कडाक्याच्या थंडीत पुणे पालिकेची शेकोटीवर बंदी! प्रदुषण नियंत्रणासाठी घेतला निर्णय
पुणे: राज्यभरात मागील आठवड्यांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे शरीराला ऊब मिळावी म्हणून अनेकजण शेकोटी पेटवत आहेत. मात्र थंडीच्या दिवसात पुणे पालिकेने शेकोटी न पेटवण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वायू प्रदूषण होत असल्यामुले पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शेकोटी न पेटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कुणी शेकोटी पेटताना दिसल्यास संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई होईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.पुणे पालिकेच्या निर्णयाबाबत सविस्तरपुणे शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले तसेच निवासी परिघांमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर शेकोट्या पेटवताना लाकूड, कचरा किंवा कोळसा जाळतात. यामधून निर्माण होणाऱ्या धूरामुळे पुणे शहरातील हवा प्रदूषण वाढत आहे. हवा प्रदूषणामुळे केवळ वातावरणामध्ये बदल होत नसून याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होत आहे. शेकोट्या पेटवल्यामुळे धूर, कार्बन मोनोऑक्साइड आणि अन्य हानिकारक वायूंच उत्सर्जन होऊन श्वसनावर परिणाम होतो. ज्यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसन रोगांचा धोका वाढत आहे.\केंद्र आणि राज्य शासनाने हवा प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी विविध कायदे आणि नियम बनवले आहेत. जसे कि 'हवा (प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, १९८१' अंतर्गत भाग ४ कलम १९ (५), 'घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६' कलम १५ (छ) आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांचेकडील राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमच्या २०२२ च्या मार्गदर्शक तत्वांनुसार उघड्यावर कोळसा किंवा जैविक पदार्थ (प्लास्टिक / रबर) आणि इतर कचरा जाळण्यास मनाई केली आहे.https://prahaar.in/2025/11/19/pitya-bhai-takes-up-lotus-actor-ramesh-pardeshi-joins-bjp/यामुळे पुणे शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर मनपा कर्मचारी किंवा मनपा ठेकेदाराकडील नियुक्त कंत्राटी कामगारांना शेकोटी पेटवून उघड्यावर कोळसा / प्लास्टिक / रबर आणि इतर कचरा जाळून धूर निर्माण केल्याचे आढळल्यास पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल. या पार्श्वभूमीवर कोणत्याही गृहनिर्माण संकुलातील वॉचमन, सफाई कामगार आणि इतर कामगार व्यक्तींनी या नियमांचे उल्लंघन करू नये असा आदेश पालिका आयुक्तांनी दिला आहे.
Pune : आमदार शिरोळे यांना दिलासा ; बहिरट यांची याचिका फेटाळली
पुणे – विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी भाजपचे विजयी उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली निवडणूक याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी हा निकाल दिला. यामध्ये शिरोळे यांच्यावतीने ॲड. अनुराग मिश्रा आणि ॲड. रोहन नहार यांनी बाजू मांडली. मतदार यादीत छेडछाड झाल्याचा, मतदारसंख्येत संशयास्पद […] The post Pune : आमदार शिरोळे यांना दिलासा ; बहिरट यांची याचिका फेटाळली appeared first on Dainik Prabhat .
Pimpri : आयारामांमुळे जुन्या-जाणत्यांमध्ये धाकधूक; निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी
– प्रकाश गायकर पिंपरी– महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसे निवडणुकीचे रण तापू लागले आहे. या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्यांनी पुन्हा जिंकण्यासाठी अनुकूल पक्ष निवडण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या भाजपमधून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक संधीसाधू फिल्डींग लावत आहेत. भाजपचा इलेक्िटव्ह मेरिटचा फाॅम्र्यूला अशा संधीसाधूंच्या पथ्यावर पडत आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या […] The post Pimpri : आयारामांमुळे जुन्या-जाणत्यांमध्ये धाकधूक; निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी appeared first on Dainik Prabhat .
Pune District : खेड तालुक्यात इच्छुकांचा प्रचार कोटीच्या घरात
राजगुरूनगर : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी काही दिवसापूर्वी आरक्षण जाहीर झाले तेंव्हापासून इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीच्या तोंडावर इच्छुक उमेदवारांनी महिला मतदारांना देवदर्शन घडविण्याचा सपाटा उठवला असून आतापर्यंत एका जिल्हा परिषद गटातील तीन चार इच्छुक उमेदवारांचा खर्च कोटींच्या घरात गेला आहे. खेड तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य […] The post Pune District : खेड तालुक्यात इच्छुकांचा प्रचार कोटीच्या घरात appeared first on Dainik Prabhat .
Pune : पात्रता प्रमाणपत्राविना मुद्रांक शुल्क माफी
कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचा ‘मुठे समिती’चा ठपका – मुंढवा सरकारी जमीन व्यवहार प्रकरण पुणे – मुंढवा येथील सरकारी जमिनीच्या व्यवहारात मुद्रांक शुल्क माफी घेताना जिल्हा उद्योग केंद्राचे पात्रता प्रमाणपत्र जोडले नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दस्त नोंदणीवेळी मुद्रांक शुल्क माफी ग्राह्य ठरत नाही, तरीही दस्त नोंदणी केल्याने त्यातून सरकारचा महसूल बुडविल्याचे मुठे समितीच्या अहवालात म्हटले आहे. […] The post Pune : पात्रता प्रमाणपत्राविना मुद्रांक शुल्क माफी appeared first on Dainik Prabhat .
Pune District : राजगुरूनगर नगरपरिषदेसाठी ४ नगरसेवकांचे अर्ज अवैध
राजगुरूनगर : राजगुरूनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत मंगळवार (दि. १८) छाननीच्या दिवशी पक्षाची अधिकृत उमेदवारी (एबी फॉर्म) न जोडल्याने चार नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज अवैध (बाद) ठरले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शैलजा पाटील आणि सहायक निवडणूक अधिकारी अंबादास गरकळ यांनी दिली. छाननीमध्ये प्रभाग क्रमांक दोनमधून किरण बबनराव मलघे, प्रभाग क्रमांक आठमधून रुपेश मुकुंद खांगटे, अक्षय चिमाजी […] The post Pune District : राजगुरूनगर नगरपरिषदेसाठी ४ नगरसेवकांचे अर्ज अवैध appeared first on Dainik Prabhat .
पुणे : शालेय शिक्षण विभागात आयएएस अधिकाऱ्यांचा शिरकाव वाढला
राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी यशदाच्या उपमहासंचालक त्रिगुण कुलकर्णी यांची बदलीद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेशही राज्य शासनाने जारी केले आहेत. शालेय शिक्षण विभागात आयएएस अधिकाऱ्यांचा शिरकाव दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर […] The post पुणे : शालेय शिक्षण विभागात आयएएस अधिकाऱ्यांचा शिरकाव वाढला appeared first on Dainik Prabhat .
Pune District : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निवडणुकीच्या रिंगणात
बारामती : बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना देखील रिंगणात उतरली आहे. जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवढे स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असून त्यांनी पाच प्रभागात सात उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. धनुष्यबाणाच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. बारामती नगर परिषदेवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अनेक वर्ष वर्चस्व आहे. असे असले तरी यंदाच्या निवडणुकीत मात्र त्यांचे मित्र असलेल्या पक्षांनी उमेद […] The post Pune District : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निवडणुकीच्या रिंगणात appeared first on Dainik Prabhat .
Vadgaon Maval : सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मतदार जनजागृती उपक्रम
वडगाव मावळ– नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यादृष्टीने नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मतदार जनजागृती उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवायला सुरुवात केली आहे. शहरातील शाळा, महाविद्यालये, बस स्थानके, बाजारपेठा आणि गर्दीची सार्वजनिक ठिकाणी सक्रीय जनजागृती करण्यात येत आहे. निवडणूक प्रशासनाकडून नागरिकांच्या थेट भेटी घेत मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले जात आहे. विशेषतः […] The post Vadgaon Maval : सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मतदार जनजागृती उपक्रम appeared first on Dainik Prabhat .
'पिट्या भाई'ने कमळ घेतले हाती! अभिनेता रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश
पुणे: 'मुळशी पॅटर्न' चित्रपट फेम पिट्या भाई म्हणजेच अभिनेता रमेश परदेशीने आता कमळ हाती घेतले आहे. काही दिवसांपूर्वी पिट्या भाईने संघाच्या गणवेशातील फोटो पोस्ट करत 'मी माझ्या विचारांसोबत, राष्ट्रप्रथम' असे कॅप्शन लिहले होते. सोशल मीडीयावरील या अचानक केलेल्या पोस्टमुळे रमेश परदेशी हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र रमेश परदेशीने काल (१८ नोव्हेंबर) भाजपमध्ये प्रवेश केल्याने या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितत रमेश परदेशी यांनी भाजपात प्रवेश केला आहे.विशेष म्हणजे रमेश परदेशी हे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पुण्यात भरलेल्या मनसे मेळाव्याला रमेश उपस्थित होता. या मेळाव्यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रमेश परदेशीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील फोटो शेअर केल्यावरुन सुनावले होते. छाती ठोकपणे सांगतो मी संघाचा कार्यकर्ता आहे, असे म्हणताय तर मग इथे कशाला टाईमपास करायला आलात? एकाच ठिकाणी कुठेतरी राहा, अशा शब्दाच ठाकरेंनी रमेशला प्रश्न केला होता.
Pune District : मंचर निवडणुकीत 24 उमेदवारांचे अर्ज बाद
मंचर : नगरपंचायत निवडणुकीत झालेल्या छाननीत 24 उमेदवारांचे अर्ज मंगळवार, दि.18 रोजी बाद झाले आहेत. त्यामुळे 17 जागांसाठी 92 तर नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहे. अशी माहिती निवडणूक कार्यालयातून देण्यात आली. मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व 17 प्रभागासाठी निवडणूक होत असून उमेदवारी अर्जांची छाननी झाली. नगरपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अंजली कुलकर्णी, सहाय्यक […] The post Pune District : मंचर निवडणुकीत 24 उमेदवारांचे अर्ज बाद appeared first on Dainik Prabhat .
नवले पूल अपघात प्रकरण : दोन दिवसांत येणार आरटीओचा अहवाल
पुणे – मुंबई- बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळ झालेल्या गंभीर अपघातामध्ये कंटेनरला आग लागल्याने गिअर बॉक्स पूर्ण जळाला आहे. त्यामुळे त्याचे तांत्रिक विश्लेषण करताना अडचणी येत आहेत. परिणामी कंटेनरचा अपघात कशामुळे झाला, याबाबतचा प्रादेशिक परिवहन विभागाचा (आरटीओ) अहवाल येत्या दोन दिवसांत येण्याची शक्यता आहे. या अपघातात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याचे सांगण्यात आले. हा ट्रक राजस्थान […] The post नवले पूल अपघात प्रकरण : दोन दिवसांत येणार आरटीओचा अहवाल appeared first on Dainik Prabhat .
pune : पुणे विमानतळाचा सर्वाधिक प्रवाशांचा रेकॉर्ड
एका दिवसात ३५ हजार प्रवाशांनी केला प्रवास पुणे – हिवाळी हंगाम सुरू होताच पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या शुक्रवारी (दि. १४) सर्वाधिक ३५ हजार ७१० प्रवाशांनी प्रवास केला असून, आतापर्यंतचा एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. यंदाच्या हिवाळी हंगामामध्ये विशेष विमान सेवा वाढलेल्या नाहीत. येत्या काही दिवसांमध्ये दोहा ही नवीन […] The post pune : पुणे विमानतळाचा सर्वाधिक प्रवाशांचा रेकॉर्ड appeared first on Dainik Prabhat .
Pimpri : राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्षपदी लोखंडे, समन्वयक पदी लांडे यांची नियुक्ती
पिंपरी – पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा काबिज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्थानिक पदाधिकार्यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या आहेत. शहर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष पदी शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या दृष्टीने जिल्हा समन्वय व नियोजन करण्यासाठी समन्वयक […] The post Pimpri : राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्षपदी लोखंडे, समन्वयक पदी लांडे यांची नियुक्ती appeared first on Dainik Prabhat .
Pune : दिल्लीचे विमान तीन तास रखडले
प्रवाशांचा विमानतळावर गोंधळ पुणे – पुणे-दिल्ली विमानसेवेला उशीर होणे हे वारंवार घडत असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवारी (दि. १८) पहाटे पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला तीन तास उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना ताटकळावे लागले. विलंबाचे कारण प्रवाशांना सांगितले नसल्याने ते वैतागले होते. विमान पहाटे एक विमान पाच वाजून पाच मिनिटांनी दिल्लीसाठी उड्डाण करणार […] The post Pune : दिल्लीचे विमान तीन तास रखडले appeared first on Dainik Prabhat .
Pimpri : आरक्षणात बदल, नाराजीचे पडसाद; महापालिकेवर मोर्चा
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी केलेल्या आरक्षण सोडतीमध्ये दोन प्रभागांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने बदल करण्याच्या सूचना दिल्या. हा बदल केल्यानंतर महापालिका प्रशासनाला प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. प्रभाग क्रमांक ३० मधील नाराज इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह मंगळवारी (दि. १८) महापालिका भवनावर मोर्चा काढला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३२ प्रभागांमधील अनुसूचित जाती […] The post Pimpri : आरक्षणात बदल, नाराजीचे पडसाद; महापालिकेवर मोर्चा appeared first on Dainik Prabhat .
१७ नोव्हेंबरची सकाळ मी कधीही विसरू शकणार नाही. माझी फुलांसारखी मुले इझान, हमदान आणि साबिया, माझी सून हुमारा आणि मुलगा इरफान हे सर्वजण मला सोडून गेले. मला सौदी अरेबियाहून फोनवर बातमी मिळाली की त्यांची बस मक्का-मदिना येथे जाताना अपघातात जळून खाक झाली. हे ऐकून माझे हृदय थांबले. माझा इरफान त्याच्या कुटुंबाच्या आशीर्वाद आणि शांतीसाठी प्रार्थना करून काबा येथे गेला होता. तो आणि त्याची निष्पाप मुले आता या जगात नाहीत हे मी कसे स्वीकारू. अल्लाह त्यांच्या आत्म्याला स्वर्ग देवो. ७२ वर्षीय सलीम अहमद हे त्यांचे ६ आणि ७ वर्षांचे नातू इजान आणि हमदान यांचा फोटो पाहून भावनिक होतात. हैदराबादचे रहिवासी सलीम यांनी सौदी बस अपघातात त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण पुढची पिढी गमावली. त्यांचा मुलगा इरफान अहमद हा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांपैकी एक होता. १६ ते १७ नोव्हेंबरच्या रात्री, सुमारे १:३० वाजता, मक्काहून मदीनाला जाणारी एक पर्यटक बस डिझेल टँकरला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की संपूर्ण बस जळून खाक झाली. या अपघातातून मोहम्मद शोएब नावाचा फक्त एकच व्यक्ती बचावला. अपघाताच्या वेळी तो चालकाच्या शेजारी बसला होता. सध्या त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये १८ महिला, १७ पुरुष आणि १० मुले आहेत. दैनिक भास्करने या दुःखद अपघातात जीव गमावलेल्यांच्या घरी भेट दिली. ज्यांनी आपल्या प्रियजनांना कायमचे गमावले आहे ते फक्त शेवटच्या वेळी का असेना, त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह त्यांच्याकडे सोपवण्याची विनंती करतात. हैदराबादहून ५४ लोक काबा शरीफला गेले होते, त्यापैकी फक्त ९ जण वाचले हैदराबाद पोलिसांच्या माहितीनुसार, हैदराबादमधील ५४ जण ९ नोव्हेंबर रोजी काबा शरीफला भेट देण्यासाठी सौदी अरेबियाला गेले होते. त्यांनी खाजगी टूर ऑपरेटरद्वारे बुकिंग केले होते. त्यांना २३ नोव्हेंबर रोजी परतायचे होते. तथापि, त्या वेळेपूर्वीच ही दुर्घटना घडली. मदिनापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुहरसजवळ भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) पहाटे १:३० वाजता हा अपघात झाला. त्यावेळी बरेच प्रवासी झोपले होते आणि त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. अपघाताच्या दिवशी चार जण मक्कामध्ये राहिले होते, तर इतर चार जणांनी गाडी बुक करून स्वतंत्रपणे मदीनाला गेले होते आणि ते वाचले. अपघात झालेल्या बसमध्ये ४६ लोक होते. यामध्ये हैदराबादचे रहिवासी मोहम्मद आसिफ नईम यांच्या कुटुंबातील १८ सदस्यांचा समावेश आहे, जे आता हयात नाहीत. आसिफ यांच्या मते, अपघातात त्यांच्या कुटुंबातील नऊ मुले आणि तितकेच तरुण मृत्युमुखी पडले. हे सर्वजण ९ तारखेला मक्का-मदीना यात्रेसाठी निघाले होते. नईम म्हणतात, माझी पत्नी आणि मुलगी उमरा करण्यासाठी मक्का येथे गेल्या होत्या. उमरा केल्यानंतर त्या मदीनाला परतत असताना अपघात झाला. माझे सासरे, दोन मेहुणी आणि त्यांचे कुटुंब त्यांच्यासोबत होते. माझ्या भावाची पत्नी, मुलगी आणि जावई यांच्या कुटुंबात फक्त एकच मूल उरले आहे, जे सध्या अमेरिकेत शिक्षण घेत आहे. या अपघाताने माझ्या कुटुंबाच्या तीन पिढ्या उद्ध्वस्त झाल्या. सरकारला माझी एकच विनंती आहे की आम्हाला सौदी अरेबियाला जाण्यासाठी वेळ द्यावा. या अपघाताचीही चौकशी झाली पाहिजे. यासाठी जो कोणी जबाबदार असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. बहिणीने तिचे वचन पूर्ण केले पण आता ती हयात नाही मोहम्मद युनूसची बहीण झाकिया हिचाही अपघातात मृत्यू झाला. ती तिचा पती मस्तान आणि मुलगा सोहेलसोबत उमरा करण्यासाठी गेली होती. आपल्या बहिणीची आठवण काढत युनूस म्हणतात, मला ९ नोव्हेंबर रोजी झाकियाचा फोन आला. ती खूप आनंदी होती. ती म्हणाली, 'लहानपणापासून तू मला उमरा करण्यासाठी मक्का आणि मदीनाला जावे अशी इच्छा करत होतास. बघ, आज तो दिवस आला आहे.' मला तिचे शब्द आठवत राहतात. माझ्या बहिणीने तिचे वचन पाळले, पण ती आता या जगात नाही. आम्ही तेलंगणा सरकारला विनंती केली आहे की आम्हाला लवकरात लवकर सौदी अरेबियाला परतण्याची व्यवस्था करावी. आमच्याकडे आमचे पासपोर्ट आहेत. आम्ही जितक्या लवकर तिथे पोहोचू तितकेच आम्हाला आमच्या प्रियजनांचे मृतदेह शेवटचे पाहता येतील. मला माझ्या बहिणीला किमान एकदा तरी भेटायचे आहे, जरी ते शेवटचे असले तरी. हैदराबादमधील सुलेमान नगर येथील रहिवासी निजाम यांच्या पत्नी परवीन बेगम (३४) ९ नोव्हेंबर रोजी त्यांच्या दोन बहिणींसह सौदी अरेबियात आल्या. त्या आठ दिवस मक्का येथे राहिल्या. १७ नोव्हेंबर रोजी मदीनाला परतताना त्यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. परवीन त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्यासाठी काबा येथे गेली होती. भास्करशी बोलताना निजाम म्हणाले, आम्ही मक्का टूर अँड ट्रॅव्हल ऑपरेटरकडे बुकिंग केले होते. घटनेच्या दिवशी सकाळी ७ वाजताच्या सुमारास, ट्रॅव्हल कंपनीने आम्हाला कळवले की प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका बसला सौदी अरेबियामध्ये अपघात झाला आहे. त्यांची पत्नी आणि एक नातेवाईक गंभीरपणे भाजले होते. त्यांना रुग्णालयात नेले जात होते. काही वेळानंतर आम्हाला सांगण्यात आले की त्यांचा मृत्यू झाला आहे. जर शोएबने बसमधून उडी मारली नसती तर मृत्यू निश्चित होता हैदराबादचे संयुक्त पोलिस आयुक्त तफसीर इक्बाल यांनी सौदी बस अपघाताबद्दल सांगितले की, सौदी अरेबियातील मुहरास भागात झालेल्या या दुःखद अपघातात पंचेचाळीस जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ४३ जण हैदराबादचे, दोन सायबराबादचे आणि एक कर्नाटकातील हुबळीचा होता. बसमध्ये १८ पुरुष, १८ महिला आणि १० मुले होती. या घटनेतून वाचलेला एकमेव व्यक्ती मोहम्मद शोएब याने बसची खिडकी तोडून बसमधून उडी मारली आणि आपला जीव वाचवला. तथापि, स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचे दोन्ही हात गंभीर भाजले. या घटनेनंतर, तेलंगणा सरकारने सचिवालयात एक नियंत्रण कक्ष स्थापन केला. यामुळे लोकांना त्यांच्या नातेवाईकांबद्दल माहिती मिळू शकेल. मृतांच्या शवविच्छेदन तपासणीसाठी आम्ही रियाध पोलिस आणि भारतीय दूतावासाशी सतत संपर्कात आहोत. हैदराबाद पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांपैकी बहुतेक जण हैदराबाद, रामनगर, मुरादनगर, मुगलनगर आणि चिंतालमेट येथील होते. अझरुद्दीन पीडित कुटुंबासह सौदी अरेबियाला जाणारसौदी बस अपघातानंतर, तेलंगणा सरकारचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री मोहम्मद अझरुद्दीन यांनी पीडित कुटुंबांची भेट घेतली आणि त्यांना मदतीचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या आदेशानुसार, अझरुद्दीन आता मदत कार्यात मदत करण्यासाठी सौदी अरेबियाला जाणार आहेत. तेलंगणा सरकारच्या म्हणण्यानुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांना सौदी अरेबियाला पाठवले जाईल. मृतदेह भारतात परत आणण्याऐवजी, धार्मिक विधीनुसार सौदी अरेबियातच त्यांचे दफन केले जाईल. मृतांच्या कुटुंबियांना ₹५ लाखांची सानुग्रह मदत दिली जाईल. जेद्दाहमधील भारतीय दूतावासाने देखील एक हेल्पलाइन जारी केली आहे. सौदी अरेबियातील मदीनाजवळ भारतीय उमराह यात्रेकरूंच्या झालेल्या दुःखद बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर, जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने २४x७ नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हेल्पलाइनचे संपर्क तपशील ८००२४४०००३ आहेत. सौदी अरेबियामध्ये भारतीय उमरा यात्रेकरूंच्या बस अपघाताबद्दल असदुद्दीन ओवैसी यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी हैदराबादमधील दोन ट्रॅव्हल एजन्सींशीही बोलले आहे ज्या लोकांना मक्का आणि मदीना येथे घेऊन जातात. एआयएमआयएम प्रमुखांनी रियाधमधील भारतीय दूतावासाचे डेप्युटी चीफ ऑफ मिशन (डीसीएम) अबू मथान जॉर्ज यांच्याशीही संपर्क साधला. जॉर्जने त्यांना माहिती दिली की रियाधमधील स्थानिक अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत आणि मृतांचे मृतदेह सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. सौदी अरेबियातील धार्मिक तीर्थयात्रा धोकादायक बनवणारे ३ घटक४५० किमी लांबीचा मक्का-मदीना कॉरिडॉर हा हज आणि उमरा यात्रेकरूंसाठी खूप वर्दळीचा मार्ग मानला जातो आणि संपूर्ण सौदी अरेबियामध्ये रस्ते अपघात हे फार पूर्वीपासून एक मोठे आव्हान आहे. या मार्गावर उमरा यात्रेकरूंसाठी इतका धोका का आहे? हे समजून घेण्यासाठी, आम्ही लखनौमधील डॉ. शकुंतला मिश्रा राष्ट्रीय पुनर्वसन विद्यापीठाचे माजी शैक्षणिक डीन प्रोफेसर एपी त्रिपाठी यांच्याशी बोललो. त्यांनी तीन घटक स्पष्ट केले. १. मक्का-मदीना कॉरिडॉर रस्ते अपघात प्रवण क्षेत्रमक्का ते मदीना हा महामार्ग अत्यंत लांब आणि वाळूचा आहे. हा मार्ग देखील एक व्यावसायिक मार्ग आहे ज्यामध्ये खूप कमी वळणे आहेत. परिणामी, या मार्गावरून तेल टँकर आणि इतर जड वाहने सतत प्रवास करतात. वर्दळीचा मार्ग असल्याने, रस्ते अपघातांचा धोका जास्त असतो. मार्गाच्या लांबीमुळे, वाहनचालकांना अनेकदा झोप येते किंवा आळशी होतात आणि अपघात होतात. २. टक्कर आणि आगीचा धोकासौदी अरेबियामध्ये तेल हे उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन आहे. दर मिनिटाला तुम्हाला महामार्गांवरून तेलाचे टँकर ये-जा करताना दिसतील. हज यात्रेकरू त्यांच्या वाहनांमधून मक्का आणि मदिना येथे प्रवास करतात. त्यामुळे, तेल टँकरसारख्या ज्वलनशील साठवणुकीशी टक्कर झाल्याने आगीचा धोका वाढतो. असे अपघात नियमित रस्ते अपघातांपेक्षाही अधिक विनाशकारी असतात आणि त्यामुळे नेहमीच मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याचा धोका असतो. ३. रस्ते चांगले आहेत पण नैसर्गिक आव्हाने अनेक सौदी अरेबियाचे रस्ते चांगले असले तरी, वाळवंटी प्रदेशामुळे त्यांना अनेकदा धुळीचे वादळ आणि इतर आव्हानांना तोंड द्यावे लागते असे आढळून आले आहे. अशा मार्गांवर प्रवास करणे धोकादायक आहे. म्हणून, प्रवास करण्यापूर्वी तुमचा ड्रायव्हर सौदी रोडवेज असोसिएशनमध्ये नोंदणीकृत आहे याची खात्री करा. अशा घटना रोखण्यासाठी, सौदी सरकारने त्यांच्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ऑक्टोबर २०१९ मध्ये, मदीनाजवळ बस आणि वाहनाच्या धडकेत ३५ प्रवाशांचा मृत्यू झाला.
दिल्लीत झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात १५ जणांचा मृत्यू झालेला दहशतवादी डॉ. उमर याला शहादत मिशन मानत होता. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये उमर असे म्हणत आहे की आत्मघाती बॉम्बस्फोट हे सर्वात जास्त चुकीचे समजले जाते. उमरने दुसऱ्या एका माणसाला आत्मघाती हल्ला करण्यास प्रोत्साहित केले होते, परंतु त्या माणसाने इस्लाममध्ये आत्महत्या निषिद्ध असल्याचे सांगून नकार दिला. आत्मघातकी बॉम्बस्फोटाची सुरुवातीपासून आतापर्यंतची संपूर्ण कहाणी आणि तो आत्मघातकी बॉम्बर कसा तयार केला जातो जाणून घेऊया... प्रश्न-१: आत्मघातकी बॉम्बस्फोट कधी आणि कसे सुरू झाले?उत्तर: १८८१ मध्ये रशियावर झार अलेक्झांडर दुसरा यांचे राज्य होते. पीपल्स विल नावाची एक संघटना अनेक दिवसांपासून झारची हत्या करण्याचा कट रचत होती. १३ मार्च रोजी, झार सेंट पीटर्सबर्ग येथील राजवाड्याजवळ त्याच्या शाही गाडीतून येत असताना, एका हल्लेखोराने गाडीवर आयईडी बॉम्ब फेकला. या हल्ल्यात एक अंगरक्षक ठार झाला, परंतु झारला काहीही दुखापत झाली नाही. स्फोटाच्या आवाजाने राजाला त्याच्या गाडीतून बाहेर पडून घटनास्थळाची चौकशी करण्यास भाग पाडले. त्याच वेळी, दुसरा हल्लेखोर, इग्नासी ह्रीनिव्हिएकी, आयईडी घेऊन, राजाच्या पाया पडला. बॉम्बचा स्फोट लगेच झाला आणि त्यात दोघेही ठार झाले. ही घटना रशियामधील पहिली नोंद झालेली आत्मघातकी बॉम्बस्फोट मानली जाते. १८८१ मध्ये पहिल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात रशियन झारचा मृत्यू झाल्यापासून ७२,००० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि दुप्पट जखमी झाले आहेत. ओळखल्या गेलेल्या हल्लेखोरांपैकी ९०% पेक्षा जास्त पुरुष होते. सर्वात तरुण आत्मघातकी बॉम्बर हा ४ वर्षांचा मुलगा होता स्रोत: अॅक्शन ऑन आर्म्ड व्हायोलन्स (AOAV) प्रश्न-२: जगातील कोणत्या देशांनी आणि गटांनी याचा सर्वात जास्त वापर केला?उत्तर: रशियामध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोट सुरू झाल्यानंतर, युद्धापासून ते दहशतवादी हल्ल्यांपर्यंत सर्व गोष्टींसाठी याचा वापर होऊ लागला. याचा सर्वाधिक वापर करणारे लोक खालीलप्रमाणे आहेत... १. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी कामिकाझे पायलट २. श्रीलंकेतील एलटीटीई आत्मघातकी हल्लेखोर ३. अल-कायदाचे आत्मघातकी हल्लेखोर ४. आयसिसचे आत्मघातकी हल्लेखोर ५. इस्रायलमधील हमासचे सैनिक ६. अमेरिकेविरुद्ध तालिबान फिदायीन प्रश्न-३: कोणत्या धार्मिक विचारसरणीत आत्मघाती बॉम्बस्फोट सर्वात जास्त दिसून येतात?उत्तर: ज्यांनी आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवले ते सर्व धर्मांचे होते, ज्यात मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शिंतो आणि हिंदू यांचा समावेश होता. आहे. एक ज्यू हल्लेखोर देखील होता, ज्याचा बॉम्ब फुटला नाही. ५८% आत्मघाती बॉम्बस्फोटांसाठी आयसिस आणि तालिबान जबाबदार आहेत. २०२० मध्ये जगभरात एकूण १२७ आत्मघाती बॉम्बस्फोटांची नोंद झाली. गुन्हेगार... तालिबान: ३८ आयसिस: ३६ हयात तहरीर अल-शाम: १० अल-शबाब: २४ बोको हराम: १० इतर: ०९ स्रोत:राष्ट्रीय सुरक्षा अभ्यास संस्था, इस्रायल (२०२०) प्रश्न-४: इस्लाममध्ये आत्महत्या निषिद्ध आहे, मग बहुतेक आत्मघाती हल्लेखोर मुस्लिम का असतात?उत्तर: कुराणच्या चौथ्या अध्यायातील ३० व्या श्लोकानुसार,'और अपने आप को न मारो। बेशक अल्लाह तुम पर रहम करने वाला है। याचा अर्थ असा की कुराण आत्महत्येला मान्यता देत नाही. असे असूनही, आत्महत्या करणारे कट्टरपंथी मुस्लिम अल्लाहच्या नावाने असे करण्याचा दावा करतात. खरं तर, ते कुराणच्या दुसऱ्या सुरातील १५४ व्या आयताचा उल्लेख करतात ज्यामध्ये म्हटले आहे की'अल्लाहच्या मार्गात मारल्या गेलेल्यांना मृत म्हणू नका, उलट ते जिवंत आहेत, परंतु तुम्ही त्यांना ओळखत नाही.' 9/11 च्या हल्ल्यानंतर, अल-जझिरा धार्मिक तज्ञ शेख युसूफ अल-करदावी म्हणाले,'आत्मघाती बॉम्बर' हा शब्द अन्याय्य आणि दिशाभूल करणारा आहे, कारण हे हल्ले शूर कमांडो आणि त्यांच्या हौतात्म्याशी संबंधित आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांना आत्महत्या असे लेबल लावू नये. इजिप्तची राजधानी कैरो येथील इस्लामिक कायद्याचे प्राध्यापक मोहम्मद सलीम इलोवा म्हणतात, 'अनेक मुस्लिमांना असे वाटते की आपण इतरांना मारणाऱ्यांना मारले पाहिजे, आपल्या लोकांना मुक्त केले पाहिजे आणि त्यांना त्यांचे हक्क दिले पाहिजेत. माझ्यासाठी, स्वतःचा जीव देणे हे शौर्याचे कृत्य आहे. या लोकांना वाटते की ते अल्लाहच्या फायद्यासाठी स्वतःला मारत आहेत.' हसन अल-बन्ना आणि सय्यद कुतुब सारख्या इस्लामिक विद्वानांनी २० व्या शतकात म्हटले होते की बहुतेक इस्लामिक देशांच्या सरकारे अल्लाहने दाखवलेल्या मार्गावर चालत नाहीत. त्यांच्यावर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत आहे. जरी त्यांनी कधीही हिंसाचाराचे आवाहन केले नाही, तरी इस्लामिक नियम लागू करण्याची त्यांची इच्छा हळूहळू वाढली. जिहादमध्ये रूपांतरित झाली. शिकागो येथील इलिनॉय विद्यापीठात, प्रा. सुंग-वान चोई यांच्या अहवालानुसार, '१९८३ मध्ये लेबनॉनमधील बेरूत येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर, अमेरिकन सैन्याने माघार घेतली होती. अशाच काही इतर हल्ल्यांनंतर, इस्लामिक संघटनांना वाटले की पाश्चात्य प्रभाव कमी करण्यासाठी आत्मघाती हल्ला हा एक चांगला मार्ग आहे. प्रश्न ५: आत्मघातकी हल्लेखोरांची निवड आणि तयारी कशी केली जाते?उत्तर: भास्करने दोन वर्षांपूर्वी आत्मघाती बॉम्बर कसे निवडले जातात आणि प्रशिक्षित केले जातात यावर (तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान), आयसिस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया) आणि बीएलए (बलुचिस्तान लिबरेशन) लष्करात काम केलेल्या दहशतवाद्यांशी बोलल्यानंतर एक अहवाल तयार केला होता. त्यानुसार... आत्मघातकी बॉम्बर प्रशिक्षण प्रक्रिया... दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित दहशतवादी पाकिस्तानमधून चालवले जात आहेत, असे वृत्त आहे. त्यांना गटांनी कट्टरपंथी बनवले होते. निवृत्त लष्करी लेफ्टनंट जनरल के. जी. एस. ढिल्लन यांच्या मते, '१९९० च्या दशकात काश्मीरमध्ये फिदायीन हल्लेखोरांना ड्रग्ज दिले जात होते, ज्यामुळे ते शुद्धीवर नव्हते. डॉ. उमरच्या व्हिडिओमध्ये तो ज्या पद्धतीने वारंवार त्याच्या नाकाला हात लावत आहे, त्यावरून असेच दिसते. त्याला ड्रग्ज देण्यात आले. प्रश्न-६: भारतात आत्मघातकी बॉम्बस्फोटांचा इतिहास कसा होता?उत्तर: भारतात आत्मघातकी बॉम्बस्फोटांची सुरुवात १९९१ मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येपासून झाली. आतापर्यंत ४ मोठ्या घटना घडल्या आहेत... १. राजीव गांधींची हत्या, १९९१ : २१ मे १९९१ च्या रात्री तामिळनाडूमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधींची हत्या करण्यात आली. निवडणूक रॅलीसाठी श्रीपेरंबुदूर येथे गेले होते. एलटीटीईचा आत्मघाती बॉम्बर धनूने गर्दीत गांधींचे पाय स्पर्श करण्यासाठी वाकून आयईडीचा स्फोट घडवला. या हल्ल्यात राजीव गांधी आणि हल्लेखोर धनूसह १८ जणांचा मृत्यू झाला. २. बेगमपेट, हैदराबाद येथे स्फोट, २००५ : १२ ऑक्टोबर रोजी बेगमपेट येथे पोलिस आयुक्तांच्या टास्क फोर्सवर हल्ला. हरकत-उल-जिहाद इस्लामीच्या एका आत्मघातकी हल्लेखोराने कार्यालयावर हल्ला केला. हल्लेखोरासह एका होमगार्डचा मृत्यू झाला. ३. पुलवामा हल्ला, २०१९ : १४ फेब्रुवारी रोजी काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर ३०० किलो स्फोटके टाकण्यात आली. एका भरलेल्या कारला धडक बसली. या हल्ल्यात ४४ सैनिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. ४. दिल्ली स्फोट, २०२५ : १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये स्फोट झाला. १५ जणांचा मृत्यू झाला आणि ३० हून अधिक जखमी झाले. कार डॉ. ती उमर उन नबी चालवत होता, जो काश्मीरमधील पुलवामाचा रहिवासी होता. तो विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक होता. प्रश्न-७: दिल्ली आत्मघातकी बॉम्बस्फोट हा एक नवीन धोक्याची घंटा का आहे?उत्तर: दिल्ली बॉम्बस्फोट हा अनेक कारणांमुळे भारतासाठी चिंतेचा विषय आहे...
अग्रलेख : शेख हसीनांचे भवितव्य
सध्या भारताच्या आश्रयाला असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशातील लवादाने मानवतेच्या विरोधात अपराध केल्याच्या कारणावरून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे शेख हसीना यांचे एकूणच भवितव्य आता संकटात सापडले आहे. बांगलादेशात फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकात भाग घ्यायला शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग पक्षाला या आधीच बंदी घालण्यात आली आहे. […] The post अग्रलेख : शेख हसीनांचे भवितव्य appeared first on Dainik Prabhat .
भाष्य : कोवळी पानगळ रोखणार कशी?
– सत्यसाई पी. एम. मेळघाटात जूनपासून अवघ्या सहा महिन्यांपर्यंतच्या काळात कुपोषणामुळे 65 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने, आश्चर्य व्यक्त करत उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले आहे. एकीकडे देश विकासाकडे वाटचाल करीत असल्याची जोरदार चर्चा होत असताना त्याचवेळी मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात लहान बालके कुपोषणामुळे माना टाकत आहेत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा एक असा आदिवासी प्रदेश […] The post भाष्य : कोवळी पानगळ रोखणार कशी? appeared first on Dainik Prabhat .
लक्षवेधी : स्थानिक निवडणुकांची मोर्चेबांधणी
– राहुल गोखले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम ऐकू यायला लागले असले, तरी प्रमुख पक्षांत जागावाटप आणि युतीचे समीकरणे जोडताना चलबिचल होत आहे. राज्यात 29 महानगरपालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायत, 336 पंचायत समिती आणि 246 नगरपरिषदा आहेत. सध्या नगरपालिका, नगर परिषद आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीला गती आली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांचा व्यापही […] The post लक्षवेधी : स्थानिक निवडणुकांची मोर्चेबांधणी appeared first on Dainik Prabhat .
पुणे शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पुणे-बंगळूरु महामार्गावरील नवले पुलाचा परिसर गेली अनेक वर्षे अपघातांसाठी ‘कुख्यात’ ठरत आहे. वाढते वाहनभार, रस्त्याची रचना, मोठ्या उताराचा ढलान आणि अवजड वाहनांचे नियंत्रण सुटणे या गोष्टींच्या संगमामुळे या ठिकाणी अपघातांची मालिका अखंड सुरू आहे. त्यामुळे मृत्यू इथले संपत नाहीत असेच म्हणावे लागेल. नवले पूल परिसरात घडलेले अपघात हे एक-दोन घटनांपुरते मर्यादित नाहीत. गेल्या काही वर्षांमध्ये शेकडो अपघातांची नोंद झाली असून यांपैकी अनेक अपघात गंभीर स्वरूपाचे ठरले आहेत. काही घटनांमध्ये अवजड वाहनांनी ब्रेक फेल झाल्याने गतीवर नियंत्रण सुटून अनेक वाहने चेंगरली गेली, तर काही अपघातांमध्ये दुचाकीस्वार, पादचारी आणि खासगी वाहनचालकांचे प्राण गेले. नुकताच एक अपघात झाला त्यात ८ जणांना जीव गमवावा लागला, तर २२ जण गंभीररीत्या जखमी झाले. या अपघाताच्यानिमित्ताने नवले पुलाची असुरक्षितता पुन्हा चर्चेत आली. त्यामुळे 'मृत्यू इथले संपत नाहीत' असेच म्हणावे लागेल. नवले पुलावर अपघात झाल्यावर नुसतीच उपाययोजनांची चर्चा होते, पण त्यावर कृती शून्य असते. गेल्या आठ वर्षांत नवले पूल परिसरात २१० पेक्षा अधिक अपघात झाले आहेत. यामध्ये ८२ पेक्षा अधिक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. यामध्ये प्रवाशांसह काही स्थानिक नागरिकांचाही समावेश आहे. आणखी किती निष्पापांचे बळी घेणार आहात? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करताना दिसतात. नवले पुलावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र, ठोस उपाययोजना नसल्याने स्थानिक संतप्त झाले आहेत. या होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.वडगाव बुद्रुक, नऱ्हे गावाच्या हद्दीतून मुंबई-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता जांभूळवाडी बोगद्यामार्गे जातो. आतापर्यंत ८२ पेक्षा अधिक लोकांचे बळी नवले पूल, कात्रज रस्ता, नऱ्हे येथील महामार्गावर गेले आहेत. रस्त्याचा तीव्र उतार आणि त्या उतारावरून खाली येताना वाहनांचे वेग आपोआप वाढतात आणि जर चालकाने काळजी घेतली नाही तर वाहनावरचे नियंत्रण सहज सुटू शकते. या भागात अनेक अवजड वाहने विशेषत: कंटेनर, ट्रक, टेलर नियमितपणे ये-जा करतात. या वाहनांमध्ये यांत्रिक बिघाड किंवा ब्रेकची क्षमता कमी असल्यास अपघाताची शक्यता वाढते. अनेकदा जड वाहनांचे चालक उतारावर येताना इंजिन बंद करणे किंवा न्यूट्रल गिअरमध्ये वाहन चालवणे पसंत करतात, ज्यामुळे वेग अनियंत्रित वाढतो. तसेच काही चालक सतत डावीकडे राहण्याचा नियम पाळत नाहीत, अचानक लेन बदलतात किंवा सिग्नलचे पालन करत नाहीत. वाहनचालकांची बेपर्वाई कारणीभूत ठरते. रस्त्याची रचना देखील समस्या वाढवणारी आहे. उतारानंतर अचानक वळण येते आणि पुढे एक महत्त्वाचा सिग्नल लागतो. त्यामुळे उतारावर वेग जास्त झाल्यास पुढे वाहन थांबवणे कठीण होते. वाहतूक कोंडी, रस्त्याची दुरुस्ती, अपुरा प्रकाश, संकेत फलकांचा अभाव किंवा चुकीची बांधणी हेही घटक अपघातास कारणीभूत ठरतात, अशी काही कारणे आहेत, की ज्यामुळे अपघातात वाढ होताना दिसत आहे. कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यान ८ कि. मी. रस्त्यावर उतार आहे. हा उतार आय. आर.सी.च्या मानकाप्रमाणे योग्य आहे. इंधन वाचविण्यासाठी वाहने न्यूट्रल करून चालवतात व त्या भागांत सतत ब्रेकचा वापर केल्यामुळे ब्रेक निकामी होतात. त्यामुळे नियंत्रण सुटून अपघात होतात, असे एनएचएआयने म्हटले आहे.गेल्या २५ वर्षांपासून शेकडो लोकांचे बळी नवले पूल, कात्रज रस्ता आणि नऱ्हे येथील महामार्गावर झालेले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. यामुळे निष्पापांचे बळी जात आहेत. सध्या रोज नवले पुलाखाली वाहतूक कोंडी होत असून याठिकाणी एक भुयारी मार्ग करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अपघात वाढल्यानंतर प्रशासनाने काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. उतारावर वेगमर्यादा दर्शवणारे फलक लावणे, रस्त्याचे पुनर्बांधणी करणे, अतिरिक्त सिग्नल बसवणे, पोलीस गस्त वाढवणे अशी पावले उचलण्यात आली. काही वेळा विशेष मोहिमेद्वारे अवजड वाहनांची तपासणी करण्यात आली. ब्रेक तपासणी, फिटनेस तपासणी आणि वाहतूक नियमभंगावरील कारवाईतही वाढ करण्यात आली आहे. पण, प्रशासनाची उपाययोजना बहुतेकदा तात्पुरती आणि अपुरी असते. अपघात झाल्यावर काही दिवस गदारोळ होतो आणि नंतर परिस्थिती पूर्ववत होते. त्यामुळे या मार्गावरील कायमस्वरूपी रस्त्याचे डिझाइन बदलणे, उतार कमी करणे, स्वतंत्र अवजड वाहन मार्ग तयार करणे अशा दीर्घकालीन उपायांची गरज आहे. नवले पुलावर होणारे अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करणे गरजेचे आहे. जसे की, रस्त्याच्या उताराचे पुनर्मूल्यांकन आणि सुधारणा, रस्त्याचा उतार कमी करणे किंवा त्यास सुरक्षित स्वरूप देण्यासाठी तांत्रिक बदल आवश्यक आहेत. अवजड वाहनांसाठी वेगळा मार्ग असणे आवश्यक आहे. उतारावरून येणाऱ्या जड वाहनांसाठी स्वतंत्र लेन किंवा स्वतंत्र मार्ग तयार केल्यास सुरक्षितता वाढण्यास मदत होईल. ट्रक, कंटेनर यांची निरंतर तांत्रिक तपासणी गरजेची आहे. कठोर वाहतूक नियमांची अंमलबजावणी महत्त्वाची आहे.नवले पूल परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना प्रशासन ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. इथे सर्वसामान्य माणसाच्या जीवाची काहीच किंमत नाही का? अजून किती निष्पाप लोकांचे जीव घेणार आहात? मरण एवढे स्वस्त झाले आहे का? असे संतप्त सवाल पुणेकर करत आहेत. नवले पूल परिसरात सातत्याने अपघात होतात; परंतु अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होते. चर्चा, बैठका होतात अन् त्यानंतर पुन्हा काहीच होत नाही. प्रवासी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी. त्याबरोबरीने प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या वतीने महामार्गावर ‘सावधान, पुढे नवले पूल आहे’ अशा आशयाचे फलक लावले. मात्र, तात्पुरत्या उपाययोजना सोडता प्रशासनाने कुठल्याच ठोस उपाययोजना केल्या नाहीत. नवले पूल हा केवळ पुण्यातील एक वाहतुकीचा बिंदू नाही, तर गेल्या काही वर्षांतील अनेक दुर्घटनांचा केंद्रबिंदू ठरला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांनी पुन्हा पुन्हा सावधगिरीची घंटा वाजवली आहे. त्यामुळे यापुढील अपघात टाळण्यासाठी प्रशासन, नागरिक आणि वाहनचालक यांनी एकत्रितपणे पावले उचलणे अत्यावश्यक आहे. सुरक्षितता ही केवळ कागदी घोषणा न राहता प्रत्यक्षात लागू झाल्यावरच नवले पूल परिसर भविष्यातील अपघातांच्या सावटातून मुक्त होईल.
डीपफेक आणि एआयवर आधारित गुन्हे : वाढता धोका आणि संरक्षण
गेल्या काही वर्षांपासून कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल) आणि विशेषत: डीपफेक तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे. एका बाजूला एआयमुळे आरोग्य, शिक्षण, उद्योग अशा अनेक क्षेत्रांत नवनवीन संधी निर्माण होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला याच तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. डीपफेक आणि एआय आधारित गुन्हे हे आजच्या डिजिटल युगातील एक मोठे आव्हान बनले आहे.डीपफेक हा शब्द 'डीप लर्निंग' आणि 'फेक' या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. हे एक प्रकारचे सिंथेटिक मीडिया आहे. याचे कार्य लक्षात घेतले असता, डीपफेक तंत्रज्ञान 'जनरेटिव्ह ॲडव्हर्सेरियल नेटवर्क्स' नावाच्या एआयचा वापर करते. याच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचे फोटो, व्हिडीओ आणि आवाजाचे नमुने घेऊन त्याची हुबेहूब बनावट; परंतु अत्यंत वास्तववादी प्रतिमा, व्हिडीओ किंवा ऑडिओ तयार केले जातात. आपण अनेकदा राजकीय नेत्यांची भाषणे, काही उच्चपदस्त मोठ्या लोकांच्या फोटोखाली व्हिडीओमध्ये रीलमध्ये जे काही ऐकतो, पाहतो ते याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेले असते. अनेकदा अशा लोकांना समाजात बदनाम करण्यासाठी, त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी समाज माध्यमातून असे चुकीचे व्हिडीओ, ऑडिओ, रील्स व्हायरल केले जातात. सर्वसामान्य जनतेला यातील खरे- खोटे समजणे सहजासहजी शक्य होत नाही. याचा परिणाम समाजात तेढ निर्माण करणे, राजकीय समीकरण बदलणे, कोणत्याही संवेदनशील विषयाला वेगळे वळण देणे यावर होताना दिसतो. हे बनावट कंटेंट इतके खरे वाटतात, की ते मूळ आहेत की बनावट, हे ओळखणे कोणत्याही सामान्य माणसाला जवळजवळ अशक्य होते.एआय आणि डीपफेक आधारित प्रमुख गुन्हे याचा अभ्यास केला असता, समजते की एआय आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर अनेक प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांसाठी केला जात आहे. त्यातील प्रमुख प्रकार म्हणजेच तोतयागिरी आणि आर्थिक फसवणूक हा होय. गुन्हेगार एआय निर्मित आवाज किंवा व्हिडीओ वापरून पीडितांच्या मित्र, कुटुंबातील सदस्य, किंवा उच्च अधिकाऱ्याची नक्कल करतात. बनावट आणीबाणी किंवा महत्त्वाच्या वायर ट्रान्सफरची मागणी करून लोकांची आर्थिक फसवणूक करतात. चेहरा किंवा आवाज ओळखण्यावर आधारित सुरक्षा प्रोटोकॉल भेदण्यासाठी डीपफेकचा वापर करून बँक खाती हॅक करणे, कर्ज घेणे किंवा क्रेडिट कार्ड उघडणे शक्य होते. खंडणी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी सुद्धा गुन्हेगार याचा आधार घेतात. गुन्हेगार एखाद्या व्यक्तीचे बनावट, तडजोड करणारे किंवा आक्षेपार्ह व्हिडीओ/फोटो तयार करतात. या बनावट कंटेंटचा वापर करून पीडितांना ब्लॅकमेल केले जाते आणि त्यांच्याकडून पैसे उकळले जातात किंवा त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध काम करण्यास भाग पाडले जाते. चुकीची आणि खोटी माहिती पसरवणे राजकीय नेते किंवा सार्वजनिक व्यक्ती असे काहीतरी बोलत किंवा करतानाचे डीपफेक व्हिडीओ तयार केले जातात, जे त्यांनी प्रत्यक्षात कधीच केले नसते. याचा उपयोग प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्यासाठी, सामाजिक संघर्ष निर्माण करण्यासाठी किंवा निवडणुकांमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी केला जातो. ओळख चोरी आणि फेक प्रोफाईल्स लोकांचे ऑनलाइन उपलब्ध असलेले फोटो वापरून AI आणि डीपफेकच्या मदतीने त्यांचे फेक प्रोफाईल्स तयार करणे. या प्रोफाईलचा वापर इतरांची फसवणूक किंवा गैरवर्तन करण्यासाठी केला जातो.या धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? हे जाणून घेणे आजमितीला खूप आवश्यक आहे. एआय आधारित गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.सत्यापनावर भर द्या : फोनवर किंवा व्हिडीओ कॉलवर एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने पैशांची मागणी केल्यास, ताबडतोब शंका घ्या. त्यांच्याशी खाजगीरीत्या संपर्क साधून स्वतंत्रपणे माहितीची सत्यता तपासा. डीपफेक व्हिडीओंमध्ये काही विसंगती असतात, जसे की चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांची हालचाल, प्रकाशाची दिशा किंवा आवाजाची गुणवत्ता. अशा बारीक गोष्टींकडे लक्ष द्या.वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा : सोशल मीडियावर तुमचे खूप जास्त वैयक्तिक फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करणे टाळा. गुन्हेगार याच डेटाचा वापर डीपफेक तयार करण्यासाठी करतात. तुमचे पासवर्ड मजबूत ठेवा आणि शक्य असल्यास टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा.एआय जनरेटेड कंटेंट ओळखा : केंद्र सरकारने निर्देश दिले आहेत, की एआयच्या मदतीने तयार केलेल्या कोणत्याही कंटेंटसोबत (व्हिडीओ, ऑडिओ, फोटो) तो 'एआय जनरेटेड' असा उल्लेख करणे आवश्यक आहे. अशा सूचना असलेल्या कंटेंटवर लगेच विश्वास ठेवू नका.जागरूक रहा : डीपफेक आणि सायबर गुन्ह्यांच्या नवीन पद्धतींबद्दल माहिती ठेवा.आपल्यासोबत असा कोणताही गुन्हा झाल्यास काय कराल? हे लक्षात ठेवा. ताबडतोब तक्रार करणे महत्त्वाचे आहे. सायबर गुन्ह्याची माहिती मिळाल्यास त्वरित राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवा. यासाठी संपर्क क्रमांक मदतीसाठी १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा. एआय तंत्रज्ञान एक शक्तिशाली साधन आहे; परंतु त्याचा गैरवापर रोखणे आवश्यक आहे. व्यक्तिगत स्तरावर जागरूकता आणि सतर्कता बाळगणे, तसेच कायदेशीर आणि तंत्रज्ञानाच्या स्तरावर कडक नियमावली तयार करणे, हेच डीपफेक आणि एआय आधारित गुन्ह्यांचा वाढता धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.- मीनाक्षी जगदाळे
दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १९ नोव्हेंबर २०२५
पंचांगआज मिती कार्तिक कृष्ण चतुर्दशी नंतर अमावस्या शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वा स्वाती, योग सिद्धी, चंद्र राशी तूळ, भारतीय सौर २८ मार्गशीर्ष शके १९४७, बुधवार, दि.१९ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४७, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ६.४२, मुंबईचा चंद्रास्त ५.११, राहू काळ १२.६ ते १.२६, दर्श अमावास्या, अमावास्या प्रारंभ सकाळी ९.४०.दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : व्यवसाय-धंद्यात उधारी नको.वृषभ : प्रवास कार्य सिद्ध होतील.मिथुन : आर्थिक परिस्थिती ठीक राहील.कर्क : काही बाबतीत अनपेक्षित यश मिळू शकते.सिंह : अधिकार वाढतील.कन्या : आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल.तूळ : उत्साह उमेद वाढेल.वृश्चिक : मानसन्मान व प्रसिद्धी मिळेल.धनू : हाती घेतलेल्या कामात प्रयत्नांद्वारे यश मिळेल.मकर : एकाचा राग दुसऱ्यावर काढू नका.कुंभ : प्रवासाचे नियोजन कराल.मीन : काही वेळेस मनस्ताप वाढवणाऱ्या घटना घडू शकतात.
कृषी महामंडळाच्या गच्चीवरून उडी मारत रेकॉर्डवरील गुन्हेगाराची आत्महत्या
पुणे :18 पोलिस ठाण्यात समुपदेशनासाठी बोलवलेल्या व्यक्तीने कृषी महामंडळाच्या बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. १८) सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास घडली. समीर हमीद शेख (४०, रा. गल्ली नं. १३, आंबेडकर नगर, मार्केटयार्ड) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. समीर शेख हा रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शेख हा […] The post कृषी महामंडळाच्या गच्चीवरून उडी मारत रेकॉर्डवरील गुन्हेगाराची आत्महत्या appeared first on Dainik Prabhat .
Ramesh Pardeshi : अखेर ! पिट्याभाईचा राज ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’
पुणे : ‘मुळशी पॅटर्न’ या सुपरहिट मराठी चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला ‘पिट्या भाई’ म्हणजेच अभिनेते रमेश परदेशी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष असलेल्या परदेशी यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे […] The post Ramesh Pardeshi : अखेर ! पिट्याभाईचा राज ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ appeared first on Dainik Prabhat .
फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच आठवड्यात सात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश काढण्यात आले होते आणि आज परत राज्यातील ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आहेत. यात वाशिम, अकोला आणि परभणीच्या जिल्हाधिकारीपदावर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पाहा कोणत्या अधिकाऱ्यांच्या कुठे बदल्या झाल्या ? राहुल रंजन महिवाल (IAS:RR:२००५) यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती प्रकाश खपले (IAS:SCS:२०१३) आयुक्त, मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजी नगर यांची महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय महामंडळ मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती डॉ. मंजिरी मानोलकर (IAS:SCS:२०१६) व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे यांची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे येथे आयुक्त म्हणून नियुक्ती त्रिगुण कुलकर्णी (IAS:SCS:२०१६) उपमहासंचालक, यशदा, पुणे यांची एससी आणि एचएससी बोर्ड पुणे येथे अध्यक्ष म्हणून नियुक्त अंजली रमेश (IAS:RR:2020) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांची मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजी नगर येथे आयुक्त म्हणून नियुक्ती
अखेर अनमोल बिश्नोईच्या अमेरिकेत आवळल्या मुसक्या, भारतात आणण्याच्या प्रक्रियेला वेग!
नवी दिल्ली : गँगस्टर अनमोल बिश्नोईचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात भारतीय यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे अशी माहिती सूत्रांमार्फत दिली जात आहे. अनमोल बिश्नोई हा बाबा सिद्दीकी हत्याकांड, सिद्धू मूसेवाला हत्याकांड आणि सलमान खानच्या घरावर गोळीबाराचा मास्टरमाइंड आहे.अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे आणि त्याने लॉरेन्स टोळीच्या प्रत्येक कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले असून केंद्रीय संस्था आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेसाठी हे एक मोठे यश मानले जात आहे. अनमोल बिश्नोईवर देशभरातील अनेक राज्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.बाबा सिद्दीकी यांच्या हत्येआधी शूटर अनमोलच्या संपर्कात होते. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेला शूटर घटनेपूर्वी अनमोल बिश्नोईच्या संपर्कात होता, असे यापूर्वी मुंबई गुन्हे शाखेने सांगितले होते. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनमोल आणि तीन संशयित शूटर यांच्यात कॅनडा आणि अमेरिकेत असताना स्नॅपचॅटद्वारे संदेशांची देवाणघेवाण झाली.कोण आहे अनमोल बिश्नोई? अनमोल बिश्नोई हा गँगस्टर लॉरेन्सचा धाकटा भाऊ आहे. अमेरिकेत बसून तो भारतात गुन्हेगारी कारवाया करत होता. अनमोलविरुद्ध १८ गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये मूसेवालाच्या हत्येसाठी शस्त्रे आणि रसद पुरवणे यांचाही समावेश आहे. मुंबईतील वांद्रे येथील सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली होती. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी बाबा सिद्दीकीची त्यांच्या मुलाच्या ऑफिसबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, अनमोलही त्या गोळीबार करणाऱ्यांच्यासंपर्कात होता.एनआयएने अनमोलला 'मोस्ट वॉन्टेड' व्यक्ती म्हणून घोषित केले आहे आणि त्याच्या डोक्यावर '१० लाख' रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मुंबई पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लूकआउट सर्क्युलरजारीकेलेआहे.
महापालिकेच्या निवडणुकीआधीच मुंबईतला राष्ट्रवादीचा चेहरा पडला
मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या शक्यता आहे. याआधीच अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईतला चेहरा असलेले नवाब मलिक कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत.राज्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. एकूण ६,८५९ जागांसाठी मतदान होणार आहे. २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी थेट पद्धतीने निवडणूक होईल. नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत तर नगरपंचायतींसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धत आहे. नगरपालिकांमध्ये मतदारांना नगराध्यक्षपदासाठी एक तर प्रभागासाठी दोन अशी तीन मते द्यावी लागणार आहेत. नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी प्रत्येकी एक अशी दोन मते द्यावी लागतील. मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याच्या शक्यता आहे. याआधीच नवाब मलिक यांच्यावर मुंबई सत्र न्यायालयाच्या अंतर्गत पीएमएलए न्यायालयामध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले. यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.नवाब मलिक यांच्यावर डी कंपनीच्या हसीना पारकर, सलीम पटेल आणि १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान यांच्याशी संगनमत करून बळकावलेल्या मालमत्तेच्या आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सर्व आरोपींविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत; असेही ईडीच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले. पीएमएलए कायद्याच्या कलम ३,४ आणि १७ अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले. नवाब मलिक यांनी आरोप फेटाळले आहेत. आता पीएमएलए न्यायालयात नवाब मलिक यांच्या विरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू होणार आहे. जर पुरवणी आरोपपत्र दाखल झालं तर दाऊद किंवा दाऊदशी संबंधित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.नवाब मलिक यांना २०२२ मध्ये अटक झाली होती. तब्येतीच्या कारणामुळे सध्या नवाब मलिक जामिनावर आहेत. नवाब मलिक यांनी डी कंपनीच्या हसीना पारकर, सलीम पटेल आणि १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान यांच्याशी संगनमत करून गोवावाला कम्पाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बळकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी १९ डिसेंबर २०२५ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यानंतर दैनंदिन सुनवणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार
मुंबई (खास प्रतिनिधी) :विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास महानगरपालिकेकडून हाती घेण्यात आला आहे. एकूण दोन टप्प्यात पूर्ण केल्या जाणाऱ्या या पुनर्विकास प्रकल्पाचे पूर्णतः बांधकाम प्रथमच महानगरपालिका करणार आहे. या अंतर्गत बाधित होणाऱ्या प्रथम टप्प्यातील ३ इमारती महापालिकेच्या ‘एन’ विभागाकडून मंगळवारी १८ नोव्हेंबर २०२५ रिकाम्या रिकाम्या करण्यात आल्या.मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे यांच्या देखरेखीखाली, सहायक आयुक्त (एन विभाग) डॉ. गजानन बेल्लाळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.विक्रोळी पार्कसाईट येथील या पुनर्विकासात एकूण २८ इमारती बाधित होत आहेत. या सर्व इमारती सी-१ प्रवर्गातील असून अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. प्रथम टप्प्यात असलेल्या एकूण ९ अतिधोकादायक इमारतींपैकी ५ इमारती यापूर्वीच रिकाम्या करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी प्रस्तावित एस-३ इमारतीच्या एकूण २३ मजल्यांपैकी १३ मजल्यांपर्यंतचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर, यातील ३ अतिधोकादायक इमारती मंगळवारी रिकाम्या करण्यात आल्या. रिकाम्या करण्यात आलेल्या या इमारती लवकरच पाडण्यात येतील.या इमारतींमध्ये ६७ भाडेकरू वास्तव्यास होते. बाधित झालेल्या भाडेकरूंना भांडुप येथील ओबेरॉय रियल्टी येथे प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी (पीएपी) राखीव असलेल्या सदनिकांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी सदनिका देण्यात आल्या आहेत. सदर पुनर्विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भाडेकरूंना त्यांच्या अस्तित्वात असलेल्या २८० चौरस फुटाच्या सदनिकेच्या बदल्यात विक्रोळी पार्कसाइट येथील नवीन इमारतींमध्ये ४०५ चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका मालकी तत्वावर वितरित करण्यात येईल.
भारतात केवळ तीनच मोठ्या सरकारी बँका राहणार? SBIचा पाठिंबा
नवी दिल्ली- भारतातील आर्थिक क्षेत्रातील वाढीचा स्तर वाढविण्यासाठी अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे मोठ्या बँकांमध्ये विलीनीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेला स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष सी.एस. शेट्टी यांनी पाठिंबा दिला आहे. काही लहान बँका अजूनही अस्तित्वात असल्याने आणखी बदल आवश्यक आहेत. जर विलीनीकरणाचा दुसरा टप्पा आला तर त्यात काहीही चूक नाही असे ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत शेट्टी […] The post भारतात केवळ तीनच मोठ्या सरकारी बँका राहणार? SBIचा पाठिंबा appeared first on Dainik Prabhat .
सहाराची मालमत्ता अदानी समूहाला मिळणार ?
नवी दिल्ली – अदानी समूहाला मालमत्ता विकण्याची परवानगी मागणार्या सहारा समूहाच्या याचिकेवरील सुनावणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने सहा आठवड्यांसाठी पुढे ढकलली. न्यायालयाने केंद्र सरकारला या मुद्यावर मिकस क्युरीने सादर केलेल्या नोटवर उत्तर दाखल करण्यास सांगितले. सरन्यायाधीश बी.आर. गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने सहकार मंत्रालयाला या प्रकरणात पक्षकार बनवले. तत्पूर्वी, केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व […] The post सहाराची मालमत्ता अदानी समूहाला मिळणार ? appeared first on Dainik Prabhat .
Anmol Bishnoi : अनमोल बिष्णोई येणार भारताच्या ताब्यात; अमेरिकेतून करण्यात आले प्रत्यार्पण
मुंबई : गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल भारताच्या ताब्यात येणार आहे. विविध गंभीर गुन्ह्यांबद्दल वॉन्टेड असणाऱ्या अनमोलचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात आले. आता तो उद्या (बुधवार) भारतात पोहचेल, अशी माहिती मुंबई पोलीस दलातील सुत्रांकडून देण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील अनमोल हा महत्वाचा आरोपी आहे. त्याशिवाय, बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या […] The post Anmol Bishnoi : अनमोल बिष्णोई येणार भारताच्या ताब्यात; अमेरिकेतून करण्यात आले प्रत्यार्पण appeared first on Dainik Prabhat .
IAS Officer Transfers: राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती
IAS Officer Transfers: 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. या आदेशानुसार, सध्या पुण्यातील यशदा येथे उपमहासंचालक पदावर कार्यरत असलेले त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. त्रिगुण कुलकर्णी यांच्यासोबतच राहुल रंजन महिवाल, प्रकाश खपले, डॉ. मंजिरी मानोलकर, अंजली रमेश या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या […] The post IAS Officer Transfers: राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती appeared first on Dainik Prabhat .
अवैधरित्या डिझेलची विक्री करणाऱ्यांविरुध्द कारवाई; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
मुंबई – अवैधरित्या डिझेलची खरेदी/विक्री करणाऱ्यांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईत राज्यस्तरीय दक्षता पथकामार्फत १२,४९,६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई तथा अध्यक्ष, राज्यस्तरीय दक्षता पथक प्रमुख यांनी मुंबई-अहमदाबाद हायवेवर आमगाव येथील हॉटेल अरोमा समोरील मोकळ्या जागेत अवैधरित्या डिझेलची खरेदी व साठवणूक करुन तेथूनच त्याची विक्री करीत असल्याच्या माहीती […] The post अवैधरित्या डिझेलची विक्री करणाऱ्यांविरुध्द कारवाई; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल-१ मधून वगळून शेड्यूल-२ मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावही तयार करून सादर करावा. मानवांवर हल्ले करणाऱ्या बिबट्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ठिकाणी तातडीने पिंजरे बसवावेत. यासोबतच, पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी दोन रेस्क्यू सेंटर पुढील दोन ते तीन महिन्यांत सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले.राज्यातील बिबट्यांच्या प्रश्नांसंदर्भात मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार शरद सोनवणे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव राजेश कुमार, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) एम श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) श्रीनिवास रेड्डी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी कालबद्ध पद्धतीने तातडीचे आणि दीर्घकालीन अशा दोन प्रकारे उपाययोजना करण्यात याव्यात. तातडीच्या उपायांमध्ये गावे व शहरांजवळील बिबट्यांना शोधून पकडण्यात यावेत. यासाठी ड्रोनची मदत घ्यावी. पिंजरे, वाहने, मनुष्यबळ आदी बिबटे पकडण्यासाठी आवश्यक साहित्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून द्यावेत. तसेच दीर्घकालीन उपाययोजनेत बिबट्यांची नसबंदी करण्यात यावी. तसेच पकडलेल्या नरभक्षक बिबट्यांना ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यात दोन रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी तातडीने जागा शोधून आराखडे तयार करावेत. तसेच गोरेवाडा सह इतर ठिकाणी सध्या असलेल्या रेस्क्यू सेंटरची क्षमता वाढविण्यात यावी.बिबट्यांचा समावेश शेड्यूल एक मध्ये आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्यांना पकडणे, त्यांना मारणे यावर मर्यादा येतात. त्यामुळे बिबट्यांना शेड्यूल एकमधून काढण्यासंबंधी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. बिबट्यांच्या नसबंदीची परवानगी केंद्र शासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्यांना शोधून नसबंदी करण्यात यावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.बचाव केंद्रांची क्षमता तातडीने वाढवावी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री शिंदे यांनी बिबट्यांची समस्या वाढल्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाल्याचे सांगितले. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी गाव व शहराजवळ फिरणाऱ्या बिबट्यांना ड्रोनच्या सहाय्याने शोधून त्यांना पकडण्यात यावे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तातडीने वाढविण्यात यावे. नागरी वस्तीत बिबटे आल्यास तो नरभक्षक समजूनच त्याला पकडण्यात यावे. बिबट्यांचा वावर असलेल्या भागात रेस्क्यू टीम व वाहनांची संख्याही वाढवावी. सध्या असलेल्या माणिकडोह व इतर ठिकाणच्या रेस्क्यू सेंटरची क्षमता वाढवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.बिबट्यांचा वावर असलेल्या ठिकाणच्या शाळांची वेळ बदला, उपमुख्यमंत्री अजित पवारउपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, बिबट्यांच्या हल्ल्यामुळे अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांमधील भीती कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्यात याव्यात. बिबट्यांचा वावर असलेल्या ठिकाणी पोलीस व वन विभागाने गस्त वाढवावी. तसेच बिबट्यांचा वावर असलेल्या पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील भागांमध्ये शाळांची वेळ सकाळी 9.30 ते 4.00 अशी करण्यात यावी. रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी तातडीने निधीचा प्रस्ताव देण्यात यावा.जंगलात भक्ष्य मिळण्यासाठी उपाययोजना करा, वन मंत्री गणेश नाईकजंगलामधील भक्ष्य कमी झाल्यामुळे बिबटे हे मानवी वस्तीत येऊन हल्ले करत आहेत. त्यामुळे जंगलामध्येच त्यांना भक्ष्य मिळण्यासाठी बिबट्यांची संख्या जास्त असलेल्या जंगलात शेळ्या सोडण्यात यावेत. जेणेकरून ते मानवी वस्तीत येणार नाहीत. तसेच बिबट्यांना पकडण्यासाठी पुणे जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने 1200 पिंजरे पुरविण्यात येत आहेत, अशी माहिती वन मंत्री नाईक यांनी यावेळी दिली.माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, दौंडचे आमदार राहूल कुल, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, श्रीरामनगरचे आमदार लहू कानडे त्यांच्या भागातील समस्या सांगून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.बिबट्यांना शेड्यूल एक मधून बाहेर काढण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशपुणे जिल्ह्यात दोन बचाव केंद्रे सुरू करागाव/शहराजवळील फिरणाऱ्या बिबटे पकडण्यासाठी ड्रोनचा वापर करानरभक्षक बिबट्यांना शोधून नसबंदी कराबिबट्यांचा वावर असलेल्या भागात पोलीस व वन विभागाने गस्त वाढवावीरेस्क्यू टीम व वाहनांची संख्या वाढवावी
राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण
महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही सन्माननवी दिल्ली : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत जलव्यवस्थापन आणि संवर्धन क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये (२०२४) महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्यावतीने तो स्वीकारला. तसेच उत्कृष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विभागात नवी मुंबई महापालिकेने प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आज झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय जल पुरस्कार - २०२४ प्रदान करण्यात आले. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, जलशक्ती राज्यमंत्री राजभूषण चौधरी, राज्यमंत्री व्ही. सोमन्ना, विभागीय सचिव व्ही. एल. कांथाराव व विभागाचे सचिव अशोक, के. के. मीना यावेळी उपस्थित होते. विखे पाटील यांच्यासोबत राज्याच्या जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिपक कपूर उपस्थित होते.या मानांकन स्पर्धेत गुजरातला दुसरा तर हरियाणाला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, आपल्या भाषणात, अमृता इतक्याच मौल्यवान असलेल्या जल संसाधनाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या सर्वांचं कौतुक केले. भारतीय परंपरेमधे जलस्रोतांना पूजनीय मानले गेले आहे. माणूस अन्नाशिवाय काही काळ जगू शकेल, मात्र पाण्याशिवाय जगू शकत नाही, त्यामुळे पाण्याच्या संवर्धनासाठी काम करणारे कौतुकास पात्र आहेत, असे यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या. गेल्यावर्षी सुरू झालेल्या जलसंवर्धन जनसहभाग उपक्रमाद्वारे 35 लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचना उभारल्या गेल्या असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले. देशात मर्यादित जलस्रोत असल्याने त्याचा वापर जपून करायला हवा आहे. हवामान बदलाचा जलस्रोतांवर परिणाम होत असून जलस्रोतांच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केले.महाराष्ट्राला 'सर्वोत्कृष्ट राज्य' पुरस्कार अभिमानाची बाबपुरस्कार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र सदन येथे माध्यमांशी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, महाराष्ट्राला 'सर्वोत्कृष्ट राज्य' म्हणून सन्मान प्राप्त होणे ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. राज्य सरकारने राबवलेल्या अभिनव जलव्यवस्थापन धोरणांचा आणि शेतकरी, पाणी वापर संस्था तसेच प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय सहभागाचा हा विजय आहे.बंद नलिका वितरण प्रणाली, उपसा सिंचन प्रकल्पांचे आधुनिकीकरण, नदी जोड प्रकल्प, पम्पिंग स्टोरेज योजना, जलाशयांवर फ्लोटिंग सौर प्रकल्प आणि सांडपाणी शुद्धीकरण-पुनर्वापर या सहा अभिनव संकल्पनांमुळे महाराष्ट्राला हे यश मिळाल्याचे विखे पाटील यांनी नमूद केले. महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.या प्रमुख यशासोबतच महाराष्ट्रातील इतर दोन संस्थांनाही महत्त्वाच्या श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले. “सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था” या गटात नवी मुंबई महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावला. हा पुरस्कार आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्वीकारला. “सर्वोत्कृष्ट जलवापरकर्ता संस्था” नाशिक जिल्ह्यातील कनिफनाथ जल/पाणी वापर सहकारी संस्थेला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी यांनी स्वीकारला.
आमदार सिध्दार्थ शिरोळे यांना उच्च दिलासा: दत्ता बहिरट यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका फेटाळली
पुणे – विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी भाजपचे विजयी उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली निवडणूक याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी हा निकाल दिला. यामध्ये शिरोळे यांच्या वतीने ॲड. अनुराग मिश्रा आणि ॲड. रोहन नहार यांनी युक्तिवाद केला. मतदार यादीत छेडछाड […] The post आमदार सिध्दार्थ शिरोळे यांना उच्च दिलासा: दत्ता बहिरट यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका फेटाळली appeared first on Dainik Prabhat .
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी यशदाच्या उपमहासंचालक त्रिगुण कुलकर्णी यांची बदलीद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेशही राज्य शासनाने जारी केले आहेत. शालेय शिक्षण विभागात आयएएस अधिकाऱ्यांचा शिरकाव दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाल्याची चर्चाही रंगू लागली आहे. गेल्या […] The post शालेय शिक्षण विभागात आयएएस अधिकाऱ्यांचा शिरकाव वाढता वाढे; राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती appeared first on Dainik Prabhat .
अचानक डिजिटल ब्लॅकआउट; Cloudflare बंद पडताच अनेक अॅप्स ठप्प !
मुंबई : जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना आज सकाळपासून अचानक अनेक डिजिटल सेवांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागला. X (पूर्वी ट्विटर), Canva, ChatGPT, OpenAI, AWS यांसह असंख्य लोकप्रिय प्लॅटफॉर्म काही काळासाठी ठप्प झाले. या मोठ्या व्यत्ययामागील कारण क्लाउडफ्लेअरचा तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले जात आहे. इंटरनेट ट्रॅफिकचे व्यवस्थापन आणि सुरक्षा हाताळणाऱ्या या महत्त्वाच्या नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये समस्या उद्भवल्याने हजारो वेबसाइट्सचा वेग मंदावला आणि अनेक सेवा पूर्णपणे बंद झाल्या.वापरकर्त्यांनी टाइमलाइन न उघडणे, पोस्ट्स लोड न होणे, लॉग-इन अपयशी ठरणे, तसेच फोटो-फाइल अपलोड न होण्यासारख्या तक्रारी मोठ्या प्रमाणात नोंदवल्या. क्लाउडफ्लेअरच्या जागतिक डेटा सेंटर्समध्ये सुरू असलेल्या देखभाल प्रक्रियेदरम्यान अनपेक्षित अडथळा निर्माण झाल्यामुळे उत्तर अमेरिका, युरोप, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत व्यापक परिणाम जाणवला. अनेक सेवांना 500 एरर येत होता, तर काही साइट्स पूर्णपणे बंद पडल्या.या आउटेजचा सर्वाधिक फटका X आणि Canva वापरकर्त्यांना बसला. X वर टाइमलाइन रिफ्रेश न होणे, DM न उघडणे अशा समस्या वाढल्या. तर भारत, अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांत Canva सेवा पूर्णपणे निष्क्रिय झाली. फोटो एडिटिंग, प्रोजेक्ट डिझाइन आणि फाइल सेव्हिंगमध्ये प्रचंड अडचणींमुळे वापरकर्त्यांनी इतर पर्यायांचा आधार घेतला. डाउनडिटेक्टरवर काही मिनिटांतच शेकडो तक्रारी नोंदवल्या गेल्या.क्लाउडफ्लेअर हे जगातील सर्वात मोठ्या इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्कपैकी एक असून वेबसाइट्स जलद, सुरक्षित आणि स्थिर ठेवण्यासाठी ते CDN, सुरक्षा संरक्षण आणि डेटा सेंटर सेवा पुरवते. वेबसाइट्सवर अचानक वाढलेला ट्रॅफिक, सर्व्हरवरील हल्ले किंवा जास्त लोड सांभाळण्यासाठी क्लाउडफ्लेअरचे सर्व्हर कंटेंट अनेक ठिकाणी पसरवतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना जवळच्या सर्व्हरमधून पेज पटकन उघडता येतात. त्यामुळे या कंपनीत झालेला कोणताही बिघाड एका प्लॅटफॉर्मपुरता मर्यादित राहत नाही, तर हजारो वेबसाइट्सला त्याचा फटका एकाचवेळी बसतो.भारतामध्ये ChatGPT च्याही सेवा बंद झाल्या. काही ठिकाणी प्लॅटफॉर्म उघडत नव्हता, तर काही ठिकाणी प्रतिसाद मिळण्यात मोठा विलंब होत होता. डिजिटल साधनांवर अवलंबून असलेले अनेक कामकाज काही तासांसाठी ठप्प राहिले. क्लाउडफ्लेअरमधील या बिघाडाने जागतिक इंटरनेट यंत्रणा किती गुंतागुंतीची आणि परस्परावलंबी आहे, याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली.
एनडीए बिहारमध्ये पास, दिल्ली आणि महाराष्ट्रात 'स्थानिक'च्या परीक्षेसाठी सज्ज
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने २४३ पैकी २०२ जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली. एनडीए बिहार विधानसभा निवडणुकीच्या परीक्षेत पास झाली. आता एनडीएने दिल्ली आणि महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी तयारी सुरू केली आहे. तर विरोधक 'स्थानिक'च्या निवडणुकांमध्ये एनडीएला पराभवाचे पाणी पाजण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये होणार असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीआधीची ही एक मोठी लढाई आहे.फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्लीत आम आदमी पक्षाच्या दारुण पराभवानंतर, ३० नोव्हेंबर रोजी १२ एमसीडी वॉर्डमध्ये पोटनिवडणुका होत आहे. यात आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पार्टी हे दोन्ही पक्ष ताकद आजमावून बघतील. काँग्रेस पण या निवडणुकीत नशीब आजमावणार आहे.महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. एकूण ६,८५९ जागांसाठी मतदान होणार आहे. २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी थेट पद्धतीने निवडणूक होईल. नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत तर नगरपंचायतींसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धत आहे. नगरपालिकांमध्ये मतदारांना नगराध्यक्षपदासाठी एक तर प्रभागासाठी दोन अशी तीन मते द्यावी लागणार आहेत. नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी प्रत्येकी एक अशी दोन मते द्यावी लागतील.राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी निवडणूकनगरपालिका : २४६नगरपंचायती : ४२एकूण जागा : ६,८५९अर्ज दाखल प्रक्रिया : १० ते १७ नोव्हेंबरअर्ज माघार : २१ नोव्हेंबरपर्यंतमतदान : २ डिसेंबरमतमोजणी : ३ डिसेंबरविभागनिहाय नगरपालिका व नगरपंचायतीकोकण : २७, नाशिक : ४९, पुणे : ६०, छत्रपती संभाजीनगर : ५२, अमरावती :४५,नागपूर:५५देशात पुढील पाच वर्षात आसाम, केरळ, तामीळनाडू, पश्चिम बंगाल या चार राज्यांसह पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातही विधानसभेची निवडणूक होणार आहे. विधानसभेच्या आसाममध्ये १२६, तामिळनाडूत २३४, केरळमध्ये १४०, पश्चिम बंगालमध्ये २९४ आणि पुद्दुचेरीत ३० जागा आहेत. या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत.
छोटे भूखंड आता ‘विनाशुल्क’नियमित! राज्यातील ६० लाख मालमत्ताधारकांसह ३ कोटी नागरिकांना लाभ
मुंबई : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती महसूल विभागाने निश्चित केली असून याबाबत सर्व प्रशासकीय यंत्रणेला छोटे भूखंड नियमित करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जारी केले. या निर्णयाचा राज्यातील ६० लाख कुटुंबांसह सुमारे ३ कोटी नागरिकांना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे, ” तुकडेबंदी […] The post छोटे भूखंड आता ‘विनाशुल्क’ नियमित! राज्यातील ६० लाख मालमत्ताधारकांसह ३ कोटी नागरिकांना लाभ appeared first on Dainik Prabhat .
अॅड. असीम सरोदे यांचा सनद रद्दचा निर्णय स्थगित
पुणे – ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. असीम सरोदे यांना बार काऊन्सिल ऑफ इंडियाने दिलासा दिला आहे. बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाने दिलेल्या सनद रद्दच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर ‘मी पुन्हा येतोय’ अशा शब्दांत पोस्ट शेअर करत अॅड. सरोदे यांनी बार काऊन्सिल ऑफ इंडियाचे आभार मानले आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभेचे […] The post अॅड. असीम सरोदे यांचा सनद रद्दचा निर्णय स्थगित appeared first on Dainik Prabhat .
मंगळवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास, X, ChatGPT आणि Canva यासह ७५ लाख वेबसाइट अचानक बंद पडल्या. त्याचे कारण क्लाउडफ्लेअरचा डाउनटाइम होता. क्लाउडफ्लेअर म्हणजे काय, ते कसे काम करते, ते का बंद आहे आणि वापरकर्त्यांनी काळजी करावी का? दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये या पाच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील... प्रश्न-१: क्लाउडफ्लेअर म्हणजे काय आणि ते कसे काम करते? उत्तर: इंटरनेट हे एका मोकळ्या रस्त्यासारखे आहे, जिथे कोणीही चालू शकते. चांगले लोक आणि वाईट हेतू असलेले दोघेही. वेबसाइटवर दुर्भावनापूर्ण ट्रॅफिक पोहोचण्यापासून रोखण्यासाठी, सर्वात जास्त वापरले जाणारे उत्पादन क्लाउडफ्लेअर आहे. ते वेबसाइट जलद, सुरक्षित आणि अधिक विश्वासार्ह बनविण्यास मदत करते. वेबसाइट्स त्याच्या सेवा वापरतात. क्लाउडफ्लेअर वेबसाइटच्या अगदी समोर उभे आहे, जसे रस्त्यावरील सुरक्षा चौकी. ते वेबसाइटवर येणाऱ्या प्रत्येक विनंतीची तपासणी करते. जर काही चूक असेल तर ती वेबसाइटवर पोहोचण्यापूर्वीच ती ब्लॉक करते. जर एखाद्याला मूलभूत माहितीची आवश्यकता असेल, तर ते आपोआप त्या प्रश्नांची उत्तरे देते. जेणेकरून ट्रॅफिक थेट मूळ वेबसाइटवर जाणार नाही आणि वेबसाइट ओव्हरलोड होणार नाही. प्रश्न २: जगभरातील ७५ लाख वेबसाइट्स बंद करण्यात क्लाउडफ्लेअरची भूमिका काय आहे? उत्तर: क्लाउडफ्लेअर लाखो वेबसाइट्ससाठी सुरक्षा गेट म्हणून काम करते. जर हे गेट बंद असेल किंवा दूषित असेल तर कोणताही ट्रॅफिक त्यातून जाऊ शकत नाही. सर्व ट्रॅफिक एकतर थांबवले जाते किंवा नाकारले जाते. सध्याच्या आउटेजमध्ये नेमके हेच घडत आहे. क्लाउडफ्लेअरचा चेकपॉईंट बंद आहे, त्यामुळे अनेक वेबसाइट्स बंद आहेत. प्रश्न ३: क्लाउडफ्लेअर का बंद आहे, सध्याचा आउटेज का झाला? उत्तर: क्लाउडफ्लेअर सारख्या मोठ्या सीडीएन कंपनीचे, संपूर्ण किंवा मोठ्या प्रमाणात नेटवर्क बंद पडण्याची कारणे सामान्यतः फारच दुर्मिळ असतात. तथापि, पाच प्रमुख शक्यता आहेत... आजच्या आउटेजबद्दल, क्लाउडफ्लेअरने आतापर्यंत फक्त अॅप्लिकेशन सेवा मध्ये समस्या असल्याचे सांगितले आहे आणि ते त्यावर उपाय शोधत आहेत. बहुतेक संकेत असे आहेत की, ते कॉन्फिगरेशनमध्ये झालेल्या चुकीच्या बदलामुळे झाले आहे. जून २०२४ चा आउटेजही असाच होता. प्रश्न ४: हा देखील सायबर हल्ला असू शकतो का? उत्तर: क्लाउडफ्लेअरमधील ९९% मोठे आउटेज अंतर्गत त्रुटी मुळे होतात आणि बाह्य हल्ले किंवा भौतिक नुकसान फारच दुर्मिळ आहे. सध्या, हा सायबर हल्ला असल्याचे दिसत नाही. वापरकर्त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. प्रश्न ५: पुढे काय होईल? प्रतिसाद: क्लाउडफ्लेअरने सांगितले की, त्यांना या समस्येची जाणीव आहे आणि ते तपास करत आहेत. आम्ही या समस्येचा संपूर्ण परिणाम समजून घेण्यासाठी आणि कमी करण्यासाठी काम करत आहोत. लवकरच अधिक अपडेट्स प्रदान केले जातील. त्यांच्या अधिकृत वेबसाइट https://www.cloudflarestatus.com/ वरील नवीनतम अपडेटमध्ये म्हटले आहे की, आम्ही ॲप्लिकेशन सर्व्हिसेस ग्राहकांसाठी सेवा पुनर्संचयित करण्यासाठी काम करत आहोत. ही बातमी पण वाचा... जगभरात ChatGPT आणि X सुमारे 2 तासांपासून बंद:क्लाउडफ्लेअर डाउन झाल्याने सेवांमध्ये व्यत्यय, 75 लाख बेवसाइट्सवर परिणाम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X, AI चॅटबॉट ChatGPT आणि Canva यांच्या सेवा देशभरात जवळपास दोन तासांपासून बंद आहेत. मंगळवारी संध्याकाळी ५:०० वाजल्यापासून या सेवा बंद आहेत. भारतासह जगभरातील वापरकर्त्यांना लॉग इन करण्यात, साइन अप करण्यात, पोस्ट करण्यात, पाहण्यात आणि प्रीमियम सेवांसह प्रमुख वैशिष्ट्ये वापरण्यात समस्या येत आहेत. वाचा सविस्तर बातमी...
मुंबई : अयोध्येचा राजा, माणूस, कुंकू, झनक झनक पायल बाजे, डॉ. कोटनीस की अमर कहानी, दो आँखे बारा हाथ, नवरंग, पिंजरा’ यांसारखे अजरामर चित्रपट निर्माण करणाऱ्या चित्रपती डॉ. व्ही. शांताराम ज्यांनी मराठी आणि हिंदीमधील ९२ चित्रपटांची निर्मिती, ५५ चित्रपटांचे दिग्दर्शन आणि २५ चित्रपटांमध्ये कलाकार म्हणून काम केले आहे यांचे १२५वे जयंती वर्ष येत्या १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरु होत आहे.१२५व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने डॉ. व्ही. शांताराम यांची कारकीर्द जिथे बहरली त्या कोल्हापूर, पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. जानेवारी मध्ये मुंबई व ठाणे येथे होणाऱ्या आशियाई चित्रपट महोत्सवात डॉ. व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचा विशेष विभाग असणार आहे तसेच प्रभात चित्र मंडळ आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया या संस्था डॉ. व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचे विशेष शो आयोजित करणार आहेत.तसेच या १२५व्या जयंती वर्षानिमित्त गोव्यात आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डॉ. व्ही. शांताराम निर्मित ‘डॉक्टर कोटनीस की अमर कहानी (१९४६)’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे आणि महोत्सवाच्या सांगता समारंभात डॉ. व्ही. शांतारामांचे चित्र असलेल्या पोस्ट स्टॅम्पचे अनावरण करण्यात येणार आहे.
महायुतीत कुरबुरी ? एकनाथ शिंदेंनी दिली 'ही'प्रतिक्रिया
मुंबई : राज्यात महायुतीत मिठाचा खडा पडतो की, काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीवर शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी बहिष्कार टाकला आणि अनुपस्थित राहिले. महत्वाची बाब ही आहे की, या नाराजी नाट्यादरम्यान शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे मात्र या बैठकीस उपस्थित होते. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.फोडाफोडीचे राजकारण हे या नाराजी मुख्य कारण होते. शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महायुतीमधील फोडाफोडीच्या राजकारणावर मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. महायुतीमधील घटकपक्ष एकमेकांचे आमदार, माजी आमदार, नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी फोडणार नाही, असा निर्णय फडणवीस आणि शिंदे उपस्थित असलेल्या बैठकीत झाला.एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रियामहायुतीतल्या कुरबुरींचे वृत्त मीडियाने देण्यास सुरुवात केली. ही बातमी येऊ लागताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मीडिया प्रतिनिधींनी 'ऑफ द रेकॉर्ड' प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेुळे महायुतीमधील नाराजी नाट्यावर पडदा पडला आहे. महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली आहे. खाली काही असले तर सर्वात जास्त जागांवर युती करायची आहे. आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवून एकत्र राहायचे आहे. युतीधर्म पाळण्यासाठी आम्ही बिहारपर्यंत जातो. भाजपच्या नेत्यांना या बाबतीत समज देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. शिवसेनेच्या नेत्यांना या बाबतीत समज देण्याची जबाबदारी माझी, असं थोडक्या पण स्पष्ट शब्दात एकनाथ शिंदेयांनीसांगितले.
पुण्यात गुरुवारी पाणीबाणी, पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन
पुणे : पुणे शहरातील जलकेंद्रांच्या दुरुस्ती कामामुळे गुरुवार २० नोव्हेंबर रोजी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर शुक्रवारी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र (५०० एमएलडी), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर व पर्वती एलएलआर टाकी परिसर, पर्वती टँकर पॉइंट, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर जलकेंद्र, चिखली जलकेंद्र, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारितील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत जीएसआर टाकी परिसर, शिवणे इंडस्ट्रीज परिसर, एसएनडीटी एचएलआर टाकी व एमएलआर टाकी परिसर, चतु:शृंगी टाकी परिसर, होळकर जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्र. १ व २, गणपती माथा, जुने वारजे जलकेंद्र तसेच नव्याने समाविष्ट गावे बूस्टर पंपिगअंतर्गत येणारा परिसर येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंत तीन हजार मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. खडकवासला धरणातून एक हजार ४०० मिलिमीटर व्यासाच्या दोन जलवाहिन्या तीन हजार मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला जोडण्यात आल्या आहेत. आता खडकवासला ते पर्वती तीन हजार मिलिमीटर व्यासाच्या वाहिनीवरील फ्लोमीटर बसविणे व एक हजार ४०० मिलिमीटर वाहिनीवरील बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविणे या कामांसाठी एक हजार ४०० मिलिमीटर व्यासाचे व्हॉल्व्ह पूर्ण बंद होत आहेत. त्याच्या तपासणीसाठी व वडगाव जलशुद्धीकरण केंद्र ‘फेज २’ची क्षमता वाढविण्यासाठी नवीन संपवेल टाकीच्या भिंतीला कोअर कटिंग करण्यासाठी; तसेच देखभाल-दुरुस्तीच्या इतर कामांसाठी धरणातून होणारा संपूर्ण पाणीपुरवठा गुरुवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी सहा ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवावा लागणार आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे. दरम्यान महापालिकेने पाणीपुरवठा बंद असणाऱ्या प्रभागातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे व पाण्याचा साठा करण्याचेआवाहनकेलेआहे.
मुंबईतील उड्डाणपुलांची दुरुस्ती करणार
मुंबई : मुंबईतील सर्व उड्डाणपुलांची दुरुस्ती तातडीने हाती घेऊन रस्त्यांच्या पृष्ठभागावर नवीन थर (रिसरफेसिंग) टाकण्यात यावा. ही कामे फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या दुरुस्तीच्या कामाचे संनियंत्रण नगरविकास विभागाकडून करण्यात यावे यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेला गुणवत्ता नियंत्रण कक्ष सुरू करण्यात यावा, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात मुंबईतील सर्व उड्डाणपुलांची सद्यस्थिती व दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेणारी बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, एमएसआरडीएचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी हे दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.मुंबईत एमएसआरडीएकडे पाच आणि एमईपी कडे १९ असे एकूण २४ उड्डाणपुल असून ते मुंबई महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र आता पावसाळा संपल्यानंतर या उड्डाणपुलांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. या सर्व रस्त्यांचे रिसरफेसिंग करावे. ज्याठिकाणी रस्ता खडबडीत झाला आहे अशा ठिकाणी युद्धपातळीवर रस्त्यावरील ठिगळ काढून रस्ता गुळगुळीत करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेले ४२ उड्डाणपुलांची देखील तातडीने दुरूस्ती हाती घ्यावी, असे सांगतानाच अटलसेतूचे देखील रिसरफेसिंग करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यासर्व कामांचे नगरविकास विभागाच्या मार्फत गुणवत्ता नियंत्रण करण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, छोटे भूखंड आता 'विनाशुल्क'नियमित होणार
मुंबई : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती महसूल विभागाने निश्चित केली असून याबाबत सर्व प्रशासकीय यंत्रणेला छोटे भूखंड नियमित करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जारी केले. या निर्णयाचा राज्यातील ६० लाख कुटुंबांसह सुमारे ३ कोटी नागरिकांना फायदा होणार आहे.विशेष म्हणजे, तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार हा सातबाऱ्यावरील शेरा काढून टाकला जाईल. आठ मुद्द्यांच्या या कार्यपद्धतीने महाराष्ट्रातील अनेक वर्षापासून रखडलेला छोट्या जमिनीचा व्यवहार कायदेशीर होईल.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशावरून महसूल विभागाने याबाबतची कार्यपद्धती जारी केली असून, १५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत झालेल्या जमीन व्यवहारांना लागू असणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA) यांसारख्या नियोजन प्राधिकरणांच्या क्षेत्रातील निवासी/वाणिज्यिक झोन, छावणी क्षेत्रातील जमिनी, प्रादेशिक आराखड्यात अकृषिक वापरासाठी दर्शविलेले क्षेत्र आणि गावठाणांच्या हद्दीलगतचे 'पेरीफेरल एरिया' क्षेत्र यामध्ये समाविष्ट आहे.* सातबाऱ्यावर नाव लागणार : अनेकदा गुंठेवारीने घेतलेल्या जमिनींची नोंद 'तुकडेबंदी' कायद्यामुळे सातबारा उताऱ्यावर होत नव्हती किंवा झाल्यास ती 'इतर हक्कात' होत असे. आता या निर्णयामुळे सातबाऱ्यावर नाव लागणार* फेरफार रद्द झाला असल्यास : जर यापूर्वी खरेदीचा फेरफार रद्द झाला असेल, तर तो पुन्हा तपासून मंजूर केला जाईल आणि खरेदीदाराचे नाव कब्जेदार म्हणून लावले जाईल.* इतर हक्कात नाव असल्यास : ज्यांचे नाव सध्या सातबाराच्या 'इतर हक्कात' आहे, त्यांचे नाव आता मुख्य 'कब्जेदार' सदरात घेतले जाईल.* शेरा कमी करणे : तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार असा जर काही शेरा सातबाऱ्यावर असेल, तर तो काढून टाकला जाईल.* अनोंदणीकृत व्यवहारांसाठीही संधीज्यांनी फक्त नोटरी किंवा स्टॅम्प पेपरवर व्यवहार केले आहेत आणि दस्त नोंदणीकृत नाहीत, अशा नागरिकांना तलाठी व मंडळ अधिकारी दस्त नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करतील. मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदणी केल्यानंतर त्यांचीही नावे सातबारावर लावली जातील.* पुढील विक्रीचा मार्ग मोकळाएकदा हे तुकडे नियमित झाले आणि खरेदीदाराचे नाव अधिकार अभिलेखात आले की, सदर जमिनीची पुन्हा विक्री करण्यास किंवा हस्तांतरण करण्यास भविष्यात कोणताही प्रतिबंध राहणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शहरी आणि निमशहरी भागात वास्तव्यास असलेल्या मध्यमवर्गीय भूखंडधारकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या मालमत्तेला आता कायदेशीर हक्क प्राप्त होणार आहेत.----------------तुकडेबंदीचे व्यवहार नियमित करण्यासाठी जमिनीच्या चालू बाजारभावाच्या २५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागत होती, नंतर ती ५ टक्के करण्यात आली. मात्र, तरीही नागरिक पुढे येत नसल्याने आता शासनाने कोणतेही मूल्य न आकारता हे व्यवहार नियमित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याचा ६० लाख कुटुंबे म्हणजेच राज्यातील सुमारे ३ कोटी नागरिकांना लाभ होईल. - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
मुंबई : मुंबईतील ‘अक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ च्या प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नव्या योजनेनुसार वरळी आणि बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरात दोन विस्तृत सबवे उभारले जाणार आहेत. या सुविधा उपयोगात आल्यावर मेट्रो स्टेशनपासून महत्त्वाच्या व्यावसायिक, सांस्कृतिक आणि वाहतूक केंद्रांपर्यंत थेट पादचारी जोडणी निर्माण होणार आहे.पहिला सबवे वरळीतील नेहरू सायन्स सेंटर मेट्रो स्टेशनशी जोडला जाणार आहे. अंदाजे १.६ किमी लांबीचा हा मार्ग वरळी प्रोमेनेड, नेहरू प्लॅनेटोरियम, कोस्टल रोडजवळ उभारली जाणारी नवीन बाग, माजी वरळी डेअरीच्या जागेवर होणारे व्यावसायिक केंद्र या प्रमुख ठिकाणांपर्यंत सुसंगतपणे जोडल्याने वर्ली परिसरातील वाहतूक कमी होण्यास आणि पादचारी सुरक्षेत वाढ होण्यास मदत होईल.BKC सबवे – बुलेट ट्रेन टर्मिनलशी थेट जोडणीदुसरा सबवे बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (BKC) मेट्रो स्टेशनपासून सुरू होऊन १.४ किमी अंतरावर असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनलपर्यंत नेईल. हा सबवे BKC मधील महत्त्वाच्या कार्यालयीन, व्यावसायिक व सार्वजनिक स्थळांशीही जोडला जाईल, ज्यामुळे हा भाग प्रमुख इंटरचेंज हब म्हणून अधिक मजबूत होईल.दोन्ही सबवेंसाठीची एकत्रित लांबी ३ किमीपेक्षा जास्त असून, MMRCL लवकरच या प्रकल्पासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी एका विशेष एजन्सीची नियुक्ती करणार आहे. हीच एजन्सी बांधकामाच्या काळात प्रकल्प व्यवस्थापनाची जबाबदारीही सांभाळेल, अशी माहिती MMRCL चे संचालक आर. रमणा यांनी दिली.वरळी डेअरी प्लॉटच्या व्यावसायिक विकासाचा मार्ग मोकळाया प्रकल्पातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वरळी डेअरीचा मोठा भूखंड. शासकीय स्तरावर या जागेचा व्यावसायिक वापरासाठी बदल करण्यास तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. शहरी विकास विभाग DCPR मध्ये आवश्यक बदल करणार असून, या परिसराचे नियोजन MMRDA कडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे या जागेचा पुनर्विकास आता गतीने होण्याची अपेक्षा आहे.
किमान पाच इमारतीच्या गटाचे 'मिनी क्लस्टर 'लवकरच
मुंबई : मिरा -भाईंदर महानगरपालिकेने मंजूर केलेल्या क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेला मोठी गती मिळत असुन किमान पाच इमारतीच्या गटाला अथवा ठराविक चौरस मीटर क्षेत्र असलेल्या जागेला ' मिनी क्लस्टर ' म्हणून मान्यता देऊन क्लस्टरचे सर्व लाभ देण्याचे धोरण निश्चित केले जात आहे. या संदर्भात तातडीने सुधारित प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजूरीसाठी पाठविण्याच्या सुचना नगरविकास विभागाला केल्या आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.बैठकीला नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव असिम कुमार गुप्ता, मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा बिनोद शर्मा, निर्मलकुमार चौधरी, उपसचिव (नगरविकास), विनोद मोरे,कक्ष अधिकारी, पुरषोत्तम शिंदे, सहाय्यक संचालक नगररचना विभाग (मिरा -भाईंदर), माजी नगरसेवक राजेश वेतोसकर, शिवकुमार शर्मा, प्रेमसिंग राजपूत, गौरांग राठोड, नितीन मिस्त्री, जितेंद्र शहा इत्यादी नागरिक व वास्तुविशारद उपस्थित होते.मिरा -भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील किमान पाच इमारतींचा गट करून अथवा ठराविक चौरस मीटर क्षेत्र असलेल्या जागेचा एकत्रिकृत विकास, नियंत्रक व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) नुसार क्लस्टर योजनेचे लाभ देण्यात येतील. तसा सुधारित प्रस्ताव तातडीने नगरविकास विभागाने तयार करून मंजूरीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे पाठवून दयावा, अशा सूचना दिल्याचे मंत्री सरनाईक म्हणाले.दरम्यान, ३० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या असुरक्षित, दाटीवाटीने वसलेल्या इमारतींचा किमान ५ इमारतींचा गट करून त्यांचे ' मिनी क्लस्टर ' धोरणं निश्चित केले जात आहे. सध्या येथील रहिवाशांना स्थानांतराची आवश्यकता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी तात्पुरते स्टेजिंग एरिया नसल्याने या नागरिकांसाठी अडचणी वाढल्या होत्या. मात्र क्लस्टर मॉडेल वाढवून या समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येत आहेत.जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गतीग्रामपंचायत काळातील जुन्या ३० वर्षापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या इमारतींच्या विकासासाठी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर पुनर्विकास करण्याचे निश्चित करण्यात आले असून अशा इमारतींना UDCPR मधील तरतुदीनुसार असेसमेंट उताऱ्यावरील बांधकाम क्षेत्र प्रमाण मानून त्यावर परिगणना करून ६ जी टेबल च्या वर प्रोत्साहन चटई क्षेत्र मिळवून देण्यात येणार आहे. या दोन्ही निर्णयांमुळे आगामी काळात धोकादायक व आयुर्मान झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा वेग वाढणार असून झोपडपट्टीमुक्त, सुरक्षित व शाश्वत शहराच्या दिशेने पाऊल टाकण्यास मदत होणार आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.
फडणवीसांच्या बाणाने शिवसेना घायाळ!
मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज झालेल्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला. बैठक झाल्यावर सेनेचे मंत्री थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. या भेटीत भाजपमधील वाढत्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना भाजप पक्षप्रवेश देत असल्याचा थेट आरोप शिवसेनेच्या मंत्र्यांनी केला. यावर शिवसेनेच्या मंत्र्यांनाच फडणवीसांनी खडे बोल सुनावले. मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांना उल्हासनगरात प्रवेश देऊन फोडाफोडीच्या राजकारणाला आपण सुरुवात केल्याचे फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.काय म्हणाले फडणवीस?काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमधील शिवसेनेने भाजपच्या काही माजी नगरसेवकांना आपल्या गळाला लावले होते. ही ताजी घटना फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांसमोर मांडली. फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात तुम्ही केली आणि आता आक्षेप देखील तुम्हीच नोंदवत आहात असे देखील फडणवीस म्हणाले. आज कॅबिनेट बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात होत असलेल्या कॅबिनेटला शिवसेनेचे मंत्री गेलेच नाहीत. परंतु मी उपमुख्यमंत्री आहे त्यामुळे मला बैठकीला उपस्थित राहावे लागेल असे सांगून एकनाथ शिंदे बैठकीस उपस्थित राहिले.शिवसेनेची सर्वात मोठी नाराजी ही, देवेंद्र फडणवीसांकचे निकटवर्तीय आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या रवींद्र चव्हाण यांच्यावर आहे. चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पक्षप्रवेशाची जणू रांगच लावली आहे. शिवसेनेचे मंत्री, आमदार, माजी नगरसेवक असलेल्या मतदारसंघांमध्येच चव्हाण विरोधी पक्षातील नेत्यांचे पक्षप्रवेश करून घेत आहेत आणि त्यामुळेच शिवसेनेची अधिक नाराजी चव्हाण ओढवून घेत आहेत.
लोकल ट्रेन मधील धक्कादायक अनुभवाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री गिरीजा ओक?
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्री गिरीजा ओक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘तारे जमीन पर’, ‘शोर इन द सिटी’ आणि ‘जवान’सारख्या चित्रपटांतून तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. मात्र आता तिचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा लूक, तिचा साधेपणा आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे चाहत्यांनी तिला ‘नॅशनल क्रश’ म्हणायला सुरुवात केली आहे.गिरीजा ओकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील काही धक्कादायक अनुभव उघड केले. ती म्हणाली, लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना लोक तुम्हाला जाणूनबुजून धक्का देऊन, स्पर्श करुन निघून जातात... कधीकधी तर जाणूनबुझून तुमच्यावर येऊन आदळतात. हे फार विचित्र आणि धक्कादायक असलं तरीसुद्धा आता हे अगदी नॉर्मल झालंय... मलाही एका मुलाने अचानक मागून स्पर्श केला आणि नंतर तो लगेच गायब झाला. त्या क्षणी मला काहीच कळले नाही.गिरीजा पुढे म्हणाली की, त्यानं त्याचं बोट माझ्या पाठीवर फिरवलं, मग माझ्या मानेपासून, माझ्या पाठीपर्यंत आणि मग गर्रकन फिरला... जोपर्यंत मला कळेल की, नेमकं काय झालंय, तोपर्यंत तो मुलगा गायब झालेला... मी त्याला ओळखूच शकले नाही... ना मला त्याच्याबाबत काही माहीत होतं...तिच्या लहानपणीच्या शाळेतील अनुभवांबाबत गिरीजा म्हणाली, शाळेत एक मुलगा मला सतत त्रास देत असे. त्यावेळी मी त्याला प्रतिकार करत थोबाडीत मारले. हाच अनुभव मला स्वतःसाठी उभे राहण्याचे धैर्य शिकवणारा ठरला.गिरीजा ओकने तिच्या कुटुंबातील महिलांचा, विशेषतः तिच्या आईचा, धैर्य आणि आत्मविश्वासावर होणारा प्रभावही सांगितला. ती म्हणाली, माझी आई आणि आजी नेहमीच छळाला प्रतिकार करत असत. त्या शांतपणे नाही, तर ठामपणे, निश्चयाने स्वतःसाठी उभे राहायच्या. मी लहान असताना त्यांना धैर्याने वागताना पाहिले आणि त्यातून मलाही प्रत्येक परिस्थितीत स्वतःसाठी उभे राहण्याची शिकवण मिळाली.व्यावसायिक क्षेत्रात गिरीजा ओकने फार लहान वयातच ‘गोष्ट छोटी डोंगरावधी’, ‘गुलमोहर’, ‘मानिनी’ आणि ‘अडगुले मडगुले’सारख्या मराठी चित्रपटांतून पदार्पण केले. आजही तिचा अभिनय प्रेक्षकांना भावतो आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य, साधेपणा आणि धैर्य चाहत्यांना प्रेरणा देते.गिरीजा फक्त तिच्या सौंदर्यासाठीच नव्हे, तर तिच्या जीवनातील धैर्य, संघर्ष आणि आत्मविश्वासामुळेही चाहत्यांच्या हृदयात घर करत आहे, आणि स्त्रियांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
भाजप ‘दोस्तीत कुस्ती’करत आहे.! फडणवीसांनी शिंदेंच्या नेत्यांना सुनावले खडे बोल, नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis | Eknath Shinde – स्थानिकच्या निवडणूका येवू घातल्या असता, राज्यातील सर्वच पक्षांनी आपपल्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येकच पक्षात जोरदार इनकमिंग देखील होत असताना, राज्यातील सर्वात मोठा पक्ष असणार्या भाजपने गेल्या काही दिवसांपासून इनकमिंगवर जोर लावला. त्यांनी गतवेळच्या विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेल्यांना प्रवेश दिल्यामुळे, सत्तेत असणार्या शिंदेसेनेचे आमदार वैतागले असून त्यांनी मंगळवारी […] The post भाजप ‘दोस्तीत कुस्ती’ करत आहे.! फडणवीसांनी शिंदेंच्या नेत्यांना सुनावले खडे बोल, नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : डोंबिवलीतील राजकीय घडामोडींमध्ये मोठा बदल झाला आहे. माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल म्हात्रे, माजी नगरसेवक महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे आणि कल्याण-दोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.या वेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्षात नवीन नेत्यांचे स्वागत केले. समारंभात कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, भाजप डोंबिवली पश्चिम मंडलाचे माजी अध्यक्ष समीर चिटणीस, माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक राहूल दामले, मंदार हळबे, जितेंद्र भोईर, नंदू म्हात्रे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.रविंद्र चव्हाण म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे आणि संजय विचारे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या भागातील सर्व कार्यकर्त्यांनी दीर्घकाळ एकत्र काम केले आहे आणि मविआ सरकारच्या काळात त्यांना अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. आता विकासाच्या दृष्टीने काम करणे हा उद्देश आहे.”अनमोल म्हात्रेसोबत भाजपात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अश्विनी म्हात्रे, शिवसेनेचे युवा विभाग प्रमुख गजानन जोशी, विभाग अध्यक्ष ओमकार सुर्वे, माधुरी साळुंके, सुषमा सावंत, अलका कोलते, सविताताई शेलार, लक्ष्मीताई रानभरे आणि श्रद्धा माने यांचा समावेश आहे.महेश पाटील आणि डॉ. सुनीता पाटील यांच्यासोबत भाजपात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अण्णा राणे, संजय विचारे, शाखा प्रमुख सरिता शर्मा, विभाग प्रमुख संगीता अंबरे, उपविभाग प्रमुख आरती चव्हाण, अलका कुळे, छाया कांबळे, उपविभाग प्रमुख ऋषिकेश देशमुख, विभाग प्रमुख दीपक पारेख, शाखा प्रमुख वसंत सुखदरे, सुनील पाटील आणि संदीप तेमुरे यांचा समावेश आहे.या पक्षप्रवेशामुळे डोंबिवली आणि कल्याण परिसरातील भाजपाची ताकद वाढेल, अशी अपेक्षा आहे.
जगभरात ‘X’डाऊन! एलन मस्क यांच्या प्लॅटफॉर्मसह ChatGPT, Cloudflare सेवाही ठप्प
नवी दिल्ली : एलन मस्क यांच्या मालकीचे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) आज जगभरातील अनेक वापरकर्त्यांसाठी ठप्प झाले. केवळ X च नव्हे, तर Cloudflare मधील एका मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे ChatGPT, Perplexity, आणि Claude सारख्या प्रमुख इंटरनेट सेवांवरही गंभीर परिणाम झाला आहे. या आऊटेजमुळे जागतिक इंटरनेटचा मोठा भाग विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. काही वेळानंतर […] The post जगभरात ‘X’ डाऊन! एलन मस्क यांच्या प्लॅटफॉर्मसह ChatGPT, Cloudflare सेवाही ठप्प appeared first on Dainik Prabhat .
जगदलपूर : बस्तर प्रदेशातील जगदलपूर येथे उभारण्यात आलेला पांडम कॅफे हा बस्तरच्या डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीपणाचे उच्चाटन करण्याच्या चालू मोहिमेत सुरू असलेल्या सकारात्मक बदलाचे प्रेरणादायी प्रतीक आहे. हा कॅफे आशा, प्रगती आणि शांतता दर्शवत आहे, असे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी केले आहे. साई यांनी बस्तर प्रदेशातील जगदलपूर येथील विभागीय मुख्यालयात एका अनोख्या पांडम […] The post Vishnu Deo Sai : आत्मसमर्पित माओवाद्यांसाठी पांडम कॅफेचे उद्घाटन; छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांचे मोठे पाऊल appeared first on Dainik Prabhat .
Election News : काँग्रेसने एकटे लढण्याच्या निर्णयाचा पुर्णविचार करावा; ठाकरेंचा सल्ला !
Election News – मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसने एकट्याने लढण्याची केलेली घोषणा विरोधी पक्षांच्या एकतेसाठी हानिकारक आहे, असे ठाकरेसेनेने म्हटले आहे. मुंबई वेगळी करण्याची भाजपची योजना उधळून लावण्यासाठी एकत्रित लढाईचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसेला विरोधी गटात घेतल्यास त्यांचा उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदारांच्या संख्येत घट होण्याची काँग्रेसला असलेल्या चिंतेवर प्रकाश […] The post Election News : काँग्रेसने एकटे लढण्याच्या निर्णयाचा पुर्णविचार करावा; ठाकरेंचा सल्ला ! appeared first on Dainik Prabhat .
नवी मुंबई: स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) कार्यरत होणार आहे. विशेषतः भारतातील प्रथम नवीन ग्रीनफील्ड विमानतळ या कारणामुळे प्रसिद्धीस आलेले विमानतळ नाताळचा दिवस सोडून २५ डिसेंबर पासून व्यावसायिक कामकाज सुरू करणार आहे आणि माहितीनुसार दररोज विमानतळावर २३ वेळा विमाने उड्डाणे करतील अशी घोषणा मंगळवारी करण्यात आली. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे. माहितीनुसार, पहिल्या महिन्यात, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (NMIA) सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान या १२ तासांसाठी दररोज २३ वेळा उड्डाणे होतील असे प्रसिद्धीपत्रकात कंपनीने स्पष्ट केले. या कालावधीत, विमानतळ प्रति तास १० वेळा उड्डाणे करेल.माहितीनुसार, विमानतळावरील पहिली उडणारे फ्लाइट बेंगळुरूहून इंडिगो ६E४६० असणार आहे. ते सकाळी ८:०० वाजता विमानतळावर उतरणार आहे. त्यानंतर इंडिगो 6E882 सकाळी ८.४० वाजता हैदराबादसाठी रवाना होणार आहे ज्यात जे नवीन विमानतळावरून पहिली आउटबाउंड सेवा सुरू होईल. प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे, सुरुवातीच्या लाँच कालावधीत प्रवाशांना इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस आणि अकासा एअर द्वारे चालवल्या जाणाऱ्या सेवांचा फायदा होईल जे मुंबईला १६ प्रमुख देशांतर्गत स्थळांशी जोडतील,असे निवेदनात विमानतळाने म्हटले आहे.उपलब्ध माहितीनुसार, फेब्रुवारी २२०५ पासून, विमानतळ २४ तास सुरू करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशाच्या (Mumbai Metropolitical Region MMR) च्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी ३४ विमाने भविष्यात सुरु होऊ शकतात. सुरक्षा एजन्सी आणि एअरलाइन भागीदारांसह सर्व भागधारकांच्या सहकार्याने व्यापक ऑपरेशनल रेडीनेस आणि एअरपोर्ट ट्रान्सफर (ORAT) चाचण्या सध्या विमानतळ प्रशासन घेत आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ ऑक्टोबर रोजी एनएमआयएचे उद्घाटन केले होते. या नव्या विमानतळामुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या (एमएमआर) वाढत्या विमान वाहतूक गरजांना पूर्ण करण्यासाठी या विमानाचा निश्चितच फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबईतील असलेल्या दोन विमानतळावरील तणाव कमी होऊन नवी मुंबई व आसपास उपनगरात राहत असलेल्या प्रवाशांचीही गैरसोय होणार नाही.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रायव्हेट लिमिटेड (एनएमआयएएल) हे ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या विकास बांधकाम, ऑपरेशन आणि देखभालीसाठी स्थापन केलेली एक विशेष कंपनी आहे.एनएमआयएएल ही अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) ची उपकंपनी असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (MIAL) मधील सार्वजनिक खाजगी भागीदारी (Public Private Partnership PPP) असून माहितीनुसार ७४ टक्के हिस्सा हा योजनेचा असणार आहे तर शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेडचे (सिडको) उर्वरित २६ टक्के हिस्सा अथवा भागभांडवल (Stake) आहे.
Advay Hiray Joins BJP : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का ! उपनेते अद्वय हिरे यांचा भाजपमध्ये प्रवेश
Advay Hiray Joins BJP : नाशिकच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षप्रवेश होताना दिसत आहे. त्यातच उबाठा म्हणजेच उद्धव बाळासाहेब पक्षाला लागलेली गळती काही थांबायचे नाव घेईना. अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची साथ सोडली. त्यातच आता पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश […] The post Advay Hiray Joins BJP : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का ! उपनेते अद्वय हिरे यांचा भाजपमध्ये प्रवेश appeared first on Dainik Prabhat .
Rahul Gandhi : “दिल्लीत एसआयआरविरोधात काँग्रेसची रॅली”–राहुल गांधी
Rahul Gandhi | Congress – काँग्रेस सुरुवातीपासूनच केंद्र सरकारच्या मतदार यादीचे विशेष सघन पुनरीक्षण (एसआयआर)ला विरोध करत आहे. आता, काँग्रेस एसआयआर विरोधात दिल्लीत रॅली काढण्याचा विचार करत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रामलीला मैदानावर ही रॅली होणार आहे. एसआयआरवरील काँग्रेसच्या बैठकीनंतर संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी या रॅलीची घोषणा केली. एसआयआर राज्यांमधील वरिष्ठ नेत्यांसोबत एक बैठक […] The post Rahul Gandhi : “दिल्लीत एसआयआरविरोधात काँग्रेसची रॅली” – राहुल गांधी appeared first on Dainik Prabhat .
'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' (Uri: The Surgical Strike) या सुपरहिट चित्रपटातून देशभर 'द सर्जिकल स्ट्राइक' फेम मिळवलेले दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) यांच्या आगामी 'धुरंधर' या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर प्रदर्शित होताच, प्रेक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जवळपास ४.०७ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जबरदस्त ॲक्शन आणि प्रत्येक कलाकाराचा 'खतरनाक' अवतार पाहायला मिळतोय. हा थरार अनुभवताना अक्षरशः अंगावर काटा येतो. आदित्य धर यांनी या चित्रपटात जबरदस्त ॲक्शन आणि तगडी स्टारकास्ट यांचे समीकरण उत्तम जुळवण्यात यश मिळवले आहे, हे ट्रेलर पाहून स्पष्ट होते. आदित्य धर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तान आणि दहशतवाद या ज्वलंत विषयांवर आधारित कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे आणि त्यात मल्टीस्टार (Multi-Star) कलाकारांचा तडकासुद्धा आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक सिनेरसिकांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून, या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.https://youtu.be/BKOVzHcjEIo?si=VlOHeF8m486-cP1dचित्रपटात भारताच्या सुरक्षेचा थरारदिग्दर्शक आदित्य धर यांच्या 'धुरंधर' चित्रपटाचा जवळपास चार मिनिटांचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, यामध्ये प्रेक्षकांना अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त आणि रणवीर सिंह यांच्यासारख्या तगड्या कलाकारांच्या भूमिकांची झलक पाहायला मिळते. ट्रेलरवरून प्रत्येक भूमिकेला पडद्यावर चांगला स्क्रीनटाइम मिळाला असेल, हे स्पष्ट होते. या चित्रपटात अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांच्या खलनायकी भूमिका अत्यंत क्रूर आणि भयानक असल्याचे दिसून येते. खलनायक माणसांना जणू बाहुल्याच समजतात आणि त्यांच्यावर अत्याचार करतानाचे सीन्स (Scenes) पाहून अक्षरशः अंगावर काटा येतो. ट्रेलरच्या सुरुवातीलाच हा चित्रपट वास्तविक कथेवर आधारित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अर्जुन रामपाल हा एका अत्यंत हिंसक पद्धतीने ओळख करून दिलेल्या मेजर इक्बाल नावाच्या आयएसआय एजंटच्या (ISI Agent) भूमिकेत आहे. आर. माधवन यांनी अजय सन्यालची भूमिका साकारली आहे, जी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या भूमिकेपासून प्रेरित आहे. अक्षय खन्ना हा रहमान डकाईच्या भूमिकेत आहे. तर, संजय दत्त हे एसपी चौधरी अस्लमच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटातून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गुप्त सुरक्षा युद्धाचा थरार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.https://prahaar.in/2025/11/18/maharashtra-cabinet-meeting-maharashtra-government-taken-6-important-decisions-devendra-fadnavis-eknath-shinde-ajit-pawar-maharashtra-election/दहशतवादी संघटनेत इफ्तिखार बनून काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा थरारक प्रवासहा चित्रपट एका वास्तविक आणि अत्यंत धाडसी कथेवर आधारित असल्याची चर्चा आहे. 'धुरंधर' हा चित्रपट मेजर मोहित शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. मेजर शर्मा यांनी २००० च्या दशकाच्या सुरुवातीला हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत 'इफ्तिखार' बनून अंडरकव्हर एजंटचं (Undercover Agent) काम केलं होतं. त्यांच्या या शौर्यगाथेवर हा चित्रपट प्रकाश टाकणार आहे. 'उरी' च्या प्रचंड यशानंतर तब्बल सहा वर्षांनी दिग्दर्शक आदित्य धर यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. थरारक अॅक्शन आणि देशप्रेम या त्यांच्या खास शैलीमुळे 'धुरंधर' कडूनही प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या ५ डिसेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला भीषण आग !
मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ आणि इतर रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या मनावर घर करणाऱ्या अभिनेता शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोरेगाव याठिकाणी कोलते पाटील व्हर्व्ह या बिल्डिंगमधील त्याच्या निवासस्थानात लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सुदैवाने, घटनेच्या वेळी घरात कोणीही नव्हते त्यामुळे या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. अग्निशमन दलाच्या तत्पर प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी केलेली मेहनत दिसून येत आहे.शिव ठाकरेच्या टीमने या प्रकरणी अधिकृत निवेदनाद्वारे माहिती दिली आहे की, “आज सकाळी मुंबईतील कोलते पाटील व्हेर्व्ह इमारतीतील शिव ठाकरे यांच्या घराला आग लागली. या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही, परंतु घरातील काही सामग्री मोठ्या प्रमाणात जळून नष्ट झाल्या आहेत. अभिनेत्याचे कुटुंब सुरक्षित आहे.”सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अद्याप शिवने स्वतः सोशल मीडियाद्वारे या घटनेबाबत कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही.मूळ अमरावतीचा असलेला शिव ठाकरे ‘एमटीव्ही रोडीज रायजिंग’, ‘बिग बॉस मराठी २’, ‘बिग बॉस १६’, ‘झलक दिखला जा ११’, ‘खतरों के खिलाड़ी १३’ या रिऍलीटी शोमधून लोकप्रिय झाला. मराठी तसेच हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात त्याने वेगळे स्थान निर्माण केले आहे. अलिकडे त्याने मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले होते, ज्याची माहिती त्याने ‘झलक दिखला जा’ शो दरम्यान चाहत्यांसोबत शेअर केली होती.
Shiv Thakare : बिग बॉस विनर ‘शिव ठाकरे’च्या घराला भीषण आग.! अभिनेता थोडक्यात बचावला, Video पाहा….
Shiv Thakare : ‘बिग बॉस मराठी’ सीजन 2 चा विनर आणि अभिनेता शिव ठाकरे अल्पावधीत प्रसिद्ध झाला. मराठीनंतर शिवला हिंदीमध्ये अमाप प्रसिद्धी मिळाली. आता तो हिंदी इंडस्ट्रीमध्येच अधिक सक्रिय असतो. काही काळापूर्वीच त्याने मुंबईत स्वतःचं घर घेतलं. पण आज 18 नोव्हेंबरला त्याच्या घराला अचानक आग लागली आहे. या आगीत शिवचे संपूर्ण घर जळून राख झाले […] The post Shiv Thakare : बिग बॉस विनर ‘शिव ठाकरे’च्या घराला भीषण आग.! अभिनेता थोडक्यात बचावला, Video पाहा…. appeared first on Dainik Prabhat .
Gill and Gambhir : शुभमन गिल आणि गाैतम गंभीर यांच्यात मतभेद? क्रीडा वर्तुळात चर्चाना उधाण
भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोठा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिलला पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (१५ नोव्हेंबर २०२५) इडन गार्डन्स मैदानावर नेक इंजुरीचा त्रास झाला, ज्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावे लागले. त्यानंतर थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले यानंतर तो पहिल्या कसोटीच्या उर्वरित भागातून बाहेर पडला. ही दुखापत इतकी जास्त गंभीर […] The post Gill and Gambhir : शुभमन गिल आणि गाैतम गंभीर यांच्यात मतभेद? क्रीडा वर्तुळात चर्चाना उधाण appeared first on Dainik Prabhat .
Share Market: 6 दिवसांनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; गुंतवणूकदारांचे ₹2.5 लाख कोटींचे नुकसान
मुंबई: भारतीय शेअर बाजारात मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी जोरदार नफावसुली (Profit Booking) पाहायला मिळाली. यामुळे सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीमध्ये (Nifty) गेल्या ६ दिवसांपासून सुरू असलेली तेजी थांबली. जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांक (Sectoral Indices) लाल निशाणाखाली बंद झाले. सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण: बीएसई सेन्सेक्स: २७७.९३ अंकांनी (०.३३%) घसरून ८४,६७३.०२ च्या पातळीवर बंद. निफ्टी: १०३.४० अंकांनी (०.४०%) घसरून २५,९१०.०५ […] The post Share Market: 6 दिवसांनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; गुंतवणूकदारांचे ₹2.5 लाख कोटींचे नुकसान appeared first on Dainik Prabhat .
Cabinet Decisions: आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील 6 महत्वाचे निर्णय जाणून घ्या..
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने आज बृहन्मुंबई उपनगरातील 20 एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्यासंबंधीचे धोरण निश्चित केले. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबई व उपनगरांत मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने आजच्या बैठकीत आयकॉनिक शहर विकासासाठी धोरणही जाहीर केले आहे. (नगर विकास विभाग) राज्यातील […] The post Cabinet Decisions: आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील 6 महत्वाचे निर्णय जाणून घ्या.. appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ३४३.३२ अंकाने व निफ्टी १०३.४० अंकांने घसरला आहे. त्यामुळे सेन्सेक्स ८४६०७.६३ अंकांने व निफ्टी ५० हा २५९१०.०५ पातळीवर स्थिरावला आहे. आज जागतिक अस्थिरतेच्या फटका शेअर बाजारात बसल्याने व आगामी आकडेवारीची प्रतिक्षा गुंतवणूकदार करत असल्याने मोठ्या प्रमाणात 'सेल ऑफ' झाले आहे.c विशेषतः आज अखेरच्या सत्रात सकाळच्या सत्रातील वाढलेल्या बँक निर्देशांकात घसरण झाल्याने व एकूणच मिड स्मॉल कॅप शेअर्समध्ये घसरण कायम राहिल्याने बाजार 'लाल' रंगात बंद झाले आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात १०५.५५ व बँक निफ्टीत ६३.४५ अंकांने घसरण झाली आहे. बाजारात आज सेल ऑफ झाल्याने मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय अस्थिरतेच्या काळात सावधगिरी बाळगल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसह व घरगुती गुंतवणूकदारांकडून मोठी गुंतवणूक आजच्या दिवशी झाल्याची शक्यता कमी आहे. एआय कंपनीच्या निकालातील अनिश्चितता व युएससह जागतिक स्तरावर आयटी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात सेल ऑफ झाले तोच फटका भारतीय बाजारालाही कायम बसला आहे. याशिवाय रिअल्टी, मेटल, हेल्थकेअर या श्रेत्रीय समभागातही बाजारात नुकसान झाले. तसेच फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का यावरही अद्याप शाश्वती नसल्याचाही फटका बाजारात बसला.निफ्टी व्यापक निर्देशांकात (Nifty Borader Indices) अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण मिड कॅप सिलेक्ट (०.५७%),मिडकॅप १०० (०.५९%), स्मॉलकॅप १०० (१.०५%), स्मॉलकॅप ५० (१.०४%), मायक्रोकॅप २५० (०.८१%) निर्देशांकात झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (१.१५%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.८३%) व, रिअल्टी (१.१९%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.७२%), मेटल (१.०७%) निर्देशांकात झाली आहे.बीएसई (Bombay Stock Exchange BSE) व एनएसई (नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE) या दोन्ही शेअर बाजारात 'बियरिश' भावना कायम राहिल्याने रॅली होण्यास अपयश आले आहे. बीएसईत ४३४१ समभागांपैकी (Stocks) १४६७ समभागात वाढ झाली असून इतर २७९३ समभागात घसरण झाली आहे. एनएसईत ३२१४ समभागापैकी ९६९ समभागात वाढ झाली असून २१६८ समभागात घसरण झाली आहे. एकूणच कमोडिटी बाजारतही अस्थिरता आज कायम राहिली आहे.अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.४२%)सह सगळ्याच निर्देशांकात घसरण झाली सर्वाधिक प्रमाणात निकेयी (३.०१%), स्ट्रेट टाईम्स (०.८६%), हेंगसेंग (१.८३%), तैवान वेटेड (२.५८%), सेट कंपोझिट (०.७९%), शांघाई कंपोझिट (०.८२%) निर्देशांकात झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ बॉम्बे बर्मा (९.७६%), जीएमआर एअरपोर्ट (६.१८%), सफायर फूडस (४.३४%), केपीआर मिल्स (३.२५%), एथर एनर्जी (३.०८%), किर्लोस्कर ऑईल (२.८६%) एम अँड एम फायनांशियल सर्विसेस (२.७७%), सुंदरम फायनान्स (२.४९%), भारती हेक्साकॉम (२.४८%), फेडरल बँक (२.८८%), अतुल (२.१५%), हुडको (२.००%) समभागात झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण टीआरआयएल (७.६३%), काईन्स टेक (५.५८%), एसकेएफ इंडिया (४.०१%) गोदावरी पॉवर (४.०२%),अलेबिंक फार्मा (३.७२%), होनसा कंज्यूमर आयनॉक्स वाईंड (४.६०%), जीएमडीसी (३.५४%), नेटवेब टेक्नॉलॉजी (३.५१%), सीएट (३.३४%), शिंडलर इलेक्ट्रॉनिक्स (३.३३%), सीसीएल प्रोडक्ट (३.१३%), कल्पतरू प्रोजेक्ट (३.०२%), कमिन्स इंडिया (२.९४%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'अलीकडील तेजीनंतर गुंतवणूकदारांनी नफा बुक केल्याने देशांतर्गत शेअर बाजार घसरला, जो कमकुवत जागतिक भावना दर्शवितो. डिसेंबरमध्ये अमेरिकन फेडच्या दर कपातीची अपेक्षा कमी झाली आहे, ज्यामुळे भावनांवर परिणाम झाला आहे. मजबूत डॉलरमुळे आयटी, धातू आणि रिअल्टी शेअर्समध्ये घसरण झाली आहे, तर खाजगी बँकांनी काही आधार दिला आहे. गुंतवणूकदार आता या आठवड्यातील अमेरिकन नोकऱ्यांच्या आकडेवारीची वाट पाहत आहेत, जे फेडच्या धोरणात्मक दृष्टिकोनाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. पुढे जाऊन, भारत-अमेरिका व्यापार करारातील प्रगती आणि देशांतर्गत उत्पन्नाचा दृष्टिकोन मजबूत केल्याने आत्मविश्वास पुनर्संचयित होण्यास मदत होऊ शकते आणि बाजारातील गतीला २६००० पातळीच्या निफ्टी५० पातळीच्या उंबरठ्यावर पोहोचण्यास मदत होऊ शकते.'आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण निफ्टी पोझिशनवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'निफ्टी १५० अंकांच्या मर्यादेतच राहिला, जो सलग दुसऱ्या दिवशी एकत्रीकरणाचा दिवस होता. दैनिक चार्टवर मंदीचा एक गुंतवणुकीचा नमुना तयार झाला आहे, जो चालू किमतीतील वाढीला विराम देण्याचे संकेत देतो. ताशी आरएसआयने मंदीच्या क्रॉसओवरमध्ये प्रवेश केला आहे आणि निर्देशांकाने ताशी वेळेच्या फ्रेमवर खालचा टॉप तयार केला आहे, जो ट्रेंडच्या सुरुवातीला कमकुवतपणा दर्शवितो. खालच्या टोकावर, समर्थन (Support) २५८५० पातळीवर ठेवले आहे; या पातळीपेक्षा कमी झाल्यास २५७०० पातळीच्या दिशेने आणखी सुधारणा होऊ शकते. दुसरीकडे, २६०००-२६०५० पातळीवर प्रतिकार दिसून येतो, ज्याच्या वर ट्रेंड उलटू शकतो.'
अजित पवारांच्या घराबाहेर अघोरी पूजा
बारामती : बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'सहयोग सोसायटी' या निवासस्थानासमोर अघोरी पूजा आणि भानामतीचा प्रकार उघडकीस आला आहे. आज सकाळी हा प्रकार समोर आला. निवडणुकीच्या तोंडावर अशी घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे 'कुणाचं तिकीट मिळविण्यासाठी किंवा कुणाचं तिकीट कापण्यासाठी तर हा प्रकार केला नाही ना?' अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. यामागे काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने हा प्रकार केला गेला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. एकूण ६,८५९ जागांसाठी मतदान होणार आहे. २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी थेट पद्धतीने निवडणूक होईल. नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत तर नगरपंचायतींसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धत आहे. नगरपालिकांमध्ये मतदारांना नगराध्यक्षपदासाठी एक तर प्रभागासाठी दोन अशी तीन मते द्यावी लागणार आहेत. नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी प्रत्येकी एक अशी दोन मते द्यावी लागतील. उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. यामुळे मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक कधी होणार हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे. निवडणुकीची ही धामधूम सुरू असतानाच अजित पवारांच्या घराबाहेर घडलेल्या प्रकारामुळे चर्चेला उधाण आले आहे.उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ अशा प्रकारे लिंबू-नारळ, हळद-कुंकू ठेवले जाणे सामान्य नसून, हा अंधश्रद्धेच्या हेतूने केलेला प्रकार असू शकतो अशी दाट शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. कालच नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. आता उमेदवारांनी केलेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे आणि याच दरम्यान हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.हा प्रकार नक्की काय आहे? आणि हे कोणी केले? याचा सखोल तपास व्हावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे आणि पोलिसांनी देखील परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी निवडणूकनगरपालिका : २४६नगरपंचायती : ४२एकूण जागा : ६,८५९अर्ज दाखल प्रक्रिया : १० ते १७ नोव्हेंबरअर्ज माघार : २१ नोव्हेंबरपर्यंतमतदान : २ डिसेंबरमतमोजणी : ३ डिसेंबरविभागनिहाय नगरपालिका व नगरपंचायतीकोकण : २७, नाशिक : ४९, पुणे : ६०, छत्रपती संभाजीनगर : ५२, अमरावती :४५,नागपूर:५५
Sunrisers Hyderabad : सनरायजर्स हैदराबादकडून कर्णधाराची घोषणा ! पॅट कमिन्स सांभाळणार संघाची धुरा
आयपीएल 19 व्या मोसमासाठी 16 डिसेंबरला मिनी ऑक्शन होणार आहे. यावर्षीदेखील हे मिनी ऑक्शन अबुधाबीत पार पडणार आहे. या अगोदर 15 नोव्हेंबरला एकूण 10 फ्रँचायजींनी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली होती. यावेळी रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये अनेक मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. तसेच काही महत्वाच्या खेळाडूंची ट्रेड विंडोद्वारे डील झाली. राजस्थान रॉयल्सने सीएसकेच्या रवींद्र […] The post Sunrisers Hyderabad : सनरायजर्स हैदराबादकडून कर्णधाराची घोषणा ! पॅट कमिन्स सांभाळणार संघाची धुरा appeared first on Dainik Prabhat .
थोड्याच वेळापूर्वी सुदीप फार्मा आयपीओसाठी प्राईज बँड घोषित 'ही'असेल प्रति शेअर किंमत
मोहित सोमण: सुदीप फार्मा लिमिटेड कंपनीने आपली प्राईज बँड (Price Band) आज जाहीर केला आहे. ५६३ ते ५९३ रूपये प्रति शेअर हा निश्चित करण्यात आला असून १ रूपयांच्या दर्शनी मूल्य (Face Value) नुसार हा विकला जाईल. ८९५ कोटींचा हा आयपीओ २१ ते २५ नोव्हेंबर कालावधीत गुंतवणूकीसाठी उपलब्ध होणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) २६ नोव्हेंबरला होणार असून २८ नोव्हेंबरला शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. किरकोळ अथवा रिटेल गुंतवणूकदारांना किमान १४७२५ रूपये (२५ शेअर) गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली असून ICICI Securities लिमिटेड कंपनी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार आहे. तर MUFG Intime India Private Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. एकूण १५०९२७५० शेअर (८९५ कोटी मूल्यांकन) बाजारात कंपनीतर्फे उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यापैकी १६०२०२४ शेअर (९५ कोटी मूल्यांकन) बाजारात फ्रेश इशू असून उर्वरित ८०० कोटी मूल्यांकन असलेले १३४९०७२६ शेअर ऑफर फॉर सेल (OFS) साठी उपलब्ध असणार आहेत. बीएसई व एनएसईवर शेअर सूचीबद्ध होणार आहे.पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) ५०% वाटा, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३५% वाटा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १५% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. सुजित भयानी, अवनी भयानी, शनिल भयानी, सुजित भयानी हिंदू अनडिवायडेड फॅमिली, रिवा रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड, भयानी फॅमिली ट्रस्ट हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर १०% वाढ झाली असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) इयर ऑन इयर बेसिसवर ४% वाढ झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला तिमाही बेसिसवर (QoQ) मार्च तिमाहीतील ५११.३३ कोटींच्या तुलनेत जून तिमाहीत कंपनीला १३०.०८ कोटीचे उत्पन्न मिळाल्याने कंपनीच्या उत्पन्नात मोठी घसरण झाली आहे. तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात जून तिमाहीतील १३८.६९ कोटींच्या तुलनेत जून तिमाहीत ३१.२७ कोटी घसरण झाली आहे. ईबीटा (EBITDA) मध्येही जून तिमाहीतील १९९.२८ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ४८.५७ कोटींवर घसरण झाली आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ६६९७.७५ कोटी रूपये आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी भांडवली खर्चासाठी (Capital Expenditure), व दैनंदिन कामकाजासाठी (General Corporate Purposes) करण्यात येणार आहे. माहितीनुसार, या नवीन इश्यूमधून मिळणारे ७५.८ कोटी रुपयांचे उत्पन्न गुजरातमधील नंदेसरी फॅसिलिटी १ येथे असलेल्या तिच्या उत्पादन लाइनसाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी व यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी भांडवली खर्चासाठी असेल असे कंपनीने आपल्या डीएचआरपीत (Draft Red Herring Prospectus DHRP) मध्ये म्हटले होते. कंपनी औषधनिर्माण, अन्न आणि पोषण उद्योगांसाठी एक्सिपियंट्स आणि विशेष घटकांची तंत्रज्ञान प्रणित उत्पादक आहे आणि जागतिक आरोग्यसेवा परिसंस्थेत (Ecosystem) योगदान देण्यासाठी कार्य करत आहे. कंपनी ऑपरेशन्समध्ये नावीन्य आणण्याच्या प्रयत्नात एन्कॅप्सुलेशन, स्प्रे ड्रायिंग, ग्रॅन्युलेशन, ट्रायच्युरेशन, लिपोसोमल तयारी आणि ब्लेंडिंग यासारख्या प्रक्रियांसाठी तिच्या अंतर्गत विकसित तंत्रज्ञानाचा वापर करते.माहितीनुसार, कंपनीने युनायटेड स्टेट्स, दक्षिण अमेरिका, युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका आणि आशिया-पॅसिफिक सारख्या प्रमुख प्रदेशांसह १०० हून अधिक देशांमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपले अस्तित्व प्रस्थापित केले आहे. ३० जून २०२५ पर्यंत ७२२४६ मेट्रिक टन वार्षिक उपलब्ध उत्पादन क्षमता असलेली ही कंपनी उत्पादन क्षमतेच्या बाबतीत शिशु पोषण, क्लिनिकल पोषण आणि अन्न आणि पेय क्षेत्रांसाठी अन्न-दर्जाच्या लोह फॉस्फेटच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे (स्रोत: एफ अँड एस अहवाल). त्याच तारखेपर्यंत तिच्या एका उत्पादन सुविधेला खनिज-आधारित घटकांच्या निर्मितीसाठी युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अँडमिनिस्ट्रेशन (यूएसएफडीए) ने मान्यता दिली आहे.कंपनीने ११०० हून अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे आणि फायझर इंक, इंटास फार्मास्युटिकल्स लिमिटेड, मॅनकाईंड फार्मा लिमिटेड, मर्क ग्रुप, अलेम्बिक फार्मास्युटिकल लिमिटेड, अरबिंदो फार्मा लिमिटेड, कॅडिला फार्मास्युटिकल लिमिटेड, आयएमसीडी एशिया लिमिटेड मायक्रो लॅब्स लिमिटेड आणि डॅनोन एसए यासारख्या प्रमुख ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध निर्माण केले आहेत असे कंपनीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले होते.
केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या
कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. या मैदानावर प्रथमच कसोटी क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोलकात्यातील निराशाजनक पराभवानंतर मालिकेत पुनरागमन करण्याचा दबाव भारतीय संघावर आहे, तर पहिल्या विजयामुळे आफ्रिकन खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे.दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू केशव महाराज याच्या सलग तीन विकेट्सवरून उद्भवलेल्या “नॉन-हॅटट्रिक” चर्चेला जोर आला आहे. कोलकाता कसोटीत महाराजने भारताचे शेवटचे दोन फलंदाज अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांना दोन सलग चेंडूंवर बाद केले. त्यामुळे गुवाहाटीत तो गोलंदाजीसाठी येताच पहिल्याच चेंडूवर जर त्यांनी विकेट घेतली, तर त्याच्या तीन चेंडूंवर तीन विकेट्स पूर्ण होतील. मात्र, हे तांत्रिकदृष्ट्या हॅटट्रिक मानले जाणार नाही, कारण नियमांनुसार एखाद्या गोलंदाजाने एकाच सामन्यात सलग तीन चेंडूंवर विकेट घेतल्यावरच हॅटट्रिक मानली जाते. पुढील सामन्यात मिळालेली तिसरी विकेट त्या नियमात बसत नाही. यापूर्वी २०२१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध महाराजने टेस्ट हॅटट्रिक नोंदवली आहे.बारसापारा स्टेडियम कसोटी क्रिकेटसाठी नवे असल्याने येथील खेळपट्टीचा प्रभाव कसा असेल याबाबत मोठी उत्सुकता आहे. विकेट फलंदाजांसाठी अनुकूल राहील की स्पिन आणि सीम दोन्ही गोलंदाजांना मदत मिळेल? याकडे सर्वांचे लक्ष असेल. पहिल्याच तासात पिच सामन्याची दिशा ठरवू शकेल. मालिकेत १–० ने मागे असलेल्या भारतासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे, तर दक्षिण आफ्रिका आघाडी कायम ठेवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. कसोटी क्रिकेटच्या गुवाहाटीतील पहिल्या अध्यायाचा निकाल काय येणार, याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत.
Bihar Election 2025 – बिहार विधानसभा निवडणुकीत मी पैसे देऊन मते खरेदी केली नाहीत. आता पैसे देऊन ज्यांनी मते खरेदी केली, त्यांना उत्तर द्यावे लागेल. आज आम्हाला आमच्या पराभवाने एक धक्का बसला आहे. पण आम्ही ही पोकळी भरून काढू. काही लोक असा विचार करत आहेत की, मी बिहार सोडून जाईन; पण हा त्यांचा गैरसमज आहे, […] The post Bihar Election 2025 : मते खरेदी करण्यासाठी वाटले पैसे.! बिहारमधील पराभवाबद्दल प्रशांत किशोर स्पष्टच बोलले appeared first on Dainik Prabhat .
कॅबिनेट बैठकीवर शिंदे गटाच्या मंत्र्यांचा ‘अघोषित बहिष्कार’; नाराजीची 6 कारणे जाणून घ्या…
मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरू असतानाच, महायुतीमधील भारतीय जनता पक्ष (BJP) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये (Shivsena) राजकीय संघर्ष पेटल्याचं चित्र आहे. नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात आली असून, अनेक ठिकाणी भाजपने शिवसेना शिंदे गटातील नेत्यांना, नगरसेवकांना आपल्या पक्षात घेत उमेदवारी दिल्याने शिंदे गट प्रचंड नाराज आहे. […] The post कॅबिनेट बैठकीवर शिंदे गटाच्या मंत्र्यांचा ‘अघोषित बहिष्कार’; नाराजीची 6 कारणे जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .
Ajit Pawar । Suraj Chavan : महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेला बिग बॅास मराठी सीझन पाचचा विजेता सूरज चव्हाण हा कोणत्या कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. बिग बॅास मराठीच्या पाचव्या सीजनचा विनर ठरल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेकडून त्याच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव करण्यात आला. या खेळात त्याने सर्वांचीच मनं जिंकली. बिग बॉसची ट्रॉफी मिळाल्यानंतर सूरजचं आयुष्य अक्षरशः बदललं. आर्थिक सुबत्ता आली, […] The post Suraj Chavan : सूरज चव्हाणचं स्वप्नातलं घर सत्यात उतरलं.! गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर अजित पवारांची खास कमेंट appeared first on Dainik Prabhat .
दर 8 मिनिटांनी एक मूल बेपत्ता; सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली : देशात दर आठ मिनिटांनी एक मूल बेपत्ता होत असल्याचा दावा करणाऱ्या एका बातमीच्या वृत्तावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी चिंता व्यक्त केली. न्यायालयाने हा एक गंभीर मुद्दा म्हटले आहे. न्या. बी. व्ही. नागरत्न आणि न्या. आर. महादेवन यांच्या खंडपीठाने असे नमूद केले की, भारतातील दत्तक प्रक्रिया गुंतागुंतीची आहे आणि केंद्र सरकारने ही प्रणाली सोपी […] The post दर 8 मिनिटांनी एक मूल बेपत्ता; सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता appeared first on Dainik Prabhat .
समाज माध्यमांतील बनावट जाहिरातींपासून सावधान; गृह मंत्रालयाने नागरिकांना दिला इशारा
नवी दिल्ली : केंद्रिय गृह मंत्रालयाने नागरिकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाढत असलेल्या बनावट जाहिरातींबद्दल सावध केले आहे. या जाहिरातींचा उपयोग फसव्या गुंतवणूक योजना, बनावट नोकरीच्या संधी आणि ऑनलाइन घोटाळे करण्यासाठी केला जात आहे. अनेकदा वापरकर्त्यांना दिशाभूल करण्यासाठी डीपफेक व्हिडिओंचा वापर केला जातो. या घोटाळ्यांमुळे देशभरातील पीडितांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यापैकी अनेकजण आकर्षक दृश्ये, […] The post समाज माध्यमांतील बनावट जाहिरातींपासून सावधान; गृह मंत्रालयाने नागरिकांना दिला इशारा appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज, १८ नोव्हेंबर रोजी, राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet Meeting) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्याच्या विकासाच्या दृष्टीने सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाचा निर्णय हा बृहन्मुंबई उपनगरातील गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकासाबाबत आहे. पुनर्विकासाचे धोरण निश्चित: मंत्रिमंडळाने वीस एकर (२० एकर) किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या (MHADA) गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्यासंबंधीचे धोरण निश्चित केले आहे. या धोरणामुळे मुंबईतील अनेक जुन्या आणि मोठ्या म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे मुंबई उपनगरातील नागरिकांना आधुनिक आणि सुरक्षित घरे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, ज्यामुळे मुंबईच्या विकासाला अधिक गती मिळेल, असे मानले जात आहे.https://prahaar.in/2025/11/18/dumper-kills-another-20-year-old-girl-in-hinjewadi-absconding-dumper-driver-arrested/आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले महत्वाचे निर्णय१. नगर विकास आणि आयकॉनिक शहरांचे धोरणनगर विकास विभागाने राज्यातील सिडकोसह विविध प्राधिकरणांकडील जमिनी आणि भूखंडांचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य दिले आहे. या बैठकीत संकल्पना-आधारित (Concept-Based) आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर करण्यात आले. यानुसार, सिडकोसह अन्य प्राधिकरणांना संबंधित संकल्पनांवर आधारित एकात्मिक वसाहती निर्माण करण्याचे अधिकार मिळणार आहेत. या धोरणातून निवासी एकात्मिक वसाहत किंवा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रांची (International Business Hubs) उभारणी होणार असून, प्राधिकरणांकडील लॅँड बँकेचा प्रभावी वापर करणे हा यामागचा उद्देश आहे.२. गृहनिर्माण आणि परवडणारी घरेगृहनिर्माण विभागाने मुंबईकरांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. बृहन्मुंबई उपनगरातील वीस एकर (२० एकर) किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या (MHADA) गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणामुळे मुंबई शहर व उपनगर क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.३. मदत व पुनर्वसन विभागाला बळमदत व पुनर्वसन विभागाने भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेची प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी नवीन पदांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 'भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३' मधील कलम ६४ अन्वये दाखल असलेल्या प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होण्यास मदत होणार आहे.४. कौशल्य विकास आणि नोकरीची संधीराज्यातील युवकांसाठी कौशल्य आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता एकूण ३३९ पदांची निर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये शिक्षकांची २३२ आणि शिक्षकेतर १०७ पदांचा समावेश आहे, ज्यामुळे या विद्यापीठाला अधिक बळकटी मिळणार आहे.५. महिला व बाल विकास विभागाकडून सामाजिक सुधारणामहिला व बाल विकास विभागाने एक महत्त्वपूर्ण सामाजिक सुधारणा केली आहे. महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायद्यातील काही मानहानीकारक शब्द वगळण्यास मान्यता देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधि व न्याय विभागाने केलेल्या शिफारशींनुसार, 'महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम, १९५९' यातील कलम ९ व कलम २६ मधील 'महारोगाने पिडीत', 'कुष्टरोगी', 'कुष्ठालये' असे शब्द वगळले जाणार आहेत.६. विधि व न्याय विभागातील सुधारणायाशिवाय, विधि व न्याय विभागाने महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळात मान्यता दिली आहे.
पाकिस्तानी रॅपरने फडकवला भारताचा झेंडा, टीका होताच म्हणाला ‘पुन्हा करेन…’
Pakistani Rapper Talha Anjum | पाकिस्तानी रॅपर तल्हा अंजुमने लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान भारतीय तिरंगा फडकावला आहे. इव्हेंटमध्ये सिंगर गर्दीतून एका फॅनकडून तिरंगा घेऊन डोक्यावर फडकावताना दिसला. नंतर त्याने झेंडा खांद्यावर ठेवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तिरंगा फडकावतानाचा तल्हा अंजुमचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पाकिस्तानमध्ये त्याला ट्रोल केले जात आहे. तल्हा अंजुम यांनी […] The post पाकिस्तानी रॅपरने फडकवला भारताचा झेंडा, टीका होताच म्हणाला ‘पुन्हा करेन…’ appeared first on Dainik Prabhat .
Delhi Blast Case। जैश-ए-मोहम्मदच्या आत्महत्येच्या मॉड्यूलमध्ये सहभागी असलेल्या अटक केलेल्या डॉक्टरांच्या चौकशीतून आणि त्यांच्या मोबाईल फोनमधून तपास यंत्रणांना महत्त्वाचे आणि धक्कादायक पुरावे मिळाले आहेत. आरोपींच्या मोबाईल फोनच्या फॉरेन्सिक तपासणीत सिग्नल अॅपवर एक गट असल्याचे उघड झाले, ज्याचा प्रशासक फरार मॉड्यूलचा नेता डॉ. मुझफ्फर होता आणि त्यात डॉ. उमर, डॉ. मुझम्मिल, डॉ. आदिल आणि डॉ. शाहीन […] The post आरोपी डॉक्टरांनी चौकशीदरम्यान केले महत्त्वाचे खुलासे ; अॅपचा वापर अन् I-20 कारसंबधी दिली महत्वाची माहिती appeared first on Dainik Prabhat .
चार वर्षांनी रणवीरचं जोरदार कमबॅक! अंगावर शहारे आणणारा ‘धुरंधर’चा ट्रेलर आऊट
Dhurandhar Movie Trailer : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटाची जोरदार चर्चा केली जात होती. अखेर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रॅाकी और रानी की प्रेमकहाणी या चित्रपटानंतर रणवीर तब्बल चार वर्षानंतर पुन्हा एकदा धुरंधर चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर रणवीरच्या […] The post चार वर्षांनी रणवीरचं जोरदार कमबॅक! अंगावर शहारे आणणारा ‘धुरंधर’चा ट्रेलर आऊट appeared first on Dainik Prabhat .
Vladimir Putin visit to India। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन २३ व्या वार्षिक भारत-रशिया शिखर परिषदेसाठी भारताला भेट देणार आहेत. त्यांच्या भेटीच्या काही आठवड्यांपूर्वी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि त्यांचे रशियन समकक्ष सर्गेई लावरोव्ह यांनी शिखर परिषदेच्या तपशीलांवर चर्चा करण्यासाठी मॉस्कोमध्ये भेट घेतली. या दरम्यान, संरक्षण आणि गतिशीलतेसह अनेक करारांना अंतिम स्वरूप देण्यात आले, ज्यावर भेटीदरम्यान […] The post पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा? ; परराष्ट्र मंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती appeared first on Dainik Prabhat .
टीव्ही अभिनेत्री रुपल त्यागीने केला साखरपुडा; शेअर केले खास फोटो
Roopal Tyagi | अभिनेत्री रुपल त्यागीला ‘सपने सुहाने लडकपन के’ या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. यात तिने गुंजन नावाच्या भूमिका साकारली होती. मात्र यानंतर ती लाईमलाईटमध्ये दूर राहिली, याच दरम्यान आता रुपल तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. रुपल हिने गुपचूप साखरपुडा उरकला असून याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रुपल हिने बॉयफ्रेंड […] The post टीव्ही अभिनेत्री रुपल त्यागीने केला साखरपुडा; शेअर केले खास फोटो appeared first on Dainik Prabhat .
UNited Nations। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेबद्दल संयुक्त राष्ट्रांनी दु:ख व्यक्त केले आहे. परंतु, संयुक्त राष्ट्रांनी,” बांगलादेशी न्यायालयाचा निर्णय पीडितांसाठी एक महत्त्वाचा क्षण आहे” असे देखील म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी काल माध्यमाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी,” कोणत्याही परिस्थितीत मृत्युदंडाच्या वापराला आम्ही विरोध […] The post “आम्ही शेख हसीनाच्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध…” ; बांगलादेश न्यायालयाच्या निर्णयावर संयुक्त राष्ट्रांनी काय म्हटले? वाचा appeared first on Dainik Prabhat .
पाचोरा : पाचोरा आणि चाळीसगाव नगरपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. जळगाव जिल्ह्यातील दोन प्रमुख तालुक्यांमध्ये ही निवडणूक होत असताना, पाचोऱ्यामध्ये मात्र भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या युतीमधील घटक पक्षांनी एकमेकांविरुद्ध अर्ज दाखल करून थेट लढत जाहीर केली आहे. यामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. पाचोऱ्यात युती तोडणारा संघर्ष […] The post जळगाव जिल्ह्यात युतीचा तिढा! पाचोऱ्यात भाजप-शिंदे गटाची थेट लढत; दोन्ही पक्षांकडून रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: गेल्या वर्षभरापासून एजीआर (Adjusted Gross Revenue AGR) विवादात फसलेल्या वोडाफोन आयडिया लिमिटेड (Vodafone Idea VI Limited) शेअरने आपले जबराट पुनरागमन बाजारात केले आहे. काल वीआयने आपला तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीचा शेअर १ वर्षाच्या अप्पर सर्किटवर म्हणजेच ११.०८ रूपयांवर पोहोचला होता. आज मात्र १% पातळीवर बाजारात घसरण झाली आहे. दुपारी १.१५ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ०.८२% घसरण होत शेअर १०.८४ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत होता. मात्र गेल्या आठवड्यात शेअरने चांगला परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. गेल्या तीन दिवसात कंपनीचा शेअर ११% पेक्षा अधिक पातळीवर उसळला आहे. सर्वोच्च न्यायालयाने वीआयला सरकारकडून २०१६-२०१७ पासून प्रलंबित असलेला एजीआरवर तोडगा (Reconcile) काढण्याचे आदेश दिले होते. यामध्ये कंपनीला मोठा दिलासा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. याखेरीज काल तिमाही निकालाप्रमाणे कंपनीच्या निव्वळ तोट्यातही घसरण झाल्याने कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. या दोन कारणांमुळे गेल्या आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.आज नका बुकिंग व बाजारातील अस्थिरतेमुळे किरकोळ घसरण झाली असली तरी कंपनीच्या शेअरने गेल्या पाच दिवसांत ५.४५%, महिनाभरात २१.३६%, व सहा महिन्यांत ६१.४६% परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. कंपनीचा सबस्क्राईबर बेस ठीक असला तरी कंपनीवर गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कर्जाचे ओझे होते. दुरसंचार विभागाने (Department of Telecommunications) कडून प्रलंबित एजीआर कंपनीकडे २०१६-२०१७ कालावधीतील मागितला होता. वीआयएलने दूरसंचार विभागाच्या ५६०६ कोटींच्या मागणीविरुद्ध ऑक्टोबर महिन्यात नवीन याचिका दाखल केली होती. सध्या कंपनीचे ७८५०० कोटींची एजीआर थकबाकी आहे.२७ ऑक्टोबर आणि ३ नोव्हेंबर रोजी देण्यात आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकारला आर्थिक वर्ष २०१७ पर्यंत व्याज आणि दंडासह सर्व देणींचे व्यापक पुनर्मूल्यांकन आणि समेट करण्याची परवानगी मिळाली होती. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या ऑपरेटरसाठी हा एक मोठा दिलासा मिळाला होता. असे असताना कंपनीचा आर्थिक निकालातही सुधारणा झाली होती. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या निव्वळ तोट्यात सुधारणा झाली होती. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ७१७५.९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ५५२४.२ कोटींचा निव्वळ तोटा (Net Loss) कंपनीला झाला आहे. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) मध्ये गेल्या वर्षीच्या १०९३२.२ कोटींच्या तुलनेत २.४% वाढ झाल्याने महसूल १११९४.७ कोटीवर पोहोचला होता. कंपनीच्या एआरपीयुतही (Average Revenue per User ARPU) मध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १६५ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १८० कोटींवर एआरपीयु पोहोचला आहे.या तिमाहीत महसूल १११.९ अब्ज रुपये होता जो इयर ऑन इयर बेसिसवर २.४% होता. अहवालानुसार, तिमाहीसाठी ईबीटा ४६.९ अब्ज रुपये होता. IndAS ११६ चा परिणाम वगळता रोख ईबीटा (EBITDA) अथवा करपूर्व नफा) २२.५ अब्ज रुपये होता. आर्थिक वर्ष २५ च्या दुसऱ्या तिमाहीत महसूल २३.२ अब्ज रुपये होता. तिमाहीसाठी आणि आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीसाठी कॅपेक्स अनुक्रमे १७.५ अब्ज रुपये आणि ४२.० अब्ज रुपये होता असे कंपनीने म्हटले आहे.उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने ३० सप्टेंबर २०२५ रोजी बँकांकडून कर्ज १५.३ अब्ज रुपये होते आणि रोख आणि बँक शिल्लक ३०.८ अब्ज रुपये होती. या वर्षी मार्चमध्ये Vi 5G सेवा आणि सहा महिन्यांच्या कालावधीत ५G स्पेक्ट्रम असलेल्या सर्व १७ प्राधान्य मंडळांमध्ये विस्तारित केले गेले आहे. त्यामुळे हे विभाग कंपनीच्या महसुलात सुमारे ९९% इतकी मोलाची भूमिका बजावतात. सध्या व्हीआय ५जी सेवा २९ शहरांमध्ये उपलब्ध आहेत आणि ग्राहकांच्या मागणी आणि ५जी हँडसेटच्या वापरावर आधारित आम्ही अधिक शहरांमध्ये विस्तार करत राहू.'५जी रोलआउटसोबतच, आम्ही नवीन ४जी साइट्स जोडून आणि हाय स्पीड ब्रॉडबँड नेटवर्कसाठी आमचे कोर आणि ट्रान्समिशन नेटवर्क अपग्रेड करून आमच्या हाय-स्पीड ब्रॉडबँड नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी गुंतवणूक करत आहोत. मार्च २०२४ मध्ये आमचे ४जी लोकसंख्येचे कव्हरेज ८४% पेक्षा जास्त झाले आहे जे मार्च २०२४ मध्ये ७७% होते. आमची ४जी डेटा क्षमता ३८% पेक्षा जास्त वाढली आहे, ज्यामुळे मार्च २०२४ च्या तुलनेत सप्टेंबर २०२५ मध्ये ४जी स्पीडमध्ये १७% सुधारणा झाली आहे. आमच्या नियोजित गुंतवणुकीसह, ४जी लोकसंख्येचे कव्हरेज लोकसंख्येच्या सुमारे ९०% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.' असे कंपनीने म्हटले होते.व्होडाफोन आयडिया लिमिटेडचे सीईओ अभिजित किशोर म्हणाले आहेत की,' ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव देण्याच्या आमच्या धोरणात्मक हेतूकडे आम्ही सातत्याने प्रगती करत आहोत. आम्ही आमचे ४जी कव्हरेज ८४% पेक्षा जास्त लोकसंख्येपर्यंत वाढवले आणि आमच्याकडे ५जी स्पेक्ट्रम असलेल्या सर्व १७ मंडळांमध्ये ५जी रोलआउट पूर्ण केले.डेटा व्हॉल्यूममध्ये सुमारे २१% वाढ आमच्या भिन्न प्रीपेड आणि पोस्टपेड ऑफरिंगद्वारे ग्राहकांना टिकवून ठेवण्याची आणि त्यांना जोडण्याची आमची क्षमता दर्शवते. आम्ही आमचे ४जी कव्हरेज ९०% लोकसंख्येपर्यंत वाढवण्यावर आणि वाढत्या ५जी हँडसेट दत्तक घेऊन भौगोलिक क्षेत्रात आमचा ५जी फूटप्रिंट वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आमच्या ५००-५५० अब्ज रुपयांच्या व्यापक भांडवली खर्चाच्या योजनांना पाठिंबा देण्यासाठी कर्ज वित्तपुरवठा सुरक्षित करण्यासाठी आम्ही कर्जदारांशी संपर्कात आहोत. आम्ही पुढे जात असताना, उत्कृष्ट ग्राहकांना अनुभव देण्यासाठी आमचा गुंतवणूक प्रवास सुरूच आहे.' असे म्हटले होते.सप्टेंबरमध्ये, वोडाफोन आयडियाने दूरसंचार विभागाने उभारलेल्या ९४५० कोटी रुपयांच्या एजीआर मागणीवर दंड आणि व्याज माफ करण्याची मागणी केली होती त्यातील बराचसा २०१७ सालच्या आधीच्या कालावधीशी संबंधित आहे जो २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आधीच निकाली काढला होता. या रकमेपैकी २७७४ कोटी रुपये व्होडाफोन आयडियाच्या विलीनीकरणानंतर थकबाकीशी संबंधित आहेत तर ५६७५ कोटी रुपये व्होडाफोन समूहाच्या विलीनीकरणापूर्वीच्या देणींशी संबंधित आहे असा युक्तिवाद कंपनीने केला होता. मात्र एप्रिलमध्ये थकित थकबाकीतील आधारावर भारत सरकारने २२% भागभांडवल कंपनीचे खरेदी केले होते. त्यानंतर आणखी भागभांडवल खरेदी सरकारने केले. आता एकूण ४९% भागभांडवल (Stake) सरकारचा आहे. पण सरकारने आम्ही अधिग्रहण करणार नसल्याच यावेळी स्पष्ट केले होते.मात्र व्होडाफोन आयडियाने ३६९५० कोटींच्या थकीत देणी इक्विटीमध्ये रूपांतरित केली गेली जी सरकारकडे ट्रान्स्फर झाली होती. मूळ प्रवर्तक, व्होडाफोन पीएलसी आणि आदित्य बिर्ला ग्रुप यांचे कंपनीवरील ऑपरेशनल नियंत्रण कायम राहणार असल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले होते. वोडाफोन यूकेचे भागभांडवल सुमारे २४.४% वरून अंदाजे १६.१% कमी झाले आहे आणि आदित्य बिर्ला यांची मालकी १४% ९.४% कमी झाले आहेमात्र कंपनीच्या उत्पन्नात सुधारणा होत असताना तोट्यातही घसरण होत आहे. प्रति ग्राहक महसूलातही वाढ होत असताना सरकारच्या नव्या दिलासा दिल्यानंतर कंपनीच्या मजबूत फंडामेंटलमुळे यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
रहस्य, अॅक्शन आणि भावनांचा संगम, ‘आफ्टर ओ.एल.सी’चा ट्रेलर प्रदर्शित
मुंबई: दुनियेच्या आड दडलेलं एक गूढ लवकरच उलगडणार, अशी भावना ‘आफ्टर ओ.एल.सी’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहून वाटू लागले आहे. बरेच दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘आफ्टर ओ.एल.सी’ चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. मैत्री, विश्वासघात, आणि लपलेल्या रहस्यांच्या गुंत्यातून बाहेर पडताना हा चित्रपट कोणतं रहस्य मागे सोडणार याची उत्कंठा ट्रेलरवरून स्पष्ट होते. हा चित्रपट कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीला जोडणारा धागा आहे. कारण यातील निर्माते आणि काही कलाकार हे कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीतील दिग्गज आहेत.दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र दिग्दर्शित ‘आफ्टर ओ.एल.सी’ हा चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके, प्रसाद खांडेकर, अश्विनी चवरे, शलाका पवार, रुक्मिणी सुतार या कलाकारांची फौज पाहायला मिळते. या चित्रपटाची कथा नक्षलवादी पार्श्वभूमीवर आधारित आहे. ट्रेलरमधील दृश्य पाहता चित्रपटातील लोकेशन्स नक्षलवादी भागांत शूट झाल्याचे समजते. ट्रेलरमधील लक्षणीय बाब म्हणजे संगीत. ‘आफ्टर ओ.एल.सी’मध्ये मराठी गीतकार क्षितिज पटवर्धन आणि मंदार चोळकर यांनी गीतकार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तर गायक अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, रोहित राऊत, आनंदी जोशी, आर्या आंबेकर, अभय जोधपुरकर यांनी पार्श्वगायनाची धुरा सांभाळली आहे.https://prahaar.in/2025/11/18/un-security-council-approves-trumps-gaza-peace-plan/कन्नड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी हा चित्रपट मराठी आणि कन्नड भाषेत दिग्दर्शित केला आहे. तर या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा दिपक राणे, विजयकुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी सांभाळली असून ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ अंतर्गत निर्मिती केली आहे. येत्या २८ नोव्हेंबरला ‘आफ्टर ओ.एल.सी’ हा सिनेमा जगभरात मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.
विरोधकांच्या टीकेनंतर भाजपचा यू-टर्न! पक्षप्रवेशाला स्थगिती मिळताच काशिनाथ चौधरींना अश्रु अनावर
Kashinath Chaudhari Palghar | पालघर साधू हत्याकांड प्रकरणात भाजपने ज्या नेत्यावर आरोप केले होते, त्यालाच दोन दिवसपूर्वी पक्षात प्रवेश दिला. या प्रकरणात भाजपने त्यावेळी काशिनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले होते. यावरून विरोधकांनी भाजपवर टीका करण्यास सुरूवात केल्यानांतर भाजपने त्यांच्या पक्ष प्रवेशाला स्थगिती दिली. काशिनाथ चौधरींना पक्षात प्रवेश देऊन 24 तासांत भाजपने आता यू-टर्न घेतला आहे. […] The post विरोधकांच्या टीकेनंतर भाजपचा यू-टर्न! पक्षप्रवेशाला स्थगिती मिळताच काशिनाथ चौधरींना अश्रु अनावर appeared first on Dainik Prabhat .
‘आफ्टर ओ.एल.सी’चा अॅक्शनपॅक्ट ट्रेलर प्रदर्शित; शिवानी सुर्वेच्या लूकने वेधले लक्ष
After OLC : बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘आफ्टर ओ.एल.सी’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी चित्रपटातील कलाकार आणि इतर टीमही उपस्थित होती. रहस्यमय थरार, एक्शन पॅक्ड सीन्सने भरलेला या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्कंठा प्रचंड वाढवलेली आहे. हा चित्रपट कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीला जोडणारा […] The post ‘आफ्टर ओ.एल.सी’चा अॅक्शनपॅक्ट ट्रेलर प्रदर्शित; शिवानी सुर्वेच्या लूकने वेधले लक्ष appeared first on Dainik Prabhat .
अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पासाठी 'ॲक्शन'मोडवर
प्रतिनिधी:अखेर फेब्रुवारी महिन्यात महत्वपूर्ण आर्थिक वर्ष २०२६-२७ अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली अर्थतज्ज्ञ व भांडवल बाजारतज्ज्ञ, इंडस्ट्री व कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. अंतिम अर्थसंकल्प निर्माण करण्यापूर्वी वित्त मंत्रालय संबंधित जाणकारांचे मत जाणून घेत असते. यावेळी या बैठक, व चर्चासत्राला सुरूवात झाली असू विषयीची माहिती आपल्या एक्स पोस्टमध्ये वित्त मंत्रालयाने दिली आहे.आपल्या एक्स पोस्टमध्ये वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की,' केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ वर्षाच्या संदर्भात भांडवली बाजारातील भागधारकांसोबत चौथ्या पूर्व-अर्थसंकल्पीय सल्लामसलतीचे अध्यक्षस्थान भूषवले आहे.' असे म्हटले. केंद्रीय वित्तीय राज्यमंत्री पंकज चौधरी, भारताचे आर्थिक सल्लागार नागेश्वरन व इतर तज्ज्ञ देखील या बैठकीत उपस्थित होते.या बैठकीत गरजा, मागणी, अपेक्षा, आर्थिक नियोजन अशा विविध विषयांवर चर्चा झाली होती. यांनी वित्त मंत्रालयाला या निमित्ताने आपली सल्लामसलत केली आहे. उपलब्ध माहितीनुसार यंदा बँकिंग,बीएफएसआय (Banking Financial Services and Insurance), आयटी या क्षेत्रात विशेष महत्व दिले जाणार आहे. तसेच उत्पादन, मूलभूत सुविधा, स्टार्टअप या क्षेत्रातील सुधारणांनाही महत्व दिले जाईल अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. २० नोव्हेंबरला हॉस्पिटालिटी, पर्यटन क्षेत्रातील मान्यवर वित्तमंत्र्यांना भेटणार असून २१ तारखेला पायाभूत सुविधा (Infrastructure),ऊर्जा, नागरी विकास इत्यादी विषयांवर संबंधित क्षेत्रातील नेते मान्यवर भेटणार आहेत. अंतिम बैठक २६ तारखेला होणार असून यावेळी विभागाचे अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील प्रणेते वित्तमंत्र्यांना भेटणार आहेत. यापूर्वी त्यांनी एमएसएमई क्षेत्रातील उद्योजकांची भेट घेतली होती.

22 C