SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

26    C
...

Akola Crime News : अकोल्यात ‘धुरंधर’ (Dhurandhar 2 ) स्टाईल गुंडगिरी; एकेमकांवर सपासप वार; पोलिसांनी काढली धिंड

अकोला ( Akola Crime News ) : अकोला शहरातील कौलखेड परिसरात ‘धुरंधर’ ( Dhurandhar 2 ) चित्रपट बघून गुंडगिरी करणाऱ्या पाच तरुणांना पोलिसांनी अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. श्रद्धा नगर भागात भरदिवसा तीन जणांवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तातडीने कारवाई करत पोलिसांनी आरोपींची धिंड काढत त्यांच्या दहशतीला लगाम घातला आहे.धारदार शस्त्रांनी तिघांवर हल्ला५ एप्रिल रोजी दुपारी कौलखेड परिसरात पाच जणांनी धारदार शस्त्रांनी तीन युवकांवर हल्ला केला. या हल्ल्यात अभिलाष हिंगे, रविकिरण उर्फ छोटू ठाकरे आणि हरी ओम रोठे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.चित्रपट पाहून नशेत धिंगाणाप्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी धुरंधर 2 ( Dhurandhar 2 ) हा चित्रपट पाहिल्यानंतर नशेत परिसरात धिंगाणा घातला. स्वतःला ‘धुरंधर’ समजत त्यांनी नागरिकांवर हल्ला करत दहशत निर्माण केली. या संपूर्ण घटनेचे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.२४ तासांत आरोपी जेरबंदघटनेनंतर अकोला पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि खदान पोलीस ठाण्याच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत सर्व पाच आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली. हे सर्व आरोपी अल्पवयीन असल्याचे तपासात उघड झाले आहे.पोलिसांनी काढली धिंडपोलिसांनी या आरोपींची कौलखेड परिसरात धिंड काढत ‘रोड शो’ केला. ज्या भागात त्यांनी दहशत पसरवली, त्याच ठिकाणी त्यांना फिरवण्यात आले. यावेळी आरोपींनी कान पकडून नागरिकांची माफी मागितली आणि “अकोला जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला” अशा घोषणा दिल्या. या कारवाईमुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक बसला आहे.

फीड फीडबर्नर 6 Apr 2026 9:10 am

Samyuktha Menon: “सोशल मीडियातून मिळाली संधी; संयुक्ता मेननचा बॉलिवूड डेब्यू”

Samyuktha Menon संयुक्ताने २०१६ साली ‘पॉपकॉर्न’ या मल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. त्यानंतर तिने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 9:03 am

Top 10 News : काँग्रेसने पोटनिवडणूक माघारीसाठी ठेवली मोठी अट, तुकाराम मुंढेंनी समाजासमोर ठेवला नवा आदर्श आणि गौरव मोरेने गुपचूप बांधली लग्नगाठ, वाचा अशा टॉप १० बातम्या

Top 10 News : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या स्वत: बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 8:57 am

Vasai - Virar Crime : वसई–विरारमध्ये मृतदेह सापडण्यांची मालिका सुरूच; १५ दिवसांत ६ घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वसई-विरार : वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात मृतदेह सापडण्याच्या घटनांनी गंभीर वळण घेतले असून, अवघ्या १५ दिवसांत सहा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रविवारी सायंकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्ग वरील विरार फाटा येथे सडलेल्या अवस्थेतील एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.कचऱ्याजवळ सडलेल्या अवस्थेत मृतदेहस्थानिकांना दुर्गंधी आल्याने त्यांनी परिसरात शोध घेतला असता कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एक मृतदेह दिसून आला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मांडवी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. हा मृत्यू नैसर्गिक, अपघाती की घातपात, याचा तपास सुरू आहे.१५ दिवसांत सहा मृतदेहगेल्या दोन आठवड्यांत या परिसरात सापडलेल्या मृतदेहांची मालिका चिंताजनक आहे.२१ मार्च : शिरवली येथे महिलेचा कुजलेला मृतदेह; पती अटकेत२३-२४ मार्च : धानिवबाग येथे ६ वर्षीय बालिकेचा विहिरीत मृतदेह२६-२७ मार्च : पेल्हार फाटा येथे शिरच्छेद अवस्थेत पुरुषाचा मृतदेहमार्च अखेर : नालासोपारा पश्चिम येथे नाल्यात अज्ञात महिलेचा मृतदेह३०-३१ मार्च : फुलपाडा येथे अज्ञात इसमाचा मृतदेह५ एप्रिल : विरार फाटा येथे सडलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेहनागरिकांमध्ये भीतीचे वातावरणसतत उघड होत असलेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. “गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. निर्जन भाग, अपुरी प्रकाशयोजना आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव यामुळे गुन्हेगारांना वाव मिळत असल्याची तक्रारही नागरिक करत आहेत.पोलिसांसमोर तपासाचे आव्हानकाही प्रकरणांत आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी अनेक मृतदेहांची ओळख पटवणे अद्यापही आव्हानात्मक ठरत आहे. बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींचा आधार घेत तपास सुरू असून, या घटनांमागील सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.वसई–विरार पट्ट्यात सलग सापडणारे मृतदेह ही गंभीर बाब ठरत असून, या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून कडक उपाययोजना आणि देखरेख वाढवण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

फीड फीडबर्नर 6 Apr 2026 8:30 am

Janhvi Kapoor: “१५व्या वर्षी पाहिलेला धक्कादायक अनुभव; जान्हवी कपूरचा खुलासा ऐकून सगळेच हादरले”

Janhvi Kapoor जान्हवीने सांगितले की, ती जेव्हा फक्त १५ वर्षांची होती आणि शाळेत शिकत होती, तेव्हा तिला एक अत्यंत विचित्र आणि भीतीदायक गोष्ट अनुभवायला मिळाली.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 8:01 am

PMRDA News : पीएमआरडीएचा स्ट्रक्चर प्लॅन कागदावरच! ६ महिन्यांची मुदत, २ महिने उलटले; कामाला मुहूर्त कधी?

PMRDA News : रस्ते, सांडपाणी आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचे भवितव्य टांगणीला; स्ट्रक्चर प्लॅन विलंबाचा फटका थेट पुणे-पिंपरी चिंचवड लगतच्या ग्रामीण भागाला.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 7:00 am

'शूद्र' स्त्रियांशी संबंध ठेवत असत नंबुद्री ब्राह्मण:वंश सुधारण्याच्या नावाखाली जन्माला आलेल्या मुलांपासून दूर राहत असत, केरळच्या राजकारणावर किती परिणाम?

केरळमधील त्रावणकोर प्रदेश. एक ब्राह्मण पुरुष तयार होऊन नायर वस्तीत जातो. तेथे एका घराबाहेर अंघोळ करतो. कपडे बदलतो. एक दुसरा ब्राह्मण त्याला जेवण वाढवतो. मग तो चप्पल काढून आत जातो, जिथे एक स्त्री त्याची वाट पाहत असते. जेव्हा स्त्रीचा पती परत येतो आणि त्याला घराबाहेर एका पुरुषाची चप्पल दिसते, तेव्हा तो काहीही न बोलता परत फिरतो. कारण त्याला समजते की त्याची पत्नी एका नंबुदरी ब्राह्मण पुरुषासोबत 'संबंधम'मध्ये आहे. हा किस्सा केरळमधील दशकांपूर्वीच्या 'संबंधम' परंपरेचा आहे, ज्यात नंबुदरी ब्राह्मण नायर स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवू शकत होते. आता केरळमध्ये निवडणुका होणार आहेत. आजची कथा याच 'संबंधम' परंपरेची… नायर स्त्रिया एकापेक्षा जास्त पुरुषांशी संबंध ठेवू शकत होत्या लग्नानंतरही पत्नीला घरी घेऊन जात नाहीत नंबूदरी ब्राह्मण कोचीनच्या राजाचे 16 वर्षांच्या मुलीशी संबंधम संबंधम, शोषण आहे की मातृसत्तेचे प्रतीक? केरळमधील काँग्रेसचे लोकसभा खासदार आणि लेखक शशी थरूर संबंधमबद्दल लिहितात, ‘नायर समाजातील पुरुष तेव्हाच त्यांच्या पत्नींकडे जाऊ शकत होते, जेव्हा त्यांच्या घराबाहेर इतर कोणत्याही पुरुषाची चप्पल काढलेली नसेल.’ CPI(M) च्या माजी खासदार सुभाषिनी अली संबंधमला नायर स्त्रियांचे शोषण आणि जातीय भेदभाव मानतात. त्या म्हणतात, ’नायर कुटुंबांमध्ये घराबाहेर एक जागा असायची - मडम. नंबुद्री पुरुष आधी इथे यायचे. एक खालच्या दर्जाचा पंडित त्यांच्यासाठी जेवण बनवायचा. मडममध्ये पुरुष जेवण करायचे, अंघोळ करायचे आणि कपडे बदलायचे. मग नायर स्त्रीच्या खोलीत जायचे. त्यांच्या कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला स्पर्श करत नव्हते. शिवाय संबंधममधून जन्माला आलेल्या मुलांना हात लावत नव्हते.’ मात्र, सर्व इतिहासकार असे मानत नाहीत. काहींचे म्हणणे आहे की संबंधम परंपरा नायर जातीमध्ये मातृसत्ता आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे प्रतीक होती. इतिहासकार के. एम. पणिक्कर यांच्या मते, बहुविवाहाची नोंद 16व्या ते 18व्या शतकादरम्यान इंग्रजांनी केली आहे. त्यांना नायरांच्या घराच्या 60 यार्ड, म्हणजे 200 फूट परिसरात येण्याचीही परवानगी नव्हती, त्यामुळे ही नोंद विश्वसनीय नाही. त्यावेळच्या मल्याळी साहित्यात बहुविवाहाचा कोणताही उल्लेख नाही. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश अधिकारी डॉ. फ्रान्सिस बुचानन जेव्हा सर्वेक्षणासाठी केरळमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांनी संबंधमबद्दल लिहिले- नायर स्त्रिया त्यांच्या प्रियकरांमध्ये अनेक ब्राह्मण, राजे आणि उच्च कुळातील पुरुष असल्याचा अभिमान बाळगत असत. मात्र, केरळचे इतिहासकार नंदकुमार याला स्त्रियांचे स्वातंत्र्य मानतात. त्या म्हणतात की, त्यावेळच्या स्त्रिया आपला जोडीदार स्वतः निवडू शकत होत्या. त्यांना लग्नानंतर आपले घर आणि नाव सोडावे लागत नव्हते. पुरुष स्वतः त्यांच्या घरी येत असत. संबंधम ही वंश सुधारण्याची पद्धत होती का? सुभाषिनी अली सांगतात की, आरएसएसचे दुसरे सरसंघचालक एम. एस. गोळवलकर यांनी संबंधमला वंश सुधारण्याचा एक प्राचीन मार्ग सांगितले होते. दिल्ली विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक शम्सुल इस्लाम यांच्या मते, 17 डिसेंबर 1960 रोजी गुजरात विद्यापीठात दिलेल्या भाषणात गोळवलकर यांनी हे म्हटले होते. गोळवलकर म्हणाले… RSSच्या मुखपत्र ‘ऑर्गनायझर’च्या जानेवारी 1961च्या आवृत्तीतही या भाषणाचा उल्लेख आहे. ब्रिटिश मिशनऱ्यांच्या आगमनामुळे संबंधमवर बंदी घालण्यात आली आजच्या राजकारणावर संबंधमचा काही परिणाम आहे का? संबंधम परंपरेत दोन पात्र होते - नायर आणि नंबुद्री ब्राह्मण. दशकांपूर्वी शूद्र मानली जाणारी नायर जात आज सामान्य वर्गात येते. केरळमध्ये नायर सुमारे 15% आहेत. तर ब्राह्मण सुमारे 2% आहेत. यापैकी नंबुद्री फक्त 1% आहेत. तज्ञांचे मत आहे की केरळच्या राजकारणात संबंधमचा थेट परिणाम दिसत नसला तरी, अशा परंपरांनी लोकांमध्ये जातीय दरी निर्माण केली आहे. याचा वापर राजकीय पक्ष नायरांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी करतात.

दिव्यमराठी भास्कर 6 Apr 2026 6:52 am

Pune Temperature : पुण्याचा पारा ३६ अंशाच्या पार; उन्हाचा चटका आणखी वाढणार, पाहा तुमच्या भागातील तापमान

Pune Temperature : पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाची उघडीप, कमाल तापमानात ४ अंशांची वाढ; लोहगावमध्ये रविवारी सर्वाधिक ३६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 6:45 am

आजचे एक्सप्लेनर:काय आहे 'प्लॅन SERE', ज्यामुळे इराणमध्ये 36 तास जिवंत राहिला पायलट; अमेरिकेने रेस्क्यूत स्वतःचीच 2 विमाने का नष्ट केली?

3 एप्रिल रोजी इराणमध्ये क्रॅश झालेल्या अमेरिकन जेटच्या दुसऱ्या वैमानिकालाही जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. यासाठी ट्रम्प यांनी डझनभर विमाने, शेकडो विशेष कमांडो आणि सीआयएचे गुप्तचर नेटवर्क कामाला लावले होते. इराणी सैन्यासोबत दिवसभर गोळीबार सुरू होता. ट्रम्प म्हणाले, 'आम्ही आमच्या योद्ध्यांना कधीही मागे सोडत नाही. ते शूर योद्धे दुर्गम पर्वतांमध्ये शत्रूच्या सीमेत लपले होते. शत्रूचे सैन्य दर तासाला त्यांच्या जवळ पोहोचत होते.' शेवटी, बेपत्ता वैमानिकाने 36 तास स्वतःला जिवंत कसे ठेवले आणि हे संपूर्ण बचाव अभियान कसे पार पडले; अमेरिका आपल्या प्रत्येक जवानासाठी इतका जीव धोक्यात का घालते, आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया.. प्रश्न-1: अमेरिकेने 36 तासांत वैमानिकाचे बचाव अभियान कसे पूर्ण केले?उत्तर: अमेरिकेने क्रॅश झालेल्या F-15E च्या ज्या सदस्याला वाचवले, ते कर्नल रँकचे अधिकारी आणि वेपन सिस्टम स्पेशालिस्ट होते, तर वैमानिकाला 3 एप्रिल रोजीच वाचवण्यात आले होते. अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सला अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेपत्ता कर्नल सुमारे दोन दिवस इराणमध्ये राहिले… प्रश्न-2: अमेरिकेचा 'प्लॅन SERE' काय आहे, ज्याच्या आधारावर शत्रूच्या प्रदेशात पायलट जिवंत राहतात?उत्तर: युद्धात अडकलेल्या आपल्या सैनिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धादरम्यान 'प्लॅन SERE' तयार केला होता. याचा अर्थ आहे- Survival, Evasion, Resistance आणि Escape. हा प्लॅन 5 स्टेप्समध्ये काम करतो... स्टेप-1: विमानातून बाहेर पडण्यापूर्वी पायलटची तयारी खाली उतरल्यानंतर पायलट सर्वात आधी लपतो आणि पॅराशूट कुठेतरी पुरतो. नंतर रेडिओ उपकरणे तपासतो. स्टेप-2: जिवंत राहण्यासाठी 'रूल ऑफ थ्री' आणि सर्व्हायव्हल किट स्टेप-3: इव्हेजन म्हणजे शत्रूच्या नजरेतून वाचणे स्टेप-4: बचावासाठी स्वतः पळून जाणे किंवा टीमची मदत घेणे स्टेप-5: पकडले गेल्यास शत्रूसमोर टिकून राहणे प्रश्न-3: इराण अमेरिकन पायलटला का पकडू शकले नाही?उत्तर: 4 मोठ्या कारणांमुळे इराणसाठी पायलटला पकडणे अत्यंत कठीण होते... 1. अमेरिकन विमान इराणच्या दक्षिण-पश्चिमेकडील कोगिलुयेह-बोयर-अख्मद प्रांतात क्रॅश झाले होते. येथे अरुंद दऱ्या असलेली 16 हजार किमी लांब झाग्रोस पर्वतरांग आहे, ज्याची शिखरे 4,200 मीटरपर्यंत उंच आहेत. कर्नल 7000 फूट उंच शिखरावर लपले होते. येथे एका व्यक्तीसाठी लपणे सोपे आहे, परंतु सैन्य ऑपरेशन कठीण असते. 2. CIA ने ‘डिसेप्शन कॅम्पैन’ म्हणजेच दिशाभूल करण्याचे अभियान चालवले होते. एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की इराणी सैन्य यामुळे त्रस्त होते. जेव्हा CIA ने आपल्या युक्तीने कर्नलचे अचूक ठिकाण शोधून काढले.3. विमान त्या भागात क्रॅश झाले होते, जिथे अनेक भटक्या जमाती राहतात. हे लोक इराणी सत्तेबद्दल सहानुभूती बाळगत नाहीत. या लोकांनी अमेरिकेला मदत केली. म्हणूनच इराणनेही वैमानिकाला पकडण्यासाठी बक्षीस ठेवले होते.4. केंटवेल यांच्या मते, सर्वात मोठे कारण आहे - अमेरिकेचे जलद आणि प्रगत बचाव अभियान. अमेरिका आपल्या एकाही जिवंत सैनिकाला किंवा त्याच्या मृतदेहाला बाहेर काढण्यासाठी पूर्ण ताकद लावते. तर इराणचे हवाई संरक्षण अत्यंत कमकुवत झाले आहे. प्रश्न-4: अमेरिकन सैन्याचा आपल्या सैनिकाला मागे न सोडण्याचा उद्देश काय आहे?उत्तर: अमेरिकेच्या संरक्षण विभागाची संस्था - जॉइंट पर्सनल रिकव्हरी एजन्सी, JPRA युद्धात अडकलेल्या सैनिकांना परत आणण्याची जबाबदारी सांभाळते. तिचे राष्ट्रीय धोरण आहे की कोणताही सैनिक किंवा लष्करी कर्मचारी कोणत्याही मिशन दरम्यान शत्रूच्या प्रदेशात मागे सोडला जाणार नाही. हे धोरण 1955 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आयझेनहॉवर यांनी सशस्त्र दलांच्या 'आचारसंहितेत' समाविष्ट केले होते. 2003 मध्ये ते अमेरिकन सैन्याच्या प्रत्येक जवानासाठी युद्धाच्या 'नियम आणि कर्तव्यांमध्ये' देखील समाविष्ट करण्यात आले. अमेरिकन सैन्य हे सुनिश्चित करते की प्रत्येक सैनिक हे जाणूनच युद्धात उतरावा की त्याची सुरक्षा सैन्याची नैतिक जबाबदारी आहे आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत मागे सोडले जाणार नाही. अमेरिकन नेव्हीचे मरीन, स्पेशल फोर्स कमांडो, रेंजर किंवा एअरफोर्सचे जवान असोत, सर्वांच्या Creed म्हणजे प्रतिज्ञेमध्ये एक खास गोष्ट समाविष्ट आहे- 'I WILL NEVER LEAVE A FALLEN COMRADE BEHIND.' म्हणजे- ‘मी माझ्या कोणत्याही साथीदाराला युद्धात मागे सोडणार नाही.’ उदाहरणार्थ, अमेरिकेच्या मरीन कॉर्प्सचे लॅटिन ब्रीदवाक्य आहे- ‘Nemo Resideo’ म्हणजे 'कोणालाही मागे सोडू नका.' प्रश्न-5: अमेरिकेने यापूर्वीही आपल्या सैनिकांसाठी बचाव मोहीम राबवली आहे का?उत्तर: होय, अमेरिकेने यापूर्वीही आपल्या सैनिकांना किंवा युद्धकैद्यांना वाचवण्यासाठी मोठ्या मोहिमा राबवल्या आहेत… फिलिपाइन्समध्ये 2600 हून अधिक कैद्यांची सुटकादुसऱ्या महायुद्धादरम्यान, 30 जानेवारी 1945 रोजी अमेरिकेने फिलिपाइन्सच्या कॅबानाटुआन कॅम्पमध्ये बचाव मोहीम राबवली. येथे जपानी सैन्याने हजारो अमेरिकन सैनिकांना कैद केले होते. अमेरिकन रेंजर्स आणि फिलिपिनो गनिमी सैनिकांनी हल्ला करून 489 अमेरिकन सैनिक आणि 33 नागरिकांसह एकूण 522 लोकांची सुटका केली. 530 जपानी आणि 4 अमेरिकन सैनिक मारले गेले. 23 फेब्रुवारी 1945 रोजी फिलिपाइन्सच्या लॉस बानोस कॅम्पमध्ये अमेरिकन एअरबॉर्न सैनिक आणि फिलिपिनो गनिमी सैनिकांनी हल्ला केला. काही सैनिक पॅराशूटने उतरले, तर बाकीचे तलावाच्या मार्गाने पोहोचले. जपानी रक्षकांना हरवून महिला आणि मुलांसह 2,147 कैद्यांना बाहेर काढण्यात आले. व्हिएतनाम युद्धादरम्यान 4000+ सैनिकांना बाहेर काढलेव्हिएतनाम युद्धादरम्यान 1970 ते 1972 पर्यंत अमेरिकेने कैद्यांना सोडवण्यासाठी अनेक CSAR मिशन्स चालवली. यात 4000 हून अधिक सैनिक सोडवण्यात आले. 45 विमाने नष्ट झाली आणि 70 हून अधिक बचाव पथकाचे सदस्य मारले गेले. या काळात अमेरिका केवळ 5 युद्धकैद्यांना मुक्त करू शकले. 21 नोव्हेंबर 1970 रोजी उत्तर व्हिएतनामच्या परिसरात 'आयव्हरी कोस्ट' हे ऑपरेशन राबवण्यात आले. येथे 65 कैदी असल्याची शक्यता होती. अमेरिकन कमांडो हेलिकॉप्टर आणि विमानांनी शत्रूच्या परिसरात घुसून कॅम्पपर्यंत पोहोचले, परंतु त्याआधीच कैद्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले होते. ISISच्या तुरुंगावर हल्ला करून 70+ लोकांना वाचवले

दिव्यमराठी भास्कर 6 Apr 2026 6:38 am

CBSE Board : सीबीएसईचा शाळांना कडक इशारा! अवांतर शुल्क आकारल्यास होणार कारवाई

CBSE Board : 'टू बोर्ड परीक्षा' धोरणांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर शुल्क वसुली करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई; सीबीएसई बोर्डाचा स्पष्ट संदेश.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 6:30 am

Pune Metro : मेट्रो धावणार अन् पर्यावरणही जपणार! हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचा ‘ग्रीन’पॅटर्न; ५,५०० झाडे १००% जगली

Pune Metro : माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पात पर्यावरणाचा समतोल; ७४८ झाडांचे यशस्वी पुनर्रोपण, तर ५,५०० नवीन वृक्षांची लागवड.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 6:15 am

Pune Railway : पुणे स्टेशनचा ताण हलका! हडपसर स्थानकाचा १५३ कोटींत कायापालट; पाहा काय आहेत नवीन सुविधा

Pune Railway : 'अमृत भारत स्टेशन' योजनेअंतर्गत पुणे रेल्वे विभागाला कोट्यवधींचा निधी; हडपसरमध्ये १५३ कोटी खर्चून प्लॅटफॉर्मची लांबी आणि यार्ड क्षमता वाढवली.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 6:00 am

अग्रलेख : नो टीव्ही, मोबाइल

आधुनिक काळामध्ये दिवाणखान्यातील टीव्ही आणि हातातील मोबाइल फोन (No TV, No Mobile) हे जीवनशैलीचे अविभाज्य भाग झाले असतानाच महाराष्ट्र राज्यासह देशातील काही शहरांमध्ये मोबाइल आणि टीव्हीपासून नवीन पिढीला दूर ठेवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 6:00 am

Pashan Balewadi Link Road : बाणेर-पाषाणकरांचा ३४ वर्षांचा वनवास संपणार! २५ कोटी जमा, ‘मिसिंग लिंक’चा मार्ग मोकळा

Pashan Balewadi Link Road : भूसंपादनासाठी पुणे महानगरपालिकेने जमा केले २५ कोटी रुपये; ३४ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटणार.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 5:30 am

PMC News : चांदणी चौक-भूगाव रस्ता आराखड्याला ‘ब्रेक’! स्थायी समितीचा आदेश; नेमकं कारण काय?

PMC News : चांदणी चौक ते भूगाव रस्ता रुंदीकरणासाठी तयार केलेल्या २०३ कोटींच्या आराखड्याला स्थायी समितीची तूर्त स्थगिती दिली आहे.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 5:15 am

Indapur News : उजनीत पाणी, तरीही शेतकरी तहानेला! भाटनिमगावचा बंधारा कोरडा ठणठणीत; शेतकरी आक्रमक

Indapur News : उजनी धरणात २४.९५ टीएमसी उपयुक्त साठा असूनही भाटनिमगाव बंधारा रिकामा; इंदापूर आणि माढा तालुक्यातील उपसा सिंचन योजना ठप्प.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 5:00 am

चर्चेत : भविष्यासाठी जनगणना

जनगणनेतून (Census) केवळ वर्तमानच पुढे येत नाही, तर आपल्या भविष्यालाही आकार दिला जात असतो. त्यामुळे वर्तमानासह भविष्यासाठीही जनगणना गरजेची आहे आणि सर्व नागरिकांचे सहकार्यही तेवढेच आवश्यक आहे.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 5:00 am

प्रगतीशिल शेतकरी:“तिखट” प्रयोगाचे ”गोड फळ, मिरची लागवडीतून 35 गुंठ्यांत 7 लाख कमाई; सटाण्याच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

निसर्गाचा लहरीपणा आणि पिकांवरील रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अनेकदा हवालदिल होतो. मात्र, नाशिक जिल्ह्यातील सटाणे तालुक्यातील गोराणे येथील सुनील जाधव या तरुण शेतकऱ्याने संकटावर मात करत यशाचा नवा मार्ग शोधला. मर आणि तेल्या रोगामुळे डाळिंबाची बाग उपटून टाकण्याची वेळ आलेल्या जाधव यांनी खचून न जाता मिरची लागवडीचा प्रयोग केला. केवळ ३५ गुंठे क्षेत्रात ७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून त्यांनी शेतीतील आपली तिखट' जिद्द सिद्ध केली. जाधव यांच्या भागात डाळिंब हे मुख्य पीक. मात्र, गेल्या काही वर्षांत तेल्या आणि मर रोगामुळे बागांचे मोठे नुकसान होत आहे. खर्च करूनही उत्पन्न मिळत नसल्याने जाधव यांनी धाडसी निर्णय घेत डाळिंबाची बाग काढून तिथे मिरची लावण्याचे ठरवले. १८ मे २०२५ रोजी त्यांनी क्लाऊज ६३००' या वानाची ११ हजार रोपे दोन फूट अंतरावर बेड पद्धतीने लावली. दरम्यान, ज्या क्षेत्रात डाळिंबाची बाग रोगामुळे उपटून टाकावी लागली, त्याच जमिनीत मिरचीने भरघोस उत्पन्न दिले. डाळिंबाच्या तुलनेत कमी वेळात आणि कमी खर्चात हे यश मिळाल्याने परिसरात जाधव यांच्या प्रयोगाचे कौतुक होत आहे. जैविक खतांची किमया' या प्रयोगात जाधव यांनी रासायनिक खतांचा वापर मर्यादित ठेवून जैविक पद्धतीवर भर दिला. त्यांनी एक टन गांडूळ खताचा वापर केला. तसेच, गांडूळ खत निर्मितीमधून मिळणारे व्हर्मीवॉश' (पोषक द्रव) ठिबक आणि फवारणीद्वारे पिकाला दिले. यामुळे रोपांची वाढ जोमदार झाली आणि मिरचीला चकाकी मिळाली. या दर्जेदार मिरचीला सुरतच्या बाजारपेठेत मोठी मागणी मिळाली, ज्यातून त्यांना लाखांचे उत्पन्न मिळाले. नियोजनाची जोड; सेंद्रिय शेतीचा तोड बदलत्या हवामानात पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन बाजारपेठेचा अचूक अंदाज घेणे ही काळाची गरज बनली आहे. सुनील जाधव यांनी बाजारपेठेचा शोध घेत भाजीपाला पिकाचे केलेले नियोजन आदर्श ठरले. विशेषतः रासायनिक खतांऐवजी गांडूळ खताचा वापर केल्याने जमिनीचा पोत सुधारतो आणि पिकाला नैसर्गिक दर्जा मिळतो. अशा सेंद्रिय प्रयोगांमुळे उत्पादनात शाश्वतता येते, कमी खर्चात भरघोस नफा मिळतो आणि शेती खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरते.दरम्यान, शेतीच्या याच भागात इतर शेतकरी साधारण एकरी दोन लाख रुपयाचे उत्पन्न घेतात. मात्र सुनील जाधव यांना अधुनिक पध्दतीने नियोजन करीत ३५ गुंठे क्षेत्रात सात लाख रुपयाचे उत्पन्न घेतले. शेतकरी मोबाइल नंबर : 9921807958

दिव्यमराठी भास्कर 6 Apr 2026 5:00 am

Junnar Crime : जुन्नर हादरलं! शिवसेनेच्या नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा; भररस्त्यात महिलेला अडवून..पाहा काय घडलं?

Junnar Crime : राजकीय सुडापोटी मला अडकवलं जातंय; विनयभंगाचे आरोप शिवसेनेच्या नेत्याने फेटाळले, जुन्नर तालुक्यात चर्चांना उधाण.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 4:45 am

Akluj News : सरकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की! २८ खुर्च्या, ६ संगणक अन् ‘बोलेरो’गाडी जप्त; पाहा काय आहे प्रकरण

Akluj News : १ लाख ५७ हजार रुपयांचे कार्यालयीन साहित्य जप्त; ६५ इंची स्क्रीनपासून ते स्टील्सच्या बाकांपर्यंत सर्वच साहित्यावर न्यायालयाची टाच.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 4:30 am

Palasnath Yatra : पळसदेवचा आखाडा गाजला! आखाड्यात रंगली १५० मल्लांची दंगल; पाहा कोण ठरलं ‘मैदानाचा राजा’

Palasnath Yatra : नामवंत मल्लांच्या १५० कुस्त्यांनी डोळ्यांचे पारणे फेडले; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 4:15 am

MLA Mauli Katke : आव्हाळवाडीचा कायापालट! २.५० कोटींचा निधी अन् रस्ते चकाचक; पाहा कुठे होणार काम?

MLA Mauli Katke : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण रस्ते विकास योजनेअंतर्गत तीन महत्त्वाचे मार्ग मार्गी लागणार; दळणवळण अधिक सुकर आणि सुरक्षित होणार.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 3:45 am

Crop Damage : पुरंदरमध्ये निसर्गाचा तांडव! जेऊरमध्ये ६०% केळी भुईसपाट; शेतकऱ्याच्या कष्टावर फिरलं पाणी

Crop Damage : पुरंदरच्या जेऊर आणि मांडकी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहाकार; साडेबारा एकरवरील केळीच्या बागा उन्मळून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 3:30 am

Atul Benke : अतुल बेनके यांची दिल्लीत मोठी झेप! ५० कोटींच्या पुलाचा मार्ग मोकळा; पाहा कसा असेल प्लॅन

Atul Benke : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी आमदार अतुल बेनके यांच्या भेटीत हिवरे बु.-उंब्रज पुलाच्या ५० कोटींच्या निधीवर शिक्कामोर्तब.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 3:15 am

Rahata Crime : राहाता हादरलं! वीरभद्र यात्रेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; भावांनी जाब विचारताच २० जणांचा राडा

Rahata Crime : राहात्याचे ग्रामदैवत वीरभद्र महाराज यात्रेत विनयभंगाची संतापजनक घटना; आरोपींना पाठीशी घालणाऱ्या जमावावर पोलिसांचा लाठीमार.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 3:00 am

Nevasa Accident : महामार्गावर रक्ताचा सडा! एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक; पती –पत्नी जागीच ठार

Nevasa Accident : छत्रपती संभाजीनगरहून लग्न उरकून परतणाऱ्या वाघमारे दांपत्याचा एसटी बसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू; नेवासे फाटा परिसरात हळहळ.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 2:30 am

PCMC News : महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बँक खात्यात जमा होणार सण अग्रिम रक्कम; पण ‘या’अटी लागू

PCMC News : पिंपरी चिंचवड महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी १५ हजार रुपये सण अग्रिम मंजूर.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 2:15 am

Bailgada Sharyat : बैलगाडा प्रेमींनो लक्ष द्या! कर्जतमध्ये आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार; पाहा बक्षिसांची लयलूट

Bailgada Sharyat : थोरवे फाउंडेशनच्या वतीने 'आमदार केसरी' बैलगाडा शर्यतीचे जंगी आयोजन; प्रथम क्रमांकासाठी आलिशान चारचाकी गाडीचे बक्षीस.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 2:00 am

Maval Real Estate : मावळात जमिनीला सोन्याचा भाव, पण शेतकरी होतोय कंगाल? पाहा धक्कादायक वास्तव

Maval Real Estate : सह्याद्रीच्या कुशीतील मावळ तालुका ठरतोय गुंतवणुकीचा हॉटस्पॉट; फार्महाऊस आणि रिसॉर्टच्या नावाखाली शेकडो एकर जमिनी परक्यांच्या घशात.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 1:45 am

Fake Baba Arrested : खालापूर हादरलं! भोंदू बाबाचा अघोरी विधीच्या नावाखाली महिलांवर अत्याचार

Fake Baba Arrested : काळी जादू आणि जादूटोण्याची भीती दाखवून महिलांचे लैंगिक शोषण; खालापूर आणि कळंबोलीत गुन्हे दाखल, आणखी पीडित समोर येण्याची शक्यता.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 1:15 am

Satara News : सातारची हवा बदलली! वाढती धूळ आणि वाहतूक कोंडीवर पालिकेचा उतारा काय? पाहा ८ महत्त्वाचे उपाय

Satara News : सातारच्या हवेची गुणवत्ता धोक्यात; ग्रीन मोबिलिटी आणि एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टिमसाठी पालिकेला हवी राजकीय इच्छाशक्ती.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 1:00 am

Satara Zilla Parishad : खटावचा वनवास संपला! १७ वर्षांनंतर तालुक्याला मिळाली ‘बंपर लॉटरी’; पाहा कोणाकडे गेली सत्ता?

Satara Zilla Parishad : विधानसभा पुनर्रचनेनंतर विखुरलेल्या खटाव तालुक्याला मिळाले मोठे राजकीय प्रतिनिधित्व; आमदार महेश शिंदे यांच्या रणनीतीने विरोधक चितपट.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 12:45 am

Gas Cylinder Scam : एजन्सी होणार रद्द? ग्राहकांच्या रोषानंतर विक्रम गॅसवर मोठी कारवाई, पाहा काय आहे प्रकरण

Gas Cylinder Scam : ग्राहकांची लूट आणि कर्मचाऱ्यांची अरेरावी महागात; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून विक्रम गॅस एजन्सीला ४ लाख रुपयांचा दंड.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 12:30 am

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांगआज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके १९४८ . सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२८ मुंबईचा चंद्रोदय ०७.०८ , मुंबईचा सूर्यास्त ०६.५३ मुंबईचा चंद्रास्त ०६.३० राहू काळ ०२.१४ ते ०३.४७ . १५ पर्यन्त चांगलादैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

फीड फीडबर्नर 6 Apr 2026 12:30 am

Crop Damage : रहिमतपूर परिसरात निसर्गाचा कोप; अवकाळीने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान

Crop Damage : काढणीला आलेली पिके जमिनीला टेकली! बांध फुटल्याने शेतजमीन वाहून गेली, सरकारने तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी.

दैनिक प्रभात 6 Apr 2026 12:15 am

RCB vs CSK : आरसीबीने चेन्नईचा धुव्वा उडवत नोंदवला सलग दुसरा दमदार विजय! सीएसकेने साधली पराभवाची हॅट्ट्रिक

RCB vs CSK : गतविजेत्या आरसीबीने चेन्नई सुपर किंग्सचा ४३ धावांनी पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 11:38 pm

Bhuvneshwar Kumar Record : भुवनेश्वर कुमारने रचला नवा इतिहास! आयपीएलमध्ये ‘हा’पराक्रम करणारा ठरला पहिलाच वेगवान गोलंदाज

Bhuvneshwar Kumar Record : चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात भुवीने विकेट्सचे 'द्विशतक' पूर्ण करत इतिहास रचला आहे.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 10:57 pm

Eknath Shinde : जगाला युद्धाची नव्हे, बुद्धाची गरज! कर्मकांडात अडकू नका : एकनाथ शिंदे 

Eknath Shinde : ठाण्यात आयोजित ८ व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुद्धांच्या शांततेच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 10:29 pm

Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल झाला इतिहासजमा; पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन पूल उभारला जाणार

परळ आणि प्रभादेवी या भागांदरम्यान ११३ वर्षे प्रवाशांच्या वाहतुकीला दिशा दिल्यानंतर एल्फिन्स्टन रोड ओव्हरब्रिज (Elphinstone Bridge) रविवारी इतिहासजमा झाला. आता या पुलाचे शेवटचे उर्वरित गर्डरही काढून टाकण्यात आले आहेत.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 10:25 pm

Pune News : पुण्यात भरधाव टँकरचा थरार; मोहम्मदवाडीत १९ वर्षीय तरुणाचा चिरडून मृत्यू

Pune News : पुण्याच्या मोहम्मदवाडी परिसरात टँकरने दुचाकीला धडक दिल्याने आरिफ शेख या १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 10:11 pm

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्यास, मंत्र्याच्या स्वीय सहायकास लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यानंतर, मंत्रालयातल्या आणखी एका अधिकाऱ्याला लाच घेतला लाच लुचपत प्रतिबंधन विभागाने अटक केली आहे. खारघर परिसरात लाच घेताना सापळा रचून एसीबीकडून लाचखोर अधिकाऱ्यास बेड्या ठोकण्यात आल्या. अर्थ व नियोजन विभागात कक्ष अधिकारी म्हणून असणारे विलास लाड यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांची मोठी लाच घेताना अटकेची कारवाई करण्यात आली.मंत्रालयातल्या कामासाठी लाच घेण्याचा प्रयत्न केल्याचं दुसर मोठ प्रकरण समोर आलं असून मंत्रालयातल्या लाचखोरीला चाप बसवण्यासाठी एसीबीने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात एसीबीने कारवाईचा धडाका लावला होता, तेव्हा मार्च एन्डमुळे ही कारवाई होत असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात होती. मात्र, आता एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एसीबीने पुन्हा एकदा आपला मोर्चा थेट मंत्रालयात वळवला आहे. मंत्रालयातील कक्ष अधिकारी असलेल्या विलास लाड याला रंगेहाथ अटक करण्यात आली. विशेष म्हणजे सर्वसामान्य माणसांचा एका वर्षाचा पगारही नसतो, तेवढी मोठी रक्कम लाच स्वरुपात हा अधिकारी एका दिवसात घेत होता. त्यामुळे, प्रशासन आणि सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार व सर्वसामान्यांची होणारी पिळवणूक हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करुन देण्यासाठी या अधिकाऱ्याने लाच मागितली होती, त्यानुसार ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने लाचखोर आरोपीस अटक केली. खारघर परिसरात एसीबीने ट्रॅप रचून ही कारवाई केल्याने मंत्रालयातील प्रशासकीय वर्तुळात आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे.

फीड फीडबर्नर 5 Apr 2026 10:10 pm

Pakistan : पाकमध्ये अतिवृष्टीचे ४५ बळी; मृतांमध्ये २३ लहान मुलांचा समावेश

पाकिस्तानातील खैबर पख्तुनक्वा प्रांतात गेल्या १० दिवसात झालेल्या अतिवृष्टीशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये किमान ४५ जणांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 9:49 pm

Shivsena Operation Tiger : निवडणुकीआधीच शिंदेंच्या शिवसेनेनं रणशिंग फुंकलं! राजकीय स्फोटाचे दिले संकेत

हे दोन्ही पक्ष सध्या महायुतीच्या सत्तेत सहभागी आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अद्याप पूर्णपणे सावरलेला (Shivsena Operation Tiger) नाही.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 9:39 pm

Viral Video  : “बाप असावा तर असा”; मुलीच्या घटस्फोटानंतर केलं अनोखं स्वागत, व्हिडिओ व्हायरल

Viral Video : मेरठमध्ये एका वडिलांनी आपल्या मुलीचा घटस्फोट झाल्यानंतर तिचे जल्लोषात स्वागत केले.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 9:30 pm

Congress: काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर

मुंबई: अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीने शेवटपर्यंत प्रयत्न केले असले, तरी काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरवत थेट आव्हान देण्याचे निश्चित केले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बारामतीसाठी आकाश विश्वनाथ मोरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असून, यामुळे आता सुनेत्रा पवार विरुद्ध आकाश मोरे असा अधिकृत सामना रंगणार आहे.बारामती हा पवार कुटुंबाचा अभेद्य गड मानला जातो. अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांनी मोर्चेबांधणी केली होती. मात्र, काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी ११ वाजता आकाश मोरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

फीड फीडबर्नर 5 Apr 2026 9:30 pm

Uttar Pradesh Accident: बोलेरोने मागून उभ्या असलेल्या टँकरला दिली धडक; अपघातात ५ जण ठार, अनेक जण जखमी

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सीबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परधोली जवळ झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या एका बोलेरो गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टँकरला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की गाडी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. अपघातानंतर, मृतदेह बाहेर काढण्यासाठी बोलेरो गाडी तोडावी लागली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. जखमींना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.बोलेरोने टँकरला मागून दिली धडकमिळालेल्या माहितीनुसार, लखनौहून भरधाव वेगाने येणाऱ्या एका बोलेरो कारने बरेलीच्या सीबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परधोलीजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टँकरला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अनेक जणांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो अतिशय भरधाव वेगाने धावत होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट टँकरला धडकली. या धडकेनंतर वाहनाचा पुढचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आणि गाडीतील प्रवासी आत अडकले.अति वेगामुळे झाला अपघातअपघाताची माहिती मिळताच, पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले, मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघातानंतर एक मुलगा गाडीत अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी पोलीस व वाटसरूंनी बचावकार्य सुरू केले. कटर आणि इतर उपकरणांच्या साहाय्याने गाडी कापून मुलाला बाहेर काढण्यात आले. तसेच धडक बसल्यानंतर लगेचच मागून येणाऱ्या एका मोटरसायकलनेही गाडीला धडक दिली, ज्यामुळे अपघाताची तीव्रता आणखी वाढली. पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासानुसार, अतिवेग आणि निष्काळजीपणा ही अपघाताची कारणे असल्याचा संशय आहे.

फीड फीडबर्नर 5 Apr 2026 9:10 pm

Nitin Gadkari : बंगाल, आसाममध्ये भाजपा जिंकेल; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास

विधानसभा निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या पश्‍चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपसाठी पोषक स्थिती आहे. दोन्ही राज्यांत आमचा पक्ष जिंकेल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रविवारी व्यक्त केला.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 8:59 pm

Baramati Election 2026 : काँग्रेसने सुनेत्रा पवारांविरोधात दिला तगडा उमेदवार; ‘या’नावावर शिक्कामोर्तब

Baramati Election 2026 : बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न फसले असून आता बारामतीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 8:52 pm

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूची अफवा.! व्हाइट हाउसने केले खंडन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत उलट सुलट चर्चा सुरू असतानाच रविवारी सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या मृत्यूची अफवा पसरली.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 8:44 pm

LPG Gas Cylinder : गॅस सिलिंडरच्‍या पुरवठ्यात वाढ; युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून नागरिकांना शांततेचे आवाहन

पश्चिम आशियातील युद्धजन्‍य परिस्थितीमुळे देशातील एलपीजी (LPG Gas Cylinder) पुरवठा विस्‍कळीत झालेला असताना वितरक केंद्रांवर वैध ओळखपत्र दाखवून थेट (काउंटरवरून) खरेदी करता येणाऱ्या ५ किलोच्या लहान गॅस सिलिंडर्सची विक्री वाढवण्यात आली आहे.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 8:37 pm

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न'पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा संदेशठाणे : बौद्ध धम्म हा केवळ धर्म नसून एक व्यापक सामाजिक विचारसरणी आणि परिवर्तनाची चळवळ आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. सम्राट अशोक जयंतीनिमित्त आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत ते बोलत होते.बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशनतर्फे (Buddharatna Sagar Welfare Foundation) गडकरी रंगायतन येथे हा भव्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात “नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय” या मंत्रोच्चारांनी झाली. गौतम बुद्ध (Gautama Buddha) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शिंदे यांनी उपस्थित भिक्खू संघ, विद्वान आणि धम्मप्रेमींचे स्वागत केले.या कार्यक्रमाला खासदार ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, तसेच विविध देशांतून आलेले भिक्खू उपस्थित होते. ठाण्याच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, सम्राट अशोक आणि सातवाहन काळात या भागात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता. कान्हेरी लेणी आणि प्राचीन सोपारा येथील स्तूप हे त्याचे महत्त्वाचे पुरावे आहेत.धम्म परिषद ही सामाजिक परिवर्तनाची महत्त्वाची पायरी असल्याचे सांगत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. या वेळी शिंदे यांना ‘बौद्ध रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. “अशा सन्मानांमुळे जबाबदारी वाढते आणि समाजासाठी अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते,” असे त्यांनी नमूद केले. #ठाणे |सम्राट अशोक जयंतीचे औचित्य साधून आज आठव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन ठाणे शहरातील गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते. बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशन आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित राहून माझे मनोगत सादर केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला “नमो बुद्धाय, नमो… pic.twitter.com/YhxRZN01i8— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 5, 2026शिंदे यांनी महाकवी वामनदादा कर्डक Waman Dada Kardak यांच्या ओळी उद्धृत करत बौद्ध विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. “बौद्ध धम्म हा दुःखातून मुक्ती देणारा मार्ग असून तो सत्य, अहिंसा आणि करुणेवर आधारित जीवनपद्धती आहे,” असे त्यांनी सांगितले.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या धम्मदीक्षेमुळे लाखो लोकांना समानता आणि स्वाभिमानाचा मार्ग मिळाला, असेही त्यांनी स्पष्ट केले. “बुद्ध पेरला की बाबासाहेब उगवतात,” असे म्हणत त्यांनी गौतम बुद्धांच्या विचारांचा समाजावर झालेला प्रभाव अधोरेखित केला.जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शांततेचा संदेश देताना “जगाला युद्ध नको, बुद्ध हवा,” असे सांगितले. “द्वेषाने द्वेष संपत नाही, प्रेमानेच तो संपतो,” हा बुद्धांचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.भाषणाचा समारोप करताना त्यांनी, “न तलवार की धार से, न गोलियों की बौछार से… दुनिया बदलेगी तो सिर्फ बुद्ध के विचार से,” या ओळींमधून शांततेचा आणि मानवतेचा संदेश दिला.

फीड फीडबर्नर 5 Apr 2026 8:10 pm

Baramati Assembly by-election : बारामती पोटनिवडणुकीत महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी

- निवडणूक बिनविरोध करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे इतर सर्व पक्षांना आवाहनठाणे : बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही जागा दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे.दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. ठाणे येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे. महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना याच भावनेतून सर्व पक्षांनी सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केले.महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) बारामती पोटनिवडणूक लढवणार नसेल तर काँग्रेस महायुतीच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत दिल्लीतील नेत्यांची देखील परवानगी मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बारामतीमधून काँग्रेसकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.एकीकडे काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले असताना दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

फीड फीडबर्नर 5 Apr 2026 8:10 pm

SRH vs LSG : शेवटच्या ओव्हरचा थरार अन् पंतचा ‘नाबाद’प्रहार! लखनौने उघडलं विजयाचं खातं; हैदराबादच्या नवाबना घरच्या मैदानावर केलं चारीमुंड्या चित

SRH vs LSG : कर्णधार ऋषभ पंतने एकाकी झुंज देत लखनऊला या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 7:29 pm

Sambhajinagar News : महाराष्ट्र हळहळला ..! पोहायला गेलेल्या 4 तरुणांचा बुडून मृत्यू, परिसरात शोककळा

Sambhajinagar News : हर्सूल तलावात ४ तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढले

दैनिक प्रभात 5 Apr 2026 7:20 pm

India-Nepal Relations : “भारत-नेपाळ संबंध बळकट करण्याची गरज”; नेपाळचे राजदूत डॉ. शंकर प्रसाद शर्मा यांचे मत

नेपाळला समुद्रापर्यंत जाण्याचा मार्ग भारतामधूनच उपलब्ध होतो. तसेच आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा बहुतांश हिस्सा नेपाळ हे भारताकडून किंवा भारतामार्फतच आयात करतो.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 7:20 pm

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने दमदार सुरुवात केली. कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी तो सार्थकी लावला.या सामन्यात मोहम्मद शामी (Mohammed Shami) याने अप्रतिम कामगिरी करत इतिहास रचला. त्याने अवघ्या ४ षटकांत केवळ ९ धावा देत २ बळी घेतले. त्याची इकॉनॉमी २.२० इतकी प्रभावी होती. या कामगिरीमुळे तो लखनऊसाठी ४ षटकांच्या स्पेलमध्ये सर्वात कमी धावा देणारा गोलंदाज ठरला.गेल्या काही महिन्यांपासून मोहम्मद शामीच्या निवृत्तीची चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्याने आयपीएलच्या १९ व्या हंगामातील पहिल्या दोन सामन्यांमध्येच आपल्या गोलंदाजीच्या जोरावर निवृत्तीच्या चर्चांना चोख उत्तर दिलं आहे.Shamifesting more wickets pic.twitter.com/UwhVVxIM1b— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 5, 2026शमीने आपल्या स्पेलची सुरुवातच आक्रमक पद्धतीने केली. पहिल्याच षटकात त्याने अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याला बाद केले, तर पुढील षटकाच्या पहिल्याच चेंडूवर स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड (Travis Head) याला माघारी पाठवले. यापूर्वीच्या सामन्यात त्याने के एल राहुल (KL Rahul) याला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते. या कामगिरीमुळे त्याने पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत जाहीर खान (Zaheer Khan) याला मागे टाकत सातव्या स्थानावर झेप घेतली. या यादीत भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) अव्वल स्थानावर आहे.☝️ Abhishek Sharma☝️ Travis HeadVintage #MohammadShami! #SRH’s dangerous duo is gone, and #LSG are off to a great start! #TATAIPL 2026 | #SRHvLSG | LIVE NOW https://t.co/X6t7Rxs79d pic.twitter.com/CnjvNzYwqv— Star Sports (@StarSportsIndia) April 5, 2026विशेष म्हणजे, शमी मागील हंगामात सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा भाग होता. २०२५ मध्ये त्याचा फॉर्म खराब राहिला होता. त्याने ९ सामन्यांत फक्त ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला ट्रेडद्वारे एलएसजीमध्ये आणण्यात आले. मात्र, यंदा त्याने आपल्या जुन्याच संघाविरुद्ध शानदार कमबॅक करत सर्वांना प्रभावित केले.दरम्यान, एलएसजीचे मालक संजीव गोएंका (Sanjiv Goenka) सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. शमीची घातक गोलंदाजी पाहून त्यांनी तिरुपती बालाजींचा फोटो डोक्याला लावत आनंद व्यक्त केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

फीड फीडबर्नर 5 Apr 2026 7:10 pm

Air India : एअर इंडियाकडून ३१ पर्यंत इस्रायलची विमानसेवा स्थगित

या भारतीय नागरिकांना वैयक्ति किंवा व्यवसायिक कारणांसाठी भारतात परत येणे यामुळे अवघड झाले आहे.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 7:07 pm

Rishabh Pant Catches : पंत आहे की पक्षी? हवेत उडून टिपले दोन अफलातून झेल; ‘त्या’डाइव्हने तर पूर्ण स्टेडियम झालं अवाक! पाहा VIDEO

Rishabh Pant Catches : ऋषभ पंतने यष्टीमागे हवेत झेपावत दोन असे झेल टिपले, ज्यामुळे हैदराबादच्या मोठ्या धावसंख्येच्या मनसुब्यांना सुरुंग लागला.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 6:59 pm

IAS Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांचा आदर्श! आईच्या अस्थींचे नदीत नव्हे, तर शेतात विसर्जन करून लावले वडाचे झाड

IAS Tukaram Mundhe : माजी सचिव तुकाराम मुंढे यांनी आपल्या आईच्या निधनानंतर पारंपरिक प्रथा बाजूला ठेवून पर्यावरणपूरक पद्धतीने अस्थी विसर्जन केले.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 6:55 pm

Sabarimala Temple : मोठी अपडेट ! शबरीमला प्रकरणी उद्यापासून सर्वोच्‍च न्‍यायालयात होणार अंतिम सुनावणी

केरळमधील शबरीमला मंदिर (Sabarimala Temple) प्रवेश प्रकरणावर आता सर्वोच्च न्यायालयात ९ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ७ एप्रिलपासून अंतिम सुनावणी होणार आहे.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 6:54 pm

West Bengal Elections 2026 : बंगालमध्ये भाजपची भिस्त मोदींच्या करिष्म्यावर.! मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करण्याची रणनीती

पुढील काही दिवसांनंतर कुणाचा चेहरा पुढे करायचा का याविषयीचा निर्णय सर्वस्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा असेल.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 6:53 pm

Abhishek Sharma Record : अभिषेक शर्माने नकोशा यादीत रोहित-सॅमसनची केली बरोबरी, तब्बल सहावेळा पाहायला ‘हा’दिवस

Abhishek Sharma Record : या सामन्यात अवघ्या २ चेंडूंत शून्यावर बाद झाल्याने अभिषेकच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 6:26 pm

Maharashtra Politics : शरद पवारांना बसणार धक्का ! ‘हे’ 2 धुरंधर नेते शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का (Maharashtra Politics) बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 6:12 pm

Iran Attack on Kuwait : इराणचा कुवैतमधील मंत्रालयाच्या इमारतींवर हल्ले

इराणने रविवारी (५ एप्रिल) कुवैतमधील अनेक इमारतींना लक्ष्य केले. कुवैतच्या वित्त मंत्रालयाने सांगितले की, तेल क्षेत्रात असलेल्या मंत्रालयाच्या एका कॉम्प्लेक्सवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला इराणच्या आक्रमक भूमिकेचे द्योतक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ड्रोनच्या माध्यमातून हे हल्ले करण्यात आले असून त्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.या हल्ल्याचा एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये शुवैख तेल क्षेत्रातील कॉम्प्लेक्सचा एक भाग जळताना दिसत आहे. कॉम्प्लेक्समधून आगीच्या मोठ्या ज्वाला उसळताना दिसत आहेत. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की, या हल्ल्यात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आपत्कालीन पथके आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी प्रतिसाद दिला आहे.दरम्यान, वित्त मंत्रालयाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत अधिकृत निवेदन जारी केले. कुवैतच्या सैन्यानेही सांगितले की, त्यांची हवाई संरक्षण प्रणाली येणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनना सक्रियपणे अडवत आहे. इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत खाडी प्रदेशात आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत.कुवैतच्या सैन्याने ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हटले, “सध्या कुवैतची हवाई संरक्षण प्रणाली शत्रूच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनमधून निर्माण झालेल्या धोक्यांना प्रत्युत्तर देत आहे.” तसेच, जर कोणालाही स्फोटांचे आवाज ऐकू आले, तर ते हवाई संरक्षण प्रणालीने क्षेपणास्त्रे अडवल्यामुळे होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.कुवैतसह खाडीतील अनेक देश २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इराणच्या हल्ल्यांच्या कक्षेत आले आहेत. तेव्हापासून हे हल्ले वाढत जाऊन आता व्यापक प्रादेशिक संघर्षाचे रूप धारण करत आहेत.

फीड फीडबर्नर 5 Apr 2026 6:10 pm

Nanded Crime : टोळीयुद्धाने नांदेड शहर हादरले; एकाचा थेट रुग्णालयात घुसून खून

नांदेड शहरात शनिवारी (४ एप्रिल) मध्यरात्री पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला. येथील कुख्यात साईलाला आणि सदा गैंगमध्ये वर्चस्वाच्या वादातून मध्यरात्री झालेल्या संघर्षात तीन जणांची हत्या झाली. धक्कादायक बाब म्हणजे एकाची तर चक्क शासकीय रुग्णालयात घुसून हत्या करण्यात आली.अरिजितसिंग गजानन चव्हाण (२५, रा. बालाजीनगर, नांदेड) तर दुसऱ्या टोळीतील सय्यद आवेज सय्यद खलील (२७) आणि मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख (२३, रा. देगलूर नाका, नांदेड) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. नांदेड शहर या टोळीयुद्धाने हादरले असून शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील साईलाला आणि सदा टोळीत गेल्या अनेक महिन्यांपासून वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे. या दोन्ही टोळ्यांमध्ये यापूर्वीही अनेकवेळा संघर्ष उडालेला आहे. दरम्यान सदा टोळीचा अरिजितसिंग चव्हाण हा शुक्रवारी रात्री कॅनाल रोडावील ई-स्क्वेअर परिसरात आपल्या दोन साथीदारांसह धुरंदर हा चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. रात्री दीड वाजता चित्रपट संपल्यानंतर तो साथीदारांसह घराकडे निघताच आधीपासून तेथेच दबा धरून बसलेल्या साईलाला टोळीच्या आरोपींनी आवेज आणि अरचाजने अरिजितसिंगला आडविले आणि अचानक त्याच्यावर खंजरने हल्ला चढविला. काही क्षणातच अरिजितसिंग रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी अरिजितच्या साथीदारांनीही धारदार शस्त्राने हल्ले केले.रुग्णालयात बेडवरच केली हत्या :अरिजितसिंगवर हल्या झाल्याची माहिती मिळताच त्याचा भाऊ राजेश चव्हाण हा टोळीतील काही साथीदारांसह रुग्णालयात दाखल झाला. आपल्या भावाचा मृत्यू झाल्याचे त्याला कळताच त्याच्या बाजूच्याच बेडवर उपचारासाठी ठेवलेला आवेज जिवंत असल्याचे कळताच चाकू काडून आवेजवर रुग्णालयातच सपासप वार केले. या हल्ल्यात आवेजचाही मृत्यू झाला.आधी रस्त्यावर आणि नंतर रुग्णालयातच घडलेल्या या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली. रुग्णालयात एकच धावपळ उडाली. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर तेथे उपस्थित पोलिसांनी हल्लेखोरांना पकडले. नंतर रुग्णालयात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

फीड फीडबर्नर 5 Apr 2026 6:10 pm

Top 10 News : मंत्रालयात लाचखोर अधिकारी जाळ्यात ते खरात प्रकरणात मुख्यमंत्र्यांची घोषणा..; वाचाच आजच्या १० टॉप बातम्या…

Top 10 News : मंत्रालयात लाचखोर अधिकारी जाळ्यात ते खरात प्रकरणात मुख्यमंत्र्यांची घोषणा..; वाचाच आजच्या १० टॉप बातम्या...

दैनिक प्रभात 5 Apr 2026 6:08 pm

World Cup 2027 : एकदिवसीय विश्वचषकासाठी कर्णधाराची घोषणा! ‘या’खेळाडूकडे सोपवली मोठी जबाबदारी

World Cup 2027 : २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आतापासूनच क्रिकेट विश्वात हालचाली सुरू झाल्या आहेत.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 5:55 pm

Royal Enfield bikes : बाईक प्रेमींसाठी आनंदाची बातमी.! रॉयल एनफील्ड ‘ही’जबरस्त बाईक झाली लाँच; किंमत आणि रंग पाहाच….

रॉयल एनफील्ड भारतीय बाजारपेठेतील तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ही कंपनीच्या सर्वात परवडणाऱ्या बाईक्सपैकी एक आहे.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 5:54 pm

Akhilesh Yadav : जनगणनेशिवाय महिला आरक्षण नको; अखिलेश यादव यांचा केंद्र सरकारवर निशाणा

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरले असून, संसदेत आणि विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण देण्यापूर्वी नवीन जनगणना करणे अनिवार्य असल्याचे प्रतिपादन केले.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 5:43 pm

Bollywood Upcoming Movies : २०२६-२७ मध्ये प्रदर्शित होणार ‘हे’७ ब्लॉकबस्टर चित्रपट; सिनेरसिकांना मिळणार पोटभर मेजवानी

२०२६ आणि २०२७ ही वर्षेही अशीच असणार आहेत, कारण इंडस्ट्रीमध्ये अनेक मोठे आणि मेगा-बजेट चित्रपट रांगेत आहेत, ज्यामुळे प्रदर्शनापूर्वीच प्रचंड चर्चा निर्माण झाली आहे.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 5:30 pm

Wardha News : वर्धा हादरलं ! अल्पवयीन मुलाकडून काका व चुलत भावाची हत्या

वर्धा जिल्ह्यात (Wardha News) रविवारी जमिनीच्या वादाने हिंसक वळण घेतले. लग्नाच्या वरातीत एका अल्पवयीन मुलाने आपला काका आणि चुलत भावाची भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 5:29 pm

Middle East War : मध्य-पूर्व आशियातील युद्धामुळे युक्रेनवरील अमेरिकेचा वरदहस्त कमी होणार ?

झेलेन्स्की यांना व्यक्त केली भीतीकीव : पश्चिम आशियातील संकटाचा परिणाम जागतिक स्तरावर दिसून येत असून संपूर्ण जगात याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या युद्धामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की विशेषतः तणावाखाली आहेत. झेलेन्स्की यांनी अशी भीती व्यक्त केली आहे की अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष दीर्घकाळ चालल्यास युक्रेनला मिळणारा अमेरिकेचा पाठिंबा कमकुवत होऊ शकतो. त्यांनी सांगितले की वॉशिंग्टनच्या प्राधान्यक्रमात बदल झाल्यामुळे युक्रेनला अत्यंत आवश्यक असलेल्या पॅट्रियट एअर डिफेन्स क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्यात घट होऊ शकते.इस्तंबूलमध्ये माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत झेलेन्स्की म्हणाले की, रशियाकडून दररोज होत असलेल्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी युक्रेनला अमेरिकेत तयार होणाऱ्या पॅट्रियट एअर डिफेन्स प्रणालीची अत्यंत गरज आहे. रशियाने चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या आक्रमणानंतर अग्रिम मोर्च्यासोबतच शहरी भागांवरही मोठ्या प्रमाणात हल्ले झाले असून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. रशियाने युक्रेनच्या ऊर्जा पुरवठ्यालाही लक्ष्य केले आहे, ज्यामुळे ड्रोन आणि क्षेपणास्त्र उत्पादनात अडथळे निर्माण झाले आहेत आणि हिवाळ्यात नागरिकांना हीटिंग व पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले.झेलेन्स्की म्हणाले, “आपल्याला हे मान्य करावे लागेल की सध्या आम्ही प्राधान्यक्रमात नाही. त्यामुळे इराण युद्ध दीर्घकाळ चालल्यास आम्हाला मिळणारा पाठिंबा कमी होईल, अशी मला भीती वाटते.” मॉस्को आणि कीव यांच्या प्रतिनिधींमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेली ताजी चर्चा फेब्रुवारीमध्ये कोणताही ठोस निष्कर्ष न निघता संपली. झेलेन्स्की यांनी रशियावर चर्चा लांबवण्याचा आरोप करत सांगितले की युक्रेन अजूनही संभाव्य करारासाठी अमेरिकन मध्यस्थांशी संपर्कात आहे आणि मजबूत सुरक्षा हमीची मागणी करत आहे. मात्र त्यांनी हेही मान्य केले की या चर्चांकडून जागतिक लक्ष काही प्रमाणात हटले आहे.ते पुढे म्हणाले की त्यांची सर्वात मोठी चिंता पॅट्रियट प्रणालीबाबत आहे, कारण रशियन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची असून सध्या युक्रेनकडे त्याचा प्रभावी पर्याय नाही. झेलेन्स्की यांच्या मते, सुरुवातीपासूनच या प्रणालींचा पुरेसा पुरवठा झाला नाही आणि इराणमधील युद्ध लवकर संपले नाही तर परिस्थिती आणखी कठीण होईल.झेलेन्स्की यांना आशा होती की युरोपीय देश पॅट्रियट प्रणाली खरेदी करण्यासाठी मदत करतील. मात्र आता सहाव्या आठवड्यात प्रवेश केलेल्या इराण युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का बसला असून पश्चिम आशियातील मोठा भाग त्याच्या प्रभावाखाली आला आहे. त्यामुळे मर्यादित संसाधनांवर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे, शस्त्रसाठे इतर दिशेकडे वळवले जात आहेत आणि युक्रेनमधील शहरे बॅलिस्टिक हल्ल्यांसाठी अधिक असुरक्षित बनत आहेत.युक्रेनच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा उद्देश मॉस्कोची अर्थव्यवस्था कमकुवत करणे आणि युद्ध महागडे बनवणे हा आहे. मात्र इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत, ज्यामुळे रशियाचे उत्पन्न वाढत असून त्याची युद्धक्षमता मजबूत होत आहे. झेलेन्स्की म्हणाले की मध्यपूर्वेतील युद्धामुळे रशियाला आर्थिक फायदा होत आहे. त्यांनी रशियन तेलावरील अमेरिकन निर्बंधांमध्ये मर्यादित सवलत दिल्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “रशियाला यामुळे अतिरिक्त पैसा मिळत आहे आणि त्याचा त्यांना फायदा होत आहे.”

फीड फीडबर्नर 5 Apr 2026 5:10 pm

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातची ईडी चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस

सध्या राज्यासह देशात चर्चेत असलेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) अहोरात्र प्रयत्न करत आहे. शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीचे पथक गेले असता ती पथकाला गुंगारा देण्यात यशस्वी ठरली. मात्र, यावेळी खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. SIT ने त्याची कसून चौकशी केली.सध्या अशोक खरात प्रकरणाबद्दल रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच आता या प्रकरणाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.भोंदू अशोक खरात प्रकरणातील सर्व व्यवहारांची ईडी चौकशी (ED) होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच भोंदू अशोक खरातवर आतापर्यंत एकूण १२ गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?“अशोक खरात प्रकरणाचा तपास सुरू आहे. अशोक खरातच्या संपत्तीची आणि गैरव्यवहारांची चौकशी केली जाईल. अशोक खरात प्रकरणात काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी स्पष्ट सांगतो की अशा प्रकरणाबाबत सरकारला जे करायला पाहिजे ते सरकार करत आहे”, असं मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.अशोक खरातची ईडी चौकशी होणार का?अशोक खरात प्रकरणातील सर्व व्यवहारांची ईडी चौकशी होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “खरात प्रकरणातील व्यवहारांबाबत नक्कीच ईडी चौकशी होणार आहे. त्याबाबत ईडीने या गोष्टीची माहिती घेतली आहे. ईडीनेही त्यांची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा खरातच्या जमिनी कुठे-कुठे आहेत, याची माहिती समजली की नियमानुसार जे-जे करावं लागेल ते आम्ही करणार आहोत”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.सीडीआर कोणी लीक केला? चौकशी होणार“अशोक खरात प्रकरणातील सीडीआर कोणालाही प्राप्त करून घेण्याचा अधिकार नाही. तो अधिकार फक्त ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांनाच तो अधिकार आहे. मात्र, या प्रकरणातील सीडीआर कसा लीक झाला? तो सीडीआर कोणी लीक केला? या संदर्भातील चौकशी राज्य सरकार करणार आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या प्रकरणात फक्त आरोप-प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्या विरोधात सबळ पुरावा असेल त्यांच्यावर कारवाई होईलच. मात्र, कोण-कोणाशी बोललं या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टम चालत नाही”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

फीड फीडबर्नर 5 Apr 2026 5:10 pm

पगारातून जास्त पीएफ कापला जाणार? नवीन नियमांमुळे वेतन रचनेत झाले मोठे बदल

मुंबई : १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या नवीन कर आणि श्रम नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे “पगारातून जास्त पीएफ कापला जाणार का?” असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, मते थेट पीएफ दर वाढवण्यात आलेला नसला तरी पगाराच्या संरचनेतील बदलांमुळे पीएफ आणि ग्रॅच्युइटीमध्ये वाढ होऊ शकते.पगार रचनेत काय बदल?नवीन आयकर नियमांनुसार, कर्मचाऱ्यांच्या पगारातील भत्ते, सुविधा आणि इतर लाभ यांचे मूल्यांकन अधिक स्पष्टपणे केले जाणार आहे. यामुळे आधी करमुक्त असलेले अनेक भत्ते आता करपात्र ठरण्याची शक्यता आहे. परिणामी, कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या CTC (Cost to Company) मध्ये बदल करावे लागू शकतात.पीएफ आणि ग्रॅच्युइटीवर परिणामनवीन श्रम संहितेनुसार, कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन (Basic Salary) किमान CTC च्या ५०% असणे आवश्यक आहे. त्यामुळे बेसिक पगार वाढल्यास त्यावर आधारित PF (Provident Fund) आणि ग्रॅच्युइटीचे योगदान आपोआप वाढते. यामुळे कर्मचार्‍यांच्या पगारातून जाणारी रक्कम वाढल्याचे दिसू शकते.टेक-होम सॅलरी कमी होणार?पगारात कोणतीही वाढ न होता, रचना बदलल्यामुळे टेक-होम सॅलरीवर परिणाम होऊ शकतो. कारणकरपात्र भत्ते वाढतीलPF योगदान वाढेलकाही सुविधा करपात्र ठरतीलयामुळे हातात मिळणारा पगार कमी झाल्याचे वाटू शकते.सुविधा आणि भत्त्यांवर करनवीन नियमांनुसार, कंपनीकडून मिळणाऱ्या अनेक सुविधा आता करपात्र ठरू शकतात. उदाहरणार्थ:कंपनीची कार वापरघरभाडे किंवा निवास सुविधावीज, पाणी, गॅस बिलमुलांचे शिक्षण शुल्कगिफ्ट्स आणि क्लब सदस्यत्वयामुळे करपात्र उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.जुनी की नवी कर प्रणाली?कर्मचाऱ्यांसाठी अजूनही जुनी आणि नवी कर प्रणाली निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.जुनी प्रणाली : वजावट आणि सूट जास्तनवी प्रणाली : कर दर कमी पण सवलती कमीएकूणच, १ एप्रिलपासून लागू झालेल्या नवीन नियमांमुळे थेट पीएफ दर वाढलेला नाही. मात्र, पगाराच्या रचनेतील बदलांमुळे PF आणि करपात्र उत्पन्न वाढून टेक-होम सॅलरीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कर्मचार्‍यांनी आपली वेतन स्लिप नीट तपासून, आवश्यक असल्यास आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

फीड फीडबर्नर 5 Apr 2026 5:10 pm

Himachal Pradesh Avalanche : अटल बोगद्याजवळ हिमस्खलन; सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही

हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळ असलेल्या अटल टनल रोहतांगच्या टोकाजवळ हिमखंड कोसळल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांच्या हिमवृष्टीनंतर रविवारी (५ एप्रिल) ऊन पडताच दुपारच्या सुमारास अटल टनलच्या उत्तर पोर्टलजवळ पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये हिमस्खलन झाले. हिमस्खलनाचा वेग इतका प्रचंड होता की हवेत उडणारे बर्फाचे तुकडे पर्यटकांपर्यंत पोहोचले.पर्यटकांसाठी हे दृश्य रोमांचक ठरले; मात्र कोणी या हिमस्खलनाच्या विळख्यात सापडले असते तर मोठे नुकसान होऊ शकले असते. हिमखंड कोसळताना पाहून स्थानिकांनी शिट्ट्या वाजवत आणि आवाज करून पर्यटकांना सावध केले. रविवारी सकाळी ऊन पडताच पर्यटक फोर-बाय-फोर वाहनांमधून अटल टनल रोहतांग येथे पोहोचले होते. या हिमस्खलनात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र त्यातून उडालेला बर्फाचा प्रचंड ढग पर्यटकांपर्यंत पोहोचला.दोन दिवसांपूर्वीच सीमा सडक संघटना (बीआरओ) यांच्या शिफारसीनुसार लाहौल-स्पीती प्रशासनाने अटल टनलच्या उत्तर पोर्टललगतच्या परिसरात पर्यटन उपक्रमांवर बंदी घातली होती. तसेच हिमखंड कोसळण्याचा इशाराही आधीच देण्यात आला होता. एप्रिल २०२६ च्या सुरुवातीला लाहौल-स्पीती तसेच मनाली परिसरातील पर्यटनस्थळांवर झालेल्या अवेळी हिमवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे लाहौल व मनाली खोऱ्यात हिमस्खलनाचा धोका वाढला आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, सतत सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे मनाली–केलंग मार्गावर हिमस्खलनाचा धोका अधिक वाढला आहे.

फीड फीडबर्नर 5 Apr 2026 5:10 pm

Shubman Gill Injury : शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट! पुढच्या सामन्यात खेळणार की नाही? पार्थिव पटेलने केलं स्पष्ट

Shubman Gill Injury : गिल नक्की कधी पुनरागमन करणार, या प्रश्नाने चाहत्यांना काळजीत टाकले असतानाच आता संघाचे सहाय्यक प्रशिक्षक पार्थिव पटेल यांनी यावर मोठे अपडेट दिले आहे.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 4:57 pm

Devendra Fadnavis : “अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार”; देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

गहू, हरभरा, ज्वारी आणि बाजरी यांसारखी कापणीसाठी सज्ज असलेली पिके अनेक ठिकाणी भुईसपाट झाली आहेत.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 4:43 pm

Devendra Fadanvis : अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या महाराष्ट्रात (Devendra Fadanvis) मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 4:31 pm

Riyan Parag Captaincy : परागच्या कप्तानीचा ‘इरफान’फॅन! रियान परागच्या ‘त्या’दोन निर्णयांचे पठाणकडून कौतुक, पाहा VIDEO

Riyan Parag Captaincy : भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने राजस्थानचा नवा कर्णधार रियान पराग याच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले आहे.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 4:22 pm

Raghav Chadha : “खरे चित्र अजून समोर यायचे आहे…”; राघव चड्ढा यांचं जोरदार प्रत्युत्तर

पण आम आदमी पक्षाचे नेते अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवून कारवाई करतात, हे मात्र न समजण्यासारखे आहे, असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा यांनी केले आजे.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 4:19 pm

Abhishek bachchan : अखेर ऐश्वर्यासोबतच्या नात्याबाबत अभिषेकनं सोडलं मौन

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) आणि अभिषेक बच्चन (Abhishek bachchan ) अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असतात. अलीकडेच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चाही जोरदार रंगल्या होत्या. त्यावेळी अभिषेकने या केवळ अफवा असल्याचं म्हटलं होतं. नुकताच अभिषेकनं एका मुलाखतीत ऐश्वर्या आणि त्याच्या नात्याबाबत आणि दोघेही आपली मुलगी आराध्याचा सांभाळ कसे करतात याबद्दलची माहिती दिली असून यावेळी अभिषेक ऐश्वर्याच्या स्टारडमवरही प्रतिक्रिया दिली.ज्यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न झालं होतं, त्यावेळी ऐश्वर्या राय खूप मोठी स्टार होती. या मुलाखतीत, जेव्हा अभिषेकला विचारण्यात आलं की, त्याला पत्नीच्या स्टारडममुळे आधी असुरक्षित वाटलं का? यावर त्यानं उत्तर दिलं असून या मुलाखतीत पत्नी ऐश्वर्या रायच्या स्टारडमबद्दल वाटणाऱ्या इनसिक्योरिटीबाबत खुलासा केला असून यावेळी मुलाखतीत त्यानं आपल्या आई - वडिलांचं उदाहरण दिलं आहे.या मुलाखतीत बोलताना अभिषेक म्हणाला 'जेव्हा माझ्या आई वडिलांचं लग्न झालं. तेव्हा माझी आई माझ्या वडिलांपेक्षा मोठी स्टार होती. त्यामुळे यामध्ये काही विचित्र वाटण्यासारखं नाही. वर्चस्व गाजवलं पाहिजे, अशा मानसिकतेनं माझं संगोपन झालेलं नाही. ही एक पार्टनरशिप आहे. मी ऐश्वर्याला करिअरच्या सुरुवातीपासून ओळखत असून माझी दुसरी फिल्म मी ऐश्वर्यासोबत केली होती. त्यावेळी आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतो. आम्ही फक्त चांगले मित्र होतो', असं अभिषेकनं म्हटलं आहे.ऐश्वर्यासोबतच्या नात्याबद्दल बोलताना अभिषेक पुढे म्हणाला, 'जेव्हा आम्ही प्रेमसंबंध, एंगेजमेंट आणि नंतर लग्नाच्या माध्यमातून एकत्र आलो, तेव्हा आमच्यात एक पार्टनरशिप तयार झालं. आमच्यात असं कधी बोलणं नाही झालं की, मी कमवेन आणि तू घराची काळजी घेशील. अशी चर्चा आमच्यात कधीच झालेली नाही. हे खूप नैसर्गिकरित्या घडतं. पण माझ्यासाठी हे खूप अहंकारातून येतं', असं अभिषेक यावेळी म्हणाला आहे. तसेच, यावेळी अभिषेक म्हणाला, 'मी इगोबाबत उल्लेख केला कारण, शर्यत जिंकण्यासाठी समोरच्या व्यक्तीनं पराभव पत्कारावा किंवा धावणं थांबवावं, अशी माझी मानसिकता नाही', असं अभिषेकनं स्पष्ट केलं असून 'मला अशा नात्यात राहायचं नाही, जिथे मला पुरुषी वाटावं म्हणून माझ्या पत्नीला एखादी गोष्ट करणं सोडावं लागेल. सुदैवानं माझ्या पत्नीलाही तसं वाटत नाही', असं यावेळी या मुलाखतीत अभिषेकनं त्यांच्या नात्याबद्दल बोलताना स्पष्ट केलं आहे.

फीड फीडबर्नर 5 Apr 2026 4:10 pm

U-17 National Boxing Championship : गडकरींच्या हस्ते बॉक्सिंग स्पर्धेचा दमदार शुभारंभ!

- स्टेजवरूनच दिला जोशाचा पंच… नागपूरमध्ये बॉक्सिंगचा थरार रंगात!- ग्लोव्हज हातात… स्टेजवरून दिला जोशपूर्ण संदेश, खेळाडूंमध्ये उत्साहाची लाट!नागपूर : नागपूरमध्ये सुरू असलेल्या U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपला आज एक वेगळीच उंची मिळाली, जेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात होताच संपूर्ण वातावरण उत्साहाने भारून गेले, आणि गडकरी यांनी स्टेजवरून खेळाडूंना दिलेल्या प्रेरणादायी संदेशाने स्पर्धेला नवा जोश मिळाला.मान्यवरांची दमदार उपस्थिती :या प्रसंगी प्रमोद कुमार बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे महासचिव, राहुल शेवाळे महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष, रणजीत सावरकर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष, राकेश तिवारी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव, मिलन वैद्य महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे कोषाध्यक्ष यांच्यासह आशिष जयस्वाल, कृपाल तुमाने, दीपक सावंत, संजय निरुपम, मनीषाताई कायंदे, किरण पांडव, श्रीमती देवांग आणि अर्जुन अवॉर्ड विजेते गोपाल देवांग यांची उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले,“खासदार चषकाच्या माध्यमातून आम्ही ६५ विविध खेळांना प्रोत्साहन देत आहोत. बॉक्सिंगसारखा दमदार खेळही त्यात महत्त्वाचा भाग आहे.” त्यांच्या या वक्तव्याने खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.स्टेजवरून दिला जोशाचा ‘पंच’ :विशेष म्हणजे, गडकरी यांनी बॉक्सिंगचे ग्लोव्हज परिधान करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांच्या या कृतीने आणि संदेशाने उपस्थित खेळाडू व प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला.देशभरातून आलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत गडकरी म्हणाले,“ही स्पर्धा तुमच्यासाठी मोठं व्यासपीठ आहे. मेहनत करा, देशाचं नाव उज्वल करा.”या भव्य उद्घाटनामुळे नागपूर शहरात बॉक्सिंगचा उत्साह शिगेला पोहोचला असून, देशभरातील युवा बॉक्सर आता रिंगमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

फीड फीडबर्नर 5 Apr 2026 4:10 pm

Nitish Kumar : नितीश कुमार १० एप्रिल रोजी राज्यसभा सदस्यत्वाची घेणार शपथ

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेत प्रवेश करण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्या शपथविधीची तारीखही निश्चित झाली आहे. बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांनी नितीश यांच्या शपथविधीची तारीख जाहीर केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री नितीश कुमार १० तारखेला राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतील. त्यांच्या शपथविधीनंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व, एनडीए आणि मुख्यमंत्री संयुक्तपणे निर्णय घेतील. परिणामी, बिहारच्या पुढील मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ९ एप्रिल रोजी दिल्लीसाठी रवाना होतील. ते १० एप्रिल रोजी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतील. शपथविधीनंतर ते १० तारखेच्या संध्याकाळपर्यंत किंवा ११ एप्रिलच्या सकाळपर्यंत पाटण्याला परततील. राज्यसभेची जागा घेतल्यानंतर ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी जोरदार चर्चा आहे. १० एप्रिलनंतर नवीन सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू होईल. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात, म्हणजेच खरमासनंतर, बिहारला नवीन सरकार आणि नवीन मुख्यमंत्री मिळू शकतात. पण पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबतचा अंतिम निर्णय एनडीएचे सर्वोच्च नेतृत्व घेणार आहे.बिहार भाजपचे अध्यक्ष संजय सरावगी म्हणाले, मुख्यमंत्री नितीश कुमार १० तारखेला राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतील. त्यांच्या शपथविधीनंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व, एनडीए आणि मुख्यमंत्री संयुक्तपणे निर्णय घेतील. संजय सरावगी यांच्या वक्तव्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. नवीन मुख्यमंत्र्यांच्या घोषणेबाबत राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. इतर एनडीए नेत्यांनीही एका बैठकीनंतर नवीन मुख्यमंत्री लवकरच निश्चित होतील, असे म्हटले आहे.

फीड फीडबर्नर 5 Apr 2026 4:10 pm

Bangladesh Cricket Board : बांगलादेश क्रिकेट बोर्डात खळबळ, तीन संचालकांचा राजीनामा

बांगलादेश क्रिकेट बोर्डात (बीसीबी) गोंधळाचे वातावरण आहे. ढाका येथे झालेल्या प्रदीर्घ संचालक मंडळाच्या बैठकीनंतर काही तासांतच बीसीबीच्या तीन संचालकांनी राजीनामा दिला. बैठकीनंतर लगेचच फय्याझुर रहमान यांनी आपल्या निर्णयाची माहिती मंडळाला दिली, तर त्यानंतर थोड्याच वेळात शानियान तनिम आणि मेहराब आलम चौधरी यांनीही राजीनामा दिला. यामुळे बीसीबीच्या निवडणुकांनंतर सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत राजीनामा देणाऱ्या संचालकांची एकूण संख्या सहा झाली आहे.या वर्षी जानेवारीमध्ये इश्तियाक सादिक यांनी वैयक्तिक कारणांचा हवाला देत सर्वप्रथम राजीनामा दिला होता. गेल्या महिन्यात, मीडिया अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर काही दिवसांनी अमजद हुसेन यांनी मंडळाला आपली नोटीस पाठवली होती. सरकारने नामनिर्देशित केलेले बीसीबी संचालक यासिर मोहम्मद फैसल यांनी गुरुवारी राजीनामा दिला, त्यानंतर इतर तीन संचालकांनीही राजीनामा दिला.अध्यक्ष अमीनुल इस्लाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नेमके काय घडले, ज्यामुळे फय्याझुर, तनिम आणि चौधरी यांनी हा निर्णय घेतला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बैठकीनंतर, नवीन मीडिया अध्यक्ष मोहम्मद मोखसेदुल कमाल यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांना फय्याझूर यांच्या राजीनाम्याबद्दल वृत्तांमधून समजले. इतर दोघांनी पत्रकार परिषदेनंतर राजीनामा दिला. ते म्हणाले, आम्ही यावर मंडळात चर्चा केलेली नाही. ज्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांनी त्यांच्या निर्णयामागे वैयक्तिक कारणे दिली आहेत. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. तुम्ही ज्यांचा उल्लेख करत आहात (फय्याझूर), ते आमच्यासोबत बैठकीला उपस्थित होते. आम्हाला त्यांच्या राजीनाम्याबद्दल बैठकीनंतर समजले. ढाका मेट्रोपोलिस क्रिकेट समितीचे उपाध्यक्ष असलेल्या फय्याझूर यांनी, ढाका लीग सुरळीतपणे चालवण्यासाठी पुढाकाराच्या अभावाबद्दल अलीकडेच बीसीबीवर टीका केली होती.सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत सहा राजीनामे ही एक लक्षणीय संख्या आहे, आणि ज्या मंडळात निवडून आलेले संचालक त्यांच्या पूर्ण कार्यकाळासाठी पदावर राहतात, तिथे तर ही संख्या अधिकच लक्षणीय आहे. बीसीबीमधील सध्याचे वातावरण पाहता, एकाच संध्याकाळी त्यापैकी तिघांचे राजीनामे अधिकच चिंताजनक आहेत. सरकार सध्या एका समितीमार्फत गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या बीसीबी निवडणुकांची चौकशी करत असून, ही समिती पुढील आठवड्यात क्रीडा मंत्रालयाला आपला अहवाल सादर करेल अशी अपेक्षा आहे.

फीड फीडबर्नर 5 Apr 2026 4:10 pm

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार निश्चित? ‘हा’नेता देणार सुनेत्रा पवारांना टक्कर

अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघ (Baramati By Election) रिक्त झाला असून, या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 4:09 pm

Mantralaya Bribe Case : मोठी बातमी..! मंत्रालयात लाचखोरीचा भंडाफोड; 6.37 लाखांची लाच घेताना बडा अधिकारी जाळ्यात

Mantralaya Bribe Case : मंत्रालयातील अर्थ व नियोजन विभागाचे कक्ष अधिकारी विलास लाड यांना ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच घेताना खारघरमध्ये अटक करण्यात आली आहे.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 4:06 pm

Rahul Gandhi : हिमंता बिस्वा यांना तुरुंगात पाठवू; राहुल गांधी यांची टीका

सरमा यांनी माफी मागितली तरी आम्ही त्यांना सोडणार नाही आणि जोपर्यंत त्यांना तुरुंगात पाठवले जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले आहे.

दैनिक प्रभात 5 Apr 2026 3:49 pm

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर!

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बाटु विद्यापीठ प्रशासनाला कडक निर्देशमुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करत आहे.. विशेषतः लोणेरे (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांच्या (DBATU) परीक्षा आणि निकाल प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ठोस पावले उचलली आहेत.बाटु विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक आणि गुणपत्रिका तसेच पदवी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी,संस्थाचालक आणि लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्या आहेत. तसेच या सर्व कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे अनेक महाविद्यालये व संस्थाचालकांनी विद्यापीठापासून विसंलग्निकरणाचीही मागणी केली आहे. या सर्व शैक्षणिक बाबींची विचार करून प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश देऊन परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.नव्या नेतृत्वावर मोठी जबाबदारीपरीक्षा सुधारणांचा दांडगा अनुभव असलेल्या प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती विद्यापीठात करण्यात आली आहे. राजेश अग्रवाल समितीसह विविध शासकीय समित्यांवर काम केलेले आहे.या अनुभवातून प्रभारी कुलगुरूंनीपुढील ३ ते ६ महिन्यांत सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे आणि विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले आहेत.विद्यापीठाच्य प्रशासकीय सुधारणा करण्याचे शासनाचे 'व्हिजन'निकाल प्रक्रिया कालबद्ध करण्यासाठीपरीक्षा वेळेत घेऊन निकाल विहित मुदतीत जाहीर करण्याला सर्वोच्च प्राधान्यएआय (AI) सक्षम महाविद्यालये : विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व महाविद्यालये कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) सज्ज करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.सेंटर्स ऑफ एक्सलन्स (Centers of Excellence): सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलद्वारे उत्कृष्टता केंद्रे उभारली जातील. यासाठी CSR निधी आणि शासकीय अनुदानातून तरतूद केली जाणार आहे.तसेच प्रभारी कुलगुरूंना परीक्षा आणि निकाल प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी स्पष्ट आणि कडक सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे हित राज्य शासनाचे सर्वोपरी असून, शैक्षणिक नियोजन सुस्थितीत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. परीक्षा व निकाल प्रक्रिया सुरळीत सुरू झाली की विसंलग्निकरणाचा प्रश्नच उद्भवणार नाही, असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले.

फीड फीडबर्नर 5 Apr 2026 3:10 pm