SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

30    C
... ...View News by News Source

आम्ही लाखो मशिदी उभारू, MIM चे असदुद्दीन ओवैसी फुत्कारले

नवी दिल्ली : जोपर्यंत हे जग आहे, जगाचं अस्तित्व आहे. तोपर्यंत मुसलमान राहणार. आम्ही लढत राहू. आम्ही लाखो मशिदी उभारू; असे एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी म्हणाले. त्यांनी जाहीर भाषणातून फुत्कारत निर्वाणीचा इशारा दिला. ओवैसींच्या या वक्तव्यामुळे पुन्हा धार्मिक तणाव निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. मुसलमानांचे दमन कराल तर देश कमकुवत होईल, असा धोक्याचा इशारा त्यांनी जाहीर भाषणातून दिला. मुसलमानांकडे द्वेषाने बघाल आणि त्यांच्यावर अन्याय कराल तर देशाचा विकास कसा होईल ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.मुसलमानांना दुय्यम दर्जाचे नागरिक करण्याचा विचार काही जण करत आहेत. त्यांनी हा विचार डोक्यातून काढून टाकावा. तुमच्या पिढ्या संपून जातील. पण आम्ही संपणार नाही. जोपर्यंत हे जग आहे, जगाचं अस्तित्व आहे. तोपर्यंत मुसलमान राहणार. आम्ही लढत राहू. आम्ही लाखो मशिदी उभारू; असे एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुसलमानांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत चिंता व्यक्त केली. मुसलमानांवर अन्याय कराल तर परिणाम भोगाल, अशा स्वरुपाचा इशाराही त्यांनी दिला.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 8:30 pm

भाजपचा मोठा निर्णय; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तरुणांना प्राधान्य

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला गती दिली आहे. आता भाजपने देखील एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून, निवडणुकीची समीकरणे बदलण्याची चिन्हे यामुळे दिसू लागली आहेत.मुंबईतील एका कार्यक्रमात तरुणांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप ३५ वर्षांखालील तरुणांना कमीत कमी ४० टक्के तिकिटे देणार आहे.” युवाशक्तीवरचा विश्वास आणि पक्षातील नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या दिशेने हा मोठा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भाजपच्या या भूमिकेमुळे सध्याच्या अनेक पदाधिकाऱ्यांची तिकीट कापले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद ते पंचायत समिती या सर्व पातळ्यांवरील निवडणुकांमध्ये हा नियम लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेला भाजपचा हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार असून, युवा नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी केलेला हा प्रयत्न किती यशस्वी ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी निवडणूकमहाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. एकूण ६,८५९ जागांसाठी मतदान होणार आहे. २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी थेट पद्धतीने निवडणूक होईल. नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत तर नगरपंचायतींसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धत आहे. नगरपालिकांमध्ये मतदारांना नगराध्यक्षपदासाठी एक तर प्रभागासाठी दोन अशी तीन मते द्यावी लागणार आहेत. नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी प्रत्येकी एक अशी दोन मते द्यावी लागतील. उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. यामुळे मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक कधी होणार हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.नगरपालिका : २४६नगरपंचायती : ४२एकूण जागा : ६,८५९अर्ज दाखल प्रक्रिया : १० ते १७ नोव्हेंबरअर्ज माघार : २१ नोव्हेंबरपर्यंतमतदान : २ डिसेंबरमतमोजणी : ३ डिसेंबरविभागनिहाय नगरपालिका व नगरपंचायतीकोकण : २७, नाशिक : ४९, पुणे : ६०, छत्रपती संभाजीनगर : ५२, अमरावती : ४५, नागपूर : ५५

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 8:10 pm

१२ वर्षांचा दुरावा संपला; दानवे–लोणीकर पुन्हा एकत्र, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

जालना : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम वाढत असताना जालना जिल्ह्यातील एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांनी तब्बल १२ वर्षे असलेला अबोला संपवत पुन्हा हातमिळवणी केल्याचे चित्र दिसले. गेली चार दशके पक्षात एकत्र काम करणाऱ्या या दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळापासून मतभेद होते. मात्र नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांनीही एकत्र येऊन प्रचाराला वेग दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.एका कार्यक्रमात बोलताना माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, “आमचा वाद हा वैयक्तिक नव्हता. कोणत्या कार्यकर्त्याला संधी द्यायची, कोणाला पद मिळावे यावरून मतभेद झाले होते. विरोधकांनी त्याचा फायदा घेतला, पण आता ते सर्व संपले आहे.”ते पुढे म्हणाले, “भाजपला आम्ही उभं केलं, त्याला बळ दिलं. आता पुन्हा एकत्र येण्यात काहीही आश्चर्य नाही. पुढील निर्णय आम्ही दोघे मिळून घेणार आहोत. हा वाद कार्यकर्त्यांसाठी सुरू झाला आणि आता त्यांच्याच हितासाठी संपवला आहे.”दानवे यांनी विरोधकांवर टोल लगावत म्हटले, “आम्ही एकत्र आल्याने काहींचा तोल जाईल. जुळू इच्छिणारे जुळतीलच. ही विचारांची लढाई आहे.”ते पुढे म्हणाले की, ज्या काळात भाजप जिल्ह्यात चौथ्या क्रमांकावर होता, त्या काळात दोघांनीही खांद्याला खांदा लावून काम केले. “आज पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे आणि ही निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आम्ही एकत्र आलो आहोत, आता कार्यकर्त्यांनीही एकत्र यावं,” असे आवाहन त्यांनी केले.राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनीही एकजुटीचा संदेश दिला. ते म्हणाले, “जिल्ह्यात भाजप अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे घडवून आणली आहेत. आता पुढील विकास आणि पक्षाच्या बळकटीसाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत.”

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 8:10 pm

Dharmendra Passes Away : ‘माझे १० किलो रक्त कमी झाले…’, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट

Dharmendra passes away cricketers pay emotional tributes : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात आणि विशेषतः चित्रपटसृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे. भारतीय क्रिकेट जगतानेही या महान कलाकाराच्या जाण्यावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांसारख्या अनेक […] The post Dharmendra Passes Away : ‘माझे १० किलो रक्त कमी झाले…’, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 8:00 pm

Ajanta–Ellora : “अजिंठा-वेरूळ हे तत्वज्ञान, सर्जनशीलतेचे गतिमान भारतीय भांडार”–युनेस्को

AIKYAM 2025 | Ajanta–Ellora – अजिंठा आणि वेरूळ हे जागतिक वारसा स्थळे तत्वज्ञान, सर्जनशीलता आणि सामायिक मानवी प्रयत्नांचे गतिमान भारतीय भांडार आहेत, जे त्यांच्या वारशाने मानवजात एकत्रितपणे काय साध्य करू शकते याची सर्वांना आठवण करून देतात, असे युनेस्कोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय ‘ऐक्यम २०२५’ या […] The post Ajanta–Ellora : “अजिंठा-वेरूळ हे तत्वज्ञान, सर्जनशीलतेचे गतिमान भारतीय भांडार” – युनेस्को appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 7:34 pm

गेल्या ३ वर्षातील अपघात, सिलेंडर आणि रासायनिक स्फोटांची पुन्हा चौकशी होणार?

मुंबई : दिल्लीतील कार स्फोटाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र पोलीस गेल्या तीन वर्षात झालेल्या मोठ्या अपघात, आगी, स्फोट, रसायन आणि सिलेंडर स्फोटांची पुन्हा चौकशी करणार आहेत. जे अपघात म्हणून दाखवले गेले त्या घटनांमध्ये राष्ट्रविरोधी किंवा दहशतवादी घटकांचा सहभाग होता का, हे पोलीस तपासणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी सर्व शहरांच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस अधीक्षकांना हे निर्देश […] The post गेल्या ३ वर्षातील अपघात, सिलेंडर आणि रासायनिक स्फोटांची पुन्हा चौकशी होणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 7:31 pm

मोदी, फडणवीसांच्या आहवानाचा स्थानिक नेत्यांना विसर; भाजपच्या नेत्याकडून पक्षाला घरचा आहेर

अमरावती : घराणेशाहीच्या विरोधात सातत्याने भूमिका व्यक्त करणाऱ्या भाजपने नगरपालिकांच्या निवडणुकीत नेत्यांच्या सग्यासोयऱ्यांची उमेदवार म्हणून निवड केल्याने त्यावर पक्षातच तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपमधील ज्येष्ठ नेते अरविंद नळकांडे यांनी उघडपणे याविषयी नाराजी व्यक्त करीत भाजपच्या नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. अरविंद नळकांडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही राजकीय घराण्याशी संबंध नसलेल्या आणि केवळ […] The post मोदी, फडणवीसांच्या आहवानाचा स्थानिक नेत्यांना विसर; भाजपच्या नेत्याकडून पक्षाला घरचा आहेर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 7:08 pm

Ayushman Bharat: आयुष्मान भारत योजनेचं ‘कव्हरेज’वाढणार; 5 लाखांऐवजी आता ’10 लाखांपर्यंत’मोफत उपचार?

Ayushman Bharat: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत-PMJAY (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना) अंतर्गत आरोग्य विम्याच्या रकमेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या या योजनेत लाभार्थी कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांची सुविधा मिळते, मात्र आता सरकार ही मर्यादा वाढवून १० लाख रुपये करण्याची तयारी करत आहे. या वाढीव कव्हरेजमुळे देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांना वाढत्या आरोग्य […] The post Ayushman Bharat: आयुष्मान भारत योजनेचं ‘कव्हरेज’ वाढणार; 5 लाखांऐवजी आता ’10 लाखांपर्यंत’ मोफत उपचार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 6:59 pm

IND vs SA : यशस्वी जैस्वालचा मोठा पराक्रम! सचिननंतर २१ व्या शतकात ‘ही’कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

IND vs SA Yashasvi Jaiswal equals Sachin Tendulkar’s record : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ मोठ्या पराभवाच्या छायेखाली आहे. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर, दुसऱ्या सामन्यातही पाहुण्या संघाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. परिणामी, भारतीय संघ २५ वर्षांनंतर प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावण्याच्या मार्गावर आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांकडून अत्यंत निराशाजनक कामगिरी […] The post IND vs SA : यशस्वी जैस्वालचा मोठा पराक्रम! सचिननंतर २१ व्या शतकात ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 6:53 pm

महाराष्ट्र भवन कामात राजकीय दबाव? भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील महाराष्ट्र भवन भुखंडावरील काम धिम्या गतीने सुरू असल्याचे आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाकडून प्रतिकात्मक पिंडदान आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी महाराष्ट्र भवनाचे काम मिळवण्यासाठी ठराविक राजकीय नेते दबाव तंत्र वापरत असल्याचा आरोप भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून करण्यात आला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले […] The post महाराष्ट्र भवन कामात राजकीय दबाव? भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 6:35 pm

Sachin Pilgaonkar : “मला संधी मिळाली यासाठी मी…”; धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सचिन पिळगावकर म्हणाले, पोस्ट चर्चेत !

Sachin Pilgaonkar | Dharmendra : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. 89 वर्षांच्या या व्यक्तीने मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि रुग्णालयातही दाखल होते त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. तेव्हापासून ते त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी वेळ घालवत होते. मात्र, सोमवारी (दि. […] The post Sachin Pilgaonkar : “मला संधी मिळाली यासाठी मी…”; धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सचिन पिळगावकर म्हणाले, पोस्ट चर्चेत ! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 6:22 pm

कामाची बातमी! प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची नवीन यादी जाहीर, PMAY-G मध्ये तुमचे नाव कसे तपासायचे जाणून घ्या…

PM Gramin Awas Yojana 2025: केंद्र सरकारने ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांसाठी चालवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत सन २०२५ ची अद्ययावत लाभार्थी यादी (लाभार्थ्यांची नवीन यादी) अधिकृतपणे जाहीर केली आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना, जी पूर्वी इंदिरा आवास योजना म्हणून ओळखली जात होती, तिचा मुख्य उद्देश […] The post कामाची बातमी! प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची नवीन यादी जाहीर, PMAY-G मध्ये तुमचे नाव कसे तपासायचे जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 6:14 pm

Bharat Gogawale : विधानसभेत ज्याने चुकीचं काम केलंय, त्यांचा सत्यानाश होवो; भरत गोगावलेंनी केला नवस

Bharat Gogawale : रायगड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात आता देवालाही साक्षी ठेवली जातेय. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री व महायुतीचे बलाढ्य नेते भरत गोगावले यांनी श्रीवर्धन येथे थेट हरिहरेश्वर देवाच्या साक्षीने नवस केला आहे. विधानसभेला ज्यांनी जाणूनबुजून आमच्या विरोधात चुकीचं काम केलं, त्याचा सत्यानाश होवो… त्याचं घर वाटोळं होवो, असा नवस गोगावले यांनी केला आहे. हे […] The post Bharat Gogawale : विधानसभेत ज्याने चुकीचं काम केलंय, त्यांचा सत्यानाश होवो; भरत गोगावलेंनी केला नवस appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 6:11 pm

Dharmendra He-Man : धर्मेंद्रच्या 'ही-मॅन'नावामागील रहस्य! पडद्यावरील 'विरू'ची खरी कहाणी जाणून घ्या

भारतीय सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाच्या जोरावर तब्बल सहा दशके अधिराज्य गाजवलेले ज्येष्ठ आणि लाडके अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून संपूर्ण सिनेसृष्टीतून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. धर्मेंद्र यांची कारकीर्द आणि त्यांना मिळालेल्या 'ही-मॅन' (He-Man) या खास उपाधीबद्दलची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. धर्मेंद्र यांना भारतीय चित्रपटसृष्टीचा 'ही-मॅन' का म्हटले जाते, यामागे केवळ त्यांची देखणी शरीरयष्टी नसून, त्यांच्या अभिनयाची वेगळी शैली आणि पडद्यावरील दमदार व्यक्तिमत्त्व कारणीभूत आहे.https://prahaar.in/2025/11/24/dharmendra-pass-away-actor-last-movie-ikkis-will-release-on-tomorrow-25-novemeber-2025/'ही-मॅन' उपाधी मागची तीन प्रमुख कारणे१. रुबाबदार शरीरयष्टी आणि 'ॲक्शन हिरो'ची नवी ओळखधर्मेंद्र यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत त्यांना जगातील सर्वात देखण्या (Most Handsome) कलाकारांपैकी एक मानले जात होते. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात, विशेषतः १९६६ साली प्रदर्शित झालेल्या 'फुल और पत्थर' या चित्रपटाने त्यांच्या 'ही-मॅन' प्रतिमेला बळकटी दिली. या चित्रपटात धर्मेंद्र यांनी शर्टलेस भूमिका करून आपल्या कणखर शरीरयष्टीचे दर्शन घडवले, जी भारतीय सिनेमात कच्च्या मर्दानगीचे (Raw Masculinity) प्रारंभिक प्रतिनिधित्व होते. याच भूमिकेनंतर ते बॉलिवूडचे मूळ 'ॲक्शन हिरो' म्हणून स्थापित झाले आणि त्यांना 'ही-मॅन' ही उपाधी मिळाली.२. निर्भीड, देशभक्त आणि ताकदवान भूमिकाधर्मेंद्र यांनी अनेक चित्रपटांमध्ये निर्भीड, देशभक्त आणि निडर नायकाच्या भूमिका साकारल्या. त्यांचे पडद्यावरील व्यक्तिमत्त्व हे नेहमीच 'ताकदवान' आणि 'आधार देणारे' असायचे. 'शोले' (Veeru), 'मेरा गाव मेरा देश', 'धरम वीर' यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनी त्यांना 'लार्जर दॅन लाईफ हिरो' बनवले. 'ही-मॅन' हे शीर्षक केवळ शारीरिक ताकदीचे नाही, तर धैर्य, आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक आहे.३. शक्ती आणि कोमलता यांचा दुर्मिळ संगमधर्मेंद्र यांच्या 'ही-मॅन' प्रतिमेचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यामध्ये शारीरिक शक्ती आणि कोमलता यांचा दुर्मिळ संगम होता. त्यांनी एका बाजूला 'फूल और पत्थर' किंवा 'शोले'मध्ये अ‍ॅक्शन केली, तर त्याचवेळी 'सत्यकाम' (Satyakam) मध्ये एक आदर्शवादी, संवेदनशील भूमिका आणि 'चुपके चुपके' (Chupke Chupke) मध्ये उत्कृष्ट कॉमेडी करून आपले अष्टपैलुत्व सिद्ध केले. हीच अष्टपैलुत्व आणि पडद्यावरील नैसर्गिक ताकद यामुळे त्यांनी 'ही-मॅन ऑफ बॉलिवूड' ही उपाधी शेवटपर्यंत टिकवून ठेवली. धर्मेंद्र यांनी सहा दशकांच्या कारकिर्दीत ॲक्शन, रोमान्स आणि कॉमेडी या तिन्ही प्रकारांवर सहजतेने राज्य केले आणि म्हणूनच ते भारतीय सिनेमाच्या इतिहासात अविस्मरणीय 'ही-मॅन' म्हणून ओळखले जातात.धर्मेंद्रचा शेवटचा चित्रपटधर्मेंद्र यांनी अभिनित केलेला 'इक्किस' (Ikkis) हा सिनेमा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे. दुर्दैवाने, हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. हा सिनेमा येत्या २५ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. 'इक्किस' या चित्रपटाबद्दल धर्मेंद्र स्वतः खूप उत्सुक होते. त्यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलरही शेअर केला होता. या चित्रपटात त्यांची एक महत्त्वाची भूमिका आहे. विशेष म्हणजे, या सिनेमात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिका साकारत आहे. त्यामुळे एका बाजूला सिनेसृष्टीतील दोन पिढ्या एकत्र आल्या होत्या, तर दुसऱ्या बाजूला धर्मेंद्र यांच्या निधनामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच दुःखद वातावरण निर्माण झाले आहे. पुढच्या महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याने, चाहते मोठ्या पडद्यावर आपल्या लाडक्या 'ही-मॅन'ला शेवटचा सलाम करू शकतील.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 6:10 pm

सावधान! सिम कार्डचा गैरवापर झाल्यास 50 लाख दंड अन् तुरुंगवासही…‘ही’काळजी घ्या..

नवी दिल्ली: सायबर फसवणूक (Cyber Fraud) आणि इतर गैरकृत्यांमध्ये सिम कार्डचा वाढता गैरवापर लक्षात घेऊन केंद्र सरकारने आता कठोर पाऊले उचलली आहेत. यापुढे सिम कार्डचा गैरवापर झाल्यास केवळ गुन्हेगारांवरच नव्हे, तर ज्याच्या नावावर ते सिम कार्ड नोंदणीकृत आहे, त्या ग्राहकावरही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, अशी स्पष्ट आणि कठोर चेतावणी दूरसंचार विभागाने (DoT) आज (सोमवार) […] The post सावधान! सिम कार्डचा गैरवापर झाल्यास 50 लाख दंड अन् तुरुंगवासही… ‘ही’ काळजी घ्या.. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 6:03 pm

चऱ्होली खुर्द ग्रामपंचायतीकडून कर थकबाकीवर 50% सवलत; नागरिकांनी संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

आळंदी – ग्रामपंचायत चऱ्होली खुर्दने मालमत्ता कर आणि इतर कर थकबाकीदारांसाठी एक मोठी सवलत जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आणि ग्रामसभेच्या ठरावानुसार, ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत सर्व निवासी मालमत्ता कर व इतर थकबाकीच्या वसुलीसाठी 50% सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मूळ थकबाकीपैकी […] The post चऱ्होली खुर्द ग्रामपंचायतीकडून कर थकबाकीवर 50% सवलत; नागरिकांनी संधीचा लाभ घेण्याचे आवाहन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 5:46 pm

Devendra Fadnavis : भाजपचे ४० टक्के उमेदवार ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे असतील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भाजप येत्या महापालिका निवडणुकांसाठी किमान ४० टक्के तिकिटे ३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस एका कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधत होते. मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की, भाजपकडून महापालिका निवडणूक लढवणाऱ्यांपैकी किमान ४० टक्के उमेदवार ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे असतील. कोणतीही लोकशाही संस्था ही समाजाचे […] The post Devendra Fadnavis : भाजपचे ४० टक्के उमेदवार ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे असतील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 5:40 pm

Operation Sindoor : “ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नव्हे, स्वाभिमानाची घोषणा होती..”–संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

Operation Sindoor | Rajnath Singh – आम्ही जगाला दाखवून दिले की भारत युद्ध करू इच्छित नाही, परंतु जर सक्ती केली तर भारत त्यापासून पळून जाणार नाही. भगवान श्रीकृष्णाने पांडवांना हे देखील स्पष्ट केले होते की, युद्ध हे सूड किंवा महत्त्वाकांक्षेसाठी नाही तर धार्मिक राज्य स्थापनेसाठी लढले जाऊ शकते. ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नव्हती, […] The post Operation Sindoor : “ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नव्हे, स्वाभिमानाची घोषणा होती..” – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 5:31 pm

उद्यापासून SSMD House of Manohar आयपीओ बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल हा आयपीओ सबस्क्राईब करावा? जाणून घ्या

मोहित सोमण: एसएसएमडी ॲग्रोटेक इंडिया लिमिटेड (House of Manohar) कंपनीचा आयपीओ उद्यापासून बाजारात दाखल होत आहे. ३४ कोटींच्या आयपीओसाठी प्राईज बँड ११४ ते १२१ रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. उद्या २५ ते २७ नोव्हेंबरपर्यंत हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला असणार आहे. माहितीनुसार, ०.२८ कोटी इक्विटी शेअरचा संपूर्णपणे फ्रेश इशू असून ३४.०९ कोटी रूपये इतके या शेअरचे मूल्यांकन असेल. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान २००० शेअर घेणे अनिवार्य करण्यात आले आहे म्हणजेच किरकोळ (Retail) गुंतवणूकदारांना किमान २४२००० रूपयांची गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली आहे. 3Dimension Capital Services Limited हे कंपनीचे बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून BigShare Services Private Limited आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. एकूण विक्रीसाठी इशू साईज २७१७००० शेअर असणार आहेत तर मार्केट मेकरसाठी त्यातील १५६००० शेअर राखीव असणार आहेत. मार्केट मेकर म्हणून निकुंज स्टॉक ब्रोकर लिमिटेड काम करणार आहे.पात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना आयपीओचे वाटप (Allotment) २८ नोव्हेंबरला होणार असून आयपीओचे लिस्टिंग २ डिसेंबरला बीएसई एसएमईवर अपेक्षित आहे. एकूण गुंतवणूकपैकी ५.५४% वाटा मार्केट मेकरसाठी, ०.९६% वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Qualified Institutional Buyers QIB), विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non Institutional Investors NII) ४६.७५%, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ४६.७५% वाटा गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. इशू मुंजाल, सुरभी मुजाल, जय गोपाल मुंजाल हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.मुख्य स्वरूपात कंपनी हाऊस ऑफ मनोहर (HOM) ची सुरुवात सुरुवातीला मनोहर लाल जयगोपाल अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज आणि एस.एस. अ‍ॅग्रो इंडिया या दोन स्वतंत्र मालकी कंपन्यांपासून झाली होती नंतर त्यांचे विलीनीकरण (Merger) श्री धनलक्ष्मी फ्लोअर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड असे झाले होते नंतर त्यांचे नाव बदलून एसएसएमडी अ‍ॅग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असे ठेवण्यात आले.एसएसएमडी अ‍ॅग्रोटेक इंडिया लिमिटेड उच्च दर्जाच्या कृषी-अन्न धान्य उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन, व्यापार आणि रिर्पॅकिंगमध्ये गुंतलेली आहे. कंपनी चार या चार मनोहर अ‍ॅग्रो, सुपर एस.एस., दिल्ली स्पेशल, श्री धनलक्ष्मी ब्रँडिंग अंतर्गत कंपनी काम करते. कंपनीचे उत्पादना व्यतिरिक्त वितरण विक्रीसाठी मोठे नेटवर्क दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या प्रदेशात पसरलेले आहे. कंपनी D2C (Direct to Consumer) आपल्या छोट्या उत्पादन निर्मिती प्रकल्पासह सेवाही पुरवते.उत्पादन पोर्टफोलिओमध्ये अथवा प्रोडक्ट लाईनमध्ये पफ्ड राईस, रामदाणा (चोळई), बेसन, मटर पीठ, चणा डाळ, इडली रवा, तांदळाची पावडर आणि चणा डाळीचे यासह इतर उत्पादनांचा समावेश आहे. आकडेवारीनुसार, कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) यंदा ३५% अधिक महसूल मिळाला असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ३८८% वाढ झाली आहे. तिमाही बेसिसवर कंपनीच्या करोत्तर नफ्यात ५.३८ कोटींवरून ३.८४ कोटींवर घसरण झाली आहे. तर तिमाही बेसिसवर ईबीटा (EBITDA) ८.४७ कोटीवरून ५.७९ कोटीवर घसरला आहे. तर कंपनीच्या उत्पन्नातही तिमाही बेसिसवर ९९.१८ कोटीवरून ५५.१३ कोटींवर घसरण झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी खेळत्या भांडवलासाठी (Working Capital Requirements), थकबाकी चुकती करण्यासाठी, भांडवली खर्चासाठी, नव्या अधिग्रहणासाठी, दैनंदिन कामकाजासाठी करणार आहे.गुंतवणूकदारांनी हा आयपीओ सबस्क्राईब करावा का?ज्येष्ठ पत्रकार व आयपीओतज्ज्ञ दिलीप दावडा आपल्या पुनरावलोकनात म्हणतात,'सेल ही कृषी अन्न उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन, व्यापार आणि पुनर्पॅकिंगमध्ये गुंतलेली आहे. ती मनोहर अ‍ॅग्रो, सुपर एस एस, दिल्ली स्पेशल आणि श्री धनलक्ष्मी या ब्रँड नावाखाली तिच्या उत्पादनांचे मार्केटिंग करत आहे. कंपनीने अहवाल दिलेल्या कालावधीत तिच्या टॉप आणि बॉटम लाईन्समध्ये वाढ नोंदवली आहे, परंतु आर्थिक वर्ष २०२५ पासून बॉटम लाईन्समध्ये अचानक वाढ झाल्याने सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. ती अत्यंत स्पर्धात्मक आणि विखंडित, तसेच उच्च व्हॉल्यूम -कमी मार्जिन विभागात कार्यरत आहे. आयपीओ नंतरचा लहान इक्विटी बेस देखील स्थलांतरासाठी दीर्घ कालावधीचा गर्भावस्था दर्शवितो. सरासरी लीड मॅनेजरकडून हा महागडा आणि गुंतागुंतीचा इशू (IPO) गुंतवणूक वगळण्यात काहीही नुकसान नाही'कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) १०८.४६ क़ोटी रूपये असून सध्या आयपीओपूर्व ग्रे बाजारात समभागाची (Shares) किंमत रुपये आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 5:30 pm

कोलकाता पाठोपाठ गुवाहाटी कसोटीवरही दक्षिण आफ्रिकेचेच वर्चस्व

गुवाहाटी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकाने पहिल्या डावात भारताला मोठ्या फरकाने पराभूत केले. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकाने ४८९ धावा केल्या. त्यानंतर भारताचा पाठलाग करताना संघ फक्त २०१ धावांवर सर्वबाद झाला. यामुळे दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात २८८ धावांची आघाडी मिळाली आणि सामन्यावर त्यांचा स्पष्ट वर्चस्व निर्माण झाला.भारताकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ५८ धावा केल्या, तर वॉशिंग्टन सुंदरने ४८ धावा केली. अन्य फलंदाज मोठ्या प्रमाणावर टिकाव धरू शकले नाहीत. केएल राहुल २२ धावा करून माघारी गेला, त्याला केशव महाराजने बाद केले. सलामीवीर जयस्वालने ९७ चेंडूत ५८ धावा करून अर्धशतक पूर्ण केले, परंतु सायमन हार्मरच्या गोलंदाजीने त्याला माघारी पाठवले. साई सुदर्शन १५, ध्रुव जुरेल ०, ऋषभ पंत ७, रवींद्र जडेजा ६, नितीश कुमार रेड्डी १०, कुलदीप यादव १९, जसप्रीत बुमराह ५ धावा करून बाद झाले, तर मोहम्मद सिराज २ धावा करून नाबाद राहिला.दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जानसेनने ६ विकेट्स घेतले, तर सायमन हार्मरने ३ आणि केशव महाराजने १ विकेट घेतली. त्यांच्या जोरदार गोलंदाजीमुळे भारताच्या फलंदाजांना डावात टिकाव धरता आला नाही.दुसऱ्या दिवशी भारताने १ बाद ९५ धावांवरून ७ बाद १२२ अशी खेळी केली आणि विजय मिळवण्याच्या आशा संपल्या. जॅनसेनच्या आक्रमक शॉर्ट-पिच गोलंदाजीमुळे भारताचा डाव पूर्णपणे तुटला. बॉल-बाय-बॉल रेकॉर्डनुसार, कसोटीमध्ये एका डावात जॅनसेनसारखी गोलंदाजी अजून कोणीही वापरली नाही, ज्यामध्ये त्याने बाउन्सरचा प्रभावी वापर करून भारताचे फलंदाज माघारी पाठवले.दक्षिण आफ्रिकेला ४८९ धावांचा पाठलाग करण्यासाठी फक्त २०१ धावा मिळाल्यामुळे त्यांना पहिल्या डावात २८८ धावांची आघाडी मिळाली. भारताच्या मालिकेत विजयी परिणामाची आशा संपली असून, दक्षिण आफ्रिकेला १-० अशी आघाडी मिळाली आहे.दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना जॅनसेन आणि हार्मरच्या गोलंदाजीमुळे कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादवने काही काळ बचावात्मक फलंदाजी करून आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी दक्षिण आफ्रिकेने भारतावर पूर्ण वर्चस्व गाजवले.भारतासाठी आता तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभव टाळण्याचे मोठे आवाहन आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 5:30 pm

Dhananjay Munde : भर सभेत धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण? सर्वांच्या भुवया उंचावल्या

Parli Municipal Council Election : परळी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या संयुक्त कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले एक वाक्य सध्या बीड जिल्ह्यात प्रचंड चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आहे. “गेल्या १० महिन्यांपासून जगमित्र कंपनीचे कार्यालय सुरू आहे… पण आज इथे एक माणूसही नाही,” असे धनंजय मुंडे यांनी सभेत बोलताना म्हटले. हे […] The post Dhananjay Munde : भर सभेत धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण? सर्वांच्या भुवया उंचावल्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 5:18 pm

धक्कादायक.! अमेरिकेचा व्हिसा न मिळाल्यामुळे महिला डॉक्टरची आत्महत्या

Female doctor | suicide | US visa – अमेरिकेचा व्हिसा मिळू न शकल्याने एका ३८ वर्षीय महिला डॉक्टरने आत्महत्या केली. तिचा व्हिसा अर्ज नाकारण्यात आल्यानंतर ती बऱ्याच काळापासून नैराश्याने ग्रस्त होती. त्यातूनच तिने हे टोकाचे पाउल उचलले असे पोलिसांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे ही धक्कादायक घटना घडली. शनिवारी मोलकरणीचा फोन आल्यानंतर, डॉक्टरचे कुटुंब तिच्या […] The post धक्कादायक.! अमेरिकेचा व्हिसा न मिळाल्यामुळे महिला डॉक्टरची आत्महत्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 5:10 pm

Dharmendra Last Movie : अखेरचा चित्रपट रिलीजच्या तोंडावर अन्... 'ही-मॅन'धर्मेंद्र यांनी घेतला जगाचा निरोप; धर्मेंद्र यांचा 'हा'चित्रपट ठरणार अखेरचा!

मुंबई : भारतीय सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाने अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते आणि 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचे आज दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने केवळ देओल कुटुंबावरच नव्हे, तर त्यांच्या असंख्य चाहत्यांवर आणि संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. गेले काही दिवस धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना श्वसनासंबंधीचा (Respiratory illness) त्रास होत असल्याने, ३१ ऑक्टोबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अधिक खालावल्यामुळे त्यांना काही काळ आयसीयूमध्ये (ICU) ठेवण्यात आले होते. रुग्णालयातील उपचारानंतर त्यांना घरी उपचारासाठी नेण्यात आले होते. गेले काही दिवस ते घरीच उपचार घेत होते, मात्र त्यांची मृत्यूशी असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांच्या निधनाची अधिकृत बातमी प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर यांनी जाहीर केली. करण जोहरने त्यांच्यासोबत अखेरचा 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' हा चित्रपट केला होता. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. तब्बल सहा दशके प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या महान कलाकाराच्या जाण्याने भारतीय सिनेसृष्टीची मोठी हानी झाली आहे.https://prahaar.in/2025/11/24/actor-dharmendra-passes-away-know-dharmendra-11-most-famous-films/८९ व्या वर्षीही अभिनयाची धमकवयाच्या ८९ व्या वर्षीही त्यांनी अभिनयाची साथ सोडली नव्हती आणि ते सातत्याने चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. नव्वदीच्या उंबरठ्यावर असतानाही त्यांनी चित्रपटामध्ये काम करणे थांबवले नाही. त्यांची नुकतीच करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' मध्ये केलेली भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. गेले काही दिवस त्यांची प्रकृती नाजूक होती. अखेर आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र आजारी असताना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. यात सुपरस्टार शाहरुख खान, सलमान खान, गोविंदा, आमिषा पटेल यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश होता. चाहत्यांमध्ये दुःख: धर्मेंद्र आजारी पडल्याची बातमी समोर आल्यापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी चाहत्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली होती. पण नियतीला कदाचित काही वेगळेच मंजूर होते. त्यांच्या निधनानंतर देशभरातील त्यांचे चाहते अत्यंत दुःखी झाले असून, सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हा एक न भरून येणारा तोटा आहे.'शोले' ते 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'पर्यंत धर्मेंद्र यांनी गाजवला सिनेसृष्टीचा पडदाबॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या या अभिनेत्याने तब्बल सहा दशके भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवले. त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अत्यंत नम्रपणे झाली होती. धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला १९६० मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटाद्वारे सुरुवात केली. विशेष म्हणजे, या पहिल्या चित्रपटासाठी त्यांना केवळ ५१ रुपये मानधन देण्यात आले होते. मात्र, या तुटपुंज्या मानधनामुळे ते थांबले नाहीत. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 'शोले', 'धर्मवीर', 'मेरा गाव मेरा देश' आणि 'सीता गीता' अशा विविध धाटणीच्या ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम करून सिनेसृष्टीत आपले स्थान भक्कम केले. त्यांची 'शोले'मधील 'विरू' ची भूमिका आजही अजरामर आहे. धर्मेंद्र यांनी आपल्या वयाच्या ८९ व्या वर्षापर्यंत अभिनय करणे थांबवले नव्हते. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात त्यांनी दमदार काम केले होते. या चित्रपटात त्यांनी रणवीर सिंगच्या आजोबांची (दादू) महत्त्वपूर्ण आणि भावूक भूमिका साकारली होती. धर्मेंद्र यांच्या या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीमुळे भारतीय सिनेसृष्टीला मोठे योगदान मिळाले आहे.धर्मेंद्रचा शेवटचा चित्रपटधर्मेंद्र यांनी अभिनित केलेला 'इक्किस' (Ikkis) हा सिनेमा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे. दुर्दैवाने, हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. हा सिनेमा येत्या २५ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. 'इक्किस' या चित्रपटाबद्दल धर्मेंद्र स्वतः खूप उत्सुक होते. त्यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलरही शेअर केला होता. या चित्रपटात त्यांची एक महत्त्वाची भूमिका आहे. विशेष म्हणजे, या सिनेमात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिका साकारत आहे. त्यामुळे एका बाजूला सिनेसृष्टीतील दोन पिढ्या एकत्र आल्या होत्या, तर दुसऱ्या बाजूला धर्मेंद्र यांच्या निधनामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच दुःखद वातावरण निर्माण झाले आहे. पुढच्या महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याने, चाहते मोठ्या पडद्यावर आपल्या लाडक्या 'ही-मॅन'ला शेवटचा सलाम करू शकतील.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 5:10 pm

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

'चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड' उपमुख्यमंत्री अजित पवारमुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला असून, अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, धर्मेंद्र यांच्या अभिनयात नैसर्गिकता, साधेपणा आणि मनाला भिडणारी भावनिक ताकद होती. ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, ‘दिललगी’ अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. विशेषतः ‘शोले’मधील त्यांनी साकारलेली ‘वीरू’ची भूमिका रसिकांच्या मनात अजरामर आहे. धर्मेंद्र यांचा चित्रपट प्रवास म्हणजे मेहनत, समर्पण आणि कलाविश्वाप्रती असलेल्या निःस्वार्थ प्रेमाचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून निखळ आनंद दिला. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.धर्मेंद्र यांनी आपल्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत आठ वेळा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळवले होते. त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि दमदार अभिनयामुळे त्यांना ‘हिंदी सिनेमा’चा ‘ही-मॅन’ म्हणून ओळख मिळाली होती. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटूंबियांना, चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 5:10 pm

यंदाच्या वर्षीही भारतीय अर्थव्यवस्था ६.५% वेगाने वाढणार - एस अँड पी ग्लोबल

मोहित सोमण:भारतीय अर्थव्यवस्था यावर्षीही ६.५% दराने वाढू शकते असे भाकीत रिसर्च अँड ॲनालिटिक्स व रिसर्च कंपनी एस अँड पी ग्लोबलने केले आहे. तसेच पुढील वित्तीय वर्षात ६.७% दराने अर्थव्यवस्था वाढेल असे संस्थेने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.एस अँड पी ग्लोबलने आपल्या इकॉनॉमिक आउटलुक आशिया-पॅसिफिक अहवालात म्हटले आहे की, भारताचे वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) गेल्या पाच तिमाहींमध्ये सर्वात जलद गतीने वाढले आहे, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या कालावधीत ते ७.८% आहे.वाढलेली घरगुती मागणी, जीएसटी दरकपात, वाढता ग्राहक उपभोग (Consumer Consumption), आणि वित्तीय पतधोरणात झालेल्या सकारात्मक बदलामुळे ही ६.५% दरवाढ कायम राहणार असे संस्थेने आपल्या निष्कर्षात म्हटले आहे. किंबहुना अस्थिरता रोखली गेल्यास पुढील आर्थिक वर्षात ही वाढ ६.७% दरावर होऊ शकते असे अहवालात म्हटले आहे.विशेषतः एप्रिल ते जून (FY26) तिमाहीत वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन (Real Gross Domestic Product GDP) हा ७.८% वाढला असल्याचे महत्वाचे निरीक्षण अहवालाने नोंदवले आहे ज्यामुळे सकारात्मक अर्थकारणामुळे ही वाढ राखण्यास भारताला यश आले आहे. सध्या भारत व युएस यांच्यातील तोडगा न निघाल्याने अद्याप भूराजकीय अस्थिरता कायम आहे. अद्याप निष्कर्ष न निघाल्याने व्यापारी अस्थिरता कायम आहे मात्र यावर तोडगा निघाल्यास भारताच्या अर्थकारणाला आणखी वेग मिळू शकतो तसेच जीडीपीत आणखी वाढ होऊ शकते असे अहवालातून स्पष्ट होते. याखेरीज युएसकडून भारतावर आकारलेले अतिरिक्त टॅरिफ वाढी नंतरही भारताच्या अर्थव्यवस्थेने जून तिमाहीत अनपेक्षितपणे घौडदौड केली हे अहवालातील आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.इतकेच नाही तर ३७५ गरजवंत वस्तूंवरील जीएसटी दरकपात झाल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात खरेदी वाढली. उपभोगात झालेल्या वाढीसह वाढत्या मागणीमुळे मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेतील उलाढाल वाढली असे अहवालात मांडले गेले आहे. आयकर विभागाने ७ लाखांच्या ऐवजी १२ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गीयांना वाढविलेल्या रिबेट सवलतीमुळे घरोघरी मोठ्या प्रमाणात बचतही झाली. एकूणच अर्थव्यवस्थेसाठी ही नवी धोरणे नवसंजीवनी ठरली असल्याचे स्पष्ट झाले.यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २६ साठी ६.८% च्या किंचित जास्त जीडीपी वाढीचा अंदाज वर्तवला आहे, जो मजबूत देशांतर्गत वापर आणि सहाय्यक आर्थिक धोरणांभोवती आशावाद दर्शवितो. 'आशिया-पॅसिफिक वाढ २०२६ मध्ये बहुतांशी टिकून राहील, परंतु पुढील धोरणात्मक व्याजदर कपातीसाठी जागा माफक आहे' असे एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जचे आशिया-पॅसिफिक मुख्य अर्थशास्त्रज्ञ अहवालाबाबत बोलताना लुई कुइज म्हणाले आहेत. त्यांनी असाही इशारा देखील दिला की उच्च व्यापार निर्बंध आणि औद्योगिक धोरणे येत्या काळात व्यापार, गुंतवणूक आणि एकूण वाढीवर मात्र परिणाम करू शकतात.जूनमध्ये आरबीआयने ५०-बेसिस-पॉइंट दर कपात केली ज्यामुळे बेंचमार्क पॉलिसी दर ५.५% वर आला, जो तीन वर्षातील सर्वात कमी आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये रेपो दरात कुठलाही बदल केलेला नव्हता. मात्र आशावादी वातावरणात तज्ञांच्या मते डिसेंबर महिन्यातही रेपो दरात कपात होऊ शकते. असे झाल्यास बाजारात तरलता आणखी वाढू शकते दरम्यान अद्याप युएस भारत यांच्यातील करार निश्चित न झाल्याने ती टांगती तलवारही डोक्यावर कायम आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 5:10 pm

हि-मॅन’ची एक्झिट वेदनादायकॲड.आशिष शेलार

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, पद्मभूषण धर्मेंद्रजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे.त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने, प्रभावी संवादशैलीने आणि हृदयाला भिडणाऱ्या अभिनयाने त्यांनी भारतीय सिनेमाला एक वेगळं स्थान प्राप्त करून दिले. ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि बॉलिवूडचा हि - मॅन अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली.आज जरी एक सुवर्णयुग संपले असले, तरी धर्मेंद्रजींच्या अभिनयाची आणि संस्कारांची अमिट छाप सदैव आपल्या स्मरणात राहील.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, अशा शब्दात माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 5:10 pm

Dharmendra : घेऊन टांगा सर्जा निघाला.! धर्मेंद्र झळकलेत ‘या’मराठी सिनेमात, पाहा Video

Dharmendra | Marathi Movie : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. ८९ वर्षांच्या या व्यक्तीने मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि रुग्णालयातही दाखल होते त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. तेव्हापासून ते त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी वेळ घालवत होते. मात्र, सोमवारी (दि. […] The post Dharmendra : घेऊन टांगा सर्जा निघाला.! धर्मेंद्र झळकलेत ‘या’ मराठी सिनेमात, पाहा Video appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 4:48 pm

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहिली धर्मेंद्र यांना श्रद्धांजली; म्हणाले, हि-मॅन’ची एक्झिट चटका लावणारी

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. 89 वर्षांच्या या व्यक्तीने मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि रुग्णालयातही दाखल होते त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. तेव्हापासून ते त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी वेळ घालवत होते. मात्र, सोमवारी (दि. 24 ) सकाळी […] The post Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहिली धर्मेंद्र यांना श्रद्धांजली; म्हणाले, हि-मॅन’ची एक्झिट चटका लावणारी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 4:44 pm

Smriti Mandhana : लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांची आणि पलाशची तब्येत कशी बिघडली? होणाऱ्या सासूने सांगितला सर्व घटनाक्रम

Smriti Mandhana Wedding Postponed : क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा बहुप्रतिक्षित विवाह सोहळा २३ नोव्हेंबर रोजी सांगलीत होणार होता, मात्र लग्नाच्या दिवशीच स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या नाट्यमय घटनेमुळे नियोजित विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यानंतर पलाश मुच्छलची तब्येत बिघडली होती. दरम्यान या सर्व […] The post Smriti Mandhana : लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांची आणि पलाशची तब्येत कशी बिघडली? होणाऱ्या सासूने सांगितला सर्व घटनाक्रम appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 4:24 pm

Dharmendra Family: धर्मेंद्रच्या मागे कुटुंबात कोण कोण आहे आणि ते काय करतात ?

Dharmendra Family: बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र, त्यांच्या दमदार अभिनयासोबतच खाजगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिले. ८९ वर्षांचे धर्मेंद्र आता या जगात नाहीत, पण आपल्या मागे एक यशस्वी कुटुंब सोडून गेले आहेत. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हिंदी सिनेसृष्ट्रीवर ६५ वर्षांहून अधिक काळ राज्य करणाऱ्या या ‘ही-मॅन’च्या संपूर्ण कुटुंबाबद्दल आज आपण जाणून […] The post Dharmendra Family: धर्मेंद्रच्या मागे कुटुंबात कोण कोण आहे आणि ते काय करतात ? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 4:24 pm

भीषण अपघात: हिवरा पाटीजवळ ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; पती ठार, पत्नी गंभीर जखमी

हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ वर हिवरा पाटीजवळ रविवारी सकाळी साडेअकरा वाजता झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीस्वार पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. गणपूर कामठा (जि. नांदेड) येथे लग्न समारंभासाठी जात असताना, कळमनुरी येथील ज्ञानेश्वर पांडुरंग डाखोरे (वय २८) आणि त्यांची पत्नी शालिनी (वय २५) यांच्या दुचाकीला (एमएच २६ […] The post भीषण अपघात: हिवरा पाटीजवळ ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; पती ठार, पत्नी गंभीर जखमी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 4:15 pm

Dharmendra : एका संपूर्ण युगाचा अंत.! PM मोदींपासून ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वाहिली धर्मेंद्र यांना श्रद्धांजली

Dharmendra | narendra modi | draupadi murmu : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. 89 वर्षांच्या या व्यक्तीने मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि रुग्णालयातही दाखल होते त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. तेव्हापासून ते त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी वेळ घालवत होते. […] The post Dharmendra : एका संपूर्ण युगाचा अंत.! PM मोदींपासून ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वाहिली धर्मेंद्र यांना श्रद्धांजली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 4:10 pm

Dharmendra Died : ६ दशके गाजवणारा 'ही-मॅन'! धर्मेंद्र यांचे ११ चित्रपट जे आजही आयकॉनिक; अभिनय पाहून तुम्ही म्हणाल, व्वा!

मुंबई : भारतीय सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाच्या जोरावर तब्बल सहा दशके अधिराज्य गाजवलेले ज्येष्ठ आणि लाडके अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून संपूर्ण सिनेसृष्टीतून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीची मोठी हानी झाली असून, त्यांच्या पार्थिवावर आज विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या अविस्मरणीय कारकिर्दीतील असे दहा चित्रपट आहेत, जे प्रत्येक चाहत्यांनी किंवा सिनेरसिकांना आयुष्यात एकदातरी पाहिलेच पाहिजेत:https://prahaar.in/2025/11/24/dharmendra-passes-away-bollywood-vetarna-actor-dharmendra-death-at-the-age-of-89/१. शोलेरमेश शिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला आणि १९७५ साली आलेला शोले हा चित्रपट धर्मेंद्र यांना वेगळी ओळख देऊन गेला. त्यांनी या चित्रपटात केलेली भूमिका चांगलीच अजरामर झाली. याच चित्रपटापासून त्यांना विरू असे आदराने म्हटले जाऊ लागले.२. प्रतिज्ञा१९७५ मध्येच प्रदर्शित झालेला 'प्रतिज्ञा' हा चित्रपट धर्मेंद्र यांच्या करियरमधील एक अतिशय महत्त्वाचा ॲक्शन आणि कॉमेडी चित्रपट आहे. यात त्यांनी एका गावकऱ्याची भूमिका साकारली आहे, जो आपल्या प्रेमाचा आणि वडिलांचा बदला घेण्यासाठी शहरातून गावात परततो. या चित्रपटातील ॲक्शन सीन्स आणि धर्मेंद्र-हेमा मालिनी यांची रोमान्स केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. 'मैं जट यमला पगला दीवाना' हे त्यांचे प्रसिद्ध गाणे याच चित्रपटातील आहे, जे आजही लोकांच्या ओठांवर आहे.३. चुपके चुपकेचुपके-चुपके ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला आणि १९७५ साली आलेला चुपके चुपके हा चित्रपटही धर्मेंद्र यांच्या अभिनयामुळे चांगलाच गाजला. या चित्रपटात त्यांनी या चित्रपटात परिमल त्रिपाठी हे पात्र साकारले होते.४. द बर्निंग ट्रेनधर्मेंद्र यांचा द बर्निंग ट्रेन हा चित्रपटही चांगलाच गाजला. या चित्रपटात त्यांनी विनोद खन्ना, मालिनी, जितेंद्र, परवनी बाबी, नितू सिंह या अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली होती.५. धरम वीरधरम वीर हा चित्रपट १९७७ साली आला होता. या चित्रपटात त्यांनी वीर हे पात्र साकारले होते. या चित्रपटात त्यांनी प्राण, जितेंद्र, रंजित यासारख्या कसलेल्या अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली होती.६. रॉकी और राणी की प्रेम कहाणीअलिकडेच रणवीरसिंह आणि आलिया भट्ट यांचा रॉकी और राणी की प्रेमकहाणी हा चित्रपट आला होता. या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. या चित्रपटात शबाना आझमी यांच्यासोबत त्यांची केमिस्ट्री जुळून आली होती.७. हकिकतभारत-चीन युद्धातील एका भारतीय सैनिकाची कथा हा या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. या चित्रपटात धर्मेंद्र प्रथमच सैनिकाच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट १९६४ साली प्रदर्शित झाला होता.८. फुल और पथरहा चित्रपट १९६६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात धर्मेंद्र अॅक्शन हिरो म्हणून समोर आले होते. या चित्रपटात मीना कुमार त्यांच्यासोबत होती.९. सत्यकामहा चित्रपट १९६९ साली प्रदर्शित झाला होता. शर्मिला टागोर, संजिव कुमार यासारख्या कलाकारांसोबत धर्मेंद्र यांनीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली होती.१०. मेरा गाव मेरा देशया चित्रपटात धर्मेंद्र यांच्याोसबत विनोद खन्ना, आशा पारेख यासारखे कलाकार होते. हा चित्रपट १९७१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गीत आजही तेवढ्याच आवडीने ऐकले जातात.११. चरसॲक्शन, रोमान्स आणि कॉमेडीने ओपप्रोत असलेला चरस हा चित्रपट १९७६ साली आला होता. हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. धर्मेंद्र यांनी या चित्रपटात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा भंडाफोड करणाऱ्या एका व्यक्तीची भूमिका केलेली आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 4:10 pm

सुपरस्टार धरमपाजी गेले पण त्यांची संपत्ती व आर्थिक नियोजन माहिती आहे का? 'ही'आहे संपूर्ण माहिती

मोहित सोमण:बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते व सुपरस्टार धर्मेंद्र देओल यांची आज वयाच्या ८९ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. त्यांनी केवळ बॉलीवूड अथवा फिल्म इंडस्ट्रीत अधिराज्य नाही तर आपली गुंतवणूकही सामर्थ्याने केली. आपल्या कमाईचे नियोजन उत्तम करून धर्मेंद्र देओल यांनी आपला 'वेल्थ' पोर्टफोलिओ उभा केला. पैशाचे उत्तम नियोजन, हजरजबाबी निर्णय, तसेच योग्य ठिकाणी दूरदृष्टीने गुंतवणूक या गुणांमुळे ते चित्रपटसृष्टीत ओळखले गेले. याच महिन्यात ८ तारखेला त्यांचा वाढदिवस ९० वा वाढदिवस होता. परंतु आजारपणाशी झुंज देताना ते ९० व्या वर्षात पदार्पण करू शकले नाहीत.मात्र तुम्हाला कल्पना आहे? धर्मेंद्र देओल यांनी आपली संपत्ती कशी व्यवस्थापित केली?आपल्या उतरत्या वयातही त्यांनी गरम धरम धाबा हॉटेलची २०१५ मध्ये घोषणा केली होती. त्यांनी मोठ्या प्रमाणात रियल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली. विशेषतः १९९९ नंतर त्यांनी चित्रपटात कमी काम करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांनी वित्त व्यवस्थापनात अधिक महत्व दिले. २०२२ मध्ये धर्मेंद्र देओल यांनी 'ही मॅन' ची स्थापना केली. तसेच त्यांनी यापूर्वीच १०० एकरचे फार्म हाऊस लोणावळा येथे खरेदी केली होती. दस्तुरखुद्द महाराष्ट्रातच त्यांनी मिडिया अहवालातील माहितीनुसार, १७ कोटींची मालमत्ता खरेदी केली होती. त्यांनी काही हॉटेल व्यवस्थापकांशी भागीदारी करत ३० कॉटेजचा रिसोर्टही बांधला होता. एकूण १२ एकरचा हा भूखंड (Plot) असल्याचे सांगण्यात येते. उपलब्ध माहितीनुसार, व फोटो व आकडेवारीनुसार सुपरस्टार धर्मेंद्र यांना चारचाकी चालवण्याची व चारचाकीचे (कार कलेक्शन) करण्यासाठी आवाड होती. त्यांच्याकडे विंटेज फियाट, मर्सिडीज बेंझ SL 500, रेंज रोव्हर यांसारख्या अनेक गाड्या त्यांचा पोर्टफोलिओत होत्या. इतकेच नाही तर त्यांनी महाराष्ट्र शेती व विना शेती (Non Agricultural) भूखंड खरेदी केले होते. मिडिया रिपोर्ट नुसार त्यांचे वार्षिक अधिकृत उत्पन्न १२ कोटीपेक्षा अधिक होते. एकूण संपत्ती ३३५ कोटी होती व इतर मालमत्ता व मूल्यांकन (Miscellaneous Assets and Valuation) १३.२० कोटींची होती.पंजाबमधील सामान्य कुटुंबात जन्म घेतल्यानंतर दिल मिल तेरा हम भी तेरे या १९६० सालच्या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. शोले (१९७५) मधून ते घराघरात पोहोचले.प्रतिभावान अभिनेत्री हेमा मालिनी सोबतची त्यांची ऑन-स्क्रीन जोडी एक लोकप्रिय चित्रपट बनली आणि राजा जानी, सीता और गीता, शराफत, नया जमाना यांचा अशे एकापाठोपाठ एक हिट चित्रपट त्यांनी दिले. १९८० च्या दशकातही त्यांनी चित्रपट निर्मितीमध्ये भरभराट केली व त्यातूनही उत्पन्न मिळवले.१९८३ मध्ये विजयता फिल्म्सची स्थापना केली आणि त्यांचा पुत्र सनी देओल यांना बेताब चित्रपटातून लाँच केले होते. शिवाय, त्यांनी १९९५ मध्ये बरसात या चित्रपटातून धाकटा मुलगा बॉबी देओल यांनाही यशस्वीरित्या लाँच केले, अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर, २००७ मध्ये धर्मेंद्रने सहाय्यक भूमिका साकारल्या विशेषतः त्यांनी आपल्या दोन्ही मुलांसोबत यमला पगला दिवाना, अपने या चित्रपटात देखील काम केले होते. धर्मेंद्रच्या चित्रपटांमध्ये गंभीरता, अ‍ॅक्शन, रोमँटिक कॉमेडीजमधी अदा लक्षात घेता अभिनेता म्हणून त्यांची अभिनयातील व्याती लोकांना दिसली.उपलब्ध माहितीनुसार, प्रत्येक चित्रपटासाठी ते ५ कोटी रुपये मानधन घेत होते. आणि याव्यतिरिक्त, प्रत्येक ब्रँड एंडोर्समेंटसाठी त्यांना १ ते ३ कोटी रुपयांपर्यंत रक्कम मिळत होती. त्यांनी अनेक कार्यक्रमातही सहभाग घेतला तसेच टेलिव्हिजन जाहिरातींमध्ये सहभागी आहेत, विविध ब्रँडचे प्रमोशन करतात आणि परिणामी त्यांचे मासिक उत्पन्न १ कोटी रुपयांपेक्षा केवळ टेलिव्हिजनमधून मिळत होते.मुंबईतील राहत असलेल्या जूहू येथील निवासस्थानासह धर्मेंद्रकडे दोन निवासी मालमत्ता आहेत ज्याची किंमत ७.५० कोटी रुपये आणि दुसरी ३२ कोटी रुपये सांगितली जाते.२०१५ ते २०२० दरम्यान, धर्मेंद्र यांना पाठदुखी, स्नायूंचा ताण आणि अशक्तपणा यासारख्या अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला, ज्यामुळे कधीकधी रुग्णालयात दाखल करावे लागत असे. २०२५ मध्ये, धर्मेंद्र यांच्या डाव्या डोळ्याच्या कॉर्नियाला नुकसान झाल्यानंतर कॉर्नियल प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्येष्ठ चित्रपट स्टार धर्मेंद्र यांचे सोमवारी सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी अल्प आजाराने निधन झाले. श्रीराम राघवन यांचा बहुप्रतिक्षित युद्ध नाटक 'इक्किस' हा चित्रपट धर्मेंद्र यांचा मोठ्या पडद्यावर शेवटचा चित्रपट असेल. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा अभिनीत हा हिंदी चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 4:10 pm

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील तेजस्वी पर्वाला उजाळा देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीतल्या एका सुवर्ण अध्यायाचा अंत झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले की, ब्लॅक अँड व्हाईटच्या काळापासून ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत धर्मेंद्र यांनी सातत्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. स्वप्नाळू आणि आत्मीय तरुण नायकापासून ते बलदंड, तडफदार व्यक्तिमत्त्वाच्या भूमिकांपर्यंत त्यांनी आपल्या अभिनयाने स्वतंत्र छाप उमटवली. कालांतराने ‘ही-मॅन ऑफ बॉलिवूड’ म्हणून मिळालेली त्यांची ओळख त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेची साक्ष देते.शोलेमधील वीरूची मैत्री जशी पडद्यावर अजरामर झाली, तशीच मैत्री आणि जिव्हाळा जपणारी त्यांची स्वाभाविक वृत्ती वास्तवातही जाणवायची, असेही मुख्यमंत्री म्हणाले. जुन्या आणि नव्या दोन्ही पिढ्यांना जोडणारा सेतू म्हणून धर्मेंद्र यांच्याकडे पाहिले जात असे. अनेकांचे ते मार्गदर्शक, आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान होते.चित्रपटसृष्टीसोबतच त्यांनी बिकानेरचे लोकसभा प्रतिनिधित्व करत भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणूनही कार्य केले. मात्र अभिनय आणि सर्जनशील प्रयोगशीलता यांनाच त्यांनी सदैव महत्व दिले. तीनशेहून अधिक चित्रपटांत त्यांच्या बहुरंगी भूमिका पाहायला मिळतात. एकाच वर्षी नऊ हिट चित्रपट देण्याचा त्यांच्याकडे असलेला विलक्षण विक्रम आजही सिनेसृष्टीत अभिमानाने आठवला जातो.आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत ते सिनेसृष्टीत सक्रिय राहिले, हा त्यांचा व्यासंग आणि समर्पणाचा सर्वोच्च नमुना असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंबीयांसह कोट्यवधी चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दुःखात आम्ही मन:पूर्वक सहभागी आहोत आणि ईश्वर सर्वांना धैर्य देओ, अशी प्रार्थना करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 4:10 pm

Stock Market Closing Bell: शेअर बाजारात 'होत्याचे नव्हते'सेन्सेक्स ३३१.२१ व निफ्टी १०८.६१ अंकाने कोसळला

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळची किरकोळ वाढ दुपारपर्यंत घसरणीत बदलली आहे. होत्याचे नव्हते झाल्याने शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स ३३१.२१ अंकाने घसरत ८४९००.७१ व निफ्टी १०८.६१ अंकाने घसरत २५९५९.४० पातळीवर स्थिरावला आहे. आज सकाळी युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल या आश्वासकतेनुसार, आशियाई बाजारातील इतर बाजारांसह भारतीय बाजारात वाढ झाली मात्र अद्याप गुंतवणूकदारांना भूराजकीय परिस्थितीची अनिश्चितता व आयटी तेजीतील घसरण यामुळे अखेरच्या सत्रात मोठी पडझड झाली आहे. सकाळी किरकोळ वाढलेले बँक निर्देशांकात घसरणीत बदलल्याने आयटी, मिडस्मॉल आयटी टेलिकॉम वगळता इतर निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली आहे. निफ्टी व्यापक निर्देशांकात नेक्स्ट ५० (०.४२%), मिडकॅप सिलेक्ट (०.८१%),स्मॉल कॅप १०० (०.८५%) या निर्देशांकात मोठी वाढ झाली असून निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक घसरण रिअल्टी (२.०५%), मेटल (१.२३%), मिडिया (०.५३%), केमिकल्स (१.३१%) या घसरण झाली. सकाळी आयटीत ०.५० ते १% वाढ झालेली असताना आयटी अखेरीस ०.४१% वाढीसह बंद झाला.खासकरून अस्थिरता निर्देशांक (Volatility Index VIX) २.८९% घसरला असतानाही शेअर बाजारात नकारात्मक भावना, घसरलेली परदेशी गुंतवणूक या गोष्टी वरचढ ठरल्याने बाजारातील रॅली रोखली गेली.काल युएस बाजारात चांगली रॅली झाली होती. आज सुरूवातीच्या कलात अखेरच्या सत्रात एस अँड पी ५०० (०.८१%), एस अँड पी ५०० (०.९२%) बाजारात वाढ झाली आहे तर डाऊ जोन्स सपाट राहिला तर आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात गिफ्ट निफ्टी (०.३७%) सह निकेयी २२५ (२.४६%), सेट कंपोझिट (०.१३%), कोसपी (०.१९%) निर्देशांकात घसरण झाली असून सर्वाधिक वाढ हेंगसेंग (१.६९%), जकार्ता कंपोझिट (१.८२%), शांघाई कंपोझिट (०.०५%), स्ट्रेट टाईम्स (०.६१%) निर्देशांकात झाली आहे रशिया युक्रेन यांच्यातील तोडगा निघण्याची शक्यता असल्यानं युएस रशिया समिट होऊ शकते या भावनेतून कच्च्या तेलाच्या निर्देशांकात आज घसरण झाली असून कमोडिटी बाजारातील जागतिक सकारात्मक अस्थिरतेमुळे सोन्याचांदीच्या निर्देशांकातही आज घसरण झाली आहे. आज सुरूवातीच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी ४९ पैशांनी वाढ झाली होती तो संध्याकाळपर्यंत घसरत ८९.२० रूपयांवर व्यवहार करत आहेत.अखेरच्या सत्रात आज सर्वाधिक वाढ आयटीआय (९.३९%),ग्राविटा इंडिया (७.४९%),असाही इंडियन ग्लास (७.०५%), हनीवेल ऑटो (६.२४%), स्विगी (४.९७%), क्लीन सायन्स (४.१४%), रेल विकास (३.४६%), एनबीसीसी (३.४३%) समभागात झाली आहे तर अनंत राज (६.५०%), टीआरआयएल (५.६४%),डीसीएम श्रीराम (५.३०%), रिलायन्स पॉवर (४.६३%), नावा (४.४७%), बीईएमएल लिमिटेड (४.२१%), सम्मान कॅपिटल (४.१७%), सीजी पॉवर (३.८३%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'रेंज-बाउंड पॉझिटिव्ह सत्रानंतर, सोमवारच्या समाप्तीनंतर, निफ्टी५० निर्देशांक २६००० च्या प्रमुख मर्यादेच्या वर टिकू शकले नाहीत म्हणून, बाजार गेल्या अर्ध्या तासात घसरणीसह बंद झाला. अंतरिम अमेरिका-भारत व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यात येणाऱ्या विलंबासारख्या महत्त्वाच्या घटनांच्या जोखमीच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांची भावना सावध राहिली. तरीही, आयटी समभागांमध्ये निवडक खरेदीने काही आधार दिला. एक उज्ज्वल बाब म्हणजे, जागतिक बाजारपेठा आशावादी आहेत, डिसेंबरमध्ये फेड दर कपातीच्या नूतनीकरणाच्या अपेक्षांमुळे, यूएस रोजगार डेटाला नकारात्मक जोखीम निर्माण झाल्यामुळे. स्थानिक पातळीवर, जीडीपी वाढ, नियंत्रित महागाई, स्थिर तेलाच्या किमती आणि मजबूत एच२ कमाईचा दृष्टीकोन यासह अनुकूल मॅक्रो निर्देशकांनी बाजार स्थिरतेत योगदान दिले आहे.'आजच्या बाजारातील रूपयावर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'शुक्रवारच्या घसरणीनंतर रुपयाने दिवसाची सुरुवात ८९.२० वर जोरदार वाढ करून केली. शुक्रवारी ८९.६५ च्या जवळील सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचल्यानंतर रुपयाने ०.३५ रुपये किंवा ०.३९% वाढ नोंदवली. गेल्या आठवड्यात झालेल्या घसरणीचे मुख्य कारण भारत-अमेरिका व्यापार करारातील विलंब, प्रगतीबाबत कोणतेही ठोस अपडेट नसणे,वाढत्या अमेरिकन डॉलर निर्देशांक आणि खालच्या पातळीवर दृश्यमान हस्तक्षेपाचा अभाव हे होते. आजच्या तेजीनंतरही, व्यापक कल कमकुवत दिसत आहे आणि नजीकच्या काळात रुपया ८८.७५-८९.५० च्या अस्थिर श्रेणीत व्यापार करेल अशी अपेक्षा आहे.'आजच्या बाजारातील बँक निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'ताशी चार्टवर, निर्देशांकाने खालचा वरचा भाग बनवला आहे, जो त्याच्या ५० ईएमए (EMA) च्या खाली बंद झाला आहे आणि आर एस आय (Relative Strength Index RSI) मंदीच्या क्रॉसओवरमध्ये आहे, जो कमकुवत गती दर्शवितो. दैनिक चार्टवर, निर्देशांक शुक्रवारीच्या नीचांकी पातळीवर बंद झाला, जो त्याच्या २० दिवसांच्या ईएमए (Exponential Moving Average EMA) पातळीच्या ५८३०० पातळीच्या आसपास असलेल्या दिशेने संभाव्य रिट्रेसमेंट दर्शवितो. म्हणूनच, सध्याच्या पातळीवर सावधगिरी बाळगली पाहिजे. बँक निफ्टी बंद आधारावर ५९३०० पातळी पुन्हा मिळवेपर्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.'

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 4:10 pm

Stock Market : शेअर बाजारात नफा बुकिंग, सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला

Stock Market : सोमवार, २४ नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. दिवसभरातील अस्थिरतेनंतर अखेरच्या टप्प्यात जोरदार नफावसुलीमुळे प्रमुख निर्देशांक खाली आले. सेन्सेक्स 331 अंकांची घसरण नोंदवून बंद झाला, तर निफ्टीने 25960 चा महत्त्वाचा आधार गमावला. सेन्सेक्स ३३१.२१ अंकांनी (०.३९%) घसरून ८४,९००.७१ च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी ५० १०८ अंकांनी (०.४२%) घसरून २५,९५९.१५ […] The post Stock Market : शेअर बाजारात नफा बुकिंग, सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 4:10 pm

‘ही-मॅन’ची राजकीय सफर ! निवडणुकीत न उतरण्याची शपथ घेणारे धर्मेंद्र कसे झाले खासदार? वाचा रंजक किस्सा

Dharmendra : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि ‘गरम धरम’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी २००४ मध्ये अचानक राजकारणात उडी घेतली. भाजपच्या तिकिटावर राजस्थानातील बिकानेर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि काँग्रेसच्या रामेश्वर लाल दुडी यांचा सुमारे ६०,००० मतांनी पराभव करत खासदार म्हणून संसदेत प्रवेश केला. त्यानंतर पाच वर्षांनी त्यांची राजकीय कारकीर्द निराशेत बदलली. त्यांनी पुन्हा कधीही […] The post ‘ही-मॅन’ची राजकीय सफर ! निवडणुकीत न उतरण्याची शपथ घेणारे धर्मेंद्र कसे झाले खासदार? वाचा रंजक किस्सा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 3:54 pm

Pune news : जांबुळवाडी नवीन बोगद्यात रस्ता सुरक्षा मार्गदर्शन व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पुणे – जांबुळवाडी नवीन बोगदा परिसरात वाहनचालकांसाठी “रस्ता सुरक्षा मार्गदर्शन आणि वाहनचालकांचे आरोग्य तपासणी शिबिर” पार पडले. प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या मार्गदर्शना नुसार व वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमादरम्यान मोटार वाहन निरीक्षक वसंत कलंबरकर यांनी रस्ता सुरक्षा नियमांचे महत्त्व, वाहन चालविताना होणाऱ्या मानवी चुका व त्यातून […] The post Pune news : जांबुळवाडी नवीन बोगद्यात रस्ता सुरक्षा मार्गदर्शन व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 3:47 pm

अलविदा…! धरमपाजी अनंतात विलीन, थोरला मुलगा सनी देओलने दिला मुखाग्नी

Dharmendra Passed Away | बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर प्रकृती अस्वास्थामुळे उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विले पार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत देओल कुटुंब पोहचले आहे. याशिवाय बॉलीवूडमधील कलाकार दाखल झाले आहेत. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक […] The post अलविदा…! धरमपाजी अनंतात विलीन, थोरला मुलगा सनी देओलने दिला मुखाग्नी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 3:19 pm

Dharmendra : मेरा बड़ा बेटा..! धर्मेंद्रंच्या शेवटच्या चित्रपटातील व्हॉईस नोट ऐकली का? ‘या’दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

Dharmendra Death : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. ८९ वर्षांच्या या व्यक्तीने मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि रुग्णालयातही दाखल होते त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. तेव्हापासून ते त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी वेळ घालवत होते. मात्र, सोमवारी (दि. २४ ) […] The post Dharmendra : मेरा बड़ा बेटा..! धर्मेंद्रंच्या शेवटच्या चित्रपटातील व्हॉईस नोट ऐकली का? ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 3:18 pm

Health: ‘मसाल्यांची राणी’ इलायची फक्त स्वाद नाही वाढवत तर आरोग्यासाठीही आहे अत्यंत फायदेशीर!

Health: भारतीय स्वयंपाकघरातील सुगंध आणि चवीसाठी ओळखली जाणारी इलायची म्हणजेच मसाल्यांची राणी. मिठाईपासून रोजच्या जेवणापर्यंत तिचा वापर होतो. पण इलायचीचा फायदा केवळ चवीपुरताच मर्यादित नाही तर ती शरीरासाठी औषधासारखी काम करते. आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, रोजच्या आहारात प्रमाणात इलायचीचा समावेश केल्यास अनेक आरोग्यसमस्या दूर राहतात आणि शरीर तंदुरुस्त राहते. इलायचीचे प्रमुख आरोग्यदायी फायदे १. रक्तदाब नियंत्रित […] The post Health: ‘मसाल्यांची राणी’ इलायची फक्त स्वाद नाही वाढवत तर आरोग्यासाठीही आहे अत्यंत फायदेशीर! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 3:13 pm

बॉलिवूडचा ही-मॅन काळाच्या पडद्याआड; धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहचली सिनेसृष्टी

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक दशकं आपल्या अभिनयाने अमीट ठसा उमटवणारे दिग्गज कलाकार धर्मेंद्र यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्येत सुधारल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले होते, मात्र आज सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.धर्मेंद्र यांच्या घराबाहेर चाहत्यांची वर्दळ वाढली. त्यांच्या प्रकृतीची माहिती सतत घेत असलेले बॉलिवूडमधील अनेक कलाकारही त्यांच्या भेटीसाठी धावले होते. निधनाची बातमी बाहेर आल्यानंतर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे थेट विलेपार्ले येथील स्मशानभूमीकडे रवाना झाले. हेमा मालिनी देखील स्मशानभूमीत पोहोचल्या असून कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्काराची तयारी करताना दिसले.सिनेसृष्टीत 'ही-मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रवासात ३०० पेक्षा अधिक चित्रपटांत काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विविध भूमिकांमधील त्यांचा सहज अभिनय, अ‍ॅक्शन-हिरोची प्रतिमा आणि रोमँटिक persona यामुळे ते आजही चाहत्यांच्या मनात विशेष स्थान राखून आहेत. याच दरम्यान, आमिर खान देखील श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्मशानभूमीकडे रवाना झाल्याचे पाहायला मिळाले आहे.चित्रपट निर्माता करण जोहर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत धर्मेंद्र यांच्या जाण्याने “एका युगाचा अंत” झाल्याची भावना व्यक्त केली आहे.रुग्णालयातून घरी आल्यानंतर स्वतः गाडी चालवत अमिताभ बच्चन यांनी धर्मेंद्र यांची भेट घेतली होती. दोघांनी मिळून अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले असल्याने त्यांच्यातील जवळीक विशेष होती. अभिनयासोबतच धर्मेंद्र यांनी राजकारणातही सक्रिय भूमिका बजावली होती.धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. चाहत्यांनीही मोठ्या संख्येने स्मशानभूमीकडे धाव घेतली असून आपल्या आवडत्या अभिनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी होत आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 3:10 pm

१ शेअरवर मिळवा २४ शेअर फ्री 'या'कंपनीकडून बोनस इशूसाठी ५ डिसेंबर अंतिम तारीख

मोहित सोमण:एपिस इंडिया या बीएसईवरील सूचीबद्ध (Listed) असलेल्या शेअरने गुंतवणूकदारांसाठी धमाल गिफ्ट आणले आहे. एक शेअर खरेदी केल्यास २४ शेअर बोनस मिळणार आहेत. २४:१ या गुणोत्तरात हे शेअर मिळणार आहेत असे कंपनीने आपल्या एक्सचेंज निवेदनात म्हटले आहे. १० रूपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या शेअरची अंतिम नोंदणी दिनांक (रेकॉर्ड डेट) ५ डिसेंबर असणार आहे. त्यामुळे ५ तारखे आधी शेअर खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना या ऑफरचा लाभ होणार आहे. एपिस इंडियाने ही संबंधित माहिती घोषित करुन हे शेअर पूर्णपणे पेडअप (Fullly Paid) शेअर असतील असेही यावेळी स्पष्ट केले आहे.यापूर्वी कंपनीने डिसेंबर २०१० मध्ये ३२३: १०० प्रमाणात बोनस शेअर इशू जाहीर केला होता. कंपनी प्रामुख्याने मधाचे उत्पादन करते त्याशिवाय इतर खजूर, चहाळ जाम, व संबंधित एफएमसीजी उत्पादने कंपनी बाजारात आणते. कंपनीने गेल्या आठवड्यात ५% वाढ नोंदवली असून गेल्या महिनाभरात कंपनीने २१.५४% वाढ नोंदवली आहे. तर संपूर्ण एक वर्षात ३११.१२% परतावा कंपनीने गुंतवणूकदारांना दिला आहे. दरम्यान कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ६०४.९० कोटी रूपये आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ (All time High) १०९७.९० रूपयावर नोंदवली गेली असून ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण (All time Low) २८०.४० रूपये प्रति शेअरवर नोंदवली गेली आहे. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर सप्टेंबर तिमाहीत १९.६७% अधिक महसूल मिळाला होता तर कंपनीच्या नफ्यात तिमाही बेसिसवर ५.५१% वाढ नोंदवली होती.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 3:10 pm

धर्मेंद्र कोणत्या आजारांनी ग्रस्त होते? ; ‘त्या’आजारातून वाचणं किती कठीण?, वाचा सविस्तर

Dharmendra Death। ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाच्या त्रासाची तक्रार केल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ८९ वर्षीय धर्मेंद्र हे गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय देखरेखीखाली होते आणि सध्या आयसीयूमध्ये होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता. या […] The post धर्मेंद्र कोणत्या आजारांनी ग्रस्त होते? ; ‘त्या’ आजारातून वाचणं किती कठीण?, वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 3:10 pm

अभिनेते धर्मेंद्रची आवडती कार कोणती होती? ; चार्मिंग हिरोने पहिली कार कधी खरेदी केली?

Dharmendra Car। बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. धर्मेंद्र यांची अभिनय कारकीर्द खूपच शानदार होती. या दिग्गज अभिनेत्याने भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. अभिनयाच्या यशाच्या शिखरावर पोहोचण्यासोबतच धर्मेंद्र एक आलिशान जीवनशैली देखील जगले. धर्मेंद्र यांना लक्झरी कारचीही आवड होती. पण तुम्हाला माहिती आहे का […] The post अभिनेते धर्मेंद्रची आवडती कार कोणती होती? ; चार्मिंग हिरोने पहिली कार कधी खरेदी केली? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 2:56 pm

Embassy Development Update: एम्बेसी डेव्हलपमेंट्स उत्तर बेंगळुरूमध्ये १०३०० कोटी रुपयांचे सहा निवासी प्रकल्प सुरू करणार

बंगलोर: एम्बेसी डेव्हलपमेंट्स लिमिटेड कंपनी उत्तर बेंगळुरूमध्ये सुमारे १०३०० कोटी रुपयांचे सहा नवीन निवासी प्रकल्प सुरू करणार आहे असे कंपनीने आज स्पष्ट केले आहे. कंपनीच्या मते त्यामुळे आर्थिक वर्ष २६ साठी कंपनीचा आर्थिक मजबूत विकास मार्ग अधिक प्रमाणात होणार आहे. आगामी लाँचमध्ये एम्बेसी स्प्रिंग्सच्या ऐतिहासिक एकात्मिक टाउनशिपमध्ये दोन प्रीमियम रेरा-मंजूर निवासी विकास, एम्बेसी ग्रीनशोर आणि एम्बेसी व्हर्डे फेज २ यांचा समावेश आहे असे कंपनीने स्पष्ट केले.एम्बेसी ग्रीनशोर २, ३ आणि ४ बीएचके कॉन्फिगरेशनमध्ये ८००+ अपार्टमेंट्सची विस्तृत ऑफर कंपनी देईल असे कंपनीने आपल्या माहितीत म्हटले.फिचर्सनुसार यात मोठे लेआउट,स्पेसिफिकेशन्स आणि एलिव्हेटेड फिनिश असेल.पूर्णतः बुक झालेल्या फेज एक ला अपवादात्मक प्रतिसादावर आधारित एम्बेसी व्हर्डे फेज २ घर खरेदीदारांना चांगली मालमत्ता खरेदी करण्यासाठी एक नामी संधी देईल असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. हे मूल्य अनलॉक करण्याची आणि उत्तर बेंगळुरूच्या विकास कथेचा भाग होण्याची आणखी एक संधी देईल असेही कंपनीने यावेळी स्पष्ट केले.आर्थिक वर्ष २६ साठी नियोजित प्रकल्पापैकी आणखी एक प्रकल्प लाँच म्हणजे हेब्बलमधील एक नवीन निवासी प्रकल्प असेल अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे. विक्री झालेल्या एम्बेसी लेक टेरेसेसच्या शेजारी स्थित या १० एकरच्या भूखंडावरील खरेदीदारांसाठी ३ बीएचके (मध्यम आणि मोठे) आणि ४ बीएचके स्वरूपात ६००+ प्रीमियम निवासस्थाने असतील असे कंपनीने म्हटले.विस्तृत उत्तर बेंगळुरूच्या उपस्थितीव्यतिरिक्त, कंपनी या वर्षी सुरू होण्याच्या नियोजित ११६ एकर क्षेत्रफळाचा ‘केवळ आमंत्रित लोकांसाठी व्हिला आणि ‘प्रीमियम व्हिला प्रकल्प’ यासह दोन अतिरिक्त प्रकल्पांचे अनावरण करेल असे कंपनीने म्हटले. हे प्रकल्प उत्तर बेंगळुरूमध्ये प्रीमियम अपार्टमेंट आणि व्हिलामध्ये सुमारे ५.६ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळाचा समावेश आहे.या घडामोडींवर आपली प्रतिक्रिया देताना एम्बेसी डेव्हलपमेंट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य विरवानी म्हणाले आहेत की,'आमच्या दोन प्रकल्पांना रेरा मंजुरी मिळाल्याने, आम्ही वाढीच्या एका रोमांचक टप्प्यात प्रवेश केला आहे आणि आर्थिक वर्ष २६ साठी आमचे अंदाजे ५००० कोटींचे पूर्व-विक्री लक्ष्य साध्य करण्याचा आम्हाला विश्वास आहे. बदलत्या जीवनशैलीच्या पसंती, एकात्मिक समुदायांची वाढती मागणी आणि चांगल्या प्रकारे डिझाइन केलेल्या घरांवर लक्ष केंद्रित केल्याने बेंगळुरूचा प्रीमियम गृहनिर्माण बाजार वेगाने विकसित होत आहे. उत्तर बेंगळुरूचा गुंतवणुकीचा केंद्रबिंदू आमच्या सर्वात धोरणात्मक बाजारपेठांपैकी एक आहे, जो भारतातील नवीन पिढीच्या घरमालकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित करतो. आमचे आगामी प्रकल्प या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत - अपवादात्मक कनेक्टिव्हिटी, डिझाइन आणि मूल्य उपलब्ध करतात'कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एम्बेसी स्प्रिंग्जमधील तिच्या लक्झरी प्लॉट केलेल्या विकासाची संपूर्ण २०४ कोटी रूपयांच्या आसपास समजली जात आहे. एम्बेसी डेव्हलपमेंट्स लिमिटेड (पूर्वी इक्विनॉक्स इंडिया डेव्हलपमेंट्स लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे आणि पूर्वी इंडियाबुल्स रिअल इस्टेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारी कंपनी भारतातील मोठ्या आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक आहे. कंपनी भारतीय शहरांमध्ये निवासी, व्यावसायिक आणि विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्पांच्या बांधकाम आणि विकासात विशेषज्ञ आहे. बेंगळुरू, मुंबई महानगर प्रदेश (MMR) आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) वर लक्ष केंद्रित करून, कंपनीचे चेन्नई, जोधपूर, वडोदरा, विझाग आणि इंदूर येथे देखील अस्तित्व आहे. ही कंपनी बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) वर सूचीबद्ध (Listed) आहे आणि इन्फोमेरिक्सकडून आयव्हीआर ए-स्टेबल दीर्घकालीन कर्ज रेटिंग धारण करते.नाम इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कंपनी यांच्यातील विलीनीकरणाच्या योजनेला ७ जानेवारी २०२५ रोजी माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरण (एनसीएलएटी) ने अलीकडेच मंजुरी दिल्यानंतर एम्बेसी ग्रुप प्रवर्तक (Promoter) जितेंद्र विरवानी, आदित्य विरवानी काही गट संस्थांसह) ४२.६५% नियंत्रक हिस्सा असलेले नव्या आस्थापनेचे नवे प्रवर्तक बनले आहेत. २४ जानेवारी २०२५ पासून विलीनीकरण यशस्वीरित्या अंमलात आणण्यात आले आणि १३ फेब्रुवारी २०२५ पासून कंपनीचे नाव एम्बेसी डेव्हलपमेंट्स लिमिटेड असे ठेवण्यात आले.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 2:10 pm

Dharmendra Passes Away : कोहिनूर हरपला! धर्मेंद्र यांची मृत्यूशी झुंज अपयशी, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ आणि लोकप्रिय सुपरस्टार, 'ही-मॅन' (He-Man) म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे आज वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. सिनेसृष्टीतील या 'हँडसम हंक'ने अखेर जगाचा कायमचा निरोप घेतल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर आणि त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू होते. तब्येत अधिक खालावल्यामुळे त्यांना साधारणतः १२ दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांची प्रकृती अधिक नाजूक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता आणि ते घरीच विश्रांती घेत होते. मात्र, अखेर त्यांची मृत्यूशी असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. तब्बल सहा दशके आपल्या दमदार अभिनयाने आणि हँडसम लूकने भारतीय सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या या 'कोहिनूर' कलाकाराच्या निधनाने चित्रपटसृष्टीत मोठी आणि न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमीमुळे अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडाले आहे आणि विविध कलाकारांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा बनला बॉलिवूडचा 'ही-मॅन' सुपरस्टारएका सर्वसामान्य पंजाबी कुटुंबातून आलेल्या मुलाने इंडस्ट्रीचा 'ही-मॅन' हा किताब कसा मिळवला, हे जाणून घेणे रंजक आहे. फार कमी लोकांना माहिती असेल की, सिनेसृष्टी गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांचे मूळ नाव केवल कृष्ण देओल होते. पण, चित्रपटांमध्ये त्यांची ओळख धर्मेंद्र या नावानेच झाली. धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावी झाला. त्यांचे बालपण एका सर्वसामान्य पंजाबी जाट कुटुंबात व्यतीत झाले. त्यांचे वडिलोपार्जित गाव लुधियानातील पखोवाल तहसीलमधील रायकोटजवळील डांगो हे होते. धर्मेंद्र यांनी त्यांचे सुरुवातीचे आयुष्य सहनेवाल गावात घालवले. त्यांचे शिक्षण लुधियानातील लालटन कलान येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत झाले. त्यांचे वडील गावातील याच शाळेचे मुख्याध्यापक होते. एका सामान्य घरातील आणि ग्रामीण भागातील मुलाने आपल्या कर्तृत्वाने आणि अभिनयाच्या बळावर भारतीय चित्रपटसृष्टीवर सहा दशके राज्य केले. त्यांच्या या प्रवासाने अनेक कलाकारांना प्रेरणा दिली आहे.ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या शेवटच्या १२ दिवसांचा संघर्षगेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. त्यांच्या शेवटच्या १२ दिवसांमध्ये तब्येतीमध्ये मोठा चढ-उतार पाहायला मिळाला.अचानक प्रकृती बिघडल्यामुळे धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांच्यावर तब्बल १२ दिवस उपचार सुरू होते. सुरुवातीला त्यांच्या प्रकृतीला उपचारांनी चांगला प्रतिसाद मिळत होता, पण नंतर त्यांची प्रकृती काहीशी नाजूक झाली. प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना आयसीयू (ICU) मधून व्हेंटिलेटरवर (Ventilator) हलवण्यात आले होते. काही काळानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने आणि देओल कुटुंबीयांनीही दिली. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते घरीच होते, मात्र अखेर त्यांची मृत्यूशी असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार्सनी त्यांची भेट घेतली होती. सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, आमिषा पटेल, रितेश देशमुख यांसारख्या मोठ्या स्टार्सनी रुग्णालयात जाऊन 'ही-मॅन' यांची भेट घेतली. भेटीनंतर रुग्णालयातून बाहेर पडताना सर्वच स्टार्सच्या डोळ्यांत अश्रू तराळलेले पाहायला मिळाले, ज्यामुळे धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची नाजूकता तेव्हाच स्पष्ट झाली होती.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 2:10 pm

किंग्ज सर्कल, वडाळा, कुर्ला वासियांची तुंबणाऱ्या पाण्याची समस्या काही दिवसांचीच

अखेर माहुल पंपिंग स्टेशनसाठीची जमिन हस्तांतरीतमिठागराची जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका मोजणार साडेतेरा कोटी रुपयेआता माहुलच्याही कामाला लवकरच होणार सुरुवातमुंबई (सचिन धानजी):मुंबईत पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा जलदगतीने निचरा व्हावा यासाठी महापालिकेच्यावतीने प्रस्तावित केलेली पंपिंग स्टेशनची कामे पूर्ण झाली असली तरी मोगरा नाला आणि माहुल खाडीवरील पंपिंग स्टेशनची कामे रखडलेली आहेत. माहुल खाडीवरील पंपिंग स्टेशनकरता मिठागराची जागा ताब्यात घेण्यावरून जो विलंब झाला आहे, ती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. या पंपिंग स्टेशनकरता खासगी मालकाला नुकसान भरपाई देत मिठागराची जागा हस्तांतरणाची सर्व प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आहे. त्यामुळे या महिन्यांतच ही जागा ताब्यात येवून माहुलमधील पंपिंग स्टेशनच्या कामाला सुरुवात होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे किंग्ज संर्कल, गांधी मार्केट, कुर्ला नेहरु नगरची पाणी तुंबण्याची भीती आता काही दिवसांचीच राहणार आहे.२६ जुलैच्या महापुरानंतर ब्रिमस्टोवॅड अहवाल आणि चितळे समितीच्या शिफारशीनुसार २००८मध्ये मुंबईमध्ये एकूण आठ ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करणारी उदंचन केंद्र बनवण्याचा निर्णय घेतला होता. या आठपैंकी हाजी अली, ईला, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड, ब्रिटानिया आणि गझदरबंध ही सहा उदंचन केंद्रांची कामे पूर्ण होवून ती कार्यान्वित झाली आहेत. परंतु मोगरा व माहुल या दोन ठिकाणच्या पर्जन्यजल उदंचन केंद्रांची कामे रखडलेलीच आहेत. मोगरा नाला आणि माहुल खाडीवरील पर्जन्य जल केंद्राच्या उभारणीसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली असली तरी जागेचा वाद आहे. यातील माहुल खाडीवरील पंपिंग स्टेशनकरता वडाळा येथील एमबीपीटी मार्गावरील माहुल नाल्याच्या पातमुखावर मिठागराच्या जमिनीची निवड करण्यात आली आहे. यासाठीच्या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.https://prahaar.in/2025/11/24/is-ajit-pawar-in-trouble-due-to-his-statement-regarding-government-funds/ही जागा मिठ उत्पादनाची असल्यामुळे मिठ उत्पादक मेसर्स हॉरमुझ सॉल्ट वर्क्स यांना मिठ उत्पादन न करता आल्यामुळे त्यांना होणाऱ्या व्यावसायिक नुकसान भरपाईसाठी १०.४७ कोटी रुपये देण्याची मागणी झाली होती . पुढे या कंपनीशी वाटाघाटी केल्यामुळे त्यांनी ८.३७ कोटी रुपये नुकसान भरपाई स्वीकारण्याचे मान्य केले आहे. या केंद्रासाठी सुमारे २४ हजार ९९५ चौरस मीटर एवढ्या भूखंडाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे जमिनीचे मुल्य ५ कोटी रुपये निश्चित केले आहे. त्यामुळे जमिनीची किंमत आणि व्यावसायिक नुकसान भरपाई अशाप्रकारे १३.४० कोटी रुपये एवढे देवून ही जमिन पंपिंग स्टेशनकरता हस्तांतरीत करुन घेण्यात येत आहे.या माहुलमधील पर्जन्य जल केंद्राच्या उभारणीमुळे किंग्ज सर्कल, गांधी मार्केट, वडाळा पूर्व आण् कुर्ला नेहरु नगर इत्यादी ठिकाणी पावसाळ्यामध्ये साचणाऱ्या तथा पूरसदृश्य परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या ठिकाणच्या जमिनीच्या संपादनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर या पंपिंग स्टेशनच्या कामाला सुरुवात केली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 2:10 pm

आताची सर्वात मोठी बातमी: 'या'तीन कंपन्यांचे लवकरच विलीनीकरण? त्यानंतर खाजगीकरण? - सुत्र

प्रतिनिधी: जुलै २०२० मध्ये प्रस्तावित झालेली विमा कंपनीच्या विलीनकरणावर चर्चा काही कारणास्तव थांबलेली होती. मात्र पुन्हा एकदा याविषयी चर्चा सुरू झाल्याने पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, पुन्हा एकदा ओरिएंटल इन्शुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स या तिन्ही कंपन्यांचे विलीनीकरण होऊ शकते याविषयी सरकार पुन्हा सकारात्मक विचार करत असून याविषयी मोठ्या पातळीवर विचार मंथन होऊ शकते. मात्र यावर अद्याप निर्णय झाला नसला तरी तिन्ही कंपन्यांचे अर्थकारण, सरकारची वित्तीय प्रणाली यांचा विचार करुनच पुढील निर्णय वित्त मंत्रालय घेऊ शकते‌ अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे.सध्या ही चर्चा पुढील पातळीवर गेली नसली तरी प्राथमिक पातळीवर सुरू आहे. वित्त मंत्रालयाने अद्याप यावर कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही. त्यामुळे याविषयी अनिश्चितता कायम असली तरी या चर्चेत पुन्हा वेग आल्याने विविध स्तरांवरून विविध प्रतिसाद येत आहेत. तिन्ही कंपन्यांची अर्थक्षमता, उत्पादकता (Productivity), कार्यक्षमता (Efficiency) वाढण्यासाठी सरकार या विलीनीकरणचा गांभीर्याने विचार करत आहे. पीएसयु कंपनी असलेल्या या तिन्ही कंपन्यांत १७४५० रूपये गुंतवणूक सरकारने केली होती. अर्थमंत्री म्हणून अरूण जेटली यांनी कार्यभार सांभाळला असताना २०१८-२०१९ सालीच्या अर्थसंकल्पात तिन्ही कंपन्यांचे विलिनीकरण होईल असे वक्तव्य केले होते. मात्र त्यानंतर सरकारने ही कल्पना मागे घेत त्याऐवजी जुलै २०२० मध्ये १२४५० कोटींची भांडवली गुंतवणूक या विमा कंपन्यात केली होती.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा झाल्यामुळे, वित्त मंत्रालय या संस्थांच्या विलीनीकरणाचे प्राथमिक मूल्यांकन केले. तसेच सुत्रांच्या माहितीनुसार सरकारने जाहीर केलेल्या सामान्य विमा कंपनीचे खाजगीकरण करण्याच्या प्रस्तावाची तपासणी केली जात आहे असे सूत्रांनी सांगितले. विविध पर्यायांवर चर्चा सुरू आहे, परंतु अद्याप काहीही निश्चित झालेले नाही.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ सालच्या अर्थसंकल्पात दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एका सामान्य विमा कंपनीचे खाजगीकरण यासह मोठ्या प्रमाणात खाजगीकरणाचा आपला मानस स्पष्ट केला होता. उत्पादकता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक असल्याचा आपला हेतू त्यांनी स्पष्ट केला होता. सामान्य विमा (General Insurance) कंपन्यांचे खाजगीकरण करण्यास परवानगी देणारा सामान्य विमा व्यवसाय (राष्ट्रीयकरण) सुधारणा कायदा २०२१ ऑगस्ट २०२१ मध्ये संसदेने मंजूर केला. सुधारित कायद्याने केंद्र सरकारने विशिष्ट विमा कंपनीमध्ये किमान ५१% इक्विटी भांडवल ठेवण्याची आवश्यकता वगळली. तसेच, सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांमध्ये अधिक खाजगी सहभागाला परवानगी देणे आणि विमा प्रवेश आणि सामाजिक संरक्षण वाढवणे, यासह इतर उद्दिष्टांची तरतूद केली.विम्याची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि प्रवेश वाढवण्यासाठी परदेशातील नवीन कंपन्यांना प्रवेश मिळावा यासाठी, सरकारने येत्या हिवाळी अधिवेशनात विमा क्षेत्रात एफडीआय मर्यादा सध्याच्या ७४% १००% करण्यासाठी एक विधेयक मांडले होते. संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात १५ कामकाजाचे दिवस असतील.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 2:10 pm

आता भारत व युरोप यांच्यात युपीआयसह व्यवहार शक्य? आरबीआयकडून मोठी माहिती समोर

प्रतिनिधी:आरबीआयच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की आरबीआय केवळ भारतात नाही तर परदेशातही युपीआय (Unified Payment Interface UPI) माध्यमातून व्यवहार सुरळित, सुरक्षित, सोपे, सुकर व्हावे यासाठी परकीय देशातील वित्तीय प्रणालींशी सहकार्य करत नव्या इंटरलिंकेजसाठी कार्यरत आहे असे आरबीआयने म्हटले आहे. माहितीनुसार, आरबीआय (Reserve Bank of India), व एनपीसीआय (National Payments Corporation of India NPCI) यांच्या आसपासातील सहकार्यासह युरोपियन सेंट्रल बँकेशी सहकार्य करत एकत्रित युपीआय कनेक्ट करण्यासाठी मोठ्या पातळीवर बोलणी करत आहे. टार्गेट इन्स्टंट पेमेंट सेटलमेंट (TIPS) प्रणालीतून हे भविष्यात शक्य होऊ शकते.खासकरून युरोपियन प्रदेशातील नागरिक व भारतातील नागरिक यांच्या वाढत्या प्रतिनिधित्वातून वाढलेला व्यवहार पाहता परदेशी युपीआय सुरु झाल्यास मोठ्या प्रमाणात व्यापारांसह ग्राहकांना दिलासा मिळेल यासाठी आरबीआय प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता पैसे पाठवण्याची सु़विधा सुकर होऊ शकते.याविषयी बोलताना आरबीआयने आपल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की,'युरोसिस्टमद्वारे चालवल्या जाणाऱ्या इन्स्टंट पेमेंट सिस्टम, टार्गेट इन्स्टंट पेमेंट सेटलमेंट (TIPS) शी UPI ला जोडण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड (NIPL) युरोपियन सेंट्रल बँकेशी संपर्क साधत आहेत. रचनात्मक आणि शाश्वत सहभागानंतर, दोन्ही बाजूंनी UPI-TIPS लिंकसाठी अंमलबजावणीचा टप्पा सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे.प्रस्तावित UPI-TIPS इंटरलिंकेजचा उद्देश भारत आणि युरो क्षेत्रामधील सीमापार रेमिटन्स सुलभ करणे आहे आणि दोन्ही अधिकारक्षेत्रांच्या वापरकर्त्यांना त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.तांत्रिक एकात्मता, जोखीम व्यवस्थापन आणि सेटलमेंट व्यवस्था यासह UPI-TIPS लिंक कार्यान्वित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि NIPL युरोपियन सेंट्रल बँकेशी जवळून सहकार्य करत राहतील.'

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 2:10 pm

Pune : कात्रज बायपास मार्गावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण; नव्या आदेशाची ‘या’तारखेपासून अंमलबजावणी

पुणे – शहर वाहतूक विभाग हद्दीतील कात्रज बाह्यवळण मार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिजदरम्यान वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागाकडून नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त अधिकाराचा वापर करून पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी दिलेल्या आदेशानुसार, कात्रज बायपासवरील भूमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेवटपर्यंतच्या मार्गावर सर्व […] The post Pune : कात्रज बायपास मार्गावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण; नव्या आदेशाची ‘या’ तारखेपासून अंमलबजावणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 1:56 pm

‘ही-मॅन’म्हणजे नक्की काय? ; धर्मेंद्र यांनाच हे नाव का मिळाले? वाचा

He Man ‘Dharmendra’ । हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. ८९ वर्षांच्या या व्यक्तीने मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि रुग्णालयातही दाखल होते त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. तेव्हापासून ते त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी वेळ घालवत होते. मात्र, सोमवारी सकाळी त्यांचे […] The post ‘ही-मॅन’ म्हणजे नक्की काय? ; धर्मेंद्र यांनाच हे नाव का मिळाले? वाचा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 1:53 pm

‘शोले’च्या विरुची एक्झिट! धर्मेंद्र यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Dharmendra Passes Away | बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. याच दरम्यान त्यांच्या निधनाच्या अफवा देखील पसरल्या होत्या. त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अखेर त्यांच्या जुहूतील […] The post ‘शोले’च्या विरुची एक्झिट! धर्मेंद्र यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 1:41 pm

तब्बल १० हजार रक्तपिशव्यांचे महाअभियानात संकलन; मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली कृतज्ञता

पुणे : शहरात रक्ताचा तुटवडा गंभीर होत असताना, पुणेकरांनी पुन्हा एकदा सामाजिक उत्तरदायित्वाच्या उच्च परंपरेचे जतन करीत, खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान महाअभियानात ५६ रक्तदान शिबिरांमधून तब्बल १० हजार ३३८ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन केले. दरवर्षी होणाऱ्या या उपक्रमाला पुणेकरांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मोहोळ यांनी कृतज्ञता […] The post तब्बल १० हजार रक्तपिशव्यांचे महाअभियानात संकलन; मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली कृतज्ञता appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 1:29 pm

Beauty tips: साबण खरेदी करताना चुका करू नका! तुमच्या त्वचेसाठी कोणता साबण योग्य? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Beauty tips: आपल्या दैनंदिन वापरातील सर्वात मूलभूत वस्तू म्हणजे साबण. पण अनेकजण न विचार करता कुठलाही साबण वापरतात आणि नंतर त्वचा कोरडी पडणे, खरखरीत होणे किंवा ऍलर्जी होणे अशा समस्या उद्भवतात. म्हणूनच तुमच्या त्वचेप्रमाणे योग्य साबण निवडणे अत्यंत गरजेचे आहे. आज बाजारात सेंसिटिव, हायड्रेटिंग, अँटी-बॅक्टेरियल, हर्बल असे अनेक प्रकारचे साबण उपलब्ध आहेत. मात्र कोणता साबण […] The post Beauty tips: साबण खरेदी करताना चुका करू नका! तुमच्या त्वचेसाठी कोणता साबण योग्य? जाणून घ्या महत्त्वाची माहिती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 1:21 pm

Pakistan: पेशावरमध्ये फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरीच्या मुख्यालयावर हल्ला

पेशावर : पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांत पुन्हा एकदा दहशतवादाच्या रडारवर आला आहे.२४ नोव्हेंबरला सोमवारी पहाटे पेशावरमधील फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी (एफसी) मुख्यालयावर आत्मघातकी हल्ला झाला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनेची पुष्टी करत सुरक्षा दलाने तातडीने प्रत्युत्तर दिल्याचे सांगितले. संपूर्ण परिसराला वेढा घालून रोडमार्ग बंद करण्यात आले आहेत.कॅपिटल पोलिस अधिकारी डॉ. मियां सईद अहमद यांनी सांगितले की एफसी मुख्यालयावर अचानक हल्ला झाला आणि जवानांनी त्वरित मोर्चा उघडला. सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वतःला उडवून दिल्यानंतर सतत गोळीबार सुरू झाला. या कारवाईदरम्यान तीन दहशतवादी ठार झाले असून उर्वरित संशयितांचा शोध सुरु आहे. कॉम्प्लेक्समधील सर्व इमारती आणि परिसराची तपासणी युद्धपातळीवर सुरू आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 1:10 pm

“सेटलमेंट करा म्हणून सांगायला पोलीस स्टेशनवर कोण गेले होते?”गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात दमानियांकडून पंकजा मुंडेंना सवाल

Anjali Damania Vs Pankaja Munde | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे गर्जे यांनी मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मात्र त्यांच्या आई-वडिलांकडून ही हत्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. . अनंत गर्जे यांच्यासह सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळामुळेच गौरी यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप […] The post “सेटलमेंट करा म्हणून सांगायला पोलीस स्टेशनवर कोण गेले होते?” गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात दमानियांकडून पंकजा मुंडेंना सवाल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 1:09 pm

“वक्फ सुधारणा, SIR विवाद अन् तलाक-ए-हसन…” ; नव्या सरन्यायाधीशांसमोर ‘या’मोठ्या मुद्द्यांचे आव्हान 

Justice Suryakant। न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताच्या राष्ट्रपतींनी भारताचे सरन्यायाधीश (CJI) म्हणून नियुक्ती केली आहे. ते आज देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. ते माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांची जागा घेतील. त्यांचा कार्यकाळ १४ महिन्यांचा असेल, कारण न्यायमूर्ती सूर्यकांत फेब्रुवारी २०२७ मध्ये निवृत्त होणार आहेत. न्यायाधीश म्हणून, त्यांनी यापूर्वी अनेक प्रमुख राष्ट्रीय प्रकरणांच्या सुनावणीत सहभाग […] The post “वक्फ सुधारणा, SIR विवाद अन् तलाक-ए-हसन…” ; नव्या सरन्यायाधीशांसमोर ‘या’ मोठ्या मुद्द्यांचे आव्हान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 1:04 pm

Gautami Patil: “शांततेत कार्यक्रम पाहा… नाहीतर येऊच नका!”…वर्ध्यातल्या गोंधळानंतर गौतमी पाटीलचा थेट इशारा

Gautami Patil: प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच वर्ध्यात झालेल्या तिच्या कार्यक्रमात जोरदार गोंधळ झाला होता. स्टेजवरच नृत्य नीट दिसत नसल्याच्या कारणावरून काही प्रेक्षकांनी राडा घातला, खुर्च्यांची तोडफोड केली आणि वातावरण पूर्णपणे बिघडवलं. पैसे देऊनही कार्यक्रम व्यवस्थित पाहता न आल्याने संतापलेल्या काही तरुणांनी अक्षरशः खुर्च्यांची तोडफोड केली. वर्ध्यातील राड्यामुळे निर्माण […] The post Gautami Patil: “शांततेत कार्यक्रम पाहा… नाहीतर येऊच नका!”… वर्ध्यातल्या गोंधळानंतर गौतमी पाटीलचा थेट इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 12:33 pm

इकडे बिटकॉइन कोसळले अन् तिकडे ट्रम्प यांना ९,८०० कोटींचा फटका, संपत्तीत मोठी घसरण

Donald Trump Networth। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे, त्यांच्या एकूण संपत्तीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, ट्रम्प यांच्या एकूण संपत्तीत १.१ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे, हे प्रामुख्याने क्रिप्टोकरन्सी बाजारातील गोंधळामुळे, विशेषतः प्रमुख क्रिप्टो, बिटकॉइनच्या क्रॅशमुळे झाले आहे. ट्रम्प यांच्या कंपनीच्या टीएमटीजी शेअर्समध्ये घट फोर्ब्सच्या नवीन अहवालानुसार, […] The post इकडे बिटकॉइन कोसळले अन् तिकडे ट्रम्प यांना ९,८०० कोटींचा फटका, संपत्तीत मोठी घसरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 12:32 pm

शुक्रवारी तेजस विमान कोसळले आज शेअर ९% कोसळला

मोहित सोमण:शुक्रवारी 'दुबई एअर शो ' दरम्यान तेजस विमान कोसळले होते. त्यामुळे काहींनी कंपनीच्या उत्पादन क्षमतेवर व दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने गुंतवणूकदारांनी एचयुएल (Hindustan Aeronautics Limited) कंपनीच्या शेअरला नकारात्मक कौल दिला. परिणामी सुरूवातीच्या व्यवहारात कंपनीचा शेअर थेट ९% कोसळला आहे. ८ ते ९% घसरण आज सातत्याने शेअर्समध्ये झाली होती. दुपारी १२ वाजेपर्यंत कंपनीचाअ शेअर ३.५२% घसरण झाल्याने ४४३३.४० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. अर्थात सकाळी ११ नंतर शेअरने रिकव्हरी सुरु केल्याने घसरण थांबली असली तरी आज झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.शुक्रवारी झालेल्या घटनेनंतर कंपनीने, दुबई एअर शोमध्ये हवाई प्रदर्शनादरम्यान धाडसी IAF पायलटच्या मृत्यूमुळे त्यांना खूप दुःख झाले आहे असे आपल्या निवेदनात म्हटले आहे. विंग कमांडर नमांश स्याल असे या मृत्यूमुखी पडलेल्यांचे नाव आहे. एचएएलने बनवलेले विमान २० महिन्यांत दुसऱ्यांदा अपघातात सापडले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये राजस्थानमधील जैसलमेर येथे याआधीचा अपघात झाला होता परंतु पायलट सुरक्षितपणे बाहेर पडला होता. आपल्या नेमक्या शब्दात,'दुबई एअर शोमध्ये हवाई प्रदर्शनादरम्यान धाडसी आयएएफ पायलटच्या निधनाने एचएएलला खूप दुःख झाले आहे. एचएएल शोकग्रस्त कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो' असे एचएएलने आपल्या एक्सवर पोस्टवर लिहिले आहे.या तिमाहीत कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १०% अधिक एकत्रित नफा (Total Consolidated Net Profit) मिळाला होता तर कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर ११% वाढ झाली होती. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १५१० कोटींच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीला १६६९ कोटींचा एकत्रित निव्वळ नफ मिळाला आहे तर कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात ५९७६.२९ कोटीवरून ६६२८.६१ कोटींवर वाढ नोंदवली आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 12:30 pm

सम्राटना गृहमंत्री बनवण्यास नितीश कसे तयार झाले?:नेपाळ हिंसेनंतर लिहिली पटकथा, शहांसोबत 2 बैठका; गुन्हेगारी नियंत्रणावर प्रदीर्घ चर्चा

बिहारच्या नवीन सरकारमध्ये जर कोणत्याही मंत्रालयाने सर्वात मोठा राजकीय संदेश दिला असेल तर ते गृहखाते आहे. नितीश कुमार यांच्याकडे २० वर्षे असलेले हे खाते आता सम्राट चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. हा केवळ खात्यांमध्ये बदल नाही तर बिहारमध्ये सत्तेत बदल होण्याचे संकेत देखील देतो. हे सत्ता हस्तांतरण अचानक झाले नाही. बऱ्याच काळापासून भाजपमध्ये अशी मागणी होती की राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडून पक्षाकडेच सोपवावी. जेणेकरून उत्तर प्रदेशसारखे आदर्श येथे राबवता येईल. यासाठी बिहारमध्ये अनेक वेळा योगींचे पोस्टर्सही लावण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, दिल्लीत नितीश कुमार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात झालेल्या बैठकीदरम्यान ही पटकथा लिहिली गेली. नेपाळमधील जेन-झी चळवळ, सीमापार तस्करी, चिकन नेक सुरक्षा, कट्टरपंथी नेटवर्क आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्र व्यापाराची संवेदनशीलता लक्षात घेता सप्टेंबर २०२५ मध्ये हा निर्णय घेण्यात आला. नितीश कुमार यांच्या शहा यांच्यासोबतच्या दोन बैठकींमुळे अखेर करारावर शिक्कामोर्तब झाले. बिहारमधील कोणत्या सुरक्षा मुद्द्यांवर नितीश यांनी सहमती दर्शवली, शहा यांनी त्यांना संपूर्ण रणनीती कशी समजावून सांगितली आणि भाजप पुढे कोणत्या प्रकारची कारवाई करत आहे याबद्दलचा विशेष अहवाल वाचा... आता जाणून घ्या हा निर्णय कसा घेतला गेला... अमित शहांच्या बैठकींनी खेळ बदलला सूत्रांकडून असे दिसून येते की हा निर्णय ४८ तासांत घेण्यात आला नाही. उलट, तो दोन महिन्यांच्या नियोजनाचा परिणाम आहे. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी, सप्टेंबरमध्ये दिल्लीत गृहमंत्री अमित शहा, नितीश कुमार आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत बिहारमधील वाढत्या सायबर गुन्हेगारी, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि संघटित गुन्हेगारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ६०% मोठ्या टोळ्या सीमावर्ती भागातून कार्यरत असल्याचे वृत्त आहे. बिहारचे पुढील राजकीय उद्दिष्ट विकास नव्हे तर सुरक्षा आणि प्रशासन असेल हेही बैठकीत मान्य करण्यात आले. त्यामुळे बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी जलद निर्णय घेतले पाहिजेत. यासाठी जबाबदारी देखील स्थापित केली पाहिजे. या बैठकीत, सम्राट चौधरी यांना उत्तरदायी चेहरा म्हणून पुढे आणण्यात आले, कारण ते बिहारमध्ये कट्टरपंथी म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी बिहारमध्ये योगी आदित्यनाथ मॉडेल लागू करण्यासाठी सातत्याने वकिली केली आहे. त्यांनी योगींच्या शैलीत एक संवादही दिला: गुन्हेगार एकतर तुरुंगात असतील किंवा कबरीत असतील. यानंतरच नितीश यांनी त्यांना गृहमंत्रालय देण्यास सहमती दर्शविली. तथापि, त्यांनी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अधिकार कायम ठेवला. बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्था, आंतरराष्ट्रीय सुरक्षेचा उल्लेख... ४ मुद्द्यांमध्ये समजून घ्या... १. नेपाळ आणि बिहार सीमेवरील जेन-झी चळवळ बिहारची ७२९ किमी लांबीची सच्छिद्र नेपाळ सीमा नेहमीच दिल्लीसाठी सॉफ्ट झोन राहिली आहे. ८-९ सप्टेंबर २०२५ च्या रात्री नेपाळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २१ तरुणांचा मृत्यू झाला. त्यानंतर, नेपाळमध्ये बेरोजगारीवरून जेन-झी निदर्शने वाढली. पोलिस स्टेशन, मंत्री निवासस्थाने आणि प्रशासकीय इमारतींवर हल्ले करण्यात आले. भारतीय सुरक्षा यंत्रणांना भीती होती की या अस्थिरतेचा प्रथम परिणाम बिहार, सीतामढी, अररिया, किशनगंज, मधुबनी या सीमावर्ती जिल्ह्यांवर होऊ शकतो. नेपाळमधील राजकीय अस्थिरतेमुळे बिहारमध्ये बनावट चलन, ड्रग्ज पुरवठा, मानवी तस्करी आणि शस्त्रास्त्रांच्या नेटवर्कचा प्रसार पूर्वी झाला आहे. गुप्तचर विभागाने सप्टेंबरच्या अहवालात इशारा दिला होता की पुढील १८ महिन्यांत बिहार-नेपाळ सीमा सर्वात संवेदनशील असेल. म्हणूनच, केंद्र सरकारला एक आक्रमक, चतुर गृहमंत्री हवा होता जो पोलिस यंत्रणा वेगाने चालू ठेवू शकेल. ते केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सतत संपर्कात राहतील आणि दिल्लीत होणाऱ्या बैठकांना उपस्थित राहू शकतील. खरं तर, नितीश दिल्लीत होणाऱ्या गृहमंत्र्यांच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत; त्यांनी नेहमीच राज्याच्या डीजीपीला पाठवले आहे. नेपाळशी संबंधित या मुद्द्याची संवेदनशीलता जाणून असलेले नितीश सहमत होते. २. चिकन नेक: बांगलादेश आणि पूर्व भारतातील राष्ट्रीय सुरक्षा बफर स्टेट बिहार सिलिगुडी कॉरिडॉर, ज्याला चिकन नेक असेही म्हणतात, हा २२ किमीचा अरुंद मार्ग आहे जो भारताच्या ईशान्येला देशाच्या उर्वरित भागाशी जोडतो. जर आपण भारताच्या सुरक्षेचा नकाशा काढला तर बिहार हा त्याचा कणा असेल. २०२३-२४ मध्ये, धार्मिक अतिरेकी संघटना, बनावट चलन रॅकेट आणि बांगलादेशातून रोहिंग्या घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली. ही घुसखोरी बिहारमधून होत होती. केंद्राला राज्यांच्या सहकार्याची आवश्यकता होती, जिथे गृहखाते सर्वकाही ठरवते. राजकीयदृष्ट्या, भाजप राष्ट्रीय सुरक्षेचे श्रेय स्वतःकडे घेऊ इच्छिते. सम्राट चौधरी हे राष्ट्रवादी व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या भाषणांमध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि सुरक्षा हे नेहमीचे विषय असतात. त्यांच्या आगमनामुळे बिहार एटीएस, विशेष कार्य दल आणि केंद्रीय संस्थांमधील समन्वय वाढू शकतो. म्हणूनच भाजप समर्थक नेते म्हणाले, बिहार आता फक्त एक राज्य राहिलेले नाही, तर राष्ट्रीय सुरक्षा पट्टा आहे. आता, भाजप ते थेट केंद्र सरकारकडून हाताळेल. ३. बिहारला कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत नंबर १ राज्य बनवण्याचे ध्येय भाजपला माहित आहे की गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईपर्यंत उद्योग, थेट परदेशी गुंतवणूक आणि स्टार्टअप्स येणार नाहीत. २०२२ च्या एनसीआरबीनुसार, बिहारमध्ये गुन्हेगारी प्रलंबित राहण्याचा दर ८८% आहे. सम्राट चौधरी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वारंवार सांगितले आहे की पोलिस काम करतील, सबबी करणार नाहीत. त्यांचे धोरण सोपे आहे: एकतर गुन्हेगारी कमी करा किंवा पद सोडा. एनसीआरबीच्या मते, हिंसक गुन्ह्यांमध्ये बिहार आघाडीवर आहे. खून आणि खून करण्याचा प्रयत्न यामध्ये ते सातत्याने देशातील पहिल्या पाच राज्यांमध्ये स्थान मिळवते. बिहारमधील गुन्ह्याचे स्वरूप अधिक गंभीर आहे आणि हे त्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. या प्रतिमेला तोंड देण्यासाठी सम्राट चौधरी यांना एक प्रमुख व्यक्ती बनवण्यात आले आहे. नितीश यांनीही सहमती दर्शवली आणि २०२९ पर्यंत आपला संदेश देता यावा म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात बिहारला प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. ४. सम्राट 'कट्टर' आहे या वस्तुस्थितीमुळे नितीश यांना खात्री पटली नितीश कुमार हे प्रशासकीय, संयमी आणि संस्थात्मक सरकार चालवतात. भाजपने असा युक्तिवाद केला की सोशल मीडियावरील ट्रोल-चालित कथा आणि हिंसक गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी आता राजकारणाची कठोर प्रतिमा आवश्यक आहे. भाजपने नितीश कुमार यांना हा प्रस्ताव सादर केला. त्यांनी सम्राट यांच्या कामगिरीची उदाहरणे दिली, ज्यात पंचायत राज मंत्री असताना चार महिन्यांत २६३ भ्रष्टाचार संशयितांना निलंबित करणे समाविष्ट होते. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी भाजपच्या आक्रमकतेला बळकटी देण्यासाठी पोस्टर वॉर, रस्त्यावरील निदर्शने आणि पगडी राजकारणाची मोहीम सुरू केली. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी क्षेत्रीय तपासणी आणि रात्रीची गस्त घातली. त्यानुसार, भाजपने सम्राट यांना एक सक्रिय शासक म्हणून सादर केले. नितीश यांना लक्षात आले की, त्यांच्या वयामुळे, कठोर राजकारण आता त्यांना शोभत नाही. म्हणून नितीश यांनी हे खाते सोडण्यास सहमती दर्शविली. तथापि, कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर भाजप जबाबदार राहील, असे नितीश कुमार यांनी सुज्ञपणे सांगितले. तथापि, आयपीएस अधिकाऱ्याच्या बदलीची जबाबदारी त्यांनी कायम ठेवली. यावरून हे स्पष्ट होते की नितीश यांनी गृहखाते सोडले असले तरी, त्यांच्या संमतीशिवाय सम्राट मोठे निर्णय घेऊ शकणार नाहीत. नियमित कायदा आणि सुव्यवस्थेच्या इतर बाबींमध्ये, सम्राट आक्रमक निर्णय घेऊ शकतात.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 12:12 pm

अयोध्येतील राम मंदिरावर उद्या ध्वजारोहण

ऐतिहासिक क्षणाला पंतप्रधान मोदी यांची उपस्थितीअयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येत मंगळवारी २५ नोव्हेंबर रोजी नवीन इतिहास लिहिला जाणार आहे. श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर भगवा विजय ध्वज फडकवण्यासाठी एक भव्य समारंभ आयोजित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असतील.ध्वजात सूर्याचे प्रतीक असेल, जे भगवान रामाच्या सूर्यवंशी वंशाचे आणि दैवी उर्जेचे प्रतीक आहे. पॅराशूट उत्पादनात विशेषज्ञ असलेल्या अहमदाबाद येथील एका कंपनीने हा ध्वज डिझाइन केला आहे. ११ फूट रुंद आणि २२ फूट लांब असा या ध्वजाचा आकार आहे. हा ध्वज तीन थरांचा असून, तो रेशमी सिल्कचा आहे आणि त्याचा रंग पितांबरी आहे. हा रंग सूर्योदयापूर्वी क्षितिजावर दिसणाऱ्या लालसर रंगासारखा आहे. सूर्य, पाऊस आणि जोरदार वारा सहन करण्यासाठी हा विशेष पॅराशूट कापड आणि रेशमी धाग्यांपासून बनवला आहे. या ध्वजावर हाताने नक्षीकाम करून भगवान रामाचे राजचिन्ह असलेले कोविदार वृक्ष, सूर्यदेवाचे प्रतीक आणि त्या सूर्याच्या मध्यभागी ओंकार हे चिन्ह बनवण्यात आले आहे. हा ध्वज तयार करण्यासाठी एकूण ६ कारागिरांनी मेहनत घेतली आहे. हा समारंभ सुमारे चार तास चालेल. पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि हजारो मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी मंदिर संकुलात ७ हजार हून अधिक पाहुण्यांना संबोधित करतील. भगवान महादेव, गणेश, हनुमान, सूर्यदेव, माँ भगवती, माँ अन्नपूर्णा आणि शेषावतार यांच्या उपकेंद्रांनाही विस्तृत सजावटीने सजवण्यात आले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, ध्वजारोहणाचा संपूर्ण कार्यक्रम फक्त १० मिनिटांचा असेल आणि तो माध्यान्ह काळात अभिजित मुहूर्तावर केला जाईल.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 12:10 pm

सरकारी निधी बाबतच्या वक्तव्यामुळे अजित पवार अडचणीत ?

नाशिक: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून येत्या २ डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष प्रचार करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार मतदान तोंडावर असताना पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका प्रचार सभेमध्ये बोलताना अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे.बारामती तालुक्यातील मालेगाव नगर पंचायत निवडणुकीमध्ये पक्षाचा प्रचार करताना अजित पवारांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करताना, 'तुमच्याकडे मत आहे, तर माझ्याकडे निधी आहे' असे विधान केले. पुढे जर तुम्ही पक्षाचे सर्व उमेदवार निवडून दिले तर मी तुम्हाला शब्द देतो, शहराला निधीची कमतरता भासू देणार नाही. जर तुम्ही आपल्या पक्षाचे सर्व उमेदवार विजयी केले तर मी सर्व आश्वासने पूर्ण करेल. पण जर निवडून आले नाहीत तर मी पण विचार करेन असे अजित पवार यांनी म्हटले आहे. या भागात पवारांनी १८ उमेदवार उभे केले आहेत.https://prahaar.in/2025/11/24/special-blocks-between-these-stations-of-central-railway-for-interlocking-work-know-the-detailed-schedule/दरम्यान अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर शिउबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. सरकारला जो पैसा मिळतो तो जनतेच्या टॅक्समधून मिळतो, हा पैसा अजित पवार यांच्या घरातून येत नाही. अजित पवार यांचं हे वक्तव्य म्हणजे मतदारांना धमकावण्याचा प्रकार आहे, हे लोकशाही विरोधात आहे, निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार? असा थेट सवाल दानवेंनी उपस्थित केला आहे. तसेच निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.अजित पवार आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. जानेवारी २०२५ मध्ये, बारामती या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात एका जाहीर सभेला संबोधित करताना सुद्धा केलेले त्यांचे विधान चर्चेत होते. तुम्ही मला मतदान केले आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझे मालक आहात, या विधानावरून अजित पवारांवर टीका होतं होती. आता परत त्यांनी मतदारांना आवाहन करताना केलेले विधान चर्चेत आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 12:10 pm

विशेष Explainer: आज MSCI Index Rejig अंतिम मुदत भारतासाठी निर्णायक बदल? नक्की MSCI Index म्हणजे काय? कुठल्या कंपन्यांची एंट्री व एक्सिट जाणून घ्या

मोहित सोमण:जागतिक बेंचमार्क म्हणून प्रस्थापित झालेला एम एस सी आय (Morgan Stanley Capital International MSCI) निर्देशांकातील मागील आढाव्याच्या अंमलबजावणीची मुदत आज संपली आहे. त्यामुळे आता या निर्देशांकात मोठे बदल होणार आहेत. मागील बैठकीनुसार, फोर्टिस हेल्थकेअर, वन ९७ (Paytm), जीई व्हर्नोवा टी अँड डी इंडिया, सिमेन्स एनर्जी इंडिया हे शेअर भारतीय मानक निर्देशांकात (Indian Standard Index) या श्रेणीत जोडले गेले आहेत तर कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Concor), टाटा इलकसी (Tata Elxsi) हे शेअर काढण्यात आले आहेत. जुन्या यादीची आज मुदत संपत असल्याने आज सत्र संपल्यानंतर हे नवे बदल पार पडणार आहेत. त्यामुळे या फेरबदलायमुळे बदललेल्या मानकांनुसार भारतीय शेअर बाजारातील हालचाल परिणामकारकरित्या बदलू शकते.नक्की आणखी काय बदल आहेत?सात लार्जकॅप व मिडकॅप शेअरमध्ये बदल झालेले आहेत. उदाहरणार्थ या जागतिक निर्देशांकातून भारतीय बाजारातील अपोलो हॉस्पिटल, लुपिन, युपीएल, अलकेम लॅबोरेटरी, ज्यूब्लिंएट फूडस, एसआरएफ, एशियन पेंटस या शेअर्समध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची आवक वाढण्याची शक्यता आहे. कारण या शेअरचे प्रतिनिधित्व अथवा वजन वाढल्याने या कंपन्यांचा निर्देशांकात प्रभाव वाढू शकतो. तर दुसरीकडे निर्देशांकातून संवर्धना मदर्सन, झायडस लाईफसायन्स, कोलगेट पामोलीव, भारत फोर्ज, सुंदरम फायनान्स या सारख्या शेअरचे संबंधित आंतरराष्ट्रीय निर्देशांकातील वजन अथवा प्रभाव घसरणार आहे.आता MSCI India Index म्हणजे नक्की काय?MSCI Index हा एक जागतिक दर्जाचा मानक म्हणून ओळखला जातो. शेअर बाजारातील गुणात्मक व संख्यात्मक परिस्थितीचा अंदाज घेऊन कंपन्यांच्या निर्देशांकातील प्रभावाचे मोजमाप या निमित्ताने केले जाते. या निर्देशांकातील बदल सुचवण्यासाठी वर्षातून चार वेळा बैठक संस्थेकडून घेतली जाते. सामान्यतः फेब्रुवारी, मे, ऑगस्ट, नोव्हेंबर महिन्यात ही बैठक होते. या बैठकीत परिस्थितीचे पुनरावलोकन (Review) घेऊन यांच्यातील काही शेअर काढून निर्देशांकातील वेटेजसाठी काही नवी शेअरची घोषणा केली जाते.कंपनीच्या गुणात्मक व संख्यात्मक दर्जा व्यतिरिक्त इतर कंपनीचे निकषही या निर्देशांकात तपासले जातात. कंपनीची आर्थिक परिस्थिती, बाजारातील परिस्थिती, परिणामकारकता, कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation), कंपनीचा बाजारात फ्री फ्लोट (उपलब्ध असलेले) शेअर, तसेच कंपनीच्या शेअरमधील सहजता, उपलब्धता, तरलता (Liqudity) यांचा सांगोपांग विचार करुन पुढील बदल केले जातात. बाजारातील परिस्थितीवर अभ्यास करून हे महत्वपूर्ण निर्णय संस्था वेळोवेळी घेत असते. सध्या घडत असलेले परिणाम पाहता भविष्यातील कामगिरीही पडताळून संस्था नव्या व जुन्या शेअरचे पुनरावलोकन करते. निकाल लागल्यानंतरही कंपनीच्या शेअर्समध्ये याचा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम संबंधित शेअरवर होत असतो. नव्याने सामील झालेल्या शेअर्सला निर्देशांकात महत्व प्राप्त झाल्याने या शेअर्समध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणूकही वाढू शकते.शेअरला जमा सामील अथवा काढण्याचे निकष काय?कंपनीची कामगिरी, साईज, बाजार भांडवल, रोजची तरलता (Liquidity) किंवा शेअर्समध्ये दररोजचे व्यवहार किती (Average Daily Traded Value) अशा अनेक निकषांचा विचार केला जातो. त्यानंतर कंपनीचे लार्ज मिड स्मॉल कॅप मध्ये वर्गीकरण केले जाते.मुख्य निर्देशांकाशी संलग्न असलेल्या कंपनीच्या तुलनेत या निर्देशांकात संबंधित कंपन्यांचे वर्गीकरण होते. क्षेत्रीय विशेष निर्देशांक त्यांचे गुणधर्म त्या क्षेत्रातील कंपनीची कामगिरी, महत्व, बाजार भांडवल या आधारे त्या क्षेत्रीय विशेष निर्देशांकातील कंपनीचे वेटेज निश्चित होते.कंपनीचे बाजार भांडवल किती आहे यावरून या शेअरचे निर्देशांकातील महत्व निश्चित होते.निवडीनंतर, स्टॉकचे वजन फ्री-फ्लोट-अ‍ॅडजस्टेड मार्केट कॅपिटलायझेशन किंवा विशिष्ट निर्देशांक नियमांनुसार निश्चित केले जाते.निर्देशांकाचे का आहे महत्व?२०२५ पर्यंत, अंदाजे १८.३ ट्रिलियन डॉलर इतकी व्यवस्थापनाखालील मालमत्ता जागतिक स्तरावर एम एस ए आय निर्देशांकात बेंचमार्क केल्या गेल्या आहेत असे समजले जाते. या निर्देशांकात २ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ETF) समाविष्ट आहेत. यामुळेच निर्देशांक जागतिक वित्त क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली मानकांमध्ये (Standards) समाविष्ट झाले आहेत.त्यातही भारतासाठी हा निर्देशांक महत्वाचा कारण आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत, भारत 'MSCI Emerging Market' निर्देशांकात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्देशांक म्हणून समाविष्ट केला गेला होता. चीननंतर देशाचा क्रमांक लागतो.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 12:10 pm

गुणपत्रिका न मिळाल्याने करिअर कोलमडले; उच्च न्यायालयाचे शिक्षण मंडळाला फटकारे

मुंबई : महाविद्यालय आणि राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय चुकीमुळे एका विद्यार्थ्याला तब्बल नऊ वर्षे योग्य बारावीची गुणपत्रिका मिळाली नाही. या विलंबामुळे त्याचे करिअर गंभीर अडचणीत सापडले यामुळे त्याला व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा देण्याची संधीही गमवावी लागली . शेवटी मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत विद्यार्थ्याला दिलासा दिला असून, आवश्यक शुल्क भरताच त्याला २०१६ च्या परीक्षेची गुणपत्रिका १५ दिवसांत आणि प्रमाणपत्र ३० दिवसांत देण्याचा आदेश न्यायालयाने मंडळ व महाविद्यालयाला दिला आहे.न्यायालयाने आपल्या निर्णयात महाविद्यालय आणि मंडळाच्या सलग चुकांसाठी कठोर शब्दांत ठणकावले न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने सांगितले की', संस्थांच्या त्रुटींमुळे विद्यार्थ्याला दंड भोगावा लागणे अन्यायकारक आहे. अशा प्रकरणांत व्यावहारिक दृष्टीकोन ठेवणे अत्यावश्यक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. सोबतच दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.न्यायालयाने आदेशात म्हटले की, विद्यार्थ्याला गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र देण्यात यावे, जेणेकरून तो कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी या निकालाचा उपयोग करू शकेल.नेमके काय घडले?विद्यार्थी ओंकारने २०१६ च्या बारावी परीक्षेचा निकाल घोषित करावा यासाठी २०२३ मध्ये याचिका दाखल केली होती. नोटीस बजावूनही मंडळाने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. ओंकारने २०१४ मध्ये ४५.५४% गुणांसह बारावी उत्तीर्ण केली होती. त्यानंतर गुणवत्ता सुधारणा योजनेअंतर्गत त्याने गुण वाढवण्याचा पर्याय निवडला. परंतु २०१५ मध्ये तो गुण सुधारत असताना अनुत्तीर्ण ठरला. त्याच वेळी महाविद्यालयाने त्याचा ऑनलाइन फॉर्म चुकीचा भरला. २०१५ मध्ये ‘सुधारणा’ विद्यार्थी दाखवण्याऐवजी ‘अनुत्तीर्ण’ दाखवले गेले. पुढे २०१६ मध्ये तो प्रत्यक्षात ‘रिपिटर’ असताना त्याला चुकीने ‘सुधारणा विद्यार्थी’ म्हणून दाखवण्यात आले. दोन्ही चुका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी २०१८ आणि २०२२ च्या पत्रांमध्ये मान्य केल्या.मंडळाकडून त्याला २०१४ च्या मूळ गुणांपैकी किंवा २०१५ च्या गुणांपैकी एक निवडण्याचा पर्याय देण्यात आल्याचा कोणताही पुरावा न्यायालयात सादर करता आला नाही.गुण वाढले तरी विद्यार्थ्याचे नुकसानचन्यायालयाने सांगितले की, मंडळाने २०१६ चा निकाल जाहीर न केल्याने विद्यार्थ्याचे नुकसान झाले. २०१६ मध्ये त्याचे गुण ५८.६१% पर्यंत वाढले होते. पण निकाल न मिळाल्याने त्याला पुढील शिक्षण आणि प्रवेश परीक्षा दोन्हीपासून दूर राहावे लागले. २०१४ च्या गुणांवर आधारित पीसीबीचे एकत्रित गुण ४५% पेक्षा कमी असल्याने तो पात्रताच गाठू शकला नाही. त्यामुळे गुण वाढूनही त्याच्या प्रगतीचा मार्ग बंद झाला.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 12:10 pm

“अरुणाचल प्रदेश चीनचा भाग…” ; शांघाय विमानतळावर भारतीय महिलेचा छळ, सांगितली आपबिती, वाचा

Arunachal Pradesh। अरुणाचल प्रदेशात जन्मलेल्या आणि सध्या युनायटेड किंग्डममध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या प्रेमा वांगजोम थोंगडोक यांनी चीनवर गंभीर आरोप केले आहेत. शांघाय पुडोंग विमानतळावरील चिनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांचा भारतीय पासपोर्ट ओळखण्यास नकार दिला आणि त्यांचा छळ केला, १८ तासांसाठी तिला ताब्यात ठेवण्यासारख्या परिस्थितीत ठेवले. २१ नोव्हेंबर रोजी प्रेमा लंडनहून जपानला जात होती आणि शांघायमध्ये तीन […] The post “अरुणाचल प्रदेश चीनचा भाग…” ; शांघाय विमानतळावर भारतीय महिलेचा छळ, सांगितली आपबिती, वाचा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 12:04 pm

Huma Qureshi: हुमा कुरैशी म्हणाली, फेमिनिस्ट असणं चुकीचं नाही; आणि “पुरुषांना कमी दाखवणं हा उद्देश नाही”

Huma Qureshi: बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी वुमन-सेंट्रिक भूमिकांसाठी ओळखली जाते. ‘गँग्स ऑफ वासेपूर’पासून ते ‘महारानी’पर्यंत तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये हुमाने फेमिनिझमविषयी आपलं स्पष्ट मत मांडलं. तिच्या मते, फेमिनिझमचा अर्थ आज अनेकजण चुकीच्या पद्धतीने समजून घेत आहेत. “फेमिनिस्ट असणं काही चुकीचं नाही”… हुमा कुरैशी एका पॉडकास्टमध्ये बोलताना हुमा म्हणाली, “आजच्या काळात […] The post Huma Qureshi: हुमा कुरैशी म्हणाली, फेमिनिस्ट असणं चुकीचं नाही; आणि “पुरुषांना कमी दाखवणं हा उद्देश नाही” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 11:58 am

औंधमध्ये बिबट्याचे दर्शन; वनविभागाकडून शोधमोहीम सुरू, ‘ही’माहिती समोर…

Leopard Terror | औंध परिसरातील रहिवाशांना पहाटेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आरबीआय कॉलनी आणि सिंध सोसायटीच्या आसपास हा बिबट्या फिरताना दिसल्याची माहिती नागरिकांनी दिली. ही माहिती देताच पुणे वन विभाग तातडीने सतर्क झाला. बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी सर्व तांत्रिक साधनांचा वापर सुरू असून, पथके पूर्ण तयारीत आहेत. बिबट्या दिसल्यास त्याला पकडण्यासाठी […] The post औंधमध्ये बिबट्याचे दर्शन; वनविभागाकडून शोधमोहीम सुरू, ‘ही’ माहिती समोर… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 11:52 am

इंटरलॉकिंग कामासाठी मध्यरेल्वेच्या 'या'स्थानकांदरम्यान विशेष ब्लॉक! जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा - बीव्हीटी यार्ड, तसेच कल्याण – लोणावळा विभागातील अप यार्डमध्ये प्री नॉन-इंटरलॉकिंग अणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे. ज्यात मुंबई ते पुण्यादरम्यान चालणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांप्रमाणेच लोकलचे वेळापत्रकसुद्धा बिघडणार असल्याने दररोज मुंबई ते पुणे ये-जा करणाऱ्यांना प्रवासामध्ये अडथळा निर्माण होणार आहे.२६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान वेळापत्रकातील मुख्य बदल- पुणे-मुंबई इंटरसिटी आणि पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस या गाड्यांना २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचण्यास १० ते १५ मिनिटांचा उशीर होण्याची शक्यता आहे.-२६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत धावणाऱ्या पुणे-लोणावळा लोकल गाड्या लोणावळ्यापर्यंत न जाता तळेगाव येथे शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील.- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून पुणे मार्गे चेन्नई आणि हैदराबादला जाण्याऱ्या एक्स्प्रेसला लोणावळ्यापर्यंत पोहोचण्यास १० ते १५ मिनिटांचा उशीर होण्याची शक्यता आहे.- २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी अप (मुंबईकडे जाणारा) आणि डाउन (पुण्याकडे येणारा) या दोन्ही मार्गांवर सकाळी ११.२५ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पॉवर ब्लॉक असणार आहे.एक्स्प्रेस गाड्यांना उशीर!पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्स्प्रेस: १ तास १५ मिनिटं उशीरानेकोल्हापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोयना एक्स्प्रेस: ४० मिनिटं उशीरानेबंगळुरू-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उद्यान एक्स्प्रेस: ३० मिनिटं उशीरानेदौंड-इंदूर एक्स्प्रेस: १ तास उशीरानेदरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, त्यांनी या ११ दिवसांच्या कालावधीत रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी आपल्या गाडीच्या वेळापत्रकाची सद्यस्थिती तपासून घ्यावी.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 11:30 am

Top Stocks to Buy: चांगल्या रिटर्न्ससाठी आज 'हे'चार शेअर खरेदी करण्याचा ब्रोकरेजचा सल्ला

प्रतिनिधी: आजचे कुठले शेअर खरेदीसाठी फायदेशीर ते बघूयात पुढीलप्रमाणे -१) Reliance Industries: कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने या शेअरला बाय कॉल दिला असून १५४४ (Common Market Price CMP) खरेदीसह विक्रीसाठी १७०० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत (Target Price) ठेवण्याचा सल्ला ब्रोकरेजने दिला आहे.२) Max Healthcare: मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने या शेअरला बाय कॉल दिला असून ११७९ रूपये खरेदी किंमतीसह (CMP) विक्रीसाठी १७०० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत (Target Price) ठेवण्याचा सल्ला ब्रोकरेजने दिला आहे.३) Eternal (Zomato): जे एम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज लिमिटेड (JMFL) ब्रोकरेज कंपनीने शेअरला बाय कॉल दिला असून शेअर्समध्ये ४५० रूपये लक्ष्य किंमत (TP) निश्चित करण्यात आली आहे.४) Dr Reddy's Laboratories : या शेअरला जेएमएफएलने बाय कॉल दिला आहे तर लक्ष्य किंमत (TP) १५२२ रूपये निश्चित करण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 11:30 am

सिंध प्रांताविषयी संरक्षणमंत्र्यांच्या त्या’विधानाने पाकची झोप उडाली ; काश्मीरचा मुद्दा छेडत पुन्हा गरळ ओकली

Pakistan Foreign Ministry। भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या सिंध प्रांताबाबत केलेल्या विधानावर शेजारील पाकिस्तानमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदन जारी करून या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, सिंह यांचे विधान आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करते आणि हिंदू धर्माच्या विस्तारवादी मानसिकतेचे प्रतिबिंबित करते. परराष्ट्र मंत्रालयाने भारतावर तीव्र […] The post सिंध प्रांताविषयी संरक्षणमंत्र्यांच्या त्या’ विधानाने पाकची झोप उडाली ; काश्मीरचा मुद्दा छेडत पुन्हा गरळ ओकली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 11:28 am

Shefali Shah: अक्षय कुमारची आई बनल्यानंतर ऑफर्स गायब! शेफाली शाहची कबुली

Shefali Shah: बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शाह आज ‘दिल्ली क्राइम’ सीजन 3 मधील दमदार अभिनयामुळे पुन्हा चर्चेत आहेत. पण करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक निर्णय आजही त्या आठवतात अक्षय कुमारच्या आईची भूमिका स्वीकारणं. 2005 मध्ये रिलीज झालेल्या ‘वक्त: द रेस अगेंस्ट टाइम’ या चित्रपटात शेफालीने अक्षयची आई आणि अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका केली होती. आता जवळपास […] The post Shefali Shah: अक्षय कुमारची आई बनल्यानंतर ऑफर्स गायब! शेफाली शाहची कबुली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 11:19 am

श्रद्धा कपूरने दुखापतीनंतर दिली हेल्थ अपडेट; शेअर केला Video

Shraddha Kapoor Health Update | अभिनेत्री श्रद्धा कपूरला ‘ईठा‘ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर चाहत्यांकडून देखील चिंता व्यक्त करण्यात आली. आता तिने स्वत: व्हिडीओ शेअर करत हेल्थ अपडेट दिलं आहे. श्रद्धाने व्हिडीओ शेअर करत तिच्या पायाची दुखापतही दाखवली. तिच्या पायाला प्लॅस्टर लावलेलं दिसत आहे. यावेळी चाहत्यांशी संवाद साधत तिने सांगितले की, […] The post श्रद्धा कपूरने दुखापतीनंतर दिली हेल्थ अपडेट; शेअर केला Video appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 11:15 am

Stock Market Opening Bell: सकाळच्या सत्रात शेअर बाजारात किरकोळ तेजी 'या'कारणामुळे

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. आज सुरुवातीच्या कलात सेन्सेक्स १५६.८१ व निफ्टी ४६.३० अंकांने उसळला आहे. सेन्सेक्स बँक व बँक निफ्टीतही किरकोळ वाढ झाली आहे. मिडकॅप व स्मॉल कॅप शेअर्समध्येही किरकोळ वाढ झाल्याने एकूणच बाजारात वाढ झाली. प्रामुख्याने आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील आयटी शेअर्समध्ये मोठी वाढ झाली असून यासह युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीवरील अपेक्षा नव्या वक्तव्यांमुळे आणखी वाढल्या असल्याने बाजारात किरकोळ रॅली झाली आहे.सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ श्याम मेटालिक्स (८.०९%), सफायर फूडस (३.९२%), केएसबी (३.४३%), रेंडिंगटन (३.१६%), बजाज होल्डिंग्स (२.२२%), ब्रिगेड एंटरप्राईजेस (२%), रिलायन्स पॉवर (१.९६%), इंटरग्लोब एव्हिऐशन (१.७२%), पेज इंडस्ट्रीज (१.५६%) समभागात सर्वाधिक वाढ झाली असून सर्वाधिक घसरण कॅपलिन पॉईंट लॅब्स (४.०७%) एजिस (३.०१%), अंबर एंटरप्राईजेस (२.३७%), हेक्सावेअर टेक्नॉलॉजी (२.१९%), फिनोलेक्स इंडस्ट्रीज (१.५०%), सारडा एनर्जी (१.८८%,), पिडिलाईट इंडस्ट्रीज (१.४३%) निर्देशांकात झाली आहे.आजच्या बाजारपूर्व परिस्थितीवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,' २०२४ च्या सप्टेंबरच्या उच्चांकी पातळीला तोडण्यासाठी निफ्टी आणि सेन्सेक्सचे मागील प्रयत्न यशस्वी झाले नाहीत कारण एफआयआयच्या विक्रीमुळे तेजी कमी झाली आणि अमेरिका-भारत व्यापार करार प्रत्यक्षात आला नाही. तसेच आर्थिक वर्ष २७ च्या उत्पन्न वाढीबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती. आता हळूहळू नवीन विक्रमी उच्चांकाकडे जाण्याच्या बाजूने परिस्थिती बदलत आहे. या तेजीसाठी सर्वात महत्त्वाचा उत्प्रेरक मजबूत उत्पन्न वाढीमुळे येईल. आर्थिक वर्ष २७ मध्ये १५% पेक्षा जास्त उत्पन्न वाढ होण्याची शक्यता आहे. हा एक मजबूत मूलभूत आधार आहे. अमेरिका-भारत व्यापार करार कधीही होऊ शकतो. एआय व्यापारातील कमकुवतपणा एफआयआयना भारतात खरेदीदार बनवण्यास भाग पाडेल. गुंतवणूकदारांनी उच्च वाढीची क्षमता असलेल्या लार्जकॅप आणि दर्जेदार मिडकॅपवर लक्ष केंद्रित करावे. सर्वसाधारणपणे स्मॉलकॅप्सचे जास्त मूल्यमापन होत राहते.'

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 11:10 am

‘सिंध पुन्हा भारताचा भाग होऊ शकतो’

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे सूतोवाचनवी दिल्ली : सध्या पाकिस्तानात असलेला ‘सिंध प्राप्त पुन्हा भारताचा भाग होऊ शकतो, असे वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना केले. ‘सीमा कधी बदलेल हे कोणी सांगू शकत नाही आणि उद्या सिंध भारताला पुन्हा परत मिळू शकते’, असे सांगताना त्यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्या एका पुस्तकाचा दाखला दिला.दरम्यान, ‘सिंध हा प्रदेश आज भारताचा भाग नसला तरी संस्कृतीनुसार तो नेहमीच भारताचा भाग राहील’, असे बोलताना, लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या नेत्यांनी सिंध प्रदेश भारतापासून वेगळं होणं हे कधीही स्वीकारले नाही, याची पुन्हा आठवण करून दिली. ते म्हणाले, 'मी आज या ठिकाणी लालकृष्ण आडवाणी यांचा देखील उल्लेख करू इच्छितो. त्यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिले आहे की, सिंधी हिंदूंनी विशेषतः त्यांच्या पिढीतील लोकांनी आजही सिंध प्रांत भारतापासून वेगळा होणे स्वीकारलेले नाही. केवळ सिंधमध्येच नाही, तर संपूर्ण भारतात हिंदू सिंधू नदीला पवित्र मानतात आणि सिंधमधील काही मुस्लीमदेखील सिंधू नदीला पवित्र मानत होते. असे त्यांनी सांगितले. सिंधूचे पाणी मक्केच्या आब-ए-जमजमपेक्षाही कमी पवित्र नाही. हे आडवाणींचे वाक्य आहे”, असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.“आज मी त्यांचा (आडवाणींचा) एक कोट सांगत आहे. आज सिंधची भूमी भारताचा भाग भलेही नसेल. पण सभ्यतेच्या दृष्टीने सिंध नेहमीच भारताचा भाग राहील. आता राहिली गोष्ट जमिनीची, तर सीमा कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. कारण उद्या सिंध भारताला पुन्हा परत मिळू शकतं. सिंधू नदीला पवित्र मानणारे आपले सिंधचे लोक नेहमीच आपले असतील, मग ते कुठेही असले तरी”, असे सिंह यांनी सांगितले.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 11:10 am

म्हाडाच्या वसाहतीतील एकल इमारतींच्या पुनर्विकासाला यापुढे परवानगी नाही

मुंबई : राज्य शासनाने म्हाडाच्या अभिन्यासात एकत्रित पुनर्विकासास पात्र असलेल्या परिसरात यापुढे एकल इमारतीच्या पुनर्विकासाला परवानगी न देण्याचे धोरण जारी केले आहे. म्हाडाचे ११४ अभिन्यास असून ५६ वसाहती आहेत. रहिवाशांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतुने एकत्रित पुनर्विकास व्हावा, या दिशेनेच यापुढे म्हाडा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य शासनाने म्हाडाच्या एकत्रित पुनर्विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे म्हाडाला आता 'बांधकाम आणि विकास संस्थे'मार्फत (सी ॲॅण्ड डी एजन्सी) निविदेद्वारे विकासक नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याधी विविध अभिन्यासात अनेक एकल इमारतींना पुनर्विकासासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. सध्या म्हाडाने एकल इमारतीच्या पुनर्विकासाला परवानगी दिलेली नाही. आता नव्याने जाहीर केलेल्या धोरणात यापुढे अभिन्यासात एकत्रित पुनर्विकास होत असेल तर एकल इमारतीच्या पुनर्विकासाला परवानगी दिली जाणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. पत्राचाळ प्रकल्पाच्या झालेल्या दुरवस्थेचा रहिवाशांनी धसका घेतला आहे. एकत्रित पुनर्विकासामुळे आमच्यावर तशी पाळी येऊ नये, अशी अपेक्षा रहिवाशी व्यक्त करीत आहेत.आतापर्यंत म्हाडाने एक-दोन इमारतींच्या पुनर्विकासाला परवानगी दिल्यामुळे पायाभूत सुविधांचा प्रश्न उपस्थित झाला होता. म्हाडा इमारती १९७० च्या आसपास बांधण्यात आल्या होत्या. त्यावेळी उभारण्यात आलेल्या तुटपुंज्या पायाभूत सुविधा आता पुरेशा नाहीत. एकत्रित पुनर्विकास झाला, तर रहिवाशांना एकल पुनर्विकारहिवासाच्या तुलनेत नक्कीच मोठे घर मिळणार आहे.आतापर्यंत म्हाडाने मोतीलाल नगर (गोरेगाव), अभ्युदयनगर (काळाचौकी), वांद्रे रिक्लेमेशन, आदर्शनगर (वरळी), सरदार वल्लभभाई पटेल नगर (अंधेरी पश्चिम) या वसाहतींचा पुनर्विकास सी अॅॅण्ड डी एजन्सीमार्फत करण्याचे ठरविले आहे. या वसाहतीत अभ्युदयनगर वगळता अन्यत्र एकल इमारतींच्या पुनर्विकासासाठी परवानगी दिली होती. हा परिसर वगळून आता एकत्रित पुनर्विकासासाठी परवानगी दिली जाणार असले तरी परिसरात एकसंधता राहावी यासाठी नियमावली तयार करण्याचे अधिकार म्हाडाला बहाल करण्यात आले आहेत.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 11:10 am

'आयुष्मान भारत'अंतर्गत सत्तरीनंतर १० लाखांपर्यंत मोफत उपचार

नवी दिल्ली : भारतातील वैद्यकीय खर्च वाढला आहे, मात्र आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेने देशातील जनतेला आधार दिला आहे. अशातच आता या योजनेत मिळणाऱ्या कव्हरमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी PM-JAY योजनेत कुटुंबाला ५ लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत होता, मात्र,आता १० लाखांपर्यंतचा विमा मिळणार आहे. आता ७० वर्षांवरील प्रत्येक सदस्याला अतिरिक्त ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार आहे. देशातील लाखो लोकांना फायदा होणार आहे.आयुष्मान भारत ही मोदी सरकारची आरोग्य विमा योजना आहे. या योजनेद्वारे देशातील गरीब जनतेला आरोपग्यविमा दिला जातो. यामुळे गंभीर आजारावरील उपचार मोफत किंवा कमी पैशांमध्ये केले जातात. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाखांचे कॅशलेस कव्हर मिळते. देशातील हजारो रुग्णालयांमध्ये याच्या माध्यमातून उपचार घेता येतात. या योजनेत सर्व गंभीर आजारांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फायदा होत आहे. या योजनेअंतर्गत कुटुंबातील पती-पत्नी, मुले (नवजात बालके), पालक, आजी-आजोबा, भावंडे, सासू-सासरे आणि कुटुंबासोबत राहणाऱ्या इतर सदस्यांच्या उपचारासाठी ५ लाखांचे कव्हर मिळते.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 11:10 am

डॉलरच्या तुलनेत रुपयाची गरूडझेप बाजार उघडताच ४९ पैशाने वधारला

मोहित सोमण:सकाळी अस्थिरतेत चढउतार करत असलेल्या रूपयाने डॉलरच्या तुलनेत मोठी झेप घेतली आहे. सुरूवातीच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल ४९ पैशाने उसळला असल्याने ८९.१७ रूपये प्रति डॉलर दरपातळी गाठण्यास भारतीय रूपयाला यश आले. शुक्रवारी व शनिवारी रूपया निच्चांकी स्तरावर बाजारात व्यवहार करत होता. मोठ्या प्रमाणात रूपयात घसरण झाल्याने रूपया ८९.४३ या पातळीवर कोसळला होता तो ४९ पैशाने रिबाऊंड झाल्याने आज रूपया सुरूवातीच्या कलात ८९.१७ रूपयांवर पोहोचला आहे. मोठ्या प्रमाणात रूपयात सुधारणा झाल्याने जागतिक स्तरावरील भारतीय व्यवहाराय याचा फायदा होऊ शकतो.युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का यावरील अनिश्चितता गेल्या आठवड्यात असताना डॉलरच्या तुलनेत पूर्वेकडील देशांचे व विशेषतः आशियाई देशांचे चलन युएस डॉलरपेक्षा घसरत होते तर डॉलरच्या निर्देशांकात सातत्याने वाढ झाल्याने रूपयाने परवा खराब कामगिरी केली. मात्र सकारात्मक जागतिक संकेतानुसार भारतीय शेअर बाजारासह चलनी बाजारात स्थैर्य आलेले सकाळी पहायला मिळाले. बाजार तज्ञांनी युएस फेड दरात कपातीची अपेक्षा व्यक्त केली असताना एका फेड गव्हर्नरने आपल्या भाषणात काल दरकपातीचे संकेत दिले त्याचा फायदा युएस बाजारातील डाऊ जोन्समधील वाढीसह भारतीय बाजारात परावर्तित केला आहे.चलन व्यापारी सावधपणे आशावादी आहेत असेही चलन व्यवस्थापन तज्ञांनी म्हटले आहे. फिनरेक्स ट्रेझरी अँडव्हायझर्स एलएलपीचे ट्रेझरी प्रमुख आणि कार्यकारी संचालक अनिल कुमार भन्साळी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की,'बहुतेकांचा असा विश्वास आहे की पुढील काही आठवड्यांसाठी रुपया प्रति डॉलरच्या मानसिक पातळीपेक्षा ९० च्या पातळीवर जाऊ शकतो, विशेषतः डिसेंबर अखेरपर्यंत अपेक्षित भारत-अमेरिका व्यापार करारावर बाजारपेठ प्रगतीची वाट पाहत असताना. तथापि, त्यांनी इशारा दिला की कोणताही ब्रेकथ्रू न मिळाल्यास ९० चा टप्पाही लवकरच प्रत्यक्षात येऊ शकतो.'दरम्यान सकाळी डॉलर निर्देशांक १००.१८ वर किंचित जास्त होता तथापि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी देशांतर्गत बाजारपेठांवर दबाव आणत भारतीय शेअर बाजारातील १७६६.०५ कोटी रुपयांचे शेअरची विक्री केली. तसेच मोठ्या प्रमाणात त्यादिवशी पैशाची जावकही वाढली. आज परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका महत्वाची असेल परंतु आरबीआयच्या हस्तक्षेपी निर्णयाचा रूपयांच्या दरपातळीवर परिणाम होईल. सकाळी १०.४० वाजता डॉलरच्या निर्देशांकातही ०.०१% वाढ झाली आहे त्यामुळे रूपयांचे पुनरागमन यशस्वी ठरते का अवमूल्यन होते ते अखेरच्या सत्रातही स्पष्ट होईल.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 11:10 am

मेट्रो शहरांमधील विषारी हवेने मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य धोक्यात!

नवी दिल्ली : वायू प्रदूषण आता केवळ श्वसनाचा धोका राहिलेला नाही, तर लहान मुलांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. लहान मुलांच्या डोळ्यांवर दिसणारे चष्म्याला मोबाइल फोन स्क्रीनचा अतिवापराला कारणीभूत ठरवले जाते. मात्र भारतातील प्रमुख महानगरांमध्ये (मेट्रो शहरांमध्ये) डॉक्टरांना मुलांमध्ये लहान मुलांमध्येही मायोपिया (जवळचे कमी दिसणे) समस्या आढळून येत आहेत. आता देशातील महानगरांमधील नेत्ररोग तज्ज्ञांनी खराब हवेमुळे हा विकार मुलांमध्ये वाढत असल्याचे स्पष्ट केले आहे.दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, बंगळूरु आणि इतर प्रदूषित महानगरांमध्ये नेत्ररोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे की, मुलांमध्ये मायोपिया (जवळचे कमी दिसणे) पूर्वीपेक्षा खूप लवकर विकसित होत आहे. अशा मुलांच्या संख्येत होणारी वाढ ही काळजी वाढविणारी आहे. डोळ्यांसाठी हानिकारक असणारे हवेतील लहान कण, कमी झालेला दिवसाचा प्रकाश याचा शहरी मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचाही अभ्यास केला जात आहे.पूर्व आशियामध्ये मायोपियाने आधीच साथीचे रूप घेतले आहे. जागतिक आरोग्य संस्था यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, सध्याचे महानगरांधील हवेची गुणवत्ता अशीच खालावत राहिल्यास भारतही त्याच दिशेने जाऊ शकतो. जागतिक आरोग्य संस्थांचा अंदाज आहे की, २०५० पर्यंत जगातील अर्धी लोकसंख्या मायोपियाने ग्रस्त असेल. यासाठी पर्यावरणीय घटक मोठी भूमिका बजावतील. अभ्यासातून हे देखील दिसून आले आहे की, घराबाहेर घालवलेला कमी वेळ आणि नैसर्गिक प्रकाशाच्या संपर्कात कमी येणे, या दोन्ही गोष्टींवर वायू प्रदूषणाचा मोठा परिणाम होतो, ज्यामुळे लहान मुलांमध्ये लवकर मायोपिया होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 11:10 am

‘आयएनएस माहे’ आज भारतीय नौदलात

मुंबई : भारतीय नौदलाची सामरिक ताकद अधिक भक्कम करणारा सोहळा सोमवारी पाहायला मिळणार आहे. माहे-क्लास अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट मालिकेतील पहिली युद्धनौका ‘आयएनएस माहे’ २४ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे कमिशनिंग करून नौदलात दाखल होणार आहे.या ऐतिहासिक समारंभाला लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, याचे अध्यक्षस्थान व्हाइस अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन (फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, पश्चिम नौदलकमांड) भूषवतील.INS माहेच्या कमिशनिंगमुळे शॅलो वॉटर लढाऊ नौकांच्या नव्या स्वदेशी पिढीचे आगमन होणार आहे. हे जहाज संपूर्णपणे आकर्षक डिझाइन, वेगवान कार्यक्षमता आणि आधुनिक युद्धतंत्र यांनी सुसज्ज असून, ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. भारताच्या युद्धनौका डिझाइन, बांधकाम आणि प्रणाली एकत्रीकरणातील प्रभुत्वाचा हा भक्कम पुरावा मानला जात आहे.कमी खोलीच्या समुद्रातही शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध तत्काळ प्रत्युत्तर देण्याची क्षमता यामुळे पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर एक 'सायलेंट हंटर' म्हणून कार्यरत राहणार आहे. समुद्री सुरक्षेत वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हे जहाज नौदलासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 11:10 am

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली शपथ ; भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळणार

Justice Suryakant। न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे नवे सरन्यायाधीश बनले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत त्यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. […] The post न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली शपथ ; भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 10:58 am

नवले ब्रिजजवळ पुन्हा अपघात; कारची डिव्हायडरवर धडक, दोघे जण थोडक्यात बचावले

पुणे – नवले ब्रिज परिसरात मध्यरात्री झालेल्या अपघातात एक Tata Altroz कार उलटून गंभीर स्वरूपाची हानी झाली. मात्र वाहनातील दोन्ही प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री सुमारे 12:30 वाजता VRL बस स्टॉपजवळ महामार्ग व सर्व्हिस रोडच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवर कार जोरात आदळली. धडक एवढी जबरदस्त होती की कार उलटून सर्व्हिस रोडवर […] The post नवले ब्रिजजवळ पुन्हा अपघात; कारची डिव्हायडरवर धडक, दोघे जण थोडक्यात बचावले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 10:48 am

शेअर बाजाराची सुरुवात स्थिर! सेन्सेक्स १३७ अंकांनी वधारला तर निफ्टीने २६,११३ ओलांडले

Stock Market Today। आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजाराची सुरुवातसकारात्मक झाली. बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५०, हिरव्या रंगात उघडले. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक ८८.१२ अंकांनी म्हणजेच ०.१० टक्क्यांनी वाढून ८५,३२०.०४ वर पोहोचला, तर एनएसई निफ्टी ५० ५४.६५ अंकांनी म्हणजेच ०.२१ टक्क्यांनी वाढून २६,१२२.८० वर उघडला. सकाळी ९:२० वाजेपर्यंत, सेन्सेक्स १३७ […] The post शेअर बाजाराची सुरुवात स्थिर! सेन्सेक्स १३७ अंकांनी वधारला तर निफ्टीने २६,११३ ओलांडले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 10:44 am

महाबळेश्वर पालिकेची निवडणूक ताकदीने लढणार –कुमार शिंदे

महाबळेश्वर – नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) व गिरीस्थान नगरविकास आघाडी (नियोजित) ताकदीने मैदानात उतरणार असल्याची घोषणा आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुमार शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वात, महाबळेश्वर वासीयांच्या साथीने ही निवडणूक लढणार असल्याचे शिंदे म्हणाले. यावेळी आघाडीचे सर्व उमेदवार […] The post महाबळेश्वर पालिकेची निवडणूक ताकदीने लढणार – कुमार शिंदे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 10:31 am

पाकिस्तान हादरला ! पेशावरमधील एफसी मुख्यालयावर हल्ला ; परिसरात दोन स्फोट

Pakistan Bomb Blast। पाकिस्तानातील पेशावरमधील फेडरल कॉन्स्टेब्युलरी (एफसी) मुख्यालयावर आज सकाळी बंदूकधारींनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, गोळीबाराचा आवाज ऐकू येताच, पोलिस आणि सुरक्षा दलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराला वेढा घातला. पेशावरमधील अनेक रहिवाशांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “त्यांना एफसी मुख्यालयातून बॉम्बस्फोटासारखा मोठा आवाज ऐकू आला” असे म्हटले. दरम्यान, […] The post पाकिस्तान हादरला ! पेशावरमधील एफसी मुख्यालयावर हल्ला ; परिसरात दोन स्फोट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 10:30 am

फुटबॉल मॅचेससाठी घरातून निघाला पालघरात मृतावस्थेत सापडला; मुंबईच्या अंडर-१६ खेळाडूचा रहस्यमय मृत्यू

पालघर : मुंबईजवळील पालघर परिसरात एका फुटबॉल खेळाडूचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ‘पुण्याला मॅचेस खेळायला जात आहे’ असे सांगून घराबाहेर पडलेला हा तरुण दोन दिवसांनी घनदाट जंगलात मृतावस्थेत सापडला. या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.मृत तरुणाचे नाव सागर सोरती असे असून त्याने मुंबईच्या अंडर-१६ फुटबॉल संघात आपल्या खेळाची छाप सोडलेला उदयोन्मुख खेळाडू होता. १५ नोव्हेंबर रोजी घरातून बाहेर पडल्यापासून १६ नोव्हेंबरपासून त्याचा कुटुंबीयांशी कोणताही संपर्क नव्हता. आपल्या मुलाने २ दिवस काही संपर्क न केल्याने कुटुंबीयांनी शोधमोहीम सुरू केली, तेव्हा १८ नोव्हेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील कासा पोलिसांना मेंढवण खिंडच्या जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला. एका उदयोन्मुख खेळाडूचा मृतदेह पालघर जिल्ह्यात संशयास्पद अवस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी ओळख पटवली.या प्रकरणाची नोंद घेऊन कासा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सागरच्या मृत्यूमागचे कारण अजून स्पष्ट झाले नसून विविध अंगांनी तपास सुरू आहे. एका उज्ज्वल भविष्य असलेल्या खेळाडूचा असा अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 10:30 am

वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंना धक्का

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्या होमपिचवरच अनपेक्षित धक्का बसला आहे. वाई नगरपालिका निवडणुकीत झालेल्या अचानक घडामोडींमुळे शिवसेनेचा उमेदवार बाद झाला असून संबंधित नेत्याचे पदही गेल्याने पक्षात खळबळ माजली आहे.वाई नगरपालिकेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे यांनी त्यांच्या भावाला, प्रवीण शिंदे यांना उमेदवारी दिली होती. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणी विकास शिंदे यांनी भावाला उमेदवारी मागे घ्यायला सांगितल्याने परिस्थिती एकदम बदलली. हा निर्णय कोणालाही विश्वासात न घेता घेतल्याचा आरोप करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी विकास शिंदे यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे उमेदवारही बाद झाला आणि उपजिल्हाप्रमुखांचे पदही गमावले.घडलेल्या या प्रकारानंतर विकास शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांकडून उमेदवारीबाबत कोणतीही सूचना न मिळाल्याने शेवटच्या दोन मिनिटांत एबी फॉर्म मागे घेतल्याचा दावा त्यांनी केला. तसेच अनेक वेळा संपर्क साधूनही पक्षाकडून स्पष्ट भूमिका न आल्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले.याचबरोबर विकास शिंदे यांनी जिल्हाप्रमुख रणजित भोसले यांच्यावर गंभीर आरोप केले. वाई तालुक्यात राहूनही इतर पक्षांशी अधिक संपर्क साधणे, टार्गेट करणे, विरोधात बातम्या छापून आणणे आणि कोणतीही नवीन शाखा उभी न करणे अशा अनेक गोष्टींसाठी त्यांनी भोसले यांना जबाबदार ठरवले. वाईतील या नाट्यमय घटनांमुळे निवडणूक रणधुमाळीत नवीन घडामोडींची भर पडली आहे आणि शिवसेनेसमोर प्रश्न उभा राहिला आहे.

फीड फीडबर्नर 24 Nov 2025 10:30 am

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीचा मॉडर्न-रेट्रो लुक व्हायरल; फॅन्स म्हणाले, ‘एजलेस ब्यूटीची बरोबरीच नाही!’

Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा आपल्या शानदार स्टाइलमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. चित्रपटांपासून थोडी दूर राहूनही शिल्पा नेहमीच आपल्या फॅशन आणि ग्लॅमरने चाहत्यांना प्रभावित करत असते. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या नवीन फोटोंनी इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. मॉडर्न–रेट्रो फ्यूजन लुकने जिंकली मने शिल्पाने आपल्या नव्या फोटोशूटमध्ये ट्यूब-टॉप ब्लाउज आणि धोती-स्टाईल साडी […] The post Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीचा मॉडर्न-रेट्रो लुक व्हायरल; फॅन्स म्हणाले, ‘एजलेस ब्यूटीची बरोबरीच नाही!’ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 24 Nov 2025 10:22 am