सेबी रियल टाईम डेटा नियमात बदल करणार 'कन्सल्टेशन पेपर'बाजारात दाखल
मोहित सोमण: सेबी (Security Exchange Board of India SEBI) या भांडवली बाजारातील नियामक मंडळाने आणखी एक महत्वाचा कन्सल्टेशन पेपर बाजारात आणला आहे. नव्या नियमानुसार, आता आगामी काळात सेबीने गुंतवणूकदारांच्या ग्राहक संरक्षणासाठी नवा कायदा आणणार आहेत. कंपन्यांच्या टाईम लाईन डेटातील बदल यामध्ये सूचवले जाणार आहेत. नवीन नियमावली आखण्यापूर्वी सेबीने गुंतवणूकदार व नागरिकांकडून प्रतिक्रिया मागितल्या आहेत. २७ जानेवारीपर्यंत गुंतवणूकदार आपल्या प्रतिक्रिया अथवा अभिप्राय सेबीकडे नोंदवू शकतील.नव्या नियमावलीत काय असू शकते?नव्या नियमात, कंपनीचा लाईव डेटा केवळ एक्सचेंज शेअर करू शकतील अर्थातच तो ट्रेडिंग व संबंधित कारणासाठी असावा.नव्या नियमानुसार, ज्ञानवर्धनसाठी अथवा शिकण्यासाठी १ दिवसाच्या अंतराने असावा. त्वरीत डेटा शेअर करण्यास संस्थांना मनाई असेल.यापूर्वी जानेवारी २०२५ मधील सेबी पत्रकानुसार केवळ ३ महिन्यांच्या कालावधीनंतर हा डेटा शेअर करता येईल असे म्हणण्यात आले होते. तत्पूर्वी में २०२४ मध्ये सेबीच्या परिपत्रकानुसार, केवळ १ दिवसाच्या कालावधीनंतर शेअर करण्याची मुभा होती. त्यामुळे दोन्ही परिपत्रकाचा उदेश वेगळा होता असे सेबीने स्पष्ट केले. त्यामुळे मे २०२४ च्या परिपत्रकाने एक्सचेंजेसना शैक्षणिक उद्देशांसाठी एक दिवसाच्या विलंबाने अथवा नंतर डेटा सामायिक करण्याची परवानगी दिली होती असे सेबीने नव्या सूचनेत म्हटले आहे. तर जानेवारी २०२५ चे परिपत्रक त्यानंतर लागू होते आणि त्यात केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी किती जुना डेटा वापरला जाऊ शकतो हे नमूद केले आहे आणि त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे असेही पुढे सेबीने म्हटले.त्यामुळे नव्या पेपरनुसार दोन्ही अधिसूचनेत सामायिकता आणून भागभांडवलधारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी (विशेषतः गुंतवणूक व अभयासासाठी) आणल्याचे सेबीने म्हटले.यासह मे २०२४ च्या परिपत्रकाने एक्सचेंजेसना शैक्षणिक उद्देशांसाठी एक दिवसाच्या विलंबाने डेटा सामायिक करण्याची परवानगी दिली असून तर जानेवारी २०२५ चे परिपत्रक त्यानंतर लागू होते आणि त्यात केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी किती जुना डेटा वापरला जाऊ शकतो हे नमूद केले आहे आणि त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.नव्या लिस्टेड कंपन्यांच्या रिअल टाइम किमतीच्या डेटाचा वापर करणाऱ्या ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म, ॲप्स, वेबसाइट्स इत्यादींच्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी सेबीने २४ मे २०२४ रोजीच्या परिपत्रकाद्वारे 'थर्ड पार्टी रिअल टाइम किमतीचा डेटा सामायिक करण्यासंबंधीचे नियम प्रसिद्ध केले होते. या नियमांनुसार, कोणत्याही थर्ड पार्टीसह विविध प्लॅटफॉर्मसह, रिअल टाइम किमतीचा डेटा सामायिक केला जाणार नाही. केवळ जिथे सिक्युरिटीज बाजाराच्या सुव्यवस्थित कामकाजासाठी किंवा नियामक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अशी माहिती सामायिक करणे आवश्यक आहे या अशाच प्रकरणांचा अपवाद असेल असे सेबीने म्हटले आहे.गुंतवणूकदार शिक्षण आणि सल्ला/शिफारस यांमध्ये फरक करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे बाजाराचा डेटा, ज्यावर आधारित शैक्षणिक सामग्री विकसित केली जाते. शैक्षणिक उद्देशांसाठी थेट डेटा वापरणे हे शुद्ध शैक्षणिक कार्यांच्या व्याप्तीच्या बाहेर आहे कारण यामध्ये भविष्यातील किमतींचा अंदाज लावण्यासाठी सध्याच्या डेटाचे विश्लेषण करणे समाविष्ट आहे जे गुंतवणूक सल्लागार (Investment Advisors)/संशोधन विश्लेषक (Research Advisors) कार्यांच्या व्याख्येत येते असे सेबीने पुढे म्हटले.आणखी सेबीने काय म्हटले?शैक्षणिक उद्देशांसाठी किमतीचा डेटा प्रदान करण्यासाठी एक दिवसाचा विलंब हा MIIs (Market Infrastructure Institutions) आणि बाजार मध्यस्थांनी पाळायचा किमान तांत्रिक विलंब आहे. तर तीन महिन्यांच्या विलंबाचा निकष ही एक सामग्री आधारित अट आहे जी शिक्षकांनी पाळणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांची सामग्री पूर्णपणे शैक्षणिक मानली जाईल असेही सेबीने म्हटले.SEBI ला भागधारकांकडून एक दिवसाचा विलंब खूप कमी असल्याबद्दल आणि एक दिवसाच्या विलंबाच्या डेटाचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याबद्दल टिप्पण्या प्राप्त झाल्या ज्यामुळे विलंब कालावधी वाढवण्याची गरज निर्माण झाली. अंतर्गत स्तरावर, तीन महिन्यांचा विलंब खूप जास्त आहे आणि जर हा कालावधी कमी केला तर शैक्षणिक माहिती अधिक प्रभावी होऊ शकते, यावरही विचारविनिमय करण्यात आला. त्यामुळे यातून मध्यम मार्ग काढण्याचा सेबी प्रयत्न करत असल्याचे दिसते.
Delcy Rodriguez। व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर, लॅटिन अमेरिकन देश आणि अमेरिकेतील संबंध आणखी बिघडले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ते स्वतः व्हेनेझुएलाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी असा इशाराही दिला आहे की जर देशाच्या अंतरिम सरकारचे कार्यकारी अध्यक्ष त्यांना सहकार्य करत नसतील तर अमेरिका दुसऱ्या फेरीच्या कारवाईपासून मागे हटणार नाही. व्हेनेझुएलाच्या कार्यकारी […] The post “व्हेनेझुएला कोणत्याही बाह्य शक्तीच्या नियंत्रणाखाली नाही” ; ट्रम्पच्या इशाऱ्याने अंतरिम अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्जचा संताप appeared first on Dainik Prabhat .
लग्नाबद्दलच्या ‘त्या’प्रश्नावर श्रद्धा कपूरने दिले खास उत्तर
Shraddha Kapoor | अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. याद्वारे ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कातही राहते. नुकतेच तिला लग्नाबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने दिलेल्या उत्तराची चांगलीच चर्चा रंगली आहे. सध्या श्रद्धा राहुल मोदीला डेट करत असून अनेकदा दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियाद्वारे समोर आले आहेत. अलीकडेच श्रद्धाने तिच्या ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनसाठी […] The post लग्नाबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर श्रद्धा कपूरने दिले खास उत्तर appeared first on Dainik Prabhat .
Crime News :दोस्तानेच दोस्ताचा गळा कापला;मृत्यदेह डोंगराळ भागात फेकुन दिला
छ.संभाजीनगर : मित्रच बनाला मित्राचा दुश्मन..संभाजी नगरमध्ये मोबाईल आणि पैशांच्या वादातुन एक सराईत गुन्हेगारानी मित्राने दुसऱ्या साथीदारासह आपल्या स्वताच्याच मित्राला संपवल्याची घटना घडली आहे..छावणी परिसरात एका २० वर्षीय तरुणाची अत्यंत गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जटवाडा येथील डोंगराळ भागात फेकून देण्यात आला होता.यानंतर या घटनेमुळे तेथील परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.शकील अरेफ शेख (वय) २० असं मृत्य युवकाच नाव आहे.असं माहितीतुन स्पष्ट झालं आहे..या घटने अगोदर बळी गेलेल्या शकील अरेफ शेख यांच्या आईला ही सराईत गुन्हेगार सय्यद सिराज अली यांने धमकवल्याच माहितीतून समोर आलं आहे...बेपत्ता होण्यापूर्वी मुख्य आरोपी सिराज याने शकीलच्या आईला फोन करून मोबाईल आणि पैसे परत न केल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी दिली होती. ४ जानेवारीच्या रात्री शकील हा सिराजसोबत घराबाहेर पडला अन् त्यानंतर त्याचा संपर्क तुटला.ते काल मंगळवारी सकाळी मिटमिटा परिसरातील डोंगर भागात नागरिकांना पडलेला एक मृतदेह आढळला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तपास केला असता, तो मृतदेह शकीलचा असल्याचं समजले..या घटनेने परिसरात दहशत पसरली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी सुरक्षिततेसंदर्भात खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे आणि आरोपींच्या ताब्यातील इतर गुन्हेगारांना लवकर पकडण्याची प्रक्रिया सुरू आहे.या घटनेने मोबाईल आणि पैशांच्या वादातून मित्रांमध्ये होणाऱ्या संघर्षाची गंभीरता पुन्हा एकदा दाखवली आहे.
टायटन्सने जबरदस्त तिमाही निकाल नोंदवल्यानंतर शेअर दे दणादण!
मोहित सोमण: टाटा एंटरप्राईजेस समुहाची फ्लॅगशिप कंपनी टायटन (Titan) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आज नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. सकाळी सत्राच्या सुरुवातीलाच शेअर ४% पेक्षा अधिक पातळीवर उसळला होता. आज दुपारी १२.४४ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी ४.५१% वाढ झाल्याने कंपनीचा शेअर ४.५१% उसळला असून ४२९७.१० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. कंपनीने आपल्या तिसऱ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली. यातील माहितीनुसार, इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ४०% वाढ महसूलात नोंदवली आहे. विविध व्यवसायांची वर्गवारी केल्यास घरगुती व्यवसायात (Domestic Business) मध्ये ज्वेलरीत ३८%, तनिष्क मिया, झोया, बीयोन या व्यवसायांत ४०%, कार्टलेन ४२%, घड्याळे १३%, आय केअर १६%, इमर्जिंग बिझनेस १४% वाढ झाली आहे. तर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एकूण स्टोअर्समध्ये अथवा दालनात ज्वेलरीत ५४, तनिष्क २३, कार्टलेन २४, घड्याळ २२, आयकेअर १७, इमर्जिंग बिझनेस दालनात २ दालनाने वाढ झाली आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एकूणच वाढलेल्या मागणीमुळे, तसेच सणाच्या कालावधीत वाढलेल्या वाढीमुळे, तसेच एएसपी (Average Selling Prices ASP) वाढ झाल्याने कंपनीच्या ज्वेलरी व्यवसाय महसूलात अंतिमतः वाढ झाल्याचे कंपनीने यावेळी स्पष्ट केले. घड्याळाच्या व्यवसायात इयर बेसिसवर १३% वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. यावेळी या कंपनीने दोन अंकी वाढ नोंदवली असून कंपनीच्या सोनाटा, फास्टट्रॅक या प्रोडक्ट उत्पादनातील विक्रीतील वाढीचा कंपनीला झाला. या कंपनीच्या तिमाही बेसिसवर १७% वाढ इयर ऑन इयर झाली आहे. आयकेअर बाबतीत कंपनीने १६% वाढ एकूण घरगुती व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढलेल्या प्रोडक्ट लाईन मुळे झाली असल्याचे म्हटले. तर उदयोन्मुख बाजारपेठेत (Emerging Business) मध्ये कंपनीने इयर ऑन इयर बेसिसवर २२% वाढ नोंदवली आहे. दरम्यान कंपनीच्याच तनीरा (Taneria) बाबतीत विक्रीत इयर ऑन इयर बेसिसवर ६% घसरण झाली आहे. त्यामुळे एकूणच आकडेवारीवर यांचा काही परिणाम झाल्याचे कंपनीने नमूद केले होते. आंतरराष्ट्रीय ज्वेलरी व्यवसायात (Tanishq, Mia, Cartlane) इयर बेसिसवर तब्बल ८१% वाढ झाली असल्याने अंतिमतः कंपनीने चांगले प्रदर्शन नोंदवले आहे. यामुळेच शेअर्समध्ये आज मोठी वाढ झाली आहे.कंपनीने चांगला निकाल नोंदवल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ४ ते ५% वाढ झाली होती. कंपनीच्या शेअरने ४३१२.१० रूपये प्रति शेअर ही इंट्राडे उच्चांक पातळी गाठली होती. गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये ५.९२% वाढ झाली असून महिन्यात शेअर्समध्ये १३.९७% वाढ तर संपूर्ण वर्षभरात शेअर्समध्ये २२.४९% वाढ झाली आहे. तर इयर टू डेट बेसिसवर (YTD) बेसिसवर शेअर्समध्ये ५.९२% वाढ झाली आहे.
Gemini AI: आता न्यू इयर रिझोल्यूशन फेल होणार नाहीत, जेमिनी बनेल तुमचा पर्सनल कोच
Gemini AI: नवं वर्ष सुरू होताच अनेकजण फिटनेस, करिअर, बचत किंवा नवीन कौशल्य शिकण्याचे संकल्प करतात. पण योग्य नियोजन नसल्यामुळे हे संकल्प काही आठवड्यांतच अपयशी ठरतात. मात्र २०२६ मध्ये Google Gemini AI या समस्येवर उपाय घेऊन आला आहे. गुगलने १० प्रभावी प्रॉम्प्ट्स दिले आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे न्यू इयर रिझोल्यूशन नीट प्लान करू शकता, […] The post Gemini AI: आता न्यू इयर रिझोल्यूशन फेल होणार नाहीत, जेमिनी बनेल तुमचा पर्सनल कोच appeared first on Dainik Prabhat .
शनिदेवाच्या दर्शनाआधीच काळाने डाव साधला; मिनी बसच्या धडकेत तीन मित्रांचा जागीच मृत्यू
अहिल्यानगर : इगतपूरीजवळील गिरणारे येथील काही तरुण पालखी घेऊन शिर्डीला गेले होते. त्यापैकी काही तरुण शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी रिक्षाने निघाले होते. मात्र, दर्शनाआधीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. राहुरीहून भरधाव वेगात येणाऱ्या मिनी बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर मिनी बस रस्त्याच्या कडेला उलटली.राहुरी–शनीशिंगणापूर मार्गावर उंबेरे गावाजवळ भरधाव मिनी बस आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात इगतपुरी तालुक्यातील गिरणारे गावातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, इगतपूरीजवळील गिरणारे येथील काही तरुण पालखी घेऊन शिर्डीला गेले होते. त्यापैकी काही तरुण शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी रिक्षाने निघाले होते. मात्र, दर्शनाआधीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. राहुरीहून भरधाव वेगात येणाऱ्या मिनी बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर मिनी बस रस्त्याच्या कडेला उलटली.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, रिक्षातील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या अपघातात दीपक जगन डावखर (२२), आकाश मनोहर डावखर (२२) आणि दीपक विजय जाधव (२२) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिघेही नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी तालुक्यातील गिरणारे गावचे रहिवासी होते.दरम्यान, या अपघातात रूपेश गणेश भगत (१९) आणि रोशन गंगाधर डावखरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला?, मिनी बसचा वेग किती होता? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
बुधवार विशेष: भारतीय अर्थव्यवस्थेपुढील वास्तविक संधी व आव्हाने
मोहित सोमणभारतीय अर्थव्यवस्था सुधरूढ स्थितीत असली तरी निश्चितच काही आव्हाने कायम आहेत. भारतात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती होत असली अजून शाश्वत विकास बाकी आहे. आताच आपण जपानला मागे टाकत ४ ट्रिलियन रूपयांची अर्थव्यवस्था झालो आहोत. हे मान्य आहे. पण निश्चितच निमशहरी भागात अद्याप खूप काम करणे बाकी यावर दुमत नाही. गेल्या वर्षभरात सेमीकंडक्टर, आयटी, इन्फ्रास्ट्रक्चर, इतर सेवा क्षेत्रातील रोजगार निर्मितीत वाढ झाली. आरबीआयच्या माहितीप्रमाणे, किमान ४० मिलियन (४० दशलक्ष) नोकऱ्यांची निर्मिती झाली स्पष्टच आहे. किंबहुना भारताला २०४८ पर्यंत विकसित भारत बनवायचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. त्यादृष्टीने अर्थव्यवस्थेतील आव्हाने पाहता फेब्रुवारीतील अर्थसंकल्प अत्यंत वास्तववादी बनवणे क्रमप्राप्त असेल. सध्या सगळ्याच राजकीय पक्षांची लोकप्रिय घोषणेची अगतिकता आहे हे आपण समजू शकतो. याचा सर्वाधिक फटका अर्थव्यवस्थेला बसतो. प्रामुख्याने भारतातील करदात्यांच्या पैशाला महत्व आहे. प्रामुख्याने या अर्थसंकल्पात मुख्य बाब आवश्यक म्हणजे कृषी क्षेत्राशिवाय इतर क्षेत्रांना प्राधान्य देणे.वास्तविक आजही जीडीपीतील ६०% पेक्षा जास्त योगदान केंद्रित असलेल्या शहरांकडून जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागात नव्या रोजगार संधीची कवाडे उघडी करणे गरजेचे आहे ते होतही आहे. परंतु त्याची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे.सेवा क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात ग्रामीण व निमशहरी भागात विस्तारले गेल्यास त्यांचा शहराकडील ओढा कमी होईल. मोठ्या प्रमाणात स्थलांतर थांबेल आज कित्येक प्रमाणात शेतीला निसर्गाची कृपादृष्टी नाही. प्रामुख्याने वेळेवर पाऊस न पडणे, वाढलेली जमीनीची धूप, घसरलेली उत्पादकता अशा कारणांमुळे ही रोजगार संधी व व्यवसायाच्या संधी लोकसंख्येच्या दृष्टीने अपुऱ्या पडत आहे. सरकारने अर्थातच सरकारने मध्यंतरी प्रतिदिनी रक्कम मनरेगा योजनेतंर्गत ३७० रुपयांवर वाढवली असली तरी ती विशिष्ट काळापर्यंत मर्यादित असते. उर्वरित वर्षभर शेतकऱ्यांना शेती व कुक्कुटपालनावर अवलंबून रहावे लागते. सध्या दुष्काळात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असताना शिकलीसवरलेली लोके शहराकडे वळू लागली आहेत व गावे ओस पडली आहेत.आजही ६५% भारत ग्रामीण भागात राहतो. तरीही त्यातून रोजगार निर्मितीच्या संधी पुरेशा नाहीत. केवळ कृषी क्षेत्रावर अवलंबून न राहता या क्षेत्राशी संलग्न असलेल्या एफएमसीजी (Fast Moving Consumer Goods FMCG), कंज्यूमर ड्युरेबल्स (ग्राहक उपयोगी वस्तू), आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इ कॉमर्स अशा कित्येक क्षेत्राची दारे मोठ्या व्यापक पातळीवर उघडली पाहिजेत. गेल्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात सरकारने आपले प्राधान्य एमएसएमई (MSME), एआय (Artificial Intelligence), ई कॉमर्स, शेती तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, अक्षय उर्जा निर्मिती यावर अधिक प्रमाणात दिला. मात्र या नव्या युएसने लादलेल्या अतिरिक्त शुल्काचा फटका या संवेदनशील क्षेत्रात बसला. वास्तविक पाहता देशात खूप मोठ्या प्रमाणात वस्तूंच्या उपभोगात वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रातील मागणी वाढत आहे. असे असले तरी वास्तविकपणे छोट्या शहारत विविध कारणांमुळे गुंतवणूकदार आजही गुंतवणूक करण्यास कचरतात. त्यामुळे मोठ्या उद्योजकांचे प्राधान्य मोठी शहरांना असल्याने ग्रामीण भागातील क्वालिटी बँक लाईफ सुधारण्याचे आव्हान आजही कायम आहे.जर आपण अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास जगभरातील तज्ञ व आर्थिक सेवा क्षेत्रातील संस्थेकडून भारताच्या अर्थव्यवस्थेचे कौतुक होत आहे. भारताला मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करताना आपल्या वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यास यश मिळाले आहे. केवळ गेल्या २०२५-२६ आर्थिक वर्षाचा विचार केल्यास मोदी सरकारने ६.८१ लाख कोटींची भांडवली गुंतवणूक केली ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधेत वाढ होणे अपेक्षित आहेच पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मिती होण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र अपुऱ्या सुविधा, अथवा अपुऱ्या कौशल्य विकासामुळे जगभरात वेगाने वाढलेल्या तंत्रज्ञानाबरोबर सामावून घेण्यासाठी ग्रामीण तरुणांना पुरेश्या संधी उपलब्ध नाहीत. निश्चितच मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात स्कील डेव्हलपमेंट प्रोगाम अंतर्गत या संधी निर्माण केल्या. याशिवाय प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, पीएम विश्वकर्मा योजना यांसारख्या एकाहून एक सरस योजना आणल्या ज्याचा प्रचंड लाभ तरूणांना होत आहे.परंतु जागतिकीकरणात नंतर परिस्थिती अत्यंत वेगाने बदलत आहे. एकच तंत्रज्ञान ६ महिन्याच्यावर राहत नाही. सातत्याने त्यात डेव्हलपमेंट होते. नवीन तंत्रज्ञान बाजारात येते त्यानुसार काळानुरूप सुसंगत असे बदल करणे यावर देशाचे लक्ष केंद्रित झाले पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सनंतर आता ब्लॉकचेन, फिनटेक, मशिन लर्निंग या क्षेत्रात अफाट संधी उपलब्ध आहेत. भारतातील या क्षेत्रातील गुंतवणूक १ लाख कोटीहून एका वर्षात येण्याची शक्यता असताना मोठ्या प्रमाणात शहरात जागांची, कौशल्य असलेल्या व्यक्तींची कमी आहे. शाश्वत विकासाच्या अंतर्गत शहरासोबत ग्रामीण भागातील लोकांना यांचे प्रशिक्षण दिल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती वाढू शकते. वाढत असलेल्या पायाभूत सुविधा, बांधकामांचा वापर केल्यास मोठी आयटी पार्क उभारण्यासाठी पुरेशी जागा खेडोपाडी उपलब्ध आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार निर्मितीचा फायदा होऊ शकतो. हेल्थकेअर क्षेत्रातही मोठ्या संधी बाजारात आहेत. मोठ्या प्रमाणात भारत व काही देशात द्विपक्षीय करार झाल्याने मोठ्या प्रमाणात निर्यातीच्या संधी विशेषतः अगदी आदिवासी क्षेत्रापासून निमशहरी भागापर्यंत आहे. त्यांचा लाभ करुन देणे यावरही उद्योजकांनी लक्ष लागणे गरजेचे आहे. निश्चितच भूराजकीय अस्थिरतेच्या काळात संकटे येतात नफा कमी होतो परंतु युएस वगळता इतर देशातील आपल्या निर्यातीत वाढ होणे शक्य होणार आहे. देश बदलत आहे अर्थात आव्हाने कायम आहे.संधी आव्हान ही कायम असतात पुढेही राहतील पण या कराच्या पैशाचा विनिमय जर निवडणूक व राजकारणापेक्षा उत्पादकतेवर वाढवल्यास त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा अर्थकारणात होईल त्यानंतर लोकप्रिय योजनांची घोषणा क्रमप्राप्त होणार नाही. कारण या लोकप्रिय योजनेतून अनेकदा पैशाचा अपव्यय होतो. त्यापेक्षा उत्पादकता वाढवल्यास शेतकरी व व्यापारी, अथवा कष्टकरी माणसाला झळ बसणार नाही. वित्तीय तूटही गेल्या दहा वर्षांत नियंत्रणात आली असली तरी सरकारने योजनात्मक विकास व भांडवली खर्चात वाढ केल्याने निश्चितच क्रेडिट वाढ होत असताना त्याचा भार अर्थव्यवस्थेवर पडतो. त्यामुळे सरकारलाही वित्तीय तूट विकास व जगभरातील अर्थव्यवस्था या तिन्ही मुद्यावर संतुलित भूमिका घेणे आवश्यक असेल स्वाभाविकपणे निती आयोग यावर आपले पुढील धोरण स्पष्ट करेल. तत्पूर्वी मोठ्या प्रमाणात कॉपोर्रेट कर संकलनात व उत्पन्नात वाढ होत असताना वैयक्तिक कर संकलनात घसरण होत आहे ही देखील चिंतेची बाब आहे. लोकांनीही प्रामाणिकपणे कर भरणे हे क्रमप्राप्त असले तरी समाजाच्या बाजूनेही या तरतूदीचे संपूर्ण अवलंबन दिसत नाही. दोन्ही बाजूने हातात हात घालून ही विकासाची यात्रा सुरु करावी लागेल. नव्या अर्थसंकल्पाकडून खूप आशा आकांक्षा लोकांच्या आहेत. निश्चितच यामध्ये मूलभूत सुविधा व मूलभूत विकासावरही लक्ष केंद्रित ह़ोऊ शकेल अशी आशा करूयात. दरम्यान हे असताना रूपयांचे अवमूल्यन रोखणे हे देखील आरबीआयच्या प्राधान्यक्रमाचा भाग असणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच सहकार्य शाश्वत विकास विकसित भारत करण्यासाठी वेगाने करावा लागेल असे दिसते.
वर्षा उसगांवकर यांनी आपल्या आईबद्दल केला मोठा खुलासा, मी माझ्या आईला घेऊन...
मुंबई : मराठी चित्रपटविश्वात अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ गाजवला. अगदी कमी वयात आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरु करून वर्षा उसगावकर यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटात देखील आपली अभिनयाची छाप पाडली. अगदी उतार वयातही त्यांनी मालिकेत आपले काम सुरु ठेवलेच आहे. मागच्या वर्षीच बिग बॉस सीझन ५ मधेही वर्ष उसगावकर यांनी सहभाग घेतला होता. वर्ष उसगावकर यांचा चाहता वर्गही जास्त आहे. आजही त्यांचे चित्रपट अगदी आवडीने पाहिलेही जातात. वर्षा उसगावकर यांच्या खासगी आयुष्यापेक्षा त्यांचे कामच जास्त चर्चेत राहिले आहे.आता त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास वर्ष उसगावकर यांचे सासरे म्हणजेच प्रसिद्ध संगीतकार रवी शंकर शर्मा. यांनी वर्षा यांच्यासोबतच त्यांच्या मुलालाही संपत्तीतून बाहेरचा रस्ता दाखवला बेखल केले.आणि आपली संपूर्ण संपत्ती आपल्या मुलींच्या नावावर केली.वर्षा उसगांवकर यांचा मातोश्रीच्या शेजारी बंगला आहे. त्यामुळे'बाळासाहेब ठाकरे वर्षा उसगांवकर यांचे शेजारी होते. नुकताच एका वर्षा उसगांकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक किस्सा सांगत आपल्या आठवणी ताज्या केल्या आहेत.वर्षा उसगांवकर या म्हणाल्या की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे घर शेजारी होते. त्यामुळे मला छान २४ तास पोलिस संरक्षण असायचे. मला कधीही कलानगरमध्ये जानाता भीती वाटली नाही. रात्रीचे कितीही वाजूदेत पोलिस संरक्षण कायम. मला ते घरीबोलावून गोष्टी सांगायचे. कितीतरी जोक्स सांगायचे. त्यांचा स्वभाव खूप जास्त खेळकर होता. मला नेहमी म्हणायचे की, काय गं… गोव्याची मुलगी कसं काय गोव्याहून इथं आलीस.गोव्याची मुलगी दामूकडे राहतेस.. असे ते कायम बोलायचे. एकदा माझी आई आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला खूप जोक्स वगैरे सांगितले.. ते बोलायचे की, मी बियर पितो.. दुपारी पण ही कॅलरीशिवाय बिअर आहे. मी त्यावेळी म्हटले बापरे हे बियर पितात आणि असे सांगतात पण… म्हणजे असा गमतीशीर त्यांचा स्वभाव होता. मग ते मिथूनला फोन लावणार याला फोन लावणार.. मग त्यांच्याशी आमचे बोलणे करून देणार, असा त्यांचा स्वभाव होता खूप जास्त छान.. त्यांचे मार्मिक बोलणे मला कायम आवडायचे.
अकोला : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काहीही घडू शकते' याची प्रचिती अकोट आणि अंबरनाथ नगरपरिषदेच्या निमित्ताने आली आहे. विचारधारेच्या पलीकडे जाऊन सत्तेसाठी परस्परविरोधी पक्ष एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेषतः अकोट नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाने थेट 'एमआयएम'ला सोबत घेतल्याने आणि अंबरनाथमध्ये काँग्रेसशी हातमिळवणी केल्याने भाजपच्या 'काँग्रेसमुक्त भारत' आणि विचारधारेच्या घोषणेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अकोट नगरपरिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने एक नवा प्रयोग केला आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 'अकोट विकास मंच' स्थापन करण्यात आला असून, यामध्ये भाजप आणि एमआयएम (MIM) एकत्र आले आहेत. या मंचाची विशेष बाब म्हणजे यामध्ये शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती हे सर्वच एकमेकांचे विरोधक सहभागी झाले आहेत. दुसरीकडे, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेतही धक्कादायक समीकरण समोर आले आहे. येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने थेट काँग्रेसशी युती केली आहे. राज्याच्या राजकारणात भाजप आणि शिंदे गट एकत्र असताना, स्थानिक पातळीवर मात्र सत्तेसाठी भाजपने काँग्रेसचा हात धरल्याने एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.https://prahaar.in/2026/01/07/the-increasing-number-of-illegal-immigrants-poses-a-threat-of-widespread-social-crises-concerns-expressed-by-prominent-experts/देवेंद्र फडणवीस यांचा स्थानिक नेत्यांना सज्जड इशाराया सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अकोटमध्ये भाजपची एमआयएमसोबत आणि अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत झालेली हातमिळवणी ही पक्षाच्या विचारधारेला धरून नसून, अशा प्रकारच्या युतीला भाजपमध्ये कोणतेही स्थान नाही, अशा कडक शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला. काँग्रेस आणि एमआयएम या दोन पक्षांसोबत भाजपची युती होणे कधीही शक्य नाही. स्थानिक पातळीवर जर अशा हालचाली झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. पक्षाची विचारधारा गहाण ठेवून केलेली कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. केवळ नाराजी व्यक्त करून न थांबता, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ज्या कुणीही स्थानिक नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेतृत्वाला अंधारात ठेवून ही युती केली आहे, त्यांची चौकशी केली जाईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. यामुळे अकोट आणि अंबरनाथमधील भाजप नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.नेमकं काय घडलं अकोट नगरपरिषदेत?अकोट नगरपरिषदेच्या ३५ सदस्यीय सभागृहात भाजपने ११ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा मान मिळवला आणि माया धुळे या थेट नगराध्यक्षपदी निवडून आल्या. मात्र, सभागृहात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेले बहुमत (१८ पेक्षा जास्त सदस्य) भाजपकडे नव्हते. हे बहुमत जुळवण्यासाठी भाजपने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एमआयएम (५ जागा) आणि इतर मित्रपक्षांना सोबत घेऊन 'अकोट विकास मंच'ची स्थापना केली आहे. भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर यांची या आघाडीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या नव्या आघाडीमुळे एक विलक्षण तांत्रिक बदल झाला आहे. एमआयएमच्या नगरसेवकांना आता भाजपचे गटनेते रवी ठाकूर यांनी काढलेला 'व्हिप' (आदेश) पाळावा लागणार आहे. आगामी १३ जानेवारी रोजी होत असलेल्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीत ही आघाडी आपली ताकद दाखवणार आहे. या दिवशी मंचातील सर्व सदस्य एकत्रितपणे मतदान करतील, ज्यामुळे भाजपचा उपनगराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजप आणि एमआयएम हे दोन परस्परविरोधी विचारधारेचे पक्ष सत्तेसाठी एकत्र आल्याने अकोटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.हा तर शिवसेनेचा घात...नगरपरिषदेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने थेट काँग्रेसचा हात धरला आहे. या 'अकल्पनीय' युतीमुळे अंबरनाथमध्ये भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होणार असला तरी, राज्याच्या राजकारणात मात्र या 'अभद्र' युतीवरून वादाचे काहूर माजले आहे.अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले यांनी नगराध्यक्षपदी बाजी मारली. मात्र, नगरपरिषदेत बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. सभागृहात भाजपचे १६, काँग्रेसचे १२ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ४ असे एकूण ३२ नगरसेवक एकत्र आल्याने बहुमताचा आकडा पूर्ण झाला आहे. विशेष म्हणजे, २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने आपल्या पारंपरिक कट्टर विरोधकाशी (काँग्रेस) घरोबा केला आहे. या युतीवर शिंदे गटाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. एकीकडे देशपातळीवर 'काँग्रेसमुक्त भारत'च्या गर्जना करणाऱ्या भाजपने स्थानिक पातळीवर सत्तेसाठी शिवसेनेचा घात केला आहे, अशी टीका शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी केली आहे. ही युती केवळ 'तडजोड' नसून शिवसेनेच्या पाठीत खुपसलेला खंजीर असल्याची भावना शिंदे समर्थकांमध्ये आहे. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातच असा पेच निर्माण झाल्याने हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Krantijyoti Marathi Medium School Film : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२६ रोजी हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतीज्योतीविद्यालय-मराठीमाध्यम‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॅाक्स अॅाफिसवर चांगली कामगिरी केली असून, तब्बल ३ .९ १ कोटी रुपये कमावले आहेत. ही मराठी चित्रपटासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. अजूनही प्रेक्षकांकडून उत्तम प्रदिसाद चित्रपटाला मिळताना दिसत आहे. मराठी […] The post मराठी चित्रपटाची सुरुवात दणक्यात! ‘क्रांतीज्योती मराठी-माध्यम’ चित्रपटाची प्रेक्षकांना भुरळ; पाच दिवसात… appeared first on Dainik Prabhat .
काँग्रेस आणि एमआयएमसोबत झालेल्या युतीवर फडणविसांची प्रतिक्रिया; थेट कारवाईचा दिला इशारा
Devendra Fadnavis | भाजपने अकोट नगरपरिषदेत बहुमतासाठी चक्क एमआयएम पक्षासोबत युती केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. भाजपने एमआयएमसह इतर सर्व प्रमुख पक्षांना सोबत घेत अकोट विकास मंच स्थापन केला आहे. या नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तर दुसरीकडे अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेसची युती झाली. यावरुन भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होण्यास […] The post काँग्रेस आणि एमआयएमसोबत झालेल्या युतीवर फडणविसांची प्रतिक्रिया; थेट कारवाईचा दिला इशारा appeared first on Dainik Prabhat .
8th Pay Commission। आठव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या आधीही राज्य कर्मचाऱ्यांसाठी आठव्या राज्य वेतन आयोगाची स्थापना करण्याची घोषणा करणारे आसाम हे देशातील पहिले राज्य बनले आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा लवकर आठव्या वेतन आयोगाचे फायदे मिळतील का? याविषयी सध्या चर्चा सुरु आहे. आसाम सरकारचा प्रमुख उपक्रम 8th […] The post राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या आधी मिळणार आठवा वेतन आयोग ? ; वाचा सविस्तर माहिती appeared first on Dainik Prabhat .
Nashik Accident : भरधाव वाहनाची मागून दुचकीला जोरदार धडक! नवरा बायकोचा जागीच मृत्यु; थरारक अपघात
नाशिक : महाराष्ट्रामध्ये वाहनांच्या अपघातांची मालीका सुरुच.. काल मंगळवारी साक्री-शिर्डी राष्टिय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ढोलबारे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात नवापूर तालुक्यातील आमलीपाडा (जि. नंदुरबार) येथील नवरा बायकोचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संदीप दासू गावित (वय ३५) व त्यांची पत्नी आशा संदीप गावित (वय ३२) अशी मृतांची नावे आहेत. समोर आलेल्या माहितीतून समजलं आहे.. हे दांपत्य नवापूरहून येवला येथे आपल्या मुलांना भेटण्यासाठी दुचाकीवरून प्रवास करत होते. सकाळी ७.३० सुमारास ढोलबारे गावाजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली.या धडकेनंतर दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती समोरून येणाऱ्या पिकअप वाहनावर आदळली. या भीषण अपघातात संदीप आणि आशा गावित यांचा जागीच मृत्यू झाला. क्षणात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दोन चिमुकल्या मुलांचे आई-वडील कायमचे हिरावले गेले आहेत.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. साक्री–शिर्डी महामार्गावरील अपूर्ण काम, दिशादर्शक फलकांचा अभाव, दुभाजक नसणे आणि धोकादायक वळणे यामुळेच अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप स्थानिकांनी केले आहेत..
Crime News : जुन्नर येथील खून प्रकरणातील फरार आरोपी वारजे पोलीसांकडून अटक
ओझर : जुन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत नोंद असलेल्या गुन्हा दाखल असलेल्या खून प्रकरणातील फरार आरोपीस वारजे पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या अटक केली आहे. सदर गुन्ह्यात फिर्यादी शरद निंबा साबळे (वय ४२ वर्षे, व्यवसाय – शेती, रा. निमगिरी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि ५ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता, मौजे निमगिरी, ता. […] The post Crime News : जुन्नर येथील खून प्रकरणातील फरार आरोपी वारजे पोलीसांकडून अटक appeared first on Dainik Prabhat .
संंजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट! तीन नेत्यांची नाव घेत केला ‘हा’मोठा दावा म्हणाले…
Sanjay Raut : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे भाजपवर सडकून टीका केली होती. भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यांनी केलेल्या आरोपांनंतर राजकारण चांगले तापले होते. त्यानंतर अजित पवार आणि भाजपच्या नेत्यांमध्ये वार पलवावर सुरू झाले असून राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. या सगळ्या घडामोडींवर उबाठा […] The post संंजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट! तीन नेत्यांची नाव घेत केला ‘हा’ मोठा दावा म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .
Amit Deshmukh | भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुखांसंदर्भात केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. ‘भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, ‘असं रवींद्र चव्हाण यांनी भाष्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसकडून निषेध व्यक्त केला जात आहे. याच दरम्यान, लातूरमधील विविध सामाजिक संघटना आणि […] The post “भाजपच्या चुकीमुळे लातूरच्या जनतेला नाहक त्रास होऊ नये, येत्या काळात उत्तर देऊ”; लातुर बंदची हाक देताच अमित देशमुखांचे आवाहन appeared first on Dainik Prabhat .
निर्माता मंदार देवस्थळीने शशांक केतकर नंतर 'या'अभिनेत्रीनेचेही थकवले ३ लाख
मुंबई : हे मन बावरे, होणार सून मी या घरची यासारख्या प्रसिद्ध मालिकांमधला प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर हा नेहमी सोशल मिडीयावर कायम सक्रिय असतो. त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील तो ओळखला जातो. सोशल मीडियाद्वारे तो दैनंदीन जीवनातील विविध गोष्टींवर, समस्यांवर आपली मत मांडत असतो.या अभिनेत्याने नुकतच 'हे मन बावरे' या सीरिअलच्या निर्मात्यावर म्हणेजच मंदार देवस्थळी वर पैसे थकवण्याचे गंभीर आरोप केले होते. हे मन बावरे ही सीरिअल संपून जवळपास ७ वर्ष झाली तरी माझे ५ लाख काही मला मिळाले नाही. मंदारने सतत तारखा दिल्या तसेच पैसे देण्याच्या थापा मारल्या. अशी वक्तव्य करत, याबद्दलचे सर्व पुरावे त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून चाहत्यांसोबत शेअर ही केले होते.
सरकारी लाडक्या बहिणींकडून वसूली, शासकीय कर्मचाऱ्यांनी लाटले प्रती महिना १५ हजार
मुंबई : लाडकी बहीण योजनाचा लाभ घेण्यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहे. या नियमांत बसणाऱ्या महिलांनाच लाभ मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. तरीही अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.बुलढण्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला योजनेचा लाभमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाकडून महिला व बालकल्याण विभागाला विविध विभागात कार्यरत असलेल्या १९६ कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली होती. या योजनेचा १९६ महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्या प्रकरणी चौकशी केली असता १९० कर्मचारी हे अर्धवेळ आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे आढळल्याने ते पात्र ठरत आहेत.उरलेल्या ६ शासकीय कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत प्रत्येकी १६ हजार असे एकूण १९ हजार रुपये रक्कम वसूल करण्यात आले. या महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे. लवकरच त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे या कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे.
Shefali Shah: अभिनेत्री शेफाली शाह सध्या तिच्या अभिनयामुळे यशाच्या शिखरावर आहे. मात्र वैयक्तिक आयुष्यात तिला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शेफालीने तिच्या पहिल्या लग्नातील त्रासदायक अनुभवांबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे. शेफाली शाहने अभिनेता हर्ष छाया यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र काही वर्षांतच हे नातं तुटलं आणि दोघांचा घटस्फोट झाला. या नात्यात […] The post Shefali Shah: शेफाली शाहचा खुलासा; पहिल्या लग्नात सहन केला भावनिक छळ, माजी पतीसोबतचं नातं होतं वेदनादायक appeared first on Dainik Prabhat .
supreme court on UPSC। सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या मुद्द्यावर एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालय यूपीएससी परीक्षेशी संबंधित एका याचिकेवर सुनावणी करत आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, एकदा अर्जदाराने यूपीएससी परीक्षेत आरक्षणाचा लाभ घेतला की, तो सामान्य श्रेणीतील जागांवर नियुक्तीसाठी पात्र नाही. हे निरीक्षण सामान्य श्रेणीसाठी महत्त्वाचे मानले जाते. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध […] The post “…तर मग सर्वसाधारण जागांवर अधिकार नाही” ; UPSC प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द appeared first on Dainik Prabhat .
“ठाकरे ब्रँड फक्त बाळासाहेब होते, आता सगळे संपलेत”; निलेश राणेंची बोचरी टीका
Nilesh Rane : ऐन थंडीच्या दिवसांमध्ये मुंबईतील पारा राजकारणामुळे चांगलाच तापला आहे. येत्या काही दिवसांवर पालिका निवडणूक येऊन ठेपलेली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. मुंबईसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षाने देखील कंबर कसली असून, रणनिती आखण्यात आली आहे. शिवसेना शिंदे यांच्या पक्षाने मुंबई महापालिकेसाठी दिग्गज नेत्यांवर प्रचाराची धुरा सोपवली आहे. त्यानुसार […] The post “ठाकरे ब्रँड फक्त बाळासाहेब होते, आता सगळे संपलेत”; निलेश राणेंची बोचरी टीका appeared first on Dainik Prabhat .
‘आमच्या नजरा…’; व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या कारवाईवर भारताचे मोठे विधान
S Jaishankar on Venezuela। जगभरातील देश व्हेनेझुएलाच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. चीनसह अनेक देशांनी अमेरिकेच्या कृतींचा तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी याविषयी बोलताना, “व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या लष्करी कारवाई आणि राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरोसह त्यांच्या पत्नीच्या अटकेमुळे उद्भवलेल्या संकटादरम्यान भारताची सर्वात मोठी चिंता व्हेनेझुएलाच्या जनतेची सुरक्षा आहे.” असे त्यांनी म्हटले आहे. जयशंकर लक्झेंबर्गमध्ये […] The post ‘आमच्या नजरा…’; व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या कारवाईवर भारताचे मोठे विधान appeared first on Dainik Prabhat .
Reena Roy: पडद्यावरील पहिली ‘नागिन’ जिने प्रेक्षकांची मने जिंकली
Reena Roy: बॉलीवूडमध्ये काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी प्रत्येक भूमिकेला ताकद, आत्मविश्वास आणि वेगळी छाप दिली. दिग्गज अभिनेत्री रीना रॉय यांचा आज वाढदिवस आहे. १९७० आणि १९८० च्या दशकात ‘नागिन’, ‘कालीचरण’सारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सुरुवातीचं आयुष्य रीना रॉय यांचा जन्म ७ जानेवारी १९५७ रोजी मुंबईत झाला. त्यांचं मूळ नाव सायरा अली […] The post Reena Roy: पडद्यावरील पहिली ‘नागिन’ जिने प्रेक्षकांची मने जिंकली appeared first on Dainik Prabhat .
मांजरी: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नवीन प्रभागात चांगल्या पद्धतीने विकासाचे नियोजन करण्याची जाण शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये आहे. त्यामुळे मतदारांनी त्यांना पालिकेत पाठवावे,” असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपआण्णा घुले यांनी केले. प्रभाग क्रमांक १५ मधील शिवसेना उमेदवार राजश्री विकी माने, संदीप मारुतराव लोणकर, सीमा सुधीर घुले व निलेश दिलीप घुले यांच्या […] The post PMC Election : विकासाची जाण असलेल्या शिवसेना उमेदवारांना पालिकेत पाठवा; माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप आण्णा घुले यांचे आवाहन appeared first on Dainik Prabhat .
Pune : जनता आमच्या पाठीशी उभी- मारुती आबा तुपे
हडपसर : “कोणी कितीही आरोप केले तरी आमचे कामच त्याचे उत्तर आहे. आम्ही समाजासाठी प्रामाणिक आणि सच्चे कार्यकर्ते म्हणून काम करत असल्यामुळे जनता आमच्या पाठीशी उभी राहते आणि प्रभागातून विजय निश्चित आहे,” असा विश्वास स्थायी समितीचे माजी सदस्य मारुती आबा तुपे यांनी व्यक्त केला. हडपसर-सातववाडी प्रभाग क्रमांक १६ मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मारुती आबा […] The post Pune : जनता आमच्या पाठीशी उभी- मारुती आबा तुपे appeared first on Dainik Prabhat .
सत्ता मिळवण्यासाठी भाजपची चक्क एमआयएमसोबत युती; अनोख्या राजकीय प्रयोगाची सर्वत्र चर्चा
Akot Nagar Panchayat | भाजपने सत्तेसाठी आपली तत्व बाजूला ठेवून एक मोठा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. अकोटच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपने एक अनोखा राजकीय प्रयोग केला आहे. एमआयएमसह इतर सर्व प्रमुख पक्षांना सोबत घेत अकोट विकास मंच स्थापन केला आहे. अकोटमध्ये सत्तेसाठी चक्क एमआयएमसोबत आघाडी केल्याने राज्यभरात जोरदार चर्चा सुरु झाली. याआधी अंबरनाथमध्येही भाजपने स्थानिक […] The post सत्ता मिळवण्यासाठी भाजपची चक्क एमआयएमसोबत युती; अनोख्या राजकीय प्रयोगाची सर्वत्र चर्चा appeared first on Dainik Prabhat .
प्रचारात निष्काळजीपणा! फटाके लावले अन् उडाला आगीचा भडका; पळ काढणाऱ्यांवर 'ही'अभिनेत्री चिडली
मुंबई : सध्या महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक उमेदवार आपल्या पक्षाचा, आपल्या चिन्हाचा प्रचार हा जोरात करताना दिसत आहे. यंदा २९ महापालिकांमध्ये निवडणुकांसाठी एकाच दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. तर एकाच दिवशी सर्वच महापालिकांचे निकाल देखील जाहीर होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवार हा कंबर कसून प्रचाराला लागला आहे. कुठे मोठमोठ्या रॅली, तर कुठे प्रचार सभांचे आयोजन आणि तेवढ्याच उत्साहाने उमेदवारांचे कार्यकर्ते सुद्धा प्रचाराच्या कामाला लागले आहेत.मात्र काही वेळेस अतिउत्साह होतो आणि होत्याच नव्हतं होऊन बसत. असाच काहीसा प्रकार मुंबईत घडला आहे. एका उमेदवाराच्या कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे मोठा अनर्थ घडला आहे. हा प्रकार एका बॉलीवूड अभिनेत्रींच्या आसपासच्या परिसरात घडल्याने या प्रकारविरोधात आता बॉलिवूड अभिनेत्रीन संताप व्यक्त केला आहे.अभिनेत्री डेझी शाह हीच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये तिने प्रचंड संताप व्यक्त केला असून , घडलेला प्रकार किती भयानक होता याबद्दल सांगितले आहे.
भारतीय घरात २५००० टन सोन्याच्या अनुत्पादक साठा 'ही'अहवालातील धक्कादायक माहिती समोर
मोहित सोमण: सध्या भारतात मोठ्या प्रमाणात भूराजकीय अस्थिरतेचा परिणाम विशेषतः कमोडिटीत जाणवत असताना आयआयएफएल कॅपिटलच्या 'आउटलूक २०२६' धक्कादायक माहिती समोर आणली आहे. या नव्या अहवालानुसार भारतातील घरांमध्ये असलेला सुमारे सोन्याचा साठा सुमारे २५००० टन असून सध्याच्या अस्थिरतेतील परिस्थितीत तो घसरणीचा अथवा अस्थिरतेचा अंडकरंट पचवत आहे. सध्या भूराजकीय अस्थिरतेच्या काळात व जागतिक अनिश्चिततेच्या काळात चलनातील स्थिरता,आर्थिक लवचिकता (Economical Flexibility) आणि उपभोगाला (Consumption) आधार देत, देशाच्या सर्वात महत्त्वाच्या मॅक्रोइकॉनॉमिक शॉक ॲब्सॉर्बरपैकी एक म्हणून शांतपणे उदयास आला असे अहवालाने नमूद केले आहे. या नव्या आयआयएफएल कॅपिटलच्या 'आउटलूक २०२६' अहवालानुसार, घरातील सोन्याचे अंदाजे बाजारमूल्य आता भारताच्या जीडीपीच्या जवळपास ८०% आहे. ही वाढ सोन्यात नागरिकांनी अथवा गुंतवणूकदारांनी केलेली दीर्घकालीन संचय आणि गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतींमध्ये झालेल्या तीव्र वाढीमुळे झाली असल्याचेही अहवालात म्हटले गेले आहे.अहवालात पुढे म्हटले आहे की, घरातील सोन्यापैकी केवळ एक छोटासा भाग तारण म्हणून वापरला जातो ज्यामुळे सोन्याच्या तारणावर आधारित कर्जवाटपात वाढीसाठी मोठा वाव मिळतो. एकीकडे बँका आणि एनबीएफसी सुरक्षित कर्जवाटप वाढवत असताना या साठ्याचा धोका न वाढवता हा साठा पतवाढीला आधार देतो असे अहवालाने म्हटले आहे. एकीकडे असुरक्षित कर्ज वितरणात वाढ झाली असताना तणावाची चिन्हे दिसत असताना एनपीए नियंत्रित करण्यास बँकेसमोर आव्हाने आहेत.सप्टेंबर महिन्यात जीएसटीचे तर्कसंगतीकरण झाले होते. त्यानंतर केवळ ५ व १८% हे दोनच पर्याय ठेवण्यात आले होते. ग्राहक उपयोगी वस्तूत मोठ्या प्रमाणात दरकपात झाल्याने व बाजारातील खरेदी वाढल्याने वैयक्तिक उपभोगही (Personal Consumption) वाढले. यावर आधारित निरिक्षण नोंदवताना अहवालाने म्हटले आहे की,'कर कपातीमुळे उपभोगाला चालना मिळाली आहे. वाढ सामान्य पातळीवर परत येईल,उपभोगाला चालना देणे सहसा खूप कठीण असत. भारतीय कुटुंबांकडे सुमारे २५००० टन सोने आहे आणि त्यापैकी तारण म्हणून वापरल्या जाणाऱ्या सोन्याचे प्रमाण खूप कमी आहे'. त्यामुळे अद्याप मोठ्या प्रमाणातील सोन्याचा साठा बाहेर आलेला नाही असे अहवालाचा निष्कर्ष आहे.याशिवाय अहवालात अधोरेखित केले आहे की, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये जागतिक सोन्याच्या किमतींमध्ये तीव्र वाढ होत असतानाच, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सोन्याची खरेदी वाढवली होती. या संयोजनामुळे घरातील सोने आणि आरबीआयची खरेदी रुपयाच्या अवमूल्यनाचा प्रभाव कमी करण्यास मदत झाली आणि ज्या वेळी परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीवर दबाव होता, त्या वेळी भारताचा बाह्य ताळेबंद (Fiscal Accountibility) मजबूत झाला, असेही त्यात म्हटले गेले.एकीकडे विदेशी चलनाचे चांगले व्यवस्थापन केल्याने मोठ्या प्रमाणातील परकीय चलन साठा मोठ्या प्रमाणात आरबीआयच्या साठ्यात वाढला होता. त्यामुळे समाधानकारक साठा असल्याने व एकूणच मालमत्तेमध्ये सोन्याचा वाटा वाढत असल्याने, धोरणकर्त्यांना आता चलनातील अस्थिरता व्यवस्थापित करण्यासाठी अधिक लवचिकता मिळाली असल्याचे अहवालात म्हटले आहे. गेल्या वित्तीय पतधोरण समिती बैठकीत आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी परकीय चलन मुबलक प्रमाणात असल्याचे स्पष्ट करत ट्रेडिंग व आयातीत देय दिल्यानंतरही ११ महिने बॅलन्स ऑफ पेमेंटसाठी परकीय चलन उरेल असे म्हटले होते. यावरच अहवालाने एक प्रकारे शिक्कामोर्तब केले.हे उपभोगासाठीही महत्त्वाचे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. सोन्याच्या तारणावरील कर्ज कुटुंबांना उत्पन्नाची वाढ मंदावल्यावर उच्च-किमतीच्या कर्जाचा अवलंब न करता मंदीच्या काळात खर्च सुलभ करण्यास अनुमती देते, ज्यामुळे मागणी स्थिर होण्यास मदत होते. याविषयी बोलताना अहवालात,'कर्जवाटप संपूर्ण अर्थव्यवस्थेला नसून कुटुंबांना केले जाते, मोठ्या प्रमाणातील सोन्याचे तारण भारतात सुरक्षित कर्जवाटप वाढीसाठी आणि कौटुंबिक उपभोगासाठी मजबूत संधी निर्माण करते. तारण म्हणून ठेवलेल्या सोन्याचे प्रमाण एकूण मालकीच्या सोन्याच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे सोन्यावरील कर्जवाटप वाढू शकते' असे म्हटले. दरम्यान हे सोन्याचे कवच सुप्त भांडवल म्हणून काम करून या सामर्थ्याला आधार देते तसेच तणावाच्या काळात उपलब्ध असले तरी तेजीच्या काळात पूर्णपणे वापरले जात नाही ज्यामध्ये अनुत्पादकतेचाही मुद्दा अहवालाने यावेळी उपस्थित केला.
राज्यात पुन्हा थंडी वाढणार! तापमानाचा पारा घसरला; पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका कायम
मुंबई : नववर्षाच्या दुसऱ्याच आठवड्यात राज्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. उत्तर भारतात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली असून तापमानचा पारा ही घसरत चाला आहे, याचा मोठा परिमाण हा महाराष्ट्रावर होताना दिसत आहे. पंजाब, चंदीगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरियाणा, झारखंडसह उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये नवीन थंडीची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच उत्तरेकडील थंडीचा परिणाम विदर्भात जाणवू लागला असून विदर्भात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.गोंदियामध्ये या हंगामातील सर्वात कमी तापमान ७ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. तसंच धुळे आणि नागपूरमध्येही तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत थंडीचा कडाका राहण्याची शक्यता आहे.दुसरीकडे पुण्यात मागील तीन दिवसांत किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यात थंडीपासून काहीसा दिलासा पुणेकरांना मिळाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस पुण्यातील हवामानाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रातील काही भागात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.याखेरीज वर्धा येथे ८.४ अंश सेल्सिअस, अमरावती येथे ९.३ अंश सेल्सिअस, ब्रह्मपुरी येथे९.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात सर्वाधिक किमान तापमान बुलढाणा व यवतमाळ येथे प्रत्येकी १५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. मागील काही दिवसांपासून विदर्भात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रात्रीच्या तापमानात वाढ होऊन किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.हवामान खात्यानुसार पुढील काही दिवस विदर्भात किमान तापमान कमीच राहण्याची शक्यता आहे.
India US Relations। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी असलेल्या संबंधांवर चर्चा केली आहे. ट्रम्प यांनी यावेळी बोलताना,”दोघांमध्ये चांगले संबंध आहेत, परंतु रशियाचे तेल खरेदी करण्यासाठी भारतावर लादलेल्या मोठ्या शुल्कामुळे पंतप्रधान मोदी नाराज आहेत” असे म्हटले आहे. हाऊस रिपब्लिकन सदस्यांच्या रिट्रीट दरम्यान पंतप्रधान मोदींशी झालेल्या त्यांच्या संभाषणाचा संदर्भ देत ट्रम्प म्हणाले […] The post ट्रम्प यांना त्यांची चूक कळली, म्हणाले,”पंतप्रधान मोदी माझ्यावर खूश …” ; भारतासोबतच्या संबंधांबद्दल केले ‘हे’ विधान ? appeared first on Dainik Prabhat .
काँग्रेस नेत्यावर मशिदीबाहेर धारदार शस्त्रांनी वार; उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर ताब्यात
Hidayat Patel | काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर राजकीय वादातून 6 जानेवारी रोजी जीवघेणा चाकू हल्ला झाला होता. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अकोट तालुक्यातील मोहाळा गावात हल्लेखोराने त्यांच्यावर हा हल्ला केला होता. हल्ला केल्यानंतर मारेकरी फरार झाले होते. मात्र संशयित आरोपी उबेद पटेलला रात्री ताब्यात घेण्यात आले आहे. उबेद पटेल हा 24 […] The post काँग्रेस नेत्यावर मशिदीबाहेर धारदार शस्त्रांनी वार; उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर ताब्यात appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार एमसीडी अर्थात दिल्ली मनपाने तुर्कमान गेट परिसरातील अनधिकृत मशिद आणि इतर बेकायदा बांधकाम पाडले. मोठ्या पोलीस बंदोबस्तात मनपाने कारवाई केली. कारवाई सुरू असताना मुसलमानांनी दगडफेक करुन शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी बळाचा वापर करुन परिस्थितीवर लगेच नियंत्रण मिळवले.अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी दिल्ली मनपाने दहा बुलडोझर, १५ जेसीबी, ७० डंपर यांचा वापर केला. मनपाच्या कारवाईवेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच एक हजार पोलीस जवानांचा बंदोबस्त घटनास्थळी होता. मशिदीकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेटिंग लावून बंद करण्यात आले होते.दगडफेक आणि पोलिसांचा लाठीमारकारवाई सुरू असतानाच स्थानिक लोक आणि बाहेरून आलेल्या नागरिकांनी विरोध करत जमावाने बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या आणि गॅस बुलेट्सचा वापर केला. पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले होते.अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली आहे. ज्यांनी दगडफेक आणि हिंसाचार केला, त्यांची ओळख सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे केली जाईल. कोणत्याही उपद्रवी व्यक्तीला सोडले जाणार नाही.न्यायालयाचा आदेश काय होता ?डिसेंबर महिन्यात एमसीडीने रामलीला मैदानातील अवैध अतिक्रमण आणि अनधिकृत व्यावसायिक उद्योग थांबवण्याचे आदेश दिले होते. तपासात असे आढळले की, सरकारी जमिनीचा वापर नकाशात नसलेल्या मोठ्या बांधकामासाठी आणि लग्नाचा हॉल याचा वापर खासगी कार्यक्रमांसाठी केला जात होता. दिल्ली उच्च न्यायालयाने मशिदीला लागून असलेला दवाखाना बेकायदा घोषित केला होता.
कल्याण ज्वेलर्सच्या तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ४% वाढ
मोहित सोमण: देशातील मोठ्या प्रमाणात ज्वेलरी ब्रँड चेनपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने (Kalyan Jewellers) आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ज्वेलर्सला पहिल्या तिमाहीतील एकूण महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३१% वाढ नोंदवली आहे. तर कंपनीच्या एकूण परदेशी कामकाजातील महसूलात (International Operations) इयर ऑन इयर बेसिसवर ३१% वाढ झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ज्वेलर्सच्या मध्यपूर्वेतील व्यवसायात पहिल्या तिमाहीत इयर ऑन इयर बेसिसवर २६% वाढ झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले. याशिवाय जागतिक व्यवसायात गेल्या तिमाहीतील तुलनेत १५% एकत्रित महसूल (Consolidated Revenue) वाढला आहे. कल्याण ज्वेलर्सने दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात अक्षय तृतीया, इतर सण, व लग्नाच्या हंगाम या कारणामुळे गेल्या तिमाहीत मोठी वाढ झाली आहे.संपलेल्या तिमाहीत कल्याण ज्वेलर्सने भारतात नवी १० दालने (Showroom) उघडली आहेत. तर युएसमध्ये १ व इतर ठिकाणी ८ दालने उघडली आहेत. मोठ्या प्रमाणात कंपनीची व्हर्टिकल व हॉरिझोंटल वाढ झाल्याने कंपनीच्या महसूलात व विस्तारात वाढ झाली आहे. कंपनीच्या मते, ज्वेलरीचा विक्रीतही वाढ झाली असल्यासह वाढत्या मागणीमुळे कंपनीने आपली वाढ नोंदवली आहे. सध्या कंपनीची भारत व मध्यपूर्वेतील मिळून एकूण ४०५ दालने आहेत.कंपनीने यापूर्वी कॅन्डेरे नावाचा ब्रँड लाँच केला होता. एकूणच बाजारातील वाढ झाल्यानंतर कल्याण ज्वेलर्सने आपल्या निवेदनात,:आमच्या कॅन्डेरे या डिजिटल-फर्स्ट दागिन्यांच्या प्लॅटफॉर्मने, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत, नुकत्याच संपलेल्या तिमाहीत अंदाजे ६७% महसूल वाढ नोंदवली. कॅन्डेरेने मे २०२५ च्या उत्तरार्धात आपली ब्रँड मोहीम सुरू केली. ब्रँड मोहीम सुरू झाल्यानंतरच्या कालावधीत, मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत, शोरूममधील ग्राहकांची उपस्थिती, वेब ट्रॅफिक आणि महसूल वाढीमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण सुधारणेमुळे आम्ही उत्साहित आहोत.' असे म्हटले आहे.सकाळच्या सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये थेट ४% वाढ झाली आहे. सकाळी १० वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ३.७३% वड झाल्याने शेअर ५१८.७० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. सध्या कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ५१६९५ कोटी रुपये आहे. गेल्या एक आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ७.५९% वाढ झाली असून संपूर्ण वर्षभरात मात्र -२७.७७% घसरण झाली आहे. इयर टू डेट (YTD) बेसिसवर ७.७५% वाढ झाली आहे. दिवसभरात कंपनीने ५२०.५५ रूपये प्रति शेअरवर इंट्राडे उच्चांक नोंदवला आहे.
पुणे : पुणे शहर आणि परिसरातील दैनंदिन वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या नागरिकांसाठी २०२६ हे वर्ष 'दिलासादायक' ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (MSIDC) पुणे जिल्ह्यातील दोन अत्यंत महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, २०२५ मध्ये या प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी मिळाली होती आणि आता प्रत्यक्ष जमिनीवर कामाला सुरुवात झाल्याने पुणेकरांच्या प्रवासाचा वेग वाढणार आहे. पुणे शहराच्या अंतर्गत भागात आणि उपनगरांना जोडणाऱ्या रस्त्यांवरील वाहनांचा प्रचंड ताण लक्षात घेऊन हे दोन प्रकल्प आराखड्यात समाविष्ट करण्यात आले होते. MSIDC तर्फे राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पांमुळे पुण्यातील महत्त्वाचे जंक्शन्स आणि कनेक्टिव्हिटी पॉईंट्स सुलभ होणार आहेत. यामुळे शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच शहराबाहेर जाणारा प्रवासही कमी वेळेत पूर्ण होईल. २०२५ हे वर्ष या प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया आणि मंजुरीमध्ये गेले. मात्र, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व तांत्रिक अडथळे दूर करून प्रत्यक्ष यंत्रणा कामाला लागली आहे. हे दोन्ही मार्ग पुण्यातील दळणवळणाच्या दृष्टीने 'लाईफलाईन' ठरणार असल्याचे बोलले जात आहे. या कामाच्या नियोजित वेळापत्रकामुळे आगामी काळात पुणेकरांना खड्डेमुक्त आणि सिग्नलमुक्त प्रवासाचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे.https://prahaar.in/2026/01/07/thane-metro-opening-date-revealed-by-pratap-sarnaik-will-connect-mumbai-to-thane-seamlessly/हडपसर ते यवत प्रवासाचे चित्र बदलणार!नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मंजुरीनंतर, हडपसर-यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या दोन मेगा प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कामाला आता गती मिळणार आहे. तब्बल ५,२६२ कोटी रुपये खर्चून उभारला जाणारा हडपसर-यवत उड्डाणपूल पुणे-सोलापूर हायवेवरील कोंडी कायमची संपवण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. हडपसरमधील भैरोबा नाळा ते यवत दरम्यान होणाऱ्या या सहा पदरी उड्डाणपुलामुळे सोलापूरकडे जाणारी वाहतूक आता विनाअडथळा पार पडणार आहे. जून २०२५ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती, मात्र आता त्याच्या लांबीत सुमारे ४.५ किलोमीटरची वाढ करण्यात आल्याने हा मार्ग अधिक सुटसुटीत होणार आहे. या विस्तारामुळे स्थानिक वाहतूक आणि हायवेची लांब पल्ल्याची वाहतूक वेगळी होऊन प्रवासाचा वेळ अर्ध्यावर येईल.तळेगाव-चाकण-शिक्रापूर: ५४८-डी महामार्गाचा कायापालटपुणे जिल्ह्यातील औद्योगिक पट्ट्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर (राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी) च्या बांधकामालाही याच वर्षात मुहूर्त मिळणार आहे. एकूण ५३.२ किलोमीटर लांबीच्या या मार्गाचे काम दोन टप्प्यांत केले जाईल. विशेष म्हणजे, यातील २४.२ किलोमीटरचा रस्ता हा 'एलिव्हेटेड' (उन्नत) मार्ग असणार आहे, ज्यामुळे चाकण परिसरातील अवजड मालवाहतुकीचा आणि कामगारांच्या प्रवासाचा प्रश्न सुटेल. हे दोन्ही प्रकल्प केवळ रस्ते नसून पुण्याच्या आर्थिक विकासाचे महामार्ग ठरणार आहेत. हडपसर-यवत पुलामुळे सोलापूर-पुणे कनेक्टिव्हिटी सुधारेल, तर तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग हा ऑटोमोबाईल आणि लॉजिस्टिक हबला मोठी चालना देईल. या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असून, पुढील काही वर्षांत पुणेकरांना वाहतूक कोंडीमुक्त प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.'या' कंपनीकडे सोपवली जबाबदारीया दोन्ही महत्त्वाच्या मार्गांच्या बांधकामासाठी 'मोंटेकार्लो लिमिटेड' या नामांकित कंपनीची निवड करण्यात आली आहे. तांत्रिक आणि आर्थिक निकषांवर पात्र ठरल्यानंतर या कंपनीला कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. सध्या या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल आणि कंत्राटाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. मंत्रालयातून हिरवा कंदील मिळताच यंत्रसामग्री आणि कामगार प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी दाखल होतील. MSIDC मधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन महिन्यांच्या आत हडपसर–यवत आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर या दोन्ही मार्गांचे काम सुरू होण्याचे दाट संकेत आहेत.
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ; आता धावणार १८ डब्ब्यांची उपनगरीय रेल्वे
मुंबई : मुंबईकरांसाठी नव्यावर्षातील मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईकरांची रोजची तारे वरची कसरत बघता रेल्वेने १८ डब्ब्यांची लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे येत्या १४ आणि १५ जानेवारी रोजी विरार-डहाणू मार्गावर १८ डब्ब्यांच्या उपनगरीय गाड्यांची चाचणी करणार आहे. भारतीय रेल्वेकडून इतक्या लांब लोकल गाड्यांची ही पहिलीच चाचणी असेल.सध्या मुंबईकरांच्या सेवेत १२ आणि १५ डब्ब्यांच्या लोकल गाड्या आहेत. त्यामुळे त्यांच्या फेऱ्या ही वाढल्या आहेत. परिणामी मुंबई लोकलची गर्दी ही दिवसेंदिवेस वाढत चालली आहे. वाढली गर्दी , लोकलवरचा वाढता ताण लक्षात घेत. रेल्वेनी १८ डब्ब्यांची उपनगरीय लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.कश्या असतील १८ डब्ब्यांच्या रेल्वे ?एका ट्रेनमध्ये बॉम्बार्डियरची इलेक्ट्रिक सिस्टम असेल तर, दुसऱ्या ट्रेनमध्ये मेधाची इलेक्ट्रिक सिस्टम असेल. दोन्ही ट्रेनमध्ये अनिवार्य सुरक्षा चाचण्या घेतल्या जटिल. या चाचण्यांमध्ये दोन महत्वाच्या सुरक्षा चाचण्यांचा समावेश असेल. आपत्कालीन ब्रेकिंग डिस्टन्स , ज्यामद्धे आपत्कालीन काळात ट्रेन किती दूरवर जाऊ शकते हे तपासल जाईल. दुसरी म्हणजे कपलर फोर्स चाचणी असेल, ज्या चाचणीत ब्रेकिंग दरम्यान कोचना पडणाऱ्या दाबाचे मूल्यांकन केल जाईल.
शेअर बाजार पुन्हा कोसळला ! सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला तर निफ्टी २६,११७ च्या खाली
Stock Market Today। भारतीय शेअर बाजाराने आज आठवड्याच्या तिसऱ्या सत्रात, व्यापार दिवसाची सुरुवात नकारात्मकतेने केली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५०, लाल रंगात उघडले. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक ४४२.९४ अंकांनी म्हणजेच ०.५२ टक्क्यांनी घसरून ८४,६२०.४० वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी ५० ३५.६० अंकांनी म्हणजेच ०.१४ टक्क्यांनी घसरून २६,१४३.१० वर उघडला. […] The post शेअर बाजार पुन्हा कोसळला ! सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला तर निफ्टी २६,११७ च्या खाली appeared first on Dainik Prabhat .
हरमनप्रीतची झेप; दीप्तीचे अव्वल स्थान निसटले!
आयसीसी टी-२० क्रमवारी जाहीरदुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीनुसार भारतीय संघाच्या क्रमवारीत काही महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौरने फलंदाजीच्या क्रमवारीत दोन स्थानांनी प्रगती केली आहे, तर अष्टपैलू दीप्ती शर्माला गोलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान गमवावे लागले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेतील अंतिम सामन्यात हरमनप्रीतने ४३ चेंडूंत ६८ धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली होती. याच उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर ती फलंदाजांच्या क्रमवारीत दोन स्थानांनी वर चढली असून, आता ती १३व्या स्थानावर पोहोचली आहे. दीप्ती शर्मासाठी मात्र ही क्रमवारी निराशाजनक ठरली. तिला ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँडने मागे टाकले आहे. दीप्ती आता टी-२० गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. सदरलँडकडे आता ७३६ रेटिंग पॉइंट्स आहेत, तर दीप्ती तिच्यापासून केवळ एक पॉइंट मागे आहे. तरीही दीप्ती अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर कायम आहे.या ताज्या क्रमवारीनुसार भारतीय संघाच्या काही प्रमुख खेळाडूंना पुढील सामन्यांमध्ये कामगिरी सुधारण्याचे आव्हान असणार आहे.इतर भारतीय खेळाडूंची स्थितीस्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी फलंदाजीच्या क्रमवारीत अनुक्रमे तिसरे आणि सहावे स्थान कायम राखले आहे.जेमिमा रॉड्रिग्ज टॉप-१० मधून बाहेर पडली असून १२व्या स्थानावर गेली आहे.जलद गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर पाच स्थानांनी घसरली असून, ती देखील आता टॉप-१० गोलंदाजांच्या यादीत नाही.
ॲशेस मालिका : सिडनीच्या मैदानात स्टीव्ह स्मिथची बॅट तळपली
'द वॉल' द्रविडचा विक्रम मोडीत काढून ३७ वे कसोटी शतक पूर्णसिडनी : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आपल्या बॅटची जादू पुन्हा एकदा दाखवली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या ॲशेस कसोटीच्या तिसऱ्या दिवशी स्मिथने झंझावाती फलंदाजी करत आपल्या कारकिर्दीतील ३७ वे कसोटी शतक पूर्ण केले. या शतकामुळे त्याने भारताचे दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांचा विक्रम मागे टाकत जागतिक क्रिकेटमध्ये एक नवा मैलाचा दगड प्रस्थापित कला आहे. या शतकासह स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्यांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. त्याने राहुल द्रविड (३६ शतके) यांना मागे टाकले असून, तो आता सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या जागतिक यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता त्याच्या पुढे फक्त कुमार संगकारा (३८), रिकी पाँटिंग (४१), जो रूट (४१), जॅक कॅलिस (४५) आणि सचिन तेंडुलकर (५१) हे खेळाडू आहेत.ॲशेस मालिकेच्या इतिहासात स्मिथने आपले १३ वे शतक झळकावले आहे. त्याचप्रमाणे अॅशेसमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या अनेक फलंदाजांच्या यादीत त्याने जॅक हॉब्स यांना मागे सारून दुसरे स्थान पटकावले आहे. आता केवळ सर डॉन ब्रॅडमन (१९ शतके) हे स्मिथच्या पुढे आहेत. स्मिथच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली असून, क्रिकेट विश्वात त्याच्या फलंदाजीची आणि विक्रमांची जोरदार चर्चा सुरू आहे.ऑस्ट्रेलियाची सामन्यावर पकडस्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड (१६३ धावा) यांच्यातील जबरदस्त भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने पाचव्या कसोटीत इंग्लंडवर वर्चस्व मिळवले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने मोठ्या धावसंख्येकडे कूच केली असून, इंग्लंडचा संघ दबावाखाली दिसून येत आहे.सर्वाधिक कसोटी शतके (२०२६ पर्यंतची स्थिती):क्रमांक खेळाडू कालावधी सामने शतके१ सचिन तेंडुलकर १९८९-२०१३ २०० ५१२ जॅक कॅलिस १९९५-२०१३ १६६ ४५३ रिकी पॉन्टिंग १९९५-२०१२ १६८ ४१४ जो रूट २०१२-२०२६ १६३ ४१५ कुमार संगकारा २०००-२०१५ १३४ ३८६ स्टीव्ह स्मिथ २०१०-२०२६ १२३ ३७७ राहुल द्रविड १९९६-२०१२ १६४ ३६
मोहित सोमण: आजही पाचव्या सत्रात घसरण कायम आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाल्याने सेन्सेक्स १२९.५४ व निफ्टी ४१.०५ अंकाने घसरला आहे. आज युएस व्हेनेझुएला यांच्यातील द्वंद्व कायम असताना पुन्हा एका भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी आपले सेल ऑफ नफा बुकिंग सुरू ठेवल्याने बाजारात अस्थिरता कायम राहिली आहे. सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही बँक निर्देशांकात पुन्हा एकदा घसरण झाल्याने बाजारातील आधारपातळी निर्देशांकात राखता आली नाही. आगामी कंपन्यांच्या तिमाही निकालावर देखील गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. दरम्यान क्षेत्रीय निर्देशांकातील आयटी, मेटल, कंज्यूमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे घसरण मर्यादित राहिली आहे. तर ऑटो, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक, प्रायव्हेट बँक निर्देशांकात मोठी घसरण झाली. सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ केएसबी (३९६.२७%), जेबीएम ऑटो (५.०७%), टाटा टेक्नॉलॉजी (४.२१%), टायटन इलेक्सी (३.२२%), इन्फोऐज इंडिया (३.२१%), एमसीएक्स (२.५४%) समभागात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण इंडियन हॉटेल्स (२.७३%), मेट्रोपॉलिस हेल्थ (२.७०%), सिप्ला (२.३१%), टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल (१.९५%), टीबीओ टेक (१.७८%), आरबीएल बँक (१.५६%) समभागात झाली आहे.
ठाणे : मुंबई आणि ठाणे या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) आणि ४-ए (कासारवडवली-गायमख) बाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो सेवा २०२६ मध्ये प्रवाशांसाठी खुली होणार असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकल्पामुळे ठाणेकरांचा मुंबईचा प्रवास सुसाट आणि प्रदूषणमुक्त होणार आहे. ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदारसंघाचा प्रगती अहवाल सादर करताना मंत्री सरनाईक यांनी या मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर आढावा दिला. ते म्हणाले की, या संपूर्ण मेट्रो मार्गिकेचे काम एकूण तीन मुख्य टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे. तांत्रिक सोय आणि प्रवाशांची निकड लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण केले जाणार असून, २०२६ पर्यंत प्रत्यक्ष मेट्रो सेवा सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पाला झालेल्या विलंबाबाबत बोलताना सरनाईक यांनी स्पष्ट केले की, महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे प्रशासकीय स्तरावर काही कामांना विलंब झाला होता. मात्र, आता आचारसंहितेचा अडथळा दूर झाल्याने प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आली आहे. वडाळा, विक्रोळी ते थेट कासारवडवली असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मार्गिका संजीवनी ठरणार आहे.https://prahaar.in/2026/01/07/a-whirlwind-of-election-rallies-by-minister-nitesh-rane-in-nalasopara/ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत प्रताप सरनाईक यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांची माहिती दिली. यावेळी त्यांनी ठाणे मेट्रोच्या कामात स्वतः सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. २०२६ मध्ये ही मेट्रो रुळावर धावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाबाबत मुंबई आणि ठाणेकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.मार्ग कसा असणार?प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोचा सर्वात पहिला टप्पा ठाणे शहरांतर्गत असेल. कॅडबरी जंक्शन ते गायमुख हा १०.५ किलोमीटर लांबीचा मार्ग मार्च २०२६ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये कासारवडवली ते गायमुख या २.७ किलोमीटरच्या मेट्रो लाईन ४-ए विस्ताराचाही समावेश असेल. हा टप्पा सुरू झाल्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची मोठी सुटका होणार आहे. पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत, म्हणजेच २०२६ च्या अखेरीस, दुसरा टप्पा सुरू करण्याचे नियोजन आहे. हा टप्पा गायमुखपासून विक्रोळीतील गांधी नगरपर्यंत असेल, ज्याची लांबी सुमारे १० किलोमीटर आहे. या टप्प्यामुळे ठाणे आणि मुंबईच्या उपनगरांमधील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. मेट्रो लाईन ४ चा शेवटचा टप्पा जो विक्रोळी ते वडाळ्यापर्यंत आहे, तो २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. वडाळ्यापर्यंतचा मार्ग पूर्ण झाल्यावर ठाणे ते दक्षिण मुंबई असा प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करणे शक्य होईल. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदारसंघाचा प्रगती अहवाल सादर करताना सरनाईक यांनी ही माहिती दिली. यावेळी युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वश सरनाईक देखील उपस्थित होते. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असून, विकासाच्या माध्यमातून जनतेची सेवा करत आहोत, असा दावाही त्यांनी यावेळी केला. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सादर केलेला हा विकास अहवाल आणि मेट्रोची डेडलाईन ठाणेकरांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
‘तो’निर्णय अन् ऐन निवडणुकीच्या काळात भाजपला धक्का! राज्य निवडणूक आयोगाने…
Mumbai Municipal Corporation Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी खूप कमी दिवस शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचारात कोणतीही कसर सोडली जात नसून, जोरात प्रचार सुरू आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून थंडी सुरू असली तरी निवडणुकीमुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपकडून मुंबई निवडणुकीसाठी रणनिती आखण्यात आली असून त्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. मात्र, […] The post ‘तो’ निर्णय अन् ऐन निवडणुकीच्या काळात भाजपला धक्का! राज्य निवडणूक आयोगाने… appeared first on Dainik Prabhat .
K. Kavitha। तेलंगणाच्या राजकारणातील एक महत्त्वाचा अध्याय अधिकृतपणे संपला आहे. भारत राष्ट्र समिती (BRS) च्या सदस्या कलवकुंतला कविता म्हणजेच के.कविता यांचा विधान परिषदेतील (MLC) राजीनामा अखेर स्वीकारण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी सभागृहात कविता यांच्या भावनिक भाषणानंतर परिषदेचे अध्यक्ष गुट्टा सुखेंद्र रेड्डी यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. विधिमंडळ सचिवांनी या संदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. […] The post के. कविता यांचा विधानपरिषदेचा राजीनामा स्वीकारला ; भावुक निरोप देत BRS शी तोडले नाते, नव्या राजकीय इनिंगची तयारी ? appeared first on Dainik Prabhat .
टीकास्त्रांच्या धुराळ्यात मुद्देच हरवले; मतदारांवर प्रचाराचा भडीमार
स्वप्निल काळे पिंपरी: शहरात निवडणुकीचे वारे सध्या जोरदार वाहत आहेत. उमेदवारांकडून पत्रक वाटप चौकाचौकांत बॅनर्स, सोशल मीडियावर जाहिराती आणि सभांमधून घोषणांचा भडीमार सुरू आहे. मात्र या साऱ्या गदारोळात विकासापेक्षा प्रतिमानिर्मिती आणि कामापेक्षा एकमेकांवरील टीकास्त्रांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचे चित्र ठळकपणे दिसून येत आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवार आपली चांगली प्रतिमा जनतेसमोर मांडण्याच्या प्रयत्नात आहे. आपण […] The post टीकास्त्रांच्या धुराळ्यात मुद्देच हरवले; मतदारांवर प्रचाराचा भडीमार appeared first on Dainik Prabhat .
Daisy Shah: घराजवळ आग लागल्यानंतर अभिनेत्री संतापली, म्हणाली…काही ‘बेवकूफ’ लोकांमुळे प्रकार घडला
Daisy Shah: बॉलीवूड अभिनेत्री डेजी शाह हिने मंगळवारी सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या घराजवळील इमारतीला आग लागल्याची घटना सांगितली असून, या प्रकारामागे फटाके फोडणाऱ्या लोकांची गैरजबाबदारी असल्याचा आरोप केला आहे. ही घटना मुंबईतील बांद्रा ईस्ट परिसरात घडली. मंगळवारी रात्री डेजी शाह तिच्या पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर गेली असताना […] The post Daisy Shah: घराजवळ आग लागल्यानंतर अभिनेत्री संतापली, म्हणाली… काही ‘बेवकूफ’ लोकांमुळे प्रकार घडला appeared first on Dainik Prabhat .
वसई-विरार निवडणूक रिंगणात कोट्यधीश उमेदवार
दोन उमेदवारांकडे अब्जावधींची संपत्तीविरार : वसई-विरार महापालिकेच्या मतदानाची तारीख जवळ जवळ येत असताना, उमेदवारांच्या प्रचाराला सुद्धा वेग आला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोप याबाबत चर्चा होत असल्या तरी सर्वाधिक चर्चा ही यनिवडणुकीतील उमेदवाराच्या संपत्तीची होत आहे. वसई-विरार मध्ये अनेक कोट्याधीश उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर दोन उमेदवार हे अब्जाधीश असल्याचे दिसून येत आहे. वार्षिक बजेट ४ हजार कोटी रुपये असलेल्या वसई-विरार महापालिकेचा समावेश राज्यातील चार क वर्गातील महापालिकेमध्ये होतो.सन २०११ च्या जनगणनेनुसार वसई-विरार शहराची लोकसंख्या १२ लाखांवर असली तरी, आज मात्र ही संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे या शहरासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून विविध योजनांसाठी कोट्यवधींचा निधी दिल्या जात आहे. दरम्यान, या पालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. ११ लाख रुपयांची खर्च मर्यादा उमेदवारांना देण्यात आल्याने उमेदवार सुद्धा निवडणुकीसाठी चांगले खर्च करीत आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात अनेक उमेदवार हे कोट्यधीश आहेत. तर दोन उमेदवार हे अब्जाधीश आहेत.बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव माजी नगरसेवक अजीव पाटील यांच्या उमेदवारी अर्ज मालमत्ता विवरणपत्रामध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांची एकूण मालमत्ता ही २ अब्ज ९१ कोटी ६५ लाख ६७ हजार एवढी दाखविण्यात आली आहे. त्यानंतर पंकज ठाकूर हे दुसरे अब्जाधीश उमेदवार आहेत. पंकज ठाकूर यांच्या कुटुंबीयांची एकूण मालमत्ता १ अब्ज ४३ कोटी ९ लाख ६७ हजार एवढी दाखविण्यात आली आहे. तर अनेक उमेदवार हे कोट्याधीश आहेत.जमीन, इमारती, गाळे, सदनिका, शेअर बाजारातील गुंतवणूक अत्याधुनिक वाहने, सोन्या चांदीचे दागिने आणि मोठी रोकड उमेदवारांनी दाखवलेल्या मालमत्तेच्या विवरण पत्रात नमूद आहे.
भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !
तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्ममुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये मोबाईल नेटवर्कची समस्या कायम आहे. मोबाईल नेटवर्क सुरू करण्याबाबत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसीएल) आणि दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही. मेट्रो स्थानकांतील पायाभूत सुविधांशी जोडणी करण्यासाठी ‘एसीईएस इंडिया’ या त्रयस्थ कंपनीकडून दूरसंचार कंपन्यांना अवाजवी दर आकारले जात असल्याचे बोलले जात आहे. या तिढ्याचा तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म असल्याने नियमित प्रवाशांची नेटवर्कअभावी गैरसोय होत आहे.आरे ते कफ परेडदरम्यान मेट्रो-३ मार्गिकेची भुयारी मेट्रो सेवा सुरू आहे. यातील वरळी ते कफ परेडपर्यंतचा शेवटचा टप्पा सुरू होऊन तीन महिने उलटून गेले असतानाही मोबाईल नेटवर्कचा प्रश्न कायम आहे. मेट्रो मार्गिकेच्या केवळ काही मर्यादित भागांमध्येच वोडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलचे नेटवर्क उपलब्ध आहे. प्रवासादरम्यान मोबाईलवरून बाहेरील संपर्क साधणे शक्य होत नाही. दररोज तिकिटासाठी ५० ते ७० रुपये मोजावे लागतात, तरीही एमएमआरसीएल प्रशासन प्रवाशांसाठी मोबाईल नेटवर्कची सुविधा उपलब्ध करण्यात इतके ढिम्म का? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. ‘अॅक्वा लाइन’साठी एमएमआरसीएलने एसीईएस इंडिया लिमिटेड या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. मात्र, टेलिकॉम कंपन्यांचा आरोप आहे, की एसीईएसकडून नेटवर्क उभारणीसाठी अवाजवी दर आकारले जात आहेत. अनेक बैठका होऊनही तोडगा न निघाल्यामुळे अद्याप काही मेट्रो प्रवाशांना नेटवर्क सुविधा मिळू शकलेली नाही. एका प्रमुख टेलिकॉम ऑपरेटरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसीईएसने ११८ कोटी रुपयांचा भांडवली खर्च असल्याचा दावा केला आहे. मात्र, टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या अंतर्गत अंदाजानुसार हा खर्च फक्त सुमारे ३० कोटी रुपयांपर्यंत असायला हवा.सूत्रांनी सांगितले की, सुरुवातीला मुंबई मेट्रो आणि त्यांच्या विक्रेत्याकडून प्रति स्टेशन १३ लाख रुपये मागितले जात होते. नंतर हे शुल्क कमी करून प्रति स्टेशन ५.५ लाख रुपये करण्यात आले. दुसरीकडे, टीपीएसच्या अंतर्गत गणनेनुसार प्रति स्टेशन दरमहा प्रत्येकी ३९,००० रुपये भांडवली खर्च आणि त्यावर १० टक्के व्यवस्थापन शुल्क देणे अपेक्षित आहे. याच आर्थिक वादामुळे भुयारी मेट्रो मधील नेटवर्क प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही आणि त्याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे.
श्रेयस अय्यर फिटनेस परीक्षेत उत्तीर्ण
विजय हजारे करंडक : मुंबई, कर्नाटक, सौराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत दाखलमुंबई : विजय हजारे करंडक २०२५-२६ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. या सामन्यांच्या निकालानंतर बाद फेरीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. सौराष्ट्र, कर्नाटक आणि मुंबई यांसारख्या बलाढ्य संघांनी मोठे विजय मिळवत आपला दबदबा कायम ठेवला, तर काही सामन्यांचे निकाल अत्यंत चुरशीचे लागले.या सामन्यात मुंबईने हिमाचल प्रदेशवर केवळ ७ धावांनी निसटता विजय मिळवला. हिमाचल प्रदेशने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. मुंबईकडून यशस्वी जयस्वाल आणि मुशीर खान यांनी डावाची सुरुवात केली. पण जयस्वाल १५ धावांवरच बाद झाला. त्यानंतर मुशीर खानला त्याचा भाऊ सर्फराज खान साथ देण्यासाठी आला. सर्फराजने आक्रमक फलंदाजी करताना १० चेंडूंत २१ धावांची आक्रमक खेळी केली. पण त्यानंतर तो बाद झाला. त्यामुळे श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. एकीकडे मुशीर आक्रमक खेळत असताना दुसरीकडे श्रेयस संयमी खेळ करत होता. या दोघांमध्ये ५४ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी झाली. यादरम्यान मुशीरने अर्धशतक पूर्ण केले. पण त्याला कुशल पलने बाद केले. त्याने ५१ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ७३ धावांची खेळी केली.त्यानंतर मात्र श्रेयस अय्यरने वादळी खेळ केला. त्याला सूर्यकुमार यादवने साथ दिली. सूर्यकुमार २४ धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस शतकही करेल, असं वाटत होते. मात्र २६ व्या षटकात तो कुशल पलविरुद्ध खेळताना अमनप्रीत व्ही सिंगकडे झेल देत बाद झाला. श्रेयसने ५३ चेंडूंत १० चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली. या खेळीमुळे मुंबईने २५ षटकातच २२० धावांचा टप्पा पार केला होता. दरम्यान पावसामुळे ३३ षटकांचा करण्यात आलेल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील मुंबईने हिमाचल प्रदेशवर केवळ ७ धावांनी विजय मिळवला.हैदराबादच्या अमन रावची द्विशतकी खेळीहैदराबादच्या २१ वर्षीय सलामीवीर अमन राव याने विजय हजारे ट्रॉफीत धुमाकूळ घातला. मोहम्मद शमी, आकाश दीप व मुकेश कुमार या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना त्याने चांगलाच चोप दिला. बंगालविरुद्ध त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून आपले द्विशतक पूर्ण केले. तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरलेल्या हैदराबादला अमन व राहुल सिंग गहलौत आश्वासक सुरुवात करून दिली. १६ व्या षटकात १०४ धावांची ही भागीदारी संपुष्टात आली आणि राहुलला ५४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६५ धावांवर माघारी जावे लागले. त्यानंतर कर्णधार तिलकसोबत दुसऱ्या विकेटसाठी अमनने ९७ चेंडूंत ८७ धावा जोडल्या. तिलक ४५ चेंडूंत ३४ धावांवर माघारी परतला. दरम्यान बंगालचा संघ लक्ष्याचा पाठलाग करताना निष्प्रभ ठरला.शुभमन गिल स्वस्तात बाद : धुक्यामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात गोव्याने प्रथम फलंदाजी करताना ३३.३ षटकांत सर्वबाद २११ धावा केल्या. सुयश प्रभुदेसाई (६६ धावा) आणि ललित यादव (५४ धावा) यांनी दिलेले योगदान वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. अर्जुन तेंडुलकर केवळ १ धाव काढून बाद झाला. २१२ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या पंजाब संघाची सुरुवात खराब झाली. पुनरागमन करणारा कर्णधार शुभमन गिल स्वस्तात (अवघ्या ७ धावांवर) बाद झाला, ज्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर सलामीवीर हरनूर सिंगने डावाची धुरा सांभाळली. त्याने नाबाद ९४ धावांची जबरदस्त खेळी करत पंजाबला विजय मिळवून दिला. पंजाबने २९ व्या षटकातच ४ गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे लक्ष्य पूर्ण केले.सौराष्ट्र विरुद्ध सर्विसेस: फलंदाजांचा झंझावातसौराष्ट्रने या सामन्यात आपल्या फलंदाजीच्या जोरावर वर्चस्व गाजवले. आक्रमक पवित्रा घेत सौराष्ट्रने ३४९ धावांचा डोंगर उभा केला आणि सर्विसेसचा १११ धावांनी मोठा पराभव केला. फलंदाजी करताना सौराष्ट्रच्या सलामीवीरांनी भक्कम सुरुवात करून दिली. मधल्या फळीतील फलंदाजांनी वेगवान धावा कुटल्यामुळे निर्धारीत ५० षटकांत त्यांनी ३४९/५ अशी मोठी धावसंख्या उभारली. यात चेतेश्वर पुजारा आणि अर्पित वसावडा यांच्या महत्त्वपूर्ण खेळींचा समावेश होता. ३५० धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना सर्विसेसच्या फलंदाजांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सौराष्ट्रच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. सर्विसेसचा डाव २३८ धावांत आटोपला.
Pimpri : अर्थव्यवस्थेला चालना देणारी निवडणूक; समाजाच्या प्रत्येक स्तराला मिळतेय उत्पन्नाची संधी
पिंपरी – भारतातील निवडणूक अर्थात जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा एक उत्सव असतो. 2024 पासून शहरात सातत्याने निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणूक पैशांवर जिंकल्या जात असल्याचे आरोप होत असले तरी निवडणूक स्थानिक पातळीवर अर्थव्यवस्थेला चालना देते, हे सत्य नाकारता येत नाही. समाजातील तळा-गाळापर्यंत विविध कामांच्या माध्यमातून पैसा पोहचू लागतो. अनेकांना तात्पुरता का होईना रोजगार मिळतो आणि अनेक […] The post Pimpri : अर्थव्यवस्थेला चालना देणारी निवडणूक; समाजाच्या प्रत्येक स्तराला मिळतेय उत्पन्नाची संधी appeared first on Dainik Prabhat .
Pimpri : विविध प्रभागात माजी नगरसेवकांमध्ये जोरदार फाइट; एका प्रभागात भाऊ-भाऊ रिंगणात
पिंपरी– पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वेगवेगळ्या एकूण १७ प्रभागांमध्ये माजी महापौर, माजी नगरसेवक, सत्तारूढ पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते हे एकमेकांसमोर निवडणूक रिंगणात आले आहेत. त्यामुळे सामन्यांची रंगत चांगलीच वाढली आहे. या ठिकाणी जोरदार फाईट होणार असून या लढतींकडे शहराचे लक्ष लागले आहे. भोसरीतील गव्हाणे वस्ती प्रभाग पाच ड मधून अनुराधा गोफणे विरुद्ध प्रियंका बारसे रिंगणात आहेत. […] The post Pimpri : विविध प्रभागात माजी नगरसेवकांमध्ये जोरदार फाइट; एका प्रभागात भाऊ-भाऊ रिंगणात appeared first on Dainik Prabhat .
Pune : आता क्राॅस व्होटिंगसाठी फिल्डिंग
पुणे– महापालिकेची प्रभाग रचना आणि त्यानंतर प्रारूप मतदार यादीत प्रभागांची मोडतोड झाल्यानंतर भाजप वगळता इतर जवळपास सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक लढविण्याची संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर आता उमेदवारी मिळाल्याने, तसेच भाजप मध्ये नाराजांची मोठी फळी असल्याने या फळीला सोबत घेऊन शहरातील अनेक प्रभागांमध्ये क्राॅस व्होटिंगसाठी फिल्डिंग लावली जात आहे. अनेक प्रभागांमध्ये चार सदस्यांमध्ये एक- […] The post Pune : आता क्राॅस व्होटिंगसाठी फिल्डिंग appeared first on Dainik Prabhat .
उबाठा मनसेचा वचननामा,आमचा पंचनामा
मुंबईत २२ वर्षांत रेन वॉटर हार्वेस्टींगचा नाही पत्ताइमारतींना ओसी, पण प्रत्यक्षात सत्ता काळात उबाठाला याची अंमलबजावणी करण्यात अपयशमुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उबाठा आणि मनसेच्या वतीने मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा जाहीर केला आहे. यामध्ये नवीन इमारतींमध्ये रेनवॉटर परकोलेशन पिट्स आणि मुंबईत काही ठराविक जागी रेन वॉटर होडींग टँकस साकारणार असल्याचे नमुद केले. विशेष नवीन इमारत बांधकामांमध्ये वर्षा संचयन प्रकल्पाची बंधनकारक असतानाही मागील २२ ते २३ वर्षांमध्ये याची परिणामकारक अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सत्ता काळात उबाठाला या रेन वॉटर हार्वेस्टींगची आठवण झाली नाही आणि सत्तेपासून दूर राहिल्यानंतर जनतेला पुन्हा एकदा रेन वॉटर हार्वेस्टींगचे स्वप्न दाखवले जात आहे.सन २००२मध्ये प्रारंभी १ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर वर्षा संचयन प्रकल्प राबवणे बंधनकारक केले होते. त्यानंतर २००७ मध्ये त्यात बदल करून ३०० चौरस मीटरवरील जागेवरही ही योजना राबवणे बंधनकारक केले होते. मात्र, सन २००७नंतर ३०० चौरस फुटांच्या जागेवर हजारो गृहनिर्माण प्रकल्प राबवले गेले, परंतु एकाही प्रकल्पांमध्ये याच अंमलबजावणी झालेली नाही. विशेष म्हणजे महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाच्यावतीने बांधकामांना ओसी प्रमाणपत्र देताना याची पाहणी करून हे प्रमाणपत्र दिले जाते. परंतु पुढे हा प्रकल्प कार्यान्वितच दिसत नाही.मागील २२ ते २३ वर्षांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्पाला तिलांजली दिली जात असून महापालिकेत सत्तेवर असलेल्या उबाठाला कधीही याची दखल घ्यावीशी वाटली नाही.समुद्राचे पाणी गोड्या पाण्यात रुपांतरीत करणारा नि:क्षारीकरण अर्थात डिसॅलिनेश प्रकल्प राबवून मुंबईकरांना सध्याच्या दरानेच मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार अशाप्रकारचे वचनही दिले आहे. परंतु सन २०१९मध्ये याबाबतची घोषणा शिवसेनेने केली. परंतु सन २०२५च्या शेवटच्या महिन्यात याची निविदा अंतिम होवून कंत्राटदाराची निवड केली आहे. त्यानुसार कामालाही सुरुवात झाली आहे. मात्र, मागील काही वर्षांमध्ये यासाठीचा कंत्राटदारही पुढे येत नव्हता. यासाठी आता साडेअकरा हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. हा प्रकल्प आता मार्गी लागला आहे.नालेसफाईची कामे ही वर्षाचे १२ महिने केली जातील आणि पुढील ५ वर्षांत नाल्यांवर संरक्षक जाळी बसवली जाईल.मुंबईतील विविध नाल्यांची सफाईचे काम महापालिकेच्यावतीने केली जात असून पावसाळ्यापूर्वी ८० टक्के आणि पावसाळ्याच्या काळात १० टक्के आणि नंतर १० टक्के अशाप्रकारे ही सफाई करणे बंधनकारक आहे. परंतु नाल्याची सफाई ही नेहमीच हातसफाई ठरत असून शिवसेनेच्या सत्ता काळात नालेसफाईच्या कामांमधील भ्रष्टाचाराप्रकरणी अनेकांना शिक्षाही झाली आहे. नाल्यांवर जाळ्या बसवण्याची प्रकिया यापूर्वीही महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली असून झोपडपट्टी वस्त्यांमध्ये अशाप्रकारच्या जाळ्या लावणे आणि नाले बंदिस्त करणे आदींची कामे यापूर्वीही हाती घेण्यात आली आहे. परंतु तांत्रिकदृष्ट्या जाळ्या बसवणे आणि बंदिस्त करणे हे शक्य होत नसल्याचे प्रशासनाने उबाठा शिवसेनेच्या काळात दिसून आले आहे. त्यामुळे आता नाल्यांवर संरक्षक जाळ्या बसवण्याची गाजरे का दाखवली जात आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.
उल्हासनगरमध्ये २० प्रभाग; ७८ जागांसाठी ४३२ उमेदवारांमध्ये सामना
पालिका निवडणुकीचा बहुरंगी महासंग्राम उल्हासनगर : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पुन्हा सुरू झाली आहे. शहरातील राजकारण तापले असून, यंदा भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची अपेक्षित युती न घडल्याने सत्तासंघर्ष अधिक रंगतदार ठरणार आहे. मतदारांसमोर अनेक पर्याय उपलब्ध असल्याने ही निवडणूक खऱ्या अर्थाने बहुरंगी ठरणार आहे. राष्ट्रीय पक्षांबरोबरच स्थानिक गटांनीही मैदानात जोरदार तयारी केली आहे.भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि उबाठा यांच्यातील समीकरणे ढवळून निघाल्याने राजकीय अनिश्चितता वाढली आहे. याशिवाय टीम ओमी कलानी, साई पक्ष, काँग्रेस, अजित पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आणि बसपा असे विविध पक्षही मैदानात उतरल्याने सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती लागणार याबाबत चर्चेला वेग आला आहे.तिकीट वाटपात अनेक दिग्गज उमेदवार डावलले गेले, त्यामुळे अपक्ष उमेदवारींचा वाद उफाळून आला. परिणामी, काही प्रभागांमध्ये त्रिकोणी, तर काही ठिकाणी चतुरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. शहरातील सत्ता, विकास आणि राजकीय वर्चस्वाचा फैसला १६ जानेवारीला मतपेटीतून होणार आहे. प्रचाराचा शेवटचा टप्पा अधिक आक्रमक आणि आरोप-प्रत्यारोपांनी भरलेला असणार आहे.निवडणूक प्रभागांचा आढावा२० प्रभागांतील ७८ जागांसाठी एकूण ७०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यापैकी ६१८ अर्ज वैध ठरले, तर १८६ उमेदवारांनी माघार घेतल्याने अखेर ४३२ उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. शहरात ४ लाख ३९ हजार ९१२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत (पुरुष : २ लाख ३२ हजार ७३६; महिला: २ लाख ७ हजार २२; इतर: १५४).
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण्यात
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ७ जानेवारीला ठाण्यात येत आहेत. शहराच्या विकासाबाबत नागरिकांच्या मनातील प्रश्न, अपेक्षा आणि ठाण्याच्या सर्वांगीण प्रगतीवर चर्चा करण्यासाठी राम गणेश गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ७ वाजता विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी याबाबत माहिती दिली.ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप–शिवसेना–रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) महायुतीच्या माध्यमातून लढत होत असून, केंद्र सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारने ठाण्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.या पार्श्वभूमीवर ठाण्याचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. या चर्चासत्रात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी केले आहे.
Petrol Diesel Price : गुड न्यूज! लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरणार; जाणून घ्या सविस्तर अपडेट
मुंबई : देशात सध्या महागाईचा आलेख सातत्याने उंचावत असून सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. जीवनावश्यक वस्तूंपासून ते इंधनापर्यंत अनेक गोष्टींचे भाव गगनाला भिडले असतानाच, आता सराफा बाजारातून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विक्रमी पातळीवर असलेल्या सोन्याच्या दरात आता घसरण होणार असून, यामुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एकीकडे सोन्याच्या दरात घसरण होत असताना, दुसरीकडे मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असूनही, भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची सर्वसामान्यांची अपेक्षा अजूनही पूर्ण झालेली नाही. इंधन दर कमी झाल्यास मालवाहतूक स्वस्त होऊन महागाईवर नियंत्रण मिळवता येईल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.https://prahaar.in/2026/01/07/ubatha-mnss-promise-our-panchnama/जूनपर्यंत पेट्रोल-डिझेल स्वस्त होणारवाढत्या इंधन दरामुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. २०२६ या वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर घसरण्याची शक्यता असून, परिणामी येत्या जून महिन्यापर्यंत भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) रिसर्च रिपोर्टमध्ये हा महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्टेट बँकेच्या अहवालानुसार, सध्या जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी पडझड पाहायला मिळत आहे. सौदी अरेबिया आणि रशियासह 'ओपेक प्लस' (OPEC+) देशांनी तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारपेठेत तेलाचा पुरवठा वाढल्यामुळे किमती कमी होत आहेत. सध्या भारतीय क्रूड बास्केटचे दर हे सुमारे ६२.२० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहेत, जे जून २०२६ पर्यंत ५० डॉलरपर्यंत खाली येऊ शकतात.इंधन दरात कपात झाल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा दिलासाजागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या बदलांचे थेट परिणाम आता भारतीय ग्राहकांच्या खिशावर दिसू लागणार आहेत. ताज्या आर्थिक अहवालानुसार, कच्च्या तेलाच्या किमतीत जर १४ टक्क्यांची मोठी घट झाली, तर त्याचे दूरगामी परिणाम देशातील महागाईवर होतील. यामुळे केवळ पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार नाही, तर देशाचा एकूण महागाई दर ३.४ टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आला आहे. हा सर्वसामान्यांसाठी खूप मोठा दिलासा मानला जात आहे.
भटक्या श्वानांचे होणार सर्वेक्षण
अशी असणार शिक्षकांवर जबाबदारीअलिबाग : आधीच अनेक अशैक्षणिक कामाचे ओझे असताना आता प्राथमिक शिक्षकांवर श्वान नियंत्रण कार्यक्रमाचा भाग म्हणून गावातील श्वान मोजण्याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांवर येऊन पडली आहे.या निर्णयामुळे जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी येत्या शुक्रवारी ९ जानेवारी रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, विभागांचे अधिकारी आणि प्रशासन यांच्यात चर्चा होणार आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या निर्णयाविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्याचा निर्णय काही शिक्षक संघटनांनी घेतला आहे. श्वानदंशाचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करीत असतानाच ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, पशुसंवर्धन विभाग किंवा स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावी अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेला विरोध दर्शविण्यात येत आहे.रायगड जिल्ह्यात दरवर्षी साधारणतः दोन हजारांहून अधिक नागरिकांना श्वानदंश होण्याच्या घटना घडत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मूळ अध्यापन कामांवर परिणाम श्वानगणनेमुळे शिक्षकांच्या होणार असल्याचा आक्षेप शिक्षक मूळ अध्यापन कार्यावर परिणाम संघटनांनी घेतला आहे.आम्ही शिक्षक आहोत, श्वानगणक नव्हे, अशी भूमिका अनेक संघटनांनी निवडणुका, जनगणना, विविध मांडली आहे. शिक्षणाशिवाय सर्वेक्षणे आणि आता श्वानगणना अशा अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे शिक्षकांवर ताण वाढत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.ग्रामीण भागात साधारणतः प्रत्येक घरात एकतरी श्वान पाळलेला असतो. पाळीव आणि भटके श्वान यामधील फरक ओळखणे, प्रत्येक घरातील श्वानांची नोंद घेणे, तसेच गावात, वाड्या-वस्त्यांमध्ये व गल्ल्यांमध्ये मुक्तपणे भटकणाऱ्या कुत्र्यांवर नजर ठेवणे, ही जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडली आहे. या कामात मुख्याध्यापकांना नोडल अधिकारी, तर सर्व्हेक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचे सरकारी आदेश आल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. श्वानगणनेची जबाबदारी थेट शिक्षकांवर टाकण्यात आली आहे.
ग्रीन सी प्रजातीच्या कासवाला दिले जीवदान
कोकण किनारपट्टीवर पहिल्यांदाच आढळले हिरवे नर कासवश्रीवर्धन : श्रीवधर्नच्या कोकण किनारपट्टीवर पहिल्यांदाच हिरवे कासव आढळले, असून त्यास जीवदान देण्यात आले. तालुक्यातील बागमांडला येथे नवीन फेरीबोट जेट्टीच्या बाजूला वाहून आले आणि अडकून पडलेल्या, ग्रीन सी प्रजातीच्या कासवाला वनविभाग आणि कासव संवर्धन प्रकल्पाच्या सदस्यांनी जीवदान दिले.कासवाला सुरक्षीतपणे पाण्यात सोडण्यात आले. कोकण किनारपट्टीवर ग्रीन सी प्रजातीचे नर कासव किनाऱ्याला वाहून येण्याची ही पहिलीच घटना असल्याने, वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या दरम्यान बाणकोट ते बागमांडला दरम्यान फेरीबोट चालवली जाते. श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला येथील नवीन फेरीबोट जेटीच्या बाजूला एक भले मोठे कासव वाहून आल्याचे आणि ते चिखलात अडकून पडल्याचे तिथे काम करणाऱ्या आकाश सुरेश पाडलेकर यांच्या निसर्दशनास आले. त्याने लागलीच ही माहीती कांदळवन विभाग अलिबागच्या वन अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी तातडीने कर्मचारी पाठवून कासवाची पहाणी केली असता. तिथे ग्रीन सी या प्रजातीचे नर कासव असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे कासव आकाराने खूपच मोठे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. १८९ सेंटीमेटर लांब ६२ सेंटीमीटर रुंद असे पूर्ण वाढ झालेले शेपटी असलेले नर कासव असल्याचे वनकर्मचाऱ्यांच्य लक्षात आले.शरीरावर कोणत्याही जखमा अथवा खुणा नव्हत्या. हे कासव पाण्याला ओहोटी लागल्यामुळे ते किनाऱ्यावर एका बाजूला वाहून आले असावे आणि नंतर तिथे पाणी नसल्याने अडकून पडले असावे असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पाण्यात सोडण्यापूर्वी कासवाच्या शरीरावर कोणतीही जखमा नाही ना अखवा त्याला कुठली इजा नाही याची खात्री करून घेतली आणि त्यानंतरच त्याला पाण्याजवळ नेऊन सोडण्यात आले. पाण्याजवळ ठेवले असता, काही क्षणातच कासव पाण्याखाली जात खोल समुद्रात निघून गेले. कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या माद्या प्रजनन काळात अंडी टाकण्यासाठी किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात येत असतात. क्वचित प्रसंगी ग्रीन टर्टल प्रजातीच्या माद्याही किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. पण ग्रीन टर्टल प्रजातीची कासवे त्यातही नर कासवे किनारट्टीवर फारशी येत नाहीत, त्यामुळे हे नर कासव किनाऱ्याला कसे लागले याबाबत आश्चर्य व्यक्त केलेजात आहे.
नवी मुंबईकरांवर पाणीटंचाई! आज या भागात ७ तास राहणार पाणीपुरवठा बंद
नवी मुंबई : नवी मुंबईकरांना पुन्हा एकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सिडकोकडून साई गावाजवळील मुख्य जलवाहिनीवर तातडीची दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आल्याने आज, बुधवार ७ जानेवारी रोजी शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा तब्बल सात तास बंद ठेवण्यात येणार आहे. अचानक जाहीर झालेल्या या पाणीकपातीमुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.सिडकोने दिलेल्या माहितीनुसार , सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत खारघर, तळोजा, उवा आणि द्रोणागिरी परिसरात नळ कोरडे राहणार आहेत. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पाणीपुरवठा सुरू होणार असला तरी सुरुवातीला कमी दाबाने आणि मर्यादित प्रमाणातच पाणी उपलब्ध होईल. सात तासांचा पाणीपुरवठा बंद असल्याने गृहिणी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच व्यावसायिकांची मोठी अडचण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, नवी मुंबईकरांना गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा पाणीपुरवठा खंडित होण्याचा सामना करावा लागत आहे. १९ डिसेंबर रोजी वायल आणि ठोंबरेवाडी येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी कळंबोली, नवीन पनवेल आणि करंजाडे परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. वारंवार होणाऱ्या या तांत्रिक बिघाडांमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, सिडकोच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.पाणीपुरवठा कधीही खंडित होणार याची पूर्वसूचना वेळेवर मिळत नसल्याने अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सातत्याने दुरुस्तीची कामे सुरू असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत?, असा सवाल आता नवी मुंबईकर विचारू लागले आहेत.
Pune news : “मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर”–कुणाल टिळक
पुणे – शहराचा दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या शिंदे आळी, चिंचेची तालीम परिसरात महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे या सुविधांच्या उभारणीसाठी लोकसहभाग आणि प्रशासनातील दुवा म्हणून काम करण्यावर आपला भर राहणार असल्याची ग्वाही प्रभाग क्रमांक २५ ड मधील भाजपचे अधिकृत उमेदवार कुणाल शैलेश टिळक यांनी मतदारांना दिली. टिळक यांनी मंगळवारी […] The post Pune news : “मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर” – कुणाल टिळक appeared first on Dainik Prabhat .
Pune : बिबवेवाडीत जनसंपर्क मोहिमेचा धडाका; रम्यनगरीत राष्ट्रवादी उमेदवारांचा प्रचार
बिबवेवाडी – महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रितम नागपूरे, गौरव घुले, अस्मिता शिंदे आणि रश्मी आमराळे यांनी प्रभाग क्र. २० मध्ये जनसंपर्क मोहिमेचा धडाका कायम ठेवला आहे. गेल्या दोन दिवसांत बिबवेवाडी गावठाण परिसरासह उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधून आपल्या कार्याचा लेखाजोखा मांडला. बिबवेवाडी गावठाण आणि रम्यनगरी सोसायटी परिसरात प्रचार फेरीचे आयोजन […] The post Pune : बिबवेवाडीत जनसंपर्क मोहिमेचा धडाका; रम्यनगरीत राष्ट्रवादी उमेदवारांचा प्रचार appeared first on Dainik Prabhat .
Pune : प्रभाग क्र. २१ काँग्रेसमय; प्रचाराला वेग; नागरिकांकडून उमेदवारांना प्रतिसाद
महर्षीनगर– पुणे महापालिकेच्या प्रभाग क्र. २१ मुकुंदनगर-सॅलसबरी पार्क येथील काँग्रेस पक्षाचे उमेदवार अक्षय जैन, डॉ. स्नेहल पाडळे, योगिता सुराणा व पुष्कर आबनावे यांनी मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर येथे नागरिकांशी संवाद साधला. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या महर्षी नगर भागात अनेक वर्षा नंतर काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पाहण्यास मिळत आहे. […] The post Pune : प्रभाग क्र. २१ काँग्रेसमय; प्रचाराला वेग; नागरिकांकडून उमेदवारांना प्रतिसाद appeared first on Dainik Prabhat .
Pune : मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर –कुणाल टिळक
पुणे – शहराचा दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या शिंदे आळी, चिंचेची तालीम परिसरात महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे या सुविधांच्या उभारणीसाठी लोकसहभाग आणि प्रशासनातील दुवा म्हणून काम करण्यावर आपला भर राहणार असल्याची ग्वाही प्रभाग क्रमांक २५ ड मधील भाजपचे अधिकृत उमेदवार कुणाल शैलेश टिळक यांनी मतदारांना दिली. टिळक यांनी मंगळवारी शिंदे […] The post Pune : मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर – कुणाल टिळक appeared first on Dainik Prabhat .
Pune District : ‘इंद्रायणी’पुन्हा फेसाळली
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील कोट्यवधी भाविकांची श्रद्धास्थान असलेली पवित्र इंद्रायणी नदी वाढत्या जलप्रदूषणामुळे पुन्हा एकदा पांढर्या फेसाने फेसाळली असून, नदीचे विदारक स्वरूप पाहून भाविक, वारकरी व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून रसायनयुक्त व मैलामिश्रित सांडपाणी थेट इंद्रायणीत सोडले जात असल्याने नदीचे प्रदूषण धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे. मात्र, या गंभीर प्रश्नाकडे […] The post Pune District : ‘इंद्रायणी’ पुन्हा फेसाळली appeared first on Dainik Prabhat .
Pune news : प्रचारावेळी भेटले शाळेतले मित्र.! अमर आवळेंनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
पुणे– महापालिका निवडणुकीचा प्रचार सध्या सर्वच जोमाने सुरू आहे. भेटीगाठी, पदयात्रा, प्रचारफेऱ्या काढून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे. याच प्रचारात प्रभाग क्रमांक २७ मध्ये शाळेतील जुने मित्र भेटण्याचा योगायोग जुळून आला. येथील भाजपचे उमेदवार महेश (ऊर्फ) अमर आवळे यांना नवी पेठमध्ये प्रचार करीत असताना शाळेतील जुने मित्र भेटले आणि आपला मित्रच […] The post Pune news : प्रचारावेळी भेटले शाळेतले मित्र.! अमर आवळेंनी दिला जुन्या आठवणींना उजाळा appeared first on Dainik Prabhat .
Pune : विकासाची जाण असलेल्या शिवसेना उमेदवारांना महापालिकेत पाठवा
मांजरी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नवीन प्रभागात चांगल्या पद्धतीने विकासाचे नियोजन करण्याची जाण शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये आहे. त्यामुळे मतदारांनी त्यांना पालिकेत पाठवावे, असे आवाहन माजी जि.प. सदस्य दिलीप घुले यांनी केले. प्रभाग क्र. १५ मधील शिवसेना उमेदवार राजश्री विकी माने, संदीप मारुतराव लोणकर, सीमा सुधीर घुले व निलेश दिलीप घुले यांच्या प्रचारार्थ मांजरी बु., […] The post Pune : विकासाची जाण असलेल्या शिवसेना उमेदवारांना महापालिकेत पाठवा appeared first on Dainik Prabhat .
Pune District : कवठे येमाईत दुरावलेले बछडे आईच्या कुशीत
शिरूर : कवठे येमाई (ता. शिरूर) येथील गणेशनगर परिसरात रविवारी (दि.४) शेतकरी गणपत बाळासाहेब तावरे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना बिबट्याचे दोन लहान बछडे आढळले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दुरावलेल्या बछड्यांची व त्यांच्या आईची भेट घडवून आणण्यासाठी वनविभागाने गणेशनगर परिसरात पिंजरा लावला. पिंजऱ्यात सोमवारी (दि. ५) पहाटेच्या सुमारास अंदाजे पाच वर्षे वयाची बिबट […] The post Pune District : कवठे येमाईत दुरावलेले बछडे आईच्या कुशीत appeared first on Dainik Prabhat .
“व्हेनेझुएलाहून थेट अमेरिकेत ५० दशलक्ष बॅरल तेल येणार” ; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
Donald Trump on Venezuela। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाबद्दल एक मोठी घोषणा केली. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर घोषणा करत व्हेनेझुएलाचे अंतरिम सरकार अमेरिकेला ३० ते ५० दशलक्ष बॅरल उच्च दर्जाच्या तेलाची विक्री करणार असल्याचे म्हटले. तसेच ट्रम्प यांच्या मते, “अमेरिकेला हे तेल बाजारभावाने मिळेल” डोनाल्ड ट्रम्प यांनी याविषयी बोलताना, “तेल विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचे […] The post “व्हेनेझुएलाहून थेट अमेरिकेत ५० दशलक्ष बॅरल तेल येणार” ; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा appeared first on Dainik Prabhat .
Irrfan Khan: शूटिंगपूर्वी रडायचे इरफान, नसीरुद्दीन शाहांच्या सल्ल्याने बदललं आयुष्य
Irrfan Khan: बॉलीवूड आणि आंतरराष्ट्रीय सिनेसृष्टीत आपल्या सहज, नैसर्गिक अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे दिवंगत अभिनेते इरफान खान आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. मात्र त्यांच्या यशामागे मोठा संघर्ष दडलेला होता, हे फार कमी लोकांना माहिती आहे. एक काळ असा होता की शूटिंगला जाण्याआधी इरफान इतके घाबरायचे की ते रडायचे. इरफान खान यांचा जन्म ७ जानेवारी […] The post Irrfan Khan: शूटिंगपूर्वी रडायचे इरफान, नसीरुद्दीन शाहांच्या सल्ल्याने बदललं आयुष्य appeared first on Dainik Prabhat .
दोन माजी बेस्ट समिती अध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात
मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषवलेले दोन माजी नगरसेवक यंदा पालिका निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. वार्ड क्रमांक २०६ मधून नाना आंबोले, तर वार्ड क्रमांक २०४ मधून अनिल कोकीळ हे उभे आहेत. दोघेही शिवसेना शिंदे गटाकडून उभे असून, अखंड शिवसेनेमधून त्यांनी बेस्ट समिती अध्यक्षपद भूषवली होते. नाना आंबोले यांनी २०१५-१७ व अनिल कोकीळ हे २०१७ - १८ दरम्यान बेस्ट समिती अध्यक्ष होते. आज बेस्ट उपक्रमाची अवस्था अत्यंत वाईट झाली असून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत. तसेच खासगीकरणामुळे ही बेस्ट मोठ्या प्रमाणात तोट्यात गेली आहे. अशाच बेस्ट उपक्रमाला नवी उभारी देण्यासाठी अनुभवी अध्यक्षांची गरज आहे. गेली चार वर्षे निवडणुका न झाल्याने बेस्ट उपक्रमावर प्रशासनराज आहे.मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमास निधी देण्यास हात आखडता घेतला आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी त्यांना सातत्याने मोठा संघर्ष करावा लागत आहे. नुकतीच झालेल्या बेस्ट बस भाडेवाढीने थोडीफार आर्थिक अवस्था सुधारली असली तरी तोटा मोठ्या प्रमाणात असल्याने आजही महापालिकेच्या आर्थिक मदतीवर बेस्टला अवलंबून राहावे लागत आहे. खासगीकरणामुळे बेस्ट खरेच फायद्यात आहे का तोट्यात आहे हे सुद्धा कळण्यास मार्ग नाही. बेस्ट उपक्रमावर अंकुश ठेवण्यासाठी सक्षम बेस्ट समिती व बेस्ट समिती अध्यक्षांची सध्या गरज असून बेस्टच्या निवृत्त व सध्या कायमस्वरूपी असलेल्या कर्मचाऱ्यांचे भवितव्य त्यांच्या हाती असणार आहे.
जळगावात महायुतीचे शक्ती प्रदर्शन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रॅलीला प्रचंड गर्दीजळगाव : जळगाव शहरात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महापालिका प्रचारार्थ आयोजित रोड शोला शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने महायुतीने शहरात शक्ती प्रदर्शन केले. सायंकाळी महापालिका निवडणुक प्रचारार्थ मुख्यमंत्री यांचे धुळयाहून आगमन जळगाव शहरात झाले. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची भाजपाने जोरदार तयारी केली. जिल्हाभरातून पदाधिकारी, निवडून आलेले नगराध्यक्ष, नगरसेवक शहरात भाजपा कार्यालयात दाखल झाले, रोड शोमध्ये दोन रथांचे आयोजन करण्यात आले. त्यात एका रथात सर्व निवडून आलेले नगराध्यक्ष, नगरसेवक तर, दुसऱ्या रथात मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री गुलाबराव पाटील,संजय सावकारे, गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, अमोल जावळे, चंद्रकांत सोनवणे, अमोल पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी होते. या रोड शोमध्ये दहा हजारांवर पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले असल्याचा दावा केला आहे.जळगाव शहराच्या विकासासाठी मदत करणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना काँग्रेसच्या काळात शहर विकासासाठी ५० कोटी देखील मिळाले नव्हते असे सांगून जळगाव शहराच्या विकासासाठी आम्ही हजार कोटी दिले. आतापर्यंत ८६३ कोटींची विकासकामे दिली. यापुढे शहराच्या विकासासाठी पैसा देत राहू असे आश्वासन दिले. त्याचबरोबर पुढील पाच वर्षांत जळगाव स्मार्ट सिटी करण्याचा संकेत दिला. जळगावात उदयोग यावेत म्हणून जळगाव एमआयडीसीला डी दर्जा देण्यात आला आहे, यामुळे येथे सबसिडी मिळत असल्याने शहरात आता नवे उद्योग येतील, असे त्यांनी सांगितले.
७२ तासांत बदलले तीन पक्ष; मतदार राजाही संभ्रमात!
उल्हासनगर : उल्हासनगरमधील प्रभाग क्रमांक १५ मध्ये अवघ्या ७२ तासांत घडलेल्या एका प्रकाराने महापालिका निवडणुकीतील राजकीय नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या संपूर्ण पॅनेलने ऐनवेळी अर्ज मागे घेत, शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने उल्हासनगरच्या राजकारणात खळबळ उडाली. या प्रकारामुळे पक्षनिष्ठा, तत्त्व आणि विचारधारा यापेक्षा संधी महत्त्वाची ठरते का, असा थेट सवाल उपस्थित झाला आहे.या प्रभागात नीलेश बोबडे, रवी वसिटा, सुरज कारकर आणि एक महिला उमेदवार हे सत्ताधारी भाजपचे कार्यकर्ते होते. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली व राष्ट्रवादी (अजित पवार गट)कडून उमेदवारी अर्ज दाखल केला; परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या चारही उमेदवारांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेत,थेट शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. परिणामी, प्रभाग क्रमांक १५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे संपूर्ण पॅनलच निवडणूक रिंगणातून बाहेर पडले.तर अर्ज मागे घेण्याबाबत सुरज कारकर म्हणाले की, “आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून अर्ज भरला होता, पण अर्ज मागे घेतल्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला खेद आहे. तसेच शिवसेनेचा आणि आमचा दृष्टिकोन एकच असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, या पॅनलमधील काही उमेदवारांनी अवघ्या दोन दिवसांत भाजप - राष्ट्रवादी अजित पवार गट- शिवसेना शिंदे गट असा राजकीय प्रवास केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या घटनेमुळे निवडणुकीतील पक्षनिष्ठा, विचारसरणी आणि राजकीय नैतिकता या संकल्पनांवरच प्रश्नचिन्ह उभे राहिल्याच्या भावणा स्थानिक मतदारांनी व्यक्त केल्या.
अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसची युती
बहुमतासाठी अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेचा 'गेम' करण्याची रणनितीअंबरनाथ : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याच्या राजकारणात आज सर्वांत मोठी रणनिती उघडकीस आली आहे. राज्यात महायुती असली तरी ठाणे जिल्ह्यात भाजपने शिवसेनेला (शिंदे गट) मोठा धक्का दिला आहे. अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेना (शिंदे गट) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससोबत युती केली. या खेळीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना २३ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुळे विजयी झाल्या. निवडणुकीत भाजपला १६ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ४ नगरसेवक मिळून ३२ सदस्यांची मोट तयार झाली असून, भाजप बहुमत मिळवणार आहे.अंबरनाथ नगर परिषद निवडणूक ही श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील बालेकिल्ला मानली जात होती. अनेक वर्षांपासून सत्ता राखणाऱ्या शिवसेनेला (शिंदे गट) भाजपच्या युतीने मोठा झटका दिला आहे. तेजश्री करंजुळे यांच्या यशामुळे शिवसेनेची (शिंदे गट) प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. या युतीने अंबरनाथमधील राजकीय समीकरण पूर्ण बदलले असून, भविष्यातील नगर परिषद राजकारणासाठी ही महत्त्वाची वळणबिंदू ठरणार आहे. भाजप उपाध्यक्ष गुलाबराव करंजुळे-पाटील यांनी असा दावा केला की, ''युतीसाठी शिवसेनेकडून प्रतिसाद मिळालेला नव्हता. निवडणुकीत अंबरनाथ नगर परिषदेची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे होती. ही नगर परिषद कल्याण लोकसभा मतदारसंघात येते, त्यामुळे भाजप-काँग्रेसची युती शिंदे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानली जात आहे.'' या युतीमुळे अंबरनाथमधील राजकीय समीकरण पूर्ण बदलले असून, भविष्यातील नगर परिषदेतील सत्ता विभाजनासाठी हा निर्णय निर्णायक ठरणार आहे.
Pune District : बळीराजा मोफत आरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद
सोरतापवाडी :-सोरतापवाडी पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी सुदर्शन चौधरी, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे आणि लक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बळीराजा मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला सोरतापवाडी, तरडे, शिंदवणे, वळती तसेच हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातून सुमारे साडेचार हजार नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रचंड प्रतिसाद दिला. या भव्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा […] The post Pune District : बळीराजा मोफत आरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद appeared first on Dainik Prabhat .
पुणे : पुढचे आठ-दहा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. प्रचाराचे योग्य पद्धतीने नियोजन करा. मात्र, जे काही करताय ते नियमामध्ये करा! कोठेही सिसीटीव्ही फुटेजमध्ये येणार नाही, कोणतेही चुकीचे व्हिडीओ व्हायरल होणार नाहीत, याकडे कळजीपूर्वक लक्ष द्या, असा मोलाचा खबरदारीचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या उमेदवारांना दिला. उपमुख्यमंत्री पवार यांनी मंगळवारी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या […] The post Pune news : कोठेही सिसीटीव्ही फुटेजमध्ये सापडू नका.! अजित पवारांचा पक्षाच्या उमेदवारांना खबरदारीचा सल्ला appeared first on Dainik Prabhat .
Pune : महिला मतदारांची भूमिका निर्णायक –नीलम गोऱ्हे
पुणे– वाहतूक कोंडीमुक्त आणि भयमुक्त पुण्याची निर्मिती, दोन लाख महिलांना लखपती बनविणे, बचत गटातील महिलांना ५० हजारांचे अनुदान देणे, प्रलंबित वाड्यांचे प्रश्न मार्गी लावणे, झोपडपट्ट्यांचे पुर्नवसन करून प्रत्येक झोपडीधारकाला पाचशे चौरस फुटांचे घर यांसह शहरातील विविध १८ विकासाच्या मुद्यांवर शिवसेना पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरली आहे, असे शिवसेना नेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत […] The post Pune : महिला मतदारांची भूमिका निर्णायक – नीलम गोऱ्हे appeared first on Dainik Prabhat .
Pune District : शेवटच्या घटकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवणार : प्रशांत कुर्हाडे
आळंदी : आळंदी हे संतपरंपरेचे व वारकरी संस्कृतीचे केंद्र आहे. या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, भूमिगत गटारे, आरोग्य सुविधा तसेच पर्यावरणपूरक प्रकल्पांना प्राधान्य दिले जाईल. भाविकांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येतील. आळंदीतील शेवटच्या घटकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्याचा संकल्प आहे, असे मनोगत […] The post Pune District : शेवटच्या घटकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवणार : प्रशांत कुर्हाडे appeared first on Dainik Prabhat .
Pune District : सोसायटीधारकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध
वाघोली : प्रभाग क्रमांक ०३ (लोहगाव–विमाननगर–वाघोली) परिसरातील सोसायटीधारकांच्या विविध समस्या, विकासकामे व नागरी सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी नोवोटेल हॉटेल, विमाननगर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस परिसरातील विविध सोसायटींचे चेअरमन, सभासद व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी, “प्रभाग क्रमांक ०३ मधील […] The post Pune District : सोसायटीधारकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध appeared first on Dainik Prabhat .
“हिंमत असेल तर या, मी वाट पाहतोय…” ; ‘या’देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी दिले ट्रम्प यांना खुले आव्हान
Colombia On US। व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर लॅटिन अमेरिकेत तणाव वाढत चालला आहे. यावेळी अमेरिकेचे लक्ष्य कोलंबिया असू शकते अशा चर्चा सुरु आहेत. दरम्यान, कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी स्वतः हा दावा केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खुलं आव्हान दिलं आहे. त्यांनी “जर तुमच्यात हिंमत असेल तर या, मी इथेच […] The post “हिंमत असेल तर या, मी वाट पाहतोय…” ; ‘या’ देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी दिले ट्रम्प यांना खुले आव्हान appeared first on Dainik Prabhat .
मुंबईतील सात प्रभागांमध्ये युती आणि आघाडीचे उमेदवारच आमने-सामने
मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा महायुती तसेच उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप)यांची आघाडी असली तरी मुंबईतील सात प्रभागांमध्ये ही महायुती किंवा आघाडी दिसून येत नाही. तर या चार प्रभागांमध्ये हे सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असून यात कुणाचा बळी जातो याकडे सर्वांचे लक्ष आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे, उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शपची युती झाली असली तरी प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक १४३, प्रभाग क्रमांक १७५ यामध्ये मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शप यांचे उमेदवारी प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर ठाकले गेले आहेत. त्यामुळे या दोन प्रभागांमध्ये मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.तर प्रभाग क्रमांक ३४, प्रभाग क्रमांक १७३ आणि प्रभाग क्रमांक २२५मध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना अशी लढत पहायला मिळणार आहे.या तिन्ही प्रभागांमध्ये भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार एकमेकांसमोर ठाकले गेले आहेत. तर प्रभाग क्रमांक १७९मध्ये शिवसेना विरुद्ध रिपाइं आठवले यांच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे, तसेच याच प्रभागांत उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शपच्या उमेदवारांनीही स्वतंत्र अर्ज भरले आहे. तर प्रभाग १५०मध्ये शिवसेना विरुद्ध रिपाइं आठवले यांच्या पक्षाचे उमेदवार आमने-सामने आहेत.महायुती आणि आघाडीचे उमेदवारच असलेले प्रभागप्रभाग क्रमांक ३४सॅम्युअल डेनिस भाजप विजय महाडिक, शिवसेनाप्रभाग क्रमांक १४३प्रांजल प्रशांत राणे, मनसे रेहमत खान, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)प्रभाग क्रमांक १५०वनिता कोकरे, भाजप अंसारी आयेशा अली (रिपाइं आठवले)प्रभाग क्रमांक १७५अर्चना कासले, मनसे आरती राजेंद्र देवेंद्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)प्रभाग क्रमांक १७९सरदार शमाबी यासिन, शिवसेना भारती पांडे, (रिपाइं आठवले)प्रभाग क्रमांक १७९दीपाली सचिन खेडेकर, उबाठा भारती पांडे, राष्ट्रवादी काँग्रेस, शपप्रभाग क्रमांक १७३पूजा रामदास कांबळे, शिवसेना शिल्पा केळुसकर, भाजपप्रभाग क्रमांक २२५हर्षिता नार्वेकर, भाजप सुजाता सानप, शिवसेना
नाशिकच्या दोन माजी महापौरांचा शिवसेनेत प्रवेश
नाशिक : नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभ दीप निवासस्थानी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीत लक्षणीय वाढ झाली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दशरथ पाटील महापौर असताना पार पडलेल्या नाशिक कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनाचा उल्लेख करत, “कुंभमेळ्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील भव्य आयोजनाचे नियोजन, प्रशासनाशी समन्वय आणि जनतेच्या सोयीसुविधांचा अनुभव शिवसेनेसाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.
मीरा-भाईंदर महापालिकेत चार माजी महापौरांची प्रतिष्ठा पणाला
भाईंदर : मीरा-भाईंदर पालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत पालिकेत महिलाराजच राहिलेले आहे. या काळात झालेल्या आठपैकी सहा वेळा महापौर बनण्याचा मान महिलांना मिळाला. त्यापैकी चार माजी महापौरांची प्रतिष्ठा निवडणुकीत पणाला लागली आहे.मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी चार माजी महापौर विविध प्रभागांतून लढत देत आहेत. यातील तीन माजी महापौर भाजपकडून, तर एक माजी महापौर शिवसेनेकडून नशीब अजमावत आहे. महापौर पद हे सर्वाधिक काळ महिलांकडे राहिले तर उपमहापौरपदी सर्वाधिक काळ पुरुषांकडे राहिले. आठपैकी सात वेळा पुरुष उपमहापौर राहिले आहेत; मात्र त्यापैकी केवळ भाजपचे हसमुख गेहलोत माजी उपमहापौर निवडणूक लढवत आहेत. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या कार्यकाळात गेहलोत उपमहापौरपदी विराजमान होते.निर्मला सावळे : मीरा-भाईंदर महापालिकेची २००२ मध्ये स्थापना झाल्यानंतर दुसरा महापौर होण्याचा मान निर्मला सावळे यांना मिळाला होता.कॅटलीन परेरा : कॅटलीन परेरा माजी आमदार दिवंगत गिल्बर्ट मेंडोंसा यांच्या कन्या आहेत. २०१२ मध्ये महापौरपदी विराजमान झाल्या. शिवसेनेच्या विभाजनानंतर त्या शिंदे गटासोबत राहिल्या. त्या भाईंदर पश्चिम येथील प्रभाग आठमधून निवडणूक रिंगणात आहेत.डिंपल मेहता : भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता यांच्या गळ्यात २०१७ मध्ये माळ पडली. आता त्या पुन्हा एकदा मीरा रोड येथील प्रभाग १२ मधून निवडणूक लढवत आहेत.जोत्स्ना हसनाळे : २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपतना ज्योत्स्ना हसनाळे महापौर होत्या. काशीमीरा येथील प्रभाग १४ मधून भाजपच्या तिकीटावर त्या नशीब अजमावत आहेत.
Pune District : नाटंबीमध्ये विनापरवानगी वृक्षतोड; ग्रामस्थांच्या तक्रारीला वनविभागाची केराची टोपली
भोर : भोर-आंबवडे रस्त्यावरील नाटंबी (ता. भोर) गावात विनापरवानगी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गावातील पद्मावती देवस्थान ट्रस्टच्या गट क्रमांक ४९५ मध्ये ही वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. याठीकाणी सुमारे साडेचार एकर जागेत औषधी वनस्पती व फळबाग लागवड करण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे ही झाडे दिवसाढवळ्या तोडून, तोडलेले लाकूड टेम्पोमधून बाहेर […] The post Pune District : नाटंबीमध्ये विनापरवानगी वृक्षतोड; ग्रामस्थांच्या तक्रारीला वनविभागाची केराची टोपली appeared first on Dainik Prabhat .
Pimpri : प्रभाग १६ मध्ये वातावरण राष्ट्रवादीमय
पिंपरी: पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पदयात्रेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. पॅनल प्रमुख मोरेश्वर भोंडवे यांच्यासह चारही उमेदवारांनी काढलेली पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे संपूर्ण प्रभागात राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या वेळी प्रभाग १६ चे पॅनेल प्रमुख व सर्वसाधारण गट ‘ड’ […] The post Pimpri : प्रभाग १६ मध्ये वातावरण राष्ट्रवादीमय appeared first on Dainik Prabhat .
Pune District : पाऊण लाख भाविक मयुरेश्वर चरणी लीन
मोरगाव : अंगारिका चतुर्थी निमित्ताने आष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथे पहाटेपासूनच भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यामुळे मोरगावला यात्रेचे स्वरूप आले होते. पहाटे पाच ते रात्री उशीरापर्यंत सुमारे पाऊण लाख भाविकांनी मयुरेश्वराचे दर्शन घेतले असल्याची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक राजेंद्र जगताप यांनी दिली. पहाटे गुरव मंडळींची प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य गाभारा […] The post Pune District : पाऊण लाख भाविक मयुरेश्वर चरणी लीन appeared first on Dainik Prabhat .
Pimpri : पदे दिल्याचे भान विसरलेल्यांना घरी बसवा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
पिंपरी – बारामती ही माझी जन्मभूमी असली तरी पिंपरी चिंचवड ही माझी कर्मभूमी आहे. मी अनेकांना पदे दिली. मात्र काहींनी पदे दिल्याचे भान ठेवले नाही, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. माणुसकी सोडलेल्या या मंडळींना घरी बसवा असे आवाहन त्यांनी केले. पिंपरी गाव प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू […] The post Pimpri : पदे दिल्याचे भान विसरलेल्यांना घरी बसवा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन appeared first on Dainik Prabhat .
पुणे – स्वयंशिस्तीमुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर मर्यादा येत नसून, प्रत्यक्षात आपले रक्षण होत असते. वाहतूक सुरक्षा ही एक सामूहिक जबाबदारी असून, खरे सामर्थ्य वेगात नसून नियंत्रणात असते. हे तरुणांनी समजून घेतले पाहिजे. सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन पुणे परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी केले. एमआयटी आर्ट, डिझाईन व […] The post Pune news : ‘सुरक्षित वाहतुकीसाठी नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे…’; पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे appeared first on Dainik Prabhat .
इंदापूर : मॅरेथॉनसारखा स्तुत्य, आरोग्यदायी व समाजप्रबोधनात्मक उपक्रम आपल्या नगरीत सुरू होत असून, उपक्रमाला सर्व इंदापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी केले. इंदापूर स्पोर्ट्स अँड हेल्थ फाउंडेशन आयोजित, वीरश्री मालोजीराजे भोसले इंद्रेश्वर मॅरेथॉन सीजन-वन, या ऐतिहासिक उपक्रमाच्या लोगोचे अनावरण इंदापूरचे ग्रामदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्रीइंद्रेश्वर मंदिराच्या पावन प्रांगणात […] The post Pune District : मॅरेथॉन ही इंदापूरच्या आरोग्यदायी भविष्याची चळवळ : नगराध्यक्ष भरत शहा यांचे प्रतिपादन appeared first on Dainik Prabhat .
Pune : प्रभाग १७ मध्ये भाजपकडून विकासाचा पर्याय; उमेदवारांचा घरोघरी प्रचार
हडपसर – प्रभाग क्र. १७ मध्ये भारतीय जनता पक्षाने सुशिक्षित, तरुण व दमदार उमेदवार देत नागरिकांसमोर एक सक्षम राजकीय पर्याय उभा केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागाचा विकास रखडला होता. आता, भाजपच्या माध्यमातून हडपसरच्या विकासाला गती मिळत असून अनेक रखडलेली विकासकामे मार्गी लागत आहेत. भविष्यात प्रभाग स्वच्छ, सुंदर व सुनियोजित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचेच सर्व […] The post Pune : प्रभाग १७ मध्ये भाजपकडून विकासाचा पर्याय; उमेदवारांचा घरोघरी प्रचार appeared first on Dainik Prabhat .
Pimpri : शहरातील भ्रष्टाचाराचा आका संपवायचा आहे –अजित पवार
पिंपरी– शहरामध्ये नऊ वर्ष ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी स्वतःची घरे भरली आहेत. महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत दादागिरी केली आहे. यांना पैशांची मस्ती आणि सत्तेची गुर्मी आहे. हे कारभारी आता बदलायला पाहिजे. ज्यांनी महापालिकेत भ्रष्टाचार केला आहे, त्या भ्रष्टाचाराचा आका संपवायचा असून त्यांना त्यांची जागा दाखवायची असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील भाजप […] The post Pimpri : शहरातील भ्रष्टाचाराचा आका संपवायचा आहे – अजित पवार appeared first on Dainik Prabhat .
Pune news : इयत्ता चौथी, सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिलला होणार !
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता चौथी, इयत्ता सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिलला एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज नोंदणीसाठी २ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. शासनमान्य शाळांमधून २०२५ -२६ या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्जात परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध […] The post Pune news : इयत्ता चौथी, सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिलला होणार ! appeared first on Dainik Prabhat .

30 C