Mumbai : मुंबईत भुयारी मेट्रो सेवा कोलमडली.! तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय
मुंबई – मुंबईतील पहिल्या आणि महत्त्वाकांक्षी भुयारी मेट्रो-३ सेवेला आज पुन्हा तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. दक्षिण मुंबईतील सीएसएमटी स्थानकाजवळ भुयारात मेट्रो काही काळासाठी बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले. मेट्रोच्या दरवाजांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते वारंवार उघड-बंद होत होते. यामुळे खबरदारी म्हणून मेट्रो काही वेळ थांबविण्यात आली होती. त्यामुळे या बिघाडाचा परिणाम संपूर्ण […] The post Mumbai : मुंबईत भुयारी मेट्रो सेवा कोलमडली.! तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय appeared first on Dainik Prabhat .
१) आम्ही शांत बसणार नाही.! मुंडेंच्या कमबॅकची शक्यता, सुप्रिया सुळेंचा इशारा : नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणूक प्रकरणात २ वर्षांची शिक्षा सुनावलीये. यानंतर त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची खाती तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवलीयेत. कोकाटेंच्या जागी आता माजी मंत्री धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची […] The post टॅरिफ माझा प्रिय शब्द.! सुप्रिया सुळेंचा इशारा ते पृथ्वीराज चव्हाण यांची हकालपट्टी…; TOP 10 News वाचा एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .
सोलापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज होत आहे. याबाबत पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांनी विठ्ठल मूर्तीची पाहणी करून अहवाल सादर करण्यात आला आहे. याबाबत शासनाच्या विधी व न्याय विभागाने परवानगी दिल्यावर विठ्ठल मूर्तीवर वज्रलेप होणार आहे. दरम्यान, यापूर्वीही पांडूरंगाच्या चरणांची झीज झाली होती. त्यावेळी वज्रलेप लावण्यात आला होता. यावेळी ही हीच प्रक्रीया […] The post Solapur News : महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; पुरातत्व विभागाकडून अहवाल सादर appeared first on Dainik Prabhat .
अनधिकृत ‘एलईडी’ मासेमारी करणाऱ्यांना मत्स्यव्यवसाय विभागाचा दणका
मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार गस्ती मोहीम; तीन नौकांवर कठोर कारवाईमुंबई : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत ‘एलईडी’ मासेमारी करणाऱ्यांना मत्स्यव्यवसाय विभागाने दणका दिला आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार राबवलेल्या विशेष गस्ती मोहिमेत रायगड जिल्ह्यातील तीन नौका जप्त करण्यात आल्या असून, त्यावरील एलईडी मासेमारीचे सर्व साहित्यही विभागाने ताब्यात घेतले आहे.रायगड जिल्ह्यातील सागरी भागात अनधिकृत एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाने १७ आणि १८ डिसेंबर रोजी रात्री आणि सकाळी धाडी घातल्या. १७ डिसेंबर रोजी रात्री ९:३० वाजता केलेल्या पहिल्या कारवाईत जगन्नाथ कोळी यांच्या मालकीची ‘साई गणेश’ ही नौका अनधिकृत एलईडी पद्धतीने मासेमारी करताना विभागाच्या गस्ती नौकेने पकडली. त्याच दिवशी रात्री ११ वाजता अलिबागलगत यशवंत नाखवा यांची ‘हेरंब कृपा’ ही नौका अनधिकृत एलईडी लाइट्स वापरून मासेमारी करताना आढळली आणि तीही जप्त करण्यात आली.तिसरी कारवाई १८ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता उरण तालुक्यातील तुकाराम पाटील यांच्या ‘श्रीसमर्थ कृपा’ या नौकेवर करण्यात आली. विभागाच्या गस्ती नौकेने तपासणी केली असता या नौकेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत एलईडी साहित्य आढळले. या कारवाईत ४ हजार वॅटचे अंडर वॉटर एलईडी लाइट्स, १ हजार वॅटचे सीया लाइट्स, ४०० वॅटचे हॅलोजन बल्ब आणि जनरेटर असे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई सहआयुक्त (सागरी) महेश देवरे, प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय मुंबई नागनाथ भादुले, परवाना अधिकारी ससून गोदी, परवाना अधिकारी करंजा, परवाना अधिकारी मिरकरवाडा (रत्नागिरी) आणि परवाना अधिकारी साखरीनाटे (रत्नागिरी) यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली.
बंगळुरू : घरात लहान मूल असताना क्षणभराचे दुर्लक्षही किती मोठी किंमत मोजायला लावू शकते, याचा हृदयद्रावक अनुभव असिस्टंट डायरेक्टर कीर्तन नाडगौडाला आला आहे. KGF २ मध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलेले कीर्तन नादगौडा यांच्या साडेचार वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.कीर्तन नादगौडा यांचा मुलगा सोनार्श हा खेळता खेळता लिफ्टमध्ये गेला आणि त्याच दरम्यान तो लिफ्टमध्ये अडकला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.नेमकं काय घडलं?ही घटना सोमवारी, १५ डिसेंबर रोजी घडली. साडेचार वर्षांचा सोनार्श घरात खेळत असताना अचानक लिफ्टमध्ये गेला. काही क्षणांतच अपघात घडला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. अपघाताची तीव्रता इतकी होती की रुग्णालयात पोहोचेपर्यंत उशीर झाला. या घटनेने नादगौडा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.कीर्तन नादगौडा यांनी KGF २ या गाजलेल्या चित्रपटात दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. सध्या ते ‘मैत्री मुव्ही मेकर्स’च्या एका मोठ्या आगामी प्रोजेक्टवर काम करत होते. करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना आलेल्या या वैयक्तिक आघातामुळे तो पूर्णपणे हादरले आहेत. या दु:खद घटनेनंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांनी सोशल मीडियावर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
TVF (द व्हायरल फीव्हर) हे भारतातील सर्वात मोठ्या कंटेंट प्रोड्यूसर्सपैकी एक असून, प्रेक्षकांना सातत्याने सर्वाधिक आवडणारा, रिलेटेबल आणि मनोरंजक कंटेंट देत आले आहे. OTT स्पेसला नव्या अर्थाने परिभाषित करण्यात TVFची महत्त्वाची भूमिका राहिली आहे आणि प्रेक्षकांची नाडी TVFइतकी अचूकपणे कोणीच ओळखत नाही, हे त्यांनी पुन्हा पुन्हा सिद्ध केले आहे. आपल्या शोद्वारे TVFने अनेक उत्तम कलाकारांना व्यासपीठ दिले आहे आणि मोना सिंग देखील आपल्या OTT करिअरच्या सुरुवातीचे श्रेय याच प्लॅटफॉर्मला देते.अलीकडेच मोना सिंग यांनी टेलिव्हिजनवरून OTT कडे झालेल्या आपल्या प्रवासाबद्दल बोलताना त्यासाठी TVFचे आभार मानले. त्या म्हणाल्या, “2020 च्या लॉकडाऊननंतर सगळ्यांनीच OTT स्वीकारले, कारण आपण सगळे घरी बसून कंटेंट पाहत होतो. पण माझ्यासाठी, एक कलाकार आणि एक माणूस म्हणून, टीव्हीचा प्रवास पुरेसा झाला होता. मी टीव्हीवर जवळपास सगळेच प्रकारचे काम केले होते. टीव्ही मला पुढे काहीतरी नवीन देऊ शकत नव्हता. तेव्हा मला वाटले की आता पुढचे मोठे पाऊल उचलायला हवे, जरी ते नेमके काय असेल हे मला माहीत नव्हते.मी यूट्यूबवर TVFच्या अनेक वेब सिरीज पाहत असे आणि त्यांच्यापासून खूप प्रेरणा मिळाली. त्या खूपच रिअल आणि रिलेटेबल वाटायच्या. त्याच काळात मी TVFसोबत माझी पहिली वेब सिरीज ये मेरी फॅमिली केली. तिथूनच माझ्या OTT प्रवासाची सुरुवात झाली आणि त्यानंतर मागे वळून पाहण्याची वेळच आली नाही. आज मी हा काळ सेलिब्रेट करते आहे—वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारते आहे, चित्रपट, OTT आणि सगळ्याचा योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न करते आहे. एकूणच, OTT माझ्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे.”मोना सिंग यांनी TVFसोबत ये मेरी फॅमिली या सिरीजमध्ये काम केले. त्या आधीच टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक परिचित चेहरा असल्या, तरी त्यांच्या OTT करिअरची खरी सुरुवात TVFसोबतच झाली—आणि त्यानंतर इतिहास घडत गेला. यावरून स्पष्ट होते की TVFने नेहमीच खऱ्या आणि असाधारण टॅलेंटवर विश्वास ठेवला आहे.याशिवाय, भारतातील डिजिटल स्टोरीटेलिंगला नवे रूप देण्यात TVFची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. 2014 मध्ये परमनंट रूममेट्सपासून वेब सिरीज क्रांतीची सुरुवात केल्यानंतर, TVFने पिचर्स, ट्रिपलिंग, अॅस्पिरंट्स, पंचायत, कोटा फॅक्टरी आणि गुल्लक यांसारखे दर्जेदार आणि लक्षात राहणारे शो दिले आहेत. नव्या टॅलेंटला संधी देणे आणि आयुष्याशी जोडलेल्या कथा मांडणे यामुळे TVFने असे एक युनिव्हर्स तयार केले आहे, ज्यावर प्रेक्षकांचा विश्वास आहे आणि ज्याच्याशी ते भावनिकदृष्ट्या जोडले गेले आहेत.प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मिळणारी सातत्यपूर्ण दाद यावर्षी मिळालेल्या अनेक नामांकनांमधूनही स्पष्टपणे दिसून येते. नेहमी काहीतरी नवीन करण्याचा विचार करणारा TVF आता एका नव्या क्रिएटिव्ह क्षेत्रात पाऊल टाकत आहे—VVAN – Force of the Forest या प्रोजेक्टसह, जो एकता कपूर यांच्या बालाजी मोशन पिक्चर्स आणि अरुणाभ कुमार यांच्या द व्हायरल फीव्हर यांच्यातील एक विशेष सहयोग आहे.
Beed News : बीडमध्ये कॉलेजवरून परतणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण; तपासासाठी पोलिसांची पथके तयार
बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई शहराच्या मध्यवर्ती भागात गुरुवारी दुपारी कॉलेजमधून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे दोन तरुणांनी अपहरण केले आहे. ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयाच्या रस्त्यावर घडली. मुलगी कॉलेजमधून पायी घरी परतत असताना दोन तरुणांनी तिला अडवले. आरोपींनी तिच्यावर हल्ला केला आणि तिला जबरदस्तीने एका कारमध्ये ढकलून, जालना जिल्ह्यातील अंबड […] The post Beed News : बीडमध्ये कॉलेजवरून परतणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण; तपासासाठी पोलिसांची पथके तयार appeared first on Dainik Prabhat .
Satara News : आ. महेश शिंदे यांच्या हस्ते श्री सेवागिरी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
पुसेगाव : मनातील मालिन्य, द्वेष भावना काढून टाकण्याची शक्ती प पू श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीत आहे.या देवस्थानच्या विकासासाठी भरभरासाठी तसेच शासनदरबारी ट्रस्टचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू असे आश्वासन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांनी दिले. सेवागिरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी प्रदर्शनाचे […] The post Satara News : आ. महेश शिंदे यांच्या हस्ते श्री सेवागिरी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन appeared first on Dainik Prabhat .
Satara News : लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सेवागिरी रथोत्सव उत्साहात संपन्न
पुसेगाव : संपूर्ण राज्यात आणि उत्तर कर्नाटकामध्ये प्रसिध्द असलेल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री सेवागिरी महाराजांच्या ७८ व्या स्मृतिदिनानिमित्त निघालेल्या रथाच्या मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले होते.कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना.महेश शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे व आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते आज सकाळी दहा वाजता रथपूजन झाले. रथपूजन सोहळ्यास मठाधिपती सुंदरगिरी महाराज, सेवागिरी […] The post Satara News : लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सेवागिरी रथोत्सव उत्साहात संपन्न appeared first on Dainik Prabhat .
माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला
मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी नैतिकतेच्या आधारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. अजित पवार यांनी गुरुवारी तो स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला.कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिल्याने, त्यांच्या अडचणीत वाढ झाली. कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाल्याने, त्यांच्याकडील खाते काढून घेण्याची शिफारस बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे केली. त्यानुसार, कोकाटे यांच्याकडील खाते काढून ते अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यानंतर, कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारून तो मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याची माहिती अजित पवार यांनी गुरुवारी समाज माध्यमांद्वारे दिली.
पुणे : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिके आडवी झाली, उत्पादनात घट झाली तर काही भागांत संपूर्ण पीकच हातचे गेले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुमारे ३१ हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर करत पीक विमा योजनेतून प्रति हेक्टर १७,५०० रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. ही रक्कम थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी यासाठी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.सरकारकडून देण्यात येणारी ही मदत थेट वैयक्तिक शेतकऱ्याच्या नुकसानीवर आधारित नसून महसूल मंडळ पातळीवरील पीक कापणी प्रयोगावर अवलंबून असणार आहे. प्रत्येक महसूल मंडळात बारा ठिकाणी पीक कापणी प्रयोग घेतले जातात. या प्रयोगांतून त्या मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाते.हे सरासरी उत्पादन मागील पाच वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी, तुलना करून नुकसानभरपाई ठरवली जाते. जर चालू हंगामातील सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असेल, तरच त्या महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा भरपाईसाठी पात्र ठरणार आहेत.भरपाईची रक्कम किती मिळणार?भरपाईची रक्कम ही उत्पादनातील घट किती टक्क्यांनी आहे, यावर ठरवली जाणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या महसूल मंडळात सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या १० टक्क्यांनी कमी असेल, तर विमा संरक्षित रकमेच्या केवळ १० टक्केच भरपाई मिळणार आहे.उत्पादनातील घट जशी वाढेल, तशी भरपाईची टक्केवारीही वाढणार आहे. जर एखाद्या महसूल मंडळात सरासरी उत्पादन पूर्णपणे घटून शून्यावर आले, तर संबंधित शेतकऱ्यांना संपूर्ण विमा संरक्षित रक्कम मिळू शकते. उदाहरणार्थ, सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षण रक्कम सुमारे ५६ हजार रुपयांपर्यंत आहे. मात्र अशी पूर्ण भरपाई मिळणे प्रत्यक्षात शक्य नाहीयाच कारणामुळे सरकारने जाहीर केलेली प्रति हेक्टर १७,५०० रुपयांची मदत सर्व शेतकऱ्यांना मिळेलच, याची हमी देता येत नाही. प्रत्येक महसूल मंडळातील परिस्थिती वेगवेगळी असल्याने काही ठिकाणी मोठे नुकसान होऊनही सरासरी उत्पादन तुलनेने जास्त राहू शकते. अशा परिस्थितीत त्या मंडळातील शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी भरपाई मिळण्याची शक्यता आहे.
लोकसभेत प्रचंड गदारोळात ‘जी राम जी’विधेयक मंजूर; शिवराज सिंह चौहान यांच्यावर फेकले कागद !
Ji Ram Ji bill passed | Lok Sabha | Shivraj Singh Chouhan – देशातील ग्रामीण जनतेला दोन दशके रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (मनरेगा) नाव आणि स्वरूप बदलणारे भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) म्हणजेच व्हीबी-जी राम-जी हे विधेयक अखेर गुरुवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकाला विरोधी […] The post लोकसभेत प्रचंड गदारोळात ‘जी राम जी’ विधेयक मंजूर; शिवराज सिंह चौहान यांच्यावर फेकले कागद ! appeared first on Dainik Prabhat .
Yashasvi Jaiswal 2 KG weight loss in 2 Day : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या प्रकृतीबाबत एक चिंताजनक अपडेट समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांत यशस्वीचे सुमारे २ किलो वजन कमी झाले असून डॉक्टरांनी त्याला ७ ते १० दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान हरियाणाविरुद्धच्या सामन्यात त्याची […] The post Yashasvi Jaiswal : जैस्वालची तब्येत अचानक बिघडली; दोन दिवसांत २ किलो वजन घटलं, नेमकं काय झालं? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
Ajit Pawar : अखेर अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; म्हणाले…
नाशिक/मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे आमदार आणि राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याच्या प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या निकालानंतर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोकाटे […] The post Ajit Pawar : अखेर अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .
Pench : पेंच व्याघ्र प्रकल्पात आता 'सोलर बोट'ची सफारी लवकरचं पर्यटकांच्या सेवेत!
किरंगीसरा ते नवेगाव खैरी दरम्यान धावणार पर्यावरणपूरक 'सोलर बोट'पेंच : निसर्गप्रेमी आणि वन्यजीव पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी आता जल पर्यटनाची (Water Tourism) विशेष सोय करण्यात आली आहे. किरंगीसरा, कोलीतमारा ते नवेगाव खैरी या विस्तीर्ण जलमार्गावर पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा, यासाठी २२ सीटर अत्याधुनिक सोलर बोट पेंचमध्ये दाखल झाली आहे.प्रत्यक्ष पाहणी आणि सुविधांचा आढावा नुकतीच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी या सोलर बोटीतून विहार करत संपूर्ण मार्गाची तांत्रिक पाहणी केली. उपलब्ध सुविधा, सुरक्षितता आणि पर्यटनाच्या दृष्टीने या मार्गाचे महत्त्व यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लवकरच अशाच प्रकारची दुसरी सोलर बोटदेखील येथे उपलब्ध होणार असून, यामुळे पर्यटकांची प्रतीक्षा संपणार आहे. पेंचच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन पेंच व्याघ्र प्रकल्प हे त्याच्या दुर्मिळ वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीतून वाहणारी विस्तीर्ण नदी हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. या जल सफारीदरम्यान पर्यटकांना केवळ पाण्याचा शांत अनुभव मिळणार नाही, तर विविध दुर्मिळ आणि स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन घडेल. नदीकाठी पाणी पिण्यासाठी येणारे वाघ, बिबट्या आणि इतर वन्यप्राणी पाहण्याची दुर्मिळ संधी मिळेल.https://prahaar.in/2025/12/18/the-municipal-corporation-says-that-mumbais-air-quality-has-improved-compared-to-last-year/पर्यावरणपूरक सोलर बोट असल्यामुळे आवाजाचं प्रदूषण होणार नाही, परिणामी वन्यजीवांना त्रास न होता पर्यटकांना शांततेत निसर्ग अनुभवता येईल. लवकरच उद्घाटन आणि पर्यटकांना आवाहन या दोन्ही सोलर बोटींचे उद्घाटन लवकरच एका विशेष सोहळ्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर या बोटी सर्वसामान्य पर्यटकांसाठी खुल्या केल्या जातील. भविष्यात येथे अधिक अत्याधुनिक बोटी उपलब्ध करून देण्याचा मानस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.पेंच व्याघ्र प्रकल्प हे एक निसर्गसंपन्न ठिकाण आहे. येथील जल पर्यटनाचा सुरक्षित आणि शांत अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन प्रशासकीय स्तरावरून करण्यात आले आहे.बोटीची ठळक वैशिष्ट्ये:क्षमता : २२ सीटर मोठी सोलर बोट.मार्ग : किरंगीसरा - कोलीतमारा ते नवेगाव खैरी.वैशिष्ट्य : पूर्णपणे पर्यावरणपूरक, आवाजाचा त्रास नाही.फायदा : जलमार्गावरून वन्यजीव आणि पक्षी निरीक्षणाची विशेष संधी.
नितीश कुमारांनी हिजाब ओढल्याचा व्हिडीओ व्हायरल; महिलेने २४ तासातच घेतला टोकाचा निर्णय
पटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एका कृतीमुळे सुरू झालेला वाद आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. सरकारी डॉक्टरांना नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी महिला डॉक्टर आयुष नुसरत परवीन यांचा हिजाब ओढल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर अवघ्या २४ तासांत संबंधित डॉक्टर महिलेने बिहार सरकारची नोकरी न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे आपण मानसिक तणावात असल्याचे आयुष नुसरत परवीन यांनी सांगितले. त्यांनी बिहार कायमचे सोडल्याचेही स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे त्यांच्या सन्मानाला धक्का बसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.नेमकं प्रकरण काय?बिहारमध्ये नुकताच सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार नियुक्तीपत्र देत असताना आयुष नुसरत परवीन यांचा हिजाब ओढल्याचा प्रकार घडला. आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.व्हिडीओ व्हायरल होताच या प्रकारावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. अनेकांनी हा प्रकार असंवेदनशील असल्याचे म्हटले असून, महिला डॉक्टरच्या वैयक्तिक आणि धार्मिक सन्मानाचा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणामुळे बिहारच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर आयुष नुसरत परवीन यांनी बिहार सरकारची नोकरी स्वीकारणार नसल्याचा निर्णय घेतला असून, पुढील वाटचाल काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे अडू नये ! - महसूलमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना
महसूल विभागाचा ‘डिजिटल’ कायापालट!मुंबई : छोट्या-छोट्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे अडता कामा नयेत,असा सक्त सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाचे स्वतंत्र डाटा सेंटर आणि महसूल विभागाच्या तांत्रिक सक्षमीकरणाबाबतच्या उच्चस्तरीय बैठकीत केली.ते म्हणाले,जमिनीचा डाटा हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा असून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि विभागाच्या सक्षमीकरणासाठी अधिकाऱ्यांनी तयारी करावी. महसूल विभागाला देशात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी अत्याधुनिक यंत्रणा उभारावी.राज्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना जमिनीशी संबंधित कामे घरबसल्या आणि विनासायास करता यावीत, यासाठी महसूल विभागाचे संपूर्ण डिजिटलायझेशन आणि आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक (IGR) रविंद्र बिनवडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.राज्याची सर्व जमीन ‘डाटा सेंटर’वर येणारमहसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, राज्याच्या कानाकोपऱ्यातील जमिनींची मोजणी आणि नोंदी अद्ययावत करायच्या आहेत. ई-फेरफार, ई-मोजणी २.०, ई-पीक पाहणी, महाभूमी पोर्टल यांसारख्या ५५ हून अधिक ॲप्लिकेशन्सचा भार सध्या यंत्रणेवर आहे. भविष्यात संपूर्ण राज्याची जमीन डाटा सेंटरवर आणायची असल्याने या प्रणालीत कोणताही तांत्रिक बिघाड खपवून घेतला जाणार नाही. भूसंपादन आणि इतर महसूल विषयक कामे जलदगतीने होण्यासाठी हे आधुनिकीकरण काळाची गरज आहे.नागपूरला होणार 'डिझास्टर डाटा सेंटर'माहितीच्या सुरक्षिततेबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सध्या नवी मुंबईतील ऐरोली येथे डाटा सेंटर कार्यरत असले तरी, नैसर्गिक आपत्ती किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास कामात खंड पडू नये यासाठी ‘डिझास्टर रिकव्हरी’ (DR) साईट अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने नागपूर येथे डिझास्टर डाटा सेंटर कार्यान्वित करण्यात येईल, तसेच मुंबईतील डाटा सेंटरचेही आधुनिकीकरण करण्यात येईल, असे बैठकीत निश्चित करण्यात आले. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी यावेळी महसूल विभागाला आयटी विभागाच्या मदतीने जागा आणि तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
पृथ्वीराज चव्हाण यांची हकालपट्टी करावी.! ‘ऑपरेशन सिंदूर’वरून भाजप आक्रमक
Prithviraj Chavan | BJP – ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपने गुरुवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. चव्हाण यांची टिप्पणी देशविरोधी असून, त्यामुळे भारतीय लष्कराचा अपमान झाला आहे, असा आरोप करत काँग्रेसने त्यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपने केली. भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय […] The post पृथ्वीराज चव्हाण यांची हकालपट्टी करावी.! ‘ऑपरेशन सिंदूर’वरून भाजप आक्रमक appeared first on Dainik Prabhat .
Ravindra Dhangekar : पुण्यात भाजप-शिवसेनेची जागा वाटपाची चर्चा; मात्र रवींद्र धंगेकरांना डावललं
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात जागावाटपासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेत एक उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना पूर्णपणे डावलण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी धंगेकर यांनी पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात भाजपचे पुणे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर […] The post Ravindra Dhangekar : पुण्यात भाजप-शिवसेनेची जागा वाटपाची चर्चा; मात्र रवींद्र धंगेकरांना डावललं appeared first on Dainik Prabhat .
Stokes Archer Fight : लाइव्ह सामन्यात स्टोक्स-ऑर्चरमध्ये जुंपली! जोरदार वादावादीचा VIDEO व्हायरल
Stokes Archer Fight video viral : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित ‘अॅशेस’ मालिकेतील तिसरा कसोटी सामना सध्या ॲडलेडच्या मैदानावर रोमांचक वळणावर पोहोचला आहे. मात्र, खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडची स्थिती अत्यंत नाजूक असून संघ पराभवाच्या छायेत दिसत आहे. विशेष म्हणजे, मैदानावर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्यात झालेल्या तीव्र वादाने या सामन्याला […] The post Stokes Archer Fight : लाइव्ह सामन्यात स्टोक्स-ऑर्चरमध्ये जुंपली! जोरदार वादावादीचा VIDEO व्हायरल appeared first on Dainik Prabhat .
मोबाईलचा वापर ‘स्मार्ट’हवा; अतिरेकाने होताहेत दुष्परिणाम –प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
पुणे: किशोरवयीन मुलांमध्ये मोबाईल वापराचे मोठे आकर्षण आहे. एवढेचनाही, तर मुलांमध्ये मोबाईलच्या वापराचे चांगले व वाईट परिणाम याबाबत जागरूकता येत असली, तरी त्याचा मोह सुटत नसल्याचेदिसून येत आहे. मुलांना मोबाईलचा स्मार्ट वापर हवा आहे. त्याचवेळी मोबाईलच्या अतिरेकी वापरानेशारीरिक व मानसिक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा ‘मर्यादित व शहाणपणाचा’ वापर […] The post मोबाईलचा वापर ‘स्मार्ट’ हवा; अतिरेकाने होताहेत दुष्परिणाम – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया appeared first on Dainik Prabhat .
Mamata Banerjee – रोजगार हमीसाठी गाजलेल्या मनरेगाचे नाव का बदलण्यात आले? सध्याच्या केंद्र सरकारला महात्मा गांधींची एलर्जी असावे, असे दिसते. जर केंद्र सरकार राष्ट्रपित्याचा आदर करू शकत नसतील तर आम्ही करू. आम्ही आमच्या ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव कर्मश्री असे ठेवू, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला संताप व्यक्त केला. व्यवसाय आणि […] The post Mamata Banerjee : केंद्र सरकारला महात्मा गांधींची एलर्जी.! ‘मनरेगा’चे नाव बदलल्याने ममता बॅनर्जी भडकल्या appeared first on Dainik Prabhat .
मुंबई: मारूती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India) कंपनीने मोठी घोषणा केली आहे. दिव्यांगासाठी ही योजना फळास ठरू शकते कारण बुधवारी मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या कार्समध्ये सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी एक पाऊल म्हणून मारूतीने स्विव्हल सीटच्या पर्यायासह वॅगनआर सादर बाजारात आणल्याची घोषणा नुकतीच केली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना अधिक सोयीसुविधा देण्यासाठीस्विव्हल सीट्स डिझाइन केल्या आहेत असे कंपनीने सांगितले. 'हा उपक्रम संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय १० शी सुसंगत आहे, ज्याचा उद्देश असमानता कमी करणे आहे' असे कंपनीने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे.'स्विव्हल सीट्समुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी दैनंदिन प्रवास अधिक सोयीस्कर होईल. वॅगनआर हे भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पहिल्या दहा मॉडेल्सपैकी एक आहे आणि हे सुलभीकरण व वैशिष्ट्य मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचवण्यासाठी ते आदर्श आहे' असे मारुती सुझुकी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिसाशी ताकेउची यांनी सांगितले.कंपनीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातील माहितीनुसार, वॅगनआर स्विव्हल सीट किटची ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) येथे सुरक्षा चाचण्या करण्यात आल्या आहेत आणि ते सगळ्या त्या आवश्यक सुरक्षा मानकांचे पालन कंपनी करते, असे कंपनीने नमूद केले.सुझुकी ग्रुपच्या 'बाय युवर साइड' या कॉर्पोरेट घोषणेपासून प्रेरणा घेऊन हा उपक्रम संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय १० शी सुसंगत आहे, ज्याचा उद्देश सध्याची असमानता कमी करणे आहे हे उद्दिष्टही कंपनीने यावेळी स्पष्ट केले.उपलब्ध माहितीनुसार, या उपक्रमासाठी मारुती सुझुकीने NSRCEL-IIM बंगळूरच्या स्टार्टअप इनक्यूबेशन प्रोग्राम अंतर्गत बंगळूर स्टार्टअप TRUEAssist Technology Private Limited सोबत भागीदारी केली आहे. ग्राहक मारुती सुझुकी अरेना डीलरशिपवर स्विव्हल सीट रेट्रो फिटमेंट किट म्हणून ग्राहक ऑर्डर करू शकतात. ही सीट नवीन वॅगनआर मॉडेल्समध्ये बसवता येईल किंवा सध्याच्या वाहनांमध्ये रेट्रोफिट करता येईल असे कंपनीने म्हटले.
मुंबई पालिका निवडणुकीसाठी १५० जागांवर महायुतीचे एकमत
अमित साटम यांची माहिती; नवाब मलिकांऐवजी अन्य कोणाकडे नेतृत्व दिल्यास राष्ट्रवादीचे महायुतीत स्वागतमुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या जागावाटपासाठी भाजप आणि शिवसेनेतील दुसऱ्या बैठकीत १५० जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित ७७ जागांवर लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी गुरुवारी दिली. मुंबईला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे हाच महायुतीचा मुख्य फॉर्म्युला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दादर येथील भाजपच्या 'वसंत स्मृती' कार्यालयात ही बैठक पार पडली. बैठकीला भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर उपस्थित होते. तर, शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी खासदार राहुल शेवाळे, खासदार मिलिंद देवरा, प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे उपस्थित होते.बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अमित साटम म्हणाले, १५० जागांवर आमचे पूर्ण एकमत झाले आहे. उर्वरित ७७ जागांवर येत्या दोन-चार दिवसांत चर्चा पूर्ण करून अंतिम निर्णय घेतला जाईल. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. जागावाटपाच्या फॉर्म्युलाबाबत ते म्हणाले, कोण किती जागा लढवतो हे महत्त्वाचे नाही. महायुती म्हणून २२७ जागा लढवून १५० पेक्षा अधिक जागा जिंकणे आणि मुंबईला भ्रष्टाचारमुक्त, विकासाभिमुख प्रशासन देणे हा आमचा उद्देश आहे. गेल्या २५ वर्षांत मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकवणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.उमेदवारांबाबत अद्याप चर्चा नाहीसाटम पुढे म्हणाले, महायुतीचा महापौर मुंबईकरांचा महापौर असेल. मुंबईचा विकास सातत्याने सुरू ठेवणे, शहराची सुरक्षितता अबाधित राखणे आणि मतांच्या राजकारणासाठी शहराचा रंग बदलण्याच्या प्रयत्नांना आळा घालणे यावर आमचे एकमत आहे. या बैठकीत उमेदवार निवडीबाबत अद्याप चर्चा झाली नसल्याचे साटम यांनी स्पष्ट केले. महायुतीत रिपब्लिकन पक्षाचा (आठवले गट) समावेश असून, सर्व २२७ जागा एकत्र लढवण्यावर भर दिला जाणार आहे, असेही ते म्हणाले.अनिर्णित जागांवर फडणवीस-शिंदे निर्णय घेतील : उदय सामंत उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, आजच्या बैठकीत १५० जागांबाबत चर्चा झाली. ७७ अनिर्णित जागांबाबत एक-दोन दिवसांत चर्चा होईल. कोण किती जागा लढतो, यापेक्षा महायुती म्हणून आम्ही पुढे जात आहोत. १५० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निश्चिय आम्ही केला आहे. तिकिट वाटप जाहीर होईल, तेव्हा कोणाला किती जागा मिळाल्या, हे तुम्हाला कळेल. अनिर्णित राहिलेल्या जागांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, अशी माहिती सामंत यांनी दिली.नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीशी संबंध नाही – अमित साटमदरम्यान, महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादीला निमंत्रण दिले नव्हते का, असा प्रश्न विचारला असता अमित साटम म्हणाले, नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमचे काही देणघेणे नाही, अशी आमची भूमिका आहे. मलिक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही. मुंबईसाठी राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक आहेत, राष्ट्रवादीने मलिक यांच्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी दिली असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करु इच्छित नाही. उद्या राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून दुसऱ्या कोणा नेत्यावर मुंबईची जबाबदारी दिली तर त्यांचे स्वागत आहे, अशी भूमिका साटम यांनी मांडली
भयानक हत्याकांड; जौनपूरमध्ये मुलानेच आई-वडिलांची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले
जौनपूर : उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. जाफराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील अहमदपूर गावात अंबेश कुमार या तरुणाने आपली आई बबिता (६०) आणि वडील श्यामलाल (६२) यांची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्येनंतर आरोपीने दोघांच्या मृतदेहांचे तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी नदीत फेकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.पोलिसांच्या चौकशीत अंबेश कुमारने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने प्रथम आईची हत्या केल्यानंतर वडिलांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांच्या मृतदेहांचे तुकडे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे वडील श्यामलाल हे रेल्वेचे निवृत्त लोको पायलट होते. ८ डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अंबेश आणि त्याच्या वडिलांमध्ये पैशाच्या कारणावरून जोरदार वाद झाला होता. या वादातूनच अंबेशने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.हत्येनंतर आरोपीने मृतदेहांचे तुकडे सहा पोत्यांमध्ये भरून ते आपल्या गाडीच्या डिक्कीत ठेवले. घरातील रक्ताचे डाग साफ करून आणि कपडे धुऊन त्याने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पहाटे चार ते पाचच्या दरम्यान तो गाडीतून निघून गेला. वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे गोमती नदीच्या बेलाव घाटावर फेकण्यात आले, तर आईच्या मृतदेहाचे तुकडे जलालापूर परिसरातील साई नदीत टाकण्यात आले. नदीत मृतदेहाचे अवयव आढळल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.पोलिस तपासात कौटुंबिक वादाचा आणखी एक धागा समोर आला आहे. लॉकडाऊन काळात अंबेश कुमारने कोलकातामधील सहजिया नावाच्या महिलेशी विवाह केला होता. ती कोलकातामध्ये ब्युटी पार्लर चालवते. मात्र कुटुंबीय या विवाहास विरोध करत होते आणि अंबेशवर घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकत होते. घटस्फोटासाठी पैशांच्या मागणीवरून घरात सतत वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने जौनपूरसह संपूर्ण उत्तर प्रदेशात खळबळ उडवून दिली आहे.
IND vs SA fans fury reactions video viral : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना बुधवारी लखनौ येथे खेळवला जाणार होता. मात्र, उत्तर भारतात वाढलेल्या प्रचंड धुक्यामुळे सुरक्षेचे कारण देत हा सामना अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे मैदानावर मोठ्या आशेने आलेल्या हजारो क्रिकेट चाहत्यांना एकही चेंडूचा खेळ न […] The post IND vs SA : ‘तीन पोती गहू विकून आलो होतो…’, सामना रद्द झाल्यानंतर संतापलेल्या चाहत्याचा VIDEO व्हायरल appeared first on Dainik Prabhat .
BMC Election : मुंबईसाठी महायुतीचा फॉर्मुला ठरला ! ‘एवढ्या’जागांवर एकमत तर राष्ट्रवादीचा ‘पत्ता कट’
मुंबई महापालिकेवर (BMC Election) सत्ता मिळवण्यासाठी महायुतीने आपली कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी (BMC Election) महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये (शिंदे गट) 227 पैकी तब्बल 150 जागांवर एकमत झाले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. राष्ट्रवादी (अजित पवार गट) […] The post BMC Election : मुंबईसाठी महायुतीचा फॉर्मुला ठरला ! ‘एवढ्या’ जागांवर एकमत तर राष्ट्रवादीचा ‘पत्ता कट’ appeared first on Dainik Prabhat .
‘OTT’प्लॅटफॉर्मला सेन्साॅर नाही.! माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे स्पष्टीकरण
OTT platforms – ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रकाशित होणारा कंटेंट सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या अधिकारक्षेत्राबाहेर राहील. परंतु सध्याच्या माहिती तंत्रज्ञान नियमांनुसार त्याचे नियमन स्वतंत्रपणे सुरू राहील, असे स्पष्टीकरण माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहे. एका लेखी निवेदनात, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरावर आधारित, मंत्रालयाने नमूद केले की ओटीटी कंटेंटचे नियमन माहिती […] The post ‘OTT’ प्लॅटफॉर्मला सेन्साॅर नाही.! माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे स्पष्टीकरण appeared first on Dainik Prabhat .
Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये मोठी चकमक 3 नक्षलवादी ठार
सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एका महिलेसह तीन नक्षलवादी ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. सुकमा पोलीसांनी पीटीआयला सांगितले की, गोलापल्ली पोलीस स्टेशन परिसरातील एका डोंगरावर सकाळी गोळीबार सुरू झाला, जेव्हा जिल्हा राखीव दलाचे एक पथक या भागात माओवादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध मोहिमेवर होते. आतापर्यंत चकमकीच्या ठिकाणाहून […] The post Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये मोठी चकमक 3 नक्षलवादी ठार appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात किरकोळ घसरण झाली आहे. सेन्सेक्स ७७.८४ अंकानी घसरला असून ८४४८१.८१ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी ३ अंकाने घसरत २५८१५.५५ पातळीवर स्थिरावला आहे. तरीही बाजारातील अस्थिरता काही प्रमाणात स्थिरावली असली असूनही पुन्हा एकदा बाजारात शॉर्ट पोझिशन वाढवल्याने मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असल्याने आज बँक निर्देशांकातील अपेक्षित घसरण रोखली गेली असून अखेरच्या रूपयात मोठी रिकव्हरी झाली ज्यामुळे घरगुती गुंतवणूकदारांनी आज आपली रोख विक्री मर्यादित राखली. घरगुती गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे बाजारात त्याचा निश्चितच फायदा झाला असला तरी भारत युएस यांच्यातील द्विपक्षीय करारावर अनिश्चितता तसेच ऑटो, मिडिया, तेल व गॅस शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा फटकाही बाजारात बसला. दरम्यान आयटी, कंज्यूमर ड्युरेबल्स, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारात घसरण मर्यादित राहिली आहे.याशिवाय बँक निर्देशांकाही सेन्सेक्स बँक किरकोळ वाढीसह बंद झाला असून बँक निफ्टीत किरकोळ घसरण झाली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,ऑटो शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणात ट्रेडिंगमध्ये वाढ झाल्याने अस्थिरतेचा फटका ऑटो शेअर्समध्ये बसला होता ज्यामुळे सलग चौथ्या सत्रात ऑटो शेअर्समध्ये घसरण झाली आहे. दरम्यान कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही जागतिक भूराजकीय अस्थिरतेच्या फटक्यामुळे तेल व गॅस शेअर्समध्ये घसरण झाली. आगामी युएस बाजारातील महागाईतील आकडेवारीची प्रतिक्षा गुंतवणूकदार करत असल्याने आगामी आशियाई बाजारातही त्यांचे पडसाद उमटू शकतात. चलनविषयक धोरणाच्या भविष्यातील मार्गाबद्दल अनिश्चितता अस्थिरतेत भर घालत आहे. स्थानिक पातळीवर, डेरिव्हेटिव्ह्ज डेटा एकत्रीकरण टप्प्याकडे निर्देश करतो. तथापि कमी अस्थिरता आणि जास्त विक्री निर्देशक सूचित करतात की अधूनमधून शॉर्ट-कव्हरिंग रॅली नाकारता येत नाहीत असे तज्ञांचेही मत आहे.खासकरुन आशिया-पॅसिफिक प्रदेशातील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात फंडामेंटल व टेक्निकल कमकुवत पातळीवर व्यवहार करत आहेत. उदाहरणार्थ जपानमध्ये आलेल्या आकडेवारीनंतर जपानचा निक्केई तोट्यात सुरू असताना तंत्रज्ञान आणि एआय स्टॉक्समध्ये नफाबुकिंग व एका अहवालाच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित भांडवली खर्चातून परताव्यावर पुन्हा वाढलेली चिंता यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. अमेरिकेच्या प्रमुख चलनवाढीच्या डेटापूर्वी बाजारातील सहभागी देखील सावध अधिक होत आहेत याचाही फटका भारताला बसला. दुपारच्या सत्रात सकाळी सावरलेले बाजार पुन्हा एकदा खाली सपोर्ट लेवल मिळण्यास कमी पडले असून स्मॉलकॅप शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा आणखी फटका बसला. मिडकॅपमध्येही किरकोळ घसरण झाली असताना लार्जकॅपचा संमिश्र प्रतिसाद दिसून आला.आज अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.०३%)सह निकेयी २२५ (०.८३%), कोसपी (१.५५%), सेट कंपोझिट (०.५४%), जकार्ता कंपोझिट (०.६९%) निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली असून केवळ हेंगसेंग (०.०५%), शांघाई कंपोझिट (०.१६%) निर्देशांकात वाढ झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.३१%) निर्देशांकात वाढ झाली असून एस अँड पी ५०० (१.१६%), नासडाक (१.८०%) निर्देशांकात घसरण झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ एचबीएल इंजिनिअरिंग (७.३५%),एचडीएफसी एएमसी (७.१५%), रिलायन्स पॉवर (५.८६%), हिंदुस्थान कॉपर (५.२३%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (४.०६%), पीबी फिनटेक (३.९३%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण हिताची एनर्जी (५.१७%), ओला इलेक्ट्रिक (४.९८%), सिमेन्स इंजिनिअरिंग (४.९५%), रामकृष्ण फोर्ज (३.७५%), एबी लाईफस्टाईल (३.६९%), कल्पतरू प्रोजेक्ट (३.५१%), एमआरपीएल (३.०७%), पीटीसी इंडस्ट्रीज (३.०२%), कमिन्स इंडिया (२.८२%) निर्देशांकात घसरण झाली आहे.बँक निफ्टीबाबत भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,' बँक निफ्टी अजूनही एका मर्यादित श्रेणीत व्यवहार करत आहे; तथापि, हा निर्देशांक त्याच्या महत्त्वाच्या अल्प-मुदतीच्या १० दिवसांच्या एसएमए (Simple Moving Average SMA) जवळ पुन्हा पुन्हा विक्रीच्या दबावाला सामोरे जात आहे जे बाजारातील मंदीचा कल दर्शवते. जर निर्देशांकाने ५८७०० येथील रेंज सपोर्ट तोडला आणि त्याखाली क्लोजिंग दिले, तर घसरणीचा धोका वाढू शकतो. वरच्या बाजूला, तात्काळ प्रतिकार पातळी (Immediate Resistance) ५९१५० पातळीवर आहे, तर आधार पातळी ५८७०० पातळीच्या जवळ आहे. ५८७०० पातळीच्या खाली निर्णायक क्लोजिंग झाल्यास ५८३५० पातळीपर्यंत आणखी घसरण होऊ शकते, जिथे ५०-दिवसांचा एसएमए (SMA) आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात अस्थिर व्यवहार झाले, ज्यात लार्ज-कॅप शेअर्सनी मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्सच्या तुलनेत पिछाडी घेतली. सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर, सुरुवातीच्या तेजीला व्हॅल्यू बाइंग आणि मध्यवर्ती बँकेच्या हस्तक्षेपामुळे रुपयाला मिळालेल्या पाठिंब्यामुळे आधार मिळाला. तथापि, अमेरिका-भारत संभाव्य व्यापार कराराबद्दलच्या अनिश्चिततेमुळे बाजारातील भावनांवर परिणाम झाला, ज्यामुळे दिवसाच्या उत्तरार्धात नफावसुली झाली. क्षेत्रनिहाय विचार केल्यास,आयटी आणि वित्तीय सेवा क्षेत्रांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले, तर ऑटो, तेल आणि वायू, रसायने आणि फार्मा क्षेत्रांमध्ये लक्षणीय कमजोरी दिसून आली. पुढे पाहता, बाजाराला स्पष्ट दिशादर्शक संकेतांसाठी अमेरिकेचा मुख्य चलनवाढीचा दर आणि बेरोजगारीच्या दाव्यांची आकडेवारी, तसेच बँक ऑफ इंग्लंड, युरोपियन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ जपानच्या व्याजदर निर्णयांवर लक्ष केंद्रित करावे लागेल.'बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,' निफ्टीमध्ये कमजोरी कायम आहे, कारण निर्देशांकाला तासाभराच्या चार्टवर २००-डीएमए (Daily Moving Average DMA) पातळी पुन्हा मिळवण्यात अपयश आले आहे आणि बाजारातील मंदीचे वातावरण भारतीय इक्विटींना खाली खेचत आहे. सलग खालच्या शिखरांची निर्मिती मंदीच्या दृष्टिकोनाला आणखी बळकटी देत आहे. मोमेंटम इंडिकेटर आरएसआय (Relative Strength Index RSI) बेरिश क्रॉसओव्हरमध्ये आहे आणि तो देखील खालची शिखरे तयार करत आहे, जे गती कमकुवत होत असल्याचे दर्शवते. बाजाराचा कल कमकुवतच राहिला आहे आणि २५७०० ची पातळी ब्रेकडाउनसाठी असुरक्षित दिसत आहे. २५७०० पातळीच्या खाली निर्णायक घसरण झाल्यास करेक्शनच्या पुढील टप्प्याला वेग येऊ शकतो. वरच्या बाजूला (Upside) २५९०० पातळीच्या आसपास प्रतिकार पातळी आहे.'
नवी दिल्ली : भारतामध्ये कुपोषण हे अर्भक आणि बालमृत्यूचे कारण म्हणून ओळखले जात नाही. अतिसाराचे आजार, अज्ञात कारणांमुळे येणारा ताप आणि जखमा ही या मृत्युसाठी मुख्य कारणे आहेत, असे प्रतिपादन राज्यसभा सदस्य आणि महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी केले.कुपोषणाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी, अंगणवाडी सेवा, पोषण अभियान आणि किशोरवयीन मुलींसाठीची योजना (१४-१८ वर्षे, आकांक्षित […] The post Savitri Thakur : बालमृत्यूमागे कुपोषण हे कारण नाही; महिला-बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांचे प्रतिपादन appeared first on Dainik Prabhat .
धनंजय मुंडे नाही तर बीडच्या ‘या’नेत्याला मिळणार कोकाटेंचं मंत्रिपद? अजित पवार घेणार मोठा निर्णय !
Dhananjay Munde | Manikrao Kokate | Ajit Pawar : शासकीय सदनिकेचा गैरवापर केल्याप्रकरणी नाशिक न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावल्यानंतर, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. कोकाटे यांचे मंत्रिपद गेल्यानंतर आता त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या शर्यतीत धनंजय मुंडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे वाटत असले, तरी राजकीय […] The post धनंजय मुंडे नाही तर बीडच्या ‘या’ नेत्याला मिळणार कोकाटेंचं मंत्रिपद? अजित पवार घेणार मोठा निर्णय ! appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : सरकारकडून मनरेगाऐवजी नव्या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी १२५ दिवसांच्या ग्रामीण रोजगाराची हमी दिली जाणार असल्याचा दावा केला जात असला, तरी हा केवळ दिखावा आहे. १०० दिवसांवरून १२५ दिवस काम देण्याची भाषा ही फसवणूक आहे. या योजनेचा मोठा भार राज्यांवर टाकला जाईल. अनेक राज्यांकडे, विशेषतः ज्या राज्यांना या योजनेची सर्वाधिक गरज आहे, तिथे पुरेसा निधीच […] The post Priyanka Gandhi : ग्रामीण रोजगार हमी योजना संपुष्टात आणण्याचा डाव; जी-राम-जी विधेयकावरून प्रियांका गांधींचा हल्लाबोल appeared first on Dainik Prabhat .
एसीएमई सोलारने ४७२५ कोटी रुपयांचे वित्तपुरवठा मिळवला
गुरूग्राम: एसीएमई सोलार होल्डिंग्ज लिमिटेड (एसीएमई सोलार) या अक्षय उर्जा (Renewable Energy) आपल्या नव्या विस्तारासाठी व पायाभूत सुविधेसह आर्थिक बाबीत रिस्ट्रक्चरिंग करण्यासाठी कंपनीने आपल्या विविध उपकंपन्यांच्या माध्यमातून कर्ज उभारण्याचे घोषित केले. या आपल्या उपकंपनी (Subsidiary) कंपन्यांच्या विविध ऊर्जा प्रकल्पाला वित्तीय पुरवठा करण्यासाठी कंपनीने एकूण ४७२५ कोटी मूल्यांकनांचे कर्ज विविध बँकाकडून मिळवले आहे. कंपनीने संबंधित आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्येही स्पष्ट केली आहे.कंपनीच्या मते, केवळ ऊर्जा प्रकल्पांच्या बांधकामासाठी निधी उभारण्यासाठी आणि वित्तपुरवठ्याचा खर्च कमी करण्यासाठी नाही तर आपल्या आर्थिक भांडवली रचना सुरळीत करण्यासाठी हे कर्ज उभारण्यात येणार आहे.१८ ते २० वर्षांच्या कालावधीसाठी वित्तपुरवठा आणि पुनर्वित्तपुरवठ्यासाठी (Refinancing) प्रकल्पबांधणीसाठी कर्जाचा समावेश आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन ग्रीनफिल्ड वित्तपुरवठा (Greenfield Refinancing) करण्यासाठी ३०० मेगावॉटच्या एसीएमई सिग्मा एफडीआरई प्रकल्पासाठी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएफसी लिमिटेड) कडून २७१६ कोटी रुपये आणि १५० मेगावॉटच्या एसीएमई प्लॅटिनम सोलार + ईएसएस प्रकल्पासाठी नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (NaBFID) कडून ८०० कोटी रुपयांचा पहिला ग्रीनफिल्ड प्रकल्प वित्तपुरवठा प्राप्त केला आहे. अशी प्राथमिक माहिती पुढे आली. यापूर्वीच दोन्ही प्रकल्प सध्या बांधकामाच्या अंतिम टप्प्यात आहेत असे कंपनीने स्पष्ट केले होते.कंपनीच्या दाव्यानुसार, ३०० मेगावॉटच्या एसीएमई सीकर सोलार प्रकल्पाच्या कार्यान्वित प्रकल्पाच्या पुनर्वित्तपुरवठ्यासाठी कंपनीने येस बँकेकडून १२०९ कोटी रुपये गोळा केले आहेत. ज्यामुळे आता कर्जाच्या खर्चातील सुरुवातीला १७० बीपीएस आणि अखेरीस १९५ बीपीएसची कपात झाली असेही कंपनीने स्पष्ट केले. उपलब्ध माहितीनुसार, एसीएमई सोलारसाठी येस बँकेकडून हा पहिला दीर्घकालीन पुनर्वित्तपुरवठा आहे.या वित्तपुरवठ्याच्या फेरीमुळे,चालू आर्थिक वर्षात कंपनीने सुमारे १०५९० कोटी रुपयांचा ग्रीनफिल्ड वित्तपुरवठा सुरक्षित केला आहे ज्यामुळे बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांमधील स्वाक्षरी केलेल्या पीपीएच्या ९०% पेक्षा जास्त कर्जाची एकूण तरतूद करणे कंपनीला शक्य झाले आहे.याव्यतिरिक्त कंपनीने सुमारे ३३८० कोटी रुपयांच्या कर्जाचा पुनर्वित्तपुरवठा केल्याने पुनर्वित्तपुरवठा केलेल्या कर्जावर सुमारे १३५ बीपीएस दर कपात साध्य झाली आहे आणि इतर प्रकल्पांसाठी सुमारे ४०३५ कोटी रुपयांच्या कर्जावर अतिरिक्त सुमारे ६० बीपीएस दर कपात झाली आहे असेही म्हटले.नॉन-फंड आधारित मर्यादा एसीएमई सोलारने या वर्षी आयसीआयसीआय बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, फर्स्ट अबू धाबी बँक, एक्झिम बँक इत्यादी विविध बँकांकडून नॉन-फंड आधारित कर्ज मर्यादांचाही विस्तार केला आहे. या मर्यादा प्रकल्प उभारणीच्या टप्प्यात ट्रेड फायनान्सद्वारे कर्जाचा खर्च कमी करण्यास मदत करतात.तरीही कंपनीच्या शेअर्समध्ये दुपारी ३.०२ वाजेपर्यंत १.२९% अंकांने घसरण झाली होती. ज्यामुळे कंपनीचा शेअर २३३ रूपये प्रति शेअर व्यवहार करत होता.
Supriya Sule On Dhananjay Munde : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या खळबळजनक घडामोडी घडत आहेत. नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार, दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे कोकाटे यांची आमदारकी रद्द झाली असून त्यांना मंत्रिपदावरूनही पायउतार व्हावे लागले आहे. कोकाटे यांची आमदारकी […] The post Supriya Sule : आम्ही शांत बसणार नाही.! धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, सुप्रिया सुळेंचा सरकारला दम appeared first on Dainik Prabhat .
प्रियंका गांधींनी घेतली मंत्री नितीन गडकरींची भेट; नेमकी काय झाली चर्चा?
Nitin Gadkari-Priyanka Gandhi | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी भेट घेतली. एकीकडे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. मात्र गडकरी आणि प्रियंका गांधी यांच्या भेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र ही भेट प्रियंका गांधी यांच्या वायनाड मतदारसंघातील रस्ते प्रकल्पांबाबत […] The post प्रियंका गांधींनी घेतली मंत्री नितीन गडकरींची भेट; नेमकी काय झाली चर्चा? appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : गेल्या २४ तासांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या डॉ. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशावर अखेर आज शिक्कामोर्तब झाले. स्वर्गीय राजीव सातव यांचे हिंगोलीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असे स्पष्ट प्रतिपादन प्रज्ञा सातव यांनी यावेळी केले. आज सकाळी त्यांनी विधीमंडळ सचिवांकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सोपवला आणि त्यानंतर रितसर भाजपमध्ये प्रवेश केला. विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेसला सोडचिठ्ठी प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस का सोडली? या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी 'विकास' हाच मुख्य मुद्दा असल्याचे सांगितले. महाराष्ट्राचा जो चौफेर विकास सुरू आहे, त्याला अधिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या समर्थकांची मोठी फळी हिंगोलीत सक्रिय आहे, ती आता प्रज्ञा सातव यांच्या रूपाने भाजपशी जोडली गेली आहे. हिंगोलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ हिंगोलीतील काँग्रेसचे मोठे नेतृत्व म्हणून प्रज्ञा सातव यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, त्यांनी आमदारकीचा कार्यकाळ शिल्लक असतानाच राजीनामा देऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. केवळ राजकारण म्हणून नव्हे, तर हिंगोलीच्या जनतेच्या हितासाठी मी हा धाडसी निर्णय घेतला आहे, असे सांगत त्यांनी आपल्या नव्या राजकीय प्रवासाची दिशा स्पष्ट केली.https://prahaar.in/2025/12/18/finally-pradnya-satav-embraced-the-lotus-symbol-she-joined-the-bjp-in-the-presence-of-chandrashekhar-bawankule-and-ravindra-chavan/प्रज्ञा सातव यांनी व्यक्त केल्या जुन्या आठवणी अन् कार्यकर्त्यांचे मानले आभारभाजपच्या विशाल परिवारात मला आणि माझ्या हजारो कार्यकर्त्यांना सन्मानाने सामावून घेतल्याबद्दल मी पक्ष नेतृत्वाचे मनापासून आभार मानते, अशा शब्दांत त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. सातव कुटुंबाचा सेवेचा वारसा प्रज्ञा सातव यांनी आपल्या भाषणात दिवंगत खासदार राजीव सातव आणि त्यांच्या मातोश्री रजनीताई सातव यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्या म्हणाल्या, राजीवजी हे हिंगोलीचे सुपुत्र होते. त्यांनी आणि रजनीताईंनी आपले संपूर्ण आयुष्य हिंगोलीच्या विकासासाठी अर्पण केले. गेल्या २० वर्षांपासून मी देखील त्यांच्या सोबत राहून एनजीओ आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय होते. सातव कुटुंबाने नेहमीच जनसेवेला प्राधान्य दिले असून, तोच वारसा आता मी भाजपमध्ये पुढे नेणार आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर नवा प्रवास २०२१ मध्ये विधीमंडळात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. विशेषतः आपल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्या म्हणाल्या, आज मी ज्या ठिकाणी उभी आहे, त्यात माझ्या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याच आग्रहाखातर आणि हिंगोलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे.\राजीवभाऊंचे आशीर्वाद अन् देवाभाऊंची साथ!\राजीवभाऊंचे आशीर्वाद आणि देवाभाऊंची (देवेंद्र फडणवीस) साथ, सर्वजण मिळून करू संकटांवर मात! अशा शब्दांत डॉ. प्रज्ञा सातव यांनी भाजपमधील आपल्या नव्या राजकीय वाटचालीचा संकल्प व्यक्त केला. केवळ पदासाठी नव्हे, तर महाराष्ट्राच्या चौफेर विकास प्रक्रियेत सक्रिय वाटा उचलण्यासाठी आपण भाजपमध्ये सामील झाल्याचे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. कार्यकर्त्यांचा कौल आणि 'देवाभाऊंचे' नेतृत्व प्रज्ञा सातव यांनी आपल्या भाषणात भाजप प्रवेशाचे श्रेय कार्यकर्त्यांच्या आग्रहाला दिले. त्या म्हणाल्या की, माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की, आपण अशा नेतृत्वाखाली काम करावे जिथे राज्याचा विकास केंद्रस्थानी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे आणि त्या प्रवासात सहभागी होण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांच्या 'सबका साथ' मंत्राचा स्वीकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचा उल्लेख करत प्रज्ञा सातव यांनी भविष्यातील कामाची दिशा स्पष्ट केली. मी आणि माझे कार्यकर्ते यापुढे 'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास आणि सबका विश्वास' या तत्त्वाने काम करत राहू. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवणे हेच आमचे ध्येय असेल, असे आश्वासन त्यांनी भाजप नेत्यांना आणि जनतेला दिले. राजकीय वलय आणि विकासाची सांगड राजीव सातव यांनी पाहिलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आता भाजपच्या ताकदीची साथ मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रज्ञा सातव यांच्या या आक्रमक आणि स्पष्ट भूमिकेमुळे हिंगोली आणि मराठवाड्यात भाजपच्या विस्ताराला नवी गती मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.
पैसे तयार ठेवा! कार मार्केट हदरवायला निसान तयार! आली नवी बी-एमपीव्ही ग्रॅव्हाइटची झलक
गुरुग्राम: पैसे तयार ठेवा कारण निसान एक आपली दमदार चारचाकी बाजारात लवकरच दाखल करणार आहे. कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला ही गाडी बाजारात लाँच करण्याची घोषणा केली असून अद्याप किंमत, व इतर सखोल माहिती अद्याप प्रकाशित केलेले नाही. नुकताच कंपनीने कारची झलक दाखविण्यासाठी एक टीजर प्रदर्शित केलेला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, निसानची सातआसनी चारचाकी (कार) बी-एमपीव्ही 'ग्रॅव्हाइट' या नावाने २०२६ च्या सुरुवातीला लॉन्च केली जाईल. निसानने आपल्या ध्येयधोरणात मोठ्या प्रमाणात बदल केले होते त्याच्याशीच सुसंगत भारतातील ब्रँडच्या नवीन आणि धोरणात्मकदृष्ट्या तयार केलेल्या उत्पादन मालिकेअंतर्गत सादर केले जाणारे पहिले उत्पादन आहे असे कंपनीने म्हटले.जुलै २०२४ मध्ये निसान मोटर इंडियाच्या महत्त्वाकांक्षी उत्पादन योजनेतील दुसरे मॉडेल म्हणून घोषित केलेली ही गाडी नव्या अपग्रेडसह बाजारात येणार आहे. उत्पादन रोडमॅपमध्ये २०२६ च्या सुरुवातीला ग्रॅव्हाइटचे लॉन्च त्यानंतर २०२६ च्या मध्यभागी टेक्टॉन आणि २०२७ च्या सुरुवातीला ७-सीटर सी-एसयूव्हीचा समावेश आहे अशा उत्पादनांचा आगामी प्रोडक्ट पोर्टफोलिओत समावेश असेल असे कंपनीने म्हटले.‘ग्रॅव्हिटे’ हे नाव ‘ग्रॅव्हिटी’ (गुरुत्वाकर्षण) या शब्दापासून प्रेरणा घेते. त्यामुळे हे कंपनीने नवे नाव उत्पादनाला कायम ठेवले असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.महत्वपूर्ण झलक-मॉड्युलॅरिटी आणि आरामदायक रचना -ग्रॅव्हिटे केबिनमधील प्रशस्त जागेसाहित बाजारात दाखल होईल. उत्पादक निसानने दिलेल्या माहितीनुसार, यातील प्रत्येक घटकातील पैलू मल्टीपर्पज व सहज वापरासाठी बारकाईने डिझाईन केलेला आहे. प्रवाशांच्या आणि मालाच्या बदलत्या गरजांनुसार सहजपणे जुळवून घेणाऱ्या अल्ट्रा-मॉड्युलर सीटिंगपासून ते स्मार्ट जागेच्या वापरापर्यंत दैनंदिन प्रवास आणि कुटुंबासोबतच्या लांबच्या रोड ट्रिप्स दोन्ही तितक्याच सहजपणे शक्य होईल असा दावा कंपनीने केला. ग्रॅव्हिटे चेन्नईमध्ये स्थानिक पातळीवर उत्पादित केली जाईल. निसानच्या लाइनअपमधील दुसरे महत्त्वाचे मॉडेल म्हणून, ग्रॅव्हिटे हे भारतीय बाजारात दाखल होईल.डिझाइन आणि प्रेरणा-आकर्षक सी-आकाराची फ्रंट ग्रिल ग्रॅव्हिटेचे आकर्षक वैशिष्ट्य असेलकंपनीच्या दाव्यानुसार ग्रॅव्हिटे हे विशिष्ट हुड ब्रँडिंगसह मागील-दरवाजा बॅजिंग असणारी सेगमेंटमधील पहिली कार असणार आहे.मागील भागात निसानच्या वैशिष्ट्यपूर्ण सी-आकाराच्या इंटरलॉक थीमचा वापरMPV उपस्थितीनिसान एएमआयईओ (आफ्रिका, मध्य पूर्व, भारत, युरोप आणि ओशनिया) चेअरपर्सन, मॅसिमिलियानो मेसिना म्हणाले आहेत की,' भारत हा एएमआयईओच्या कामगिरीमध्ये एक महत्त्वाचा योगदानकर्ता आहे आणि निसान मोटर इंडिया आमच्या धोरणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आर्थिक वर्ष २५ मध्ये, आम्ही आमच्या व्यावसायिक कामकाजाला बळकटी दिली आहे, आमचा पोर्टफोलिओ विस्तारला आहे आणि आमच्या २०२४ च्या उत्पादन योजनेअंतर्गत दिलेली प्रत्येक आश्वासने पूर्ण केली आहेत. आगामी उत्पादनांची श्रेणी जी जागतिक दृष्टिकोनातून तयार केली गेली आहे, परंतु भारतीय ग्राहकांच्या गरजांशी सुसंगत आहे . या गतिमान बाजारपेठेप्रती आमची बांधिलकी दर्शवते. भारतात विकसित केलेल्या आणि भारतासाठी बनवलेल्या नवीन मॉडेल्ससह, तसेच अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये निर्यातीमुळे, भारत हा निसान अलायन्ससाठी वाढीचा चालक आणि केंद्रस्थान दोन्ही आहे. 'ग्रॅव्हाइट'च्या अनावरणाने आमची सातत्यपूर्ण प्रगती दिसून येते आणि भविष्याबद्दलचा आमचा आत्मविश्वास दृढ होतो.'बाजारातील अहवालातील माहितीनुसार, काय असतील आणखी फिचर्स?ग्राहक ५-स्पीड मॅन्युअल किंवा ५-स्पीड एएमटी युनिटची अपेक्षा करू शकतात. सध्याच्या अहवालांमध्ये या विशिष्ट मॉडेलसाठी सीव्हीटी (Continuosly Variable Transmission) गिअर बॉक्स पर्यायाचा कोणताही उल्लेख अद्याप केलेला नाही.निसान ४ ते ५ (XE, XL, XV, XV Premium) या व्हेरिएंटमध्ये येऊ शकते असे प्रसारमाध्यमांनी सांगितले.व्हेरिएंट: बेस व्हेरिएंट कारची किंमत साधारणतः ६ ते ६.२० लाखापासून रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक हॅचबॅक गाड्यांपेक्षा याची किंमत कमी असेल. ७ आसनासह गाडी बाजारात येणारफूल लोडेड एएमटी आवृत्तीची किंमत अंदाजे ९ ते ९.५० लाख रुपयांपर्यंत बाजारात येण्याची शक्यताउपलब्ध माहितीनुसार, अधिकृत बाजारपेठेतील लाँच Q1 २०२६ (पहिल्या तिमाहीत) अपेक्षितप्रसारमाध्यमांना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाँचनंतर थोड्याच वेळात अधिकृत बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक अधिक माहितीसाठी www.nissan.in या संकेतस्थळावर भेट देऊ शकतील असे म्हटले जात आहे.
Tu Meri Main Tera Trailer: कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांच्या आगामी रोमँटिक-कॉमेडी चित्रपट ‘तू मेरी, मैं तेरा’ चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या अवघ्या आठवडाभर आधी धर्मा प्रोडक्शनच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हा ३ मिनिटे २१ सेकंदांचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये दोघांची रोमँटिक केमिस्ट्री, हलकी-फुलकी कॉमेडी आणि मजेशीर संवाद पाहायला मिळतात. हा […] The post Tu Meri Main Tera Trailer: कार्तिक आर्यन-अनन्या पांडेच्या ‘तू मेरी, मैं तेरा’चा ट्रेलर प्रदर्शित; प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .
“टॅरिफ माझा प्रिय शब्द, जागतिक पातळीवर दबाव निर्माण…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Donald Trump | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने धक्कादायक निर्णय घेत आहेत. त्यांच्या टॅरिफ हल्ल्यांनी जगाला धक्के दिले आहेत. मात्र टॅरिफ हे केवळ अमेरिकेची शक्ती दर्शवणारे नाही, तर जागतिक पातळीवर दबाव निर्माण करण्यासाठी एक प्रभावी साधन ठरल्याचे त्यांनी म्हंटले आहे. इतकेच काय तर त्यांनी आपल्या व्यापार धोरणाचेही समर्थन केले आहे. याशिवाय त्यांनी आठ युद्ध […] The post “टॅरिफ माझा प्रिय शब्द, जागतिक पातळीवर दबाव निर्माण…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा appeared first on Dainik Prabhat .
Donald Trump | M K Stalin | Narendra Modi – भारत आणि अमेरिकेमधील निर्यातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे आयातशुल्क लावले आहे. द्विपक्षीय कराराद्वारे अमेरिकेच्या शुल्क समस्येवर तातडीने तोडगा काढला जावा आणि तामिळनाडुच्या वस्त्रोद्योगासारख्या राज्यातील निर्यात क्षेत्रांमध्ये चैतन्य आणावे असा मजकूर असलेले एक पत्र तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र […] The post ट्र्म्प यांच्या टॅरिफविषयी लवकर मार्ग काढा.! मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, थेट म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण:सेबीने ब्रोकरसाठी नियमात मोठे बदल केले आहेत. गुंतवणूकदारांसाठी पारदर्शक फ्रेमवर्क स्थापन करण्यासाठी सेबीने स्टॉक ब्रोकर नियम १९९२ मध्ये मूलभूत बदल केल्यानंतर एसबी रेग्युलेशन २०२५ (Stock Broker Regulations 2025) लागू केले आहे. याच निर्णयाचे स्वागत मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यानी (Asset Management Companies AMC) केल्याने या कंपन्यांचे शेअर आज मोठ्या पातळीवर उसळले आहेत. नव्या बदलानुसार प्रस्तावित ब्रोकरेज कॅप कमी केली असली तरी बीईआर (Brokerage Expense Ratio) मध्ये मोठा दिलासा दिला आहे. म्हणजेच प्रस्तावित निययानुसार, ब्रोकरेज खर्चामधून (Brokerage Expense) सरकारी खर्च, जीएसटी, एसटीटी व इतर खर्चाचा समावेश काढून टाकला असल्याने नाराज असलेल्या सेबी नोंदणीकृत ब्रोकरला आता दिलासा मिळाला आहे. नव्या बदलानुसार सेबी बोर्डाने विविध श्रेणींच्या फंडांसाठी मूळ खर्च गुणोत्तर (Base Expenses Ratio) कमी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.सेबीने इंडेक्स फंड आणि ईटीएफसाठी आता नवे गुणोत्तर १.००% वरून ०.९०% कमी केला जाणार आहे (वैधानिक करांव्यतिरिक्त) तसेच फंड ऑफ फंड्स (FoFs) लिक्विड स्कीम्स, इंडेक्स फंड्स किंवा ईटीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी १% वरून ०.९०% तसेच इक्विटी स्कीम्समध्ये ६५% जास्त गुंतवणूक करणाऱ्यांसाठी २.२५% वरून २.१०% आणि इतर एफओएफ (FoF)साठी २% वरून १.८५% पातळीवर कमी केला आहे. इतर ओपन-एंडेड स्कीम्समध्ये फंडाचा आकार (AUM) वाढल्यास बेस कमी होईल असे सेबीने आपल्या अधिनियमात स्पष्ट केले.आणखी माहितीनुसार, ५०० कोटी रुपयांपर्यंतच्या फंडांसाठी २.२५% वरून २.१०% (इक्विटी) आणि सध्याच्या २.०% वरून १.८५% (इतर गुंतवणूकीसाठी) ही कपात व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेत (AUM) स्लॅबनुसार १०,१५ बेसिस पॉइंट्सच्या दरम्यान आहे.यासह लोज-एंडेड स्कीम्समध्ये इक्विटी आधारित फंडांसाठी १.२५%-१.०% आणि इतरांसाठी १% वरून ०.८०% बेस असणार आहे असे सेबीने म्हटले आहे. पुढे सेबीने सांगितले की, एकूण खर्च गुणोत्तर (Total Exepense Ratio TER) हे आता एकूण बीईआर (Base Expense Ratio) ब्रोकरेज, सेबीचे नियामक शुल्क आणि वैधानिक शुल्कांची बेरीज असणार आहे असे सेबीने नव्या अधिसूचनेत स्पष्ट केले. त्यामुळे कॅप कमी झाली तरी मार्जिंनमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण न झाल्याने ब्रोकरेजला दिलासा मिळाला असून एकूण अधिनियमात अधिक पारदर्शकता आल्याने गुंतवणूकदारांना सुद्धा मोजणीची संपूर्ण स्पष्टता मिळणार आहे.यासह नव्या नियमानुसार, व्यवहारांच्या अंमलबजावणीसाठी लागणारे STT/CTT,GST, मुद्रांक शुल्क (Notary), सेबी शुल्क, एक्सचेंज शुल्क इत्यादी वैधानिक आणि नियामक शुल्क परवानगी असलेल्या ब्रोकरेज मर्यादेव्यतिरिक्त प्रत्यक्ष दरांनुसार आकारले जातील. एक्झिट लोड असलेल्या योजनांवर उपाय म्हणून सध्या आकारण्यास परवानगी असलेले अतिरिक्त ५ बीपीएस आता काढून टाकण्यात आले आहेत.१७ डिसेंबरला झालेल्या सेबी बैठकीत म्युचुअल फंड अधिनियम १९९६ (Mutual Fund Regulations 1996) मध्ये प्रस्तावित बदलाला पारित केले जाणार आहे. या नव्या म्युच्युअल फंड नियमावलीत नव्या बदलानुसार नियमावली अधिक पारदर्शक व सोपी करण्यात आली आहे. उदाहरणार्थ या प्रक्रियेमुळे नियमांतील पाने १६२ पानांवरून ८८ पानांपर्यंत, म्हणजेच ४४% ने कमी झाला आहे. शब्दांची संख्या सध्याच्या नियमांमधील ६७००० शब्दांवरून नवीन मसुद्यामध्ये ३१००० शब्दांपर्यंत, म्हणजेच अंदाजे ५४% ने कमी झाली आहे. सेबीने म्युच्युअल फंड गुंतवणुकीत फेरबदल करण्यासाठी व नियामक तरतुदी ओळखण्यासाठी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) द्वारे सर्वेक्षण केले गेले होते. त्यांनी सुचवलेल्या बदलानुसार हे बदल करण्यात आल्याचे सेबीने स्पष्ट केले.आणखी कुठले फेरबदल?व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवण्यासाठी सार्वजनिक इश्यूसंबंधीच्या काही आवश्यकता सुलभ करण्यासाठी मंडळाने सेबी (ICDR) नियम, २०१८ मधील सुधारणांना मंजुरी दिली.अस्तित्वात असलेल्या आयपीओतील पब्लिक इशूसाठी सर्व महत्त्वाचे पैलू व कंपनीची माहिती मसुदा ऑफर दस्तऐवज (DRHP) आणि ऑफर दस्तऐवज (RHP) मध्ये उघड करणे आता बंधनकारक असणार आहे. सार्वजनिक इश्यूसंबंधीची प्रमुख माहिती अनेक विभागांमध्ये पसरलेली असते ती सोपी करताना एकाच ठिकाणी ती दिली जाऊ शकते. सध्याच्या आरएचपी (Red Hearing Prospectus RHP) टप्प्यावर प्रमुख ठळक मुदे दाखल करण्याच्या गरजेव्यतिरिक्त ही संक्षिप्त माहिती डीआरएचपी (Draft Red Hearing Prospectus DRHP) टप्प्यावर देखील उपलब्ध असणार आहे. या सुधारणांमुळे निधी उभारणीशी संबंधित आवश्यकता सुलभ होतील आणि व्यवसाय करण्याची सुलभता वाढेल अशी अपेक्षा सेबीला अपेक्षा आहेकॉर्पोरेट कर्ज बाजारात किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवण्याच्या आणि कर्ज बाजारात सादरीकरण (Presentation) देण्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मंडळाने सेबीने (नॉन-कन्व्हर्टिबल सिक्युरिटीजचे जारीकरण आणि सूची) नियम, २०२१ (NCD Rules ) मध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावावर विचार केला आणि त्यास मान्यता दिली आहे .जेणेकरून कर्ज जारी करणाऱ्या कंपन्यांना गुंतवणूकदारांच्या विशिष्ट श्रेणींना प्रोत्साहन देण्याची परवानगी मिळेल. सध्या, कर्ज सिक्युरिटीज बाजारात दाखल करणाऱ्या कंपन्यांना सादरीकरणाशी संबंधित सेवांसाठी शुल्क किंवा कमिशन वगळता अर्ज प्रसिद्ध करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला प्रोत्साहन देण्याची परवानगी नाही.या घडामोडीनंतर नुवामा लाईफ इंडिया, नुवामा वेल्थ, आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी, मोतीलाल ओसवाल, जेएम फायनांशियल या सारख्या शेअर्समध्ये ७ पातळीवर वाढ झाली आहे. दुपारी १.५३ वाजेपर्यंत आदित्य बिर्ला सन लाईफ (१.४२%), कॅनरा रोबेको एएमसी (५.६७%), एचडीएफसी एएमसी (६.७६%) युटीआय असेट मॅनेजमेंट कंपनी (२.२०%), नुवामा वेल्थ (२.३६%), मोतीलाल ओसवाल (३.९४%),जेएम फायनांशियल (२.५६%) समभागात (Stocks) मध्ये वाढ झाली आहे.सेबीने ब्रोकरेज नियंत्रित पातळीवर वाढवून नियम सुटसुटीत व सोपे केले आहेत. त्यामुळे त्यांच्या संतुलित भूमिकेमुळे इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आणखी भर पडणार आहे. दुसरीकडे ऑक्टोबर २०२५ मध्ये सल्लागार पत्रात (Consultation) पेपरात मोठ्या प्रमाणात बेस एक्सपेंस रेशोत वाढ केली जाणार होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात ब्रोकरेजने यावर निराशा व्यक्त केली जात असताना नमूद आता टीइआर (TER) कमी करण्याच्या बाबतीत कमी कठोर भूमिका घेण्यात आली आहे. त्याचवेळी गुंतवणूकदारांसाठी शुल्क रचना अधिक पारदर्शक केल्याने रिटेल गुंतवणूकदारांना आणखी प्रोत्साहन मिळणार आहे. बुधवारी संध्याकाळी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर जाहीर केलेले हे नवीन नियम या आर्थिक वर्षात अधिसूचित केले जातील आणि १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहेत अशी माहिती सेबीने आपल्या अंतरिम आदेशात दिली आहे.
हैदराबाद : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निधी अग्रवाल (Nidhi Agrawal) हिला एका सार्वजनिक कार्यक्रमात अतिउत्साही चाहत्यांच्या भीषण गर्दीचा सामना करावा लागला. सुपरस्टार प्रभासच्या आगामी ‘द राजा साब’ या चित्रपटातील ‘सहना सहना’ गाण्याच्या लाँचिंगसाठी निधी एका मॉलमध्ये पोहोचली होती. मात्र, कार्यक्रमाहून परतताना चाहत्यांच्या गर्दीने मर्यादा ओलांडल्यामुळे निधी अग्रवालची सुरक्षितता धोक्यात आली होती.नेमका प्रकार काय घडला?What a shame ! pic.twitter.com/cnzkMfZkaB— Prashanth Rangaswamy (@itisprashanth) December 17, 2025इव्हेंट संपवून बाहेर पडत असताना, निधीला पाहण्यासाठी आणि तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. काही क्षणातच शेकडो लोकांनी तिला चहूबाजूंनी वेढले. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, त्या अफाट जनसागरात निधी अक्षरशः दिसेनाशी झाली होती. तिच्यासोबत असलेल्या वैयक्तिक अंगरक्षकांनी (Bodyguards) कडे करण्याचा प्रयत्न केला, पण लोकांच्या धक्काबुक्कीपुढे त्यांची शक्ती अपुरी पडली. यावेळी अनेक जण तिला स्पर्श करण्याचा आणि सेल्फीसाठी तिच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते, ज्यामुळे निधी प्रचंड अस्वस्थ आणि घाबरलेली दिसत होती.नेटकऱ्यांचा संताप आणि तीव्र प्रतिक्रियाया घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'गल्ट'ने शेअर केलेल्या या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे, थोडी लाज वाटू द्या, ती किती संकटात आहे हे दिसत नाही का?, तुम्ही तिचे चाहते नाही, तर तुम्ही तिला त्रास देत आहात., सेलिब्रिटींना आदर द्यायला शिका, कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत सुमार होते. प्रत्यक्षदर्शींच्या मते, गर्दी इतकी अनियंत्रित होती की परिस्थिती हाताबाहेर गेली होती. सुरक्षा पथकाला मोठ्या मुश्किलीने गर्दीतून वाट काढून निधीला सुरक्षित कारपर्यंत पोहोचवावे लागले.कोण आहे निधी अग्रवाल?निधी अग्रवालने २०१७ मध्ये टायगर श्रॉफसोबत ‘मुन्ना मायकल’ या हिंदी चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला. तिने ‘आयस्मार्ट शंकर’, ‘ईश्वरन’ आणि ‘हरि हारा वीरा मल्लु’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. मारुती यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘द राजा साब’ हा चित्रपट ९ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या मोठ्या बजेटच्या चित्रपटात प्रभास आणि निधी अग्रवाल यांच्यासह बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते संजय दत्त, मालविका मोहनन आणि रिद्धी कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Gautami Patil : बिग बॅास मराठीचे सहावे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नवीन पर्वाचा एक टीझरही प्रदर्शित झाला आहे. सहाव्या पर्वातील संभाव्य स्पर्धेकांची नावे समोर आली आहेत. या नावांमध्ये आता आणखी एक नाव सामील झाले आहे. महाराष्ट्राची लाडकी ‘सबसे कातील गौतमी पाटील’ बिग बॅासच्या घरात स्पर्धेक म्हणून सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली […] The post गौतमी पाटीलने पुन्हा एकदा बिग बॅासची अॅाफर नाकारली, कारण…; स्वतः केला खुलासा म्हणाली “चाहते आतुर असले तरी…” appeared first on Dainik Prabhat .
“वाल्मिक कराड प्रकरणी मुंडेंचा राजीनामा घेतला, तर शिंदेंचा…”; पुरावे दाखवत सुषमा अंधारेंची मागणी
Eknath Shinde | राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील दरे गावाजवळ सावरी येथील तेजयश रिसॉर्टजवळ काही दिवसांपूर्वी मुंबईच्या पोलीस पथकाने छापा टाकत 45 किलो अमली पदार्थ जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या अमली पदार्थांची किंमत 145 कोटी रुपये आहे. हे रिसॉर्ट एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश संभाजी शिंदे यांच्या मालकीचे असल्याचा दावा शिवसेना उपनेत्या सुषमा […] The post “वाल्मिक कराड प्रकरणी मुंडेंचा राजीनामा घेतला, तर शिंदेंचा…”; पुरावे दाखवत सुषमा अंधारेंची मागणी appeared first on Dainik Prabhat .
Neha Kakkar: नेहा कक्कर वादात का अडकली? ‘कँडी शॉप’ गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर टीकेची झोड
Neha Kakkar : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिची गाणी पार्टी, लग्नसमारंभ आणि कार्यक्रमांची शान मानली जातात. मात्र यावेळी नेहाला गाण्यामुळे कौतुकाऐवजी सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. नुकतंच तिचं ‘कँडी शॉप’ हे नवं गाणं रिलीज झालं असून, ते यूट्यूबवर ट्रेंडिंग झालं आहे. तरीही या गाण्यामुळे वाद निर्माण […] The post Neha Kakkar: नेहा कक्कर वादात का अडकली? ‘कँडी शॉप’ गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर टीकेची झोड appeared first on Dainik Prabhat .
सीबीएफसी ओटीटी कंटेंटवर सेन्सॉरशिप करू शकत नाही
स्ट्रीमर्सना आचारसंहितेअंतर्गत ३-स्तरीय नियमांचे पालन करावे लागेल - माहिती तंत्रज्ञान नियमांचे स्पष्टीकरणनवी दिल्ली : सध्या ओटीटी कंटेंटचा वाढता प्रभाव आणि प्रेक्षकांच्या पाहण्याच्या सवयी लक्षात घेता, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील सेन्सॉरशिपच्या संदर्भात सूचना जारी करण्यात आली.केंद्र सरकारने १७ डिसेंबर (बुधवार) रोजी लोकसभेत स्पष्ट केले की,ओटीटी कंटेंट सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या (CBFC) कार्यक्षेत्राबाहेर राहील.तथापि,सरकारने असेही सांगितले की,ओटीटी प्लॅटफॉर्मचे नियमन २०२१ च्या माहिती तंत्रज्ञान नियमांनुसार केले जाईल आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनी त्याऐवजी वयानुसार त्यांच्या कंटेंटचे स्वतःच वर्गीकरण करणे आवश्यक आहे.सेन्सॉरशिप म्हणजे काय ?सेन्सॉरशिप म्हणजे सरकार,संस्था किंवा इतर गट यांच्याकडून भाषण,माहिती,कला किंवा संवादावर नियंत्रण ठेवणे. आक्षेपार्हा,हानिकारक,संवेदनशील असा मगैरसोयीचा मानला मजकूर जातो, ज्यामध्ये पुस्तके,चित्रपट,वृत्तपत्रे, आणि कला यांसारख्या माध्यमांना लागू होते.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सद्वारे राष्ट्रीय,प्रादेशिक,ऑनलाइन या पातळ्यांवर सेन्सॉरशिप असते. तर भारतामध्ये चित्रपट आणि माध्यमे यांना सेन्सॉरशिप लागू होते . ज्यामध्ये चित्रपटांध्ये केंद्रीय फिल्म प्रमाणन मंडळ (CBFC) चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी त्यांना प्रमाणपत्र देते आणि आवश्यक असल्यास दृश्ये कापण्यास सांगते.आणि माध्यमांमध्ये पत्रकार,लेखक आणि कलाकारांवर दबाव आणून किंवा हल्ले करून सेन्सॉरशिप केली जाते.सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजे काय ?सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC), ज्याला सामान्यतः 'सेन्सॉर बोर्ड' म्हणतात, ही भारत सरकारची एक वैधानिक संस्था आहे जी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. याचे मुख्य काम सिनेमॅटोग्राफ कायदा, १९५२ नुसार चित्रपट, ट्रेलर आणि माहितीपट यांना सार्वजनिक प्रदर्शनासाठी प्रमाणित करणे (सर्टिफाय) आहे, जेणेकरून ते देशातील सार्वजनिक सुव्यवस्थेच्या आणि नैतिकतेच्या निकषांची पूर्तता करतील. केवळ CBFC ने प्रमाणित केल्यानंतरच चित्रपट चित्रपटगृहांमध्ये किंवा टीव्हीवर दाखवता येतात.ओटीटी प्लॅटफॉर्म्स सीबीएफसीच्या कक्षेबाहेर राहणारमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाने उपरोक्त स्पष्टीकरण दिले असून,डिजिटल माध्यमातील आशयाचे नियमन आचारसंहितेनुसार स्वतंत्रपणे केले जाते,यावर पुन्हा एकदा जोर दिला आहे.सरकारने सांगितले की,ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आशयावर सीबीएफसीचा अधिकार चालत नाही.सीबीएफसीची स्थापना सिनेमॅटोग्राफ कायदा,१९५२ अंतर्गत करण्यात आली होती आणि सार्वजनिक प्रदर्शनासाठी चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी त्याला देण्यात आली होती.
ठाणेकरांचा प्रवास होणार वेगवान! शीव उड्डाणपुल समांतर उभारणार दोन पदरी पूल
ठाणे : मुंबई महापालिकेने शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसोबतच त्याच्या समांतर दोन पदरी नवीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवा पूल उभारण्यात आल्यास ठाणे ते सीएसएमटी दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित होणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील शीव उड्डाणपूल पूर्व–पश्चिम दिशेला जोडणारा महत्त्वाचा दुवा असून सध्या त्याची पुनर्बांधणी महापालिकेकडून सुरू आहे. हा पूल मूळतः महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधला होता. सध्या या पुलावर ‘दोन अधिक एक’ अशी वाहतूक व्यवस्था असून ठाणे व पूर्व उपनगरांकडे जाण्यासाठी दोन मार्ग, तर दक्षिण मुंबईतील सीएसएमटीकडे जाण्यासाठी एक मार्ग उपलब्ध आहे. मात्र वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने गर्दीच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.ही समस्या दूर करण्यासाठी शीव उड्डाणपुलाच्या समांतर स्वतंत्र दोन पदरी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या नव्या पुलामुळे ठाणे ते सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी थेट पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून विद्यमान पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होईल.नवीन उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर इंधनाची बचत होऊन वाहनचालकांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत. या पुलाची आवश्यकता असल्याचे मत वाहतूक पोलिसांनीही नोंदवले आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च १५५ कोटी २ लाख ३७ हजार रुपये इतका आहे.कंत्राटदार नियुक्तीबाबत निर्णयमहालक्ष्मी परिसरातील काही उड्डाणपूल विस्तारकामे एका कंत्राटदाराला देण्यात आली होती. मात्र वाहतूक आणि सह पोलिस आयुक्तांनी या कामांसाठी ना हरकत प्रमाणपत्र नाकारले होते. संबंधित ठिकाणी पूल आवश्यक नसल्याचे नमूद करण्यात आले असून अतिक्रमणेही हटवण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ही कामे रखडली आहेत. भविष्यात कंत्राटदाराकडून अतिरिक्त खर्चाची मागणी होऊ नये, यासाठी नवीन शीव उड्डाणपुलाचे काम त्याच कंत्राटदाराला देण्याचा विचार महापालिकेकडून केला जात आहे.उड्डाणपुलाच्या कामाला गतीशीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम सध्या वेगात सुरू असून हे काम २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सध्या रेल्वे हद्दीतील कामे, रेल्वे पुलावरील उत्तर दिशेच्या अर्ध्या भागावर गर्डर बसवणे, पोहोच मार्गांचे बांधकाम तसेच दोन पादचारी भुयारी मार्गांचे काम सुरू आहे. गर्डर बसवण्याचे काम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणार असून त्यानंतर रेल्वे हद्दीतील उर्वरित कामे पूर्ण केली जाणार आहेत.
चिनी संस्थेचा जीपीएस ट्रॅकर लावलेला सीगल कर्नाटकच्या किनाऱ्यावर सापडला
तो सीगल मंगळवारी कारवार येथील रवींद्रनाथ टागोर समुद्रकिनाऱ्यावर किनारी सागरी पोलीस विभागाला सापडला आणि त्याला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.कर्नाटक : कर्नाटकच्या कारवार किनाऱ्यावर एका जखमी सीगल पक्ष्याच्या शरीराला चिनी संस्थेचा जीपीएस ट्रॅकर लावलेला आढळला,कारवार येथे भारतीय नौदलाचा महत्त्वाचा तळ (INS कदंब) असल्याने,या घटनेमुळे गुप्तचर यंत्रणांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.ज्यामुळे स्थानिक रहिवासी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा ट्रॅकर चीनच्या 'Chinese Academy of Sciences' शी संबंधित असल्याचे आढळले, जे पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्याच्या वैज्ञानिक संशोधनाचा भाग असू शकतो.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मंगळवारी कारवार येथील रवींद्रनाथ टागोर समुद्रकिनाऱ्यावर सागरी किनारा पोलीस पथकाला एक सीगल पक्षी सापडला आणि त्याला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.नंतर अधिकाऱ्यांनी त्या जखमी पक्ष्याची तपासणी केली.पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करत आहेत,ट्रॅकरमधून मिळालेल्या डेटाचे विश्लेषण करत आहेत आणि चिनी संस्थेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की,त्या सीगलच्या शरीराला एक जीपीएस ट्रॅकर बांधलेला होता.या उपकरणामध्ये एका लहान सौर पॅनेलसह एक इलेक्ट्रॉनिक युनिट होते. अधिकाऱ्यांना त्या ट्रॅकरला एक ईमेल पत्ता जोडलेला आढळला,तसेच पक्षी सापडल्यास दिलेल्या आयडीवर संपर्क साधण्याची विनंती करणारा एक संदेशही होता.पोलिसांनी सांगितले की,हा ईमेल पत्ता चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेसशी संबंधित आहे,जी स्वतःला पर्यावरण-विज्ञान संशोधन केंद्र म्हणून वर्णन करते.अधिकारी स्पष्टीकरण मिळवण्यासाठी नमूद केलेल्या ईमेल आयडीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.स्थलांतराच्या पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी तो पक्षी वैज्ञानिक संशोधन प्रकल्पाचा भाग होता की नाही,यासह अनेक पैलू तपासले जात आहेत,असे उत्तर कन्नडचे पोलीस अधीक्षक दीपन एम.एन. यांनी सांगितले. भारताच्या सर्वात महत्त्वाच्या नौदल तळांपैकी एक तळ कारवारमध्ये असल्यामुळे, या घटनेने सामरिक महत्त्वामुळे लक्ष वेधून घेतले आहे.
मेस्सीच्या कार्यक्रमामध्ये झालेल्या गोंधळाची चौकशी एसआयटीकडे; अटकेची संख्या ६ वर
कोलकाता: अवघ्या फुटबॉल विश्वाला आपल्या कवेत घेऊन फिरणारा अर्जेंटिनाचा विश्वविजेता फुटबॉल कर्णधार लिओनेल मेसी खास भारत भेटीसाठी आला खरा, पण त्याची झलकही सर्वसामान्य प्रेक्षक बघू शकला नसल्यामुळे भारतीय फुटबॉलचे माहेरघर असलेल्या सॉल्ट लेक मैदानावर गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.कोलकाता येथील सॉल्ट लेक मैदानावर मेस्सीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी चाहत्यांनी हजारो रुपये मोजले होते. मात्र मेस्सी मैदानात फार वेळ न थांबल्यामुळे संतप्त झालेल्या चाहत्यांनी मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. काहींनी खुर्च्या आणि बाटल्या फेकत निषेध व्यक्त केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोलकाता राज्य सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीने काल (१८ डिसेंबर)ला सॉल्टलेक स्टेडियमला भेट देत गोंधळ घालणाऱ्यांपैकी एकाला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली आहे, ज्यामुळे अटक झालेल्यांची संख्या सहा झाली आहे.https://prahaar.in/2025/12/18/through-his-sculptures-ram-sutars-art-will-be-remembered-for-centuries-to-come-chief-minister-devendra-fadnavis/दुसरीकडे, पोलिसांच्या अपयशामुळेच ही अनुचित घटना घडली. पोलीस हे राज्य सरकारचे कठपुतळी आहेत, त्यामुळे राज्य पोलीस एसआयटीमध्ये असतील तर निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही. पोलीस काम करत आहेत हे दाखवण्यासाठी निष्पाप तरुणांना अटक केली जात आहे. भगवा छावणी त्या सर्वांना कायदेशीर मदत करेल. मेस्सीच्या कार्यक्रमाच्या नावाखाली ३०० कोटी रुपयांहून अधिक घोटाळा झाला, असे अधिकारी म्हणाले.
Pragya Satav : महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या निवडणुकीच्या काळातच काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, लातूर जिल्ह्यातील मोठं नाव विधानपरिषदेच्या आमदारडॅा. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आज १८ डिसेंबर रोजी आमदारकीचा राजीनामा दिला असून त्यांनी अधिकृत भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला आहे. त्यांच्यासह […] The post “…म्हणून भारतीय जनता पार्टीच्या परिवारात सामील झालो”; भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच प्रज्ञा सातव यांची पहिली प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .
जमावाकडून धक्काबुक्की, गैरवर्तन…; निधी अग्रवालला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड
Nidhhi Agerwal | साऊथ सुपरस्टार प्रभासच्या आगामी ‘द राजा साब’ घोषणा झाल्यानंतर या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील ‘सहाना सहाना’ या गाण्याचा लाँच सोहळा हैदराबादमध्ये झाला. यावेळी मोठी गर्दी पाहायला मिळाली. या कार्यक्रमाला निधी अग्रवालने देखील हजेरी लावली होती. मात्र कार्यक्रमातून बाहेर पडताना अभिनेत्री निधी अग्रवाल हिला प्रचंड गर्दीने घेरले, ज्याचा व्हिडीओ […] The post जमावाकडून धक्काबुक्की, गैरवर्तन…; निधी अग्रवालला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना आज वेग आला असून, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांनी अखेर भाजपचे 'कमळ' हाती घेतले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सातव कुटुंबाने काँग्रेसची साथ सोडल्यामुळे राज्याच्या राजकारणात, विशेषतः मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.https://prahaar.in/2025/12/18/pradnya-satav-resigns-from-her-congress-position-submitted-her-resignation-to-the-legislature-secretary/बावनकुळे आणि चव्हाणांकडून स्वागत यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रज्ञा सातव यांच्यासारख्या सुशिक्षित आणि कर्तृत्ववान महिला नेत्या भाजपमध्ये आल्याने पक्षाची ताकद दुपटीने वाढली आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी त्या नक्कीच मोलाचे योगदान देतील. तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हा प्रवेश केवळ एका व्यक्तीचा नसून हिंगोलीतील एका मोठ्या जनशक्तीचा भाजपमध्ये झालेला प्रवेश आहे, अशा शब्दांत त्यांचे स्वागत केले.काँग्रेसमधील 'सातव' पर्वाचा अंत दिवंगत राजीव सातव हे काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील मोठे नेते होते. त्यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांनी त्यांचा वारसा पुढे नेला. मात्र, गेल्या काही काळापासून पक्षात होत असलेल्या अंतर्गत कुरघोडी आणि दुर्लक्षामुळे त्यांनी भाजपचा रस्ता धरला. प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर तातडीने हा प्रवेश सोहळा पार पडला, ज्यामध्ये हिंगोली आणि मराठवाड्यातील शेकडो कार्यकर्तेही सहभागी झाले होते. निवडणुकीपूर्वी काँग्रेसची पिछेहाट आगामी निवडणुकांच्या तोंडावर प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसची संपूर्ण संघटनाच आता धोक्यात आली असून, भाजपला तिथे एक सक्षम चेहरा मिळाला आहे. पक्षात काम करताना सन्मान मिळत नसेल, तर लोकांसाठी काम करण्यासाठी निर्णय घ्यावा लागतो, अशा शब्दांत प्रज्ञा सातव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.कोण आहेत डॉ. प्रज्ञा सातव?डॉ. प्रज्ञा सातव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसचा मराठवाड्यातील मोठा चेहरा म्हणून डॉ. प्रज्ञा सातव यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, आजच्या त्यांच्या निर्णयामुळे सातव कुटुंबाचे काँग्रेसशी असलेले दशकांचे नाते संपुष्टात आले आहे. डॉ. प्रज्ञा सातव या केवळ राजीव सातव यांच्या पत्नी म्हणूनच नव्हे, तर एक सुशिक्षित आणि आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी पक्षाने प्रज्ञा सातव यांना संधी दिली आणि त्या बिनविरोध विधानपरिषदेवर निवडून आल्या. पहिल्या कार्यकाळानंतर पक्षाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आणि २०२४ मध्ये त्या दुसऱ्यांदा विधानपरिषदेच्या आमदार बनल्या. त्यांचा सध्याचा कार्यकाळ २०२४ ते २०३० असा तब्बल सहा वर्षांचा होता. मात्र, आमदारकीचे अजून ५-६ वर्षे शिल्लक असतानाच त्यांनी राजीनामा देण्याचे धाडस दाखवले आहे. त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळत होत्या. राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. त्यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांनी हिंगोली आणि मराठवाड्यात पक्षबांधणीसाठी प्रयत्न केले. मात्र, गेल्या काही काळापासून पक्षांतर्गत कुरघोडी आणि गटबाजीमुळे त्या अस्वस्थ होत्या. अखेर आजच्या राजीनाम्यामुळे त्यांचा काँग्रेसमधील औपचारिक प्रवास थांबला असून, आता त्या भाजपच्या माध्यमातून नवी राजकीय इनिंग सुरू करण्यास सज्ज झाल्या आहेत.
Sanjay Raut : काल दिवसभर (१७ डिसेंबर) दोन महत्वाच्या आणि मोठ्या घडामोडी घडल्या. एक म्हणजे राष्ट्रवादीचे नेते सध्या बिनखात्याचे मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांच्या सदनिका प्रकरणात त्यांना सुनावण्यात आलेल्या २ वर्षांची शिक्षेची आणि १० हजार रुपयांची दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीत जाऊन […] The post “देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्याने गेम करतील आणि शेवटचा घाव…”; राऊतांच्या दाव्याने टेन्शन वाढवलं म्हणाले “कोकाटे…” appeared first on Dainik Prabhat .
तपस्वी शिल्पकार काळाच्या पडद्याआड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ शिल्पकार डॉ राम सुतार यांना श्रद्धांजलीमुंबई, दि. १८:- शिल्पकला क्षेत्रावर आपले आणि महाराष्ट्राचे नाव कोरणारा तपस्वी शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मश्री, महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ शिल्पकार डॉ. राम सुतार यांना निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.दरम्यान, मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना सांत्वना दिली.मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, रामभाऊंच्या निधनाने जागतिक कीर्तीचा कलाकार आपल्यातून निघून गेला. प्रमाणबद्धता आणि त्यातील जिवंतपणा हे त्यांच्या कलेचे वैशिष्टय होते. काही दिवसांपूर्वी त्यांना महाराष्ट्र शासनाचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान करण्यासाठी आम्ही त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी गेलो होतो, पुरस्कार स्वीकारताना त्यांनी 'महाराष्ट्र माझा' या गीताच्या ओळी उच्चारल्या तेव्हा भारावून गेलो होतो. अनेक शिल्पांना त्यांनी आकार दिला. स्टॅच्यु ऑफ यूनिटीमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा किंवा अंदमानमधील वीर सावरकर यांचा पुतळा. शंभराव्या वर्षी सुद्धा ते इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामात गुंतले होते. त्यांनी तयार केलेले अनेक पुतळे संसद भवन परिसरात उभे आहेत. आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, आपले संत अशा मोठ्या मांदियाळीच्या शिल्पांना आकार देण्याचे काम त्यांनी केले. या शिल्पांच्या माध्यमातून त्यांची कला शतकानुशतके आपल्या स्मरणात राहील आणि प्रत्येक शिल्प पाहताना त्यांचेच स्मरण होईल, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्हीत्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
गुटखा उत्पादक आणि सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार विशेष धोरण आणणार
मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती; गुटखा उत्पादकांवर नवीन वर्षांत मकोका लागणारमुंबई : राज्यात गुटख्यावर बंदी असूनही शाळा-महाविद्यालय परिसरात त्याची विक्री सर्रास होत असल्याने सरकार आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. गुटखा उत्पादक आणि सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष धोरण आणले जाणार असून, मकोका कायद्यात आवश्यक दुरुस्त्या करून येत्या नव्या वर्षात गुटखा उत्पादकांवर मकोका लागू करण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.यापूर्वी गुटखा उत्पादक आणि विक्रेत्यांवर मकोका लावण्यासाठीचा प्रस्ताव विधि आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, कायद्यातील तरतुदींनुसार 'हार्म आणि हर्ट' या दोन्ही घटकांच्या अभावी तो लागू होऊ शकत नव्हता. त्यामुळे कायद्यात बदल करून गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर मकोका लागू करण्यासाठी आवश्यक दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. हा कायदा अधिक कठोर करण्याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती.नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने यावर काम सुरू केले आहे. गुटखा उत्पादकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष धोरण आणि कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी दुरुस्ती प्रस्ताव लवकरात लवकर विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्याचे निर्देश मंत्री झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
राजीव सातव अमर रहेच्या घोषणा अन् आजच 'कमळ' हाती घेणार?मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून आजची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज (१८ डिसेंबर) आपल्या आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सोपवला असून, त्या आजच भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अंतर्गत गटबाजी ठरली कारणीभूत? गेल्या काही काळापासून प्रज्ञा सातव या पक्षांतर्गत असलेल्या प्रचंड गटबाजीमुळे नाराज असल्याची चर्चा होती. हिंगोली आणि प्रदेश पातळीवर त्यांना डावलले जात असल्याच्या तक्रारी त्यांनी यापूर्वी केल्या होत्या. याच नाराजीतून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आज दुपारी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश सोहळा पार पडण्याची शक्यता असून, यामुळे काँग्रेसमधील 'राजीव सातव' यांच्या कट्टर समर्थकांमध्ये मोठी चलबिचल सुरू झाली आहे. राहुल गांधींसाठी मोठा धक्का दिवंगत राजीव सातव हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय सहकारी होते. त्यांच्या निधनानंतर राहुल गांधी यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती. मात्र, आता सातव यांच्याच पत्नीने काँग्रेसची साथ सोडल्यामुळे गांधी परिवारासाठी हा मोठा वैयक्तिक आणि राजकीय धक्का मानला जात आहे. सतेज पाटील यांचा दावा फोल ठरणार? दुसरीकडे, काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी या पक्षप्रवेशाच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले होते. मात्र, आज प्रत्यक्ष राजीनामा सादर झाल्यामुळे सतेज पाटील यांचा दावा फोल ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत.https://prahaar.in/2025/12/18/maharashtras-comedy-show-is-good-but-its-always-truthful-in-its-opinions-ashish-shelar-launches-a-scathing-attack-on-sanjay-raut-through-a-poem/काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना समर्थकांचा मोठा फौजफाटाआमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला, मात्र हा राजीनामा देताना त्यांनी केलेले शक्तीप्रदर्शन राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारे ठरले. केवळ कागदोपत्री राजीनामा न देता, आपल्या समर्थकांच्या अफाट गर्दीसह प्रज्ञा सातव विधीमंडळ सचिवांच्या दालनात पोहोचल्या. यावेळी त्यांच्यासोबत हिंगोली जिल्ह्यातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी परिसर घोषणाबाजीने दणाणून सोडला. प्रज्ञा सातव राजीनामा देण्यासाठी आल्या असताना त्यांच्या समर्थकांनी राजीव सातव अमर रहे अशा जोरदार घोषणा दिल्या. काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करत असतानाही कार्यकर्त्यांनी स्वर्गीय राजीव सातव यांच्या नावाचा जयघोष केल्याने एक भावनिक वातावरण निर्माण झाले होते. प्रज्ञा सातव तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दर्शवला. राजीनाम्याच्या वेळी कार्यकर्त्यांनी केलेले हे शक्तीप्रदर्शन म्हणजे प्रज्ञा सातव यांनी भाजपमधील आपल्या नव्या इनिंगची केलेली दमदार सुरुवात मानली जात आहे. हिंगोलीत राजीव सातव यांचा मानणारा मोठा वर्ग आहे, हा वर्ग आता भाजपच्या गोटात सामील झाल्यामुळे मराठवाड्यात काँग्रेसला मोठी गळती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.कोण आहेत डॉ. प्रज्ञा सातव?डॉ. प्रज्ञा सातव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसचा मराठवाड्यातील मोठा चेहरा म्हणून डॉ. प्रज्ञा सातव यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, आजच्या त्यांच्या निर्णयामुळे सातव कुटुंबाचे काँग्रेसशी असलेले दशकांचे नाते संपुष्टात आले आहे. डॉ. प्रज्ञा सातव या केवळ राजीव सातव यांच्या पत्नी म्हणूनच नव्हे, तर एक सुशिक्षित आणि आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी पक्षाने प्रज्ञा सातव यांना संधी दिली आणि त्या बिनविरोध विधानपरिषदेवर निवडून आल्या. पहिल्या कार्यकाळानंतर पक्षाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आणि २०२४ मध्ये त्या दुसऱ्यांदा विधानपरिषदेच्या आमदार बनल्या. त्यांचा सध्याचा कार्यकाळ २०२४ ते २०३० असा तब्बल सहा वर्षांचा होता. मात्र, आमदारकीचे अजून ५-६ वर्षे शिल्लक असतानाच त्यांनी राजीनामा देण्याचे धाडस दाखवले आहे. त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळत होत्या. राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. त्यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांनी हिंगोली आणि मराठवाड्यात पक्षबांधणीसाठी प्रयत्न केले. मात्र, गेल्या काही काळापासून पक्षांतर्गत कुरघोडी आणि गटबाजीमुळे त्या अस्वस्थ होत्या. अखेर आजच्या राजीनाम्यामुळे त्यांचा काँग्रेसमधील औपचारिक प्रवास थांबला असून, आता त्या भाजपच्या माध्यमातून नवी राजकीय इनिंग सुरू करण्यास सज्ज झाल्या आहेत.
Kirtan Nadagouda Son Death: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. KGF आणि ‘सलार’सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे को-डायरेक्टर व असिस्टंट डायरेक्टर कीर्तन नादगौडा यांच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. त्यांच्या अवघ्या ४ वर्षांच्या मुलाचा, सोनारश नादगौडा याचा, दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात लिफ्टमध्ये अडकल्यामुळे झाला असून, उपचारांपूर्वीच मुलाचा जीव गेला. या […] The post Kirtan Nadagouda Son Death: ‘KGF’ आणि ‘सलार’च्या को-डायरेक्टरवर दुःखाचा डोंगर, ४ वर्षांच्या मुलाचा लिफ्ट अपघातात मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
१. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे निधन ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे वयाच्या 101व्या वर्षी निधन झाले. नोएडा येथील राहत्या घरी रात्री 1.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी ११ वाजता गुरुग्राममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राम सुतार यांनी जगभरात २०० हून अधिक पुतळे बनवले आहेत. त्यामध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा सरदार वल्लभभाई पटेल […] The post प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश निश्चित ते शहापूरच्या लेकाची IPL मध्ये वर्णी; TOP 10 News वाचा एका क्लिकवर… appeared first on Dainik Prabhat .
Ashok Chavan : महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या निवडणुकीच्या काळातच काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, लातूर जिल्ह्यातील मोठं नाव विधानपरिषदेच्या आमदार डॅा. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आज १८ डिसेंबर रोजी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सादर केला आहे. […] The post भाजपमध्ये प्रज्ञा सातव जाणार? पक्ष प्रवेशासाठी ‘या’ बड्या नेत्याचा हात? भाजप नेत्याने सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टचं सांगितलं appeared first on Dainik Prabhat .
शेख हसीना यांच्या मुलाचा भारताला इशारा; म्हणाले “चिंतेची बाब, दहशतवाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता”
Sheikh Hasina Son Warns | बांगलादेशात देशव्यापी आंदोलन व हिंसाचार या घटनांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडण्याचा निर्णय घेतला. हसीना सरकार कोसळल्यानंतर मोहम्मद युनूस सध्या बांगलादेशच्या हंगामी सरकारचे सल्लागार म्हणून काम पाहात आहेत. याशिवाय शेख हसीना यांच्या आवामी लीग या पक्षाला निवडणुकीत सहभाग घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सध्या बांगलादेशमधील सामाजिक […] The post शेख हसीना यांच्या मुलाचा भारताला इशारा; म्हणाले “चिंतेची बाब, दहशतवाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता” appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत असलेल्या विशेष न्यायालयाने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी सार्वजनिक सुविधांसाठी राखीव असलेल्या म्हाडाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपांप्रकरणी एफआयआर दाखल करून सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले.स्थानिक रहिवासी रमेश सत्यन बोरवा यांनी दाखल केलेल्या तक्रारीला परवानगी देताना विशेष न्यायाधीश सत्यनारायण आर. नवंदर यांनी हा आदेश दिला. बोरवा यांनी आरोप केला होता की,तीन वेळा आमदार राहिलेल्या व्यक्तीने म्हाडाने सोयीसुविधा आणि बागेसाठी आरक्षित केलेल्या कुर्ला (पूर्व) येथील भूखंडावर अनधिकृतपणे एक हॉल आणि अनेक व्यावसायिक आस्थापना बांधल्या आहेत.तक्रारदाराने आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ प्रतिज्ञापत्रासह कागदपत्रे सादर केली होती.तक्रार आणि म्हाडाने जारी केलेल्या पत्रव्यवहारासह सादर केलेल्या पुराव्यांची तपासणी केल्यानंतर, न्यायालयाने नोंदवले: “वरवर पाहता असे दिसते की,म्हाडाने सुविधा सेवा आणि बागेसाठी आरक्षित केलेल्या भूखंडावर,काही व्यावसायिक केंद्रांसह एक सभागृह अनधिकृतपणे बांधण्यात आले आहे.”न्यायाधीशांनी निरीक्षण केले की, कुडाळकर यांच्यावर केलेले आरोप “विशिष्ट” आहेत आणि तक्रारदाराने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांना पुष्टी मिळाली आहे.म्हाडाच्या २५ नोव्हेंबरच्या पत्राची दखल घेत न्यायाधीशांनी सांगितले की,आरोपांमध्ये 'काही तथ्य'आहे,जे पोलीस हस्तक्षेपासाठी पुरेसे आहे.त्यांनी नमूद केले की,सादर केलेल्या पुराव्यांवरून दखलपात्र गुन्हे उघडकीस आले आहेत,ज्यासाठी चौकशीची आवश्यकता आहे,आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार,एसीबीच्या एका योग्यरित्या अधिकृत वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत गुन्हा दाखल करून तपास करण्याचे निर्देश दिले.न्यायालयाने नमूद केले की,तक्रारीनुसार,मतदारसंघाच्या विकासासाठी वाटप केलेल्या सार्वजनिक निधीचा कथित गैरवापर करण्यात आला होता,आणि तक्रारदाराने असा दावा केला की,मंजूर केलेले काम करण्याऐवजी,त्याने उत्पन्न मिळवण्यासाठी सभागृह बांधले आहेआणि त्या वास्तू बेकायदेशीरपणे भाड्याने दिल्या आहेत.या प्राथमिक टप्प्यावर न्यायाधीशांनी निरीक्षण केले की,आरोप हे गंभीर स्वरूपाचेअसून ते सार्वजनिक मालमत्तेवरील अनधिकृत बांधकामाशी संबंधित आहेत,ज्यामुळे चौकशी करणे आवश्यक आहे.म्हणून,नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,२०२३ च्या कलम १७५ (३)नुसार एफआयआर नोंदवून सखोल तपास करण्याचे आणि अंतिम अहवाल या न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देणे योग्य ठरेल,असे न्यायाधीशांनी नमूद केले. तथापि,अखेरीस न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सहायक पोलीस आयुक्तांना एफआयआर नोंदवून तपास करण्याचे निर्देश दिले.
Minorities Rights Day : आज, १८ डिसेंबर रोजी देशभरात अल्पसंख्यांक अधिकार दिन साजरा केला जात आहे. हा दिवस धार्मिक, जातीय, वांशिक आणि भाषिक अल्पसंख्यांक समुदायांचे अधिकार जपण्यासाठी आणि त्यांची जाणीव वाढवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. समाजातील प्रत्येक घटकाला समान अधिकार, सन्मान आणि सुरक्षितता मिळावी, हा या दिवसामागचा मुख्य उद्देश आहे. अल्पसंख्यांक अधिकार दिनाची सुरुवात कधी झाली? […] The post Minorities Rights Day: आज अल्पसंख्यांक अधिकार दिन आहे. जाणून घ्या संविधानात अल्पसंख्यांकांना कोणते अधिकार आहेत? appeared first on Dainik Prabhat .
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मनपाची रणधुमाळी सुरु:आता नागरिकांच्या समस्या सुटणार?
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांचे अखेर बिगुल वाजलं आहे. ज्या निवडणुकांची नागरिक वाट पाहत होते, त्या आता प्रत्यक्षात येऊ घातल्या आहेत. 15 डिसेंबर रोजी निवडणूक आयोगाने घोषणा केली आणि स्पष्ट झालं की,15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुका होणार आहेत. मात्र प्रश्न असा आहे की, तब्बल 8 ते 9 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर, आता खरंच नागरिकांच्या समस्या सुटणार का? हा सवाल आता फक्त चर्चेपुरता उरलेला नाही,तर तो प्रत्येक घरातून, प्रत्येक वस्तीमधून, प्रत्येक प्रभागातून ऐकू येऊ लागला आहे. या दीर्घ काळात नागरिकांनी बरंच काही सहन केलं आहे.खड्ड्यांनी भरलेले रस्ते, अनियमित पाणीपुरवठा, न चालणारे पथदिवे, कचऱ्याचे ढीग,सिटी बसचा अभाव, वाढती गुन्हेगारी, सुरक्षेचा प्रश्न आणि करांचा वाढता बोजा या सगळ्यांशी नागरिक रोज झुंज देत आले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात एकूण 29 प्रभाग आहेत.शहर मोठं आहे, लोकसंख्या वाढतेय, पण आजही अनेक प्रभागांमध्ये पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत गरज पूर्ण होत नाही, हीच वस्तुस्थिती आहे. या निवडणुकीत फक्त उमेदवार मैदानात उतरलेले नाहीत,तर अपेक्षा, प्रश्न आणि नाराजीही मैदानात आहे.आणि म्हणूनच गरज आहे नागरिकांचा थेट, निर्भीड आवाज जनतेसमोर आणण्याची. हाच आवाज, हेच वास्तव, दिव्य मराठी घेऊन येत आहे ‘लढाई मनपाची… आवाज नागरिकांचा' या विशेष मालिकेत. तुम्ही ऐकणार आहात नागरिकांचे प्रश्न,पाहणार आहात प्रत्येक प्रभागाचं वास्तव, आणि जाणून घेणार आहात उमेदवारांची आश्वासनं आणि त्यांची जबाबदारी. कारण ही लढाई फक्त निवडणुकीची नाही… ही लढाई आहे नागरिकांच्या हक्कांची...
Akshay Khanna : सध्या बॅाक्स अॅाफिसवर धुरंधर चित्रपटाने धुराळा उडवून दिला आहे. ५ डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने चारशे कोटींचा विक्रमी टप्पा पार केला आहे. आता चित्रपटाची ५०० कोटींच्या दिशेने वाटलाच सुरू झाली आहे. खरंतर धुरंधर या चित्रपटातून बऱ्याच दिवसांनी अभिनेता रणवीर सिंह हा कमबॅक करणार असल्याने चाहते त्याला पाहण्यासाठी आतुर झाले होते. चित्रपटाने […] The post धुरंधरला मिळालेल्या तुफान यशानंतर अक्षय खन्ना पहिल्यांदाच बोलला; एकाच वाक्यात दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाला… appeared first on Dainik Prabhat .
शिल्पांच्या माध्यमातून राम सुतारांची कला शतकानुशतके स्मरणात राहील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्रभूषण, डॉ. राम सुतार यांचे बुधवारी (१७ डिसेंबर) रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र शोककळा पसरली असून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सुतार यांना आदरांजली वाहणारी पोस्ट सोशल मीडीयावर टाकली आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, राम सुतार यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांचे पुत्र अनिल सुतार यांना दूरध्वनी करून शोकसंवेदना व्यक्त केल्या आणि त्यांना सांत्वना दिली.ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्रभूषण, डॉ. राम सुतार यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांचे पुत्र अनिल सुतार यांना दूरध्वनी करून शोकसंवेदना व्यक्त केल्या आणि त्यांना सांत्वना दिली.रामभाऊंच्या निधनाने जिवंत मूर्ती साकारणारा जागतिक कीर्तीचा एक उमदा कलाकार आपल्यातून निघून गेला.… pic.twitter.com/HwJ9EXBR9D— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 18, 2025पुढे त्यांनी लिहिले आहे, रामभाऊंच्या निधनाने जिवंत मूर्ती साकारणारा जागतिक कीर्तीचा एक उमदा कलाकार आपल्यातून निघून गेला. अत्यंत बारकाईने केलेली कलाकुसर आणि त्यातील जिवंतपणा हे त्यांच्या कलेचे वैशिष्टय होते. काहीच दिवसांपूर्वी नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान करण्यासाठी आम्ही गेलो होतो, पुरस्कार स्वीकारताना त्यांनी 'महाराष्ट्र माझा' या गीताच्या ओळी उच्चारल्या तेव्हा भारावून गेलो होतो. अनेक शिल्पांना त्यांनी आकार दिला. स्टॅच्यु ऑफ यूनिटीमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा किंवा अंदमानमधील वीर सावरकर यांचा पुतळा. वयाच्या १००व्या वर्षी सुद्धा ते इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामात गुंतले होते. संसद भवन परिसरात सुद्धा त्यांनी तयार केलेले अनेक पुतळे आहेत. आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, आपले वारकरी संत अशा मोठ्या मांदियाळीच्या शिल्पांना आकार देण्याचे काम त्यांनी केले. या शिल्पांच्या माध्यमातून त्यांची कला शतकानुशतके आपल्या स्मरणात राहील आणि ते प्रत्येक शिल्प पाहताना त्यांचेच स्मरण होईल.मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशाप्रकारे फडणवीसांनी सुतारांच्या निधनाचा शोक व्यक्त केला आहे.
नवी मुंबईतील महत्त्वाचा बस डेपो अखेर ६ वर्षांनंतर सुरू
१९० कोटींचा खर्च, २१ मजली भव्य बांधकामनवी मुंबई : सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वाशी येथील महत्त्वाचा बस डेपो अखेर प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.गेल्या सहा वर्षांपासून या बस डेपोचे नूतनीकरण आणि पुनर्बांधणीचे काम सुरू होते.अखेर १६ डिसेंबर रोजी वाशी बस डेपो कार्यान्वित करण्यात आला असून,या डेपोमध्ये अत्याधुनिक सुविधा आणि बदल करण्यात आले आहेत.१९० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या २१ मजली डेपोचे काम दीड वर्षांपूर्वीच पूर्ण झाले होते.राजकीय नेत्यांच्या अनुपलब्धतेमुळे उद्घाटने पुढे ढकलली जात होती,मात्र आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला.१८ महिन्यांपूर्वी बांधकाम पूर्णअखेर सोमवार संध्याकाळपासून हा डेपो कार्यान्वित करण्यात आला आहे.या दीर्घ विलंबाच्या काळात जुने बस स्थानक पाडण्यात आले होते.त्यामुळे प्रवाशांना वाशी–कोपर खैरणे या वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरूनच बस पकडाव्या लागत होत्या. यामुळे वाहतुकीचा धोका, तसेच ऊन-पावसाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत होता.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पनवेल आणि वाशी रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या बसेस या नव्या वाशी बस डेपोमध्ये थांबतील.मात्र ठाणे आणि घनसोलीकडून येणाऱ्या बसेस विश्णुदास भावे प्रेक्षागृहाच्या दिशेने वळवण्यात येणार असून, त्या बसेसना वाशी बस डेपोमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.या प्रकल्पाची सुरुवात २०१८ साली १४० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकासह झाली होती.मात्र कालांतराने खर्च वाढत गेला आणि अंतिम खर्च १९० कोटी रुपयांवर पोहोचला.वाशी येथील जुन्या बस डेपोच्या जागेवर उभारण्यात आलेल्या या २१ मजली इमारतीसाठी तीन वेळा पूर्णत्वाच्या मुदती वाढवाव्या लागल्या.ऑक्टोबर २०१९ मध्ये हा बस डेपो पूर्णपणे बंद करण्यात आला होता.वैशिष्ट्ये काय?या भव्य इमारतीत खालचा पाच मजली भाग आणि वरचा १६ मजली भाग आहे. एकूण जागेपैकी सुमारे ७५ टक्के क्षेत्र बस वाहतुकीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.उर्वरित व्यावसायिक भागात रेस्टॉरंट, बँक्वेट हॉल तसेच कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधुनिक रचनेचा आणि बहुपयोगी सुविधांनी सुसज्ज असा हा वाशी बस डेपो नवी मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीत एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
मोहित सोमण: फिनटेक तंत्रज्ञानात आता मोठ्या प्रमाणात क्रांती होत आहे. मोठ्या या संक्रमणाच्या काळात गुगलने अॅक्सिस बँकेशी भागीदारी करत 'रूपे' (RuPay) प्रणित 'गुगल पे फ्लेक्स अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड ' हे नवे उत्पादन बाजारात आणले आहे. या नव्या युपीआयशी जोडलेल्या क्रेडिट कार्डाचा मोठ्या प्रमाणात लाभ तरूणांना, सर्वांनाच व जेनझी पीढीला होणार आहे. दैनंदिन जीवनात ईएमआय असेल,खरेदी असेल, इतर खर्च असतील, कर्ज असेल सगळ्या आर्थिक व्यवहारांचा लेखाजोखा घेणे आता सहज शक्य होणार आहे. या डिजिटल क्रेडिट कार्ड अंतर्गत अनेक वित्तीय सुविधा लाँच करण्यात आलेल्या आहेत.दैनंदिन युपीआय (Unified Payment Interface UPI) वापरताना अनेकदा निधीची कमतरता अथवा काही कारणाने टंचाई भासते अशावेळी भौतिक क्रेडिट कार्ड सुविधेप्रमाणेच आता ग्राहक डिजिटल क्रेडिट कार्ड सुविधा गुगल पे अॅपमध्येच वापरता येणार आहे. अधिकृत प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, 'रुपे नेटवर्कवर तयार केलेले, हे कार्ड लोक दररोज करत असलेल्या यूपीआय पेमेंट्सप्रमाणेच क्रेडिट अनुभव सर्वव्यापी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवते जे गुगल पेच्या सोयीस्कर, सुरक्षित अनुभवाने आणि अॅक्सिस बँकेच्या विश्वासार्ह बँकिंग कौशल्याने समर्थन प्राप्त केले आहे' असे म्हटले आहे.त्यामुळे आता ग्राहक युपीआयमध्ये असलेल्या सुविधा क्रेडिट कार्डशी असलेल्या सुविधांशी एकत्रित करू शकणार आहेत. रूपे हे प्रथम सर्वात मोठे देशपातळीवर चालणारे कार्ड पेमेंट नेटवर्क समजले जाते. अनेकदा लहान मध्यम अथवा को ऑपरेटिव्ह बँका आपल्या ग्राहकांना 'रूपे' क्रेडिट कार्ड सुविधा प्रदान करतात. मास्टरमाईंड, विझा या जागतिक क्रेडिट कार्ड नेटवर्कला टक्कर देणारी मेड इन इंडिया प्रणाली ओळखली जाते. असे असल्याने या आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध करणाऱ्या कंपन्यांना पर्याय म्हणून टिअर १ व टिअर २ शहरात मोठ्या प्रमाणात रूपे अधिक प्रमाणात वापरले जाते. आर्थिक समावेशनात (Financial Inclusion) पुढील टप्पा म्हणजे निमशहरी व ग्रामीण भागातही युपीआय व्यवहार होत असताना आर्थिक सुविधा वाढवण्यासाठी हे नवे कार्ड डिझाईन करण्यात आले आहे.मास्टरकार्ड आणि व्हिसाच्या विपरीत, रुपे कार्ड्स यूपीआयशी लिंक केली जाऊ शकतात. ही कार्यक्षमता नवीन गुगल पे कार्डला विशेष बनवेल असा कयास मांडला जात आहे कारण ते यूपीआयच्या व्यापक स्विकारार्हतेचा क्रेडिट कार्डच्या फायद्यांशी जोडणे ग्राहकांना सोपे जाणार आहे.या गुगल पे फ्लेक्स अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणखी काय फायदे आहेत?१) पेमेंटमधील लवचिकता - तुम्ही एकाच वेळी अनेक मर्चंटला सहजपणे एका क्लिकवर थकीत देणी, अथवा पेमेंट सहज करू शकता. हे रूपे पेमेंट कार्ड क्रेडीट कार्ड इकोसिस्टीमशी संबंधित असल्याने ही डिजिटल पेमेंट सहज होतील.२) रिवार्ड जिंका- या केलेल्या व्यवहारातून आता सहजपणे रिवार्डस पॉईंट्स ग्राहकांना प्रत्येक व्यवहारामागे मिळतील. महिन्याच्या शेवटापर्यंत वाट न पाहता यातून तुम्हाला पुढील व्यवहारासाठी ते पॉईंट्स वापरता येऊ शकतात. माहितीनुसार, १ स्टार पॉईंट्स म्हणजे १ रूपयाचा रिवार्ड असणार आहे.३) पेमेंट सुविधा- तुम्ही क्रेडिट कार्डाची थकबाकीही युपीआयनेच भरू शकाल त्यासाठी भौतिक कार्ड स्वाईप करण्याची गरज भासणार नाही. एकाच गुगल पे अँपमध्ये सगळे काही व्यवहार व व्यवस्थापन शक्य होणार आहे.४) पेबॅक फिचर- सर्वात महत्वाचे फिचर्स म्हणजे पेबॅक फिचर म्हणजे ग्राहकांना विविध पेमेंट विविध पद्धतीने करता येणार आहे. त्यामुळे ग्राहक त्यांची थकीत कर्ज अथवा देणी एक महिना, सहा महिने अशा विविध पद्धतीने आपले हप्ते (EMI) भरू शकणार आहेत.गुगल पे अशा बाजारपेठेत प्रवेश करत आहे जिथे इतर कंपन्या आधीच सक्रिय आहेत. यापूर्वी भारतातील सर्वात मोठ्या युपीआय ॲप असलेल्या PhonePe ने आपला RuPay क्रेडिट कार्ड बाजारात आणण्यासाठी एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी केली होती.त्यानंतर त्यांनी व्हिसा आणि RuPay दोन्ही क्रेडिट कार्ड्स देण्यासाठी एसबीआय कार्ड्ससोबत भागीदारी केली.या कार्ड शिवाय बाजारात Cred आणि Super.money यांसारख्या इतर पेमेंट ॲप्सद्वारे देखील युपीआय कनेक्टेड को-ब्रँडेड RuPay क्रेडिट कार्ड्स दिली जातात. गुगल पेकडे आधीच एस क्रेडिट कार्ड नावाचे दुसरे कार्ड उपलब्ध आहे जे व्हिसा नेटवर्कवरील अॅक्सिस बँकेच्या सहयोगाने बाजारात उपलब्ध आहे.
एमपीमध्ये एका नवीन प्रकारचा घोटाळा होत आहे. 'एक्सक्लुझिव्ह हाऊस पार्टी'च्या नावाखाली तरुणांना फसवून त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल केली जात आहे. यासाठी सोशल मीडियावर आकर्षक व्हिडिओ पोस्ट केले जातात. पार्टीमध्ये स्ट्रेंजर मीटसारखी आकर्षक आश्वासने दिली जातात, पण प्रत्यक्षात अशी कोणतीही पार्टी नसते. दिव्य मराठी रिपोर्टरने भोपाळमध्ये होणाऱ्या अशाच एका हाऊस पार्टीचे तिकीट खरेदी केले. 14 डिसेंबर रोजी ही पार्टी भोपाळमधील एका रिसॉर्टमध्ये होणार होती. निश्चित वेळेवर रिपोर्टर आणि 50 हून अधिक तरुण-तरुणी स्थळावर पोहोचले, पण तिथे पार्टीचा कोणताही मागमूस नव्हता. सारांश पटेल नावाच्या ज्या व्यक्तीने सोशल मीडियावर हाऊस पार्टीचे पेज तयार केले होते, तेदेखील डिलीट केले होते. विशेष बाब म्हणजे, जे तरुण-तरुणी फसवणुकीचे बळी ठरले, त्यांना रिपोर्टरने पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले, तेव्हा ते म्हणाले- कोण स्वतःची बदनामी करून घेईल? हाऊस पार्टीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक कशी केली जात आहे आणि त्यांना आपल्या जाळ्यात कसे ओढले जात आहे. वाचा इन्वेस्टिगेशन... सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाला क्लूरिपोर्टरला सोशल मीडियावर 'भोपाळ हाऊस पार्टी' नावाच्या आयडीची माहिती मिळाली. या आयडीवरून 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या पार्टीचे जोरदार प्रमोशन केले जात होते. या आयडीवर दोन-तीन व्हिडिओदेखील अपलोड केले होते. यामध्ये मुली शॉर्ट ड्रेसमध्ये होत्या. नशेत झुलणारे कपल्स, पूलकिनारी मजा करणारे आणि हुक्का लाउंजचे वातावरण दाखवले होते. 'स्ट्रेंजर मीट'चे आमिष दाखवले होतेयाचे सर्वात मोठे आकर्षण 'स्ट्रेंजर मीट'ची संकल्पना होती. युवकांना सांगण्यात आले होते की ही एक अशी पार्टी असेल जिथे 50 मुले आणि 50 मुलींच्या जोड्या बनवल्या जातील. अनोळखी लोकांशी मैत्री करण्यासाठी खास खेळांचे आयोजन करण्याचेही वचन देण्यात आले होते. तसेच, पेजवर लिहिले होते की पार्टी पूर्णपणे गोपनीय राहील. व्हिडिओ लाईक केला तर ॲडमिनचा मेसेज मिळालारिपोर्टरने हे व्हिडिओ लाईक केले आणि पेजवर मेसेज पाठवला तेव्हा ॲडमिन सारांश पटेलने थेट रिपोर्टरशी संपर्क साधला. रिपोर्टर आणि सारांश पटेल यांच्यात या पार्टीबद्दल चर्चा झाली. सारांश पटेल: काय मदत करू शकतो?रिपोर्टर: हाऊस पार्टी जॉईन करायची आहे. सारांश पटेल: तुमचं वय काय आहे?रिपोर्टर: वय का पाहिजे? सारांश पटेल: आमच्या पार्टीत सामील होणाऱ्या लोकांचे वय 21 ते 35 वर्षे आहे.रिपोर्टर: माझे वय देखील 35 वर्षे आहे. सारांश पटेल: ठीक आहे, पडताळणीसाठी माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर आधार आयडी आणि लोकेशन पाठवा.रिपोर्टर: लोकेशन का?सारांश पटेल: तुम्ही ज्या लोकेशनवर राहता, तिथेच एक माणूस पार्टीचा पास देऊन जाईल. माझ्या इन्स्टाच्या बायोमध्ये एक फॉर्म आहे, तो भरून सबमिट करा. (सारांशच्या सांगण्यावरूना रिपोर्टरने फॉर्म भरला. पटेलने व्हॉट्सॲपवर याची पुष्टी केली. यानंतर त्याने रिपोर्टरच्या व्हॉट्सॲप नंबरवर पेमेंटसाठी एक बार कोड पाठवला.) रिपोर्टर: किती पेमेंट करायचे आहे?सारांश पटेल: 2 हजार रुपये...।रिपोर्टर: पार्टीमध्ये काय सुविधा मिळेल? सारांश पटेलने याचे उत्तर देण्याऐवजी एका पार्टीचे ब्रोशर पाठवले. ब्रोशरनुसार ही पार्टी 7 डिसेंबर रोजी झाली होती. ब्रोशरमध्ये लिहिले होते की, भोपाळच्या प्रायव्हेट एलिट सर्कलमध्ये तुमचे स्वागत आहे. या पार्टीमध्ये केवळ अप्रूव्हड पाहुणेच उपस्थित राहू शकतात. त्याचबरोबर ब्रोशरमध्ये पार्टीत दिल्या जाणाऱ्या फूड आणि ड्रिंक्सचाही उल्लेख होता. ज्यात स्वतःची दारूची बाटली आणण्याचीही सुविधा दिली होती. हुक्का आणि पूल साइड पार्टीचाही उल्लेख होता. ही पार्टी भोपाळच्या एका लक्झरी फार्म हाऊसमध्ये आयोजित केली होती. ज्याचा पूर्ण पत्ता दिला नव्हता. पेमेंट कन्फर्म झाल्यावर लिहिले- स्लॉट बुकसर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर सारांश पटेलने 'हाऊस पार्टी भोपाळ' नावाचा एक नवीन व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला. त्या ग्रुपमध्ये रिपोर्टरलाही ॲड केले आणि लिहिले की आता पार्टीशी संबंधित सर्व अपडेट्स याच ग्रुपमध्ये दिले जातील. ग्रुपचे स्टेटस 'ओन्ली ॲडमिन' असे होते, म्हणजे ग्रुपचे इतर सदस्य त्यावर आपले कमेंट्स पाठवू शकत नव्हते. रिपोर्टरने ग्रुप पाहिला तेव्हा त्यात सुमारे 50 ते 100 नंबर ॲड केलेले होते. यात मुली आणि मुले दोघेही सामील होते. थोड्या वेळाने ग्रुपवर मेसेज आला- स्लॉट बुक. 14 डिसेंबरच्या एक दिवस आधी म्हणजे 13 डिसेंबरच्या संध्याकाळी ग्रुपवर आणखी एक मेसेज आला. ज्यात पार्टीचे ठिकाण (वेन्यू) दिले होते. हे हलालपुरा बस स्टँडसमोर असलेले एक रिसॉर्ट होते. सारांश पटेलने लिहिले- ही उद्याची लोकेशन असेल आणि एंट्री दुपारी 3 वाजता सुरू होईल. पार्टीचा दिवस, तरुण पोहोचले आणि त्यांची फसवणूक झाली14 डिसेंबर म्हणजे पार्टीच्या दिवशी रिपोर्टर भोपाळमधील हलालपूर बस स्टँडजवळच्या रिसॉर्टवर पोहोचला. येथे तरुण-तरुणींची गर्दी जमायला लागली होती. हे सर्वजण हाऊस पार्टीसाठी येथे पोहोचले होते. पण, येथे पोहोचल्यावर पार्टीसारखे कोणतेही वातावरण दिसले नाही. एक पार्टी नक्कीच सुरू होती, पण तो एक कौटुंबिक कार्यक्रम होता. तरुण सारांश पटेलला शोधत होते. पण, येथे कोणीही उपस्थित नव्हते. काही तरुणांनी रिसॉर्टच्या मालकाशी संपर्क साधला असता, त्यांनी स्पष्टपणे नकार देत सांगितले की, त्यांच्याकडे अशा प्रकारची कोणतीही पार्टी बुक केलेली नाही आणि त्यांना याबद्दल कोणतीही माहिती नाही. हे ऐकून तरुणांना धक्का बसला. त्यांनी विरोध करण्याऐवजी येथून निघून जाणे पसंत केले. रिपोर्टरने तरुणांना सांगितले की, आपण पोलिसांत तक्रार करायला हवी, तेव्हा त्यापैकी एक तरुण म्हणाला- अरे, कोण कटकट घेणार? मी तर पालकांपासून लपून पार्टीत सामील होण्यासाठी आलो होतो. रिपोर्टरने आणखी एक-दोन तरुणांशी बोलल्यावर कळले की, ते इटारसी, होशंगाबाद आणि बैतूल येथून ही पार्टी जॉईन करण्यासाठी आले होते. कुणीही आपल्या घरी या पार्टीबद्दल सांगितले नव्हते. रिसॉर्ट संचालक म्हणाला- आमच्या नावाचा गैरवापर झालाबैरागड येथील ज्या रिसॉर्टचे नाव ठिकाण म्हणून वापरले गेले, त्याच्या संचालकाने दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की, 14 डिसेंबर रोजी दिवसभर त्यांना अनेक फोन आले आणि अनेक तरुण थेट रिसॉर्टवर पोहोचले. ते सर्व एका हाऊस पार्टीबद्दल विचारत होते. ते म्हणाले, आमच्याकडे त्या दिवशी कोणतीही बुकिंग नव्हती. ठगांनी आमच्या परवानगीशिवाय आमच्या रिसॉर्टचे नाव वापरले, ज्यामुळे आमच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. जाणून घ्या, ही टोळी कशी काम करते? हा घोटाळा एका सुनियोजित पद्धतीने चालवला जातो, ज्याच्या प्रत्येक टप्प्यावर युवकांना फसवण्याची पूर्ण तयारी असते. 1. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडणे: सर्वात आधी, पार्टीमध्ये रुची दाखवणाऱ्या युवकांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडले जाते. या ग्रुपमध्ये वातावरण तयार करण्यासाठी काही बनावट सदस्य देखील असतात, जे पार्टीबद्दल उत्साह दाखवतात. 'लिमिटेड एंट्री,' 'लवकर बुक करा,' आणि 'एक्सक्लुझिव्ह क्राउड' यांसारख्या शब्दांचा वापर करून एक प्रकारची तातडी निर्माण केली जाते. 2. फॉर्म, शुल्क आणि बनावट पडताळणीइंस्टाग्राम पेजच्या बायोमध्ये एका गुगल फॉर्मची लिंक दिली जाते, जी भरणे अनिवार्य असल्याचे सांगितले जाते. या फॉर्ममध्ये नाव, नंबर आणि वय यांसारखी माहिती मागितली जाते, जेणेकरून असे वाटेल की पार्टी केवळ प्रौढ लोकांसाठी आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे, वयाच्या पडताळणीच्या नावाखाली तरुणांकडून त्यांच्या आधार कार्डचा फोटो किंवा तपशील मागितला जातो. यामुळे केवळ त्यांचे पैसेच लुटले जात नाहीत, तर त्यांच्या ओळखीशी संबंधित संवेदनशील माहिती देखील चोरीला जाते, ज्याचा भविष्यात गैरवापर होऊ शकतो. 3. पेमेंट आणि ठिकाणाचा खुलासाफॉर्म भरल्यानंतर तरुणांना एक QR कोड किंवा UPI आयडी पाठवला जातो, ज्यावर पेमेंट करण्यास सांगितले जाते. पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर त्यांना सांगितले जाते की पार्टीचे ठिकाण कार्यक्रमाच्या दिवशीच सांगितले जाईल जेणेकरून गोपनीयता राखली जाईल. 4. फसवणूक केल्यानंतर गायबपार्टीच्या दिवशी पीडितांना एक लोकेशन पाठवले जाते. जेव्हा ते तिथे पोहोचतात, तेव्हा त्यांना सत्य कळते. या दरम्यान, ठग आपला फोन बंद करतात, व्हॉट्सॲपवर मेसेजला उत्तर देणे बंद करतात आणि काही तासांतच इंस्टाग्राम अकाउंट डिलीट किंवा इनॲक्टिव्ह केले जाते. पॅटर्न तोच, फक्त शहरं आणि चेहरे बदलताततपासात हेदेखील समोर आले आहे की, ही कोणतीही स्थानिक टोळी नाही, तर एक असे नेटवर्क आहे जे देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये याच पॅटर्नवर काम करते. भोपाळपूर्वी इंदूर, जयपूर आणि चंदीगडसारख्या शहरांमध्येही अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या बातम्या आल्या आहेत. पॅटर्न नेहमी एकच असतो- एक नवीन इंस्टाग्राम आयडी तयार करणे, आकर्षक व्हिडिओ टाकणे, तरुणांना ग्रुपमध्ये जोडणे, फॉर्म भरून घेणे, पेमेंट घेणे आणि नंतर गायब होणे.
नाशिक : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नाशिक जिल्ह्याच्या राजकारणातील मोठं नाव समजले जाणारे माणिकराव कोकाटे यांना १९९५ चे सदनिका प्रकरण भोवले आहे. ऐन निवडणुकीच्या काळातच या प्रकरणावर मोठा निर्णय देण्यात आला आहे. खोट्या कागदपत्रांचावापर करून स्वतःलाआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकदाखवले आणिमुख्यमंत्री कोट्यातील१० टक्के आरक्षणाचा लाभ घेत नाशिक येथील उच्चभ्र ठिकाणी सदनिका बळकावल्या, असा आरोप […] The post नाशिकमध्ये पक्षासाठी मोठे आव्हान; एक मंत्री रुग्णालयात, दुसऱ्यावर अटकेची टांगती तलवार; अजित दादांच्या भूमिकेकडे लक्ष appeared first on Dainik Prabhat .
पुणे- जळगाव नवा जलदगती मार्ग; ३ तासांत प्रवास
पुणे ते छत्रपती संभाजीनगर शहरांना जोडणारा आत्याधुनिक महामार्गपुणे : पुणे ते छत्रपती संभाजीनगरला जोडण्यासाठी एक्स्प्रेस हायवे उभारण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. हा नवीन एक्स्प्रेस हायवे आत्याधुनिक असणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर जळगाववरून पुण्याचा प्रवास सुसाट होणार आहे. फक्त २ तासांत पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास करता येणार आहे.पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा हा आत्याधुनिक आणि चांगला महामार्ग असणार आहे. यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ फार कमी होणार आहे. यामुळे पुणे ते जळगाव अंतरदेखील कमी होणार आहे. सध्या पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी सहा ते साडेसहा तास लागतात. दरम्यान, या नवीन महामार्गामुळे तुम्ही फक्त २ तासांत हा प्रवास करू शकतात. त्यामुळे प्रवासाचा कालावधी ३-४ तासांनी कमी होणार आहे, असा दावा नितीन गडकरी यांनी केला.याचसोबत मुंबई-नागपूर या महामार्गाला जळगाव जोडण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाला. सध्या जळगावरून अजिंठा, सिल्लोडमार्गे छत्रपती संभाजीनगरला जावे लागते. त्यासाठी अडीच तास लागतात. दरम्यान, हा रस्ता समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे.त्यापूर्वी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर असा एक्स्प्रेस हायवे बांधण्यात येणार आहे. यामुळे हा कालावधी फक्त १ तासावर येणार आहे. जळगाव-छत्रपती संभाजी नगर असा १ तास प्रवास आणि तिथून पुढे छत्रपती संभाजीनगर ते पुणे असे दोन तास गृहीत धरले तर तुमचा प्रवास फक्त तीन तासांचा होणार आहे. जळगाववरुन पुण्याला फक्त ३ तासात पोहोचता येणार आहे.पुणे ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गासाठी १६ कोटी ३१८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग आत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील औद्योगिक, व्यापारी आणि सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या ओव्हरगाव परिसरात जमिनीच्या जुन्या वादातून एका माजी सरपंचाची अकरा जणांच्या टोळीने अमानुषपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांहू पठाण असे मृत व्यक्तीचे नाव असून, या हल्ल्यात त्यांची दोन मुलेही गंभीर जखमी झाली आहेत. जटवाडा रस्त्यावर घडलेल्या या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे.काय आहे नेमकी घटना?मिळालेल्या माहितीनुसार, ओव्हरगावमधील एका जमिनीच्या ताब्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून दादा पठाण आणि आरोपींमध्ये वाद सुरू होता. याच वादाचे पर्यावसान गुरुवारी रात्री भीषण रक्तरंजित संघर्षात झाले. अकरा जणांच्या एका टोळीने पूर्ण तयारीनिशी पठाण यांच्यावर हल्ला चढवला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पठाण यांच्या कुटुंबातील महिला आरोपींसमोर हात जोडून वाद मिटवण्यासाठी आणि आपल्या माणसांना सोडून देण्यासाठी विनवणी करत होत्या. मात्र, डोक्यात सूडाची भावना भिनलेल्या या टोळीला पाझर फुटला नाही. त्यांनी लाठ्याकाठ्या आणि लाथाबुक्क्यांनी दादा पठाण यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर भीषण प्रहार केले. या अमानुष मारहाणीत दादा पठाण यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी रात्रीच एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत, तर उर्वरित १० हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात खालील ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. इम्रान खान मोईन खान पठाण, जमीर इनायत खान पठाण, मोसीन मोईन खान पठाण, अफरोज खान गयाज खान, अस्लम गयाज पठाण ऊर्फ गुड्डू, हैदर खान गयाज खान पठाण, समीर जमीर पठाण, उमेर जमीर पठाण, फुरकान अजगर पठाण, रामअवतार सागरमल साबू, मोईन इनायत खान पठाण फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली असून, परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एका लोकप्रतिनिधीची अशा प्रकारे दिवसाढवळ्या हत्या झाल्याने ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.जमिनीच्या वादातून ११ गावगुंडांचा जटवाडा रोडवर धुमाकूळगावातीलच एका जमिनीच्या ताब्यावरून पठाण आणि गावातील काही व्यक्तींमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू होता. बुधवारी दुपारी जटवाडा रस्त्यावर ही ११ जणांची सशस्त्र टोळी दादा पठाण आणि त्यांच्या मुलांवर तुटून पडली. हातात लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या या गुंडांनी दादा पठाण यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी कुटुंबातील महिलांनी हल्लेखोरांना रोखण्याचा आणि त्यांचे मन वळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण डोक्यात गुंडगिरी आणि सूड भिनलेल्या या टोळीने वृद्ध सरपंचाला जागीच ठार करेपर्यंत मारहाण सुरूच ठेवली. या हल्ल्याच्या घटनेमुळे ओव्हरगाव आणि जटवाडा रोड परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून रात्री उशिरापर्यंत एका मुख्य आरोपीला अटक केली आहे. मात्र, उर्वरित १० हल्लेखोर सध्या फरार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. एका ज्येष्ठ माजी लोकप्रतिनिधीची अशा प्रकारे अमानुष हत्या झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.https://prahaar.in/2025/12/18/jai-mata-di-shiv-abhishek-and-much-more-messi-is-captivated-by-indian-culture/किरकोळ वाटेचा वाद ठरला काळएका छोट्याशा वाटेवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हत्याकांडात झाल्याची धक्कादायक घटना ओव्हरगाव (जटवाडा रोड) येथे घडली आहे. ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांहू पठाण (६८) यांची जमिनीच्या वादातून ११ जणांच्या टोळीने लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, गुन्हेगारांच्या मुजोरीचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वाटेच्या वादातून संपूर्ण जमिनीवर डोळा मिळालेल्या माहितीनुसार, दादा पठाण यांचे कुटुंब मूळचे ओव्हरगावचेच रहिवासी असून त्यांची गावातील शाळेजवळ शेती आहे. या शेतजमिनीच्या कडेला असलेल्या एका अरुंद वाटेवरून आरोपींनी सुरुवातीला वाद उकरून काढला होता. मात्र, हा वाद केवळ वाटेपुरता मर्यादित न राहता, आरोपींच्या टोळीने पठाण यांच्या संपूर्ण जमिनीवरच आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली होती. यावरून गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही गटांत तणाव होता. जेसीबी बोलावताच टोळीने गाठले शेत बुधवारी दुपारी दादा पठाण आपल्या जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी जेसीबी घेऊन शेतात गेले होते. काम सुरू असतानाच, पूर्ववैमनस्य मनात धरून अकरा जणांची टोळी हातात शस्त्रे घेऊन तिथे पोहोचली. काही कळण्याच्या आतच या टोळीने पठाण यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी कुटुंबातील महिलांनी हल्लेखोरांचे पाय धरून, हात जोडून विनवण्या केल्या, आमच्या माणसांना सोडा अशी आर्त हाक मारली. पण, क्रूरतेने ग्रासलेल्या या टोळीने ६८ वर्षीय वृद्धावर लोखंडी रॉड आणि लाठ्यांनी सपासप वार केले. या हल्ल्यात दादा पठाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे दोन मुलगे गंभीर जखमी झाले आहेत.'कानून हमारे हाथ में है!'कायदा आमच्या खिशात आहे, अशी दर्पोक्ती करत ओव्हरगावच्या ११ गावगुंडांनी माजी सरपंच दादा सांहू पठाण (६८) यांची जटवाडा रोडवर क्रूरपणे हत्या केली. या घटनेने केवळ ओव्हरगावच नव्हे, तर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरला आहे. जमिनीच्या वादातून झालेल्या या हत्येमध्ये हल्लेखोरांनी केवळ अमानुषपणाच दाखवला नाही, तर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्वतःच्याच मालमत्तेची तोडफोड करून स्वतःवरच हल्ला झाल्याचा बनावही रचला. कंपाऊंडचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न आणि मुजोरी घटनेची सुरुवात झाली ती बुधवारी दुपारी, जेव्हा दादा पठाण यांनी आपल्या जमिनीच्या सपाटीकरणासाठी जेसीबी बोलावला होता. मुख्य आरोपी इम्रान खान आणि अफरोज खान यांचे पठाण यांच्या घरासमोरच दुकान आहे. जुन्या वादाचे निमित्त साधून या टोळीने प्रथम दादा पठाण यांची मुले अफसर आणि जुबेर यांच्यावर हल्ला चढवला. आपल्या पतींचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्या पत्नींनी दोघांना तातडीने घराच्या कंपाऊंडमध्ये नेले आणि गेटला कुलूप लावून घेतले. बाहेरून महिला हात जोडून विनवण्या करत असताना, ही क्रूर टोळी कानून हमारे हाथ में है असे ओरडत लोखंडी रॉडने गेटचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत होती. अखेर त्यांनी वृद्ध दादा पठाण यांना लक्ष्य केले आणि त्यांचा जीव जाईपर्यंत त्यांना बेदम मारहाण केली. स्वतःवरच हल्ला झाल्याचा रचला बनाव धक्कादायक बाब म्हणजे, पठाण यांची हत्या केल्यानंतर आपणच बळी आहोत हे दाखवण्यासाठी या टोळीने स्वतःच्याच दुकानाची तोडफोड केली. आपण हल्लेखोर नसून आपल्यावरच हल्ला झाला आहे, असा खोटा पुरावा निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता. मात्र, प्रत्यक्षदर्शी आणि प्राथमिक तपासातून या टोळीचा हा बनाव उघड पडला आहे.
मुंबई: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या निधनाने शिल्पकलेच्या क्षेत्रातील एक महान पर्व आणि 'शिल्पकलेचा कोहिनूर' काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.शिल्पकलेतील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या राम सुतार यांनी आपल्या कलेच्या जोरावर भारतीय संस्कृती आणि महापुरुषांचे विचार जगभर पोहोचवले. त्यांच्या प्रदीर्घ योगदानासाठी त्यांना केंद्र सरकारतर्फे 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.https://prahaar.in/2025/12/18/the-end-of-a-golden-era-padma-shri-ram-sutar-who-set-an-ideal-standard-in-sculpture-passes-away/राम सुतार यांनी महाराष्ट्राच्या मातीतून आपल्या कलेला सुरुवात केली आणि जागतिक स्तरावर स्थान मिळवले. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार त्यांना प्रदान करण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच आम्ही त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी गेलो होतो. त्यावेळी झालेली त्यांची भेट शेवटची ठरली, असे उपमुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटले आहे.नर्मदा तीरावरील सरदार वल्लभभाई पटेल यांचा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी', संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा अशा अनेक अजरामर कलाकृतींच्या माध्यमातून ते सदैव आपल्यात जिवंत राहतील. वयाच्या १०१ व्या वर्षापर्यंत कलेची साधना करणाऱ्या श्री. सुतार यांनी नवीन पिढीतील हजारो कलाकारांना मार्गदर्शन केले. त्यांच्या जाण्याने शिल्पकलेचे विद्यापीठच हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
आयसीसी टी - २० क्रमवारीत वरुण चक्रवर्तीचा डंका
अव्वल १० गोलंदाजांच्या यादीत स्थान मुंबई : भारतीय संघाचा मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने आयसीसीच्या ताज्या ट्वेंटी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत आपले स्थान आणखी बळकट केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील भेदक कामगिरीच्या जोरावर वरुणने कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग गुणांची कमाई केली असून, आता त्याला पाकिस्तानचा माजी गोलंदाज शाहिद आफ्रिदीचा सर्वकालीन विक्रम खुणावत आहे.वरुण चक्रवर्ती सध्या ८१८ रेटिंग गुणांसह क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. त्याने दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडच्या जेकब डफीविरुद्ध तब्बल ११९ गुणांची मोठी आघाडी घेतली आहे. या कामगिरीमुळे वरुण हा आयसीसी टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत सर्वोत्तम रेटिंग गुण मिळवणाऱ्या अव्वल १० गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवणारा भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याने यापूर्वीचा भारताचा जसप्रीत बुमराहचा २०१७ मधील ७८३ गुणांचा विक्रम मोडीत काढला आहे.वरुणच्या या क्रमवारीत प्रगतीचे मुख्य कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची त्याची सध्याची मालिका. त्याने या मालिकेतील सलग तिसऱ्या सामन्यात दोन विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. धरमशाला येथे झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने केवळ ११ धावांत २ बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताने तो सामना ७ गडी राखून जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.सर्वाधिक गोलंदाज रेटिंग - पुरुषांची टी-२० आंतरराष्ट्रीय उमर गुल ( पाकिस्तान) - ८६५ रेटिंग सॅम्युअल बद्री ( वेस्ट इंडीज) - ८६४ रेटिंग डॅनिएल व्हिटोरी ( न्यूझीलंड ) - ८५८ रेटिंग सुनील नरीन ( वेस्ट इंडिज ) - ८३२ रेटींग रशाीद खान ( अफगाणिस्तान) - ८२८ रेटिंग तब्रेझ शम्सी ( द. आफ्रिका) - ८२७ रेटिंग शाहिद आफ्रिदी ( पाकिस्तान )- ८२२ रेटिंग वरुण चक्रवर्थी ( भारत ) - ८१८ रेटिंग शादाब खान ( पाकिस्तान ) - ८११ रेटिंग वनिंदू हसरंगा ( श्रीलंका) - ८०९ रेटिंगआता लक्ष्य उमर गुलचा विक्रमवरुणने सध्याच्या कामगिरीने पाकिस्तानचा फिरकीपटू शादाब खानला मागे टाकले आहे. आता त्याचे पुढील लक्ष्य पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज उमर गुलच्या (८६५ गुण) सर्वकालीन सर्वोच्च रेटिंग विक्रमावर असेल. वरुणच्या फिरकीचा जादू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कायम राहिल्यास, लवकरच तो टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरू शकतो.
ब्रोकरेजने मजबूत फंडामेंटल व आर्थिक परिस्थिती व कंपनीच्या विस्तारित बाजूकडे पाहता जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज व मोतीलाल ओसवालने ६ शेअर सूचवले आहेत. जाणून घेऊयात कुठले शेअर खरेदीसाठी फायदेशीर-१) TCS Consultancy- टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज (JMFL) बाय कॉल दिला असून ३६९० रूपये लक्ष्य किंमत (Target Price TP) शेअरसाठी आपल्या अहवालात नमूद केली आहे.मोतीलाल ओसवालनेही टीसीएसला ३२१८ रूपये खरेदी किंमतीसह (CMP) ३७% अपसाईड प्रमाणे बाय कॉल दिला असून ४४०० रूपये प्रति लक्ष्य किंमत (Target Price TP) शेअरने गाठणे अपेक्षित आहे आहे असे ब्रोकरेजच्या अहवालाने म्हटले आहे.२) Amber Enterprises India- अंबर एंटरप्राईजेस कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियलने बाय कॉल दिला असून ७७५० रूपये लक्ष्य किंमतीसह आपल्या पोर्टफोलिओत शेअर जोडण्याचा (Add) सल्ला कायम ठेवला आहे.३) Crompton Greaves Consumer Eletectricals- क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंज्यूमर इलेक्ट्रिकल कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला मोतीलाल ओसवाल फायनांंशियल सर्विसेस या ब्रोकरेजने दिला असून २४९ रूपये सामान्य खरेदी किंमत (Common Market Price CMP) सह शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजने दिलेल्या माहितीनुसार, ४०% अपसाईड (वाढीसह) शेअर ३५० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत म्हणून (Target Price TP) लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.४) Lodha Developes- मोतीलाल ओसवालनेच लोढा डेव्हलपर्स लिमिटेड शेअरला बाय कॉल दिला असून १०६४ रूपये सामान्य खरेदी किंमतीसह ७७% अपसाईडसह शेअर १८८८ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीवर अपेक्षित आहे असे ब्रोकरेजने आपल्या अहवालात म्हटले आहे.५) Godrej Consumer- गोदरेज कंज्यूमर ड्युरेबल्स शेअरला मोतीलाल ओसवालने बाय कॉल दिला असून ११८० रूपये प्रति शेअर खरेदी किंमतीसह २३% शेअर अपसाईड अपेक्षित आहे असे म्हटले आहे. त्यामुळे ब्रोकरेजने लक्ष्य किंमत १४५० रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.६) VRL Logistics- वीआरएल लॉजिस्टिक्स लिमिटेडला मोतीलाल ओसवालनेच बाय कॉल दिला असून २६६ रूपये प्रति शेअर खरेदी किंमत निश्चित केली आहे. कंपनीने आपल्या अहवालात शेअर ३२% अपसाईड जाऊ शकतो असे म्हटले असून लक्ष्य किंमत ३५० रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
शिल्पकलेतील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड - उपमुख्यमंत्री अजित पवार
भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा प्रतिभावान शिल्पकार गमावला- उपमुख्यमंत्री अजित पवारमुंबई: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या निधनामुळे शिल्पकलेच्या क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून या क्षेत्रातील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की,राम सुतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शेकडो शिल्प साकारली. त्यांचे प्रत्येक शिल्प अप्रतिम सौंदर्याचा अद्भुत नमुना आहे. छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,सरदार वल्लभभाई पटेल या महामानवांच्या शिल्पातून त्यांनी देशाचा इतिहास जिवंत केला.या महामानवांचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहोचवले.गेल्याच महिन्यात त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन राज्य शासनाच्या वतीने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानाने प्रदान करण्यात आला होता.आणि अभिजात भाषा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला होता.त्यावेळी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला होता.https://prahaar.in/2025/12/18/with-the-passing-of-maharashtra-bhushan-ram-sutar-the-kohinoor-of-sculpture-has-faded-into-the-annals-of-time-deputy-chief-minister-eknath-shinde/राम सुतार यांनी महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येऊन दिल्लीत आपलं अढळ स्थान निर्माण केलं. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केलं. यातून त्यांची कामाप्रती निष्ठा दिसून येते.एवढ्या मोठ्या पदावर पोहोचल्यावरही ते प्रत्येकाशी आत्मीयतेने, आपुलकीने बोलत.साधेपणा आणि नम्रपणा हा त्यांचा स्थायीभाव होता. देशभरातील अनेक मूर्तिकारांना घडवण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.दगडातून जिवंत भावना साकारणारा जादूगार आज शांत झाला असला तरी त्यांनी घडवलेली शिल्पे युगानुयुगे त्यांची आठवण करून देत राहतील. राम सुतार यांचे निधनाने भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा उत्तुंग प्रतिभेचा शिल्पकार आपण गमावला आहे.त्यांच्या कुटूंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
राऊतांच्या पुनरागमनावर मंत्री शेलारांची उपरोधिक टोलेबाजीमुंबई : महाराष्ट्र राज्याचे राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोपांनी तापलेले असतानाच, भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर 'काव्यप्रहार' केला आहे. संजय राऊत यांनी प्रकृतीच्या कारणास्तव काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदा सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शेलारांनी ट्विटरच्या (X) माध्यमातून एक उपरोधिक कविता शेअर करत राऊतांच्या कार्यशैलीवर आणि त्यांच्या भाषेवर जोरदार टीका केली आहे.मी तीन महिन्यांनी पुन्हा येईन म्हणाले...एक महिन्याच्या आतच ते परत आले..विश्वविख्यात प्रवक्त्यांना ठणठणीत पाहून आम्हाला ही बरेचं वाटले !त्यांचापुन्हा सकाळचा भोंगा सुरु झालामहाराष्ट्राचा सकाळी सकाळी चॅनल बदलण्याचा हंगाम परत आला..यांना ऐकण्यापेक्षा महाराष्ट्राची…— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 18, 2025सकाळचा भोंगा पुन्हा सुरू झाला आशिष शेलार यांनी आपल्या कवितेत संजय राऊत यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदांचा उल्लेख 'सकाळचा भोंगा' असा केला आहे. राऊत यांनी मी तीन महिन्यांनी परत येईन असे म्हटले होते, मात्र ते एका महिन्याच्या आतच परतल्याचा टोला शेलारांनी लगावला. विश्वविख्यात प्रवक्त्यांना ठणठणीत पाहून बरे वाटले, पण आता महाराष्ट्राचा सकाळी सकाळी चॅनेल बदलण्याचा हंगाम परत आला आहे, असे म्हणत त्यांनी राऊतांच्या भाषणांतील कंटाळवाणेपणावर बोट ठेवले.हास्यजत्रेची तुलना आणि 'उखाड दिया'चा उल्लेख शेलार यांनी आपल्या कवितेत लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' याचा संदर्भ दिला आहे. ते म्हणतात, यांना ऐकण्यापेक्षा महाराष्ट्राची हास्यजत्रा बरी, विनोदी असली तरी ती विचारांवर नेहमीच खरी! संजय राऊत यांच्या आक्रमक भाषेवर टीका करताना शेलार पुढे म्हणतात की, हे प्रवक्ते खूप बोलतात, कोणाचेही नाव घेतात आणि 'उखाड दिया'ची गर्जना करतात. मात्र, अशा गर्जना करून ते स्वतःच्याच पक्षाला उखडून टाकत असल्याचा दावा शेलारांनी केला आहे.२९ महापालिकांतील पराभवाचे भाकीत कवितेच्या शेवटी शेलारांनी राजकीय इशाराही दिला आहे. संजय राऊत हे त्यांच्या पक्षाचे 'हुकमाचे एक्के' असल्याचे म्हटले जाते, पण हे 'विश्वविख्यात' प्रवक्ते जितके जास्त बोलतील, तितका त्यांच्या पक्षाचा आगामी २९ महापालिकांमध्ये पराभव पक्का आहे, असा घणाघात शेलारांनी केला आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आशिष शेलार यांची ही कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून भाजप समर्थकांकडून तिला दाद मिळत आहे. तर दुसरीकडे, ठाकरे गटाकडून या टीकेला काय उत्तर मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेलार आणि राऊत यांच्यातील हा 'ट्विटर वॉर' आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
जय माता दी, शिवाभिषेक आणि बरचं काही... मेस्सीला भारतीय संस्कृतीची भुरळ
जामनगर: दिग्गज फुटबॉल पट्टू लिओनेल मेस्सी याचा भारतीय दौरा संपुष्टात आला असून तो आपल्या मायदेशी परतला आहे. दोन दिवसांच्या भारत भेटी दरम्यान अनेक शहरांना आणि सेलिब्रिटींना त्याने भेट दिली. यामध्ये अनंत अंबानी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या वनताराला मेस्सीने दिलेली भेट महत्त्वाची आणि विशेष आकर्षण ठरली. वनतारामध्य अनंत अंबानी आणि त्यांची पत्नी राधिका मर्चंट यांनी मेस्सीचे स्वागत केले. यानंतर मेस्सीने सनातन धर्म व हिंदू चालरितींनुसार महाआरती आणि हिंदू देवीदेवतांची पूजा आणि शिवाभिषेक केला. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला असून व्हायरल होत आहे.
पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही मोर्चा काढणारच!
मराठी अभ्यास केंद्रासह विविध शैक्षणिक संघटनांचा आज मोर्चा मुंबई : मराठी शाळांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात मराठी अभ्यास केंद्राने आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठी शाळांचा मुद्दा राज्याच्या पटलावर यावा, तसेच त्यातून मराठी शाळांविषयी सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी गुरुवार, १८ डिसेंबर रोजी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय संघटनेने घेतला. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरीही संघटना आपल्या भूमिकेवर ठाम असून पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाण्याची तयारी संघटनेने केली आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालय परिसरात गुरुवारी तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.मराठी अभ्यास केंद्रातर्फे रविवार, १४ डिसेंबर रोजी दादरच्या राजर्षी शाहू सभागृह येथे ‘ठरवून बंद पाडलेल्या/पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांची परिषद’ आयोजित केली होती. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, संघटना, पालक, अभ्यासक आदी या परिषदेत सहभागी झाले होते. त्यावेळी झालेल्या विचारमंथनातून मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मोर्चाची माहिती माता रमाबाई आआंबेडकर नगर पोलीस ठाणे आणि आझाद मैदान पोलीस ठाण्याला देण्यात आली. मात्र, भारतीय दंडसंहिता कलम १६८ चा आधार घेवून दोन्ही ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला. तसेच मोर्चाला परवानगी नाकारली. परवानगी नसताना मोर्चा काढल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला.मात्र, मराठी अभ्यास केंद्र मोर्चाच्या निर्णयावर ठाम असून गुरुवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ठरवून बंद पाडलेल्या आणि पाडल्या जाणाऱ्या पालिकेच्या मराठी शाळांबद्दलची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि संबंधितांना वेळोवेळी दिली आहे. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने मोर्चाचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. आयुक्तांची भेट होत नाही तोवर महापालिकेच्या परिसरात आम्ही बसून राहणार असल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. हा मोर्चा शांतपणे, सनदशीर मार्गाने काढण्यात येणार असून मराठीप्रेमींनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, तसेच मराठी माध्यमाच्या शाळाच राहिल्या नाहीत, तर अन्य माध्यमांच्या शाळाही राहणार नाहीत. त्यामुळे अमराठी भाषकांनीही मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.विविध राजकीय व शैक्षणिक संघटनांचा पाठिंबाभारतीय राष्ट्रीय काँग्रेस, धर्मराज्य पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी राजकीय पक्षांसह महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळ, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना, मराठी एकीकरण समिती, मुंबई मराठी अध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अन्याय निवारण सेवा संघ आदी विविध शैक्षणिक संघनांनाही या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.
मोहित सोमण:सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. काल सकाळच्या तेजीनंतर टेक्निकल कारणाने व अस्थिरतेने बाजार घसरले होते आजही मरगळ कायम असल्याने बाजारात संमिश्र प्रतिसाद अपेक्षित होता. सकाळी सेन्सेक्स १७०.३१ व निफ्टी ४३.६५ अंकाने घसरला आहे. कालची पीएसयुतील रॅलीही थंडावली असून मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्येही घसरण झाली आहे. व्यापक निर्देशांकात नेक्स्ट ५० (०.६३%), मायक्रोकॅप २५० (०.७९%), स्मॉलकॅप २५० (०.५५%) निर्देशांकात झाली आहे. तर सकाळच्या सत्रात क्षेत्रीय निर्देशांकातील आयटी, फायनांशियल सर्विसेस २५/५० निर्देशांकात वाढ झाल्याने काही पातळीवर बाजाराला आधार मिळाला असून सर्वाधिक घसरण ऑटो (१.२३%), मिडिया (०.७८%), फार्मा (०.८५%),मिड स्मॉल हेल्थकेअर (०.८६%) समभागात झाली आहे.गिफ्ट निफ्टीत पहाटे घसरण झाल्यानंतर युएस पेरोल कमकुवत आकडेवारीनंतर आता गुंतवणूकदारांचे शटडाऊन नंतर प्रथमच जाहीर केल्या जाणाऱ्या आगामी महागाई आकडेवारीमुळे अस्वस्थता कायम आहे. तोच कल आशियाई बाजारातील सुरु असून आजचे बाजार रूपयातील कामगिरी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणूक व सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारातील घरगुती गुंतवणूकदारांच्या कामगिरीवर आधारित असणार आहे.सुरूवातीच्या कलात सर्वाधिक वाढ इंद्रप्रस्थ गॅस (६.३०%), निप्पॉन लाईफ (६.२२%), नुवामा वेल्थ (४.१७%), रिलायन्स पॉवर (३.८८%), एम अँड एम फायनांशियल सर्विसेस (३.१९%), एचडीएफसी एएमसी (२.८०%), श्रीराम फायनान्स (२.७१%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण अक्झो नोबेल (१४.२६%), ओला इलेक्ट्रिक (७.५७%),आयओबी (६.९५%), सारेगामा इंडिया (५.४२%), रामकृष्ण फोर्ज (५.६०%), प्राज इंडस्ट्रीज (४.७४%), कोचिन शिपयार्ड (४.४५%) समभागात झाली आहे.गुंतवणूकदारांसाठी आजची स्ट्रॅटेजी काय?चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक अमृता शिंदे - सध्याची अस्थिरता आणि जागतिक अनिश्चितता लक्षात घेता, व्यापाऱ्यांना निवडक राहण्याचा आणि घसरणीच्या वेळी खरेदी करण्याची रणनीती अवलंबण्याचा सल्ला दिला जातो. योग्य लिव्हरेज, कडक ट्रेलिंग स्टॉप-लॉस आणि टप्प्याटप्प्याने नफा-वसुली करण्याची शिफारस केली जाते. जागतिक संकेतांचे आणि महत्त्वाच्या तांत्रिक स्तरांचे बारकाईने निरीक्षण करून नवीन लाँग पोझिशन्स केवळ २६१०० च्या वर सातत्यपूर्ण ब्रेकआउट झाल्यावरच विचारात घेतल्या पाहिजेत. ' असे म्हणाल्या आहेत.जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार -'मेरिकेच्या बाजारात एआय (AI) संबंधित व्यापारात कमकुवतपणा येण्याचा कल वाढत आहे. हा कल २०२६ च्या सुरुवातीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे, आणि याचा फायदा भारतासारख्या गैर-एआय (non-AI) बाजारांना होईल.कालच्या व्यापारातून एक महत्त्वाचा निष्कर्ष हा निघतो की, एफआयआय (FII) खरेदी आणि निव्वळ संस्थात्मक खरेदी असूनही बाजार खाली घसरला. याचे कारण कदाचित एफआयआयने बाजारात त्यांच्या शॉर्ट पोझिशन्स वाढवणे हे असू शकते. याचा अर्थ नजीकच्या काळात एफआयआय ' तेजी आल्यावर विक्री करा' (sell on rally) या रणनीतीचा अवलंब करतील.आता बाजारात एक चिंता आहे की, जपानची मध्यवर्ती बँक आज आक्रमक संदेशासह व्याजदर वाढवेल का. जर असे झाले, तर त्यामुळे 'येन कॅरी ट्रेड'मध्ये उलथापालथ होऊ शकते, ज्यामुळे एफआयआयद्वारे आणखी विक्री होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी आता बाजारातील घसरणीच्या वेळी उच्च दर्जाचे आणि योग्य मूल्यांकनाचे शेअर्स खरेदी करून साठवणे आवश्यक आहे.'
डिजिटल प्लॅटफॉर्मवर सरकारचा चाप
अश्लीलता आणि सायबर गुन्ह्यांविरुद्ध कारवाई होणारमुंबई : सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढणारी अश्लीलता, अफवा आणि ऑनलाइन सायबर गुन्ह्यांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने आता कंबर कसली आहे. 'माहिती तंत्रज्ञान कायदा' (आयटी अॅक्ट) आणि 'आयटी नियम २०२१' च्या माध्यमातून डिजिटल विश्वात बेकायदेशीर सामग्री पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर चौकट तयार करण्यात आली आहे.नवीन नियमांनुसार, ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे ५ लाखांपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत, त्यांना आता भारतात स्थानिक तक्रार निवारण अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी आणि नोडल संपर्क व्यक्तींची नियुक्ती करणे अनिवार्य आहे. तसेच, दरमहा 'अनुपालन अहवाल' प्रसिद्ध करून किती तक्रारी आल्या आणि त्यावर काय कारवाई झाली, याची माहिती देणेही बंधनकारक करण्यात आले आहे. फेसबुक, एक्स (ट्विटर), इन्स्टाग्राम यांसारख्या मध्यस्थांवर आता 'योग्य ती काळजी' घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जर एखाद्या प्लॅटफॉर्मवर बेकायदेशीर किंवा हानिकारक मजकूर आढळला, तर तो त्वरित हटवणे ही त्या कंपनीची कायदेशीर जबाबदारी असेल. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित कंपन्यांना त्यांचे 'सेफ हार्बर' संरक्षण (कायदेशीर संरक्षण) गमवावे लागू शकते. या निर्णयामुळे इंटरनेटचा वापर करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा वाढणार असून, सायबर गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होणार आहे.गुन्हेगारांवर होणार थेट कारवाईआयटी कायद्यातील विविध कलमांनुसार आता सायबर गुन्ह्यांसाठी कडक शिक्षेची तरतूद आहे. कलम ६६ ई: खाजगी गोपनीयतेचे उल्लंघन केल्यास दंड आणि शिक्षा, कलम ६७, ६७ अ, ६७ ब: अश्लील किंवा लैंगिकदृष्ट्या स्पष्ट मजकूर प्रसारित केल्यास कठोर कारवाई, कलम ८०: पोलिसांना संशयिताचा शोध घेण्याचे आणि विना वॉरंट अटक करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
‘पतीच्या मृत्यूनंतर रेल्वेमध्ये त्यांच्या जागी मला नोकरी मिळाली होती. एक दिवस नोकरीवरून परतले तेव्हा माझी सासू झोपली होती. त्या दिवशी माझा मुलगा शेजाऱ्याच्या घरी झोपला होता. मी त्याला तिथून घेऊन आले, माझ्या पलंगावर झोपवले आणि मी स्वतःही त्याच्यासोबत झोपले. दिवसभराच्या नोकरीनंतर शरीर थकून गेले होते, डोळा लागणारच होता. तेव्हा अचानक कोणाच्यातरी पायांची चाहूल ऐकू आली. मी काही समजण्यापूर्वीच, तिने दारावर टांगलेला टॉवेल हिसकावून घेतला आणि माझ्या तोंडावर टाकून पूर्ण ताकदीने दाबायला लागली. मी किंचाळत तडफडत होते. माझी किंकाळी ऐकून शेजारी जमा झाले. बिछान्यातून उठले तेव्हा पाहिले - माझी सासूच टॉवेलने माझे तोंड दाबत होती. ती मोठ्याने म्हणत होती - तू माझ्या मुलाला खाल्ले. तू मांगलिक आहेस. कुलच्छनी आहेस. आता तुझ्या मुलाला घेऊन इथून पळून जा, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही. तेव्हा घरमालकही आले. ते मला म्हणाले - मुलाला उचल आणि लगेच इंदूरला, तुझ्या माहेरी निघून जा. तू अशा प्रकारे मारली गेलीस, तर मी पोलिसांना साक्षही देणार नाही. त्या दिवसानंतर मी इथे इंदूरला येऊन राहू लागले.‘ हेमलता मांडले, वय वर्ष 63, हे बोलताना त्यांचा आवाज कातर होतो. चष्म्यातून ओघळणारे अश्रू पुसत त्या म्हणतात- ‘पती नसलेली एकटी स्त्री असणं, आणि त्यात आई होणं... ही शिक्षा मी रोज भोगत राहिले.’ ब्लॅकबोर्डमध्ये यावेळी सिंगल मदर्सच्या काळोख्या कथा- एकीच्या सासूने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, एकीच्या पतीने तिला परदेशात नेऊन घरातून बाहेर काढले आणि एकी, नातेसंबंध न टिकल्याने डोनरकडून स्पर्म घेऊन आई झाली. हेमलता मांडले सध्या त्यांचा मुलगा आणि सुनेसोबत इंदूरमध्ये राहतात. त्यांचा मुलगा प्रतीक एका आयटी कंपनीत काम करतो. हेमलता पतीच्या मृत्यूची आणि त्यानंतरच्या परिस्थितीची आठवण करून वारंवार आपले हात चोळतात. त्या दिवसांचा विचार करून आजही त्यांच्या अंगावर शहारे येतात. त्या म्हणतात, ‘मी पतीसोबत जबलपूरमध्ये राहत होते. जून 1988 मध्ये लग्नाच्या एका वर्षानंतर मुलाचा जन्म झाला. सप्टेंबर 1990 ची गोष्ट आहे. त्या दिवशी पती ड्युटीवर जात होते. अचानक म्हणाले- जर मी परत आलो नाही, तर मुलासोबत मिळून माझ्या पितरांचे श्राद्ध करून घे.’ मी घाबरून म्हणाले- असं का म्हणताय? तुम्ही उद्या सकाळी परत या, मग आपण एकत्र श्राद्ध करू. मला काय माहीत होतं की दुसऱ्याच दिवशी त्यांचंच श्राद्ध करावं लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी मिळाली की पतीची तब्येत खराब आहे. सासूबाईंसोबत रुग्णालयात पोहोचले. कुणीही खरं सांगायला तयार नव्हतं. अस्वस्थतेत मी ऑपरेशन थिएटरपर्यंत पोहोचले. तेव्हा डॉक्टर म्हणाले- ‘प्रभाकर मांडले यांचा मृतदेह पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पाठवण्यात आला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे.’ प्रभाकर मांडले हे माझ्याच पतीचं नाव होतं. हे ऐकताच मी बेशुद्ध पडले. मला सुमारे 36 तासांनंतर शुद्ध आली. डॉक्टर म्हणाले- 'यांना लगेच घरी घेऊन जा, नाहीतर दोन-दोन अंत्ययात्रा काढाव्या लागतील.' पतीच्या निधनानंतर काही महिन्यांतच रेल्वेमध्ये त्यांच्या जागी मला नोकरी मिळाली. हे बोलताना त्या समोर भिंतीवर टांगलेल्या मुलाच्या फोटोकडे पाहू लागतात. त्या म्हणतात, ‘माझा मुलगा त्यावेळी सव्वा वर्षाचा होता. सासूबाईंकडे सोडून ड्युटीवर जायचे, पण त्या त्याला दूधही पाजत नव्हत्या. बाळ उपाशी रडत राहायचं.’ ‘जेव्हा तो शौचास जायचा, तेव्हा सासू त्याला दोन-दोन तास बाथरूममध्ये उभे ठेवायची. मी परतल्यावर, कपड्यांशिवाय, टब-बादली पकडून माझा मुलगा मला पाहून ओरडू लागायचा. त्याला त्या अवस्थेत पाहून माझे काळीज फाटायचे.’ सासूला वाटत होते की मी नोकरी सोडून द्यावी, पण नोकरीशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही आधार नव्हता. जेव्हा सासूने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी इंदूरला माझ्या माहेरी परत आले. नोकरी करत असताना मुलाला सांभाळणे कठीण होते. मी रेल्वे अधिकाऱ्यांना पत्र लिहून मुलाला ऑफिसमध्ये आणण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळाली. त्यानंतर मी माझ्या लहान मुलाला ड्युटीवर सोबत घेऊन जाऊ लागले- दुसऱ्या खोलीत दूध पाजून झोपवत असे आणि मग कामाला लागत असे. अशा प्रकारे मी माझ्या मुलाला वाढवले. मुलगा थोडा मोठा झाल्यावर, माझे मेहुणे त्याला शाळेत घेऊन जात आणि सोडून येत. माझे वडील त्यावेळी नेहमी म्हणायचे- ‘हेमलता, दुसरे लग्न कर. म्हातारपणी पतीची उणीव भासेल.’ मी फक्त एवढेच म्हणायचे- जेव्हा एक राहिला नाही, तर दुसरे करणार नाही. अशा प्रकारे मुलाला पाहून जगत राहिले. 2019 मध्ये मुलाच्या लग्नाच्या दिवशी खूप रडले होते. वरातीत, जेव्हा सर्वजण फेटा बांधत होते, तेव्हा मीही फेटा बांधून घेतला आणि मुलाला म्हटले- ‘मीच तुझ्यासाठी वडीलही आहे. आज वडिलांचे कर्तव्य मीच पार पाडेन.’ पतीची खूप आठवण येते. त्यांची आठवण काढून आजही प्रत्येक रात्री गुपचूप रडून घेते. विचार करते, ‘ज्या वयात मुली नटतात-सजतात, त्याच वयात मी विधवा झाले. मांडीवर मुलगाही होता.’ त्यावेळी जेव्हा मी बसमध्ये प्रवास करत असे, तेव्हा महिला मला टिकली देत असत- ‘दीदी, आज टिकली लावली नाही?’ त्यांना कसे सांगू की, 26 वर्षांच्या वयात सर्व काही हिरावून घेतले गेले. ही गोष्ट वडिलांना सांगितली, तेव्हा ते म्हणाले- ‘एक छोटीशी टिकली लावत जा.’ एक दिवस मुलगा कुठूनतरी मोठी, लाल भडक टिकली घेऊन आला आणि माझ्या कपाळावर लावली. मिठी मारून म्हणाला- ‘आई, टिकली लावत जा. तू सुंदर दिसतेस.’ इंदूरमध्ये अशा प्रकारे सिंगल मदर हेमलताची कहाणी जाणून घेतल्यानंतर मी दिल्लीला पोहोचलो. तिथे माझी भेट कनॉट प्लेस येथील एका एनजीओमध्ये काम करणाऱ्या रश्मी सहगल यांच्याशी झाली. भेटताच मी विचारले- तुम्हाला किती मुले आहेत? ऐकताच रश्मीचे पाय थांबतात. ती म्हणते, 'येता-जाता, भाजी घेताना गेल्या तीन वर्षांत हा प्रश्न अनेकदा ऐकला आहे. अचानक ओठांवर 'दोन मुले'... बोलता बोलता ती थांबते. मग ती म्हणते - 'एक मूल.' मनातल्या मनात विचार करते की जर 'दोन मुले' असे म्हटले तर अनेक प्रश्न निर्माण होतील - ती मुले कुठे आहेत, पती काय करतात आणि कुठे आहेत... वगैरे.' 'सध्या, या क्षणी मी फक्त एका मुलाची आई आहे.' 'या क्षणी एका मुलाची आई?' - मला तिचे बोलणे समजले नाही. पुन्हा विचारल्यावर रश्मी म्हणते, 'आत्ताच मुलीचा फोन आला होता. दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणामुळे तिचे ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. गेल्या आठवड्यातच तिला बोर्डिंग स्कूलमधून घेऊन आले आहे. आज घरी मोलकरीण आलू-पराठा बनवत होती, तेव्हा मुलगी म्हणाली - 'मॉम, आज तर रेस्टॉरंटसारखे जेवण बनत आहे. तू कधी येणार?' कुठे राहता? 'अनेक घरे बदलल्यानंतर सध्या मी माझी मुलगी लॉरिनसोबत ग्रेटर नोएडा येथे राहते.' रश्मी पुढे म्हणते, 'माझा मुलगा माही त्याच्या वडिलांसोबत राहतो. कुठे, मला माहीत नाही. चार वर्षांपासून त्याला भेटले नाहीये. मुलामुळे मी कोणताही चित्रपट पाहत नाही - पडद्यावर मूल दिसताच मला तोच दिसतो.' मुलाचा कोणताही फोटो? संपूर्ण मोबाईल तपासल्यावरही रश्मीला मुलाचा एकही फोटो मिळत नाही. ती म्हणते, 'अशी एकही रात्र जात नाही, जेव्हा माझ्या अश्रूंनी उशी ओली होत नाही. आजही मुलाची कोणतीही बातमी नाही, तरीही मी आई आहे - मला वाटते की तो ठीक असेल.' ती सांगते, 'पती मुलाला घेऊन जात असताना धमकी दिली होती की तो मुलीला घेऊन जात नाहीये, त्याच समाधान मान, नाहीतर तिलाही हिसकावून घेऊन जाईन. आता फक्त मुलीसाठी जगत आहे. सिंगल मदर झाले आहे. अनेकदा विचार करूनच थरथर कापते - जर मला काही झाले, तर माझ्या 10 वर्षांच्या मुलीचे काय होईल? माझे स्वप्न आहे की मुलीला शिकवून मोठे करावे, तिच्यासाठी एक घर बनवावे, ज्याच्या गेटच्या बोर्डवर 'लॉरिन हाऊस' असे लिहिलेले असेल. जेणेकरून कधी कोणी तिला टोमणा मारला, घरातून बाहेर काढले तर ती म्हणू शकेल - माझे स्वतःचेही घर आहे.' पती कुठे राहतात? ‘परदेशात… कदाचित ऑस्ट्रेलियात, आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत.’ रश्मी एका वाक्यात उत्तर देते आणि शांत होते. थोड्या वेळाने ती म्हणते- ‘2014 मध्ये मी जिथे नोकरी करत होते, तिथेच एका काश्मिरी मुस्लिम तरुणाशी माझी भेट झाली. काही काळानंतर आम्ही काश्मीरला जाऊन लग्न केले. मग आम्ही दुबईला गेलो. तिथे 2015 मध्ये शस्त्रक्रियेने मला मुलगी झाली. दुसऱ्याच दिवशी मी रुग्णालयातून घरी आले. बाळाला दूध पाजण्यापासून ते डायपर आणण्यापर्यंत सर्व काही मलाच करावे लागत होते. पोटातले टाके कच्चे होते, जखम उघडली आणि त्यात पू भरला.’ ती थांबते- ‘त्याच वेळी मला समजले होते की मी एकटी आहे. पतीचे मुलीशी काहीही नाते नव्हते. ते फक्त थोडी निश्चित रक्कम देत असत. त्याच पैशात मला सर्व काही सांभाळावे लागत असे.’ त्याच्या दोन वर्षांनंतर, 2017 मध्ये मुलगा माहीचा जन्म झाला. तेव्हा वाटले की आता कदाचित सर्व काही ठीक होईल. काळजी घेण्यासाठी काश्मीरहून माझी सासूही आली होती. त्या म्हणायच्या- ‘तुमची मुले माझ्या हाताने काही खात नाहीत, तुम्हीच त्यांना सांभाळा.’ खरं तर, मुलांची सर्व जबाबदारी माझ्यावरच होती. आजही तो हिजाब माझ्याकडे आहे, ज्यात गाठ बांधून मी माझ्या मुलाला पोटाशी बांधून ठेवत असे. पोटावर बांधून त्याला दूध पाजत असे आणि मुलीला जेवण भरवत असे.’ भारतात कशा आल्या? रश्मीच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटते, जणू ती जुन्या जखमा लपवत असावी. ती म्हणते- ‘2022 ची गोष्ट आहे. त्यावेळी आम्ही सिंगापूरमध्ये राहायला लागलो होतो. तिथे रोज दोन्ही मुलांना शाळेत सोडायला जावे लागत असे. सकाळी पतीला उठवले की ते माझ्याशी भांडू लागत असत. एक दिवस मी पतीला म्हणाले की, मला ड्रायव्हिंग शिकवा, जेणेकरून मी मुलांना शाळेत सोडू शकेन. त्यानंतर मी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज केला. ज्या दिवशी ड्रायव्हिंग टेस्ट होती, त्या दिवशी माझ्या पतीने मला कार देण्यास नकार दिला. मी कारसमोर उभी राहून विनवणी करत राहिले - चावी देण्यास सांगत राहिले, पण त्यांनी माझे ऐकले नाही. जाताना माझ्या पायावरून कार चालवत ते ऑफिसला निघून गेले. त्याच दिवशी मी ठरवले - ज्या व्यक्तीला माझी किंमत नाही, त्याच्यासोबत राहणे निरुपयोगी आहे. 2023 येईपर्यंत परिस्थिती आणखी बिघडली. एका रात्री पतीने मला आणि माझ्या मुलीला घरातून बाहेर काढले. त्यांना वाटले की, प्रत्येक वेळीप्रमाणे मी रडेन आणि सकाळी परत येईन, पण त्या दिवशी मी मित्रांना फोन करून उसने पैसे मागितले. तिकीट काढले आणि मुलीला सोबत घेऊन दिल्लीला आले. जी मुलगी सिंगापूरच्या अभ्यासक्रमात शिकत होती, तिला दिल्लीत कोणताही शाळा प्रवेश देण्यास तयार नव्हती. सर्व शाळा मुलाच्या वडिलांचे तपशील मागत होत्या. मोठ्या मुश्किलीने एका शाळेत प्रवेश मिळाला. तिथे महिन्याची फी 15 हजार होती, तर त्यावेळी माझा पगार फक्त 30 हजार होता. जवळपास एक वर्ष मुलीला शिकवले, पण नंतर त्या शाळेने मुलीला काढून टाकले. त्यानंतर मुलगी आजारी पडू लागली. जे काही बचत केलेले पैसे आणि दागिने होते, ते विकून तिचा उपचार केला. त्या काळात माझीही तब्येत खूप बिघडली. रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली. मी मुलीला काही दिवसांसाठी माझ्या आईकडे सोडण्यासाठी लाजपत नगरला गेले, पण आईने दरवाजा बंद केला आणि सरळ नकार दिला - इथे येऊ नकोस. आजारी असल्यामुळे माझी नोकरी सुटली. त्यावेळी लोक सल्ला देत होते - 'दुसरे लग्न कर. मुलीच्या मागे लागून आयुष्य का खराब करत आहेस. ज्याचे बाळ आहे, त्याला देऊन टाक.' त्यांना काय माहीत, मी माझ्या मुलीसाठी जगत आहे. त्यावेळी मुलगी काही मागायची, तेव्हा मी काहीतरी बहाणा करायची. तिला सत्य सांगण्याची हिंमत होत नव्हती. जेव्हा मी नोकरीसाठी मुलाखत द्यायला जायची, तेव्हा मुलगी फोन करून विचारायची - ‘आई, नोकरी लागली का?’ मी हसून म्हणायची - ‘नाही बेटा’. मनातल्या मनात विचार करायची - आज पुन्हा तिला पिझ्झा खाऊ घालण्याचे आणि चित्रपट दाखवण्याचे वचन पूर्ण करू शकणार नाही. असेच चार महिने निघून गेले. आता सर्व ठीक आहे. तुम्ही स्वतःला अनाथ का म्हणत आहात? ‘मी चौथ्या वर्गात होते, तेव्हाच बाबांचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. त्यानंतर आईने दुसरे लग्न केले. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण मी कशाबशा त्याच घरात राहिले. एके दिवशी आईने मला आणि माझ्या बहिणीला गाडीत बसवून जवळच्या एका अनाथाश्रमात सोडून दिले. त्यानंतर आम्ही कधीच घरी परतलो नाही.’ रश्मीच्या कथेनंतर मी भोपाळला परतलो, जिथे संयुक्ता बॅनर्जी यांची भेट झाली. संयुक्ता लग्नाशिवाय आई झाली आहे. त्या सांगतात, ‘२००७ मध्ये मी बॉयफ्रेंडसोबत मुंबईत लिव्ह-इनमध्ये राहत होते. माझ्या कुटुंबाला सर्व काही माहीत होते. नंतर आम्ही लग्नही केले, पण नाते टिकले नाही. मी परत भोपाळला आले आणि २०१४ मध्ये आमच्यात परस्पर संमतीने घटस्फोट झाला.’ संयुक्ता म्हणते, ‘घटस्फोटानंतर आई होण्याचं माझं स्वप्न अपूर्ण राहिलं. मी विचार केला की एक मूल दत्तक घ्यावं. त्यासाठी मी अर्जही केला, पण अनेक वर्षे यश मिळालं नाही. तोपर्यंत माझं वय 35 वर्षं झालं होतं. त्याच दरम्यान कळलं की पती नसतानाही स्पर्म डोनरच्या मदतीने आई होता येतं. मी स्पर्म घेण्याचा निर्णय घेतला आणि आई झाले. अशा प्रकारे मी सिंगल मदर आहे.’
महापालिका म्हणतेय, गेल्यावर्षीच्या तुलनेत मुंबईच्या हवेतील गुणवत्तेत सुधारणा
समीर ऍप आणि संकेतस्थळाच्या आकडेवारीच्या आधारे केला महापालिकेला दावामुंबई : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे उपलब्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्यावर्षी १ ते १६ डिसेंबर २०२४ च्या तुलनेत यंदा सदर कालावधीदरम्यान हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे . १ ते १६ डिसेंबर २०२४ या कालावधीसाठी गेल्यावर्षी हवा गुणवत्ता निर्देशांक हा १६७ ते १५८ या दरम्यान होता. तर, यंदा १ ते १६ डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी हा निर्देशांक १०५ ते ११३ असा सुधारित झालेला आहे. महानगरपालिका प्रशासनाद्वारे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अविरतपणे व सातत्याने केले जात असलेले सर्वस्तरिय प्रयत्न याचे सकारात्मक परिणाम केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे जारी करण्यात आलेल्या हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या आकडेवारीमध्ये दिसून येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे..हवा निर्देशांक पाहण्याकरिता नागरिकांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे जारी करण्यात आलेली अधिकृत आकडेवारीच बघावी. यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे https://cpcb.nic.in हे संकेतस्थळ व भ्रमणध्वनीवर उपलब्ध असणारे ‘समीर’ हे अधिकृत ऍप वापरावे, असेही आवाहन डॉ. ढाकणे यांनी यानिमित्ताने केले आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे प्राधिकृत करण्यात आलेल्या अत्याधुनिक यंत्र-सामुग्रीद्वारे मुंबईतील क्षेत्रातील हवेची गुणवत्ता नियमितपणे तपासली जाते. ही तपासणी करण्यासाठी उच्च गुणवत्तेची हवा गुणवत्ता मापन यंत्रणा वापरली जाते. या यंत्रणेद्वारे उपलब्ध होणारी आकडेवारी ही अधिक विश्वासार्ह असते. यानुसार ही आकडेवारी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या https://cpcb.nic.in या संकेतस्थळावर आणि ‘समीर’ या अधिकृत भ्रमणध्वनी ऍपवर उपलब्ध करुन देण्यात येत असते.महापालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या सर्वस्तरिय प्रयत्नांमध्ये पाण्याच्या टँकरद्वारे डीप क्लीनिंग करण्यासह रस्ते स्वच्छ करणे, मिस्टींग मशीनद्वारे फवारणी करणे, योग्य उपाययोजना न करणा-या बांधकामांना कारणे दाखवा नोटीस बजावणे, कार्यस्थगिती आदेश देणे, या बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे. या अंतर्गत दिनांक १ ते १६ डिसेंबर २०२५ दरम्यान ३७६ ठिकाणी पाण्याच्या टँकरद्वारे रस्ते स्वच्छ करण्यासह डीप क्लीनिंग करण्यात आले, २५३ ठिकाणी मिस्टींग मशीनद्वारे फवारणी करण्यात आली, ३५३ प्रकरणी कारणे दाखवा नोटीस; तर १२१ ठिकाणी कार्यस्थगिती आदेश बजाविण्यात आले आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे यंदाच्या हिवाळ्यातील हवा गुणवत्तेत सुधारणा दिसून येत असून, ती मध्यम श्रेणीत आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल खात्याचे उप आयुक्त अविनाश काटे यांनी दिली आहे.या अनुषंगाने सर्व संबंधितांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे की, कचरा जाळणे अथवा तत्सम बाबी करणे टाळावे. त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे व प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करावे.
एका सुवर्णपर्वाचा अस्त, शिल्पकलेचा आदर्श घालून देणारे पद्मश्री राम सुतार काळाच्या पडद्याआड
नवी दिल्ली: शेकडो शिल्पांना आकार देऊन जगासमोर शिल्पकलेचा आदर्श ठेवणारे जागतिक ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार काळाच्या पडद्याआड गेले आहेत. यावर्षीच्या फेब्रुवारीमध्ये त्यांनी आयुष्याची शताब्दी साजरी केली असून वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर आज (१८ डिसेंबर) सकाळी ११ वाजता नोएडा येथे अंत्यसंस्कार आणि अंतिम विधी होतील, तर नोएडाच्या ए२ सेक्टर १९ ते सेक्टर ९४ या मार्गावर त्यांची अंत्ययात्रा निघेल अशी माहिती त्यांचे चिरंजीव अनिल सुतार यांनी दिली आहे.स्टॅच्यु ऑफ युनिटीला दिला आकारदेशभरात राम सुतार यांनी अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचा समावेश आहे. सुतार यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या गेल्या ६० वर्षांत २००हून अधिक भव्य शिल्प तयार केली. सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत यांच्यासह अन्य नेत्यांचेही शिल्प राम सुतार यांनी तयार केली आहेत. त्यांनी आपल्या हाताने विदेशातील महात्मा गांधींचे असंख्य पुतळे घडविले आहेत. संसदेसमोरील महात्मा गांधींचा कांस्य आणि पाषणातील पुतळाही त्यांनी घडविला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे जगभरात भारताच्या समृद्ध वारशाचे प्रतीके म्हणून उभे राहिलेले आहेत.'पद्मभूषण' आणि 'पद्मश्री'ने सन्मानितकला क्षेत्रातील योगदानाबद्दल राम सुतार यांना २०१६ मध्ये पद्मभूषण आणि १९९९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व राम सुतार यांना महाराष्ट्र राज्य सरकारचा २०२४ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.दगड आणि संगमरवरी शिल्पकलेवर प्रभुत्वराम सुतार यांचा जन्म १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे सुतार कुटुंबात झाला होता. बालपण अत्यंत कठीण संघर्षात जात असताना त्यांच्यामधील प्रतिभा त्यांचे गुरुजी श्रीराम जोशी यांनी हेरली. त्यांच्यामधील उद्योन्मुख कलाकार घडविण्यासाठी श्रीराम जोशी यांनी राम यांना मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित केले. जेजेमधून शिक्षण घेत असताना त्यांच्या उपजत असलेल्या प्रतिभेचा अधिक विकास झाला. राम सुतार यांनी जेजे स्कूलमध्ये सातत्याने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत असताना अभ्यासक्रमाच्या शेवटी त्यांनी मॉडेलिंगसाठी प्रतिष्ठित असे मेयो सुवर्णपदक मिळविले.सरकारी नोकरी सोडून धरली स्वतंत्र व्यवसायाची वाटछत्रपती संभाजीनगरमधील जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेण्यांचे पुनर्जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून १९५० मध्ये महत्त्वाचे काम करण्यात आले. त्यावेळी सुतारांनी मॉडेलर म्हणून अनेक शिल्पांना गतवैभव मिळवून देण्यासाठी काम केले. यानंतर १९५९मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयात दृकश्राव्य प्रसिद्धी संचालनालय प्रदर्शन विभागात तांत्रिक सहाय्यक म्हणून कार्यरत होते. मात्र, शिल्पकलेची जास्त आवड असल्याने त्यांनी नोकरी सोडून यामध्येच स्वतंत्र व्यवसाय करणे पसंत केले.पंडित नेहरुंनीदेखील केले होते कौतुकगांधी सागर धरणावरील चंबळ स्मारक हे सुतारांनी केलेले काम खूप चर्चेत आले होते. काँक्रीटच्या एकाच ठोकळ्यातून कोरलेली ४५ फूट उंच भव्य मूर्ती ही मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बंधुत्वाचे प्रतिक मानले जाते. या मूर्तीमध्ये एक माता दोन मुलांसह असल्याचे कोरीव काम पाहून तत्कालीन पंडित जवाहरलाल नेहरुदेखील खूश झाले होते.'आनंदवन'मध्ये आहे शिल्प उद्यानमहात्मा गांधींचा भव्य आकाराचा अर्धपुतळा ही त्यांच्या सुप्रसिद्ध कलाकृतींपैकी एक आहे. महात्मा गांधी शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने भारत सरकारने रशिया, इंग्लंड, मलेशिया, फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, बार्बाडोस आणि काराकास यांसारख्या देशांना महात्मा गांधींचे अर्धपुतळे भेट म्हणून दिले आहेत. हे पुतळे राम सुतार यांनी घडविलेले आहेत.नोएडा येथील राम सुतार यांचा स्टुडिओ संग्रहालयासारखा भव्य आहे. तिथे अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या भव्य प्रतिकृती तसेच अनेक मॉडेल्स मोठ्या संख्येने आहेत. त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी वडिलांच्या कलाकृती एकत्र प्रदर्शित करून 'आनंदवन' नावाचे एक विस्तीर्ण शिल्प उद्यान विकसित केले आहे. हे भारतामधील अनोखे कलादालन सूरजकुंड-भडखल तलाव रस्त्यावर स्थित आहे.
चारकोपमध्ये होणार भाजपचे रेकॉर्ड...
िचत्र पालिकेचे चारकोप िवधानसभासचिन धानजीउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील चारकोप विधानसभा भाजपचा मोठा बालेकिल्ला असून या विधानसभेत एकमेव उबाठाचा नगरसेवक आहे. तर भाजपचे पाच नगरसेवक आहेत. त्यामुळे एकमेव प्रभाग क्रमांक १९ हा उबाठाचा असला तरी भविष्यात याठिकाणी शिवसेनेला जाण्याची शक्यता कमी असून या ठिकाणच्या या विधानसभेतील सर्वच जागा या भाजप लढवण्याची दाट शक्यता आहे . त्यामुळे विधानसभेतील सर्वच जागा लढवल्या जाणाऱ्या भाजपचा हा एकमेव विधानसभा मतदारसंघ असेल.चारकोप विधानसभेत सन २००९ पासून भाजपचे आमदार म्हणून योगेश सागर निवडून येत आहेत. सन २०१७च्या निवडणुकीत युती न झाल्याने भाजपने सहाही जागेवर उमेदवार उभे केले आणि पाच जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आणले. यातील एकमेव प्रभाग १९ मध्ये उबाठाच्या शुभदा गुडेकर या निवडून आल्या होत्या; परंतु आता शुभदा गुडेकर या वयोमानानुसार निवडणूक न लढवता आपल्या मुलीला निवडणूक रिंगणात उतरवत असल्याने या प्रभागात भाजपचे कमळ फुलण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व जागी भाजपचे उमेदवार उभे करून सहाही नगरसेवक या विधानसभेत निवडून आणण्याचे रेकॉर्ड भाजपचे आमदार योगेश सागर यांना करण्याची संधी प्राप्त झाली आहे. प्रभाग १९ मध्ये उबाठाची माजी नगरसेविका असल्याने ही जागा शिवसेनेला सोडली जाते की भाजप स्वत: लढवते याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.लोकसभा निवडणुकीत चारकोप विधानसभेत मिळालेल्या मतदानाची आकडेवारी पीयूष गोयल, भाजप : १,२५,६३५ भूषण पाटील, काँग्रेस :४६,५४९ चारकोप विधानसभेचा निकाल योगेश सागर,भाजप : १,२७,३५५ यशवंत सिंह, काँग्रेस : ३६,२०१ दिनेश साळवी, मनसे : १५,२०० प्रभाग क्रमांक १९ (ओबीसी महिला)हा प्रभाग सर्वसामान्य महिला करता आरक्षित होता. परंतु हा प्रभाग आता ओबीसी महिला करता राखीव झाला आहे. या प्रभागातून उबाठाच्या शिवसेनेच्या शुभदा गुडेकर या निवडून आलेल्या असल्या तरी आता उबाठाकडून शुभदा गुडेकर या आपल्या मुलीला निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या विचारात आहेत. या प्रभागावर भाजपाचा दावा आहे. याप्रभागातून भाजपाच्यावतीने सुलभ जोशी, साळुंखे आणि रेश्मा टक्के यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराची चर्चा नाही. प्रभाग क्रमांक २० (सर्वसाधारण)हा प्रभाग यापूर्वी सर्वसाधारण होता आणि पुन्हा एकदा प्रभागाचे आरक्षण समान राहिले आहे. या प्रभागातून भाजपाचे बाळा तावडे हे निवडून आले होते. त्यामुळे भाजपाच्यावतीने पुन्हा बाळा तावडे यांचे नाव स्पर्धेत आहे. त्यामुळे बाळा तावडे जिल्हाध्यक्ष असल्याने स्वत: निवडणूक लढवतात की दुसऱ्याला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. तर उबाठाकडून राजन निकम आणि मनसेकडून दिनेश साळवी यांचे तर काँग्रेसकडून विनायक पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. प्रभाग क्रमांक २१ (महिला)हा प्रभाग ओबीसी महिलाकरता आरक्षित होता आणि या प्रभागातून प्रथम भाजपाच्या शैलजा गिरकर आणि त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची सुनबाई ऍड प्रतिभा गिरकर विजयी झाल्या होत्या. पण आता हा प्रभाग महिला झाल्यामुळे याठिकाणी भाजपाकडून ऍड प्रतीभा गिरकर यांचे नाव अग्रकमावर आहेत, तसेच याच प्रभागातून क्रांती गिरकर यांचेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे गिरकर कुटुंबातील कुणाच्या वाट्याला भाजपा उमेदवारी देतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. तर उबाठाकडून इच्छुकाचे नाव समोर नसले तरी काँग्रेसकडून मुच्छाला याचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे या प्रभागा भाजपा विरुध्द उबाठा अशीच लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक २२ (सर्वसाधारण)हा प्रभाग पूर्वी ओबीसी महिलाकरता राखीव होता आणि या प्रभागातून भाजपाच्या प्रियंका मोरे या निवडून आल्या होत्या पण आता हा प्रभाग खुला अर्थात सर्वसाधारण झाल्यामुळे भाजपात इच्छुकांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. या प्रभागातून विद्यमान नगरसेविका प्रियंका मोरे यांच्यासह कमलेश यादव आणि निखिल व्यास यांच्याही नावाची चर्चा आहे. तर उबाठाकडून आशिष पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या प्रभागात भाजपा विरुध्द उबाठा अशीच प्रमुख लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक ३० (सर्वसाधारण )हा प्रभाग यापूर्वी सर्वसाधारण महिला करता राखीव होता आणि या प्रभागातून भाजपाच्या लिना देहेरकर या निवडून आल्या होत्या. परंतु आता हा प्रभाग आता सर्वसाधारण झाल्यामुळे या प्रभागात भाजपाच्यावतीने लिना देहेरकर यांच्यासह काँग्रेसकडून संतोष राणे हे आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या विचारात आहे. तसचे उबाठाकडून उदय रुघाणी यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत आहे प्रभाग क्रमांक ३१ (महिला)हा प्रभाग पूर्वी ओबीसी राखीव होता आणि या प्रभागातून भाजपाचे कमलेश यादव हे निवडून आले होते. परंतु आता हा प्रभाग महिला राखीव झाला असून भाजपाकडून कमलेश यादव यांची मुलगी मनिषा यादव यांना निवडूक रिंगणात आहे. तर या प्रभागावर मनसेचा डोळा असून मनसेचे दिनेश साळवी या प्रभागातून आपली मुलगी मनिषा यांना निवडणूक रिंगणात आणण्याचा विचारात आहे. तर उबाठाकडून ज्योती मोरे यांच्याही नावाची चर्चा आहे. प्रभाग क्रमांक ३२( ओबीसी महिला)हा प्रभाग यापूर्वी ओबीसी महिलाकरता राखीव होता. याप्रभागातून काँग्रेसच्या स्टेफी केणी या निवडून आल्या होत्या. पण पुढे जात प्रमाणपत्र पडताळणीमध्ये त्या अपात्र ठरल्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरील तत्कालिन शिवसेनेच्या गीता भंडारी या पुढे ननगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. त्यामुळे हा प्रभाग पुन्हा ओबीसी महिलाकरता राखीव झाल्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराच्या नावाची चर्चा नाही. तर उबाठाकडून पुन्हा गीता भंडारी यांच्या नावाची चर्चा आहे. तर भाजपाकडूनही पुन्हा अर्चना वाडे यांचेच नाव चर्चेत आहे.
जिल्ह्यासाठी २८८ कोटींचा विकासनिधी
आराखड्यापैकी ६० टक्के निधी मिळाला, ५० टक्क्यांचे वितरणअलिबाग : राज्य सरकारने नुकतीच दोन वर्षे पूर्ण केली. मात्र आद्यपही रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठकच होत नाही. यामुळे निधीचा विनियोग कसा करायचा असा पेच निर्माण झाला होता. मात्र जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांना समान निधी देण्यावर एकमत झाले असून, जिल्हा वार्षिक आराखड्यापैकी ६० टक्के निधी म्हणजेच २८८ कोटी प्राप्त झाला आहे. त्यापैकी ५० टक्के निधी वितरित झाला असल्याची माहिती नियोजन विभागाकडून देण्यात आली.राज्य शासनाकडून रायगड जिल्हा नियोजन समितीकडे वार्षिक आराखड्यापैकी ६० टक्के म्हणजे २८८ कोटी निधी प्राप्त झालेला आहे. जिल्ह्याचा २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ४८१ कोटी वार्षिक आराखड्याला राज्यस्तरीय समितीने मंजुरी दिली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत ४९ कोटींचा वाढीव निधी जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. प्राप्त झालेला निधी हा आमदारांना मतदारसंघात विकास कामासाठी समप्रमाणात वाटपाचा निर्णय झालेला आहे. जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यापैकी ६० टक्के म्हणजेच २८८ कोटी निधी प्राप्त झालेला आहे. जिल्ह्यातील सातही आमदार हे सत्ताधारी पक्षातील आहेत. त्यामुळे विकासकामासाठी समप्रमाणात निधी प्रत्येक आमदाराला वाटप करण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी कामाचे प्रस्ताव सादर करून वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन मंजुरी दिली मिळाली आहे. त्यामुळे ५० टक्के निधी वितरित झाला असून, आचारसंहिता संपल्यावर उर्वरित निधी वितरित केला जाणार आहे. महाविकास आघाडी काळात तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे या आमदारांना कमी निधी देऊन त्याच्या मतदारसंघात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप करीत शिंदेसेनेने बंड पुकारले होते. यासाठी मध्य काढून आलेला निधीचे या वादाची पुनरावृत्ती होऊ नये समप्रमाणात वाटप आमदारमध्ये केले जाऊन संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.दरम्यान, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्षपद पालकमंत्री यांच्याकडे असते, तर आमदार विशेष निमंत्रित सदस्य असतात, तसेच जिल्ह्यातील इतर सदस्य निमंत्रित असतात. रायगडाचे पालकमंत्री पद अजूनही रिक्त आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पालकमंत्री पदावरून कुरघोडी सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्याला पालकमंत्री जाहीर झाला नसल्याने जिल्हा नियोजन समिती बैठक झालेली नाही आहे. पालकमंत्री नसल्याने जिल्ह्याचा विकास काहीसा रखडला आहे.जिल्हा वार्षिक आराखड्यापैकी २८८ कोटी म्हणजे ६० टक्के निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. यापैकी ५० टक्के निधी हा वितरित झाला आहे. जानेवारीच्या १५ तारखेपर्यंत पुढील वर्षीचे प्रस्ताव घेऊन जिल्हा वार्षिक आरखडा तयार करण्यात येणार आहे. तो जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.- उमेश सूर्यवंशी, (जिल्हा नियोजन अधिकारी)
उमेदवारी अर्ज फेटाळल्यास कोर्टात जाता येणार नाही!
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांआधी राज्य सरकारचा निर्णयमुंबई : राज्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याआधी या निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहणार असल्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.याविरुद्ध कोर्टात अपील करता येणार नाही. त्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम १४ (२) मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत यावेळी मान्यता देण्यात आली.यापूर्वी हा निर्णय नाकारला गेल्यास उमेदवार जिल्हा न्यायालयात अपील करण्याची मुभा होती. मात्र, वेगवेगळ्या कोर्टात अशी अपिले बराच वेळ प्रलंबित राहत असल्याने निवडणुका वेळेवर आणि ठरलेल्या वेळेत होऊ शकत नव्हत्या. त्यामुळे निवडणुका वेळेत पार पाडता याव्यात म्हणून हा बदल करण्यात आल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सोने तस्करीसाठी मुंबई विमानतळ मुख्य केंद्र! काय सांगतो डीआरआयचा अहवाल? जाणून घ्या सविस्तर
मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि पश्चिम बंगाल सारख्या हॉटस्पॉट ठिकाणी सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात झाली आहे. २०२४-२५ मध्ये, डीआरआयने १,०७३ किलो सोने जप्त केले ज्याची बाजार किंमत अंदाजे ७८५ कोटी रुपये आहे, असे अहवालात म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे जप्त केलेल्या सोन्याच्या प्रमाणात आणि आढळलेल्या प्रकरणांच्या संख्येत मुंबई विमानतळ हे सोने तस्करीचे मुख्य केंद्र म्हणून अव्वल ठरल्याचे महसूल गुप्तचर संचालनालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे.डीआरआयच्या मते, सोन्याची तस्करी करणारे सिंडिकेट एका संरचित नेटवर्कद्वारे काम करतात. परदेशात किंवा भारतात असलेले मास्टरमाइंड ऑपरेशन्ससाठी निधी देतात. तर आयोजक वाहकांची भरती करत असून वाहक लपवलेले सोने भारतात वाहतूक करतात आणि येथील स्थायिक हँडलर भारतातील नेटवर्कच्या प्रमुख सदस्यांना पुढील विक्रीसाठी सोने पाठवतात. कधीकधी दागिन्यांव्यतिरिक्त इतर स्वरूपात तस्करी केलेले सोने बेकायदेशीर सुविधांवर २४-कॅरेट बार स्वरूपात वितळवले जाते. जे दागिन्यांमध्ये रूपांतरित करून देशांतर्गत बाजारपेठेत एकत्रित विकले जाते.https://prahaar.in/2025/12/18/if-you-fly-kites-using-nylon-kite-string-during-the-makar-sankranti-festival-action-will-be-taken-pune-police-adopt-an-aggressive-stance/हवाई मार्ग, विशेषतः मध्य पूर्व आणि आग्नेय आशियातील मेट्रो आणि टियर-२ विमानतळांना जोडणारी विमाने, भारतात सोन्याची तस्करी करण्याचे प्रमुख मार्ग आहेत. तस्कर महिला, कुटुंबे आणि एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांसह विविध प्रवाशांच्या प्रोफाइलचा वापर करून भारतात सोने तस्करी करतात. वाढत्या प्रमाणात, तस्कर विमानाच्या पोकळीत सोने लपवत आहेत जेणेकरून नंतर क्रू, प्रवासी किंवा विमानतळ कर्मचारी शोधू शकतील. कधीकधी, आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान विमानात लपवलेले सोने विमानाच्या देशांतर्गत प्रवासादरम्यान प्रवाशांकडून परत मिळते. शिवाय, ट्रान्झिट प्रवासी शरीर लपवून सोन्याची तस्करी करतात आणि ते विमानतळ कर्मचाऱ्यांना देतात, असे अहवालात म्हटले आहे.मानवी शरीरात सोने लपवणे ही एक अधिक अत्याधुनिक आणि धोकादायक पद्धत आहे. सिंडिकेट मेणाच्या स्वरूपात सोन्याचे लहान कॅप्सूलमध्ये रूपांतर करतात, जे नंतर स्कॅनर आणि मॅन्युअल तपासणीद्वारे शोध टाळण्यासाठी शरीराच्या पोकळीत घातले जातात. हा ट्रेंड वाहकाच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या उच्च-जोखीम लपवण्याच्या तंत्रांकडे वाढत्या बदलाचे प्रतिबिंबित करतो, असे अहवालात म्हटले आहे. तर २०२४-२५ मध्ये सोने तस्करी करणाऱ्या वाहकांच्या प्रोफाइलवरून असे दिसून आले की, पकडण्यात आलेल्या बहुतेक व्यक्ती पुरुष होत्या. तथापि, पकडण्यात आलेल्या व्यक्तींपैकी एक दशांश महिलांची उपस्थिती, महिलांच्या सहभागाच्या वाढत्या ट्रेंडला अधोरेखित करते.
मेट्रो- ९, मेट्रो- २ बीचे निवडक टप्पे ३१ डिसेंबरपर्यंत सुरू होणार
मुंबई : मेट्रो लाईन ९ आणि मेट्रो लाइन २ बी या दोन नव्या मेट्रो मार्गांचे निवडक टप्पे ३१ डिसेंबरपर्यंत प्रवाशांसाठी खुले होणार आहेत. यामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही मार्गांच्या आंशिक उद्घाटनासाठीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली आहे.दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो-९ ही विद्यमान मेट्रो लाइन ७ ची विस्तारित लाईन आहे. अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो-७ मार्गकेची एकूण लांबी १३.५८ किमी आहे. दहिसर पूर्व आणि वेगाने विकसित होत असलेल्या मीरा-भाईंदर परिसरातील दळणवळण अधिक मजबूत करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व ते काशीगावदरम्यान मेट्रो सेवा सुरू होणार असून त्यामुळे उत्तर उपनगरांतील प्रवासाचा वेळ कमी होण्यासह वाहतूककोंडीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. लाइन ९ वरील नव्याने उभारण्यात आलेल्या स्थानकांवर मेट्रो गाड्या उभ्या असल्याचे दृश्य समोर आल्याने या मार्गाची तयारी जवळपास पूर्ण झाल्याचे स्पष्ट होते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार स्थानके, ट्रॅक आणि रोलिंग स्टॉक मोठ्या प्रमाणावर तयार असून अंतिम सुरक्षा तपासणी व एकत्रीकरणाशी संबंधित परवानग्यांची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, मुंबईभर मेट्रोचे जाळे विणले गेले असून काही सेवा सुरू झाल्या असून लाखो मुंबईकर मेट्रो सेवेचा लाभ घेत आहेत. यामुळे उपनगरीय रेल्वेवरील प्रवाशांचा ताण कमी झाला आहे.मेट्रो लाइन ९, मेट्रो लाइन २ बी हे नवे मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबईतील सर्वाधिक गजबजलेल्या रस्त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहेत. सध्या मोठ्या प्रमाणावर रस्ते वाहतुकीवर अवलंबून असलेल्या हजारो प्रवाशांचा दैनंदिन प्रवास सुलभ होण्याची अपेक्षा आहे. मेट्रो लाईन ९ ही मेट्रो लाइन ७ शी अखंडपणे जोडली जाणार असून त्यामुळे अंधेरी (पूर्व) ते मीरा-भाईंदरदरम्यान अधिक सुलभ आणि वेगवान संपर्क उपलब्ध होईल. यामुळे आधीच ताणाखाली असलेल्या उपनगरी रेल्वे सेवांवरील तसेच मुख्य रस्त्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे. मेट्रो लाईन २ बीच्या काही टप्प्यांचेही समांतरपणे उद्घाटन होणे हे मुंबई मेट्रो जाळ्याच्या सातत्यपूर्ण विस्ताराचे द्योतक आहे.
पूर्वमुक्त मार्गावरील आणिक पांजरपोळ दुहेरी बोगदा होणार अधिक प्रकाशमान
विद्युतभाराची क्षमता वाढवणारमुंबई : मुंबईतील पूर्वमुक्त मार्ग अर्थात इस्टर्न फ्री वेवरील आणिक पांजरपोळ भुयारी वाहतूक मार्गामध्ये मार्ग दिवे प्रकाशमान नसल्याने याठिकाणी विद्युत व्यवस्था कमजोर असल्याने यामध्ये अंधूक प्रकाश पसरतो. परिणाली या भुयारी वाहतूक मार्गामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. यामध्ये विद्युत व्यवस्थेसह आता एक्झॉस्ट प्रणालीही समक्ष केली जाणार आहे.मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील पूर्वमुक्त मार्गामध्ये बांधलेले भारतातील पहिले दुहेरी बोगदे ५०५ मीटर उत्तरेकडे आणि ५५५ मीटर दक्षिणेकडे इतक्या लांबीचे तसेच प्रत्येकी १८ मीटर रुंदी आणि ९ मीटर उंचीचे आहेत. हे दुहेरी बोगदे हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अर्थात एमएमआरडीएने आणिक पांजरपोळ लिंक रोड (एपीएलआर) प्रकल्पाचा भाग म्हणून बांधण्यात आले होते. हे दुहेरी बोगदे त्यानंतर मुंबई महानगरपालिकेस सुपुर्द करण्यात आले आहेत. जून २०१३ मध्ये हा मार्ग जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. अशा प्रकारची बोगदा प्रणाली ही शहराच्या अखत्यारीत तयार करण्यात आलेली असून ती शहरी वाहतुकीकरिता वापरली जाणारी भारतातील पहिली बोगदा प्रणाली म्हणून ओळखली जाते.पूर्वमुक्त मार्गाच्या दुहेरी बोगदयांमध्ये कराव्याच्या कामाच्या प्रमाणाची माहिती घेण्यासाठी महापालिकेच्या रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळ परिक्षण केली. या परिक्षणादरम्यान, या ठिकाणी असलेली विद्यमान प्रकाश व्यवस्था आणि इतर विद्युतभार एलटी कनेक्शनवर असल्याचे दिसून आले. विद्यमान विद्युत व्यवस्थेसाठी आवश्यक भार १२५ किलोवॅट आहे. परंतु येथील विद्युतभाराची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नवीन अद्ययावत प्रकाश व्यवस्था आणि एक्झॉस्ट प्रणालीसाठी आवश्यक भार सुमारे ५०० किलोवॅट आणि त्याहून अधिक वाढवण्यात येत आहे. त्यानुसार यांत्रिक व विद्युत विभागाच्यावतीने निविदा मागवून याचे काम हाती घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी सुमारे सव्वा पाच कोटी रुपयांचा खर्च केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे काम पुढील ९ महिन्यांमध्ये पूर्ण केले जाईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

29 C