SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

29    C
... ...View News by News Source

Kiara Advani Sidharth Malhotra Daughter Name: कियारा–सिद्धार्थ यांनी शेअर केली आपल्या लाडक्या राजकुमारीची पहिली झलक; जाणून घ्या मुलीचं नाव

Kiara Advani Sidharth Malhotra Daughter Name: बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी अखेर आपल्या लहानग्या राजकुमारीच्या नावाचा खुलासा केला आहे. 15 जुलै 2025 रोजी मुंबईतील एका रुग्णालयात कियाराने मुलीला जन्म दिल्यानंतर, तिच्या नावाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. आज कियाराने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत मुलीचं सुंदर नाव जाहीर […] The post Kiara Advani Sidharth Malhotra Daughter Name: कियारा–सिद्धार्थ यांनी शेअर केली आपल्या लाडक्या राजकुमारीची पहिली झलक; जाणून घ्या मुलीचं नाव appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 12:05 pm

“”थर्ड वर्ल्ड”च्या नागरिकांना अमेरिकेत घुसू देणार नाही” ; गोळीबार प्रकरणानंतर ट्रम्प यांचा आक्रमक पवित्रा

Donald Trump on “Third World”। अमेरिकेच्या वॉशिंग्टन, डीसीमध्ये झालेल्या गोळीबारानंतर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण त्यांनी आज एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर ट्रम्प यांनी त्यांचे प्रशासन “‘थर्ड वर्ल्ड” मधून म्हणजेच तिसऱ्या जगातून येणाऱ्या स्थलांतरितांना देशात कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी […] The post “”थर्ड वर्ल्ड” च्या नागरिकांना अमेरिकेत घुसू देणार नाही” ; गोळीबार प्रकरणानंतर ट्रम्प यांचा आक्रमक पवित्रा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 11:58 am

विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आज शेअर बाजार सपाट ; निफ्टी २६००० च्या वर

Share Market। गेल्या तीन दिवसांपासून तेजी कायम ठेवल्यानंतर आज भारतीय शेअर बाजार स्थिर राहिला. निफ्टी ५० २६,२३७.५ अंकांवर उघडला, तर बीएसई सेन्सेक्स किंचित वाढून ८५,७९१ अंकांवर पोहोचला. मात्र, सुरुवात सपाट असूनही, बेंचमार्क निर्देशांक वाढत राहिला, ज्याला एफएमसीजी, धातू आणि इतर क्षेत्रातील समभागांनी पाठिंबा दिला. निफ्टीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, हिंडाल्को, टायटन आणि अदानी […] The post विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आज शेअर बाजार सपाट ; निफ्टी २६००० च्या वर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 11:42 am

Pune District : डाळिंबाच्या बागेची नासधूस; शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका, शिरूर तालुक्यातील ‘या’गावात नेमकं काय घडलं?

जांबुत : जांबुत – शरदवाडी (ता. शिरूर ) येथे अज्ञात समाजकंटकाकडून सुमारे तीन एकर क्षेत्रावरील डाळिंब बागेच्या शेतातील सुमारे १ हजार ३०० झाडे तोडून नासधूस करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत परिसरातील शेतकऱ्यानी संताप व्यक्त केला असुन अशा प्रकारे नुकसान करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जांबुत, शरदवाडी परिसरातील शेतकरी […] The post Pune District : डाळिंबाच्या बागेची नासधूस; शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका, शिरूर तालुक्यातील ‘या’ गावात नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 11:42 am

Skin Care Tips: घरीच तयार करा Vitamin C Serum; जाणून घ्या सोपे व सर्वात उत्तम उपाय

Skin Care Tips: त्वचा निरोगी, तजेलदार आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी योग्य आहार, भरपूर पाणी आणि हेल्दी लाइफस्टाइलची गरज असते. त्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो विटामिन C. कारण ते कोलेजन तयार करण्यात मदत करते, त्वचेची इलास्टिसिटी टिकवून ठेवते आणि सुरकुत्या, फाइन लाइन्स व काळे डाग कमी करण्यात उपयुक्त ठरते. बाजारात अनेक व्हिटॅमिन C सिरम उपलब्ध असतात, परंतु […] The post Skin Care Tips: घरीच तयार करा Vitamin C Serum; जाणून घ्या सोपे व सर्वात उत्तम उपाय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 11:36 am

“रस्त्यांची अवस्था पाहून पालकमंत्री म्हणून मला लाज वाटली “; अजित पवार भरसभेतून असं का म्हणाले?

Ajit Pawar : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकासाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुतांशी ठिकाणी निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने प्रचाराची मोहिम सर्वत्र मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार […] The post “रस्त्यांची अवस्था पाहून पालकमंत्री म्हणून मला लाज वाटली “; अजित पवार भरसभेतून असं का म्हणाले? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 11:32 am

Suddep Pharma Share Listing: सुदीप फार्मातील आयपीओ गुंतवणूक मालामाल? शेअर थेट प्रति शेअर ३०% प्रिमियमसह सूचीबद्ध

मोहित सोमण: सुदीप फार्मा लिमिटेडचे आज जोरदार लिस्टिंग झाले आहे. शेअर थेट मूळ प्राईज बँडपेक्षा ३०% अधिक प्रिमियम किंमतीवर व्यवहार करत असल्याने एक शेअरची किंमत ७६६- ७६७ या पातळीवर सुरु आहे. ८९५ कोटी मूल्यांकनाचा हा आयपीओ (IPO) २१ ते २५ नोव्हेंबर कालावधीत बाजारात दाखल झाला होता. आज २८ जूनला शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) झाला आहे. कंपनीने आयपीओसाठी ५९३ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित केला होता. एकूण ०.१६ कोटी शेअर बाजारात विक्रीसाठी दाखल झाले होते. त्या पब्लिक इशूपैकी ९५ कोटींचे शेअर फ्रेश इशू असून उर्वरित १.३५ कोटी शेअर ऑफर फॉर सेल (Offer for Sale OFS) उपलब्ध होते ज्यांचे मूल्यांकन ८०० कोठुन होते. बीएसई व एनएसईवर शेअर सूचीबद्ध झाला आहे.आयपीओपूर्वी कंपनीने २६८.५० कोटी रुपये अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले होते. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे (Promoter) भागभांडवल ८९.३७% होते ते आयपीओनंतर आता ७६.१५% आहे. कंपनी प्रामुख्याने फार्मा उत्पादनात कार्यरत आहे. कंपनीचे सहा उत्पादन प्रकल्प (Manufacturing) ५०००० MT क्षमतेसह बाजारात कार्यरत आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर भांडवली खर्चासाठी (Capital Expenditure) व दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे. कंपनीच्या आयपीओला एकूण ९३.७१ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते ज्यामध्ये किरकोळ (Retail) गुंतवणूकदारांकडून १५.६५ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २१३.०८ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) ११६.७२ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 11:30 am

स्पॉटलाइट-येथे काजू, बदाम, चारोळी करतात मतदान:आगर-मालवा येथील मतदान केंद्र 93,94 ची काय आहे खासियत, पाहा व्हिडिओ

मध्य प्रदेशातील आगर-मालवा येथे काजू, बदाम, पिस्ता, कांदा आणि टीव्ही, अगदी अँटेनापर्यंत नावे असलेले लोक मतदान करतात. अखेर पारधी समाजातील लोकांच्या इतक्या विचित्र नावांची कहाणी काय आहे, हे चर्चेत का आणि कधी आले, संपूर्ण माहितीसाठी वर दिलेल्या इमेजवर क्लिक करून व्हिडिओ पाहा.

दिव्यमराठी भास्कर 28 Nov 2025 11:21 am

पाकिस्तानमध्ये मध्यरात्री ड्रामा ; इम्रान खानचा मुलगा म्हणाला, “माझे वडील जिवंत आहेत याचा…”

Imran Khan Dead। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या कुटुंबाला आणि पीटीआयच्या कोणत्याही नेत्याला त्यांना भेटण्याची परवानगी नाही. दरम्यान, याच कारणावरून पाकिस्तानच्या आदियाला तुरुंगाबाहेर रात्री उशिरापर्यंत नाट्यमय घडामोडी घडत होत्या. दरम्यान, इम्रान खान यांचे पुत्र कासिम खान यांनी केलेल्या पोस्टमुळे या प्रकरणात तणाव निर्माण झाला आहे. […] The post पाकिस्तानमध्ये मध्यरात्री ड्रामा ; इम्रान खानचा मुलगा म्हणाला, “माझे वडील जिवंत आहेत याचा…” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 11:06 am

“मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडणारच”; ऐन निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगेंचा थेट इशारा

Manoj Jarange : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा माहोल आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सर्वच पक्षांकडून केला जात आहे. स्थानिक निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीमधील पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचार सभांमध्ये ‘लाडकी बहीण’ योजनाचा उल्लेख करत नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. २ डिसेंबर रोजी येऊन ठेपलेल्या २४७ नगपरिषदा आणि […] The post “मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडणारच”; ऐन निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगेंचा थेट इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 10:45 am

गोळीबार प्रकरणानंतर ट्रम्प यांच्या रडारवर पुन्हा जो बायडेन ; ‘त्या’निर्णयाची करणार चौकशी, ‘या’१९ देशावरही करडी नजर

Donald Trump on Joe Biden। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. ट्रम्प यांनी बायडेन यांच्या कारकिर्दीत १९ देशांच्या नागरिकांना देण्यात आलेल्या ग्रीन कार्डची चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत. यासोबतच त्यांनी निर्वासितांच्या मुद्यावरही व्यापक आढावा घेण्यास प्रशासनाला सांगितले आहे. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती […] The post गोळीबार प्रकरणानंतर ट्रम्प यांच्या रडारवर पुन्हा जो बायडेन ; ‘त्या’ निर्णयाची करणार चौकशी, ‘या’ १९ देशावरही करडी नजर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 10:33 am

ज्ञानोबा माऊलीचे कार्य स्टॅण्डफोर्ड विद्यापीठात

मुंबई : सर्व समाजासाठी ज्ञानाचे दरवाजे उघडणाऱ्या ज्ञानोबा माऊली यांचे कार्य साता समुद्रापार स्टॅण्डफोर्ड विद्यापीठात नेण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी सांगितले.मध्य रेल्वेच्या सर्व ५ विभाग, कार्यशाळा आणि फील्ड युनिट्समधील विविध ठिकाणी भंगाराची विक्री करण्यात आली आहे. तसेच विकल्या जाणाऱ्या भंगारातील प्रमुख वस्तूंमध्ये रेल, फेरस भंगार, नॉन-फेरस भंगार, रोलिंग स्टॉक, कोच आणि वॅगन्स यांचा समावेश आहे. ही कामगिरी झिरो स्क्रॅप मिशन प्रति मध्य रेल्वेची सातत्यपूर्ण बांधिलकी आणि भंगार विल्हेवाटीतील सुधारित कार्यक्षमतेचे प्रतीक आहे. मध्य रेल्वेदेखील शिल्डसाठी आघाडीवर असून एकूण २२ पैकी १० कामगिरी पॅरामीटर्स झोनमध्ये तिने प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवले आहे.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 10:30 am

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान रविवारपासून एकदिवसीय सामन्यांची मालिका, कोण मारणार बाजी ?

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने ०-२ अशी जिंकली. दोन्ही सामन्यात भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. या धक्क्यातून सावरत भारतीय संघ एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज होत आहे. वेळापत्रकानुसार रविवार ३० नोव्हेंबर २०२५ पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना झारखंडमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १:३० वाजता सुरू होईल.भारत आणि दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यांमध्ये ९४ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने ९४ पैकी ५१ सामने जिंकले आहेत तर भारतीय संघाने ४० सामने जिंकले आहेत आणि तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय संघाने घरच्या मैदानावर १८ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने २६ सामने जिंकले आहेत. परदेशात, भारतीय संघाने १२ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने १४ सामने जिंकले आहेत. तटस्थ ठिकाणी झालेल्या सामन्यांपैकी १० सामने भारताने आणि ११ सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत.एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघकेएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), रिषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह और ध्रुव जुरेलभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकापहिला सामना - ३० नोव्हेंबर २०२५ - रांची, झारखंडदुसरा सामना - ०३ डिसेंबर २०२५ - रायपूर, छत्तीसगडतिसरा सामना - ०६ डिसेंबर २०२५ - विशाखापट्टणम (वायझॅग), आंध्र प्रदेश

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 10:30 am

‘वनतारा’च्या उद्दिष्टांचे जागतिक स्तरावर पुनरुज्जीवन

सीआयटीईएसच्या बैठकीत भारताच्या भूमिकेला मान्यताजामनगर : उझबेकिस्तानमधील समरकंद येथे नुकतेच पार पडलेल्या ‘सीआयटीईएस’च्या (साईट्स) २०व्या परिषदेच्या बैठकीत स्थायी समिती आणि सदस्य राष्ट्रांनी प्रचंड बहुमताने भारताच्या भूमिकेला ठाम मान्यता दिली. प्राण्यांच्या आयातीसंदर्भात भारताविरोधात कोणतीही कारवाई करण्यासारखे पुरावे किंवा कारणे नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.या निष्कर्षामुळे वनताराच्या कायदेशीर, पारदर्शक आणि विज्ञानाधिष्ठित वन्यजीव संवर्धन मॉडेलची ठोस पुष्टी झाली असून, जागतिक नियमांचे पालन करणारे आणि नैतिकदृष्ट्या सर्वाधिक सुशासित असे वन्यजीव संवर्धन केंद्र म्हणून वनताराची प्रतिष्ठा अधोरेखित झाली. जागतिक वन्यजीव नियमपालनाचे मूल्यमापन करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांशी संबंधितसचिवालयाने सप्टेंबर २०२५ मध्ये वनताराची दोन दिवस तपासणी केली. या भेटीत त्यांनी वनतारातील प्राणीसाखळी, पशुवैद्यकीय व्यवस्था, नोंदी, बचावकार्य आणि कल्याण प्रक्रियेची सखोल छाननी केली.३० सप्टेंबर २०२५ रोजी स्थायी समितीकडे सादर केलेल्या अहवालात सचिवालयाने वनताराला अत्याधुनिक पायाभूत सुविधा, प्रगत पशुवैद्यकीय सेवा आणि सक्षम बचाव-पुनर्वसन प्रणाली असलेले, जगातील सर्वोत्तम कल्याणकेंद्रित संस्थांपैकी एक म्हणून मान्यता दिली. त्यांनी स्पष्टपणे नोंदवले की, वनताराचे कार्य प्राणीकल्याण आणि संवर्धनावर आधारित आहे आणि ही संस्था कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक प्राणी व्यापारात सहभागी नाही. वनताराचे खुलेपण, सहकार्य व संबंधित प्रक्रियांशी सुसंगतता यांचाही त्यांनी उल्लेख केला.रविवारी स्थायी समितीतील चर्चेत सदस्य देशांच्या प्रचंड बहुमताने भारताच्या भूमिकेला दिलेले समर्थन हे वनताराच्या प्रामाणिकपणाचे व उद्दिष्टांचे जागतिक स्तरावर पुनरुज्जीवन आहे. यामुळे चुकीच्या समजुती दूर होऊन जनमतात पसरलेल्या अपूर्ण किंवा दिशाभूल करणाऱ्या कथनांना वस्तुनिष्ठ आधार मिळाला आहे. वनतारा संवर्धन, नियमपालन आणि प्राणीसेवा या तिन्ही क्षेत्रांत योग्य पद्धतीने कार्यरत आहे.पक्षकारांचा हा व्यापक पाठिंबा भारताच्या अंमलबजावणी चौकटीवरील विश्वास दृढ करणारा आहे, तसेच स्थापना दिनापासून वनताराने या मानकांचे सातत्याने पालन केल्याची आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली आहे. जागतिक संवर्धन क्षेत्रातील वनताराच्या योगदानाचे हे एक प्रभावी प्रमाणपत्र आहे.हे आंतरराष्ट्रीय निष्कर्ष भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) निष्कर्षांची पूर्णपणे जुळणारे आढळून येतात. एसआयटीने वनताराविरुद्धच्या सर्व आरोपांची कायदेशीर, आर्थिक, कल्याणविषयक तसेच साईट्ससंदर्भात सखोल चौकशी केली. दस्तऐवज परीक्षण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांशी सल्लामसलत आणि जामनगर सुविधेची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर एसआयटीने सर्व तक्रारी आणि माध्यमांमध्ये व्यक्त झालेले आरोप ‘समर्थन न होणारे, आधारहीन आणि कायदेशीर व तथ्यात्मक पुराव्यांपासून पूर्णपणे दूर’ असल्याचे नमूद केले.तपासणीत हेही स्पष्ट झाले की, सर्व प्राणी वैध आयात परवानग्यांसह आणि गैर-व्यावसायिक उद्देशांसाठीच आणले गेले, कोणतीही वन्यजीव तस्करी, मनी लॉन्डरिंग किंवा आर्थिक अनियमितता झालेली नाही आणि इनव्हॉइसविषयक उल्लेख हे केवळ सीमाशुल्क मूल्यांकनाची नियमित प्रक्रिया होती. तसेच, वनतारा केवळ केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांचे पालन करतेच असे नाही, तर ते मानकांपेक्षा अधिक काटेकोरपणे पाळते. त्याला ‘ग्लोबल ह्यूमेन सर्टिफाइड’ दर्जा आहे आणि ते खासगी संकलन नसून एक प्रमाणित, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र आहे.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 10:30 am

डोंबिवलीच्या रेल्वे स्थानकातून नावच गायब

बाहेरगावच्या प्रवाशांंमध्ये संभ्रमडोंबिवली : गेल्या वर्षापासून डोंबिवली स्थानकाचे नूतनीकरण, डागडूजी, प्लेटफॉर्म रुंदीकरण, वाढीव जिना, सरकते जिने पत्र्याचे शेड असे अनेक काम सुरू आहेत. मात्र हे काम करत असताना रेल्वे प्रशासनाकडून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे जणू नव्याने नामकरण केले गेले आहे. स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूला एकूण आठ प्रवेशद्वार आहेत. एकाही प्रवेशद्वारावर कुठेच 'डोंबिवली' असा उल्लेख नाही. त्यामुळे बाहेरून आलेल्या प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतो. आपण नक्की कोणत्या स्थानकाजवळ आहोत असा प्रश्न ते विचारतात.आठही प्रवेशद्वारांवर नाट्यनगरी, नृत्यनगरी, क्रिडा नगरी, साहित्य नगरी, उद्योग नगरी, संगीत नगरी, एकता नगरी, कला नगरी असे लिहिले गेले आहे. ही नावे म्हणजे डोंबिवली शहराला मिळालेल्या उपमा आहेत. उपमा मिळाल्या म्हणून आपण मूळ नाव मिटवू शकत नाही.ठाणे ग्रामीण भागातील प्रमोद कांबळे यांनी मध्य रेल्वे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) हिरेश मीना यांची कार्यालयात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. लवकरात लवकर डोंबिवली स्थानकाबाहेरील कमावर डोंबिवली हे मूळ नाव सुद्धा लिहावे. अनेक दिवसांपासून रेंगाळत चाललेली कामे लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावी अशी विनंती करून सांगितले. अन्यथा शिवसेना स्टाइल तीव्र आंदोलन करू असा इशारादेखील देण्यात आला. गेल्या वर्षी निवडणुकीच्या दरम्यान अर्धवट काम झाले असताना रेल्वे प्रशासनाने आमदारांना डोंबिवली स्थानक नूतनीकरण लोकार्पण करण्याची परवानगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 10:10 am

डोंबिवलीत सापडला महिलेचा मृतदेह; पती फरार

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी किरकोळ घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून पतीने हत्या केली. त्यानंतर पती फरार झाला. त्याला शोधण्यासाठी मानपाडा पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटनेही तपासास गती दिली आहे. पोलिसांनी सद्गुरू निवास चाळीतील घरमालक वासुदेव दिवाणे यांच्या फिर्यादीवरून पोपट दाहिजे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. काटई नाक्यावरील कोळेगावात असलेल्या कृष्णाई नगरमध्ये असलेल्या सद्गुरू निवास चाळीतील रूम नं. ४ मध्ये ज्योती आणि पोपट दाहिजे वास्तव्यास होते. पोपट यश डेव्हलपर्सकडे बिगारीचे काम करतो. बुधवारी सकाळी यश डेव्हलपर्सचे बाळासाहेब म्हस्के यांनी पोपट कामावर का आला नाही हे पाहण्यासाठी गेले असता घराचा दरवाजा बाहेरून बंद होता. घरमालक वासुदेव यांना याबबत कळविले. म्हस्के यांनी ज्योतीच्या मोबाईलवर संपर्क साधला. ज्योतीच्या मोबाइल फोनचा आवाज घरातून येत होता. खिडकीतून डोकावून पाहिले असता फरशीवर रक्त आढळले. दिवाणे आणि म्हस्के यांनी दाराला बाहेरून लावलेले कुलूप तोडून खोलीत प्रवेश केला. वासुदेव यांनी पोलीसांच्या मदतीने स्थानिक डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी ज्योतीला मृत घोषित केले. पती पोपटने ओढणीच्या मदतीने गळा आवळून पत्नला ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केल्यानंतर ज्योतीचा मृतदेह कडोंमपाच्या शास्त्रीनगर रुग्णालयाकडे पाठवून दिला.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 10:10 am

Stock Market Opening Bell: सकाळच्या सत्रात संमिश्र तेजीची अस्थिर भावना 'या'कारणामुळे जाणून घ्या आजची निफ्टी पोझिशन

मोहित सोमण:आज शेअर बाजारात सकाळच्या सत्रात तेजीयुक्त संमिश्र प्रतिसाद कायम आहे. प्रामुख्याने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात किरकोळ वाढ झाली आहे. सेन्सेक्स २०.९९ व निफ्टी १.६० अंकाने किरकोळ वाढला आहे. किरकोळ वाढलेल्या बँक निर्देशांकासह मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये सुरू असलेल्या घसरणीचा बाजारात धोका कायम राहू शकतो. याशिवाय परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणूक 'अंतिम' निर्देशांकांची आकडेवारी अखेरच्या सत्रात निश्चित करतील. पण एकूणच बाजारात औत्सुक्याचे वातावरण असले तरी अस्थिरता कायम राहू शकते. आज अधिक निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली असली तरी ऑटो (०.४९%), एफएमसीजी (०.१६%) निर्देशांकात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.युएस बाजारातील तेजीचा परिणाम आजही बाजारात कायम असला तरी जपानमधील वाढलेल्या महागाई निर्देशांकामुळे आशियाई बाजारात संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी भारतातील दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीतील आकडेवारीवर गुंतवणूकदारांची बारीक नजर असू शकते. त्यामुळे सुरूवातीच्या कलात मजबूत फंडामेंटल असूनही गुंतवणूकदार सावधगिरीची भावना बाळगू शकतात.सकाळच्या सत्रात बँक ऑफ इंडिया (४.९९%), बंधन बँक (२.८१%), अदानी टोटल गॅस (२.७५%), बीएसएसएफ इंडिया (२.३७%), प्राज इंडस्ट्रीज (१.८४%) समभागात सर्वाधिक वाढ झाली असून सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण जेल इंडिया (१०%), पीसीबीएल केमिकल्स (८.३३%), नुवोको विस्टा (४.८४%), व्होल्टास (२.८६%), आयनॉक्स इंडिया (१.५७%), झेन टेक्नॉलॉजी (१.५५%) समभागात झाली आहे.आज सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्या कलावर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'निफ्टी आणि सेन्सेक्सने काल प्रस्थापित केलेल्या नवीन विक्रमांमधून महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की मर्यादित संख्येने कामगिरी करणाऱ्या लार्जकॅप कंपन्यांमध्ये झालेल्या कमी तेजीमुळे हे नवीन विक्रम आहेत. बाजार नवीन उच्चांकावर असूनही, बहुतेक किरकोळ गुंतवणूकदार, विशेषतः मार्च २०२० मध्ये कोविड क्रॅशनंतर बाजारात आलेले नवीन गुंतवणूकदार, तोटा दर्शविणारे पोर्टफोलिओ धारण करत आहेत. हा विरोधाभास किरकोळ गुंतवणूकदारांना स्मॉलकॅप्सबद्दल असलेले वेड आणि त्यांच्या मूल्यांकनाकडे दुर्लक्ष करून स्मॉलकॅप्स चांगले प्रदर्शन करतील असा त्यांचा विश्वास यामुळे आहे. जर किरकोळ गुंतवणूकदारांना २०२६ मध्ये अपेक्षित असलेल्या तेजीत सहभागी व्हायचे असेल, तर त्यांना वाढीची क्षमता असलेल्या लार्जकॅप्स आणि दर्जेदार मिडकॅप्समध्ये गुंतवणूक करावी लागेल.जरी सेन्सेक्स आणि निफ्टीने काल नवीन उच्चांक गाठला असला तरी, निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक त्याच्या शिखरापेक्षा सुमारे ९% खाली आहे. ही मोठी घसरण प्रामुख्याने या विभागातील खराब कमाई वाढ आणि उच्च मूल्यांकनामुळे आहे. सर्वसाधारणपणे, स्मॉलकॅप्स अल्प ते मध्यम कालावधीत कमी कामगिरी करत राहण्याची शक्यता आहे.'सकाळच्या सत्रातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'कालची घसरण आमच्या २६१६५ पातळीच्या घसरणीच्या जवळ संपली, ज्यामुळे आणखी एक वरच्या प्रयत्नाची शक्यता कायम राहिली. परंतु २६४६०-५५० पातळीच्या मार्गावर चालण्यासाठी आपण गती गमावत आहोत. तोपर्यंत, २६२२५ पातळीच्या दोन्ही बाजूंनी चढउतार होण्याची अपेक्षा करा. दरम्यान, २६०९८-२६०३२ पर्यंत घसरण बुल्सना पुन्हा एकत्र येण्यास प्रोत्साहित करू शकते. त्याच खाली घसरण २५८६० उघड करेल.'

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 10:10 am

पेण, अलिबाग, रोहा नगरपालिकांमध्ये अाठ उमेदवार बिनविरोध

रायगडमध्ये आता २०९ नगरसेवक पदांसाठी निवडणूकअलिबाग : रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग आणि रोहा या तीन नगरपालिकांमध्ये एकूण आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पेण नगरपरिषदेत सर्वाधिक ६ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत, तर अलिबाग आणि रोहामध्ये प्रत्येकी एक नगरसेवक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये रोह्यात राजेंद्र जैन (काँग्रेस), अलिबागमध्ये प्रशांत नाईक (शेकाप), पेणमध्य दीपक गुरव (राष्ट्रवादी काँग्रेस), वसुधा पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), सुशिला ठाकूर (राष्ट्रवादी काँग्रेस), मालती म्हात्रे (भाजप), स्मीता माळी (भाजप), अभिराज कडू (भाजप) यांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन, महाड, रोहा, पेण, उरण, खोपोली, कर्जत, माथेरान या दहा नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सर्व ठिकाणी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक चार नगरसेवक बिनविरोध निवडून आले.भाजपचे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले, तर शेकापचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, मरूड रोहा, महाड, पेण, उरण, माथेरान या १० नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी लढत होणार असून, दहा नगर परिषदांमध्ये २१७ नगरसेवक निवडून द्यायचे होको, त्यापैकी आठ नगरसेवक निवडून आल्यामुळे आता २०९ नगरसेवक पदांसाठी निवडणूक होत आहे.रायगड जिल्ह्यात ७७० जणांची शस्त्रे पोलिसांकडे जमानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीरायगड जिल्ह्यातील नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील नगरपालिकांच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाल्यानंतर परवाना असलेली पिस्तूल, बंदूक, आदी शस्त्रे पोलिसांकडे जमा करावी लागतात. जिल्ह्यातील दहा नगर परिषद क्षेत्रातील शस्त्रे परवानाधारक ७७० जणांनी आपली शस्त्रे पोलिसांकडे जमा केली आहेत. राज्यात ४ नोव्हेंबर रोजी नगर परिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन, महाड, रोहा, पेण, उरण, खोपोली, कर्जत, माथेरान या दहा नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था चोख राहावी, तसेच निवडणूक प्रक्रियेच्या काळात अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी निवडणूक काळात नागरिकांनी स्वसंरक्षणासाठी घेतलेली शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यात येतात.नगर परिषद निवडणुकीत उमेदवारांना चिन्हांचे वाटपरायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांसाठी बुधवारी झालेल्या चिन्ह वाटपासह स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला आहे. जिल्ह्यात सर्वच नगर परिषदांमध्ये चिन्ह वाटपाची प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार पडली. अलिबाग नगर परिषद क्षेत्रात एकूण दहा प्रभागांमध्ये २० जागांसाठी निवडणूक होत आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय आघाड्या स्पष्टपणे दिसून आल्या आहेत. शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी केली आहे, तर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी महायुती म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. याशिवाय शिवसेना (ठाकरेंचा गट)ने स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकीत शेकाप पक्षाला 'खटारा' हे चिन्ह देण्यात आले असून, अपक्ष उमेदवार 'कपबशी' चिन्हावर रिंगणात उतरणार आहेत. इतर राष्ट्रीय आणि प्रमुख पक्ष मात्र आपल्या अधिकृत चिन्हांवरच निवडणूक लढवत असल्याची माहिती तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिली. अलिबाग नगर परिषदमध्ये एकच उमेदवार अपक्ष आहे. चिन्ह वाटपाची प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यात शांततेत पार पडल्याने उमेदवार आता प्रचार युद्धासाठी सज्ज झाले आहेत. आघाड्या, स्वतंत्र उमेदवारी आणि प्रत्येक प्रभागातील स्थानिक समीकरणांमुळे अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नगर परिषदांची निवडणूक अधिक रंगतदार होणार एवढे मात्र निश्चित!

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 10:10 am

माथेरानच्या निवडणुकीत ई-रिक्षा ठरतेय कळीचा मुद्दा

माथेरान : माथेरान नगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई व खासदार सुनील तटकरे यांच्या सभा एकाच दिवशी झाल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. मतदारांना आकर्षित करणारे मुद्दे नसल्याने मरगळ दिसत आहे मात्र ई-रिक्षाच्या मुद्द्यावरून प्रचाराला गती येऊ लागली आहे.पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी भाषणात सांगितले ई-रिक्षा बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची राज्य सरकार तत्काळ अंमलबजावणी करणार आहे तसेच ई-रिक्षा देखील स्वतः राज्य सरकार खरेदी करणार आहे या मध्ये घोडेवाल्यांचा व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही याची ग्वाही शंभूराज देसाई यांनी दिली. शिवराष्ट्र पॅनलच्या सभेत खासदार सुनील तटकरे यांनी देखील ई-रिक्षामुळे येथील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मोठी मदत झाली असून स्थानिक व पर्यटकांची पायपीट वाचली आहे याचा चांगला परिणाम येथील पर्यटन वाढीसाठी होणार आहे मात्र या बदलाचा परिणाम येथील आश्वचालकांवर होणार नाही याउलट त्यांचा व्यवसाय वाढेल ई-रिक्षा पॉइंटवर जाणार नाहीत त्यामुळे त्यांनी निश्चिंत राहावे असे स्पष्ट केले.आश्वचालकांची मतदार संख्या मोठी असल्यामुळे त्यांना सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीत गोंजारत असतात, मात्र निवडणूक संपल्यावर सर्वजण घोडेवाल्यांना विसरून जात असल्याची भावना घोडेवाल्यांमधून व्यक्त केली जातं आहे. गेल्या चाळीस वर्षांत एकही नवीन तबेला आश्वचालकांना कोणी बांधून दिला नाही हे देखील कटू सत्य आहे.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 10:10 am

'मिसिंग लिंक'प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई - पुणे प्रवास होणार सुलभमुंबई : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग लोणावळा-खंडाळा विभागातील टायगर व्हॅलीजवळ उभारण्यात आला आहे. हा ६५० मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल आता जवळपास पूर्णत्वास आला आहे. जमिनीपासून सुमारे १०० मीटर उंचीवर असलेल्या या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गाचे उद्घाटन मे २०२६ मध्ये होणार असून हा मार्ग सुरू झाल्यावर मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास आणखी सुलभ होणार आहे.या प्रकल्पाचे ९६ टक्के पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे; परंतु केबल-स्टेड पूल हा तांत्रिकदृष्ट्या सर्वात कठीण भाग आहे. वाऱ्याचा वेग, मुसळधार पाऊस आणि दरीची खोली यामुळे त्याचे काम मंदावले आहे. या कठीण परिस्थितीमुळे अभियंत्यांना अतिरिक्त सावधगिरी बाळगावी लागत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे. लोणावळा-खंडाळा घाटांच्या खडकाळ भूप्रदेशातून बाहेर पडून हा प्रकल्प आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. टायगर व्हॅली येथील ६५० मीटर लांबीच्या केबल-स्टेड पुलाचा डेक जवळजवळ पूर्ण झाला आहे. पावसाळ्यानंतरच्या बांधकामाला वेग आला असून डेकचा फक्त शेवटचा भाग जोडणीच्या प्रतीक्षेत आहे. हवामान आणि भूप्रदेशाची परिस्थिती अनुकूल राहिल्यास पुढील चार महिन्यांत हा शेवटचा तुकडा जोडण्याचे पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे.मुंबई - पुणे प्रवास ३० मिनिटांतजुन्या अपघात-प्रवण घाट मार्गाला बायपास करण्यासाठी डिझाइन केलेला १३.३ किमी लांबीचा हा आठ-लेनचा प्रवेश-नियंत्रित कॉरिडॉर आहे. कार्यान्वित झाल्यानंतर तो मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास वेळ अंदाजे ३० मिनिटांनी कमी करेल आणि प्रवास जवळजवळ सहा किलोमीटरने कमी करेल अशी अपेक्षा आहे. १२० किमी प्रतितास वेगासाठी डिझाइन केलेला मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात असून तो सुरू कधी होणार याबाबत आता प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे.घाटाचा रस्ता टाळता येणारमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर या द्रुतगती मार्गावरील घाटाचा रस्ता टाळता येणार आहे. यामुळे येथे सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीतून देखील प्रवाशांची सुटका होणार आहे. हा १३.३ किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंग दोन्ही महानगरांमधील प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 10:10 am

चक्क पोलीस ठाण्याचीच जागा हडपली!

अनधिकृत इमारतही केली अधिकृत, माजी आयुक्त, नगररचना संचालकांविरोधात गुन्हेपालघर : वसई पोलीस ठाण्याच्या मालकीची जमीन हडप करून खासगी कंपनीच्या नावे केली. तसेच राजकीय वरदहस्त असलेल्या एका स्थानिक नेत्याची अनधिकृत इमारतसुद्धा नियमित करण्यात आली. दहा वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात चौकशीअंती बुधवारी वसई पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात फसवणूक, बनावट दस्तएवेज तयार करणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संबंधित कंपनीचे व्यवस्थापक संचालक माजी नगरसेवक जमील शेख, तत्कालीन महापालिका आयुक्त, तत्कालीन उपायुक्त, नगररचना संचालक, वास्तुविशारद, पुरातत्त्व विभागाचे अधिक्षक यांचा समावेश आहे.वसई पोलीस ठाण्याच्या मालकीची १ हेक्टर ८४ गुंठे जागा आहे. या जागेचा सातबारा उतारा सर्वेक्षण क्रमांक ९ ब अंतर्गत शासकीय जमीन पोलीस विभागाच्या नावे आहे. या ठिकाणी पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. या ठिकाणी पोलीस ठाण्याची अथवा पालिकेची कोणतीही विनापरवानगी न घेता अनधिकृत रस्ता तयार करण्यात आला असून तो ग्रॅड लॉजेस्टीक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावे करण्यात आल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र नगररचना अधिनियम अंतर्गत रस्ता निष्कासित करून संबंधित विभागांना हस्तांतरण करणे बंधनकारक होते. मात्र गैरमार्गाने दस्तऐवज तयार करून ते पोलिस विभाग, विभागीय आयुक्त, नगरपालिकेचे प्रशासन आणि कोकण विभागाकडे सादर करून दिशाभूल करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी सुकेशीनी कांबळे यांनी तक्रार करून पाठपुरावा सुरू केला होता. हा घोटाळा करण्यासाठी वसई पोलीस ठाण्याच्या मूळ नकाशा देखील गायब करण्यात आला होता. त्यावर अनेक आंदोलने, तक्रारी देखील झाल्या. त्या प्रकरणी पोलिसांतर्फे चौकशी सुरू होती. चौकशी अंती आणि १० वर्षांच्या पाठपुराव्या नंतर अखेर वसई पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तयार करण्यात आलेला अनधिकृत रस्ता माजी स्वीकृत नगरसेवक जमील शेख यांच्या खासगी निवासस्थानी जाण्यासाठी आहे. त्यांचे खासगी निवास्थान सर्वे क्रमांक ११ अ आणि ब या जागेत आहे. मात्र त्याला लागूनच वसईचा ऐतिहासिक किल्ला असून वसई किल्ल्याच्या परिसरात हे बांधकाम करण्यात आलेले आहे. हे बांधकाम अनधिकृत असून ते देखील त्यावेळी नियमित करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलीस आयुक्तालयातील वसई विभागात कार्यरत सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोरगे यांच्या फिर्यादीनंतर पोलीस ठाण्याची जागा हडपून अनधिकृत रस्ता तयार करणे आणि अनधिकृत निवासी बांधकाम नियमित करणे या प्रकरणी वसई विरार महापालिकेचे माजी सभापती अफीफ शेख यांचे वडील जमील शेख आणि त्यांच्या ग्रॅड लॉंजेस्टीक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक संचालक- सदस्य, छोटू बिस्मिला शेख, वास्तुविशारद संजय नारंग त्यांचे अन्य साथीदार, वसई विरार महानगरपालिकेचे सन २०१६ ते २०१७ या कालावधीत कार्यरत तत्कालीन आयुक्त, तत्कालीन उपायुक्त, तत्कालीन नगररचना संचालक, तत्कालीन प्रभाग समिती आय सहा. आयुक्त तसेच पुरातत्त्व विभागाचे सन २०१५ मधील कार्यरत तत्कालीन अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 10:10 am

१११ कोटींचा बँक व्यवहार अन् अधिकाऱ्यांचे कानावर हात

जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रकारपालघर : जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका खात्यातून एकाचवेळी १११ कोटी ६५ लाख रुपयांचा व्यवहार (डिमांड ड्राफ्ट) बुधवारी केला जात होता. मात्र बँक अधिकाऱ्यांना संशय आल्याने हा व्यवहार रोखण्यात आला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत आपल्याला कल्पनाच नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा हा व्यवहार करण्यामागे कोण होते याबाबतची आता सार्वजनिक बांधकाम विभागात आणि बँकेत चौकशी करण्यात येत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे देताना ठेकेदारांकडून प्रत्येक कामात अनामत रक्कम जमा करून घेण्यात येते. कामासाठी मंजूर रकमेच्या एक ते दोन टक्का तर काही विशिष्ट कामांमध्ये ही अनामत रक्कम ही पाच टक्क्यांपर्यंत जमा करून घेतल्या जाते. विकास कामे पूर्ण झाल्यानंतर ठेकेदारांनी अनामत रकमेची मागणी केल्यास काही काळानंतर त्यांना ती रक्कम परत केली जाते.दरम्यान, जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये ठेकेदारांची अनामत रक्कम जमा असलेले वेगळे खाते आहे. याच खात्यातून २७ नोव्हेंबर रोजी जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका कर्मचाऱ्यांने १११ कोटी ६५ लक्ष रुपयांचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) काढण्यासाठी चेक व आवश्यक स्लीप जव्हारच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा केली. एकाचवेळी इतक्या मोठ्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट काढण्यात येत असल्याने बँक कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना संशय आला. परिणामी बँक अधिकाऱ्यांनी डिमांड ड्राफ्टकरिता देण्यात आलेल्या चेकच्या स्वाक्षऱ्या व इतर बाबीची पडताळणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट दिली. त्यावेळी कार्यालयात उपस्थित असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी आपण हा चेक दिला नसल्याची भूमिका घेतली. तसेच इतक्या मोठ्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट काढू नये अशी सूचनाही बँकेला केली आहे.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 10:10 am

Aishwarya Rai: ऐश्वर्या रायबद्दल पाकिस्तानी मौलवीचं वादग्रस्त वक्तव्य; सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप

Aishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री व माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही महिन्यांत ती बच्चन कुटुंबासोबत क्वचितच दिसल्याने तिच्या आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल अफवा पसरू लागल्या आहेत. अशातच पाकिस्तानातील धर्मगुरू मुफ्ती अब्दुल कावी यांनी ऐश्वर्याबद्दल केलेलं विधान मोठ्या वादाला तोंड फोडत आहे. मौलवीचं वक्तव्य व्हायरल मौलवी […] The post Aishwarya Rai: ऐश्वर्या रायबद्दल पाकिस्तानी मौलवीचं वादग्रस्त वक्तव्य; सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 10:04 am

बारामतीतील निवडणूक स्थगितीपासून ते ऐश्वर्या राय पर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर

आता घड्याळाची वेळ चांगली नाही – शिवेंद्रराजे भोसले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. रहिमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ सभेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळावर जोरदार टीका केलीय. आपलं चिन्ह कमळ आहे आता घड्याळाची वेळ चांगली नाही, आता […] The post बारामतीतील निवडणूक स्थगितीपासून ते ऐश्वर्या राय पर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 9:31 am

मुंबईत मोठ्या आकाराच्या जाहिरात फलकाला बंदी

फुटपाथ, गच्चीवरही जाहिरात लावण्यास नसेल परवानगीमुंबई : मुंबईत मागील अनेक महिन्यांपासून लटकलेल्या जाहिरात धोरणासाठी आता मार्गदर्शक तत्वे बनवण्यात आली आहेत. या धोरणामध्ये ४० बाय ४० चौरस फुटांपेक्षा अधिक आकाराचा जाहिरात फलक लावण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या आकाराच्या फलकाला परवानगी दिली जाणार नाही. पदपथ तसेच इमारतीच्या गच्चीवरही जाहिरात प्रदर्शित करण्यास नव्याने परवानगी दिली जाणार नाही.मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी जाहीर केलेल्या ‘जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे- २००८’ मध्ये सुधारणा करत २०२५ मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही नवीन बाबींचा समावेश केला आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मुंबईत क्षेत्रात ४० बाय ४० फुटांपेक्षा जास्त आकारमानाच्या जाहिरात फलकास परवानगी दिली जाणार नाही. पदपथ तसेच इमारतीच्या गच्चीवर जाहिरात प्रदर्शित करण्यास नव्याने परवानगी दिली जाणार नाही. डिजिटल जाहिरात फलकांची (डिजिटल होर्डिंग) प्रकाशमानता (ल्यूमिनन्स रेशिओ) ३:१ या गुणोत्तरापेक्षा अधिक ठेवता येणार नाही. तसेच, लुकलुकणाऱ्या (फ्लिकरिंग) जाहिरात प्रदर्शित करण्यास परवानगी नसेल. मॉल्स, मल्टिप्लेक्सेस, व्यापारी संकुल (शॉपिंग कॉम्प्लेक्स), वाणिज्यिक इमारती (कमर्शिअल बिल्डिंग), पेट्रोल पंप येथे एलईडी जाहिरात प्रदर्शित करता येईल. तसेच, बांधकाम सुरू असलेल्या व दुरुस्तीची कामे सुरू असलेल्या इमारतींच्या कुंपणावर तसेच इमारतीच्या बाह्यभागावर व्यावसायिक व अव्यावसायिक जाहिराती प्रदर्शित करता येतील.दरम्यान, मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रथमच एकेरी (सिंगल) व पाठपोट (बॅक टू बॅक) फलकांसोबतच ‘व्ही’ व ‘एल’ आकार तसेच त्रिकोणी (ट्राय व्हिजन), चौकोनी (स्केअर व्हिजन), पंचकोनी (पेंटागॉन व्हिजन), षटकोनी स्वरुपाच्या (हेक्झागॉन व्हिजन) जाहिरात फलकांना यापुढे परवानगी देण्यात येईल. याकरीता वाहतूक पोलीसांची ‘ना हरकत’ लागेल.मुंबईतील जाहिरातींचे नियमन करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून ‘जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे-२०२५’ (पॉलिसी गाईडलाइन्स फॉर डिस्प्ले ऑफ आऊटडोअर अॅडव्हर्टाइजमेंट) जाहीर करण्यात आली आहेत. २७ नोव्हेंबर २०२५ पासून ही मार्गदर्शक तत्त्वे महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत आहेत. जाहिरातदार, जाहिरात संस्था तसेच संबंधित सर्व घटकांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्यामार्फत जाहिरातींना परवानगी देणे तसेच अनधिकृत जाहिरातींविरोधात कारवाई करण्याची कार्यवाही केले जाते. मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३२८/३२८ अ अंतर्गत, मुंबईतील हद्दीतील जाहिरातींचे नियमन केले जाते.या पार्श्वभूमीवर, माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या समितीने सुचविलेल्या शिफारसी तसेच नागरिकांच्या हरकती व सूचना विचारात घेऊन ‘जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे – २०२५’ जाहीर करण्यात येत आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे सविस्तर स्वरुपात महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर २७ नोव्हेंबर २०२५ पासून उपलब्ध करण्यात येत आहेत, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 9:30 am

बीएमसी गुंतवणूक घोटाळ्याच्या वादाला नवीन वळण

मुंबई : मुंबई महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्ताने वांद्रे येथील एका पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूक केल्यास स्वस्त दरात घरे मिळतील, असे आमिष दाखवत थेट उच्चपदस्य पोलस, पालिका अधिकारी यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्यालाही गुंतवणूक करण्यास भाग पाडत तब्बल ८० कोटींची रक्कम हडपल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यानेच आरोप करणाऱ्याला कायदेशीर नोटीस पाठविल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. गुंतवणूक घोटाळ्याच्यादरम्यान, सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांनी त्यांच्यावरील सर्व गंभीर आरोपांचे सविस्तर आणि अधिकृत खंडन केले. कायदेशीर प्रक्रियेनुसार, सहाय्यक आयुक्त पाटील यांनी युकेस्थित व्यावसायिक निशित पटेल यांना ४ नोव्हेंबर रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तीन दिवसांत ठोस पुरावे सादर करण्याची नोटीस बजावली. अन्यथा, ही तक्रार उच्चपदस्थ अधिकाऱ्याची बदनामी करण्याच्या उद्देशाने आहे असे गृहीत धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नोटीशीत नमूद केले होते.ही तक्रार पूर्णपणे खोटी, निराधार आणि कोणत्याही पुराव्याशिवाय आहे. हा विषय आता तपास संस्था आणि राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, असे स्पष्ट करत महेश पाटील यांनी कोणत्याही चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. घोटाळ्याभोवतीच्या आरोपांमुळे महाराष्ट्र प्रशासनातील भ्रष्टाचाराबद्दलच्या चर्चेला आणखी बळकटी मिळाली आहे. आता, पाटील यांच्या अधिकृत प्रतिक्रियेमुळे, प्रकरणाने एक नवीन वळण घेतले आहे.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 9:30 am

वातानुकूलित लोकलमध्ये बनावट तिकिटावर प्रवास करणाऱ्या महिलेस अटक

मुंबई : रेल्वे तिकीट तपासनिसाच्या सतर्कतेमुळे एका महिला प्रवाशाकडून बनावट तिकीट कल्याण-दादर वातानुकूलित लोकलमधून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली. नियमित तपासणीदरम्यान आज उजेडात आले. मुंबई विभागाचे तिकीट निरीक्षक विशाल नवले यांनी १०.०२ च्या कल्याण–दादर वातानुकूलित लोकलमध्ये नियमित तपासणीदरम्यान एका महिला प्रवाशाला थांबवले. त्यांनी वातानुकूलित लोकलमध्ये अंबरनाथ –दादर मार्गावर प्रवासासाठी ११ डिसेंबर २०२५ पर्यंत वैध असलेले युटीसद्वारे निर्मित सीझन तिकीट दाखवले. सखोल तपासणी केल्यावर नवले यांना तिकीट संशयास्पद वाटले आणि त्यांनी तत्काळ त्याची पुष्टी मागितली. पडताळणीनंतर हे तिकीट मागील कालबाह्य तिकीटावरून बनवलेले बनावट तिकीट असल्याचे स्पष्ट झाले. महिला प्रवासी गुडिया शर्मा यांना कारवाईसाठी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले.त्यानंतरच्या तपासात असे दिसून आले की, बनावट सीझन तिकीट तिचे पती ओंकार शर्मा यांनी तयार केले होते आणि ते तिला वापरण्यासाठी देण्यात आले होते. भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ (BNS) कलम ३१८/४, ३३६/२, ३३६/३, ३४० आणि ३/५ अंतर्गत फसव्या तिकीट पद्धतींमध्ये सहभागी असल्याबद्दल दोन्ही व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विशाल नवले यांच्या सतर्कतेमुळे बनावट तिकीट रॅकेटचा पर्दाफाश झाला. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .अधिकृत विक्रेत्यांकडून, रेल्वे स्थानकावरील बुकिंग काऊंटरमधून किंवा एटीव्हीएमद्वारे जारी केलेले वैध तिकिटे घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रवाशांना केले आहे. प्रवासी त्यांच्या मोबाईल फोनवर युटीस ॲप डाउनलोड करू शकतात आणि मोबाईल युटीस ॲपद्वारे तिकिटे बुक करू शकतात. प्रवाशांना इशारा देण्यात येतो की, बनावट तिकिटे तयार करणे / मिळवणे किंवा त्यावरून प्रवास करणे यांसारख्या फसवणूक करणाऱ्या मार्गांचा वापर करू नये. अशी कृत्ये भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत दंडनीय असून, दंड अथवा कमाल ७ वर्षांपर्यंतची कैद किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 9:30 am

सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी मोठा निर्णय; राज्य निवडणूक आयोगाने ३५ जागांवरील निवडणुका केल्या रद्द, कारण…

State Election Commission : आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. राज्यात या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात २४७ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत या निवडणुकांवर स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला. त्यामुळे या निवडणुकांचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र, […] The post सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी मोठा निर्णय; राज्य निवडणूक आयोगाने ३५ जागांवरील निवडणुका केल्या रद्द, कारण… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 9:25 am

टोरेसनंतर 'वन क्लिक मल्टिट्रेड'कंपनीचा घोटाळा, गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन संस्थापक पसार

मुंबई: टोरेस घोटाळ्यापाठोपाठ दादरमध्ये आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. विविध ऑफर्सच्या नावाखाली सुरू असलेल्या या घोटाळ्यात सुमारे दोन हजार गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. 'वन क्लिक मल्टिट्रेड' नावाच्या संस्थेने केलेल्या या घोटाळ्यातील फसवणुकीच्या रकमेचा आकडा सुमारे सव्वाचार कोटींपर्यंतचा आहे. या प्रकरणात संस्थेचे संस्थापक नामदेव बाबाजी नवले व सहकारी अलका दीपक महाडिक यांच्याविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या संस्थेतील दोन्ही आरोपी गुंतवणूक दारांचे पैसे घेऊन पसार झाले आहेत. वडाळा परिसरात राहणाऱ्या मधुरा महेश भोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संस्थेची सहकारी अलका हीने तक्रारदार मधुरा यांच्या घरी येऊन 'वन क्लिक मल्टिट्रेड' या योजनेची माहिती दिली होती. दर महिना हजार रुपये अशी रक्कम वीस महिने गुंतविल्यानंतर एकविसाव्या महिन्यांत पंचवीस हजार परतावा आणि महिन्याच्या १६ तारखेला लकी ड्रॉ या ऑफरला बळी पडून मधुरा यांनी योजनेत गुंतवणूक केली. सुरुवातीला सर्व देयके एप्रिल २०२५ पर्यंत सुरळीत मिळत होती. त्यानंतर पैसे मिळण्यास बंद झाले. पैसा मिळत नसल्यामुळे चौकशी केल्यावर नवले यांनी पैसे शेअर मार्केटमध्ये अडकले असल्याचे सांगत वेळ मारून नेली. मात्र काही दिवसांतच दादर येथील कार्यालयाला टाळे लागल्याचे समोर आले. तक्रारदार मधुरा भोळेच्या अंतर्गत ८२ सदस्यांनी आठ लाख एकोणावीस हजार रुपये भरले. ज्यातील केवळ २५ हजार रुपये परतावा मिळाला. मधुरा यांच्या ओळखीतून गुंतवणूक केलेल्या ३२ जणांनी या ऑफर्ससाठी अजून गुंतवणूकदारांची साखळी तयार केली. अशाप्रकारे सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त ठेवीदारांकडून गोळा केलेली रक्कम अशी सुमारे चार कोटी एकेचाळीस लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजेच संस्थेचे संस्थापक नामदेव बाबाजी नवले वेगवेगळ्या ठिकाणी भाडेतत्त्वावर कार्यालय घेऊन फसवणूकीची मालिका सुरू ठेवत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, भोईवाडा ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) नितिन महाडिक या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 9:10 am

जोगेश्वरीत उबाठासमोरच मोठे आव्हान! भाजपा, शिवसेना एकाचे दोन करू देणार का?

मुंबई (सचिन धानजी):उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील जोगेश्वरी विधानसभेत उबाठाचे आमदार म्हणून बाळा नर हे निवडून आले आहेत. परंतु या विधानसभेत उबाठाचे ते एकमेव नगरसेवक शिल्लक राहिले होते. त्यामुळे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर बाळा नर यांचा आपले जास्तीत नगरसेवक निवडून आणण्याच प्रयत्न असेल तर उबाठाचा एकमेव नगरसेवकही कमी करण्याचा प्रयत्न शिवसेना आणि भाजपाचा असणार आहे. या विधानसभेत एकही खुला प्रभाग नसल्याने आपली पत्नी, सून किंवा मुलीला निवडून रिंगणात उतरवण्याचा माजी नगरसेवकांह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर वेळ आली आहे. त्यामुळे जोगेश्वरीत शिवसेना, भाजपा पेक्षा उबाठामध्ये इच्छुकांची मोठी यादी असल्याने बंडखोरीची सर्वाधिक भीती याच पक्षाला राहणार आहे.जोगेश्वरी विधानसभेत एकूण आठ नगरसेवकांचे प्रभाग आहेत. त्यात भाजपाच्या प्रीती सातम, पंकज यादव आणि उज्ज्वला मोडक हे तीन नगरसेवक आहेत, तर रेखा रामवंशी, प्रविण शिंदे, सदानंद परब आणि सोफिया नाझिया हे शिंदे शिवसेनेचे चार नगरसेवक आणि उबाठाचे बाळा नर हे एकमेव नगरसेवक शिल्लक राहिले होते. पण आता तेही आमदार बनले आहेत. या विधानसभेत एकही प्रभाग सर्वसाधारण खुला न झाल्याने सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. या प्रभागात पाच सर्वसाधारण महिला, दोन ओबीसी महिला आणि अनुसूचित जमाती अर्थात एसटी करता एक अशाप्रकारे राखीव प्रभाग झाले आहेत.महिला राखीव झाल्याने या माजी नगरसेविका शिवानी शैलेश परब, सुगंधा शेट्ये, जितू वळवी, मनिषा पांचाळ आदींना पुन्हा संधी निर्माण झाली आहे. रविंद्र वायकर शिवसेनेत गेल्याने शैलेश परब यांनी पुन्हा एकदा अंधेरी जोगेश्वरीत आपले बळ निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून माजी नगरसेविका शिवानी परब यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचार केल्याचे बोलले जात आहे. जोगेश्वरी विधानसभेत भाजपाला तीन जागा राखून अन्य जागांवर विजय मिळवायचा आहे, तर शिवसेनेला आपल्या जागा कायम राखण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागणार आहे.प्रभाग क्रमांक ५२ (ओबीसी महिला)हा प्रभाग सलग दुसऱ्यांदा ओबीसी महिला राखीव झाला आहे. या प्रभागातून भाजपाच्या प्रीती सातम या मागील वेळेस निवडून आल्या होत्या. आता आरक्षणाने त्याचं प्रभाग कायम राखल्याने विद्यमान नगरसेवक म्हणून त्यांची दावेदारी प्रथम मानली जात आहे. तर उबाठाकडून माजी नगरसेविका आणि शिवसेनेतून मनसे आणि मनसेतून पुन्हा उबाठात प्रवेश केलेल्या सुगंधा शेटे यांचे नाव चर्चेत आहे. तसेच उबाठाचे शाखाप्रमुख संदीप गाढवे हे आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्ना आहे. या प्रभागात खरी लढत ही भाजपा आणि उबाठा यांच्यातच होण्याची शक्यता आहे. मनसेचा प्रभाव या मतदार संघात दिसून येत नाही.प्रभाग ५४ (एस टी)हा प्रभाग मागील निवडणुकीत अनुसूचित जाती करता राखीव होता. या प्रभागातून शिवसेनेतून रेखा रामवंशी या निवडून आल्या होत्या. पण आता त्या शिंदे शिवसेनेत आहेत. प्रभाग आता अनुसूचित जमाती करता राखीव झाला आहे. त्यामुळे रामवंशी यांना घरी बसावे लागणार आहे. तर अनुसूचित जमाती करता म्हणजे एस टी करता राखीव झाल्याने उबाठाकडून पुन्हा माजी नगरसेवक जितेंद्र वळवी यांना संधी मिळू शकते. तर याच प्रभागात उबाठाकडून अशोक खांडवे हेही इच्छुक असल्याने दोघांमध्ये उमेदवारीबाबत स्पर्धा दिसून येणार आहे. तर काँग्रेसकडून काँग्रेसच्या आदिवासी विभागाचे मुंबई अध्यक्ष सुनील कुमरे हे आपल्या मुलीला निवडणूक रिंगणात उतरवण्यास इच्छुक आहे. हा प्रभाग शिवसेनेच्या वाट्याला येणार असल्याने जर उबाठाच्या कुणाला उमेदवारी मिळते आणि कोण नाराज होतो याकडे शिवसेनेचे लक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेकडे उमेदवार नसल्यास भाजपा या जागेवर दावा करु शकते असे बोलले जात आहे.प्रभाग क्रमांक ७२(ओबीसी महिला)हा प्रभाग पूर्वी ओबीसी होता आणि आगामी निवडणुकीत हा प्रभाग ओबीसी महिला राखीव झाला आहे. या प्रभागातून भाजपाचे पंकज (सर) यादव हे निवडून आले होते. पण आता ओबीसी महिला प्रभाग राखीव झाल्याने त्यांच्या पत्नी ममता यादव यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यास इच्छुक आहेत. तर या प्रभागावर उबाठा शिवसेनेचा दावा असेल. उबाठाच्या वतीने समिक्षा माळी आणि माजी नगरसेविका मनिषा पांचाळ यांचीही नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडूून इच्छुकाच्या नावाची चर्चा अद्याप ऐकायला येत नाही.प्रभाग क्रमांक ७३(महिला)हा प्रभाग सर्वसाधारण खुला होता. पण आता हा प्रभाग महिला राखीव झाला आहे. या प्रभागात शिवसेनेचे प्रविण शिंदे हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यामुळे या प्रभागात शिवसेनेचा दावा असल्याने प्रविण शिंदे हे आपल्या सुनेला निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे. तर उबाठाकडून रोणा रावत आणि सुचित्रा चव्हाण यांच्या नावाची इच्छुक म्हणून चर्चा आहे. हा प्रभागात मनसेचा पहिला दावा असेल आणि माजी नगरसेवक भालचंद्र आंबोरे हे आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्नात आहे. तर काँग्रेसच्या इच्छुकाचे नाव चर्चेत दिसून येत नाही.प्रभाग क्रमांक ७४ (महिला)प्रभाग महिला राखीव होता आणि या मतदार संघातून भाजपाच्या उज्ज्वला मोडक निवडून आल्या होत्या. पुन्हा हा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने भाजपकडून मोडक यांचे नाव अग्रक्रमावर आहे. मोडक यांच्यासह प्रविण मर्गज हे आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी तयारीत असल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेनेकडून दिप्ती वायकर यांचेही नाव चर्चेत आहे. तर उबाठाकडून श्रावणी मंदार मोरे यांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेसकडून समिता नितीन सावंत यांचेही नाव चर्चेत आहे.प्रभाग क्रमांक ७७ (महिला)हा प्रभाग सर्वसाधारण अर्थात खुला असून या प्रभागातून उबाठा शिवसेनेचे बाळा नर हे निवडून आले होते. पण आता बाळा नर हे जोगेश्वरीचे आमदार म्हणून निवडून आले असून हा प्रभाग महिला राखीव झाला आहे. महिला राखीव प्रभाग झाल्याने उबाठाच्यावतीने शिवानी शैलेश परब या इच्छुक आहेत. तर विश्वनाथ सावंत हे आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवण्यास इच्छुक आहेत. याशिवाय नंदकुमार ताम्हणकर हेही आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मिळत आहे. तर शिवसेनेकडून प्रियंका आंबोळकर, रचना सावंत आणि प्राजक्ता सावंत यांच्या नावाची चर्चा आहे. या प्रभागात शिवसेना विरुध्द उबाठा अशीच लढत होणार आहे. या प्रभागात काँग्रेसच्यावतीने मोनिका प्रविण वाडेकर यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत आहे.प्रभाग क्रमांक ७८ (महिला)हा प्रभाग ओबीसी महिला राखीव होता. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोफिया नाझिया या निवडून आल्या होत्या. परंतु आता हा प्रभाग महिला राखीव झाला आहे. सोफिया नाझिया या आता शिवसेनेत असल्याने या प्रभागात शिवसेनेचा दावा असेल. शिवसेनेकडून नाझिया या प्रमुख दावेदार आहेत. तर हा प्रभाग मनसेला सोडला जाण्याची शक्यता आहे. या प्रभागातून मनसेचे भालचंद्र आंबोरे हे निवडून आले होते. त्यामुळे मनसेसाठी हा प्रभाग सोडला जाण्याची शक्यता आहे, पण यावर राष्ट्रवादी काँग्रेसही दावा करू शकेल. त्यामुळे मनसेचे भालचंद्र आंबोरे हे आपल्या पत्नीसाठी या प्रभागातूनही प्रयत्नशील असतील असेही बोलले जात आहेत. तर उबाठाकडून वैशाली भिंगार्डे तर काँग्रेसकडून रौफ हे आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.प्रभाग क्रमांक ७९ (महिला)हा प्रभाग सर्वसाधारण अर्थात खुला असल्याने या प्रभागातून शिवसेनेचे सदानंद परब हे निवडून आले होते. पण हा प्रभाग आता महिला आरक्षित झाला आहे. महिला राखीव प्रभाग झाल्याने या प्रभागातून शिवसेनेचे सदानंद परब हे आपल्या पत्नीला निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. तर भाजपाकडून संतोष मेढेकर आपल्या वहिनीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. तर उबाठाकडून शिवानी परब ,मानसी जुवाटकर याही इच्छुक असल्याची माहिती मिळत् आहे. या प्रभागातून शिवसेना विरुध्द उबाठा अशी लढत पाहायला मिळणार आहे.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 9:10 am

लाल किल्ला पर्यटकांसाठी १० दिवस बंद

नवी दिल्ली : दिल्लीचा ऐतिहासिक लाल किल्ला येत्या डिसेंबर महिन्यात १० दिवसांसाठी सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. ५ ते १४ डिसेंबरपर्यंत पर्यटकांसाठी लाल किल्ला पूर्णपणे बंद असणार आहे.भारत पहिल्यांदाच ‘अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणा’संदर्भातील युनेस्कोच्या २०व्या सत्राचे आयोजन करत आहे. यासाठी लाल किल्ला हे ठिकाण निवडण्यात आले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या सहसंचालक नंदिनी भट्टाचार्य साहू यांनी सांगितले की, ‘अमूर्त सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्यासंदर्भातील सत्र ८ ते १३ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.या प्रतिष्ठित जागतिक कार्यक्रमात २४ हून अधिक देशांचे प्रतिनिधी व एक हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होतील, ज्यामध्ये सांस्कृतिक वारसा, संवर्धन व जागतिक वारसा व्यवस्थापनाशी संबंधित तज्ज्ञ आणि अधिकारी यांचा समावेश असणार आहे.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 9:10 am

नियोजनबद्ध तयारी आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे भुयारी मेट्रो प्रकल्प यशस्वी

व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची माहितीमुंबई : मुंबईतील वाहतूक सुलभ व सुरळीत होण्यासाठी मेट्रो आणि कोस्टल रोडसारख्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या प्रकल्पांमध्ये सुरुवातीला आलेल्या समस्या, कायदेशीर व पर्यावरणीय परवाने, नागरिकांचे प्रश्न अशा अनेक आव्हानांवर नियोजनबद्ध तयारी, पारदर्शक संवाद, विविध शासकीय संस्थांचा समन्वय आणि जनतेचा सहभाग यामुळे या प्रकल्पांना यश मिळाल्याचे मुख्यमंत्री यांच्या अपर मुख्य सचिव तथा मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले.भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित दिवंगत. बी. जी. देशमुख स्मृती व्याख्यानमालेत अश्विनी भिडे यांनी मेट्रो आणि किनारी मार्ग या प्रकल्पाच्या उभारणीमागचे नियोजन, कार्यपद्धती उलगडून सांगितली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे (प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता आणि सुशासन) अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष व माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मानद सचिव विजय सतबीरसिंग, खजिनदार विकास देवधर आदी यावेळी उपस्थित होते. अश्विनी भिडे यांनी भारतातील पहिली संपूर्ण भुयारी मेट्रो लाईन ३ कुलाबा ते सिप्झच्या निर्मिती मागची संपूर्ण माहिती सादरीकरणाद्वारे दिली.अपर मुख्य सचिव भिडे म्हणाल्या की, संपूर्ण भुयारी असलेला मेट्रो प्रकल्प हा केवळ अभियंता प्रकल्प नसून सामाजिक अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण आहे. पाचपेक्षा अधिक वर्षे वर्दळीची ठिकाणे, रहिवासी भागात काम चालले असतानाही व्यापक संवाद आणि समाजमाध्यमाद्वारे पारदर्शकपणे माहिती दिल्यामुळे लोकांचा विश्वास टिकवता आला. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजनपूर्वक पूर्वतयारी, सक्षम व कटिबद्ध नेतृत्व, जलद निर्णय क्षमता, कामाच्या ठिकाणाची सतत पाहणी व आढावा, उत्तम सांघिक कार्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नागरिकांशी खुला संवाद, समस्या सोडविण्याची वृत्ती आणि राजकीय इच्छाशक्ती हे सर्वात महत्त्वाचे घटक ठरले. मुंबई पोलीस, महापालिका, बंदरे, रेल्वे, संरक्षण, विमानतळ प्राधिकरण आदी विविध संस्थांच्या समन्वयामुळे आणि मुख्यमंत्री वॉररुममधील सातत्यपूर्ण मार्गदर्शन व पाठिंब्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.आतापर्यंत अटल सेतू, मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सी लिंक सागरी किनारी मार्ग आणि नवी मुंबई विमानतळ हे प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर बांद्रा-वर्सोवा, वर्सोवा-दहिसर-भाईंदर व उत्तन विरार हे सागरी किनारा मार्ग, वरळी-शिवडी कनेक्टर आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग ते समृद्धी महामार्ग तसेच बोरीवली-ठाणे टनेल, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह टनेल रोड यांची कामे सुरू आहेत. याशिवाय पुढील काळात विरार-अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडॉर आणि वाढवण बंदर हे प्रकल्प सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले की, मुंबईसारख्या ठिकाणी भुयारी मेट्रोचा प्रकल्प उभारणे ही अतिशय कठिण गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्राने ती साध्य केली आहे. राज्यातील या प्रकल्पाची यशस्विता पाहून दिल्लीतील मेट्रोही भुयारी करण्याची मागणी होत आहे. अशा प्रकल्पातून नागरिकांना चांगली सेवा मिळते. याप्रमाणेच प्रशासनातील प्रत्येकाने सांघिक व सकारात्मक भावनेने काम करावे.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 9:10 am

Yami Gautam Birthday: आयएएसचं स्वप्न सोडलं आणि बॉलिवूडची स्टार बनली! जाणून घ्या यामी गौतमची प्रेरणादायी स्टोरी

Yami Gautam Birthday: बॉलिवूडमधील साध्या-सोप्या व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारी यामी गौतम आज एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण मजेशीर गोष्ट म्हणजे, यामीला लहानपणापासून कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. तिचं एकच स्वप्न होतं ते म्हणजे IAS ऑफिसर बनून देशाची सेवा करण्याचं. 28 नोव्हेंबरला जन्मलेल्या यामी गौतमचा वाढदिवस आज साजरा होत आहे. बिलासपूर (हिमाचल प्रदेश) येथे […] The post Yami Gautam Birthday: आयएएसचं स्वप्न सोडलं आणि बॉलिवूडची स्टार बनली! जाणून घ्या यामी गौतमची प्रेरणादायी स्टोरी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 8:50 am

गौरी गर्जे प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; अनंतच्या शरीरावरही आढळल्या जखमा: ‘तो’संशय बळावला, कोर्टात काय घडलं?

Dr. Gauri Garje Death Case : भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी डॅा. गौरी गर्जे पालवे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. गौरी यांच्या मृत्यू प्रकरणी पती अनंत गर्जेला पोलिसांना अटक केली आहे. कोर्टाने अनंतला २७ नोव्हेंबरपर्यंत […] The post गौरी गर्जे प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; अनंतच्या शरीरावरही आढळल्या जखमा: ‘तो’ संशय बळावला, कोर्टात काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 8:47 am

मुंबईतील प्रदूषित हवेवर आज न्यायालयात सुनावणी

महापालिकेला स्पष्टीकरण देण्याचे निर्देशमुंबई : गेल्या काही दिवसांत हवेची गुणवत्ता ही सध्या खराबहून अति खराब वर्गात पोहोचली आहे. वातावरणात पसरलेली धूळ आणि धुराचे कण यामुळे दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. या गोष्टीची दखल घेत या संदर्भात दाखल जनहित याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.मुंबईत खासकरून हिवाळ्याच्या दिवसांत घसरणाऱ्या ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ (एक्यूआय)वरून उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल केली होती. या याचिकेत न्यायालयाने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ दरायस खंबाटा याची अमायकस क्युरी (कोर्टाचा मित्र) म्हणून नियुक्ती केली आहे. ज्यात वनशक्ती या पर्यावरणवादी संस्थेतर्फे हस्तक्षेप याचिका दाखल करत जनक द्वारकादास यांनीही युक्तिवाद केला होता. साधारणत: वर्षभरापूर्वी झालेल्या सुनावणीत एक्यूआय सुधारण्यासाठी एकूण २७ उपाययोजनांची यादी दिली गेली होती. ज्यांचा स्वीकार करत महापालिकेने १२ जूनपर्यंत आपला अहवाल सादर करणे अपेक्षित होते. मात्र हा अहवाल विचारणा करूनही अद्याप सादर झालेला नसल्याची माहिती गुरुवारी वनशक्तीतर्फे जनक द्वारकादास यांनी न्यायालयाला दिली. याची नोंद घेत मुंबई महापालिकेला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देत न्यायालयाने शुक्रवारी यावर तातडीची सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठापढे तातडीची सुनावणी होणार आहे.मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स २७० वरमुंबईकरांसाठी चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे, वाढत्या प्रदूषणामुळे इथल्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. सध्या मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स २७० या खराब प्रकारात असून, तो ३०० ते ४०० या ‘अत्यंत खराब’ पातळीच्या जवळ पोहोचला आहे. ज्यामुळे मुंबईकरांना श्वसनाच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. सध्या मुंबईचा एक्यूआय 'खराब' दर्शवण्यात आला असून, पुढील दोन दिवस तो 'खराब'च राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या काळात खासकरून श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घेऊन मास्कचा वापर करणे फायद्याचे ठरेल.श्वसनाच्या विकारात वाढया परिस्थितीमुळे मुंबईकरांना सध्या खोकला आणि घशाचा त्रास जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीत श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तापमानात अचानक झालेली घट आणि समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांचा मंदावलेला वेग यामुळे पुढचे काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची चिन्हे आहेत. याशिवाय मुंबईत कोस्टल रोडची अखेरची कामं, मेट्रो यांसारखी विकासकामेही युद्धपातळीवर सुरू असल्याने हे प्रदूषण येत्या काळातही कायम राहणार आहे.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 8:10 am

बलाढ्य भारताच्या तीन भूभागांवर टीचभर नेपाळचा दावा

१०० रुपयांच्या नोटेवर दाखवले भारताचे तीन भागमुंबई : विशाल आणि बलाढ्य अशी जगाच्या नकाशावर ओळख असलेल्या भारताच्या तुलनेत टीचभर असलेल्या नेपाळने पुन्हा बेटकुळ्या फुगवून दाखवायला सुरुवात केली आहे. भारतासोबत पुन्हा पंगा घेण्याची हिंमत नेपाळने दाखवली आहे. गुण नाही पण वाण लागला, या म्हणीप्रमाणे नेपाळ्यांनी चीनसारखे वाकडे पाऊल टाकले आहे. नेपाळने आपल्या १०० रुपयांच्या नव्या चलनी नोटेवर छपाई केलेल्या नकाशात भारताचे तीन भूभाग दाखवले आणि ते आपले असल्याचा दावा केला आहे. यावरून नवा वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.नेपाळच्या या अजब कृतीने भारतासोबतचा निवळलेला तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेपाळच्या केंद्रीय बँकेने गुरुवारी १०० रुपयांची नोट चलनात आणली. त्यामध्ये देशाचे सुधारित राजनैतिक मानचित्र छापण्यात आले आहे. १०० रुपयांच्या चलनी नोटेवर छापलेल्या मानचित्रात नेपाळने कालापानी, लिपुलेख आणि लिंपीयाधुरा आदी भूभाग आपल्या देशाचाच भाग आहे अशा स्वरूपात दाखवले आहे.आपली ‘उंची’ किती? आपण करतोय काय? अशी अवस्था असलेल्या नेपाळला भारताने त्यांची योग्य जागा दाखवली आहे. नेपाळचे हे पाऊल एकतर्फी व कृत्रिम क्षेत्रीय विस्तार असल्याचे भारताने म्हटले आहे. नेपाळ राष्ट्र बँक अर्थात एनआरबीद्वारे जारी केलेल्या नव्या नोटेवर माजी गव्हर्नर डॉ. महाप्रसाद अधिकारी यांची स्वाक्षरी आहे, तर तिथी विक्रम सवंत २०८१ (२०२४ ईस्वी) अशी आहे.तत्कालीन पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वातील सरकारने मे २०२० मध्ये संसदेत संविधान सुधारणा मंजूर करून कालापानी, लिपुलेख आणि लिंपीयाधुरा हे भूभाग आपल्या देशात समाविष्ट करून नव्या मानचित्राला अधिकृत मान्यता दिली होती. तेच सुधारित मानचित्र आता १०० रुपयांच्या नव्या चलनी नोटेवर छापण्यात आले आहे.माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या कृतीचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. याच ओलींना तरुणाईच्या आंदोलनानंतर पायउतार व्हावे लागले होते.भारताने नेपाळला ठणकावलेभारताने नेपाळच्या या कृतीवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. लिपुलेख, कालापानी आणि लिंपीयाधुरा हे अविभाज्य भाग आहेत आणि नेपाळने उचललेले हे पाऊल अत्यंत चुकीचे आणि अस्वीकारार्ह आहे, असे भारताने ठणकावून सांगितले आहे. दरम्यान, नेपाळची सीमा भारताची पाच राज्ये सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यांना लागून आहे. काही भूभागांवरून या दोन देशांमध्ये बऱ्याच काळापासून सीमावाद सुरू आहे.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 8:10 am

पाच वर्षं उलटले तरी किती वेळ चौकशी करणार?

दिशा सालियन प्रकरणी न्यायालयाने पोलिसांना फटकारलेमुंबई : दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी मालाड येथील इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. तिच्यावर सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. मृत्यूनंतर पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून गुन्हा नोंदवला. मात्र, पाच वर्षे उलटूनही चौकशी प्रलंबित असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.न्यायालयाने गुरुवारी (दि. २७) दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील चौकशीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत पोलिसांना फटकारले. दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी मालाड येथील इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. तिच्यावर सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.मृत्यूनंतर पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून गुन्हा नोंदवला. मात्र, पाच वर्षे उलटूनही चौकशी प्रलंबित असल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि आर. आर. भोसले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने विचारले की, एवढ्या काळानंतरही चौकशी प्रलंबित कशी? कोणीतरी मरण पावले आहे. तुमचे काम इतकेच आहे, की ती आत्महत्या होती की सदोष मनुष्यवध. मग अजूनही चौकशी कशासाठी चालू आहे? यावर सरकारी वकील एम. देशमुख यांनी सांगितले की, या प्रकरणी सर्व शक्यता तपासून पाहण्यासाठी चौकशी सखोल पद्धतीने केली जात आहे.सालियन कुटुंबाचा आरोपदिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मार्च २०२५ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामध्ये त्यांनी दावा केला की दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. हे प्रकरण राजकीय स्तरावर दडपण्यात आले आहे. त्यामुळे या चौकशीची जबाबदारी सीबीआयकडे द्यावी. तसेच, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल करावा. त्यांची मुलगी अत्यंत संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळली व तिच्याशी संबंधित पुरावे व माहिती लपवण्यात आली.सरकारी वकिलांचा प्रतिवादसरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला, की घटनेनंतर पोलिसांनी अनेकवेळा दिशाच्या आई-वडिलांचे जबाब घेतले होते व त्यांनी त्यावेळी कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता. आता पाच वर्षांनी वडील असे गंभीर आरोप करत आहेत. न्यायालयाने पोलिसांना फटकारत प्रश्न केला की, सतीश सालियन हे पीडितेचे वडील आहेत. कायद्याने परवानगी असलेली कागदपत्रे त्यांना देण्यात काय अडचण आहे? खंडपीठाने पोलिसांकडून स्पष्ट भूमिका मागवली आहे. तसेच न्यायालयाने पोलिसांना शवविच्छेदन अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 8:10 am

Pune District : महाविकास आघाडीचा सासवडमध्ये वचननामा जाहीर

सासवड : सासवड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजित मधुकर जगताप यांनी विस्तृत आणि सर्वसमावेशक वचननामा जाहीर केला असून शहराच्या समतोल, पर्यावरणपूरक आणि वेगवान विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “मशाल” या निवडणूक चिन्हावर मतदान करून नागरिकांनी आपल्या सेवेसाठी संधी द्यावी, असे ते म्हणाले. वचननाम्यात शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, […] The post Pune District : महाविकास आघाडीचा सासवडमध्ये वचननामा जाहीर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 8:02 am

अग्रलेख : स्वप्नांना धक्का

संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने दमदार पावले टाकली जात असतानाच भारताला एक धक्का बसला. दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात तेजस दुर्घटनाग्रस्त झाले. हे भारताचे संपूर्ण स्वदेशी आणि बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. भारतीय तंत्रज्ञांच्या तंत्रदृष्टीचा आणि अथक परिश्रम व इच्छाशक्तीचा परिपाक असलेले हे तेजस अचानक असे कोसळणे हा सर्व भारतीयांच्या आणि विशेषत: त्या स्वप्नासाठी वाटचाल […] The post अग्रलेख : स्वप्नांना धक्का appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 7:55 am

धक्कादायक! चौथ्या मजल्यावरून उडी घेत विवाहित तरुणीने संपवलं जीवन, कारण अस्पष्ट

प्रभात वृत्तसेवा पुणे – बुधवार पेठेत एका विवाहित तरुणीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. संबंधित तरुणी काही वर्षांपूर्वी इमारतीत राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. तिची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नाही.तरुणीने टेरेसवर जाऊन इमारतीच्या मध्य भागात उडी मारल्याने ती जागेवरच मृत पावली. आवाज आल्याने रहिवाशांनी पाहिले असता, […] The post धक्कादायक! चौथ्या मजल्यावरून उडी घेत विवाहित तरुणीने संपवलं जीवन, कारण अस्पष्ट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 7:45 am

RSS कार्यकर्त्याच्या मुलाची हत्या आंतरराष्ट्रीय कट आहे का?:पाकिस्तानशी कनेक्शन, वडिलांनी सांगितले- ना शत्रुत्व, ना धमकी मिळाली, मग का मारले?

'मला किंवा माझ्या मुलाला कधीही कोणती धमकी मिळाली नाही. आजपर्यंत त्याचे कोणाशीही भांडण झाले नाही. तो कोणत्याही प्रकारचे व्यसन करत नव्हता किंवा त्याला वाईट सवयीही नव्हत्या. मग तो का निशाण्यावर आला, हे कळत नाही?' पंजाबमधील फिरोजपूर येथे राहणारे RSS कार्यकर्ते बलदेव अरोरा अजूनही त्यांचा मुलगा नवीनच्या मृत्यूच्या दुःखातून सावरलेले नाहीत. 15 नोव्हेंबरच्या संध्याकाळी, जेव्हा 38 वर्षीय नवीन आपल्या मुलांना शाळेतून आणायला जात होते, तेव्हा मोची बाजारात दोन बाईकस्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. वडील बलदेव यांचे म्हणणे आहे की, पंजाबमधील परिस्थिती खूपच वाईट आहे. कधी, कोण, कोणाला गोळी मारेल हे माहीत नाही. येथे प्रशासनासारखी कोणतीही गोष्ट दिसत नाही. पंजाब पोलिसांनुसार, आतापर्यंतच्या तपासात लुटमार, खंडणी किंवा आपापसातील वैमनस्याचा कोणताही अँगल समोर आलेला नाही. पोलीस टार्गेट किलिंगच्या दृष्टिकोनातून तपास करत आहेत. पोलिसांमधील आमच्या सूत्रांनी सांगितले की, नवीनच्या मारेकऱ्यांच्या निशाण्यावर येण्याचे कारण त्याची RSS पार्श्वभूमी आहे. हत्येचे धागेदोरे पाकिस्तानशीही जोडले जात असल्याचे दिसत आहे. पंजाबमध्ये यापूर्वीही आंतरराष्ट्रीय लक्ष्यित हत्या आणि हल्ले झाले आहेत. ज्यात पाकिस्तानसोबत इतर अनेक देश सामील होते. तपास पूर्ण झाल्यानंतरच कटाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. दैनिक भास्करने नवीनच्या वडिलांशी आणि पोलिसांमधील आपल्या सूत्रांशी बोलून संपूर्ण प्रकरण समजून घेतले. पंजाबमधील परिस्थिती खूप वाईट आहे, कोण कोणाला मारेल, काही सांगता येत नाहीफिरोजपूरचे रहिवासी बलदेव अरोरा आरएसएस कार्यकर्ते आहेत. नवीन त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांना एक मुलगीही आहे, ती चंदीगडमध्ये राहते. बलदेव १५ नोव्हेंबरचा दिवस आठवून सांगतात, ‘मी घटनेच्या १० मिनिटांपूर्वीच दुकानात पोहोचलो होतो. नवीन म्हणाला की बाबा, आता मी घरी जातो. मुलांना फिरायला घेऊन जाईन. तो निघालाच होता आणि बातमी आली की त्याला कोणीतरी गोळी मारली. नवीनला २ वर्षांचा मुलगा आणि ८ वर्षांची मुलगी आहे.' पोलिसांच्या तपासाबाबत काही माहिती मिळाली का? 'नाही, पंजाबची परिस्थिती खूप वाईट आहे. कोण, कोणाला आणि कधी मारेल, काही सांगता येत नाही. यांना शिक्षा देणारेही कोणी नाही.' आरएसएसची पार्श्वभूमी हत्येचे कारण ठरली का? हे तर माहीत नाही. आम्ही नेहमीच निशाण्यावर असतो. मीच नाही तर माझे वडील दीनानाथ अरोरा हे देखील RSS चे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. 'काँग्रेसच्या काळात जेव्हा आणीबाणी लागली होती. तेव्हा माझ्या वडिलांनी सत्याग्रह केला होता. लोकांनी समजावले की तुम्हाला तुरुंगात टाकले जाईल, तेव्हा ते म्हणायचे - मला हेच तर हवे आहे. मी देखील लहानपणापासून संघटनेशी जोडलेला आहे. आता मला प्रौढ कार्य प्रमुखपदाची जबाबदारी मिळाली आहे. 40 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांशी विचार विनिमय करणे आणि त्यांच्यासोबत बैठका घेणे हे माझे काम आहे.' संघाला थांबवणे हा हल्लेखोरांचा उद्देश असू शकतो का? यावर बलदेव अरोरा म्हणतात, '1989 मध्ये मोगा येथे शाखेच्या वेळी हल्ला झाला होता. अंदाधुंद गोळीबार झाला होता आणि 25 कार्यकर्ते मारले गेले होते. त्यात माझ्या वडिलांचे अनेक सहकारीही मारले गेले होते. तरीही दुसऱ्या दिवशी शाखा लागली होती. माझे वडील त्यात गेलेही होते. पंजाबमध्ये संघटनेवर हल्ल्यांचा जुना इतिहास आहे, पण संघ आपले काम करत राहतो.' वैयक्तिक वैमनस्य-खलिस्तानी पत्राशी संबंध, दोन्ही सिद्धांत फेटाळलेघटनेबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले की, 'हत्येचे नियोजन व्यावसायिक पद्धतीने झाले होते. त्यामुळे वैयक्तिक वैमनस्याचा सिद्धांत फेटाळण्यात आला. त्यानंतर खलिस्तानी संघटना असल्याचा दावा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर समोर आली. जेव्हा तिची चौकशी झाली, तेव्हा ती बनावट निघाली.' खालिस्तानी संघटना असल्याचा दावा करणाऱ्या पत्राची चौकशी झाली का? 'होय, पत्रात 1984 मध्ये झालेल्या ऑपरेशन ब्लूस्टारचा उल्लेख आहे. या मुलाच्या (नवीन) कुटुंबीयांनी तेव्हा शिखांच्या अकाल तख्तवरील हल्ल्यानंतर जल्लोष केला होता, असे लिहिले आहे. हे सर्व खूप अनौपचारिक पद्धतीने लिहिले आहे. सामान्यतः संघटना अशा प्रकारचे तर्क किंवा कारणे देत नाहीत. हे पूर्णपणे बनावट आहे.' ते पुढे म्हणतात, 'मृतक नवीन 38-39 वर्षांचा आहे. ऑपरेशन ब्लूस्टार 41 वर्षांपूर्वी झाले. जर 1984 च्या दंगली हे कारण होते, तर त्यावेळी हयात असलेल्या व्यक्तीला लक्ष्य केले असते, त्यावेळी जन्मालाही न आलेल्या व्यक्तीला नाही. ज्या अकाउंटवरून पत्र पोस्ट झाले, त्याचीही चौकशी झाली आहे. ते बनावट आहे.' पाकिस्तानशी संबंधांच्या सिद्धांतावर तपास सुरूपंजाब पोलिसांनी हत्येप्रकरणी आतापर्यंत 3 जणांना अटक केली आहे, तर 2 जण फरार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये कनव, हर्ष आणि जतिन यांना एन्काउंटरनंतर पकडण्यात आले. 2 साथी फरार आहेत. जतिनला एन्काउंटरदरम्यान दोन गोळ्या लागल्या असून तो रुग्णालयात दाखल आहे. मात्र, जतिनला पैसे कुठून मिळाले, नवीनची हत्या कोणी करवून घेतली, याचा तपास सुरू आहे. पाकिस्तान कनेक्शनचीही चौकशी केली जात आहे. पाकिस्तानमधील एखाद्या संघटनेने RSS ला लक्ष्य केले आहे का? यावर पोलीस सूत्रांनी सांगितले, 'बघा, आतापर्यंतच्या तपासात वैयक्तिक शत्रुत्व आणि खलिस्तान कनेक्शनची शक्यता फेटाळण्यात आली आहे.' आरोपींकडून खलिस्तानी लिबरेशन फ्रंट (KLF) संघटनेबद्दलही चौकशी केली जात आहे. पाकिस्तानशी संबंधांच्या सिद्धांतावर तपास सुरू आहे. हत्येचे धागेदोरे पाकिस्तानशीही जोडले जात असल्याचे दिसत आहे. 'हे अगदी स्पष्ट आहे की हिंदूवादी संघटना लक्ष्यावर होती. आता तपास पूर्ण झाल्यानंतरच सर्व काही स्पष्ट होईल. यामागे पंजाबला अस्थिर करण्याचा प्रयत्न दिसत आहे. नवीन लक्ष्यावर येण्याचे कारण त्याची RSS पार्श्वभूमी आहे. एखाद्या सामान्य माणसाला किंवा व्यापाऱ्याला मारून तो संदेश दिला जाऊ शकत नव्हता, जो संदेश RSS पार्श्वभूमीच्या व्यक्तीला मारून दिला जाऊ शकतो.' पोलिसांना आरोपींच्या चौकशीतून असे समजले आहे की, हत्येचा कट कनवच्या वाढदिवसाच्या पार्टीत रचण्यात आला. हत्येचा सूत्रधार जतिन आहे. त्याने इतर साथीदारांना पैशांचे आमिष दाखवून काम करवून घेतले. हर्ष आणि कनव यात सहभागी होते. नवीनवर गोळी झाडणारा आरोपी बादल फरार आहे. या कामात वापरलेली बंदूक पंजाबबाहेरून मागवण्यात आली होती. मात्र, ती कुठून मागवण्यात आली, हे अजून कळलेले नाही. प्रकरणात NIA ची एन्ट्री होईलपोलिस सूत्रांनुसार, 2-3 दिवसांच्या आत पोलिसांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पोलिसांच्या तपासाला काही मर्यादा आहेत. प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ची एन्ट्री जवळपास निश्चित आहे. यापूर्वीही अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि व्यक्तींवरील हल्ल्यांचा तपास NIA ने केला आहे. आतापर्यंत समोर आलेला पॅटर्न, तो 2016 ते 2017 दरम्यान झालेल्या टार्गेट किलिंग आणि हल्ल्यांच्या कार्यपद्धतीसारखा वाटत आहे. आरएसएसने म्हटले- संस्थेवर हल्ला करण्यासाठी सॉफ्ट टार्गेट निवडलेया प्रकरणी आम्ही आरएसएस कार्यकर्ते प्रमोद यांच्याशीही बोललो. ते म्हणतात, 'यापूर्वीही पंजाबमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ले झाले आहेत. त्यामुळे हा हल्लाही आरएसएसला लक्ष्य करून करण्यात आला आहे, हे नाकारता येत नाही.' 'खरं तर संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. देशभरात कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. पंजाबमध्ये घरोघरी संपर्क साधून संघ लोकांना संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. हा हल्ला संघाचा प्रसार रोखण्यासाठी असू शकतो. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतरच निश्चितपणे काही सांगता येईल.' 10 वर्षांत 9 लक्ष्यित हत्या - एकच पॅटर्ननवीनची हत्या अशी काही पहिली घटना नाही. 6 ऑगस्ट 2016 रोजी जालंधरमध्ये आरएसएसच्या पंजाब युनिटचे उपाध्यक्ष निवृत्त ब्रिगेडियर जगदीश गगनेजा यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एनआयएने 2019 मध्ये अहवाल सादर केला होता. चौकशी अहवालात हत्येचा कट रचणाऱ्या 11 लोकांची नावे समाविष्ट होती. अहवालानुसार हे नियोजन पाकिस्तानात झाले होते. मात्र, निधी पुरवण्यापासून ते लक्ष्यित हत्येपर्यंत अनेक देशांतील लोक सामील होते. एजन्सीच्या तपासणीत असे म्हटले होते की, ही हत्या खालिस्तान लिबरेशन फोर्स (KLF) च्या सर्वोच्च नेतृत्वाने रचली होती आणि हा एका आंतरराष्ट्रीय कटाचा भाग होता. या अहवालात 2016 ते 2017 पर्यंत मारल्या गेलेल्या विशिष्ट संघटना आणि समुदायाच्या लोकांच्या तपासाचाही समावेश करण्यात आला होता. सर्व हत्यांचा नमुना आणि उद्देश एकच होता. या हत्येमध्ये पाकिस्तान, इटली, यूके, ऑस्ट्रेलियाच्या नेटवर्कचा वापर करण्यात आला होता. अहवालात या हत्यांना ‘आंतरराष्ट्रीय कट’ असे म्हटले होते. अर्थसहाय्यापासून ते नियोजनापर्यंत अनेक देश यात सामील होते, असे स्पष्टपणे नमूद केले होते. पाकिस्तान यात प्रमुख भूमिकेत होता. जालंधरचे जगदीश गगनेजा, लुधियानाचे रविंदर गोसाईं आणि अमृतसरचे विपिन शर्मा यांच्यासह सर्वांच्या लक्ष्यित हत्यांच्या पद्धती आणि निधीवर सविस्तर तथ्ये दिली होती. पुन्हा तेच स्वरूप - मास्क घातलेले दोन बाईकस्वार आले पंजाब पोलिसांच्या एका अन्य अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आमच्याशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, 'आरएसएस पदाधिकारी बलदेव अरोरा यांच्या मुलाच्या, नवीन अरोराच्या हत्येमध्येही बाकीच्या लक्ष्यित हत्यांप्रमाणेच स्वरूप आहे. तिथेच गर्दीने भरलेल्या बाजारात दोन बाईकस्वारांनी लक्ष्यावर गोळ्या झाडल्या.' ते पुढे म्हणतात, ‘तुम्ही बघा, शाखांवर जे हल्ले झाले, तेही याच पद्धतीचे होते. पंजाबमध्ये असे नाही की फक्त हिंदूवादी संघटनाच निशाण्यावर आल्या आहेत, पाद्री आणि नामधारीही आहेत. पण हे तुरळकच आहेत. खालिस्तानी असोत किंवा पाकिस्तानी, RSS त्यांच्यासाठी शत्रू नंबर-1 आहे.

दिव्यमराठी भास्कर 28 Nov 2025 7:42 am

Central Railway: पुणे-मुंबई प्रवास होणार सुपरफास्ट! बदलापूर-कर्जत नवीन रेल्वे लाईनला केंद्र सरकारचा ग्रीन सिग्नल

प्रभात वृत्तसेवा पुणे – मध्य रेल्वे विभागातील बदलापूर- कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या लाइन प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना हिरवा कंदील दिला. मंजूर झालेल्या या प्रकल्पांची एकूण किंमत सुमारे २ हजार ७८१ कोटी रुपये आहे. यामुळे पुणे-मुंबई प्रवास […] The post Central Railway: पुणे-मुंबई प्रवास होणार सुपरफास्ट! बदलापूर-कर्जत नवीन रेल्वे लाईनला केंद्र सरकारचा ग्रीन सिग्नल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 7:30 am

हिंजवडीत धक्कादायक प्रकार! १५ बालकांना वर्गात कोंडून अंगणवाडी मदतनीस बैठकीला; दोषींवर कारवाईचे आदेश

प्रभात वृत्तसेवा पुणे – हिंजवडीसारख्या आयटी पार्कमध्ये धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. हिंजवडी ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटातील तब्बल १५ चिमुकल्यांना वर्गातच कोंडून आणि बाहेरून सेफ्टी दरवाजाला कुलूप लावून मदतनीस चक्क माजी सरंपचांच्‍या बैठकीला हजेरी लावण्यासाठी गेल्याची घटना घडली आहे. ही बाब जिल्‍हा परिषदेच्‍या अधिकाऱ्यांच्या चौकशीतून समोर […] The post हिंजवडीत धक्कादायक प्रकार! १५ बालकांना वर्गात कोंडून अंगणवाडी मदतनीस बैठकीला; दोषींवर कारवाईचे आदेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 7:20 am

राज्यव्यापी शाळा बंद! मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यव्यापी संपाचा इशारा, ‘या’दिवशी शाळा राहणार बंद

प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.राज्यातील २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये, १५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यता शासन निर्णय […] The post राज्यव्यापी शाळा बंद! मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यव्यापी संपाचा इशारा, ‘या’ दिवशी शाळा राहणार बंद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 7:15 am

Pune News: बिबट्यापासून वाचण्यासाठी शस्त्र उचला? व्हायरल मेसेजवर वन विभागाने दिले स्पष्टीकरण..जाणून घ्या

प्रभात वृत्तसेवा पुणे – बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी शस्त्र वापरण्याचे वनविभागाने आदेश दिले आहेत अशी अफवा औंध भागात पसरली आहे. परंतु, असे कोणतेही आदेश दिले नसल्याचे स्पष्टीकरण वनविभागाने दिले आहेत. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशाप्रकारच्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. औंध येथे रविवारी (दि.२३ नोव्हेंबर) बिबट्या आढळून आला होता, त्यानंतर वनविभागाने नागरिकांना […] The post Pune News: बिबट्यापासून वाचण्यासाठी शस्त्र उचला? व्हायरल मेसेजवर वन विभागाने दिले स्पष्टीकरण..जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 7:10 am

पुणेकरांनो सावधान! भटक्या कुत्र्यांना खाऊ घालताय? मग ही बातमी आधी वाचा, महापालिकेचा कडक आदेश

प्रभात वृत्तसेवा पुणे – भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालताय तर त्याची माहिती १५ दिवसांच्या आत महापालिकेला द्यायची आहे. नागरिक, प्राणिप्रेमी संस्था, संघटना यांना महापालिकेने या सूचना दिल्या आहेत. तसे लेखी आदेशही महापालिकेच्या आरोग्य विभागाने काढले आहेत. हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशावरून काढण्यात आला आहे. एका अर्जामध्ये याची तपशीलवार माहिती भरायची आहे. त्यामध्ये मोकाट श्वानांना […] The post पुणेकरांनो सावधान! भटक्या कुत्र्यांना खाऊ घालताय? मग ही बातमी आधी वाचा, महापालिकेचा कडक आदेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 7:10 am

पुणेकरांसाठी गुड न्यूज! मेट्रो आता तुमच्या दारात; खडकवासला ते खराडी प्रवास होणार सुपरफास्ट

प्रभात वृत्तसेवा पुणे – केंद्र शासनाकडून पुणे मेट्रोच्या विस्तारीत मार्गांना मिळालेल्या मंजुरीमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. शहराच्या चारही दिशांना मेट्रोचे जाळे पोहोचणार असून विद्यमान मार्गांसह नव्याने मंजूर झालेल्या मार्गांमुळे पुण्यातील दैनंदिन प्रवाशांची संख्या तब्बल पाच लाखांनी वाढण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व मार्गांचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन […] The post पुणेकरांसाठी गुड न्यूज! मेट्रो आता तुमच्या दारात; खडकवासला ते खराडी प्रवास होणार सुपरफास्ट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 7:00 am

SPPU Exam Update: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! १ ते ३ डिसेंबरच्या परीक्षा पुढे ढकलल्या, पहा नवं वेळापत्रक

प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्‍यात नगरपरिषदा व नगरपंचायतीच्‍या निवडणुकांमुळे राज्‍यातील सर्व विद्यापीठांनी १ ते ३ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या सर्व परीक्षांच्‍या वेळापत्रकात बदल करण्याचे निर्देश उच्‍च शिक्षण विभागाने दिले. त्‍यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यादरम्‍यान होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत व नगरपालिकांच्या […] The post SPPU Exam Update: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! १ ते ३ डिसेंबरच्या परीक्षा पुढे ढकलल्या, पहा नवं वेळापत्रक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 6:45 am

Akshay Kumar: मोबाइलच्या स्क्रीनवरून मैदानावर! पुण्यातल्या ४४ हजार खेळाडूंना अक्षय कुमारचा फिटनेस मंत्र

प्रभात वृत्तसेवा पुणे – लहान मुले हल्ली मोबाइल गेममध्ये रमली आहेत. त्यामुळे मैदानात येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. अशा परिस्थितीत पुण्यातून तब्बल ४४ हजार खेळाडू मैदानात उतरत आहेत, ही मोठी गोष्ट आहे. खेळातूनच आरोग्य घडते आणि आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन अभिनेता अक्षय कुमारने केले. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई […] The post Akshay Kumar: मोबाइलच्या स्क्रीनवरून मैदानावर! पुण्यातल्या ४४ हजार खेळाडूंना अक्षय कुमारचा फिटनेस मंत्र appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 6:40 am

Pune Crime: आंदेकरच्या खात्यात सापडले २१ कोटी; मासळी बाजारातून उकळली खंडणी?

प्रभात वृत्तसेवा पुणे – मासळी बाजारातील व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दाखल गुन्ह्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह दोघांना अटक केली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी बंडू आंदेकर, त्याचा पुतण्या शिवम यांना २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.याप्रकरणी सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर, पुतण्या शिवम उदयकांत आंदेकर यांना अटक केली आहे. खंडणी […] The post Pune Crime: आंदेकरच्या खात्यात सापडले २१ कोटी; मासळी बाजारातून उकळली खंडणी? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 6:30 am

PMC News: नव्या होर्डींग्जला अचानक ‘ब्रेक’; अतिरिक्त आयुक्तांनी परवान्यांना स्थगिती का दिली? वाचा कारण

प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी क्षेत्रीय कार्यालयांना नवीन होर्डींग्जच्या परवानगीचे अधिकार दिले असले, तरी त्यापूर्वी आपल्या हद्दीतील अनधिकृत जाहिरात फलक काढण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. मात्र, वास्तवात अनधिकृत होर्डींग्जवरील कारवाई अत्यल्प असून, नवीन परवाने देण्यात मात्र क्षेत्रीय कार्यालयांनी मोठ्या प्रमाणावर गती दाखवली आहे. गेल्या एका महिन्यात शहरातील १५ पैकी […] The post PMC News: नव्या होर्डींग्जला अचानक ‘ब्रेक’; अतिरिक्त आयुक्तांनी परवान्यांना स्थगिती का दिली? वाचा कारण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 6:15 am

बारामतीत मोठं ट्विस्ट! ‘या’दोन जागांवर निवडणूक रद्द; ऐनवेळी न्यायालयाचा धक्कादायक निर्णय

प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच न्यायालयाच्या निर्णयामुळे दोन प्रभागातील दोन जागांची निवडणूक वगळून नगराध्यक्ष व इतर नगरसेवक पदाच्या जागांची निवडणूक होणार आहे. प्रभाग क्रमांक 13 ब आणि प्रभाग क्रमांक 17 अ या दोन जागांची निवडणूक निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर होणार आहे.बारामती नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संगीता राजापूरकर यांनी यासंदर्भात एक […] The post बारामतीत मोठं ट्विस्ट! ‘या’ दोन जागांवर निवडणूक रद्द; ऐनवेळी न्यायालयाचा धक्कादायक निर्णय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 6:00 am

महापालिकेच्या वतीने मोफत रोजगार मेळावा! १० पेक्षा जास्त क्षेत्रांतील कंपन्या येणार; असा घ्या लाभ.

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका, समाज विकास विभाग, लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड ऑटो क्लस्टर येथे मोफत भव्य रोजगार मेळावा शुक्रवारी (दि. २८) आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शहरातील विविध औद्योगिक कंपन्या सहभागी होणार असून युवक–युवतींना एकाच ठिकाणी विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध […] The post महापालिकेच्या वतीने मोफत रोजगार मेळावा! १० पेक्षा जास्त क्षेत्रांतील कंपन्या येणार; असा घ्या लाभ. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 5:45 am

पिंपरीत सिनेस्टाईल थरार! पोलिसांचा पाठलाग, आरोपींचे फायरिंग अन् एका झटापटीत फिरली बाजी..

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पोलिसांनी सराईत चोरट्यांचा थरारक पाठलाग करत त्‍यांना गाठले, परंतु एका चोरट्याने थेट पोलिसांवर गोळीबार केला. एका पोलीस हवालदाराने दाखविलेल्‍या प्रसंगावधानाने गोळी कारच्‍या छताला लागली व पोलीस बचावले. हा प्रकार सोमाटणे टोलनाक्‍याजवळ घडला. पोलिसांनी तिघांना पकडले असून त्‍यांच्‍याकडून दोन पिस्‍टल, सात काडतूस, धारदार शस्त्रे, दागिने जप्‍त करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये घरफोडी-चोरीच्या गुन्ह्यांना […] The post पिंपरीत सिनेस्टाईल थरार! पोलिसांचा पाठलाग, आरोपींचे फायरिंग अन् एका झटापटीत फिरली बाजी.. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 5:30 am

डोळ्यादेखत कुंकू पुसलं! पत्नीसमोर पतीचा गोळ्या झाडून खून; खेडमधील धक्कादायक घटना

प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – खेड तालुक्यातील लादवड-कोळेकर वस्ती परिसरात आज (दि. 27) सकाळी साडेदहाच्या सुमारास खेड न्यायालयात केसच्या तारखेस जाण्यासाठी पत्नीसमवेत मोटारसायकलवर निघालेल्या केतन शामराव कारले (वय 23, रा. चांदूस, ता. खेड) यांच्यावर त्यांच्या मित्रानेच पिस्तुलातून गोळीबार करत त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली. याबाबत खेड पोलीस ठाण्यात मृताची पत्नी कुमकुम केतन कारले यांनी फिर्याद […] The post डोळ्यादेखत कुंकू पुसलं! पत्नीसमोर पतीचा गोळ्या झाडून खून; खेडमधील धक्कादायक घटना appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 5:00 am

Theur Accident: भरधाव ट्रकने उडवल्या एकापाठोपाठ ९ गाड्या; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

प्रभात वृत्तसेवा थेऊर – येथील थेऊर – कोलवडी रस्त्यावर ट्रकने 9 दुचाकींना धडक दिल्याने दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) येथील स्मशानभूमीजवळ बुधवारी (दि. 26 ) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात […] The post Theur Accident: भरधाव ट्रकने उडवल्या एकापाठोपाठ ९ गाड्या; काळजाचा ठोका चुकवणारी घटना appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 4:45 am

Shirur News: एकल महिलांना मिळाला हक्काचा आधार; ‘माझे अस्तित्व’शिबिराची शिरूरमध्ये जोरदार चर्चा

प्रभात वृत्तसेवा शिरूर – पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मलठण (ता. शिरूर) येथे गुरूवारी (दि. २७) ‘माझे अस्तित्व–शक्ती’ एकल महिलांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गटविकास अधिकारी महेश डोके यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पडले असून, परिसरातील एकल महिलांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. […] The post Shirur News: एकल महिलांना मिळाला हक्काचा आधार; ‘माझे अस्तित्व’ शिबिराची शिरूरमध्ये जोरदार चर्चा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 4:30 am

Sharad Pawar: निधी हवा तर मतदान करा? अजित पवारांच्या त्या विधानावर शरद पवारांचा संताप..म्हणाले

प्रभात वृत्तसेवा बारामती – नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत विकासकामावर नाही तर पैसे, निधीवर मते मागितली जात आहेत. पैसे किती द्यायचे, यासाठी सध्या चढाओढ सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ठिकठिकाणी गट झाले आहेत. पैसे, निधीवर मत मागितली जात आहेत, ही चांगली गोष्ट नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक निवडणुकांबाबत […] The post Sharad Pawar: निधी हवा तर मतदान करा? अजित पवारांच्या त्या विधानावर शरद पवारांचा संताप..म्हणाले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 4:15 am

ते माझ्यासाठी सर्वकाही होते… - हेमा मालिनीची भावुक पोस्ट

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या ८९व्या वर्षी झालेल्या निधनानं संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकात बुडाली. अनेक दशकं चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या सुपरस्टारच्या शेवटच्या क्षणांत त्यांच्या सोबत मुलं आणि पत्नी हेमा मालिनी खंबीरपणे उभे होते. त्यांचं कुटुंब अजूनही या दुःखातून सावरू शकलेलं नाही. अशातच, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी हेमा मालिनी यांनी अखेर आपल्या भावना व्यक्त केल्या. आयुष्यभर साथ देणाऱ्या जोडीदाराच्या आठवणी सांगताना त्यांनी भावनिक शब्दांत आपलं दु:ख व्यक्त केलं आणि त्यांच्या सहवासाच्या क्षणांना उजाळा दिला. त्या म्हणतात -धरमजी,ते माझ्यासाठी खूप काही होते. प्रेमळ पती, ईशा आणि अहानाचे आदर्श वडील, मित्र, तत्त्वज्ञ, मार्गदर्शक, कवी… आणि आयुष्यातील प्रत्येक कठीण क्षणी ‘ज्याच्याकडे मी धाव घेई’ असे माझे सर्वस्व! ते नेहमीच माझ्या कुटुंबाशी आत्मीयतेने वागले, प्रेम आणि समभावाने प्रत्येकाला आपलंसं केलं.कलाकार म्हणून त्यांचं अपार कसब, प्रचंड लोकप्रियतेनंतरही असलेली नम्रता आणि सार्वत्रिक आकर्षण यामुळे ते खऱ्या अर्थाने अद्वितीय आयकॉन होते. माझं वैयक्तिक दु:ख शब्दांत व्यक्तच होऊ शकत नाही…, त्यांच्याविना आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कायमच राहील.आयुष्यभराच्या सहवासानंतर आता फक्त असंख्य आठवणी उरल्या आहेत….”

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 4:10 am

पक्षकारांचा त्रास आता संपणार! राजगुरूनगर नवीन न्यायालयात मिळणार ‘या’खास सुविधा; वाचा कधी आहे उद्घाटन?

प्रभात वृत्तसेवा राजगुरूनगर – राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन रविवारी (दि. 30) रोजी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती तथा पुणे जिल्हा पालक न्यायमूर्ती रेवती मोहिते -डेरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती राजगुरूनगर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. वैभव कर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.राजगुरुनगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची नवीन 7 […] The post पक्षकारांचा त्रास आता संपणार! राजगुरूनगर नवीन न्यायालयात मिळणार ‘या’ खास सुविधा; वाचा कधी आहे उद्घाटन? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 4:00 am

Khed News: मुंबईच्या डबेवाल्यांचे ‘जनक’कोण? खेडमधील ‘या’गावाला मिळणार आता जागतिक ओळख

प्रभात वृत्तसेवा आंबेठाण – खेड तालुक्यातील वाजवणे (ता. खेड) या शांत गावाने आज एक ऐतिहासिक क्षण अनुभवला. मुंबई शहराच्या जगप्रसिद्ध डबेवाला सेवेला शिस्त, शून्य-चूक पद्धती आणि पर्यावरणपूरक कार्यपद्धतीची भक्कम पायाभरणी करणारे आद्य मार्गदर्शक स्व. महादू हावजी बच्चे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येत असलेल्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाले. सुमारे 125 वर्षांच्या परंपरेला […] The post Khed News: मुंबईच्या डबेवाल्यांचे ‘जनक’ कोण? खेडमधील ‘या’ गावाला मिळणार आता जागतिक ओळख appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 3:45 am

leopard attack: ‘सायंकाळी सातनंतर घराबाहेर नको’! दौंड तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला, पशुधन धोक्यात

प्रभात वृत्तसेवा मलठण – राज्यात दिवसेंदिवस नागरी वस्तीसह पाळीव जनावरांवर बिबट्यांचे हल्ले वाढत चालले आहेत. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढत असून शेतातील गोट्यांमधील जनावरांवर बिबट्या हल्ले करू लागला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात भीमा नदीकिनारी झाडे झुडपे आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र असल्याने बिबट्यानं दडण्यासाठी खूप जागा आहे. रात्री शिकारीच्या शोधत […] The post leopard attack: ‘सायंकाळी सातनंतर घराबाहेर नको’! दौंड तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला, पशुधन धोक्यात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 3:30 am

मंचरमध्ये राजकीय फड रंगणार! आज दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा; नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार तापला

प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीच्या निवडणूक मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना प्रचाराचा जोर शिगेला पोहोचला आहे. यात आता राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांमुळे मंचरचे निवडणूक वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. शुक्रवार, दि. 28 रोजी या […] The post मंचरमध्ये राजकीय फड रंगणार! आज दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा; नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार तापला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 3:00 am

अवसरी खुर्दमध्ये बिबट्या जेरबंद! वनविभागाच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ, ग्रामस्थांकडून सुटकेचा निःश्वास

प्रभात वृत्तसेवा मंचर – अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) परिसरातील वायाळमळा येथे वनविभागाच्या पिंजऱ्यात एक वर्षांचा नर बिबट्या जेरबंद झाला. वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई गुरुवार, दि.२७ रोजी करण्यात आली.अमोल महादेव वायाळ यांच्या वस्तीशेजारी काही दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याच्या तक्रारीनंतर पिंजरा लावण्यात आला होता. गुरुवारी सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकलेला असल्याचे आढळून आले. घटनेची माहिती […] The post अवसरी खुर्दमध्ये बिबट्या जेरबंद! वनविभागाच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ, ग्रामस्थांकडून सुटकेचा निःश्वास appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 2:45 am

राष्ट्रीय चेतनेचा उदय

अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज विराजमान झाला तो दिवस मंगळवार २५ नोव्हेंबर २०२५. या भव्य मंदिरावर धर्मध्वज फडकवणे हा केवळ धार्मिक क्षण नाही, तर सनातन श्रद्धेच्या जागतिक प्रतिष्ठेचा पुरावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करताच, 'जय श्री राम'च्या भावनिक जयघोषात उपस्थित विशाल जनसमूह हेलावला. धर्मध्वज फडकवण्याच्या ऐतिहासिक क्षणाने संपूर्ण अयोध्यानगरी भक्तीने भारावून गेली. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर, धर्मपाठासह, भाविकांमध्ये 'जय श्री राम'चा जयघोष दुमदुमला. हे केवळ मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचेच नव्हे, भारताच्या सांस्कृतिक जाणिवेचे प्रतीक होते. दुसऱ्या बाजूला हा क्षण पाच शतकांपासून चालत आलेल्या संघर्षाच्या सार्थकतेचे प्रतीक ठरतो. १५२८ मध्ये मोगल शासक बाबरचा सेनापती मीर बाकी याने प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मस्थानाचे पवित्र मंदिर उद्ध्वस्त करून त्यावर बाबरी मशीद बांधली. संघर्षाची बीजे रोवली गेली ती तेव्हापासूनच. तो संघर्ष केवळ जमिनीच्या तुकड्यासाठी नव्हता, तर ‘आस्था’ आणि ‘अनास्था’ यांच्यातला होता. भारताच्या आत्म्यावरचे ते आक्रमण होते. श्री रामभक्तांनी तेव्हापासूनच रामजन्मभूमी मुक्त करण्यासाठी अविरत संघर्ष केला, प्रसंगी बलिदानही दिले. इतिहासातील नोंदीनुसार, या संपूर्ण काळात तब्बल ७६ मोठे संघर्ष झाले आणि असंख्य कारसेवकांचे, साधू-संतांचे रक्त सांडले. १८५३ मध्ये हिंदू-मुस्लीम समाजात यावरून पहिला मोठा वाद झाला. त्यानंतर १८८५ मध्ये महंत रघुबर दास यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. ९० च्या दशकात विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली श्री रामजन्मभूमी आंदोलन उभे राहिले. ‘श्री रामलला हम आयेंगे, मंदिर भव्य बनायेंगे’ ही घोषणा देशव्यापी झाली. मग ६ डिसेंबर १९९२ ची घटना असो, वा त्यानंतरचा न्यायालयीन लढा; प्रत्येक टप्पा हा या यज्ञातील एका आहुतीसारखाच होता. ५०० वर्षांच्या संघर्षाचा निर्णायक क्षण आला तो ९ नोव्हेंबर २०१९ रोजी. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक आणि एकमताने निर्णय देत, वादग्रस्त जमीन श्रीराम मंदिराला देण्याचा स्पष्ट आदेश दिला. त्यानंतर ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते या भव्य मंदिराचे भूमिपूजन झाले आणि बांधकामाची सुरुवात झाली.भगवान राम जन्मभूमीवर भव्य मंदिर बांधण्याची इच्छा पूर्ण होण्यास इतका कालावधी का लागला? त्याची अनेक कारणे आहेत. स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च प्राथमिकता असूनही, संकुचित राजकीय विचारांमुळे ती दुर्लक्षित राहिली. कोणत्याही स्वाभिमानी राष्ट्राची प्राथमिक जबाबदारी म्हणजे स्वातंत्र्य मिळताच आक्रमणामुळे बाधित झालेल्या पुरातन वारसा जपण्यासाठी ते अवशेष पुसून टाकणे. जगभरातील अनेक देशांनी हेच केले आहे. रशियन साम्राज्याने बांधलेले ऑर्थोडॉक्स चर्च पाडण्याचा पोलंडचा निर्णय हे एक उदाहरण त्यासाठी देता येईल; परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सांस्कृतिक वारशाचा अभिमान असलेले राजकीय नेतृत्व नसल्याने अनेक वर्षं राम मंदिराच्या निर्माणाकडे आपण लक्ष दिले नाही. हिंदुधर्मियांचे आस्थेचे स्थान असलेले राम मंदिर अयोध्येत बांधून पूर्ण झाले, ते केवळ न्यायव्यवस्थेने वाद सोडवण्याचा निर्णय घेतल्यामुळे नाही, तर मोदी सरकारने अनुकूल धार्मिक सलोख्याची परिस्थिती निर्माण केल्यामुळे न्यायव्यवस्था ती सोडवू शकली. याउलट, आधीच्या बहुतेक केंद्र सरकारांनी अशा परिस्थितीत कोणतीही ठोस पावलं उचललेली दिसली नाहीत. हे संकुचित राजकारण तसेच मॅकॉलेच्या शिक्षण व्यवस्थेतून जन्मलेल्या मानसिकतेमुळे होते, ज्याचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येतील आपल्या भाषणातून केला होता. यापूर्वीची गुलाम मानसिकता पूर्णपणे नष्ट करण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले. मॅकॉलेच्या शिक्षण व्यवस्थेतून जन्मलेल्या मानसिकतेने भारतीय समाजाला केवळ त्याच्या समृद्ध सांस्कृतिक जाणिवेपासून दूर नेले नाही, तर त्या वारशाबद्दल मनात न्यूनगंडाची भावना निर्माण केली. पंतप्रधान मोदी यांनी पुढील दहा वर्षांत ही मानसिकता मुक्त करण्याचा दृढनिश्चय केला आहे, हे काही कमी नाही, पण हे तितकेसे सोपेही नसल्याने त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल आवश्यक आहे. त्यांनी तेही अयोध्याभूमीतूनच सांगितले आहे.धर्मध्वजाबाबतच्या पारंपरिक श्रद्धा आहेत. हे शक्ती, वैभव आणि संरक्षणाचेही एक शक्तिशाली प्रतीक मानले जाते. शास्त्रांमध्ये त्याचे वर्णन ऊर्जा आणि आध्यात्मिक तेजाचे प्रकटीकरण म्हणून केले आहे. राम मंदिरात फडकवल्या जाणाऱ्या ध्वजाचा भगवा रंग देखील विशेष ओळख करून देतो. तो दीर्घकाळापासून शौर्य, त्याग, भक्ती आणि शक्तीचे प्रतीक आहे. ध्वजावर चित्रित केलेले सूर्य चिन्ह ऊर्जा, प्रकाश आणि जीवन दर्शवते, तर त्याच्या मध्यस्थानी कोरलेले 'ॐ' हे सौर मंडळाचे पहिले आणि अंतिम उच्चारण आहे, जे आध्यात्मिक शक्ती आणि देवत्व दर्शवते. कचनारची एक प्रजाती, कोविदार वृक्ष हा अयोध्येचा राज्यवृक्ष आहे. भरत जेव्हा रामाला राजी करण्यासाठी चित्रकूटला गेला तेव्हा त्याच्या रथावर 'कोविदार' असा शिलालेख असलेला ध्वज होता, असे असंख्य संदर्भ आहेत. खरं तर, आज भारत केवळ आपल्या चेतना, मन आणि काळाला स्वतःच्या चेतनेशी जोडत नाही, तर भविष्यासाठी ऊर्जा आणि दिशा देखील निश्चित करत आहे. दिशा, चेतना आणि आदर्शांचा हा संगम असाधारण आहे. एकीकडे ते कल्याणकारी लोकपरंपरेचे बीज धारण करते, तर दुसरीकडे, त्याच्या आध्यात्मिक-सांस्कृतिक आदर्शांची आणि शौर्याचीही खोल जाणीव आहे. अयोध्या आता केवळ एक धार्मिक नगरी नव्हे, तर जागतिक स्तरावर भारताच्या सांस्कृतिक परंपरेची राजधानी म्हणून उदयास आली आहे. प्रभू रामचंद्रांच्या आदर्श नीतीनुसार जगाला मार्गदर्शन करण्याची भारताची क्षमता दर्शविणारा हा धर्मध्वज अनेक शतके अवकाशात दिमाखाने फडकत राहील, यात शंका नाही.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 2:30 am

Ranjangaon Crime: रांजणगावात दिवसाढवळ्या घरफोडी! ५ लाखांचा मुद्देमाल लंपास, पोलिसही चक्रावले

प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – रांजणगाव गणपती परिसरात स्मशानभूमीसमोर, सोनेसांगवी रस्त्यावर बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडीची घटना समोर आली आहे. या चोरीत तब्बल ५ लाख २९ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे.याबाबत नीलम पांडुरंग तोडकर (वय ४८, रा. रांजणगाव गणपती) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. सोमवारी फिर्यादी कुटुंब […] The post Ranjangaon Crime: रांजणगावात दिवसाढवळ्या घरफोडी! ५ लाखांचा मुद्देमाल लंपास, पोलिसही चक्रावले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 2:30 am

Manchar Election: निवडणुकीचा ज्वर की डोकेदुखी? मंचरमध्ये उमेदवारांच्या ‘या’कृतीमुळे व्यापारीही संतापले

प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर शहरात निवडणुकीची प्रचारमोहीम जोरात सुरू असून विविध पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांच्या वाहनांवरील स्पीकरमधून होणारा कर्कश आवाज नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. व्यापारी, दुकानदार, रुग्णालयातील रुग्ण, तसेच शाळांमधील विद्यार्थी उच्च आवाजामुळे हैराण झाले असून, आवाजाची तीव्रता (डेसिबल) कमी ठेवावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. निवडणूक मतदानास अवघे तीन दिवस राहिल्यामुळे सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा […] The post Manchar Election: निवडणुकीचा ज्वर की डोकेदुखी? मंचरमध्ये उमेदवारांच्या ‘या’ कृतीमुळे व्यापारीही संतापले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 2:15 am

मराठवाड्यात खासदार, आमदारांची सत्त्वपरीक्षा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत सध्या राजकीय रंगत भरली आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक आपल्याच पक्षाचे निवडून यावेत यासाठी सत्ताधारी पक्षातील भाजप, एकनाथ शिंदे गट तसेच अजित पवार गटाने कंबर कसली आहे. याविरुद्ध विरोधी पक्षांत असलेल्या काँग्रेस व उबाठा गटाने देखील यासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील प्रचार सभा तसेच नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील प्रचार सभा लक्षवेधक ठरली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मराठवाड्यातील सर्वच भाजप उमेदवारांना मोठे बळ मिळाले आहे. अयोध्येत पार पडलेल्या धर्मध्वज सोहळ्याचा फायदा देखील मोठ्या प्रमाणात भाजपला मिळणार आहे. अयोध्येतील कार्यक्रमामुळे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित राष्ट्राविषयीच्या भूमिकेमुळे भाजपचे संख्याबळ मराठवाड्यात निश्चितच वाढणार आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजप तसेच राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्याच्या विकासासाठी असलेली भूमिका प्रत्येक प्रचार सभेतून स्पष्ट केली जात आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी तसेच विविध नेत्यांनी मराठवाड्यात भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून यावेत यासाठी सूक्ष्म नियोजन करीत पक्षाचे कार्य व विकासाची दिशा स्पष्ट करत मतदारांकडे आपली भूमिका मांडली. याचबरोबर राज्यात सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मराठवाड्यात विशेष लक्ष केंद्रित केले. मराठवाड्यातील धाराशिव तसेच नांदेड जिल्ह्यात त्यांच्या विक्रमी सभा पार पडल्या. आपल्याकडे तिजोरीची चावी आहे, असे सांगत त्यांनी मतदारांना आकर्षित केले. शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मराठवाड्यातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावेत असे आदेश त्यांच्या सहकारी मंत्र्यांना दिले आहेत. त्या दृष्टीने राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मराठवाड्यात आपली शक्ती पणाला लावली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी नांदेड जिल्ह्यातील सभेत भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर केलेली टीका राज्यभर गाजत आहे. खासदार अशोक चव्हाण हे अन्न खातात की नाही, असा प्रश्न आपल्याला पडला आहे, अशी टीका करून त्यांच्याकडे असलेल्या भरमसाट एजन्सीचा पाढाच वाचला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्र्यांनी मते मिळविण्यासाठी टीकेची झोड उठवली आहे. प्रत्यक्षात भाजपवर टीका न करता त्या पक्षातील नेत्यांना रडारवर ठेवले जात आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या सभेत अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध बोलत त्यांनी नांदेड जिल्ह्यात सभा गाजवली. राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ग्रामीण भागातील नाळ पक्की करण्यावर जोर दिला आहे. त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. परभणी जिल्ह्याच्या नेत्या तसेच भाजपच्या मंत्री मेघना बोर्डीकर यादेखील भाजपचे उमेदवार कसे निवडून येतील या दृष्टीने प्रयत्नशील आहेत; परंतु त्यांच्या तोडीला असलेल्या उबाठा गटातील नेत्यांनी त्यांना जेरीस आणले आहे. बीड जिल्ह्यातील मंत्री पंकजा मुंडे यांची देखील कसोटी पणाला लागली आहे. बीड जिल्ह्यात असलेल्या काही संवेदनशील भागातील मतदान प्रक्रिया रखडली जाण्याची भीती काही राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यातील प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने पावले उचलली आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील मराठवाड्यातील लातूर व नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक सभा घेतल्या. एकेकाळी मराठवाड्यातील लातूर व नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा मोठा गड होता. या दोन्ही जिल्ह्यांनी महाराष्ट्राला एकेकाळी मुख्यमंत्रीपद दिले होते. काँग्रेसच्या कोट्यातून मुख्यमंत्रीपद घेतलेल्या नेत्यांच्या जिल्ह्यात काँग्रेसची दुरवस्था झाली आहे. ही दुरवस्था भरून काढण्याच्या दृष्टीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्वतःच्या पक्षातील उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्नरत आहेत. मराठवाड्यातील हिंगोली व परभणी जिल्ह्यात उबाठा गटाचे वर्चस्व आहे.या ठिकाणी त्यांच्याच पक्षाचे खासदार आहेत. या दोन्ही जिल्ह्यांत त्यांच्या पक्षातील खासदारांनी मोठी शक्ती पणाला लावली आहे. एकंदरीत मराठवाड्यातील भाजप, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट व सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांची व खासदारांची मोठी राजकीय कसोटी आहे. नगर परिषद तसेच नगरपंचायतसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आहे. तसेच लगेच दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबर रोजी मतमोजणी आहे. आपल्या पक्षातील उमेदवारांच्या पारड्यात मते पडावीत, यासाठी मराठवाड्यात सत्ताधारी पक्षातील आमदार एकमेकांच्या विरुद्ध बोलून मत मिळविण्याचे प्रयत्न करीत आहेत. एकंदरीत राज्याचे मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजवरची स्पष्ट भूमिका भाजपच्या विजयासाठी फायदेशीर ठरणार आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या स्पष्ट भूमिका जनतेच्या हिताच्या आहेत. त्यामुळे मराठवाड्यात भाजपकडे ओढा असलेले मतदार जास्त संख्येने आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने मराठवाड्याला भरभरून निधी मिळालेला आहे. त्यामुळे त्या निधीने मराठवाड्याचा कायापालट होत आहे. ही बाब लक्षात घेऊन मराठवाड्यातील सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक हे भाजपचेच असतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत असलेल्या आमदारांचीच ही खरी कसोटी आहे. आपल्या पक्षातील जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणले तर आपल्या पक्षातील वरिष्ठ नेते आपली किंमत करतील, या भावनेतून आमदार मंडळी देखील मराठवाड्यात कामाला लागलेली आहेत.- डॉ. अभयकुमार दांडगे

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 2:10 am

Junnar Crime: खोट्या गुन्ह्याची भीती दाखवून लुटले दीड कोटी! ओतूरमधील ब्लॅकमेलर पती-पत्नीचा पर्दाफाश

प्रभात वृत्तसेवा ओतूर – बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला ओतूर पोलिसांनी अटक केली आहे. ओतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी ही माहिती दिली.खामुंडी (ता. जुन्नर) येथील मारुती मनोहर कदम (वय ६१) यांनी १५ मे २०२५ रोजी ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. […] The post Junnar Crime: खोट्या गुन्ह्याची भीती दाखवून लुटले दीड कोटी! ओतूरमधील ब्लॅकमेलर पती-पत्नीचा पर्दाफाश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 2:00 am

Ambegaon News: भारतीय संविधान हा राष्ट्रग्रंथ; घराघरात पोहोचला पाहिजे –पूर्वा वळसे पाटील यांचे प्रतिपादन

प्रभात वृत्तसेवा लाखणगाव – भारतीय संविधान जगात श्रेष्ठ असून ते प्रत्येक नागरिकाच्या घराघरात असणे आवश्यक आहे.संविधान हा राष्ट्रग्रंथ असल्याने त्याचा सन्मान आणि मूल्यांची जपणूक व्हावी. असे प्रतिपादन पूर्वा वळसे पाटील यांनी केले.लाखणगाव (ता.आंबेगाव) येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक संविधान भवन समिती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ग्रामपंचायत, न्यू इंग्लिश स्कूल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखणगाव […] The post Ambegaon News: भारतीय संविधान हा राष्ट्रग्रंथ; घराघरात पोहोचला पाहिजे – पूर्वा वळसे पाटील यांचे प्रतिपादन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 1:45 am

पाकिस्तान हुकूमशाहीच्या दिशेने...

पाकिस्तानने संरक्षण दल प्रमुख असे पद निर्माण करत त्याची जबाबदारी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याकडे सोपवली. नवीन दुरुस्ती विधेयकांतर्गत, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती मुनीर यांची या पदावर नियुक्ती करतील. यामुळे लष्करप्रमुखांना राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयापेक्षा जास्त अधिकार मिळणार असल्याने पाकिस्तानमध्ये हुकूमशहाचा उदय होऊ घातला आहे.पाकिस्तान संविधानाच्या कलम २४३ मध्ये सुधारणा करत आहे. त्यासाठी संसदेत २७वे दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले. पाकिस्तानी सरकारने सैन्यांमध्ये चांगले समन्वय स्थापित करण्यासाठी हे पद तयार केले जात आहे, असे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात ते भारताचे अनुकरण आहे. भारतात जसे सरसेनाध्यक्षपद तयार करण्यात आले, तसे पाकिस्तानमध्ये हे पद तयार करण्यात आले; परंतु भारतात लोकशाही आहे आणि इथल्या सरसेनाध्यक्षांना पंतप्रधान आणि राष्ट्रपतींपेक्षा जास्त अधिकार नाहीत. पाकिस्तानमध्ये असीम मुनीर यांच्यासाठी ही घटनादुरुस्ती करण्यात आली असून, आता त्यांच्या एकाच आदेशाखाली सेना, नौदल आणि हवाई दल काम करू शकतील. सामान्यतः लष्करप्रमुखांना संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्त केले जाते. पंतप्रधान आणि राष्ट्रीय धोरणात्मक कमांडच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात. संरक्षण दलांचे प्रमुख हे तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख म्हणूनही ओळखले जातात; परंतु ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे हादरलेल्या पाकिस्तान सरकारने घाईगडबडीत केलेल्या घटनादुरुस्तीमुळे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान सरकारने मुनीर यांना ‘फील्ड मार्शल’ म्हणून बढती दिली. ‘फील्ड मार्शल’ हे पाकिस्तानी सैन्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद आहे. आता संविधानात सुधारणा करून मुनीर यांना तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख बनवण्यात आले. या नवीन दुरुस्ती विधेयकांतर्गत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार अध्यक्ष आसिफ अली झरदारी हे मुनीर यांना ‘सीडीएफ’ पदावर नियुक्त करतील. ही घटनादुरुस्ती पाकिस्तानात लष्करी राजवटीच्या नवीन युगाची सुरुवात आहे.भारताच्या फाळणीनंतर काही वर्षांनी पाकिस्तानमध्ये पहिला मार्शल लॉ लागू करण्यात आला. १९५८ मध्ये जनरल अयुब खान यांनी राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा यांना काढून टाकले आणि मार्शल लॉ लागू केला. १९५८ ते १९७१ पर्यंत चाललेला हा पाकिस्तानचा पहिला लष्करी हस्तक्षेप होता. या काळात २५ मार्च १९६९ रोजी अयुब यांनी पदाचा राजीनामा दिला आणि याह्या खानकडे सत्ता सोपवली. १९७७ मध्ये दुसरा लष्करी उठाव झाला, तेव्हा जनरल झिया-उल-हक यांनी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून टाकले. झिया यांचे शासन १९७७ ते १९८८ पर्यंत चालले. १९९९ मध्ये तिसरा उठाव झाला.भारताकडून कारगील युद्ध हरल्यानंतर जनरल परवेझ मुशर्रफ आणि तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात संघर्ष निर्माण झाला. यामुळे १९९९ मध्ये मुशर्रफ यांनी लोकशाही सरकार उलथवून टाकले. मुशर्रफ यांचे शासन २००८ पर्यंत टिकले. हा सर्व इतिहास पाहिला, तर पाकिस्तानमध्ये सत्तेची चावी लष्कराकडे आहे, हे स्पष्ट होते. असे असले, तरी २००८ पासून पाकिस्तानमध्ये कोणत्याही लष्करी अधिकाऱ्याने सत्तेचे सूत्र हाती घेतलेले नाही.अर्थात सत्तेची सूत्रे नेहमीच लष्करी मुख्यालयात बसलेल्या जनरलकडे राहिली आहेत. पाकिस्तानमध्ये लोकशाही सरकारने लष्कराला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते उलथून टाकण्यात आले. संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी अलीकडेच सध्याच्या सरकारचे वर्णन ‘हायब्रिड सरकार’ असे केले. हायब्रिड म्हणजे ते अशा व्यवस्थेचा संदर्भ देतात, ज्यामध्ये लष्करी नेतृत्व आणि नागरी सरकार एकत्रितपणे निर्णय घेतात. आता मात्र ही परिस्थिती बदलणार आहे. १९७३ नंतर पहिल्यांदाच पंतप्रधानांनी लष्करप्रमुख मुनीर यांची ‘फील्ड मार्शल’ म्हणून नियुक्ती केली आहे आणि आता त्यांना ‘संवैधानिक संरक्षण’ प्रदान करणे आवश्यक होते.त्यासाठी घटनादुरुस्ती करण्यात आली. गेल्या वर्षी पाकिस्तान लष्कर कायद्यातील दुरुस्तीने लष्करप्रमुखांचा कार्यकाळ वाढवला होता; परंतु त्यांच्या नियुक्तीच्या वेळी मुनीर यांच्यासाठी तीन वर्षांची अधिसूचना जारी करण्यात आली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’ची धास्ती घेतलेल्या पाकिस्तानने घटनेमध्ये २७ वी दुरुस्ती केली. हे करताना तिथल्या सरकारने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. लष्करप्रमुखांकडे जादा अधिकार सोपवताना पाकिस्तानचे लोकनियुक्त सरकार त्यांच्या हातची कळसूत्री बाहुली ठरणार आहे. या निर्णयाविरोधात माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष रस्त्यावर उतरला असला, तरी त्याला काहीच अर्थ नाही. हे विधेयक सशस्त्र दलांशी संबंधित असलेल्या संविधानाच्या कलम २४३ मध्ये सुधारणा करते. या विधेयकाअंतर्गत राष्ट्रपती पंतप्रधानांशी सल्लामसलत करून लष्करप्रमुख आणि संरक्षणप्रमुखांची नियुक्ती करतील. लष्करप्रमुख आता संरक्षण दलाचेही प्रमुख असतील. शिवाय, संरक्षण प्रमुख पंतप्रधानांशी सल्लामसलत करून राष्ट्रीय धोरणात्मक कमांडच्या प्रमुखाची नियुक्ती करतील.मुनीर यांना आधीच ‘फील्ड मार्शल’चा दर्जा देण्यात आला होता. ताज्या संविधान दुरुस्ती विधेयकामुळे त्याला घटनात्मक मान्यता मिळाली. मुनीर यांच्याकडे ‘फील्ड मार्शल’चे पद आणि विशेषाधिकार आयुष्यभर राहतील. याव्यतिरिक्त, संयुक्त ‘चीफ ऑफ स्टाफ कमिटी’च्या अध्यक्षपदाची पदवी रद्द केली जाईल. नवीन कायदा सरकारला फील्ड मार्शल, एअर फोर्स मार्शल आणि ‘ॲडमिरल ऑफ द फ्लीट’ या पदांवर अधिकाऱ्यांना बढती देण्याचा अधिकार देतो. पाकिस्तानच्या इतिहासात या पदावर बढती मिळालेले ते दुसरे सर्वोच्च लष्करी अधिकारी बनले. या व्यतिरिक्त, लष्करी समन्वय सुधारण्यासाठी त्यांनी संरक्षण दलप्रमुख पद निर्माण करण्याची योजना आखली. नव्या घटनादुरुस्तीनंतर पंतप्रधानही ‘फील्ड मार्शल’ला काढून टाकू शकत नाहीत. पंतप्रधान ‘राष्ट्रीय स्ट्रॅटेजिक कमांड’च्या कमांडरची नियुक्ती करतील. त्यामुळे पाकिस्तानच्या कमांड रचनेवर लष्करी नियंत्रण स्थापित होईल.शिवाय, पंतप्रधानांना ‘फील्ड मार्शल’ची पदवी काढण्याचा, महाभियोग चालवण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राहणार नाही. निवृत्तीनंतर फील्ड मार्शलना अतिरिक्त जबाबदाऱ्या देता येतील. शरीफ यांच्या सरकारने लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल यांच्या पदांना संवैधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुनीर यांच्या अधिकारांमध्ये वाढ करण्यासाठी एक घटनात्मक सुधारणा आणण्यात आली आहे. संसदेत २७ व्या घटनात्मक दुरुस्तीमुळे लष्करप्रमुखांना प्रचंड अधिकार मिळणार आहेत. या दुरुस्तीमुळे संरक्षण दल प्रमुख हे एक नवीन पद निर्माण होईल. मुनीर यांच्याकडे पंतप्रधानांपेक्षा जास्त अधिकार असल्याचे म्हटले जात असले, तरी ते २७व्या घटनादुरुस्तीद्वारे स्वतःसाठी आजीवन सुरक्षा भिंत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.या दुरुस्तीमुळे ‘फील्ड मार्शल’ना आजीवन विशेषाधिकार मिळतील आणि त्यांच्याविरुद्ध आयुष्यभर कोणताही खटला दाखल करता येणार नाही. देशाला झालेल्या नुकसानासाठी त्यांना जबाबदार धरले जाण्याची भीती आहे, म्हणून ते या वादग्रस्त दुरुस्तीद्वारे स्वतःसाठी आजीवन संरक्षण सुनिश्चित करत आहेत. अर्थात या खेळामागे अमेरिकेचा हात असू शकतो. मात्र एखादा फुगा अशा प्रकारे किती फुगवता येतो, याला मर्यादा असतात, हे पाकिस्तानी प्रशासक विसरलेले दिसतात.- प्रा. जयसिंग यादव(लेखक राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत)

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 1:30 am

Range Hills Metro: अखेर मुहूर्त सापडला! रेंजहिल्स मेट्रो स्टेशनच्या कामाला वेग, प्रवाशांची प्रतीक्षा संपणार

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर पिंपरी ते सिव्हिल कोर्ट दरम्यान मेट्रो १ ऑगस्ट २०२३ ला सुरू झाली. असे असले तरी, अद्याप रेंजहिल्स मेट्रो स्टेशन सुरू झालेले नाही. या स्टेशनचे काम महामेट्रोने नुकतेच सुरू केले आहे.पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर ६ मार्च २०२२ पासून मेट्रो सुरू झाली. नवीन मेट्रोचा आनंद घेण्यासाठी या […] The post Range Hills Metro: अखेर मुहूर्त सापडला! रेंजहिल्स मेट्रो स्टेशनच्या कामाला वेग, प्रवाशांची प्रतीक्षा संपणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 1:15 am

जमीन घोटाळ्याप्रकरणी शेख हसीनांना २१ वर्षांची शिक्षा!

मुलगा-मुलीलाही प्रत्येकी ५ वर्षांचा तुरुंगवासनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबासाठी आजचा दिवस मोठा धक्का देणारा ठरला आहे. ढाका येथील एका न्यायालयाने जमीन घोटाळ्याशी संबंधित तीन प्रकरणांमध्ये शेख हसीना यांना एकूण २१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या कुटुंबावरही या निर्णयाचा मोठा परिणाम झाला असून, हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद जॉय आणि कन्या सायमा वाजेद पुतुल यांनाही प्रत्येकी ५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.बांगलादेशच्या राजकारणात हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. ढाका येथील विशेष न्यायाधीश-५ मोहम्मद अब्दुल्लाह अल मामून यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल गुरुवारी (२७ नोव्हेंबर) दिला. भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांखाली ही कारवाई झाली आहे. याआधीच, जुलै २०२४ च्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी ‘मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी’ क्राइम्स ट्रिब्यूनलने हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.न्यायालयाने ज्या तीन प्रकरणांमध्ये गुरुवारी निर्णय दिला, त्यात शेख हसीना यांच्यावर ढाका येथील पुरबाचल परिसरात सरकारी भूखंडांचे अवैध वाटप स्वतःच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी केल्याचा आरोप आहे. शेख हसीना यांना प्रत्येक प्रकरणात ७-७ वर्षांची शिक्षा, अशी एकूण २१ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तर, जमीन घोटाळ्याशी संबंधित उर्वरित तीन प्रकरणांवर १ डिसेंबर रोजी निर्णय येणार आहे, त्यामुळे हसीना यांची शिक्षा वाढण्याची शक्यता आहे.या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात शेख हसीना यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही आरोपी बनवण्यात आले होते. शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय यांना न्यायालयाने ५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा आणि १ लाख टाका दंड ठोठावला आहे. तर, मुलगी सायमा वाजेद पुतुल यांनाही ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी अँटी-करप्शन कमिशनने जानेवारीमध्ये सुरू केली होती. तथापि, हसीना आणि त्यांच्या कुटुंबाने हे सर्व आरोप राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचे सांगत सतत आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.भारताकडे प्रत्यार्पणाची विनंतीजुलै २०२४ मध्ये झालेल्या प्रचंड विद्यार्थी आंदोलनानंतर शेख हसीना यांचे सरकार कोसळले. ५ ऑगस्ट २०२४ रोजी त्या देश सोडून पळून गेल्या आणि त्यांनी भारतात आश्रय घेतला. आता ढाका येथील हंगामी सरकारने शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताकडे केली आहे. भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी बुधवारी सांगितले की, भारताला विनंती अर्ज मिळाला असून, त्याची कायदेशीर तपासणी सुरू आहे.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 1:10 am

PCMC News: ‘सुविधा’नव्हे, हा तर फक्त ‘देखावा’! महापालिकेतील ‘त्या’कक्षाचे सत्य आले समोर..उद्योजकांची नाराजी

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – शहरातील उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘उद्योग सुविधा कक्ष’ स्थापन केला. मात्र, हा कक्ष पूर्णपणे ठप्प असून हा महापालिकेचा फक्त देखावा असल्याचे समोर आले आहे. उद्योगांना कोणतीही मदत होत नसल्याचा आरोप करीत उद्योजकांनी प्रशासनाविरुध्द नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा कक्ष तयार करणाऱ्या अधिकारी, सल्लागारांचेही पितळे उघड पडले आहे. राज्य सरकारच्या […] The post PCMC News: ‘सुविधा’ नव्हे, हा तर फक्त ‘देखावा’! महापालिकेतील ‘त्या’ कक्षाचे सत्य आले समोर..उद्योजकांची नाराजी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 1:00 am

Wai Municipal Election: नगरपालिका क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासाच्या योजना राबवणार –चंद्रशेखर बावनकुळे

प्रभात वृत्तसेवा वाई – वाई नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा उमेदवारांना विजय मिळवून देण्याचे आवाहन केले. भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या या सभेत त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडून नगरपालिका क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक मोठ्या योजना राबविल्या जाणार असल्याचे सांगितले.येथील साेनगिरवाडीमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ आयाेजित ते […] The post Wai Municipal Election: नगरपालिका क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासाच्या योजना राबवणार – चंद्रशेखर बावनकुळे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 12:45 am

Satara Election: पालिकेच्या आखाड्यात शिवेंद्रराजेंची एन्ट्री! पदयात्रेने शहर ढवळून निघाले; निकालाबाबत केला ‘हा’मोठा दावा

प्रभात वृत्तसेवा सातारा – सातारा नगर पालिकेच्या निवडणुकीनिमित्त भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शहरात पदयात्रांचा धडाका सुरु ठेवला आहे. यामुळे वातावरण ढवळून निघाले असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांच्यासह भाजपच्या सर्व उमेदवारांना मताधिक्य देण्याचा निर्धार सातारकरांनी केला आहे. दरम्यान, सातारा शहराच्या चौफेर विकासासाठी ‘कमळ’ हाच पर्याय असून […] The post Satara Election: पालिकेच्या आखाड्यात शिवेंद्रराजेंची एन्ट्री! पदयात्रेने शहर ढवळून निघाले; निकालाबाबत केला ‘हा’ मोठा दावा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 12:30 am

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २८ नोव्हेंबर २०२५

पंचांगआज मिती मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी शके १९४७, चंद्र नक्षत्र शततारका, योग व्याघात चंद्र राशी कुंभ. भारतीय सौर ७ पौष शके १९४७, शुक्रवार, दि. २८ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.५३, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय १२.५६, मुंबईचा चंद्रास्त ००.५३ उद्याची, राहू काळ ११.०२ ते १२.२६. दुर्गाष्टमी, महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी, शुभ दिवस - दुपारी १२.२७नंतर.दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : महत्त्वाची कामे मार्गी लागतील.वृषभ : पत प्रतिष्ठा वाढेल.मिथुन : मनावरील ताण निघून जाईल, अडचणी दूर होतील.कर्क : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.सिंह : समाजातील मान्यवर व्यक्तींच्या गाठीभेटी होतील.कन्या : नवीन नवीन संधी मिळतील.तूळ : भाग्य साथ देईल.वृश्चिक : महत्त्वाची कामे करू नका.धनू : अचानक धनलाभाची शक्यता.मकर : आपल्याला झेपतील एवढीच कामे घ्या.कुंभ : वादविवाद टाळा.मीन : आर्थिक बाजू चांगली राहील.

फीड फीडबर्नर 28 Nov 2025 12:30 am

Satara News: जुन्या रजिस्टरात दडलेला हक्क! कोयना भूकंपग्रस्तांच्या लाखो नोंदी आता डिजिटल होणार

प्रभात वृत्तसेवा कोयनानगर – ११ डिसेंबर १९६७ च्या प्रलयंकारी भूकंपानंतर शासनाने मदत व पुनर्वसनासाठी तयार केलेली कोयना भूकंपग्रस्तांची ६१० रजिस्टर आज अर्धशतकानंतर अक्षरशः मोडकळीला आलेली आहेत. नोंदी धूसर, पान, तुटकी आणि अनेक ठिकाणी माहिती अपूर्ण असल्याने भूकंपग्रस्तांच्या दाखल्यांमध्ये वर्षानुवर्षे अडथळे निर्माण होत होते. आता या सर्व रजिस्टरचे स्कॅनिंग आणि डिजिटल स्वरूपात जतन करण्याचे मोठे काम […] The post Satara News: जुन्या रजिस्टरात दडलेला हक्क! कोयना भूकंपग्रस्तांच्या लाखो नोंदी आता डिजिटल होणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Nov 2025 12:15 am

श्रीलंकेत ११ दिवसांपासून पावसाचे तांडव!

पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत ३१ जणांचा बळी; १४ बेपत्तानवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस, पूर आणि विनाशकारी भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तींमध्ये आतापर्यंत ३१ जणांना मृत्यू झाला आहे. तर, अजूनही १४ जण बेपत्ता आहे. या आपत्तीमुळे देशभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.सर्वाधिक १८ मृत्यू एकट्या मध्यवर्ती डोंगराळ भागात झाले आहेत. अडाडेराना न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, सुमारे १० लोक जखमी झाले असून, अजूनही १४ जण बेपत्ता आहेत. एका थरारक घटनेत, कुंबुक्काना येथे एक प्रवासी बस वाढत्या पाण्यात अडकली होती. मात्र, आपत्कालीन पथकांनी तत्परता दाखवत बसमधील २३ प्रवाशांना वाचवले, अशी माहिती डेली मिरर ऑनलाइनने दिली आहे. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि मदत कार्याचे नियोजन करण्यासाठी अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. देशातील एकूण २५ पैकी १७ प्रशासकीय जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या आग्नेय भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता खोल दाबाच्या पट्ट्यात तीव्र होण्याची शक्यता आहे. हा कमी दाबाचा पट्टा सध्या बट्टीकोलोआपासून २१० किलोमीटर आग्नेयेस स्थित आहे आणि तो पुढील १२ तासांत वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. देशाच्या विविध भागात २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 11:10 pm

SMAT 2025 : उर्विल पटेलचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत कहर! अवघ्या इतक्या चेंडूत ठोकले वादळी शतक

Urvil Patel smashes 31 ball century in SMAT 2025 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. यामध्ये अनेक आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनी कमाल केली आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत असलेल्या उर्विल पटेल याने धुमाकुळ घातला असून त्याच्या कामगिरीची चर्चा देशात होत आहे. गुजरातचा कर्णधार उर्विलने फक्त 31 चेंडूत शतक ठोकून धुमाकूळ घातला. हैदराबादच्या जिमखाना […] The post SMAT 2025 : उर्विल पटेलचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत कहर! अवघ्या इतक्या चेंडूत ठोकले वादळी शतक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 10:58 pm

1 तारखेला रात्री 10 वाजता प्रचार थांबेल: नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक प्रचारात मोठे बदल, जाणून घ्या सर्वकाही

मुंबई : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीर प्रचारबंदीच्या कालावधीबाबत सुधारित आदेश जारी केले आहेत. या सुधारणेनुसार, मतदान सुरू होण्यापूर्वी प्रचाराची समाप्ती कधी होईल याबद्दलची पूर्वीची तरतूद बदलण्यात आली आहे. आयोगाच्या ४ नोव्हेंबरच्या एकत्रित आदेशातील आचारसंहितेबाबत तरतूद सुधारित करण्यात आली आहे. त्यानुसार आता मतदान सुरू होण्याच्या दिवशीच्या अगोदरच्या दिवशी रात्री १० […] The post 1 तारखेला रात्री 10 वाजता प्रचार थांबेल: नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक प्रचारात मोठे बदल, जाणून घ्या सर्वकाही appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 10:48 pm

शिक्षक पात्रता परीक्षेत गोंधळ: कोल्हापूरच्या पोलीस पथकाकडून परीक्षा परिषदेत कसून चौकशी, TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे संच तपासासाठी ताब्यात

पुणे – कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने गेल्या आठवड्यात शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्याची मोठी कारवाई करत कसून तपास सुरू ठेवला आहे. त्यात या कोल्हापूरच्या पोलीस पथकाने पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयात तळ ठोकून अधिकाऱ्यांकडे टीईटी परीक्षेबाबत सखोल चौकशी करत प्रश्नपत्रिकांचे संच तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे […] The post शिक्षक पात्रता परीक्षेत गोंधळ: कोल्हापूरच्या पोलीस पथकाकडून परीक्षा परिषदेत कसून चौकशी, TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे संच तपासासाठी ताब्यात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 10:37 pm

WPL 2026 Auction चा महासंग्राम! यंदाच्या लिलावात टॉप-५ सर्वात महागडे खेळाडू कोण ठरले? जाणून घ्या

WPL 2026 Mega Auction Top 5 Most Expensive Players : महिला प्रीमियर लीग (WPL 2026) २०२६ साठी नवी दिल्ली येथे झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये फ्रेंचायझींनी खेळाडूंवर अक्षरशः पैशांचा वर्षाव केला. अनेक स्टार खेळाडूंसाठी संघात मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक-फलंदाज अॅलिसा हिली हिला मात्र कोणताही खरेदीदार मिळाला नाही. या ऑक्शनची सर्वात महागडी खेळाडू म्हणून […] The post WPL 2026 Auction चा महासंग्राम! यंदाच्या लिलावात टॉप-५ सर्वात महागडे खेळाडू कोण ठरले? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 10:26 pm

Gauri Garje Case : अनंत गर्जेला २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Gauri Garje Case : महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याला २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. न्यायालयाने हा आदेश दिला आहे. अनंत गर्जे हा डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणातला मुख्य संशयित आरोपी आहे.डॉ. गौरी गर्जेने राहत्या घरात आत्महत्या केल्याची माहिती उघड झाल्यानंतर सुरू झालेल्या तपासात अनेक नवीन बाबी समोर येत आहेत. प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालानुसार, गौरीच्या गळ्यावर दाब पडल्याचे तसेच तिच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे नमूद झाले आहे. केवळ गौरीच नव्हे, तर अनंत गर्जेच्याही शरीरावर खुणा आढळल्या असल्याने ही घटना नेमकी कशामुळे घडली, यावर नवीन प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याशिवाय पोलिसांना मिळालेल्या कॉल रेकॉर्डिंग्स आणि घरातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये काही संशयास्पद बाबी असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे. या सर्व पुराव्यांची सखोल तपासणी करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्यामुळे अनंत गर्जेची कोठडी वाढवण्यात आली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, गौरीच्या पतीसोबत नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर मारहाण, मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप ठेऊन बीएनएसच्या १०८, ८५, ३५२, ३५१(२) या कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या जबाबात, गौरीला किरण नावाच्या व्यक्तीच्या पहिल्या पत्नीच्या गर्भधारणेबाबतची काही कागदपत्रे मिळाल्यानंतर ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती, अशी माहिती दिली आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, पोस्टमॉर्टम अहवाल, जखमांचे स्वरूप, मोबाईलमधील संभाषण आणि सीसीटीव्ही फूटेज यांच्या आधारे पुढील महत्त्वाचे खुलासे समोर येऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 10:10 pm

सोमवार आणि मंगळवारी मुंबईत पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) -मुंबई (३) जलवाहिनीवर, अमर महल भूमिगत बोगद्याच्या (१ व २) शाफ्टला जोडणाऱ्या २५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी छेद-जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या अनुषंगाने सोमवार, १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्या पासून हाती घेण्यात येणार आहे. हे काम मंगळवारी २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. Ya कालावधीत एकूण ११ प्रशासकीय विभागांमध्ये पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या कालावधीत काही विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, तर काही विभागांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद अर्थात १०० टक्के पाणी कपात राहणार आहे.घाटकोपर (पूर्व) येथील छेडा नगर जंक्शन परिसरात असलेल्या ३००० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला अमर महल बोगदा शाफ्टशी जोडणाऱ्या २५०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी छेद जोडणी करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. सोमवार, १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून ते मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत म्‍हणजेच एकूण ३० तास हे कामकाज करण्‍यात येणार आहे. या कामकाजामुळे शहर विभागातील ए, बी, सी, ई, एफ दक्षिण, एफ उत्‍तर विभाग अर्थात कुलाबा ते परळ, शीव आदी भागात आणि पूर्व उपनगरातील एम पूर्व, एम पश्चिम, एल, एस व एन विभागात कुर्ला भांडुप, नाहूर, चेंबूर, देवनार, गोवंडी आदी भागात पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या कालावधीत काही विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल तसेच काही विभागांचा पाणीपुरवठा बंद राहील.तरी संबंधित परिसरातील नागरिकांनी या कालावधीसाठी पाण्याचा आवश्यक साठा करावा. पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.प्रभावित विभागांचा तपशील पुढीलप्रमाणे :‘ए’ विभाग :* (बीएचआर जलाशय पुरवठा क्षेत्र) सेंट जॉर्ज रुग्णालय, पी. डी'मेलो मार्ग, रामगड झोपडपट्टी, भारतीय रिझर्व्ह बँक, नौदल डॉकयार्ड, डाकघर (जी. पी. ओ.) जंक्शन ते रिगल सिनेमा जंक्शन पर्यंत, शहीद भगतसिंग मार्गाच्या बाजूने‘बी’ विभाग :* वाडीबंदर परिक्षेत्र - नंदलाल जानी मार्ग, लीलाधर सह मार्ग, दाणाबंदर, संत तुकाराम मार्ग, पी. डी.’ मेलो मार्ग, वाडीबंदरउमरखाडी, नूरबाग चिंचबंदर, वालपाखाडी, कारागृह मार्ग, रामचंद्र भट्ट मार्ग, आनंदराव सुर्वे मार्ग, सामंतभाई नानजी मार्ग, डॉ. माहेश्वरी मार्ग, केशवजी नाईक, भाग एस. व्ही. पी., शायदा मार्ग, फ्लँक मार्ग, नवरोजी टेकडी, तांडेल (निशाण), निशाणपाडा रस्ता. मध्य रेल्वे परिक्षेत्र - रेल्वे क्षेत्र मुंबई बंदर न्यास (बी. पी. टी.) क्षेत्रडोंगरी ‘बी’ - तांडेल, टनटनपुरा, सॅम्युअल, मोहम्मद उमर, कोकीळ मार्ग, आय. एम. एम., वाय. एम. मार्ग, दोंताड, खडक, इस्राईल मोहल्ला, धोबी, शेरीफ देवजी, व्ही. व्ही. चंदन, दरियास्थान, काजी सय्यद, सय्यद मुखरी, इसाजी, नृसिंहनाथ, जंजीकर, रघुनाथ महाराज, जुना बंगालीपुरा, भंडारी, अभयचंद गांधी मार्ग, लोकमान्य टिळक रस्ता, निशाणपाडा, मशीद बंदर.बाबुला टँक परिक्षेत्र - इमामवाडा, आय. आर. मार्ग, मोहम्मद अली, मेमनवाडा, पीरू गल्ली, कांबेकर, नाखोडा, कोळसा, नारायण धुरू, अब्दुर रहमान रस्ता‘सी’ विभाग :* बाबुला टँक परिक्षेत्र - इब्राहिम रहिमतुल्ला मार्ग, मौलाना शौकत अली मार्ग, मौलाना आझाद मार्ग, एस. व्ही. पी. मार्ग, मटन रस्ता, चिमना बुचर रस्ता, बारा इमाम मार्ग, गुज्जर रस्ता, खारा टाकी मार्ग, ब्रिगेडियर उस्मान मार्ग, निजाम रस्ता, मशीद रस्ता, इस्माईल कुरटे मार्ग, बनियान रस्ता, किका रस्ता, बापू गोहल्ला मार्ग, अलीखोटे मार्ग. त्र्यंबक परशुराम मार्ग, दुसरा पठाण रस्ता, पहिला पठाण रस्ता, डॉ. मित्रसेन महिमतुरा मार्ग (तिसरा कुंभारवाडा), संतसेना महाराज मार्ग (दुसरा कुंभारवाडा), भंडारी रस्ता (पहिला कुंभारवाडा), दुर्गादेवी स्ट्रीट आणि दुसरी डंकन गल्ली‘ई’ विभाग : नेसबिट मार्ग, ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, बदलूपुरा, नागपाडा, शेख हाफिजुद्दीन मार्ग, मेघराज शेट्टी मार्ग, गणेश हरी पारुंडेकर मार्ग, पाईस रस्ता, मुस्सा किल्लेदार मार्ग, सोफिया झुबेर मार्ग, डिमटीमकर मार्ग, एम. ए. मार्ग, टँक पाखाडी मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, के. के. रस्ता.मुंबई सेंट्रल पुरवठा - एम. एस. अली मार्ग, बेलासिस मार्ग, कामाठीपुरा, एस. पी. मार्ग, शुक्लाजी रस्ता, मनाजी राजूजी मार्ग, आग्रीपाडा.बाबुला टाकी पुरवठा - डिमटीमकर मार्ग, उंद्रिया रस्ता, खंडिया रस्ता, टेमकर रस्ता, शेख कमरुद्दीन रस्ता, मस्तान टँक मार्ग, टँक रस्ता, काझिपुरा, डंकन मार्ग, जे. जे. मार्ग. दत्ताराम लाड मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भाई बाल मुकुंद मार्ग, काळाचौकी, चिंचपोकळी, टी. बी. कदम मार्ग'एफ' दक्षिण पुरवठा परिक्षेत्र - म्हातार पाखाडी परिक्षेत्र + ताडवाडी म्हातार पाखाडी मार्ग, सेंट मेरी मार्ग, नेसबिट मार्ग, ताडवाडी, रेल्वे कुंपण, शिवदास चापसी मार्ग.डॉकयार्ड रोड परिक्षेत्र - माझगाव कोळीवाडा, नरसू नाखवा विठोबा मार्ग, ब्रह्मदेव खोत मार्ग, दर्गा गल्ली, नाथ पै मार्ग, डिलिमा रस्ता, रुग्णालय गल्ली, चर्च गल्ली, बेकर गल्ली, नवाब टाकी पूल.हाथीबाग परिक्षेत्र - हातीबाग परिसर, शेठ मोतिशाह गल्ली.बी. पी. टी. परिक्षेत्र - मुंबई बंदर न्यास (बी. पी. टी.) क्षेत्र, दारुखाना, लकडा बंदर.रे रोड परिक्षेत्र - बॅरिस्टर नाथ पै मार्ग, मोदी कुंपण, ऍटलस मिल कुंपण, घोडपदेव परिसर.माउंट मार्ग परिक्षेत्र - रामभाऊ भोगले मार्ग, फेर बंदर नाका, राणीबाग, घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, शेठ मोतिशाह गल्ली, टी. बी. कदम मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. मस्कारेऱहास मार्ग, डी. पी. वाडी, काळाचौकी, नारियल वाडी, संत सावता मार्ग, चापसी भीमजी मार्गजे. जे. रुग्णालय - जे. जे. रुग्णालय (दिनांक १ व २ डिसेंबर २०२५ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा)‘एफ उत्तर’ विभाग :* परिक्षेत्र ०१ शीव (पश्चिम), शीव (पूर्व), वडाळा (पूर्व), दादर (पूर्व व पश्चिम)कोरबा मिठागर, आनंदवाडी, मुंबई बंदर न्यास (बी. पी. टी.), प्रवेशद्वार क्रमांक ०४, शहीद भगतसिंग मार्ग.प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, डब्ल्यू. टी. टी., न्यू कफ परेड, अल्मेडा कंपाऊंडरावळी उच्चस्तरीय जलाशय, केंद्रीय कर्मचारी वसाहत (CGS) पुरवठारावळी उच्चस्तरीय जलाशय, केंद्रीय कर्मचारी वसाहत (CGS) विशेष पुरवठारावळी निम्नस्तरीय जलाशय. कोकरी आगार, केंद्रीय कर्मचारी वसाहत, मुंबई बंदर न्यास पुरवठाशीव (सायन) हॉस्पिटल परिक्षेत्र०७ कोरबा मिठागर (विशेष पुरवठा)अभ्युदय नगर परिक्षेत्र ०१के. ई. एम., टाटा, एम. जी. एम., वाडियाशिवडी, वडाळा पूर्व/पश्चिमडॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, दिनशा पतित मार्ग, एस. एस. राव मार्ग, डॉ. एमेस्ट बोर्जेस मार्ग, परमार गुरुजी मार्ग, गोखले मार्गजेरबाई वाडिया मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्गनायगावपरेल गाव, आचार्य धोंडे मार्ग, विजयकुमार वाळिंबे मार्ग इत्यादीशिवडी स्मशानभूमी रस्ता, टी. जे. मार्ग, गणेश नगर झोपडपट्टी, शिवडी छेद मार्गशिवडी पूर्व गडी अड्डा, शिवडी कोळीवाडा.मुंबई बंदर न्यास परिक्षेत्रकाळेवाडी परिक्षेत्र – जिजामाता नगर, राम टेकडी मार्ग, मिंट वसाहत.पूर्व उपनगरे‘एल’ विभाग : नवीन टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर , नेहरू नगर, मदर डेरी मार्ग, शिवसृष्टी मार्ग, नाईक नगर, जागृती नगर, केदारनाथ मंदीर मार्ग, स. गो. बर्वे मार्ग, कुर्ला (पूर्व), नवरेबाग, कामा नगर, हनुमान नगर , पोलिस वसाहत , कसाई वाडा, चुनाभट्टी , राहुल नगर, एव्हरार्ड नगर, कुरेशी नगर, तक्षशीला नगर, कॅफे गल्ली, पान बाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अलिदादा इस्टेट, राजीव गांधी नगर, स्वदेशी जीवन चाळ, चुनाभट्टी फाटक, प्रेम नगर, हिल मार्ग, मुक्तादेवी मार्ग, ताडवाडी, समर्थ नगर‘एम पूर्व’ विभाग : लल्लूभाई कुंपण, कमला रमण नगर, रमण मामा नगर, शिवाजी नगर, बैंगणवाडी, लोटस वसाहत, गौतम नगर, गायकवाड नगर, अयोध्या नगर, शिवाजी नगर, वाशी नाका, भारत नगर, चिता कॅम्प, मानखुर्द. साठे नगर, झाकीर हुसेन नगर, देवनार गाव, देवनार वसाहत, न्यू भारत नगर, हशू अडवाणी नगर, म्हाडा इमारती, वाशी नाका, वाढवली गाव, भाभा अणुसंशोधन केंद्र (बी. ए. आर. सी.) वसाहत, नटवर पारेख कंपाऊंड.,रफिक नगर, मंडाळा गाव, न्यू मंडाळा, पद्मा नगर, विष्णू नगर, एल. यू. गडकरी मार्ग, आर. एन. ए. उद्यान, कुकरेजा इमारती वाशी नाका, सह्याद्री नगर, चिता कॅम्प, महाराष्ट्र नगर, म्हाडा इमारती, इंडियन ऑइल नगरबी. डी. पाटील मार्ग येथील रिफायनरी विभाग‘एम पश्चिम’ विभाग : मैत्री पार्क, घाटला, चेंबूर गावठाण, सुभाष नगर, लालडोंगर, सिद्धार्थ वसाहत, स्वस्तिक पार्क, पोस्टल वसाहत.चेंबूर कॅम्प, एम. एस. इमारत १-३२माहुलगाव, म्हैसूर वसाहत, वाशीगाव, वाशीनाका, कोकण नगर, जिजामाता नगर, अंबापाडा. भक्ती पार्क, एम. एम. आर. डी. ए. इमारतीटिळक नगर, ठक्कर बाप्पा वसाहत, पेस्तम सागर, शेल वसाहत, सहकार नगर, पी. एल. लोखंडे मार्ग, छेडा नगर, पी. वाय. थोरात मार्ग, मुकुंद नगर, नागेवाडी, महात्मा फुले नगर‘एन’ विभाग : विद्याविहार (पूर्व), चित्तरंजन नगर, राजावाडीसंपूर्ण घाटकोपर (पूर्व) विभाग, पंत नगर, गारोडिया नगर, लक्ष्मी नगर, बेस्ट वसाहत, नायडू वसाहत, रमाबाई नगर, कामराज नगर, विक्रोळी गाव, गोदरेज ट्रीज.घाटकोपर (पश्चिम) येथील काही परिसर, विद्याविहार (पश्चिम), नारायण नगर, महात्मा गांधी मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग ते एन. एस. एस. मार्ग ते श्रेयस सिनेमा, कामा गल्ली, किरोळ आणि खलई गांव, पारशीवाडी, चिराग नगर, महेंद्र उद्यान, नवीन माणेकलाल.सर्वोदय रुग्णालय, जीवदया लेन, भीमनगर येथील पाण्याच्या टाक्या, नित्यानंद नगर, पवार चाळ, पाटीदार वाडी, गंगावाडी, बरोट वाडी (दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद राहील व दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा)‘एस’ विभाग :* नाहूर (पूर्व), भांडुप (पूर्व), कांजूर (पूर्व), टागोर नगर, कन्नमवार नगर विक्रोळी (पूर्व)

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 10:10 pm

मतचोरीवरून लक्ष विचलित करण्याचा खटाटोप; कॉंग्रेसचा भाजपवर पलटवार

नवी दिल्ली : मतचोरी, सदोष मतदारयाद्या, बुथस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) मृत्यूच्या घटना, अरूणाचल प्रदेशवर चीनचा दावा आदी मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा भाजपचा खटाटोप आहे. त्यातून तो पक्ष आमच्या नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटसचा विषय पुढे करत आहे, असा पलटवार कॉंग्रेसने केला. भाजपच्या आरोपांचा समाचार घेण्यासाठी कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपशी संबंधित काही सोशल […] The post मतचोरीवरून लक्ष विचलित करण्याचा खटाटोप; कॉंग्रेसचा भाजपवर पलटवार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 10:07 pm

सावरकर मानहानी प्रकरणात नवा ‘ट्विस्ट’: वादग्रस्त भाषणाची ‘सीडी’न्यायालयात चालेना, पुरावे नोंदवण्यास विलंबावर राहुल गांधींच्या वकिलांचा आक्षेप

पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वादग्रस्त भाषणाची सीडी न्यायालयातील सरतपासणीदरम्यान ‘प्ले’ न झाल्याने नवा ‘ट्विस्ट’ निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर, या प्रकरणी अत्यंत महत्त्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात दाखल केलेल्या दोन सीडी चालविण्यात याव्यात, अशी मागणी तक्रारदार सात्यकी सावरकरांच्या वकिलांनी केली. त्यावर, सरतपासणी घेण्यासाठी तक्रारदारांच्या वकिलांकडून वारंवार मुदतवाढ घेण्यात […] The post सावरकर मानहानी प्रकरणात नवा ‘ट्विस्ट’: वादग्रस्त भाषणाची ‘सीडी’ न्यायालयात चालेना, पुरावे नोंदवण्यास विलंबावर राहुल गांधींच्या वकिलांचा आक्षेप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 10:04 pm

अक्षय कुमारचा मंत्र: ‘आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली’; खासदार क्रीडा महोत्सवाची सांगता, विजेत्यांचा गौरव

पुणे : ‘लहान मुले हल्ली मोबाइल गेममध्ये रमली आहेत. त्यामुळे मैदानात येणाऱ्या मुलांची संख्या कमी झाली आहे. अशा परिस्थितीत पुण्यातून ४४ हजार खेळाडू मैदानात उतरतात, ही मोठी गोष्ट आहे. खेळातूच उत्तम आरोग्य घडत असते आणि आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे,’ असे मत अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केले. त्याने पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी […] The post अक्षय कुमारचा मंत्र: ‘आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली’; खासदार क्रीडा महोत्सवाची सांगता, विजेत्यांचा गौरव appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 9:50 pm

WinZO च्या संस्थापकांना अटक; 43 कोटी रुपयांचं प्रकरण काय आहे ते जाणून घ्या…

WinZO founders arrested: ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील आघाडीचे नाव असलेल्या WinZO प्लॅटफॉर्मचे संस्थापक पावन नंदा आणि सौम्या सिंह राठौर यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंगच्या गंभीर आरोपांखाली अटक केली आहे. बेंगळुरू येथे चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. रियल-मनी गेम्सवर (Real-Money Games) बंदी आल्यानंतर कंपनीने सुमारे ₹४३ कोटी रुपयांची […] The post WinZO च्या संस्थापकांना अटक; 43 कोटी रुपयांचं प्रकरण काय आहे ते जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 9:43 pm

PM Modi : ब्लाइंड वर्ल्डकप विजेत्या महिला संघाचा पंतप्रधान मोदींकडून खास सन्मान! पाहा VIDEO

PM Modi Meets India Womens Blind Cricket Team : भारतीय दृष्टीहीन महिला क्रिकेट संघाने नेपाळला हरवून महिला ब्लाइंड टी-२० विश्वचषक २०२५ चा पहिलाच खिताब जिंकला होता. अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा ७ विकेट्सने पराभव करत इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयानंतर, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वचषक विजेत्या खेळाडूंची भेट घेऊन त्यांचा उत्साह वाढवला. ज्याचा व्हिडीओ सोशल […] The post PM Modi : ब्लाइंड वर्ल्डकप विजेत्या महिला संघाचा पंतप्रधान मोदींकडून खास सन्मान! पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 9:32 pm