मतदान अधिक, तरीही एमआयएमपेक्षा मनसेच्या जागा कमी
मुंबई : मुंबई महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाला मिळालेले यश हा चर्चेचा विषय झाला आहे. या निवडणुकीत एआयएमआयएमला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. मात्र मिळालेल्या मतांच्या टक्केवारीचा विचार करता मनसेची मते ही एआयएमआयएमच्या मतांपेक्षा अधिक आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी १६ जानेवारी रोजी रात्री उशीरा पूर्ण झाली. त्यानंतर मुंबई महापालिकेतील राजकीय बलाबलाचे चित्र स्पष्ट झाले. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना (ठाकरे) पक्ष आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना (शिंदे) पक्ष असून कॉंग्रेस चौथ्या क्रमांकावर, एआयएमआयएम पाचव्या क्रमांकावर आहे. तर मनसेला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागेल आहे.त्यापाठोपाठ राष्ट्रवादी, समाजवादी, राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षांचा क्रमांक आहे. मुंबई महापालिकेच्या रिंगणात तब्बल २९ विविध पक्ष उतरले होते. त्यापैकी केवळ नऊ पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत. यंदा मराठीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या मनसेला एआयएमआयएमपेक्षा कमी जागा मिळाल्या. मात्र मतांच्या टक्केवारीचा आणि आकडेवारीचा विचार केला तर मनसेची मतांची टक्केवारी एआयएमआयएमपेक्षा जास्त आहे.
मुंबईत ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधणार
महापालिका निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णयमुंबई : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचे निकाल लागले आहेत. त्यात बहुतांश महापालिकेत भाजपने वर्चस्व राखले आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या मदतीने यश मिळाले. राज्यभर विजयाचा उत्साह दिसत आहे. या महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत १० मोठे निर्णय घेण्यात आले. मुंबईतील पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधली जाणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्पास मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासह मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार?
शरद पवार गटाकडून हालचालींना सुरुवातमुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल आल्यानंतर, आता सर्वच राजकीय रक्ष आगामी काळात होणाऱ्या १२ जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रितपणे लढवण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आलो होतो. आम्ही सर्व पक्षाचे प्रमुख उपस्थित होतो. ज्या पद्धतीने महापालिकेला आम्ही एकत्रितपणे सामोरे गेले होतो, त्याच पद्धतीने पुढील निवडणुकांना सामोरे जाण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी, आम्ही शरद पवार यांच्याकडे आलो होतो. असे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. ते शनिवारी बारामतीत पत्रकारांसोबत बोलत होते.शिंदे म्हणाले, ‘आम्ही जेथे शक्य आहे, तेथे एकत्रितपणे जिल्हा परिषद-पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहोत. मात्र, काठी ठिकाणी स्वतंत्रपणे लढावे, असे वाटल्यास, तशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जाण्याची चर्चा झाली’. महापालिका निवडणूक निकालासंदर्भात बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, ‘स्थानिक पातळीवरील निवडणुकीच्या संदर्भात जो कौल जनतेने दिलेला असतो, तो मान्य करावा लागतो. आम्ही तो कौल मान्य केला आहे.विलीनीकरणावर नाही, तर निवडणुकीवर चर्चा : दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे, यासंदर्भात काही चर्चा झाली? यावर शिंदे म्हणाले, ‘आज विलीनीकरणाचा काही विषय नव्हता, एकत्रितपणे निवडणूक लढवण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. त्याची परवानगी मागण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी आलो होतो. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जेथे शक्य होईल तेथे एकत्रितपणे लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.’
भाजपचा मुंबईतील विजय ही अभिमानास्पद बाब
मालदामध्ये ‘स्लिपर वंदे भारत’ला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मोदींचे प्रतिपादननवी दिल्ली : ‘भाजपने देशात सुशासन आणि विकासाचे एक नवीन मॉडेल विकसित केले आहे. आज संपूर्ण भारतातील जनता याचा मनापासून स्वीकार करत आहे. महाराष्ट्रातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले आणि भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. महाराष्ट्राची राजधानी आणि जगातील सर्वात मोठ्या महापालिकांपैकी एक असलेल्या मुंबईत भाजपने पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीत विजय मिळवला,’ असे सांगताना ही एक मोठी अभिमानास्पद बाब आहे. ज्या भागांमध्ये वर्षानुवर्षे भाजपबद्दल खोट्या गोष्टी आणि अफवा पसरवल्या गेल्या, तिथेही आता मतदार आम्हाला आशीर्वाद देत आहेत. तुमचा आजचा उत्साह पाहून मला खात्री आहे की, यावेळी बंगालची जनताही भाजपला दणदणीत विजय मिळवून देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास व्यक्त केला आहे.पंतप्रधान मोदी यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेनचा शुभारंभ केला. यामुळे भारतातील लांब पल्ल्याच्या प्रवासात क्रांती घडेल, असे ते म्हणाले. भारताच्या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सभेला संबोधित करताना मोदी यांनी राज्यातील विकासाच्या गतीवर प्रकाश टाकला. ही ट्रेन पश्चिम बंगालमधील हावडा व आसाममधील गुवाहाटी या शहरांना जोडणार असून, यामुळे ईशान्य व पूर्व भारतामधील कनेक्टिव्हिटी, पर्यटन व व्यापाराला चालना मिळणार असल्याचे सांगितले.रेल्वेच्या नियमांत बदलवंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी रेल्वे बोर्डाने काही कडक नियम लागू केले आहेत: १. फक्त कन्फर्म तिकिटे : या ट्रेनमध्ये आरएसी किंवा प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना प्रवासाची परवानगी नसेल. फक्त पूर्णपणे पुष्टी झालेली तिकिटेच जारी केली जातील. २. आरक्षण कोटा: या ट्रेनमध्ये इतर कोणताही सामान्य कोटा लागू नसेल. केवळ महिला, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि ड्युटी पास धारकांसाठीच आरक्षणाची तरतूद असेल.रेल्वेबाबत माहिती४०० किमीपर्यंतचे किमान भाडेएसी १: १ हजार ५२० रुपयेएसी २: १ हजार २४० रुपयेएसी ३: ९६० रुपये
शिरूर : शिरूर तालुक्यातील पारोडी येथील वडिलोपार्जित शेतजमीन बळकावण्यासाठी तब्बल सहा दशकांपूर्वीच्या एकत्रिकरण नोंदींमध्ये छेडछाड करून बनावट जबाब, खोट्या सह्या व शिक्के तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात एकूण १३ जण आरोपी आहेत. विशेष म्हणजे या कथित कटात […] The post Shirur News : बनावट दस्तऐवजांचा मोठा कट उघड; भूमी अभिलेख कार्यालयातील ३ कर्मचाऱ्यांसह दहा जणांवर गुन्हा appeared first on Dainik Prabhat .
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारांची यादी जाहीर
Nationalist Congress Party : राज्यातील महापालिका निवडणुका पार पडल्या असून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना मैदानात […] The post मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारांची यादी जाहीर appeared first on Dainik Prabhat .
‘क्रिप्टो’च्या नावाने ९० लाख लुटले!
एमआयडीसी पोलिसांकडून तीन आरोपींना अटकमुंबई : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका कापड व्यावसायिकाची सुमारे ९० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ॲन्थोनी चेट्टीयार ऊर्फ ॲन्थोनी साहिल, सोहेल खान आणि अमजदअली शेख अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर या तिघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील तक्रारदार कापड व्यावसायिक असून ते विलेपार्ले येथे राहतात. त्यांची घाटकोपर येथे एका खासगी कंपनी असून या कंपनीतून त्यांचे सर्व व्यवहार चालतात. गेल्या वर्षीं त्यांची ध्रुव मेहता या व्यक्तीशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान त्याने त्याचा गारमेंटसह फॅब्ररिक अक्सेसरीजचा व्यवसाय आहे. त्यांचा सर्व व्यवहार क्रिप्टो करन्सीमध्ये चालत असून त्यात त्यांना रुपयांच्या तुलनेत जास्त फायदा होत असल्याचे सांगितले.त्यामुळे त्यांनीही त्यांचे सर्व व्यवहार क्रिप्टो करन्सीमध्ये करण्याचा सल्ला दिला. त्याच्या परिचित काही डिलर कडून ते त्यांना क्रिप्टो करन्सी देतील असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याच्याकडून क्रिप्टो करन्सी घेण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे ते त्यांच्या भावासोबत ध्रुवच्या अंधेरीतील कार्यालयात गेले. तिथे ध्रुवसोबत इतर सातजण उपस्थित होते.यावेळी ध्रुवने त्यांची ओळख ॲन्थोनी साहिल, अमजद शेख, अजगर हुसैन, शेख अशफाक, मनोज प्रजापती आणि मोहम्मद तौसिन खान अशी करून दिली. ही रक्कम ॲन्थोनीला देण्यास सांगून त्याने त्यांना दिलेल्या क्यूआर लिंकवर क्रिस्टो करन्सी ट्रान्स्फर करणार असल्याचे सांगतले. त्यामुळे त्यांनी ॲन्थोनीला ९० लाख रुपये दिले. मात्र बराच वेळ होऊन त्यांनी त्यांना एक लाख युएसडीटी क्रिप्टो करन्सी पाठविली नाही.त्यामुळे त्यांनी ध्रुवसह इतर सातही आरोपींना संपर्क साधून याबाबत विचारणा केली. मात्र त्यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. नंतर त्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आठजणांविरुद्ध एमआडीसी पोलिसांत तक्रार केली. याच गुन्ह्यात एक महिन्यांपासून फरार असलेल्या ॲन्थोनी, सोहेल आणि अमजदअली यांना पोलिसांनी अटक केली.
मुस्लीम मतदारांची मते यापुढेही निर्णायक ठरणार
मुंबई : संपूर्ण राज्यातील महानगरपालिकांमध्ये एआयएमआयएमचे ९५ च्या आसपास नगरसेवक निवडून आले असून त्यात मुंबईतील चार नगरसेवकांचा समावेश आहे. मुस्लीम नगरसेवकांची ही वाढती संख्या त्यातही मुस्लीम महिलांची जास्त संख्या लक्ष वेधून घेत आहे. मुंबईतील मुस्लिमबहुल पट्ट्यांमध्येही एआयएमआयएमकडे वळलेली मते आता निर्णायक ठरत आहेत.मागील कार्यकाळात २७ नगरसेवकांची संख्या आता थेट ३१ वर पोहोचली आहे. त्यामुळे आता मुस्लिम मतदारांना कोणी यापुढे गृहीत धरू नये असा इशाराच यातून मिळत आहे. मुंबई शहरातील मुस्लिम बहुल विभागात जी मते पूर्वी काँग्रेस व नंतर समाजवादी पार्टीला पडत होती. आता तीच मते हैदराबाद पुरती मर्यादित असलेल्या एआयएमआयएमला पडताना दिसत आहे तर मुंबईतील बहुतांश भागात मुस्लिम मते ही भाजपला विरोध म्हणून मुस्लिम मतदारास मिळतात. हे लक्षात घेता यंदा सर्वच पक्षांनी मुस्लिम उमेदवारांना तिकीट मोठ्या प्रमाणात दिले होते त्यात शिवसेना उबाठाचे नऊ उमेदवारांपैकी तीन निवडून आले तर समाजवादी पार्टी व काँग्रेसनेही मुस्लिम मतदार उभे करून नगरसेवक निवडून आणले. मागील कार्यकाळात २७ नगरसेवक होते ती संख्या आता ३१ झाली आहे. विशेष म्हणजे भाजपने एकही मुस्लिम उमेदवार यावेळेस दिला नव्हता.
Zilla Parishad and Panchayat Samiti elections | राज्यातील 29 महापालिका निवडणुकींचे मतदान पार पडल्यानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारी सुरू झाली आहे. निवडणुकादरम्यान अनेकदा ईव्हीएम मशीन ऐवजी मतपत्रिकेवर घेण्याची मागणी सातत्याने विरोधकांकडून करण्यात आली होती. यानंतर आता पुढील महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे माजी […] The post “जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घ्या”; बड्या नेत्याची निवडणूक आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी appeared first on Dainik Prabhat .
“….तर आम्ही विरोधात बसायलाही तयार”; भाजपची भूमिका, शिंदेंच्या होमग्राऊंडवरील संघर्ष चव्हाट्यावर
Thane Municipal Corporation Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील दुसरा टप्पा समजल्या जाणाऱ्या २९ महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजप सर्वच पक्षांना वरचढ ठरला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेसह अनेक महापालिकांवर भाजपच्या सर्वाधिक जागा जिंकून आल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला ८९ तर शिवसेना शिंदे पक्षाला २९ जागा मिळाल्या आहेत. उपमुख्यमंत्री […] The post “….तर आम्ही विरोधात बसायलाही तयार”; भाजपची भूमिका, शिंदेंच्या होमग्राऊंडवरील संघर्ष चव्हाट्यावर appeared first on Dainik Prabhat .
महापालिकेतील नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या दुप्पट
मागच्या दाराने महापालिकेत प्रवेश करण्यासाठी अनेकांची पक्षाकडे लॉबिंगभाजपला चार आणि उबाठाच्या तीन जणांची वर्णीमुंबई : मुंबई महापालिकेची निवडणुकीची प्रक्रिया पार पडून नगरसेवकांची निवड झाल्यानंतर आता ज्यांना पक्षाने तिकीट नाकारली असे पक्षाचे पदाधिकारी आता मागच्या दाराने महापालिकेत प्रवेश करणार आहेत. तसेच निवडणुकीत ज्यांनी चांगली कामे केली अशांना पक्षाच्यावतीने महापालिकेत नामनिर्देशित सदस्य म्हणून पाठवले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेतील नामनिर्देशित सदस्यपदी आपली वर्णी लागावी, यासाठी प्रत्येक पक्षातील पदाधिकाऱ्यांची पक्षप्रमुखांकडे किंवा मुंबई अध्यक्षांकडे लॉबींग सुरु होणार आहे. मुंबईत यापूर्वी पाच नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती केली जात असली तरी यापुढे ही संख्या दुप्पट केल्याने प्रत्येक पक्षाच्या वाट्याला जाणाऱ्या पदांमध्येही वाढ होणार असल्याने यंदा दहा सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपल्या कोट्यातून एका पदाधिकाऱ्याची किंवा प्रतिष्ठीत व्यक्तीची महापालिकेत नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करता येणार आहे.मुंबई महापालिकेत सन २०१७ च्या निवडणुकीनंतर भाजपच्यावतीने गणेश खणकर, श्रीनिवास त्रिपाठी, काँग्रेसच्यावतीने सुनील नरसाळे, तत्कालिन शिवसेनेच्यावतीने अरविंद भोसले आणि तृष्णा विश्वासराव यांनी नामनिर्देशित महापालिका सदस्य तथा नगरसेवक, नगरसेविकापदी नियुक्ती केली होती. परंतु यापूर्वी पाच नामनिर्देशित नगरसेवकांच्या तुलनेत आता दहा नामनिर्देशित नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. प्रत्येक पक्षाच्या एकूण नगरसेवक संख्येच्या आधारे अर्थात गणसंख्येनुसार नामनिर्देशित नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे भाजपचे एकूण ८९ नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांच्यावतीने ४ व्यक्तींची नियुक्ती नामनिर्देशित नगरसेवक म्हणून केली जाण्याची शक्यता आहे, तर उबाठाचे ६५ आणि मनसेचे ६ याप्रमाणे ७१ नगरसेवक असल्याने किमान तीन सदस्य उबाठाच्यावतीने सभागृहात पाठवले जावू शकतात. शिवसेना आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक एक जागा जावू शकते अशाप्रकारचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना, उबाठा आणि काँग्रेसच्यावतीने महापालिका सभागृहात नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त केले जाणार असल्याने प्रत्येक पक्षाचे प्रमुख आणि अध्यक्ष यांच्याकडे आतापासूनच लॉबिंग होत असल्याचे ऐकायला मिळत आहे.सभागृहात बसणार कुठे?मुंबई महापालिकेची सदस्य संख्या २२७ वरून २३६ करण्याचा प्रयत्न ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला; परंतु, पुढे प्रभागांची संख्या वाढवण्याचा हा निर्णय रद्द करून प्रभागांची संख्या २२७ एवढी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र २३६ प्रभाग संख्या वाढवल्यानंतर सदस्यांना सभागृहात बसण्यासाठी जागा नसून २३६ अधिक पाच नामनिर्देशित अशाप्रकारे २४१ महापालिका सदस्यांना बसण्यासाठी जागा अपुरी पडणार असल्याची चिंता यापूर्वीपासून व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर २२७ आणि दहा नामनिर्देशित सदस्य याप्रकारे आता २३७ एवढी सदस्य संख्या होणार असल्याने सभागृहात तेवढी आसन क्षमताही नाही, याची पूर्ण कल्पना असूनही महापालिका प्रशासनाच्यावतीने सभागृहाचे क्षेत्रफळ वाढवण्याच्या दृष्टीकोनातून कोणत्याही प्रकारची हालचाल झालेली नाही. परिणामी आता महापालिका सभागृहात पाच नामनिर्देशित सदस्य वाढवण्यात येणार असल्याने त्यांच्यासाठी आता अधिक जागा राखीव निर्माण करतानाच महापालिका सचिव आणि महापालिकेच्या कामांचे वृत्तांकन करणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आपल्या जागा गमावण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सभागृहाची आसन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न मागील प्रशासकांच्या कालावधीमध्ये न झाल्याने याचा परिणाम महापालिकेत निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या आसन व्यवस्थेवर होणार आहे. यासर्व नगरसेवकांना दाटीवाटीने बसून महापालिकेच्या कामांमध्ये भाग घ्यावा लागणार आहे.
कोकणातील रेल्वेगाड्या होणार विस्कळीत
तुतारी, मांडवी, कोकणकन्या एक्स्प्रेस विलंबाने धावणारमुंबई : डिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन प्रकल्पाच्या पायाभूत कामानिमित्त पनवेल – कळंबोली दरम्यान विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक रविवार, २५ जानेवारी रोजी रात्रकालीन असेल. या ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या मार्गात आणि वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तसेच या ब्लॉकमुळे तुतारी, मांडवी, कोकणकन्या एक्स्प्रेस विलंबाने धावतील.मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने कळंबोली येथे ११० मीटर लांबीच्या ओपन वेब गर्डर उभारणीसाठी पनवेल – कळंबोलीदरम्यान अप व डाऊन मार्गावर विशेष वाहतूक ब्लॉक घेतला आहे. रविवारी मध्यरात्री १.२० ते रात्री ३.२० दरम्यान दोन तासांचा ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे गाडी क्रमांक २२१९३ दौंड-ग्वाल्हेर एक्स्प्रेस कर्जत – कल्याण – वसई रोड मार्गे वळविण्यात येईल. गाडी क्रमांक १२१३४ मंगळूरु – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस पनवेल येथे रात्री ३.१४ ते रात्री ३.२० दरम्यान थांबविण्यात येईल. या ब्लॉकमुळे प्रवाशांना त्रास होईल.कळंबोली – पनवेलदरम्यान २५ जानेवारी रोजी मध्यरात्री १.२० ते पहाटे ५.२० दरम्यान चार तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉक कालावधीत काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात आणि मार्गात बदल केला आहे. गाडी क्रमांक २२१९३ दौंड – ग्वाल्हेर एक्स्प्रेस कर्जत – कल्याण – वसई रोड मार्गे वळविण्यात येईल.गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस सोमटणे स्थानकांदरम्यान रात्री २.५८ ते पहाटे ५.२० या कालावधीत थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक २०११२ मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकण कन्या एक्स्प्रेस पनवेल येथे पहाटे ४.०२ ते पहाटे ५.२० पर्यंत थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक ११००४ सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्स्प्रेस आपटा स्थानकात पहाटे ४.२५ ते पहाटे ५.१५ पर्यंत थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक १२६२० मंगळुरू – लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्स्प्रेस जिते स्थानकात पहाटे ४.४१ ते पहाटे ५.१० पर्यंत थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक १०१०३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव मांडवी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ८.२० वाजता पुनर्निर्धारित करण्यात येईल. गाडी क्रमांक १७३१७ हुबळी – दादर एक्स्प्रेस १५ मिनिटे उशिरा धावेल.
27 ऑक्टोबर 2024 रोजी, तामिळनाडूतील विल्लुपुरम जिल्ह्यातील विक्रवंडी येथील रस्ते लोकांनी गजबजले होते. इतकी वाहने आली की वाहतूक कोंडीच्या भीतीने प्रशासनाला टोल प्लाझा मोफत करावे लागले. राजकीय पक्ष स्थापन केल्यानंतर, दक्षिण भारतीय चित्रपटांचे सुपरस्टार थलापती विजय या दिवशी पहिली रॅली घेणार होते. रॅलीमध्ये लाखो लोक पोहोचले. कडक उन्हात खुर्ची डोक्यावर घेऊन बसले. थलापती विजय यांची जशी चित्रपटांमध्ये एंट्री होते, तशीच एंट्री या रॅलीमुळे राजकारणात झाली. तामिळनाडूमध्ये एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी विजय यांच्यामुळे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांच्या DMK पक्षाचे आणि काँग्रेसचे युती धोक्यात आली आहे. काँग्रेसने DMK कडून 40 जागांची मागणी केली आहे, ज्यावर पक्ष सहमत नाही. काँग्रेसचा एक गट विजय यांच्यासोबत जाण्याची वकिली करत आहे. तज्ञांचे मत आहे की असे झाल्यास DMK ला नुकसान होईल. भाजप नेते अन्नामलाई यांनीही विजय यांना एकत्र निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. दोन्ही परिस्थितीत भाजपला फायदा होईल. गेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त 4 जागा जिंकणाऱ्या भाजपला 22 जागांवर आघाडी घेता येऊ शकते. विजयच्या चित्रपटाला राहुल गांधींचा पाठिंबा, स्टालिन यांना संदेश काय?विजय यांचा एक चित्रपट येत आहे, 'जन नायगन', म्हणजे 'जन नेता'. सेन्सर बोर्डाने त्याच्या काही संवादांमुळे प्रमाणपत्र दिले नाही. संवादांमध्ये राजकीय टिप्पणी असल्याचा आरोप आहे, ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. 'जन नायगन' हा विजयचा शेवटचा चित्रपट आहे, यानंतर ते पूर्णपणे राजकारणावर लक्ष केंद्रित करतील. 13 जानेवारी 2026 रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी तामिळनाडूमध्ये होते. याच दरम्यान त्यांनी X वर लिहिले - 'जन नायगन' चित्रपटाला थांबवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न तमिळ संस्कृतीवरील हल्ला आहे. मिस्टर मोदी, तुम्ही तमिळ लोकांचा आवाज दाबण्यात कधीही यशस्वी होणार नाही.' राहुल गांधींची टिप्पणी त्यावेळी आली आहे, जेव्हा DMK आणि काँग्रेस यांच्यात विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून ओढाताण सुरू आहे. तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या 234 जागा आहेत. काँग्रेस DMK कडून 40 जागांची मागणी करत आहे. DMK त्याला 25 ते 30 जागा देण्यासच तयार आहे. यामुळे नाराज झालेले तामिळनाडू काँग्रेसचे नेते विजयच्या 'तामिळगा वेत्री कझगम' म्हणजेच TVK पक्षासोबत युती करू इच्छितात. राहुल गांधींनी विजयच्या चित्रपटाला पाठिंबा देणे, तामिळनाडूमध्ये काँग्रेस-DMK युतीमध्ये पहिली फूट मानली जात आहे. काँग्रेसने विजयसोबत हातमिळवणी केली, तर भाजपला फायदातामिळनाडूचे राजकीय तज्ज्ञ जॉन जे केनेडी म्हणतात, ‘गेल्या 50 वर्षांत तामिळनाडूच्या द्रविड राजकारणाने राष्ट्रीय पक्षांना खूप मागे ढकलले आहे. भाजप असो वा काँग्रेस, दोघांनाही येथील राजकारणात पाय रोवण्यासाठी AIADMK आणि DMK सोबत हातमिळवणी करावी लागली.' '2021 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे यश DMK सोबतच्या आघाडीमुळे होते. निवडणुकीत DMK ने 133 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 18 जागा मिळाल्या. काँग्रेसला DMK च्या मुख्य मतदारांचा पाठिंबा मिळाला. तामिळनाडूमध्ये काँग्रेसकडे ना कार्यकर्ते आहेत ना अशी विचारधारा आहे, जी तमिळ मतदारांना जोडू शकेल. म्हणूनच DMK तिला जास्त जागा देऊ इच्छित नाही. अशा परिस्थितीत राहुल गांधींनी विजयच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यामागे 3 उद्देश असू शकतात.’ 1. विजय यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न.2. राहुलने DMK ला संदेश दिला की तामिळनाडूमध्ये काँग्रेसकडे विजय हा देखील एक पर्याय आहे.3. तमिळ संस्कृतीचा विरोधक असल्याचे सांगून भाजपवर निशाणा साधला. तमिळनाडूमध्ये काँग्रेस अजूनही DMK सोबत युतीत आहे, पण मंत्रिमंडळाचा भाग नाही. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत DMK ने मित्रपक्षांच्या मदतीशिवायच सरकार स्थापन केली होती. ज्येष्ठ पत्रकार डॉ. बसवराज इटनाल म्हणतात, ‘विधानसभा निवडणुकीत थलापती विजयच्या प्रवेशामुळे आणि काँग्रेस-DMK ची युती तुटल्यास भाजपला फायदा होऊ शकतो. विशेषतः त्या 18 विधानसभा जागांवर, जिथे काँग्रेसने मागील निवडणूक जिंकली होती. यापैकी बहुतेक जागांवर DMK ची पारंपरिक मतपेढी म्हणजे द्रविड, ओबीसी, अल्पसंख्याक, शहरी मध्यमवर्ग काँग्रेसच्या बाजूने हस्तांतरित झाली. अशा परिस्थितीत DMK शिवाय काँग्रेससाठी पुन्हा 18 जागा जिंकणे अशक्य आहे.’ ‘6 जागा अशा आहेत, जिथे विजयचा प्रभाव आहे. येथेही भाजपला फायदा होऊ शकतो. मात्र, जागांची संख्या वाढवण्यासाठी काँग्रेसने TVK सोबत जाणे धोकादायक पाऊल ठरू शकते. 10 खासदार आणि 18 आमदार टिकवून ठेवण्यासाठी तिला DMK सोबतच राहावे लागेल.’ तामिळनाडूमध्ये भाजपची 60 जागांवर लढण्याची तयारीभाजप तामिळनाडू निवडणुकीत आपला जुना विक्रम सुधारण्यासाठी प्रत्येक डाव खेळत आहे. 23 डिसेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन आणि NDA च्या नेत्यांनी भाजपचे निवडणूक प्रभारी पीयूष गोयल आणि अर्जुन राम मेघवाल यांच्यासोबत बैठक घेतली होती. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, बंद खोलीत झालेल्या या बैठकीत जागावाटप आणि आघाडीतील सर्वात मोठा पक्ष AIADMK सोबत निवडणूक जिंकण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली. तामिळनाडू भाजपचे एक वरिष्ठ नेते दिव्य मराठीला सांगतात की, पक्ष AIADMK सोबत जागावाटपावर वाटाघाटी करत आहे. 2021 मध्ये भाजपने 20 जागांवर निवडणूक लढवली होती. यावेळी आम्ही यापेक्षा दुप्पट जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेते पुढे म्हणतात, 'माजी मुख्यमंत्री आणि AIADMK चे सरचिटणीस पलानीस्वामी यांना त्यांची पार्टी 170 जागांवर निवडणूक लढवावी असे वाटते. ते भाजपला 23 जागा देण्यास तयार आहेत, पण भाजप यावेळी 60 जागांची मागणी करत आहे. यावर गृहमंत्री अमित शाह आणि पलानीस्वामी यांच्यात दिल्लीत चर्चा झाली आहे. आता पलानीस्वामी NDA च्या मित्रपक्षांशी बोलतील.' ‘आम्ही थलापती विजय आणि काँग्रेसवरही लक्ष ठेवून आहोत. विजय यांचा पक्ष काँग्रेससोबत जावो किंवा DMK सोबत, विजय आमच्यासाठी मोठे आव्हान नाहीत. आमचे लक्ष या अटकळांवर जाण्याऐवजी DMK ला हरवण्यावर आहे.’ काँग्रेस-DMK मध्ये फूट पडली, तर भाजपला किती फायदा होईल? ज्येष्ठ पत्रकार एन. गोवर्धन या प्रश्नाचे उत्तर एका जुन्या किस्स्यातून देतात. ते म्हणतात, '2021 मध्ये मला कोलाचेलमध्ये एक नारळ विक्रेता भेटला. त्याने सांगितले की DMK काँग्रेससोबत आहे. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार जिंकेल.' 'मी त्या व्यापाऱ्याला विचारले की तू हे इतक्या आत्मविश्वासाने कसे बोलू शकतोस? व्यापाऱ्याने सांगितले- मत काँग्रेसला देत आहोत, पण आमचा विश्वास स्टालिनवर आहे. ते काँग्रेससोबत आहेत, त्यामुळे संतुलन साधावे लागेल.’ गोवर्धन म्हणतात, 'कोलाचेल जागेवर काँग्रेसचे उमेदवार प्रिन्स यांनी भाजपच्या पी. रमेश यांचा 24 हजार मतांनी पराभव केला होता. जर यावेळी काँग्रेसने स्टालिनची साथ सोडली, तर भाजप येथे आघाडी घेऊ शकतो. काँग्रेस-डीएमकेची युती तुटल्यास सर्वाधिक नुकसान कोणाचे होईल, हे तुम्ही स्वतःच समजून घ्या.' तज्ज्ञ म्हणाले- कोणत्याही पक्षाला एकट्याने बहुमत मिळवणे कठीणतामिळनाडू आणि दक्षिणेकडील राजकारणावर 25 वर्षांपासून लक्ष ठेवून असलेले राजकीय विश्लेषक टीएस सुधीर यांचे मत आहे की, तामिळनाडूमध्ये असा कोणताही पक्ष नाही जो यावेळी बहुमताने सरकार स्थापन करू शकेल. जर निवडणूक जिंकायची असेल तर राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांशी युती करावीच लागेल. आम्ही सुधीर यांना 3 प्रश्न विचारले… 1. काँग्रेस-DMK युतीमध्ये फूट पडल्यास कोणाला फायदा होईल?उत्तर: भाजपला फायदा होईल कारण लोकांची DMK विरोधातील धारणा बदलेल. काँग्रेसचा प्रत्येक विधानसभा जागेवर लहानच का असेना, पण एक मतपेढी आहे. कडव्या स्पर्धेत हाच किरकोळ फरक निर्णायक ठरतो. तथापि, काँग्रेस तमिळ राजकारणात मोठी खेळाडू नाही, त्यामुळे मतपेढीच्या दृष्टीने तिचा प्रभाव फारसा नसेल. प्रश्न 2: थलापती विजय यांचा उदय DMK आणि काँग्रेसमध्ये कोणाला जास्त अस्वस्थ करत आहे?उत्तर: काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटू लागले आहे की पक्षाचे तामिळनाडूमधील भविष्य आणि त्याला नवीन ऊर्जा देऊन उभे करण्यासाठी विजय यांच्यासोबत जाणे चांगले राहील. त्यांचे मत आहे की DMK काँग्रेसला खूप कमी जागा देते आणि सत्तेतही वाटा देत नाही. प्रश्न 3: भाजपला जास्त फायदा युती तुटल्याने होईल की विजय यांच्या राजकारणात येण्याने?उत्तर: तामिळनाडूमध्ये भाजपचा कोणताही मजबूत मतदारवर्ग नाही. एकट्याच्या बळावर ते जिंकण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांचे भविष्य AIADMK कडून होणाऱ्या मतांच्या हस्तांतरणावर अवलंबून आहे. NDA ला जागा तेव्हाच मिळतील, जेव्हा ते DMK सरकारच्या विरोधातील नाराजीचा फायदा घेऊ शकतील. राजकीय पक्ष काय म्हणत आहेत... DMK: तामिळनाडूची परंपरा, सत्तेत कधीच वाटा मिळाला नाहीDMK आघाडीचे गठबंधन तुटण्याच्या अटकळांवर तामिळनाडू सरकारमधील राज्यमंत्री आणि वरिष्ठ DMK नेते आय. पेरियासामी म्हणतात, ‘काँग्रेसला सत्तेत वाटा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण DMK ची अशी कोणतीही योजना नाही. तामिळनाडूची परंपरा अशी आहे की, येथे कधीही दोन पक्षांच्या भागीदारीचे सरकार बनले नाही.’ काँग्रेस: सत्तेत वाटा मिळवण्यासाठी DMK सोबत चर्चा करत आहेकाँग्रेस-DMK यांच्यातील जागावाटपावरून सुरू असलेल्या वादळावर आम्ही तामिळनाडू काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के. सेल्वपेरुंथगई यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितले, ‘निवडणूक जिंकल्यानंतर आमच्या पक्षालाही राज्य सरकारमध्ये वाटा मिळावा अशी आमची इच्छा आहे. आम्ही DMK सोबत सातत्याने चर्चा करत आहोत. अंतिम निर्णय मुख्यमंत्री एमके स्टालिन आणि आमचे नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गेच घेतील.’ भाजप: द्रमुक-काँग्रेसमध्ये एकमेकांपासून सुटका करून घेण्याची स्पर्धा तामिळनाडू भाजपचे राज्य प्रवक्ते नारायणन तिरुपती म्हणतात, ‘गेल्या ५ वर्षांत द्रमुकने तामिळनाडूच्या लोकांना फक्त लुटले आहे. काँग्रेसनेही देशासाठी काहीही विचार केला नाही. द्रमुक युतीबद्दल तामिळनाडूमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष निवडणुकीपूर्वी एकमेकांपासून सुटका करून घेण्यासाठी नाटक करत आहेत.’ भविष्यात भाजप विजयच्या पक्षासोबत युती करू शकते का? नारायणन उत्तर देतात, ‘तामिळनाडूच्या विकासासाठी जर कोणताही पक्ष एनडीएमध्ये येऊ इच्छितो, तर भाजप त्याचे स्वागत करेल. जर थलापती विजय आमच्याशी संपर्क साधतील, तर त्यांच्यासोबत काम करण्यास आम्ही तयार आहोत.’ किती जागांवर थलापती विजय यांचा प्रभावचेन्नई, कांचीपुरम, कोईम्बतूर, करूर, मदुराई, तंजावर आणि मैलापूरमध्ये विजयची चांगली फॅन फॉलोइंग आहे. चेन्नई: येथे विजयचे फॅन क्लब आहेत. ते येथे शूटिंगही करत आले आहेत. येथे तरुण मतदारांची संख्या चांगली आहे. कांचीपुरम: येथे आयटी व्यावसायिक आणि प्रथमच मतदान करणारे मतदार जास्त आहेत, जे विजयच्या फॅन क्लबशी जोडलेले आहेत. कोयंबतूर: येथे काँग्रेस आणि DMK ची मर्यादित पकड आहे. या परिसरात विजयचे जवळचे लोक राहतात. करूर: येथे 18 ते 35 वयोगटातील मतदार सर्वाधिक आहेत. विजयचे फॅन क्लब सक्रिय आहेत. विजय येथे येऊन चित्रपट प्रदर्शन आणि सोशल मीडिया मोहीम यांसारख्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. 27 सप्टेंबर 2025 रोजी करूरमध्येच विजयच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत 39 लोकांचा मृत्यू झाला होता.
प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे जिल्हा प्रशासनाच्या विद्यमाने व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन १९ ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रोलॉग रेस मंगळवार, १९ जानेवारी २०२६ रोजी पुणे शहरात होणार असून, त्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने शहराच्या मध्यवर्ती आणि […] The post Pune Traffic Updates: शहर ९ तास ‘सायकल’स्वारांच्या ताब्यात! प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका हे आपले कमिशन नाही आणि महापालिका हा आपला व्यवसायही नाही. पालिका हे आर्थिक, सामाजिक विकासाचं माध्यम आहे. त्यामुळे पारदर्शकपणे, प्रामाणिकपणे काम पार पाडणे आवश्यक आहे. कोणी कितीही मोठा असला, तरी कोणाचाही उन्माद, गैरकारभार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील नवनिर्वाचित उमेदवारांना दिला आहे. महापालिका निवडणूक […] The post Devendra Fadnavis: “महापालिका म्हणजे कमिशनचा धंदा नाही!”; नवीन नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांचा पहिलाच कडक डोस appeared first on Dainik Prabhat .
मनपावर ‘नारीशक्ती’चा दबदबा! ८८ नगरसेविका घुमवणार सभागृह; पुरुषांपेक्षा महिलांची संख्या सरस
प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिकेच्या नवीन सभागृहात तब्बल ८८ महिला नगरसेविका असणार आहेत. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढया मोठया संख्येने नगरसेविका असणार आहेत. महापालिकेच्या १६५ जागांसाठी ३५० महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यातील ८८ महिला निवडून आल्या असून सभागृहात नारीशक्तीचा आवाज घुमणार आहे. यामुळे सत्ताधारी पक्ष महिलाशक्तीचा सन्मान करण्यासाठी महापौरपद महिला नसरसेविकेला देऊ शकतात. पालिकेत ७७ पुरूष […] The post मनपावर ‘नारीशक्ती’चा दबदबा! ८८ नगरसेविका घुमवणार सभागृह; पुरुषांपेक्षा महिलांची संख्या सरस appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरात होत असलेल्या पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळे सोमवारी, १९ जानेवारी रोजी पुणे महापालिकेच्या ठराविक क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा आदेश जाहीर केला. १९ जानेवारी रोजी स्पर्धेतील प्रोलॉग […] The post पुणेकरांनो लक्ष द्या! सोमवारी फर्ग्युसन, जेएम रोडसह ‘हे’ रस्ते राहणार बंद; शाळा-कॉलेजेसना सुट्टी जाहीर appeared first on Dainik Prabhat .
Pune News: नगरसेवक घडविणारी कष्टकऱ्यांची काॅलनी; स्वच्छता सेवकाचा मुलगा झाला नगरसेवक
प्रभात वृत्तसेवा पुणे – सदाशिव पेठेच्या दक्षिणेला असलेल्या आंबिल ओढा झोपडपट्टीलगत असलेल्या कष्टकऱ्यांची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साने गुरुजी वसाहतीने आणखी एक नगरसेवक शहराला दिला आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील स्वच्छ्तासेवक विमल आवळे आणि विलास आवळे यांचा मुलगा अमर आवळे हे प्रभाग क्रमांक २७ मधून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक […] The post Pune News: नगरसेवक घडविणारी कष्टकऱ्यांची काॅलनी; स्वच्छता सेवकाचा मुलगा झाला नगरसेवक appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – मराठवाड्यातून येणाऱ्या अनेक गाड्या पुणे जंक्शनऐवजी हडपसर स्थानकावरच टर्मिनेट करण्याचा निर्णय पुणे विभागाच्या मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिवसह सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा प्रवासी आंदोलन करतील, असा इशारा प्रवाशी संघटनेकडून देण्यात आला आहे. माजी केंद्रीय […] The post Pune Railway News: नांदेड-पुणे एक्सप्रेस पुणे जंक्शनला येणार नाही; रेल्वे प्रशासनाचा ‘हा’ नवा नियम वाचा appeared first on Dainik Prabhat .
‘मेड इन इंडिया’ टेक हब आता वाद नाही, तर गरज बनली आहे. जेव्हा सरकारच्या मंत्रालयांनी गूगल-मायक्रोसॉफ्ट सोडून झोहोसारखे स्वदेशी प्लॅटफॉर्म स्वीकारले आहेत, तेव्हा प्रश्न आहे - भारत AI आणि प्रगत तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होऊ शकेल का? दिव्य मराठीशी खास बातचीत करताना, झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू स्पष्टपणे म्हणतात - गूगलने AI मध्ये 15 वर्षे गुंतवणूक केली. संशोधन झाले, शोधनिबंध प्रकाशित झाले, प्रयोग झाले. ओपनएआय (OpenAI) सारखी कंपनी देखील त्याच संशोधन इकोसिस्टममधून (परिसंस्थेतून) बाहेर पडली. शिकवण अशी आहे की आता आपणही AI क्षेत्रात 10 वर्षांचा ‘टेक रेझिलियन्स’ (तंत्रज्ञान लवचिकता) योजना तयार करावी. जर आपल्याला बाजारातून फळे विकत घ्यायची नसतील, तर स्वतःची झाडे लावावी लागतील. कदाचित 1-2 वर्षांत परिणाम दिसणार नाहीत, पण 5-10 वर्षांत परतावा मिळेल आणि तीच खरी गुंतवणूक असते. डिग्री विरुद्ध कौशल्य, परदेशी अवलंबित्व, गावांतून तंत्रज्ञान क्रांती आणि भारताच्या तंत्रज्ञान भविष्यावरील त्यांचे स्पष्ट विचार जाणून घेण्यासाठी ही खास मुलाखत... अनेक मंत्रालये परदेशी कंपन्या सोडून झोहोवर स्थलांतरित होत आहेत, हा स्वदेशी तंत्रज्ञानातील एक मैलाचा दगड आहे का? हा एक मैलाचा दगड नक्कीच आहे, पण अजून बराच पल्ला गाठायचा आहे. तंत्रज्ञानावर आपले बाह्य अवलंबित्व खूप जास्त आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) उदाहरण घ्या. आपल्याला AI साठी एनव्हीडियाच्या जीपीयू चिप्सची आवश्यकता असते. फार कमी लोकांना माहीत आहे की, संपूर्ण भारताला वर्षभरात फक्त 50 हजार जीपीयू चिप्सचा कोटा मिळतो, तर ओपनएआय (OpenAI) किंवा ग्रोक (Grok) सारख्या कंपन्यांकडे लाखो चिप्स आहेत, म्हणजे, पैसे असूनही आपण त्या खरेदी करू शकत नाही. आता आपल्याला हे सर्व तंत्रज्ञान देशातच विकसित करावे लागेल. फक्त AI वर लक्ष केंद्रित करणे ही चूक ठरेल. आज AI फॅशन आहे, पण देशाला 100-200 गंभीर तंत्रज्ञान (critical technologies) ओळखणे आवश्यक आहे, मेटलर्जीपासून सेमीकंडक्टर्सपर्यंत, सर्व क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही ‘10 वर्षांच्या टेक रेझिलिअन्स’ सांगितले, त्याबद्दल सांगा? मी नेहमी म्हणतो की आपण नेलकटरसुद्धा बनवत नाही. तुम्ही बाजारातून नेलकटर विकत घेतल्यास, ते चीन, कोरिया किंवा जपानमध्ये बनवलेले असेल. कोरिया आपल्यापेक्षा जास्त समृद्ध आहे कारण तो लहान-लहान उत्पादनेही बनवतो आणि विकतो. जर आपल्याला ग्लोबल प्लेयर बनायचे असेल, तर 10 वर्षांचे धोरण तयार करावे लागेल. टीका सहन करायलाही शिकावे लागेल. 20-25 वर्षांपूर्वी चीनी स्टार्टअप्सवरही खूप टीका होत असे, म्हटले जात असे की, ते निकृष्ट आहेत, नक्कल करतात. आज चीन तंत्रज्ञानात कुठे आहे... हे आपल्याला माहीत आहे. एआयच्या युगात युवकांचे लक्ष कशावर असावे, पदवी की कौशल्य? कौशल्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मी असे म्हणत नाही की विद्यार्थ्यांनी लगेच कॉलेज सोडावे, पण पदवीसोबतच आपल्या क्षेत्राशी संबंधित नवीन-नवीन कौशल्ये नक्कीच शिकावी. जर तुम्ही अभियंता असाल, तर काहीतरी तयार करा. सुरुवातीला जरी काही समस्या आल्या तरी... करत रहा. म्हणजे आता तुम्हाला कॉलेजच्या वेळेपासूनच प्रत्यक्ष प्रकल्प (hands–on projects) करावे लागतील. एआय (AI) येत्या काळात नोकऱ्या हिरावून घेईल का? आज स्वित्झर्लंडमधील एका शिक्षकाला आयफोन खरेदी करण्यासाठी 3 दिवस काम करावे लागते. भारतात तोच आयफोन खरेदी करण्यासाठी शिक्षकाला 3-6 महिने लागू शकतात. मग कमी काम करून आयफोन खरेदी करता येत असेल तर कोणताही शिक्षक याबद्दल दुःखी होईल का? एआयमुळे (AI) आपली गुणवत्ता तर वाढेलच, पण नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल. तंत्रज्ञान स्वस्त होईल आणि जी सामान्य कामे आहेत, त्यांच्या जागी विशेषीकृत नोकऱ्या (specialized jobs) विकसित होतील. अर्थव्यवस्था यंत्रांची नसते. यंत्रे ग्राहक नाहीत. अर्थव्यवस्था माणसांमुळे चालते. ही गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यावी लागेल की एआय अशा नोकऱ्यांची जागा घेणार नाही, जिथे मानवी संबंध सर्वात महत्त्वाचे आहेत. शिक्षक, परिचारिका (नर्स) आणि डॉक्टर–यांचे काम मशीन हिरावून घेऊ शकत नाही. होय, एआय त्यांचे काम नक्कीच सुधारू शकते. म्हणजे येथे नोकरी गमावण्याची नाही, तर कामाला अधिक बळकट करण्याची गोष्ट आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय कंपन्यांचे लक्ष कशावर असावे? आपण देशात नीट-जेईई सारखी रँकिंग विद्यार्थ्यांसाठी करतो, ती कंपन्यांसाठी का करू नये? कंपन्यांमध्ये स्पर्धा आवश्यक आहे. स्वतंत्र तज्ञांचे एक पॅनेल असावे, जे कंपन्यांना त्यांच्या क्षमतेनुसार रँक करेल. दरवर्षी ही रँकिंग प्रकाशित व्हावी. नीट-जेईईच्या निकालांप्रमाणेच एक मोठा राष्ट्रीय कार्यक्रम बनावा. यामुळे ज्या कंपन्या चांगले काम करत आहेत, त्यांना ओळख मिळेल, गुंतवणूक मिळेल. 10 वर्षे असे सातत्याने केले, तर चमत्कार होऊ शकतो. 20 वर्षांत आपण जागतिक नेते देखील बनू शकतो. भारताला एआयच्या क्षेत्रात काय करण्याची गरज आहे? 1980 च्या दशकात असे म्हटले जात होते की जपान प्रत्येक तंत्रज्ञानात नंबर वन बनेल, पण तसे झाले नाही, कारण तेथील लोकसंख्या घटली. भारताकडे आज युवा लोकसंख्या आहे. आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर नवीनता आणावी लागेल. प्रतिभेला टिकवून ठेवायचे असेल तर संधी द्याव्या लागतील. तुम्ही टेक कंपनी गावातून सुरू करण्याचे मॉडेल का निवडले? जर तुम्ही भारतातील मोठी मेट्रो शहरे, नोएडा, चेन्नई किंवा बेंगळुरू पाहिली तर तुम्हाला दिसेल की तिथे काम करणारे खूप मोठे टॅलेंट ग्रामीण भागातून आणि लहान शहरांमधून आले आहे. याचा अर्थ असा की टॅलेंट गावांमध्ये आधीपासूनच अस्तित्वात आहे, पण ते ओळखण्याची आणि वापरण्याची विचारसरणी कमी पडली आहे. भारतात आजही टॉप कॉलेजचे पदवीधर परदेशात का जात आहेत? मी 1989 मध्ये IIT मद्रासमधून शिक्षण घेतले होते. त्यावेळी सुमारे 80% विद्यार्थी परदेशात जात होते. आज तोच आकडा घटून सुमारे 20% राहिला आहे. म्हणजेच, टॉप संस्थांमधून ब्रेन ड्रेन कमी झाले आहे, आणि हे एक चांगले लक्षण आहे, पण टॅलेंट तिथेच जाते जिथे संधी असतात. म्हणून प्रश्न हा आहे की, भारतात प्रतिभेला टिकवून ठेवण्यासाठी संधी कशा निर्माण कराव्यात. विद्यार्थी आज थांबत आहेत कारण देशात पूर्वीपेक्षा अधिक संधी आहेत. ग्रामीण कार्य मॉडेल मोठ्या प्रमाणावर वाढवता (स्केल करता) येऊ शकते का? मी हे आकडेवारीने समजावून सांगू इच्छितो. भारतात ८३२ जिल्हे आहेत, त्यापैकी सुमारे ६०० जिल्ह्यांना ग्रामीण मानले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, देशात सुमारे २ लाख ५० हजार पंचायती आहेत. आता प्रश्न हा आहे की, आपण ६०० अशा कंपन्या शोधू शकतो का, ज्या प्रत्येक जिल्ह्यासाठी वचनबद्ध असतील? फक्त एवढेच हवे आहे. त्याचप्रमाणे, जर प्रत्येक पंचायतीसाठी एक वचनबद्ध तंत्रज्ञ (टेक्नोलॉजिस्ट) मिळाला, तर आपल्याला एकूण सुमारे अडीच लाख लोकांची गरज असेल. आज टेक उद्योगात काही दशलक्ष लोक काम करत आहेत. अशा परिस्थितीत, अडीच लाख लोकांचे गावासाठी वचनबद्ध असणे (कमिटेड असणे) पूर्णपणे शक्य आहे. मला पूर्ण विश्वास आहे की हेच मॉडेल स्केलेबल आहे. फक्त वचनबद्ध लोकांची गरज आहे. गावाशी संबंधित कोणतीतरी आठवण, जी तुमच्यासाठी जीवनाचा धडा (लाइफ लेसन) बनली असेल? मी गावात वाढलो आहे. मी अभ्यासात खूप चांगला होतो. एकदा माझ्या गल्लीतील एका वृद्ध महिलेने मला सांगितले होते, 'तुमच्यासारखी मुले आमच्या गावात कमीच असतात, पण काही काळानंतर अशी मुले गाव सोडून जातात, पण तू या गावाला विसरू नकोस आणि आमच्या लोकांसाठी काहीतरी कर.' ती महिला ५-१० वर्षांनी निधन पावली, पण तिचे शब्द आजही माझ्यासोबत आहेत. त्या महिलेने जे काही सांगितले होते... ते आजही अनेक अर्थांनी प्रासंगिक आहे. श्रीधर वेम्बू यांच्या जीवनातील आनंदाचा मंत्र काय आहे? माझा आनंद आता अधिक आध्यात्मिक झाला आहे. या क्षणात आनंदी राहणे… हाच खरा मंत्र आहे. पक्ष्यांचा आवाज, सूर्योदय, तारे पाहणे; हाच खरा आनंद आहे. मोठ्या डील्स, लाँच, कौतुक - हे सर्व दुय्यम आहेत. लहान-लहान गोष्टींमध्ये आनंद घ्यायला शिकणे हाच खरा आनंद आहे.
कारभाऱ्यांना करावी लागणार प्रतिक्षा! आरक्षण सोडत नसल्याने महापौर निवडीसाठी लागणार किमान १५ दिवस
प्रभात वृत्तसेवा पुणे : निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना पालिकेची पायरी चढण्यासाठी आणखी २० ते २२ दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. महापौरपदाची आरक्षण सोडत शासनाने काढलेली नसल्याने उमेदवारांना महापौर निवडीनंतरच नगरसेवकपदाचा मान स्विकारता येणार आहे.सरकार येत्या तीन-चार दिवसात आरक्षण सोडत काढणार असून त्यानंतर, मुख्य सभा बोलवणे, निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करणे तसेच निवडणुकीचा कार्यक्रम राबविणे यासाठी […] The post कारभाऱ्यांना करावी लागणार प्रतिक्षा! आरक्षण सोडत नसल्याने महापौर निवडीसाठी लागणार किमान १५ दिवस appeared first on Dainik Prabhat .
Devendra Fadnavis: “आता मी स्वतः मैदानात उतरणार”! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला
प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या जनतेने सर्व राजकीय आडाखे मोडीत काढत भारतीय जनता पक्षाला जे अनपेक्षित आणि अभूतपूर्व यश दिले आहे, ती आमच्यावरील विश्वासाची पोचपावती आहे. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी महापौर निवड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून मी स्वतः पुण्याच्या मैदानात उतरणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यावर विशेष लक्ष ठेवणार असल्याचे स्पष्ट […] The post Devendra Fadnavis: “आता मी स्वतः मैदानात उतरणार”! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला appeared first on Dainik Prabhat .
Pune Crime: पराभवाचा राग अनावर! भाजप उमेदवाराच्या समर्थकांचा भावाच्याच घरात शिरून राडा
प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीत पराभूत झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थकाने तरुण तसेच त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करुन धमकी दिल्याची घटना भवानी पेठेत घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी गणेश शिवाजी लडकत (५३, रा. भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंदार लडकत, प्रीतम बनकर, रोहित […] The post Pune Crime: पराभवाचा राग अनावर! भाजप उमेदवाराच्या समर्थकांचा भावाच्याच घरात शिरून राडा appeared first on Dainik Prabhat .
Mundhwa Land Scam: शीतल तेजवानीचा जामीन अर्ज फेटाळला; सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा कट
प्रभात वृत्तसेवा पुणे – मुंढवा येथील सरकारी जमीन परस्पर पार्थ पवारांची भागीदारी असलेल्या अमेडिया कंपनीला विकताना कोट्यवधींचे मुद्रांक शुल्क चुकवून सरकारी फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य आरोपी शीतल तेजवानीचा जामीन अर्ज पौड न्यायालयाने फेटाळला. हा केवळ मुद्रांक शुल्क चुकवेगिरीचा प्रकार नसून, राज्याच्या महसुलाचे मोठे नुकसान करण्यासाठी आरोपींनी जाणीवपूर्वक रचलेला कट असल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. […] The post Mundhwa Land Scam: शीतल तेजवानीचा जामीन अर्ज फेटाळला; सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा कट appeared first on Dainik Prabhat .
Alandi News: आळंदीत प्रवाशांची दीड किलोमीटर पायपीट! बस स्थानक हलवलं पण सोयीसुविधा वाऱ्यावर
प्रभात वृत्तसेवा आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदी येथील पीएमपीएमएल बस स्थानकाचे पंधरा दिवसांपूर्वी विस्तारीकरण करून ते दोन वेगवेगळ्या ठिकाणी विभागण्यात आले आहे. या प्रक्रियेत पुणे विभागातून येणाऱ्या बसेस आळंदी देहू फाटा वाय जंक्शन येथील मोकळ्या जागेत हलवण्यात आल्या आहेत. मात्र, या नवीन ठिकाणी प्रवाशांसाठी कसल्याही प्रकारच्या निवाऱ्याची अथवा प्रकाशाची सोय करण्यात आलेली नाही. यामुळे हडपसर, शेवाळेवाडी, […] The post Alandi News: आळंदीत प्रवाशांची दीड किलोमीटर पायपीट! बस स्थानक हलवलं पण सोयीसुविधा वाऱ्यावर appeared first on Dainik Prabhat .
शिक्रापूर-सणसवाडीत राष्ट्रवादीला खिंडार? महापालिका विजयानंतर ‘हा’मोठा नेता भाजपच्या वाटेवर
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – राज्यभर नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महत्त्वाच्या महापालिकांवर भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवली आहे. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांचे मनोबल उंचावले आहे. विशेष म्हणजे, शिक्रापूर-सणसवाडी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा […] The post शिक्रापूर-सणसवाडीत राष्ट्रवादीला खिंडार? महापालिका विजयानंतर ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेवर appeared first on Dainik Prabhat .
भारतीय संत परंपरेचा इतिहास हा काही केवळ अध्यात्माचा प्रवास नाही. तो माणसांच्या वेदनांचा व आत्मसन्मानाच्या संघर्षाचा इतिहास आहे. या इतिहासात काही नावे एवढी उजळून दिसतात की, त्यांचा प्रकाश अनेकांचे अस्तित्व झाकोळून टाकतो. संत बंका हे अशाच प्रकाशाच्या सावलीत राहिलेले, पण मध्ययुगीन भारतातील अत्यंत महत्त्वाचे संत होते. ते दलित परंपरेतील एक महत्त्वाचे घटक होते. त्यानंतरही त्यांचे नाव मराठी संत साहित्याच्या मुख्य प्रवाहात क्वचितच आढळते. ही अनुपस्थिती अपघाती नाही, तर इतिहासाच्या निवडीचे फलित आहे. संत बंका यांची कौटुंबीक पार्श्वभूमी संत बंका हे महाराष्ट्रातील एक संत व कवी होते. ते संत निर्मळा यांचे पती व संत चोखामेळा यांचे मेहूणे होते. त्यांचा जन्म मेहेनपुरी येथील एका महार कुटुंबात झाला. ते विठ्ठल भक्त होते. त्यांचा काळ साधारणतः 13 व्या व 14 व्या शतकातील मानला जातो. हा काळ महाराष्ट्रात जातव्यवस्था अधिक गडद होण्याचा, अस्पृश्यतेला धार्मिक समर्थन मिळवण्याचा व समाजाची विभागणी पवित्र व अपवित्र अशा चौकटीत करण्याचा होता. अशा काळात विठ्ठलभक्ती ही केवळ मोक्षाचा मार्ग नव्हती, तर ती दलित समाजघटकांसाठी स्वतःच्या माणुसकीच्या दावा करण्याचे साधन होती. संत बंका याच प्रवाहात उभे राहतात. संत चोखामेळ्यांच्या सुख दुःखाचे सहप्रवासी संत बंका यांच्या पत्नी संत निर्मळाबाई ह्या संत चोखामेळ्याच्या भगिनी होत्या. त्यामुळे बंका हे चोखामेळ्यांच्या केवळ नातलग नव्हते, तर त्यांच्या दुःखाचे व भक्तीचे सहप्रवासी होते. चोखामेळा व बंका हे अनेकदा पंढरीच्या वारीला एकत्र जात. पण मंदिराच्या दारात पोहोचताच त्यांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागे. या प्रसंगामुळे बंकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. देव सर्वांचा असेल, तर माझ्यात व त्याच्यात ही भिंत कुणी उभारली? असा प्रश्न ते विचारत. संत बंका यांच्याविषयी वारकरी लोककथा संग्रहात एक किस्सा सांगण्यात आला आहे. त्यात असे म्हटले आहे की, वारी सुरू असताना एका गावात कीर्तन सुरू होते. सर्व वारकरी आत बसले होते, पण बंका व चोखामेळा सर्वांपासून दूर बाहेर बसले होते. पावसामुळे सर्वत्र चिखल झाला होता. तेव्हा बंका चोखांना म्हणाले, आपण बाहेर बसलो तरी हरकत नाही. पण विठ्ठल आपल्याशी संवाद साधतोय हे काही कमी नाही. या प्रसंगातून संत बंका यांच्या भक्तीची दिशा स्पष्ट होते. देव मंदिरात आहे की नाही, यापेक्षा देव माणसाशी कसा वागतो, हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे होते. देवाने माझे नाव घेतलंय का? संत बंकांची भक्ती लाचार नव्हती. ती आत्मदीनतेत रमणारी नव्हती. ती शांत होती, पण निष्क्रिय नव्हती. संत चोखामेळ्यांच्या अभंगांसारखे बंकांचे अभंग आज लिखित स्वरुपात उपलब्ध नाहीत. पण त्यांच्या विचारांचा ठसा लोककथा व त्यांच्या कौटुंबीक स्मृतींतून स्पष्टपणे जाणवतो. एकदा एका ब्राह्मणाने बंकांना विचारले, तू अस्पृश्य असूनही देवाचे नाव कसे घेतोस? तेव्हा बंकांनी उत्तर दिले, देवाने माझे नाव घेतलंय का? हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. या प्रसंगातून संत बंका यांच्या विचारांची उंची कुणाच्याही लक्षात येईल. बंका यांचे अभंग उपलब्ध का नाहीत? बंका यांचे अभंग फारसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही असा युक्तिवाद केला जातो. पण लेखक सदानंद मोरे यांच्या मते, हा युक्तिवाद साफ चुकीचा आहे. अभंग नोंदवले जाणे हे साहित्यिक गुणवत्ता नव्हे तर सामाजिक सत्ता ठरवत असते. ब्राह्मण संतांचे अभंग शेकडो वर्षे जपले गेले. पण दलित संतांचे अभंग मात्र मौखिक परंपरेतच राहिले. त्यामुळे संत बंका यांचे लेखन हरवले. कारण, ते जतन करून ठेवण्याची कुणाचीच इच्छा नव्हती. त्यामुळे बंका हे मोठ्या ग्रंथांचे संत नसतील, पण मोठ्या प्रश्नांचे संत निश्चितच होते. त्यांनी ईश्वराला स्वीकारले, प ईश्वराच्या नावाखाली होणारा अवमान धुडकावून लावला. त्यांनी भक्ती केली, पण गुलामगिरी स्वीकारली नाही. त्यामुळेच कदाचित इतिहासाने त्यांन दुर्लक्षित केले असावे. भक्ती खरी असेल तर माणुसकी का नाही? संत चोखामेळा यांचा भिंतीखाली दबून मृत्यू झाला. या घटनेनंतरही बंका व निर्मळा यांनी विठ्ठलाच्या दर्शनाला जाणे थांबवले नाही. पण मंदिराविषयीच्या त्यांच्या श्रद्धेत मात्र मोठा बदल झाला. मंदिर म्हणजे देव नव्हे ही जाणीव त्यांच्या भक्तीला अधिक मानवी बनवते. संत बंका यांनी अत्यंत शांतचित्ताने जातव्यवस्थेच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देव आमचा असेल, तर मंदिर का नाही? भक्ती खरी असेल तर माणुसकी का नाही? असे विविध प्रश्न त्यांच्या जीवनकथेतून उलगडताना दिसतात. त्यामुळे आजच्या काळात संत बंका आठवणे म्हणजे केवळ इतिहासात भर घालणे नव्हे, तर कधी - कधी इतिहासाला प्रश्न विचारणे हीच खरी भक्ती आहे हे दाखवून देणारे आहे. संत बंका यांचे 4 फेब्रुवारी 1318 मध्ये निधन झाले. विठ्ठल हा भक्ती व योग यांचा संगम संत बंका यांचे काही अभंग फार लोकप्रिय आहेत. त्यांनी आपल्या अभंगात विटेवर उभ्या असणाऱ्या विठ्ठलाला केवळ मूर्ती न मानता, योगी तत्त्व म्हणून पाहिले. विठ्ठलाचे तेज नदीकाठी पसरलेले आहे. देव लोकांत उभा आहे, दूर कुठेही नाही. मुकुट, कुंडले व तेजस्वी मुख यामुळे विठ्ठल शोधून दिसतो. पण हा देखावा केवळ बाह्य सौंदर्याचा नाही. तो योगियांच्या धान्यात सतत मिरवणआरा आहे. म्हणजेच विठ्ठल हा भक्ती व योग यांचा संगम आहे, असे बंका म्हणतात. ते आपल्या अभंगात म्हणतात, चरण मिरवले विटेवरी दोनी ।ध्यातसे ध्यानी सदाशिव ॥1॥तो हा पंढरीराव कर दोनी कटीं ।अभा असे तटीं भीवरेच्या ॥2॥मुगुट कुंडले श्रीमुख शोभले ।ध्यानी मिरवलें योगियांच्या ॥3॥वंका म्हणे सर्व सिध्दिंचा दातार ।भक्तां अभयकर देत असे ॥4॥ विद्यापीठांनी साहित्य शोधण्याचा प्रयत्न करावा डॉक्टर यु म पठाण आपल्या साहित्य परंपरा मंगळवेढ्याची या पुस्तकात म्हणतात, आज उपलब्ध असलेली बंका महाराजांची अभंगरचना फार थोडी आहे. ती अल्प असली तरी बहुगुणी व बहुपेडी आहे. वारकऱ्यांच्या अभंगाच्या काळात व मौखिक परंपरेत शोध घेतल्यास त्यांच्या आणखी काही रचना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या मराठी विभागांनी का प्रयत्न करू नयेत? 13 व्या शतकातील दलितांची वेदना, त्यांची दुःख, त्यांना नाकारला गेलाला सामाजिक न्याय, त्यांच्या अस्फुट हुंदक्यांतून शब्दबद्ध झालेली समर्थ कविता बंका महाराजांच्या प्रतिभेतून प्रकटली आहे. बंका आपल्या अन्य एका अभंगात म्हणतात, प्रेमाचा पुतळा विठोबा सावळा ।उभा तो देखिला भीमातटीं ॥1॥कर कटावरी पाउलें साजिरीं ।शंख चक्र करीं मिरवतसे ॥2॥योगियांचा राणा गोपीमोहन कान्हा ।भक्तिचा आंदणा घरोघरी ॥3॥वंका म्हणे ऐसा कृपेचा कोवळा ।पाळी भक्तलळा प्रेमासाठीं ॥4॥ बंकोबांचे चोखोबा चरित्र अभ्यासण्याजोगे डॉक्टर यु म पठाण म्हणतात, संत बंका यांची भक्ती कविता अनेकपदरी आहे. संत नामदेवांनी त्रिखंडात्मक ज्ञानदेव चरित्र लिहिले. त्यातून आपल्याला ज्ञानदेव व त्यांच्या भावंडांच्या जीवनाचा शोध-वेध घेता आला. ज्ञानदेव, नामदेवांना तत्कालीन समाजस्थितीचे यथार्थ आकलन कसे झाले या सूक्ष्म निरीक्षणाने त्यांच्या भावी समाजचिंतनास कशी दिशा मिळाली, याचा मूळस्त्रोत आपल्याला कळतो. या दृष्टीने बंका महाराजांचे चोखोबा चरित्र अभ्यासण्याजोगे आहे. आज उपलब्ध असलेल्या केवळ 11 अभंगांच्या माध्यमातून बंकोबांनी कितीतरी गोष्टी साध्य केल्या. यादव कालीन संप्रदायिक व धार्मिक वास्तवाची पार्श्वभूमी आपण जितकी (खऱ्या अर्थाने) समरस होऊन लक्षात घेऊ, त्या प्रमाणात आपल्याला बंका महाराजांच्या लेखनाच्या सहाय्याने अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येईल. बंकोबांच्या एक घटना नमूद आहे. ती घटना अशी - चोखोबांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन प्रत्यक्ष पांडुरंग भुकेल्या ब्राह्मणाचे रूप घेऊन चोखोबांच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरी भोजनाला येतो. संत नामदेवांच्या त्रिखंडात्मक ज्ञानदेव चरित्रातील तिर्थावळीच्या अभंगासारखेच चोखोबा चरित्रातील या घटनेचाही वाच्यार्थ न घेता, लक्षार्थ म्हणजू सूचितार्थ, ध्वन्यर्थ समजून घ्यायला हवा. बंका महाराजांनी आपल्या लेखनासाठी हाच विषय का बरे निवडला असावा? याचे कारण स्पष्ट आहे. जे वर्णवादी सनातनी लोक शूद्रांना अस्पृश्य मानत होते, त्यांच्या बुरसटलेल्या मानसिकतेवर हा एक कठोर प्रहारच नाही का? कुणी साधे ब्राह्मण चोखोबांच्या घरी जेवायला किंवा अन्न मागायला आले असते तर ती घटना त्या मानाने सामान्य मानावी लागली असती. खरे तर यादव काळात अशी घटना घडलीच नसती. कारण, शूद्राघरचे भोजन कितीही चांगले असले तरी ते ब्राह्मणांनी घेऊ नये असे दंडात्मक उल्लेखच त्या काळातील काही ग्रंथांत आढळतात. चोखा चोखट असून, निर्मळच आहे हे यादव काळात सांगण्याचे धाडस बंका महाराजांसारखे मराठी भाषेच्या प्रारंभीच्या काळातील दलित संतकवीच करू शकतात. ते तत्कालीन बुरसटलेल्या मुलतत्त्व विरोधी मानसिकतेचा भुगा व चुरा करण्यासाठी या दृष्टीने व अर्थाने तसेच संदर्भाने बंका महाराजांचा हा अभंग पुन्हा एकदा वाचावा - चोखा चोखट निर्मळ।तया अंगी नाही बळ ॥1॥चोखा सुखाचा सागर।चोखा भक्तीचा आगर ॥2॥चोखा प्रेमाची माउली।चोखा कृपेची साउली ॥3॥चोखा मनाचे मोहन।बंका घाली लोटांगण ॥4॥ जातव्यवस्थेवर आवाज बुलंद करणारे संत संत बंका महाराजांचे जीवन हे केवळ भक्तीचे उदाहरण नव्हते, तर जातीय अन्यायाविरुद्ध शांत, पण ठाम आवाज उभारणारे प्रतीक होते. त्यांनी विठ्ठलाच्या प्रेमळ रूपातून माणुसकीचा संदेश दिला. दलित समाजाच्या वेदना अभंगांच्या माध्यमातून व्यक्त केल्या. त्यांचे विचार आजही समाजातील भेदभाव दूर करण्यास मदत करतात. प्रेरणा देतात. इतिहासाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असले तरी, त्यांच्या विचारांची उंची व प्रश्न विचारण्याची ताकद कधीही कमी होत नाही. अशा या थोर संताचे 4 फेब्रुवारी 1318 रोजी निधन झाले. त्यांच्या कार्याने पंढरीच्या भक्ती परंपरेत एक नवा अध्याय लिहिला गेला. धुरंधर मालिकेतील खालील स्टोरीज वाचा... धुरंधर-57; अँटोनियो ग्राम्शी:तुरुंगाच्या 4 भिंतीत जग बदलण्याची शक्ती शोधणारा अन् वैचारिक क्रांती शस्त्रांपेक्षा वरचढ असल्याचे सांगणारा विचारवंत धुरंधर-56; राणी गाइदिन्ल्यू:झाशीच्या राणीची गोष्ट माहिती असणाऱ्यांना इंग्रजांना आव्हान देणाऱ्या आदिवासी कन्येची गोष्ट माहिती आहे का? धुरंधर-55; पां. म. बापट:सशस्त्र क्रांतिकारक ते अहिंसक सत्याग्रहाचा सेनापती अन् अखेर झाडू उचलून ग्राम स्वच्छता करणारा सुधारक धुरंधर-54; नाना पाटील:म्हार, मांगांना लांब का ठेवता? ते घान कामं करत्यात म्हणून? तुमचा डावा हातही तेच करतो, असे सांगणारा क्रांतिसिंह धुरंधर-53; नेल्सन मंडेला:भारताला दुसरे घर मानणाऱ्या आफ्रिकन गांधींची कहाणी; 27 वर्षे कैद भोगूनही मनात कटूता न ठेवणारा मदिबा धुरंधर-52; शकुंतला देवी:शाळेचे तोंड न पाहता संगणकाची परीक्षा पाहणाऱ्या अन् गणिताला खेळ मानणाऱ्या कानडी महिलेची जादूई कहाणी धुरंधर-51; केशवराव जेधे:ब्राह्मणेतर चळवळीचा प्रमुख चेहरा अन् सामाजिक न्यायासाठी झगडणारा ठसकेबाज दृढनिश्चयी मराठी लढवय्या धुरंधर-50; डॉक्टर सलीम अली:पक्ष्यांच्या जगाचे रहस्य उलगडून मानवाला निसर्गाच्या दिशेने जाण्यास प्रेरित करणारा पक्ष्यांचा 'चालता फिरता विश्वकोश' धुरंधर-49; सर रोनाल्ड रॉस:'साला एक मच्छर'! मलेरिया अन् डास यांच्यातील परस्पर संबंध शोधून मानवतेची सेवा करणारा थोर वैज्ञानिक धुरंधर-48; होमी जहांगीर भाभा:दगडधोंड्यांच्या भारतात अणुज्योत पेटवून अज्ञानाचा अंधःकार दूर करणारा श्रीमंत घरातला बंडखोर तरुण धुरंधर-47; बिंदेश्वरी प्रसाद मंडल:ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या इमारतीचा सर्वात मजबूत पाया रचणाऱ्या बिहारच्या जमीनदाराची कथा धुरंधर-46; कार्ल बुशबी:ना ट्रेन ना प्लेन ना बाईक, तब्बल 27 वर्षांच्या अन् 58 हजार किलोमीटरच्या पदयात्रेची अनोखी कथा जी आजही सुरूय धुरंधर-45; जाईबाई चौधरी:स्त्री जीवन फुलवणारी अन् दलित महिलांना शैक्षणिक, सांस्कृतिक संजीवणी देणारी विदर्भातील थोर सेविका धुरंधर-44; ओशो रजनीश:पापाला पुण्याचे अन् हिंसेला अहिंसेचे कपडे घालावे लागतात असे सांगत ईश्वरापूर्वी स्वतःला शोधण्याचा सल्ला देणारा थोर दार्शनिक धुरंधर-43; अमृता प्रीतम:मैं तेनु फिर मिलांगी, कित्थे? किस तरह? पता नहीं; प्रेम, वेदना अन् स्वातंत्र्याचा सूर छेडत बाईचे जगणे मांडणारी लेखिका धुरंधर-42; दगडाबाई शेळके:स्वतःच्या नवऱ्याचे दुसरे लग्न लावून मराठवाडा मुक्तिसंग्रामात स्वतःला झोकून देणारी जालन्याची 'झाशीची राणी' धुरंधर-41; यशवंत घाडगे:दुसऱ्या महायुद्धात मर्दुमकी दाखवत ब्रिटिशांकडून इटलीच्या सैनिकांना कंठस्नान घालणारा मराठी सैनिक धुरंधर-40; शाहीर अमर शेख:धग, रग, आग, धुंदी अन् बेहोशीची जिवंत बेरीज असणारा तथा 'बर्फ पेटला हिमालयाला विझवायला चला' म्हणणारा शाहीर धुरंधर-39; टी. एन. शेषन:'नेत्यांना नाश्त्यात खाणारे' तथा EC ला अभूतपूर्व ताकद अन् प्रतिष्ठा मिळवून देणारे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त धुरंधर-38; डॉ. एम एस स्वामीनाथन:उपासमारीच्या सावटाखाली झुरणाऱ्या भारताला स्वावलंबनाचे स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवणारा शास्त्रज्ञ धुरंधर-37; मेजर शैतान सिंह:1962 च्या भारत - चीन युद्धात 120 जवानांच्या जोरावर शत्रूचा फडशा पाडणारा अन् पोट फाटले तरी मैदान न सोडणारा बहाद्दर धुरंधर-36; राणी वेलू नाचियार:महिलांची फौज तयार करून ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांना पहिल्यांदा धूळ चारणारी शिवगंगाची 'वीर मंगई' धुरंधर-35; अय्यनकाली:महिलांना छाती झाकण्याची परवानगी मिळवून देणारा अन् दलितांनी पिकवलेले धान्य चालते, मग ते का चालत नाहीत? असा प्रश्न करणारा सुधारक धुरंधर-34; जगन्नाथ शंकरशेठ:लोकांचा विश्वास जिंकणारी श्रीमंती गरिबांवर उधळणारा अन् परकियांनाही आपला वाटणारा मुंबईचा खरा शिल्पकार धुरंधर-33; अण्णाभाऊ साठे:दीड दिवस शाळेत जाऊन साहित्याचा सूर्य झालेला लोकशाहीर; जात, धन अन् धर्मदांडग्यांना आव्हान देणारा अण्णा धुरंधर-32; धीरूभाई अंबानी:गरिबीवर मात करत कोट्यवधी भारतीयांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे भारताचे एक अप्रतिम उद्योग रत्न धुरंधर-31; राजर्षी शाहू महाराज:अस्पृश्याला मानाचे पान अन् नांगरासाठी तोफा वितळवून लोखंड देणारे शाहू महाराज ग्रेट का होते? धुरंधर-30; चे गेव्हारा:अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द जागवून अवघ्या जगातील क्रांतीचा चेहरा बनलेला तुमच्या 'T शर्ट'वरील क्रांतिदूत धुरंधर-29; संत कबीर:पैशांच्या मागे पळणाऱ्यांचा देव कसा? असा परखड सवाल करत समस्त मानवतेला साधेपणाचा संदेश देणारा महानायक धुरंधर-28; राणी चेन्नम्मा:स्वकियांची फंदफितुरी जमिनीत गाडून 1857 च्या सशस्त्र उठावापूर्वी इंग्रजांना धूळ चारणारी 'कर्नाटकची लक्ष्मीबाई' धुरंधर-27; अहिल्याबाई होळकर:न्यायबुद्धीने स्वतःच्या नवऱ्याला धारेवर धरत चोराच्याही पोटाचा प्रश्न सोडवणाऱ्या दूरदृष्टीच्या शासक धुरंधर-26; डॉ. जयंत नारळीकर:ब्रह्मास्त्र होते तर रामाच्या राज्यात वीज होती का? असा झोंबणारा प्रश्न करणारा भारताचा मराठमोळा शास्त्रज्ञ धुरंधर-25; मुथुलक्ष्मी रेड्डी:महिला हक्क अन् आईचे 'देवदासी'पण पाहून त्याविरोधात लढा पुकारणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला आमदार धुरंधर-24; कुलदीपसिंग चांदपुरी:पाकच्या 2000 हून अधिक सैनिकांना 120 जवानांच्या बळावर धूळ चारणारा लढवय्या; '1971' ची अमर गाथा धुरंधर-23; चंद्रप्रभा सैकियानी:पडदा प्रथेवर लाथ घालून महिलांना आभाळ खुले करणारी आसामची हिरकणी; कुमारी माता झाली तरी डगमगली नाही धुरंधर-22; कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील:महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणाचा सूर्य पेरून उपेक्षितांच्या झोपडीत ज्ञानाचे पीक काढणारा खरा 'धुरंधर' धुरंधर-21; प्रबोधनकार ठाकरे:मराठी समाज मनात मोक्याच्या ठिकाणी पक्क्या गाठी मारून जातिभेदांच्या जखमांचा खोलवर शोध घेणारा बहुजन हिंदुत्त्ववादी धुरंधर-20; भीमराव रामजी आंबेडकर:चवदार तळ्याला ताळ्यावर आणणारा दलितोद्धारक अन् सामाजिक समरसतेचा खरा विवेकी शिल्पकार धुरंधर-19; जिगर मुरादाबादी:'शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ खुदा नहीं,' असे म्हणत मौलवींकडून टाळ्या पिटवून घेणारा सूफी शायर धुरंधर-18; आनंदीबाई जोशी:'पृथ्वीच्या पाठीवर हिंदुस्तान इतका दुसरा रानटी देश नाही', असे ठणकावून सांगणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर धुरंधर-17; भगतसिंग:'बॉम्ब अन् पिस्तुले क्रांती आणत नाहीत, क्रांती लोकांच्या मनात जन्मते', असे ठामपणे सांगणारा 'शहीद ए आझम' धुरंधर-16; शहाजीराजे भोसले:छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रेरणास्थान अन् बृहन्महाराष्ट्राची स्थापना करणारा धोरणी राजा धुरंधर-15; ई. व्ही. रामासामी:देव आहे हे सिद्ध करण्याचे आव्हान देत तर्कशुद्ध अन् निर्भय मतांद्वारे समाजात क्रांती घडवणारा भारताचा 'पेरियार' धुरंधर-14; कार्नेलिया सोराबजी:रूढी परंपरांना आव्हान देत शिक्षण, समानता अन् मानवी हक्कांसाठी अथक झगडणारी भारताची पहिली महिला बॅरिस्टर धुरंधर-13; खासेराव जाधव:बहुजन समाजाच्या खांद्यावरील निरक्षरतेचे 'जू' काढून त्यांना उच्च शिक्षणाच्या गंगेचे पाणी पाजणारा अवलिया धुरंधर-12; तंट्या भिल्ल:आदिवासींमध्ये राष्ट्रीयत्व जागवणारा 'रॉबिनहूड', थोर स्वातंत्र्यसैनिक; वाचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचे सोनेरी पान धुरंधर-11; विठ्ठल सखाराम पागे:उकिरड्याला खरकटे माहिती नसल्याच्या काळात 'भूकबळी'वर नामी उपाय शोधणारा राजकारणी धुरंधर-10; मोहन हिराबाई हिरालाल:विनोबा भावेंचे 'सर्वायतन' नक्षलग्रस्त गडचिरोलीत रुजवणारा अन् गरिबांना लक्ष्मीदर्शन घडवणारा अवलिया धुरंधर-9; फातिमा शेख:सावित्रीमाईंची मैत्रीण अन् भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका; फातिमा एक काल्पनिक पात्र होत्या का? तुम्हीच ठरवा धुरंधर-8; एकनाथ दगडू आवाड:बापाचा बुचडा कापून 'पोतराज' प्रथेवर घाव घालणारा पोरगा; कथित गुन्हेगारीने बदनाम झालेल्या बीडचा थोर माणूस धुरंधर-7; स्वामी विवेकानंद:मानवतेचा उत्कृष्ट प्रेमी, महान निधर्मी तत्ववेत्ता; नरेंद्रनाथ दत्त यांचे अखेरचे काही तास कसे होते? धुरंधर-6; कंदुकुरी वीरेशलिंगम पंथुलु:अंधश्रद्धेवर लाथ घालून विधवा पुनर्विवाह अन् ज्ञानाची वात पेटवणारा आंध्रचा 'लेखणी'सम्राट धुरंधर-5; भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड:दोन वेळा वाचवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राण धुरंधर-4; डॉ. विश्राम रामजी घोले:महिला उत्थानासाठी पेटून उठलेला सुधारक, ज्यांची 'बाहुली' ठरली स्त्री शिक्षणाची पहिली बळी धुरंधर-3; पार्वतीबाई आठवले:वैधव्य अन् परावलंबन दैवी भोग मानणारी, पण पोटच्या गोळ्याच्या काळजीने असामान्य झालेली एक निरक्षर स्त्री धुरंधर-2; बसव प्रेमानंद:अंधश्रद्धेच्या खाटेवर आजारी पडलेल्या समाजाला विज्ञानाचे औषध देऊन चमत्कारांची पुरती हवा काढणारा थोर दार्शनिक धुरंधर-1; नरहर अंबादास कुरुंदकर:विचारांची श्रीमंती वाढवणारा अन् आजच्या किर्र वैचारिक काळोखात प्रकाशवाट दाखवणारा थोर विचारवंत
प्रभात वृत्तसेवा न्हावरे – शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात नव्हे तर थेट तळागाळातील कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी या निर्णयाचं स्वागत केल आहे तर काही ठिकाणी अस्वस्थता निर्माण झाली आहे. वरिष्ठ पातळीवर गुप्त बैठकांची लगबग सुरु असताना, खालच्या पातळीवर मात्र कार्यकर्त्यांचा संयम सुटू लागला आहे. कालपर्यंत ज्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरुन घोषणा दिल्या, […] The post ZP Election 2026: भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचा ‘मास्टर प्लॅन’; नगरपालिकेची पुनरावृत्ती जिल्हा परिषदेत होणार? appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – केंदूर (ता. शिरूर) येथे पहाटेच्या सुमारास तीन चोरट्यांनी घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवत एका कुटुंबाला मारहाण केली आणि सोन्याचे साडेचार तोळे दागिने व रोख रक्कम लुटून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. केंदूर येथील बबन सुक्रे हे […] The post Shikrapur Crime: केंदूरमध्ये कोयत्याचा धुमाकूळ; ७० वर्षीय वृद्धाला मारहाण करून सोन्याचे दागिने केले लंपास appeared first on Dainik Prabhat .
Shirur Crime: कवठे येमाईत चोरट्यांचा धुमाकूळ; घरासमोर उभी केलेली ‘पिकअप’रातोरात केली गायब
प्रभात वृत्तसेवा शिरूर – कवठे येमाई (ता. शिरूर) येथे घरासमोर मोकळ्या जागेत उभी केलेली पिकअप गाडी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमनाथ नथू जाधव (वय २४, रा. कवठे यमाई) यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घरासमोरून वाहन चोरीला गेल्याने परिसरात वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. फिर्यादी सोमनाथ जाधव यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय […] The post Shirur Crime: कवठे येमाईत चोरट्यांचा धुमाकूळ; घरासमोर उभी केलेली ‘पिकअप’ रातोरात केली गायब appeared first on Dainik Prabhat .
महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरेपद्मपुराणातील एका कथेनुसार प्राचीन काळी एक प्रभंजन नावाचा धर्मपरायण राजा राज्य करीत होता. तो एकदा शिकारीला गेला असता त्याने एका झाडीमध्ये एक हरिण पाहिले. त्याने त्याचा वेध घेऊन बाण चालवला. हरिण घायाळ झाले. हरिणाने उठून आजूबाजूला पाहताच त्याला धनुष्यबाण घेतलेला राजा दिसला. त्याला पाहताच तो म्हणाला ‘हे राजन! मी माझ्या पाडसाला दूध पाजीत होते. असे असताना त्याच वेळेस तू मला मारले. हे कृत्य योग्य नाही, त्यामुळे मी तुला शाप देते की, तू या वनात राक्षस होऊन मांस भक्षण करशील’.हरिपाठणीची ही शापवाणी ऐकून राजा दुःखी झाला. तो म्हणाला ‘तू आपल्या पाडसाला पाजीत आहेस याची मला जाणीव नव्हती. माझ्याकडून चूक झाली. मी तुझ्या शापाचा स्वीकार करतो; परंतु यातून मला कधी मुक्ती मिळेल’. तेव्हा हरिणी म्हणाली, पुढे कालांतराने तुला भेटलेल्या नंदा नामक गाईमुळे तू शापमुक्त होऊन परत मनुष्य होशील, असा उ:शाप दिला. हळूहळू त्या जंगलात गवत व पाण्याचे साठे निर्माण झाले. त्यामुळे गाई चारणाऱ्या गवळी लोकांनी रानाच्या बाजूला नदीच्या काठी मुकाम केला.एके दिवशी एक गाय चरत चरत दूर गेली व प्रत्यक्ष वाघाच्या समोरच उभी राहिली. आयती चालत आलेली ही शिकार पाहून वाघाला आनंद झाला, तर वाघाला पाहून गाय गर्भगळीत होऊन, परत जाण्यासाठी प्रयत्न करू लागली, तोच वाघाने तिला म्हटले, ‘थांब! आज नियतीनेच तू भक्ष्य म्हणून माझ्या समोर उभी झाली आहेस. तेव्हा आता कुठे जातेस? मी तुला खाणार आहे. तेव्हा गाय घाबरली व वाघाची गयावया करून त्याला विनवू लागली. माझे पोर लहान आहे. अद्याप त्याला गवतही खाता येत नाही. तू आता मला खाल्लेस तर माझे पोरदुधाविना राहील. तेव्हा मी त्याला पाजून येते व नंतर तू मला भक्षण कर. गाईचे हे कळकळीचे बोलणे ऐकून वाघ म्हणाला, ‘तू आपण होऊन माझ्या समोर आली आहेस आणि आता परत जाण्याची विनवणी करत आहेस, पण मला सांग मृत्यूच्या दारातून परत आल्यानंतर मरण्यासाठी पुन्हा कोणी येतो का? त्यावर गाय म्हणाली, ‘मला प्रिय असणाऱ्या सर्व व्यक्तींची शपथ घेऊन मी सांगते, मी परत येईन. मला एकदा माझ्या बाळाला दूध पाजू दे. त्याला कल्याण अकल्याणाच्या चार गोष्टी सांगून व त्याला माझ्या सख्यांच्या स्वाधीन करून मी नक्की परत येईन. मी माझा शब्द न पाळल्यास मला मातृ-पितृ हत्या करणाऱ्याला जे पाप लागते ते पाप मला लागेल. एखादी उत्तम कथा ऐकत असताना जो मध्ये विघ्न आणतो त्याला जे पाप लागते ते मला लागेल. वचन न पाळणाऱ्याला जे पाप लागते ते मला लागेल. कृपया म्हणून मला जाऊ द्या, मी परत येईन.वाघाने तिची विनवणी ऐकून तिला जाण्याची परवानगी दिली. गाय धावतच आपल्या वासराकडे आली. ती अत्यंत घाबरलेली होती. वासराने तिला पाहून तू एवढी घाबरली का आहेस? तुला वेळ का झाला? अशी विचारणा केली असता दुःखी अंतकरणाने तिने सर्व कथा कथन केली व आज पोटभर दूध पिऊन घे, उद्या तुला दूध मिळणार नाही. मला पुन्हा वाघाकडे जावे लागेल, असे म्हटले. तेव्हा पाडस म्हणाले, जी मुले केवळ आईच्या दुधावरच जिवंत आहेत त्यांना )आईशिवाय दुसरा कोणता आधार मिळणार? मुलांना आईशिवाय आधार नाही. तेव्हा मी सुद्धा तुझ्यासोबत येईन. तुझ्या वाचून मी कसा राहू. माझ्यासह तुला वाघाने खाल्ल्यास मातृभक्ताला जी गती मिळते ती तरी मला प्राप्त होईल, असे म्हणून वासरूही गाईसोबत वाघाकडे निघाले.वाघाकडे गेल्यावर गाईने वाघास म्हटले, ‘मी तुला दिलेल्या वचनाप्रमाणे आली आहे. आता तू माझे भक्षण करून तृप्त हो’. सत्य वचनाप्रमाणे वागणाऱ्या गाईला पाहून वाघ म्हणाला, तुझ्या सत्य वागण्याचे मला कौतुक आहे. म्हणून मी तुला मुक्त करीत आहे. जग सत्यावरच अधिष्ठीत आहे, हे तू दाखवून दिले आहेस. धर्म सुद्धा सत्यावरच आधारित आहे.माझ्याकडून आजपर्यंत अनेक पापे घडली आहेत. आता पापमुक्तीसाठी मी काय करावे असे वाघाने गाईला विचारले. गाय म्हणाली, कृतयुगात तपाने, त्रेतायुगात ज्ञानाने व द्वापार युगात यज्ञाने जे फळ मिळते ते कलियुगात दानाने प्राप्त होते व सर्व दानात श्रेष्ठ दान म्हणजे अभयदान, जे तू आता मला दिले आहेस. जो अभय देतो तो परब्रह्म पद प्राप्त करतो, असा उपदेश केला. वाघाने गाईला तिचे नाव विचारतात तिने नंदा म्हणून सांगितले. हे ऐकताच राजा शापमुक्त झाला व पूर्ववत मनुष्य रूपात आला.गाईच्या धर्मपरायण वृत्तीमुळे प्रत्यक्ष धर्म त्या ठिकाणी प्रकट झाला व गाईला म्हणाला, तुझ्या धर्मपरायण वृत्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे. तू इच्छित वर माग. तेव्हा गाय म्हणाली, हे स्थान ऋषीमुनींसाठी पवित्र स्थान व्हावे व ही सरस्वती नदी नंदा सरस्वती म्हणून ओळखली जावी, असा वर मागितला. धर्माने तथास्तु म्हणताच गाय वासरासह सत्यलोकी गेली. राजाही त्याच्या मृत्यूनंतर स्वर्गलोकी गेला.
वाघोलीचा पुण्यात डंका! रत्नमाला सातव यांनी मोडला मतदानाचा विक्रम; ‘या’दिग्गज नेत्याचा केला पराभव
प्रभात वृत्तसेवा वाघोली – पुणे महानगरपालिकेत वाघोलीचा समावेश झाल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्य मिळवून वाघोलीच्या पहिल्या नगरसेवकांचा बहुमान रामदास दत्तात्रय दाभाडे, अनिल दिलीप सातव, रत्नमाला संदीप सातव यांनी मिळवला आहे.भाजप, आरपीआय मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार रामदास दाभाडे, अनिल दिलीप सातव यांनी प्रभाग क्रमांक तीनमध्ये दहा हजाराच्या पुढे मताधिक्य मिळवून विजय संपादन केला आहे. तर […] The post वाघोलीचा पुण्यात डंका! रत्नमाला सातव यांनी मोडला मतदानाचा विक्रम; ‘या’ दिग्गज नेत्याचा केला पराभव appeared first on Dainik Prabhat .
वेध : कैलास ठोळेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते भारताने ‘रिफॉर्म एक्सप्रेस’मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे २०४७ पर्यंत देशाच्या विकासाच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल. २०२५ मधील सर्वात उल्लेखनीय आर्थिक घडामोडी म्हणजे व्यापक जीएसटी सुधारणा, विमा क्षेत्रात शंभर टक्के परकीय गुंतवणुकीला मान्यता आणि कामगार सुधारणांतर्गत २९ कायद्यांचे चार आधुनिक संहितांमध्ये एकत्रीकरण; परंतु या सुधारणांचा परिणाम पाहणे बाकी आहे.काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी संकेत दिले होते, की राज्यांनी उत्पादनाला प्रोत्साहन देण्याबरोबरच व्यवसाय सुलभता सुधारण्याकडे तसेच सेवाक्षेत्राला बळकटी देण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. पाचव्या राष्ट्रीय मुख्य सचिवांच्या परिषदेला संबोधित करताना त्यांनी प्रशासन, सेवा आणि उत्पादन यांसह प्रत्येक क्षेत्रात गुणवत्तेला प्राधान्य देण्यावर भर दिला. ‘मेक इन इंडिया’ अद्याप गुणवत्तेचा समानार्थी शब्द बनलेला नाही, हे दुर्लक्षित करता येणार नाही. त्याचप्रमाणे, प्रशासनात नवीन कार्य संस्कृती विकसित करण्याच्या दिशेने काही पावले उचलली गेली असली, तरी गोष्टी अद्याप यशस्वी झालेल्या नाहीत. भविष्यात नवीन कायद्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, तसेच मनरेगामध्ये मूलभूत बदल करणारे ‘व्हीबी-जीरामजी’ हे देखील किती परिणामकारक ठरते ते कळेल. शिक्षण, व्यवसाय सुलभता आणि अणुऊर्जेशी संबंधित या वर्षी अमलात आणलेल्या काही सुधारणांबाबतही हेच म्हणता येते. ज्या उद्दिष्टांसाठी या सुधारणा अमलात आणल्या गेल्या आहेत, त्या कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होतील याची खात्री केली पाहिजे. सुधारणांचे सकारात्मक परिणाम केवळ दृश्यमानच नसून सामान्य माणसालाही जाणवले पाहिजेत. विविध क्षेत्रांतील सुधारणा प्रभावी करण्यासाठी, नोकरशाहीच्या प्रत्येक पातळीवर सुधारणा होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारशी संबंधित उच्चस्तरीय नोकरशाहीच्या कार्यपद्धतींमध्ये काही बदल झाले आहेत, हे खरे आहे; परंतु खालच्या पातळीवरील वृत्ती तशीच आहे. सर्वात वाईट म्हणजे, नोकरशाहीतील भ्रष्टाचार संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. म्हणूनच सामान्य माणूस सुधारणांचे पूर्ण फायदे अनुभवू शकत नाही. त्यांना अजूनही प्रत्येक टप्प्यावर अडचणींचा सामना करावा लागतो.या पार्श्वभूमीवर प्रत्येक क्षेत्रात सुधारणा रास्त पद्धतीने अमलात आणण्यासाठी बरेच काही करण्याची आवश्यकता आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. २०२५ मध्ये हाती घेतलेल्या व्यापक सुधारणांसह विविध स्तरांवर उदयोन्मुख जागतिक आव्हाने आणि शेजारील देशांमधील घडामोडींदरम्यान देशाने २०४७ पर्यंत विकसित भारताचा पाया रचला आहे. २०२५ हे संरचनात्मक सुधारणांचे निर्णायक वर्ष होते. सोपे कायदे, मजबूत व्यवस्था आणि नियंत्रित महागाईमुळे जागतिक विश्वासार्हता वाढली. सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीच्या अहवालातून समोर येणारे चित्र दर्शवते, की २०२५ हे वर्ष असे वर्ष म्हणून लक्षात ठेवले जाईल. भारताने मोठे संकल्प, जलद गती आणि खोल सुधारणा अमलात आणण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने कालबाह्य आणि असंबद्ध कायद्यांचे थर काढून टाकले. त्याच्या कर आणि नियामक प्रणाली सुलभ केल्या. उद्योगांसाठी नवीन संधी उघडल्या आणि विश्वासपूर्ण राष्ट्राच्या आकांक्षांशी शासन व्यवस्था संंरेखित केली. या काळात, भारताची अर्थव्यवस्था स्पष्टता, व्यापकता आणि जागतिक महत्त्वाकांक्षेकडे प्रगती करत होती. त्याचा परिणाम ग्रामीण भारत, उद्योग, कामगार बाजार आणि भविष्याला आकार देणाऱ्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये जाणवला. जागतिक अंदाजांना मागे टाकत, भारतीय अर्थव्यवस्थेने २०२५मध्ये ८.२ टक्के अशी आश्चर्यकारक जीडीपी वाढ नोंदवली. कर आकारणीपासून कामगार सुधारणांपर्यंत, बंदर आधुनिकीकरणापासून अणुऊर्जेपर्यंत आणि परकीय थेट गुंतवणूक ते मुक्त व्यापार करारांपर्यंत, तसेच लक्षणीय नियंत्रण मुक्तीपर्यंतच्या महत्त्वाच्या सुधारणांद्वारे अर्थव्यवस्थेला बळकटी दिल्याचा हा परिणाम होता.जीएसटी स्लॅबमध्ये कपात आणि तर्कसंगतीकरण असूनही, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जीएसटी महसूल बजेट अंदाजांपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे. हे भारताला स्पष्ट आणि वाढीवर केंद्रित अप्रत्यक्ष कर चौकटीकडे नेत आहे. दिल्लीतील मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेत मोदी यांनी केलेल्या ‘सुधारणा एक्सप्रेस’चा उल्लेख केवळ धोरणांबद्दल नव्हता, तर सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात होणाऱ्या बदलांबद्दल होता. पूर्वी जीएसटीमध्ये अनेक स्लॅब होते. त्यामुळे सामान्य व्यक्तीला प्रत्येक वस्तूवर किती कर आकारला जाईल हे समजणे कठीण झाले होते. सेससह ०, ५, १२, १८ आणि २८ टक्के कर होता. एकाच श्रेणीतील वस्तू अनेकदा वेगवेगळ्या स्लॅबमध्ये ठेवल्या जात होत्या. त्यामुळे गोंधळ आणि वाद निर्माण होत होते. याशिवाय ४० टक्क्यांचा आणखी एक कर स्लॅब ठेवण्यात आला होता. त्यात लक्झरी वाहने आणि तंबाखू इत्यादी उत्पादने समाविष्ट होती. तथापि, अल्कोहोलसारखी उत्पादने अजूनही जीएसटीअंतर्गत येत नाहीत. २०२५ च्या जीएसटी सुधारणांनंतर, कर स्लॅब सोपा करण्यात आल्यामुळे दैनंदिन वस्तूंवरील भार कमी झाला. दुधासारख्या उत्पादनांच्या किमतीही कमी झाल्या. परतफेड आणि इनपुट क्रेडिट्स स्वयंचलित आणि वेळेवर असल्याचा दावा करण्यात आला. प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर भरणाऱ्यांना सरकारकडून नोटिसा आणि तपासणीपासून मुक्तता मिळाली. संपूर्ण व्यवस्था डिजिटल आणि पारदर्शक बनली. त्यामुळे कर भरणे सोपे आणि विश्वासार्ह झाले. म्हणूनच २०२५ सामान्य माणसासाठी दिलासादायक होते, असे म्हणता येईल.मोबाईल फोन, वॉशिंग मशीन, स्वयंपाकघरातील उपकरणे आणि बांधकाम साहित्य यांसारख्या वस्तूंवरील कर कमी करण्यात आल्यामुळे मध्यमवर्गावरील दबाव कमी झाला आहे. २२ सप्टेंबर २०२५ पासून या नवीन कर स्लॅबची अंमलबजावणी झाली असली, तरी ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन ४.६ टक्क्यांनी वाढले. डिजिटल डेटाबेस, आधार लिंकिंग आणि एआय-आधारित पडताळणीमुळे लोकांचे जीवन सोपे झाले आहे. पंतप्रधानांनी परिषदेत स्पष्टपणे सांगितले, की विकसित भारत म्हणजे गुणवत्ता आणि वितरणावर विश्वास. हा विश्वास सामान्य नागरिकाला प्रणालीशी जोडतो. जमीन, उपयुक्तता आणि सामाजिक पायाभूत सुविधा हे व्यवसाय सुलभतेचा भाग मानले पाहिजेत. म्हणूनच राष्ट्रीय उत्पादन अभियानाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. २०२५ मध्ये व्यवसाय सुलभता आता फक्त मोठ्या उद्योगांना संदर्भित करत नाही. परवाना, नोंदणी, तपासणी आणि अनुपालन प्रक्रिया कमी करण्यात आल्या आहेत. ‘एक राज्य, एक डिजिटल व्यवसाय खिडकी’ उपक्रमाला प्रोत्साहन देण्यात आले. स्टार्ट अप्ससाठी स्व-प्रमाणीकरण आणि जोखीम-आधारित तपासणीमुळे भीतीचे घटक दूर झाले. देशांतर्गत उत्पादनासाठी अनेक उत्पादने ओळखली गेली.आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी एक ठोस रोडमॅप विकसित करण्यात आला. स्थानिक उत्पादनात वाढ झाल्याने मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय उपकरणे आणि कृषी यंत्रसामग्रीच्या किमती स्थिर झाल्या. सरकारने प्रशासनात ‘एआय’ आणि डेटा-चालित देखरेखीला प्रोत्साहन दिले. सायबर सुरक्षा प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेशी जोडली गेली. असा दावा करण्यात आला, की किसान सन्मान निधी, शिष्यवृत्ती आणि आरोग्य योजनांमधून डुप्लिकेट आणि बनावट लाभार्थी काढून टाकण्यात आले आणि वेळेवर खऱ्या लाभार्थींना निधी पोहोचवण्यात आला. शिक्षण, आरोग्य, वाहतूक आणि पर्यटनातील सेवा गुणवत्तेचे मोजमाप करण्यासाठी डेटाचा वापर करण्यात आला. त्यामुळे तक्रारींचे निराकरण जलद झाले. देशाची जवळजवळ ७० टक्के लोकसंख्या काम करण्याच्या वयाची आहे. सामान्य माणसाच्या समस्यांचे जलद निराकरण आणि विश्वास निर्माण करणे, ही सुधारणा एक्सप्रेस आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत म्हणजे २०४७ पर्यंत उच्च, मध्यम उत्पन्नाचा दर्जा प्राप्त करण्याचे ध्येय ठेवून देश आर्थिक वाढ, संरचनात्मक सुधारणा आणि सामाजिक प्रगतीच्या मजबूत पायावर उभा राहत आहे. जागतिक नाणेनिधीच्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन अहवालानुसार, ४.१८ ट्रिलियन डॉलर्सच्या जीडीपीसह भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि पुढील अडीच ते तीन वर्षांमध्ये जर्मनीला तिसऱ्या स्थानावरून मागे टाकण्याच्या मार्गावर आहे,२०३० पर्यंत भारताला ७.३ ट्रिलियन डॉलर्सचा जीडीपी अपेक्षित आहे. आर्थिक वाढीचा हा वेग अपेक्षेपेक्षा जास्त आहे. औद्योगिक आणि सेवाक्षेत्रातील वाढीमुळे वास्तविक सकल मूल्यवर्धित वाढ ८.१ टक्क्यांनी वाढली. मजबूत देशांतर्गत मागणी, उत्पन्न कर आणि वस्तू आणि सेवा कराचे सरलीकरण, कच्च्या तेलाच्या किमती कमी करणे, सरकारने प्राधान्य दिलेला भांडवली खर्च आणि कमी चलनवाढीमुळे अनुकूल आर्थिक आणि आर्थिक परिस्थिती यांसह अनेक घटकांमुळे भारताचा देशांतर्गत विकास दर वरच्या दिशेने जात आहे. सध्याच्या सुधारणांमुळे विकासाच्या शक्यता आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे. रोजगार हा विकास आणि समृद्धीमधील महत्त्वाचा दुवा आहे. प्रभावी धोरण ठरवण्यासाठी रोजगाराच्या ट्रेंडचे निरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानूटीनएजमधल्या मुलांशी वागावं तरी कसं याबाबतीत मागील लेखात आपण किशोरावस्थेतील मुलांच्या शारीरिक, मानसिक बदलांबद्दल समजावून घेतलं आणि त्यांच्यातील हार्मोनल बदलामुळे येणारी आव्हाने जाणून घेतली. पालकांनो, आपल्याला या मुलांशी नेमकं वागावं तरी कसं असा प्रश्न पडतो आणि म्हणूनच आजच्या या लेखात मुलांचे मित्र न बनता बाबाच्या भूमिकेत राहूनही आपण आपलं पालकत्व किती निरोगी पद्धतीने निभावू शकतो, हे समजून घेऊयात.आपलं मूल आपल्या खांद्याजवळ आलं, आपल्या पायातील चप्पल त्याच्या पायात येऊ लागते, त्यावेळेला मुलाचे मित्र बना असं सांगितलं जातं; परंतु आजच्या काळामध्ये मुलांना मित्र सहज मिळतात, त्यांच्याशी संवादही चांगला होतो. घरात मात्र त्यामानाने संवाद कमीच होतो. मुलं आपल्याला सांगताना बऱ्याच गोष्टी फिल्टर करून सांगतात. अशा वेळेस मैत्रीची भावना असणं किंवा मित्राचा रोल करणं यात हरकत काहीच नाही. पण एकूणच आजच्या जगातली आव्हानं पेलताना तसंच आकर्षणांचा मोह पडताना मुलांना सावरण्यासाठी आपल्याला त्यांचे बाबाच बनणं जास्त योग्य आहे.खरं सांगू का या टीनेजर मुलांना आपल्या वडिलांच्या अप्रुव्हलनुसार मोठं व्हायला आवडतं, कारण ते आपल्या वडिलांचा आदर करतात. पालकांनो आपल्या मुलांचा हात हातात घेऊन, मुलांना प्रेरणा देण्याची ही संधी दिली, सपोर्ट दिला तर एक आदर्श वास्तव पुरुष बनण्यासाठी त्यांना मदतच होईल.मित्र होण्यापेक्षा बाबा म्हणून तुम्ही या वयातील मुलांसाठी काही मर्यादा आखायलाच हव्यात. त्यांनी कोणते पर्याय निवडले, तर त्याचे परिणाम काय होतील, त्यांनी मर्यादा ओलांडल्या, स्वतःला बंधनं घालून घेतली तर काय होऊ शकतं याची जाणीव मुलांना द्यावीच लागेल. काही कठीण प्रसंगात वडिलांची भूमिकाच पार पाडावी लागते. मित्र न बनता बाबांच्या रोलमध्ये जाऊनही प्रेम, आदर आणि काळजी दाखवली तर तुमचं आणि मुलांचं नातं अधिक दृढ होईल. मुलं शहाणपणाने निर्णय घ्यायला शिकतील.मुलात आणि तुमच्यात मोकळा संवाद घडू द्या. काही वेळेला असं होऊ शकतं की ज्या लोकांचे त्यांच्या पालकांशी जवळचं नातं बनलेलं नसतं, ते आपल्या मुलांचा मित्र बनण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून मुलांशी आपले नाते अधिक दृढ होईल. तुमच्यापैकी काहीजण आपल्या वडिलांशी चांगला संवाद साधू शकले नाहीत म्हणून आपल्या मुलाचा चांगला मित्र बनावे असं त्यांना साहजिकच वाटतं, पण ते प्रत्येक वेळी योग्य ठरत नाही.मुलं टीनएजमध्ये येता-येता बरीच स्वावलंबी होऊ लागतात. आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत याचा शोध घेण्याचा प्रयत्न ते करतात. काही पालक तरुणांसारखा पेहराव करून कूल दिसण्याचा प्रयत्न करतात, पण अशा गोष्टी त्यांच्या मुलांना रुचत नाहीत. मुलांना वाटतं की तुम्ही त्यांची बरोबरी करताय आणि तुम्ही हास्यास्पद दिसता. पालकांनो सतत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा स्थिर मनाने मुलांना ऊर्जा दिली तर ते अधिक चांगलं ठरेल.मुलांच्या आयुष्यात खूप मित्र येतात आणि जातात पण बाबा हा खूप मित्रांसारखा नसतो. तर तो एकमेव असतो. तुम्ही मुलांच्या आयुष्यात कायम असता. त्यामुळे त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी तुम्ही त्यांना कधी रागवला तरी इतर मित्रांप्रमाणे तुम्ही त्यांना सोडून जाल ही भीती नसते. तुमच्या मुलासाठी तुम्ही नेहमीच आहात याची जाणीव त्यांना करून द्यायला हवी पालकांनो.मुलांना पत्र लिहिणे ही एक अभिनव कल्पना होऊ शकते. खूप लांबलचक पत्र लिहायची गरज नाही पण जे हृदयाला भिडणार असेल असं पत्र जरूर लिहा जसं की -प्रिय मुला,तू किती भराभरा मोठा होतो आहेस. मला तुला हे सांगायचेय की तुझी प्रगती पाहून मला माझ्या टीनेजर मुलाचा अभिमान वाटतो. हे वाचून तू डोळे विस्फारले असशील. पण मला तुझ्याविषयी वाटतं ते अगदी खरं आहे.अलीकडच्या दिवसात तुला मित्रांबरोबर वेळ घालवायला खूप आवडते हे मला कळतंय.मित्र महत्त्वाचे असतात हे मला ठाऊक आहे. माझी अशी इच्छा आहे की तुझ्या मित्रांसारखाच मी तुझ्यासाठी इम्पॉर्टंट व्हावं.तू माझ्याबरोबर भरपूर वेळ घालवावास. आता तू ज्या भूमिकेत आहेस त्या भूमिकेत मीही कधीतरी होतो. जेव्हा मी टीनेजमध्ये होतो, मी ती भूमिका छान पार पाडली आणि आता तुझी टर्न आहे. म्हणूनच आता मला तुझ्यासाठी पालकाची भूमिका निभवायलाच हवी.याचा अर्थ असा नाही की मला तुझ्या आयुष्यात इन्व्हॉलव्ह व्हायचं नाही. याचा अर्थ असाही नाही की आपण दोघं एकत्र काहीच काम करू शकत नाही जे तू तुझ्या मित्रांबरोबर करतोस. आपण मुलगा आणि वडील यांच्या भूमिकेत असलो तरीही काही चांगले क्षण आपण एकत्र घालवू शकतो. काही कामं आपण नक्कीच एकत्र करू शकतो.तुला चांगले मार्क्स मिळाले नाहीत तेव्हा मी थोडा नाराज होईन, पण तू प्रयत्न करतोय असे जेव्हा मला दिसेल तेव्हा मला वाटेल की हरकत नाही, तू अजून प्रयत्न करशीलच. तुझ्या चुकांची दुरुस्ती करण्यात माझी मदत तुला हवी असेल, तर मी नेहमी तयार आहे तुझ्यासाठी.माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख काय आहे सांगू का तुला? तुला मोठं होताना पाहणं. हाच माझ्या जीवनातला आनंद आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो पण तुझ्या मित्रांसारखा नाही तर वडिलांसारखं आहे माझं प्रेम. तू आनंदात राहावे यासाठी मी काहीही करायला तयार आहे. नवनवीन गोष्टी शिकायला तुझ्या आयुष्यात तुला खूप वेळ आहे. मी तुझ्या प्रत्येक गोष्टींसाठी अवेलेबल आहे. कधी कधी तुला वाटत असेलही की मी तुझ्या अवतीभवती असू नये पण मी असणारच आहे कारण ते प्रत्येक पालकाचं कर्तव्यच आहे.तुझा बाबा...तुमच्या मुलांना तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते आवर्जून सांगा पालकांनो. त्यांनी काय असायला हवं हे कदाचित तुम्ही त्यांना कधी सांगितलं नसेल. ते तुम्ही तुमच्या मनाच्या तळाशी दडवून ठेवलं असेल पण तुम्ही ते संवादातून पत्रातून किंवा तुमच्या देहबोलीतूनही मुलांना सांगू शकता कारण आजच्या काळात मित्र होण्यापेक्षा बाप बनण्याची भूमिका ही अधिक जबाबदारीची आहे.
हम प्यार का सौदा करते हैं एक बार...
नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरेकाही गाणी लोकप्रिय होतात ती एखाद्या गायकाच्या गायकीमुळे, काही लोकप्रिय होतात गाण्याच्या आशयाला अगदी अनुरूप असे संगीत मिळाल्यामुळे तर काही त्या गाण्याच्या जबरदस्त ठेक्यामुळे! अशी गाणी वर्षानुवर्षे ऐकूनही कधी जुनी होत नाहीत.रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केलेला राजेंद्रकुमार आणि वैजयंती मालाचा ‘जिंदगी’ आला १९६४ साली. सिनेमात या दोघांबरोबर प्रमुख भूमिकेत होते राजकुमार, पृथ्वीराज कपूर, हेलन आणि मेहमूद. शिवाय ‘नेहमीचे यशस्वी’ म्हणून होते जयंत, लीला चिटणीस, जीवन, धुमाळ, कन्हैयालाल चतुर्वेदी, बेबी फरीदा (नंतरच्या फरीदा दादी) आणि मुमताज बेगम. सिनेमा चांगला चालला. त्याचा तामिळमध्ये वाझकाई पडागू(१९६५) या नावाने आणि तेलगूमध्ये ‘आडा ब्राथूकू’(१९६५) या नावाने रिमेकही आला होता.‘जिंदगी’ची कथा टिपिकल श्रीमंत प्रेमी राजन (राजेंद्र कुमार) आणि गरीब प्रेमिका बीना (वैजयंतीमाला) या प्रकारातली होती. त्यामुळे मुलाचे वडील राय बहादूर गंगासरन (पृथ्वीराज कपूर) यांचा या लग्नाला विरोध असणे, त्यांनी लग्नाला नकार देऊन त्यात अनेक अडथळे आणणे वगैरे सर्व आलेच. वैजयंतीमाला नाटकात काम करून आपली व आपल्या विधवा आईची उपजीविका चालवणारी एक अभिनेत्री असते. तिला एकदम नकार न देता ‘एकदा तरी भेटा’ असा आग्रह राजन वडिलांकडे धरतो. तेंव्हा ते त्याला न कळवता थियेटरमध्ये जाऊन तिचा नाच पाहतात. त्यांना आपल्या मुलाचे लग्न एका नर्तिकेशी व्हावे हे अजिबात पटत नाही. ते लग्नाला स्पष्ट नकार देतात.त्याकाळच्या फिल्मी रिवाजाप्रमाणे ‘माझ्या मुलाचा नाद सोडण्यासाठी तुला किती पैसे हवे ते सांग?’ असा प्रस्ताव ते एकांतात बीनापुढे मांडतात. मात्र कथानकात पुढे अनेक नाट्यमय घटना घडत जातात आणि शेवटी एका गंभीर प्रसंगातून गेल्यावर ते सुनेचा स्वीकार करतात आणि सिनेमा सुखांत होतो.शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांच्या लेखणीतून उतरलेली ‘जिंदगी’ची सगळी गाणी लोकप्रिय झाली. त्यात मन्नाडे साहेबांच्या आवाजातले ‘मुस्कुरा लाडले मुस्कुरा’ (शैलेन्द्र) विषयाच्या वेगळेपणाने लक्षात राहिले. रफी साहेबांनी तबियतमध्ये गायलेले हसरत जयपुरी यांचे ‘पहले मिले थे सपनोमे और आज सामने पाया, हाय कुर्बान जाऊ’ रसिकांनी खूप पसंत केले. लतादीदींच्या आनंदी आणि दु:खी अशा दोन्ही मूडमधल्या ‘हम प्यार का सौदा करते हैं एक बार’ला (हसरत जयपुरी) तर त्यावर्षीच्या ‘बिनाका गीतमाला’च्या लोकप्रियतेच्या यादीत २८वा क्रमांक मिळाला होता. शंकर जयकिशन यांनी दिलेले संगीत कर्णमधुर तर होतेच शिवाय गाण्यात सूचित केलेल्या प्रेमाच्या बेधुंद, कलंदर भावना रसिकांच्या मनात अगदी सहज उतवरत होते. वैजयंतीमालाचा विजेसारखा पदन्यास, उत्कृष्ट अभिनय आणि वर लतादीदीचा नाजूक गोड आवाज, सगळी भट्टीच जमलेली होती!तारुण्यातल्या प्रेमाची एक अवस्था असते जेंव्हा प्रेमिकाला सगळे काही शक्य वाटत असते. त्याला स्वत:च्या प्रेमाबद्दल जबरदस्त आत्मविश्वास असतो, अभिमान असतो. गीतकाराने त्या भावना अगदी उत्कटपणे या नृत्यगीताच्या शब्दात उतरवल्या होत्या.वैजयंतीमाला मुळात शास्त्रीय नृत्य शिकलेली अभिजात कलाकार! ‘जिंदगी’च्या वेळी ती ३१ वर्षांची असून इतकी सुंदर दिसत होती की तिचे वय केवळ २४/२५ असावे असे वाटे. या गाण्याच्या वेळी त्यातून सिनेमाची थीम आणि त्यातली तिची एक मनस्वी मुलगी ही भूमिकाच सादर करायची असल्यामुळे तिने या गीतनृत्यात खूप समरसून अभिनयकेल्याचे लक्षात येते. तिचा अभिनय गीताचे शब्द जिवंत करतो-‘हम प्यार का सौदा करते हैं एक बार,चाहे मिट जाएँ, चाहे मर जाएँ,हम प्यार का सौदा...’प्रेमात तरुण मन इतके अनावर झालेले असते की ते म्हणते आता मृत्यू आला तरी काही चिंता नाही, पण माझे प्रेम कधीच कमी होणार नाही. हेच माझे पहिले आणि शेवटचे प्रेम!कुणावर मनापसून प्रेम करणे म्हणजे जर आगीच्या डोंबात उडी मारणे असेल, तर मी त्यात सतत जळत राहायला तयार आहे. माझ्या जिवलगाची साथ मी केवळ जीवनातच नाही तर मेल्यावरही निभावेन. मला आता जगाची मुळीच पर्वा नाही.‘इश्क तेरा आग है तो, इसमें जलते जाएँगे,मौत हो या जिन्दगी हम, साथ चलते जाएँगे,हम वो नहीं हैं प्यारके राही, जो दुनियासे डर जाएँ..’हम प्यार का सौदा...’मनाला भावलेल्या त्या एका जिवलग व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या कलंदर प्रेमिकाची मन:स्थिती जगावेगळीच असते. उत्कट भावनातिरेकाच्या त्या मानसिकतेत त्याला वाटते आपल्यावर असलेले छत्र उडून गेले, कुणाचाही आधार राहिला नाही, किंवा पायाखालची जमीन सरकून गेली तरी मी माझ्या प्रेमाचा अभिमानच बाळगेन. माझे प्रेम आता कुणापुढेही झुकणार नाही. जीवनात कितीही वादळे आली तरी मी मागे हटणार नाही. माझ्या प्रेमाची नौका मी जीवनाच्या उफाळणाऱ्या सागरात उतरवून पैलतीर गाठणारच आहे. मी प्रामाणिक प्रेमाचा सौदा एकदाच करून टाकला आहे. त्यात आता काहीही बदलशक्य नाही!‘चाहे बदले आसमाँ और चाहे बदले ये जमीं,आँख नीची हो वफाकी, ऐसा हो सकता नहीं,हम तूफामें डालके कश्ती, डूबके पार उतर जाएँ..,हम प्यार का सौदा...’आपल्या हिंदी गीतकारांची काही बाबतीत कमालच वाटते. एकीकडे अशी एकदाच होणाऱ्या प्रेमाच्या चिरंतनपणाची प्रांजळ कबुली देणारी हसरत जयपुरी यांची कविता तर दुसरीकडे त्याहून अगदी वेगळाच सल्ला देणारे गाणेही सापडतेच.‘जिंदगी’नंतर ९ वर्षांनी आलेल्या ‘बॉबी’(१९७३)मध्ये विठ्ठलभाई पटेल यांनी एक गाणे लिहिले. मन्नाडे साहेबांच्या दमदार आवाजातल्या त्यांच्या आवाजासारखेच दमदार व्यक्तिमत्त्व लाभलेल्या प्रेमनाथच्या तोंडी दिलेल्या त्या गाण्याचे शब्द होते, ‘प्यार मे सौदा नही!’ लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी वेगळाच फेस्टीव मूड डेव्हलप करणाऱ्या संगीताने हे गाणे सुरू केले होते“ना मांगू सोना चांदी, ना मांगू हिरा मोती,ये मेरे किस कामके, देता हैं दिल दे बदलेमे दिलके, प्यारमे सौदा नही. ”चक्क नायिकेच्या बापाची भूमिका करणारा प्रेमनाथ या गाण्यात इतका बेधुंद नाचला होता की ज्याचे नाव ते! आपल्या सहज अभिनयाने गोव्यातील एका श्रीमंत पण रांगड्या कोळ्याचे व्यक्तिमत्त्व त्याने हुबेहूब उभे केले होते. पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी!
ट्रोलिंग : दुसऱ्याला दुखावण्याचा परवाना नव्हे!
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. व्यक्त होण्यासाठी, विचार मांडण्यासाठी आणि समाजात संवाद साधण्यासाठी हे माध्यम अत्यंत प्रभावी ठरले आहे. मात्र याच माध्यमातून एक नवीन आणि चिंताजनक प्रकार जन्माला आला – तो म्हणजे ‘ट्रोलिंग’.ट्रोलिंग म्हणजे काय?ट्रोलिंग म्हणजे मुद्दामहून दुसऱ्याला चिडवणं, अपमान करणं, त्याच्यावर टीका करणं – तीही विनाकारण, चुकीच्या पद्धतीने आणि बहुतेकदा अज्ञात ओळखीमागे लपून. अशा प्रकारचं वर्तन हे खास करून प्रसिद्ध व्यक्ती, कलाकार, महिला, किंवा राजकीय मतप्रदर्शन करणाऱ्यांच्या बाबतीत जास्त दिसून येतं.काही लोक म्हणतात की ट्रोलिंग हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं एक अंग आहे. विनोद किंवा व्यंग म्हणून त्याचा उपयोग होतो आणि त्यातूनच काही वेळा जनतेची भावना मोकळ्या स्वरूपात व्यक्त होते. पण हे समर्थन फार काळ टिकत नाही. कारण जिथे ट्रोलिंग सुरू होते, तिथे सुसंवाद संपतो.ट्रोलिंगचे खूप अयोग्य परिणाम होत असतात जसे -मानसिक त्रास : ट्रोलिंगमुळे अनेक व्यक्तींना मानसिक तणाव, न्यूनगंड, आत्मविश्वास कमी होणे यासारखे गंभीर परिणाम सहन करावे लागतात.स्वतःला व्यक्त करण्याचा अधिकार हिरावणे: कोणी काही मत मांडले आणि लगेच त्यावर ट्रोलिंगचा मारा झाला, तर पुढच्या वेळी तो व्यक्ती बोलायचं धाडस करणार नाही.हिंसा आणि द्वेषाला खतपाणी: ट्रोलिंग केवळ विनोदापुरता राहात नाही; त्यातून जाती, धर्म, लिंग यावर आधारित द्वेष पसरतो. हे समाजाला विघटित करण्याचं काम करतं.भयानक दुष्परिणाम : ट्रोलिंगच्या भयानक उदाहरणांमध्ये काही जणांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. यावरून हे कृत्य किती गंभीर ठरू शकतं हे लक्षात येतं.दोन ताजी उदाहरण देते -१.पी. व्ही. सिंधूवर झालेलं ट्रोलिंग (२०२४)२०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयारी करत असताना भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला एका सामन्यात पराभव पत्करावा लागला. यानंतर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिच्यावर “करिअर संपलं”, “नावालाच मोठी”, “फक्त जाहिराती करण्यात दंग” अशा टीकांचा मारा केला.ट्रोलर्सनी तिच्या खेळावर नव्हे तर तिच्या वैयक्तिक आयुष्यावर, वेशभूषेवर आणि सामाजिक कामांवरही अश्लील आणि असभ्य शब्दांत टीका केली.परिणाम: सिंधूने या ट्रोलिंगला अत्यंत संयमाने उत्तर दिलं. एका मुलाखतीत तिने सांगितलं की, “मी माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. पराभव हा खेळाचा भाग आहे. ट्रोलिंगने मी नक्कीच थांबणार नाही.” ही प्रतिक्रिया अत्यंत परिपक्व होती, पण ही परिस्थितीच दाखवते की समाजात यशस्वी, परिश्रमी व्यक्तींनाही विनाकारण ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.ट्रोलिंग कोणालाही वाचवत नाही, मग तो खेळाडू असो, कलाकार, शिक्षक की सामान्य व्यक्ती आणि अशा घटना आपल्याला सतत आठवत राहतात की “अभिव्यक्ती स्वातंत्र्य” म्हणजे दुसऱ्याला दुखावण्याचा परवाना नव्हे.२. विराट कोहली – एक वाईट डाव आणि ट्रोलिंगचा मारा (२०२४ IPL)२०२४ च्या IPL मध्ये एका सामन्यात विराट कोहली फारशी चांगली खेळी करू शकला नाही. एका चुकीच्या शॉटनंतर त्याच्या नावाने सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झालं.ट्रोलिंगचे स्वरूप :“रिटायर होऊन जा आता.”“केवळ ब्रँडसाठी खेळतोय.”त्याच्या कुटुंबीयांवरही दुर्भावनायुक्त पोस्ट.परिणाम : कोहलीने मैदानावर पुन्हा उत्तम कामगिरी करत उत्तर दिलं, पण अशा ट्रोलिंगमुळे मानसिक तणाव वाढू शकतो आणि खेळाडूंच्या आत्मविश्वासावर घातक परिणाम होऊ शकतो, हेही या प्रसंगातून लक्षात येतं.हे उदाहरणं दाखवते की ट्रोलिंग केवळ मतप्रदर्शन नाही, तर ती व्यक्तीच्या मेहनती, कर्तृत्व, आणि आत्मिक शांततेवर होणारा एक अकारण हल्ला असतो. अभिव्यक्तीचा हक्क, जबाबदारीने वापरणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.जर ट्रोलिंग थांबवायचं असेल, तर संवेदनशीलता, सहानुभूती आणि संवादाचे शिष्टाचार टिकवणं अत्यावश्यक आहे.मला तर वाटतं ट्रोलिंगच्या काही चांगल्या बाजूही असतील आणि कधी चांगले परिणाम ही जरी होत असले तरीही ट्रोलिंग काहीही योग्य नाही. विनोद, व्यंग, मतप्रदर्शन या गोष्टी सभ्य भाषेत, आदराने करता येतात; परंतु ट्रोलिंगचा हेतूच दुसऱ्याला खिजवणं, अपमान करणं आणि समाजात नकारात्मकता पसरवणं असा असल्यामुळे ते कधीही योग्य ठरू शकत नाही.तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया हे समाजघटक एकत्र आणण्यासाठी आहेत. ते द्वेष, दहशत आणि मानसिक त्रास पसरवण्यासाठी नव्हे. त्यामुळे ट्रोलिंगसारख्या अयोग्य प्रकारांना थांबवणं, त्याबाबत जागरूकता निर्माण करणं, आणि ऑनलाइन व्यवहारात संवेदनशीलता राखणं हे आपलं सामूहिक उत्तरदायित्व आहे.ट्रोलिंग म्हणजे स्वातंत्र्य नव्हे, ती एक हिंसक मानसिकता आहे – जी कोणालाही लागु शकते आणि कोणाच्याही आयुष्यावर खोल परिणाम करू शकते. म्हणूनच – ट्रोलिंग अयोग्यच आहे.
शिरूरमध्ये महिला तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात! ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरसगाव काटा (ता. शिरूर) सजातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) प्रमीला नागेश वानखेडे (वय ४४) यांना ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, शिरूर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तक्रारदाराच्या वडिलाेपार्जित जमिनीचा पंचनामा त्यांच्या बाजूने […] The post शिरूरमध्ये महिला तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात! ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा तळेगाव ढमढेरे – आठवडे बाजार स्थलांतरित करण्याच्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या हालचालींना स्थानिक व्यापारी वर्गाकडून तीव्र विरोध झाला आहे. शनिवारी (दि. १७) ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रशासनाने बाजार स्थलांतराच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती दिली असून, बाजार ‘जैसे थे!’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मुख्य रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी पाहता […] The post Talegaon Dhamdhere: आठवडे बाजाराचे स्थलांतर तूर्तास टळले; व्यापाऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासनाचा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा बारामती – राज्यात नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीपासून दोन्ही राष्ट्रवादीचे सूर जुळले. त्यानंतर पुणे, पिंपरी महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढविली. त्यानंतर महापालिकांच्या धुरळा खाली बसतो न् बसतो तोच बारामती येथे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्याची घोषणा केली. मात्र, अजित पवार यांनी […] The post झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीत संभ्रम! शशिकांत शिंदे म्हणतात ‘एकत्र लढणार’, पण अजितदादांचं ‘ते’ उत्तर..वाचा appeared first on Dainik Prabhat .
मनस्वीनी,पूर्णिमा शिंदेस्वतःला ओळखा, स्वतःच्या शक्तीला ओळखा. स्वतःला जपा, स्वतःवर प्रेम करा. काळजी घ्या स्वतःची. स्वाभिमानी राहा. स्वतःशी प्रामाणिक राहा. चांगल्याशी चांगलं वागून अपेक्षा ठेवली, तर ते तसेच होईल असे नाही ना! मग का बाळगायचं अपेक्षांचं ओझं? ते ओझं उतरवून फेकून द्या! कधीतरी मोकळं जगा! मोकळा श्वास घ्या... कायम कशात न् कशात गुरफटलेले का राहता? विचारा मनाला पटतंय का? स्वार्थ नकाे, पण शहाणपणा आणा. शहाणपण जे आजपर्यंत नाही केले. लोकांचे लेसन-धडे घेतले. उपकाराची फेड अपकाराने. त्यावर दुसऱ्याला शहाणं करण्याच्या नादात फुकट सल्ले दिले. मूर्ख बनलो. करू दे दुसऱ्याला, जे व्हायचं ते होऊ दे. ज्याचं त्याचं बघतील. निस्तारुदे त्यांना. किती वेळा आपला अमूल्य क्षण वेळ, पैसा, ताकद दुसऱ्यासाठी खर्च करायचे. म्हणून आजच बकेट लिस्ट करा. कामाला लागा. आनंद शोधा. आनंद निर्मिती करा. आनंद टिपा. स्वतःला प्राधान्य द्या. आपल्या मनाला खूश करा. ते दुसरं कोणीच करू शकणार नाही.तुम्हाला विचारणार आहे का कोणी? बाबा हे काय झालं? तू असा का गप्प आहेस? नाही ना! मग काढा भली मोठी लिस्ट लिहून. जे कधीच नाही केलं ते आता करा. ती वेळ ठरवा. आज विचारा स्वतःला काय हवे? ते दिले आहे का कधी? नाहीस ना! इतरांच्या नादात लक्ष दिले नाही. हो ना. वाटलंच... मला. आपण आपल्यापेक्षा समोरच्याचाच विचार जास्त करतो. सोम्या, गोम्या, ठकी, सखी बाकी त्यांना आता पूर्णविराम द्या. आपली किंमत आपण ठरवा. त्यांच्या नादी लागून आपण आपली किंमत कमी करून घेतोय ना. मग आधी स्वतःला ओळखा. स्वतःची शक्ती स्वतःवर खर्च करा. आजवर जे म्हणत होते ना, तुला काय येतंं! काय जमणार नाही. तेच नेमकं करून दाखवा दुनियेला. जे हसत होते ना त्यांना... अरे कोणाकोणाला वाटतं आपल्याला काही हवे, काही मिळवायचे, जे नाही मिळाले. तेही मग मिळवा. नसेल परिस्थिती अनुकूल, खाल्ल्या खस्ता, काट्यांवरून चाललो. झिजलो चंदनासारखे... पण आता वेळ आली आहे. चूक करू नका, पुन्हा पुन्हा ती चूक निस्तरा, स्वप्नांचा पाठलाग करा, का मन मारून जगताय इतरांसाठी ! जे तुम्हाला कवडीचीही किंमत देत नाहीत. त्यांच्यासाठी आजवर सोडली ना गंगा आपल्या ध्येयावर. मग आताच उठा, लिस्ट करा, कामाला लागा, स्वप्नांचा पाठलाग करा. पुढे जा. कारण तुमच्या हाताला धरून कोणीच तुम्हाला पुढे घेऊन जाणार नाही. जे हसत होते त्यांनी तुमचे स्वागत करून तुम्हाला सन्मान पुरस्कार देईपर्यंत थांबूच नका गड्यांनो! करून दाखवा!! दाखवून द्या त्यांना... अरे मी संघर्ष यात्री आहे. अरे मी संघर्ष योद्धा आहे. माझी सारखे संयम, शिस्त, शांतता आणि प्रयत्न कोणीच करू शकणार नाही. मी आता कोणाच्या दाबण्याने दबणार नाही. बोलण्याने मरणार नाही.एकदा एक दिवस जिंकणार. हार का म्हणून मानायची मी. मी नाहीच मानणार हार.मला राखेतून उठून फिनिक्स पक्षासारखे पुन्हा एकदा उंच आकाशी भरारी मारायची आहे. एका मनाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीतून, दृढनिश्चयातून, आत्मविश्वासाने ठिणगीतून. ती माझ्या मनाला वेडापिसा करतेय. खुणावतेय. म्हणूनच माझी ताकद, शक्ती, ऊर्जा मला माहिती आहे. मी डगमगत नाही. मी महत्त्वाकांक्षी आहे. मी ध्येयवादी आहे. मी स्वप्नवेडी आहे. माझे मला ध्येय गाठायचे आहे. समुद्राच्या लाटा आणि भरून आलेलं आभाळ, कडाडणारी वीज होऊन मनातल्या वादळांना परतवून लावण्याची माझ्यात शक्ती आहे. मी संकल्प केला आहे. माझे मन, मनगट, मणका माझा मेंदू मी पाहिलेली स्वप्नं साकारण्यासाठी सज्ज आहेत. कालाच्या ओघात मागे पडत कधी जाणते-अजाणतेपणे मागे सारत राहिलेली मी माझी स्वप्नं केव्हा तरी एकदा पूर्ण करायचीच आहे. ही बकेट लिस्ट बरं,! होणार लवकरच, पूर्ण. नववर्षाच्या सुरुवातीलाच मनाने मनाला निक्षून सांगितलेला स्वागताचा संकल्प. नववर्षाचा स्वागताचा संकल्प.
सामान्य माणूस खरोखर दखलपात्र आहे?
दखल : महेश धर्माधिकारीसामान्य माणसासाठी मतदान करणे हा हक्क आणि राष्ट्रीय कर्तव्यही असते. बोटाला शाई लावलेले फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट करून आपण किती कर्तव्यदक्ष आहोत, हे तो जगाला सांगत असतो, पण बहुतेक राजकीय उमेदवार सामान्य माणसाकडे मतांचा आकडा म्हणून पाहतात. त्यांच्या दृष्टीने तो नागरिक नसून व्होट बँकेचा केवळ एक घटक असतो. बदलत्या सामाजिक परिस्थितीत सामान्य माणूस दखलपात्र कसा बनणार?सध्या सगळीकडे निवडणुकांचे वारे वाहत आहेत. राज्यात नगरपालिका, नगर परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. यापुढे जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. प्रत्येक उमेदवार निवडणूक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावतो. साम, दाम, दंड, भेद आदी क्लृप्त्या वापरून आपण प्रतिस्पर्धी उमेदवारावर कशी कुरघोडी करू शकू याचाच विचार करत असतो. मात्र, या एकूण प्रक्रियेत ज्याच्या भल्यासाठी निवडणुका घेतल्या जातात त्या सामान्य माणसाचा कितपत विचार केला जातो, हा एक संशोधनाचा विषय आहे. भारतीय लोकशाहीची खरी ताकद सामान्य माणूस असल्याचे मानले जाते. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार, अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि सत्ताधाऱ्यांना निवडण्याची ताकद सामान्य नागरिकाकडे आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर सात दशकांनंतरही एक प्रश्न कायम आहे आणि तो म्हणजे हा सामान्य माणूस खरोखरच राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे का, की तो केवळ निवडणुकांपुरताच महत्त्वाचा घटक ठरतो? आज सामान्य माणूस रोजच्या जीवनात अनेक समस्यांशी झुंजत आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, अपुऱ्या नागरी सुविधा, भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि प्रशासनातील अनास्था यामुळे त्याचे जीवन अधिकाधिक कठीण होत चालले आहे. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा, शिक्षण आणि रस्ते अजूनही अपुरे आहेत; तर शहरी भागात वाहतूक कोंडी, प्रदूषण, महाग घरभाडे आणि विशेषत: महिलांची असुरक्षितता याने नागरिक त्रस्त आहेत. याशिवाय तरुणांच्या बेराजगारीचा प्रश्न तर वाढतच चालला आहे. मात्र निवडणूक काळात चित्र बदलते.निवडणुका जाहीर होताच सामान्य माणूस अचानक राजकारणाचा केंद्रबिंदू बनतो. नेते त्याच्या दारात येतात, समस्या ऐकण्याचे नाट्य घडते, आश्वासनांची रेलचेल होते. प्रत्येक मतासाठी याच सामान्य माणसाला दोन ते अडीच हजार रुपयांची खैरातही वाटली जाते. पण निवडणुका संपताच हा सामान्य माणूस पुन्हा दुर्लक्षित होतो. एकदा उमेदवाराला निवडून दिले की आपल्या समस्या ऐकून घ्यायलाही त्याला वेळ नसतो. निवडणुकीत पाण्यासारख्या खर्च केलेल्या पैशांची वसुली त्याला अधिक महत्त्वाची वाटत असते. सामान्य माणसाच्या प्रश्नांकडे पाहण्यासाठी पुढील निवडणूक येईपर्यंत वाट पाहावी लागते. सामान्य माणसाच्या दृष्टीने निवडणुकीत मतदान करणे हा त्याचा हक्क आणि राष्ट्रीय कर्तव्यही असते. बोटाला शाई लावलेले फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट करून तो आपण किती कर्तव्यदक्ष आहोत, हे जगाला ओरडून सांगत असतो, पण बहुतेक राजकीय उमेदवार सामान्य माणसाकडे मतांचा आकडा म्हणून पाहतात. त्यांच्या दृष्टीने तो नागरिक नसून व्होट बँकेचा केवळ एक घटक असतो. त्याच्या रोजच्या समस्या, जीवनातील संघर्ष यांचा सखोल अभ्यास करण्याऐवजी त्याला भावनिक मुद्द्यांत अडकवले जाते. धर्म, जात, राष्ट्रवाद, अस्मिता, भीती किंवा अभिमान या भावनांचा कुशल वापर करून मतांचे ध्रुवीकरण केले जाते. जाती-जातींमध्ये, विविध धर्मांमध्ये भांडण लावणे हा तर राजकीय पक्षांचा आवडता खेळ. या भांडणांच्या इंधनावर स्वत:ची पोळी भाजून घेण्यात ते तरबेज आहेत.गेल्या काही वर्षांमध्ये जातीय अस्मिता एवढ्या टोकदार झाल्या आहेत की, प्रत्येक जातीने आपले महापुरुष जणू वाटून घेतले आहेत. एरवी रोज एकत्र काम करणारे, रोज एकत्र डबा खाणारेही या खोट्या जातीय अस्मितेपायी एकमेकांची तोंडे पाहणे पसंत करत नाहीत तेव्हा सद्सदविवेकाचा पराजय, तर राजकीय स्वार्थाचा विजय झाल्याची खंत वाटते. जात हाच आजच्या राजकारणाचा केंद्रबदू बनला आहे. उमेदवारांची निवड, मतदानाचे गणित आणि आघाड्या जातीनुसार ठरतात. विकास, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यापेक्षा जात महत्त्वाची ठरते. मतदारांनी हा दृष्टिकोन बदलला नाही तर हे थांबणार नाही, हे वास्तव आहे. राजकीय पक्षांच्या दृष्टीने आणखी एक मोठी व्होट बँक म्हणजे शेतकरी. दर वेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी आदी विषयांवर केवळ राजकारण होते. या समस्यांच्या मुळाशी जाऊन सोडवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. प्रत्येक निवडणुकीमध्ये शेतकरी, कामगार, महिला, तरुण, मध्यमवर्ग यांच्यासाठी वेगवेगळे जाहीरनामे तयार होतात; मात्र त्यातील बहुतेक घोषणा कागदावरच राहतात. धोरणे आखली जातात, पण अंमलबजावणी अपुरी आणि संथ असते. सामान्य माणसाची फसवणूक तर बहुआयामी असते. अवास्तव आश्वासने देऊन मोठी स्वप्ने दाखवली जातात. कोट्यवधी नोकऱ्या, सर्वांसाठी घरे, मोफत सुविधांची आश्वासने दिली जातात. भावनिक मुद्द्यांचा वापर करून मूळ प्रश्न बाजूला सारले जातात. आकडेवारीचा गैरवापर होतो. शेतकरी कर्जमाफीसारख्या घोषणांचा गाजावाजा होतो. प्रत्यक्षात अटी आणि मर्यादांमुळे अनेक शेतकरी सवलतीवाचून वंचित राहतात.राजकीय आश्वासने पाळली न जाण्याची कारणे संरचनात्मक आहेत. भारतात निवडणूक जाहीरनाम्याला कोणताही कायदेशीर दर्जा नाही. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर आश्वासने विसरली किंवा पाळली नाहीत तरी शिक्षा होत नाही. सत्तेत आल्यानंतर राजकारण्यांचे प्राधान्यक्रम बदलतात, निधीअभावी योजना रखडतात, प्रशासन अपयशी ठरते किंवा हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. परिणामी, मतदार फसवला जातो, पण त्याच्याकडे तक्रार करण्यासाठी प्रभावी यंत्रणा नसते. महानगरांपासून लहान शहरांपर्यंत नागरी सुविधा ही कायमची डोकेदुखी ठरली आहे. खड्डेमय रस्ते, अनियमित पाणीपुरवठा, कचऱ्याचे ढीग, ड्रेनेज समस्या आणि वाढती गुन्हेगारी हे नित्याचे दृश्य झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकारण इतके शिरले आहे की विकास दुय्यम ठरतो. पोलिसांवर राजकीय दबाव, तपासातील ढिलाई आणि न्यायालयीन विलंब यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास डळमळीत होत आहे. आजच्या घडीला राजकीय आश्वासनांचा मागोवा घेणारी स्वतंत्र, प्रभावी आणि बंधनकारक यंत्रणा अस्तित्वात नाही. निवडणूक आयोगाची भूमिका आचारसंहितेपुरती मर्यादित आहे. न्यायालये कधी कधी हस्तक्षेप करतात, पण ती अपवादात्मक बाब असते. परिणामी, आश्वासन न पाळणाऱ्या राजकारण्यांना जबाबदार धरण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी होते. विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांविरोधात आवाज उठवतात, न केलेल्या कामांची जंत्री सादर करतात, भ्रष्टाचारावरून सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढतात, पण त्यात राजकारणाचाच भाग अधिक असतो.बरेचदा हे मुद्दे केवळ स्वत:ची पोळी भाजून घेण्यासाठीच वापरले जातात. त्यातून स्वत:चा आर्थिक किंवा संवैधानिक फायदा करून घेतला की हे मुद्दे आपोआप मागे पडतात. कोणीच सामान्य माणसाचा विचार करताना दिसत नाही. देशातील बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असताना, बेरोजगार तरुणांचा राजकीय वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. मोर्चे, आंदोलन, प्रचार, सोशल मीडिया ट्रोलिंग यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. तात्पुरते पैसे, पदांचे आमिष किंवा भावनिक मुद्दे देऊन त्यांना गुंतवले जाते. मोर्चे आणि आंदोलनांमध्ये या तरुणांवर खटले दाखल होतात आणि त्याचा त्यांच्या पुढील कारकिर्दीवर वाईट परिणाम होतो. याच तरुणांचा उपयोग विधायक कामांसाठीही करून घेता येऊ शकतो. त्यांच्यासाठी आर्थिक स्थैर्याच्या संधी निर्माण करून देता येऊ शकतात, पण दीर्घकालीन रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास आणि उद्योगवाढ याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. कारण प्रश्न विचारणारा, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी तरुण सत्तेसाठी अस्वस्थ ठरतो. म्हणजेच असा तरुण वर्ग त्यांना नकोच असतो. भारतीय राजकारणातील आणखी एक दुर्दैवी सत्य म्हणजे गुन्हेगारांचा राजकारणातील सर्रास वावर आणि त्याला मिळत असलेली समाजमान्यता. ही समस्या फारच गंभीर बनली आहे. संसद आणि विधानसभांमध्ये गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेले लोक मोठ्या संख्येने दिसतात. निवडणुका जिंकण्यासाठी पैसा, बाहुबल आणि गुन्हेगारी नेटवर्कचा वापर केला जातो. किंबहुना, निवडून येण्यासाठी हेच निकष महत्त्वाचे मानले जातात. यामुळे स्वच्छ प्रतिमेचे, प्रामाणिक उमेदवार बाजूला पडतात आणि लोकशाहीची मूल्ये धोक्यात येतात.राजकारणाचे क्षेत्र स्वच्छ असावे असे वाटणाऱ्यांसाठी ‘नोटा’ हा एक पर्याय आहे, मात्र त्याचा प्रत्यक्ष परिणाम शून्य आहे. ‘नोटा’ला सर्वाधिक मते मिळाली तरी निवडणूक रद्द होत नाही किंवा नवीन उमेदवार उभे राहत नाहीत. त्यामुळे तो केवळ निषेध नोंदवण्यापुरताच मर्यादित राहतो. आणखी एक चुकीची आणि सर्वांच्या अंगवळणी पडलेली ‘परंपरा’ म्हणजे अनैसर्गिक युत्या आणि आघाड्या. विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेसाठी वैचारिक विरोधकही एकत्र येताना दिसतात. अशा अनैसर्गिक आघाड्या मतदारांचा विश्वास ढासळवतात. सत्तेसाठी सर्व काही चालते ही भावना बळावते आणि राजकारणाविषयी उदासीनता वाढते. अनेक पक्षांमध्ये पक्षांतर करणाऱ्यांना तिकीट आणि पदे मिळतात, तर वर्षानुवर्षे काम करणारे कार्यकर्ते दुर्लक्षित राहतात. यामुळे पक्षांमध्ये नाराजी, फूट आणि संधीसाधूपणा वाढतो. राजकीय निष्ठेपेक्षा सत्तेसाठीची गणिते महत्त्वाची ठरतात. भारतीय राजकारणात सामान्य माणूस आजही निर्णयप्रक्रियेच्या केंद्रस्थानी नाही, तर एक साधन आहे. खऱ्या अर्थाने बदल घडवायचा असेल तर जागरूक मतदार, प्रश्न विचारणारा तरुण, पारदर्शक प्रशासन आणि राजकीय आश्वासनांना कायदेशीर बंधन आवश्यक आहे. अन्यथा, लोकशाही ही केवळ मतदानापुरती मर्यादित राहील आणि सामान्य माणूस सतत फसवला जात राहील. म्हणूनच आपण बदलाची वाट पाहणार आहोत की, बदल घडवणार आहोत, खरा प्रश्न हाच आहे.
राजस्थानमध्ये घुमला ‘ज्ञानोबा-तुकोबांचा’जयघोष; शंकराचार्यांच्या उपस्थितीत रंगला भक्तीचा सोहळा
प्रभात वृत्तसेवा आळंदी – येथील वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारी श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची यांच्या वतीने राजस्थानमधील सोजत (जिल्हा पाली) येथे ज्ञानोबा-तुकोबांचा नामघोष करण्यात आला. श्रीसंत नामदेवराय यांनी वारकरी संप्रदायाची पताका पंजाबपर्यंत नेली, तोच वारसा पुढे चालवत ही संस्था भारतातील विविध राज्यांत संप्रदायाचा प्रचार करत आहे. परमपूज्य श्रीस्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त […] The post राजस्थानमध्ये घुमला ‘ज्ञानोबा-तुकोबांचा’ जयघोष; शंकराचार्यांच्या उपस्थितीत रंगला भक्तीचा सोहळा appeared first on Dainik Prabhat .
Mulshi News: “कामाच्या जोरावर पुन्हा एकदा..”; कोमल वाशिवले यांची पौड गणातून प्रबळ दावेदारी
प्रभात वृत्तसेवा पौड – मुळशी तालुक्यातील आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पौड गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुळशीचे माजी सभापती कोमल वाशिवले या प्रबळ दावेदार म्हणून पुढे आल्या आहेत. आजपर्यंत त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर तसेच नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या विश्वासामुळे त्यांना मोठा जनसमर्थन लाभत असल्याचे चित्र आहे. तशी पक्षाकडे त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोमल वाशिवले यांनी […] The post Mulshi News: “कामाच्या जोरावर पुन्हा एकदा..”; कोमल वाशिवले यांची पौड गणातून प्रबळ दावेदारी appeared first on Dainik Prabhat .
महापालिका निवडणुकीत ‘१६’आकड्याचा अजब योगायोग! निकालातील ‘हे’आकडे पाहून थक्क व्हाल!
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांना दहा हजारांहून अधिक मतांनी पराभूत केले.भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे हे भाजपाच्या आयात धोरणाला वैतागून राष्ट्रवादीत गेले आणि त्यांनी आपला संपूर्ण पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून आणला. चार पैकी तीन उमेदवार दहा हजारांपेक्षा अधिक अंतराने विजयी झाले. दहा हजारी प्रभाग प्रभाग क्रमांक तीन […] The post महापालिका निवडणुकीत ‘१६’ आकड्याचा अजब योगायोग! निकालातील ‘हे’ आकडे पाहून थक्क व्हाल! appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पवनानगर – पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित पुणे ग्रॅड चॅलेंज टूर २०२६ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.स्पर्धेचा पहिला टप्पा मंगळवारी (दि. २०) सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पौड, लोणावळा ग्रामीण, कामशेत आणि वडगाव मावळ पोलीस […] The post Maval Traffic Alert: आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे वाहतुकीत बदल; ‘हे’ मार्ग राहतील पूर्णपणे बंद..पाहा appeared first on Dainik Prabhat .
नक्षत्रांचे देणे,डॉ. विजया वाडसगळे पालक तिच्या वर्गाचा आग्रह धरीत.‘का? तिचाच वर्ग का?’‘अहो, आमच्या बाळूचाच तसा आग्रह आहे.’‘अहो पण का? कारण सांगाल का?’‘ते पण ज्योती टीचरांनाच विचार.’मुख्याध्यापकांकडे शिक्षकांनीच तक्रार केली होती म्हणा.‘ज्योती टीचर, वर्गाला परीक्षेआधी पेपर दाखवते.’‘ही कसली परीक्षा? हे तर चक्क चीटिंग.’‘ज्योती ही टीचर नाही. चीटर आहे.’‘तिने परीक्षेचा खेळखंडोबा मांडला आहे.’‘परीक्षा व्यवस्थेची पूर्ण बोळवण केली आहे.’‘परीक्षा ही परीक्षाच राहिली नाहीये.’‘मुले सरळ सांगतात, आम्हाला ज्योती टीचरच हवी, परीक्षा देताना सुपरवायझर म्हणून.”शेवटी मुख्याध्यापकांनी ज्योतीला बोलावून घेतले.‘ज्योती टीचर, तुमच्याबद्दल सर्व शिक्षकांची सामूहिक तक्रार आहे.’‘काय सर? आपलं, मोठे सर?”‘तुम्हाला परीक्षा या शब्दाचा अर्थ कळतो का ज्योतीबाई?’‘मला शिक्षण या शब्दाचा अर्थ चांगला कळतो, मोठे सर.’‘काय अर्थ कळतो? मला समजेल का? ज्योती टीचर.’‘जे मनास सुजाण बनवते, माणुसकी जगायला शिकविते, जगण्यात आनंद निर्माण करते, ते खरेशिक्षण.’‘अगदी बरोबर ज्योतीबाई. पण ‘परीक्षा’ या शब्दाचा अर्थ काय आहे तुमच्या शब्दकोशात?’‘परीक्षा म्हणजे आकलनाचा पाढा वाचणे.’‘म्हणजे तुम्हांला परीक्षा हा शब्द नि त्यांचा अर्थ चांगला ठाऊक आहे तर ज्योतीबाई.’‘माझे बोलणे तुम्हांला औधत्यपूर्ण वाटेल कदाचित मोठे सर. पण ताणविरहित परीक्षा हे शिक्षणाचे मूळ उदिष्ट असले पाहिजे, असे मला प्रकर्षाने वाटते.’‘तांत्रिक दृष्टीने पाहिले तर ठीकच वाटते हे. पण ज्योतीबाई जो तो विद्यार्थी म्हणतो की मलाज्योतीबाईच टीचर म्हणून हव्यात. त्याच टीचर सगळ्या शाळेला कशा हो पुरणार? म्हणजे सगळ्याविषयात आपणास गती आहे का?’‘नाही ना’...‘परीक्षा या शब्दाचा अर्थ, मिळविलेले ज्ञान किती पचले, किती पोचले असा शुद्ध अर्थ.”‘होय मोठे सर, मला मान्य आहे. पण पूर्णपणे मी माझे मत मांडू शकते का विस्ताराने?’‘बोला.’‘धन्यवाद सर.’‘आता मांडा तुमची भूमिका.’‘मी मुलांना आधी पेपर दाखविते सर.’‘अहो, तीच तक्रार आहे मजकडे.’‘पेपर बघायला मिळतो म्हणून कोण खूश असतात, माझे सारे विद्यार्थी.’‘तेही चांगलेच ठाऊक आहे मला.’‘मोठे सर, मुले सारा पेपर बघतात आणि पुस्तकातून त्याची उत्तरे शोधतात.’‘ही कसली परीक्षा? हा तर शिक्षण व्यवस्थेचा अपमान.’‘मग सर, त्याचे फायदे कोणते आहेत ते सांगू?’‘सांगा.’‘माझ्या सुपरविजनच्या वेळी मी मुलांना आधी पेपर देते.’‘पुढे?’‘मग त्या त्या विषयाची पुस्तके देते.’‘मग?’‘मग मुले परीक्षेतील प्रश्नानुरूप उत्तरे शोधतात.’‘बापरे!’ ‘ही कसली परीक्षा?’ ‘ज्योतीबाई?’‘त्याने तीन फायदे होतात.’‘सांगा!’‘माझ्याकडे जो सुपरविजनला वर्ग येतो, त्यातील मुले स्वस्थचित्त असतात.”“अहो असणारच ना! प्रश्नपत्रिका हातात तर असते.”“मुले मनापासून अभ्यास करतात त्या प्रश्नोतरांचा!”“अहो करणारच ना।”“मग मी पुस्तके काढून घेते त्यांच्याकडून.”‘दूसरा फायदा म्हणजे मुले स्वस्थचित्त असतात आणि आत्मविश्वासाने भरलेली असतात. पुन्हापरीक्षेसाठी जवळ पुस्तक नसते ना त्यांच्या.’सर निरुत्तर झाले. मला वाटते ओपन बुक टेस्टची ही जन्म कथा असावी.
प्रभात वृत्तसेवा पवनानगर – शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादन वाढते आणि शेतकऱ्यांचे जीवनमान निश्चितच उंचावले, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. येळसे येथील पवना संस्कृती साई रोझेस या अत्याधुनिक फुलशेती प्रकल्पाला बाळासाहेब थोरात व त्यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी प्रकल्पाची पाहणी करताना ते बोलत होते. आधुनिक […] The post Maval News: “तरच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल..”; आधुनिक तंत्रज्ञानाबाबत बाळासाहेब थोरातांनी मांडले स्पष्ट मत appeared first on Dainik Prabhat .
महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात? भाजपची एकहाती सत्ता पण ‘या’दोन गटांत जुंपली..वाचा
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने बहुमत मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरामध्ये भाजपामध्ये भोसरी आणि चिंचवड असे दोन गट आहे. तर पिंपरी विधानसभेमध्ये देखील पडद्याआडून सूत्रे हलविणाऱ्या चाणक्यांची चलती आहे. नक्की कोणाला महापौर, स्थायी समिती यासारखी महत्वाची पदे मिळणार याकडे संपूर्ण […] The post महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात? भाजपची एकहाती सत्ता पण ‘या’ दोन गटांत जुंपली..वाचा appeared first on Dainik Prabhat .
पक्षांतर भोवलं की पावलं? २८ आयाराम जिंकले, तर ११ दिग्गजांना जनतेनं घरचा रस्ता दाखवला
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – निवडणुकीपूर्वी शहरात पक्षांतराचे वारे नव्हे तर वादळ वाहत होते. शेकडोंच्या संख्येने विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकत्र्यांनी पक्षांतर केले. त्यापैकी काहींना पक्षांनी उमेदवारीही दिली. परंतु यंदा मतदार राजाचा मूड जरा वेगळाच होता. जनेतेने राजकीय वर्तुळाला धक्के देणारे जनादेश दिले. भाजपला बहुमत मिळाले असले तरी शहरात वेगवेगळ्या भागांत पक्षांची ओळख असलेल्या नेत्यांना देखील […] The post पक्षांतर भोवलं की पावलं? २८ आयाराम जिंकले, तर ११ दिग्गजांना जनतेनं घरचा रस्ता दाखवला appeared first on Dainik Prabhat .
कथा,रमेश तांबेएकदा एक शेठजी एका जंगलात फिरायला गेले होते. जंगल अतिशय घनदाट होते. फिरता फिरता त्यांना एका झाडावर दोन दुर्मीळ पक्षी बसलेले दिसले. मध्यम आकाराचे रंगीबेरंगी पक्षी पाहून त्याला फार आनंद झाला. अन् त्याच्या मनात विचार आला की, असे पक्षी आपल्या बागेत असतील तर काय मजा येईल ना! पण त्या पक्ष्यांना पकडायचं कसं? हा प्रश्न त्याच्यापुढे होता. त्यामुळे त्यांनी त्या जंगलातच राहणाऱ्या एका माणसाला विचारलं, “अरे बाबा हे दोन पक्षी मला तू पकडून देशील का? मी तुला पैसे देईन!”, “माझ्यासाठी अगदी सोपं काम आहे” असे म्हणत त्याने त्या दोन पक्ष्यांना शेठजींच्या हवाली केले. मग शेठजींनी त्याला काही पैसे दिले. तो माणूस खूप खूश झाला आणि निघून गेला. मग शेठजी दोन्ही पक्षी घेऊन आपल्या बागेत आले आणि माळ्याला म्हणाले, “हे दोन पक्षी मी तुला देतो आहे, या पक्ष्यांना तू चांगलं शिकवं, त्यांच्यावर लक्ष ठेव” असं म्हणून शेठजी निघून गेले. एका महिन्यानंतर त्यांना आठवण झाली, की आपण ते दोन पक्षी आणले होते, चला बघू या त्यांची काय प्रगती झाली आहे.मग एके दिवशी शेठजींनी बागेत येऊन माळ्याला विचारलं, “अरे, तुला ते दोन पक्षी दिले होते त्यांना चांगलं तयार केलंस की नाही?” माळी म्हणाला, “होय शेठजी, त्यातला एक पक्षी बघा कसा उडतो आहे, आकाशात छान भराऱ्या घेतोय! पण दुसरा पक्षी मात्र एकाच जागेवर बसलेला असतो. तो पाहा रोज त्याच फांदीवर बसलेला असतो. त्यानंही आकाशात उडावं, हवेत मस्त गिरक्या घ्याव्यात यासाठी मी किती तरी प्रयत्न केले. पण तो काही उडायला तयार नाही.” शेठजी म्हणाले, “अरे मग मला अगोदर सांगायचं नाहीस का? एवढे दिवस वाट का पाहिलीस. ठीक आहे. मी उत्तम अशा पक्षी तज्ज्ञांना, पक्ष्यांना शिकवणाऱ्या हुशार शिक्षकांना घेऊन येतो. ते त्याला शिकवतील.” मग अनेकांनी भरपूर प्रयत्न केले. पण कुणालाच यश येईना. पक्षी तज्ज्ञ आले, पक्षी डॉक्टर आले. जगातल्या वेगवेगळ्या भागातून आले पण तो पक्षी फांदीवरून उडायला काही तयार होईना! शेठजीला आश्चर्य वाटले. एकाच जंगलातले एकाच झाडाच्या फांदीवर बसलेले दोन पक्षी आपण आणले. त्यातला एक पक्षी चांगला उडतो, इकडे तिकडे भराऱ्या मारतो, प्रतिसाद देतो, सारं काही करतो. पण दुसरा मात्र फांदीवरून उडायचं नावच घेत नाही, हा प्रकार शेठजींना फारच सतावत होता.त्याच माणसाला आपण शोधून आणला पाहिजे, असं ठरवून शेठजी पुन्हा जंगलात गेले. अन् त्याला म्हणाले, “अरे तू मला जे दोन पक्षी दिले होते, त्यातला एक पक्षी चांगला निघाला आणि दुसरा मात्र खोटा. सहा महिने झाले एक पक्षी छान सगळीकडे उडतो आहे. भराऱ्या मारतोय, ऐकतोय सगळ्यांचं; पण एक पक्षी मात्र गेले सहा महिने एकाच फांदीवर बसून आहे. तूच चल माझ्यासोबत आणि त्या पक्ष्याला नीट करून दाखवं.” मग तो माणूस शेठजीच्या बागेमध्ये आला. तर त्यानं पाहिलं की खरंच, एक पक्षी तिथेच बसलेला आहे. त्याला पाहून तो जंगलातला माणूस म्हणाला, “शेठजी, तुम्ही उद्या सकाळी या हा पक्षी तुम्हाला उडताना दिसेल.” मोठ्या आत्मविश्वासाने तो माणूस म्हणाला. “किती पक्षी तज्ज्ञ, किती पक्षी डॉक्टर जगभरातून मी बोलावले त्यांना जमलं नाही आणि तू लगेच सांगतोस उद्या होईल! “फसवत नाहीस ना मला?” शेठजी म्हणाले. “तुम्ही उद्या नक्की या हा तुम्हाला पक्षी उडताना दिसेल.”दुसऱ्याच दिवशी शेठजी बागेत आले. त्यांना माहीत होतं, की एक तर तो माणूस पळून तरी गेला असेल किंवा तो पक्षी तिथेच बसलेला असेल. पण बघतो तर काय तो माणूस माळ्याबरोबर गप्पा मारत उभा होता. शेठजीने मोठ्या आश्चर्याने विचारले, “काय रे लागला का आपला पक्षी उडायला! तसा तो माणूस म्हणाला, “होय शेठजी, बघा ना कसा मस्त उडतोय, छान भराऱ्या मारतोय.” मोठमोठ्या पक्षी तज्ज्ञांना जे जमलं नाही ते या जंगलात राहणाऱ्या साध्या माणसाला कसं काय जमलं! हे बघून शेठजी म्हणाले, “कसं शक्य झालं रे तुला!” “काही नाही शेठजी, तो ज्या झाडाच्या फांदीवर बसत होता ती फांदीच मी कापून टाकली, मग काय त्याला उडण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.”मित्रांनो, आपणसुद्धा आयुष्यभर अशीच एक सुरक्षित फांदी धरून ठेवलेली असते. ती सोडायचा आपण कधीच प्रयत्न करीत नाही. त्यामुळे आपल्यात काही क्षमता आहेत, काही शक्ती आहे याचा आपल्याला अंदाजच येत नाही. मग आपल्या हातून भविष्यात जी चांगली कामं होणार आहेत त्याच्यापासून आपण दूर राहतो. म्हणूनच आपला विकास होत नाही. त्यासाठीच वर्षानुवर्ष धरून ठेवलेली ती सुरक्षित फांदी आपण सोडायला हवी; आपल्यातल्या क्षमता जोखण्यासाठी, आपल्या प्रगतीसाठी, आपल्या भविष्यासाठी!
प्रभात वृत्तसेवा सातारा – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिल्ह्यातील भाजप आमदारांच्या सहकार्याने लढवल्या जाणार आहेत. समन्वय, संयम आणि अचूक रणनीती हे शिवेंद्रसिंहराजे यांच्या रणनीतीचा भाग असून जिल्ह्यातील दहांपैकी सात नगरपालिका निवडून आणणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडून पक्षश्रेष्ठींना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकांमध्ये याच यशाची अपेक्षा […] The post ZP Election 2026: जिल्हा परिषदेसाठी शिवेंद्रसिंहराजेंचा ‘मास्टर प्लॅन’; पण ‘या’ नेत्याच्या चालीमुळे महायुतीत पेच वाढणार? appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा दहिवडी – माण तालुक्याच्या राजकारणात आंधळी जिल्हा परिषद गट हा केवळ एक भौगोलिक भाग नसून तो सत्तेचा कणा राहिला आहे. आगामी निवडणुकीत हा गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने आणि त्यासोबतच पंचायत समितीच्या सभापतिपदाचे द्वार खुले झाल्याने या मतदारसंघातील राजकीय ईर्ष्या टोकाला पोहोचली आहे. प्रस्थापित नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई आणि नव्या दमाच्या इच्छुकांमधील महत्त्वाकांक्षा […] The post ZP Elections 2026: माणच्या सत्तेची गुरुकिल्ली ‘आंधळी’ गटातच; गोरे बंधूंना शह देण्यासाठी विरोधकांची फिल्डिंग appeared first on Dainik Prabhat .
Satara Crime: उंब्रजहून येणाऱ्या दाम्पत्याला भररस्त्यात लुटलं; चार जणांनी मिळून लंपास केले दागिने
प्रभात वृत्तसेवा सातारा – उंब्रज ते सातारा दुचाकी वरुन येणाऱ्या पती-पत्नीला चारचाकी गाडी आडवी मारुन चौघांनी लुटले आहे. पत्नीजवळ असलेले दागिने व रोख रक्कम असा 84 हजारांचा मुद्देमाल काढुन अज्ञातांनी पोबारा केला. याप्रकरणी सुषमा अनिल बाबर(वय 45, रा. संभाजीनगर सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुषमा बाबर व त्याचे […] The post Satara Crime: उंब्रजहून येणाऱ्या दाम्पत्याला भररस्त्यात लुटलं; चार जणांनी मिळून लंपास केले दागिने appeared first on Dainik Prabhat .
साप्ताहिक राशिभविष्य, १८ ते २२ जानेवारी २०२६
साप्ताहिक राशिभविष्य, १८ ते २२ जानेवारी २०२६अडचणींवर मात करालमेष : तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी होणार आहात. आपल्या प्रयत्नांना चांगले यश मिळणार आहे. आपण सर्व अडचणींवर मात करणार आहात. आपला आत्मविश्वास चांगला असणार आहे. नोकरीमध्ये आपली परिस्थिती चांगली असणार आहे. आगीपासून सावध राहणे. डोळ्यांवरील इजा होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता.नवीन ओळखी होण्याची शक्यता, त्यातून आपणाला लाभ होणार आहे.आपला सामाजिक दर्जा वाढेल. कुटुंबातील व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून आपणाला सहकार्य मिळणार आहे.स्थावरबाबतचे प्रश्न सुटतीलवृषभ : कुटुंबातील प्रश्न सुटतील. इतरांच्या मताला प्राधान्य द्या. शांतपणे निर्णय घ्या. कार्यक्षेत्रात परिश्रमाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. स्थावरबाबतचे प्रश्न सुटतील. जमीन- जुमला विषयीचे थंडावलेले व्यवहार गतीमान होतील; परंतु वाद-विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. व्यवसायातील परिस्थिती समाधानकारक राहील. कुटुंबातून पत्नीचे सहकार्य मिळेल. मित्रमंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक भेटल्यामुळे आनंदात भर पडेल. कोणाशीही मतभेद टाळा. कोणत्याही लहान-मोठ्या आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे हिताचे ठरेल. जुन्या गुंतवणुका आर्थिक फायदा मिळवून देतील. नवीन गुंतवणुका होतील.आव्हाने स्वीकारामिथुन : सदरील कालावधीमध्ये आपल्याला निरनिराळ्या वेळेस निराळी आव्हाने स्वीकारावी लागतील. ती आव्हाने स्वीकारा. त्याचा आपल्याला भविष्यात फायदा मिळेल. नोकरीमध्ये जास्त काम करावे लागेल. वेळेचे नियोजन फायदेशीर ठरेल. वरिष्ठांची मर्जी राहील. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल; परंतु वादविवादाचे प्रसंग टाळा. शिस्त व नियम पाळा. एखादी महत्त्वाची व्यक्ती भेटेल. हाती घेतलेल्या कामात हमखास यश प्राप्त होईल. कुटुंबीयांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. येणाऱ्या समस्यांचा आपण यशस्वीरीत्या सामना कराल. कुटुंबातील मुला-मुलींकडून त्यांच्या प्रगतीपर वार्ता कानी येतील. कुटुंबातील वातावरण आनंदी, उत्साही राहील.कार्यमग्न राहाकर्क : आपण आपल्या कार्यक्षेत्रात अधिक लक्ष दिल्यास आपली कार्ये त्वरेने होतील. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. चालढकल किंवा आळस नको. कार्यमग्न राहणे हिताचे ठरेल. त्याचप्रमाणे नियोजनाचा फायदा मिळेल. व्यवसाय, नोकरी या ठिकाणी सुलभ वातावरण राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळवाल. बोलण्यापेक्षा कृतीला महत्त्व द्या. विद्यार्थ्यांनी अध्ययनात अधिक परिश्रम करण्याची गरज. कुसंगती टाळा. वेळ वाया घालवू नका. गुरुजनांचे मार्गदर्शन, मदत मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगती करता येईल. मित्रमंडळींच्या वर्तुळात रमून जाल.उत्साह वृद्धिंगत होईलसिंह : आपल्या कार्यक्षेत्रात व कौटुंबिक बाबतीत कामाचा ताण जाणवेल; परंतु ही कामे आपण उत्साहाने पार पाडाल. विविध कामांसाठी धावपळ होण्याची शक्यता राहील. कलाकार साहित्यक्षेत्रातील जातक व विद्यार्थी यांना अनुकूलता मिळेल. कलाकारांना नवीन कामे मिळतील, तसेच प्रसिद्धीसह मानसन्मान मिळून धनलाभ होईल. राहत्या घराबद्दलचे प्रश्न मिटतील, तसेच राहत्या घरात भौतिक सुख सुविधा वाढविण्यासाठी खर्च आनंदाने कराल. स्थावर विषयक प्रश्न सुटू लागतील. नोकरीत वरिष्ठांशी जुळवून घ्या. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. धार्मिक बाबतीत रस वाढून एखाद्या सामाजिक किंवा धार्मिक कार्यात सक्रिय योगदान उत्साहाने द्याल.स्पर्धा जाणवेलकन्या : नोकरी-व्यवसायात स्पर्धक बलवान होतील, तसेच हितशत्रूंच्या कारवाया वाढतील. आपण शांत राहा तसेच आपल्या कामाकडे लक्ष द्या. कुटुंबात मित्र-मंडळ यांच्या वर्तुळात कार्यस्थळ वाद-विवाद टाळा. घरातील सदस्यांच्या म्हणण्याला प्राधान्य द्या. किरकोळ वाद-विवाद आकडे दुर्लक्ष करा; परंतु आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. महत्त्वाची कामे करू शकाल. यश लाभेल. व्यवसायात नियोजनाला महत्त्व प्राप्त होईल. मित्रमंडळी नातेवाईक आप्तेष्ट यांच्या गाठीभेटी होतील. मोठे निर्णय घेताना त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या. विद्यार्थ्यांनी नवीन काही शिकण्यासाठी कंटाळा आळस करू नये.इतरांना मदत करालतूळ : आपल्या जवळील व्यक्तीला किंवा नातेवाइकांपैकी कोणालातरी आपल्या मदतीची आवश्यकता भासेल ती मदत आपण स्वतःहून कराल. एखाद्याला काही शिकवून त्याचे हित जोपासाल. जमीन-जुमला स्थावरमालमत्ता याविषयीचे प्रश्न सोडविता येतील. विद्यार्थीवर्गाला त्यांच्या परिश्रमाचे अपेक्षित श्रेय मिळेल. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. कार्यक्षेत्रापेक्षा कुटुंबात आपला वेळ जास्ती जाईल. नावलौकिकात भर पडेल. कुटुंबीयांसमवेत आनंदात वेळ जाईल. कामाचा ताण जाणवेल. आर्थिक बाजू समाधानकारक राहील. प्रकृतीकडे लक्ष द्या. नोकरीत व्यवसायात प्रगती झालेली दिसेल. प्रसिद्धी व आर्थिक लाभ मिळतीलवृश्चिक : अनुकूल ग्रहमानामुळे अनुकूलतेचा लाभ मिळेल. यश प्रसिद्धी व आर्थिक लाभ देणारा हा कालावधी असेल. जुन्या गुंतवणुका भरघोस आर्थिक लाभ मिळवून देतील. नव्या गुंतवणुका करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. स्थावर संपत्ती, जमीन-जुमला यांचे रेंगाळलेले व्यवहार गतिमान होतील. वरिष्ठांशी बोलताना योग्य शब्दांचा वापर करा. काही वेळेस संवेदनशील प्रसंगाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वादविवाद टाळा. राजकारण गटबाजी नको. कलाकार व साहित्यक्षेत्रातील जातकांना प्रसिद्धीसह आर्थिक लाभ मिळतील. नावलौकिकात भर पडेल. अनावश्यक खर्च टाळा. दाम्पत्य जीवनात मधुरता राहील.मिश्र फळे मिळतीलधनु : मिश्र प्रकारचे ग्रहमान लाभल्यामुळे मिश्र फळे प्रतिपादित होतील. विविध प्रकारच्या कार्यालयीन व कौटुंबिक अडथळ्यांचा अनुभव घ्यायला लागेल. अप्रिय गोष्टींचा अनुभव येईल. काही वेळेस मनाविरुद्ध निर्णय स्वीकारावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी मिळतेजुळते घेण्याचा प्रयत्न करावा. आपल्यातील कलागुणांना चांगले प्रोत्साहन मिळेल. कुटुंबात व मित्र मंडळ यांच्या वर्तुळामध्ये वाद-विवाद टाळणे हितकारक ठरेल. व्यवसायात आर्थिक देवाण-घेवाणींवरून वादविवादाची शक्यता व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील. त्यामुळे आपण आपली कर्जे चुकती करू शकाल.महत्त्वाकांक्षा पूर्ण होतीलमकर : बरेच दिवस आपल्या मनातील असलेली एखादी महत्त्वाची इच्छा अथवा महत्वाकांक्षा पूर्ण होईल. त्यासाठी प्रयत्न कमी पडता कामा नयेत याची खबरदारी घ्या. स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होऊ शकते, त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास त्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक. अतिआत्मविश्वास नुकसानीस कारणीभूत ठरू शकतो. लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. दाम्पत्य जीवनातील वाद-विवाद, कलह सदृश्य प्रसंगात बदलू शकतात. प्रवासाचे योग घटित होत आहेत. प्रवास कार्य सिद्ध होतील. स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न साकार होईल. राहत्या घरासाठी खर्च कराल.रागावर नियंत्रण आवश्यककुंभ : रोजच्या दैनंदिन कामात कुटुंबात व कार्यस्थळी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. काही बाबतीत आपला राग अनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद टाळणे अत्यावश्यक तसेच सहकाऱ्यांना समजून घ्या, त्यांचे पूर्ण म्हणणे ऐकून घ्या. स्वतः शांत राहिल्यामुळे मनावरचा ताण कमी होईल. स्थावर इस्टेट तसेच वडिलोपार्जित संपत्ती बद्दलचे वाद-विवाद संपुष्टात येतील. भावंडांशी समजूतदारपणे वागा. जोडीदाराच्या लहरीपणामुळे वाद-विवाद संभवतात. विशेषतः भागीदारी व्यवसायात भागीदाराबरोबर वाद-विवाद टाळा. व्यवसायिक दुनियेतील आर्थिक व्यवहारात ताणतणाव नको कुटुंबातील मुलामुलींची प्रगती होईल. संयमाने व शांतपणे आपल्या पुढील समस्यांचे निवारण करू शकाल.अनुकूलतेमध्ये भरमीन : शुभ ग्रहांच्या योगामुळे अनुकूलतेमध्ये भर पडेल. नशिबाची साथ मिळाल्याने यशाची वाटचाल करणे सुलभ होईल. आपल्या समोरील कामे थोड्याच प्रयत्नात होत असल्याचे अनुभव आपल्याला आश्चर्य वाटेल. कामकाजाचा व्याप वाढणार आहे. विरोधकांची भीती बाळगण्याचे कारण नाही. खेळाडू व राजकीय क्षेत्रातल्या जातकांना हा काळ अनुकूल राहील. एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी होता येईल. यशदायी आणि सुंदर अशा कालावधीचा अवश्य लाभ घेता येईल. महत्त्वाची कामे करून घ्या. मनातील इच्छा परतीचा हा काळ असल्याने एखादे अवघड काम अथवा एखादी महत्वाकांक्षा पूर्ण होईल.
चित्रदुर्ग : कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या वाहनाला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून वैष्णवी पाटील यांच्यासह अन्य तिघे जखमी झाले आहेत. पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैष्णवी पाटील या बेंगळुरूहून कोल्हापूरकडे परतत असताना आज पहाटे त्यांची इनोव्हा कार एका लॉरीला धडकली. धडक इतकी तीव्र होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात कारमधील दोन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर उर्वरित जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी वाहनांच्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.या अपघातामुळे कोल्हापूर पोलीस दलासह अँटी करप्शन ब्युरोमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही घटनेची अधिक चौकशी केली जात आहे.
दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १८ जानेवारी २०२६
पंचांगआज मिती पौष अमावस्या शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वा षाढा नंतर उत्तराषाढा योग हर्षण. चंद्र राशी धनु भारतीय सौर २८ पौष शके १९४७. रविवार दिनांक १८ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय नाही, मुंबईचा सूर्यास्त ०६.२२ मुंबईचा चंद्रास्त ०५.५९ , राहू काळ ०४.५९ ते ०६.२२ अमावास्या वर्ज,दर्श अमावास्या, अमावास्या समाप्ती-रात्री-१२;१२दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : व्यवसायिक फायदे होणार आहेत.वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात जिद्दीने वाटचाल करणार आहात.मिथुन : मनासारख्या घटना घडतील.कर्क : संघर्षाच्या पवित्र्यात राहणार आहात.सिंह : चांगल्या संधी चालून येतील.कन्या : नोकरीमध्ये दगदग वाढणार आहे.तूळ : घरातल्या कुरबुरी घरातच मिटवा.वृश्चिक : आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.धनू : हाती घेतलेली कामे पूर्ण होतील.मकर : चांगला उत्कर्षाचा दिवस असणार आहे.कुंभ : समोरच्या व्यक्तीवर छाप पाडाल.मीन : मनात समाधान कारक विचार असणार आहे.
RCB W vs DC W RCB beat DC by 8 Wickets : महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ च्या ११ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बगळुरू (RCB) संघाने आपला दबदबा कायम राखला आहे. आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा ८ विकेट्सनी पराभव करत विजयाचा चौकार ठोकला. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी दिल्लीला १६६ धावांत गुंडाळले आणि […] The post RCB W vs DC W : शतक हुकलं पण दिल्लीला नमवलं! स्मृती मानधनाची कॅप्टन इनिंग; आरसीबीने ठोकला विजयाचा चौकार appeared first on Dainik Prabhat .
कोल्हापूर : गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर कानडेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नेसरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे यांची कोल्हापूर पोलिस अधीक्षकांनी तडकाफडकी बदली केली आहे. बाळंतपणानंतर घरी जाणाऱ्या सुवर्णा राहुल कुंदेकर (वय २९ , रा. अडकूर, ता. चंदगड) यांचा या अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांवर संशयित चालकाला संरक्षण दिल्याचा आरोप करत आक्रमक आंदोलन केले. या तणावपूर्ण प्रसंगाने उफाळलेल्या संतापामुळे पोलिस प्रशासनाने घाईघाईने कारवाई करत गाढवे यांची पोलीस कंट्रोल रूमला रवानगी केली.गुरुवारी दुपारी नेसरीहून अडकूरकडे जाणाऱ्या राहुल कुंदेकर (वय ३२) यांच्या मोटारीला (एमएच ०४ डीएम ३७४९ ) चंदगडहून नेसरीकडे येणाऱ्या स्वप्निल रानगे (राहणार चंदगड) यांच्या मोटारीने (एमएच ०९ जीए ७५१५ ) समोरासमोर धडक दिली. रानगे हे चंदगड नगरपंचायतीतील कर निर्धारण अधिकारी आहेत. या धडकेत सुवर्णा यांच्यासह त्यांचा सात दिवसांचा नवजात बाळ, दोन वर्षांचा रुद्र आणि आरती भाबर (वय ६०, रा. हलकर्णी) असे चार जण जखमी झाले. सुवर्णा यांचा कोल्हापूर रुग्णालयात मृत्यू झाला, तर इतरांची गडहिंग्लजमधील दवाखान्यांत प्रकृती स्थिर आहे. ग्रामस्थांच्या मते, अपघातानंतर नेसरी पोलिसांनी संशयित रानगे याला तात्काळ अटक न करता संरक्षण दिले. यामुळे हजारो अडकूरकरांनी मृतदेह पोलिस ठाण्यासमोर ठेवून मोर्चा काढला आणि एका गाडीला आग लावली.नेसरी पोलिसांकडून अपघाताची नोंद करण्यात आली असून, रानगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तर या अपघाताची आम्ही अधिक चौकशी करत असून आरोपीला शिक्षा नक्कीच मिळेल, नागरिकांनी थोडा संयम बाळगावा. अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे.दरम्यान, या प्रकरणाने स्थानिक राज्यमार्गावरील सुरक्षा आणि पोलिस कारवाईची निष्पक्षता यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Nagpur News: नागपुरात आयकर विभागाची व्यापाऱ्यावंर मोठी कारवाई
नागपूर : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच नागपूर शहरात आयकर विभागाने मोठी धडक कारवाई करत व्यापाऱ्यांची पळापळ उडवून दिली आहे. शनिवारी पहाटेपासून आयकर विभागाच्या पथकाने नागपुरातील सुपारी व्यापाराशी संबंधित 20 हून अधिक ठिकाणी एकाचवेळी छापे टाकून तपास सुरू केला आहे. या अचानक झालेल्या कारवाईमुळे शहरातील व्यापारी वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुपारीच्या कथित बेकायदेशीर व्यापारात सहभागी असल्याचा संशय असलेल्या काही नामांकित व्यापाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये राजू अण्णा उर्फ राजेश शिनॉय, अलताफ कलीवाला, आसिफ कलीवाला, गनी कलीवाला यांच्यासह काही ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचा समावेश आहे. या व्यापाऱ्यांचे मुंबईतील सुपारी व्यापारी फारूक भाई यांच्याशी कथित आर्थिक व्यवहार असल्याची चर्चा असून, त्याच अनुषंगाने आयकर विभागाने ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. शनिवारी सकाळपासून आयकर विभागाची मोठी टीम शांतिनगर, कामठी रोड, कळमना परिसर आणि मां उमिया इंडस्ट्रियल एरिया येथे सक्रिय होती. राजू अण्णा यांच्या निवासस्थानासह कलीवाला बंधूंची कार्यालये व गोदामांमध्ये सखोल तपास करण्यात आला. याशिवाय इतवारी आणि जागनाथ बुधवारी परिसरातील सुपारी व्यापाराशी संबंधित दुकानांवरही आयकर पथकाने धडक दिली.या छाप्यांदरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एके-47 शस्त्रांनी सज्ज सुरक्षा कर्मचारी आणि डॉग स्क्वॉडच्या उपस्थितीमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता होती. नागपूर हे मध्य भारतातील सुपारी व्यापाराचे प्रमुख केंद्र मानले जाते. येथून मोठ्या प्रमाणावर सुपारीचा पुरवठा विविध राज्यांमध्ये केला जातो, ज्यामध्ये तंबाखू, मावा आणि गुटख्याच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या सुपारीचा समावेश असल्याचा संशय आहे.आयकर विभागाला या व्यापारातून मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी आणि काळ्या पैशाचा व्यवहार झाल्याचा संशय आहे. मात्र, छाप्यांमध्ये नेमके काय निष्पन्न झाले याबाबत आयकर विभागाने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच या कारवाईचे खरे स्वरूप समोर येईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या कारवाईमुळे नागपूरच्या व्यापारी क्षेत्रात मोठी चर्चा सुरू असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Beatriz Taufenbach :Toxicटीझरमुळे वादाचे सावट; अभिनेत्री बिट्रिझ टॉफेनबैखला केलं जातयं ट्रोल..!
Beatriz Taufenbach : दाक्षिणात्य सिनेमा आजकाल सर्वांचे आवडते झाले आहेत व तसचं रॉकिंग स्टार यशच्या बहुप्रतीक्षित ‘Toxic’ चित्रपटाचा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आणि वाद सुरू झाला आहे. यशच्या वाढदिवसा दिवशी ८ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या टीझरमधील एका दृश्यामुळे चित्रपट अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. खास म्हणजे स्मशानभूमीत चित्रीत करण्यात आलेला एक सीन प्रेक्षकांच्या आणि सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आला आहे.टीझरमध्ये यशसोबत ब्राझलीयन अभिनेत्री Beatriz Taufenbach हिच्यावर चित्रित करण्यात आलेला सीन अनेकांना नैतिकदृष्ट्या आक्षेपार्ह वाटत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या दृश्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. काही युजर्सनी हा सीन अनावश्यक असल्याचे म्हटले, तर काहींनी चित्रपटाच्या कथानकासाठी तो आवश्यक असल्याचे समर्थन केले. या संपूर्ण प्रकरणानंतर अभिनेत्री Beatriz Taufenbach हिने आपले सोशल मीडिया अकाऊंट तात्पुरते डिअॅक्टिवेट केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वाढत्या ट्रोलिंगपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी आणि नकारात्मक कमेंट्सपासून वाचण्यासाठी तिने हा निर्णय घेतला असावा. सध्या तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट असल्याचेही सांगितले जात आहे. या वादाने आता अधिक गंभीर वळण घेतले असून, ‘Toxic’ च्या टीझरविरोधात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडे (CBFC) तक्रार दाखल करण्यात आली आहे. टीझरमधील काही दृश्ये नैतिकतेच्या चौकटीबाहेर असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.गीतू मोहनदास दिग्दर्शित ‘Toxic’ हा यशच्या करिअरमधील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट मानला जात आहे. टीझरमध्ये यशचा डार्क, रॉ आणि इंटेन्स लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतानाच, वादग्रस्त सीनमुळे चित्रपट चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आगामी काळात या वादावर निर्माते आणि सेन्सॉर बोर्ड काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
IND U19 vs BAN U19 India beat Bangladesh : आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय युवा संघाने आपला धडाका कायम राखला आहे. स्पर्धेतील सातव्या सामन्यात भारताने डकवर्थ-लुईस (DLS) नियमाच्या आधारे बांगलादेशचा १८ धावांना पराभव केला. पावसाच्या व्यत्ययानंतरही भारतीय गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यामुळे टीम इंडियाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. वैभव सूर्यवंशी आणि अभिज्ञान कुंडूची […] The post IND U19 vs BAN U19 : टीम इंडियाची विजयी गर्जना! बांगलादेशचा धुव्वा उडवत सलग दुसरा विजय; विहान-अभिज्ञान ठरले शिल्पकार appeared first on Dainik Prabhat .
Share Market: शेअर बाजार ‘या’रविवारी सुरू राहणार
मुंबई – एक फेब्रुवारी रोजी रविवार असला तरी शेअर बाजारांचे कामकाज चालू राहील अशी माहिती राष्ट्रीय शेअर बाजार व मुंबई शेअर बाजारानी जारी केली आहे. रविवार असतानाही केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. त्यामुळे शेअर बाजारांनी रविवारी कामकाज चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री करीत असलेल्या भाषणाची माहिती शेअर बाजारात दरवर्षी सादर केली […] The post Share Market: शेअर बाजार ‘या’ रविवारी सुरू राहणार appeared first on Dainik Prabhat .
Indian Export: 27 देशांची बाजारपेठ भारतीय उद्योगांसाठी होणार खुली
नवी दिल्ली – लवकरच भारत आणि युरोपियन समुदायादरम्यान मुक्त व्यापार करार होणार आहे. त्यामुळे भारत कमी शुल्कावर युरोपातील 27 देशांना निर्यात करू शकणार आहे. अशा परिस्थितीत भारतातील विविध उद्योगांना एक विस्तारित बाजारपेठ मिळणार आहे. या करारामुळे कापड, औषधी, रसायने, अभियांत्रिकी वस्तू, दागिने क्षेत्राला बळकटी मिळणार असल्याचे सांगितले जाते. दोन्ही बाजूदरम्यान अनेक वर्षापासून या विषयावर चर्चा […] The post Indian Export: 27 देशांची बाजारपेठ भारतीय उद्योगांसाठी होणार खुली appeared first on Dainik Prabhat .
Weather Alert : राज्यातील हवामानात मोठे बदल, अलर्ट जारी
Weather Alert : राज्यात सध्या तापमानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत असून हवामानाचा लहरीपणा कायम आहे. काही भागांत दुपारच्या वेळी उकाडा जाणवत असताना, सकाळी आणि रात्री थंडीचा प्रभाव अद्याप कमी झालेला नाही. विदर्भातील गोंदिया येथे राज्यातील नीचांकी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस राज्यात असंच मिश्र हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली […] The post Weather Alert : राज्यातील हवामानात मोठे बदल, अलर्ट जारी appeared first on Dainik Prabhat .
Q3 results 2026: HDFC, Yes बँकेचा नफा वाढला; ICICI बँकेला मात्र तिसऱ्या तिमाहीत फटका
Q3 results 2026: खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने शनिवारी आपला तिसर्या तिमाहिचा ताळेबंद जाहीर केला. या ताळेबंदातील माहितीनुसार एचडीएफसी बँकेचा नफा यातही 12 टक्क्यांनी वाढून 19,807 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी यात तिमाहीत बँकेला 17,657 कोटी रुपयाचा नफा झाला होता. तर सप्टेंबरअखेर संपलेल्या दुसर्या तिमाहीत बँकेला 18,653 कोटी रुपयाचा नफा झाला होता. म्हणजे तिमाही […] The post Q3 results 2026: HDFC, Yes बँकेचा नफा वाढला; ICICI बँकेला मात्र तिसऱ्या तिमाहीत फटका appeared first on Dainik Prabhat .
राज्यातला हाच खरा धुरंदर; वसई-विरारवर एकहाती सत्ता गाजवणारे हितेंद्र ठाकूर कोण?
वसई-विरार : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत झालेल्या पराभवानंतर अवघ्या वर्षभरातच घेण्यात आलेल्या वसई-विरार महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली आहे. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये या महापालिकेवर असलेले वर्चस्व कायम ठेवत वसई-विरार महापालिकेचा गड बविआने राखला आहे. स्थानिक राजकारणात वसई-विरार हा भाग बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला मानला जातो आणि या बालेकिल्ल्याचे केंद्रबिंदू आहेत […] The post राज्यातला हाच खरा धुरंदर; वसई-विरारवर एकहाती सत्ता गाजवणारे हितेंद्र ठाकूर कोण? appeared first on Dainik Prabhat .
BMC Election : मुंबईच्या निकालात बिहारचा दबदबा; एकाच तालुक्यातील 6 जणांनी उधळला विजयी गुलाल
BMC Election : देशातील सर्वात श्रीमंत आणि महत्त्वाची बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या यंदाच्या निवडणुकीत एका खास गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले. बिहारमधील मिथिलांचल (मिथिला प्रदेश) च्या मधुबनी जिल्ह्यातील झंझारपूर या एकाच तालुक्यातील सहा उमेदवारांनी मुंबईच्या विविध वार्डमध्ये दमदार कामगिरी करत उत्तर भारतीय मतदारांचा शहरातील निर्णायक प्रभाव स्पष्ट केला आहे. या सहाही उमेदवारांनी आपापल्या प्रभागात विजय मिळवून […] The post BMC Election : मुंबईच्या निकालात बिहारचा दबदबा; एकाच तालुक्यातील 6 जणांनी उधळला विजयी गुलाल appeared first on Dainik Prabhat .
BCB Requests ICC Group Change : आगामी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या वेळापत्रकावरून नवा वाद निर्माण झाला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) भारतात सामने खेळण्याबाबत सुरक्षेच्या कारणास्तव चिंता व्यक्त केली असून, त्यांचे सामने श्रीलंकेत हलवण्याचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) ठेवला आहे. शनिवारी, १७ जानेवारी रोजी ढाका येथे बीसीबी आणि आयसीसी प्रतिनिधींच्या बैठकीत हा औपचारिक […] The post BCB Requests ICC : टी-२० विश्वचषक भारतात खेळण्यास बांगलादेशचा पुन्हा नकार! आता ICC समोर ठेवली ‘ही’ नवी अट appeared first on Dainik Prabhat .
Mumbai - Pune Expressway : अटल सेतुपासुन थेट पुण्यापर्यंत ९० मिनिटात,नक्की मार्ग काय ?
Mumbai - Pune Expressway : मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांरीकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सध्या अडीच ते तीन तास लागणारा मुंबई–पुणे प्रवास भविष्यात केवळ ९० मिनिटांत पूर्ण होणार आहे. केंद्र सरकारने मुंबई–पुणे दरम्यान सुमारे १३० किलोमीटर लांबीचा नवा सुपरफास्ट एक्सप्रेसवे उभारण्यास मंजुरी दिली असून, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे.सध्या अस्तित्वात असलेल्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरून दररोज हजारो वाहनांची कोंडी पाहायला मिळते. मात्र खंडाळा घाटातील अरुंद वळणं, पावसाळ्यात होणारी घसरण, अपघात आणि सुट्टीच्या दिवसांतील प्रचंड गर्दी यामुळे प्रवास अनेकदा चार ते पाच तासांपर्यंत लांबतो. या कायमस्वरूपी समस्येवर उपाय म्हणून सरकारने सध्याच्या मार्गाच्या समांतर एक अत्याधुनिक आणि वेगवान एक्सप्रेसवे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.हा नवा मार्ग जेएनपीए परिसरातील अटल सेतूजवळून सुरू होऊन थेट पुण्याजवळील शिवरे जंक्शनपर्यंत जाणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे १५ हजार कोटी रुपये असून, पहिल्या टप्प्यात पगोटे ते पनवेल चौक दरम्यानच्या मार्गाला आधीच मंजुरी देण्यात आली आहे.नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या एक्सप्रेसवेवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कमी वळणं, सुरक्षित वेगवान लेन, मजबूत पूल आणि आवश्यक ठिकाणी बोगदे उभारले जाणार आहेत. त्यामुळे घाटातील अपघातप्रवण भाग टाळले जातील आणि वाहतूक अधिक सुरळीत होईल.या मार्गाचा फायदा केवळ मुंबई–पुणेपुरता मर्यादित राहणार नाही. हा एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर मुंबई–पुणे–बेंगळुरू हा लांब पल्ल्याचा प्रवास सुमारे साडेपाच तासांत शक्य होईल. त्यामुळे उद्योग, व्यापार, लॉजिस्टिक्स, पर्यटन आणि बंदरांशी संबंधित क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.मुंबई–पुणे एक्सप्रेसवेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे नितीन गडकरी आता आणखी एक पाऊल पुढे टाकत, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हा नवा सुपरफास्ट मार्ग उभारत आहेत. हा प्रकल्प म्हणजे केवळ रस्ता नसून, महाराष्ट्राच्या आर्थिक आणि दळणवळण विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
Instagram रील्स आता मराठीसह पाच भारतीय भाषांमध्ये उपलब्ध, क्रिएटर्ससाठी खुशखबर..!
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने भारतीय क्रिएटर्ससाठी मोठा अपडेट दिला आहे. आता रील्स तयार करताना क्रिएटर्सना हिंदीसह मराठी, बंगाली, तमिळ आणि तेलगू या भाषांचा वापर करता येणार आहे. यामुळे भारतीय युजर्सना त्यांच्या स्वतःच्या भाषेत रील्स तयार करण्याची आणि पाहण्याची सुविधा मिळेल.गेल्या वर्षी नोव्हेंबर 2025 मध्ये हाऊस ऑफ Instagram इव्हेंटमध्ये कंपनीने हिंदी भाषेला साथ देण्याची घोषणा केली होती. आता त्यात पाच भारतीय भाषांचा विस्तार केला गेला आहे. यामध्ये AI आधारित व्हॉइस ट्रान्सलेशन आणि लिप-सिंकिंग फीचर्स देखील समाविष्ट आहेत, जे क्रिएटर्सला जिवंत आणि नैसर्गिक आवाजासह रील्स तयार करण्यास मदत करतात. Instagram च्या मते, डब केलेले व्हिडिओ अजिबात रोबोटिक वाटणार नाहीत आणि क्रिएटर्सच्या मूळ आवाजाच्या टोनसारखेच दिसतील. क्रिएटर्स आता रील्समध्ये मजकूर आणि कॅप्शनसाठी देवनागरी, बंगाली, आसामी आणि मराठी फॉन्ट वापरू शकतील. या भाषांचा सपोर्ट सगळ्यात आधी अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.याशिवाय Instagram ने युजर्ससाठी ऑक्टोबर 2025 मध्ये मॅप फीचर रोलआउट केले आहे. या फीचरच्या मदतीने लोक आपले लोकेशन शेअर करू शकतात आणि पॉप्युलर रील्स कुठे चित्रीत झाल्या आहेत ते देखील पाहू शकतात. या अपडेटमुळे क्रिएटर्स आणि युजर्स यांच्यातील समन्वय सुधारेल, भारतीय भाषांमध्ये सामग्रीची पोहोच वाढेल आणि लोक आपल्या स्थानिक भाषेत रील्स अनुभवू शकतील. सोशल मीडिया क्षेत्रात ही पायरी भारतीय क्रिएटर्ससाठी नक्कीच आनंदाची आहे.Instagram च्या या पावल्यामुळे स्थानिक भाषांमध्ये क्रिएटिव्ह कंटेंट तयार करण्यासाठी नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. आता भारतीय क्रिएटर्सना त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग अधिक सोपे झाले आहेत.
मुंबईच्या महापौर पदावरून वाढला सस्पेन्स.! शिंदे आणि ठाकरेंच्या विधानाने उंचावल्या सर्वांच्या भुवया
BMC Results 2026 – भाजप आणि शिंदेसेना युतीने महत्वाचे मिशन फत्ते करत मुंबई महापालिकेची सत्ता मिळवली. मात्र, काही घडामोडी आणि राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांमुळे मुंबईच्या महापौर पदाचा सस्पेन्स वाढला आहे. आपल्या नगरसेवकांना लक्झरी हॉटेलमध्ये हलवण्याच्या शिंदेसेनेच्या कृतीमुळे भुवया उंचावल्या गेल्या आहेत. तशातच देवाच्या मनात असेल तर आपलाही महापौर होईल, असे कुतूहल चाळवणारे वक्तव्य ठाकरेसेनेचे प्रमुख उद्धव […] The post मुंबईच्या महापौर पदावरून वाढला सस्पेन्स.! शिंदे आणि ठाकरेंच्या विधानाने उंचावल्या सर्वांच्या भुवया appeared first on Dainik Prabhat .
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा येथे झालेल्या हिंसाचारामागे भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या निलंबित नेत्याचा हात असू शकतो, असा गंभीर आरोप टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी शनिवारी केला. त्यांनी नागरिकांना शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन केले. जिल्ह्याचे मुख्यालय बहरामपूर येथे रोडशोनंतर झालेल्या सभेत बोलताना बॅनर्जी म्हणाले की, बेलडांगा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी त्यांना कार्यक्रम […] The post Abhishek Banerjee : बेलडांगा हिंसाचारात भाजप व टीएमसीच्या निलंबित नेत्याचा हात? अभिषेक बॅनर्जींचा दावा appeared first on Dainik Prabhat .
मोठी बातमी! पराभव जिव्हारी लागला; शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा राजीनामा
नागपूर: उपराजधानीच्या राजकारणात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ५० हून अधिक उमेदवार रिंगणात उतरवूनही एकाही जागेवर विजय मिळवता न आल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. नागपूर महानगरपालिकेच्या १५१ जागांसाठी […] The post मोठी बातमी! पराभव जिव्हारी लागला; शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा राजीनामा appeared first on Dainik Prabhat .
RCB Home Ground Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि त्यांच्या लाखो चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएल २०२६ साठी आरसीबीचे होम ग्राउंड कोणते असणार, यावर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कर्नाटक सरकारने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल सामने आयोजित करण्यासाठी अधिकृत मंजुरी दिली आहे. […] The post RCB Home Ground : आरसीबीच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज! IPL 2026 साठी ‘हे’ स्टेडियम असणार ‘होम ग्राऊंड’ appeared first on Dainik Prabhat .
First Training Squadron : भारतीय नौदलाची फर्स्ट ट्रेनिंग स्क्वाड्रन सिंगापूरमध्ये दाखल
सिंगापूर : आयएनएस तीर, आयएनएस शार्दूल, आयएनएस सुजाता तसेच भारतीय तटरक्षक दलाचे सारथी हे जहाज यांचा समावेश असलेली भारतीय नौदलाची फर्स्ट ट्रेनिंग स्क्वाड्रन गुरुवारी सिंगापूर येथील चांगी नौदल तळावर दाखल झाली. ही स्क्वाड्रन दक्षिण-पूर्व हिंदी महासागर क्षेत्रात प्रशिक्षण मोहिमेवर आहे. २०२६ हे वर्ष आसियान–भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. म्हणून ही मोहीम […] The post First Training Squadron : भारतीय नौदलाची फर्स्ट ट्रेनिंग स्क्वाड्रन सिंगापूरमध्ये दाखल appeared first on Dainik Prabhat .
BMC Results 2026 : ‘शिंदेसेनेच्या पाठिंब्याविना भाजपचा महापौर अशक्य’; चंद्रकांत पाटलांची बोलणी सुरु
BMC Results 2026 – महायुतीतील अंतर्गत फाटाफूट, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची अघोषित आघाडी असूनही भाजपने सांगली महापालिका निवडणुकीत दमदार कामगिरी करत ७८ पैकी ३९ जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी केवळ एका जागेची गरज असलेल्या भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी आता शिंदेसेनेकडे मोर्चा वळवला असून, उपमहापौरपदाच्या बदल्यात पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालांनुसार, काँग्रेसने […] The post BMC Results 2026 : ‘शिंदेसेनेच्या पाठिंब्याविना भाजपचा महापौर अशक्य’; चंद्रकांत पाटलांची बोलणी सुरु appeared first on Dainik Prabhat .
मनपा निवडणुकीच्या निकालानंतर कोल्हापुरात काँग्रेसला धक्का
गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेशउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्नठाणे : कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वासराव आबाजी पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षातील आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सदरचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पार पडला.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासराव पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विश्वासराव पाटील यांचा सहकार क्षेत्रातील तसेच पक्ष संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव शिवसेनेसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या पक्षप्रवेशात शिरोली दुमला गावचे सरपंच सचिन पाटील, हनुमान दूध संघ महेचे अध्यक्ष बुद्धिराज शंकर पाटील महेकर, यशवंत सहकारी बँक कुडित्रेचे संचालक नंदकुमार अण्णासाहेब पाटील, तसेच अनिल सोलापूरे, राहुल पाटील, एस. के. पाटील, माधव पाटील, सुनील पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.कार्यक्रमाला करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके हेही उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक व विधानसभा राजकारणात शिवसेनेची भूमिका अधिक मजबूत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मोठा ट्विस्ट..! महापौर शिंदे गटाचाच? भाजपला जोरदार धक्का, किंगमेकर उमेदवार अज्ञातस्थळी
मुंबई : महापालिका निवडणूक निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी अनेक महापालिकांमध्ये स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपला 89 जागा, तर शिवसेना शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या आहेत. येथे भाजपला एकहाती बहुमत नसल्याने महापौरपदासाठी शिंदे गटाची साथ अपरिहार्य ठरणार […] The post मोठा ट्विस्ट..! महापौर शिंदे गटाचाच? भाजपला जोरदार धक्का, किंगमेकर उमेदवार अज्ञातस्थळी appeared first on Dainik Prabhat .
शिरूर : शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १४ गणांसाठी निवडणूक प्रक्रिया गतिमान झाली आहे. शिरूर तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, निवडणूक काळात उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी व सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे. अर्ज विक्रीचा आकडा वाढला, […] The post शिरूर: जिल्हा परिषद गटांसाठी 37 तर पंचायत समिती गणांसाठी 120 उमेदवारी अर्जांची विक्री, निवडणूक प्रक्रिया गतिमान appeared first on Dainik Prabhat .
दोन रशियन महिलांची गोव्यात हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात, पुढील तपास सुरू
पणजी – गोव्यात दोन रशियन महिलांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघड झाली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी एका पुरूषाला अटक केली आहे. ही घटना उत्तर गोव्यातील अरंबोल आणि मोरजीम गावात घडली. १४ आणि १५ जानेवारी रोजी दोन रशियन महिलांची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी अलेक्सी लिओनोव्ह या रशियन पुरूषाला […] The post दोन रशियन महिलांची गोव्यात हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात, पुढील तपास सुरू appeared first on Dainik Prabhat .
वरखेडच्या ‘स्वामी समर्थ’साखर कारखान्यात वजनात फसवणूक; शेतकरी संघटना आक्रमक!
नेवासा – माजी मंत्री विजयबापू शिवतारे चेअरमन असलेल्या वरखेड येथील स्वामी समर्थ शुगर अँड ॲग्रो इंडस्ट्रीज या खासगी साखर कारखान्यात उसाच्या वजनमापात मोठी तफावत आढळल्याने खळबळ उडाली आहे. शेतकरी संघटनेने पुराव्यासह हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर शनिवारी कारखाना कार्यस्थळावर तीव्र आंदोलन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी कामगार आणि वाहतूकदारांकडून वजनाबाबत तक्रारी येत […] The post वरखेडच्या ‘स्वामी समर्थ’ साखर कारखान्यात वजनात फसवणूक; शेतकरी संघटना आक्रमक! appeared first on Dainik Prabhat .
TMC Election Mayor : ठाण्याच्या महापौरपदी शिंदे कुणाला देणार बढती ? ‘या’नेत्यांची नावे चर्चेत
TMC Election Mayor : ठाणे महानगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिंदे गट) जबरदस्त कामगिरी करत एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. १३१ सदस्यीय सभागृहात शिवसेनेने ७१ जागांवर स्पष्ट विजय मिळवला असून, ४ जागांवर आघाडी कायम असल्याने हा आकडा ७५ पर्यंत पोहोचला आहे. या दणदणीत विजयानंतर आता सर्वांचे लक्ष ठाण्याच्या महापौरपदावर कुणाची वर्णी लागणार […] The post TMC Election Mayor : ठाण्याच्या महापौरपदी शिंदे कुणाला देणार बढती ? ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत appeared first on Dainik Prabhat .
सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
पुणे : शहरात आयोजित ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दि. १९ जानेवारी रोजी पुणे महानगरपालिकेच्या ठराविक क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा महत्त्वपूर्ण आदेश आज निर्गमित केला. १९ जानेवारी […] The post सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
डॉ.आंबेडकर महाविद्यालयात मंगळवारी आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
पुणे – पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या येरवडा येथील डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने येत्या मंगळवारी (दि.२०) सकाळी १० वाजता सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहयोगातुन व पुढाकाराने दरवर्षी ही वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येते. यंदाही या स्पर्धेसाठी नियोजन करण्यात आले आहे. कनिष्ठ विभागासाठी डॉ. बाबासाहेब […] The post डॉ.आंबेडकर महाविद्यालयात मंगळवारी आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा appeared first on Dainik Prabhat .
Mamata Banerjee : “ममतांचा बंगालला बांगलादेश करण्याचा प्रयत्न”; भाजपचा गंभीर आरोप
Mamata Banerjee – पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती ब्रिटिशांनी १९०५ मध्ये केलेल्या बंगालच्या फाळणीची आठवण करून देणारी असल्याचा आरोप करत भाजपने शनिवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तीव्र टीका केली. एसआयआर थांबवण्यासाठी आणि बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांचे संरक्षण करण्यासाठी राज्यात हिंसाचाराला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पक्षाच्या मुख्यालयात […] The post Mamata Banerjee : “ममतांचा बंगालला बांगलादेश करण्याचा प्रयत्न”; भाजपचा गंभीर आरोप appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : “निवडणुका संपल्या, आता आमचा कोणीही शत्रू नाही. जे असतील, ते आमचे वैचारिक विरोधक आहेत. त्यामुळे मुंबईच्या विकासाच्या अजेंड्याला जे साथ देतील, त्यांना सोबत घेऊ. जे साथ देणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढे जाऊ. पण, मुंबई आता थांबणार नाही”, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मांडली.मुंबई पालिका निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप उमेदवारांचा शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांना संबोधित करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह भाजपचे मुंबईतील वरिष्ठ नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, “काहीजण सांगू लागले आहेत, गेल्यावेळी तुमच्या ८२ जागा आल्या होत्या, त्यात आला केवळ ७ जागांची वाढ झाली, तुम्ही असे कोणंते मोठे यश मिळवले. पण, त्यांना मला सांगायचे आहे, गेल्यावेळी आम्ही २२७ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी ८२ जिंकलो होतो. पण, यंदा १३५ लढवून ८९ जिंकलो आहोत. एकट्या भाजपला मुंबईत ४५ टक्के मतदान झाले. उबाठाचा विचार करता, भाजपपेक्षा ३० अधिक जागा लढवूनही ते २७ टक्क्यांवर आहेत. गेल्या तीन निवडणुकांत जो सगळ्यात मोठा पक्ष होता, त्याला ८९ जागा कधीच मिळाल्या नव्हत्या. भाजपने कमी जागा लढवून देखील, ते साध्य करून दाखवले.”फडणवीस म्हणाले, मुंबईतील कुठलाही विभाग बघा, झोपडपट्टीपासून ते टोलेजंग इमारतींपर्यंत सगळ्या समाजाने भाजपला मतदान केले आहे. भाषेच्या, जातीच्या पलिकडे, प्रत्येक समाज भाजपसोबत उभा राहिला आहे. विशेषतः जे लोक मराठी माणसाला आपली जहागीर समजत होते, त्यांच्या हे लक्षात आले आहे, की मुंबईतील मराठी माणूस हा विकासासोबत म्हणजे भाजपसोबत आहे. भाजपने सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी यश मिळवले आहे. त्यासाठी अमित साटम यांचे अभिनंदन. अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप चांगले योगदान दिले. निवडणूक प्रमुख आशिष शेलार आणि सगळ्या आमदारांनी पूर्ण ताकदीने आपापल्या क्षेत्रात प्रचंड मोठा विजय खेचून आणला. त्यामुळे हा टीम मुंबई भाजपचा विजय आहे.आता मराठी माणूस मुंबईबाहेर जाणार नाही“या विजयाने आम्ही आनंदीत आहोत. पण, हा आनंद उन्मादात परिवर्तीत होऊ देणार नाही. ज्या दिवशी महायुतीचा महापौर मुंबई पालिकेत बसेल, त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही कामाला लागू आणि मुंबईला जगातील उत्तम शहर बनवण्यासाठी प्रयत्न करू. या मुंबईतून एकही मराठी माणूस बाहेर जाणार नाही. झोपडपट्टी, चाळीत, पागडीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना हक्काचे घर देण्याचा संकल्प आम्ही पूर्ण करू. मुंबईची हवा शुद्ध झाली पाहिजे, या अजेंड्यावर काम करू”, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मुंबई ‘लिव्हेबल’ आणि ‘लव्हेबल’ बनवूदेवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी मुंबईकरांना विश्वास देतो, की सध्या हातात घेतलेली विकासकामे पुढच्या दोन-तीन वर्षांत पूर्ण करू आणि नवीन कामे हाती घेऊ. मुंबई ‘लिव्हेबल’ आणि ‘लव्हेबल’ बनवू. सर्व नगरसेवकांना माझी विनंती आहे, की हा विश्वास मुंबईकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीने केलेल्या विकासावर दाखवलेला आहे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाला या विश्वासाला पात्र ठरावे लागेल. या महापालिकेत पारदर्शी आणि प्रामाणिकतेने कारभार चालवावा लागेल. मुंबई पालिका पूर्णपणे लोकाभिमूख पद्धतीने चालवावी लागेल, जनतेचेच राज्य महापालिकेत चालले पाहिजे, अशा पद्धतीने कारभार चालवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तरच पुढच्या काळात मुंबईकरांसमोर ताठ मानेने जाता येईल. ”
मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणताही वाद नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणताही वाद नाही महापौरपदाचा निर्णय एकनाथ शिंदे, मी आणि दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून घेऊ, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असले तरी संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निकालांकडे लागले होते. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. दुसरीकडे उबाठा आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या आघाडीने ७० हून अधिक जागांवर विजय मिळवला असून विरोधी बाकांवरही मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे.मुंबईत भाजपने ८९ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ताकद सिद्ध केली आहे. तर महायुतीतील शिवसेनेने २९ जागा जिंकत सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या निकालानंतर आता मुंबईचा पुढील महापौर कोण होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.महापौरपदाबाबत शिवसेनेतील काही नवनिर्वाचित नगरसेवक आणि नेत्यांनी आपली अपेक्षा व्यक्त केली होती. यावर प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, त्यांनी कोणताही वाद होणार नसल्याचे स्पष्ट केले. महापौरपदाचा निर्णय एकनाथ शिंदे, मी आणि दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून घेऊ, असे त्यांनी सांगितले.मुंबई महापौरपदाबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली जाईल. महापौर कोण असेल, किती काळासाठी असेल आणि सत्तेचे नियोजन कसे असेल, याचा निर्णय परस्पर समन्वयातून घेतला जाईल. कोणताही संघर्ष न करता दोन्ही पक्ष एकत्रितपणे मुंबईचे प्रशासन सक्षमपणे चालवतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
Amelia Kerr creates history in WPL 2026 : महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ मध्ये यूपी वॉरियर्सने सलग दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवला. दरम्यान या सामन्यात मुंबई इंडियन्सची स्टार अष्टपैलू खेळाडू अमेलिया केरने आपल्या नावावर एका सुवर्ण विक्रमाची नोंद केली आहे. यूपी वॉरियर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात अमेलिया केरने डब्ल्यूपीएलच्या इतिहासात ५० विकेट्स पूर्ण करण्याचा पराक्रम केला. […] The post Amelia Kerr Record : अमेलिया केरने रचला इतिहास! महिला प्रीमियर लीगमध्ये ‘हा’ खास पराक्रम करणारी पहिलीच खेळाडू appeared first on Dainik Prabhat .
नाशिकमध्ये शिंदेसेना सत्तेत की विरोधी बाकावर?
नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने 72 जागा जिंकत पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 62 जागांचा टप्पा भाजपने सहज ओलांडला असून, कोणाच्याही पाठिंब्याशिवाय सत्ता स्थापन करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपला थेट आव्हान देत महापौरपदाचे स्वप्न पाहणाऱ्या शिंदेसेनेला मात्र केवळ 26 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यंदा मतदानाची टक्केवारी […] The post नाशिकमध्ये शिंदेसेना सत्तेत की विरोधी बाकावर? appeared first on Dainik Prabhat .
कैरो : नाईल नदीवर इथिओपियाने बांधलेल्या विशाल धरणामुळे उद्भवलेल्या पाणी वाटप तंट्यामध्ये मध्यस्थी पुन्हा सुरू करण्याची तयारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखवली आहे. त्यांच्या या भूमिकेचे इजिप्त आणि सुदानने स्वागत केले आहे. इथिओपियाने नाईल नदीवर बांधलेल्या ग्रँड इथिओपियन रेनेसान्स डॅम नावाचे विशाल धरणाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. या धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून ५ हजार […] The post Nile River : नाईल नदी पाणी वाटप प्रकरणी ट्रम्प यांची मध्यस्थीची तयारी; इजिप्त आणि सुदानने केले स्वागत appeared first on Dainik Prabhat .

23 C