दौंडमध्ये भलताच प्रकार! भर सभेतून पदाधिकारी पळाले, संतप्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे
प्रभात वृत्तसेवा मलठण – दौंड तालुक्यातील राजेगाव येथील ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत थेट ग्रामपंचायत कार्यालयालाच टाळे ठोकले. विशेष म्हणजे, तहकूब ग्रामसभेमध्ये जमा-खर्चाचा हिशेब विचारला असता सरपंच आणि ग्रामसेवकाने माहिती देण्याऐवजी सभेतून पळ काढल्याने हा प्रकार घडला. जोपर्यंत त्यांना २०२३ ते २०२५ या कालावधीतील संपूर्ण जमा-खर्चाची माहिती मिळत नाही, तोपर्यंत कार्यालय उघडले जाणार […] The post दौंडमध्ये भलताच प्रकार! भर सभेतून पदाधिकारी पळाले, संतप्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे appeared first on Dainik Prabhat .
गुलाबी थंडीत राजकारण ‘हॉट’! पूर्व हवेलीत झेडपी निवडणुकीसाठी सोशल मीडियावर जोर
प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – फेसबुक, ट्विटर, व्हॉटस ॲप व इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडियाचा जोरदारपणे वापर करून २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्यापासून दिल्लीपासून गल्ली पर्यंतच्या सर्वच राजकीय नेत्यांना सोशल मीडियाचे महत्त्व समजले. आगामी काळात राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वीच सोशल मीडियाचा प्रभाव दिसून येत […] The post गुलाबी थंडीत राजकारण ‘हॉट’! पूर्व हवेलीत झेडपी निवडणुकीसाठी सोशल मीडियावर जोर appeared first on Dainik Prabhat .
Paud News: एक दिवसाचा संप, पण हजारो नागरिकांना ताप! पौडमधील अभिलेख कक्ष बंद; नेमकं कारण काय?
प्रभात वृत्तसेवा पौड – महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार आज घेतलेल्या एक दिवसीय राज्यव्यापी संपामुळे मुळशी तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष बंद ठेवण्यात आला. परिणामी, संपूर्ण तालुक्यातील कानाकोपऱ्यातून दस्तऐवजांसंबंधी कामांसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली.महसूल सेवकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला होता. या आंदोलनात मुळशी तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी आपल्या […] The post Paud News: एक दिवसाचा संप, पण हजारो नागरिकांना ताप! पौडमधील अभिलेख कक्ष बंद; नेमकं कारण काय? appeared first on Dainik Prabhat .
Daund News: यवत पोलीस ठाण्यात नेमकं चाललंय काय? बेपत्ता कर्मचारी परतला, पण वाद अजूनही पेटलेलाच
प्रभात वृत्तसेवा यवत – यवत (ता. दौंड) येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे हे गायब झाले होते. ते (दि.१०) रात्री उशिरा आपल्या घरी परतले. यावर अखेर पडदा पडला. मात्र, आंबेडकरी चळवळीचे नेते पंकज धिवार यांनी पत्र देत आंदोलनाची हाक दिली. तत्पूर्वीच रणदिवे घरी आले असल्याची माहिती समोर […] The post Daund News: यवत पोलीस ठाण्यात नेमकं चाललंय काय? बेपत्ता कर्मचारी परतला, पण वाद अजूनही पेटलेलाच appeared first on Dainik Prabhat .
नीरा परिसरात खाकी वर्दीचा धाक संपला? अवैध वाळू माफिआंची मुजोरी; थेट अधिकाऱ्यावरच हल्ला
प्रभात वृत्तसेवा नीरा – अवैध वाहतूक करणाऱ्या उन्माद झालेल्या वाहनचालकांनी महसूल कर्मचाऱ्यावरच हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार जेजुरी पोलीस ठाणे हद्दीतील गुळुंचे येथे घडला. दोन जणांविरोधात जेजुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजे थोपटेवाडी हद्दीत अवैध क्रशर वाहतूक करत असलेल्या डंपरवर कारवाई करण्यासाठी जात असलेल्या महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी शरद […] The post नीरा परिसरात खाकी वर्दीचा धाक संपला? अवैध वाळू माफिआंची मुजोरी; थेट अधिकाऱ्यावरच हल्ला appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा वाल्हे – मागील आठवड्यात सलग दोन-तीन दिवस पहाटे धुके पडत होते. यानंतर वातावरणात अनेक बदल होऊन दररोज पहाटे धुके, दिवसभर ढगाळ वातावरण, दव, उन्हाची कमतरता, कडाक्यांची थंडी आदी वातावरणातील बदलाने कांदा उत्पादन, तसेच रब्बी हंगामातील बहुतांश पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढले आहे. दीड महिन्यांपासून वातावरणातील विविध बदल पिकांवर विविध रोगराईला निमंत्रण देत आहोत. […] The post Walhe News: पांढऱ्या धुक्याने केला घात! कांदा उत्पादकांवर मोठं संकट; महागड्या औषधांचा खर्च परवडणार का? appeared first on Dainik Prabhat .
Vijay Stambh Abhivadan: कोरेगाव भीमासाठी प्रशासनाचा ‘मेगा प्लॅन’तयार; वाचा सविस्तर नियोजन
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणे फाटा येथे एक जानेवारी २०२६ रोजी होणारा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शासकीय यंत्रणानी सर्व संघटनांना विश्वासात घेवून यशस्वी करावा आणि कार्यक्रमास येणाऱ्या अनुयायींची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. एक जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या कोरेगाव भीमा […] The post Vijay Stambh Abhivadan: कोरेगाव भीमासाठी प्रशासनाचा ‘मेगा प्लॅन’ तयार; वाचा सविस्तर नियोजन appeared first on Dainik Prabhat .
पौडमध्ये पार्किंगचा ‘बट्ट्याबोळ’! तहसीलला जायचं तर गाडी लावायची कुठे? नागरिकांचा सवाल
प्रभात वृत्तसेवा पौड – मुळशी तालुक्याच्या मुख्य प्रशासनिक केंद्र असलेल्या पौड येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय आणि नुकतेच सुरू झालेल्या दिवाणी–फौजदारी न्यायालय परिसरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. शासकीय कार्यालयांच्या आवारात वाहन पार्किंगस बंदी करण्यात आल्याने विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला वाहन उभे करण्याशिवाय पर्याय राहत नाही. याचा थेट परिणाम वाहतूक […] The post पौडमध्ये पार्किंगचा ‘बट्ट्याबोळ’! तहसीलला जायचं तर गाडी लावायची कुठे? नागरिकांचा सवाल appeared first on Dainik Prabhat .
Bhor Election: भोरकरांची उत्सुकता शिगेला! निकालाला उरले फक्त ९ दिवस; कोणाचं नशीब उघडणार?
प्रभात वृत्तसेवा भोर (दत्तात्रय बांदल) – भोर नगरपालिकेसाठी २ डिसेंबरला मतदान झाले असून मतमोजणी दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला होणार होती. परंतु अचानक उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मतमोजणी २१ डिसेंबरला घेण्याचा निर्णय घेतला. मतमोजणीसाठी आता अवघे ९ दिवस शिल्लक राहिल्याने नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांसह नागरिकांमध्ये निकालाची उत्सुकता लागली आहे. थंडीचा कडाका वाढला असून पोलिसांना मात्र […] The post Bhor Election: भोरकरांची उत्सुकता शिगेला! निकालाला उरले फक्त ९ दिवस; कोणाचं नशीब उघडणार? appeared first on Dainik Prabhat .
भवानीनगरमध्ये तणाव! ‘छत्रपती’कारखान्यासमोरून पालखी मार्ग नेण्यास सक्त विरोध
प्रभात वृत्तसेवा भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यासमोरील रस्ता व पुलाचे काम सणसरपर्यंत श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सध्या चालू आहे. ते काम करू दिले जाणार नसल्याचा निर्णय ग्रामस्थ, पदाधिकारी यांनी एकमताने घेऊन हा रस्ता कारखान्याच्या बाजूने (बायपास) करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सणसर येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. […] The post भवानीनगरमध्ये तणाव! ‘छत्रपती’ कारखान्यासमोरून पालखी मार्ग नेण्यास सक्त विरोध appeared first on Dainik Prabhat .
Rice Harvest: राजगड तालुक्यात भातमळणीला ‘वेग’; ग्रामीण भागात चैतन्याचे वातावरण
प्रभात वृत्तसेवा विंझर – राजगड तालुक्यातील भातशेतीची लगबग सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली असून, भातमळणीच्या कामाला वेग आला आहे. शेतकरी मोठ्या उत्साहाने आणि जोमाने भाताची मळणी करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात एक आनंदी आणि चैतन्यमय वातावरण तयार झाले आहे. शेतकऱ्यांत पीक हाताशी आल्याने उत्साह वाढला असून त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले आहे. यंदा अनेक भागांमध्ये चांगले […] The post Rice Harvest: राजगड तालुक्यात भातमळणीला ‘वेग’; ग्रामीण भागात चैतन्याचे वातावरण appeared first on Dainik Prabhat .
नागपूर अधिवेशनात मोठी मागणी! ‘या’प्रसिद्ध अध्यात्मिक गुरुंना द्या महाराष्ट्र भूषण; आमदार खताळ आग्रही
प्रभात वृत्तसेवा संगमनेर – सामाजिक, आध्यात्मिक आणि जनकल्याणकारी कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांना राज्य शासनाने ‘महाराष्ट्र भूषण’ या राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात केली आहे. नरेंद्र महाराज यांनी समाजजागृती, व्यसनमुक्ती, शिक्षण, संस्कारवर्धन, आरोग्य, गौसंवर्धन आणि मानवसेवा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य […] The post नागपूर अधिवेशनात मोठी मागणी! ‘या’ प्रसिद्ध अध्यात्मिक गुरुंना द्या महाराष्ट्र भूषण; आमदार खताळ आग्रही appeared first on Dainik Prabhat .
Satara News: ‘बाय गं’असं काय आहे या कादंबरीत? साताऱ्यातील लेखिकेला एकामागून एक पाच मोठे पुरस्कार
प्रभात वृत्तसेवा सातारा – प्रसिद्ध लेखिका विद्या पोळ जगताप यांनी लिहिलेल्या ‘बाय गं’ कादंबरीला मराठी साहित्य विश्वातील मानाचे समजले जाणारे पाच पुरस्कार मिळाले आहेत.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेचा उत्कृष्ट कादंबरीसाठीचा ‘उत्तम बंडू तुपे पुरस्कार’ मसापचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते आणि मसापचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. […] The post Satara News: ‘बाय गं’ असं काय आहे या कादंबरीत? साताऱ्यातील लेखिकेला एकामागून एक पाच मोठे पुरस्कार appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा सातारा – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाने संयुक्तपणे विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे अचूकपणे लेखन कसे करावे, या विषयावर मार्गदर्शन करणारे व्हिडिओ तयार करण्यासाठी मंडळाने शिक्षकांसाठी अभिनव व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित केली आहे. ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग, सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे’ या कृतीकार्यक्रमांतर्गत आयोजित […] The post Satara News: कोकण आणि कोल्हापूर बोर्डाचा ‘मास्टरस्ट्रोक’; विद्यार्थ्यांसाठी सुरू केलाय ‘हा’ खास उपक्रम appeared first on Dainik Prabhat .
सातारकरांनो सावधान! शहरात पुन्हा सक्रिय झालीय ‘ती’टोळी; एकाच दिवसात ३ महिलांना गंडा
प्रभात वृत्तसेवा सातारा – शहरात एका दिवसात तीन वृद्ध महिलांना तोतया पोलिसांनी हजारो रुपयांचा गंडा घातला. पोलीस असल्याचे सांगत विश्वास संपादन करुन सोन्याचे दागिने हातचलाखी करुन नेले. याप्रकरणी शाहूपुरी व सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील कमानी हौद येथे बुधवार दि. 10 रोजी दुपारच्या सुमारास मंगल सदानंद वंजारी (वय 66, रा. […] The post सातारकरांनो सावधान! शहरात पुन्हा सक्रिय झालीय ‘ती’ टोळी; एकाच दिवसात ३ महिलांना गंडा appeared first on Dainik Prabhat .
मोदी सरकार मनरेगा योजनेचे नाव बदलणार; ‘हे’असणार नवं नाव
नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याशी (मनरेगा) संबंधित योजनेला नवे नाव मिळणार आहे. त्या योजनेचे नामकरण पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असे केले जाणार आहे. त्याविषयीच्या विधेयकाला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मनरेगा योजनेंतर्गत देशाच्या ग्रामीण भागांत आर्थिक वर्षातील किमान १०० दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली. आता कामाचे दिवस वाढवून १२५ […] The post मोदी सरकार मनरेगा योजनेचे नाव बदलणार; ‘हे’ असणार नवं नाव appeared first on Dainik Prabhat .
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील पोतरा तेलंगवाडी परिसरात शुक्रवारी (ता. १२) सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या दगावल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व शेतमजूरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कळमनुरी तालुक्यातील पोतरा तेलंगवाडी शिवारातील शेतकरी काशीराम मोदे यांच्या शेतातील आखाड्यावर बांधलेल्या दोन शेळ्यांवर रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला केला. सकाळी काशीराम शेतात गेले […] The post कळमनुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या दगावल्या; वन विभागाचे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन appeared first on Dainik Prabhat .
Vaibhav Suryavanshi Rection on Sledging : भारतीय अंडर-१९ संघाने सध्या सुरू असलेल्या आशिया कपमध्ये आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. यूएईविरुद्धचा पहिला सामना भारताने तब्बल २३४ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत जोरदार विजयी सलामी दिली. या विजयात सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीने सर्वाधिक लक्ष वेधले. वैभवने या सामन्यात १७१ धावांची अविस्मरणीय खेळी करत सर्वांची मने जिंकली. […] The post Vaibhav Suryavanshi : ‘मला मागून कोणी काही बोलले तरी…’, स्लेजिंगबद्दलच्या प्रश्नावर वैभव सूर्यवंशीच्या उत्तराने जिंकली सर्वांची मनं appeared first on Dainik Prabhat .
सायबर सुरक्षेसाठी महाराष्ट्रात मायक्रोसॉफ्ट एआयचा वापर
मुंबई – सायबर सुरक्षेसाठी महाराष्ट्रात नागपूर येथे मायक्रोसॉफ्टच्या एआय टूलचा वापर यशस्वीरित्या झाला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चौकशीचा वेग 80 टक्क्यांनी वाढला आहे, अशी माहिती मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी दिली. नडेला यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मायक्रोसॉफ्टच्या गुंतवणुकीच्या आगामी प्रकल्पाचा बाबत चर्चा केली. सायबर सेक्युरिटीसंदर्भातील प्रकल्प महाराष्ट्रातील इतर भूभागात राबविण्याच्या […] The post सायबर सुरक्षेसाठी महाराष्ट्रात मायक्रोसॉफ्ट एआयचा वापर appeared first on Dainik Prabhat .
मेक्सिकोच्या आयात शुल्कामुळे निर्यातदारांसमोर नवा पेच
नवी दिल्ली – अमेरिकेला होणारी निर्यात कमी झाल्यामुळे निर्यातदारासमोर अडचणी निर्माण झाल्या असतानाच भारतातील विविध उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात आयात करणार्या मेक्सिकोने भारतीय आयातीवर शुल्क लावल्यामुळे निर्यात कमी होण्याचा धोका वाढला आहे. ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक विनी मेहता यांनी सांगितले की, मेक्सिकोत बरेच वाहन उत्पादन प्रकल्प आहेत. या प्रकल्पातून अमेरिकेला निर्यात होत असते. […] The post मेक्सिकोच्या आयात शुल्कामुळे निर्यातदारांसमोर नवा पेच appeared first on Dainik Prabhat .
Silver price: चांदीचा दर शुक्रवारी 5,100 रुपयांनी वाढून 1 लाख 99 हजार 500 रुपये प्रति किलोवर
नवी दिल्ली – अमेरिकेच्या फेडरल रिझवनेे काल व्याजदरात पाव टक्के कपात केल्यानंतर सोने आणि चांदीचे दर नव्या उच्चांकी पातळीवर जात आहेत. जागतिक बाजारात या दोन धातूचा दर वाढत आहे. त्याचबरोबर रुपयाच्या अवमूल्यनामुळे भारताला या दोन धातूची आयात महागात पडत आहे. अशा परिस्थितीत भारतामध्ये या दोन धातूचे दर आणखी वाढत आहेत. दिल्ली सराफात चांदीचा दर शुक्रवारी […] The post Silver price: चांदीचा दर शुक्रवारी 5,100 रुपयांनी वाढून 1 लाख 99 हजार 500 रुपये प्रति किलोवर appeared first on Dainik Prabhat .
रशियाकडून खनिज तेल आयात पाच महिन्यांच्या उच्चांकावर; जानेवारीपासून कमी होण्याची शक्यता
नवी दिल्ली – नोव्हेंबर महिन्यात भारताने रशियाकडून केलेली खनिज तेलाची आयात चार टक्क्यांनी वाढवून 2.6 अब्ज युरो इतकी झाली आहे. हा पाच महिन्याचा उच्चांक आहे. दरम्यान भारताने ऑस्ट्रेलियाला शुद्ध इंधनाची निर्यात वाढविल्याची माहिती समोर आली आहे. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन इयर या संस्थेने उपलब्ध केलेल्या माहितीनुसार भारत अजूनही रशियाकडून खनिज तेल खरेदी […] The post रशियाकडून खनिज तेल आयात पाच महिन्यांच्या उच्चांकावर; जानेवारीपासून कमी होण्याची शक्यता appeared first on Dainik Prabhat .
नागपूर : विधान परिषदेत आ.मिलिंद नार्वेकर यांनी समृद्धी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातात नागरिकांच्या होणाऱ्या मृत्यूबाबत मांडलेल्या लक्षवेधीमध्ये मेघना बोर्डीकर साकोरे ,राज्यमंत्री यांनी शासनाच्या वतीने समृद्धी महामार्गावर केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली त्यांनतर झालेल्या चर्चेत स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था उघडकीस आल्यानंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभापती स्थानावरून शासनास तातडीचे आणि स्पष्ट निर्देश दिले. “सध्याची कार्यरत असणारी स्वच्छतागृहे आणि स्नॅक्स सेंटर आहेत का? असतील तर मग ती गूगलवर टाकली आहेत का? ती टाकली नसतील तर एका महिन्याच्या आत गूगलवर उपलब्ध करून देण्यात यावीत. कारण पाट्या नाहीयेत, कुठे थांबायचे कळत नाही आणि जिथे जावे तिथे स्वच्छतागृह बंद असते. त्यामुळे गूगलवर लोकेशन तातडीने उपलब्ध करण्यात यावे, ” असे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले.लक्षवेधी प्रश्न मांडताना विधानपरिषद सदस्य चित्रा वाघ यांनी समृद्धी महामार्गावरील स्वच्छतागृहांची अत्यंत बिकट परिस्थिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. विशेषतः सिन्नरजवळील ‘हिरकणी कक्ष’ म्हणून दाखविण्यात आलेल्या स्वच्छतागृहात स्वच्छतेचा पूर्ण अभाव असून ते गोडाऊनसारखे वापरले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महामार्गावरील अनेक स्वच्छतागृहे बंद, अस्वच्छ किंवा वापरण्यायोग्य नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, डायबिटीक रुग्ण आणि सर्वसामान्य प्रवाशांना गंभीर गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०१ अंतर्गत दिलेली लक्षवेधी सूचना क्र. ४१२ सभागृहात वाचून दाखवली. या लक्षवेधीमध्ये त्यांनी समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांची धक्कादायक आकडेवारी, मूलभूत सुविधांचा अभाव, पर्यटन हंगामात वाढणारी गर्दी आणि महामार्गावरील सुरक्षा व सोयींविषयी उपस्थित झालेले प्रश्न नमूद केले.या लक्षवेधींना उत्तर देताना शासनाने माहिती दिली की, समृद्धी महामार्गावरील नियोजित २९ सोयी-सुविधांपैकी २२ ठिकाणी इंधन स्थानके, स्नॅक्स सेंटर आणि स्वच्छतागृहांसह सेवा सुरू आहेत. तसेच २१ ठिकाणी एकूण ४२० एफआरपी स्वच्छतागृहे उपलब्ध असून त्यांच्या देखभालीसाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमले आहेत. काही ठिकाणी तात्पुरती हॉटेल व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि उर्वरित सुविधांचे काम जलदगतीने सुरू असल्याचेही सरकारने स्पष्ट केले.मात्र उत्तर समाधानकारक असले तरी प्रत्यक्ष स्थिती वेगळी असल्याचे लक्षात घेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासनाला ठाम शब्दांत निर्देश देताना नमूद केले की, “सध्या प्रत्यक्षात कार्यरत असणारी स्वच्छतागृहे गूगलवर दिसत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना कुठे थांबायचे ते कळत नाही. एका महिन्यात सर्व लोकेशन्स गूगलवर दर्शविण्यात यावीत. स्वच्छता, सुरक्षा आणि सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात.”
मोठी बातमी..! पुण्यातील उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी चार तहसीलदारांसह दहा जण निलंबित
पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या ९० हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खननाप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली. या गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी अशा नऊ जणांचे निलंबन करण्यात आले. परवानगीपेक्षा ९० हजार ब्रास अधिक उत्खनन झाल्याचे ईटीएस मोजणीत निष्पन्न झाले असून, […] The post मोठी बातमी..! पुण्यातील उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी चार तहसीलदारांसह दहा जण निलंबित appeared first on Dainik Prabhat .
पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाची सुरुवात उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला एका भव्य विश्वविक्रमाच्या नोंदीने झाली. ‘लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स’ हा विश्वविक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये प्रस्थापित करून पुणेकरांनी भारतातील बोलीभाषा आणि आदिवासी शब्दांना मुख्य प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा विश्वविक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने भगवान बिरसा मुंडा यांच्या थोर कार्याला […] The post भगवान बिरसा मुंडा यांना खास अभिवादन: पुणे पुस्तक महोत्सवाचा श्रीगणेशा विश्वविक्रमाने, ‘लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स’चा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये समावेश appeared first on Dainik Prabhat .
India U19 beat UAE U19 by to 243 run : सलामीवीर वैभव सूर्यवंशीने केलेल्या दमदार १७१ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने १९ वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेत संयुक्त अरब अमिराती संघाला २३४ धावांनी नमवत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४३३ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात संयुक्त अरब अमिराती संघाचा डाव निर्धारित ५० षटकांत […] The post IND U19 vs UAE U19 : वैभव सूर्यवंशीच्या शतकाने उडवला यूएईचा धुव्वा! टीम इंडियाची २३४ धावांनी विजयी सलामी appeared first on Dainik Prabhat .
Rahul Gandhi News : राहुल गांधींच्या ‘त्या’प्रकरणाच्या सुनावणीला स्थगिती
सुल्तानपूर – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी संबंधित मानहानी प्रकरणाच्या सुनावणीला शुक्रवारी स्थगिती देण्यात आली. गांधींच्या वकिलांनी अतिरिक्त वेळ मागितल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी २३ डिसेंबर रोजी घेण्याचे आदेश दिले. न्यायालयात साक्षीदार रामचंद्र दुबे यांची उलटतपासणी प्रस्तावित होती. मात्र राहुल गांधींचे वकील काशी प्रसाद शुक्ला यांनी वेळ मागितल्याने ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. याआधी ९ […] The post Rahul Gandhi News : राहुल गांधींच्या ‘त्या’ प्रकरणाच्या सुनावणीला स्थगिती appeared first on Dainik Prabhat .
सोलापुरात उसाच्या दरावरुन शेतकरी आक्रमक
सोलापूर : सोलापूर शहराजवळील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या समोर गुरुवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. ऊस गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरीही एकही सहकारी साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केलेला नाही. या कारणावरुन शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 38 साखर कारखाने असूनही शेतकऱ्यांना आपले हक्क मिळत नसल्याची तक्रार ऊस […] The post सोलापुरात उसाच्या दरावरुन शेतकरी आक्रमक appeared first on Dainik Prabhat .
IndiGo flight : इंडिगोचे चार उड्डाण निरीक्षक निलंबित
नवी दिल्ली – इंडिगोच्या ऑपरेशनल संकटाच्या ११ व्या दिवशी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एक मोठे पाऊल उचलले आहे. या अंतर्गत, डिजिसीएने चार उड्डाण निरीक्षकांना निलंबित केले आहे. दुसरीकडे, इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स दुसऱ्यांदा डिजीसीएसमोर हजर झाले. भारताची सर्वात मोठी आणि जगातील पाचवी सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो गेल्या काही दिवसांपासून सर्वात कठीण काळातून जात आहे. […] The post IndiGo flight : इंडिगोचे चार उड्डाण निरीक्षक निलंबित appeared first on Dainik Prabhat .
Police Bribe News: पोलिस निरीक्षकाला 1 लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक; काय आहे प्रकरण?
अमरावती: अवधुतवाडी येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेश रणधीर यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. रणधीर यांच्यावर त्यांच्याच अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. राज्यात सरकारी अधिकारी यांनी लाच स्वीकारण्याच्या प्रकरणांमध्ये […] The post Police Bribe News: पोलिस निरीक्षकाला 1 लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक; काय आहे प्रकरण? appeared first on Dainik Prabhat .
मुद्रांक शुल्क वादाबाबत उच्च न्यायालयाऐवजी थेट राज्य शासनाकडे अपील
विधानसभेत सुधारणा विधेयक एकमताने मंजूर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधयेकनागपूर : मुद्रांक शुल्काशी संबंधित वादांमध्ये सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य विधिमंडळाने घेतला आहे. 'महाराष्ट्र मुद्रांक (दुसरी सुधारणा) विधेयक २०२५' विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले असून, यामुळे आता मुद्रांक शुल्काच्या वादात नागरिकांना उच्च न्यायालयात धाव घेण्याऐवजी थेट राज्य शासनाकडे अपील करण्याची सुलभ संधी उपलब्ध होणार आहे.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक (सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक १०३) विधानसभेत मांडले. या विधेयकावर चर्चा करताना आमदार भास्कर जाधव आणि अतुल भातखळकर यांनी आपली मते मांडली, त्यानंतर सभागृहाने हे विधेयक एकमताने मंजूर केले.नेमका बदल काय?chandraसध्याच्या 'महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, १९५८' मधील तरतुदींनुसार, मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध केवळ उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करूनच दाद मागता येत होती. यामुळे उच्च न्यायालयावर खटल्यांचा भार वाढत होता आणि पक्षकारांचा न्यायालयीन खर्चही वाढत असे. तसेच, न्यायालयात प्रकरणे प्रलंबित राहिल्यामुळे शासचाचा महसूल मोठ्या कालावधीसाठी अडकून पडत असे.यावर उपाय म्हणून या सुधारणा विधेयकाद्वारे अधिनियमात नवीन 'कलम ५३ब' समाविष्ट करण्यात आले आहे. या नव्या तरतुदीनुसारमुख्य नियंत्रक महसूल प्राधिकाऱ्याच्या आदेशाने व्यथित झालेली कोणतीही व्यक्ती आता आदेश मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील दाखल करू शकेल.या अपिलासाठी एक हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. राज्य शासन दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर योग्य तो निर्णय देईल आणि हा निर्णय अंतिम असेल.विधेयकाचे उद्दिष्टया सुधारणेमुळे उच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी होईल आणि सामान्य नागरिकांचा वेळ व पैसा वाचेल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. तसेच, शासनाचा अडकलेला महसूल लवकर मोकळा होण्यास मदत होईल, असेही या विधेयकाच्या उद्देश व कारणांच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या विधेयकामुळे कलम ३२ क आणि कलम ५३ मध्येही अनुषंगिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. नागरिकांना जलद न्याय मिळावा आणि प्रशासकीय कार्यवाही सुलभ व्हावी, या हेतूने हे विधेयक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शेत रस्त्याच्या वादात मिळणार 'मोफत'पोलीस संरक्षण
उपविभागीय अधिकाऱ्यांनाही अधिकार सोपविण्याची तरतूदविलंब टाळण्यासाठी इमेल द्वारे पाठविण्यात येणार नोटीस • विधेयक विधानसभेत एकमताने करण्यात आले मंजूरनागपूर : शेत रस्ते आणि वहिवाटीच्या प्रश्नांवर जलद गतीने नोटीस बजावणे आणि त्यावर निर्णय घेणे शक्य होणार असून, अर्जदार शेतकऱ्यांना आता मोफत पोलीस संरक्षण मिळणार आहे. राज्य शासनाने 'मामलतदार न्यायालय (सुधारणा) विधेयक, २०२५' विधानसभेत एकमताने मंजूर केले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक मांडले.विलंब टाळण्यासाठी ई-मेलद्वारे नोटीस मामलतदार न्यायालय अधिनियम, १९०६ मध्ये कामकाजाच्या वेळी नोटीस बजावण्याच्या प्रक्रियेत स्पष्टता नव्हती, ज्यामुळे अनेकदा न्यायालयीन प्रक्रियेला विलंब होत असे. अपूर्ण पत्ते किंवा पक्षकारांनी नोटीस नाकारल्याने वेळेचा अपव्यय होत असे. यावर उपाय म्हणून, नवीन विधेयकात 'कलम १४अ' समाविष्ट करण्यात आले आहे. यापुढे नोटिसा पोस्टाने किंवा 'इलेक्ट्रॉनिक मेल' सेवेद्वारे देखील बजावता येणार आहेत. जर वरील मार्गांनी नोटीस देणे शक्य नसेल, तर संबंधित जमिनीच्या गावात किंवा सार्वजनिक ठिकाणी नोटीस डकवून ती बजावली असल्याचे मानले जाईल.शेत रस्त्यासाठी मोफत पोलीस संरक्षणशेतकऱ्यांच्या दृष्टीने या विधेयकातील सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे कलम २१ मध्ये करण्यात आलेली सुधारणा होय.शेत रस्ते किंवा वहिवाटीच्या मार्गाच्या वापराच्या प्रकरणांमध्ये, मामलतदाराने दिलेल्या निर्णयाचे पालन करण्यास जर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्याने कसूर केली, तर अर्जदारास 'मोफत पोलीस संरक्षण' पुरविणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. यापूर्वी अंमलबजावणीमध्ये अडचणी येत होत्या, त्या आता दूर होऊन शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देणे सुलभ होणार आहे. अधिकार व्याप्तीत वाढ या विधेयकाद्वारे कलम २३ मध्येही सुधारणा करण्यात आली असून, जिल्हाधिकारी आणि 'डेप्युटी कलेक्टर' यांच्यासोबतच आता 'उपविभागीय अधिकारी' यांनाही अधिकार सोपविण्याची तरतूद करण्यात आली आहे.विधानसभेत विधेयकाचे स्वागतमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक मांडल्यानंतर सभागृहात यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी आमदार भास्कर जाधव, अभिमन्यू पवार, संजय गायकवाड, अभिजीत पाटील, राघवेंद्र पाटील, राजेश पवार आणि राजकुमार बडोले यांनी या विधेयकावर आपली मते मांडली. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या आणि न्यायालयीन प्रक्रियेला गती देणाऱ्या या विधेयकाला सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला, आणि अखेर हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. या सुधारणांमुळे मामलतदार न्यायालयाचे कामकाज अधिक पारदर्शक आणि जलद होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Ashish Nehra on Shubman Gill Form : गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा हे कर्णधार शुबमन गिलच्या सध्याच्या फॉर्मवर होत असलेल्या घाईगडबडीतील टीकेमुळे नाराज आहेत. नेहरा यांनी स्पष्ट केले आहे की, टी-२० सारख्या अस्थिर फॉरमॅटमध्ये केवळ दोन सामन्यांच्या कामगिरीवरून एखाद्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवणे, हे निष्कर्ष काढण्याच्या वाढत्या प्रवृत्तीचे लक्षण आहे. आशिया चषकादरम्यान टी-२० आंतरराष्ट्रीय […] The post Ashish Nehra : ‘पर्याय हवेत तर वॉशिंग्टन सुंदरलाही सलामीला पाठवा…!’, गिलच्या फॉर्मवरून भडकले कोच नेहरा appeared first on Dainik Prabhat .
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रमनागपूर : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या पूर परिस्थितीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता नव्याने अभियानाला सुरुवात करण्यात आली असून या अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधान भवन येथील मंत्रिपरिषद सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रम पार पडला. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सरपंच, ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील दहा वर्षात राज्यामध्ये कुठल्याही अभियानाची यशस्वीता बघितली, तर त्यामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे निदर्शनास येते. कुठलेही अभियान लोकसहभागाशिवाय यशस्वी होत नाही. जलयुक्त शिवार अभियान हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे जलसाक्षरता वाढून राज्य जलसंपन्न होण्यास मदत झाली. जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीतून महाराष्ट्र ' रोल मॉडेल' म्हणून देशात पुढे आले. यासोबतच नरेगा ११ कलमी कार्यक्रम, मागेल त्याला शेततळे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करावे. ग्रामपंचायत डिजिटल, स्वयं अर्थपूर्ण असाव्यात, तसेच गावांचा पर्यावरणपूरक विकास करण्यात यावा, यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रामसभांना या अभियानासाठी सहकार्य करणारे कलाकार उपस्थित राहणार आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांमध्ये समृद्धीची स्पर्धा निर्माण होईल. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी अभियानात सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी अभियानाची पार्श्वभूमी सांगितली. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला अभिनेते भारत गणेशपुरे, संदीप पाठक, पृथ्वीक प्रताप, अभिनेत्री शिवाली परब, विभागाचे अधिकारी उपस्थित होते.थोडक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान..ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या स्तरावर केंद्र, राज्य शासनाच्या सर्व योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्पर्धा व्हावी, या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पंचायतराज संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांची कार्यक्षमता वाढावी, यासाठी तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर स्पर्धात्मक स्वरुपात सन 2025-26 या वर्षापासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येत आहे.ग्रामपंचायत सक्षम, सुशासनयुक्त, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, उपजिविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ हे या अभियानाचे मुख्य घटक आहेत. या अभियानांतर्गत विविध स्तरांवर पुरस्कार दिले जाणार आहेत.
उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी नाही, तर सहलीला आलेत; परिणय फुकेंचा घणाघात
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदावरून केलेल्या विधानांचा भाजपा आमदार परिणय फुके यांनी खरपूस समाचार घेतला आहे. आमदार फुके यांनी आज माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे हे अधिवेशनासाठी नाही, तर नागपुरात केवळ सहलीसाठी आले आहेत, असा खोचक टोला लगावत फुके यांनी ठाकरे गटाच्या आरोपांची हवाच काढून घेतली.अडीच वर्षांत अधिवेशन घेतले नाही, आता नियम शिकवताय?उद्धव ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्यावर टीका करताना परिणय फुके म्हणाले, मी उद्धव साहेबांचे नागपुरात स्वागत करतो, पण ते इथे विधिमंडळाचे कामकाज करण्यासाठी आले नसून सहलीसाठी आले आहेत. फुके यांनी आठवण करून दिली की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांच्या काळात त्यांनी नागपुरात एकही अधिवेशन घेतले नाही. ज्यांनी विदर्भात अधिवेशनच होऊ दिले नाही, ते आता नियमांच्या गोष्टी करत आहेत, हे हास्यास्पद असल्याचे फुकेंनी म्हटले.विरोधी पक्षनेतेपदासाठी १०% आमदारांचा नियमविरोधी पक्षनेता कोण असावा, हे सरकारने ठरवू नये या ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना फुके यांनी तांत्रिक मुद्दा मांडला. ते म्हणाले, विरोधी पक्षनेतेपदासाठी संबंधित पक्षाकडे सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान १० टक्के आमदार असणे आवश्यक असते. म्हणजेच किमान २९ आमदार निवडून आलेले असावे लागतात. सध्या ठाकरे गटाकडे हे संख्याबळ नाही, त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकले नाही. त्यांची हीच 'खदखद' आता बाहेर येत असल्याचे फुके यांनी स्पष्ट केले.उपमुख्यमंत्री किती असावेत हा मुख्यमंत्र्यांचा अधिकारदोन उपमुख्यमंत्री असणे घटनाबाह्य असल्याच्या आरोपांवरूनही फुकेंनी ठाकरेंना आरसा दाखवला. किती उपमुख्यमंत्री ठेवायचे हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार असतो. उद्धव ठाकरेंना विसर पडला असेल की अजित पवार त्यांच्याच मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते, असे सांगत फुके यांनी महायुतीचे सरकार आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे काम उत्तम रितीने करत असल्याचे सांगितले.बॅगा आणि हेलिकॉप्टरचे आरोप म्हणजे पराभवाची भीतीविरोधकांकडून हेलिकॉप्टरमधून पैसे आणले जात आहेत आणि बॅगा तपासल्या जाव्या असे आरोप केले जात आहेत. यावर बोलताना फुके म्हणाले की, हे केवळ आगामी पराभवाच्या भीतीतून शोधलेले नवीन फंडे आहेत. विधानसभेत पराभव झाल्यानंतर त्यांनी मतदार याद्यांवर बोट ठेवले होते. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणारा पराभव त्यांना दिसू लागल्याने त्यांनी आतापासूनच 'हेलिकॉप्टर आणि बॅगा' अशी नवीन कारणे शोधायला सुरुवात केली आहे. ही त्यांची 'पराजित मानसिकता' आहे, अशा शब्दांत परिणय फुके यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
नवी दिल्ली: भारताच्या आर्थिक क्षेत्रात एक महत्त्वाचा आणि मोठा बदल घडवणारा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ने भारतीय डाक विभाग (India Post) सोबत एक महत्त्वपूर्ण करार (MoU) केला आहे. या करारानुसार, टपाल खात्याचे कर्मचारी आणि एजंट आता प्रशिक्षण घेऊन प्रमाणित म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर म्हणून काम करणार […] The post पोस्टमन आता MF डिस्ट्रीब्युटर! गावागावात पोहोचणार ‘म्युच्युअल फंड’ सेवा; BSE – India Postमध्ये ऐतिहासिक करार appeared first on Dainik Prabhat .
Copra MSP: सुक्या खोबऱ्याच्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारने वाढवला भाव
नवी दिल्ली: केंद्र सरकारने कोपरा अर्थात सुक्या खोबऱ्याच्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक कॅबिनेट समितीने (CCEA) 2026 च्या हंगामासाठी कोपराच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार, मिलिंग कोपरासाठी 2026 च्या हंगामाकरिता 12,027 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी […] The post Copra MSP: सुक्या खोबऱ्याच्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारने वाढवला भाव appeared first on Dainik Prabhat .
महायुतीतून राष्ट्रवादीला डच्चू ? कोल्हापूरात शिंदेसेना तर इचलकरंजीत भाजप आक्रमक
कोल्हापूर : कोल्हापूर व इचलकरंजी या महापालिकेच्या निवडणुका महायुतीच्या झेंड्याखाली लढवण्याचा निर्धार केला असला तरी दुसरीकडे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला डावलण्याच्या हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली नसल्याचा आरोप करून राष्ट्रवादीला बाजूला सारण्याचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. इचलकरंजी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने महायुतीत […] The post महायुतीतून राष्ट्रवादीला डच्चू ? कोल्हापूरात शिंदेसेना तर इचलकरंजीत भाजप आक्रमक appeared first on Dainik Prabhat .
नवाब मलिकांचे नेतृत्व भाजपला कदापि मान्य नाही, अमित साटम यांचा इशारा
नागपूर: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (अजित पवार गट) नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून थेट इशारा दिला आहे. नवाब मलिक यांचे नेतृत्व भाजपला कदापि मान्य नाही, असे स्पष्ट करत साटम यांनी युतीबाबत भाजपची भूमिका रोखठोकपणे मांडली आहे.काय म्हणाले अमित साटम?आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमित साटम यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात भाजपची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, जर मुंबई महापालिका निवडणूक लढवताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे सोपवले जाणार असेल, तर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीसोबत कोणत्याही प्रकारची युती करणार नाही.युतीसाठी भाजपची अटसाटम यांनी पुढे स्पष्ट केले की, आमचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेसला नसून केवळ नवाब मलिक यांच्या नेतृत्वाला आहे. जर नवाब मलिक नेतृत्व करणार नसतील आणि पक्षाची धुरा दुसऱ्या कोणाकडे असेल, तर युती करण्यासाठी आमचा कोणताही विरोध नाही, असे साटम यांनी नमूद केले.मलिकांशी संबंध ठेवणार नाहीनवाब मलिक यांच्यावर असलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्यापासून अंतर राखले आहे. यावर बोलताना साटम म्हणाले, नवाब मलिक यांचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाला कदापि मान्य नाही. तसेच मलिक यांच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध भारतीय जनता पक्ष ठेवणार नाही.निर्णय राष्ट्रवादीचा, भूमिका भाजपचीराष्ट्रवादी काँग्रेसने नेतृत्व कोणाकडे द्यावे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे साटम यांनी मान्य केले. कोणाकडे नेतृत्व द्यायचे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय आहे, पण आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे, असे सांगत साटम यांनी चेंडू आता राष्ट्रवादीच्या कोर्टात टोलावला आहे.
सभागृहात मंत्री येत नसतील, तर त्यांच्यावर बिबटे सोडा - सुधीर मुनगंटीवार
नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून विधानसभेत मंत्री आाणि संबंधित विभागांचे सचिव उपस्थित नसल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित होत असताना, शुक्रवारी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही असाच अनुभव आला. मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून आणि घरकुल योजनेच्या रखडलेल्या निधीवरून मुनगंटीवार यांनी सभागृहात आक्रमक होत सरकारला धारेवर धरले. ‘सभागृहात मंत्री येत नसतील, तर त्यांच्यावर बिबटे सोडा, हे धंदे आता बंद करा’, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी आपला संताप व्यक्त केला.विधानसभेत सभागृहात अर्धा तास चर्चा सत्रात मुनगंटीवार बोलण्यासाठी उभे राहिले असता संबंधित विभागाचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावरून त्यांचा पारा चढला. त्यांनी तालिका अध्यक्षांना सुनावले की, मंत्री महोदयांना सभागृहात आणण्याचे दायित्व आमचे नसून ते तुमचे आहे. आमदार उपस्थित असतांना मंत्री अनुपस्थित रहातात. हे आता चालणार नाही, असे ते म्हणाले.भारत माता माझी आई, डोके ठेवायला जागा नाही!चंद्रपूर जिल्ह्यातील ‘यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने’च्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुलाचे लाभ देण्यावरून रखडलेल्या निधीवरून मुनगंटीवार अधिकच आक्रमक झाले. ‘भारत माता माझी आई; पण डोक ठेवायला जागा नाही’, अशी गरिबांची अवस्था झाली आहे. मुंबईत असलेल्यांसाठी सरकारकडे ११ लाख कोटी रुपये आहेत; पण आमच्या चंद्रपूरमधील तुटक्या-फुटक्या घरात रहाणार्या गरिबांसाठी लागणारे ९६ कोटी ३६ लाख रुपये मिळत नाहीत. ज्या अधिकार्यांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे, त्यांनी कोरड्या विहिरीत जीव दिला पाहिजे, अशा तिखट शब्दांत त्यांनी टीका केली.बिरबलाची खिचडी शिजेल; पण तुमचा निधी येणार नाही!सरकारच्या कारभारावर टीका करतांना मुनगंटीवार म्हणाले की, या योजनेचा एक हप्ता मिळाल्यावर दुसर्या हप्त्यासाठी गरिबांना चातक पक्ष्याहून अधिक वाट पहावी लागते. कापूसकोंड्याची गोष्ट संपेल, बिरबलाची खिचडी शिजेल, चिऊताई दरवाजा उघडेल; पण तुमचा निधी काही येत नाही. अधिकार्यांनी लिहून दिलेली उत्तरे वाचू नका, तर निधी कधी देणार ते स्पष्ट सांगा, असा थेट जाब त्यांनी मंत्री अतुल सावे यांना विचारला.चंद्रपूरला १०० टक्के निधी त्वरित देऊ - मंत्री अतुल सावे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी परखड शब्दांमध्ये घरकुल योजनेविषयीची आपली तक्रार मांडल्यानंतर ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी ‘निधी लवकरात लवकर दिला जाईल’, असे आश्वासन दिले. ते म्हणाले की, पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी ३०० कोटी रुपये संमत झाले आहेत. चंद्रपूरला विहीत १०० टक्के निधी त्वरित दिला जाईल. आपण नवीन घरकुल ‘पंतप्रधान आवास योजने’च्या माध्यमातून देत आहोत; पण आधीच्या घरकुल योजनेसाठी आपण ३०० कोटी रुपयांची व्यवस्था केली आहे. त्वरित त्यावर कार्यवाही होईल, असे उत्तर त्यांनी दिले.
बहराइच: उत्तर प्रदेशातील बहराइच शहरात गेल्या वर्षी दुर्गा विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचार आणि रामगोपाल मिश्रा यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने गुरुवारी निर्णय दिला आहे. सुमारे १४ महिने चाललेल्या सुनावणीनंतर, अप्पर सत्र न्यायाधीश (ADJ) यांच्या न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी सरफराज याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. याचबरोबर, सरफराजचे वडील आणि दोन भावांसह एकूण नऊ अन्य दोषींना जन्मठेप सुनावण्यात […] The post बहराइच दुर्गा विसर्जन हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी सरफराजला फाशीची शिक्षा, 9 जणांना जन्मठेप, तिघांची निर्दोष मुक्तता appeared first on Dainik Prabhat .
‘पगडी’पद्धत म्हणजे नेमके काय? मुंबईतील लाखो रहिवाशांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
मुंबई: मुंबईतील जुन्या आणि धोकादायक ‘पगडी’ इमारतींमध्ये राहणाऱ्या लाखो लोकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या या इमारतींच्या आड येणारे सगळे अडथळे आता दूर होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने मुंबईतील ‘पगडी सिस्टीम’ (भाडेकरू पद्धत) टप्प्याटप्प्याने संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. यासाठी राज्य सरकार लवकरच नवे आणि स्पष्ट नियम लागू करणार […] The post ‘पगडी’ पद्धत म्हणजे नेमके काय? मुंबईतील लाखो रहिवाशांना राज्य सरकारचा मोठा दिलासा appeared first on Dainik Prabhat .
वर्षभरात राज्यात पापलेटच्या उत्पादनात ३ हजार ५५ मेट्रिक टनांची वाढ
मंत्री नितेश राणेंची माहिती; कायदेशीर बाबींचे काटेकोर पालन करूनच मासेमारीला परवानगीमुंबई : राज्यात पापलेट (सिल्वर पॉम्फ्रेट) मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजार ५५ मेट्रिक टनांची वाढ झाली असून, हे संवर्धनात्मक उपाययोजनांचे यश असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.शुक्रवारी विधानसभेत निवेदन करताना मंत्री नितेश राणे म्हणाले, “सोशल मीडियावर पापलेट उत्पादनाबाबत निर्माण झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही माहिती देत आहोत. राज्य सरकारने ५ सप्टेंबर २०२३ रोजी सिल्वर चांदेरी पापलेटला ‘राज्य मासा’ म्हणून घोषित केले आहे. या प्रजातीचे जतन, सागरी परिसंस्थेचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी मत्स्यसाठा टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.”त्यांनी पुढे सांगितले की, शाश्वत मासेमारीसाठी लहान माशांची पकड रोखण्याच्या उद्देशाने २ नोव्हेंबर २०२३ रोजी ५४ प्रजातींसाठी किमान कायदेशीर आक्रमण निश्चित केले आहे. यात पापलेटचाही समावेश असून त्याचे किमान कायदेशीर आक्रमण १३४ मिमी टीएल ठरवण्यात आले आहे. त्यामुळे फक्त १३४ मिमीपेक्षा मोठ्या पापलेटचीच मासेमारी कायदेशीर राहील. दरवर्षी १ जून ते ३१ जुलै राज्याच्या समुद्रकिनारी मासेमारी पूर्णपणे बंद ठेवली जाते. तसेच, मत्स्यप्रजनन आणि परिसंस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी राज्यात १८२ ठिकाणी कृत्रिम रीफ (भिंती) उभारण्यात आल्या आहेत. यात पालघर जिल्ह्यात ३७ आणि ठाणे जिल्ह्यात १० कृत्रिम रीफचा समावेश आहे.उत्पादनाच्या आकडेवारीबाबत बोलताना मंत्री राणे यांनी सांगितले की, २०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्यात १३ हजार ३३३ मेट्रिक टन पापलेटचे उत्पादन झाले होते, तर २०२४-२५ मध्ये ते वाढून १६ हजार ३८८ मेट्रिक टन झाले आहे. म्हणजेच एका वर्षात ३ हजार ५५ मेट्रिक टनांची थेट वाढ नोंदवली गेली. “कायदेशीर बाबींचे काटेकोर पालन करूनच पापलेटची मासेमारी करण्यास परवानगी आहे. सरकार पापलेट संवर्धनाबाबत अत्यंत सकारात्मक असून, सतत नवे उपाय योजत आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळात प्रवेशासाठी पासेसची दीड हजारात विक्री?; चौकशीचे आदेश
नागपूर : नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अभ्यागतांना प्रवेश देणारे पास दीड हजार रुपयांत विकले जात आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला. या प्रकारांमुळे दहशतवादीही सहज आत शिरू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश तालिका सभापती कृपाल तुमाने यांनी दिले आहेत.गेल्या वर्षी काही आमदारांच्या तक्रारीनंतर अभ्यागतांसाठी दररोजचे प्रवेश पास देण्यावर बंदी घालण्यात आली होती. तसेच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनीही हिवाळी अधिवेशन सुरू होताच सर्व सदस्यांना पासशिवाय कोणालाही विधानभवन परिसरात आणू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दोन दिवसांत २३ आमदारांनी विनापास लोकांना आत नेल्याचे उघड झाले होते.आता हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी (१२ डिसेंबर) शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी थेट विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करीत खळबळ उडवून दिली. ते म्हणाले, “माझ्या कार्यकर्त्यांकडे आमदारांचे पत्र असूनही त्यांना पास मिळाले नाहीत आणि ते दिवसभर बाहेर उभे होते. पण बाहेर दीड हजार रुपये देऊन पास मिळत आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. अशा पद्धतीने विधिमंडळाची सुरक्षा धोक्यात आली आहे. दीड हजारात पास मिळत असेल तर दहशतवादी कधीही आत येऊ शकतो. कुणी पैसे घेऊन हे पास जारी केले, याची चौकशी व्हावी”, अशी मागणी त्यांनी केली.हेमंत पाटील यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, “अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच मर्यादित पास देण्याचे सांगितले होते. मात्र आज विधिमंडळ परिसरात एवढी गर्दी आहे की नीट चालता येत नाही. हे सगळे लोक आत कसे आले? इतक्या मोठ्या प्रमाणात पास कुणी आणि का जारी केले?”असे सवाल त्यांनी केले. दोन्ही आमदारांच्या मागणीनंतर तालिका अध्यक्ष कृपाल तुमाने यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Eknath Shinde : “लोकशाही हे पवित्र मंदिर आहे आणि सर्वसामान्य जनता हेच माझे दैवत आहे”–एकनाथ शिंदे
Eknath Shinde : सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन वेळप्रसंगी कायदा व लालफितीत न अडकता आवश्यकतेनुसार कायदे बदलण्याची तयारी लोकप्रतिनिधींनी ठेवावी यासाठी संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या आयुधांचा वापर करावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. विधानपरिषद सभागृहात राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे लोकप्रतिनिधींची मतदार संघांप्रती असलेली जबाबदारी आणि त्यासाठी सभागृहाच्या माध्यमातून उपलब्ध असलेले संविधानीक व्यासपीठ या विषयावर […] The post Eknath Shinde : “लोकशाही हे पवित्र मंदिर आहे आणि सर्वसामान्य जनता हेच माझे दैवत आहे” – एकनाथ शिंदे appeared first on Dainik Prabhat .
वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही; उद्धव ठाकरेंची ठाम भूमिका
नागपूर : वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही. विदर्भ हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे. तो पूर्ण महाराष्ट्राचाच भाग आहे. सध्याचे मुख्यमंत्री हे संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मात्र ते विदर्भातून येतात, तरी देखील वेगळ्या विदर्भाचा मुद्दा निघत असेल तर आता महाराष्ट्र अखंड ठेवणार की तुकडे होणार हे सरकारने स्पष्ट करावे, अशी स्पष्ट व […] The post वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही; उद्धव ठाकरेंची ठाम भूमिका appeared first on Dainik Prabhat .
Salil Arora smashed 39 ball century in SMAT 2025 : पंजाबचा यष्टिरक्षक-फलंदाज सलिल अरोराने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. पुणे येथील डीवाय पाटील अकादमीवर झालेल्या नॉकआऊट सामन्यात झारखंडविरुद्ध खेळताना सलिलने केवळ ३९ चेंडूंमध्ये शतक झळकावत क्रिकेट वर्तुळात खळबळ माजवली आहे. तो या स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा चौथा खेळाडू ठरला असून पंजाबचा दुसराच […] The post Salil Arora : पंजाबच्या सलिलचा ‘SMAT 2025’ मध्ये धुमाकूळ! ३९ चेंडूत शतक ठोकत ऑक्शनपूर्वी फ्रेंचायझींना दिला संदेश appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली: देशातील किरकोळ (रिटेल) महागाई दराने नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा किंचित उसळी घेतली आहे. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे त्यांच्या खिशावरील ताण वाढला आहे. शुक्रवारी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित असलेला किरकोळ महागाई दर (Retail Inflation) ऑक्टोबर महिन्यातील ०.२५ टक्क्यांवरून वाढून नोव्हेंबरमध्ये ०.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही […] The post नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई वाढली; भाजीपाला, अंडी, मांस-मासे झाले महाग; सामान्य नागरिकांच्या खिशावर वाढला ताण appeared first on Dainik Prabhat .
मोठी बातमी..! तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती; राष्ट्रीय हरित लवादाचा अंतरिम आदेश
नाशिक : नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील असलेली १८०० झाडे तोडून तेथे साधुग्राम उभारण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर या वृक्षतोडीला जोरदार विरोध केला जात आहे. नाशिकमधूनच नव्हे, तर राज्यभरातून निसर्गप्रेमी, अभिनेते, नागरिक यांनी या वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. अखेर या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ही झाडे तोडण्यास राष्ट्रीय हरिद […] The post मोठी बातमी..! तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती; राष्ट्रीय हरित लवादाचा अंतरिम आदेश appeared first on Dainik Prabhat .
COVID-19 cases : २०२५ मध्ये कोविड मृत्यूंमध्ये मोठी वाढ; आकडा ऐकून उडतील होश !
COVID-19 cases : राज्यात कोविड-१९चा प्रसार २०२५ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत निम्म्याहून अधिक कमी झाला असला, तरी मृत्यूंच्या आकड्यात किरकोळ वाढ झाल्याची माहिती महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी विधानसभेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन पाटील यांच्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात मंत्री अबिटकर म्हणाले की, जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत कोविड-१९मुळे ३५ मृत्यू […] The post COVID-19 cases : २०२५ मध्ये कोविड मृत्यूंमध्ये मोठी वाढ; आकडा ऐकून उडतील होश ! appeared first on Dainik Prabhat .
Share Market This Week: या आठवड्यात गुंतवणूकदारांचे 1.41 लाख कोटी पाण्यात
Share Market This Week: भारतीय शेअर बाजारासाठी हा आठवडा (८ डिसेंबर ते १२ डिसेंबर) मोठा चढ-उताराचा आणि निराश करणारा ठरला. आठवड्याच्या सुरुवातीला विक्रमी उंची गाठल्यानंतर आलेल्या जोरदार नफावसुलीमुळे बाजार दबावाखाली आला. परिणामी, आठवडाभरात बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी-५० मध्ये साप्ताहिक आधारावर ०.५ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या एकूण संपत्तीचे ₹ १,४१,८१३.४७ कोटी इतके […] The post Share Market This Week: या आठवड्यात गुंतवणूकदारांचे 1.41 लाख कोटी पाण्यात appeared first on Dainik Prabhat .
धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?
बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत पीएचडी करण्याचा मानस जाहीर केला आहे. कोणत्या विषयावर संशोधन करणार, याबद्दल सध्या उत्सुकता वाढली असून या चर्चेला मोठी रंगत आली आहे.काही दिवसांपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितले की ते नियमितपणे अभ्यास करत आहेत आणि पीएचडीसाठी तयारीही सुरू आहे. यावेळी पीएचडीच्या विषयाबाबत विचारले असता त्यांनी विनोदात, भूताखेतांवर आधारित विषयाचा गंभीर अभ्यास करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले.जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये भुतांवर संशोधन केले जाते आणि काही संशोधकांनी या विषयावर पीएचडीही केली आहे. ऑक्सफर्डसारख्या नामांकित विद्यापीठातही अलौकिक घटनांवर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. भविष्यात या विषयावर बाहेरील विद्यापीठात अर्ज करण्याची इच्छा असल्याचे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले.सध्या त्यांनी कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेतलेला नसला तरी भुतांवर आधारित संशोधनाचा त्यांचा इरादा स्पष्ट दिसतो. अलौकिक विषयांवरील अभ्यास नवा नाही. एडिनबर्ग विद्यापीठ गेल्या पाच दशकांपासून भूतविद्येसंबंधी अभ्यासक्रम राबवत आहे. भारतातही काही शिक्षणसंस्था असे कोर्स चालवतात. थॉमस फ्रान्सिस विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठात आयुर्वेद शाखेत ‘भूत विद्ये’वर प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या या नव्या निर्णयामुळे भूतविद्या आणि अलौकिक संशोधनाविषयी नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
विश्वासार्ह ‘ए वन ग्रुप’ची नवी ओळख ‘युगम रिअल्टी’; ‘Foundation to Future’ टॅगलाईनसह नवी वाटचाल!
पुणे: बांधकाम क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या आणि गुणवत्तापूर्ण निवासी व व्यावसायिक प्रकल्प उभारणाऱ्या ‘ए वन ग्रुप’ने आता आपली ओळख बदलून ‘युगम रिअल्टी’ या नवीन ब्रँड नावाने काम करण्याची घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण बदलासह कंपनीने ‘Foundation to Future’ ही नवी टॅगलाईनही जाहीर केली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय कणेकर यांनी ही माहिती […] The post विश्वासार्ह ‘ए वन ग्रुप’ची नवी ओळख ‘युगम रिअल्टी’; ‘Foundation to Future’ टॅगलाईनसह नवी वाटचाल! appeared first on Dainik Prabhat .
इंडिगोची उड्डाणं रद्द, शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान
मुंबई : इंडिगो विमान कंपनीची शेकडो उड्डाणं रद्द झाली. या गोंधळाचा प्रवाशांना फटका बसला. पण फक्त प्रवासीच नाही तर विमानातून फुलांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागले.लग्नसराईचा हंगाम आणि फुलांना असलेली आंतरराष्ट्रीय मागणी यामुळे अनेक फूल उत्पादक शेतकरी विमानांतून फुलांचा मोठ्या शहरांमध्ये पुरवठा करतात. वाजवी दरात फुलांची वाहतूक करणे शक्य असल्यामुळे देशातील अनेक शेतकरी विमानांचा पर्याय वापरत होते. यातही बहुसंख्य शेतकऱ्यांचा कल फुलांच्या वाहतुकीसाठी इंडिगोची विमानं वापरण्याकडे होता. पण इंडिगो विमान कंपनीची शेकडो उड्डाणं रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांचे फुलांच्या वाहतुकीचे नियोजन कोलमडले.मावळ तालुक्यातून दररोज सुमारे ५० हजार गुलाब फुलांची विमानाने निर्यात केली जाते. सामान्यतः एका गुलाबाचा भाव सरासरी २० रुपये असतो, पण या फुलांची किंमत दररोज दहा लाख रुपये होते. गुलाबांची निर्यात हा मावळमधील शेतकऱ्यांसाठी मोठा व्यवसाय आहे. मात्र, इंडिगोच्या विमानसेवेतील गोंधळामुळे देशांतर्गत आणि परदेशात निर्यात होणाऱ्या गुलाब फुलांच्या ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत. ही परिस्थिती फक्त मावळचीच नाही राज्यातील अनेक फुल उत्पादकांचे कमी जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. या तोट्याची भरपाई कोण करणार असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
नागपूर : राज्याच्या विकासाची भाग्यरेषा ठरलेल्या 'समृद्धी महामार्गा'वर प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. महामार्गावरील अपघातांची आकडेवारी सरकारने अत्यंत पारदर्शकपणे सभागृहात मांडली असून, केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर वाहन चालवताना होणाऱ्या मानवी चुकांकडेही गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत राज्यमंत्री मेघा बोर्डीकर यांनी आज विधानपरिषदेत व्यक्त केले.अपघातांचे विश्लेषण आणि सरकारी वास्तवविरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना राज्यमंत्री मेघा बोर्डीकर यांनी कोणतीही लपवाछपवी न करता २०२३ ते २०२५ या कालावधीतील आकडेवारी स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, या कालावधीत ४२५ अपघात झाले असून, त्यामध्ये ४०५ व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, या अपघातांचे तांत्रिक विश्लेषण केले असता, हे अपघात रस्त्याच्या त्रुटींमुळं नसून प्रामुख्याने मानवी चुकांमुळे होत असल्याचे समोर आले आहे.सरकारने निदर्शनास आणून दिले की, जास्त वेगाने गाडी चालवणे (Overspeeding), चालकाला डुलकी लागणे, टायर फुटणे, सुरक्षित अंतर न ठेवणे आणि चुकीचे ओव्हरटेकिंग हीच अपघातांची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे सरकारने आता जनजागृती आणि नियम पालनावर अधिक भर देण्याचे धोरण स्वीकारले आहे.सत्ताधारी बाकांवरील सदस्य आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सिन्नर येथील महिला स्वच्छतागृहांच्या अवस्थेबाबत प्रशासनाचे कान टोचले. सिन्नर येथे महिला स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय घाण असून ती तातडीने सुधारली पाहिजे, अशी रोखठोक भूमिका वाघ यांनी मांडली. सरकारने या तक्रारीची अत्यंत गंभीर दखल घेतली असून, संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना तातडीने स्वच्छता आणि डागडुजी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महिलांच्या सुरक्षेच्या आणि सोयीच्या बाबतीत सरकार तडजोड करणार नाही, असे संकेत यावेळी देण्यात आले.तंत्रज्ञानाचा वापर वाढवणारयाच चर्चेदरम्यान सभापतींनी प्रवाशांच्या सोयीसाठी 'गुगल मॅप'वर (Google Maps) रेस्ट स्टॉप्सचे लोकेशन अपडेट करण्याची महत्त्वाची सूचना केली. ही सूचना सरकारने तत्काळ मान्य केली असून, प्रवाशांना महामार्गावर सुविधा शोधताना त्रास होऊ नये, यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. विरोधक मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या एअर ॲम्ब्युलन्स आणि इतर सुविधांच्या मुद्द्यावरही सरकार टप्प्याटप्प्याने काम करत असून, समृद्धी महामार्ग हा 'अपघातमुक्त' करण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्नशील असल्याचे या चर्चेतून दिसून आले.
महाराष्ट्र सरकारकडून पोलिसांना मोठी भेट; ५३८ चौरस फूट सरकारी घरे मंजूर, कुणाला होणार फायदा?
मुंबई : मुंबई पोलिस दलातील कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. आतापर्यंत मुंबईतील पोलीस कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टरना केवळ ४८४ चौरस फूट (४५ चौरस मीटर) सरकारी घरे मिळत होती, तर राज्याच्या इतर भागांत त्याच पदावरील पोलिसांना ५३८ चौरस फूट (५० चौरस मीटर) घरे दिली जात होती. ही भेदभावपूर्ण तफावत आता पूर्णपणे दूर झाली […] The post महाराष्ट्र सरकारकडून पोलिसांना मोठी भेट; ५३८ चौरस फूट सरकारी घरे मंजूर, कुणाला होणार फायदा? appeared first on Dainik Prabhat .
मोठी बातमी! 2027ची जनगणना होणार ‘डिजिटल’; जाणून घ्या महत्वाच्या तारखा आणि वैशिष्ट्ये
Census 2027: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘जनगणना २०२७’ साठी ₹११,७१८ कोटींच्या मोठ्या बजेटला मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २०२७ मध्ये होणारी ही जनगणना देशातील पहिली डिजिटल जनगणना असेल. या महत्त्वपूर्ण जनगणनेत जातीनिहाय गणना देखील समाविष्ट केली जाणार आहे. दोन टप्प्यांत होणार गणना: मोबाईल ॲपद्वारे डेटा संकलन – केंद्रीय माहिती […] The post मोठी बातमी! 2027ची जनगणना होणार ‘डिजिटल’; जाणून घ्या महत्वाच्या तारखा आणि वैशिष्ट्ये appeared first on Dainik Prabhat .
Rivaba Jadeja Exposes Indian Cricketers : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी आणि जामनगरची आमदार रिवाबा जडेजाने भारतीय संघातील खेळाडूंच्या वर्तनाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. परदेशी दौऱ्यांवर असताना अनेक भारतीय क्रिकेटपटू गैरकृत्यांमध्ये (वाईट कामांमध्ये) सामील होतात, असा दावा रिवाबा यांनी एका व्हिडिओमध्ये केला आहे, जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जडेजाच्या […] The post Rivaba Jadeja : ‘परदेश दौऱ्यांवर भारतीय क्रिकेटर्स गैरकृत्यांमध्ये सामील होतात…!’, जडेजाच्या पत्नीचा खळबळजनक खुलासा appeared first on Dainik Prabhat .
Video : सार्वजनिक शौचालयात थाटला संसार? गॅस, बेड, गाद्या अन् बरच काही.. मुंबईतील धक्कादायक प्रकार
मुंबई : मुंबईतील भांडूप पश्चिमेतील सुभाष नगर येथील सार्वजनिक शौचालयात काही लोकांनी बेकायदा अतिक्रमण करून तिथेच पूर्ण संसार थाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. गॅस, बेड, कपडे, भांडी-कुंडी असा सगळा संसार शौचालयातच सुरू असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) च्या मुंबई कार्याध्यक्षा मनिषा तुपे यांनी परिसराची पाहणी केली […] The post Video : सार्वजनिक शौचालयात थाटला संसार? गॅस, बेड, गाद्या अन् बरच काही.. मुंबईतील धक्कादायक प्रकार appeared first on Dainik Prabhat .
नाशिकच्या तपोवनातील झाडांना तात्पुरता दिलासा – राष्ट्रीय हरित लवादाची वृक्षतोडीला स्थगिती – कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला अखेर मोठा धक्का बसला असून राष्ट्रीय हरित लवादाने 15 जानेवारीपर्यंत तात्पुरती स्थगिती जारी केली आहे. या ठिकाणी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा वाढता विरोध, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन आणि मनसेने दाखल केलेल्या जनहित याचिकेनंतर आज लवादाने महत्त्वपूर्ण निर्णय देत सर्व प्रकारच्या […] The post Today TOP 10 News: तपोवनातील झाडांना तात्पुरता दिलासा, रेरा -मोफा, कुणबी जातप्रमाणपत्र, ई-केवायसी, जनगणना… वाचा आजच्या 10 टाॅप बातम्या appeared first on Dainik Prabhat .
Dhurandhar : ‘धुरंधर’चा बॉक्स ऑफिसवर धुमधडाका.! सात दिवसांत २०० कोटींचा टप्पा पार
Dhurandhar Worldwide Collection | Dhurandhar : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला अभिनेता रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘धुरंधर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यातच या चित्रपटाने देशात तसेच परदेशातही विक्रमी यश मिळवत धुमाकूळ घातला आहे. धुरंधरच्या प्रदर्शनापूर्वी धनुष आणि कृती सेननचा ‘तेरे इश्क […] The post Dhurandhar : ‘धुरंधर’चा बॉक्स ऑफिसवर धुमधडाका.! सात दिवसांत २०० कोटींचा टप्पा पार appeared first on Dainik Prabhat .
महाराष्ट्राच्या 'कोल्हापुरी'चा डंका सातासमुद्रापार; डिझाइन आणि मार्केटिंगसाठी 'प्राडा' मदत करणार
नागपूर : पायाला भिडणारी पण जगभरात रुबाबदार समजली जाणारी महाराष्ट्राची 'कोल्हापुरी चप्पल' आता आंतरराष्ट्रीय फॅशन विश्वात मानाचे स्थान पटकावणार आहे. जगप्रसिद्ध लक्झरी ब्रँड 'प्राडा' (Prada) आणि राज्य सरकारचे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (LIDCOM) यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांना दिली.नेमका काय आहे हा प्रकल्प?संजय शिरसाट यांनी सांगितले की, कोल्हापुरी चपलांचे पारंपरिक सौंदर्य आणि 'प्राडा'चे जागतिक दर्जाचे मार्केटिंग व डिझाइन यांचा संगम या प्रकल्पातून होणार आहे. कोल्हापूर आणि आजूबाजूच्या भागातील चर्मकार समाजातील कारागिरांनी बनवलेल्या चपला आता 'प्राडा'च्या ब्रँडखाली जगभरात विकल्या जातील. यासाठी 'प्राडा' कंपनी स्थानिक कारागिरांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फिनिशिंग आणि डिझाइनचे प्रशिक्षणही देणार आहे.कारागिरांचे नशीब पालटणार - संजय शिरसाटया उपक्रमाबाबत उत्साहाने माहिती देताना शिरसाट म्हणाले, आमच्या चर्मकार समाजाकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेली कला आहे, पण त्यांना योग्य बाजारपेठ आणि दाम मिळत नव्हता. आता 'प्राडा'सारखा मोठा ब्रँड आपल्यासोबत आल्यामुळे या कारागिरांच्या कलेला सोन्याचा भाव मिळेल. जी चप्पल स्थानिक बाजारात ५००-१००० रुपयांना विकली जाते, तीच चप्पल आंतरराष्ट्रीय बाजारात १०-१५ हजार रुपयांना विकली जाईल आणि त्याचा थेट फायदा आमच्या कारागिरांना होईल.फेब्रुवारी २०२६ पर्यंत उत्पादन बाजारातसरकारने या प्रकल्पासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या काही महिन्यांत प्रशिक्षण पूर्ण होऊन, फेब्रुवारी २०२६ पर्यंत 'प्राडा-कोल्हापुरी' हे संयुक्त उत्पादन जागतिक बाजारात उपलब्ध होईल, असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला.महत्त्वाचे फायदे: जागतिक ओळख: कोल्हापुरी चप्पल आता पॅरिस, मिलान आणि लंडनच्या शोरूममध्ये दिसेल. आधुनिक तंत्रज्ञान: कारागिरांना पारंपारिक पद्धतीसोबतच आधुनिक मशिनरी आणि तंत्रज्ञान सरकार पुरवणार आहे. रोजगार वाढ: या करारामुळे ग्रामीण भागातील हजारो तरुणांना रोजगार मिळेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. विरोधक केवळ टीका करत असताना, महायुती सरकारने चर्मकार समाजाच्या उत्थानासाठी हे ठोस पाऊल उचलल्याचे शिरसाट यांनी यावेळी अधोरेखित केले.
PM Modi Cabinet Decision : दोन टप्प्यात होणार जनगणना; २०२७ च्या जनगणनेसाठी संपूर्ण योजना जाहीर
Union Cabinet Decisions | Modi Government – शुक्रवारी मंत्रिमंडळाने तीन महत्त्वाचे निर्णय घेतले. मंत्रिमंडळाने जनगणनेसाठी ₹११,७१८ कोटींच्या अर्थसंकल्पाला मान्यता दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोळसा जोडणी धोरणात सुधारणा करण्यासाठी कोळसा सेतू धोरणालाही मान्यता दिली. सरकारने कोपरा २०२५ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) लाही धोरणात्मक मान्यता दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी २०२७ च्या जनगणनेबद्दल माहिती […] The post PM Modi Cabinet Decision : दोन टप्प्यात होणार जनगणना; २०२७ च्या जनगणनेसाठी संपूर्ण योजना जाहीर appeared first on Dainik Prabhat .
Vinesh Phogat withdraws retirement : भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेने आपली निवृत्ती माघार घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५० किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये पोहोचल्यानंतरही, तिचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम अधिक असल्याने तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले होते. या तीव्र निराशेमुळे तिने तातडीने निवृत्तीची […] The post Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगाटने घेतला यू-टर्न! निवृत्ती मागे घेत आगामी ऑलिम्पिकसाठी सुरु केली तयारी appeared first on Dainik Prabhat .
थंडीचा कडाका वाढला, शाळांच्या वेळेत मोठा बदल, आता किती वाजता भरणार?
नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट तीव्र झाली असून, सकाळच्या वेळेत पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरत आहे. यामुळे लहान विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने नाशिक महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पालिकेच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आता सकाळी ७.०० ऐवजी ८.०० वाजता […] The post थंडीचा कडाका वाढला, शाळांच्या वेळेत मोठा बदल, आता किती वाजता भरणार? appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: विमा क्षेत्रात परिवर्तन आता नव्याने होणार आहे. मोठ्या स्तरावर विमा (Insurance) क्षेत्रातील नियमावलीत बदल करताना 'ईज ऑफ डुईं बिझनेस' साध्य करण्यासाठी व मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने परिवर्तनवादी धोरण आखले होते. याचाच पुढील अध्याय म्हणून प्रथमच सरकारने १००% परदेशी गुंतवणूक (Foreign Direct Investment FDI) मान्य केल्याचे एका अहवालात म्हटले गेले आहे. प्रसारमाध्यमांनी याविषयी वृत्त देऊन अंतर्गत पातळीवर या बीलाला मान्यता दिली असून लवकरच ते सभागृहात मंजूरीसाठी सादर केले आहे. असे झाल्यास मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक विमा क्षेत्रात होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व व्यापार वृद्धी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.गेल्याच अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकार ७४% वरून १००% परदेशी गुंतवणूक विमा क्षेत्रात मंजूर करण्याचा विचार करत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे या फेब्रुवारी महिन्यातील नव्या अर्थसंकल्पापूर्वी सरकार या विधेयकावर शिक्कामोर्तब करणार होते. हे जवळपास निश्चित असून अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा करणे अथवा प्रस्ताव पारित करणे बाकी आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आज दुपारी ४ वाजेपर्यंत यावर पुष्टी सरकारकडून केली जाईल दरम्यान जर हा निर्णय यशस्वी झाल्यास मोठ्या प्रमाणात भारतीय विमा औद्योगिक क्षेत्रात परिवर्तन अपेक्षित आहे. केवळ परिवर्तन नाही तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवल्यास स्पर्धात्मक दृष्टीने बाजारात ग्राहक राखण्यासाठी कंपन्यांमध्ये रस्सीखेच सुरू होऊ शकते. ज्यामुळे अंतिमतः सेवेचा दर्जा सुधारल्यास याचा अंतिम फायदा ग्राहकांना होणार आहे.सध्याचा बाजार पाहता एकूण आयुर्विमा व्यवसायात ४७.८१२ वाटा परदेशी गुंतवणूकदारांचा असून, ४०.८% वाटा दैनंदिन विम्यात, व २९.४६% वाटा एकूण खाजगी क्षेत्रात असल्याचे आकडेवारी सांगते. ५७ विमा कंपन्यातील २४ आयुर्विमा कंपन्या असून उर्वरित इतर ३४ कंपन्यांचा आयुर्विमा वगळता इतर श्रेणीतील विमा आहे.विमा क्षेत्र का वाढत आहे?मोठ्या घोषणेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैयक्तिक आयुर्विम्यावर जीएसटी माफ केल्याने मोठ्या प्रमाणात विमा खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यासह विमा (Insurance) कंपन्यांचे कार्यक्षमता, कार्यक्षेत्र वाढल्याने यांचा फायदा विक्रीत कंपन्यांना होत आहे. यासह वाढलेल्या जनमानसातील जनजागृतीचा फायदा वेळोवेळी विमा क्षेत्रातील वाढीला होत आहे. असे असताना ऑक्टोबर, नोव्हेंबर कालावधीत विमा विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.आणखी विमा क्षेत्र किती वाढू शकते?यावर प्रश्न विचारला असता इंडसइंड जनरल इन्शुरन्सचे (पूर्वीच्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स) सीईओ राकेश जैन म्हणाले आहेत की,'२०२५ मध्ये भारताच्या सामान्य विमा उद्योगाने स्थिर प्रगती दर्शविली, एकूण प्रीमियम ३.०८ ट्रिलियन (६.२%) पर्यंत पोहोचले. तरीही, जीवन-बाह्य (Non Life) विमा प्रवेश सुमारे १% राहिला आहे, जो जागतिक सरासरी ४% पेक्षा खूपच कमी आहे, जो प्रचंड संभाव्य क्षमतेचे संकेत देतो. आरोग्य विम्याने पोर्टफोलिओमध्ये आघाडी घेतली असून प्रीमियमच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त योगदान दिले. वाढती जागरूकता, महामारीनंतरच्या आर्थिक संरक्षण गरजा आणि जवळजवळ १२% वैद्यकीय महागाई यामुळे ही वाढ झाली आहे. हे ट्रेंड आर्थिक आणि नियामक बदलांमध्ये क्षेत्राची लवचिकता (Flexibility) आणि अनुकूलता अधोरेखित करतात.पुढे पाहता, २०२६ मध्ये ८-१३% वाढीचा वेग वाढण्याचे आश्वासन दिले आहे, जे वाढत्या विमा जागरूकता, कमी सेवा असलेल्या बाजारपेठांमध्ये खोलवर प्रवेश आणि आरोग्य आणि व्यावसायिक मार्गांसाठी सतत मागणीमुळे चालते. तंत्रज्ञान एक निर्णायक उत्प्रेरक राहील, ज्यामध्ये एआय आधारे अंडररायटिंग, टेलिमॅटिक्स-आधारित मोटर उत्पादने आणि बीमा सुगम सारख्या प्लॅटफॉर्ममुळे ग्राहक अनुभवात सकारात्मक बदल होईल. २०२५ मध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब आधीच ३०% पेक्षा जास्त वाढला आहे, जो या क्षेत्रातही वाढलेल्या सोयी आणि पारदर्शकतेकडे असलेले स्पष्ट बदल दर्शवितो. या नव्या उपक्रमामुळे केवळ कार्यक्षमता सुधारणार नाही तर विश्वास आणि सहभाग वाढवणारे वैयक्तिकृत उपाय (Personalised Solutions) देखील मिळतील.विमा क्षेत्रातील आव्हाने -या विषयी बोलताना राकेश जैन म्हणाले की,'जलद डिजिटलायझेशनमुळे सोयीसुविधा सुधारल्या आहेत परंतु नवीन आव्हानेही निर्माण झाली आहेत. विमा फसवणुकीमुळे उद्योगाला दरवर्षी सुमारे ५०००० कोटींचे नुकसान होते, ज्यामध्ये १०% प्रीमियम फसव्या क्रियाकलापांमुळे गमावले जातात. सायबरसुरक्षा धोके वाढत आहेत २०२४ मध्ये भारतात २.०४ दशलक्ष घटना घडल्या, ज्यामध्ये ३१ दशलक्ष रेकॉर्ड उघड करणाऱ्या उल्लंघनाचा समावेश आहे. BFSI मध्ये फिशिंग हल्ल्यांमध्ये १७५% वाढ झाली, तर डीपफेक घोटाळ्यांमध्ये २८०% वाढ झाली. डेटा उल्लंघनाची सरासरी किंमत १९.५ कोटी आहे, जी आर्थिक परिणाम अधोरेखित करते. विश्वास आणि परिसंस्थेच्या (Ecosystem) अखंडतेचे रक्षण करण्यासाठी एआय-संचालित फसवणूक विश्लेषण (Fraud Analysis) भविष्यसूचक जोखीम स्कोअरिंग आणि मजबूत सायबरसुरक्षा फ्रेमवर्कमधील गुंतवणूक आता मिशन-क्रिटिकल स्थितीत आहे.निवडक उत्पादनांवरील जीएसटी काढून टाकण्यासह अलीकडील जीएसटी सुधारणा, परवडणारी क्षमता सुधारत आहेत आणि २०२६ मध्ये प्रवेश वाढवतील. हवामान धोके गंभीर आहेत, २०२४ मध्ये भारताला २४० हून अधिक अत्यंत हवामान घटनांचा सामना करावा लागला, ज्यामुळे १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले. जलद पेमेंट आणि लवचिकतेसाठी पॅरामीट्रिक विमा आणि प्रगत हवामान जोखीम मॉडेलिंगसारखे नाविन्यपूर्ण उपाय आवश्यक आहेत. ही उत्पादने समुदाय आणि व्यवसायांसाठी दोन्हीसाठी संरक्षण सुनिश्चित करू शकतात.२०२६ मध्ये पाऊल ठेवत असताना, आमचे लक्ष स्पष्ट आहे: विश्वास मजबूत करणे, ग्राहकांचा अनुभव वाढवणे आणि समावेशक संरक्षण वाढवणे. वितरण, अंडररायटिंग आणि दाव्यांमध्ये डिजिटल दृष्टिकोन २०४७ पर्यंत 'सर्वांसाठी विमा' हे राष्ट्राचे स्वप्न साध्य करण्यासाठी महत्त्वाचा असेल. प्रत्येक प्रक्रिया, उत्पादन आणि परस्परसंवाद तंत्रज्ञानाद्वारे समर्थित असले पाहिजेत जेणेकरून वेग, पारदर्शकता आणि सुविधा मिळेल. भविष्य आशादायक आहे आणि सहकार्य आणि दूरदृष्टीने, आम्ही लाखो लोकांच्या हिताचे रक्षण करताना शाश्वत वाढ करण्यास सज्ज आहोत. एकत्रितपणे, आम्ही असे भविष्य घडवू जिथे विमा सर्वांसाठी सुलभ, परवडणारा आणि विश्वासार्ह असेल.' असे जैन म्हणाले आहेत.
Nilesh Ghayawal : निलेश घायवळ हजर झाला नाही तर सर्व मालमत्ता जप्त करणार, पोलिसांचा थेट इशारा
पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ याला पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. बनावट कागदपत्रे वापरून पासपोर्ट मिळवत लंडनला पळून गेलेल्या घायवळवर दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांच्या चार्जशीटमध्ये पोलिसांनी त्याला फरारी घोषित केले आहे. आता ३० दिवसांत तो स्वतः न्यायालयात हजर झाला नाही तर त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी […] The post Nilesh Ghayawal : निलेश घायवळ हजर झाला नाही तर सर्व मालमत्ता जप्त करणार, पोलिसांचा थेट इशारा appeared first on Dainik Prabhat .
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबवली जाणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत प्रदान करते. या योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाने ई-केवायसी करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली […] The post Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी; ‘ई-केवायसी’मध्ये दुरुस्तीची संधी, अन्यथा 1,500 रुपये मिळणार नाहीत appeared first on Dainik Prabhat .
Myanmar military attacks – म्यानमारच्या लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात एका मोठ्या बंडखोर सशस्त्र दलाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागातील एक रुग्णालय उद्ध्वस्त झाले. या हल्ल्यात चौतीस रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचारी ठार झाले. बुधवारी रात्री पश्चिमेकडील राखीन राज्यातील अरकान आर्मीचे वर्चस्व असलेल्या म्रौक-यू टाउनशिपमधील रूग्णालयावर हा हल्ला झाला त्यात अन्य ८० जण जखमी झाले. तथापि, सत्ताधारी लष्कराने या […] The post Myanmar military attacks : म्यानमारच्या लष्कराचा आपल्याच देशातील रूग्णालयावर हल्ला; ३४ जणांचा मृत्यू, ८० जण जखमी appeared first on Dainik Prabhat .
Vaibhav Suryavanshi Century in U19 Asia Cup 2025 : अंडर-१९ आशिया कप २०२५ स्पर्धेची शानदार सुरुवात झाली असून, पहिल्याच सामन्यात भारतीय संघाच्या वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला आहे. या उदयोन्मुख फलंदाजाने अंडर-१९ आशिया कपच्या इतिहासात सर्वात कमी वयात शतक झळकावणारा खेळाडू बनण्याचा बहुमान मिळवला आहे. त्याने हे ऐतिहासिक शतक केवळ ५६ चेंडूंमध्ये पूर्ण केले, ज्यात त्याने […] The post Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा शतकी धडाका कायम! अंडर-१९ आशिया कपमध्ये रचला नवा इतिहास appeared first on Dainik Prabhat .
H-1B व्हिसा तपासणीचा धसका: भारतात अडकलेले शेकडो लोक संकटात, नोकरी गमावण्याची भीती
नवी दिल्ली: अमेरिकेच्या नव्या ‘सोशल मीडिया तपासणी’ नियमांमुळे सध्या मोठी खळबळ उडाली आहे. या नियमांमुळे H-1B व्हिसा अपॉइंटमेंट्स अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे शेकडो भारतीय व्हिसाधारक मायदेशातच अडकून पडले आहेत, ज्यामुळे त्यांच्या नोकरी आणि करिअरवर मोठे संकट उभे राहिले आहे. व्हिसा अपॉइंटमेंट्स मार्च २०२६ पर्यंत पुढे ढकलल्या- H-1B व्हिसासाठी अर्ज केलेल्या अनेक लोकांना […] The post H-1B व्हिसा तपासणीचा धसका: भारतात अडकलेले शेकडो लोक संकटात, नोकरी गमावण्याची भीती appeared first on Dainik Prabhat .
विधानसभेतला राडा अंगलट; पडळकर अन् आव्हाड समर्थकांना तुरुंगवासाची शिक्षा
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान (३० जून ते १८ जुलै २०२५) घडलेल्या खळबळजनक राड्याच्या प्रकरणात विधानसभा विशेषाधिकार समितीने मोठी कारवाईची शिफारस केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमधील धक्काबुक्की प्रकरणी समितीचा अहवाल आज (१२ डिसेंबर २०२५) सभागृहात सादर करण्यात आला. या घटनेमुळे विधानभवनाच्या प्रतिमेला […] The post विधानसभेतला राडा अंगलट; पडळकर अन् आव्हाड समर्थकांना तुरुंगवासाची शिक्षा appeared first on Dainik Prabhat .
Brent crude oil prices fall : 2026 मध्ये ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती 50 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरतील?
मुंबई: जागतिक ऊर्जा बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत २०२६ मध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता एका ताज्या अहवालातून वर्तवण्यात आली आहे. ‘रॅबोबँक इंटरनॅशनल’च्या (Rabobank International) अहवालानुसार, २०२६ मध्ये ब्रेंट क्रूड ऑइलच्या (Brent Crude Oil) सरासरी किमती ५० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास राहू शकतात. याचा थेट फायदा सामान्य ग्राहकांना आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला होण्याची शक्यता आहे. नेमका अंदाज काय? […] The post Brent crude oil prices fall : 2026 मध्ये ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती 50 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरतील? appeared first on Dainik Prabhat .
Pune Crime : अपहरण करून खंडणी उकळणारे तीन आरोपी अटकेत, विधीसंघर्षित मुलगी ताब्यात
पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पथकाने अपहरण, मारहाण आणि गंभीर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आले असून विधीसंघर्षित मुलीस ताब्यात घेण्यात आले आहे. अक्षय गंगाधर बुधेवार ( २२, रा. गोकळनगर, कात्रज) , अमोल अंकश शिंदे ( २८, रा. कर्वेनगर, कोथरूड,) आणि राहुल तानाजी […] The post Pune Crime : अपहरण करून खंडणी उकळणारे तीन आरोपी अटकेत, विधीसंघर्षित मुलगी ताब्यात appeared first on Dainik Prabhat .
राज्यातील ६० ठिकाणी 'स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क 'उभारणार! - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
नागपूर : विद्यार्थी दशे पासूनच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा ' संस्कार ' शालेय विद्यार्थ्यांच्यावर व्हावा! तसेच वाहन धारक असलेल्या त्यांच्या पालकांच्यात रस्ता सुरक्षिततेबध्दल जनजागृती व्हावी तसेच ज्येष्ठाना विरंगुळा मिळावा या तिहेरी उद्देशाने राज्यभरातील विविध शहरांमध्ये ' स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क ' उभारण्याची योजना मोटार परिवहन विभागाने आखली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.मंत्री सरनाईक म्हणाले की, देशात आणि प्रामुख्याने राज्यांमध्ये वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेता वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे अत्यंत गरजेचं झाले आहे. त्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ज्या शहरांमध्ये प्रादेशिक अथवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत, त्या शहरात ' स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क ' निर्माण करून तेथे शालेय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वाहतुकीच्या नियमांचे आकलन करून देणे, तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभागाच्या किमान एक एकर जागेमध्ये एक कोटी रुपये खर्च करून हे ट्राफिक पार्क उभारले जाईल. या पार्कमध्ये दुर्मिळ वनस्पती, विविध आकर्षण फुल झाडे, हिरवळीचे पट्टे असे सुंदर आरेखन असलेले 'प्रबोधन, माहिती व विरंगुळयाचे केंद्र उभारण्यात येणार आहे. याचा लाभ शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनींना त्यांच्या संस्कारक्षम वयामध्ये वाहतूक नियम प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी त्यांच्या पालकांना वाहतुकीचे नियम पाळणारे जबाबदार नागरिक बनविण्यासाठी तर ज्येष्ठांना मनोरंजनाबरोबर विश्रांतीसाठी होईल ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विविध वाहतूक चिन्हे, प्रतिके, वेगमर्यादा पालन करण्याच्या सूचना, सुभाषितांच्या माध्यमातून या उद्यानामध्ये विद्यार्थी व त्यांच्या पालकांना वाहतुकीचे नियम पालन करण्यासंबंधिचे प्रबोधन करणे, हा याचा मुख्य हेतू आहे . तथापि, या पार्कमध्ये विविध दुर्मिळ वनस्पती आकर्षक फुलझाडे व लँडस्केपिंग च्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र देखील निर्माण केली जाईल.सध्या मोटार परिवहन विभागाकडे असलेल्या मोकळ्या जागेमध्ये हे ' ट्राफिक पार्क ' उभारले जाणार आहेत. जिथे मोटार परिवहन विभागाची जागा नसेल तिथे महापालिका, नगरपालिका सारख्या स्थानिक स्वराज संस्थांच्या माध्यमातून अशी जागा विकसित करण्यात येणार आहे. ' स्वर्गीय आनंद दिघे ट्राफीक पार्क ' निर्मितीचा सर्व खर्च रस्ता सुरक्षा निधीच्या माध्यमातून मोटार परिवहन विभाग करणार आहे. तथापि भविष्यात त्याची देखभाल संबंधित महापालिका अथवा नगरपालिकेने करणे अपेक्षित आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या मतदारसंघात ठाणे व मिरा - भाईंदर येथे अशा पद्धतीचे ट्राफिक पार्क यापूर्वी निर्माण केले आहेत. त्याला विद्यार्थी त्यांचे पालक व ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. (अभिजीत भोसले) जनसंपर्क अधिकारी मा. मंत्री परिवहन
मुंबई: महाराष्ट्राने आणखी एक ऐतिहासिक पाऊल रचले आहे. पोलिस यंत्रणेला गुन्ह्यांच्या तपासासाठी ए आय तंत्रज्ञान समाविष्ट करून देणारे पहिले राज्य महाराष्ट्र ठरले आहे. यासाठी एक विशेष तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या सिस्टिमचे नाव महाक्राईमओएस (MahaCrimeOS AI) ठेवलेले आहे. या माध्यमातून गुन्ह्याची झटपट उकल होण्यासाठी मोठ्या पातळीवर मदत होणार आहे. मायक्रोसॉफ्ट ए आय टूर या कार्यक्रमात या यंत्रणेचे अनावरण करण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्ट इंडिया डेव्हलपमेंट सेंटर (IDC) व स्पेशल पर्पज व्हेईकल असलेले मार्वल (Marvel) यांच्या संयुक्त विद्यमाने हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आल्याचे या कार्यक्रमातील घोषणेत म्हटले गेले.ही ओएस Microsoft Azure व Open AI यांची मदत घेऊन पोलिस अधिकाऱ्यांना गुन्ह्याची उकल करण्यास मदत करतील. नागपूरसह इतर २३ पोलिस स्थानकात ही यंत्रणा बसवली गेल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'जनतेच्या हितासाठी नैतिक आणि जबाबदार एआय हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. एआयमध्ये कार्यक्षमता सुधारून, जीवनमान वाढवत प्रत्येक नागरिकासाठी खऱ्या अर्थाने जगण्याची सोय करून परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती या यंत्रणेत आहे.' असे म्हटले.ते पुढे म्हणाले, 'मायक्रोसॉफ्टसोबतचे आमचे सहकार्य जटिल सायबर गुन्ह्यांच्या आव्हानांचे निराकरण करण्यापासून सुरू झाले होते, परंतु त्याची क्षमता खूपच जास्त आहे. अधिक प्रभावी, नागरिक-केंद्रित राज्य निर्माण करण्यासाठी आम्ही या शक्तीचा जबाबदारीने वापर करण्याचा मानस करतो.'अत्याधुनिक एआय-संचालित तंत्रज्ञान पोलिस अधिकाऱ्यांना एआय बेसद्वारे त्वरित डिजिटल केस फाइल्स तयार करण्यास अनेक भाषांमध्ये डेटा काढण्यास आणि संदर्भात्मक कायदेशीर समर्थन मिळविण्यास ही यंत्रणा मदत करणार आहे.शिवाय, ही प्रणाली संबंधित प्रकरणांशी आधारित पोलिस यंत्रणेला डिजिटल पुराव्यांचे अधिक कार्यक्षमतेने विश्लेषण करण्यास मदत करते.लाँचची घोषणा करताना, मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नाडेला यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासन, सुरक्षा आणि कार्यक्षमता कशी वाढवू शकते यावर चर्चा केली. राज्य पोलिसांसोबत मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याबद्दल बोलताना, सीईओ सत्या नाडेला म्हणाले की,'हे सहकार्य सार्वजनिक प्रणालींमध्ये जबाबदार नवोपक्रमावर वाढत्या लक्ष केंद्रित करेल.'राज्य पोलिसांच्या वतीने बोलताना, नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक आणि मार्व्हेलचे सीईओ हर्ष पोद्दार 'महाक्राइमओएस एआय आपण सायबर गुन्ह्यांशी कसे लढतो याची पुनर्परिभाषा (Redefine) करत आहे. जटिलतेला स्पष्टता आणि गतीमध्ये बदलत आहे. हे व्यासपीठ केवळ जलद तपासांबद्दल नाही ते विश्वास निर्माण करण्याबद्दल, प्रशासनासाठी नवीन मानके (Standards) स्थापित करण्याबद्दल आणि संपूर्ण भारतात पसरू शकेल असे मॉडेल तयार करण्याबद्दल आहे.'असे म्हटले.
महाराष्ट्राच्या 'कोल्हापुरी'चा डंका सातासमुद्रापार; डिझाइन आणि मार्केटिंगसाठी 'प्राडा'मदत करणार
नागपूर : पायाला भिडणारी पण जगभरात रुबाबदार समजली जाणारी महाराष्ट्राची 'कोल्हापुरी चप्पल' आता आंतरराष्ट्रीय फॅशन विश्वात मानाचे स्थान पटकावणार आहे. जगप्रसिद्ध लक्झरी ब्रँड 'प्राडा' (Prada) आणि राज्य सरकारचे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (LIDCOM) यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांना दिली.नेमका काय आहे हा प्रकल्प?संजय शिरसाट यांनी सांगितले की, कोल्हापुरी चपलांचे पारंपरिक सौंदर्य आणि 'प्राडा'चे जागतिक दर्जाचे मार्केटिंग व डिझाइन यांचा संगम या प्रकल्पातून होणार आहे. कोल्हापूर आणि आजूबाजूच्या भागातील चर्मकार समाजातील कारागिरांनी बनवलेल्या चपला आता 'प्राडा'च्या ब्रँडखाली जगभरात विकल्या जातील. यासाठी 'प्राडा' कंपनी स्थानिक कारागिरांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फिनिशिंग आणि डिझाइनचे प्रशिक्षणही देणार आहे.कारागिरांचे नशीब पालटणार - संजय शिरसाटया उपक्रमाबाबत उत्साहाने माहिती देताना शिरसाट म्हणाले, आमच्या चर्मकार समाजाकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेली कला आहे, पण त्यांना योग्य बाजारपेठ आणि दाम मिळत नव्हता. आता 'प्राडा'सारखा मोठा ब्रँड आपल्यासोबत आल्यामुळे या कारागिरांच्या कलेला सोन्याचा भाव मिळेल. जी चप्पल स्थानिक बाजारात ५००-१००० रुपयांना विकली जाते, तीच चप्पल आंतरराष्ट्रीय बाजारात १०-१५ हजार रुपयांना विकली जाईल आणि त्याचा थेट फायदा आमच्या कारागिरांना होईल.फेब्रुवारी २०२६ पर्यंत उत्पादन बाजारातसरकारने या प्रकल्पासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या काही महिन्यांत प्रशिक्षण पूर्ण होऊन, फेब्रुवारी २०२६ पर्यंत 'प्राडा-कोल्हापुरी' हे संयुक्त उत्पादन जागतिक बाजारात उपलब्ध होईल, असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला.महत्त्वाचे फायदे: जागतिक ओळख: कोल्हापुरी चप्पल आता पॅरिस, मिलान आणि लंडनच्या शोरूममध्ये दिसेल. आधुनिक तंत्रज्ञान: कारागिरांना पारंपारिक पद्धतीसोबतच आधुनिक मशिनरी आणि तंत्रज्ञान सरकार पुरवणार आहे. रोजगार वाढ: या करारामुळे ग्रामीण भागातील हजारो तरुणांना रोजगार मिळेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. विरोधक केवळ टीका करत असताना, महायुती सरकारने चर्मकार समाजाच्या उत्थानासाठी हे ठोस पाऊल उचलल्याचे शिरसाट यांनी यावेळी अधोरेखित केले.
मोहित सोमण:आज आठवड्याचा शेवट गोड झाला आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात वाढ कायम राहिल्याने सेन्सेक्स व निफ्टी चांगल्या स्तरावर स्थिरावला आहे. सेन्सेक्स ४४९.५३ अंकाने उसळत ८५२६७.६६ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी १४८.४० अंकाने उसळत २६०४६ पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स व बँक निफ्टीतील रॅली अखेरच्या सत्रात मर्यादित तेजीत राहिल्याने अपेक्षित वाढ बाजारात झाली नाही. मात्र मेटल, रिअल्टी शेअर्सने केलेल्या कामगिरीचा आधारे बाजारात बुलिश पँटर्न कायम राहिला आहे. विशेषतः युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फोनवरून बोलणी झाल्याचे नेतृत्वाने स्पष्ट केल्यानंतर बाजारात सकारात्मकता कायम होती. मात्र अद्याप या द्विपक्षीय करारात निश्चितता आली नसल्याने काही प्रमाणात अस्थिरतेचा 'अंडरकरंट' आज कायम राहिला आहे. आजही मिड कॅप शेअर्सने अखेरच्या सत्रात कमाल केली असून स्मॉलकॅप शेअर्समध्ये अपेक्षित वाढ झाली नाही. बाजारात सर्वाधिक वाढ मेटल (२.६२%), रिअल्टी (१.५३%), कंज्यूमर ड्युरेबल्स (१.४६%), तेल व गॅस (१.११%) निर्देशांकात झाली घसरण एफएमसीजी (०.२४%), मिडिया (०.०४%) निर्देशांकात झाली आहे.युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात झाल्यानंतर सकाळप्रमाणेच अखेरच्या सत्रात वातावरण कायम राहिले आहे. मेटल शेअर्सच्या जोरावर आज शेअर बाजारात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात झाल्यानंतर तज्ञांच्या मते या वर्षी आरबीआयही ५% पातळीवर रेपो दर स्थिरावू शकते असे म्हटले असल्याने सातत्याने बँक निफ्टीत रॅली झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. याखेरीज कमोडिटी बाजारातील परिस्थिती आज नियंत्रणात असली तरी रूपयात झालेल्या निचांकी कामगिरीचा फटका बाजारात बसला. आजही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओतील विक्रीत वाढ केली असल्याची शक्यता असली तरी घरगुती गुंतवणूकदारांनी अंशतः नफा बुकिंग करत दुसरीकडे आपली गुंतवणूक वाढवली. एकूणच बाजारातील मजबूत फंडामेंटल आज शेअर बाजारात परावर्तित झाले.आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात सगळ्याच निर्देशांकात तेजीचा अंडरकरंट कायम राहिला. त्यामुळे एकाही निर्देशांकात घसरण झाली नाही. सर्वाधिक वाढ निकेयी २२५ (१.४५%), हेंगसेंग (१.६२%), कोसपी (१.३६%) निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.२२%), एस अँड पी ५०० (०.२१%) निर्देशांकात वाढ झाली असून नासडाक (०.२६%) निर्देशांकात घसरण झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ टीआरआयएल (१७.१६%), अनंत राज (९.०२%), हिंदुस्थान झिंक (७.४६%), जीएसआर एअरपोर्ट (६.३०%), सीसीएल प्रोडक्ट (५.९७%) सारडा एनर्जी (५.१३%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण टाटा टेलिकम्युनिकेशन (३.१९%), ज्युबिलिएंट फूडस (२.४०%), डीसीएम श्रीराम (२.२८%), हिंदुस्थान युनिलिव्हर (१.९५%), पीआय इंडस्ट्रीज (१.९२%), सिमेन्स (१.६२%),डाबर इंडिया (१.३२%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'अमेरिकेच्या फेडने दर कपात केल्यानंतर जागतिक जोखीम घेण्याची क्षमता सुधारली, रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आणि एफआयआयचा सततचा प्रवाह असूनही, तरलता आशावाद वाढला आणि देशांतर्गत समभागांमध्ये वाढ झाली. ऑटो, धातू, ग्राहकोपयोगी वस्तू आणि रिअल्टी यांनी वाढ केली, तर एफएमसीजी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी कमी कामगिरी केली. अलिकडच्या एकत्रीकरणानंतर व्यापक निर्देशांक खरेदीची आवड दाखवत आहेत, ते पुन्हा उसळी घेत आहेत. आज येणारा भारताचा नोव्हेंबरचा सीपीआय आरबीआयच्या आराम क्षेत्रात राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे धोरण स्थिरतेच्या अपेक्षांना बळकटी मिळेल. जवळच्या काळातील लक्ष हे रुपया पातळी वाढ एफआयआय प्रवाह आणि व्यापार चर्चा, बीओजे (वाढण्याची शक्यता), ईसीबी आणि बीओई धोरण यावर लक्ष असेल.'आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की, 'थोड्या काळासाठी कमकुवत राहिल्यानंतर निफ्टी पुन्हा २६,००० च्या वर गेला आहे. शुक्रवारी, निर्देशांक २१ ईएमए (Exponential Moving Average EMA) वर परत आला आणि पुन्हा वर आला. ४ तासांच्या चार्टवर, RSI (Relative Strength Index RSI) तेजीच्या क्रॉसओवरमध्ये आहे जो सुधारणाशील गती दर्शवितो. नजीकच्या काळात, जोपर्यंत निर्देशांक २५९०० च्यावर राहील तोपर्यंत हा ट्रेंड रचनात्मक राहण्याची शक्यता आहे, जो एक प्रमुख आधार पातळी म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. वरच्या बाजूस, निर्देशांक अल्पावधीत २६३०० च्या दिशेने जाऊ शकतो'आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'बँक निफ्टीने दैनिक चार्टवर एक लहान अनिर्णीत डोजी तयार केला, जो संकोच दर्शवितो, परंतु त्याच्या वरच्या बंदसह त्याचा १०-दिवसांचा ईएमए (EMA) पुन्हा मिळवला. जर निर्देशांक पुढील २-३ सत्रांसाठी १०-दिवसांच्या ईएमएवर टिकला, तर तो पुन्हा ताकद आणि गती मिळवण्याची अपेक्षा आहे. ५९५०० च्या वरचा फॉलो-अप बंद भावनेला आणखी चालना देऊ शकतो, जरी RSI ने अद्याप तेजीच्या क्रॉसओवरची पुष्टी केलेली नाही. २०-दिवसांच्या ईएमए (EMA) जवळ आधार ५९१०० वर आहे, तर प्रतिकार (Resistance) ५९५०० आणि ५९८०० पातळीवर दिसत आहे.'
Silver Price:चांदीच्या दरात शुक्रवारी जबरदस्त तेजी दिसून आली, आणि वायदा बाजारात (Futures Market) चांदीने प्रथमच २ लाख रुपये प्रति किलोग्रॅमचा विक्रमी स्तर ओलांडला. गुंतवणूकदारांकडून असलेली मजबूत मागणी आणि जागतिक बाजारातून मिळालेले सकारात्मक संकेत ही या तेजीमागची मुख्य कारणे आहेत. सलग चौथ्या दिवशी वाढ नोंदवत, मार्च डिलिव्हरीसाठी असलेल्या चांदीच्या फ्यूचर कॉन्ट्रॅक्टमध्ये ₹1,420 म्हणजेच 0.71 टक्क्यांची वाढ […] The post Silver Price futures market: वायदा बाजारात चांदीने प्रथमच ओलांडला 2 लाख रुपये प्रति किलोचा विक्रमी स्तर appeared first on Dainik Prabhat .
Gautam Gambhir : अर्शदीपच्या ७ वाईडनंतर गंभीरचा पारा चढला, हँडशेकमधला राग पाहिलात का? VIDEO व्हायरल
Gautam Gambhir Angry on Arshdeep Singh : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. मुल्लानपूर येथे पार पडलेल्या या सामन्यात प्रथम गोलंदाज आणि त्यानंतर फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कमालीचे नाराज असल्याचे दिसून आले. त्यांचा हा संताप व्यक्त करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर […] The post Gautam Gambhir : अर्शदीपच्या ७ वाईडनंतर गंभीरचा पारा चढला, हँडशेकमधला राग पाहिलात का? VIDEO व्हायरल appeared first on Dainik Prabhat .
Donald Trump | russia-ukraine war – रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांमध्ये होत असलेल्या विलंबामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खूप निराश झाले आहेत, असे व्हाइट हाउसने गुरुवारी सांगितले. ट्रम्प निराश आहेत आणि फक्त बैठकांसाठी बैठका घेण्याची त्यांची इच्छा नाही. पत्रकार परिषदेत, व्हाइट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, अध्यक्षांना काहीही निष्पन्न न होणाऱ्या बैठकींचा […] The post russia-ukraine war : काही निष्पन्न न होणाऱ्या बैठका नकोत.! रशिया- युक्रेन युद्ध थांबत नसल्यामुळे ट्रम्प नाराज appeared first on Dainik Prabhat .
पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यात अनेकांची नावं समोर येणार, तहसीलदारांचा खळबळजनक खुला
पुणे : मुंढवा येथील कोट्यवधी रुपयांच्या शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. निलंबित तहसीलदार सुर्यकांत येवले यांनी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तब्बल ८ ते १० तासांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, मुंढवा सर्व्हे नंबर ८८ मधील सुमारे ४० एकर शासकीय जमीन बोटॅनिकल गार्डनला खाली करण्याचे पत्र पाठवण्यासाठी प्रशासनातील […] The post पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यात अनेकांची नावं समोर येणार, तहसीलदारांचा खळबळजनक खुला appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: इंडिगो विमान कंपनी (Interglobe Aviation Limited) कंपनी आणखी अडचणीत अडकली आहे. दोन कारणांमुळे पुन्हा एकदा कंपनी चर्चेत आली आहे. प्रथम म्हणजे एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो कंपनीला सीजीएसटी (CGST) कमिशनर कार्यालयातून ५८.७५ कोटींचा दंड भरण्याची नोटीस आली असून याशिवाय इतर भुर्दंड भरण्याचीही मागणी कर विभागाने केली असल्याचे कंपनीने म्हटले. आर्थिक वर्ष २०२-२०२१ कालावधीसाठी ही नोटीस आल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले. तर दुसऱ्या प्रकरणात सीसीआय (Competition Commission of India CCI) कंपनीच्या चौकशीची तयारी करत असल्याचे प्रसारमाध्यमांना खात्रीलायक वृत्त दिले आहे. डीजीसीएने (Directorate General of Civil Aviation DGCA) घोषित केलेल्या नियमांवलीची पूर्तता केली नसल्याचे स्पष्ट केले विभागानेच स्पष्ट केलेले असताना, नव्या माहितीनुसार सुत्रांच्या म्हणण्यानुसार स्पर्धा आयोग नियमांची पायमल्ली कंपनीने केली आहे का यावर सीसीआयच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी चौकशीची तयारी सुरू केली आहे.मात्र टॅक्स प्रकरणात कंपनीने अपिलीय प्राधिकणाकडे दंड वसूली विरोधात दाद मागण्याची तयारी सुरू केलेली आहे. कंपनीने या नोटीसही विरोधात खटला दाखल करण्याचे ठरवले असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. बीएसईला दिलेल्या निवेदनात, इंडिगोने कर आदेशाला 'चुकीचा' असा शब्दप्रयोग केला आहे. व म्हटले आहे की, त्यांच्याकडे गुणवत्तेतील आधारे एक मजबूत युक्तिवाद आहे आणि बाह्य कर सल्लागारांनीही त्याला पाठिंबा दिला आहे. या विकासामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर, दैनंदिन कामकाजावर किंवा व्यापक व्यावसायिक कृतीत भौतिक परिणाम होण्याची अपेक्षा नाही असे तज्ञांनी आम्हाला (कंपनीला) स्पष्ट केले आहे. इंडिगोला यापूर्वीही अशाच प्रकारची तपासणीचा सामना करावा लागला आहे, परंतु नवीन दंड भारतातील सर्वात मोठ्या विमान कंपनीसाठी विशेषतः नाजूक क्षणी आला आहे' असे म्हटले.इंडिगोच्या सुरक्षा आणि ऑपरेशनल मानकांवर (Operational Standards) देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार असलेल्या चार उड्डाण निरीक्षकांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) बडतर्फ केले असून ही कारवाई एअरलाइनच्या बिकट समस्येशी संबंधित आहे. १ नोव्हेंबरपासून नवीन उड्डाण शुल्क नियमांच्या अंमलबजावणीमध्ये योग्य नियोजनाचा अभाव हे इतर घटकांव्यतिरिक्त इंडिगोच्या कामकाजातील व्यत्ययांचे एक प्रमुख कारण म्हणून जबाबदार धरले जात आहे.या महिन्यात अपुरे नियोजन आणि अधिक कडक सुरक्षा नियमांचे पालन करण्यात अपयश आल्याने शेकडो उड्डाणे रद्द झाली आतापर्यंत रद्द झाली आहेत. या रद्दीकरणाचा मोठा फटका विमान प्रवाशांना बसला आहे. त्यामुळे देशभरातील हजारो प्रवासी आता रद्द झाल्यामुळे अडकले आहेत. सूत्रांचा दावा आहे की डीजीसीएने निरीक्षकांच्या देखरेख आणि तपासणीच्या जबाबदाऱ्यांमध्ये निष्काळजीपणा आढळल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली. एअरलाइनच्या कामांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी, नियामकाने आता इंडिगोच्या गुरुग्राम कार्यालयात दोन विशेष देखरेख पथके तैनात केली आहेत.आज डीजीसीएला संध्याकाळी ६ वाजेपर्यंत या पथकांकडून दररोज अहवाल प्राप्त होईल. एक पथक इंडिगोच्या ताफ्याचा आकार, पायलटची उपलब्धता, क्रू वापराचे तास, प्रशिक्षण वेळापत्रक,स्प्लिट ड्युटी पॅटर्न, अनियोजित रजा, स्टँडबाय कर्मचारी आणि क्रू कमतरतेमुळे प्रभावित झालेल्या उड्डाणांच्या संख्येवर लक्ष ठेवून आहे. एअरलाइन आणि ट्रॅव्हल एजन्सींकडून परतफेडीची स्थिती, नागरी विमान वाहतूक आवश्यकता (CAR) नुसार परतफेड, वक्तशीरपणा, सामान परत करणे आणि सामान्य रद्दीकरण स्थितीची पडताळणी या मुद्यावर नियामक कंपनीची चौकशी करु शकतात.मात्र या निमित्ताने कंपनीच्या देशांतर्गत विमान उड्डाण क्षेत्रातील एकाधिकारशाहीवर (Dominance) मोठ्या प्रमाणात टीका झाली. आयोगाने याचीच दखल घेत पुढील कार्यवाहीची तयारी सुरू केली आहे. सध्या इंडिगो एअरलाईन्सचा एकूण व्यवसायात इतर कंपनीच्या तुलनेत सर्वाधिक ६५% पेक्षा अधिक हिस्सा (Market Share) आहे. या वातवलणात ग्राहकांच्या हिताचे उल्लंघन झाले आहे का? तसेच असलेली एकूण वर्चस्वाची स्थिती, विशिष्ट बाबतीत वर्चस्व आणि याच वर्चस्वाचा गैरवापर झाला आहे का? यासारख्या विविध पैलूंची तपासणी केली या चौकशीत केली जाणार आहे. इंडिगोविरुद्ध आतापर्यंत कोणतीही औपचारिक तक्रार नाही आणि सीसीआय स्पर्धा नियमांचे स्वतःहून उल्लंघन झाले आहे का ते तपासत आहे असे अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना पुढे सांगितले आहे.सीसीआयचे स्पर्धा कायद्याचा कलम ४ हा वर्चस्वाच्या गैरवापराशी संबंधित आहे. हा कायदा नैतिकतेविरोधी एकाधिकारशाही वर्चस्वाचा गैरवापर करून लहान कंपनीच्या शोषणापासून रक्षण करण्याशी संबंधित आहे. मोनोपोलीचा फायदा घेऊन जास्त किंमत आकारणे, तर बाजारपेठेत प्रवेश नाकारणे या प्रकाराशी संबंधित आहे. नियमांनुसार, स्पर्धा नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आहेत की नाही यावर निष्कर्ष काढण्यासाठी सीसीआय प्रथम उपलब्ध माहितीची तपशीलवार तपासणी करते. जेव्हा उल्लंघनाचे प्रथमदर्शनी पुरावे आढळतात तेव्हाच नियामक या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देतो. व एखाद्या संस्थेचे वर्चस्व असणे स्पर्धाविरोधी नसते, परंतु जर वर्चस्वाचा गैरवापर होत असेल तर ते स्पर्धाविषयक नियमांचे उल्लंघन करते.बाजारपेठेतील स्पर्धाविरोधी पद्धती रोखण्यासाठी तसेच निष्पक्ष व्यवसाय मार्गांना प्रोत्साहन देण्यासाठी सीसीआय काम करते.
HBDSuperstarRajinikanth – सुपरस्टार रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी शुक्रवारचा दिवस हा दुहेरी आनंदाचा होता. या दिग्गज स्टारने त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा केलाच शिवाय चित्रपटसृष्टीत अभिनयाची ५० वर्षेही पूर्ण केली. हा दिवस संपूर्ण तामिळनाडू भारतभर सर्वत्र एका उत्सवासारखा नटला. याप्रसंगी त्याच्या विशेष चित्रपट पुनर्प्रकाशन, संगीत कार्यक्रम आणि थीम असलेल्या पार्ट्यांनी या अभिनेत्याच्या पडद्यावरच्या उल्लेखनीय अर्धशतकी प्रवासाचा सन्मान […] The post सुपरस्टार रजनीकांत यांना ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा; मराठमोळ्या स्टाईल अन् अॅक्शनची रुपेरी पडद्यावर ५० वर्षे पूर्ण ! appeared first on Dainik Prabhat .
विशेष समितीच्या अहवालातील गंभीर निरीक्षण; आव्हाड-पडळकर समर्थकांच्या राड्याप्रकरणी अहवाल सादरनागपूर : मुंबईतील विधानभवन परिसरात पावसाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी शुक्रवारी विशेषाधिकार समितीचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. समितीचे अध्यक्ष आ. नरेंद्र भोंडेकर यांनी हा अहवाल सभागृहात वाचून दाखवला. या अहवालात विधानभवनाच्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवण्यात आली असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनाही विधानभवनातील कर्मचाऱ्यांकडून अगदी सहजतेने आणि विनापडताळणी प्रवेशपत्रिका (पास) देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.घटना काय घडली होती?दि. १७ जुलै २०२५ रोजी पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना विधानभवनाच्या लॉबीत जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख आणि आ. गोपीचंद पडळकर यांचे समर्थक सर्जेराव टकले यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. काही क्षणातच त्याचे रुपांतर धक्काबुक्कीत आणि नंतर हाणामारीत झाले. या घटनेमुळे विधिमंडळ परिसरात मोठी खळबळ उडाली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीरतेने घेत, विशेषाधिकार समितीकडे चौकशीसाठी पाठवले होते.समितीच्या चौकशीत काय आले समोर?विशेषाधिकार समितीने या प्रकरणी एकूण १० बैठका घेतल्या. नितीन देशमुख, सर्जेराव टकले यांच्यासह इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सीसीटीव्ही फुटेज, प्रवेशपत्रिका वितरण रजिस्टर आदी पुराव्यांची पडताळणी केली. चौकशीअंती समितीला आढळले की, विधानभवनात येणाऱ्या अभ्यागतांची कोणतीही पार्श्वभूमी तपासली जात नाही. त्यामुळेच गंभीर गुन्हे दाखल असलेले व्यक्तीही विधानभवनाच्या लॉबीपर्यंत मजल मारू शकले.समितीच्या प्रमुख शिफारशी१. विधानभवनात अभ्यागतांना प्रवेश देण्याकरिता स्वतंत्र नियमावली तयार करावी. ही नियमावली सुरक्षा तज्ज्ञ आणि सल्लागारांच्या मार्गदर्शनाने बनवावी आणि त्याचे काटेकोर पालन करावे.२. प्रवेशिका वितरण प्रणाली ही महाराष्ट्र पोलीस डेटाबेसशी थेट जोडावी, जेणेकरून अभ्यागतांची रिअल-टाईम गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासणी होईल. गुन्हेगारी रेकॉर्ड आढळल्यास त्यांचा प्रवेश आपोआप नाकारला जाईल.३. सुरक्षा सल्लागार आणि पोलीस दलाशी सतत समन्वय ठेवून विधानभवनाची सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम करावी.४. पास वितरण प्रणाली तंत्रज्ञानतज्ज्ञांच्या सल्ल्याने आधुनिक आणि सुरक्षित बनवावी.दोषींवर कठोर कारवाईची शिफारससमितीने नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांना विधानभवनाच्या विशेषाधिकाराचा भंग केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. त्यांना प्रत्येकी दोन दिवसांची दिवाणी कारावासाची शिक्षा आणि मुंबई तसेच नागपूर येथील विधानभवन परिसरात ३१ डिसेंबर २०२९ पर्यंत प्रवेशबंदी करण्याची शिफारस केली आहे.
पहिली ते १२वी पर्यंतच्या प्रत्येक पुस्तकात शिवरायांचा इतिहास समाविष्ट करणार
राज्यमंत्री पंकज भोयर यांची विधान परिषदेत माहितीनागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात अधिक व्यापक आणि सखोल स्वरूपात समाविष्ट व्हावा, यासाठी महाराष्ट्र सरकार आग्रही असून, आता इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या प्रत्येक पुस्तकात शिवरायांचा इतिहास समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी सीबीएसईच्या अभ्यासक्रमात शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत मर्यादित असल्याचा मुद्दा ‘अर्धा तास चर्चा’मध्ये उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना डॉ. भोयर म्हणाले, “आता हा इतिहास २ हजार २०० ते २ हजार ५०० शब्दांपर्यंत वाढवण्यात आला आहे. इयत्ता आठवीत ‘द राइज ऑफ मराठा’ हा स्वतंत्र धडा २२ पानांत समाविष्ट करण्यात आला आहे. पण आम्ही येथेच थांबणार नाही. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या प्रत्येक पुस्तकात छत्रपतींचा इतिहास योग्य प्रमाणात मांडण्यासाठी 'एनसीईआरटी'कडे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत सविस्तर प्रस्ताव पाठवला आहे.”राज्य सरकारच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच सीबीएसईच्या अभ्यासक्रमात ‘द राइज ऑफ मराठा’ हे स्वतंत्र प्रकरण समाविष्ट झाल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच लवकरच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना शिवरायांचे प्रेरणादायी कार्य समजावे यासाठी विशेष आग्रह धरला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.पंतप्रधान मोदींकडून शिवरायांच्या आदर्शांचे अनुकरण विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना डॉ. भोयर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या आदर्श राज्यव्यवस्थेचेच अनुकरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात राबवत आहेत. शेतकरी सन्मान योजना, कृषी योजना, महा-राजस्व समाधान शिबिरे अशा अनेक योजनांना शिवरायांचेच नाव देण्यात आले आहे.” शिवचरित्राच्या विकृतीकरणाबाबत आमदार जयंत आसगावकर यांनी कारवाईचा प्रश्न उपस्थित केला. तर अमोल मिटकरी यांनी ‘अस्सल शिवचरित्र साधने समिती’ त्वरित स्थापन करण्याची मागणी केली. जगन्नाथ अभ्यंकर यांनी राज्याच्या ३० टक्के अभ्यासक्रमात महाराष्ट्राच्या इतिहासाला प्राधान्य देण्याची सूचना मांडली. या सर्व मुद्द्यांची दखल घेत डॉ. भोयर यांनी ‘शिवचरित्र वाचन’ उपक्रम शाळांत राबवण्याबाबत शिक्षण विभागाशी चर्चा करू अशी ग्वाही दिली.
भास्कर जाधव एकटे असल्यावर वेगळे बोलतात, आदित्य ठाकरे असल्यावर वेगळ्या टोनमध्ये बोलतात!
मंत्री नितेश राणेंची टोलेबाजी; मत्स्यविकास बोर्डाच्या पुनरुज्जीवनासाठी लवकरच बैठक घेणारनागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत जोरदार टोलेबाजी केली. मत्स्यविकास बोर्डाच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या भास्कर जाधव यांना उत्तर देताना राणे म्हणाले, “भास्कर जाधव एकटे असताना वेगळ्या टोनमध्ये बोलतात, आदित्य ठाकरे असताना वेगळ्या टोनमध्ये बोलतात. आदित्य ठाकरे नसताना तर मिठीही मारतात,” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.आमदार भास्कर जाधव यांनी मत्स्यविकास बोर्डाच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. ते म्हणाले, “१ जून ते १ जुलै या कालावधीत मासेमारी बंदी असते, तेव्हा मच्छिमारांना उत्पन्नाचे साधन नसते. मासळीचे दर वाढले तरी बहुतांश पैसा दलालांकडे जातो, मच्छिमार उपेक्षित राहतात. म्हणूनच माथाडी बोर्डाच्या धर्तीवर मत्स्यविकास बोर्ड स्थापन केले होते. पण आज या बोर्डाची मुंबईत स्वतःची जागाही नाही. मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी यात लक्ष घालून मत्स्यविकास बोर्डाचे पुनरुज्जीवन करावे,” अशी सूचना जाधव यांनी केली.यावर उत्तर देताना नितेश राणे यांनी जाधव यांच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. “भास्कर जाधव यांनी खूप चांगली माहिती दिली. मी नक्कीच या बोर्डाची माहिती घेईन. त्यांनी केलेली सूचना अतिशय महत्त्वाची आहे. लवकरच याबाबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ,” असे आश्वासन राणे यांनी दिले. तसेच, “जाधव यांचा अनुभव मच्छिमार आणि कोकणाला उपयोगी पडला तर आम्हाला आनंदच आहे,” असेही ते म्हणाले.सिल्वर पापलेट माशांबाबत निवेदनदरम्यान, सिल्वर पापलेट माशाच्या संख्येबाबत समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या चर्चेला उत्तर देताना राणे यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकारने ५ सप्टेंबर २०२३ रोजी सिल्वर पापलेटला ‘राज्य माशा’चा दर्जा दिला आहे. तसेच ५४ मासळी प्रजातींवर मासेमारी बंदी घातली आहे. “पापलेटची संख्या कमी होत असल्याच्या चर्चा चुकीच्या आहेत. या प्रजातीच्या संरक्षणासाठी सरकारने ठोस पावले उचलली आहेत,” असे त्यांनी सभागृहात निवेदन करताना सांगितले.
साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत'चे काय आहे खरे नाव ?
रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये एकाहून एक असे हिट ,सरस चित्रपट केलेत. सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. ते ७५ वर्षांचे झाले आहेत. त्यांनी ५० वर्षांच्या कारकिर्दीत १७० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केलं आहे पण तुम्हाला रजनीकांत यांचे खरे नाव माहीत आहे का ? त्यांच्या खऱ्या नावाबद्दल फारच कमी लोकांना माहीत आहे , तर मग जाणून घेऊया..रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० साली बंगळुरू येथे झाला. त्यांचे वडील रामोजी राव गायकवाड हे पोलिस कॉन्स्टेबल होते तर आई गृहिणी होती. रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजी राव गायकवाड असे आहे.रजनीकांत यांनी १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या “अपूर्व रागंगल” या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. बालचंदर दिग्दर्शित या चित्रपटात त्यांनी सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली. त्यानतंर १९७८ मध्ये आलेल्या ‘भैरवी’ चित्रपटात ते प्रमुख अभिनेता म्हणून झळकले. रजनीकांत चित्रपटसृष्टीत ५० पेक्षा जास्त वर्षांपासून सक्रीय आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत १७० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. या सुपरस्टारने तमिळ, हिंदी, तेलगू, कन्नड,बंगाली आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं असून त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.कामाबद्दल बोलायचं झालं तर रजनीकांत हे शेवटचे “कुली” चित्रपटात दिसले होते. हा २०२५ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला. तcharectersर आता रजनीकांत हे ‘जेलर २’मध्ये दिसतील. हा चित्रपट १२ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. रजनीकांत कमल हासन यांच्यासोबतही एका चित्रपटावर काम करत आहेत.
मायक्रोसॉफ्टसोबत १७ अब्ज डॉलर्सचा ऐतिहासिक करार; आशियातील सर्वात मोठा 'GCC'प्रकल्प महाराष्ट्रात
नागपूर : महाराष्ट्र हे गुंतवणुकीच्या बाबतीत देशात एक नंबरचे राज्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याच्या अर्थव्यवस्थेला आणि रोजगार निर्मितीला कलाटणी देणारी मोठी घोषणा केली. राज्यात 'ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर'चा (GCC) आशियातील सर्वात मोठा प्रकल्प येणार असून, त्या माध्यमातून तब्बल ४५ हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली.४५ हजार नोकऱ्यांचे 'गिफ्ट'राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. याबद्दल माहिती देताना फडणवीस म्हणाले, आम्ही एक खूप मोठा प्रकल्प निश्चित केला आहे. हा एक GCC (Global Capability Center) प्रकल्प असून, आशिया खंडात पहिल्यांदाच २ दशलक्ष (2 Million) स्क्वेअर फुटांचा हा भव्य प्रकल्प उभारला जाईल. या एकाच प्रकल्पामुळे राज्यात ४५ हजार तरुणांना थेट रोजगार मिळणार आहे. लवकरच यासंदर्भातील सामंजस्य करार (MoU) करण्यात येईल. हा प्रकल्प प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यात सुरू होईल, ज्यामुळे या शहरांचा चेहरामोहरा बदलेल.मायक्रोसॉफ्ट आणि FedEx सोबत मोठी उडीकेवळ नोकऱ्याच नव्हे, तर तंत्रज्ञानाच्या बाबतीतही महाराष्ट्र जगात आघाडीवर रहावा, यासाठी फडणवीस प्रयत्नशील आहेत. त्यांनी सांगितले की, मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्य नडेला यांच्याशी आपली सविस्तर चर्चा झाली आहे. मायक्रोसॉफ्टसोबत १७ अब्ज डॉलर्सचा (सुमारे १.४० लाख कोटी रुपये) मोठा करार झाला आहे. तसेच, जागतिक लॉजिस्टिक कंपनी FedEx सोबतही चर्चा झाली असून, त्यांचाही GCC प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.गुन्हेगारी रोखण्यासाठी 'AI'चा वापरआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रशासनात कसा करता येईल, याचे व्हिजन फडणवीस यांनी मांडले. सत्य नडेला यांच्याशी बोलताना, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) चा वापर करून क्राईम कंट्रोल (गुन्हेगारी नियंत्रण) कसे करता येईल, यावर भर देण्यात आला. भविष्यात पोलिसांना आणि तपास यंत्रणांना AI ची मोठी मदत होणार आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्य नडेला यांच्यातील चर्चेचाही सकारात्मक परिणाम राज्याला मिळणार आहे.संस्कृत नेत्याला आदरांजलीविकासाच्या गप्पांमधेच राजकीय संस्कृतीचे दर्शनही फडणवीस यांनी घडवले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना फडणवीस भावूक झाले. शिवराज पाटील हे केवळ काँग्रेसचे नेते नव्हते, तर देशाचे एक मोठे आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व होते. ते अत्यंत अभ्यासू होते आणि नेहमीच संविधानाचा आणि सभ्यतेचा आदर करत. माझे त्यांच्याशी खूप चांगले आणि जवळचे संबंध होते. अनेकदा फोन करून ते माझ्या निर्णयांचे कौतुक करत असत, अशा शब्दांत फडणवीस यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस असल्याने फडणवीस यांनी सभागृहाच्या वतीने त्यांनाही शुभेच्छा दिल्या.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर ; म्हणून न्यायालयाने पुढे ढकलली सुनावणी
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने काही अहवाल अद्याप उपलब्ध झाले नसल्यामुळे सुनावणी पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. वैद्यकीय आणि न्यायवैद्यक अहवालांशिवाय कोणताही आदेश देता येणार नाही, असे न्यायालयाने सांगितले.मालाड येथील एका उच्चभ्रू सोसायटीतल्या उंचावरील एका मजल्यावरुन पडल्यामुळे दिशाचा ८ जून २०२० रोजी मृत्यू झाल्याची प्राथमिक नोंद पोलिसांनी केली होती. तपासात हाती आलेल्या इतर माहितीवरुन पोलिसांनी नंतर दिशाने आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली होती. पण दिशा प्रकरणाशी संबंधित काही अहवाल अद्याप आलेले नाही. या प्रकरणी न्यायालयाने नाराजी व्यक्त करत दिशाचा शवविच्छेदन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी याचिका दाखल करून गंभीर आरोप केले. दिशावर सामूहिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. गुन्हा तात्काळ नोंदवावा, तपास सीबीआयकडे द्यावा, काही प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी प्रकरण झाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत… असा देखील आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांनी दिशा प्रकरणाशी संबंधित सर्व वैद्यकीय अहवाल न्यायालया सादर करण्याचे निर्देश दिले.

23 C