आज 22 एप्रिल रोजी वसुंधरा दिन (Earth Day) साजरा केला जातो. आज निसर्गाच्या सान्निध्यात राहून हा दिवस साजरा करा. निसर्ग जसा आपला आहे तसा पशुपक्षी आणि इतर जीवांचाही आहे.
दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २२ एप्रिल २०२६
पंचांगआज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४८ षष्ठी.चंद्र नक्षत्र कृतिका. योग आयुष्यमान चंद्र राशी वृषभ भारतीय सौर २ वैशाख शके १९४८. बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.१६ मुंबईचा चंद्रोदय ०७.४०, मुंबईचा सूर्यास्त ०६.५७ मुंबईचा चंद्रास्त ०९.११ राहू काळ ०९.२६ ते ११.०२.श्री नृसिंह नवरात्र आरंभ चांगला दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
Borivali : बोरीवलीतील पंजाबी गल्लीतील डायग्नोस्टीक सेंटर खासगी संस्थेकडे
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्यावतीने अनेक रुग्णालये खासगी संस्थांना चालवण्यास देण्याचा निर्णय घेतला असून त्यातील बोरीवली पश्चिम येथील पंजाबी गल्लीतील महानगरपालिकेच्या मालकीच्या पंजाबी गल्ली डायग्नोस्टिक्स सेंटर हे आता खासगी संस्थेला चालवण्यास देण्यात येणार आहे. यासाठी क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेड या कंपनीला चालवण्यास देण्यात येणार आहे. खासगी सहभाग तत्त्वावर या संस्थेची निवड महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.महानगरपालिकेच्या मालकीचे बोरीवली पश्चिम येथे पंजाबी गल्ली डायग्नोस्टिक्स सेंटर हे प्लॉट क्र. एफपी नं. ११या ठिकाणी असून तळमजला अधिक दोन मजले अशी एकूण २९८३.१४ चौ. मिटर इतक्या क्षेत्रफळाची जागा बांधून तयार आहे. या ठिकाणी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर या जागेवर बाह्य रुग्ण विभाग, विविध तपासण्या व चाचण्यासाठी प्रयोगशाळा, डायलेसिस केंद्र, सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन महानगरपालिकेने निश्चित केलेल्या व महानगरपालिकेच्या रुग्णांना सध्या लागू असलेल्या दराने सुरू करण्यात येणार आहे.क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेड संस्थेला, सर्वसामान्य तसेच अत्याधुनिक बाह्य रुग्ण आणि ओटीपीटी विभाग, मूलभूत सोनोग्राफी आणि मेमोग्राफी (पॅथोलॉजी आणि रेडिओलॉजी) निदान सेवा, सी.टी. आणि एम.आर.आय. स्कॅन ह्या सेवा सुविधा सुरू करण्याकरिता नेमणूक करण्यात आली आहे. पुढील ३० वर्षांकरता या संस्थेची निवड करण्यात आली आहे. यासाठी सस्थेला देण्यात येणाऱ्या जागेसाठी प्रत्येक वर्षी २ कोटी ०५ लाख रुपये एवढे अधिमुल्य आकारले जाणार आहे.बोरीवली या क्षेत्रात पूर्व आणि पश्चिम विभाग मिळून जवळपास २० लाख लोकवस्ती असून यासाठी बोरीवली येथे भगवती रुग्णालयात ११० खाटांचे रुग्णालयात सुरू आहेत. या रुग्णालयात बाह्य रुग्णविभाग, विविध तपासण्या व चाचण्यासाठी सर्व सामान्य तसेच अत्याधुनिक प्रयोगशाळा, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय स्कॅन या विविध सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. नजीकच्या काळात बोरीवली (पश्चिम) येथे ४९० रुग्णशय्या असलेले नव्याने भगवती रुग्णालय सुरू होणार आहे. परंतु तोपर्यन्त स्थानिक लोकांना कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल व्हावे लागतात. या रुग्णालयात डहाणू, ठाणे, वसई-विरार, मिरा-भायंदर या परिसरातील रुग्ण तसेच गोराई, दहिसर, कांदिवली, बोरीवली येथील स्थानिक रुग्णपण उपचारासाठी दाखल होतात. या सुविधा महानगरपालिकेतर्फे देण्यासाठी आवश्यक ते डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी वर्ग यांची नेमणूक करावी लागते व त्यांच्या आस्थापनेसाठी कायम स्वरूपी खर्च करावा लागतो. वरील उपाय म्हणून सद्यस्थितीत ही या संस्थेची निवड करुन त्यांना जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज! ‘हा’मॅचविनर खेळाडू संघात परतला
आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सुरुवातीला यश मिळाले होते, पण त्यानंतर सलग चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. मात्र, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईने दमदार पुनरागमन केले.
Tushar Doshi : तुषार दोशी पुन्हा अडचणीत? नव्या कारनाम्याने पोलीस दलात खळबळ
Tushar Doshi : सांगलीचे नूतन एसपी तुषार दोशी यांनी साताऱ्यातून बदली होताना नियमबाह्य बदल्या केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
Latur News : लातूरमध्ये उष्माघाताचा तीव्र झटका; शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना उष्माघाताचा तीव्र झटका बसला, जो त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे.
'स्थानिक माथाडी भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य द्या'
मुंबई :राज्यात कुठल्याही आस्थापनेत माथाडी कामगारांची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात प्राधान्य द्यावे, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले. मंत्रालयात दापिवली (ता पनवेल जि. रायगड) येथील मे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या आस्थापनेत स्थानिक माथाडी कामगारांना माथाडी स्वरूपाचे काम मिळण्याबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. बैठकीला आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच.पी तुम्मोड, उपसचिव स्वप्नील कापडणीस, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अधिकारी, माथाडी बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर म्हणाले, स्थानिक भूमिपुत्र माथाडी कामगारांना रोजगाराच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या शासन निर्णयाप्रमाणे ८० टक्के भूमिपुत्रांना रोजगार दिला पाहिजे. या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी. बीपीसीएल कंपनीने आपल्या मालवाहतूकदारांच्या माध्यमातून नवीन माथाडी कामगारांची मागणी करावी. ही मागणी माथाडी बोर्डाने तत्काळ मान्य करीत नवीन स्थानिक माथाडी भूमिपुत्रांना रोजगार द्यावा. तसेच अशा कंपन्यांना माथाडी बोर्डाकडे माथाडी कामगारांची मागणी करण्यासाठी नोंदणी करण्याची तरतूद करण्यात यावी.स्थानिकांवर अन्याय होऊ नये किंवा त्यांना रोजगाराच्या संधींपासून डावलले जाऊ नये. स्थानिकांना डावलल्यास ही बाब कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही कामगार मंत्री फुंडकर यांनी दिला. स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेता, कंपन्यांशी तातडीने समन्वय साधावा. नियमानुसार स्थानिक तरुणांना रोजगारात सामावून घेण्यासाठी जे प्रयत्न आवश्यक आहेत, ते प्राधान्याने करावेत, असेही कामगार मंत्री यांनी सांगितले.
Mumbai : मौलाना शौकत अली मार्गावरील अनधिकृत फर्निचर विक्रेत्यांवर कारवाई, चालवला बुलडोझर
मुंबई(विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्या ‘ई’ विभाग अंतर्गत मौलाना शौकत अली मार्गावरील जुने फर्निचर विक्रेत्यांवर तसेच इतर अतिक्रमणांवर महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाकडून कारवाई करण्यात आली. उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात आणि सहायक आयुक्त आनंद कंकाळ यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.‘ई’ विभागातील मौलाना शौकत अली मार्गावर विशेषत: मुरली देवरा नेत्र रूग्णालयापासून ते जे. जे. रुग्णालय सिग्नलपर्यंतच्या परिसरात अतिक्रमण झाल्यामुळे पादचा-यांना चालताना अडथळा निर्माण होत होता. पादचा-यांना रस्त्यावरून चालावे लागत होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागातील परिरक्षण आणि अतिक्रमण निर्मूलन पथकांनी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने संयुक्तपणे मोहीम राबवली.या कारवाईदरम्यान फर्निचर विक्रेत्यांवर धडक व कठोर कारवाई करण्यात आली. पदपथांवर अस्ताव्यस्त पसरलेले जुने फर्निचर जेसीबीच्या सहाय्याने जागेवरच नष्ट करण्यात आले. त्याचबरोबर तोडलेल्या फर्निचरांचा कचरा तात्काळ हटविण्यात आला. पदपथावरील सर्व अतिक्रमणे दूर करण्यात आली. तसेच परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.या मोहिमेत १ जेसीबी, ४ मजूर, ३ अधिकारी आणि २ अभियंते सहभागी होते. तसेच, नागपाडा पोलीस ठाण्याचे ९ अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. दरम्यान, अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात नियमितपणे कारवाई सुरू राहील, असे महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाद्वारे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येत आहे.
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा आता दुसऱ्या टप्प्यात आली असताना सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma Record) याला अप्रतिम सूर गवसला आहे.
Masur News : कराड तालुक्यातील मसूर येथे २१ एप्रिल रोजी अन्नसुरक्षा विभागाने सागर पान शॉपवर कारवाई करून ७८,९६६ रुपयांचा गुटखा जप्त केला.
Maharashtra Rain Alert : उन्हाच्या तडाख्यात पावसाची हजेरी.! राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
एकीकडे उन्हाचा चटका वाढत असतानाच, दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धास्ती वाढवली आहे.
John Ternus : अॅपलचे सीईओ टिम कुक पायउतार होणार; जॉन टर्नस सूत्रे घेणार हाती
आयफोन बनवणार्या अॅपलने कंपनीतील मोठ्या फेरबदलाची घोषणा केली आहे. सीईओ टिम कुक पायउतार होणार असून ते दीर्घकाळ हार्डवेअर प्रमुख असलेल्या जॉन टर्नस (John Ternus) यांच्याकडे सूत्रे सोपवणार आहेत.
Ashok Kharat : भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात.! अशोक खरात विरोधात ‘हा’गुन्हा दाखल
इतर गुन्ह्यांच्या संदर्भात आधीच पोलीस कोठडीत असलेल्या खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Reva Diamond : रेवा डायमंडची अक्षय्य तृतीयेला जोरदार विक्री; महसूलात वार्षिक पातळीवर 2.67 पट वाढ
पु ना गाडगीळ आणि सन्स समूहाच्या 190+ वर्षांच्या परंपरेचा वारसा लाभलेल्या रेवा डायमंड (Reva Diamond) या प्रमाणित नैसर्गिक डायमंड ज्वेलरी ब्रँडने, यंदाच्या अक्षय्य तृतीया (19 एप्रिल 2026) निमित्त उत्कृष्ट विक्री कामगिरी नोंदवत आर्थिक वर्ष 2026-27 ची दमदार सुरुवात केली आहे.
Devendra Fadnavis : पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्या.! मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश
पालखी मार्गावरील विकास कामे पूर्ण करण्यात येत असून यावर्षी वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे.
बिहारमधील एका अपक्ष खासदाराच्या वक्तव्याने संपूर्ण राजकारण तापलं आहे. नुकताच त्यांनी राजकारणातील महिला आणि त्यांच्या वर्तनाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा संपूर्ण देशातून विरोध केला जात आहे. याप्रकरणी बिहार राज्य महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली असून आयोगाने खासदाराकडून त्यांच्या विधानाचे स्पष्टीकरण मागवले आहे.जाणून घ्या नेमकं प्रकरण :बिहारचे पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी राजकारणात कार्यरत असलेल्या महिलांसंदर्भात अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांनी असा दावा केला आहे की, तडजोडीशिवाय देशाच्या राजकारणात महिलांना पुढे जाणे जवळजवळ अशक्य झाले आहे आणि त्यांच्या सुरक्षेला गांभीर्याने घेतले जात नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना पप्पू यादव म्हणाले की, भारतीय समाजात महिलांना देवी मानले जात असले तरी, वास्तव याच्या अगदी उलट आहे.पप्पू यादव यांच्या मते, राजकारणातील बहुतेक महिला आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात प्रभावशाली लोकांच्या वैयक्तिक वर्तुळातून करतात. त्यांनी असा आरोप केला की, सत्तेच्या वर्तुळात महिलांचे शोषण खोलवर रुजलेले आहे. पप्पू यादव म्हणाले की, कटू सत्य हे आहे की ९०% महिलांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही राजकारण्यांच्या बिछान्यातूनच होते. एखाद्या प्रभावशाली नेत्याच्या खोलीत प्रवेश केल्याशिवाय महिला राजकारणात येऊ शकत नाहीत.https://prahaar.in/2026/04/19/dmk-and-congress-did-not-allow-womens-reservation-bill-to-be-passed-amit-shah/या प्रकरणाची स्वतः दखल घेऊन, बिहार राज्य महिला आयोगाने खासदार पप्पू यादव यांना त्यांच्या वक्तव्यासंदर्भात नोटीस बजावली असून त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांना तीन दिवसांच्या आत नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे.मोठ्या संख्येने राजकारणी अश्लील गोष्टी पाहतात :पुढे बोलताना पप्पू यादव यांनी राजकारण्यांच्या चारित्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, संसद आणि राज्य विधानसभांमधील अनेक प्रतिनिधी महिलांना आदराने वागवत नाहीत. ते असेही म्हणाले की, मोठ्या संख्येने राजकारणी अश्लील गोष्टी पाहतात आणि याची पडताळणी करण्यासाठी त्यांच्या मोबाईल फोनची तपासणी केली पाहिजे.https://prahaar.in/2026/04/18/defeat-of-the-nari-shakti-vandan-adhiniyam-is-an-insult-to-women/नारी शक्ती वंदन कायदा म्हणजे फक्त एक राजकीय खेळी :पप्पू यादव यांनी महिला आरक्षणाबाबतच्या केंद्र सरकारच्या हेतूंवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, याला केवळ एक राजकीय खेळी म्हटले आहे. त्यांनी नारी शक्ती वंदन कायद्याला केवळ एक राजकीय खेळी म्हटले आणि सरकारकडे पूर्ण बहुमत असताना हा कायदा आधी का आणला नाही, असा प्रश्न विचारला. त्यांच्या मते, या कायद्यात मागासवर्गीय, अत्यंत मागासवर्गीय, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक महिलांसाठी स्वतंत्र तरतुदींचा समावेश असलाच पाहिजे, अन्यथा त्याचे फायदे केवळ श्रीमंतांपुरतेच मर्यादित राहतील.
Kerala Massive Explosion : फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू
केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील मुंडाथिकोड गावात फटाक्यांच्या गोदामात भीषण आग आणि स्फोटाची घटना घडली आहे. या दुर्घटनेत किमान ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना वडक्कनचेरी नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या मुंडाथिकोड गावात घडली. येथे आगामी २६ एप्रिल रोजी होणाऱ्या प्रसिद्ध त्रिशूर पूरम उत्सवासाठी फटाके आणि कच्चा माल एका शेडमध्ये साठवून ठेवण्यात आला होता. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून १३ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमींपैकी ५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर २ जणांना रुग्णालयातील वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच १७ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.प्राथमिक अहवालानुसार, स्फोट इतका तीव्र होता की त्याचे धक्के अनेक किलोमीटरपर्यंत जाणवले आणि काहींनी तो भूकंप असल्याचा समज केला. या दुर्घटनेत ४० हून अधिक लोक भाजले गेले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.https://prahaar.in/2026/04/21/bihar-politics-shocking-statement-by-mp-opposing-nari-shakti-act-womens-political-career-starts-from-the-bed/घटनेनंतर परिसरातील रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. हे फटाक्यांचे गोदाम तिरुवंबाडी देवासम यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, येथे सुरक्षा नियमांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
बारामती : अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी बारामतीत महायुतीने सभा घेतली. या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत आले होते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बारामतीत सुनेत्रा पवारांचा प्रचार केला. अजित पवारांची चुलत बहीण या नात्याने खासदार सुप्रिया सुळे यांनीही सुनेत्रा पवारांसाठी प्रचार केला. शरद पवारांनी तब्येतीच्या कारणास्तव प्रचार करणे टाळले पण बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनीही सुनेत्रा पवारांसाठी प्रचार केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत बोलताना अजित पवारांच्या कार्याचा गौरव केला. आठवणींना उजाळा दिला आणि सुनेत्रा पवारांना मतदान हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली असल्याचे भावनिक आवाहन बारामतीकरांना केले. एकनाथ शिंदेंनीही कामाचा माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांच्या कार्याचा गौरव केला. आठवणींना उजाळा दिला आणि सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचे आवाहन बारामतीच्या मतदारांना केले.काल शरद पवारांनी फोन करून आघाडीचा पाठिंबा सुनेत्रा पवारांनाच असल्याचे सांगितले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीच्या प्रचारसभेत दिली. सभेत बोलताना सुनेत्रा पवारांना जाहीर केलेल्या पाठिंब्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचे जाहीर आभार मानले. सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचारसभेत बोलताना व्यक्त केला. अजित पवारांप्रमाणेच सुनेत्रा पवारही ठामपणे राज्याच्या विकासाचा गाडा ओढतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.प्रचारसभेवेळी अजित पवारांवील एक छोटी फिल्म दाखवण्यात आली. ही फिल्म बघताना सुनेत्रा पवारांचे अश्रू दाटून आले होते. अजित पवारांनी बारामतीच्या तीन पिढ्यांना एका कुटुंबासारखं जपलं. राज्याचं काम करणाऱ्या अजित पवारांनी बारामतीविषयीची आपुलकी कायम जपली. अशा या दादा माणसाच्या आकस्मिक जाण्यानं बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी जशी कुटुंबानं, दोन्ही मुलांनी साथ दिली तशी बारामतीकरांसह पूर्ण राज्यानंही काळजी घेतली. सर्वांनीच माझ्यावर आणि मुलांवर मुलांवर भरभरून प्रेम केले, असे सांगताना राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक झाल्या होत्या. अजित पवार यांच्या विचारांना उजाळा देताना त्यांच्यासारखेच काम करून दाखवेन, असा विश्वास व्यक्त करत मी संघर्ष योद्ध्याची सहचारिणी असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या.शरद पवार आजारीशरद पवारांनी तब्येत बरी नसल्यामुळे सुनेत्रा पवारांसाठी प्रचार करणे टाळले. पण बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले. सध्या शरद पवार रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी तब्येत साथ देत नसल्यामुळे इतक्यात बारामतीत येणे शक्य नाही पण बारामतीकरांनी सुनेत्रा पवारांची साथ सोडू नये असे भावनिक आवाहन केले आहे.
Donald Trump : आता युद्धविराम नाही! डोनाल्ड ट्रम्प यांचा मुदतवाढ देण्यास नकार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला कडक इशारा दिला असून, येत्या बुधवारापर्यंत दोन्ही देशांमध्ये कोणताही करार झाला नाही, तर इराणवर थेट हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
मुंबई : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकाराबद्दल औद्योगिक भूखंडाची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत.विधानभवनामध्ये तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्र८ डी./१ येथे सडेकर इनव्हायरो इंजिनीअर्स प्रा. लि. यांनी अवैधरित्या व बेकायदेशीरपणे घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकाराची विल्हेवाट लावल्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.औद्योगिक भूखंडाचा करार एमआयडीसीने २०१५ व २०२० मध्येच रद्द केला असतानाही कंपनीकडून बेकायदेशीरपणे काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, उच्च रासायनिक घटक (High COD) असलेले सांडपाणी थेट नाल्यात व समुद्रात सोडले जात असल्याची तक्रार समोर आल्याने या प्रकरणात सविस्तर माहिती घेण्याकरिता प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
Heatstroke : अतिउष्णतेच्या संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम उपाययोजना करणार
मुंबई : हवामान बदल या संकटाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला, विशेषतः अल्प भूधारक शेतकऱ्यांना बसत आहे अतिउष्णतेच्या संकटावर उपाययोजना करण्यासाठी तसेच ‘उष्णता प्रतिसादक्षम व शाश्वत शीतकरणासाठी सेंटर फॉर एक्सलेन्स’चा शुभारंभ करण्यात आला असून हे केंद्र भविष्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेचा भाग म्हणून कार्यरत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे आयआयएम, नागपूर येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हिट रेसिलियन्स अँड सस्टेनेबल कुलिंग’चे उदघाटन केले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, नॅचरल रिसोर्सेस डिफेन्स कौन्सिलचे अध्यक्ष मनीष बापना, एनआरडीसी इंडियाच्या कंट्री डायरेक्टर दीपा सिंग बगई, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण, नागपूर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. भिमराया मैत्री उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,विदर्भासह राज्याच्या अनेक भागांत अलीकडे उष्णतेच्या लाटेमुळे शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याची वेळ आली होती. हवामान बदल या संकटाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला, विशेषतः छोट्या शेतकऱ्यांना बसत आहे. दुष्काळ, गारपीट आणि वाढते तापमान यामुळे समस्याही गंभीर होत आहेत, यावर तोडगा काढण्यासाठी सेंटर फॉर एक्सलन्स उपयुक्त ठरणार आहे. या संस्थेमार्फत सुरुवातीला प्राधान्याने उष्णलाट कृती आराखडा आणि शहरी हवामान कृती आराखड्यांचा आढावा घेऊन प्राधान्य दिलेल्या शहरांना आणि जिल्ह्यांना तांत्रिक अंमलबजावणीसाठी सहाय्य केले जाईल. उष्णलाट कृती आराखड्यासाठी सक्षम योजना तयार करणे, वार्षिक अंमलबजावणीवर भर देणे. त्यासाठी अधिकारी, आरोग्य कर्मचारी, स्थानिक शहरी नागरिकांसाठी प्रशिक्षण आराखडा तयार करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहे. २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा नवीकरणीय स्रोतांमधून, २०३५ पर्यंत ६५ टक्के ऊर्जा अपारंपरिक स्रोतांतून घेण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांना लागणारी १६ हजार मेगावॅट वीज सौर ऊर्जेद्वारे देण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाढत्या उष्णतेमुळे सर्वत्रच एसी वापर वाढतो त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी यावर उपाय म्हणून राज्यात प्रभावी ‘हीट अॅक्शन प्लॅन’ राबवला जाईल. बांधकाम क्षेत्रात आणि दैनंदिन वापरात स्थानिक व पर्यावरणपूरक उपाययोजनांना प्राधान्य देऊन विकास साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.आयआयएम नागपूरमध्ये विशेष केंद्रनागपूरसह विदर्भात उन्हाळ्याची तीव्रता अधिक असते. या समस्येला तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूर आणि अमेरिकेतील ‘नॅचरल रिसोर्सेस डिफेन्स कौन्सिल’ (एनआरडीसी) या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार ‘आयआयएम’ नागपूरमध्ये उष्णता प्रतिसादक्षम व शाश्वत शीतकरणासाठी सेंटर फॉर एक्सलेन्स’ या विषयावर उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतातील उष्णतेचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन, या केंद्रामार्फत त्यावर उपाय शोधण्याचे काम केले जाणार आहे.राज्यात “राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था”केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या धर्तीवर मिहान, नागपूर येथे स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यासाठी शासनाने रु. १८४ कोटी मंजूर केले आहेत. या इमारतीचे बांधकाम महाप्रित यांच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्यामध्ये आठ सेंटर फॉर एक्सलन्स असणार आहेत. त्यातील एक केंद्र हे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हिट रेझिलन्स ॲण्ड सस्टेनेबल कुलिंग हे असणार आहे. यासाठी नॅचरल रिसोर्सेस डिफेन्स कौन्सिल न्यूयॉर्क या स्वयंसेवी संस्थेचे तांत्रिक सहकार्य लाभणार आहे.सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हिट रेझिलन्स ॲण्ड सस्टेनेबल कुलींग कामकाज राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था (एसआयडीएम) मिहान, नागपूर येथून चालविण्यात येणार आहे.
Pandharpur : पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई :आषाढी वारी काळात निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी दोन्ही पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक चांगली व सुविधायुक्त करण्यात यावीत, वारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी तसेच पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.पालखी मार्गांवरील विश्रामस्थळ सुविधा निर्मिती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.पुणे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकास कामांची माहिती दिली.श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकास कामांसाठी सुमारे १३०३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी ९६४ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातील ९५९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या आराखड्यांतर्गत दोन्ही पालखी मार्गातील पालखीतळांच्या ठिकाणी स्वच्छतागृहांसाठी सेफ्टी टँक, कमानीचे बांधकाम करणे, जमीन सपाटीकरण करणे, हायमास्ट पोल उभारणे, संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे, रस्त्यांची दुरुस्ती, पालखी कट्टा तयार करणे आदी कामांपैकी बहुतांश कामे पूर्ण झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यंदा २५ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान ८ जुलै रोजी तर श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान ७ जुलै रोजी होणार आहे. दोन्ही पालखी मार्गावर वारकरी भाविकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी. पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांशी चर्चा करून त्यांना आणखी कोणत्या सुविधा हव्यात त्या करून द्याव्यात. पालखी तळावर कायमस्वरुपी पायाभूत सुविधांची कामे करावीत. पालखी तळावर वारकऱ्यांसाठी गेल्या वर्षी हँगरची व्यवस्था करण्यात आली होती, त्या प्रमाणे यंदाही अतिरिक्त हँगरची व्यवस्था करावी. पालखी मार्गावरील महामार्गांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत.पुलकुंडवार म्हणाले की, पालखी मार्गावरील विकास कामे पूर्ण करण्यात येत असून यावर्षी वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे. गेल्या वर्षी दोन्ही पालखी मार्गावर ३७०० मोबाईल शौचालये पुरविण्यात आली होती. यंदा ५ हजार मोबाईल शौचालये पुरविण्याचे नियोजन आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने दोन्ही पालखी मार्गावरील महामार्गाची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. दिवेघाट ते हडपसर आणि बारामती ते इंदापूर मार्गांची कामे सुरू आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Marine Technology : आधुनिक सागरी तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणणार; मंत्री नितेश राणे
मुंबई :राज्यातील सागरी वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळ (Maharashtra Maritime Board) चे बंदरे निरीक्षक व तत्सम अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत सध्याच्या फेरीबोट व रो-रो सेवांचा सविस्तर आढावा घेत विविध सुधारणा उपायांवर चर्चा करण्यात आली.राज्यातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता फेरीबोट सेवांमध्ये अधिक कार्यक्षमतेची गरज असल्याचे अधोरेखित करत मंत्री राणे यांनी तिकीट प्रणाली अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी डिजिटल अॅप विकसित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यामुळे प्रवाशांना जलद, सोयीस्कर आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करत ओव्हरलोडिंग रोखणे, सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळणे आणि अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देशही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिले. याशिवाय परदेशातील प्रगत सागरी वाहतूक प्रणालींचा अभ्यास करून त्यातील आधुनिक तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, तसेच त्यासाठी ठोस आणि कृतीक्षम प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.राज्यातील नागरिकांना अधिक सुरक्षित, दर्जेदार व आधुनिक सुविधा दिल्याने शासनाच्या महसुलात वाढ होईल यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश ही या बैठकीत देण्यात आले.
Kerala Explosion : केरळमध्ये पूरम उत्सवापूर्वी स्फोटाचे तांडव; 13 जणांचा जागीच मृत्यू
Kerala Explosion : त्रिशूर जिल्ह्यातील फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा सध्या मोठ्या दिमाखात आणि उत्साहात (Players Banned in PSL) सुरू आहे. नव्या दमाच्या खेळाडूंच्या चमकदार कामगिरीने स्पर्धेला वेगळीच रंगत आणली आहे.
महसूलवाढीसाठी कोल्हापूर चित्रनगरी व एन. डी. स्टुडिओचा बहुउद्देशीय वापर करणार
मुंबई :राज्यातील चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रीकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूर चित्रनगरी तसेच कर्जत येथील एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (फिल्मसिटी) संचालक मंडळाची १६८ वी बैठक आज मुंबईतील पुल देशपांडे कला अकादमी च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध प्रशासकीय व विकासात्मक मुद्द्यांसह महसूलवाढीच्या दृष्टीने नव्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मंत्री शेलार यांनी उपलब्ध अधोसंरचनेचा अधिक प्रभावी व नियोजनबद्ध वापर करण्यावर भर दिला.चित्रनगरीचा आगामी वर्षांचा १८ कोटी महसूल वाढीचा आर्थिक ताळेबंद मंजूर झाला.राज्यातील चित्रनगरी व स्टुडिओ संकुलांमध्ये आधुनिक सुविधा, प्रशस्त मोकळी जागा आणि आकर्षक लोकेशन्स उपलब्ध आहेत. या सुविधांचा वापर नियोजनपूर्वक केल्यास चित्रीकरणाच्या कामावर परिणाम न होता पूरक स्वरूपात विवाह सोहळे, कॉर्पोरेट कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आदींसाठी जागा उपलब्ध करून देता येऊ शकते. यामुळे संस्थेच्या महसुलात लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल, असे यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले.यासाठी स्वतंत्र धोरण तयार करताना चित्रीकरणास प्राधान्य देत वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन, स्वतंत्र झोन निश्चिती, कार्यक्रमांसाठी परवानगी प्रक्रिया, भाडे दरांची पारदर्शक रचना, ऑनलाईन बुकिंग प्रणाली, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व पार्किंग नियोजन, स्वच्छता व देखभाल यांसारख्या सर्व बाबींचा सविस्तर विचार करावा, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, स्टुडिओमधील तांत्रिक उपकरणे, सेट्स आणि सर्जनशील वातावरण सुरक्षित राहील यासाठी आवश्यक ती काळजी घेणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी सांगितले.बहुउद्देशीय वापरामुळे चित्रनगरी आर्थिकदृष्ट्या लाभदायी ठरतील. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास आणि पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री शेलार यांनी व्यक्त केला.या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी चित्रलेखा खातू तसेच बैठकीस महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
‘युवकांमध्ये प्रचंड सृजनशीलता, नाविन्यता, कौशल्यता आणि कल्पकता’
मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ या राष्ट्रीय पोस्टर डिझाईन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी स्पर्धेतील ७५ विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.देशाच्या प्रगतीचा आणि दूरदृष्टीचा कलात्मक पद्धतीने सादरीकरण करून ‘विकसित भारत’ या संकल्पनेला प्रोत्साहन देणे हा या राष्ट्रीय पोस्टर डिझाईन स्पर्धेचा उद्देश होता. ही स्पर्धा २० सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. देशभरातून सुमारे ३ हजार नोंदी प्राप्त झाल्या.आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत अभियान, योग, वेव्ह्ज समिट, मेक इन इंडिया, स्किल इंडिया आणि हवामान बदल या नऊ विषयांवर कलाकृती सादर करण्यात आल्या.या स्पर्धेचे मूल्यमापन अच्युत पालव, वासुदेव कामत, सुधारक ओलवे, प्रसून जोशी, रवी जाधव, भरत दाभोलकर, गौरव दालमिया आणि श्रीनिवासन स्वामी या मान्यवरांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर स्पर्धेतील निवडक कलाकृतींच्या कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, देशातील युवक-युवतींमध्ये प्रचंड सृजनशीलता, नाविन्यता, कौशल्यता आणि कल्पकता आहे. भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ ही मोठी ताकद असून तिचा प्रत्यय या स्पर्धेतील कलाकृतींमधून स्पष्टपणे येतो.ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयुष्य देशसेवेसाठी समर्पित असून त्यांच्या प्रेरणेने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य विभाग आणि चित्रनगरीच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.स्पर्धेतील कलाकृतींचे प्रदर्शन राज्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध उपक्रम राबविण्यात येत असून CSR अंतर्गत सात संस्थांना एकूण ६५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Uddhav Thackeray : ममतांच्या पराभवासाठी 2 लाखांहून अधिक सीआरपीएफ जवान तैनात; उद्धव ठाकरे यांचा दावा
भाजप नेतृत्वातील केंद्र सरकारने पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करण्यासाठी दोन लाखांहून अधिक सीआरपीएफ जवान तैनात केले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला.
Sunetra Pawar : अजितदादांच्या अपघाताबाबत माझ्याही शंका; बारामतीत सुनेत्रा पवार भावूक
Sunetra Pawar : बारामती पोटनिवडणूक सांगता सभेत सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या निधनाबाबत संशय व्यक्त केला आहे.
या मेळाव्यास ७० हून अधिक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच ११ कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांनी उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट
मुंबई :राज्यातील आयटी क्षेत्रातील कामगारांच्या हिताचे रक्षण करणे, त्याकरिता उपाय योजना सुचविणे याबाबत विस्तृत व दूरगामी कार्यवाही अपेक्षित आहे. त्यासाठी अभ्यास गटाची स्सथान करावी, असे निर्देश ॲड आकाश फुंडकर यांनी दिले.मंत्रालयात पुणे शहरातील हिंजवडी येथील आय टी पार्क मधील विविध आय टी कंपन्यांमध्ये असलेल्या कामगारांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कामगार मंत्री बोलत होते.बैठकीस आमदार शंकर जगताप, अपर मुख्य सचिव श्रीमती आय. ए कुंदन, कामगार आयुक्त एच पी तुम्मोड, उपसचिव स्वप्नील कापडणीस आदींसह आय टी कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर होणारी जबरदस्ती, अन्यायकारक राजीनामा घेण्याची प्रक्रिया आणि एचआर (HR) नियमांमधील त्रुटी दूर करण्यासाठी उपाय योजना आवश्यक आहे. या संदर्भात सखोल चौकशी करण्यासोबतच विशेष अभ्यास गट गठीत करण्यात यावा. आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर जबरदस्तीने राजीनामा देण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटनांची सखोल चौकशी करावी. एचआर नियम आणि कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या पद्धतींचे नियमन झाले पाहिजे. कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते असलेले आणि जुन्या कंपनीने ' डी लिंक ' न केलेल्या कर्मचाऱ्यांच्याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला कळविण्यात यावे. याबाबत पत्रव्यवहार करून अशा कर्मचाऱ्यांना मदत करावी, असे कामगार मंत्री ॲड फुंडकर म्हणाले.शॉप ॲक्ट (Shop Act) परवाना असलेल्या प्लेसमेंट एजन्सींची माहिती घ्यावी. अनेकदा प्लेसमेंट एजन्सींच्या माध्यमातून होणाऱ्या नियुक्तीत अनियमितता आढळते. त्यामुळे अशा सर्व एजन्सींच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांची सत्यता तपासण्यात यावी. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवावी. कामगार विभागाच्या सीआयएस (CIS) प्रणालीचा वापर करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या तक्रारी कशा नोंदवता येतील, याची माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही कामगार मंत्री ॲड फुंडकर यांनी दिल्या.
Eknath Shinde : सुनेत्रा पवारांना बहुमताने निवडून आणणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली
ठाणे : नेत्रा पवार यांच्यासारख्या सक्षम, संवेदनशील आणि लोकाभिमुख उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना केले. तसे करणे हीच स्वर्गीय अजितदादा पवार यांना खरी श्रध्दांजली ठरेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर बारामती येथे झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला शिंदे यांनी दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना सुरूवातीला अजित पवारांच्या स्मृतीला अभिवादन केले. अजित पवारांच्या निधनानंतर बारामती मधल्या घराघरांमध्ये आपला माणूस गेल्याची भावना होती. अशा पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा होती, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.मी तुमच्यासमोर केवळ राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून उभा आहे. आपल्याला केवळ लोकप्रतिनिधी निवडायचा नाही, तर आपल्या परिसराचा स्वाभिमान आणि विकासाचा वारसा पुढे नेणारी व्यक्ती निवडायची आहे. अजित पवारांनी बारामतीच्या विकासासाठी कशाप्रकारे मेहनत घेतली आहे हे आपणाला माहितच आहे. आज शिवसेना, महायुतीच्या माध्यमातून आपण सुनेत्रा पवार यांच्यासारख्या सक्षम, संवेदनशील आणि लोकाभिमुख उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आलो असून त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन एकनाथ शिंदे म्हणाले.सुनेत्रा पवार बारामतीच्या प्रत्येक कुटुंबाचा, शेतकऱ्याचा, महिलांचा आणि तरुणांचा आवाज बनतील असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. सुनेत्रा पवारांना तुम्ही अनेक वर्षांपासून जवळून पाहिलं आहे. सत्तेत असो किंवा नसो, सामान्यांच्या सुखा-दुःखात धावून जाणं आणि संयमाने प्रश्न सोडवणं हा त्यांचा स्वभाव आहे. राजकारणापेक्षा समाजकारणावर त्यांनी नेहमीच भर दिला. घराची जबाबदारी सांभाळत असतानाच, समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिल्याची भावना एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली.ही निवडणूक विकासाची आणि विश्वासाची आहे. ज्या हातांनी नेहमी मदतीचा आधार दिला, त्या हातांना आज तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. अजित पवार यांनी बारामतीसाठी केलेल्या विकास कामांची परंपरा अधिक वेगाने पुढे नेण्याचं काम सुनेत्रा पवार करतील. आम्ही सर्वजण एकत्र येऊन बारामतीला आणखी सक्षम, समृद्ध आणि आधुनिक बनवू, अशी ग्वाहीही यावेळी एकनाथ शिंदेंनी दिली.सुनेत्रा पवार या आपल्या भगिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावं. आपल्या डोळ्यासमोर फक्त आपल्या भागाचा विकास आणि येणाऱ्या पिढीचं भविष्य ठेवा. आमचे शिवसैनिक सुनेत्रा वहिनींना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी बारामती मधील लाडक्या बहिणी, भावांना दिला. यावेळी मंत्री उदय सामांत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
22 एप्रिल रोजी वसुंधरा दिन साजरा केला जातो. यंदा या दिनाचे 56 वे वर्ष साजरे होत आहे. आज निसर्गाच्या सान्निध्यात राहून हा दिवस साजरा करा.
महान पैलवान खाशाबा दादासाहेब जाधव (Khashaba Jadhav) यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याच्या प्रस्तावाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
Top 10 News : प्रभात हा महाराष्ट्रातील आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. राज्य, देश आणि जागतिक पातळीवरील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. चला, जाणून घेऊया
Yusuf Pathan : माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, नेमकं काय घडलं? वाचा…
पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी खालिद खान व अन्य दोघांना ताब्यात घेतले.
Shiv Sena : पहलगाममध्ये पर्यटकांसाठी बलिदान देणाऱ्याला शिवसेनेने दिले नवे घर
पहलगाम : “धर्म, भाषा आणि पंथाच्या पलीकडे जाऊन मानवतेसाठी स्वतःचा जीव अर्पण करणारा आदिल हा केवळ एक तरुण नव्हे, तर देशाच्या अस्मितेचा जाज्वल्य दीप आहे,” असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. “एका आईचा मुलगा, एका कुटुंबाचा आधार क्षणात हिरावला गेला… पण मानवतेसाठी दिलेलं हे बलिदान देश कधीच विसरणार नाही, ते इतिहासात कोरलं गेलं आहे,” असं ते म्हणाले.पहलगाम येथे येथे शहीद झालेल्या सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या कुटुंबाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करत आर्थिक मदत आणि नवीन घर सुपूर्द केले. या भावनिक आणि अभिमानाच्या क्षणाला आयोजित कार्यक्रमात शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला.याआधी २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देताना शिंदे म्हणाले की, त्या काळजाला हादरवणाऱ्या प्रसंगात निरपराध पर्यटकांना लक्ष्य करत अंधाधुंद गोळीबार सुरू होता. त्या वेळी आदिलने निर्भीडपणे पुढे जात दहशतवाद्यांच्या हातातील बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी झुंज दिली. स्वतःचा जीव पणाला लावत त्यांनी मानवतेचे रक्षण केले आणि शहीद झाले.“त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे,” असे सांगत शिंदे पुढे म्हणाले, “मी स्वतः त्या वेळी पहलगामला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न केले आणि संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेवले.”“तो फक्त एका कुटुंबाचा मुलगा नव्हता, तर देशाच्या भविष्याला वाचवणारा खरा योद्धा होता,” असेही त्यांनी अधोरेखित केले. “शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नाही, तर देशभक्तीची जाज्वल्य ओळख आहे,” असे सांगत त्यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेच्यावतीने आदिल यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत आणि पक्के घर बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ते वचन पूर्ण करत उभारण्यात आलेल्या नव्या घराला “आनंद नाथ भवन” असे नाव देण्यात आले असून, ते स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले.“हे घर केवळ निवारा नाही, तर एका वीराच्या बलिदानाचा सन्मान आहे,” असे त्यांनी सांगितले. “आम्ही जे बोलतो ते करतो आणि जी कमिटमेंट करतो ती पूर्ण करतो, हीच शिवसेनेची ओळख आहे,” असे ठामपणे सांगत शिंदे यांनी आदिल यांच्या कुटुंबाला विश्वास दिला. “तुम्ही एक आधार गमावला आहे, पण संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे.”स्थानिक नागरिकांनी परिसराला पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याची मागणी केली असता, केंद्र सरकारच्या सहकार्याने सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. तसेच महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पर्यटक काश्मीरमध्ये येत असून, भविष्यात ही संख्या अधिक वाढवण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, आदिल यांच्या कुटुंबीयांनी भावना व्यक्त करत सांगितले, “एकनाथ शिंदे यांनी दिलेले वचन पूर्ण केले. त्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली आणि घरही बांधून दिले. हे घर आमच्यासाठी केवळ निवारा नसून सन्मान आणि आधार आहे.” आदिल यांच्या बहिणीने आणि भावाने यावेळी साश्रूपूर्ण नयनांनी शिंदे यांचे आभार मानले.या कार्यक्रमाला मंत्री संजय शिरसाठ, मंत्री योगेश कदम, शिवसेना सचिव कॅप्टन अजित अडसूळ, सरहद्द संस्थेचे संचालक संजय नहार, मराठवाडा युवा सेनेचे बाजीराव चव्हाण, युवासेना सचिव कोकण विभाग विकास गोगावले, युवासेना कोअर कमिटी सदस्य अभिमन्यू खोपकर, अनंतनाग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रमीज रजा, अप अधीक्षक फारुख अहमद, जम्मू-काश्मीर शिवसेना प्रमुख अश्विनी कुमार गुप्ता, राज्य सचिव मोहम्मद शकील मोगरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसेनेच्या वतीने बांधण्यात आलेले घर आदिल सय्यद यांच्या कुटुंबियांना देण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे पहलगाम जिल्ह्यातील हाफतनार या त्यांच्या मूळ गावी उपस्थित होते.
Ayush Mhatre Replacement : आयुष म्हात्रेच्या जागी कुणाची वर्णी लागणार? ‘या’तिघांची नावे चर्चेत
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा युवा आणि फॉर्मात असलेला फलंदाज आयुष म्हात्रे (Ayush Mhatre Replacement) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संपूर्ण उरलेल्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
पोलीस भरती झाल्याचे सांगून एका तरुणाने सोसायटीत पेढे वाटले, तसेच अभिनंदन करणारा फलक चौकात लावला.
पत्रकार तसेच राजकीय पदाधिकारी असल्याचे सांगत ५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज म्हणजेच मंगळवार २१ एप्रिल रोजी दुपारी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सव्वातीनच्या सुमारास बदलापूरहून आलेली जलद लोकल तांत्रिक बिघाडामुळे नियोजित फलाटाऐवजी दुसऱ्याच फलाटावर वळवण्यात आली. मात्र त्या फलाटावर आधीच एक लोकल उभी असल्याने दोन्ही गाड्या समोरासमोर येण्याची धोकादायक स्थिती निर्माण झाली.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मोटरमनने तत्काळ ब्रेक लावत प्रसंगावधान दाखवले आणि संभाव्य अपघात टळला. या घटनेमुळे रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक ५ ते ८ दरम्यानची रेल्वे वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली. एकाच ट्रॅकवर आलेल्या लोकलला सुरक्षितपणे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हळूहळू सेवा पूर्ववत करण्यात आली.वाहतूक कोलमडली, प्रवाशांचे हाल :ऐन गर्दीच्या वेळेत घडलेल्या या प्रकारामुळे जलद मार्गावरील सेवा विस्कळीत झाली आणि CSMTसह इतर स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली. अनेकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सिग्नल यंत्रणेत नेमका कोणता बिघाड झाला याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या बॅकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली असून, रखडलेली वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.
- रोपवाटिकांसाठीच्या मातीला रॉयल्टी माफमुंबई : देवस्थान इनाम जमिनींचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार विधिमंडळाच्या येणाऱ्या अधिवेशनात कायदा करणार आहे. याबवतची तयारी सुरू झाली असून, नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना नोंदविण्यासाठी कायद्याचा मसुदा लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सांगितले.रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील ऐतिहासिक पेढे परशुराम देवस्थानच्या इनामी जमिनींचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात महसूलमंत्र्याच्या दालनात झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. बैठकीला आमदार शेखर निकम, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.देवस्थान जमिनींबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. नवीन कायद्याची प्रक्रिया राबवताना लोकभावना आणि तांत्रिक बाबींचा विचार केला जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना आणि संबंधित पक्षकारांना आपली मते मांडता यावीत, यासाठी ही माहिती ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.फळबागांच्या 'पीकपाणी' नोंदीत बदल :कोकणातील फळबागायतदारांसाठीही या बैठकीत एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला. फळबागांचे पीकपाणी नोंद दरवर्षी करण्याऐवजी ते दर तीन वर्षांनी करण्यात यावी, यासाठी जमाबंदी विभाग व फलोत्पादन विभागाने संयुक्त प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना महसूलमंत्र्यांनी दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा दरवर्षीचा प्रशासकीय त्रास कमी होण्याची शक्यता आहे.रोपवाटिकांसाठी मातीवरील रॉयल्टी माफ होणार :जिल्ह्यातील रोपवाटिका चालकांसाठी माती उपलब्ध करून देताना त्यावर कोणतीही रॉयल्टी आकारली जाऊ नये, असा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील फळबाग लागवडीला आणि रोपवाटिका व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची चिन्हे आहेत.
Nitesh Rane : मोरा मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले नुकसान तातडीने भरून काढावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिले. संबंधित प्रकरणात मत्स्यव्यवसाय विभागाने नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून हा प्रश्न मार्गी लावावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.मंत्रालयात मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार महेश बालदी (Mahesh Baldi), मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. एन. रामास्वामी तसेच आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आदी उपस्थित होते. मोरा मच्छीमार सोसायटी आणि गावातील इतर मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यासाठी त्यांच्या नुकसानीचे योग्य वर्गीकरण करून सविस्तर अहवाल संबंधित विभागाकडे सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.https://prahaar.in/2026/04/21/law-on-temple-land-in-the-upcoming-session-revenue-minister-chandrashekhar-bawankule-royalty-waiver-on-soil-for-nurseries/गस्ती नौका आणि ड्रोन खरेदीचा आढावा :याच बैठकीत मत्स्यव्यवसाय विभागामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या पाच गस्ती नौका आणि ड्रोनच्या खरेदी प्रक्रियेचा आढावाही घेण्यात आला. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
Blast in Palghar : पालघरमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
पालघर जिल्ह्यात (Blast in Palghar) मंगळवारी एका फटाका निर्मिती केंद्रात भीषण स्फोट झाला. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
Tilak Varma : शतक झळकावल्यानंतर तिलक वर्माचा हार्दिक बाबत मोठा खुलासा
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील ३०वा सामना काल मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात (Tilak Varma) खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर हंगामातील दुसरा विजय नोंदवला.
Violent clash at Gurudwara in Germany : जर्मनीतील गुरुद्वारात दोन गटांमध्ये हिंसक झटापट, ११ जण जखमी
जर्मनीतील मोर्स शहरातील ड्यूसबर्ग भागात असलेल्या एका गुरुद्वारात दोन गटांमध्ये अचानक हिंसक झटापट झाली. या घटनेत किमान ११ जण जखमी झाले आहेत. माहितीनुसार, हा वाद इतका वाढला की या वादात चाकू, कृपाण, पेपर स्प्रे आणि अगदी पिस्तुलाचाही वापर करण्यात आला. या भांडणात सुमारे ४० जण सहभागी होते, असे सांगितले जात आहे.गुरुद्वारात धार्मिक कार्यक्रम सुरू होण्याच्या तयारीत असतानाच दोन्ही गटांमध्ये वाद वाढला आणि हातघाईतून तो हिंसाचारात बदलला. सोशल मीडियावर काही व्हिडिओही समोर आले असून त्यामध्ये लोक एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत.प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, काही लोकांनी अचानक पेपर स्प्रेचा वापर केला. त्यानंतर एका व्यक्तीने पिस्तुलातून गोळीबार केला, तर अनेकांकडे चाकू आणि कृपाणसारखी धारदार शस्त्रे होती. मात्र, पोलिसांना अद्याप खरे पिस्तूल सापडलेले नाही. प्राथमिक तपासात हे ब्लँक-फायरिंग पिस्तूल असू शकते, असे समोर आले आहे. अशा प्रकारच्या पिस्तुलातून खरी गोळी झाडली जात नाही, मात्र आवाज आणि स्फोटासारखा धक्का निर्माण होतो.https://prahaar.in/2026/04/21/manipur-earthquake-5-2-magnitude-earthquake-hits-manipur-panic-among-citizens/पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा वाद गुरुद्वारा समितीच्या निवडणुका आणि निधी (पैसे) यावरून झाल्याचे समोर आले आहे. जुन्या आणि नव्या व्यवस्थापनामध्ये बऱ्याच काळापासून तणाव होता. गुरुद्वारावरील नियंत्रण आणि निर्णय घेण्याच्या अधिकारावरून दोन्ही गट आमनेसामने आले होते.एका मध्यमवयीन प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, हा हल्ला आधीपासून नियोजित वाटत होता.या घटनेची माहिती मिळताच मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. विशेष टॅक्टिकल युनिटलाही तैनात करण्यात आले. सर्व जखमींवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले. दरम्यान, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून नेमका कोणी कोणावर हल्ला केला, याचा तपास पोलिस करत आहेत.
Tariff Refund : अमेरिकेचा मोठा निर्णय : भारताला मिळू शकतो तब्बल ₹1 लाख कोटींचा टॅरिफ रिफंड!
अमेरिकेत सुरू असलेल्या व्यापार चर्चांदरम्यान भारतासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांच्या काळात लादण्यात आलेल्या मनमानी टॅरिफबाबत अमेरिकन न्यायालयाने आक्षेप घेतल्यानंतर आता भारतीय वस्तूंवर आकारलेल्या शुल्काच्या परताव्याचा मार्ग मोकळा झाला आहे.त्या काळात भारतीय वस्तूंवर लावण्यात आलेल्या मोठ्या टॅरिफपैकी सुमारे १० ते १२ अब्ज डॉलर्स इतका भाग बेकायदेशीर ठरू शकतो. भारतीय रुपयांत याची किंमत अंदाजे ₹८३,००० ते ₹१,००,००० कोटी इतकी आहे. या रकमेच्या परताव्यासाठी अमेरिकेच्या कस्टम्स विभागाने २० एप्रिल २०२६ पासून CAPE प्लॅटफॉर्मचा पहिला टप्पा सुरू केला आहे.‘रिफंड विंडो’ उघडली कशी?हा संपूर्ण वाद आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायदा International Emergency Economic Powers Act (IEEPA) अंतर्गत लावलेल्या दंडात्मक शुल्कांशी संबंधित आहे. ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणांतर्गत अनेक देशांवरील आयातीवर मोठे टॅरिफ लादण्यात आले होते. मात्र, अमेरिकेच्या न्यायालयांनी या निर्णयातील त्रुटी दाखवत हे शुल्क कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असल्याचे नमूद केले.या निर्णयानंतर अमेरिकेने जागतिक स्तरावर सुमारे १६६ अब्ज डॉलर्सच्या टॅरिफ रिफंडसाठी दार उघडले असून, त्यासाठी नवीन ऑनलाइन पोर्टलही सुरू करण्यात आले आहे.https://prahaar.in/2026/04/21/us-india-trade-deal-indian-delegation-to-visit-washington-this-week-for-us-india-trade-deal/भारतीय निर्यातदारांना कसा फायदा?ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह Global Trade Research Initiative (GTRI) च्या माहितीनुसार, या रिफंडपैकी मोठा हिस्सा भारतात तयार झालेल्या वस्तूंशी संबंधित आहे.तथापि, हा रिफंड थेट भारतीय निर्यातदारांना मिळणार नाही, कारण दावा करण्याचा अधिकार फक्त अमेरिकन आयातदारांकडे (US importers) आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना त्यांच्या अमेरिकन खरेदीदारांशी समन्वय साधावा लागेल.भविष्यातील ऑर्डर्समध्ये सवलत, रिफंड शेअरिंग किंवा किंमतीत बदल करून भारतीय कंपन्या या रकमेचा फायदा घेऊ शकतात. विशेषतः टेक्सटाइल, इंजिनिअरिंग वस्तू आणि केमिकल्स क्षेत्रांना यामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Mumbai local : मोठा अपघात टळला.! एकाच ट्रॅकवर समोरासमोर दोन लोकल, नेमकं काय घडलं?
ऐन गर्दीच्या वेळी जलद मार्गावरील सेवा विस्कळीत झाल्याने CSMTसह इतर स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
Rule For Gas Cylinder : ‘हा’नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; सरकारकडून नवा नियम लागू
Rule For Gas Cylinder : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवर मोठे ऊर्जा संकट (Rule For Gas Cylinder) निर्माण झाले आहे. याचा थेट फटका भारतालाही बसत आहे.
Chhagan Bhujbal : बारामती पोटनिवडणूक सांगता सभेत छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे आवाहन केले.
Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्याकडे रायगड दक्षिणची धुरा
- महाराष्ट्र भाजपकडून जिल्हानिहाय प्रभारी जाहीरमुंबई : संघटन बांधणी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र भाजपने मंगळवारी जिल्हानिहाय प्रभारींची नियुक्ती केली. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे रायगड दक्षिण जिल्ह्याच्या प्रभारी पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोकणात पक्षाची पकड अधिक घट्ट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.सिंधुदुर्गसाठी आमदार योगेश सागर, रत्नागिरी उत्तरसाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि रत्नागिरी दक्षिणसाठी निरंजन डावखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगड उत्तर भागाची जबाबदारी अतुल काळसेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ठाणे आणि नवी मुंबईसाठीही पक्षाने विशेष रणनीती आखली आहे. ठाणे शहरासाठी विक्रांत पाटील, तर ठाणे ग्रामीणच्या प्रभारीपदी उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांची वर्णी लागली आहे. नवी मुंबईत शशिकांत कांबळे, कल्याणमध्ये जयप्रकाश ठाकूर आणि उल्हासनगरमध्ये नाना सूर्यवंशी संघटनात्मक बांधणीचे काम पाहतील. पालघरसारख्या आदिवासी बहुल आणि संवेदनशील जिल्ह्यासाठी राणी द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.https://prahaar.in/2026/04/21/navi-mumbai-panvel-unseasonal-rains-arrive-relief-from-the-heat-but-citizens-scramble/उत्तर महाराष्ट्रात नाशिक दक्षिण जिल्ह्याची धुरा माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली असून, नाशिक शहरासाठी मंगेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. धुळे शहरात माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली असून, धुळे ग्रामीणसाठी रवींद्र अनासपुरे यांची नियुक्ती झाली आहे. जळगाव जिल्ह्यातही रोहिणी नायडू, अनुप अग्रवाल आणि प्रदीप पेशकार यांच्याकडे विविध विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अहिल्यानगर उत्तर भागात लक्ष्मण सावजी हे पक्षाचे काम पाहतील.
Ayush Mhatre Injury : CSK ला मोठा धक्का ! आयुष म्हात्रे दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर
Ayush Mhatre Injury : चेन्नई सुपर किंग्स साठी आयपीएल २०२६ चा हंगाम अत्यंत निराशाजनक (Ayush Mhatre Injury) सुरु आहे. या दिग्गज संघाला १९व्या मोसमात अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
- भाजयुमोच्या ‘युवाशक्ती जागर यात्रे’चा प्रारंभमुंबई : राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि 'अर्बन नक्षलवादा'च्या माध्यमातून तरुणांच्या मनात संविधानाविरुद्ध विष पेरणाऱ्या शक्तींना रोखण्याचे काम 'युवाशक्ती जागर यात्रा' करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित या राजव्यापी यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा अधिकृत प्रारंभ केला. मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात ३५ वर्षांखालील तरुणांची लोकसंख्या ६५ टक्के आहे. ही मोठी शक्ती जर संघटित होऊन एका दिशेने चालली, तर राज्यात मोठे परिवर्तन घडून येईल. मात्र, सध्या काही शक्ती युवकांमध्ये संविधानाविरुद्ध कलुषित मते पसरवत आहेत. या तरुणांना संविधानाने दिलेल्या व्यवस्थेप्रती जागृत करण्याची जबाबदारी युवा मोर्चा पार पाडेल.https://prahaar.in/2026/04/21/navi-mumbai-panvel-unseasonal-rains-arrive-relief-from-the-heat-but-citizens-scramble/महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर कठोर शब्दांत टीका केली. संसदेत विरोधकांनी महिला आरक्षणाची जणू 'भ्रूणहत्या'च केली. जनगणना आणि पुनर्रचनेच्या (डिलिमिटेशन) नावाखाली विरोधक खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत. मुळात त्यांना आरक्षण द्यायचेच नाही, ही त्यांची बुरसटलेली मानसिकता आहे. या यात्रेच्या माध्यमातून नारीशक्तीला जागृत करून विरोधकांना या विधेयकाला पाठिंबा देण्यास भाग पाडले जाईल, असेही फडणवीस यांनी नमूद केले.यात्रेचे स्वरूप आणि उद्दिष्टे : भाजयुमोची ‘युवाशक्ती जागर यात्रा' संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असून शेतकरी, कामगार आणि आयटी क्षेत्रातील तरुणांपर्यंत पोहोचणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात गेल्यामुळे युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राजकीय व सामाजिक प्रगल्भता येईल. कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाला राज्यातील पहिल्या क्रमांकाची संघटना बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारच्या योजना गावखेड्यातील शेवटच्या तरुणापर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. कृष्णराज महाडिक यांनी यात्रेच्या नियोजनाबाबत माहिती देताना सांगितले की, केवळ राज्यातीलच नव्हे तर केंद्रातील नेत्यांचे आणि विद्यार्थी चळवळीतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन या यात्रेसाठी घेण्यात आले असून, राज्यातील संपूर्ण युवावर्ग या मोहिमेत जोडला जाईल.
Marathi Rapper RocKsun : मराठमोळा रॅपर रॉक्सनच्या गाण्यांची हिप-हॉपमध्ये क्रेझ
मुंबई: महाराष्ट्राच्या हिप-हॉप क्षेत्रात उदयास आलेला तरुण आणि दमदार आवाज म्हणजे रॉकसन. आपल्या प्रभावी गीतलेखन आणि वास्तववादी मांडणीमुळे रॉक्सनने अल्पावधीतच संगीतप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. रॉक्सनला ६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये नवरदेव बी एस सी ॲग्री या चित्रपटातील “लाल चिखल” या गीतासाठी उत्कृष्ट गीत म्हणून नामांकन मिळालं आहे. त्याने केलेल्या लेटेस्ट फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.२०१७ पासून संगीत आणि रॅपिंग क्षेत्रात सक्रिय असलेल्या रॉक्सनला २०२१ साली प्रदर्शित झालेल्या “गुलाबाच्या फुला” या गाण्यामुळे मोठी ओळख मिळाली. या गाण्याने त्याला महाराष्ट्रात मराठी रॅपर म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली. रॉक्सनची दिग्गज, रक्कम, महान, सल्तनत अशी अनेक मराठी रॅप गाणी प्रसिद्ध आहेत.रॉक्सनच्या संगीताची खासियत म्हणजे सामाजिक विषयांवर आधारित आशयपूर्ण मांडणी. युवकांचे प्रश्न, संघर्ष, आणि वास्तव जीवनातील अनुभव यांना तो आपल्या गाण्यांमधून प्रभावीपणे व्यक्त करतो. पारंपरिक मराठी संस्कृती आणि आधुनिक हिप-हॉप शैली यांचा संगम त्याच्या कामामध्ये स्पष्टपणे दिसून येतो.https://prahaar.in/2026/04/21/operation-sindoor-dont-cross-the-line-india-doesnt-forget-indian-army-suggestive-tweet-on-the-anniversary-of-the-pahalgam-attack/रॅपर रॉक्सन त्याच्या रॅपिंग करिअरविषयी सांगतो, “मी २०१७ पासून संगीत आणि रॅपिंग क्षेत्रात सक्रिय आहे. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या “गुलाबाच्या फुला” या गाण्यामुळे मोठी ओळख मिळाली. मला ६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये “लाल चिखल” या गीतासाठी उत्कृष्ट गीत म्हणून नामांकन मिळालं आहे. “लाल चिखल” हे केवळ एक गाणं नसून, समाजाची एक काळी बाजू आहे. काही चुकीच्या प्रथा, यंत्रणा, समाज शेतकऱ्यांची कशी पिळवणूक करतो हे त्या गाण्यात मांडल आहे. शेतकऱ्यांचं खर आयुष्य मी या गाण्यात दर्शवलं आहे. या गाण्याला नामांकन मिळालं यात मला आनंदच आहे परंतु या समाजाला आणि यंत्रणांना विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांची बाजू लक्षात घेवून जमेल तशी मदत करावी.”आजच्या डिजिटल युगात रॉक्सनने विविध म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर आपली उपस्थिती मजबूत केली आहे. त्याच्या गाण्यांना तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, मराठी हिप-हॉपला नवी उंची देण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा आहे.आगामी काळात रॉक्सनकडून अधिक नाविन्यपूर्ण आणि प्रभावी प्रोजेक्ट्सची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मराठी संगीत क्षेत्रात त्याचा प्रवास प्रेरणादायी ठरत असून, तो नव्या पिढीसाठी एक महत्त्वाचा आवाज म्हणून उदयास येत आहे.
Maharashtra Politics : संजय राऊत यांनी भाजपमध्ये मोठी फूट पडल्याचा दावा केला असून महिला आरक्षण विधेयकाच्या आडून ८५० खासदार करण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे.
Tamil Nadu Election : तमिळनाडूतील प्रचार थंडावला; बहुपक्षीय लढतीत लक्ष मतदान यंत्रांकडे
Tamil Nadu Election : यावेळची निवडणूक लढत प्रामुख्याने दोन प्रमुख आघाड्यांमधील थेट सामना म्हणून पाहिली जात आहे.
नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक, अंधश्रद्धेला खतपाणी घालणे असे गंभीर आरोप खरातवर आहे. सध्या भोंदू खरात कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. खरात याच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाईचा वेग वाढवला असून, त्याच्या बेनामी संपत्तीवर टाच आणण्यासाठी कठोर पाऊल उचलली जात आहेत. त्यामुळे आता अशोक खरातसह त्याच्या कुटुंबीयांचीही अडचण वाढणार आहे.भोंदू खरातकडे कोट्यवधींची मालमत्ता खरातची किमान १५ ते १७ हजार कोटींची संपत्ती असल्याचा अंदाज आहे. यात कोट्यवधीची बेनामी मालमत्ता आहे. प्राथमिक तपासात बेकायदेशीर मार्गाने मिळवलेली मालमत्ता तात्पुरती जप्त (प्रोव्हिजनल अटॅचमेंट) करण्याची प्रक्रिया 'ईडी'कडून राबवली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पुढील टप्प्यात खरातला समन्स बजावून चौकशी, बैंक खात्यांची तपासणी, आर्थिक देवाणघेवाणीचे विश्लेषण आणि आवश्यकता असल्यास अटकेची कारवाईही केली जाऊ शकते. त्यामुळे एसआयटीकडून ईडीकडे खरातचा (Ashok Kharat) ताबा काही दिवसांपुरता जाऊ शकतो. त्यासाठी ईडी न्यायालयाची परवानगी मागणार आहे. सध्या खरात पाचव्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहे.ईडीकडून एक स्वतंत्र गुन्हा खरातवर अगोदरच दाखल झालेला आहे. त्यानंतर त्याच्या घरासह कार्यालयावर ईडीने धाड टाकली होती. या चौकशीत खरातचे प्रॉपर्टी रॅकेट समोर आले होते. त्यात आता खरातशी संबंधित शासनातील काही अधिकारी, खासगी ब्रोकर, पुणे व नाशिकमधील काही विकासक रडारवर आहेत. नाशिक-अहिल्यानगर-पुणे (Nashik-Ahilyanagar-Pune) यादरम्यानचे खरातचे प्रॉपर्टी रॅकेट उघड झाल्यानंतर सोलापूरमध्ये देखील खरातने जमीन लाटल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर ईडीकडून अत्यंत सावध पावले उचलली जात असून पहिल्या टप्प्यात खरातचे बँक खाते तात्पुरते सील करण्यात आले.कुटुंबियांचीही होणार अडचणअशोक खरात आधीच अडचणीत असताना ईडीने जर खरातच्या एखाद्या मालमत्तेवर तात्पुरती टाच (प्रोव्हिजनल अटॅचमेंट) आणली तर त्याचे कुटुंबीय देखील अडचणीत येतील. कारण असे झालयास खरातच्या मालमत्तेबाबत आणि व्यवहारांवर अनेक निर्बंध येतील. महत्त्वाचे म्हणजे संबंधित मालमत्ता खरात जरी तुरुंगात असला तरी त्याच्या कुटुंबातील वारसदारास अन्य कोणालाही विकता येणार नाही तसेच दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरण, गिफ्ट किंवा वसीयतद्वारे बदल करणेही बंद होणार आहे. बँकेत कर्जासाठी खरात व त्याच्या पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता गहाण ठेवता येणार नाही. याशिवाय कागदपत्रांमध्ये फेरफार करणे किंवा मालमत्ता लपवण्याचे प्रयत्न केल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरू शकतो.
नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील नागरिकांना आज सकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने मोठा दिलासा मिळाला. दमट हवामानामुळे पावसाची शक्यता वर्तवली जात असतानाच सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास पनवेलसह नवी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे कामासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रेल्वे स्थानके, मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि चौकांमध्ये अचानक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.दुचाकीस्वारांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून अनेकांनी झाडांच्या आडोशाला किंवा बसथांब्यांवर आसरा घेतला. काही ठिकाणी वाहतुकीवरही तात्पुरता परिणाम झाला. तरीही या सरींसोबत आलेल्या गार वाऱ्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी या पावसाचा मनमुराद आनंद घेतला. लहान मुलांनी तर पावसात भिजत खेळण्याचा आनंद लुटला. मात्र कार्यालयात जाणारे कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी आणि प्रवासी वर्ग यांना पावसामुळे भिजतच प्रवास करावा लागला.https://prahaar.in/2026/04/21/manipur-earthquake-5-2-magnitude-earthquake-hits-manipur-panic-among-citizens/दरम्यान, हवामान खात्याने आधीच उकाड्यासोबतच काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली होती. बदलत्या हवामानामुळे पुढील दोन ते तीन दिवस अशाच हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजचा पाऊस हा केवळ हवामानातील बदल नसून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक ठरला आहे.https://prahaar.in/2026/04/21/ipl-2026-tilak-varma-mumbai-indians-triumph-on-the-back-of-tilak-varmas-magnificent-century/दरम्यान, बदलापूर परिसरातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक त्रस्त झाले होते. अशातच सकाळी ढग दाटून आले आणि गडगडाटासह पावसाने शहराला झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाची विशेष गैरसोय झाली. अनेकांना भिजतच रेल्वे स्थानक गाठावे लागले, तर ग्रामीण भागातही या पावसाचा परिणाम जाणवला. एकूणच, या अवकाळी पावसाने उकाड्यापासून दिलासा दिला असला तरी दैनंदिन जीवनात काही प्रमाणात विस्कळीतपणा निर्माण केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Mumbai 3.0 : अटल सेतू ते पुणे द्रुतगती जोडमार्ग फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार
- ‘मुंबई ३.०’साठी कनेक्टिव्हिटीचे जाळे; जोडमार्गाचे अभियांत्रिकी टप्पे पूर्णत्वाकडेमुंबई : मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमधील प्रवासाचे अंतर अवघ्या काही मिनिटांवर आणणाऱ्या 'अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग' या जोडप्रकल्पाने (कनेक्टर) महत्त्वाचे अभियांत्रिकी टप्पे ओलांडले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या कामाला विशेष गती दिली असून, आतापर्यंत १४३ ठिकाणी पाया उभारणी (फाऊंडेशन) पूर्ण झाली आहे. या प्रकल्पामुळे 'मुंबई ३.०' च्या संकल्पनेला बळ मिळणार असून नवी मुंबई विमानतळ आणि पुण्याकडे जाणारा प्रवास सिग्नलविरहित होणार आहे.७.३५ किमी लांबीच्या या सहा मार्गिकांच्या पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. एकूण १७६ पायाभूत ठिकाणांपैकी १४३ ठिकाणचे काम पूर्ण झाले असून, १४१ ठिकाणी पियर्स (खांब) उभे राहिले आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ८३० प्रीकास्ट गर्डर्सपैकी ६५३ गर्डर्सची उभारणी पूर्ण झाली आहे. पळस्पे परिसरात द्रुतगती मार्गाला जोडण्यासाठी स्लिप रोड्स आणि सर्व्हिस रोड्सच्या रुंदीकरणाचे कामही समांतरपणे सुरू आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडीविना प्रवाशांना महामार्गावर प्रवेश मिळेल.हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर अटल सेतूमार्गे (शिवडी-न्हावा शेवा) चिर्ले आणि पळस्पेवरून थेट पुण्याकडे जाता येईल. यामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार असून लॉजिस्टिक्स क्षेत्रालाही गती मिळणार आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही या मार्गामुळे सुलभ प्रवेश मिळणार असल्याने हा मार्ग भविष्यात मुंबई आणि पुण्याच्या आर्थिक प्रगतीचा कणा ठरणार आहे.https://prahaar.in/2026/04/21/us-india-trade-deal-indian-delegation-to-visit-washington-this-week-for-us-india-trade-deal/नोकरदार आणि विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास सुलभ होईल : डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीएअटल सेतूमार्गे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आता सिग्नलविरहित प्रवास शक्य होईल. यामुळे नोकरदार आणि विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास सुलभ होईल. 'मुंबई ३.०' घडवताना तासांचा प्रवास मिनिटांत आणण्याचे आमचे 'मुंबई इन मिनिट्स' हे उद्दिष्ट या प्रकल्पाद्वारे पूर्ण होत आहे.गुंतवणुकीला पूरक वातावरण :फेब्रुवारी २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे उद्दिष्ट आहे. हा मार्ग नव्या विकासकेंद्रांना जोडणारा दुवा ठरेल. यामुळे मुख्य मुंबईवरील ताण कमी होऊन नवी मुंबई आणि आसपासच्या भागात औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल. समुद्री पूल, द्रुतगती मार्ग आणि मेट्रो नेटवर्कचे एकात्मिक जाळे विणण्याच्या एमएमआरडीएच्या योजनेतील हा एक महत्त्वाचा दुवा आहे.प्रकल्पाची वैशिष्ट्ये :लांबी : ७.३५ किलोमीटर.मार्गिका : सहा (११.५ मी. + ११.५ मी. रुंद).प्रमुख जोडणी : अटल सेतू, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि नवी मुंबई विमानतळ.सद्यस्थिती : १४१ पियर्स आणि ६५३ गर्डर्सची उभारणी पूर्ण.
आशय : वीणा सानेकर डहाणू जवळ ऐने नावाचे छोटेसे गाव आहे. या गावात वसलेल्या स्नेहनगरीत जाण्याचा योग नुकताच आला. एका बाजूला क्रीडांगण, नवीनच वसलेले कला कुटिर, सर्वत्र हिरवीगार झाडे, सहअध्ययन केंद्र, मध्यभागी बैठक जमवण्यासाठी मस्त जागा…, दुसरीकडे बैठी शाळा, छोटीशी बाग आणि खेळ…! ही स्नेहनगरी वसवणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ आणि भाषातज्ज्ञ रमेश पानसे यांची भेट म्हणजे समृद्ध करणारा अनुभव! बालशिक्षणात रमलेले पानसे सर शिक्षणाबद्दल तासन् तास बोलू शकतात...’ त्यादिवशी मात्र कवितांच्याच मैफलीचा बेत सरांनी उत्स्फूर्तपणे ठरवला.सगळे नव्याने उभ्या राहिलेल्या पर्णकुटीत जमले. बैठकीची गोल रचना. दिवे लागल्याने प्रकाशाची पखरण वातावरण सुंदर करत होती. सगळे सुचेल तशा कविता म्हणत होते. किती वेगवेगळ्या कवितांचा आनंद सगळे लुटत होते. सोबत अनिताताईंनी केलेली गरमगरम भजी शामदादा समोर ठेवत होते आणि मैफलीला अधिकच रंग चढत होता.यानिमित्ताने आपल्या आवडत्या कविता सगळेच आठवत - शोधत होते.युगामागुनी चालली रे युगे ही कितीदा करावी भास्करा वंचनाकितीकाळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रितीची याचनाही कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत कविता, कुब्जा ही इंदिरा संतांची कविता, बा.भ . बोरकरांची कविता, पु. शि.रेगे, सदानंद रेगे, वसंत आबाजी डहाके, गदिमा, शांता शेळके यांची कविता अशा वेगवेगळ्या कविता उपस्थित जयेश, ज्योती, सुषमाताई, स्नेहल, ईशा, पानसे सर अशा सर्वांनीच सादर केल्या. अधूनमधून कुणी स्वतःच्या जपून ठेवलेल्या कविताही सादर करीत होते.या रंगलेल्या मैफलीत मोजकेच छोटे प्रेक्षक होते. त्यांच्यासाठी विंदा करंदीकरांच्या ‘एटु लोकांचा देश,’ ‘अबबब अबबब केवढा फणस आई’ या बालकविताही सादर झाल्या. मनमोहन नातू, पद्मा गोळे यांच्या कविता ऐकायला मिळणे हा दुर्मिळ आनंद होता. सेल्युलर तुरुंगाची भिंत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यातील संवाद मनमोहन नातू यांच्या कवितेतून साकारला तर ‘मी एक पक्षीण आकाश वेडी दुज्याचे मला भान मुळी नसे’ ही कविता समर्थ स्त्रीचा आत्मस्वर टिपत होती.शब्दांमध्ये जगणे पुन्हा, शब्दांमध्ये मरणे पुन्हा हे अंतहीन समुद्रसे माझा परि दुबळा पसा अशी अवस्था कविता ऐकताना होत होती.‘सई माया सजनीले, सैनच पडेना हे व्हराडी लोकगीत’ ऐकणे आणि ताल धरणे हा अत्यंत वेगळाच आनंद होता. लघुअनियतकालिकांच्या चळवळीचे पानसे सर म्हणजे महत्वाचे साक्षीदार. त्या सगळ्या काळातील वाड्मयीन घडामोडीं विषयी पानसे सर मोकळेपणाने बोलत राहिले. सतीश काळसेकर, मनोहर ओक, गुरुनाथ धुरी यांच्यावर सर भरभरुन बोलत. तसेच मराठीच्या विविध प्राध्यापक व लेखक - कवींच्या आठवणी निघत होत्या. शंकर वैद्य सरांचे अध्यापन आणि त्यांची कविता हा सरांचा आवडता विषय. सरांचा ‘दर्शन’ हा कवितासंग्रह या गप्पांमध्ये पुन्हा पुन्हा आठवत राहिला. एम ए च्या वर्गात असताना सरोजिनी बाई वैदय, शंकर वैद्य सर, डहाके सर, गणोरकर बाई, पुष्पा भावेबाई यांचे वर्ग स्मरत होते. अनपेक्षितपणे जमलेली ही मैफिल कवितांची होती, शब्दांची होती, गीतांची आणि गीतकारांची होती, तितकीच ती माणसांच्या अविस्मरणीय आठवणींची होती.
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले आहे. मस्साजोग गावच्या सरपंच पदाची पोटनिवडणुक ही बिनविरोध होईल अशी चर्चा होती कारण या जागेसाठी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख या उभ्या होत्या मात्र आता ही निवडणूक बिनविरोध होणार नसून अश्विनी संतोष देशमुख आणि स्वरूपानंद विश्वनाथराव देशमुख यांच्यात आता थेट लढत होणार आहे. आणखी ३ उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५ पैकी ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने ही चुरस अधिकच स्पष्ट झाली आहे.'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव' - स्वरूपानंद देशमुखदिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेली जागा ही त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख ( Ashwini Santosh Deshmukh )यांना मिळावी यासाठी अनेक जण आग्रही होते मात्र तसे काही घडले नाही. दरम्यान अश्विनी देशमुख यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, अश्विनी देशमुख या स्वतः हून निवडणूक लढवत नसून त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचा, विशेषतः त्यांच्या दिराचा मोठा दबाव आहे. काहींची राजकीय महत्त्वाकांक्षा आडवी येत असल्याने अश्विनी देशमुख यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला....तर गावासमोर नाक घासेनसरपंच पदाची पोटनिवडणूक २८ एप्रिल रोजी होणार असून २९ एप्रिल रोजी मतमोजणी होईल. दरम्यान स्वरूपानंद देशमुख हे पोटनिवडणुकीत उभे राहिल्याने त्यांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा 'डमी' उमेदवार म्हणून स्वरूपानंद देशमुख उभे राहिले आहेत, असा आरोप त्यांच्यावर केला जात होता. या आरोपाला त्यांनी प्रत्युत्तर देत खुले आव्हान देत म्हटले आहे की जर मी कोणाच्या सांगण्यावरून उभा राहिलो आहे हे सिद्ध झाले, तर सर्व गावासमोर नाक घासून त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे.हीच त्यांना खरी श्रद्धांजलीयापूर्वी मला ग्रामस्थांनी साडेतीन वर्षे काम करण्याची संधी दिली होती. आता पुढील १८ महिन्यांच्या कार्यकाळात संतोष देशमुख यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, असेही स्वरूपानंद देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान एकीकडे सहानभूतीची लाट आणि दुसरीकडे अनुभवाचा दावा यापैकी ग्रामस्थ कोणाला कौल देतील हे निवडणूक निकालात दिसून येईल. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.
Manipur Earthquake : मणिपुरमध्ये ५.२ रिश्टर तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट
मणिपुरच्या अनेक भागांमध्ये आज म्हणजेच मंगळवार २१ एप्रिल रोजी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.२ इतकी नोंदवण्यात आली असून, त्याचे केंद्र कामजोंग जिल्ह्यात होते.नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार, हा भूकंप सकाळी ५.५९ वाजता झाला. धक्के जाणवताच कामजोंग आणि आसपासच्या भागातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि अनेकजण घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाचे केंद्र अक्षांश २४.७०३ उत्तर आणि रेखांश ९४.४१५ पूर्व येथे, सुमारे ६२ किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगण्यात आले. या धक्क्यांचा परिणाम शेजारच्या नागालँड आणि आसाम राज्यांमध्येही जाणवला.https://prahaar.in/2026/04/20/india-south-korea-relations-from-chips-to-ships-india-korea-will-create-new-opportunities-together-prime-minister-narendra-modi/सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. यापूर्वी सोमवारी उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे रात्री ८.३२ वाजता रिश्टर स्केलवर ३ तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याचे केंद्र सुमारे १० किलोमीटर खोलीवर होते. तसेच सोमवारी सकाळी जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे समुद्रात सुमारे ८० सेंटीमीटर उंच लाटा उसळल्या आणि किनाऱ्यावर आदळल्या. त्यानंतर जपानमध्ये सुनामीचा इशाराही देण्यात आला होता.
भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भातील प्रयत्न आता अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचले आहे. या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी भारतीय प्रतिनिधीमंडळ या आठवड्यात वॉशिंग्टनला पोहोचत आहे. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती दिली आहे.सर्जिओ गोर यांनी एका ट्विटद्वारे अधिकृत पुष्टी करत सांगितले की, भारतीय व्यापार प्रतिनिधीमंडळ या आठवड्यात वॉशिंग्टनला पोहोचत आहे. या महत्त्वाच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम स्वरूप देणे हा आहे. भारत- अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराशी संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यासाठी विशेष भारतीय व्यापार प्रतिनिधीमंडळ याच आठवड्यात वॉशिंग्टन दौऱ्यावर जाणार आहे.https://prahaar.in/2026/04/21/share-market-stock-market-rises-in-early-trade-sensex-nifty-gains/अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी या दौऱ्याचे स्वागत करत, व्यापार कराराला अंतिम रूप देण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे. या कराराच्या आर्थिक परिणामांवर भाष्य करताना अमेरिकन राजदूत म्हणाले की, हा आगामी करार भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांसाठी ‘विन-विन’ म्हणजेच फायदेशीर ठरणार आहे.अमेरिकन राजदूतांच्या विधानामुळे ट्रम्प प्रशासन हा द्विपक्षीय करार दोन्ही देशांसाठी परस्पर लाभदायक मानत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता उद्योगजगताचे लक्ष या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या बैठका आणि करारावर अंतिम शिक्का कधी बसतो याकडे लागले आहे.
महाराष्ट्रीय साड्या या राज्याच्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासाचा जिवंत पुरावा आहेत. नाजूक जरीकामासाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध पैठणी साडी असो किंवा पारंपरिक महाराष्ट्रीय शैलीत नेसली जाणारी प्रतिष्ठित नऊवारी साडी असो, या साड्या संपूर्ण भारतातील आणि भारताबाहेरील महिलांना आजही मोहित करत आहेत. त्यांच्यातील अभिजातता आणि परंपरेच्या संगमामुळे, कोणत्याही साडीप्रेमीच्या वॉर्डरोबमध्ये त्या असायलाच हव्यात. या लेखात आपण महाराष्ट्रीय साड्यांचे विविध प्रकार, त्यांचे सांस्कृतिक महत्त्व आणि पारंपरिक तसेच आधुनिक अशा दोन्ही लूक्ससाठी तुम्ही त्या कशा स्टाईल करू शकता, याबद्दल जाणून घेऊ या.महाराष्ट्रातील साड्यांचे प्रकारमहाराष्ट्रातील साड्या अत्यंत वैविध्यपूर्ण आहेत, प्रत्येक साडी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून उगम पावते आणि सांस्कृतिक जडणघडणीत तिचे एक खास स्थान आहे. येथे काही सर्वात प्रतिष्ठित प्रकार दिले आहेत :१. पैठणी साडीपैठणी ही महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध साडी आहे. ‘रेशीमची राणी’ म्हणून ओळखली जाणारी ही साडी तिच्या आकर्षक रंगांसाठी, नाजूक हाताने विणलेल्या जरीच्या काठांसाठी आणि मोराची नक्षी असलेल्या पदरासाठी प्रसिद्ध आहे. पारंपरिकरीत्या शुद्ध रेशमापासून बनवलेल्या पैठणी साड्या शतकानुशतके ऐश्वर्य आणि परंपरेचे प्रतीक राहिल्या आहेत.२. नऊवारी साडीनऊवारी साडी, जिला ‘कास्ता’ साडी असेही म्हणतात, तिच्या नेसण्याच्या पद्धतीमुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे. सर्वसाधारण सहा-वारी साडीच्या विपरीत, नऊवारी साडी नऊ-वारी लांब असते आणि तिची नेसण्याची पद्धत पायजम्यासारखी असते, ज्यामुळे महिलांना सहजपणे वावरता येते. ही साडी महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे आणि अनेकदा सण-उत्सव व लग्नसमारंभांमध्ये परिधान केली जाते.३. कोल्हापुरी साडीकोल्हापुरी साड्या साध्या, वजनाने हलक्या असून रोजच्या वापरासाठी किंवा लहान-सहान सणासुदीच्या प्रसंगांसाठी उत्तम आहेत. त्यांचे सुज्ञतापूर्ण लालित्य आणि आरामदायीपणा यामुळे, परंपरा आणि व्यावहारिकता यांचा मेळ घालू इच्छिणाऱ्या महिलांमध्ये त्या लोकप्रिय आहेत.४. नारायण पेठ साडीनारायण पेठ या गावातून उगम पावलेल्या या साड्या, त्यांच्या आकर्षक काठांसाठी ओळखल्या जातात; हे काठ सामान्यतः लाल किंवा काळ्या रंगाचे असून त्यावर बारीक सोनेरी जरीकाम केलेले असते. त्या त्यांच्या मजबूत पोत आणि तेजस्वी रंगांसाठी ओळखल्या जातात, ज्यामुळे धार्मिक विधी आणि सणांसाठी त्या एक लोकप्रिय निवड ठरतात.महाराष्ट्रीय साड्यांचे सांस्कृतिक महत्त्वमहाराष्ट्रातील प्रत्येक प्रकारच्या साडीला एक गहन सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्त्व आहे. या साड्या केवळ वस्त्र नाहीत; त्या राज्याच्या समृद्ध इतिहासाचे आणि कलाकुसरीचे प्रतिबिंब आहेत.हातमागाचा वारसा : पैठणीसारख्या महाराष्ट्रीय साड्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्राचीन तंत्रांचा वापर करून विणल्या जातात. प्रत्येक साडी ही प्रेमाचे प्रतीक असते आणि तिच्या गुंतागुंतीच्या नक्षीकामामुळे व हाताने विणलेल्या स्वरूपामुळे ती पूर्ण होण्यास अनेकदा महिने लागतात.परंपरेचे प्रतीक : लग्न असो, धार्मिक उत्सव असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो, महाराष्ट्रीय साडी नेसणे हे परंपरेप्रती आदराचे प्रतीक मानले जाते. नऊवारीसारख्या साड्यांना महाराष्ट्रीय विवाहसोहळे आणि विधींमध्ये विशेष महत्त्व असून, त्या शालीनता, सामर्थ्य आणि वारसा यांचे प्रतीक मानल्या जातात.महाराष्ट्रीय साड्या कशा स्टाईल कराव्यातमहाराष्ट्रीयन) साड्या बहुगुणी असून वेगवेगळ्या प्रसंगांनुसार त्या विविध प्रकारे नेसता येतात. तुम्हाला पारंपरिक लूक हवा असो किंवा आधुनिकतेचा स्पर्श, या साड्यांमध्ये असंख्य पर्याय उपलब्ध आहेत.पारंपारिक देखावापारंपरिक महाराष्ट्रीयन लूकसाठी, नऊवारी साडी नेसून त्यासोबत नथ, हिरव्या बांगड्या आणि 'चिंचपेटी' नावाचा पारंपरिक मोत्यांचा हार यांसारखे पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने घाला. सांस्कृतिक सौंदर्याचा पुरेपूर अनुभव घेण्यासाठी हा लूक टिकली आणि कोल्हापुरी चपला घालून पूर्ण करा.समकालीन फ्यूजनजर तुम्हाला तुमच्या पैठणी साडीला आधुनिक टच द्यायचा असेल, तर ती एका समकालीन ब्लाउजसोबत परिधान करा -उदाहरणार्थ, कोल्ड शोल्डर किंवा हाय-नेक डिझाइन. लग्नसमारंभ किंवा सणासुदीच्या कार्यक्रमांसाठी योग्य असलेल्या फ्यूजन लूकसाठी तुम्ही कमरेला बेल्ट लावून साडीला आवळू शकता. साडीला अधिक महत्त्व देण्यासाठीकमीत कमी दागिने घाला.सणासुदीचे प्रसंगकोल्हापुरी आणि नारायण पेठ साड्या लहान सणांच्या प्रसंगांसाठी उत्तम आहेत. एक मोहक पण तरीही साधा लूक मिळवण्यासाठी तुम्ही हलका नेकलेस, कानातले आणि साधी टिकली लावू शकता.- प्रतिनिधी
Water Safety: पाणी दिसायला स्वच्छ म्हणजे सुरक्षित असेलच असं नाही!
Water Safety आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहार जितका महत्त्वाचा आहे, तितकेच स्वच्छ पाणी, मोकळी हवा आणि स्वच्छ परिसरही गरजेचे आहेत. पाणी स्वच्छ असेल तर आरोग्य चांगले राहते आणि आरोग्य चांगले असेल तर जीवनात प्रगती होते. म्हणूनच प्रत्येकाने पाण्याच्या स्वच्छतेकडे गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे.
Kalki Koechlin : कल्की कोचलिनने ‘त्या’घटनेनंतर झालेल्या मानसिक आरोग्याबाबत केला खुलासा
Kalki Koechlin : कल्कीचा घटस्फोट झाला तेव्हा तिला भरपूर मानसिक वेदना सहन कराव्या लागल्या.
Uddhav Thackeray : भारतीय कामगार सेनेच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
Pune Water Supply : पुण्याच्या पाणीकपातीवर प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय
पुणे : सूर्याचा प्रकोप हा वाढत जातोय, तापमानाचा पारा इतका वाढलाय की थेट तापमान ४०- ४५ अंशापर्यत जाऊन पोहोचलाय, त्यामुळे पाण्याची वाफ देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे धरणामंधील पाणीसाठा हा कमी होण्याची चिन्हे आहेत. पुण्यात पाणीकपातीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असून प्रशासनाने याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.पुण्यात मुबलक पाणीसाठा पाणीकपाती बाबत महत्वाचा निर्णय घेताना पुणे प्रशासनाने धरणांमधील सध्या पाणीसाठ्याची आधारे घेत आकडेवारीनुसार सध्याचा साठा ११.५ टीएमसी ( ३९ % ) असून गेल्या वर्षी हा साथ १०.४ टीएमसी ( ३६ %) होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १ टीएमसी पाणीसाठा अधिक असल्याने पालिकेचा पाणी कपातीला विरोध आहे. तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांची स्थिती सध्या समाधानकारक आहे.https://prahaar.in/2026/04/16/heatwave-sop-mandates-12-4pm-break-for-informal-workers/अल निनो च्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता असल्याने जलसंपदा विभागाने पुणे पालिकेला १५ % कपात करण्याचे आवाहन केले होते. समाधानकारक पाऊस पडेपर्यंत पाणीकपात चालू ठेवण्याचा प्रस्ताव त्या पत्रात मांडण्यात आला होता. मात्र पालिकेने प्रस्ताप तूर्तास बाजूला ठेवला आहे.https://prahaar.in/2026/04/21/share-market-stock-market-rises-in-early-trade-sensex-nifty-gains/पालिकेच्या म्हणण्यानुसार शहरातील अनेक भागात कमीदाबाने पाणीपुरवठा होत आहे, यावरून नागरिक प्रचंड तक्रार करत आहेत. पाणीकपात हा उपाय नसून वितरण पद्धत सुधारली पाहिजे हे नागरिकांचे मत आहे. पुण्याच्या पाणीकपातीचा निर्णय सध्या बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही बैठक सध्या लांबणीवर आहे. कालवा समितीची बैठक पूर्ण झाल्यानंतरच पुण्यात पाणीकपात करायची की नाही हा प्रश्न मार्गी लागणार आहे.
ट्रम्पकडून ती आनंदवार्ता आली अन् शेअर बाजाराने मोठी उसळी मारली ; नेमकं काय घडलं ?
अमेरिका इराण युद्धामुळे शेअर बाजारात ( Share Market )मोठ्या घडामोडी घडत होत्या. गुंतवणूकदार यामुळे चांगलेच धास्तावाले होते. त्यामुळे शेअर बाजारात देखील मोठी पडझड पहायला मिळत होती. हे युद्ध लवकरात लवकर थांबावे अशी आशा सर्वानाच होती पण कधी अमेरिकेतून तर कधी इराणमधून निराशा समोर येत होती. असे असले तरी सध्या युद्ध काही दिवसांसाठी बंद आहे. अशातच अमेरिकेतून अशी काही गुडन्यूज समोर आली आहे आहे की शेअर बाजारात ( Share Market ) मोठी उसळी दिसून आली. विशेष म्हणजे आखाती देशातील युद्धाची (war )धग कायम असतानाही शेअर बाजाराने मोठी उसळी मारली आहे.आज सकाळी बाजार उघडताच घडले असे काही...आज सकाळी बाजार उघडताच सकाळी 9:20 वाजता, सेन्सेक्स 430 अंकांच्या तेजीसह 78,950 अंकावर व्यापार करत होता. तर निफ्टी 50 हा 117 अंकांच्या उसळीसह 24,480 च्या स्तरावर ट्रेड करत होता. भारत आणि अमेरिका व्यापार कराराविषयी ( India US Trade Deal) मोठी अपडेट समोर आल्यानंतर आखाती युद्धाची भीती झटक्यात बाजूला झाली आणि गुंतवणूकदारांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. आणि गुंतवणुकीस पुन्हा समोर आले. जणू आज मंगळवारी शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे मंगलच मंगल झाले. बीएसई बास्केटमध्ये अदानी पोर्ट (Adani Port) , आयसीआयसीआय बँक (ICICI ), एल अँड टी, बजाज फायनान्स हे टॉप गेनर ठरले.आज सेन्सेक्स आणि निफ्टी सुसाट आज बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी रॉकेटसारखा उडाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्सने 500 अंकाहून अधिक उसळी आली. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज, NSE Nifty ने तेजीचा घोडा दौडवला. 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 96.86 अंक वा 0.12 टक्क्यांच्या तेजीसह उघडला होता. पहिल्या सत्रात सेन्सेक्सने 78,617.16 अंकाची सुरुवात केली. एनएसई निफ्टी 50 ने दिवसाची सुरुवात चांगली झाली. आज निफ्टी 50 हा 9.70 अंक वा 0.04 टक्क्यांच्या उसळीसह 24,374.55 च्या स्तरावर उघडला.अमेरिकेतून आलेल्या वृत्तानुसार, भारत आणि अमेरिकेत व्यापारी करारात ( India US Trade Deal) मोठा बदल पहायला मिळू शकतो. 20 एप्रिलपासूनच याविषयीच्या चर्चा सुरु असून त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे. अमेरिकेन न्यायालयाने टॅरिफ हे बेकायदेशीर म्हटले होते. टॅरिफ (tariff ) रद्द करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान दर्पण जैन यांच्या नेतृत्वात एक डझन भारतीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ अमेरिकन दौऱ्यावर असल्याचे आणि ते अनेक विषयावर चर्चा करणार असल्याचे समोर येत आहे.
संसदेत मांडण्यात आलेले 'नारी शक्ती वंदन' विधेयक पराभूत झाले आणि एका ऐतिहासिक बदलाची संधी हुकली. ८५० जागांपर्यंत संसदेचा विस्तार आणि महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारी ही घटनादुरुस्ती केवळ तांत्रिक कारणास्तव नव्हे, तर राजकीय श्रेयवाद आणि जुन्या पुरुषी मानसिकतेच्या पेचप्रसंगात अडकली.१७एप्रिल २०२६ हा दिवस भारतीय इतिहासातील आणि विशेषतः महिलांच्या अधिकारांच्या संदर्भात एक 'काळा दिवस' म्हणून गणला जाईल. संसदेच्या जागांची संख्या ८५० करणारी आणि वैधानिक संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारी महत्त्वपूर्ण घटनादुरुस्ती संसदेत पराभूत झाली. महिलांप्रती देशात सन्मानाची भावना निर्माण करू शकणारे हे विधेयक संसदेने हाणून पाडले. या दुर्दैवी घटनेला जबाबदार कोण? तर तीच जुनी पुरुषी मानसिकता आणि भाजपला विरोध करण्याच्या नावाखाली एकत्र आलेली काँग्रेस व तिचे साथीदार पक्ष. विरोधकांनी स्वतःच्या क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी एक ऐतिहासिक संधी गमावली आहे. आज जरी विरोधक मोदींना पराभूत केले म्हणून आनंदात असले तरीही त्यांना याचा जाब द्यावा लागेल. महिलांना मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी झगडावे लागले आहे आणि ब्रिटनमध्येही महिलांना आधी मतदानाचा हक्क नव्हता. त्यांच्याकडे मोठ्या चळवळी झाल्या आणि महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. भारतीय महिलांच्या बाबतीत हाच पुरुषी मानसिकतेचा अनुभव येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारतीय महिलांना मतदानाचा हक्क मिळाला; मात्र पुरुषी मानसिकता आड आली आणि महिलांना प्रतिनिधित्व देण्याच्या बाबतीत तीच मानसिकता कारण ठरली. ती आजही ठरत आहे. ६० कोटी भारतीय महिलांचे हक्क आणि स्वप्ने विधेयक पराभूत झाल्यामुळे चिरडली गेली आहेत.मोदी यांनी या विधेयकाची काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी भ्रूणहत्या केली असे म्हटले. त्यात असत्य काहीच नाही. कारण काँग्रेस प्रथमपासूनच महिलांविरोधी होती आणि आजही आहे. हेच राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून दाखवून दिले. त्यांनी दक्षिणेतील राज्यांना कमी प्रतिनिधित्व देण्याचा भाजपचा डाव आहे हे सांगण्यासाठी या विधेयकाची हत्या केली. पण राहुल यांची आजी इंदिरा गांधी या पंतप्रधान झाल्या, त्या महिलांना प्रतिनिधित्व देण्यात आल्यामुळे हे राहुल विसरले. वास्तविक 'नारी शक्ती वंदन' अधिनियमामुळे भारताच्या नारीशक्तीला तिचा उचित सन्मान आणि योग्य हक्क दिले जाणार होते. कारण हा कायदा महिलांची सामाजिक जबाबदारी निश्चित करण्याबरोबरच सामाजिक चेतनाही आणणार होता. मोदी सरकारची धोरणे महिलांप्रती अत्यंत अनुकूल आहेत. पण विरोधकांना हे सहन होणारे नाही. त्यामुळे त्यांनी दक्षिणेतील राज्यांचा आधार घेत हे विधेयक हाणून पाडले. जेव्हा मुलींची भ्रूणहत्या करण्यात येते तेव्हा ती मानसिकता अशा बदलांनी पराभूत होते. मोदी सरकारला हेच हवे होते; मात्र काँग्रेस आणि विरोधी मानसिकतेला ते नको होते. आता भारत विकसित देश होण्याच्या दिशेने निघाला आहे आणि या परिस्थितीत महिलांना त्यांचे उचित आणि योग्य हक्क दिले असते, तर ते जास्त योग्य दिसले असते. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता असे एक संस्कृत वचन आहे. म्हणजे जेथे नारीचे पूजन केले जाते तेथे देवताही रमतात. पण अर्थात काँग्रेस आणि त्यांच्या नतद्रष्ट साथीदारांना इतके उच्च विचार कसे सुचतील. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भात्यातील एकमेव बाण काढला आणि एकी करून विधेयक हाणून पाडले.महिला आरक्षण विधेयक नवा विचार नव्हता, पण मोदी यांच्या नेतृत्वाची खरी परीक्षा होती. आता हे विधेयक जरी हाणून पाडण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाले असले तरीही त्यांना महिला मतदार क्षमा करणार नाहीत. त्या पुढील निवडणुकीत जरूर धडा शिकवतील. कारण या विरोधी पक्षांनी महिलांचा अक्षम्य अपराध केला आहे. सामाजिक मानसिकता बदलण्याची ताकद या विधेयकात होती. महिला आरक्षण विधेयक प्रथम १९९० पासून मांडले होते पण कधी पक्षीय राजकारणाच्या भिंतींना ते धडकून पुढे सरकले नाही. पंचायत समित्यांमध्ये ते लागू करण्यात आले आणि महिलांना काही प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले. पण तेथेही पुरुषच महिलांवर अधिराज्य गाजवत. महिलांना आरक्षण देण्याची तरतूद या विधेयकात होती; मात्र २९८ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने, तर २३० सदस्यांनी प्रतिकूल मत दिल्याने विधेयक पराभूत झाले. पण हा पराभव मोदींचा नाही तर तो विरोधकांचा आहे. या विधेयकाच्या बरोबरीने २०२६-२७ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचनेचा प्रश्न होता आणि याचाच आधार घेत विरोधकांनी विधेयकाच्या विरोधी मतदान केले. कोटामुळे राजकीय प्रतिनिधित्व कमी होईल अशी भीती दक्षिणेतील राज्ये आणि तृणमूल काँग्रेस यांनी घेतली. भाजपचा हा निवडणुकीचे प्रतिनिधित्वाची पुनर्रचना करण्याचा डाव आहे असा आरोप या पक्षांनी केला. पण भाजपचा प्रत्यारोप असा होता की, विरोधी पक्ष महिला विरोधी आणि दुर्बल घटक विरोधी आहेत. तसेच महिलांना योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी हा प्रयोग आवश्यक आहे.गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहाला असे आश्वासन दिले होते, की ८१६ सदस्यांच्या सभागृहात दक्षिणेतील राज्यांचे प्रतिनिधित्व आता आहे तितकेच राहील. पण विरोधक हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यांनी विधेयक पराभूत केले. विरोधक आणि सत्ताधारी पक्ष या परिसीमन विधेयकावरून संघर्ष करत आहेत. त्यात विरोधक विधेयक पराभूत करण्यात यशस्वी झाले आहेत. पण महिला आरक्षण आणि परिसीमन हे एकमेकांशी निगडित आहेत आणि हे विरोकांच्या ध्यानी आलेले नाही. मोदी सरकारचा हा संसदेत पहिलाच पराभव आहे. महिलांना जेव्हा आपले खरे द्रोही कोण आहेत हे लक्षात येईल तेव्हा त्या काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. विरोधकांनी प्रगतीपेक्षा राजकारणाचा पर्याय निवडला आहे. त्याची शिक्षा त्यांना महिला मतदार देतीलच. पण या विधेयकाने काँग्रेस आणि पुरुषी मानसिकतेची शिकार असलेल्यांचे खरे कारनामे उघड झाले आहेत.
- भारतीय लष्कराकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवणमुंबई : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ हिंदू पर्यटकांचे टार्गेट किलींग केले होते. या भ्याड हल्ल्याची उद्या म्हणजेच बुधवार २२ एप्रिल रोजी वर्षपूर्ती असून त्याच्या पूर्वसंध्येला भारतीय लष्कराने ट्विटरव (एक्स) पोस्ट करत “मर्यादा ओलांडू नका, भारत विसरत नाही” असे सांगत ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवण करवून दिली आहे.यासंदर्भातील पोस्टमध्ये भारतीय सेनेने नमूद केले की, “जेव्हा मानवतेच्या मर्यादा ओलांडल्या जातात, तेव्हा उत्तरही ठाम आणि निर्णायक असते. न्याय मिळाला आहे. भारत एकजूट आहे.” यासोबतच एका ग्राफिकमध्ये “काही मर्यादा कधीही ओलांडल्या जाऊ नयेत. भारत विसरत नाही,” असा संदेश देण्यात आला.https://prahaar.in/2026/04/21/pune-water-supply-administration-takes-this-important-decision-regarding-water-cuts-in-pune/पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली होती. भारतीय सेनेने पाकिस्तान तसेच पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले चढवले. या कारवाईदरम्यान ९ प्रमुख दहशतवादी लॉन्चपॅड उद्ध्वस्त करण्यात आले आणि लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद व हिज्बुल मुजाहिदीन यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आले. या लष्करी कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये ४ दिवस तणावपूर्ण संघर्ष सुरू राहिला. मोठे नुकसान सहन केल्यानंतर पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधत युद्धविरामाची विनंती केली. पाकिस्तानच्या विनवणीनंतर अखेर १० मे रोजी दोन्ही बाजूंमध्ये युद्धविरामावर सहमती झाली.When boundaries of humanity are crossed, the response is decisive.Justice is Served.India Stands United.#SindoorAnniversary #JusticeEndures #NationFirst pic.twitter.com/rtgYu9Hg11— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) April 21, 2026https://prahaar.in/2026/04/21/iran-us-conflict-will-jd-vance-visit-pakistan-uncertainty-persists-ahead-of-iran-us-talks/सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक करत ते स्पष्ट राजकीय निर्देशांखाली तिन्ही सैन्यदलांमधील उत्कृष्ट समन्वयाचे उदाहरण असल्याचे म्हटले होते. तसेच, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन सुदर्शन चक्र’ची घोषणा केली होती. या मोहिमेचा उद्देश शत्रूच्या घुसखोरीला आळा घालणे आणि भारताच्या आक्रमक क्षमतांमध्ये वाढ करणे हा आहे.
आखाती युद्ध केवळ भूराजकीय संघर्ष नसून जागतिक अर्थव्यवस्थेच्या मुळावर घाव घालणारे संकट ठरते. तेलाच्या किमतींपासून रोजगारापर्यंत प्रत्येक स्तरावर त्याचे परिणाम दिसून येतात. अशा वेळी दीर्घकालीन उपाययोजना, पर्यायी ऊर्जा स्रोतांचा विकास, आर्थिक स्वावलंबन आणि स्थिर धोरणे यांची गरज अधिक तीव्रतेने जाणवते. अन्यथा, प्रत्येक जागतिक संघर्षासोबत अर्थव्यवस्थेची हीच घसरण पुन्हा पुन्हा अनुभवावी लागेल.आखाती प्रदेशातील युद्ध हे केवळ दोन-तीन देशांपुरते मर्यादित राहात नाही, तर त्याचे पडसाद संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर उमटतात. तेलसंपन्न आखाती देश जागतिक ऊर्जा पुरवठ्याचे केंद्र असल्यामुळे तेथील अस्थिरता ही थेट आर्थिक अस्थिरतेत रूपांतरित होते. अशा युद्धपरिस्थितीत सर्वप्रथम फटका बसतो तो कच्च्या तेलाच्या किमतींना. तेलाच्या किमती झपाट्याने वाढू लागल्या की वाहतूक, उत्पादन, वीजनिर्मिती अशा सर्वच क्षेत्रांवर परिणाम होतो आणि महागाईचा भडका उडतो. भारतासारख्या तेलआयात-निर्भर देशासाठी ही परिस्थिती अधिकच गंभीर ठरते. आयातीवरील खर्च वाढल्याने चालू खाते तुटीवर ताण आता येतो, रुपयाचे अवमूल्यन होते आणि सरकारसमोर आर्थिक संतुलन राखण्याचे मोठे आव्हान उभे राहते. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होतो, तर उद्योगक्षेत्रासाठी उत्पादनखर्च वाढतो. परिणामी, बाजारातील मागणी घटते आणि आर्थिक वाढीचा वेग मंदावतो. या पार्श्वभूमीवर कॉर्पोरेट कंपन्यांच्या नफ्यावर मोठा परिणाम दिसून येतो. उत्पादनखर्च वाढणे, कच्च्या मालाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होणे आणि जागतिक मागणीत घट होणे या कारणांमुळे कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण कमी होते. अनेक कंपन्यांना खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात. त्यात नवीन प्रकल्पांना स्थगिती देणे, विस्तार योजनांना ब्रेक लावणे किंवा कर्मचाऱ्यांची कपात करणे यांचा समावेश असतो. अशा परिस्थितीत कॉर्पोरेट क्षेत्राची जोखीम घेण्याची क्षमता कमी होते आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे निर्णय पुढे ढकलले जातात. असे गंभीर परिणाम होत असल्याने परिस्थितीचा वेध घ्यायला हवा.युद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता ही गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा अडथळा असते. देशांतर्गत तसेच परदेशी गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळतात. शेअर बाजारात चढ-उतार वाढतात. भांडवली बाजारातील विश्वास कमी होतो आणि नवीन गुंतवणुकीचा ओघ मंदावतो. परकीय गुंतवणूक घटल्यास तंत्रज्ञान हस्तांतरण, रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक वाढ यांवरही नकारात्मक परिणाम होतो. या सर्व प्रक्रियेचा फटका बसतो तो रोजगार क्षेत्राला. उद्योगांमध्ये उत्पादन कमी झाले, गुंतवणूक थांबली आणि नफा घटला की कंपन्या सर्वप्रथम मनुष्यबळावर गदा आणतात. नवीन भरती थांबते, कंत्राटी कर्मचाऱ्यांची कपात होते आणि काही वेळा कायमस्वरूपी नोकरकपातही केली जाते. सेवाक्षेत्रातही याचा परिणाम जाणवतो, कारण ग्राहकांचा खर्च कमी झाल्याने व्यवसायांवर ताण वाढतो. परिणामी मध्यमवर्गीय तसेच निम्नवर्गीय कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटते. युद्धाचा परिणाम केवळ थेट आर्थिक आकड्यांपुरता मर्यादित राहत नाही, तर समाजाच्या मानसिकतेवरही परिणाम करतो. अनिश्चिततेमुळे लोक खर्च करण्यापेक्षा बचतीकडे वळतात. त्यामुळे बाजारातील मागणी आणखी घटते. हीच साखळी अर्थव्यवस्थेच्या मंदीला अधिक गती देते. जागतिक स्तरावर व्यापारमार्गांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास निर्यात-आयात व्यवहारांवरही परिणाम होतो आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेलाच धक्का बसतो. अशा परिस्थितीत सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहते. महागाई नियंत्रणात ठेवणे, आर्थिक वाढ टिकवून ठेवणे आणि रोजगारनिर्मितीला चालना देणे या तिन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य करणे कठीण होते.यातून वित्तीय तूट वाढण्याचा धोका निर्माण होतो, तर सामाजिक कल्याण योजनांवरील खर्च वाढवण्याची गरजही भासते. त्यामुळे आर्थिक धोरणे आखताना संतुलन साधणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. पश्चिम आशियातील इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यातील भीषण संकटाच्या छाया आता भारतीय अर्थव्यवस्थेवर पडू लागल्या आहेत. या युद्धाचा फारसा परिणाम होणार नाही आणि आम्ही विशेष काळजी घेतली आहे, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात येत असले, तरी इतर देशांप्रमाणे भारतावरही विपरीत परिणाम होणार आहे, हे स्पष्ट आहे. ‘मूडीज’ या जागतिक पतमानांकन संस्थेने २०२६-२७ साठी भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या, म्हणजेच जीडीपीच्या वाढीचा अंदाज ६.८ टक्क्यांवरून ६ टक्के इतका खाली आणला आहे. याचे कारण या युद्धामुळे होर्मुझ खाडीमधील वाहतूक अनेक देशांसाठी बंद झाली आणि अन्यत्रही क्षेपणास्त्र हल्ले सुरू असल्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली. भारताला लागणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी ५५ आणि एलपीजीपैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त पुरवठा याच युद्धग्रस्त भागातून होतो. खतांच्या आयातीवर परिणाम झाल्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२४-२५ मध्ये २.४ टक्के असलेली सरासरी महागाई आता ४.८ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. यापूर्वी, म्हणजे १९७३ मध्ये तेल निर्यातदार राष्ट्रांनी अचानकपणे इंधनाचे दर वाढवल्यामुळे भारतावर महासंकट कोसळले होते. त्यावेळी याच्या परिणामी, तसेच सातत्याच्या दुष्काळामुळे भाववाढीचे संकट कोसळले होते.आजघडीला भारताची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूपच चांगली आहे. अन्नधान्याची टंचाई केव्हाच दूर झाली आहे. परंतु तरीही आताचा काळ जागतिकीकरणाचा असल्यामुळे पूर्वीपेक्षा आता युद्धजन्य स्थितीचे फटकेही जास्त बसण्याची शक्यता असते. याचे कारण परदेशांतून भारतात येणाऱ्या पैशांपैकी ४० टक्के वाटा हा आखाती देशातून येतो. त्याचप्रमाणे उदारीकरणानंतर जागतिक व्यापारातील भारताचा हिस्सा हळूहळू वाढत आहे आणि वेगवेगळ्या वस्तूंची व सेवांची निर्यात भारत करू लागला आहे. युद्धाच्या वणव्यामुळे अमेरिकेतील इंधनदराने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. युद्धापूर्वी तीन डॉलर प्रति गॅलनच्या खाली असलेले पेट्रोल दर चार डॉलरच्या पार गेले. तर मालवाहतुकीसाठी कणा मानल्या जाणाऱ्या डिझेलच्या किमतीत युद्ध सुरू झाल्यापासून ४७ टक्क्यांची वाढ झाली आणि त्याचे दर ५.५०डॉलर प्रति गॅलनपर्यंत पोहोचले. युरिया आणि खतांच्या किमती वाढल्याने अमेरिकन शेतकऱ्यांवर सुमारे ५० हजार डॉलर्सचा अतिरिक्त बोजा पडला आहे. त्याचप्रमाणे कम्प्युटर चिप्स बनवण्यासाठी लागणाऱ्या हेलियम वायूचा ३५ टक्के पुरवठा कतारमधून होतो. हा पुरवठा थांबल्याने सिलिकॉन व्हॅलीतील टेक कंपन्यांवर मोठे संकट कोसळले आहे. रुग्णालयातील एमआरआय उपकरणासाठी हेलियम अनिवार्य असतो, ज्याची टंचाई आता दूर व्हायला हवी. होर्मुझची नाकेबंदी अधिक काळ सुरू राहिल्यास अमेरिकेमध्ये मंदी येणे अटळ आहे. अमेरिकेचा २०२६ मधील विकासदर २.६ टक्क्यांवरून थेट एक टक्क्यावर येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याचा अर्थ अमेरिका पुन्हा एकदा १९७०च्या दशकातील ‘स्टॅगफ्लेशन’सारख्या परिस्थितीत पोहोचू शकते. अशा परिस्थितीत विकासदर कमी आणि महागाई जास्त असते. शिवाय युद्ध थांबले तरी बंद झालेल्या तेलविहिरी पुन्हा सुरू होण्यासाठी अनेक महिने लागतात. तसेच युद्धात उद्ध्वस्त झालेल्या पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीला काही वर्षे लागू शकतात. त्यामुळे इंधन दर पूर्वीच्या स्तरावर येथे येण्याची शक्यता कमीच आहे. अमेरिकेची स्थिती अशी राहिल्यास भारतासारख्या मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांनाही चटके बसणार, हे स्पष्ट आहे. वास्तविक, यापूर्वी देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये पैशांचा ओघ वाढला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सर्वसामान्य नागरिक असो वा मोठे उद्योग समूह, आपल्या गरजा आणि विस्तारासाठी बँकांकडे कर्ज मागणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. देशातील ९५ टक्के बाजारपेठ व्यापणाऱ्या ४१ प्रमुख बँकांकडून गोळा केलेल्या माहितीनुसार, उद्योगांना देण्यात येणाऱ्या कर्जामध्ये मोठी झेप पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षी उद्योगांची कर्जवृद्धी केवळ साडेसाते टक्के होती. ती आता वाढून १३.५ टक्के झाली आहे. पायाभूत सुविधा अभियांत्रिकी, रसायने, पेट्रोलियम आणि कापड उद्योगांतून कर्जाची सर्वाधिक मागणी दिसून आली आहे. या क्षेत्रात १६.१६ टक्के वाढ झाली असून, प्रामुख्याने एनबीएफसी आणि कमर्शियल रियल इस्टेट क्षेत्राकडून मोठी मागणी आली आहे. वैयक्तिक कर्ज विभागात १५ टक्क्यांची वाढ झाली आहे गृहकर्जामध्ये स्थिरता दिसत असली, तरी वाहनकर्ज आणि गोल्ड लोन घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.अर्थात ही आकडेवारी युद्धापूर्वीची, फेब्रुवारी महिन्यातील आहे. त्यानंतरच्या परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक पडला आहे. त्यामुळे बदलत्या स्थितीत कॉर्पोरेट क्षेत्राचे नफे १५ टक्क्यांनी तरी कमी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कंपन्यांचे नफे पावणेतीन लाख कोटी रुपयांनी, म्हणजेच जीडीपीच्या ०.८ टक्क्यांनी घटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेने व्यक्त केला आहे.
Sharad Pawar : शरद पवार पुन्हा रुग्णालयात; सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत महत्वाची माहिती
Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृतीच्या कारणास्तव मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Vidya Balan : चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.
गेल्या काही वर्षात ऑनलाईन व्यवहार असो किंवा वस्तू ने-आण करण्याची पद्धत, सर्व काही बदलले आहे. यासोबतच प्रवासासाठी सुद्धा ऑनलाईन कॅब असेल किंवा बाईक टॅक्सी यांचा वापर देखील सर्रास वाढला आहे. पण हे सर्व होत असताना सुरक्षितरित्या सर्व गोष्टी होणे आवश्यक असते. आपला प्रवास कुठल्याही त्रासाशिवाय होणे हा हेतू डोळ्यसमोर ठेऊन आपण ऑनलाईन कॅब असेल, बाईक असेल टॅक्सी असेल हे बुक करतो मात्र या प्रवासात किंवा प्रवासानंतर प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असाच रॅपिडो सेवेचा लाभ घेतलेल्या अनुष्का नावाच्या मुलीला याचा अनुभव आला आहे.नेमकं काय घडलं ?उत्तर प्रदेशातील गाझियाबदामध्ये (Uttarpradesh)अनुष्का नावाच्या मुलीसोबत एक विचित्र प्रकार घडला. अनुष्काने इन्स्टाग्रामवरील तिच्या अकाऊंटवरून हा भयावह अनुभव शेअर केला असून त्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या रात्री तिची रॅपिडोची राईड पूर्ण झाल्यानंतरही त्या ड्रायव्हरने डायरेक्ट व्हॉट्सॲपवर मेसेज करत तिच्याशी संपर्क साधला. तिला तिच्या ड्रॉप पॉईंटवर सोडल्यावरही त्याने तिला मेसेज केला. ” ओळखलं नाहीस का? आत्ता तर ड्रॉप करून आलो” असं त्याने लिहीलं . त्यावर तरूणीने तू रॅपिडो रायडर आहेस का असा सवाल विचारल्यावर त्याने हो असं उत्तर दिलं. एवढंच नव्हे तर पुढे त्याने आणखीही मेसेज केला. “तू खूप क्युट दिसते. ट्रॅडिनशल कपड्यांत छान दिसत होतीस, तुझं वय काय ?” असे मेसेज त्या ड्रायव्हरने पुढे केले. ती एकटी राहते का असंही त्याने जाणून घेण्याचा प्रयत्न त्याने केला, असा दावा संबंधित तरूणीने केला आहे.
Share Market : सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ
मुंबई : देशांतर्गत शेअर बाजारात आज (मंगळवार, २१ एप्रिल) सुरुवातीच्या व्यवहारात तेजीचा कल दिसून येत आहे. व्यवहारांची सुरुवात किंचित वाढीने झाली. बाजार उघडल्यानंतर लगेचच खरेदीदारांनी खरेदीचा सपाटा सुरू केला, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी वाढ झाली. सकाळी १०:०० वाजेपर्यंत, सेन्सेक्स ०.६३ टक्क्यांनी आणि निफ्टी ०.५६ टक्क्यांनी वधारला होता.शेअर बाजारातील दिग्गज कंपन्यांमध्ये, नेस्ले इंडिया, ॲक्सिस बँक, एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स यांचे शेअर्स १.६८ टक्के ते ०.७२ टक्क्यांपर्यंतच्या वाढीसह व्यवहार करत होते. दुसरीकडे, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी लाइफ, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, इन्फोसिस आणि जिओ फायनान्शिअल यांचे शेअर्स ३.१९ टक्के ते ०.५० टक्क्यांपर्यंतच्या घसरणीसह व्यवहार करत होते.आजच्या व्यवहारानुसार, शेअर बाजारात २,७१७ शेअर्समध्ये सक्रिय व्यवहार सुरू होते. यापैकी २,१६९ शेअर्समध्ये वाढ झाली, तर ५४८ शेअर्समध्ये घट झाली. त्याचप्रमाणे, सेन्सेक्समधील ३० पैकी २७ शेअर्स खरेदीच्या पाठिंब्यामुळे तेजीत राहिले. दुसरीकडे, विक्रीच्या दबावामुळे तीन शेअर्समध्ये घट झाली. निफ्टीमधील ५० पैकी ४२ शेअर्समध्ये वाढ झाली, तर आठ शेअर्समध्ये घट झाली.बीएसई सेन्सेक्स आज ९६.८६ अंकांच्या वाढीसह ७८,६१७.१६ अंकांवर उघडला. व्यवहार सुरू झाल्यानंतर लगेचच खरेदीदारांनी खरेदी सुरू केली, ज्यामुळे निर्देशांकाच्या हालचालीला चालना मिळाली. तथापि, नफावसुलीच्या उद्देशाने अधूनमधून विक्रीचे सत्रही सुरू होते. असे असूनही, निर्देशांकाच्या हालचालीवर लक्षणीय परिणाम झाला नाही. बाजारात सुरू असलेल्या खरेदी-विक्रीच्या पार्श्वभूमीवर, सकाळी १० वाजेपर्यंत सेन्सेक्स ४९२.२७ अंकांनी वाढून ७९,०१२.५७ अंकांवर व्यवहार करत होता.https://prahaar.in/2026/04/21/mumbai-local-update-central-railway-services-disrupted-for-the-second-consecutive-day-massive-crowds-at-diva-station/सेन्सेक्सप्रमाणेच, एनएसई निफ्टीनेही आज ९.७० अंकांच्या किंचित वाढीसह २४,३७४.५५ अंकांवर व्यवहाराला सुरुवात केली. बाजार उघडताच, निर्देशांक घसरून २४,३५४.९० अंकांवर पोहोचला. त्यानंतर, खरेदीदारांनी आपली खरेदी तीव्र करून निफ्टीच्या हालचालीला चालना दिली. खरेदीच्या पाठिंब्याने, निर्देशांक २४,५१२.३५ अंकांपर्यंत उसळी घेऊन पोहोचला. यानंतर, नफावसुलीच्या विक्रीमुळे त्याच्या हालचालीतही किंचित घट झाली. बाजारात सुरू असलेल्या खरेदी-विक्रीच्या पार्श्वभूमीवर, सकाळी १० वाजेपर्यंतच्या व्यवहारानंतर, निफ्टी १३६.३० अंकांच्या वाढीसह २४,५०१.१५ अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.तत्पूर्वी, आदल्या दिवशी, सोमवारी, सेन्सेक्स २६.२७ अंकांच्या म्हणजेच ०.०३ टक्क्यांच्या वाढीसह ७८,५२०.३० अंकांच्या पातळीवर बंद झाला होता. तर निफ्टी सोमवारी ११.३० अंकांच्या म्हणजेच ०.०५ टक्क्यांच्या वाढीसह २४,३६४.८५ अंकांच्या पातळीवर बंद झाला होता.
Airtel Recharge: एअरटेलचा 84 दिवसांचा प्लान महाग; ग्राहकांना पुन्हा बसला झटका
Airtel Recharge नव्या 899 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना पूर्वीसारखेच फायदे मिळणार आहेत. या प्लानमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते. तसेच अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि नॅशनल रोमिंग कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय दररोज 100 एसएमएसही मिळतात.
Yusuf Pathan : भायखळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत खालिद खान, उमरशाद खान आणि शोएब खान यांना अटक केली.
Hungary PM Peter Magyar : ICC ने बेंजामिन नेतन्याहू आणि इस्रायलचे माजी संरक्षण मंत्री योव गॅलँट यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते.
Mumbai Local Update : दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वे विस्कळीत; दिवा स्थानकात प्रचंड गर्दी
ठाणे : मध्य रेल्वेमार्गावरील डोंबिवली रेल्वे स्थानक येथे सोमवारी लोकल ट्रेनचा डबा रुळावरून घसरून झालेल्या अपघाताचा परिणाम दुसऱ्या दिवशीही कायम असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.विशेषतः दिवा रेल्वे स्थानक येथे सकाळपासूनच प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. स्थानकाच्या दोन्ही फलाटांवर टोकापर्यंत खच्चून भरलेली गर्दी दिसून येत होती. महिला प्रवाशांची संख्याही लक्षणीय होती. या गर्दीचे छायाचित्रे सध्या सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असून परिस्थितीची गंभीरता अधोरेखित करत आहेत.https://prahaar.in/2026/04/20/mumbai-local-empty-local-coach-derails-in-dombivli-train-schedule-disrupted/दरम्यान, सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल ट्रेन सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी झालेल्या अपघातानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच खर्डी स्थानकाजवळ रात्री आवश्यक दुरुस्ती कामांसाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. हा ब्लॉक पहाटे तीन वाजता संपून सेवा पूर्ववत होणे अपेक्षित होते, मात्र तो सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहिल्यामुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक ठप्प झाली.https://prahaar.in/2026/04/21/mumbai-against-drugs-mumbai-against-drugs-campaign-to-launch-in-mumbai-starting-may-1-2026-decision-reached-today-during-a-meeting-chaired-by-guardian-minister/या सर्व घडामोडींमुळे मंगळवारीही मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला असून प्रवाशांना उशिरा धावणाऱ्या गाड्यांचा फटका बसत आहे. रेल्वे प्रशासनाने परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले असले तरी सध्या तरी प्रवाशांना गर्दी आणि विलंबाचा सामना करावा लागत आहे.
Iran - America War : जेडी वॅन्स पाकिस्तानला जाणार का? इराण- अमेरिका चर्चेपूर्वी अनिश्चितता कायम
वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला असून, कूटनीती आणि संघर्ष यांच्या दरम्यान थेट युद्धाची शक्यता निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानमध्ये प्रस्तावित दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी आपले विशेष दूत स्टीव विटकॉफ आणि जॅरेड कुशनर यांना इस्लामाबादला पाठवले आहे. मात्र, या चर्चेबाबतचे चित्र अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. कारण या बैठकीत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स सहभागी होणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.एका बाजूला ट्रम्प यांनी स्टीव विटकॉफ आणि जॅरेड कुशनर यांना इस्लामाबादला पाठवून निर्णायक लढाई आता चर्चेच्या टेबलावर लढली जाईल, असा स्पष्ट संदेश दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यावरचे अनिश्चिततेचे सावट या चर्चेची गंभीरता आणि रणनीती यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.https://prahaar.in/2026/04/20/iran-america-war-did-america-seize-an-iranian-cargo-ship/माहितीनुसार, उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स अद्याप अमेरिकेतून रवाना झालेले नाहीत. वॅन्स सध्या अमेरिकेतच आहेत आणि त्यांच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत कोणतीही स्पष्ट पुष्टी झालेली नाही. यावरून चर्चेची तयारी अद्याप पूर्णपणे अंतिम झालेली नसल्याचे संकेत मिळतात. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, जेडी वॅन्स मंगळवारी पाकिस्तान दौऱ्यावर जाऊ शकतात. तेथे इराणशी संबंधित मुद्द्यांवर नव्या फेरीची चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, इराणने अद्याप या चर्चेत सहभागी होण्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. त्यामुळे अनिश्चितता कायम आहे.दरम्यान चर्चेबाबत केवळ अमेरिकेकडूनच नव्हे, तर इराणकडूनही स्पष्टता नाही. इराणी अधिकाऱ्यांनी चर्चेत सहभागी होण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत दिले आहेत, मात्र अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. यापूर्वी इराणने अमेरिकेवर गैरप्रामाणिकपणाचा आरोप करत चर्चेत अनुत्सुकता दाखवली होती.https://prahaar.in/2026/04/20/iran-america-war-irgcs-dominance-in-irans-decision-making-process-possibility-of-talks-with-america-low/दुसरीकडे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे या संभाव्य चर्चांसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर हे संपूर्ण प्रक्रियेत मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. यापूर्वी ११ ते १२ एप्रिलदरम्यान दोन्ही बाजूंमध्ये सुमारे २१ तास चर्चा झाली होती, मात्र ती कोणताही निष्कर्ष निघाल्याशिवाय संपली होती. आता युद्धविरामाची मुदत जवळ येत असताना ही दुसरी फेरी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. एकूणच, जेडी वॅन्स यांच्या दौऱ्याबाबतचा संभ्रम आणि इराणची अनिश्चित भूमिका यामुळे ही चर्चा यशस्वी होईल की नाही, हे सांगणे कठीण आहे. येत्या काही दिवसांतच हे ठरणार आहे की हा कूटनीतिक प्रयत्न शांततेकडे नेईल की परिस्थिती आणखी गंभीर बनेल.
Swanandi Sardesai: स्वानंदी सरदेसाई झाली नवरी; पारंपरिक लूकने जिंकली चाहत्यांची मनं
Swanandi Sardesai स्वानंदीने १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर लग्न केलं. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत “श्री. व सौ.” अस कॅप्शन दिल आहे. या पोस्टमधून तिच्या लग्नाची माहिती समोर आली. स्वानंदीच्या पतीचं नाव विक्रांत रामदास असं आहे.
Wagholi News : या विषयावर चर्चा करण्यासाठीप्रभाग क्रमांक १,२,३ चे नगरसेवक रामभाऊ दाभाडे अनिल सातव, ऐश्वर्या पठारे, श्रेयस खांदवे, तसेच सुरेंद्र पठारे, बॉबी टिंगरे उपस्थित होते.
Revenue department : महसूल विभागाचा बेमुदत संप; राज्यभर कामकाजावर मोठा परिणाम
Revenue department : या संपाचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.
Dr. Gopalrao Patil : भाजपचे माजी खासदार काळाच्या पडद्याआड! लातूरमध्ये शोककळा
Dr. Gopalrao Patil : भाजपचे माजी खासदार डॉ. गोपाळराव विठ्ठलराव पाटील यांचे निधन झाले असून, लातूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
मुंबई : राज्यात अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी महिला व बालविकास विभागाने व्यापक आणि प्रभावी उपाययोजना राबविल्याने राज्यभरात १३ बालविवाह रोखण्यात यश आले याचे महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले.राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन मार्गदर्शनाने यंत्रणा सज्जअक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असल्याने या दिवशी सामूहिक विवाहांसोबत बालविवाहांचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागाने आधीच सतर्कता बाळगली होती. यासाठी राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बालविकास विभागाचे सचिव, आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या आणि बालविवाह रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.राज्यात जनजागृतीचे व्यापक अभियानराज्यात जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर जनजागृतीचे व्यापक अभियान राबविण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन १०९८, अंगणवाडी सेविका, ग्राम बाल संरक्षण समित्या आणि बालकल्याण क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या माध्यमातून कीर्तन, भागवत, पथनाट्य, पदयात्रा, पोस्टर्स, स्टीकर्स आदी विविध उपक्रमांतून नागरिकांना बालविवाहाचे दुष्परिणाम पटवून देण्यात आले. तसेच, बालविवाह प्रतिबंधक शपथ घेण्याचे कार्यक्रम आयोजित करून प्रत्येक घरापर्यंत जनजागृती पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याची माहितीमुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी किंवा मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्यास अशा विवाहांना आळा घालण्यासाठी मंगल कार्यालय मालक, वाजंत्री पथक, पुजारी तसेच संबंधित नातेवाईकांवर २४ तासांत गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याची माहितीही नागरिकांना देण्यात आली.रायगड १, अहिल्यानगर ५, बुलढाणा १, यवतमाळ २, छत्रपती संभाजीनगर १,धाराशिव २, परभणी १ असे एकूण १३ बालविवाह रोखण्यात यश मिळाले.महिला व बालविकास विभागाच्या या प्रभावी आणि समन्वयित कारवाईया सर्व प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून अक्षय तृतीयेच्या दिवशी राज्यातील विविध ठिकाणी होणारे १३ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश मिळाले. यापैकी यवतमाळ जिल्ह्यात एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाच्या या प्रभावी आणि समन्वयित कारवाईमुळे बालविवाहासारख्या कुप्रथेविरुद्ध ठोस संदेश समाजात पोहोचला असून भविष्यातही अशा प्रकारच्या मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.
IPL 2026 Tilak Varma : तिलक वर्माच्या शानदार शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा विजय
अहमदाबाद : तिलक वर्माची स्फोटक फलंदाजी आणि अश्विनी कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर ९९ धावांनी विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, तिलकच्या नाबाद १०१ धावांच्या जोरावर मुंबईने २० षटकांत पाच विकेट्स गमावून १९९ धावा केल्या. गुजरातचा संघ १५.५ षटकांत केवळ १०० धावाच करू शकला आणि सर्वबाद झाला. धावांच्या फरकाने मिळवलेला हा मुंबईचा आयपीएलमधील चौथा सर्वात मोठा विजय आहे. तसेच, गुजरातचा संघ आपल्या सर्वात कमी धावसंख्येवर सर्वबाद होण्याची ही दुसरी वेळ होती..सलग चार पराभवांनंतर मुंबईचा हा पहिला विजय आहे. या हंगामातील दुसऱ्या विजयासह, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाने चार गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यांचा नेट रन रेट देखील सुधारून +०.०६७ झाला आहे. गुजरात सध्या सहा गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.https://prahaar.in/2026/04/17/ipl-2026-mi-vs-pbks-some-tough-decisions-have-to-be-made-hardik-pandya-will-mumbais-internal-dispute-affect-the-game/गुजरातची सामन्याची सुरुवात खराब झाली होती. डावाच्या पहिल्याच चेंडूवर संघाने साई सुदर्शनला (०) गमावले. पुढच्याच षटकात, जोस बटलरच्या (५) रूपाने त्यांना दुसरा धक्का बसला. त्यानंतर, वॉशिंग्टन सुंदर आणि शुभमन गिल यांनी २० चेंडूंमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ३५ धावा जोडल्या, पण ही जोडी तुटल्यानंतर संघ पुन्हा गडबडला. वॉशिंग्टन १७ चेंडूंमध्ये २६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर शाहरुख खानने १७ धावांचे योगदान दिले. कर्णधार शुभमन गिलने १४ धावांची खेळी केली. मुंबईसाठी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणाऱ्या अश्विनी कुमारने २४ धावांत चार बळी घेतले, तर गझनफर आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.https://prahaar.in/2026/04/16/mumbai-indians-suffer-fourth-consecutive-defeat-punjab-wins-kings-become-ipl-toppers/यापूर्वी, गुजरातविरुद्ध मुंबईची सुरुवात खराब झाली होती, रबाडाने पॉवरप्लेमध्येच मुंबईला तीन बळी मिळवून दिले होते. रबाडाने क्विंटन डी कॉक (१३), दानिश मालेवार (२) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (१५) यांना बाद करून मुंबईचा डाव सावरला होता. त्यानंतर तिलकने नमन धीरसोबत मिळून मुंबईचा डाव सावरला. या दोन फलंदाजांनी ४० चेंडूंमध्ये चौथ्या विकेटसाठी ५२ धावा जोडल्या. नमन धीर बाद झाल्यानंतर, तिलक आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांनी मुंबईसाठी एक मोठी भागीदारी रचली. त्यांनी ३८ चेंडूंमध्ये पाचव्या विकेटसाठी ८१ धावा जोडल्या, ज्यात तिलकचे योगदान सर्वाधिक होते. हार्दिक बाद झाला, पण तिलकने आपली विकेट टिकवून ठेवली.सामन्यादरम्यान तिलकला दुखापत झाली आणि त्याची तपासणी करण्यासाठी फिजिओला मैदानावर यावे लागले. तिलकने फलंदाजी सुरू ठेवली. जरी त्याने सावकाश सुरुवात केली आणि पहिल्या २२ चेंडूंमध्ये केवळ १९ धावा केल्या, तरी त्यानंतर टिळकने वेग वाढवला आणि पुढच्या २३ चेंडूंमध्ये ८२ धावा केल्या. तिलकने ४५ चेंडूंमध्ये आपले पहिले आयपीएल शतक पूर्ण केले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाने केलेले हे संयुक्त-सर्वात जलद शतक आहे. यापूर्वी, २००८ मध्ये सनथ जयसूर्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मुंबईसाठी तितक्याच चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. तिलकने कॅमेरॉन ग्रीनचा विक्रम मोडला, ज्याने २०२३ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ४७ चेंडूंमध्ये शतक केले होते. गुजरातकडून रबाडाने तीन बळी घेतले, तर सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
Tea Side Effects: उन्हाळ्यात जास्त चहा पिताय? हे साइड इफेक्ट्स जाणून घेतले तर आजच कमी कराल!
Tea Side Effects चहामध्ये कॅफीन आणि टॅनिनसारखे घटक असतात. हे घटक मर्यादित प्रमाणात घेतले तर फारसा त्रास होत नाही, पण जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. विशेषतः रिकाम्या पोटी चहा पिणे किंवा दिवसभरात अनेक वेळा चहा घेणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
BMC News : नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक नामंजूर, महापालिका सभागृहात तीव्र पडसाद
विरोधी पक्षांचा तीव्र शब्दांत केला निषेधमुंबई :महिलांना योग्य प्रमाणात सर्व विधी मंडळात, विधानसभा, लोकसभा या ठिकाणी प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी नारी शक्ती वंदन अधिनियम या विधेयकाला बहुमताने नामंजूर करण्यात आल्याने याचा निषेध करण्यात आले. काँग्रेस आणि उबाठासह इतर विरोधी पक्षांचा समाचार घेत भाजपने तीव्र निषेध करत महिलांच्या सक्षमीकरणा प्रवाह आम्ही रोखू शकत नाही. आम्ही महिलांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा सभागृहात देण्यात आला.मुंबई महापालिका सभागृहात सभागृहनेते गणेश खणकर यांनी संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम या विधेयकाला बहुमताने नामंजूर करण्यात आल्याने तसेच तसेच विधेयकाला विविध कारणे पुढे कयन विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा निषेधाचे निवेदन सभागृहात केले. यावर काँग्रसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी विधेयक का नामंजूर करण्यात आले याची कारण देत पक्षाने महिलांना प्राधान्य दिले.म्हणून काँग्रेसचे नेतृत्व आले होते,असे सांगण्याचा प्रयत्न केला. यावर भाजपच्या राजेश्री शिरवडकर यांनी देश महासत्तेच्या दिशेने जात असल्याने हा विरोध असल्याचे सांगितले. तर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी नारी वंदनीय आहे, नंदनीय करू नका असे सांगत हे आरक्षण आले तरी वरळीत आरक्षण झाले तर मलाच उमेदवारी मिळेल असाही विश्वास व्यक्त केला.राखी जाधव यांनी महिलेला संधी मिळाली तर ती नेतृत्व करते असे सांगितले, तर बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी उबाठाला कांग्रेसच्या मांडीवर बसल्याचा आरोप केला. तर प्रिती सातम यांनी हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे पुढील महिला शिक्षा भोगणार असल्याचे सांगत मुस्लिम महिलांची तलाकमधून सुटका देशाच्या पंतप्रधानांनी केली असे सांगत ज्या पक्षाला घराणेशाहीच्या गाद्या उबवायच्या आहेत, म्हणून त्यांनी विरेाध केल्याचे सांगितले. शीतल गंभीर यांनी २७ वर्षांपूर्वी जर काँग्रेसने यावर निर्णय घेतला असता तर आज ही चर्चा करावी लागली नसती,असे सांगितले.https://prahaar.in/2026/04/20/bmc-news-massive-enforcement-drive-in-the-bandra-to-santacruz-east-area-water-pipeline-encroachments-cleared-in-bandra/विशाखा राऊत यांनी उबाठाच्या महिला आघाडीचे स्वर्गीय सुषमा स्वराज यांनी कौतुक केल्याचे सांगितले. तर श्रध्दा जाधव यांनी महिला सक्षम असून हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे पंतप्रधानांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन महिलेला पंतप्रधान करावे अशी सूचना केली. तर तेजस्वी घोसाळकर यांनी विधेयक मंजूर न होणे हा काळा दिवस असल्याचे सांगितले. तर स्वप्ना म्हात्रे यांनी महिलेसारखी ताकद कुणाकडेच नसल्याचे सांगितले.यावर महापौर रितू तावडे यांनी आपण महापौर किंवा पिठासीन अधिकारी म्हणून बोलत नसून एक महिला म्हणून बोलत असल्याचे सांगत हा राजकीय नैतिक दिवाळखोरीचा हा ठसठसीत पुरावा असल्याचे सांगितले. हीच का विरोधी पक्षाची महिला सक्षमीकरणाची व्याख्या का असा सवाल करत रितू तावडे यांनी विरोधकांना याची किंमत मोजावीच लागेल असा इशाराही दिला. हे विधेयक मंजूर झाले नसले तरी महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रवाह रोखला जावू शकत नाही,असे सांगत त्यांनी तीव्र शब्दांत याचा निषेध केला.यावेळी चर्चत संध्या दोशी, विजय उबाळे,मेहेर हैदर,दिक्षा कारकर, विशाखा राऊत, तुलिफ मिरांडा, अंकित प्रभू, नवनाथ बन, मिनल तुर्डे, प्रकाश दरेकर,संगिता शर्मा, प्रमोद सावंत, राणी दि्वेदी, आशा मराठे, साईनाथ दुर्गे,हेतल गाला, सिध्दार्थ शर्मा, तेजिंदर तिवाना, विजेंद्र शिंदे, सचिन पडवळ आदींनी चर्चेत भाग घेतला होता.https://prahaar.in/2026/04/20/bmc-all-assistant-commissioners-must-prioritize-cleanliness-in-their-respective-zones-additional-commissioners-directive/
BMC News : मुंबई महापालिकेच्या १५३ वर्षांत सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण
महापालिका अधिनियमांमध्ये तरतूद नाही तरीही सत्ताधारी पक्षाने उचलले पाऊलमुंबई : मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे. महापालिकेचे सोमवारी पार पडलेले अर्थसंकल्पीय चर्चेचे यू ट्युब लाईव्ह करण्यात आले. अशाप्रकारे महापालिकेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने नगरसेवकांसह त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हे थेट प्रक्षेपण करताना महापालिकेच्या अधिनियमांचे उल्लंघन झाले असून अधिनियमांमध्ये स्पष्ट तरतूद नसतानाही या सभागृहाचे कामकाज लाईव्ह करण्यात आल्याने सर्व माजी नगरसेवकांसह निवृत्त सचिवांकडूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.https://prahaar.in/2026/04/20/bmc-all-assistant-commissioners-must-prioritize-cleanliness-in-their-respective-zones-additional-commissioners-directive/मुंबई महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर महापालिका सभागृहाचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी झाली होती. त्यानंतर महापौर आणि सभागृहनेत्यांनी सभागृहाचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सोमवारपासून महापालिकेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे.https://prahaar.in/2026/04/20/bmc-news-massive-enforcement-drive-in-the-bandra-to-santacruz-east-area-water-pipeline-encroachments-cleared-in-bandra/महापालिकेचे पहिले सभागृह ४ सप्टेंबर १८७३मध्ये भरले होते. त्यानंतर मागील १५ वर्षांपासून महापालिकेचे कामकाज लाईव्ह करण्यात यावे अशी मागणी सातत्याने नगरसेवकांकडून केले जात आहे. परंतु आजवर केवळ आणि केवळ अधिनियमांमध्ये तरतूद नसल्याची कारणे देत अशाप्रकारची सुविधा महापालिका सभागृहात देण्यास येत नव्हती.अशाप्रकारे सभागृहाचे कामकाज लाईव्ह करण्यासाठी धोरणात्मक निर्णय नसल्यामुळे मागील महिन्यात माजी महापौर व नगरसेविका श्रध्दा जाधव आणि नगरसेवक अंकित प्रभू यांनी सभागृहाचे कामकाज लाईव्ह करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वार केली. परंतु याबाबतचेही ठरावही सभागृहात मंजूर झालेले नाही. मात्र, महापालिकेच्या इतिहासात सभागृहाचे कामकाज लाईव्ह होताना ते नियमांचे उल्लंघन करून सुुरु करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. महापौर आणि सभागृह नेत्यांनी केवळ प्रायोगिक तत्वावर सभागृहाचे कामकाज लाईव्ह करताना अधिनियमातील तरतुदींचा विचार केलेला दिसून येत नाही. त्यामुळे जोवर अधिनियमांमध्ये तरतूद होत नाही तोवर प्रायोगिक तत्वावरही याचे थेट प्रक्षेपण करता येत नाही. तरीही हा प्रकार घडल्यामुळे प्रत्यक्षात नियमांचे उल्लंघन झाल्याची चर्चा सर्वच स्तरावर सुरु आहे.

29 C