Elena Rybakina : एलिना रायबाकिनाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अरीना सबालेंकाचा पराभव करत जेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
ISI : तुम्ही भारताला पाठिंबा देऊ नका; आयएसआयची काश्मिरी बुद्धिजीवींना धमकी
पाकिस्तान ५ फेब्रुवारी रोजी तथाकथित काश्मीर एकता दिन (ISI) म्हणून वार्षिक प्रचार मोहीम सुरू करण्याची तयारी करत आहे. दरम्यान, त्याची गुप्तचर संस्था, दहशतवादी प्रॉक्सी संघटनांद्वारे, जागतिक व्यासपीठांवर इस्लामाबाद-पुरस्कृत दहशतवादाचा सातत्याने पर्दाफाश करणाऱ्या काश्मिरी बुद्धिजीवींना ठार मारण्याची धमकी देत आहे.
DCM Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांनी घेतली राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढत राष्ट्रवादी काँग्रेसने नेतृत्वाची सूत्रे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हाती दिली. विधिमंडळ गटनेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.मुंबईतील लोकभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते. शपथविधी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी ‘अजितदादा अमर रहे’ आणि ‘महाराष्ट्राचा एकच वादा, अजितदादा’ अशा घोषणा देत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विधानसभेतील आणि विधानपरिषदेतील पक्षाचे सर्व ४८ आमदार उपस्थित होते. सहा वेळा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळलेल्या अजित पवारांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे.दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर शनिवारी दुपारी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांचे नाव गटनेतेपदासाठी सुचवले, तर या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. उपस्थित सर्व आमदारांनी या प्रस्तावाला समर्थन दिले.सुनेत्रा पवार यांच्या निवडीचा ठराव विधानसभेतील आणि विधानपरिषदेतील अशा एकूण ४८ आमदारांच्या सह्यांनी मंजूर करण्यात आला. या बैठकीत दोन ठराव संमत करण्यात आले असून, पहिल्या ठरावानुसार त्यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली, तर दुसऱ्या ठरावानुसार पक्षनेता म्हणून निवड करण्यास मान्यता देण्यात आली. या दोन्ही ठरावांना एकमताने संमती मिळाल्याने सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचे सर्वाधिकार आले आहेत.गटनेतेपदी निवडीची अधिकृत पत्रे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधिमंडळ सचिवालयाकडे सादर केली. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला असून, तो उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांनी बारामती मतदारसंघातून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती; मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती.
DCM Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अल्प परिचय
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यांच्या सामाजिक, संस्थात्मक आणि राजकीय प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.कौटुंबिक व शैक्षणिक पार्श्वभूमीसुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे झाला. त्यांचे वडील कै. बाजीराव पाटील आणि यांच्याकडे १३ गावची पाटीलकी होती. त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी (बी.कॉम.) प्राप्त केली आहे. सुनेत्रा पवार या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी असून त्यांना पार्थ आणि जय अशी दोन मुले आहेत.सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिली शपथ, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व्यासपीठावर उपस्थित.शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार, खासदारांची उपस्थिती..#prahaarnewsline #MarathiNews #DeputyCM… pic.twitter.com/UIPahRkhWm— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) January 31, 2026सामाजिक व संस्थात्मक कार्य- गेल्या २३ वर्षांपासून त्या सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून बारामती परिसरात विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी विकासाचे भक्कम जाळे उभे केले आहे.- बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून त्यांनी ६ हजारांहून अधिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.- ‘एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी एक लाखांहून अधिक वृक्षांचे रोपण केले आहे. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.- विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यासोबतच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे तसेच महिलांसाठी कर्करोग जनजागृती मोहिमा आयोजित केल्या आहेत.राजकीय कारकीर्द- २५ जून २०२४ पासून त्या राज्यसभेच्या सदस्य (खासदार) म्हणून कार्यरत आहेत. आज त्यांनी या पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.- संसदेत त्यांनी शिक्षण, महिला, बालके, युवक व क्रीडा विषयक स्थायी समितीवर काम केले आहे.- मेक्सिको येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला संसद सदस्य परिषदेत त्यांनी भारतीय संसदेचे प्रतिनिधित्व केले आहे.मिळालेले सन्मानसुनेत्रा पवार यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार (२०२३), राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार (२०२४) आणि ग्रीन वॉरियर पुरस्कार यांचा समावेश आहे.
मुंबईकरांनो, राणीबागे भरणार पुष्पोत्सव, कोणत्या तारखेला ते जाणून घ्या..
मुंबई : शिशिर ऋतूची चाहूल लागली की मुंबईकरांना वेध लागतात ते ‘मुंबई पुष्पोत्सवाचे’. घड्याळाच्या काट्यावर आणि वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या मुंबईकरांसाठी ‘मुंबई पुष्पोत्सव’ म्हणजे एक सुगंधी पर्वणी असते. यंदा हा पुष्पोत्सव येत्या ६ ते ८ फेब्रुवारी होणार आहे. असून यामध्ये विविध प्रजातींची रंगीबेरंगी फुलझाडे, फळझाडांची रोपे, औषधी वनस्पती तसेच विविध ऋतूंमध्ये आढळणारी फुले आदी मिळून सुमारे ५ हजार रोपांचा ‘मुंबई पुष्पोत्सवात’ समावेश असतो. पर्यावरणाची आवड आणि फुलझाडांवर प्रेम करणाऱ्या पर्यावरणप्रेमींसाठी पुष्पोत्सवात उद्यानविषयक साहित्याची विक्री, झाडांसाठी लागणारी खते आदींची दालनेही येथे खुली करण्यात येणार आहेत. या तीन दिवसांच्या ‘मुंबई पुष्पोत्सवात’ नागरिकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात अर्थात राणीबाग येथे येत्या ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. येत्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी मुंबई पुष्पोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील. उर्वरित दोन दिवस म्हणजेच ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ‘मुंबई पुष्पोत्सव’ नागरिकांसाठी खुला असेल. यंदाचा हा २९ वा पुष्पोत्सव आहे.मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप आयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या देखरेखीखाली ‘मुंबई पुष्पोत्सव’ भरविण्यात येत आहे.पर्यावरणप्रेमींसाठी उद्यान विषयक कार्यशाळामुंबई पुष्पोत्सवासोबतच ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत उद्यान विषयक कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यशाळेमध्ये बागकाम कसे करावे, झाडांची निगा कशी राखावी, रोपांना, झाडांना, वेलींना कोणते खत कधी व किती प्रमाणात द्यावे, याविषयी अभ्यासपूर्ण प्रशिक्षण देण्यात येणार आहे.मुंबई पुष्पोत्सवाला असणार आकर्षक संकल्पनेचे कोंदणमुंबई पुष्पोत्सवात फुलझाडांची सुरेख मांडणी आणि आकर्षक सजावट केली जाते. यासोबतच दरवर्षी एक खास संकल्पना घेवून पुष्पोत्सव साजरा केला जातो. गतवर्षी भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले होते. विविध फुलांच्या मनमोहक रचनांमधून राष्ट्रध्वज, भारतरत्न पुरस्काराची प्रतिकृती तसेच राष्ट्रीय फळ आंब्याची रचनाही झेंडूच्या फुलांनी साकारली होती. या सजावटीने मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले होते. यंदाच्या मुंबई पुष्पोत्सवातही आगळीवेगळी आणि आकर्षक संकल्पना राबविण्यात येणार आहे. सलग तीन दिवस सुरू राहणाऱ्या या पुष्पोत्सवाचा मुंबईकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.v
धारावी ते घाटकोपरमधील प्रक्रिया केलेले मलजल भांडुप संकुलात
पाणी वहन करण्यासाठी संकुलात ९७० लिटर क्षमतेचा जलबोगद्याची उभारणीमलजल प्रक्रिया केंद्रातील पाणी वहन करणाऱ्या भांडुप संकुलातील बोगदा प्रकल्पाला गतीमुंबई : घाटकोपर मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र ते भांडुप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र आणि पुढे भांडुप संकुलापर्यंत तृतीय संस्करण प्रक्रिया केलेले पाणी वहन करण्यासाठी जलबोगद्याचा आराखडा व बांधकामाची कामे सध्या सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी भांडुप संकुल येथील प्रकल्प कार्यस्थळास भेट देऊन पाहणी केली. मलजल प्रक्रिया प्रकल्पाद्वारे ५० टक्के मलजलावर तृतीय संस्करण प्रक्रिया करण्याचे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने ५०० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या तृतीय संस्करण प्रक्रिया केलेले पाणी वहन करण्यासाठी धारावी ते घाटकोपर आणि पुढे भांडुप संकुल पर्यंत ९७० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या जमिनीखालील बोगद्याची उभारणी प्रस्तावित आहे. या जलबोगद्याच्या बांधकामासंबंधी प्राथमिक कामे प्रगतिपथावर आहेत.भांडुप संकुल ते भांडुप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्रादरम्यानचे अंतर ४ हजार ३६५ मीटर आहे. भांडुप संकुल येथे १७५ मीटर खोलीचा लॉन्चिंग शाफ्ट उभारण्यात येत आहे. पैकी शाफ्टचे उत्खनन कार्य ४५ मीटर खोलीपर्यंत पूर्ण झाले आहे. बोगदा खनन कार्य पूर्ण झाल्यानंतर बोगदा खनन यंत्र बाहेर काढण्यासाठी भांडुप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र येथे १०४ मीटर खोलीचा पुनर्प्राप्ती शाफ्ट प्रस्तावित आहे.दुसऱ्या बोगदा खनन संयंत्राच्या सहाय्याने भांडुप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र ते घाटकोपर मलजल प्रक्रिया सुविधा केंद्रादरम्यान प्रस्तावित बोगद्याच्या खोदणीसाठी आवश्यक संरेखन निश्चित करण्यात आले आहे. हे अंतर ७ हजार २४५ मीटर आहे. भांडुप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र येथे १५५ मीटर खोलीचा लॉन्चिंग शाफ्ट उभारण्यात येत आहे. पैकी शाफ्टचे उत्खनन कार्य ७.७ मीटर खोलीपर्यंत पूर्ण झाले आहे.प्रकल्प अंतर्गत बोगदा खनन संयंत्राच्या सहाय्याने बोगदा खोदणीचे काम करण्यात येणार असून बोगद्याची लांबी एकूण मिळून ११ हजार ६१० मीटर इतकी आहे. भांडुप संकुल, भांडुप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र व घाटकोपर मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र यादरम्यान आवश्यक संरेखन निश्चित करून बोगदा खोदणीचे कार्य नियोजित पद्धतीने प्रगतिपथावर आहे. आयुक्तांसमवेत या पाहणीमध्ये उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरूषोत्तम माळवदे, प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प) महेंद्र उबाळे यांच्यासह संबंधित अभियंते, अधिकारी यावेळी उपस्थित होते.धारावी ते घाटकोपरमधील प्रक्रिया केलेले मलजल भांडुप संकुलातमुंबईच्या पाणी पुरवठ्यात वाढ करण्यासाठी आणि मागणी - पुरवठ्यातील तूट कमी करण्यासाठी विश्वासार्ह आणि हवामान बदल संवेदनक्षम स्त्रोत विकसित करण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका कार्यक्षेत्रात निर्माण होणा-या मलजलावर आधुनिक प्रक्रिया करण्यासाठी विविध ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्याचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मलजल प्रक्रिया प्रकल्पांद्वारे सांडपाण्यातील घनकचरा, घातक रासायनिक घटक तसेच रोगकारक जंतू काढून टाकण्यात येतात. परिणामी, प्रक्रिया केलेले पाणी सुरक्षितरीत्या पुनर्वापरासाठी उपलब्ध होते. त्यामुळे पाण्याच्या स्त्रोतांवरील ताण कमी होऊन नागरी स्वच्छता राखली जाते आणि नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल.डॉ भूषण गगराणी, आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका
Jayant Patil : राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत जयंत पाटलांचा सर्वात मोठा खुलासा; राजकीय वर्तुळात खळबळ
Jayant Patil : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.
Supriya Sule : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’प्रतिक्रिया
Supriya Sule : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्याने राज्याच्या राजकारणात ((Supriya Sule) मोठी उलथापालथ झाली आहे.
Mumbai Indians Playoffs : ५ पराभव होऊनही मुंबईचा संघ अजूनही बाद झालेला नाही, पण त्यांचा पुढील प्रवास आता स्वतःच्या कामगिरीवर नाही तर दुसऱ्यांवर अवलंबून आहे.
DCM Sunetra Pawar: आमदार नसतानाही सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री कशा बनल्या? जाणून घ्या नियम
DCM Sunetra Pawar: शनिवारी दुपारी 2 वाजता त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड झाली आणि सायंकाळी 5 वाजता त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या.
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच नवीन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ होत आहे. हा शपथविधी नंतर व्हायला हवा होता, या घडामोडींवरून खुर्ची माणसापेक्षा जास्त महत्त्वाची आहे हे दिसून येते, असे मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटले आहे.
DCM Sunetra Pawar : “मी सुनेत्रा अजित पवार..”; अखेर पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ
DCM Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी आज सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Budget 2026: 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री? ‘या’वस्तू महागण्याची शक्यता
Budget 2026: उद्या सकाळी अर्थसंकल्पीय भाषणापूर्वीच सर्वसामान्यांना 'डबल झटका' बसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Pat Cummins : वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
Ajit Pawar : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय आता शरद पवार नाही तर ‘ही’व्यक्ती घेणार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अकाली निधन झाल्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.
Budget 2026-27 : रविवारी बजेट; शेअर बाजार सुरू असणार की बंद? जाणून घ्या
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या म्हणजेच रविवार १ फेब्रुवारी रोजी २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करतील. देशाचा अर्थसंकल्प रविवारी जाहीर होत असल्याने उद्या शेअर बाजार सुरू असणार की बंद याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मात्र रविवार असूनही बजेट सदरीकरणाच्या दिवशी शेअर मार्केट सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे इतिहासात दुसऱ्यांदाच रविवारच्या दिवशी शेअर मार्केट सुरू असणार आहे.रविवारी शेअर मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय दोन्ही बाजार समित्यांकडून घेण्यात आला आहे. मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार या दोन्ही समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. साधारणतः शनिवार आणि रविवार या दोन दिवशी शेअर मार्केटचे व्यवहार हे बंद असतात. मात्र मागच्या वर्षी १ फेब्रुवारी २०२५ शनिवारी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होतं. त्यामुळे तेव्हा पहिल्यांदा शनिवार असूनही शेअर बाजारातले व्यवहार सुरू ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे यंदाही रविवार असूनदेखील शेअर मार्केट सुरू राहणार असल्याचे दोन्ही बाजार समित्यांनी जाहीर केले आहे.यामुळे उद्या बजेटच्या दिवशी रविवार असूनही ट्रेडिंग करता येणार आहे. नेहमीच्या बाजार वेळेनुसार म्हणजेच ९:१५ ते ३:३० पर्यंत ट्रेडिंग करता येणार आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पापूर्वी संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये भारताचा जीडीपी विकास दर ७.० टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.सर्वेक्षणानुसार, देशांतर्गत सुधारणा आणि सरकारी गुंतवणुकीमुळे जागतिक आव्हाने असूनही देशाच्या अर्थव्यवस्थेची अंतर्गत ताकद सतत वाढताना दिसत आहे.
नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या सादर होणार असून, अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) सलग नवव्यांदा बजेट मांडून नवा इतिहास रचणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी केंद्र सरकार आपली तिजोरी खुली करण्याची शक्यता असून, रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे २.७० लाख कोटी ते २.८० लाख कोटी रुपयांच्या विक्रमी निधीची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे प्रवास अधिक आधुनिक, वेगवान आणि आरामदायी बनवण्यासाठी सरकारचे विशेष लक्ष आहे. यामध्ये प्रामुख्याने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे, ज्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास प्रवाशांसाठी सुसह्य होईल. याशिवाय, नवीन रेल्वे मार्गांचा विस्तार करणे, जुन्या रुळांचे नूतनीकरण आणि रेल्वे स्थानकांचे हायटेक सुशोभीकरण यांसाठी या निधीचा मोठा हिस्सा वापरला जाण्याचा अंदाज आहे.https://prahaar.in/2026/01/31/sunetra-pawar-resigns-as-rajya-sabha-mp-she-will-take-oath-of-maharashtra-dcm-at-evening/जूनपर्यंत ८ वंदे भारत स्लीपर गाड्या धावणार...केंद्र सरकार येत्या जून महिन्यापर्यंत ८ नव्या 'वंदे भारत स्लीपर' गाड्या सुरू करण्याच्या तयारीत असून, संपूर्ण आर्थिक वर्षात अशा १२ आधुनिक गाड्या प्रवाशांच्या सेवेत रुजू होतील. रात्रीचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी या ट्रेनची विशेष रचना करण्यात आली आहे. मध्यमवर्गीय प्रवाशांचा विचार करून सरकार 'अमृत भारत' रेल्वेचाही विस्तार करणार आहे. मार्च महिन्यापर्यंत या रेल्वेचे नवीन आणि प्रगत 'व्हर्जन' पाहायला मिळेल. विशेष म्हणजे, रेल्वेच्या सुरक्षेसाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी पहिल्यांदाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा मोठा वापर केला जाणार आहे. याव्यतिरिक्त, रेल्वे प्रवाशांची सर्वात मोठी डोकेदुखी असलेल्या 'वेटिंग लिस्ट'च्या समस्येवरही सरकार ठोस पाऊल उचलत आहे. पुढील दोन वर्षांत वेटिंग लिस्ट पूर्णपणे संपवण्यासाठी अतिरिक्त डबे जोडणे आणि नवीन पिढीच्या वेगवान रेल्वे गाड्यांची निर्मिती करण्यावर बजेटमध्ये भर दिला जाणार आहे.७० अधिकारी आता आठवडाभर 'नजरकैदेत'केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ (Budget 2026) च्या सादरीकरणाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून, आज २७ जानेवारी रोजी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथे पारंपरिक “हलवा समारंभ” उत्साहात पार पडला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट प्रक्रियेशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वहस्ते मिठाई भरवून अर्थसंकल्पाच्या छपाईला अधिकृत हिरवा कंदील दाखवला. हलवा समारंभ हा केवळ गोडधोड खाण्याचा कार्यक्रम नसून, तो अर्थसंकल्पाच्या अत्यंत गोपनीयतेचा (Secretcy) काळ सुरू झाल्याचा संकेत आहे. या कार्यक्रमानंतर बजेट तयार करण्यात सहभागी असलेले सुमारे ६० ते ७० अधिकारी आणि कर्मचारी अर्थमंत्रालयाच्या तळघरातील प्रेसमध्ये “लॉक-इन” होतात. पुढील काही दिवस, म्हणजेच अर्थसंकल्प संसदेत सादर होईपर्यंत, हे अधिकारी बाह्य जगापासून पूर्णपणे तुटलेले असतात. त्यांना त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याची किंवा मोबाईल वापरण्याचीही परवानगी नसते. अर्थसंकल्पातील कोणतीही माहिती फुटू नये, या उद्देशाने ही कडक गुप्तता पाळली जाते.
मुंबईतील कोस्टल रोडवर सहा ठिकाणी बायोटॉयलेटची सुविधा
प्रोमेनाडवर पादचारी भुयारी मार्गात उभारण्यात आली ही सुविधामुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता अर्थात मुंबई कोस्टल रोडवर सहा ठिकाणी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून अत्याधुनिक प्रकारच्या जैव विघटनक्षम शौचालयांची म्हणजेच बायो-टॉयलेट्स उभारणी करण्यात आली आहे. कोस्टल रोडवरील विहार क्षेत्रावर पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक २, ४, ६, ११, १२ आणि १४ या ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.मुंबईच्या सुलभ वाहतुकीच्या बाबतीत धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) हा अभियांत्रिकी आविष्काराचा उत्तम नमुना म्हणून ओळखला जातो. या मार्गावर ठिकठिकाणी विहार क्षेत्र अर्थात प्रोमेनाड निर्माण करण्यात आले आहेत. समुद्रकिनारी उभारलेल्या या विहारक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात नागरिक, पर्यटक येतात. त्यांच्यासाठी स्वच्छताविषयक उत्तम सुविधा देण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनात घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून जैव विघटनक्षम शौचालये (बायो-टॉयलेट्स) उपलब्ध करून देण्यात आली आहेत.या कोस्टल रोडवरील पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक २, अमरसन्स उद्यानाजवळ; पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक ४, आकृती इमारत वाहनतळाजवळ; पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक ६, हाजी अली जंक्शन; पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक ११, वरळी दुग्धशाळेसमोर; पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक १२, बिंदूमाधव ठाकरे चौकाजवळ; पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक १४, खान अब्दुल गफार खान मार्गावर बिंदूमाधव ठाकरे चौकाच्या उत्तर दिशेला; अशा एकूण सहा ठिकाणी या सुविधा आहेत.या अत्याधुनिक मॉड्युलर जैव विघटनक्षम शौचालयाचा आकार २० बाय २० बाय ८ फूट असून १ केडब्ल्यू सौरऊर्जा प्रणालीवर कार्यरत राहील. यामध्ये महिलांसाठी २ ज्यामध्ये १ पाश्चिमात्य आणि १ भारतीय शैलीचे, तर पुरुषांसाठी २, बालकांसाठी १ आणि दिव्यांगांसाठी १ पाश्चिमात्य शैलीचे शौचालय आहे. तर, ६ युरिनल, ३ वॉशबेसिन, ३ सेन्सर आधारित आरसे, ३ साबण डिस्पेन्सर, १ सॅनिटरी पॅड इन्सिनरेटर, १ सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, १ हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी, ३ हजार लीटर क्षमतेचे १ डीआरडीओ बायो-डायजेस्टर आदी सुविधांचाही यात समावेश आहे.योग्य कचरा व्यवस्थापन करणे व वीज वापर मर्यादित ठेवण्यासाठी या अत्याधुनिक मॉड्युलर शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. सहा ठिकाणी शौचालयांचे एसआयटीसी काम पूर्ण झाले आहे. ही स्वच्छतागृहे सौंदर्यदृष्ट्या आकर्षक असून सागरी मार्ग परिसराच्या सुशोभीकरणात भर घालणारी आहेत. या सुविधेचा मुख्य उद्देश नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व नीटनेटकी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे तसेच, नाममात्र वापर शुल्काच्या माध्यमातून आर्थिक शाश्वतता राखणे हा आहे.घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या धोरणानुसार, नव्याने उभारण्यात आलेल्या आकांक्षी शौचालयासाठी अर्थात अॅस्पिरेशनल टॉयलेट्स ठरविण्यात आलेल्या दरांप्रमाणे वापर शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यानुसार महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी ५ रुपये इतके नाममात्र शुल्क आकारले जाईल.
रंगणार थरार वर्ल्डकपचा! भारत पाकिस्तान आमने सामने, जाणून घ्या वर्ल्ड कप कधी? कुठे? पाहता येणार ....
मुंबई : विश्वचषकाच्या स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की अपेक्षा कमाल स्तरावर पोहोचतात. आता हीच उत्सुकता अंडर-१९ विश्वचषकात पाहायला मिळणार असून, येत्या रविवारी सुपर-६ फेरीत भारतीय आणि पाकिस्तान अंडर-१९ संघ आमनेसामने येणार आहेत. स्पर्धेतील आतापर्यंतचा भारतीय संघाचा दबदबा आणि पाकिस्तानविरुद्धची ऐतिहासिक चुरस यामुळे या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.आतापर्यंत जिंकलेले सामनेभारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत विजयी घोडदौड करत आहे. आयुष्य म्हात्रेच्या नेतृत्वाखाली संघाने चार सामने खेळले आहेत.आणि ते चारही सामने जिंकले आहेत, त्यामुळे या हा सामनाही भारताने जिंकावा अशी चाहत्यांची आशा आहे.IND vs PAK U १९ संघामधील सामना कधी आणि कुठे होईल आणि कुठे पाहता येईल ते जाणून घ्यासामना कधी खेळला जाईल ?भारतीय १९ वर्षाखालील संघ आणि पाकिस्तान १९ वर्षाखालील संघ यांच्यातील सामना हा रविवार १ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे.कुठे खेळवला जाईल?भारत पाकिस्तान मधील विश्वचषकाचा हा सामना झिम्बाब्वेमध्ये बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाणार आहे.सामना केव्हा सुरु होईल ? भारतीय अंडर १९ संघ आणि पाकिस्तान अंडर १९ संघ विश्वचषक सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १ वाजता सुरु होईल . आणि नाणेफेक दुपारी १२:३० वाजता होईलसामना कुठे पाहता येईल? हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल शिवाय जीव हॉटस्टार वर मोबाईलद्वारे पाहता येईल.भारतीय अंडर-१९ संघ:आयुष्य म्हात्रे (कर्णधार ) , आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, दीपेश देवेंद्रन, मोहम्मद अनन, आरोन जॉर्ज, अभिज्ञान कुंडू, किशन कुमार सिंग, विहान मल्होत्रा, उद्धव मोहन, हेनिल पटेल, खिलन पटेल, हरवंश पंगालिया, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी.पाकिस्तान अंडर-१९ संघ:समीर मिन्हास, अली हसन बलोच, उस्मान खान, अहमद हुसैन, फरहान युसूफ (कर्णधार), हुजैफा अहसान, हमजा जहूर (यष्टीरक्षक), अब्दुल सुभान, मोमीन कमर, मोहम्मद सय्यम, अली रझा, मोहम्मद शायन, दानियाल अली खान, उमर झैब, नकब, नक्कल.
Gram Panchayat Election : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधी? तारखांबाबत मोठी अपडेट समोर
Gram Panchayat Election : राज्यातील १४,२३७ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत असतानाच राज्य सरकारने निवडणुका किमान सहा महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
Budget 2026: आरोग्य विमा स्वस्त होणार? अर्थसंकल्पात मोठ्या कर सवलतीची शक्यता
Budget 2026: विमा उद्योगाने केंद्र सरकारकडे आरोग्य विमा, ओपीडी खर्च आणि सेवानिवृत्तीनंतरच्या उत्पन्नावर विशेष कर सवलत देण्याची आग्रही मागणी केली आहे.
KL Rahul Bowled : हरप्रीत ब्रारचा तो ‘मिस्ट्री बॉल’अन् केएल राहुलचा उडाला मधला स्टंप! पाहा VIDEO
KL Rahul Bowled : हरप्रीत ब्रार याने आपल्या एका 'जादुई' चेंडूवर कर्नाटकचा स्टार फलंदाज केएल राहुलला चकवा देत क्लीन बोल्ड केले
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेते पदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. विधानभवनात शनिवारी दुपारी २ वाजता झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत याबाबतचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.अजित पवार यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांचे नाव गटनेतेपदासाठी सुचवले, तर या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. यावर उपस्थित सर्व आमदारांनी समर्थन दिल्यानंतर सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.सुनेत्रा पवार यांच्या निवडीचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेतील आणि विधानपरिषदेतील अशा एकूण ४८ आमदारांच्या सह्यांनी मंजूर करण्यात आला. या बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले असून, पहिल्या ठरावानुसार सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली, तर दुसऱ्या ठरावानुसार त्यांची पक्षनेता म्हणून निवड करण्यास मान्यता देण्यात आली. या दोन्ही ठरावांना एकमताने संमती मिळाल्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे आता पक्षाचे सर्वाधिकार आले आहेत.खासदारकीचा दिला राजीनामागटनेतेपदी निवडीची अधिकृत पत्रे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधिमंडळ सचिवालयाकडे सादर केली. दरम्यान, गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सादर केला. सुनेत्रा पवार यांनी बारामती मतदारसंघातून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती; मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती.
NCP Merger News : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर काय असेल शरद पवारांची भूमिका?
NCP Merger News : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने केवळ सत्तेची समीकरणे (NCP Merger News) बदलली नाहीत, तर राष्ट्रवादी
Gold Silver Rates: चांदी एकाच दिवसात 1,28,000 रुपयांनी का घसरली? जाणून घ्या नेमकं कारण
Gold Silver Rates: १९ जानेवारी रोजी प्रथमच ३ लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या चांदीने २९ जानेवारीपर्यंत ४.२० लाख रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला होता.
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड केली
होत्याच झालं नव्हतं... धावती लोकल पकडायला गेली अन्.....
बदलापूर : सकाळची प्रचंड गर्दीची वेळ आणि प्रत्येक जण वेळेवर लोकल पकडून कामावर वेळेवर जाणयासाठी धावपळ करत असतो. पण हीच धावपळ, हीच गर्दी एका नवविवाहितेच्या जीवावर बेतली आहे.नेमकं घडल काय ?सकाळची ८ वाजून ११ मिनिटांचीची सीएसएमटी ट्रेन आणि बदलापूर स्टेशनवर जमलेली प्रचंड गर्दी, प्रत्येक जण ट्रेन पकडण्यासाठी घाई करत होतेआणि अश्यातच २८ वर्षीय चेतना चंद्रशेखर देवरुखकर ही तरुणी सुद्धा ट्रेन पकडण्याच्या धावपळीत होती, काही कारणास्तव ट्रेन पकडायला तिला उशीर झाला. अन् ट्रेन स्टेशनवरून सुटली, तीच सुटलेली ट्रेन पकडण्यासाठी चेतना प्रयत्न करत होत्या. याच प्रयत्नात त्यांच्या तोल गेला आणि त्या ट्रेनखाली आल्या यात त्यांच्या दुर्दैवी मृत्यु झाला.चेतना देवरुखकर यांचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं. त्या बदलापूर जुवेळी येथील जगन्नाथ गॅलेक्सीत वास्तव्याला होत्या. सुखी संसाराची स्वप्ने पाहत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या निधनानाची बातमी समजताच देवरुखकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी अपघाती निधनाची नोंद केली आहे.मुंबईत गर्दी वाढत चालल्याने ट्रेनला ही प्रचंड गर्दी असते. अनेकजण ट्रेनला लटकतात जीव धोक्यात घालून धावती लोकल पकडतात. आणि याच धावपळीत याच प्रवासात अनेकजण आपल्या जीवाला मुकतात. अति घाई संकटात नेई, एक ट्रेन चुकली तर चुकूदेत आपल्या आयुष्य लाखमोलाचा असत. याचे भान प्रवाशांनी राखणे गरजेचे आहे.
अजित पवारांविषयी संजय राऊतांचे प्रेम पुतनामावशीसारखे
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर लगेच उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची इतकी घाई का केली असं विचारून प्रेमाचा कळवळा दाखवणा-या संजय राऊतांचे प्रेम पुतना मावशी सारखे आहे. महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असताना हिणकस वक्तव्ये करत संजय राऊतांनी दिवंगत अजित पवार यांचा अपमान कसा केला हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. संजय राऊतांनी दुःखामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करू नये, असे टीकास्त्र भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शनिवारी सोडले. या ना त्या प्रकारे सतत नकारात्मक बोलणे, अपप्रचार करणे हेच काम राऊत करत आहेत.राऊतांनी अजितदादांवर वारंवार पातळी सोडून टीका केली होती याचे स्मरणही बन यांनी करून दिले.अजित दादा यांच्या मृत्यूनंतर लगेच उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची इतकी घाई का केली जाते आहे, असे म्हणत भाजपावर टीका करणा-या राऊतांचा खरपूस समाचार घेत श्री. बन म्हणाले की, राऊतांनी या गोष्टीमध्ये नाक खुपसण्याची गरज नाही. सत्तापदावरच्या व्यक्तीचे निधन झाल्यावर त्या पदावरील पुढील नियुक्ती ही क्रमप्राप्त असते. इंदिरा गांधी, जयललिता, मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर लगेचच त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचा शपथविधी झाला होता याचा दाखला देत बन यांनी राऊतांना लक्ष्य केले.परिस्थितीनुसार कठीण प्रसंगात पक्षाच्या हितासाठी निर्णय घ्यावे लागतात. अजितदादांच्या निधनानंतर पक्ष नेता निवड, उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय याबाबत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा असेल. यामध्ये नाहक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेऊन यापुढील निर्णयात शाह यांचा हात असेल असे म्हणणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे अशी प्रखर टीका ही बन यांनी केली.राऊतांना अजितदादांबद्दल कधीही प्रेम नव्हते, ते सातत्याने अजित पवारांचा द्वेष करायचे. अजितदादांना लोकांचे मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत होते, याबद्दल सातत्याने उद्धव ठाकरे, उबाठा गट आणि राऊतांनी त्यांचा द्वेष केला, अशी टीका बन यांनी केली. अजितदादांना लोकांनी नेहमीच भरभरून मते देत निवडून दिले होते, संजय राऊत मात्र एकदाही निवडून आले नाहीत, असा टोला बन यांनी लगावला.
फेब्रुवारी १ पासून बदलणार 'या'बँकांचे नियम; जाणून घ्या नवीन नियम
फेब्रुवारी २०२६ हा महिना सरकारी आणि खासगी बँकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. फेब्रुवारीपासून अनेक बँकांचे नियम बदलणार आहेत. उद्यापासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासूनस्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसी (ICICI) बँक, एचडीफससी (HDFC) बँक आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) च्या ग्राहकांसाठी अनेक मोठे आणि महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत.बँकिंगमधील या मोठ्या बदलांचा थेट परिणाम आता दैनंदिन बँकिंग व्यवहारांवर, क्रेडिट कार्ड वापरावर आणि केवायसीशी संबंधित प्रक्रियांवर होणार आहे.आयएमपीएस ट्रान्सफर शुल्कापासून ते क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स आणि केवायसी वेळेच्या मर्यादेपर्यंत सर्व नियमांमध्ये बदल होणार आहेत.एसबीआय बँकेचे नवीन नियम :एसबीआयने काही IMPS व्यवहारांवर आकारले जाणारे सेवा शुल्क बदलले आहे.₹२५,००० ते ₹ १ लाख दरम्यानच्या ऑनलाइन आयएमपीएस व्यवहारांवर आता ₹२ + जीएसटी आकारला जाईल. तसेच₹१ लाख ते ₹२ लाख दरम्यानच्या व्यवहारांवर ₹६ + जीएसटी आकारला जाईल. तर₹२ लाख ते ₹५ लाखांपर्यंतच्या IMPS व्यवहारांवर ₹१० + GST शुल्क आकारले जाईल. हे नियम येत्या१५ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होतील.आयसीआयसी बँकेचे नवीन नियम :फेब्रुवारी १, २०२६ पासून, ICICI बँक त्यांच्या काही क्रेडिट कार्डवरील बुक माय शो (BookMyShow) मोफत चित्रपट तिकिटाचा लाभ बंद करेल. तर वाहतूक आणि विमा खर्चावर मिळवलेले रिवॉर्ड पॉइंट्स सुरू राहतील. काही कार्ड धारकांसाठी रिवॉर्ड सिस्टम आणखी वाढवली जाईल, म्हणजेच चित्रपटाचा फायदा काढून टाकला जाईल, परंतु इतर रिवॉर्ड्स कायम राहतील.एचडीफससी बँकेचे नवीन नियम :एचडीफससी बँकेने त्यांच्या प्रीमियम इन्फिनिया मेटल क्रेडिट कार्डसाठी रिवॉर्ड पॉइंट रिडेम्पशनमध्ये बदल केले आहेत. १ फेब्रुवारी २०२६ पासून, ग्राहक दरमहा जास्तीत जास्त ५ वेळा रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करू शकतील. पूर्वी, यावर कोणतीही मर्यादा नव्हती.पंजाब नॅशनल बँक (PNB) चे नवीन नियम :पंजाब नॅशनल बँकने त्यांच्या ग्राहकांना त्यांचे KYC अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ज्या खात्यांमध्ये केवायसी प्रलंबित आहे, त्यांनी २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत त्यांचे केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. वेळेवर केवायसी अपडेट न केल्यास खात्यातील व्यवहारांवर निर्बंध लागण्याची शक्यता आहे.
After OLC Marathi Film : ‘आफ्टर ओ.एल.सी’ अखेर प्रदर्शनासाठी सज्ज; शिवानी सुर्वे अॅक्शन मोडवर
After OLC Marathi Film :
Epstein Files: अल्पवयीन मुलींच्या लैंगिक तस्करीप्रकरणी आरोपी असलेल्या जेफ्री एपस्टीनशी संबंधित प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने अलीकडेच सुमारे ३० लाख पानांची ‘एपस्टीन फाइल्स’ सार्वजनिक केली असून, त्यामध्ये अनेक नामांकित व्यक्तींची नावे समोर आली आहेत.
Mardaani 3 Box Office Collection : मर्दानी ३ चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे.
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडली; सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्त्वपूर्ण आदेश
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांची दोन तास तपासणी झाल्यानंतर त्यांना पुन्हा तुरुंगात नेण्यात आले.
Bhumi Padnekar : “लोकांंनी जागरूक राहणे आणि….”; भूमि पेडणेकरने सोशल मीडिया वापराविषयी व्यक्त केले मत
Bhumi Padnekar : अभिनेत्री भूमि पेडणेकर हिने तिच्या सोशल मीडिया वापराबाबत भाष्य केले आहे.
Parth Pawar And Supriya Sule : पार्थ पवार यांनी बारामतीत गोविंदबाग या निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली.
माणसाने आपले कर्तव्य श्रेष्ठ मानावे
गोष्ट लहान, अर्थ महान,शिल्पा अष्टमकरआजच्या काळात आपण हक्कांविषयी खूप बोलतो. माझा हक्क, माझं स्वातंत्र्य, माझी मागणी — हे शब्द नेहमी ऐकायला मिळतात; परंतु हक्क मिळण्याआधी कर्तव्ये पार पाडणे हेच खरे श्रेष्ठत्व आहे, हे आपण अनेकदा विसरतो.कर्तव्य म्हणजे काय?कर्तव्य म्हणजे आपली जबाबदारी, आपले काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडणे. विद्यार्थ्याचे कर्तव्य म्हणजे मन लावून अभ्यास करणे. शिक्षकांचे कर्तव्य म्हणजे विद्यार्थ्यांना घडवणे. पालकांचे कर्तव्य म्हणजे संस्कार देणे. आणि नागरिकांचे कर्तव्य म्हणजे समाज व देशासाठी जबाबदारीने वागणे.महाभारतातील श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्मयोग शिकवला -“कर्म कर, फळाची अपेक्षा करू नकोस.”याचा अर्थ असा की, कर्तव्य पार पाडणे हेच आपले खरे धर्मकार्य आहे.ज्या व्यक्तीने आपले कर्तव्य श्रेष्ठ मानले, ती व्यक्ती कधीही छोट्या स्वार्थात अडकत नाही. ती वेळेचे भान ठेवते, नियम पाळते आणि इतरांप्रती आदराने वागते.आज समाजात अनेक समस्या दिसतात -अनुशासनाचा अभाव, कर्तव्याकडे दुर्लक्ष आणि जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती.यावर एकच उपाय आहे - प्रत्येकाने स्वतः पासून सुरुवात करणे. आपण आपले कर्तव्य नीट पार पाडले, तर समाज आपोआप सुसंस्कृत होईल आणि देश प्रगतीच्या मार्गावर जाईल.म्हणूनच हक्क मागण्याआधी कर्तव्य ओळखू या आणि कर्तव्याला श्रेष्ठ मानून ते निष्ठेने पार पाडू या.यासाठी भगवान पाणिनीची गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते -सर्वश्रेष्ठ व्याकरणतज्ज्ञ भगवान पाणिनी अरण्यात शिष्यांना पाठ देत होते. शिष्य आणि पाणिनी पाठात अगदी रंगून गेले होते. इतक्यात पानांची सळसळ, पाखरांचा आवाज ऐकू आला. आणि काय आश्चर्य! प्रत्यक्ष वाघ! महाराजांचं आगमन झालं होतं. त्या महाराजांना पाहून शिष्य घाबरून पळू लागले. पण भगवान पाणिनी मात्र आपल्या कामात दंग. वाघाला पाहून त्यांनी सरळ “व्याजीघ्रतीनी व्याघ्र” ज्याची घाणेन्द्रीये तीक्ष्ण आहेत तो व्याघ्र, अशी त्या शब्दांची व्युत्पत्ती ते शिष्यांना सांगू लागले.वाघ आला आणि त्याने शिकवण्यात दंग असलेल्या पाणिनींना पाहिले. थोडा वेळ वाघ शांतपणे पाणिनीकडे बघत राहिला. भगवान पाणिनी मात्र शिष्यांना पाठ देण्यात मग्न होते. वाघाने पाणिनींपुढेच बैठक मारली. हा सर्व प्रकार शिष्यगण झुडपांत लपून पाहत होते. ते सर्वजण आश्चर्यचकित झाले. भगवान पाणिनीनी आपला पाठ संपवताच वाघाने पाणिनीला ठार मारले.सर्व शिष्यगण शरमिंदे झाले. वाघ समोर असूनही पाणिनी आपल्या कर्तव्यापासून दूर झाले नाहीत त्यांची एकाग्रता भंगली नाही.तात्पर्य : आपल्या कामात इतके मन असावे की, त्यातून मिळणारा आनंदाचा ठेवा आपल्याला व इतरांना सतत मिळावा.विचार : माणसाने आपल्या प्राणापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानावे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पात सुरू केलेल्या घोषणा आणि नवीन योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपने एक योजना आखली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी सत्ताधारी पक्षाने अर्थसंकल्पाबाबत व्यापक प्रचार मोहीम आखली आहे, जेणेकरून अर्थसंकल्पातील घोषणा आणि धोरणे थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता येतील.भारतीय जनता पक्षाने अर्थसंकल्पाच्या प्रचारासाठी एक सविस्तर आराखडा तयार केला आहे. १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान देशव्यापी अर्थसंकल्प मोहीम सुरू करण्याची भाजपची तयारी आहे.यासाठीच पक्षाने २०२६ च्या अर्थसंकल्पीय मोहिमेची योजना आखली आहे.पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातील.या काळात सर्व केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषदा घेतील आणि अर्थसंकल्पातील मुख्य मुद्दे जनतेसमोर मांडतील.भाजपने देशभरातील अंदाजे १५० ठिकाणी पत्रकार परिषदा घेण्याची योजना आखली आहे. या कार्यक्रमांद्वारे सरकार अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी उचललेल्या पावलांवर प्रकाश टाकेल.सोशल मीडियाचा योग्य वापर :याव्यतिरिक्त, सोशल मीडियाला या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग बनवण्यात आले आहे. यामुळे बजेटमधील ठळक मुद्यांचा प्रचार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केला जाईल.यासाठी, सोशल मीडियाइन्फ्लुएंसर्स यांना सहभागी करून घेतले जाईल आणि बजेटशी संबंधित माहिती रील्सद्वारे सोप्या आणि आकर्षक पद्धतीने सादर केली जाईल. तरुणांपर्यंत बजेटचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्याचेही पक्षाचे उद्दिष्ट आहे.या संपूर्ण अर्थसंकल्पीय मोहिमेची जबाबदारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडे देण्यात आली आहे. त्यांच्या टीममध्येसरोज पांडे, श्रीकांत शर्मा, नरेंद्र रैना, जीवीएल नरसिंह राव, गोपाल कृष्ण अग्रवाल, अनिल अँटनी, संजय टंडन आणि गुरु प्रकाश पासवान यांचा समावेश आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पापूर्वी संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये भारताचा जीडीपी विकास दर ७.० टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.सर्वेक्षणानुसार, देशांतर्गत सुधारणा आणि सरकारी गुंतवणुकीमुळे जागतिक आव्हाने असूनही देशाच्या अर्थव्यवस्थेची अंतर्गत ताकद सतत वाढताना दिसत आहे.
Food: गूळ आणि बाजरी पासून बनवा स्वादिष्ट, गोड आणि पौष्टिक चूरमा
Food: हिवाळ्यात शरीराला उब देणारा आहार खूप गरजेचा असतो. अशा वेळी अनेक सुपरफूड्स असले, तरी बाजरीची सर काही वेगळीच आहे. बाजरीची तासीर उष्ण असते आणि त्यात गूळ मिसळला की शरीराला आतून छान उब मिळते.
Sanjay Raut : अजित पवार असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे शक्य होते. आमच्याकडे बोलण्यासारखं खूप असल्याची संजय राऊतांची प्रतिक्रिया
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता त्यांच्या काही वैयक्तिक इच्छा आणि राजकीय हालचालींबाबतचे धक्केदायक खुलासे समोर येत आहेत. अजित दादांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र आणायच्या होत्या आणि त्यासाठी त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून विशेष प्रयत्न सुरू केले होते, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. जयंत पाटील यांनी सांगितले की, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हयातीतच दोन्ही गट एकत्र यावेत, अशी अजित दादांची मनापासून इच्छा होती. या प्रक्रियेसाठी खुद्द शरद पवारांनी माझ्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. गेल्या सहा महिन्यांत या संदर्भात अनेक गुप्त बैठका पार पडल्या असून, दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा सकारात्मक दिशेने सुरू होती. दादांच्या या अचानक जाण्याने राष्ट्रवादीच्या पुनर्रचनेच्या या प्रक्रियेला आता कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.१२ फेब्रुवारीला होणार होतं राष्ट्रवादीचं विलीनीकरण...पण त्याआधीचयेत्या १२ फेब्रुवारीला दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी मुहूर्त ठरला होता, मात्र त्याआधीच काळाने अजित दादांवर झडप घातली. या प्रक्रियेबाबत अधिक माहिती देताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, बारामतीला होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीसाठी आम्ही विमानाने जाणार होतो, पण धावपट्टीच्या तांत्रिक अडचणीमुळे योग्य विमान मिळू शकले नाही. या संपूर्ण प्रक्रियेत सुप्रिया सुळे यांनाही विश्वासात घेण्यात आले होते. आधी पक्ष एकत्र करायचा आणि नंतर इतर सत्तेचे निर्णय घ्यायचे, अशी अजित दादांची स्पष्ट भूमिका होती. दुसरीकडे, अजित पवार यांच्या पक्षातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, सध्या पक्षाचे सर्व निर्णय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे तिघे मिळून घेत आहेत. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय असून मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच तो पार पडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.'दादा रात्री घरी यायचे, एकत्र जेवण करायचो...अजित दादा गेल्या काही काळापासून अत्यंत गुप्तपणे जयंत पाटील यांच्या संपर्कात होते आणि साहेबांच्या (शरद पवार) उपस्थितीतच पुन्हा घरवापसी करण्यासाठी ते आग्रही होते, असा खुलासा खुद्द जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांनी सांगितले की, अजित दादा अनेकदा रात्रीच्या वेळी त्यांच्या निवासस्थानी येत असत. गेल्या काही दिवसांत दादा किमान चार वेळा माझ्या घरी आले होते. आम्ही एकत्र जेवण करायचो आणि तासनतास पक्षाच्या भवितव्यावर चर्चा करायचो. जनमानसात निर्माण झालेली आपली प्रतिमा सुधारून पुन्हा एकदा साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र काम करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, असे पाटील यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी संध्याकाळी दिलेल्या प्रतिक्रियेतही पाटील यांनी या छुप्या हालचालींचे संकेत दिले होते. केवळ सत्तेसाठी नव्हे, तर शरद पवारांच्या हयातीतच पक्ष एकसंध व्हावा यासाठी दादांनी मानसिक तयारी पूर्ण केली होती, हे आता स्पष्ट झाले आहे.८ ते १० वेळा गुप्त बैठका झाल्या होत्याआणखी एक मोठा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे. गेल्या काही काळात दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी जयंत पाटील यांच्या निवासस्थानी तब्बल ८ ते १० वेळा गुप्त बैठका पार पडल्या होत्या असा मोठा खुलासा जयंत पाटील यांनी केला. जयंत पाटील यांनी सांगितले की, अजित दादा माझ्या घरी अनेकदा येत असत. सुरुवातीच्या ४ बैठकांमध्ये तर दादांनी केवळ त्यांच्या मनातील भावनांना वाट करून दिली. शरद पवार साहेबांबद्दल त्यांच्या मनात आजही प्रचंड आदर होता. गेल्या दोन-अडीच वर्षांत जे काही राजकीय मतभेद झाले, ते सर्व विसरून पुन्हा एकदा साहेबांच्या नेतृत्वाखाली एकसंध राष्ट्रवादी उभी करण्यासाठी ते अतिशय सकारात्मक होते. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा जुन्या ताकदीने उभा राहावा, ही दादांची अंतिम इच्छा होती. त्यासाठी त्यांनी वैयक्तिक अहंकार बाजूला ठेवून स्वतः पुढाकार घेतला होता, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.जयंत पाटील ठरवतील ती तारीख मंजूर१६ तारखेला झालेल्या एका निर्णायक बैठकीत अजित पवार यांनी विलीनीकरणाचे सर्वाधिकार जयंत पाटील यांना दिले होते. जयंत पाटील यांनी सांगितले की, १६ तारखेला माझ्या घरी महत्त्वाची बैठक झाली, ज्याला अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील आणि पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. आम्ही आधी जिल्हा परिषद निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचे आणि निकालानंतर ८ फेब्रुवारीला त्याची घोषणा करण्याचे ठरवले होते. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून १२ फेब्रुवारीला अधिकृतपणे पक्ष एकत्र करायचे निश्चित झाले होते. विलीनीकरणावर शिक्कामोर्तब करण्यासाठी नेते अजित दादांना म्हणाले, उद्याच पहाटे आपण साहेबांना भेटायला जाऊया. सुरुवातीला विमानाने जाण्याचे नियोजन होते, पण बारामतीची धावपट्टी लहान असल्याने विमान उतरू शकणार नव्हते. अखेर सर्व नेते पहाटेच गाड्यांनी बारामतीला निघाले आणि सकाळी ८ वाजता शरद पवारांच्या समोर बसले. तिथे झालेल्या सविस्तर चर्चेनंतरच १२ फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. आधी दोन्ही पक्ष एकत्रित करायचे याच्याबद्दल दादांचा आग्रह होता. आता त्याचे बरेच तपशील आहेत, कधीतरी मोकळ्या वेळेत मी त्याचाही खुलासा करेल, पण फारच सविस्तर आणि अनेक वेळा त्याचे चर्चा आम्ही सगळ्यांनी सोबत चर्चा केली होती. काही वेळा सुप्रिया सुळे देखील त्यात उपस्थित होत्या, त्यामुळे बऱ्यापैकी चर्चा पुढे गेलेली होती. त्यांनी मला हे देखील सांगितलं होतं की सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ त्यांच्या पक्षातील अन्य आमदारांना देखील याची त्यांना कल्पना दिलेली आहे. हे त्यांनी आम्हाला स्पष्ट पणाने सांगितलं होतं. अजितदादांचं असं मत होतं की, मी जेव्हा निर्णय सांगतो, तेव्हा तुम्ही चिंता करायची गरज नाही. हे सगळे माझे जे सहकारी आहेत ते मी म्हणेन त्याप्रमाणे निर्णय घेतील असं दादांनी म्हटल्यांचंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णयसुनेत्रा पवार यांचा मंत्रिमंडळातील शपथविधी आणि अजित पवार यांच्या पक्षातील सध्याच्या घडामोडींवर जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सुनेत्रा वहिनींचा शपथविधी हा पूर्णपणे त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असून, मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच हे सोपस्कार पार पडत आहेत, असे पाटील यांनी म्हटले आहे. अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पक्षाचा कारभार नक्की कोण चालवत आहे, यावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले की, सद्यस्थितीत पक्षाचे सर्व महत्त्वाचे निर्णय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काही प्रमाणात छगन भुजबळ हेच घेताना दिसत आहेत. या तिन्ही नेत्यांच्या मतानुसारच सध्या पक्षाची पुढील दिशा ठरत असल्याचे चित्र आहे. जयंत पाटील यांनी यावेळी अधिक भाष्य करणे टाळले. त्यांचा पक्ष सध्या आमच्यापासून स्वतंत्र आहे, त्यामुळे त्यांच्या अंतर्गत निर्णयांवर बोलणे मला योग्य वाटत नाही. त्यांच्या पक्षात नक्की काय सुरू आहे, याची मला सविस्तर माहिती नाही, असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला.https://prahaar.in/2026/01/31/cr-shiv-station-three-passengers-fell-onto-running-local-train-track-during-morning-rush-hour/नियती किती क्रूर असू शकते, हे अजित दादांच्या जाण्याने दिसून आलेनियती किती क्रूर असू शकते, हे अजित दादांच्या जाण्याने दिसून आले, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित दादांच्या अपघाताबाबत बोलताना त्यांनी एका स्थानिक सरपंचाच्या हवाल्याने खळबळजनक माहिती दिली आहे. विमान कोसळण्यापूर्वी हवेत असतानाच त्यातून मोठा आवाज येत होता, असे तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याचे पाटील यांनी नमूद केले. अपघाताच्या कारणांबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, विमानामध्ये तांत्रिक बिघाड होता की अन्य काही, हे आता केवळ 'ब्लॅक बॉक्स'च्या अहवालातूनच स्पष्ट होईल. अजित पवारांनी विलीनीकरणाचा निर्णय हा राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांच्या संमतीने आणि एकमताने घेतला होता, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. अजित दादांसोबतच्या नात्यावर भाष्य करताना पाटील भावूक झाले. मी, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील आणि आर. आर. (आबा) पाटील आम्ही अनेक वर्षं एकत्र काम केलं. आमच्यात कधीही एकमेकांविरुद्ध स्पर्धा नव्हती. राजकारणात मर्यादा कशा पाळायच्या, याचे उत्तम भान दादांना होते. त्यांनी कधी माझ्यावर आणि मी कधी त्यांच्यावर टीकेची मर्यादा ओलांडली नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.अजित पवार हे एक उत्तम मुख्यमंत्री ठरले असते...अजित पवार जर मुख्यमंत्री झाले असते, तर त्यांनी महाराष्ट्राचा कायापालट केला असता. कामाचा धडाका आणि अंमलबजावणीतील त्यांचा हातखंडा राज्यासाठी प्रभावी ठरला असता, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी अजित दादांच्या प्रशासकीय कौशल्याचे कौतुक केले. दादांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादीच्या एकीकरणाचा चेंडू जयंत पाटलांनी अजित पवार गटाच्या विद्यमान नेत्यांच्या कोर्टात टाकला आहे. जयंत पाटील म्हणाले की, विलीनीकरणाच्या चर्चेवेळी दादांचा एक ठाम विश्वास होता. माझ्या पक्षात मी जे म्हणेन तेच होईल आणि एकही आमदार विरोधात जाणार नाही, याची त्यांना खात्री होती. मात्र, आता ज्या नेतृत्वाशी मी चर्चा करत होतो, तेच नेतृत्व (अजित पवार) आपल्यात नाही. त्यामुळे आता ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्यांनी पुढाकार घेऊन दादांचे शेवटचे स्वप्न पूर्ण करावे. अजित दादांची शेवटची इच्छा 'एकसंध राष्ट्रवादी' हीच होती. ही इच्छा पूर्ण करण्याची सद्बुद्धी सर्वांना मिळो, असे आवाहन जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे. दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सीता व नीता या दोघी बहिणी रोजच्यासारख्या सायंकाळी आपली शाळा आटोपल्यावर घरी आल्या. आपला अभ्यास उरकून घेतला. त्या त्यांच्या मावशीजवळ प्रश्न विचारण्यासाठी जाऊन बसल्या.“मावशी सकाळी सूर्य उगवण्याआधी आपण झुंजूमुंजू झाले असे म्हणतो. ते कसे असते?” सीताने शंका विचारली.“संधिप्रकाशासारखीच प्रक्रिया सकाळी सूर्योदयापूर्वीही होत असते. संधिप्रकाशासारखाच प्रकाश आपणास रात्रीचा अंधार संपल्यानंतर सकाळी पूर्व दिशेस सूर्योदयाच्या आधी दिसतो. त्यालाच ‘झुंजरूक’ किंवा ‘झुंजूमुंजू’ असे म्हणतात. सूर्य क्षितीजाखालून किंचितसा वर डोकावताच हा झुंजरूक सुरू हाेतो. सूर्य जसजसा वर येतो तसतसा हा झुंजरूक हळूहळू वाढत जातो, तसतसे तांबडे फुटते, हळूहळू दिवस उजाडू लागतो. शेवटी प्रत्यक्ष सूर्यच पूर्णपणे उगवतो नि चोहिकडे स्वच्छ उजेड पडतो. त्यालाच दिवस म्हणतात. आले ना आता लक्षात?” मावशीने प्रेमाने विचारले.“होय मावशी! हे तर लक्षात आलं. आता संधिप्रकाशानंतर रात्र कशी होते हे सांगशील तर बरे होईल.” नीता म्हणाली.“आणि मावशी! रात्रीनंतर दिवस कसा काय होतो गं? ते सुद्धा सांग आम्हाला.” सीताने नीताच्या प्रश्नात भर घातली.“सांगते. तेही सांगते,” मावशी सांगू लागली, “आपली पृथ्वी ही स्वत:भोवती फिरताना सतत सूर्याभोवतीसुद्धा फिरत असते हे आताच थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलेच आहे. लक्षात आहे ना?” मावशीने अंदाजे खडा टाकला.“होय मावशी.” दोघीही म्हणाल्या.“फारच छान!” मावशी म्हणाली, “तुम्ही दोघीही अभ्यासात्मक गोष्टी चांगल्या लक्षात ठेवता, ही आनंदाची बाब आहे. असे लक्षात ठेवत गेल्याने व वारंवार आठवून पाहत गेल्यानेच तर स्मरणशक्तीची चांगली वाढ होते.” मावशी पुढे सांगू लागली, “आपल्या पृथ्वीला स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जो कालावधी लागतो त्याला एक दिवस म्हणतात. त्याचेच आपण आपल्या सोयीसाठी चोवीस भाग केलेत व त्यांना आपण तास म्हणतो. म्हणजेच पृथ्वीला स्वत:भोवती एक गिरकी पूर्ण करण्यास २४ तास लागतात म्हणून एक दिवस हा २४ तासांचा असतो.”“पण मावशी दिवस तर सहसा १२ तासांचाच तर असतो ना?” सीता विचारत पुढे बोलली, “आणि तू तर सांगते की दिवस हा २४ तासांचा असतो.”“बरोबर आहे ते.” मावशी बोलली, “२४ तासांच्या दिवसाला खरे तर एक वार असे म्हणतात. त्यालाच अहोरात्र किंवा दिनरात्र अथवा रातदिन म्हणतात. सांगा बरे एकूण किती व कोणकोणते वार आहेत?” मावशीने प्रश्न केला.“एकूण सात वार आहेत मावशी आणि ते म्हणजे...” सीता उत्तर देत असतानाच मध्येच नीता बोलत “रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार.” असे खडाखड आळीपाळीने दोघींनीही वारांची नावे सांगितली.मावशी पुढे म्हणाली, “मानवाने त्याच्या सोयीसाठी या चोवीस तासांचे म्हणजे एका वाराचे दोन भाग केले आहेत. पृथ्वीवरील कोणत्याही एखाद्या ठिकाणी पूर्वेकडे सूर्य उगवल्यापासून म्हणजे एका सूर्योदयापासून तर तो परत त्याच ठिकाणी पुन्हा उगवेपर्यंतच्या म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतच्या कालावधीला एक वार म्हणतात. जोपर्यंत सूर्य आपणास दिसतो त्या काळाला दिवस म्हणतात. असा १२ तासांचा दिवस होतो. तसेच ज्यावेळी सूर्य दिसत नाही त्या काळाला रात्र म्हणतात. अशी १२ तासांची रात्र असते. म्हणूनच १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र असे म्हणतात आणि एक दिवस व एक रात्र मिळून एक खरा दिवस किंवा वार होतो.”“चला आजची चर्चा आपण जरा थांबवू. मला एक पुस्तक वाचायचे आहे.” मावशी बोलली.“हो मावशी.” दोघीही म्हणाल्या व मावशीजवळून उठल्या.
Jayant Patil : दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा घटनाक्रम आणि तारखेबाबत जयंत पाटलांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
Mardaani 3 ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एन्ट्री; पहिल्याच दिवशी केली एवढी कमाई
बॉलिवूडची 'लेडी सिंघम' अर्थात राणी मुखर्जी पुन्हा एकदा मोठ्या पदडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिचा बहुप्रतिक्षित असा मर्दानी ३ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला.या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा 'शिवानी शिवाजी रॉय' या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. राणी मुखर्जी हिच्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. आणि या चित्रपटाला प्रेक्षकवर्गानेही भरभरून प्रतिसाद दिला आहे.मर्दानी ३ ने पहिल्या दिवशी भारतात सुमारे ४.५६ कोटींच्या जवळपास रुपयांची कमाई केली आहे. राणी मुखर्जीच्या मागील चित्रपट मर्दानी २ याच्या तुलनेत या चित्रपटाने चांगलीच कामगिरी केली आहे. मर्दानी २ ने पहिल्या दुवंशी ३.८० कोटींची कामे केली होती, त्या तुलनेत तिसऱ्या भागाला प्रेक्षकांनी अधिक पसंती दर्शवली आहे.राणी मुखर्जी 'शिवानी शिवाजी रॉय' या डॅशिंग पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत पडद्यावर परतली आहे. 'मर्दानी ३' हा चित्रपट शुक्रवारी, ३० जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. गंभीर विषय आणि राणीच्या जबरदस्त अभिनयामुळं या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर समाधानकारक सुरुवात केली आहे.मर्दानी ३सिनेमाच्या एकूण कमाई बद्दल बोलायचं झालं तर सिनेमानं भारतभर ४.५६ कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. तर Worldwide कलेक्शन हे ५.५० कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जातंय. या आकड्यांमध्ये बदल होण्याचीही शक्यता असते.यावेळी शिवानी शिवाजी रॉय एका अत्यंत गंभीर अशा ९३ मुलींच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास करताना दिसत आहे. अभिराज मिनावाला यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. अतिशय थरारक पद्धतीनं हा गंभीर विषय मांडला आहे. यशराज फिल्म्सनं तिकीट दरांबाबत विशेष रणनीती आखली असून, सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात तिकीटे उपलब्ध करून दिली आहेत.
'राष्ट्रवादीकडे असलेलं सर्वात मोठं पद सुनेत्रा पवारांनी स्वीकारावं'
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या जे आहे त्यात राज्याचे उपमुख्यमंत्रिपद हे सर्वात मोठे पद आहे. यामुळेच हे पद अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी स्वीकारावे अशी आमची इच्छा आहे. एकदा सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या की त्यांच्या नेतृत्वात इतर राजकीय प्रश्न सोडवता येतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसने नेते आणि मंत्री छगन भुजबळ म्हणाले.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीन करण्याबाबत चर्चा सुरू होती का ? या प्रश्नावर पक्षाशी संबंधित सर्व राजकीय प्रश्न सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या की त्यांच्या नेतृत्वात सोडवता येतील असेच भुजबळ पुन्हा म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत पक्ष आग्रही आणि ठाम असल्याचे भुजबळ म्हणाले.सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करणार किंवा कसे याबाबत मला कोणतीही माहिती नाही असे शरद पवारांनी सांगितले. या संदर्भात आत्ता मी बोलू शकत नाही. पण सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे ही माझ्या पक्षाची भूमिका मी पुन्हा एकदा आपल्यापुढे ठामपणे मांडेन असे छगन भुजबळ म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार पक्षाच्या आमदारांची आज म्हणजेच शनिवार ३१ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील मुख्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षाचा गटनेता निवडला जाणार आहे. अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या गटनेता या पदासाठी निवडीची प्रक्रिया आजच पूर्ण केली जाणार आहे. या निवड प्रक्रियेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. या भेटीनंतर राज्यपालांकडे शपथविधीसाठी वेळ मागितला जाईल आणि लवकरच सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री या पदाची शपथ घेतील, असे सूत्रांकडून समजते.
Sonam Kapoor: बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दुसऱ्यांदा आई होणार असलेली सोनम नुकतीच मुंबईतील लोअर परेल येथे आयोजित एका आंतरराष्ट्रीय ब्युटी ब्रँडच्या इव्हेंटमध्ये दिसली.
मुंबई : मुंबईच्या लोकल प्रवासातील जीवघेणी गर्दी पुन्हा एकदा प्रवाशांच्या मुळावर उठली आहे. शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या शीव स्थानकाजवळ तीन प्रवासी धावत्या लोकलमधून रुळांवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. अफजल चौधरी, सचिन विश्वकर्मा आणि जेनिल सय्यद या तीन प्रवाशांनी शुक्रवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास कुर्ला स्थानकातून सीएसएमटीकडे जाणारी धीमी लोकल पकडली होती. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने या तिघांनाही आत शिरता आले नाही आणि त्यांना दारावरच लटकून प्रवास करावा लागला. गाडी सुरू झाल्यानंतर काही वेळातच शीव स्थानकाजवळ गर्दीच्या रेट्यामुळे या तिघांचाही तोल गेला आणि ते धावत्या लोकलमधून थेट रुळांवर फेकले गेले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. लोकलमधील वाढत्या गर्दीमुळे काही दिवसांपूर्वीच एका शिक्षकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, आता या अपघातामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.https://prahaar.in/2026/01/31/border-2-box-office-collection-day-8-sunny-deols-film-crosses-rs-300-crore/जखमींना तातडीने उपचारासाठी शीव रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींपैकी अफजल चौधरी यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. तर सचिन आणि जेनिल या दोन प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे. या भीषण दुर्घटनेनंतर बचाव कार्यासाठी रेल्वे प्रशासनाला ओव्हरहेड वायरमधील (OHE) विद्युत पुरवठा काही काळ बंद करावा लागला. याचा थेट परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेतच गाड्या थांबल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. जखमी प्रवाशांना रुळांवरून सुरक्षितपणे बाजूला केल्यानंतर आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विद्युत पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आणि लोकल वाहतूक धीम्या गतीने पूर्ववत करण्यात आली.रेल्वे पोलिसांकडून तपास सुरूसकाळी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी आणि प्रवाशांचे दाराला लटकणे ही नेहमीचीच बाब झाली असली तरी, ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार गर्दीच्या रेट्यामुळे प्रवाशांचा तोल गेला असावा असे वाटत असले तरी, प्रवासात डब्यामध्ये प्रवाशांमध्ये काही वादावादी किंवा झटापट झाली होती का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. डब्यातील इतर प्रवाशांचे जबाब आणि उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस या निष्कर्षापर्यंत पोहोचणार आहेत. या तपासानंतरच अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.मध्य, हार्बर रेल्वे विस्कळीतएका बाजूला मध्य रेल्वेच्या कळवा आणि ठाणे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांजवळ साचलेल्या कचऱ्याला सायंकाळच्या वेळी भीषण आग लागली. या आगीमुळे निर्माण झालेला धूर आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुख्य मार्गावरील वाहतूक तब्बल अर्धा तास थांबवण्यात आली होती. दुसरीकडे, हार्बर रेल्वेवरही तांत्रिक बिघाडाने प्रवाशांची वाट अडवली. खांदेश्वर आणि मानसरोवर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवरील तब्बल चार सिग्नलमध्ये अचानक बिघाड झाला. या बिघाडामुळे लोकल गाड्यांच्या एकामागे एक रांगा लागल्या आणि रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले. घरी परतण्याच्या घाईत असलेल्या हजारो प्रवाशांना या दुहेरी संकटामुळे स्थानकांवर ताटकळत उभे राहावे लागले.
PM Modi Talk To Venezuela Acting President :
Sunil Tatkare : शरद पवारांंचा विलीनकरणाचा गौप्यस्फोट; सुनील तटकरेंची एकाच वाक्यात प्रतिक्रिया
Sunil Tatkare : शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या विधानानंतर आता सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : सनी देओलच्या बहुप्रतिक्षित 'बॉर्डर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या विकेंडनंतर चित्रपटाच्या कमाईत थोडी घट झाली असली तरी, या चित्रपटाने जगभरात ३०० कोटी रुपयांचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. 'सॅकनिल्क' (Sacnilk) या इंडस्ट्री ट्रॅकरनुसार, चित्रपटाने आतापर्यंत भारतात २३५.२५ कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे.https://prahaar.in/2026/01/31/sunetra-pawar-will-take-oath-deputy-chief-minister-sharad-pawar-big-statement-on-merger-ajit-pawar-wish/पहिल्या आठवड्यातील तुफान प्रतिसादानंतर, ८ व्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी चित्रपटाने ११ कोटी रुपयांची कमाई केली. शुक्रवारी थिएटरमध्ये प्रेक्षकांची एकूण उपस्थिती १५.०५ टक्के इतकी होती. यामध्ये सकाळच्या शोला ६.५८ टक्के, तर रात्रीच्या शोला सर्वाधिक २३.६५ टक्के प्रतिसाद मिळाला. मुंबईमध्ये ८५१ शोमध्ये २१ टक्के उपस्थिती नोंदवली गेली. दिल्ली-एनसीआरमध्ये १,२७० शोमध्ये १४.६७ टक्के उपस्थिती पाहायला मिळाली. शुक्रवारी राणी मुखर्जीचा 'मदार्नी ३' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३.८ कोटींची कमाई केली असली तरी, 'बॉर्डर २' च्या कमाईच्या वेगावर त्याचा कोणताही मोठा परिणाम झालेला दिसत नाही.अनुराग सिंग दिग्दर्शित 'बॉर्डर २' हा १९९७ मध्ये आलेल्या जेपी दत्ता यांच्या 'बॉर्डर' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल आहे. यामध्ये सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांज, अहान शेट्टी, मोना सिंग आणि सोनम बाजवा यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि जेपी दत्ता यांची मुलगी निधी दत्ता यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री…! कोण आहेत सुनेत्रा पवार?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर काल (शुक्रवारी, ता. ३०) खासदार सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आज त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून, सामाजिक कार्यातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता सत्तेच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचला आहे. परंतु, अजित पवार यांच्या पत्नी आणि पवार कुटुंबियांची सून, ही ओळख वगळता सुनेत्रा यांचा राजकीय प्रवास नेमका कसा आहे, ते जाणून घेऊयात...सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी तेर (जि. धाराशिव) येथे झाला. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण असून, त्यांना मोठा राजकीय वारसा लाभला. १९८५ मध्ये अजित पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर काटेवाडी (ता. बारामती) येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली.काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ रोवण्याचे श्रेय सुनेत्रा पवार यांना जाते. पहाटेपासून स्वतः हातात खराटा घेऊन कामाला सुरुवात करत त्यांनी संपूर्ण गावाला या अभियानात सहभागी करून घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली काटेवाडीने ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या कामाची दखल घेत देश-विदेशातील अभ्यासकांनी काटेवाडीला भेट दिली. याच कार्यामुळे त्यांना सार्क देशांच्या 'साकोसान' परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या सामाजिक कार्याची दखल व्यापक पातळीवर घेतली गेली.बारामतीमध्ये ‘एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण तसेच महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती असे विविध उपक्रम त्यांनी राबवले. या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय व नेतृत्वात्मक सहभाग राहिला. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.लग्नानंतर शेतकाम, पोल्ट्री व्यवसाय, गाईगुरे सांभाळणे आणि दूध काढणे अशी कामे त्यांनी आवडीने केली. अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीत घर सांभाळणे, नातेसंबंध जपणे, सामाजिक कार्य करणे तसेच कठीण प्रसंगी त्यांना साथ व सल्ला देणे, ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम नोंदवला जाणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला. त्यापूर्वी त्या पवार कुटुंबातील प्रत्येक निवडणुकीत सक्रिय प्रचार करत असत आणि बारामतीतील अनेक विक्रमी विजयांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. पक्षफुटीनंतर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली; मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तरीही त्या खचल्या नाहीत आणि जनसेवेत सक्रिय राहिल्या.यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. राज्यसभा खासदार म्हणून काम करत असतानाच त्यांच्याकडे तालिका सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या आसनावर विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला. आता अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
धक्कादायक! आयटीचे छापे पडताच बंगळुरुतील प्रसिद्ध बिल्डरने संपवलं स्वतःचं आयुष्य
बंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारकॉन्फिडंट ग्रुपचे अध्यक्ष सी जे रॉय यांनी स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली. नुकताच आयकर विभागाने त्यांच्या अनेक कंपन्यांवर छापे टाकले होते. त्यानंतर शुक्रवार ३० जानेवरी रोजी सी जे रॉय यांनी आपल्या कार्यालयातडोक्यात गोळी झाडून आपलं आयुष्य संपवून घेतलं. ते ५७ वर्षांचे होते.गुरुवारी (२९ जानेवरी) सकाळी, आयकर विभागाने त्याच्याशी संबंधित अनेक कंपन्यांवर छापे टाकले होते. या छाप्यांमध्ये, त्यांच्याकडे त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचे उघड झाले.पोलिसांनी पुढे सांगितले की; अशोका नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत, गोळीबाराची घटना घडली. प्रथमदर्शनी असे दिसते की कॉन्फिडंट ग्रुपचे अध्यक्ष आणि संस्थापक सी जे रॉय यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र त्यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी एचएसआर लेआउटमधील नारायण रुग्णालयात आहे. पोलिस आयुक्तांनी पुढे सांगितले की, ही घटना दुपारी ३ ते ३.३० च्या दरम्यान घडली.#WATCH | Confident Group Chairman C.J. Roy suicide case | In Bengaluru, CJ Babu, brother of C.J. Roy says, ...I have to meet the family to discuss about the cremation.When asked if he has any other kind of suspicion, he says, No other...Other than Income Tax issue, he had… pic.twitter.com/NQI0Ikx7nR— ANI (@ANI) January 31, 2026या प्रकरणाला आत्महत्येस प्रवृत्त करणे म्हणून पाहिले जाऊ शकते का असे विचारले असता, सध्या, आयकर अधिकारी येथे नाहीत. आम्ही त्यांच्याशी बोलू त्यानुसार पुढच्या तपासाला सुरुवात होईल, असे पोलिसांनी सांगितले.आयकर विभागाच्या पथकाकडून गेल्या दोन तीन दिवसांपासून छापेमारी आणि चौकशी सुरु होती. सीजे रॉय यांच्या भारताबाहेर असलेल्या कुटुंबीयांच्या संपर्कात पोलीस असल्याची माहिती आहे. कॉन्फिडंट ग्रुप कर्नाटक आणि केरळमध्ये कार्यरत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आयकर विभागाच्या छाप्यांमुळं सीजे रॉय अस्वस्थ झाले होते.सीजे रॉय हे मूळचे केरळचे असून कोची येथील रहिवासी आहेत. सीजे रॉय हे मल्याळम चित्रपटांचे निर्माते देखील आहेत. मोहनलाल यांचा बिगबजेट सिनेमा कॅसानोवा याचा समावेश आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अवघ्या ७२ तासांत महाराष्ट्राच्या राजकारणाने एक अनपेक्षित वळण घेतले आहे. शुक्रवारी दिवसभर चाललेल्या वेगवान घडामोडींनंतर आता सुनेत्रा पवार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी ५ वाजता राजभवनावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. काल दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीतच सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे, एकीकडे शरद पवार हे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचे संकेत देत असताना, दुसरीकडे मात्र या मोठ्या निर्णयाबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला या प्रक्रियेत बाजूला ठेवले गेले की त्यांना मुद्दाम अंधारात ठेवले गेले? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यानच झालेली ही नाट्यमय निवड राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फोडणार की सत्तासंघर्षाला पूर्णविराम देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.https://prahaar.in/2026/01/31/sunetra-pawar-oath-to-the-decision-regarding-sunetra-pawar-was-taken-in-a-hurry-know-what-exactly-happened/विलीनीकरणाचा 'मुहूर्त' ठरला होता, पण...महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका बाजूला सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची तयारी सुरू असतानाच, दुसरीकडे शरद पवार यांनी केलेल्या एका खळबळजनक विधानामुळे खळबळ उडाली आहे. येत्या १२ तारखेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृतपणे विलीनीकरण होणार होते, असा मोठा खुलासा शरद पवार यांनी केला आहे. गेल्या चार महिन्यांपासून अजित पवार आणि जयंत पाटील या विलीनीकरणासाठी सातत्याने चर्चा करत होते आणि हा निर्णय आता अंतिम टप्प्यात आला होता, असेही पवारांनी स्पष्ट केले. दोन्ही गट एकत्र यावेत ही खुद्द अजितदादांची मनापासून इच्छा होती आणि त्यांच्या या शेवटच्या इच्छेचा आम्ही मान राखू इच्छितो, असे म्हणत शरद पवारांनी विलीनीकरणाला थेट हिरवा कंदील दिला आहे. मात्र, या विलीनीकरणाच्या प्रक्रियेला अजित पवार गटातील काही बड्या नेत्यांचा तीव्र विरोध असल्याचे समजते. हे विलीनीकरण झाल्यास आपले राजकीय महत्त्व कमी होईल, अशी भीती या नेत्यांना वाटत आहे. याच विरोधामुळे शरद पवारांना अंधारात ठेवून आणि विलीनीकरणाची प्रक्रिया लांबणीवर टाकण्यासाठीच घाईघाईने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेण्यात आला का? अशा चर्चांना आता उधाण आले आहे. इतकंच नव्हे तर अजित पवारांनी १४ बैठका घेतल्या होत्या. विलीनीकरणाबाबत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात बैठका झाल्या होत्या. बैठकीत सहभागी झालेले नेते विलीनीकरणावर सकारात्मक होते. त्या बैठकीत विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता.
Alia Bhatt: बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट आज अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणली जाते. वैयक्तिक आयुष्यात ती अभिनेता रणबीर कपूरची पत्नी आणि लाडकी मुलगी राहाची आई आहे.
Yugendra Pawar Post : “प्रिय अजितकाका, तुम्हाला बघत-बघत,…”; युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट चर्चेत
Yugendra Pawar Post : अजित पवार यांच्या निधानानंतर पुतण्या युगेंद्र पवार यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
राजरंग : राज चिंचणकरकोणत्याही कलाकृतीच्या सादरीकरणाच्या मागे अनेक विभाग आणि व्यक्ती कार्यरत असतात. लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या आणि अशा अनेक मंडळींचे त्या कलाकृतीच्या निर्मितीमागे कष्ट असतात. मात्र ती कलाकृती रसिकांसमोर सादर होताना त्या कलाकृतीच्या लेखकाला दुर्लक्षिले जाते; अशी चर्चा कलाक्षेत्रात कायम सुरू असते. वास्तविक, लेखक हा त्या कलाकृतीचा जन्मदाता असतो; मात्र नंतरच्या काळात याच लेखकाचा संबंधित मंडळींना विसर पडल्याची ओरड नेहमी होत असते. याच पार्श्वभूमीवर काही ठोस भाष्य करणाऱ्या 'आत्मचरित्र' आणि 'वार्ता लिफ्ट' या दोन एकांकिका सध्या मराठी रंगभूमीवर लक्ष वेधून घेत आहेत. 'लेखक' नामक महत्त्वाच्या घटकाला केंद्रस्थानी ठेवत, हे दोन प्रयोग सध्या रंगभूमीवर काही सांगू पाहत आहेत. यातून लेखकाचे 'भूमिका' म्हणून जगणे प्रकर्षाने दृगोच्चर होत आहे.या दोन एकांकिकांपैकी 'आत्मचरित्र' या एकांकिकेचे लेखन दीपक कुलकर्णी यांनी १९८८ मध्ये केलेले आहे; तर 'वार्ता लिफ्ट' ही एकांकिका वैभव पाटील यांनी यावर्षी लिहिली आहे. दीपक कुलकर्णी यांची 'आत्मचरित्र' ही एकांकिका त्याकाळी खूप गाजली होती. एक लेखक एका आडगावात, वीस वर्षे एका वाड्यात नोकरासोबत राहत आहे. प्रसिद्धी, पैसा, सन्मान यापासून तो खूप लांब आहे. पण आपल्या भूतकाळापासून पलायन करण्याकरता त्या लेखकाने चित्रकला जवळ केलेली आहे. त्याचे बोध मन म्हणत आहे की आत्मचरित्र लिही; पण अबोध मनातल्या त्याच्या आठवणी त्याला त्रास देत आहेत. आत्मचरित्र लिहिताना स्वतःशी प्रतारणा करावी लागेल म्हणून हा लेखक शेवटपर्यंत आत्मचरित्र लिहीत नाही. असा आशय असलेली ही एकांकिका तिच्या शक्तिशाली आशयामुळे मनाची पकड घेते. नीलेश पवार, राजन काजळरोकर आदी कलाकार यात भूमिका साकारत आहेत. अशीच, 'लेखक' या विषयाशी संबंध असलेली दुसरी एकांकिका म्हणजे 'वार्ता लिफ्ट'. ही एकांकिका वैभव पाटील या युवा लेखकाने लिहिली आहे. आजची पत्रकारिता व मुलाच्या आजारपणासाठी प्रकाशकाला पुस्तके विकणारा लेखक यांच्या आयुष्यातली हतबलता यात मांडली आहे. समाजातली आजची पत्रकारिता व लेखकाचे सामाजिक स्थान, हा या एकांकिकेचा पाया आहे. अभय धुमाळ, दिनार केळुसकर आदी कलाकार यात भूमिका रंगवत आहेत. या एकांकिकांची निवड आणि दिग्दर्शन महेंद्र डोंगरे यांनी केले असून, विषयांचे विविधिकरण शोधत असताना त्यांची कलाकार म्हणून असलेली सामाजिक बांधिलकी व नाटकाविषयीची कळकळ यातून दिसून येते.एकूणच ही सगळी प्रक्रिया आणि प्रयोगांच्या निमित्ताने महेंद्र डोंगरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणतात, “एकांकिका ही केवळ रंगभूमीची एक शाखा नाही; तर समाजाच्या बौद्धिक, सामाजिक व कलात्मक जाणिवेचा तो आरसा आहे. इतिहास, सद्यस्थिती, सुवर्णकाळ आणि भविष्य असे तिचे चार टप्पे पाहिले, तर एक सुसंगत असा प्रवास दिसून येतो. १९७० ते १९९० हा काळ मराठी एकांकिकेचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. त्या काळात 'लेखन' हे केंद्रस्थानी होते. त्याचा साहित्यिक दर्जा उच्च होता. एकांकिका म्हणजे 'शॉर्टकट' नव्हता; तर ती एकप्रकारची कलात्मक जबाबदारी होती. त्या काळात, एकांकिका म्हणजे एका व्यक्तीच्या माध्यमातून संपूर्ण समाज बोलत असे. याच संदर्भाने, 'वार्ता लिफ्ट' आणि 'आत्मचरित्र' या दोन एकांकिका भाष्य करतात.वास्तविक, हे सर्व मांडण्याचे कारण म्हणजे काळाच्या वेगवान प्रवाहात, जिथे 'रिल्स' हा प्रकार मानवी मनाचा भाग होत आहे; त्याचकाळात एकांकिकेचे विषयही एका वाक्यात सांगता येतील. पण शब्द फुगवटा ३५ ते ४० मिनिटे फुगवून एकांकिका सादर केल्या जात आहेत. त्यात मुख्य भाग कल्पनाविष्काराचा असतो. अशाच या प्रवाहात गोरेगाव, मुंबईची 'सोहम साधना ग्रुप' ही संस्था वेगळा प्रयोग करत आहे. गेल्या महिन्यात या संस्थेने 'विदूषक' या विषयावर दोन एकांकिका सादर केल्या होत्या. आता ही संस्था 'लेखक' या सामायिक विषयावर दोन एकांकिका करत आहे. वाचण्याऐवजी पाहण्यात रस घेणारा आजचा समाज आहे. एकेकाळी शब्दांची गारुडे घालणारी लेखक मंडळी समाजात अतिशय प्रतिष्ठा, मानसन्मान बाळगून होती. आज प्रवाहाच्या ओघात खाली ढकलला गेलेला लेखणीकार लेखक, नाटकाच्या दृकश्राव्य माध्यमातून तसूभरही उंचावला तरी माझी कल्पना सार्थकी लागली, असे मी समजेन.”
सुंदर स्वप्नातल्या बंगल्यातील मृण्मयीचं एक नातं असंही
टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमलबालकलाकार ते अभिनेत्री असा सुयश प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी सुपल. व्यावसायिक रंगभूमीवर पहिलं पाऊल टाकणाऱ्या मृणामयीचं ‘एक नातं असंही’ या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग आज पनवेलमध्ये आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये होणार आहे.मृण्मयीचे शालेय शिक्षण वांद्रेच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत झाले. जेव्हा ती शिशू वर्गात होती, तेव्हाच तिने ऑडिशन देण्यास सुरुवात केली. तिने मिराकल्स अॅकॅडमीमधून मॉडेलिंगचा कोर्स केला होता. जेव्हा ती तिसरीत होती तेव्हा तिला बालाजी प्रॉडक्शनची स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘हे बंध रेशमाचे’ ही मालिका मिळाली होती. ती चौथीत होती तेव्हा, तिला कलर्स वाहिनीवरील ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतील छोट्या ईश्वरीची भूमिका मिळाली. तिला यातील भूमिकेसाठी म. टा. सन्मान अॅवॉर्ड मिळाले. या भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. अगदी अमेरिकेतून फॅन्स तिला भेटायला भारतात आले. ही मालिका व ईश्वरीची भूमिका तिच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरली.ती पाचवीत असताना तिला ‘तू माझा सांगाती’ ही मालिका मिळाली. त्यामध्ये चिन्मय मांडलेकर होते, छोट्या आवलीची भूमिका तिने साकारली होती. संत तुकारामांची संसार गाथा व आवली यावर ही मालिका होती. त्यानंतर ती सहावीत असताना तिला संजय लीला भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी’ या हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये गोपिकाबाईची भूमिका तिने साकारली होती. त्या चित्रपटातील दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली. नंतर 'रेडू' हा चित्रपट तिने केला. अमेझॉनची पेनाची जाहिरात तिने केली. तृतीयपंथ गौरव सावंतवरची एक डॉक्युमेंटरी होती, त्यामध्ये तिने गौरव सावंतच्या गायत्री नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. पोलिओची जाहिरात केली. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडेसोबत ‘ब्लॅक बोर्ड’ नावाचा चित्रपट केला. 'अँब्रो' नावाची एक शॉर्ट फिल्म तिने केली. त्यासाठी तिला इंटरनॅशनल बेस्ट चाईल्ड अॅक्ट्रेसचा अॅवॉर्ड मिळाला. 'भाकर,' 'बाजार','बंपर लॉटरी' हे चित्रपट तिने केले. नंतर तिने शिक्षणासाठी थोडा ब्रेक घेतला.त्यानंतर तिने कीर्ती कॉलेजला पुढील शिक्षण घेतले. तेथील सांस्कृतिक कार्यक्रमात तिने भाग घेतला होता. युथ फेस्टिवलमध्ये तिने भाग घेतला होता. अकरावीत असताना तिला स्टार प्रवाह वाहिनीवरील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेतील छोट्या रमाबाईची भूमिका मिळाली. ती भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे.खूप दिवसांपासून तिला नाटकात काम करण्याची इच्छा होती. तो योग जुळून आला. ' रेडू' चित्रपट करीत असताना निकिताने 'एक नातं असं’ही या नाटकवाल्यांकडे तिचे नाव सुचविले. या नाटकामध्ये तिची काव्या या मुलीची भूमिका आहे. ती केवळ कणखर मुलगी नसून, प्रेमळ बहीण आहे. ती अल्लड, खोडकर, समजूतदार स्वार्थी अशी सर्व गुणसंपन्न आहे. आजच्या काळातील ती मुलगी आहे.आजच्या धावपळीच्या जगात नातेसंबंध दुरावलेले आहेत. भाऊ व बहिणीमधील दुरावा वाढत चाललेला आहे. रक्षाबंधन, भाऊबीज हे सण साजरे करण्यासाठी आपल्याकडे भाऊ, बहीण नसेल याची चिंता तिने व्यक्त केली. भाऊ-बहिणीच्या महत्त्वाच्या नात्यावर हे नाटक भाष्य करीत आहे. या नाटकानंतर बहीण-भावामधील वितुष्ट मिटेल असा आशावाद तिने व्यक्त केला.'एक नातं असंही' हे नाटक नात्यातील गुंतागुंत, सद्यस्थितीवर भाष्य करणारं, थोडसं हसा पिकवणारं, सामाजिक विषय गांभीर्याने घेणारं असं हे नाटक आहे. कार्तिक आणि काव्या या भाऊ-बहिणीच्या नात्यावर या नाटकाची कथा आहे. कार्तिकला गायक व्हायचे असते; परंतु परिस्थितीमुळे तो हतबल होतो. बहिणीचे शिक्षण व्हावे म्हणून तो एका कंपनीत नोकरी करतो. पुढे काव्याच्या आयुष्यात एक मुलगा येतो, त्याच्या येण्याने कार्तिक आणि काव्याच्या नात्यात दुरावा निर्माण होतो की संबंध दृढ होतात? एका भावाने बहिणीसाठी केलेल्या त्यागाची जाणीव बहिणीला राहते का? या साऱ्या प्रश्नाची उकल या नाटकातून होणार आहे. या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग पनवेलच्या आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ३१ जानेवारीला संध्याकाळी ४.३० वाजता होणार आहे. या नाटकाचे लेखन विस्मय दीपक कासार यांनी केले असून दिग्दर्शन दर्शन सिद्धार्थ घोलप यांनी केले आहे. या नाटकाची निर्मिती शिवाय मेघा या निर्मिती संस्थेने केले असून अभिजित भालेराव हे या नाटकाचे निर्माते आहेत.माणसाने कितीही आधुनिक प्रगती केली तरी, आपसातील नाते जपणे खूप आवश्यक आहे. ‘एक नातं असंही’ हे नाटक एका सामान्य नात्याची असामान्य गोष्ट सांगणार आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली गेली आहे. आज म्हणजेच शनिवार ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी होणार असून, त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या काही तासांपासून घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमताने अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे वृत्त आहे. आज विधिमंडळ गटनेता निवडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची मुंबईत होणाऱ्या महत्वाच्या बैठकीनंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.मात्र शपथविधीची घाई कशासाठी असा सवाल उपस्थित होत असतानाच विश्वसनीय सूत्रांकडून याचं उत्तर समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,सुनेत्रा पवार यांना इतक्या लवकर तात्काळ गट नेते निवड आणि उपमुख्यमंत्री पदावर निवड हा अंतिम निर्णय एनसीपी कोअर टीमचाच आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाची चर्चा मुद्दाम काही जण घडवू पाहत असल्यानेच इतक्या घाईत सुनेत्रा पवार यांची निवड करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. एनसीपी कोअर टीम आणि सुनेत्रा पवार यांच्या सहमतीनेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शपथविधी लवकर करण्याची भूमिका एनसीपी कोअर टीमने घेतली. सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करणे आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष करणे ही भूमिका प्रफुल पटेल, सुनीव तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्याच भूमिकेतून मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी शुक्रवारी (३० जानेवरी) सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री या पदासाठी होकार दिल्याचे कळते.त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे : शरद पवारदरम्यान शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की; सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही. आजचा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मला याबाबत काही माहिती नाही. अजित पवार यांचे निधन हा राज्यासाठी मोठा आघात आहे. राष्ट्रवादीने काय करावे, हे त्यांच्या पक्षातील नेते ठरवतील. भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. विलिनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. पण आता खंड पडला.त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे.शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आले आहे.
Sharad Pawar: सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही - शरद पवार
Sharad Pawar : अजित पवार यांच्या निधानानंतर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेतून मोठे गौप्यस्फोट केले आहे.
Stress & Obesity: स्ट्रेसमुळे वजन का वाढतं? जाणून घ्या इमोशनल ईटिंगमागचं संपूर्ण शास्त्र
Stress & Obesity: आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव (स्ट्रेस), चिंता आणि नैराश्य या समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहेत. मानसिक आरोग्याच्या या अडचणी केवळ मनापुरत्याच मर्यादित राहत नाहीत, तर त्यांचा थेट परिणाम शरीरावरही होतो, असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.
मुंबई : उपमुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो काही निर्णय घेईल, त्याला भाजप आणि राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा राहील, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मांडली. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याबाबत चर्चा सुरू आहे. उद्या, शनिवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होणार असून, त्यात गटनेत्याची निवड केली जाणार आहे. तसेच अजित पवार यांच्या जागी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिले जाईल, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अजितदादांचे कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस जे काही निर्णय घेईल, त्याला भाजप पक्ष आणि सरकारचा पूर्ण पाठिंबा असेल. राष्ट्रवादीचे नेते दोन वेळा माझ्याशी चर्चा करून गेले असून, या चर्चेत त्यांनी पक्षाची कार्यपद्धती, उपलब्ध पर्याय आणि पुढील वाटचाल याबाबत माहिती दिली आहे. मात्र अंतिम निर्णय हा संबंधित पक्षाचाच असतो, त्यामुळे त्या निर्णयावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.अर्थसंकल्प कोण सादर करणार?राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अर्थसंकल्पाची संपूर्ण तयारी अजितदादांनीच केली होती. आता मी स्वतः यात लक्ष घालून अर्थसंकल्पाशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करून घेणार आहे. त्यानंतर अर्थसंकल्प कोणी सादर करायचा, याबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.मुंबईच्या महापौर पदाबाबत दोन दिवसांत निर्णयमहापौर पदाच्या निवडणुकांबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महायुतीतील संबंधित पक्षांमध्ये चर्चा झाली आहे. मुंबई तसेच इतर शहरांतील महापौर पदासाठी जी नावे पुढे आली आहेत, त्यावर येत्या एक-दोन दिवसांत चर्चा केली जाईल. त्यानंतर अंतिम नावे निश्चित केली जातील. संबंधित महानगरांचे अध्यक्ष आणि आमदार योग्य तो निर्णय घेतील. नागपूरच्या महापौर पदासंदर्भातही एकूण चर्चा झाली असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
निवडणुका पुढे ढकलल्याने शिक्षक संभ्रमात
परीक्षा आणि निवडणूक ड्युटी एकाच वेळी; शिक्षकांच्या अडचणीत वाढ मुंबई : महाराष्ट्रात १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे तारखांमध्ये बदल झाल्याने शिक्षक अडचणीत आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाला असून, त्याचा थेट परिणाम सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्याने शिक्षकांना आता एक मोठा संभ्रम उभा राहिला आहे.सध्या शिक्षकांचे प्रमुख दडपण म्हणजे ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी देशव्यापी होणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा. या परीक्षेसाठी अनेक शिक्षक आधीच बसले आहेत. दुसरीकडे, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे त्यांना निवडणूक ड्युटीही करावी लागणार आहे. परीक्षा आणि निवडणूक ड्युटी एकाच वेळी येत असल्यामुळे शिक्षक संभ्रमात पडले आहेत परीक्षा द्यायची की निवडणूक ड्युटी करायची? हा प्रश्न त्यांना सतावत आहे.मागील काही दिवसांत महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीनंतर लगेचच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे टप्पे जाहीर झाले होते. यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सतत निवडणूक ड्युटीमध्ये व्यस्त होते. आता या निवडणुका पुढे ढकलल्याने त्यांची धावपळ आणखी वाढली आहे. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होईल, तर मतमोजणी ७ फेब्रुवारीऐवजी ९ फेब्रुवारी रोजी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.शिक्षकांच्या दडपणामध्ये आणखी भर पडली आहे. कारण दोन्ही घटनांमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या कर्तव्याशी जुळत असल्याने मानसिक ताण वाढत आहे. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य यावरही नकारात्मक परिणाम होत आहे.केंद्रप्रमुख परीक्षा ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे, तर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ७ व ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता सुरू होईल. दोन्ही परीक्षा जिल्ह्याबाहेरच्या केंद्रांवर होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना फक्त परीक्षा देण्यापुरतेच नव्हे, तर निवडणूक ड्युटीची जबाबदारीही पार पाडावी लागणार आहे. शिक्षकांमध्ये आता अशा परिस्थितीत कारवाईची भीती आहे, कारण निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या टप्प्यात बदल केला तरीही त्यांची ड्युटी रद्द होईल की नाही, याबाबत स्पष्टता नाही.राज्यातील शिक्षक संघटनांनीदेखील या परिस्थितीवर लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. शिक्षकांनी सांगितले की, “दोन्ही कर्तव्य अत्यावश्यक असून त्यात प्राधान्य ठरवणे कठीण झाले आहे. आयोगाकडून योग्य निर्णय अपेक्षित आहे.”एकूणच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आणि निवडणूक आयोगाच्या तारखेतील बदलांमुळे शिक्षकांच्या कामाचा ताण आणि मानसिक दडपण वाढले आहे. राज्यातील शिक्षण संस्थांना आणि निवडणूक व्यवस्थापनाला आता या परिस्थितीचा विचार करून शिक्षकांना न्याय्य मार्गाने सोडवावे लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यात नवीन रक्तपेढी सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
रक्तपिशव्यांचे संकलन करण्यासाठी हमीपत्राची गरज मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यात नवीन रक्तपेढी सुरू करण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून त्यानुसार महानगरांमध्ये रक्तपेढी स्थापन करण्यासाठी संस्थांना स्वयंप्रेरित रक्तदान शिबिरांद्वारे वार्षिक तीन हजारांपेक्षा अधिक रक्तपिशव्या तर शहरी, ग्रामीण व आदिवासी भागांसाठी दोन हजार रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. दोन वर्षांनंतर राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे.सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार नवीन रक्तपेढ्यांना मंजुरी देण्यासाठी तयार करण्यात आलेले परिपूर्ण व व्यापक धोरण लागू करण्यात येत आहे. या धोरणानुसार राज्याचे भौगोलिक क्षेत्र हे महानगर, शहरी, ग्रामीण आणि आदिवासी या चार गटांमध्ये विभागले. महानगरात रक्तपेढी सुरू करू इच्छिणाऱ्या संस्थांना स्वयंप्रेरित रक्तदान शिबिरांद्वारे वार्षिक तीन हजारांपेक्षा अधिक रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. शहरी, ग्रामीण व आदिवासी भागांसाठी हा निकष दोन हजार रक्तपिशव्या इतका आहे. रक्त हा मौल्यवान संसाधन असल्याने त्याचे घटक वेगळे करून कार्यक्षम वापर करण्यावर यात भर दिला आहे. त्यामुळे भौगोलिक क्षेत्र कोणतेही असले तरी, रक्तघटक विभाजनाची सुविधा उपलब्ध असलेल्या नवीन रक्तकेंद्रांनाच परवानगी देण्यात येणार आहे. एकही रक्तपेढी नसलेल्या ग्रामीण भागामध्ये जिल्हास्तरीय निकष पूर्ण झाले नसले तरी त्यांना परवानगी देण्याची तरतूद केली आहे.कोणत्या संस्था ठरणार पात्र : एनबीटीसीच्या निकषांनुसार अर्जदार संस्था ही स्वयंसेवी किंवा धर्मादाय स्वरूपाची असून, किमान दोन वर्षे जुनी आणि आरोग्यसेवा क्षेत्राशी संबंधित असावी लागेल. वार्षिक रक्तसंकलन, समुपदेशक व सामाजिक कार्यकर्त्यांची नियुक्ती, घटक विभाजन सुविधा उभारणी आणि एसबीटीसी व एनबीटीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत हमीपत्रे आवश्यक असेल. या संस्थांना देण्यात येणारे ना हरकत प्रमामणपत्र हे दोन वर्षांसाठी वैध राहणार आहे.रुग्णालय आधारित रक्तपेढीसाठी निकषरुग्णालयाधारित रक्तपेढीसाठी विशिष्ट निकष घातले आहेत. रुग्णालयाने स्वतंत्र रक्तपेढी उभारण्याची गरज सविस्तर स्पष्ट करणे, खाटांची संख्या व विशेष शस्त्रक्रिया, आपत्कालीन सेवा यांचा तपशील देणे बंधनकारक राहणार आहे. अशा रक्तपेढ्यांना परिसरातील ३ ते ४ रुग्णालयांना रक्त व रक्तघटक पुरवण्याचे हमीपत्र द्यावे लागेल. २०० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांची क्षमता असलेली वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांना अंतर्गत रक्तपेढीसाठी परवानगी दिली जाईल. सरकारी रुग्णालयांना मात्र आरोग्य विभागाच्या गरजेनुसार रक्तपेढी सुरू करता येईल आणि त्यासाठी परिषदेकडून स्वतंत्र परवानगीची आवश्यकता राहणार नाही.
तिरुवनंतपुरममध्ये आज भारत-न्यूझीलंड मालिकेचा समाराेप
होम ग्राऊंडवर संजूसाठी शेवटची संधी? इशानच्या एन्ट्रीने वाढला दबावतिरुवनंतपुरम : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील निर्णायक आणि शेवटचा सामना शनिवारी खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने ही मालिका वर्ल्ड कपच्या तयारीसाठी महत्त्वाची मानली असली तरी, यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनसाठी हा सामना अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. संजू आपल्या घरच्या मैदानावर पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असला, तरी त्याच्या खराब फॉर्ममुळे 'प्लेइंग इलेव्हन'मधील त्याच्या स्थानावर टांगती तलवार आहे.चौथ्या सामन्याला मुकलेला इशान किशन पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे दिसत असून तो सरावासाठी मैदानात उतरला आहे. फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, इशान खेळण्याची शक्यता जास्त आहे, मात्र अंतिम निर्णय फिजिओ घेतील. इशानच्या पुनरागमनामुळे संजू सॅमसनला संघातून डच्चू मिळणार की संघ व्यवस्थापन त्याला घरच्या मैदानावर शेवटची संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.संजू सॅमसन या मालिकेतील चारही सामन्यांत अपयशी ठरला आहे. वर्ल्ड कपपूर्वी फॉर्म मिळवण्यासाठी ही मालिका सुवर्णसंधी होती, मात्र संजूला त्याचा फायदा उठवता आला नाही. खेळाडूंना अधिक संधी देणे गरजेचे आहे, मात्र वर्ल्ड कपमध्ये जाताना आत्मविश्वास आणि फॉर्म दोन्ही महत्त्वाचे आहेत, असे म्हणत कोटक यांनी संजूच्या कामगिरीवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले आहे.प्रशिक्षक कोटक यांनी तरुण फलंदाज अभिषेक शर्माचे विशेष कौतुक केले. अभिषेकने कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या खेळात मोठी सुधारणा केली असल्याचे त्यांनी नमूद केले.न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संजू अपयशी ठरलेला दिसतो आहे. त्याला मागील चार सामन्यांत १०, ६, ०, २४ अशाच धावा करता आल्या आहेत. संजू सॅमसनचा फॉर्मवर विचारलेल्या प्रश्नावर कोटक म्हणाले, त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या धावा सध्या दिसत नाही. त्याला त्याची स्पेस, मोकळीस देण्याचे आमचे काम आहे.सामन्यापूर्वी खेळाडूंनी मंदिरात टेकवला माथानिर्णायक सामना ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे सर्व खेळाडू तिरुवनंतपुरममधील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचाही समावेश होता. खेळाडू मंदिरात पोहोचल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये खेळाडूंनी दर्शनासाठी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्याचे पाहायला मिळते.जसप्रीत बुमराहला विश्रांतीभारताने ही मालिका ३-१ अशी आधीच जिंकली आहे आणि त्यामुळे पाचव्या सामन्यात काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. जसप्रीत बुमराह व हार्दिक पांड्या यांना आजच्या लढतीत विश्रांती दिल्यास आश्चर्य वाटायला नको. तिसऱ्या सामन्यातही त्यांना विश्रांती दिली गेली होती. संजू सॅमसनला आणखी एक संधी मिळेल हे निश्चित आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात ‘जनरेशन वॉर’
जोकोविच विरुद्ध अल्काराझ यांच्यात लढतमेलबर्न : मेलबर्न पार्कच्या रॉड लेव्हर एरिनावर झालेल्या दोन थरारक उपांत्य फेरीच्या सामन्यांनंतर, ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत टेनिस विश्वातील दोन सर्वात मोठे खेळाडू आमने-सामने उभे ठाकले आहेत. एकीकडे विक्रमादित्य नोव्हाक जोकोविच आहे, तर दुसरीकडे युवा आणि तडफदार जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला कार्लोस अल्काराझ.३८ वर्षीय नोव्हाक जोकोविचने (जागतिक क्रमवारीत चौथे स्थान) विद्यमान दुहेरी विजेत्या जानिक सिनरला पाच सेटच्या महाकाव्य लढतीत पराभूत करून ११ व्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमध्ये प्रवेश केला. जोकोविचने सिनरवर ३-६, ६-३, ४-६, ६-४, ६-४ असा विजय मिळवला.आता अंतिम फेरीत नोवाक जोकोविचचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या कार्लोस अल्काराझशी होईल, ज्याने पहिल्या उपांत्य फेरीत अलेक्झांडर झ्वेरेवला पाच सेटच्या सामन्यात पराभूत केलं होतं. कार्लोस अल्काराझचा सामना सुमारे पाच तास आणि २७ मिनिटे चालला, ज्यामुळे तो स्पर्धेच्या इतिहासातील तिसरा सर्वात मोठा सामना ठरला. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कार्लोस अल्काराझचा हा पहिलाच अंतिम सामना असेल. जर हा सामना त्याने जिंकला, तर तो करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण करणारा सर्वात तरुण पुरुष खेळाडू बनेल. ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी खेळवला जाईल. दिग्गज खेळाडू की नवा तरुण खेळाडू कोण बाजी मारणार, यावर सर्वांच्या नजरा असतील. टेनिस जगत या ऐतिहासिक अंतिम फेरीची आतुरतेने वाट पाहत आहे, जिथे जोकोविचचा २५ वा ग्रँड स्लॅम आणि अल्काराझचा पहिला ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदाचा सामना असणार आहे.अंतिम सामन्याची पार्श्वभूमी रविवार होणाऱ्या अंतिम सामन्याकडे संपूर्ण टेनिस विश्वाचे लक्ष लागले आहे. जोकोविच २४ ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या मार्गारेट कोर्टच्या विक्रमापासून केवळ एक पाऊल दूर आहे. फायनलमध्ये त्याचा १००% (१०-०) जिंकण्याचा रेकॉर्ड आहे. हा सामना अनुभवी जोकोविच आणि २२ वर्षीय अल्काराझ यांच्यातील 'पिढ्यांची लढाई' म्हणून पाहिला जात आहे. त्यांच्या मागील सामन्यांमध्ये, जोकोविच ५-४ असा अल्काराझच्या पुढे आहे. २०२४ पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्येही जोकोविचनेच बाजी मारली होती.
रायगड जिल्ह्यात १४७ जणांचे मरणोत्तर नेत्रदान
४१ अंधांना मिळाली नवी दृष्टीअलिबाग : मरणानंतरही दुसऱ्यासाठी जगण्याची आस रायगड जिल्ह्यातील नागरिक मरणोत्तर नेत्रदानातून पूर्ण करीत आहेत. अशा नेत्रदात्यांमुळे १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२५ या पावणेपाच वर्षाच्या कालावधीत ४१ दृष्टिहिनांना सृष्टीचे नितांतसुंदर दर्शन घडले.माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे नेत्र काही तास जिवंत असतात. मृत्यूनंतर काही तासात काढलेल्या नेत्रांचा अंधत्व आलेल्यांना फायदा होऊ शकतो आणि हे जग त्यांना पाहता येऊ शकते. नेत्ररोपण यशस्वी झालेल्या व्यक्तीला ६० टक्के दिसू शकते. नेत्रदानासाठी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरिरातून सहा तासांच्या आत डोळ्यातील नेत्रपटल काढून घेणे आवश्यक असते. या डोळ्यांचे दोन ते तीन दिवसांमध्ये रोपण होणेही आवश्यक असते. नेत्ररोपणामध्ये बुबुळाच्या पाठीमागे असलेल्या 'कॉनिर्या' या भागाचे रोपण केले जाते.रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नेत्रदानाबद्दल चांगली जनजागृती होत आहे. वर्षाला सुमारे ३०० नागरिक मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करीत आहेत. त्यामुळे अशा नेत्रदानाचे प्रमाणही वाढले आहे. १ एप्रिल २०२१ ते डिसेंबर २०२५ या पावणेपाच वर्षात जिल्ह्यात १४७ जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. यामधून ४१ अंधांवर बुबुळ रोपण शस्त्रक्रिया करून नवी दृष्टी देण्यात आली, तर उर्वरित जणांचे नेत्रपटल संशोधनासाठी पाठविण्यात आले आहेत.असे झाले नेत्रदान१ एप्रिल २१ ते ३१ डिसेंबर २५ या कालावधीत रायगड जिल्ह्यात १४७ जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले. (२९४ नेत्र बुबुळांचे संकलन) जिल्हा रुग्णालयात ८८ नेत्र बुबुळे संकलन (४४ जणांचे नेत्रदान), शंकर आय बँक १६ नेत्र बुबुळे संकलन (८ नेत्रदान), लक्ष्मी आय बँक १९० नेत्र बुबुळे संकलन (८० जणांचे नेत्रदान), शस्त्रक्रिया ४१, संशोधन ११६, इतर संस्थेत पाठवलेले नेत्र बुबुळ ६.
Shard Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यावर पक्षातील नेत्यांचे एकमत झाले आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाची धुरा देखील पवार कुटुंबाकडेच राहावी, अशी भूमिका वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षपदही सुनेत्रा पवारांकडेच दिले जाणार आहे. या सर्व परिस्थितीवर शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही. अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे :शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की; सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही. आजचा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मला याबाबत काही माहिती नाही. अजित पवार यांचे निधन हा राज्यासाठी मोठा आघात आहे. राष्ट्रवादीने काय करावे, हे त्यांच्या पक्षातील नेते ठरवतील. भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. विलिनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. पण आता खंड पडला.त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे.शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आले आहे.उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी :सुनेत्रा पवार यांचा आज म्हणजेच शनिवार ३१ जानेवरी रोजी संध्याकाळी ५ वाजता शपथविधी होणार आहे. याचपार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या बारामतीहून मुंबईकडे रवाना झाल्या असून, त्यांच्यासोबत पुत्र पार्थ आणि जय पवार, तसेच अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा हे देखील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक शनिवारी दुपारी २ वाजता विधानभवनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडेल, अशी माहिती पक्ष सूत्रांनी दिली आहे.
वसई-विरार महापालिकेत महापौर पदासाठी ७ अर्ज
उपमहापौर पदासाठी ५ अर्जविरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आले. बहुजन विकास आघाडी आणि भाजप या दोनही राजकीय पक्षाकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महापौर पदासाठी एकूण ४ जणांचे ७ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये बहुजन विकास आघाडीच्या तीन नगरसेवकांनी आणि भाजप तर्फे एका सदस्याने अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौर पदासाठी एकूण ३ जणांचे ५ अर्ज दाखल झाले आहेत. यात बविआतर्फे २ तर भाजपच्या एका नगरसेवकाने अर्ज दाखल केला आहे.वसई-विरार महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला बहुमत मिळाले आहे. ११५ पैकी ७१ सदस्य त्यांचे निवडून आले असून त्यातील एका काँग्रेसच्या सदस्याला बविआचा पाठिंबा होता. तर भाजप- शिवसेना महायुतीचे ४४ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचा महापौर आणि उपमहापौर होणार हे निश्चित आहे. महानगरपालिकेच्या महापौर पदासाठीची आरक्षण देखील नुकताच जाहीर झाले असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी हे आरक्षण निघाले आहे. दरम्यान, शुक्रवारी महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. बहुजन विकास आघाडीतर्फे अजीव पाटील, प्रफुल्ल साने, निषाद चोरघे यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. या तिघांनीही प्रत्येकी २ अर्ज दाखल करण्यात आले. तर भाजपतर्फे ॲड. दर्शना त्रिपाठी यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एकूण ७ अर्ज पालिकेकडे दाखल झाले आहेत.तर दुसरीकडे उपमहापौर पदासाठी बविआतर्फे मार्शल लोपीस, कन्हैया भोईर यांनी प्रत्येकी २ अर्ज दाखल केले आहेत. तर भाजपतर्फे नारायण मांजरेकर यांनी एक अर्ज दाखल केला असून एकूण ५ अर्ज सादर करण्यात आले आहेत. ३ फेब्रुवारी रोजी बविआतर्फे कोण अर्ज मागे घेणार आणि कोण महापौर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच महायुतीने सदर निवडणूक अविरोध होऊ नये यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, की आणखी काही चमत्कारिक घडणार आहे हे ३ फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार आहे.
महापौरांना ७५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता
उपमहापौरांना ६५ हजार, तर विरोधी पक्षनेत्याला ५० हजारविरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना नियमानुसार विविध सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत. महापौर यांना वाहन प्रतिपूर्ती भत्ता म्हणून दर महिन्याला ७५ हजार रुपये दिल्या जातील. तसेच उपमहापौर यांना ६५ हजार, स्थायी समिती सभापती ५५ हजार, विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेत्याला ५० हजार, तर इतर सर्व सभापतींना वाहन प्रतिपूर्ती भत्ता म्हणून प्रत्येक महिन्याला ४५ हजार रुपये दिले जाणार आहेत.स्थानिक स्वराज्य सस्थांमध्ये ग्रामपंचायत सरपंचांपासून, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर अशा सर्व लोकप्रतिनिधींना त्यांच्या अडीच किंवा पाच वर्षांच्या कालावधीत मानधन तसेच विविध सोयी सुविधा देण्यात येतात. अनेक शहरांमध्ये महापौर,उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता यांच्यासाठी शासकीय निवासस्थान देखील आहेत. वसई-विरारमध्ये पदाधिकाऱ्यांसाठी अद्याप शासकीय निवासस्थान उपलब्ध नाही. या ठिकाणी प्रशस्त अशी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाचे कामकाज सुरू आहे. मात्र नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना या इमारतीत बसण्याची संधी ३ फेब्रुवारीपासून मिळणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व पदाधिकाऱ्यांचे दालन सज्ज केले आहेत. दरम्यान, वसई-विरार महापालिकेत २०१६ पूर्वी महापौर यांना ४५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता देण्यात येत होता. तर उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांना ४० हजार आणि विरोधी पक्षनेता यांना ३७ हजार अशा प्रकारे वाहन भत्ता देण्यात येत होता. २०१६ पासून प्रतिपूर्ती भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता ९ प्रभाग समिती सभापतीसह, महिला व बालकल्याण समिती सभापती, वैद्यकीय आरोग्य साहाय समिती सभापती,परिवहन समिती सभापती, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, स्थायी समिती सभापती, उपमहापौर आणि महापौर यांना वाढीव दरानुसार वाहन प्रतिपूर्ती भत्ता देण्यात येणार आहे.१२५ सदस्यांना १० हजार रुपये मानधनमहापालिकेच्या वर्गवारीनुसार तेथील नगरसेवकांना मानधन दिले जाते. राज्यातील २९ महापालिकांपैकी चार महापालिका क वर्गात समाविष्ट आहेत. यामध्ये वसई-विरार महापालिकेचा समावेश आहे. त्यामुळे येथील नगरसेवकांना दरमहा १० हजार रुपये मानधन महापालिकेकडून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. पालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या ११५ नगरसेवकांसह स्वीकृत १० नगरसेवकांना सुद्धा सदर मानधन देण्यात येणार आहे. यासाठी पालिकेचा नगरसेवकांच्या मानधनावर प्रत्येक महिन्याला १२ लाख ५० हजार एवढा खर्च होणार आहे.आयुक्तांनाही महापौरांप्रमाणे वाहन भत्तामहापालिकेच्या आयुक्तांना सुद्धा महापौर यांच्या प्रमाणेच ७५ हजार वाहन प्रतिपूर्ती भत्ता देण्यात येतो. तसेच अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपसंचालक नगररचना, सहायक आयुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि विभाग प्रमुखांना सुद्धा ४० ते ४५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता प्रत्येक महिन्यात दिल्या जातो.
‘बँकेची रोकड आणण्या-घेऊन जाण्याचे काम ज्या गाडीत होते, त्याच गाडीत तुमच्या दोन हजारांच्या नोटा बदलून देऊ. 50 कोटींच्या नोटा असल्या तरी अडचण नाही. 40 टक्के कमिशन आमचे असेल.’ हा खुलासा 2 हजारच्या नोटा बदलणाऱ्या माफियांनी भास्करच्या कॅमेऱ्यावर केला. चार्टर्ड अकाउंटंट फर्मच्या नावाखाली माफिया नोटा बदलण्याचा व्यवसाय चालवत आहेत. हे नेक्सस उघड करण्यासाठी आम्ही ब्रोकर बनून तीन माफियांना भेटलो. तिघांनी नोटा बदलण्याचे वेगवेगळे मार्ग सांगितले. तीन दलालांशी रिपोर्टरची भेट. सविस्तर अहवाल वाचा…।पहिली भेट : गजेंद्र यादव ठिकाण : जयपूरिया मॉल, इंदिरापुरम काय पद्धत सांगितली : बँकेच्या गाडीत बदलून देऊ आधी 5 कोटी 2 स्लॉटमध्ये… आम्ही गजेंद्रला सांगितले की, आमच्याकडे 50 कोटी रुपयांच्या दोन हजारच्या नोटा आहेत आणि त्या बदलून घ्यायच्या आहेत. गजेंद्र: 5 कोटींच्या स्लॉटमधून करून घ्यारिपोर्टर: ठीक आहेगजेंद्र: कॅश तुमच्याकडे आहे ?रिपोर्टर: होय, आमच्याकडे, म्हणजे पार्टीकडे गजेंद्र: किती रिपोर्टर: तुम्ही सांगा टक्केवारी कशी ठरवायची आहे. 50 कोटींच्या सर्व नोटा 2 हजारच्या आहेत गजेंद्र: 45 टक्के. यात 5% आमच्या मध्यस्थाचे राहतील. त्यांचे 40 चे आकडे आहेत.रिपोर्टर: ठीक आहेगजेंद्र: 5 आमचे वाचतील, अडीच तुम्ही घ्या, अडीच आम्ही घेऊरिपोर्टर: ठीक आहे गजेंद्र: सध्या आमचे सीए साहेब नाहीत. तेच सर्व करतील.रिपोर्टर: ठीक आहे गजेंद्र: गाडी येईल आणि गाडीतूनच घेऊन जातील.रिपोर्टर: कोणाची गाडी?गजेंद्र: त्यांची सिस्टीम.उदित: CMSगजेंद्र: बँकेच्या रोख रकमेची सीएमएस (गाडी) मिळेल.रिपोर्टर: सीएमएसची गाडी येईल?गजेंद्र: हो. गजेंद्रने सांगितले की, या कामात त्याच्यासोबत देवेंद्र वर्मा नावाचा एक चार्टर्ड अकाउंटंटही सामील आहे, ज्याची नोएडा येथे भागीदारीत चालणारी एक सीए फर्म आहे. सीए देवेंद्र वर्मा यांच्याशी आमची भेट नोएडा सेक्टर-18 मधील एका रेस्टॉरंटमध्ये झाली. रिपोर्टर आणि देवेंद्र यांच्यातील संभाषण देवेंद्र: सांगा मग काय आहे रिपोर्टर: 2 हजारच्या नोटांचे 50 कोटी बदलायचे आहेत देवेंद्र: 50-50 मध्ये बोलणे झाले आहे रिपोर्टर: होगजेंद्र: 5 आम्ही ठेवू, 40 देऊरिपोर्टर: म्हणजे पार्टीला 50गजेंद्र : पार्टीला 50 जातील. तुमच्या पार्टीला 40 जातील. बाकीचे जे 10 उरले, त्यातून 5-5 आम्ही ठेवूदेवेंद्र: ठीक आहे, कधी कराल? टप्प्याटप्प्याने?रिपोर्टर: टप्प्याटप्प्यानेच समजदारी आहे देवेंद्र: जसे दुसऱ्या शहरातून आणायचे आहे, नोएडा मध्ये एका ठिकाणी ठेवले, त्यातून अडीच आणले, मग एका तासानंतर अडीच आणले…रिपोर्टर: नाही, असे होणार नाही. जसे बोलणे झाले आहे, 5 कोटींचा स्लॉट, तर 5 कोटी मी तुमच्याकडे घेऊन येईन.देवेंद्र: अडीच देऊन टाकू.रिपोर्टर: तुम्ही मला अडीच द्याल, 500-500 च्या नोटांमध्ये. देवेंद्र: म्हणाल तर 100-100 च्या देऊन टाकू, पण मग खूप जास्त होईल. रिपोर्टर: कुली करावा लागेल.देवेंद्र: हो, 500-500 ठीक राहील. एक दिवस निश्चित करा. त्या दिवशी तुम्ही घेऊन या.रिपोर्टर: ठीक आहे, एकदा लोकेशन (जागा) सांगून द्या कुठे आणायचे आहे.देवेंद्र: ते मी सांगून देईन. देवेंद्र वर्मा आणि गजेंद्र यादव यांच्या दाव्यांवरून हे दिसून येते की दिल्ली एनसीआरमध्ये 2 हजारच्या नोटा बदलण्याची प्रणाली सक्रिय आहे. तपासादरम्यान आमची पुढची भेट अबरार नावाच्या व्यक्तीशी झाली. अबरारचे संपर्क जुन्या दिल्लीतील अनेक हवाला एजंट्सशी असल्याचे सांगितले गेले. अबरारने सांगितले की, तो सय्यद केसी नावाच्या एका व्यक्तीला ओळखतो, जो 2 हजारच्या नोटांची कितीही मोठी रक्कम बदलून देऊ शकतो. अबरारच्या मते, सय्यद चांदनी चौकातील एक मोठा हवाला एजंट आहे. दुसरी भेट : सय्यद केसी ठिकाण : जाफराबाद, दिल्ली कोणती पद्धत सांगितली : बँक कामकाजाच्या दिवशी बदलले जातील रिपोर्टर आणि सय्यद यांच्यातील संभाषण… सैयद: अंदाजे किती आहेरिपोर्टर: 50 कोटींच्या आसपास सैयद: तुम्हाला हवे तेवढे आणारिपोर्टर: 10 कोटी पण होतील ?सैयद: काही अडचण नाही. तुम्ही बँक वर्किंग डेला आणारिपोर्टर: बँकसैयद: हो, बँक वर्किंग डेला, सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंतरिपोर्टर: तर बँकेत असेलसैयद: बँकेत नाही. आम्ही आमच्याकडे ठेवू, तुम्ही काढाल. तुम्हाला बँक वर्किंग डेला आणायचे आहेरिपोर्टर: म्हणजे बँक वर्किंग डेलाचसैयद: हो, आम्ही काढून देऊ. समोर बँक आहे, काही अडचण नाहीरिपोर्टर: 5 कोटी निघतीलसैयद: हो, सर्व व्यवस्था करूरिपोर्टर: पैसे कसे देणार, सिस्टम काय असेलसैयद: गाडी घेऊन या, तिथेच हँडओव्हर करूरिपोर्टर: गाडीत देणारसैयद: होयरिपोर्टर: आधी पैसेसैयद: आधी तपासणी करू, मग लगेच देऊ. वेळ लागणार नाहीरिपोर्टर: कमिशन किती राहीलसैयद: 35–65, 65 तुम्हाला देऊ, 35 ते ठेवतील रिपोर्टर: म्हणजे 1 कोटीत 65 लाख तुम्हालासैयद: होय, थेट रोख. 500 च्या नोटांमध्येरिपोर्टर: 2000 च्या नोटा बँकेत जमा होतीलसैयद: होय, बँकिंग चॅनेलद्वारेसैयद: आमच्याकडे CMS गाडीची परवानगी आहे. मोठ्या नोटांच्या हालचालीची व्यवस्था असते रिपोर्टर: किती रक्कम नेहमी असतेसैयद: 20–25 कोटी. बाहेरून हस्तांतरण झाल्यास लगेच सैयद केसीने दावा केला की, जुन्या दिल्लीतील आडते, म्हणजेच हवाला व्यावसायिक, 35 टक्के कमिशनवर 2 हजारच्या नोटा बदलण्याच्या या संपूर्ण खेळाला अंजाम देतील. त्याच्या मते, या लोकांची बँकांमध्ये सेटिंग आहे. सीएमएसच्या गाडीतून पैसे येतील आणि तिथेच मोजणी व तपासणीनंतर हातोहात 2 हजारच्या बदल्यात नवीन नोटा दिल्या जातील. त्याचा दावा होता की, संपूर्ण व्यवहार गाडीच्या आतच पूर्ण केला जाईल. नोटा बदलणाऱ्या 2 माफियांशी भेटल्यानंतर आमची चौकशी आणखी पुढे सरकली. सूत्रांकडून असे समजले की, हा खेळ केवळ हवाला नेटवर्कपुरता मर्यादित नाही. इंटरनेटवरही असे अनेक लोक आणि ग्रुप सक्रिय आहेत, जे क्रेडिट कॅश करून देण्याचा किंवा डिजिटल व्यवहाराच्या नावाखाली 2 हजारच्या नोटा बदलवून देण्याचा दावा करतात. गुगलवर शोधल्यावर आम्हाला 'कॅश अगेन्स्ट क्रेडिट कार्ड' नावाच्या एका वेबसाइट मिळाली. वेबसाइटवर दिलेल्या नंबरवर आम्ही थेट कॉल केला. फोन संतोष नावाच्या व्यक्तीने उचलला. आम्ही कोणताही आडपडदा न ठेवता थेट 2 हजारच्या नोटा बदलवून देण्याबद्दल सांगितले. थोड्याच वेळात बोलणे भेटीची वेळ निश्चित करण्यापर्यंत पोहोचले. जागा आणि वेळही निश्चित झाली. तिसरी भेट : संतोष कुमार ठिकाण : कनॉट प्लेस, नवी दिल्ली काय पद्धत सांगितली : 30 टक्केच परतावा मिळेल रिपोर्टर आणि संतोष यांच्यातील संभाषण… संतोष: पूर्ण रक्कम एकाच वेळी होऊ शकत नाही, भागांमध्ये करावी लागेल. रिपोर्टर: हो संतोष: सुरुवातीला किती रकमेने सुरुवात होऊ शकते? रिपोर्टर: 50 लाखांपासून सुरुवात करूया. संतोष: सुरुवातीसाठी थोडे जास्त आहे, तरीही बोलून सांगेन. रिपोर्टर: नोट अगदी नवीन आहेत, वापरलेले नाहीत. ज्यांच्याशी देवाणघेवाण होईल, ती दिल्लीबाहेरची पार्टी आहे का? संतोष: हो, बाहेरची पार्टी आहे. रिपोर्टर: सध्या बँका घेत नाहीत, फक्त RBI घेत आहे. संतोष: होय, आता प्रक्रिया RBI चॅनलमधूनच आहे. औपचारिकता आणि कागदपत्रे समजून घ्यावी लागतील. रिपोर्टर: इथे तर थेट रोख व्यवहाराची चर्चा होत आहे. संतोष: मोठ्या रकमेवर प्रश्न उपस्थित होतात, त्यामुळे प्रक्रिया काळजीपूर्वक करावी लागेल. रिपोर्टर: काम नक्की आहे? संतोष: होय, निश्चित आहे. रिपोर्टर: कमिशन किती? संतोष: 30% परत मिळेल, 70% तिकडे राहील. संतोष: आधी वेळ असता तर चांगली किंमत मिळाली असती, आता परिस्थिती कमकुवत आहे. नोट बदलण्याचे नियम काय आहेत : नोंदीशिवाय बदलणे बेकायदेशीर RBI ने स्पष्ट केले आहे की, 2 हजार रुपयांची नोट अजूनही वैध चलन आहे. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीकडे 2 हजार रुपयांची नोट असल्यास तो कोणताही गुन्हा नाही, परंतु या नोटा RBI मध्ये जमा करणे आवश्यक आहे. देशभरात RBI ची 19 इश्यू कार्यालये आहेत, जिथे नोटा बदलता येतात. आरबीआयनुसार, 2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा बँक खात्यात जमा करण्यासाठी कोणतेही नवीन दस्तऐवज आवश्यक नाहीत, परंतु प्रक्रिया केवायसी नियमांनुसार होते. सामान्यतः, 20 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलताना कागदपत्रे मागितली जात नाहीत, तथापि, संशय आल्यास किंवा वारंवार व्यवहार केल्यास ओळख विचारली जाऊ शकते. बँकेत जमा करताना केवायसी (KYC) अनिवार्य आहे. आधार/पॅनची मागणी केली जाऊ शकते. मोठ्या रकमेवर पॅनसोबत पैशाच्या स्रोताचीही चौकशी होते. इंडिया पोस्टद्वारे पाठवतानाही ओळख आणि बँक तपशील देणे आवश्यक आहे. आरबीआय स्पष्ट करते की रेकॉर्ड किंवा सेटिंगशिवाय 2 हजार रुपयांच्या नोटा बदलणे नियमांच्या विरोधात आहे. निष्कर्ष : सरकारने काळ्या पैशांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने 2 हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या, परंतु नोट माफिया त्यांच्या नेटवर्कद्वारे काळ्या पैशाला पांढरे करत आहेत. प्रश्न असा निर्माण होतो की आतापर्यंत किती काळ्या पैशावाल्यांनी आपले पैसे सुरक्षित केले असतील. हे प्रकरण केवळ नियमांच्या उल्लंघनाचे नाही, तर संपूर्ण आर्थिक प्रणालीच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते. टीप : भास्करने या संपूर्ण प्रकरणावर RBI, दिल्ली पोलीस, आयकर विभाग आणि ED यांना ईमेल केला आहे. उत्तर मिळताच बातमीत अपडेट करू.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यावर शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ठाण्यात शिवसेना-भाजपची बिनविरोध सत्तास्थापना
महापौर आणि उपमहापौर दोघांचीही बिनविरोध निवड ठाणे : महापालिकेच्या महापौरपदी शिंदेसेनेच्या कोपरीमधील नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, तर दोन वर्षांसाठी महापौर पद मिळावे अन्यथा विरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपने आपली भूमिका बदलत सत्तेत राहणे पसंत करत उपमहापौरपदी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून कृष्णा पाटील यांनी नामनिर्देशन दाखल केले. विरोधात कोणीही अर्ज दाखल केले नसल्याने महापौर आणि उपमहापौर या दोघांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.महापौर पदासाठी शिवसेनेतून ७ नगरसेवकांची नावे पुढे आली होती. यात विमल भोईर, पद्मा भगत, दीपक जाधव, गणेश कांबळे, आरती गायकवाड, वनिता घोगरे आणि दर्शना जानकर यांची नावे आघाडीवर होती. मात्र अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा कोपरीवर विश्वास टाकत येथील सलग दोन वेळा निवडून आलेल्या शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांच्यावर विश्वास टाकत त्यांना महापौर पदाची संधी दिली आहे. त्या कोपरी येथील प्रभाग क्रमांक २० मधून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.दुसरीकडे महापौर पदावर दावा करणाऱ्या भाजपने अखेर उपमहापौर पदावर समाधान मानले आहे. त्यानुसार शुक्रवारी प्रभाग क्रमांक ११ मधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. विरोधी गटाकडून कोणीही नामनिर्देशन पत्र दाखल न केल्याने महापौर आणि उपमहापौर पदाची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. त्यानुसार येत्या ३ फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा केली जाणार आहे.सव्वा वर्ष असणार महापौर आणि उपमहापौर पदमहापौर आणि उपमहापौरपदाचा फाॅर्म्युला निश्चित झाला असून पहिले सव्वा वर्ष महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर आणि त्यानंतर सव्वा वर्षाने शिवसेनेचा महापौर विराजमान होणार आहे. तसेच भाजपकडून देखील उपमहापौर पद हे सव्वा वर्षँसाठी असणार आहे. त्यानंतर पुन्हा सव्वा वर्षाने उपमहापौर पद ही बदलले जाणार आहे. त्या ठिकाणी दुसरा चेहरा दिला जाणार आहे. असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. महापौर पद शिवसेनेकडेच आणि उपमहापौर पद हे भाजपकडेच राहणार आहे.
चार नगरसेवकांविरोधात उबाठा गट आक्रमक
बेपत्ता नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरूकल्याण : पक्षाचा आदेश न मानणाऱ्या ठाकरे गटातील चार नगरसेवकांविरोधात उबाठा गट आक्रमक झाला असून, बेपत्ता ४ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती उबाठा पक्षाचे शहर प्रमुख बाळा परब, गटनेते उमेश बोरगावकर आणि पक्ष प्रतोद संकेश भोईर यांनी दिली. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील त्या चार प्रभागांत पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत उबाठा गटाचे ११ नगरसेवक निवडून आले. मात्र निवडून आल्यापासून कल्याणमधील मनसेतून ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक राहुल कोट आणि नगरसेविका स्वप्नाली केणे या नॉटरिचेबल आहेत, तर शिवसेना शिंदे गटातील ठाकरे गटातून निवडून आलेले मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे नगरसेवक देखील बेपत्ता आहेत. याबाबत उबाठा गटाच्या वतीने त्यांना पक्षाच्या बैठकीला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र या बैठकीला आणि कोकण विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणीला देखील हे चारही नगरसेवक गैरहजर राहिल्याने उबाठा गटाने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.याबाबत शुक्रवारी कल्याणच्या शिवसेना शहर शाखेमध्ये नगरसेवक आणि शहर प्रमुख यांच्यासोबत बैठक पार पडली. जे चार नगरसेवक मशाल चिन्हावर निवडून आले आहेत मात्र त्यांना व्हीप मान्य नाही अशा चारही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केले असल्याची माहिती दिली.
कल्याण-डोंबिवलीत महापौर-उपमहापौर बिनविरोध
महापालिका सभागृहात महायुतीचे वर्चस्वकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून महापौर पद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे. या महापौर पदासाठी शिवसेनेच्या वतीने नगरसेविका हर्षाली चौधरी थवील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर उपमहापौर पदासाठी भाजपच्या वतीने नगरसेवक राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात पालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे हे दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, मनसेचे माजी आमदार राजू पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष नंदू परब, नरेंद्र सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. मात्र दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराचे अर्ज दाखल झाल्याने, या महत्त्वाच्या पदांवरील निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेतील निवडणूक प्रक्रिया ही केवळ औपचारिकता ठरणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून असून, नव्या महापौर आणि उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.कडोंमपा निवडणुकीमधून नवनिर्वाचित झालेल्या सदस्यांपैकी एकाची महापौर पदी, तर दुसऱ्याची उपमहापौरपदी निवड करण्यासाठी विभागीय आयुक्त कोकण भवन यांनी जिल्हा अधिकारी मुंबई शहर आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मीरा-भाईंदरमध्ये डिंपल मेहता महापौर, तर ध्रुवकिशोर पाटील उपमहापौर पदी निश्चित
भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवत विजयी झालेल्या भाजपने ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी डिंपल मेहता आणि ध्रुवकिशोर पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडे प्रचंड बहुमत असल्याने महापौर पदी डिंपल मेहता आणि उपमहापौर पदी ध्रुवकिशोर पाटील यांचा विजय निश्चित आहे.मीरा-भाईंदर महापालिकेच्या ९५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने ७८ जागांवर विजय मिळवला आहे, तर काँग्रेसने १३ आणि शिवसेनेने ३ जागांवर विजय मिळवला होता, तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता त्यानी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता भाजपची संख्या ७९ झाली आहे. शुक्रवारी महापौर पदासाठी डिंपल मेहता यांनी तर उपमहापौर पदासाठी ध्रुवकिशोर पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. डिंपल मेहता यांच्यासाठी नगरसेविका शानू गोहिल आणि स्नेहा पांडे सूचक व अनुमोदक आहेत, तर ध्रुवकिशोर पाटील यांच्यासाठी नगरसेवक संजय थेराडे आणि भगवती शर्मा सूचक व अनुमोदक आहेत.काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन मीरा-भाईंदर शहर विकास आघाडी स्थापन करून त्यांच्यावतीने काँग्रेसच्या रुबीना शेख यांनी महापौर पदासाठी तर शिवसेनेच्या वंदना विकास पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. ७९ विरुद्ध १६ अशी लढत असल्याने मीरा-भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहता आणि उपमहापौर पदी ध्रुवकिशोर पाटील यांचा विजय निश्चित आहे. डिंपल मेहता यापूर्वी २०१७ मध्ये महापौर होत्या, तर ध्रुवकिशोर पाटील हे १९९९ पासून नियमित नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. सभागृहात ते ज्येष्ठ नगरसेवक आहेत.
केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालयातर्फे घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्या नियमांची अधिसूचना
प्रदूषण करणाऱ्यांवरच नुकसानभरपाईची जबाबदारी १ एप्रिलपासून होणार अंमलबजावणी अलिबाग : घनकचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असून, त्यातच घनकचरा व्यवस्थापनाबाबत असलेल्या कायदे आणि नियमांच्या सर्रास होणाऱ्या उल्लंघनामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचण्याच्या वाढलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अत्यंत गांभीर्याने दखल घेत घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्या नियमांची अधिसूचना काढली आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०२६ पासून करण्यात येणार आहे.नव्या अधिसुचनेत अनेक महत्वाचे बदल लागू करण्यात आले असून, त्यात घनकचऱ्याच्या उगमस्थानीच चार भागांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण अनिवार्य करण्यात आले आहे, तर प्रदूषण करणाऱ्यावरच नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी राहाणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ अधिसूचित केले आहे. ते घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ ची जागा घेतील. हे नियम पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ अंतर्गत अधिसूचित करण्यात आले असून, ते १ एप्रिल २०२६ पासून पूर्णपणे लागू होतील. सुधारित नियमांमध्ये कार्यक्षम कचरा वर्गीकरण आणि व्यवस्थापनावर विशेष लक्ष केंद्रित करून चक्राकार अर्थव्यवस्था आणि कचरा उत्पादकांचे विस्तारित उत्तरदायित्व या तत्वांचा समावेश करण्यात आला आहे.राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरणीय नुकसानभरपाई निश्चित करणार : नवीन नियमांमध्ये नोंदणीशिवाय काम करणे, खोटे अहवाल देणे, बनावट कागदपत्रे सादर करणे किंवा अयोग्य घनकचरा व्यवस्थापन पद्धतीसह नियमांचे पालन न केल्यास प्रदूषण करणाराच नुकसानभरपाई देईल, या तत्वावर आधारित पर्यावरणीय नुकसानभरपाई आकारण्याची तरतूद आहे. या अंतर्गत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ संबंधित मार्गदर्शक तत्वे तयार करणार आहे. तर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रदूषण नियंत्रण समित्या पर्यावरणीय नुकसानभरपाई निश्चित करतील.लँडफिलच्या कामगिरीवर देखरेख ठेवण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे जबाबदारीनव्या नियमांतर्गत लँडफिलिंगवरील अर्थात कचराभूमीवर कचरा टाकण्याशी संबंधित निर्बंध अधिक कठोर केले गेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी विलगीकरण न केलेला कचरा सॅनिटरी लँडफिलमध्ये पाठविल्यास यासाठी त्यांच्यावर अधिक शुल्क आकारण्याची तरतूद या नियमांमध्ये करण्यात आली आहे. विलगीकरण न केलेल्या कचऱ्यासाठीचे हे शुल्क कचरा विलगीकरण, वाहतूक आणि प्रक्रियेच्या खचपिक्षा जास्त असेल, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनिवार्यपणे लँडफिलचे वार्षिक लेखापरीक्षण अर्थात ऑडिट करणे या नियमांतर्गत बंधनकारक केले गेले आहे, तर लँडफिलच्या कामगिरीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.उगमस्थानीय घनकचऱ्याचे चार भागांमध्ये वर्गीकरणघनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ अंतर्गत, घनकचऱ्याच्या उगमस्थानीच कचऱ्याचे ओला कचरा, सुका कचरा, मॅनिटरी कचरा आणि विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असलेला कचरा, अशा चार भागांमध्ये वर्गीकरण करणे आवश्यक आहे. ओल्या कचऱ्यामध्ये स्वयंपाक घरातील कचरा, भाज्या, फळांची साले, मांस, फुले इत्यादींचा समावेश असून, त्यावर स्थळाच्या सुविधेमध्ये कंपोस्ट खत तयार करून अथवा बायो-निमेशनद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे. सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, कागद, धातू, काच, लाकूड आणि रबर इत्यादींचा समावेश असून, तो वर्गीकरण आणि पुनर्वापरासाठी मटेरियल रिकव्हरी फैसिलिटीजमध्ये पाठवला जाणार आहे. सॅनिटरी कचऱ्यामध्ये वापरलेले हायपर, सॅनिटरी टॉवेल्स, टॅम्पोन आणि कंडोम इत्यादींचा समावेश असून, तो सुरक्षितपणे गुंडाळला जाईल आणि स्वतंत्रपणे साठविला जाईल. विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असलेल्या कचऱ्यामध्ये रंगाचे डबे, बल्ब, पारा असलेले थर्मामीटर आणि औषधे इत्यादींचा समावेश असून, तो अधिकृत संस्थाद्वारे गोळा केला जाणार आहे, अथवा निर्धारित संकलन केंद्रांवर जमा केला जाणार आहे.
राजिप निवडणुकीत शिवसेनेचे ४०, शेकापचे १९ उमेदवार निवडणूक रिंगणात
अलिबाग : रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी युती-आघाडीच्या राजकारणात सर्वच पक्षांच्या वाट्याला कमी अधिक जागा आलेल्या असल्या, तरी जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेचे सर्वाधिक ४० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दुसरीकडे अनेक वर्षे शिवतीर्थावर राज्य करणारा आणि मागील निवडणुकीत २३ जागा जिंकणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे यावेळी केवळ १९ उमेदवारच निवडणूक रिंगणात आहेत.रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी निवडणूक होत असून, त्यासाठी १७३ उमेदवार रिंगणात आहेत. आता पक्षनिहाय लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून, जिल्ह्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे केल्याने यंदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे महायुतीतील घटक पक्षांचे उमेदवार काही ठिकाणी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने उत्तर रायगडात भाजपबरोबर आघाडी केली आहे. तरीही शिंदेंच्या शिवसेनेने सर्वाधिक ४० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेपाठोपाठ भाजपने ३० मतदारसंघांत आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. दक्षिण रायगडात भाजपबरोबर युती करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या निवडणुकीत २९ जागांवर, तर शेकाप आणि शिवसेना ठाकरे गट यांनी प्रत्येकी १९ मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत.काँग्रेस पक्षाने ९ जागांवर उमेदवार दिले असून, मनसेने ३ मतदारसंघांत आपली उपस्थिती नोंदवली आहे. वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आणि भाकप यांनी केवळ एका जागेवर उमेदवार उभे केल्याने या पक्षांची भूमिका मर्यादित स्वरूपाची राहिली आहे, तर २१ अपक्ष उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. दरम्यान, राजिपवर सातत्याने सत्तेत राहणाऱ्या शेकापची यावेळी उमेदवार उभे करण्यात देखील पिछेहाट झाल्याचे दिसून येत आहे. मागील निवडणुकीत २३ जागा जिंकत शेकाप सत्तेतील प्रमुख घटक पक्ष बनला होता. यावेळी शेकापचे अनेक नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून अन्य पक्षात सामील झाले. त्यामुळे यावेळी शेकापने नवीन तरुण उमेदवारांना संधी दिली आहे.अपक्षांना संधीरायगड जिल्ह्यात सक्रिय असलेल्या प्रमुख राजकीय पक्षांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अपक्षांना येथील निवडणुकांमध्ये फारसा वाव मिळताना दिसत नाही. मात्र यावेळच्या निवडणुकीत २१ अपक्ष उमेदवार उभे आहेत. यात राजकीय पक्षांच्या बंडखोर उमेदवारांचाही समावेश आहे. हे अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकतात. त्यातच जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी ३१ चा मॅजिक फिगर गाठण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची चढाओढ सुरू आहे. अशावेळी सत्तासंघर्षात अपक्षांचाही भाव वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील ‘आयटीआय’ होणार ‘स्किल डेव्हलमपेंट हब’
मंत्री मंगलप्रभात लोढा; पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्याचा समावेशमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शाश्वत विकासाच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या ‘पीएम-सेतू’ योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आधुनिक ‘स्किल डेव्हलमपेंट हब’ म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. उद्योगांची संख्या कमी असलेल्या भागांत सेवा क्षेत्र, बहुकौशल्य अभ्यासक्रम आणि उपजीविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, यामुळे राज्यातील तरुणांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाच्या दर्जेदार संधी उपलब्ध होतील, अशी माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेच्या पहिल्या टप्प्यास मान्यता देण्यात आली. या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून, पुढील टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांचाही समावेश केला जाणार आहे. कुशल मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा यांतील तफावत दूर करण्यासाठी आयटीआयचे आधुनिकीकरण करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.केंद्र आणि राज्य सरकार करणार २४२ कोटींचा खर्चपीएम-सेतू योजनेंतर्गत आयटीआयचे आधुनिकीकरण ‘हब अॅण्ड स्पोक’ प्रारूपात करण्यात येणार आहे. या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकार मिळून सुमारे २४२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये केंद्र सरकारचा ५० टक्के, राज्य सरकारचा ३३ टक्के आणि उद्योग क्षेत्राचा १७ टक्के असा निधी वाटा असेल. एका क्लस्टरसाठी (एक हब आयटीआय व चार स्पोक आयटीआय) पाच वर्षांसाठी अंदाजे २४१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यापैकी केंद्र सरकारचा ११२ कोटी, राज्य शासनाचा ९८ कोटी आणि उद्योग क्षेत्राचा ३१ कोटी रुपयांचा सहभाग असेल. राज्य शासनाकडून पाच वर्षांसाठी करावयाच्या ९८ कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली आहे. नवीन अभ्यासक्रम सुरू करणारएका हब आयटीआयमध्ये सरासरी चार नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, दहा विद्यमान अभ्यासक्रमांची श्रेणीसुधारणा केली जाईल. स्पोक आयटीआयमध्ये दोन नवीन अभ्यासक्रम सुरू केले जातील आणि आठ विद्यमान अभ्यासक्रमांची श्रेणी सुधारणा करण्यात येणार आहे. उद्योगांची संख्या कमी असलेल्या भागांत सेवा क्षेत्र, बहुकौशल्य आणि उपजीविका आधारित अभ्यासक्रमांवर विशेष भर देण्यात येणार आहे. भारताची गुरुकुल परंपरा, नालंदासारखी विद्यापीठे आणि आर्यभट्टांसारखे विद्वान यांमुळे देश ज्ञानार्जनाचे जागतिक केंद्र ठरला होता. त्याच ज्ञानपरंपरेला आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची जोड देत आयटीआयच्या माध्यमातून ‘नवा भारत’ घडवण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करत आहेत, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीपुढे उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा राजकीय वारसा, पक्षाचे भवितव्य आणि सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यावर महाराष्ट्राचा कानाकोपरा खऱ्या अर्थांने शोकाकुल झाल्याचे मागील तीन दिवसांत पाहावयास मिळाले. अजित पवार यांच्या जाण्याने पवार कुटुंबीयांची, राष्ट्रवादी पक्षाची, बारामतीकरांची जितकी हानी झाली, त्याहून अधिक हानी अजित पवारांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची व महाराष्ट्रातील जनतेची झाली आहे. स्पष्टवक्तेपणा, रोखठोक विचार मांडणारा एक राजकारणी महाराष्ट्राने गमविला. मराठीतील नावाजलेले कवी भा. रा. तांबे यांनी त्यांच्या कवितेत म्हटलेच आहे की, रामकृष्णही आले-गेले, त्याविण जग का ओसचि पडले. काळ हा सुरूच राहतो, वेळ कधीही, कोणासाठी थांबत नाही. अजित पवारांच्या अकाली जाण्याने पार्थ, जय व सुनेत्रा पवार तसेच अन्य पवार कुटुंबीयांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. संघटना पोरकी झाली आहे. संघटना अधिक काळ निर्णायकी ठेवून चालत नाही. दु:ख बाजूला ठेवून निर्णय घ्यावेच लागतात. मासा पाण्यात रडतो, त्याचे अश्रू कधीही कोणाला दिसत नाहीत. तशीच अवस्था आज अजित पवारांवर प्रेम करणाऱ्या सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ व राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांची व मंत्र्यांची झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचे तब्बल ६ वेळा अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपद भूषविले आहे. राज्याचा ११ वेळा अर्थसंकल्प अजितदादांनी मांडला आहे. अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राचे एक उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले आहे. राज्याला नव्याने अर्थमंत्री शोधावा लागणार आहे. राज्याला उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तर राष्ट्रवादी पक्षाला संघटना सांभाळणारे नेतृत्व हवे. अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबीय शोकाकुल असले तरी उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुखपद रिक्त ठेवणे परवडणारे नसल्याने राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेतेमंडळींनी धावपळ सुरू केली आहे आणि ते करणे गरजेचे होते. अजित पवारांची व शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून सुरू आहे. अजित पवारांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता आणि शरद पवारांनीही त्यास संमती दिली होती. विलीनीकरणावर शिक्कामोर्तब होण्याची घटिका समीप आली आणि काळाने अजितदादांवर झडप घालून त्यांना हिरावून नेले. अजितदादांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळावी आणि पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवावे, असा सूर आता राष्ट्रवादीच्या खासदार, आमदार, मंत्री, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आळविला जात आहे. शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलेल्या अजित पवारांनी काही कारणास्तव काकांपासून वेगळे होत आपली स्वतंत्र राजकीय चूल मांडली होती. अजित पवारांच्या पाठीशी स्वतंत्र जनाधार असल्याने विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आले हाेते. अजित पवारांच्या तसेच शरद पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादीमधील प्रत्येकाचीच नव्हे तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत, काका-पुतणे पुन्हा एकाच राजकीय व्यासपीठावर एकत्रित दिसावेत अशी महाराष्ट्रीय जनतेचीही इच्छा आहे.सुनेत्रा पवार या लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय व्यासपीठावर सक्रिय झाल्या असल्या तरी गेली अनेक दशके त्यांनी अजित पवारांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात पडद्याआडून साथ दिलेली आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंविरोधात पराभूत झाल्यावर अजित पवारांनी त्यांना राज्यसभेवर खासदार बनविले. एप्रिल २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये रायगड मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून पार्थ पवार निवडणूक लढवित असताना सुनेत्रा पवारांनी पडद्याआडून बऱ्यापैकी धुरा सांभाळल्याचे राष्ट्रवादीमधील घटकांकडून सांगण्यात येत आहे. अजित पवारांनी सार्वजनिक कार्यक्रमातून भाषण करताना अनेकदा सुनेत्रा पवारांचे आभारही मानले. सुनेत्रा पवारांनी घर सांभाळल्याने मला महाराष्ट्र सांभाळता आला असल्याचे, राजकारणासाठी तसेच लोकांसाठी वेळ देता आला असल्याचे सांगत त्यांच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त केली होती. बारामतीमधील अनेक कार्यक्रमांमध्ये अजित पवारांसोबत सुनेत्रा पवारांची उपस्थिती असायची. अजित पवारांनी स्वत:ची स्वतंत्र राजकीय चूल मांडल्यावर सुनेत्रा पवार यांचा राजकीय ठिकाणी वावर वाढण्यास सुरुवात झाली. आज अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबीय, राष्ट्रवादी संघटना, सरकारमधील अजित पवारांचे सहकारी या सर्वांना सांभाळण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार या परिवारावर आलेली आहे. नजीकच्या काळात राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्यावर शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार आदी मंडळी मदतीला येतीलच. अजित पवारांच्या जाण्याने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदावर सुनेत्रा पवारांनी बसावे अशी इच्छा राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे, अनेक आमदारांकडूनही तशी भावना उघडपणे व्यक्त केली जात आहे. तीन दिवसांचा दु:खवटा सुरू असल्याने राष्ट्रवादीमधील घटकांनी याबाबत सुनेत्रा पवार, पार्थ पवार व जय पवार यांच्याशी चर्चा केली नसली तरी लवकरच ते चर्चा करतील व निर्णय घेतील. अजित पवारांच्या जाण्याने दु:ख भरून येणार नसले तरी राष्ट्रवादी संघटनेसाठी, आमदारांसाठी, कार्यकर्त्यांसाठी त्यांना डोळ्यांतील अश्रू पुसून लवकरात लवकर सक्रिय व्हावे लागणार आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नीलेश लंके आदी अनेक मंडळी सुनेत्रा पवारांच्या मदतीला असणारच. पार्थ पवार, जय पवार यांनी राष्ट्रवादीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क करावाच लागणार आहे. अडचणीच्या काळात अजितदादांचा परिवार स्वत:चे आभाळाएवढे दु:ख बाजूला सारुन पक्षासाठी, कार्यकर्त्यांसाठी सक्रिय झाला आहे, हे चित्र लवकरात लवकर निर्माण होणे राष्ट्रवादीसाठी आवश्यक आहे. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यासाठी राष्ट्रवादीकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रातील शोकाकुल जनतेचीही ती इच्छा आहे. त्यामुळे लवकरच सुनेत्रा पवारांचा शपथविधी होवून अजित पवारांनंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडून यावे लागेल. महाराष्ट्राच्या राजकीय सारीपटावर सुनेत्रा पर्वाचा शुभारंभ झाल्याचे पहावयास मिळणार आहे.
अकोल्यात भारतीय जनता पक्षाच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी निवड झाली, तर नागपूरमध्ये भाजपची पकड मजबूत असताना अमरावतीत सत्ता निश्चित होत आहे, मात्र चंद्रपूरमध्ये राजकीय संघर्षाने चित्र अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.वार्तापत्र उत्तर महाराष्ट्र अविनाश पाठकमहाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचे निकाल लागून आता दोन आठवडे उलटलेले आहेत. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या चारही महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल असे चित्र सुरुवातीला वाटत होते. त्यानुसार अकोल्यात भारतीय जनता पक्षाच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी निवड झाली आहे, तर नागपूरमध्ये ६ फेब्रुवारीला भारतीय जनता पक्षाचाच महापौर निवडला जाईल हे नक्की आहे. मात्र अमरावती आणि चंद्रपूर येथे आजही परिस्थिती काहीशी अनिश्चित वाटत आहे. त्यातही अमरावतीत आता परिस्थिती आटोक्यात आली असल्यासारखे दिसते आहे मात्र चंद्रपुरात अजूनही मारामारी सुरूच आहे.नागपूरमध्ये १५१ जागांपैकी भाजपने १०२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांना कोणाच्याही मदतीची गरज नाही. ते स्वबळावरच सर्व पदांवर दावा सांगू शकतात. मात्र शिंदे सेनेला ते एखादी तरी जागा देतील अशी शक्यता बोलली जात आहे. त्याचप्रमाणे रिपब्लिकन आठवले गटाला सुद्धा ते सत्तेत सहभागी करतील हे देखील निश्चित आहे. कारण नागपुरात रिपब्लिकन मतांचा जो जोर असलेला भाग आहे, तिथे हा भाग भविष्यातही भाजपसोबतच यावा यासाठी ही रणनीती असेल असे बोलले जाते.याचवेळी नागपुरात भारतीय जनता पक्षाने कठोर आत्मपरीक्षण करण्याची देखील गरज राजकीय विश्लेषक बोलून दाखवत आहेत. २०१७ मध्ये नागपुरात भाजपला १०८ जागांवर विजय मिळाला होता. मात्र यावेळी ती संख्या १०२ वर घसरलेली आहे. नागपुरातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच भाजप नेते निवडणुकीपूर्वी आम्ही १२० जागा जिंकू असा दावा करत होते. मात्र शून्याची जागा बदलली असल्यामुळे १२० चे १०२ झाले आहेत. हे बघता भाजपची रणनीती कुठेतरी चुकली असेही बोलले जाते आहे.भाजपच्या जागा कमी होण्यामागे विदर्भात नागपुरात एमआयएमचे जे काही प्रस्थ वाढले ते देखील लक्षात घेणे गरजेचे झाले आहे. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या मुस्लीमबहुल भागात दंगल झाली आणि ती इकडे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचली होती. त्यावेळी त्या काही घटना घडल्या त्याचेच पर्यावसान एमआयएमचे वर्चस्व वाढवण्यात झाले असल्याचे बोलले जात आहे. या दंगलीच्या प्रमुख सूत्रधार म्हणून त्याला अटक झाली होती त्याची पत्नीच एका प्रभागातून विजयी झाली आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षात जागा वाटपामध्ये जे काही गोंधळ झाले त्यामुळे देखील पक्षाला काही जागांचा फटका बसला हे निश्चित आहे. उमेदवार निवडताना काही ठिकाणी बाहेरच्या पक्षातून आलेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देत जुन्या जाणत्यांना अंगठा दाखवला गेला. त्याचप्रमाणे बाहेरच्या प्रभागातील उमेदवारांना भलत्याच प्रभागात लादले गेले. अखेरच्या क्षणापर्यंत याद्या जाहीर केल्या नाहीत आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांना बोलावून बी फॉर्म दिले गेले. त्यामुळे जो काही गोंधळ झाला त्याचा परिणाम मतदारांवर देखील झाला आहे.त्याचबरोबर काँग्रेसमध्ये नवे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी जो नियोजनबद्ध प्रचार केला आणि योग्य असे उमेदवार निवडले त्याचाही फटका भाजपला बसल्याचे बोलले जात आहे. विकास ठाकरे हे धडाकेबाज नेते म्हणून ओळखले जातात त्याचाच फायदा काँग्रेसला झाल्याचे बोलले जात आहे.अमरावतीत जरी भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नसले तरी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाने त्यांना निर्विवाद पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजप राणांचा पक्ष आणि काही अपक्ष म्हणून अमरावतीत भाजपची सत्ता येईल हे आता निश्चित झाले आहे. ६ फेब्रुवारीला अमरावतीत महापौर, उपमहापौरांची निवडणूक होणार आहे त्या दिवशी चित्र स्पष्ट होईल.चंद्रपूरमध्ये मात्र आज काय होईल हे सांगणे कठीण आहे. तिथे भाजपमध्ये आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार सुधीर मुनगंटीवार या दोघांच्या भांडणामुळे आणि शहराध्यक्षांनी ऐनवेळी उमेदवार यादी बदलल्यामुळे भाजपला जागा कमी मिळाल्या आणि काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना उबाठा गटाच्या मदतीने काँग्रेस तिथे सत्ता मिळवू शकेल असे चित्र होते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उबाठा पक्षाने तिथे अवघ्या सहा जागांच्या जोरावर पहिली अडीच वर्षे महापौरपद मागितले आहे, तर २७ जागा घेणाऱ्या काँग्रेसमध्ये शिवसेनेला महापौर पद देऊ नये असा मतप्रवाह आहे. त्यामुळे परिस्थिती डामाडौल आहे.त्याचवेळी काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातला संघर्ष उफाळून आला आहे. दोघांनीही नगरसेवकांचे वेगवेगळे गट तयार केले असून एका गटाने सर्व सदस्यांची नोंदणी करून टाकली आहे. त्यामुळे जास्तच गोंधळाची परिस्थिती झाली आहे. त्यात वडेट्टीवार गटाचे नगरसेवक बसने जात असताना त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आणि ही घटना धानोरकर गटाने घडवून आणल्याचा दावा केला जात आहे. त्यातील एक हल्लेखोर पकडला गेला असून त्याच्याकडून ही माहिती मिळाल्याचे सांगितले जात आहे.इथे काँग्रेसवासी असलेले विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर हे दोघेही मूळ शिवसैनिकच आहेत. विजय वडेट्टीवार २००५-६ या दरम्यान नेते नारायण राणे यांच्या समवेत शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमध्येच वाढत वाढत ते आता विरोधी पक्षनेते पदापर्यंत पोहोचण्याच्या तयारीत आहेत. प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर हे २०१९ पर्यंत शिवसैनिकच होते. त्यावेळी ते शिवसेनेचे आमदार होते आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी हवी होती.मात्र ही जागा युतीमध्ये भाजपसाठी सोडलेली असल्यामुळे त्यांनी शिवसेना पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसची उमेदवारी घेऊन भाजपचे उमेदवार आणि तत्कालीन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभव करत ते खासदार म्हणून निवडून आले. नंतर बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यावर प्रतिभा धानोरकर यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि त्या विद्यमान खासदार आहेत. मात्र वडेट्टीवार आणि धानोरकर या दोघांमध्ये विस्तवही जात नाही. त्यामुळे आता महापौर कोणत्या गटाचा करायचा यावर वाद सुरू असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन्ही गटांना एकत्र बसवून तडजोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून काहीही साध्य झाले नाही. परिणामी दोघांमध्ये चांगलेच भांडण सुरू आहे. याच दरम्यान भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील नेते सुधीर मुनगंटीवार हे मात्र महापौर आमचाच होणार असा दावा करीत आहेत. त्यांना या दोन दिग्गजांच्या भांडणाचा कितपत फायदा मिळेल त्यावरच चंद्रपूरचा महापौर कोणाचा होणार हे भविष्य ठरणार आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा सुरू होत आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांना भयमुक्त व आत्मविश्वासपूर्ण वातावरण मिळणे गरजेचे आहे. अभ्यास, योग्य मार्गदर्शन, पालक-शिक्षकांचा सकारात्मक सहभाग आणि मानसिक स्वास्थ्य यांचा समतोल साधल्यास विद्यार्थी निर्धास्तपणे परीक्षेला सामोरे जाऊन यश संपादन करतील.रवींद्र तांबेमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ या दरम्यान तर इयत्ता दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी शिक्षण मंडळाने संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. तसेच दक्षता समिती व भरारी पथकांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. असे असले तरी परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा देणे गरजेचे आहे. त्यासाठी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांचा उत्साह वाढवायला हवा. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.भयमुक्त म्हणजे विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जातील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्षभरातील केलेला अभ्यास अतिशय महत्त्वाचा असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शाळेत नियमित जाऊन नियमितपणे अभ्यास केलेला असेल त्यांना परीक्षेचे भय वाटणार नाही. असे विद्यार्थी आनंदाने परीक्षेला सामोरे जातात. जे विद्यार्थी अभ्यासात चुकारपणा करतात असे विद्यार्थी जसजशी परीक्षेची तारीख जवळ येते तसतसे तणावाखाली येत असतात. त्यामुळे त्यांना परीक्षेला जाताना भय वाटत असते. याला कारणं सुद्धा अनेक असतील. मात्र विद्यार्थ्यांना आपले ध्येय गाठायचे असेल तर अभ्यास महत्त्वाचा असतो. शाळा सुरू झाल्यापासून विद्यालयामध्ये जसा अभ्यास शिकवून झालेला असेल त्याप्रमाणे वेळेचे नियोजन करून अभ्यास करावा. विद्यार्थ्यांनी अभ्यास एके अभ्यास जरी केला तरी आपण एक विद्यार्थी आहोत, आपल्यासाठी कोणीतरी परिश्रम करीत आहेत याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांचे विचार शिक्षणाशी निगडित असावेत. शिक्षणामुळेच आपण मोठे होऊ शकतो याची जाणीव त्यांच्यात निर्माण व्हायली हवी. महत्त्वाची बाब म्हणजे, विद्यार्थ्यांनी दररोज आपल्या आवडीचे वेळेवर जेवण घ्यावे. व्यायाम करावा, खेळ व पुरेशी झोप घ्यावी. मात्र अति विचार टाळावेत. अनाठायी वेळ वाया घालवू नये. त्यात मध्ये टी. व्ही.वरील कार्यक्रम व बातम्या पाहाव्यात यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडत असते. असे नियमित करायला हवे. हीच खरी यशाची गुरुकिल्ली असते. परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी मन शांत ठेवणे गरजेचे असते. मन शांत ठेवल्याने अभ्यासामध्ये मन रमते. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती आपोआप निघून जाते. खोडकर मित्रांचा नाद सोडून चांगल्या मित्रांच्या सहवासात राहावे. मोबाईलला चार हात दूर ठेवावे. आवश्यक कामासाठी मोबाईलचा वापर करावा. याचा परिणाम परीक्षेची तयारी झाल्याने विद्यार्थी हसत हसत आनंदाने परीक्षेला जातात. बरेच विद्यार्थी अभ्यासात चुकारपणा केल्याने परीक्षेच्या कालावधीत मानसिक तणावाखाली दिसतात. याचा परिणाम आपण काय करावे काय करू नये याचा विचार करीत विद्यार्थी असतात. अशावेळी त्यांच्या मनातील भीती घालविण्यासाठी किंवा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्याला तसेच त्यांच्या पालकांना समुपदेशन करणे गरजेचे आहे. परीक्षेपूर्वी प्रत्येक विद्यालयांनी किंवा एकत्रितपणे मानसोपचार तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आयोजित करण्यात यावेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर होते.दहावी आणि बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असतात. या दोन्ही परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या भयातून मुक्त करायला हवे. हेच विद्यार्थी देशाचे सुजाण नागरिक बनणार आहेत. वर्ष, महिने आणि आता काही दिवस परीक्षेला शिल्लक राहिले आहेत. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे महत्त्व आजही कमी झालेले नाही. विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची दिशा या परीक्षांवर अवलंबून असते. आता बारावीच्या परीक्षेला १० दिवस आणि दहावीच्या परीक्षेला २० दिवस आहेत. वर्षभर आपण काय केले? किती तास अभ्यास केला? मार्गदर्शक कोण होते? गंमती जंमती काय केल्या? हे सर्व बाजूला ठेवावे. विद्यार्थ्यांनी आपल्या भवितव्याचा विचार करून परीक्षेचे वेळापत्रक डोळ्यांसमोर ठेवून अभ्यासाची उजळणी करावी. त्याचप्रमाणे लिहिण्याचा सरावही नियमित करावा. आतापर्यंत आपल्याला प्रत्येक विषयात किती गुण मिळाले याची चर्चा करू नये. आता एकच लक्ष अंतिम परीक्षा. दिलेल्या वेळेत विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे लिहिणे. ती सुद्धा उत्तरपत्रिकेत खाडाखोड न करता. मनामध्ये कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता. प्रश्नाच्या उत्तराच्या महत्त्वाच्या वाक्याखाली लाईन मारणे. प्रश्न नवीन पानावर सोडविणे. याची पूर्व सूचना शाळा सुरू झाल्यावर प्रश्नाचे उत्तर कसे लिहावे. प्रश्नपत्रिका कशी सोडवावी याविषयी अध्यापकांनी ज्या सूचना दिल्या असतील त्याचे काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही प्रकारचे दडपण घेऊ नये. मन प्रसन्न ठेवून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेल्या वेळेत लिहून पूर्ण करावीत. परीक्षेच्या कालावधीत भीतीविरहित विद्यार्थ्यांच्या मनात वातावरण निर्माण केले पाहिजे. यासाठी परीक्षेच्या कार्यकाळात वातावरण निर्मिती अतिशय महत्त्वाची असते. तरच विद्यार्थी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला भयमुक्त परीक्षेला सामोरे जाऊन परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करू शकतात.
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांनी सामाजिक कार्यात स्वतः झोकून देऊन काम केले. २०२४ ची बारामती लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती. पण त्यांच्या वाट्याला पराभव आला.
Preity Zinta: बॉलीवूडची बिंदास आणि नेहमी हसतमुख असलेली अभिनेत्री प्रीती झिंटा आज आपला ५१वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणा आणि आत्मविश्वासामुळे प्रीतीने नेहमीच चाहत्यांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली. तिचं वैयक्तिक आयुष्यही कायम चर्चेत राहिलं आहे विशेषतः तिच्या प्रेमसंबंधांमुळे.
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. यामुळे येथे पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
मतमोजणी व आंगणेवाडी जत्रा एकाच दिवशी
प्रशासनाला सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहनसिंधुदुर्गनगरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मतदान आणि मतमोजणीच्या तारखामध्ये बदल करण्यात आला आहे. झालेल्या बदलानुसार ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; तर ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.मतमोजणीच्या दिवशीच म्हणजे ९ फेब्रुवारी रोजी कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव देखील असणार आहे. मतमोजणी आणि श्री देवी आंगणेवाडी जत्रा याच दिवशी येत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. लोकशाहीचा उत्सव आणि श्रद्धेचा महोत्सव एकाच दिवशी साजरा होत असताना, संयम, शिस्त आणि सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी संयुक्त निवेदनाव्दारे केले आहे.मतमोजणी प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरक्षा, वाहतूक आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन आवश्यक असते. त्याचबरोबर आंगणेवाडी जत्रेसाठी राज्याच्या विविध भागांतून तसेच जिल्ह्याबाहेरून लाखो भाविक सिंधुदुर्गात दाखल होतात. त्यामुळे रस्ते, वाहतूक मार्ग, सार्वजनिक सेवा आणि सुरक्षेवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांनी आणि भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा, पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. मतमोजणी केंद्रांच्या परिसरात अनधिकृत गर्दी करू नये, कोणत्याही अफवा किंवा अपप्रचाराला बळी पडू नये. प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे नागरिकांनी पालन करावे. नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास मतमोजणी प्रक्रीया आणि आंगणेवाडी जत्रेचे नियोजन शांततेत आणि सुरळीत पार पडेल, असा विश्वासही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला आहे.
गुहागरात युती विरुद्ध उबाठा लढत रंगणार
आशिष कारेकर गुहागर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुहागर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद व १० पंचायत समिती गणासाठी निवडणूक होत आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणी युती विरुद्ध उबाठा लढत रंगणार असल्याचे चित्र आहे. गुहागर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका भाजप -शिवसेना हे युतीच्या माध्यमातून लढत आहेत. तर महायुतीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील एकत्र असल्याचे दिसून येत नाही.महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी शरद पवार गट या निवडणुकीत फारसा सक्रिय नाही तर काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. तर उबाठा व मनसे हे एकत्र निवडणूक लढवत आहेत. यामध्ये देखील मनसे केवळ एका जागेवर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे इतर सर्व ठिकाणी उबाठाने आपले उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी युती विरुद्ध उबाठा अशीच लढत होणार आहे.यात असगोली जिल्हा परिषद गटात युतीकडून संतोष जैतापकर व उबाठाकडून आ. भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांच्यात टक्कर होणार आहे. शृंगारतळी जिल्हा परिषद गटातून युतीकडून डॉ. राजेंद्र पवार व मनसेचे प्रमोद गांधी, कोंडकारूळ जिल्हा परिषद गटातून युतीकडून अपूर्वा बारगोडे व उबाठाकडून मानसी घाणेकर, वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून युतीकडून नेत्रा ठाकूर व उबाठाकडून सिद्धी रामगडे, पडवे जिल्हा परिषद गटातून युतीकडून महेश नाटेकर व उबाठाकडून सचिन बाईत अशी लढत रंगणार आहे. पंचायत समितीचा विचार करता अंजनवेल पंचायत समिती गणातून उबाठाकडून प्राजक्ता जांभारकर व युतीकडून सारिका दाभोळकर, असगोली पंचायत समिती गणातून उबाठाकडून उर्वी खैर व युतीकडून पूनम रावणंग, तळवली पंचायत समिती गणातून उबाठाकडून संदीप धनावडे व युतीकडून मंगेश जोशी, शृंगारतळी पंचायत समिती गणातून उबाठाकडून संजय पवार व युतीकडून गौरव वेल्हाळ, मळण पंचायत समिती गणातून उबाठाकडून साक्षी चव्हाण व युतीकडून मानसी रांगळे, कोंडकारूळ पंचायत समिती गणातून उबाठाकडून महेश गोवळकर व युतीकडून प्रणव पोळेकर, वेळणेश्वर पंचायत समिती गणातून उबाठाकडून सचिन जाधव व युतीकडून संदीप गोरीवले, शीर पंचायत समिती गणातून उबाठाकडून ज्योत्स्ना काताळकर व युतीकडून स्नेहा शिगवण, पडवे पंचायत समिती गणातून उबाठाकडून रवींद्र आंबेकर व युतीकडून निलेश सुर्वे तर पाचेरी सडा पंचायत समिती गणातून उबाठाकडून शशिकला मोरे व युतीकडून सुचिता घाणेकर यांच्यात खरी लढत रंगणार आहे. त्यामुळे एकंदरीत गुहागरमधील ५ जिल्हा परिषद व १० पंचायत समिती गणाचा विचार करता बहुतांश ठिकाणी युती विरुद्ध उबाठा अशीच लढत होणार आहे हे चित्र स्पष्ट आहे.
सीटीईटी परीक्षार्थी शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्याची मागणी
खेड : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड यांच्यावतीने ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सीटीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले.मूळतः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही निवडणूक पुढे ढकलून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. या अचानक झालेल्या तारखेतील बदलामुळे खेड तालुक्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक अडचणीत सापडले आहेत. ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्र शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) नियोजित असून या परीक्षेसाठी अनेक शिक्षक परीक्षार्थी आहेत. मात्र त्याच कालावधीत त्यांना निवडणूक कर्तव्य देण्यात आल्याने या शिक्षकांना अत्यंत महत्त्वाच्या सीटीईटी परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी बोलताना अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी सांगितले की, सीटीईटी ही शिक्षकांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा असून निवडणूक प्रक्रियेमुळे कोणत्याही शिक्षकाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. त्यामुळे तहसीलदार यांनी या विशेष परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ७ व ८ फेब्रुवारी रोजी ज्यांची सीटीईटी परीक्षा आहे, अशा शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली. निवेदन देते वेळी सचिव धर्मपाल तांबे, संघटना प्रवक्ता शैलेश पराडकर, सल्लागार परशुराम पेवेकर यांच्यासह शिक्षक समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
२९ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठे-महाविद्यालयांमध्ये भेदभाव रोखणाऱ्या UGC च्या नवीन नियमांवर स्थगिती दिली. न्यायालयाने म्हटले की, नियमांमधील तरतुदी स्पष्ट नाहीत. त्यांचा गैरवापर होऊ शकतो. UGC च्या २०१२ च्या नियमांमध्ये बदल केल्यानंतर १३ जानेवारी २०२६ रोजी ते जारी करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा एक गट ते आवश्यक असल्याचे सांगत होता, तर दुसरा गट विरोधात होता. स्थगिती मिळाल्यानंतर विरोध करणारे विद्यार्थी याला विजय मानत आहेत आणि समर्थन करणारे नाराज आहेत. ३० जानेवारी रोजी JNU मध्ये स्थगितीविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यांचे म्हणणे आहे की, नियमांच्या गैरवापराचा युक्तिवाद निरर्थक आहे. त्यामुळे नवीन नियमांवर स्थगिती दिली जाऊ शकत नाही. शेवटी, SC/ST-OBC सोबतचा भेदभाव थांबणे हे सवर्णांचे शोषण कसे असू शकते? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्ही काही विद्यार्थ्यांशी बोललो. तसेच, UGC च्या नवीन नियमांची गरज का पडली, हे तज्ञांकडून समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. बंदीमुळे संतप्त विद्यार्थी म्हणाले…आमच्यावरील भेदभाव थांबला पाहिजे, हे सवर्णांचे शोषण कसे?दिल्ली विद्यापीठात शिकणारा जयदेव हिंदी विभागातून एमए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे खूश नाही. त्याचे मत आहे की नियमांच्या गैरवापराचा युक्तिवाद निरर्थक आहे. तो म्हणतो, 'या देशात भ्रष्टाचार इतका वाढला आहे की कोणत्याही नियम-कायद्याचा गैरवापर थांबवता येत नाही.' ते पुढे म्हणतात, ‘नियमांना विरोध करणाऱ्यांना हे दिसत नाही की एका विशिष्ट वर्गाचे दीर्घकाळापासून शोषण होत आहे, जे त्यांना चालू ठेवायचे आहे. मागासलेल्या जातींच्या लोकांचे शोषण थांबवण्याची चर्चा झाली तेव्हा हे सवर्णांना स्वतःचे शोषण कसे वाटू लागले?’ ‘UGC कायदा 2026 ज्या शोषणाविरुद्ध आला, मग ते SC/ST विरुद्ध असो, OBC, दिव्यांग किंवा महिलांविरुद्ध असो, ते शोषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. देशातील कोणत्याही विद्यापीठात पाहिले तरी, प्रत्येक ठिकाणी हे वर्ग शोषित आहेत.’ जयदेव पुढे म्हणतात, ‘आता अस्पृश्यता हाच फक्त जातीय भेदभाव राहिलेला नाही. त्याचे स्वरूप बदलले आहे. सरकारने असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर यांच्या भरतीबाबत एक डेटा जारी केला होता. असिस्टंट प्रोफेसरच्या भरतीसाठी OBC च्या 80%, ST च्या 83% आणि SC च्या 60% जागा रिक्त आहेत. अशा परिस्थितीत जो सवर्ण समाज असा युक्तिवाद करत आहे की शोषण कुठे होत आहे, त्याला हे दिसत नाही का? तो फक्त अस्पृश्यतेलाच जातीय शोषण मानत आहे का?’ ही आम्हाला लढवण्याची (भांडणाची) साजिश, आम्ही काय फक्त भरडले जाण्यासाठी?ममता देखील दिल्ली विद्यापीठातून पीएचडी करत आहेत. UGC चे नवीन नियम आणल्याने आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्याने त्या नाराज आहेत. त्यांचे मत आहे की ही दोन्ही वर्गातील लोकांना लढवण्याची राजकीय साजिश आहे. ममता म्हणतात, 'आमच्यासारखे लोक काय फक्त भरडले जाण्यासाठी आहेत? नियम-कायदे आमच्या विरोधात असोत किंवा आमच्या समर्थनात, आम्ही फक्त भरडले जातो. हे नियमन आले तेव्हा आम्हाला आनंद झाला आणि वाटले की विद्यापीठात-महाविद्यालयात होणारा भेदभाव थांबवला जाईल.' 'आम्ही आनंद साजरा करत होतो, तेवढ्यात स्वतःला प्रोग्रेसिव्ह म्हणवणाऱ्या तथाकथित लोकांनी मोठ्या संख्येने नियमांना विरोध करण्यास सुरुवात केली. हा विरोध मान्यही करण्यात आला. आम्ही लोक विनाकारण यात अडकलो आहोत. आम्ही ना हा कायदा मागितला होता ना तो रद्द करण्यास सांगितले होते. आता उलट आम्हाला जागोजागी जाऊन सांगावे लागत आहे की आम्ही किती छळले जात आहोत.' त्या पुढे म्हणतात, 'सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण इतक्या लवकर मंजूर केले आणि निकालही दिला. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना सांगितले की त्यांनी समाज विभागला जाण्यापासून रोखले. हा मुद्दा समाजात वाद वाढवू शकला असता. शेवटी, समानतेबद्दल बोलल्याने समाजात कोणते युद्ध वाढते?' निर्णयामुळे आनंदी विद्यार्थी म्हणालेम्हणतात - पंडित आहात, मंदिरात घंटा वाजवा, आम्हीही पीडित आहोतदिल्ली विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेणारे हर्षवर्धन मिश्रा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आनंदी आहेत. ते म्हणतात, 'आमची हीच मागणी होती की विधेयक मागे घेण्यात यावे किंवा त्यात सुधारणा करावी जेणेकरून ते सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक वाटू नये. आम्ही यात काही प्रमाणात यशस्वी झालो आहोत.' हर्षवर्धन पुढे म्हणतात, 'नवीन नियमांमध्ये थेट दावा केला जात आहे की ओबीसी, एससी/एसटी फक्त बळी असू शकतात. छळ करणारे लोक फक्त सामान्य श्रेणीचे. हे समाजाला विभाजित करणारे आहे. आम्ही विचारले की आकडेवारी दर्शवते की एससी/एसटी विद्यार्थी भेदभावाला बळी पडत आले आहेत. यावर हर्षवर्धन म्हणतात, 'हे म्हणूनच आहे कारण आम्ही असे मानले आहे की शोषित फक्त एससी/एसटी किंवा ओबीसीच आहेत, तर तसे नाही. फक्त काही विशिष्ट वर्गातील लोकच पीडित आहेत असे म्हणणे चुकीचे आहे. प्रत्येक जाती-वर्गातील व्यक्ती याचा बळी ठरू शकते आणि छळ करणाराही कोणत्याही जातीचा असू शकतो.' 'मी ब्राह्मण आहे, पण मलाही भेदभावाला सामोरे जावे लागते. मित्र म्हणतात- पंडितजी, मंदिरात जाऊन घंटा वाजवा, भीक मागा, इथे शिकायला का आलात? JNU आणि BHU कॅम्पसच्या भिंतींवर 'ब्राह्मण, बनिया गो बॅक' असे लिहिलेले आहे, तुम्हाला काय वाटते की आमच्यासोबत जातीय सूचक शब्दांचा वापर होत नाही? गेल्या ७ महिन्यांपासून विद्यापीठात मला हे सर्व अनेकदा सहन करावे लागले आहे.' हर्षवर्धन यांच्या मते, UGC च्या २०१२ च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये प्रत्येक वर्गाचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे तो भेदभाव संपवून समानता राखण्याचा एक सार्वत्रिक मार्ग आहे, ज्यात कोणीही पीडित असू शकतो आणि कोणीही आरोपी. सामाजिक न्याय टिकवून ठेवण्यात याची मोठी भूमिका आहे. समान अधिकार देण्यासाठी आमच्यासोबत भेदभाव का?भरत चौधरी देखील दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेत आहेत. ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आनंदी आहेत. भरत म्हणतात, ‘जर न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केला नसता, तर समाज चुकीच्या दिशेने गेला असता. त्यामुळे हे आवश्यक होते. UGC ने नवीन नियमांमध्ये नाव तर इक्विटी कमिटी ठेवले, पण इक्विटी तेव्हाच येईल ना, जेव्हा तुम्ही सर्वांना सोबत घेऊन चालाल.‘ ‘UGC च्या नवीन नियमांना असे परिभाषित केले आहे की शोषण केवळ SC/ST, OBC आणि दिव्यांगांसोबत होऊ शकते. त्यातून जनरल कॅटेगरीला पूर्णपणे वगळण्यात आले आहे. आता एखाद्या एका वर्गाला वगळून इक्विटी कशी येऊ शकते.‘ भरत नवीन नियमांमध्ये मुदत निश्चित करण्यावर आणि खोट्या तक्रारीवर कोणतीही जबाबदारी किंवा शिक्षा नसल्याबद्दल प्रश्न विचारतात. ते म्हणतात, नवीन नियमात तक्रार करणाऱ्यासाठी ओळख सांगणे आवश्यक नाही. खोट्या तक्रारीवर शिक्षाही निश्चित नाही, अशा परिस्थितीत याचा गैरवापर होतो. 'कुणीही खोटी तक्रार करून विनाकारण कोणालाही अडचणीत आणू शकते. आपापसातील वैमनस्यातूनही अशा प्रकारची कामे केली जाऊ शकतात. अशा परिस्थितीत ज्याच्या विरोधात खोटी तक्रार केली जात आहे, त्याच्यावर याचा काय परिणाम होईल, हे कोण बघेल. त्यामुळे नियम असे नसावेत की एकाला समान अधिकार देण्यासाठी दुसऱ्यासोबत भेदभाव केला जाईल.' विद्यापीठे-महाविद्यालयांमध्ये भेदभावाची नोंदवलेली प्रकरणे विद्यापीठे-महाविद्यालयांमधील भेदभाव संपवण्यासाठी UGC ने 2012 मध्ये 'प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन्स' आणले होते. तथापि, 2016 मध्ये हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर हे नियम अधिक कठोर करण्याची मागणी पुढे आली. ऑगस्ट 2019 मध्ये रोहित वेमुलाच्या आईने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती की भेदभावाविरोधातील नियम अधिक कठोर केले जावेत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2025 मध्ये नवीन नियम बनवण्याचे निर्देश दिले होते. UGC चाच डेटा सांगतो की, गेल्या पाच वर्षांत विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये जातीवर आधारित भेदभावाच्या तक्रारी 118% नी वाढल्या आहेत. हा डेटा UGC ने उच्च शिक्षण संस्थांमध्ये स्थापन केलेल्या इक्वल ऑपर्च्युनिटी सेल (EOC) आणि SC/ST सेलकडून गोळा केला होता. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2025 मध्ये UGC ला निर्देश दिले होते की, 2012 च्या 'प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन्स' अंतर्गत जातीय भेदभावाच्या तक्रारींचा डेटा द्यावा. त्यानंतर हा अहवाल UGC ने संसदेच्या स्थायी समितीला आणि सर्वोच्च न्यायालयाला सादर केला होता. उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीवर आधारित भेदभावाशी संबंधित अनेक अहवाल यापूर्वीही समोर आले आहेत. 2007 मध्ये एम्स दिल्लीमध्ये जातीय भेदभावाबाबत सुखदेव थोरात समितीने अहवाल जारी केला होता. हा उच्च शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभावाचा स्वतःच्या प्रकारचा पहिला अधिकृत दस्तऐवज होता. अहवालात असे नमूद केले होते की एम्समध्ये SC/ST विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर भेदभावाला सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे 2023 मध्ये IIT बॉम्बेमध्ये दलित आणि आदिवासी विद्यार्थ्यांसोबत भेदभावाचे सर्वेक्षण समोर आले होते. IIT बॉम्बेच्या SC/ST विद्यार्थी सेलच्या सर्वेक्षणानुसार, एक चतुर्थांश SC/ST विद्यार्थ्यांनी सांगितले होते की ते मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांशी झुंजत आहेत. यापैकी 9% विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी जातीला मोठे कारण सांगितले होते. चौघांनी प्राध्यापकांच्या जातीय आणि भेदभावपूर्ण वर्तनालाही कारण सांगितले होते. तज्ज्ञ - नवीन नियमातून भेदभावाची व्याख्याच काढून टाकलीजातीच्या मुद्द्यांवर सातत्याने लिहिणारे लेखक आणि IRS अधिकारी एम.एस. नेथ्रपाल म्हणतात की या नियमांना SC/ST आणि OBC वर्गातील लोकांनी विरोध करायला हवा होता कारण यात अनेक त्रुटी आहेत. ते म्हणतात, ‘नियमांनुसार जी कॉमन इक्विटी कमिटी बनवण्याची चर्चा आहे, त्यात कुलगुरू (VC) आणि वरिष्ठ प्राध्यापकांना (Senior Professor) समाविष्ट करण्याची चर्चा आहे. हे कोण लोक आहेत? दलित समुदायातून आलेला कोणताही कुलगुरू नाहीये. नवीन नियमांमध्ये भेदभावाची व्याख्याच काढून टाकली आहे. आता समिती स्वतःच्या विवेकबुद्धीने ठरवेल की ते कोणत्या गोष्टीला भेदभाव मानतात आणि कोणत्या गोष्टीला नाही.’ ते नवीन नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणतात, नवीन नियमांमध्ये EWS, दिव्यांग आणि महिलांना एकाच इक्विटी सेलमध्ये समाविष्ट केले आहे. लिंगाच्या आधारावर आणि जातीच्या आधारावर होणारा भेदभाव या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मागासलेल्या जातीचा व्यक्ती कोणत्याही पदावर असला तरी, त्याच्यासोबत जातीच्या आधारावर तेव्हाही भेदभाव होतो. IIT, IIM मध्ये हे लागू नाही, जिथे आत्महत्येची जास्त प्रकरणे आहेतनेथ्रपाल पुढे म्हणतात, ‘हे नियम IIT, IIM आणि अनेक उच्च शिक्षण संस्थांमध्ये लागूच होत नाहीत, तर याच संस्थांमध्ये दलित आणि मागासलेल्यांसोबत भेदभाव आणि आत्महत्येची प्रकरणे जास्त येतात.’ नवीन नियमांना स्थगिती मिळाल्यानंतर नेत्रपाल म्हणतात, ’वेगवेगळ्या समित्यांच्या शिफारशीनंतर 2012 मध्ये अशा प्रकारचे नियमन (रेगुलेशन) आले होते. आता जो नियम आला आहे, त्यावर अनेकांनी असा युक्तिवाद केला की यामुळे विद्यार्थी विभागले जातील. पण हा नियम तर 2012 पासून आहे, मग यामुळे विद्यार्थी विभागले गेले का?’ ‘बनावट प्रकरणांची (फेक केस) चर्चाही व्यर्थ आहे. 2012 पासून नियम आल्यानंतर किती बनावट प्रकरणे आली, याचा काही डेटा आहे का? जे हा युक्तिवाद करत आहेत, त्यांनी फक्त यूपीचे (उत्तर प्रदेशचे) उदाहरण घ्यावे. SC/ST कायद्यांतर्गत दोष सिद्ध होण्याचा दर 80% आहे आणि दोष न्यायालयात सिद्ध होतो. जर बनावट प्रकरणे असती तर हा दर कमी झाला असता.’ ज्यांचे शतकानुशतके वर्चस्व आहे, ते भेदभावाची तक्रार करत आहेतदिल्ली विद्यापीठाचे माजी सहाय्यक प्राध्यापक आणि 'जातिगत जनगणना' पुस्तकाचे लेखक लक्ष्मण यादव नवीन नियमांच्या गरजेबद्दल म्हणतात की, सर्वोच्च न्यायालयाने 2012 च्या नियमांना अधिक कठोर करण्यास सांगितले होते. यासाठी हे उपाय झाले आणि 2026 मध्ये नवीन नियम जारी करण्यात आले. तथापि, यात भेदभावाचे प्रकार सांगितले नाहीत, तर 2012 च्या नियमांमध्ये ते होते. विरोध आणि थांबवण्याबद्दल ते म्हणतात, '80-90% संस्थांमध्ये जे प्रमुख आहेत, ते सवर्णच आहेत. समितीत SC/ST, OBC चे किती सदस्य असतील, हे सांगितले नाही. याचा अर्थ असा की विरोध चुकीच्या दृष्टिकोनातून झाला. तर विरोध याचा व्हायला पाहिजे की हे नियम वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी अजूनही ठोस नाहीत.' लक्ष्मण म्हणतात, ’जे लोक शतकानुशतके वर्चस्वात राहिले आहेत, ते विरोध करून म्हणतात की त्यांच्यावर भेदभाव होईल. जसे महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या बाजूने कायदे बनवले जातात, जेणेकरून त्यांना आपण संधी देऊ. गैरवापर तिथेही होतो. तो तर प्रत्येक कायद्याचा होत आहे. काही उदाहरणे घेऊन तुम्ही संपूर्ण कायद्याला विरोध करू शकत नाही.’
शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालय आणि सॅनिटरी पॅड अनिवार्य
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आदेशअन्यथा शाळांची मान्यता होणार रद्दनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांना मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटणे बंधनकारक करण्याचे निर्देश दिले. मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधली पाहिजेत. ज्या शाळांनी असे केले नाही त्यांना मान्यता रद्द करावी लागेल. न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रत्येक शाळेत अपंगांसाठी अनुकूल शौचालये बांधण्याचे निर्देश दिले. केंद्र सरकारच्या मासिक पाळी स्वच्छता धोरणाची देशभर अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या जया ठाकूर यांनी २०२४ मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. सर्व सरकारांना तीन महिन्यांत त्याचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, संविधानाच्या कलम २१ अंतर्गत जगण्याच्या अधिकारात मासिक पाळीच्या आरोग्याचा अधिकार समाविष्ट आहे. या महत्त्वाच्या निरीक्षणासोबतच, न्यायालयाने आपल्या आदेशात इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. हा निर्णय केवळ व्यवस्थेतील लोकांसाठी नाही तर अशा वर्गखोल्यांसाठी देखील आहे जिथे मुली मदत घेण्यास कचरतात. हे शिक्षकांसाठी देखील आहे जे मदत करू इच्छितात; परंतु संसाधनांच्या कमतरतेमुळे ते करू शकत नाहीत.सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, हा आदेश अशा पालकांसाठी देखील आहे ज्यांना त्यांच्या मौनाचा परिणाम कळत नाही आणि संपूर्ण समाजासाठी हे दाखवून देण्यासाठी आहे की प्रगती आपण सर्वात असुरक्षित लोकांचे संरक्षण कसे करतो यावरून मोजली जाते.तीन महिन्यांच्या आत अंमलबजावणी सक्तीचीजनहित याचिकेत मुलींच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्तसामाजिक कार्यकर्त्या जया ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आणि मुलींच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली. याचिकेत म्हटले आहे की, अनेक मुली त्यांच्या मासिक पाळीच्या वेळी येणाऱ्या समस्यांमुळे शाळा सोडतात, कारण त्यांच्या कुटुंबांकडे पॅडसाठी पैसे नसतात आणि त्या दिवसांत कापड वापरून शाळेत जाणे हे एक आव्हान आहे. शाळांमध्ये मुलींसाठी मोफत पॅडची कमतरता आहे, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. शिवाय, शाळांमध्ये वापरलेले पॅड विल्हेवाट लावण्याची सुविधा नाही, ज्यामुळे मुलींना मासिक पाळीच्या वेळी शाळेत जाता येत नाही.सरकारी, खासगी शाळेत सुविधा हवीच!सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रत्येक सरकारी किंवा खासगी शाळेत लिंग-विभाजनित शौचालये आणि पाण्याची सुविधा असल्याची खात्री करावी. सर्व नवीन शाळांमध्ये, अपंग शाळांसह, गोपनीयता सुनिश्चित केली पाहिजे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रत्येक शाळेच्या शौचालय परिसरात बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध असल्याची खात्री करावी. मासिक पाळीच्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अतिरिक्त गणवेश आणि इतर आवश्यक साहित्याने सुसज्ज मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन केंद्रे स्थापन करावीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढली
पुजाऱ्यांना तीन पाळ्यांमध्ये काम करावे लागणारनवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतासह जगभरातून कोट्यवधी भाविक रामचरणी नतमस्तक झाले. अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रामललाचे दर्शन घेण्याची आस आजही भाविकांमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता राम मंदिरात सेवा करणारे पुजारी आता तीन पाळ्यांमध्ये काम करणार असल्याचे म्हटले जात आहे.अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते राम मंदिरावर धर्म ध्वजारोहण करण्यात आले. राम मंदिर परिसरात अनेक अन्य मंदिरही स्थापन करण्यात आली आहेत. राम मंदिर पूर्ण झाल्यावरही लाखो भाविक प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत येत आहेत. रामनगरी अयोध्येत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. राम मंदिर आणि हनुमानगढी येथे भाविकांची वाढलेली संख्या लक्षात घेता, प्रशासनाला दर्शन व्यवस्थेत बदल करावे लागले आहेत. राम मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे प्रत्येक भाविकाला सहज, सुलभ आणि सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी नवीन व्यवस्था लागू केल्या आहेत.दर्शन घेण्यासाठी पाच रांगेतून भाविक दर्शन घेत होते. आता ही संख्या सात करण्यात आली आहे. राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर भाविकांच्या सोयीसाठी ही संख्या नऊ असणार आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि दर्शन प्रक्रिया सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.राम मंदिरामुळे अयोध्येचा कायापालट झाला असून स्थानिकांच्या अर्थकारणातही कायापालट झाला आहे. उद्योग व्यवसाय व रोजगारालाही चालना मिळाली आहे.

28 C