SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

32    C
... ...View News by News Source

‘महावतार नरसिंह’ पाच भाषेत प्रदर्शित होणार

मुंबई : हॉम्बले फिल्म्स आणि कलीम प्रॉडक्शन्सच्या बॅनर अंतर्गत अश्विन कुमार दिग्दर्शित 'महावतार नरसिंह' या चित्रपटाचा एक नवा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये भव्य दृश्यांद्वारे एक महाकाव्यात्मक पौराणिक कहाणीचे सादरीकरण करण्यात आले.अश्विन कुमार यांचा आगामी चित्रपट ‘महावतार नरसिंह’ सध्या पोस्टर्समुळे चर्चेत आहे. हा चित्रपट हॉम्बले फिल्म्स आणि कलीम प्रॉडक्शन्सने संयुक्तपणे केला आहे. 'महावतार' ही एक सिरीज आहे आणि हा त्यातल पहिला भाग आहे. भगवान विष्णूंच्या विविध अवतारांच्या कथा यामध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. महावतार नरसिंह हा हॉम्बले फिल्म्सचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या बॅनरने याआधी KGF Chapter 1 & 2, सालार: पार्ट 1 – सीजफायर, आणि कांतारा सारखे पॅन-इंडिया ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.नृसिंह जयंतीच्या दिवशी, 'महावतार नरसिंह'च्या निर्मात्यांनी २५ जुलै २०२५ ही तारीख निश्चित केली आहे. 'महावतार नरसिंह' हा चित्रपट २५ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट कोणत्या तारखेला प्रदर्शित करणार हे जाहीर करतेवेळी एक जबरदस्त व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओत महावतार नरसिंहाचे रौद्र रूप आणि त्याची दिव्य गर्जना दाखवण्यात आली आहे. या व्हिडिओमधून एक संदेश दिला आहे.'महावतार नरसिंह'चे दिग्दर्शन अश्विन कुमार यांनी केले असून या चित्रपटाचे निर्माते शिल्पा धवन, कुशल देसाई आणि चैतन्य देसाई आहेत . कलीम प्रोडक्शन्सच्या अंतर्गत त्यांनी हॉम्बले फिल्म्ससोबत मिळून हा चित्रपट तयार केला आहे. हा चित्रपट 3D फॉरमॅटमध्ये आणि पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

फीड फीडबर्नर 12 May 2025 2:10 pm

राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक

मुंबई : भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत मुंबईत वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीत राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील सुरक्षेवर आणि सज्जतेवर झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते. भारतीय लष्करातर्फे लेफ्ट. जनरल पवन चढ्ढा, कर्नल संदीप सील, भारतीय नौदलातर्फे रियर अ‍ॅडमिरल अनिल जग्गी, नौदल कमांडर नितेश गर्ग, भारतीय वायुदलातर्फे एअर वाईस मार्शल रजत मोहन हे बैठकीला उपस्थित होते. रिझर्व्ह बँक, जेएनपीटी, बीपीटी, मुंबई स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, एटीएस, होमगार्ड यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.गुप्तचर माहितीचे आदानप्रदान, तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि काय खबरदारी घ्यायची यावर प्रामुख्याने चर्चा या बैठकीत झाली. संरक्षण दलांना राज्य सरकारतर्फे अपेक्षित सहकार्य आणि अधिक गतीची समन्वय यंत्रणा उभारण्यावर चर्चा झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय सैन्याने ज्या ताकदीने आणि अचूकपणे ऑपरेशन सिंदूर राबविले, ते अभूतपूर्व आहे. संरक्षण दलांना मी सलाम करतो. मुंबईसारखे शहर हे अतिशय महत्वपूर्ण आहे. भारताची आर्थिक राजधानी आहे. यापूर्वी मुंबईवर हल्ले झाले तेव्हा शत्रूकडून आम्ही भारताच्या आर्थिक राजधानीवर हल्ला केला हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. येणार्‍या काळात संपूर्ण ताकदीने काम करावे लागेल. या स्थितीत गुप्तचर माहितीचे आदानप्रदान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. सायबर सुरक्षेबाबत सर्वांनाच अधिक काळजी घ्यावी लागेल. राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण दलाचे अधिकारी मिळून अधिक समन्वयाने एकत्रितपणे काम करुया.राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री सचिवालयातील सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक शिरीष जैन, राज्यातील आपत्ती व्यवस्थापनच्या अतिरिक्त मुख्य सचिव सोनिया सेठी, तसेच मुंबई जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि इतर विभागांचे अधिकारी सुद्धा बैठकीला उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 12 May 2025 2:10 pm

भारती सिंहला थायलँडला फिरायला गेल्याने नेटकऱ्यांनी केले ट्रोल; रडत-रडत दिले स्पष्टीकरण

Bharti Singh | कॉमेडियन भारती सिंह पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. एकीकडे भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाचं वातावरण असताना भारती परदेशात फिरायला गेली आहे. यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे तिचे कुटुंबीय अमृतसरमध्ये तणावात असताना भारती परदेशात फिरायला गेल्याने तिच्यावर टीका केली जात आहे. मात्र यानंतर भारतीने रडत रडत तिच्या युट्यूब चॅनलवर एक […] The post भारती सिंहला थायलँडला फिरायला गेल्याने नेटकऱ्यांनी केले ट्रोल; रडत-रडत दिले स्पष्टीकरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 1:40 pm

दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार १३ मे २०२५ रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांना Digilocker ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका डाऊनलोड करुन ठेवता येईल. परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सोय मंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन बघता येणार आहे. शाळांना त्यांचा एकत्रित निकाल शाळेच्या लॉगिनमध्ये पाहता येईल.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवरुन निकालाची प्रिंट काढता येईल तसेच निकालाची सॉफ्ट कॉपी डाऊनलोड करुन घेता येईल. निकाल ऑनलाईन उपलब्ध असला तरी पुढील शैक्षणिक वर्षासाठी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी निकालाची अधिकृत प्रत दाखवावी लागते. यासाठी निकालाची मूळ प्रत विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत मिळणार आहे.ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या वेबसाईटवर स्वतः अथवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याकरिता विद्यार्थ्यांना १४ मे पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज भरताना Debit Card/ Credit Card/UPI/Net Banking द्वारे शुल्क भरण्याची सोय आहे.माध्यमिक प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या (answer sheet) पुनर्मुल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत (photocopy) मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील.निकाल पाहण्यासाठी लिंक :1. https://results.digilocker.gov.in2. https://mahahsscboard.in3. http://hscresult.mkcl.org4. https://results.targetpublications.org

फीड फीडबर्नर 12 May 2025 1:30 pm

NCP Politics : महाराष्ट्रात आणखी एका पुतण्याने सोडली काकाची साथ, अजित पवारांचा धरला हाथ

नांदेड : नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री भाजपचे खासदार अशोक चव्हाण याना आहे. त्यांचा पुतण्या उदय चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण गमावलेल्यांना दोन […] The post NCP Politics : महाराष्ट्रात आणखी एका पुतण्याने सोडली काकाची साथ, अजित पवारांचा धरला हाथ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 1:22 pm

तोट्यातून नफ्यात आली अनिल अंबांनींची कंपनी

मुंबई : अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स पॉवरचे शेअर्स वधारले आहे. मुंबईच्या शेअर बाजारात अर्थात बीएसईमध्ये सोमवारी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसून आली. हे शेअर ४३.५० रुपयांवर पोहोचले. कंपनी तोट्यातून नफ्यात परतली आहे. रिलायन्स पॉवरने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत १२६ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला ३९७.५६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.रिलायन्स पॉवरचे एकूण उत्पन्न चौथ्या तिमाहीत २०६६ कोटी रुपये होते. गेल्या वर्षी याच कालावधीत रिलायन्स पॉवरचे एकूण उत्पन्न २१९३.८५ कोटी रुपये होते. कंपनीचा एकूण खर्च मार्च २०२५ च्या तिमाहीत १९९८.४९ कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत २६१५.१५ कोटी रुपयांवर होता.आर्थिक वर्ष २०२४-२५ चा विचार केला तर रिलायन्स पॉवरचा एकत्रित निव्वळ नफा २९४७.८३ कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीला २०६८.३८ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.गेल्या एका वर्षात रिलायन्स पॉवरचे शेअर्स ७५ टक्क्यांपेक्षा जास्त वधारले आहेत. अनिल अंबानी यांच्या मालकीच्या या कंपनीच्या शेअर्सची किंमत १३ मे २०२४ रोजी २४.४० रुपये होती. १२ मे २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स ४३.५० रुपयांवर पोहोचले. गेल्या पाच वर्षांबद्दल बोलायचे झाले तर रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. १५ मे २०२० रोजी कंपनीचे शेअर्स १.८० रुपयांवर होते. १२ मे २०२५ रोजी रिलायन्स पॉवरचे शेअर्स ४३ रुपयांच्या पुढे गेले. गेल्या दोन वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये २६५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ५३.६४ रुपये आहे. त्याच वेळी, रिलायन्स पॉवरच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २३.३० रुपये आहे.

फीड फीडबर्नर 12 May 2025 1:10 pm

प्रतीकने वडील राज बब्बर यांना लग्नात न बोलवण्यामागचे सांगितले कारण…

Pratik Babbar | दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर याचा फेब्रुवारी महिन्यात प्रिया बॅनर्जीसोबत विवाह पार पडला. मात्र या लग्नात त्याने वडील राज बब्बर आणि त्याचे भावंड उपस्थित नव्हते. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगली होती. यानंतर आता प्रतीकने कुटुंबाला त्याच्या लग्नात न बोलवण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. प्रतीकने आई स्मिता पाटील यांच्या घरी […] The post प्रतीकने वडील राज बब्बर यांना लग्नात न बोलवण्यामागचे सांगितले कारण… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 12:50 pm

Pune Gramin : सणसवाडी पाठोपाठ कवठे येमाई परिसरात आढळले दोन रानगवे; परिसरात खळबळ

शिरूर : शिरूर तालुक्यातील सणसवाडी पाठोपाठ कवठे येमाई परिसरात शुक्रवारी (ता. ९) दुपारनंतर दोन रानगवे दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुंजाळवाडी येथील अष्टविनायक महामार्गालगत असलेल्या एका शेतात हे गवे फिरताना नागरिकांनी पाहिले. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या गव्यांचे चित्रीकरण देखील केले आहे. या घटनेनंतर कवठे येमाई चे माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून […] The post Pune Gramin : सणसवाडी पाठोपाठ कवठे येमाई परिसरात आढळले दोन रानगवे; परिसरात खळबळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 12:43 pm

शेअर बाजार वधारला, गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव निवळण्याची चिन्ह दिसताच भारतीय शेअर बाजार वधारला. गुंतवणूकदारांमध्ये शेअर खरेदीचा उत्साह दिसू लागला. बीएसई सेन्सेक्स २३५० .४२ गुणांनी वधारला आणि ८१,८०४.८९ गुणांवर जाऊन पोहोचला. गुंतवणूकदारांच्या उत्साहामुळे बीएसई सेन्सेक्स २.९६ टक्क्यांनी वधारला. तणाव निवळण्याचे सकारात्मक परिणाम एनएसईच्या निफ्टीतही दिसून आले. निफ्टी फिफ्टी ७२८.२५ गुणांनी वधारला आणि २४,७३६.२५ गुणांवर जाऊन पोहोचला. गुंतवणूकदारांच्या उत्साहामुळे निफ्टी फिफ्टी ३.०३ टक्क्यांनी वधारला.याआधी २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पहलगाम येथे २६ नागरिकांची हत्या केली. यापैकी २५ भारतीय होते आणि एक नेपाळी होता. ठार मारलेल्या २६ जणांपैकी २५ जणांना फक्त हिंदू आहेत म्हणून ठार करण्यात आले होते. नाव आणि धर्म विचारुन त्यांना अतिरेक्यांनी निष्ठुरपणे ठार केले होते. यावेळी मध्यस्तीचा प्रयत्न केला म्हणून एका स्थानिक मुसलमानाला ठार करण्यात आले होते. या घटनेनंतर ७ मे रोजी भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले करुन अतिरेक्यांचे नऊ तळ नष्ट केले होते. भारताची कारवाई ही फक्त अतिरेक्यांच्या विरोधात होती. पण पाकिस्तानने थेट भारताच्या नागरी वस्त्यांवर आणि सैन्य तळांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचे हल्ले परतवले. नंतर भारताने पाकिस्तानच्या ११ हवाई तळांवर तसेच अतिरेक्यांच्या निवडक लाँचपॅडवर हल्ले करुन ते निकामी केले. भारत जोरदार कारवाई करत आहे आणि आपण बचाव करण्यास असमर्थ आहोत, याची जाणीव होताच पाकिस्तानने भारतापुढे शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. भारताने हा प्रस्ताव स्वीकारत १० मे रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधीला सहमती दर्शवली. लष्करी संकेतानुसार शस्त्रसंधी झाल्यानंतर दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी चर्चा करुन पुढील कारवाईचे निर्णय घ्यायचे असे ठरले. आता सोमवार १२ मे रोजी दुपारी बारा वाजता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करणार आहेत. चर्चा यशस्वी झाली तर शस्त्रसंधी कायम राहील. पण चर्चा अयशस्वी झाली तर पुन्हा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. पण रविवारच्या रात्रीपासून सोमवारी अद्यापपर्यंत सीमेवर गोळीबाराचे वृत्त नाही. यामुळे तणाव निवळणार अशी चर्चा गुंतवणूकदारांमध्ये सुरू आहे. याचाच सकारात्मक परिणाम शेअर बाजारत दिसला.

फीड फीडबर्नर 12 May 2025 12:30 pm

“सरकारविरोधात बोललो, तर ED, CBI आणि…”; जावेद अख्तरांनी पुन्हा एकदा व्यक्त केले परखड मत

Javed Akhtar | बॉलिवूडचे ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर विविध विषयांवर आपले परखड मत मांडताना दिसतात. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत हिंदी कलाविश्वातील सेलिब्रिटींसंदर्भात भाष्य केले आहे. बॉलिवूड कलाकार सरकारविरोधात का बोलत नाहीत? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला या प्रश्नाचं उत्तर त्यांनी स्पष्ट शब्दांत दिले. त्यांच्या या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जावेद अख्तर […] The post “सरकारविरोधात बोललो, तर ED, CBI आणि…”; जावेद अख्तरांनी पुन्हा एकदा व्यक्त केले परखड मत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 12:23 pm

कर्तव्याची हाक…! मातृभूमीसाठी सुट्ट्या रद्द, एक महिन्याची सुटी; जवान सातव्या दिवशीच पुन्हा सीमेवर

परभणी : भारत आणि पाकिस्तानमध्ये बॉर्डवर असलेल्या तणावामुळे सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत निघण्याचे आदेश त्यांना दिले गेले आहेत. यामध्ये कोणी सुट्टीवर आलेलं, कोण लग्नासाठी आलेलं होतं, मात्र आता त्यांना लगोलग निघावं लागत आहे. एक महिन्याची सुट्टी घेऊन मुळगावी आलेल्या व काश्मिरातील राजोरी सेक्टर येथे राष्ट्रीय रायफल मध्ये कार्यरत असलेल्या […] The post कर्तव्याची हाक…! मातृभूमीसाठी सुट्ट्या रद्द, एक महिन्याची सुटी; जवान सातव्या दिवशीच पुन्हा सीमेवर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 12:17 pm

Virat Kohli Retirement : रोहितनंतर विराट कोहलीचीही कसोटीतून निवृत्तीची घोषणा; भावनिक पोस्ट केली शेअर

Virat Kohli Retirement : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. त्याने एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. विराट कोहलीची पोस्ट काय ? विराट कोहलीने कसोटी जर्सी घातलेला स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, “कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्लू जर्सी घालून १४ वर्षे झाली […] The post Virat Kohli Retirement : रोहितनंतर विराट कोहलीचीही कसोटीतून निवृत्तीची घोषणा; भावनिक पोस्ट केली शेअर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 12:03 pm

‘अभिनय सोड इडली-वडे विक’; पहिला चित्रपट हिट तरीही अभिनेत्यावर झाली टीका

Suniel Shetty | बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र सुरुवातीला त्यालाही फार कष्ट करावे लागले. सुरुवातीला त्याचे दोन चित्रपट बंद पडले. ज्यानंतर दिग्दर्शक आणि निर्मात्यांनीही त्याला खराब अभिनेता असल्याचे म्हंटले. त्याला रेस्टॉरंटमध्येइडली-वडे विकण्याचाही सल्लाही देण्यात आला. सुनील शेट्टीने याबाबत खुलासा केला आहे. एका मुलाखतीत सुनील शेट्टीने सांगितले की, ‘फौलाद आणि आरजू […] The post ‘अभिनय सोड इडली-वडे विक’; पहिला चित्रपट हिट तरीही अभिनेत्यावर झाली टीका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 11:44 am

भारत - पाकिस्तानचे डीजीएमओ दुपारी १२ वाजता भेटणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे डीजीएमओ अर्थात डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स हे सोमवार १२ मे रोजी दुपारी बारा वाजता चर्चेसाठी भेटणार आहेत. यावेळी कोणकोणत्या मुद्यांवर चर्चा होणार हे अद्याप अधिकृतरित्या जाहीर झालेले नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने अतिरेक्यांचे सर्व तळ बंद करावे, अतिरेक्यांना प्रशिक्षण देणे तसेच मदत करणे थांबवावे अशी मागणी भारताकडून केली जाणार आहे. भारताकडून मोस्ट वाँटेड अतिरेक्यांची यादी पाकिस्तानला दिली जाण्याची आणि या अतिरेक्यांना २४ तासांत भारताच्या ताब्यात द्यावे अशी मागणी केली जाण्याचीही शक्यता आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरचा ताबाही भारत मागण्याची शक्यता आहे. भारताकडून केल्या जाणाऱ्या मागण्यांना पाकिस्तान कसा प्रतिसाद देतो यावर शस्त्रसंधीचे भवितव्य अवलंबून असेल.Major points from the press conference held by DGMO Lieutenant General Rajiv Ghai, Air Marshal AK Bharti and Vice Admiral AN Pramod, on Operation Sindoor:1. Over 100 terrorists killed in the action. 11 air bases in Pakistan destroyed. Indian Army inflicted heavy damage in… pic.twitter.com/82EOOZXMyN— ANI (@ANI) May 11, 2025याआधी २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पहलगाम येथे २६ नागरिकांची हत्या केली. यापैकी २५ भारतीय होते आणि एक नेपाळी होता. ठार मारलेल्या २६ जणांपैकी २५ जणांना फक्त हिंदू आहेत म्हणून ठार करण्यात आले होते. नाव आणि धर्म विचारुन त्यांना अतिरेक्यांनी निष्ठुरपणे ठार केले होते. यावेळी मध्यस्तीचा प्रयत्न केला म्हणून एका स्थानिक मुसलमानाला ठार करण्यात आले होते. या घटनेनंतर ७ मे रोजी भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले करुन अतिरेक्यांचे नऊ तळ नष्ट केले होते. भारताची कारवाई ही फक्त अतिरेक्यांच्या विरोधात होती. पण पाकिस्तानने थेट भारताच्या नागरी वस्त्यांवर आणि सैन्य तळांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचे हल्ले परतवले. नंतर भारताने पाकिस्तानच्या ११ हवाई तळांवर तसेच अतिरेक्यांच्या निवडक लाँचपॅडवर हल्ले करुन ते निकामी केले. भारत जोरदार कारवाई करत आहे आणि आपण बचाव करण्यास असमर्थ आहोत, याची जाणीव होताच पाकिस्तानने भारतापुढे शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. भारताने हा प्रस्ताव स्वीकारत १० मे रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधीला सहमती दर्शवली. लष्करी संकेतानुसार शस्त्रसंधी झाल्यानंतर दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी चर्चा करुन पुढील कारवाईचे निर्णय घ्यायचे असे ठरले. आता सोमवार १२ मे रोजी दुपारी बारा वाजता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करणार आहेत. चर्चा यशस्वी झाली तर शस्त्रसंधी कायम राहील. पण चर्चा अयशस्वी झाली तर पुन्हा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.पहलगाममधील घटनेनंतर भारताने पाकिस्तान विरोधात केलेली कारवाई सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित. शस्त्रसंधी झाली तरी या करारावरील स्थगिती भारताने कायम ठेवली आहे. भारत - पाकिस्तान दरम्यान रेल्वे, रस्ते, विमान आणि जल मार्गाने होणारी वाहतूक बंद. भारत - पाकिस्तान दरम्यान व्यापार बंद. पाकिस्तानच्या नागरिकांचे भारतीय व्हिसा स्थगित. पाकिस्तानच्या नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश. पाकिस्तानच्या दुतावासातील संरक्षण मंत्रालय, भूदल, नौदल आणि हवाई दलाचे प्रतिनिधी यांची हकालपट्टी. पाकिस्तानच्या दुतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या ५५ वरुन ३० वर आणली. पाकिस्तानव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे नऊ तळ आणि अतिरेक्यांचे निवडक लाँचपॅड केले नष्ट. पाकिस्तानचे ११ हवाई तळ केले निकामी भारताच्या हल्ल्यात युसुफ अजहर, अब्दुल मलिक रउफ, मुदस्सीर अहमद यांच्यासह १०० पेक्षा जास्त अतिरेकी ठार. आयसी ८१४ विमान अपहरण आणि पुलवामा हल्ला प्रकरणाशी संबंधित मोस्ट वाँटेड अतिरेकी ठार पाकिस्तानच्या सैन्याच्या अनेक पायाभूत सोयीसुविधा निकामी लाहोर, गुरजनवाला येथील पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा आणि रडार नष्ट. पाकिस्तानचे अनेक ड्रोन, निवडक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र भारताने केली नष्ट आगळीक केली तर चोख प्रत्युत्तर देणार; भारताचा पाकिस्तानला इशारा इथून पुढे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्ल्याला मदत करणारा देश हा भारताचा शत्रू समजला जाणार आणि त्यांच्याविरोधात करवाई होणार

फीड फीडबर्नर 12 May 2025 11:30 am

“इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता…”; रोहित पवारांनी १९७१च्या युद्धाची करून दिली आठवण

Rohit Pawar | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्याचे सांगितले जाते. याशिवाय ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नाबाबतही भाष्य केले होते. मात्र विरोधकांकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकारावर आक्षेप नोंदवला जात आहे. भारत-पाकिस्तानातील या संघर्षानंतर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी १९७१ च्या युद्धाची आठवण करून देत एक ट्वीट शेअर केले आहे. […] The post “इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता…”; रोहित पवारांनी १९७१च्या युद्धाची करून दिली आठवण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 11:05 am

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

Amravati MP Pakistan threat : अमरावतीच्या भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याच्या धमकीचा काॅल आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ‘हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढ़ने वाली थोडे दिन की मेहमान.. जल्दी उडाने है वाले है’, अशा पद्धतीच्या नवनीत राणा यांना धमक्या आल्या आहेत. याप्रकरणी नवनीत राणा यांनी तातडीने पोलिस ठाण्यात […] The post Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 10:37 am

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’म्हणत मोदींवरही साधला निशाणा

Shahid Afridi on PM Modi | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर रविवारी तिन्ही सैन्यदलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानविरोधात राबवण्यात आलेल्या लष्करी मोहीमेची माहिती दिली. ऑपरेशन सिंदूर’मध्ये किमान 100 दहशतवादी आणि पाकिस्तानचे 30 ते 40 सैनिक मारले गेल्याची माहिती डीजीएमओचे लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली. तीन दिवस चाललेल्या पाकिस्तानच्या या हल्ल्यांना भारतीय […] The post शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 10:23 am

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

Raju Khare : मोहोळ तालुक्यासाठी ५९ कोटी रुपये मिळाले, आणि वर्तमानपत्रात मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुम्ही कसले पैसे आणले ? तुमचा काय संबंध? निवडणुकीत पडलाय, विधानसभेच्या सभागृहात तर मी होतो, असं सांगत आमदार राजू खरे यांनी माजी आमदार यशवंत माने यांचं नाव न घेता जोरदार टोला लगावला. मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्रात शासनाच्या […] The post Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 10:06 am

पाकिस्तानपासून 50 मीटर अंतरावर राहणाऱ्यांचे धाडस:क्षेपणास्त्र हल्ल्यानंतरही गावकरी ठाम, म्हणाले गोळ्या खाऊ पण घर सोडणार नाही

काशीवाडमा गाव पंजाबमधील पठाणकोट शहरापासून फक्त ३० किलोमीटर अंतरावर आहे. चौपालमध्ये पक्के रस्ते, काँक्रीटची घरे आणि पत्ते खेळणारे आणि गप्पा मारणारे लोक यामुळे ते इतर कोणत्याही सामान्य गावासारखे दिसते. पण हे गाव खास आहे. हे गाव पाकिस्तानच्या सर्वात जवळच्या गावांपैकी एक आहे. पाकिस्तानची सीमा येथून फक्त ५० मीटर अंतरावर आहे. हवाई दलाच्या ऑपरेशन सिंदूरनंतर, पाकिस्तानने ८ मे पासून भारतीय शहरांवर हल्ले सुरू केले, त्यामुळे सीमेलगतची गावे रिकामी होऊ लागली. काशीवाडमा गावालाही गोळीबार किंवा ड्रोन हल्ल्याचा धोका होता, पण येथील लोक खंबीर राहिले. प्रशासनाचे लोक गाव रिकामे करण्यासाठी आले, पण लोकांनी नकार दिला. ८ ते १० मे दरम्यान पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, गुजरात आणि पंजाबवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. १० मे रोजी पठाणकोट एअरबेसलाही लक्ष्य करण्यात आले. या दिवशी झालेल्या युद्धबंदीनंतर आता सीमेवर शांतता आहे. दिव्य मराठीने काशीवाडमा गाठले आणि या गावात लोक कसे राहतात ते पाहिले, जे नेहमीच गोळीबाराच्या धोक्यात असते. गेल्या ४ दिवसांत सीमावर्ती भागात दिसल्यासारखा कोणताही भीती किंवा तणाव येथे नव्हता. गावातील रहिवासी चुन्नीलाल यांनी १९७१ चे युद्ध पाहिले आहे. ते म्हणतात, 'तेव्हा आम्ही गाव सोडले.' मी आता जाणार नाही. त्याच गावातील राधेश्याम म्हणतात, 'जर आपल्याला मरावे लागले तर गोळीनेच मरू.' मृत्यू एके दिवशी येणारच आहे, त्याला घाबरायचे कशाला? लोक घाबरत नाहीत, त्यांनी गोळीबार टाळण्यासाठी बंकर बांधले आहेत गावात प्रवेश करताच एक गोष्ट जाणवते. पाकिस्तानच्या इतक्या जवळ राहूनही, येथील लोकांमध्ये कोणतीही भीती नाही. गावकऱ्यांच्या बोलण्यावरून याचे कारण स्पष्ट होते. देवराज शर्मा हे सुमारे ७५ वर्षांचे आहेत. संपूर्ण आयुष्य या गावात घालवले. ते म्हणतात, 'पाकिस्तानच्या बाजूने वातावरण धोकादायक आहे, पण आम्हाला काळजी नाही. पाकिस्तानकडून कोणतीही भीती नाही. सरकार आणि बीएसएफ आम्हाला मदत करतात. यामुळे आपल्याला सुरक्षित वाटते. सरकारने किंवा बीएसएफने गावकऱ्यांच्या सुरक्षेची व्यवस्था केली आहे का? देवराज म्हणतात, 'आम्ही आमच्या सुरक्षेसाठी स्वतःची व्यवस्था केली आहे. आम्ही कच्चे बंकर बांधले आहेत. रात्री धोका असल्यास किंवा गोळीबार झाल्यास, सर्वजण बंकरमध्ये जातात. देवराज बंकर बनवण्याची पद्धतही स्पष्ट करतात, 'सुमारे सहा फूट खोल आणि चार ते पाच फूट रुंद खड्डा खणून घ्या.' त्यावर जाड लाकूड ठेवलेले असते. त्यावर ताडपत्री पसरवली जाते आणि त्यावर सुमारे चार फूट जाडीचा मातीचा थर ठेवला जातो. काही ठिकाणी विटांचाही वापर केला जातो. एका बंकरमध्ये ५-६ लोक सहज राहू शकतात. शेतात काही बंकरही बांधण्यात आले आहेत. आम्हीही त्यांना भेटायला गेलो. विटा आणि सिमेंटपासून बनवलेले हे बंकर वरून मातीच्या ढिगाऱ्यासारखे दिसतात. आत १५-२० लोक उभे राहण्यासाठी जागा आहे. शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी एक खिडकी बनवण्यात आली आहे. सैन्याच्या गरजेनुसार बंकर देखील बांधण्यात आले आहेत. सैनिक येथून शत्रूवर गोळीबारही करू शकतात. काशीवाडमा गावातील बहुतेक लोक शेतकरी आहेत. येथे शेती करणे हे एक कठीण काम आहे. देवराज म्हणतात, 'आमची शेतेही सीमेवरील कुंपणाच्या पलीकडे आहेत.' तिथे सुमारे २० एकर जमीन आहे. जेव्हा आम्ही शेतीकडे जातो तेव्हा बीएसएफचे सैनिक आमच्यासोबत असतात. यामुळे आम्हाला कोणताही धोका नाही. सध्या युद्धासारखी परिस्थिती असल्याने, बीएसएफने आम्हाला शेतात जाण्यापासून रोखले आहे. सैन्याला साहित्य आणि शस्त्रे पाठविण्यासाठी सायकलपासून एक तात्पुरते वाहन बनवले गेलेआम्हाला गावात विक्की शर्मा भेटला. त्याने त्याच्या सायकलपासून जुगाड गाडी बनवली आहे. हे वाहन सैन्याला रसद आणि दारूगोळा पुरवण्यासाठी बनवण्यात आले आहे. विकी म्हणतो, 'जर युद्ध झाले तर आम्ही बीएसएफ आणि आर्मीसाठी अन्न आणि इतर साहित्य घेऊन जाऊ.' आपण त्यांच्यासोबत एकत्र लढू. आम्ही पाकिस्तानी सैन्याला घाबरत नाही आणि घाबरणारही नाही. आपण इथेच राहू, या गावात. त्याची गाडी दाखवत विकी म्हणतो, 'ही सैनिकांसाठी उपयुक्त ठरेल.' आम्ही त्यात सामान भरून बीएसएफ-आर्मी पोस्टवर पोहोचवू. गावकरी म्हणाले- पाकिस्तानकडून होणारा गोळीबार ही काही नवीन गोष्ट नाही आम्ही गावातील प्रदीप कुमारला विचारले की सीमेवर राहणे किती कठीण आहे, येथील जीवन कसे आहे? ते उत्तर देतात, 'जर कोणताही आदेश आला किंवा परिस्थिती बदलली तर आम्ही त्यानुसार वागतो.' हे सर्व आमच्यासाठी नवीन नाही. आम्ही आमच्या सुरक्षेसाठी बंकर बांधले आहेत. इथे भेटलेले एक वयस्कर माणूस चुन्नीलाल म्हणतात, '१९७१ च्या युद्धादरम्यान परिस्थिती खूप वाईट होती. गावात अराजकता होती. लोक गाव सोडून गेले होते. यावेळी असा कोणताही हेतू नाही. मी इथे खूप कष्टाने घर बांधले आहे. आता गाव सोडल्यानंतर मी कुठे जाऊ? आमच्याकडे राहण्यासाठी दुसरी कोणतीही जागा नाही आणि कोणताही संपर्क नाही. ६७ वर्षांच्या रामा यांनी १९७१ चे युद्ध देखील पाहिले आहे. आम्ही त्यांना विचारले की यावेळी त्यांना भीती वाटत आहे का? त्या म्हणतात, 'नाही.' आपण कुठेही जाणार नाही. मी माझ्या घरीच राहीन. गावातील सर्व लोक सारखेच विचार करतात. जर मृत्यू यायचाच असेल तर तो येऊ द्या. तथापि, त्याच गावातील वंदना कुमारी मुलांबद्दल आणि कुटुंबाबद्दल चिंतेत आहेत. त्या म्हणतात, 'जर कोणी सीमेपलीकडून आले किंवा काही घडले तर आपण काय करू?' मला काहीच समजत नाही. आमचे पालक इथे आहेत. आता मी माझ्या नातेवाईकांसह कुठे जाऊ? कोणास ठाऊक, भविष्यातही परिस्थिती अशीच राहू शकते. म्हणूनच आपण इथे राहतो. हे देखील खरे आहे की येथे दररोज काहीतरी किंवा दुसरे घडतच असते. त्याच गावातील राणो देवी देखील त्याच गोष्टीची काळजीत आहे. त्या म्हणतात, 'जेव्हा अडचणी वाढतील तेव्हा मुलांचे काय होईल?' इथे काम नाही. लहान जागा खोदून बंकर बनवण्यात आले आहेत. छत मोठ्या कष्टाने तयार केले आहे. घरासारखी दुसरी जागा नाही. 'प्रशासन आम्हाला आमची घरे सोडायला सांगते, पण आम्ही कुठे जायचे?' मधुबाला म्हणते, 'प्रशासन आम्हाला घरे सोडायला सांगते, म्हणून आम्हाला भीती वाटते, पण आम्ही कुठे जायचे?' आपल्याला राहण्यासाठी काहीतरी जागा असली पाहिजे. आता जे काही होईल ते इथेच होईल. इथे कोणीही मदत करायला येत नाही. आपण कसे आहोत हे कोणी विचारत नाही. नवरा रोजंदारीवर काम करणारा कामगार आहे. त्याचे काम इथे आहे. तो घरी बसला आहे. उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. गावातील राधेश्याम म्हणतात- इथे सगळं ठीक आहे. कोणीही कुठेही गेलेले नाही आणि कोणीही जाऊ इच्छित नाही. आपण याआधीही असे बरेच काही पाहिले आहे. तुम्ही कदाचित हे सर्व पहिल्यांदाच पाहत असाल. त्याला गाव सोडावे लागलेले जुने दिवस आठवतात. मग ते म्हणतात, जर आपण माघार घेतली तर इतके सामान घेऊन कुठे जाणार? हे सर्व कोणता नातेवाईक सांभाळेल? ही समस्या पुन्हा पुन्हा उद्भवते. गावात किराणा दुकान चालवणारे रतन चंद सध्याच्या परिस्थितीबद्दल म्हणतात, 'गावात सर्व काही ठीक आहे. सगळे गावात आहेत. कोणीही कुठेही गेले नाही. प्रशासनानेही आम्हाला जास्त दूर जायला सांगितले नाही. दयाल चंदही तेच म्हणतात, 'आम्ही शेतकरी आहोत, आम्ही शेतात काम करतो आणि जनावरे पाळतो.' सरकारने येथे एक बंकर बांधावा, जेणेकरून आम्हाला निवारा मिळेल. आम्ही रोजंदारीवर काम करणारे कामगार आहोत, जर आम्ही दुसरीकडे गेलो तर जगणे खूप कठीण होईल. खासदार म्हणाले- गावकऱ्यांना वेगळी मदत मिळावीआम्ही गावातील लोकांशी बोलत असताना पठाणकोटचे काँग्रेस खासदार सुखजिंदर सिंग रंधावा आले. दिव्य मराठीशी बोलताना ते म्हणाले, 'सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना विशेष प्रोत्साहन मिळायला हवे. यामुळे त्यांचे मनोबल उंचावेल आणि देशाच्या सीमा मजबूत होतील. इथल्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर मला कोणतीही भीती दिसली नाही. रंधावा १९७१ चे उदाहरण देतात, 'तेव्हा सीमेपासून १६ किलोमीटरपर्यंतचा परिसर एक विशेष क्षेत्र मानला जात असे.' तिथल्या लोकांना सरकारी नोकऱ्या आणि सैन्यात प्राधान्य मिळायचे. शिक्षक आणि डॉक्टरांना अतिरिक्त प्रोत्साहन देण्यात आले. यामुळे त्यांनी अमृतसर किंवा गुरुदासपूरऐवजी सीमावर्ती भागात काम करणे पसंत केले. 'त्यावेळी १००-१५० रुपये जास्तीचेही महत्त्वाचे होते.' भारताच्या सीमा मजबूत आहेत. देशात भीतीचे वातावरण असले तरी येथील लोक कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहेत. या क्षेत्रांमध्ये केंद्र सरकार कोणती मदत करत आहे? या प्रश्नावर रंधावा म्हणतात, 'सध्या देशाची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. २०१४ नंतर, सीमावर्ती भागात दिले जाणारे प्रोत्साहन हळूहळू काढून टाकण्यात आले आहे. आम्ही हा मुद्दा संसदेत उपस्थित करू. सध्याचा उद्देश पाकिस्तानचे कोणतेही नापाक हेतू हाणून पाडणे आहे. रंधावा पुढे म्हणतात, 'माझा जन्मही सीमावर्ती भागात झाला. मी ज्या मतदारसंघातून खासदार आहे तो मतदारसंघही सीमेवर आहे. मी १९७१ चे युद्ध पाहिले आहे. त्या वेळीही लोक घरातून पळून जात नव्हते, आजही पळून जाणार नाहीत. फरक एवढाच आहे की तेव्हा घरे मातीची होती, आता ती काँक्रीटची घरे आहेत. पूर्वी घरांमध्ये बंकर बांधले जात होते. आताही आम्ही गावकऱ्यांना बंकर बांधण्याचा सल्ला दिला आहे. सीमावर्ती भागातील ५ जिल्ह्यांमध्ये शाळा उघडणार नाहीतपाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पंजाब जिल्ह्यांमधील परिस्थिती सामान्य होऊ लागली आहे. शिक्षण मंत्री हरजोत बैंस म्हणाले की, १२ मे पासून सर्व शाळा आणि महाविद्यालये सुरू होतील. तथापि, पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या अमृतसर, फिरोजपूर, तरनतारन आणि पठाणकोटसह बर्नाला येथील डीसींनी सर्व शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, अमृतसर, फिरोजपूर, फाजिल्का, तरनतारन, पठाणकोट आणि गुरुदासपूर येथील सीमेलगतची गावे रिकामी करण्यात आली. आता लोक आपापल्या घरी परतू लागले आहेत. पठाणकोट आणि जम्मू सीमेवरही बाजारपेठा उघडल्या आहेत. जालंधरमध्ये लष्कराच्या गणवेशात ४ संशयित आढळलेजालंधरमध्ये लष्कराच्या गणवेशातील ४ संशयित दिसले. मंदिरात पोहोचल्यानंतर या लोकांनी पुजाऱ्याकडून अन्न आणि पाणी मागितले होते. पोलीस त्यांचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. चौघेही मंदिराबाहेर पोहोचले आणि दार ठोठावले. पुजारी गेटवर आला तेव्हा संशयितांनी पिण्यासाठी पाणी मागितले. यानंतर त्याने जेवणाची व्यवस्था करण्याबद्दल बोलले. पुजाऱ्याने फोन करून जेवण मागवताच ते चौघेही तिथून पळून गेले. जेव्हा त्याला संशय आला तेव्हा त्याने पोलिसांना कळवले. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम राबवली आणि सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले, परंतु चौघेही सापडले नाहीत. याशिवाय, मालेरकोटला पोलिसांनी २ पाकिस्तानी हेरांना अटक केली आहे. ते भारतीय सैन्याच्या हालचालींबद्दल माहिती पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाला पाठवत होते. त्या बदल्यात त्यांना ऑनलाइन पेमेंट मिळत होते. ही माहिती पंजाब पोलिसांचे डीजीपी गौरव यादव यांनी दिली. त्यांनी सांगितले की, आरोपींकडून दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत आणि त्यांचा तपास सुरू आहे. पाकिस्तानने युद्धबंदी मोडल्यास आम्ही योग्य उत्तर देऊ - लष्कराने म्हटलेभारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या २५ तासांनंतर, रविवारी संध्याकाळी ६:३० वाजता, तिन्ही सैन्यांनी १ तास १० मिनिटे पत्रकार परिषद घेतली. यामध्ये, लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई, व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद आणि एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. १० मे रोजी संध्याकाळी ५ वाजता भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. पाकिस्तानमध्ये राफेल पाडल्याच्या प्रश्नावर लष्कराने म्हटले आहे की, 'आपण अजूनही युद्धाच्या स्थितीत आहोत. आम्ही यावर काहीही बोलणार नाही कारण आम्हाला त्यांना कोणताही फायदा द्यायचा नाही.एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, पाकिस्तानने १० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. आम्ही त्यांनाही त्याबद्दल सांगितले. आज काय होते ते पाहूया. आमच्या प्रतिसादाचा विचार केला तर तुम्हाला कळेल की भारतीय सैन्य योग्य उत्तर देण्यास सक्षम आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 May 2025 9:35 am

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

India Vs Pakistan | पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूरची योजना आखण्यात आली. या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. 11 मे रोजी भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही दलाच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्सची (DGMO) संयुक्त पत्रकार परिषद झाली. यात ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यात आली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकव्याप्त कश्मीर […] The post पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 9:31 am

पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदा पाकिस्तानकडून गोळीबार नाही, शांततेत गेली रात्र

नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीनंतर जम्मू-काश्मीर आणि नियंत्रण रेषेजवळील इतर भागात ११-१२ची रात्र शांततेत गेली.कोणत्याही प्रकारच्या घटनेची माहिती समोर आलेली नाही. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदा शेजारील देशाकडून कोणत्याही प्रकारची कुरापत समोर आलेली नाही. भारतीय लष्कराने ही माहिती दिली.१० मेच्या संध्याकाळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीचा करार झाला त्यानंतर दोन्ही देशांनी शांतता कायम राखण्याचा निर्णय घेतला. मात्र पाकिस्तानकडून तीन तासांतच शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करण्यात आले आणि भारतातील काही शहरांमध्ये ड्रोनने हल्ला करण्यात आला. भारतीय लष्करानेही प्रत्युत्तर देत सर्व ड्रोन्स पाडले. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सातत्याने जम्मू-काश्मीरच्या सीमेलगतच्या भागांमध्ये गोळीबर करत होता. याला भारताच्या लष्करानेही तोडीस तोड उत्तर दिले. ७ ते १० मे दरम्यान पाकिस्तानन भारताची अनेक सैन्य ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले उधळून लावले. तसेच त्यांच्या एअरबेसचेही मोठे नुकसान केले.६-७मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर६-७मेच्या रात्री भारताच्या वायूदलाकडून ऑपरेशन सिंदूर लाँच करण्यात आले. या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यात १००हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या हल्ल्याने पाकिस्तान चांगलाच चवताळला आणि त्यांनी सातत्याने भारतावर ड्रोन आणि मिसाईल्सचा हल्ला केला. ७ ते १० मे दरम्यान दोन्ही देशांदरम्यान तणावाची स्थिती होती.पहलगाम हल्ल्यानंतर केले होते ऑपरेशन सिंदूरजम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता. या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते तर अनेक जण जखमी झाले होते. या २६ पर्यटकांमध्ये एका नेपाळी नागरिकाचा समावेशही होता. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ६-७ मेच्या रात्री कारवाई केली आणि १००हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले.

फीड फीडबर्नर 12 May 2025 9:30 am

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई : राज्‍य सरकारची बहुचर्चित लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला, असा आरोप सामाजिक आणि आदिवासी विकास खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. अशातच आता लाडकी बहीण योजनेमध्ये सरकार दरमहा दीड हजार रुपये देते. ज्या बहिणींना उद्योग सुरु करावयाचा असेल आणि भांडवल नसेल तर […] The post Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 9:28 am

पाकिस्तानी आर्मी जनरलला दारू आणि महिलांचे व्यसन:अयुब खानपासून मुनीरपर्यंत, हिंदूंबद्दल द्वेष आणि जिहादच्या वेडेपणाने पाकिस्तानचा केला नाश

१० मे रोजी संध्याकाळी ५ वाजता युद्धबंदी असूनही, पाकिस्तानकडून तोफखाना आणि ड्रोन हल्ले करण्यात आले. पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांना भारतासोबत युद्ध हवे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मुनीरच्या आधीही पाकिस्तानमध्ये असे अनेक सेनापती होते ज्यांनी जबरदस्तीने भारतावर कब्जा केला आणि पराभवाला सामोरे जावे लागले. मंडे मेगा स्टोरीमध्ये, अशा ५ पाकिस्तानी लष्करप्रमुखांची कहाणी आहे, ज्यांनी त्यांच्या दुष्कृत्यांसाठी, लबाडीसाठी आणि हेतू पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानला उद्ध्वस्त केले... भारताला धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानचा नाश करण्यास तयार लेडीज मॅन म्हणून प्रसिद्ध, अनेक प्रसिद्ध महिलांशी मैत्री दारूचे व्यसन इतके की रात्री १० नंतर दिलेल्या आदेशांचे पालन करणे अनावश्यक ज्या व्यक्तीने त्यांना लष्करप्रमुख बनवले त्यांना पदच्युत करण्यात आले आणि फाशी देण्यात आली अमेरिकेकडून निधी घेऊन काश्मीरमध्ये जिहाद सुरू केला हुदूद अध्यादेश लागू, बलात्कार पीडितेकडून बलात्काराचा पुरावा मागितला पंतप्रधान नवाज यांना न कळवताच कारगिल युद्ध सुरू झाले जेव्हा विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली नाही, तेव्हा एक सत्तापालट करण्यात आला जेव्हा इम्रान खानने त्यांना पदावरून काढून टाकले तेव्हा मुनीरने त्यांना तुरुंगात पाठवले भारताच्या हवाई हल्ल्याचा बदला घेण्याची शिफारस

दिव्यमराठी भास्कर 12 May 2025 8:46 am

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,”भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

India Vs Pakistan | भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर रविवारी भारतीय सैन्य, वायुसेना आणि नौदलाच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्सची (DGMO) ११ मे २०२५ रोजी संयुक्त पत्रकार परिषद झाली. यात ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यात आली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकव्याप्त कश्मीर आणि पाकिस्तानातील 100 हून दहशतवादी आणि 40 सैनिक मारले गेल्याची माहिती लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली. तसेच […] The post “पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 8:31 am

मेट्रो-३ मार्गिकेचा आरे ते वरळीपर्यंतचा प्रवास सुस्साट

बीकेसी ते आचार्य अत्रे दरम्यान १६३७७ जणांनी केला प्रवासमुंबई (प्रतिनिधी) : मेट्रो-३ मार्गिकचा बीकेसी ते आचार्य अत्रे दरम्यानचा दुसरा टप्पा शनिवारी सकाळपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला झाला. आता आरे ते आचार्य अत्रे चौक, वरळी हा गारेगार प्रवास भूमिगत मेट्रोने अवघ्या ६० रुपयांत करता येणार आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत आरे ते वरळी या मार्गावर ३२,७९१ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉरिशनमार्फत (एमएमआरसी) देण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो-३ (अॅक्वालाईन) च्या बीकेसी मेट्रो स्थानक ते आचार्य अत्रे मेट्रो स्थानकापर्यंतच्या टप्पा २-अचे लोकार्पण शुक्रवारी पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'मुंबई मेट्रो-३ एक्वालाईनच्या टप्पा २ अ (बीकेसी ते आचार्य अत्रे चौक) चा सेवा विस्तार करण्यात आला. शनिवारपासून नागरिकांसाठी हा टप्पा खुला करण्यात आला. आरे ते वरळी या मार्गावर ३२,७९१ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला, तर बीकेसी ते आचार्य अत्रे दरम्यान पहिल्याच दिवशी १६३७७ जणांनी केला प्रवास केला.मेट्रो-३ मार्गावर सोमवार ते शनिवारी पहिली मेट्रो सकाळी ६.३० वाजता तर शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता असणार आहे. रविवारी सकाळी पहिली मेट्रो सकाळी ८.३० वाजता तर शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता असणार आहे. मेट्रो-३ च्या दुसऱ्या टप्प्यात बीकेसी, धारावी, शीतलादेवी, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक ही स्थानके आहेत. मेट्रो-३ चा वरळी ते कुलाबा हा शेवटचा टप्पा ऑगस्टपासून मुंबईकरांच्या सेवेत येईल.वरळीतून फिनिक्स मॉलला जाणे सोयीचे व्हावे यासाठी मॉलतर्फे वरळी मेट्रो स्थानकावरून गाडलांची सोय करण्यात आली आहे. पासाठी मॉलकडून मुंबई मेट्रो रेल कॉरिशनसोबत करार करण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यातधारावी, शीतलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक आहे, तर तिसरा टप्यात वरळी ते कफ परेड व अंतिम टप्पा पूर्ण झाल्यावर, नेहरू विज्ञान केंद्र, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, अँट रोड, गिरगाव, काळबादेवी, सीएसएमटी, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड यांसारख्या स्थानकांचा समावेश असेल,

फीड फीडबर्नर 12 May 2025 8:30 am

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

छत्तीसगड : छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील विधानसभा पोलीस स्टेशन परिसरात रविवारी रात्री उशिरा एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खारोरा-बालोदा बाजार रोडवर लोक माझदा गाडीतून मुलांच्या वाढदिवसाच्या समारंभातून परतत असताना हा अपघात झाला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माझदा गाडी खारोरा परिसरात पोहोचताच, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका वेगवान ट्रेलर ट्रकने तिला जोरदार […] The post Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 8:29 am

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Girish Mahajan : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भारत पाकिस्तानात लष्करी कारवायांना पूर्णविराम लागला आहे. भारताने युद्धबंदीची घोषणा केली असून यासाठी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम यांनी मध्यस्थी केली असल्याचे बोलले जात आहे. युद्धबंदीनंतर उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी माघार घ्याचची काही गरज नव्हती अशी प्रतिक्रिया देत भारत सरकार ट्रम्प यांना मध्यस्थी करून कोणाला वाचवत […] The post Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 8:12 am

Accident: छत्तीसगडच्या रायपूरमध्ये भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू

रायपूर: छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये भीषण रस्ते अपघात झाला आहे. रायपूर-बालोदाबाजार मार्गावर सरागांवजवळ रविवारी रात्री उशिरा एक ट्रक आणि ट्रेलर यांच्यात टक्कर झाली. या अपघातात कमीत कमी १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झालेत.जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये ९ महिला, २ मुली, एक किशोरवयीन तर ६ महिन्याच्या बाळाचा समावेश आहे.या ट्रेलरमधून लोक बाळाच्या सहा महिन्याच्या कार्यक्रमावरून परतत होते. मत्यू पावलेले हे सर्व लोक छत्तीसगडच्या चटौद गावाचे निवासी पुनीत साहू यांचे नातेवाईक होते.

फीड फीडबर्नर 12 May 2025 8:10 am

मृत्युदंड: मुलाला चादरीत गुंडाळले, भिंतीवर आदळून मारले:मृतदेह बॅगेत घेऊन सिनेमा हॉलमध्ये गेली, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे पाहिला, आज अंजनाबाई केसचा भाग-1

महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील एसटी बसस्थानक. तारीख होती १४ एप्रिल १९९१ आणि वेळ होती रात्रीचे ११ वाजेची. एका म्हाताऱ्या बाईच्या मांडीवर अडीच वर्षांचा मुलगा रडत होता... मम्मी-मम्मी. त्या बाईने मुलाला एका कोपऱ्यात नेले आणि त्याच्या गालावर दोन-तीन वेळा मारले. मुलाने जोरात ओरडायला सुरुवात केली. म्हातारी आणखीनच संतापली. तिने आपल्या सर्व शक्तीनिशी मुलाचा गळा दाबायला सुरुवात केली. मुलाला त्रास होऊ लागला. ती समोरच्या लोखंडी रेलिंगकडे धावली. तिने मुलाची मान धरली आणि रेलिंगवर तीन-चार वेळा जोरात आदळले. बाळ रक्ताने माखले होते. ते गप्प झाले. या वृद्ध महिलेचे नाव अंजनाबाई होते. काही क्षणांनंतर, रेणुका आणि सीमा या दोन तरुणीही अंजनाबाईंकडे पोहोचल्या. त्यांच्यासोबत किरण नावाचा एक माणूसही होता. अंजनाबाई म्हणाल्या, 'त्याचे कपडे रक्ताने माखले आहेत, ते धुवावे लागतील.' रेणुकाने लगेच तिच्याकडे एक बाटली पुढे केली. अंजनाबाईंनी कपडे धुतले. तिने मुलाचा मृतदेह कापडात गुंडाळला आणि रेणुकाला म्हणाली , 'तो फेकून दे.' तोपर्यंत मी इथेच बसेन. रेणुकाच्या हातात वडापाव होता. अंजनाबाईंनी तिच्या हातातून वडापाव घेतला आणि बसून स्वतः खाऊ लागली. रेणुका, सीमा आणि किरण मुलाचा मृतदेह घेऊन निघून गेले. कोल्हापूरचे विक्रम हायस्कूल जवळच होते. रस्त्याच्या कडेला एक तुटलेली रिक्षा उभी होती. तिघेही थोडा वेळ आजूबाजूला पाहत राहिले. शांतपणे त्यांनी मृतदेह रिक्षाखाली ठेवला आणि बस स्टँडवर परतले. तीन वर्षांनंतर... १८ ऑक्टोबर १९९४, रात्रीचे १२ वाजले होते. ठिकाण: हडपसर, पुणे. अंजनाबाई, रेणुका आणि सीमा एकत्र झोपल्या होत्या. त्यांच्यासोबत एक तीन वर्षांची मुलगीही होती. अचानक ती रडू लागली. अंजनाबाईंनी मुलीला आपल्या मांडीवर घेतले आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अंजनाबाई झोप घेत होत्या. दरम्यान, मुलगी जोरात ओरडू लागली. अंजनाबाई रागाने उठल्या आणि त्यांनी तिला दोनदा चापट मारली. ती आणखी जोरात ओरडू लागली. त्या खोलीत झोपलेल्या रेणुका आणि सीमाही जागे झाल्या. अंजनाबाई दार उघडून मुलीला घेऊन तिसऱ्या मजल्यावर गेल्या. ती मुलगी सतत मम्मी-मम्मी ओरडत होती. सुरुवातीला अंजनाबाईंनी तिच्या सर्व शक्तीनिशी मुलीचे तोंड दाबले, पण ती गप्प बसली नाही. मग ती पुढे सरकली, छताच्या कडेला गेली. खाली झुडपे होती. अंजनाबाईंनी मुलीला झुडपात फेकून दिले. मोठा आवाज आला. मुलीने ओरडणे थांबवले. खोलीत परत येताच अंजनाबाई म्हणाल्या , 'ती कुठेतरी झुडपात पडली असेल.' जा, तिची विल्हेवाट लावा. रेणुका आणि सीमा पटकन निघाल्या. ती मुलगी झुडपांमध्ये निर्जीव पडली होती. दोघीही मिळून मुलीचा गळा दाबत राहिले जोपर्यंत त्यांना खात्री पटली नाही की ती मेली आहे. ऐक, 'तिचे कपडे महाग आहेत, ते काढून घे.' सीमाने रेणुकाला सांगितले. रेणुकाने मुलीचे कपडे काढले आणि तिला तिथेच सोडून खोलीत आली. रात्री एक वाजता रेणुकाने सुटकेस उचलली आणि पुन्हा झुडपांमध्ये पोहोचली. तिने मुलीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि निघून गेली. काही वेळाने, ती एका कालव्याजवळ पोहोचली आणि सुटकेस कालव्यात फेकून दिली आणि घरी परतली. ११ महिन्यांनंतर... २९ ऑगस्ट १९९५ रोजी अंजनाबाई, रेणुका, सीमा आणि किरण नाशिकला पोहोचले. त्यांनी मकवाना परिसरात भाड्याने खोली घेतली. दररोज संध्याकाळी हे लोक नाग चौकीजवळील एका घराभोवती फेऱ्या मारत असत. ते चौघेही त्या घराजवळ फिरायचे आणि नंतर परत यायचे. १० दिवसांनी, म्हणजे ९ ऑगस्ट १९९५ रोजी, रेणुका आणि सीमा एका घरी पोहोचल्या. दारावर थाप पडली आणि एक बाई बाहेर आली. तिघीही आत गेल्या. ते आपसात बोलू लागले. त्यांच्या हावभावांवरून ते एकमेकांना ओळखत असल्याचे दिसून येत होते. त्या घरात दोन मुली आणि त्यांचे वडील होते. एक मुलगी ९ वर्षांची होती आणि दुसरी ७ वर्षांची होती. सीमाने ९ वर्षांच्या मुलीला बोलावले आणि तिला तिच्या शेजारी बसवले. काही वेळाने तिने विचारले- 'बडी मम्मीला तुझी खूप आठवण येते.' तू काही दिवसांसाठी आमच्या घरी येशील का? मुलगी म्हणाली- हो. तिचे वडील नकार देत होते तरी तिने ऐकले नाही. रेणुका आणि सीमा मुलीला सोबत घेऊन त्यांच्या घरी परतल्या. अंजनाबाईंनी मुलीला मिठी मारली आणि म्हणाली, ' तू कोल्हापूरला येशील का?' मुलगी आनंदाने म्हणाली - हो. दुसऱ्या दिवशी सकाळी चौघीही बसमध्ये बसून कोल्हापूरला निघाल्या. त्या तिथे पोहोचल्या तेव्हा रात्र झाली होती. किरण म्हणाला, 'चला जवळच कुठेतरी खोली घेऊन रात्र घालवूया.' अंजनाबाई म्हणाल्या- 'हो, काहीतरी बघा, पण माझ्याकडे जास्त पैसे नाहीत.' स्वस्त काहीतरी शोधा. अनेक हॉटेल्समधील खोल्यांबद्दल चौकशी केल्यानंतर, अखेर त्यांना बस स्टँडजवळील 'महाराज' नावाच्या हॉटेलमध्ये खोली सापडली. सर्वजण रात्रभर इथेच राहिले. दुसऱ्या दिवशी टॅक्सी बुक केली आणि नरसोवारीला निघाले. ती ९ वर्षांची मुलगीही त्यांच्यासोबत होती. काही तासांनी टॅक्सी एका उसाच्या शेताजवळून जात होती. मग रेणुकाने टॅक्सी थांबवली. ती अंजनाबाईंना म्हणाली - 'मी लघवी करणार आहे.' ती टॅक्सीतून उतरली आणि ९ वर्षांच्या मुलीसोबत उसाच्या शेताकडे चालत गेली. ती मुलीला शेतात खोलवर घेऊन गेली. मुलगी बसताच रेणुकाने मागून तिची मान घट्ट पकडली. मुलीने कसे तरी स्वतःला तावडीतून सोडवले, पण ती अडखळली आणि पडली. रेणुका उडी मारून त्याच्या छातीवर बसली आणि तिचा गळा दाबू लागली. मुलगी म्हणाली- 'तू काय करतेयस... मला सोड.' रेणुकाने मान सोडली नाही. मुलगी धडपडत होती. इतक्यात सीमा तिथे पोहोचली. रेणुका सीमाला म्हणाली - 'तिचे हात आणि पाय धर.' सीमाने मुलीचे हात आणि पाय धरले. काही वेळाने मुलीचे शरीर शांत झाले. दोन्ही महिला ५ मिनिटे त्या निर्जीव मुलीकडे पाहत राहिल्या. शरीरात हालचाल होत नव्हती. ती मुलगी मेली होती. दोघींनी तिला जवळच्या कालव्यात नेले आणि तिथे फेकून दिले. मग त्या परत आल्या आणि गाडीत बसल्या. अंजनाबाई टॅक्सी ड्रायव्हरला म्हणाल्या - 'चल, आपल्याला आता निघायला हवे.' ड्रायव्हरने संकोचून विचारले , 'मुलगी कुठे गेली?' सीमा रागाने म्हणाली , 'तिची आई आली होती.' तिने सोबत नेले. काही अंतर चालल्यानंतर त्यांना वाटेत दत्तात्रेय मंदिर दिसले. अंजनाबाईंनी गाडी थांबवली. तिघेही गाडीतून उतरले, मंदिराबाहेरील नळावर हातपाय धुतले आणि आत गेले. तिघांनीही निवांतपणे दर्शन घेतले. पुजाऱ्याकडून प्रसाद घेतला आणि नंतर नाशिकला परतले. सुमारे ९ महिन्यांनंतर… १२ एप्रिल १९९६, पल्लवी लॉज, कोल्हापूर. खोली क्रमांक २०३ मधून एका मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता. अंजनाबाईंच्या मांडीवर दीड वर्षांची मुलगी होती. ती सतत ओरडत होती. रेणुका आणि सीमा जवळच बसल्या होत्या. त्यांच्या संवादादरम्यान सीमा म्हणाली – 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा चित्रपट उषा थिएटरमध्ये सुरू आहे. आपण तो बघायला जायला हवं का? अंजनाबाई रागाने ओरडल्या आणि म्हणाल्या, आधी तिच्याबद्दल काहीतरी करा... रात्रभर ती रडत असताना मला डोकेदुखी होत आहे. त्यांचा मोठा आवाज ऐकून ती मुलगी आणखी जोरात रडू लागली. अंजनाबाई उठल्या आणि त्यांनी सर्व शक्तीनिशी मुलीचा गळा दाबला. मुलीचे डोळे लाल झाले. शरीर निळे झाले. रेणुका अंजनाबाईंना म्हणाली - 'ती मेली असेल ना?' अंजनाबाई उठल्या आणि बाळाला चादरीत गुंडाळले. त्यांनी तिला भिंतीवर तीन-चार वेळा आपटले. चादर रक्ताने माखलेली होती. ती रेणुकाला म्हणाली- 'ते बॅगेत ठेव.' मग आपण चित्रपट पाहूया. रेणुकाने मृतदेह बॅगेत ठेवला आणि बॅगेला घेऊन तिघेही चित्रपट पाहण्यासाठी निघाले. थिएटरमध्ये पोहोचताच, गेटवर बसलेल्या गार्डने रेणुका यांना सांगितले, आता तिकिटांची वेळ नाही. खूप उशीर झाला आहे. दुसरा शो पाहा. तिघीही गार्डशी भांडू लागल्या. कंटाळून गार्ड म्हणाला, भांडू नका, आत जा. त्या तिघीही एकमेकांशी बोलत बोलत थिएटरमध्ये पोहोचल्या. त्यांनी मृतदेह असलेली बॅग बाजूला ठेवली आणि चित्रपट पाहू लागल्या. सुमारे दीड तासानंतर मध्यांतर झाले. सीमा उठली आणि मृतदेह असलेली बॅग घेऊन वॉशरूममध्ये गेली. तिथे आधीच दोन महिला होत्या. सीमा बेसिनमध्ये हात धुवू लागली. दोघीही बाहेर येताच सीमाने बॅग एका कोपऱ्यात ढकलली. ती हळूहळू बाहेर पडली आणि एका दुकानाकडे गेली. दुकानदाराला सीमा म्हणाली- 'भाऊ... मला तीन समोसे द्या.' दुकानदाराला पैसे दिले आणि समोसे घेऊन हॉलमध्ये आली. सीमा तिच्या सीटवर बसली आणि चित्रपट पाहू लागली. तिघींनीही ३ तास ​​९ मिनिटांचा संपूर्ण चित्रपट पाहिला. दरम्यान, त्यांनी टाळ्या वाजवल्या, हसल्या आणि मजा केली. मग ती तिच्या लॉजवर परतली. दुसरीकडे, वॉशरूममध्ये ठेवलेल्या बॅगमधून हळूहळू रक्त गळू लागले होते, परंतु आतापर्यंत कोणाच्याही लक्षात आले नव्हते. या अंजनाबाई, सीमा आणि रेणुका कोण होत्या? त्यांच्यासोबतचा किरण कोण होता? हे लोक मुलांना का मारत होते? उसाच्या शेतात मारल्या गेलेल्या मुलीशी त्यांचे काय संबंध होते? महाराष्ट्रातील सिरियल किलर सिस्टर्स केसचा भाग-२ उद्या म्हणजे मंगळवारी वाचा... पोलिसांनी तिन्ही महिलांना पकडले, पण त्यांनी किती मुलांची हत्या केली हे कोणालाही माहिती नव्हते. पोलिसांनी हे गूढ कसे उलगडले? तिन्ही महिलांनी मिळून उसाच्या शेतात ज्या मुलीला मारले तिचे नाव क्रांती होते. एका वर्षानंतर, क्रांतीची आई बाजारात अंजनाबाईंना भेटली. जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीबद्दल विचारले तेव्हा अंजनाबाई म्हणाल्या की ती धुळे शहरात आहे. क्रांतीच्या पालकांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन एफआयआर दाखल केला. पोलिसांनी अंजनाबाई, रेणुका आणि सीमा यांनाही अटक केली. आतापर्यंत कोणालाही माहिती नव्हते की या तिन्ही महिलांनी एकामागून एक अनेक मुलांना मारले आहे. अंजनाबाई केस भाग २ मध्ये संपूर्ण कथा वाचा...

दिव्यमराठी भास्कर 12 May 2025 7:46 am

महाराष्ट्रातील मोटार परिवहन सीमा चौकी लवकरच बंद होणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहितीमुंबई (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आणि वस्तू व सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीच्या आनुषंगाने, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा उद्देश आंतरराज्य वाहतूक सुरळीत करणे आणि व्यावसायिक वाहनांच्या हालचाली तील अडथळे दूर करणे हा आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सन १९६६ मध्ये स्थापन झालेल्या या सीमा चौक्यांचा उद्देश वाहनांची हालचाल नियंत्रित करणे, परिवहन नियमांचे पालन सुनिश्चित करणे आणि रस्ते कर वसूल करणे असा होता. मात्र GST लागू झाल्यानंतर व डिजिटल अंमलबजावणीच्या उपाययोजनांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे प्रत्यक्ष चौकशीसाठी स्थापन केलेल्या या सीमा चौकींची आवश्यकता आता उरलेली नाही.या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील परिवहन विभागाला निर्देश दिले होते. तसेच मुख्य परिवहन आयुक्त कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या सीमा चौकी लवकरच बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्याबरोबरच राज्य ट्रान्सपोर्ट युनियन ने देखील वारंवार यासंदर्भात निवेदन देऊन सीमा चौक्या बंद करण्याबद्दल मागणी केली होती. त्या अनुषंगाने प्रशासकीय त्रुटी दूर करून सकारात्मक अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवलेला आहे. त्यांच्या मंजुरी नंतर राज्याच्या सीमेवरील चेकपोस्ट बंद करण्यात येतील.तत्पूर्वी महाराष्ट्रात मोटार परिवहन व सीमाशुल्क विभाग यांच्या एकत्रित तपासणी नाक्यांसाठी इंटिग्रेटेड चेक पोस्ट प्रकल्प राबवण्यात आला होता. त्यासाठी में अदानी प्रा.लि. या संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. तसेच संबंधित सुविधांचे संचालन व देखरेख करण्यासाठी त्यांच्या सोबत करार केले गेले होते. तथापि, हे सीमा नाके बंद करण्याच्या निर्णय झाल्यामुळे संबंधित संस्थेला नुकसान भरपाई म्हणून ५०४ कोटी रुपये अदा करणे आवश्यक आहे. तथापि, ही रक्कम अदा केल्यानंतर संबंधित तंत्रज्ञान व स्थावर मालमत्ता परिवहन विभागाच्या मालकीची होणारं आहे, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. या संदर्भात परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने या निर्णयाचे परिणाम व परिणामकारकता यांचा सखोल अभ्यास केला. या अहवालाच्या आधारे शासनाने हे निष्कर्ष काढले की, ऑनलाईन प्रणाली व इलेक्ट्रॉनिक देखरेखीद्वारे प्रत्यक्ष चौकशीची गरज प्रभावीपणे बदलता येऊ शकते. या संक्रमणामुळे कार्यक्षमतेत वाढ, विलंब कमी होणे आणि गैरप्रवृत्ती रोखण्यास मदत होईल. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक मांनी केले.

फीड फीडबर्नर 12 May 2025 7:30 am

म्हाडाच्या धोकादायक इमारतींची होणार डागडुजी ...तर अतिधोकादायक इमारती रिकाम्या केल्या जाणार

मुंबई (प्रतिनिधी) : म्हाडाने मुंबई शहरातील उपकरप्राप्त (सेस) इमारतीच्या केलेल्या स्ट्रक्चर ऑडिटमध्ये ९५ इमारती या अतिधोकादायक आढळल्या असून, जवळपास ४२५ इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहेत. त्यानुसार अतिधोकादायक प्रमारती रिकाम्या केल्या जाणार असल्या तरी धोकादायक इमारतींना डागडुजीचा टेकू लावावा लागणार आहे. संबंधित इमारतीमध्ये कोणत्या प्रकारची दुरुस्ती करावी लागणार आहे, याचा आढावा घेऊन पावसाळ्यापूर्वी काम केले जाणार आहे. त्यामुळे येथे वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.मुंबईमध्ये सध्या १३ हजारांहून अधिक उपकर प्राप्त जुन्या इमारती आहेत. त्यांची दुरुस्ती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून केली जाते, मात्र अनेक इमारती पुरत्या जीर्ण झाल्या असून, त्या दुरुस्तीपलीकडे गेल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात MHADA जीर्ण झालेल्या इमारती कोसळून अपघात घडू नये, यासाठी म्हाडाने प्रथमदर्शनी बोकादायक दिसणाऱ्या ६२५ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट फेब्रुवारीमध्ये सुरू केले होते. त्यापैकी ५५० इमारतींचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल आला असून, त्यामध्ये ९५ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. त्यामुळे या इमारतो पावसाळयापूर्वी खाली कराव्यात, यासाठी म्हाडाकडून संबंधित रहिवाशांना नोटीस दिल्या जात आहेत. तसेच त्यांना संक्रमण शिबिर देण्याची कार्यवाही केली जाणार आहेत, मात्र या इमारती धोकादायक झाल्या असल्या तरी दुरुस्तीयोग्य असल्याचे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये म्हटले आहे त्यांच्या दुरुस्तीसाठी म्हाडाने तयारी सुरू केली असून, ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याबी माहिती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.म्हाडाच्या मुंबई शहरातील एकूण उपकरप्राप्त (सेस) इमारतींपैकी सी-२ (अ) या धोकादायक गटात १२८ इमारती असून, त्या रिकाम्या करून स्ट्रक्चरल दुरुस्ती करावी लागणार आहे. तर सी-२ (बी) या गटात २७९ इमारती असून, त्या रिकाम्या न करता स्ट्रक्बरल ऑडिट करावे लागणार आहे. तसेच सी-३ या गटात ३४ इमारती असून, त्यांची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये एखादी इमारत अतिधोकादायक म्हणजे सी-१ प्रकारात आढळल्यास संबंधित इमारतीच्या मालकाला म्हाडा अधिनियमातील नवीन कलम ७९ अ नुसार सहा महिन्यांत पुनर्विकास प्रस्ताव सादर करण्याबाबत नोटीस दिली जाईल, त्याने प्रस्ताव न दिल्यास रहिवाशांना प्रस्ताव सादर करण्याची संधी दिली जाते, मात्र इमारतमालक आणि रहिवाशांनी पुनर्विकासाचा प्रस्ताव न दिल्यास म्हाडाला स्वतः पुनर्विकास करता येणार आहे.

फीड फीडबर्नर 12 May 2025 7:10 am

आजचे एक्सप्लेनर:युद्धविराम पाकिस्तानला हवा होता की भारताला, ऐन वेळेवर आपण का थांबवले हल्ले; काय आहे वास्तव? जाणून घ्या 5 सिद्धांत

१० मे २०२५… भारत आणि पाकिस्तानमध्ये सतत ड्रोन हल्ले आणि गोळीबार होत होता. त्यानंतर संध्याकाळी ५.२५ वाजता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ट्रूथ सोशलवर पोस्ट केले, 'भारत आणि पाकिस्तान युद्धविरामावर सहमत झाले आहेत.' यानंतर, मीडिया रिपोर्ट्समध्ये युद्धविरामाबाबत अनेक सिद्धांत समोर आले. कुठेतरी असे म्हटले जात होते की अमेरिकेला एका मोठ्या हल्ल्याची गुप्त माहिती मिळाली होती, तर कुठेतरी पाकिस्तानने अमेरिकेकडे युद्धविरामाची विनंती केली. पाकिस्तानला किंवा भारताला युद्धविराम हवा होता का, तो अमेरिकेच्या दबावाखाली झाला का; आजच्या एक्सप्लेनरमध्ये आपण मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेल्या युद्धविरामाच्या 5 सिद्धांतांबद्दल जाणून घेऊ... सिद्धांत-१: ब्राह्मोस हल्ल्यानंतर पाकिस्तानला वाटले की भारत अणुप्रकल्प नष्ट करेल, तेव्हाच त्याने अमेरिकेला फोन केला सिद्धांत-२: उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला, म्हणाले- संघर्ष खूप वाढू शकतो, पाकिस्तानशी थेट बोला सिद्धांत-३: ८.५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात आयएमएफने पाकिस्तानसाठी युद्धविरामाची अट ठेवली सिद्धांत-४: शस्त्रास्त्रे निकामी झाल्यानंतर चीनने युद्धविरामाचा दबाव आणला सिद्धांत-५: भारताने ऑपरेशन बुनियान उल मारसूस थांबवण्याची योजना आखली, अमेरिकेकडून युद्धविराम , भारत-पाकिस्तानशी संबंधित इतर बातम्या वाचा लष्कराने म्हटले- जर पाकिस्तानने युद्धबंदी मोडली तर आम्ही योग्य उत्तर देऊ: ऑपरेशन सिंदूरमध्ये शत्रूचे ४० सैनिक आणि १०० दहशतवादी मारले; ५ भारतीय जवान शहीद भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या २५ तासांनंतर, रविवारी संध्याकाळी ६:३० वाजता, तिन्ही सैन्यांनी १ तास १० मिनिटे पत्रकार परिषद घेतली. यामध्ये, लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई, व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद आणि एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल माहिती दिली. पूर्ण बातमी वाचा...

दिव्यमराठी भास्कर 12 May 2025 6:47 am

अग्रलेख : जित्याची खोड

काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आणि त्याचा काहीकाळ सामना केल्यानंतर पाकिस्तानने आपणहून शस्त्रसंधीची मागणी केली. पाकिस्तानच्या या मागणीला प्रतिसाद देऊन भारतानेही युद्धविरामाला सहमती दर्शवली. भारत पाकिस्तानच नव्हे तर जगातील अनेक देशांनी या युद्धविरामाच्या निर्णयानंतर जरी निःश्‍वास सोडला असला, तरी या युद्धविरामाच्या निर्णयानंतर तीनच तासात पाकिस्तानने पुन्हा एकदा सीमेवर अंधाधुंद […] The post अग्रलेख : जित्याची खोड appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 6:00 am

Pimpri : ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात

तळेगाव दाभाडे : गावागावांत पोलीस आणि नागरिकांमधील परस्परसंबंध अधिक दृढ करून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने पुणे ग्रामीण पोलीस दलाने ‘एक गाव, एक पोलीस पाटील, एक पोलीस अंमलदार’ या नावीन्यपूर्ण योजनेची सुरूवात केली आहे. १ मे अर्थात महाराष्ट्र दिन पासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील संपूर्ण १ हजार ५७४ गावांमध्ये ही […] The post Pimpri : ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 5:58 am

Pune District : नाट्याचे प्रशिक्षण लहान वयात मिळणे कौतुकास्पद -तपकिरे

अकलूज : उत्कृष्ट नृत्य कलाकार, नाट्य कलाकार तेव्हाच घडतो जेव्हा त्याला योग्य मार्गदर्शन मिळते. अकलूज शाखेने लहान मुलांसाठी योग्य प्रशिक्षण शिबीर घेतले ही कौतुकास्पद बाब असल्याचे मत सिनेअभिनेते अजय तपकिरे यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा अकलूजच्या वतीने 7 दिवसीय नृत्य, नाट्य, अभिनय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचा समारोप कु. […] The post Pune District : नाट्याचे प्रशिक्षण लहान वयात मिळणे कौतुकास्पद -तपकिरे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 5:58 am

Pune District: झेंडू उत्पादक शेतकर्‍यांमध्ये समाधानकारक वातावरण

लोणी देवकर : चालू वर्षी बाजारामध्ये झेंडूच्या फुलांना कायमच सरासरी प्रति किलो रु. 40 ते 50 असा समाधानकारक दर राहिला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यात झेंडू उत्पादक शेतकर्‍यांमध्ये उत्साही वातावरण असल्याचे चित्र दिसून येत आहे. चालू वर्षी झेंडूचे दर हे दसरा व दिवाळी सणामध्ये तेजीतच राहिले आहेत. त्यावेळी झेंडू उत्पादक शेतकर्‍यांना चांगला आर्थिक आधार मिळाला होता. […] The post Pune District: झेंडू उत्पादक शेतकर्‍यांमध्ये समाधानकारक वातावरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 5:57 am

Pune District : संत ज्ञानेश्वर महाराज 750व्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जन्मोत्सव सोहळ्याचे निमित्त साधून दि. 3 ते 10 मे दरम्यान आळंदीत भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. चाकणरोड येथे भाविकांसाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून हजारो भाविक या सोहळ्यासाठी आळंदीत दाखल झाले होते. शुक्रवारी (10 मे) सायंकाळी काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता […] The post Pune District : संत ज्ञानेश्वर महाराज 750व्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 5:54 am

Satara : एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

सातारा : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत 2025-26 या वर्षात क्षेत्र विस्तार कार्यक्रमांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड आणि आंबा, चिकू, मोसंबी, पेरू, आवळा या फळपिकांच्या जुन्या बागांचे पुनरुज्जीवन व आळिंबी उत्पादन प्रकल्प यासाठी अनुदान देण्यात येते. यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे. फळपिकांचे उत्पादन वाढवणे आणि […] The post Satara : एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत अर्ज करण्याचे आवाहन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 5:48 am

Pune : राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या शुल्कात कपात

पुणे : येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातील अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना भराव्या लागणाऱ्या नोंदणी शुल्कात कपात करण्यात आली असून, आता राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून शंभर रुपये शुल्क आकारले जाणार आहे. गेल्यावर्षीपर्यंत पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती या विभागांतील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत होती. […] The post Pune : राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या शुल्कात कपात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 5:46 am

Satara : पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा

सातारा : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेऊन, पशुपालकांनी आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांनी केले आहे. या योजनांसाठी दि. 15 जूनअखेर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. शेतीला जोडव्यवसाय म्हणून जिल्हास्तरीय योजनेंतर्गत 2 दुधाळ गायी, म्हशी गटवाटप, […] The post Satara : पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 5:44 am

Nagar : पोलीस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सीसीटीव्ही यंत्रणा बंद

संगमनेर : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संगमनेर शहरांमध्ये 50 लाख रुपये निधीतून अद्यावत अशी सीसीटीव्ही यंत्रणा व कंट्रोल रूम उभारण्यात आली. ही सीसीटीव्ही यंत्रणा पोलीस प्रशासनाकडे हस्तांतरित असून सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही सीसीटीव्ही यंत्रणा बंद का ? असा परखड सवाल आमदार सत्यजीत तांबे यांनी विचारला आहे. अहिल्यानगर येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार सत्यजीत तांबे […] The post Nagar : पोलीस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सीसीटीव्ही यंत्रणा बंद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 5:42 am

Pimpri : ‘इतिहास लढणाऱ्यांचा बनतो, घरात बसणाऱ्यांचा नाही’

कार्ला : आपल्या आचरणातून आई वडीलांचा अपमान होणार नाही, याची काळजी घ्या. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणावे लागतील. इतिहास लढणाऱ्यांचा होतो, घरात बसणाऱ्यांचा नाही, असे मत हभप माऊली महाराज पठाडे यांनी कीर्तनरूपी सेवा देताना केले. वेहेरगाव येथे आई एकविरा देवी पायथा मंदिर नूतनीकरणानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. वेहेरगाव ग्रामस्थ, दानशूर […] The post Pimpri : ‘इतिहास लढणाऱ्यांचा बनतो, घरात बसणाऱ्यांचा नाही’ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 5:29 am

Pimpri : उदय सामंत यांच्या हस्ते महाकाव्यसंमेलन लोगोचे अनावरण

पिंपरी : भोसरी येथील नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने 17 व18 मे दरम्यान पिंपळे गुरव येथे होणार्‍या आठव्या अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन 2025 च्या लोगोचे अनावरण मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री उदय सामंत यांना महाकाव्यसंमेलनाची निमंत्रण पत्रिका देण्यात आली. मुंबई येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार तुकाराम काते, […] The post Pimpri : उदय सामंत यांच्या हस्ते महाकाव्यसंमेलन लोगोचे अनावरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 5:25 am

Pune : चार लघुपटांना मिळणार मिती लघुपट शिष्यवृत्ती

पुणे : गेली चार वर्षे मिती फिल्म सोसायटीतर्फे राष्ट्रीय पातळीवर मिती लघुपट महोत्सव आयोजित केला जातो. यावर्षी डिसेंबरमध्ये पर्यावरण या विषयावरील ५ वा मिती लघुपट आणि माहितीपट महोत्सव आयोजित केला आहे. नवीन लघुपट निर्माते, लेखक, दिग्दर्शक यांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी मिती फिल्म सोसायटी चार लघुपटांना २५ हजार रुपयांची मिती शिष्यवृत्ती योजना जाहीर करत असल्याची माहिती […] The post Pune : चार लघुपटांना मिळणार मिती लघुपट शिष्यवृत्ती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 5:25 am

Pimpri : आधार केंद्र परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पिंपरी : जिल्ह्यातील ग्रामीण भाग (महसूल मंडल), नगर पालिका व शहरी भागातील महानगर पालिका येथे सद्यस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार आधार केंद्र सुरू करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आधार संच वितरण करण्यात येणार आहे. या संदर्भात पात्र आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइट http://www.pune.gov.in वर जाऊन अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष, ग्रामीण भाग (महसूल […] The post Pimpri : आधार केंद्र परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 5:23 am

Pune : सातबारा उतारा आणखी स्पष्ट, सुटसुटीत

पुणे : सातबारा उताऱ्यावर अपाक शेरा, एकमॅ नोंद, तगाई कर्ज, बंडींग कर्ज, भूसुधार कर, इतर पोकळीस्त नोंदी अशा कालबाह्य नोंदी आहेत. या कालबाह्य नोंदीमुळे शेतकऱ्यांना जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार अथवा कर्ज प्रकरणे, भूसंपादन नोबदला आदी कामकाजावेळी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. या सर्व पार्श्वभूमीवर सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य व निरुपयोगी नोंदी कमी करण्याची मोहीम राबविण्याची सूचना महसूल […] The post Pune : सातबारा उतारा आणखी स्पष्ट, सुटसुटीत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 5:21 am

Pune : तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ च्या अर्हताप्राप्त उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. दि. ४ मार्च ते ९ मे २०२५ या कालावधीत नवी मुंबई केंद्रावर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आयोगाने यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. ही यादी तात्पुरती असून, अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्र […] The post Pune : तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 5:17 am

Pune : स्पर्धा परीक्षार्थीचा अपघातात मृत्यू, पोलीस उपनिरीक्षक मित्र जखमी

पुणे : मित्राच्या विवाह समारंभातील हळदीला हजेरी लावून परत येणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला आहे. तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. त्याच्यासमवेत असलेला पोलीस उपनिरीक्षक मित्र जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर भागात घडली. समाधान संभाजी भिटे (३१, रा. नीर निंबगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे […] The post Pune : स्पर्धा परीक्षार्थीचा अपघातात मृत्यू, पोलीस उपनिरीक्षक मित्र जखमी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 5:14 am

Pune : अविवेकी लोकांनी देशावर युद्ध लादले

पुणे : कोणतेही युद्ध ही रोमँटिक गोष्ट नाही, तसेच ती एखादी बॉलिवूडची चित्रपटाची कथा नाही. मोठी मानवी हानी, निर्वासितांचे प्रश्‍न, कुटुंबांची ताटातूट अदृश्य पण खोल सामाजिक नुकसान युद्धामुळे होत असते . युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवे. अविवेकी लोकांनी आपल्यावर युद्ध लादले. युद्धासाठी आनंद व्यक्त करणे योग्य नाही. प्रत्येक समस्येचा पहिला उपाय […] The post Pune : अविवेकी लोकांनी देशावर युद्ध लादले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 5:10 am

Pune : सुधारित पीक विमा योजनेमध्ये नगदी पिकासाठी ५ टक्के योगदान

पुणे : राज्यात एक रुपयात पीक विमा योजनेची अंमलबजावणी होत असताना गैरप्रकार झाल्याचे समोर आले. त्यामुळे ती योजना आता रद्द करून राज्य शासनाने सुधारीत पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना आता पीक विम्यासाठी खरिप हंगामात २ टक्के, रब्बीसाठी १.५ टक्के योगदान आणि नगदी पिकांच्या विमा योजनेसाठी ५ टक्के योगदान द्यावे लागणार […] The post Pune : सुधारित पीक विमा योजनेमध्ये नगदी पिकासाठी ५ टक्के योगदान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 5:06 am

Pune : विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पाषाणकडील रॅम्पचे काम वगळता जूनअखेर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्या दृष्टीने प्राधिकरणाने नियोजन केले आहे. त्यामुळे गणेशखिंड रस्त्यावरील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो प्रकल्प आणि गणेशखिंड व सेनापती […] The post Pune : विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 5:02 am

Pune District : ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार?

वडापुरी : इंदापूर तालुक्यातील मुदत संपलेल्या वीस ग्रामपंचायतीसाठी वॉर्डातील आरक्षणाची सोडत तसेच सरपंच आरक्षण सोडत नुकतीच झाली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार याद्याही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत; परंतु निवडणूक कधी लागणार, असा प्रश्न इच्छुक उमेदवारांना पडला आहे. आरक्षण सोडत झाल्यामुळे व प्रत्येक ग्रामपंचायतीला सरपंच कोण होणार हे सर्व जाहीर झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या सदस्य, सरपंच निवडणुकीसाठी अनेकांनी […] The post Pune District : ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 5:02 am

Pune District : छत्रपती कारखाना येणार्‍या निवडणुकांचा ठरणार ट्रेलर

इंदापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा घोळ मिटला असून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार्‍या चारच महिन्यात पार पडतील, असे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटातील नेहमीचेच कलाकार तयारीस लागलेले दिसून येत आहेत, असे असले तरी देखील याच तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागली असल्याने व खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार […] The post Pune District : छत्रपती कारखाना येणार्‍या निवडणुकांचा ठरणार ट्रेलर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 5:02 am

Nagar : बचतगटांना आर्थिक पाठबळ मिळाल्याने महिला सक्षम –आ. खताळ

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील १६३ महिला बचतगटांना उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) अंतर्गत ८ कोटी २१ लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. या माध्यमातून गावागावातील महिलांना व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक पाठबळ मिळाले असल्यामुळे महिला खऱ्या अर्थाने सक्षम झाल्या असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. संगमनेर पंचायत समिती येथे समुदाय संसाधन व्यक्तींची आढावा […] The post Nagar : बचतगटांना आर्थिक पाठबळ मिळाल्याने महिला सक्षम – आ. खताळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 4:47 am

Pimpri : नामांकित कंपनीचे दीड लाखांचे बनावट कपडे जप्त

पिंपरी : अंडरआर्मर कंपनीच्या नावाचा आणि लोगोचा वापर करून बनावट कपडे विक्री केल्याप्रकरणी हिंजवडी येथील एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.10) सायंकाळी मेगा फॅशन या दुकानात करण्यात आले. पुरन रंगलाल बोरवाल (45, रा. कोथरुड पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी सुनिल रत्नप्पा पुजारी (32, रा.मुंबई) यांनी हिंजवडी […] The post Pimpri : नामांकित कंपनीचे दीड लाखांचे बनावट कपडे जप्त appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 3:52 am

Pimpri : आंबी येथे भव्य रुग्णालयाची उभारणी

वडगाव मावळ : मावळवासीयांच्या आरोग्यसेवेला अधिक सक्षम करण्यासाठी आंबी येथे उभारण्यात आलेले ‘पुष्पलता डी. वाय. पाटील हॉस्पिटल’ लवकरच सुरु होणार आहे. या रुग्णालयास आमदार सुनील शेळके यांनी भेट दिली आणि हा प्रकल्प मावळवासीयांच्या आरोग्यसेवेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. वडगाव-कान्हे आणि लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयांप्रमाणेच, हे नवीन आणि सुसज्ज हॉस्पिटल मावळमधील नागरिकांच्या […] The post Pimpri : आंबी येथे भव्य रुग्णालयाची उभारणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 3:34 am

Pimpri : सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज

अवसरी : पुणे जिल्ह्यात सामुदायिक विवाह सोहळे लोप पावत चालले आहे. भोरवाडी अवसरी खुर्द येथील शिवसम्राट युवा प्रतिष्ठानने मोफत सामुदायिक विवाह सोहळा चळवळ पुढे चालू ठेवण्याचे अतिशय चांगले काम गेले पंधरा वर्षे सुरू ठेवले आहे. त्यामुळे तालुक्यातील गरजू कुटुंबीयांची लग्न मोफत होत असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. भोरवाडी (ता.आंबेगाव) येथे सहकार महर्षी […] The post Pimpri : सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 3:05 am

जित्याची खोड...

आम्ही शांततेत राहावे म्हणून युद्ध करतो असे प्रख्यात ग्रीक तत्वज्ञ ॲरिस्टॉटल याचे वचन आहे. त्याची प्रचिती मोदी यांनी काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आणून दिली. मोदी यांचा युद्धाचा आडाखा अचूक होता. भारताने पाकच्या नागरिकांवर हल्ले केले नाहीत. पाकच्या मांडीवर बसून भारतातील निरपराध नागरिकांना कंठस्नान घालणाऱ्या दहशतवाद्यांना टार्गेट केले. हे युद्ध होते आणि पाकचा या युद्धात सर्वंकष पराभव झाला, तसा तो पूर्वीही साडेतीन वेळा झाला आहे. पण आता तर तो जास्तच परिणामकारक आणि प्रिसिजन म्हणजे अचूक हल्ला होता असे म्हणावे लागेल. मोदी यांचे अचूक अंदाज आणि आडाखे किती अचूक आहेत याचा अंदाज येतो. वास्तविक हे युद्ध पारंपरिक अर्थाने नव्हते, तर हा पाकच्या नापाक इराद्यांना जमीनदोस्त करण्याच्या इराद्याने भारताने पाकला शिकवलेला धडा होता. पहलगाम येथे पाकच्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर नृशंस हल्ले केले आणि त्यांचे कपडे काढून त्यांना ठार मारले. अनेकांना कलमा पढायला लावला आणि ज्यांना तो येत नव्हता त्यांना पॉइंट ब्लॅक गोळ्या घातल्या. या दहशतवाद्यांना मोदी यांनी धडा शिकवण्याचा निर्धार केला आणि तो अमलातही आणला. या जागी नेहरू किंवा काँग्रेसचे सरकार असते तर मुळमुळीत निषेधाचे खलिते धाडत बसले असते. पण मोदी आणि नेहरू किंवा काँग्रेस यांच्यात हा गुणात्मक फरक आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आपल्याला नेमके काय हवे आहे हे निश्चित जाणते आणि तसेच करते. त्यामुळे मोदींची लोकप्रियता पराकोटीची वाढली आहे. पण येथे मोदी यांच्या लोकप्रियतेचा प्रश्नच नव्हता. ज्या भारताच्या निरपराध भगिनींनी आपले कुंकू गमावले त्यांच्या पतींच्या हत्येचा बदला घेणे आवश्यक होते आणि तेच मोदी यांनी केले. त्यामुळे या कारवाईला मोदी यांनीच 'ऑपरेशन सिंदूर' हे सार्थ नाव दिले.https://prahaar.in/2025/05/11/indian-foreign-secretary-vikram-misri-has-urged-pakistan-to-take-appropriate-steps-regarding-ceasefire-violations/भारताला आता विरोधक शहाणपणा शिकवत आहेत की, भारताने युद्ध का केले नाही आणि पाकला संपूर्ण उद्ध्वस्त करायला हवे होते. जर तसे केले तर हेच विरोधक बोंबलत गेले असते की मोदी सरकारने पाकच्या लोकांना ठार मारले म्हणून. त्यामुळे मोदी यांनी शांत राहून आपला बदला घेतला आणि महिलांना न्यायही दिला आहे. पाकच्या कोणत्याही भुलावणीस बळी पडू नये हे जाणून मोदी यांनी पाकला आता त्यांच्या दहशतवाद्यांच्या अड्यांना उद्ध्वस्त केले आहे. जर लोकांना मारले असते तर पाक गाऱ्हाणी घेऊन बोंबलत गेला असता. पण आता त्याला ती संधी नाही. कारण भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करून ते बेचिराख केले आहेत. यातच मसूद अझर याच्या कुटुंबीयांचा खात्मा झाला आहे. हा मसूद अझर म्हणजे तोच की ज्याने कंदाहार येथे विमान अपहरण प्रकरणात भारतीयांना ओलिस ठेवले होते आणि त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला होता. त्याचे नऊ कुटुंबीय ठार झालेत, तर दुसरा एक दहशतवादी अब्दुल रऊफ हा देखील या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झाला आहे. हे युद्ध नव्हते तर पाकला त्याच्या जबरदस्त आगळीकीबद्दल तितकीच न भूतो न भविष्यती अशी शिक्षा होती. दहशतवादी आता हा धडा धेऊन चुकले असतील. आता भारतात काँग्रेसचे सरकार नाही, तर मोदी यांच्या भाजपाचे राज्य आहे आणि ते आपल्याला थोड्याही चुकीचे प्रायश्चित्त देते. पाकच्या शस्त्रसंधीवर भारताचा विश्वास नाही. त्यामुळे आता भारताने पाकला ठणकावून सांगितले आहे की यापुढे जर पाकने कोणतीही आगळीक केली, तर ते भारताविरोधात युद्ध पुकारले असा त्याचा अर्थ धेतला जाईल. यामुळे पाक आधीच गर्भगळीत झाला आहे. मोदी यांनी सिंधू जल करार स्थगित राहील अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे पाकच्या नाकातोंडात पाणी गेले आहे आणि त्यामुळे त्यांची शेती पाण्याअभावी सुकणार आहे. तसेच कित्येक आर्थिक उपाय योजले आहेत ज्यामुळे पाकचे जिणे मुश्किल होणार आहे. पाकला शिकवला तो धडा पुरेसा नसला तरीही सध्या तरी इतके पाकला आपल्या चुकीची जाणीव करून देणे आवश्यक होते आणि ती मोदी यांनी करून दिली आहे. भारताने या ऑपरेशनमध्ये दहशतवादी तळांवर हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. हे यश फार मोठे आहे. भारताने कुठेही जनतेला ढाल केले नाही. त्याउलट पाकने त्याच्या स्वभावानुसार आपल्याच जनतेला ढाल करून भारतीय लष्करांवर हल्ले केले होते. पण ते हल्ले सर्व फोल ठरले. आता पाकला असा धडा शिकवला आहे की काही वर्षे तरी तो यातून डोके वर काढू शकणार नाही. पाकच्या कारवाया बंद तर होतीलच पण दहशतवादी ज्यांनी पहलगाम हत्याकांड घडवले त्यांना वेचून ठार मारण्यावर आता भारत लक्ष केंद्रित करेल. कारण भारताची ही जखम आहे की, जे दहशतवादी या हल्ल्याला जबाबदार आहेत ते तर पळून गेले आहेत. त्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत भारताचा बदला अपुरा राहील. आता पाकला शांततेची शिकवण याद येते आहे. पाकचे दैनीक 'द डॉन'मध्ये उपदेशाचे डोस पाजले आहेत की युद्ध कसे चुकीचे आहे. पण अगोदर कुणी सुरुवात केली आणि इतके दिवस पाक तेच करत होता. आता भारताकडून जशास-तसे किंबहुना त्यापेक्षाही कडवे उत्तर मिळायला लागले म्हणून पाकला आता शांतता आठवते आहे. शांतता हवी असेल तर ताकदवान असावे लागते. दुर्बळांच्या आवाहनाला कुणीही प्रतिसाद देत नाही. भारताने हे सिद्ध केले आहे. पाकने मात्र आपण अद्यापही सुधारत नाही असे वारंवार सिद्ध केले आहे. त्याने शस्त्रसंधी झाल्यावरही आगळीक सुरूच ठेवली आहे. पाकचे ड्रोन भारतीय हद्दीत येत आहे आणि त्यामुळे कित्येक घरांचे नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी माणसेही ठार झाली आहेत. पाकला कोणत्याही परिस्थितीत सामंजस्याचे बोलणे समजत नाही. त्याला बरबादीची भाषाच समजते. तसे असेल तर भारतही त्यास आता तसेच उत्तर देईल. मोदी यांनी पाकला धडा तर शिकवला आहे पण पाक ते समजणार नसेल तर पाकशी सर्वंकष हल्ल्याची भाषा करावी लागेल. अजूनही पाकच्या कुरापती काढण्याचे उद्योग सुरूच आहेत. त्या थांबल्या नाहीत, तर भारताला अखेरचा घाव घालावा लागेल. मग पाकला जगातील कोणताही देश वाचवू शकणार नाही हे सत्य आहे.

फीड फीडबर्नर 12 May 2025 2:30 am

Pimpri : पीएमआरडीएची गुंठेवारीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) गुंठेवारी कायद्यांतर्गत बांधकामे अधिकृत करून घेण्यासाठीच्या कामांना नागरिकांकडून थंड प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी पीएमआरडीए प्रशासनाने गुंठेवारीअंतर्गत बांधकामे नियमित करण्यासाठी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आधी ही मुदत 31 मार्चपर्यंत होती. गुंठेवारी कायद्यामध्ये योग्य त्या सुधारणा करून 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे गुंठेवारी पद्धतीने विकसित झालेले अनधिकृत […] The post Pimpri : पीएमआरडीएची गुंठेवारीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 2:20 am

Pune District : घोडेगाव लोकन्यायालयामध्ये ४९ दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली

घोडेगाव : घोडेगाव न्यायालयात आयोजित लोकन्यायालयामध्ये ४९ दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यात आली. विविध प्रकरणांमध्ये ७२ लाख १९ हजार ६०५ रुपयांची वसुली झाली आहे. अशी माहिती वकील संघाचे अध्यक्ष अॅड. समीर निघोट यांनी दिली. घोडेगाव न्यायालयात लोकन्यायालय आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन न्यायाधीश एस. एस. पुळुजकर यांच्या हस्ते झाले. यावेळी फौजदारी आणि दिवाणी […] The post Pune District : घोडेगाव लोकन्यायालयामध्ये ४९ दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 2:10 am

पालिका निवडणुकांचे शिवधनुष्य दोन्ही ठाकरेंसाठी अवघडच...!

महाराष्ट्रनामा : सुनील जावडेकरमहाराष्ट्रातील गेले तीन वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या महापालिका नगर परिषदा, जिल्हा परिषदा तसेच पंचायत समितीच्या निवडणुका या आगामी चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्यातील ज्या महापालिका आणि नगर परिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे आणि जेथे प्रशासकीय राजवट आहे अशा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी चार महिन्यांत घेण्याचे आणि निवडणुकांची अधिसूचना आगामी महिनाभरात काढण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर २०२२ पूर्वी ओबीसीचे आरक्षण जे त्यापूर्वी अस्तित्वात होते त्याच ओबीसींच्या आरक्षणानुसार या वेळच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विशेषत: मोठ्या महापालिका नगर परिषदा जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांचा मार्ग अखेरीस मोकळा झाला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये पालिका निवडणुकांच्या तयारीच्या अानुषंगाने पडद्याआडून आणि पडद्यावर देखील मोठ्या प्रमाणावर हालचाली होऊ लागल्या आहेत.राज्याच्या दृष्टीने मुंबई महापालिका ही सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. साहजिकच मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून मुंबईवर आपले वर्चस्व दाखवण्याची संधी भाजपा यंदा साधल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही अशीच चिन्हे आहेत. यापूर्वी २०१७ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्यावेळी भाजपा आणि एक संघ शिवसेना यांची युती राज्यात सत्तेवर होती. मात्र तरी देखील मुंबई महापालिकेच्या निवडणुका या भाजपा आणि शिवसेनेने स्वतंत्र लढल्या होत्या त्यामध्ये सत्ताधारी शिवसेनेला ८४, तर भारतीय जनता पक्षाला अवघ्या दोन जागा कमी म्हणजेच ८२ जागा मुंबईत स्वबळावर जिंकता आल्या होत्या. राज्यातील सत्तेत त्यावेळी असलेले शिवसेनेचे महत्त्व लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मैत्रीला जागत मुंबई महापालिकेची सत्ता ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी एकसंघ शिवसेनेला बहाल केली होती. हे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी जे काही केले आणि अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या प्राप्तीनंतर आज शिवसेनेची जी काही वाताहात झाली आहे ती जर लक्षात घेतली, तर एकट्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई, ठाणे, नाशिक अथवा संभाजीनगर अशा कोणत्याही मोठ्या महापालिका जिंकणे हे आता जवळपास अशक्य म्हणजेच दुरापास्त झाले आहे. भाजपाने एकीकडे स्वतःची राजकीय रेषा मोठी करतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांची राजकीय रेषा कशी कापली जाईल याचीही पुरेपूर व्यवस्था करून ठेवली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, कल्याण, डोंबिवली अथवा नवी मुंबई अशा कोणत्याही महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची लढत ही प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर अथवा भारतीय जनता पक्षाबरोबर होणार आहे आणि जर आताचे राजकीय चित्र लक्षात घेतले, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अथवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्यामुळे शिवसेना आणि भाजपा यांच्या मातब्बर उमेदवारांसमोर हतबल असलेले उद्धव ठाकरे यांचे उमेदवार किती आणि कसा तग धरतील याबाबत राजकीय वर्तुळात शंकाच आहेत.एकनाथ शिंदेंचे प्रबळ आव्हान...!या पालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासमोर एकीकडे भाजपासारखा बलाढ्य राष्ट्रीय पक्ष, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेतूनच फुटून उभी ठाकलेली दुसरी प्रती शिवसेना, अशा दोन मातब्बर विरोधकांशी एकाचवेळी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना लढावे लागणार आहे. भाजपा उमेदवारांच्या पाठीशी केंद्रीय तसेच राज्यातील सत्तेचे पाठबळ असल्यामुळे भाजपा उमेदवार हे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना सहजरीत्या चारही मुंड्या चित करू शकतील असे राजकीय चित्र आहे. त्याचबरोबर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेतून ऑल आऊट करणे हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. एका प्रकारे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांचेही राजकीय अस्तित्व हे मुंबई महापालिकेवर अवलंबून आहे. एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेवर गेल्या दोन वर्षांपासून आपले लक्ष केंद्रित केले असून महापालिका निवडणुका जिंकण्यामध्ये हातखंडा असलेले एकनाथ शिंदे हे मुंबईतही बाजी मारतील का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसे तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील ५०, ५५ हून अधिक नगरसेवक स्वतःकडे वळवण्यात यश मिळवले आहे. मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारीदेखील मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे घेतले आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या वाढत्या राजकीय वर्चस्वापुढे उद्धव ठाकरे कितपत टिकाव धरू शकतील हे देखील एक प्रश्नचिन्हच आहे. उद्धव ठाकरेंचे लहान-मोठे एकेक शिलेदार रोज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत डेरे दाखल होत आहेत. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुठभर निष्ठावांतांच्या पाठबळावर उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेंचा उधळलेला हा चौखूर यशाचा घोडा रोखणे हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठे डोकेदुखी ठरली आहे.उद्धव-राज एकत्र येऊनही फारसा उपयोग नाही?भाजपा एकनाथ शिंदे यांचा मुंबई, ठाणे आणि नाशिक, नवी मुंबई, पालघर या जिल्ह्यांमधील महापालिकांमध्ये असलेला राज्यातील आणि केंद्राच्या सत्तेच्या माध्यमातून दबदबा लक्षात घेऊन भाजपा पेक्षाही एकनाथ शिंदे यांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्याशी संधान साधू शकतात. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यानंतर देखील मुंबईत हे दोन्ही ठाकरे बंधू भाजपाच्या बलाढ्य ताकतीपुढे टिकाव धरण्याची शक्यता कमी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे हिंदुत्वाची ताकद ही २०१४ पासून भारतीय मतदार आणि महाराष्ट्रातील शहरी मतदारही प्रादेशिक पक्षांना मतदान करणे ऐवजी भाजपासारख्या प्रबळ हिंदुत्ववादी राष्ट्रीय पक्षाला मतदान करणे हे आता अधिक श्रेयस्कर मानू लागला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भाजपाबरोबर असल्यामुळे भाजपाबरोबरचे फायदे हे शिंदे आणि अजित पवार यांना मिळत आहेत. तथापि उद्या जर शिंदे अथवा अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच जर काही आगळीक केली, तर भाजपाच्या केंद्रीय तसेच राज्यातील सत्तेच्या माध्यमातून जे काही लाभ या दोघाही नेत्यांना आणि त्यांच्या पक्षांना मिळत आहेत ते आपसूकच बंद होतील याची जाणीव या दोघाही नेत्यांना आहे. त्यामुळेच थोड्याफार कुरबुरी या सर्वत्र असतात मात्र २०२९ पर्यंत केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकार हे शक्तिशाली आणि स्थिर सरकार असल्यामुळे कुरबुरी किंवा नाराजी असली तरी देखील हे दोघेही नेते सत्ता सोडू शकत नाहीत याची जाणीव भाजपा नेत्यांना देखील आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जरी पालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले तरीदेखील प्रत्यक्ष मतदानात दोन्ही ठाकरे बंधूंचा कितपत प्रभाव पडेल याबाबत साशंकता आहे. फार तर एकनाथ शिंदे यांची उमेदवार जिथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवारासमोर असतील तेथे मराठी मतदार कोणाचे नेतृत्व स्वीकारतात यावरून राज आणि उद्धव एकत्र आल्याचा परिणाम हा सकारात्मक आहे की नकारात्मक आहे याचाही निकाल लागू शकणार आहे. अर्थात यासाठी उद्धव ठाकरे यांना महाआघाडीची म्हणजेच विशेषत: काँग्रेसची साथ कितपत लाभते हेही पाहावे लागणार आहे. कारण लोकसभेला महाआघाडीने मुस्लीम आणि दलित मतांचे जे ध्रुवीकरण साध्य करण्यात यश मिळवले होते ते जर का पालिका निवडणुकीतही कायम राखायचे असेल, तर उद्धव ठाकरे यांना काँग्रेसची साथ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. एकूणच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे यश हे पूर्वीसारखे त्यांच्या स्वतःच्या पाठबळावर निश्चित होणार नसून महाआघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच मनसे यांच्या भूमिका या नेमक्या काय असणार आहेत यावरच बरेच काही अवलंबून आहे.

फीड फीडबर्नर 12 May 2025 2:10 am

Pune District : भोरच्या लोकआदालतीत ३३ प्रकरणे निकाली

भोर : भोर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये शनिवार (दि.१०) झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण ३९४ प्रलंबित प्रकरणांपैकी १६ प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ०९ लाख ९४ हजार ११४ रुपयांची वसुली करण्यात आली. लोक अदालतीमध्ये १११५ दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १७३ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन १ लाख ९४ हजार ७५६ इतक्या रकमेची वसुली झाली, […] The post Pune District : भोरच्या लोकआदालतीत ३३ प्रकरणे निकाली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 2:07 am

स्कॉटलंडमध्ये होणाऱ्या नेपाळ क्रिकेट संघाची घोषणा

रोहितकडे कर्णधार पदाची जबाबदारीनवी दिल्ली : नेपाळ क्रिकेट बोर्डाने स्कॉटलंडमध्ये होणाऱ्या आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. रोहित पौडेल हा नेपाळचे नेतृत्व करणार आहे. तसेच या संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी दीपेंद्र सिंग आयरी याच्याकडे देण्यात आली आहे. नेपाळ क्रिकेटने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही माहिती दिली आहे. नेपाळ टीम स्कॉटलँड दौऱ्याआधी इंग्लंडमध्ये सराव सामने खेळणार आहे. नेपाळ क्रिकेट टीम १६ ते ३१ मे दरम्यान ६ सराव सामने खेळणार आहे. तसेच नेपाळ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ स्पर्धेत नेदरलँड्स आणि स्कॉटलंड विरुद्ध प्रत्येकी २-२ सामने खेळणार आहे. तसेच नेपाळ टीम लीग २ स्पर्धेनंतर टी-२० ट्राय सीरिजसाठी स्कॉटलँडमध्ये थांबणार आहे.https://prahaar.in/2025/05/11/why-is-virat-kohli-retiring-from-test-cricket/नेपाळ क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या संघात रोहित पौडेल (कर्णधार), आसिफ शेख, कुशल भुरटेल, अनिल कुमार साह, भीम शार्की, आरिफ शेख, बसीर अहमद, गुलशन कुमार झा, दीपेंद्र सिंग आयरी, संदीप लामिछाने, सोमपाल कामी, करण केसी, ललित नारायण राजबंशी, नंदन यादव आणि रिजन ढकल यांचा समावेश आहे.

फीड फीडबर्नर 12 May 2025 1:10 am

Pune : युद्धजन्य परिस्थितीमुळे मासेमारीवर बंधने

पुणे : भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे मच्छीमारांच्या नौकांवर प्रतिबंध आल्याने त्याचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. मासेमारी कमी झाली आहे. परिणामी, गणेश पेठ येथील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळीची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. याखेरीज, उन्हाच्या कडाक्याने मासळीला मागणी कमी आहे. मात्र, त्यातुलनेत आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने खोल समुद्रातील मासळीच्या भावात वीस ते तीस टक्क्यांनी वाढ […] The post Pune : युद्धजन्य परिस्थितीमुळे मासेमारीवर बंधने appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 12 May 2025 12:49 am

चीनला फटका, भारतीय निर्यातीचा झटका

महेश देशपांडेजगातील दोन सर्वात दोन मोठे देश असलेल्या अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धाने धोकादायक वळण घेतले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्काचा (आयात शुल्क) चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्याच वेळी, भारताने आपली करप्रणाली कडक करण्याचा आणि बनावट सवलती आणि कपातींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.जागतिक व्यापार संघटनेच्या मते अमेरिकेने ट्रम्प यांनी लादलेले शुल्क २०२५ अखेरपर्यंत सुरू ठेवल्यास चीनची अमेरिकेतील निर्यात ७७ टक्क्यांनी कमी होऊ शकते. २०२४ मध्ये अमेरिकेने चीनमधून अंदाजे ४४० अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या; परंतु २०२५ मध्ये त्यात मोठी घट अपेक्षित आहे. दरम्यान, चीनच्या अर्थव्यवस्थेवर ट्रम्प यांनी लादलेल्या आयात शुल्काचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. आपल्यावर या व्यापारयुद्धाचा परिणाम होत नसल्याचे भासवत असला तरी चीन या व्यापारयुद्धामुळे दबावाखाली आला आहे. चीनची अर्थव्यवस्था कोरोनानंतरच्या मंदी, कमकुवत देशांतर्गत मागणी आणि रिअल इस्टेट संकटाशी अगोदरच झुंजत आहे. चीनच्या औद्योगिक आरोग्याचा मोजमाप मानला जाणारा खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) एप्रिलमध्ये ४९ पर्यंत घसरला. मार्चमध्ये हा आकडा ५०.५ होता. ५० पेक्षा कमी गुण मिळाल्यास उद्योगांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. हे स्पष्ट आहे की अमेरिकन शुल्कामुळे चीनच्या उत्पादनावर परिणाम होत आहे, निर्यात मंदावली आहे, बेरोजगारी वाढत आहे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात विलंब होत आहे.चीनमधील तांब्याचे साठे झपाट्याने कमी होत आहेत. ही गती कायम राहिल्यास जूनपर्यंत हा साठा पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतो. अमेरिकेतून तांब्याची प्रचंड मागणी आणि संभाव्य शुल्काच्या भीतीमुळे जगभरातून चीनला होणारा तांब्याचा पुरवठा खंडित झाला आहे. ‘मर्कुरिया’सारख्या प्रमुख व्यापारी कंपन्यांनी याला ‘इतिहासातील सर्वात मोठा पुरवठा धक्का’ म्हटले आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की चीनला अमेरिकन तांब्यावर लादलेल्या करातून सूट मागावी लागत आहे. चीन सरकार उघडपणे झुकण्यास तयार नसले तरी पडद्यामागे वेगळाच खेळ सुरू आहे.https://prahaar.in/2025/05/11/hydroponic-marijuana-worth-rs-2-crore-seized-in-mumbai-one-arrested/रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार मार्च २०२५ मध्ये सेवा व्यापारासह भारताची एकूण निर्यात ८२४.९ अब्ज डॉलर या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या ७७८.१ अब्ज डॉलर निर्यातीच्या तुलनेत ही वाढ ६.०१ टक्के आहे. सेवा निर्यातीने वाढीची गती कायम ठेवली आहे. २०२५ मध्ये ती ३८७.५ अब्ज डॉलर या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली. गेल्या वर्षीच्या ३४१.१ अब्ज डॉलरपेक्षा ती १३.६ टक्के जास्त आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार मार्च २०२५ मध्ये सेवा निर्यात ३५.६ अब्ज डॉलर्स होती. मार्च २०२४ मध्ये ती ३०.० अब्ज डॉलर्स झाली. म्हणजेच त्यात १८.६ टक्के वाढ झाली. २०२५ मध्ये पेट्रोलियम उत्पादने वगळता व्यापारी मालाची निर्यात विक्रमी ३७४.१ अब्ज डॉलर झाली. २०२४ मध्ये ती ३५२.९ अब्ज डॉलर होती. ती सहा टक्क्यांनी वाढली. ही आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक बिगर-पेट्रोलियम वस्तूंची निर्यात आहे. वाणिज्य मंत्रालयाने १५ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या पूर्वीच्या आकडेवारीनुसार ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात भारताची एकूण वस्तू आणि सेवा निर्यात ५.५ टक्क्यांनी वाढू न विक्रमी ८२०.९३ अब्ज डॉलर झाली आहे. तथापि, त्या वेळी रिझर्व्ह बँकेने सेवा निर्यातीचा प्रत्यक्ष डेटा संकलित केला नव्हता आणि निर्यात मोजण्यासाठी ढोबळ अंदाज वापरला होता. आता प्रत्यक्ष आकडेवारी येत असल्याने, एकूण मूल्यात वाढ नोंदवली गेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करवाढीचा जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, भारत आणि अमेरिका लवकरच द्विपक्षीय व्यापार करारावर पोहोचण्यासाठी चांगल्या स्थितीमध्ये आहेत.चालू चर्चेचा एक भाग म्हणून भारताच्या वाणिज्य विभागाचे आणि अमेरिकन व्यापार प्रतिनिधी कार्यालयाचे प्रतिनिधी २३-२५ एप्रिल रोजी वॉशिंग्टनमध्ये भेटले आणि २०२५ च्या शरद ऋतूपर्यंत (सप्टेंबर-ऑक्टोबर) द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा पूर्ण करण्यावर चर्चा केली. मार्च २०२५ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या द्विपक्षीय चर्चेचा हा पाठपुरावा होता. वॉशिंग्टन, डीसी येथील बैठकीमध्ये टीमने टॅरिफ आणि नॉन-टॅरिफ बाबींचा समावेश असलेल्या विविध विषयांवर चर्चा केली. टीमने २०२५ च्या शरद ऋतूपर्यंत परस्पर फायदेशीर, बहु-क्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा पूर्ण करण्याच्या मार्गावर चर्चा केली.दरम्यान, भारतीय स्मार्टफोन बाजारात वेगाने बदल होताना दिसत आहेत. एके काळी देशातील आघाडीची स्मार्टफोन कंपनी असलेली ‘शाओमी’ आता मूल्य हिस्सेदारीच्या बाबतीत टॉप ५ ब्रँडमधून बाहेर पडली आहे, तर ॲपल पहिल्यांदाच मूल्याच्या आधारावर भारतातील स्मार्टफोन बाजारपेठेतली अव्वल कंपनी बनली आहे. ‘काउंटरपॉइंट रिसर्च’च्या अहवालानुसार २०२५ च्या पहिल्या तिमाहीमध्ये ‘शाओमी’चा घाऊक मूल्य हिस्सा पाच टक्क्यांपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे. २०२४ च्या पहिल्या तिमाहीमध्ये हा हिस्सा दहा टक्के होता. २०२० च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये हा हिस्सा १९ टक्के होता. दुसरीकडे २०२५ च्या पहिल्या तिमाहीमध्ये घाऊक विक्रीत ‘ॲपल’चा वाटा २६ टक्के झाला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत तो वीस टक्के होता. या काळात, ‘ॲपल’ने सॅमसंग, विवो, ओप्पो आणि शाओमीसारख्या ब्रँडना मागे टाकत प्रथमच अव्वल स्थान मिळवले आहे. या सर्व स्पर्धक ब्रँड्सचा वाटा सरासरी दोन टक्क्यांनी कमी झाला आहे.२०२४ च्या पहिल्या तिमाहीमध्ये सॅमसंग अव्वल स्थानी होता. त्यानंतर ॲपल, विवो, ओप्पो आणि शाओमी यांचा क्रमांक लागतो. २०२५ च्या पहिल्या तिमाहीमध्ये मोटोरोला आणि गुगल या फक्त दोन ब्रँड्सने बाजारातील वाटा वाढवला. ‘मोटोरोला’चा हिस्सा दुप्पट होऊन चार टक्के झाला. ‘गुगल पिक्सेल’चा वाटा एक टक्क्यावरून दोन टक्क्यांपर्यंत वाढला. त्याच वेळी ‘नथिंग’चा वाटा एक टक्काच राहिला. ‘काउंटरपॉइंट रिसर्च’चे संशोधन प्रमुख तरुण पाठक यांच्या मते कोरोनानंतर भारतात प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. ॲपल, सॅमसंग आणि व्हिवो सारख्या ब्रँड्सनी हा ट्रेंड ओळखला आणि ‘ईएमआय’ आणि ‘फायनान्सिंग’ योजनांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचले. यामुळेच हे ब्रँड पुढे जाऊ शकले. या ब्रँड्सचे सुमारे ५० टक्के फोन कर्ज योजनांअंतर्गत खरेदी केले गेले होते.

फीड फीडबर्नर 12 May 2025 12:30 am

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांगआज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके १९४७ म्हणजेच सोमवार, दि. १२ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.०५ मुंबईचा सूर्यास्त ७.०४, मुंबईचा चंद्रोदय ६.०३, मुंबईचा चंद्रास्त ५.२९. उद्याचा राहू काळ ७.४२ ते ९.२०. वैशाखपौर्णिमा, कूर्म जयंती, पुष्टिपती विनायक जयंती, बुद्ध पौर्णिमा, वैशाख स्नान समाप्ती, पौर्णिमा समाप्ती-रात्री-१०.२५, पारशी दये मासारंभ.दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : शांततेने निर्णय घ्यावे लागतील.वृषभ : सरकारी कामात यश मिळेल.मिथुन : जवळचे प्रवास घडतील.कर्क : भाग्याची साथ मिळेल.सिंह : व्यवसाय-धंद्यात प्रगती होऊन उलाढाल वाढेल.कन्या : वादविवाद टाळा.तूळ : आर्थिक चिंता सुटतील.वृश्चिक : सकारात्मक विचारांच्या व्यक्तींच्या सहवासात राहा.धनु : जुने मित्रमंडळी भेटतील.मकर : तरुण-तरुणींचे प्रश्न सुटल्यामुळे आनंदी राहाल.कुंभ : नवीन बदल घडवून आणू शकाल.मीन : प्रेमात यश लाभेल.

फीड फीडबर्नर 12 May 2025 12:10 am

मूल्यांकनात महाराष्ट्र अग्रगण्य; काही निकषांवर मात्र पीछेहाट!

प्रा. नंदकुमार काकिर्डे'केअर’ या नामवंत पत दर्जा देणाऱ्या संस्थेच्या केअर एज या विभागाने नुकताच देशातील सर्व राज्यांचे विविध निकषांवर मूल्यांकन करणारा अहवाल २०२५ मध्ये प्रकाशित केला. यामध्ये मोठ्या राज्यांच्या संमिश्र क्रमवारी मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून त्या खालोखाल गुजरात व कर्नाटक यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ईशान्य भारत, डोंगराळ प्रदेश व लहान राज्ये या गटामध्ये गोवा प्रथम क्रमांकावर आला असून त्या खालोखाल उत्तराखंड व सिक्कीम यांनी बाजी मारली आहे.प्रत्येक राज्याचे मूल्यांकन करण्यासाठी राज्याची आर्थिक कामगिरी, एकूण वित्तीय व्यवस्थापन, वित्तीय क्षेत्रात नोंदवलेली वाढ, पायाभूत सुविधांचा विकास, सामाजिक विकास, प्रशासनाची गुणवत्ता व पर्यावरणीय शाश्वतता हे महत्त्वाचे निकष ठरवण्यात आले होते. लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाल्याची व राज्य कर्जाच्या डोंगराखाली दबले गेले असल्याची टीका विरोधी पक्ष करत असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे या तिघांच्या नेतृत्वाखाली राज्याची कामगिरी काहीशी सरस झाल्याचे चित्र या मूल्यांकनामध्ये दिसत आहे. एका बाजूला विद्यमान सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावयाची झाली तरी सुद्धा काही निकषांवर राज्याने गंभीर चिंतन करण्याची व त्यात सुधारणा करण्याची निश्चित गरज आहे. सर्व राज्यांत प्रथम क्रमांक मिळवला म्हणून कौतुक करून न घेता आपण अनेक निकषांवर अग्रस्थानी नाही या वस्तुस्थितीची जाणीव असली पाहिजे. वरील सात निकषांपैकी फक्त एकाच निकषामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. वित्तीय क्षेत्रात नोंदवलेली वाढ या निकषांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक आघाडीवर आहे. याचे प्रमुख कारण देशातील प्रमुख विमा कंपन्या आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या कामगिरीमुळे राज्याला चांगला हातभार लागलेला आहे.वित्तीय व्यवस्थापनाच्या बाबतीत कमी महसूली तूट व कर्जावरील योग्य नियंत्रण या निकषांमध्ये ओडिशा हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांच्या निकषावर पंजाब व हरियाणा या दोन राज्यांनी आघाडी घेतलेली असून छोट्या राज्यांमध्ये गोव्यातील पायाभूत सुविधा विकास चांगल्या पद्धतीने झालेला आहे. सामाजिक विकासाच्या निकषावर बोलावयाचे झाले तर साक्षरतेचा तळागाळापर्यंत झालेला प्रसार व राज्याचा आरोग्य निर्देशांक या निकषांवर केरळने लक्षणीय कामगिरी केल्याने त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.विविध राज्यांच्या प्रशासनाची गुणवत्ता पाहिली तर महाराष्ट्राचे चित्र समाधानकारक नाही. या निकषावर आंध्र प्रदेशाने सर्वाधिक गुण मिळवलेले असून कार्यक्षम न्यायव्यवस्था व डिजिटल प्रशासन यामध्ये हे राज्य अग्रस्थानावर आहे. गेल्या काही वर्षात राज्याचे पर्यावरण योग्य मार्गावर आहे किंवा कसे याचा विचार केला तर महाराष्ट्र त्यात पिछाडीवर आहे. वरील सात प्रमुख निकषांवर सर्व राज्यांचे मूल्यांकन केलेले असले तरी त्यासाठी विविध प्रकारचे पन्नास निर्देशांक वापरण्यात आलेले आहेत. यामध्ये राज्याच्या आर्थिक व वित्तीय व्यवस्थापनाला सर्वाधिक म्हणजे ४५ गुण ठेवण्यात आले असून त्या खालोखाल वित्तीय विकास, पायाभूत सुविधा यासाठी प्रत्येकी १५ गुण ठेवण्यात आले आहेत. सामाजिक व प्रशासकीय कार्यक्षमतेसाठी प्रत्येकी १० गुण असून पर्यावरणीय शाश्वतता यासाठी ५ गुण ठेवले होते. एकूण १०० पैकी ५० पेक्षा जास्त गुण महाराष्ट्र (५५.५० ), गुजरात (५२.४०), कर्नाटक (५१.९) व तेलंगणा (५१.४) या राज्यांनाच मिळाले असून तामिळनाडूला अगदी काठावर म्हणजे ५०.१ गुण मिळालेले आहेत. बिहार सारख्या राज्याला ३५ टक्क्यांपेक्षाही कमी मार्क पडलेले आहेत. याच निकषांवर ईशान्येकडील राज्ये,डोंगराळ प्रदेश व छोटी राज्ये समूहाचा विचार करता गोव्याला ६२.१० गुण मिळालेले आहेत. त्या खालोखाल उत्तराखंडला ४८.२० गुण तर सिक्कीमला ४७.२ गुण मिळालेले आहेत. या राज्यांमध्ये नागालँडला सुद्धा सर्वात कमी म्हणजे ३८.२० गुण मिळालेले आहेत. महाराष्ट्राला संमिश्र मूल्यांकनात प्रथम क्रमांक मिळण्याचे कारण म्हणजे राज्यातील वित्तीय,आर्थिक व सामाजिक विकास या तीन निकषांवर सर्वाधिक गुण लाभले आहेत; परंतु पश्चिम भारतातील राज्यांनी वित्तीय, आर्थिक व विकासाच्या क्षेत्रावर बाजी मारली असली तरी दक्षिणेतील राज्यांनी पर्यावरण प्रशासकीय कार्यक्षमता आर्थिक व वित्तीय विकास या सर्व क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. छोट्या राज्यांच्या गटांमध्ये गोव्याने पाच निकषांवर सर्वात चांगली कामगिरी केली असून त्यात वित्तीय विकास पायाभूत सुविधा सामाजिक विकास व वित्तीय तुटी वरील नियंत्रण यामध्ये सर्वाधिक चांगली कामगिरी केली आहे. या निकषावर सर्वात वाईट अवस्था पंजाब व बिहार यांची आहे. राज्य सहकारी बँका किंवा बिगर बँकिंग वित्त संस्था यांना कर्ज वाटप देण्यात तसेच म्युच्युअल फंड व आरोग्य विमा या क्षेत्रात शहरी व ग्रामीण भागात पोहोचण्यामध्ये महाराष्ट्राला चांगले यश लाभलेले आहे. त्या खालोखाल तेलंगणा व तामिळनाडू यांचा क्रमांक लागतो. परंतु बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांची कामगिरी असमाधान कारक आहे. छोट्या राज्यांमध्ये मणिपूर, नागालँड व मिझोराम यांची स्थिती खूपच प्रतिकूल आहे.पायाभूत सुविधा निर्माण करण्यात पंजाब, हरियाणा व तेलंगणा ही राज्ये आघाडीवर असून महाराष्ट्राला त्यात केवळ ३५.९ गुण पडले आहेत. उच्च शिक्षण साक्षरता,बालमृत्युदर,बहुपर्यायी गरिबी निर्देशांक व बेरोजगारीचा दर या निकषांवर केरळ व तामिळनाडू यांची कामगिरी सर्वाधिक चांगली आहे.https://prahaar.in/2025/05/11/worlds-largest-govardhan-gaushala-inaugurated-by-chief-minister-devendra-fadnavis/महाराष्ट्राचा यात तिसरा क्रमांक आहे. छोट्या राज्यांमध्ये बहुतेक सर्व राज्यांची कामगिरी ५० टक्क्यांपेक्षा जास्त चांगली आहे. प्रशासकीय कार्यक्षमतेमध्ये महाराष्ट्र देशात सातव्या क्रमांकावर आहे. व्यवसाय करण्यासाठी पूरक वातावरण, पोलीस यंत्रणेची शक्ती, न्यायालयांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण,अल्प वेळात खटले निकाली निघण्याची यंत्रणा, सार्वजनिक सेवांची कार्यक्षमता आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा ही सहा राज्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त कार्यक्षम ठरलेली आहेत. ओडिशा हे राज्य प्रशासकीय कार्यक्षमतेमध्ये ३५ टक्के ही गुण मिळू शकले नाही. पर्यावरण, गुणवत्ता, जंगलांचे राज्यांना लाभलेले आवरण, पर्यायी ऊर्जानिर्मिती आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता या निकषांवर महाराष्ट्र केवळ ४६.८० गुण मिळवून आठव्या क्रमांकावर आहे. ही अत्यंत खेददायक बाब आहे.यामध्ये कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पंजाब, गुजरात व केरळ ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत. मात्र झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार व राजस्थान या राज्यांना ३५ टक्क्यांपेक्षाही कमी गुण मिळालेले आहेत. एकंदरीत महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी एकत्र येऊन गंभीरपणे या सर्व कमतरता, त्रुटी व अकार्यक्षमतेचा आढावा घेऊन प्रत्येक निकषांवर महाराष्ट्र अग्रभागी राहील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आजच्या स्थितीला वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने आपला प्रथम क्रमांक दिसत आहे इतकेच.‘केअर’ या सर्वांगीण पतदर्जा मूल्यमापन करणाऱ्या संस्थेच्या ‘केअर एज’ विभागाने देशातील सर्व राज्यांचे नुकतेच व्यापक मूल्यांकन केले. यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेले राज्य म्हणून संमिश्र मूल्यांकनात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवला असला तरी त्यातील अनेक महत्त्वाच्या निकषांवर महाराष्ट्राची पीछेहाट झालेली आढळते. या अहवालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या कामगिरीचा लेखाजोखा.

फीड फीडबर्नर 12 May 2025 12:10 am

युद्धाचा पाकिस्तानला फटका

उमेश कुलकर्णीएकीकडे भारताने पाकिस्तानवर सर्जीकल स्ट्राईक केला असून त्यांच्या हजारो दहशतवाद्यांना टिपून ठार मारण्याचे कृत्य सुरू केले आहे आणि त्याला ऑपरेशन सिंदूर हे समर्पक नाव दिले आहे. कारण दहशतवाद्यांनी पहलगामच्या पर्यटकांच्या महिलांचे पती निवडून त्यांना ठार केले होते आणि तरीही यातील सर्व नराधम पळून गेले आहेत, तर दुसरीकडे सौदी अरेबिया आणि अमेरिकन दबावाखाली तेल उत्पादन धोरणात मोठा बदल करण्याचे घाटत आहे. ओपेक प्लस देशांनी म्हणजे पेट्रोल उत्पादक देशांनी अत्याधिक उत्पादन करणाऱ्या देशांना एक इशारा दिला आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस पेट्रोलियम निर्यातदार देशांची बैठक पार पडली. त्या बैठकीत रशिया आणि त्याचे सहकारी देश सहभागी झाले होते आणि त्यात असे ठरले की, तेल उत्पादन तेजीने वाढवले जावे. जूनच्या अखेरीस तेल उत्पादन दररोज चार लाख बॅरलहून अधिक करण्यावर वाढवले जाईल. त्यामुळे तेलाची अर्थव्यवस्था आणि तेलाभोवती फिरणारे राजकारण अधिक सक्रीय होईल आणि त्याचा फायदा तेल उत्पादक देशांना होईल. याच प्रकारेच जून तिमाहीच्या दरम्यान तेलाचे उत्पादन दररोज प्रति १० लाख टन बॅरल इतके पोहोचण्याची अपेक्षा आहे.बेट क्रूड तेलाचा दर आताच ६१ डॉलर प्रति बॅरलपर्यंत उतरला आहे. जेव्हा सारे देश या बातमीला समजतील तोपर्यंत तेलाच्या किमती ६० डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली येतील. आता हा निर्णय ओपेकने घेतला आहे. मग साहजिकच प्रश्न येतो की, हा निर्णय अस्थायी स्वरूपाच आहे की नुकत्याच घेतलेल्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयापासून मागे हटण्याची ही सुरुवात आहे. या निर्णयाचे कारण सौदी अरेबिया आहे आणि त्याने आपल्या या निर्णयामागील कारणे दिली आहेत. सौदी अरेबियाचा राग कझाकीस्तान आणि इराकवर आहे. कारण या देशांनी धोकेबाजी करत उत्पादनाचा कोटा निश्चित न करताच तेल उत्पादन चालू ठेवले आहे. जेव्हा किमती कमी असतात तेव्हा इराक किंवा कझाकीस्तानसारखे देश त्यापासून काहीही धडा घेत नाहीत आणि अत्याधिक उत्पादन कमी करत नाहीत. जर आणखी काही दिवस असेच जर राहिले, तर सौदी अरेबिया आपल्याकडील उत्पादनाचा वेग वाढवेल आणि त्याचा फटका मग भारतासह जगाला बसेल. फार मागे जायला नको. पण जेव्हा भारत बांगलादेश युद्ध सुरू होते तेव्हा ओपेकच्या निर्णयाने साऱ्या जगावर परिणाम केला होता आणि त्यावेळी योम किप्पूरच्या लढाईनंतर ओपेक देशांनी पेट्रोल पुरवठ्यावर निर्बंध आणले होते आणि त्यावेळी साऱ्या जगाला त्याचा फटका बसला होता. तसेच काहीसे करण्याचा आता ओपेक देशांचा प्रयत्न आहे. अर्थात भारताला यात दगाफटका करण्याचा इरादा नाही. पण भारताला त्याचा फटका बसू शकतो. पण पाकिस्तानला या युद्धामुळे त्याच्या आर्थिक व्यवस्थेला जोरदार फटका बसणार आहे. पहलगाम ह्ल्ल्यानंतर तेथील पर्यटन व्यवस्था मोडीत निघाली आहे, हा किरकोळ परिणाम झाला. पण त्यापेक्षाही घातक आणि गंभीर परिणाम असा आहे की अगोदरच अत्यंत खराब अवस्थेत असलेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखीच गाळात जाणार आहे.https://prahaar.in/2025/05/11/india-inflicted-4-major-blows-in-4-attacks-pakistan-panicked-and-called-for-ceasefire/किंबहुना गेलीच आहे. पाकची अगोदरच कोसळण्याच्या अवस्थेत असलेली अर्थव्यवस्था यामुळे अगदीच नष्ट होणार आहे. भारतातील काही नतद्रष्ट लोक या अवस्थेत पाकला आपण वाचवले पाहिजे असे म्हणत पाकला वाचवत आहेत. त्यात अनेक दिग्गज आहेत. पण ज्यांचे कुणीच नातेवाईक पाकच्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात नव्हते त्यांना निराधार विधवांचा विलाप काय समजणार असा हा प्रश्न आहे. पाकवर सध्या कर्जाचा डोंगर आहे. युद्ध लांबले, तर तो आणखीच वाढणार आहे आणि त्यातून पाक कधीच बाहेर येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पाकच्या खराब आर्थिक स्थितीमुळे पाकचे अंतर्गत व्यवस्था कोलमडून पडणार आहे आणि त्याला अगदी भीक मागण्याची वेळ येणार आहे. पण निरपराध भारतीय पर्यटकांना कंठस्नान घालणाऱ्या पाकला आणि त्यांच्या दहशतवाद्यांना असेच शासन व्हायला हवे. कारण त्याशिवाय पाक धडा शिकणार नाही हे वास्तव आहे. पाकची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या बेतात आहे आणि तसे झाले तर भारतासाठी हे सूडाचे समाधान असेल. सध्या पाक कर्जाच्या सापळ्यात आहे आणि त्यामुळे श्रीलंकेची आठवण येणे साहजिक आहे, कारण श्रीलंकाही असाच कर्जाच्या सापळ्यात अडकला होता आणि चीनच्या हंबनटोटा बंदराच्या मार्फत चीनच्या पूर्ण अधीन झाला होता. तेच पाकच्या नशिबी आहे. पाकही युद्धाच्या पराभवाच्या परिणामी आर्थिक आणि राजकीय पेचप्रसंगात सापडणार आहे. पाकची अर्थव्यवस्था प्रदीर्घ काळापासून अस्थिर आहे. फरक इतकाच की आता ती कोसळण्याच्या बेतात आहे.गेल्या ऑक्टोबरमध्ये जागतिक बँकेने दिलेल्या अहवालात म्हटले होते की, पाकने दोन दशकात गरिबी निर्मूलनात बऱ्यापैकी यश मिळवले आहे. त्यामुळे तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी त्यांना कर्ज द्यायला तयार झाला होता. पण पहलगामच्या हल्ल्याने पाकने त्या यशावर पाणी फेरले आहे. त्यामुळे पाक पुन्हा पहिल्या गरिबीच्या खाईत पडला आहे. जागतिक बँकेनुसार पाकचे एकूण बाह्य कर्ज १३०.४३३ अब्ज डॉलरपर्यंत २०२१ च्या अखेरपर्यंत होते. २०२२ पर्यंत ते १२६.९ अब्ज डॉलरपर्यंत गेले. आताच्या घडीला पाकचा कर्ज आणि जीडीपी असे गुणोत्तर ७० टक्क्यांच्या धोकादायक झोनमध्ये आहे. ४० ते ५० टक्के सरकारचा महसूल हा व्याजदर देण्यातच जातो. उरलेल्या पैशांत देशात विकासकामे आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होतात. यामुळे पाक सध्या कंगाल झाला आहे आणि लवकरच या युद्धामुळे तर तो भिकेला लागणार आहे. आर्थिक पेचप्रसंग आहेतच पण आता राजकीय पेचामुळेही पाकची अवस्था नाजूक झाली आहे. पाकचे आर्थिक संकट आणखी बिकट होईल आणि त्यामुळे संरचनात्मक कमतरता आणि आणि धोरणात्मक अनिश्चितता यामुळे सुरक्षा आव्हाने वाढतील. यामुळे पाक अशा एका गर्तेत जाईल की, त्यातून बाहेर येणे त्याला अवघड होईल. देशाचा परकीय चलन साठा नऊ वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे. त्यामुळे सरकार तेल, वायू, खते आणि अन्नपदार्थ यासारख्या वस्तू आयात करण्यावर भर देत आहे. त्यांसाठी लागणारा पैसा पाककडे नाही. पाकमध्ये महागाई ३० टक्के आहे. ती पाकला परवडणारी नाही. त्या परिस्थितीत युद्ध झाले आणि लांबले, तर पाकमध्ये लवकरच अन्नसाठी रांगा लागतील. जसे रशियात काही वर्षांपूर्वी लोक ब्रेडच्या एका तुकड्यासाठी रांगा लावत होते ते दिवस पाकसाठी दूर नाहीत. त्यामुळे पाकच्या कोसळण्याचा असाही अर्थ आहे. पाकमधील लाखो कमी उत्पन्न असलेल्यांसाठी अभूतपूर्व अडचणी होत आहेत आणि तरीही ते लोक दहशतवाद्यांना पोसत आहेत. त्यांची शिक्षा त्यांना मिळत आहे.

फीड फीडबर्नर 12 May 2025 12:10 am

कोलंबो येथील तिरंगी मालिकेवर भारतीय महिला संघाचा कब्जा

यजमान श्रीलंकन महिला संघाचा ९७ धावांनी पराभवकोलंबो : कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील अंतिम सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. भारतीय फलंदाज स्मृती मानधनाने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ३४२ धावा केल्या. श्रीलंकन महिला संघाला अवघ्या २४५ धावाच करता आल्या. अखेर भारताने ९७ धावांनी हा सामना जिंकत विजेतेपदावर कब्जा करत आपले नाव कोरले. भारताच्या ३४३ धावांचे लक्ष्य समोर ठेवून मैदानात उतरलेल्या श्रीलंकन महिला संघाला पहिल्याच षटकात मोठा झटका बसला. हंसिनी पेरेराला अमनज्योत कौरने त्रिफळाचित करत तंबूत धाडले. त्यानंतर विष्मी गुणरत्ने आणि चमारी अटापट्टू जोडीने ६८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. मात्र ही भागीदारी कौरने तोडली. तिने गुणरत्नेला त्रिफळाचित करत ३६ धावांवर माघारी धाडले. चमारीने डीसील्व्हा सोबत संघाचा धावफलक हलता ठेवत ५३ धावांची भागीदारी केली.अखेर स्नेह राणाने दोन्ही फलंदाजांना माघारी धाडले. चमारी अटापट्टूने ५१, तर डीसील्व्हाने ४८ धावा केल्या. त्यानंतर विहंगा, बडांगे हे श्रीलंकन संघांचे खेळाडू स्वस्त्यात माघारी परतले. अनुष्का संजीवनीने सुगंदिका कुमारीसोबत ५१ धावांची भागीदारी करत श्रीलंकन संघाला विजयाच्या आशा दाखवल्या. मात्र श्रीलंकन संघाच्या या आशेवर भारतीय महिला गोलंदाजांनी पाणी फेरले. संपूर्ण श्रीलंकन संघ ५० षटकेही पूर्ण खेळू शकला नाही. २४५ धावांत त्यांचे सर्व खेळाडू बाद झाले. भारतीय महिला संघाने ९७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारतीय महिला संघाकडून स्नेह राणाने ४ तर अमनज्योत कौरने ३ गडी बाद केले. तत्पूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीर मानधना आणि प्रतीक रावल यांनी सावध सुरुवात केली आणि पहिल्या ५ षटकांत फक्त १४ धावा केल्या. तथापि, नंतर त्याने धावांचा वेग वाढवला. रावल बाद होण्यापूर्वी दोघांनी ७० धावा जोडल्या. त्यानंतर मंधानाला हरलीन देओलच्या रूपात आणखी एक मजबूत जोडीदार मिळाला, दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी १०० पेक्षा जास्त धावा जोडल्या. दरम्यान, ५० धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर मानधना आक्रमक दिसली.भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या बॅटने सामन्यात महत्वाच्या धावा आल्या. हरमनप्रीत कौर हिने संघासाठी ३० चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या यामध्ये तिने यामध्ये तिने १ षटकार आणि ४ चौकार मारले. रिचा घोष मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरली तिने आजच्या सामन्यात ९ चेंडू खेळले आणि ८ धावा करून बाद झाली. स्मृती मानधना हिने संघासाठी १०१ चेंडूंमध्ये ११६ धावा केल्या. यामध्ये तिने २ षटकार आणि १५ चौकार मारले. ५० षटकात भारतीय महिला संघाने ७ गडी गमावून ३४२ धावा केल्या होत्या. श्रीलंकेने महिला संघासमोर ३४३ धावांचे लक्ष होते.

फीड फीडबर्नर 12 May 2025 12:10 am

पुतीन यांच्याकडून युक्रेनसमोर बिनशर्त चर्चेचा प्रस्ताव; झेलेन्स्कींकडून स्वागत

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी युक्रेन समोर चर्चा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तुर्कीयेची राजधानी इस्तंबुलमध्ये कोणत्ही पुर्वअटीशिवाय ही चर्चा व्हावी, असे पुतीन यांनी म्हटले आहे. आज पहाटेच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना पुतीन यांनी रशिया आणि युक्रेन दरम्यान २०२२ मध्ये सुरू झालेली शांतता प्रक्रियेची चर्चा पुन्हा सुरू करण्याचा हा प्रस्ताव मांडला. युरोपातल्या ४ […] The post पुतीन यांच्याकडून युक्रेनसमोर बिनशर्त चर्चेचा प्रस्ताव; झेलेन्स्कींकडून स्वागत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 May 2025 10:56 pm

युद्धबंदी असूनही, भारतातील सर्व 12 निर्बंध कायम:ना नद्यांना पाणी मिळणार, ना पाकिस्तानींना व्हिसा; IPL आणि विमानतळाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही

युद्धबंदी असूनही, भारताने लादलेले सर्व १२ निर्बंध अजूनही लागू आहेत. यामध्ये सिंधू जल करार, पाकिस्तानी नागरिकांवर व्हिसा बंदी आणि सोशल मीडिया अकाउंटवर बंदी यासारखे निर्णय समाविष्ट आहेत. पाकिस्ताननेही आपले कोणतेही निर्णय बदललेले नाहीत. तथापि, सरकार लवकरच आयपीएल पुन्हा सुरू करण्याबाबत आणि विमानतळ सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ शकते. भारत-पाकिस्तान युद्धबंदीशी संबंधित ही बातमी देखील वाचा... जग तीन युद्धांचे ओझे सहन करू शकत नाही:ट्रम्प यांच्या मध्यस्थीने भारत-पाकिस्तानमध्ये युद्धबंदी, जाणून घ्या 6 प्रमुख कारणे १० मे रोजी संध्याकाळी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले: मला तुम्हाला कळवण्यास आनंद होत आहे की अमेरिकेच्या वतीने रात्रभर चाललेल्या चर्चेनंतर, भारत आणि पाकिस्तानने तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. वाचा सविस्तर बातमी...

दिव्यमराठी भास्कर 11 May 2025 10:45 pm

Explainer: भारत-पाकिस्तान संघर्षात आर्थिक, मानवी नुकसान आणि युक्रेन-रशिया युद्धाशी तुलना

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान १० मे रोजी शस्त्रसंधी लागू झाली, परंतु पहलगाम हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ड्रोन हल्ल्यांमुळे दोन्ही देशांना आर्थिक आणि मानवी नुकसान सहन करावे लागले. २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यात २६ नागरिक ठार झाले, तर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत १३०-१४० दहशतवादी ठार […] The post Explainer: भारत-पाकिस्तान संघर्षात आर्थिक, मानवी नुकसान आणि युक्रेन-रशिया युद्धाशी तुलना appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 May 2025 10:37 pm

भारत आणि पाकिस्तानबाबत अमेरिकेची भूमिका कशी बदलत राहिली? याचा अर्थ काय?

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान शनिवारी सायंकाळी ५ वाजेपासून युद्धबंदी लागू झाली. विदेश सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पाकिस्तानच्या लष्करी संचालकांनी (DGMO) दुपारी ३:३५ वाजता भारताच्या समकक्षांशी संपर्क साधला आणि दोन्ही बाजूंनी जमीन, समुद्र व हवेतून हल्ले थांबवण्याचे ठरले. दोन्ही देशांचे DGMO १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करणार […] The post भारत आणि पाकिस्तानबाबत अमेरिकेची भूमिका कशी बदलत राहिली? याचा अर्थ काय? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 May 2025 10:22 pm

IPL 2025: आयपीएल प्रेमींसाठी गुड न्यूज! उर्वरित सामने सुरू होण्याचा मार्ग मोकळा

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर सुरू झालेले भारत पाक अघोषित युद्धाला विराम मिळाल्यामुळे, इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL 2025) सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या वाढत्या तणावामुळे आयपीएलचे सामने काही काळासाठी स्थगित करण्यात आले होते. मात्र अलीकडेच आलेल्या माहितीनुसार आयपीएलचे सामने पुनः खेळवले जाण्याची शक्यता आहे. हे सामने १६ किंवा १७ मे रोजी पुन्हा सुरू होऊ शकतात, ज्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.कोणकोणत्या मैदानावर रंगतील सामने?आयपीएल २०२५ चे उर्वरित सामने लखनऊ, हैद्राबाद, कोलकाता तसेच अहमदाबादमध्ये खेळवले जाण्याची शक्यता आहे. ज्याची सुरुवात, लखनौच्या एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यादरम्यानच्या सामन्याने होण्याची शक्यता आहे. तर क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर सामने हैद्राबादधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होऊ शकतात. क्वालिफायर २ व्यतिरिक्त अंतिम सामना कोलकाता येथे देखील आयोजित केला जाऊ शकतो. अंतिम सामना ३० मे किंवा १ जून रोजी होण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 11 May 2025 10:10 pm

‘आम्ही काही पाकिस्तानी विमाने पाडली, आपले सर्व वैमानिक सुरक्षित’: भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल सांगितले

नवी दिल्ली – भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर रविवारी भारतीय सैन्य, वायुसेना आणि नौदलाने संयुक्त पत्रकार परिषद घेत ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिली. लष्करी संचालक (DGMO) लेफ्टनंट जनरल राजीव घई, वायुसेनेचे DG एअर ऑपरेशन्स एअर मार्शल अवधेश कुमार भारती आणि नौदलाचे DGNO व्हाईस अॅडमिरल ए.एन. प्रमोद यांनी यावेळी बोलताना ऑपरेशनच्या यशाचा खुलासा केला. DGMO घई यांनी सांगितले की, “ऑपरेशन […] The post ‘आम्ही काही पाकिस्तानी विमाने पाडली, आपले सर्व वैमानिक सुरक्षित’: भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल सांगितले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 May 2025 10:09 pm

नव्या पोपकडून युक्रेन आणि गाझामध्ये शांततेचे आवाहन

व्हॅटिकन सिटी : पोप लिओ चौदावे यांनी रविवारी दुपारी त्यांच्या पहिल्या आशीर्वादसभेमध्ये युक्रेनमध्ये खऱ्या आणि न्याय्य शांततेचे आणि गाझामध्ये तात्काळ युद्धबंदीचे आवाहन केले. ध्रुवीकरण झालेल्या कॅथोलिक चर्चमध्ये एकतेचा हा प्रतीकात्मक संदेश होता. जगभरातल्या मोठ्या शक्तींना मी पुन्हा एकदा युद्ध नको, याच मागणीचे आवाहन करत आहे, असे पोप लिओ यांनी सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या गॅलरीतून उपस्थित जनसमुदायाला […] The post नव्या पोपकडून युक्रेन आणि गाझामध्ये शांततेचे आवाहन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 May 2025 9:57 pm

IPL 2025 : दिल्लीला मोठा धक्का! आता ‘हा’खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी भारतात येणार नाही

DC Player Mitchell Starc IPL 2025 Participation in Doubt : आयपीएल २०२५ पुन्हा सुरू होण्याची तयारी सुरू झाली आहे. १६ मे पासून ही स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होणार असल्याची चर्चा आहे. पण या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर, आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएलमध्ये परतणे थोडे कठीण वाटत आहे. जोश हेझलवूडबद्दल एक […] The post IPL 2025 : दिल्लीला मोठा धक्का! आता ‘हा’ खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी भारतात येणार नाही appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 May 2025 9:50 pm

काश्‍मीर मुद्द्यावर अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली आहे का? कॉंग्रेसचा मोदी सरकारला सवाल

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षविरामाची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्याबद्दल कॉंग्रेस पक्षाने आश्‍चर्य व्यक्त केले. तसेच, काश्‍मीर मुद्द्यावर अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली आहे का, असा सवाल मोदी सरकारला केला. संघर्षविरामाची घोषणा ज्या पद्धतीने झाली त्यावरून कॉंग्रेसने सरकारला घेरले. त्यासाठी पक्षाचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. भारत आणि […] The post काश्‍मीर मुद्द्यावर अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली आहे का? कॉंग्रेसचा मोदी सरकारला सवाल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 May 2025 9:46 pm

'सर्व लक्ष्य साध्य झाले, सर्व भारतीय वैमानिक सुरक्षित परतले...', लष्कराने दिली ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण माहिती

नवी दिल्ली: दिनांक ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी छावण्यांवर, ऑपरेशन सिंदूरद्वारे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याची आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईची माहिती देण्यासाठी तिन्ही भारतीय सैन्यांनी रविवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत, नौदल ऑपरेशन्सचे महासंचालक (डीजीएनओ) व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद, भारतीय हवाई दलाचे महासंचालक एअर ऑपरेशन्स एअर मार्शल ए.के. भारती आणि डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी 'ऑपरेशन सिंदूर' संबंधित संपूर्ण माहिती दिली.रविवारी झालेल्या या पत्रकार परिषदेत एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, आम्ही ठरवलेले लक्ष्य पूर्णपणे साध्य केले आहे आणि आमचे सर्व वैमानिक सुरक्षितपणे घरी परतले आहेत. भारतीय सशस्त्र दलांबद्दल ते म्हणाले की, आमचे सैन्य सध्या अतिशय सतर्क आहेत आणि कोणत्याही संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत.एअर मार्शल ए.के. भारती यांनी स्पष्टपणे सांगितले की भारताचे उद्दिष्ट शत्रूला योग्य उत्तर देणे आहे आणि मृतदेह मोजणे नाही. ते पुढे असे देखील म्हणाले की, आम्ही ज्या काही पद्धतीचा आणि साधनांचा वापर केला, त्यांचा शत्रूवर इच्छित परिणाम झाला आहे. त्यामुळे किती जण मारले गेले? किंवा किती जण जखमी झाले? हे मोजणे आमचे काम नाही. एअर मार्शल भारती यांनी स्पष्ट केले की भारताचे उद्दिष्ट अनावश्यक विनाश नाही तर दहशतवादाशी थेट जोडलेले लक्ष्य नष्ट करणे आहे.'आम्ही तिथे हल्ला केला जिथे पाकिस्तानला सर्वात जास्त नुकसान झाले', एअर मार्शल एके भारतीएअर मार्शल एके भारती म्हणाले की, भारताने पाकिस्तानवर हल्ला केला जिथे त्याचे सर्वात जास्त नुकसान झाले. आम्ही संपूर्ण पश्चिम आघाडीवरील पाकिस्तानच्या हवाई दलाच्या तळांवर, कमांड सेंटरवर, लष्करी पायाभूत सुविधांवर आणि हवाई संरक्षण प्रणालींवर लक्ष्य केले. भारतीय हल्ल्यांमध्ये चकलाला, रफिक आणि रहीम यार खान सारख्या महत्त्वाच्या हवाई तळांचा समावेश होता. यानंतर, सरगोधा, भुलारी आणि जेकबाबाद सारख्या इतर महत्त्वाच्या लष्करी तळांवरही हल्ला करण्यात आला. ते म्हणाले की, या सर्व ठिकाणांच्या प्रत्येक यंत्रणेला लक्ष्य करण्याची आणि त्यापलीकडे जाण्याची पूर्ण क्षमता आमच्याकडे आहे.'३ दिवस चाललेला संघर्ष युद्धापेक्षा कमी नव्हता, आमचे ५ सैनिक शहीद झाले' - डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घईडीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पाकिस्तानी सैन्याच्या झालेल्या नुकसानीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, नियंत्रण रेषेवर (एलओसी) ३५-४० पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याच अंदाज आहे. जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले तेव्हा पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य आणि भारतीय सशस्त्र दलांच्या पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केले. ते म्हणाले की, आमचे लक्ष्य फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर होते, पण जेव्हा पाकिस्तानने आमच्या पायाभूत सुविधांवर हवाई घुसखोरी आणि हवाई कारवाया सुरू केल्या तेव्हा आम्ही जड शस्त्रे वापरली. ते पुढे असे देखील म्हणाले की ३ दिवस चाललेला संघर्ष हा एखाद्या युद्धापेक्षा कमी नव्हता. आमचे सर्व वैमानिक सुखरूप परतले आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपले ५ सैनिक शहीद झाल्याचेही त्यांनी सांगितले.अरबी समुद्रात केली गेली 'ऑपरेशन सिंदूर' ची चाचणीभारतीय नौदलाचे महासंचालक नौदल ऑपरेशन्स (डीजीएनओ), व्हाइस अॅडमिरल ए.एन. प्रमोद म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर, भारतीय नौदलाचे वाहक युद्ध गट, पृष्ठभागावरील लढाऊ युनिट्स, पाणबुड्या आणि नौदल विमान वाहतूक संसाधने पूर्ण युद्ध तयारीत समुद्रात तैनात करण्यात आली होती. ते म्हणाले की, हल्ल्याच्या ९६ तासांच्या आत, आम्ही अरबी समुद्रात अनेक शस्त्र चाचण्यांदरम्यान आमच्या रणनीती आणि ऑपरेशनल प्रक्रियांची चाचणी घेतली आणि त्यात सुधारणा केल्या. भारतीय नौदलाच्या शक्तिशाली उपस्थितीमुळे पाकिस्तानला त्यांचे नौदल आणि हवाई दल बंदरे आणि किनारी भागात मर्यादित ठेवावे लागले, ज्यावर सतत लक्ष ठेवले जात असे.कराची देखील लक्ष्य होतेव्हाइस अॅडमिरल प्रमोद यांनी 'ऑपरेशन सिंदूर' संबंधित झालेल्या या पत्रकार परिषदेत एक धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले की, आमची शत्रूवर प्रत्युत्तराची पद्धत संयमी, संतुलित, चिथावणीखोर आणि जबाबदार होती. गरज पडल्यास हल्ला होऊ शकेल अशा ठिकाणांना लक्ष्य करण्याची तयारी देखील आम्ही केली होती. ज्यामध्ये कराचीचाही समावेश होता. त्यांनी असेही स्पष्ट केले की भारतीय नौदल अजूनही पूर्ण ताकदीने समुद्रात उपस्थित आहे आणि कोणत्याही प्रतिकूल कृतीला निर्णायक प्रत्युत्तर देण्यास ते सज्ज आहेत.शस्त्रसंधीनंतर काही तासांतच पाकिस्तानने केले उल्लंघनशनिवारी, १० मे रोजी संध्याकाळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीची अधिकृत घोषणा केली होती. त्याला काही तास होत नाहीच तोच, पाकिस्तानने त्याचे उल्लंघन केले. श्रीनगरसह, भारताच्या अनेक भागात पाकिस्तानचे ड्रोन आणि स्फोटांचे आवाज ऐकू आले. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर काही तासांतच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कठोर भूमिका घेतली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानच्या या कृतीला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

फीड फीडबर्नर 11 May 2025 9:30 pm

पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचाच हात; ऑपरेशन सिंदूरबाबत लष्कराने दिली माहिती

नवी दिल्ली : दहशतवाद्यांना उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. या कारवाईत फक्त दहशतवादी स्थळ उद्‌ध्‍वस्‍त केली. त्यामध्ये एकाही नागरिकाला लक्ष केले नाही. ज्या ठिकाणी दहशतवादी स्थळ आहेत त्या सर्व ९ ठिकाणी भारतीय लष्कराने हल्ला केला. त्यामुळे हा लढा फक्त दहशतवादाविरूद्ध आहे. तसेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचाच हात आहे, असा दावा डीजीएमओ लेफ्टनंट […] The post पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचाच हात; ऑपरेशन सिंदूरबाबत लष्कराने दिली माहिती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 May 2025 9:27 pm

IPL 2025 पुन्हा सुरु होण्यापूर्वी आरसीबीची वाढली डोकेदुखी, नेमकं कारण काय? जाणून घ्या

IPL 2025 resumes RCB new challenges as Josh Hazelwood : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावामुळे आयपीएल २०२५ स्पर्धा एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आली आहे. आता दोन्ही देशांमधील परस्पर संमतीने युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, आयपीएल २०२५ चे उर्वरित सामने पुन्हा सुरू होणार आहेत. तत्पूर्वी आरसीबी संघाची चिंता वाढली आहे. कारण त्यांचा आघाडीचा […] The post IPL 2025 पुन्हा सुरु होण्यापूर्वी आरसीबीची वाढली डोकेदुखी, नेमकं कारण काय? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 May 2025 9:08 pm

Ladki Bahini Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्‍या निधीवरून जुंपली; इतर खात्यांचा निधी वळवला नसल्‍याचे अधिका-यांकडून स्पष्टीकरण

मुंबई : राज्‍य सरकारची बहुचर्चित लाडकी बहीण योजनेच्‍या निधीवरून सध्‍या वाद निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला, असा आरोप सामाजिक आणि आदिवासी विकास खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला. यावर योजनेतील वरिष्ठ अधिका-यांनी स्पष्टीकरण दिले. अधिका-यांचे म्हणणे आहे की, प्रधानमंत्री आवास योजना […] The post Ladki Bahini Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्‍या निधीवरून जुंपली; इतर खात्यांचा निधी वळवला नसल्‍याचे अधिका-यांकडून स्पष्टीकरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 May 2025 9:07 pm

Precautionary Blackout: : जैसलमेरात खबरदारीचा ब्लॅकआउट; भारत-पाकिस्तान तणावानंतर सतर्कता

Precautionary Blackout: भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी (१० मे) झालेल्या तात्पुरत्या युद्धविरामानंतर राजस्थानच्या जैसलमेर आणि बारमेर जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्री खबरदारीचा ब्लॅकआउट लागू करण्यात आला. जैसलमेर जिल्हा प्रशासनाने रात्री ७:३० ते सकाळी ६:००, तर बारमेरमध्ये रात्री ८:०० ते सकाळी ६:०० पर्यंत हा ब्लॅकआउट जाहीर केला आहे. युद्धविरामानंतरही सीमेवर ड्रोन हल्ले आणि स्फोटांचे आवाज ऐकू आल्याने प्रशासनाने […] The post Precautionary Blackout: : जैसलमेरात खबरदारीचा ब्लॅकआउट; भारत-पाकिस्तान तणावानंतर सतर्कता appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 May 2025 8:54 pm

जगप्रसिद्ध साई मंदिरात हार, फुल, प्रसाद बंदीचा निर्णय : गोरक्ष गाडीलकर

कृष्णा पॉल (एपिडी, शिर्डी विमानतळ )शिर्डी : भारत पाकिस्तान युद्धजन्य परी स्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साई संस्थान प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून रविवार दि.११ में २०२५ पासून जगप्रसिद्ध साई समाधी मंदिरात फुलहार, प्रसाद नेण्यास मनाई असणार आहे.या निर्णयाची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सुरक्षितेतच्या दृष्टीने शिर्डीत साई संस्थानच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला.याप्रसंगी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अतिरिक्त पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक श्री कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, पी.आय प्रदीप देशमुख आधीच संस्थांचे सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.यावेळी साई मंदिर सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शिर्डीत देश-विदेशात दररोज हजारो भक्त साई समाधीच्या दर्शनासाठी येतात, फुलहार आणि प्रसाद साई समाधीवर चढवतात, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना फुलहार आणि प्रसाद साई समाधी मंदिरात नेण्यास आता मनाईचा असणार आहे. तसा निर्णय पुढील आदेशापर्यंत घेण्यात आला आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वीच साई संस्थानला धमकीचा मेल देखील प्राप्त झाला आहे. या अगोदर अनेकदा धमकीचे पत्र देखील साई संस्थानला मिळाले आहेत. परंतु यावेळची परिस्थिती वेगळी आहे. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशातील तणावाची परिस्थिती आणी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे साई संस्थानची सुरक्षा यंत्रणा 'अलर्ट मोड'वर ठेवण्यात आली आहे.पवित्र सुवर्ण मंदिर असलेल्या अमृतसर शहरावर पाकिस्तानने ड्रोनचा हल्ला चढवला होता.भारतीय लष्कराने हा हल्ला निष्फळ केला. परंतु या हल्ल्यांमुळे पाकिस्तान भारतातील धार्मिक स्थळ टार्गेट करत असल्याचे निश्चित झाले.यामुळे भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच, युद्धजन्य स्थितीमुळे धार्मिक स्थळांच्या सुरक्षितेतचा वाढ करून त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सुरक्षिततेचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस यंत्रणेला कडक उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून सुरक्षिततेच्या दृष्टीने जागतिक किर्तीचे देवस्थान असलेल्या शिर्डी शहरातील श्री साईबाबा संस्थानने हार, फुल, प्रसाद बंदीचा मोठा निर्णय घेतला आहे.https://prahaar.in/2025/05/11/chief-minister-worships-the-statue-of-chhatrapati-shivaji-maharaj-in-sindhudurg/साई मंदिर सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेतला आढावा भारत पाक युद्ध परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर केंद्र आणी राज्य सरकारच्या आदेशानुसार अंतरराष्ट्रीय साईबाबा विमानतळावर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली असून शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. शिर्डी विमानतळवरून नियमित येणाऱ्या जाणाऱ्या प्लाईट सुरु ठेवण्यात आल्या असून यामध्ये अद्यापतरी कोणताही बदल केला नाही.

फीड फीडबर्नर 11 May 2025 7:30 pm

Shivaji Maharaj Statue : राजकोटावर उभारला शिवाजी महाराजांचा दिमाखदार पुतळा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले लोकार्पण

सिंधुदुर्ग : मालवणच्या ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण रविवारी करण्यात आले आहे. या भव्य सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच स्वाभिमानाने आणि अधिक भव्यतेने उभारला आहे.मागच्या काळात ज्यावेळी दुर्दैवी घटना […] The post Shivaji Maharaj Statue : राजकोटावर उभारला शिवाजी महाराजांचा दिमाखदार पुतळा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले लोकार्पण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 May 2025 7:29 pm

‘100 हून अधिक दहशतवादी मारले, ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी’; DGMO राजीव घई यांची माहिती

नवी दिल्ली : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करत १०० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. रविवारी संध्याकाळी तिन्ही सैन्यदलांच्या लष्करी संचालकांनी (DGMO) आयोजित पत्रकार परिषदेत लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी या ऑपरेशनची सविस्तर माहिती देत पाकिस्तानला कठोर इशारा दिला. “आमचा एकमेव उद्देश दहशतवादी नेटवर्क नष्ट करणे हा होता,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. […] The post ‘100 हून अधिक दहशतवादी मारले, ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी’; DGMO राजीव घई यांची माहिती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 May 2025 7:21 pm

IND vs SL : स्मृती मानधनाचे ऐतिहासिक शतक! ‘हा’पराक्रम करणारी ठरली जगातील तिसरीच महिला खेळाडू

IND vs SL Smriti Mandhana 11th ODI century : महिला तिरंगी एकदिवसीय मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ९७ धावांनी पराभव करुन जेतेपद पटकावले. या सामन्यात भारताने स्टार फलंदाज स्मृती मानधनाच्या शतकी खेळीच्या जोरावर ३४३ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ २४५ धावांवर गारद झाला. दरम्यान स्मृतीने शतक झळकावत इतिहास रचला आहे. स्मृती वनडेत […] The post IND vs SL : स्मृती मानधनाचे ऐतिहासिक शतक! ‘हा’ पराक्रम करणारी ठरली जगातील तिसरीच महिला खेळाडू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 May 2025 7:19 pm

Mumbai High Alert : मुंबईत हायअलर्ट जारी; समुद्रमार्गांवर कडेकोट बंदोबस्त तैनात

मुंबई : भारत-पाकिस्तान युद्धावर आता युद्धविराम लागला आहे. सध्या देशाच्या सीमेवर तणावपूर्ण शांतता असली तरी जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमधील जीवन पूर्वपदावर येत आहे. पण तरी सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून देशातील सर्व सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहेत. पण मुंबईत समुद्रमार्गांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई ही […] The post Mumbai High Alert : मुंबईत हायअलर्ट जारी; समुद्रमार्गांवर कडेकोट बंदोबस्त तैनात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 May 2025 6:55 pm

‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच…जर तिकडून गोळ्या झाडल्या तर इकडून’; भारताचा पाकिस्तानला स्पष्ट संदेश

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान शनिवारी सायंकाळी युद्धबंदीचा करार झाला असला, तरी पाकिस्तानने त्याचे उल्लंघन केल्याचा भारताचा दावा आहे. न्यूज एजन्सी ANI ने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे, “पाकिस्तानकडून गोळी आली, तर आम्ही गोळ्याने उत्तर देऊ. त्यांनी काही केल्यास आमचे प्रत्युत्तर अधिक विनाशकारी असेल.” युद्धबंदीनंतर […] The post ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच… जर तिकडून गोळ्या झाडल्या तर इकडून’; भारताचा पाकिस्तानला स्पष्ट संदेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 May 2025 6:43 pm

Virat Kohli: विराट कसोटी क्रिकेटमधून का घेतोय निवृत्ती

मुंबई: काहीच दिवसांपूर्वी भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यापाठोपाठ आता सर्वाच्या गळ्यातील ताईत असलेल्या विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय असं जाहीर केलंय आणि बीसीसीआयला कळवलंय. विराट कोहलीने आताचा हा निर्णय का घेतला ? पाहूयातविराट कोहली. क्रिकेटप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा क्रिकेटपटू. त्याचे असंख्य चाहते आहेत. त्याच्या स्टाईल्स फॉलो करणारे फॅन्सही आहेत. मात्र याच विराट कोहलीने रोहित शर्मापाठोपाठ कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतलाय. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय असं विराटने बीसीसीआयला कळवलंय. मात्र या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती बीसीसीआयने विराट कोहलीला केलीय. विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा अद्याप केलेली नाही, मात्र त्याच्या या निर्णयाने क्रिकेटचाहत्यांमध्ये नाराजी पसरलीय.कसोटी सामने खेळण्यासाठी टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. फलंदाजीत फरफॉर्म दाखवू न शकलेल्या रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेतली. हाच निकष विरोट कोहलीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.आपल्या फलंदाजीने समोरच्या गोलंदाजांची पिसे काढणाऱ्या आणि पराभवाचं विजयात रुपांतर करणाऱ्या विराट कोहलीने निवृत्ती घोषणा का केली ते पाहूयातकसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची कारणं- बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सुमार फलंदाजी-बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत निराशाजनक कामगिरी-केवळ पर्थ कसोटीत केलं शतक-ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा 1-3 असा पराभवधडाकेबाज फलंदाज म्हणून ख्याती असलेल्या विराट कोहलीने जून 2011 रोजी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. विराट कोहली पहिला सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला.कसोटी क्रिकेटमधील कामगिरी-एकूण 123 कसोटी सामने खेळला-210 डावांमध्ये 46.85च्या सरासरीने धावा-30 शतकं आणि 31 अर्ध शतकांचा समावेशविराट कोहलीने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीमुळे सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. आता बीसीसीआयने दिलेल्या फेरविचाराच्या प्रस्तावाबाबत विराट कोहली काय निर्णय घेणार याकडे क्रिकेटजगताचं आणि क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय.

फीड फीडबर्नर 11 May 2025 6:30 pm