Ayatollah Ali Khamenei Alive:
बांगलादेशासोबत निर्माण झालेल्या राजनैतिक तणावाचा परिणाम भारताच्या पर्यटन (Indian Tourism) क्षेत्रावर दिसून आला आहे. वर्ष २०२५ मध्ये भारतात येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत ९.४ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.
SL vs PAK : या सामन्यात खेळाच्या मैदानाबाहेर एका वेगळ्याच आर्थिक गणिताची चर्चा रंगली आहे.
- मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ!मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू होणाऱ्या आशियातील सर्वात जलद 'एम-टू-एम' रो-रो जलवाहतूक सेवेला कोकणवासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. उद्या, रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता मुंबईतील भाऊचा धक्का येथे या सेवेचा शुभारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडणार आहे. यानंतर ही बोट विजयदुर्गकडे प्रस्थान करणार असून, या प्रवासासाठी प्रवाशांनी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात बुकिंग केले आहे. पहिल्याच दिवशी विविध श्रेणींमधून जवळपास सर्वच तिकीट बुकिंग होत आली आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले आहे की, सुमारे ६२६ प्रवासी आणि मोठ्या संख्येने वाहने वाहून नेण्याची क्षमता असलेले हे अत्याधुनिक रो-रो जहाज मुंबई ते विजयदुर्ग हे अंतर अवघ्या ६ ते ७ तासांत पूर्ण करणार आहे. सुरक्षित आणि आरामदायी समुद्रप्रवासासोबतच पर्यटकांना कोकणचा विस्तीर्ण निसर्गरम्य समुद्रकिनारा अनुभवण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. ही सेवा महाराष्ट्राच्या सागरी वाहतुकीच्या इतिहासातील एक नवीन आणि वैभवशाली अध्याय ठरणार असून, भविष्यात या सेवेमुळे रस्ते वाहतुकीवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होईल. कोकणाला वेगवान कनेक्टिव्हिटी देण्यासाठी आणि राज्याच्या सागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा प्रकल्प एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर प्रत्यक्षात साकार झाला आहे. या प्रतिसादाबद्दल बोलताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, कोकणवासीयांनी या सेवेचे केलेले स्वागत हे या प्रकल्पाच्या यशाची पावती आहे. या सेवेमुळे केवळ वेळेची बचत होणार नाही, तर कोकणातील पर्यटन, स्थानिक व्यापार आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळेल. उद्याच्या पहिल्या फेरीसाठी झालेल्या बुकिंगच्या तपशिलानुसार, सर्वाधिक पसंती इकोनॉमी श्रेणीला मिळाली असून प्रीमियम श्रेणी, बिझनेस श्रेणी आणि प्रथम दर्जा (फर्स्ट क्लास) श्रेणीत देखील प्रवाशांनी आपले स्थान आरक्षित केले आहे.प्रवाशांच्या सोयीसाठी ₹३,००० पासून ₹९,००० पर्यंतचे विविध तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. केवळ प्रवासीच नव्हे तर वाहनांच्या वाहतुकीसाठीही या सेवेला उत्तम प्रतिसाद लाभला असून, पहिल्याच दिवशी चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे बुकिंग मोठ्या प्रमाणात झाले आहे. या प्रतिसादावरून मुंबई-कोकण प्रवासासाठी ही सेवा किती आवश्यक आहे हे स्पष्ट होते.
US-Israel strikes on Iran: मध्यपूर्वेतील युद्धाचा भारतीय विमान वाहतुकीला मोठा फटका; 179 उड्डाणे रद्द
US-Israel strikes on Iran: दक्षिण इराणमध्ये अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात एका शाळेवर बॉम्ब पडून ५१ विद्यार्थी ठार झाल्याचे इराणच्या सरकारी दूरदर्शनने सांगितले. या साखळी घटनांमुळे मध्यपूर्वेतील संपूर्ण हवाई वाहतूक विस्कळीत झाली असून लाखो प्रवासी अडचणीत सापडले आहेत.
तुकाराम मुंढेंचा लातूरमध्ये दणका! अनियमितता आढळल्याने अपंगांच्या दोन शाळा कायमच्या बंद
School News : लातूर जिल्ह्यातील दोन दिव्यांग शाळांमधील अनियमिततेमुळे अपंग कल्याण सचिव तुकाराम मुंढे यांनी त्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
Punjab News : पंजाबमध्ये 2.5 किलो आरडीएक्स जप्त; दोघांना अटक
पंजाब पोलिसांनी (Punjab News) शनिवारी एका मोठ्या दहशतवादी कटाचा डाव उधळून लावत विदेशी पाठबळ असलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे.
Israel Iran Attack: तज्ञांच्या मते हा संघर्ष UAE च्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका ठरू शकतो, कारण देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय व्यापार, पर्यटन आणि परकीय गुंतवणुकीवर अवलंबून आहे.
पुणेकरांनो लक्ष द्या! मंगळवारी मार्केट यार्डातील भाजीपाला आणि फळ बाजार बंद, काय आहे कारण?
Pune Market Yard Closed : मंगळवारी (३ मार्च) धुलीवंदनानिमित्त पुणे मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, फुल, पान आणि केळी बाजार बंद राहणार आहे.
Mohammad Amir Prediction : पाकिस्तानच्या 'हारना मना है' या एका टीव्ही शोमध्ये बोलताना आमिरने आपल्या जुन्या विधानाचा पुनरुच्चार केला. त्याने म्हटले होते की, भारत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकणार नाही.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना २०१७ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाचे पालन न झाल्याने राज्य सरकारविरोधात पुन्हा अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.
Pune Politics : पुणे भाजप व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी महेश गुप्ता यांची नियुक्ती
Pune Politics : भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी महेश गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रत्येक तालुक्यात होणार सहा 'महाराजस्व समाधान शिबिरे'; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
- महसूल विभागातील १५ सेवांचा एकाच ठिकाणी लाभमुंबई : राज्यभरातील सामान्य जनतेला शासकीय सेवांचा लाभ त्वरित मिळावा यासाठी महसूल विभागाने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक तालुक्यात सहा शिबिरे आयोजित केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधीमंडळात दिली.या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी १८ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत महसूल मंडळ स्तरावर पूर्वतयारी करण्यात येणार आहे. नागरिकांचे अर्ज गोळा करणे आणि कागदपत्रांची पूर्तता करणे ही कामे या काळात पूर्ण केली जातील, जेणेकरून शिबिराच्या दिवशी प्रत्यक्ष लाभ देता येईल.छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ च्या प्रभावी व यशस्वी अंमलबजावणीसाठी दृकश्राव्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली.या बैठकीत अभियानाच्या नियोजन, अंमलबजावणीची कार्यपद्धती तसेच नागरिकांना वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याबाबत सविस्तर चर्चा केली.… pic.twitter.com/k3nlH91aOb— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) February 28, 2026शिबिरांचे वेळापत्रक :अभियान तीन टप्प्यांत राबवले जाणार असून त्याचे नियोजन खालीलप्रमाणे असेल:मार्च महिना : तालुक्यातील दोन महसूल मंडळांसाठी ७ मार्च आणि १४ मार्च (शनिवार) रोजी शिबिरे होतील.एप्रिल महिना : तालुक्यातील दुसऱ्या दोन मंडळांसाठी १० एप्रिल आणि १७ एप्रिल रोजी आयोजन केले जाईल.मे महिना : नगरपालिका आणि नगरपंचायत स्तरावर ८ मे आणि १५ मे (शुक्रवार) रोजी दोन शिबिरे पार पडतील.अशा प्रकारे प्रत्येक तालुक्यात एकूण ६ शिबिरांच्या माध्यमातून महसूल प्रशासन जनतेच्या दारी पोहोचणार आहे.१५ महत्त्वाच्या सेवांचा मिळणार लाभ :या समाधान शिबिरांमध्ये महसूल खात्याशी संबंधित १५ विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये दाखले, उतारे आणि इतर शासकीय योजनांच्या लाभांचा समावेश आहे. या अभियानासाठी सर्व खासदार, आमदार, पालकमंत्री तसेच सर्व मंत्र्यांना त निमंत्रित करण्यात आले असून, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हे जनतेचे प्रश्न मार्गी लावले जातील, असेही मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
Todays Top 10 News: झाडाला धडक, युद्धाची धग, सोने-चांदी तेजीत... अजित पवार विमान अपघात अहवालापासून इराण युद्धापर्यंत आजच्या सर्व मोठ्या बातम्या
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना धक्का ! शिंदेंच्या शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश; राजकीय हालचालींना वेग
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. डोंबिवलीत ठाकरे गटाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
Jammu Kashmir Team : यावेळी मुख्यमंत्र्यांनी जम्मू-काश्मीर संघासाठी २ कोटी रुपयांच्या रोख बक्षीसाची (Cash Prize) घोषणा केली. हे बक्षीस खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्यात वितरित केले जाणार आहे.
Ajit Pwar plane crash report: विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) उष्णतेमुळे खराब झाला असला तरी त्यातील कच्चा डेटा डाऊनलोड करण्यात आला असून तांत्रिक विश्लेषण सुरू आहे.
Firecracker Blast : फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; १८ कामगारांचा दुर्दैवी अंत
Firecracker Blast : आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन १८ कामगारांचा मृत्यू झाला आहे.
Food delivery staff : ऑनलाईन फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी सक्तीची
मुंबई : राज्यात ऑनलाईन खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या कंपन्यांना यापुढे कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी बंधनकारक राहणार असून, ज्या कंपन्या हा नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी शनिवारी विधानसभेत दिला.भाजप आमदार भिमराव तापकीर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, राज्यातील झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, झेप्टो, अमेझॉन आणि इतर ऑनलाईन खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या वितरण कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी सक्तीची करण्यासाठी शासन काही परिपत्रक काढणार आहे का? पोलीस पडताळणी न करता कर्मचारी ठेवले गेले तर संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई केली जाईल का? तसेच, ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने खाद्यपदार्थ मागवल्यास संबंधित अॅपवर वितरण कर्मचाऱ्यांची माहिती ग्राहकांना दिसण्यासाठी काही आदेश दिले जातील का? असे प्रश्न त्यांनी विचारले.यावर उत्तर देताना मंत्री आकाश फुंडकर म्हणाले की, ऑनलाईन खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करत असताना जाहिरात देऊन त्रयस्थ संस्थेमार्फत त्यांची नोंदणी करतात. ऑनलाईन अर्जच्या माध्यमातून ही नोंदणीची प्रक्रिया केली जाते. पार्टनरशिपच्या नावावर त्यांचा हा करार होत असतो. या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया त्रयस्थ संस्थांमार्फत होत असल्याने कंपन्या स्वत:वरची जबाबदारी झटकताना दिसतात. परंतु, मध्यंतरीच्या काळात घडलेल्या घटनांनंतर गृहविभागामार्फत काही सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यावेळी या कर्मचाऱ्यांची चारित्र्य तपासणी करण्याबाबत कामगार विभागाने गृह विभागाला सुचित केले.पोलिसांकडून पडताळणी सुरू :मंत्री फुंडकर म्हणाले, सध्यातरी सगळ्या कंपन्या पोलीस पडताळणी करत आहेत. तरीसुद्धा येणाऱ्या काळात सर्व आस्थापनांना सुचित केले जाईल की, पोलीस पडताळणी केल्याशिवाय कामगारांना नोंदवू नये. असा कामगार आढळल्यास त्याला कामावरून कमी करण्यात यावे. तसेच, ज्या कंपन्या नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.
Uday Bhanu Chib : भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब यांना जामीन मंजूर
भारत मंडपम येथे आयोजित 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट' दरम्यान झालेल्या आंदोलनाप्रकरणी अटकेत असलेले भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब (Uday Bhanu Chib) यांना शनिवारी दिल्ली न्यायालयाने जामीन मंजूर केला.
भारतीय हवामान विभागाने (Weather Update) शनिवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत देशातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहतील.
आता मुंबईत धावणार पत्रकार-कॅमेरामनसाठी स्वतंत्र अॅम्ब्युलन्स
- मुख्यमंत्री फडणवीस, शिंदेंनी केले सेवेचे लोकार्पण....- 'आरबीजी फाउंडेशन-टीव्हीजेए'चा उपक्रम; लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचीही साथमुंबईः राज्यभरातील विशेषतः मुंबई महानगराच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या, घडलेल्या वेगवान घडामोडी अर्थात, 'ब्रेकिंग न्यूज' त्या-त्या क्षणाला लोकांपर्यंत पोचविणाऱ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील पत्रकार-कॅमेरामन आणि संबंधित घटकांसाठी आता स्वतंत्र 'अॅम्ब्युलन्स' रस्त्यावर उतरल्या आहेत. मीडिया विश्वातील धावपळीत पत्रकारांच्या आरोग्याकरिता ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवी मुंबईतील 'आरबीजी फाउंडेशन' आणि' टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन’च्या पुढाराकाने सुरू केलेल्या या सेवेचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत झाले.विधान भवनाच्या आवारात झालेल्या या उदघाटन सोहळ्याला राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोजगार हमी योजनेचे मंत्री, भरत गोगावले, फाउंडेशनच्या अध्यक्ष मधुरा गेठे, टीव्ही जर्नालिसस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव, सदस्य मनश्री पाठक यांच्यासह पंकज दळवी, कार्यकारिणी सदस्य मनाली गायकवाड, राजेश साफळे, अनिल सौंदडे असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही काळात प्रचंड वेगवान झाले आहे. त्यामुळे राजकारण आणि संबंधित बाबींना मीडियात महत्त्व दिले जाते. अशातच 'ब्रेकिंग न्यूज'च्या दुनियेत आघाडी घेत असताना, पत्रकार मंडळींची धावपळ होते. परिणामी, या सततच्या धावपळीने पत्रकार अणि इतर घटकांच्या आरोग्यावर कळत-नकळतपणे परिणाम होतो. ही बाब हेरून पत्रकारांच्या आरोग्याकडे वेळोवेळी लक्ष देऊन, हा घटक अधिक सक्षम राहावा, याकरिता आरबीजी फाउंडेशन'ने आणि टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन’ने पत्रकारांच्या आरोग्यासाठी योजना आखण्याचे नियोजन केले आहे. त्यातून फाउंडेशनने आता स्वतंत्र 'अॅम्ब्युलन्स' उपलब्ध करून दिल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार आणि कॅमेरामनचे नेतृत्व करणाऱ्या राज्यपातळीवरील 'टीव्ही जर्नालिस्ट असोएिशन'च्या माध्यमातून पत्रकार आणि कॅमेरामन यांच्यासाठी ही सेवा पुरविली जाईल.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पत्रकार हे अनेकदा अतिशय संवेदनशील ठिकाणी पोचून कव्हरेज करतात. त्यामुळे अपघात ओढण्याची भीती असते. अशा वेळी पत्रकारांना हक्काची सेवा देण्यासाठी आरबीजी फाउंडेशन आणि टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचा ही योजना चांगली आहे.’’‘’पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी उपायांची गरज आहे. पत्रकारांसाठी अॅम्ब्युलन्स सुरू केली, हे स्तुत्य असले, तरी त्याची गरज येऊ नये, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.फाउंडेशनच्या अध्यक्ष मधुरा गेठे म्हणाल्या, पत्रकारांचे आरोग्यासाठी ही संकल्पना आहे. त्यातून आता दोन अॅम्ब्युलन्स उपलब्ध केल्या आहेत. अॅम्ब्युलन्स सेवेनंतर पत्रकारांचे ‘हेल्थ कार्ड' तयार करण्याचे नियोजन आहे. यापुढे 'टीव्हीजेए' च्या उपक्रमातत आरबीजी फाउंडेशनचे सहकार्य राहील.मनश्री पाठक यांनी प्रस्ताविक करू उपस्थितांचे स्वागत केले आणि आभार मानले.
मुंबई-गोवा महामार्गावरील कामांना वेग - सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले
मुंबई : मुंबई – गोवा महामार्गावरील प्रलंबित कामांना गती देण्यात आली असून माणगाव व इंदापूर बायपासची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. माणगाव व इंदापूर बायपास वगळता उर्वरित मुंबई – गोवा महामार्ग (एनएच-६६) मे महिन्यापर्यंत पूर्णत्वाला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधानपरिषदेत दिली.विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे या सदस्यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता.माणगाव बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम नव्या एजन्सीकडून सुरू असून ते प्रगतीपथावर असल्याचे सांगून मंत्री भोसले म्हणाले की, माणगाव व इंदापूर बाह्यवळण मार्गासह तीन रेल्वे उड्डाणपूल आणि दोन मोठे पूल या कामांचा समावेश प्रकल्पात आहे. ही कामे जुलै २०२५ मध्ये सुरू करण्यात आली असून जुलै २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. संबंधित ठेकेदार काम न करत नसल्याने त्याच्याकडून ते काम काढून घेऊन नव्या एजन्सीला देण्यात आल्याचेही सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी सांगितले.कोकणातील गणेशोत्सव काळातील वाहतूक कोंडी लक्षात घेता माणगाव–महाड मार्गावरील ताम्हिणी घाटाचा बाह्य वळण मार्ग पावसाळ्यापूर्वी, म्हणजे मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मानस आहे. त्यामुळे माणगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले.चिपळूण येथील पूल मे २०२६ पर्यंत पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असून मुख्य काम पूर्णत्वास आले आहे. तसेच संगमेश्वर येथील हातखंबा उड्डाणपुलाचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण होईल.गांधार पाले लेण्याजवळील रेस्ट एरिया (पार्किंग, टॉयलेट्स, कॅफेटेरिया) येथे झालेल्या तोडफोडीबाबत 16 डिसेंबर 2025 रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, पूर्वी तेथे एकच सुरक्षा रक्षक असताना आता चार रक्षक नेमण्यात आले आहेत. तसेच सीसीटीव्ही बसविण्याची प्रक्रिया सुरू असून भविष्यातील सुरक्षेसाठी सर्व रेस्ट एरियांसाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात येणार असल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले.गांधार लेण्यापरिसरातील रेस्ट एरियामध्ये पर्यटन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आवश्यक सुधारणा केल्या जातील, असेही शेवटी सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी सांगितले.
Justice KV Viswanathan : एआय मुख्य कार्यांची जागा घेऊ शकत नाही : न्या. विश्वनाथन
Justice KV Viswanathan : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. व्ही. विश्वनाथन यांनी नागपुरात वकिलांना एआय (AI) च्या मर्यादांची जाणीव करून दिली.
Kapil Sibal : अटक करण्यापूर्वी पुराव्यांची शहानिशा करा; कपिल सिबल यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर, ज्येष्ठ विधीज्ञ आणि राज्यसभा खासदार कपिल सिबल (Kapil Sibal) यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
T20 World Cup Semifinal : भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात आता एकच प्रश्न आहे – उपांत्य फेरीत भारताची गाठ कोणाशी पडणार?
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अखत्यारीतील क्रीडा, अल्पसंख्याक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रश्नांची उत्तरं अधिवेशनात दत्तात्रय भरणे आणि हसन मुश्रीफ देणार आहेत.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच पश्चिम बंगालमधील (Mamata Banerjee) हाय-प्रोफाइल भवानीपूर मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासूनच म्हणजेच नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निकालांत भाजपने मुसंडी मारत 'नंबर १' चे स्थान पटकावले. केवळ नगरपालिकाच नव्हे, तर राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकीतही भाजपने आपला गड राखला असून, येथे महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या संपूर्ण निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. महानगरपालिका असो वा जिल्हा परिषदेच्या निवडणुका, भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीने एकत्रितपणे विरोधकांना चारी मुंड्या चीत केले. जिल्हा परिषदांच्या निकालांनी ग्रामीण भागातही महायुतीची पकड मजबूत असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणुकीच्या धामधुमीत राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अनेक दिग्गजांनी आणि स्थानिक नेत्यांनी आपला मूळ पक्ष सोडून सत्ताधारी गटात प्रवेश केला. या पक्षांतराचा सर्वाधिक फटका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला बसल्याचे दिसून आले. अनेक बालेकिल्ल्यांमध्ये संघटनात्मक खिंडार पडल्याने ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळवता आले नाही, परिणामी महाविकास आघाडीच्या पदरी निराशा पडली.https://prahaar.in/2026/02/28/mumbai-goa-highway-work-to-be-completed-by-end-of-may-minister-shivendraraje-bhosale-assures-in-legislative-council/डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाला खिंडारनिवडणुकांचे निकाल लागून काही काळ उलटत नाही तोच, डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यातच भगवे वादळ निर्माण करत अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे डोंबिवलीत ठाकरे गटाची संघटनात्मक बांधणी पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र आहे. यामध्ये केवळ सामान्य कार्यकर्तेच नव्हे, तर पक्षाचे कणा मानले जाणारे विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि अनेक शाखा प्रमुखांनी सामूहिकरीत्या शिंदे गटात प्रवेश केला. विधानसभेतील महाविकास आघाडीच्या पराभवानंतर डोंबिवलीत ठाकरे गटाला बसलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्यभरात शिवसेना ठाकरे गटातून गळती सुरूच आहे. अनेक निष्ठावान नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेना शिंदे गट किंवा भाजपची वाट धरली आहे. डोंबिवलीतील या घडामोडींमुळे आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली संघटना वाचवण्याचे आणि हे पक्षांतर रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सतत सुरू असलेली ही पडझड आगामी काळात पक्षासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
अजित पवार यांच्या निधनाबद्दल रोहित पवारांचे राजकारण अत्यंत चुकीचे आणि घृणास्पद - आनंद परांजपे
अजितदादा पवार यांच्या दु:खद व दुर्दैवी निधनाबद्दल आमदार रोहित पवार हे राजकारण करत आहेत ते अत्यंत चुकीचे आणि घृणास्पद आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी रोहित पवार यांच्या राजकारणाला ठाणे येथे माध्यमांशी बोलताना उत्तर दिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे व पार्थ पवार यांच्यासमवेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणावे अशी मागणी केली होती. शिवाय त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणीही केली होती मात्र दुर्दैवाने आमदार रोहित पवार गेले काही दिवस राजकारण करत आहेत त्याबद्दल आनंद परांजपे यांनी नाराजी व्यक्त केली.गुन्हा दाखल करण्याचे राजकारण रोहित पवार यांनी थांबवावे :शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रोहित पवार यांनी भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातील तांत्रिक अडचणींचा अभ्यास करुन गुन्हा नोंदवला जाईल असे आश्वस्त करुन देखील आज शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची रोहित पवार यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त करुन देखील गुन्हा दाखल करण्याचे राजकारण रोहित पवार यांनी थांबवावे.कुटुंबाने एकटं कसं पाडलं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे :खरंतर २ जुलै २०२३ मध्ये वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर अजित पवार यांना कुटुंबाने एकटं कसं पाडलं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. किंबहुना लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार या बाहेरच्या पवार आहेत आणि घरातील पवारांना मतदान करा असे वक्तव्य वरिष्ठांकडून करण्यात आले होते याची आठवण करून देताना आनंद परांजपे यांनी विधानसभा निवडणुकीत अत्यंत हताश होऊन कुटुंबाने मला एकटं पाडलं पण बारामतीची जनता मला एकटं पाडणार नाही ही उद्विग्नता दादांनी व्यक्त केल्याचा व्हिडिओ आजही सगळ्यांकडे पहायला मिळत असल्याचे सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कमपणे उभा आहे :आज अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राजकारण केले जातेय. ते चुकीचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनिशी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार, पार्थ, जय पवार यांच्या मागे भक्कमपणे उभा आहे. राष्ट्रीय अधिवेशनात जय पवार यांना मागील खुर्चीत बसवण्यात आले अशाप्रकारचा चुकीचा व्हिडीओ माध्यमांमध्ये दाखवण्यात आला शिवाय तसा आरोप रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला. मुळात अधिवेशनाचे फेसबुक लाईव्ह सुरू होते त्यावेळी सुत्रसंचालक सुरज चव्हाण हे जय पवार यांना पुढे बसण्यासाठी आग्रह करत होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नेत्यांवर जे आरोप केले जात आहेत ते चुकीचे आहेत असेही आनंद परांजपे म्हणाले.महाराष्ट्रासमोर सत्य आले पाहिजे पण अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातावरुन जे राजकारण केले जात आहे ते चूकीचे आहे. आम्ही सर्वजण म्हणजे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा नेते नाही तर महाराष्ट्राने अजितदादांसारखं नेतृत्व मुकलंय ती महाराष्ट्रातील जनता सत्य बाहेर येण्याची आतुरतेने वाट पहात आहे असेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.
PAK vs SL : क्रिकबझ'शी संवाद साधताना सेहवागने पाकिस्तानच्या सद्यस्थितीवर आणि त्यांच्या फलंदाजीच्या क्षमतेवर सडकून टीका केली आहे.
Hingoli: अनिल पतंगे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
Hingoli: नियुक्तीचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जिल्ह्यात पक्षवाढीसाठी कटिबद्ध राहू, अशी प्रतिक्रिया पतंगे यांनी नियुक्तीनंतर दिली.
Beed Crime News : धनंजय मुंडे यांचे समर्थक गोविंद फड यांनी फेसबुकवर मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांना 'कार्यक्रम खल्लास' करण्याची धमकी
M.K.Stalin : तामिळनाडूमध्ये खोट्या केसेसचा फॉर्म्युला नको; मुख्यमंत्री स्टॅलिन यांची भाजपवर टीका
स्टॅलिन (M.K.Stalin) म्हणाले की, भाजपने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध खोटे खटले अर्थात दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरण दाखल करून आणि त्यांना तुरुंगात टाकून भित्रेपणाचे कृत्य केले. त्यांच्याकडे (भाजपा) प्रामाणिकपणे आणि सरळ पद्धतीने निवडणुकांना सामोरे जाण्याचे धाडस नव्हते.
Iran US tensions: शाळेवरील हल्ल्यात निरपराध मुलांचे बळी गेल्याने हे युद्ध आता केवळ लष्करी संघर्षापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्याच्या झळा सामान्य नागरिकांपर्यंत, विशेषतः लहान मुलांपर्यंत पोहोचल्या आहेत.
मुंबई : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रशासकीय वारशाचे जतन करण्यासाठी राज्य शासनाने मोडी व फारसी लिपींच्या प्रचार-प्रसारासाठी स्वतंत्र पुरस्कार जाहीर केले आहेत. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार “मोडी लिपी प्रचार-प्रसार पुरस्कार” आणि “फारसी लिपी प्रचार-प्रसार पुरस्कार” दरवर्षी प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.महाराष्ट्राच्या इतिहासात मोडी लिपीचा वापर शासन कामकाजासाठी तर फारसी लिपीचा वापर राजकीय कागदपत्रे, फरमाने व परराष्ट्र व्यवहारासाठी होत असे. आज या लिपींचा वापर कमी झाला असला, तरी त्या राज्याच्या ऐतिहासिक ठेव्याचा महत्त्वाचा भाग आहेत. या लिपीतील प्राचीन दस्तऐवजांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाचे अमूल्य संदर्भ दडलेले आहेत. त्यामुळे अभ्यासक, संशोधक आणि नव्या पिढीने या लिपींचा अभ्यास करावा व त्यांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.मोडी लिपी पुरस्कारासाठी निकष :मोडी लिपी पुरस्कारासाठी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेने मराठेकालीन इतिहासाचा अभ्यास केलेला असावा किंवा मोडी लिपीच्या प्रचार-प्रसारात भरीव योगदान दिलेले असावे. मोडी लिपीत पुस्तक प्रकाशित केलेले असणे आवश्यक असून त्या पुस्तकातून मराठेकालीन इतिहासावर नव्या दृष्टिकोनातून प्रकाश टाकलेला असावा. पुस्तकावर कोणतेही शास्त्रीय आक्षेप नसावेत आणि ते मराठी भाषेत असावे. निवड झालेल्या पुरस्कार्थ्यास एक लाख रुपये रोख रक्कम व मानपत्र प्रदान करण्यात येईल.फारसी लिपी पुरस्कारासाठी निकष :फारसी लिपी पुरस्कारासाठी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेने मराठेकालीन इतिहासाच्या संदर्भात अभ्यास किंवा फारसी लिपीच्या प्रचार-प्रसारात उल्लेखनीय कार्य केलेले असावे. फारसी लिपीतील पुस्तक प्रकाशनात सहभाग किंवा संशोधनात्मक योगदान अपेक्षित आहे. या पुरस्कारासाठीही एक लाख रुपये रोख रक्कम व मानपत्र देण्यात येणार आहे.या दोन्ही पुरस्कारांसाठी स्वतंत्र निवड समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव अध्यक्ष, तर सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित उपसचिव, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक, आणि पुराभिलेख संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव म्हणून कार्य पाहतील. मोडी लिपी समितीत इतिहासतज्ज्ञ राजेंद्र दुमे व सुनील कदम यांचा समावेश आहे, तर फारसी लिपी समितीत इतिहासतज्ज्ञ गुरूप्रसाद कानिटकर व पराग पिंपळखरे यांचा समावेश आहे.शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील ऐतिहासिक लिपींचे जतन व संवर्धनास चालना मिळेल, अशी अपेक्षा मंत्री ॲड.शेलार यांनी केली.
शिरुर तालुक्यातील (Shirur News) गणेगाव दुमाला येथील म्हसोबावाडीच्या जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात अतिक्रमण करुन शाळेचे कामकाज विस्कळीत केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
US Iran War 2026 : अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील ३० ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर इराणने ५ देशांमधील अमेरिकन तळांना लक्ष्य केले आहे.
Iran-Israel War : इराण-इस्रायलमध्ये युद्ध भडकताच ‘या’देशांनी घेतला मोठा निर्णय
इस्रायल आणि इराण यांच्यात मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू झाले असून, या संघर्षाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. इस्रायलने इराणवर प्रथम हल्ले (Iran-Israel War) केल्यानंतर अमेरिकेनेही या युद्धात उडी घेतली आहे
Pakistan Semifinal Equation : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी आपल्या 'आकाशवाणी' या यूट्यूब शोमध्ये पाकिस्तानच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या शक्यतांवर सविस्तर चर्चा केली आहे.
US-Israel Attacks Iran: “सावध राहा, घराबाहेर पडू नका”; इस्रायलमधील भारतीयांना दूतावासाचा इशारा
US-Israel Attacks Iran: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच इशारा दिला होता की वाटाघाटी अयशस्वी झाल्यास इराणवर हल्ला होऊ शकतो. त्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे शनिवारी इराणमधील अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले. इराणने तातडीने आणीबाणी घोषित केली असून संपूर्ण प्रदेशात तणाव वाढत चालला आहे.
Budget Session : कापूस खरेदीची मुदत १५ मार्चपर्यंत वाढविली
मुंबई : राज्यातील कापूस खरेदीची मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. या अनुषंगाने पणन विभागाने कापूस खरेदी मुदत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला.या मागणीचा सकारात्मक विचार करून केंद्र सरकारने राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत कापूस खरेदीसाठीची मुदत १५ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शनिवारी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.यासोबतच राज्य शासनामार्फत हरभरा खरेदी प्रक्रीया राबवली जाणार आहे. १ मार्च २०२६ पासून शेतकरी नोंदणी आणि ५८७५ रुपये प्रती क्विंटल या हमीभावाने हरभर खरेदी सुरू करण्यात येत आहे, अशी माहितीही पणन जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली.
मुंबई : मुंबई आणि ठाणे या जोडशहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणाऱ्या 'मेट्रो-४' (ग्रीन लाईन) प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या प्रकल्पाचा पहिला टप्पा एप्रिल २०२६ पर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचे राज्य सरकारने विधानपरिषदेत स्पष्ट केले. आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर झालेल्या चर्चेत भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी मेट्रो कामातील विलंब आणि वाढत्या खर्चाबाबत प्रशासनाला प्रश्न विचारला.चर्चेदरम्यान प्रवीण दरेकर यांनी प्रकल्पातील त्रुटींकडे लक्ष वेधले. मेट्रो-४ प्रकल्पाची मूळ मुदत जुलै २०२१ होती, जी आता ऑगस्ट २०२६ पर्यंत पुढे गेली आहे. या विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च १२७४ कोटी रुपयांनी वाढला आहे. तसेच, मुलुंड आणि घाटकोपर येथील दुर्घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे, असे दरेकर यांनी नमूद केले. कांजूरमार्ग कारशेडच्या जागी मोगरपाडा (ठाणे) येथे कारशेड हलवल्याने कामाच्या गतीवर झालेला परिणाम लक्षात घेता, हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होईल, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मेट्रो-४ च्या टप्प्याटप्प्याने पूर्ण होणाऱ्या कामाचे सविस्तर नियोजन सभागृहासमोर ठेवले. त्यांनी सांगितले की, मेट्रो-४ प्रकल्पाचा फेज-१ एप्रिल २०२६ पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर फेज-२ डिसेंबर २०२६ पर्यंत आणि अंतिम फेज-३ नोव्हेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. तांत्रिक अडचणी आणि कारशेडचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता कामाला वेग आला असून, मुंबईकर आणि ठाणेकरांना लवकरच या आधुनिक वाहतूक सेवेचा लाभ मिळेल, असे सकारात्मक उत्तर सरकारने दिले आहे.
Banjara Reservation : बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी अभ्यास समितीची स्थापना
मुंबई : मराठा आरक्षणासाठी ‘हैदराबाद गॅझेट’चा आधार घेतल्यानंतर, आता त्याच धर्तीवर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. बंजारा प्रवर्गातील उपवर्गांसह या समाजाचा ‘एसटी’मध्ये समावेश करण्याबाबतची कायदेशीर आणि तांत्रिक बाजू तपासण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातील बंजारा समाज सध्या विमुक्त जाती (अ) म्हणजेच 'व्हीजेएनटी' प्रवर्गात मोडतो. मात्र, हैदराबाद गॅझेटमध्ये या जमातीचा उल्लेख ‘आदिम’ असा असल्याने, आपल्याला अनुसूचित जमातीचे लाभ मिळावेत, अशी जुनी मागणी समाजाने लावून धरली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ४ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली होती. त्या बैठकीतील निर्णयानुसार आता ही उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.निवृत्त न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. सी. जे. सोनोवाल (मानववंश शास्त्रज्ञ), डॉ. शैलेशकुमार दारोकर (समाजशास्त्रज्ञ), ॲड. नितीन गांगल (कायदेतज्ज्ञ) आदी मान्यवरांचा समितीत समावेश असेल. ही समिती बंजारा समाजाच्या सामाजिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अभ्यास करून आपला अहवाल सरकारला सादर करेल.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला होता. याच गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख 'आदिम' जमात म्हणून असल्याचे समोर आले आहे. या कायदेशीर आधारामुळे बंजारा समाजाला 'एनटी'मधून 'एसटी' प्रवर्गात जाण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो, असा दावा समाजातील अभ्यासकांनी केला आहे.
मुंबई : दरवर्षी होळी आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. माणगाव-इंदापूर बायपासचा काही भाग वगळता, येत्या मे महिन्यापर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे संपूर्ण काम पूर्णत्वास गेलेले असेल, अशी महत्त्वाची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज विधानपरिषदेत दिली. भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे आश्वासन दिले.https://prahaar.in/2026/02/28/metro-travel-for-mumbai-thanekars-will-soon-be-smooth-government-plans-to-inaugurate-metro-4-project-in-phases/सभागृहात सदस्य निरंजन डावखरे यांनी महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सहभाग घेताना आमदार प्रवीण दरेकर आक्रमक पाहायला मिळाले. हा महामार्ग रेकॉर्डब्रेक उशिरा होणारा मार्ग ठरला आहे. कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे चाकरमान्यांना वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागत आहे. आता होळीचा सण जवळ आला आहे, अशा वेळी प्रवाशांना हा विहित वेळेत पूर्ण होऊन दिलासा मिळणार का? असा थेट सवाल दरेकरांनी विचारला. तसेच, महाड येथील गांधारपाले लेणी परिसरात पर्यटन विकासासाठी बांधकाम विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.यावर सकारात्मक उत्तर देताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी कामाचे वेळापत्रक स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, चिपळूणचा महत्त्वाचा पूल मे २०२६ पर्यंत खुला होईल, तर हातखंबा उड्डाणपुलाचे काम याचवर्षी एप्रिलपर्यंत पूर्ण होत आहे. माणगाव-इंदापूर मार्गाची मुदत २०२७ असली तरी, उर्वरित महामार्ग मे २०२६ पर्यंत प्रवासासाठी सज्ज असेल. तसेच, गांधारपाले लेणी येथे पर्यटन विभागाच्या माध्यमातून आवश्यक सुधारणा करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले. सरकारच्या या भूमिमेमुळे कोकणच्या विकासाला आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
पुणे हादरले! वाघोलीत २० वर्षीय तरुणीची इमारतीवरून उडी; उपचारादरम्यान मृत्यू
Wagholi Suicide News : वाघोली परिसरातील मॅजेस्टिक ओयसिस या उंच इमारतीत राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीने आठव्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना घडली.
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘NCMC स्मार्ट कार्ड’ (National Common Mobility Card) उपक्रमाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने टाकलेल्या या पावलाला अवघ्या आठवड्याभरातच १ लाखाहून अधिक प्रवाशांनी पसंती दर्शवली आहे. या यशाबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी समाधान व्यक्त केले असून, ही आकडेवारी एसटीच्या आधुनिक प्रवासाची साक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे.एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात दिवसांत एकूण १,००,०२१ प्रवाशांनी या स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये ‘महिला सन्मान योजने’च्या लाभार्थ्यांचा वाटा सर्वाधिक असून, तब्बल ३७,९२७ महिलांनी नोंदणी केली आहे. त्याखालोखाल ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेतील ३४,९४८ नागरिक आणि इतर ज्येष्ठ नागरिकांपैकी २४,९२७ जणांनी डिजिटल प्रवासाला पसंती दिली आहे. तसेच, इतर सर्वसाधारण प्रवाशांनीही या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला आहे. पारंपारिक रोख व्यवहारांना फाटा देऊन सुरक्षित आणि पारदर्शक प्रवास करण्याकडे प्रवाशांचा कल वाढत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.https://prahaar.in/2026/02/28/us-airstrikes-on-tehran-all-flights-cancelled-immediately/सक्तीच्या अफवांवर विश्वास ठेवू नकादरम्यान, १ मार्चपासून स्मार्ट कार्डशिवाय सवलत मिळणार नाही, अशा चर्चा समाज माध्यमांवर पसरल्या होत्या. यावर स्पष्टीकरण देताना महामंडळाने सांगितले की, जोपर्यंत किमान ८०% सवलत धारक प्रवाशांची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे कार्ड अनिवार्य केले जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. तरीही, भविष्यातील सुलभ प्रवासासाठी जवळच्या बसस्थानकावर किंवा अधिकृत एजंटकडे जाऊन आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. हे 'वन नेशन वन कार्ड' तत्त्वावर आधारित कार्ड भविष्यात इतर सार्वजनिक वाहतूक सेवांसाठीही वापरता येणार आहे, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक 'स्मार्ट' होणार आहे.
National Science Day 2026 : विकास आणि कल्याणासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करा - पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा देत भारताच्या वैज्ञानिक कामगिरीचा उत्सव साजरा केला. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून मोदींनी विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपण संशोधन, नवोन्मेष आणि वैज्ञानिक कुतूहलाचा उत्सव साजरा करतो, जो आपल्या देशाला पुढे नेत राहतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर लिहिले आहे की, हा दिवस सर सी.व्ही. रमण यांनी लावलेल्या 'रमण इफेक्ट' या क्रांतिकारी शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या शोधामुळे भारतीय संशोधनाला जागतिक नकाशावर भक्कम स्थान मिळाले. आपल्या तरुणांना सक्षम बनवण्याचा, संशोधन परिसंस्था अधिक बळकट करण्याचा आणि राष्ट्र विकास तसेच जागतिक कल्याणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.तसेच तरुण नवोन्मेषकांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे आणि संशोधनाच्या संधींचा विस्तार करणे यावर सरकारचे सतत लक्ष केंद्रित असल्याचे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले.Today, on National Science Day, we celebrate the spirit of research, innovation and scientific curiosity that drives our nation forward.This day commemorates the groundbreaking discovery of the Raman Effect by Sir CV Raman. This discovery placed Indian research firmly on the… pic.twitter.com/YcjOAdPosr— Narendra Modi (@narendramodi) February 28, 2026विज्ञान दिवसाचा इतिहास :नोबेल पारितोषिक विजेते सी.व्ही. रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावला. त्यानिमित्त दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. १९२८ मध्ये जाहीर झालेल्या या शोधामुळे प्रकाशाचे विकिरण दिसून आले आणि १९३० मध्ये सी.व्ही. रमन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला. भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक जिंकणारे ते पहिले आशियाई बनले.
मुंबई : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गेल्या १० वर्षांत परराज्यातील विद्यापीठांच्या पदव्यांच्या आधारे देण्यात आलेल्या पदोन्नतींचा मुद्दा आज विधानपरिषदेत चांगलाच गाजला. भारतीय जनता पक्षाचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेत, नियमबाह्य पदोन्नती मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि त्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. यावर उत्तर देताना राज्य सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले आहे.https://prahaar.in/2026/02/28/passengers-respond-overwhelmingly-to-sts-ncmc-smart-card-crosses-1-lakh-mark-within-a-week/सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान आमदार अमित गोरखे यांनी एआयसीटीई (AICTE) आणि यूजीसी (UGC) च्या पदव्यांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सहभागी होत प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, कर्नाटक, आसाम, सिक्कीम, राजस्थान आणि केरळ यांसारख्या राज्यांतील विद्यापीठांकडून 'डिस्टन्स एज्युकेशन'द्वारे मिळवलेल्या पदव्यांच्या आधारे अनेक कर्मचाऱ्यांनी पदोन्नती लाटली आहे. विशेषतः अभियांत्रिकी आणि तांत्रिक शिक्षणाच्या बाबतीत अशा दूरस्थ पदव्या अवैध असतानाही, महापालिका प्रशासनाने कोणतीही चौकशी न करता या पदव्या ग्राह्य धरल्या आहेत.दरेकर यांनी पुढे असा आरोप केला की, महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून या नियमबाह्य पदव्यांच्या जोरावर आपली पदे उंचावली आहेत. अशा किती कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आणि किती जणांना पदोन्नती दिली गेली, याचा राज्यस्तरीय तपशील सरकारने सभागृहात सादर करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.या गंभीर प्रश्नावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, एआयसीटीई आणि यूजीसीच्या नियमांनुसार सर्व तांत्रिक बाबी तपासून घेतल्या जातील. परराज्यातील पदव्यांच्या आधारे झालेल्या या पदोन्नतींची राज्य सरकारमार्फत चौकशी करण्यात येईल आणि पुढील तीन महिन्यांत या चौकशीचा सविस्तर अहवाल सभागृहासमोर ठेवला जाईल. सरकारच्या या सकारात्मक निर्णयामुळे आता पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 'स्मार्ट' पदोन्नती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
INS Anjdip : शत्रूला धडकी भरणार! 'आयएनएस अंजदीप'भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल
चेन्नई : आयएनएस अंजदीप, ही पाणबुडी विरोधी युद्धनौका , ‘शॅलो वॉटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) प्रकल्पातील चौथे जहाज चेन्नई बंदरात झालेल्या अधिकृत समारंभात भारतीय नौदलात औपचारिकपणे दाखल झाले आहे. नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाईस ऍडमिरल संजय भल्ला यांनी या कार्यक्रमाचे यजमानपद भूषवले. नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, पूर्ववर्ती अंजदीप चे माजी कमांडिंग ऑफिसर, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (जीआरएसई), कोलकाता आणि लार्सन अँड टुब्रो शिपबिल्डिंग, कट्टुपलीचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.नौदल प्रमुखांनी आपल्या भाषणात भारतीय नौदलात जहाजाच्या समावेशाचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित केले, तसेच जहाज बांधणी करणाऱ्यांची वचनबद्धता आणि पाठिंबा तसेच जहाज वेळेवर नौदलाच्या सेवेत दाखल करण्यासाठी जहाजावरील कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने घेतलेल्या परिश्रमांची प्रशंसा केली.कारवारच्या किनाऱ्याजवळच्या समुद्रातील ऐतिहासिक बेटाच्या नावावरून आयएनएस अंजदीप हे नाव देण्यात आले असून, समुद्र किनाऱ्या जवळच्या उथळ समुद्रातील पाणबुडीविरोधी युद्धासाठी खास डिझाइन केलेल्या युद्धनौकांच्या मालिकेत या युद्धनौकेचा समावेश करण्यात आला आहे. या जहाजाच्या बांधणीसाठी ८०% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला असून, यामधून युद्धनौका डिझाइन आणि संरक्षण इलेक्ट्रॉनिक्समधील भारताची स्वयंपूर्णता दिसून येते. यामध्ये प्रमुख स्वदेशी प्रणालींचे एकत्रीकरण समाविष्ट आहे.'डॉल्फिन हंटर' म्हणून ओळखले जाणारे, ७७ मीटर लांब, १४०० टन वजनाचे हे जहाज, किनारपट्टी प्रदेशात जलद प्रतिसाद आणि शाश्वत ऑपरेशन्ससाठी तयार केले आहे. पृष्ठभागावरील धोके प्रभावीपणे शोधणे, त्यांचा मागोवा घेणे आणि निष्प्रभ करणे, यासाठी हे जहाज आधुनिक एएसडब्ल्यू संच आणि एकात्मिक प्रगत लढाऊ व्यवस्थापन प्रणालीने सुसज्ज आहे.आपल्या पूर्वसुरी आयएनएस अर्नाळा आणि आंद्रोथ नंतर, आयएनएस अंजदीपचे भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणे, भारतीय नौदलाच्या, आपल्या दर्जात सुधारणा करणे, आणि क्षमता वाढवण्याच्या नियोजित मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे भारताच्या सागरी व्यापार मार्गांची आणि किनारी भागातील पायाभूत सुविधांची सुरक्षा सुनिश्चित होईल. देशाच्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी हे जहाज तामिळनाडू आणि पुद्दुचेरी नौदल क्षेत्राच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंगच्या परिचालन आणि प्रशासकीय नियंत्रणाखाली सोपवण्यात आले आहे.
शिक्षण संस्थांच्या सुरक्षिततेसाठी 'नोडल अधिकारी' नेमणारमुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या भेडसावणाऱ्या भटक्या श्वानांच्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि शिक्षण संस्थांच्या आवारातील सुरक्षितता वाढवण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान आमदार मनिषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर चर्चा करताना, भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी भटक्या श्वानांचा उपद्रव आणि नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला.प्रवीण दरेकर यांनी सभागृहात सांगितले की, मुंबईसारख्या महानगरात वाहतुकीनंतर नागरिक सर्वात जास्त त्रस्त असतील तर ते भटक्या श्वानांच्या उपद्रवामुळे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) शैक्षणिक संस्थांच्या परिसरात स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी स्वतंत्र 'नोडल अधिकारी' नेमण्याचे परिपत्रक काढले होते. मात्र, अद्याप अशा नियुक्त्या झालेल्या नाहीत. या समस्येवर उपाय म्हणून दरेकर यांनी एक अभिनव सुचविली. राज्यातील ३ ते साडेतीन हजार बेरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून या कामांचे नियोजन केल्यास, भटक्या श्वानांचा प्रश्न सुटेल आणि त्याचवेळी सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींच्या हाताला काम मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दरेकर यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवली. शिक्षण संस्थांमध्ये तातडीने नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देश दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, शाळांच्या परिसरात कचरा साठणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले. भटक्या श्वानांचा प्रश्न केवळ मुंबईचा नसून संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मर्यादा पाळून कोणत्या अतिरिक्त उपाययोजना करता येतील, यासाठी लवकरच एक विशेष बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिले. सरकारच्या या भूमिकेमुळे शैक्षणिक संस्थांची सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य या दोन्ही आघाड्यांवर सकारात्मक बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Jammu Kashmir Champion : १९५९-६० मध्ये प्रथमच या स्पर्धेत उतरलेल्या जम्मू-काश्मीरला तब्बल ६७ वर्षांनंतर हे जेतेपद मिळवण्यात यश आले आहे. या विजयात औकिब नबीचे योगदान मोलाचे ठरले.
Prime Minister of Nepal : नेपाळच्या पंतप्रधानपदासाठी ‘या’ 3 नेत्यांमध्ये चुरस
गेल्या वर्षी जनआंदोलनाच्या (Prime Minister of Nepal) दबावामुळे के.पी. शर्मा ओली सरकार पायउतारझाल्यापासून पहिल्यांदाच होत असलेल्या निवडणुकीत बलेंद्र शाह उर्फ बालेन, गगन थापा आणि माजी पंतप्रधान खांदगा प्रसाद ओली उर्फ के.पी. शर्मा ओली हे तिघे पंतप्रधानपदासाठीचे दावेदार असणार आहेत.
धावपट्टीवर मृत्यूचे तांडव ! विमानतळाबाहेर विमान थेट वाहनांवर आदळले; १५ जणांचा मृत्यू
Plane Crash : बोलिव्हियामध्ये लष्करी विमान हरक्यूलिस C-130 लँडिंगदरम्यान धावपट्टीवरून घसरून रस्त्यावर कोसळले.
Mumbai Traffic AI Management System : आता मुंबईच्या ट्राफिक मॅनेजमेंटसाठी होणार AI ची मदत
- मुंबई उपनर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांची माहितीमुंबई : एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईच्या ट्राफिक मॅनेजमेंटचा प्लॅन तयार करण्यात येत आहे. तसेच याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा मुंबई उपनर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली.विधानसभेत आज (२८ फेब्रुवारी) आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरी येथे होणाऱ्या वाहतुक कोंडीकडे सरकारचे लक्ष वेधले. तर दुसरीकडे आमदार अस्लम शेख यांनी मुंबईतील अनेक रस्त्यांवर प्रवेश नसलेल्या मार्गावर उलट दिशेने गाड्या चालवल्या जात असल्यामुळे होणारे अपघात आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याबद्दल तक्रार केली. तसेच आमदार वरुण सरदेसाई यांनी वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रातील बिकेसी, कला नगर, कुर्ला ते सांताक्रुझ जोड मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्ग या परिसरात होत असलेल्या वाहतुक कोंडीकडे सभागृहाचे लक्ष वेधले तर आमदार दिलीप लांडे यांनी चांदिवली परिसरातील वाहतुक कोंडीचा मुद्दा मांडला.यावर उत्तर देताना मुंबई उपनर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगीतले की, याबाबत नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असून, वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्तांना याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईचा वाहतूक नियोजन आराखडा मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार तयार करण्यात येत असल्याचे सांगितले.तसेच मुंबईतील रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या भंगार गाडयांचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार असून मुंबई महापालिका याबाबत कार्यवाही करीत आहे, तसेच मुंबईतील आमदारांनी ज्या सूचना केल्या आहेत त्याचा विचार करुन याबबात लवकरच बैठकही घेण्यात येईल, असे मंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगितले.
- मुंबई-पुणे महामार्गावरील टँकर दुर्घटनेनंतर विशेष खरबदारीमुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या टँकर दुर्घटनेनंतर प्रवाशांना तब्बल ३६ तासांहून अधिक काळ वाहतूक कोडींचा सामना करावा लागला. यामुळे वाहतूक व्यवस्थापन प्रणालीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. या पार्श्वभूमीवर महामार्गांवरील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी वाहतूक कंपन्यांना मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (२८ फेब्रुवारी) विधानसभेत दिली. घातक आणि ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करताना अपघात झाल्यास काय उपाययोजना कराव्यात, याबाबत स्पष्ट कार्यपद्धती नसल्याची कबुली देत संबंधित कंपन्यांना आवश्यक साधनसामग्री व प्रक्रिया निश्चित करण्याचे निर्देशही दिल्याचे त्यांनी सांगितले.या संदर्भातील लक्षवेधी सूचना आमदार अमित साटम यांनी विधानसभेत मांडली. ३ फेब्रुवारी रोजी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रोपोलिनचा टँकर उलटल्याने वायूगळती होऊन परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आली होती. घातक व ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करताना तपासणीची व्यवस्था आहे का, ती कार्यान्वित होती का आणि अशा वाहतुकीसाठी स्वतंत्र नियमावली आहे का, असे प्रश्न साटम यांनी उपस्थित केले.यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर देताना संबंधित टँकरने आवश्यक परवाना घेतला होता व त्याची नियमित तपासणीही होत असल्याचे स्पष्ट केले. वाहनचालकाचा तोल गेल्याने टँकर पलटी झाला, मात्र अधिकाऱ्यांनी व वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी उपाययोजना करून ज्वलनशील पदार्थ सुरक्षितपणे हलविल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या घटनेदरम्यान निर्माण झालेल्या ३६ तासांच्या वाहतूक कोंडीच्या काळात वसूल केलेला टोल परत करण्याचा निर्णय एमएसआरडीसीमार्फत घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. काही देशांमध्ये अशा परिस्थितीत टँकर एअर लिफ्ट करण्याची पद्धत असून, त्या दृष्टीनेही एमएसआरडीसीमार्फत चाचपणी केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तरात सांगितले की, अशा प्रकारची वाहतूक करणाऱ्या केंद्रीय कंपन्यांकडेही आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक साधनसामग्री उपलब्ध नव्हती. त्यामुळे या घटनेतून धडा घेत संबंधित कंपन्यांना रेस्क्यू साधने उपलब्ध ठेवणे आणि अपघात झाल्यास पुढील कार्यपद्धती निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बहुतांश कंपन्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने त्यांच्याकडेही स्पष्ट एसओपी नव्हती, हे या घटनेतून समोर आले असल्याचे त्यांनी नमूद केले.सूर्यास्तानंतर हेलिकॉप्टर वापरण्यावर मर्यादा :- या चर्चेत जयंत पाटील यांनी मोठ्या वाहतूक कोंडीच्या प्रसंगी पोलिस व आपत्कालीन यंत्रणांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी विशेष हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याची मागणी केली. तसेच प्रवाशांना वेळोवेळी माहिती देण्यासाठी साइनबोर्ड प्रणाली अधिक सक्षम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध असली तरी देशात सूर्यास्तानंतर हेलिकॉप्टर वापरण्यावर मर्यादा आहेत, ही मोठी अडचण आहे.- दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) बसविण्यात आली असून तिच्या माध्यमातून वाहतूक विभागणी, थांबविणे व वळविणे शक्य आहे. संबंधित घटनेवेळीही ही प्रणाली वापरण्यात आली; मात्र ती अधिक वेगाने कार्यान्वित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात आयटीएमएसच्या साहाय्याने प्रत्येक व्यक्तीपर्यंत तातडीची माहिती पोहोचेल, अशी सुविधा विकसित करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Pune FDA Raid : पुण्यात बनावट अलब्युरेल औषधाचा मोठा भांडाफोड; अनेक वितरक-पुरवठादारांवर गुन्हा
Pune FDA Raid : पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने बनावट 'अलब्युरेल' औषधाचा मोठा साठा जप्त केला आहे.
Pune News : पुण्यातील मांजरी येथे खाद्यतेल व्यावसायिकाकडून १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी न्यूज चॅनेलच्या संपादकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Budget Session : मुंबईसह महानगरात नामांकीत रुग्णालयांकडून 'आयुष्यमान भारत'चा लाभ देण्यास नकार
- विधानसभेत सर्वपक्षीय आमदार आक्रमक; महिनाभरात तोडगा काढण्याचे मंत्र्यांचे आश्वासनमुंबई : मुंबईसह महानगरातील नामांकीत रुग्णालयांकडून आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्यास नकार दिला जात असून, गरीब रुग्णांची हेळसांड होत आहे. परिणामी 'एमएमआर' प्रदेशात या योजनेचा काहीही उपयोग होत नसल्याचा आरोप करीत शनिवारी (२८ फेब्रुवारी) विधानसभेत सर्वपक्षीय आमदार आक्रमक झाले.पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार शंकर जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील आयुष्यमान भारत योजनेंतर्गत रुग्णालये उपचार नाकारत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. अतुल भातखळकर, संजय केळकर, मनिषा चौधरी, वरुण सरदेसाई, हेमंत ओगले आदी आमदारांनी याच उपप्रश्न उपस्थित केले. मुंबई आणि एमएमआर रिजनमधील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आयुष्यमान भारत योजनेतील रुग्णांवर उपचार करण्यास नकार देतात. या योजनेमधील रुग्णांना तेथे प्रवेशही दिला जात नाही. त्यामुळे या योजनेचा मुंबई एमएमआर रिजनमध्ये काहीही उपयोग होत नाही, असा आरोप आमदार अतुल भातखळकर आणि वरूण सरदेसाई यांनी केला. त्यावर आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी साचेबद्ध उत्तर दिल्यामुळे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करीत, यात सरकारला नेमकी अडचण काय आहे, असा सवाल केला.दरपत्रक जाहीर करण्याची मुख्य मागणी आहे. मंत्री मुळ प्रश्नाला बगल देत असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला. आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या प्रचार प्रसारावर राज्य सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. मात्र मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये या योजनेचा फायदा रुग्णांना होत नाही. अनेक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल या योजनेंतर्गत समावेशाला नकार देतात. यामुळे रुग्णांना चांगल्या रुग्णालयांमध्ये उपचार मिळत नाही. तसेच या योजनेंतर्गत नोंदणी झालेल्या रुग्णालयांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीच आहे. त्यामुळे आहे त्या सरकारी उपचारांच्या दरावर अधिक रुग्णालयाची नोंदणी करणार का? आणि मुंबई एमएमआर रिजनमध्ये वेगळे दरपत्रक लागू केले जाईल का, असे प्रश्न भातखळकर यांनी उपस्थित केले.दरपत्रक बदलल्याशिवाय पर्याय नाही - संजय केळकरआमदार संजय केळकर म्हणाले, आम्ही मोठ्या प्रमाणात कॅम्प घेऊन आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड दिले. मात्र कार्ड घेऊन गेलेल्या रुग्णांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार मिळत नाही. त्यामुळे आता आम्ही कार्ड देणेच बंद केले आहे. नोंदणी असलेल्या हॉस्पिटलमध्येही अशा कार्डधारक रुग्णांना उभे देखील केले जात नाही. त्यामुळे एमएमआर रिजनमध्ये दरपत्रक बदलल्याशिवाय चांगले हॉस्पिटल या योजनेत समाविष्ट होणार नाही. दरपत्रक बदलण्याबद्दल सरकार काय विचार करत आहे, असा सवाल केळकर यांनी उपस्थित केला. सत्ताधारी आमदारांनी घरचा आहेर दिल्यानंतर आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डिकर यांनी एमएमआर रिजनमधील नामांकित हॉस्पिटलचा योजनेमध्ये समावेश करण्यासाठी या महिन्याच्या आत बैठक घेऊ, असे आश्वासन सभागृहाला दिले.
Sunil Tatkare : रोहित पवारांच्या टीकेला तटकरेंचं प्रत्युत्तर; 2019 ची जुनी घटना सांगत म्हणाले…
Sunil Tatkare : सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
Donald Trump : अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढत असतानाच शनिवारी इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमध्ये हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या संरक्षणमंत्र्यांनी देशभरात आणीबाणी जाहीर केली. इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनी यांच्या कार्यालयाजवळ हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यानंतर इराणने आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले आहे. या कारवाईमुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला असून युद्धाचे सावट […]
Skin Care Tips तज्ज्ञांच्या मते, कोपर आणि गुडघ्यांवर सतत घर्षण होत राहते. तसेच या भागांमध्ये तेलग्रंथी कमी असल्याने त्वचा लवकर कोरडी पडते. कालांतराने मृत त्वचेच्या पेशी साचतात आणि त्वचा काळसर दिसू लागते. वैद्यकीय भाषेत याला ‘हायपरपिग्मेंटेशन’ असे म्हटले जाते. मेलानिनचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचेचा रंग गडद होतो.
Chembur Accident : चेंबूरमध्ये भीषण अपघात; बांधकामाच्या ८व्या मजल्यावरून ६ कामगार खाली पडले
मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष नगर भागात सुरू असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीवर काम करताना आठव्या मजल्यावरून सहा कामगार खाली कोसळल्याची दुर्घटना शनिवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.सहाही कामगार गंभीर जखमी :प्राथमिक माहितीनुसार, संबंधित इमारतीचे बांधकाम सुरू असताना हे कामगार ८व्या मजल्यावर काम करत होते. अचानक तोल गेल्याने ते खाली पडले. या अपघातात सहाही कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.नियमांचे उल्लंघन केल्याने घडला अपघात :माहितीनुसार, अपघाताच्या वेळी कामगारांनी आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर केलेला नव्हता. उंच इमारतींवर काम करताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट आणि इतर सुरक्षात्मक उपकरणे वापरणे बंधनकारक असते. मात्र या ठिकाणी नियमांचे पालन झाले नसल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. योग्य सुरक्षा साधने वापरली असती तर हा अपघात टाळता आला असता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.तत्काळ मदतकार्य सुरू :अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
Vijay Rashmika : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रश्मिका-विजयने दिली 'गुड न्यूज'; चाहत्यांना सुखद धक्का!
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. राजस्थानमधील उदयपूर येथे अत्यंत राजेशाही थाटात आणि पारंपरिक पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या लग्नातील फोटोंनी एकच धुमाकूळ घातला असून, या जोडीचा पारंपरिक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. लग्नाची ही धामधूम सुरू असतानाच, या नवविवाहित जोडप्याने आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का (सरप्राईज) दिला आहे. लग्नाचे विधी संपल्यानंतर ही जोडी कोणती नवीन बातमी देणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. अनेकांना वाटले ही बातमी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असेल, परंतु हे सरप्राईज त्यांच्या प्रोफेशनल लाइफबद्दल आहे. खऱ्या आयुष्यात 'मिस्टर अँड मिसेस' झाल्यानंतर, ही लाडकी जोडी आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. त्यांच्या या आगामी प्रोजेक्टमुळे चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाहीये. विजय आणि रश्मिकाच्या आगामी 'राणाबली' या चित्रपटाचे पोस्टर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अधिकृतपणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये दोघांचाही लूक अतिशय लक्षवेधी असून, लग्नाच्या मुहूर्तावरच ही घोषणा केल्यामुळे चित्रपटाची चर्चा आता शिगेला पोहोचली आहे. केवळ पोस्टरच नाही, तर आज चाहत्यांसाठी अजून एक विशेष सरप्राईज समोर येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.https://prahaar.in/2026/02/28/israel-iran-conflict-escalates-missile-strike-on-tehran-emergency-declared/'राणाबली' आणि 'जयम्मा'ची केमिस्ट्री चर्चेत
क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत
क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळाने नोटीस बजावली आहे. ही नोटीस रांची येथील त्याच्या निवासी भूखंडाच्या व्यावसायिक वापराबद्दल असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या नोटीसनुसार, धोनीला निवासी उद्देशांसाठी वाटप केलेल्या मालमत्तेतून पॅथॉलॉजी लॅब चालवली जात असल्याचा आरोप आहे.नेमकं प्रकरण काय ?झारखंड स्टेट हाऊसिंग बोर्डाने धोनीला एक अधिकृत नोटीस बजावली असून, ही नोटीस रांचीमधील हरमू परिसरातील एका निवासी प्लॉटशी संबंधित आहे. H-10A क्रमांकाच्या या प्लॉटबाबत बोर्डाने गंभीर आक्षेप नोंदवले असून, नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा केला आहे. हाऊसिंग बोर्डाच्या आरोपांनुसार, संबंधित प्लॉट केवळ राहण्याच्या उद्देशाने देण्यात आला होता.धोनीने पॅथॉलॉजी लॅब चालवली?मात्र, सध्या त्या ठिकाणी कथितरीत्या एक पॅथॉलॉजी लॅब चालवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. निवासी क्षेत्रात व्यावसायिक उपक्रम राबवणे हे वाटप नियमांच्या अटींचे थेट उल्लंघन असल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे. या प्रकरणी धोनीकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले असून प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.नियमांचे उल्लंघन कोणासाठीही खपवून घेतले जाणार नाही :बोर्डाने आपल्या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे की, जर १५ दिवसांच्या आत धोनीकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर या प्लॉटचे वाटप रद्द करण्याची शिफारस केली जाऊ शकते. हाऊसिंग बोर्ड सध्या अशा सर्व प्रकरणांची चौकशी करत आहे, जिथे निवासी जागांचा वापर कमर्शियल कामांसाठी केला जात आहे. नियमांचे उल्लंघन कोणासाठीही खपवून घेतले जाणार नाही, असा थेट इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
Sanjay Raut : केजरीवाल यांच्या सुटकेनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया; केली ‘ही’मोठी मागणी
Sanjay Raut : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत मोठी मागणी केली आहे.
जगाला हादरवून सोडणारी एक अत्यंत मोठी लष्करी कारवाई समोर आली आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील प्रदीर्घ संघर्षाची ठिणगी पुन्हा एकदा पडली असून, इस्रायलने थेट इराणची राजधानी तेहरानवर महाभयंकर मिसाईल हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे इराणमध्ये प्रचंड घबराट पसरली असून राजधानीत एकापाठोपाठ एक झालेल्या स्फोटांनी परिसर हादरून गेला आहे. या हल्ल्याची तीव्रता इतकी मोठी आहे की, यामुळे मध्यपूर्वेतील युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत. या हल्ल्यानंतर इस्रायलने कोणत्याही संभाव्य प्रतिहल्ल्याचा सामना करण्यासाठी आपल्या देशात 'राष्ट्रीय आणीबाणी' घोषित केली आहे. इस्रायलमधील प्रत्येक शहरात, गल्लीत आणि मुख्य रस्त्यांवर धोक्याचे सायरन वाजवले जात आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी किंवा बंकरमध्ये आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व घडामोडींवरून इस्रायल आता पूर्णपणे युद्धाच्या भूमिकेत (War Mode) असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. इस्रायलच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता इराण काय पाऊल उचलणार, याकडे संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत. इराणने जर या हल्ल्याचा लष्करी भाषेत बदला घेतला, तर याचे रूपांतर तिसऱ्या महायुद्धात होईल की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.https://prahaar.in/2026/02/28/big-change-from-march-1-railway-ticket-booking-upi-payment-lpg-cylinder-price-what-will-change/इस्रायलमध्ये आणीबाणी लागूइराणच्या संभाव्य हल्ल्याचा धोका ओळखून इस्रायलने केलेल्या 'प्रीएम्पिटिव्ह स्ट्राईक' (प्रतिबंधात्मक हल्ला) नंतर संपूर्ण पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्याला इराणकडून 'जशास तसे' उत्तर मिळण्याची दाट शक्यता असल्याने इस्रायल सरकारने संपूर्ण देशात तातडीने आणीबाणी (Emergency) लागू केली आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने (IDF) दिलेल्या माहितीनुसार, शत्रूचा प्रतिहल्ला कोणत्याही क्षणी होऊ शकतो, या भीतीने संपूर्ण देश सध्या 'हायअलर्ट'वर आहे. इस्रायलमधील परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर असून, देशभरातील शहरे आणि गल्ल्यांमध्ये धोक्याचे सायरन सतत वाजत आहेत. नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, प्रत्येकाच्या मोबाईलवर सतर्क राहण्याचे आणि तात्काळ सुरक्षित स्थळी किंवा 'बॉम्ब शेल्टर'मध्ये जाण्याचे संदेश धडाधड पाठवले जात आहेत. नागरिकांमध्ये घबराट असली तरी प्रशासनाकडून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. लष्करी सुरक्षेचा उपाय म्हणून इस्रायलने आपले हवाई क्षेत्र (Airspace) सर्व प्रकारच्या नागरी उड्डाणांसाठी पूर्णपणे बंद केले आहे. याचा अर्थ असा की, आता इस्रायलमधून कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही आणि बाहेरून येणाऱ्या विमानांनाही तिथे उतरण्याची परवानगी नसेल.अलर्ट राहा...नागरिकांना 'प्रोएक्टिव्ह' सतर्कतेचा इशाराइस्रायलच्या संरक्षण दलाने (IDF) आपल्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा 'प्रोएक्टिव्ह अलर्ट' जारी केला आहे. हा केवळ इशारा नसून कोणत्याही संभाव्य संकटाला सामोरे जाण्यासाठी केलेली पूर्वतयारी आहे. इराणकडून कोणत्याही क्षणी भीषण मिसाईल किंवा ड्रोन हल्ला होऊ शकतो, अशी दाट शक्यता आयडीएफने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी किंवा 'बंकर'मध्ये आश्रय घ्यावा, अशा सूचना मोबाईल मेसेजद्वारे धडाधड पाठवल्या जात आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्ज यांनी संपूर्ण देशात राष्ट्रीय स्तरावर आणीबाणी घोषित केली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात युद्धाचे सावट पसरले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ,इस्रायलने सुरक्षेचा कडक उपाय म्हणून आपले हवाई क्षेत्र (Airspace) पूर्णपणे सील केले आहे. इतकेच नाही तर, इस्रायलच्या हवाई हद्दीत किंवा सीमाभागात कोणत्याही परिस्थितीत प्रवेश करू नका, असे कडक आवाहन जगातील सर्व आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना (Airlines) करण्यात आले आहे. इस्रायलमधून होणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली असून, देश आता बाह्य जगापासून हवाई मार्गाने तुटला आहे. ही संपूर्ण तटबंदी केवळ इराणच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्यासाठी करण्यात आली आहे.शाळा-कॉलेजांना सुट्टी, वर्क फ्रॉम होमचे आदेशखबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील सर्व शाळा आणि महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहेत. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या सर्व कार्यक्रमांवर कडक बंदी घालण्यात आली असून, नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इतकेच नाही तर, खासगी आणि सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' (घरातून काम) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची हालचाल मर्यादित राहील. दुसरीकडे, इराणची राजधानी तेहरान इस्रायलच्या भीषण हल्ल्याने हादरून गेली आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, तेहरानमधील अत्यंत गजबजलेल्या 'यूनिव्हर्सिटी स्ट्रीट' (University Street) आणि 'जोमहुरी' (Jomhouri) परिसरात मिसाईलचा थेट मारा करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले असून इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य केल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवले जात आहेत. इराणच्या अधिकृत सरकारी प्रसारमाध्यमांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून, तेहरानमध्ये किमान तीन प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे स्पष्ट केले आहे. हे स्फोट नेमके कुठे झाले आणि त्यात किती प्रमाणात जीवित किंवा वित्तहानी झाली आहे, याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. मात्र, या हल्ल्यामुळे इराणच्या संरक्षण यंत्रणेत मोठी खळबळ उडाली असून, आता इराण यावर काय प्रत्युत्तर देतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
अमेरिकेचा तेहरानवर हवाई हल्ला; सर्व उड्डाणे तात्काळ रद्द
तेहरान : मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना इराणची राजधानी तेहरान येथे हवाई हल्ले झाल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहे. व्हायरल होणारे व्हिडिओ आणि स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार शहरातील काही भागांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि मध्यवर्ती परिसरात धुराचे लोट दिसून आले.ही कारवाई इस्त्रायल कडून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेसोबत वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा घटनाक्रम घडल्याचे सांगितले जात आहे. काही क्षेपणास्त्रे विद्यापीठ परिसरासह इतर भागांमध्ये पडल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिकृत पातळीवर संपूर्ण तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.इस्रायलमध्ये आणीबाणीचा इशारासंभाव्य प्रत्युत्तराच्या धोक्यामुळे इस्रायलमध्ये खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. इस्रायली संरक्षण दलाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे, स्वतःचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती तणावपूर्ण असल्याने तेल अवीव येथील सर्व व्यावसायिक उड्डाणे तात्पुरती रद्द करण्यात आली आहेत.हवाई क्षेत्र तात्पुरते बंदइस्रायलच्या वाहतूक मंत्रालयाकडून सुरक्षेच्या कारणास्तव नागरी विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. सुरक्षा स्थितीचा आढावा घेतल्यानंतरच हवाई क्षेत्र पुन्हा खुले करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. उड्डाणे सुरू करण्यापूर्वी किमान २४ तास आधी सूचना दिली जाईल, असेही सांगण्यात आले.दरम्यान, अमेरिकेतील परदेशी दूतावासांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी राहण्याचे निर्देश दिले आहेत. परिस्थितीचा वेगाने बदलणारा स्वरूप लक्षात घेता आंतरराष्ट्रीय पातळीवरही या घडामोडींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.
Accident News : अवघ्या आठ दिवसांपूर्वी कात्रज डेअरीसमोर झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका चिमुरड्याचा बळी गेला.
Prajakta Gaikwad : लग्नानंतर प्राजक्ता गायकवाडने हेअर स्टाइल बदलली आहे. यावरूनच नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
Prajakta Mali : “बाय बाय…”; प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत, व्हिडिओ शेअर केला अन्…
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने १५ दिवस ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिने याबद्दल इंन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चाहत्यांना कळवले आहे.
Baby Massage: दररोज मालिश केल्याने बाळाची हाडे मजबूत होतात का? तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितली खरी गोष्ट
Baby Massage डॉक्टर सांगतात की मालिश करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे बाळासोबत जिव्हाळ्याचे नाते तयार करणे. मालिश करताना आई-वडिलांचा स्पर्श, डोळ्यांचा संपर्क आणि संवाद यामुळे बाळाशी भावनिक बंध अधिक मजबूत होतात.
मार्चच्या 'या'तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा
मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन मंडळाने बदल केले आहेत. प्रवाशांच्या गरजेनुसार बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक उपक्रमाने बससेवेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी प्रवासी असलेल्या थांब्यांवरील सेवा कमी करून गर्दीच्या मार्गांवर बसच्या फेऱ्या वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय काही मार्गांवर वातानुकूलित बससेवा सुरु करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबई आणि उपनगरांतील काही मार्ग व थांब्यांमध्ये फेरबदल करण्यात आले असून हे बदल १ मार्चपासून लागू होणार आहेत.मार्गांमध्ये करण्यात आलेले बदल पुढीलप्रमाणे आहेत :ए ६ बस आता बॅकबे आगाराऐवजी कुलाबा आगारापर्यंत धावेल.ए २२ मार्ग विजय वल्लभचौकऐवजी जिजामाता उद्यान ते मजास आगारदरम्यान चालवला जाईल.मार्ग ६९ वडाळा आगाराऐवजी शिवडीतील प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथे संपेल.ए ५१५ सेवा सिप्झ गावाऐवजी सिप्झ बस स्थानकापर्यंत मर्यादित राहील.ए १ मार्गातही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सांताक्रुझ डेपोदरम्यान धावणारी ही बस वांद्रे रिक्लेमेशन आणि वांद्रे पश्चिम बस स्थानकाचा वळसा टाळून माहीम कोळीवाडा ते वांद्रे टॉकीजदरम्यान स्वामी विवेकानंद रोडमार्गे थेट धावेल. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्याची शक्यता आहे.ए १०१ मार्गाचा विस्तारही करण्यात आला आहे.सध्या सीएसएमटी ते वर्ल्ड ट्रेड सेंटरदरम्यान धावणारी ही बस आता महात्मा फुले मंडईपर्यंत जाईल. परतीचा मार्ग डॉ. डी. एन. रोड आणि हुतात्मा चौकातून असेल. यामुळे दक्षिण मुंबईतील प्रवाशांना अधिक सोय होणार आहे.याशिवाय काही मार्गांवर वातानुकूलित बससेवा सुरू केली जाणार आहे.ए २०३ (आरसी चर्च – कमला नेहरू उद्यान),ए ३२४ (शास्त्री नगर – चांदिवली बस स्थानक),ए ३२६ (अंधेरी स्थानक पश्चिम – मिल्लतनगर),ए ३४६ (अंधेरी स्थानक पश्चिम – रमेश नगर),ए ३५४ (अंधेरी स्थानक पश्चिम – वीरा देसाई मार्ग विस्तारित),ए ३८१ (माहुल गाव – कुलाबा बस स्थानक)ए ४१२ (माजगाव आगार – मुंब्रा फाटा, ठाणे) या मार्गांवर एसी बस उपलब्ध होणार आहेत.प्रशासनाने कोणताही मार्ग पूर्णपणे बंद केलेला नसून प्रवासीसंख्येनुसार फेरबदल केले असल्याचे स्पष्ट केले आहे. नव्या व्यवस्थेमुळे सेवा अधिक कार्यक्षम आणि जलद होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
Rajya Sabha Election 2026 : राज्यसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाने चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
Rajya Sabha Election 2026 : राज्यसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाने चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
Breaking News: इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला; एकामागून एक स्फोट झाल्याने सायरन वाजण्यास सुरुवात
Israel Strikes on Iran : इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचे हवाई क्षेत्र पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे.
Balochistan Conflict: बलुचिस्तानमध्ये रक्तरंजित संघर्ष; ४० तासांच्या चकमकीत २०० जणांचा मृत्यू
Balochistan Conflict हा संघर्ष बलुचिस्तानमधील विविध जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी झालेल्या हल्ल्यांनंतर सुरू झाला. क्वेटा, ग्वादर, मुस्तुंग आणि नोशकी यांसारख्या भागांत दहशतवादी कारवाया करण्यात आल्या. या हल्ल्यांची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) या संघटनेने स्वीकारली आहे.
१ मार्चपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा
मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन मंडळाने बदल केले आहेत. प्रवाशांच्या गरजेनुसार बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक उपक्रमाने बससेवेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी प्रवासी असलेल्या थांब्यांवरील सेवा कमी करून गर्दीच्या मार्गांवर बसच्या फेऱ्या वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय काही मार्गांवर वातानुकूलित बससेवा सुरु करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबई आणि उपनगरांतील काही मार्ग व थांब्यांमध्ये फेरबदल करण्यात आले असून हे बदल १ मार्चपासून लागू होणार आहेत.मार्गांमध्ये करण्यात आलेले बदल पुढीलप्रमाणे आहेत :ए 6 बस आता बॅकबे आगाराऐवजी कुलाबा आगारापर्यंत धावेल.ए 22 मार्ग विजय वल्लभचौकऐवजी जिजामाता उद्यान ते मजास आगारदरम्यान चालवला जाईल.मार्ग 69 वडाळा आगाराऐवजी शिवडीतील प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथे संपेल.ए 515 सेवा सिप्झ गावाऐवजी सिप्झ बस स्थानकापर्यंत मर्यादित राहील.ए 1 मार्गातही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सांताक्रुझ डेपोदरम्यान धावणारी ही बस वांद्रे रिक्लेमेशन आणि वांद्रे पश्चिम बस स्थानकाचा वळसा टाळून माहीम कोळीवाडा ते वांद्रे टॉकीजदरम्यान स्वामी विवेकानंद रोडमार्गे थेट धावेल. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्याची शक्यता आहे.ए 101 मार्गाचा विस्तारही करण्यात आला आहे. सध्या सीएसएमटी ते वर्ल्ड ट्रेड सेंटरदरम्यान धावणारी ही बस आता महात्मा फुले मंडईपर्यंत जाईल. परतीचा मार्ग डॉ. डी. एन. रोड आणि हुतात्मा चौकातून असेल. यामुळे दक्षिण मुंबईतील प्रवाशांना अधिक सोय होणार आहे. याशिवाय काही मार्गांवर वातानुकूलित बससेवा सुरू केली जाणार आहेए 203 (आरसी चर्च – कमला नेहरू उद्यान),ए 324 (शास्त्री नगर – चांदिवली बस स्थानक),ए 326 (अंधेरी स्थानक पश्चिम – मिल्लतनगर),ए 346 (अंधेरी स्थानक पश्चिम – रमेश नगर),ए 354 (अंधेरी स्थानक पश्चिम – वीरा देसाई मार्ग विस्तारित),ए 381 (माहुल गाव – कुलाबा बस स्थानक)ए 412 (माजगाव आगार – मुंब्रा फाटा, ठाणे) या मार्गांवर एसी बस उपलब्ध होणार आहेत.प्रशासनाने कोणताही मार्ग पूर्णपणे बंद केलेला नसून प्रवासीसंख्येनुसार फेरबदल केले असल्याचे स्पष्ट केले आहे. नव्या व्यवस्थेमुळे सेवा अधिक कार्यक्षम आणि जलद होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
Holi Special Recipe होळीच्या निमित्ताने मखमलीसारखे नरम आणि चविष्ट दहीवडे कसे बनवायचे, याची सोपी रेसिपी आणि काही खास टिप्स जाणून घेऊया.
Aishwarya Desai : बहुप्रतिक्षित स्पिरिट चित्रपटात अभिनेत्री ऐश्वर्या देसाईची एन्ट्री झाली असून अभिनेत्रीचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
या होळीला घरीच बनवा रंग-गुलाल:घटक आणि बनवण्याची पद्धत जाणून घ्या, होळी खेळण्यापूर्वी पॅच टेस्ट करा
होळीचा सण जवळ आला आहे. या निमित्ताने लोक रंग-गुलाल खेळतात. मात्र, बाजारात मिळणारे सिंथेटिक रंग त्वचा आणि आरोग्य, दोन्हीसाठी हानिकारक असतात. ‘इंडियन जर्नल ऑफ क्लिनिकल बायोकेमिस्ट्री’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, बाजारात मिळणाऱ्या सिंथेटिक रंगांमध्ये हानिकारक रसायने मिसळली जातात. यामुळे त्वचेवर पुरळ, डोळ्यांची जळजळ, ॲलर्जी आणि श्वसनासंबंधी समस्या उद्भवू शकतात. लहान मुलांवर याचा परिणाम अधिक गंभीर असू शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता होळीचा आनंद घ्यायचा असेल, तर नैसर्गिक रंग-गुलाल एक चांगला पर्याय आहे. हे घरीही सहज बनवता येतात. म्हणून आज 'कामाची बातमी' मध्ये आम्ही घरी रंग-गुलाल बनवण्याच्या टिप्स सांगणार आहोत. तसेच जाणून घेऊया की- तज्ज्ञ: डॉ. संदीप अरोरा, वरिष्ठ सल्लागार, त्वचाविज्ञान, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, दिल्ली डॉ. पद्मा सिंग, निवृत्त व्याख्याता, रसायनशास्त्र, प्रयागराज प्रश्न- बाजारात मिळणाऱ्या रंगांमध्ये कोणती रसायने असतात? त्यांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो? उत्तर- बाजारात मिळणाऱ्या स्वस्त आणि सिंथेटिक रंगांमध्ये अनेक रसायने असू शकतात. जसे की- हे रंग अनेक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. जसे की- मुले आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांमध्ये रासायनिक रंगांचा प्रभाव अधिक गंभीर असू शकतो. प्रश्न- घरी ऑरगॅनिक रंग-गुलाल कसे बनवाल? उत्तर- घरी ऑरगॅनिक रंग-गुलाल बनवणे सोपे आहे. यासाठी काही सोप्या पद्धती खालीलप्रमाणे आहेत- केशरी: संत्र्याच्या साली वाळवून बारीक वाटून घ्या. यात थोडे कॉर्न फ्लोअर आणि थोडी हळद मिसळा. मिश्रण चाळणीने चाळून घ्या. तुमचा सुगंधी केशरी गुलाल तयार आहे. हिरवा: पालक, कोथिंबीर किंवा पुदिन्याची पाने वाटून त्याचा रस काढा. यात गुलाबजल मिसळा. सुख्या गुलालासाठी हे मिश्रण कॉर्न फ्लोअरमध्ये मिसळून उन्हात वाळवा आणि नंतर चाळून घ्या. गुलाबी: बीटचा रस घ्या. यात गुलाबजल आणि गरजेनुसार कॉर्न फ्लोअर मिसळा. चांगले मिसळून उन्हात वाळवा आणि बारीक वाटून चाळून घ्या. लाल: जास्वंदीची फुले किंवा गुलाबाच्या पाकळ्या भिजवून वाटून घ्या. त्यात कॉर्न फ्लोअर मिसळून वाळवा आणि बारीक पावडर तयार करा. पिवळा: थोडी हळद गरम पाण्यात उकळा. थंड झाल्यावर त्यात कॉर्न फ्लोअर आणि गुलाबजल मिसळा. ते वाळवून वाटून घ्या. हवे असल्यास हळद आणि बेसन एकत्र करूनही पिवळा गुलाल बनवू शकता. खाली दिलेल्या ग्राफिकमधून घरी सेंद्रिय रंग-गुलाल बनवण्याचे सोपे मार्ग समजून घ्या- प्रश्न- घरी सेंद्रिय रंग बनवायला किती वेळ लागतो? उत्तर- जर तुम्ही ओला (लिक्विड) रंग बनवत असाल तर तो 10-15 मिनिटांत तयार होतो. गुलाल बनवण्यासाठी उन्हात वाळवण्याच्या प्रक्रियेमुळे 2 ते 3 दिवसांचा वेळ लागू शकतो. प्रश्न- ऑरगॅनिक रंग-गुलाल वापरण्याचे काय फायदे आहेत? उत्तर- ऑरगॅनिक रंग फक्त त्वचेसाठी सुरक्षित नसतात, तर पर्यावरणासाठीही अनुकूल असतात. खाली दिलेल्या ग्राफिकमधून त्याचे सर्व फायदे जाणून घ्या- प्रश्न- घरी रंग बनवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? उत्तर- घरी रंग बनवणे हा सुरक्षित पर्याय आहे. पण काही खबरदारी घेणे खूप महत्त्वाचे आहे. जसे की- या खबरदारीने तुम्ही सुरक्षित आणि आनंदी होळी साजरी करू शकता. प्रश्न- घरी बनवलेले ऑरगॅनिक रंग किती दिवसांपर्यंत सुरक्षित राहतात? उत्तर- हे एअरटाइट डब्यात 1–2 आठवड्यांपर्यंत सुरक्षित ठेवता येतात. जर रंगात ओलावा राहिला तर त्याला बुरशी लागू शकते. लिक्विड रंग 1–2 दिवसांच्या आत वापरणे चांगले आहे, कारण ते लवकर खराब होऊ शकतात. प्रश्न- घरी बनवलेले रंग कपड्यांवर डाग सोडू शकतात का? उत्तर- बहुतेक ऑरगॅनिक रंग हलके असतात आणि सामान्य धुण्याने निघून जातात. तरीही, बीट, हळद किंवा फुलांपासून बनवलेले गडद रंग हलके डाग सोडू शकतात. त्यामुळे होळी खेळताना जुने किंवा हलक्या रंगाचे कपडे घालणे चांगले असते. प्रश्न- ऑरगॅनिक रंग लहान मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत का? उत्तर- ऑरगॅनिक रंग रासायनिक रंगांच्या तुलनेत अधिक सुरक्षित असतात. परंतु लहान मुलांसाठी ते पूर्णपणे धोकामुक्त आहेत असे म्हणता येणार नाही. काही मुलांची त्वचा संवेदनशील असते, ज्यामुळे नैसर्गिक वस्तूंमुळेही ॲलर्जी होऊ शकते. म्हणून-
Rule Change From 1 March : आता जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट तसेच आरक्षण तिकीट-सर्व काही एकाच RailOne अॅपमध्ये उपलब्ध असेल.
थंडी संपताच महाराष्ट्रात जाणवू लागलाय उन्हाचा तडाखा
मुंबई : थंडी सरत आली आहे. आणि हवामानात बदल जाणवायला लागला आहे. मार्च मधल्या आल्हाददायक वातावरणात उकाडा जाणवायला लागला असून हळू हळू गरमीच्या ऋतूला सुरुवात होते आहे.मुंबईत हवामान काही दिवस उष्ण आणि दमट राहणार असून तापमानाचा पारा ३२ अंशाच्या पार जाणार आहे, बदलत वातावरण, कोरड हवामान शिवाय हवेची खराब गुणवत्ता यामुळे मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळी घ्यावी.पुण्यातही हवापालट झाली आहे. हवामान कोरडे आणि उष्ण राहणार असून पारा हा ३३ अंशांपर्यत पोहोचणार आहे. सकाळी काहीसा गारवा तर दुपारी कडक ऊन पुणेकरांना येत्या काही दिवसात असे विचीत्र हवामान अनुभवायला मिळणार आहे.
येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने रेल्वे आरक्षण, बँक ठेवी आणि UPI व्यवहारांशी संबंधित नियमांचा समावेश आहे. हे बदल केवळ प्रशासकीय नसून, त्यांचा थेट परिणाम तुमच्या महिन्याच्या बजेटवर आणि दैनंदिन आर्थिक नियोजनावर पडणार आहे. १ मार्चपासून होणाऱ्या बदलांचा प्रभाव तुमच्या स्वयंपाकघरापासून ते थेट हातातल्या मोबाईल फोनपर्यंत दिसून येईल. यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे LPG गॅस सिलेंडरच्या दरातील संभाव्य सुधारणा. दर महिन्याच्या सुरुवातीला गॅस कंपन्या किमतींचा आढावा घेतात, त्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमती बदलू शकतात. प्रवाशांसाठी रेल्वे तिकीट बुकिंगच्या प्रक्रियेत किंवा सॉफ्टवेअरमध्ये काही महत्त्वाचे बदल दिसू शकतात. कोणते कोणते बदल होणार आहेत जाणून घ्या.१. रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमीरेल्वे प्रवासाच्या तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये १ मार्चपासून आमूलाग्र बदल होत आहे. आतापर्यंत लाखो प्रवासी जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकिटांसाठी वापरत असलेले जुने UTS App पूर्णपणे बंद होणार आहे. त्याऐवजी, रेल्वे आता 'Rail One App' हे नवीन आणि अद्ययावत ॲप्लिकेशन लाँच करत आहे. या एकाच ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना केवळ जनरल किंवा प्लॅटफॉर्म तिकीटच नाही, तर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण (Reservation) देखील करता येणार आहे. जुन्या ॲपमधील तांत्रिक सुविधा १ मार्चपासून बंद होत असल्याने प्रवाशांनी नवीन ॲप डाऊनलोड करणे अनिवार्य ठरेल.२. बँकिंग आणि UPI व्यवहारांत सुरक्षेचा 'डबल डोस'डिजिटल व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी १ मार्चपासून UPI च्या नियमात मोठी सुधारणा केली जात आहे. आता मोठी रक्कम ट्रान्सफर करताना केवळ पिन (PIN) टाकून चालणार नाही, तर सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर म्हणून बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन (ठसा किंवा फेस आयडी) आणि एक्स्ट्रा ऑथेंटिकेशन पूर्ण करावे लागेल. यामुळे सायबर फसवणुकीला लगाम बसेल. बँकिंग क्षेत्रातील दुसरा मोठा बदल म्हणजे सरासरी मासिक शिल्लक (Average Monthly Balance) मोजण्याची पद्धत. आता ही शिल्लक महिन्याच्या एकूण सरासरीवर गृहीत धरली जाणार असल्याने, ग्राहकांना दंडाचा फटका बसण्याची शक्यता कमी होईल आणि मोठा आर्थिक फायदा मिळेल.३. व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसाठी 'सिम बाइंडिंग' अनिवार्यसोशल मीडिया ॲप्सचा गैरवापर रोखण्यासाठी १ मार्चपासून व्हॉट्सॲप (WhatsApp) आणि टेलिग्राम (Telegram) साठी 'सिम बाइंडिंग' (SIM Binding) हा कडक नियम लागू होत आहे. या नियमानुसार, तुमचे मेसेजिंग ॲप्स तुमच्या फोनमधील सक्रिय सिम कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे. जर तुमच्या फोनमध्ये प्रत्यक्ष सिम कार्ड नसेल किंवा ते बंद असेल, तर तुम्ही त्या फोनवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम वापरू शकणार नाही. बनावट अकाऊंट्स आणि ओटीपी घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.४. स्वयंपाकघराचे बजेट बदलणार?दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे १ मार्च रोजी देखील इंधन कंपन्या गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर करतील. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार होत असताना, सर्वसामान्यांचे लक्ष घरगुती गॅस सिलेंडरच्या (LPG) किमतींकडे लागले आहे. गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅसचे दर स्थिर असले तरी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे १ मार्चला यामध्ये किमती वाढणार की घटणार, हे स्पष्ट होईल. यामुळे गृहिणींच्या बजेटवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
सिडकोच्या ‘माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबईमध्ये’ योजनेला मुदतवाढ; या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
नवी मुंबई : सिडकोतर्फे राबविण्यात येत असलेल्या १६,८७६ घरांच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबईमध्ये” या गृहनिर्माण योजनेत पर्याय निवडीसाठी मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन आता पसंतीचे घर निवडण्यासाठी १९ मार्च २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.ही योजना शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मार्फत राबविण्यात येत असून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या नोडमध्ये ही घरे उपलब्ध आहेत. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उभारण्यात येणाऱ्या या गृहसंकुलांना रेल्वे, महामार्ग आणि मेट्रोची चांगली जोडणी मिळणार आहे.या योजनेअंतर्गत अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२६ असून पसंतीचे पर्याय निवडण्याची अंतिम तारीख १९ मार्च २०२६ आहे. इच्छुकांनी [www.cidcohomes.com](http://www.cidcohomes.com) या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.योजनेबाबतची अधिकृत माहिती सिडकोकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या निवेदनांद्वारे तसेच अधिकृत समाजमाध्यमांवर उपलब्ध करून दिली जाते. नागरिकांनी अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत स्त्रोतांवरच भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या या घरांना मोठा प्रतिसाद मिळत असल्यानेच मुदतवाढ देण्यात आल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःचे घर मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राजस्थानातील जयपूर, अजमेर आणि ब्यावरमध्ये गुलालाच्या नावाखाली दळलेल्या दगडाच्या पावडरमध्ये रंग आणि सुगंध मिसळून विकले जात आहे. हे दगडाचे गुलाल त्वचेच्या ॲलर्जीचे कारण बनू शकते. डोळ्यांत गेल्यास दृष्टी जाऊ शकते आणि श्वासावाटे शरीरात गेल्यास फुफ्फुसे खराब होऊ शकतात. खरे गुलाल आरारूट, टॅल्कम पावडर आणि मैद्यापासून बनवले जाते, तर डोलोमाईट, मार्बलसह अनेक प्रकारच्या दगडांच्या पावडरमध्ये रंग मिसळून गुलालाच्या नावाखाली विकले जात आहे. 7 ते 10 रुपयांची दगडाची पावडर बाजारात 30 ते 40 रुपये किलोपर्यंत विकली जात आहे. भास्करच्या 5 दिवसांच्या तपासणीत हे सत्य समोर आले. वाचा संपूर्ण अहवाल… जयपूर: 10 ते 12 रुपये किलोमध्ये दगड वाटून बनवला गुलाल जयपूरच्या सुदर्शनपुरा इंडस्ट्रियल एरियातील गुलाल फॅक्टऱ्यांमध्ये माती आणि केमिकल वापरून गुलाल तयार केला जात असल्याची माहिती मिळाली होती. भास्कर टीम तिथे पोहोचली तेव्हा काही कर्मचारी मशीनने गुलाल बनवून पॅक करत होते. आमची भेट फॅक्टरीच्या अकाउंटंटशी झाली. रिपोर्टर : गुलाल पाहिजे, काय भाव आहे? अकाउंटंट : मातीचा आहे. 10 रुपये किलो पण आहे आणि 12 रुपये किलो पण. रिपोर्टर : भावात काही कमी जास्त होईल का? कोणते-कोणते रंग आहेत? अकाउंटंट : दर निश्चित आहे. 4 रंग मिळतील. यानंतर त्याने आत नेऊन पोत्यांमधून काढून नमुना दाखवला. आत मशीनमध्ये पांढरी पावडर टाकली जात होती. मुनीम गेल्यानंतर तिथे काम करणाऱ्या लोकांना विचारले असता ते म्हणाले-मार्बलच्या दगडाची पावडर आहे. आत बरीच पांढऱ्या पावडरची पोती ठेवली होती. सेंट टाकताच नकली गुलालाला सुगंध येऊ लागला भास्कर टीम सुदर्शनपुरातच दुसऱ्या गुलाल कारखान्यात पोहोचली. तिथे राजेंद्र नावाचा माणूस भेटला. कारखान्याच्या बाहेर पांढऱ्या पावडरची बरीच पोती आणि केमिकलचे रिकामे ड्रम होते. (यानंतर एक कर्मचारी येतो आणि नमुना दाखवतो.) (कर्मचारी थोड्या वेळाने पुन्हा नमुना घेऊन येतो.) ब्यावर : व्यापारी म्हणाला- गुलालमुळे ॲलर्जी होणार नाही याची हमी नाही जयपूरनंतर भास्करची टीम ब्यावरला पोहोचली. ब्यावरमध्ये सर्व प्रकारच्या दगडांची पिसाई केली जाते. टीमने नगर परिषदेजवळ खंडेलवाल ट्रेडिंगवर एका मोठ्या व्यापाऱ्याशी व्यवहार केला. व्यापाऱ्याने कबूल केले-दगड वाटून बनवतात ब्यावरच्या अजमेरी गेटपासून काही अंतरावर मोनू होल सेलर नावाचे गुलाल आणि रंगाचे गोदाम होते. (याच दरम्यान व्यापाऱ्याजवळ उभा असलेला मुलगा म्हणाला- पांढऱ्या दगडाला वाटून बनवतात, ते निकृष्ट असते. त्रास पण होतो. यावर व्यापाऱ्याने त्याला डोळे वटारून गप्प केले. मुलगा तिथून निघून गेला.) अजमेर : गुलाल दाखवून सांगितले- यात फक्त वाळू असते यानंतर भास्कर टीम अजमेरच्या मुंदरी बाजारात पोहोचली. एका दुकानाबाहेर पिचकाऱ्यांचा साठा ठेवला होता. व्यापारी म्हणाला- सर्व प्रकार उपलब्ध आहेत अजमेरच्या मुंदडी बाजारातच भास्कर टीम आणखी एका व्यापाऱ्याकडे पोहोचली. (यानंतर व्यापाऱ्याने अरारोटपासून बनवलेले 55, 65 आणि 85 रुपये किलो भावाचे गुलालही दाखवले.) लहान पॅकिंगमध्ये सर्वात जास्त भेसळ अरारोटच्याही बनवल्या आहेत तीन श्रेणी अनेक घाऊक विक्रेत्यांनी ग्राहकांना फसवण्यासाठी अरारोटच्या गुलालाच्याही 3 श्रेणी बनवल्या आहेत. अधिकारी हतबल, कारण मार्गदर्शक तत्त्वे निश्चित नाहीत ब्यावरचे सीएमएचओ डॉ. संजय गहलोत यांचे म्हणणे आहे की ब्यावरमध्ये सर्वाधिक गुलालचा वापर बादशाहच्या स्वारीत होतो. यात वापरल्या जाणाऱ्या गुलालच्या गुणवत्तेबाबत समिती तयार केली जाते. तर बाजारात विकल्या जाणाऱ्या गुलालबाबत विभागाकडून जनजागृती केली जाते. रासायनिक रंगांचा वापर न करण्यास सांगितले जाते. सर्वात मोठी समस्या ही देखील आहे की गुलालबाबत कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. हे उत्पादन ना फुलांमध्ये येते ना सौंदर्यप्रसाधनांमध्ये. दोन वर्षांत गुलालबाबत ब्यावरमध्ये कोणतीही कारवाई झालेली नाही.
दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील एल आल्टो शहरात बोलिव्हियन वायुसेनेचे हरक्युलिस C-१३० हे अजस्र विमान अपघातग्रस्त झाले. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६ च्या सुमारास हा अपघात झाला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, ३० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. लँडिंग किंवा टेक-ऑफच्या प्रक्रियेदरम्यान विमानावरचे नियंत्रण सुटले आणि ते धावपट्टीवरून वेगाने बाहेर घसरले. विमानाचा वेग इतका जास्त होता की, त्याने विमानतळाची मजबूत सीमाभिंत (Boundary wall) क्षणात तोडली आणि ते थेट जवळच्या सार्वजनिक रस्त्यावर जाऊन कोसळले. या अनपेक्षित संकटामुळे रस्त्यावरील नागरिकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. रस्त्यावर कोसळल्यानंतर हे महाकाय विमान तेथून जाणाऱ्या अनेक कार आणि इतर वाहनांवर आदळले. ही धडक इतकी भीषण होती की अनेक वाहने विमानाखाली चिरडली गेली असून त्यांचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.रस्त्यावर नव्या कोऱ्या चलनी नोटांचा खच
Ajit Pawar : आज 28 फेब्रुवारी या दिवशी अजित पवार यांच्या विमान अपघाताला एक महिना पूर्ण झाला आहे. आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे.
Bill Clinton ही चौकशी न्यूयॉर्कमधील चॅप्पाक्वा येथे बंद दरवाज्यामागे पार पडली. या वेळी खासदारांनी क्लिंटन यांना तीव्र प्रश्न विचारले. मात्र क्लिंटन यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले आणि आपण कधीही कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच जेफरी एपस्टीन करत असलेल्या कथित गैरप्रकारांची आपल्याला कोणतीही कल्पना नव्हती, असेही त्यांनी सांगितले.
Plane Crash : पैशांनी भरलेले विमान कोसळलं; रस्त्यावर पडलेल्या नोटा पाहून लोकांची उडाली झुंबड
Plane Crash : विमानात असलेल्या 15 जणांचा मृत्यू झाला असून किमान 30 जण जखमी झाले आहेत.

26 C