केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. संकटाच्या काळात अंदाज/अनुमान आणि सनसनाटी बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. इस्रायल-इराण संघर्षादरम्यान खोट्या आणि काल्पनिक बातम्यांच्या प्रसारणानंतर, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलला (बीएआरसी) हा निर्देश जारी केला आहे.माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, काही वृत्तवाहिन्या युद्धाच्या परिस्थितीचे अनावश्यकपणे खळबळजनक/सनसनाटीकरण करत आहेत. अशा प्रकारच्या मजकुरामुळे सामान्य जनतेमध्ये, विशेषतः बाधित भागातील कुटुंबांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण होऊ शकते.हे लक्षात घेऊन, सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांच्या टीआरपी अहवालावर चार आठवड्यांसाठी बंदी घातली आहे. या कालावधीत, वाहिन्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन सामान्य प्रक्रियेनुसार केले जाणार नाही. हे उल्लेखनीय आहे की, ६ मार्च रोजी पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने वृत्तवाहिन्यांचे टीआरपी चार आठवड्यांसाठी स्थगित करण्याचे आदेश दिले होते.
Ajit Pawar : अजित पवारांचा घातपात कि अपघात? शरद पवारांचा मोठा खुलासा
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमानाचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला.
Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण
मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्यांना अचानक आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.एसी कोचमध्ये लागली अचानक आग :मिळालेल्या माहितीनुसार, हे वर्कशॉप मध्य रेल्वे अंतर्गत असून येथे ट्रेनच्या डब्यांची दुरुस्ती आणि देखभाल केली जाते. वर्कशॉपच्या आवारात उभ्या असलेल्या एसी कोचमध्ये अचानक आग लागली. उपकरणांमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले आणि धुराचे मोठे लोट परिसरात पसरले.अनेक अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल :घटनास्थळी उपस्थित कर्मचारी आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. आग लागल्याची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही मिनिटांतच अनेक अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आग इतर डब्यांपर्यंत पसरू नये म्हणून परिसर रिकामा करण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले होते.
आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावामुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून राबविण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प नियोजनानुसार सुरू असून मे २०२७ पर्यंत मुंबईतील मुंबईतील सीसी रस्त्यांचे काम मे २०२७ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी दिली.महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीनंतर आमदार अमीत साटम यांनी मुंबईत सुरू असलेल्या रस्ते कामांविषयी माहिती दिली.मुंबईतील एकूण रस्त्यांचे जाळे सुमारे २,०५० किमी आहे. त्यापैकी २०२२ पूर्वीच सुमारे १,२०० किमी रस्ते सिमेंट काँक्रिट (CC) मध्ये रूपांतरित करण्यात आले होते. २०२२ नंतर आणखी ६७७ किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेण्यात आले असून त्यापैकी सुमारे ७१% म्हणजेच ४८१ किमी काम पूर्ण झाले आहे, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.आमदार अमीत साटम यांनी पुढे सांगितले की हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबविला जात आहे. पहिला टप्पा ३०७ किमीचा असून तो ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू झाला, तर दुसरा टप्पा ३७० किमीचा असून तो ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झाला.उर्वरित कामांपैकी १०–१५% काम मे २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, तर आणखी १०% काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण प्रकल्प मे २०२७ पर्यंत पूर्ण होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यावर सुमारे १,९०० किमी रस्ते पूर्णपणे काँक्रिटीकरण करण्यात आलेले असतील, असे त्यांनी नमूद केले.कामांची गुणवत्ता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आयआयटी ची थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या IIT दुसऱ्या टप्प्याचे ऑडिट करत असून आता पहिल्या टप्प्याचेही ऑडिट करणार असल्याचे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.आर्थिक परिणामांबाबत बोलताना त्यांनी खड्डे दुरुस्तीवरील खर्चात सातत्याने घट होत असल्याचे सांगितले. २०२३–२४ मध्ये हा खर्च २०२ कोटी रुपये होता. तो २०२४–२५ मध्ये १५६ कोटी रुपयांपर्यंत खाली आला. म्हणजे त्यात २३% घट झाली. २०२५–२६ मध्ये हा खर्च आणखी कमी होऊन ८९ कोटी रुपये झाला, म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत ४३% घट झाली. चालू वर्षासाठी खड्डे दुरुस्तीचा निविदा खर्च सुमारे ४४ कोटी रुपये अपेक्षित आहे, म्हणजेच आणखी ५०% घट होईल, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.
Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक स्थळांना - राजराजेश्वरम मंदिर आणि गुरुवायूर मंदिराला भेट दिली. त्यांनी एकूण ६ कोटी रुपयांची (प्रत्येकी ३ कोटी रुपये) देणगी जाहीर केली. त्यांनी ऐतिहासिक पूर्व गोपुरमच्या जीर्णोद्धारासह राजराजेश्वरम मंदिराच्या व्यापक नूतनीकरणासाठी १२ कोटी रुपयांचे वचनही दिले. तालिपरंबा येथील राजराजेश्वरम मंदिराच्या भेटीदरम्यान, अंबानी यांनी पोनुमकुडम, पट्टम, थाली आणि नेय्यमृत्टू निक्की व अश्वमेध यांसारखे पारंपरिक विधी केले. त्यांनी मंदिराच्या सुरू असलेल्या कामांसाठी ३ कोटी रुपयांचा धनादेशही सादर केला.गोपुरमच्या जीर्णोद्धारासाठी १२ कोटी रुपयांची मोठी मदत जाहीरअनंत अंबानी यांनी मंदिराच्या ऐतिहासिक पूर्व गोपुरमच्या जीर्णोद्धारासाठी १२ कोटी रुपयांची मोठी मदत जाहीर केली. हे गोपुरम सौंदर्यदृष्ट्या आणि वास्तुकलेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जाते आणि ते जवळपास दोन शतकांपासून जीर्ण अवस्थेत होते. या प्रकल्पामुळे दुकाने आणि इतर आकर्षणांमध्ये सुधारणा होऊन मंदिराच्या वास्तुकलेचे सौंदर्यही वाढेल. या प्रसंगी त्यांच्यासोबत त्यांचे जवळचे सहकारी उपस्थित होते. मंदिर प्रशासनाने पारंपरिक सन्मानाने त्यांचे स्वागत केले. यावेळी टिकेके देवस्वमचे अध्यक्ष टी.पी. विनोद कुमार, कार्यकारी अधिकारी के.पी. विनीन, मुख्य पुजारी ई.पी. कुबेरन नंबुथिरी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.गुरुवायूर मंदिराला अधिक समृद्ध बनवण्याचा उपक्रमअनंत अंबानी यांनी गुरुवायूर मंदिराला भेट दिली, जिथे त्यांनी भगवान गुरुवायूरप्पन यांची प्रार्थना केली आणि मंदिर ट्रस्टला ३ कोटी रुपयांची देणगी दिली. प्राणी संवर्धनाप्रती आपली वचनबद्धता कायम ठेवत, त्यांनी गुरुवायूर मंदिराच्या कल्याणासाठी इच्छा व्यक्त केली. यामध्ये हत्तींसाठी एक समर्पित रुग्णालय, साखळीमुक्त निवारा आणि हत्तींची काळजी, शास्त्रीय व्यवस्थापन व भरती पद्धती यांसारख्या आधुनिक सुविधांच्या विकासाचा समावेश आहे. गुरुवायूर येथे देवस्वम मराठा ए. व्ही. गोपीनाथ आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.'पवित्र मंदिरांचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी'या प्रसंगी बोलताना अनंत अंबानी म्हणाले की, भारताची आध्यात्मिक परंपरा केवळ प्रार्थनास्थळे नाहीत, तर त्या अशा जिवंत संस्था आहेत, ज्या श्रद्धा, समाज, करुणा आणि निसर्ग यांच्याशी असलेले आपले सखोल नाते अधिक दृढ करतात. पवित्र मंदिरांचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. भारताचा समृद्ध आध्यात्मिक वारसा जतन करण्यासाठी, मंदिरांमधील अवशेषांना बळकट करण्यासाठी, बौद्ध अनुभवाला समृद्ध करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित मंदिरांच्या कल्याणाला चालना देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.
मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवावीत, असे त्यांनी सांगितले.सह्याद्री अतिथीगृह येथे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत कृषी पणन मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ.अमोल यादव, व्यवस्थापक सतीश वराडे, शैलेंद्र जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.बैठकीत कृषी पणन मंडळाची निर्यात सुविधा केंद्रे, आस्थापना विषयक बाबी तसेच ई-नाम संदर्भातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यभर उपलब्ध असलेल्या सुविधा केंद्रांचा अधिक प्रभावी वापर करून कृषीमालाची प्रक्रिया वाढविणे, त्याची निर्यात आणि स्थानिक बाजारपेठेत विक्री सुलभ करणे यावर भर देण्यात आला. यामुळे काढणीनंतरच्या हाताळणीतील नुकसान कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल. विविध देशांच्या मागणीनुसार कृषीमालाची गुणवत्ता, ट्रेसिबिलिटी आणि पॅकेजिंग यावर विशेष लक्ष केंद्रित केल्यास निर्यात वाढीस चालना मिळू शकते, असे मंत्री जयकुमार रावल यांनी नमूद केले.आंबा हंगाम २०२६ सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या विकीरण (irradiation) प्रक्रियेच्या सुविधा केंद्रांच्या नियोजनाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आंबा निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यासाठी अतिरिक्त अमेरिकन निरीक्षक उपलब्ध करून देण्याबाबत अपेडाकडे पाठपुरावा करावा. महाराष्ट्रातील कृषीमालाला इतर राज्यांमध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पणन मंडळातील अधिकाऱ्यांनी विविध राज्यांमध्ये अभ्यास दौरे करावेत, असे आदेश मंत्री रावल यांनी यावेळी दिले.
Pune: मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्ट्स तर्फे सकाळ माध्यम समूहाच्या सहकार्याने आयोजित केला जाणारा हा कार्यक्रम देशातील एक अत्यंत प्रतिष्ठित सांस्कृतिक उपक्रम मानला जातो.
MI Vs RR : मुंबई इंडियन्स-राजस्थान रॉयल्स सामना रद्द होणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट्स
आयपीएल २०२६ स्पर्धेतील आजचा (७ एप्रिल) सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (MI Vs RR) यांच्यात गुवाहाटीच्या एसीए बारसापारा स्टेडियमवर होणार आहे. मात्र, स्थानिक हवामानामुळे या सामन्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
मी स्वतः काँग्रेसच्या पाठिंब्याने आणि मार्गदर्शनाखाली निवडणुका लढवल्या आहेत. आम्ही काँग्रेसच्या विचारधारेतच वाढलो आहोत, असे सुळे यांनी सांगितले.
IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?
गुवाहाटीत आज पुन्हा एकदा आयपीएलचा थरार रंगणार असला, तरी आकाशात दाटलेले काळे ढग चाहत्यांची चिंता वाढवत आहेत. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आजचा सामना पावसाच्या सावटाखाली होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा सामना गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियम येथे रंगणार आहे.रियान पराग यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकत दमदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने एक विजय मिळवला असला तरी मागील सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.दरम्यान, यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे गुवाहाटीतील हवामान आज निर्णायक भूमिका बजावू शकते.कसा असेल हवामानाचा अंदाज?आज गुवाहाटीत सुमारे १० टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असल्याने खेळपट्टीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. दमट हवामानामुळे फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, तर वेगवान गोलंदाजांना सीम मूव्हमेंटचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.हेड-टू-हेड आकडेवारीमुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत ३१ सामने खेळले गेले आहेत. यापैकी मुंबईने १६ सामने जिंकले, तर राजस्थानने १४ वेळा विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे.हार्दिक खेळणार का?मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या मागील सामन्यात आजारपणामुळे खेळू शकला नव्हता. त्या सामन्यात सूर्यकुमार यादव यांनी नेतृत्व केले होते, पण संघाला पराभव पत्करावा लागला. मात्र, हार्दिक पांड्या संघासोबत गुवाहाटीत दाखल झाल्याने आज तो खेळण्याची शक्यता जास्त आहे.सामना कुठे पाहाल?राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना आज संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक ७ वाजता होणार आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येईल. तसेच JioHotstar ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
Shirin Sharmin Chaudhury : बांगलादेशच्या माजी सभापती शरीन शर्मिन चौधरी यांना अटक
शरीन शर्मिन चौधरी (Shirin Sharmin Chaudhury) असे या माजी सभापती महिलेचे नाव असून त्यांना ढाका मेट्रोपोलिटन पोलिसांच्या डिटेक्टिव्ह ब्रॅंचने अटक केली आहे.
Devendra Fadnavis : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 128 कोटींची मदत जाहीर; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर-डिसेंबर २०२५ मधील पीक नुकसानीसाठी १२८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.
सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचनामुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.पालकमंत्री राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून मुंबईसाठी लवकर सेवा सुरू करण्यासाठी मंत्रालयातील आपल्या दालनात बैठक घेतली. बैठकीस विमानचालनचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (दूरदृश्य प्रणालीद्वारे) चिपी विमानतळाचे संचालक कुलदीप सिंह, महाराष्ट्र विमानतळ कंपनीच्या व्यवस्थापक प्रांजली खवळे, कार्यकारी अभियंता मिस्बाह अन्वार आदी उपस्थित होते.मंत्री राणे म्हणाले, चिपी मुंबई हवाई वाहतूक करिता शासनाकडून Viability Gap Funding VGF मंजूर आहे. मात्र विमानसेवा सुरू होण्यास विलंब होत आहे. यासाठी संबंधित कंपनीने विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. मुंबईसाठी सकाळी व सायंकाळी अशी दिवसातून दोन वेळा विमान सेवा सुरू करण्याबाबतही कंपनीने विचार करावा असेही ते म्हणाले.चिपी मुंबई विमान सेवा सूरू करण्यासाठी आवश्यक सुरक्षा परवानग्यासह अन्य परवाने घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने अखेर पडदा टाकला आहे. ६ एप्रिल २०२६ रोजी एका विशेष गॅझेट नोटिफिकेशनद्वारे अमरावती (Amravati) शहराला राज्याची अधिकृत आणि कायमस्वरूपी राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे. संसदेने 'आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन) विधेयक २०२६' मंजूर केल्यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी या ऐतिहासिक निर्णयावर स्वाक्षरी केली. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारने तत्काळ ही अधिसूचना लागू केली आहे. या निर्णयामुळे आता आंध्र प्रदेशच्या राजधानीबाबतचा सर्व तांत्रिक आणि राजकीय संभ्रम कायमचा संपुष्टात आला असून, अमरावतीच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.https://prahaar.in/2026/04/07/attack-on-the-israeli-consulate-in-istanbul/'तीन राजधानी'च्या चर्चांना पूर्णविराम२ एप्रिल रोजी लोकसभेनंतर राज्यसभेतही या विधेयकाला आवाजी मतदानाने संमती देण्यात आली. या ऐतिहासिक मंजुरीमुळे आता राज्यात यापुढे 'तीन राजधानी'चे मॉडेल राबवण्याचे किंवा राजधानी बदलण्याचे सर्व कायदेशीर पर्याय संपुष्टात आले आहेत. कायदा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, जरी हे विधेयक आता मंजूर झाले असले तरी, हा सुधारित कायदा २ जून २०२४ पासून लागू झाल्याचे मानले जाईल. २०१४ च्या मूळ आंध्र प्रदेश पुनर्गठन कायद्यात दुरुस्ती करून हा मोठा बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या पाऊलामुळे आता अमरावतीच्या राजधानी पदावर कोणतीही कायदेशीर टांगती तलवार उरलेली नाही.YSRCP चा केंद्राच्या निर्णयाला कडाडून विरोधकेंद्र सरकारने अमरावतीला कायमस्वरूपी राजधानीचा दर्जा दिल्यानंतर आता आंध्र प्रदेशात राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाने (YSRCP) या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत आपला विरोध दर्शवला आहे. या निर्णयामुळे राजधानीसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष झाले आहे, असा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. अमरावतीच्या विकासाची मुहूर्तमेढ २०१५ मध्ये तत्कालीन तेलगू देसम पक्षाच्या (TDP) कार्यकाळात रोवण्यात आली होती. मात्र, २०१९ मध्ये सत्तांतर होऊन वायएसआर काँग्रेस सत्तेत आल्यानंतर त्यांनी 'तीन राजधानी'चे मॉडेल मांडले होते. यामुळे अमरावतीचा मुख्य प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून अधांतरी होता. आता केंद्राच्या नव्या कायद्यामुळे जगनमोहन रेड्डी यांच्या 'तीन राजधानी'च्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला मोठा धक्का बसला असून, राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.NDA सरकारच्या निर्णयामुळे विकासकामांना वेग२०२४ मध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतर, सरकारने 'एकच राजधानी' म्हणून अमरावतीवर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे गेल्या काही काळापासून रखडलेले सर्व प्रलंबित प्रकल्प आता युद्धपातळीवर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. एकाच मजबूत राजधानीमुळे राज्याच्या प्रशासनात अधिक सुसूत्रता आणि स्थैर्य येईल, अशी आशा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. राजधानीच्या निश्चितीमुळे केवळ पायाभूत सुविधांचे कामच मार्गी लागणार नाही, तर राज्याच्या एकूणच प्रशासकीय कारभाराला मोठी चालना मिळणार आहे. गुंतवणुकीचे आणि विकासाचे केंद्र म्हणून अमरावतीला पुन्हा उभारी देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
David Warner: दारू पिऊन गाडी चालवणे पडले महागात; डेव्हिड वॉर्नरला अटक
नवी दिल्ली: पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर एका कायदेशीर वादात अडकला आहे. वृत्तानुसार, वॉर्नरवर मद्यपान करून गाडी चालवल्याचा आरोप आहे आणि पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, नंतर त्याची सुटका करण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा हा माजी सलामीवीर सध्या पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ मध्ये कराची किंग्सचे कर्णधारपद भूषवत आहे. पीएसएलमधील त्याच्या फ्रँचायझीच्या सामन्यांमध्ये काही दिवसांचे अंतर होते, त्यामुळे तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता. news.com.au च्या वृत्तानुसार, डेव्हिड वॉर्नरवर मद्यपान करून गाडी चालवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ५ एप्रिलच्या रात्री सिडनीच्या मारुब्रा परिसरात पोलिसांनी केलेल्या श्वास चाचणीत त्याच्या शरीरातील अल्कोहोलची पातळी कायदेशीर मर्यादेपेक्षा जवळपास दुप्पट आढळली.श्वास चाचणी पॉझिटिव्हन्यू साउथ वेल्स पोलिसांच्या निवेदनानुसार, वॉर्नर चाचणी स्थळी पोहोचण्यापूर्वीच आपले वाहन थांबवून पार्क केले होते. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून घटनास्थळीच श्वास चाचणी घेतली, ज्याचा निकाल सकारात्मक आला. त्यानंतर वॉर्नरला अटक करून मारुब्रा पोलीस ठाण्यात नेण्यात आले, जिथे दुसऱ्या चाचणीत त्याच्या शरीरातील अल्कोहोलची पातळी ०.१०४ असल्याचे उघड झाले. हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले असून, तो पुढील महिन्यात न्यायालयात हजर होईल.पोलिसांकडून निवेदन जारीपोलिसांच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ५ एप्रिल रोजी, सायंकाळी अंदाजे ५:३० वाजता, पोलीस मारुब्रा येथील मलबार रोडवर यादृच्छिक श्वास तपासणी करत होते. तपासणी स्थळापूर्वी एक वाहन पार्क केलेले दिसले. अधिकाऱ्यांनी चालकाची तपासणी केली, ज्यात तो पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर त्याला अटक करून पोलीस ठाण्यात नेण्यात आले, जिथे दुसऱ्या चाचणीत त्याचे प्रमाण ०.१०४ आढळले. त्या व्यक्तीला ७ मे, २०२६ रोजी डाउनिंग सेंटर स्थानिक न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.डेव्हिड वॉर्नरने २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि तेव्हापासून तो मीडिया आणि फ्रँचायझी क्रिकेटकडे वळला आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत १०० हून अधिक कसोटी सामने खेळले आणि ऑस्ट्रेलियाला अनेक महत्त्वाचे विजय मिळवून दिले आहेत.
अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत
जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरूमुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत देण्यात आल्य़ाची माहिती मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने राज्यात शेतीचे सुमारे १ लाख १४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यामुळे १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्य़ांच्या शेती आणि शेतीमालाचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना १२८.८६ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. हे नुकसान प्रामुख्याने चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात नुकसान झाले होते.जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण १ लाख ४५ हजार ६०६ हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले असून २ लाख ३३ हजार ८९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पावसामुळे केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदूरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा, आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या अवकाळी पावसामुळे पाच लोकांचा मृत्यु आणि नऊ लोक जखमी झाले. अवकाळी पावसामुळे ३६ जनावरांचाही मृत्यु झाला आहे.एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या पावसानेही १ लाख ९४ हजार ३२९ शेतकऱ्यांच्या १ लाख २२ हजार ९९३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार स्पष्ट झाले आहे. जानेवारीपासून झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे.१०५ टीएमसी पाणीसाठा तयारदरम्यान, जुलै २०२२ पासून जलसंपदा विभागाचे ४१ प्रकल्प पूर्ण झाले असून सुमारे १०५ टीएमसी पाणीसाठा तयार झाला असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकल्पांमुळे अतिरिक्त २.९५ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जुलै २०२२ पासून आजपर्यंत २२५ प्रकल्पांना सुधारित तसेच प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या मान्यता ४.३५ लाख कोटी रुपयांच्या असून हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ३३.४५ लाख हेक्टर सिंचन क्षमता तयार होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाने सादरीकरणाद्वारे दिली.
Lalit Modi : आयपीएलमध्ये प्रत्येक हंगामात 2,400 कोटींचे नुकसान; ललित मोदींचा बीसीसीआयवर आरोप
आयपीएलचे माजी माजी आयुक्त ललित मोदी (Lalit Modi) यांनी बीसीसीआयवर थेट आरोप केला आहे.
Rajpal Yadav : कर्जावरून थट्टा अन् सलमान खानचा पाठिंबा.! राजपाल यादव VIDEO पोस्ट करत म्हणाला…
या घटनेनंतर अनेक चाहत्यांनी राजपाल यादव ( Rajpal Yadav )यांच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी विनोद करताना कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याची खिल्ली उडवू नये, अशी मागणी केली.
Amaravati Capital : अखेर अमरावती झाली ‘या’राज्याची अधिकृत राजधानी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Amaravati Capital : आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा २०२६ नुसार अमरावती ही आता राज्याची अधिकृत राजधानी आहे. ६ एप्रिल रोजी केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना काढली आहे.
David Warner Arrested : खळबळजनक ! डेविड वॉर्नरला अटक; काय घडलं नेमकं?
पाकिस्तान सुपर लीग २०२६ स्पर्धा सुरू असताना दिग्गज ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner Arrested) पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला भूतकाळाची आठवण करून देत म्हटले की, ५५ वर्षांपूर्वी पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते, हे त्यांनी विसरू नये. त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, यावेळी जर पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिले, तर त्याचे किती तुकडे होतील हे देवच जाणे. तसेच त्यांनी पाकिस्तानी नेतृत्वाला संयम राखण्याचा आणि इतिहासातून धडा घेण्याचा सल्ला दिला.पश्चिम बंगालमधील बैरकपूर येथील निवडणूक सभेत बोलताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या धमकीबरोबरच तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानी धमकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत का आहेत, असा सवाल अभिषेक बॅनर्जी यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले की, देशाचे संरक्षणमंत्री म्हणून ते स्वतः या विषयावर बोलत आहेत आणि प्रत्येक मुद्द्यावर पंतप्रधानांनीच प्रतिक्रिया देणे आवश्यक नसते. भारताच्या सुरक्षा आणि संरक्षणविषयक धोरणाबाबत सरकारची भूमिका पूर्णपणे स्पष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. संरक्षणाशी संबंधित विषयांवर बोलण्यासाठी ते पूर्णपणे अधिकृत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी अलीकडेच भारताविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. अहवालानुसार, भारताकडून कोणतीही कारवाई झाल्यास पाकिस्तान कोलकात्यावर हल्ला करून प्रत्युत्तर देईल, असे त्यांनी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना राजनाथ सिंह यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी अशा प्रकारची भडकाऊ विधाने करू नयेत. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानला आपल्या चुकीची मोठी किंमत मोजावी लागली आणि बांग्लादेशच्या निर्मितीसह त्याचे दोन तुकडे झाले, याची त्यांनी आठवण करून दिली.
Israeli Consulate Attack: इस्तंबूलमधील इस्रायली वाणिज्य दूतावासावर हल्ला
नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, तुर्कीमधील इस्तंबूल येथील इस्रायली वाणिज्य दूतावासाबाहेर गोळीबार झाला आहे. तुर्की टीव्हीनुसार, या गोळीबारात दोन हल्लेखोर ठार झाले, तर तिसऱ्याला पकडण्यात आले. या गोळीबारात एक पोलीस अधिकारीही जखमी झाला आहे. इमारतीच्या आजूबाजूचा परिसर तात्काळ सील करण्यात आला.हल्लेखोरांकडे प्राणघातक शस्त्रेतुर्कस्तानच्या हॅबरटर्क प्रसारकाच्या वृत्तानुसार, हल्लेखोरांकडे प्राणघातक लांब पल्ल्याची शस्त्रे होती. त्यांनी इस्रायली वाणिज्य दूतावासाबाहेर गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात घबराट पसरली. घटनास्थळ आणि आजूबाजूचा परिसर तात्काळ सील करण्यात आला.हल्लेखोरांची ओळख किंवा त्यांच्या हेतूविषयी तात्काळ कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. तुर्कीचे न्यायमंत्री अकिन गुर्लेक यांनी सांगितले की, या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. हॅबर्टर्कने सांगितले की, वाणिज्य दूतावास त्या उंच इमारतीच्या खालच्या मजल्यावर होता.इस्रायली राजनयिक सूत्रांनी असाही दावा केला आहे की, हल्ल्याच्या वेळी तुर्कस्तानमध्ये एकही इस्रायली राजनयिक उपस्थित नव्हता. सध्या इस्तंबूलमधील महावाणिज्य दूतावासात किंवा अंकारा येथील दूतावासात एकही इस्रायली राजनयिक नाही.हल्लेखोरांबद्दल काय आढळून आले?गृहमंत्री मुस्तफा सिफ्टसी यांनी ट्विटरवर पोस्ट केले की, हल्लेखोर शेजारच्या इझमिट शहरातून भाड्याच्या गाडीने इस्तंबूलला आले होते. हल्लेखोरांपैकी एक जण धर्माचा अपमान करणारा गट असल्याचे त्यांनी म्हटले असले तरी, त्यांनी त्या संघटनेचे नाव उघड केले नाही. इस्लामिक स्टेट गटाने यापूर्वी तुर्कीमध्ये अनेक प्राणघातक हल्ले केले आहेत. हल्लेखोरांपैकी दोघे भाऊ होते आणि त्यापैकी एकाची अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हेगारी पार्श्वभूमी होती.
Maharashtra Politics : रत्नागिरीतील युवासेना नेते उमेश खताते यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत.
IIT Baba: पत्नी प्रतीका यांच्या मते, अभय सिंह अत्यंत साधे आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत. दोघांची भेट सुमारे वर्षभरापूर्वी झाली होती. आता ते दोघे मिळून सनातन संस्कृतीचा प्रसार करण्याचा संकल्प करत आहेत. भविष्यात “सनातन युनिव्हर्सिटी”सारख्या प्रकल्पावर काम करण्याचीही त्यांची योजना आहे.
केरळमधील सबरीमला मंदिराबाबत (Sabarimala Temple Case) केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडली. केंद्र सरकारने म्हटले की, पूजा स्थळी कोण जाऊ शकते हा “लिंगभेदाचा मुद्दा” नसून तो धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि देवतेच्या विशिष्ट स्वरूपाशी संबंधित आहे.सुनावणीपूर्वी दाखल केलेल्या आपल्या लेखी उत्तरात सरकारने नमूद केले की, सबरीमला येथे १० ते ५० वयोगटातील महिलांवरील प्रवेशबंदी ही भगवान अय्यप्पांच्या ‘नैष्ठिक ब्रह्मचारी’ स्वरूपामुळे आहे; ती कोणत्याही प्रकारच्या अपवित्रता किंवा हीनतेच्या भावनेवर आधारित नाही. केंद्र सरकारतर्फे उपस्थित सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले, “महिलांना प्रवेशाची परवानगी दिल्यास येथील पूजा-पद्धतीचे मूळ स्वरूपच बदलून जाईल, ज्यामुळे संविधानाने संरक्षित धार्मिक बहुलतेला धक्का बसेल. श्रद्धाळू म्हणजे पुरुष आणि महिला दोघेही शतकानुशतके सबरीमला मंदिरातील (Sabarimala Temple Case) स्थापित परंपरांनुसारच भगवान अय्यप्पांची पूजा करत आले आहेत.” सरकारने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की केरळमधील सबरीमला मंदिरात मासिक पाळीच्या वयोगटातील महिलांच्या प्रवेशावरील बंदी कायम ठेवावी.सरकारने युक्तिवाद केला की हा मुद्दा पूर्णपणे धार्मिक श्रद्धा आणि संप्रदायाच्या स्वायत्ततेच्या कक्षेत येतो आणि तो न्यायालयीन पुनरावलोकनाच्या मर्यादेबाहेर आहे. केंद्राने पीठाला सावध करताना म्हटले की, धार्मिक प्रथा तर्कसंगतता, आधुनिकता” किंवा “वैज्ञानिक औचित्य” अशा निकषांवर तपासण्याचे मापदंड स्वीकारू नयेत. अशा प्रकारे परीक्षण केल्यास न्यायालये एखाद्या धर्माच्या अंतर्गत समजुतीऐवजी स्वतःचे तत्त्वज्ञान लादत असल्याचा अर्थ निघेल, असे सरकारने म्हटले. याशिवाय केंद्राने असेही नमूद केले की, “एखादी प्रथा तर्कसंगत आहे का, न्यायालयीन संवेदनांना अनुरूप आहे का किंवा परिवर्तनवादी संवैधानिक तत्त्वांशी सुसंगत आहे का, याची तपासणी करणे हे संवैधानिक पुनरावलोकन ठरत नाही. (Sabarimala Temple Case)न्यायाधीश धार्मिक ग्रंथांची व्याख्या करण्यासाठी प्रशिक्षित नसतात आणि धार्मिक प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी आवश्यक संस्थात्मक साधनेही त्यांच्या जवळ नसतात, असेही सरकारने स्पष्ट केले. ही मते अशा वेळी मांडण्यात आली, जेव्हा सर्वोच्च न्यायालयात केरळमधील प्रसिद्ध सबरीमला मंदिरात (Sabarimala Temple Case) सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या २०१८ च्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या दीर्घकाळ प्रलंबित पुनर्विचार याचिकांवर सुनावणी होणार.
'तारक मेहता का उल्टा चश्मा'फेम दिशा वकानीच्या वडिलांचं निधन
मुंबई: टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील दयाबेनच्या भूमिकेसाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री दिशा वकानी हिला तिच्या कुटुंबाकडून एक अत्यंत दुःखद बातमी मिळाली आहे. दिशा वकानीचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते भीम वकानी यांचे अहमदाबादमध्ये निधन झाले आहे. ते काही दिवसांपासून आजारी होते. भीम वकानी हे केवळ एक उत्कृष्ट अभिनेतेच नव्हते, तर त्यांनी आपली मुलगी दिशा आणि सुंदरलालची भूमिका साकारणारा मुलगा मयूर वकानी यांच्या कारकिर्दीला आकार देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती.असित कुमार मोदी यांच्याकडून तीव्र शोक व्यक्तमनीकंट्रोलशी बोलताना, शोचे निर्माते तसेच वकानी कुटुंबाच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे असित मोदी म्हणाले की, त्यांना आज सकाळी कुटुंबाकडून या कधीही भरून न येणाऱ्या नुकसानीबद्दल समजले. ते भावूक झाले आणि म्हणाले, भीम वकानी स्वतः एक निष्णात चित्रकार, अभिनेते आणि दिग्दर्शक होते. दयाबेन म्हणून दिशा वकानीला प्रसिद्धी मिळवून देण्यात तिच्या वडिलांची मोठी भूमिका होती. त्यांनी दिशाचे करिअर घडवण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले होते. असित मोदी यांनी पुढे सांगितले की, भीम वकानी यांच्यासोबत त्यांचे नाते व्यावसायिकतेपेक्षा अधिक कौटुंबिक होते. जेव्हा जेव्हा ते मुंबईला येतं, तेव्हा ते असित मोदींच्या घरी राहत आणि ते एकत्र वेळ घालवत असत. त्यांच्या निधनामुळे असित मोदींना असे वाटत आहे की जणू त्यांनी आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य गमावला आहे.'लगान' पासून ते शाहरुख-आमिरसोबत काम करण्यापर्यंतभीम वकानी हे मनोरंजन विश्वातील एक आदरणीय व्यक्तिमत्व होते. त्यांनी आमिर खानच्या 'लगान' या कल्ट क्लासिक चित्रपटात काम केले होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले. ते 'स्वदेस'मध्ये शाहरुखसोबत दिसले होते. विशेष म्हणजे, भीम वकानी 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या काही भागांमध्ये जेठालालच्या वडिलांच्या मित्राच्या भूमिकेत दिसले होते. भीम वकानींच्या संगोपन आणि मार्गदर्शनामुळेच त्यांची दोन मुले, दिशा वकानी आणि मयूर वकानी, आज यशाच्या शिखरावर आहेत.भीम वकानी यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अहमदाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच, अनेक टीव्ही कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यापासून दूर असलेल्या दिशा वकानी यांना एक मोठे वैयक्तिक नुकसान सहन करावे लागत आहे. वकानी कुटुंबासाठी हा कठीण काळ आहे, कारण त्यांनी केवळ एक गुरूच नव्हे, तर आपल्या कलेला समर्पित असलेला एक खरा कलाकार गमावला आहे.
रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये
दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र नव्हते ते होते स्वप्नांचे प्रतिबिंब. प्रत्येक रेषेत जिद्द, प्रत्येक रंगात आशा आणि प्रत्येक कलाकृतीत स्वतःला सिद्ध करण्याची ताकद दडलेली होती. निमित्त होते सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग कलाकारांसाठीच्या विशेष कला कार्यशाळेचे.मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन येथे ६ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान दिव्यांग कलाकारांसाठीच्या विशेष कला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन यांच्या सहकार्याने व आयसोवा (IASOWA) आणि राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग सक्षमीकरण संस्था (NIEPID) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत मुंबई आणि परिसरातील विविध संस्थांमधील ४२ दिव्यांग कलाकारांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेत, आपल्या सर्जनशीलतेची झलक सादर केली आहे. या कार्यशाळेत १८ पेक्षा अधिक संस्थां सहभागी झाल्या. या उपक्रमामागे आयसोवाच्या अध्यक्ष मीनाक्षी अग्रवाल यांचा महत्त्वपूर्ण पुढाकार आहे.कलेच्या माध्यमातून वेगळी ओळख या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे विविधतेतून निर्माण होणारी सर्जनशीलता. ऑटिझम, डाउन सिंड्रोम, बौद्धिक दिव्यांगत्व, श्रवणदोष, अल्पदृष्टी, पॅराप्लेजिया अशा विविध प्रकारच्या दिव्यांगत्वावर मात करत या कलाकारांनी कलेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. कलाकारांनी सूक्ष्म तपशीलांनी परिपूर्ण चित्रे रेखाटली. प्रत्येकाच्या कलेत त्यांचा स्वतःचा अनोखा दृष्टिकोन दिसून येत होता. त्यांच्या प्रत्येक रेषेत एक प्रयत्न, प्रत्येक रंगात एक जिद्द आणि प्रत्येक चित्रात मीही काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास दिसत होता.दिव्यांग कलाकारांसाठी कलाही एक वेगळीच ओळख निर्माण करते. त्यांच्या आयुष्यातील आव्हाने, संघर्ष आणि अनुभव हे त्यांच्या कलेतून अधिक प्रभावीपणे व्यक्त होतात. जिथे शब्द अपुरे पडतात, तिथे रंग त्यांच्या भावना स्पष्टपणे मांडतात. कधीकधी एक साधे चित्रही त्यांच्या मनातील खोल विचार आणि भावना व्यक्त करून जाते. शारीरिक किंवा बौद्धिक अडचणी असूनही ही मुल कलेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत.योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि व्यासपीठ मिळाल्यास या मुलांची कला अधिक खुलते. शाळा, संस्था आणि शिक्षक यांची भूमिका इथे अत्यंत महत्त्वाची ठरते. लहान वयातच त्यांच्या कलेला दिशा दिल्यास ते केवळ चांगले कलाकारच नव्हे, तर आत्मविश्वासू व्यक्ती म्हणून घडतात. दिव्यांग मुलांच्या कलेला प्रोत्साहन देणे ही केवळ कुटुंबाची किंवा संस्थांची जबाबदारी नाही, तर संपूर्ण समाजाची आहे. त्यांच्या कलाकृतींना दाद देणे, प्रदर्शनांना भेट देणे आणि त्यांना संधी उपलब्ध करून देणे हीच खरी त्यांच्यासाठी प्रेरणा ठरते.या कार्यशाळेचा उद्देश सर्जनशील चित्रकला सत्रे, कौशल्य विकास उपक्रम, आत्मविश्वास वाढविण्याच्या संधी आणि कला क्षेत्रातील करिअर मार्गांची ओळख करून देणे हा आहे.या कार्यशाळेचा समारोप ८ एप्रिल रोजी होणाऱ्या चित्रप्रदर्शनाने होणार आहे. दुपारी ३ वाजता जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या मुख्य सभागृहात या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, ८ ते १० एप्रिल २०२६ दरम्यान हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.दिव्यांग कलाकारांनी आपल्या कलेतून सिद्ध केले आहे की,मर्यादा शरीरात असतात, पण स्वप्नांना आणि सर्जनशीलतेला कधीच मर्यादा नसतात. दिव्यांग कलाकारांसाठी आयोजित हा ‘विविधतेचा उत्सव’ केवळ एक कला उपक्रम नसून, तो आहे त्यांच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या कलेचा उत्सव.
नागपूर : नागपूरमधील लकडगंज (Nagrpur News) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. नुकतीच करिअरची नवी उड्डाणे घेण्यास सज्ज झालेल्या २८ वर्षीय एअर होस्टेसने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गायत्री उर्फ गौरी बनसोड असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.https://prahaar.in/2026/04/07/dreams-blossoming-through-colors-at-j-j-school-of-art/नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, गायत्रीने नुकतेच एअर होस्टेसचे प्रशिक्षण पूर्ण केले होते आणि एका नामांकित खासगी विमान कंपनीत तिने नोकरीला सुरुवात केली होती. गायत्रीचे एका तरुण डॉक्टरासोबत प्रेमसंबंध होते आणि विशेष म्हणजे या दोघांचे लग्नही ठरले होते. मात्र, रविवारी मध्यरात्री सुमारे २ वाजताच्या सुमारास गायत्री आणि तिच्या प्रियकरामधून फोनवर जोरदार वाद झाला. या वादानंतर गायत्री मानसिकदृष्ट्या प्रचंड अस्वस्थ झाली होती. याच नैराश्यातून तिने रात्रीच्या सुमारास राहत्या घरातील फ्लॅटमध्ये गळफास लावून आपले जीवन संपवले. घटनेच्या वेळी गायत्रीचे कुटुंबीय काही कामानिमित्त भंडारा येथे गेले होते. घरी कुणीही नसल्याची संधी साधून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. कुटुंबीय जेव्हा भंडाऱ्याहून परतले, तेव्हा गायत्रीने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा धक्कादायक प्रकार पाहताच त्यांनी एकच टाहो फोडला.पोलिसांकडून तपास सुरूघटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टम) शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. प्राथमिक तपासात प्रियकरासोबत झालेला वादच आत्महत्येस कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरी पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी गायत्रीच्या प्रियकराची आणि कुटुंबीयांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा (Iran-US-Israel War) आजचा ३९ वा दिवस आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली. अमेरिकेने ठरवलं तर इराणला एका रात्रीत नष्ट करु शकतो आणि ही कारवाई आज रात्रीसुद्धा होऊ शकते. हे युद्ध सध्या अमेरिकेच्या इच्छेनुसार लढलं जातंय आणि अमेरिकेकडे कमी वेळात मोठं नुकसान करण्याची शक्ती आहे, असं म्हणताच दुसरीकडे अमेरिका - इस्रायलकडून इराणच्या १७ निवासी भागांवर बॉम्बहल्ले करण्यात आले आहेत.खोर्रमाबाद विमानतळाला लक्ष्य :अमेरिका-इस्रायलकडून आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये खोर्रमाबाद विमानतळाला लक्ष्य करण्यात आले आहे. दरम्यान, इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने इराणी नागरिकांना इशारा देत रेल्वेगाड्या आणि रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. फारसी भाषेत जारी केलेल्या संदेशात इस्रायलने म्हटले की, असे न केल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच इराणच्या अल्बोर्ज प्रांतावर झालेल्या अमेरिकन-इस्रायली हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या १८ जणांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.निःशस्त्र नागरिकांवर हल्ला :इराणी रेड क्रेसेंट संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील १७ निवासी भागांवर बॉम्बहल्ले केले. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये संघटनेने म्हटले, “नागरिकांवर हल्ला करण्याचे कोणतेही औचित्य नाही. आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदे स्पष्टपणे सांगतात की निःशस्त्र नागरिकांवर हल्ला करणे हा युद्धगुन्हा आहे.”मध्य इस्रायलचे मोठे नुकसान :दरम्यान, इराणी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रभर चाललेल्या अमेरिकन-इस्रायली हल्ल्यांमध्ये १५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागली. इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणने डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे मध्य इस्रायलमध्ये मोठे नुकसान झाले, मात्र अनेक क्षेपणास्त्रे हवेतच पाडल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायलच्या बचाव सेवांच्या हवाल्याने सांगितले की हे नुकसान इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांमधून डागण्यात आलेल्या क्लस्टर सबम्युनिशन्समुळे झाले.इराणकडून प्रतिहल्ल्याची तयारी सुरु :इराणच्या लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिका आणि इस्रायलच्या आक्रमक कारवायांनंतरही सर्व शहरांमध्ये क्षेपणास्त्र प्रक्षेपक सक्रिय ठेवण्यात आले असून दररोज क्षेपणास्त्र डागले जात आहेत. वृत्तानुसार एका लष्करी सूत्राने सांगितले की इराणची क्षेपणास्त्र हल्ला क्षमता पूर्णपणे सक्रिय करण्यात आली आहे. नव्या तुकड्यांची तैनाती करून शत्रूच्या हवाई हल्ल्यांना जलद गतीने निष्प्रभ केले जात आहे.तेहरानच्या आकाशात अनेक लढाऊ विमाने उड्डाण करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अहवालानुसार तेहरानमध्ये मोठे स्फोट ऐकू आले. इराणवरील अचानक वाढलेल्या हल्ल्यांचा संबंध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीशी जोडला जात आहे. ट्रम्प यांनी इराणला मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत करार करण्याचे अल्टिमेटम दिले होते. तसे न झाल्यास इराणमधील प्रत्येक पूल आणि ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला होता.
MI vs RR : राजस्थानविरुद्धच्या सामन्याआधी मुंबईच्या संघात मोठे बदल; ‘या’खेळाडूचा पत्ता कट होणार?
आयपीएल २०२६ स्पर्धेतील आज (७ एप्रिल) होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स (एमआय) संघाचा सामना राजस्थान रॉयल्स (आरआर) विरुद्ध (MI vs RR) गुवाहाटीतील एसीए स्टेडियमवर होणार आहे.
Agricultural News : अवकाळीने तब्बल ‘इतक्या’लाखांहून अधिक हेक्टर पिकांचे नुकसान
Agricultural News : मार्च ते एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात २९ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Mahavitran : महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
या बैठकीत महावितरणची (Mahavitran) आर्थिक पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्य सरकार भांडवली बाजारात सरकारी रोखे आणणार आहे.
Stock Market Today: बीएसईवर आज एकूण 4,381 शेअर्समध्ये व्यवहार झाला. त्यापैकी 2,668 शेअर्स वाढीसह, 1,560 शेअर्स घसरणीसह तर 153 शेअर्स स्थिर बंद झाले. याशिवाय, 70 शेअर्सनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर 45 शेअर्सनी 52 आठवड्यांचा नीचांक नोंदवला.
Opinion Polls 2026: आसामध्ये BJP आघाडीवर, बंगालमध्ये चुरशीची लढत; केरळ-तमिळनाडूत रंजक चित्र
Opinion Polls 2026: एकंदरीत, आसाममध्ये BJP मजबूत दिसत असताना केरळमध्ये UDF, तमिळनाडूत NDA आणि पश्चिम बंगालमध्ये BJP-TMC यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. निवडणूक निकाल काय येतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
Pune Accident News : मावळमध्ये दुर्दैवी घटना; बास्केटबॉल खेळताना लोखंडी स्टॅन्ड अंगावर पडला अन् ....
पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने खळबळ उडाली आहे. बास्केटबॉल खेळताना लोखंडी स्टॅन्ड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.इंदोरी येथील तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटमध्ये ही घटना घडली. विशाल वर्मा (वय 20) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो बी. टेकच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. अपघात इतका गंभीर होता की त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.नेमकी घटना कशी घडली?मिळालेल्या माहितीनुसार, विशाल वर्मा हा मूळ उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील रहिवासी असून, तो शिक्षणासाठी पुण्यात वसतिगृहात राहत होता. रविवारी सकाळी सुमारे 7.30 वाजता तो बास्केटबॉल खेळण्यासाठी मैदानात गेला होता. खेळ सुरू असताना अचानक बास्केटबॉल पोस्टवरील जाड लोखंडी स्टॅन्ड निकामी होऊन त्याच्यावर कोसळला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेबाबत वेगवेगळे दावेया दुर्घटनेनंतर नेमकी घटना कशी घडली याबाबत दोन भिन्न मते समोर येत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, खेळ सुरू असताना अचानक स्टॅन्ड कोसळला. तर महाविद्यालय प्रशासनाच्या मते, संबंधित विद्यार्थी रिंगला लटकून व्यायाम करत होता आणि त्यावेळी स्टॅन्ड त्याचे वजन सहन करू शकला नाही.विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरणघटनेनंतर संस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये निष्काळजीपणा झाल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. तसेच जखमी अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात विलंब झाल्याचाही आरोप पुढे येत आहे.कुटुंबावर दुःखाचा डोंगरया घटनेची माहिती मिळताच विशालचे आई-वडील अयोध्याहून पुण्यात दाखल झाले. शिक्षणासाठी घरापासून दूर गेलेल्या मुलाचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.पोलिस तपास सुरूघटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी सध्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. या घटनेत निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Lashkar-e-Taiba : श्रीनगर पोलिसांची मोठी कारवाई; पोलिसांकडून लष्कर-ए-तैयबा नेटवर्कचा भंडाफोड
- दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांसह पाच जणांना अटकश्रीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित एका आंतरराज्यीय दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड केला आहे. या ऑपरेशनदरम्यान दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांसह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. श्रीनगरमधून अब्दुल्ला उर्फ अबू हुरैरा याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.१६ वर्षांपासून फरार असलेला अब्दुल्ला अखेर पोलिसांच्या ताब्यात :मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला हा गेल्या १६ वर्षांपासून फरार होता. जम्मू-काश्मीरच्या बाहेर लष्कर-ए-तैयबाची ठिकाणे उभारण्यात तो यशस्वी झाला होता. पोलिसांनी सांगितले की, अब्दुल्लासोबतच पाकिस्तानी दहशतवादी उस्मान उर्फ खुबैब यालाही या मोठ्या कारवाईत अटक करण्यात आली आहे. या मोठ्या कारवाईत जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत केंद्रीय यंत्रणांनीही सहभाग घेतला. तपास यंत्रणांनी जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि हरियाणा यांसह १९ ठिकाणी छापे टाकले असून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.लष्कर-ए-तैयबाच्या नेटवर्कचा पर्दाफाश :तपासादरम्यान लष्कर-ए-तैयबाच्या एका सखोल नेटवर्कचा पर्दाफाश झाला, जे दहशतवाद्यांना साहित्य आणि आर्थिक मदत पुरवण्यात सहभागी होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या पाच जणांपैकी तीन जण श्रीनगरचे रहिवासी आहेत. तसेच मोहम्मद नकीब भट, आदिल राशिद भट आणि गुलाम मोहम्मद मीर उर्फ मामा यांना दहशतवाद्यांना आश्रय, अन्न आणि इतर रसद सहाय्य पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.४० विदेशी दहशतवाद्यांचे नेतृत्व :अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासातून समोर आले आहे की एका विदेशी दहशतवाद्याने लष्कर-ए-तैयबाच्या नेटवर्कच्या मदतीने बनावट कागदपत्रे आणि ओळखपत्रांच्या आधारे देशाबाहेर प्रवास करण्यात यश मिळवले होते. हे दहशतवादी सुमारे १६ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी करून आले होते आणि काश्मीर खोऱ्यातील विविध जिल्ह्यांत सक्रिय होते. या कालावधीत त्यांनी सुमारे ४० विदेशी दहशतवाद्यांचे नेतृत्व व समन्वय केले होते. यापैकी बहुतेक दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी चकमकीत ठार केले आहे.
Udhayanidhi Stalin : भाजपसाठी पुदुच्चेरी म्हणजे धोरणांची ‘प्रयोगशाळा’; उदयनिधी स्टॅलिन यांचा आरोप
तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि द्रमुक (डीएमके) नेते उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 धडाकेबाज निर्णय; जाणून घ्या सविस्तर..
Maharashtra Cabinet Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महावितरणची पुनर्रचना, MRSAC चे कंपनीत रूपांतर आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी १६५ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली.
महाराष्ट्रात आता 'एआय'साठी स्वतंत्र मंत्रालयीन विभाग
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; महावितरणची आर्थिक पुनर्रचना करणारमुंबई : राज्याच्या प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी अनेक क्रांतिकारी निर्णयांवर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार, आता 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (एआय) आणि माहिती तंत्रज्ञानासाठी स्वतंत्र मंत्रालयीन विभाग स्थापन करण्यात येणार असून, महावितरणची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी तिची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातील डिजिटल गव्हर्नन्सला गती देण्यासाठी सध्याच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे रूपांतर आता 'इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आयुक्तालयात' केले जाणार आहे. विशेष म्हणजे, मंत्रालयीन विभाग, आयुक्तालय आणि सर्व जिल्ह्यांसाठी कायमस्वरूपी पदांचा समावेश असलेला स्वतंत्र 'आयटी संवर्ग' (आयटी केडर) निर्माण केला जाईल. यामुळे सरकारी कामकाजात एआय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे शक्य होणार आहे.महावितरण शेअर बाजारात उतरणारराज्यातील वीज वितरण व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी महावितरणच्या आर्थिक पुनर्रचनेचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, महावितरण कंपनी आता शेअर बाजारात (लिस्टिंग) नोंदणीकृत होणार आहे. शासन हमी असलेल्या ३२ हजार ६७९ कोटी रुपयांच्या कर्जासाठी भांडवली बाजारात सरकारी रोखे आणले जातील. कृषी वीज वितरण व्यवसायाचे स्वतंत्र विभाजन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला, ज्यामुळे कृषी पंपांच्या वीज पुरवठ्याचे व्यवस्थापन अधिक सुलभ होईल.'महाजिओटेक' कंपनीची स्थापनानियोजन विभागांतर्गत कार्यरत असलेले 'महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर' (एमआरसॅक) आता सोसायटीऐवजी कंपनी (कलम ८ अंतर्गत) म्हणून काम करणार आहे. या बदलामुळे रस्ते माहिती प्रणाली, नगररचना, जलयुक्त शिवार, आणि खाणकामाच्या अभ्यासाला व्यावसायिक गती मिळेल. तसेच, भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी 'महाजिओटेक' ही नवीन कंपनी स्थापन करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. याद्वारे विद्यार्थी आणि संशोधकांसाठी नवीन शैक्षणिक कार्यक्रम राबवले जातील.आपत्ती व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेचे सहाय्य'महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम' (एमआरडीपी) अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनासाठी खासगी भांडवल आणि जागतिक बँकेकडून १६५ कोटींचा निधी उभारला जाणार आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांना गृहकर्जात आणि लघु उद्योजकांना व्यवसायासाठी विशेष सवलती व विमा सुरक्षा दिली जाईल. कृष्णा खोऱ्यातील सांगली, कोल्हापूर आणि इचलकरंजी या शहरांमधील पुराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडे तयार करण्यात येणार आहेत.
सागरी सुरक्षेसाठी आणखी १० ड्रोन खरेदी करा!
मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; संवेदनशील लँडिंग पॉईंट्सवर सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि 'सागर मित्र' नेमणारमुंबई : महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी आणि अनधिकृत मासेमारीला पूर्णपणे लगाम घालण्यासाठी आणखी १० ड्रोन खरेदी करा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी दिले.मंत्रालयात आयोजित मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सागरी सीमांच्या सर्वेक्षणासाठी ड्रोन हा सर्वात प्रभावी पर्याय ठरत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ च्या कठोर अंमलबजावणीसाठी गस्ती नौकांसोबतच या ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.दरम्यान, सागरी सुरक्षेचा आढावा घेताना मंत्री राणे यांनी किनारपट्टीवरील ९१ अतिसंवेदनशील 'लँडिंग पॉईंट्स'वर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या. या केंद्रांवर 'महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळा'मार्फत सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच, 'प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने'अंतर्गत 'सागर मित्र' नेमणुकीच्या प्रक्रियेला गती देण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.कोळंबी पालनासाठी नवे धोरणराज्यात कोळंबी पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी 'भूपट्टा धोरण' आणि भूवाटपाचा आराखडा तयार करण्यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. कोळंबी पालन विकासासाठी प्राधान्यक्रमाचा कार्यक्रम निश्चित करून त्याद्वारे मत्स्योद्योगाला व्यावसायिक उभारी देण्याचा सरकारचा मानस आहे. या बैठकीला 'सिबा' कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.रिक्त पदे लवकरच भरणारमत्स्यव्यवसाय विभागाच्या कामाचा व्याप पाहता, नवीन आकृतीबंधानुसार तातडीने कर्मचारी भरती प्रक्रिया राबवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आणि नव्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी रिक्त पदे भरण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले. या बैठकीला मत्स्यव्यवसाय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. रामास्वामी एन., आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा (Iran-US-Israel War) आजचा ३९ वा दिवस आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली. अमेरिकेने ठरवलं तर इराणला एका रात्रीत नष्ट करु शकतो आणि ही कारवाई आज रात्रीसुद्धा होऊ शकते. हे युद्ध सध्या अमेरिकेच्या इच्छेनुसार लढलं जातंय आणि अमेरिकेकडे कमी वेळात मोठं नुकसान करण्याची शक्ती आहे, असंही ट्रम्प म्हणालेत. तर दुसरीकडे आण्विक युद्धासाठी (Nuclear War) वापरलं जाणारं डूम्सडे प्लेन आकाशात घिरट्या घेताना दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे.इराणला चार तासांत बेचिराख करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेचं आण्विक युद्धासाठी वापरलं जाणारं विमान आकाशात 'डूम्सडे प्लेन' नावे ओळखल्या जाणाऱ्या विमानाच्या नेब्रास्का हवाईतळावर घिरट्या सुरू असल्याचं दिसून आलं आहे. हा तळ अमेरिकेच्या ओमाहा राज्यात आहे. अणू युद्धावेळी विशेष कमांड आणि कन्ट्रोलसाठी या विमानाचा वापर होतो. हे बोईंग कंपनीने तयार केलेलं ई-4 बी नाईटवॉच जातीचं विशेष विमान आहे.इराणने उडवली अमेरिकेची खिल्ली :संपूर्ण इराण (Iran-US-Israel War) देश एका रात्रीत नष्ट केला जाऊ शकतो. आणि ती रात्र उद्याचीही असू शकते, अशी डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिल्यानंतर आता इराणने देखील प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेच्या धमक्यांना आमच्या येथील लहान मुलंसुद्धा घाबरत नाहीत, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याची इराणकडून खिल्ली उडवण्यात आली आहे. आज रात्रीची प्रतिक्षा असल्याचं आव्हान देखील इराणकडून देण्यात आलं आहे.किंग फहद कॉजवे पूल बंद :तर दुसरीकडे इस्रायलने (Iran-US-Israel War) देखील मोठा इशारा दिला असून, सौदी अरेबिया आणि बहरीनला जोडणारा किंग फहद कॉजवे हा महत्त्वाचा पूल तात्पुरता बंद करण्यात आला आहे. इराणकडून संभाव्य हवाई हल्ल्यांच्या धमक्यांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला. वाढता तणाव लक्षात घेता पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. हा पूल बहरीनसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, तो सौदी अरेबियाशी असलेला एकमेव रस्तामार्ग आहे.
Air India: एअर इंडियाचा प्रवास ८ एप्रिलपासून महाग होणार; जाणून घ्या किती खर्च येणार?
नवी दिल्ली: टाटा ग्रुपच्या मालकीच्या एअर इंडियाने प्रवाशांना मोठा धक्का दिला आहे. जर तुम्हीही एअर इंडियाने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर आता तुमच्या भाड्यात वाढ होऊ शकते. कंपनीने ८ एप्रिलपासून आपल्या इंधन अधिभाराच्या रचनेत बदल जाहीर केला आहे, ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही मार्गांवरील तिकिटे अधिक महाग होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी जारी केलेल्या एका निवेदनात एअर इंडियाने म्हटले आहे की, जागतिक स्तरावर जेट इंधनाच्या (एटीएफ) किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.आता इंधन अधिभार कसा आकारला जाईल?एअर इंडियाने देशांतर्गत विमानसेवेसाठीचा एकसमान दर रद्द करून अंतरावर आधारित नवीन अधिभार प्रणाली लागू केली आहे. सरकारने एटीएफच्या किमतींवर कमाल २५ टक्क्यांची मर्यादा घातल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे.नवीन दर (देशांतर्गत विमान प्रवासासाठी)० ते ५०० किमी: २९९ रु५०१ ते १,००० किमी: ३९९ रु१,००१ ते १,५०० किमी: ५४९ रु१,५०१ ते २,००० किमी: ७४९ रु२,००० किमी पेक्षा जास्त: ८९९ रुआंतरराष्ट्रीय विमानसेवेवरही परिणामएअर इंडियाने असे संकेत दिले आहेत की आंतरराष्ट्रीय मार्गांवरील इंधन अधिभारातही सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामुळे तेथील तिकीट दरांवरही परिणाम होऊ शकतो. एकूणच, ८ एप्रिलपासून एअर इंडियाने प्रवास करणे प्रवाशांसाठी अधिक महाग होऊ शकते, कारण वाढत्या इंधन खर्चाचा थेट परिणाम भाड्यांमध्ये दिसून येत आहे.जेट इंधनाच्या दरात मोठी वाढ२७ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यासाठी जेट इंधनाची सरासरी जागतिक किंमत फेब्रुवारीच्या अखेरीस असलेल्या ९९.४० रुपये प्रति बॅरलवरून वाढून १९५.१९ रुपये प्रति बॅरल झाली. ही जवळजवळ १०० टक्क्यांची प्रचंड वाढ आहे.कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणातून तयार होणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन इंधनाची (ATF) किंमत दोन प्रमुख कारणांमुळे वाढली आहे.१ कच्च्या तेलाच्या किमतींमधील वाढ२ रिफायनरी मार्जिनमधील (ज्याला क्रॅक स्प्रेड्स म्हणतात) मोठी वाढ
- निवडणूक आयोगाकडून जिलानिहाय आकडेवारी जाहीरपश्चिम बंगालमध्ये मतदार यादीच्या पुनरावलोकन प्रक्रियेत (एसआयआर) एकूण ९०.६६ लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. आयोगाने ६० लाखांहून अधिक प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर डेटा सार्वजनिक केला असून, प्रथमच जिलानिहाय नावे समाविष्ट व वगळण्याची माहितीही दिली आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.मतदार यादी शुद्धीकरणाची ही प्रक्रिया तीन टप्प्यांत पूर्ण झाली. डिसेंबर २०२५ मध्ये प्रारूप यादी तयार करताना ५८.२ लाख नावे वगळण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये अंतिम यादी प्रसिद्ध होईपर्यंत आणखी ५.४६ लाख नावे कमी करण्यात आली. सध्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर व सखोल तपासणीनंतर २७ लाखांहून अधिक नावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला असून, एकूण वगळलेल्या नावांची संख्या ९० लाखांपेक्षा अधिक झाली आहे.निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, “लॉजिकल डिस्क्रेपन्सी” म्हणजेच डेटामधील तांत्रिक त्रुटींमुळे ६० लाखांपेक्षा जास्त मतदारांची प्रकरणे तपासणीसाठी ठेवण्यात आली होती. ही प्रकरणे ‘अंडर ऍडज्युडिकेशन’ श्रेणीत ठेवण्यात आली होती. आतापर्यंत ५९.८४ लाख प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून, तपासणीनंतर ३२.६८ लाख पात्र मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यात आली आहेत, तर २७.१६ लाख अपात्र मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. उर्वरित प्रकरणांची तपासणी अद्याप सुरू आहे.निवडणूक आयोगाच्या इतिहासात प्रथमच पश्चिम बंगाल एसआयआर संदर्भातील जिलानिहाय नावे जोडणे आणि वगळणे याची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणे आणि मतदार यादीची विश्वासार्हता मजबूत करणे हा आयोगाचा उद्देश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणे हे एक मोठे प्रशासकीय आव्हान होते, जे न्यायिक अधिकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण करण्यात आले आहे.दरम्यान, विरोधी पक्ष विशेषतः तृणमूल काँग्रेस यांनी या मोठ्या प्रमाणावर नाव वगळण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला असून, हे मतदारांना वगळण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, या प्रक्रियेचा अधिक परिणाम अल्पसंख्याक आणि सीमावर्ती भागांवर झाला आहे. तर भाजप आणि निवडणूक आयोगाने ही कारवाई मतदार यादीची शुद्धता राखण्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.पश्चिम बंगाल विधानसभेसाठी दोन टप्प्यांत आगामी २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर एसआयआर प्रक्रिया आणि मतदार यादीतील बदलांवर राजकीय वातावरण तापले आहे.
Smart Lockdown : इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीवर बंदी घातल्यापासून, दक्षिण आशियाई आणि युरोपीय देशांना पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.
Crime News : आरोपी पूजा राजेंद्र पवारला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Fat Types: मेद चांगला की वाईट? आरोग्यासाठी योग्य फॅट्स ओळखा आणि राहा निरोगी!
Fat Types मेद पूर्णपणे टाळणे योग्य नाही, पण योग्य प्रकारचा मेद निवडणे आणि त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. संतुलित आहार आणि योग्य माहितीच्या आधारे आपण निरोगी जीवन जगू शकतो.
Akshay Kumar : ‘भुत बंगला’चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसणार मराठमोळी अभिनेत्री
Akshay Kumar : मिथिला पालकरने दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासोबतचा सेटवरील व्हिडीओ शेअर करत मानले आभार
Panama City Blast:मध्यपूर्वेत एकीकडे आगीचा भडका उडत असताना आता दुसरीकडे अमेरिका आणि पनामा देशाला जोडणाऱ्या पनामा कालव्याजवळ भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे.
Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....
मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या मनावर राज्य केले होते, त्याचपाठोपाठ धुरंधर २ या सिनेमानेही सर्वांवर आपली छाप सोडली आहे. हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालताना आपल्याला दिसत आहे. सहसा बहुतेक चित्रपट थोड्याच हफ्त्यात आपला सिनेमागृहांवरून आपला गाशा गुंडाळतात, परंतु रिलीज नंतर १९ दिवस उलटूनही धुरंधर २ हा चित्रपट अजूनही ठाण मांडून बसला आहे.या सिनेमाची छाप ही सर्वांच्याच मनावर पडली. अगदी सामान्य प्रेक्षक वर्गापासून ते नेतेमंडळी, ज्येष्ठ अभिनेता - अभिनेत्री आणि आता चक्क क्रिकेटच्या देवाला विराट आणि अनुष्काला देखील या सिनेमाची भुरळ पडली आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत. सिनेमाबद्दल स्तुतीसुमने उधळली आहेत.विराट कोहली याने सिनेमात पहिला असून आपला रिव्ह्यू इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. त्यानं लिहिलंय की, सिनेमाच्या चार तासांच्या कालावधीत त्याला स्क्रीनवरून एका क्षणाचाही आपली नजर हटवता आली नाही. कोहलीनं लिहिलंय की, मी आज धुरंधर २ सिनेमा पहिला आणि मी पूर्ण आत्मविश्वासानं असं म्हणू शकतो की भारतात मी यापूर्वी अशाप्रकारचे सिनेमे केव्हाव्ही पहिले नाही. मी जवळपास चार तास जागेवरून एका क्षणासाठीही हललो नाही.दिग्दर्शक आदित्य धरवरही कोहलीनं स्तुतिसुमनं उधळली तुम्ही निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीतून तुमची प्रतिभा आणि समर्पण स्पष्टपणे दिसतंय. तुम्हाला माझा सलाम! तुम्ही खरोखरंच एक अद्भूत आहात... अभिनेता रणवीर सिंहबद्दल बोलताना म्हणाला की, या सिनेमानंतर तुम्ही एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे तुमचा अभिनय केवळ अप्रतिमच नव्हे, तर त्याहूनही कितीतरी श्रेष्ठ आहात.अनुष्का म्हणते कीआदित्य धरला टॅग करत अनुष्काने लिहिले: तुम्ही अप्रतिम चित्रपट बनवला आहे, ४ तासांचा असे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा सिनेमे बनवायला खूप धाडस लागत, यात अनेक बारीक आब्रिक गोष्टींवर लक्ष ठेवले गेले आहे तुम्ही एक अत्यंत मौलिक आणि आत्मविश्वासू चित्रपट निर्माते आहात.आपला पहिला सहकलाकार रणवीर सिंगच्या 'उत्कृष्ट' अभिनयाचे कौतुक करत अनुष्काने लिहिले: तू आयुष्यात एकदाच मिळणारी भूमिका साकारलीस आणि एक दमदार, निर्दोष अभिनय सादर केलास. अनुष्कामाधवन, रामपाल, राकेश बेदी सर आणि चित्रपटातील प्रत्येक उत्कृष्ट कलाकार—प्रत्येकाचा अभिनय अगदी अचूक आहे; तुमच्या प्रत्येकाशिवाय या चित्रपटाची कल्पनाच करता येत नाही. यामागे असलेल्या प्रत्येकाचे खूप खूप अभिनंदन, असे अनुष्का पुढे म्हणाली‘धुरंधर 2’ने बॉक्स ऑफिसवर विक्रमांची मालिका सुरू ठेवली आहे. चित्रपटाने 1000 कोटींचा टप्पा पार केला असून, भारतात सुमारे 1134 कोटी आणि जागतिक स्तरावर 1500 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. रोजच्या कमाईतही सातत्याने वाढ होत असल्याने चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे.एकीकडे बॉक्स ऑफिसवर यशाची घोडदौड आणि दुसरीकडे विराटसारख्या मोठ्या नावाकडून मिळालेलं कौतुक, यामुळे ‘धुरंधर 2’ची लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत चित्रपट आणखी नवे विक्रम प्रस्थापित करेल अशी सर्वाना खात्री आहे.
Suraj Chavan : काँग्रेसकडून पार्थ पवारांवर टीका; राष्ट्रवादीकडून राहुल गांधीचे नाव घेत बोचरा पलटवार
Suraj Chavan : पार्थ पवार यांच्यावरील टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिला पलटवार करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू; वाहतूक कोंडीतून होणार सुटकामुंबई : मुंबईच्या वेशीवर असलेल्या मीरा-भाईंदर शहराला जोडणारी महत्त्वाकांक्षी ‘मेट्रो-९’ मार्गिका अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. दहिसर (पूर्व) ते काशिगाव या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातून धावणारी ही पहिली मेट्रो सेवा ठरली असून, यामुळे दहिसर चेकनाक्यावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची मोठी सुटका होणार आहे.दहिसर (पूर्व) मेट्रो स्थानक येथे आयोजित या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्यासह मेट्रो प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांनी नव्या मेट्रोतून प्रवास करत सुविधांचा आढावा घेतला.मेट्रो मार्गिका ९ ही दहिसर (पूर्व) ते मीरा भाईंदर दरम्यान १०.५ किमी लांबीची उन्नत मार्गिका आहे. यातील पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशिगाव दरम्यान ४.७ किमीचा मार्ग सुरू झाला आहे. यात दहिसर (पूर्व), पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशिगाव या चार स्थानकांचा समावेश आहे. या सेवेमुळे दहिसर टोल प्लाझा येथील वाहतूक कोंडी १० ते १५ टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, रस्त्यावरील साधारण २० ते ३० टक्के प्रवासी मेट्रोकडे वळल्यास पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ताण हलका होण्यास मदत होईल.'मल्टी मोडल' प्रणालीही मेट्रो मार्गिका दहिसर (पूर्व) येथे मेट्रो-७ (दहिसर ते अंधेरी) आणि पुढे ७-अ (विमानतळ जोडणी) च्या माध्यमातून 'रेड लाईन'शी जोडली गेली आहे. यामुळे मीरा-भाईंदरमधील रहिवाशांना थेट मुंबई विमानतळापर्यंत अखंड प्रवास करणे शक्य होणार आहे. बस आणि ऑटोरिक्षा यांच्याशी असलेल्या 'मल्टी मोडल' एकात्मिकरणामुळे प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागणार नाही.पर्यावरणपूरक आणि आधुनिक प्रवासया मेट्रोमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यंत्रणा जोडण्यात आली आहे. यामुळे गाड्यांच्या ब्रेकमुळे निर्माण होणारी ऊर्जा पुन्हा वापरली जाणार असून, यामुळे विजेची मोठी बचत होईल. इलेक्ट्रिक मेट्रोमुळे कार्बन उत्सर्जनात घट होऊन हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. स्थानकांवर लिफ्ट, सरकते जिने, सीसीटीव्ही यंत्रणा आणि दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष स्पर्शक्षम मार्गांची सोय करण्यात आली आहे. संपूर्ण प्रणालीवर रिअल-टाइम देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीकृत नियंत्रण कक्ष कार्यरत राहील.
Iran-US-Israel War : युद्ध आणखी पेटणार? इस्रायलने दिला मोठा इशारा; सौदी-बहरैन पूल बंद
मध्य पूर्व आशियामधील युद्ध (Iran-US-Israel War) आता सहाव्या आठवड्यात पोहोचले असून परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. ज्यावेळी हे युद्ध काही क्षणांत संपवू असे दावे डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते, त्याच संघर्षात ते आता अडकलेले दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नव्याने इशारा देत स्पष्ट केले आहे की, ठरलेल्या वेळेत होर्मुज सामुद्रधुनी (Strait of Hormuz) खुली केली नाही तर अमेरिका कठोर कारवाई करेल. गरज भासल्यास इराणच्या वीज प्रकल्पांवर आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ले केले जाऊ शकतात, अशीही चेतावणी त्यांनी दिली. यावर प्रत्युत्तर देताना इराणने ठाम भूमिका घेतली असून, युद्धातील नुकसानीची भरपाई मिळेपर्यंत होर्मुज खुली केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.पाकिस्तानचा मध्यस्थीचा प्रयत्न :दरम्यान, पाकिस्तानकडून मध्यस्थीचे प्रयत्न सुरू आहेत. इराणमध्ये (Iran-US-Israel War) कोसळलेल्या अमेरिकन लढाऊ विमानातील पायलटला मोठ्या बचाव मोहिमेत सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या कारवाईत कोणतीही अमेरिकन जीवितहानी झाली नाही, मात्र पायलट जखमी असल्याची माहिती देण्यात आली. त्याचवेळी A-10 थंडरबोल्ट II हे विमान होर्मुजजवळ कोसळले, पण त्याचा पायलटही वाचवण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवरही हालचाली सुरू असून, ओमान इराणशी संवाद साधत आहे, तर पाकिस्तान आणि इजिप्त अमेरिका-इराण संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.अशातच आता इस्रायलने (Iran-US-Israel War) मोठा इशारा दिला असून, सौदी अरेबिया आणि बहरीनला जोडणारा किंग फहद कॉजवे हा महत्त्वाचा पूल तात्पुरता बंद करण्यात आला आहे. इराणकडून संभाव्य हवाई हल्ल्यांच्या धमक्यांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला. वाढता तणाव लक्षात घेता पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. हा पूल बहरीनसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, तो सौदी अरेबियाशी असलेला एकमेव रस्तामार्ग आहे.रेल्वे आणि संबंधित सुविधांचा वापर टाळण्याचे आवाहन :तसेच, इस्रायल डिफेन्स फोर्सेस यांनी इराणमधील (Iran-US-Israel War) नागरिकांना इशारा दिला आहे. त्यांनी लोकांना रेल्वे आणि संबंधित सुविधांचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे, कारण त्यांच्यावर हल्ल्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर जारी केलेल्या संदेशात, नागरिकांनी तातडीने रेल्वे प्रवास बंद करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Kashi Vishwanath Vedic Clock : टिक-टिक नव्हे, आता मुहूर्तात वेळ! काशीत ‘वैदिक घड्याळ’ची एंट्री!
वाराणसी : उत्तर प्रदेशातील जगप्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर (Kashi Vishwnath Temple) आता केवळ अध्यात्माचेच नव्हे, तर भारताच्या प्राचीन वैज्ञानिक वारशाचेही केंद्र बनले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांनी भेट दिलेले 'विक्रमादित्य वैदिक घड्याळ' (Vikrmadity Vedic Clock) सध्या भाविकांमध्ये आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरत आहे. सुमारे ७०० किलोग्रॅम वजनाचे हे भव्य घड्याळ म्हणजे परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा एक अद्भूत संगम आहे. हे घड्याळ सामान्य १२ किंवा २४ तासांच्या 'ग्रेगोरियन कॅलेंडर'वर आधारित नसून, पूर्णपणे वैदिक कालमापन पद्धतीवर चालते. दिवसाचे ३० मुहूर्तांमध्ये विभाजन करणारे हे जगातील पहिलेच घड्याळ मानले जाते. याद्वारे स्थानिक वेळेसोबतच तिथी, नक्षत्र आणि इतर खगोलशास्त्रीय माहिती अचूकपणे पाहता येते. या उपक्रमामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भारताच्या प्राचीन आणि प्रगत कालगणनेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.https://prahaar.in/2026/04/07/new-twist-in-ashok-kharat-case-after-ias-two-senior-women-police-officers-are-being-discussed/वैदिक घड्याळाद्वारे अनुभवा 'भारतीय कालमापन' पद्धती'विक्रमादित्य वैदिक घड्याळ' हे केवळ वेळ पाहण्याचे साधन नसून, ते निसर्ग आणि विज्ञानाचा मेळ घालणारे एक यंत्र आहे. हे घड्याळ पाश्चात्य पद्धतीपेक्षा वेगळे असून दिवसाची विभागणी ३० मुहूर्तांमध्ये करते, ज्यातील प्रत्येक मुहूर्त साधारण ४८ मिनिटांचा असतो. या घड्याळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची सुरुवात सूर्योदयाच्या वेळी (०:००) होते, तर सूर्यास्ताची वेळ साधारणपणे १५ व्या मुहूर्ताच्या आसपास येते. हे घड्याळ 'स्थानिक माध्य वेळेवर' (Local Mean Time) आधारित असल्याने सूर्याच्या स्थितीनुसार अत्यंत अचूक वेळ दर्शवते. केवळ तास-मिनिटेच नव्हे, तर भारतीय पंचांगातील तिथी आणि नक्षत्र यांचीही माहिती यातून मिळते.आधुनिक हवामान पद्धतीपेक्षा २३% जास्त अचूक भाकितेविशेष म्हणजे, हवामानशास्त्र आणि ज्योतिष विभागांनी केलेल्या ताज्या अभ्यासानुसार, वैदिक पद्धतीवर आधारित भाकिते ही आधुनिक हवामान अंदाजांच्या तुलनेत २० ते २३ टक्क्यांनी अधिक अचूक असल्याचे सिद्ध झाले आहे. हे घड्याळ केवळ परंपरा जपणारे साधन नसून, ते IST (भारतीय प्रमाणवेळ) आणि GMT (ग्रीनविच मीन टाइम) या दोन्ही जागतिक वेळ पद्धती एकाच वेळी डिजिटल स्वरूपात दर्शवते. वैदिक ग्रंथांमधील प्राचीन ज्ञान आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान यांचा हा एक यशस्वी प्रयोग आहे. लोकांना आपल्या पारंपरिक ज्ञानप्रणालीशी पुन्हा जोडणे आणि प्राचीन विज्ञानाचे पुनरुज्जीवन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या घड्याळाच्या स्थापनेमुळे भारतीय विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान एकाच व्यासपीठावर आले आहे.
Pawan Khera: काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आसाम पोलिसांचे एक पथक दाखल झाले आहे.
नवी दिल्ली : आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर देशांतर्गत शेअर बाजार नीचांकी पातळीवरून सावरत असल्याचे दिसत आहे. आजच्या व्यवहाराची सुरुवातही कमजोर झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये मोठी घसरण झाली. तथापि, थोड्याच वेळात खरेदीदारांनी पुन्हा खरेदी सुरू केल्याने दोन्ही निर्देशांकांच्या कामगिरीत सुधारणा झाली. सकाळी १० वाजेपर्यंत, सेन्सेक्स ०.२८ टक्क्यांनी, तर निफ्टी ०.३७ टक्क्यांनी घसरून व्यवहार करत होता.शेअर बाजारातील दिग्गज कंपन्यांमध्ये, हिंडाल्को इंडस्ट्रीज, विप्रो, ओएनजीसी, बजाज फायनान्स आणि कोल इंडिया यांचे शेअर्स ३.२८ टक्के ते ०.७२ टक्क्यांपर्यंतच्या वाढीसह व्यवहार करत होते. दुसरीकडे, मॅक्स हेल्थकेअर, इंटरग्लोब एव्हिएशन, इटरनल, महिंद्रा अँड महिंद्रा आणि आयशर मोटर्सचे शेअर्स २.६५% ते १.८६% पर्यंतच्या तोट्यासह व्यवहार करत होते.आजच्या व्यवहारानुसार, शेअर बाजारात २,६४९ स्टॉक्सचा सक्रिय व्यवहार सुरू होता. यापैकी १,३८७ स्टॉक्स नफ्यात व्यवहार करत होते, तर १,२६२ स्टॉक्स तोट्यात व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे, सेन्सेक्समधील ३० स्टॉक्सपैकी ११ स्टॉक्स खरेदीच्या पाठिंब्याने नफ्यात व्यवहार करत होते. दुसरीकडे, विक्रीच्या दबावामुळे १९ स्टॉक्स तोट्यात व्यवहार करत होते. निफ्टीमधील ५० स्टॉक्सपैकी १४ स्टॉक्स नफ्यात व्यवहार करत होते, तर ३६ स्टॉक्स तोट्यात व्यवहार करत होते.बीएसई सेन्सेक्स आज ३७२.४९ अंकांच्या घसरणीसह ७५,७३४.३६ अंकांवर उघडला. व्यवहाराच्या सुरुवातीला, निर्देशांक ८२४.४४ अंकांनी घसरून ७३,२८२.४१ अंकांवर आला. त्यानंतर लगेचच, खरेदीदारांनी खरेदी सुरू केल्याने निर्देशांकाच्या हालचालीत सुधारणा झाली. बाजारात सुरू असलेल्या खरेदी-विक्रीच्या दरम्यान, सकाळी १० वाजता सेन्सेक्स २०४.२७ अंकांनी घसरून ७३,९०२.५८ अंकांवर व्यवहार करत होता.सेन्सेक्सप्रमाणेच, एनएसई निफ्टी देखील १२९.५५ अंकांनी घसरून २२,८३८.७० अंकांवर आला. बाजार उघडताच, निर्देशांक २४८.९५ अंकांनी घसरून २२,७१९.३० अंकांवर आला होता. त्यानंतर खरेदीदारांनी पुन्हा खरेदी सुरू केल्याने निर्देशांकात सुधारणा झाली. बाजारात सुरू असलेल्या खरेदी-विक्रीनंतर, सकाळी १० वाजेपर्यंतच्या व्यवहारानंतर, निफ्टी ८४.८० अंकांच्या घसरणीसह २२,८८३.४५ अंकांवर व्यवहार करत होता.तत्पूर्वी सोमवारी, अगोदरच्या दिवशी सेन्सेक्स ७८७.३० अंकांनी किंवा १.०७ टक्क्यांनी वाढून ७४,१०६.८५ अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी २५५.१५ अंकांनी किंवा १.१२ टक्क्यांनी वाढून २२,९६८.२५ अंकांवर बंद झाला होता.
Pune News : नराधम माता! स्वार्थासाठी आईनेच संपवला ११ महिन्यांचा पोटचा गोळा; कारण ऐकून बसेल धक्का...
शिरूर : आईच्या प्रेमाला कलंक लावणारी एक अतिशय संतापजनक घटना शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथे उघडकीस आली आहे. एका निष्ठुर मातेने आपल्या केवळ ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा बळी घेतल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पूजा रवींद्र पवार असे या आरोपी महिलेचे नाव असून, तिने स्वतःच्या स्वार्थापोटी 'यश' नावाच्या आपल्या निष्पाप मुलाची निर्घृण हत्या केली. केवळ हत्या करूनच ही माता थांबली नाही, तर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी तिने चिमुकल्याचा मृतदेह जवळच असलेल्या एका विहिरीत फेकून दिला. आईच्या कुशीत सुरक्षित वाटणाऱ्या यशचा अशा प्रकारे अंत झाल्याचे समजताच परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या क्रूर कृत्यामागचे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू केला आहे.दुसरं लग्न करायचंय, मुलगा नकोय' ...पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत आरोपी पूजा पवार हिने आपला गुन्हा कबूल केला. मला दुसरे लग्न करायचे होते, पण लहान मुलगा सोबत असेल तर लग्न होण्यात अडचणी येतील, अशा अत्यंत विकृत आणि निष्ठुर विचारातून तिने यशला संपवण्याचा कट रचल्याची कबुली दिली आहे. एका मातेच्या स्वार्थापायी निष्पाप जीवाचा अंत झाल्याने तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. कोकणातील मुरुड येथून फिरून आल्यानंतर मुलगा यश सतत रडत होता. याचा राग मनात धरून तिने हे अमानुष पाऊल उचलले.https://prahaar.in/2026/04/07/gas-cylinder-relief-government-doubles-supply-of-5-kg-lpg-cylinders-migrants-students-to-benefit-from-govt-move/पुरावा नष्ट करण्यासाठी मातेचा भयंकर कटआपल्या ११ महिन्यांच्या मुलाला मार्गातून हटवण्यासाठी या मातेने अमानुषतेचा कळस गाठला. पूजाने यशचे डोके घरासमोरील सिमेंटच्या ओट्यावर जोराने आपटून त्याला जागीच संपवले. हत्या केल्यानंतर कोणताही पुरावा मागे राहू नये, यासाठी पूजाने अत्यंत नियोजनबद्ध रितीने रक्ताचे डाग पाण्याने धुवून काढले. एवढेच नव्हे तर, मुलाचा मृतदेह एका कपड्याच्या बॅगेत कोंबून ती बॅग जड करण्यासाठी त्यात मोठे दगड भरले. ही बॅग पाण्यावर तरंगू नये म्हणून तिने ती शेतातील एका खोल विहिरीत फेकून दिली. गुन्हा केल्यावर कोणताही पश्चात्ताप न होता पूजाने या सर्व गोष्टी अत्यंत शांतपणे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, तिच्या या निर्दयी वागण्यामुळे शिरूर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.पोटच्या गोळ्याची हत्या करणाऱ्या आईला बेड्यासुरुवातीला मुलगा बेपत्ता असल्याचे नाटक करणाऱ्या आणि अपघाताचा बनाव रचणाऱ्या पूजा पवार या मातेचा बुरखा अखेर पोलिसांनी फाडला आहे. वडील रवींद्र अशोक पवार यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयावरून पूजाची चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या पूजाने पोलिसांच्या कडक तपासणीसमोर गुडघे टेकले आणि आपल्या पोटच्या गोळ्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत शेतातील विहिरीतून ११ महिन्यांच्या यशचा मृतदेह बाहेर काढला असून तो उत्तरीय तपासणीसाठी (Post-mortem) पाठवण्यात आला आहे. आपल्याच मुलाचा जीव घेऊन गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या घटनेमुळे भांबर्डे गावासह संपूर्ण शिरूर तालुका हादरला असून, एका निष्पाप जिवाचा बळी घेणाऱ्या या मातेला कठोर फाशीची शिक्षा व्हावी, अशी संतप्त मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
नाशिक : नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पदर उलगडू लागले आहेत. पोलीस कोठडीत असलेल्या खरातची कसून चौकशी सुरू असतानाच, या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट प्रशासकीय वर्तुळापर्यंत पोहोचले आहेत. अशातच आता या प्रकरणात अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. IAS पाठोपाठ दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी अशोक खरातला मिळालेल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे. यामुळे फक्त नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालीये.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील आयएएस (IAS) अधिकाऱ्यापाठोपाठ दोन महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या. खरातच्या संपर्कात असलेल्या या महिला अधिकाऱ्यांपैकी एक डीसीपी (DCP) तर दुसरी एसीपी (ACP) दर्जाची अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. या दोन महिला पोलीस अधिकारी कोण? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.हवी तिथे पोस्टिंग मिळावी म्हणून ...वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या या महिला अधिकाऱ्यांचे नाव खरातसोबत जोडले गेल्याने तपास यंत्रणांनी नव्या मार्गाने तपास सुरू केला आहे. आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी बाबाकडे धाव घेतली होती का? असा सवाल देखील विचारला जात आहे. अशोक खरात प्रकरणात भोंदू बाबासोबत काही आर्थिक व्यवहारही झाले का? याबाबत तपास होण्याची शक्यता असल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल :अशोक खरातवर (Ashok Kharat) केवळ लैंगिक अत्याचाराचेच नव्हे, तर फसवणुकीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती उभी केल्याचे आरोपही आहेत. नाशिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा सखोल तपास सुरू केला आहे. पोलिसांनी जमा केलेली महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या ताब्यात देण्यात आली असून, खरातचे आर्थिक साम्राज्य नेमके कसे उभे राहिले, याचा तपास सुरू आहे.
Pratap Sarnaik : शालेय सहलींतून एसटीच्या तिजोरीत १२७ कोटींची भर
महसुलात मोठी वाढ; सुरक्षित प्रवासाला पालकांची पसंतीमुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यातील ‘लाल परी’ने शालेय सहलींच्या माध्यमातून यंदा यशाचे नवे शिखर गाठले आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात एसटीने २५ हजार ५५८ बस फेऱ्यांच्या माध्यमातून तब्बल १२७ कोटी १८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविले असून, मागील वर्षाच्या तुलनेत महसुलात ३३ कोटी २९ लाखांची मोठी वाढ झाली आहे. सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी आजही ‘एसटी’च विद्यार्थ्यांची पहिली पसंती असल्याचे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, शालेय सहल हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटन स्थळांची ही मुशाफिरी सुरक्षित असावी, याकडे शासनाचा कटाक्ष आहे. या शैक्षणिक वर्षात लाखो विद्यार्थ्यांनी एसटीच्या माध्यमातून सुखकर प्रवास केला असून, सुरक्षिततेच्या बाबतीत एसटीला पर्याय नाही, यावर या उत्पन्नाने शिक्कामोर्तब केले आहे.शाळा आणि महाविद्यालयांनी एसटीच्या माध्यमातून सहलींचे आयोजन केल्यास विद्यार्थ्यांना प्रवासी भाड्यात शासनाकडून ५० टक्के सवलत दिली जाते. यामुळेच विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांना एसटीचा आधार मोठा वाटतो. खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत माफक दर आणि विश्वासार्हता ही एसटीची बलस्थाने ठरली आहेत.नव्या बसेसमुळे प्रवास झाला सुखकरयंदा बहुतांश सहलींसाठी महामंडळाने नव्या आणि अद्ययावत बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास केवळ सुरक्षितच नाही, तर अत्यंत आरामदायी आणि समाधानकारक झाला. राज्यभरातून मिळालेल्या २५ हजार ५५८ बस फेऱ्यांच्या मागणीवरून एसटीवरील जनतेचा विश्वास अधोरेखित झाला आहे.शालेय सहलींसाठी एसटीने नेहमीच पुढाकार घेतला आहे. आगामी काळातही शाळा-महाविद्यालयांनी खासगी बसेसच्या मागे न लागता एसटीच्या सुरक्षित प्रवासालाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन मी करतो.
Pooja Sawant : “संसारासाठी मी काही वेळ काम सोडून ऑस्ट्रेलियाला गेले पण…”; पूजा सावंतने केला खुलासा
Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंत सालबर्डी सिनेमामुळे चर्चेत असून तिने नुकत्याच एका मुलाखतीत खाजगी आयुष्यावर विचारलेल्या प्रश्नांवर मनमोकळीपणाने उत्तर दिली.
Tamil Nadu news: पोलिस कोठडीत झालेल्या बेदम मारहाणीमुळे बाप-लेकाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात मदुराई जिल्हा न्यायालयाने मोठा निर्णय देत 9 पोलिस कर्मचाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.
Ants in Kitchen: किचनमधील मुंग्यांचा त्रास संपवा; हे सोपे घरगुती उपाय करून पाहा!
Ants in Kitchen हे सर्व उपाय नैसर्गिक आणि सुरक्षित असल्यामुळे घरात लहान मुले किंवा पाळीव प्राणी असले तरीही वापरायला हरकत नाही. मात्र, किचन स्वच्छ ठेवणे आणि अन्नपदार्थ झाकून ठेवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
Chetak Screen Awards 2026 : जावेद अख्तर, रमेश सिप्पी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार बॉबी देओलने स्वीकारला.
Iran Israel War: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने इराणला मोठा धक्का दिला आहे.
Newasa News : वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड संभाजी काळे; उपाध्यक्षपदी अॅड. राजू इनामदार यांची निवड
Newasa News : वकील संघाच्या झालेल्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड जी. एम निकम व अँड ए. जी करडक यांनी काम पाहिले.
Operation NoVoice हे अॅप्स दिसायला पूर्णपणे सामान्य आणि विश्वासार्ह वाटत होते. फोटो एडिटिंग, गेम्स किंवा युटिलिटी अॅप्सच्या नावाखाली हे उपलब्ध होते. त्यामुळे वापरकर्त्यांना संशय न येता त्यांनी हे अॅप्स सहज डाउनलोड केले. पण प्रत्यक्षात या अॅप्समध्ये अत्यंत धोकादायक मॅलवेअर लपलेले होते.
नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट ओढवले असून, याचे पडसाद भारतातही उमटताना दिसत आहेत. एलपीजी गॅसच्या वाढत्या तुटवड्यामुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच, केंद्र सरकारने एक दिलासादायक पाऊल उचलले आहे. विशेषतः विद्यार्थी आणि स्थलांतरित कामगारांची सोय लक्षात घेऊन सरकारने ५ किलोच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा आता दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक संकटामुळे उद्भवलेल्या टंचाईवर मात करण्यासाठी सरकारने हा 'डबल सिलिंडर'चा कोटा लागू केला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा रोजंदारीवर काम करणारे मजूर, शहरात राहणारे विद्यार्थी आणि नोकरीनिमित्त स्थलांतर करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. गॅस तुटवड्यामुळे निर्माण झालेली ओढाताण कमी करण्यासाठी आणि गरजूंपर्यंत इंधन पोहोचवण्यासाठी सरकारने ही यंत्रणा अधिक गतीमान केली आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा आधार मिळाला आहे.https://prahaar.in/2026/04/07/sangli-crime-news-disputes-at-a-tamasha-alcohol-and-romantic-relationships-a-deadly-end-three-consecutive-murders-in-sangli-within-24-hours-create-a-sensation/५ किलो सिलिंडरचा कोटा दुप्पटराज्यांमध्ये निर्माण झालेली सिलिंडरची पळापळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने ५ किलोच्या छोट्या गॅस सिलिंडरचा कोटा दुप्पट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सर्व राज्य सरकारांना तातडीने पत्र पाठवण्यात आले असून, सिलिंडरचे दैनंदिन वाटप वाढवण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे आता सामान्य नागरिकांना सिलिंडरसाठी वणवण करावी लागणार नाही.स्थलांतरित आणि विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णयआता स्थलांतरित कामगार, मजूर आणि विद्यार्थ्यांना गॅस कनेक्शनसाठी पत्त्याच्या पुराव्याची (Address Proof) अट राहणार नाही. केवळ आपले ओळखपत्र दाखवून ५ किलोचा 'एफटीएल' (FTL) सिलिंडर सहज खरेदी करता येणार आहे, ज्यामुळे कागदपत्रांच्या कटकटीतून त्यांची मुक्तता झाली आहे. या योजनेतंर्गत, केंद्र सरकार राज्य सरकारांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत या छोट्या सिलिंडरचा साठा उपलब्ध करून देत आहे. तेल विपणन कंपन्यांमार्फत थेट वितरण केले जाणार असल्याने, रोजंदारीवर काम करणाऱ्यांना आणि बाहेरगावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हा गॅस वेळेवर मिळणे सोपे होणार आहे. जागतिक संघर्षाचा फटका सर्वसामान्यांच्या चुलीला बसू नये, यासाठी सरकारने वितरणाची ही नवीन आणि सोपी व्यवस्था तातडीने कार्यान्वित केली आहे.
Thane News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराजवळ ही घटना घडल्यामुळे सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
Share Market: गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजारात दिसत असलेली तेजी आज ओसरली आहे
Prakash Mahajan : दमानियांचा बोलवता धनी कोण? शिवसेना नेते प्रकाश महाजनांचा सवाल; केली ‘ही’मोठी मागणी
Prakash Mahajan : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणातील सीडीआर समोर आणला. त्यांनी थेट राजकीय नेत्यांची नावे घेत कोणी कितीवेळा खरातशी संपर्क साधला याची माहिती दिली. यावरुन राजकारण तापले असून, शिवसेना नेते प्रकाश महाजन यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
LPG Crisis in India: इराण युद्धानंतर भारतासह जगभरातील अनेक देशांना एलपीजीच्या संकटाचा सामना करावा लागला.
Karuna Munde :बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.
Hinjewadi IT Park area : प्रत्यक्षात वीजपुरवठा केव्हा सुरू होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत सर्व पक्षांनी व नेतेमंडळींनी एक भावनिक आवाहन केले आहे.
मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे. त्यामुळे मीरा भाईंदर वासियांचा प्रवास आता लवकरच गारेगार आणि जलद , सुलभ होण्याची शक्यता आहे. तसेच पॉड टॅक्सिचे देखील भूमिपूजन करण्यात येणार आहे.मेट्रो ९ चे महत्व आणि कनेक्टिव्हिटीमेट्रो लाईन ९ ही मुंबई मेट्रो प्रकल्पातील महत्त्वाची मेट्रो लाईन मानली जात आहे. दहिसर ते काशिगाव दरम्यान धावणारी ही लाईन मेट्रो लाईन ७ शी जोडली गेल्यामुळे प्रवाशांना थेट अंधेरीपर्यंत प्रवास करता येणार आहे. यामुळे उपनगर आणि शहर यांतील अंतर कमी होऊन रोजच्या प्रवासाला मोठी गती मिळणार आहे.मार्ग आणि स्थानकांची माहितीया मेट्रो मार्गावर दहिसर, पांडुरंग वाडी, मीरा गाव आणि काशिगाव अशी प्रमुख स्थानके असणार आहेत. या स्थानकांमुळे मीरा-भाईंदर परिसरातील रहिवाशांना सहजपणे मेट्रो सेवा उपलब्ध होईल.मेट्रोमधील सुविधाही संपूर्ण लाईन एलिव्हेटेड स्वरूपात असून, प्रवाशांसाठी आधुनिक वातानुकूलित डबे उपलब्ध असतील. याशिवाय स्मार्ट कार्ड आणि QR कोड तिकीट सुविधा देण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली असून, प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.लाईन ७ आणि लाईन ९ संयुक्त कॉरिडॉरमेट्रो लाईन ७ आणि लाईन ९ या एकत्रितपणे कार्यरत राहणार असून, गुंदवली ते काशिगाव असा संयुक्त कॉरिडॉर तयार झाला आहे. यामुळे अंधेरी पूर्व ते मीरा-भाईंदर दरम्यान थेट प्रवास शक्य होणार आहे. लाईन ७ आता विस्तारित स्वरूपात अधिक प्रभावीपणे चालवली जाणार आहे.वेळापत्रक आणि सेवामेट्रो ची पहिली गाडी : ५.५० वाजता सुटणारशेवटची गाडी : रात्री ११ वाजेपर्यंत धावेलगर्दीच्या वेळेत ५ ते ६ मिनिटांच्या अंतराने गाड्या उपलब्ध असतीलइतर वेळेत ८ ते १० मिनिटांचा फरक असेलआठवड्याच्या दिवसांत २७६ फेऱ्या, शनिवारी २२३ आणि रविवारी २०५ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.प्रवास वेळेत मोठी बचतसध्या दहिसर ते काशिगाव हा प्रवास रस्त्याने साधारण ३० ते ४५ मिनिटांचा होतो. मात्र मेट्रो सुरू झाल्यानंतर हा प्रवास केवळ १० ते १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून दिलासा मिळून प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.पर्यावरण आणि विकासावर परिणामया प्रकल्पामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होऊन प्रदूषणात घट होण्याची अपेक्षा आहे. तसेच मीरा-भाईंदर परिसरातील विकासाला चालना मिळून रोजगार, शिक्षण आणि व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
Sangli Crime News : तमाशातील वाद, दारू प्रेमसंबंधांचा शेवट; २४ तासांत सांगलीत सलग तीन खुनांनी खळबळ
सांगली : सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या खुनांच्या घटनांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कवलापूर आणि कुपवाड परिसरात घडलेल्या या घटनांमागे किरकोळ वाद, दारूचे नशेत झालेले भांडण आणि प्रेमसंबंधातील तणाव अशी विविध कारणे समोर आली आहेत.कवलापूरमध्ये तमाशा कार्यक्रमात वादातून खूनकवलापूर येथे यात्रेनिमित्त आयोजित तमाशा कार्यक्रमात पहिली घटना घडली. विश्वास कल्लाप्पा सुतार (वय ३२) हा तरुण कार्यक्रम पाहण्यासाठी आला होता. त्याचवेळी रोहित उर्फ नवनाथ नाईक हा देखील तेथे उपस्थित होता. गर्दीत झालेल्या धक्काबुक्कीमुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. दोघेही दारूच्या नशेत असल्याने वाद अधिक चिघळला. या वादातून रोहित उर्फ नवनाथ याने विश्वासच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.कुपवाडमध्ये दारू पिताना वाद; एकाचा खूनदुसरी घटना कुपवाड शहरात घडली. सचिन माने हा दारू पिण्यासाठी दुकानात गेला असताना त्याच्यासोबत पूर्वीपासून वाद असलेले दोन जण तेथे आले. त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. या घटनेत दोघांनी सचिन माने याच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केला. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.प्रेमसंबंधातून पत्नीनेच पतीचा घेतला जीवतिसरी घटना कुपवाड एमआयडीसी परिसरात समोर आली. दगडू केंगार या बांधकाम कामगाराचा खून त्याच्या पत्नीने केल्याचे उघड झाले आहे. संबंधित महिलेला पोलिसांनी अटक केली असून, तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या नात्याला पतीचा विरोध असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. अखेर या तणावातूनच पत्नीने पतीचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे.पोलिस तपास आणि परिसरातील तणावसलग तीन खुनांच्या घटनांमुळे सांगली जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सर्व घटनांचा सखोल तपास सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.छोट्याश्या कारणांवरून घडलेल्या या गंभीर घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पुढील काळात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सांगली पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
Abhijeet Sawant and Priyanka Chopra अभिजीत सावंत हा भारताचा पहिला ‘इंडियन आयडल’ विजेता ठरला होता. त्या काळात त्याची लोकप्रियता खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती. देशभरात त्याची क्रेझ होती आणि त्याचा प्रभाव बॉलीवूड स्टार्सपर्यंत पोहोचला होता. याच काळातील एक अनुभव त्याने सांगितला आहे.
Navjot Kaur Sidhu: पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.
Nana Patole : पार्थ पवार यांनी काँग्रेसविषयी केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण तापले असून, आता पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Iran War: होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून इराणची अमेरिकेला धमकी ; युद्धविरामासाठी १०-कलमी योजना प्रसिद्ध
Iran War: इजिप्त, पाकिस्तान आणि तुर्कीये या देशांनी मध्यस्थी करत शस्त्रसंधीचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र तो प्रस्ताव इराणने काल औपचारिकपणे फेटाळून लावला आहे.
Amol Mitkari Baramati : अमोल मिटकरी यांनी ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, त्या गोजुबावी या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले.
Tabu Akshay Friendship : बॉलिवूडची जुनी मैत्री चर्चेत! अक्षय कुमार-तब्बू यांनी आठवणींना दिला उजाळा
Tabu Akshay Friendship : अक्षय कुमार आणि तब्बू यांची मैत्री आजही घट्ट आहे. भूत बंगला सिनेमाच्या ट्रेलर लॅान्चला दोघांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
US-Israel Iran War : मध्य पूर्वेतील युद्ध अधिक तीव्र होत आहे. सोमवारीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली की, जर मंगळवार रात्रीपर्यंत करार झाला नाही, तर तेहरानला चार तासांत उद्ध्वस्त केले जाईल.
Baramati byelection 2026 : पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात असल्याची टिप्पणी केली होती.
Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी
मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी करत आहे. मंदिरातील धार्मिक उपक्रम, देणग्या आणि त्यामागील आर्थिक व्यवहार यांची साखळी उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खरातसह मंदिराशी संबंधित व्यक्तींना समक्ष बसवून विचारपूस करण्यात आली असून, तपासाला नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पोलीस कोठडी आणि तपासाची दिशाया प्रकरणात अशोक खरात याला न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात तपास यंत्रणा त्याच्याकडून विविध बाबींवर सखोल माहिती घेत आहेत. केवळ धार्मिक उपक्रमांपुरता हा तपास मर्यादित न राहता आर्थिक आणि इतर गंभीर आरोपांच्या दिशेनेही तपास केला जात आहे.पुजारी आणि कर्मचाऱ्यांची समक्ष चौकशीतपासादरम्यान ईशान्येश्वर मंदिरातील पुजारी आणि एका कर्मचाऱ्याला पुन्हा एकदा समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. या प्रकारच्या चौकशीत वेगवेगळ्या जबाबांतील विसंगती तपासून सत्यस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. संबंधितांकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी करत तपास पथक पुढील धागेदोरे जोडत आहे.मंदिरातील देणग्या आणि आर्थिक प्रवाहाचा मागोवामंदिरात होणाऱ्या पूजा, विशेष विधी आणि त्यासाठी येणाऱ्या देणग्या यांचा तपशीलवार तपासला जात असून, दानरूपात मिळणारी रक्कम नेमकी कोणत्या खात्यांमध्ये जमा होत होती, ती रक्कम कशी वापरली जात होती, तसेच कॅश व्यवहार किती प्रमाणात होत होते याबाबत माहिती गोळा करण्यात येत आहे. या आर्थिक प्रवाहातून काही अनियमितता समोर येण्याची शक्यता तपासली जात आहे. मंदिरात आयोजित केल्या जाणाऱ्या महापूजा आणि विशेष धार्मिक विधींवरही तपास पथकाने लक्ष केंद्रीत केले आहे. या पूजा कोणाच्या मार्गदर्शनाखाली पार पडत होत्या, त्यासाठी कोणती व्यवस्था केली जात होती आणि त्या निमित्ताने आर्थिक व्यवहार झाले का, याचा सखोल तपास सुरू आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला जात होता का, याचाही शोध घेतला जात आहे.बँक खात्यांची मोठ्या प्रमाणावर छाननीअशोक खरात यांच्याशी संबंधित सुमारे 130 हून अधिक बँक खात्यांमधील व्यवहारांची तपासणी सुरू आहे. या खात्यांमधून सुमारे 63 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. काही खात्यांमध्ये खरात यांचे नाव नॉमिनी म्हणून आढळत असून, ती खाती त्यांच्या संपर्क क्रमांकावर चालवली जात असल्याचा अंदाज तपासातून समोर येत आहे. तपासादरम्यान पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील उच्च मूल्याच्या मालमत्तांकडेही लक्ष वेधले गेले आहे. या मालमत्ता त्याच्या चार्टर्ड अकाउंटंट प्रकाश पोफळे याच्या नावावर असल्याची माहिती समोर आली असून, 2024 मध्ये पोफळे यांनी 18 रो-हाऊस आणि सुमारे 49 गुंठे जमीन खरेदी केल्याची नोंद आहे. अधिकृत किमत 19.56 कोटी रुपये असली तरी बाजारमूल्य 100 कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.. अधिकृत किमतीपेक्षा बाजारमूल्य जास्त असल्याने काळा पैसा आणि कर फसवेगिरी केल्याचा संशय आहे.जमिनी आणि परदेशी आर्थिक दुव्यांचा तपासनाशिक, सिन्नर आणि शिर्डी परिसरातील 52 हून अधिक जमिनींची चौकशी करण्याची तयारी सुरू आहे. याशिवाय हवाला व्यवहार आणि परदेशातील आर्थिक दुवे, विशेषतः यूएईपर्यंत पोहोचणाऱ्या व्यवहारांचा तपासही पुढील टप्प्यात होण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रकरणाचा व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे.या प्रकरणात केवळ SITच नव्हे, तर अंमलबजावणी संचालनालय (ED) देखील तपासात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्थिक गैरव्यवहार, बेनामी मालमत्ता आणि हवाला व्यवहार या सर्व बाबींचा एकत्रित तपास होण्याची शक्यता असल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.एकूणच, अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी विविध अंगांनी चौकशीचा वेग वाढवला असून, आर्थिक व्यवहारांपासून धार्मिक उपक्रमांपर्यंत सर्व बाबींची सखोल तपासणी सुरू आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणातून आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज
मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील ही लढत गुवाहाटीच्या एसीए स्टेडियमवर रंगणार असून, दोन्ही संघांसाठी स्पर्धेतील स्थान मजबूत करण्याची ही मोठी संधी मानली जात आहे.सामन्याची वेळ आणि प्रसारणहा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार असून, स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर तसेच हॉटस्टारवर थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. गुवाहाटीतील एसीए स्टेडियमवर या सामन्याला चांगलीगर्दी होण्याची अपेक्षा आहेदोन्ही संघांची सध्याची कामगिरीमुंबई इंडियन्सने आतापर्यंत दोन सामन्यांपैकी एक विजय मिळवला असून, एक सामना गमावला आहे. त्यामुळे सातत्य राखण्याचे आव्हान मुंबईसमोर आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने दोन्ही सामने जिंकून स्पर्धेला दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे विजयाची हॅट्रिक करण्याच्या उद्देशाने राजस्थान मैदानात उतरू शकते.एकूण आकडेवारीमुंबई आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत 32 सामने झाले असून, त्यात मुंबईचे 17-15 असे थोडेसे वर्चस्व दिसते. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर प्रथम गोलंदाजी करताना राजस्थानने मुंबईवर 12-9 अशी आघाडी घेतली आहे. घरच्या मैदानावर राजस्थानने 13 पैकी 8 सामने जिंकले असल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.गुवाहाटी खेळपट्टी आणि हवामानगुवाहाटीतील खेळपट्टीचा विचार करता, मागील काही सामन्यांमध्ये मोठे लक्ष्य राखण्यात संघांना अपयश आले आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, सुमारे 55 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सामन्यावर हवामानाचा परिणाम होऊ शकतो.सामन्यातील महत्त्वाचे मुद्देराजस्थानचा आक्रमक खेळ मुंबईसाठी आव्हान ठरू शकतो. त्यामुळे त्यांच्या फलंदाजांना रोखण्यासाठी मुंबईला अचूक डावपेच आखावे लागतील. विशेषतः राजस्थानच्या सलामीवीरांची कामगिरी निर्णायक ठरू शकते. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या मागील सामन्यात अनुपस्थित होता. मात्र, त्याने सराव सुरू केल्याने या सामन्यात त्याच्या पुनरागमनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह अद्याप या स्पर्धेत विकेट मिळवू शकलेला नाही. त्यामुळे या सामन्यात तो प्रभावी कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल यांना रोखण्यासाठी मुंबईला ठोस रणनीती आखावी लागेल. तसेच तुषार देशपांडेविरुद्ध रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची फलंदाजी कशी ठरते, याकडेही लक्ष असेल.एकूणच, आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असून, राजस्थान आपली विजयी मालिका कायम राखणार की मुंबई पुनरागमन करत दुसरा विजय मिळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का! बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्ते हाती धनुष्यबाण घेणार
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांना कोकणात मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Curd Benefits: दररोज दही खा आणि मिळवा नैसर्गिक ग्लो; तरुण, सुंदर त्वचेसाठी सोपा उपाय!
Curd Benefits दही हे फक्त चविष्ट अन्न नसून ते पोषणमूल्यांनी भरलेले एक सुपरफूड आहे. आयुर्वेदानुसार, दही शरीराला आतून निरोगी ठेवते आणि त्याचा सकारात्मक परिणाम त्वचेवरही दिसून येतो. दररोज दही खाल्ल्याने त्वचा स्वच्छ, मऊ आणि तजेलदार दिसू लागते.
Ravindra Chavan :भारतीय जनता पार्टीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Chand Mera Dil Release Date या चित्रपटात अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता लक्ष्य लालवानी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे, ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. करण जोहर यांनी शेअर केलेल्या पोस्टर्समध्ये दोघांची रोमँटिक केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येते.
Top 10 News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे.

28 C