ते ‘वॉर्मी’चे लक्षयित ग्राहक आहेत. सुरुवातीला, या जोडप्याने विविध दुकानांमध्ये आपल्या उत्पादनांचा प्रचार केला. वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात दिली. अनेक ठिकाणी पॉप-अप स्टोअर उभारले.भारतात ही एक नवीन संकल्पना असल्याने, ही उत्पादने कशी वापरायची हे लोकांना समजावून सांगण्यासाठी त्यांना अनेक प्रात्यक्षिके घ्यावी लागली. सुरुवातीला, त्यांची उत्पादने भारतातील सुमारे ४०० दुकानांमध्ये, प्रामुख्याने हिमाचल प्रदेश आणि हरियाणात उपलब्ध होती. पहिल्याच वर्षात कंपनीने २ कोटी रुपयांची उलाढाल केली. आज हा व्यवसाय सुमारे १५ कोटी रुपयांच्या वार्षिक महसुलापर्यंत पोहोचला आहे. २०२२ मध्ये त्यांनी ब्ल्यूहीट ही नवीन श्रेणी सुरू केली, जी शरीरातील वेदना कमी करण्यासाठी हीट थेरपी पॅचेस प्रदान करते. तसेच त्यांनी स्वतःचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Nysh.in सुरू करून व्यवसायाला डिजिटल दिशा दिली. दरमहा फक्त १०० ऑर्डर्स मिळायच्या आता त्यात ५०० पट वाढ झाली आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आपल्या उत्पादनांचा दबदबा निर्माण केला आहे. त्याचसोबत इतरही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर त्यांची उत्पादने उपलब्ध आहेत. मुंबईतील लोअर परळ येथे वॉर्मीचे कार्यालय आहे, तर त्यांचा उत्पादन कारखाना मुंबईपासून १२० किमी अंतरावर, बोईसर जिल्ह्यातील तारापूर येथे आहे. त्यांच्याकडे १०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.कोणतीही कल्पना छोटी नसते. त्या कल्पनेवर विश्वास ठेवून तिला जर कृतीची जोड दिली, तर कोटींचा व्यवसाय देखील उभारता येतो हे भावना व्होरा यांच्या ‘वॉर्मी’ने सिद्ध केले आहे.
Central Railway : मध्य रेल्वे सलग तिसऱ्या दिवशी ४५ मिनिटे उशिराने; प्रवाशांचे हाल
ठाणे : डोंबिवली स्थानकावर रिकाम्या रेल्वेचा डब्बा घसरला आणि संपूर्ण मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, त्या दिवसापासून लोकल या उशिराने धावत आहेत, आज तिसरा दिवस उजाडला तरी लोकल चे वेळापत्रक सुधारलेले दिसत नाही आहे, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोणताही अधिकृत मेगाब्लॉक जाहीर केलेला नसताना लोकलची वेळ बिघडल्यामुळे लोकलचा पुरता बोजवारा उडाला आहे.https://prahaar.in/2026/04/20/mumbai-local-empty-local-coach-derails-in-dombivli-train-schedule-disrupted/सोमवारची ती दुर्घटना आणि तीन दिवस मनस्तापसोमवारी डोंबिवली स्थानकात कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रिकाम्या लोकलचा एक डबा रुळावरून घसरला, आणि याच घटनेनंतर मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, काही लोकल रद्द झाल्या तर काही लोकलचा मार्ग बदलावा लागला, कमी काही तासातच पूर्ण होईल असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले होते परंतु काम पूर्ण झाले तरीही अद्याप रेल्वेचे वेळापत्रक सुधारलेले नाही. कल्याण ते ठाणे दरम्यान स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळत असून गाड्या अत्यंत धीम्या गतीने धावत आहेत.मेगाब्लॉकच्या वावड्या उठल्यासकाळची पहिलीच लोकल कासाराहून पाऊण तास उशिराने धावली. मिळालेल्या माहितीनुसार आसनगाव दरम्यान लोकल फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली होती. मात्र ठाण्यापासून पुन्हा ती स्लो ट्रॅकवर चालवण्यात आली. जेव्हा प्रवाशांनी याबाबत विचारणा केली असता रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉकचे कारण पुढे करण्यात आले.https://prahaar.in/2026/04/21/diagnostic-center-in-borivalis-punjabi-galli-handed-over-to-a-private-entity/प्रवाशांचा तीव्र संतापसलग तीन दिवस मध्य रेल्वेची वाहतूक गर्दीच्या वेळेला विस्कळीत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. या त्रासामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी दिसत आहे. आमच्या वेळेला किंमत नाही का ? असा सवाल प्रवासी विचारू लागले आहेत.
डॉ. दीपक शिकारपूर माणसाला सर्वात हवीशी वाटणारी आणि अत्यावश्यक असलेली एक बाब नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे. ती म्हणजे व्यक्तिगत गुप्तता उर्फ ‘प्रायव्हसी’! तसे पाहिले तर ती आताच हाताबाहेर जात आहे. दुकानांमध्ये, रस्त्यावर कॅमेरे असतातच. शिवाय संगणकांमध्ये, हँडसेटमध्ये, गाडीमध्ये ‘जीपीएस’ असते. पण स्मृतिभ्रंशासारख्या रोगांचे प्रमाणदेखील वाढत असल्याने आपले काय हरवले आहे, तेच बहुधा आपण विसरून जाऊ!माझ्याकडे १८८० मधले एक दुर्मीळ पुस्तक आहे!’ एखादा संग्राहक अभिमानाने सांगतो. आपल्यालाही त्याचे कौतुक वाटते, कारण इतकी जुनी वस्तू त्याने जीवापाड जपलेली असते आणि पुढच्या पिढ्यांना ऐतिहासिक संदर्भ म्हणून तिचा (कदाचित) उपयोग होणार असतो... ‘कदाचित’ असे म्हटले कारण चक्रावणाऱ्या वेगाने तांत्रिक प्रगती होण्याच्या या दिवसांमध्ये बदलती जीवनशैली आणि संकल्पनांमध्ये कोण जाणे किती व्यक्तींना अशा संग्राहकांचे आणि त्यांच्याकडे असलेल्या वस्तूंचे महत्त्व वाटेल! हे झाले वस्तूंचे उदाहरण. तंत्रज्ञानातील बदलांसोबत संबंधित उपकरणांचे दृश्य रूप आणि कार्यपद्धतीदेखील किती आणि कशी बदलते पाहा. तसेच होणारे सर्वच बदल चांगलेच असतील असेही नाही; परंतु त्या दिशेने प्रवास सुरू आहे हे नक्की!२०३५ पर्यंतच्या अत्याधुनिक काळात सर्वात आधी बळी पडणार आहे टपाल आणि तार खात्याचा म्हणजेच पोस्टाचा. गंमत पाहा, फक्त दहा-पंधरा वर्षांपूर्वी हे विधान अतिशयोक्तीपूर्ण वाटले असते. कारण शहरी भाग वगळला तरी खेड्यापाड्यांमधील लोक तोपर्यंत संवादाच्या विविध माध्यमांसाठी पोस्टावर अवलंबून असत; परंतु मोबाइल फोनच्या क्रांतीने हे भाकीत पार उलटे करून टाकले. शिवाय येणारा जमाना तत्काळ उर्फ ‘इंस्टंट’चा आहे. मोबाइल फोन, संगणक, इंटरनेटच्या वापराने लगेचच संभाषण आणि संदेशवहन होत असताना उशिराने मिळणाऱ्या टपालसेवेवर कोण अवलंबून राहील? तसेच तंत्रज्ञानाबरोबरच खासगी कुरियर सेवेने टपाल खात्याचा महसूल बऱ्यापैकी खाल्ला आहे. ही सेवा चालवणे सरकारला दिवसागणिक न परवडणारे होत चालले आहे, हे तर आपण पाहतोच आहोत. खरे तर, हळूहळू का होईना, पोस्ट ऑफिसचे रूपांतर बँकेमध्ये होऊ लागले आहे. बँकेवरून आठवले, चेकदेखील पोस्टाच्याच वाटेने जात आहे, हे वाचून बहुतेकांना आश्चर्य वाटेल; पण ते खरे आहे. चेकवरील प्रशासकीय प्रक्रिया करण्यामागचा खर्च अनेक बँका आणि वित्तसंस्थांना दिवसेंदिवस न पेलवणारा होत आहे. खुद्द ग्रेट ब्रिटनमध्ये २०२८ पर्यंत धनादेशाला त्याच्या सिंहासनावरून पायउतार करण्याबाबतची योजना कार्यान्वित झाली आहे. ‘प्लास्टिक मनी’ म्हणजेच विविध क्रेडिट-डेबिट-प्रीपेड कार्डे, फोन बँकिंग आणि इंटरनेट याद्वारे होणाऱ्या आर्थिक व्यवहारांची संख्या जगभर विलक्षण वेगाने वाढत असल्याचाही हा परिणाम आहे.या यादीमध्ये पुढचे नाव आहे वृत्तपत्रांचे. वाचक म्हणतील आता हे फारच झाले, आपल्याकडे असे होणे शक्यच नाही. शिवाय गरम चहाचे घुटके घेत पेपर वाचण्याची मजा कोण सोडेल? हे घडून येण्यासाठी कदाचित जरा वेळ लागेल (भारतामध्ये २०३५ पर्यंत वृत्तपत्रांचा खप उतरणीला लागलेला असेल असा काहीजणांचा अंदाज आहे.) पण जागतिक पातळीवरचा कल तसा आहे खरा. जगभरातील अनेक युवक-युवतींनी दररोजचे वृत्तपत्र विकत घेणे बंद केले आहे. (अर्थात आपल्याकडच्या तुलनेने बाहेरच्या देशांमध्ये वृत्तपत्रे खूपच महाग असतात हेदेखील तितकेच खरे.) त्यांचे म्हणणे बातम्या काय, इंटरनेट, रेडिओ किंवा मोबाइल फोनवर मिळतातच. शिवाय वृत्तपत्रांच्या मालकांनीही हे वारे ओळखून ई-आवृत्त्या सुरू केल्या आहेतच. त्यावर जास्त तत्परतेने ताज्या बातम्या कळण्याची शक्यता असल्याने त्या लोकप्रिय होत आहेत. छापील वृत्तपत्रांकडून आपला विषय पुस्तकांकडे जाणे नैसर्गिक आणि अपरिहार्य आहे, नाही का? वैयक्तिक तसेच सार्वजनिक पातळीवरचे छापील पुस्तकांचे साम्राज्य प्रचंड असले तरी त्याला दोन अंगभूत मर्यादा आहेत. पुस्तकांचे वजन आणि त्यांना लागणारी जागा. शिवाय देखभाल आहेच. दोन-तीन हजार पुस्तके सहज घरी बाळगणाऱ्या खऱ्या पुस्तकप्रेमींना या अडचणींचा चांगलाच अनुभव असतो. तसेच नव्या पिढीचे वाचन एकंदरीतच कमी झाले आहे, असेही दिसते. त्यामागची कारणे काहीही असोत.बरे, आजकाल पुस्तके ऑनलाइन खरेदी करता येतात. ‘अमेझॉन’वर मिळणाऱ्या ‘किंडल’ सारख्या इलेक्ट्रॉनिक साधनामध्ये हजारो पुस्तके मावतात. अशी साधने स्वतःच्या बॅटरीवर सात-आठ दिवसदेखील चालतात. कुठेही बसून कितीही वाचा! बोटांना पाने उलटण्याऐवजी ‘पेज डाउन’चे बटन दाबण्याची सवय लागली की झाले! दूरध्वनीच्या लँडलाइन जोडणीबाबत मात्र कोणाचे दुमत असेल, असे वाटत नाही. जगात तर सोडाच, भारतातदेखील अनेक कुटुंबांमध्ये मुले लहान असल्याने अशांनी लँडलाइन जवळजवळ नाइलाजानेच सांभाळली आहे. काहींनी तर कित्येक वर्षांची दोन पिढ्यांची सवय आहे म्हणूनच बहुधा लँडलाइन ठेवली असावी. मोबाइल फोनच्या सेवेतील तांत्रिक प्रगती, ‘नंबर पोर्टेबिलिटी’ अशा सुविधांमुळे लँडलाइनचे अस्तित्वच धोक्यात येणार हे उघड दिसते आहे.संगीत अर्थातच नष्ट होणार नाही; परंतु त्याच्या उपलब्धतेचे मार्ग आणि पद्धती बदलतील. खरे तर संगीत उद्योगातील फायदा दिवसेंदिवस कमी होत आहे. पायरसी उर्फ अनधिकृत वापर आणि वितरण, हे त्यामागील एक मोठे कारण आहेच; परंतु (जरा वादाचा मुद्दा असलेली) आणखी एक गंभीर बाबदेखील यात समाविष्ट आहे. संगीतातील सर्जनशीलता, उत्स्फूर्तता आणि नवनिर्मिती कमी होत आहे. सध्याच्या ‘रीमिक्स’च्या संख्येवरून हे सहज समजून येईल. शिवाय फाइल शेअरिंग आणि सुलभ डाउनलोडिंगच्या तंत्रामुळे ‘सीडी’च्या जमान्यात भरपूर व्यवसाय करणारा संगीतउद्योग, आता आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आला आहे.इंटरनेटमार्फत मिळणाऱ्या सुविधा आणि त्यांचा प्रसार अनंत असल्याने रेकॉर्ड्स, कॅसेट आणि सीडी असा प्रवास करून आलेला संगीत उद्योग- त्याने स्वतःचीच भविष्यकालीन धोरणे तपासून न पाहिल्याने सध्या तरी जरा गोंधळलेल्या अवस्थेत आहे. याबाबत ‘रोलिंग स्टोन्स’ या जगप्रसिद्ध वाद्यवृंदाशी संबंधित असलेल्या स्टीव्ह नॉपरने एक पुस्तकही लिहिले आहे. आपल्याकडे दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्या, डीटीएच आदींचे प्रस्थ सध्या वाढत असले तरी जागतिक पातळीवर पारंपरिक अर्थाने टीव्ही पाहणे कमी होत आहे. याची कारणे दोन. एक तर ‘लाइव्ह स्ट्रीमिंग’ सारख्या तंत्रांमुळे संगणकावर तसेच सेलफोनमार्फत थेट टीव्ही उपलब्ध होण्याचे प्रमाण आणि वेग वाढतो आहे. तसेच कॉम्प्युटर गेम्ससारखे करमणुकीचे इतर प्रकारही संगणकावर मिळत असल्याने त्यापासून दूर जाऊन वेगळे माध्यम वापरण्याची गरज कमी होत आहे. ‘नेटफ्लिक्स’सारख्या सुविधेमुळे प्रेक्षकाला काय पाहावे, याबाबतचे निर्णयस्वातंत्र्य मिळू लागले आहे. शिवाय टीव्हीवरील वाढत्या जाहिरातींमुळे मूळ कार्यक्रमाचा एकंदर कालावधी वाढत चालला आहे. बरे, जाहिराती न दाखवण्याने वाहिन्यांची पंचाईत होते. कारण प्रक्षेपणाचा वाढता खर्च. असे हे दुष्टचक्र किती काळ नीट चालते ते पहायचे!आता आपल्या ध्यानात आले असेल, की भविष्यात संगणक वा तत्सम सुविधा खरेदी करण्याची किंवा सीडीवरचे सॉफ्टवेअर, पुस्तके वा संगीत जवळ बाळगण्याची कदाचित गरजच भसणार नाही. विशिष्ट सेवाशुल्क देऊन आपण क्लाउडमध्ये मिळणारी सर्व पूरक साधने आणि उपकरणे वापरू शकू. कोणत्याही लॅपटॉप वा हँडसेटमार्फत आपण महाजालात ‘ठेवलेल्या’ आपल्या वस्तूंपर्यंत ‘पोहोचू’ शकू. ‘मायक्रोसॉफ्ट विंडोज’ आणि ‘ॲपल मॅक’ हे ओएसचे प्रमुख उत्पादक आणि ‘गूगल’ यांनी एकत्र येऊन, इंटरनेटच्या माध्यमाद्वारे, अशी सेवा पुरवण्याच्या दृष्टीने फार मोठी पावले यापूर्वीच टाकली आहेत. अर्थात यामुळे मानवी मनातल्या ‘हे माझे आहे!’ या स्वामित्वाच्या कल्पनेला कदाचित तडा जाईल. कारण महाजालावरच्या आपल्या वस्तू प्रत्यक्ष नाही, तर आभासी (व्हर्चुअल) स्वरूपात असतील! आत्तापर्यंतच्या भविष्यकथनात वर्णिलेल्या वस्तू गेलेल्या परवडल्या, असे म्हणण्याची पाळी कदाचित २०३५ पर्यंत येणार आहे. कारण माणसाला सर्वात हवीशी वाटणारी (आणि अत्यावश्यक असलेली) बाब नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे. ती म्हणजे व्यक्तिगत गुप्तता उर्फ ‘प्रायव्हसी’! तसे पाहिले तर ती आत्ताच जाऊ लागली आहे. दुकानांमध्ये, रस्त्यावर कॅमेरे असतातच. शिवाय संगणकांमध्ये, हँडसेटमध्ये, गाडीमध्ये ‘जीपीएस’ असते. पण याचीही चिंता करायचे फारसे कारण नाही. स्मृतिभ्रंशासारख्या (अल्झायमर्स) रोगांचे प्रमाणदेखील वाढत असल्याने आपले काय हरवले आहे, तेच बहुधा आपण विसरून जाऊ!
Iran US Conflict डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, होर्मुज सामुद्रधुनी बंद राहिल्यास इराणला मोठा आर्थिक फटका बसतो. त्यामुळे इराण फक्त राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी हा मार्ग बंद ठेवण्याची भाषा करत आहे.
Pahalgam Attack Anniversary : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला
Oily Skin Tips: ऑयली स्किनचा त्रास? या सोप्या टिप्सने मिळवा फ्रेश, चमकदार आणि तरुण त्वचा!
Oily Skin Tips तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात तापमान वाढल्याने त्वचेतील तेलनिर्मिती वाढते. हे अतिरिक्त तेल, घाम आणि धूळ यांच्यासोबत मिसळून त्वचेचे पोर्स ब्लॉक करतात. त्यामुळे त्वचा अधिक तेलकट दिसते आणि त्वचेच्या समस्या वाढतात.
Top 10 News: राज्य, देश-विदेश, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी....
KEM Hospital in Parel : परळच्या केईएम रुग्णालयाचे नाव बदलणार, तरीही इंग्रजी संशिप्त नाव तेच राहणार
मुंबई :मुंबईतील ब्रिटीशकालिन रस्त्यांची तसेच वास्तूंची नावे बदलण्याचा सपाटा सुुर असतानाच आता केईएम रुग्णालयाचेही नाव बदलण्यात येणार आहे. परळ येथील किंग एडवर्ड मेमोरियल अर्थात के. ई. एम. रुग्णालय रुग्णालयाचे नामकरण 'कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय' केले जाणार आहे. मात्र हे नामकरण केले जाणार असले तरी इंग्रजीतील संशिप्त नाव हे के.ई.एम असेच राहणार आहे.राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षांना पत्र लिहून स्वदेशी वारसांच्या सुसंगततेसाठी केईएम रुग्णालयाचे पुनर्नामकरण करण्याची मागणी केली आहे. हे पत्र आता सार्वजनिक आरोग्य समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. या पत्रामध्ये लोढा यांनी असे म्हटले आहे की, स्वदेशी' या प्रेरणादायी संकल्पनेच्या प्रभावाखाली आपला देश समृध्द स्वदेशी वारसा पुनर्प्रस्थापित आणि गौरव करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक संस्थांच्या परकीय नावांचे पुनर्नामकरण करणे आवश्यक आहे. आजमितीपर्यंत अनेक संस्था वसाहतवादी काळातील नावांचा वापर करत आहे. जे दास्याच्या काळाची आठवण करून देतात. या वास्तुंना देण्यात येणाऱ्या नावांची जागा ही आपली संस्कृती, मुल्ये आणि प्रेरणादायी इतिहास जपण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक व्यक्तींना सन्मान देणाऱ्या नावांनी घेतली पाहिजे. याकरता , किंग एडवर्ड मेमोरियल (के.ई.एम.) रुग्णालय या मुंबईतील संस्थेचे पुनर्नामकरण झाल्यास भारतीय इतिहास आणि संस्कृतीतून निवडलेले नाव भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.त्यामुळे , किंग एडवर्ड मेमोरियल (के. ई. एम. रुग्णालय) रुग्णालयाचे 'कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय' (केईएम) असे पुनर्नामकरण करण्यात यावे,असे म्हटले आहे.
Mulnd Stray Dog Shelters : आणिक आणि मुलुंडमधील भूखंडांचे भटक्या श्वानांच्या निवारासाठी वगळणार आरक्षण
मुंबई :महापालिकेच्या एम पूर्व विभागातील आणिक भूखंडावरील रुग्णालय आणि टी विभागातील मुलुंडमधील घनकचरा व्यवस्थापन सुविधा ही आरक्षणे वगळून आता त्याठिकाणी जनावरांचे रुग्णालय तथा पशुनिवारा याबाबतचे आरक्षण टाकण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणचे आरक्षण वगळून त्याठिकाण भटक्या श्वान निवारा केंद्र आणि निर्बिजीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेले निर्णय आणि शासनाच्या निर्णयानुसार शैक्षणिक संस्था, रुग्णालये, रेल्वे स्थानके, बस स्थानके व आगार, क्रीडा संकुले इ. परिसरातील भटक्या श्वानांची नसबंदी करून श्वान निवारागृहात कायमस्वरूपी ठेवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार पशुवैद्यकीय आरोग्य खाते तथा देवनार पशुवधगृहाने आदींच्या परिसरातील भटक्या श्वानांची नसबंदी करून श्वान निवारागृहात कायमस्वरूपी ठेवण्यासंदर्भात महानगरपालिका विभागाअंतर्गत जागांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याप्रमाणे महापालिकेच्या एम पूर्व विभागातील आणिक भूखंडावरील रुग्णालय आणि टी विभागातील मुलुंडमधील घनकचरा व्यवस्थापन सुविधा ही आरक्षण वगळून आता त्याठिकाणी जनावरांचे रुग्णालय तथा पशुनिवारा याबाबतचे आरक्षण टाकण्याचा निर्णय घेतला आहे.https://prahaar.in/2026/04/21/bmc-news-live-telecast-of-house-proceedings-in-the-153-year-history-of-the-mumbai-municipal-corporation/क्षेत्रात भटक्या श्वानांसाठी निवारागृहे स्थापन करण्यासाठी महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या पि शोध घेण्यासाठी प्रमुख अभियंता (विकास नियोजन) कार्यालयास अवगत केले. मुंबई महापालिकेच्या मंजूर विकास आराखडा २०३४ नुसार जनावरांचे तथा गुरांचे रुग्णालय या करीता एक भूखंड एफ/ दक्षिण विभागात आरक्षित असून विकास नियोजन विभागाने ताब्यात घेतलेल्या भुखंडांपैकी या प्रयोजनाकरिता वापरता येऊ शकणार आहे. तसेच'पी/उत्तर' विभागातील ५ टक्के सुविधा भुखंड असुन हा भूखंड कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनाकरीता आरक्षित नाही. याशिवाय 'एम/पूर्व' विभागातील भुखंड रुग्णालयाकरिता आरक्षित असुन 'एम/पश्चिम' येथील भुखंड महानगरपालिका प्रसुतीगृह महानगरपालिका दवाखाना व आरोग्य केंद्र याकरीता आरक्षित आहे. त्यामुळे 'एम/पूर्व' किंवा 'एम/पश्चिम' येथील भूखंड श्वान निवारागृहाकरिता वापरावयाचा असल्याबाबत 'ना-हरकत' प्राप्त करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागास पत्रव्यवहार करण्यात आला असता, त्यानुसार 'एम/पूर्व' विभागातील आणिक येथील स्थित अंदाजे ८४११.५० चौ.मी. इतके क्षेत्रफळ असलेली जागा श्वान निवारागृहासाठी वापराबाबत 'ना-हरकत' दिलेली आहे.'टी' विभागातील न.भू.क्र. १३०८ मौजे मुलुंड (पुर्व) या आरक्षित भूखंडावर या पूर्वीच मा. महानगरपालिका आयुक्त ह्यांनी मंजूरी दिल्यानुसार ४२२ चौ. मी. इतके क्षेत्रफळ असलेल्या जागेत महापालिकेने श्वान निंबीजीकरण केंद्र व्ही- टिम या प्राणी कल्याण संस्थेमार्फत् स्थापित केले आहे. तेथेच लगत असलेल्या अंदाजे ३००० चौ.मी. इतके क्षेत्रफळ असलेला भूखंड महानगरपालिकेच्या श्वान निवारागृहे करिता पशुवैद्यकीय आरोग्य खाते तथा देवनार पशुवधगृहाला 'मा-हरकत' प्राप्त झाली आहेत.https://prahaar.in/2026/04/20/bmc-all-assistant-commissioners-must-prioritize-cleanliness-in-their-respective-zones-additional-commissioners-directive/भूखंडावर श्वान निवारागृहे महानगरपालिकेमार्फत बांधण्यास किंवा सार्वजनिक भागीदारी तत्वावर कमीत कमी १० वर्षासाठी स्वारस्य अभिव्यक्ती मागवून या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे 'टी' विभागातील न. भू. क्र. १३०१ ऐवजी न. भू. क्र. १३०८ हा भूखंड सद्यस्थितीतील वापरानुसार प्रस्तावित श्वान निवारागृह या प्रयोजनाकरिता योग्य असल्याचे सबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. परंतु, या भूखंडापर्यंत पोहचण्याकरिता थेट प्रवेश मार्ग अस्तित्वात नाही. त्यामुळे या भूखंडालगतचा भूखंड न.भू.क्र.१३०४ (भाग) व न.भू.क्र.१३०५ (भाग) हा २७.४५मी. रुंद प्रस्तावित विकास नियोजन रस्त्याने बाधित असल्याकारणाने मुलुंड पूर्व येथील हे तीनही भूखंड मिळून एकूण ३०००.०० चौ. मी. क्षेत्रावर श्वानांचे निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे.
Bhabha hospital : वांद्रे भाभा, कुर्ला भाभा आणि भगवती रुग्णालयांत कॅथलॅब
पुढील ३० वर्षांसाठी संस्थांची केली निवडरुग्णालयातील जागा भाडेतत्वावर देण्यात येणारमुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे के. बी. भाभा रुग्णालय, कुर्ला के. बी. भाभा रुग्णालय, आणि बोरीवलीतील हरीलाल भगवती रुग्णालय या तीन उपनगरीय रुग्णालयांमध्ये कॅथ लॅब सुरु करण्यात येणार आहे. यासाठी अनुक्रमे रुबी ऐल केअर सर्विसेस प्रा. लिमिटेड व सुराना चेरीटेबल ट्रस्ट या संस्थेची निवड करण्यात आली असून प्रत्येकी दहा याप्रमाणे तीस वर्षांकरता या संस्थेच्यावतीने कॅथ लॅब चालवण्यासाठी जागा भाडेतत्वावर दिली जाणार आहे.मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे के. बी. भाभा रुग्णालय, कुर्ला के. बी. भाभा रुग्णालय, आणि बोरीवलीतील हरीलाल भगवती रुग्णालय या ३ उपनगरीय रुग्णालयांमध्ये कॅथ लँब या रुग्णोपयोगी सुविधा सार्वजनिक खाजगी सहभाग प्रोत्साहन धोरणांतर्गत प्रथम १० वर्षाकरिता व नंतर सेवा समाधानकारक असल्यास दहा अधिक दहा वर्षासाठी नूतनीकरणास सापेक्ष अशा एकूण ३० वर्षाकरिता सुरु करण्याबाबत महापालिकेच्यावतीने निविदा मागण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त संस्थेची कॅथलॅब करता निवड करून संबंधित रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी ही जागा देण्याबाबत प्रशासनाच्यावतीने प्रस्ताव सुधार समितीत सादर करण्यात आला अहे.केईएम, शीव, नायर, आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमध्ये कॅथलॅब सुविधा उपलब्ध आहेत. केईएम रुग्णालयात नुकतीच 'रॅडियल लाऊंज'सह अत्याधुनिक सुविधा सुरू करण्यात आली आहे.कॅथलॅब ही हृदयविकाराचे निदान आणि उपचारांसाठी वापरली जाणारी अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे, जिथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि स्टेंटिंग यांसारख्या प्रक्रिया कमीत कमी चिरफाड करून केल्या जातात. वाढत्या हृदयविकार रुग्णांमुळे सरकारी रुग्णालयांमध्ये पीपीपी तत्त्वावर कॅथलॅब सुरू करण्यात येत आहेतया कॅथ लॅबसाठी अशाप्रकारे केली संस्थांची निवडके. बी. भाभा रुग्णालय, वांद्रेएकूण क्षेत्रफळ : ४८९.१० चौरस मीटरवार्षिक शुल्क : १३ लाख १२ हजार ०९० रुपयेसंस्थेची नेमणूक : रुबी ऐल केअर सर्विसेस प्रा. लि.के. बी. भाभा रुग्णालय, कुर्लाएकूण क्षेत्रफळ : २१०.६१ चौ. मीटरवार्षिक शुल्क : २ लाख ८५ हजार रुपयेसंस्थेची नेमणूक : रुबी ऐल केअर सर्विसेस प्रा. लिबोरीवली हरीलाल भगवती रुग्णालय, बोरीवलीएकूण क्षेत्रफळ : ७३०.७३ चौ. मीटरवार्षिक शुल्क : ९ लाख रुपयेसंस्थेची नेमणूक : सुराना चेरीटेबल ट्रस्ट
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगामच्या निसर्गरम्य 'बैसारन व्हॅली'त झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश सुन्न झाला होता. २६ निष्पाप पर्यटकांचा बळी घेणाऱ्या या घटनेने माणुसकीला काळिमा फासला, पण त्याच वेळी भारताच्या अदम्य धैर्याची आणि लष्करी सामर्थ्याची नवी ओळख जगाला करून दिली.‘पहलगाम’ शब्द उच्चारला, तरी तो भीषण दहशतवादी हल्ला डोळ्यांंसमोर येतो. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. काश्मीरच्या सौंदर्यांचे वर्णन करताना 'पृथ्वीवरील नंदनवन' हा शब्द नेहमीच वापरला जातो. मात्र, गेल्या वर्षी याच दिवशी नंदनवनातील पहलगामच्या निसर्गरम्य 'बैसारन व्हॅली'मध्ये रक्ताचे सडे पडले. हा दिवस केवळ त्या २६ निष्पाप जीवांच्या बलिदानाच्या स्मरणाचा नाही, तर दहशतवादाविरोधात भारत देश किती ठामपणे उभा आहे, याचं प्रत्यंतर दर्शवणारा आहे. बैसारन व्हॅलीमध्ये पर्यटक घोडेस्वारीचा आणि निसर्गाचा आनंद घेतात. त्यादिवशी दुपारी १ ते ३ च्या सुमारास अचानक ४ ते ७ सशस्त्र दहशतवादी जंगलातून बाहेर आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले बहुतांश पर्यटक होते. हल्ल्याच्या त्या भीषण क्षणांमध्ये केवळ मृत्यूचे तांडव नव्हते, तर माणुसकीची काही उदाहरणेही जगाला पाहायला मिळाली. आदिल हुसेन शाह नावाच्या एका स्थानिक खेचरस्वाराने पर्यटकांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील दिलीप देसले आणि अतुल मोने यांच्यासह देशाच्या विविध भागांतील पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. आपल्या कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेले भारतीय नौदलाचे अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल हेदेखील या हल्ल्याचे बळी ठरले. हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. पाकिस्तान पुरस्कृत 'द रेसिस्टन्स फ्रंट' या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केवळ निषेध व्यक्त करून थांबायचे नाही, अशी ठाम भूमिका घेतली. दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. ७ मे २०२५ रोजी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्त कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर 'सर्जिकल स्ट्राईक' केला, ज्यात सुमारे १००हून अधिक दहशतवादी मारले गेले. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांसारख्या संघटनांची महत्त्वाची केंद्र उद्ध्वस्त करण्यात लष्कराला यश मिळाले. ही मोहीम केवळ २३ मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण झाली, ज्यामध्ये 'राफेल' विमानांचा वापर करण्यात आला होता. त्याव्यतिरिक्त भारताने पहिल्यांदाच १९६० चा ऐतिहासिक सिंधू जल करार स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला. जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडील दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही, तोपर्यंत हा करार व्यवहारात राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भारत सरकारने घेतली. पाकिस्तानशी व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानचं कंबरडे मोडलं.https://prahaar.in/2026/04/21/operation-sindoor-dont-cross-the-line-india-doesnt-forget-indian-army-suggestive-tweet-on-the-anniversary-of-the-pahalgam-attack/या हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अनेक मोठे बदल करण्यात आले. क्यूआर कोड आणि डिजिटल ट्रॅकिंगची पद्धत अवलंबली गेली. पर्यटकांच्या प्रत्येक वाहनाला आणि घोडेस्वारांना विशेष क्यूआर कोड दिले जाऊ लागले. त्यामुळे कोणता पर्यटक कोणत्या भागात आहे, याची अचूक माहिती नियंत्रण कक्षाला मिळू लागली. पहलगाम आणि बैसारन व्हॅलीसारख्या दऱ्याखोऱ्यांतील घनदाट जंगलांच्या भागात २४ तास उच्च-गुणवत्तेच्या ड्रोनद्वारे गस्त घातली जात आहे. जंगलात कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ अलर्ट दिला जातो. स्थानिक लोकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी गावकऱ्यांना संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आलं आहे.दहशतवाद्यांना स्थानिक स्तरावर कोणताही आधार मिळणं आता कठीण होत आहे. लष्कर आणि स्थानिक पोलीस यांच्यात समन्वय वाढवण्यासाठी विशेष 'क्विक रिस्पॉन्स टीम्स' तैनात करण्यात आल्या आहेत, ज्या ५ मिनिटांच्या आत कोणत्याही घटनास्थळी पोहोचू शकतात. काश्मीर खोऱ्यातील स्थानिक दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त 'ऑपरेशन महादेव' राबवलं. २८ जुलै २०२५ पर्यंत पहलगाम हल्ल्यात थेट सहभागी असलेल्या सुलमान उर्फ फैजल जट आणि हमजा अफगाणी यांसह सर्व प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. पाकिस्तानी नागरिकांसाठी असलेली 'सार्क व्हिसा सवलत योजना' रद्द करण्यात आली असून पूर्वी दिलेले व्हिसाही अवैध ठरवण्यात आले आहेत. अटारी-वाघा सीमा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही देशांमधील नागरिक आणि मालाची ये-जा थांबली आहे. आज एक वर्षानंतर पहलगाम पुन्हा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. काश्मीरमधील पर्यटनस्थळांवर क्यूआर कोड आधारित पडताळणी यंत्रणा आणि तंत्रज्ञानावर आधारित कडक निगराणी ठेवली जाते आहे. स्थानिकांच्या मनात अजूनही जखमा ओल्या असल्या तरी दहशतवादाला थारा न देण्याचा त्यांचा निर्धार अधिक पक्का झाला आहे. पहलगामचा हा हल्ला केवळ पर्यटकांवरचा हल्ला नव्हता, भारताच्या अखंडतेवर आणि शांततेवर केलेला आघात होता, अशी भारतीयांची भावना आहे. शहीद झालेल्या २६ जीवांना आदरांजली वाहताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की अशा भ्याड कृत्यांनी भारताचा विकास आणि काश्मीरची प्रगती यापुढेही थांबणार नाही. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी संपूर्ण देशाने एकजुटीने उभं राहायला हवं. या दुःखद घटनेतून सावरत असताना आपण त्या बलिदानाचं स्मरण ठेऊया आणि शांततापूर्ण व सुरक्षित भारताच्या निर्माणासाठी कटिबद्ध होऊया. पहेलगाम हल्ल्यातील शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाहीत. हा देश तुमच्या धैर्याचा आणि त्या भयाण दिवशी दाखवलेल्या माणुसकीचा सदैव ऋणी राहील. दहशतवादाचा अंत आणि शांततेचा सूर्योदय हाच देशवासीयांचा निश्चय आहे. त्या भ्याड हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप जीवांना आणि वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!
वार्तापत्र : मध्य महाराष्ट्रवाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके पाणी उपलब्ध करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असतानाच, आता 'पाणी कपाती'च्या वादाने शहरात नवा पेच निर्माण केला आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याच्या पाणीटंचाईचा घेतलेला हा आढावा...पुणे हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर म्हणून ओळखले जाते. आयटी हब, शैक्षणिक केंद्र आणि औद्योगिक वाढ यामुळे पुण्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र या विकासासोबतच शहरासमोर एक गंभीर समस्या उभी राहिली आहे, ती म्हणजे दुष्काळ आणि पाणीटंचाई. दरवर्षी उन्हाळा सुरू होताच पुण्यातील अनेक भागांत पाण्याची कमतरता जाणवू लागते आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. शेतीच्या भरण-पोषणापासून अर्थव्यवस्थेपर्यंत प्रत्येक घटकावर परिणाम करणाऱ्या मान्सूनच्या प्रवासात यंदा 'एल निनो'चे विघ्न येण्याची दाट चिन्हे आहेत. ही दुष्काळाची चाहूलच म्हटली पाहिजे. यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून कालावधीत पाऊसमान कमीच राहणार असल्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज चिंता वाढवणारा आहे. या वर्षी नैऋत्य मोसमी पावसावर एल निनोचा प्रभाव राहणार असून, देशभर सरासरीच्या ९२ टक्के पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.राज्यात अलीकडेच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उद्भवलेली राजकीय परिस्थिती, तसेच सध्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने यंदाची 'कालवा समिती'ची बैठक लांबणीवर पडली आहे. परिणामी, पुणे शहर आणि ग्रामीण भागासाठीच्या पाणी वाटपाचे नियोजन रखडले आहे. या बैठकीत होणारा निर्णय हा शहर आणि शेती या दोघांच्याही हिताचा असतो. बैठक जेवढ्या लवकर होईल, तेवढ्या प्रभावीपणे उन्हाळ्यातील पाण्याचे नियोजन करता येते. बारामती पोटनिवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच ही बैठक होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी कपातीचा वाद कसा मिटतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा, बाष्पीभवन आणि शहराची वाढती मागणी यांचा विचार करून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी निश्चित केले जाते. सध्या अधिकृत निर्णय झाला नसल्याने पुढील नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.पुणे शहर आणि ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट गंभीर रूप धारण करत आहे. खडकवासला धरण परिसरातील चार धरणांमध्ये एकूण ४५ टक्के पाणीसाठा उरला आहे. खडकवासला (४३%), पानशेत (५६%), वरसगाव (४६%) आणि टेमघर (११.८८%) यांचा एकूण साठा सध्या सुमारे १४ टीएमसी आहे. गेल्या वर्षी याच तारखेला तो १२.९ टीएमसी होता. म्हणजे यंदा १.२ टीएमसी जास्त पाणी उपलब्ध असले, तरी शहराला दरमहा १.५ टीएमसी पाणी लागते आणि जुलैअखेरपर्यंत ७-८ टीएमसी लागणार आहे. शेतीसाठीही ४ टीएमसी अतिरिक्त पाणी सोडले जाते. शहरात पीएमसी आणि पीसीएमसी दोन्ही ठिकाणी पाण्याचा दाब कमी झाला असून कात्रज, कोंढवा, धायरी, वडगाव बुद्रुक, पाषाण, बावधन यांसारख्या उपनगरांत जानेवारीपासूनच टँकरची मागणी वाढली आहे.उष्णतेची लाट तीव्र होत असल्याने बाष्पीभवन आणि गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढती मागणी लक्षात घेता पाटबंधारे विभागाने १५ टक्के कपातीची विनंती केली होती, मात्र पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी एक थेंबही कपात न करण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे. या वादावर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पाणी कपातीचा निर्णय पालिकेनेच घ्यावा असे स्पष्ट केल्याने पेच वाढला आहे.ही समस्या योग्य नियोजन आणि उपाययोजनांद्वारे कमी करता येऊ शकते. शहरी भागात पावसाच्या पाण्याचे साठवण करणे, पाण्याचा पुनर्वापर करणे आणि पाइपलाइनमधील गळतीवर नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. हरित क्षेत्र वाढवणे हाही एक मार्ग आहे. ग्रामीण भागात जलसंधारण, नालेबांध, गाळ साठवण तलाव आणि शेतात तळे तयार करून पाणी साठवता येते. आधुनिक सिंचन पद्धती आणि पीक पद्धतीत बदल केल्यास पाण्याची बचत होईल. नागरिकांची भूमिका यात महत्त्वाची आहे. पाणी वाचवणे, अनावश्यक वापर टाळणे आणि गळती दुरुस्त करणे या सवयी अंगीकारल्यास परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. शाळा आणि सामाजिक संस्थांनी जनजागृती करणे आवश्यक आहे. हवामान बदल हा दीर्घकालीन घटक असून भविष्यासाठी नवीन जलस्रोत विकसित करणे आणि जलव्यवस्थापन प्रभावी करणे गरजेचे आहे. एकूणच, पुण्यातील पाणीटंचाई ही नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे वाढलेली आहे. शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय आवश्यक आहे. योग्य नियोजन आणि जनजागृतीतूनच यावर नियंत्रण मिळवता येईल. 'जल है तो कल है' हे लक्षात घेऊन पाण्याची बचत हीच काळाची गरज आहे.
चला, पुन्हा जोडू या मातीशी नाते!
जागतिक वसुंधरा दिनजागतिक वसुंधरा दिवसाच्या निमित्ताने यंदा 'आपली शक्ती, आपला ग्रह' ही संकल्पना जगभर राबवली जात आहे. केवळ मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून पृथ्वीला हिरवेगार कसे ठेवता येईल? देशी बियाणे, सेंद्रिय कापूस आणि प्लास्टिकमुक्तीच्या वाटेवरचे आपले पाऊल किती महत्त्वाचे आहे? जाणून घेऊ या या लेखातून...कच्च्या तेलाच्या वाढत्या दरामुळे पॉलिस्टर महागले आणि कापसाची मागणी वाढली. काही वर्षांपूर्वी कापसाचे ‘बीटी बियाणे’ (जनुकीय सुधारित) विकसित झाले. या बियाणांमुळे उत्पादन वाढत असले तरी, कालांतराने त्याचे गंभीर दुष्परिणाम समोर येत आहेत. बीटी कापसाचा पालापाचोळा जमिनीत कुजल्यावर मातीतील सूक्ष्म जीवाणूंवर विपरीत परिणाम होतो. दरवर्षी नवीन बियाणे विकत घ्यावे लागते आणि मातीचा कस कमी झाल्याने रासायनिक खतांचा वापर अनिवार्य ठरतो, ज्यामुळे शेतीचा खर्च वाढतो. तसेच, बेकायदा 'एचटी बीटी' बियाणांमुळे ‘ग्लायफोसेट’सारख्या तणनाशकांचा वापर वाढून पर्यावरणास घातक तणे तयार होतात. कापूस म्हणजे “पांढरे सोने”; सिंधू संस्कृतीच्या अभ्यासानुसार भारतात सुमारे ७००० वर्षांपासून कापूस पिकवला जात आहे. हे 'कापूस पुराण' मांडण्याचे कारण म्हणजे २२ एप्रिल रोजी साजरा होणारा 'वसुंधरा दिवस'. पृथ्वीच्या संरक्षणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि जनजागृती करण्याचा हा एक महत्त्वाचा दिवस.आज आपण वापरतो ते कपडे खरोखरच पर्यावरणस्नेही आहेत का? वस्त्रोद्योगात ७०,००० हून अधिक कृत्रिम रसायने वापरली जातात, त्यापैकी केवळ २ टक्के सुरक्षित आहेत. 'पर्यावरणस्नेही कापड' म्हणजे ते उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर नैसर्गिक असावे. कॉर्पोरेट कंपन्यांनी ग्राहकांचा जो गोड गैरसमज करून दिला आहे, त्याला ‘बाहेर बरवा, आत हिरवा’ ही म्हण चपखल लागू पडते. या क्षेत्रात श्रीरंग देवबा लाड यांनी स्वतःचे नैसर्गिक तंत्रज्ञान विकसित केले, ज्याबद्दल त्यांना २०२६ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी कापसाच्या फांद्यांचा सखोल अभ्यास करून शेंडा खुडणी, अतिघन लागवड आणि ठिबक सिंचन यांसारख्या नैसर्गिक पद्धती अवलंबल्या. यामुळे बोंडाचे वजन वाढले, किडींचा प्रादुर्भाव कमी झाला आणि मातीचा ओलावा टिकून राहिल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढला.दुसरे उदाहरण व्ही. आर. अनंथू यांचे आहे. त्यांनी शेतकऱ्यांना जनुकीय बियाणे व रसायने सोडून शाश्वत देशी बियाणे वापरण्याचे प्रशिक्षण दिले. देशी कापसाचे ‘सरळ वाण’ संरक्षित करून, सेंद्रिय पद्धतीने कापूस उत्पादन ते कापड विघटनापर्यंतची सर्व प्रक्रिया नैसर्गिक ठेवली. कुशल कामगारांकडून हातमागावर विणलेल्या या कापडाला अपराजिता, हळद, मंजिष्ठा आणि पळस यांसारख्या नैसर्गिक रंगांनी सजवले जाते. अगदी बटणेही नारळाच्या करवंटीपासून बनवली जातात. हे कापड नैसर्गिक असल्याने त्याचे विघटनही सहज होते, अशा प्रकारे खऱ्या अर्थाने वसुंधरेचे देणे वसुंधरेला परत दिले जाते.वसुंधरा दिवसाची सुरुवात १९७० मध्ये अमेरिकेत झाली. युनेस्को परिषदेत शांतता कार्यकर्ते जॉन मॅककॉनेल यांनी मांडलेल्या प्रस्तावानंतर, सिनेट सदस्य गेलॉर्ड नेल्सन यांनी या दिवसाची अधिकृत सुरुवात केली. आज १९० हून अधिक देशांत हा दिवस साजरा होतो.सध्या आपली पृथ्वी हवामान बदल, प्रदूषण आणि जंगलतोड यांसारख्या संकटांचा सामना करत आहे. निसर्गाचे रक्षण ही केवळ सरकारची नाही, तर प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. या वर्षीच्या वसुंधरा दिनाची संकल्पना ‘आपली शक्ती, आपला ग्रह’ ही आहे. यात 'आपली शक्ती' म्हणजे प्रत्येक मानवाचे वैयक्तिक योगदान. आपण पुढील गोष्टी करू शकतो.१. वृक्षारोपण : केवळ झाडे लावू नका, ती जगवा.२. प्लास्टिक त्याग : एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालून कापडी पिशव्या वापरा.३. बचत : पाणी आणि विजेचा अपव्यय टाळा.४. कचरा व्यवस्थापन : ओला व सुका कचरा वेगळा करून 'पुनर्वापर' संस्कृती रुजवा.५. कमी प्रदूषण : जवळच्या प्रवासासाठी सायकल वापरा किंवा चालत जा.निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो, पण हाव नाही, हे महात्मा गांधींचे विचार आजही लागू होतात. पृथ्वी आपली माता आहे आणि वाढत्या स्वार्थामुळे आपण तिचे शोषण करत आहोत. वसुंधरा दिवस हा केवळ एक दिवसाचा सोहळा न राहता, तो आपल्या जीवनशैलीचा भाग बनायला हवा. आपली पृथ्वी हिरवीगार आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू या.
काश्मीरमध्ये पोनी (म्हणजे घोडा) चालवणारे बशीर अहमद आणि परवेझ अहमद यांनी पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांना केवळ आपल्या घरात थांबवले नाही, तर ठिकाणाची माहितीही दिली. आपल्या ढोक (म्हणजे झोपडी) मध्ये दहशतवाद्यांना चहा पाजला, जेवण दिले. पॉलिथीनमध्ये भाजी-पोळी पॅक करून दिली. ते दहशतवादी आहेत हे माहीत असूनही पोलीस किंवा सुरक्षा दलांना माहिती दिली नाही. NIA ने आपल्या आरोपपत्रात हे खुलासे केले आहेत. तपासादरम्यान NIA ने एकूण 1,113 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात 31 शाल विक्रेते, 543 ढोक (म्हणजे झोपडी) मध्ये राहणारे लोक, 117 पोनी चालवणारे, 69 पशु मालक, 42 छायाचित्रकार, 54 ढाबा-भेळपुरी आणि चहा विक्रेते, 36 तिकीट काउंटर-झिपलाइन वाले, 25 टॅक्सी चालक, 19 दुकान मालक, 23 इतर जिल्ह्यांतील संशयित आणि इतर 54 लोक यांचा समावेश होता. चार्जशीटनुसार, हल्ल्याचा कट पाकिस्तानात बसलेल्या साजिद सैफुल्ला जट्ट उर्फ अली भाईने रचला, जो लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे. एनआयएने त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यानेच हल्ल्यासाठी ठिकाण सांगितले आणि निर्देशांक पाठवले होते. तीन पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले आणि हल्ला केला. पहलगाम हल्ल्याच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त वाचा इनसाइड स्टोरी… साक्षीदाराचा खुलासा: बशीरला शस्त्रधारी लोकांसोबत जाताना पाहिलेचार्जशीटमध्ये एका साक्षीदाराला X-1 असे नाव देण्यात आले आहे. त्याने खुलासा केला, ‘मी हिल पार्कच्या रस्त्याने घरी परतत होतो. मी बशीर अहमद जोठारला शस्त्रधारी तीन लोकांना इशारा करताना पाहिले. नंतर सर्वांना बशीरचा भाचा परवेझ अहमदच्या झोपडीत जाताना पाहिले. मी परवेझलाही ओळखतो.' 'दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ एप्रिल रोजी मी नेहमीच्या कामासाठी बैसरन घाटीत गेलो. अजानच्या वेळेच्या आसपास मी परवेझ अहमद आणि बशीर अहमद जोठार यांना तिथे फिरताना पाहिले.’ हल्ल्याच्या वेळी X–1 घटनास्थळी होता. तिन्ही दहशतवाद्यांनी त्यालाही थांबवले आणि कलमा वाचायला सांगितले. कलमा वाचल्यावर त्याला जाऊ दिले. दूरून त्याने दहशतवाद्यांना गोळीबार करताना पाहिले. X–1 ने तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे. परवेझ म्हणाला- मामा आत आला आणि आम्हाला गप्प राहायला सांगितलेपरवेझ अहमदने चौकशीत सांगितले, ‘२१ एप्रिल, २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता मी आणि पत्नी घरात चहा बनवण्याची तयारी करत होतो. तेव्हा माझा मामा बशीर अहमद जोठार आत आला आणि आम्हाला गप्प राहायला सांगितले. तो बाहेर गेला आणि काही मिनिटांनी परत आला. त्याच्या मागे तीन लोक होते, ज्यांच्या हातात शस्त्रे होती.’ ‘ते आत येऊन बसले. पाणी मागताना ते म्हणाले की, ते खूप दूरून आले आहेत. थकले आहेत आणि तहानलेले आहेत. पाणी प्यायल्यानंतर ते म्हणाले की, अल्लाहच्या मार्गात लढणाऱ्या आणि काश्मिरी मुस्लिमांच्या स्वातंत्र्यासाठी जिहाद करणाऱ्यांना पाणी पाजल्यास मला सवाब मिळेल.’ ‘ते उर्दू बोलत होते, ज्यात पंजाबी स्पर्श होता. ते काश्मिरी वाटत नव्हते. मला जाणवले की ते मुजाहिद होते. त्यांनी मला बॅग आणि पाऊच लपवायला सांगितले. मी त्यांना ढोकमध्ये पडलेल्या ब्लँकेट्स, बिछान्याखाली लपवले. पत्नी ताहिराला सर्वांसाठी चहा बनवायला सांगितले. तिन्ही मुजाहिद ढोकच्या भिंतीला टेकून बसले होते. ‘ या खुलाशानंतर बशीर अहमद जोठारची चौकशी करण्यात आली. बशीर आणि परवेझला 22 जून, 2025 रोजी अटक करण्यात आली. बशीरचा खुलासा: झाडांच्या मागून तीन सशस्त्र लोक आले बशीर अहमद जोठारने खुलासा केले की, 19 आणि 20 एप्रिल रोजी पाण्यामुळे मी बैसरन घाटीत गेलो नव्हतो. 21 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मी माझ्या घोड्याला पाहण्यासाठी जंगलात गेलो. तेव्हा झाडांच्या मागून तीन सशस्त्र व्यक्ती समोर आले. त्यांनी मला सांगितले की, आम्हाला सुरक्षित ठिकाणी घेऊन चला आणि अल्लाहच्या नावाने जेवणाची व्यवस्था करा. हे ऐकताच मला जाणवले की हे मुजाहिद आहेत. मी त्यांना परवेजच्या ढोकजवळ घेऊन गेलो आणि सांगितले की, येथे थांबून माझ्या इशाऱ्याची वाट पहा. मी परवेजच्या ढोकमध्ये शिरलो आणि परवेज-ताहिराला शांत राहण्यास सांगितले. आजूबाजूला नजर टाकल्यानंतर मी त्यांना हातांनी इशारा केला. मग ते माझ्या मागोमाग परवेजच्या ढोकमध्ये आत आले. ते एकमेकांना भाईजान म्हणत होते. ताहिराने सर्वांसाठी चहा बनवला. लहान उंचीच्या एका मुजाहिदने जेवण बनवण्यास सांगितले. मी ताहिराला भात आणि कच्चे टोमॅटो बनवण्यास सांगितले. जेवण करत असताना त्यांनी माझ्याशी अमरनाथ यात्रेबद्दल बोलले. सुरक्षा छावण्या आणि परिसरात जवानांच्या हालचालींबद्दल विचारले. ते आमच्याशी उर्दू आणि पंजाबीमध्ये बोलत होते. आपसात पंजाबीमध्ये बोलत होते. त्यांच्या बोलण्यात मी साजिदचे नाव ऐकले. जेवणानंतर त्यांनी ताहिराला पोळ्या बांधायला सांगितल्या. हळद, मिरची आणि मीठही घेऊन गेले होते बशीरने पुढे सांगितले, ‘परवेजने जुन्या कपड्याच्या तुकड्यात 10 पोळ्या बांधल्या आणि एका पॉलिथीनमध्ये भाजी ठेवली. मुजाहिदांनी एका पॉलिथीनमध्ये हळद, मिरची आणि मीठही घेतले. त्यांनी परवेजच्या ढोकवरून एक पातेले आणि पळीही घेतली. मी ढोकला पाण्यापासून वाचवण्यासाठी जी मोठी पॉलिथीन ठेवली होती, ती एका मुजाहिदाने घेतली.’ त्यांच्याकडे सिगारेट, टॉफी आणि खजूरही होते. ते सुमारे 5 तास ढोकमध्ये राहिले आणि रात्री 10 वाजता एक-एक करून बाहेर पडले. बाहेर पडताना लहान उंचीच्या मुजाहिदाने परवेजला 3 हजार रुपये दिले. मुजाहिद गेल्यानंतर 5 मिनिटांनी मीही निघून गेलो. ‘22 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मी परवेजला हिल पार्क पोनी स्टँडजवळ भेटलो. आम्ही आमच्या घोड्यांवरून दोन पर्यटकांना घेऊन बैसरन घाटीत पोहोचलो. त्यांना मुख्य गेटवर सोडल्यानंतर परवेज आणि मी घोड्यांना मुख्य गेटजवळच बांधले. आम्ही पार्कमध्ये फिरत असताना, आम्हाला तेच तीन लोक पार्कच्या कुंपणाजवळ बसलेले दिसले.’ ‘आम्ही लगेच मुख्य गेटकडे आलो आणि ज्या पर्यटकांना घेऊन गेलो होतो, त्यांच्या येण्याची वाट पाहू लागलो. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पोनी स्टँडवरून निघालो. मी पहलगाम मार्केटमध्ये असताना, मला एका पोनीवाल्याने सांगितले की बैसरनमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे, ज्यात अनेक पर्यटक मारले गेले आहेत. हल्ल्यानंतर मी हिल पार्कजवळील ढोक सोडून खैय्यारमधील माझ्या घरी स्थलांतरित झालो. पकडले जाण्याच्या भीतीने मी याबद्दल कोणाशीही बोललो नाही.’ चकमकीत तिन्ही दहशतवादी ठार 28 जुलै, 2025 रोजी श्रीनगरमधील डाचीगामच्या महादेव हिल्समध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात तीन दहशतवादी मारले गेले. त्यांच्याजवळ सापडलेल्या शस्त्रांच्या फॉरेन्सिक तपासणीतून पुष्टी झाली की तीच शस्त्रे बैसरनमध्ये झालेल्या हल्ल्यात वापरली गेली होती. या चकमकीदरम्यान एक GoPro कॅमेरा सापडला. मोबाईल डेटाच्या विश्लेषणातून दहशतवादी नेटवर्कशी संबंध असल्याचे सिद्ध झाले. तपासणीत असे आढळून आले की 21 डिसेंबर 2023 रोजी लष्करी वाहनावर हल्ला, 4 मे 2024 रोजी वायुसेनेच्या वाहनावर हल्ला, 9 जून 2024 रोजी शिव खोरी यात्रेकरूंवर हल्ला, 20 ऑक्टोबर रोजी APCO कंपनीवर हल्ला आणि 22 एप्रिल 2025 रोजी बैसरनमध्ये झालेल्या हल्ल्यात जप्त केलेली शस्त्रे सारखीच होती. चौकशीत हे सिद्ध झाले की तिन्ही दहशतवाद्यांना पाकिस्तानात बसलेल्या लष्कर-ए-तैयबाचा कमांडर साजिद जट्टकडून सूचना मिळत होत्या. हा हल्ला पूर्वनियोजित कट होता, जो पाकिस्तानमधून चालवला गेला आणि स्थानिक पातळीवर मदत घेण्यात आली. साजिद जट्ट थेट दहशतवादी सुलेमानच्या संपर्कात होता. सुलेमानच्या फोनमध्ये 'अल्पाइन क्वेस्ट' (alpine quest) ॲप डाउनलोड होते. यावर इंटरनेटशिवाय कोणत्याही ठिकाणाचे कोऑर्डिनेट्स (निर्देशांक) मिळतात. ॲपमध्ये आधीच बैसरन घाटीचे लोकेशन (स्थान) सेट केले होते. घटनास्थळावरून जप्त केलेल्या ब्लँकेट आणि सामानावर बशीर आणि परवेझचा डीएनए (DNA) आढळला. मोबाइल फोनच्या तपासणीत असे आढळून आले की दहशतवाद्यांचे फोन पाकिस्तानातून खरेदी केले होते आणि त्यात त्यांची छायाचित्रेही होती. कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) वरून हे देखील सिद्ध झाले की बशीर आणि परवेझ घटनेच्या वेळी त्याच परिसरात उपस्थित होते. दोन्ही स्थानिक आरोपींनी आधीच मोठ्या प्रमाणात रेशन खरेदी केल्याचे पुरावेही मिळाले. ते आधीपासूनच दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत असावेत अशी शक्यता आहे. या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबा आणि द रेसिस्टन्स फ्रंट यांचा सहभाग होता. काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे, पर्यटन उपक्रम थांबवणे आणि देशविरोधी कारवायांना प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश होता. खटला सध्या ट्रायल स्टेजमध्येNIA पोलीस स्टेशन जम्मू येथे FIR क्रमांक RC-02/2025/NIA/JMU अंतर्गत 27 एप्रिल 2025 रोजी गुन्हा दाखल झाला. हा खटला NIA कायदा 2008 अंतर्गत जम्मू येथील विशेष न्यायालयात सादर करण्यात आला आहे आणि आरोपपत्र क्रमांक 03/2025 दाखल झाले आहे. खटला ट्रायल स्टेजमध्ये आहे. यानंतर आरोप निश्चित केले जातील आणि खटला चालेल, ज्यामध्ये साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे सादर केले जातील. सर्व पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालय निकाल देईल.
पहलगामची बैसरन दरी. हिरव्यागार दऱ्या आणि गवताळ प्रदेशाने भरलेली. काश्मीरला येणारे पर्यटक येथे नक्की यायचे. बरोबर एक वर्षापूर्वी 22 एप्रिल रोजीही आले होते. तेव्हा जंगलातून तीन दहशतवादी आले आणि 13 मिनिटांत 26 लोकांची हत्या केली. बैसरन दरी ओस पडली. पूर्ण वर्ष उलटले, पण अजूनही ओसाडपणा कायम आहे. येथे आता पूर्वीसारखे पर्यटक येत नाहीत. लोकांना दरी फिरवणारे मार्गदर्शक (गाईड) उद्ध्वस्त झाले. त्यांचे घोडे आणि गाड्याही विकल्या गेल्या. पहलगाममध्ये हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले गेले, भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानकडून सूड घेतला, पण बैसरन दरीत काहीही बदलले नाही. मुंबईची मुनिजा कुटुंबासोबत काश्मीर फिरायला आल्या, तेव्हा पहलगामलाही पोहोचल्या. त्यांना बैसरन दरीत जायचे होते, पण त्या जाऊ शकल्या नाहीत, कारण हल्ल्यानंतर दरी पुन्हा उघडलीच नाही. पहलगाम हल्ल्यानंतर काय बदलले 1. 48 पैकी 6 पर्यटन स्थळे अजूनही बंद, सुरक्षा मंजुरी मिळाल्यानंतर उघडतील हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये 48 पर्यटन स्थळे बंद करण्यात आली होती. यापैकी 42 पुन्हा उघडण्यात आली. 6 अजूनही बंद आहेत. बैसरन खोऱ्याव्यतिरिक्त चंदनवाडी, गुरेज, अथवटो, बंगस आणि रामकुंडचे सुरक्षा पुनरावलोकन (सिक्युरिटी रिव्ह्यू) सुरू आहे. मंजुरी मिळाल्यानंतर (क्लिअरन्स मिळाल्यानंतर) ती उघडली जाऊ शकतात. दहशतवादी हल्ल्यापूर्वी एप्रिल, जून आणि जुलैमध्ये दररोज 10 हजारांहून अधिक पर्यटक पहलगामला येत होते. आता फक्त 2000 ते 2500 येतात. आता बैसरन घाटी कधी उघडेल, हा प्रश्न आम्ही जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना विचारला. त्यांनी अधिकृतपणे (ऑफिशियली) बोलण्यास नकार दिला, परंतु सांगितले की सध्या येथील सुरक्षा तपासली जात आहे. मंजुरी मिळाल्यानंतरच (क्लिअरन्स मिळाल्यानंतरच) निर्णय घेतला जाईल. 2. घोडेवाले, दुकानदारांच्या ओळखीसाठी QR कोड असलेले कार्ड संवेदनशील पर्यटन स्थळांची यादी तयार करण्यात आली आहे. येथे पर्यटकांच्या थेट संपर्कात येणाऱ्या स्थानिक लोकांची पडताळणी केली जाईल. त्यांना QR कोड असलेले कार्ड दिले जात आहे. ते स्कॅन करताच, त्यांची माहिती, फोन नंबर, आधार नंबर आणि पत्त्याची माहिती मिळेल. याची सुरुवात याच आठवड्यात पहलगाममध्ये झाली आहे. मुंबईहून आलेल्या पर्यटक मुनिजा मोहम्मद मेरीशा सांगतात, ‘पहलगाम हल्ल्यामुळे थोडी घाबरले होते. येथे फिरल्यानंतर भीती नाही. सुरक्षिततेवर काम सुरू आहे. प्रत्येक घोडेवाल्याकडे एक QR कोड आहे. तो स्कॅन केल्यावर आपण योग्य व्यक्तीसोबत फिरायला आलो आहोत हे कळते.’ मुनिजा याचा अनुभव सांगतात, ‘मी एका घोडेवाल्याशी बैसरन घाटीला जाण्याबद्दल बोलत होते. त्याने आपली ओळख पटवण्यासाठी QR कोड दाखवला. तो स्कॅन करताच त्याची संपूर्ण माहिती आली. नाव- मोहिद्दीन मागरे. पत्ता- पहलगाम. फोन नंबर 9469******. आधार नंबर 4491********. व्यवसाय-पोनी मॅन. पोलीस पडताळणी- होय.’ टूरिस्ट गाईड जब्बार अहमद मागरे म्हणतात की, QR कोड सुरू करून सरकारने चांगले काम केले आहे. यामुळे घोडेवाले, कॅमेरावाले आणि दुकानदार यांची योग्य ओळख पटत आहे. आतापर्यंत 165 पेक्षा जास्त घोडेवाल्यांना कार्ड जारी करण्यात आले आहेत. आम्ही सर्वात आधी पर्यटकांना कार्डच दाखवतो. गाडीवाले आणि दुकानदार, सर्वांचे वेगवेगळे QR कोड आहेत. 3. दहशतवाद्यांच्या मदतनीसांविरोधात आरोपपत्र पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ओव्हरग्राउंड वर्कर्सविरुद्ध जम्मू NIA कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. खटला सुरू झाला आहे. 1300 पानांच्या आरोपपत्रात हल्ल्याचा कट पाकिस्तानात रचल्याचे पुरावे देण्यात आले आहेत. पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा आणि द रेजिस्टेंस फ्रंटसह 7 आरोपी बनवण्यात आले आहेत. आरोपपत्रात पाकिस्तानी हँडलर सज्जाद जट्टचे नावही आहे. 4. दहशतवाद्यांशी भिडलेल्या आदिलच्या पत्नीला नोकरी, कुटुंबाला घर मिळाले काश्मिरी युवक सय्यद आदिल हुसेन 22 एप्रिल, 2025 रोजी पर्यटकांसोबत बैसरन घाटीत गेले होते. दहशतवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा ते पर्यटकांना वाचवण्यासाठी एका दहशतवाद्याशी भिडले. त्याची रायफल पकडली. आदिलला दहशतवाद्याने तीन गोळ्या मारल्या. कुटुंबाची जबाबदारी 29 वर्षांच्या आदिलवरच होती. जम्मू-काश्मीर सरकारने त्यांची पत्नी गुलनाज अख्तर यांना सरकारी नोकरी दिली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हापतनार गावात घर बांधून दिले आहे. आदिलचा भाऊ नौशाद म्हणतो, 'त्याच्या मृत्यूमुळे आम्हाला दुःख होते, पण त्याहून अधिक अभिमान वाटतो. त्याने दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले नाहीत.' टूर ऑपरेटर म्हणाले- EMI भरू शकत नाही, बँकवाले गाडी घेऊन जातील जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून सुमारे 90 किमी दूर पहलगाम आणि पहलगामपासून 6 किमी दूर बैसरन व्हॅली आहे. गवताची मोठी मैदाने, देवदारची घनदाट जंगले, बर्फाच्छादित पर्वतांमुळे ही जागा स्वित्झर्लंडची आठवण करून देते. म्हणूनच याला मिनी स्वित्झर्लंड असे नाव पडले. येथे फक्त घोडेस्वारी करून किंवा ट्रेकिंग करूनच जाता येते. ज्या ठिकाणाहून पर्यटक आपला प्रवास सुरू करत असत, तिथे बरेच घोडे आणि मार्गदर्शक उपलब्ध असत. एक वर्षानंतरही ते भेटले, पण आधीपेक्षा खूप कमी. दरीचा रस्ता दाखवणारा फलकही काढून टाकण्यात आला. पहलगामपासून 2-3 किमी दूर कनहमर्ग आहे. आता मार्गदर्शक लोकांना तिथेच फिरवायला घेऊन जातात. बैसरन व्हॅलीकडे कोणीही जाऊ शकत नाही. टूर ऑपरेटर मोहम्मद शफी सांगतात की, बैसरन व्हॅली पहलगाममधील सर्वात आवडते ठिकाण आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर 8-9 महिने पहलगाम पूर्णपणे बंद होते. दीड-दोन महिन्यांपासून पर्यटक यायला सुरुवात झाली आहे. बैसरन व्हॅलीसोबत चंदनवाडीही बंद आहे. त्यामुळे फक्त 20% पर्यटक येत आहेत. स्थळे बंद असल्यामुळे तेही लवकर परत जातात.’ ‘लवकरच दरी उघडली जाईल असे सांगण्यात आले आहे, पण अजून अंतिम निर्णय झालेला नाही. पोलिस आणि एजन्सींनी संपूर्ण सुरक्षा तपासणी करावी. किमान चंदनवाडी तरी उघडायला हवी. चंदनवाडीत बर्फ असतो. पर्यटक तेच पाहण्यासाठी येतात. आमच्या गाड्यांचे हप्ते बाकी आहेत. जर ही पर्यटन स्थळे उघडली नाहीत, तर हप्ते भरता येणार नाहीत. बँकवाले गाडी घेऊन जातील. चंदनवाडीवर पोलिस चौकी आहे, सैन्य तैनात आहे. ते उघडले जाऊ शकते. बैसरन दरी भले बंद ठेवावी.’ पहलगाममधील पोनी मॅन असोसिएशनचे अध्यक्ष बिलाल अहमद म्हणतात, ‘एक वर्षानंतरही आमचे काम बंद आहे. अनेक लोकांनी आपले घोडे आणि गाड्या विकल्या. काही पर्यटन स्थळे उघडल्याने काम सुरू झाले आहे. रोज 200-500 रुपयांची कमाई होत आहे. आम्ही मागणी करत आहोत की आणखी काही स्थळे उघडली जावीत.’ ‘आता पर्यटक येत आहेत. आम्ही त्यांना इकडे-तिकडे फिरवतो. यामुळे पर्यटक खूश होत नाहीत. ते तर बैसरन दरी आणि चंदनवाडी फिरण्यासाठी येतात. यापैकी कोणतेही उघडले, तर चांगले राहील. येथे आता खूप सुरक्षा आहे. आम्ही लोकही समजलो आहोत की कोणत्या प्रकारचे लोक वाईट आहेत आणि त्यांच्यापासून दूर राहायचे आहे.’ 22 एप्रिल 2025 चा दिवस, जेव्हा बैसरन दरीत हल्ला झाला दुपारी साधारण 2 वाजताची गोष्ट आहे. पर्यटकांचे गट दरीत व्हिडिओ-फोटो शूट करत होते. त्याच वेळी तीन दहशतवादी जंगलातून आले आणि गोळ्या झाडू लागले. पहिली गोळी साधारण 2.20 वाजता चालली. सुरुवातीला कोणालाच समजले नाही की काय झाले आहे. जेव्हा मृतदेह पडू लागले, तेव्हा वाटले की हल्ला झाला आहे. लोक वाचण्यासाठी पळाले, पण त्या मैदानात लपण्याची जागाच नव्हती. हल्ल्यात एकूण 26 लोक मारले गेले. पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, भारताने ७ मे रोजी रात्री दीड वाजता पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर हवाई हल्ला केला. भारताने कोटली, बहावलपूर, मुरीदके, बाग आणि मुझफ्फराबादमध्ये हवाई हल्ला केला. यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचे ठिकाण समाविष्ट आहे. मुझफ्फराबाद ही पाकिस्तानव्याप्त काश्मीरची राजधानी आहे आणि येथूनच दहशतवादी नेटवर्क चालवले जाते. ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. यात कंदाहार विमान अपहरण, पठाणकोट आणि संसद हल्ल्यात सामील असलेला अब्दुल रऊफ अजहरचाही समावेश आहे. रऊफ जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचा भाऊ होता.
इराण युद्ध सुरू झाल्यापासून पाकिस्तानात तेलाच्या दरात 44% आणि चीनमध्ये 31% वाढ झाली आहे. सर्वाधिक पेट्रोल आणि डिझेल उत्पादन करणाऱ्या अमेरिकेतही पेट्रोल 42% महाग झाले आहे. मात्र, भारतात किमती स्थिर आहेत. तेल कंपन्यांना दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. तरीही किमती वाढवण्यात आलेल्या नाहीत. भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर का वाढत नाहीत? सरकार 5 राज्यांमधील निवडणुका संपण्याची वाट पाहत आहे का? निवडणुकीनंतर दर किती वाढू शकतात? आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया... प्रश्न- 1: युद्धादरम्यान जगभरात पेट्रोलच्या किमती वाढत आहेत का?उत्तर : इराण युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक स्तरावर तेलाची टंचाई आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याच्या एक दिवस आधी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव सुमारे 67 डॉलर प्रति बॅरल होता. युद्धानंतर तो वाढून 120 डॉलर प्रति बॅरल झाला. मार्चमध्ये कच्च्या तेलाचा सरासरी भाव 103 डॉलर प्रति बॅरल होता. यामुळे सुमारे 120 देशांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. अमेरिकेचे युद्ध सुरू होण्यापूर्वी, म्हणजेच फेब्रुवारीमध्ये, पेट्रोलचा सरासरी दर 2.94 डॉलर प्रति गॅलन, म्हणजे सुमारे 274.54 रुपये होता. एप्रिलमध्ये तो 4.14 प्रति गॅलन, म्हणजे 386.6 रुपयांवर पोहोचला आहे. प्रश्न- 2: मग भारत सरकार दर का वाढवत नाही?उत्तर : सरकारी नियमांनुसार, 2010 पासून पेट्रोल आणि 2014 पासून डिझेलचे नियंत्रणमुक्त करण्यात आले आहे, म्हणजेच त्याचे विक्री दर सरकार नव्हे तर तेल कंपन्यांद्वारे निश्चित केले जातात. कंपन्या कच्च्या तेलाचे दर, रिफायनिंग खर्च, सरकारी कर, इनपुट खर्च आणि त्यांचा स्वतःचा नफा विचारात घेऊन दररोजचे दर निश्चित करतात. तरीही, तेल कंपन्यांद्वारे निश्चित केलेल्या किमतींमध्ये सरकारचा हस्तक्षेप असतो. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही सर्वात मोठी सरकारी मालकीची तेल विपणन कंपनी आहे. द प्रिंटनुसार, इंडियन ऑइलने सांगितले होते की किमतींशी संबंधित प्रश्न पेट्रोलियम मंत्रालयाला विचारले पाहिजेत. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींचा थेट जनतेवर परिणाम होत असल्याने, या किमतींना मुख्य निवडणूक मुद्दा मानले जाते. त्यामुळे सरकारविरुद्धचा सार्वजनिक रोष रोखण्यासाठी निवडणुकीदरम्यान तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवल्या जातात. तेलाचे संकट असूनही तेलाच्या किमतींमध्ये वाढ न झाल्याने, हा मुद्दा पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमधील विधानसभा निवडणुकांशी जोडला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी आहे, तर सर्व राज्यांचे निकाल 4 मे रोजी जाहीर केले जातील. DCS बँकेच्या कार्यकारी संचालक राधिका राव यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, अधिकारी कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम सामान्य लोकांवर टाकणे टाळतील. स्थानिक वापर आणि उद्योगांना पाठिंबा देण्याव्यतिरिक्त, राज्य निवडणुकांमुळे सरकारचा दृष्टिकोन संयमित राहील. मात्र, निवडणुकांच्या आसपासच्या महिन्यांत तेलाच्या किमती नियंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. इंग्रजी वृत्तपत्र 'द प्रिंट'च्या अहवालानुसार, तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनालिसिस सेल (PPAC) च्या आकडेवारीवरून हे सिद्ध होते की, विधानसभा निवडणुकीपूर्वी तेलाच्या किमती वाढण्यापासून रोखल्या जातात आणि निवडणुकीनंतर त्या वाढतात... आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढूनही किरकोळ दरात वाढ न केल्यामुळे तेल कंपन्यांना नुकसान होते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी होतात तेव्हाही तेल कंपन्या विक्री किंमत कमी करत नाहीत जेणेकरून त्यांचे नुकसान भरून काढता येईल. प्रश्न- 3 : किंमत न वाढल्याने तेल कंपन्यांना किती नुकसान होत आहे?उत्तर : भारतात पेट्रोलचे दर शेवटचे मे 2022 मध्ये वाढले होते. इराण युद्धामुळे गेल्या 50 दिवसांपासून तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. तरीही, सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. मात्र, प्रीमियम पेट्रोलच्या दरात ₹2.35 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. खाजगी पुरवठादार नायरा एनर्जीने मार्चमध्ये पेट्रोलच्या दरात ₹5 आणि डिझेलच्या दरात ₹3 प्रति लिटरने वाढ केली आहे. मात्र, बाजारात सरकारशी संबंधित तेल कंपन्यांचे वर्चस्व आहे, ज्यांनी दरात वाढ केलेली नाही. या तीन कंपन्यांमध्ये प्रामुख्याने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे. मार्चमध्ये या कंपन्यांना दररोज ₹2,400 कोटींचे नुकसान झाले होते. ऑस्ट्रेलियन मल्टीनॅशनल बँकिंग कंपनी मॅक्वेरी ग्रुप लिमिटेडच्या मते, जेव्हा कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल ₹10 ची वाढ होते, तेव्हा भारतीय तेल कंपन्यांना प्रति लिटर ₹6 चे नुकसान होते. जेव्हा कच्च्या तेलाची किंमत $135 ते $165 प्रति बॅरलपर्यंत असते, तेव्हा भारतीय कंपन्यांना पेट्रोलवर ₹18 आणि डिझेलवर ₹35 चे नुकसान होईल. सवल- 4 : जर नुकसान झाले तर सरकार ते कसे व्यवस्थापित करते?उत्तर : भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करण्यासाठी संरचनेचे अनेक स्तर आहेत. कच्च्या तेलाच्या बाजारभावाव्यतिरिक्त सरकारी शुल्क देखील या दरांवर परिणाम करतात. या प्रणालीमुळे असे होते की जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, तेव्हा सरकार तत्काळ बाजारातील किमती वाढवत नाही. त्याऐवजी, ती आधी उत्पादन शुल्क कमी करते किंवा तेल कंपन्यांना थोड्या काळासाठी नुकसान सहन करण्यास सांगते. हे नुकसान भरून काढण्यासाठी, जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती कमी होतात, तेव्हा सरकार बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करत नाही. ती तेल कंपन्यांना नफा कमावण्याची परवानगी देते. इराण युद्धानंतरही सरकार अशा प्रकारे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती व्यवस्थापित करते... प्रश्न- 5: तर मग निवडणुकीनंतर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढू शकतात?उत्तर : राहुल गांधींनी गेल्या महिन्यात X वर एका पोस्टमध्ये म्हटले होते की, निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेल आणि LPG चे दर वाढतील. ही फक्त वेळेची बाब आहे. निवडणुकीनंतर जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागतील. TMC नेते अभिषेक बॅनर्जी यांनी एका रॅलीत केंद्र सरकारला आव्हान दिले होते की त्यांनी पुढील पाच वर्षांपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणार नाही असे वचन द्यावे. ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने भारतात तेलाच्या दरांबाबतच्या एका अहवालात म्हटले होते की, एप्रिलमध्ये निवडणुकीनंतर पेट्रोल पंपावर तेलाचे दर वाढण्याचा धोका आहे. ट्रान्सपोर्टर असोसिएशन, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे सदस्य शैलेंद्र गुप्ता यांच्या मते, निवडणुकीनंतर डिझेलच्या दरात वाढ केली जाईल. सुमारे 10% ट्रक निष्क्रिय उभे आहेत. जर किमती वाढल्या तर 30% ट्रक बंद स्थितीत उभे राहतील. सध्या निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती वाढ होईल याचा कोणताही निश्चित अंदाज देता येत नाही. तथापि, मॅक्वेरी रिपोर्टनुसार, असे म्हटले जात आहे की निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सध्याच्या नुकसानीइतकीच वाढ होऊ शकते, म्हणजेच, पेट्रोलसाठी ₹18 प्रति लिटर आणि डिझेलसाठी ₹35 प्रति लिटर. तथापि, असे होण्याची शक्यता कमी आहे कारण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात इतकी मोठी वाढ यापूर्वी कधीही झाली नाही. ब्रिटिश बहुराष्ट्रीय बँक स्टँडर्ड चार्टर्ड पीएलसीच्या इंडिया इकॉनॉमिक रिसर्चच्या प्रमुख अनुभूती सहाय यांच्या मते, जर कच्च्या तेलाची किंमत सरासरी $95 प्रति बॅरल असेल, तर सरकारला डिझेल आणि गॅसोलीनच्या दरात ₹8 ते ₹15 ची वाढ करावी लागेल. जर कच्च्या तेलाची किंमत सरासरी $85 ते $90 प्रति बॅरल असेल, तरीही पेट्रोलच्या दरात ₹3 ते ₹7 ची वाढ करावी लागेल. प्रश्न- 6 : भाव वाढले तर त्याचा काय परिणाम होईल?उत्तर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सामान्य माणसाच्या घरगुती खर्चावर थेट परिणाम होईल...
इराण युद्ध सुरू झाल्यापासून, पाकिस्तानात पेट्रोलची किंमत 320 पाकिस्तानी रुपयांवरून 460 रुपयांपर्यंत वाढली आहे, म्हणजेच केवळ 50 दिवसांत जवळपास 44% वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, अमेरिकेत तेलाच्या किमती 42% आणि चीनमध्ये 31% नी वाढल्या. मात्र, भारतात याच काळात तेलाच्या किमती स्थिर राहिल्या. यामुळे तेल कंपन्यांना दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. भारतात तेलाच्या किमती का वाढल्या नाहीत? कंपन्या हे नुकसान कसे भरून काढत आहेत? आणि निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार आहेत का? जाणून घ्या आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न 1: इराण युद्धादरम्यान जगभरात पेट्रोलच्या किमती कशा वाढल्या? उत्तर: 27 फेब्रुवारी रोजी इराणवरील हल्ल्याच्या आदल्या दिवशी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे 67 डॉलर होती. युद्धादरम्यान, ती प्रति बॅरल 120 डॉलरपर्यंत वाढली. मार्चमध्ये, कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 103 डॉलर होती. 21 एप्रिल रोजी, ती प्रति बॅरल सुमारे 87 डॉलर होती. यामुळे, जगभरातील सुमारे 120 देशांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या. अमेरिकेत युद्ध सुरू होण्यापूर्वी, फेब्रुवारीमध्ये, गॅसोलीनची सरासरी किंमत प्रति गॅलन 2.94 डॉलर, म्हणजेच अंदाजे ₹274.54 होती. एप्रिलमध्ये, ती प्रति गॅलन 4.14 डॉलर, म्हणजेच ₹386.6 वर पोहोचली. प्रश्न 2: भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती का वाढत नाहीत? उत्तर: सरकारी नियमांनुसार, 2010 पासून पेट्रोल आणि 2014 पासून डिझेलचे दर नियंत्रणमुक्त करण्यात आले आहेत. याचा अर्थ, त्यांचे विक्री दर सरकार नव्हे, तर तेल कंपन्या ठरवतात. कंपन्या कच्च्या तेलाची किंमत, शुद्धीकरण खर्च, सरकारी कर, उत्पादन खर्च आणि स्वतःचा नफा या घटकांचा विचार करून दैनंदिन दर निश्चित करतात. तथापि, तेल कंपन्यांनी ठरवलेल्या दरांमध्ये सरकारचा सहभाग असतो. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही सर्वात मोठी सरकारी तेल विपणन कंपनी आहे. 'द प्रिंट' या इंग्रजी वृत्तपत्रातील एका वृत्तानुसार, इंडियन ऑइलने म्हटले आहे की, दरांसंबंधीचे प्रश्न पेट्रोलियम मंत्रालयाकडे निर्देशित केले पाहिजेत. तेलाच्या संकटातही दरवाढ न होण्याचे कारण पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांशी जोडले जात आहे. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींचा थेट परिणाम जनतेवर होत असल्याने सरकारविरोधात जनतेचा रोष टाळण्यासाठी निवडणुकांदरम्यान तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवल्या जातात. पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा दुसरा टप्पा 29 एप्रिल रोजी आहे, तर सर्व राज्यांचे निकाल 4 मे रोजी जाहीर होतील. डीबीएस बँकेच्या कार्यकारी संचालक राधिका राव यांनी गेल्या महिन्यात सांगितले, वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींचा भार सरकार सर्वसामान्यांवर टाकणार नाही. देशांतर्गत वापर आणि उद्योगांना आधार देण्यासोबतच राज्य निवडणुकांमुळे सरकारचा दृष्टिकोन संयमित राहील. मात्र, निवडणुकांच्या आसपासच्या महिन्यांत तेलाच्या किमती नियंत्रित करण्याची ही पहिली वेळ नाही. 'द प्रिंट'मधील एका अहवालानुसार, तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाच्या (PPAC) आकडेवारीवरून असे दिसून येते की, विधानसभा निवडणुकांपूर्वी तेलाच्या किमती वाढण्यापासून रोखल्या जातात आणि निवडणुकांनंतर त्या कमी केल्या जातात... जून 2017 पासून तेलाच्या किमतींसाठी ‘डायनॅमिक प्राइसिंग सिस्टीम’ लागू आहे, ज्याअंतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दर 15 दिवसांऐवजी दररोज बदलतात. तत्कालीन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले होते की, यामुळे किमतींमध्ये पारदर्शकता येईल. 2014 ते 2019 पर्यंत तेलाच्या किमती स्थिर होत्या. त्यामुळे त्या राजकीय शस्त्र बनल्या नाहीत. त्यानंतर, राष्ट्रीय विधानसभा निवडणुकांदरम्यान तेलाच्या किमती नियंत्रित करण्यास सुरुवात झाली. एप्रिल 2019 ते एप्रिल 2020 पर्यंत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 53 डॉलरपर्यंत घसरल्या. त्यानंतर, कोविड-19 आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे, डिसेंबर 2022 पर्यंत तेलाच्या किमती प्रति बॅरल 88 डॉलरपर्यंत वाढल्या. एप्रिल 2019 मध्ये, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि सिक्कीममध्ये निवडणुकीच्या पाच दिवस आधीपासून ते निवडणुकीपर्यंत किमती स्थिर राहिल्या. नोव्हेंबर 2020 मध्ये, बिहारमध्ये मतदानाच्या 51 दिवस आधीपासून किमती स्थिर राहिल्या आणि मतदानानंतर बदल सुरू झाला. 2021 मध्ये, पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या शेवटच्या दिवसाच्या एक महिना आधीपर्यंत तेलाच्या किमती स्थिर राहिल्या आणि मतदानानंतर पाच दिवसांनी किमती वाढू लागल्या. फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये निवडणुका झाल्या. उत्तर प्रदेशात, मतदानाच्या बरोबर चार महिने आधीपर्यंत किमती स्थिर राहिल्या. निवडणुकीनंतर केवळ दोन आठवड्यांत किमती बदलू लागल्या. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती वाढत असूनही, किरकोळ तेलाच्या किमती न वाढवल्यामुळे तेल कंपन्यांना तोटा होतो. परिणामी, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती कमी झाल्यावरही तेल कंपन्या आपला तोटा भरून काढण्यासाठी विक्री किंमती कमी करत नाहीत. प्रश्न 3: किमती न वाढवल्यामुळे तेल कंपन्यांना किती तोटा होत आहे? उत्तर: भारतात तीन प्रमुख पेट्रोलियम कंपन्या आहेत: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन. मार्च महिन्यात, या कंपन्यांना दररोज ₹2,400 कोटींचा तोटा झाला. मॅक्वेरी ग्रुप लिमिटेड या ऑस्ट्रेलियन बहुराष्ट्रीय बँकिंग कंपनीनुसार, जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 10 डॉलरने वाढतात, तेव्हा भारतीय तेल कंपन्यांना प्रति लिटर 6 रुपयांचा तोटा होतो. जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 135 ते 165 रुपयांच्या दरम्यान असतात, तेव्हा भारतीय कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 18 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर 35 रुपयांचा तोटा होतो. प्रश्न 4: जर भारताला तोटा होत असेल, तर सरकार हे कसे हाताळत आहे? उत्तर: भारतातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत रचना बहुस्तरीय आहे. कच्च्या तेलाच्या बाजारभावाव्यतिरिक्त, सरकारी शुल्कांचाही या किमतींवर परिणाम होतो... सर्वप्रथम, कच्च्या तेलावर रिफायनरीमध्ये प्रक्रिया करून त्याचे पेट्रोल आणि डिझेलमध्ये रूपांतर केले जाते. डीलर कमिशन प्रति लिटर 2 ते 4 रुपयांपर्यंत असते. त्यानंतर केंद्र सरकार उत्पादन शुल्क आकारते. सध्या, पेट्रोलवर प्रति लिटर 11.9 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर 7.8 रुपये उत्पादन शुल्क आहे. मग, राज्य सरकारे व्हॅट (VAT) लावतात. प्रत्येक राज्याद्वारे आकारला जाणारा कर वेगवेगळा असतो. त्यामुळे, मुंबईत पेट्रोलची किंमत ₹103.5, दिल्लीत ₹94.7 आणि भोपाळमध्ये ₹106.6 आहे. या प्रणालीमुळे, जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, तेव्हा सरकार लगेचच बाजारभाव वाढवत नाही. ते आधी उत्पादन शुल्क कमी करते किंवा तेल कंपन्यांना थोड्या कालावधीसाठी तोटा सहन करण्यास सांगते. हा तोटा भरून काढण्यासाठी, जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती कमी होतात, तेव्हा सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करत नाही. ते तेल कंपन्यांना नफा कमावण्याची संधी देते. इराण युद्धानंतरही, सरकार अशाच प्रकारे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रित करत आहे... युद्ध सुरू होण्यापूर्वी, भारत सरकारने पेट्रोलवर ₹21.9 आणि डिझेलवर ₹17.8 चे उत्पादन शुल्क लावले होते. 27 मार्च रोजी, पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीवरील शुल्क ₹10 ने कमी करण्यात आले. असे असूनही, एप्रिल महिन्यात तेल कंपन्यांना दररोज 1,600 कोटी रुपयांचा तोटा होत आहे. इराण युद्ध सुरू झाल्यापासून, भारत रशियाकडून दररोज सरासरी 1.5 दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात करत आहे. हे प्रमाण 2 दशलक्ष बॅरलपर्यंत वाढवले जाऊ शकते. 2019 नंतर प्रथमच भारताने इराणकडून दोन तेल टँकर खरेदी केले. याव्यतिरिक्त, अमेरिका आणि आफ्रिकन देशांकडूनही तेलाची आयात केली जात आहे. मार्च महिन्यात पेट्रोलियम मंत्रालयाने जाहीर केले की, भारत आपल्या गरजेच्या 70% पर्यंत तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीव्यतिरिक्त इतर मार्गांनी मिळवत आहे. यापूर्वी, भारताला लागणाऱ्या कच्च्या तेलापैकी 45% ते 50% तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येत असे. भारत सरकारने फेब्रुवारीमध्ये जाहीर केले की, 1 एप्रिलपासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळले जाईल. याचा अर्थ पेट्रोलमध्ये 20% अल्कोहोल असेल. प्रश्न 5: निवडणुकीनंतर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार आहेत का? उत्तर: राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात X वर एका पोस्टमध्ये म्हटले होते, निवडणुकांनंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमती वाढतील. ही केवळ काळाची बाब आहे. निवडणुकांनंतर जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागतील. टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांनी एका सभेत केंद्र सरकारला पुढील पाच वर्षांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती न वाढवण्याचे वचन देण्याचे आव्हान दिले. ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने भारतातील तेलाच्या किमतींवरील एका अहवालात म्हटले आहे, एप्रिलमधील निवडणुकांनंतर पेट्रोल पंपांवर तेलाच्या किमती वाढण्याचा धोका आहे. सध्या, निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती किती वाढतील याचा कोणताही अचूक अंदाज देता येत नाही. तथापि, मॅक्वेरीच्या अहवालाच्या आधारे असे म्हटले जात आहे की, निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलवरील सध्याचे नुकसान तितक्याच प्रमाणात वाढू शकते, म्हणजेच पेट्रोलसाठी प्रति लिटर ₹18 आणि डिझेलसाठी प्रति लिटर ₹35 पर्यंत. ब्रिटिश बहुराष्ट्रीय बँक स्टँडर्ड चार्टर्ड पीएलसीच्या भारतातील आर्थिक संशोधन विभागाच्या प्रमुख अनुभूती सहाय यांच्या मते, जर कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 95 डॉलर राहिली, तर सरकारला डिझेल आणि पेट्रोलच्या दरात 8 ते 15 रुपयांनी वाढ करावी लागेल. इतकेच नव्हे, तर जर कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 85 ते 90 डॉलर राहिली, तर पेट्रोलच्या दरात 3 ते 7 रुपयांनी वाढ करावी लागेल. प्रश्न 6: किमती वाढल्यास काय परिणाम होईल? उत्तर: पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य माणसाच्या घरगुती खर्चावर थेट परिणाम होईल... भारतातील 70% मालवाहतूक ट्रकद्वारे केली जाते, ज्यात डिझेलचा वापर होतो. डिझेलच्या किमती वाढल्यामुळे फळे, भाजीपाला आणि धान्य यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतील. यामुळे घरगुती खर्चात 10% ते 15% वाढ होऊ शकते. याशिवाय, एलपीजीच्या किमतीतील वाढीचा अधिक मोठा परिणाम होईल. ट्रॅक्टरचा वापर नांगरणी आणि सिंचनासाठीही केला जातो. डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य पिकवण्याचा खर्च वाढेल, ज्यामुळे सर्वसामान्य माणसाला ते खरेदी करणे अधिक महाग होईल. टॅक्सी चालक, कॅब चालक आणि सार्वजनिक बसचे भाडेदेखील वाढेल. याचा परिणाम ऑनलाइन शॉपिंग आणि फूड डिलिव्हरीच्या शुल्कावरही होईल. लोक पेट्रोल आणि डिझेल वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांकडे वळतील. तज्ञांच्या मते, जेव्हा पेट्रोलच्या किमती 10% ते 15% वाढतात, तेव्हा इलेक्ट्रिक वाहनांमधील (EVs) आवड 20% ते 25% वाढते. वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नोकरी गमवावी लागेल. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस या वाहतूकदार संघटनेचे सदस्य शैलेंद्र गुप्ता यांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलच्या संकटामुळे 10% वाहने आधीच सेवेबाहेर आहेत. तेलाच्या किमती वाढल्यास 30% वाहने चालू शकणार नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे महागाई वाढेल. सध्या भारतातील महागाईचा दर 3.7% आहे. पेट्रोलच्या किमती वाढल्या आणि इराण युद्ध सुरूच राहिल्यास, 2027 पर्यंत तो 4.7% पर्यंत पोहोचू शकतो.
एप्रिल महिना संपत आला तसा विविध संस्थांचे हवामान विषयक अंदाज प्रसिद्ध झाले. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस (Rain) पडेल असा सगळ्या संस्थांचा सूर आहे.
लक्षवेधी : अर्थव्यवस्थेतील आशा-निराशा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून असलेले मतभेद संपले नसले, तरीदेखील युद्धाची तीव्रता कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय शेअर बाजारात (Share Market) पुन्हा एकदा उत्साह संचारला असून, जागतिक व्यापार पुनश्च सुरळीत होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
आज 22 एप्रिल रोजी वसुंधरा दिन (Earth Day) साजरा केला जातो. आज निसर्गाच्या सान्निध्यात राहून हा दिवस साजरा करा. निसर्ग जसा आपला आहे तसा पशुपक्षी आणि इतर जीवांचाही आहे.
दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २२ एप्रिल २०२६
पंचांगआज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४८ षष्ठी.चंद्र नक्षत्र कृतिका. योग आयुष्यमान चंद्र राशी वृषभ भारतीय सौर २ वैशाख शके १९४८. बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.१६ मुंबईचा चंद्रोदय ०७.४०, मुंबईचा सूर्यास्त ०६.५७ मुंबईचा चंद्रास्त ०९.११ राहू काळ ०९.२६ ते ११.०२.श्री नृसिंह नवरात्र आरंभ चांगला दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
Borivali : बोरीवलीतील पंजाबी गल्लीतील डायग्नोस्टीक सेंटर खासगी संस्थेकडे
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्यावतीने अनेक रुग्णालये खासगी संस्थांना चालवण्यास देण्याचा निर्णय घेतला असून त्यातील बोरीवली पश्चिम येथील पंजाबी गल्लीतील महानगरपालिकेच्या मालकीच्या पंजाबी गल्ली डायग्नोस्टिक्स सेंटर हे आता खासगी संस्थेला चालवण्यास देण्यात येणार आहे. यासाठी क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेड या कंपनीला चालवण्यास देण्यात येणार आहे. खासगी सहभाग तत्त्वावर या संस्थेची निवड महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.महानगरपालिकेच्या मालकीचे बोरीवली पश्चिम येथे पंजाबी गल्ली डायग्नोस्टिक्स सेंटर हे प्लॉट क्र. एफपी नं. ११या ठिकाणी असून तळमजला अधिक दोन मजले अशी एकूण २९८३.१४ चौ. मिटर इतक्या क्षेत्रफळाची जागा बांधून तयार आहे. या ठिकाणी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर या जागेवर बाह्य रुग्ण विभाग, विविध तपासण्या व चाचण्यासाठी प्रयोगशाळा, डायलेसिस केंद्र, सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन महानगरपालिकेने निश्चित केलेल्या व महानगरपालिकेच्या रुग्णांना सध्या लागू असलेल्या दराने सुरू करण्यात येणार आहे.क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेड संस्थेला, सर्वसामान्य तसेच अत्याधुनिक बाह्य रुग्ण आणि ओटीपीटी विभाग, मूलभूत सोनोग्राफी आणि मेमोग्राफी (पॅथोलॉजी आणि रेडिओलॉजी) निदान सेवा, सी.टी. आणि एम.आर.आय. स्कॅन ह्या सेवा सुविधा सुरू करण्याकरिता नेमणूक करण्यात आली आहे. पुढील ३० वर्षांकरता या संस्थेची निवड करण्यात आली आहे. यासाठी सस्थेला देण्यात येणाऱ्या जागेसाठी प्रत्येक वर्षी २ कोटी ०५ लाख रुपये एवढे अधिमुल्य आकारले जाणार आहे.बोरीवली या क्षेत्रात पूर्व आणि पश्चिम विभाग मिळून जवळपास २० लाख लोकवस्ती असून यासाठी बोरीवली येथे भगवती रुग्णालयात ११० खाटांचे रुग्णालयात सुरू आहेत. या रुग्णालयात बाह्य रुग्णविभाग, विविध तपासण्या व चाचण्यासाठी सर्व सामान्य तसेच अत्याधुनिक प्रयोगशाळा, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय स्कॅन या विविध सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. नजीकच्या काळात बोरीवली (पश्चिम) येथे ४९० रुग्णशय्या असलेले नव्याने भगवती रुग्णालय सुरू होणार आहे. परंतु तोपर्यन्त स्थानिक लोकांना कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल व्हावे लागतात. या रुग्णालयात डहाणू, ठाणे, वसई-विरार, मिरा-भायंदर या परिसरातील रुग्ण तसेच गोराई, दहिसर, कांदिवली, बोरीवली येथील स्थानिक रुग्णपण उपचारासाठी दाखल होतात. या सुविधा महानगरपालिकेतर्फे देण्यासाठी आवश्यक ते डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी वर्ग यांची नेमणूक करावी लागते व त्यांच्या आस्थापनेसाठी कायम स्वरूपी खर्च करावा लागतो. वरील उपाय म्हणून सद्यस्थितीत ही या संस्थेची निवड करुन त्यांना जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज! ‘हा’मॅचविनर खेळाडू संघात परतला
आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सुरुवातीला यश मिळाले होते, पण त्यानंतर सलग चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. मात्र, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईने दमदार पुनरागमन केले.
Latur News : लातूरमध्ये उष्माघाताचा तीव्र झटका; शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना उष्माघाताचा तीव्र झटका बसला, जो त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे.
Nari Shakti : संसदेत ३३ टक्के महिला आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही!
वरळीतील ‘जन आक्रोश’ मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारामुंबई : महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून विरोधकांनी आपला संविधानविरोधी आणि महिलाविरोधी चेहरा उघडा पाडला आहे. हे विधेयक केवळ तांत्रिक कारणास्तव थांबले असले, तरी महिलांची ही लढाई आता थांबणार नाही. ज्या दिवशी संसदेत आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला लोकप्रतिनिधी म्हणून बसतील, त्याच दिवशी हा लढा यशस्वी झाला असे आम्ही मानू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिला.https://www.youtube.com/watch?v=eraKtSoPHugलोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे वरळी येथे भव्य 'जन आक्रोश महिला संमेलना'चे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात हजारो महिलांनी सहभाग नोंदवून राहुल गांधी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मेळाव्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम, महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक मंत्री व पदाधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासून महिलांना आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, मात्र काँग्रेसची नीती नेहमीच अडवणुकीची राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन हे विधेयक आणले, पण आपली राजकीय दुकानदारी बंद होईल या भीतीने विरोधकांनी त्याला खो घातला. आता गप्प बसून चालणार नाही. ज्यांना नारीशक्तीचे वावडे आहे, त्यांची झोप उडवण्यासाठी राज्यातील एक कोटी महिलांच्या सह्यांची मोहीम राबवली जाईल. या सह्यांचे निवेदन राहुल गांधी आणि आघाडीच्या नेत्यांना पाठवून महिलांचा संताप त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल.'विरोधकांनी महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला'भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही आपल्या भाषणात विरोधकांवर सडकून टीका केली. भाषणामध्ये महिला सक्षमीकरणाच्या बाता मारायच्या आणि प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की पळ काढायचा, ही विरोधकांची जुनी खोड आहे. या विधेयकाला विरोध करून त्यांनी केवळ कागदावरच्या तरतुदीला नव्हे, तर कोट्यवधी महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर महिलांचा खऱ्या अर्थाने विचार मोदीजींनी केला, मग विरोधकांच्या पोटात का दुखले? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
'स्थानिक माथाडी भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य द्या'
मुंबई :राज्यात कुठल्याही आस्थापनेत माथाडी कामगारांची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात प्राधान्य द्यावे, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले. मंत्रालयात दापिवली (ता पनवेल जि. रायगड) येथील मे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या आस्थापनेत स्थानिक माथाडी कामगारांना माथाडी स्वरूपाचे काम मिळण्याबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. बैठकीला आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच.पी तुम्मोड, उपसचिव स्वप्नील कापडणीस, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अधिकारी, माथाडी बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर म्हणाले, स्थानिक भूमिपुत्र माथाडी कामगारांना रोजगाराच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या शासन निर्णयाप्रमाणे ८० टक्के भूमिपुत्रांना रोजगार दिला पाहिजे. या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी. बीपीसीएल कंपनीने आपल्या मालवाहतूकदारांच्या माध्यमातून नवीन माथाडी कामगारांची मागणी करावी. ही मागणी माथाडी बोर्डाने तत्काळ मान्य करीत नवीन स्थानिक माथाडी भूमिपुत्रांना रोजगार द्यावा. तसेच अशा कंपन्यांना माथाडी बोर्डाकडे माथाडी कामगारांची मागणी करण्यासाठी नोंदणी करण्याची तरतूद करण्यात यावी.स्थानिकांवर अन्याय होऊ नये किंवा त्यांना रोजगाराच्या संधींपासून डावलले जाऊ नये. स्थानिकांना डावलल्यास ही बाब कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही कामगार मंत्री फुंडकर यांनी दिला. स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेता, कंपन्यांशी तातडीने समन्वय साधावा. नियमानुसार स्थानिक तरुणांना रोजगारात सामावून घेण्यासाठी जे प्रयत्न आवश्यक आहेत, ते प्राधान्याने करावेत, असेही कामगार मंत्री यांनी सांगितले.
Mumbai : मौलाना शौकत अली मार्गावरील अनधिकृत फर्निचर विक्रेत्यांवर कारवाई, चालवला बुलडोझर
मुंबई(विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्या ‘ई’ विभाग अंतर्गत मौलाना शौकत अली मार्गावरील जुने फर्निचर विक्रेत्यांवर तसेच इतर अतिक्रमणांवर महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाकडून कारवाई करण्यात आली. उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात आणि सहायक आयुक्त आनंद कंकाळ यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.‘ई’ विभागातील मौलाना शौकत अली मार्गावर विशेषत: मुरली देवरा नेत्र रूग्णालयापासून ते जे. जे. रुग्णालय सिग्नलपर्यंतच्या परिसरात अतिक्रमण झाल्यामुळे पादचा-यांना चालताना अडथळा निर्माण होत होता. पादचा-यांना रस्त्यावरून चालावे लागत होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागातील परिरक्षण आणि अतिक्रमण निर्मूलन पथकांनी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने संयुक्तपणे मोहीम राबवली.या कारवाईदरम्यान फर्निचर विक्रेत्यांवर धडक व कठोर कारवाई करण्यात आली. पदपथांवर अस्ताव्यस्त पसरलेले जुने फर्निचर जेसीबीच्या सहाय्याने जागेवरच नष्ट करण्यात आले. त्याचबरोबर तोडलेल्या फर्निचरांचा कचरा तात्काळ हटविण्यात आला. पदपथावरील सर्व अतिक्रमणे दूर करण्यात आली. तसेच परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.या मोहिमेत १ जेसीबी, ४ मजूर, ३ अधिकारी आणि २ अभियंते सहभागी होते. तसेच, नागपाडा पोलीस ठाण्याचे ९ अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. दरम्यान, अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात नियमितपणे कारवाई सुरू राहील, असे महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाद्वारे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येत आहे.
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा आता दुसऱ्या टप्प्यात आली असताना सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma Record) याला अप्रतिम सूर गवसला आहे.
Masur News : कराड तालुक्यातील मसूर येथे २१ एप्रिल रोजी अन्नसुरक्षा विभागाने सागर पान शॉपवर कारवाई करून ७८,९६६ रुपयांचा गुटखा जप्त केला.
Maharashtra Rain Alert : उन्हाच्या तडाख्यात पावसाची हजेरी.! राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
एकीकडे उन्हाचा चटका वाढत असतानाच, दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धास्ती वाढवली आहे.
John Ternus : अॅपलचे सीईओ टिम कुक पायउतार होणार; जॉन टर्नस सूत्रे घेणार हाती
आयफोन बनवणार्या अॅपलने कंपनीतील मोठ्या फेरबदलाची घोषणा केली आहे. सीईओ टिम कुक पायउतार होणार असून ते दीर्घकाळ हार्डवेअर प्रमुख असलेल्या जॉन टर्नस (John Ternus) यांच्याकडे सूत्रे सोपवणार आहेत.
Reva Diamond : रेवा डायमंडची अक्षय्य तृतीयेला जोरदार विक्री; महसूलात वार्षिक पातळीवर 2.67 पट वाढ
पु ना गाडगीळ आणि सन्स समूहाच्या 190+ वर्षांच्या परंपरेचा वारसा लाभलेल्या रेवा डायमंड (Reva Diamond) या प्रमाणित नैसर्गिक डायमंड ज्वेलरी ब्रँडने, यंदाच्या अक्षय्य तृतीया (19 एप्रिल 2026) निमित्त उत्कृष्ट विक्री कामगिरी नोंदवत आर्थिक वर्ष 2026-27 ची दमदार सुरुवात केली आहे.
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होत आहे. महायुती ८ जागांवर दावा करत असतानाच काँग्रेस आणि ठाकरे गटात एका जागेसाठी संघर्ष सुरू झाला आहे.
Devendra Fadnavis : पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्या.! मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश
पालखी मार्गावरील विकास कामे पूर्ण करण्यात येत असून यावर्षी वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे.
बिहारमधील एका अपक्ष खासदाराच्या वक्तव्याने संपूर्ण राजकारण तापलं आहे. नुकताच त्यांनी राजकारणातील महिला आणि त्यांच्या वर्तनाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा संपूर्ण देशातून विरोध केला जात आहे. याप्रकरणी बिहार राज्य महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली असून आयोगाने खासदाराकडून त्यांच्या विधानाचे स्पष्टीकरण मागवले आहे.जाणून घ्या नेमकं प्रकरण :बिहारचे पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी राजकारणात कार्यरत असलेल्या महिलांसंदर्भात अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांनी असा दावा केला आहे की, तडजोडीशिवाय देशाच्या राजकारणात महिलांना पुढे जाणे जवळजवळ अशक्य झाले आहे आणि त्यांच्या सुरक्षेला गांभीर्याने घेतले जात नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना पप्पू यादव म्हणाले की, भारतीय समाजात महिलांना देवी मानले जात असले तरी, वास्तव याच्या अगदी उलट आहे.पप्पू यादव यांच्या मते, राजकारणातील बहुतेक महिला आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात प्रभावशाली लोकांच्या वैयक्तिक वर्तुळातून करतात. त्यांनी असा आरोप केला की, सत्तेच्या वर्तुळात महिलांचे शोषण खोलवर रुजलेले आहे. पप्पू यादव म्हणाले की, कटू सत्य हे आहे की ९०% महिलांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही राजकारण्यांच्या बिछान्यातूनच होते. एखाद्या प्रभावशाली नेत्याच्या खोलीत प्रवेश केल्याशिवाय महिला राजकारणात येऊ शकत नाहीत.https://prahaar.in/2026/04/19/dmk-and-congress-did-not-allow-womens-reservation-bill-to-be-passed-amit-shah/या प्रकरणाची स्वतः दखल घेऊन, बिहार राज्य महिला आयोगाने खासदार पप्पू यादव यांना त्यांच्या वक्तव्यासंदर्भात नोटीस बजावली असून त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांना तीन दिवसांच्या आत नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे.मोठ्या संख्येने राजकारणी अश्लील गोष्टी पाहतात :पुढे बोलताना पप्पू यादव यांनी राजकारण्यांच्या चारित्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, संसद आणि राज्य विधानसभांमधील अनेक प्रतिनिधी महिलांना आदराने वागवत नाहीत. ते असेही म्हणाले की, मोठ्या संख्येने राजकारणी अश्लील गोष्टी पाहतात आणि याची पडताळणी करण्यासाठी त्यांच्या मोबाईल फोनची तपासणी केली पाहिजे.https://prahaar.in/2026/04/18/defeat-of-the-nari-shakti-vandan-adhiniyam-is-an-insult-to-women/नारी शक्ती वंदन कायदा म्हणजे फक्त एक राजकीय खेळी :पप्पू यादव यांनी महिला आरक्षणाबाबतच्या केंद्र सरकारच्या हेतूंवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, याला केवळ एक राजकीय खेळी म्हटले आहे. त्यांनी नारी शक्ती वंदन कायद्याला केवळ एक राजकीय खेळी म्हटले आणि सरकारकडे पूर्ण बहुमत असताना हा कायदा आधी का आणला नाही, असा प्रश्न विचारला. त्यांच्या मते, या कायद्यात मागासवर्गीय, अत्यंत मागासवर्गीय, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक महिलांसाठी स्वतंत्र तरतुदींचा समावेश असलाच पाहिजे, अन्यथा त्याचे फायदे केवळ श्रीमंतांपुरतेच मर्यादित राहतील.
Kerala Massive Explosion : फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू
केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील मुंडाथिकोड गावात फटाक्यांच्या गोदामात भीषण आग आणि स्फोटाची घटना घडली आहे. या दुर्घटनेत किमान ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना वडक्कनचेरी नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या मुंडाथिकोड गावात घडली. येथे आगामी २६ एप्रिल रोजी होणाऱ्या प्रसिद्ध त्रिशूर पूरम उत्सवासाठी फटाके आणि कच्चा माल एका शेडमध्ये साठवून ठेवण्यात आला होता. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून १३ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमींपैकी ५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर २ जणांना रुग्णालयातील वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच १७ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.प्राथमिक अहवालानुसार, स्फोट इतका तीव्र होता की त्याचे धक्के अनेक किलोमीटरपर्यंत जाणवले आणि काहींनी तो भूकंप असल्याचा समज केला. या दुर्घटनेत ४० हून अधिक लोक भाजले गेले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.https://prahaar.in/2026/04/21/bihar-politics-shocking-statement-by-mp-opposing-nari-shakti-act-womens-political-career-starts-from-the-bed/घटनेनंतर परिसरातील रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. हे फटाक्यांचे गोदाम तिरुवंबाडी देवासम यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, येथे सुरक्षा नियमांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
बारामती : अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी बारामतीत महायुतीने सभा घेतली. या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत आले होते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बारामतीत सुनेत्रा पवारांचा प्रचार केला. अजित पवारांची चुलत बहीण या नात्याने खासदार सुप्रिया सुळे यांनीही सुनेत्रा पवारांसाठी प्रचार केला. शरद पवारांनी तब्येतीच्या कारणास्तव प्रचार करणे टाळले पण बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनीही सुनेत्रा पवारांसाठी प्रचार केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत बोलताना अजित पवारांच्या कार्याचा गौरव केला. आठवणींना उजाळा दिला आणि सुनेत्रा पवारांना मतदान हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली असल्याचे भावनिक आवाहन बारामतीकरांना केले. एकनाथ शिंदेंनीही कामाचा माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांच्या कार्याचा गौरव केला. आठवणींना उजाळा दिला आणि सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचे आवाहन बारामतीच्या मतदारांना केले.काल शरद पवारांनी फोन करून आघाडीचा पाठिंबा सुनेत्रा पवारांनाच असल्याचे सांगितले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीच्या प्रचारसभेत दिली. सभेत बोलताना सुनेत्रा पवारांना जाहीर केलेल्या पाठिंब्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचे जाहीर आभार मानले. सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचारसभेत बोलताना व्यक्त केला. अजित पवारांप्रमाणेच सुनेत्रा पवारही ठामपणे राज्याच्या विकासाचा गाडा ओढतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.प्रचारसभेवेळी अजित पवारांवील एक छोटी फिल्म दाखवण्यात आली. ही फिल्म बघताना सुनेत्रा पवारांचे अश्रू दाटून आले होते. अजित पवारांनी बारामतीच्या तीन पिढ्यांना एका कुटुंबासारखं जपलं. राज्याचं काम करणाऱ्या अजित पवारांनी बारामतीविषयीची आपुलकी कायम जपली. अशा या दादा माणसाच्या आकस्मिक जाण्यानं बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी जशी कुटुंबानं, दोन्ही मुलांनी साथ दिली तशी बारामतीकरांसह पूर्ण राज्यानंही काळजी घेतली. सर्वांनीच माझ्यावर आणि मुलांवर मुलांवर भरभरून प्रेम केले, असे सांगताना राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक झाल्या होत्या. अजित पवार यांच्या विचारांना उजाळा देताना त्यांच्यासारखेच काम करून दाखवेन, असा विश्वास व्यक्त करत मी संघर्ष योद्ध्याची सहचारिणी असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या.शरद पवार आजारीशरद पवारांनी तब्येत बरी नसल्यामुळे सुनेत्रा पवारांसाठी प्रचार करणे टाळले. पण बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले. सध्या शरद पवार रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी तब्येत साथ देत नसल्यामुळे इतक्यात बारामतीत येणे शक्य नाही पण बारामतीकरांनी सुनेत्रा पवारांची साथ सोडू नये असे भावनिक आवाहन केले आहे.
Donald Trump : आता युद्धविराम नाही! डोनाल्ड ट्रम्प यांचा मुदतवाढ देण्यास नकार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला कडक इशारा दिला असून, येत्या बुधवारापर्यंत दोन्ही देशांमध्ये कोणताही करार झाला नाही, तर इराणवर थेट हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
मुंबई : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकाराबद्दल औद्योगिक भूखंडाची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत.विधानभवनामध्ये तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्र८ डी./१ येथे सडेकर इनव्हायरो इंजिनीअर्स प्रा. लि. यांनी अवैधरित्या व बेकायदेशीरपणे घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकाराची विल्हेवाट लावल्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.औद्योगिक भूखंडाचा करार एमआयडीसीने २०१५ व २०२० मध्येच रद्द केला असतानाही कंपनीकडून बेकायदेशीरपणे काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, उच्च रासायनिक घटक (High COD) असलेले सांडपाणी थेट नाल्यात व समुद्रात सोडले जात असल्याची तक्रार समोर आल्याने या प्रकरणात सविस्तर माहिती घेण्याकरिता प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
Pandharpur : पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई :आषाढी वारी काळात निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी दोन्ही पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक चांगली व सुविधायुक्त करण्यात यावीत, वारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी तसेच पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.पालखी मार्गांवरील विश्रामस्थळ सुविधा निर्मिती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.पुणे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकास कामांची माहिती दिली.श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकास कामांसाठी सुमारे १३०३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी ९६४ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातील ९५९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या आराखड्यांतर्गत दोन्ही पालखी मार्गातील पालखीतळांच्या ठिकाणी स्वच्छतागृहांसाठी सेफ्टी टँक, कमानीचे बांधकाम करणे, जमीन सपाटीकरण करणे, हायमास्ट पोल उभारणे, संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे, रस्त्यांची दुरुस्ती, पालखी कट्टा तयार करणे आदी कामांपैकी बहुतांश कामे पूर्ण झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यंदा २५ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान ८ जुलै रोजी तर श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान ७ जुलै रोजी होणार आहे. दोन्ही पालखी मार्गावर वारकरी भाविकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी. पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांशी चर्चा करून त्यांना आणखी कोणत्या सुविधा हव्यात त्या करून द्याव्यात. पालखी तळावर कायमस्वरुपी पायाभूत सुविधांची कामे करावीत. पालखी तळावर वारकऱ्यांसाठी गेल्या वर्षी हँगरची व्यवस्था करण्यात आली होती, त्या प्रमाणे यंदाही अतिरिक्त हँगरची व्यवस्था करावी. पालखी मार्गावरील महामार्गांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत.पुलकुंडवार म्हणाले की, पालखी मार्गावरील विकास कामे पूर्ण करण्यात येत असून यावर्षी वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे. गेल्या वर्षी दोन्ही पालखी मार्गावर ३७०० मोबाईल शौचालये पुरविण्यात आली होती. यंदा ५ हजार मोबाईल शौचालये पुरविण्याचे नियोजन आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने दोन्ही पालखी मार्गावरील महामार्गाची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. दिवेघाट ते हडपसर आणि बारामती ते इंदापूर मार्गांची कामे सुरू आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Nitesh Rane : मांडवा-मरीना व रेवस-मांडवा जेट्टी कामांना गती द्या, मंत्री नितेश राणेंचे निर्देश
मुंबई :अलिबाग तालुक्यातील मांडवा मरीना जेट्टी विकास तसेच रेवस-मांडवा प्रवासी जेट्टी दुरुस्ती व मजबुतीकरणाच्या कामांना गती देऊन ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस आमदार महेंद्र दळवी यांच्यासह विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.प्रकल्पामुळे अलिबाग- मुंबई सागरी प्रवास अधिक सुरक्षित व वेगवान होण्यास मदत होणार असून, पर्यटन व स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे. कोकणातील सागरी प्रवासी वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि सक्षम करण्यासाठी ही कामे पावसाळ्यापूर्वीच प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री नितेश राणेंनी दिल्याअप्रोच जेट्टी, स्लोपिंग जेट्टी, मोठ्या व्यासाच्या पाइल्स बसविणे, तसेच अप्रोच चॅनलमध्ये ड्रेजिंग व विद्युत सुविधांची उभारणी यासारखी महत्त्वाची कामे समाविष्ट आहेत. या प्रकल्पाच्या एकंदरीत कामाची सुमारे ५८ टक्के भौतिक प्रगती झाली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले असता या प्रकल्पाची उर्वरित कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी दिले. तसेच रेवस येथील जेट्टी मजबुतीकरणाचे कामही तातडीने मार्गी लावण्याबाबत त्यांनी सूचित केले.मांडवा प्रवासी जेट्टीबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या व बोटींची संख्या लक्षात घेता जेट्टीची दुरुस्ती व मजबुतीकरण आदी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. आयआयटी मुंबईच्या तांत्रिक अहवालानुसार जेट्टीच्या संरचनेत तातडीने दुरुस्तीची गरज असून प्राथमिक दुरुस्तीची कामे सुरू आहेत. दोन्ही प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
Marine Technology : आधुनिक सागरी तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणणार; मंत्री नितेश राणे
मुंबई :राज्यातील सागरी वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळ (Maharashtra Maritime Board) चे बंदरे निरीक्षक व तत्सम अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत सध्याच्या फेरीबोट व रो-रो सेवांचा सविस्तर आढावा घेत विविध सुधारणा उपायांवर चर्चा करण्यात आली.राज्यातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता फेरीबोट सेवांमध्ये अधिक कार्यक्षमतेची गरज असल्याचे अधोरेखित करत मंत्री राणे यांनी तिकीट प्रणाली अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी डिजिटल अॅप विकसित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यामुळे प्रवाशांना जलद, सोयीस्कर आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करत ओव्हरलोडिंग रोखणे, सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळणे आणि अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देशही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिले. याशिवाय परदेशातील प्रगत सागरी वाहतूक प्रणालींचा अभ्यास करून त्यातील आधुनिक तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, तसेच त्यासाठी ठोस आणि कृतीक्षम प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.राज्यातील नागरिकांना अधिक सुरक्षित, दर्जेदार व आधुनिक सुविधा दिल्याने शासनाच्या महसुलात वाढ होईल यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश ही या बैठकीत देण्यात आले.
Kerala Explosion : केरळमध्ये पूरम उत्सवापूर्वी स्फोटाचे तांडव; 13 जणांचा जागीच मृत्यू
Kerala Explosion : त्रिशूर जिल्ह्यातील फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा सध्या मोठ्या दिमाखात आणि उत्साहात (Players Banned in PSL) सुरू आहे. नव्या दमाच्या खेळाडूंच्या चमकदार कामगिरीने स्पर्धेला वेगळीच रंगत आणली आहे.
महसूलवाढीसाठी कोल्हापूर चित्रनगरी व एन. डी. स्टुडिओचा बहुउद्देशीय वापर करणार
मुंबई :राज्यातील चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रीकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूर चित्रनगरी तसेच कर्जत येथील एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (फिल्मसिटी) संचालक मंडळाची १६८ वी बैठक आज मुंबईतील पुल देशपांडे कला अकादमी च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध प्रशासकीय व विकासात्मक मुद्द्यांसह महसूलवाढीच्या दृष्टीने नव्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मंत्री शेलार यांनी उपलब्ध अधोसंरचनेचा अधिक प्रभावी व नियोजनबद्ध वापर करण्यावर भर दिला.चित्रनगरीचा आगामी वर्षांचा १८ कोटी महसूल वाढीचा आर्थिक ताळेबंद मंजूर झाला.राज्यातील चित्रनगरी व स्टुडिओ संकुलांमध्ये आधुनिक सुविधा, प्रशस्त मोकळी जागा आणि आकर्षक लोकेशन्स उपलब्ध आहेत. या सुविधांचा वापर नियोजनपूर्वक केल्यास चित्रीकरणाच्या कामावर परिणाम न होता पूरक स्वरूपात विवाह सोहळे, कॉर्पोरेट कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आदींसाठी जागा उपलब्ध करून देता येऊ शकते. यामुळे संस्थेच्या महसुलात लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल, असे यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले.यासाठी स्वतंत्र धोरण तयार करताना चित्रीकरणास प्राधान्य देत वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन, स्वतंत्र झोन निश्चिती, कार्यक्रमांसाठी परवानगी प्रक्रिया, भाडे दरांची पारदर्शक रचना, ऑनलाईन बुकिंग प्रणाली, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व पार्किंग नियोजन, स्वच्छता व देखभाल यांसारख्या सर्व बाबींचा सविस्तर विचार करावा, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, स्टुडिओमधील तांत्रिक उपकरणे, सेट्स आणि सर्जनशील वातावरण सुरक्षित राहील यासाठी आवश्यक ती काळजी घेणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी सांगितले.बहुउद्देशीय वापरामुळे चित्रनगरी आर्थिकदृष्ट्या लाभदायी ठरतील. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास आणि पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री शेलार यांनी व्यक्त केला.या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी चित्रलेखा खातू तसेच बैठकीस महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
‘युवकांमध्ये प्रचंड सृजनशीलता, नाविन्यता, कौशल्यता आणि कल्पकता’
मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ या राष्ट्रीय पोस्टर डिझाईन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी स्पर्धेतील ७५ विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.देशाच्या प्रगतीचा आणि दूरदृष्टीचा कलात्मक पद्धतीने सादरीकरण करून ‘विकसित भारत’ या संकल्पनेला प्रोत्साहन देणे हा या राष्ट्रीय पोस्टर डिझाईन स्पर्धेचा उद्देश होता. ही स्पर्धा २० सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. देशभरातून सुमारे ३ हजार नोंदी प्राप्त झाल्या.आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत अभियान, योग, वेव्ह्ज समिट, मेक इन इंडिया, स्किल इंडिया आणि हवामान बदल या नऊ विषयांवर कलाकृती सादर करण्यात आल्या.या स्पर्धेचे मूल्यमापन अच्युत पालव, वासुदेव कामत, सुधारक ओलवे, प्रसून जोशी, रवी जाधव, भरत दाभोलकर, गौरव दालमिया आणि श्रीनिवासन स्वामी या मान्यवरांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर स्पर्धेतील निवडक कलाकृतींच्या कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, देशातील युवक-युवतींमध्ये प्रचंड सृजनशीलता, नाविन्यता, कौशल्यता आणि कल्पकता आहे. भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ ही मोठी ताकद असून तिचा प्रत्यय या स्पर्धेतील कलाकृतींमधून स्पष्टपणे येतो.ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयुष्य देशसेवेसाठी समर्पित असून त्यांच्या प्रेरणेने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य विभाग आणि चित्रनगरीच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.स्पर्धेतील कलाकृतींचे प्रदर्शन राज्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध उपक्रम राबविण्यात येत असून CSR अंतर्गत सात संस्थांना एकूण ६५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Uddhav Thackeray : ममतांच्या पराभवासाठी 2 लाखांहून अधिक सीआरपीएफ जवान तैनात; उद्धव ठाकरे यांचा दावा
भाजप नेतृत्वातील केंद्र सरकारने पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करण्यासाठी दोन लाखांहून अधिक सीआरपीएफ जवान तैनात केले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला.
या मेळाव्यास ७० हून अधिक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच ११ कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांनी उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे : मुख्यमंत्री
मुंबई : राज्यातील प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी ‘झिरो ब्युरोक्रसी’ची संकल्पना राबविण्याचा निर्धार व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाने ‘स्टार्टअप’प्रमाणे कार्य करण्याची गरज व्यक्त केली. सुलभ प्रक्रिया, पूर्वानुमेय आणि मानवी हस्तक्षेप कमी करून पात्र नागरिकांना थेट सेवा देणे हेच ‘झिरो ब्युरोक्रसी’चे मूळ तत्त्व असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.नागरी सेवा दिन २०२६ आणि ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२५-२६’ अंतर्गत पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या सभारंभास कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकजकुमार तसेच पुरस्कारार्थी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची ‘स्टार्टअप’शी तुलना करत, प्रत्येक विभागाने स्वतःकडे एक स्वतंत्र स्टार्टअप म्हणून पाहिले पाहिजे, असे सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, झिरो ब्युरोक्रसी म्हणजे अधिकारी नसणे नव्हे, तर प्रक्रियांची पुनर्रचना (री-इंजिनिअरिंग) करून त्या अधिक सुलभ आणि पारदर्शक करणे होय. कोणत्याही व्यक्तीच्या पसंती-अपसंतीवर सेवा अवलंबून न राहता, पात्रतेनुसार सेवा मिळाली पाहिजे. या शासनाने शंभर दिवस आणि १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत प्रशासनातील कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला असून, त्यातील ८५ टक्के उद्दिष्टे पूर्ण करण्यात यश आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ सुधारण्यासाठी विविध प्रक्रियांचे सुलभीकरण करण्यात आले आहे.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘विकसित महाराष्ट्र २०४७’चा आराखडा मांडताना २०२९, २०३५ आणि २०४७ हे तीन टप्पे निश्चित केल्याचे सांगितले. “महाराष्ट्र आता देशांतर्गत नव्हे तर जागतिक पातळीवर स्पर्धा करत आहे. राज्याची अर्थव्यवस्था जगातील 30व्या क्रमांकावर असून, आगामी काळात ती आणखी बळकट होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्रशासनातील सेवा वितरण सुधारण्यासाठी वीस महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, ‘आपले सरकार २.० च्या माध्यमातून नागरिकांना अधिक सुलभ सेवा देण्याची तयारी सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रशासनातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या कामाकडे ‘स्टार्टअप’च्या दृष्टिकोनातून पाहिल्यास नावीन्य, कार्यक्षमता आणि वेग यांचा संगम साधता येईल. अशा उपक्रमांमुळेच प्रशासन ‘झिरो ब्युरोक्रसी’कडे वाटचाल करू शकते.यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाविन्यपूर्ण आणि परिवर्तनशील कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करून “प्रशासनातील कल्पकता आणि नव्या कल्पनांची अंमलबजावणी हीच भविष्यातील बदलाची दिशा ठरेल,” असे सांगत त्यांनी सर्व पुरस्कारार्थ्यांचे अभिनंदन केले.
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट
मुंबई :राज्यातील आयटी क्षेत्रातील कामगारांच्या हिताचे रक्षण करणे, त्याकरिता उपाय योजना सुचविणे याबाबत विस्तृत व दूरगामी कार्यवाही अपेक्षित आहे. त्यासाठी अभ्यास गटाची स्सथान करावी, असे निर्देश ॲड आकाश फुंडकर यांनी दिले.मंत्रालयात पुणे शहरातील हिंजवडी येथील आय टी पार्क मधील विविध आय टी कंपन्यांमध्ये असलेल्या कामगारांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कामगार मंत्री बोलत होते.बैठकीस आमदार शंकर जगताप, अपर मुख्य सचिव श्रीमती आय. ए कुंदन, कामगार आयुक्त एच पी तुम्मोड, उपसचिव स्वप्नील कापडणीस आदींसह आय टी कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर होणारी जबरदस्ती, अन्यायकारक राजीनामा घेण्याची प्रक्रिया आणि एचआर (HR) नियमांमधील त्रुटी दूर करण्यासाठी उपाय योजना आवश्यक आहे. या संदर्भात सखोल चौकशी करण्यासोबतच विशेष अभ्यास गट गठीत करण्यात यावा. आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर जबरदस्तीने राजीनामा देण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटनांची सखोल चौकशी करावी. एचआर नियम आणि कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या पद्धतींचे नियमन झाले पाहिजे. कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते असलेले आणि जुन्या कंपनीने ' डी लिंक ' न केलेल्या कर्मचाऱ्यांच्याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला कळविण्यात यावे. याबाबत पत्रव्यवहार करून अशा कर्मचाऱ्यांना मदत करावी, असे कामगार मंत्री ॲड फुंडकर म्हणाले.शॉप ॲक्ट (Shop Act) परवाना असलेल्या प्लेसमेंट एजन्सींची माहिती घ्यावी. अनेकदा प्लेसमेंट एजन्सींच्या माध्यमातून होणाऱ्या नियुक्तीत अनियमितता आढळते. त्यामुळे अशा सर्व एजन्सींच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांची सत्यता तपासण्यात यावी. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवावी. कामगार विभागाच्या सीआयएस (CIS) प्रणालीचा वापर करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या तक्रारी कशा नोंदवता येतील, याची माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही कामगार मंत्री ॲड फुंडकर यांनी दिल्या.
Eknath Shinde : सुनेत्रा पवारांना बहुमताने निवडून आणणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली
ठाणे : नेत्रा पवार यांच्यासारख्या सक्षम, संवेदनशील आणि लोकाभिमुख उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना केले. तसे करणे हीच स्वर्गीय अजितदादा पवार यांना खरी श्रध्दांजली ठरेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर बारामती येथे झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला शिंदे यांनी दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना सुरूवातीला अजित पवारांच्या स्मृतीला अभिवादन केले. अजित पवारांच्या निधनानंतर बारामती मधल्या घराघरांमध्ये आपला माणूस गेल्याची भावना होती. अशा पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा होती, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.मी तुमच्यासमोर केवळ राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून उभा आहे. आपल्याला केवळ लोकप्रतिनिधी निवडायचा नाही, तर आपल्या परिसराचा स्वाभिमान आणि विकासाचा वारसा पुढे नेणारी व्यक्ती निवडायची आहे. अजित पवारांनी बारामतीच्या विकासासाठी कशाप्रकारे मेहनत घेतली आहे हे आपणाला माहितच आहे. आज शिवसेना, महायुतीच्या माध्यमातून आपण सुनेत्रा पवार यांच्यासारख्या सक्षम, संवेदनशील आणि लोकाभिमुख उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आलो असून त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन एकनाथ शिंदे म्हणाले.सुनेत्रा पवार बारामतीच्या प्रत्येक कुटुंबाचा, शेतकऱ्याचा, महिलांचा आणि तरुणांचा आवाज बनतील असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. सुनेत्रा पवारांना तुम्ही अनेक वर्षांपासून जवळून पाहिलं आहे. सत्तेत असो किंवा नसो, सामान्यांच्या सुखा-दुःखात धावून जाणं आणि संयमाने प्रश्न सोडवणं हा त्यांचा स्वभाव आहे. राजकारणापेक्षा समाजकारणावर त्यांनी नेहमीच भर दिला. घराची जबाबदारी सांभाळत असतानाच, समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिल्याची भावना एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली.ही निवडणूक विकासाची आणि विश्वासाची आहे. ज्या हातांनी नेहमी मदतीचा आधार दिला, त्या हातांना आज तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. अजित पवार यांनी बारामतीसाठी केलेल्या विकास कामांची परंपरा अधिक वेगाने पुढे नेण्याचं काम सुनेत्रा पवार करतील. आम्ही सर्वजण एकत्र येऊन बारामतीला आणखी सक्षम, समृद्ध आणि आधुनिक बनवू, अशी ग्वाहीही यावेळी एकनाथ शिंदेंनी दिली.सुनेत्रा पवार या आपल्या भगिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावं. आपल्या डोळ्यासमोर फक्त आपल्या भागाचा विकास आणि येणाऱ्या पिढीचं भविष्य ठेवा. आमचे शिवसैनिक सुनेत्रा वहिनींना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी बारामती मधील लाडक्या बहिणी, भावांना दिला. यावेळी मंत्री उदय सामांत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
22 एप्रिल रोजी वसुंधरा दिन साजरा केला जातो. यंदा या दिनाचे 56 वे वर्ष साजरे होत आहे. आज निसर्गाच्या सान्निध्यात राहून हा दिवस साजरा करा.
महान पैलवान खाशाबा दादासाहेब जाधव (Khashaba Jadhav) यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याच्या प्रस्तावाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
Top 10 News : प्रभात हा महाराष्ट्रातील आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. राज्य, देश आणि जागतिक पातळीवरील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. चला, जाणून घेऊया
Yusuf Pathan : माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, नेमकं काय घडलं? वाचा…
पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी खालिद खान व अन्य दोघांना ताब्यात घेतले.
Ayush Mhatre Replacement : आयुष म्हात्रेच्या जागी कुणाची वर्णी लागणार? ‘या’तिघांची नावे चर्चेत
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा युवा आणि फॉर्मात असलेला फलंदाज आयुष म्हात्रे (Ayush Mhatre Replacement) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संपूर्ण उरलेल्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
Sharad Pawar : मोठी बातमी..! शरद पवार मतदान करणार नाहीत; कारणही आलं समोर..
Sharad Pawar : प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान करू शकणार नाहीत.
पोलीस भरती झाल्याचे सांगून एका तरुणाने सोसायटीत पेढे वाटले, तसेच अभिनंदन करणारा फलक चौकात लावला.
पत्रकार तसेच राजकीय पदाधिकारी असल्याचे सांगत ५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज म्हणजेच मंगळवार २१ एप्रिल रोजी दुपारी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सव्वातीनच्या सुमारास बदलापूरहून आलेली जलद लोकल तांत्रिक बिघाडामुळे नियोजित फलाटाऐवजी दुसऱ्याच फलाटावर वळवण्यात आली. मात्र त्या फलाटावर आधीच एक लोकल उभी असल्याने दोन्ही गाड्या समोरासमोर येण्याची धोकादायक स्थिती निर्माण झाली.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मोटरमनने तत्काळ ब्रेक लावत प्रसंगावधान दाखवले आणि संभाव्य अपघात टळला. या घटनेमुळे रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक ५ ते ८ दरम्यानची रेल्वे वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली. एकाच ट्रॅकवर आलेल्या लोकलला सुरक्षितपणे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हळूहळू सेवा पूर्ववत करण्यात आली.वाहतूक कोलमडली, प्रवाशांचे हाल :ऐन गर्दीच्या वेळेत घडलेल्या या प्रकारामुळे जलद मार्गावरील सेवा विस्कळीत झाली आणि CSMTसह इतर स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली. अनेकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सिग्नल यंत्रणेत नेमका कोणता बिघाड झाला याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या बॅकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली असून, रखडलेली वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.
- रोपवाटिकांसाठीच्या मातीला रॉयल्टी माफमुंबई : देवस्थान इनाम जमिनींचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार विधिमंडळाच्या येणाऱ्या अधिवेशनात कायदा करणार आहे. याबवतची तयारी सुरू झाली असून, नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना नोंदविण्यासाठी कायद्याचा मसुदा लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सांगितले.रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील ऐतिहासिक पेढे परशुराम देवस्थानच्या इनामी जमिनींचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात महसूलमंत्र्याच्या दालनात झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. बैठकीला आमदार शेखर निकम, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.देवस्थान जमिनींबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. नवीन कायद्याची प्रक्रिया राबवताना लोकभावना आणि तांत्रिक बाबींचा विचार केला जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना आणि संबंधित पक्षकारांना आपली मते मांडता यावीत, यासाठी ही माहिती ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.फळबागांच्या 'पीकपाणी' नोंदीत बदल :कोकणातील फळबागायतदारांसाठीही या बैठकीत एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला. फळबागांचे पीकपाणी नोंद दरवर्षी करण्याऐवजी ते दर तीन वर्षांनी करण्यात यावी, यासाठी जमाबंदी विभाग व फलोत्पादन विभागाने संयुक्त प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना महसूलमंत्र्यांनी दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा दरवर्षीचा प्रशासकीय त्रास कमी होण्याची शक्यता आहे.रोपवाटिकांसाठी मातीवरील रॉयल्टी माफ होणार :जिल्ह्यातील रोपवाटिका चालकांसाठी माती उपलब्ध करून देताना त्यावर कोणतीही रॉयल्टी आकारली जाऊ नये, असा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील फळबाग लागवडीला आणि रोपवाटिका व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची चिन्हे आहेत.
Nitesh Rane : मोरा मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले नुकसान तातडीने भरून काढावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिले. संबंधित प्रकरणात मत्स्यव्यवसाय विभागाने नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून हा प्रश्न मार्गी लावावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.मंत्रालयात मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार महेश बालदी (Mahesh Baldi), मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. एन. रामास्वामी तसेच आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आदी उपस्थित होते. मोरा मच्छीमार सोसायटी आणि गावातील इतर मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यासाठी त्यांच्या नुकसानीचे योग्य वर्गीकरण करून सविस्तर अहवाल संबंधित विभागाकडे सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.https://prahaar.in/2026/04/21/law-on-temple-land-in-the-upcoming-session-revenue-minister-chandrashekhar-bawankule-royalty-waiver-on-soil-for-nurseries/गस्ती नौका आणि ड्रोन खरेदीचा आढावा :याच बैठकीत मत्स्यव्यवसाय विभागामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या पाच गस्ती नौका आणि ड्रोनच्या खरेदी प्रक्रियेचा आढावाही घेण्यात आला. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
Blast in Palghar : पालघरमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
पालघर जिल्ह्यात (Blast in Palghar) मंगळवारी एका फटाका निर्मिती केंद्रात भीषण स्फोट झाला. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
Violent clash at Gurudwara in Germany : जर्मनीतील गुरुद्वारात दोन गटांमध्ये हिंसक झटापट, ११ जण जखमी
जर्मनीतील मोर्स शहरातील ड्यूसबर्ग भागात असलेल्या एका गुरुद्वारात दोन गटांमध्ये अचानक हिंसक झटापट झाली. या घटनेत किमान ११ जण जखमी झाले आहेत. माहितीनुसार, हा वाद इतका वाढला की या वादात चाकू, कृपाण, पेपर स्प्रे आणि अगदी पिस्तुलाचाही वापर करण्यात आला. या भांडणात सुमारे ४० जण सहभागी होते, असे सांगितले जात आहे.गुरुद्वारात धार्मिक कार्यक्रम सुरू होण्याच्या तयारीत असतानाच दोन्ही गटांमध्ये वाद वाढला आणि हातघाईतून तो हिंसाचारात बदलला. सोशल मीडियावर काही व्हिडिओही समोर आले असून त्यामध्ये लोक एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत.प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, काही लोकांनी अचानक पेपर स्प्रेचा वापर केला. त्यानंतर एका व्यक्तीने पिस्तुलातून गोळीबार केला, तर अनेकांकडे चाकू आणि कृपाणसारखी धारदार शस्त्रे होती. मात्र, पोलिसांना अद्याप खरे पिस्तूल सापडलेले नाही. प्राथमिक तपासात हे ब्लँक-फायरिंग पिस्तूल असू शकते, असे समोर आले आहे. अशा प्रकारच्या पिस्तुलातून खरी गोळी झाडली जात नाही, मात्र आवाज आणि स्फोटासारखा धक्का निर्माण होतो.https://prahaar.in/2026/04/21/manipur-earthquake-5-2-magnitude-earthquake-hits-manipur-panic-among-citizens/पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा वाद गुरुद्वारा समितीच्या निवडणुका आणि निधी (पैसे) यावरून झाल्याचे समोर आले आहे. जुन्या आणि नव्या व्यवस्थापनामध्ये बऱ्याच काळापासून तणाव होता. गुरुद्वारावरील नियंत्रण आणि निर्णय घेण्याच्या अधिकारावरून दोन्ही गट आमनेसामने आले होते.एका मध्यमवयीन प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, हा हल्ला आधीपासून नियोजित वाटत होता.या घटनेची माहिती मिळताच मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. विशेष टॅक्टिकल युनिटलाही तैनात करण्यात आले. सर्व जखमींवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले. दरम्यान, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून नेमका कोणी कोणावर हल्ला केला, याचा तपास पोलिस करत आहेत.
पुणे : लग्न जमत नाही म्हणून अनेक तरुण सध्या नैराश्यात दिसत आहे. मुलीच्या तसेच वडिलांच्या एकंदरीतच कुटुंबियांच्या मुलाकडून वाढलेल्या अपेक्षा या कारणामुळे आज अनेक मुलांना लग्न जमण्यास अडचण येत आहे. यापूर्वी तर मुलांनी लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून मोर्चे देखील काढलेले आहेत. आता याच सर्व गोष्टी विचारात घेता पुण्यातील एका उत्साही तरुणाने लग्नासाठी मुलगी मिळावी म्हणून अजबच पर्याय शोधला. अर्थात जेव्हा सत्य समोर आले तेव्हा त्याचा प्लॅन चांगलाच फसला.नेमकं प्रकरण काय ?लग्नासाठी उत्साही असलेला २६ वर्षीय तरुण ऋषिकेश राजू जाधव ( rushikesh jadhav ) याने लग्न जमवण्यासाठी आणि इम्प्रेशन” मारण्यासाठी भलताच प्रयोग केला. या तरुणाने स्वतःला पुणे शहर पोलीसमध्ये निवड झाल्याचे भासवण्यासाठी शहरभर फ्लेक्स लावले. लग्न जमत नसल्यामुळे आणि मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी हा सगळा खटाटोप केल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेशचे ( rushikesh jadhav ) लग्न जमत नव्हते. मुलींच्या घरी प्रभाव पाडण्यासाठी आणि आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्याने आपली पुणे शहर पोलीस दलात निवड झाल्याचे खोटे सांगितले. तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने थेट पोलीस वर्दीतील फोटो काढून ते आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर (Whatsapp Status) ठेवले आणि मी पोलीस झालो असा प्रचार सुरू केला.अखेर ऋषिकेशचे बिंग फुटले...विशेष म्हणजे त्याने स्वतःच्या अभिनंदनाचे मोठे फ्लेक्स नऱ्हे परिसरात लावले. या फ्लेक्सवर तो पोलीस वर्दीत (Fake Police) रुबाबदार दिसत होता. मात्र, परिसरातील खऱ्या पोलिसांच्या नजरेत हे फ्लेक्स पडले आणि त्यांना संशय आला. जेव्हा पोलिसांनी अधिकृतपणे या नावाच्या उमेदवाराची चौकशी केली, तेव्हा पुणे पोलीस दलात या नावाची कोणतीही व्यक्ती भरती झाली नसल्याचे (Fake Police) उघड झाले आणि ऋषिकेशचे बिंग फुटले.एवढा खोटा गाजावाजा कशासाठी ?हा सर्व प्रकार आणि खोटा गाजावाजा केवळ मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी आणि लग्नाची 'लाईन' लावण्यासाठी ऋषिकेशने केल्याचे तपासात निष्पन्न झाले. नऱ्हे पोलीस ठाण्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेत ऋषिकेश जाधव विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 204 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सोशल मीडियावर या घटनेची चर्चा चांगलीच रंगली आहे. दरम्यान एकाबाजूला वाढणाऱ्या अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगारीचा मुद्दा यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Tariff Refund : अमेरिकेचा मोठा निर्णय : भारताला मिळू शकतो तब्बल ₹1 लाख कोटींचा टॅरिफ रिफंड!
अमेरिकेत सुरू असलेल्या व्यापार चर्चांदरम्यान भारतासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांच्या काळात लादण्यात आलेल्या मनमानी टॅरिफबाबत अमेरिकन न्यायालयाने आक्षेप घेतल्यानंतर आता भारतीय वस्तूंवर आकारलेल्या शुल्काच्या परताव्याचा मार्ग मोकळा झाला आहे.त्या काळात भारतीय वस्तूंवर लावण्यात आलेल्या मोठ्या टॅरिफपैकी सुमारे १० ते १२ अब्ज डॉलर्स इतका भाग बेकायदेशीर ठरू शकतो. भारतीय रुपयांत याची किंमत अंदाजे ₹८३,००० ते ₹१,००,००० कोटी इतकी आहे. या रकमेच्या परताव्यासाठी अमेरिकेच्या कस्टम्स विभागाने २० एप्रिल २०२६ पासून CAPE प्लॅटफॉर्मचा पहिला टप्पा सुरू केला आहे.‘रिफंड विंडो’ उघडली कशी?हा संपूर्ण वाद आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायदा International Emergency Economic Powers Act (IEEPA) अंतर्गत लावलेल्या दंडात्मक शुल्कांशी संबंधित आहे. ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणांतर्गत अनेक देशांवरील आयातीवर मोठे टॅरिफ लादण्यात आले होते. मात्र, अमेरिकेच्या न्यायालयांनी या निर्णयातील त्रुटी दाखवत हे शुल्क कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असल्याचे नमूद केले.या निर्णयानंतर अमेरिकेने जागतिक स्तरावर सुमारे १६६ अब्ज डॉलर्सच्या टॅरिफ रिफंडसाठी दार उघडले असून, त्यासाठी नवीन ऑनलाइन पोर्टलही सुरू करण्यात आले आहे.https://prahaar.in/2026/04/21/us-india-trade-deal-indian-delegation-to-visit-washington-this-week-for-us-india-trade-deal/भारतीय निर्यातदारांना कसा फायदा?ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह Global Trade Research Initiative (GTRI) च्या माहितीनुसार, या रिफंडपैकी मोठा हिस्सा भारतात तयार झालेल्या वस्तूंशी संबंधित आहे.तथापि, हा रिफंड थेट भारतीय निर्यातदारांना मिळणार नाही, कारण दावा करण्याचा अधिकार फक्त अमेरिकन आयातदारांकडे (US importers) आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना त्यांच्या अमेरिकन खरेदीदारांशी समन्वय साधावा लागेल.भविष्यातील ऑर्डर्समध्ये सवलत, रिफंड शेअरिंग किंवा किंमतीत बदल करून भारतीय कंपन्या या रकमेचा फायदा घेऊ शकतात. विशेषतः टेक्सटाइल, इंजिनिअरिंग वस्तू आणि केमिकल्स क्षेत्रांना यामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Mumbai local : मोठा अपघात टळला.! एकाच ट्रॅकवर समोरासमोर दोन लोकल, नेमकं काय घडलं?
ऐन गर्दीच्या वेळी जलद मार्गावरील सेवा विस्कळीत झाल्याने CSMTसह इतर स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
Rule For Gas Cylinder : ‘हा’नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; सरकारकडून नवा नियम लागू
Rule For Gas Cylinder : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवर मोठे ऊर्जा संकट (Rule For Gas Cylinder) निर्माण झाले आहे. याचा थेट फटका भारतालाही बसत आहे.
Chhagan Bhujbal : बारामती पोटनिवडणूक सांगता सभेत छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे आवाहन केले.
Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्याकडे रायगड दक्षिणची धुरा
- महाराष्ट्र भाजपकडून जिल्हानिहाय प्रभारी जाहीरमुंबई : संघटन बांधणी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र भाजपने मंगळवारी जिल्हानिहाय प्रभारींची नियुक्ती केली. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे रायगड दक्षिण जिल्ह्याच्या प्रभारी पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोकणात पक्षाची पकड अधिक घट्ट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.सिंधुदुर्गसाठी आमदार योगेश सागर, रत्नागिरी उत्तरसाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि रत्नागिरी दक्षिणसाठी निरंजन डावखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगड उत्तर भागाची जबाबदारी अतुल काळसेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ठाणे आणि नवी मुंबईसाठीही पक्षाने विशेष रणनीती आखली आहे. ठाणे शहरासाठी विक्रांत पाटील, तर ठाणे ग्रामीणच्या प्रभारीपदी उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांची वर्णी लागली आहे. नवी मुंबईत शशिकांत कांबळे, कल्याणमध्ये जयप्रकाश ठाकूर आणि उल्हासनगरमध्ये नाना सूर्यवंशी संघटनात्मक बांधणीचे काम पाहतील. पालघरसारख्या आदिवासी बहुल आणि संवेदनशील जिल्ह्यासाठी राणी द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.https://prahaar.in/2026/04/21/navi-mumbai-panvel-unseasonal-rains-arrive-relief-from-the-heat-but-citizens-scramble/उत्तर महाराष्ट्रात नाशिक दक्षिण जिल्ह्याची धुरा माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली असून, नाशिक शहरासाठी मंगेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. धुळे शहरात माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली असून, धुळे ग्रामीणसाठी रवींद्र अनासपुरे यांची नियुक्ती झाली आहे. जळगाव जिल्ह्यातही रोहिणी नायडू, अनुप अग्रवाल आणि प्रदीप पेशकार यांच्याकडे विविध विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अहिल्यानगर उत्तर भागात लक्ष्मण सावजी हे पक्षाचे काम पाहतील.
Ayush Mhatre Injury : CSK ला मोठा धक्का ! आयुष म्हात्रे दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर
Ayush Mhatre Injury : चेन्नई सुपर किंग्स साठी आयपीएल २०२६ चा हंगाम अत्यंत निराशाजनक (Ayush Mhatre Injury) सुरु आहे. या दिग्गज संघाला १९व्या मोसमात अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
Marathi Rapper RocKsun : मराठमोळा रॅपर रॉक्सनच्या गाण्यांची हिप-हॉपमध्ये क्रेझ
मुंबई: महाराष्ट्राच्या हिप-हॉप क्षेत्रात उदयास आलेला तरुण आणि दमदार आवाज म्हणजे रॉकसन. आपल्या प्रभावी गीतलेखन आणि वास्तववादी मांडणीमुळे रॉक्सनने अल्पावधीतच संगीतप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. रॉक्सनला ६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये नवरदेव बी एस सी ॲग्री या चित्रपटातील “लाल चिखल” या गीतासाठी उत्कृष्ट गीत म्हणून नामांकन मिळालं आहे. त्याने केलेल्या लेटेस्ट फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.२०१७ पासून संगीत आणि रॅपिंग क्षेत्रात सक्रिय असलेल्या रॉक्सनला २०२१ साली प्रदर्शित झालेल्या “गुलाबाच्या फुला” या गाण्यामुळे मोठी ओळख मिळाली. या गाण्याने त्याला महाराष्ट्रात मराठी रॅपर म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली. रॉक्सनची दिग्गज, रक्कम, महान, सल्तनत अशी अनेक मराठी रॅप गाणी प्रसिद्ध आहेत.रॉक्सनच्या संगीताची खासियत म्हणजे सामाजिक विषयांवर आधारित आशयपूर्ण मांडणी. युवकांचे प्रश्न, संघर्ष, आणि वास्तव जीवनातील अनुभव यांना तो आपल्या गाण्यांमधून प्रभावीपणे व्यक्त करतो. पारंपरिक मराठी संस्कृती आणि आधुनिक हिप-हॉप शैली यांचा संगम त्याच्या कामामध्ये स्पष्टपणे दिसून येतो.https://prahaar.in/2026/04/21/operation-sindoor-dont-cross-the-line-india-doesnt-forget-indian-army-suggestive-tweet-on-the-anniversary-of-the-pahalgam-attack/रॅपर रॉक्सन त्याच्या रॅपिंग करिअरविषयी सांगतो, “मी २०१७ पासून संगीत आणि रॅपिंग क्षेत्रात सक्रिय आहे. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या “गुलाबाच्या फुला” या गाण्यामुळे मोठी ओळख मिळाली. मला ६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये “लाल चिखल” या गीतासाठी उत्कृष्ट गीत म्हणून नामांकन मिळालं आहे. “लाल चिखल” हे केवळ एक गाणं नसून, समाजाची एक काळी बाजू आहे. काही चुकीच्या प्रथा, यंत्रणा, समाज शेतकऱ्यांची कशी पिळवणूक करतो हे त्या गाण्यात मांडल आहे. शेतकऱ्यांचं खर आयुष्य मी या गाण्यात दर्शवलं आहे. या गाण्याला नामांकन मिळालं यात मला आनंदच आहे परंतु या समाजाला आणि यंत्रणांना विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांची बाजू लक्षात घेवून जमेल तशी मदत करावी.”आजच्या डिजिटल युगात रॉक्सनने विविध म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर आपली उपस्थिती मजबूत केली आहे. त्याच्या गाण्यांना तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, मराठी हिप-हॉपला नवी उंची देण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा आहे.आगामी काळात रॉक्सनकडून अधिक नाविन्यपूर्ण आणि प्रभावी प्रोजेक्ट्सची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मराठी संगीत क्षेत्रात त्याचा प्रवास प्रेरणादायी ठरत असून, तो नव्या पिढीसाठी एक महत्त्वाचा आवाज म्हणून उदयास येत आहे.
राहुल गांधींना परदेशात जास्त रस वाटू लागला असेल. त्यांना भारताचा कंटाळा आला आहे. ताजी हवा घेण्यासाठी ते परदेशात जातात.
Maharashtra Politics : संजय राऊत यांनी भाजपमध्ये मोठी फूट पडल्याचा दावा केला असून महिला आरक्षण विधेयकाच्या आडून ८५० खासदार करण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे.
Tamil Nadu Election : तमिळनाडूतील प्रचार थंडावला; बहुपक्षीय लढतीत लक्ष मतदान यंत्रांकडे
Tamil Nadu Election : यावेळची निवडणूक लढत प्रामुख्याने दोन प्रमुख आघाड्यांमधील थेट सामना म्हणून पाहिली जात आहे.
नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक, अंधश्रद्धेला खतपाणी घालणे असे गंभीर आरोप खरातवर आहे. सध्या भोंदू खरात कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. खरात याच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाईचा वेग वाढवला असून, त्याच्या बेनामी संपत्तीवर टाच आणण्यासाठी कठोर पाऊल उचलली जात आहेत. त्यामुळे आता अशोक खरातसह त्याच्या कुटुंबीयांचीही अडचण वाढणार आहे.भोंदू खरातकडे कोट्यवधींची मालमत्ता खरातची किमान १५ ते १७ हजार कोटींची संपत्ती असल्याचा अंदाज आहे. यात कोट्यवधीची बेनामी मालमत्ता आहे. प्राथमिक तपासात बेकायदेशीर मार्गाने मिळवलेली मालमत्ता तात्पुरती जप्त (प्रोव्हिजनल अटॅचमेंट) करण्याची प्रक्रिया 'ईडी'कडून राबवली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पुढील टप्प्यात खरातला समन्स बजावून चौकशी, बैंक खात्यांची तपासणी, आर्थिक देवाणघेवाणीचे विश्लेषण आणि आवश्यकता असल्यास अटकेची कारवाईही केली जाऊ शकते. त्यामुळे एसआयटीकडून ईडीकडे खरातचा (Ashok Kharat) ताबा काही दिवसांपुरता जाऊ शकतो. त्यासाठी ईडी न्यायालयाची परवानगी मागणार आहे. सध्या खरात पाचव्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहे.ईडीकडून एक स्वतंत्र गुन्हा खरातवर अगोदरच दाखल झालेला आहे. त्यानंतर त्याच्या घरासह कार्यालयावर ईडीने धाड टाकली होती. या चौकशीत खरातचे प्रॉपर्टी रॅकेट समोर आले होते. त्यात आता खरातशी संबंधित शासनातील काही अधिकारी, खासगी ब्रोकर, पुणे व नाशिकमधील काही विकासक रडारवर आहेत. नाशिक-अहिल्यानगर-पुणे (Nashik-Ahilyanagar-Pune) यादरम्यानचे खरातचे प्रॉपर्टी रॅकेट उघड झाल्यानंतर सोलापूरमध्ये देखील खरातने जमीन लाटल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर ईडीकडून अत्यंत सावध पावले उचलली जात असून पहिल्या टप्प्यात खरातचे बँक खाते तात्पुरते सील करण्यात आले.कुटुंबियांचीही होणार अडचणअशोक खरात आधीच अडचणीत असताना ईडीने जर खरातच्या एखाद्या मालमत्तेवर तात्पुरती टाच (प्रोव्हिजनल अटॅचमेंट) आणली तर त्याचे कुटुंबीय देखील अडचणीत येतील. कारण असे झालयास खरातच्या मालमत्तेबाबत आणि व्यवहारांवर अनेक निर्बंध येतील. महत्त्वाचे म्हणजे संबंधित मालमत्ता खरात जरी तुरुंगात असला तरी त्याच्या कुटुंबातील वारसदारास अन्य कोणालाही विकता येणार नाही तसेच दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरण, गिफ्ट किंवा वसीयतद्वारे बदल करणेही बंद होणार आहे. बँकेत कर्जासाठी खरात व त्याच्या पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता गहाण ठेवता येणार नाही. याशिवाय कागदपत्रांमध्ये फेरफार करणे किंवा मालमत्ता लपवण्याचे प्रयत्न केल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरू शकतो.
नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील नागरिकांना आज सकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने मोठा दिलासा मिळाला. दमट हवामानामुळे पावसाची शक्यता वर्तवली जात असतानाच सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास पनवेलसह नवी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे कामासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रेल्वे स्थानके, मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि चौकांमध्ये अचानक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.दुचाकीस्वारांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून अनेकांनी झाडांच्या आडोशाला किंवा बसथांब्यांवर आसरा घेतला. काही ठिकाणी वाहतुकीवरही तात्पुरता परिणाम झाला. तरीही या सरींसोबत आलेल्या गार वाऱ्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी या पावसाचा मनमुराद आनंद घेतला. लहान मुलांनी तर पावसात भिजत खेळण्याचा आनंद लुटला. मात्र कार्यालयात जाणारे कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी आणि प्रवासी वर्ग यांना पावसामुळे भिजतच प्रवास करावा लागला.https://prahaar.in/2026/04/21/manipur-earthquake-5-2-magnitude-earthquake-hits-manipur-panic-among-citizens/दरम्यान, हवामान खात्याने आधीच उकाड्यासोबतच काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली होती. बदलत्या हवामानामुळे पुढील दोन ते तीन दिवस अशाच हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजचा पाऊस हा केवळ हवामानातील बदल नसून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक ठरला आहे.https://prahaar.in/2026/04/21/ipl-2026-tilak-varma-mumbai-indians-triumph-on-the-back-of-tilak-varmas-magnificent-century/दरम्यान, बदलापूर परिसरातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक त्रस्त झाले होते. अशातच सकाळी ढग दाटून आले आणि गडगडाटासह पावसाने शहराला झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाची विशेष गैरसोय झाली. अनेकांना भिजतच रेल्वे स्थानक गाठावे लागले, तर ग्रामीण भागातही या पावसाचा परिणाम जाणवला. एकूणच, या अवकाळी पावसाने उकाड्यापासून दिलासा दिला असला तरी दैनंदिन जीवनात काही प्रमाणात विस्कळीतपणा निर्माण केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Mumbai 3.0 : अटल सेतू ते पुणे द्रुतगती जोडमार्ग फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार
- ‘मुंबई ३.०’साठी कनेक्टिव्हिटीचे जाळे; जोडमार्गाचे अभियांत्रिकी टप्पे पूर्णत्वाकडेमुंबई : मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमधील प्रवासाचे अंतर अवघ्या काही मिनिटांवर आणणाऱ्या 'अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग' या जोडप्रकल्पाने (कनेक्टर) महत्त्वाचे अभियांत्रिकी टप्पे ओलांडले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या कामाला विशेष गती दिली असून, आतापर्यंत १४३ ठिकाणी पाया उभारणी (फाऊंडेशन) पूर्ण झाली आहे. या प्रकल्पामुळे 'मुंबई ३.०' च्या संकल्पनेला बळ मिळणार असून नवी मुंबई विमानतळ आणि पुण्याकडे जाणारा प्रवास सिग्नलविरहित होणार आहे.७.३५ किमी लांबीच्या या सहा मार्गिकांच्या पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. एकूण १७६ पायाभूत ठिकाणांपैकी १४३ ठिकाणचे काम पूर्ण झाले असून, १४१ ठिकाणी पियर्स (खांब) उभे राहिले आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ८३० प्रीकास्ट गर्डर्सपैकी ६५३ गर्डर्सची उभारणी पूर्ण झाली आहे. पळस्पे परिसरात द्रुतगती मार्गाला जोडण्यासाठी स्लिप रोड्स आणि सर्व्हिस रोड्सच्या रुंदीकरणाचे कामही समांतरपणे सुरू आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडीविना प्रवाशांना महामार्गावर प्रवेश मिळेल.हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर अटल सेतूमार्गे (शिवडी-न्हावा शेवा) चिर्ले आणि पळस्पेवरून थेट पुण्याकडे जाता येईल. यामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार असून लॉजिस्टिक्स क्षेत्रालाही गती मिळणार आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही या मार्गामुळे सुलभ प्रवेश मिळणार असल्याने हा मार्ग भविष्यात मुंबई आणि पुण्याच्या आर्थिक प्रगतीचा कणा ठरणार आहे.https://prahaar.in/2026/04/21/us-india-trade-deal-indian-delegation-to-visit-washington-this-week-for-us-india-trade-deal/नोकरदार आणि विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास सुलभ होईल : डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीएअटल सेतूमार्गे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आता सिग्नलविरहित प्रवास शक्य होईल. यामुळे नोकरदार आणि विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास सुलभ होईल. 'मुंबई ३.०' घडवताना तासांचा प्रवास मिनिटांत आणण्याचे आमचे 'मुंबई इन मिनिट्स' हे उद्दिष्ट या प्रकल्पाद्वारे पूर्ण होत आहे.गुंतवणुकीला पूरक वातावरण :फेब्रुवारी २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे उद्दिष्ट आहे. हा मार्ग नव्या विकासकेंद्रांना जोडणारा दुवा ठरेल. यामुळे मुख्य मुंबईवरील ताण कमी होऊन नवी मुंबई आणि आसपासच्या भागात औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल. समुद्री पूल, द्रुतगती मार्ग आणि मेट्रो नेटवर्कचे एकात्मिक जाळे विणण्याच्या एमएमआरडीएच्या योजनेतील हा एक महत्त्वाचा दुवा आहे.प्रकल्पाची वैशिष्ट्ये :लांबी : ७.३५ किलोमीटर.मार्गिका : सहा (११.५ मी. + ११.५ मी. रुंद).प्रमुख जोडणी : अटल सेतू, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि नवी मुंबई विमानतळ.सद्यस्थिती : १४१ पियर्स आणि ६५३ गर्डर्सची उभारणी पूर्ण.
आशय : वीणा सानेकर डहाणू जवळ ऐने नावाचे छोटेसे गाव आहे. या गावात वसलेल्या स्नेहनगरीत जाण्याचा योग नुकताच आला. एका बाजूला क्रीडांगण, नवीनच वसलेले कला कुटिर, सर्वत्र हिरवीगार झाडे, सहअध्ययन केंद्र, मध्यभागी बैठक जमवण्यासाठी मस्त जागा…, दुसरीकडे बैठी शाळा, छोटीशी बाग आणि खेळ…! ही स्नेहनगरी वसवणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ आणि भाषातज्ज्ञ रमेश पानसे यांची भेट म्हणजे समृद्ध करणारा अनुभव! बालशिक्षणात रमलेले पानसे सर शिक्षणाबद्दल तासन् तास बोलू शकतात...’ त्यादिवशी मात्र कवितांच्याच मैफलीचा बेत सरांनी उत्स्फूर्तपणे ठरवला.सगळे नव्याने उभ्या राहिलेल्या पर्णकुटीत जमले. बैठकीची गोल रचना. दिवे लागल्याने प्रकाशाची पखरण वातावरण सुंदर करत होती. सगळे सुचेल तशा कविता म्हणत होते. किती वेगवेगळ्या कवितांचा आनंद सगळे लुटत होते. सोबत अनिताताईंनी केलेली गरमगरम भजी शामदादा समोर ठेवत होते आणि मैफलीला अधिकच रंग चढत होता.यानिमित्ताने आपल्या आवडत्या कविता सगळेच आठवत - शोधत होते.युगामागुनी चालली रे युगे ही कितीदा करावी भास्करा वंचनाकितीकाळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रितीची याचनाही कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत कविता, कुब्जा ही इंदिरा संतांची कविता, बा.भ . बोरकरांची कविता, पु. शि.रेगे, सदानंद रेगे, वसंत आबाजी डहाके, गदिमा, शांता शेळके यांची कविता अशा वेगवेगळ्या कविता उपस्थित जयेश, ज्योती, सुषमाताई, स्नेहल, ईशा, पानसे सर अशा सर्वांनीच सादर केल्या. अधूनमधून कुणी स्वतःच्या जपून ठेवलेल्या कविताही सादर करीत होते.या रंगलेल्या मैफलीत मोजकेच छोटे प्रेक्षक होते. त्यांच्यासाठी विंदा करंदीकरांच्या ‘एटु लोकांचा देश,’ ‘अबबब अबबब केवढा फणस आई’ या बालकविताही सादर झाल्या. मनमोहन नातू, पद्मा गोळे यांच्या कविता ऐकायला मिळणे हा दुर्मिळ आनंद होता. सेल्युलर तुरुंगाची भिंत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यातील संवाद मनमोहन नातू यांच्या कवितेतून साकारला तर ‘मी एक पक्षीण आकाश वेडी दुज्याचे मला भान मुळी नसे’ ही कविता समर्थ स्त्रीचा आत्मस्वर टिपत होती.शब्दांमध्ये जगणे पुन्हा, शब्दांमध्ये मरणे पुन्हा हे अंतहीन समुद्रसे माझा परि दुबळा पसा अशी अवस्था कविता ऐकताना होत होती.‘सई माया सजनीले, सैनच पडेना हे व्हराडी लोकगीत’ ऐकणे आणि ताल धरणे हा अत्यंत वेगळाच आनंद होता. लघुअनियतकालिकांच्या चळवळीचे पानसे सर म्हणजे महत्वाचे साक्षीदार. त्या सगळ्या काळातील वाड्मयीन घडामोडीं विषयी पानसे सर मोकळेपणाने बोलत राहिले. सतीश काळसेकर, मनोहर ओक, गुरुनाथ धुरी यांच्यावर सर भरभरुन बोलत. तसेच मराठीच्या विविध प्राध्यापक व लेखक - कवींच्या आठवणी निघत होत्या. शंकर वैद्य सरांचे अध्यापन आणि त्यांची कविता हा सरांचा आवडता विषय. सरांचा ‘दर्शन’ हा कवितासंग्रह या गप्पांमध्ये पुन्हा पुन्हा आठवत राहिला. एम ए च्या वर्गात असताना सरोजिनी बाई वैदय, शंकर वैद्य सर, डहाके सर, गणोरकर बाई, पुष्पा भावेबाई यांचे वर्ग स्मरत होते. अनपेक्षितपणे जमलेली ही मैफिल कवितांची होती, शब्दांची होती, गीतांची आणि गीतकारांची होती, तितकीच ती माणसांच्या अविस्मरणीय आठवणींची होती.
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले आहे. मस्साजोग गावच्या सरपंच पदाची पोटनिवडणुक ही बिनविरोध होईल अशी चर्चा होती कारण या जागेसाठी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख या उभ्या होत्या मात्र आता ही निवडणूक बिनविरोध होणार नसून अश्विनी संतोष देशमुख आणि स्वरूपानंद विश्वनाथराव देशमुख यांच्यात आता थेट लढत होणार आहे. आणखी ३ उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५ पैकी ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने ही चुरस अधिकच स्पष्ट झाली आहे.'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव' - स्वरूपानंद देशमुखदिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेली जागा ही त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख ( Ashwini Santosh Deshmukh )यांना मिळावी यासाठी अनेक जण आग्रही होते मात्र तसे काही घडले नाही. दरम्यान अश्विनी देशमुख यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, अश्विनी देशमुख या स्वतः हून निवडणूक लढवत नसून त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचा, विशेषतः त्यांच्या दिराचा मोठा दबाव आहे. काहींची राजकीय महत्त्वाकांक्षा आडवी येत असल्याने अश्विनी देशमुख यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला....तर गावासमोर नाक घासेनसरपंच पदाची पोटनिवडणूक २८ एप्रिल रोजी होणार असून २९ एप्रिल रोजी मतमोजणी होईल. दरम्यान स्वरूपानंद देशमुख हे पोटनिवडणुकीत उभे राहिल्याने त्यांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा 'डमी' उमेदवार म्हणून स्वरूपानंद देशमुख उभे राहिले आहेत, असा आरोप त्यांच्यावर केला जात होता. या आरोपाला त्यांनी प्रत्युत्तर देत खुले आव्हान देत म्हटले आहे की जर मी कोणाच्या सांगण्यावरून उभा राहिलो आहे हे सिद्ध झाले, तर सर्व गावासमोर नाक घासून त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे.हीच त्यांना खरी श्रद्धांजलीयापूर्वी मला ग्रामस्थांनी साडेतीन वर्षे काम करण्याची संधी दिली होती. आता पुढील १८ महिन्यांच्या कार्यकाळात संतोष देशमुख यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, असेही स्वरूपानंद देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान एकीकडे सहानभूतीची लाट आणि दुसरीकडे अनुभवाचा दावा यापैकी ग्रामस्थ कोणाला कौल देतील हे निवडणूक निकालात दिसून येईल. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.
Manipur Earthquake : मणिपुरमध्ये ५.२ रिश्टर तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट
मणिपुरच्या अनेक भागांमध्ये आज म्हणजेच मंगळवार २१ एप्रिल रोजी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.२ इतकी नोंदवण्यात आली असून, त्याचे केंद्र कामजोंग जिल्ह्यात होते.नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार, हा भूकंप सकाळी ५.५९ वाजता झाला. धक्के जाणवताच कामजोंग आणि आसपासच्या भागातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि अनेकजण घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाचे केंद्र अक्षांश २४.७०३ उत्तर आणि रेखांश ९४.४१५ पूर्व येथे, सुमारे ६२ किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगण्यात आले. या धक्क्यांचा परिणाम शेजारच्या नागालँड आणि आसाम राज्यांमध्येही जाणवला.https://prahaar.in/2026/04/20/india-south-korea-relations-from-chips-to-ships-india-korea-will-create-new-opportunities-together-prime-minister-narendra-modi/सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. यापूर्वी सोमवारी उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे रात्री ८.३२ वाजता रिश्टर स्केलवर ३ तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याचे केंद्र सुमारे १० किलोमीटर खोलीवर होते. तसेच सोमवारी सकाळी जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे समुद्रात सुमारे ८० सेंटीमीटर उंच लाटा उसळल्या आणि किनाऱ्यावर आदळल्या. त्यानंतर जपानमध्ये सुनामीचा इशाराही देण्यात आला होता.
सौंदर्य आणि प्रतिभेसाठी भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यासपीठ असलेल्या 'मिस इंडिया'च्या ६१ व्या पर्वाचा नुकतेच ऐतिहासिक समारोप झाला. १८ एप्रिल २०२६ रोजी ओडिशाच्या भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीमध्ये झालेल्या अंतिम सोहळ्यात एका नवीन नावाची सुवर्ण अक्षरात नोंद झाली.गोव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साध्वी सतीश सैल हिला 'मिस इंडिया २०२६' चा मुकुट प्रदान करण्यात आला. तिला 'मिस इंडिया २०२४' निकिता पोरवाल हिच्या हस्ते मुकुट प्रदान करण्यात आला. आता ती 'मिस वर्ल्ड २०२७' मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाली आहे.गोव्याची रहिवासी असलेली साध्वी सतीश सेल ही केवळ एक मॉडेलच नाही, तर एक उद्योजिकासुद्धा आहे. तिने अनेक मोठ्या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला आहे आणि अनेक नामांकित ब्रँड्सच्या जाहिरातींचा ती चेहरा राहिली आहे. तिची ओळख केवळ ग्लॅमरच्या जगापुरती मर्यादित नाही; ती बांधकाम आणि विकास क्षेत्रातील एका कंपनीची सह-संस्थापकसुद्धा आहे. तिने अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदवी मिळवली आहे. तिला सात भाषाही येतात. मिस इंडिया बनून तिने सिद्ध केले आहे की ती केवळ सुंदरच नाही, तर खूप हुशारही आहे.आपल्या विजयानंतर, साध्वीने एक अत्यंत भावनिक संदेश शेअर केला. ती म्हणाली की, हा अनुभव तिच्यासाठी केवळ एक स्पर्धा नव्हती, तर मैत्री आणि एकत्र प्रगती करण्याचा एक प्रवास होता. आपल्या सर्व सह-स्पर्धकांना विजेते संबोधत ती म्हणाली की, त्या सर्वांचे ध्येय एकच आहे : जागतिक स्तरावर भारताला गौरव मिळवून देणे.ग्रँड फिनालेच्या रात्री, साध्वी सतीश सेलने आपल्या पोशाख आणि शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या भव्य रात्रीसाठी, साध्वीने सिल्व्हर आणि ब्लॅक रंगाच्या मोनोक्रोमॅटिक गाऊनमध्ये एक धाडसी विधान केले. तिचा गाऊन वास्तुशिल्पीय आणि थोडासा हटके होता. गडद रंगाच्या बेस लेयरवर चांदीच्या रंगाच्या धातूच्या मण्यांचे काम होते, ज्यामुळे एक आकर्षक इल्युजन इफेक्ट तयार झाला होता. गाऊनवरील नक्षीकाम ठळक आणि भौमितिक होते, ज्यामुळे ती गर्दीत उठून दिसत होती. हाय-नेक आणि स्लीव्हलेस कटमुळे तिचे खांदे आणि मोहक देहयष्टी अधिकच खुलून दिसत होती. साध्वीने तिच्या केसांसाठी एक आकर्षक आणि नीटनेटका अंबाडा निवडला होता. या हेअरस्टाईलमुळे तिच्या हाय-नेक गाऊनचे तपशील आणि डिझाइन अधिकच उठून दिसत होते.मिस इंडिया २०२६ च्या अंतिम फेरीच्या परीक्षक मंडळात प्रसिद्ध नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस आणि अभिनेत्री-नर्तिका लॉरेन गॉटलिब यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता. या संध्याकाळने पुन्हा एकदा सिद्ध केले की मिस इंडिया केवळ बाह्य सौंदर्याचे मोजमाप नाही, तर बुद्धिमत्ता आणि नेतृत्वाचा एक उत्सव आहे, ज्याचे प्रतिनिधित्व आता गोव्याची साध्वी सतीश सैल करणार आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भातील प्रयत्न आता अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचले आहे. या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी भारतीय प्रतिनिधीमंडळ या आठवड्यात वॉशिंग्टनला पोहोचत आहे. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती दिली आहे.सर्जिओ गोर यांनी एका ट्विटद्वारे अधिकृत पुष्टी करत सांगितले की, भारतीय व्यापार प्रतिनिधीमंडळ या आठवड्यात वॉशिंग्टनला पोहोचत आहे. या महत्त्वाच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम स्वरूप देणे हा आहे. भारत- अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराशी संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यासाठी विशेष भारतीय व्यापार प्रतिनिधीमंडळ याच आठवड्यात वॉशिंग्टन दौऱ्यावर जाणार आहे.https://prahaar.in/2026/04/21/share-market-stock-market-rises-in-early-trade-sensex-nifty-gains/अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी या दौऱ्याचे स्वागत करत, व्यापार कराराला अंतिम रूप देण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे. या कराराच्या आर्थिक परिणामांवर भाष्य करताना अमेरिकन राजदूत म्हणाले की, हा आगामी करार भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांसाठी ‘विन-विन’ म्हणजेच फायदेशीर ठरणार आहे.अमेरिकन राजदूतांच्या विधानामुळे ट्रम्प प्रशासन हा द्विपक्षीय करार दोन्ही देशांसाठी परस्पर लाभदायक मानत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता उद्योगजगताचे लक्ष या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या बैठका आणि करारावर अंतिम शिक्का कधी बसतो याकडे लागले आहे.

30 C