SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
... ...View News by News Source

श्रीलंकेत ११ दिवसांपासून पावसाचे तांडव!

पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत ३१ जणांचा बळी; १४ बेपत्तानवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस, पूर आणि विनाशकारी भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तींमध्ये आतापर्यंत ३१ जणांना मृत्यू झाला आहे. तर, अजूनही १४ जण बेपत्ता आहे. या आपत्तीमुळे देशभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.सर्वाधिक १८ मृत्यू एकट्या मध्यवर्ती डोंगराळ भागात झाले आहेत. अडाडेराना न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, सुमारे १० लोक जखमी झाले असून, अजूनही १४ जण बेपत्ता आहेत. एका थरारक घटनेत, कुंबुक्काना येथे एक प्रवासी बस वाढत्या पाण्यात अडकली होती. मात्र, आपत्कालीन पथकांनी तत्परता दाखवत बसमधील २३ प्रवाशांना वाचवले, अशी माहिती डेली मिरर ऑनलाइनने दिली आहे. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि मदत कार्याचे नियोजन करण्यासाठी अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. देशातील एकूण २५ पैकी १७ प्रशासकीय जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या आग्नेय भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता खोल दाबाच्या पट्ट्यात तीव्र होण्याची शक्यता आहे. हा कमी दाबाचा पट्टा सध्या बट्टीकोलोआपासून २१० किलोमीटर आग्नेयेस स्थित आहे आणि तो पुढील १२ तासांत वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. देशाच्या विविध भागात २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 11:10 pm

SMAT 2025 : उर्विल पटेलचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत कहर! अवघ्या इतक्या चेंडूत ठोकले वादळी शतक

Urvil Patel smashes 31 ball century in SMAT 2025 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. यामध्ये अनेक आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनी कमाल केली आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत असलेल्या उर्विल पटेल याने धुमाकुळ घातला असून त्याच्या कामगिरीची चर्चा देशात होत आहे. गुजरातचा कर्णधार उर्विलने फक्त 31 चेंडूत शतक ठोकून धुमाकूळ घातला. हैदराबादच्या जिमखाना […] The post SMAT 2025 : उर्विल पटेलचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत कहर! अवघ्या इतक्या चेंडूत ठोकले वादळी शतक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 10:58 pm

1 तारखेला रात्री 10 वाजता प्रचार थांबेल: नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक प्रचारात मोठे बदल, जाणून घ्या सर्वकाही

मुंबई : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीर प्रचारबंदीच्या कालावधीबाबत सुधारित आदेश जारी केले आहेत. या सुधारणेनुसार, मतदान सुरू होण्यापूर्वी प्रचाराची समाप्ती कधी होईल याबद्दलची पूर्वीची तरतूद बदलण्यात आली आहे. आयोगाच्या ४ नोव्हेंबरच्या एकत्रित आदेशातील आचारसंहितेबाबत तरतूद सुधारित करण्यात आली आहे. त्यानुसार आता मतदान सुरू होण्याच्या दिवशीच्या अगोदरच्या दिवशी रात्री १० […] The post 1 तारखेला रात्री 10 वाजता प्रचार थांबेल: नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक प्रचारात मोठे बदल, जाणून घ्या सर्वकाही appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 10:48 pm

शिक्षक पात्रता परीक्षेत गोंधळ: कोल्हापूरच्या पोलीस पथकाकडून परीक्षा परिषदेत कसून चौकशी, TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे संच तपासासाठी ताब्यात

पुणे – कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने गेल्या आठवड्यात शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्याची मोठी कारवाई करत कसून तपास सुरू ठेवला आहे. त्यात या कोल्हापूरच्या पोलीस पथकाने पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयात तळ ठोकून अधिकाऱ्यांकडे टीईटी परीक्षेबाबत सखोल चौकशी करत प्रश्नपत्रिकांचे संच तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे […] The post शिक्षक पात्रता परीक्षेत गोंधळ: कोल्हापूरच्या पोलीस पथकाकडून परीक्षा परिषदेत कसून चौकशी, TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे संच तपासासाठी ताब्यात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 10:37 pm

WPL 2026 Auction चा महासंग्राम! यंदाच्या लिलावात टॉप-५ सर्वात महागडे खेळाडू कोण ठरले? जाणून घ्या

WPL 2026 Mega Auction Top 5 Most Expensive Players : महिला प्रीमियर लीग (WPL 2026) २०२६ साठी नवी दिल्ली येथे झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये फ्रेंचायझींनी खेळाडूंवर अक्षरशः पैशांचा वर्षाव केला. अनेक स्टार खेळाडूंसाठी संघात मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक-फलंदाज अॅलिसा हिली हिला मात्र कोणताही खरेदीदार मिळाला नाही. या ऑक्शनची सर्वात महागडी खेळाडू म्हणून […] The post WPL 2026 Auction चा महासंग्राम! यंदाच्या लिलावात टॉप-५ सर्वात महागडे खेळाडू कोण ठरले? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 10:26 pm

Gauri Garje Case : अनंत गर्जेला २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Gauri Garje Case : महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याला २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. न्यायालयाने हा आदेश दिला आहे. अनंत गर्जे हा डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणातला मुख्य संशयित आरोपी आहे.डॉ. गौरी गर्जेने राहत्या घरात आत्महत्या केल्याची माहिती उघड झाल्यानंतर सुरू झालेल्या तपासात अनेक नवीन बाबी समोर येत आहेत. प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालानुसार, गौरीच्या गळ्यावर दाब पडल्याचे तसेच तिच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे नमूद झाले आहे. केवळ गौरीच नव्हे, तर अनंत गर्जेच्याही शरीरावर खुणा आढळल्या असल्याने ही घटना नेमकी कशामुळे घडली, यावर नवीन प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याशिवाय पोलिसांना मिळालेल्या कॉल रेकॉर्डिंग्स आणि घरातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये काही संशयास्पद बाबी असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे. या सर्व पुराव्यांची सखोल तपासणी करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्यामुळे अनंत गर्जेची कोठडी वाढवण्यात आली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, गौरीच्या पतीसोबत नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर मारहाण, मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप ठेऊन बीएनएसच्या १०८, ८५, ३५२, ३५१(२) या कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या जबाबात, गौरीला किरण नावाच्या व्यक्तीच्या पहिल्या पत्नीच्या गर्भधारणेबाबतची काही कागदपत्रे मिळाल्यानंतर ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती, अशी माहिती दिली आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, पोस्टमॉर्टम अहवाल, जखमांचे स्वरूप, मोबाईलमधील संभाषण आणि सीसीटीव्ही फूटेज यांच्या आधारे पुढील महत्त्वाचे खुलासे समोर येऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 10:10 pm

मतचोरीवरून लक्ष विचलित करण्याचा खटाटोप; कॉंग्रेसचा भाजपवर पलटवार

नवी दिल्ली : मतचोरी, सदोष मतदारयाद्या, बुथस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) मृत्यूच्या घटना, अरूणाचल प्रदेशवर चीनचा दावा आदी मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा भाजपचा खटाटोप आहे. त्यातून तो पक्ष आमच्या नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटसचा विषय पुढे करत आहे, असा पलटवार कॉंग्रेसने केला. भाजपच्या आरोपांचा समाचार घेण्यासाठी कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपशी संबंधित काही सोशल […] The post मतचोरीवरून लक्ष विचलित करण्याचा खटाटोप; कॉंग्रेसचा भाजपवर पलटवार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 10:07 pm

सावरकर मानहानी प्रकरणात नवा ‘ट्विस्ट’: वादग्रस्त भाषणाची ‘सीडी’न्यायालयात चालेना, पुरावे नोंदवण्यास विलंबावर राहुल गांधींच्या वकिलांचा आक्षेप

पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वादग्रस्त भाषणाची सीडी न्यायालयातील सरतपासणीदरम्यान ‘प्ले’ न झाल्याने नवा ‘ट्विस्ट’ निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर, या प्रकरणी अत्यंत महत्त्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात दाखल केलेल्या दोन सीडी चालविण्यात याव्यात, अशी मागणी तक्रारदार सात्यकी सावरकरांच्या वकिलांनी केली. त्यावर, सरतपासणी घेण्यासाठी तक्रारदारांच्या वकिलांकडून वारंवार मुदतवाढ घेण्यात […] The post सावरकर मानहानी प्रकरणात नवा ‘ट्विस्ट’: वादग्रस्त भाषणाची ‘सीडी’ न्यायालयात चालेना, पुरावे नोंदवण्यास विलंबावर राहुल गांधींच्या वकिलांचा आक्षेप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 10:04 pm

अक्षय कुमारचा मंत्र: ‘आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली’; खासदार क्रीडा महोत्सवाची सांगता, विजेत्यांचा गौरव

पुणे : ‘लहान मुले हल्ली मोबाइल गेममध्ये रमली आहेत. त्यामुळे मैदानात येणाऱ्या मुलांची संख्या कमी झाली आहे. अशा परिस्थितीत पुण्यातून ४४ हजार खेळाडू मैदानात उतरतात, ही मोठी गोष्ट आहे. खेळातूच उत्तम आरोग्य घडत असते आणि आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे,’ असे मत अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केले. त्याने पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी […] The post अक्षय कुमारचा मंत्र: ‘आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली’; खासदार क्रीडा महोत्सवाची सांगता, विजेत्यांचा गौरव appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 9:50 pm

WinZO च्या संस्थापकांना अटक; 43 कोटी रुपयांचं प्रकरण काय आहे ते जाणून घ्या…

WinZO founders arrested: ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील आघाडीचे नाव असलेल्या WinZO प्लॅटफॉर्मचे संस्थापक पावन नंदा आणि सौम्या सिंह राठौर यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंगच्या गंभीर आरोपांखाली अटक केली आहे. बेंगळुरू येथे चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. रियल-मनी गेम्सवर (Real-Money Games) बंदी आल्यानंतर कंपनीने सुमारे ₹४३ कोटी रुपयांची […] The post WinZO च्या संस्थापकांना अटक; 43 कोटी रुपयांचं प्रकरण काय आहे ते जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 9:43 pm

PM Modi : ब्लाइंड वर्ल्डकप विजेत्या महिला संघाचा पंतप्रधान मोदींकडून खास सन्मान! पाहा VIDEO

PM Modi Meets India Womens Blind Cricket Team : भारतीय दृष्टीहीन महिला क्रिकेट संघाने नेपाळला हरवून महिला ब्लाइंड टी-२० विश्वचषक २०२५ चा पहिलाच खिताब जिंकला होता. अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा ७ विकेट्सने पराभव करत इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयानंतर, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वचषक विजेत्या खेळाडूंची भेट घेऊन त्यांचा उत्साह वाढवला. ज्याचा व्हिडीओ सोशल […] The post PM Modi : ब्लाइंड वर्ल्डकप विजेत्या महिला संघाचा पंतप्रधान मोदींकडून खास सन्मान! पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 9:32 pm

महिला प्रिमीअर लीग २०२६ च्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : महिला प्रीमिअर लीग २०२६ हंगामाच्या तयारीला वेग आला असून गुरूवारी नवी दिल्लीत मेगा ऑक्शन पार पडत आहे. पाचही फ्रँचायझींनी ऑक्शनपूर्वी एकूण १८ खेळाडूंना कायम ठेवले आहे. महिला प्रीमिअर लीग २०२६ चे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. यानुसार स्पर्धेची सुरुवात ९ जानेवारी २०२६ रोजी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर पहिल्या सामन्याने होणार आहे. तर फायनल ५ फेब्रुवारी २०२६ रोजी वडोदरा येथे रंगणार आहे. या वेळापत्रकातील मोठा बदल म्हणजे महिला प्रीमिअर लीग आता जानेवारीत सुरू होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रमांशी संघर्ष टाळण्यासाठी वेळेत बदल करण्यात आला असून, संपूर्ण हंगाम फक्त नवी मुंबई आणि वडोदरा या दोन शहरांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे.यंदाच्या हंगामासाठी १९४ भारतीय आणि ८३ परदेशी अशा एकूण २७७ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. मात्र, त्यापैकी फक्त ७३ खेळाडूंनाच करारबद्ध करण्याची परवानगी आहे आणि त्यापैकी २३ जागा या परदेशी खेळाडूंना राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सोफी डिव्हाईन, सोफी एक्लेस्टन, एलिसा हिली, अमेलिया केर, मेग लॅनिंग, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग आणि लॉरा वॉलव्हार्ड्ट या नावाजलेल्या खेळाडूंचा Marquee यादीत समावेश आहे. त्यामुळे या खेळाडूंसाठी संघांमध्ये जोरदार बोली लावली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.वूमेन्स प्रीमियर लीगच्या खेळाडू लिलावात भारताची अष्टपैलू दीप्ती शर्मा सर्वाधिक किमतीची भारतीय खेळाडू ठरली. श्रेणी टप्प्यात उत्तर प्रदेश योद्ध्यांनी तिच्यासाठी ३ कोटी २० लाख रुपये इतकी हक्क राखून बोली लावून तिला पुन्हा संघात स्थान दिले. भारताच्या महिला क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या दीप्तीवर संघाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला.परदेशी खेळाडूंमध्ये न्यूझीलंडच्या अमेलिया केरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुंबईच्या संघाने तिला ३ कोटी रुपये देत आपल्या ताफ्यात कायम ठेवले. उपयुक्त फलंदाजी व अचूक फिरकीगोलंदाजी या गुणांच्या जोरावर केरची निवड ठरली. लिलावाच्या जलदगती टप्प्यात भारताची अनुभवी गोलंदाज शिखा पांडे सर्वांत महागडी ठरली. उत्तर प्रदेश योद्ध्यांनी तीला २ कोटी ४० लाख रुपये देत आपल्या संघात घेतले. तिच्या अचूक गोलंदाजीचा अनुभव संघाला महत्त्वाचा ठरणार आहे.या तिन्ही खेळाडूंच्या मोठ्या बोलीमुळे आगामी स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. महिला प्रीमियर लीगमधील या लिलावामुळे भारतीय महिला क्रिकेटचा वाढता दर्जा पुन्हा अधोरेखित झाला आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 9:30 pm

धुळ प्रदुषण वाढले, मुंबईतील ५३ बांधकामांना काम थांबवा नोटीस

मुंबई - मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याप्रकरणी मुंबईतील ५३ बांधकामांना ‘कामे थांबवा’ नोटीस मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. तरीही मुंबई महानगरपालिकेडून जारी वायू प्रदूषणासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. बांधकाम स्थळी संवेदक (सेन्सॉर) आधारित वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) मोजणारे संयंत्र अविरतपणे सुरू राहतील हे सुनिश्चित करावे. ही संयंत्रे बंद आढळल्यास संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांनी दिला आहे.वायू प्रदूषण नियंत्रणासाठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई महानगरपालिकेने २८ मुद्यांचा समावेश असलेली सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटकोरपणे पालन होत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिकेकडून सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात वायू प्रदूषणात वाढ निदर्शनास आल्यानंतर वायू प्रदूषणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी या पथकाच्या वतीने २६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत एकूण ५३ बांधकामांना ‘कामे थांबवा’ नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘जी दक्षिण’ विभागातील सिद्धार्थ नगर परिसरातील १७, ‘ई’ विभागातील भायखळा, माझगाव परिसरातील ५, ‘पी उत्तर’ विभागातील मालाड (पश्चिम) परिसरातील ३१ बांधकामांचा समावेश आहेदरम्यान, बांधकामाच्या ठिकाणी संवेदक अर्थात सेन्सॉर आधारित वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणाऱ्या संयंत्रांच्या सद्यस्थितीबाबत अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी मंगळवारी २७ नोव्हेंबर २०२५ आढावा घेतला. मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी ६६२ संवेदक (सेन्सॉर) आधारित वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारे संयंत्र बसविण्यात आले आहेत. तर, २५१ संयंत्र प्रस्थापित करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. एकूण ४०० संयंत्रे ही एकत्रित माहिती संकलनाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या डॅशबोर्डशी संलंग्नित करण्यात आली आहेत. यापैकी, ११७ संयंत्रे सक्रिय नसल्याचे अर्थात बंद असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांना नोटीस बजावल्या जात असून त्यानंतरही याठिकाणची संयंत्र सक्रिय नसल्याचे आढळून आल्यास विभाग (वॉर्ड) स्तरावर नेमण्यात आलेल्या एकूण ९५ भरारी पथकांच्या माध्यमांतून संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. अश्विनी जोशी यांनी दिला आहे .मुंबईतील २०९ बेकऱ्या स्वच्छ इंधनावरबेकरी हेसुद्धा वायू प्रदूषणास कारक घटकांपैकी एक आहेत. मुंबईतील एकूण ५९३ बेकरींपैकी २०९ बेकऱ्या स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या होत्या. महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे ५७ बेकऱ्या स्वच्छ इंधनावर परावर्तित झाल्या आहेत. तर, मागील सहा महिन्यात ७५ बेकऱ्यांनी या परिवर्तनासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच, ८८ बेकऱ्यांनी महानगर गॅस मिळण्यासाठी अर्ज केला आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 9:30 pm

मुंबईतले रस्ते धुळमुक्त करण्यासाठी 'ही'योजना राबवणार

मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘रस्ते स्वच्छता व धुळ नियंत्रण मोहीम’ राबविण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर कार्यरत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कनिष्ठ पर्यवेक्षकांनी दत्तक घेतलेल्या रस्त्यांवर ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवली जाणार आहे.मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग) अविनाश काटे यांच्या देखीरेखीत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीत ‘रस्ते स्वच्छता व धुळ नियंत्रण मोहीम’ आयोजित करण्यात आली आहे.येत्या २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या या मोहीम अंतर्गत, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कनिष्ठ पर्यवेक्षकांनी दत्तक घेतलेल्या रस्त्यांवर सखोल स्वच्छता करण्यास प्राधान्य द्यावे. यासाठी पाणी टँकर, मिस्टिंग मशीन तसेच अन्य यांत्रिक उपकरणे व संयंत्रांचा वापर करावा. प्रामुख्याने वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) अधिक असलेले बोरिवली (पूर्व), मालाड (पश्चिम), चकाला – अंधेरी (पूर्व), देवनार, माझगाव, नेव्ही नगर – कुलाबा, मुलुंड (पश्चिम), पवई या परिसरातील वायू निर्देशांकांत सुधारणा होईल, यादृष्टीने व्यापक स्वच्छता करावी. विभाग स्तरावर कार्यरत असलेले घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंते यांनी या संपूर्ण मोहिमेचे काटेकोरपणे पर्यवेक्षण करावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. या कनिष्ठ पर्यवेक्षक अर्थात जेओंच्या माध्यमातून ७५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची पाण्याने धुवून स्वच्छता केली जाणार आहे. ही मोहिम पुढील तीन दिवस चालणार आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 9:30 pm

भाजपच्या ‘या’आमदाराची विरोधकांना कापून काढण्याची भाषा; नेमकं काय झालं ते जाणून घ्या..

नागपूर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले असताना, भाजप आमदार आशिष देशमुख यांनी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत थेट वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कळमेश्वरमध्ये बोलताना देशमुख यांनी विरोधकांना उघड धमकी दिली. “हे देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे. ते गृहमंत्री आहेत आणि ते नागपूरचे आहेत. त्यामुळं जास्त कराल तर कापून काढू,” अशा […] The post भाजपच्या ‘या’ आमदाराची विरोधकांना कापून काढण्याची भाषा; नेमकं काय झालं ते जाणून घ्या.. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 9:14 pm

पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचा कल ‘जनरल मेडिसिन’ कडे

मुंबई (प्रतिनिधी): देशातील पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी २०२५) यंदा विद्यार्थ्यांचा कल एमडी जनरल मेडिसिन या शाखेकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. टॉपर विद्यार्थ्यांपासून उच्च गुणधारकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर या शाखेची निवड करताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षांपासून प्रतिष्ठा मिळवलेल्या रॅडिओलॉजीने यंदाही आपले स्थान कायम राखले असले तरी या वर्षी ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातुलनेत सर्जरीला प्राधान्य नसल्यामुळे तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.टॉप १० पैकी ९ विद्यार्थ्यांनी तसेच शंभरमधील जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांनी जनरल मेडिसिनचा पर्याय निवडल्याने ही शाखा पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. व्यापक क्लिनिकल काम, सुरक्षित करिअर, पुढील सुपर-स्पेशॅलिटीचे पर्याय आणि रुग्णांशी थेट निगडित काम यामुळे या शाखेची लोकप्रियता वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दुसरीकडे, गेल्या दशकभरात ‘हॉट फेव्हरेट’ मानली जाणारी एमडी रॅडिओडायग्नोसिस (रॅडिओलॉजी) ही यंदाही विद्यार्थ्यांची आवडती शाखा असली तरी स्थिर उत्पन्न आणि कमी शारीरिक ताण अशा कारणांमुळे तिची मागणी कायम असल्याचे दिसते. टेले-रॅडिओलॉजी आणि एआय-आधारित निदान तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात संधी वाढत असून त्याचा थेट परावर्तन विद्यार्थ्यांच्या पसंतीत दिसते.निवड प्रक्रियेत देशातील सर्वोच्च गुणवत्ता दाखविणाऱ्या वैद्यकीय पदवीधरांनी आपली पसंती स्पष्ट केली आहे. करिअरची स्थिरता हे ऑपरेशन थिएटरपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरत आहे.प्रथम फेरीच्या मार्गदर्शनामध्ये मेडिसिन आणि रॅडिओलॉजी या शाखांवर उच्च गुणांच्या विद्यार्थ्यांचा मोठा भर दिसला तर शस्त्रक्रिया (सर्जरी) शाखेतील निवड लक्षणीयरीत्या घटली. आकडेवारीचा विचार करता पहिल्या १५०० उमेदवारांपैकी ६३२ (४२ टक्के) उमेदवारांनी जनरल मेडिसिन, तर ४४७ (३० टक्के) यांनी रॅडिओलॉजीची निवड केली. त्याच्या तुलनेत अवघे ६ टक्के विद्यार्थ्यांनीच एमएस जनरल सर्जरी स्वीकारली. हा कल उच्च-जोखमीच्या प्रक्रिया, दीर्घ प्रशिक्षण, ताणतणाव आणि वाढत्या वैद्यकीय वादप्रकरणांबद्दलच्या चिंतांमुळे दिसत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 9:10 pm

पंतप्रधान मोदी कर्नाटक आणि गोव्याचा दौरा करणार, ७७ फुटी श्रीराम मूर्तीचे अनावरण करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार २८ नोव्हेंबर रोजी कर्नाटक आणि गोव्याला भेट देणार आहेत. सकाळी साडे अकराच्या सुमाराला पंतप्रधान कर्नाटकातील उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट देणार आहेत. त्यांनतर ते गोव्याला जाणार आहेत. गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'सार्ध पंचशतमानोत्सव' सोहळ्यानिमित्त पंतप्रधान दुपारी सव्वा तीनच्या सुमारास मठाला भेट देणार आहेत.Tomorrow, 28th November, is a special day as the programme to mark the 550th-year celebration of the Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math will be held in Canacona, Goa. I look forward to joining the celebrations. A 77 feet statue of Prabhu Shri Ram will be unveiled on…— Narendra Modi (@narendramodi) November 27, 2025पंतप्रधान मोदींचा उडुपी दौरापंतप्रधान उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट देणार असून लक्षकंठ गीता पारायणात सहभागी होणार आहेत. या आध्यात्मिक कार्यक्रमाला विद्यार्थी, साधू, विचारवंत आणि समाजातील विविध स्तरातील नागरिक मिळून सुमारे एक लाख जण उपस्थित राहणार असून ते एका स्वरात श्रीमद भगवद गीतेचे पठण करणार आहेत.याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते कृष्णा गर्भगृहासमोरील सुवर्ण तीर्थ मंडपाचे उद्घाटन होणार आहे आणि पवित्र कनकाना किंदीसाठी तयार करण्यात आलेल्या कनक कवचाचे समर्पण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. ही एक पवित्र खिडकी आहे त्यातून संत कनकदास यांना भगवान कृष्णाचे दिव्य दर्शन झाले असे मानले जाते. उडुपी येथील श्रीकृष्ण मठाची स्थापना आठशे वर्षांपूर्वी वेदांताच्या द्वैत तत्वज्ञानाचे संस्थापक मध्वाचार्य यांनी केली होती.पंतप्रधान मोदींचा गोवा दौरागोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'सार्ध पंचशतमानोत्सव' सोहळ्यानिमित्त पंतप्रधान दक्षिण गोव्यातील कानाकोना येथील मठाला भेट देणार आहेत.श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ परिसरात उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम यांच्या ७७ फूट उंचीच्या कांस्य पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार असून मठाने विकसित केलेल्या रामायण थीम पार्क उद्यानाचे' देखील ते उदघाटन करतील. यावेळी पंतप्रधान एका खास टपाल तिकिटाचे आणि स्मृती नाण्याचे अनावरण करतील, तसेच उपस्थितांना संबोधितदेखील करतील.श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ हा पहिला गौड सारस्वत ब्राह्मण वैष्णव मठ आहे. येथे १३ व्या शतकात जगद्गुरु मध्वाचार्य यांनी स्थापित केलेल्या द्वैत व्यवस्थेचे पालन केले जाते. मठाचे मुख्यालय कुशावती नदीच्या काठावर दक्षिण गोव्यातील एका लहानशा शहरात पर्तगाळी येथे आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 9:10 pm

Devendra Fadnavis : “दोन वर्षात एक कोटी लखपती दीदींचे लक्ष्य”–मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis : राज्यातील सरकार हे महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरुच ठेवणार असून पुढील दोन वर्षांच्या कालावधीमध्ये एक कोटी लखपती दीदी निर्माण करण्याचे उद्दीष्ट्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. अहमदपूर, उदगीर, रेणापूर आणि इतर महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला फडणवीस संबोधित करत होते. विविध नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका […] The post Devendra Fadnavis : “दोन वर्षात एक कोटी लखपती दीदींचे लक्ष्य” – मुख्यमंत्री फडणवीस appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 9:00 pm

बीएमसी अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून व्यावसायिकाला बेदम मारहाण !

मुंबई – शहरातील एका रिअल इस्टेट प्रकल्पाशी संबंधित आर्थिक वादातून एका महानगरपालिका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करत, एका ५३ वर्षीय व्यावसायिकाने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ही कथित घटना ४ ऑक्टोबर रोजी घडली. या महिन्याच्या सुरुवातीला तक्रार दाखल करण्यात आली असली तरी, कोणताही प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आलेला नाही, असे पोलिसांनी […] The post बीएमसी अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून व्यावसायिकाला बेदम मारहाण ! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 8:49 pm

WPL 2026 Auction : एअरफोर्सच्या विंग कमांडरचा ऑक्शनमध्ये जलवा! बेस प्राइसपेक्षा सहापट अधिकची लागली बोली

Shikha Pandey sold for 2.4 crore to UP Warriorz : महिला प्रीमियर लीग २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडे हिच्यावर फ्रेंचायझींनी अक्षरशः पैशांचा वर्षाव केला. या खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि यूपी वॉरियर्स यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली, परंतु अखेरीस यूपी वॉरियर्सने बाजी मारली आणि तिला २.४ कोटी रुपयांमध्ये […] The post WPL 2026 Auction : एअरफोर्सच्या विंग कमांडरचा ऑक्शनमध्ये जलवा! बेस प्राइसपेक्षा सहापट अधिकची लागली बोली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 8:24 pm

WPL 2025 Auction : एअरफोर्सच्या विंग कमांडरचा ऑक्शनमध्ये जलवा! बेस प्राइसपेक्षा सहापट अधिकची लागली बोली

Shikha Pandey sold for 2.4 crore to UP Warriorz : महिला प्रीमियर लीग २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडे हिच्यावर फ्रेंचायझींनी अक्षरशः पैशांचा वर्षाव केला. या खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि यूपी वॉरियर्स यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली, परंतु अखेरीस यूपी वॉरियर्सने बाजी मारली आणि तिला २.४ कोटी रुपयांमध्ये […] The post WPL 2025 Auction : एअरफोर्सच्या विंग कमांडरचा ऑक्शनमध्ये जलवा! बेस प्राइसपेक्षा सहापट अधिकची लागली बोली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 8:24 pm

हाँगकाँगमधील भीषण आगीचे कारण आले समोर; आगीत ५५ जणांचा मृत्यू, २७९ अजूनही बेपत्ता

हाँगकाँग : हाँगकाँगमधील Tai Po District मध्ये बुधवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण शहर हादरलं आहे. या घटनेत आतापर्यंत ५५ जणांचा मृत्यू झाला असून, २७९ लोक अजूनही बेपत्ता आहेत, असे अधिकृत माहितीवरून कळत आहे. हे हाँगकाँगमधील ३० वर्षातील सर्वात मोठे अग्नितांडव आहे.आग ३२ मजली निवासी इमारतीच्या बाहेरील बांबूच्या ज्वलनशील स्कॅफोल्डिंगमधून सुरू झाली, जिथे इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. इमारतीवर लावलेल्या सुरक्षा जाळ्या, वेगवान वारा आणि ज्वलनशील साहित्य यांच्या संयोगामुळे आग काही मिनिटांतच मोठ्या प्रमाणावर पसरली. जवळील आठ टॉवरच्या गृहनिर्माण संकुलातील सात इमारतींमध्ये आग पसरली आणि जवळपास २००० फ्लॅट्स जळून खाक झाले.हाँगकाँग पोलिसांनी आगीशी संबंधित तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गंभीर आरोप आहेत. अटक केलेले तिघे लोक बांधकाम कंपनीचे अधिकारी आहेत, ज्यांच्यावर इमारतींच्या नूतनीकरणासाठी वापरल्या गेलेल्या ज्वलनशील साहित्याबाबत गंभीर निष्काळजीपणा केल्याचा आरोप आहे. यात दोन संचालक व एक प्रकल्प सल्लागार आहे.हाँगकाँग अग्निशमन विभागाने १४० पेक्षा जास्त फायर ट्रक्स, ६० रुग्णवाहिका आणि ९०० हून अधिक बचाव कर्मचारी घटनास्थळी तैनात केले. किमान ६८ जखमींना रुग्णालयात दाखल केले गेले, त्यापैकी २५ जणांची प्रकृती गंभीर आहे. संकुलातील शेकडो नागरिकांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना, तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.पोलिसांच्या अहवालानुसार, इमारतीवर लावलेल्या संरक्षक जाळ्या, वॉटरप्रूफ कॅनव्हास आणि प्लास्टिक फॅब्रिक अग्निरोधक मानकांची पूर्तता करत नसल्याचे दिसून आले. लिफ्ट लॉबीच्या खिडक्यांवर पॉलीयुरेथेन फोम वापरल्याने आग वेगाने पसरली, असेही तपासात उघड झाले.हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन ली यांनी विशेष तपास पथक तयार करून बेपत्ता लोकांच्या शोध मोहिमेला गती दिली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शोक व्यक्त करत बचाव कार्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे निर्देश दिले आहेत.हाँगकाँगमधील ही भीषण आग आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती शहरासाठी मोठा धक्का ठरली आहे, तर सरकार आणि बचाव कर्मचाऱ्यांचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 8:10 pm

बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करणार

मुंबई : राज्यात बेकायदेशीर पद्धतीने तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांचे रॅकेट मोडून काढण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंबर कसली असून, केवळ आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म-मृत्यूचे दाखले आणि नोंदी तात्काळ रद्द करून, पोलिसात तातडीने तक्रार दाखल करण्याचे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले असून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सोळा मुद्यांच्या आधारे जन्म-मृत्यू दाखल्याची तपासणी करावी असे सुचविण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव गृह तसेच अतिरिक्त मुख्य सचिव महसूल यांच्या उच्चस्तरीय बैठकीतील सूचनानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी आदेश दिले.'या' तारखेनंतरचे आदेश रद्द होणार११ ऑगस्ट २०२३ च्या सुधारणेनंतर नायब तहसीलदारांनी वितरीत केलेले जन्म-मृत्यू नोंदीचे आदेश परत घेण्याचे आणि रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, ज्या प्रकरणांमध्ये केवळ आधार कार्डला पुरावा मानून जन्म मृत्यू दाखले दिले गेले आहेत, ते आदेश त्रुटीपूर्ण मानले जातील. आधार कार्ड हा जन्माचा किंवा जन्म ठिकाणाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही, असे महसूल विभागाने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा हवाला देऊन स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या देखरेखीखाली विशेष मोहीम राबवून विशेष मेळाव्याद्वारे या कामाचा निपटारा केला जावा असे बजावण्यात आले आहे.खोट्या नोंदी आढळल्यास थेट गुन्हा दाखलमहसूलमंत्री बावनकुळे यांच्या निर्देशानुसार, अर्जातील माहिती आणि आधार कार्डवरील जन्मतारीख यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित व्यक्तीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच, जे लाभार्थी मूळ प्रमाणपत्र परत करणार नाहीत किंवा जे आता सापडत नाहीत, त्यांची यादी बनवून त्यांना 'फरार' घोषित करण्याची प्रक्रिया आणि त्यांच्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्याची स्थानिक पोलिसांनी करावी असे म्हटले आहे.• राज्यातील 'ही' शहरे रडारवरअवैध जन्म-मृत्यू प्रकरणांमध्ये राज्यातील काही विशिष्ट शहरे आणि तालुके 'हॉटस्पॉट' असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये अमरावती, सिल्लोड, अकोला, संभाजीनगर शहर, लातूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, पुसद, परभणी, बीड, गेवराई, जालना, अर्धापूर आणि परळी या ठिकाणांचा समावेश असून, येथील तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना ही प्रकरणे गांभीर्याने तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.ठळक वैशिष्ट्ये:• केवळ ‘आधार कार्ड’वर मिळालेले जन्म दाखले रद्द होणार.• जन्मतारखेत तफावत आढळल्यास थेट पोलिसात तक्रार.• बनावट प्रमाणपत्र घेणारे लाभार्थी पळून गेल्यास त्यांना ‘फरार’ घोषित करणार.• संभाजीनगर, अमरावती, लातूरसह १४ ठिकाणी विशेष तपास मोहीम.__मुळात जन्म मृत्यूचे दाखले देण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा आहे. मात्र एक वर्षे उलटून गेल्यावर हे दाखले महसूल विभागामार्फत दिली जातात. त्यासाठी तहसीलदार व त्यावरील अधिकारी सक्षम आहेत. मात्र, अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे बरेच गैरप्रकार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे आता प्रमाणपत्र परत घेणे किंवा त्यांची फेरतपासणी करण्याचे निश्चित केले आहे. - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 8:10 pm

मल जल प्रक्रिया केंद्रांची कामे जलदगतीने

केंद्र उभारणीच्या कामाच्या कार्यवाहीला वेग देण्याचे निर्देशमुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत एकूण ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्याची कार्यवाही प्रगतिपथावर असून अतिरिक्‍त मनुष्यबळ उपलब्ध करून कामे तीन सत्रांत (शिफ्ट) अखंडितपणे सुरू ठेवण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ अभिजित बांगर यांनी दिले आहेत.नवीन मलजल प्रक्रिया केंद्रांमुळे समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता व सागरी जीवनामध्ये सुधारणा होणार असल्‍याचेही बांगर यांनी अधोरेखित केले.मुंबईतील पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिने महानगरपालिकेकडून एकूण ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहेत. अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी महानगरपालिका मुख्‍यालयात या कामांचा प्रकल्‍पनिहाय आढावा गुरुवारी २७ नोव्हेंबर रोजी घेतला. त्‍यावेळी त्‍यांनी हे निर्देश दिले. प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) अशोक मेंगडे यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते, प्रकल्‍प व्‍यवस्‍थापन सल्‍लागार यावेळी उपस्थित होते.मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाच्या वतीने वरळीमध्ये ५०० दशलक्ष लीटर प्रतिदिन, वांद्रे येथे ३६० दशलक्ष लीटर प्रतिदिन, मालाडमध्ये ४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन, घाटकोपरमध्ये ३३७ दशलक्ष लीटर प्रतिदिन, धारावीमध्ये ४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन, भांडुपमध्ये २१५ दशलक्ष लीटर प्रतिदिन आणि वेसावे (वर्सोवा) येथे १८० दशलक्ष लीटर प्रतिदिन याप्रमाणे एकूण ७ केंद्र उभारणीची कार्यवाही वेगाने सुरू आहे. या प्रकल्पांद्वारे दररोज २ हजार ४६४ दशलक्ष लीटर मलजलावर प्रक्रिया केली जाणार आहे. या सातही मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पाची भौतिक कामे वेगाने सुरू आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार, घाटकोपर, वेसावे (जुलै २०२६), भांडुप (ऑगस्‍ट २०२६), वरळी, वांद्रे, धारावी (जुलै २०२७) आणि मालाड मलजल प्रक्रिया केंद्र (जुलै २०२८) पूर्णत्‍वाचा कालावधी आहे. या विहित कालमर्यादेतच कामे पूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश बांगर यांनी दिले.मलजल प्रक्रिया कार्य अंतर्गत प्राथमिक व दुय्यम प्रक्रियांसह १ हजार २०० दशलक्ष लीटर मलजलावर तृतीय स्तरीय प्रक्रियाही केली जाणार आहे. विविध प्रयोजनार्थ या पाण्‍याचा पुनर्वापर केला जाणार आहे. तसेच, टप्‍प्‍याटप्‍प्‍याने १०० टक्‍के मलजलावर तृतीय स्तरीय प्रक्रिया करून विविध प्रयोजनार्थ पुनर्वापर करण्‍याचे नियोजन आहे. नवीन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता आणि सागरी जीवनामध्ये सुधारणा होईल, असेही बांगर यांनी नमूद केले.मलजल प्रक्रिया केंद्र उभारणी कामातील विविध आव्‍हानांविषयी बांगर म्‍हणाले की, भांडुप, घाटकोपर, वेसावे आणि मालाड येथील मलजल प्रक्रिया केंद्र अस्तित्त्वातील खारक्षेत्र मध्‍ये उभारले जात आहेत. कांदळवनामुळे मालाड मलजल प्रक्रिया केंद्र उभारणी कामाला परवानगी मिळण्‍याकामी विलंब झाला. मात्र, सद्यस्थितीत दररोज ३००० मनुष्‍यबळ प्रकल्‍पस्‍थळी कार्यरत आहे. अत्‍यंत गतीने काम करून केवळ एका वर्षात ४० टक्‍के भौतिक कामे पूर्ण झाली आहेत. तर, जागेची उपलब्‍धता कमी असल्‍याने वैशिष्‍ट्यपूर्ण रचनेच्‍या बहुमजली इमारतीत धारावी मलजल प्रक्रिया केंद्र उभारले जात आहे. या केंद्रातून बाहेर पडणारे फेरप्रक्रियायुक्‍त पाणी मिठी नदीत सोडले जाणार आहे. वांद्रे पश्चिम परिसरात सागरी सेतू नजीक वांद्रे मलजल प्रक्रिया केंद्राचे बांधकाम करण्यात येत आहे. प्रकल्पाची भौतिक प्रगती समाधानकारक आहे. या ठिकाणी छतावरील बाग आणि व्‍ह्युविंग टॉवर अशा वैशिष्ट्यपूर्ण वास्तूदेखील उभारण्‍याचे नियोजन असल्‍याचे अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी सांगितले.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 8:10 pm

गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना 'मृदगंध जीवनगौरव पुरस्कार'प्रदान

मुंबई : मी मातीतला माणूस असून, लोककलेने माझे भरणपोषण केले. आज लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार स्विकारताना आनंद होत असल्याची भावना गझलनवाझ भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केली. ‘निहाल हो गयी जिंदगी मेरी’... अशा शब्दांत भीमरावांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. १५ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृद‌्‌गंध पुरस्कार २०२५’ च्या दिमाखदार समारंभात ते बोलत होते. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिषजी शेलार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.आपले अवघे आयुष्य लोककलेसाठी समर्पित करणाऱ्या संगीत नाटक अकादमी, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या मृदगंध पुरस्कार विजेत्यांमध्ये शाहीर राजेंद्र राऊत (लोककला क्षेत्र),प्रदीप शिंदे (शिल्पकला), अभिनेते जयवंत वाडकर (अभिनय क्षेत्र),परेश मोकाशी (दिग्दर्शक), मधुगंधा कुलकर्णी (अभिनेत्री आणि निर्माती), अभिनेत्री रिंकू राजगुरू (नवोन्मेष प्रतिभा-अभिनय क्षेत्र) यांना ‘मृद‌्‌गंध पुरस्कार २०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाचा हा पुरस्कार आमच्यासाठी लाखमोलाचा असल्याची भावना मान्यवर पुरस्कार विजेत्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिष शेलार, अर्थतज्ज्ञ-माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, यांच्यासह संगीत-अभिनय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.‘रसिक मायपाब आणि कुटुंबाच्या साथीने मी माझ्या बाबांना आठवणीतून जिवंत ठेवू शकलो. बाबांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराच्या निमित्ताने आपले ऋणानुबंध आणि रसिकांचे प्रेम आमच्यावर असंच कायम राहू द्या’, असं सांगत लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव, प्रसिद्ध गायक व विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश वत्सला विठ्ठल उमप यांनी उपस्थितांचे आभार मानले.लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा पहाडी आवाज हा महाराष्ट्राच्या चळवळीचा आवाज होता. वंचितांच्या आवाजाचं प्रतिनिधित्व करत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून जो संघर्ष उभा केला ते कौतुकास्पद आहे. आता नंदेश त्यांचं कार्य ज्या पद्धतीने पुढे नेतो आहे आणि उत्तम अशा हिऱ्यांना आपल्यासमोर घेऊन त्यांना पुरस्काररूपी कौतुकाचं बळ देतोय ते नक्कीच अभिनंदनीय आहे, असं सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी याप्रसंगी सांगितलं.‘आपल्या भौतिक गरजा भागल्या की आपलं आयुष्य समृद्ध होतं असं नाही, सामाजिक आरोग्यासाठी कला ही तितकीच महत्त्वाची असते आणि ती जपण्याचं काम ही कलावंत मंडळी सातत्याने करीत आहेत त्यासाठी त्यांचे मी आभार मानतो, अशा शब्दांत भालचंद्र मुणगेकर यांनी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले. ‘महाराष्ट्राच्या लोककलेला जागतिक स्तरावर नेणारा लोकशाहीर, लोककलेच्या सर्व प्रकारांत मुक्त संचार करणारे, परंपरा आणि नवता यांचा सुरेख, सुरेल संगम घालणारे लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे कलेसाठीचं योगदान अमूल्य असल्याची भावना आमदार अमित साटम यांनी यावेळी बोलून दाखविली.पद्मश्री उस्ताद शाहीद परवेझ खान यांचे सितार वादन तसेच लावणी कलावंत रेशमा मुसळे परितेकर (पुणे) यांची संगीतबारी असा सादरीकरणाचा रंजक आस्वाद रसिकांनी घेतला.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 8:10 pm

Bank Account Rules: बँक बॅलन्स शून्य असला तरी काढता येणार 10 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे सुविधा…

Bank Account Rules: पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत (PMJDY) उघडलेल्या शून्य बॅलन्स खात्यांमध्ये (Zero Balance Account) आता एक विशेष सुविधा मिळत आहे, ज्यामुळे खातेदारांना त्यांच्या खात्यात पैसे नसतानाही 10 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. ही सुविधा ‘ओव्हरड्राफ्ट’ (Overdraft) म्हणून ओळखली जाते आणि अडचणीच्या वेळी खातेदारांसाठी हा मोठा आधार ठरत आहे. जन धन योजनेत उघडलेली सर्व […] The post Bank Account Rules: बँक बॅलन्स शून्य असला तरी काढता येणार 10 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे सुविधा… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 7:56 pm

Narendra Modi : “युवाशक्ती उद्योजकतेसह नवी शिखरे गाठत आहेत”–पंतप्रधान मोदी

Narendra Modi – आज देश अंतराळ क्षेत्रात एक अभूतपूर्व संधी असल्याचे पाहत असून खाजगी क्षेत्राच्या प्रगतीमुळे भारताची अंतराळ परिसंस्था मोठी झेप आहे. स्कायरूटचे इन्फिनिटी कॅम्पस हे भारताची नवीन विचारसरणी, नवोन्मेष आणि युवाशक्तीचे प्रतिबिंब आहे. युवकांची जोखीम घेण्याची क्षमता आणि उद्योजकता नवीन उंची गाठत आहे. आगामी काळात जागतिक उपग्रह प्रक्षेपण परिसंस्थेत भारत आघाडीचा देश म्हणून कसा […] The post Narendra Modi : “युवाशक्ती उद्योजकतेसह नवी शिखरे गाठत आहेत” – पंतप्रधान मोदी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 7:43 pm

आमदार संतोष बांगर यांच्या घरावर पोलिसांची धाड; कारण काय? जाणून घ्या…

हिंगोली: राज्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील स्थानिक वाद आता विकोपाला गेला आहे. कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या घरी पहाटेच्या सुमारास तब्बल १०० पोलिसांनी धाड टाकून झाडाझडती घेतल्याची माहिती विधानपरिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली आहे. हा सर्व प्रकार भाजपचे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या दबावाखाली झाला असल्याचा गंभीर आरोप हेमंत […] The post आमदार संतोष बांगर यांच्या घरावर पोलिसांची धाड; कारण काय? जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 7:42 pm

WPL 2026 Auction : मुंबई इंडियन्सने ‘या’खेळाडूसाठी लावली सर्वाधिक बोली! बेस प्राइसपेक्षा सहापट अधिक पैसा ओतला

Amelia Kerr sold to Mumbai Indians for 3 crore : महिला प्रीमियर लीग २०२६ साठी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक स्टार खेळाडूंवर मोठी बोली लागली. या ऑक्शनमध्ये न्यूझीलंडची स्टार अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुंबई इंडियन्सने या खेळाडूला पुन्हा आपल्या संघात सामील करण्यासाठी जोरदार बोली लावली आणि अखेरीस […] The post WPL 2026 Auction : मुंबई इंडियन्सने ‘या’ खेळाडूसाठी लावली सर्वाधिक बोली! बेस प्राइसपेक्षा सहापट अधिक पैसा ओतला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 7:41 pm

भारताच्या १६ वर्षीय तन्वी शर्माने माजी विश्वविजेत्या ओकुहाराला हरवले

लखनऊ : भारताच्या १६ वर्षीय तन्वी शर्माने माजी विश्वविजेत्या नोझोमी ओकुहाराला पराभूत करून सय्यद मोदी इंटरनॅशनलच्या क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला. तन्वीने नोझोमी ओकुहारा विरोधातला सामना हा १३-२१, २१-१६, २१-१९ असा जिंकला. या वर्षाच्या सुरुवातीला यूएस ओपन सुपर ३०० च्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या सोळा वर्षीय तन्वीने ५९ मिनिटांच्या रोमांचक सामन्यात दुसऱ्या मानांकित ओकुहारावर १३-२१, २१-१६, २१-१९ असा विजय मिळवला.एकोणीस वर्षीय मनराजने २०२३ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या प्रणॉयचा केवळ ४३ मिनिटांत २१-१५, २१-१८ असा पराभव पत्करून पुरुष एकेरीच्या ड्रॉमध्ये धक्कादायक कामगिरी केली.अव्वल मानांकित उन्नती हुडाने तस्निम मीरवर २१-१५, २१-१० असा विजय मिळवत अंतिम आठमध्ये स्थान निश्चित केले, तर मिथुन मंजुनाथने सहाव्या मानांकित थरुन मन्नेपल्लीचा दुसऱ्या फेरीच्या सामन्यात २१-१६, १७-२१, २१-१७ असा पराभव केला.उन्नतीचा सामना सातव्या मानांकित रक्षिता श्री संतोष रामराजशी होईल, ज्याने देविका सिहागचा १६-२१, २१-१९, २१-१७ असा पराभव केला, तर मिथुनचा सामना या वर्षाच्या सुरुवातीला युगांडा इंटरनॅशनल चॅलेंज आणि इराण फजर इंटरनॅशनल चॅलेंज जिंकणाऱ्या मनराजशी होईल. २०२१ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक विजेता माजी जागतिक क्रमांक १ किदाम्बी श्रीकांतने सनीथ दयानंदचा २१-६, २१-१६ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्रियांशू राजावतने बीएम राहुल भारद्वाजवर २१-१६, १०-२१, २१-१२ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.किरण जॉर्ज, आलाप मिश्रा आणि सिद्धार्थ गुप्ता हे आपापल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यांमध्ये पराभव पत्करून स्पर्धेतून बाहेर पडले.महिला एकेरीत, इशाराणी बरुआने सहाव्या मानांकित पोलिना बुहरोवाला २१-१५, २१-८ असे पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, जिथे तिचा सामना तुर्कीच्या चौथ्या मानांकित नेस्लिहान अरिनशी होईल. तथापि, तान्या हेमंत आणि अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत पराभवामुळे बाहेर पडल्या.पुरुष दुहेरीत, पाचव्या मानांकित हरिहरन अम्साकारुनन आणि एमआर अर्जुन यांनी मलेशियाच्या लाऊ यी शेंग आणि लिम त्झे जियान यांच्यावर २१-१२, २१-१८ असा विजय मिळवत प्रगती केली.गतविजेत्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत झेनिथ अबीगेल आणि लिखिता श्रीवास्तव यांच्यावर २१-१७, २१-१२ असा विजय मिळवला.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 7:30 pm

Disha Salian : दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी पोलिस किती काळ करणार.! मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

Disha Salian – सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी शहर पोलिस किती काळ करणार, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे. ८ जून २०२० रोजी मालाड येथील एका निवासी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला. त्यानंतर शहर पोलिसांनी अपघाती मृत्यूचा खटला दाखल केला. न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि आर आर भोसले यांच्या खंडपीठाने […] The post Disha Salian : दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी पोलिस किती काळ करणार.! मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 7:16 pm

दिव्यांगांच्या अपमानास्पद टीकेसाठी कायदा करा.! सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना

नवी दिल्ली – दिव्यांगांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता अधोरेखित करताना, सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्राला एससी-एसटी कायद्याच्या धर्तीवर अपंग आणि दुर्मिळ अनुवांशिक विकार असलेल्या व्यक्तींची खिल्ली उडवणाऱ्या अपमानास्पद टीकेला दंडनीय गुन्हा ठरवण्यासाठी कायदा तयार करण्याचा विचार करण्यास सांगितले. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जमातींच्या सदस्यांविरुद्ध जातीवादी […] The post दिव्यांगांच्या अपमानास्पद टीकेसाठी कायदा करा.! सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 7:01 pm

WPL 2026 Auction : दीप्ती शर्मा ठरली WPL च्या इतिहासातील दुसरी सर्वात महागडी खेळाडू! यूपी वॉरियर्सने पाडला पैशांचा पाऊस

Deepti Sharma 2nd most expensive player in WPL history : महिला प्रीमियर लीग २०२६ (WPL 2026) साठी नुकत्याच झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मावर मोठी बोली लागली. दिल्ली कॅपिटल्सने दीप्तीवर पैशांचा पाऊस करत आपल्या संघात सामील करण्याचा प्रयत्न केला, परंतु यूपी वॉरियर्सने (UPW) राईट टू मॅच (RTM) कार्डचा वापर करत बाजी मारली आणि […] The post WPL 2026 Auction : दीप्ती शर्मा ठरली WPL च्या इतिहासातील दुसरी सर्वात महागडी खेळाडू! यूपी वॉरियर्सने पाडला पैशांचा पाऊस appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 7:00 pm

महायुतीत खळबळ: 2 तारखेनंतर मोठा राजकीय भूकंप होणार? रवींद्र चव्हाणांचे सूचक विधान

जळगाव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महायुतीतील अंतर्गत कलगीतुरा शिगेला पोहोचला असून, भाजप नेते आणि पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका स्फोटक विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) नेते नीलेश राणे यांनी भाजपवर पैसे वाटपाचा गंभीर आरोप केल्यानंतर, त्याबाबत विचारले असता, चव्हाण यांनी अत्यंत सावध पवित्रा घेतला. आज (२७ […] The post महायुतीत खळबळ: 2 तारखेनंतर मोठा राजकीय भूकंप होणार? रवींद्र चव्हाणांचे सूचक विधान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 6:47 pm

डेफलिंपिक २०२५ मध्ये भारताने जिंकली २० पदके

डेफलिंपिक २०२५ मध्ये भारताने नऊ सुवर्ण पदकांवर कोरले नावटोकियो : जपानमधील टोकियो येथे १५ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या उन्हाळी डेफलिंपिक २०२५ मध्ये भारताने वीस पदके जिंकली. यात नऊ सुवर्ण (गोल्ड), सात रौप्य (सिल्व्हर) आणि चार कांस्य (ब्राँझ) पदकांचा समावेश आहे. भारताने जिंकलेल्या वीस पदकांपैकी सोळा पदके नेमबाजांनीच जिंकली आहेत. डेफलिंपिकमधील ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी २०२२ च्या डेफलिंपिकमध्ये भारताने आठ सुवर्ण, एक रौप्य आणि सात कांस्य अशी सोळा पदके जिंकली होती.यंदा २५ वे डेफलिंपिक झाले, पहिले डेफलिंपिक १९२४ मध्ये पॅरिस येथे झाले होते. या स्पर्धेला १०१ वर्षांची परंपरा आहे. यंदाच्या डेफलिंपिकमध्ये भारताने ११ स्पर्धेत भाग घेतला होता. यासाठी भारतातून ७३ खेळाडूंचा चमू टोकियो येथे आला होता. यात ४५ पुरुष आणि २८ महिला खेळाडू होते.टोकियो २०२५ मध्ये, ऑलिंपियन दीक्षा डागरने महिला गोल्फ स्पर्धेत तिचे डेफलिंपिक विजेतेपद राखले. नेमबाजीमध्ये १२ खेळाडूंसह सर्वात मोठा भारतीय संघ होता तर अॅथलेटिक्समध्ये भारताकडून ११ खेळाडू सहभागी झाले होते.धनुष श्रीकांतने १० मीटर एअर रायफल प्रकारात २५२.२ गुणांसह विश्वविक्रम केला. मोहम्मद वानियाने त्याच स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत नेमबाजांनी भारताला पहिले पदक जिंकून दिले. महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत महित संधू आणि कोमल वाघमारे यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.रायफल एस महित संधू हा सर्वात यशस्वी नेमबाज होता ज्याने दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह चार पदके जिंकली. अनुया प्रसादने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत विश्वविक्रम केला. अभिनव देशवालने पुरुषांच्या २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि पात्रता फेरीत जागतिक आणि डेफलिम्पिक विक्रमाशी बरोबरी केली. प्रांजली धुमाळने महिलांच्या २५ मीटर पिस्तूलमध्येही असेच केले. लोमा स्वेनने कराटेमध्ये भारतासाठी पहिल्यांदाच डेफलिंपिक पदक जिंकले.२०२५ च्या डेफलिंपिकमध्ये भारतीय पदक विजेतेखेळाडू - कार्यक्रम - खेळ - पदक दीक्षा डागर - महिला वैयक्तिक - गोल्फ - सुवर्ण धनुष श्रीकांत/महित संधू - मिश्र १० मीटर एअर रायफल संघ - शूटिंग - सुवर्ण धनुष श्रीकांत - पुरुषांची १० मीटर एअर रायफल - शूटिंग - सुवर्ण अनुया प्रसाद - महिलांची १० मीटर एअर पिस्तूल - शूटिंग - सुवर्ण अभिनव देशवाल/प्रांजली धुमाळ - मिश्र १० मीटर एअर पिस्तूल - शूटिंग - सुवर्ण महित संधू - महिला ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स - शूटिंग - सुवर्ण अभिनव देशवाल - पुरुषांची २५ मीटर पिस्तूल - शूटिंग - सुवर्ण प्रांजली धुमाळ - महिलांची २५ मीटर पोस्टोल - शूटिंग - सुवर्ण सुमित दहिया - पुरुष ९७ किलो - कुस्ती - सुवर्ण मोहम्मद वानिया - पुरुषांची १० मीटर एअर रायफल - शूटिंग - रौप्य महित संधू - महिलांची १० मीटर एअर रायफल - शूटिंग - रौप्य अभिनव देशवाल - पुरुषांची १० मीटर एअर पिस्तूल - शूटिंग - रौप्य प्रांजली धुमाळ - महिलांची १० मीटर एअर पिस्तूल - शूटिंग - रौप्य महित संधू - महिलांची ५० मीटर रायफल प्रोन - शूटिंग - रौप्य शौर्य सैनी - पुरुषांची ५० मीटर रायफल प्रोन - शूटिंग - रौप्य अमित कृष्णन - पुरुष ८६ किलो - कुस्ती- रौप्य लोमा स्वेन - कुमिते ५० किलो - कराटे - कांस्य कोमल वाघमारे - महिलांची १० मीटर एअर रायफल - शूटिंग - कांस्य कुशाग्र सिंग राजावत - पुरुषांची ५० मीटर रायफल प्रोन - शूटिंग - कांस्य मोहम्मद वानिया/कोमल वाघमारे - मिश्र १० मीटर एअर रायफल संघ - शूटिंग - कांस्य

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 6:31 pm

मुंबईकरांसाठी अच्छे दिन.! महाराष्ट्र –गुजरातला जोडणाऱ्या दोन मोठ्या प्रकल्पांना मंजुरी

Maharashtra -Gujarat – केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी महाराष्ट्र आणि गुजरातमधील चार जिल्ह्यांना जोडणाऱ्या दोन मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली असल्याने आता यामुळे भारतीय रेल्वेचे विद्यमान नेटवर्क २२४ किलोमीटरने वाढणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे २,७८१ कोटी रुपये खर्च येईल. या प्रकल्पांमध्ये गुजरातमधील द्वारका-कनालस रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि मुंबई महानगर प्रदेशातील बदलापूर आणि कर्जत दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचे […] The post मुंबईकरांसाठी अच्छे दिन.! महाराष्ट्र – गुजरातला जोडणाऱ्या दोन मोठ्या प्रकल्पांना मंजुरी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 6:19 pm

Jemimah Rodrigues : मैत्रिणीसाठी कायपण…! जेमिमाने रॉड्रिग्जने स्मृती मानधनासाठी घेतला मोठा निर्णय

Jemimah Rodrigues skips WBBL for Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज आणि वर्ल्डकप विजेती खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स हिने एक अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तिने ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठेची महिला बिग बॅश लीग न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. जेमिमा हिला ब्रिसबेन हीट संघाने आपल्या टीममध्ये समाविष्ट केले होते, परंतु आता ती ऑस्ट्रेलियाला […] The post Jemimah Rodrigues : मैत्रिणीसाठी कायपण…! जेमिमाने रॉड्रिग्जने स्मृती मानधनासाठी घेतला मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 6:15 pm

Aadhaar Card Status: सरकारने 2 कोटी ‘आधार’कार्ड का केले निष्क्रिय; तुमचं कार्ड ॲक्टिव्ह आहे का? एका मिनिटात असं तपासा

Aadhaar Card Status: केंद्र सरकारने आधार डेटाबेस स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी २ कोटींहून अधिक आधार क्रमांक (Aadhaar Number) निष्क्रिय (Deactivate) केले आहेत. अशा परिस्थितीत, आपले आधार कार्ड चालू (Active) आहे की नाही, हे घरबसल्या अगदी सहज तपासता येते. आजकाल प्रत्येक सरकारी कामात आधार क्रमांक हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून वापरला जातो. अशा परिस्थितीत, आपले आधार […] The post Aadhaar Card Status: सरकारने 2 कोटी ‘आधार’ कार्ड का केले निष्क्रिय; तुमचं कार्ड ॲक्टिव्ह आहे का? एका मिनिटात असं तपासा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 6:05 pm

लपवलेले संवाद झाले व्हायरल.! लीक फोन कॉलमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुपिते उघड; ‘WhatsApp’प्रायव्हसीवर प्रश्नचिन्ह

Trump phone call leaked | Donald Trump | WhatsApp : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांच्यातील फोन संभाषण लीक झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. हा कॉल १४ ऑक्टोबर २०२५ रोजी व्हॉट्सअ‍ॅपवर झाला होता, आणि त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग व […] The post लपवलेले संवाद झाले व्हायरल.! लीक फोन कॉलमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुपिते उघड; ‘WhatsApp’ प्रायव्हसीवर प्रश्नचिन्ह appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 5:43 pm

Rishabh Pant : ‘माफ करा, या वेळी आम्ही अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही’, लाजिरवाण्या पराभवानंतर पंतची भावुक पोस्ट

Rishabh Pant Apologise to fans : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ०-२ असा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघात निराशेचे वातावरण पसरले आहे. गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने खराब कामगिरीबद्दल थेट चाहत्यांची माफी मागितली आहे. पंतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, या पराभवाची जबाबदारी स्वीकारली असून, […] The post Rishabh Pant : ‘माफ करा, या वेळी आम्ही अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही’, लाजिरवाण्या पराभवानंतर पंतची भावुक पोस्ट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 5:21 pm

Abhijeet Sawant and Gautami Patil : 'तो' AI Video नव्हता! गौतमी पाटील-अभिजीत सावंत लवकरच एकत्र; व्हायरल व्हिडीओमागचं खरं गुपित झालं OPEN.

काही दिवसांपूर्वी गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) आणि महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) यांचा एक एआय (AI) व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. गौतमी आणि अभिजीतने स्वतःच्या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. 'सबसे कातील गौतमी पाटील' आणि सदाबहार गाण्यांसाठी ओळखले जाणारे गायक अभिजीत सावंत यांचा हा रोमँटिक अंदाज पाहून चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र, आता या व्हिडिओमागचे खरे कारण समोर आले आहे. हा एआय व्हिडिओ त्यांच्या आगामी प्रोजेक्टची केवळ एक झलक होती, हे स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गायक अभिजीत सावंत लवकरच एका नव्या गाण्यातून रसिकांच्या भेटीला येणार आहेत. या गाण्याचा सर्वात मोठा ट्विस्ट (Twist) म्हणजे, या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील देखील अभिजीतसोबत काम करताना दिसणार आहे. पहिल्यांदाच ही अनोखी जोडी एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र येत असल्याने चाहत्यांमध्ये या गाण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.https://prahaar.in/2025/11/27/finally-the-date-of-the-legislative-session-will-be-set-for-december-1st/गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) यांनी २०२५ या वर्षात 'चाल तुरु तुरू' आणि नुकतेच प्रदर्शित झालेले 'आय पॉपस्टार'मधील 'मोहब्बते लुटाऊंगा' चे नवंकोरं 'जेन-झी' (Gen-Z) व्हर्जन अशा अनेक ट्रेंडिंग गाण्यांनी प्रेक्षकांना मोहित केले आहे. आपल्या सुमधूर आवाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा अभिजीत आता अजून एका नव्या गाण्यामधून भेटीला येत आहे. अभिजीतचे हे नवंकोरं गाणं 'रुपेरी वाळूत' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यात महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील देखील अभिजीत सावंतसोबत वेगळ्या आणि आकर्षक अंदाजात काम करताना दिसणार आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. हे बहुप्रतिक्षित गाणं येत्या ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 'रुपेरी वाळूत' हे गाणे जुन्या गाण्याचा नवा ट्विस्ट (Twist) असणार की अभिजीत आणि गौतमी काहीतरी नवीन घेऊन येणार, हे जाणून घेण्यासाठी आता चाहत्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. अभिजीतच्या आवाजाची जादू आणि गौतमीचा खास अंदाज यामुळे हे गाणं नक्कीच हीट होण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 5:10 pm

मुंबईत आता मोठ्या आकाराच्या जाहिरात फलकाला बंदी..

फुटपाथ आणि गच्चीवरही जाहिरात लावण्यास नसेल परवानगीमुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत मागील अनेक महिन्यापासून लटकलेल्या जाहिरात धोरणासाठी आता मार्गदर्शक तत्वे बनवण्यात आली आहेत. या धोरणामध्ये ४० बाय ४० चौरस फुटांपेक्षा अधिक आकाराचा जाहिरात फलक लावण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या आकाराच्या फलकाला परवानगी दिली जाणार नाही. पदपथ तसेच इमारतीच्या गच्चीवरही जाहिरात प्रदर्शित करण्यास नव्याने परवानगी दिली जाणार नाही.मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी जाहीर केलेल्या ‘जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे- २००८’ मध्ये सुधारणा करत २०२५ मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही नवीन बाबींचा समावेश केला आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मुंबईत क्षेत्रात ४० X ४० फुटांपेक्षा जास्त आकारमानाच्या जाहिरात फलकास परवानगी दिली जाणार नाही. पदपथ तसेच इमारतीच्या गच्चीवर जाहिरात प्रदर्शित करण्यास नव्याने परवानगी दिली जाणार नाही. डिजिटल जाहिरात फलकांची (डिजिटल होर्डिंग) प्रकाशमानता (ल्यूमिनन्स रेशिओ) ३:१ या गुणोत्तरापेक्षा अधिक ठेवता येणार नाही. तसेच, लुकलुकणाऱ्या (फ्लिकरिंग) जाहिरात प्रदर्शित करण्यास परवानगी नसेल. मॉल्स, मल्टिप्लेक्सेस, व्यापारी संकुल (शॉपिंग कॉम्प्लेक्स), वाणिज्यिक इमारती (कमर्शिअल बिल्डिंग), पेट्रोल पंप येथे एलईडी जाहिरात प्रदर्शित करता येईल. तसेच, बांधकाम सुरू असलेल्या व दुरुस्तीची कामे सुरू असलेल्या इमारतींच्या कुंपणावर तसेच इमारतीच्या बाह्यभागावर व्यावसायिक व अव्यावसायिक जाहिराती प्रदर्शित करता येतील.दरम्यान, मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रथमच एकेरी (सिंगल) व पाठपोट (बॅक टू बॅक) फलकांसोबतच ‘व्ही’ व ‘एल’ आकार तसेच त्रिकोणी (ट्राय व्हिजन), चौकोनी (स्केअर व्हिजन), पंचकोनी (पेंटागॉन व्हिजन), षटकोनी स्वरुपाच्या (हेक्झागॉन व्हिजन) जाहिरात फलकांना यापुढे परवानगी देण्यात येईल. याकरीता वाहतूक पोलीसांची ‘ना हरकत’ लागेल.मुंबईतील जाहिरातींचे नियमन करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून ‘जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे-२०२५’ (पॉलिसी गाईडलाइन्स फॉर डिस्प्ले ऑफ आऊटडोअर अॅडव्हर्टाइजमेंट) जाहीर करण्यात आली आहेत. २७ नोव्हेंबर २०२५ पासून ही मार्गदर्शक तत्त्वे महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत आहेत. जाहिरातदार, जाहिरात संस्था तसेच संबंधित सर्व घटकांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्यामार्फत जाहिरातींना परवानगी देणे तसेच अनधिकृत जाहिरातींविरोधात कारवाई करण्याची कार्यवाही केले जाते. मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३२८/३२८ अ अंतर्गत, मुंबईतील हद्दीतील जाहिरातींचे नियमन केले जाते. या पार्श्वभूमीवर, माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या समितीने सुचविलेल्या शिफारसी तसेच नागरिकांच्या हरकती व सूचना विचारात घेऊन ‘जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे – २०२५’ जाहीर करण्यात येत आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे सविस्तर स्वरुपात महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ पासून उपलब्ध करण्यात येत आहेत, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 5:10 pm

Textiles Tex-RAMPS Scheme: कापड उद्योगात २.० परिवर्तन होणार? अत्याधुनिकीकरणासाठी गिरिराज सिंह यांच्याकडून ३०४ कोटींची योजना जाहीर

नवी दिल्ली: कापड उद्योगाला चालना देण्यासाठी व आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने टीईएक्स रॅम्पएस (Textile Focused Research, Assessment, Monitoring, Planning, And Startup Tex- RAMPS) योजनेला मान्यता दिली आहे. ३०५ कोटींच्या या योजनेला काळाच्या ओघात कापड निर्मिती व उद्योगांचा विकास, क्षेत्रातील संशोधन, आकलन, अमंलबजावणी, तसेच या साधनांचा वापर करून स्टार्टअप उद्योगांची पायभरणी करण्यासाठी व एकूणच स्पर्धात्मक वातावरण निर्मितीसाठी मान्यता देण्यात आली आहे. एकूणच या निमित्ताने कापड उद्योगाला चालना मिळताना आर्थिक वर्ष २०२५-२६ या कालावधीत ३०५ कोटींच्या योजनेला केंद्र सरकारने मान्यता दिल्याने वित्त आरोग्याच्या छताखाली या योजनेला अंतर्भूत करण्यात आले आहे.त्यामुळे या योजनेची घोषणा करताना केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह म्हणाले आहेत की,ही योजना संशोधन, डेटा आणि नवोपक्रम एकत्र आणते ज्यामुळे भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला सक्षम बनवता येते आणि शाश्वतता, तंत्रज्ञान आणि स्पर्धात्मकतेमध्ये देशाला जागतिक आघाडीवर स्थान मिळते. भारताच्या वस्त्रोद्योग आणि वस्त्रोद्योग परिसंस्थेला (Ecosystem) भविष्यासाठी बळकटी देण्याच्या उद्देशाने, टेक्स-रॅम्प्सची रचना संशोधन, डेटा प्रणाली, नवोपक्रम समर्थन आणि क्षमता विकासातील गंभीर अंतर दूर करण्यासाठी केली आहे.'सरकारच्या मते या गोष्टी नव्या योजनेतून शक्य -टेक्स-रॅम्प्स योजनेतून पुढील गोष्टी अपेक्षित आहेत: जागतिक बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मकता वाढवणे संशोधन आणि नवोन्मेष परिसंस्था (Innovation Ecosystem) मजबूत करणे डेटाचालित धोरणनिर्मिती रोजगाराच्या संधी निर्माण करणे राज्ये, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि सरकारी संस्थांमध्ये सखोल सहकार्य वाढवणेटेक्स-रॅम्प्स योजना भारतासाठी एक लवचिक, भविष्यासाठी तयार आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कापड परिसंस्था तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे असे सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे.Tex Ramps योजनेतील प्रमुख घटक कुठले असतील?१. संशोधन आणि नवोपक्रम- भारताची नवोपक्रम क्षमता वाढविण्यासाठी स्मार्ट टेक्सटाइल, शाश्वतता (Sustainbility) प्रक्रिया कार्यक्षमता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील संशोधनाचा प्रचार२. डेटा, विश्लेषण आणि निदान- पुराव्यावर आधारित धोरण तयार करण्यास सुलभ करण्यासाठी रोजगार मूल्यांकन, पुरवठा साखळी (Supply Chain) मॅपिंग आणि डेमोग्राफिक अभ्यासासह मजबूत डेटा सिस्टमची निर्मिती३. एकात्मिक वस्त्रोद्योग सांख्यिकी प्रणाली (ITSS)- संरचित (Structural) सह धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी वास्तविक डेटा आणि विश्लेषण प्लॅटफॉर्म४. क्षमता विकास आणि ज्ञान परिसंस्था- राज्यस्तरीय नियोजन मजबूत करणे, सर्वोत्तम पद्धतींचा प्रसार, क्षमता बांधणी कार्यशाळा आणि क्षेत्रीय कार्यक्रमांचे आयोजन५. स्टार्टअप आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन- उच्च-मूल्य (High Value) असलेल्या टेक्सटाइल स्टार्ट-अप्स आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी इनक्यूबेटर, हॅकेथॉन आणि शैक्षणिक-उद्योग सहकार्यांसाठी पाठिंबा इत्यादी गोष्टींचा समावेश असेल.भारत सरकार वस्त्रोद्योग क्षेत्रात वाढ, कौशल्य विकास आणि जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी अनेक प्रमुख योजना वेळोवेळी राबवत असते. गेल्या काही वर्षातील ही तिसरी प्रमुख योजना आहे यापूर्वी कापड उद्योगाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा (Infrastructure) विकासासाठी पीएम मित्र पार्क, उत्पादन वाढविण्यासाठी उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह (Production Linked Incentive PLI) योजना आणि कौशल्य विकासासाठी समर्थ योजना (SAMARTH) यांचा समावेश आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 5:10 pm

Mahavatar Narsimha Oscar : अभिमानास्पद.! ‘महावतार नरसिंह’सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत; भक्त प्रल्हादाला प्रेक्षकांची साथ, इतका यशस्वी का झाला?

Mahavatar Narsimha Oscar : २०२६ च्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मसाठी पात्र असलेल्या चित्रपटांची यादी जाहीर झाली आहे आणि “महावतार नरसिंह” हा भारतीय चित्रपट पात्र ठरला आहे. अकादमीने स्वतः एक अधिकृत अपडेट शेअर केला आहे ज्यामध्ये “महावतार नरसिंह” या श्रेणीतील अनेक चित्रपटांशी स्पर्धा करेल याची पुष्टी केली आहे. भारतासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. तसेच चित्रपटाची […] The post Mahavatar Narsimha Oscar : अभिमानास्पद.! ‘महावतार नरसिंह’ सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत; भक्त प्रल्हादाला प्रेक्षकांची साथ, इतका यशस्वी का झाला? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 4:31 pm

Stock Market Closing Bell: शेअर बाजारात 'टॉम आणि जेरी'चढउताराची अखेर किरकोळ वाढीनेच ! सेन्सेक्स ११०.८७ व निफ्टी १०.२५ अंकाने वधारला

मोहित सोमण:मजबूत फंडामेंटलमुळे आज शेअर बाजारात वाढ झाली आहे. अखेरच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकातील रॅली राखण्यास बाजारात यश आले असले तरी नफा बुकिंग, घरगुती गुंतवणूकदारांकडून सेल ऑफ या कारणामुळे सेन्सेक्स व निफ्टी उच्चांकावरून घसरल्याने बाजारात किरकोळ वाढीसह बंद झाला आहे. सेन्सेक्स ११०.८७ व निफ्टी १०.२५ अंकाने उसळल्याने सेन्सेक्स ८५७२०.३८ व निफ्टी २६२१५.५५ पातळीवर स्थिरावला आहे. जागतिक शेअर बाजारात टेक युएस शेअरसह फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीवरील आशावादामुळे बुलिश पँटर्न कायम राहिला होता. सेन्सेक्स बँक व निफ्टी बँक निर्देशांकातील अस्थिरतेमुळे चढउतार मोठ्या प्रमाणात झाली आहे परंतु अखेरीस सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात समाधानकारक वाढ कायम राहिल्याने सपोर्ट लेवल मिळू शकली आहे. मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये तेजी घसरल्याने बाजारातील रॅलीची घौडदौड अखेरीस मर्यादित राहिली आहे. ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही संमिश्र प्रतिसाद राहिला असून निफ्टी व्यापक निर्देशांकात अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ मिड कॅप ५० (०.१६%), मिड कॅप सिलेक्ट (०.४८%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण स्मॉलकॅप १०० (०.५३%), स्मॉलकॅप ५० (०.५७%) निर्देशांकात झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ आज मिडिया (०.८४%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.४६%),फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.६५%) निर्देशांकात झाली आहे.आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ अशोक लेलँड (७.२५%), सारेगामा इंडिया (५.०९%), जीएमडीसी (४.७४%), तेजस नेटवर्क (४.६३%), जिलेट इंडिया (३.९७%), एम अँड एम फायनांशियल सर्विसेस (३.९४%), संवर्धना मदर्सन (३.८६%), सन टीव्ही नेटवर्क (३.४३%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण वर्लपूल इंडिया (११.४२%), नाटको फार्मा (४.८१%), बजाज होल्डिंग्स (४.१६%), रेडिको खैतान (४.०६%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (३.४९%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (३.१०%), जेपी पॉवर वेंचर (२.९७%), अनंत राज (२.९७%), आयशर मोटर्स (२.७७%), अदानी एंटरप्राईजेस (२.५९%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक अजय मेनन म्हणाले आहेत की,' जवळजवळ १४ महिन्यांच्या एकत्रीकरणानंतर, निफ्टी ५० ने नवीन उच्चांक गाठले आहेत, ज्याला मोठ्या कॅपिटल कंपन्यांमधील व्यापक ताकद आणि बाजारातील भावना सुधारल्याने पाठिंबा मिळाला आहे. निफ्टी मिडकॅपने देखील विक्रमी पातळी गाठली आहे, ज्यामुळे निर्देशांकातील दिग्गजांपेक्षा जास्त सहभाग दिसून येतो. आरबीआय आणि यूएस फेडरल रिझर्व्ह या दोन्हीकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे ही तेजी आणखी वाढली आहे ही जी व्याजदर-संवेदनशील क्षेत्रांसाठी दृश्यमानता सुधारते आणि नवीन एफपीआय इनफ्लोला चालना देऊ शकते. यासोबतच, जीएसटी तर्कसंगतीकरण आणि ग्रामीण मागणी सुधारण्यामुळे - तिसऱ्या तिमाहीतून कमाई पुनर्प्राप्तीची सुरुवातीची चिन्हे कमाई चक्रात आत्मविश्वास वाढवत आहेत. निर्यात-संबंधित क्षेत्रांना चालना देणाऱ्या संभाव्य व्यापार कराराच्या सभोवतालच्या आशावादामुळे भावना आणखी मजबूत झाली आहे. एकत्रितपणे, हे घटक गुंतवणूकदारांना निवडक स्थितीच्या पलीकडे जाण्यास आणि अधिक व्यापक-आधारित बाजार अपसायकलसाठी पोर्टफोलिओ पुनर्स्थित करण्यास प्रवृत्त करत आहेत.'आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'नफा बुकिंग सुरू होण्यापूर्वी निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांकांनी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर भारतीय बाजार स्थिर झाले. वर्षभरात, किरकोळ विक्रेते प्राथमिक गुंतवणूकदार म्हणून उदयास आले. तथापि, एकूण बाजार कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी राहिली, ज्यामुळे वर्षअखेरीस धोका पत्करण्याची शक्यता निर्माण झाली. बाजारातील सहभागी आता उद्याच्या जीडीपी प्रिंटवर अमेरिका-भारत करार आणि आरबीआय धोरण बैठकीसारख्या महत्त्वाच्या घटनांकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. हे घटक इक्विटीसाठी जवळच्या काळातील दिशा निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.'बाजारातील आजच्या बँक निफ्टीतील हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'बँक निफ्टी एका लहान कॅंडलस्टिकसह बंद झाला, जो ५९४३५ पातळीचा उच्चांक तोडल्यानंतर फॉलो-अप चाल म्हणून काम करत होता, हे दर्शविते की बुल्सने निर्देशांकावर मजबूत पकड कायम ठेवली आहे. ७२ पातळीवर किंचित जास्त खरेदी केलेल्या झोनमध्ये पुन्हा प्रवेश केल्याने आरएसआयने पाठिंबा दर्शविला आहे, जो सूचित करतो की खरेदी-विक्री धोरण व्यापाऱ्यांसाठी योग्य आहे. ५९३०० आणि ५९००० पातळीवर प्रमुख समर्थन पातळी (Support Level) दिसून येत आहेत, जी संचय क्षेत्र म्हणून काम करू शकते. वरच्या बाजूला (Up Side) तात्काळ प्रतिकार (Immdiate Resistance) ६०००० पातळीच्या चिन्हावर स्थित आहे, जर गती कायम राहिली तर त्याची चाचणी केली जाऊ शकते.'आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'सकारात्मक सुरुवातीनंतर निर्देशांक बाजूलाच राहिला, दिवसाचा शेवट जवळजवळ कोणताही बदलला नाही. गुरुवारी, निफ्टीने १४ महिन्यांनंतर नवीन सार्वकालिक उच्चांक नोंदवला, परंतु ब्रेकआउट म्यूट झाला आणि त्यानंतर निर्देशांक बाजूलाच सरकला. तथापि, अल्पकालीन कल सकारात्मक राहिला आहे, निर्देशांक सर्व प्रमुख मूव्हिंग सरासरींपेक्षा आरामात व्यवहार करत आहे. आरएसआय तेजीच्या क्रॉसओवरमध्ये आहे आणि उच्च-शीर्ष, उच्च तळाशी रचना अबाधित दिसते, जी चढत्या चार्ट पॅटर्नची पुष्टी करते. खालच्या टोकावर, समर्थन २६००० पातळीवर ठेवले आहे जोपर्यंत ही पातळी ओलांडली जात नाही तोपर्यंत निर्देशांक २६४४०/२६५८० पातळीच्या दिशेने जाऊ शकतो. बाय-ऑन-डिप्स दृष्टिकोन हा एक चांगला धोरण असेल, कारण अलिकडच्या तीक्ष्ण वरच्या हालचालीनंतर जवळच्या काळात काही एकत्रीकरण अपेक्षित आहे.'आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'रुपया ०.०६ ने कमकुवत होऊन ८९.३१ पातळीवर व्यवहार करत होता, डॉलर निर्देशांक १०० डॉलरच्या खाली राहिल्याने तो बाजूलाच राहिला. गेल्या काही दिवसांपासून दुय्यम बाजार मजबूत राहिल्याने आणि सर्वकालीन उच्चांकी पातळीजवळ फिरत राहिल्याने, सकारात्मक परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) आवक (Inflow) सुरू राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे रुपयाला काही प्रमाणात दिलासा मिळेल.रुपया ८८.७५-८९.५५ रुपयांच्या श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे.'

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 4:30 pm

Gautam Gambhir : ‘यशाचं श्रेय दिलं होतं का?’, गंभीरवर टीका करणाऱ्यांना गावस्करांचा सवाल; म्हणाले, ‘मग पराभवानंतरच कोच…’

Sunil Gavaskar defends Gautam Gambhir : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला ०-२ अशा मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गुवाहाटी येथे फलंदाजीची वाताहत झाल्यानंतर तब्बल २५ वर्षांनी दक्षिण आफ्रिका संघाने भारताच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचला. या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट जगतात हाहाकार माजला असून, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला पदावरून हटवण्याची […] The post Gautam Gambhir : ‘यशाचं श्रेय दिलं होतं का?’, गंभीरवर टीका करणाऱ्यांना गावस्करांचा सवाल; म्हणाले, ‘मग पराभवानंतरच कोच…’ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 4:28 pm

मैत्रीच्या गणपतीच्या दानपेटीतील दीड लाखांची गोशाळेस भेट; सामाजिक बांधिलकी जपत अनोखा उपक्रम

बिबवेवाडी (पुणे) – गणेशोत्सव काळात ‘मैत्रीच्या गणपती’ला भाविकांकडून मिळालेल्या दानातील तब्बल दीड लाख रुपये भिवरी येथील ‘गुरुमाँ डॉ. मंजूश्री गोशाळे’ला अर्पण करण्यात आले. प्रमुख उद्योगपती मनोज छाजेड यांच्या वाढदिवसानिमित्त दानपेटीतील सर्व रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या कार्याचे समाजात सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगी मैत्रीच्या गणपतीचे प्रमुख मनोज छाजेड, गोशाळेचे अध्यक्ष […] The post मैत्रीच्या गणपतीच्या दानपेटीतील दीड लाखांची गोशाळेस भेट; सामाजिक बांधिलकी जपत अनोखा उपक्रम appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 4:17 pm

कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रि‍पदासाठी संघर्ष, सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यातील संघर्ष मठांपर्यंत पोहोचला

नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील संघर्ष आता राज्यातील मठांपर्यंत पोहोचला आहे. मुख्यमंत्रि‍पदासाठी सुरू झालेला हा संघर्ष हळू हळू तीव्र होऊ लागला आहे. या संघर्षामुळे काँग्रेसचे कर्नाटकमधील राजकीय समीकरण बिघडण्याची शक्यता वाढली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे दोघेही स्वतःचा गट मबजूत करण्यासाठी तसेच प्रतिस्पर्धी गटाला कमकुवत करण्यासाठी शह काटशहचे राजकारण करू लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिस्पर्धी आमदारांना स्वतःच्या गटात ओढण्यासाठी ५० कोटी रुपये, फ्लॅट, लक्झरी कार अशा स्वरुपाची आमिषं दिली जात आहेत.मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील संघर्षात आता वोक्कालिगा समाजाचा आदिचुंचनगिरी मठ ओढला गेला आहे. आदिचुंचनगिरी मठाचे प्रमुख निर्मलानंद नाथ स्वामी यांनी जाहीररित्या डी. के. शिवकुमार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी काँग्रेसला निर्वाणीचा इशाराही दिला आहे. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी दलित आणि ओबीसी नेत्यांना आपल्या बाजूला ओढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ता स्थापनेवेळी सिद्धरामय्या अडीच वर्ष मुख्यमंत्री राहतील नंतर हे पद डी. के. शिवकुमार यांना दिले जाईल, असा तोंडी करार झाला होता. पण अडीच वर्ष उलटली तरी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पद सोडलेले नाही. यामुळेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे ओबीसी गटातील कुरुबा समाजाचे प्रतिनिधित्व करतात तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे वोक्कालिगा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. राजकीय संघर्ष वाढला तर कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या मतपेढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेसच्या नेत्यांवर कर्नाटकचा राजकीय पेच सोडवण्यासाठीचा दबाव वाढत चालला आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 4:10 pm

Maharashtra Winter Session 2025 : अखेर विधीमंडळ अधिवेशनाची तारीख १ डिसेंबरला ठरणार!

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) निवडणुकांमुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra Legislature Session) तारखेचा मुहूर्त अखेर ठरला आहे. विधीमंडळ कामकाजाबाबत निर्णय घेण्यासाठी विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची (BAC) बैठक १ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीत अधिवेशनाची नेमकी तारीख आणि कालावधी निश्चित केला जाणार आहे. दुपारी २.३० वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक विधीमंडळात होणार आहे. त्यामुळे, अधिवेशनाच्या कामकाजाबाबतची अनिश्चितता आता संपुष्टात येणार आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 4:10 pm

सावधान! आयटीआर भरताना परदेशी मालमत्ता व उत्पन्न लपवताय? CBDT Nudge मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू

प्रतिनिधी:आता आयकर भरताना चुका होत असतील तर त्या वेळीच सुधारणे आवश्यक असते. यासाठी केंद्र सरकारचा सीबीडीटी विभाग म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) वेळोवेळी करदात्यांची जनजागृती करत असतो. या भूमिकेअंतर्गत आयकर विभागाने दुसरी NUDGE मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत शुक्रवारपासून ओळखल्या जाणाऱ्या 'NUDGE' लोकांना एसएमएस आणि ईमेल पाठवले जातील ज्यात त्यांना दंडापासून वाचण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ रोजी अथवा त्यापूर्वी त्यांच्या सुधारित माहितीचा स्वेच्छेने आढावा घेण्यास सांगितले जाणार आहे. यापूर्वी वित्तीय विभागाच्या सर्वेक्षणात अनेकदा करदाते आपली परदेशातील संपत्ती, अथवा कमाई याबाबत आयटीआर मध्ये उल्लेख करत नाहीत. त्यामुळे या आरटीआर भरताना देशांतर्गत सोडून परदेशी स्थावर मालमत्ता व कमाई बाबत उल्लेख करणे क्रमप्राप्त असते त्यामुळे जर यापूर्वी काही चूक असल्यास ती तांत्रिक चूक सुधारण्यासाठी विभागाकडून वेळ दिला जाणार आहे.अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार , आर्थिक वर्ष २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन (AEOI) या नव्या तंत्रज्ञानामुळे माहिती लपवलेल्या अथवा परदेशी मालमत्ता भरायची राहिलेल्या नागरिकांना एसएमएस व ईमेल गेले होते. याच नज (Nudge) मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात या यंत्रणेचा वापर केला गेला होता. आता याचा दुसरा अध्याय (फेज) सरुऊ होणार आहे. स्वतः सीबीडीटीच्या अंतर्गत विश्लेषणात उच्च-जोखीम प्रकरणे (High Risk) ओळखली गेली आहेत. त्या संबंधित करदात्यांकडे परदेशी मालमत्ता अस्तित्वात असल्याचे दिसून आले होते. परंतु असेसमेंट वर्ष (AY) साठी आर्थिक वर्ष २२०५-२६ साठी दाखल केलेल्या आयटीआरमध्ये त्यांची नोंद केली गेली नाही असे विभागाने म्हटले.आयटीआरमध्ये अनुसूची परदेशी मालमत्ता (Forgien Assets) आणि परदेशी स्रोत उत्पन्न (Foreign Source Income) मध्ये योग्य अहवाल देणे सुलभ करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे असे विभागाने यावेळी स्पष्ट केले आहे. १९६१ च्या आयकर कायदा आणि काळा पैसा (अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर आकारणी कायदा, २०१५ अंतर्गत परकीय मालमत्ता आणि उत्पन्नाची अचूक आणि संपूर्ण माहिती उघड करणे ही एक वैधानिक तरतूद असते.'स्वैच्छिक अनुपालन (Compliance) सुधारण्यासाठी सीबीडीटी डेटा तंत्रज्ञान वापरून करदात्या-केंद्रित उपाययोजना मजबूत करत आहे. मार्गदर्शन आणि सक्षम करण्यासाठी डेटाचा गैर हस्तक्षेप वापर (NUDGE) हा उपक्रम अचूक अहवाल देण्यास आणि महसूल एकत्रित करण्यास प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या दूरदर्शी, तंत्रज्ञानप्रणि प्रशासनासाठी सीबीडीटीच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करतो.' असेही संस्थेने संबोधले आहे.यापूर्वी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरू झालेल्या पहिल्या NUDGE मोहिमेत निवडक करदात्यांना लक्ष्य केले गेले होते. या अपुरी माहिती देणाऱ्या करदात्याना एईओआय (AEOI) फ्रेमवर्क अंतर्गत परदेशी संपत्तीबाबत २०२४-२५ च्या आयकर रिटर्नमध्ये (ITR) संबंधित वास्तविक माहिती उघड न केलेल्या परदेशी मालमत्ता धारण केल्याचे आपल्या रिपोर्टमध्ये नोंदवले होते.त्यामुळे विभागाच्या मते या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसून आले. २४६७८ करदात्यांनी त्यांचे रिटर्न पुन्हा तपासले आणि २९२०८ कोटी रुपयांची परदेशी मालमत्ता उघड केली होती तसेच १०८९.८८ कोटी रुपयांचे परदेशी स्रोत उत्पन्न उघड आयटीआरमध्ये उघड केली होती.तसेच सीबीडीटीला कॉमन रिपोर्टिंग स्टँडर्ड्स (CRS) नुसार भागीदार अधिकार क्षेत्रांकडून आणि फॉरेन अकाउंट टॅक्स कम्प्लायन्स अँक्ट (FTCA) अंतर्गतही युनायटेड स्टेट्सकडून भारतीय रहिवाशांच्या परदेशी वित्तीय मालमत्तेशी संबंधित माहिती मिळते. ही माहिती संभाव्य आर्थिक विसंगती ओळखण्यास आणि करदात्यांना वेळेवर आणि अचूक अनुपालनाकडे मार्गदर्शन करण्यास मदत करते.सीबीडीटीने सर्व पात्र करदात्यांना वैधानिक अहवाल आवश्यकतांचे पूर्णपणे पालन करण्यासाठी या संधीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. अनुसूची एफए आणि एफएसआय अंतर्गत सीआरएस, एफएटीसीए आणि प्रकटीकरण आवश्यकतांविषयी (Disclosure Requirements) अधिक तपशील प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 4:10 pm

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेटचे नियम बदलले; नाव, पत्ता, जन्म तारखेसाठी आता ‘हे’कागदपत्रे आवश्यक

Aadhaar Card Update: आजच्या काळात सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेल्या आधार कार्डमध्ये (Aadhaar Card) बदल किंवा अपडेट (Update) करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नवीन नियमावली जाहीर केली आहे. नाव, पत्ता किंवा जन्म तारीख बदलण्यासाठी आता कोणते कागदपत्र (Documents) आवश्यक असतील, याबाबत UIDAI ने स्पष्ट माहिती दिली आहे. या नवीन यादीमुळे नागरिकांसाठी आधार […] The post Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेटचे नियम बदलले; नाव, पत्ता, जन्म तारखेसाठी आता ‘हे’ कागदपत्रे आवश्यक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 3:53 pm

‘बाहों में चली आओ…’; गाण्यावर भाग्यश्रीचा मनमोहक डान्स पाहून चाहते घायाळ, व्हिडीओ व्हायरल

Bhagyashree : सिनेसृष्टीतील कलाकार त्यांच्या सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. कलाकारांचे इंन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात रील व्हायरल होत असतात. बॅालीवूड इंडस्ट्रीत मैने प्यार किया या चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री भाग्यश्री सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री भाग्यश्रीने तिच्या […] The post ‘बाहों में चली आओ…’; गाण्यावर भाग्यश्रीचा मनमोहक डान्स पाहून चाहते घायाळ, व्हिडीओ व्हायरल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 3:32 pm

प्राइम व्हिडिओची नवी मालिका ‘दलदल’ IFFI 2025 मध्ये सादर—महिला-केंद्रित क्राईम थ्रिलरची प्रभावी झलक

मुंबई : भारताच्या सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओने आज ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) त्यांच्या मालिकेची ‘दलदल’ची एक्सक्लूसिव्ह फर्स्ट लुक सादर केली. या काल्पनिक मालिकेने आपल्या रोमांचकारी सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, ज्यात मुंबईच्या नव्या डीसीपी रीटा फेरेरा एका निर्दयी खुनीचा माग काढताना शहराच्या नैतिक धूसर प्रदेशात अडकत जाते आणि स्वतःच्या भूतकाळातील सावल्यांना सामोरी जाते. विश धमिजा यांच्या बेस्टसेलिंग कादंबरी भेंडी बाजारवर आधारित ‘दलदल’ हे अबंडेंटिया एंटरटेनमेंटचे निर्मितीकार्य असून, सुरेश त्रिवेणी यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे आणि निर्माते म्हणून विक्रम मल्होत्रा व त्रिवेणी कार्यरत आहेत. दिग्दर्शन अमृत राज गुप्ता यांचे असून, लेखन त्रिवेणी, श्रीकांत अग्नीस्वरण, रोहन डी’सूझा आणि प्रिया सागी यांनी केले आहे. ही सायकोलॉजिकल क्राईम थ्रिलर भूमी सतीश पेडणेकर, आदित्य रावल आणि सामरा तिजोरी यांच्या प्रमुख भूमिकांनी सजलेली असून लवकरच भारतासह जगभरातील २४०+ देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.इन-रूम एक्सक्लूसिव्ह टीझर प्रीव्ह्यूनंतर “बियॉन्ड द स्टीरियोटाइप: रिडिफायनिंग विमेन अँड पॉवर इन मॉडर्न स्टोरीटेलिंग” या शीर्षकाखाली ज्ञानवर्धक फायरसाईड चर्चा झाली. या सत्रात मालिकेची मुख्य अभिनेत्री भूमी सतीश पेडणेकर व प्राइम व्हिडिओ इंडिया येथील डायरेक्टर आणि हेड ऑफ ओरिजिनल्स निखिल माधोक सहभागी झाले होते, तसेच ‘दलदल’चे अन्य सर्जनशील सहकारीही उपस्थित होते. त्यांनी मालिकेच्या मनोवैज्ञानिक गाभ्यावर आणि महिला पात्रांच्या चित्रणात रूढ चौकटी मोडण्याच्या प्रयत्नांवर चर्चा केली. चर्चेत स्पष्ट केले गेले की ‘दलदल’ जाणीवपूर्वक महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या रूढ चित्रणापासून दूर जाते आणि त्याऐवजी एक बहुआयामी स्त्रीचे वास्तववादी चित्रण करते—जी एकाच वेळी मजबूतही आहे, द्वंद्वपूर्णही, संवेदनशीलही आणि जटिल उद्दिष्टांनी प्रेरितही.प्राइम व्हिडिओ इंडिया चे डायरेक्टर आणि हेड ऑफ ओरिजिनल्स निखिल माधोक यांनी महिलाकेंद्रित कथनाच्या ब्रँडच्या दृष्टिकोनावर बोलताना म्हटले, “प्राइम व्हिडिओमध्ये आमचा महिला-प्रधान स्टोरीटेलिंगचा दृष्टिकोन पूर्णपणे विचारपूर्वक आहे. दशकेभर मुख्य प्रवाहातील चित्रपट 90% पुरुष नायक आणि पुरुष दृष्टिकोनाभोवतीच फिरत राहिले, तर दूरदर्शनने (महिला प्रेक्षकांवर लक्ष केंद्रित असूनही) महिलांच्या कहाण्या घराच्या चौकटीपुरत्या मर्यादित ठेवल्या. स्ट्रीमिंगने आम्हाला हे पॅटर्न मोडण्याची संधी दिली—जिथे आम्ही अशा महिलांना समोर आणतो ज्यांच्याकडे एजन्सी आहे, खोली आहे, अपूर्णता आहे आणि ज्यांची व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यासारखी विकसित होते. तुम्ही हे आमच्या संपूर्ण स्लेटमध्ये पाहू शकता: ‘दलदल’, ‘दहाड’, ‘कॉल मी बे’, ‘मेड इन हेवेन’, ‘फोर मोर शॉट्स प्लीज’, ‘सुजल’ आणि इतर अनेक भाषांमधील कथांमध्ये—जिथे महिला प्रतीक नसून पूर्ण विकसित, जटिल पात्रे आहेत.” त्यांनी पुढे सांगितले, “हे फक्त महिलांच्या कहाण्या सांगण्याबाबत नाही; तर महिलांचा सहभाग संकल्पनेपासून लेखन, निर्मिती आणि अंमलबजावणीपर्यंत सर्व स्तरांवर सुनिश्चित करण्याबाबत आहे. हा एक सातत्यपूर्ण आणि सजग प्रयत्न आहे, आणि प्रतिसाद अत्यंत सकारात्मक आहे. प्रेक्षकांनी महिला-केंद्रित कथांना नाकारले नाही; त्यांनी त्या स्वीकारल्या आहेत.”मालिकेत डीसीपी रीटा फेरेराची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री भूमी सतीश पेडणेकर म्हणाल्या, “मी माझ्या घरातील महिलांकडून शिकलो की ताकद नेहमी आवाजात नसते—ती शांत, ठाम आणि जगावर सतत प्रश्न उपस्थित करणारीही असू शकते. हे मी माझ्या आईत पाहिले आणि रीटातही. रीटा जास्त बोलत नाही, पण खूप काही करते. कृती शब्दांपेक्षा मोठी असते, आणि ते रीटा फेरेरापेक्षा कोणी चांगले दाखवू शकत नाही. पहिल्यांदा मला संवाद वा डोळ्यांच्या भावांवर अवलंबून रहायचे नव्हते. मला सर्वात लहान शारीरिक संकेतांतून संवाद साधायचा होता—जसे अपराधगंडाने तिची मान ताणली जाणे किंवा राग आल्यावर शरीराची प्रतिक्रिया. ही माझ्या करिअरमधील सर्वांत कठीण भूमिकांपैकी एक होती, आणि त्यातून बाहेर येण्यासाठी मला महिनो लागले. पण ती अत्यंत समाधानकारक होती, कारण मला अशा टीमबरोबर काम करायला मिळाले ज्यांना जटिलता, अंधार आणि महिलांसाठी अँटी-हीरो गुण लिहिण्याचा विश्वास आहे. आमच्यासाठी असे पात्र फार कमी लिहिले जातात.”अबंडेंटिया एंटरटेनमेंटचे संस्थापक आणि सीईओ व ‘दलदल’चे निर्माता विक्रम मल्होत्रा यांनी ‘शकुंतला देवी’, ‘जलसा’, ‘शेरनी’, ‘हश हश’ आणि आता ‘दलदल’सारख्या प्रकल्पांद्वारे मजबूत महिला पात्रांना पाठिंबा देण्याबाबत सांगितले, “अबंडेंटियामध्ये नेहमी कथा प्रथम असते आणि त्यानंतर कथेचे दृष्टीकोन. माझा विश्वास असा आहे की जसजसे आपण कहाण्यांना महिला-प्रधान किंवा पुरुष-प्रधान अशा विभागांत विभागता, तसतशी त्यांची सार्वत्रिकता कमी होते. कहाण्यांनी सार्वत्रिक पातळीवर जोडले गेले पाहिजे; त्यानंतरच त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. मजबूत महिला पात्रे घडवताना संतुलन अत्यंत महत्त्वाचे असते. कोणीही पूर्णपणे चांगले किंवा पूर्णपणे वाईट नसते. भारतीय सिनेमातील महिलांच्या ऐतिहासिक चित्रणाबद्दल माझी समस्या हीच आहे की ते नेहमी एका बाजूला झुकते. अबंडेंटियामध्ये आम्ही मानवी सत्य, जटिलता, सूक्ष्मता आणि भावनिक प्रामाणिकता स्वीकारतो.”निर्माता आणि क्रिएटर सुरेश त्रिवेणी म्हणाले, “जेव्हा हा शो प्रथम माझ्याकडे आला, तेव्हा माझ्याही मनात तीच शंका होती जी बऱ्याच लोकांच्या मनात असते: आणखी एक क्राईम कथा—तेच जुने पॅटर्न्स. या शैलीत ठराविक टेम्पलेट असतात आणि आपण त्यात अडकू असे वाटते. पण ‘दलदल’साठी आमची मुळीच ती दिशा नव्हती. ही फक्त चांगले विरुद्ध वाईट किंवा ‘खुनी कोण?’ याबद्दलची कथा नाही. आम्हाला यापुढे जायचे होते. आम्हाला जाणून घ्यायचे होते की सगळे सुरू कुठून होते. सत्य हे आहे की आपण सर्वांमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही आहेत; आपण सर्वांमध्ये कुठेतरी राग आहे. ही मालिका याच क्षेत्राचा शोध घेते. ‘व्होडनिट’च्या चौकटीत अडकायचे नव्हते; आम्हाला हा प्रश्न विचारायचा होता, लोक ते करतातच का?”दिग्दर्शक अमृत राज गुप्ता म्हणाले, “पहिली स्क्रिप्ट वाचताना मलाही कळत नव्हते की रीटा तशी का आहे, तिचे आघात, तिचा भूतकाळ आणि त्याने तिचा वर्तमान कसा घडवला. हे समजून घेतल्यावर प्रक्रिया सोपी झाली. आणि जेव्हा तुमच्याजवळ भूमीसारखी सहयोगी, सहज आणि उदार अभिनेत्री असते, तेव्हा काम आनंद देणारे होते. निर्माते आणि क्रिएटर यांच्या सहकार्याने सर्व गोष्टी हळूहळू योग्य ठिकाणी बसत गेल्या. आम्ही सतत स्वतःला आठवण करून देत होतो की पात्रे इतकी जटिल असल्यामुळे ‘कमी म्हणजे जास्त’. आम्हाला कोणतीही भावना अतिशय दाखवायची नव्हती. आम्हाला त्यांना मनुष्य म्हणून पाहायचे होते—संवेदनशील, त्रुटीपूर्ण, स्तरित. आम्हाला कोणाची बाजू घ्यायची नव्हती. आम्हाला पाहायचे होते आणि प्रेक्षकांना त्यांचा दृष्टिकोन ठरवू द्यायचा होता.”विक्रम मल्होत्रा आणि सुरेश त्रिवेणी निर्मित आणि त्रिवेणी यांनी मालिकेच्या रूपात क्रिएट केलेली ‘दलदल’—अबंडेंटिया एंटरटेनमेंटची निर्मिती—विश धमिजा यांच्या भेंडी बाजार या बेस्टसेलिंग कादंबरीवर आधारित आहे. दिग्दर्शन अमृत राज गुप्ता यांचे असून, भूमी सतीश पेडणेकर, आदित्य रावल आणि सामरा तिजोरी प्रमुख भूमिकेत आहेत. ‘दलदल’ लवकरच प्राइम व्हिडिओवर भारतासह २४०+ देश आणि प्रदेशांमध्ये एक्सक्लूसिव्हरीत्या प्रदर्शित होणार आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 3:30 pm

How To Clean Gold: घरच्या घरी सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता कशी करावी? जाणून घ्या सोपे आणि सुरक्षित उपाय

How To Clean Gold: सोन्याचे दागिने महागडे असतात आणि त्यांची काळजीपूर्वक स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक असते. कानातले, अंगठ्या किंवा मंगळसूत्रावर मळ, तेल किंवा धूळ साचू लागली की दागिन्यांची चमक कमी होते. अशावेळी घरच्या घरीच ते नीट आणि सुरक्षित पद्धतीने साफ करता येतात. पाहूया काही सोपे उपाय. १. टूथपेस्टने स्वच्छता अत्यंत मऊ आणि बिनदाणेदार टूथपेस्ट वापरा. […] The post How To Clean Gold: घरच्या घरी सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता कशी करावी? जाणून घ्या सोपे आणि सुरक्षित उपाय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 3:26 pm

१० वर्षांनंतरही ‘तारा’ जिवंत: तमाशामधील दीपिकाचा अभिनय नव्या पिढीचा आवाज बनला

मुंबई : दीपिका पादुकोणच्या तमाशा या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात दीपिकाने एक वेगळी, पण सहज समजून घेता येणारी भूमिका साकारली होती. ही अशी भूमिका आहे जी प्रत्येक मुलीच्या मनाला स्पर्श करते, कारण अनेकांना ताऱ्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. रोमँटिक आणि भावनिक कथानकात तिच्या व्यक्तिरेखेला एक खास खोलपणा आहे. प्रेम, स्वातंत्र्य आणि संवेदनशीलतेचं सुंदर मिश्रण असलेल्या ताऱ्याला दीपिकाने अतिशय जिवंतपणे उभं केलं आहे. या सर्व गुणांचा एकत्रित प्रभाव तिला अशी व्यक्ती बनवतो जी आपल्यालाही ओळखीची वाटते कदाचित आपण स्वतःच.ताऱ्याचा निडर स्वभाव, तिची रोमांचप्रियता, तिची रंगीबेरंगी आणि स्पष्ट विचारसरणी, तिचं मोठं मन आणि निर्भयपणे सत्य सांगण्याची तिची सवय, या सगळ्यांना दीपिकाने ज्या साधेपणाने आणि बारकाईने साकारलं आहे, त्यामुळेच ती या चित्रपटाची खरी जान बनते. *तमाशा* आजही दीपिकाच्या सर्वात आवडत्या आणि चर्चित चित्रपटांपैकी एक मानला जातो. तिच्या अभिनयातून दिसून येतं की ती अगदी छोट्या-छोट्या भावनाही किती सहज आणि वास्तववादी पद्धतीने जिवंत करते.रणबीर कपूरने साकारलेल्या वेदसोबत तिची केमिस्ट्री अत्यंत सुंदर दिसते आणि कथेला आणखी रंजक बनवते. आपल्या करिअरमध्ये दीपिकाने अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत, पण त्यामध्ये तारा ही एक वेगळीच आणि उठून दिसणारी व्यक्तिरेखा आहे. *तमाशा*मध्ये ती अनेक भावना व्यक्त करते आणि त्या देखील अत्यंत शांत, संतुलित आणि साधेपणाने. यामुळेच हा पात्र लोकांच्या मनात आजही खोलवर रुजलेला आहे.इम्तियाज अलींच्या चित्रपटांमध्ये पात्रं कॅमेऱ्यासमोर जगतात आणि श्वास घेतात, आणि दीपिका आपल्या अभिनयातून हे पुरेपूर सिद्ध करते. तारा ही अशी व्यक्तीरेखा आहे जी आजही लोकांना आपलीसारखी वाटते, चित्रपटाला अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही. ताऱ्याच्या रूपातील दीपिकाचा अभिनय हा अजूनही तिच्या करिअरमधील सर्वात सुंदर आणि मनाला भिडणाऱ्या परफॉर्मन्सपैकी एक मानला जातो.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 3:10 pm

नाशिकमध्ये सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली सात पानी चिठ्ठी

नाशिक : नाशिक शहरात एका नवविवाहितेने घरगुती छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पंचवटी परिसरातील हिरावाडीत राहणाऱ्या नेहा संतोष पवार हिने विषारी औषध सेवन करून आयुष्य संपवले. मृत्यूपूर्वी तिने सात पानी चिठ्ठी लिहित पती आणि सासरकडून होत असलेल्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, नेहाचे लग्न ४ जून २०२५ रोजी संतोष पवार याच्यासोबत झाले होते. लग्नाला काहीच महिने झाले असतानाच तिच्या जीवनात अत्याचारांची मालिका सुरू झाल्याचे तिने आपल्या चिठ्ठीत स्पष्ट केले आहे. सतत पैशांची मागणी, माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव, चारित्र्यावर संशय, आजारी असतानाही काम करायला भाग पाडणे, शिवीगाळ, तसेच नणदी व सासूकडून होणारा अपमान, अशा सर्व प्रकारच्या छळाचा उल्लेख तिने केलेला आहे.नेहाने चिठ्ठी सासरच्या लोकांकडून लपवली जाईल या भीतीने तिचे फोटो काढून भावाला व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. सात पानी चिठ्ठीत तिने पतीच्या वागणुकीबाबत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अपमानित करणे, कौमार्य तपासण्याचा प्रयत्न करणे, तसेच पूर्वीच्या प्रेमसंबंधातील अश्लील फोटो दाखवणे, हे सर्व प्रकार तिने चिठ्ठीत नोंदवले आहेत.चिठ्ठीमध्ये नेहाने पतीच्या अनैतिक संबंधांचा देखील उल्लेख केला आहे. तिने सांगितले की नवऱ्याने त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे अश्लील फोटो दाखवले होते. सासरकडून “माहेरून पैसे आण” असा सतत दबाव असल्याचेही नेहाने म्हटले आहे. तिच्या म्हणण्यानुसार, माहेरहून २० हजार रुपये आणि भावाची गाडी आणून दिल्यानंतरही मागण्या थांबल्या नाहीत. नवरा सारखा 'तुझा कोणी ठेवलेला यार असेल' म्हणून सारखी माहेरी जाते असे टोमणे मारायचा.चिठ्ठीत नेहाने सासू व नणदींकडून होणाऱ्या वागणुकीचाही उल्लेख केला आहे. पाळी आली आहे असे सांगितल्यावर सासूने संशय घेतला आणि नणंदेला तिला पाळी आली आहे की नाही हे चेक करायला सांगितलं होतं. नणंदा टोमणे मारायच्या आणि नवऱ्याला व सासूला खोटे सांगायच्या, असं गंभीर आरोप नेहाने आपल्या सुसाईड नोटमध्ये केले आहेत.नेहाने आपल्या चिठ्ठीच्या शेवटी लिहिलं होतं की, तुम्ही मला खूप प्रेमाने वाढवलं पण माझं नशीब खराब होते, म्हणून नवरा आणि सासर चांगले भेटले नाही. रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा मी विष पिऊन स्वत:ला संपवते आहे.नेहाची चिठ्ठी तपासात महत्त्वाचा पुरावा ठरली आहे. प्राथमिक तपासात पोलिसांनी पती, त्याच्या तीन बहिणी आणि सासूला अटक केली आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.अलीकडेच वैष्णवी हागवणे आणि डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणानंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 3:10 pm

शेअर बाजारात उच्चांकावर मोठी घसरगुंडी! सेन्सेक्स अखेरच्या सत्रात ५०० अंकाने व निफ्टी ८० अंकांने घसरला 'या'कारणांमुळे

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात एक यील्ड पातळी गाठल्यानंतर गुंतवणूकदारांनी सावधगिरीची भावना न बाळगता मोठ्या प्रमाणात सेल ऑफ करून आपला मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग सुरू केल्याने शेअर बाजारातील एकाच सत्रात सेन्सेक्स ५०० अंकाहून अधिक पातळीवर कोसळला असून निफ्टीही ८० अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे सेन्सेक्स ८५७६५ या उच्चांकी पातळीवरून ८५४९१.२३ पातळीवर व निफ्टी २६२८५.९५ पातळीवरून २६२०० पातळीवर कोसळला आहे. बाजार तज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी सावधगिरीची न बाळगता केवळ छोट्या नफा कमाईवर अवलंबून न राहता नियोजनबद्ध पद्धतीने व वित्तीय शिस्तीने कार्यवाही केल्याने शेअर बाजारातील घसरण झाली आहे. अर्थात शेअर बाजारात सकाळच्या सत्रात चांगल्या पद्धतीने वाढ झाल्याने गुंतवणूकदारांच्या अपेक्षा बळावल्या होत्या मात्र अखेरच्या सत्रात बँक निर्देशांक, तेल व गॅस, रिअल्टी शेअर्समध्ये घसरण झाल्याने व मेटल शेअर्समधील रॅली घसरल्याने अर्थातच इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली असली तरी अद्याप 'हिरव्या' रंगातच बाजार व्यवहार करत आहे.सकाळी बँक निर्देशांकाने निफ्टीला मोठे बळ मिळावून दिले होते. उदाहरणार्थ एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स ळ अँक्सिस बँक, एल अँड टी, या शेअर्समध्ये वाढ झाल्याने बँक निफ्टीत रॅली झाली होती तर इतर कंपन्यांमध्ये बजाज ऑटो, हिंदाल्को इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स एल अँड टी सारख्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजाराने दरपातळी राखण्यात यश मिळवले. मात्र बजाज होल्डिंग्स, आयशर मोटर्स, डीसीएम श्रीराम, इंडियन बँक, टीसीएस, टाटा स्टील यांसारख्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने बाजारातील रॅली घसरली आहे.दुपारपर्यंत सेन्सेक्स ८५,४९१.२३ वर घसरला असून दिवसाच्या उच्चांकापेक्षा सुमारे ५६४ अंकांनी कमी तर निफ्टी दुपारी १:३० वाजेपर्यंत २६१५० पातळीच्या खाली २६१४४.७५ पातळीवर आला होता. अशा परिस्थितीतआयशर मोटर्स, ईटरनल आणि ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन हे निफ्टी५० निर्देशांकात मोठ्या प्रमाणात घसरले होते तर बजाज फायनान्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हर हे निर्देशांकातील सर्वाधिक वाढणाऱ्या कंपन्यांमध्ये होते जे३ टक्क्यांपर्यंत आज वाढले.आज सेन्सेक्सच्या मासिक डेरिव्हेटिव्ह्जच्या समाप्तीच्या (Monthly Expiry) दिवशी बाजारात मोठ्या हालचाली झालेल्या दिसल्या. आतापर्यंत अनुभव बघता एक्सपायरी सत्रांमध्ये सामान्यतः किमतीत तीव्र चढउतार प्राईज पोझिशन्स बदलल्या जातात अथवा त्यांना स्क्वेअर ऑफ केले जाते.आजच्या या हालचालीवर जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट आनंद जेम्स म्हणाले आहेत की,निर्देशांक २६१६५ पातळीच्यावर सकारात्मक पूर्वाग्रह राखेल अशी अपेक्षा होती परंतु जर तो २६०९८ पातळीच्या वर राहिला नाही तर आणखी नफा घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.निफ्टी व्यापक निर्देशांकांची कामगिरी पाहता स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये आज अनपेक्षितपणे घसरण झाली आहे आणि दोन दिवसांचा रॅली त्यानिमित्ताने संपली आहे. विशेषतः सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक १४ महिन्यांच्या नवीन उच्चांकावर पोहोचले असतानाही हे घडले आहे.'महत्त्वाच्या निर्देशांकांनी सर्वकालीन उच्चांक गाठला असला तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप विश्वाचा एक मोठा भाग, ज्यामध्ये अनेक क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे, सुधारात्मक किंवा नाजूक क्षेत्रात आहे. रॅलीचा पुढचा टप्पा टिकवून ठेवणे अर्थपूर्ण कमाई पुनर्प्राप्ती, जागतिक मॅक्रोमध्ये स्थिरता आणि सतत देशांतर्गत सहभागावर अवलंबून असेल. आम्ही उच्च पातळीवर गतीचा पाठलाग करण्याऐवजी निवडक, गुणवत्ता-केंद्रित दृष्टिकोनाचा सल्ला देतो' असे बाजार तज्ञ तापसे म्हणाले आहेत. जागतिक कमोडिटी बाजारातही कमालीची अस्थिरता पहायला मिळत आहे. जागतिक बाजारातील अस्थिरतेमध्ये ग्रीनबॅकची मागणी कायम राहिल्याने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया किरकोळ किंमतीत घसरत आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची वाढलेली गुंतवणूक व कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने काही प्रमाणात बाजारात आधार मिळाला आहे परंतु चलनावर व्यापक दबाव कमी करण्यासाठी ते पुरेसे नव्हते असे फॉरेक्स व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 3:10 pm

‘काँग्रेसचे अनेक सोशल मीडिया अकाउंट परदेशातून चालतात” ; संबित पात्रा यांचा गंभीर आरोप

Sambit Patra on Congress। भाजप खासदार संबित पात्रा यांनी ,”काँग्रेस पक्ष देशाबाहेरील व्यक्तींशी संगनमत करत भारताविरुद्ध एक दृष्टिकोन तयार करण्यासाठी आहे. ” असा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी हा आरोप करताना, सोशल मीडियाच्या फीचर्सवरून असे दिसून आलंय कि अनेक काँग्रेस नेत्यांचे आणि संघटनात्मक खात्यांचे स्थान भारतात नाही तर परदेशात आहे.” असे म्हटले आहे. पात्रा यांनी […] The post ‘काँग्रेसचे अनेक सोशल मीडिया अकाउंट परदेशातून चालतात” ; संबित पात्रा यांचा गंभीर आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 2:59 pm

‘दशावतार’फेम अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी! सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर

Priyadarshini Indalkar : ‘दशावतार‘ या मराठी चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. बॅाक्स अॅाफिसवर चांगली कमाई चित्रपटाने केली. या चित्रपटात अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले. त्याचप्रमाणे चित्रपटातील इतर सहकलाकारांनी साकारलेल्या भूमिकेचे देखील कौतुक प्रेक्षकांनी केले. या चित्रपटात अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिच्या व्यक्तिरेखेचे देखील खूप कौतुक झाले. अशातच आता अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने चाहत्यांना […] The post ‘दशावतार’फेम अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी! सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 2:48 pm

Ram Gopal Varma: ‘हाय रामा’ गाण्यामागची मजेदार गोष्ट; दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सांगितला पडद्यामागचा ड्रामा!

Ram Gopal Varma : एक लोकप्रिय गाणे तयार होईपर्यंत किती मोठा संघर्ष करावा लागतो, हे अनेकांना ठाऊक नसते. अशाच एका प्रसिद्ध गाण्यामागची मनोरंजक आणि थोडी ड्रामेबाज गोष्ट अलीकडेच समोर आली. 1995 साली प्रदर्शित झालेल्या ‘रंगीला’ या सुपरहिट चित्रपटातील ‘हाय रामा’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र या गाण्याच कंपोजिशन आणि शूटिंग ही […] The post Ram Gopal Varma: ‘हाय रामा’ गाण्यामागची मजेदार गोष्ट; दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सांगितला पडद्यामागचा ड्रामा! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 2:47 pm

“मुंबईत कधीही असुरक्षित वाटलं नाही”; कॅनडामधील कॅफेवर झालेल्या हल्ल्यानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Kapil Sharma | कॉमेडियन अभिनेता कपिल शर्माने कॅनडातील सरे शहरातील त्याच्या ‘कॅप्स कॅफे’वर झालेल्या फायरिंग प्रकरणांवर भाष्य केले आहे. कॅनडातील सरी येथील कॅप्स कॅफेवर पहिला हल्ला जुलैमध्ये, त्यानंतर दुसरा ऑगस्ट आणि तिसरा ऑक्टोबरमध्ये झाला होता. मात्र या घटनांमुळे कॅफेला उलट मोठी ओपनिंग मिळाली आणि स्थानिक लोकांचा पाठिंबाही वाढल्याचं त्याने सांगितले. कपिलने सांगितले की, “गोळीबाराची घटना […] The post “मुंबईत कधीही असुरक्षित वाटलं नाही”; कॅनडामधील कॅफेवर झालेल्या हल्ल्यानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 2:43 pm

“ट्रम्पना स्वतःची प्रशंसा ऐकायला आवडते, म्हणून जेव्हा पुतिन फोन करतील..” ; लीक झालेल्या फोन कॉलमुळे एकच खळबळ

Trump phone call leaked। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांची स्तुती ऐकायला आवडते. ते या त्यांच्या गुणाचा वापर करून अनेक कामे करून घेता येऊ शकतात. ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांच्यात झालेल्या संभाषणाने सध्या एकच गोंधळ उडाला आहे. या दोघांमधील फोन कॉल वरील […] The post “ट्रम्पना स्वतःची प्रशंसा ऐकायला आवडते, म्हणून जेव्हा पुतिन फोन करतील..” ; लीक झालेल्या फोन कॉलमुळे एकच खळबळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 2:31 pm

'बाबा... जे काका घरी आले होते, तेच जंगलात घेऊन गेले':वडील म्हणाले- एवढे बोलून मुलगी बेशुद्ध पडली; रायसेन रेप पीडितेच्या कुटुंबीयांची आपबीती

मुलगी घरासमोरील रस्त्याने अडखळत येत होती. ती पूर्णपणे रक्ताने माखलेली होती. मला पाहताच घाबरून 'पप्पा' म्हणत ती मला बिलगली. फक्त एवढंच सांगू शकली की, जे काका घरी आले होते, तेच तिला जंगलात घेऊन गेले. बोलता बोलता तिचा आवाज तुटला आणि ती माझ्याच हातात बेशुद्ध होऊन कोसळली. हे म्हणणं आहे त्या 6 वर्षांच्या निष्पाप मुलीच्या वडिलांचं, जिच्यावर 21 नोव्हेंबरच्या रात्री मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील गौहरगंज परिसरात अत्याचार करण्यात आले. ती मुलगी भोपाळच्या एम्स (AIIMS) रुग्णालयात जीवन आणि मृत्यू यांच्यात एक कठीण लढाई लढत आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आणि कुटुंबाच्या प्रार्थनांमुळे ती आता शुद्धीवर आहे आणि आपल्या घरच्यांशी तुटक-तुटक बोलू शकत आहे, पण तिच्यावर अजून तीन शस्त्रक्रिया होणे बाकी आहे. याचा अर्थ तिला अजून अनेक दिवस रुग्णालयाच्या बेडवरच काढावे लागतील, अशा वेदना सहन करत, ज्याची कल्पना करणेही कोणासाठी अशक्य आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की पीडितेला तीन तास उशिरा उपचारासाठी एम्समध्ये आणण्यात आले होते, ज्यामुळे खूप रक्तस्राव झाला होता. जर तिला वेळेवर रुग्णालयात आणले असते तर कदाचित इतक्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेची वेळ आली नसती. या घृणास्पद घटनेचा आरोपी, २३ वर्षीय सलमान खान, अजूनही पोलिसांच्या ताब्यात नाही. गेल्या ५ दिवसांपासून गौहरगंज पोलीस ठाण्यासमोर शेकडो लोकांचा जमाव जमला आहे. त्यांची फक्त एकच मागणी आहे - आरोपीचा एन्काउंटर. आरोपीने मुलीसोबत जी क्रूरता केली, त्यालाही सार्वजनिकरित्या शिक्षा व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. अखेर २१ नोव्हेंबरच्या त्या संध्याकाळी असे काय घडले होते? हे समजून घेण्यासाठी दिव्य मराठीने पीडितेच्या पालकांशी बातचीत केली. वडील म्हणाले- घटनेपूर्वी तो माझ्याशी बोलला होतामासूमचे वडील सांगतात की, संध्याकाळचे साडेपाच वाजले असतील. आरोपी सलमान आमच्या घरापाशी आला. तो आमच्या कॉलनीत नेहमी यायचा. आमच्याशी बोलायचा, मुलांना चॉकलेट द्यायचा. २१ नोव्हेंबरलाही तो आला होता. त्याने मला विचारले- 'कसे आहात?' मी म्हणालो- 'ठीक आहे.' काही मिनिटांनी तो निघून गेला आणि मी पण आत जेवायला गेलो. तेव्हा मला माहीत नव्हते की हा माणूस विश्वासाचा मुखवटा घातलेला एक सैतान आहे. ते पुढे सांगतात की, सुमारे एका तासानंतर, संध्याकाळी 6:30 वाजता माझी 6 वर्षांची मुलगी खेळायला बाहेर पडली. तिने आईला सांगितले की ती आधी शेजारच्या काकूंना टोमॅटो देऊन येईल आणि मग खेळायला जाईल. असे म्हणून ती घरातून बाहेर पडली. संध्याकाळचे सुमारे 7:30 वाजले असतील, मी पत्नीला मुलीबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले की ती खेळायला गेली आहे. वडील म्हणाले- मी तिला ज्या अवस्थेत पाहिले ते मी विसरू शकणार नाहीयानंतरही ती परत न आल्याने आम्ही तिला आजूबाजूला शोधायला सुरुवात केली, पण तिचा कुठेही पत्ता लागला नाही. मुलीचे वडील सांगतात की रात्री साधारण आठ वाजता मी मुलीला शोधत घराबाहेर रस्त्यावर उभा होतो, तेव्हा माझी नजर अशा दृश्यावर पडली, ज्यामुळे माझ्या पायाखालची जमीन सरकली. ते म्हणतात, जे मी पाहिले, ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. ती घरासमोरील रस्त्यावरून येताना दिसली, तिने फक्त वर कुर्ती घातली होती आणि ती पूर्णपणे रक्ताने माखलेली होती. तिने मला पाहताच मोठ्याने 'पप्पा' अशी किंकाळी फोडली आणि धावत येऊन माझ्या छातीला अशी बिलगली जणू तिला जीव वाचवण्यासाठी शेवटचा आधार मिळाला होता. त्या निरागस मुलीने तुटक आवाजात जे सांगितले, ते कोणत्याही वडिलांसाठी ऐकणे असह्य होते. ती म्हणाली, जे काका संध्याकाळी आले होते, ते मला जंगलाच्या दिशेने, थोडे पुढे घेऊन गेले, आणि माझे तोंड दाबले. आरोपी सलमान, विश्वासाच्या बुरख्याखाली लपलेला क्रूरकर्मापीडितेच्या वडिलांनी सांगितले की, आरोपी सलमान खान आधी राजा भैयाच्या क्रशरवर काम करत होता, पण त्याच्या वाईट वागणुकीमुळे आणि वाईट सवयींमुळे राजा भैयाने त्याला नोकरीवरून काढून टाकले होते. नोकरीवरून काढल्यानंतर तो भटकू लागला. गेल्या एक-दोन महिन्यांपासून तो त्यांच्या परिसरातच राहत होता. तो जाणूनबुजून कॉलनीतील लोकांशी, विशेषतः मुलांशी मिसळायचा, जेणेकरून कोणालाही त्याच्यावर संशय येऊ नये. त्याने मुलांसाठी टॉफीवाले काका अशी प्रतिमा निर्माण केली होती. याच विश्वासाचा फायदा घेऊन त्याने हे घृणास्पद कृत्य केले. त्याने केवळ एका चिमुकलीच्या शरीरालाच नव्हे, तर एका कुटुंबाच्या विश्वासालाही छिन्नविछिन्न केले. ​​​​आईचे दुःख, माझ्या मुलीचे गाल थपडांनी सुजले होतेजेव्हा आम्ही पीडितेच्या आईशी बोललो, तेव्हा त्यांचा कंठ दाटून आला. त्यांनी रडत सांगितले की त्यांना दोन मुलगे आणि दोन मुली आहेत, आणि पीडिता त्यांची सर्वात लहान आणि लाडकी मुलगी आहे, जी दुसऱ्या इयत्तेत शिकते. त्यांनी सांगितले की आरोपी सलमानला त्यांची मुले आधीपासून ओळखत होती, कारण तो नेहमी घराच्या जवळ येत-जात असे आणि टॉफी आणत असे. त्या रात्रीच्या भयानक दृश्याची आठवण करून आईने सांगितले, 'मुलीला खूप मारहाणही करण्यात आली होती. तिचे दोन्ही गाल इतके लाल आणि सुजले होते, जणू कोणीतरी तिला वारंवार आणि खूप जोरात थप्पड मारल्या असतील. तिच्या दोन्ही गुडघ्यांवर आणि हातांवर खोल जखमा आणि ओरखडे होते. इतकेच काय, तिची कंबरही वाईट रीतीने सोलली गेली होती.' आईने सांगितले की सर्वात भयानक जखमा तिच्या खासगी अवयवांवर होत्या, ज्या इतक्या गंभीर होत्या की डॉक्टरांना त्वरित अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्यांनी सांगितले, 'जेव्हा तिला एम्समध्ये आणले, तेव्हा ती बेशुद्ध होती, पण आता शस्त्रक्रियेनंतर तिला शुद्ध आली आहे, ती बोलू शकत आहे. पण तिला अजूनही काही दिवस रुग्णालयात ठेवले जाईल.' तीन तास उशिरा उपचार मिळालापीडितेला सर्वात आधी गौहरगंज येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, तेथून डॉक्टरांनी तिला औबेदुल्लागंज येथे रेफर केले. सूत्रांनी सांगितले की, जेव्हा पीडितेला रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा तिथे 600-700 लोकांची गर्दी रुग्णालयात जमली होती. बीएमओ अमृता जीवने कर्तव्यावर नव्हती. बीएमओने एसडीएमला सांगितले की, त्यांच्याकडे डायल 108 रुग्णवाहिकेत पेट्रोल भरण्यासाठीही पैसे नाहीत आणि रुग्णवाहिकाही निकामी पडली आहे. त्यानंतर सागर फॅक्टरीतून रुग्णवाहिका मागवण्यात आली. याच अनास्थेमुळे ओबेदुल्लागंजहून भोपाळला जाण्यासाठी तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागला, ज्यामुळे मुलीचे खूप रक्तस्राव झाले. ​शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंतशनिवारी डॉक्टरांनी मुलीची शस्त्रक्रिया केली. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की तिचे गुप्तांग खूप खराब झाले होते. डॉक्टरांना नाइलाजाने गुप्तांगापर्यंत जाणाऱ्या नसांना बायपास करून नवीन व्यवस्था तयार करावी लागली, जेणेकरून शौचास जाता येईल आणि गुप्तांग बरे होण्यास सुरुवात होईल. मुलगी सध्या आयसीयूमध्ये आहे आणि बोलू शकत आहे. पूर्ण बरी झाल्यानंतर तिची आणखी एक शस्त्रक्रिया होईल. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, संसर्ग पसरण्याची भीती असल्याने ते तिला अजून डिस्चार्ज देत नाहीत. पूर्ण बरे होण्यासाठी कमीत कमी सहा महिने लागतील. यानंतरही ती पूर्णपणे सामान्य होईल की नाही याबद्दल डॉक्टरांना शंका आहे. रुग्णालयात जीवन-मृत्यूशी झुंजणारी चिमुकली आणि उफाळलेला जन-आक्रोशभोपाळच्या एम्समध्ये मुलीवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांची एक टीम तिच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. ती शुद्धीवर असली तरी, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खोल धक्क्यात आहे. तिच्यासमोर अजून एक लांब आणि वेदनादायक प्रवास आहे. तर, दुसरीकडे गौहरगंजमध्ये लोकांचा संताप गगनाला भिडला आहे. आरोपीच्या फरार झाल्याने पोलीस प्रशासनावरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, जर पोलिसांनी वेळेवर कारवाई केली असती, तर आरोपी आतापर्यंत गजाआड असता. ते या प्रकरणात कोणत्याही प्रकारची ढिलाई सहन करण्यास तयार नाहीत. त्यांची एकच मागणी आहे - 'सलमानला फाशी द्या' किंवा 'त्याचा एन्काउंटर करा'.

दिव्यमराठी भास्कर 27 Nov 2025 2:24 pm

भारतीय क्रिकेटपटू पुजाराच्या मेहुण्याची आत्महत्या! बलात्काराचा आरोप अन् एका वर्षात जीवन संपवले, जाणून घ्या सविस्तर

राजकोट: भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील नातेसंबंधामुळे चर्चेत आला आहे. पुजाराचा मेहुणा जीत रसिखभाई पाबरीवर याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तपास सुरू झाला आहे. एका तरुणीने जीत विरोधात २६ नोव्हेंबर २०२४ रोजी बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होताच जीतने आत्महत्या केली असल्याने त्याच्या आत्महत्येसाठीचे प्राथमिक कारण हेच सांगितले जात आहे. लग्नाचे आश्वासन देऊन शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप या तरुणीने तक्रारीमध्ये केला होता. यामुळे तणावाखाली आलेल्या जीतने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.जीत पाबरी विरोधात एका तरुणीने २६ नोव्हेंबर २०२४ रोजी मालवीय नगर पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या तरुणीसोबत जीतचा साखरपुडा झाला होता. पण पुढे दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याने त्यांनी नातेसंबंध तोडून टाकले. त्यानंतर तरुणीने जीत विरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली. लग्नाचे आश्वासन देऊन साखरपुडा झाल्यावर जीतने अनेकदा जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले आणि नंतर लग्न मोडले, असे गंभीर आरोप तरुणीने केले. या प्रकरणामुळे जीत विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर वर्षभरातच जीतने आत्महत्या करत जीवन संपवले. यावेळी चेतेश्वर पुजारा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात समालोचन करत होता.https://prahaar.in/2025/11/27/zubin-gargs-murder-assam-chief-minister-himanta-biswa-sarmas-shocking-statement-in-the-assembly/मिळालेल्या माहितीनुसार, जीत गेल्या वर्षभरापासून कायदेशीर खटल्याचा सामना करत होता. यामुळे तो बराच ताणतणावात होता. पण आत्महत्येमागील नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि पुढील चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे,असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.चेतेश्वर पुजारा यांची सासरवाडी जामजोधपूरमध्ये आहे. पण त्याच्या सासरचे लोक गेल्या २० वर्षांपासून राजकोटमध्येच वास्तव्यास असून ते कॉटन जिनिंग फॅक्ट्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या मालकीचा एक कारखाना आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 2:10 pm

खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् ; बार्शीत ४ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेळगावमध्ये गुरुवारी दुपारी ४ वर्षांच्या मुलाचा ट्रॅक्टरसह विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गावात विहिरीत अडकलेली मोटार बाहेर काढण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना झाली.याचदरम्यान जवळच खेळत असलेला शिवराज संदिप शेरखाने हा चार वर्षांचा मुलगा खेळता खेळता ट्रॅक्टरवर चढला. चुकून त्याच्या हातून गिअर सरकल्याने ट्रॅक्टरचा तोल गेला आणि क्षणार्धात तो थेट विहिरीत कोसळला. ही घटना इतकी अचानक घडली की आसपासच्या लोकांना प्रत्यक्षात काही समजायलाच वेळ मिळाला नाही. ट्रॅक्टर विहिरीत पडताच शिवराज बेचक्यात अडकल्याने त्याला वाचवणे अशक्य बनले.अपघातानंतर शिवराजचे वडील संदिप शेरखाने यांनी मुलाला वाचवण्यासाठी तत्काळ धाव घेतली. गावातील युवकांनीही जीवाची पर्वा न करता विहिरीत उड्या मारत शोध मोहिम हाती घेतली. स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.अग्निशमन आणि पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचताच रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मात्र ट्रॅक्टर विहिरीच्या तळाशी अडकलेला, खोल पाणी आणि चिखल यामुळे शोधकार्य अत्यंत गुंतागुंतीचे झाले. ट्रॅक्टर बाहेर काढणे शक्य नसल्याने प्रथम विहिरीतील पाणी कमी करण्याचा निर्णय घेतला. सलग १२ तासांच्या प्रयत्नांनंतर विहिरीतील पाणी बाहेर काढण्यात यश आले आणि पाणी उतरल्यावर शिवराजचा मृतदेह तळाशी दिसून आला. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. अवघ्या चार वर्षांच्या निरागस मुलाचा झालेला मृत्यू कुटुंबासाठी आणि गावासाठी मोठा धक्का आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 2:10 pm

चेहऱ्यावर सुरकुत्या, पांढरे केस…’असंभव’चित्रपटातील ‘या’अभिनेत्रीचा खतरनाक लुक समोर

Asmabhav Movie | सध्या सोशल मिडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या आगळ्या वेगळ्या लुकची चांगलीच चर्चा रंगली आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची अशी अवस्था पाहून चाहते देखील अचंबित झाले आहेत. या अभिनेत्रीचे नाव आहे प्रिया बापट. तिच्या आगामी ‘असंभव’ या चित्रपटासाठी तिने हा खास लुक केला आहे. ‘असंभव’ सिनेमात प्रियाने दुहेरी भूमिका साकारली आहे. साधना सैगल […] The post चेहऱ्यावर सुरकुत्या, पांढरे केस…’असंभव’ चित्रपटातील ‘या’ अभिनेत्रीचा खतरनाक लुक समोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 1:46 pm

‘या’देशात भूकंपाचे जोरदार धक्के ; 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद

Indonesia Earthquake। इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर आज ६.४ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. आचे प्रांताजवळ हा भूकंप जाणवला. इंडोनेशियन हवामानशास्त्र, हवामानशास्त्र आणि भूभौतिकशास्त्र एजन्सी (BMKG) नुसार, भूकंपाची खोली १० किलोमीटर होती. हा भूकंप जवळपासच्या अनेक भागात जाणवला, परंतु अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की त्सुनामीचा धोका नाही. हा भूकंप केवळ प्रभावित भागातच नाही तर आजूबाजूच्या परिसरातही जाणवला. हा […] The post ‘या’ देशात भूकंपाचे जोरदार धक्के ; 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 1:32 pm

Pune News : १ तास कुलूप लावून... हिंजवडीत निष्काळजीपणाचा कळस; सेविका अन् मदतनीसांनी २० चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडलं;

पुणे : पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी (Hinjawadi, Pune) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. इथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मिळून तब्बल वीस लहान मुलांना अंगणवाडीमध्ये कोंडून ठेवल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये हा प्रताप घडला आहे. या घटनेचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्यात लहान मुले अक्षरशः घाबरून रडत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. चिमुकल्यांना अशाप्रकारे कोंडून ठेवल्याचे पाहून पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. अंगणवाडीतील सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी हा प्रताप केल्याचे उघड झाले आहे. ज्या ठिकाणी मुलांची काळजी घेणे अपेक्षित आहे, त्याच ठिकाणी त्यांच्यावर असा मानसिक आघात झाल्यामुळे पालकांमध्ये तीव्र असंतोष आहे. पालकांनी या सेविका आणि मदतनीस यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.'माजी सरपंचाने बैठकीला बोलावले म्हणून...'हिंजवडीत धक्कादायक प्रकार, सेविका अन मदतनीस वीस लहानग्यांना अंगवाडीत कोंडून बैठकीला गेल्या. मुलं रडत बसली. कालच्या घटनेचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती#Punenews #hinjewadinews pic.twitter.com/g7DHcLNpGv— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) November 27, 2025पुण्यातील हिंजवडी येथील अंगणवाडीत २० निष्पाप मुलांना आतमध्ये कोंडून ठेवण्याच्या धक्कादायक घटनेनंतर आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी या कृतीमागील धक्कादायक खुलासा केला आहे. सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी स्पष्ट केले की, ग्रामपंचायतीतील एका माजी सरपंचाने बैठकीसाठी बोलावले म्हणून त्यांनी मुलांना आतमध्ये ठेवून अंगणवाडीला कुलूप लावले आणि त्या बैठकीसाठी निघून गेल्या. काल, बुधवार (दि. २६) रोजी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान हा संतापजनक प्रकार घडला. काही वेळेसाठी का असेना, लहान मुलांना अशाप्रकारे अंगणवाडीत कोंडून ठेवणे हे किती धोकादायक आणि संतापजनक आहे, हे व्हायरल झालेल्या व्हिडिओतील मुलांच्या आक्रोशावरून स्पष्ट होत आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी ही कृती अत्यंत गंभीर मानली जात आहे. उपस्थितांनी ही गंभीर बाब तात्काळ मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांच्या निदर्शनास आणून दिली. गिराम यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, सेविका शिंदे आणि साखरे या दोघींना बैठक सोडून तात्काळ अंगणवाडीचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले. आता या घटनेनंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी या सेविका आणि मदतनीस यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.https://prahaar.in/2025/11/27/domestic-abuse-kills-nashik-newlywed-woman-her-7-page-note-reveals-torture/नेमकं काय प्रकरण ?पुण्यातील हिंजवडी परिसरातून एक अत्यंत गंभीर आणि धोकादायक असा प्रकार उघडकीस आला आहे, ज्यामुळे प्रशासकीय निष्काळजीपणावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. येथील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी तब्बल २० लहान मुलांना केंद्रातच बंद ठेवून कुलूप लावल्याचे समोर आले आहे. या दोन्ही अंगणवाडी सेविकांनी हा धक्कादायक प्रकार घडवण्यामागे ग्रामपंचायतीतील एका माजी सरपंचाने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्याचे कारण दिले आहे. काल, बुधवार (दि. २६) रोजी सकाळी सुमारे ११ ते १२ या वेळेत हा प्रकार घडला, जेव्हा मुलांना केंद्रातच बंदिस्त करण्यात आले. लहानग्या मुलांना अगदी काही काळासाठीसुद्धा अशा प्रकारे बंदिस्त करून ठेवणे किती घातक आणि धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय व्हायरल झालेल्या व्हिडिओतील मुलांच्या रडण्याच्या आवाजातून स्पष्टपणे येत आहे. या घटनेनंतर चिमुकल्यांच्या पालकांनी आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. उपस्थितांनी ही बाब तातडीने मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांच्याकडे पोहोचवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, गिराम यांनी सेविका शिंदे आणि साखरे यांना तत्काळ बैठक सोडून अंगणवाडीचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले. या गंभीर निष्काळजीपणावर बाल विकास प्रकल्प अधिकारी आता कोणती कठोर कार्यवाही करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 1:30 pm

युएस एफडीएकडून आलेल्या निकालानंतर ग्लेनमार्क फार्मा शेअरला गुंतवणूकदारांचा तुल्यबळ प्रतिसाद, २% शेअर उसळला

मोहित सोमण:ग्लेनमार्क फार्मा या भारतातील मोठ्या फार्मा कंपनीच्या शेअर्समध्ये आज चांगली वाढ झाली आहे. सत्र सुरूवातीच्या काळात शेअर २% पर्यंत उसळला होता. दुपारी १ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर १.०१% उसळत १९४०.६० रूपयांवर व्यवहार करत आहे. कंपनीला युएस स्थित अन्न नियामक व सुरक्षा मंडळ (US Food and Drug Administration FDA) यांच्याकडून ईआयआर (Establishment Inspection Report) प्राप्त झाल्याचे कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे कंपनीच्या युएस मधील मोनरोई, नॉर्थ कॅरोलिना युएस येथे उत्पादन प्रकल्प सुरु करण्याच्या प्रस्तावाला एफडीएने परवानगी दिली गेली असल्याचे कंपनीने आज जाहीर केले. या सकारात्मक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठा प्रतिसाद दिला होता.कंपनीच्या उत्पादन सुविधेत ०९ जून ते १७ जून २०२५ या कालावधीत ही तपासणी करण्यात आली.या सकारात्मक घडामोडींसह, आम्ही व्यावसायिक उत्पादन पुन्हा सुरू करू असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले. कंपनी भारतासह विदेशात काम करणारी एमएनसी फार्मा कंपनी आहे.यापूर्वी कंपनीने १८ जूनला स्टॉक एक्सचेंज (BSE) फॉर्म-४८३ बद्दल माहिती दिली होती. त्यात कंपनीसाठी एफडीए कडून आलेले वॉर्निंग लेट अंतर्भूत होते असे कंपनीने स्पष्ट केले होते मात्र कंपनीला हिरवा कंदील मिळाल्यानंतर शेअरमध्ये तेजी दिसत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, ग्लेनमार्क फार्माने क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजच्या उपचारांसाठी जगातील पहिली नेब्युलाइज्ड, फिक्स्ड-डोस ट्रिपल थेरपी लाँच केली होती.त्यांनी त्यामध्ये केलेल्या निवेदनात,'नेब्झमार्ट GFB स्मार्ट्यूल्स आणि एअर्झ एफबी स्मार्ट्यूल्स लाँच केले. श्वासनलिकेतील अडथळा, जळजळ कमी करण्यासाठी आणि फुफ्फुसांचे कार्य आणि लक्षण नियंत्रण सुधारण्यासाठी ग्लायकोपिरोनियम, फॉर्मोटेरॉल आणि बुडेसोनाइडसह तीन सिद्ध औषधे एकत्र करतात' असे त्यात म्हटले आहे.ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ही एक आर अँड डी करणारी जागतिक फार्मा कंपनी आहे. कंपनी ब्रँडेड, जेनेरिक्स आणि ओटीसी विभागांमध्येही कार्यरत आहे. श्वसन, त्वचाविज्ञान आणि ऑन्कोलॉजीच्या उपचारात्मक क्षेत्रात कंपनी काम करते. कंपनीकडे चार खंडांमध्ये पसरलेल्या ११ उत्पादन सुविधा आहेत आणि ८० हून अधिक देशांमध्ये कंपनी कार्यरत आहे. गेल्या एक महिन्यापासून कंपनीच्या शेअरमध्ये ६.८३% वाढ झाली आहे तर ६ महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये ३९.८२% वाढ झाली आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 1:30 pm

राजकीय वर्तुळात खळबळ! “50 खोके एकदम ओके ही सत्यघटना”; भाजप आमदाराचा दावा, थेट शिंदेंच्या आमदाराचं नाव घेतलं

Tanaji Mutkule : महाविकास आघाडी फुटण्यामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. त्यांना या बंडासाठी भाजपकडून देखील बळ देण्यात आल्याची चर्चा या बंडाचा उल्लेख आल्यानंतर सातत्याने होत असते. बंडात शिंदेंना साथ देणाऱ्या आमदारांवर उद्धव सेनेकडून ५० खोके घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. ‘५० खोके एकदम ओके’ असा नारा देखील उद्धवसेनेच्या वतीने देण्यात […] The post राजकीय वर्तुळात खळबळ! “50 खोके एकदम ओके ही सत्यघटना”; भाजप आमदाराचा दावा, थेट शिंदेंच्या आमदाराचं नाव घेतलं appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 1:29 pm

झुबीन गर्गची 'हत्या'च! आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे विधानसभेत धक्कादायक वक्तव्य

गुवाहाटी: आसामचा सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्गचा मृत्यू ही कुठलीही दुर्घटना नसून त्याची हत्या केली असल्याचा धक्कादायक खुलासा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. आसाम राज्यातील विरोधी पक्षाने झुबीन गर्गच्या मृत्यूबाबत चर्चा झाली पाहिजे अशी मागणी केली होती. यावर उत्तर देताना मंगळवारी (२५ नोव्हेंबर) आसामच्या विधानसभेत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी हे धक्कादायक वक्तव्य केले. तपासकर्त्यांच्या हाती नवे पुरावे लागले असल्याचे ही यावेळी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले.मुख्यमंत्री सरमा म्हणाले, झुबेनचा मृत्यू हा 'गुन्हेगारी कट' किंवा 'गुन्हेगारी हत्या' नव्हती. तर ती 'स्पष्ट हत्या' होती. राज्य पोलिसांचे विशेष तपास पथक जुबिनच्या मृत्यूची चौकशी करत आहे. जुबिन गर्गच्या संशयास्पद परिस्थितीत झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आसाम सरकारने गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक आयोगही स्थापन केला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास अत्यंत संवेदनशीलतेने चालला आहे. त्यामुळे मी याबाबत अधिक माहिती देऊ शकत नाही, मात्र या प्रकरणात ज्यांचा हात आहे त्यांना शिक्षा केली जाईल. आम्ही सरकार म्हणून कुणाचाही बचाव करणार नाही.https://prahaar.in/2025/11/27/glorious-moment-unveiling-of-a-half-length-statue-of-dr-babasaheb-ambedkar-at-unesco-headquarters-on-the-occasion-of-constitution-day/नॉर्थ इस्ट इंडिया फेस्टिव्हलसाठी झुबीन गर्ग सिंगापूरला गेला होता. फेस्टिव्हल दरम्यान १९ सप्टेंबर रोजी समुद्रात पोहताना त्याचा मृत्यू झाला. यानंतर नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे मुख्य आयोजक श्यामकानू महंता, झुबीनचे मॅनेजर सिद्धार्थ शर्मा, झुबीनचा चुलत भाऊ आणि पोलीस अधिकारी संदीपन गर्ग आणि त्यांचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर नंदेश्वर बोरा आणि प्रबीण वैश्य यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचा आदेश मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला.जुबिन गर्ग याच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या एक सदस्यीय आयोगाने जबाब नोंदवण्याची आणि पुरावे सादर करण्याची अंतिम मुदत १२ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. न्यायमूर्ती सौमित्र सैकिया यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने ३ नोव्हेंबरपासून घटनेसंदर्भात जबाब नोंदवण्यास आणि पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 1:10 pm

कोटक महिंद्रा प्रायव्हेट बँकिंगकडून भारतातील पहिला लक्झरी निर्देशांक सुरु होणार

२०२२ पासून वेलनेस रिट्रीट्स, क्युरेटेड एक्सपिरीयन्सेस आणि ब्रँडेड रेसिडेन्सेसमुळे लक्झरी किमतींमध्ये वार्षिक ६.७% वाढमुंबई:आज कोटक समुहाने कोटक प्रायव्हेट बँकिंगने आज कोटक प्रायव्हेट लक्झरी इंडेक्स (KPLI) चे अनावरण केले आहे. विविध १२ श्रेणीतील लक्झरी उत्पादने आणि ग्राहकांच्या अनुभवांमध्ये अथवा अनुभीतीचा लेखाजोखा व्यक्त करण्यासाठी व लक्झरी वस्तूतील किमतीतील चढउतारांचा मागोवा घेण्यासाठी कंपनीने हा पहिलाच निर्देशक बाजारात आणला आहे. कोटक प्रायव्हेट बँकिंगने निर्देशांक प्रकाशित करण्यासाठी अर्न्स्ट अँड यंग एलएलपी (EY) ला देण्यासाठी नियुक्त केले अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे. हा निर्देशांक भारतातील अल्ट्रा-हाय-नेट-वर्थ व्यक्ती (UHNIs) लक्झरीकडे असलेला दृष्टीकोन कसा बदलतोय याचे परिमाण स्पष्ट करेल. त्यांच्या मते लक्झरीचा अर्थ कसा बदलत आहेत यावर आकडेवारीतील आधारासह नवीन ट्रेड स्पष्ट करणार आहे.माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०३० पर्यंत भारताचा लक्झरी बाजार अंदाजे ८५ अब्ज डॉलर्सकडे जात असताना, केपीएलआय (Kotak Private Luxury Index KPLI) स्पष्टपणे बदल दर्शवितो असे समुहाने निवेदनात म्हटले आहे. 'ग्राहकांच्या मालकीकडून अनुभवाकडे आणि भौतिकतेपासून सजग राहणीकडे' या दृष्टिकोनातून या निर्देशांकाची निर्मिती झाली आहे. यामध्ये केवळ गुंतवणूकदार नाही तर ब्रँड आणि सल्लागारांसाठी हा निर्देशांक किंमत वेल्थ व ट्रेंड सेटिंग ट्रॅकरपेक्षा अधिक पातळीवर काम करू शकतो.याविषयी बोलताना अहवालाचे लाँच करताना, कोटक प्रायव्हेट बँकिंगचे सीईओ ओईशर्य दास म्हणाले आहेत की,'कोटक प्रायव्हेटमध्ये, आमचा असा विश्वास आहे की लक्झरी ही केवळ मालकी हक्काबद्दल नाही तर भारतातील ओळखल्या जाणाऱ्या अल्ट्रा-एचएनआय समुदायासाठी वैयक्तिकरण, कारागिरी आणि वारसा आहे. आमच्या आर्थिक कौशल्याच्या वारशाचा आणि संपत्तीच्या गतिशीलतेबद्दल खोल अंतर्दृष्टीचा फायदा घेत, या अहवालाची पहिली आवृत्ती अनेक मालमत्ता आणि जीवनशैली श्रेणींमध्ये लक्झरीसाठी एक व्यापक बेंचमार्क प्रदान करते. लक्झरी इंडेक्सद्वारे, आम्ही गुंतवणूकदार, ब्रँड आणि सल्लागारांना या दोलायमान परिसंस्थेला (Ecosystem) आकार देणारे ट्रेंड आणि सांस्कृतिक बदल समजून घेण्यासाठी एक मौल्यवान सूचक परिमाण ऑफर करतो. आम्हाला आशा आहे की हे उद्दिष्टाने लक्झरीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक कंपास म्हणून काम करेल, जो क्लायंटना संपत्ती वाढविण्यास आणि त्यांचे जीवन समृद्ध करण्यास करेल.'निर्देशांक कामगिरी: (Insights)अहवालातील माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२२ पासून ६.७% वार्षिक वाढ - केपीएलआय २०२५ मध्ये १२२ पातळीवर पोहोचला आहे जो गेल्या तीन वर्षांत २२% वाढला. आर्थिक २०२५ मध्ये लक्झरी रिअल इस्टेट आणि डिझायनर हँडबॅग्ज सारख्या श्रेणींनी बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांपेक्षा चांगली कामगिरी केली असे समुहाने आपल्या निरीक्षणात म्हटले.नवीन प्रतीक- अमनबाग आणि आनंदा सारख्या आरोग्य रिट्रीट्सने २०२२ पासून कल्याण श्रेणीमध्ये १४.३% वार्षिक वाढ केली आहे, हे दर्शविते की दीर्घायुष्य आणि सजगता आता आधुनिक समृद्धीचे मोलमाप व्यक्त करते.अनुभव - अंटार्क्टिक क्रूझपासून ते मिशेलिन-तारांकित जेवणापर्यंत, एक्सक्लुझिव्ह एक्सपिरियन्स इंडेक्स २०२२ पासून ११.६% वार्षिक वाढला आहे, अहवालातील माहितीनुसार,तो केवळ मालमत्तेसाठीच नाही तर विकासासाठी समृद्धीसाठी आपली 'भूक' दर्शवितो.लक्झरी रिअल इस्टेट ओळख- ब्रँडेड, तंत्रज्ञान प्रणित घरांची मागणी आर्थिक २०२२ पासून इयर ऑन इयर बेसिसवर १०.८% वाढली आहेत ज्यामुळे रिअल इस्टेट अंतिम संपत्तीचे मोजमाप करण्याचे नवे साधन बनले.फॅशन होल्ड्स, घड्याळे आणि वाइन योग्य - आर्थिक वर्ष २०२२ पासून डिझायनर हँडबॅग्जमध्ये १०.२% वार्षिक वाढ झाली आहे, तर लक्झरी घड्याळे आणि उत्तम वाइनमध्ये सुधारणा झाल्या आहेत -वारसा म्हणून शिक्षण - २०२२ पासून एलिट (श्रीमंती) विद्यापीठाच्या शिक्षण शुल्कात वार्षिक ८.४% वाढ झाली आहे, ज्यामुळे शिक्षण हे लक्झरी आणि वारशाचे विधान बनले आहे.कार्यपद्धती - केपीएलआय १२ श्रेणींमध्ये वर्षानुवर्षे किंमतीतील बदलांचा मागोवा घेते. मूल्य धारणा, यूएचएनआय खर्चाचे नमुने आणि परिमाण यानुसार यातील विविध निष्कर्ष प्राप्त केले जातात. बेस वर्ष म्हणून २०२२ निवडल्यास तुलनात्मक विश्लेषणासाठी पहिले पोस्ट-महामारी (Post Covid Index बेंचमार्क आहे. या श्रेणीत प्राइम रिअल इस्टेट, डिझायनर हँडबॅग्ज, लक्झरी घड्याळे, लक्झरी अनुभव, आरोग्य आणि कल्याण, लक्झरी ऑटोमोबाईल्स, ललित कला, उत्तम दागिने, डिझायनर शूज, एलिट विद्यापीठे, उत्तम वाइन आणि दुर्मिळ व्हिस्की आणि लक्झरी प्रवास यांचा समावेश निर्देशांकात असेल हे स्पष्ट झाले आहे.हे काय संकेत देते?जास्त किंमती: वाढती मागणी, टंचाई, ग्राहकांच्या अनुभवांसाठी बदलणारा सांस्कृतिक ट्रेंडकमी किंमती: बाजारपेठेत सुधारणा किंवा प्राधान्यक्रम बदलणे जसे की पारंपारिक संग्रहित वस्तूंपासून दूर जाऊन अनुभवात्मक लक्झरीकडे जाणे होय.यावर भाष्य करताना'कोटक प्रायव्हेट लक्झरी इंडेक्स भारतात लक्झरीने किती खोलवर मूळ धरले आहे हे दर्शवितो' असे EY चे भागीदार भाविन सेजपाल म्हणतात. '२०२२ पासून २२% वाढ ही वैविध्यपूर्ण, लवचिक आणि संपत्ती निर्मिती आणि अनुभवांनी प्रेरित परिपक्व होत असलेल्या लक्झरीच्या बाजारपेठेचे संकेत देते. भारतातील अल्ट्रा-एचएनआय लक्झरीला ओळख,वारसा आणि मूल्य जतन म्हणून पुन्हा परिभाषित (Redefined)करत आहेत. रिअल इस्टेट आणि लक्झरीच्या अनुभवांपासून ते वेलनेस ट्रॅव्हलपर्यंत, जागतिक लक्झरीच्या पुढील अध्यायाला आकार देत आहे.'निर्देशांकात लक्झरीची किंमत आता एखाद्याच्या मालकीबद्दल नाही तर तो कसा जगतो याबद्दल आहे असेही समुहाने निर्देशांक जाहीर करताना स्पष्ट केले आहे. भारतातील हा पहिलाच लक्झरी ट्रॅकर निर्देशांक असणार आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 1:10 pm

इम्रान खान यांची खरंच हत्या झालीय का? ; पाकिस्तानच्या तुरुंग प्रशासनाने दिली ‘ही’महत्वाची माहिती

imran khan death। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याभोवती सुरू असलेल्या अफवांमध्ये, एक नवीन अपडेट समोर आला आहे. पाकच्या खासगी वृत्तवाहिनीनुसार, आदियाला तुरुंग प्रशासनाने बुधवारी पीटीआय संस्थापकांना तुरुंगाबाहेर हलवण्यात आल्याच्या अफवांचे खंडन केले. तुरुंग प्रशासनाने आग्रह धरला की ते तुरुंगातच आहेत आणि त्यांची प्रकृती चांगली आहे. तुरुंग अधिकारी काय म्हणाले ? imran khan death। रावळपिंडी […] The post इम्रान खान यांची खरंच हत्या झालीय का? ; पाकिस्तानच्या तुरुंग प्रशासनाने दिली ‘ही’ महत्वाची माहिती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 1:05 pm

मलायका अरोरा मिस्ट्री मॅनसोबत एअरपोर्टवर स्पॉट; व्हिडिओ व्हायरल

Malaika Arora | अभिनेत्री मलायका अरोराचे अर्जुन कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर आता तिचे नाव आणखी एका तरुणासोबत जोडले जात आहे. मुंबईतील एका म्युझिक कॉन्सर्टनंतर आता या दोघांना एअरपोर्टवर एकत्र पाहिलं गेलं आहे. मलायका या मिस्ट्री मॅनमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात मलायका अगदी कॅज्युअल लूकमध्ये एअरपोर्टवर दिसली. यावेळी […] The post मलायका अरोरा मिस्ट्री मॅनसोबत एअरपोर्टवर स्पॉट; व्हिडिओ व्हायरल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 1:02 pm

Beauty Tips: तुम्ही गरम पाण्याने चेहरा धुता का? जाणून घ्या त्यामुळे त्वचेवर होणारे दुष्परिणाम

Beauty Tips: हिवाळा सुरू झाला की अनेक जण थंडीपासून आराम मिळावा म्हणून चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू लागतात. गरम पाण्यामुळे क्षणिक आराम मिळतो, पण याचे त्वचेवर होणारे दुष्परिणाम गंभीर असू शकतात. सतत गरम पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते आणि त्वचा कोरडी, खवलेदार व निस्तेज दिसू लागते. या सवयीमुळे तुम्हाला कोणते नुकसान […] The post Beauty Tips: तुम्ही गरम पाण्याने चेहरा धुता का? जाणून घ्या त्यामुळे त्वचेवर होणारे दुष्परिणाम appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 12:55 pm

गद्दारीचा मुद्दा, भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वादात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांची एंन्ट्री म्हणाले “सैयारा तू तो..”

Amit Deshmukh : राज्यात जरी महायुती एकत्र असली तरी स्थानिक निवडणुकीत मात्र विचित्र प्रकाराच्या युत्या आघाड्या झाल्याचे बघायला मिळत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातही राजकारण तापले आहे. अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील विरूद्ध भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात राजकीय वाद निर्माण झाले असून, या वादात आता काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी […] The post गद्दारीचा मुद्दा, भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वादात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांची एंन्ट्री म्हणाले “सैयारा तू तो..” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 12:54 pm

“तुमची आश्वासने पाळा, तीच खरी …” ; डीके शिवकुमार यांचा काँग्रेस हायकमांडला थेट संदेश

DK Shivkumar on Congress। कर्नाटकात मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी एक सूचक विधान केले आहे. त्यांनी,”शब्दांची ताकद ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे आणि आश्वासने पाळणे ही सर्वात मोठी शक्ती आहे.” असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाकडे सिद्धरामय्या यांच्यानंतरच्या बदलाच्या मागणीचे आणि त्याशी संबंधित राजकीय दबावाचे संकेत म्हणून पाहिले […] The post “तुमची आश्वासने पाळा, तीच खरी …” ; डीके शिवकुमार यांचा काँग्रेस हायकमांडला थेट संदेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 12:43 pm

शिवसेना आणि मनसेची युती होणार? उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’निवासस्थानी राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल

Uddhav Thackeray meets Raj Thackeray | शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (27 नोव्हेंबर) मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची भेट होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे. आज सकाळी 11.30 वाजता उद्धव ठाकरे एकटेच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेटीसाठी […] The post शिवसेना आणि मनसेची युती होणार? उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 12:32 pm

BCCI On Gautam Gambhir Resignation Ind vs SA: गौतम गंभीर यांचा राजीनामा चर्चेत; BCCI चा निर्णय स्पष्ट, महत्वाची माहिती समोर

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला २-० ने पराभव स्विकारावा लागल्यानंतर टीम इंडियाच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली आहे. या कामगिरीनंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काही ठिकाणी जोर धरू लागली होती. परंतु आता या सर्व चर्चांना पूर्णविराम देणारी महत्वाची माहिती समोर आली आहे.गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत १८ पैकी १० कसोटी सामने गमावले आहेत. मागील वर्षी न्यूझीलंडविरुद्धची मालिका आणि आता घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा झालेला पराभव या टीकेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गंभीर यांना त्यांच्या पात्रतेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी बीसीसीआयचाच अंतिम निर्णय असेल असे सांगितले. तसेच आपल्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकला हे ‘सगळे लगेच विसरले’, असेही त्यांनी म्हटले.या सर्व घडामोडींमध्ये बीसीसीआय गंभीर यांच्यावर गदा आणणार की त्यांना कायम ठेवणार, याबाबत चर्चा रंगत होती. मात्र एका वृतानुसार, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या निराशाजनक पराभवानंतरही गौतम गंभीरच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहणार आहेत. गंभीर यांचा करार २०२७ पर्यंत आहे आणि विश्वचषक जवळ येत असताना बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या मनःस्तिथीत नाही.गंभीर यांनीही सध्याच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. हा संघ अनुभवाच्या बाबतीत कमी असून सतत शिकत राहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “दोष सर्वांचा आहे, पण सुरुवात माझ्यापासून करा,” असे गंभीर म्हणाले. कसोटी क्रिकेटसाठी मोठी तारेसारखी प्रतिभा लागतेच असे नाही, तर मर्यादित कौशल्यांसह मजबूत मानसिकता असणारे खेळाडू महत्त्वाचे असतात, असेही त्यांनी सांगितले.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 12:30 pm

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकणी मोठा खुलासा ! पीओके-अफगाणिस्तानशी संबंधित हँडलर्सचा पर्दाफाश ; लाच म्हणून१० कोटी कोणाला दिले? वाचा

Delhi Blast Case। एका आठवड्याच्या चौकशीनंतर, केंद्रीय तपास संस्थांनी फरिदाबाद-सहारापूर मॉड्यूलशी संबंधित आरोपींबाबत महत्त्वाचे आणि नवीन खुलासे केले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, सीमेपलीकडे बसलेल्या दहशतवादी हँडलर्सनी डॉ. आदिलचा भाऊ आणि अल-कायदाच्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख डॉ. मुझफ्फर याला दहशतवादी कारवायांसाठी दरवर्षी १० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते आणि या गटाला दहशतवादी कारवायांसाठी दरवर्षी […] The post दिल्ली बॉम्बस्फोट प्रकणी मोठा खुलासा ! पीओके-अफगाणिस्तानशी संबंधित हँडलर्सचा पर्दाफाश ; लाच म्हणून१० कोटी कोणाला दिले? वाचा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 12:19 pm

‘आता फक्त या खास क्षणांना जपायचं’; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या चार दिवसांनी व्यक्त झाल्या हेमा मालिनी

Posted by Hema Malini : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर बॅालिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. तर काहींनी त्यांच्यासोबत काम केल्याच्या आठवणी सोशल मीडिया पोस्टमधून शेअर केल्या. बिग बी अमिताभ बच्चन यांनी जीवलग मित्राला गमावल्यानंतर भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर […] The post ‘आता फक्त या खास क्षणांना जपायचं’; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या चार दिवसांनी व्यक्त झाल्या हेमा मालिनी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 12:13 pm

मुंबईतील प्रतिजेजुरी पाहिलीत का? मुंबईतही आहे खंडोबाचे पवित्र देवस्थान

मुंबई : चंपाषष्ठीचा शिवशंकराच्या अवतार मानल्या जाणाऱ्या श्री खंडोबा देवाचा उत्सव राज्यभर मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. जेजुरीसह विविध ठिकाणी अभिषेक, भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत भक्तांनी देवदर्शनाचा आनंद लुटला. दरवर्षीप्रमाणे यंदाही जेजुरीत उत्साहाची लाट उसळली. मात्र, काहींना प्रत्यक्ष जेजुरीला जाणं शक्य नसतं. अशा भाविकांसाठी मुंबईतच एक खास पर्याय उपलब्ध आहे.मुंबईतही खंडेरायाचं शांत, पवित्र मंदिरदेशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सतत धावत्या मुंबईतसुद्धा खंडोबाचं एक जुने मंदिर आहे. इथे सगळे विधी, कुळाचार आणि सोहळे पारंपरिक रीतीनुसार पार पाडले जातात. तळी भरण्यापासून बेलभंडारा उधळण्यापर्यंत सर्व विधी येथे घडतात. अनेक जणांच्या मते हे मंदिर म्हणजे मुंबईचीच जेजुरी. वर्षभर राज्याच्या विविध भागांतून भाविक दर्शनासाठी येथे येत असतात.मलाबार हिलवर वसलेलं शांत देवस्थानदक्षिण मुंबईतील मलाबार हिल–वाळकेश्वर रोडलगत बाणगंगा परिसरात हे मंदिर शांत वातावरणात वसलं आहे. स्थानिक मराठी कुटुंबांनी अनेक दशकांपूर्वी हे देवस्थान उभारल्याचं सांगितलं जातं. आकारानं लहान पण महत्त्वानं मोठं असलेलं हे मंदिर समुदायाभिमुख असून येथे दररोजची आरती, चंपाषष्ठीचे खास सोहळे आणि अन्य धार्मिक कार्यक्रम भाविकांना वेगळा अध्यात्मिक अनुभव देतात.मंदिराचा पत्तातिन बत्ती, वाळकेश्वर रोड, मलाबार हिल, मुंबई – 400006इथं कसं पोहोचायचं?रेल्वेनं येणारांसाठी चर्नी रोड हे सर्वात जवळचं स्थानक आहे. मरिन लाइन्स आणि चर्चगेटही सोयीस्कर पर्याय आहेत. बेस्ट बस, टॅक्सी अथवा कॅबनेही मंदिरापर्यंत सहज जाता येतं. गर्दी तुलनेनं कमी असल्याने शांतपणे दर्शन घेण्याची संधी मिळते. जेजुरीला जाता येत नसेल तर मुंबईतील हे प्रतिजेजुरी नक्कीच अनुभवण्यासारखं ठरते. याशिवाय मुंबईतील अनेक कोळीवाड्यांतही खंडोबाची मंदिरे असून तिथेही चंपाषष्ठीचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 12:10 pm

व्हर्लपूल इंडियाचा शेअर ११% जबरदस्त कोसळला

मोहित सोमण:नामांकित इलेक्ट्रॉनिक्स कंपनी व्हर्लपूल इंडियाचा शेअर आज मोठ्या प्रमाणात कोसळला आहे. ११% पातळीवर सकाळच्या सत्रात शेअर्समध्ये घसरण झाली आहे. प्रामुख्याने कंपनीच्या प्रवर्तक (प्रमोटर) समुहाने आपले १.५ कोटी शेअर म्हणजेच आपले ११.८% भागभांडवल विकल्याने शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात कंपनीचा शेअर कोसळला आहे. मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये १००० कोटींचे ब्लॉक डील झाल्यानंतर शेअर उसळला होता. आज मात्र कंपनीच्या प्रमोटरने आपले भागभांडवल हिस्सा १४.२% सवलतीच्या दरात विकला आहे अशी माहिती मिळत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, कंपनी ९.५ दशलक्ष शेअर १०३० रूपये प्रति शेअर फ्लोअर प्राईजसह विकणार होती. अद्याप आणखी सविस्तर माहिती पुढे आली नसली तरी माहितीप्रमाणे या शेअर्सच्या विक्रीनंतर प्रमोटरकडे ५५० ते ६०० दशलक्ष डॉलर्सचा निधी येणार आहे.कंपनीने आपल्या भागभांडवलात घसरण केली असली तरी अद्याप प्रमोटर कंपनीकडे सर्वाधिक ५१% शेअर आहेत. मुख्य कंपनीला भारतीय युनिट्मधील आपले भागभांडवल यापूर्वीच कमी करायचे होते ते आज पार पडले आहे. व्हर्लपूल मॉरिशस या पालक कंपनीला आपले ९.८% शेअर ९८० कोटीला विकायचे होते असे प्रसारमाध्यमांनी म्हटले होते. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कंपनीने आपले २४% भागभांडवल म्हणजेच जवळपास ५००० कोटींचे भागभांडवल विकले होते.तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर २०.६% घसरण झाली होती. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ५२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीला ४१ कोटींचा नफा मिळाला होता. कंपनीच्या ईबीटा मार्जिनमध्येही ५% तुलनेत इयर ऑन इयर बेसिसवर ३.५% घसरण झाली होती. गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये २२.६% घसरण झाली असून महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ४०.७% घसरण झाली आहे.सकाळी सत्राच्या सुरुवातीला कंपनीचा शेअर ११.६३% ने घसरून १०६१.२० रुपयांवर आला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, 'कंपनीवर भाष्य करत असलेल्या १३ विश्लेषकांपैकी आठ जणांनी 'खरेदी' रेटिंग कायम ठेवले आहे, चार जणांनी 'होल्ड' करण्याची शिफारस केली आहे आणि एकाने 'विक्री' करण्याची शिफारस केली आहे.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 12:10 pm

Nashik Crime : ७ पानी सुसाइड नोट! अवघ्या ५ महिन्यांपूर्वी गृहप्रवेश झाला, अन् सासरच्या छळाला कंटाळून नववधूची आत्महत्त्या!

नाशिक : नाशिक शहरातील हिरावाडी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पतीसह सासरच्या नातेवाइकांकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून एका नवविवाहित महिलेने विष प्राशन करत आपले जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आत्महत्या केलेल्या या नवविवाहितेचे नाव नेहा संतोष पवार (बापू डावरे, वय २४, रा. हिरावाडी) असे आहे. आत्महत्येपूर्वी नेहा यांनी तब्बल सात पानांची एक सविस्तर चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी पतीसह सासरच्या नातेवाइकांकडून होणारा मानसिक आणि शारीरिक छळ, तसेच त्यांच्यावर झालेले अन्याय याचा संपूर्ण पाढा वाचला आहे. या सात पानी चिठ्ठीतील मजकूर इतका वेदनादायक आहे की, तो वाचून कोणाच्याही डोळ्यात अश्रू तरळतील. नेहा यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केलेल्या वेदना आणि तिला सहन करावा लागलेला त्रास यावरून सासरच्या मंडळींनी तिला किती छळले असेल, याचा अंदाज येतो. गेल्या काही महिन्यांपासून महिलांविरोधातील अत्याचारात वाढ होत असताना, नाशिकमधील या घटनेने प्रशासनासमोर आणि समाजासमोर गंभीर प्रश्न उभे केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.https://prahaar.in/2025/11/27/nashik-accident-news-mourning-in-champashti-devotee-dies-after-being-run-over-by-a-rathyatra-in-nashik-ozar/२४ वर्षीय नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्यामिळालेल्या माहितीनुसार, मृत नेहा संतोष पवार (बापू डावरे) हिचा विवाह जून महिन्यात संतोष पवार नावाच्या युवकासोबत झाला होता. हळदीच्या समारंभानंतर मोठ्या उत्साहात लग्न करून ती सासरी आली, गृहप्रवेश झाला आणि तिथेच तिच्या आयुष्यातील छळाला सुरुवात झाली, असे तिने चिठ्ठीत नमूद केले आहे. या ५ महिन्यांच्या काळात नेहाचा पती संतोष पवार, सासू आणि नणंदेकडून तिचा विविध कारणांवरून शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. विशेष म्हणजे, नेहा माहेरच्या लोकांशी फोनवर गप्पा मारते, असे सांगून तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला, ज्यामुळे तिचा मानसिक त्रास अधिक वाढला. सासरच्या मंडळींनी केलेल्या या सततच्या जाचाला कंटाळून बुधवारी नेहाने राहत्या घरी विष प्राशन करून आपले जीवन संपवले. अत्यंत दुर्दैवी अशा या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या चिठ्ठीतील तपशीलांच्या आधारे कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.५ महिन्यांतच 'कौमार्य चाचणी'सह अनन्वित छळनाशिकमध्ये अवघ्या ५ ते ६ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका नवविवाहितेच्या आत्महत्येने सासरच्या क्रूरतेची हद्द पार झाल्याचे उघड झाले आहे. मृत नेहा पवार यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सात पानी चिठ्ठीत सासरच्या मंडळींच्या अमानुष छळाचा आणि अत्याचाराचा धक्कादायक उल्लेख केला आहे. या चिठ्ठीतील सर्वात गंभीर आरोप म्हणजे, नेहा यांचा पती आणि नणंदेकडून त्यांची 'कौमार्य चाचणी' करण्यासारखा क्रूर प्रकार करण्यात आला होता. याशिवाय, सासरच्या मंडळींकडून वारंवार माहेरून पैसे आणण्याची मागणी केली जात होती. नेहा यांचा पती संतोष पवार याने लग्नापूर्वीच्या एका तरुणीसोबतच्या प्रेमसंबंधाचे अश्लील फोटो नेहा यांना दाखवून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. तसेच, पती, सासू आणि नणंदेकडून नेहा यांच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेतला जात होता. या सगळ्या मानसिक त्रासाला कंटाळून नेहा यांनी लग्नानंतर अवघ्या ५-६ महिन्यांतच आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. हा त्रास सहन न झाल्याने बुधवारी नेहाने घरातच विष प्राशन करून आपले जीवन संपवले. सासरचे लोक पुरावे नष्ट करतील या भीतीने, नेहा यांनी ७ पानांची चिठ्ठी लिहिल्यानंतर तिचे फोटो काढून आपल्या भावाला पाठवले होते, अशी माहिती आता उघड झाली आहे. या महत्त्वाच्या पुराव्याच्या आधारे नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात पती, सासू आणि नणंदेकडून छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 12:10 pm

“दिल्लीश्वरांच्या भीतीने ‘बाळासाहेबांचे विचार’ खुंटीला टांगले”; ‘त्या’पोस्टरवरुन अंबादास दानवेंचा शिंदेंवर निशाण

Ambadas Danve On Eknath Shinde | राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्ष हे स्वबळावरच निवडणूक लढवत असल्याचं दिसून येत आहे. प्रचारसभादरम्यान आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे गटावर बोचरी टीका केली आहे. सध्या सोशल मीडियावर निवडणुकीच्या प्रचाराचे […] The post “दिल्लीश्वरांच्या भीतीने ‘बाळासाहेबांचे विचार’ खुंटीला टांगले”; ‘त्या’ पोस्टरवरुन अंबादास दानवेंचा शिंदेंवर निशाण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 12:06 pm

हाँगकाँगमधील भीषण आगीत 44 जणांचा मृत्यू, ३०० पेक्षा जास्त बेपता ; ३ संशयितांना अटक

Massive fire in Hong Kong। हाँगकाँगच्या ताई पो जिल्ह्यातील वांग फुक कोर्ट याठिकाणी अनेक इमारतींमध्ये अचानक आग लागली. आग इतक्या वेगाने पसरली की त्यांनी सात इमारतींना वेढले. तासनतास प्रयत्न करूनही आग आटोक्यात आणता आली नाही. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. मोठ्या संख्येने लोक अजूनही बेपत्ता आहेत. तसेच अनेक जखमींवर […] The post हाँगकाँगमधील भीषण आगीत 44 जणांचा मृत्यू, ३०० पेक्षा जास्त बेपता ; ३ संशयितांना अटक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 11:51 am

“पैसे किती द्यायचे यासाठी….”; निवडणुकीतील अर्थकारणावर शरद पवार स्पष्टचं बोलले; खरपूस समाचार घेत साधला निशाणा

Sharad Pawar : निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ठिकठिकाणी गट झाले आहेत. पैसे, निधीवर मत मागितली जातं आहेत, ही चांगली गोष्ट नाही अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक निवडणुकांबाबत प्ररखड भाष्य केले. स्थानिक स्वराज्य […] The post “पैसे किती द्यायचे यासाठी….”; निवडणुकीतील अर्थकारणावर शरद पवार स्पष्टचं बोलले; खरपूस समाचार घेत साधला निशाणा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 11:43 am

120 bahadur: “मला तुझा अभिमान आहे”…शबाना आझमीने ‘120 बहादुर’मधील फरहानच्या अभिनयावर केले कौतुक

120 bahadur: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री शबाना आजमींनी फरहान अख्तरच्या ‘120 बहादुर’ या चित्रपटातील अभिनयाचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर फरहानचा फोटो शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आणि त्यांच्या दोन वेगवेगळ्या चित्रपटांतील भूमिकांची तुलना केली. शबाना यांनी इंस्टाग्रामवर फरहान अख्तरचा एक फोटो शेअर करत लिहिले, “मला तुझा खूप अभिमान आहे फरहान. तुझा […] The post 120 bahadur: “मला तुझा अभिमान आहे”… शबाना आझमीने ‘120 बहादुर’मधील फरहानच्या अभिनयावर केले कौतुक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Nov 2025 11:38 am

स्पॉटलाइट-आईच्या दुधात रेडिओ अ‍ॅक्टिव्ह युरेनियम आढळला:कर्करोग, मूत्रपिंड निकामी करणारा युरेनियम ब्रेस्ट मिल्कमध्ये कसा आला, यामुळे नवजातांना किती धोका?

नवजात बाळासाठी आईचे दूध सर्वात सुरक्षित मानले जाते, पण एका अभ्यासात बिहारमधील अनेक महिलांच्या स्तनातील दुधात किरणोत्सर्गी युरेनियम आढळले आहे. जे कर्करोग, अवयव निकामी होणे आणि डीएनए विकार यांसारखे गंभीर आजार निर्माण करू शकते. अखेर हे धोकादायक घटक स्तनातील दुधापर्यंत कसे पोहोचले आणि मुलांवर याचा काय परिणाम होऊ शकतो, हे जाणून घेण्यासाठी वर दिलेल्या इमेजवर क्लिक करून व्हिडिओ पाहा...

दिव्यमराठी भास्कर 27 Nov 2025 11:36 am

शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण; २०२७ मध्ये होणार ६ मिनिटांचा अंधार

मुंबई : येणाऱ्या वर्षात म्हणेजच २ ऑगस्ट २०२७ रोजी शतकातील सर्वात मोठं आणि दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. या घटनेदरम्यान अनेक प्रदेश तब्बल ६ मिनिटे २३ सेकंद गडद अंधारात बुडणार आहेत. २१ व्या शतकात एवढा मोठं सूर्यग्रहण यापूर्वी कधीही दिसलं नव्हतं, त्यामुळे जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आणि अवकाशप्रेमींना ही पर्वणीच आहे.खगोलशास्त्रज्ञांनी या सूर्यग्रहणाची तयारी सुरू केली असून, इतक्या मोठ्या कालावधीत होणारे खग्रास सूर्यग्रहण अवकाशशास्त्रीय संशोधनासाठीही महत्त्वाचं असेल. सहसा खग्रास सूर्यग्रहण 3 मिनिटांपेक्षा कमी वेळ टिकतं, मात्र २०२७ मध्ये होणारे ग्रहण जवळपास दुपटीहून अधिक काळ टिकणार असल्याने ते विशेष ठरणार आहे.खगोलीय दृष्टीनेही ही घटना विलक्षण आहे. या दिवशी पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूरच्या ठिकाणी असेल, त्यामुळे सूर्याचा आकार आकाशात लहान दिसेल. त्याचवेळी चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असेल, त्यामुळे तो नेहमीपेक्षा मोठा वाटेल आणि सूर्य पूर्णपणे झाकू शकेल. या दुर्मिळ संयोगामुळे सूर्यप्रकाश अडवला जाऊन दीर्घकाळ अंधार निर्माण होणार आहे.सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे जी अनुक्रमे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या रेषेमुळे उद्भवते. या काळात सूर्यासमोर असलेल्या चंद्राच्या आकारामुळे त्याच्या प्रकाशात अडथळा निर्माण होतो, परिणामी पृथ्वीवर अंधार पडतो. २ ऑगस्ट २०२७ रोजी पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर असेल. त्यामुळे आकाशात सूर्य लहान दिसेल. परंतु त्याच वेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूवर असेल आणि त्याच्या कक्षीय मार्गावर फिरत असेल, ज्यामुळे तो आकाराने मोठा दिसेल. हे दुर्मिळ संयोजन जास्त काळ सूर्यप्रकाश रोखू शकेल, ज्यामुळे हे ग्रहण जास्त काळ होईल.

फीड फीडबर्नर 27 Nov 2025 11:30 am