West Bengal : पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे ‘भरोसा पत्र’ जाहीर
भाजपकडून “सोनार बांग्ला” घडवण्याचा व्यक्त केला निर्धारकोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला अवघे 13 दिवस उरले असताना भाजपने आज, शुक्रवारी कोलकाता येथे आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या जाहीरनाम्याचे प्रकाशन करत त्याला “भरोसा पत्र” असे नाव दिले.https://prahaar.in/2026/04/10/us-200-million-drone-mq-4c-triton-disappears-over-strait-of-hormuz/या कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी सांगितले की, हे संकल्प पत्र म्हणजे जनतेवरील विश्वासाचे प्रतीक आहे आणि “सोनार बांग्ला” घडवण्याचा संकल्प यामध्ये आहे. त्यांनी दावा केला की बंगालची जनता यावेळी भाजपला सरकार स्थापन करण्याची संधी देईल. या ‘भरोसा पत्रा’मध्ये महिला आणि तरुणांसाठी आर्थिक सहाय्याच्या अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. प्रत्येक महिन्याच्या 1 ते 5 तारखेच्या दरम्यान महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये थेट जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच बेरोजगार तरुणांना दरमहा 3 हजार रुपये भत्ता देण्याचेही वचन देण्यात आले आहे.अमित शहा यांनी सांगितले की, भाजप सरकार आल्यास थकित महागाई भत्ता देण्यात येईल आणि सत्तेत आल्यानंतर 45 दिवसांच्या आत सातवे वेतन आयोग लागू केले जाईल. तसेच आयुष्मान भारतसह सर्व केंद्रीय योजना पश्चिम बंगालमध्ये लागू केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.https://prahaar.in/2026/04/10/ipl-2026-hasaranga-lucknows-headache-glow-star-spinner-hasaranga-out-of-the-rest-of-the-tournament/त्यांनी पुढे म्हटले की, घुसखोरीवर “झिरो टॉलरन्स” धोरण राबवले जाईल आणि सीमा पूर्णपणे सील करण्यात येतील. यासोबतच गायींच्या तस्करीवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.याशिवाय, राज्यात एक कोटी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच पुढील 6 महिन्यात समान नागरी कायदा लागू करण्याचेही वचन त्यांनी दिले. पश्चिम बंगालमध्ये बदलाची गरज असून लोक आता नव्या दिशेने विचार करत असल्याचे शाह यांनी यावेळी सांगितले.
Pune FDA Action : पुण्यात एफडीएची कारवाई; मावळमध्ये भेसळयुक्त आंबा पल्प जप्त
पुणे : उन्हाळ्यात नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान मावळ तालुक्यातील एका ठिकाणी भेसळयुक्त आंबा पल्प तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत एकूण 2 लाख 23 हजार 196 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.https://prahaar.in/2026/04/10/pune-crime-shocking-incident-in-pune-inside-a-shops-changing-room-in-kamshet/गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने संबंधित उत्पादन युनिटवर छापा टाकला. तपासणीदरम्यान आंबा पल्प तयार करताना अधिकृत नसलेले रंग व इतर भेसळीचे घटक वापरले जात असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून आंबा पल्प, आंबा फळ तसेच साखर, गायीचे दूध आणि द्रव केशरी रंग अशा घटकांसह एकूण सहा नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या ठिकाणी साठवून ठेवलेला 3,282.9 किलो इतका 1 कोटी 61 लाख 816 किंमतीचा माल जप्त केला. नाशवंत स्वरूप लक्षात घेऊन हा साठा नष्ट करण्यात आला.https://prahaar.in/2026/04/09/pune-news-manjari-station-to-undergo-transformation-ramtekdi-to-get-a-new-block-station/
Picture Boys : ‘छोट्या पुढारी’चा मोठ्या पडद्यावर धमाका; ‘पिक्चर बॉईज’मधून पहिली एन्ट्री
Picture Boys : पिक्चर बॅाइज या सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून, या सिनेमातून घनश्याम दरोडे मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
Transport Minister Pratap Sarnaik's announcement : ठाणेकरांची हक्काची मेट्रो तीन महिन्यांत रुळावर
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; घोडबंदर रोडचे पावसाळ्यापूर्वी रुंदीकरणमुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) वाहतूक कोंडीचा विळखा सैल करण्यासाठी राज्य सरकारने मेट्रो प्रकल्पांना वेग दिला असून, रखडलेला 'मेट्रो १०' चा मार्ग येत्या ३ ते ४ महिन्यांत प्रवाशांसाठी खुला होईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी केली. यासोबतच घोडबंदर रस्ता रुंदीकरण आणि अत्याधुनिक 'पॉड टॅक्सी' प्रकल्पाबाबत त्यांनी सरकारचा आराखडा मांडला.मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सरनाईक बोलत होते. यावेळी त्यांनी ठाणे आणि मिरा-भाईंदर पट्ट्यातील वाहतूक सुलभ करण्यासाठी ८ हजार कोटी रुपयांच्या विशेष नियोजनाची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वीच काशिगाव ते दहिसर मेट्रोचे लोकार्पण झाले. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार काशिगाव ते गायमुख हा मार्ग थेट 'मेट्रो ४' (वडाळा-कासारवडवली) ला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साधारण ८ हजार कोटी रुपये खर्चून होणाऱ्या या नवीन मेट्रो जोडणीमुळे मिरा-भाईंदरकरांना ठाणे आणि मुंबईशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.आता ठाणे, नवी मुंबईतही 'पॉड टॅक्सी'मुंबईच्या धर्तीवर आता ठाणे आणि नवी मुंबईतही 'पॉड टॅक्सी' सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एमएमआरडीएने स्थानिक महापालिकांशी समन्वय साधून या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत. तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर निविदा काढण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.घोडबंदर रोडचा अडथळा दूरघोडबंदर रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी पावसाळ्यापूर्वी या मार्गाचे रुंदीकरण पूर्ण केले जाणार आहे. रस्त्यातील विद्युत खांब आणि मेट्रो कामांमधील तांत्रिक अडथळे आता दूर झाले आहेत. गायमुख ते दहिसर रस्ता रुंदीकरणात ज्यांच्या जमिनी संपादित केल्या जातील, त्यांना एफएसआय किंवा टीडीआरच्या स्वरूपात मोबदला दिला जाईल. विशेषतः आदिवासी बांधवांच्या जमिनींबाबत संवेदनशील निर्णय घेऊन त्यांना न्याय दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
Online Payment : फसवणुकीचा धोका कमी होणार ? लवकरच RBI आणणार नवा नियम
मुंबई : देशातभरातील ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक मोठा उपाय प्रस्तावित केला आहे. यामध्ये १०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या डिजिटल पेमेंटसाठी एक तासाचा विलंब किंवा 'कूलिंग-ऑफ' कालावधी लागू करण्याची शिफारस केली गेली आहे.वाढत्या ऑनलाईन पेमेंटच्या काळात डिजिटल फसवणुकीचे प्रमाणही वाढत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं नवीन नियम प्रस्तावित केले असून ऑनलाइन पेमेंट अधिक सुरक्षित करणं आणि लोकांच्या पैशांचं फसवणुकीपासून संरक्षण करणं हा यामागचा उद्देश आहे. आरबीआयनं या सूचना एका चर्चापत्राच्या स्वरूपात प्रसिद्ध केल्या असून त्यावर ८ मे २०२६ पर्यंत जनता आणि तज्ञांकडून अभिप्राय मागवले आहेत.ऑनलाइन पेमेंटचा वापर झपाट्यानं वाढत असतानाच फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलनुसार, २०२५ मध्ये अंदाजे २२,९३१ कोटी रुपयांच्या तब्बल २८ लाख फसवणुकीच्या घटनांची नोंद झाली. त्यामुळे डिजिटल सुरक्षा मजबूत करण्याची तातडीची गरज स्पष्टपणे दिसून येते.डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक १०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या डिजिटल व्यवहारांवर (UPI किंवा IMPS/अकाउंट-टू-अकाउंट) एक तासापर्यंतचा 'कूलिंग पीरियड' लागू केला जाऊ शकतो. म्हणजे एखाद्यानं नवीन खात्यात १०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित केली, तर ती रक्कम त्वरित जमा होणार नाही तर त्यासाठी एक तास लागणार आहे.१०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ट्रान्सफरसाठी एक तास विलंब होईल, आणि तोपर्यंत ग्राहक आपले व्यवहार रद्दही करू शकतात. यामुळे एखाद्याच्या लक्षात आलं की त्यांनी चुकून किंवा फसवणुकीनं पैसे पाठवले आहेत, तर एका निश्चित कालावधीत व्यवहार रद्द करता येतील. अशाप्रकारे, लोकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी हे नवीन नियम उपयुक्त ठरू शकते.https://prahaar.in/2026/04/10/nanded-railway-trains-are-available-for-north-indians-from-maharashtra-but-when-will-the-nanded-express-start/त्याचवेळी, रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावानुसार ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ७० पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी ५०००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या हस्तांतरणासाठी विश्वासू व्यक्तीची परवानगी अनिवार्य असेल. तसेच वैयक्तिक आणि लहान व्यवसाय खात्यांमधील २.५ लाखांपेक्षा जास्त ठेवींसाठी बँक पडताळणीनंतरच निधी जमा केला जाईल.रिझर्व्ह बँक Kill Switch चाही विचार करत आहे, जे एक बटन असेल ज्यामुळे ग्राहकांना एकाच वेळी सर्व डिजिटल पेमेंट चॅनेल (यूपीआय, कार्डधारक आयडी आणि इंटरनेट बँकिंग) बंद करायची सुविधा उपलब्ध होईल.
IPL 2026 Wanindu Hasaranga : लखनऊची डोकेदुखी वाढली! स्टार स्पिनर हसरंगा उर्वरित स्पर्धेतून बाहेर
श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) दुखापतीमुळे चालू आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्स ने याची अधिकृत पुष्टी केली आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे हसरंगा अद्याप पूर्णपणे सावरू शकलेला नाही. लखनऊ सुपर जायंट्स पुढील २४-४८ तासांत हसरंगाच्या जागी पर्यायी खेळाडूची घोषणा करू शकतात.संघाचे ग्लोबल डायरेक्टर टॉम मूडी यांनी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएल प्रसारकाला सांगितले की, “वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) संघात सहभागी होऊ शकणार नाहीत आणि त्यांच्या जागी दुसरा खेळाडू घेण्याची प्रक्रिया आम्ही पुढील २४ ते ४८ तासांत पूर्ण करू.” हसरंगा जवळपास दोन महिन्यांपासून स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. वृत्तांनुसार, तो अद्याप गोलंदाजी करण्यास सक्षम नाही आणि त्याने श्रीलंका क्रिकेटकडून अनापत्ती प्रमाणपत्र (NOC) साठीही अर्ज केलेला नाही.अहवालांनुसार, दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू जॉर्ज लिंडे याला हसरंगाच्या पर्याय म्हणून संघात सामील करण्याची शक्यता आहे. या डावखुऱ्या गोलंदाजाने अद्याप आयपीएलमध्ये एकही सामना खेळलेला नाही. त्याने शेवटचा टी-२० सामना न्यूझीलंडविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत खेळला, ज्यामध्ये चार डावांत त्याला केवळ एकच विकेट मिळाली होती. तो टी-२० विश्वचषकातही खेळलेला आहे. गेल्या १२ महिन्यांत तो SA20, ‘द हंड्रेड’, ‘मेजर लीग क्रिकेट’ आणि PSL अशा विविध फ्रँचायझी लीग्समध्ये सहभागी झाला होता.https://prahaar.in/2026/04/09/bangladesh-finally-relents-bangladesh-cricket-board-invites-india/लखनऊ सुपर जायंट्सने मागील लिलावात हसरंगाला (Wanindu Hasaranga) २ कोटी रुपयांत खरेदी केले होते, मात्र दुखापतीमुळे तो संघात सहभागी होऊ शकला नाही. फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान श्रीलंकेच्या पहिल्याच सामन्यात डाव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाल्यापासून तो मैदानापासून दूर आहे.हसरंगाने आपल्या आयपीएल कारकिर्दीत एकूण ३७ सामने खेळले असून २४.३२ च्या सरासरीने ४६ विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याने एकदा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. मागील हंगामात तो राजस्थान रॉयल्स चा भाग होता, तर २०२१ ते २०२३ दरम्यान तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कडून खेळला होता.
Nani Dacoit Review: ‘डकैत’चा धमाका! नानीने म्हटलं ब्लॉकबस्टर, अदिवी शेषची करिअरमधली बेस्ट कामगिरी
Nani Dacoit Review नानी यांनी विशेषतः अदिवी शेषच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं. त्यांच्या मते, हा अदिवी शेषच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम परफॉर्मन्स आहे. त्यांनी या भूमिकेत स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आहे, असंही नानी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Melania Trump:
Israel - Pakistan Verbal Clash : आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ! पाकिस्तान - इस्रायलमध्ये शाब्दिक चकमक
- ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्यावर इस्रायल संतप्तइस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने पाकिस्तानच्या (Israel - Pakistan Verbal Clash) संरक्षणमंत्र्यांनी इस्रायलच्या विनाशाबद्दल केलेल्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन वादाला सुरुवात झाली आहे.पाकिस्तानने केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आणि अस्वीकार्य :इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले की, पाकिस्तानचे (Israel - Pakistan Verbal Clash) संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलच्या विनाशाबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आणि अस्वीकार्य आहे. त्यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारचे विधान कोणत्याही सरकारकडून स्वीकारले जाऊ शकत नाही, विशेषतः जेव्हा ते स्वतःला शांततेचे समर्थक म्हणवतात. हे वक्तव्य अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा ख्वाजा आसिफ यांच्या वादग्रस्त विधानाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती. त्यांनी सोशल मीडियावर इस्रायलविरोधात कठोर शब्दांचा वापर केला होता.इस्रायल आपल्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही :इस्रायलचे परराष्ट्रमंत्री (Israel - Pakistan Verbal Clash) गिदोन सार यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया देत स्पष्ट केले की, इस्रायल आपल्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. त्यांनी पाकिस्तानवर गंभीर आरोप करत म्हटले की, इस्रायलला “कॅन्सर” म्हणणे हे केवळ आक्षेपार्ह नसून देशाच्या अस्तित्वावर उघडपणे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. त्यांनी याला यहुदीविरोधी मानसिकतेचे उदाहरण ठरवत सांगितले की, इस्रायल आपल्या विनाशाची भाषा करणाऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध स्वतःचे संरक्षण करेल.https://prahaar.in/2026/04/09/china-ai-robot-wolf-army-ai-dogs-will-fight-drones-in-the-future-chinas-robot-wolf-army-ready-for-future-war/नेमकं प्रकरण काय ?पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ (Israel - Pakistan Verbal Clash) यांनी याआधी सोशल मीडियावर इस्रायलला “मानवतेसाठी अभिशाप” असे संबोधले होते. त्यांनी लेबनानमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराला नरसंहार म्हटले आणि निर्दोष लोकांचे जीव जात असल्याचा आरोप केला होता. यावर इस्रायलने तीव्र नाराजी व्यक्त करत हे वक्तव्य अत्यंत गंभीर आणि अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली असून, एकीकडे याला कूटनीतिक तणाव म्हणून पाहिले जात आहे, तर दुसरीकडे दोन्ही देशांमधील वाढत्या वक्तव्ययुद्धाचा भाग मानले जात आहे.लेबनानमध्ये कोणताही युद्धविराम लागू नाही :दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले की, लेबनानमध्ये कोणताही युद्धविराम लागू नाही. त्यांनी सांगितले की, इस्रायल हिजबुल्लाविरुद्ध पूर्ण ताकदीने कारवाई सुरू ठेवेल आणि आपल्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित होईपर्यंत थांबणार नाही.दुसरीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या एका विधानामुळे गोंधळ निर्माण झाला होता, ज्यात त्यांनी लेबनानही युद्धविराम कराराचा भाग असल्याचे म्हटले होते. मात्र, हा दावा डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलने फेटाळून लावला आहे.
Chhattisgarh Accident : छत्तीसगड हादरलं! लग्नावरून परतताना भीषण अपघात; ६ ठार, ३ गंभीर जखमी
छत्तीसगडमधील कांकेर (Chhattisgarh Accident) जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (९ एप्रिल) उशिरा रात्री नाथिया नवागावाजवळ दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.नेमकं प्रकरण काय ?कोतवाली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात (Chhattisgarh Accident) झाला. मृत कुटुंब कांकेरमधील उडकुडा येथील रहिवासी होते. सांगितले जात आहे की, सर्वजण चीवरांज येथे लग्न समारंभाला उपस्थित राहून आपल्या गावाकडे उडकुडाला परतत होते. त्यावेळी नाथिया नवागावाजवळ त्यांच्या गाडीची दुसऱ्या गाडीशी धडक झाली. दोन्ही गाड्या वेगात होत्या आणि धडक इतकी भीषण होती की वाहनांचे तुकडे तुकडे झाले.गाडीमधील एकाच कुटुंबातील ३ महिला, २ पुरुष आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या गाडीमधील ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.सर्वांची प्रकृती गंभीर :घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी (Chhattisgarh Accident) पोहोचले आणि जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कांकेरचे पोलीस अधीक्षक निखिल राखेचा यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. अपघातातील तिन्ही जखमींना तातडीने अॅम्ब्युलन्सच्या मदतीने जिल्हा रुग्णालय कांकेर येथे हलविण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सर्वांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.पोलिसांकडून पुढील चौकशी सुरु :कांकेरचे पोलीस अधीक्षक निखिल राखेचा यांनी सांगितले की, नाथिया नवागावाजवळ दोन गाड्यांच्या धडकेत (Chhattisgarh Accident) सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून मृतांची ओळख पटवणे आणि इतर माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. जखमींवर उपचार झाल्यानंतर त्यांच्याकडूनही माहिती घेतली जाणार आहे. मृतदेहांचा पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी मॉर्चुरीमध्ये ठेवण्यात आले असून, पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. (Chhattisgarh Accident)
Monalisa Farman Wedding : अल्पवयीन मोनालिसाने फर्मानशी लग्न केलं खरं पण आता जावं लागणार जेलमध्ये?
मुंबई : प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात माळा विकणारी एक गरीब मुलगी मोनालिसा एका व्हिडीओमुळे रातोरात स्टार झाली. तिच्या सुंदर डोळ्यांमुळे ती पटकन प्रसिद्धीच्या झोतात आली. अनेक मोठे दिग्दर्शक तिला आपल्या सिनेमांमध्ये घेऊ इच्छित होते, तिला अनेक सिनेमांच्या ऑफर सुद्धा येऊ लागल्या. कुंभमेळ्यात माळा विकणारी गरीब मुलगी ते थेट अभिनेत्री असा तिचा प्रवास झाला.https://prahaar.in/2026/04/10/nashik-it-company-busted-undercover-police-uncover-physical-harassment-and-forced-conversion-plot/त्यानंतर डायरेक्टर्स सोबत झालेले वाद यांसारख्या अनेक प्रकरणांमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकलेली होती. नुकतंच तिने केरळात जाऊन एका मुस्लिम मुलाशी लग्न केल्यामुळे ती आणखी वादाच्या भोवऱ्यात अडकली. अनेकांनी या प्रकरणाला लव्ह जिहाद असे म्हटले आहे. तसेच आता आणखी एक माहिती उघड झाली आहे. ती म्हणजे मोनालिसा अल्पवयीन आहे, तिने खोटे जन्म प्रमाणपत्र सादर करत एका मुस्लिम मुलाशी लग्न केले.NCST चा तपासराष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग म्हणेजच NCST ने या प्रकरणात तपास केला आणि तपासात अशा काही गोष्टी समोर आल्या ज्यामुळे मोनालिसाशी लग्न करणाऱ्या फर्मान खानच्या अडचणी वाढल्या आहेत. मध्य प्रदेशातील पोलीस ठाण्यात फर्मान विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यात पॉक्सो अंतर्गत त्याच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. मोनालिसा अल्पवयीन असल्याचे कळताच NCST अंतर्गत चौकशी पथक स्थापन करण्यात आले. केरळपासून मध्य प्रदेशपर्यंत सखोल तपास केला गेला आणि ३ दिवसात अहवाल आयोगाला सादर झाला.https://prahaar.in/2026/04/10/middle-east-war-trump-expresses-displeasure-over-irans-tax-collection-in-the-strait-of-hormuz/बनावट कागपत्रतपासात अनेक खुलासे झाले. मोनालिसाने लग्नासाठी वापरलेले जन्म प्रमाणपत्र बनावट होते. केरळमध्ये विवाह नोंदणीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये तिची जन्मतारीख १ जानेवारी २००८ अशी नमूद होती. परंतु महेश्वर येथील सरकारी रुग्णालयाच्या नोंदीनुसार मोनालिसाचा जन्म ३० डिसेंबर २००९ रोजी झाला आहे. यानुसार ११ मार्च २०२६ रोजी लग्न झाले तेव्हा ती १६ वर्षांची होती. आता तपास पथकाने तिचे बनावट दस्तऐवज अधिकृतपणे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे मोनालिसा आणि फर्मानला अटक होण्याची शक्यता आहे.
मुंबई : मुंबईतून उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवनवीन गाड्या उपलब्ध होत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या प्रवाशांनाच प्रतीक्षा करावी लागत आहे. मुंबई ते नांदेड या प्रस्तावित रेल्वेगाडीला मंजूरी मिळूनही आता तब्बल २ वर्षे झाली तरीही ही गाडी अजूनही फक्त कागदावरच असल्यानं प्रवाशांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे.ऑगस्ट २०२३ रेल्वे बोर्डानं एलटीटी ते नांदेड या नवीन रेल्वेला हिरवा कंदील दाखवला होता. मात्र,या गाडीच्या उद्घाटनाची फेरी काढून दररोज ही सेवा सुर करण्याचे आदेशही दिले गेले होते. पण, आज २ वर्षे झाली तरी या मार्गावर एकही गाडी धावली नाही.ही गाडी नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पण सध्या या भागात मुंबईसाठी हव्यातशा रेल्वे गाड्या नाहीत. ज्या गाड्या उपलब्ध आहेत त्यामध्ये प्रचंड गर्दी आणि तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. वंदे भारत सारख्या महागड्या गाड्या या सर्वसामान्यांना परवडत नाही, त्यामुळे प्रवाशांना हतबल होऊन खाजगी बसनं महागडा प्रवास करावा लागत आहे.https://prahaar.in/2026/04/09/municipal-corporation-ward-room-regarding-cleanliness-municipal-commissioner-gives-instructions/विशेष म्हणजे नांदेडची गाडी रखडली असताना मध्य रेल्वेनं मुंबई ते धनबाद अर्थात बिहारसाठी नवीन साप्ताहिक गाडी ८ एप्रिल२०२६ पासून सुरु केली आहे. याबाबत मराठवाड्यातील जनतेनं परराज्यातील गाड्यांना प्राधान्य दिले जात असताना महाराष्ट्रातील हक्काच्या रेल्वेकडे दुर्लक्ष का केले जात आहे?असा प्रश्न विचारत आहेत.माहितीनुसार दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितलं की, बऱ्याच तांत्रिक अडचणी आणि वाहतुकीच्या कारणांमुळे ही गाडी सुरु होऊ शकली नाही, मात्र, त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांत हे प्रयत्न नक्की यशस्वी होणार याची प्रतीक्षा नांदेडकर करत आहेत.
Justice Yashwant Verma: अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवला आहे.
Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्या नावाची चर्चा महावतार सिनेमासाठी होती. आता तिच्या हातून हा अत्यंत महत्वाचा सिनेमा गेला आहे.
Ayesha Takia: ट्रोलिंगनंतरही ठाम उभी! आयशा टाकियाची ट्रान्सफॉर्मेशन स्टोरी पुन्हा चर्चेत
Ayesha Takia आयशाने खूप लहान वयातच करिअरची सुरुवात केली. अवघ्या १३व्या वर्षी तिने जाहिरातींमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यानंतर ती म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली, जिथे तिने शाहिद कपूर आणि फाल्गुनी पाठक यांच्यासोबत काम केलं. तिच्या या कामामुळे ती प्रेक्षकांच्या नजरेत आली.
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारला त्याच्या आगामी 'भूत बंगला'(Bhooth Bangla) या हॉरर-कॉमेडी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान स्टंट करताना दुखापत झाली. सिनेमाच्या निर्मात्यांनी गुरुवारी म्हणजेच ९ एप्रिल २०२६ रोजी शेअर केलेल्या एका Behind The Scenes व्हिडिओमध्ये, अक्षय ॲक्शन सीन करताना दिसतोय. आपले अनेक स्टंट्स स्वतःच करण्यासाठी ओळखणारा जाणारा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) या व्हिडिओमध्ये, हवेत उडी मारून 'जंप किक' मारताना दिसतोय. मात्र, जमिनीवर उतरताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. यावेळी अक्षयला दुखापत झाली.अक्षयनं केवळ 'व्हिज्युअल इफेक्ट्स' किंवा कृत्रिम तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्यापेक्षा, प्रत्यक्ष स्टंट्स स्वतःच करण्याच्या आपल्या पसंदीबद्दल नुकताच भाष्य केलं होतं. अक्षय म्हणालेला की, VFX किंवा AI चा अतिवापर केल्यास ॲक्शन सीनचा खरेपणा आणि त्यातील थरार कमी होऊ शकतो. तसेच, प्रत्यक्ष स्टंट्समुळे प्रेक्षकांना त्या सादरीकरणामागे घेतलेले कष्ट खऱ्या अर्थाने अनुभवता येतात, असेही यावेळी तो म्हणाला.या सिनेमात अक्षयबरोबरच परेश रावल, असरानी, राजपाल यादव, तब्बू आणि वामिका गब्बी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 'भूत बंगला' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकताच पुढे ढकलण्यात आली असून सुरुवातीला हा सिनेमा १० एप्रिल २०२६ रोजी रिलीज होणार होता, परंतु आता हा सिनेमा १६ एप्रिल २०२६ रोजी रिलीज होणार आहे.#AkshayKumar sir injured himself on the set of #BhoothBangla while filming his action scenes.#BhoothBangla has many secrets and thrilling scenes…. Just wait till the release “IT HAS MANY LAYERS” pic.twitter.com/GCJoOS386A— Akkian by heart (Viratian by Dil) (@DevoteeAkki) April 9, 2026या सिनेमाबद्दल इन्स्टाग्रामवर माहिती देत एकता कपूरनं लिहिलं की, 'आमचे डिस्ट्रिब्युटर्स आणि सिनेमागृह मालकांशी एकत्रित चर्चा केल्यानंतर, आम्ही 'भूत बंगला'च्या प्रदर्शनासाठी १६ एप्रिल २०२६ ही नवीन तारीख निश्चित केली असून या दिवशी रात्री ९ वाजता सिनेमाचा पहिला शो सुरू होईल. 'धुरंधर: द रिव्हेंज' हा सिनेमा अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत असल्याची बातमी खूप चांगली आहे. या बदलामुळे दोन्ही सिनेमांना प्रसिद्धी मिळवता येईल.'https://prahaar.in/2026/04/09/dhurandar-2-record-breaking-box-office-earnings-now-dhurandar-2-will-be-released-on-ya-ott-platform/'भूत बंगला' सिनेमा 'बालाजी मोशन पिक्चर्स' आणि 'केप ऑफ गुड फिल्म्स' यांच्या संयुक्त विद्यमानं सादर करण्यात आला असून सिनेमाची निर्मिती अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी केली आहे. तसेच सिनेमाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं आहे. येत्या १६ एप्रिल २०२६ रोजी भूत बंगला सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
नाशिक : नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत सुरू असलेल्या लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या काळ्या कारभारावर पोलिसांनी अखेर हातोडा टाकला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत गोपनीयरीत्या राबवलेल्या 'स्पेशल ऑपरेशन'मध्ये एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे. कंपनीतील उच्चशिक्षित तरुणींना करिअरच्या प्रगतीचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केले जात होते. इतकेच नव्हे, तर त्यांच्यावर विशिष्ट धर्माची संस्कृती लादून त्यांचे धर्मांतर करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार तपासात निष्पन्न झाला आहे. पीडित तरुणी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी धाडसी पाऊल उचलत या रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेबाबत आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.https://youtu.be/9yrFEN2Ob6M?si=McJj3t-IuSr-GGaWमहिला अधिकारी वेषांतर करून कंपनीत घुसल्या अन्...मिळालेल्या माहितीनुसार, या महिला अधिकारी कर्मचारी म्हणून कंपनीत दाखल झाल्या होत्या. एका महत्त्वाच्या मीटिंग दरम्यान आरोपींनी महिलांशी अश्लील चाळे आणि गैरवर्तन करण्यास सुरुवात केली, जे या पथकाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. पुरेसा पुरावा मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या. या मोहिमेत पोलिसांनी ४० हून अधिक सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. नाशिक पोलिसांच्या या चोख नियोजनामुळे आणि धाडसी कारवाईमुळे आयटी क्षेत्रातील हे मोठे रॅकेट अखेर उद्ध्वस्त झाले आहे.https://prahaar.in/2026/04/10/middle-east-war-trump-expresses-displeasure-over-irans-tax-collection-in-the-strait-of-hormuz/अश्लील वर्तन....या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी नाशिक पोलिसांनी चित्रपटालाही मागे टाकेल असे अत्यंत गुप्त आणि धाडसी ऑपरेशन राबवून मुख्य सूत्रधारांना बेड्या ठोकल्या आहेत. काही पीडित महिलांनी कंपनीतील छळाबाबत तक्रार केल्यानंतर, पोलिसांनी थेट छापा न टाकता पुरावे गोळा करण्यासाठी एक विशेष सापळा रचला. ७ वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आले. या महिला अधिकाऱ्यांनी सॉफ्टवेअर कामाचे निमित्त काढून कंपनीत प्रवेश केला. तिथे काम करत असताना, कंपनीतील काही वरिष्ठ कर्मचारी आणि टीम लीडर्स महिलांशी लगट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आणि अश्लील वर्तन करत असल्याचे या महिला अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. स्वतःच्या डोळ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर, आम्ही पोलीस आहोत, असे सांगत या पथकाने तातडीने संबंधित आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईनंतर आतापर्यंत ९ पीडित महिलांनी धैर्याने पुढे येत गुन्हे दाखल केले आहेत. तपासातून उघड झाले आहे की, संबंधित आयटी कंपनीत केवळ कामाचेच नव्हे, तर तरुणींचे पद्धतशीरपणे ब्रेनवॉशिंग करण्याचे केंद्र सुरू होते. कंपनीतील काही टीम लीडर्स आपल्या पदाचा गैरवापर करून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे आणि त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे मानसिक परिवर्तन करायचे. हा केवळ वैयक्तिक शोषणाचा भाग नसून त्यामागे धर्मांतराचा एक मोठा मास्टरगेम असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये केवळ महिलांनाच लक्ष्य केले गेले नाही, तर एका तरुणाचेही बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असून, आतापर्यंत दोन विवाहित महिलांसह एकूण आठ तरुणींनी लैंगिक शोषण आणि विनयभंगाच्या तक्रारी दिल्या आहेत, ज्यावरून ९ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींकडून पीडितांवर त्यांच्या मूळ धर्माचा त्याग करून एका विशिष्ट धर्माची संस्कृती स्वीकारण्यासाठी सतत मानसिक दबाव टाकला जात होता. करिअरचे स्वप्न घेऊन आलेल्या तरुणांच्या हतबलतेचा फायदा घेत, त्यांच्यावर धार्मिक विचार लादण्याचे हे मोठे रॅकेट नाशिक पोलिसांनी उघडकीस आणले आहे.कॉर्पोरेट क्षेत्रातील रॅकेटचा पर्दाफाशकॉर्पोरेट जगताला हादरवून सोडणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा नाशिक पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अत्यंत तांत्रिक आणि गोपनीय पद्धतीने तपास चक्रं फिरवून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी संबंधित कंपनीतील सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि महत्त्वाचा डिजिटल डेटा आपल्या ताब्यात घेतला आहे. या तांत्रिक पुराव्यांमुळे रॅकेटचा पर्दाफाश करणे सोपे झाले. नाशिक पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे राज्यातील एका मोठ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, यामागे आणखी कोणते मोठे चेहरे आहेत, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.६ आरोपी अटकेत, पुण्यातून महिला HR ला बेड्याया प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांनी या रॅकेटमधील ६ मुख्य आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एका महिला ह्युमन रिसोर्स (HR) अधिकाऱ्याचा समावेश असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अनेक दिवसांपासून गुंगारा देणाऱ्या या महिला एचआरला पोलिसांनी पुण्यातून शोधून काढत ताब्यात घेतले आहे. पीडित महिलांनी वारंवार कंपनीत तक्रारी केल्या होत्या, मात्र या महिला एचआरने त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले. गुन्हेगारांना पाठीशी घातल्याच्या ठपक्यावरून पोलिसांनी तिला या प्रकरणात सहआरोपी केले आहे. अटकेतील सर्व सहा आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असून, या चौकशीतून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
Alum Benefits: घामाचा वास गायब! उन्हाळ्यात तुरटीचे ५ जबरदस्त उपयोग
Alum Benefits तुरटी ही स्वस्त, सहज मिळणारी आणि बहुपयोगी उपाय आहे. उन्हाळ्यातील अनेक समस्या दूर करण्यासाठी तिचा योग्य वापर केल्यास मोठा फायदा होऊ शकतो.
Eknath Shinde : खरंच ठाकरेंचे खासदार फुटणार? “गेल्या एक-दीड वर्षांपासून…”; एकनाथ शिंदेंनी मौन सोडलं
Eknath Shinde : ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या आठ खासदारांसोबत बैठक झाल्याच्या वृत्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Iran US Ceasefire: अमेरिकी नौदलाचा एक विशेष निगराणी ड्रोन, एमक्यू-४सी ट्रायटन होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अचानक गायब झाला. हा ड्रोन अमेरिकेचा सर्वात महागडा मानला जातो.
Supriya Sule : पंढपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Big Boss Marathi 6 : 'तिच्या भावना खोट्या वाटतात', राखी सांवतबद्दल सागर कारंडे म्हणाला...
मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ यंदा चांगलाच गाजला असून आता बिग बॉस मराठीचे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नुकताच घरातून सागर कारंडेची (sagar Karande) एक्झिट झाली. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात राकेश बापट, राखी सावंत , दीपाली सय्यद, अनुश्री माने, तन्वी कोलते, रेवा कौरासे आणि विशाल कोटियन हे सदस्य उरले आहेत.बिग बॉसच्या घरात राखी सावंतचा नवीन राडा रोजच पाहायला मिळतो. ती सदस्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण लावण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर तिनं राकेशसोबत लव्ह अँगल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राकेशनं तिला मी तुला मैत्रीण मानतो, असं सांगितलं. अशातच आता सागर कारंडेनं एका मुलाखतीत राखी सावंतबद्दल भाष्य केलं आहे.राखी सावंत, दीपालीला राकेशच्या नावानं डिवचत असते. दीपाली आणि राकेशमध्ये चांगली मैत्री असून राखीला त्यांची मैत्री खटकते. यावरून बिग बॉसच्या घरात असताना सागरनेही राखीला समजावलेलं.आता बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच सागर कारंडे म्हणाला की, 'राखीचं नातं हे गेमसाठी आहे. मला माहित आहे की, ती सगळं गेमसाठी करतेय. मला वाटतं की ते गेमसाठीच आहे. खऱ्या भावना असतील तर उत्तम आहे. ती रडली आहे, खूप वेळा भावूक झाली आहे. मला तेव्हा वाटलं होतं की, राकेशबद्दल तिच्या मनात भावना आहेत.' 'पण, का कोणास ठाऊक, त्यावर विश्वास ठेवावासा वाटत नाही. लांडगा आला रे आला म्हणतो ना, की खरोखरचा लांडगा येईल, तेव्हा कोणी विश्वास ठेवणार नाही. राखीचं तसचं झालेलं आहे. खरंच ती भावूक झाली असावी. त्याच्याबरोबर ती जोडली गेली असावी. पण मला ते खोटं वाटतंय. ती गेमसाठी काहीही करू शकते, याची मला खात्री आहे. बिग बॉससाठी ती काहीही करू शकते.' असं सागरनं पुढे सांगितलं आहे.https://prahaar.in/2026/04/09/bigg-boss-marathi-6-rakhi-sawant-crossed-the-limits-made-this-statement-about-deepali-and-rakesh/दरम्यान, नुकताच बिग बॉस सीझन ६ मध्ये 'तिकीट टू फिनाले' चा टास्क तन्वी कोलतेनं जिंकला असून ती फिनालेमध्ये जाणारी पहिली स्पर्धक ठरली आहे. त्यामुळे यंदा बिग बॉस मराठीच्या सीझन ६ कोण जिंकणार ? याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Share Market Update : जागतिक बाजारांकडून सकारात्मक संकेत; आशियाई बाजारही तेजीत
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील शांतता चर्चा पुन्हा मार्गी लागल्याच्या बातमीने बाजारातील वातावरण सुधारत असल्याचे दिसत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील सुरू असलेले युद्ध थांबण्याच्या आशेने बाजारांमध्ये उत्साह आहे. मागील सत्रात अमेरिकन बाजार तेजीसह बंद झाले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज (डीजेआय) फ्युचर्समध्येही आज किंचित वाढ दिसून येत आहे. तथापि, मागील सत्रात युरोपियन बाजार विक्रीच्या दबावाखाली होते. आज आशियाई बाजारांमध्ये सर्वत्र जोरदार तेजी दिसून येत आहे.https://prahaar.in/2026/04/08/share-market-update-share-market-rallies-in-early-trade-sensex-and-nifty-rise/पश्चिम आशियातील सुरू असलेले युद्ध सोडवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे मागील सत्रात अमेरिकन बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, ज्यामुळे वॉल स्ट्रीटवर जोरदार तेजी दिसून आली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज २७५.८८ अंकांनी, म्हणजेच ०.५८ टक्क्यांनी वाढून ४८,१८५.८० अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे, एस अँड पी ५०० निर्देशांक मागील सत्रात ०.६२ टक्क्यांनी वाढून ६,८२४.६६ अंकांवर बंद झाला. शिवाय, नॅसडॅक १८६.६६ अंकांनी, म्हणजेच ०.८२ टक्क्यांनी वाढून २२,८२१.६६ अंकांवर बंद झाला. डाऊ जोन्स फ्युचर्स सध्या ४८,२००.२५ अंकांवर व्यवहार करत असून, त्यात ०.०३ टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आहे.अमेरिकन बाजाराच्या तुलनेत, युरोपियन बाजार मागील सत्रात सतत दबावाखाली राहिला. एफटीएसई निर्देशांक ०.०५ टक्क्यांनी घसरून १०,६०३.४८ अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे, सीएसी निर्देशांक ०.२२ टक्क्यांनी घसरून ८,२४५.८० अंकांवर बंद झाला. याव्यतिरिक्त, डॅक्स निर्देशांक २७३.६४ अंकांनी, म्हणजेच १.१५ टक्क्यांनी घसरून २३,८०६.९९ अंकांवर बंद झाला.https://prahaar.in/2026/04/08/share-market-update-positive-signals-from-global-markets-bullish-trend-prevails-across-asia-as-well/पश्चिम आशियामध्ये शांततेच्या आशेमुळे आज आशियाई बाजारांमध्येही तेजी दिसून येत आहे. आशियाई बाजाराचे सर्व नऊ निर्देशांक तेजीमध्ये व्यवहार करत आहेत. गिफ्ट निफ्टी १०५.५० अंकांनी, म्हणजेच ०.४४ टक्क्यांनी वाढून २३,९८९.५० अंकांवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे, स्ट्रेट्स टाइम्स इंडेक्स ०.१२ टक्क्यांनी वाढून ४,९८२.८२ अंकांवर पोहोचला आहे.जकार्ता कंपोझिट इंडेक्समध्ये आज लक्षणीय वाढ दिसून आली आहे. सध्या, हा निर्देशांक १४८.४२ अंकांनी, म्हणजेच २.०३ टक्क्यांनी वाढून ७,४५६.०१ अंकांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे, कोस्पी निर्देशांक १०१.४० अंकांनी, म्हणजेच १.७५ टक्क्यांनी वाढून ५,८७९.४१ अंकांच्या पातळीवर पोहोचला आहे. टोकियो स्टॉक एक्सचेंज आणि तैवान स्टॉक एक्सचेंजमध्येही आज जोरदार तेजी दिसून येत आहे.आजच्या या वाढीमुळे, टोकियोचा निक्केई निर्देशांक ९३६.६८ अंकांनी, म्हणजेच १.६८ टक्क्यांनी वाढून ५६,८३२ अंकांच्या पातळीवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे, तैवानचा तैवान भारित निर्देशांक 418.06 अंकांनी किंवा 1.20 टक्क्यांनी वाढून 35,279.22 अंकांवर व्यवहार करत आहे. याशिवाय, एस अँड पी कंपोझिट निर्देशांक 0.83 टक्क्यांनी वाढून 1,502.08 अंकांवर, हँग सेंग निर्देशांक 211.60 अंकांनी म्हणजेच 0.82 टक्क्यांनी वाढून 25,964 अंकांवर आणि शांघाय कंपोझिट निर्देशांक 0.63 टक्क्यांच्या वाढीसह 3,991.14 अंकांवर व्यवहार करत आहे.
शस्त्रबंदीमुळे तेल आयातीवर अवलंबून असणारी भारतासारखी अनेक राष्ट्रे सुखावली. श्रेय कोणीही घ्या, पण युद्ध एकदाचे थांबू द्या, असा सूर गेल्या काही दिवसांपासून तेल आयातीला अवलंबित्व असणाऱ्या राष्ट्रांकडून उघडपणे आळविला जात होता. या युद्धाची जितकी किंमत युद्धामध्ये सहभागी असणाऱ्या अमेरिका, इस्रायल, इराण या तीन राष्ट्रांना मोजावी लागली नसेल, त्याहून अधिक किंमत तेल आयातदार राष्ट्रांना मोजावी लागली.अमेरिका आणि इराण यांच्यात १४ दिवसांकरिता युद्धविराम जाहीर झाला असला, तरी हा विराम क्षणिक ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कारण त्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सातत्याने बदलणारी भूमिका व युद्ध लढविण्याची इराणची खुमखुमी यामुळे युद्धविराम फार काळ टिकणार नसल्याचे संकेत होते. अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या युद्धविरामाला अवघा एक दिवस लोटत नाही, तोच या युद्धविरामाचे भवितव्य संकटात सापडले. दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे नियोजित असलेल्या शांतता चर्चेबाबतही अनिश्चितता निर्माण झाली.इराणचे पाकिस्तानमधील राजदूत अमिरी मोगदम यांनी इराणचं शिष्टमंडळ शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या चर्चेसाठी पाकिस्तानमध्ये येणार असल्याची माहिती एक्सवरील पोस्टमधून दिली होती. मात्र काही वेळातच त्यांनी ही पोस्ट हटवली. त्यामुळे पुन्हा युद्ध भडकण्याचे संकेत निर्माण झालेत. अमेरिका आणि इराणमध्ये सध्या दोन आठवड्यांचा युद्धविराम सुरू असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी पुन्हा एकदा इराणला निर्वाणीचा इशारा दिला.दोन्ही देशांमध्ये अंतिम आणि ठोस करार होत नाही, तोपर्यंत अमेरिकेचे लष्करी बळ इराणच्या सीमांनजीक तैनात राहील. तोपर्यंत आमचे सैन्य माघारी फिरणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. हा करार यशस्वी झाला नाही, तर इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला जाईल, अशी धमकीही त्यांनी दिली. त्यामुळे युद्धबंदीची घोषणा पुन्हा एकदा नामधारी ठरण्याची शक्यता असून विनाशकारी युद्ध अंतिम क्षणापर्यंत लढले जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले.अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण हा संघर्ष २८ फेब्रुवारीपासून सुरू आहे. बुधवारी १४ दिवसांकरता अमेरिका-इराण या दोन देशांमध्ये शस्त्रसंधी झाली. या शस्त्रसंधीला अमेरिकेचा युद्धातील मित्र इस्रायलने देखील संमती दिली. पाकिस्तानच्या मध्यस्थीने दोन आठवड्यांची शस्त्रसंधी झाल्याचे सांगण्यात आले. या शस्त्रबंदीमुळे तेल आयातीवर अवलंबून असणारी भारतासारखी अनेक राष्ट्रे सुखावली. श्रेय कोणीही घ्या, पण युद्ध एकदाचे थांबू द्या, असा सूर गेल्या काही दिवसांपासून तेल आयातीला अवलंबित्व असणाऱ्या राष्ट्रांकडून उघडपणे आळविला जात होता. या युद्धाची जितकी किंमत युद्धामध्ये सहभागी असणाऱ्या अमेरिका, इस्रायल, इराण या तीन राष्ट्रांना मोजावी लागली नसेल, त्याहून अधिक किंमत तेल आयातदार राष्ट्रांना मोजावी लागली आहे. या राष्ट्रांमध्ये भारताचा अपवाद वगळता अन्य राष्ट्रांमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे.ही युद्धबंदी प्रत्यक्षात येणार की केवळ कागदोपत्रीच घोषणा राहणार, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात शस्त्रसंधी होताच स्वत:ची पाठ थोपटून घेणारा पाकिस्तान आता तोंडावर पडला आहे. युद्धबंदीच्या घोषणेनंतर अवघ्या काही तासांमध्ये इस्रायलने लेबनॉनवर हल्ले केले. मग इराणने यूएई, कुवेतला लक्ष्य केले. शस्त्रसंधीची घोषणा झाल्यावर २४ तासांच्या आत पुन्हा युद्धविषयक घडामोडी सुरूच राहिल्या.हल्ले होतच राहिले. यामुळे पाकिस्तानने घडवून आणलेल्या व छातीचा ढोल करत जगभर दवंडी पिटवलेल्या शस्त्रसंधीचे नेमके काय झाले, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. पण लेबनॉन या शस्त्रसंधीचा भाग होता की नाही, यावरून सगळा घोळ झाला. मध्यस्थीचा दावा पाकिस्तानने केल्याने आता त्यांची गोची झाली. इस्रायलने त्यांचा शेजारी देश असलेल्या लेबनॉनवरील हल्ले सुरूच ठेवले. त्यामुळे पाकिस्तान तोंडावर आपटला.शस्त्रसंधी सगळ्या ठिकाणी लागू आहे, त्यात लेबनॉनचाही समावेश असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी जाहीरपणे म्हटले होते. १० एप्रिलला इस्लामाबादमध्ये होत असलेल्या बैठकीत या सगळ्या मुद्द्यांवर शिक्कामोर्तब होईल, असा विश्वासही शरीफ यांनी व्यक्त केला. त्यांनी केलेला दावा आणि युद्धबंदीनंतरही सुरू असलेले हल्ले यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर संभ्रम निर्माण झाला. कारण शस्त्रसंधीसंदर्भात इस्रायल आणि अमेरिकेकडून करण्यात आलेली विधाने परस्परविरोधी आहेत. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांनी शरीफ यांचा दावा स्पष्ट शब्दांत खोडून काढला. 'काहीतरी गैरसमजातून हा प्रकार घडला.लेबनॉनचा समावेश शस्त्रसंधीत असल्याचं इराणला वाटलं असेल. पण आम्ही कधीही तसे आश्वासन दिलेलं नाही. तसे संकेत देखील आम्ही कधी दिले नव्हते,’ असे अमेरिकेने स्पष्ट केल्याने पाकिस्तानच्या मध्यस्थीवर प्रश्न उपस्थित झाले. अमेरिकेनं केलेला दावा खोटा असल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. इराणसोबत झालेल्या शस्त्रसंधीत लेबनॉनच्या मुद्द्याचा समावेश होता, असा दावा अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत रिजवान सईद शेख यांनी केला. लेबनॉनचा विषय शस्त्रसंधीत नव्हताच, असा इस्रायलचाही दावा आहे. अमेरिका, इस्रायलनं घेतलेल्या भूमिकेमुळे मध्यस्थीसाठी स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर फजिती झाली.युद्ध सुरू झाल्यावर भारतासारख्या अनेक देशांमध्ये इंधन टंचाईचे सावट निर्माण झाले. अनेक उद्योगांवर परिणाम झाला. महाराष्ट्रामध्ये रोजगार-व्यवसायासाठी आलेले परराज्यातील मजूर, कर्मचारी आपल्या राज्यात निघून गेल्याने छोट्या व्यवसायांवर परिणाम झाला. किरकोळ खाद्यपदार्थांच्या गाड्या रस्त्यावरून गायब झाल्या. अनेक हॉटेल्समधील गॅसच्या टाक्या अदृश्य झाल्या. कोळशावर शेगड्या पेटविण्यात आल्या.इंधनाचे दर वाढल्यावर महागाईला पोषक वातावरण निर्माण होते. इंधनाचे दर उतरले तरी महागाई कमी होत नसल्याचा आजवरचा अनुभव आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला.जगातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'होर्मुझच्या सामुद्रधुनी'तून जाणाऱ्या प्रत्येक तेलवाहू जहाजाकडून आता इराण प्रति बॅरल १ डॉलर इतका 'टोल' वसूल करणार आहे. विशेष म्हणजे, हा कर क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून भरावा लागणार. त्यामुळे भारताला महागड्या दराने तेल खरेदी करावं लागणार.
US Iran Talks Islamabad: मध्यपूर्वेतील नाजूक युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर, जगाचे लक्ष आता पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर केंद्रित झाले आहे.
Capsicum Benefits: फक्त भाजी नाही, ‘आरोग्याची चावी’! शिमला मिरचीचे फायदे ऐकून व्हाल थक्क
Capsicum Benefits तज्ज्ञांच्या मते, शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A आणि बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणात आढळतात. हे घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि अनेक संसर्गांपासून संरक्षण करतात. त्यामुळे नियमित शिमला मिरची खाल्ल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
Arvind Sawant : एकनाथ शिंदे यांच्यासोबत उबाठा गटाच्या 8 खासदारांची गुप्त बैठक झाल्याच्या वृत्ताला खासदार अरविंद सावंत यांनी फेटाळून लावले आहे.
Gold Silver Price: देशांतर्गत वायदे बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली.
Comedian Samay Raina: ‘स्टिल अलाइव्ह’ने सोशल मीडियावर धुमाकूळ; समय रैनाच्या कॉमेडीची जबरदस्त चर्चा
Comedian Samay Raina समय रैनाचे सोशल मीडियावर ८ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मात्र, त्याने फक्त दोनच व्यक्तींना फॉलो केलं आहे राखी सावंत आणि दीपक कलाल. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. राखी सावंत आणि दीपक कलाल हे दोघेही त्यांच्या वेगळ्या आणि वादग्रस्त शैलीसाठी ओळखले जातात.
Kunal Kamra : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील 'ठाणे की रिक्षा' गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात स्टॅण्डअप कॅामेडीयन कुणाला कामरा याची हक्कभंग समितीसमोर साक्ष नोंदवण्यात आली.
Eknath Shinde Opretion Tiger : 'उबाठा'च्या खासदारांची एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक?
'ऑपरेशन टायगर'ला पुन्हा वेग; ९ पैकी ८ खासदार हजर असल्याची चर्चामुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'उबाठा' गटाला पुन्हा एकदा मोठा सुरुंग लावण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडावलेले 'ऑपरेशन टायगर' पुन्हा सक्रीय झाले असून, बुधवारी रात्री ठाण्यात शिंदे आणि 'उबाठा' गटाच्या तब्बल आठ खासदारांमध्ये गुप्त बैठक झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा नेहमीच्या मार्गावरून जात असताना अचानक वळवण्यात आला. शिंदेंनी सुरक्षा ताफा सोडून ठाण्यातील व्होल्टास कंपनी परिसरात 'उबाठा'च्या खासदारांची भेट घेतली. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत चाललेल्या या प्रदीर्घ चर्चेत खासदारांना शिवसेनेत सहभागी होण्यासाठी मोठी 'ऑफर' देण्यात आल्याचे समजते.या बैठकीला अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि राजाभाऊ वाजे हे प्रत्यक्ष हजर होते, तर ओमराजे निंबाळकर यांच्यासह दोन खासदारांनी व्हिडिओ कॉलद्वारे सहभाग नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच उबाठा गटाने खासदारांची बैठक घेऊन त्यांचा कल जाणून घेतला होता. त्यानंतर ही घडामोड घडल्याने 'उबाठा' गोटात चिंतेचे वातावरण आहे.खासदारांकडून वृत्ताचे खंडन- दुसरीकडे, चर्चेत नाव असलेल्या सर्वच खासदारांनी ही बातमी फेटाळून लावली आहे. मी काहीही झाले तरी शिंदेंसोबत जाणार नाही. अशा कोणत्याही बैठकीचे वृत्त चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली. ओमराजे निंबाळकर म्हणाले, माझ्या दोन टर्मपासून हीच चर्चा सुरू आहे. बैठकीचे फोटो असतील तर समोर आणावेत, उगीच अफवा पसरवू नका.- मला ना निमंत्रण होते, ना मी गेलो. मी प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन, कोणत्याही प्रकारे बैठकीत नव्हतो, असे संजय देशमुख यांनी सांगितले. तर,आम्ही पुण्यात किंवा आपापल्या क्षेत्रात होतो. पक्षांतराचा कोणताही विषय सध्यातरी नाही, अशी प्रतिक्रिया नागेश पाटील आष्टीकर व संजय जाधव यांनी दिली.राजकीय भूकंप होणार?दिल्लीतील नेतृत्वाने हिरवा कंदील दिला नसल्याच्या चर्चा सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री शिंदेंनी पडद्यामागे हालचाली वाढवल्या आहेत. जर हे आठ खासदार खरोखरच शिंदेंच्या संपर्कात असतील, तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
Mumbai Metropolitan Region : मुंबई महानगर प्रदेशसह विविध जिल्ह्यांना वीजपुरवठा अधिक सक्षम
महापारेषणची बाभळेश्वर–कुडूस ४०० के.व्ही. वीजवाहिनी कार्यान्वितमुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचा (महापारेषण) महत्त्वाकांक्षी बाभळेश्वर–कुडूस ४०० के.व्ही. हा वीजवाहिनी प्रकल्प गुरूवारी (दि.९) पूर्ण होऊन वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आली. ऊर्जा विभागाच्या या प्रकल्पामुळे सुमारे ५ मेगावॅट वीज नुकसान कमी होणार असून मुंबई महानगर प्रदेशातील विद्युत दाबामध्ये योग्य ती सुधारणा होणार आहे. तसेच या व्दिपथ वाहिनीवरून सुमारे ३००० अतिरिक्त वीज वहन क्षमता उपलब्ध होणार असून मुंबई, ठाणे, पालघर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे. अशी माहिती महापारेषण कडून देण्यात आली आहे.https://prahaar.in/2026/04/10/eknath-shindes-operation-tiger-secret-meeting-between-ubt-mps-and-eknath-shinde/मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या वेगाने निर्णय प्रक्रियेत महापारेषणचे संचालक (प्रकल्प/संचलन) सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता महेंद्र वाळके, वाशी परिमंडळाचे मुख्य अभियंता महेश भागवत व परिमंडळातील अधिकारी कर्मचारी यांनी कामगिरी पूर्ण केली. यंत्रणांच्या समन्वयामुळे अखेर मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात आले.या प्रकल्पांतर्गत एकूण ७१५ मनोरे उभारण्यात आले असून व्दिपथ वाहिनीची लांबी सुमारे २२८ कि.मी. आहे. यापैकी नाशिक विभागात ४८५ मनोरे उभारणी आणि ३०४ सर्किट कि.मी. तारा ओढण्याचे काम, तर वाशी विभागात २३० मनोरे उभारणी आणि १५२ सर्किट कि.मी. तारा ओढण्याचे काम पूर्ण झाले आहे.https://prahaar.in/2026/04/09/municipal-corporation-ward-room-regarding-cleanliness-municipal-commissioner-gives-instructions/या वीजवाहिनीमुळे सद्यस्थितीतील पडघे–बाभळेश्वर १ व २ या वीजवाहिनीवरील ताण कमी होणार असून प्रणालीची विश्वासार्हता वाढणार आहे. कुडूस उपकेंद्राला अतिरिक्त वीज स्रोत उपलब्ध होऊन मुंबई परिसरातील वाढत्या वीज मागणीची पूर्तता सुलभ होणार आहे. हा भव्य प्रकल्प २०१० मध्ये मंजूर करण्यात आला पण विविध अडचणींमुळे लांबला होता. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, महसूल विभाग, पोलिस आणि वनविभाग यांच्या सहकार्य व मदतीमुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी मेसर्स कल्पतरू प्रोजेक्टस इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीमार्फत करण्यात आल्याचे महापारेषणने म्हटले आहे.प्रकल्पाची वैशिष्ट्ये:सुमारे २२८ कि.मी. लांबीची वीजवाहिनीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार कालमर्यादेत प्रकल्प पूर्णमुंबई, ठाणे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम व स्थिरप्रकल्पामुळे सुमारे ५ मेगावॅट वीज नुकसान कमी होणारव्दिपथ वाहिनीव्दारे ३००० मेगावॅटपर्यंत अतिरिक्त वीज वहन क्षमतामुंबई, ठाणे, पालघर व अहिल्यानगर जिल्ह्यांना मोठा फायदाएकूण ७१५ मनोरे उभारणी नाशिक विभागात ४८५ मनोरे, वाशी विभागात २३० मनोरे उभारणीGMRT परिसरातून मार्गामुळे विशेष परवानग्या, वनपरवानग्या, मोबदले यांसारख्या अडचणींवर मातजंगल भागात मानवी श्रम व हॉटलाइन स्ट्रिंगिंगचा वापरपडघे–बाभळेश्वर वीजवाहिनीवरील ताण कमी होणारकुडूस उपकेंद्राला अतिरिक्त वीज स्रोत उपलब्धस्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी व विविध विभागांचे सहकार्यमहापारेषणच्या अधिकाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांचे यशप्रकल्प राबविताना अनेक तांत्रिक व प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागला. पुणे जिल्ह्यातील जागतिक दर्जाच्या रेडिओ दुर्बिणीच्या (GMRT) परिसरातून मार्ग जात असल्याने विशेष परवानग्या घ्याव्या लागल्या.तसेच जमिनीचे मोबदले, वनविभाग परवानग्या, राईट ऑफ वे (मार्गाधिकार) (RoW) समस्या, साहित्य वाहतूक यांसारख्या अनेक आव्हानांवर मात करण्यात आली. काही भागात जंगलातून साहित्य वाहून नेण्यासाठी मानवी श्रमांचा वापर करावा लागला, तर काही ठिकाणी वीजवाहिन्यांवर हॉटलाइन स्ट्रिंगिंग करून काम पूर्ण करण्यात आले.
मुंबई : बंजारा टायगर संघटनेच्या वतीने राज्यातील बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते. संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत प्रलंबित कामे, निधीवाढ, तसेच तांड्यांच्या मूलभूत सुविधांसंदर्भातील प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. जयकुमार गोरे यांची भेट घेण्याची वेळ मागितली. मंत्री मा. जयकुमार गोरे यांनी या मागणीची दखल घेत तात्काळ भेटीसाठी वेळ देत आंदोलकांशी मंत्रालयात चर्चा केली.https://prahaar.in/2026/04/10/bmc-news-mumbaikars-to-face-water-cuts-from-may/यावेळी आंदोलकांच्या सर्व मागण्या शांतपणे आणि सविस्तर ऐकून घेत संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. प्रलंबित कामांना गती देणे, मंजूर निधी वेळेत वितरित करणे, तसेच तांड्यांच्या विकासासाठी आवश्यक प्रशासकीय निर्णय लवकर घेण्याबाबत मंत्री महोदयांनी संबंधित विभागांना सूचना करण्याचे आश्वासन दिले.मंत्री महोदयांनी आंदोलकांना संवादाच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन करत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी मा. मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. या सकारात्मक भूमिकेची दखल घेत आंदोलकांनी तात्काळ आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.https://prahaar.in/2026/04/09/anna-bansode-young-mlas-should-focus-on-technology-education-and-skill-development-anna-bansode-appeal-for-a-developed-india/संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याच्या या भूमिकेमुळे तणावपूर्ण परिस्थिती निवळली असून, पुढील कार्यवाहीबाबत प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आंदोलकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
वानखेडे स्टेडियमवरील स्टँड व गेटच्या नामकरण सोहळ्यात क्रिकेट दिग्गजांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरवमुंबई : ज्या खेळाडूंनी इतिहास घडवला, त्यांच्या आठवणी कायम जिवंत ठेवण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने आपल्या आयकॉनिक खेळाडूंच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.वानखेडे स्टेडियमसारख्या ऐतिहासिक ठिकाणीच अशा प्रकारचा सन्मान सर्वोत्तम पद्धतीने होऊ शकतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.https://prahaar.in/2026/04/10/ipl-2026-lucknows-comeback-kkr-still-awaiting-their-first-win/मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वानखेडे स्टेडियमवर एकनाथ सोलकर गेट, डायना एडुलजी गेट आणि दिलीप सरदेसाई गेट असे नामकरण तर रवी शास्त्री स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, क्रिकेटपटू सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, डायना एडुलजी, सूर्यकुमार यादव तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, उपाध्यक जितेंद्र आव्हाड, उन्मेष खानविलकर, अरमान मलिक, अभिनेता जॅकी श्रॉफ आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, एकनाथ सोलकर, दिलीप सरदेसाई, डायना एडुलजी आणि रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सुनील गावस्कर यांनी हेल्मेटशिवाय वेगवान गोलंदाजांचा निर्भीडपणे सामना करत भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिली. दिलीप वेंगसरकर यांनी कठीण प्रसंगी संघ सावरण्याची भूमिका निभावली,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.https://prahaar.in/2026/04/09/bangladesh-finally-relents-bangladesh-cricket-board-invites-india/एकनाथ सोलकर यांच्या अफाट क्षेत्ररक्षण कौशल्याचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही त्यांची फील्डिंग अद्वितीय ठरली असती. तसेच दिलीप सरदेसाई यांच्या परदेशातील कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटला नवे स्थान मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.महिला क्रिकेटच्या क्षेत्रात डायना एडुलजी यांच्या योगदानाची दखल घेत, त्यांनी महिलांच्या क्रिकेटमध्ये झालेल्या प्रगतीचे कौतुक केले. तसेच रवी शास्त्री यांच्या अष्टपैलू कामगिरीचा उल्लेख करत त्यांच्या खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचक म्हणूनच्या भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले.आधुनिक क्रिकेटमधील स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव यांच्या अभिनव फलंदाजी शैलीचे विशेष कौतुक करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “३६० डिग्री खेळ करणारे सूर्यकुमार यादव हे मुंबईच्या क्रिकेट संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या कामगिरीमुळे मुंबईचा गौरव वाढला आहे.”मुंबईतील क्रिकेट पायाभूत सुविधांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, शहरातील छोट्या मैदानांचे संवर्धन आणि जुन्या लीजसंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. वीस- वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्नही आम्ही सोडवू, असे ते म्हणाले.मुंबईत अत्याधुनिक आणि मोठ्या स्टेडियमच्या उभारणीसाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ही अंदाजे ६० ते ८० हजार प्रेक्षक क्षमतेचे हे स्टेडियम असेल. उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आणि कोणत्याही जागेवरून उत्तम दृश्य मिळेल, अशा पद्धतीने ते उभारले जाईल,असे त्यांनी सांगितले.तथापि, कितीही नवी स्टेडियम्स उभारली, तरी वानखेडे स्टेडियमचे महत्त्व कायम राहील. वानखेडे हे सदैव आयकॉनिकच राहील,” असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला सर्वतोपरी पाठबळ देण्याची ग्वाही दिली.महान खेळाडूंना योग्य सन्मान - सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलारमुंबई क्रिकेटच्या वैभवशाली परंपरेचा गौरव करणारा आजचा दिवस सुवर्णक्षण ठरला असून, या माध्यमातून महान खेळाडूंना योग्य सन्मान देण्याचे कार्य पार पडले, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, मुंबई क्रिकेटने जगाला उत्कृष्ट खेळाडू दिले असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची ही योग्य वेळ आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांच्या योगदानाची नोंद इतिहासात कोरली जात असून हा क्षण अभिमानास्पद आहे.महिला क्रिकेटला उंचीवर नेण्यात डायना एडुलजी यांचे योगदान उल्लेखनीय असून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही देशाचे नाव उज्ज्वल केले. तसेच दिलीप सरदेसाई यांना ‘जनरेशन टुगेदर’ क्रिकेट लिजेंड संबोधत त्यांच्या खेळाची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. एकनाथ सोलकर यांच्या चपळ क्षेत्ररक्षणाचे उदाहरण देत शेलार यांनी त्यांच्या प्रामाणिक आणि प्रेरणादायी आयुष्याचा गौरव केला. तसेच रवी शास्त्री यांना “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स” म्हणत त्यांच्या नावाने स्टँडला नामकरण करणे उचितच असल्याचे त्यांनी नमूद केले.मुंबईच्या खेळाडूंनी वानखेडे मैदानावर अनेक विक्रम प्रस्थापित करत जागतिक क्रिकेटला दिशा दिली आहे. सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर आणि रवी शास्त्री यांच्या भागीदारी आजही प्रेरणादायी असून त्यांचे विक्रम अजूनही अबाधित आहेत, असेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.
Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे.
Pune Crime News : जुन्या भांडणाचा राग मनात धरून ५ ते ६ आरोपींनी एका व्यक्तीवर लोखंडी हत्याराने वार केले आणि पिस्तुलमधून गोळीबार केला होता. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Phone charger electricity consumption तज्ज्ञांच्या मते, प्लगमध्ये लावलेला चार्जर फोन नसतानाही थोडीफार वीज वापरत राहतो. यालाच “फँटम लोड” किंवा “स्टँडबाय पॉवर” असं म्हटलं जातं. म्हणजेच चार्जरमध्ये असलेला छोटा ट्रान्सफॉर्मर आणि सर्किट सतत सक्रिय राहतात आणि वीज घेत राहतात.
Sanjay Raut : उबाठा गटाचे आठ खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याची चर्चा असून, यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत जोरदार टोला लगावला आहे.
Middle East War: कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, इराणचा सहभाग असो वा नसो, तेल पुरवठा लवकरच पुन्हा सुरू होईल,असे म्हणत इराणला अप्रत्यक्षपणे इशारा दिलाय.
Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार; कामशेतमध्ये दुकानाच्या चेंजिंग रूममध्ये.....
पुणे : पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरात दुकानांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. एका कपड्यांच्या दुकानातील चेंजिंग रूममध्ये छुप्या पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरा लावून महिलेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे.https://prahaar.in/2026/03/07/a-young-man-committed-obscene-act-outside-the-college-22-year-old-youth-detained/चेंजिंग रूममध्ये कॅमेरा मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला खरेदीसाठी मुकेश फॅन्सी कॉर्नर या दुकानात खरेदीसाठी गेली होती. यावेळी दुकान मालक मुकेश मुथा याने दुकानाच्या स्टोअर रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे, हे माहिती असतानाही पीडितेस तिथे कपडे बदलण्यासाठी पाठवले. हा कॅमेरा दुकानदारानेच महिलांचे कपडे बदलण्याचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी ठेवला होता.संशय आल्यावर प्रकार उघडएका महिलेला कपडे बदलताना काहीतरी संशयास्पद असल्याची जाणीव झाल्यानंतर महिलेने दुकानदाराला जाब विचारला. मात्र, आरोपीने उलट तिच्यावर गप्प राहण्याचा दबाव टाकत तिला धमकावण्यावचा प्रयत्न केला.https://prahaar.in/2026/03/05/pune-crime-sanams-death-at-a-birthday-party-a-mans-heart-was-found-in-the-body-this-thrilling-case-in-pune-remains-a-mystery-even-after-13-years/घटनेनंतर पीडित महिलेने न घाबरता थेट कामशेत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू करून. कामशेत पोलिसांनी आरोपी मुकेश मुथा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून आणखी महिलांचे व्हिडीओ फोटो त्याच्याकडे आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.
Eknath Shinde : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा अॅापरेशन टायगरची जोरदार चर्चा रंगली आहे.
Hospital Bag For Delivery डिलिव्हरीसाठी हॉस्पिटल बॅग वेळेवर आणि योग्य पद्धतीने तयार करणे आई, बाळ आणि संपूर्ण कुटुंबासाठी आरामदायक अनुभव देऊ शकते. योग्य नियोजन केल्यास या महत्त्वाच्या क्षणी कोणतीही अडचण येत नाही.
Top 10 News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक आहेत.
Crime News : प्रियकरासाठी पत्नीनेच रचला पतीचा ‘डेथ प्लान’; ऑडिओ क्लिपमुळे......
जयपूर : राजस्थानमधील अलवर येथे पतीच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बँक अधिकाऱ्याच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा जीव घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, एका ऑडिओ क्लिपमुळे हा संपूर्ण कट उघडकीस आला आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना अटक केली.https://prahaar.in/2026/04/07/sangli-crime-news-disputes-at-a-tamasha-alcohol-and-romantic-relationships-a-deadly-end-three-consecutive-murders-in-sangli-within-24-hours-create-a-sensation/प्रेमसंबंधातून कटाची सुरुवातपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना अरोरा आणि टॅक्सी ड्रायव्हर ऋषभ शर्मा यांच्यात काही काळापासून प्रेमसंबंध होते. दोघांना एकत्र राहायचे होते, मात्र अर्चनाचा पती त्यांच्या मार्गात अडथळा ठरत असल्याने त्यांनी त्याला हटवण्याचा निर्णय घेतला, या कटाच्या आधी अर्चनाने घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन घर सोडल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर दोघांनी एकत्र येऊन पतीच्या हत्येचे नियोजन केल्याचे पोलिसांनी सांगितले.https://prahaar.in/2026/04/06/ahilyanagar-sexual-exploitation-of-a-young-woman-on-the-pretext-of-marriage-case-registered-in-shrirampur/ऑडिओ क्लिपमुळे कटाचा पर्दाफाशपतीच्या हत्येचा संपूर्ण कट जवळपास तयार असताना, एका ऑडिओ क्लिपमुळे पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. या क्लिपमध्ये संशयास्पद संभाषण आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. तांत्रिक तपास आणि पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अर्चना अरोरा आणि ऋषभ शर्मा या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून दोन्ही आरोपींची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील पुढील तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Marathi Entertainment : कॉमेडीचा ओव्हरडोस देणाऱ्या 'पिक्चर बॉईज'चा धमाकेदार टीझर लाँच
मुंबई : उन्हाळ्याच्या सुटीत कॉमेडीचा सुखद अनुभव देणाऱ्या पिक्चर बॉईज या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. १५ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, चित्रपटांमध्ये हिरो होण्यासाठी धडपडणाऱ्या दोन तरूणांची धमाल गोष्ट या चित्रपटात पाहता येणार आहे.https://prahaar.in/2026/04/09/dhurandar-2-record-breaking-box-office-earnings-now-dhurandar-2-will-be-released-on-ya-ott-platform/त्रिमूर्ती फिल्म्सनं 'पिक्चर बॉईज' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रवी पांडुरंग पंडितपवार, राजा पांडुरंग पंडितपवार हे या चित्रपटाचे निर्माते असून शिवाजी केशव पाटील हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन निलेशसिंह राजपूत यांनी केलं आहे. मंदार चोळकर, सुनील दोडगे, संध्या-प्रनिकेत यांनी लिहिलेल्या गीतांना वरुण लिखाते आणि संध्या-प्रनिकेत यांनी संगीतबद्ध केले आहे. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, जसराज जोशी, स्वप्नील गोडबोले, वरुण लिखाते, एल. के. लक्ष्मीकांत यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. विनोद पाटील यांनी छायांकन, रोहन पाटील यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. आनंद शिंदे, जसराज जोशी, स्वप्नील गोडबोले, वरुण लिखाते, एल. के. लक्ष्मीकांत यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. प्रतीक लाड, हंसराज जगताप, अरबाज शेख, पवन चुरे, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), प्रिया तुळजापूरकर, सूरज पाटील, किरण पाटील, नम्रता पोटे, निभिया शर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, प्रशांत तपस्वी, मिलिंद दास्ताने, विजय खंदारे, साक्षी पंडितपवार, विजय गिते, अंकिता राऊत अशी नव्या जुन्या कलाकांची फळी चित्रपटात आहे.https://prahaar.in/2026/04/09/matka-king-trailer-of-nagraj-manjules-matka-king-with-a-strong-star-cast-released/पिक्चर बॉईज या चित्रपटातून एक धमाल गोष्ट मांडण्यात आली आहे. चित्रपट क्षेत्राची फारशी काही माहिती नसलेल्या दोन तरुणांना हिरो व्हायचं असतं. चित्रपटाच्या क्षेत्रात आल्यानंतर त्यांच्या वाट्याला काय काय अनुभव येतात, त्यातून काय धमाल विनोदी प्रसंग घडतात याचं कथानक चित्रपटात मांडण्यात आलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधूनही त्याची झलक मिळत आहे. त्यामुळेच चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. मजेशीर कथानक, उत्तम लेखन, ताल धरायला लावणारं संगीत, दमदार अभिनय हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. उन्हाळ्याच्या सुटीत पुरेपूर मनोरंजन करणारा पिक्चर बॉईज हा चित्रपट सहकुटुंब चित्रपटगृहात जाऊनच पाहावा लागणार आहे.
Mahesh Shinde : “शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक त्यामुळे…”; शिंदेंच्या आमदाराचं मोठं विधान
Mahesh Shinde : शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याविषयी मोठं विधान केले आहे.
MNS Mira Road Attack : मिरारोडमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; किरकोळ वादातून घडली घटना
MNS Mira Road Attack : मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Sreeleela controversy: मासिक पाळी ‘बहाणा नाही’ म्हणणाऱ्या श्रीलीलावर टीकेची झोड; सोशल मीडियावर संताप
Sreeleela controversy कार्यक्रमात बोलताना श्रीलीलाने सांगितले होते की, तिने मासिक पाळीदरम्यानही शूटिंग सुरू ठेवले आणि तिच्या मते शारीरिक किंवा मानसिक अडचणींना बहाणे म्हणून वापरू नये. “आपण समानतेबद्दल बोलतो, तर आपल्याला अशा अडथळ्यांवर मात करायला हवे,” असेही ती म्हणाली होती.
Baramati and Rahuri bypoll 2026 : अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर आता बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत कोण कोण उमेदवार असणार हे चित्र स्पष्ट झाले आहे.
IPL 2026: लखनौचा कमबॅक, KKR अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत
मुंबई : आयपीएल २०२६ मधील रंगतदार सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 3 विकेटने या सामन्याला रंग चढवत विजय मिळवला. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या या सामन्यात युवा फलंदाज मुकुल चौधरीने निर्णायक भूमिका बजावत संघाला विजय मिळवून दिला.https://prahaar.in/2026/04/09/ipl-2026-bcci-announces-new-rules-for-players-who-do-not-play-matches/मुकुल चौधरीचा सामना जिंकवणारा डावलखनौची अवस्था डळमळीत असताना मुकुल चौधरीने जबाबदारी घेत नाबाद 54 धावांची खेळी साकारली. केवळ 27 चेंडूत केलेल्या या खेळीत त्याने ७षटकार आणि 2 चौकार लगावत दबाव झुगारला. शेवटच्या ओव्हरमध्ये 14 धावांची गरज असताना त्याने शांतपणे सामना लखनौच्या बाजूने वळवला.बदोनीचीही साथमुकुलला आयुष बदोनीने चांगली साथ दिली. बदोनीने 34 चेंडूत 54 धावा करत संघाला स्थैर्य दिले. मात्र इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. निकोलस पूरन, ऋषभ पंत आणि अब्दुल समद हे लवकर बाद झाले होते.KKR कडून 181 धावांचे आव्हानया आधी फलंदाजी करताना KKR ने 20 षटकांत 181 धावा केल्या. सुरुवातीला अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांनी चांगली भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. =रहाणे 41 धावांवर बाद झाल्यानंतर KKR ची गाडी अडखळली. रघुवंशी 45 धावांवर माघारी परतला, तर रिंकू सिंहलाही मोठी खेळी करता आली नाही. काही काळातच संघ 99-2 वरून 111-4 असा गडगडला. अंतिम षटकांमध्ये कॅमेरॉन ग्रीन आणि रोवमन पॉवेल यांनी आक्रमक फलंदाजी करत KKR ला सावरण्याचा प्रयत्न केला. ग्रीनने नाबाद 32, तर पॉवेलने नाबाद 39 धावा करत 70 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यामुळे KKR ने 180 चा टप्पा पार केला.https://prahaar.in/2026/04/08/ipl-2026-rr-vs-mi-rajasthan-royals-won-3rd-consecutive-match-beat-mumbai-indians-by-27-runs-at-guwahati/लखनौची पॉइंट टेबलमध्ये झेपया विजयासह लखनौने सलग दुसरा विजय नोंदवत 4 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसरीकडे KKR ला अजूनही या हंगामातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा करावी लागत आहे.एकूणच, शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात लखनौने दबावाखालीही उत्कृष्ट कामगिरी करत विजय खेचून आणला.
Bmc News : येत्या मे महिन्यापासून मुंबईकरांवर पाणीकपात
किमान १० टक्के होणार पाणी पुरवठ्यात कपातमुंबई :मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये सध्या ३५ टक्के पाणी साठा असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणी साठा चांगल्याप्रकारे असला तरी प्रत्यक्षात पावसाळ्याचे गणित पाहता मुंबई महापालिकेला पाणीकपात करण्याची गरज भासणार आहे. त्यातच राज्य शासनाने महापालिकेला ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिल्यामुळे येत्या १ मेपासून मुंबईत किमान १० टक्के कपात करण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे येत्या महिन्यात पुढील पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याच्यादृष्टीकोनातून ही कपात जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.https://prahaar.in/2026/04/09/municipal-corporation-ward-room-regarding-cleanliness-municipal-commissioner-gives-instructions/मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा,भातसा, विहार आणि तुळशी यासर्व धरणांमध्ये केवळ ५ लाख २० हजार ६९८ दशलक्ष लिटर पाण्याचा साठा आहे. टक्केवारीच्या तुलनेत हा पाणी साठा ३५ टक्के एवढा आहे. त्यामुळे सध्या असलेला पाणी साठा हा १५ जूनपर्यंत पुरणार असून पुढील कालावधीत पाऊस लांबणीवर पडण्याचाही हवामान खात्याचा अंदाज आहे. अल लिनोच्या वादळी संकटामुळे पाऊस लांबणीवर जाण्याचीही शक्यता असल्यामुळे भविष्यात पावसाळ्यात सर्व धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा होईपर्यंत या पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. त्यादृष्टीकोनातून महापालिका जल अभियंता विभागाने पाणीकपात करण्याचा विचार केला आहे. त्यासाठी कमीत कमी १० टक्के पाणीकपात करण्याचा विचार करण्यात आला असून लवकर हा प्रस्ताव लागू करुन सर्वांच्या मान्यतेने याची अंमलबजावणी केली जाणार आहे.https://prahaar.in/2026/04/09/gargai-water-project-ubt-does-not-want-to-give-excess-water-to-mumbaikars-opposition-to-gargai-water-project/मागील वर्षी पाण्याचा साठा कमी झाल्यानंतरही शासनाने भातसा धरणातील अतिरिक्त पाणी देण्याची तयारी दर्शवल्यामुळे पाणीकपात करण्यात आली नव्हती. परंतु यंदा पाऊस लांबणीवर पडण्याची भीती असल्यामुळे शासनाकडून भातसाचेही अतिरिक्त पाणी मिळण्याची शक्यता नाही. याउलट महापालिकेला आपल्या धरणातील राखीव पाणी साठाही वापरण्याची गरज भासणार आहे. याचीही मंजुरी प्राप्त करून या पाण्याचा वापर करण्याची रणनिती आखली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना येणाऱ्या काळात किमान दहा टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागेल,असा अंदाज वर्तवला जात आहे.दिनांक ९ एप्रिलच्या दिवसापर्यंतचा पाणी साठासन २०२६ : ५ लाख २० हजार ९९८(३५.९८)सन २०२५ : ४ लाख ७० हजार १०७(३२.४८)सन २०२४ : ३ लाख ९० हजार ३४७(२६.९८)
8 एप्रिल रोजी सकाळी 4 वाजता ट्रम्प यांनी इराणसोबत युद्धविरामाची घोषणा केली. 24 तासांपेक्षा कमी वेळात इस्रायलने लेबनॉनमध्ये 254 मृतदेह पसरवले. इराणने इस्रायलवर युद्धविरामाच्या मुख्य अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. यामुळे 10 एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या बैठकीवर संकट निर्माण झाले आहे. 48 तासांत युद्धविराम भंग होईल का? नेतन्याहू युद्ध का सुरू ठेवू इच्छितात? आणि जर युद्धविराम भंग झाला तर पाकिस्तानवर काय परिणाम होईल? जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न-1: अमेरिका-इराण युद्धविराम भंग होईल का?उत्तर : गेल्या 24 तासांत 4 मोठे संकेत मिळाले, ज्यामुळे युद्धविराम भंग होण्याची शक्यता आहे... 1. लेबनॉनवर हल्ले करणे इराणला मान्य नाही 2. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद झाली 3. युद्धविरामाच्या अटींवर दोन्ही देशांमध्ये मतभेद 4. इराण- अमेरिका दोन्ही हल्ल्याची धमकी देत आहेत अमेरिका डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सचे माजी गुप्तचर अधिकारी ब्रँडन बक यांच्या मते, इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविराम कायम राहील, परंतु संपूर्ण मध्यपूर्वेत तो होण्याची शक्यता कमी आहे. इस्रायलचे स्वतःचे हितसंबंध आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना इस्रायलला इराणवर हल्ला करण्यापासून रोखण्यापेक्षा लेबनॉनवर हल्ला करण्यापासून रोखणे अधिक कठीण होईल. प्रश्न- 2: अखेर नेतान्याहू यांना युद्ध का चालू ठेवायचे आहे?उत्तर : न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, युद्धविरामाची घोषणा करण्यापूर्वी ट्रम्प यांनी नेतान्याहू यांच्याशी बोलणे केले होते. मात्र, नेतान्याहू थेट वाटाघाटींमध्ये सहभागी नव्हते. अमेरिका आणि इराणी संघ पाकिस्तानमध्ये करारावर वाटाघाटी सुरू ठेवणार आहेत. इस्रायली विरोधी पक्षनेते यायर लॅपिड यांच्या मते, आम्ही आमच्या इतिहासात इतके राजकीय नुकसान कधीच सहन केले नाही. आमच्या राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले, परंतु इस्त्रायल चर्चेच्या टेबलावरही नव्हते. इस्रायलला धोरणात्मक मित्रऐवजी केवळ विनाश करणारा कंत्राटदार म्हणून पाहिले जाते. इस्रायलला भीती आहे की अमेरिकेसोबतच्या करारामुळे इराणच्या अणुकार्यक्रमाला काही प्रमाणात सूट मिळू शकते. त्यामुळे नेतान्याहू यांना लेबनॉनवर हल्ला करून युद्धविरामाचा भंग व्हावा आणि इराणवर नव्याने अमेरिकन हल्ले व्हावेत अशी इच्छा आहे. नेतान्याहू यांच्याकडे हे युद्ध सुरू ठेवण्याची 3 मुख्य कारणे आहेत... 1. इराण सध्या सर्वात कमकुवत, इस्रायलचे हेतू अजूनही अपूर्ण 2. इस्रायलला बफर बनवण्यासाठी अधिक जमिनीची गरज आहे 3. युद्ध थांबल्यास नेतन्याहू यांना तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता प्रश्न-3 : इस्रायलच्या दबावामुळे ट्रम्प पुन्हा हल्ला करू शकतात का?उत्तर : जून 2025 मध्ये जेव्हा इस्रायलने इराणवर हल्ला केला, तेव्हा सुरुवातीला ट्रम्पने विरोध केला होता. त्यावेळी अमेरिका इराणसोबत अणुकरारावर वाटाघाटी करत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेतन्याहू यांना दोघांमध्ये कोणताही करार नको होता, त्यामुळे त्यांनी वाटाघाटीदरम्यान शेवटच्या क्षणी हल्ला केला. इस्रायलने ट्रम्प प्रशासनाला सुचवले की, लष्करी हल्ला केल्याशिवाय इराणकडून असलेला अणुबॉम्बचा धोका दूर करता येणार नाही. हल्ल्यापूर्वी ट्रम्पने अनेक महिने विचार केला की नेतन्याहू यांना हल्ला करण्यापासून कसे थांबवावे, पण जेव्हा नेतन्याहू ऐकले नाहीत, तेव्हा ट्रम्पने शेवटी हिरवा कंदील दिला. 11 फेब्रुवारी 2026 रोजी नेतन्याहू यांनी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान इराणवर हल्ला करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला. अनेक रिपोर्ट्स सांगतात की इराणबद्दल ट्रम्पचे धोरण नेतन्याहू यांच्या प्रभावाखाली होते. तरीही, युद्ध सुरू झाल्यानंतर ट्रम्प यांच्या जवळच्या वर्तुळातील लोकही त्यांच्या निर्णयामुळे नाखूश होते. द न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, उपराष्ट्रपती जे.डी. वान्स यांनीही ट्रम्प यांच्या इस्रायलवरील हल्ल्याला विरोध केला होता. ते नेतन्याहू यांना ट्रम्प यांच्या पाठिंब्याच्या बाजूने नव्हते. त्यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये एका मुलाखतीत असेही म्हटले होते की, इराणसोबतच्या युद्धामुळे अमेरिकेला कोणताही फायदा होणार नाही आणि पैशांचा अपव्यय होईल. इराणवरील हल्ल्यानंतर वान्स यांनीही हेच युक्तिवाद केले होते, असा दावा केला जात आहे. अमेरिकन थिंक टँक चॅथम हाऊस येथील आंतरराष्ट्रीय सुरक्षा कार्यक्रमाचे संचालक डॉ. मॅरियन मेसमर यांच्या मते, इस्रायल अमेरिकेला युद्धात ओढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ट्रम्प आता त्यातून बाहेर पडू इच्छित आहेत. युरोपीय देशांसोबत ट्रम्प यांच्या आठवड्याच्या रागा नंतर आता असे दिसते की इस्रायलसोबतचे अमेरिकेचे संबंध मध्यपूर्वेत समस्या वाढवत आहेत. अशा परिस्थितीत, ट्रम्प पुन्हा एकदा नेतन्याहू यांच्या सांगण्यावरून इराणवर हल्ला करण्यास तयार होऊ शकतात. प्रश्न- 4 : जर युद्धविराम मोडला, तर मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर त्याचा काय परिणाम होईल?उत्तर : जर युद्धविराम तुटला तर ती पाकिस्तानसाठी एक राजनैतिक हार असू शकते. मिडल ईस्ट सिक्युरिटी ॲनालिस्ट सेथ जे. फ्रँट्झमन म्हणतात की, पाकिस्तान इराण युद्धात युद्धविरामासाठी दबाव आणून आपले महत्त्व वाढवू इच्छित होते. जर हा करार अयशस्वी झाला, तर जागतिक स्तरावर पाकिस्तानची विश्वासार्हता कमी होईल. पाकिस्तान आपली प्रतिष्ठा गमावू इच्छित नाही. राजकीय विजयाव्यतिरिक्त, हा युद्धविराम पाकिस्तानच्या आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षा हितामध्ये देखील आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये तेल, पेट्रोलची कमतरता निर्माण झाली आहे. इराण सध्या काही पाकिस्तानी जहाजांना परवानगी देत आहे, परंतु महागाई आणि अपुऱ्या तेल पुरवठ्यामुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत. जर भविष्यात सौदी अरेबिया युद्धात सामील झाला, तर पाकिस्तानलाही त्याच्यासोबतच्या संरक्षण करारामुळे युद्धात उतरावे लागेल. पाकिस्तानची इराणसोबत सीमा आहे. शत्रुत्व पुन्हा सुरू झाल्याने पाकिस्तानात निर्वासित संकटही वाढू शकते, ज्यामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि सुरक्षेवर परिणाम होईल.
Raju Shetti : हापूसच्या नावावर भेसळ केली तर गाठ माझ्याशी; राजू शेट्टींचा थेट ‘आंबा पार्टी’चा इशारा
Raju Shetti : कोकणातील हापूस उत्पादनात यंदा ९० टक्क्यांपर्यंत मोठी घट; शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी राजू शेट्टी आक्रमक.
लक्षवेधी : युद्धबंदीत पाकिस्तान केंद्रस्थानी
आखातात दीर्घकाळ तणाव निर्माण करणार्या अमेरिका-इराण संघर्षाला अखेर तात्पुरती का होईना, पण युद्धबंदीची किनार लाभली आहे.
Pune Traffic Jam : सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलामुळे वाहनांचा वेग वाढला, मात्र राजाराम पूल ते डीपी रस्त्यापर्यंत पुलावरच होतेय प्रचंड कोंडी.
Shalarth ID Scam : एसआयटीला पुन्हा मुदतवाढ; ‘तारीख पे तारीख’मुळे चौकशी रेंगाळली
Shalarth ID Scam : राज्यातील अपात्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य वेतनाबाबत एसआयटीचा तपास संथ गतीने; नागपूर, नाशिकसह मुंबईत गैरप्रकारांचे धागेदोरे.
केवळ इराणविरुद्ध युद्ध छेडल्यामुळे नाही तर मनमानी पद्धतीने कारभार करून जगाला जो घोर त्यांनी लावला आहे त्याचा त्रास खुद्द अमेरिकेच्या नागरिकांनाही होऊ लागल्यामुळे ट्रम्प (Donald Trump) यांची चर्चा होत आहे.
Mining Permits : अवैध उत्खननाला चाप! खाणकामाचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे..वाचा सविस्तर
Mining Permits : विधीमंडळातील लक्षवेधीनंतर प्रशासकीय फेरबदल; डिजिटल ट्रॅकिंग प्रणालीद्वारे राज्यातील उत्खननावर वॉच ठेवला जाणार.
Digital Arrest : जम्मू-काश्मीरमधील हल्ल्याचे नाव वापरून ८४ वर्षीय वृद्धेची फसवणूक; अटकेची भीती दाखवून बँक खात्यातून ९७ लाख लांबवले.
हा कायदा जादूटोणा (Anti-Superstition Act), अघोरी प्रथा, नरबळी प्रतिबंध करून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी बनवला आहे.
PMC News : महापालिकेत स्वीकृत सदस्यांची वर्णी; भाजपकडून ‘या’दोन नावांवर शिक्कामोर्तब
PMC News : तांत्रिक कारणास्तव रखडलेली निवड आता मार्गी; सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज सादर.
Shrinath Bhimale : जलसंपदा विभागाची १५ टक्के पाणीकपातीची मागणी श्रीनाथ भिमाले यांनी धुडकावली; पुणेकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी महापालिका ठाम.
PCMC 52 Crore Scam : ५२ कोटींचा ‘झोल’? चौकशीसाठी ५ सदस्यीय समिती मैदानात; सात दिवसांत येणार अहवाल
PCMC 52 Crore Scam : मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळाची होणार चौकशी; अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन.
Marriage Issues : शेतकरी नवरा नको ग बाई! श्रीमंत शेतकरी मुलेही लग्नाविना; ग्रामीण भागात भीषण वास्तव
Marriage Issues : भौतिक सुखाच्या अट्टाहासापायी तरुण विवाहापासून वंचित; खासगी नोकरी आणि शेतीपेक्षा सरकारी 'शिपाया'ला मुलींच्या पालकांची पसंती.
Alephata News : ६० दिवसांत हमखास कमाई! सणांच्या तोंडावर ‘या’पिकाने शेतकऱ्यांना दिली नवी आशा
Alephata News : नगदी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल; अवघ्या दोन महिन्यांत हाती येणार उत्पादन, ठिबक सिंचन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती समृद्ध.
Passenger Assaulted : एसटी महामंडळाच्या प्रतिमेला काळीमा; किरकोळ पैशांच्या वादातून प्रवाशाला मारहाण झाल्याने नागरिकांमध्ये संताप, कारवाईची मागणी.
MSRTC Ticket Hike : एसटी महामंडळाने बस आणि स्थानकांच्या स्वच्छतेसाठी तिकीटावर अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे.
Thorandale Murder : थोरांदळे खून प्रकरणाचा छडा! सराईत गुन्हेगार जेरबंद; ४ मोठे गुन्हे उघड
Thorandale Murder : थोरांदळे येथील दामोदर मिंडे यांच्या खून प्रकरणी सराईत गुन्हेगार कबीर काळेसह एकाला अटक; तपासात ओतूर, घोडेगाव आणि नाशिकमधील ४ गुन्हे उघडकीस.
Otur Rural Hospital : ओतूरकरांचा वनवास संपला! अखेर ‘या’दिवशी होणार ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन
Otur Rural Hospital : दैनंदिन 'प्रभात'च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ओतूरच्या आरोग्य सुविधेचा मार्ग मोकळा, आमदार शरद सोनवणे यांनी दिली माहिती.
Satara Zilla Parishad : सातारा जिल्हा परिषदेत भाजपने घडवून आणले सत्तांतर; जयकुमार गोरेंच्या रणनीतीसमोर महाविकास आघाडीचे संख्याबळ ठरले अपुरे.
Sangvi Phata Accident : रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला पाहून मदतीऐवजी मोबाईल काढणाऱ्या तरुणाईच्या मानसिकतेवर संतप्त प्रतिक्रिया.
Mother Kills Son : मुलाचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा खोटा दावा करत मृतदेह बीडला नेला; मात्र आजोबांच्या सतर्कतेमुळे खूनी आईचा पर्दाफाश.
Indrayani River : नदी पात्रात जलपर्णी इतकी वाढली की पाण्याच्या मोटारीच दिसेनाशा झाल्या; उन्हाळ्यात पिकांना पाणी देणे झाले कठीण.
Pune Mumbai Highway Accident : अपघातातील मृताच्या पश्चात हळहळ; महामार्गावरील वाढत्या वेगामुळे पुन्हा एकदा निष्पाप जिवाचा बळी.
PCMC Census 2026 : १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान होणार घरगुती सर्वेक्षण; प्रत्येक कुटुंबाची सामाजिक आणि आर्थिक माहिती संकलित केली जाणार.
PCMC News : नगरसेवक म्हणतात ‘आमची सहीच नाही’; मग ५२ कोटी कोणाच्या खिशात गेले?
PCMC News : स्थायी समितीची मान्यता डावलून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमांचे उल्लंघन; विधी विभागाचा धक्कादायक अभिप्राय.
Maval News : नाणे मावळात ज्वारीचा सुकाळ! यंदा विक्रमी उत्पादनाने बळीराजा सुखावला
Maval News : ज्वारीच्या कडब्यामुळे चाऱ्याची टंचाई दूर; वाढत्या महागाईच्या काळात म्हैस पालन करणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च घटणार.
दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १० एप्रिल २०२६
पंचांगआज मीती चैत्र कृष्ण चतुर्थी नंतर पंचमी शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग व्यतिपात. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर २० चैत्र शके १९४८. शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ मुंबईचा सूर्योदय ०६.२५ मुंबईचा चंद्रोदय ११.०२, मुंबईचा सूर्यास्त ०६.५४. मुंबईचा चंद्रास्त ०९.१३, राहू काळ ०७.५९ ते ०९.३२. कालाष्टमी,चांगला दिवस दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
Satara News : सातारा पालिकेचा मोठा ‘गेम’? उच्च न्यायालयाचा आदेशही सात वर्षे फाईलबंद!
Satara News : लघुउद्योगांसाठी दिलेले भूखंड परस्पर विकले; बेकायदेशीर हस्तांतरण आणि पोटभाडेकरूंच्या विळख्यात करंजे एमआयडीसी.
KKR vs LSG : शेवटच्या षटकापर्यंत रंगला, ज्यामध्ये लखनौच्या युवा खेळाडू मुकुल चौधरीने केकेआरच्या तोंडचा घास हिरावून घेतला.
Homemade Body Scrub : उन्हाळ्यात 'हे'घरगुती स्क्रब ठरतील फायदेशीर, त्वचा होईल चमदार
उन्हाळ्यात तीव्र ऊन, आर्द्रतेमुळे चेहरा काळवंडतो. कडक उन्हामध्येही चेहरा फ्रेश राहावा, चेहऱ्यावरची चमक कायम राहावी यासाठी कॉफी स्क्रब हा अतिशय उत्तम पर्याय आहे. प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि मृत त्वचेच्या पेशींमुळे त्वचा निस्तेज आणि खडबडीत होऊ शकते. कॉफी बॉडी स्क्रबमुळे त्वचा उजळून येईल. हा स्क्रब उन्हाळ्यात खुप फायदेशीर ठरेल.कॉफी आणि नारळ तेलकॉफी आणि नारळ तेलचा स्क्रब हा सर्वात सोप्या आणि प्रभावी स्क्रबपैकी एक असून नारळ तेल त्वचेला खोलवर आर्द्रता देतं आणि कॉफी मृत त्वचेच्या पेशी काढून टाकतं. दोन मोठे चमचे खोबरेल तेलात अर्धा कप कॉफी पावडर मिसळा. हे मिश्रण हळुवारपणे संपूर्ण शरीरावर चोळा. हा स्क्रब कोरड्या त्वचेला आराम देतो आणि त्वचेला मऊ बनवण्यास उपयुक्त ठरतो.कॉफी आणि ब्राऊन शुगरकॉफी आणि ब्राऊन शुगरचा स्क्रब त्वचेवर मृत पेशींचा थर साचला असेल, तर हा स्क्रब उत्तम आहे. साखरेचे कण त्वचेला खोलवर स्वच्छ करतात, ज्यामुळे त्वचा ताजीतवानी आणि तेजस्वी दिसते. हे स्क्रब तयार करण्यासाठी समान प्रमाणात कॉफी आणि ब्राऊन शुगर घेऊन त्यात थोडं ऑलिव्ह ऑइल घाला.कॉफी आणि मधकॉफी आणि मधाचा स्क्रब मधात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, यामुळे त्वचेला आर्द्रता मिळते आणि डाग कमी करण्यास मदत होते. त्वचेचा रंग एकसमान करण्यासाठी आणि नैसर्गिक चमक आणण्यासाठी हा स्क्रब उत्तम आहे. २ चमचे कॉफी पावडरमधे एक चमचा मध आणि थोडं गुलाबजल मिसळून हे स्क्रब तयार करा.कॉफी आणि दहीकॉफी आणि दही हा स्क्रब उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल, तर उत्कृष्ट ठरेल. दही आणि कॉफीचं मिश्रण खूप प्रभावी ठरतं. दह्यातील लॅक्टिक ॲसिड काळवंडलेपणा दूर करतं, तर कॉफीमुळे त्वचा ताजीतवानी वाटते. अर्धा कप दह्यामधे ३ चमचे कॉफी पावडर मिसळा. हे मिश्रण शरीरावर लावून, दहा - पंधरा मिनिटं तसेच राहू द्या आणि नंतर स्क्रब करून काढून टाका.कॉफी आणि दालचिनीकॉफी आणि दालचिनीचा स्क्रब कॉफी आणि दालचिनीचं मिश्रण शरीराच्या ज्या भागांवर अतिरिक्त चरबी किंवा सेल्युलाईट आहे, त्यांच्यासाठी उत्तम आहे. हे मिश्रण बनवण्यासाठी, अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि थोडं बदामाचं तेल कॉफीत मिसळा.स्क्रबिंग करताना नेहमी गोलाकार पद्धतीनं हळुवारपणे स्क्रब करा. बॉडी स्क्रब आठवड्यातून फक्त एकदा किंवा दोनदाच वापरा. अतिवापरामुळे त्वचा सोलली जाऊ शकते. मॉइश्चरायझर म्हणून स्क्रबिंगनंतर लोशन किंवा बॉडी बटर लावा. कोणतीही एलर्जी असल्यास योग्य ती काळजी घ्यावी.
Ajinkya Rahane Six : केकेआर विरुद्ध एलएसजी सामन्यात अजिंक्य रहाणेने मारलेल्या षटकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.
Silver Motors Nissan: पुणे कॅम्पमध्ये ‘सिल्व्हर मोटर्स निसान’च्या नव्या भव्य शोरूमचे उद्घाटन
Silver Motors Nissan: ‘सिल्व्हर जुबिली ग्रुप’च्या सातत्यपूर्ण प्रगतीतील आणखी एक उल्लेखनीय कामगिरी
Finn Allen Controversial Catch : फिन ॲलनच्या विकेटवरून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून त्याच्या कॅचचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
Sanjay Raut : “एफआयआर दाखल करून घेण्याची संधी होती”; काँग्रेस निर्णयावर संजय राऊतांचे विधान
एफआयआर दाखल झाल्यास आपण बारामती पोटनिवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेऊ, असे काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले होते.
Police Suspended : वाघोली पोलीस स्टेशनच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन
Police Suspended: पोलीस हवालदार किरण अब्दागिरे, पोलीस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश
मुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष (वॉर रुम) स्थापन करावे. तसेच, स्थानिक स्तरावर योग्यप्रकारे स्वच्छता होत असल्याची खात्री करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांनी नियमितपणे क्षेत्र भेटी द्याव्यात, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत.घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विविध प्रकल्प, उपक्रम आणि कामकाजाचा आढावा महानगरपालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत गुरुवारी ०९ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आला. यावेळी उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे पुढे म्हणाल्या, स्वच्छता ही नियमित प्रक्रिया आहे. त्यामुळे, ती नियमितपणे तितक्याच प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. मुंबईतील सागरी किनारी रस्ता, महामार्गांवर सूक्ष्म पद्धतीने स्वच्छता व्हायला हवी. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे, याठिकाणी यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र वाहने हवीत. या मार्गांवर स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या विविध बाबी अंतर्भूत असणारी विशेष वाहने (कस्टमाईज्ड व्हेईकल) तयार करण्यासाठी उत्तम संस्थांची मदत घ्यावी. काही वर्दळीची ठिकाणे स्वच्छतेच्या दृष्टीने उत्तम बनवावीत आणि मग तिथे तशीच स्वच्छता कायम राहील, यासाठी नागरिकांना जागरुक करावे, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभाग अंतर्गत कचरा संकलनासाठी आणलेल्या अद्ययावत वाहनांपैकी दहा टक्के वाहने ही इलेक्टॉनिक (ई-व्हेईकल) आहेत. घनकचरा संकलनाच्या कामासाठी मोठ्या क्षमतेची इतक्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वाहने वापरणारी महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगरपालिका आहे, असेही आश्विनी भिडे यांनी यावेळी सांगितले. तसेच, स्वच्छतेप्रती नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिकेकडून आयोजित ‘मुंबई क्लीन लीग’ या स्पर्धेत नागरिक तसेच आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विविध प्रकल्प, उपकरण, कामकाज आदींबाबत उप आयुक्त श्री. किरण दिघावकर यांनी सविस्तर सादरीकरण केले. यावेळी ते म्हणाले की, सध्या महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतून सुमारे ७२०० मेट्रिक टन घनकचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. संपूर्ण मुंबईत उत्तमप्रकारे स्वच्छता राखण्यासाठी सेवा आधारित (सर्व्हिस बेस्ड) कंत्राट पद्धती अवलंबण्यात आली आहे. तसेच, घनकचरा संकलन व वहनाच्या अनुषंगाने नवीन वाहने आणली आहेत. पूर्वी यासाठी १ हजार १९६ वाहने कार्यरत होती. पण, नव्याने आलेल्या वाहनांमध्ये क्षमतावृद्धी केल्याने आता या वाहनांची सख्या ९८८ वर आली आहे. तसेच, त्यांची रंगसंगतीही बदलण्यात आली आहे. मुंबईत ४६ ठिकाणी सुका कचरा विलगीकरण केंद्र आहेत. तर, ९४ वाहने यासाठी पूर्णवेळ कार्यरत आहेत. घरगुती काळजीयोग्य कचरा (डोमेस्टिक सॅनिटरी वेस्ट) संकलनासाठी महानगरपालिकेकडून विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ अनेक आस्थापनांकडून प्रभावीपीणे घेतला जात आहे, अशी माहितीही दिघावकर यांनी दिली.
अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्या पहिल्या माध्यमांशी संवादात सांगितले की हा युद्धविराम अद्याप अत्यंत नाजूक स्थितीत आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत संकेत दिला की हा संघर्षाचा “अंत नाही” आणि जर इस्त्रायलची निश्चित उद्दिष्टे पूर्ण झाली नाहीत, तर इस्त्रायल पुन्हा कधीही लष्करी कारवाई सुरू करू शकतो.पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले, “आमची बोट ट्रिगरवरच आहे आणि गरज पडल्यास आम्ही कोणत्याही क्षणी पुन्हा युद्धात (Iran-US-Israel War) उतरायला पूर्णपणे तयार आहोत.” त्यांनी यावरही भर दिला की युद्धविरामाचा करार इस्त्रायलच्या पूर्ण सहकार्यानेच झाला असून, इस्त्रायलला शेवटच्या क्षणी याची माहिती देण्यात आली होती हा दावा त्यांनी फेटाळून लावला.https://prahaar.in/2026/04/09/green-asha-indian-ship-indian-ship-green-asha-arrives-in-mumbai-in-the-wake-of-iran-war/पंतप्रधानांनी स्पष्ट केले की इराणसोबत झालेला हा तात्पुरता करार हिजबुल्लाहवर लागू होत नाही. त्यांनी इशारा देत सांगितले की तेहरानसोबत शत्रुत्वात तात्पुरती विश्रांती असली तरी इस्त्रायली सैन्य हिजबुल्लाहवरील (Iran-US-Israel War) हल्ले सुरूच ठेवेल.दरम्यान, लेबनानमधील मानवीय संकट अधिकच गंभीर होत चालले आहे. लेबनानच्या (Iran-US-Israel War) नागरी संरक्षण विभागाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण लेबनानमध्ये झालेल्या इस्त्रायली हल्ल्यांमध्ये मृतांचा आकडा वाढून २५४ वर पोहोचला आहे. युद्धविराम करार असूनही सुरू असलेल्या इस्त्रायली कारवायांची तीव्रता या आकड्यांमधून स्पष्ट होत आहे.
चीन वेगाने आधुनिक आणि मानवविरहित युद्धाच्या दिशेने पुढे जात आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात उघड झाले आहे की चीन असे रोबोटिक कुत्रे तयार करत आहे, जे ‘लांडग्यांच्या कळपासारखे’ एकत्रितपणे लढू शकतात. हे रोबोट स्वतः निर्णय घेण्यास सक्षम असून ड्रोनसोबत समन्वय साधत जटिल लष्करी मोहिमाही पूर्ण करू शकतात.चीनच्या सैन्यासाठी तयार करण्यात आलेले हे नवीन रोबोट जुन्या मॉडेलपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. पूर्वी हे रोबोट फक्त एका सैनिकाला मदत करत असत, मात्र आता ते एकत्र काम करणारी संपूर्ण युद्धप्रणाली बनली आहेत. चीनच्या सरकारी दूरदर्शनवरील एका कार्यक्रमात या ‘रोबोट वुल्फ’ची क्षमता देखील दाखवण्यात आली आहे. हे रोबोट विशेषतः शहरी युद्धासाठी डिझाइन करण्यात आले असून ते एकमेकांशी जोडले जाऊन काम करू शकतात. यांच्याकडे एक सामायिक नेटवर्क असते, ज्याला एका प्रकारचा “कॉमन मेंदू” म्हटले जात आहे. या प्रणालीद्वारे ते एकमेकांशी माहिती शेअर करतात आणि सामूहिक निर्णय घेतात.या रोबोटिक कुत्र्यांचे वेगवेगळ्या कामांनुसार प्रकार तयार करण्यात आले आहेत. ‘शॅडो’ व्हर्जन देखरेख आणि माहिती संकलनासाठी वापरले जाते, तर ‘ब्लडी’ व्हर्जन हल्ला करून शत्रूचा नायनाट करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. याशिवाय ‘पोलर’ नावाचा रोबोट सपोर्ट आणि लॉजिस्टिक्सची जबाबदारी सांभाळतो. विशेष म्हणजे ‘ब्लडी’ रोबोटला मायक्रो मिसाइल, ग्रेनेड लॉन्चर आणि ऑटोमॅटिक रायफलसारख्या शस्त्रांनी सुसज्ज करता येते, ज्यामुळे त्याची ताकद मोठ्या प्रमाणात वाढते. या नव्या रोबोट्सचा वेगही अधिक असून ते ताशी 15 किमीपर्यंत धावू शकतात. ते सुमारे 25 किलो वजन वाहून नेऊ शकतात आणि कठीण भौगोलिक परिस्थितीतही कार्यक्षमतेने काम करू शकतात.चीनने केवळ जमिनीवरच नव्हे तर हवेतही प्रगत तंत्रज्ञान विकसित केले आहे. ‘एटलस’ नावाची ड्रोन प्रणाली एकाच वेळी 96 ड्रोन नियंत्रित करू शकते. हे ड्रोन देखरेख, हल्ला आणि शत्रूच्या संप्रेषण प्रणालीमध्ये अडथळे निर्माण करण्याचे काम करतात. या ड्रोनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान बसवलेले असून प्रत्येक ड्रोन स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो आणि इतर ड्रोनसोबत समन्वय राखू शकतो. शास्त्रज्ञ आता अशा तंत्रज्ञानावर काम करत आहेत, ज्यामुळे ड्रोन कोणत्याही सिग्नलशिवाय एकमेकांशी समजून घेऊन कार्य करू शकतील.ड्रोनना रोखण्यासाठी चीनने ‘गुआंगजियान 11-ई’ आणि ‘गुआंगजियान 21-ए’ यांसारखी लेझर शस्त्रे विकसित केली आहेत, जी शत्रूचे ड्रोन निष्क्रिय किंवा नष्ट करू शकतात. समुद्रातही चीनने चालकविरहित जहाजे तयार केली आहेत, जसे ‘एल30’, जी स्वतः मार्ग निश्चित करू शकतात, अडथळ्यांना टाळू शकतात आणि आवश्यकतेनुसार शत्रूला घेरू शकतात.चीनमधील वैज्ञानिकांचे अंतिम लक्ष्य पूर्णपणे स्वयंचलित युद्धप्रणाली विकसित करण्याचे आहे, जी मानवी हस्तक्षेपाशिवाय मोठ्या प्रमाणावर लष्करी मोहिमा पार पाडू शकेल. तज्ज्ञांच्या मते, ‘वुल्फ पॅक’ मॉडेल भविष्यातील युद्धाचे नवे स्वरूप ठरू शकते.
Strait of Hormuz: युद्धाच्या सुरुवातीला अमेरिकेचे लक्ष्य इराणमधील सत्तापालट आणि लष्करी तळांना उद्ध्वस्त करणे हे होते. इराणने सुरुवातीला ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तर दिले, मात्र खरा 'मास्टरस्ट्रोक...

30 C