श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर
मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे जेतेपद भारतीय संघाने पटकावले. भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच वर्ल्डकप जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय महिला संघाने हे जेतेपद पटकावले. यानंतर विश्रांतीवर असलेला भारतीय संघ श्रीलंका दौरा खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.भारतीय महिला संघ यंदाच्या वर्षात अखेरची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर असणार आहे. तर महिला विश्वचषक अंतिम सामन्यातील उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीनंतर शफाली वर्माला टी-२० संघात संधी मिळाली आहे. तर राधा यादवला टी-२० संघात संधी मिळालेली नाही. तर गोलंदाजत श्रीचरणीला संधी देण्यात आली आहे.महिला विश्वचषकानंतर स्मृती मानधनाचे लग्न हा सर्वात चर्चेचा विषय ठरला होता. पण लग्नाच्या दिवशीच स्मृतीचे लग्न स्थगित करण्यात आले. त्यानंतर श्रीलंका मालिकेसाठी संघ जाहीर होण्याच्या दोन दिवसआधीच स्मृती मानधनाने सिने संगीतकार पलाश मुच्छल याच्याशी लग्न मोडलं असल्याची घोषणा तिने केली. यानंतर आता पहिल्यांदाच स्मृती मानधना मैदानावर खेळण्यासाठी उतरणार आहे. स्मृती मानधना या संघाची उपकर्णधार असेल.भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, हरलीन देओल, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर, रिचा घोष (यष्टीरक्षक), जी कमलिनी (यष्टीरक्षक), श्रीचरणी, वैष्णवी शर्माभारत-श्रीलंका मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक२१ डिसेंबर – भारत वि. श्रीलंका, पहिला टी-२० सामना, विशाखापट्ट्णम२३ डिसेंबर – भारत वि. श्रीलंका, दुसरा टी-२० सामना, विशाखापट्ट्णम२६ डिसेंबर – भारत वि. श्रीलंका, तिसरा टी-२० सामना, तिरूवनंतपुरम२८ डिसेंबर – भारत वि. श्रीलंका, चौथा टी-२० सामना, तिरूवनंतपुरम३० डिसेंबर – भारत वि. श्रीलंका, पाचवा टी-२० सामना, तिरूवनंतपुरम
कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव
कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१ धावांनी जिंकला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव झाला. कटकच्या सामन्यात भारताचा हार्दिक पांड्या चमकला. त्याने नाबाद ५९ धावा केल्या तसेच दक्षिण आफ्रिकेच्या एका फलंदाजालाही बाद केले. कटकमध्ये झालेल्या विजयामुळे भारताने पाच सामन्याच्या टी २० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. याआधी भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली आहे.https://prahaar.in/2025/12/09/india-sets-a-target-of-176-runs-against-south-africa-hardik-pandya-hits-a-blistering-half-century/कटकच्या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांना भोवला. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत सहा बाद १७५ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा डाव फक्त ७४ धावांत आटोपला. भारताने १२.३ षटकांत दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळला. भारताकडून अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह या चौघांनी प्रत्येकी दोन तर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने शून्य, एडेन मर्करामने १४, ट्रिस्टन स्टब्सने १४, डेवॉल्ड ब्रेव्हिसने २२, डेव्हिड मिलरने एक, डोनोव्हन फरेराने पाच, मार्को जॅनसेनने १२, केशव महाराजने शून्य, अँरिक नॉर्टजेने एक, लुथो सिपामलाने दोन, लुंगी न्गिडीने नाबाद दोन धावांचे योगदान दिले.याआधी भारताकडून अभिषेक शर्माने १७, शुभमन गिलने चार, सूर्यकुमार यादवने १२, तिलक वर्माने २६, अक्षर पटेलने २३, हार्दिक पांड्याने नाबाद ५९, शिवम दुबेने ११, जितेश वर्माने नाबाद दहा धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी न्गिडीने तीन, लुथो सिपामलाने दोन आणि डोनोव्हन फरेराने एक विकेट घेतली.
IND vs SA : तिलक वर्माने नॉर्खियाला ठोकला मॉन्स्टर सिक्स! चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर, पाहा VIDEO
Tilak Varma 89m Monster Six Goes Out Of Stadium : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना कटकच्या बाराबाती स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला १०१ धावांनी धूळ चारत दणदणीत विजय मिळवला. यासह पाच सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. त्तत्पूर्वी या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचा युवा फलंदाज तिलक वर्माने आपल्या […] The post IND vs SA : तिलक वर्माने नॉर्खियाला ठोकला मॉन्स्टर सिक्स! चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर, पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .
चीननं डोकं चालवलं अन् निर्यातीत झाली प्रचंड वाढ
नवी दिल्ली – भारत व अमेरिकेसारखे देश निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करुनही त्यांची व्यापारातील तूट वाढत असताना चीनने मात्र जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत निर्यात वाढवून आयात कमी करण्यात यश मिळविले आहे. या कालावधीत चीनची आयातीपेक्षा निर्यात तब्बल एक लाख कोटी डॉलरने जास्त आहे. गेल्या पूर्ण वर्षात चीनची आयातीपेक्षा निर्यात 992 अब्ज डॉलरने जास्त होती. आता […] The post चीननं डोकं चालवलं अन् निर्यातीत झाली प्रचंड वाढ appeared first on Dainik Prabhat .
डोनाल्ड ट्रम्पांचा भारताला आणखी एक झटका; अमेरिका भारतीय तांदळाची आयात रोखणार
वॉशिंग्टन – अमेरिकेतील काही तांदूळ उत्पादकांनी भारत हा अमेरिकेत तांदूळ उत्पादन मूल्यापेक्षा कमी किमतीत विकत असल्याची तक्रार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे केली. ट्रम्प यांनी लगेच या तांदळावर आयात शुल्क लावून भारतीय तांदळाची आयात रोखणार असल्याचे या शेतकर्यांना सांगितले. यामुळे अमेरिका भारतीय तांदळावर आणखी शुल्क लावण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. या बैठकीत अमेरिकेतील एका शेतकर्याने […] The post डोनाल्ड ट्रम्पांचा भारताला आणखी एक झटका; अमेरिका भारतीय तांदळाची आयात रोखणार appeared first on Dainik Prabhat .
Delhi Blast Case : दिल्ली स्फोट प्रकरण ! एनआयएकडून आणखी एका डॉक्टरला अटक
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील कार स्फोट प्रकरणी आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली. ती महत्वपूर्ण कारवाई राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केली. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात १० नोव्हेंबरला कार स्फोट घडवण्यात आला. त्यामध्ये १५ जण मृत्युमुखी पडले. ती कार डॉक्टर उमर-उन-नबी चालवत होता. त्यामुळे स्फोट प्रकरणाशी डॉक्टर आणि उच्चशिक्षितांचा समावेश असणाऱ्या व्हाइट कॉलर […] The post Delhi Blast Case : दिल्ली स्फोट प्रकरण ! एनआयएकडून आणखी एका डॉक्टरला अटक appeared first on Dainik Prabhat .
2025 पर्यंत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 300 लाख कोटींवर जाणार
नवी दिल्ली – गुंतवणूकदारांची आर्थिक साक्षरता वाढत आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीचे नवे पर्याय उपलब्ध होत आहेत. अशा परिस्थितीत भारतातील म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता 2035 पर्यंत वाढवून 300 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता एका अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. बेन अँड कंपनी व ग्रो या इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने केलेल्या विश्लेषणानुसार डिजिटल माध्यमातून गुंतवणूक करण्याचे पर्याय उपलब्ध झाल्यामुळे […] The post 2025 पर्यंत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 300 लाख कोटींवर जाणार appeared first on Dainik Prabhat .
Stock Market: एशियन पेंट्स, मारुती सुझुकी, टाटा स्टील, टीसीएस, बजाज फायनान्स शेअर्समध्ये घट
मुंबई – अमेरिकेचे पतधोरण 10 डिसेंबरला जाहीर होणार आहे. रुपया कमकुवत होत असताना परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करीत आहेत. भारत- अमेरिकेत दरम्यानचा व्यापार करार मार्गी लागण्याची शक्यता मंदावत आहे. अशा परिस्थितीत सावध गुंतवणूकदाराकडून नफेखोरी होत असल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकात सलग दुसर्या दिवशी मोठ्या प्रमाणात घट नोंदली गेली. बाजार बंद होतान मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स […] The post Stock Market: एशियन पेंट्स, मारुती सुझुकी, टाटा स्टील, टीसीएस, बजाज फायनान्स शेअर्समध्ये घट appeared first on Dainik Prabhat .
IND vs SA India beat South Africa by 101 runs : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना कटक येथे पार पडला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १०१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयात भारताच्या गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यामुळे भारतीय संघाने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या […] The post IND vs SA : हार्दिक पाठोपाठ गोलंदाजांचे दमदार प्रदर्शन! भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १०१ धावांनी दणदणीत विजय appeared first on Dainik Prabhat .
कॉसमॉस फाउंडेशन व कौशलम् न्यासद्वारा निबंध स्पर्धा
पुणे – कॉसमॉस फाउंडेशन पुणे व कौशलम् न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून घेण्यात आलेल्या ’आदर्श व समर्थ भारताचे निकष काय असावेत?’ या निबंध स्पर्धेचा अंतिम निकाल व बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून वरिष्ठ शिक्षणतज्ञ व कॉर्पोरेट प्रशिक्षक डॉ. शरद जोशी आणि जेष्ठ अर्थतज्ञ व व्यवसाय नियोजक […] The post कॉसमॉस फाउंडेशन व कौशलम् न्यासद्वारा निबंध स्पर्धा appeared first on Dainik Prabhat .
स्ट्राँग रुमबाहेर स्वखर्चाने लावलेले CCTV प्रशासनाने हटवले; उमेदवारांचा प्रशासनावरचा विश्वास डळमळीत
कोल्हापूर : पेठवडगाव नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाची तारीख पुढे ढकलल्यानंतर उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा प्रशासनावरचा विश्वास डळमळीत झाला आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी स्ट्राँग रुमबाहेर स्वतःच्या खर्चाने खासगी जागेत CCTV कॅमेरे बसवले होते. मात्र, नगरपरिषद प्रशासन आणि पोलिसांनी हे सर्व कॅमेरे काढून टाकल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे. 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर सर्व ईव्हीएम […] The post स्ट्राँग रुमबाहेर स्वखर्चाने लावलेले CCTV प्रशासनाने हटवले; उमेदवारांचा प्रशासनावरचा विश्वास डळमळीत appeared first on Dainik Prabhat .
‘हे’महत्वाचे विधेयक विधानसभेत मंजूर; राज्यातील 60 लाख कुटुंबांना दिलासा
नागपूर : राज्यातील सुमारे ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा देणारे ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२५’ मंगळवारी विधानसभेत मंजूर झाले. गुंठेवारी आणि लहान भूखंडांवर घरे बांधून राहणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या विधेयकामुळे आता लहान भूखंडांची खरेदी-विक्री सुलभ होणार आहे. तसेच, संबंधित मालकांचे नाव सातबारा उताऱ्यावर स्वतंत्रपणे लागणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे […] The post ‘हे’ महत्वाचे विधेयक विधानसभेत मंजूर; राज्यातील 60 लाख कुटुंबांना दिलासा appeared first on Dainik Prabhat .
तब्बल २८ तासांच्या प्रयत्नानंतर जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :जुन्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करून त्यांना कार्यक्षम, सुरक्षित आणि दीर्घकालीन स्वरूप देण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिका सातत्याने व्यापक उपाययोजना राबवत आहे. याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून ७५ वर्षे जुन्या, जीर्ण झालेल्या तसेच वहनक्षमता गमावलेल्या जलवाहिन्यांच्या बदलाची महत्त्वाकांक्षी मोहीम राबवली जात आहे. मोठ्या व्यासाच्या नव्या जलवाहिन्या टप्प्याटप्प्याने अंथरण्यात येत असल्यामुळे पाणीगळती, दूषित पाणीपुरवठा आणि रस्ते खचणे यांसारख्या दीर्घकालीन समस्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. या मोहिमेतील एक निर्णायक टप्पा म्हणून तानसा धरणातून भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी २७५० मिलीमीटर व्यासाची जीर्ण झालेली जलवाहिनीच्या बदलाची कार्यवाही मंगळवारी ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी पूर्ण करण्यात आली आहे.या कामाचे स्वरूप अत्यंत जटिल, आव्हानात्मक व जोखमीचे होते. जीर्ण जलवाहिनी बदलण्याचे अत्यावश्यक काम काल सोमवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू करण्यात आले. हे काम मंगळवारी ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता पूर्ण झाले. मंगळवारी या प्रक्रियेस साधारणतः २८ तासांचा कालावधी लागला. जल अभियंता विभागाच्या सातत्यपूर्ण, नियोजित आणि युद्धपातळीवरील प्रयत्नांमुळे हे काम नियोजित वेळेनुसार, यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी पूर्ण करण्यासाठी जल अभियंता विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्कृष्ट समन्वय राखून अथक परिश्रम घेतले. या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून सहकार्य केल्याबद्दल १७ प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) नागरिकांचे मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत आभार मानण्यात येत आहे. जलवाहिनी बदलण्यात आल्यानंतर आता १७ प्रशासकीय विभागांचा पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत होत आहे.मुंबईतील पाणीपुरवठा यंत्रणेचा कणा असलेल्या अनेक जलवाहिन्या या ब्रिटिशकालीन किंवा ७०–८० वर्षांपूर्वीच्या आहेत. जीर्ण जलवाहिन्यांमुळे पाणीपुरवठ्यात अडथळे, भूमिगत गळती आणि वहनक्षमता कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका सातत्याने दुरुस्ती, डागडुजी, तसेच आधुनिक आणि सक्षम जलवाहिन्या अंथरण्याची कार्यवाही करत आहे. सुरक्षित, स्वच्छ आणि अखंडित पाणीपुरवठा हा मुंबईकरांचा मूलभूत हक्क असून, तो अधिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर वैकुंठ स्मशानभुमी, नवी पेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले; पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी माजी गृहमंत्री मंत्री अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, चेतन तुपे, पोलीस उपायुक्त कृषिकेष रावल, उपविभागीय अधिकारी […] The post ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार appeared first on Dainik Prabhat .
IND vs SA : हार्दिक पंड्याची हार्ड-हिटिंग! टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावलं अनोखं शतक
IND vs SA Hardik Pandya Complete 100 Sixes in T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला कटक येथे सुरुवात झाली आहे. या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पंड्याच्या हार्ड-हिटींग फटकेबाजीच्या जोरावर १७५ धावांचा डोंगर उभारला. हार्दिक पंड्याने २८ चेंडूंत ५९ धावांची वादळी खेळी साकारत एक अनोखं शतकही पूर्ण […] The post IND vs SA : हार्दिक पंड्याची हार्ड-हिटिंग! टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावलं अनोखं शतक appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभेत भाजपवर ‘बंगाली द्वेषा’चा गंभीर आरोप करत मोठा राजकीय गदारोळ निर्माण केला आहे. बॅनर्जी यांनी भाजपवर बांग्लाभाषिकांना ‘रोहिंग्या’ ठरवून लक्ष्य करण्याचा आणि देशातून हाकलून देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला. तसेच, त्यांनी रोहिंग्यांच्या मिझोरममधील प्रवेशासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या (MHA) कथित निर्देश आणि सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) भूमिकेवरही […] The post लोकसभेत बंगाल विरुद्ध भाजप! बंगालींविरुद्ध द्वेषाचे आरोप, खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विधानावरून राजकीय गदारोळ appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली: ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यसभेत झालेल्या चर्चेला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तीव्र राजकीय वळण दिले आहे. केंद्र सरकारवर हल्लाबोल करत त्यांनी थेट आरोप केला की, आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद मुद्दाम उकरून काढण्यात आला आहे, जेणेकरून जनतेचे लक्ष बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था आणि सामाजिक समस्यांसारख्या मूळ प्रश्नांवरून हटवता यावे. […] The post खरगेंचा सरकारवर मोठा आरोप: ‘बंगाल निवडणुकीसाठी मुद्दाम वाद उकरून काढला’; बेरोजगारी, रुपयाच्या घसरणीवर तीव्र शब्दांत टीका appeared first on Dainik Prabhat .
प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यासाठी पाच दिवसांची मुदतवाढ
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीशी संबंधित सुधारित कार्यक्रम आज मंगळवार, ९ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार, महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याची मुदत सोमवार, १५ डिसेंबर २०२५ रोजीपर्यंत म्हणजेच पाच दिवस वाढवण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम माननीय राज्य निवडणूक आयोगाकडून १४ ऑक्टोबर २०२५ आणि २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. त्यानुसार, प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याचा निर्धारित कालावधी १० डिसेंबर २०२५ असा होता. आता सुधारित वेळापत्रकानुसार, प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याचा निर्धारित कालावधी १५ डिसेंबर २०२५ असा करण्यात आला आहे. म्हणजेच ५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करण्याचा निर्धारित कालावधीपूर्वी १५ डिसेंबर २०२५ होता. सुधारित वेळापत्रकानुसार, मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करण्याचा निर्धारित कालावधी २० डिसेंबर २०२५ असा आहे. तसेच, मतदान केंद्रनिहाय मतदारयादी प्रसिद्ध करण्याचा यापूर्वीचा कालावधी २२ डिसेंबर २०२५ असा होता. त्यात सुधारणा करून मतदान केंद्रनिहाय मतदारयादी प्रसिद्ध करण्याची सुधारित तारीख २७ डिसेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.
भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक
कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात एकीकडे भारताचे फलंदाज एकामागोमाग बाद होत असताना, हार्दिक पांड्याने एकहाती किल्ला लढवत धडाकेबाज अर्धशतक पूर्ण केले. हार्दिकच्या या आक्रमक आणि झुंजार खेळीमुळे भारतीय डावाला आधार मिळाला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा भारताला ६ बाद १७५ धावा करता आल्या.भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात मंगळवारी कटकमधील बाराबाती स्टेडियमवर टी- २० मालिकेतील पहिला सामना झाला. या सामन्यात भारताच्या वरच्या आणि मधल्या फळीतील फलंदाज मोठ्या खेळी करण्यात अपयशी ठरले. पण हार्दिक पांड्याने केलेल्या आक्रमणामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर १७६ धावांचे लक्ष्य ठेवता आले.भारताकडून अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी सलामीला फलंदाजी केली. मात्र भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. उपकर्णधार गिल तिसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्याला लुंगी एनगिडीने मार्को यान्सिनच्या हातून ४ धावांवर झेलबाद केले. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला होता. त्याने सुरुवात चांगली केली होती. त्याने तिसऱ्या षटकात चौकार आणि षटकार मारला. पण त्यानंतर या चौथ्या चेंडूवर सूर्यकुमारलाही लुंगी एनगिडीनेच एडेन मार्करमच्या हातून झेलबाद केले. सूर्यकुमारने ११ चेंडूत १२ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मासह तिलक वर्माने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण अभिषेकचा मोठा अडथळाही लुथो सिपामालाने दूर केला. त्याला १२ चेंडूत १७ चेंडूत त्याने मार्को यान्सिनच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे भारताची अवस्था ४८ धावांवर ३ विकेट्स अशी झाली. नंतर तिलक वर्मा आणि अक्षर पटेल यांनी ३० धावांची भागीदारी करत संघाला ७० धावांचा टप्पा पार करून दिला. पण तिलकही १२ व्या षटकात बाद झाला. त्यालाही लुंगी एनगिडीनेच बाद केले आणि झेलही मार्को यान्सिनने घेतला. तिलकने ३२ चेंडूत २६ धावा केल्या. त्याच्यानंतर हार्दिक पांड्याने फलंदाजीला येताच आक्रमक शॉट्स खेळत इरादा स्पष्ट केला. मात्र दुसऱ्या बाजूने अश्रक पटेल २१ चेंडूत २३ धावा करून बाद झाला, तर शिवम दुबेही ९ चेंडूत ११ धावांवर बाद झाला. मात्र या विकेट्स जात असतानाही दुसऱ्या बाजूने हार्दिक पांड्या दमदार फलंदाजी करत होता. त्याने त्याच्या आक्रमक फलंदाजीसह संघाला १५० धावांचा टप्पा पार करून दिला.हार्दिकने २० व्या षटकात षटकारासह २५ चेंडूत त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. यासोबतच त्याचे टी२० कारकिर्दीत १०० षटकारही पूर्ण झाले. त्याच्या खेळीमुळे भारताने २० षटकात ६ बाद १७५ धावा करता आल्या. हार्दिक २८ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ५९ धावांवर नाबाद राहिला. जितेश शर्मा ५ चेंडूत १० धावांवर नाबाद राहिला. गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. लुथो सिपामलाने २ विकेट्स घेतल्या, तर डेनोवन फरेराने १ विकेट घेतली.सूर्या ठरला अनलकी!कटकच्या मैदानातील पहिल्या टी-२० सामन्यात नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा भारताच्या विरोधात लागला. वनडेत के.ले राहुलने टॉस उंचावताना डाव्या हाताचा फंडा आजमावला होता. सूर्यानंही त्याची कॉपी केली. पण त्याचे नशीब काही बदलले नाही. सूर्यकुमार यादवसमोर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमन नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.संजूसह कुलदीप, हर्षित राणाही बाकावरटॉस गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आल्यावर सूर्यकुमार यादवनं कोणत्या रणनितीसह मैदानात उतरणार हे सांगताना प्लेइंग इलेव्हनम सांगण्याऐवजी बाहेर बसवण्यात आलेल्या मंडळींची नावे घेतली. संजू सॅमसन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा यांच्याशिवाय संघ मैदानात उतरणार असल्याचे तो म्हणाला.
Indigo Flight Crisis: इंडिगोच्या अडचणी वाढल्या! सरकारचा मोठा निर्णय; 10% उड्डाणे कपात करण्याचे आदेश
Indigo Flight Crisis: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोच्या (Indigo) फ्लाईट्सच्या गोंधळावर केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. सलग आठव्या दिवशी इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानंतर, नागरी उड्डाण मंत्रालयाने (Civil Aviation Ministry) मंगळवारी उच्चस्तरीय बैठकीत इंडिगोच्या १० टक्के विमानांच्या उड्डाणांमध्ये कपात करण्याचे निर्देश दिले. गेले आठ दिवस इंडिगोच्या विमानांच्या रद्द होण्याचे सत्र सुरूच असून, आज […] The post Indigo Flight Crisis: इंडिगोच्या अडचणी वाढल्या! सरकारचा मोठा निर्णय; 10% उड्डाणे कपात करण्याचे आदेश appeared first on Dainik Prabhat .
भटक्या व अर्धभटक्या समाजाच्या समस्या सुटणार कधी? खासदार वाकचौरे यांच्या प्रश्नावर केंद्राचे उत्तर
नेवासे – भटके विमुक्त व अर्धभटके समुदायांना जात प्रमाणपत्रे व संबंधित दस्तावेज राज्य सरकारांमार्फत देण्यात येतात आणि त्यानुसार त्यांना विविध शासन योजनांमध्ये हक्क मिळतात, असे स्पष्टीकरण मंगळवार (दि.९) रोजी लोकसभेत केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री डॉ.विरेंद्र कुमार यांनी दिले. शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी विमुक्त, घुमंतू, अर्धघुमंतू समुदाय यांच्या समस्यांबाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. […] The post भटक्या व अर्धभटक्या समाजाच्या समस्या सुटणार कधी? खासदार वाकचौरे यांच्या प्रश्नावर केंद्राचे उत्तर appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीने कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एसआयआरचे जोरदार समर्थन केले. ती प्रक्रिया नवी नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली. लोकसभेतील चर्चेत हस्तक्षेप करताना मेघवाल यांनी विरोधकांवर आणि विशेषत: कॉंग्रेसवर जोरदार पलटवार केला. देशात पहिली लोकसभा निवडणूक झाल्यापासून कॉंग्रेस पक्षच मतचोरीत मग्न होता. वारंवार होणाऱ्या पराभवाचा […] The post Arjun Ram Meghwal : सर्वोच्च न्यायालयाचे एसआयआरवर शिक्कामोर्तब; कायदा मंत्री मेघवाल यांनी केले स्पष्ट appeared first on Dainik Prabhat .
महापालिका निवडणुका भाजप-शिवसेना एकत्रित लढणार
नागपूर :महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुकेच्या दृष्टीने महायुतीने मोठे आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री दीड तास बंद दाराआड उपस्थिती चर्चा केली. निवडणुकीतील अनेक संवेदनशील मुद्दे, स्थानिक समीकरणे तसेच जागावाटपाची प्राथमिक चौकट यावर त्यांनी सविस्तर मंथन केले. रात्री उशिरा झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने राज्यभरातील सर्व पालिका निवडणुका एकत्रित पद्धतीने लढण्याचा अंतिम निर्णय घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. या बैठकीपूर्वी काही महापालिकांमध्ये स्वतंत्र लढण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र हा निर्णय झाल्यानंतर आता महायुतीची निवडणूक रणनीती एकसंघ आणि अधिक आक्रमक असेल, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे, मुंबई आणि ठाणे या दोन्ही महत्त्वाच्या महापालिकांमध्येही महायुतीच उमेदवार उतरतील, हे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही महापालिका सध्या महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने निर्णायक मानल्या जात असल्याने, या निर्णयाचे महत्त्व अधिक वाढले आहे.राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण तापत असताना सत्ता टिकवण्यासाठी आणि विरोधकांच्या रणनीतीला जोरदार उत्तर देण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. सध्या महाविकास आघाडीही मजबूतपणे या निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहे. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी प्रदेशाध्यक्ष तसेच ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती विशेष होती. राज्यभरात भाजपची संघटनात्मक शक्ती वाढवताना शिवसेना शिंदे गटासोबतची राजकीय जुळवाजुळव सुलभ करण्याचे काम या दोन्ही नेत्यांकडे आहे. त्यामुळे जागावाटपासह उमेदवारीची तयारी, प्रचारयोजना आणि स्थानिक स्तरावरील समन्वय वाढवण्यासाठी त्यांची भूमिका पुढील काळात अधिक निर्णायक ठरणार आहे. शिवाय, स्थानिक पातळीवरील नेतृत्व विकसित करून त्यांना निवडणुकीत महत्त्वाची संधी मिळावी, यावरही चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.एकमेकांच्या पक्षात प्रवेश न करण्याची सहमतीयाच बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे, युतीतील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या पक्षात प्रवेश करू नये, अशी सहमती मिळाली आहे. मागील काही महिन्यांतील राजकीय विभाजन, फुट आणि प्रवेशामुळे तणावाची स्थिती वेळोवेळी निर्माण झाली होती. परंतु आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत कलह रोखणे आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली संशयाची भावना दूर करणे महायुतीसाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप-शिवसेना शिंदे कार्यकर्ते एकत्र प्रचार करतील आणि स्थानिक पातळीवरील कोणतीही घुसखोरी किंवा गोंधळ रोखण्यासाठी पक्षांनी स्पष्ट निर्देश देण्याची तयारीही सुरू आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ निश्चितपुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या पातळीवर जागावाटपाची आणि प्रचाराच्या आराखड्याची प्राथमिक प्रक्रिया सुरू होईल. प्रत्येक शहराचे समाजगट, स्थानिक प्रस्थापित नेते, नवे चेहरे, आणि निवडणुकीतील जिंकण्याची क्षमता या सर्व मुद्द्यांवर विचार करून उमेदवार निश्चित केले जातील. महायुतीसाठी या निवडणुका प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत आणि सत्ता स्थिर राहावी यासाठी ही निवडणूक जिंकणे अत्यंत गरजेचे आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा प्रतिकार करण्याबरोबरच, मतदारांपर्यंत महायुती सरकारच्या योजनांचा आणि निर्णयांचा संदेश पोहोचवणे हेही महत्त्वाचे आव्हान असेल. त्यामुळे या निर्णयानंतर महाराष्ट्रातील महापालिकांच्या राजकारणात मोठी चक्र फिरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.
महाराष्ट्रात २०२६ मध्ये २४ सार्वजनिक सुट्ट्या
मुंबई : महाराष्ट्र शासनाने २०२६ या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. भाऊबीज (११ नोव्हेंबर २०२६, बुधवार) यादिवशी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे, सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रमुख सण आणि राष्ट्रीय दिवसांचा समावेश आहे. या सुट्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांना लागू राहील. याशिवाय १ एप्रिल २०२६ (बुधवार) हा दिवस केवळ बँकांसाठी वार्षिक लेखापरीक्षणासाठी सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिन - सोमवार २६ जानेवारी महाशिवरात्री - रविवार १५ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती - गुरुवार १९ फेब्रुवारी होळी - मंगळवार ३ मार्च गुढीपाडवा - गुरुवार १९ मार्च रमझान ईद - शनिवार २१ मार्च रामनवमी - गुरुवार २६ मार्च महावीर जन्म कल्याणक किंवा महावीर जयंती - मंगळवार ३१ मार्च फक्त बँकांना वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी - बुधवार १ एप्रिल गुड फ्रायडे - शुक्रवार ३ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर - मंगळवार १४ एप्रिल महाराष्ट्र दिन - शुक्रवार १ मे बुद्ध पौर्णिमा - शुक्रवार १ मे बकरी ईद - गुरुवार २८ मे मोहरम - शुक्रवार २६ जून स्वातंत्र्य दिन - शनिवार १५ ऑगस्ट पारशी नववर्ष दिन - शनिवार १५ ऑगस्ट ईद-ए-मिलाद - बुधवार २६ ऑगस्ट गणेश चतुर्थी - सोमवार १४ सप्टेंबर महात्मा गांधी जयंती - शुक्रवार २ ऑक्टोबर दसरा - मंगळवार २० ऑक्टोबर दिवाळी अमावस्या, लक्ष्मीपूजन - रविवार ८ नोव्हेंबर दिवाळी, बालिप्रतिपदा - मंगळवार १० नोव्हेंबर गुरुनानक जयंती - मंगळवार २४ नोव्हेंबर ख्रिसमस किंवा नाताळ - शुक्रवार २५ नोव्हेंबर
मुंबईत शुक्रवारी आणि शनिवारी राहणार या भागात पाणीकपात
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :विलेपार्ले अंधेरी पूर्व भाग (के पूर्व विभाग), वांद्रे पूर्व भाग(एच पूर्व विभाग )तसेच धारावी या (जी उत्तर )विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिनी जोडणीची कामे हाती घेतली जाणार आहेत. ही कार्यवाही शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल. हे काम शनिवारी १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पूर्ण अपेक्षित आहे. एकूण २४ तास सुरु राहणार आहे. परिणामी, या के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर के पूर्व विभागात काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.महापालिकेच्या के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील विविध ठिकाणची १८०० मिलीमीटर व्यासाची तानसा पश्चिम जलवाहिनी, १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी, २४०० मिलीमीटर व्यासाची वैतरणा जलवाहिनी आणि जी उत्तर विभागातील १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडणीचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. ही कामे शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपासून शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण २४ तास सुरु राहणार आहे.के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून - गाळून प्यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.कोणत्या भागात राहणार पाणीकपात. ‘जी उत्तर’ विभाग :(धारावी सकाळचा पाणीपुरवठा) - धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगरधारावी सायंकाळचा पाणीपुरवठा - धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जस्मिन मील मार्ग, माहीम फाटक, ए. के. जी. नगर(शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद)धारावी सकाळचा पाणीपुरवठा - जस्मिन मील मार्ग, माटुंगा कामगार वसाहत, संत रोहिदास मार्ग, ६० फूट मार्ग, ९० फूट मार्ग, संत कक्कैया मार्ग, एम. पी. नगर धोरवडा, महात्मा गांधी मार्ग(शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद)‘के पूर्व’ विभाग* :विजय नगर मरोळ, मिलीट्री रोड, वसंत ओॲसिस, गावदेवी, मरोळ गाव, चर्च रस्ता, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा.आंतरराष्ट्रीय विमानतळ व सिप्झमुलगाव डोंगरी, एम. आय. डी. सी. मार्ग क्रमांक १ ते २३, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडिविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेजचकाला, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व २, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजीनगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरतसिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांतीनगरकबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी वसाहत(शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद)....................................................................................................कोलडोंगरी, जुनी पोलीस गल्ली, विजय नगर (सहार रस्ता) मोगरपाडा(शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा)ओमनगर, कांतीनगर, राजस्थान वसाहत, साईनगर (तांत्रिकक्षेत्र) सहारगाव, सुतारपाखडी (पाईपलाईनक्षेत्र)(शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद)*‘एच पूर्व’ विभाग :संपूर्ण वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) विभाग, मोतिलाल नगरसह(शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद)*प्रभात वसाहत, टिस-३, आग्रीपाडा, कालीन, सीएसटी मार्गहंसबुरगा मार्ग, विद्यापीठ , CST सीएसटी मार्गाची दक्षिण बाजू, यशवंत नगर, सुंदर नगर, कोळीवरी गावतीन बंगला, शांतिलाल कंपाऊंड, पटेल कंपाऊंड, गोळीबार मार्ग, खार भुयारी मार्ग (सब वे) ते खेरवाडीखेरवाडी, नवापाडा, बेहराम नगर, ए. के. मार्ग, शासकीय वसाहत वांद्रे (पूर्व)(शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद)
महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही काही भागात पाऊस आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली आहे. राज्यात थंडीची लाट असून उत्तरेकडून थंडगार वारे राज्यात येत आहेत. यामुळे पारा सातत्याने खाली जात आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. मागील काही दिवसांपासून राज्यात गारठा कायम आहे. किमान तापमानात घट असल्याने गारठ्याचे प्रमाण अधिक आहे. पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. थंडीच्या मोठ्या लाटेचा इशारा देण्यात आला. याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात थंडीच्या लाटेचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला. उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडी वाढत आहे.
कूपर रुग्णालयात अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली, सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे आदेश
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्णालयातील रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांचे तातडीने आणि प्राधान्याने निराकरण करण्यात यावे. रुग्णांच्या नातलगांकडून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱयांवर होणाऱ्या अनुचित वागणुकीस आळा घालण्यासाठी रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम आणि कडेकोट करावी. संपूर्ण रुग्णालय परिसर सीसीटीव्ही निगराणीखाली आणून सुरक्षा व्यवस्थेची अंमलबजावणी सुनिश्चित करावी. अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली कार्यक्षमतेने आणि काटेकोरपणे राबवावी, असे विविध निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिले आहेत.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विलेपार्ले येथील डॉ. रू. न. कूपर रुग्णालयास महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मंगळवारी भेट देऊन रुग्णालयातील सेवांचा सर्वंकष आढावा घेतला. रुग्णसेवा अधिक परिणामकारक, सुलभ आणि रुग्णकेंद्रित करण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित विभागांना ठोस व कार्यवाहीयोग्य निर्देश दिले. वैद्यकीय सेवांचा विस्तार, नवीन सुविधा, प्रलंबित कामे आणि आवश्यक सुधारणांबाबत गगराणी यांनी सविस्तर माहिती घेतली. उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर, औषधवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख व पदव्युत्तर अधिष्ठाता डॉ. नीलम रेडेकर, वैद्यकीय अधीक्षक देव शेट्टी, डॉ. प्रवीण बांगर तसेच इतर संबंधित अधिकारी या पाहणीवेळी उपस्थित होते.रूग्णालय पाहणीची सुरुवात अपघात विभागातून करण्यात आली. तात्काळ उपचार व्यवस्था, स्वच्छता परिस्थिती, औषधसाठा, रुग्ण शय्या उपलब्धता, नोंदणी प्रणाली अशा महत्त्वाच्या घटकांचा गगराणी यांनी तपशीलवार आढावा घेतला. त्यानंतर सर्वसाधारण व विशेष उपचार विभाग, प्रसूतीगृह, बालरोग विभाग, शस्त्रक्रिया कक्ष, कॅथ लॅब, प्रयोगशाळा आणि औषधवाटप केंद्राची पाहणी करून विद्यमान व्यवस्थेत आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले.रुग्णालयातील तांत्रिक अडचणी, यंत्रसामग्रीची स्थिती, मनुष्यबळाची उपलब्धता आणि प्रलंबित दुरुस्ती कामांविषयी गगराणी यांनी अधिकाऱयांकडून माहिती घेतली. ठराविक कालमर्यादेत दोष निराकरण आणि सुविधा उन्नतीकरणाची कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश गगराणी यांनी दिले. विशेषतः स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाबाबत अधिक काटेकोर पद्धतीने उपाययोजना राबवून रुग्णालय परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि रुग्णाभिमुख करण्याचे निर्देश त्यांनी दिले.रुग्णांशी संवाद साधताना उपचार मिळण्याची गती, सुविधा, स्वच्छतागृहे, पाणी-प्रकाश व्यवस्था आणि इतर सेवांबाबत गगराणी यांनी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. रुग्णांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन तत्काळ सुधारणात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना देण्यात आले.
आगामी निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंची जोरदार तयारी; जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक
मुंबई : राज्यात नगरपालिका निवडणुकांनंतर राज्यात पुन्हा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर, ठाकरेसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पक्षाच्या जिल्हा संपर्कप्रमुखांची मुंबईत शिवसेना भवन येथे बैठक घेतली आहे. यावेळी, त्यांनी स्थानिक राजकारणात शिवसेनेची तयारी आणि मनसेसोबतच्या युतीवरही भाष्य केले आहे. ठाकरे यांनी यावेळी सर्वच जिल्हा संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन […] The post आगामी निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंची जोरदार तयारी; जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक appeared first on Dainik Prabhat .
रोहित आर्याने विनापरवानगी शाळांकडून पैसे गोळा केले!
नागपूर : पवई येथे १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या एन्काऊंटर प्रकरणाची चर्चा मंगळवारी विधानसभेत झाली. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणी सभागृहात स्पष्टीकरण देताना सांगितले की, रोहित आर्याने सीएसआर प्रकल्पाच्या नावाखाली परवानगीशिवाय शाळांकडून पैसे गोळा केले होते, त्यामुळे त्याला नोटीस बजावण्यात आली होती.भोयर यांनी सांगितले की, ओलीस ठेवलेल्या लहान मुलांच्या सुखरूप सुटकेच्या दृष्टीने आणि समयसूचक कारवाई म्हणून आर्याचे एन्काउंटर करावे लागले. बॅलिस्टिक रिपोर्टनुसार त्याच्या पिस्तुलात गोळ्या होत्याच. आतापर्यंत या प्रकरणी ११५ जणांचे जबाब नोंदवले गेले आहेत. सीएसआर अंतर्गत दोन टप्प्यांचे ९ लाख ९० हजार रुपयांचे पेमेंट मात्र सरकारने केलेच असल्याचे भोयर यांनी स्पष्ट केले.त्यावर विजय वडेट्टीवार यांनी सवाल उपस्थित केले. ते म्हणाले, कमरेच्या खाली गोळी मारण्याचा नियम असताना थेट डोक्यात का गोळी मारली? एन्काउंटरसाठी विशेषतः वाघमारे यांनाच का आणले? आर्याने ज्या मंत्र्यांचे नाव घेतले त्यांची चौकशी झाली काय? त्याची देयके सरकारकडे खरोखर थकीत होती का? राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे नेते जयंत पाटील यांनी ठेकेदारांनंतर आता सल्लागारांचेही पैसे थकवले जाण्याचा नवा प्रकार समोर आल्याचा आरोप करीत सखोल चौकशी करून अधिवेशनात अहवाल सादर करण्याची मागणी केली. नाना पटोले आणि दिलीप लांडे यांनीही याबाबत प्रश्न उपस्थित केले.या प्रकरणात आर्याने ऑडिशनच्या नावाखाली ७ ते १४ वयोगटातील सुमारे १७ मुला-मुलींना ओलीस ठेवले होते आणि माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलण्याची आग्रहाची मागणी केली होती. यापूर्वी त्याने केसरकर यांच्या घरासमोर उपोषणही केले होते.
IND vs SA : लुंगी एनगिडीचा कहर! गिल-सूर्या-अभिषेक स्वस्तात माघारी, टीम इंडियाचा डाव अडचणीत
IND vs SA 1st T20I Lungi Ngidi double blow : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेची सुरुवात भारतीय संघासाठी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. कटकच्या ऐतिहासिक बाराबाती स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने अवघ्या १७ धावांमध्ये आपले दोन महत्त्वाचे गडी गमावले. सलामीवीर शुबमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव दोघेही एकाच पद्धतीने […] The post IND vs SA : लुंगी एनगिडीचा कहर! गिल-सूर्या-अभिषेक स्वस्तात माघारी, टीम इंडियाचा डाव अडचणीत appeared first on Dainik Prabhat .
अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?
नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका पुरुषासोबत असंच झालं आहे. एक ३६ वर्षांचा पुरुष नेहमीप्रमाणे सकाळी उठला आणि दिवसाची सुरुवात करू लागला. घरातलं अन्न संपलंय त्यामुळे खाण्यासाठी काहीतरी विकत आणा असे पत्नीने त्याला सांगितले. यावर पतीने उत्तर दिले की, आठवडा झाला माझ्याकडे काम नाही... खिशात पैसा नाही...यावर पत्नीने त्याला उत्तर दिले की, “ सीएसपी सेंटरमध्ये जा आणि तुमचं अकाउंट चेक करा . त्यात काही पैसे असतील. ते काढून रेशन घेऊन या .” पत्नीने सांगितल्याप्रमाणे पती बँकेत गेला. बँकेत जाऊन त्याने तिथल्या स्टाफला खात्यात किती शिल्लक आहे ते विचारले. पुढे म्हणाला... ५०० असतील तर २०० द्या. बँक कर्मचाऱ्याने तपासले तर संबंधित व्यक्तीच्या खात्यात ६०० कोटी रुपये जमा होते. हे पाहताच बँक कर्मचाऱ्याला धक्काच बसला, तो व्यक्ती सुद्धा हैराण झाला .ही घटना बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील राजपूर या गावात घडली आहे आणि पुरुषाचं नाव जितेंद्र साह असं आहे. खात्यात ६०० कोटी आहेत हे कळल्यानंतर जितेंद्र बँक कर्मचाऱ्याला म्हणाला, ‘साहेब 200 रुपये तरी द्या..’ यावर सीएसपी सेंटरचा कर्मचारी म्हणाला, ” जर मी तुला एक रुपयाही दिला तर माझी नोकरी जाईल. तुझ्यावर कारवाई होऊ शकते. आम्हाला याबद्दल पोलिसांना कळवावं लागेल.” त्यानंतर पुढच्या २० मिनिटांत त्याचं खातं फ्रिझ केलं जातं.बँक मॅनेजर आणि पोलिसांनी याला तांत्रिक बिघाड असल्याचं म्हंटलं आहे आणि त्यावर तपास चालू आहे . गुन्हा उघडकीस येईपर्यंत त्यांना त्रास दिला जाणार नाही असे आश्वासन पोलिसांनी कुटुंबाला दिले आहे, पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.
IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली
IPL 2026 मिनी लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आलेली आहे . टॉप खेळाडूंसाठी पाच गट करण्यात आले आहेत. त्या 34 खेळाडूंची नावं सूचीबद्ध करण्यात आलेली असून, या खेळाडूंवर मोठी बोली लागू शकते. IPL 2026 च्या मिनी लिलावासाठी अंतिम यादी तयार आहे. यावेळी लिलावासाठी 350 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर 1005 खेळाडूंना लिलावा आधीच बाहेर काढण्यात आले आहे . आता प्रमुख खेळाडूंसाठी पाच गट केले आहेत. पहिल्याच फेरीत त्यांच्यावर बोली लागेल.पहिल्या गटात दिग्गज खेळाडू असणार आहेत. या गटाकडे सर्वच फ्रेंचायझींचं लक्ष वेधून आहे. हे खेळाडू मिनी लिलावात चांगल्या भावाने जाऊ शकतात. गस अॅटकिन्सन (इंग्लंड), वनिंदू हसरंगा (श्रीलंका), दीपक हुडा (भारत), वेंकटेश अय्यर (भारत), लियाम लिव्हिंगस्टोन (इंग्लंड), वियान मुल्डर (दक्षिण आफ्रिका), रचिन रवींद्र (न्यूझीलंड) हे खेळाडू प्रथम गटात आहेत.दुसऱ्या गटात डेव्हॉन कॉनवे (न्यूझीलंड), जेक फ्रेझर-मॅकगर्क (ऑस्ट्रेलिया), कॅमरून ग्रीन (ऑस्ट्रेलिया), सरफराज खान (भारत), डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका), पृथ्वी शॉ (भारत) हे खेळाडू आहे. विशेष म्हणजे पृथ्वी शॉ आणि सरफराज खान यांना मागच्या लिलावात कोणीच घेतलं नव्हतं. त्यामुळे यावेळी त्यांच्यासाठी कोण बोली लावेल याकडे लक्ष असेल.तिसऱ्या टप्प्यात यष्टीरक्षक खेळाडू असतील. यात फिन एलन (न्यूझीलंड), जॉनी बेअरस्टो (इंग्लंड), केएस भरत (भारत), क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका), बेन डकेट (इंग्लंड), रमनउल्लाह गुरबाज (अफगाणिस्तान), जेमी स्मिथ (इंग्लंड) यांचा समावेश आहे.चौथ्या टप्प्यात वेगवान गोलंदाज असतील. जेराल्ड कोएत्झी (दक्षिण आफ्रिका), आकाश दीप (भारत), जेकब डफी (न्यूझीलंड), फजलहक फारुकी (अफगाणिस्तान), मॅट हेन्री (न्यूझीलंड), स्पेन्सर जॉन्सन (ऑस्ट्रेलिया), शिवम मावी (भारत), अँरिक नोकिया (दक्षिण आफ्रिका), मथीशा पाथिराना (श्रीलंका) हे खेळाडू आहेत.पाचव्या टप्प्यात फिरकीपटूंची संच असेल. यात रवी बिश्नोई (भारत), राहुल चहर (भारत), अकील हुसेन (वेस्ट इंडिज), मुजीब उर रहमान (अफगाणिस्तान), महेश तिशाना (श्रीलंका) यांची नावं असतील.
थ्री इडियट्सचा सिक्वेल २०२६ मध्ये येणार, सिनेप्रेमींची वाढली उत्सुकता
मुंबई : तब्बल १५ वर्षांनंतर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘थ्री इडियट्स’चा सिक्वेल बनणार असल्याची मोठी घोषणा समोर आली आहे. आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी आणि करीना कपूर खान पुन्हा एकदा एकत्र झळकणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित हा बहुप्रतीक्षित सिक्वेल २०२६ मध्ये थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.पहिल्या भागाने निर्माण केलेला नॉस्टॅल्जिया, कॉलेज लाईफमधील ती धम्माल आणि मैत्रीची गोष्ट भारतीय सिनेमात विशेष ठरली. आता सिक्वेलच्या माध्यमातून ही कथा नवीन वळणांसह पुढे सरकणार असून, जुन्या आठवणी आणि नवे टच यांचा सुंदर मिलाफ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.ऑल इज वेलची जादू पुन्हा अनुभवायला मिळणारदेशभर २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थ्री इडियट्स’ने प्रेक्षकांच्या मनात अमिट छाप सोडली होती. ‘ऑल इज वेल’ हे गीत आणि त्याचा संदेश आजही लोकांच्या ओठांवर आहे. त्यामुळे सिक्वेलची घोषणा होताच सोशल मीडियावर चर्चा रंगल्या असून, फॅन्समध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट अंतिम टप्प्यात असून, संपूर्ण टीम सध्या शूटिंगच्या प्लॅनिंगमध्ये व्यस्त असल्याचे सूत्रांकडून समजते.रँचो, राजू, फरहानचा ट्रायो परत मिळणारपहिल्या भागातील हिट स्टारकास्ट तशीच राखण्यात आली आहे. आमिर खान पुन्हा रँचोच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर आर. माधवन आणि शर्मन जोशीही आपल्या जुन्या भूमिकांसह परतणार आहेत. करीना कपूर खानही या सिक्वेलचा भाग असल्याचे पुष्टीकरण झाले आहे. दिग्दर्शनाची धुरा राजकुमार हिराणी सांभाळणार असून, निर्मितीत विधु विनोद चोप्रा, हिराणी आणि आमिर खान यांचा सहभाग असेल.आमिर आणि करीना पुन्हा एकत्र – जादू परत चमकेल?‘थ्री इडियट्स’मधील आमिर–करीना ही जोडी विशेष लोकप्रिय झाली होती. त्यानंतर ते दोघे ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये झळकले, मात्र त्या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ‘थ्री इडियट्स २’मध्ये ही जोडी पुन्हा तीच जादू दाखवेल का? याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. विशेषतः पिया आणि रँचोची केमिस्ट्री हा या सिक्वेलमधील प्रमुख आकर्षण ठरणार आहे.हिराणींची खास स्टोरीटेलिंग स्टाईल, भावनिक टच, कॉमेडी आणि सामाजिक संदेश यांची मिक्स्ड प्लेट पुन्हा एकदा प्रेक्षकांना मिळणार असल्याची खात्री व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात ‘थ्री इडियट्स’चा सिक्वेल हा बॉलिवूडमधील सर्वात चर्चेचा प्रोजेक्ट ठरणार आहे.
IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५० खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. त्यापैकी २४० भारतीय तर ११० विदेशी खेळाडू आहेत. नुकताच वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पुन्हा मैदानात उतरलेला दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर-फलंदाज क्विंटन डी कॉक आणि दीर्घ विश्रांतीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करू पाहणारा ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ यांचा या यादीत समावेश आहे. स्मिथ शेवटचा आयपीएलमध्ये २०२१ मध्ये दिसला होता.आयपीएलच्या माहितीनुसार, यंदा एकूण १३९० खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली होती. त्यातील छाननी करून अंतिम ३५० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. आयपीएलमधील दहा फ्रँचायझी या ३५० खेळाडूंपैकी एकूण ७७ रिक्त जागांसाठी बोली लावणार आहेत.पृथ्वी शॉ आणि सरफराज खान पहिल्या सेटमध्येपहिल्या सेटमध्ये भारताचे पृथ्वी शॉ आणि मुंबईचा सरफराज खान या दोघांचा समावेश आहे. दोघांचीही मूळ किंमत ७५ लाख रुपये ठेवली आहे. पृथ्वीने २०१८ ते २०२४ दरम्यान आयपीएलमध्ये सातत्याने खेळले, मात्र गेल्या वर्षी त्याला कुणीही खरेदी केले नव्हते. सरफराज २०२१ नंतर आयपीएलमध्ये दिसले नाहीत. पहिल्याच सेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे कॅमरन ग्रीन, जेक फ्रेझर-मॅकगर्क, न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलरही असणार असून, या सर्वांची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे.https://prahaar.in/2025/12/09/ipl-2026-auction-34-players-to-be-bid-on-in-top-5-groups/केकेआर आणि सीएसकेकडे सर्वाधिक रक्कमकोलकाता नाईट रायडर्सने रिलीज केलेल्या ऑलराउंडर वेंकटेश अय्यरची मूळ किंमतही २ कोटी रुपये आहे. सय्यद मुश्ताक अली टी–२० स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे कुणाल चंदेला आणि अशोक कुमार यांचाही अंतिम यादीत समावेश आहे. केकेआरकडे लिलावात सर्वाधिक म्हणजे ६४.३ कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यानंतर ४३.४ कोटींसह चेन्नई सुपर किंग्सचा क्रमांक लागतो. सनरायझर्स हैदराबादकडे २५.५ कोटी आहेत.अंतिम यादीत इंग्लंडचे २१ तर ऑस्ट्रेलियाचे १९ खेळाडूअंतिम यादीत इंग्लंडचे २१ खेळाडू असून, त्यात जेमी स्मिथ, गस एटकिंसन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि टेस्ट ओपनर बेन डकेट यांचा समावेश आहे. कॅमरन ग्रीनवर मोठी बोली लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑस्ट्रेलियाचे एकूण १९ खेळाडू यात असून, जोश इंग्लिस, मॅथ्यू शॉर्ट, कूपर कोनोली आणि ब्यू वेबस्टर यांची नावे विशेष आहेत.दक्षिण आफ्रिकेचे १५ खेळाडू लिलावासाठी पात्र ठरले आहेत. डी कॉक, मिलर, एनरिख नॉर्किया, लुंगी एनगिडी, गेराल्ड कोएट्झी आणि वियान मुल्डर ही प्रमुख नावे आहेत. वेस्ट इंडिजचे ९, श्रीलंकेचे १२, न्यूजीलंडचे १६ आणि अफगाणिस्तानचे १० खेळाडू यादीत समाविष्ट आहेत. न्यूजीलंडचा तरुण स्टार रचिन रवींद्रही यात असून, चेन्नई सुपर किंग्सने त्याला यंदा रिलीज केले होते. अफगाणिस्तानच्या खेळाडूंमध्ये रहमानुल्लाह गुरबाज आणि नवीन–उल–हक यांची नावे महत्त्वाची मानली जात आहेत.
Pune News : महावितरणचे संचालक राजेंद्र पवार दिव्यांग भूषण पुरस्काराने सन्मानित
पुणे : महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांना मंगळवारी ‘दिव्यांग भूषण पुरस्कार’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महावितरणमध्ये कार्यरत असणाऱ्या दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य अपंग (दिव्यांग) कर्मचारी व अधिकारी संघटना, मुंबई यांच्या वतीने राजेंद्र पवार यांना […] The post Pune News : महावितरणचे संचालक राजेंद्र पवार दिव्यांग भूषण पुरस्काराने सन्मानित appeared first on Dainik Prabhat .
पुणेकरांना मोठा दिलासा..! ‘या’मार्गावर दुमजली उड्डाणपूल उभारणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
नागपूर : पुणे शहरातील भैरोबा नाला ते यवत दरम्यान दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार असून दुसऱ्या मजल्यावर मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी सांगितले. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुणे शहरातील वर्दळीच्या रस्ता असणाऱ्या भैरोबा नाला ते यवत दरम्यान वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न […] The post पुणेकरांना मोठा दिलासा..! ‘या’ मार्गावर दुमजली उड्डाणपूल उभारणार, मुख्यमंत्र्यांची माहिती appeared first on Dainik Prabhat .
Wagholi News : पहाटे दशक्रिया विधीसाठी निघालेल्या महिलेवर बिबट्याची झडप
वाघोली : दशक्रिया विधीसाठी पहाटे घराबाहेर पडलेल्या महिलेवर अष्टापूर परिसरात मंगळवारी (दि. ९ डिसेंबर) पहाटे बिबट्याने अचानक हल्ला केला. यात अंजना वाल्मिक कोतवाल या महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर वाघोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचार-पाचच्या सुमारास अंजना कोतवाल या दशक्रिया विधीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने […] The post Wagholi News : पहाटे दशक्रिया विधीसाठी निघालेल्या महिलेवर बिबट्याची झडप appeared first on Dainik Prabhat .
Indian Womens Team announced for T20i series : पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकणारा भारतीय महिला संघ लवकरच मैदानावर परतणार आहे. विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघ डिसेंबर महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील १५ खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे, ज्यात उपकर्णधार स्मृती […] The post Indian Womens Team : विश्वविजेत्या टीम इंडियाचे पुनरागमन! श्रीलंका टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; स्मृती खेळणार की नाही? appeared first on Dainik Prabhat .
Pune News : लष्कर पोलीस ठाण्याच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-२ ची कामगिरी
पुणे : लष्कर पोलीस ठाणे येथे दाखल गंभीर स्वरूपाच्या जबरी चोरीच्या प्रकरणातील पाहिजे आरोपीला गुन्हे शाखा युनिट २ यांच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईनंतर पोलिसांनी आरोपीला पुढील तपासासाठी लष्कर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. जाहिद कमरुदीन शेख (२०, रा. लोहियानगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर रोजी लष्कर पोलीस ठाण्याच्या […] The post Pune News : लष्कर पोलीस ठाण्याच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-२ ची कामगिरी appeared first on Dainik Prabhat .
कट्टरतेकडे झुकत असलेला बांगलादेश होत आहे कर्जबाजारी
Sanjay Savkare : मंत्री संजय सावकारे यांचे दालन ‘सील’; सार्वजनिक बांधकम खात्याची बेधडक कारवाई
मुंबई : महायुतीतील भाजपचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मंत्रालयातील दालनावर सार्वजनिक बांधकम खात्याच्या कर्मचाऱ्यांनी बेधडकपणे कारवाई केली. त्यांचे दालन सील करण्याचे कडक पाऊल उचलल्याने मंत्रालयीन कर्मचाऱ्यात आश्चर्य करण्यात येत आहे. मंत्री संजय सावकारे यांचे दालन मंत्रालयाच्या मुख्य ईमारतीत तिसऱ्या मजल्यावर आहे. सोमवारी रात्री आठनंतर त्यांचे कार्यालय उघडे आढळले. मंत्रालयाचा दारवान मंत्री व अधिकाऱ्यांची दालनांची […] The post Sanjay Savkare : मंत्री संजय सावकारे यांचे दालन ‘सील’; सार्वजनिक बांधकम खात्याची बेधडक कारवाई appeared first on Dainik Prabhat .
'तुकडेबंदी'शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर
सातबारावर आता स्वतंत्र नाव लागणारनागपूर : राज्यातील नागरी वस्त्यांमध्ये गुंठेवारी किंवा लहान भूखंडांवर राहणाऱ्या सुमारे ६० लाख कुटुंबांना म्हणजे , सुमारे तीन कोटी नागरिकांना दिलासा देणारे ऐतिहासिक तुकडेबंदी कायद्यातील जाचक अटी शिथिल करणारे 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२५' आज विधानसभेत मंजूर करण्यात आले.विधेयकामुळे आता लहान भूखंडांची खरेदी-विक्री सुलभ होणार असून, संबंधित मालकांचे नाव स्वतंत्रपणे सातबारा उताऱ्यावर लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले.अनेक वर्षांपासून नागरी भागात ५-१० गुंठे किंवा त्यापेक्षा कमी जागेत घरे बांधून राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काच्या तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. तसेच, जमिनीच्या अकृषिक (NA) वापरासाठी वारंवार जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानग्या घ्याव्या लागत होत्या. या नवीन विधेयकामुळे आता विकास आराखडा किंवा प्रादेशिक आराखडा मंजूर असलेल्या क्षेत्रात वेगळ्या 'एनए' परवानगीची गरज भासणार नाही. त्याऐवजी 'एक वेळचे अधिमूल्य' भरून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल, असे या विधेयकात स्पष्ट करण्यात आले आहे. कायद्याचा गैरवापर टाळा; विरोधकांच्या सूचनाविधेयकावर चर्चा करताना शिवसेनेचे (उबाठा) आमदार भास्कर जाधव यांनी, आमचा विधेयकाला तूर्त पाठिंबा नाही, याचा फायदा गरिबांऐवजी बिल्डर लॉबीला अधिक होण्याची शक्यता आहे, असे म्हटले. काँग्रेसचे पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, शहरांचे डीपी प्लॅन तयार नसताना केवळ जागा नियमित करून चालणार नाही, तर ९ मीटरचे रस्ते आणि गटारांची सोय कशी होणार, याचाही विचार व्हावा, अशी सूचना मांडली. त्याबरोबरच आमदार नाना पटोले, सुरेश धस, प्रवीण देटके, अमित देशमुख, राहूल कूल, कृष्णा खोपडे, हिरामन खोसकर, प्रशांत सोळंखे, अभिजित पाटील, संजय गायकवाड, रवी राणा यांनी बिलाबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक करत विधेयकाला पाठिंबा दिला. ग्रामीण भागासाठीही मागणीचर्चेदरम्यान आमदार चंद्रदीप नरके, विक्रम पाचपुते आणि रमेश बोरनारे यांनी हा निर्णय केवळ शहरांपुरता मर्यादित न ठेवता ग्रामीण भागासाठीही लागू करावा, अशी मागणी केली. पश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी धारण क्षमता कमी असल्याने तिथेही खरेदी-विक्रीत अडचणी येत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. बिल्डरांसाठी नाही, तर ६० लाख कुटुंबांसाठीचर्चेला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, हा कायदा कोणत्याही बिल्डरला फायदा देण्यासाठी आणलेला नसून, राज्यातील जी ६० लाख कुटुंबे लहान तुकड्यांवर घरे बांधून राहत आहेत, त्यांना कायदेशीर मालकी हक्क देण्यासाठी आहे.बावनकुळे म्हणाले की, या निर्णयामुळे कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही. उलट, तुकड्याचा सर्वसामान्य माणूस आता कायदेशीर मालक होईल. १५ ऑक्टोबर २०२४ नंतर कोणालाही नव्याने तुकडा पाडता येणार नाही, मात्र तोपर्यंतच्या नागरिकांना याचा मोठा लाभ मिळेल. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.विधेयकाची ठळक वैशिष्ट्ये :• नागरी भागात जमिनीच्या अकृषिक वापरासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची गरज नाही.• नियोजन प्राधिकरणाने परवानगी दिल्यास 'एनए' परवानगी गृहीत धरली जाईल.• गुंठेवारी आणि लहान तुकड्यांच्या खरेदी-विक्रीचा मार्ग सुलभ.• ६० लाख कुटुंबांच्या सातबारा उताऱ्यावर स्वतंत्र नाव लागणार.• सरसकट ग्रामीण भागात लागू नाही, परंतु रहिवासी क्षेत्र जाहीर झाल्यास लागू होऊ शकतो.
R Ashwin Sunny Leone post viral : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून रविचंद्रन अश्विन सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव्ह झाला आहे. तो आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि हटके पोस्ट्समुळे नेहमीच चर्चेत असतो. आता त्याने बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिच्या फोटोसह शेअर केलेली एक पोस्ट चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण करत आहे. अश्विनच्या पोस्टमध्ये सनी लिओनीचा फोटो कसा आला, असा प्रश्न चाहत्यांना […] The post R Ashwin : आर. अश्विनच्या पोस्टमध्ये दिसली सनी लिओनी! काय आहे व्हायरल पोस्टमागची खरी ‘भानगड’? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
तुकाराम मुंढेंविरूद्ध सभागृहात राजकारण तापले; विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
नागपूर : हिवाळी अधिवेशनामध्ये सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध लक्षवेधी आणण्यावरुन राजकीय वातावरण तापले. यावरून सभागृहात तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून आपणास बघून घेऊ, अशी धमकी आल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी म्हटले. यावेळी, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंढेंची बाजू घेतली. दरम्यान, आमदार प्रवीण दटके यांनीही सभागृहात तुकाराम मुंढेंविरुद्ध तक्रार केली आहे. खोपडे म्हणाले, तुकाराम मुंढे यांनी […] The post तुकाराम मुंढेंविरूद्ध सभागृहात राजकारण तापले; विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू appeared first on Dainik Prabhat .
पुणे : वाचनाची चळवळ सक्षम करण्यासोबतच पुण्याला पुस्तकांची राजधानी बनवण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाला पुणेकरांनी विक्रमी प्रतिसाद दिला. सुमारे एक लाख ३५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुस्तक वाचन करून, छायाचित्र अपलोड करीत विश्वविक्रमाकडे वाटचाल केली. सकाळी ११ ते दुपारी १२ या तासाभरात ७० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी पुस्तक वाचन करून […] The post Pune Book Festival: अवघे पुणे वाचनात झाले दंग! ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमात साडेसात लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा विक्रमी सहभाग appeared first on Dainik Prabhat .
Jai Anmol Ambani : जय अनमोल अंबानीविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
नवी दिल्ली : उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र जय अनमोल अंबानी यांच्याविरोधात सीबीआयने युनियन बँक ऑफ इंडियाशी संबंधित २२८.०६ कोटी रुपयांच्या कथित कर्ज फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचे माजी संचालक जय अनमोल अंबानी व रवींद्र शरद सुधाकर यांचा समावेश आहे. सीबीआयनुसार, हे प्रकरण सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला झालेल्या मोठ्या […] The post Jai Anmol Ambani : जय अनमोल अंबानीविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय? appeared first on Dainik Prabhat .
नागपूर : नागपूर-चंद्रपूर द्रुतगती महामार्गाअंतर्गत केंद्र सरकारच्या गतीशक्ती पोर्टलकडून प्राप्त सूचनांचा विचार करून एकूण 204 किलोमीटर लांबीच्या सुधारित रस्ता आखणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुंबई शहरातील घाटकोपर पूर्व, चेंबूर आणि अंधेरी (प.) आंबिवली मुद्रण कामगार नगर व चुनाभट्टी येथील भूखंडांचा खासगीकरणाच्या माध्यमातून विकासाच्या मुदतवाढीस […] The post Nagpur-Chandrapur Expressway : नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाच्या सुधारित आखणीस फडणवीसांकडून मान्यता appeared first on Dainik Prabhat .
नागपूर: महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Winter Session) दुसऱ्या दिवशी, मंगळवारी सभागृहात महिला सुरक्षा, जलसंधारण विभागातील कथित भ्रष्टाचार आणि दिव्यांग आरक्षणासाठी यूडीआयडी कार्डाची (UDID Card) सक्ती यांसारख्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दुसरीकडे, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उतरून सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. महिला सुरक्षा आणि कायदा (Women’s Safety and Law) […] The post Maharashtra Winter Session: महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काय-काय घडले? वाचा एका क्लिकवर संपूर्ण अपडेट्स appeared first on Dainik Prabhat .
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘राष्ट्रवादी’कडून ८५ हजार रक्त बाटल्या संकलन मोहिमेची घोषणा
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्या वतीने ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर भव्य रक्तदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. पवार १२ डिसेंबर रोजी ८६ व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त १२ डिसेंबर ते १२ जानेवारी या एक महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रातील विविध भागात रक्तदान शिबिरे […] The post शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘राष्ट्रवादी’कडून ८५ हजार रक्त बाटल्या संकलन मोहिमेची घोषणा appeared first on Dainik Prabhat .
Shahid Afridi Slams Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी हे एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. क्रिकेट खेळत असताना या दोन खेळाडूंमध्ये अनेकदा मैदानात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही हे दोघे सोशल मीडिया तसेच मुलाखतीतून एकमेकांवर टीका करत असतात. आता आफ्रिदीने […] The post Shahid Afridi : गंभीर-आफ्रिदी वाद पुन्हा उफाळला! रोहित-विराटला सपोर्ट करत आफ्रिदीचे गंभीरवर मोठे टीकास्त्र appeared first on Dainik Prabhat .
मुलींनी शिक्षणासोबतच स्वसंरक्षणासाठी बॉक्सिंग, कराटे खेळाचे प्रशिक्षण घ्यावे –रमेश बागवे
पुणे- सोनिया गांधी यांच्या वाढदिवासानिमित्त क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान व मुक्ता फाउंडेशन यांच्या वतीने बापूसाहेब पवार कन्या शाळा, भवानी पेठ, पुणे येथे इयत्ता दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत अपेक्षितांचा संच वाटप करण्यात आले. या प्रसंगी रमेश बागवे यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले की, सध्या विद्यार्थ्यांचा मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर […] The post मुलींनी शिक्षणासोबतच स्वसंरक्षणासाठी बॉक्सिंग, कराटे खेळाचे प्रशिक्षण घ्यावे – रमेश बागवे appeared first on Dainik Prabhat .
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
नागपूर : फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या तळहातावरती लिहीलेले हस्ताक्षर तिचेच असल्याचे पडताळण्यात आले आहे. ज्या पोलिस आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरची नावे त्यात नमूद करण्यात आली आहेत, ते तिला छळण्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री भाजप आमदार अमित साटम यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत होते. ऑक्टोबरमध्ये फलटण शहरातील […] The post फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान appeared first on Dainik Prabhat .
Arvind Kejriwal : यापेक्षा मोठा अन्याय काय असू शकतो? अरविंद केजरीवाल यांची गुजरात सरकारवर टीका
राजकोट : तुरुंगात असलेले लोक दहशतवादी नाहीत, ते शेतकरी आहेत. आपल्या देशाचे नागरिक आहेत. त्यांना भेटण्यासही परवानगी दिली जात नाही, यापेक्षा मोठा अन्याय काय असू शकतो ? असा सवाल उपस्थित करताना आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुजरात सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी, स्वातंत्र्यसैनिकांना भगतसिंग यांच्या सहकाऱ्यांनाही भेटण्यापासून रोखले गेले नव्हते, याची आठवण करून […] The post Arvind Kejriwal : यापेक्षा मोठा अन्याय काय असू शकतो? अरविंद केजरीवाल यांची गुजरात सरकारवर टीका appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : गोव्यातील नाईट क्लबमध्ये आग लागुन २५ जणांचा बळी गेला होता. या आगीच्या घटनेची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या ऐश्वर्या साळगावकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. हा नाईट क्लब वैध बांधकाम परवान्याशिवाय बांधलेला होता. अनेकवेळा ते पाडण्याचे आदेश देऊनही […] The post Arpora Nightclub Fire : गोवा नाईट क्लब प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल appeared first on Dainik Prabhat .
Hardik Pandya Angry on Paparazzi : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेला ९ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात होत आहे. या मालिकेत अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या काही आठवड्यांच्या विश्रांतीनंतर मैदानावर पुनरागमन करत असल्यामुळे चाहत्यांचे विशेष लक्ष त्याच्यावर आहे. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वीच हार्दिक त्याच्या क्रिकेटमुळे नाही, तर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. पापाराझींनी केलेल्या […] The post Hardik Pandya : हार्दिक पंड्या पापाराझींवर संतापला! गर्लफ्रेंडचे आक्षेपार्ह फोटो काढल्याने व्यक्त केली नाराजी, पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .
राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द
राज्यात 8 महिन्यात 3500 पेक्षा जास्त सायबर फसवणूकीची प्रकरणे; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
नागपूर : जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत महाराष्ट्रात ३,५०० हून अधिक सायबर फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेल्याची माहिती मंगळवारी विधानसभेत देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही आकडेवारी सादर केली. त्यांनी सांगितले की या प्रकरणांमध्ये पोलिसांनी प्रभावी कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली आहे. फडणवीस […] The post राज्यात 8 महिन्यात 3500 पेक्षा जास्त सायबर फसवणूकीची प्रकरणे; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती appeared first on Dainik Prabhat .
स्टारलिंककडून अद्याप कुठलीही किंमत जाहीर नाही. प्रसिद्ध झालेल्या किंमती चुकीच्या- स्टारलिंक
नवी दिल्ली: एलोन मस्क यांच्या स्टारलिंकने अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवल्यानंतर त्यांच्या इंटरनेट सेवेच्या किंमती कालपासून झळकत होत्या. मात्र ती चूकीची माहिती असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. स्टारलिंक बिझनेस ऑपरेशन्सच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर लिहित, कॉन्फिगरेशनमधील एका त्रुटीमुळे त्यांच्या भारतातील वेबसाइटवर डमी चाचणी डेटा थोडक्यात दिसू लागला आणि ही समस्या सोडवण्यात आली आहे. भारतातील इंटरनेटचे पॅकेज प्लान अद्याप कंपनीने ठरविले नसल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी प्रसारमाध्यमांनी स्टारलिंकच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे इंटरनेट सेवेच्या किंमती प्रकाशित केल्या होत्या.संकेतस्थळावरील किंमती पाहता त्यात स्टारलिंक सबस्क्रिप्शन प्लॅनची सुरुवातीची किंमत ८६०० रुपये असल्याचे दिसून आले होते तर ग्राहकांना हार्डवेअर रिटेल बॉक्ससाठी ३४००० रुपये मोजावे लागणार होते. भारतासारख्या किमतीच्या बाबतीत जागरूक बाजारपेठेसाठी हा टॅरिफ प्लॅन महागडा असल्याचे अनेकांना वाटले होते मात्र या किंमतीत तथ्य नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. अद्याप चाचणी पूर्ण न झाल्याने यांची किंमत निश्चित झाली नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. सुधारित किंमती येणाऱ्या दिवसात कंपनी स्पष्ट करेल पण तत्पूर्वी तांत्रिक अडचणींमुळे जुन्या किंमती संकेतस्थळावर प्रदर्शित झाल्या आहेत असे कंपनीने स्पष्ट केले.जगभर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झालेल्या स्टारलिंक्ला भारतातही स्पर्धेचा निश्चित सामना करावा लागेल. पण जगभरात क्रेझ निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध असलेले स्टारलिंक कमी आकाराचे लो लेंटंसी डिव्हाईस असते ज्यामुळे परवडणाऱ्या किमतीत हायस्पीड इंटरनेटचा उपभोग घेणे ग्राहकांना शक्य होते. सध्या स्टारलिंक जगभरातील १५० देशांना आपली सुविधा पुरवतो. यापूर्वी भारत सरकारने स्टारलिंकला परवाना दिलेला असला तरी अद्याप सेवेला सुरूवात झालेली नाही कारण भारताच्या दूरसंचार विभागाने (DoT) स्टारलिंकला व्यावसायिक उपग्रह ब्रॉडबँड सेवा चालविण्यासाठी पाच वर्षांचा परवाना दिला असला तरी लाँच करण्यापूर्वी त्यांना पुढील अनुपालन मंजुरी (Regulatory Compliance) आवश्यक आहेत.स्टारलिंक अशा दुर्गम भागांना लक्ष्य करणार आहे जिथे पारंपारिक ब्रॉडबँड पायाभूत सुविधा अगदीच मर्यादित आहेत. मर्यादित आहेत, हवामान प्रतिरोधक अशी विश्वसनीय सेवा स्टारलिंक पुरवणार आहे. स्टारलिंकने प्रमुख भारतीय दूरसंचार ऑपरेटर, भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ सोबत किरकोळ भागीदारी केली आहे. त्यांच्या नेटवर्कचा वापर करत व नेटवर्क वाढवून विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात सेवा कंपनीदेणारआहे.
हजारो शिक्षकांना दिलासा! शाळा बंद पडणार नाहीत, पटसंख्येची अट होणार शिथील
मुंबई: कमी पटसंख्या असल्याचं कारण देत राज्यभरातील ७०० मराठी शाळा बंद पडण्याची आणि २५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची भिती निर्माण झाली आहे.१५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयाला शिक्षकांचा जोरदार विरोध होत आहे.याबाबतच आता महत्त्वाची अपडेट समोर आली, असून पटसंख्येच्या निकषात बदल केला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.पटसंख्येची अट होणार शिथील...समोर आलेल्या माहितीनुसार, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे.सध्या जिल्हा परिषद,महापालिका,नगरपालिका शाळांची पटसंख्या पहिल्यांदा २० डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल.त्यानंतर पुढील दहा दिवसांत खासगी प्राथमिक शाळांची व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचीही पटसंख्या याच दिवसात पूर्ण होणार आहे.या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन होईल.सुरवातीला त्याच शाळेत,त्याच तालुक्यात,जिल्ह्यात समायोजन होईल.त्यानंतर विभागात आणि शेवटी राज्यात कोठेही त्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणार आहे.दरम्यान,नववी व दहावीच्या ज्या वर्गातील विद्यार्थी २० पेक्षा कमी आहेत,तेथील शिक्षक अतिरिक्त होणार आहेत.या निर्णयात समायोजनापूर्वी बदल होण्याची शक्यता असून त्याचा शासन निर्णय डिसेंबरअखेर अपेक्षित असल्याचेही सूत्रांनी सांगितले.दरम्यान,२०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार समायोजनाचा शासन निर्णय मागे घेण्यात आला आहे.आता २०२५-२६ ची संचमान्यता अंतिम झाल्यावर समायोजनाची कार्यवाही होईल. पण, संचमान्यतेसाठी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या निकषात बदल करावा,असा प्रस्ताव शासनाला यापूर्वीच पाठविला असून त्यावर कार्यवाही सुरु आहे,अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.महेश पालकर यांनी सांगितले आहे.
अनिल अंबानीच काय, त्यांच्या पुत्र जय अंबानीवरही २२८ कोटी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई: उद्योगपती अनिल अंबानी हे सध्या अनेक आर्थिक घोटाळा चौकशीत मुख्य आरोपी सीबीआयने बनवले असताना आणखी एक धक्का अंबानी कुटुंबियांना मिळाला आहे. अनिल अंबानी यांचे पुत्र जय अनमोल अनिल अंबानी यांच्यावर २२८ कोटींच्या युनियन बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी ठपका नियामकांनी ठेवला आहे. त्यामुळे आता अंबानी यांचे पुत्रही अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जय अंबानी यांच्या नावाचाही उल्लेख २२८ कोटींच्या कर्ज प्रकरणात युनियन बँकेकडून उल्लेख केला गेला होता. त्या आधारे सीबीआयनेही जय अंबानी यांच्या नावाने गुन्हा नोंदवला आहे. सीबीआयने यापूर्वी आंध्र बँकेनंतर आता युनियन बँकेने केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवला. जय अंबानी यांच्याशिवाय रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, रविंद्र सुधाकर यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत.युनियन बँकेच्या मुंबई शाखेकडून अनिल अंबानी यांच्या रिलायन्सने ४५० कोटींचे कर्ज घेतले होते. या क्रेडिट मर्यादे (Credit Limit) अंतर्गत पारदर्शक व्यवहार, वेळेवर हप्ते भरणे, सगळ्या पेपरची उपलब्धता, व्याज भरण्याची आश्वासकता व इतर अटीशर्तीवर हे कर्ज कंपनीला प्रदान केले गेले. मात्र काही काळानंतर कंपनीने ईएमआय भरणे बंद केल्याचा अथवा प्रलंबित ठेवल्याचा आरोप बँकेने केला आहे. या प्रकरणी बँकेला २२८ कोटीचे नुकसान झाले असा दावा सीबीआयकडे युनियन बँकेने केला. त्यामुळे बँकेने सप्टेंबर २०१९ पासून कंपनीचे कर्ज खते बँकेने एनपीए (Non Performing Assets NPA) म्हणून घोषित केले.१ एप्रिल २०१६ ते ३० जून २०१९ या कालावधीत कंपनीच्या खात्याची व ताळेबंदीची (Books of Accounts) छाननी फोरेन्सिक ऑडिट मार्फत करण्यात आली आहे ज्यामध्ये सीबीआयला निधीचा गैरवापर करून दुसऱ्या ठिकाणी निधी वळवण्याचा प्रकार घडला आहे असे सीबीआयने प्रसारमाध्यमांना स्पष्ट केले होते. यामध्ये बँकेनेही अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहातील अनिल अंबानी, त्यांचे पुत्र जय व इतर काही कंपनीच्या निवडक अधिकारी वर्गावर गंभीर आरोप यावेळीकेलेहोते.
गोवा नाईटक्लबचे मालक थायलंडमधील फुकेतमध्ये दिसले
पणजी : गोवा नाईटक्लब बिर्च बाय रोमियो लेनचे मालक गौरव लुथरा याचा भारतातून पळून गेल्यानंतरचा पहिला फोटो समोर आला आहे.तो थायलंडमध्ये दिसला आहे.गोव्यातील अर्पोरा गावातील रोमियो लेन क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्री आग लागली,त्यात २५ जणांचा मृत्यू झाला.आग लागल्यानंतर अवघ्या पाच तासांत गौरव लुथरा आणि त्याचा भाऊ सौरभ लुथरा पळून गेले.लुथरा बंधूंचा दुबईमध्ये एक बंगला आणि व्यवसाय आहे.त्यांचे संपूर्ण कुटुंब तिथे आहे.दोन्ही भावांसोबत एक महिला आहे.ती त्यांची पत्नी आहे,ओळखीची आहे की आणखी कोणी आहे हे स्पष्ट नाही.मिळालेल्या माहितीनुसार,आगीच्या घटनेनंतर गोवा नाईट क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा थायलंडमधील फुकेत येथे पळून गेले होते.भारतातून पळून गेल्यानंतर आरोपी गौरव लुथराचा पहिला फोटो समोर आला आहे.दोन्ही भाऊ फुकेत विमानतळावर दिसले.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यातील आणखी एक नाईटक्लब रोमियो लेन पाडण्याचे आदेश दिले आहेत.अर्पोरा गावातील बर्च बाय रोमियो लेन हा क्लब आगीत जळून खाक झाला आहे.गोवा सरकारही दोन्ही फरार लुथरा बंधूंना घरी परत आणण्याची तयारी करत आहे.सावंत सरकारने सीबीआयशी संपर्क साधला आहे आणि त्यांच्या विनंतीनुसार ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.दोघांनाही गोव्यात प्रत्यार्पण करण्याची तयारी सुरू आहे.लुथरा बंधूंचा आणखी एक जवळचा सहकारी अजय गुप्ता हा देखील फरार आहे.गोवा नाईट क्लब रोमियो लेनमध्ये अग्निसुरक्षा उपाययोजनांचा अभाव होता,म्हणूनच आगीत इतके लोक मृत्युमुखी पडले.क्लबमधून बाहेर पडण्याचे मार्ग अत्यंत अरुंद होते,ज्यामुळे आग लागल्यानंतर लोकांना बाहेर पडता आले नाही.क्लब कर्मचाऱ्यांनी स्वयंपाकघरातील तळघरात जाऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला,परंतु ती जागा धुराने भरली होती आणि गुदमरल्यामुळे २० कर्मचारी आणि ५ पर्यटक अशा एकूण २५ जणांचा मृत्यू झाला होता.
पुणे-नगर रस्त्यावर वाहतूक कोंडी गंभीर; राज्य महामार्ग पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप
शिरूर : पुणे–नगर महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आता गंभीर बनली असून नागरिकांनी राज्य महामार्ग पोलिसांवर तसेच जिल्हा वाहतूक शाखेवर निष्क्रियतेचे आरोप केले आहेत. वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापुर, रांजणगाव गणपती, खंडाळे माथा, एल &टी फाटा, कारेगाव अशा ठिकाणी दररोज दोन – दोन कि.मी.भर लांब कोंडीची पुनरावृत्ती होत आहे. नागरिकांच्या मते, “राज्य महामार्ग पोलिसांचे मुख्य […] The post पुणे-नगर रस्त्यावर वाहतूक कोंडी गंभीर; राज्य महामार्ग पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप appeared first on Dainik Prabhat .
IPL 2026 Auction Players Short List : आयपीएल २०२६ च्या लिलावाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. यावर्षीच्या ऑक्शनमध्ये एकूण ३५० खेळाडू भाग घेणार आहेत. बीसीसीआयने (BCCI) सर्व फ्रँचायझींशी चर्चा करून ही अंतिम यादी निश्चित केली आहे. लिलाव १६ डिसेंबर रोजी अबू धाबीच्या एतिहाद अरेनामध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल. लिलावासाठी निवडलेल्या ३५० […] The post IPL 2026 Auction : आयपीएल २०२६ च्या लिलावासाठी ३५० खेळाडूंची अंतिम यादी जाहीर! ‘या’ खेळाडूच्या एन्ट्रीने वेधलं लक्ष appeared first on Dainik Prabhat .
Pune Gramin : पिंपरखेडमध्ये आणखी एक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई
जांबुत : पिंपरखेड (ता. शिरुर) येथे वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (दि. ०९) रोजी पहाटे सहा वर्षीय मादी संवर्गातील बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. आजूबाजूच्या परिसरात बिबट्या निदर्शनास येत असल्याने स्थानिकांच्या मागणीवरून शेतकरी रोहिदास टेमकर यांचे शेतात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात हा बिबट जेरबंद झाला असल्याची माहिती शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी दिली. वनरक्षक […] The post Pune Gramin : पिंपरखेडमध्ये आणखी एक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणा (CBI) ने उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र जय अनमोल अनिल अंबानी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाची (Union Bank of India) २२८.०६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बँकेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे. अनमोल अंबानी […] The post Jai Anmol Ambani: अनिल अंबानींचा मुलगा जय अनमोलला CBIचा दणका; 228 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
ब्रह्मोसच्या हायपरसोनिक आवृत्त्या तयार; संचालक डॉ. जैतीर्थ राघवेंद्र जोशी यांची माहिती
हैदराबाद : ब्रह्मोस एरोस्पेस नवीन पिढीतील क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. हलक्या लढाऊ विमानांसाठी हा एक आकर्षक प्रकार असेल. त्यामध्ये ब्रह्मोसच्या हायपरसोनिक आवृत्त्या आणि पाणबुडी प्रक्षेपणासाठी एक मॉडेल समाविष्ट आहे, असे ब्रह्मोसचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. जैतीर्थ राघवेंद्र जोशी यांनी सांगितले. तेलंगणा रायझिंग ग्लोबल समिट २०२५ च्या भाग म्हणून सोमवारी येथे आयोजित तेलंगणा फ्लाइंग हाय: […] The post ब्रह्मोसच्या हायपरसोनिक आवृत्त्या तयार; संचालक डॉ. जैतीर्थ राघवेंद्र जोशी यांची माहिती appeared first on Dainik Prabhat .
हिंगोलीतील गोजेगावच्या योगेश सांगळेचे ISRO मध्ये अभियंता म्हणून निवड
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथील युवकाने मेहनत व चिकाटीच्या जोरावर थेट भारतीय अंतराळ संस्था ‘इस्रो’पर्यंत’ झेप घेऊन गावासह तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे. शालेय जीवनात पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाल्याचे शास्त्रज्ञ योगेश सांगळे यांनी डिजिटल प्रभात शी बोलताना सांगितले. कळमनुरी येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले गोजेगाव येथील सोपान सांगळे यांचा मुलगा योगेश […] The post हिंगोलीतील गोजेगावच्या योगेश सांगळेचे ISRO मध्ये अभियंता म्हणून निवड appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: सलग दुसऱ्यांदा शेअर बाजारात घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांनी आजही सेल ऑफ वाढवल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात 'धुलाई' झाली व निर्देशांकात वाढ होण्याची संधी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारसह घरगुती गुंतवणूकदारांनी दिली नाही. सेन्सेक्स ४३६.४१ अंकाने वाढत ८४६६६.२८ पातळीवर व निफ्टी १२०.९० अंकाने घसरत २५८३९.६५ पातळीवर स्थिरावला आहे. बँक निर्देशांकातही आज घसरण झाली असली तरी सकाळच्या मानाने फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची आशा निर्माण झाल्याने १२० अंकांने रिकव्हरी केली आहे. मात्र सपोर्ट लेवल मिळण्यास हा निर्देशांक अयशस्वी ठरला आहे. मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्येही घसरण कायम राहिली असून निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील सर्वाधिक घसरण आज आयटीत (१.१९%) कायम राहिली असून सर्वाधिक वाढ मात्र पीएसयु बँक (१.२९%), रिअल्टी (०.९५%), मिडिया (०.७०%) निर्देशांकात झाली.उद्या युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील कपात अपेक्षित असल्याने गुंतवणूकदारांनी बँक वगळता इतर निर्देशांकात मोठी सावधगिरी बाळगली जयाचक फटका आजही बाजारात कायम राहिला. दुसरीकडे रूपयात काही प्रमाणात अखेरच्या सत्रात रिबाऊंड झाले असले तरी डॉलरच्या तुलनेत रूपयात सातत्याने घसरत असल्याने मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतल्याची शक्यता आहे. कमोडिटी बाजार आजही अस्थिर राहिला. दरम्यान भूराजकीय अस्थिरतेसह विकली एक्सपायरीचा फटका बाजारात बसला. एकूणच बाजाराने आज मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग केल्याचेही चित्र नाकारता येत नाही.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडून तांदळाच्या आयातीवर आणि कॅनडातून खतांच्या आयातीवर नवीन शुल्क आकारण्याची शक्यता दर्शविल्यानंतर गुंतवणूकदारांच्या भावना आणखी वाढल्या. व्हाईट हाऊसच्या अधिवेशनात अमेरिकन शेतकऱ्यांसाठी अब्जावधी डॉलर्सच्या मदत पॅकेजचे अनावरण करताना हे वक्तव्य आले.अखेरच्या सत्रात आशियाई बाजारात गिफ्ट निफ्टी (०.३९%) सहित बहुतांश निर्देशांकात घसरण झाली आहे ज्यामध्ये सर्वाधिक घसरण हेंगसेंग (१.४८%), तैवान वेटेड (०.४३%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक वाढ सेट कंपोझिट (०.६७%) निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातही सुरूवातीच्या कलात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ टाटा टेलिकम्युनिकेशन (१७.७९%),केईंस टेक (१३.१६%), एरिस लाईफ सायन्स (१०.९१%), नावा (८.००%), त्रिवेणी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज (८.००%), जीई व्हर्नोवा (५.६४%) समभागात वाढ झाली आहे तर सर्वाधिक घसरण इ क्लर्क सर्विसेस (५.४९%), एशियन पेंटस (४.५२%), एशर एनर्जी (४.४३%), आयटीसी (३.१३%), बीएसई (२.९७%), बलरामपूर चिनी (२.९६%), हिरो मोटोकॉर्प (२.६९%) समभागात झाली आहे.आजच्या रूपयातील हालचालींवर भाष्य करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च विश्लेषक दिलीप परमार म्हणाले आहेत की,'भारतीय रुपयाने लक्षणीय सुधारणा दर्शविली आहे, दोन दिवसांच्या घसरणीला यशस्वीरित्या मागे टाकत तो आशियाई चलनांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा चलन म्हणून उदयास आला आहे. डॉलरच्या दीर्घकालीन चलनांच्या पुनर्बांधणीमुळे ही वाढ झाली. जागतिक कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे आणि प्रादेशिक चलनांच्या मजबूतीमुळे रुपयाला आणखी आधार मिळाला.तथापि, या सवलतीनंतरही, रुपया अद्याप संकटातून बाहेर पडलेला नाही, कारण मूलभूत असंतुलन कायम आहे कारण डॉलरची मागणी त्याच्या उपलब्ध पुरवठ्यापेक्षा जास्त आहे. तांत्रिकदृष्ट्या, स्पॉट युएसडी ९०.३० वर एक महत्त्वपूर्ण प्रतिकार पातळीचा सामना करत आहे, तर ८९.७० वर एक मजबूत आधारआधारशोधतआहे.'
मुंबई पालिकेच्या दत्तक वस्ती योजनेतील गैरव्यवहाराचे ऑडिट होणार
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधानसभेत घोषणामुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी ‘दत्तक वस्ती’ योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अनियमितता होत असल्याच्या गंभीर आरोपांवर अखेर राज्य सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचे संपूर्ण ऑडिट करण्यात येणार असल्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंगळवारी विधानसभेत केली.मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा लावून धरला होता. झोपडपट्टी भागातील कचरा संकलनासाठी महत्त्वाच्या असलेल्या या योजनेत नियमांचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे साटम यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या योजनेनुसार १५० कुटुंबे किंवा सुमारे ७५० लोकसंख्येच्या झोपडपट्टी भागासाठी किमान १५ कामगार नेमणे बंधनकारक आहे. मात्र बहुतांश स्वयंसेवी संस्था केवळ ५ ते १० कामगारच ठेवतात. उरलेल्या कामगारांच्या मानधनाचा अपहार होतो, असा गंभीर आरोप साटम यांनी केला. तसेच, झोपडपट्टी भागात दिवसातून दोन वेळा कचरा उचलणे अनिवार्य असतानाही प्रत्यक्षात ते होत नसल्याने रस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे दिसतात, असेही त्यांनी नमूद केले.योजनेचे निकष बदलामहापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांचाही यात सहभाग असल्याचा थेट आरोप करीत साटम यांनी योजनेचे निकष बदलण्याची मागणी केली. “७५० लोकसंख्येचा निकष ५०० करण्यात यावा, कामगारांचे मानधन वाढवावे; पण संबंधित भागात पुरेसे कामगार नेमले जायला हवेत,” असे मत त्यांनी मांडले. आमदार साटम यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी “मुंबई महापालिकेच्या दत्तक वस्ती योजनेचे ऑडिट लवकरच करण्यात येईल,” अशी ग्वाही सभागृहात दिली.
Indonesia Fire: इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे इमारतीला भीषण आग; 20 हून अधिक लोकांचा मृत्यू
Indonesia Fire: इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे मंगळवारी एक दुःखद घटना घडली आहे. येथील सात मजली कार्यालयीन इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 5 पुरुष आणि 15 महिलांचा समावेश आहे, ज्यात एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. ही भयानक आग सेंट्रल जकार्ता येथील एका भागात असलेल्या कार्यालयीन इमारतीला लागली होती. पोलिसांनी […] The post Indonesia Fire: इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे इमारतीला भीषण आग; 20 हून अधिक लोकांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
असुरक्षित कर्ज घेण्यात भारतात मोठ्या प्रमाणात वाढ- Experian Insights
वैयक्तिक कर्जाची व्यवस्थापना अंतर्गत मालमत्ता १५.९ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलीमुंबई: डेटा आणि तंत्रज्ञान अॅनालिटिक्स कंपनी एक्सपेरियनने त्यांचा नवा क्रेडिट इनसाइट्स - असुरक्षित कर्जे, सप्टेंबर २०२५ अहवाल (Credit Insights Unsecured Loan September 2025) हा अहवाल प्रकाशित केला आहे. अहवालात प्रामुख्याने वाढलेली कर्जाची विशेषतः वैयक्तिक कर्ज (Personal loan) ,मागणी वाढत असताना क्रेडिट कार्डची गरज, दुचाकी कर्जे आणि ग्राहक सेवा कर्जांमध्ये भारताच्या वाढत्या मागणीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात विकास होत आहे. भारतात या क्षेत्रातील किती वाढ झाली याची आकडेवारी अहवालात दिली गेली आहे. या निष्कर्षांवरून या क्षेत्रातील वित्तीय स्थिर पोर्टफोलिओत वाढ झालेली असून कामगिरी सुधारत आहे. वित्तीय प्रमुख प्रमुख उत्पादनांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यातील कर्जबुडव्यांच्या तुलनेत सुधारणा झाल्याने असुरक्षित क्रेडिट मागणीत सातत्यपूर्ण वाढ दिसून येते.अहवालाप्रमाणे आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत कर्जांचे नवीन स्रोत मजबूत राहिले आहेत. नवी वाढती तिकिट साईज एनबीएफसींकडून वाढत्या सहभागामुळे आणि कर्जदारांच्या वाढत्या परतफेडीच्या वर्तनामुळे या क्षेत्रात उभारी मिळाली आहे.अहवालातील माहितीनुसार, भारतातील असुरक्षित कर्ज वातावरण परिपक्व होत आहे. कर्ज घेणारे कर्जदार अधिक पातळीवर अंडररायटिंग पद्धती स्वीकारत आहेत. ग्राहक वाढती क्रेडिट विषयी शिस्त पाळत असल्याने यांच्यातील क्लिष्टता कमी होत असल्याचा निष्कर्ष अहवालात काढला जात आहे.विशेषतः मध्यम आणि उच्च-तिकीट कर्ज घेण्यातील वाढ वाढ व आत्मविश्वास दर्शवेते. सुरुवातीच्या थकबाकींमधील सुधारणा मजबूत पोर्टफोलिओ लवचिकता दर्शवितात. हे ट्रेंड आता डिजिटल कर्ज घेण्याच्या अवलंबनाचा वापर केल्याने परिणाम हे सकारात्मक आहेत. अर्ध-शहरी/ टियर ३/ टियर ४ बाजारपेठांमध्ये पारदर्शकता वाढताना दिसून आल्याचे अहवालाने म्हटले आहे.या मांडणीवर भाष्य करताना एक्सपेरियन इन इंडियाचे कंट्री मॅनेजिंग डायरेक्टर मनीष जैन म्हणाले आहेत की,'आम्ही भारतातील असुरक्षित कर्ज देण्याच्या जागेत अर्थपूर्ण बदल पाहत आहोत. मागणी वाढतच आहे, ग्राहक हाय तिकिट साईजकडे वाटचाल करत आहेत आणि परतफेडीची वर्तणूक सातत्याने सुधारत आहे. उत्पादनांमध्ये सुरुवातीच्या थकबाकींमधील सुधारणा दर्शवते की ग्राहक आणि कर्जदार दोघेही अधिक जबाबदार, माहितीपूर्ण निवडी करत आहेत, जे परिपक्व क्रेडिट इकोसिस्टमकडे सकारात्मक ट्रेंड दर्शविते.'अहवालातील प्रमुख मुद्दे:१ वैयक्तिक कर्ज - (Personal Loan)सप्टेंबर'२५ पर्यंत व्यवस्थापना अंतर्गत मालमत्ता (Asset Under Management AUM) १५.९ लाख कोटी पर्यंत वाढले आहे जे पूर्वीपेक्षा वार्षिक सरासरीपेक्षा १३% जास्त आहे.सर्व कर्ज देणाऱ्या श्रेणी (खाजगी क्षेत्रातील बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, NBFCs) ने नवीन सोर्सिंगमध्ये मजबूत वार्षिक सरासरी वाढ नोंदवली आहे.एनबीएफसींनी त् लहान तिकिट साईज आकाराच्या १ लाख कर्जांमध्ये एनबीएफसीने (Non Banking Financial Companies NBFCs) आपला हिस्सा वाढवला.मागील तिमाहीच्या तुलनेत सरासरी तिकिट साईज आकारात वाढ दिसून आली.गेल्या वर्षीच्या तुलनेत सुरुवातीच्या टप्प्यातील कर्जबुडव्यांची पातळी सुधारली.२ क्रेडिट कार्ड: (Credit Card)सप्टेंबर'२५ पर्यंत व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेत ३.४ लाख कोटी पर्यंत वाढ झाली आहे. वार्षिक सरासरीपेक्षा ही वार्षिक बेसिसवर ९% जास्त आहे.तीन तिमाहींच्या घसरणीनंतरही नवीन मंजूर कर्जात १३% तिमाही वाढ झाली. वार्षिक सरासरीपेक्षा किंचित कमी (~१%) आहे.क्रेडिट कार्ड व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेत (AUM) वर टॉप ४ कंपनीचे वर्चस्व आहे. त्यांनी पोर्टफोलिओचा वाटा ७०% वरून ७२% वार्षिक सरासरीपर्यंत वाढला आहेबँका आणि वित्तीय संस्थांमध्ये सरासरी क्रेडिट मर्यादा वाढल्या आहेत सप्टेंबर’२५ पर्यंत निव्वळ ९०+ कर्जबुडव्यांचा दर २.०% वरून १.८% वार्षिक सरासरीपर्यंत वाढला आहे.३ दुचाकी कर्जे: (2W)सप्टेंबर’२५ पर्यंत व्यवस्थापना अंतर्गत मालमत्ता १.८ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे जो वार्षिक सरासरी सरासरीपेक्षा १८% वाढ दर्शवितो.आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत नवीन कर्जांच्या मंजूर रकमेत वार्षिक सरासरीपेक्षा ९% वाढ झाली आहे.एनटीसी (New to Credit NTC) ग्राहकांकडून जास्त सोर्सिंगमुळे विना बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) चा दुचाकी कर्ज विभागात मजबूत बाजार हिस्सा आहे.हाय तिकिट साईजमध्ये (१-२ लाख) वाढतच राहिली आहे.निव्वळ ३० पेक्षा अधिक कर्जबुडव्यांचा दर वार्षिक ६.२% वरून ५.४% पर्यंत कमी झाला. जरी निव्वळ ९० हून अधिक कर्जबुडव्यांचा दर अजूनही वाढलेला आहे.४ ग्राहकोपयोगी कर्ज (Consumer Durables)सप्टेंबर २५ पर्यंत व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेत (AUM) १ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे पण जो वार्षिक १६% वाढ दर्शवितो.नवीन कर्जांच्या सोर्सिंगमध्ये वार्षिक २२% वाढ झाली, जी असुरक्षित उत्पादनांमध्ये सर्वात जलद आहे.मजबूत किरकोळ प्रवेशामुळे NBFCs ग्राहकोपयोगी कर्जाच्या सोर्सिंगवर वर्चस्व गाजवत राहिले असे अहवालात म्हटले आहे.कर्जाच्या प्रमाणात २०००० रुपयांपेक्षा कमी कर्जांचा वाटा सुमारे ६५% होता.पोर्टफोलिओ कर्जबुडव्यांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे, जी निव्वळ ३०+ आणि निव्वळ ९०+ कर्जांच्या दरांमध्ये घट दर्शवते.एक्सपेरियन क्रेडिट इनसाइट्स - (Insights) - असुरक्षित कर्जदारांना ग्राहकांच्या क्रेडिट वर्तनाचा आणि भावी जोखीम नमुन्यांचा व्यापक, डेटा-आधारित दृष्टिकोन कंपनी प्रदान करते. एक्सपेरियनचे विश्लेषण, क्रेडिट इंटेलिजन्स आणि सखोल उद्योग कौशल्याचा वापर करून, वित्तीय संस्था वित्तीय निर्णय सक्षमपणे घेण्याची क्षमता वाढवू शकतात असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले.
Stock Market: देशांतर्गत शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण नोंदवली गेली. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहार दिवशी, मंगळवार, ९ डिसेंबर रोजी सेंसेक्स (Sensex) ४३६ अंकांची मोठी घसरण नोंदवत ८४,६६६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) देखील १२१ अंकांनी घसरून २५,८४० या स्तरावर स्थिरावला. प्रमुख क्षेत्रांमध्ये घसरण – बाजारात विक्रीचा दबाव स्पष्टपणे दिसून आला. […] The post Stock Market: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी पडझड; सेंसेक्स 436 अंकांनी घसरून 84666 वर बंद; आयटी क्षेत्राला सर्वाधिक फटका appeared first on Dainik Prabhat .
Alejandro Gil : क्युबाच्या माजी अर्थमंत्र्यांना आजन्म तुरुंगवासाची शिक्षा
हवाना : क्यूबातील सर्वोचच न्यायालयाने माजी अर्थमंत्र्यांना हेरगिरीचया आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. क्युबामधये एखाद्या वरिष्ठ नेत्याला या आरोपाखाली क्युबामध्ये सुनावण्यात आलेली ही सर्वात मोठी शिक्षा आहे. माजी अर्थमंत्री अलेकझांड्रो गिल फेर्नांडेझ यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. लाचखोरी, कागदपत्रांची बनवाबनवी आणि कर चुकवेगिरीचया एका खटलयात दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्यांना २० वर्षांच्या तुरुंगवासाची आणखी […] The post Alejandro Gil : क्युबाच्या माजी अर्थमंत्र्यांना आजन्म तुरुंगवासाची शिक्षा appeared first on Dainik Prabhat .
Pune News : सदाशिव पेठेत रमेश डाईंग दुकानाला भीषण आग; साहित्य जळून खाक
पुणे : सदाशिव पेठेतील शनीपार चौकाजवळ असलेल्या रमेश डाईंग या ऑल-सीझन कपडे व सामानाच्या दुकानाला सोमवारी (दि. ९) दुपारी ११.५२ वाजता अचानक भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने १० अग्निशमन बंब व एक हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म घटनास्थळी रवाना केले. घटनास्थळी पोहोचताच अग्निशमन जवानांना दुकानाच्या टेरेसवर असलेलेल्या पञ्याच्या शेडमध्ये व सोलर पॅनलजवळ […] The post Pune News : सदाशिव पेठेत रमेश डाईंग दुकानाला भीषण आग; साहित्य जळून खाक appeared first on Dainik Prabhat .
मंत्री नितेश राणे यांचे विधानपरिषदेत आश्वासन; महिलांच्या सुरक्षेसाठी विदेशातून 'हँड ग्लोज'मागवणार
नागपूर: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मच्छीमार व्यवसायातील महिलांना कोळंबी सोलत असताना होणाऱ्या शारीरिक त्रासाचा आणि अन्य समस्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा करत महिलांना मोठा दिलासा दिला आहे.महिलांच्या हाताच्या सुरक्षेसाठी मोठी घोषणामंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, कोळंबी सोलण्याचे काम करणाऱ्या आणि मासे विकणाऱ्या महिलांना काम करताना होणारा त्रास आणि हाताला होणारी इजा यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली जाईल. नितेश राणे म्हणाले, कोळंबी सोलताना मच्छीमार विकणाऱ्या महिलांच्या हाताला कोणताही त्रास होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. 'मेक इन इंडिया' अंतर्गत तयार केलेले आणि काही विदेशामधून महिलांच्या सुरक्षेसाठी 'हँड ग्लोज' मागवण्यात येणार आहेत. या हँड ग्लोजमुळे महिलांना काम करताना हाताला होणारे नुकसान आणि होणारा त्रास टळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.दुर्गंधीवरही तोडगा काढणारकेवळ हाताच्या त्रासावरच नव्हे, तर मासे आणि कोळंबीमुळे होणारी घाण आणि दुर्गंधी यावर सुद्धा उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन मंत्री राणे यांनी सभागृहात दिले. या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यापूर्वी, लवकरच कोळंबी सोलणाऱ्या आणि मासे विकणाऱ्या ताईंबरोबर बैठक घेऊन त्यांच्या अडचणी आणि सूचना जाणून घेतल्या जातील, असेही नितेश राणे यांनी यावेळी नमूद केले. या निर्णयामुळे किनारी भागात आणि मच्छीमारी व्यवसायात कार्यरत असलेल्या हजारो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बदलापूर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
प्रवीण समजीस्कर मृत्यू प्रकरणातील तीन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखलबदलापूर : सह्याद्री सुपर सपेशालिस्ट हॉस्पिटलमधील तीन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. योगेश मिंडे , डॉ अनंत ठाणगे आणि डॉ .मनीष वाधवा या तिघांची नावे या प्रकरणात आहेत.ही कारवाई प्रवीण समजीस्कर याच्या मृत्यू प्रकरणाशी संबधित आहे .प्रवीण समजीस्कर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता .कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता .कुटुंबासोबत काही समाजसेवकांनीही गेल्या वर्षभरापासून आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरठा केला .मिळालेल्या माहितीनुसार ,प्रवीण समजीस्कर दुचाकीवरून पडल्याने त्याच्या चेहऱ्यावर किरकोळ दुखापत झाली होती . ही जखम साधी असतानाही हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला .मात्र शस्त्रक्रिया करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला .या घटनेनंतर कुटुंबीयांनी मृत्यू संशयास्पद असल्याने तक्रारी केल्या होत्या .आरोग्य विभागाच्या चौकशीनंतर डॉक्टरांचा हलगर्जीपणा ठळकपणे समोर आला .त्यानंतर बदलापूर पश्चिम ठाण्यात तिन्ही डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले . एकाच वेळी तीन डॉक्टरांवर केस नोंद नोंदवल्याने बदलापूर वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे .
शरद पवारांच्या पक्षातील सूर्यकांत मोरे विरोधात हक्कभंग
जामखेड : जामखेड नगरपालिका निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सूर्यकांत मोरे नावाच्या पदाधिकाऱ्याने विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंच्या, विधान परिषदेच्या सदस्यांबाबत आणि एकंदर विधान परिषदेच्या सभागृहाच्या विरोधात काही विधाने केली आहेत. सूर्यकांत मोरे यांनी राम शिंदेंच्या बाबतीत बोलताना उडालेले बल्ब असा शब्दप्रयोग केला होता. यावर तिथे उपस्थित खासदार निलेश लंके, सुषमा अंधारेंनी आक्षेप घेतला नव्हता. पण आता सूर्यकांतच्या अडचणी वाढल्या आहेत.सूर्यकांत मोरे, या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्याने विधानपरिषद सदस्य आणि सभापती यांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याबद्दल प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत हक्कभंग मांडला . संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. या हक्कभंग प्रस्तावाला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे.सर्वपक्षीयांचा पाठिंबाशशिकांत शिंदे तर संबंधित व्यक्तीला योग्य ती समज देण्यात येईल . पण पक्षातून काढणार नाही, कारण पक्षातून आम्ही काढलं तर लगेच दुसरे पक्षात घेण्यासाठी तयार असतात. सभागृहाबद्दल किंवा या कामकाजाबद्दल कोणाला माहिती नसते त्यामुळे अशी वक्तव्य होत असतात. त्यामुळे या सभागृहाबद्दल सगळ्यांना माहिती होणं गरजेचं आहे. बाकी काय कारवाई सभागृह करणार त्याला आमचा पाठिंबा आहे.
रोहित पवारांचे समर्थक सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग दाखल; नेमकं काय आहे कारण?
Suryakant More | अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) नेते रोहीत पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यादरम्यान सूर्यकांत मोरे यांनी विधानपरिषदेचे सभापती विधान परिषद सदस्य आणि सभापती राम शिंदे तसेच सर्व सदस्यांसंदर्भात आक्षेपार्ह टीका केली. याप्रकरणी सूर्यकांत मोरेविरोधात मंगळवारी हक्कभंग मांडण्यात आला आहे. प्रवीण दरेकर यांच्याकडून विधान […] The post रोहित पवारांचे समर्थक सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग दाखल; नेमकं काय आहे कारण? appeared first on Dainik Prabhat .
गुटखा विक्रेत्यांना 'मकोका'लावणार!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करणार
नागपूर : गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, कायद्यातील तरतुदींनुसार “हार्म आणि हर्ट” या दोन्ही घटकांअभावी तो लागू होत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल, अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाविद्यालय परिसरातील अवैध गुटखा विक्रीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. गुजरात आणि राजस्थान येथून ट्रक, टेम्पो किंवा कंटेनरच्या माध्यमातून भाजीपाला, तेल, किराणामाल किंवा फळांच्या आड लपवून नवी मुंबई परिसरातील विक्रेत्यांपर्यंत गुटखा पोहोचवला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. अशा प्रकारे गुटखा विक्री करणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) लावणार का? असा प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला.या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शाळा किंवा महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात गुटखा विक्रीचे प्रकार आढळल्यास त्या परिसरातील टपऱ्या किंवा दुकानांवर संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्याचबरोबर ही कारवाई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयाने केली जाणार आहे. तसेच ड्रग्जच्या आहारी गेलेल्या व्यक्तींसाठी पुनर्वसन केंद्रांची आवश्यकता आहे. मुंबई महानगरमध्ये दर्जेदार पुनर्वसन केंद्रांची कमतरता असून शासन यासंदर्भात आवश्यक पुढाकार घेणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.https://prahaar.in/2025/12/09/suryakant-more-in-trouble-for-insulting-the-speaker-and-members-of-the-legislative-council/आतापर्यंत किती ठिकाणी कारवाई झाली?राज्यात गुटखा बंदी आहे. गुटखा विक्री व वहन संदर्भात राज्यभरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असून विविध जिल्ह्यांमध्ये एकूण शेकडो गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली आहे. यात नवी मुंबईत १ हजार १४४, अहिल्यानगर येथे १८५, जालना ९०, अकोला ३५, नाशिक १३१, चंद्रपूर २३०, सोलापूर १०८, बुलढाणा ६६४, तसेच नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत १ हजार ७०६ गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांमी दिली.शाळा-महाविद्यालय परिसरातील टपऱ्या उद्ध्वस्त करणार - गृहराज्यमंत्री पंकज भोयरगुटखा विक्रीवर बंदी असतानासुद्धा काही ठिकाणी अवैध पद्धतीने गुटखा विक्री होते. यावर संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: यासंदर्भातील आढावा घेतला असून गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटरच्या परिसरातील टपऱ्या किंवा दुकाने उद्ध्वस्त करण्याकरिता त्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. तसेच याबाबत लोकप्रतिनिधींना माहिती देण्याकरिता तातडीने पोलिस आयुक्तांना निर्देश देऊन ती माहिती देण्यात येईल. लवकरात लवकर सर्व लोकप्रतिनिधींना याबाबतची माहिती देण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.
डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
पुणे :दि. 8 डिसेंबर (जिमाका वृत्तसेवा): ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या दुःखद निधनाची माहिती प्राप्त झाली असून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेनुसार पोलीस विभागाला आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिवंगत डॉ. बाबा आढाव यांनी आयुष्यभर सामाजिक न्याय, मजूर चळवळ […] The post डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार appeared first on Dainik Prabhat .
फराह खानकडून ‘धुरंधर’मधील अक्षय खन्नाच्या भूमिकेचे कौतुक; थेट केली ऑस्कर देण्याची मागणी
Akshaye Khanna | आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह मुख्यभूमिकेत आहे. मात्र सर्वत्र अभिनेता अक्षय खन्नाच्या धमाकेदार अभिनयाची मोठी चर्चा रंगली आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक जणांनी देखील त्याच्या अभिनयाबद्दल पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे. इतकेच काय तर, चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शक फराह खान हिनं […] The post फराह खानकडून ‘धुरंधर’मधील अक्षय खन्नाच्या भूमिकेचे कौतुक; थेट केली ऑस्कर देण्याची मागणी appeared first on Dainik Prabhat .
वध २ चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरने उत्सुकता वाढवली! ‘या’दिवशी होणार प्रदर्शित
Vadh 2 movie : काही चित्रपट हे बिग बजेट नसले तरी त्या चित्रपटांचे विषय विचार करायला भाग पाडतात. तसेच बॅाक्स अॅाफिसवरही चांगली कमाई करतात. असाच एक चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे नाव वध असून, संजय मिश्रा आणि नीना गुप्ता या कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना खेळवून ठेवले होते. आता वध चित्रपटाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या […] The post वध २ चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरने उत्सुकता वाढवली! ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित appeared first on Dainik Prabhat .
‘मासिक पाळीच्या रजेच्या धोरणाला’उच्च न्यायालयाची स्थगिती ; कर्नाटक सरकारने दिली होती मान्यता
Paid Menstrual Leave। कर्नाटक उच्च न्यायालयाने आज एका अंतरिम आदेशात, २० नोव्हेंबर रोजी कर्नाटक सरकारने लागू केलेल्या एका आदेशाला स्थगिती दिली आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत मासिक पाळीच्या वेळी पगारी रजा अनिवार्य करण्यात आली होती. सरकारी अधिसूचनेनुसार, विविध कायद्यांतर्गत नोंदणीकृत औद्योगिक आस्थापनांना सर्व कायमस्वरूपी, कंत्राटी आणि आउटसोर्स केलेल्या महिला कर्मचाऱ्यांना दरमहा एक दिवसाची पगारी रजा […] The post ‘मासिक पाळीच्या रजेच्या धोरणाला’ उच्च न्यायालयाची स्थगिती ; कर्नाटक सरकारने दिली होती मान्यता appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली: ५०.१४ लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बाब पुढे आली आहे. लोकसभेत सरकारकडून आठव्या वित्त आयोगाचे (8th Central Pay Commission) घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ केवळ कर्मचाऱ्यांनाच नाही तर ६९ लाख निवृत्तीवेतन धारकांना (Pensioners) मिळणार आहे. सरकारने वेतन आयोग लागू करण्याची तारीख अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहे. संसदेत बोलताना व आयोगात कोणाला लाभ मिळणार व कधी मिळणार या लिखित प्रश्नांचे उत्तर देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, वित्तीय आयोगाची यापूर्वीच स्थापना झाली असून टीओआर (Term of Reference) ची देखील स्थापना करण्यात आली आहे. ३ नोव्हेंबरला याची अधिसूचना वित्त मंत्रालयाने जीआर काढून दिली होती'.एकदा सगळ्याच निकषांवर बोलणी पूर्ण झाल्यावर किती रक्कमेची आवश्यकता असेल व वित्तीय पुरवठा आवश्यक असेल तशी शासन पातळीवर तरतूद करून त्याची अंमलबजावणी अंतर्गत बैठकीनंतर निश्चित केली जाईल असे मंत्री पंकज चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. फिटमेंट फॅक्टर आधारे ८ वे वित्तीय आयोग कर्मचाऱ्यांसाठी रक्कम निश्चित करू शकतात. त्याआधारे बोनस, ग्रॅच्युइटी, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, व इतर सुविधातील वित्तीय निश्चितीबाबत निर्णय या दरम्यान घेतले जातील असे म्हटले आहेत.या आठव्या वित्तीय आयोगाचा लाभ कोणाकोणाला?केंद्र सरकारचे कर्मचारी, औद्योगिक आणि बिगर-औद्योगिक दोन्हीअखिल भारतीय सेवा कर्मचारीसंरक्षण दलातील कर्मचारीकेंद्रशासित प्रदेशातील कर्मचारीभारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीआरबीआय वगळता संसदेच्या कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या नियामक संस्थांचे अधिकारी आणि कर्मचारीसर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी आणि कर्मचारीउच्च न्यायालयांचे अधिकारी आणि कर्मचारी ज्यांचा खर्च केंद्रशासित प्रदेशाद्वारे केला जातो असे कर्मचारी यांचा या आयोगात समावेश असणार आहे.पुढे काय?३ नोव्हेंबर २०२५ च्या ठरावात नमूद केल्याप्रमाणे आठवा केंद्रीय वेतन आयोग त्याच्या स्थापनेच्या तारखेपासून १८ महिन्यांच्या आत त्यांच्या शिफारसी सादर करणार आहे अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.विशिष्ट बाबींवरील शिफारसी अंतिम झाल्यानंतर, आवश्यकता असल्यास, ते अंतरिम अहवाल देखील सादर करू शकते.सरकारने पुनरुच्चार केला की अंमलबजावणीचे निश्चित वेळापत्रक, अर्थसंकल्पीय वाटप निधी आणि अंमलबजावणीबाबत निर्णय आयोगाच्या शिफारसी तपासल्यानंतर घेतले जातील हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अद्याप तारीख स्पष्ट नाही. निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या नेतृत्वाखाली या आयोगाचे कामकाजसध्यासुरूआहे.
विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान केल्याप्रकरणी सूर्यकांत मोरे हक्कभंगाच्या कचाट्यात
नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या एका पदाधिकाऱ्याने केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्याच्या विधानमंडळात मोठे वादंग निर्माण झाले आहे. या व्हिडिओ क्लिपमुळे सभागृहाच्या प्रतिमेला तडा जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.काय आहे नेमके प्रकरण?राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांनी एका कार्यक्रमातील भाषणादरम्यान थेट विधानपरिषद सभापती आणि सभागृहातील कामकाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले. विशेष म्हणजे, ज्या कार्यक्रमात हे वक्तव्य करण्यात आले, त्यावेळी आमदार रोहित पवार यांची उपस्थिती होती. या विडिओ क्लिपमुळे सभागृहाची प्रतिमा मलीन होऊन जनमानसात विश्वासार्हतेला तडा जात असल्याने भाजप आमदारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.https://prahaar.in/2025/12/09/ias-tukaram-mundhe-in-trouble-bjp-mlas-demand-suspension/हक्कभंगाची तयारी आणि कारवाईचे निर्देश:या गंभीर प्रकरणानंतर विधानपरिषदेतील भाजप आमदारांनी संबंधित व्यक्ती विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केली आहे. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सभागृहात त्यांनी स्पष्ट केले की, सूर्यकांत मोरे यांनी हे वक्तव्य केले तेव्हा आचारसंहिता भंग झालेला होता, त्यामुळे तेव्हा कोणतीही कारवाई झाली नव्हती.यावर कठोर पाऊल उचलत उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विशेष चौकशी समितीने अहवाल सादर करावा तसेच मोरे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे मत व्यक्त केले. तसेच, त्यांनी सूर्यकांत मोरे यांच्यावर पोलीस यंत्रणेद्वारे कारवाई करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या आक्षेपार्ह विधानामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
करदात्यांसाठी मोठी बातमी: नव्या कायद्यासह लवकरच नवा आयटीआर फॉर्म अधिसूचित होणार
मंत्री पंकज चौधरी यांची लोकसभेत महत्वाची माहितीनवी दिल्ली: आज अखेर 'आयकर कायदा २०२५ वर आधारित नवीन आयकर रिटर्न (आयटीआर) फॉर्म २०२७-२८ आर्थिक वर्षाच्या आधी अधिसूचित केला जाईल' असे विधान अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी संसदेत केले आहे. आयकर फॉर्मच्या सरलीकरणावरील सीबीडीटी समिती,कर तज्ञ, संस्थात्मक संस्था आणि आयकर विभागाच्या क्षेत्रीय रचनांशी व्यापक सल्लामसलत करत आहे लवकरच यांची घोषणा केली जाईल असे त्यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले आहे. सध्या चाललेल्या हिवाळी अधिवेशनात ते बोलत होते. त्यामुळे त्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, २१ ऑगस्ट रोजी लागू झालेला आयकर कायदा, २०२५ पुढील आर्थिक वर्षापासून, १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे जो संपूर्ण देशात लागू होईल. १९६१ साली ते आजतागायत असलेल्या जुन्या आयकर कायद्याची जागा संबंधित नवा कायदा घेणार आहे. त्यामुळे काळानुरूप बदललेल्या व अद्ययावत केलेला कर कायदा करदात्यांना अधिक सोपा, सुटसुटीत होऊन कायद्याचे सोप्या भाषेत सरलीकरण होणार आहे असे दिसत आहे. विशेषतः तांत्रिक शब्द असलेल्या कायद्यातील शब्दसंग्रह कमी करून कायदा अधिक वाचायला सोपा आणि सरळ होऊ शकतो ज्यामुळे ते समजणे सामान्यांना सोपे होईल.टीडीएस तिमाही आयटीआर (Income Tax Returns ITR) रिटर्न फॉर्म आणि आयटीआर फॉर्म यांच्यासारखे आयकर कायद्यांतर्गत लागू होणारे सर्व वेगवेगळे फॉर्म पुन्हा नव्याने तयार केले जाणार आहेत असे मंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत स्पष्ट केले आहे. कर धोरण विभागासोबत संचलनालय काम कर असल्याने त्यासंबंधी सध्या बदल करण्याचे काम सुरू आहे एकदा ती प्रकिया पूर्ण झाल्यानंतर फॉर्म भरणे हे करदात्यांसाठी अनुकूल बनतील असे मंत्री चौधरी यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.ते पुढे लोकसभेत म्हणाले आहेत की,'२०२६ च्या अर्थसंकल्पात केलेल्या सुधारणांमुळे प्राप्तिकर कायदा, २०२५ शी संबंधित आयटीआर फॉर्ममध्ये बदल करणे आवश्यक असेल आणि त्यानुसार, २०२६-२७ च्या पहिल्या कर वर्षाशी संबंधित आयटीआर आर्थिक वर्ष २०२७-२८ पूर्वी अधिसूचित केले जातील.' गेल्या चालू आर्थिक वर्षात (२०२६-२७ चे मूल्यांकन वर्ष Assessment Year) मिळवलेल्या उत्पन्नासाठी आयटीआर फॉर्मबाबत, चौधरी म्हणाले की,आयटीआर फॉर्मचे एकत्रीकरण आणि सरलीकरण प्रक्रिया सुरू आहे कारण ते प्राप्तिकर कायदा १९६१ च्या तरतुदींनुसार अधिसूचित केले जाणार आहेत.
फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी ६० दिवसांत आरोपपत्र सादर करणार
नागपूर : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राज्य सरकार येत्या ६० दिवसांत आरोपपत्र न्यायालयात सादर करेल. या प्रकरणाची सर्व अंगाने सखोल चौकशी करून आरोपींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. भाजप आमदार अमित साटम यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.To examine the tragic and unfortunate suicide case of a woman doctor from Satara, the SIT will investigate and a judicial commission has also been set up.साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या दुर्दैवी आत्महत्येच्या घटनेवर SIT चौकशीसोबतच न्यायिक आयोग गठीत करण्यात आला आहे.(विधानसभा,… pic.twitter.com/ShDUgHJA2A— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 9, 2025फलटण येथील पोलीस निरीक्षक गोपाळ बदने याने पीडित महिला डॉक्टराला विवाहाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले होते, हे सिद्ध झाले आहे. या घटनेच्या ५ महिन्यांपूर्वी, ही महिला वैद्यकीय अधिकारी असल्याने ती मोठ्या गुन्ह्यांतील आरोपींना तंदुरस्त नसल्याचा वैद्यकीय अहवाल देत आहे, असे पत्र वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिले आहे. यातील दुसरा आरोपी प्रशांत बनकर यानेही या महिला डॉक्टराची फसवणूक केली आहे, हे अन्वेषणात स्पष्ट झाले आहे. या महिलेने आत्महत्येपूर्वी स्वतःच्या हातावर आरोपींची नावे लिहिली आहेत, हे खरे आहे. या प्रकरणाचे अन्वेषण राज्य राखीव बल गट क्रमांक १ च्या समादेशक तेजस्वी सातपुते यांच्या देखरेखीखाली पथक करत आहे. या प्रकरणी महिला डॉक्टरने आरोपींसमवेत केलेले व्हॉट्सअप संभाषण आणि ती राहत असलेल्या खोलीसमोरील सीसीटीव्हीचे चित्रण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे; अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला दिली.पीडितेच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी द्या - प्रकाश सोळंकेया वेळी विरोधकांनी या प्रकरणावरून राज्यात लाडक्या बहिणी सुरक्षित नसल्याचा आरोप केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेशी तुलना करणे चुकीचे आहे. आम्ही राज्यातील महिलांना सुरक्षा देण्यासाठी खंबीर आणि कटिबद्ध आहोत. या वेळी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मृत महिलेच्या कुटुंबियांतील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, पीडित महिला ही कंत्राटी पद्धतीने कामावर होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांतील सदस्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देता येत नाही. तरी या प्रकरणी पीडित कुटुंबियांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य ते साहाय्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
''सीएसएमटी'स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार'
नागपूर : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाजवळ लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. ते म्हणाले की, मुंबई येथील रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा, अशी मागणी यापूर्वीच्या अधिवेशनात आमदारांनी केली होती. याविषयी रेल्वे मंत्र्यांनी स्वतः मला पुतळा कुठे असेल, कसा असेल याचे सादरीकरण करून दाखवले. रेल्वे मंत्र्यांनी सांगितले होते की, राज्यमंत्र्यांनी लोकसभेत याविषयीच्या प्रश्नावर दिलेले उत्तर जुन्या आराखड्याच्यानुसार होते. आता नव्या आराखड्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात येणार आहे. त्यानुसार त्या नव्या आराखड्याची अंतिम मान्यता घेण्यात येत आहे. नवीन आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर मुंबई रेल्वे स्थानकावर भव्य पुतळा उभा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.After the new plan is approved, a grand statue of Chhatrapati Shivaji Maharaj will be erected at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT), Mumbai.नवीन आराखडा मंजूर झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारू!… pic.twitter.com/DU3B0LSZhr— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 9, 2025
आयएएस तुकाराम मुंढे अडचणीत; भाजप आमदारांनी केली निलंबनाची मागणी
नागपूर: डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करून भाजप आमदारांनी मंगळवारी विधानसभेत त्यांच्या निलंबनाची मागणी केली.महाविकास आघाडी सरकारच्या काळात तुकाराम मुंढे नागपूर मनपा आयुक्त असताना त्यांनी शासनाची अधिकृत नियुक्ती नसतानाही नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार नियमबाह्यपणे स्वतःकडे घेतला. सीईओचे अधिकार नसतानाही त्यांनी आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांची नियमबाह्य पेमेंट्स केली. तब्बल २० कोटी रुपये त्यांनी अशाप्रकारे दिल्याचा थेट आरोप भाजप आमदार कृष्ण खोपडे व प्रवीण दटके यांनी केला.मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातील महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली, तसेच १७ कर्मचाऱ्यांना विनाकारण निलंबित केल्याचा आरोप खोपडे यांनी केला. खोपडे यांनी सांगितले की, हा विषय सभागृहात उपस्थित केल्यामुळे मुंढे यांच्या समर्थकांकडून त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असून, आरोपीला तात्काळ अटक करावे आणि मुंढेंवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.https://prahaar.in/2025/12/09/65-hostels-for-obc-students-in-the-state-the-process-of-confirming-seats-in-all-remaining-districts-is-in-the-final-stage-chief-minister-devendra-fadnavis/सभागृहात गोंधळसभागृहात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सत्ताधारी आमदार आक्रमक झाले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यात हस्तक्षेप करीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशी होईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वस्त केले. मात्र, या उत्तरावर आमदारांचे समाधान न झाल्याने त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे तालिका अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करत स्पष्ट केले की, या प्रकरणातील वस्तुस्थिती जाणून घेऊन लवकरात लवकर सभागृहात निवेदन केले जाईल.

27 C