बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू'गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज
मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत या गाण्याने १ मिलियनहून अधिक व्ह्यूजचा टप्पा पार करत सोशल मीडियावर ट्रेंड पकडला आहे. या गाण्यात ‘बिग बॉस’मधून ओळख मिळवलेला अभिनेता आयुष संजीव आणि अभिनेत्री हेमल इंगळे यांची जोडी झळकत आहे. सई गोडबोले, निहार शेंबेकर आणि शार्क यांच्या आवाजात हे गाणे चित्रित केले गेले आहे.गीतलेखन विकास साटम यांचे असून दिग्दर्शन तेजस नेरुरकर यांनी केले असून, संगीताची जबाबदारी निहार शेंबेकर, सई गोडबोले आणि शार्क यांनी सांभाळली होती, तर नृत्यदिग्दर्शन पूजा काळे यांनी केले. साईरत्न एंटरटेनमेंट प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.वेगळ्या धाटणीचा प्रयोगगायक व संगीतकार निहार शेंबेकर याने या मराठी गाण्यात प्रथमच आफ्रिकन रीदमवरील ‘बायले फंक’ शैलीचा वापर केला आहे. त्यामुळे गाण्याला आंतरराष्ट्रीय धाटणीची झलक मिळाली आहे. अभिनेत्री हेमल इंगळेनेही प्रेक्षकांचे आभार मानत गाण्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर या गाण्यावर रील्स आणि शॉर्ट व्हिडिओंचा ट्रेंडही पाहायला मिळत आहे. व्ह्यूजमुळे संगीतात काहीतरी नवीन करण्याचा प्रयोग निहार आणि संपूर्ण टीमचा यशस्वी झाल्याचा दिसत आहे.
Mulund Metro Slab Collapse: मुलुंडमधील मेट्रो दुर्घटनेत एमएमआरडीएची मोठी कारवाई; थेट पाच जणांना अटक
मुलुंड पश्चिम येथे शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी बांधकाम सुरू असलेल्या सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळला. रस्त्याने जाणाऱ्या रिक्षा आणि एका कारवर हा स्लॅब पडल्याने या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून एकाच मृत्यू झाला आहे. या घटनेवर मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी हा १०० टक्के निष्काळजीपणा आहे, दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी प्रतिकिया दिली. रितू तावडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.अशातच आता मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एमएमआरडीएने मोठी कारवाई केली आहे. एमएमआरडीएने कार्यकारी अभियंत्याला निलंबित केले असून उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. त्याच बरोबर मुलुंड पोलिसांनी कंत्राटदार आणि सल्लागार कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना अटक केली आहे. शनिवारी दुपारी मुलुंड येथील एलबीएस रोडवर मेट्रोच्या कामादरम्यान झालेल्या अपघाताप्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या चौकशी समितीच्या अहवालानंतर दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गावर मुलुंड येथे शनिवारी झालेल्या दुर्घटने प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत.अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतानाच जखमींच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीए करणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.एमएमआरडीए प्रशासनाकडून दुर्घटनेची माहिती घेतानाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सार्वजनिक सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. या दुर्घटनेची दखल घेत त्यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांचे निलंबनाचे निर्देश दिले. तसेच मेट्रो ब्रीज मार्गाचे सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ॲाडिट करण्याचे आदेश शिंदेंनी दिले आहेत.
IND vs PAK Match : सामन्यापूर्वी मोठी बातमी; ICC Men's T20 World Cup मधून नेपाळच पॅकअप
मुंबई : टी-२० वर्ल्ड कपमध्ये सुपर ८ च्या शर्यतीला वेग आला असतानाच एक संघ स्पर्धेबाहेर झाला आहे. ग्रुप C मधील सामन्यात वेस्ट इंडिजने दमदार विजय नोंदवत पुढील फेरीत प्रवेश जवळपास निश्चित केला, तर नेपाळ क्रिकेट टीमचा प्रवास इथेच संपला.नेपाळने साखळीतील तिन्ही सामने गमावल्याने त्यांच्याकडे एकही गुण उरलेला नाही. त्यामुळे नकारात्मक नेट रनरेटमुळे सुपर ८मध्ये पोहोचण्याची त्यांची शक्यता संपुष्टात आली आहे. त्यामुळे ते स्पर्धेतून अधिकृतरित्या बाहेर पडले आहेत.वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नेपाळने २० षटकांत १३३ धावा केल्या. दीपेंद्र सिंग ऐरीने अर्धशतक झळकावले, तर सोमपाल कामीने झटपट धावा केल्या. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने संयमी आणि आक्रमक फलंदाजी करत १६व्या षटकातच सामना आपल्या नावावर केला. शाई होप आणि हेटमायर यांनी महत्त्वपूर्ण खेळी साकारली, तर जेसन होल्डरने गोलंदाजीत चमक दाखवली.दरम्यान, ग्रुप सीमध्ये वेस्ट इंडिज आघाडीवर असून इंग्लंडचाही सुपर ८ मधील मार्ग जवळपास निश्चित मानला जात आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच स्पर्धेतील समीकरणे बदलल्याने पुढील सामने अधिक रोमांचक होणार आहेत.
अंबरनाथ : भाजपाचे गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. गणेश नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यामुळे ते काहीही टीका करत आहेत. तर गणेश नाईक यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये. नागरिकांनी त्यांना अनेकदा माजी केलं आहे याचे त्यांनी भान ठेवावे. आणि जर एवढीच खुमखुमी असेल तर पुढील लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा अथवा हवे तिथून आमच्या समोर येऊन निवडणूक लढवावी. असे थेट खुले आव्हान देखील यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिले.
Dr. J. B. Shinde : प्रबोधनाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. जे. बी. शिंदे यांचे निधन
आदरणीय जे. बी. शिंदे यांचे १२ फेब्रुवारी २०२६ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. संत साहित्याचे गाढे अभ्यासक तसेच चळवळीचे खंदे आधारस्तंभ असलेले शिंदे सर यांच्या जाण्याने चळवळीची खूप मोठी हानी झाली आहे.
Manipur News : मणिपूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई ! दोन महिलांसह तीन दहशतवाद्यांना अटक
मणिपूरच्या (Manipur News) दोन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित दोन महिलांसह तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी रविवारी सांगितले.
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची चिंता वाढली; चिरंजीव ३ दिवसांपासून रुग्णालयात
उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या मुलाची प्रकृती बिघडली असून गेल्या ३ दिवसांपासून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.उद्धव ठाकरे यांचं शेंडेफळ तेजस ठाकरे यांची अचानक तब्येत बिघाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे. त्याच्यावर मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.सध्या रुग्णालयात तेजस ठाकरे यांची काळजी घेण्यासाठी रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. तसेच ठाकरे कुटुंबातील इतर सदस्यांनीही तेजस ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतलीआहे.कोण आहेत तेजस ठाकरे ?- तेजस ठाकरे वन्यजीव संशोधक आहेत.- फेब्रुवारी २०१६ मध्ये ठाकरे यांनी गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या ५ नवीन प्रजाती शोधून काढल्या.- त्यापैकी एकाला त्यांच्या आडनावावरून नाव देण्यात आले.- सप्टेंबर २०१९ मध्ये, महाराष्ट्रातील पश्चिम घाटात सापांची एक नवीन प्रजाती शोधली.
Ayesha Khan : “…प्लीज असं काही करु नका”; अभिनेत्री आयेशा खान पापाराझींवर संतापली
Ayesha Khan : ‘धुरंधर’ सिनेमात ‘शरारत’ गाण्यावर भन्नाट डान्स करत अभिनेत्री आयेशा खानने अनेकांची मनं जिंकली. मात्र सध्या एका आयशा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आयेशा पापाराझींवर संतापल्याचे दिसत आहे. शनाया कपूर आणि अभिनेता आदर्श गौरव यांच्या ‘तू या मैं’ सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी आयेशा पोहोचली होती.. सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी आलेली आयेशा पापाराझींना पोज देत […]
Manipur: मणिपूरमध्ये वेगवेगळ्या कारवाईत १० दहशतवाद्यांना अटक
गेल्या २४ तासांत मणिपूरच्या विविध भागात पोलिस आणि सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत दोन महिलांसह दहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आणि जप्त केलेले आयईडी नष्ट करण्यात आले.मणिपूर पोलिस मुख्यालयाने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षा दलांनी गेल्या शनिवारी आरपीएफ/पीएलएच्या दोन सक्रिय दहशतवाद्यांना अटक केली. त्यांची ओळख वैरोकपम सनाहल मैतेई उर्फ नोंगदंबा (४६) आणि स्वयंघोषित लेफ्टनंट मयंगलंबम किरण सिंह उर्फ शांति उर्फ बोइपु (४७) अशी झाली. दोघांनाही थौबल जिल्ह्यात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन आणि चार सिम कार्ड जप्त करण्यात आले.दरम्यान, सुरक्षा दलांनी तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह पोलिस स्टेशन परिसरातील सनराइज ग्राउंड आणि गेट क्रमांक २, मोरेह दरम्यान भारत-म्यानमार सीमा जनरल क्षेत्रातून दोन सक्रिय महिला पीएलए कार्यकर्त्यांना अटक केली. त्यांची ओळख अकोइजाम सखेनबी (२३) आणि चोंगथम हेम्बाबी (१७) अशी झाली.दुसऱ्या एका कारवाईत, सुरक्षा दलांनी इंफाळ पूर्व जिल्ह्यातील सेजांग मखा लीकाई येथून सक्रिय प्रेपाक (प्रो) कॅडर इंगुडम इंगोचा सिंह (५०), उर्फ बोरोबी याला अटक केली. तिच्या ताब्यातून पाच जिवंत काडतुसे भरलेली .३२ बोरची पिस्तूल, १० प्रेपाक (प्रो) व्हिजिटिंग कार्ड, एक होंडा अॅक्टिव्हा स्कूटर, ६०० रुपये रोख आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला.सुरक्षा दलांनी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील खाबाम लामखाई भागातून खंडणीत सहभागी असलेल्या प्रेपाक (प्रो) चा सक्रिय कॅडर सोरोखैबाम रणजित सिंह (४१) याला अटक केली. त्याच्याकडून दोन मोबाईल हँडसेट आणि एक आधार कार्ड जप्त करण्यात आले.दुसऱ्या एका कारवाईत, सुरक्षा दलांनी केसीपी (अपुंबा) चा सक्रिय कॅडर खेतीक्स थोंगबाम (१९) याला अटक केली. त्याला इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील इंफाळ पोलिस स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक मोबाईल फोन आणि आधार कार्ड जप्त करण्यात आले.सुरक्षा दलांनी केलेल्या शोध मोहिमेत, इंफाळ पूर्व जिल्ह्यातून एका सक्रिय प्रीपाक कॅडरला अटक करण्यात आली. त्याचे नाव इरेंगबाम सरतकुमार मेईतेई (२१), उर्फ अचौबा असे आहे. त्याच्याकडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला.दरम्यान, चुराचंदपूर जिल्ह्यातील एका कारवाईदरम्यान, चुराचंदपूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या टी. ल्हांगकिचोई गावातील सक्रिय यूकेएनए कॅडर आणि खंडणीखोर लुंजकाई वैफेई (२०) याला मतिजंग गावातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक देशी बनावटीची ९ मिमी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत, केवायकेएलचा सक्रिय कॅडर खुमानथेम संतोष मेईतेई (३६), उर्फ कांता याला थौबल जिल्ह्यात अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन सिम कार्डसह एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. चुराचंदपूर जिल्ह्यातील चुराचंदपूर पोलिस स्टेशन हद्दीतील नागा गाव परिसरात सुरक्षा दलांनी एक आयईडी (दंडगोलाकार, दाब यंत्रणा, १० किलो स्फोटक) जप्त केले. बॉम्ब निकामी पथकाने लष्कर आणि चुराचंदपूर पोलिसांच्या उपस्थितीत आयईडी सुरक्षितपणे नष्ट केला.
Asim Munir: जर्मनीमध्ये पाकिस्तानची लाज निघाली ; सुरक्षारक्षकाने मागितले असीम मुनीर यांना ओळखपत्र
Asim Munir: जर्मनीतील म्युनिक सुरक्षा परिषदेदरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना लाज वाटली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रवेश करताना त्यांचे ओळखपत्र दाखवण्यास सांगितले.
O’Romeo Box Office : दोनच दिवसात ‘ओ रोमियो’चित्रपटाची बक्कळ कमाई! ‘या’चित्रपटांना टाकले मागे
O'Romeo Box Office : दोन दिवसात ओ रोमिओ चित्रपटाने २० कोटींहून अधिकची कमाई केली आहे.
टिपूचे उदात्तीकरण कराल तर... नितेश राणेंचा निर्वाणीचा इशारा
मुंबई : टिप्या ची बरोबरी शिवरायांशी करणे यालाच जिहादी मानसिकता बोलतात... ज्या टिप्याने लाखो हिंदूचे धर्मांतर केले.. मंदिरं तोडली.. फक्त इस्लाम वाढवण्याकडे लक्ष दिले..तो आमच्या शिवरायांच्या जवळपास पण येऊ शकत नाही ! काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आपल्या कार्यालयात शिवरायांचे फोटो काढून टिप्याचे फोटो लावून दाखवावे मग बघू... शिवरायांचे मावळे त्यांना महाराष्ट्र कसे फिरू देतात ? हर हर महादेव! अशी एक्स पोस्ट मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. धर्मांध क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे उदात्तीकरण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणे यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. एक्स पोस्ट करून नितेश राणेंनी हा इशारा दिला आहे.मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर समाजवादी पक्षाच्या निहाल अहमद यांनी त्यांच्या दालनातील छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांचे फोटो काढून धर्मांध क्रूरकर्मा टिपू सुलतान याचा फोटो लावला. यावरून झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल यांनी टिपूचे उदात्तीकरण केले. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. भाजपनेही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या भाष्याचा निषेध केला. आता मंत्री नितेश राणे यांनी तर टिपूचे उदात्तीकरण करणाऱ्यांना निर्वाणीचा इशाराच दिला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना खपवून घेतली जाणार नाही. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे अतिशय निंदनीय आहे. कॉंग्रेसला लाज वाटायला पाहिजे. जोडे चाटण्याची ही पद्धत जन्मात पाहिली नाही. छत्रपती शिवरायांनी मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त केले. त्याचवेळी हजारो, लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतानची तुलना करून दोघांनाही सारखाच सन्मान देणे म्हणणे म्हणजे जोडे चाटणे या जन्मात बघितले नाही. हे खपवून घेतले जाणार नाही. या तुलनेसाठी सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर हिंदुद्वेषी आणि क्रूर टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करून काँग्रेसने आपली ‘मुघली विचारधारा’ महाराष्ट्राला पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. निष्पाप हिंदूंची कत्तल करणाऱ्या आणि हिंदू स्त्रियांचा छळ करणाऱ्या टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी केली पाहिजे, असे विधान काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केले आहे. गेल्याच आठवड्यात तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर बुलडोझर फिरवला होता. पंडित नेहरूंपासून आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष करण्याची मुघली परंपरा काँग्रेस पुढे नेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात, टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणाऱ्या औरंगजेबप्रेमी काँग्रेसला जनता नक्कीच धडा शिकवणार, अशी टीका भाजपने केली आहे. पाठोपाठ मंत्री नितेश राणे यांनी टिपूचे उदात्तीकरण करणाऱ्यांना सुनावले आहे.टिपूने शेकडो निष्पाप ब्राह्मणांना फासावर लटकवले. हजारो हिंदू मंदिरांचा विध्वंस करून तिथे मशिदी उभारल्या. लाखो हिंदूंचे सक्तीने धर्मांतर केले. हिंदू स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करून त्यांना आपल्या जनानखान्यात डांबले. अशा 'हिंदुद्वेषी' आक्रमकाचे उदात्तीकरण करून काँग्रेसने महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घातल्याची भावना जनसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर टिपूचे उदात्तीकरण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणे यांनी समजेल अशा भाषेत निर्वाणीचा इशारा दिला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो काढून टिप्याचे फोटो लावून दाखवा मग बघा शिवरायांचे मावळे त्यांना महाराष्ट्र कसे फिरू देतात ? असे सांगत मंत्री नितेश राणे यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.
Ananya Panday : अनन्या पांडे पुन्हा प्रेमात? सोशल मिडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चांना उधाण
Ananya Panday : बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आपल्या चित्रपटांशिवाय वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. विशेषतः अनन्याच्या रिलेशनशिपबद्दल अनेक चर्चा होत असतात. यातच आता अनन्याने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिच्या प्रेमाची कबूली दिल्याचे म्हंटले जात आहे. अनन्या पांडे एका विदेशी मॉडेलला डेट करत असल्याची चर्चा आहे. तिने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केल्याने या चर्चांना उधाण आले […]
Salman Khurshid: भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार करारामुळे राष्ट्रीय राजकारण तापले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर काँग्रेसने केंद्र सरकारकडून पुरावे मागितले होते, तसेच आता ते व्यापार कराराचे पुरावे मागत आहे.
Sarah Arjuna :इंन्स्टाग्रामवरून धुरंधर फेम अभिनेत्रीने चाहत्यांसाठी खास संदेश लिहिला आहे.
School Gardening Competition: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत उत्कृष्ट शालेय परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात गारवडी जिल्हा परिवद शाळेचा खटाव तालुक्यात प्रथम, तर सातारा जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीमुळे गारवडी गावचा नावलौकिक झाला आहे. दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खटाव तालुक्यातील गारवडी या छोट्याशा गावाने पुन्हा एकदा जिल्ह्याच्या नकाशावर आपले वेगळेपण […]
Hingoli News : बम बम भोले!!! महाशिवरात्रीच्या निमित्ताने औंढा नागनाथ येथे भाविकांची मोठी गर्दी
Hingoli News: बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी केली गर्दी
Vinod Bansal: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आयसीसी विश्वचषक सामन्यापूर्वी राजकीय वक्तृत्व तीव्र झाले आहे. विश्व हिंदू परिषद (VHP) चे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी या सामन्याबाबत पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.
Mahashivratri 2026: श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात देश-विदेशातून आलेल्या भाविकांची तुफान गर्दी
छत्रपती संभाजीनगर येथील बारावे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त देश-विदेशातून आलेल्या भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून मंदिर परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमला आहे. प्रशासनाकडून सुरक्षा आणि सुव्यवस्थेची काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे.देशभरातून भक्त दर्शनासाठी दाखल झाल्याने मंदिर परिसरात सिंगल बॅरिकेट्सद्वारे नियोजन करण्यात आले असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त एसपी अन्नपूर्णा सिंग यांनी सुरक्षा व्यवस्था चोख असल्याची माहिती दिली. तसेच यावर्षी कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.भारतीय अध्यात्मपरंपरेत भगवान शिव हे संहारक नव्हे तर पुनर्निर्मितीचे प्रतीक मानले जातात. शिवाची उपासना ही केवळ धार्मिक विधी नसून, ती मन, शरीर आणि चेतनेच्या शुद्धीकरणाशी संबंधित एक शास्त्रीय प्रक्रिया आहे.शास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि रात्रभर जागरण केल्याने मन, बुद्धी आणि आत्मा शुद्ध होतात. शिवलिंगावर बेलपत्र, दूध, मध अर्पण करण्यामागेही वैज्ञानिक आधार आहे. हे पदार्थ वातावरण शुद्ध करण्यास आणि मनःशांती देण्यास सहाय्यक मानले जातात. शिवाची उपासना म्हणजे अहंकाराचा त्याग, संयमाचे पालन आणि अंतर्मनाशी संवाद साधण्याची साधना आहे. त्यामुळे शिवपूजा ही श्रद्धेसोबतच विज्ञानाशी जोडलेली आध्यात्मिक साधना मानली जाते.
हाय व्होल्टेज भारत - पाकिस्तान सामन्यात कोण कोण खेळणार ?
कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये आज म्हणजेच रविवार १५ फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजल्यापासून हाय व्होल्टेज भारत - पाकिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे. या सामन्यात दोन्ही देशांकडून कोणकोणते खेळाडू मैदानात उतरणार यावरून चर्चेला उधाण आले आहे.https://prahaar.in/2026/02/15/t20-world-cup-2026-ind-vs-pak-suryakumar-yadav-imitates-usman-tariq-video-goes-viral/भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा बरा झाला आहे. त्याने शनिवार १४ नोव्हेंबर रोजी सराव केला. यामुळे पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी अभिषेकचा विचार होण्याची शक्यता आहे. याआधी नामिबिया विरूद्धच्या सामन्यात तब्येत बरी नसल्यामुळे अभिषक शर्मा खेळला नव्हता.https://prahaar.in/2026/02/15/india-vs-pakistan-series-match-in-colombo-who-will-score-a-hat-trick-of-victory/अभिषेकचे पुनरागमन झाल्यास संजू सॅमसनला पुन्हा एकदा वगळले जाण्याची शक्यता आहे. या संदर्भातला अंतिम निर्णय भारताचे संघ व्यवस्थापन संध्याकाळीच जाहीर करण्याची शक्यता आहे.श्रीलंकेत कोलंबो येथे आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत - पाकिस्तान सामना होणार आहे. प्रेमदासाची खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात चायनामन कुलदीप यादवलाही मैदानात उतरवू शकतो . संघात तीन फिरकीपटूंना संधी मिळू शकते. तीन फिरकीपटूंना खेळवण्यासाठी अर्शदीपला वगळले जाण्याची शक्यता आहे. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबेचा विचार वेगवान गोलंदाजीसाठी होऊ शकतो. नवा चेंडू हाताळण्याची जबाबदारी हार्दिक आणि जसप्रीतकडे दिली जाण्याची शक्यता आहे.https://prahaar.in/2026/02/15/suryakumar-yadav-will-abhishek-sharma-play-in-the-india-vs-pakistan-match-or-not-important-information-about-suryakumar-yadav-in-the-press-conference/पाकिस्तान भारताविरोधात पाच फिरकीटूंना खेळवण्याचा विचार करू शकतो. शादाब खान, उस्मान तारिक, अबरार अहमद, सईम अयुब आणि मोहम्मद नवाज या फिरकीपटूंना खेळवले जाण्याची शक्यता आहे. सईम अयुबचाही गोलंदाज म्हणून विचार होऊ शकतो. उस्मान तारिक हा किती यशस्वी होणार यावर पाकिस्तानचे यश अवलंबून असेल.संभाव्य अकरा खेळाडूभारत : अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.पाकिस्तान : सॅम अयुब, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा (कर्णधार), बाबर आझम, उस्मान खान (यष्टीरक्षक), शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, उस्मान तारिक आणि अबरार अहमद
Nishikant Dubey on Rahul Gandhi: झारखंडमधील गोड्डामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभा खासदार निशिकांत दुबे यांच्या भाषणानंतर मोठा गोंधळ झाला. त्यांनी आणलेल्या वादग्रस्त पुस्तकांमुळे वातावरण आणखी तापले.
T20 World Cup 2026 IND vs PAK: सूर्यकुमार यादवने केली उस्मान तारिकची नक्कल; व्हिडीओ वायरल
कोलंबो: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. हा यंदाच्या वर्ल्डकपमधील २७ वा साखळी सामना असेल. क्रिकेटप्रेमींचे लक्ष असलेल्या या हायव्होल्टेज सामन्याआधीच एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट घोंगावत आहे. यामुळे क्रिकेटप्रेमी चिंतेत आहेत.पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज उस्मान तारीक त्याच्या स्टाईलमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. मात्र, टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं त्याचा दबाव झुगारून दिला आहे. इतकंच नव्हे, तर त्याने उस्मान तारीकच्या स्टाईलची कॉपी करत नेट प्रॅक्टिसही केली. आजच्या सामन्यापूर्वी फलंदाजांना सराव मिळावा म्हणून सूर्यकुमारने स्वतः तारिकसारखी 'स्लिंगी' ॲक्शन करून गोलंदाजी केली. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.SuryaKumar Yadav Giving India practice of how usman tariq bowls #INDVPAK #T20WorldCup #T20WorldCup2026 pic.twitter.com/rqZP4ofpGf— MESSI MB (@3166WR) February 15, 2026तारिकची गोलंदाजी करण्याची पद्धत अतिशय वेगळी असून ती आयसीसीने मंजूर केली आहे. तो चेंडू टाकताना मध्येच काही काळ थांबतो आणि त्याची चेंडू फेकण्याची पद्धत 'राउंड-आर्म' स्वरूपाची आहे, ज्यामुळे फलंदाजांना चेंडू ओळखणे कठीण जाते. सूर्याने तारिकच्या गोलंदाजीचे वर्णन 'आउट ऑफ सिलॅबस' (अभ्यासक्रमाबाहेरील) असे केले आहे. त्याने स्पष्ट केले की, परीक्षेत कधीकधी असे कठीण प्रश्न येतात, पण म्हणून आपण ते सोडून देत नाही, तर त्याचा सामना करतो. भारतीय संघ अशा आव्हानासमोर हार मानणार नाही, असेही त्याने नमूद केले.पाकिस्तान का तारिक उस्मान रुककर गेंदबाजी करता है, उसके लिए प्रैक्टिस चल रही।ऐसे ही एक मोहम्मद इरफान आया था, 7.1 फिट का लंबा। भारतीय टीम के खिलाड़ियों को उससे निपटने के लिए कुर्सी पर चढ़कर गेंदबाजी करते हुए प्रैक्टिस करवाई गई थी। pic.twitter.com/T611CX2TBc— Rajesh Sahu (@askrajeshsahu) February 15, 2026भारतीय संघाने यापूर्वीही अशा विशिष्ट गोलंदाजांचा सामना करण्यासाठी अनोख्या पद्धती वापरल्या आहेत. २०१६च्या आशिया चषकात ७ फूट उंच मोहम्मद इरफानचा सराव करण्यासाठी भारतीय फलंदाजांनी स्टूल आणि खुर्च्यांवर उभे राहून 'थ्रो-डाउन' घेतले होते. माजी फिरकीपटू हरभजन सिंगच्या मते, उस्मान तारिक हा एक कठीण गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे अनेक वैविध्यपूर्ण चेंडू आहेत. मात्र, भारतीय संघ त्याचा सामना करू शकतो, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
Rinku Rajguru : अथांग समुद्र अन्…; ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त रिंकू राजगुरूचा लाल साडीतील खास अंदाज
Rinku Rajguru : व्हिडिओमध्ये सूर्यास्तावेळी समुद्रकिनारी रिंकु राजगुरू लाल साडीत धावत असल्याचे दिसते.
US Attack in Syria: अमेरिकेने सीरियामध्ये इस्लामिक स्टेट (ISIS) च्या लक्ष्यांविरुद्ध लष्करी कारवाई तीव्र केली आहे. यूएस सेंट्रल कमांड (CENTCOM) ने ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक अंतर्गत सुरू असलेल्या ऑपरेशनची नवीन व्हिडिओ आणि माहिती जारी केली आहे.
तरुण नोकरी मागायला आला आणि बंदूक असलेली बॅग विसरला, आमदार केनेकरांच्या केबिनमध्ये सत्य उघड
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्याकडे एक तरुण नोकरी मागायला गेला आणि त्यांच्या कार्यालयातच एअरगन असलेली बॅग विसरला, हे पोलिसांच्या चौकशीनंतर समोर आले. याच घटनेची शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली.शनिवारी दुपारी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात पिस्तूल असलेली एक बाग सापडल्याने गोंधळ उडाला होता. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कंत्राटी नोकरीसाठी भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात शिफारसपत्र मागायला गेलेला तरुण बॅगसह त्यातील एअरगनही तेथेच विसरला. शनिवारी केनेकर यांचे सहकारी कार्यालयात गेल्यानंतर पिस्तूल पाहताच एकच गोंधळ उडाला.पोलिसांच्या तपासणीत ती एअरगन असल्याचे समोर आले. त्यानंतर क्रांतीचौक पोलिसांनी रितेश संतोष होळकर याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. रितेश बीएस्सीच्या तृतीय वर्षात आहे. काही दिवसांपासून तो नोकरीच्या शोधात होता. महानगरपालिकेत कंत्राटी नोकरी मिळवण्यासाठी त्याला एकाने केनेकर यांच्याकडून शिफारसपत्र घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. तो शुक्रवारी सायंकाळी तेथे गेला. सहा महिन्यांपूर्वी त्याने ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरून एअरगन हौस म्हणून खरेदी केली होती. क्रांती चौक पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.नेमकं प्रकरण काय?भाजप आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात एअर गन आढळून आल्याने खळबळ उडाली होती. रात्री भेटीसाठी आलेल्या एका व्यक्तीची बॅग कार्यालयातच विसरली गेली होती. त्या बॅगेत एअर गन सापडली. या घटनेनंतर आमदार केनेकर यांच्या घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. भेटीसाठी आलेल्या व्यक्तीच्या बॅगेत बंदूक आढळल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांच्या तपासात घटनेचे सत्य समोर आले आहे.
बंजारा समाजाला न्याय मिळणार; समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन - उपमुख्यमंत्री शिंदे
वाशीम: बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने आयोग स्थापन केला असून लवकरच समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आयोजित संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संत सेवालाल महाराजांसह सर्व संतांना वंदन केले तसेच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतींनाही अभिवादन केले.अलीकडील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद घटनेमुळे कार्यक्रम साधेपणाने घेतल्याचे सांगत त्यांनी देशभरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या बंजारा समाजाचे स्वागत केले व समाजाची एकजूट हीच खरी ताकद असल्याचे नमूद केले. तसेच यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शुभहस्ते बंजारा समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना 'सेवा पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.पोहरादेवी ही संत सेवालाल महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून येथे आल्यावर वेगळी आध्यात्मिक ऊर्जा मिळते, असे सांगताना त्यांनी हा संपूर्ण परिसर मोठे आध्यात्मिक व पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री असताना या विकास आराखड्यास ७२४ कोटी रुपयांची मंजुरी दिल्याची आठवण करून देत सेवालाल महाराज स्मारकासह सर्व कामे वेगाने पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथे विरासत संग्रहालयाचे उद्घाटन झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला. हे स्मारक भविष्यात समाजाला व कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा देणारे ठरेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.बंजारा समाजाचे आद्यदैवत, थोर तत्वज्ञ, महान विचारवंत, समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन...#SantSevalalMaharaj #संत_सेवालाल_महाराज pic.twitter.com/SsMXrmtoM1— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 15, 2026बंजारा समाज हा निसर्गपूजक, मातीत इमान राखणारा आणि राष्ट्रभक्त समाज असून इतिहासात या समाजाने देव, देश आणि धर्मासाठी बलिदान दिले आहे, असे ते म्हणाले.अन्यायाविरुद्ध उभा राहणारा आणि एकजुटीने लढणारा समाज म्हणून बंजारा समाजाची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.रामराव महाराजांच्या प्रसंगाचा उल्लेख करत मानवसमता व अहिंसेचा संदेश या परंपरेत असल्याचेही त्यांनी नमूद केले. समाजाने शिक्षण घ्यावे, एकत्र राहावे व आपली संस्कृती जपावी, असे आवाहन त्यांनी केले.सरकार सर्वसामान्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुलींचे उच्च शिक्षण मोफत, शेतकरी सन्मान व विमा योजना तसेच अतिवृष्टी मदत अशा निर्णयांचा त्यांनी उल्लेख केला. उद्योगनिर्मिती व रोजगारासाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी असून मुंबईत बंजारा समाज भवनासाठी जागा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन झाल्याने लवकरच सकारात्मक मार्ग निघेल व समाजाला न्याय मिळेल, असा पुनरुच्चार करत मेहनत, एकजूट आणि स्वाभिमान कायम ठेवण्याचे आवाहन करून त्यांनी ‘जय सेवालाल महाराज’च्या घोषणांनी भाषणाची सांगता केली.या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्याचे पालक मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, खासदार संजय देशमुख,जितेंद्र महाराज, सुनील महाराज, यशवंत महाराज, शेखर महाराज, रायजिंग महाराज, गोपाल महाराज यांच्यासह बंजारा समाजातील अन्य मान्यवर पदाधिकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sanjay Raut :संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंना सामनाच्या रोखठोक या सदरातून फटकारल्याची चर्चा रंगली असून, यावर त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.
Ajit Pawar: छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशनतर्फे लंडन येथे अजित पवार यांच्या स्मरणार्थ शोकसभा
लंडन: छत्रपती शिवाजी महाराज युवक संघठना तर्फे आज लंडन येथे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमात त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा तसेच महाराष्ट्र भवन, लंडनसाठी जाहीर करण्यात आलेल्या ५ कोटी रुपयांच्या मदतीचाही उल्लेख करण्यात आला. त्यांच्या कार्याचा आढावा घेताना उपस्थितांनी विविध आठवणींना उजाळा दिला.या कार्यक्रमाला लंडन व परिसरातील मराठी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहिली.मौनानंतर असोसिएशनचे अध्यक्ष धीरजसिंह तौर यांनी अजित पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदान, विकासकामांबद्दलची बांधिलकी तसेच समाजासाठी केलेल्या कार्याची आठवण करून दिली.या कार्यक्रमाच्या आयोजनात धीरजसिंह तौर, सुनिल पाटील, स्वराज मोहिते, आशुतोष धमले, स्वप्नील गावडे, पवन खरात, कौस्तुभ रमेकऱ, यशवंत गुरव, यश सुतार यांसह संघटनेतील सदस्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच मराठी समाजातील अनेक मान्यवर व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम शांत, भावनिक आणि आदरपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ घडली धक्कादायक घटना, बघून अनेकजण हादरले
चंद्रपूर : रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ एक धक्कादायक घटना घडली. ही घटना बघून अनेकजण हादरले. एका तरुणाने विजेच्या खांबाच्या आधाराने गळफास घेतला. ही धक्कादायक घटना राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातल्या भांदक येथे रेल्वेच्या हद्दीत घडली. रेल्वे गेट क्रमांक ३६ जवळ १८ वर्षांच्या दुर्गेश प्रसाद मसरामने विजेच्या खांबाच्या आधाराने गळफास घेतला.दुर्गेश मूळचा मध्य प्रदेशमधील कोको येथील रहिवासी होता. तो कुटुंबासह मोलमजुरीसाठी भांदक येथे आला होता. पण ऐन तारुण्यात दुर्गेशने असे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजलेले नाही. दुर्गेशच्या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रावती रेल्वे स्थानक परिसरात वर्धा-बल्लारशाह रेल्वे मार्ग आणि सायडिंगचे काम प्रगतीपथावर आहे. या कामासाठी आलेल्या मजुरांची वस्ती याच परिसरात आहे. दुर्गेश त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह याच भागात वास्तव्यास होता.पहाटेच्या सुमारास दुर्गेश घरात नसल्याचे कुटुंबातील इतर सदस्यांच्या लक्षात आले. त्यांनी शोधाशोध सुरू केली. ही शोधाशोध सुरू असताना रेल्वे पोलिसांना रेल्वे गेट क्रमांक ३६ जवळील एका वीज खांबाला लटकून तरुणाने आत्महत्या केल्याचे समजले. घटनास्थळी पोलीस आणि दुर्गेशच्या कुटुंबातील सदस्य पोहोचले तेव्हा दुर्गेशने आत्महत्या केल्याचे लक्षात आले. या प्रकरणी तपास सुरू आहे.
Sanjay Raut: टिपू सुलतानाला नायक आणि महान योद्धा मानणाऱ्या पाकिस्तासोबत भारत क्रिकेट खेळण्याचा धिक्कार का करत नाहीत, संजय राऊतांचा सवाल
उत्तरप्रदेशमधील फैजाबाद शहरात राहणारा मी मोहम्मद शरीफ. गेल्या 25 वर्षांत मी 23 हजारांहून अधिक बेवारस आणि छिन्नविछिन्न मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. मला आजही तो दिवस आठवतो, जेव्हा मोठा मुलगा रईस कामावर जाण्यासाठी घरातून निघाला होता. त्याची आई हट्ट करू लागली की, तो जेवण न करता घरातून जाणार नाही. आईचे मन राखण्यासाठी त्याने तिच्याच हाताने दोन घास खाल्ले आणि निघाला होता. तेव्हा आम्हाला काय माहीत होते की, आम्ही त्याला शेवटचे पाहत आहोत. आम्ही इतके दुर्दैवी होतो की, आमच्या मुलाचा मृतदेहही पाहू शकलो नाही. रईस होमिओपॅथी औषधांचा एमआर होता. त्याला वाचण्याची खूप आवड होती. सात मुलांमध्ये तो सर्वात मोठा होता. त्याच्या कमाईवरच घर चालायचे. मी तर सायकल मेकॅनिक होतो. घराची सर्व जबाबदारी तोच सांभाळायचा. त्या दिवशी तो संध्याकाळपर्यंत परतला नाही, तेव्हा आम्ही त्याच्या दुकानावर चौकशी केली. दुकान उघडे होते, पण रईस तिथे पोहोचलाच नव्हता. तिथे काम करणाऱ्या मुलालाही काहीच माहीत नव्हते. आम्ही परत घरी आलो. रात्रभर वाट पाहत राहिलो. सकाळी आम्ही त्या सायकल स्टँडवर गेलो, जिथे रईस आपली सायकल उभी करायचा. सायकल स्टँडवाल्याने सांगितले की, माझ्याकडे काल सकाळी सायकल उभी करून गेले होते. जाताना सांगितले होते की, सुलतानपूरला जात आहे, संध्याकाळपर्यंत येईन. आम्ही सुलतानपूरमध्येही चौकशी केली पण काहीच पत्ता लागला नाही. अनेक दिवस उलटले, रईसचा काहीच पत्ता लागला नाही. आम्ही त्याचा फोटो घेऊन इकडे-तिकडे फिरत होतो. घरात ना जेवण बनत होते, ना कोणी खात होते. आम्ही मोठ्या शहरांमध्येही त्याला शोधले. जेव्हा काहीच सुगावा लागला नाही, तेव्हा थकून घरी बसलो. नातेवाईक आणि शेजाऱ्यांकडून पैसे मागून घराचा खर्च चालवत होतो. जवळपास दीड महिन्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यातून दोन पोलीस आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती. मला पाहताच त्यांनी पिशवीतून एक सुरकुतलेला शर्ट काढून दिला. तो शर्ट माझ्या मुलाचा होता, माझ्या रईसचा. पोलिसांनी सांगितले की, महिन्याभरापूर्वी सुलतानपूरमध्ये तुमच्या मुलाची हत्या झाली आहे. त्याचा मृतदेह अनेक दिवस रस्त्याच्या कडेला पडला होता. कुत्र्यांनी त्याचा मृतदेह फाडून खाल्ला होता. आम्ही त्याचा पत्ता शोधण्याचा खूप प्रयत्न केला. अनेक दिवस त्याच्याबद्दल काहीच माहिती न मिळाल्याने त्याचा मृतदेह नदीत फेकून दिला. पोलिसांना त्याच्या शर्टवरील टेलरच्या टॅगमुळे दीड महिन्यानंतर आमच्यापर्यंत पोहोचता आले होते. पोलीस एक महिन्यापासून हा शर्ट घेऊन आजूबाजूच्या परिसरातील शिंप्यांकडे फिरत होते. शेवटी ते शेख टेलरकडे पोहोचले, ज्याने रईसचा शर्ट शिवला होता. त्यानेच शर्ट ओळखून पोलिसांना आमच्या घरी पाठवले. हे ऐकताच आमच्या पायाखालची जमीन सरकली. रईसची आई रडून रडून बेशुद्ध पडत होती. अनेक दिवस घरात चूल पेटली नाही. घरात कोणालाही काही शुद्ध नव्हती. घराच्या खर्चापासून ते लहान भावंडांच्या शिक्षणापर्यंत सर्व काही रईस पाहत होता. आम्हाला त्याच्याकडूनच सर्व आशा होत्या. एका क्षणात आमचं सर्व काही उद्ध्वस्त झालं. मी तर 15 दिवस घरात राहूच शकलो नाही. घरी येताच त्याची आठवण येऊ लागली. माझ्या मुलाचा मृतदेह अशा प्रकारे फेकून दिला गेला, हा विचार करून करून मी हैराण होत असे. जवळपास पाच-सहा महिन्यांनंतर मी निर्णय घेतला की माझ्या मुलाच्या मृतदेहासोबत जे घडले, ते कोणासोबतही घडणार नाही. आता फैजाबादमध्ये कोणाचाही मृतदेह फेकला जाणार नाही. मी त्यांच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करेन. यासाठी मी एसडीएम साहेबांना भेटलो. त्यांना लेखी दिले की बेवारस मृतदेहांवरचे अंत्यसंस्कार आता मी करेन. त्यानंतर मला पोलीस स्टेशनमधून फोन येऊ लागले. ज्या मृतदेहाचा 72 तासांपर्यंत कोणीही दावेदार नसतो, ते मृतदेह मला सोपवले जातात. हे मृतदेह एकतर रस्ते अपघातात मरण पावलेल्या लोकांचे असतात किंवा ज्यांना मारून टाकले जाते त्यांचे असतात. हिंदू मृतदेहांवर हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले जातात आणि मुस्लिम मृतदेहांवर इस्लामनुसार. हिंदूंचे सर्व रितीरिवाज मी जवळ उभे राहून माझ्या देखरेखीखाली करवून घेतो. आजकाल एका मृतदेहाच्या अंत्यसंस्काराचा खर्च सुमारे दहा हजार रुपये लागतो. आधी जास्त खर्च येत नव्हता, तेव्हा मी स्वतःच करत असे किंवा लोकांकडून वर्गणी मागत असे. मी माझी सर्व पूंजी प्रेतांच्या अंत्यसंस्कारावर लावली. जेव्हा लोकांना माझ्याबद्दल कळू लागले, सर्व काही माध्यमांमध्ये आले, तेव्हा मुकेश अंबानींसारख्या मोठ्या लोकांनी माझ्या कामाचे कौतुक केले. मग हळूहळू अयोध्या आणि फैजाबादमधील मोठ्या व्यावसायिकांनी पुढे येऊन मला साथ द्यायला सुरुवात केली. हिंदू प्रेतांच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडाची व्यवस्था फैजाबादचे मोठे व्यावसायिक आणि हॉटेल मालक शरद करतात. त्याचप्रमाणे मुस्लिम कबरी खोदण्यासाठीही मोठे लोक पुढे आले. आता या कामासाठी पैशांची अडचण येत नाही. जेव्हा मी या कामाची सुरुवात केली, तेव्हा लोक माझ्यावर हसत होते, चिडवत होते. म्हणत होते की, वेडा आहे, सडलेली प्रेते उचलतो. सर्वांनी मला मेजवान्यांमध्ये आणि नातेसंबंधात बोलावणे बंद केले. मला त्यांच्यासोबत बसू देत नव्हते. तरीही मी हे सर्व सोडले नाही. तासनतास शवविच्छेदन कक्षासमोर बसून वाट पाहत असे. हे काम करून मला खूप समाधान मिळते. प्रत्येक वेळी बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यावर मला माझ्या मुलाची आठवण येते. मी आजही भाड्याच्या घरात राहतो. जवळपास 92 वर्षांचे वय आहे आणि तब्येत सतत खराब होत आहे. रईसच्या निधनानंतर एका रस्ते अपघातात धाकट्या मुलाचाही मृत्यू झाला होता. आता फक्त एक मुलगा उरला आहे, त्यालाही गेल्या वर्षी तोंडाचा कर्करोग झाला होता. तो शाळेच्या मुलांची व्हॅन चालवतो. संपूर्ण घर-कुटुंबाची जबाबदारी आता त्याच्यावर आहे. घरातील एकमेव कमावणाराही स्वतःच आजारी आहे. सन 2020 मध्ये मला माझ्या या कार्यांसाठी पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. अलीकडेच माझ्या पाठीच्या कण्याचे ऑपरेशन उत्तर प्रदेश सरकारने करून घेतले आहे. मला आनंद आहे की मी स्वतःला जे वचन दिले होते ते पाळले. अडचणी आल्या पण थांबलो नाही. शपथ घेतली होती की आता बेवारस मृतदेह फेकले जाणार नाहीत आणि मी ते कायम ठेवले. जेव्हा नंतर लोकांना कळते की त्यांच्या लोकांचे अंतिम संस्कार मी केले आहेत, तेव्हा ते मला भेटायला येतात. आभार मानतात. आज मी इतका आजारी असूनही काम सुरू आहे. परवाच एका मुस्लिम मृतदेहावर संस्कार केले आहेत, पण इतक्या वर्षांनंतरही असे मृतदेह पाहून मला माझ्या मुलाची आठवण येते आणि मी रडतो. (मोहम्मद शरीफ यांनी आपल्या भावना भास्कर रिपोर्टर मनीषा भल्ला यांच्याशी शेअर केल्या आहेत)
Jayant Patil: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाची अपडेट; सुनेत्रा वहिनी मनात कोणताही...
मुंबई: राज्याचे अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र, यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने जोर सुरु झाल्या आहेत.अजित पवार असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली होती. अजित पवार त्यासाठी आग्रही होते, असा दावा वारंवार शरद पवार गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. परंतु, अजित पवार गटाच्या प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी हा दावा फेटाळून लावत अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती असे सांगितले. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे.बारामतीत आम्ही चार पाच जण सुनेत्रा पवारांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की, काही मदत लागली तर सांगा. कोणताही किंतू मनात बाळगू नका. विलीनीकरणाची चर्चा अजित पवारांसोबत सुरु होती तेव्हादेखील सुनेत्रा वहिनींसोबत एकदोन वेळा भेट झाली होती. सुनेत्रा वहिनी किंवा पार्थ पवार यांच्यासाठी आम्ही सपोर्टिव्ह आहोत. त्यांच्यासाठी अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते प्रतिक्रिया देणार का, हे पाहणे महत्त्वाची ठरणार आहे.राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत शशिकांत शिंदे यांचा महत्त्वाचा दावाशरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लिहिलेल्या लेखातून विलिनीकरणाबाबत महत्त्वाचे भाष्य केले होते. १२ फेब्रुवारीला आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करणार होतो. विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला होता.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचे दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की, दादांचे स्वप्न पूर्ण करायचे. त्यासाठी प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही शशिकांत शिंदे यांनी म्हटले होते.
Mahashivratri 2026: जाणून घ्या शिवाच्या उपासनेमागील विज्ञान
मुंबई: महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी भगवान शिव यांची विशेष पूजा, जप आणि उपवास केला जातो. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला ही रात्र साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला, तसेच शिवाने तांडव नृत्य करून सृष्टीच्या चक्राचे संतुलन राखले.शास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि रात्रभर जागरण केल्याने मन, बुद्धी आणि आत्मा शुद्ध होतात. शिवलिंगावर बेलपत्र, दूध, मध अर्पण करण्यामागेही वैज्ञानिक आधार आहे. हे पदार्थ वातावरण शुद्ध करण्यास आणि मनःशांती देण्यास सहाय्यक मानले जातात.ही रात्र आत्मचिंतन, संयम आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्याची संधी आहे. महाशिवरात्री आपल्याला अहंकार त्यागून साधेपणा आणि श्रद्धेने जीवन जगण्याचा संदेश देते.भारतीय अध्यात्मपरंपरेत भगवान शिव हे संहारक नव्हे तर पुनर्निर्मितीचे प्रतीक मानले जातात. शिवाची उपासना ही केवळ धार्मिक विधी नसून, ती मन, शरीर आणि चेतनेच्या शुद्धीकरणाशी संबंधित एक शास्त्रीय प्रक्रिया आहे.शिवलिंग हे विश्वाच्या ऊर्जा-तत्त्वाचे प्रतीक मानले जाते. त्यावर दूध, पाणी, मध किंवा बेलपत्र अर्पण करून अभिषेक केला जातो. यामागे पर्यावरणीय व आरोग्यदायी दृष्टीकोन देखील आहे. बेलपत्रातील औषधी गुणधर्म आणि जलाभिषेकामुळे निर्माण होणारा थंडावा मनःशांती वाढवते, असे आयुर्वेदात मानले जाते.‘ॐ नमः शिवाय’ हा मंत्र उच्चारताना निर्माण होणाऱ्या ध्वनीतरंगांचा सकारात्मक परिणाम मेंदूवर आणि भावनांवर होतो. रुद्राभिषेक किंवा ध्यान केल्याने ताण कमी होतो आणि एकाग्रता वाढते.शिवाची उपासना म्हणजे अहंकाराचा त्याग, संयमाचे पालन आणि अंतर्मनाशी संवाद साधण्याची साधना. त्यामुळे शिवपूजा ही श्रद्धेसोबतच विज्ञानाशी जोडलेली आध्यात्मिक साधना मानली जाते.
Mhada Lottery Home: म्हाडाकडून सर्वसामान्यांना दिलासा; पैसे भरण्याच्या नियमात मोठा बदल
मुंबई: आगामी काळात 'अॅडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम' अंतर्गत मुंबईत घरे उभारण्यात येणार आहेत. खासगी बिल्डर बिल्डिंग पूर्ण होईपर्यंत ग्राहकांकडून स्लॅबनुसार पैसे आकारतात. त्याच धर्तीवर विजेत्यांना टप्प्याटप्प्याने म्हणजे तीन ते चार वर्षांच्या कालावधीत म्हाडाच्या घरांसाठी पैसे भरण्याची सुविधा मिळणार आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.सध्या म्हाडाच्या इमारतीला ओसी मिळताच विजेत्यांना देकारपत्र पाठवण्यात येते. त्यानंतर विजेत्यांना २५ टक्के पैसे भरण्यासाठी ४५ दिवस व उर्वरित ७५ टक्के पैसे भरण्यासाठी त्यापुढील ६० दिवसांचा वेळ मिळतो. पैसे भरण्यासाठी कमी कालावधी मिळत असल्याने विजेत्यांची बँकेत धावपळ होते. अनेकांना वेळेत कर्ज मिळत नसल्याने घर गमवावे लागते. येत्या काळात म्हाडा 'अॅडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम' अंतर्गत मुंबईत घरे उभारणार आहे. म्हणजेच इमारत निर्माणाधीन असतानाचा त्यातील घरांचा लॉटरीत समावेश करणार आहे. त्यानंतर विजेत्यांकडून खासगी बिल्डरांप्रमाणे टप्प्याटप्याने पैसे आकारणार आहे.टप्पे असे असणारलॉटरीत घर लागल्यास सुरुवातीला दहा टक्के पैसे भरावे लागणार आहे. पुढील सहा ते आठ महिन्यांत १५ टक्के पैसे भरावे लागतील. दुसऱ्या वर्षी २५ टक्के आणि तिसऱ्या वर्षी २५ टक्के पैसे भरावे लागतील. इमारतीला ओसी मिळाल्यानंतर उर्वरित २५ टक्क्यांचा हप्ता भरावा लागेल. त्यानंतर स्टॅम्प ड्युटी रेजिस्ट्रेशन होईल.सध्या इमारतीच्या संपूर्ण बांधकामाचा खर्च म्हाडाला आपल्या तिजोरीतून करावा लागतो. लॉटरीनंतर विजेत्यांकडून पैसे येईपर्यंत वाट पहावी लागते. या स्कीमुळे म्हाडाला स्लॅबनुसार विजेत्यांकडून पैसे मिळणार आहेत. त्यामुळे प्राधिकरणाच्या देखील पैशांची बचत होणार आहे. म्हाडा लॉटरी विजेत्यांना टप्प्याटप्प्याने पैसे भरावे लागणार असल्याने त्यांच्यावर एकाच वेळी आर्थिक भार पडणार नाही. उलट पैसे जमतील तसे वेळोवेळी भरता येणार आहेत. तसेच एखाद्याला बँकेतून कर्ज घ्यावयाचे असेल तर ते सहजपणे मिळू शकणार असून जसे काम पूर्ण होईल, त्याप्रमाणे बँकेतून थेट म्हाडाला पैसे मिळतील.तर याबाबत माहिती देताना म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे म्हणाले की, सध्या मुंबईत म्हाडाकडे तयार घरांची संख्या कमी असल्याने ॲडव्हान्स काँट्रिब्युशन स्कीमअंतर्गत गृह प्रकल्प सुरू करतानाच त्याची लॉटरी काढण्याचा विचार आहे. त्यामुळे घरे पूर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळू शकेल आणि विजेत्यांनाही आर्थिक ओढाताण न करता पैशाचे नियोजन करणे शक्य होईल.
बंगळुरू: अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यात बेपत्ता झालेल्या २२ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे. कर्नाटकातील साकेत श्रीनिवासैया हा ९ फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. तेव्हापासून त्याचा शोध सुरु होता. भारतीय वाणिज्य दूतावास सॅन फ्रान्सिस्को यांनी पुष्टी केली की पोलिसांनी साकेतचा मृतदेह शोधून काढला आहे. साकेत अमेरिकेत राहून पदव्युत्तर शिक्षण घेत होता आणि तो कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कले चा विद्यार्थी होता.दूतावासाने एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले की विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पार्थिव देह लवकरात लवकर भारत येथे पाठवण्यासाठी सर्व आवश्यक मदत दिली जाईल.आपल्या पोस्टमध्ये दूतावासाने लिहिले, “हरवलेल्या भारतीय विद्यार्थी साकेत श्रीनिवासैया यांचा मृतदेह सापडल्याची माहिती देताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे. या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे आणि पार्थिव देह लवकर भारतात पाठवण्याची व्यवस्था करणे यासह सर्व आवश्यक मदत देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. आमचे अधिकारी कुटुंबाशी थेट संपर्कात असून सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात त्यांना मदत करतील.”साकेत बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी व्यापक शोधमोहीम राबवली होती. कॅम्पसपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर त्याला शेवटचे पाहण्यात आले होते. त्यानंतर अंजा लेक आणि बर्कले हिल्स परिसरात शोधमोहीम चालवण्यात आली. नंतर कॅम्पसजवळील टिल्डेन रीजनल पार्क जवळ एका निवासस्थानाजवळ त्याचा पासपोर्ट व लॅपटॉप असलेली बॅग सापडली. माध्यमांच्या वृत्तानुसार त्यांचा मृतदेह अंजा लेकमध्ये आढळला. साकेत श्रीनिवासैया हा उत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत मास्टर ऑफ सायन्सचे शिक्षण घेत होता आणि तो तुमकुरु येथील रहिवासी होता. त्याला शेवटचे अंजा लेक परिसरातच पाहण्यात आले होते.
T20 World Cup 2026 IND vs PAK: बीसीबी अध्यक्ष भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला उपस्थित राहणार नाहीत
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी शेवटच्या क्षणी आपला निर्णय बदलला आहे आणि ते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज टी-२० विश्वचषक सामन्यासाठी कोलंबोला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीबी अधिकाऱ्यांनी बैठकीनंतर याची पुष्टी केली आहे, कारण अमिनुलने कुवेतहून ढाकाला परतण्याचा निर्णय घेतला, जिथे ते आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीला उपस्थित होते.अमिनुल यांनी यापूर्वी संकेत दिले होते की, तो बीसीबी आणि बीसीसीआयमधील अंतर कमी करण्यासाठी आशियाई क्रिकेट बोर्डाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कोलंबोमध्ये होणाऱ्या सामन्याला उपस्थित राहण्याचा विचार करत आहे. कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये होणाऱ्या मोठ्या सामन्याला उपस्थित राहण्यासाठी आयसीसीकडून त्याला अधिकृत आमंत्रण मिळाले.बीसीबी पंच समितीचे अध्यक्ष इफ्तिखार रहमान म्हणाले, मी अमिनुल इस्लामशी यांच्याशी बोललो. बांगलादेश सहभागी होत नसल्याने त्यांनी म्हटले, मी केवळ सामना पाहण्यासाठी तिथे का जावे? म्हणून त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की कदाचित त्यांनी सुरुवातीला सांगितले होते की तो जाईल, पण नंतर त्यांना कळले की जर बांगलादेश खेळत नसेल तर विनाकारण जाण्यात काय अर्थ आहे?बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात त्यांचे विश्वचषक सामने खेळण्यास नकार दिला होता आणि त्यांचे सामने भारताबाहेर हलवण्याची विनंती केली होती, जी विनंती आयसीसीने फेटाळून लावली होती. आयसीसीने बांगलादेशला विश्वचषकात खेळण्याचा निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले, त्यानंतर आयसीसीने बांगलादेशला वगळले आणि त्याच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केला. दरम्यान, बांगलादेशच्या समर्थनार्थ, पाकिस्तानने सुरुवातीला स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली आणि नंतर भारताविरुद्ध खेळणार नाही असे जाहीर केले. पण आयसीसीशी झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानने आपला निर्णय बदलला आणि भारताविरुद्ध खेळण्यास सहमती दर्शविली.
मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात महाशिवरात्र आपल्याला संयम, ध्यान आणि आंतरिक शांततेचे महत्त्व समजावून सांगते. 'शिव' म्हणजे कल्याण आणि 'रात्री' म्हणजे विश्रांती. अंतरात्म्याला विश्रांती देण्याचा संदेश महाशिवरात्री अर्थात महाशिवरात्र देते. महाशिवरात्रीला शंकराची उपासना करण्यासाठी ध्यान लावण्यास सांगितले जाते. या ध्यान लावण्याच्या कृतीतून आपण नकळत अंतरात्म्याला विश्रांती देतो.महाशिवरात्र म्हणजे फक्त शंकराची पूजा करणे नाही तर नकारात्मक विचारांची जळमटे दूर करणे, सकारात्मक विचार स्वीकारणे. यंदाच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्यातील नकारात्मक विचारांचा त्याग करा आणि सकारात्मकतेकडे वाटचाल करा. प्रगती करा. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो ही सदिच्छा व्यक्त करत महाशिवरात्रीनिमित्त देत आहोत निवडक मराठमोळ्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. भक्तीत शक्ती आणि शक्तीमध्ये शिव, हर हर महादेव! Happy Mahashivratri 2026 भोलेनाथाच्या कृपेने तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग खुले होवो. Happy Mahashivratri 2026 सत्य म्हणजे शिव आणि सर्वात सुंदर अनुभव म्हणजे शिवभक्ती. Happy Mahashivratri 2026 शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महाकालाच्या भक्तीत तल्लीन होऊ, Happy Mahashivratri 2026 अंगाला भस्म, हातात त्रिशूळ... असा आहे माझा भोळानाथ, जो भक्तांच्या हाकेला धावतो. Happy Mahashivratri 2026 भोलेनाथाच्या आशीर्वादाने तुमची सर्व कामे सहज आणि सोपी होवो. शुभ महाशिवरात्री!Happy Mahashivratri 2026 कैलासपती, उमापती, महादेवा तुमच्या चरणी आमचे मस्तक सदैव नतमस्तक राहो. Happy Mahashivratri 2026 भगवान शंकराचा वरदहस्त तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो, हीच प्रार्थना. Happy Mahashivratri 2026 ज्याचा कोणी नाही, त्याचा महाकाल आहे. महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! Happy Mahashivratri 2026 महाशिवरात्रीला तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा अभिषेक होवो. Happy Mahashivratri 2026 शिवरात्रीची ही पावन रात्र तुमच्या अंतरातील अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देवो. Happy Mahashivratri 2026 नाम घेता शिवशंभूचे, दुःख पळते दूर, भक्तीच्या या सागरात, व्हावे आपण तल्लीन! Happy Mahashivratri 2026 महादेवाच्या डमरूच्या नादाने तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होवो. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा! ज्याच्या जटेत गंगा, माथ्यावर चंद्रकोर आणि कंठात विष आहे, अशा नीलकंठाला त्रिवार वंदन. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा! ओम नमः शिवाय! महादेवाच्या नामस्मरणाने तुमच्या जीवनातील सर्व संकटे भस्म होवोत. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
Indian Student Death: अमेरिकेत ९ फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेल्या २२ वर्षीय भारतीय विद्यार्थ्या साकेत श्रीनिवासय्याचा अखेर मृतदेह सापडला आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने रविवारी याची पुष्टी केली.
Mahashivratri 2026: मध्यरात्रीपासून शिवालय गजबजली; भाविकांची अलोट गर्दी
आज (रविवार, १५ फेब्रुवारी) देशभरात महाशिवरात्रीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडत आहे. या दिवशी भगवान शिवाची उपासना केली जाते. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला हा उत्सव साजरा केला जातो. पुराणांनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. या दिवशी भक्त रात्रभर ‘ॐ नमः शिवाय’ चा मंत्रजप आणि भजन-कीर्तन करतात. भाविक उपवास ठेवून शिवलिंगावर बेलपत्र, दूध, मध, धतूरा अर्पण केले जाते. शिवलिंगावर ‘पंचामृत अभिषेक’ केला जातो. महाशिवरात्रीला १२ ज्योतिर्लिंगाला भक्तांची मोठी गर्दी असते. महाशिवरात्री ही ध्यान आणि साधनेसाठी अत्यंत शक्तिशाली रात्र मानली जाते. या दिवशी केलेली प्रार्थना आणि जप विशेष फलदायी ठरतो.या पवित्र दिवशी राज्यातील वेगवेगळ्या शिव मंदिरात भक्तांनी रात्रीपासून गर्दी केली आहे.कंकालेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी:बीडमध्ये महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्रीपासून शिवालय दर्शनासाठी गजबजली आहे. बीड मधील कंकालेश्वर या प्राचीन हेमाडपंती मंदिरात मध्यरात्रीपासून दर्शन आणि अभिषेक सुरू आहे. तर पहाटे भाविकांच्या उपस्थितीत महापूजा पार पडली. कंकालेश्वर मंदिर साधारणपणे १२ व्या शतकात चालुक्य किंवा यादव काळातील असावे असा अंदाज वर्तवला जातो.भगवान शंकरांनी 'कंकासुर' नावाच्या राक्षसाचा वध येथे केला होता. अशी पौराणिक कथा आहे. तर हे मंदिर एका मोठ्या सरोवराच्या मध्यभागी बांधलेले आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी एक अरुंद पूल आहे. मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात असून त्यावर अत्यंत कोरीव काम केलेले आहे. हे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण आहे. कंकालेश्वर बीड शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. यावर्षी मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत आहे.महाशिवरात्रीनिमित्त श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात विशेष आरती संपन्न..#prahaarshorts #marathinews #prahaarnewsline #mahashivratri #ujjain pic.twitter.com/Ycb3yV2an6— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) February 15, 2026श्री राजेश्वर महाराज मंदिर:अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजेश्वर महाराज मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आकर्षक विद्युत रोषणाई आणि घोषणांनी संपूर्ण राजराजेश्वर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. ऐतिहासिक आणि पुरातन अशी ओळख असलेले हे मंदिर अकोल्यातील श्रद्धेचे केंद्र मानले जाते. विशेष पूजा-अर्चा, अभिषेक आणि भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भक्तांनी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भगवान शंकराचे दर्शन घेत महाशिवरात्री उत्साहात साजरी केली जात आहे.ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात मध्यरात्रीपासून गर्दी:हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे देशातील आठव्या स्थानी असलेले ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिर आहे. आज महाशिवरात्रीच्या पर्वावर या मंदिरात भाविकांनी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते मध्यरात्रीनंतर दुग्धाभिषेक व महापूजा करण्यात आली.या महापूजेनंतर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. देशाच्या कानाकोपऱ्यातून महाशिवरात्रीच्या या पर्वावर मोठ्या संख्येने भाविक औंढा नागनाथ नगरीत दाखल झाले आहेत. दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली आहे. हर हर महादेव व बम बम बोले चा गजर करत भाविक भक्तीमय वातावरणात दर्शन घेत आहेत. मंदिराचा परिसर देखील आकर्षक रोषणाईने उजळून निघाला आहे.
Tarique Rahman: १७ फेब्रुवारी रोजी ढाका एका मोठ्या राजकीय क्षणाचे साक्षीदार होणार आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान देशाचे पुढचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत.
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाजप खासदाराच्या रेंज रोव्हरला भर रस्त्यात लागली आग
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अग्नितांडव सुरु आहे. अशातच आता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या भाजप खासदाराच्या गाडीने भर रस्त्यात अचानक पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.राजस्थानचे भाजप खासदार लुंबाराम चौधरी यांच्या लग्जरी रेंज रोवर कारला अचानक आग लागली. मुंबई - नाशिक महामार्गावर शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) ही आग लागली. अचानक लागलेली आग ही इतकी तिव्र होती की संपूर्ण गाडी काही क्षणात जळून खाक झाली.त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी रवाना:मिळालेल्या माहितीनुसार, खासदार लुंबाराम चौधरी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी वाशिम येथून नाशिककडे निघाले होते. ते त्यांच्या ४ कोटीच्या रेंज रोवर कारने प्रवास करत होते. गोंदे फाटा परिसरातून जात असताना ड्रायव्हरला अचानक काहीतरी जळण्याचा वास आला. परिस्थितीची गांभीर्य ओळखून चालकाने तात्काळ कार रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर लगेच कारला आग लागली, पण ड्रायव्हरच्या समजुतीमुळे खासदार लुंबाराम चौधरी आणि त्यांच्यासोबतचे सर्वजण वेळेवर सुरक्षित बाहेर काढले गेले. मात्र, काही मिनिटांतच आगने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण कार जळून खाक झाली.या अपघाताची माहिती मिळताच वाडिवरे पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक अग्निशमन दलालाही बोलावण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रमाने आग आटोक्यात आणली.
Harshvardhan Sapkal : पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nitesh Rane post : हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यावर नितेश राणेंनी ट्वीटद्वारे निषेध व्यक्त केला आहे.
Jay Pawar Emotional Post: बारामतीत जनता दरबारमध्ये दादांसाठी होणारी गर्दी सुनेत्राताईंसाठीही झालेली पाहायला मिळाली.
कोलंबोत आज आर-पारची लढाई, विजयाची हॅटट्रिक कोण मारणार?
कोलंबो : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि बहुप्रतिक्षित लढत रविवारी श्रीलंकेच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी विजयाची 'हॅटट्रिक' करण्यासाठी मैदानात उतरतील. गुणतालिकेत दोन्ही संघ सध्या प्रत्येकी ४ गुणांसह अव्वल स्थानी असून, आजच्या विजयामुळे 'सुपर-८' चा मार्ग सुकर होणार आहे.सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आतापर्यंत अमेरिका आणि नामीबियाला धूळ चारत जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. भारताची फलंदाजी आणि जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील वेगवान गोलंदाजी सध्या फॉर्मात आहे. दुसरीकडे, सलमान अली आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघानेही आपले दोन्ही सामने जिंकून भारताला कडवे आव्हान देण्याची तयारी केली आहे.दरम्यान भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा गेल्या काही दिवसांपासून आजारी असून तो नामिबियाविरुद्ध खेळला नव्हता. पण सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा असून तो पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शर्माच्या येण्याने संजू सॅमसनला पुन्हा बाकावर बसवले जाऊ शकते. याशिवाय भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादव याची एन्ट्री होऊ शकते. कोलंबोची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी पोषक मानली जातेय आणि भारतीय संघ अतिरिक्त फिरकीपटूसह मैदानावर उतरू शकतो. कुलदीपसाठी रिंकू सिंगला बाहेर बसवले जाऊ शकते. पण, जर भारतीय संघाला फलंदाजीत तडजोड करायची नसेल तर कुलदीपच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला खेळवले जाऊ शकते किंवा रिंकूच्या जागीही तो खेळू शकतो. शिवम दुबेच्या जागी मोहम्मद सिराजचे पुनरागमन होऊ शकते.अशात सलमान आघाने म्हटले आहे की, त्यांना सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळायचे असल्याने अभिषेकने खेळावे. अशा प्रकारे त्याने एकप्रकारचे आव्हान दिले आहे. सलामान आघा त्याला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला, 'मला आशा आहे अभिषेक शर्मा खेळेल. मला आशा आहे तो बरा होईल. आम्हालाही सर्वोत्तम संघाविरुद्धच खेळायचं आहे.' अभिषेक आत्तापर्यंत या टी-२० वर्ल्ड कपमध्ये केवळ अमेरिकेविरुद्धचा सामना खेळला होता. या सामन्यातही तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर आजारी असल्याने क्षेत्ररक्षणासाठीही आला नव्हता. त्यानंतर नामिबियाविरुद्ध त्याच्या जागेवर संजू सॅमसन खेळला होता.हस्तांदोलनाबद्दल आघा म्हणाला...गेल्यावर्षी पहलगाम हल्ल्यानंतर आशिया कप २०२५ स्पर्धेत भारतीय संघाकडून पाकिस्तान खेळाडूंशी कोणताही संबंध ठेवण्यात आला नव्हता. या दोन संघात तीन सामने झाले, पण कोणत्याही प्रकारचा संवाद झाला नव्हता. त्यातही भारतीय संघाने हस्तांदोलन करणेही टाळले होते, ज्याची मोठ्याप्रमाणात चर्चा झाली होती. त्यामुळे आता टी-२० वर्ल्ड कपमध्येही भारतीय संघ हस्तांदोलन करण्याचा निर्णय घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत सलमान आधाने एका वाक्यात उत्तर दिले की 'ते आपण बघू.'जाहिरातींचे दर गगनाला भिडलेभारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, याचा थेट परिणाम जाहिरात बाजारपेठ आणि पर्यटन क्षेत्रावर झाल्याचे दिसून येत आहे. या एका सामन्याने जाहिरातींच्या दरांपासून ते विमानभाड्यापर्यंत सर्वच विक्रम मोडीत काढले आहेत. या महामुकाबल्यासाठी जाहिरात बाजारपेठेत लक्षणीय तेजी आली आहे. उद्योग तज्ञांच्या मते, १० सेकंदांच्या टीव्ही जाहिरात स्लॉटची किंमत आता ३० ते ४० लाखांच्या घरात पोहोचली आहे.विमान आणि हॉटेलच्या किमतीही वाढल्याहाती आलेल्या वृत्तानुसार ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म इझमायट्रिपनुसार राउंड-ट्रिप विमानभाडं सामान्य दिवसांच्या तुलनेत ४५ ते ५० टक्क्यांनी महाग झालं आहे. मेकमायट्रिप च्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारीच्या वीकेंडसाठी कोलंबोच्या बुकिंग्स गेल्या तीन दिवसांत दुप्पट झाल्या आहेत. तर क्लिअरट्रिप सांगते की भारत–पाकिस्तान सामन्यामुळे कोलंबोसाठीच्या बुकिंगमध्ये जवळपास ६५ टक्क्यांची वाढ झाली आहे. याचाच परिणाम हॉटेल दरांवरही दिसतोय. कोलंबोमधील पंचतारांकित हॉटेल्सना सर्वाधिक मागणी असून, प्रीमियम रूम्सचे दर सामान्य सीझनपेक्षा २०–२५ टक्क्यांनी वाढले आहेत. हॉटेल इंडस्ट्रीच्या मते, सामना सुरू असलेल्या कालावधीत शहरातील बहुतांश प्रमुख प्रॉपर्टीज जवळपास ‘फुल’ होण्याच्या मार्गावर आहेत. एकूणच, भारत–पाकिस्तान सामना हा आता केवळ क्रिकेटपुरता मर्यादित राहिलेला नाही. जाहिरातींपासून पर्यटनापर्यंत, प्रत्येक क्षेत्रात या सामन्याचे आर्थिक परिणाम दिसत आहेत.संभाव्य संघभारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन, संजू सॅमसन/अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव/वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.पाकिस्तान: सलमान अली आगा (कर्णधार), मोहम्मद हारिस, बाबर आझम, फखर झमान, सईम अयुब, शादाब खान, इफ्तिखार अहमद, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमदभारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये अटीतटीची लढतक्रिकेट विश्वातील सर्वात मोठा आणि रोमांचक संघर्ष म्हणून ओळखला जाणारा भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला आज कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. टी-२० विश्वचषक २०२६ मधील या हाय-व्होल्टेज सामन्याची जगभरातील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सुरुवातीला नकार देणाऱ्या पाकिस्तानने अखेर मैदानात उतरण्याची तयारी दर्शवल्याने या लढतीतील चुरस अधिकच वाढली आहे. भारतीय संघाने आतापर्यंत अमेरिका आणि नामीबिया विरुद्ध सहज विजय मिळवून आपला दबदबा निर्माण केला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा प्रवास काहीसा अडखळत सुरू आहे. नेदरलँड्सविरुद्ध १४७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या नाकीनऊ आले होते; ते जणू ‘रडत-रडत’ जिंकले आहेत. अशा स्थितीत भारताच्या फॉर्मात असलेल्या खेळाडूंना रोखण्याचे मोठे आव्हान कर्णधार सलमान आगासमोर असेल. अभिषेक शर्माच्या पुनरागमनामुळे भारताची सलामी अधिक आक्रमक झाली आहे. इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल अशी तगडी फलंदाजी भारताकडे आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती हे कोणत्याही फलंदाजीला खिंडार पाडण्यास सक्षम आहेत. बाबर आझम अजूनही आपल्या फॉर्मसाठी संघर्ष करत आहे. साहिबजादा फरहान, सईम अयुब आणि उस्मान खान यांच्यावर फलंदाजीची भिस्त आहे. शाहीन शाह आफ्रिदी आणि शादाब खान यांच्या गोलंदाजीवर पाकिस्तानची मदार असेल. कोलंबोची खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्याची शक्यता आहे. अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांच्या साथीने फिरकीचे जाळे विणून पाकिस्तानला रोखण्याचे नियोजन भारताने केले आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकले असले तरी, सांघिक कामगिरी पाहता भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियम भारतीय संघ १५ टी-२० सामने खेळला आहे त्यातील ११ सामन्यात भारतीय संघ विजयी झाला आहे. ४ सामन्यात पराभव झाला आहे. भारत-पाकिस्तान एक लढत झाली आहे त्यात भारतीय संघ विजयी झाला आहे. पाकिस्तान ७ सामने खेळला आहे त्यातील ५ सामन्यात विजयी झाला आहे २ सामन्यात पराभव झाला आहे. तरीही भारत-पाकिस्तान सामन्यात दबावाचा जो सामना करेल, तोच बाजी मारेल.
Top 10 news: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. अशातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरला होता त्या चर्चा अजूनही थांबत नाहीयेत.
म्हाडाकडे महापालिकेच्या मालमत्ता कराची ६३ कोटींची थकबाकी
मुंबई: मुंबई महापालिकेने आता मालमत्ता कराची थकीत रक्कम वसूल करण्याची मोहिम हाती घेत मोठ्या थकबाकीदारांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मोठयाप्रमाणात कराची रक्कम थकीत असलेल्या ४० थकबाकीदारांची नावे जाहीर केल्यानंतर तब्बल २७० कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या आणखी २० मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये म्हाडा प्राधिकरणासह मोठ्या विकासकांचाही समावेश आहे. वांद्र्यातील म्हाडा कार्यालयाची तब्बल ६३ कोटी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी असल्याचे दिसून आले.मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मालमत्ताकर देयके मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत मालमत्ता कर महानगरपालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर न भरल्यास महानगरपालिकेकडून टप्पेनिहाय कारवाई सुरू करण्यात येते. महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून मालमत्ता कर भरण्यासाठी पाठपुरावा करतात. तरीही मालमत्ता कर न भरल्यास 'डिमांड लेटर' पाठवण्यात येते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात मालमत्ता धारकास २१ दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते. त्यानंतर थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती, लिलाव आदी कारवाई केली जाते.तरीही, काही मोठ्या थकबाकीधारकांकडून अद्याप कर भरणा करण्यात येत नसल्याने कर निर्धारण व संकलन खात्याच्या वतीने जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. दंड रकमेसह थकबाकी रकमेचा यात समावेश आहे. महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार लिलावाची कार्यवाही करण्यात येईल. यामुळे नोटीसप्राप्त मालमत्ताधारकांनी कारवाई टाळण्यासाठी तातडीने कर भरणा करावा, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांनी केले आहे.‘टॉप २०’ मालमत्ताधारकांची यादी--महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (एच पश्चिम विभाग) - ६३ कोटी २१ लाख ४० हजार ५९१ रुपये-मेसर्स राजहंस असोसिएट्स (एस विभाग) - ४६ कोटी ०५ लाख २७ हजार ०६५ रुपये-मेसर्स विमल असोसिएट्स (के पूर्व विभाग) - ३९ कोटी ०९ लाख ८५ हजार ०८५ रुपये-नॅशनल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन (एस विभाग) - १० कोटी ३६ लाख ८१ हजार ०४८ रुपये-नॅशनल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन (एस विभाग) - १० कोटी २० लाख ७८ हजार ५८९ रुपये-यशवंत एन. जाधव एसएसव्ही रिऍल्टर्स (एन विभाग) - ९ कोटी ९४ लाख ७० हजार १४५ रुपये-अंबिका सिल्क मिल (जी दक्षिण विभाग) - ९ कोटी ६४ लाख ९० हजार ९८२ रुपये-महाराष्ट्र शासन भोगवटादार सुशीलकुमार संभाजी शिंदे प्रतिष्ठान (एच पूर्व विभाग) - ८ कोटी ७९ लाख २९ हजार ९४८ रुपये-द व्हिक्टोरिया मिल्स् लिमिटेड, प्लाझा पंचशील मिल (डी विभाग) - ८ कोटी ७६ लाख ६८ हजार ००६ रुपयेनॅशनल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन (एस विभाग) - ८ कोटी ०८ लाख ७० हजार ३२८ रुपयेमोहम्मद युसूफ खान (एल विभाग) - ७ कोटी ६४ लाख ८९ हजार ०३६ रुपये-एएच वाडिया ट्रस्ट स्कायलिंक डेव्हलपर्स (एच पूर्व विभाग) - ७ कोटी ५६ लाख ७८ हजार २७२ रुपये-मेहरून्निसा मोहम्मद साहेब खतीब (बी विभाग) - ७ कोटी ३३ लाख ८० हजार ७११ रुपये-द न्यू सन मील कॉम लिमिटेड शुभम् फॅब्रीक (जी दक्षिण विभाग) - ७ कोटी १९ लाख ३० हजार ०४७ रुपये-जय माता दि कन्स्ट्रक्शन (एम पश्चिम विभाग) - ५ कोटी ७९ लाख ३५ हजार ५६३ रुपये-ट्रान्सकॉन ट्रायम्फ फेज २ प्रायव्हेट लिमिटेड (के पश्चिम विभाग) - ५ कोटी ७८ लाख १० हजार ५५२ रुपये-ट्रान्सकॉन ट्रायम्फ फेज २ प्रायव्हेट लिमिटेड (के पश्चिम विभाग) - ५ कोटी ५६ लाख ५५ हजार ८९७ रुपये-नॅशनल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन (एस विभाग) - ५ कोटी ३५ लाख १८ हजार १३८ रुपये-एल्को आर्केड सहकारी गृहनिर्माण संस्था डी विंग (एच पश्चिम विभाग) - ४ कोटी ८१ लाख १२ हजार ०४६ रुपये-गोल्डन रॉयल टॉकीज् (डी विभाग) - ४ कोटी २२ लाख ६७ हजार ४१५ रुपये
Jayant Patil : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे.
Mumbai-Nashik Highway: भाजप खासदाराच्या धावत्या कारला आग; कोट्यावधींची रेंज रोव्हर जळून खाक
Mumbai-Nashik Highway: इंजिनमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने क्षणाचाही विलंब न लावता तातडीने कार रस्त्याच्या कडेला उभी केली.
Weather Alert: महाराष्ट्रातील 'या'जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट
मुंबई: राज्यातील हवामानात बदल जाणवायला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर पोहोचताच हवामानात पुन्हा एकदा लक्षणीय बदल जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि हवामानाच्या अद्ययावत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कोकण किनारपट्टीत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबदार आणि दमट हवामान असणार आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेची जाणीव अधिक तीव्र होईल . कमाल तापमान ३४ ते ३६ अंशांच्या आसपास आहे, तर किमान तापमान २२ ते २४ अंशांदरम्यान आहे. किनारपट्टी भागात आर्द्रता जास्त असल्याने उकाडा जाणवेल.आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर भागात हवामान कोरडे राहील. येथे कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांदरम्यान आहे, तर किमान तापमान १६ ते १९ अंशांदरम्यान नोंदवले जात आहे. सकाळी हलका गारवा असला तरी दुपारी वातावरण उबदार असेल.गेले काही दिवस मराठवाडा आणि विदर्भ विभागात स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामान आहे. आजही या भागातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर तसेच छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, परभणी आदी भागात कमाल तापमान ३४ ते ३७ अंशांदरम्यान पोहोचले आहे. किमान तापमान १८ ते २२ अंशांदरम्यान आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे.एकंदरीत १५ फेब्रुवारी रोजी राज्यात तापमान वाढीचा कल कायम आहे. आकाश स्वच्छ, पावसाचा अभाव आणि थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने उष्णतेची तीव्रता वाढली आहे. पुढील काही दिवसांतही राज्यात कोरडे आणि उबदार हवामान कायम राहील आणि हिवाळ्याचा प्रभाव आणखी कमी होत जाईल. यासोबत कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही हवामान विभागाने उष्णता वाढणार असल्याचे सांगितले आहे.
PMPML Parking : पीएमपीएमएलच्या बसेससाठी स्वतंत्र पार्किंग; महानगर परिवहन प्राधिकरण समितीत निर्णय
PMPML Parking : बस कॉरिडॉर, मल्टी-लेव्हल पार्किंग आणि 'पार्क-अँड-राईड' संकल्पनेवर भर; पीएमपीएलच्या पार्किंगचा प्रश्न सुटणार.
गाझियाबादमधील लोणी येथील अमन गार्डन फेज-2 कॉलनीमध्ये असलेल्या दुमजली घराचा दरवाजा आता क्वचितच उघडतो. हे घर कमरुद्दीनचे आहे. तोच कमरुद्दीन ज्याच्यावर विषारी लाडू खाऊ घालून दिल्लीत तीन लोकांना मारल्याचा आरोप आहे. शेजारी सांगतात की, कमरुद्दीन तंत्र-मंत्राने पैसे दुप्पट करण्याचा आणि कॅन्सरसह प्रत्येक रोगावर उपचार करण्याचा दावा करत असे. आसपासचे लोक त्याच्या घरी उपचारासाठी जातही होते. कमरुद्दीन उपचाराच्या बहाण्याने लोकांकडून लाखो रुपये लुटले होते. उपचार आणि पूजेसाठी तो त्यांच्याकडून लाडू, अंडी आणि मांस मागवत असे. त्याच्या घरी बाहेरून गाड्या येत असत. 8 फेब्रुवारी रोजी 76 वर्षांचे रणधीर, 47 वर्षांचे शिव नरेश आणि 40 वर्षांच्या लक्ष्मी 2 लाख रुपये घेऊन कमरुद्दीनकडे पोहोचले होते. कमरुद्दीनने सांगितले होते की, 2 लाख रुपयांचे 3 कोटी रुपये बनवून देईल. नंतर तिघांचे मृतदेह दिल्लीतील पश्चिम विहार परिसरात एका कारमध्ये सापडले. दिल्ली पोलीस 72 वर्षांच्या कमरुद्दीन आणि त्याच्या दोन मुलांची चौकशी करत आहे. कमरुद्दीन यापूर्वीही अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये तुरुंगात जाऊन आला आहे, असे समजले आहे. कमरुद्दीनचा भूतकाळ जाणून घेण्यासाठी आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. त्याच्या शेजाऱ्यांना भेटलो. एका पीडित रणधीरच्या कुटुंबाशी बोललो आणि अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत झालेल्या तपासाबाबत विचारले. सुरुवात कमरुद्दीनच्या घरातूनकमरुद्दीन उत्तर प्रदेशातील फिरोजाबादचा रहिवासी आहे. त्याला 5 मुले आणि 2 मुली आहेत. तीन मुले फिरोजाबादमध्ये राहतात. कमरुद्दीन तिथेही तंत्र-मंत्राचे काम करत असे. त्यामुळे त्याचे फिरोजाबादला येणे-जाणे सुरू असे. दिल्ली पोलिसांनी ट्रिपल मर्डर प्रकरणाचा तपास सुरू केला, तेव्हा त्याचा एक धागा घटनास्थळापासून सुमारे 30 किमी दूर गाझियाबादमधील लोणी येथे सापडला. कमरुद्दीन येथील अमन गार्डन फेज-2 कॉलनीत कुटुंबासोबत राहतो. कॉलनीत बहुतेक लोक 7-8 वर्षांपूर्वीच स्थायिक झाले आहेत. रस्ते कच्चे आहेत. आजूबाजूचे लोक सांगतात की कमरुद्दीनच्या घरी बाहेरूनही लोक येत असत. घरासमोर अनेकदा गाड्या उभ्या असत. त्याच्या मागील कृत्यांबद्दल कोणालाही माहिती नाही. लोणीमध्ये ज्या ठिकाणी कमरुद्दीनचे घर आहे, तिथेच त्याच्या मुलांचे किराणा दुकान आणि एक हॉटेल आहे. घराला लागून एका छोट्या भागात दर्गा बनवला आहे. येथे राहणाऱ्या नझराना कमरुद्दीनचे नाव ऐकताच संतापतात. नझराना 8 वर्षांपासून याच परिसरात राहत आहेत. त्याही कमरुद्दीनच्या फसवणुकीला बळी पडल्या आहेत. नझराना सांगतात की एका ओळखीच्या व्यक्तीने मला कमरुद्दीनबद्दल सांगितले होते. हे कृत्य (ट्रिपल मर्डर) करण्याच्या दोन दिवसांपूर्वीच कमरुद्दीन माझ्या घरी आला होता. मी त्याच्याकडून मुलावर उपचार करून घेत होते. कमरुद्दीनने कधी 20 हजार, कधी 50 हजार असे करत माझ्याकडून 2.75 लाख रुपये घेतले. मी पैसे परत मागत होते. तो हेच सांगायला आला होता की लवकरच पैसे परत करेल.नजराना पुढे म्हणते, ‘मी कमरुद्दीनला अडीच-तीन वर्षांपासून ओळखते. माझ्या मुलाच्या हृदयात छिद्र आहे. कोणीतरी मला सांगितले होते की कमरुद्दीन चांगले उपचार करतो. मी मुलाला त्याच्याकडे घेऊन गेले. मुलाला फायदा झाला नाही, तेव्हा मी कमरुद्दीनकडे पैसे परत मागितले. त्याने सांगितले होते की तू 9 किंवा 10 तारखेला (फेब्रुवारी) पैसे घेण्यासाठी ये. मी त्याच्या घरी गेले, तेव्हा पाहिले की तिथे पोलीस उभे आहेत. लोकांनी सांगितले की कमरुद्दीनने तीन खून केले आहेत. माझ्या पायाखालची जमीनच सरकली.’मुलाच्या उपचारांबद्दल आणि कमरुद्दीनच्या फसवणुकीबद्दल नजराना सांगते, ‘सुरुवातीला त्याने माझ्याकडून 1100 रुपये मजारवर टाकायला लावले होते. मग काळा कोंबडा आणायला सांगितले. त्याने म्हटले होते की तुझ्यावर काहीतरी जादू झाली आहे, मी ती उतरवून टाकेन. मी पैसे देत राहिले.''त्याच्याकडे एक चाकू असायचा. तो तो पायाच्या तळव्यात अडकवून ठेवायचा आणि मग मंत्र म्हणायचा. मग डोके धरून बसवायचा. अगरबत्ती पेटवून द्यायचा आणि त्यात फुंकर मारत राहायचा. कधी लाडू, कधी अंडी मागवायचा. मी त्याला अंड्यांच्या 50 पेक्षा जास्त ट्रे दिल्या होत्या.’कमरुद्दीनवर विश्वास कधी उडाला? नजराना म्हणते, ‘माझ्या मुलावर हॉस्पिटलमध्येही उपचार सुरू होते. एकदा त्याच्या ऑपरेशनवर एक लाख रुपये खर्च झाले. कमरुद्दीन म्हणाला की हॉस्पिटलमध्ये पैसे खर्च करू नकोस, मला दे. मी कॅन्सरवरही उपचार करतो.’ ‘कमरुद्दीनला कंटाळून घर सोडले’असाच अनुभव साजिदालाही आला आहे. तिची मुलगी आजारी असते. लोकांनी सांगितल्यावर ती मुलीला कमरुद्दीनकडे घेऊन गेली. साजिदा सांगते, ‘कमरुद्दीनने माझ्याकडून लाडू आणि अंडी मागवली. एकदा म्हणाला की अडीच किलो मांस घेऊन ये. त्याच्याकडे जाता-जाता एक वर्ष झाले, पण मुलीला आराम मिळाला नाही. तो पैशांशिवाय काम करत नव्हता. नेहमी एक-दोन हजार मागत असे. माझी मुलगी सांगत होती की कमरुद्दीनने तिलाही लाडू खाऊ घातला होता.’ याच परिसरात राहणारे अब्दुल म्हणतात, ‘कमरुद्दीनमुळे लोक त्रस्त होऊ लागले होते. तो जादूटोणा करत असे. त्रासून आम्ही स्वतः ही जागा सोडून निघून गेलो.’ आसपासचे लोक सांगतात की त्याने काही वर्षांत आसपास खूप मालमत्ता खरेदी केली आहे. त्याच्या एका जमिनीवर मशीदही बांधली आहे. मशिदीला आता कुलूप लागले आहे. दिल्ली पोलीस कमरुद्दीनच्या मालमत्तेची चौकशीही करत आहेत. तिन्ही पीडित घरी न सांगता कमरुद्दीनकडे गेलेरणधीर, शिव नरेश सिंह आणि लक्ष्मी देवी सुमारे एक वर्षापासून कमरुद्दीनच्या संपर्कात होते. पोलिसांनुसार, कमरुद्दीनने या तिघांना विश्वास दिला होता की तो तंत्र-मंत्र विद्येने त्यांच्यासाठी धनवर्षा करेल. 8 फेब्रुवारी रोजी त्याने तिघांना 2 लाख रुपये घेऊन बोलावले. त्याने फसवणूक केली की तो दोन लाख रुपयांचे तीन कोटी रुपये बनवून देईल. आरोप आहे की कमरुद्दीनने तिघांना विषारी लाडू खाऊ घातले. यामुळे तिघांचा मृत्यू झाला. आम्ही रणधीरच्या घरी नजफगढमधील बापरोला गावात पोहोचलो. तेथे त्यांचे चुलत भाऊ सरवर भेटले. सरवर सांगतात, ‘रणधीर शेती आणि प्रॉपर्टीचे काम करत होते. ते 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता घरातून निघाले होते. त्यांनी कधी सांगितले नाही की ते कोणत्या कमरुद्दीनला ओळखतात. आम्हाला आता कळले की नरेश आधीपासूनच तिथे जात होता. त्याच्याच माध्यमातून ते कमरुद्दीनला भेटले.’ रणधीरचे पुतणे हरीश सांगतात की, ताऊ खूप जास्त राखीव स्वभावाचे होते. ते सर्व काही खूप खाजगी ठेवत असत. कोणाला भेटायला जात आहेत, हे कुटुंबातील कोणालाही माहीत नव्हते. नरेश आमच्याकडे येत-जात असे. ते कोणत्याही अंधश्रद्धेत सामील होते की नाही, हे आता सांगू शकत नाही. शिव नरेश देखील प्रॉपर्टी डीलर होते. ते उत्तर प्रदेशातील एटा येथील रहिवासी होते, पण सध्या दिल्लीतील नांगली डेअरी परिसरात एकटे राहत होते. शिवनरेश आणि लक्ष्मीच्या कुटुंबाशी संपर्क होऊ शकला नाही. पोलिसांना कळले की, सलीम नावाच्या एका व्यक्तीमार्फत लक्ष्मीची आधी कमरुद्दीनशी भेट झाली होती. त्यानंतर लक्ष्मीमार्फत शिव नरेश आणि रणधीर त्याच्या संपर्कात आले. पोलीस सलीमचीही चौकशी करत आहेत. सर्वजण एकमेकांकडून ऐकूनच कमरुद्दीनला भेटले होते. आउटर दिल्लीचे डीसीपी सचिन शर्मा सांगतात, ‘लक्ष्मीचे पती आजारी होते. ती एके दिवशी कमरुद्दीनकडे गेली. कमरुद्दीनने तिला जादू दाखवून शालमधून पैसे काढून दाखवले. त्याला सांगण्यात आले की तो अशाच प्रकारे पैशांचा पाऊस पाडू शकतो.’ दिल्ली पोलिसांनुसार, कमरुद्दीनने भूत-प्रेत आणि जादूटोण्याच्या नावाखाली अशा प्रकारचा ढोंग 2010 मध्ये शिकला होता. अशा कामांसाठी तो बेसनाचे लाडू आणि अंड्यांचा वापर करत असे. दिल्लीत ज्या तीन लोकांची हत्या झाली, ते तिघेही घटनेच्या एक दिवस आधी कमरुद्दीनकडे लोणीला गेले होते. त्या दिवशी त्यांनी पैसे नेले नव्हते. त्यामुळे कमरुद्दीनने त्यांना परत पाठवले होते. कमरुद्दीनवर आधीच तीन खुनाचे आरोपपोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा त्यांना कळले की कमरुद्दीनविरुद्ध आधीच दोन गुन्हे दाखल आहेत. दोन्ही प्रकरणे खुनाशी संबंधित आहेत. पहिले प्रकरण राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील आहे. फेब्रुवारी 2014 मध्ये राजा खेडा परिसरात अनिता नावाच्या महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांना कळले की अनिता काही महिन्यांपूर्वी कमरुद्दीनच्या संपर्कात आली होती. अनिता आणि तिचा पती नारायण सिंह यांना लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही मुले झाली नव्हती. अनिता आणि तिच्या पतीने कमरुद्दीनला भेटायला सुरुवात केली आणि ते त्याच्या जाळ्यात अडकत गेले. आरोप आहे की, 26 फेब्रुवारी 2014 रोजी पैशाच्या लोभापायी कमरुद्दीनने अनिताची हत्या केली. मात्र, काही वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर तो पुराव्याअभावी निर्दोष सुटला. त्यानंतरच तो लोणीला स्थलांतरित झाला होता. त्याचप्रमाणे, मे 2025 मध्ये कमरुद्दीनवर फिरोजाबादमध्ये दोन लोकांच्या हत्येचा आरोप लावण्यात आला होता. त्याने रामनाथ आणि त्याचा एक नातेवाईक पूरन यांना तंत्र-मंत्राद्वारे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. 8 मे 2025 रोजी दोघांना घरी बोलावून काहीतरी खायला दिले. दुसऱ्या दिवशी तिथेच दोघांचे मृतदेह सापडले. एफआयआरनुसार, मृतदेहाजवळ दोन ग्लास, लाडू आणि लिंबू सापडले होते. रामनाथचा भाऊ राम सिंहने कमरुद्दीनविरुद्ध गुन्हा दाखल केला. राम सिंहने आरोप केला की कमरुद्दीनने त्याच्या भावाकडून आणि पूरणकडून तंत्र-मंत्राच्या नावाखाली मोठी रक्कम घेतली होती. फिरोजाबादमधील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की कमरुद्दीन येथेही तंत्र-मंत्राचे काम करत असे. गेल्या काही वर्षांपासून तो लोणीमध्ये राहत होता. पकडले जाण्याच्या भीतीने तो स्थानिक लोकांशी असे काम कमी करत असे. फिरोजाबादमध्ये गेल्या वर्षीच्या घटनेच्या काही दिवसांनंतर त्याला अटक करण्यात आली होती. तीन महिन्यांनंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, परंतु सप्टेंबरमध्ये त्याला उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. तर, आउटर दिल्लीचे डीसीपी सचिन शर्मा सांगतात की कमरुद्दीनव्यतिरिक्त त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांची भूमिकाही तपासली जात आहे. त्यामुळे त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. कोणत्याही पीडिताच्या कुटुंबीयांना याबद्दल फारशी माहिती नाही. आतापर्यंत त्याने तीन प्रकरणांमध्ये (ट्रिपल मर्डरसह) सामील असल्याची कबुली दिली आहे. असे आणखी पीडित असू शकतात.
PMC News : प्रशासकीय सुसूत्रतेसाठी कसरत; ४१ प्रभागांची लोकसंख्या आणि क्षेत्रफळानुसार विभागणी करण्याचे 'सामान्य प्रशासन' विभागासमोर आव्हान.
PMC News : १ हजार ९३२ निवृत्त कर्मचाऱ्यांचे मानधन थांबले; तांत्रिक कारणांमुळे विलंब होत असल्याची प्रशासनाची कबुली.
मुंबई: मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गावर मुलुंड येथे शनिवारी झालेल्या दुर्घटने प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत.अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतानाच जखमींच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीए करणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.एमएमआरडीए प्रशासनाकडून दुर्घटनेची माहिती घेतानाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सार्वजनिक सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. या दुर्घटनेची दखल घेत त्यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांचे निलंबनाचे निर्देश दिले. तसेच मेट्रो ब्रीज मार्गाचे सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ॲाडिट करण्याचे आदेश शिंदेंनी दिले आहेत.दरम्यान, या अपघाताला जबाबदार असलेल्या मिलन इंफ्रा कंपनीला पाच कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर दुर्घटनाग्रस्त मेट्रो मार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीला कन्सल्टंट करणाऱ्या लुई बर्गर कंपनीला १ कोटी रुपयाचा दंड भरावा लागणार आहे.दुर्दैवाने, या घटनेत मुंबई फिरण्यासाठी आलेले उत्तर प्रदेशातील रामधन यादव यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. रामधन यादव हे उत्तर प्रदेशातील जौनपूरमधील एका गावाचे सरपंच म्हणून काम पाहत होते. ते मित्रासोबत मुंबई फिरण्यासाठी आले होते. कळव्यात एका लग्नासाठी रामधन यादव आणि महेंद्र यादव रिक्षानं निघाले होते. त्याचवेळी मेट्रोचा सिमेंट ब्लॉक रिक्षावर कोसळला आणि ही दुर्देवी घटना घडली. मुंबई फिरल्यानंतर दोन दिवसात रामधनी यादव उत्तर प्रदेशात जाणार होते. या घटनेची माहिती मिळताच रामधन यादव यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाबाहेर एकच हंबरडा फोडला.
Pune RTO : पुणे आरटीओचा मोठा दणका! ३ हजार ६०० वाहन परवाने निलंबित; तुमचं नाव तर नाही ना या यादीत?
Pune RTO : विनापरवाना चालकांवर कडक नजर: निलंबनानंतरही वाहन चालवल्यास ५ हजार रुपयांचा दंड; आरटीओच्या संकेतस्थळावर स्टेटस होणार अपडेट.
T-20 विश्वचषकात भारत-पाक महामुकाबल्यापूर्वी एका नावाची खूप चर्चा आहे. पॉज घेऊन चेंडू फेकणारा पाकिस्तानचा मिस्ट्री स्पिनर- उस्मान तारिक. 4 आंतरराष्ट्रीय T-20 सामन्यांमध्ये 11 विकेट… प्रत्येक 8व्या चेंडूवर शिकार. PSL आणि देशांतर्गत सामने मिळून, मागील 23 सामन्यांपासून तो विकेटलेस राहिलेला नाही. परंतु चर्चा केवळ विकेट घेण्याच्या वेगाचीच नाही, तर त्याच्या विचित्र गोलंदाजी ॲक्शनची आणि त्याच्या क्रिकेटर बनण्याच्या अनोख्या कथेचीही आहे. कोण आहे उस्मान तारिक, त्याच्या गोलंदाजी ॲक्शनवर प्रश्न का उपस्थित केले जात आहेत आणि पाकिस्तानच्या या मिस्ट्री स्पिनरशी टीम इंडिया कशी सामना करेल; जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये… प्रश्न-1: उस्मान तारिकची इतकी चर्चा का होत आहे?उत्तर: पाकिस्तानचा मिस्ट्री स्पिनर उस्मान तारिक त्याच्या अनऑर्थोडॉक्स गोलंदाजी ॲक्शनमुळे चर्चेत आला आहे. चेंडू टाकण्यापूर्वी त्याचा हलकासा पॉज फलंदाजांना गोंधळात टाकतो. त्याने केवळ चार T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 88 चेंडू टाकून 11 विकेट घेतल्या आहेत… 2008 अंडर-19 विश्वचषक संघाचे सदस्य श्रीवत्स गोस्वामी यांनी त्यांच्या रन-अपची तुलना फुटबॉल पेनल्टीशी करताना म्हटले की, फुटबॉलमध्येही रन-अप दरम्यान थांबण्याची परवानगी नसते, तर मग क्रिकेटमध्ये हे कसे योग्य असू शकते. यावर, माजी भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने म्हटले की, जेव्हा फलंदाज न सांगता स्विच-हिट किंवा रिव्हर्स शॉट खेळू शकतो, तर मग निर्बंध फक्त गोलंदाजांवरच का असावेत? गोलंदाज तर न सांगता हातही बदलू शकत नाही, आधी हे नियम बदलले पाहिजेत. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी प्रश्न उपस्थित केला की, हात न वाकवता उभे राहून चेंडूचा वेग 20 किमी/तास पर्यंत वाढवता येतो का? प्रश्न-2: तर त्याची गोलंदाजीची ॲक्शन आणि पोझ लीगल नाही का? उत्तर: ICC च्या नियमांनुसार उस्मान तारिकची ॲक्शन आणि पोझ दोन्ही लीगल आहेत. आधी त्याच्या गोलंदाजीच्या ॲक्शनबद्दल बोलूया… आता चेंडू टाकण्यापूर्वीच्या पोझबद्दल… प्रश्न-3: उस्मान तारिकसोबत पाकिस्तानची फिरकी चौकडी किती मोठे आव्हान आहे?उत्तर: 2024 च्या विश्वचषकानंतर काही भारतीय फलंदाज फिरकीपटूंविरुद्ध अनेकदा अडचणीत आलेले दिसले आहेत… भारत-पाकिस्तान यांच्यातील 15 फेब्रुवारी रोजी होणारा सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर आहे. तज्ञांचे मत आहे की येथे फिरकीपटूंना 3 ते 4 अंशांपर्यंत टर्न मिळत आहे. येथे 60% विकेट फिरकीपटूंना मिळतात. भारतासाठी सर्वात मोठे आव्हान मिस्ट्री स्पिनर उस्मान तारिक आहे. कोलंबोच्या खेळपट्टीवर चेंडू मातीवर पडल्यानंतर थांबतो, जे उस्मानसारख्या स्लो-पॉज गोलंदाजासाठी योग्य आहे. जर उस्मानचे T-20 आंतरराष्ट्रीय सामने, देशांतर्गत T-20 सामने आणि PSL चे आकडे पाहिले तर, मागील 23 सामन्यांमध्ये त्याने प्रत्येक सामन्यात किमान एक विकेट घेतली आहे. या दरम्यान त्याची इकॉनॉमी 6.5 राहिली आहे आणि डॉट बॉल देखील सुमारे 42% आहेत. वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि समालोचक इयान बिशप यांनी उस्मान तारिकबद्दल म्हटले आहे की-उस्मान त्याच्या गोलंदाजीमध्ये वेगवेगळ्या अँगलचा वापर करतो. तो रॉंग आर्म, ओव्हर द टॉप, क्विकर बॉल, ऑफ स्पिन आणि हलक्या लेग स्पिनने फलंदाजाला चकवू शकतो. त्यामुळे फलंदाजाला मोठे शॉट्स खेळण्यात अडचण येते. अबरार अहमद: उस्मान व्यतिरिक्त, पाकिस्तान अबरार अहमदला देखील मिस्ट्री वेपन म्हणून वापरू शकतो. त्याचा कॅरम बॉल कोलंबोच्या मातीवर ग्रिप करत आहे. पॉवरप्लेमध्येही त्याची इकॉनॉमी फक्त 7.5 राहिली आहे. या विश्वचषकात खेळलेल्या 2 सामन्यांमध्ये त्याने 3 विकेट घेतल्या आहेत. T-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या 3 सामन्यांच्या T-20 मालिकेत अबरारने 6 विकेट घेतल्या होत्या. मोहम्मद नवाज: तिसरा फिरकीपटू मोहम्मद नवाज अनेकदा पॉवरप्लेनंतर लगेच गोलंदाजी करतो आणि धावांचा वेग थांबवतो. आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये नवाजने 3 बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत 18 धावांत 5 बळी घेतले. नवाजने 3 सामन्यांमध्ये एकूण 7 बळी घेतले होते. शादाब खान: चौथा फिरकीपटू शादाब खानही विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच फॉर्ममध्ये परतला आहे. त्याची गुगली पूर्वीपेक्षा खूप वेगाने येते. कोलंबोमध्ये लांब बाउंड्री असल्यामुळे तो फलंदाजांना मोठे शॉट्स खेळण्यास भाग पाडतो, ज्यामुळे विकेट जाण्याची भीती असते. आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये शादाबनेही 2 बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही शादाबने 4 बळी घेतले होते. याशिवाय, पाकिस्तानचा फलंदाजी अष्टपैलू सॅम अयुब देखील भारतीय फलंदाजांसाठी अडचणीचा ठरू शकतो. पाकिस्तान त्याचा वापर अनेकदा पॉवरप्ले दरम्यान करतो. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 1 षटकात 7 धावा देऊन 2 बळी घेतले होते. प्रश्न-4: टीम इंडिया उस्मान तारिक आणि पाकिस्तानी स्पिनच्या आव्हानाला कसे सामोरे जाईल?उत्तर: टीम इंडिया उस्मान तारिक आणि पाक स्पिनसमोर बॉल पाहून नैसर्गिक अटॅकिंग गेम, स्मार्ट मूव्हमेंट आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर उत्तर देऊ शकते. 2024 T-20 विश्वचषकानंतर भारतीय फलंदाज सीमर्ससमोर 157 आणि स्पिनर्ससमोर फक्त 73 वेळा बाद झाले आहेत. म्हणजे निम्म्याहूनही कमी. नामिबियाविरुद्ध जिंकल्यानंतर इशान किशन म्हणाला होता की, कोणत्याही गोलंदाजावर विशेष तयारी करण्याची गरज नाही. तो म्हणाला, 'आम्ही तयारी आधीच केली आहे. आता फक्त चेंडू बघायचा आहे आणि आपला नैसर्गिक खेळ खेळायचा आहे.' गेल्या काही वर्षांत अनेक संघांनी राशिद खानसारख्या मिस्ट्री स्पिनर्सना खेळण्यासाठी एक नवीन दृष्टिकोन स्वीकारला आहे. संघ टी-20 मध्ये राशिदच्या 4 षटकांमध्ये विकेट वाचवून खेळण्याचा प्रयत्न करतात. इतर गोलंदाजांवर अधिक धावा काढण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु कोलंबोच्या खेळपट्टीवर सर्व फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल, अशा परिस्थितीत आणखी एक दृष्टिकोन असू शकतो. मात्र, माजी भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन उस्मान तारिकविरुद्ध वेगळ्या दृष्टिकोनाची शिफारस करतात. त्यांनी सांगितले की, जर तारिक चेंडू टाकण्यापूर्वी थांबला किंवा उशीर करत असेल, तर फलंदाजाला क्रीझ सोडण्याचा अधिकार आहे, कारण त्याला चेंडू टाकण्याची योग्य वेळ समजली नाही. फलंदाज पंचांना सांगू शकतो की त्याला चेंडू कधी टाकला जाईल हे समजले नाही. जर भारतीय फलंदाजाने असे केले, तर पंचांवर दबाव वाढेल आणि ते गोलंदाजाला इशारा देऊ शकतात. यामुळे पाकिस्तानच्या या महत्त्वाच्या गोलंदाजाची लय बिघडू शकते आणि त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो. प्रश्न-5: उस्मान तारिकची पाकिस्तानी संघात खेळण्याची कहाणी काय आहे?उत्तर: उस्मान तारिकचा जन्म 1 जानेवारी 1998 रोजी पाकिस्तानमधील पेशावरच्या चारसद्दा या छोट्या गावात झाला. उस्मानला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती, परंतु 2007 मध्ये वडिलांच्या निधनानंतर त्याला क्रिकेट सोडावे लागले. आर्थिक अडचणींमुळे उस्मान पैसे कमावण्यासाठी दुबईला गेला. तिथे त्याला एका हॉटेलमध्ये तासन्तास उभे राहून कांदे कापण्याचे काम मिळाले. पाठदुखीमुळे त्याने नोकरी सोडली आणि पाकिस्तानला परतला. मात्र, 2016 मध्ये त्याला पुन्हा कामाच्या शोधात दुबईला जावे लागले. दुबईत उस्मानचा मोठा भाऊही राहत होता. दोघेही एका लेबर कॅम्पमध्ये राहत होते. यादरम्यान उस्मानच्या आयुष्यात क्रिकेट पुन्हा परतले. तो दुबईत स्ट्रीट क्रिकेट खेळू लागला. यादरम्यान त्याने वेगवान गोलंदाजी सोडून फिरकी गोलंदाजी स्वीकारली. 6 फूट 3 इंच उंचीचा उस्मान आपल्या उंच शरीरयष्टीमुळे आणि वेगळ्या ॲक्शनमुळे फलंदाजांना खूप त्रास देत असे. 2017 मध्ये पाकिस्तान सुपर लीगची टीम पेशावर झल्मीने दुबईत टॅलेंट हंट आयोजित केले. शेकडो खेळाडूंपैकी उस्मानलाही 6 चेंडू टाकण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याची पुढील फेरीसाठी निवड झाली, पण नोकरी सोडणे त्याला शक्य नव्हते. नाईलाजाने उस्मानने ट्रायल सोडून दिली. एमएस धोनीच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणाभारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित 'धोनी- द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याची विचारसरणी बदलली. चित्रपटात एक प्रसंग येतो. धोनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसलेला असतो आणि त्याच्या मनात नोकरी आणि क्रिकेट यापैकी एकाची निवड करण्याचा संघर्ष सुरू असतो. तेव्हाच पाऊस सुरू होतो आणि अचानक धोनी बेंचवरून उठून ट्रेन पकडतो आणि घरी परततो. हे सर्व दुबईतील लेबर कॅम्पमध्ये बसलेला उस्मान पाहत होता. त्याने आपल्या भावाला सांगितले - माझा प्रसंगही तर हाच आहे. त्यानंतर त्याने नोकरी सोडली आणि पेशावरला परत आला. त्याने पूर्णपणे क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. 2024 मध्ये उस्मानने पाकिस्तान सुपर लीगमध्ये पदार्पण केले, परंतु तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. 2025 मध्ये त्याने आपल्या संघ क्वेटा ग्लॅडिएटर्सला PSL च्या अंतिम फेरीत पोहोचवले. या स्पर्धेत त्याने पाच सामन्यांत 10 बळी घेतले. त्यानंतर त्याची पाकिस्तान राष्ट्रीय संघासाठीही निवड झाली. ऑक्टोबर 2025 मध्ये उस्मानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण केले.
Free Bag Scheme : शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! ४१ लाख ४३ हजार ५४ विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर; निविदा प्रक्रियेसाठी १६५ कोटींच्या निधीला मंजुरी.
Divorce Case : अवघ्या १८ दिवसांत संसार विरला! इंजिनिअर पती-पत्नीच्या घटस्फोटाची का झाली इतकी चर्चा?
Divorce Case : सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा आधार घेत इंजिनिअर दाम्पत्याचा घटस्फोट अवघ्या १८ दिवसांत मंजूर; न्यायाधीश के. व्ही. ठाकूर यांचा निर्णय.
Cyber Crime : २२ कोटींचा सायबर डल्ला! ८० हजार बँक व्यवहार आणि हवाला कनेक्शन; तपासात मोठे खुलासे
Cyber Crime : छत्रपती संभाजीनगरमधील सेतू केंद्राच्या माध्यमातून उघडलेल्या बँक खात्यांचा सायबर गुन्ह्यासाठी वापर; बँकेची शाखाही तपासाच्या फेऱ्यात.
Navale Bridge Accident : नवले पुलाचा ‘शाप’कायम? बसच्या धडकेत १९ वर्षीय कॉलेज तरुणाचा जागीच मृत्यू
Navale Bridge Accident : आराम बसची दुचाकीला जोरदार धडक; सहप्रवासी मैत्रीण जखमी, भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल.
एके दिवशी एका आईने आपल्या मुलाला बाजारात पाठवले. बाजारातून येता येता पाऊस सुरू झाला. तेव्हा या मुलाने एका इमारतीखाली आसरा घेतला. हा मुलगा ज्या इमारतीच्या खाली उभा होता, त्यातून गाण्याचे स्वर ऐकू येत होते. या इमारतीवर नाव लिहिले होते श्रीराम संगीत विद्यालय. गाण्याचे स्वर आणि शब्द ऐकून या मुलाने अगदी तसेच गाण्यास सुरुवात केली. गाणे गाण्यात हा मुलगा इतका गुंग झाला की त्याच्या पाठीमागे एक व्यक्ती येऊन उभी राहिलेलेही त्याला समजले नाही. ती व्यक्ती होती संगीत विद्यालयाचे शिक्षक शंकरराव सप्रे आणि जो मुलगा गाणे गाण्यात तल्लीन झाला होता ते होते वसंतराव देशपांडे. रागदरबारच्या आजच्या भागात आपण प्रसिद्ध गायक, ज्यांच्या आवाजाने प्रथम आपण गणपतीला वंदन करतो, तर दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्राला लग्नसमारंभात त्यांच्या गाण्याने अक्षरशः 'कंठ दाटून' रडायलाही लावतात, असे पंडित वसंतराव देशपांडे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. तर, जेव्हा लहान वसंतराव त्या इमारतीच्या खाली गाणे गाण्यात तल्लीन झालेले असतात तेव्हा मागून शिक्षक शंकरराव सप्रे येऊन उभे राहतात. वसंतराव गायचे थांबल्यावर सप्रे गुरुजी त्यांना विचारतात, तुला गाणे शिकायला आवडेल का? त्यानंतर ते वसंतरावांना घेऊन त्याच्या घरी जातात आणि वसंतरावांच्या आईची समजूत काढतात आणि गाणे शिकवण्याची परवानगी घेतात. वसंतरावांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची परिस्थिती हालाखीची झाली होती. त्यात शाळा आणि गाण्याच्या वर्गाची फी परवडणारी नव्हती. त्यावर शंकरराव सप्रे मोफत गाणे शिकवण्यास तयार असल्याचे सांगितले आणि अशी वसंतराव देशपांडेंची गायन शिकण्याची सुरुवात झाली. पंडित वसंतराव देशपांडे यांचा जन्म 2 मे 1920 रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर येथे झाला. त्यांच्या जन्मानंतर अवघ्या 6 वर्षातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे आजोबा गोविंदराव देशपांडे व्यावसायिक गायक होते, तर त्यांचे वडील बाळकृष्णबुवा पंत तबलावादक होते. त्यामुळे संगीताचा वारसा आपसूकच वसंतरावांकडे आला. लहान वयापासूनच वसंतरावांनी गायला सुरू केले होते. पेंढारकरांच्या कालियामर्दनसध्ये साकारली कृष्णाची भूमिका एकदा भालजी पेंढारकर लहानग्या वसंताच्या गाण्याने इतके प्रभावित झाले होते की त्यांनी त्यांना थेट कोल्हापूरला घेऊन गेले. पेंढारकर यांच्या 'कालियामर्दन' या चित्रपटात वसंतरावांना कृष्णाची भूमिका देण्यात आली होती. हा चित्रपट 1933 साली प्रदर्शित झाला आणि त्याकाळी हा चित्रपट चांगलाच गाजला होता. कोल्हापूरच्या वास्तव्याविषयी सांगताना वसंतरावांनी सांगितले होते की, माझे कोल्हापूरमधले वास्तव्य अनेक अर्थाने संस्मरणीय होते. त्यावेळी मला उस्ताद अल्लादिया खान, भुर्जी खान, घम्मन खान, शंकरराव सरनाईक, गोविंदराव टेंभे यांच्यासारख्या अनेक लोकांचा सहवास लाभला. मास्टर दीनानाथ मंगेशकरांसारख्या लोकांकडून मला गाणे शिकण्याची संधी मिळाली. वसंतराव मास्टर दीनानाथ मंगेशकरांचे गाणे ऐकण्यासाठी नागपूरहून अमरावतीला जात असत. वसंतरावांनी अनेक दिग्गज गायकांची गाणी ऐकली. लाहोरमध्ये ठुमरी आणि गझल गायकीचा अभ्यास वसंतरावांच्या मामांनी त्यांच्यातील संगीताची आवड पाहून वसंतरावांना लाहोरला घेऊन गेले होते. त्यांचे मामा रेल्वे खात्यात नोकरीला होते. तो काळ असा होता जेव्हा लाहोरला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची पंढरी समजले जायचे. तिथे वसंतरावांनी दोन वर्षे काढली. या काळात त्यांनी उर्दू भाषेवर प्रभुत्व मिळवले. तिथे उस्ताद बडे गुलाम अली खॉं व उस्ताद बरकत अली खॉं या बंधूद्वयींच्या मैफली ऐकल्या. ठुमरी व गझल या गायनकलेचा अभ्यास केला. याच वेळी त्यांनी असद अली खॉं या नावाच्या एका फकिराकडे जाऊन जवळपास सहा महिने केवळ 'मारवॉं' हा एकच राग त्यांच्यापाशी शिकले. लाहोरमधून परतल्यावर त्यांनी पुण्यात मिलिटरी अकाउंट्समध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. मुळात वसंतरावांना नोकरीत अजिबातच रस नव्हता, परंतु, घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी जवळपास 24 वर्षे नोकरी केली. वसंतरावांची गायन शैली वसंतरावांच्या गायकीत वैविध्य आणि परिपूर्णतेचा अद्भूत संगम होता. त्यांच्याकडे रागदारीचा मोठा संग्रह, बंदिशींचा खजिना आणि ख्याल-ठुमरीपासून गझलेपर्यंत सर्व गायनप्रकारांवर जबरदस्त हुकूमत होती. त्यांचा गळा केवळ चपळच नव्हता, तर तालावरची पकड इतकी अजोड होती की कसलेला तबलजी सोबत असतानाही त्यांची 'सम' कधीही चुकत नसे. ही सिद्धी केवळ दैवी देणगी नसून ती कठोर साधना आणि गुरुकृपेचे फळ होते. शिष्याची पात्रता आणि त्याची प्राणापलीकडची मेहनत असल्याशिवाय अशी विद्या प्राप्त होत नाही. जे कलाकार आपल्या गुरूंनी दिलेल्या दुर्मीळ विद्येचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करतात आणि कोणत्याही परिस्थितीत साधनेत खंड पडू देत नाहीत, त्यांनाच गुरूंचे श्रेष्ठ ज्ञान लाभते, हे वसंतरावांनी आपल्या कलेतून सिद्ध केले होते. वसंतराव हे एक आदर्श शिष्य होते, ज्यांच्याकडे विलक्षण ग्रहणशक्ती, कुशाग्र बुद्धी आणि अफाट स्मरणशक्तीचा वारसा होता. त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी पाठांतराची गरज भासत नसे. एकदा ऐकलेले संगीत त्यांच्या स्मरणात कायमचे कोरले जाई. संगीत रंगभूमीवरील त्या काळातील सर्व नाटके त्यांना केवळ तोंडपाठ नव्हती, तर त्यांतील प्रत्येक पद ते तितक्याच तन्मयतेने गाऊ शकत असत. विशेष म्हणजे, एखाद्या नाटकातील पद कोणत्या मूळ बंदिशीवरून किंवा रागावरून रचले गेले आहे, याच्या इतिहासाचीही त्यांना पक्की जाण होती. संगीताचा हा सखोल व्यासंग आणि कलेप्रती असलेली त्यांची निष्ठा यामुळेच ते एक अद्वितीय कलाकार म्हणून नावारूपास आले. कट्यार काळजात घुसली वसंतराव देशपांडे यांनी तब्बल 200 हून अधिक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले होते आणि 'गीत रामायणा'सह अनेक जुन्या नाटकांतून भूमिकाही साकारल्या होत्या. संगीत क्षेत्रात ते परिचित असले तरी, 1967 सालापर्यंत मुंबईतील अनेकांना त्यांची पुरेशी ओळख नव्हती, हे त्यांच्या संघर्षाचे द्योतक आहे. या प्रदीर्घ काळात त्यांना उदरनिर्वाहासाठी कारकुनी करावी लागली आणि एका लहानशा खोलीत संसार सांभाळत संगीत साधना सुरू ठेवावी लागली. पुण्यात वास्तव्य असूनही कामाचे मुख्य केंद्र मुंबईत असल्याने, नोकरी सांभाळून नाटके, मैफली आणि ध्वनिमुद्रणे करण्यासाठी त्यांना मोठी ओढाताण आणि कसरत करावी लागली. परंतु, ही कोंडी फुटायला सुरुवात झाली, जेव्हा 'कट्यार काळजात घुसली' हे नाटक आले. कट्यार काळजात घुसली या नाटकात वसंतरावांनी साकारलेली खान साहेबांची भूमिका विशेष गाजली. खान साहेब यांचे पात्र वसंतरावांनी अगदी हुबेहूब सादर केले. अभिनयातील हावभाव, बोलण्याची तसेच उभे राहण्याची आणि चालण्याची लकब आणि सूरातला जोम, यामुळे रंगमंचावर वसंतराव आहेत असे वाटतच नसायचे. दिसायचे ते फक्त खानसाहेब. या नाटकामुळे आणि भूमिकेमुळे तसेच यातील पदांमुळे वसंतराव देशपांडे यांच्या प्रसिद्धीस उशिरा का होईना पण सुरुवात झाली. वसंतराव देशपांडे यांच्या काळात घारणेशाहीचा मोठा पगडा होता. त्यामुळे देखील वसंतरावांनी इतकी गाणी गायली असूनही म्हणावी तशी प्रसिद्धी मिळत नव्हती. वसंतरावांचा नावलौकिक होण्यापूर्वी महाराष्ट्रात ग्वाल्हेर, जयपूर, आग्रा आणि किराणा या चार प्रमुख घराण्यांचा मोठा प्रभाव होता. त्या काळात सवाई गंधर्वांसारख्या दिग्गज गायकांवरही भास्करबुवांचा प्रभाव जाणवत असे, तर अमीर खाँसाहेबांची गायकी मराठी रसिकांपासून काहीशी दूर होती. अशा वातावरणात वसंतरावांचे गाणे अतिशय वेगळे ठरले. कारण त्यांच्या उत्तर हिंदुस्तानी तालमीवर मास्टर दीनानाथांच्या शैलीचा मोठा पगडा होता. वसंत देशपांडे हे नाव अस्सल मराठी असले, तरी त्यांच्या गायकीतील उत्तर हिंदुस्तानी आणि पंजाबी ढंग मराठी कानांना सुरुवातीला काहीसा वेगळा आणि चमत्कारिक वाटत होता. त्याकाळी त्यांच्यासारख्या विशिष्ट शैलीत गाणारा दुसरा कोणताही मराठी कलाकार नव्हता, ज्यामुळे त्यांची ओळख अधिक उठावदार ठरली. वसंतरावांच्या हजरजबाबीपणाचे किस्से वसंतराव देशपांडे हे हजरजबाबी होते, हे अनेकांना माहित आहेच. त्याविषयीचा एक किस्सा मी सांगू इच्छितो. 'सौभद्र' नाटकात वसंतराव एकदा नारदाच्या भूमिकेत होते. नारदाचे काम सुरुवातीला असायचे आणि गाणी सुद्धा अप्रतिम. 'राधाधर मधुमिलिंद', 'लग्नाला जातो मी' आणि 'पावना वामना' ही गाणी गाजली होती. यातील पावना वामना हे गाणे गाऊन वसंतराव आपल्या विंगेत आले. तिथे बसले होते पंडित विनायकबुवा पटवर्धन. त्यांना वसंतरावांनी नारदाचे मराठीपण सोडलेले काही फारसे रुचले नव्हते. त्यांनी विचारले, आज नारद पंजाबात कसा गेला? यावर पटकन उत्तर देताना वसंतराव म्हणाले, बुवा नारद त्रिखंडात फिरतो न? आज तो पंजाबात गेला होता. वसंतरावांच्या हजरजबाबीपणाचा आणखी एक किस्सा जो आजही अनेकांना माहित असेलच, तरी पुन्हा एकदा इथे मला सांगावा वाटतो तो म्हणजे असा, वसंतरावांना एकदा एकाने कुत्सितपणे विचारले होते की, का हो? तुमचे घराणे कोणते? या प्रश्नातून त्या प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला हे दाखवून द्यायचे होते की तुमचे कोणतेही घराणे नाही. यावर सडेतोड उत्तर देताना वसंतराव म्हणाले, देशपांडे घराणे. माझे घराणे माझ्यापासूनच सुरू होते. ख्याल आणि नाट्यसंगीतासोबतच वसंतरावांचा ठुमरी, कजरी आणि गझल यांसारख्या उत्तर हिंदुस्थानी गायनप्रकारांवरही विलक्षण अधिकार होता. इतका की खुद्द ठुमरीसम्राज्ञी बेगम अख्तर त्यांच्यासमोर शिष्या म्हणून बसत असत. त्यांनी चित्रपट आणि भावगीत क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले असून, व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांतील गाणी असोत किंवा श्रीनिवास खळे आणि यशवंत देवांच्या 'बगळ्यांची माळ फुले' व 'कुणी जाल का' यांसारखी अजरामर भावगीते, ती आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या उत्तरार्धातील 'प्रथम तुला वंदितो' सारखी भक्तिगीते आणि पं. जितेंद्र अभिषेकींनी स्वरबद्ध केलेली 'घेई छंद' किंवा 'सुरत पिया की' यांसारखी अजरामर पदे आजही नवीन गायकांसाठी एक मापदंड मानली जातात. ही गाणी जोवर कोणी गात नाही, तोवर आपण गायक झालोत असे कोणाला वाटतच नाही. भीमसेनजींचा मारवा सुरू असताना वसंताच्या निधनाच्या बातमीचा फोन वसंतराव देशपांडे एक असे कलाकार होते, जे फक्त त्यांची काला सादर करण्यासाठीच जन्माला आले आणि आपले काम पूर्ण करून निघूनही गेले. वसंतराव देशपांडे, पु.ल. देशपांडे आणि पंडित भीमसेन जोशी यांची मैत्री सर्वश्रुत आहेच. हा तो किस्सा आहे, जेव्हा पु.ल. देशपांडेंना वसंतरावांच्या निधनाची बातमी कळते. याविषयी पु.लंनीच सांगितले आहे. (पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या पत्रातील काही भाग) पु.ल. देशपांडे यांनी त्यांच्या पत्रात लिहिले होते की, रविवारी 24 तारखेला मी केवळ वसंतला भेटायला म्हणून पुण्यात आलो होतो. त्यावेळी आम्ही मजेत बोलत होतो. त्याला श्वास घेताना धाप लागत होती. पण आजाराचे स्वरूप त्याही वेळी इतके गंभीर वाटले नाही. 30 जुलैला पुणे विद्यापीठात भीमसेनची संध्याकाळची मैफल होती. यमन संपवून 7 च्या कुमारास भीमसेनने मारवा सुरू केलया. तेवढ्यात एका गृहस्थाने मला अर्जंट टेलिफोन आला आहे, असा निरोप देत मला बैठकीतून उठवून बाहेर नेले. टेलिफोनवरून वसंत देशपांडे वारल्याची बातमी आली होती. ती ऐकत असताना हॉलमधून भीमसेनचा मारवा ऐकू येत होता. मारवा हा वसंतच्या मालकीचा राग! त्याच्या निधनाच्या बातमीला त्याच मारव्याचे पार्श्वसंगीत असावे हा योगायोगही किती विचित्र. वसंता यापुढे आहेस का.. म्हणत त्या, त्या दिवशीचा त्याचा जो गंमत करायचा मूड असेल त्यासकट उभा राहिलेला दिसणार नाही. हा विचार सहन होत नाही. आपल्या अंतरंगातलाच एक भाग गळून पडल्यासारखे झाले आहे...
Alandi News : आळंदीकरांना मोठा दिलासा! मिळकतकरात ५०% सूट आणि ‘या’शाळेला मिळणार अजित पवारांचे नाव
Alandi News : आळंदीच्या हद्दवाढीला हिरवा कंदील: नागरी सुविधा आणि रस्ते विकासासाठी हद्दवाढ प्रक्रियेला वेग; नवीन क्षेत्रांचे लवकरच सर्वेक्षण.
इतिहास लिहिणारे अनेक असतात, पण इतिहासाचा चेहरामोहरा बदलणारे काही मोजकेच असतात. मराठ्यांच्या जाज्वल्य परंपरेचा इतिहास दीर्घकाळ धुक्याच्या दाट पडद्यामागे दडलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेवर मतभेद होते. तसे छत्रपती संभाजी महाराज यांच्या तेजस्व व संघर्षमय व्यक्तिमत्त्वावरही गैरसमजांचे सावट पसरलेले होते. भावनिक कथन, बखरींचे विसंगत उल्लेख व अपुऱ्या संशोधनामुळे सत्य झाकोळले गेले होते. पण वासुदेव सीताराम बेंद्रे नामक ध्यासमग्न संशोधकाने इतिहासातील या वादग्रस्त प्रश्नांना शास्त्रोक्त उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. वासुदेव बेंद्रे यांची जयंती गत 13 फेब्रुवारीला साजरी केली गेली. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत्या 19 तारखेला आहे. चला तर मग आज 'धुरंधर'मध्ये पाहूया शिवजन्माची तारीख निश्चित करणाऱ्या तथा शिवपुत्राचा खरा ज्वलंत इतिहास जगाच्या पटलावर नोंदवणाऱ्या वासुदेव बेंद्रे यांचे संशोधनकार्य... संघर्षातून संशोधनाकडे वासुदेव बेंद्रे हे एक व्यासंगी मराठी इतिहासकार होते. त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1894 रोजी झाला. रायगड जिल्ह्यातील पेण येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना मॅट्रिक पास होण्यापूर्वीच आपले शिक्षण सोडावे लागले. ते सरकारी नोकरीत शिरले. तिथे त्यांनी लघुलेखन (शॉर्ट हॅन्ड) पद्धतीचा अभ्यास केला. त्यात प्राविण्य मिळवले. ही अर्हता व अंगभूत यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांना बेंद्रे हवेहवेसे वाटू लागले. पण त्यांनी शिक्षण खात्यातच नोकरी करण्याचा निश्चय केला. त्यानुसार, शिक्षण संचालक के. जी. कॉव्हर्नटन यांनी त्यांना लघुलेखक म्हणून नोकरीवर घेतले. नोकरीला लागल्यानंतर बेंद्रे यांनी महाराष्ट्राच्या 17 व्या शतकाचा इतिहास हे आपल्या संशोधनाचे प्रमुख क्षेत्र निवडले. हे कार्य करताना त्यांचा पुण्यातील अनेक इतिहासकारांशी संबंध आला. त्यांनी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांना गुरुस्थानी माणून आपले संशोधनकार्य केले. बेंद्रे यांनी 1949 पर्यंत ही नोकरी केली. त्यांना यथावकाश अधिकाऱ्याचा दर्जा मिळाला. तत्पूर्वी, 1918 पासून बेंद्रे यांनी भारत इतिहास-संशोधक मंडळात काम सुरू केले. मुंबई प्रांताच्या तत्कालीन सरकारने 1937 साली त्यांना संशोधनासाठी 2 वर्षांची शिष्यवृत्ती जाहीर केली. ते इंग्लंडला गेले. त्यांनी इंग्लंडमधील इंडिया ऑफिस व ब्रिटिश म्यूझियममधील ऐतिहासिक साधनसामग्रीची टिपणे संग्रहित केली. त्यानंतर 1949 साली सरकारने संशोधन कार्यासाठी त्यांना पेशवे दप्तर तपासण्याची परवानगी दिली. मद्रास सरकारने 1952 मध्ये त्यांची तंजावर येथील दप्तरखान्याची तपासणी करण्यासाठी नियुक्ती केली. 1963 साली मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इतिहास संशोधन मंडळाचे संचालक म्हणून ते नियुक्त झाले. त्यानंतर 1965 मध्ये त्यांच्या खांद्यावर महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या प्रमुख कार्यवाहकपदाची जबाबदारी पडली. साधन चिकित्सा हा पहिला ग्रंथ वासुदेव बेंद्रे यांचा साधनचिकित्सा (1928) हा पहिला ग्रंथ आहे. हा ग्रंथ शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड आहे. त्यात इतिहास संशोधनाच्या साधनांची मार्मिक चिकित्सा करण्यात आली आहे. त्यांनी मराठी इतिहासावर अनेक पुस्तके लिहिली. त्यात छत्रपति संभाजी महाराज (1960) हा त्यांचा सर्वात गाजलेला ग्रंथ ठरला. या ग्रंथाने संभाजी महाराजांविषयीच्या रूढ समजुतींना धक्का दिला. बेंद्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचाही चिकित्सक अभ्यास केला. त्यांचा साधनचिकित्सा हा ग्रंथ शिवशाहीकडे एका नव्या, विश्लेषणात्मक दृष्टीने पाहण्यास शिकवतो. संत तुकारामांचे चरित्र व कार्य, तसेच आदिलशाही व कुतुबशाही सारख्या तत्कालीन सत्तांचा अभ्यास करून त्यांनी मराठेशाहीच्या इतिहासाला एक व्यापक संदर्भ दिला. संत तुकारामांवरील संशोधनही मोलाचे बेंद्रे यांनी संत तुकाराम महाराज यांच्यावरही महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांनी 1950 मध्ये श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराजकृत श्रीमद्भगवद्गीतेचा अभंगात्मक अनुवाद अथवा मंत्रगीता संपादन केली. या मंत्रगीतेच्या प्रदीर्घ प्रस्तावनेत त्यांनी तुकारामांच्या चरित्रावर सखोल अन् नवीन प्रकाश टाकला. शिवजयंतीची तारीख कशी निश्चित केली? विविध बखरींच्या वर्णनानुसार, निजामशाही बुडाल्यानंतर शहाजीराजे आदिलशहाकडे 12 हजारी फर्जंद वजीर म्हणून गेले. तिथे त्यांनी आपली पत्नी जिजाबाई व मुलगा शिवाजी यांना बोलावले. त्यावेळी शिवराय 7 वर्षांचे होऊन गेले होते. आदिलशहा सोबत हा करार शहाजी महाराजांनी 1636 च्या उत्तरार्धात केला. त्यावरून 7 वर्षे अगोदर म्हणजे 1629 ते 1630 चा पूर्वार्ध ह्या दरम्यान शिवाजी राजांचा जन्म झाला असावा असा तर्क बांधण्यात आला. पुढे पुन्हा 1642 ला आदिलशाहीत आपले घर सुटत आहे हे पाहून शहाजी राजांनी शिवाजी व जिजाऊंना 1642 मध्ये पावसाळ्यानंतर पुण्याला रवाना केले. त्यावेळी शिवाजी राजे अवघ्या 12 वर्षांचे होते. यावरून पुन्हा 1630 चाच तर्क निघतो. बखरींनुसार दादाजी कोंडदेव वारले तेव्हा शिवाजी महाराज 17 वर्षांचे होते. दादोजींचा मृत्यू काल 1647 मार्च नंतर व जुलै पूर्वीचा दिला आहे. यावरूनही पुन्हा एकदा जन्मवर्ष 1630 हेच बरोबर ठरते. अशा अनेक गोष्टींची पडताळणी करून वासुदेव बेंद्रे यांनी शिवजन्माची 19 फेब्रुवारी 1630 अशी ठरवली आहे. शिवजन्माच्या तारखेवरील वाद वासुदेव बेंद्रे यांनी 19 फेब्रुवारी 1630 ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख निश्चित केली. पण काही संशोधकानी त्यावरही खूप आक्षेप घेतले. काहींनी जुने शक, संवत, तिथी यांचे वेगळे गणित मांडले. काही इतिहासकारांनी शिवजन्माची 1627 ही तारीख ग्राह्य धरावी असा आग्रह धरला. बेंद्रे यांचे पुरावे मुख्यतः कागदपत्रांवर आधारित असले तरी खगोलशास्त्रीय गणितांच्या आधारावर याविषयी इतरही काही निष्कर्ष मांडले गेले. तथापि, शासनाने 19 फेब्रुवारी 1630 या तारखेला मंजुरी दिल्याने बेंद्रे यांच्या मताला व्यापक मान्यता मिळाली. शिवरायांचे खरे चित्र शोधून काढले मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांच्या सूचनेनुसार, मुख्यमंत्री खेर यांनी इतिहास संशोधनासाठी बेंद्रे यांना शिष्यवृत्ती देऊन युरोप व इंग्लंडला पाठवले. बेंद्रे यांनी या संधीचे सोने केले. 1933 पूर्वी शिवाजी महाराजांचे जे चित्र पुस्तकांत प्रसिद्ध होत होते अथवा तसबिरीत लावलेले असायचे ते योग्य नाही असे बेंद्रे यांचे मत होते. त्यांनी पुराव्यानिशी शिवरायांचा खरे चित्र शोधून काढले. त्यास शासनासह सर्वांनी मान्यता दिली. त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार, सर्व सरकारी कार्यालयात नवीन चित्रासह फोटो फ्रेम बदलण्यात आल्या. तसेच पुस्तकातील फोटोही बदलण्यात आले. वासुदेव बेंद्रे यांनी मुख्य संशोधन करण्यापूर्वी 1928 साली शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड प्रकाशित केला. त्यांचा हा पहिला ग्रंथ संशोधन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी दीपस्तंभासारखा आहे. शिवाजी महाराज यांच्या जन्मतारखेविषयी वाद होता. पण बेंद्रे यांनी 19 फेब्रुवारी 1630 ही शिवजन्माची खरी तारीख असल्याचे जाहीर केले. नंतर त्यास शासनानेही मान्यता दिली. जगदंब नव्हे भवानी तलवार छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार पूर्वी जगदंब म्हणून ओळखली जात होती. पण नंतर ही तलवार जगदंब म्हणून नव्हे तर भवानी तलवार म्हणून ओळखली जात होती हे बेंद्रे यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. शंभूराजांचे खरे चरित्र जगापुढे आणले वासुदेव बेंद्रे यांच्या मनात शंभूराजांचे खरे चरित्र जगापुढे आणण्याचा विचार घोळत होता. त्यांनी 1918 पासून या विषयाकडे लक्ष वेधले. यासाठी ते मिळेल त्या मार्गाने ऐतिहासिक साहित्य व संदर्भ जमवाजमव केली. परदेश दौरे केले. तेथूनही त्यांनी हजारो साधने एकत्रित केली. हजारो मूळ दस्तऐवज तपासले. त्यानंतर त्यावर आधारित संभाजी महाराजांचा चरित्र ग्रंथ 1958 मध्ये लिहून पूर्ण केला. यासाठी त्यांनी आयुष्याची तब्बल 40 वर्षे खर्ची घातली. या ग्रंथाने समाजात एकच खळबळ उडवून दिली. या ग्रंथातून संभाजी महाराजांची व्यक्तिरेखाच बदलून गेली. हा ग्रंथ येण्यापूर्वी छत्रपती शंभू महाराज यांच्या जीवनावर मराठीत पुष्कळ नाटके लिहिली गेली होती. पण त्यातील बहुतांश नाटकांत शंभूराजे हे व्यसनाधीन, बदफैली, व्यभिचारी व दुर्वर्तनी असल्याचे नमूद करण्यात आले होते. पण बेंद्रे यांनी संभाजी महाराजांची ही प्रचलित चुकीची प्रतिमा खोडून काढत त्यांची उज्ज्वल प्रतिममा, त्यांचा संघर्ष व धर्मनिष्ठा सप्रमाण सिद्ध केली. यामुळे स्वाभिमानी, पराक्रमी संभाजी महाराजांविषयीचे सर्व गैरसमज दूर झाले. शंभूमहाराजांची नकारात्मक प्रतिमा सकारात्मक बनली. त्यांचे ऐतिहासिक पुनर्वसन झाले. संभाजी महाराज एक शूर योद्धे, सक्षम प्रशासक व विद्वान राजे होते हे त्यांनी पुराव्यांनिशी सिद्ध केले. बेंद्रे यांच्या संभाजी महाराजांवरील चरित्रामुळे मराठ्यांविषयी गैरसमज असलेला मुस्लिम इतिहासकार काफिखान संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांपेक्षा सवाई का समजतो? याचा उलगडा झाला. संभाजी महाराज हे एक तेजस्वी, कर्तबगार व पराक्रमी पुरुष होते. त्यांनी निग्रही स्वराज्यनिष्ठेने आपल्या आयुष्याचा क्षण न् क्षण परकीय आक्रमणाशी झगडण्यात घालवला व शेवटी स्वतःचे बलिदान दिले, असा निष्कर्ष बेंद्रे यांनी या ग्रंथाद्वारे काढला. संभाजी महाराजांची मूळ समाधीही शोधली उल्लेखनीय बाब म्हणजे सुरुवातीला संभाजी महाराजांची समाधी तुळापूर येथे असल्याचे मानले जात होते. पण कालांतराने पुरावे आढळल्यानंतर मूळ समाधी ही तुळापूर येथे नव्हे तर वडू बुद्रुक येथे असल्याचे बेंद्रे यांच्या लक्षात आले. त्यांनी अपार कष्ट करून संभाजी महाराजांच्या मूळ समाधीचा शोध लावला. ते वडू बुद्रुकला गेले तेव्हा तेथील वास्तूची स्थिती दुर्लक्षित होती. तेथील वृंदावन झाडाझुडपांनी व निवडुंगाने पूर्णपणे झाकून गेले होते. तिथे 15 फूट उंच झाडे होती. 7 झाडे तोडल्यानंतर शंभूराजांचे वृंदावन नजरेस पडले. त्यानंतर बेंद्रे यांनी हा सर्व परिसर स्वच्छ करण्यास पुढाकार घेतला. अशा प्रकारे संभाजीराजांची मूळ समाधी शोधली गेली. इतिहासकार वि. का. राजवाडे यांच्याशी तुलना वासुदेव बेंद्रे यांचे इतिहासकार्य समजून घेताना त्यांची तुलना त्यांचे गुरु वि. का. राजवाडे यांच्याशी करणे अपरिहार्य ठरते. राजवाडे यांनी महाराष्ट्रात मूळ कागदपत्रांच्या आधारे इतिहास संशोधनाची भक्कम पायाभरणी केली. दप्तर, पत्रव्यवहार, बखरी यांचे संकलन करून त्यांनी संशोधकांसाठी साधनांचा प्रचंड साठा उपलब्ध करून दिला. त्यांच्या लेखनात राष्ट्राभिमानाची स्पष्ट छटा जाणवते. मराठ्याच्या इतिहासाकडे प्रेरणादायी दृष्टिकोनातून पाहण्याची भूमिका दिसते. बेंद्रे यांनी हीच साधनाधारित परंपरा स्वीकारली. पण ते केवळ साधनसंकलक न राहता साधनचिकित्सक ठरले. त्यांनी उपलब्ध दस्तऐवजांची परस्पर तुलना, संदर्भाचे परीक्षण व तर्कनिष्ठ विश्लेषण यावर भर दिला. विशेषतः संभाजी महाराजांसारख्या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाचे पुनर्मूल्यांकन करताना त्यांनी भावनिकतेपेक्षा पुराव्यांवर आधारित निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या लिखाणात अधिक चिकित्सक व विश्लेषणात्मक दृष्टी आढळते. अशा प्रकारे राजवाडे यांनी इतिहास संशोधनाची मशाल पेटवली. तर बेंद्रे यांनी त्या मशालीच्या प्रकाशाला अधिक नेमकेपणा दिला. एकाने साधनांची जपणूक व संकलन केले, तर दुसऱ्याने त्या साधनांतील आशयाचे पुनर्वाचन करून इतिहासातील वादग्रस्त प्रश्नांना शास्त्रीय उत्तर देण्याचा प्रयत्न केला. गुरु-शिष्य परंपरेतून पुढे जात बेंद्रे यांनी स्वतःची स्वतंत्र इतिहासदृष्टी निर्माण केली. त्याद्वारे मराठी इतिहासलेखनाला अधिक बौद्धिक खोली प्राप्त करून दिली. शंभूराजांवर 40 वर्षे खर्च करून काय मिळाले? पुण्यात एका संशोधक मेळाळा रंगला होता. त्यात संभाजी महाराजांविषयी नव्याने प्रकाशित झालेल्या ग्रंथावर चर्चा सुरू होती. काही जण स्तुती करत होते, तर काहीजण प्रश्न उपस्थित करत होते. त्या गर्दीत वासुदेव बेंद्रे शांतपणे बसले होते. तब्बल 4 दशके मोडी कागदपत्रांच्या धुळीत घालवलेला हा संशोधक वादांच्या कोलाहलातही अत्यंत स्थिर होता. अखेर एका विद्वानाने थेट प्रश्न केला, 'बेंद्रे, इतकी वर्षे तुम्ही शंभूराजांवर खर्च केलीत, काय साध्य झाले?' हा प्रश्न ऐकताच सभागृहात क्षणभर शांतता पसरली. बेंद्रे हळूहळू उभे राहिले. त्यांच्या आवाजात ना आक्रमकता होती, ना आत्मप्रौढीपणा. होता तो फक्त शांत ठामपणा. ते म्हणाले, 'मी काही नवीन इतिहास घडवला नाही. मी केवळ दस्तऐवजांवरची धूळ झटकली. सत्य आधीपासूनच तिथे होते. आपण ते पाहण्यास तयार नव्हतो.' त्यांच्या या शब्दांनी सभागृह भारावून गेले. कारण त्या वाक्यात एका इतिहासकाराचे संपूर्ण आयुष्य सामावले होते. इतिहास हा कल्पनांचा नव्हे, तर पुराव्यांचा विषय आहे, ही बेंद्रे यांची धारणा होती. म्हणूनच त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वासंबंधीचे गैरसमज दूर करताना भावनिक घोषणांपेक्षा कागदपत्रांना बोलू दिले. वाद झाले, टीका झाली, पण त्या सर्वांच्या पलीकडे त्यांनी केवळ सत्यशोधनाचा आग्रह धरला. यामुळेच मराठी इतिहासाच्या वाटचालीत बेंद्रे हे केवळ संशोधक नव्हे, तर सत्याच्या शोधात आयुष्य वेचणारे 'भीष्माचार्य' ठरतात. 1986 साली घेतला अखेरचा श्वास वासुदेव बेंद्रे यांचे 16 जुलै 1986 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनासह मराठी संशोधन क्षेत्रातील एक युग संपले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मोडी, फारसी व दप्तरांच्या अभ्यासात घालवले. हा ध्यासमग्न संशोधक अगदी शांतपणे काळाच्या पडद्याआड गेला. पण त्यांनी उभा केलेला पुराव्यांचा आधारभूत कणा आजही तेवढाच भक्कम आहे. बेंद्रे यांनी इतिहासाला भावनिक आवरणातून मुक्त करून पुराव्यांच्या कठोर प्रकाशात उभे केले. म्हणूनच त्यांचा मृत्यू हा केवळ एका व्यक्तीचा अंत नव्हता, तर त्यांच्या निधनामुळे इतिहासाकडे पाहण्याची एक चिकित्सक परंपरा हरवली होती. त्यांचे संशोधन कार्य आजही संशोधकांना दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करते. धुरंधर मालिकेतील खालील स्टोरीज वाचा… धुरंधर-62; गुरुवर्य केळूसकर:'दादोजी कोंडदेव अन् रामदास स्वामी शिवरायांचे गुरू नाहीत' असे ठामपणे सांगणारा महाराष्ट्राचा उपेक्षित वाङ्मयमहर्षी धुरंधर-61; सी. व्ही. रामन:आकाशाचा अन् समुद्राच्या पाण्याचा रंग निळाच का? या प्रश्नाचे उत्तर प्रकाशाच्या गुणधर्मातून देणारा भौतिकशास्त्रज्ञ धुरंधर-60; अलेक्झांडर कनिंगहॅम:काशी लगत स्वर्गात जाणाऱ्या पायऱ्यांचा शोध लावणारा अन् बुद्धांचा भारत शोधणारा इंग्रजी लष्करी अधिकारी धुरंधर-59; संत बंका:देव आमचाही असेल तर मंदिर का नाही? असा प्रश्न करणारे मोठ्या ग्रंथांचे नव्हे, तर मोठ्या प्रश्नांचे संत! धुरंधर-58; अँटोनियो ग्राम्शी:तुरुंगाच्या 4 भिंतीत जग बदलण्याची शक्ती शोधणारा अन् वैचारिक क्रांती शस्त्रांपेक्षा वरचढ असल्याचे सांगणारा विचारवंत धुरंधर-57; डॉ. श्रीराम लागू:'देवाचे अस्तित्व हीच मोठी अंधश्रद्धा' असल्याचे ठणकावून सांगत समाजाला अस्वस्थ करणारा बुद्धिवादी माणूस धुरंधर-56; राणी गाइदिन्ल्यू:झाशीच्या राणीची गोष्ट माहिती असणाऱ्यांना इंग्रजांना आव्हान देणाऱ्या आदिवासी कन्येची गोष्ट माहिती आहे का? धुरंधर-55; पां. म. बापट:सशस्त्र क्रांतिकारक ते अहिंसक सत्याग्रहाचा सेनापती अन् अखेर झाडू उचलून ग्राम स्वच्छता करणारा सुधारक धुरंधर-54; नाना पाटील:म्हार, मांगांना लांब का ठेवता? ते घान कामं करत्यात म्हणून? तुमचा डावा हातही तेच करतो, असे सांगणारा क्रांतिसिंह धुरंधर-53; नेल्सन मंडेला:भारताला दुसरे घर मानणाऱ्या आफ्रिकन गांधींची कहाणी; 27 वर्षे कैद भोगूनही मनात कटूता न ठेवणारा मदिबा धुरंधर-52; शकुंतला देवी:शाळेचे तोंड न पाहता संगणकाची परीक्षा पाहणाऱ्या अन् गणिताला खेळ मानणाऱ्या कानडी महिलेची जादूई कहाणी धुरंधर-51; केशवराव जेधे:ब्राह्मणेतर चळवळीचा प्रमुख चेहरा अन् सामाजिक न्यायासाठी झगडणारा ठसकेबाज दृढनिश्चयी मराठी लढवय्या धुरंधर-50; डॉक्टर सलीम अली:पक्ष्यांच्या जगाचे रहस्य उलगडून मानवाला निसर्गाच्या दिशेने जाण्यास प्रेरित करणारा पक्ष्यांचा 'चालता फिरता विश्वकोश' धुरंधर-49; सर रोनाल्ड रॉस:'साला एक मच्छर'! मलेरिया अन् डास यांच्यातील परस्पर संबंध शोधून मानवतेची सेवा करणारा थोर वैज्ञानिक धुरंधर-48; होमी जहांगीर भाभा:दगडधोंड्यांच्या भारतात अणुज्योत पेटवून अज्ञानाचा अंधःकार दूर करणारा श्रीमंत घरातला बंडखोर तरुण धुरंधर-47; बिंदेश्वरी प्रसाद मंडल:ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या इमारतीचा सर्वात मजबूत पाया रचणाऱ्या बिहारच्या जमीनदाराची कथा धुरंधर-46; कार्ल बुशबी:ना ट्रेन ना प्लेन ना बाईक, तब्बल 27 वर्षांच्या अन् 58 हजार किलोमीटरच्या पदयात्रेची अनोखी कथा जी आजही सुरूय धुरंधर-45; जाईबाई चौधरी:स्त्री जीवन फुलवणारी अन् दलित महिलांना शैक्षणिक, सांस्कृतिक संजीवणी देणारी विदर्भातील थोर सेविका धुरंधर-44; ओशो रजनीश:पापाला पुण्याचे अन् हिंसेला अहिंसेचे कपडे घालावे लागतात असे सांगत ईश्वरापूर्वी स्वतःला शोधण्याचा सल्ला देणारा थोर दार्शनिक धुरंधर-43; अमृता प्रीतम:मैं तेनु फिर मिलांगी, कित्थे? किस तरह? पता नहीं; प्रेम, वेदना अन् स्वातंत्र्याचा सूर छेडत बाईचे जगणे मांडणारी लेखिका धुरंधर-42; दगडाबाई शेळके:स्वतःच्या नवऱ्याचे दुसरे लग्न लावून मराठवाडा मुक्तिसंग्रामात स्वतःला झोकून देणारी जालन्याची 'झाशीची राणी' धुरंधर-41; यशवंत घाडगे:दुसऱ्या महायुद्धात मर्दुमकी दाखवत ब्रिटिशांकडून इटलीच्या सैनिकांना कंठस्नान घालणारा मराठी सैनिक धुरंधर-40; शाहीर अमर शेख:धग, रग, आग, धुंदी अन् बेहोशीची जिवंत बेरीज असणारा तथा 'बर्फ पेटला हिमालयाला विझवायला चला' म्हणणारा शाहीर धुरंधर-39; टी. एन. शेषन:'नेत्यांना नाश्त्यात खाणारे' तथा EC ला अभूतपूर्व ताकद अन् प्रतिष्ठा मिळवून देणारे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त धुरंधर-38; डॉ. एम एस स्वामीनाथन:उपासमारीच्या सावटाखाली झुरणाऱ्या भारताला स्वावलंबनाचे स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवणारा शास्त्रज्ञ धुरंधर-37; मेजर शैतान सिंह:1962 च्या भारत - चीन युद्धात 120 जवानांच्या जोरावर शत्रूचा फडशा पाडणारा अन् पोट फाटले तरी मैदान न सोडणारा बहाद्दर धुरंधर-36; राणी वेलू नाचियार:महिलांची फौज तयार करून ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांना पहिल्यांदा धूळ चारणारी शिवगंगाची 'वीर मंगई' धुरंधर-35; अय्यनकाली:महिलांना छाती झाकण्याची परवानगी मिळवून देणारा अन् दलितांनी पिकवलेले धान्य चालते, मग ते का चालत नाहीत? असा प्रश्न करणारा सुधारक धुरंधर-34; जगन्नाथ शंकरशेठ:लोकांचा विश्वास जिंकणारी श्रीमंती गरिबांवर उधळणारा अन् परकियांनाही आपला वाटणारा मुंबईचा खरा शिल्पकार धुरंधर-33; अण्णाभाऊ साठे:दीड दिवस शाळेत जाऊन साहित्याचा सूर्य झालेला लोकशाहीर; जात, धन अन् धर्मदांडग्यांना आव्हान देणारा अण्णा धुरंधर-32; धीरूभाई अंबानी:गरिबीवर मात करत कोट्यवधी भारतीयांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे भारताचे एक अप्रतिम उद्योग रत्न धुरंधर-31; राजर्षी शाहू महाराज:अस्पृश्याला मानाचे पान अन् नांगरासाठी तोफा वितळवून लोखंड देणारे शाहू महाराज ग्रेट का होते? धुरंधर-30; चे गेव्हारा:अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द जागवून अवघ्या जगातील क्रांतीचा चेहरा बनलेला तुमच्या 'T शर्ट'वरील क्रांतिदूत धुरंधर-29; संत कबीर:पैशांच्या मागे पळणाऱ्यांचा देव कसा? असा परखड सवाल करत समस्त मानवतेला साधेपणाचा संदेश देणारा महानायक धुरंधर-28; राणी चेन्नम्मा:स्वकियांची फंदफितुरी जमिनीत गाडून 1857 च्या सशस्त्र उठावापूर्वी इंग्रजांना धूळ चारणारी 'कर्नाटकची लक्ष्मीबाई' धुरंधर-27; अहिल्याबाई होळकर:न्यायबुद्धीने स्वतःच्या नवऱ्याला धारेवर धरत चोराच्याही पोटाचा प्रश्न सोडवणाऱ्या दूरदृष्टीच्या शासक धुरंधर-26; डॉ. जयंत नारळीकर:ब्रह्मास्त्र होते तर रामाच्या राज्यात वीज होती का? असा झोंबणारा प्रश्न करणारा भारताचा मराठमोळा शास्त्रज्ञ धुरंधर-25; मुथुलक्ष्मी रेड्डी:महिला हक्क अन् आईचे 'देवदासी'पण पाहून त्याविरोधात लढा पुकारणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला आमदार धुरंधर-24; कुलदीपसिंग चांदपुरी:पाकच्या 2000 हून अधिक सैनिकांना 120 जवानांच्या बळावर धूळ चारणारा लढवय्या; '1971' ची अमर गाथा धुरंधर-23; चंद्रप्रभा सैकियानी:पडदा प्रथेवर लाथ घालून महिलांना आभाळ खुले करणारी आसामची हिरकणी; कुमारी माता झाली तरी डगमगली नाही धुरंधर-22; कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील:महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणाचा सूर्य पेरून उपेक्षितांच्या झोपडीत ज्ञानाचे पीक काढणारा खरा 'धुरंधर' धुरंधर-21; प्रबोधनकार ठाकरे:मराठी समाज मनात मोक्याच्या ठिकाणी पक्क्या गाठी मारून जातिभेदांच्या जखमांचा खोलवर शोध घेणारा बहुजन हिंदुत्त्ववादी धुरंधर-20; भीमराव रामजी आंबेडकर:चवदार तळ्याला ताळ्यावर आणणारा दलितोद्धारक अन् सामाजिक समरसतेचा खरा विवेकी शिल्पकार धुरंधर-19; जिगर मुरादाबादी:'शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ खुदा नहीं,' असे म्हणत मौलवींकडून टाळ्या पिटवून घेणारा सूफी शायर धुरंधर-18; आनंदीबाई जोशी:'पृथ्वीच्या पाठीवर हिंदुस्तान इतका दुसरा रानटी देश नाही', असे ठणकावून सांगणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर धुरंधर-17; भगतसिंग:'बॉम्ब अन् पिस्तुले क्रांती आणत नाहीत, क्रांती लोकांच्या मनात जन्मते', असे ठामपणे सांगणारा 'शहीद ए आझम' धुरंधर-16; शहाजीराजे भोसले:छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रेरणास्थान अन् बृहन्महाराष्ट्राची स्थापना करणारा धोरणी राजा धुरंधर-15; ई. व्ही. रामासामी:देव आहे हे सिद्ध करण्याचे आव्हान देत तर्कशुद्ध अन् निर्भय मतांद्वारे समाजात क्रांती घडवणारा भारताचा 'पेरियार' धुरंधर-14; कार्नेलिया सोराबजी:रूढी परंपरांना आव्हान देत शिक्षण, समानता अन् मानवी हक्कांसाठी अथक झगडणारी भारताची पहिली महिला बॅरिस्टर धुरंधर-13; खासेराव जाधव:बहुजन समाजाच्या खांद्यावरील निरक्षरतेचे 'जू' काढून त्यांना उच्च शिक्षणाच्या गंगेचे पाणी पाजणारा अवलिया धुरंधर-12; तंट्या भिल्ल:आदिवासींमध्ये राष्ट्रीयत्व जागवणारा 'रॉबिनहूड', थोर स्वातंत्र्यसैनिक; वाचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचे सोनेरी पान धुरंधर-11; विठ्ठल सखाराम पागे:उकिरड्याला खरकटे माहिती नसल्याच्या काळात 'भूकबळी'वर नामी उपाय शोधणारा राजकारणी धुरंधर-10; मोहन हिराबाई हिरालाल:विनोबा भावेंचे 'सर्वायतन' नक्षलग्रस्त गडचिरोलीत रुजवणारा अन् गरिबांना लक्ष्मीदर्शन घडवणारा अवलिया धुरंधर-9; फातिमा शेख:सावित्रीमाईंची मैत्रीण अन् भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका; फातिमा एक काल्पनिक पात्र होत्या का? तुम्हीच ठरवा धुरंधर-8; एकनाथ दगडू आवाड:बापाचा बुचडा कापून 'पोतराज' प्रथेवर घाव घालणारा पोरगा; कथित गुन्हेगारीने बदनाम झालेल्या बीडचा थोर माणूस धुरंधर-7; स्वामी विवेकानंद:मानवतेचा उत्कृष्ट प्रेमी, महान निधर्मी तत्ववेत्ता; नरेंद्रनाथ दत्त यांचे अखेरचे काही तास कसे होते? धुरंधर-6; कंदुकुरी वीरेशलिंगम पंथुलु:अंधश्रद्धेवर लाथ घालून विधवा पुनर्विवाह अन् ज्ञानाची वात पेटवणारा आंध्रचा 'लेखणी'सम्राट धुरंधर-5; भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड:दोन वेळा वाचवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राण धुरंधर-4; डॉ. विश्राम रामजी घोले:महिला उत्थानासाठी पेटून उठलेला सुधारक, ज्यांची 'बाहुली' ठरली स्त्री शिक्षणाची पहिली बळी धुरंधर-3; पार्वतीबाई आठवले:वैधव्य अन् परावलंबन दैवी भोग मानणारी, पण पोटच्या गोळ्याच्या काळजीने असामान्य झालेली एक निरक्षर स्त्री धुरंधर-2; बसव प्रेमानंद:अंधश्रद्धेच्या खाटेवर आजारी पडलेल्या समाजाला विज्ञानाचे औषध देऊन चमत्कारांची पुरती हवा काढणारा थोर दार्शनिक धुरंधर-1; नरहर अंबादास कुरुंदकर:विचारांची श्रीमंती वाढवणारा अन् आजच्या किर्र वैचारिक काळोखात प्रकाशवाट दाखवणारा थोर विचारवंत
Shrinath Mhaskoba Yatra : दिल्ली, पुणे, कोल्हापूरसह सोलापूरच्या पैलवानांनी गाजवला वीरचा आखाडा; कुस्तीशौकीनांची मोठी गर्दी.
Pune ZP Election Results : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त! अनेक वर्षांच्या सत्तेला सुरुंग; अंतर्गत गटबाजी आणि फुटीचा भाजपला थेट फायदा.
Leopard Trapped : ऊसतोडणी हंगाम संपताना बिबट्यांचा मोर्चा आता पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे; अधिक पिंजरे लावण्याची मागणी.
Shirur News : न्हावरे गटात भाजपाला आत्मचिंतनाची गरज! राज्यात हायकमांडकडून बळ असताना संघटना कमकुवत
Shirur News : वारसा मिळाला पण सत्ता निसटली; लोकनेते स्व. बाबुराव पाचर्णे यांच्यानंतर भाजपच्या संघटनात्मक बांधणीत मोठी दरी; निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता.
महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरेपद्मपुराण हे १८ पुराणांपैकी एक असून प्रामुख्याने विष्णुभक्तीवर आधारित आहे. सर्वच पुराणातून जीव, सृष्टी, पाप-पुण्य, देवता, राक्षस यांच्या कथा सांगितल्या आहेत. पुराणे ही ब्रह्मदेवाने सांगितली व व्यासांनी त्यांना ग्रंथरूप दिले असे मानले जाते.या पद्म पुराणात तुलसीदलाच्या महात्म्यासंबंधी एक कथा आहे. ही कथा नारदाने पृथू राजाला सांगितली असा उल्लेख आहे. पद्मपुराणानुसार पूर्वीच्या काळी करवीर प्रदेशात एक धर्मदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता. तो विष्णू भक्त होता. तो नेहमी तुलसीदलाने विष्णूंची पूजा करीत असे. तसेच ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः! या मंत्राचा जप करीत असे. तो येणाऱ्या जाणाऱ्यांचा नेहमीच आनंदाने आदरसत्कार करीत असे. एके दिवशी मोठ्या पहाटे ब्रह्मप्रहरी तो विष्णुपूजनासाठी पूजा साहित्य घेऊन मंदिरात जाण्यासाठी निघाला. वाटेत त्याला एक महाभयंकर राक्षशीण दिसली. तांबड्या डोळ्यांची ती महाभयंकर राक्षशीण पाहून धर्मदत्त भीतीने थरथर कापू लागला. त्याने विष्णू नाम स्मरण सुरू केले. भीतीने थरथर कापत नाम स्मरण करत असतांना धर्मदत्ताच्या हातातील पूजा साहित्यातील तुलसीदलमिश्रित जल राक्षशीणीच्या अंगावर पडले. तुलसी मिश्रित जल अंगावर पडताच राक्षसशीणीच्या देहाचा नाश होऊन त्या ठिकाणी मानव देह धारी स्त्री प्रकट झाली.तिला पाहून धर्मदत्त आश्चर्यचकित झाला. त्याने तिला तू कोण? म्हणून विचारले असतात ती म्हणाली “मी सौराष्ट्र नगरात राहणाऱ्या एका द्विजाची पत्नी असून माझे नाव कलह असे आहे. मी नेहमी सर्वांशी भांडत असे, तसेच पतीशीही भांडण करून त्याला त्रास देत असे, मी कोणालाच चांगले अन्न देत नव्हती, ते सर्व मीच एकटी खात असे, त्यामुळे माझे पती अत्यंत दुःखी राहत असे. अखेर त्याने दुसरा विवाह केला. त्यामुळे मी चिडून विष प्राशन करून आत्महत्या केली. मी कोणतेही संत्कृत्य केलेले नसल्याने माझी रवानगी प्रेत योनीत करण्यात आली व तेव्हापासून मी सर्वत्र प्रेत योनीत भटकत असून भुकेने व्याकूळ असते. या नगरीत अशीच भटकत असताना तुमची भेट झाली व माझ्या अंगावर पडलेल्या तुळशीदल मिश्रित जलामुळे माझी मुक्तता झाली व मला मानव देह प्राप्त झाला. तेव्हा आता मला मुक्ती कशी मिळेल याबाबत मार्गदर्शन करावे? अशी तिने विनंती केली.धर्मदत्त म्हणाला “तीर्थ, दान अथवा व्रताच्या साह्याने पल्या पापकर्माचा नाश करता येतो; परंतु आजपर्यंत प्रेत योनीत असल्याने तुझ्याकडून कोणतेच पूण्य कर्म घडले नाहीत. तेव्हा मी मिळविलेल्या पुण्यापैकी थोडे पुण्य तुला देतो, त्यामुळे तुझा उद्धार होईल व तुला पूर्व शरीर प्राप्त होईल, असे म्हणून त्याने तिच्या अंगावर तुलसीदल मिश्रित जल पुन्हा प्रोक्षण केले. त्यायोगे तिच्या पापकर्माचा नाश होऊन तिला शुद्ध शरीर प्राप्त झाले.पद्मपुराणानुसार सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून विष्णुसहस्त्रनामाचे चिंतन केल्यास जीवनात सुख, शांती, समृद्धी येऊन आयुष्य वाढते व वैभव प्राप्त होते. विष्णूच्या प्रत्येक नामासोबत तुळशीचे एक एक पान वाहून विष्णूची पूजा केल्यास एक कोटी यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. काम करताना अथवाचालता बोलतांनाही विष्णू सहस्त्रनाम घेतल्यास दोष लागत नाही.
मागोवा : महेश जोशीजगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतातील प्रगत महाराष्ट्रात लोक ३२ तास एका ठिकाणी अन्न-पाण्यावाचून अडकून पडतात, ही मोठी नामुष्कीची बाब आहे. आपत्कालीन व्यवस्थेतील सर्व उपाययोजनांचा मुंबई-पुणे रस्त्यावर बळी जातो आणि प्रशासन निमूटपणे त्याकडे पाहत राहते. हे चित्र जगातील चौथ्या क्रमांकांचा अर्थव्यवस्था असलेल्या देशाला शोभादायक नाही. या समस्येवर कशी मात करता येईल?मुंबई-पुणे महामार्ग म्हणजे महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक जीवनाची नस. दररोज लाखो वाहने, हजारो मालवाहू ट्रक, प्रवासी बस, खासगी गाड्या या मार्गावरून धावतात; पण याच महामार्गावरील बोरघाटात नुकतीच झालेली तब्बल ३२ तासांची वाहतूक कोंडी ही केवळ एक अपघाती घटना नव्हती, तर आपल्या व्यवस्थेतील ढिसाळपणा, नियोजनशून्यता आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण ठरली. या काळात हजारो नागरिक रस्त्यावर अडकले. लहान मुले, वृद्ध, रुग्ण, गर्भवती महिला, कामगार, विद्यार्थी सगळेच या कोंडीत अडकले. पाणी नाही, अन्न नाही, शौचालयाची सुविधा नाही, वैद्यकीय मदत नाही. मोबाईल चार्जिंगपासून औषधांपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी नागरिकांना तडफड करावी लागली. हा केवळ ‘ट्रॅफिक जाम’ नव्हता, तर मानवी प्रतिष्ठेवरचा आघात होता. प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे कारणे दिली गेली. अवजड वाहन बिघडले, अपघात झाला. पावसामुळे रस्ता निसरडा झाला, डोंगर उतारामुळे अडथळा निर्माण झाला ही कारणे नवी नाहीत. बोरघाट हा अपघातप्रवण आणि संवेदनशील भाग आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मग हे माहीत असूनही पूर्वतयारी का नाही? एखादे वाहन बिघडल्यामुळे ३२ तासांचा जाम होत असेल, तर त्याचा अर्थ तिथे तत्काळ बचाव यंत्रणा, क्रेन, पर्यायी मार्ग व्यवस्थापन, ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीमच नाही. म्हणजे हा व्यवस्थेचा अपघात होता. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, महामार्ग विस्तार, फ्लायओव्हर, टनेल यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले. इतक्या महत्त्वाच्या मार्गावर आपत्कालीन व्यवस्थापन सक्षम नसेल, तर हा विकास लोकांसाठी आहे की ठेकेदारांसाठी, असा प्रश्न उपस्थित होतो.बोरघाटात एक रसायने वाहतूक करणारा टँकर उलटला. त्यातील वायुगळती होऊन लोक दगावू नयेत, म्हणून वाहतूक थांबवली गेली. हे योग्यच होते; परंतु अपघात झाल्यानंतर लगेच मुंबई आणि पुण्याकडच्या टोलनाक्यावरून पुढे वाहने जाऊ न देता पोलिसांनी पर्यायी मार्गाने जायला भाग पडले असते, तर लाखो लोकांना ३२ तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले नसते. या वाहतूक कोंडीदरम्यान अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस दिसले, हे खरे. त्यांनी प्रयत्नही केले; पण अपुऱ्या मनुष्यबळात, तांत्रिक साधनांशिवाय आणि वरिष्ठ पातळीवरील निर्णयांशिवाय ते काय करणार? मूळ जबाबदारी आहे सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण, राज्य परिवहन विभाग, गृह विभाग, जिल्हा प्रशासनाची. या सर्व यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून आला. एकमेकांकडे बोट दाखवण्याची आणि जबाबदारी झटकून टाकण्याची आपली शासकीय संस्कृती अजूनही बदललेली नाही. या ३२ तासांच्या कोंडीमुळे व्यवहार ठप्प झाले. मालवाहतूक खोळंबली. दूध, भाजीपाल्याचे नुकसान झाले. औषधे उशिरा पोहोचली. पर्यटनावर परिणाम झाला. इंधनाचा अपव्यय झाला. याचा थेट परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झाला. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्याची जबाबदारी कोण घेणार? कोणी चौकशी करणार आहे का? कोंडी सुरू झाल्यानंतरही अनेक तास नागरिकांना पर्यायी मार्गांची माहिती मिळाली नाही. ‘सोशल मीडिया’वर अफवा, अर्धवट माहिती आणि गोंधळ याचेच साम्राज्य होते.आज ‘डिजिटल इंडिया’च्या युगातही सरकारकडे रिअल-टाइम ट्रॅफिक अपडेट सिस्टीम नसणे ही एक लाजिरवाणी बाब आहे. एक साधा एसएमएस अलर्ट, ॲप नोटिफिकेशन किंवा एफएम रेडिओवर सूचना करणे इतके अवघड होते का? या अपघातानंतर २४ तास तत्काळ प्रतिसाद यंत्रणा बोरघाट परिसरात कायमस्वरूपी तैनात करणे, अत्याधुनिक क्रेन आणि रेस्क्यू वाहने उपलब्ध ठेवणे, स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, पर्यायी मार्गांची पूर्वनियोजित योजना, नागरिकांसाठी आपत्कालीन मदत केंद्र, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई, नियमित मॉक ड्रिल आणि आपत्ती सराव हे उपाय कागदावर न राहता जमिनीवर उतरले पाहिजेत. ही केवळ कोंडी नाही, तो इशारा आहे. बोरघाटातील ३२ तासांची वाहतूक कोंडी ही एक साधी घटना नाही. ती राज्याच्या प्रशासनाला मिळालेली जोरदार थप्पड आहे. याकडे गांभीर्याने पाहणार नसल्यास उद्या आणखी मोठी दुर्घटना आपली वाट पाहत आहे. विकास म्हणजे फक्त रस्ते बांधणे नाही, तर संकटात नागरिकांना सुरक्षित, सन्मानाने आणि वेळेत मदत देणे होय. मुंबई-पुणे महामार्ग हा केवळ दोन शहरांना जोडणारा रस्ता नाही, तर महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक जीवनाचा कणा आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि आयटी, शिक्षण व उद्योगांचे केंद्र पुणे यांना जोडणारा हा मार्ग दिवस-रात्र लाखो वाहनांचा भार सहन करतो; मात्र वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, वाहनसंख्या आणि अपुरी पायाभूत सुविधा यांमुळे हा महामार्ग आज गंभीर तणावाखाली आहे. सततची वाहतूक कोंडी, अपघात, वेळेचा अपव्यय आणि आर्थिक नुकसान यांमुळे या महामार्गाला पर्यायी मार्गाची गरज जाणवते.गेल्या दोन दशकांमध्ये मुंबई-पुणे मार्गावरील वाहनसंख्या अनेक पटींनी वाढली आहे. खासगी कार, टॅक्सी, लक्झरी बस, मालवाहू ट्रक, कंटेनर वाहने यांचा सततचा ओघ या मार्गावर असतो. एकाच मार्गावर एवढा भार टाकणे म्हणजे व्यवस्थेला जाणीवपूर्वक अपयशाकडे ढकलण्यासारखे आहे. कोणत्याही प्रगत राष्ट्रात एका महत्त्वाच्या आर्थिक कॉरिडॉरसाठी एकच प्रमुख मार्ग ठेवला जात नाही. पर्यायी मार्गांचे जाळे उभे केले जाते; मात्र महाराष्ट्रात ही संकल्पना अजूनही अपुरी आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग सुरू झाला, तेव्हा क्रांतिकारी मानला गेला. प्रवासाचा वेळ कमी झाला, सुविधा वाढल्या, सुरक्षिततेत सुधारणा झाली; पण आज तोच द्रुतगती मार्ग क्षमतेच्या पलीकडे वापरला जात आहे. द्रुतगती मार्ग म्हणजे पर्याय नव्हे, तर मुख्य महामार्गाला पूरक व्यवस्था होती. आज मात्र तोच मुख्य मार्ग बनला आहे. यामुळे अपघात, कोंडी आणि देखभालीच्या समस्या वाढत आहेत. ही स्थिती विकासाच्या धोरणातील मोठी त्रुटी आहे. पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण, उरण, पनवेल, नवी मुंबई या भागांमधील उद्योगांचा कच्चा माल आणि तयार उत्पादने याच मार्गावरून नेली जातात. वाहतूक खोळंबल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते. उद्योगांचे नुकसान होते. आयात-निर्यातीवर परिणाम होतो. गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होतो. म्हणजेच एक मार्ग ठप्प झाला, की संपूर्ण अर्थव्यवस्थेला हादरा बसतो. ही जोखीम कोणत्याही प्रगत राज्याला परवडणारी नाही. वाहतूक कोंडीत तासनतास उभ्या असलेल्या वाहनांमुळे प्रचंड प्रमाणात इंधन वाया जाते. कार्बन उत्सर्जन वाढते, हवेचे प्रदूषण होते, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो.महाराष्ट्रात रस्ते बांधले जातात; पण दीर्घकालीन वाहतूक नियोजनाचा अभाव दिसतो. समस्या निर्माण झाल्यावर उपाय शोधले जातात. हे प्रतिक्रियात्मक धोरण आहे, दूरदृष्टीचे नव्हे. फक्त रस्ते रुंद करणे हा उपाय नाही. नवे मार्ग, स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन, बहुविध वाहतूक प्रणाली (रस्ता-रेल्वे-जलमार्ग) यांचा समन्वय साधणे ही काळाची गरज आहे. विकास म्हणजे गर्दी वाढवणे नव्हे, तर ती नियोजनबद्ध पद्धतीने वाटून देणे. खंडाळा अर्थात बोरघाट हा कायमच अपघात, कोंडी आणि अनिश्चिततेचा केंद्रबिंदू ठरला आहे. पावसाळा असो, अपघात असो, दरड कोसळणे असो किंवा अवजड वाहन बिघाड एक छोटीशी घटना घडली, तरी संपूर्ण महामार्ग ठप्प होतो. अशा परिस्थितीत शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत हा पर्यायी महामार्ग तातडीने विकसित करणे ही केवळ गरज नाही, तर राज्याच्या विकासासाठीची अपरिहार्यता बनली आहे. पुणे जिल्ह्याचा औद्योगिक पट्टा, अहमदनगरकडे जाणारा मार्ग, मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणपट्टा यांना जोडणारी ही नैसर्गिक साखळी आहे. हा मार्ग विकसित झाल्यास बोरघाटावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. औद्योगिक वाहतूक वेगवान होईल. ग्रामीण भागाला विकासाची संधी मिळेल. नवी आर्थिक साखळी तयार होईल. चाकण, तळेगाव, रांजणगाव, शिक्रापूर ही महाराष्ट्राची प्रमुख औद्योगिक केंद्रे आहेत. देश-विदेशातील मोठ्या कंपन्या येथे कार्यरत आहेत.हजारो कोटींची गुंतवणूक, लाखो रोजगार या भागावर अवलंबून आहेत; पण वाहतुकीच्या समस्येमुळे मालवाहतूक वेळेवर होत नाही. उत्पादन खर्च वाढतो. निर्यातीवर परिणाम होतो. गुंतवणूकदार नाराज होतात. एक सक्षम पर्यायी महामार्ग नसल्यामुळे हा औद्योगिक पट्टा आजही अपुऱ्या पायाभूत सुविधांमध्ये अडकला आहे. कर्जत हे मुंबई, नवी मुंबई आणि कोकणाकडे जाणारे प्रमुख प्रवेशद्वार आहे. कर्जत-पनवेल-उरण-जेएनपीटी हा भाग देशातील सर्वात महत्त्वाच्या लॉजिस्टिक कॉरिडॉरपैकी एक आहे. शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत मार्ग प्रत्यक्षात आला, तर पुणे, अहमदनगर, मराठवाडा, विदर्भातून येणारी वाहतूक बोरघाट न वापरता थेट मुंबई परिसरात सहज पोहोचू शकेल. हा नव्या विकासाचा महामार्ग ठरेल. त्याची उभारणी तातडीने हाती घेऊन पूर्ण करणे हा बोरघाटातील अपघातातून मिळालेला धडा आहे.
Indrayani River : माऊलींच्या चरणी महाआरती, पण प्रदूषणाचे काय? आता सरकार उचलणार ‘हे’कठोर पाऊल
Indrayani River : विजया एकादशीला महाआरतीचा जागर; नीलम गोऱ्हेंच्या उपस्थितीत जलपूजन, मात्र सांडपाणी प्रक्रियेतील घोटाळ्यांवर ओढले ताशेरे.
Workers Strike : नवीन लेबर कोडमुळे कामगारांवर अन्याय होईल; महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या आवाहनानंतर कारखान्याच्या गेटवर तीव्र निदर्शने.
Junnar News : माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक भिडले; यात्रेच्या हिशोबावरून जुन्नरमध्ये दोन गट आमनेसामने आल्याने पोलीस बंदोबस्तात झाली चर्चा.
संवाद : गुरुनाथ तेंडुलकरतुम्हाला ही गोष्ट नक्कीच ठाऊक आहे. एक धोबी आणि त्याचा मुलगा शहरातल्या आठवड्याच्या बाजारात गाढव खरेदी करायला गेले. येताना सटरफटर अशी इतरही बरीच खरेदी झाली. त्या वजनाची थैली मुलाने डोक्यावर घेतली आणि बापाने गाढवाच्या गळ्यातली दोरी धरून चालायला सुरुवात केली. दुपार झाली होती. अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या. दोघंही पार थकले होते. वाटेत एकजण ओळखीचा भेटला नि म्हणाला, ‘एवढं गाढव असून तुम्ही दोघं पायी चालताय...? तुम्हीच खरे गाढव आहात...’ बाप मुलाला म्हणाला, ‘तू सामान घेऊन गाढवावर बस. मी चालतो.’त्यांना तसं चालताना पाहून आणखी दोन जण म्हणाले. ‘काय दिवस आलेत? तरणाताठा मुलगा गाढवावर बसलाय आणि म्हातारा बाप पायी चालतोय.’मुलगा उतरला आणि बाप गाढवावर बसला. आता लोक म्हणू लागले. ‘बाप एकटाच आरामात बसलाय. पोरगा बिचारा चालतोय... चालतोय.’त्यानंतर दोघेही गाढवावर बसले तर लोक म्हणू लागले ‘की काय माज आलाय बाप-लेकाला... त्या मुक्या प्राण्यावर दोघं-दोघं बसलेत. त्या बिचाऱ्या गाढवाचे कितीहाल होताहेत...’अखेरीस लोकांच्या या उलटसुलट बोलण्याला कंटाळून त्या बापलेकांनी गाढवाला आडवा पाडून त्याच्या पायाला लांब बांबू बांधला आणि त्याला उलटा उचलून घेऊन चालायला सुरुवात केली. गाढवाची ही अजब यात्रा पाहून आजूबाजूचे खूपसारे लोक गोळा झाले. शिट्या टाळ्या वाजवू लागले. गाढव बिथरलं. पाय झाडू लागलं. एव्हाना ही पालखी नदीवरच्या पुलावरून चालली होती. गाढवाने पाय झाडून बांधलेल्या दोऱ्या तोडल्या आणि त्या गडबडीत गाढव नदीत पडलं. वाहून गेलं. रिकामा पोकळ बांबू घेऊन बापलेक घरी परतले. आमच्या शाळेच्या क्रमिक पुस्तकात आम्हाला ही गोष्ट होती.माझ्या जवळच्या एका मित्राची विवाहित मुलगी लग्नापूर्वी गाणं शिकली होती. लग्नानंतर मात्र तिचं गाणं बंद पडलं, पण अलीकडेच तिला तिच्या क्लासमधल्या सरांनी बोलावून घेतलं आणि तिच्या आवाजात काही गाणी रेकॉर्ड केली. त्यानंतर तिची अमेरिकेतील एका शोसाठी निवड देखील झाली. पण तिनं ती संधी नाकारली. कारण काय तर म्हणे तिच्या म्हाताऱ्या सासू-सासऱ्यांकडे बघायला कोणी नव्हतं. थोरली जाऊबाई नोकरी करणारी होती. धाकटी नणंद कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती. अशा अनेक अडचणींचे अडथळे मार्गात उभे राहिले. अशावेळी नवऱ्यानं थोडं प्रोत्साहन द्यायला हवं होतं. सासू-सासऱ्यांनी देखील थोडा समजूतदारपणा दाखवायला हवा होता. पण... पण जवळच्या नातेवाइकांनी तिचे पायच ओढले. ‘तू काय स्वतःला लता मंगेशकर समजतेस की आशा भोसले?’बिचारी हिरमुसली आणि स्वतःच्या मनापेक्षा जनांचं ऐकून गप्प बसली.अशी अनेक उदाहरणं आपल्याला आजूबाजूला दिसतील. एवढंच कशाला आपणदेखील असेच लोकांचा विचार करूनच वागतो. आजूबाजूचे चार लोक काय म्हणतील याचा विचार करून स्वतःचा आतला आवाज दाबून टाकतो.आणखी एक घटना सांगतो. दहा वर्षांपूर्वी माझ्या एक नातेवाईक बाईचा नवरा अपघातात अचानक गेला. नवरा गेला त्यावेळी त्या बाईंनी नुकतीच साठी ओलांडली होती. दोन्ही मुलं परदेशात स्थायिक, अशावेळी तिच्याच परिचयातील एका गृहस्थानी सहा महिन्यांनंतर तिला चक्क लग्नासाठी विचारलं. ते देखील साधारण तिच्याच वयाचे. त्यांचीही पहिली पत्नी दीर्घ आजारानंतर वारली होती. ते मुंबईत एकटेच राहात होते. विवाहित मुलगी बंगलोरला आयटी कंपनीत होती. मुलीनंच पुढाकार घेतला आणि या बाईना आपल्या वडिलांबरोबर लगाबद्दल विचारलं... त्या बाईंनादेखील हा प्रस्ताव मनातून पटत होता. उरलेलं आयुष्य एकाकी काढण्यापेक्षा परिचयातलाच माणूस जर सहचारी म्हणून लाभला तर आयुष्याच्या उत्तरायणातील सहजीवन नक्की सुखावह होईल हे त्या बाईंनादेखील पटत होतं. त्या गृहस्थांच्या मुलीनं खूप समजावलं. मीदेखील त्यांच्याशी बोललो. पण... पण... ‘या वयात लग्न...? लोक काय म्हणतील...?’ ‘ज्या वयात केसांना मेहंदी लावायची त्या वयात हाताला मेहंदी लावणं शोभेल का?’ असा विचार करून त्या बाईनी नकार दिला...त्यानंतर त्या गृहस्थांनी त्यांच्याच ओळखीच्या दुसऱ्या एका स्त्रीशी विवाह केल्याचं समजलं, आता या घटनेला बरीच वर्षे होऊन गेली आहेत. अलीकडे एका समारंभात त्या बाई मला भेटल्या. बोलता बोलता त्यांनी ‘जनांचं ऐकून स्वतःच्या नाकारल्याबद्दल’ अत्यंत प्रांजळपणे कबुली दिली. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते...तुमच्या पाहण्यात, ऐकण्यातदेखील अशा प्रकारची काही उदाहरणं आढळतील. एखाद-दुसरं उदाहरण तर कदाचित आपल्याच आयुष्यातलंदेखील असेल. खरंय ना?म्हणूनच हिंदीत एक म्हण आहे. ‘सबसे बड़ा रोग... क्या कहेंगे लोग?’ लोक काय म्हणतील? त्यांना काय वाटेल? केवळ लोकांच्या मनाचाच विचार केल्यामुळे आपल्या स्वतःच्या मनाची विचार करण्याची शक्तीच हळूहळू हरवून जाते. स्वतःचं मन स्वतःच्या ताब्यात न राहता इतरांच्या ताब्यात जातं. विचार परावलंबी होतात... आयुष्य प्रवाहपतित होतं. आपण लोकांच्या विचारांबरोबर भरकटत वाहत जातो.वास्तविक खरं तर लोकांना कशाचंच सोयरसुतक नसतं. त्यांना केवळ बोलायचं तेवढंच ठाऊक असतं. बोलणारे लोक कधीही मदतीला धावून येत नाहीत आणि मदत करणारे कधीही समोरच्याचं मन खची होऊ देत नाहीत...बोलणारे लोक बोलले तरी ते किती दिवस बोलतील...? दोन दिवस... चार दिवस... बस्स... त्यानंतर त्यांना दुसऱ्या कुणाचा तरी नवीन विषय सापडतो आणि ते त्याच्यावर बोलतात... आपण मात्र हाताशी आलेली चांगली संधी गमावून बसतो. याच पार्श्वभूमीवर आजची कविता. कवी आहेत आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे. भा रा तांबे आणि कविता देखील सगळ्यांच्या परिचयाचीच आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय... म्हणूनच कोणतंही काम करताना आपल्या मनाचा कौल घ्यायचा. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून फक्त आतला आवाज ऐकायचा... हा ज्यांनी लोकांचा विचार न करता फक्त आतला आवाज ज्यांनी ऐकला त्यांनी इतिहास घडवल्याची अनेक उदाहरणं आहेत.आनंदीबाई जोशी... लोक काय म्हणतील याची पर्वा न बाळगता नेटानं शिकल्या. डॉक्टर झाल्या. इतरांसारखी नोकरी एके नोकरी नाकारून स्वतःच्या मनाचा कौल घेणारे धीरुभाई अंबानी. ‘विधवेसोबत लग्न केलं तर लोक काय म्हणतील?’ असा विचार न करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे. स्त्रीयांच्या शिक्षणासाठी तत्कालिन समाजाशी लढणारे महात्मा जोतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले. या सगळ्यांनी फक्त स्वतःच्या मनाचा कौल घेतला... आणि जिद्दीनं इतिहास निर्माण केला. लोक बोलतील... फक्त बोलतील... त्यांच्या मनाचा विचार करून आपल्या आयुष्यातील आनंदाच्या संधी कधीच दवडायच्या नाहीत. अखेरीस इतकंच सांगतो की, आपल्या आयुष्यात असा प्रसंग आला तर भारा तांबेंची ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ ही कविता आठवायची आणि त्याचबरोबर हिंदीतल्या गाण्याचे शब्ददेखील आठवायचे.कुछ तो लोग कहेंगे... लोगोंकाकाम है कहेना...
Indapur News : इंदापूर पंचायत समितीच्या वतीने नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा उत्साहात; विकासकामांचा वारसा पुढे नेण्याचा मान्यवरांचा निर्धार.
स्वच्छ पर्यावरणासाठी सक्षम अभियानाचा संकल्प!
प्राजक्त ओढेभारत सरकारच्या ऊर्जा सुरक्षितता, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले ‘सक्षम २०२५-२६ (संरक्षण क्षमता महोत्सव)’ हे राष्ट्रीय अभियान दि. १ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ‘तेल आणि गॅस वाचवा, हरित ऊर्जा स्वीकारा’ या घोषवाक्यासह संपूर्ण देशभर राबविण्यात आले. त्यानिमित्त...जागतिक पातळीवर वेगाने बदलणाऱ्या हवामानामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे मानवासमोर आज मोठे आव्हान उभे राहिले आहे. पारंपरिक इंधनांचा वापर दिवसागणिक वाढत गेल्याने निसर्गावर मोठा ताण पडत असून, त्याचे दुष्परिणाम आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवर ठळकपणे दिसू लागले आहेत. भविष्यात हे संकट आणखी भयावह होऊ नये यासाठी समाजाने स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जेकडे प्राधान्याने वळणे, ही काळाची गरज बनली आहे.कोळसा, पेट्रोल, डिझेल यांसारखी पारंपरिक इंधने मर्यादित स्वरूपाची आहेत. त्यांच्या ज्वलनामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड आणि इतर घातक वायू वातावरणात मिसळतात. यामुळे जागतिक तापमानवाढ, हवामानातील टोकाचे बदल, पावसाचे असमतोल स्वरूप तसेच आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. श्वसनविकार, हृदयविकार आणि त्वचारोग यांसारखे आजार याच प्रदूषणाशी थेट जोडलेले आहेत. यावर उपाय म्हणून नवी ऊर्जा क्रांती आकार घेत आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत, बायोगॅस, बायो-इंधन आणि हरित हायड्रोजन यांसारखे पर्याय आज प्रभावीपणे पुढे येत आहेत. या ऊर्जास्रोतांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे, ते अक्षय आहेत आणि पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचवतात.सूर आणि पवन ऊर्जा निर्मितीमुळे इंधन आयातीवरील खर्च कमी होऊन देशाची आर्थिक बचतही होते. उसाच्या चिपाडापासून बनविल्या जाणाऱ्या इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाकडेही आपला देश गांभीर्याने पाहू लागला आहे. अलीकडच्या काळाचा विचार केल्यास, वाहतूक क्षेत्रातही मोठे बदल होताना दिसत आहेत. इलेक्ट्रिक वाहने, हायब्रिड वाहने आणि पर्यायी इंधनावर चालणारी वाहने यांचा वापर वाढत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्राधान्याने स्वच्छ इंधनाचा समावेश केल्यास प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवता येऊ शकते. यासोबतच इंधन बचतीच्या सवयी, कार पूलिंग, सायकलचा वापर आणि पायी चालण्यास प्रोत्साहन देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.घरगुती पातळीवरही स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवता येऊ शकतो. सौर पॅनल्सद्वारे वीज निर्मिती, बायोगॅस प्रकल्प, ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर आणि विजेचा अपव्यय टाळणे या छोट्या गोष्टी मोठा बदल घडवू शकतात. शाश्वत जीवनशैली स्वीकारणे म्हणजे केवळ पर्यावरणाचे संरक्षण नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य घडवण्याच्या दृष्टीने या ऊर्जा क्रांतीकडे पाहायला हवे.या दिशेने केंद्र व राज्य सरकारांकडून विविध अभियानांद्वारे जनजागृती केली जात आहे. ‘सक्षम’सारख्या मोहिमा नागरिकांना पर्यायी इंधनांचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करत आहेत. उद्योग क्षेत्र, तसेच शहरे आणि ग्रामीण भागातही हरित ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली जात आहेत. यामध्ये संशोधन, नवतंत्रज्ञान आणि स्थानिक सहभाग आदीला विशेष महत्त्व दिले जात आहे.स्वच्छ पर्यावरण हा केवळ सरकारचा किंवा एखाद्या संस्थेचा विषय नसून, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आज प्रत्येक स्तरावर घेतलेले छोटे निर्णय उद्याच्या मोठ्या संकटांना टाळू शकतात. पर्यायी ऊर्जेचा वापर, इंधन बचत, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारल्यास हरित, सुरक्षित आणि समृद्ध भविष्यासाठी आपण भक्कम पायाभरणी करू शकतो. हीच खरी ऊर्जा क्रांती असून तिच्यात आपण सर्वांनी सहभागी होणे, ही काळाची गरज आहे.
मेरे टूटे हुए दिलसे, कोई तो आज ये पुछे...
नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरेज्याने आयुष्यात एकदा तरी ‘गाण्याच्या भेंड्या’ हा खेळ खेळला आहे त्या प्रत्येकाला ‘छलीया’मधील एक गाणे नक्कीच माहीत असते–‘डम डम डिगा डिगा, मौसम भीगा भीगा,बिन पिये मै तो गिरा, मैं तो गिरा,हाय अल्ला, सुरत आपकी सुभानअल्ला!...’कारण ‘ड’ आल्यावर पहिल्या फेरीत याच गाण्याने आपली सुटका केलेली असते. (अशीच ‘छ’ आल्यावर याच सिनेमातील ‘छलीया मेरा नाम’ने प्रत्येकाला भेंडीपासून वाचवलेले असते.) कदाचित कल्याणजी आनंदजींच्या ठेकेबाज चालीमुळेही असेल पण ही गाणी सर्वांना माहीत असतातच. राजकपूरच्या सुरुवातीच्या काळात चार्ली चॅपलीनची नक्कल करायच्या सवयीमुळे साधाभोळा स्वभाव, गरिबी आणि मनाचा मोठेपणा ही त्याच्या बहुतेक पात्रांची वैशिष्ट्ये असायची. म्हणूनच ‘डम डम डिगा डिगा’मध्ये जां निसार अख्तर यांनी गरिबीचा आणि तदनुषंगिक फिल्मी ‘बड्या दिला’चाही उल्लेख टाकला -“सनम हम माना, गरीब है,नसीबा खोटा सही, बंदा छोटा सही,दिल ये खज़ाना है प्यारका,हाए अल्ला, सूरत आपकी सुभान अल्ला.”‘छलीया’ हा १९६०ला आलेला मनमोहन देसाईंचा पहिला सिनेमा! राजकपूर आणि नूतनबरोबर प्राण, रहमान आणि शोभना समर्थ होते. फियोदोर दोस्तोव्हस्कीच्या ‘व्हाईट नाईटस’ या लघुकथेवर बेतलेल्या कथानकाला मनमोहनजींनी भारताच्या फाळणीची पार्श्वभूमी दिली.लाहोरमधील शांतीचे (नूतन) लग्न ऐन फाळणीच्यावेळी केवलशी (रहमान) होते. लग्नानंतर दोन्ही कुटुंबांना लाहोर सोडून दिल्लीला यावे लागते. फाळणीच्या भयानक परिस्थितीत झालेल्या चुकामुकीमुळे शांतीला अब्दुल रहमानच्या (प्राण) घरी राहावे लागते. काही वर्षांनी शांतीला भारतात येणे शक्य होते तेव्हा पती ‘केवल’ मोकळ्या मनाने तिचे स्वागत करतो पण तो मुलाला त्याचे नाव विचारतो तेव्हा मुलगा सांगतो, ‘अन्वर’! केवलला हा पहिला धक्का! वडिलांचे नाव विचारल्यावर तो सांगतो, अब्दुल रहमान! झाले! सगळे वातावरण क्षणात बिघडते.पतीने घराबाहेर काढलेल्या शांतीला तिचे वडीलही घरात घेत नाहीत. टोकाची निराश झालेली शांती आत्महत्येचा प्रयत्न करते तेव्हा तिथे असलेला राजकपूर (छलीया) तिला वाचवतो. पुढे सहवासाने त्याच्या मनात तिच्याविषयी प्रेम निर्माण होते. मात्र तिची खरी कहाणी समजल्यावर दिलदार छलीया तिच्यात आणि तिच्या दुरावलेल्या पतीत दिलजमाई घडवून आणतो आणि एकटाच तिच्या जीवनातून निघून जातो अशी ही कथा! कल्याणजी-आनंदजींनी समरसून संगीत दिलेली बहुतेक गाणी लोकप्रिय झाली. समीक्षकांच्या मते छलीयाच्या यशात कल्याणजी आनंदजींच्या संगीताचा मोठा वाटा होता.छलीया चांगला चालला. राजकपूरला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून आणि नूतनला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ म्हणून फिल्मफेयर नामांकनही मिळाले. पण छलीयाच्या यशामुळे मनमोहन देसाईना जणू एक फॉर्म्युलाच सापडला. पुढे त्यांच्या सिनेमातली पात्रे सिनेमाच्या पूर्वार्धात नियमितपणे हरवू लागली आणि उत्तरार्धात सापडू लागली! उदाहरणच द्यायचे झाल्यास रांगेत आहेत ‘अमर अकबर अँथोनी’(१९७७), ‘धरमवीर’(१९७७),‘नसीब’(१९८१),‘कुली’(१९८३),‘रामपूरका लक्ष्मण’(१९७२) इत्यादी इत्यादी.जिचे प्राण वाचवले त्या नूतनवर राज कपूरचे मनापासून प्रेम बसले आहे. पण त्याची ते व्यक्त करायची हिंमत होत नाही. एकदा तो तिला देवळात भेटतो. तेव्हा भावना अनावर होऊन आपले प्रेम सूचित करतो. ती विवाहित आहे आणि तिला एक मुलगा आहे हे त्याला माहीत नसते. पतीकडे परत जावून आपल्या संसार पुन्हा उभा करायची उत्कट इच्छा असलेली शांती त्याला स्पष्ट नकार देते. त्यावेळी आतून पूर्णपणे तुटलेल्या छलीयाच्या तोंडी जां निसार अख्तरसाहेबांनी एक गाणे दिले होते.कुणाही अगतिक आणि हरलेल्या प्रेमिकाची भावना व्यक्त करणारे, त्याच्या भाबड्या भावना व्यक्त करणारे अख्तरसाहेबांचे शब्द होते -‘मेरे टूटे हुए दिलसे,कोई तो आज ये पूछे.के तेरा हाल क्या है,मेरे टूटे हुए दिलसे...’माणूस प्रेमात हरल्यावर मनातून प्रचंड एकटा बनलेला असतो. त्याला स्वत:हून कुणाशी बोलावेसेही वाटत नसते. पण त्या विमनस्क अवस्थेत कुणी नुसती सहानुभूती दाखवली तरी त्याला केवढा तरी दिलासा मिळतो. पण छलीयाला असे कुणीही जवळचे नाही. कसेबसे कुणीतरी जवळचे वाटू लागले होते तेही नुसते प्रेम व्यक्त केल्याने आता कायमचे दूर जाणार हे पाहून त्याच्या मनाची घालमेल होते.नियतीला दोष देताना म्हणतो, ‘कधी नव्हे ते माझ्या जीवनाच्या शुष्क वेलीवर प्रेमाचे एक फूल उमलत होते. तू निर्दयपणे ती फांदीच तोडून टाकलीस ना?‘किस्मत तेरी रीत निराली,ओ छलिये, ओ छलनेवाली.फूल खिला तो टूटी डाली...’तो इतका निर्मळ मनाचा आहे की तो सगळ्या शोकांतिकेचा दोष स्वत:लाच देतो. माझ्या नजरेची चूक झाली, मी तिच्या वागण्याचा चुकीचा अर्थ काढला, तिच्या चांगुलपणाला प्रेम समजून बसलो यात तिचा काय दोष? असे तो स्वत:लाच विचारतो -‘जिसे उल्फत समझ बैठा,मेरी नज़रोंका धोखा था.किसीकी क्या खता है,मेरे टूटे हुए दिलसे...’अगदी एकटेपणाचे, उजाड, उदास जगणे नशिबी आलेल्या छलीयाच्या जीवनात शांतीच्या परिचयामुळे प्रेमाची शक्यता निर्माण झाली असते पण पहिल्याच प्रयत्नात त्याचे प्रेम नाकारले जाते, विफल होते. विमनस्क अवस्थेत त्याला वाटते, ‘आधी एकटा होतो, ते किती बरे होते! निदान माझा मी स्वतंत्र तरी होतो, आता हे काय होऊन बसले... नाकारले गेलेले एकतर्फी प्रेम ही किती वेदनादायी भावना असते ते मला आता समजते आहे -‘मांगी मुहब्बत पाई जुदाई,दुनिया मुझको रास न आई.पहले क़दमपर ठोकर खाई,सदा आज़ाद रहते थे.हमें मालूम ही क्या था,मुहब्बत क्या बला है.मेरे टूटे हुए दिलसे...’जुन्या काळी प्रेमाचे सफल होणे ही सिनेमातच नव्हे तर वास्तव जीवनातही फार दुर्मीळ गोष्ट होती. त्यामुळे शोकांतिकांशी लोक चटकन समरस होत. सिनेमातल्या एकेक प्रसंगाला, एकंदर कथानकाला अधिक उत्कट करणारी गाणी असत. अशी जुन्या गीतकारांनी समरसून लिहिलेली, भावनेने ओतप्रोत भरलेली गाणी, जाणकार संगीतकरांनी त्यांना दिलेले, मनात रेंगाळणारे संगीत, कलाकारांचा निरागस, सकस अभिनय हे सगळे मनाला एका वेगळाच आनंद देऊन जाते. म्हणून हा ‘नॉस्टॅल्जिया’!
आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानूमुलगा किंवा मुलगी शाळेमध्ये चांगले मार्क्स मिळवू शकले नाहीत, मुलांची फी आपण वेळेवर भरू शकलो नाही, मुलांना शाळेत आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपण विकत घेऊन देऊ शकलो नाही, मुलांच्या वागण्याबद्दल शाळेतून तक्रारी यायला लागल्या, मुलांना शाळेत कोणी त्रास देत असेल, मूल चुकीच्या मार्गाला जात असेल, तर अशा कितीतरी गोष्टींनी तुम्ही पालक खूप तणावात आहात. होय ना.तुम्ही शिकत होतात तेव्हा इतकी स्पर्धा नव्हती. एका घरात तीन मुलं असली तरी त्यांचे शिक्षण त्यामानाने सोपे होते. एवढे खर्चिक नव्हते. आज मात्र आपलं मूल केवळ आपल्या देशातच नव्हे, तर परदेशातही शिकायला जावं या इच्छेने इंग्रजी माध्यमांच्या शाळेत आणि कॉलेजात, चांगल्या युनिव्हर्सिटीत मुलांना प्रवेश मिळालाच पाहिजे या हट्टाने सगळेच कठीण होऊन बसले आहे. वास्तविक मुलं कठीण परिस्थितीतही शिष्यवृत्ती मिळवून तसेच परदेशात शिकायला गेलेले असताना पार्टटाइम जॉब करून, स्वतःचा खर्च उचलू शकतात आणि ते हे करूनही दाखवतात, पण पालक म्हणून आपण स्वतःला अपराधी समजतो आणि सतत तणावाखाली असतो.त्यामुळेच आजकालचे पालकत्व हे कमी-जास्त प्रमाणात दडपण आणणारे झाले आहे. पालक कळत-नकळत खूप तणावाखाली असतात. विशेषतः जेव्हा मुलांची अभ्यासातील प्रगती किंवा त्यांचे वागण्याचे प्रश्न निर्माण होतात, त्यांच्याविषयीच्या तक्रारी शाळेतून किंवा समाजातून येऊ लागतात. मुलं ऐकण्याच्या पलीकडे जाऊ लागतात, मुलांना वाईट सवयी लागतात त्या वेळेला तर हा तणाव विशेष स्वरूपाने वाढत जातो. त्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य खराब होऊ लागते. याकरिता पालकांचा तणाव म्हणजे काय असतो आणि आज तो इतका मोठा प्रश्न का बनला आहे? हे जाणून घ्यायला हवे. पालकांच्या तणावाची सामान्य कारणे आणि पालकांनी तणाव कसा हाताळायचा ते देखील समजून घ्यायला हवे.मुलांचे संगोपन करणे नेहमीच कठीण काम राहिले आहे, पण आजचे पालक पूर्वीपेक्षा अधिक आव्हाने आणि दबावांना सामोरे जात आहेत. पालकांचा तणाव हा एक मोठा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनला आहे. अनेक पालक “थकलेले, पूर्णपणे हताश झालेले (burned out) आणि कायम मागे पडल्यासारखे” वाटत असल्याचे सांगतात. याचे कारण काय? आजच्या पालकांकडून अशी अपेक्षा केली जाते की, त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणावर आणि सर्वांगीण विकासावर शक्य तितका वेळ आणि पैसा खर्च करावा. संशोधकांचे असेही म्हणणे आहे की, जर पालकांनी आपल्या मुलांना योग्य संधी दिल्या नाहीत, तर त्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती अनेकांना वाटते. जेव्हा इतके मोठे दडपण असते, तेव्हा पालक अडचणीत सापडणे स्वाभाविकच आहे. तुम्ही पालक असाल, तर या परिस्थितीचा सामना कसा करता येईल ते पाहूया. तणावग्रस्त पालकांसाठी आणि पालकत्वाच्या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी हे समजावून घेऊ या की पालकांचा तणाव म्हणजे काय आणि आज तो इतका मोठा प्रश्न का आहे?पालकांचा तणाव म्हणजे मुलांचे संगोपन करताना येणाऱ्या अनेक जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि मागण्यांमुळे निर्माण होणारा मानसिक तणाव.तो काळजी, चिडचिड, प्रचंड थकवा आणि कधी-कधी असहाय्यतेच्या भावनेच्या रूपात दिसू शकतो. आज पालकत्व अधिक गुंतागुंतीचे झाले आहे आणि आधुनिक जीवनातील दबाव वाढले आहेत. त्यामुळे पालकांचा तणाव हा प्रश्न पूर्वीपेक्षा जास्त तीव्र झाला आहे. आता पाहूया पालकांच्या तणावाची सामान्य कारणे.पालकत्वाशी संबंधित अनेक अडचणी-आर्थिक चिंता, काम आणि खासगी आयुष्याचा समतोल राखण्याचा ताण.१. काम आणि कौटुंबिक आयुष्याचा समतोलनोकरी आणि मुलांची जबाबदारी एकत्र सांभाळणे हे अनेक पालकांसाठी मोठे तणावाचे कारण ठरते. पालक पूर्वीपेक्षा अधिक काम करत आहेत आणि करिअर व कुटुंब यांचा समतोल साधताना चिंता, अपराधीपणा आणि मानसिक थकवा (burnout) जाणवतो.याचा परिणाम जोडीदारासोबतचा वेळ, झोप आणि स्वतःसाठीचा मोकळा वेळ यावर होतो.२. आर्थिक दबाव.मुलांचे संगोपन महागडे असते - अन्न, कपडे, शिक्षण, अतिरिक्त उपक्रम यांसाठी मोठा खर्च लागतो. त्यातच बालसंगोपनाचा खर्च प्रचंड वाढला आहे. वाढत्या जीवनखर्चामुळे आर्थिक चिंता पालकांच्या तणावात भर घालतात. कधी कधी मुलांना संधी देता न आल्यास अपराधीपणा किंवा चिंतादेखील निर्माण होते.३. पालकत्वाबद्दलच्या अपेक्षा आणि “तुलना संस्कृती”सोशल मीडियामुळे “परिपूर्ण पालकत्वा”च्या अवास्तव अपेक्षा तयार होतात. इतर कुटुंबे अगदी परफेक्ट असल्यासारखी दिसतात आणि त्यामुळे स्वतः अपुरे असल्याची भावना निर्माण होऊ शकते.४. स्वतःसाठी वेळ नसणेधावपळीच्या दिनक्रमामुळे पालकांना स्वतःला सावरण्यासाठी वेळ मिळत नाही. स्वतःची काळजी (self-care) न घेतल्यास तणाव वाढत जातो आणि संयम राखणे कठीण होते.५. मुलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि भविष्याची चिंता.मुलांचे शारीरिक, मानसिक, शैक्षणिक आणि भावनिक आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी पालकांवर मोठा ताण आणते. अनेक पालकांना आपल्या मुलांना चिंता किंवा नैराश्य येईल की काय, याची भीती वाटते. छळवणूक, हिंसा, अभ्यासाचा ताण आणि करिअरचे भविष्य या सगळ्यामुळे पालक कायम काळजीत राहतात.६. सामाजिक आधाराचा अभाव.मदतीसाठी कुटुंब, मित्र किंवा समुदाय नसेल, तर पालकत्व अधिक एकाकी वाटू शकते. आधार नसल्याने रोजच्या अडचणी अधिक कठीण भासतात.७. डिजिटल युगातील पालकत्व.स्क्रीन टाइम, सोशल मीडिया आणि ऑनलाइन सुरक्षितता या सगळ्यांमुळे आजच्या पालकांना नवीन प्रकारचा तणाव जाणवतो. योग्य काय आणि अयोग्य काय, याबाबत गोंधळ निर्माण होतो.पालकांचा तणाव कसा हाताळायचा...पालकत्व कठीण आहे आणि लगेच सोपे होईल असे नाही. तरीही, “पालकांनाही काळजीची गरज असते,” सर्व गोष्टी आपल्या नियंत्रणात नसल्या तरी, काही छोटे बदल मानसिक आरोग्यास मदत करू शकतात.१. परिपूर्णतेचा हट्ट सोडा आणि शक्य तितके मुलांकरिता उपलब्ध राहा.कोणीही परिपूर्ण पालक नसतो. तुमचे उद्दिष्ट परफेक्ट असणे नसून, मुलांच्या गरजांसाठी उपस्थित आणि संवेदनशील असणे हे असावे. चुका झाल्या तरी स्वतःला माफ करा.२. रोजच्या कामात सजगता (Mindfulness) आणा.सजगतेसाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. श्वासावर लक्ष देणे, आजूबाजूला काय आहे ते जाणवणे - हे लहान उपायही मन शांत ठेवतात.३. कुटुंबासोबत स्वतःचीही काळजी घ्या.स्वतःसाठी थोडा वेळ काढणे महत्त्वाचे आहे. सकाळी शांतपणे चहा-कॉफी पिणे, आवडते पुस्तक वाचणे किंवा थोडी ताजी हवा घेणे - हे छोटे उपाय मोठा फरक पाडू शकतात.४. गरज असेल तेव्हा मदत मागामित्र, कुटुंबीय किंवा इतर पालकांशी बोलल्याने मन हलके होते. गरज पडल्यास समुपदेशक किंवा थेरपिस्टची मदत घ्या. मदत मागणे ही कमजोरी नाही, तर ताकद आहे.५. काम आणि कुटुंबासाठी मर्यादा ठरवा.कामाच्या वेळा स्पष्ट ठेवल्याने दोन्ही बाजूंचा ताण कमी होतो. कामानंतर घरात शिरताना थोडा ब्रेक घ्या, जेणेकरून मनाची अवस्था बदलेल.६. आपल्या पालकत्वाच्या पद्धतीचा अभिमान बाळगा.इतरांशी तुलना करणे टाळा. प्रत्येक कुटुंब वेगळे असते. तुमच्यासाठी जे योग्य आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा.७. शांत करणाऱ्या दिनचर्या तयार करा.लहान सहान दिनचर्या स्थिरता देतात - एकत्र नाश्ता करणे, झोपण्यापूर्वी गोष्ट वाचणे यामुळे नातेसंबंध मजबूत होतात.८. रोज कृतज्ञतेचा सराव करा.दररोज एक-दोन गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा. कठीण दिवसांतही हे मन हलके करते.९. कौटुंबिक उपक्रम साधे ठेवा.मोठ्या कार्यक्रमांऐवजी साध्या गोष्टी करा - उद्यानात फिरणे, घरात खेळ खेळणे किंवा एकत्र स्वयंपाक करणे.१०. एकावेळी एक दिवस जगा.पालकत्व ही मॅरेथॉन आहे, शर्यत नाही. आजचा दिवस सांभाळा, गरज पडल्यास मदत घ्या आणि लहान, सुंदर क्षणांचा आनंद घ्या. मात्र चिडचिड, सतत थकवा, झोप न लागणे, डोकेदुखी, आजारपण अशी स्थिती कायम राहिल्यास मदत घ्या. सजग राहिल्यामुळे तुम्ही मुलांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता आणि नाते अधिक घट्ट होते. आवडीच्या गोष्टींसाठी थोडा वेळ काढा.पुरेशी झोप, पाणी आणि संतुलित आहार घ्या सामाजिक नाती जपा.पालकांचा तणाव मुलांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे मुले अस्वस्थ, चिंताग्रस्त किंवा वागण्यात बदल करणारी होऊ शकतात. म्हणूनच एक लक्षात घ्या की तुम्ही चुकीचे नाही आहात तुमच्या परीने तुम्ही मुलांसाठी सगळं काही चांगलंच करत आहात. तेव्हा अपराधाची भावना नको आणि तणाव तर मुळीच नको.
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील 'सहयोग' निवासस्थानी आयोजित जनता दरबारात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
Share Market Scam : शेअर मार्केटमधील नफ्याचं आमिष पडलं महागात; वाकडमधील रहिवाशाला १.५१ कोटींचा चुना
Share Market Scam : घरबसल्या गुंतवणुकीतून करोडोंच्या नफ्याचे स्वप्न दाखवून सायबर भामट्यांनी वाकडच्या रहिवाशाची १ कोटी ५१ लाखांची फसवणूक केली.
Bitcoin Fraud : ३१ लाखांचा ‘डिजिटल’डल्ला! आकुर्डीत बिटकॉइन गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक
Bitcoin Fraud : सायबर गुन्हेगारांचे नाव आणि नंबर उघड; आदिती मॅडम, शंतनू आणि अरुण रॉय यांच्याविरुद्ध निगडी पोलिसांची कारवाई सुरू.
कथा : रमेश तांबेहजार बाराशे वस्तीचं एक गाव होतं. गाव तसं सधन होतं. त्यांना त्यांच्या गावातल्या एका पुढाऱ्याचा पुतळा बनवायचा होता. म्हणून ते एका चांगल्या शिल्पकाराच्या शोधात होते. त्यासाठी त्यांनी गावाचं एक शिष्टमंडळ नेमलं होतं. एके दिवशी ते शिष्टमंडळ एका शिल्पशाळेत गेलं. तिथे अनेक मूर्ती, पुतळे ओळीने मांडले होते. ते पुतळे, तिथल्या मूर्ती खूपच छान होत्या. शिल्पकाराची कारागिरी बघून शिष्टमंडळ खूश झालं. त्यांनी ठरवलं की, याच शिल्पकाराला पुतळा बनवायला द्यायचं. मग दिवाणखान्यात दोघांची बोलणीसुरू झाली.शिष्टमंडळात, सरपंच, दोन प्रतिष्ठित गावकरी, शाळेचे मुख्याध्यापक अशी मंडळी होती. आता चर्चा सुरू झाली. कोणाचा पुतळा बनवायचा आहे. कशा पद्धतीनं बनवायचा आहे. हे हळूहळू ठरत होतं. किती फुटांचा हवा? कुठे बसवणार? इतकी सारी इत्थंभुत माहिती त्यांनी शिल्पकाराला पुरवली.शिल्पकार अगदी मन लावून ऐकत होता. शेवटी चर्चेची गाडी पैशावर आली. किती पैसे घेणार आपण? असं विचारल्यावर शिल्पकारानं कोणताही विचार न करता सरळ सांगून टाकलं की या पुतळ्याची मी पाच लाख रुपये बिदागी म्हणून घेणार. इतके पैसे ऐकल्यानंतर शिष्टमंडळातील अनेकांचे डोळे विस्फारले. त्यातला एक प्रतिनिधी अक्षरशः “काय एवढे पैसे!” असे ओरडलाच! त्यांच्याकडे पाहत शिल्पकार म्हणाले, “होय एवढेच पैसे मी आपणाकडून घेणार! त्यात एका पैशाची सूट मिळणार नाही.” शिष्टमंडळातला दुसरा सदस्य जमेल तितका गरीब भाव चेहऱ्यावर आणत शिल्पकाराला म्हणाला, “दादा काही पैसे कमी करता आले तर पाहा ना!” एक पुतळा बनवायचे एवढे पैसे कुणी घेतं का! शिल्पकार अगदी सावकाशीनं म्हणाले, “होय मी एवढेच पैसे घेतो. कारण एवढा मोठा पुतळा बनवायचा तर त्यासाठी भरपूर मेहनत असते. शिवाय वेळदेखील भरपूर लागतो. त्याचबरोबर मी माझे काम खूप कटाक्षाने चांगलेच करण्याचा प्रयत्न करतो.” पण शिष्टमंडळाचे सदस्य किंमत कमी करण्याचा आपला हेका काही सोडेनात. मग शिल्पकार सांगू लागला, “त्यात खूप काम असतं. त्यासाठी वेगवेगळी हत्यारे लागतात. खूप मेहनत असते. मदतीला अनेक माणसं लागतात.” एक सदस्य म्हणाला, “हे बघा शिल्पकार दादा, हवं तर आम्ही मदतीला माणसं देतो. काही हत्यारे लागतील ती आणून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण तुम्ही पैसे कमी करा!” शेवटी शिल्पकार म्हणाला, “नाही जमणार. माझ्या कामाचे मला पाच लाख रुपये मिळालेच पाहिजेत.” पण शिष्टमंडळ हट्टालाच पेटले, ते म्हणाले, “तुम्ही सांगा अजून तुमच्यासाठी आम्ही काय करू” मग शिल्पकार मोठ्या नम्रपणे म्हणाला, “मंडळींनो, खरंच हा पुतळा बनवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची माती लागते त्याशिवाय छान पुतळा तयार होत नाही.” तसा शिष्टमंडळातला एक उत्साही सदस्य लगेच म्हणाला, “दादा, आम्हाला सांगा कुठे मिळते ती माती. आम्ही लगेच ती घेऊन येऊ!” मग शिल्पकार हलकेच हसत म्हणाला, “अरे बाबांनो ही कला कमावण्यासाठी मी माझ्या आयुष्याची माती केली आहे. तेव्हा कुठे मला ही कला साध्य झाली आहे. त्यामुळे मला माझ्या कलेचं मूल्य मोजून घेतलंच पाहिजे!” शिल्पकाराचं बोलणं ऐकून सगळं शिष्टमंडळ अगदी गप्पच झालं!तर मित्रांनो, कोणतीही कला मिळवण्यासाठी आपल्याला आयुष्यभर कष्ट, मेहनत करावी लागते. झोकून देऊन काम लागतं. आयुष्याची माती करावी लागते. तेव्हा कुठे आपल्याला यश मिळतं. झाडांची मुळं स्वतःला गाडून घेतात जमिनीत, अंधार कोठडीमध्ये. तेव्हा पुढे झाड वाढतं. तसेच एखाद्या कलाकाराला आयुष्यभर कोंडून घ्यावं लागतं, मेहनत करावी लागते. समाजापासून दूर राहावं लागतं. नंतर पुढे त्याला ती कला प्रसन्न होते. पण आपल्यापैकी बरेच जण मात्र कोणतीही मेहनत न करता आपल्याला दैवी चमत्काराने कला प्राप्त होईल, याची आयुष्यभर वाट पाहत बसतात.
प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफमाझ्या माहितीप्रमाणे आपण सर्वांनीच कधीतरी आपल्या घरात किंवा शाळेत एक कथा ऐकलेली असते. कोणती? हा प्रश्न विचारून त्रास करून घेऊ नका. मीच तुम्हाला सांगते आणि तुम्हाला निश्चितपणे ती कुठे ऐकलेली आहे तेही कदाचित आठवेल!एक बेडकाचे पिल्लू डबक्याबाहेर खेळत होते. खेळता खेळता त्याच्या लक्षातच आले नाही की ते उड्या मारत डबक्यापासून खूप दूर गेलेले आहे. तिथे त्या बेडकाला एक मोठी आकृती दिसते. हो... म्हणजे तो एक प्राणी असतो. खरे तर त्या प्राण्याचे नाव म्हैस असते, पण बेडकाच्या पिल्लाने कधीच म्हैस पाहिलेली नसते त्यामुळे बेडकाचे पिल्लू त्या प्राण्याला पाहून घाबरते आणि बेडूक उड्या मारत आपल्या डबक्याकडे परतते. डबक्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या जीवात जीव नसतो. त्याची आई डबक्याबाहेर येऊन दूरदृष्टी ठेवून आपल्या पिल्लाची वाट पाहत असते. पिल्लू दिसताच ती पळतच सॉरी बेडूक उड्या मारत त्याच्यापर्यंत पोहोचते. पिल्लू धापा टाकत असते. आईला पाहिल्यावर पिल्लाला खूप आनंद होतो. आईला काय सांगू आणि काय नको असे त्या जीवाला होऊन जाते. आई ओरडत असते. कुठे गेला होतास? मी किती वाट पाहत होते... वगैरे वगैरे. पिल्लू आईला सांगतो, “मी एका वेगळ्या जगात गेलो होतो.” वेगळं जग म्हणजे काय हे आईला कळत नाही. ती विचारते, “म्हणजे कुठे रे? मला समजेल असं काहीतरी सांग.” मग पिल्लू म्हणतो, “मी आज एक प्राणी पाहिला. तो खूप मोठा होता. आई म्हणते, “थांब... मी तुला दाखवते. इतका मोठा होता का?” असे म्हणत ती आपलं पोट फुगवते. पिल्लू जोरात ओरडतो, “नाही...याच्याहून खूप मोठा होता.” आई आणखी पोट फुगवते परत तोच प्रश्न विचारते. पिल्लू परत परत, “नाही नाही... खूप म्हणजे खूप मोठा होता.” असे म्हणत राहतो आणि आई पोट फुगवत राहते आणि शेवटी तिचे पोट फुटते आणि ती मरून जाते.बेडकाच्या पिल्लाची आई कधीच या छोट्याशा डबक्याबाहेर गेलेली नसते त्यामुळे तिने कधीच असा कोणता मोठा प्राणी पाहिलेलाच नसतो... त्यामुळे शेवटी ती किती पोट फुगवणार? आणि किती पोट फुगवले तरी ती म्हशीएवढी थोडीच मोठी होणार? ही गोष्ट त्या बिचाऱ्या आईला कळत नाही आणि तिचा नाहक बळी जातो. आता यातून तुम्हाला कोणता संदेश मिळत आहे?आता मला जे सांगायचं आहे ते लक्षात घ्या. या बेडकाच्या पिल्लाच्या आईसारखे डबक्यात राहणारी असंख्य माणसे आपल्याला आसपास वावरताना दिसतात. आपण त्यांना काही सांगायला गेलो, तर ते त्यांचेच त्रोटक अनुभव आणि त्यांच्या तुटपुंजा विश्वाबद्दल बोलत राहतात. त्यांना त्यांची वैचारिक सीमा भेदून बाहेर जायचे नसते. त्यापेक्षा असेही म्हटले तरी चालेल की, त्यांची सीमा तेवढीच असते. त्याला ते तरी बिचारे काय करणार? कदाचित टीव्ही आल्यावर माणसांच्या थोड्याशा का होईना वैचारिक कक्षा रुंदावल्या. छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या माणसांनासुद्धा श्रीमंत माणसे कशी मोठ्या घरात राहतात... चकाचक गाड्यांमधून फिरतात... मॉडर्न कपडे घालतात... मराठी बोलताना खूप इंग्रजीही बोलतात, हे सगळं माहीत होऊ लागलेले होते, पण आता तर सोशल मीडिया आल्यावर आणि प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल आल्यावर देशविदेशातील माणसांचे जगणे त्यांना छोट्याशा चौकटीत दिसू लागले आहे. एखादे पोटाच्या आतले ऑपरेशन असो किंवा मेंदूचे, साबुदाण्यासारखा पदार्थ बनवण्याची प्रक्रिया असो किंवा रणगाडे बनवायची फॅक्टरी असो हे पाहता जणू काही माणसे मोठ्या प्रमाणात ज्ञानी होऊ लागली आहेत. अगदी सहज ते एकमेकांना सल्ले देतात. कधी कधी प्रवास करताना जेव्हा बिनओळखीची दोन माणसे एकमेकांशी बोलत असतात ते पाहणे आणि त्यांना ऐकणे हा सुद्धा माझ्यासाठी गमतीचा भाग होऊन जातो. म्हणजे एकदा असे झाले की, लोकलच्या माझ्या समोरच्या सीटवर बसलेल्या एका माणसाने दुसऱ्या माणसाला विचारले, “तुम्हाला गरगरतंय का? मग मानेच्या मागे एक फटका मारा.” असे म्हटल्याने तो बिनओळखीचा माणूस स्वतःच्या मानेवर आरामात फटका मारून घेतो. काय म्हणायचे?आजकाल अशी ज्ञानी माणसे दुसऱ्यांच्या आयुष्याचे सोने करण्याच्या जणू तयारीतच असतात; परंतु त्यांच्या पद्धतीने जेव्हा समोरचा माणूस वागायला लागतो तेव्हा त्याच्या आयुष्याची मातीसुद्धा तितक्याच सहजपणे होते. तेव्हा ज्ञानी माणूस, “मला तरी कुठे याचा अनुभव आहे? मी हे यूट्युबवर पाहिले आणि तुम्हाला सांगितले.” म्हणून मोकळा होतो. असो. तर आपला मुख्य विषय काय आहे, तर डबक्यातील बेडूक. खरोखरी आपण आपले विश्व सोशल मीडियाद्वारे निश्चितपणे विस्तारात आहोत याबद्दल शंकाच नाही; परंतु आपण बसल्या जागेवरून फक्त विश्व न्याहाळतोय. तर थोडीशी हिंमत करू या आणि डबक्याबाहेर पडू या! खऱ्या अर्थाने वैश्विक होऊ या!pratibha.saraph@ gmail.com
गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर“मोठी त्याची सावली” म्हणजे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, कार्य, विचार किंवा कर्तृत्व इतके प्रभावी असते की त्याचा परिणाम इतरांवर दीर्घकाळ जाणवतो. सावली ही नेहमी आपल्यासोबत असते - त्याचप्रमाणे त्या व्यक्तीचे संस्कार, शिकवण किंवा कार्य समाजावर कायम प्रभाव टाकत राहते. मोठी सावली हे एखाद्या महान व्यक्तीच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहे. जसा एखादा विशाल वृक्ष आपल्या सावलीत अनेकांना आसरा देतो, तशीच महान माणसे आपल्या विचारांनी, कार्याने आणि संस्कारांनी समाजाला आधार देतात. त्यांच्या कर्तृत्वाची सावली पुढील पिढ्यांवरही कायम राहते. ज्या व्यक्तीचे विचार, आचरण आणि कार्य मोठे असते, त्याची सावलीही मोठी असते. येथे सावली हा शब्द प्रतीकात्मक अर्थाने वापरलेला आहे. हे लक्षात घ्या. व्यक्तीच्या चांगल्या गुणांचा, संस्कारांचा आणि कर्तृत्वाचा समाजावर पडणारा प्रभाव म्हणजे त्याची “मोठी सावली” होय.आपल्या जीवनात आई-वडील, गुरुजन, समाजसेवक, राष्ट्रपुरुष यांची सावली आपल्यावर असते. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा परिणाम आपल्या वर्तनात दिसून येतो. उदाहरणार्थ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिक्षणाच्या आणि समतेच्या विचारांची सावली आजही समाजाला मार्गदर्शन करते. त्यांच्या कार्याची उंची मोठी असल्यामुळे त्यांची सावलीही विशाल आहे. मोठी सावली असण्यासाठी व्यक्तीचे चारित्र्य स्वच्छ, विचार उच्च आणि कृती निःस्वार्थी असावी लागते. फक्त पद, पैसा किंवा प्रसिद्धी यामुळे सावली मोठी होत नाही; तर समाजहितासाठी केलेले कार्य, प्रामाणिकपणा आणि सातत्य यामुळे व्यक्तिमत्त्व उजळते. ज्या झाडाची वाढ भक्कम आणि उंच असते, त्याची सावली अधिक पसरते. त्याचप्रमाणे ज्या माणसाचे व्यक्तिमत्त्व उंच आणि व्यापक असते, त्याचा प्रभावही दूरवर पोहोचतो.आजच्या काळात आपण चांगल्या व्यक्तींच्या सावलीत राहून योग्य संस्कार आत्मसात करणे गरजेचे आहे. चांगले विचार, कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे प्रत्येक जण स्वतःची सावली मोठी करू शकतो. समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती ठेवली, तर आपले जीवन अर्थपूर्ण ठरते. “मोठी त्याची सावली” म्हणजे मोठ्या मनाचा, उच्च विचारांचा आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीचा व्यापक प्रभाव होय. आपणही आपल्या कर्तृत्वाने आणि सद्गुणांनी अशी मोठी सावली निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.एक लहान मुलगा शिक्षणासाठी आपल्या मावशीच्या घरी राहायला आला. तो शाळेत जाऊ लागला. मित्रांबरोबर हिंडू-फिरू लागला. पण म्हणतात ना एखाद्याच्या संगतीने एकमेकांत, एकमेकांचे गुणदोष उतरतात. थोडक्यात, ‘ढवळ्याशेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला.’ या छोट्या मुलांमध्ये मित्रांचे गुणदोष दिसू लागले. काही चांगले तर काही वाईट. तो एके दिवशी आपल्या मित्रांबरोबर आमराईत आंबे पाडण्यासाठी गेला. मित्रांनी त्याला आग्रह करून आंब्याच्या झाडावर चढवले. तो आंबे पाडू लागला. इतर जण ते गोळा करू लागले. इतक्यात त्यांना रखवालदार येत असल्याची चाहूल लागली. आंबे वेचणारी सर्व मुले पळून गेली. मात्र झाडावर चढलेला त्या मुलाला पटकन उतरता आले नाही. तो रखवालदाराच्या हाती सापडला. रखवालदाराने त्याचा हात पकडून त्याच्या गालात एक चपराक ठेवून दिली आणि परत मारण्यासाठी हात उगारला. तेव्हा तो मुलगा कळवळून रखवालदाराला म्हणाला, “काका, काका मला मारू नका हो, मला वडील नाहीत.” मी तुमच्या पाया पडतो. रखवालदार त्याला म्हणाला, “वडील नाहीत ना. मग असं वागू नकोस.”या एका प्रसंगाने त्या मुलाच्या मनाचे परिवर्तन झाले. तो खूप शिकला. खूप मोठा झाला. इतकेच नव्हे तर हाच मुलगा भारताचा पंतप्रधान झाला. त्या मुलाचे नाव होते, लालबहादूर शास्त्री. ज्यांनी आपल्याला ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा दिली. म्हणतात ना ‘मूर्ती लहान, पण कीर्ती महान.’तात्पर्य : चांगल्या सवयी आपल्याला योग्य दिशेने नेतात.विचार : सत्कृत्यांची वर्णने सुवर्णाक्षरांनी लिहिली जातात.
मनस्वीनी : पूर्णिमा शिंदेपर्यावरणाचा ध्यास, निसर्ग त्याचं एक सुंदर आनंददायी, स्फूर्तिदायी प्रतीक. मनाला ताजतवानं करणारा स्वर्गच म्हणावा लागेल. आत्मबळ वाढवून कार्यगती शक्तीला ऊर्जा देणारे. निसर्ग म्हणजे प्रकृती, प्रवृत्ती, पर्यावरण, हिरवळ, हिरवाई, ऋतू, अवतीभोवतीच्या परिस्थितीवर अधिराज्य करणारी दैवी योजना. दैवी शक्ती. पण हाच निसर्ग दैवी योजनेनुसार नाही, तर मानवाच्या हाताने उन्मळून पडत आहे. उपटून, मिटवून टाकला जात आहे. निसर्गतः उगवणारा स्वयंभू पिंपळ असेल, वड, आंबा, तुळस, औदुंबर, बेल, अशोक अशा अनेक उपयुक्त जडीबुटींचा आपण ऱ्हास करू लागलो आहोत. केवळ मानवी स्वार्थापोटी कुठे रस्ता हवा, वाट हवी तर कुठे बंगले, कुठे सिमेंटचे काँक्रिटीकरण, कुठे मोठमोठे मनोरे, टॉवर उभारले जात आहेत. त्यामुळे मानवी स्वार्थापोटी नदी-नाले, खाड्या, तलाव मिटवले जात आहेत. पाण्याचे स्त्रोत संपवले जात आहेत. जेव्हा जेव्हा असे होते तेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास होतो. अधिकाधिक हानी होते. निसर्ग म्हणजे धन आहे. खनिज संपत्ती, लाकूड, रेती, वाळू, माती, चिरे, विटा, पाषाण सारे काही लुप्त होत चालले आहे. तसे पाहिले तर निसर्ग दातृत्वाने विशाल आहे. बघा ना. शहाळेचं पाणी मधुर. आंबा, काजू, फणस, संत्री, ऊस, केळी, पेरू, चिकू, सीताफळ, रामफळ प्रत्येक फळाची चवही अतिशय वेगळी, रसाळ, मधाळ आणि त्याचे वेगळेपण ही दैवी किमयाच नाही का?चिंच, आवळा, बोरं, रातांबा अशी अनेक नावे काढताच आपल्या तोंडाला पाणी सुटते ना, त्याचा विचार, चव, आठवण जिभेवर रेंगाळून जाते. तशी सर्व फळे असतात वैविध्यपूर्ण. फुलांचेही तसेच आहे. गुलाब, जास्वंदी, जाई, जुई, मोगरा, चमेली, कमळ, चाफा, अबोली, नेवाळी, सोनचाफा, रजनीगंधा, गुलछडी, केतकी, बकुळ, पारिजात, लीली, अष्टर, झेंडू, शेवंती, केवडा अशा किती किती! फुलांच्या रंगसंगती आणि रंगीतता, विविधता त्याचा सुवासिक वेगळेपणा ही देखील निसर्गाची किमयाच म्हणावी लागेल. अद्वितीय निसर्गाचा अविभाज्य भाग बनलेली या फुलांच्या सजावटीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानवी जीवनातील प्रत्येक धार्मिक विधी त्यात सांस्कृतिक सोहळे, सामाजिक संस्कार, मुंज, बारसे, डोहाळे जेवण, लग्न, वाढदिवस, मृत्यूपर्यंत. ही फुलांची उपयुक्तता रांगोळी, देवपूजा आणि मानवाची पूजा यासाठी अनन्यसाधारण आहे. तरीही आपण ही झाडे तोडतो, काय सांगायचं. ही निसर्गाची देणगी आहे, औषधी गुणवत्ता आहे. गुणकारी औषधी गुणधर्म आहेत, धन्वंतरी, संजीवनी बुटी, शतावरी अश्वगंधा, जटामासी ज्येष्ठमध, ओवा, सब्जा, तुळस, गोखरू, हिरडा, पानफुटी, दगडी पाला, आघाडा, दुर्वा, कोरफड, चंदन अशा अनेक विविध गुणधर्मीय वनस्पतींना आपण आजीबाईचा बटवा असे म्हणतो. पूर्वीच्या काळी जरा पोट दुखलं की आपण ओवा खायचो. लघवी साफ झाली नाही तर गोखरुचं पाणी प्यायचो. जुलाब होत असेल तर हिरडा. मुतखडा झाला असेल तर दगडी पाला. चेहऱ्यासाठी चंदन पावडर. काळे वांग असेल तर कोरफड. केसांसाठी मेहंदी आणि कढीपत्ता, जास्वंदाचे मिश्रण करून तेल बनवलं जातं. तेल, खनिज, संपत्ती या अशा अनेक उपयुक्तता या निसर्गाच्या संपत्तीत दडलेल्या आहेत. पण माणूस निव्वळ स्वार्थीपणाने निसर्गाचा ध्यास घेण्याऐवजी पर्यावरणाचा ऱ्हास करू लागला आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचऱ्यासाठी वापर करून आज गाई-म्हशींच्या खाण्यातून पोटात जाऊन प्लास्टिकच्या पिशव्यातर येणारं दूध सुद्धा पौष्टिक मिळणार नाही आणि तिच्या पोटामध्ये तो प्लास्टिक कधीच नष्ट होणार नाही. जनावरांना हानिकारक आहे. ओल्या कचऱ्याचा वेगळा साठा करून खतासाठी जर त्याचा उपयोग केला, तर अधिकाधिक उत्तम पीक तयार होईल. शेणखता इतकीच त्याची उपयुक्तता आहे. काही सुवासिक फुलं, औषधी वनस्पतीमुळे होमिओपॅथीची औषधे तयार होतात. आयुर्वेदाचे औषधे तयार होतात, तर काही ठिकाणी सेंट किंवा तरी तयार होतात. सुवासिक परफ्युम तयार होतात.निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यानंतर झाडे आपल्याशी बोलतात. झाडे, ते ऑक्सिजन पुरवठा करतात. आपली चिंता मिटते, प्रसन्न वाटू लागते. मन प्रसन्न झाले, तर शरीराला देखील ऊर्जा मिळते. निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यामुळे हिरव्यागार वनराईमध्ये आपण आपलं दुःख विसरून. एकांतात सहज स्वच्छंदी मनमुराद जगू शकतो. नवी नवी जगण्याची प्रेरणा आणि कारण मिळू शकते. पुन्हा उभारी मिळू शकते, मनाला आत्मबळ मिळू शकतं, हे सर्व निसर्गाच्या सान्निध्यात करायचे असेल, तर आपण लाकूडतोड बंद केली पाहिजे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी केला पाहिजे. पाण्याचे स्त्रोत बुजवणे कमी केले पाहिजे. पाण्याचा संचय केला पाहिजे. पाणी वाया जाऊ देता कामा नये. थेंबा थेंबाचा वापर चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. ही संजीवनी बुटी असल्याने फुलं, फळं, झाडे, पाणी, खनिज संपत्ती साठा हे निसर्गधन बेताने वापरायला हवं. त्या निसर्गाचा आणि पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये, तर पर्यावरणाचा ध्यास घ्या, रोज झाडांना पाणी द्या, वाढवा, संगोपन करा. वाढदिवसाला झाडे भेट द्या. सांस्कृतिक सोहळे, समारंभ, बैठका, मेळावे यामध्ये मोठे मोठे पुष्पगुच्छ न देता झाडांची भेट द्यावी. जेणेकरून अविस्मरणीय प्रसंग स्मरणात राहील आणि त्या झाडाबरोबर आपली माया वृद्धिंगत होत जाईल. झाडे लावा, झाडे जगवा. पाण्याच्या थेंबा थेंबाचा संचय करा. प्लास्टिकचा वापर टाळा. रोगराई टाळा. लाकूडतोड थांबवा. अशा पद्धतीने आपण आपल्या जवळच्या प्रत्येकाला, नागरिकाला जबाबदारीने कर्तव्याचे पालन करण्याची विनंती करू या. चला पर्यावरणाचा ध्यास घेऊ या.पर्यावरण संतुलन, संवर्धन आणि जतन करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्यच आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा तरच ही सृष्टी, पृथ्वी वाचेल आणि आपणही वाचू शकतो किंवा आपल्या बचाव होईल.
Fake Security Agencies : 'जागते रहो' म्हणणाऱ्या पोलिसांच्या सूचनांचे सोसायट्यांकडून उल्लंघन; पुन्हा एकदा गस्त वाढवण्याची मागणी.
Leopard Sightings : बोरघाटात बिबट्याच्या बछड्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Leopard Sightings : बोरघाटातील जंगल परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, लहान मुले आणि एकट्या प्रवाशांनी रात्री घराबाहेर न पडण्याच्या सूचना वनविभागाने दिल्या आहेत.
Alandi News : माजी मंत्री बबनराव घोलप आणि नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या उपस्थितीत रंगला जयंती सोहळा; संतांच्या समता आणि बंधुत्वाच्या विचारांवर मान्यवरांनी टाकला प्रकाश.
कथा :प्रा. देवबा पाटीलशाळा सुटली आणि सीता व नीता लगबगीने घरी आल्या. आज त्यांची मावशी त्यांना आपले वर्ष कसे होते हे सांगणार होती.‘वर्ष कसे मोजतात मावशी?’ नंतर सीताने प्रश्न केला.‘आणि मावशी ते लीप वर्ष काय असते गं?’ नीताने सीताच्या प्रश्नात आणखी भर टाकली.पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात. वास्तविकत: पृथ्वी ३६५ दिवसांऐवजी तंतोतंत ३६५.२५ दिवसांत सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते म्हणून ३६५ दिवसांच्या कालावधीला एक वर्ष म्हणतात. ख्रिश्चन कालगणनेनुसार वर्षाचे ३६५ दिवस करण्यासाठी इंग्रजी ७ महिने ३१ दिवसांचे, ४ महिने ३० दिवसांचे व फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा ठरवला आहे; परंतु दरवर्षी ०.२५ दिवस म्हणजेच त्या वर्षातील ६ तास शिल्लक राहतात. हा दरवर्षीचा जास्तीचा पाव दिवस भरून काढण्यासाठी दर वर्षीचे ६ तास याप्रमाणे दर ४ वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस जास्तीचा धरतात म्हणजे दर ४ वर्षांनी फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांऐवजी २९ दिवसांचा असतो. म्हणजे त्या वर्षात ३६६ दिवस होतात. म्हणून दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिना २९ दिवसांचा असतो. अशा वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात आणि विशेष म्हणजे ज्या इसवी सन वर्षाला ४ ने पूर्ण भाग जातो ते लीपवर्ष ठरविण्यात आले आहे आणि त्याच वर्षात फेब्रुवारी महिन्याचे २९ दिवस येत असतात. उदा. आता २०२४ हे लीपवर्ष होऊन गेले. आता पुढील लीपवर्ष हे २०२८ असेल. मावशीने सविस्तर माहिती सांगितली.‘हो का गं मावशी.’ दोघीही उत्तरल्या. ‘हो.’ मावशी म्हणाली, ‘पुढे ऐका, फिरताना पृथ्वीचा आस किंचितसा कलता म्हणजे झुकता असतो. अशारीतीने स्वत:भोवती व सूर्याभोवती फिरताना पृथ्वीचा काही भाग थोडा थोडा सूर्याकडे येतो व त्यावर सूर्याचा प्रकाश पडतो त्यालाच त्या भागातील ‘दिवस’ उजाडला असे म्हणतात. त्याचवेळी त्या भागाच्या विरुद्ध सूर्याकडे नसलेला पृथ्वीचा मागील भाग हा सूर्यापासून हळूहळू थोडा थोडा दूर जात असल्याने त्यावरील प्रकाश हळूहळू कमी कमी होत जातो व तेथे हळूहळू अंधार पडू लागतो. त्या विरुद्ध भागावर सूर्याचा प्रकाश मुळीच न पडल्याने त्या भागात पूर्णपणे अंधार होतो. त्यालाच त्या भागात ‘रात्र’ झाली असे म्हणतात.’मावशी पुढे सांगू लागली, “पृथ्वीच्या या भ्रमंतीमुळे उजेडाच्या भागात सकाळी आपणास हळूहळू सूर्य उगवताना दिसतो, भर दुपारी पृथ्वी सूर्याच्या बरोबर समोर आल्याने सूर्य डोक्यावर दिसतो आणि संध्याकाळी उजेडाचा भाग सूर्यापासून जसजसा मागे मागे, दूर दूर जातो तसतसा आपणास सूर्य मावळताना दिसतो. हळूहळू उजेड कमी कमी होऊन संधिप्रकाश पडतो व त्यानंतर काळोख पसरायला लागतो. उजेड्या भागात ज्यावेळी काळोख पडायला लागतो त्यावेळी आधीचा मागील अंधारा भाग हळूहळू थोडा थोडा, पुढे पुढे सूर्याकडे यायला लागतो व त्या अंधाऱ्या भागावर हळूहळू सूर्याचा थोडा थोडा प्रकाश पडायला लागतो, म्हणजेच उजाडायला लागते नि तेथे सूर्य उगवताना दिसतो.”“मग सूर्योदय व सूर्यास्त कसा होतो?” नीताने विचारले “सूर्योदय म्हणजेच सूर्याचे उगवणे आणि सूर्यास्त म्हणजे मावळणे. रात्रीनंतर सकाळी पृथ्वीचा जो भाग हळूहळू सूर्यप्रकाशात येऊ लागतो तेव्हा तेथे सूर्य हळूहळू क्षितिजाखालून वर येताना दिसतो त्यालाच सूर्योदय म्हणतात, तर दिवसानंतर सायंकाळी ज्या भागात सूर्य हळूहळू क्षितिजाखाली जाऊ लागतो तेव्हा त्याला सूर्यास्त होतो आहे असे म्हणतात. असा एका सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दिवस असतो, तर सूर्यास्तापासून दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंत रात्र असते.” मावशीने सांगितले. इतक्यात त्यांना आईने आवाज दिला व त्यांची चर्चा थांबली.
Talegaon Dabhade : अधिकारी धारेवर, नगरसेवक आक्रमक! नगरपरिषदेच्या सभेत नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
Talegaon Dabhade : शहरातील वाहतूक कोंडी आणि अपूर्ण विकासकामांवरून सभेत जोरदार खडाजंगी; नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांच्या उपस्थितीत ६ तास चालली वादळी चर्चा.

34 C