Pooja Sawant : 'कलरफुल'पूजा सावंतचं मोठ्या पडद्यावर कमबॅक! 'या'अभिनेत्यासोबत दिसणार
मुंबई : नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी कप बशी या चित्रपटांतून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु आहे.कप बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांची असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट असला, तरी त्यांचं चित्रपटसृष्टीशी असलेलं नातं जुनंच आहे. त्यांचे वडील सदानंद जोशी यांनी १९९६ साली प्रदर्शित झालेल्या पुत्रवती या चित्रपटासाठी कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशा सर्वच बाजूंवर काम केलं होतं. त्या चित्रपटानं राष्ट्रीय, राज्यस्तरीय १४ पुरस्कारांनी गौरवला गेला होता. त्यात फिल्मफेअर, स्क्रीन, राज्य पुरस्काराचा समावेश होता. त्यामुळे वडिलांचं प्रेरणादायी काम आणि त्यांचा कलात्मक वारसा आता ‘कप बशी’ या चित्रपटातून ते पुढे आणत आहेत.
दिघी सोसायटीच्या चेअरमनसह ४ संचालक पाच वर्षांसाठी अपात्र
नेवासा : नेवासा तालुक्यातील दिघी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सध्या चांगलीच चर्चेत आहे. थकबाकीदार असूनही निवडणुकीत सहभाग घेतल्यामुळे सोसायटीचे चेअरमन सोपान अंबादास नागवडे यांच्यासह शोभा सुनील निकम, दत्तात्रय रामराव दळवी आणि मच्छिंद्र रावसाहेब गवळी या चार संचालकांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. या निर्णयामुळे सोसायटीच्या कारभारात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. हा निर्णय […] The post दिघी सोसायटीच्या चेअरमनसह ४ संचालक पाच वर्षांसाठी अपात्र appeared first on Dainik Prabhat .
Joe BIden-Prostate Cancer | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याविषयी धक्कादायक बातमी समोर आली आहे. जो बायडेन यांना ‘प्रोस्टेट कर्करोगा’चे निदान झाले आहे. माजी राष्ट्रपतींना कर्करोगाचा एक अतिशय आक्रमक प्रकार आहे. तो त्यांच्या हाडांमध्ये पसरला आहे, असे सांगितले जात आहे. काल डेमोक्रॅट कार्यालयाने ही माहिती दिली. माध्यमांना दिलेल्या निवेदनात, “जो बायडेन यांना लघुशंकेशी संबंधित लक्षणे […] The post अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ‘प्रोस्टेट कर्करोगा’चे निदान ; जाणून घ्या हा आजार किती धोकादायक? appeared first on Dainik Prabhat .
Amit Thackeray | जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा बळी गेला. यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहीमेअंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची 9 तळे उद्धवस्त केले. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तान सातत्याने भारतीय शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत होता, ज्याला भारतीय सैन्यही चोख प्रत्युत्तर देत होते. 10 […] The post “युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, आणि…”; अमित ठाकरेंनी PM मोदींना पत्राद्वारे केली मागणी appeared first on Dainik Prabhat .
शेतकऱ्यांनो…! कृषी योजनांच्या लाभासाठी आता फार्मर आयडी महत्वाचा; सरकार देणार मोहिमेला गती
Farmer ID : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नागपूर येथील केंद्रीय कृषी संशोधन परिषदेत कृषी आणि ग्रामविकास विभागांचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हवामानानुसार पीक वाण विकसित करणे, प्रगत बियाणे, सेंद्रिय खत, स्मार्ट सिंचन, आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर भर दिला. तसेच, शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी […] The post शेतकऱ्यांनो…! कृषी योजनांच्या लाभासाठी आता फार्मर आयडी महत्वाचा; सरकार देणार मोहिमेला गती appeared first on Dainik Prabhat .
युसूफ पठाणचा धक्कादायक निर्णय ; पाकचा पर्दाफाश करणाऱ्या संसदीय पथकासोबत जाण्यास नकार
Yusuf Pathan on Operation Sindoor। दहशतवाद्यांचे उगमस्थान असणाऱ्या पाकिस्तानवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर, भारताने आता राजकीय राजनैतिक हल्ल्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या देशांमध्ये संसदीय शिष्टमंडळे पाठवण्याची घोषणा केली आहे. या संसदीय पक्षात पश्चिम बंगालचे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) खासदार आणि माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचेही नाव समाविष्ट करण्यात आले. शिष्टमंडळात समाविष्ट […] The post युसूफ पठाणचा धक्कादायक निर्णय ; पाकचा पर्दाफाश करणाऱ्या संसदीय पथकासोबत जाण्यास नकार appeared first on Dainik Prabhat .
LSG vs SRH, IPL 2025: लखनऊ सुपर जायंट्सला विजय आवश्यक
मुंबई(सुशील परब): आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदरावाद हा सामना लखनऊमध्ये खेळला जाणार आहे. लखनऊ सुपर जायंट्सचे ११ सामन्यांत दहा गुण झाले असून त्यांचे अजून तीन सामने वाकी आहेत. गुणतालिकेत लखनऊ सुपर जायंट्स सातव्या क्रमांकावर व सनरायझर्स हैदराबाद आठव्या क्रमांकावर आहेत.लखनऊ सुपर जायंट्सला तीनही सामने जिंकले, तर प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा आहे. त्यांना इतरही संघांवर अवलंबून राहावे लागेल. सनरायझर्स हैदरावाद प्लेऑफमधून अगोदरच बाहेर झाली आहे. ते लखनऊ सुपर जायंट्सला हरवण्याचा प्रयत्न करतील. लखनऊ सुपर जायंट्स हा सामना हरले, तर ते पण प्लेऑफमधून बाहेर होतील.मागील सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादला हरविले होते त्यामुळे त्यांचे पारडे जड आहे. ऋषभ पंत कर्णधार, निकोलस पुरन, मीचेल मार्श, एडन मार्कम, हे फलंदाजी सांभाळतील शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाशदीप हे गोलंदाजीचा भार सांभाळतील. सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी, अभिषेक शर्मा, ट्रेव्हीस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी हे सांभाळतील, तर कर्णधार पेंट कमिन्स, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, जयदेव उनादकट हे गोलंदाजीचा भार सांभाळतील, तर पाहूया लखनऊ सुपर जायंट्स सनरायझर्स हैदराबादला हरवून प्लेऑफच्या दिशेने घौडदौड करतील का?
मुंबईच्या आग्रीपाडा परिसरात गोळीबार
मुंबई : मुंबईच्या आग्रीपाडा परिसरात जमिनीच्या वादातून जमावाने गोळीबार केला. नंतर लाठ्याकाठ्यांनी एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या प्रकरणात एक जण गंभीर जखमी झाला. गोळीबार प्रकरणी पोलिसांनी ४१ जणांना अटक केली. यात वीस महिला आणि एकवीस पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून चार रायफली, मिरची स्प्रे तसेच हल्ल्यासाठी वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत. इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या सर्वांना मुंबईच्या किल्ला कोर्टाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. सर्व आरोपींना सोमवार १९ मे रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल.जमिनीच्या वादातून मनी मॅग्नम नेस्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांवर हल्ला झाला होता. या वेळी जमावाने कंपनीच्या कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना बेदम मारहाण केली. हल्लेखोरांनी रायफलने गोळीबार केला तसेच दगड आणि विटांचा मारा केला. लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांचाही हल्ल्यासाठी वापर करण्यात आला. या हल्ल्यात मॅग्नम मनी मॅग्नम नेस्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एक कर्मचारी जखमी झाले आहेत. आग्रीपाडा पोलिसांनी याप्रकरणी फ्रँको इंडिया फार्मास्यु्टिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ४१ जणांना अटक केली आहे.
हैदराबादमध्ये दहशत माजवण्याचा कट अयशस्वी ; ISIS शी संबंधित २ संशयितांना अटक, स्फोटकेही जप्त
ISIS suspects arrested । तेलंगणा पोलिसांनी आंध्र प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने एक मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे. हैदराबाद शहरात बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या या संयुक्त कारवाईत, ISIS शी संबंधित दोन संशयित दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे. यापैकी विजयनगरम येथील सिराज आणि हैदराबाद याठिकाणचा समीर याला अटक करण्यात आली […] The post हैदराबादमध्ये दहशत माजवण्याचा कट अयशस्वी ; ISIS शी संबंधित २ संशयितांना अटक, स्फोटकेही जप्त appeared first on Dainik Prabhat .
सोलापूर : सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये एका टॉवेल कारखान्यास भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये ८ जणांचा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये कारखाना मालक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह तीन कामगारांचा समावेश होता. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, या भीषण दुर्घटनेवर पंतप्रधान […] The post Solapur News : सोलापुरमधील आगीच्या दुर्घटनेत ८ जणांचा होरपळून मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख appeared first on Dainik Prabhat .
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’जिल्ह्यांना अलर्ट जारी
Weather Update | यंदाचा मान्सून वेळीआधीच भारतात दाखल होणार आहे. बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्राच्या दक्षिण भागात मान्सून सक्रिय झाला असून २७ मे पर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल. १ जून ते ५ जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून पाऊस बरसत आहे. यातच आता राज्यात आजपासून […] The post राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी appeared first on Dainik Prabhat .
शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने ; सेन्सेक्स १२७ अंकांनी तर निफ्टीही २५००० च्याही खाली
Stock Market Today । आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवसाची सुरुवात घसरणीने झाली आहे. सकाळी ९.१५ वाजता, सेन्सेक्स १२७.२० अंकांनी किंवा ०.१५ टक्क्यांनी घसरून ८२,२४४.१४ वर उघडला. तर निफ्टी १७.३० अंकांनी म्हणजेच ०.०८ टक्क्यांनी वाढीसह २५,०२४.३० पातळीवर व्यवहार करत होता. तथापि, नंतर निफ्टी २५ हजारांच्या खाली गेला. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच शुक्रवारी देशांतर्गत बाजारात घसरण […] The post शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने ; सेन्सेक्स १२७ अंकांनी तर निफ्टीही २५००० च्याही खाली appeared first on Dainik Prabhat .
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आजरा तालुक्यातील मडिलगे गावात अज्ञात चार चोरट्यांनी दरोडा घातला. यामध्ये सुमारे १४ तोळे सोने व रोख रक्कम ९० हजार रुपये लंपास केले. धक्कादायक बाब म्हणजे दरोड्यात एका महिलेवर हल्ला करत तिचा खून केल्याची घटना घडली आहे. पूजा सुशांत गुरव (वय-३२) असं खून केलेल्या महिलेचे नाव […] The post Madilage Robbery : कोल्हापुरात धाडसी दरोडा…! दराेडेखाेरांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू, जुळी मुले बचावली; पहाटे नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .
दहशतवादी अबू सैफुल्लाहचा पाकिस्तानात खात्मा; नागपुरमधील संघ मुख्यालयावर हल्ल्याचा रचला होता कट
Terrorist Abu Saifullah | लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाह याचा खात्मा करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत त्याला ठार केल्याची माहिती समोर आली आहे. अबू सैफुल्लाह हा भारतातील तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार होता. भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर […] The post दहशतवादी अबू सैफुल्लाहचा पाकिस्तानात खात्मा; नागपुरमधील संघ मुख्यालयावर हल्ल्याचा रचला होता कट appeared first on Dainik Prabhat .
Ratnagiri Accident : जगबुडी नदीच्या पुलावरून कार कोसळून 5 जणांचा मृत्यू
Ratnagiri Road Accident : रत्नागिरी जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. जगबुडी नदीच्या पुलावरुन कार थेट 100 फूट खाली कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जगबुडी नदीच्या पुलावर पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे […] The post Ratnagiri Accident : जगबुडी नदीच्या पुलावरून कार कोसळून 5 जणांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
Joe Biden: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्रोस्टेट कॅन्सर
वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला आहे. हा कॅन्सर आता हाडांपर्यंत पसरला आहे. रविवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत विधानाद्वारे ही माहिती देण्यात आली. ८२ वर्षीय बायडेन यांना शुक्रवारी याची माहिती मिळाली. त्यांना लघवीसंबंधी काही तक्रारी होत्या. त्यानंतर कॅन्सरचे निदान करण्यात आले. त्यांचे कुटुंबीय आणि डॉक्टर यावेळेस संभाव्य उपचारांच्या पर्यांयाबद्दल विचार करत आहेत.बायडेन यांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा क२न्सर ग्लेसन स्कोर ९चा आहे. याचा अर्थ आक्रमक कॅन्सर आहे. कॅन्सर हाडांपर्यंत पसरला आहे. याला मेडिकल सायन्स भाषेत मेटास्टेसिस म्हणतात. मात्र यावर उपचार शक्य आहेत. दरम्यान, सध्या स्थिती गंभीर आहे. मात्र उपचाराचे पर्याय आहेत आणि बायडेन यांचे कुटुंबीय या पर्यायांवर विचार करत आहेत.जो बायडेन २०२१ ते २०२५ पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये अचानक पुन्हा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात त्यांची कामगिरी कमकुवत राहिली होती. या घटनेनंतर डेमोक्रेटिक पक्षामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना पक्षाने उमेदवारी दिली मात्र २०२४मध्ये ट्रम्प यांच्याविरुद्ध पराभव सहन करावा लागला.
India-Pakistan Ceasefire। भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडेच झालेल्या लष्करी संघर्षानंतर, पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी, “पाकिस्तान कधीही भारतीय राजवटीसमोर झुकणार नाही आणि आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे.’ असे महंत एक प्रकारे भारताला धमकीच दिली आहे. […] The post “पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही…” ; पाकिस्तानी जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी पुन्हा ओकली गरळ appeared first on Dainik Prabhat .
'हा आजार नाहीये.' हे एक विचारपूर्वक रचलेले षड्यंत्र आहे. जर कोणताही आजार असता तर गावातील इतर लोकांनाही त्याचा त्रास झाला असता. जेव्हा मी कुटुंबात इतक्या मृत्यूंबद्दल एकत्र विचार केला तेव्हा मला जाणवले की हा आजार नाही तर खून आहे. मी खुनाचा खटला दाखल करेन. हे खूप महत्त्वाचे आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील बधल गावात अवघ्या ३७ दिवसांत ३ कुटुंबातील १७ जणांचा मृत्यू झाला. असलम यांचे कुटुंबदेखील त्यापैकी एक आहे. त्यांच्या कुटुंबातील ८ सदस्यांची प्रकृती एकामागून एक बिघडत गेली. मग सर्वजण मरण पावले. हे १७ मृत्यू ७ डिसेंबर २०२४ ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान झाले. प्रशासनाला एका गूढ आजाराचा संशय आला आणि त्यांनी गावाला कंटेनमेंट झोनमध्ये बदलले. फॉरेन्सिक तपासणीत नंतर असे दिसून आले की मृत्यूचे कारण क्लोरफेनापायर नावाचे कीटकनाशक होते. मृत १७ जणांपैकी ९५% पेक्षा जास्त लोकांच्या शरीरात हे कीटकनाशक आढळून आले. तथापि, बधल गावातील मृत्यूंचे गूढ इथेच संपले नाही. ज्या कीटकनाशकामुळे १७ जणांचा मृत्यू झाला त्यावर जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. गेल्या दोन वर्षांत हे कीटकनाशक कुठेही विकले किंवा खरेदी केले गेले नाही. तपासादरम्यान, राजौरीच्या बधल गावात झालेल्या गूढ मृत्यूंप्रमाणेच, पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्येही अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, असेही आढळून आले. आता प्रश्न असा आहे की या मृत्यूंमागे काही खोल कट आहे की कुटुंबांमधील काही परस्पर शत्रुत्व आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिव्य मराठीची टीम ग्राउंड झीरोवर पोहोचली. सर्वप्रथम जाणून घ्या...बधल गावातील १७ मृत्यूंची कहाणीजम्मूपासून सुमारे २१० किमी आणि राजौरीपासून सुमारे ६० किमी पुढे, आम्ही डोंगरांमधून बधल गावात पोहोचलो. ४ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावात, आम्ही प्रथम फजल हुसेन यांच्या घरी पोहोचलो, पण घरी कोणीही आढळले नाही. फजल हुसेन यांची मोठी मुलगी सुलताना हिचे लग्न २ डिसेंबर २०२४ रोजी असल्याचे उघड झाले. नातेवाईकांसह २०० हून अधिक लोक उपस्थित होते. ६ डिसेंबर रोजी, लग्नानंतर पहिल्यांदाच, फजल आणि त्याच्या ४ मुलांची तब्येत बिघडली. उलट्या, पोटदुखी, सुस्ती आणि बेशुद्धी येऊ लागली. ७ डिसेंबर रोजी त्यांना राजौरी येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले. ४० वर्षांच्या फजलची डोकेदुखी वाढू लागली. त्यांना मध्यवर्ती मज्जासंस्थेचा (सीएनएस) त्रास झाला आणि त्यांचे निधन झाले. फजलच्या ३ मुलांची तब्येतही झपाट्याने बिघडली. त्यांना तातडीने जम्मू बाल रुग्णालयात नेण्यात आले पण तिघांचाही मृत्यू झाला. राजौरी मेडिकल कॉलेजच्या टीमने या चारही मृत्यूंची चौकशी सुरू केली. पथकाला अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय होता. नमुने घेण्यात आले आणि त्यांची चाचणी करण्यात आली, परंतु जीवघेणा ठरू शकेल असा कोणताही विषारी पदार्थ आढळला नाही. रफिक यांचे कुटुंब...माझ्या मांडीवरची ६ वर्षांची मुलगी वेदनेने मरण पावली, आम्हाला न्याय हवा१२ डिसेंबर रोजी लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या मोहम्मद रफिकच्या कुटुंबातील लोकांची प्रकृती बिघडली. यामध्येही अशीच लक्षणे आढळून आली. त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये ४ मुले आणि रफिकची गर्भवती पत्नी यांचा समावेश होता. यानंतर आम्ही मोहम्मद रफिकच्या घरी पोहोचलो. ते म्हणतात, '१० तारखेला माझी ६ वर्षांची मुलगी नादिया कौसर शाळेत गेली नाही. ती म्हणाली- मला थोडा ताप येत आहे. मी जवळच्या एका खाजगी डॉक्टरचा सल्ला घेतला. औषध घेतल्यानंतर तिला लगेच उलट्या झाल्या. जेवण केल्यानंतर पुन्हा उलट्या झाल्या. 'मग मी दुसऱ्या दुकानातून औषध विकत घेतले, पण समस्या काही सुटली नाही.' दुसऱ्या दिवशी सकाळी ७:३० वाजता माझ्या मांडीवर बाळाचा मृत्यू झाला. यानंतर माझी इतर मुलेही आजारी पडली. त्यांना प्रथम कोटरंका रुग्णालयात नेण्यात आले, नंतर राजौरीला. जेव्हा त्यांची प्रकृती बिघडली तेव्हा त्यांना पीजीआय चंदीगड येथे पाठवण्यात आले, परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घरी परतलो तेव्हा पत्नीची तब्येत बिघडली. आता हे आजारपणामुळे झाले की मुलांच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे झाले हे माहित नाही. शेवटी पत्नीचाही मृत्यू झाला. कारण विचारले असता, रफिक म्हणतात, 'ते म्हणत आहेत की त्यांचा मृत्यू एखाद्या विषारी पदार्थामुळे झाला.' आम्हाला माहित नाही. तो कसा आला, त्यांना कोणी खायला दिले? घराव्यतिरिक्त मुले फक्त शाळेतच जेवण करत असत. ज्या दिवशी ते आजारी पडले, त्या दिवशी त्यांनी शाळेत जेवण केले होते. मला माहिती नाही की कट शाळेच्या आत घडला होता की बाहेर. आम्हाला फक्त न्याय हवा आहे. सर्वांना सारखीच लक्षणे आणि २४ तासांच्या मृत्यूसुरुवातीच्या तपासात असे दिसून आले की आजारी लोकांचे अवयव वेगाने खराब होत होते. आजारी पडल्यानंतर २४ तासांच्या आत मृत्यू झाले होते. काही प्रकरणांमध्ये मृत्यू अनेक दिवसांनीही झाला, परंतु लक्षणे सर्वांमध्ये सारखीच होती. प्रथम पोटदुखी, उलट्या, अशक्तपणा आणि थकवा येतो. तीव्र डोकेदुखी, अस्वस्थता आणि नंतर मृत्यू. वैद्यकीय पथकाने गावात एक छावणी उभारली आणि लोकांची तपासणी केली. विषाणूजन्य, जीवाणूजन्य, बुरशीजन्य आणि झुनोटिक रोगांची तपासणी करण्यात आली. पिण्याच्या पाण्याचा नमुना घेण्यात आला. रक्त, लघवी, नाकाचे स्वॅब, कपडे आणि सर्व प्रकारचे नमुने घेण्यात आले, परंतु तपासणीत काहीही आढळले नाही. वैद्यकीय पथकाने अलिकडेच मृत झालेल्या प्राण्यांची झुनोटिक आजारांसाठी तपासणी केली. २ डिसेंबर रोजी लग्नापूर्वी गावात एका म्हशीचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. म्हशीच्या मालकाने लग्नात जेवण शिजवले होते. त्या स्वयंपाकीचीही चौकशी करण्यात आली, पण काहीही सापडले नाही. एका महिन्यानंतर, असलमच्या कुटुंबातील ८ सदस्यांचा मृत्यू झालाया सगळ्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर, १० जानेवारी रोजी, बाधलमध्ये राहणाऱ्या असलमच्या कुटुंबातील आठ सदस्य एकाच वेळी आजारी पडले. त्यानंतर उर्वरित ५ मुले आणि मामा आणि काकू यांचे निधन झाले. तिसऱ्या प्रकरणात ८ मृत्यूंमुळे प्रशासनाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले. डीआरडीओ ग्वाल्हेर, एनआयव्ही पुणे, आयसीएमआर, पीजीआय चंदीगड, सीएफएसएल हे देखील या प्रकरणाच्या तपासात सहभागी झाले. केंद्रीय गृह मंत्रालय स्वतः लक्ष ठेवून होते. बधलमधील २०० हून अधिक लोकांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधूनही मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मृतांचे मूत्रपिंड, पोट, यकृत, प्लीहा आणि रक्ताचे नमुने घेण्यात आले. हे नमुने देशातील सर्व प्रमुख राष्ट्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले. अहवालात असे आढळून आले की मृत्यू झालेल्यांपैकी ९५% पेक्षा जास्त लोकांमध्ये क्लोरफेनापीर हे कीटकनाशक आढळून आले. असलम यांचे कुटुंब...शोकात सामील होण्यासाठी फजलच्या घरी गेले, संपूर्ण कुटुंब गमावलेयानंतर आम्ही मोहम्मद अस्लमच्या घराकडे निघालो. तो नुकताच हॉस्पिटलमधून परतला होता. तो म्हणतो, 'माझ्या काकांना मुले नव्हती. मला दत्तक घेण्यात आले. मी इथे १० वर्षांपासून राहत आहे. माझ्या नातेवाईक फजलच्या मृत्यूनंतर सुमारे एक महिन्यानंतर, माझ्या घरीही अशीच घटना घडली. पहिली मुलगी १२ जानेवारी रोजी मरण पावली. माझ्या कुटुंबात एकूण १० जण होते. काका आणि काकू, ६ मुले आणि आम्ही नवरा-बायको. ती तारीख ९ जानेवारी असेल. फजलच्या मृत्युनंतर आम्ही त्याच्या खातम-ए-शरीफ कार्यक्रमाला गेलो होतो. माझी पत्नी आणि तीन मुलेही माझ्यासोबत होती. एक मूल फजलच्या घरी राहिले, तर पत्नी आणि दोन मुले परत आली. 'दुसऱ्याच दिवशी, पहिली ३ मुले आजारी पडली.' मी माझ्या तीन मुलांसह राजौरीला गेलो होतो. तिथून मला जम्मूला हलवण्यात आले. प्रथम तिघेही बेशुद्ध पडले. मग एकेक करून तिघेही मरण पावले. 'काका आणि काकू घरी ठीक होते.' तिन्ही मुले शोक करत असतानाच, मामा आणि मामी देखील आजारी पडले. त्यांना राजौरी येथे नेण्यात आले आणि त्याच रात्री दोघांचाही मृत्यू झाला. यानंतर, उर्वरित तीन मुले आजारी पडली आणि नंतर तिघांचाही मृत्यू झाला. त्या सर्वांचे मृतदेह येथे, मागच्या घराजवळ पुरले आहेत. मी त्यांना दररोज सकाळी-संध्याकाळी पाहतो. आधी वाटलं होतं की हा आजार आहे, आता तो एक खोल कट असल्यासारखा वाटतोयहे मृत्यू आजारपणामुळे झाले आहेत की काही कट आहे असे तुम्हाला वाटते? उत्तरात, असलम म्हणतो, 'मला वाटत नाही की हा आजार आहे. हे पूर्णपणे षड्यंत्र आहे. जर कोणताही आजार असता तर गावातील इतर लोकांनाही त्याचा त्रास झाला असता. हा आजार नाही तर खून आहे. मी खुनाचा खटला दाखल करेन. 'मला वाटतं की जमिनीचा काही प्रश्न असेल कारण माझ्या मामा-मामीने मला दत्तक घेतलं होतं.' दत्तक घेतल्यापासून आतापर्यंत कोणताही वाद नव्हता. आता असं वाटतंय की माझ्या कुटुंबाविरुद्ध एक मोठं षड्यंत्र रचलं जात आहे. माझ्याकडे ५० ते ६० कनाल जमीन आहे. ज्यांना जमिनीची गरज आहे त्यांचे हे षड्यंत्र असू शकते. मुले आता बाहेरील व्यक्तीने दिलेले पाणी पीत नाहीत आणि टॉफीही घेत नाहीत१७ जणांच्या मृत्यूमुळे बधल गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येथे आढळलेला गफ्फुर अहमद म्हणतो, 'या मृत्यूंनंतर, आम्हा सर्वांना २२ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले. संपूर्ण गाव घाबरले आहे. शाळेत मुलांना जेवणही नाकारण्यात आले आहे. आता तपास पथकाबद्दल...प्रथम अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय होता, नंतर असे आढळून आले की मृत्यू क्लोरफेनापीरमुळे झाले आहेतबधलमधील मृत्यूंना सामोरे जाण्यासाठी एक वैद्यकीय पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाचे प्रमुख डॉ. शुजा कादरी आहेत. या प्रकरणाशी संबंधित तपासात आणि पाळत ठेवणाऱ्या पथकात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आम्ही त्यांना भेटण्यासाठी राजौरी मेडिकल कॉलेजला पोहोचलो. डॉ. शुजा हे येथील कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख आहेत. या प्रकरणाबाबत डॉ. शुजा म्हणतात, 'बाधल गावातील पहिल्या प्रकरणानंतर, सर्व संबंधित विभाग तपासात सामील झाले. सुरुवातीला आम्हाला वाटले की हे अन्नातून विषबाधा झाली आहे, परंतु एका आठवड्यानंतर, गावातील आणखी एका कुटुंबालाही याची लागण झाली. यानंतर आम्हाला वाटले की हा काही गूढ आजार आहे. तपास नव्याने सुरू झाला. आम्ही संपूर्ण गावाचे नमुने घेण्यास सुरुवात केली. आम्ही सर्व प्रकारचे नमुने घेतले - पाणी, अन्न, धान्य. त्याची चौकशी केवळ जम्मू आणि काश्मीरच्या विभागांमध्येच झाली नाही. उलट, ते देशातील सर्व प्रमुख वैद्यकीय तपास संस्थांद्वारे केले गेले. तपासात हे स्पष्ट झाले की हे अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रकरण नव्हते. हा जिवाणू संसर्ग, विषाणू किंवा झुनोटिक आजार नाही. 'दुसऱ्या प्रकरणानंतर सुमारे एक महिन्यानंतर, गावात तिसरा रुग्ण आढळला.' कुटुंबातील १० पैकी ८ सदस्यांचा मृत्यू झाला. येथेही प्रत्येकाची लक्षणे पहिल्या दोन प्रकरणांसारखीच होती. यानंतर आम्ही प्रत्येक स्तरावर केसचे निदान केले. शेवटी, पोस्टमॉर्टेम दरम्यान तपासणीसाठी घेतलेले नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासण्यात आले. मग असे आढळून आले की हा क्लोरफेनापायर नावाच्या न्यूरोटॉक्सिनचा परिणाम होता. 'मला वाटतं की मृत्युमुखी पडलेल्या ९५% पेक्षा जास्त लोकांमध्ये हे क्लोरफेनापायर कीटकनाशक आढळलं होतं.' आता हे एकतर कुटुंबांना जाणूनबुजून देण्यात आले होते किंवा कुटुंबाने चुकून ते खाल्ले होते. हा तपासाचा विषय आहे. पोलीस या दृष्टिकोनातून तपास करत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये दोन वर्षांपासून क्लोरफेनापीर विकले जात नाहीये, पीओकेमध्येही असेच मृत्यू झाले आहेतहे कीटकनाशक जम्मू आणि काश्मीरमध्ये मिळू शकते का? यावर उत्तर देताना डॉ. शुजा कादरी म्हणतात, 'आमच्या तपासातून असे दिसून आले आहे की गेल्या दीड ते दोन वर्षांत हे कीटकनाशक संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये विकले गेले नाही कारण त्यावर पूर्णपणे बंदी आहे. अशा परिस्थितीत, ते ऑनलाइन स्टोअरमधून ऑर्डर केले होते का, याचीही चौकशी केली जात आहे. 'तथापि, डोंगराळ भागात ऑनलाइन पुरवठा करणेदेखील कठीण आहे.' हे कीटकनाशक कोणी खरेदी केले हे अद्याप कळलेले नाही. तुम्ही ते कुठून खरेदी केले? हे जाणूनबुजून आणले गेले. पोलिसांच्या दृष्टिकोनातून याचा तपास केला जात आहे. 'बाधल गावात झालेल्या मृत्यूंपूर्वी काही महिने आधी, पीओकेमध्येही अशाच प्रकारचे गूढ मृत्यू झाल्याची नोंद झाली होती.' तिथेही मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अशीच लक्षणे आढळून आली. त्यामुळे, आपल्या देशाविरुद्ध काही खोल कट रचला जात आहे का, या दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. त्यामुळे, सर्व प्रकारच्या शंका लक्षात घेऊन, सर्व एजन्सी तपास करत आहेत. आम्ही राजौरीचे एसपी वजाहत हुसेन यांच्याकडून तपासाबाबत अपडेट मिळवण्याचा प्रयत्न केला पण बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत आम्हाला उत्तर मिळाले नाही.
मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट; म्हणाले “या घटनेत जाती-धर्माचा संबंध नाही”
Dhananjay Munde | बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी परळी तालुक्यातील लिंबोटा गावात एका तरूणाला मारहाण करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. समाधान मुंडेसह त्याच्यासोबतच्या १०-१२ टोळक्याने शिवराज दिवटेचे अपहरण करून त्याला डोंगराळ भागात नेऊन बांबू व लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या […] The post मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट; म्हणाले “या घटनेत जाती-धर्माचा संबंध नाही” appeared first on Dainik Prabhat .
मेट्रो-३ मार्गिकेच्या सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय
प्रवाशांची गैरसोय होणार दूरमुंबई (प्रतिनिधी) : दैनंदिन प्रवाशांसाठी एक स्वागतार्ह पाऊल म्हणून, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) मुंबई मेट्रो-३ च्या अॅक्वा लाईनवरील एवं कार्यरत स्थानकांच्या कॉन्फोरों स्तरावर मोफत वाय-फाय गुरू करण्याची घोषणा केली आहे. डिजिटल तिकोट, यूपीआय पेमेंट आणि स्टेशन आणि ऑनबोर्ड ट्रेनमधील संप्रेषण यासारख्या प्रवासी सेवांवर परिणाम करणान्या सततच्या मोबाइल नेटवर्क ब्लॅकआउट्सना दूर करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांच्या मोबाईल नेटवर्कबाबतच्या सर्व समस्या दूर होणार आहेत.मुंबई मेट्रो लाईन-३ मार्फत ही घोषणा करण्यात आली आहे. एमएमआरसीने असे महटले आहे की, मोफत वाय-फाय रोलआऊटचा उदेश स्थानकांवरील मोबाइल नेटवर्क समस्यांपासून आराम मिळवणे आहे. ही सेवा प्रयाशांना मेट्रोकनेक्ट ३ मोबाइल अॅप, तिकीट व्हेंडिंग मशीन्स (टोव्हीएम), तिकीट ऑफिस नशीन्स (टीओएम) आणि इतर यूपीआय-सक्षम पेमेंट सेवांसह महत्वाच्या डिजिटल सुविर्यामध्ये अखंडपणे प्रवेश करण्यास अनुमती देते. मुंबई मेट्रो लाईन ३. ज्याला अॅक्वा लाईन म्हणूनही ओळखले जाते, ती कुलाबा ते सीप्झ पर्यंत धावते आणि एकूण ३३.५ किमी अंतर कापते, ज्यामध्ये २० स्थानके आहेत. त्यापैकी २६ स्थानके भूमिगत आहेत. जरी अंशतः कार्यरत असली तरी, तिच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि मुंबईतील दीर्घकालीन वाहतूक कोंडी कमी करण्याची क्षमता यासाठी या लाईनचे कौतूक केले जात आहे.तथापि, डिजिटल सेवांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांसाठी मजबूत मोबाइल कनेक्टिकिटीचा अभाव एक मोठे आव्हान म्हणून उदयास आला आहे. एकूण ३७, २७६ कोटीच्या प्रकल्प खर्चासह, मेट्रो लाईन ३ ही मुंबईच्या शहरी पाहतूक नेटवर्कमधील एक महत्त्वाची प्रगती म्हणून पाहिली जाते. मोबाइल कनेक्टिव्हिटी पूर्णपणे दूर होईपर्यंत डिजिटल अंतर भरून काढण्यासाठी आणि प्रणशांचा अनुभव वाढवण्यासाठी वाय-फाय सेवा सुरू करणे हा एक महत्त्वाचा तात्पुरता उपाय म्हणून पाहिला जात आहे.सर्व प्रवाशांना सुरक्षित, विश्वासाई आणि अखंड गेट्रो अनुभव देण्याची आपली वचनबद्धता एमएमआरसीने पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. दरम्यान, ऑगस्टपर्यंत संपूर्ण मार्ग लवकरच कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, फोप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण कॉरिडॉरचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे. एकदा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर, अॅक्वालाईन मुंबईतील रस्त्यांवरील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी करेल आणि शहरातील ओव्हरलोडेड उपनगरीय रेल्वे प्रणाली वरील ताण कमी करेल असा अंदाज आहे.
खेळता खेळता कारमध्ये बसली मुले आणि अचानक लॉक झाला दरवाजा, जीव गुदमरून ४ चिमुकल्यांचा मृत्यू
अमरावती: आंध्र प्रदेशच्या ईस्ट गोदावरील जिल्ह्याच्या द्वारापुडी गावात एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. येथे कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक झाल्याने ४ चिमुकल्यांचा जीव गुदमरून मृत्यू झाला आहे. ही घटना गावातील महिला मंडळाच्या कार्यालयाजवळ घडली. यावेळी ही मुले येथील एका कारमध्ये बसून खेळत होती.मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलांचे वय ६ ते ८ वर्षे इतके होते. ते एका कौटुंबिक लग्न सोहळ्यात सामील होण्यासाठी आले होते. यादरम्यान मुले खेळत होती आणि खेळता खेळता ती कारमध्ये जाऊन बसली. चुकून गाडीचा दरवाजा लॉक झाला. बाहेर याचा कोणाला अंदाजच नव्हता. मात्र जेव्हा समजले तेव्हा खूप उशीर झाला होता.एमएसएमई मंत्री कोण्डापल्ली श्रीनिवास यांनी या घटनेप्रकरणी दु:ख व्यक्त करताना म्हटले, लग्न समारंभात सामील होण्यासाठी आलेले कुटुंबातील ही मुले खेळत होती. त्यावेळी एका बेवारस कारमध्ये ही मुले घुसली. मात्र दरवाजा आतून लॉक झाला. बऱ्याच वेळानंतर कुटुंबियांना या घटनेबाबत समजले मात्र तोपर्यंत चारही मुला-मुलींचा मृत्यू झाला होता.या घटनेने त्या चिमुकल्यांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. लग्नाचे हसते खेळते वातावरण या घटनेने पूर्ण बदलून गेले आहे. संपूर्ण कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान
नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२२ मध्ये व्हायला पाहिजे होत्या. मात्र, आता २०२५ उजाडले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती दिली. तसेच या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. त्यासाठी तयारीला लागा, असे आदेश देखील […] The post तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान appeared first on Dainik Prabhat .
“शत्रूला धूळ चारण्याचा …” ; लष्कराकडून ‘ऑपरेशन सिंदूर’चा नवीन व्हिडिओ जारी, पहा व्हिडीओ
Operation Sindoor New Video। भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडने ऑपरेशन सिंदूरचा एक नवीन व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला लष्कर योग्य उत्तर देताना दिसत आहे. लष्कराने हा व्हिडिओ जारी करत,”आम्ही आकाशाचे पृथ्वीपासून रक्षण करतो.” असे म्हटले आहे. तसेच या व्हिडिओमध्ये, भारतीय सैन्याने पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला कसे प्रत्युत्तर दिले आणि शत्रूच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या […] The post “शत्रूला धूळ चारण्याचा …” ; लष्कराकडून ‘ऑपरेशन सिंदूर’चा नवीन व्हिडिओ जारी, पहा व्हिडीओ appeared first on Dainik Prabhat .
Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण
शिरूर : नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएसई इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या निकालात शिरूरच्या सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्ता आणि परिश्रमाचा ठसा उमटवत सलग सहाव्या वर्षी 100 टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी एकूण 108 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि त्यातील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे संख्यात्मक निकालाबरोबरच गुणवत्तेच्या […] The post Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण appeared first on Dainik Prabhat .
आजपासून अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू
मुंबई: संपूर्ण राज्यात आजपासून अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. १९ ते २८ मे दरम्यान विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे. शिक्षण विभागाने https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर केंद्रीकृत प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.विद्यार्थ्यांना अर्जासाठी १०० रुपये शुल्क भरावे लागेल. याआधी ऑफलाइन अर्जासाठी हजारो रुपये मोजावे लागत होते. आता एकाच पोर्टलवरून १० कॉलेजसाठी अर्ज, डाक्युमेंट अपलोड, गुणवत्तानुसार गुणवत्ता यादी, आणि प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक मिळणार आहे.प्रवेश प्रक्रिया पारदर्शक व संगणकीकृत असून कोणताही गैरव्यवहार होणार नाही. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विभागीय कक्ष व हेल्पलाइन (८५३०९५५५६४) आणि support@mahafyjcadmissions.in या ईमेलवर मार्गदर्शन उपलब्ध आहे.प्रथम प्राधान्य क्रमांकाच्या महाविद्यालयात प्रवेश बंधनकारकविद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेशासाठी किमान १ आणि जास्तीत जास्त १० प्राधान्यक्रम भरावे लागतील. जर पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात गुणांनुसार जागा मिळाली, तर तिथे प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जर प्रवेश घेतला नाही, तर अशा विद्यार्थ्यांना पुढच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत सहभागी होता येणार नाही. त्यांना फक्त 'सर्वांसाठी खुली फेरी' या शेवटच्या फेरीतच संधी मिळेल.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १८ टक्केच पाणीसाठा
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांची पातळी साठवण क्षमतेच्या १८ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. मुंबईकरांना पुढील ६० दिवस पाणीपुरवठा करता येईल, इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पंरतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा टक्के अधिक आहे.मुंबई महानगरपालिका परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या सात तलावातून दररोज ३ हजार ९५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे.दरम्यान, तानसा, मध्य वैतरणा, भातसा आणि अप्पर वैतरणा या प्रमुख पुरवठा तलावांमधील पाण्याची पातळी २० टक्क्यांपेक्षा कमी झाली. बीएमसीने अप्पर वैतरणा आणि भातसा येथून १.८१ लाख दशलक्ष लिटरच्या राखीव साठ्यातून पाणी काढण्यासाठी राज्य सरकारची मान्यता मिळवली आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या मते, मुंबईकरांना जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. महापालिकेच्या अंदाजानुसार, एक टक्के पाणीसाठा सुमारे तीन दिवस पुरतो. दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यात पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाल्याने ५ जून २०२४ पासून ५ टक्के पाणीकपात करण्यात आले होते.
भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करारावरील वाटाघाटी पूर्णही झालेल्या नाहीत आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी झीरो टॅरिफचा दावा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. ट्रम्प १५ मे रोजी म्हणाले- भारताने आम्हाला असा करार दिला आहे की तो अमेरिकन वस्तूंवरील कर रद्द करण्यास तयार आहे. भारताने याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल चर्चेसाठी अमेरिकेला गेले आहेत. झीरो टॅरिफ म्हणजे काय, ज्यासाठी ट्रम्प इतके उत्सुक आहेत, त्याचा भारतावर काय परिणाम होईल आणि मोदी सरकार हे करेल का; आजच्या एक्सप्लेनरमध्ये याबद्दल... प्रश्न-१: ट्रम्प यांनी दावा केलेला झीरो टॅरिफ काय आहे? उत्तर: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून ट्रम्प म्हणत आहेत की भारत हा अमेरिकेवर सर्वाधिक कर लादणाऱ्या देशांमध्ये समाविष्ट आहे. २ एप्रिल २०२५ रोजी, जेव्हा ट्रम्प यांनी १०० हून अधिक देशांवर परस्पर कर लादण्याची घोषणा केली, तेव्हा त्यांनी भारतावरही २६% कर लादला. हे टॅरिफ दर ५ एप्रिलपासून लागू झाले, त्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांच्या बाजारपेठांमध्ये वेगाने घसरण सुरू झाली. ९ एप्रिल रोजी ट्रम्प यांनी चीन वगळता सर्व देशांवरील आयात शुल्क ९० दिवसांसाठी स्थगित केले. आता भारत आणि अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराद्वारे टॅरिफ दर निश्चित करण्याबाबत वाटाघाटी करत आहेत. झीरो टॅरिफ म्हणजे परदेशी वस्तूंना कोणताही कर किंवा शुल्क न घेता देशात प्रवेश करण्याची परवानगी देणे. उदाहरणार्थ, समजा अमेरिकेतून भारतात आयात केलेल्या बदामांवर ५०% कर आहे. जर अमेरिकेतून १,००० रुपयांचे बदाम आयात केले तर भारतात त्यांची एकूण किंमत १,५०० रुपये होईल. भारत आणि अमेरिका यांच्यातील झीरो टॅरिफ करारानंतर, हे बदाम भारतात निव्वळ १००० रुपयांना विकले जातील. यामुळे भारतात अमेरिकन बदामांची विक्री वाढेल. म्हणजेच, एखाद्या देशासोबत व्यापार वाढविण्यासाठी झीरो टॅरिफचा वापर केला जातो. तथापि, यामुळे देशांतर्गत बाजारपेठेचे नुकसान होते. अनेक वेळा देशात बनवलेली उत्पादने परदेशी कंपन्यांच्या स्वस्त उत्पादनांशी स्पर्धा करू शकत नाहीत. यामुळे देशांतर्गत उद्योग बंद पडू लागतात आणि देशात बेरोजगारी वाढते. झीरो टॅरिफमुळे सरकारला महसूल तोटा सहन करावा लागतो. प्रश्न-२: भारताने ट्रम्प यांना खरोखरच झीरो टॅरिफ देऊ केला आहे का? उत्तर: भारताने अधिकृतपणे अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताचा झीरो टॅरिफ आकारणीचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. ते म्हणाले- भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चा अजूनही सुरू आहेत. हे संभाषण खूप गुंतागुंतीचे आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आम्हाला असा करार हवा आहे जो दोन्ही देशांसाठी फायदेशीर असेल. दरम्यान, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल १७ ते २० मेदरम्यान अमेरिका दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते भारत-अमेरिका व्यापारावर अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांच्याशी चर्चा करतील. जेएनयूमधील आर्थिक अभ्यास आणि नियोजनाचे निवृत्त प्राध्यापक विश्वजित धर यांच्या मते, 'भारत सरकारकडून झीरो टॅरिफबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. ट्रम्प सत्तेत आल्यापासून ते इतर देशांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे दबाव आणत आहेत. त्यांचे हे विधान भारतावर दबाव आणण्यासाठीदेखील असू शकते. तथापि, वृत्तसंस्था रॉयटर्सनुसार, भारताने पहिल्या टप्प्यात ६०% अमेरिकन आयातीवर झीरो टॅरिफ लादण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारत भविष्यात ते ९०% पर्यंत वाढवू शकतो. प्रश्न-३: अमेरिकन वस्तूंवर झीरो टॅरिफ लादल्याने भारताचे कोणते नुकसान होऊ शकते? उत्तर: जर भारताने अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवरील कर रद्द केले तर त्याचे भारतातील सामान्य माणसावर तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेवर ५ मोठे परिणाम होतील... १. शून्य शुल्कामुळे भारतातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते २. झीरो टॅरिफमुळे सरकारी महसूल कमी होईल ३. देशांतर्गत बाजारपेठेत स्पर्धा वाढेल ४. देशांतर्गत उद्योग बंद पडतील, नोकऱ्या कमी होतील ५. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होऊ शकतो प्रश्न ४: अमेरिकन वस्तूंवर झीरो टॅरिफ लादल्याने भारताला काही फायदा होतो का? उत्तर: टॅरिफ रद्द करणे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले ठरणार नाही, परंतु असे केल्याने ग्राहकांना अल्पावधीत फायदादेखील होऊ शकतो. अमेरिकन वस्तू स्वस्त होतील: टॅरिफ संपल्यानंतर, भारतात अमेरिकन वस्तू खूपच स्वस्त होतील. भारत अमेरिकेकडून पेट्रोलियम क्रूड, सोने, पेट्रोलियम उत्पादने, इलेक्ट्रॉनिक घटक आणि कोळसा यासारख्या वस्तू खरेदी करतो. शुल्कात कपात झाल्यामुळे, भारतात या गोष्टी स्वस्त होतील. ट्रम्प यांचा २६% कर टळेल: अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. जर भारताने अमेरिकेसोबत झीरो टॅरिफ करार केला तर डोनाल्ड ट्रम्प भारतावर २६% कर लादणार नाहीत. यामुळे भारताला अमेरिकेत निर्यात करणे सोपे होईल आणि भारत अमेरिकेत अधिक वस्तूंची निर्यात करेल. तसेच, ट्रम्प यांच्याशी सहमत होऊन, भारत ट्रम्प यांना भारतात गुंतवणूक वाढवण्यासाठी राजी करू शकतो. ग्राहकांसाठी वाढलेले पर्याय: कमी दरांमुळे भारतीय बाजारपेठेत अधिक अमेरिकन वस्तू येतील. यामुळे भारतीय खरेदीदारांना देशांतर्गत वस्तूंचा पर्याय उपलब्ध होईल. सध्या भारत हा अमेरिकेचा दहावा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. २०२४-२५ मध्ये भारताने अमेरिकेतून ४५.३३ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ३.८ लाख कोटी रुपयांच्या वस्तू आयात केल्या. प्रश्न ५: भारत सरकार खरोखरच अमेरिकन वस्तूंवरील कर रद्द करेल का? उत्तर: विवेक मिश्रा यांच्या मते, 'ट्रम्प यांचे राजकारण पूर्वग्रहदूषित आहे, म्हणजेच भारत कोणतीही घोषणा करण्यापूर्वी ते त्याबद्दल घोषणा करतात.' युद्धविरामाच्या वेळीही ट्रम्प यांनी तेच केले. तरीही, मला वाटत नाही की भारत सरकार टॅरिफ पूर्णपणे रद्द करेल. टॅरिफमध्ये लक्षणीय सूट असेल.” विवेक मिश्रा स्पष्ट करतात- भारताचे मत असे आहे की आपण टॅरिफ सवलती देऊ शकतो पण ट्रम्पसमोर झुकणार नाही. स्टील आणि औषधांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये टॅरिफ सूट देण्याची चर्चा होऊ शकते, परंतु शेतीसारख्या क्षेत्रात, जे भारतात अतिशय संवेदनशील आहे, हा अंतर्गत राजकारणाचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांची आंदोलने होत राहतात, येथे झीरो टॅरिफ राबवणे कठीण आहे. ट्रम्प यांच्याशी सामना करण्याचा भारताचा फायदा असा आहे की अमेरिकेसोबत त्यांचा व्यापार ४५ अब्ज डॉलर्सचा आहे. व्यापार सवलतींमुळे भारताचा अधिशेष २५-३० अब्ज डॉलर्सपर्यंत कमी झाला तरी भारतावर त्याचा फारसा फरक पडणार नाही. भारतातील अमेरिकन गुंतवणूक वाढवून आणि ज्या क्षेत्रांमध्ये टॅरिफ वाढवले आहे, त्या क्षेत्रांमध्ये निर्यात वाढवून हे संतुलित केले जाईल. त्याच वेळी, ट्रम्प यांना एक आकडा दिसेल की व्यापार अधिशेष कमी झाला आहे. तर विश्वजित धर म्हणतात- कोणत्याही आयातीवर टॅरिफ लादणे अशक्य आहे. ब्रिटनसोबतच्या परराष्ट्र व्यापार करार (FTA) अंतर्गत भारताने अनेक वस्तूंवरील झीरो टॅरिफवर आणले आहे. त्याचप्रमाणे, ते अमेरिकेसोबतच्या काही वस्तूंवरही असेच करू शकते. प्रश्न ६: टॅरिफवर चर्चेसाठी गेलेल्या केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यामुळे काही तोडगा निघेल का? उत्तर: डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या रेसिप्रोकल टॅरिफवरील ९० दिवसांच्या स्थगितीपैकी जवळजवळ अर्धा कालावधी उलटून गेला आहे. अशा परिस्थितीत, भारताला लवकरच अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय व्यापार कराराच्या अटी अंतिम कराव्या लागतील. पीयुष गोयल याबद्दल बोलण्यासाठी अमेरिकेला गेले आहेत. १२ मे रोजी भारताने जागतिक बँकेला सांगितले होते की अमेरिकेने स्टील आणि अॅल्युमिनियमवर टॅरिफ लादल्याने त्यांच्या ७.६ अब्ज डॉलर्स म्हणजेच ६५ हजार कोटी रुपयांच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, भारत अमेरिकन वस्तूंवर शुल्क लादण्याचा अधिकारदेखील वापरू शकतो. या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा होऊ शकते. बिस्वजित धर यांच्या मते, 'द्विपक्षीय व्यापार करार दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आहे. हा पहिला करार आहे जिथे आपला भागीदार देश फक्त स्वतःच्या फायद्यांबद्दल बोलत आहे. आमच्या फायद्यासाठी नाही. भारत सरकारने सांगावे की, आम्ही आयात शुल्क कमी करू, पण जेव्हा आम्हाला ते योग्य वाटेल आणि जेव्हा ते आम्हाला फायदेशीर वाटेल तेव्हाच. असे होऊ नये की तुम्ही आम्हाला आदेश द्यावे आणि आम्ही टॅरिफ कमी करू. भारतात नोकऱ्या आणि उत्पन्नाचे संरक्षण करण्याचा सरकारला अधिकार आहे. जर ट्रम्प यांना आपल्या बाजारपेठेत प्रवेश करायचा असेल तर त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल.
शैक्षणिक : कोचिंग क्लास संस्कृती
– प्रा. डॉ. सुभाष राठोड शाळा-महाविद्यालये केवळ नावापुरतीच उरली असून, ‘क्लासेसमधूनच यश मिळते’ अशी चुकीची समजूत समाजमनात खोलवर रूजली आहे. हे भयंकर वास्तव आहे. आज भारतीय शिक्षणक्षेत्र एका गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे. शिक्षणाचे केंद्रीकरण शाळा व महाविद्यालयांच्या हातून निसटून खासगी कोचिंग क्लासेसकडे झुकत चालले आहे. खरं शिक्षण क्लासमध्येच मिळतं ही अपप्रवृत्ती पालक, विद्यार्थी आणि […] The post शैक्षणिक : कोचिंग क्लास संस्कृती appeared first on Dainik Prabhat .
दिल्ली वार्ता : ‘आप’वर नवं संकट!
– वंदना बर्वे दिल्ली महानगर पालिकेतील ‘आप’च्या तब्बल 15 नगरसेवकांनी एकाचवेळी राजीनामा देऊन दुसरा नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. एवढंच काय तर पक्षाचं नावही जाहीर केलं आहे. दिल्ली मनपात ‘आप’चे 113 नगरसेवक होते. यातील 15 जणांनी बंडखोरी केली. पंजाबमध्ये सरकार आणि दिल्लीत मुख्य विरोधी पक्षाची भूमिका बजावत असलेल्या पक्षातून 15 जणांनी पळ काढला […] The post दिल्ली वार्ता : ‘आप’वर नवं संकट! appeared first on Dainik Prabhat .
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची भूमिका जगाला समजावून सांगण्यासाठी भारतातील खासदारांची शिष्टमंडळे जागतिक दौरा करणार आहेत. राजनैतिक स्तरावर ही एक चांगली भूमिका असली आणि भारताची बाजू जगाला पटवून देण्यासाठी एक चांगली रणनीती असली, तरी या निमित्ताने भारतीय राजकीय पटलावर जे राजकारण सुरू झाले आहे त्याचा विचारही करावा लागणार […] The post अग्रलेख : अशिष्ट राजकारण appeared first on Dainik Prabhat .
Pimpri : भक्त निवास बुकींगच्या नावाखाली सव्वासात लाखांची फसवणूक
पिंपरी : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे संत श्री गजानन महाराज भक्त निवासात रूम बुक करण्याच्या बहाण्याने ७ लाख २२ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना देहूरोड येथे २७ ते २९ एप्रिल दरम्यान घडली. राहूल अशोकराव पाठक (वय ४१, रा. लेखा फार्मजवळ, देहूरोड, पुणे) यांनी शुक्रवारी (दि. १६) याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद […] The post Pimpri : भक्त निवास बुकींगच्या नावाखाली सव्वासात लाखांची फसवणूक appeared first on Dainik Prabhat .
Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे
पिंपळे गुरव : सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून वारंवार होणार्या वीज पुरवठा खंडिततेमुळे गंभीर प्रकारची अडचण निर्माण झाली असून, रुग्णांवर होणार्या उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. तपासण्या, शस्त्रक्रिया, डायलेसिससारख्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवा यामुळे खोळंबत असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यापासून दर दोन दिवसांनी रुग्णालयाचा 5 […] The post Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे appeared first on Dainik Prabhat .
Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले
पुणे : वातावरणातील उष्णतेमुळे आंब्याासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने राज्यासह परराज्यातून आंब्यांची आवक वाढली आहे. परिणामी गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात मोठ्या प्रमाणात आंबा दिसू लागला आहे. आंब्याचे दरही मोठ्या प्रमाणात खाली आल्याने खरेदीदारांकडून आंब्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. परिणामी, अन्य फळांच्या खरेदीकडे खरेदीदारांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. शेतकरी वर्गाकडून लहान, तसेच कच्च्या लिंबाची […] The post Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले appeared first on Dainik Prabhat .
Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर
पिंपरी : लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभाग, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना तिसर्या टर्ममध्ये संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील दोन टर्ममध्ये आठ वेळा संसदरत्न, एकदा महासंसदरत्न, एकदा संसद विशिष्टरत्न पुरस्काराने बारणे यांना सन्मानित करण्यात आले आहे. हे केवळ मावळच्या जनतेमुळे […] The post Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर appeared first on Dainik Prabhat .
Pune District: आंतरराष्ट्रीय बेसबॉल कप स्पर्धेसाठी इंदापूरचा अक्षय मोरे रवाना
इंदापूर : वर्ल्ड बेसबॉल सॉफ्ट बॉल कॉन्फेडरेशन, बेस बॉल फेडरेशन ऑफ एशिया आणि इराण बेसबॉल फेडरेशनच्या वतीने दि. 15 ते 21 मे दरम्यान इराण देशातील कराज येथे सुरू झालेल्या, सोळाव्या आंतरराष्ट्रीय वेस्ट एशिया बेसबॉल कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय बेसबॉल संघात इंदापूर येथील कु. अक्षय बाळासाहेब मोरे याची निवड झाली असून, तो या स्पर्धेसाठी इराण येथे […] The post Pune District: आंतरराष्ट्रीय बेसबॉल कप स्पर्धेसाठी इंदापूरचा अक्षय मोरे रवाना appeared first on Dainik Prabhat .
Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील पशुपालकांनी पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल परंडवाल यांनी केले आहे. यासाठी पशुपालकांनी १ जून २०२५ पर्यंत https://ah.mahabms.com या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. पशुसंवर्धन विभागामार्फत २०२५-२६ या वर्षासाठी विविध योजनांअंतर्गत अनुदान […] The post Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा appeared first on Dainik Prabhat .
Satara : कास तलाव परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
बामणोली : पावसाळ्यात येणारी रंगबेरंगी फुले, मन मोहून टाकणारा निसर्ग आणि जोडीला खळखळणारा कास तलाव. कधीतरी निसर्गाच्या सानिध्यात जावून शरीराला, मनाला विसावा देत पुन्हा चॉर्ज होण्यासाठी सातारकरांसह राज्यभरातील पर्यटकांचे हक्काचे स्थान असलेला कास तलाव हा आता तेथील सुरक्षेच्या अभावामुळे अनेकांच्या मृत्यूचे कारणही ठरु लागला आहे. शनिवारी कास तलावात बुडून एका छोट्या मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर […] The post Satara : कास तलाव परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर appeared first on Dainik Prabhat .
Pune District: कर्जमाफीचं आश्वासन हवेत विरलं
वडापुरी : खरिपाची तयारी सुरू झाली आहे. आभाळावर ढग दिसू लागले, पण मनात अजूनही चिंता गडद आहे. कारण मशागत झाली खरी, पण बियाणं, खते आणि पैसा नाही. वडापुरीसह इंदापूर, बारामती, दौंड परिसरातील शेतकरी पुन्हा एका कठीण आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. 2023 मध्ये अत्यल्प पाऊस आणि त्यानंतरच्या वर्षी मिळालेलं पीक भावाअभावी वाया गेलं. मागील दोन […] The post Pune District: कर्जमाफीचं आश्वासन हवेत विरलं appeared first on Dainik Prabhat .
Pune District: उजनीकाठच्यांनी किती दिवस पुणेकरांचे मलमूत्र प्यायचे
पळसदेव : सरकारच्या निष्काळजीपणाने पुणे व पिंपरी चिंचवड, कुरकुंभ परिसरातील एमआयडीसी व शहरातील सांडपाणी व्यवस्थित प्रक्रिया ना करता थेट नदीपात्रात सोडल्याने उजनी काठावरील नागरीकांना तसेच सोलापूर, उस्मानाबाद येथील नागरिकांना पुणेकरांचे मलमूत्र व रसायनयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे देशाच्या शाश्वत विकासाचे स्वप्न पाहून नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. या दूषित पाण्यामुळे अनेक […] The post Pune District: उजनीकाठच्यांनी किती दिवस पुणेकरांचे मलमूत्र प्यायचे appeared first on Dainik Prabhat .
Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू
पुणे : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धसंघर्षात चीनने पाकला छुपी मदत केली असून, जवळपास 20 अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीची शस्त्रास्त्रे पाकला पुरवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चीनही पाकइतकाच आपला मोठा शत्रू आहे. आपल्या जवानांचे रक्त सांडण्यास चीनही तितकाच जबाबदार असून, भविष्यात ड्रॅगनलाही धडा शिकवायला हवा, असे स्पष्ट मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी येथे व्यक्त केले. […] The post Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू appeared first on Dainik Prabhat .
Pune District: दूधधंदा तोट्यात; शेतकरी पुन्हा संकटात!
लोणी देवकर : गोठ्यात 25 गायी, दिवसाचे दोन वेळा दूध काढतो.. चारा, औषधं, मजुरी यावर खर्च होतो… पण दुधाच्या भावाने सगळं बुडवतंय! शेवटी हाती काय राहतंय? फक्त शेण! हे शब्द आहेत, महादेव शेंडगे या लोणी देवकर गावातील अनुभवी दूध उत्पादक शेतकर्यांचे.. जे गेली 35 वर्षे या व्यवसायात आहेत. गायीचं दूध शुद्ध असतं; पण त्याला मिळणारा […] The post Pune District: दूधधंदा तोट्यात; शेतकरी पुन्हा संकटात! appeared first on Dainik Prabhat .
Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही
पुणे : भाषा हाच समाजव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे. दैनंदिन जीवनात भाषेला मोठे स्थान आहे. भाषा ही त्रिकालदर्शी असून, तिची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. भाषेची नाळ आजच्या संस्कृतीशी जोडली आहे. भाषा व संस्कृतीचे जतन व्हावे, असे मत ज्येष्ठ लेखिका डॉ. नीलिमा गुंडी यांनी व्यक्त केले. आजच्या काळात लोकांनी भाषेचे बोट सोडले असून, ते योग्य नसल्याची खंतही […] The post Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही appeared first on Dainik Prabhat .
Pune District : स्वच्छ, हरित, सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा
आळंदी : पालखी सोहळ्यात वारकर्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह मागील पालखी सोहळ्याप्रमाणे सुरक्षित, अपघात मुक्त, स्वच्छ आणि हरित वारी संपन्न करण्यासाठी विभागातील सर्व अधिकार्यांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आषाढी वारी पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद […] The post Pune District : स्वच्छ, हरित, सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा appeared first on Dainik Prabhat .
Pune District: खडकवासला कालव्याचे आवर्तन बंद
कळस : खडकवासला कालव्याद्वारे सोडण्यात आलेले आवर्तन इंदापूर तालुक्यात पोहचते ना पोहोचते तोवरच अचानक बंद करण्यात आल्यामुळे तालुक्याच्या शेकडो एकर शेतीला धोका निर्माण झाला आहे. येथील लाभधारक शेतकर्यांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे. इंदापूर तालुक्यातील शेतकरी आज पाण्याविना होरपळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. एरव्ही हवेली, बारामती, दौंड या तालुक्यांत मुबलक प्रमाणात पाणी […] The post Pune District: खडकवासला कालव्याचे आवर्तन बंद appeared first on Dainik Prabhat .
Pune : जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया सुरु
पुणे : मागील चार वर्षांपूर्वी रखडलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची लेखनिक पदाची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. २०२१ मध्ये ३५६ लेखनिक पदासाठी बॅंकेने अर्ज मागविले होते. त्यावेळी तब्बल ३२ हजारांपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ज्या टप्यावर ही प्रक्रिया स्थगित काण्यात आली होती, तेथून पुढे ही प्रक्रिया आता राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या […] The post Pune : जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया सुरु appeared first on Dainik Prabhat .
Pune : पुण्यातील पंधरा प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीने एकत्रित लढवाव्यात, अशी आपल्या पक्षाची भूमिका आहे. पुणे महापालिका निवडणुकीत किमान १५ प्रभागात आपल्या पक्षाला उमेदवारी मिळावी. संपूर्ण पाच वर्षासाठी पक्षाला उपमहापौरपद मिळावे आणि मागास प्रवर्गाचे आरक्षण आल्यास महापौर पद मिळावे, अशा आपल्या मागण्या आहेत, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी […] The post Pune : पुण्यातील पंधरा प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी appeared first on Dainik Prabhat .
Pimpri : हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात : केशरचा हंगाम सुरू
पिंपरी : आंबा बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून, केशरचा हंगाम सुरू झाला आहे. हापूस शेवटच्या टप्प्यात असून, दर कमी झाले आहेत. मागील आठवडाभरापासून जिल्हाभरात वादळी वार्याची परिस्थिती असली तरी आंबा मार्केट चांगलेच सजलेले आहे. सध्या शहरातील आंबे बाजारात विविध प्रकारच्या आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल 20 ते 30 रुपयांनी […] The post Pimpri : हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात : केशरचा हंगाम सुरू appeared first on Dainik Prabhat .
Pune : शेततळे योजनचे अनुदान १ लाख करण्याचा विचार
पुणे : राज्यात पूर्वी मागेल त्याला शेततळे योजनेत ५० हजार अनुदान दिले जात असे. ते वाढवून ७५ हजार केले. आता त्यात वाढ करण्याची मागणी असून ते १ लाख रुपयांपर्यंत कसे वाढविता येईल यावर विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे, असे आदेशही […] The post Pune : शेततळे योजनचे अनुदान १ लाख करण्याचा विचार appeared first on Dainik Prabhat .
Pune : कोथिंबिर महाग, मेथी स्वस्त; मेथीची आवक दुपटीने वाढली
पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात कोथिंबिरीची आवक घटली आहे. जिल्ह्यासह विभागात पावसाने हजेरी लावल्यामुळे ही आवक घटली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या भावात जुडीमागे ५ रुपयांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दर्जानुसार जुडीला १५ ते २० रुपये भाव मिळत आहे, तर किरकोळ बाजारात २० ते ३० रुपयांनी विक्री होत आहे. याबरोबरच अंबाडी आणि चुकाच्या […] The post Pune : कोथिंबिर महाग, मेथी स्वस्त; मेथीची आवक दुपटीने वाढली appeared first on Dainik Prabhat .
सर्व पक्षीय शिष्टमंडळ, भारताची एकजूट
पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय महिलांच्या कपाळाचे कुंकू पुसल्याबद्दल त्यांना अद्दल घडवण्यासाठी मोदींनी पाकविरुद्ध जोरदार युद्धसदृष्य हालचाली केल्या आणि शंभर दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मुरीदके, बहावलपूर आदी ठिकाणच्या दहशतवादी अड्ड्यांवर लष्कराने जोरदार हल्ले चढवून दहशतवाद्यांना ठार केले. त्यातच कंदाहार येथील विमान अपहरण प्रकरणात हवा असलेला दहशतवादी अझर मसूद याचे कुटुंबीय मुरीदके येथील हल्ल्यात ठार झाले. लष्कराच्या हल्ल्यात पाकचे दहशतवादी आणि पाकचे सैनिकही ठार झाले आणि पाकला चांगलाच धडा शिकवला गेला. पाकने शरणागती पत्करली आणि पाक दाती तृण धरून शरण आला. पण मोदी यांनी आता पाकला राजनैतिक पातळीवरही नामोहरम करण्याचे धोरण स्वीकारले आहे आणि त्यांनी हा राजनैतिक सर्जिकल स्ट्राईक अत्यंत जोरदार केला आहे.पाकचे प्रथम पाणी बंद केले, नंतर पाकला जाणारी निर्यात थांबवली आणि आता तर तुर्कस्थानला धडा शिकवला आहे कारण त्याने पाकला मदत केली याचे प्रायश्चित्त त्याला देण्यात आले आहे. त्याच्याशी सर्व प्रकारचे संबंध तोडून आणि त्याच्याशी असलेले आर्थिक संबंध तोडून पण पाकसाठी हे पुरेसे नाही, कारण पाक कधीही आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला काही करू शकत नसला तरीही भारताला त्रास देत रहाणार हे ओळखून मोदी यांनी आता हा राजनैतिक ऑफेन्सिव्ह म्हणजे पाकचे सर्वकंष पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोदी यांचा मास्टर स्ट्रोक आहे. या सीझफायरमध्ये भारत ड्रोन्स किंवा क्षेपणास्त्रे डागणार नाही, तर पाकला पुरता एक्सपोझ करणार आहे. भारत आता सात उच्च शक्तीशाली पक्षांची शिष्टमंडळे जगातील विविध प्रमुख देशांना पाठवणार आहे आणि त्यांना हे पटवून देणार आहे की भारत हाच पाक पुरस्कृत दहशतवादाचा शिकार झालेला देश आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व चार एनडीएचे खासदार आणि तीन विरोधी पक्षांचे खासदार करणार आहेत. हे शिष्टमंडळ जगातील प्रमुख आंतरराष्ट्रीय राजधान्यांमध्ये जाऊन सीमावर्ती दहशतवादाविरोधात प्रबळ सहमती तयार करण्याचा प्रयत्न करेल. या डावपेचात्मक चालीमागे भारताची राष्ट्रीय ऐक्य जगासमोर एकसंधपणे आणण्याचा हेतू तर आहेच पण असा एक संदेश जगभर देण्याचा प्रयत्न आहे की, भारत यापुढे कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन करणार नाही आणि जागतिक नेत्यांनी याची दखल घ्यावी. यामुळे जागतिक नेते भारताच्या या कृत्याची दखल घेऊन पाकविरोधात ही भारताची पुढील कृती विचारात घेतील आणि पाकच्या कोणत्याही दुस्साहसाला पाठिंबा देणार नाहीत.सर्व पक्षीय शिष्टमंडळ भारताची राष्ट्रीय सहमती आणि दहशतवादाला कोणत्याही स्वरूपात मुकाबला करण्याचे भारताचे धोरण जगासमोर आणतील. दहशतवाद कोणत्याही स्वरूपातील आणि आविष्कारातील हा भारतासाठी अस्वीकारार्ह आहे हे पटवण्याचा हे नेते करतील. देशाचा जो संदेश आहे की, कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन करणार नाही हा संदेश जगाला देतील. दुसरे म्हणजे देशांतर्गत लोकांना भारताच्या या कृतीत सर्व पक्ष सहभागी आहेत हा एक मोठा संदेश देण्याचा प्रयत्न मोदी सरकारचा आहे. हा अतिशय स्तुत्य प्रयत्न आहे. कारण विरोधी पक्षांकडून सरकारवर जी संभाव्य टीका होणार आहे ती आपोआपच खाली बसेल आणि सरकारविरोधात आक्षेप घेणाऱ्यांना परस्परच उत्तर मिळेल. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीयांची सूडाची इच्छा काही अंशी पूर्ण झाली आहे पण भारतातील काही ‘आस्तिनके साप’ आहेत त्यांची वळवळ या निमित्ताने समोर आली होती. ती आता थंड होणार आहे. त्यातल्या त्यात अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असा जो आरोप मोदी सरकारवर केला जातो तो धुऊन काढण्याचा सरकारचा निर्धार आहे आणि तो या कृतीने बराचसा साध्य होणार आहे. या पूर्वीही भारताने असाच प्रयोग केला होता आणि भारतातील राजकीय पक्ष संकटाच्या समयी एक होतात असा जो संदेश गेला होता त्याला पुष्टी मिळाली आहे.या आधी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी जिनिव्हाला पाठवण्यासाठी शिष्टमंडळाच्या नेतेपदी तत्कालीन विरोधी पक्ष नेते अटलबिहारी वाजपेयी यांची निवड केली होती. पाकने आणलेल्या ठरावावर भारताची भूमिका प्रबळपणे मांडण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात भारताची भूमिका अधिक प्रबळ करण्यासाठी १९९४ मध्ये हे शिष्टमंडळ जिनिव्हाला गेले होते. या शिष्टमंडळात तेव्हाचे काश्मीरचे मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला याचे वडील, सलमान खुर्शिद आणि मनमोहन सिंग तसेच ई अहमद यांचा समावेश केला होता. तोच संदेश मोदी सरकारने देण्याचा प्रयत्न केला आहे आणि यामुळे या शिष्टमंडळात शशी थरूर, रवीशंकर प्रसाद, संजय कुमार झा, वैजयंत पांडा, कनिमोझ, सुप्रिया सुळे आदींचा समावेश करणार आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी कॉंग्रेसचे शशी थरूर यांची निवड झाली आणि त्यामुळे राहुल गांधी याचा पोटशूळ उठला.कारण काँग्रेसने मोदी सरकारच्या प्रत्येक निर्णयाला विरोध केला पाहिजे असे त्यांचे धोरण आहे, पण राहुल यांचे हे धोरण थरूर असोत की काँग्रेसला फारसे पसंत नाही, त्यामुळे थरूर हे शिष्टमंडळात सामील झाले आणि त्यांनी नेतृत्व करण्याचे मान्य केले आहे. पण ते असो. अशा संकट समयी तरी आपसतील मतभेद समोर आणू नयेत असे शिष्टाचार सांगतो. पण काँग्रेस आणि त्यापेक्षाही पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या राहुल यांना ते मान्य नाही. पण किरण रिजिजू म्हणाले ते या क्षणी महत्वाचे आहे. ते म्हणजे संकट समयी आम्ही एकजूट आहोत आणि हे जगाला दाखवण्याची हीच अत्यंत योग्य वेळ आहे. दहशतवादाबद्द्दल शून्य सहिष्णुता असा संदेश घेऊन हे शिष्टमंडळ महत्त्वाच्या ठिकाणी फिरणार आहे आणि ही बाब सर्वात महत्त्वाची आहे. प्रमुख भागीदार राष्ट्रांना भेट आणि भारताच्या राष्ट्रीय एक्याचे प्रतिबिंब मतभेदांच्या पलीकडे जाऊन आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे. अशा अवघड समयी भारत एकजूट आहे हे जगाला दाखवणे जास्त महत्त्वाचे आहे.
भारताचा तुर्कस्तानवर बहिष्काराचा बॉम्ब
उमेश कुलकर्णीऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला पाठिंबा देण्याचा निर्णय तुर्कस्तानने घेतला आणि त्या देशाला आता भारताशी वैराची भूमिका घेण्याची किंमत चुकवावी लागत आहे. तुर्कस्तानला जाणारे पर्यटकांनी धडाधड आपापले दौरे आणि फ्लाईट्स रद्द केले आहेत आणि तुर्कस्तानशी भारताचा जो काही आर्थिक व्यवहार होता तोही भारताने रद्द केला आहे. कारण तुर्कस्तानने पाकिस्तानला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्याची शिक्षा त्याला आता भोगावी लागत आहे. इकडे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने तुर्कस्तानशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले आहेत आणि त्यात तुर्की विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्या आणि इतर अनेक सवलतींवर परिणाम होणार आहे, तर तुर्कस्तानशी असलेले आर्थिक संबंध भारताने गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेही त्याच्याशी तेवढे आर्थिक संबंध नव्हतेच. पण तुर्कस्तानला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत कमालीची घट आली आहे. हा तुर्कस्तानच्या अर्थव्यवस्थेला फार मोठा धक्का आहे. वास्तविक तुर्कस्तान हा केंमाल पाशाचा देश. त्या देशाने सर्वप्रथम इस्लामी जगतात आधुनिकतेचे वारे खेळवले, त्यामुळे त्याचे पूर्वी आपल्या सरकारला किती कौतुक होते. अर्थात ही गोष्ट आहे ती स्वातंत्र्यपूर्वीच्या आधीची. त्यानंतर मात्र तुर्कस्तान हा कधी इस्लामी दहशतवाद्यांच्या जाळ्यात फसला आणि त्यात वाहवत गेला हे कुणालाच समजले नाही. भारत आणि तुर्कस्तान यांच्यातील संबंधांचा खरा फटका बसणार आहे तो तुर्कीश सफरचंदांना. ही देशाची मोठी अर्थव्यवस्था आहे. पण आता भारताने तुर्कस्तानशी व्यापार तोडल्याचा जोरदार फटका त्यांना बसला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर तुर्कस्तानने पाकिस्तानाला मोठ्या प्रमाणात ड्रोन्सची मदत केली होती आणि त्याची शिक्षा त्यांना आता भारताकडून दिली जात आहे. हा संघर्ष नव्हता तेव्हाही भारत आणि तुर्कस्तान या दोन देशांत म्हणजे वर्षे २०२५ मध्ये व्यापार असा फारसा नव्हताच. उभय देशांतील व्यापारात महत्त्वपूर्ण घट आली होती आणि आता त्यात आणखी घट होणार आहे. तुर्कीला भारताची निर्यात होते ती वार्षिक ५.२१ अब्ज डॉलर्सची ही होती एप्रिल ते फेब्रुवारी मध्याला. त्यात आता जवळपास १५ टक्के कपात झाली आहे. हा धक्का तुर्कीला सहन होणारा नाही. नवी दिल्लीचा व्यापाराचा अधिशेष वर्ष २५ मध्ये होता तो जवळपास २.३७ अब्ज डॉलर्स इतका. अंकाराचा भारताशी निर्यातीचा व्यापार केवळ १ते ५ टक्के आहे, ही यातील भारतासाठी सुखद बाब आहे. भारताकडून अभियांत्रिकी माल, त्यानंतर ऑर्गेनिक आणि इनॉर्गेनिक रसायने आणि इलेक्ट्रॉनिक माल अंकाराला (तुर्कस्तानची राजधानी) निर्यात होतो. त्यानंतर ड्रग्ज, पेट्रोलियम पदार्थ आणि औषधे यांचा क्रमांक लागतो. आता ही सारीच निर्यात खाली आली आहे. भारत ज्या वस्तू तुर्कस्तानकडून आयात करतो त्यात प्रमुख आहेत त्या मार्बल म्हणजे संगमरवर, सोने आणि भाज्या आणि सिमेंट तसेच चुनखडी यांची आयात केली जाते.आता ही आयात निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. त्यात तुर्कस्तानेच जास्त नुकसान झाले आहे. एका वृत्तपत्र बातमीनुसार, भारतातील सफरचंद उत्पादकांनी कृषी मंत्री शिवराज चौहान यांच्याशी संपर्क साधला असून त्यांना तुर्कस्तानकडून सफरचंद आयात थांबवावी अशी विनंती केली आहे. त्यानुसार भारताने जर पाऊल उचलले, तर तुर्कस्तानची काही खैर नाही. भारत वार्षिक ३ लाख ते पाच लाख टन सफरचंदांची आयात करतो. आता ही आयात भारताने थांबवली आहे. त्यामुळे तुर्कस्तानचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्याचा मोठा फटका तुर्कस्तानलाच नव्हे, तर सबंध त्या प्रदेशाला बसणार आहे. अर्थात तुर्कस्तानशी सर्व प्रकारचा व्यापार थांबवण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. तसे झाले तर तुर्कस्तानच्या साऱ्या नाड्या आवळल्या जातील आणि पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशाना असाच धडा शिकवला पाहिजे ही भावना प्रबळ आहे. तिचा आदर सरकारही करते आहे हे विशेष आहे. तुर्कीश उत्पादनांना मार्केट अक्सेस नाकारणे याचा अर्थ स्पष्ट आहे. कारण भारताची बाजारपेठ मोठी आहे आणि त्यात तुर्की उत्पादनांचे नसणे यामुळे तुर्कस्तानला, तर धोका आहेच पण पाकिस्तानला मदत करणाऱ्या सर्व राष्ट्रांनाही हा गंभीर इशारा आहे. आर्थिक दबाव हा अहिंसाचारी पण अत्यंत प्रभावी इलाज आहे हे कित्येकदा सिद्ध झाले आहे. महात्मा गांधी यांनी हेच अस्त्र वापरून ब्रिटिशांना नामोहरम केले होते. त्याचीच भारत पुनरूक्ती करत आहे आणि तसे करण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे. भारत आणि तुर्की यांचा द्विपक्षीय व्यापारी करार आणि संधी आहे. पण तोही आता धोक्यात आला आहे. केवळ द्विक्षीय करार नव्हे, तर एकमेकांच्या गुंतवणुकाही धोक्यात आहेत. त्यामुळे तुर्कस्तानचे जास्त नुकसान आहे. त्यामुळे तुर्कस्तानने मूर्खपणा केला आणि त्याला आता पाकिस्तानला मदत करण्याची शिक्षा भोगावी लागत आहे. तुर्कस्तानकडून भारतात केली जाणारी एकूण थेट परकीय गुंतवणूक म्हणजे एफडीआय ही २२७.५ दशलक्ष इतकी आहे आणि भारताने तुर्कस्तानमध्ये गुंतवणूक केली आहे ती २०० अब्ज ऑगस्ट २००० ते मार्च २०२४ या कालावधीत. आता तीही संकटात आहे.तुर्कस्तान काश्मीर प्रश्नी पाकिस्तानला पाठिंबा देण्यात पुढे राहिला आणि आता त्याने, तर पाकिस्तानच्या नापाक इराद्यात त्याची साथ दिली आहे. त्यामुळे भारताने त्याला अद्दल घडवायचा पक्का निश्चय केला आहे आणि त्याचा परिणाम समोर दिसत आहे. भारतातून तुर्कीला जाऊ नका असे क्लॅरीयन कॉल्स दिले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे पर्यटकांनी तुर्कीची पर्यटन व्यवस्था मोडीत काढण्याची व्यवस्था केली आहे. तुर्कस्तान आणि अझरबैजान भारतीय पर्यटकांची अतोनात गर्दी होत असे. आता त्यात जबरदस्त घट आली आहे. अर्थात त्याची आकडेवारी अजून हाती आली नाही, पण तुर्कस्तानला जाणाऱ्या फ्लाईट्स आणि बाकीच्या टूर्स पॅकेजेस रद्द करण्यात आल्यावर त्याची कल्पना येऊ शकते. पाकिस्तान तर भिकारी देश आहे. तिथून कोण पैसे खर्च करून तुर्कस्तानला जाणार, पण भारतासारखा विकसित देशांच्या रांगेत जाऊ पहाणारा देशातून आता पर्यटक तुर्कस्तानला जात नाहीत याचे तुर्कीने आत्मपरिक्षण केले पाहिजे. पण पाकिस्तानच्या नादी लागून त्या देशाने भारतासारखा शक्तीशाली देश गमावला आहे आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे. इतकेच नव्हे तर भारताने तुर्कस्तानची विमान कंपनी सेलेबी अनेक विमानळांवर राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देऊन मंजुरी काढून घेतली आहे. त्यामुळे तुर्कीचे नुकसान तर अतोनात झाले आहे. दिल्ली, बंगळूरु, हैदराबाद आदी प्रमुख विमानतळांवर सेलेबी आपली विमाने नेत होती. आता ती थांबवण्यात आली आहे. ही भारत सरकारची जबरदस्त चाल आहे आणि यात तुर्कस्तानचे कंबरडे मोडणार आहे. अझरबैजान आणि भारत यांच्यातील प्रवासफेऱ्या थांबवण्यात आल्या हा तुर्कस्तानला फार मोठा धक्का आहे. यातून किती वर्षे तुर्कस्तानला सावरायला लागतील याचा नेम नाही. मोदी यांचा हा सर्जिकल स्ट्राईक जबरदस्त आहे आणि त्याचे परिणाम तुर्कस्तान भोगत आहे.
बेस्टला पुनर्वैभव प्राप्त होण्याचे संकेत
मुंबई डॉट कॉम : अल्पेश म्हात्रेसातत्याने तोट्याचा सामना करावा लागणाऱ्या बेस्टला वाचवण्यासाठी अखेर नारायण राणे यांनाच पुढाकार घ्यावा लागला. हे एक प्रकारे बरेच झाले. नारायण राणे यांनी आतापर्यंत बेस्ट समिती अध्यक्षपद, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी अनेक पदे आतापर्यंत भूषविली आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठीच बेस्टच्या समर्थ कामगार संघटनेचे शिष्ट मंडळ यांनी नारायण राणे यांच्यासोबत बेस्टचे महाव्यवस्थापक यांची महिनाभरापूर्वी भेट घेतली. यात बेस्टच्या अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली त्यावर बेस्ट महाव्यवस्थापकांनी सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, त्यामुळे बेस्टच्या लाखो कामगारांना तूर्तास दिलासा मिळाला असून लवकरच बेस्ट या आर्थिक संकटातून बाहेर पडेल यावर कर्मचाऱ्यांचा विश्वास आहे.बेस्टला तोट्यातून बाहेर काढायचे असेल तर काही गोष्ट करणे आवश्यक आहे जसे की ज्या गोष्टींवर कार्यवाही करणे वर्षानुवर्षे शक्य झाले नाही अशा गोष्टी मार्गी लावणे ज्यामुळे बेस्ट तोट्यातून बाहेर येऊ शकेल असे उपाय करणे शक्य आहे. जसा बेस्टचा क अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे ही गोष्ट बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. मुंबई महापालिकेने हा प्रस्ताव संमत करून तो सरकारच्या नगर विकास खात्याकडे पाठवला असल्याचे म्हटले जाते, मात्र तांत्रिकदृष्ट्याही गोष्ट शक्य नसल्याचे पालिका आयुक्त सांगतात. पाहिजे तर हवा तेवढा पैसा घ्या, मात्र एकत्र करण्याच्या वार्ता करू नका, असे पालिका आयुक्तच खासगीत सांगतात कारण तांत्रिकदृष्ट्या ते शक्य नाही. मात्र आता हा विषय बाजूला ठेवून बेस्टला आणखी मदत करता येईल का, तर सध्या तरी पालिका याबाबतीत हतबल झालेले दिसते. या अगोदरच १५००० ते १८००० करोड मुंबई महानगरपालिकेने बेस्टला दिलेली आहेत, मात्र बेस्टमधील वाढीव तोटा पाहता आणखी पैसे देणे शक्य नाही. नुकतीच मुंबई महानगरपालिकेने बेस्टला बस भाडेवाढ करण्याची अनुमती दिली, मात्र ही बस भाडेवाढ पाहता बेस्टला जास्तीत जास्त वर्षाला तीनशे ते साडेतीनशे करोड निधी मिळू शकेल. मात्र त्याच दरम्यान प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने बस भाडेवाढ किती प्रमाणात सफल झाली ते येणारा काळच ठरवेल असो ...दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मान्यताप्राप्त कामगार युनियनने बेस्ट प्रशासनाशी विषय केलेल्या कराराप्रमाणे बेस्टचा स्वमालकीचा बस ताफा हा ३३६७ इतका अबाधित राखणे हा होता. काही वर्षांपूर्वी बेस्टकडे ४५०० स्व मालकीच्या बस होत्या आज ही संख्या घटून ७००वर आलेली आहे, तर अडीच हजारहून जास्त बस या खाजगी कंत्राटदारांच्या झाल्या आहेत. बेस्टच्या बस चालकांवरती अथवा अन्य कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येऊ नये म्हणून कामगार संघटनांनी तत्कालीन पालिका आयुक्तांबरोबर हा करार केला होता त्यात ही अट ठेवली होती. त्यात मुंबई पालिकेने भंगारात जाणाऱ्या बस गाड्यांच्या खरेदीसाठी मुंबई महानगरपालिका अनुदान देईल असे सांगितले होते. बेस्टने या अटींवर खासगीकरणास मान्यता दिली होती. मात्र खाजगी बस गाड्या बेस्ट बसच्या ताफ्यात आल्या. मात्र स्वमालकीच्या बस गाड्या घेण्यास पालिकेने अनुदान न दिल्याने आजपर्यंत स्वमालकीच्या बस गाड्यांची संख्या ८०० वर आली आहे. त्यामुळे त्यावर काम करणारे बस चालक व अभियांत्रिकी कर्मचारी रिक्त झाले आहेत, तर दुसरीकडे अडीच हजार हून जास्त बस गाड्या कंत्राटदारांच्या आल्याने व येणाऱ्या काळातही ५००० हून अधिक बस गाड्या या कंत्राटदाराच्या होणार असल्याने बेस्ट स्वमालकीचा बसगाड्या घेणार नाही हे आता ठळकपणे दिसत आहे.आणखी एक विषय यावेळी मांडण्यात आला तो म्हणजे कर्मचाऱ्यांना देय असलेला कोविड काळातील कोविड भत्ता प्रदान करणे. यातील खरी गोम म्हणजे राज्य सरकारकडून ७६ कोटींचा कोविड भत्ता बेस्टकडे आलेला आहे. मात्र काही तांत्रिक कारणे पुढे करून बेस्ट अजूनही तो कर्मचाऱ्यांना देण्यास तयार नाही. कोरोना काळ हा सगळ्यांसाठीच खूप वाईट काळ होता इतर सर्व घटकातील कर्मचारी कामगारांनी घरी बसून काम केले, मात्र कोरोना काळात आघाडीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर पडूनच काम करणे भाग होते. त्यात आरोग्य सेविकांप्रमाणेच त्यांना नें आण करण्यासाठी रेल्वे बंद असल्याने बेस्टने महत्त्वाची कामगिरी त्याकाळी बजावली होती. बेस्ट बस सेवा ही कधी नव्हे ती थेट कर्जत कसारा खोपोली विरारपर्यंत धावली होती. त्यात कितीही हाल अपेष्टा सहन करून कर्मचाऱ्यांना काम करावे लागले. संध्याकाळी कर्जत-कसाराला पोहोचलेल्याला रात्रभर बस मध्ये झोपून काढावे लागले. त्यात कोरोनाची भीती होतीच. त्यातही काळजी घेतलेल्यांना ही कोरोना झाला. असंख्य कर्मचाऱ्यांना त्यात आपले प्राण गमवावे लागले. म्हणून राज्य सरकारने भत्ता म्हणून त्याकाळी कोरोना भत्ता दिला होता. मात्र आता तो ही रक्कम इतर ठिकाणी वळवल्याने कोरोना भत्ता कधी मिळणार याकडे साऱ्या कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. क्रमश :
मुंबई-ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला...!
महाराष्ट्रनामा : सुनील जावडेकरसर्वोच्च न्यायालयाने राज्यातील महापालिकांसह मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या चार महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्यातील वातावरण पालिका निवडणुकीसाठी हळूहळू तापायला सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नेत्यांपेक्षा देखील स्थानिक कार्यकर्त्यांसाठी आणि त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. जुलै २०२२ मध्ये शिवसेनेत उठाव करून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्याचप्रमाणे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी आगामी महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा त्याचप्रमाणे पंचायत समित्यांच्या निवडणुकादेखील अत्यंत महत्त्वपूर्ण तसेच प्रतिष्ठेच्या आहेत. आता स्थानिक महापालिका असेल, नगर परिषद असेल अथवा जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील या स्थानिक स्वराज्य संस्थांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा फडकणे ही सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यासाठी देखील एक मोठी अग्नी परीक्षा असणार आहे.महाराष्ट्रात भाजपा शिवसेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी यांच्या महायुतीचे सरकार राज्यात सत्तेवर आहे तर केंद्रामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांचे सरकार सत्तेत आहे. लोकसभा निवडणुकीचे तंत्र वेगळे असते त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीचे तंत्र देखील वेगळ्या असते. मात्र या दोन्हींपेक्षा महापालिका नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचे तंत्र हे गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने बदलले आहे आणि हा बदल हा प्रामुख्याने भाजपाने त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्या पाठोपाठ दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादीने निश्चितच विरोधी पक्षांपेक्षा अधिक सजगतेने आणि सक्षमपणे आत्मसात केलेला आहे. तथापि महायुतीची ताकद ही विरोधकांपेक्षा अनेक पटीने अनेक जिल्ह्यांमध्ये अधिक असली तरी देखील स्थानिक राजकारणाची गणिते ही स्थानिक पातळीवरील राजकीय आघाड्या छोट्या-छोट्या पक्षांशी होणाऱ्या युती तसेच अपक्षांचे प्राबल्य अशा प्रामुख्याने त्या शहरातील स्थानिक राजकीय स्थितीवर राजकीय पक्षांच्या यशाची अथवा अपयशाची गणिते ही अवलंबून असतात. सर्वात उल्लेखनीय म्हणजे स्थानिक निवडणुकांमध्ये मतदार हे प्रामुख्याने कोणत्याही एका विशिष्ट राजकीय पक्षापेक्षा त्यांच्या अधिक जवळचा उमेदवार कोण आहे याला अधिक प्राधान्य देत असतात हे यापूर्वीच्याही स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीच्या निकालांवरून वारंवार स्पष्ट झालेले आहे. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीबाबत जे भाष्य केले आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आनुषंगाने महत्त्वपूर्ण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणतात की, स्थानिक संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून लढवण्यावर आमचा भर असणार आहे. तथापि स्थानिक संस्थांच्या निवडणुका या खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे जे कार्यकर्ते पाच-पाच, दहा वर्षे स्थानिक पातळीवर पक्षाला यश मिळवून देण्यासाठी सक्रिय असतात अशा कार्यकर्त्यांना न्याय देता यावा म्हणून अपवादात्मक स्थितीमध्ये वेगळा निर्णय घ्यावा लागला तर तो देखील घेता येऊ शकतो. यावरून एक गोष्ट ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे ती म्हणजे ज्या महापालिकेमध्ये अथवा जिल्हा परिषदेमध्ये भाजपाकडे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असेल त्या महापालिकेसाठी भाजपा स्वतंत्र लढण्याचा विचार करू शकते. महायुतीमध्ये भाजपाचे स्वतंत्रपणे स्वबळावर काही महापालिकांमध्ये निवडणुकीला उभा राहिला तर अशा वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी समोर भाजपाशी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव पुढे येऊ शकतो.अर्थात राजकीय भाषेमध्ये जरी जेव्हा सत्ताधारी पक्षांमधील युती, आघाडीमधील मित्रपक्ष हे जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये परस्परांच्या विरोधात उभे ठाकतात तेव्हा त्यावेळी तेथे मैत्रीपूर्ण लढत हा गोंडस शब्द असला तरी प्रत्यक्षात स्थानिक पातळीवरचा संघर्ष हा अधिक जोरदारपणे होत असतो. त्यामुळे पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत व्यक्त केलेली भावना ही निश्चितच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ही काहीशी धक्कादायक आहे असेच म्हणावे लागेल. धक्कादायक हे यासाठी कारण राज्याच्या सत्तेची सर्व सूत्रे हे अखेरीस राज्याचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचे असतात त्या मुख्यमंत्र्यांकडेच सरकार यंत्रणेचे सर्व नियंत्रण असते.. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागणार आहे ती म्हणजे भाजपाने यापूर्वी शिवसेना एक संघ असताना स्थानिक पातळीवरच्या जागावाटपावरून बऱ्याच वेळा स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि निवडणुकीनंतर मग पुन्हा भाजपा आणि शिवसेना यांची युती होऊन महापालिकांमध्ये युतीमार्फत सत्ता चालवण्यात आलेली आहे. हे सांगण्याचे प्रमुख प्रयोजन म्हणजे जर भाजपाचे राजकीय नेतृत्व हे जागा वाटपामध्ये स्वतःच्या अटी शर्तीनुसार जर जागावाटप युतीमध्ये होत नसेल अशा वेळेला एकसंघ शिवसेनेच्या नेत्यांना स्थानिक पातळीवर बाजूला करून नवीन स्थानिक राजकीय समीकरणे निर्माण करण्यास धजावत असतील, तर मग आता तर एक संघ शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत आणि भाजपाबरोबर सत्तेत असलेले एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही दुभंगलेल्या शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत आहे अशा बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजपाचे नेते हे प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्याने राज्यात भाजपा अधिकाधिक कसा विस्तारेल याचीच काळजी अधिक घेतील हे ओघाने आलेच.भाजपची ही जर एकूणच निवडणुकीची रणनीती लक्षात घेतली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी जिथे ते महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार नाही अशा महापालिका अथवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची लढत ही मैत्रीपूर्ण पद्धतीने सत्तेतील मोठा भाऊ असलेल्या बलदंड भाजपा उमेदवारांसोबत होणारच आहे. मात्र त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने समोरचा प्रमुख प्रतिस्पर्धी असणार आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भवितव्याचा विचार करावयाचा झाला तर त्यांना राज्यातील सत्तेमध्ये त्यांचे असलेले स्थान अबाधित राखण्यासाठी आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील ६ महापालिका, नाशिक महापालिका अशा या किमान महापालिकांवर तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सत्तेचा झेंडा हा त्यांना कोणत्याही परिस्थितीत फडकवावाच लागणार आहे. त्यातही मुंबई महापालिका आणि ठाणे जिल्ह्यातील महापालिका या एकनाथ शिंदे यांच्या स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.त्याचप्रमाणे अद्याप तरी महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे यांच्या मनसेची कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट झालेली नाही. महायुती आणि महाआघाडी या दोन्ही प्रमुख प्रतिस्पर्धी राजकीय आघाड्यांमध्ये पक्षांची जी काही भाऊगर्दी झाली आहे आणि त्यामुळे या सर्वाचा परिणाम स्थानिक पातळीवरील उमेदवार निवडीमध्ये जो होणार आहे ते लक्षात घेता मनसे स्वतंत्रपणे लढते की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर युती करते अथवा दोन्ही शिवसेना तसेच दोन्ही राष्ट्रवादी यांना बाजूला सारून एकट्या भाजपबरोबर हात मिळवणी करते अशा विविध शक्यतांवर स्थानिक यश अपयशाची गणित अवलंबून आहेत. कारण शेवटी ही स्थानिक पातळीवरील निवडणुका आहे दोन पाच मतांनी देखील उमेदवार पडतात जिंकून येतात अशा अत्यंत कमालीच्या अस्थिर परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांची मनसे जर स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर आली तर त्याचा परिणाम हा ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर होऊ शकतो तसाच परिणाम तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर देखील होऊ शकतो हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळे मनसेच्या भूमिकेवरही राजकीय फायदे तोटे अवलंबून आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका, मीरा-भाईंदर महापालिका, उल्हासनगर महापालिका, नाशिक महापालिका, छत्रपती संभाजी नगर महापालिका आणि तसेच काही प्रमाणात पुणे महापालिका अशा महापालिकांमध्ये यश मिळणे हे त्यांच्यासाठी अत्यावश्यक आहे. जर उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा आपले नेतृत्व अधिक सरस आणि कर्तृत्ववान आहे हे जर का सिद्ध करायचे असेल, तर एकनाथ शिंदे यांना या सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे महापौर बसवावे लागणार आहेत तरच स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व टिकून राहणार आहे.अर्थात एकनाथ शिंदे हे देखील काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत. त्यांनी राज्यामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी आधीपासूनच सुरू केली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हाप्रमुख, जिल्हाध्यक्ष तसेच महत्त्वाचे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते हे त्यांनी निवडणुकीच्या पूर्वीच स्वतःच्या शिवसेनेकडे वळवले आहेत. त्यांचे हे इनकमिंग यापुढेही सुरूच राहणार आहे. स्थानिक निवडणुका जिंकण्याचा जो काही हातखंडा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे तेवढे कसब अद्याप तरी अन्य नेत्यांकडे देखील नाही हे देखील लक्षात घेतले पाहिजे. या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते तर एकनाथ शिंदे यांच्यापासून कोसो दूर आहेत. मात्र असे असले तरी देखील राजकारणात पडद्याआडून ज्या काही राजकीय हालचाली होत असतात त्या उलथापालथ करण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. आणि एकनाथ शिंदे यांना जो धोका आहे तो इथेच आहे एवढेच त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १९ मे, २०२५
पंचांगआज मिती वैशाख कृष्ण षष्ठी ०६.१४ पर्यंत नंतर सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग ब्रह्म, चंद्र राशी मकर, भारतीय सौर २९ वैशाख शके १९४७ म्हणजेच सोमवार दिनांक १९ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.०२, मुंबईचा सूर्यास्त ०७.०७, मुंबईचा चंद्रोदय ००.४७ उद्याची मुंबईचा चंद्रास्त ११.२४, राहू काळ ०७.४० ते ०९.१८, धनिष्ठानवकारंभ, सायंकाळी ०७.२९ नंतरदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : महत्त्वाच्या कामांना गती मिळेल.वृषभ : आनंदाचे वातावरण राहणार आहे.मिथुन : मानसिक उत्साह वाढेल.कर्क : कामे मार्गी लागतील.सिंह : हातातील कामे वेगाने पूर्ण कराल.कन्या : कौटुंबिक सुख मिळेल.तूळ : स्पर्धकांवर मात करता येईल.वृश्चिक : नावलौकिक मिळेल.धनू : प्रवासाचे योग आहेत.मकर : प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरेल.कुंभ : दिवस आनंदात जाईल.मीन : व्यवसायात नवीन बदल करू शकाल.
DC vs GT Gujarat Titans beat Delhi Capitals by 10 wickets : साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांच्यातील विक्रमी भागीदारीच्या जोरावर, गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा १० विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवत प्लेऑफमध्ये एन्ट्री मारली आहे. गुजरातच्या विजयसाह आरसीबी आणि पंजाब किंग्जही प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. आता चौथ्या स्थानासाठी तीन संघांत स्पर्धा आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना […] The post DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री appeared first on Dainik Prabhat .
पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर
इस्लामाबाद : पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार हे उद्या चीनच्या दौऱ्यावर जाणार असून ते चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. अफगाणिस्तानचे हंगामी परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तगी हे देखील दिनांक २० मे रोजी चीनच्या दौऱ्यावर जाणार असून याच काळात दार, वँग यी आणि मुत्तगी यांच्यात त्रिपक्षीय चर्चा होणार आहे. […] The post पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर appeared first on Dainik Prabhat .
KL Rahul Breaks Virat Kohli’s Record for Fastest 8000 T20 Runs : आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या केएल राहुलने एक नवा विक्रम रचला. तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ८००० धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. विराटने २४३ डावांमध्ये ही कामगिरी केली. पण आता केएल राहुलने २२४ […] The post DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय appeared first on Dainik Prabhat .
Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट
जम्मू : भारतीय सुरक्षा दलांनी रविवारी जम्मू-काश्मीरच्या पूॅंच जिल्ह्यात स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट केले. नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत असणाऱ्या विविध गावांमध्ये ती महत्वपूर्ण मोहीम राबवण्यात आली. भारत आणि पाकिस्तानमध्ये नुकताच संघर्ष झाला. त्यावेळी पाकिस्तानी लष्कराने एलओसी लगत भारतीय हद्दीत मारा केला. पाकिस्तानकडून झालेल्या कुरापतींवेळी एलओसी लगतच्या गावांमध्ये तोफगोळे डागण्यात आले. त्यातील काही स्फोटाविना […] The post Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट appeared first on Dainik Prabhat .
राज्यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी
नवी दिल्ली – देशातील 17 खासदारांना यंदाचा ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ जाहीर करण्यात आलाआहे. यंदा संसदरत्न पुरस्कारांसाठी महाराष्ट्राने बाजी मारली असून सुप्रिया सुळे, मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे यांच्यासह 7 खासदारांनी या यादीत स्थान पटकावले आहे. संसदेमध्ये उल्लेखनीय, सातत्यपूर्ण व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दरवर्षी ‘प्राइम पॉइंट फाउंडेशन’ या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो. संसदेत प्रश्न […] The post राज्यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी appeared first on Dainik Prabhat .
DC vs GT, IPL 2025: लोकेश राहुलचे जबरदस्त शतक, दिल्लीचे गुजरातला २०० धावांचे आव्हान
दिल्ली: केएल राहुलने ठोकलेल्या जबरदस्त शतकाच्या जोरावर आयपीएल २०२५मधील आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी २०० धावांचे आव्हान ठेवले आहे. दिल्लीकडून लोकेश राहुलने ११२ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या जोरावर दिल्लीला २० षटकांत ३ बाद १९९ धावा करता आल्या.
₹ 20 New Notes: चलनात येणार २० रुपयांच्या नवीन नोटा, रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय
मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच २० रुपयांच्या नव्या चलनी नोटा जारी करणार आहेत. आरबीआयने एका अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. आरबीआयने सांगितले की, २० रुपयांच्या नवीन नोटांवर महात्मा गांधी यांचीच प्रतिकृती असेल, फक्त या नोटांवर नवे गवर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल.भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच महात्मा गांधी मालिकेतील २० रुपयांच्या नव्या नोटा जारी करणार आहेत, ज्याचा रंग, आकार आणि डिझाईन पूर्वीसारखीच असेल. केवळ नेतृत्व बदलल्यानंतर आरबीआय वेळोवेळी चलनी नोटा बदलत असते, त्यामुळे ही एक नियमित प्रक्रिया आहे.निवेदनात आरबीआयने काय म्हंटले आहे?आरबीआयने म्हटले आहे की २० रुपयांच्या नोटांची रचना पूर्वीच्या २० रुपयांच्या नोटांसारखीच असेल. त्यावर फक्त नवीन राज्यपालांची स्वाक्षरी असेल. रिझर्व्ह बँकेने पूर्वी जारी केलेल्या ₹ 20 मूल्याच्या सर्व नोटा कायदेशीर चलन म्हणून चालू राहतील, असे या निवेदनात म्हटले आहे.
मुंबई : सर्वपक्षीय शिष्टमंडळे परदेशांत जाऊन काय करणार? ती शिष्टमंडळे एकप्रकारे देशाची भूमिका मांडण्याऐवजी केंद्र सरकारच्या चुकांचे समर्थक करणार आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी त्या शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन ठाकरेसेनेचे नेते संजय राऊत यांनी रविवारी केले.घाईघाईने सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवण्याची गरज नव्हती. परदेशांत आपले राजदूत आहेत. ते त्यांचे कार्य करत आहेत. इंडिया आघाडीतील घटक […] The post Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन appeared first on Dainik Prabhat .
Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट
Volodymyr Zelenskyy – युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की यांनी आज अमेरिका आणि युरोपातल्या नेत्यांची रोम येथे भेट घेतली. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून उद्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा होणार आहे. त्या चर्चेवर प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न झेलेन्स्की यांच्याकडून रोमधील चर्चेत केला गेला. नवीन पोप लिओ […] The post Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट appeared first on Dainik Prabhat .
Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांची घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट
Volodymyr Zelenskyy – युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की यांनी आज अमेरिका आणि युरोपातल्या नेत्यांची रोम येथे भेट घेतली. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून उद्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा होणार आहे. त्या चर्चेवर प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न झेलेन्स्की यांच्याकडून रोमधील चर्चेत केला गेला. नवीन पोप लिओ […] The post Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांची घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट appeared first on Dainik Prabhat .
DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
DC vs GT KL Rahul Scored a century against Gujarat Titans in IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाल्यानंतर स्टार फलंदाज केएल राहुल पूर्णपणे बदललेला दिसतोय. तो पूर्वीसारखाच सातत्याने धावा करत आहे, पण आता तो पुन्हा त्याच्या जुन्या शैलीत आक्रमक फलंदाजी करत आहे. अशा फलंदाजीचे त्याला मोठे बक्षीसही मिळाले. त्याने गुजरातविरुद्धच्या सामन्यात सलामीला येत नाबाद […] The post DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू appeared first on Dainik Prabhat .
सोलापूर: सोलापुर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील एका टेक्सटाईल कारखान्याला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये तब्बल 8 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेची दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देणार असल्याचे जाहीर केले आहे.अक्कलकोट एमआयडीसीतील कारखान्याला लागेल्या आगीच्या धुराने अख्ख्या सोलापूरवासीयांच्या डोळ्यात पाणी आले. या दुर्घटनेत 8 निष्पापांचा जीव गेला असून त्यात एक वर्षाच्या चिमुकल्याचा देखील समावेश आहे.मालकासह कुटुंबातील 5 आणि 3 कामगारांचा होरपळून मृत्यूनरसंहार ठरलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी टेक्सटाईल कारखान्याचे मालक उस्मान मनसुरी आपल्या कुटुंबीयांसोबत वरच्या मजल्यावरील मास्टर बेडरुममध्ये लपून बसले होते. त्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत कुटुंबातील 5 निष्पाप जणांचा आणि कंपनीतील तीन कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. शोधकार्य सुरु असतानच या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व आठही मृतदेह हे सर्व विच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले आहेत.मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांना 5 लाख रुपयांची मदत सोलापुरमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या 8 जणांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली.मृतांची नावेसेंट्रल इंडस्ट्रीचे मालक उस्मान मनसुरी (वय 87)अनस मनसुरी (वय 24)शीफा मनसुरी (वय24)युसूफ मनसुरी (वय 1.6)आयेशा बागबान (वय 38)मेहताब बागवान (वय 51)हिना बागवान (वय 35)सलमान बागवान (वय 38)
पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या
नवी दिल्ली – लष्कर-ए-तोयबाचा खतरनाक दहशतवादी रझाउल्ला निजामनी खालिद उर्फ अबू सैफुल्ला खालिद याची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केली. ती घटना पाकिस्तानच्या सिंध प्रांतात घडल्याची माहिती दिल्लीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. भारतातील विविध दहशतवादी हल्ल्यांचा तो सूत्रधार होता. खालिदवर ३ बंदुकधाऱ्यांनी हल्ला केला. गोळीबारात गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रूग्णालयात पोहचण्याआधीच त्याचे […] The post पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या appeared first on Dainik Prabhat .
RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल
RR vs PBKS Vaibhav Suryavanshi and Arshdeep Singh : वैभव सूर्यवंशी नुकताच एक महिन्यापूर्वी १४ वर्षांचा झाला आहे. खरं तर, तो अजूनही लहान मुलगाच आहे. पण जेव्हा तो बॅट हातात घेऊन मैदानात उतरतो, तेव्हा त्याला लहान समजण्याची चूक कोणीही करू नये. आयपीएल २०२५ मध्ये त्याने अवघ्या काही सामन्यांत याचे अनेक पुरावे दिले आहेत. पण असं […] The post RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल appeared first on Dainik Prabhat .
Newasa News : बेकायदेशीर डीजे, लाउडस्पीकर आणि ड्रोनवर होणार कठोर कारवाई
नेवासा : नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी बेकायदेशीर लाउडस्पीकर, डीजे आणि ड्रोन उड्डाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. रविवारी (१८ मे २०२५) माध्यमांशी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्यांवर ध्वनी प्रदूषण कायदा २००० अंतर्गत कडक कारवाई करण्याचे स्पष्ट केले. खाडे म्हणाले, “ध्वनी प्रदूषणामुळे वृद्ध, लहान मुले, आजारी व्यक्ती आणि […] The post Newasa News : बेकायदेशीर डीजे, लाउडस्पीकर आणि ड्रोनवर होणार कठोर कारवाई appeared first on Dainik Prabhat .
मुंबईच्या नालासोपारामध्ये ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त, ५.६० कोटींचा मुद्देमाल जप्त
मुंबई : मुंबईच्या नालासोपारातील प्रगतिनगर परिसरातून तुळींज पोलिसांनी मेफेड्रोन ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. कारखाना चालविणाऱ्या नायजेरियन महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून पोलिसांनी ५ कोटी ६० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे नालासोपाऱ्यात ड्रग्ज विक्रीच नाही तर मोठ्या प्रमाणात ड्रग तयारही होत असल्याचे समोर आले. एका इमारतीमध्ये घरात हा कारखाना सापडल्याने पोलिसांनी कारवाई केली.मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील प्रगतिनगर परिसरातील अंशित प्लाझा या इमारतीच्या रूम नं. ४०५ येथे पोलिसांनी छापा टाकला असता पोलिसांना घरात ड्रग्जचा कारखाना सुरू असल्याचे आढळले. यावेळी आरोपी नायजेरियन महिला रिटा कुरेबेवाई (वय २६) हिला पोलिसांनी अटक केली.तिच्या घरातून मेफेड्रोन ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, ड्रग्ज बनवण्याचे साहित्य असा एकूण ५ कोटी ६० लाख ४० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिस पथकाने ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त केला. याप्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपी महिलेकडे भारतात वास्तव्य करण्यासाठी आवश्यक असलेला व्हिसा आढळलेला नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिस आयुक्तालयामधील नालासोपारा परिसरात नायजेरियन नागरिकांची संख्या मोठी आहे.
Satara News : पाटण-धक्का रस्ता रुंदीकरणास गती; सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम
कोयनानगर : पाटण ते धक्का या १३ किलोमीटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला गती मिळाली असून, सध्या एकाच बाजूचे काम प्राधान्याने सुरू आहे. यापैकी सुमारे ४ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. प्राधिकरणाने पावसाळ्यापूर्वी एका बाजूचे काम पूर्ण करण्याचे, तर दुसरी बाजू पावसाळ्यानंतर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता स्वप्नील […] The post Satara News : पाटण-धक्का रस्ता रुंदीकरणास गती; सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम appeared first on Dainik Prabhat .
Shirur News : कळसकरवाडी येथे भीषण अपघात ! शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
शिरूर : शिरूर तालुक्यातील तांदळी गावच्या हद्दीतील कळसकरवाडी येथे १ मे २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता झालेल्या भीषण अपघातात शेतकरी दिलीप दगडू शिंदे (वय ५०, रा. इनामगाव, ता. शिरूर) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीगोंदा येथील चालकाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी सतीश दिलीप शिंदे (वय ३८, रा. इनामगाव) यांच्या तक्रारीनुसार, दिलीप शिंदे […] The post Shirur News : कळसकरवाडी येथे भीषण अपघात ! शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
Accident News : जालन्यात ट्रक उलटून एकाचा मृत्यू
जालना – साकत घाटातील वळणावर रविवारी सकाळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी होवून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सुमित राठोड असे मृताचे नाव आहे. घटनेबाबत माहिती अशी, जालना जिल्ह्यातील चिखली येथून मका घेवून पुण्याकडे जात असलेला ट्रक रविवारी सकाळी आठ वाजता जामखेड जवळील साकत घाटामध्ये पलटी झाला. […] The post Accident News : जालन्यात ट्रक उलटून एकाचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
Shirur News : गुजरमळा, शिरूरमध्ये बांधकाम साहित्याची चोरी; पोलिसांकडून तपास सुरु
शिरूर : शिरूर शहरातील गुजरमळा परिसरात १५ मे २०२५ च्या रात्री ८ वाजल्यापासून १६ मे च्या सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत एका बांधकाम स्थळावरून ६५,००० रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली. यामुळे स्थानिक बांधकाम व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. फिर्यादी अमोल बाबाजी एरंडे (वय २९, कॉन्ट्रॅक्टर, रा. बाबुरावनगर, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या […] The post Shirur News : गुजरमळा, शिरूरमध्ये बांधकाम साहित्याची चोरी; पोलिसांकडून तपास सुरु appeared first on Dainik Prabhat .
Shirur News : मांडवगण फराटा येथे भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
शिरूर : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे 17 मे 2025 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मांडवगण फराटा ते वडगाव रासाई रस्त्यावर रोहीदास थोरात यांच्या घराजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. अपघातात सागर संभाजी कोळपे (वय २८, रा. मांडवगण फराटा) आणि यश सुधाकर भिसे (वय १२, सध्या रा. मांडवगण […] The post Shirur News : मांडवगण फराटा येथे भीषण अपघात; दोघांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
पालिका निवडणुकीसाठी भाजपाचा ‘मास्टर प्लॅन’
इच्छुक उमेदवारांची वाट खडतरपुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर पुणे पालिका निवडणुकीसाठी भाजपाने जय्यत तयारी सुरू केली आहे. अशातच, भाजपाचा मास्टर प्लॅन समोर आला आहे. तसेच लोकसभेचीच रणनीती महापालिका निवडणुकीत वापरण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षाचे जुने, अनुभवी आणि माजी नगरसेवक असलेले अनेक यंदाच्या निवडणुकीत डावलले जाण्याची शक्यता आहे. तसेच भाजपा नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याच्या अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पालिका निवडणुकीसाठी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी असल्याचे पाहावयला मिळत आहे. एका उमेदवारीसाठी चार ते पाच इच्छुक प्रत्येक ठिकाणी आहेत. त्यामुळे या इच्छुकांमधून योग्य उमेदवार निवडण्यासाठी भाजपाकडून विविध पातळ्यांवर सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी संस्थेची देखील नेमणूक करण्यात आली आहे.तसेच मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वेक्षण तीन स्तरावर करण्यात येणार आहे. केंद्रीय, प्रदेश पातळी आणि संघटनात्मक. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांना मोठ्या आव्हानांना सामोरे जाव लागणार आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने उमेदवारी निश्चित करण्यासाठी अशाच प्रकारची रणनीती आखण्यात आली होती. त्याचप्रमाणे आता हाच फॉर्म्युला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीदेखील वापरण्यात येणार आहे.निवडणुकांची जोरदार तयारीमहापालिकेच्या निवडणुका येत्या चार-पाच महिन्यांत होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुका या महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लढल्या जाणार की स्वबळाचा याचा ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. पण कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागले आहेत. दरम्यान नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, भाजपाचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना कामाला लागा, अशा सूचना दिली आहे. पालिका निवडणुकांची पार्टीने जोरात तयार केली पाहिजे, आपला महापौर महापालिकेत बसला पाहिजे अशा पद्धतीने कामाला लागा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.नव्या चेहऱ्यांना मिळणार संधीआगामी निडणुकीत भाजपामध्ये अंतर्गत धुसफूस आणि नाराजी उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण भाजपा नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या अनुभवी नेत्यांसाठी भाजपाची रणनीती डोकेदुखी ठरणार.स्वबळावर लढण्याचा नारा?स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढाव्यात, अशी मागणी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पुण्यात फॉर्म्युलादेखील सांगितला. सरसकट युती न करता ज्या ठिकाणी स्वाभाविक युती होऊ शकते त्या ठिकाणी युती करण्यात येणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.
विराट कोहलीला भारतरत्नाने सन्मानित केले पाहिजे- सुरेश रैना
बंगळूरू : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यावर सोशल मीडियावर अद्याप प्रतिक्रिया उमटत आहे. विराट कोहलीला सन्मानाने निवृत्ती मिळायला हवी होती, अशी नाराजी सर्वांनी व्यक्त केली. त्यातच विराट कोहलीला भारतरत्न मिळालायला हवा, अशी मागणी चेन्नईचा माजी खेळाडू सुरेश रैना याने केली आहे. सुरेश रैनाच्या वक्तव्यानंतर विराट कोहली आणि भारतरत्न सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैनाने विराट कोहलीला भारत रत्न देण्याची मागणी केली आहे. शनिवार(दि. १७) आयपीएलमधील आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान सुरेश रैनाने लाईव्ह टीव्हीवर चर्चेदरम्यान हा मुद्दा उपस्थित केला.कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीच्या घोषणेनंतर रैनाने त्याला सन्मानित करण्यासाठी हा सल्ला दिला आहे. सुरेश रैना म्हणाला की , 'विराट कोहलीने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्याने भारत आणि भारतीय क्रिकेटसाठी जे काही केले, त्यासाठी त्याला भारतरत्नाने सन्मानित केले पाहिजे. भारत सरकारने त्याला हा सर्वोच्च सन्मान द्यावा.'भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहलीने १२ मे रोजी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आयपीएल सुरू असतानाच विराट कोहलीने इन्स्टाग्राम पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली. किंग कोहलीला मैदानावर शानदार निरोप मिळेल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. परंतु त्याच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. विराट कोहलीला भारतरत्न मिळणार की नाही, हे येत्या काळात स्पष्ट होईल. कोहलीच्या क्रिकेटमधील योगदानाची दखल घेत सरकार ही मागणी कितपत गांभीर्याने घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोहलीच्या चाहत्यांमध्येही या मागणीला पाठिंबा मिळत आहे. सोशल मीडियावर विराट कोहलीला भारतरत्न देण्यात यावा, या मागणीने जोर धरला आहे.भारतीय क्रिकेट इतिहासात आतापर्यंत फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला भारत रत्न मिळाला आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने सचिनला भारत रत्न देण्याची शिफारस केली होती आणि तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी हा सन्मान प्रदान केला. विशेष म्हणजे, खेळाडूंना भारत रत्न देण्याचा कोणताही नियम त्यावेळी नव्हता. सचिनसाठीच प्रथम नियमांत बदल करण्यात आले होते. त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही खेळाडूला हा सन्मान मिळालेला नाही.
राम मंदिरातील २५० पुरुष आणि महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
अयोध्या : मागील काही महिन्यांमध्ये लाखो भाविकांच्या ओघामुळे अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रचंड सुरक्षा तैनात करण्यात आली होती.मात्र, आता गर्दीचा ओघ कमी झाल्याने मंदिर प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेने या व्यवस्थेत बदल करण्यास सुरुवात केली असून २५० पुरुष आणि महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले आहे.महाकुंभमेळ्याच्या काळात एसआयएस या खाजगी सुरक्षा एजन्सीतर्फे सुमारे ४५० सुरक्षा रक्षक मंदिर परिसरात तैनात करण्यात आले होते. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार, एसआयएसने तब्बल २५० पुरुष आणि महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले असून, त्यांचे प्रवेश पासही रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, मंदिर परिसरात अतिशय संवेदनशील जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे.या मागचं कारण गर्दी आणि उत्पन्नात घट ही एक बाजू असली, तरी काही कर्मचाऱ्यांवर गैरवर्तन, शिस्तभंग आणि दर्शन-आरती पासांच्या नावाखाली अनधिकृत वसुलीचे गंभीर आरोपही असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता मंदिराच्या सुरक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रामजन्मभूमीची प्रतिमा डागाळल्याची भावना काहींनी व्यक्त केली आहे. मात्र, मंदिर प्रशासन या संपूर्ण घडामोडींवर बोलण्यास टाळाटाळ करत आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ही नियुक्ती व सेवा समाप्ती ही एजन्सी आणि संबंधित संस्थांमधील अंतर्गत बाब असून, मंदिर ट्रस्ट यामध्ये थेट सहभागी नाही. सध्या राम मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था पुन्हा संतुलित केली जात असून, उरलेल्या रक्षकांवर अधिक जबाबदारी पडली आहे. मात्र, ज्यांची उपजीविका या नोकऱ्यांवर अवलंबून होती, अशा कुटुंबांसाठी ही अचानक झालेली कपात मोठा आर्थिक धक्का ठरत आहे.
ज्योती मल्होत्रानंतर आणखीन एक युट्यूबर पाकिस्तानची हेर?
पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणी युट्यूबर प्रियंका सेनापतीची चौकशीनवी दिल्ली: हरियाणातील हिसारमध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या बाबतीत आता ओडिशा कनेक्शनही समोर आले आहे. केंद्रीय गुप्तचर संस्था इंटेलिजेंस ब्युरो (IB) आणि पुरी पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे, या प्रकरणाचा तपास आता पुरीपर्यंत पोहोचला आहे. कारण ओडीशा मधील पुरी येथील युट्यूबर प्रियांका सेनापती हिच्यावर देखील पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा सप्टेंबर 2024 मध्ये ओडिशाच्या पुरीला गेली होती. या काळात तिने जगन्नाथ मंदिर आणि त्याच्या सभोवतालच्या सरकारी परिसराचे फोटो आणि व्हिडिओ बनवले होते. सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की या ठिकाणांची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पाकिस्तानमधील कार्यकर्त्यांना पाठवण्यात आली होती. या काळात ज्योती प्रियंका सेनापतीला भेटली किंवा तिच्या संपर्कात होती असाही तपास यंत्रणांना संशय आहे. ज्योती मल्होत्रा आणि प्रियंका सेनापती यांच्यात संशयास्पद संबंध समोर आल्यानंतर आयबीने पुरी पोलिसांच्या सहकार्याने तपास सुरू केला आहे.प्रियंका सेनापती ज्योती मल्होत्राच्या संपर्कातज्योतीने जगन्नाथ मंदिर आणि जवळच्या सरकारी आस्थापनांसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ टिपले होते. या ठिकाणांवरील संवेदनशील प्रतिमा आणि डेटा परदेशी कार्यकर्त्यांना पाठवला जाऊ शकतो. या प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात, आयबी अधिकाऱ्यांनी पुरीची युट्यूबर प्रियंका सेनापती हिची चौकशी केली आहे. चौकशीच्या कक्षेत आल्यानंतर प्रियांका सेनापतीने सोशल मीडियावर लाईव्ह येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.सोशल मीडियाद्वारे प्रियंकाने स्पष्ट केली बाजूयुट्यूबर ज्योती मल्होत्रासोबत संपर्कात आल्याने, प्रियांकावर देखील पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात केल्या गेलेल्या चौकशीनंतर, प्रियांकाने सोशल मीडियावर लाईव्ह द्वारे आपली बाजू स्पष्ट केली आहे. ती म्हणाली की, ज्योती माझी फक्त एक यूट्यूब मैत्रीण होती. तिच्या कोणत्याही गुन्हेगारी कृत्यांबद्दल मला माहिती नव्हते. जर मला माहित असते की ती शत्रू देशासाठी हेरगिरी करत आहे, तर मी तिच्याशी कोणताही संपर्क ठेवला नसता. प्रियांका पुढे म्हणाली की, मी ज्योतीला व्यावसायिक कंटेंटवरून ओळखत होते. वैयक्तिकरित्या, मला या बातमीने धक्का बसला आहे. मी तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. ज्योतीच्या अटकेनंतर आणि प्रियांकाच्या चौकशीनंतर, गुप्तचर संस्थांनी पुरी, भुवनेश्वर आणि इतर पर्यटन स्थळांची सुरक्षा वाढवली आहे. विशेषतः, ड्रोन, डीएसएलआर आणि व्यावसायिक कॅमेरे वापरून सार्वजनिक ठिकाणी शूट करणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सवर लक्ष ठेवले जात आहे.सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे प्रकरण एका नवीन प्रकारच्या धोक्याकडे निर्देश करते ज्यामध्ये सायबर-एजंट माहिती गोळा करण्यासाठी आणि पाठवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत. एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की आजचा गुप्तहेर कोणत्याही सीमेवरून येत नाही, तो तुमच्या फोनच्या स्क्रीनमागे आहे. तपास यंत्रणांच्या मते, हे प्रकरण एखाद्या मोठ्या कटाचा भाग असू शकते आणि त्याच्या तळाशी जाण्यासाठी ओडिशापासून हरियाणापर्यंत अनेक ठिकाणी तपास सुरू आहे. जर तपासात असे आढळून आले की, प्रियंका सेनापती या प्रकरणात कुठल्याही प्रकारे सहभागी आहे तर तिला देखील अटक होऊ शकते. सध्या, प्रियंका आणि ज्योतीची संभाषणे, सोशल मीडियावरील संवाद आणि डेटा शेअरिंगचा सखोल तपास केला जात आहे.
नवी दिल्ली: भारतात अनेक हाय-प्रोफाइल दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप असलेला लष्कर-ए-तैयबा (LET) चा कुख्यात दहशतवादी सैफुल्ला खालिद पाकिस्तानच्या सिंध प्रांतात मारला गेला आहे. रविवारी सूत्रांनी ही माहिती दिली. त्याच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. २००१ मध्ये रामपूर येथील सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला, २००५ मध्ये बंगळुरूमधील इंडियन सायन्स काँग्रेस (ISC) वर हल्ला आणि २००६ मध्ये नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयावर हल्ला या तीन मोठ्या हल्ल्यांमध्ये खालिद प्रमुख सूत्रधार होता.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील बदिन जिल्ह्यातील माटली तालुक्यात त्याला ठार करण्यात आले. हा दहशतवादयांचा नेता लष्करच्या दहशतवाद्यांना नेपाळमार्गे भारतात घुसखोरी करण्यास मदत करत असे. त्यामुळे भारतीय भूमीवर लष्कर-ए-तैयबाच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाली होती.कोण होता सैफुल्ला खालिद?सैफुल्लाह भारताविरुद्ध अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. सैफुल्ला उर्फ विनोद कुमार उर्फ मोहम्मद सलीम उर्फ खालिद उर्फ वनियाल उर्फ वाजिद उर्फ सलीम भाई अशी त्याची अनेक नावं आहेत. सैफुल्ला नेपाळमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या संपूर्ण दहशतवादी मॉड्यूलचे व्यवस्थापन करत असे. सैफुल्लाहचे मुख्य काम लष्कराच्या दहशतवादी कारवायांसाठी कॅडर आणि आर्थिक मदत पुरवणे होते. सैफुल्लाने एका नेपाळी नागरिक महिलेशी लग्न देखील केले होते. तो लष्कर आणि जमात उद दावासाठी भरती आणि निधी संकलनाचे काम करायचा. अलिकडेच त्याने पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील बदिन जिल्ह्यातील माटली येथे आपले लपण्याचे ठिकाण बनवले होते. तिथून, तो लष्कर-ए-तैयबा, संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेला पाकिस्तानी दहशतवादी गट आणि त्याची आघाडीची संघटना जमात-उद-दावासाठी काम करत होता. या संघटनांचा उद्देश दहशतवादी कारवायांसाठी भरती करणे आणि निधी उभारणे हा आहे.
RR vs PBKS : हरप्रीतच्या फिरकीने पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर! नेहल-शंशाक जोडीने गाजवलं जयपूरचं मैदान
RR vs PBKS Punjab Kings beat Rajasthan Royals by 10 runs : आयपीएल २०२५ च्या पुनरागमनासह, पंजाब किंग्जने एका रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा १० धावांनी पराभव केला. जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने नेहल वधेरा आणि शशांक सिंग यांच्या दमदार खेळीच्या जोरावर २१९ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात राजस्थानचे स्फोटक फलंदाज हरप्रीत ब्रारच्या फिरकीच्या […] The post RR vs PBKS : हरप्रीतच्या फिरकीने पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर! नेहल-शंशाक जोडीने गाजवलं जयपूरचं मैदान appeared first on Dainik Prabhat .
Sayesha Goyal : पुण्याची सायेशा गोयल लंडनमधील आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत उपविजेती
पुणे : भारत – सेंट मेरीज ज्युनिअर कॉलेज, पुण्याची १७ वर्षीय विद्यार्थिनी सायेशा राजेश गोयल हिने १२ ते १६ मे २०२५ दरम्यान लंडन, युनायटेड किंगडम येथे इंग्लिश स्पीकिंग युनियन आयोजित आंतरराष्ट्रीय पब्लिक स्पीकिंग स्पर्धेत (IPSC) भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले. जगभरातील ४७ देशांमधील १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या सायेशाने भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवले. तिने […] The post Sayesha Goyal : पुण्याची सायेशा गोयल लंडनमधील आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत उपविजेती appeared first on Dainik Prabhat .
पाकिस्तानवर IMF ने लादल्या नव्या ११ अटी
वॉशिंग्टन डी. सी. : पाकिस्तान आणि दहशतवाद हे दोन्ही समानार्थी शब्द झाले आहेत. पाकिस्तान आजही दहशतवाद्यांची पाठराखण करत आहे. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला आर्थिक मदत देऊ नये अशी ठाम भूमिका भारताने घेतली आहे. भारताच्या भूमिकेचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात इंटरनॅशनल मॉनेटरी फंडाच्या (आयएमएफ) निर्णय प्रक्रियेवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. आयएमएफने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेली आर्थक मदत हवी असल्यास नव्या ११ अटी आणि जुन्या अटी अशा एकूण ५० अटींचे पालन करण्याचे बंधन पाकिस्तानवर घातले आहे.भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. हा तणाव निवळावा यासाठी पाकिस्तानने ठोस उपाय करणे अपेक्षित आहे. अन्यथा या तणावामुळे आयएमएफकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही पाकिस्तानला देण्यात आला आहे.पाकिस्तानने देशाचा १७.६ ट्रिलियन रुपयांचा अर्थसंकल्प संसदेतून मंजूर करुन घ्यावा अशी अट आयएमएफने पाकिस्तानला घातली आहे. वीज बिलांवरील कर्ज सेवा अधिभारात वाढ आणि तीन वर्षांपेक्षा जास्त जुन्या वापरलेल्या कारच्या आयातीवरील निर्बंध उठवणे या अटीही आयएमएफने पाकिस्तानला घातल्या आहेत. पाकिस्तानच्या अर्थसंकल्पात विकासनिधी म्हणून १.०७ ट्रिलियन रुपयांची तरतूद करण्याला आयएमएफने परवानगी दिली आहे. तसेच पाकिस्तानला संरक्षणासाठी जास्तीत जास्त २.४१४ ट्रिलियन रुपयांची तरतूद करण्याला आयएमएफने परवानगी दिली आहे.नवीन कृषी उत्पन्न कर कायदे लागू करा आणि कर रचनेत सुधारणा करा तसेच प्रशासकीय कामकाजात सुधारणा करा असे निर्देश आयएमएफने पाकिस्तानला दिले आहेत. पाकिस्तान सरकारने २०२७ पर्यंतचे आर्थिक नियोजन निश्चित करुन कळवावे, असेही आयएमएफने पाकिस्तानला सांगितले आहे. तसेच २०२८ पासून पाकिस्तान वाढत्या अनुत्पादक खर्चांना लगाम घालण्यासाठी नियामक संस्थेद्वारे काय उपाय करणार याची लेखी माहिती आयएमएफने मागवली आहे.पाकिस्तान सरकारने १ जुलै २०२५ पर्यंत वार्षिक वीज दर पुनर्नियोजनाचे नवे आदेश जारी करावे. १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत खर्च पुनर्प्राप्ती पातळीवर ऊर्जा दर राखण्यासाठी अर्धवार्षिक गॅस दर समायोजनाची अधिसूचना देखील जारी करावी; अशा अटी आयएमएफने घातल्या आहेत.कॅप्टिव्ह पॉवर लेव्हीचे पाकिस्तानने मे महिन्यातच कायद्यात रुपांतर करावे, असेही आयएमएफने सांगितले आहे. कर्ज सेवा अधिभारावरील कमाल ३.२१ रुपये प्रति युनिट मर्यादा काढून टाकण्यासाठी संसदेने जूनपर्यंत कायदा करावा, असेही आयएमएफने सांगितले आहे.
Pope Leo – पोप लिओ १४ वे यांनी आज कॅथोलिक चर्चचेनवीन पोप पदाची सूत्रे हाती घेतली. जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पोप लिओ १४ वे यांनी म्हटले आहे. सेंट पीटर्स स्वेअर येथे हजारो अनुयायांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभामध्ये त्यांनी सर्वांना संवादाचा संदेश दिला. पोप लिओ यांनी पोप पदाचा आपला पहिला अधिकृत दौरा पियाझ्झामधून […] The post Pope Leo : पोप लिओ यांनी हाती घेतली ‘कॅथोलिक चर्च’च्या पदाची सूत्रे; जगभरातील शांततेसाठी करणार प्रयत्न appeared first on Dainik Prabhat .
RR vs PBKS : यशस्वी-वैभवने घातला धुमाकूळ! राजस्थानने पॉवर प्लेमध्ये ठोकले सर्वात वादळी अर्धशतक
RR vs PBKS Rajasthan Royals set IPL 2025 records with fastest 50 : राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल २०२५ चा ५९ वा सामना जयपूरमध्ये खेळला जात आहे. सवाई मानसिंग स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने २० षटकांत ५ गडी गमावून २१९ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी […] The post RR vs PBKS : यशस्वी-वैभवने घातला धुमाकूळ! राजस्थानने पॉवर प्लेमध्ये ठोकले सर्वात वादळी अर्धशतक appeared first on Dainik Prabhat .
Mexico : मेक्सिकोच्या नौदलचे जहाज ब्रुकलिन पुलाला धडकले
न्यूयॉर्क : मेक्सिकोच्या नौदलाचे प्रशिक्षणासाठीचे एक जहाज आज न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलिन पुलाला धडकले. जहाजाचे वरील तीन मजले पुलाच्या कठड्याला धडकल्यामुळे जहाज आणि पुलाच्या बांधकामाचेही नुकसान झाले. पुलाचा काही भाग इस्ट नदीमध्ये कोसळला. या अपघातामुळे जहाजावरील खलाशी नदीच्या पाण्यात पडले आणि काही जण जखमी झाले. न्यूयॉर्कच्या फायर डिपार्टमेंटने जखमी खलाशांना पाण्यातून बाहेर काढले मात्र एकूण किती […] The post Mexico : मेक्सिकोच्या नौदलचे जहाज ब्रुकलिन पुलाला धडकले appeared first on Dainik Prabhat .
Israeli attack : गाझामधील इस्रायलच्या हल्लयात १०३ जण ठार
देर अल-बलाह (गाझा पट्टा) – इस्रायली सैन्याने रात्रभरात संपूर्ण गाझा पट्ट्यामध्ये केलेल्या हल्ल्यात किमान १०३ जण ठार झाले आहेत. अशी माहिती रुग्णालय आणि वैद्यकीय सूत्रांनी दिली. इस्रायलने नव्याने वाढवलेल्या हल्ल्यामुळे गाझाच्या उत्तर भागातील मुख्य रुग्णालय बंद करावे लागले आहे. दक्षिणेकडीलखान युनिसशहरामध्ये आणि शहराच्या आजूबाजूच्या परिसरात इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये ४८ पेक्षा जास्त लोक ठार झाले […] The post Israeli attack : गाझामधील इस्रायलच्या हल्लयात १०३ जण ठार appeared first on Dainik Prabhat .
Pune News : शिवाजीनगरला सर्वाधिक पावसाची सरी; पुण्यात काही भागांत हलका पाऊस
पुणे : शहरात आणि उपनगरांमध्ये आज दिवसभरात ढगाळ वातावरण राहिले आणि काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. शिवाजीनगरमध्ये सर्वाधिक 14 मिमी पावसाची नोंद झाली, तर चिंचवड, हडपसर, वडगावशेरी यांसारख्या भागांतही समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली. महत्त्वाचे पावसाचे मोजमाप (मिमी): शिवाजीनगर: 14.0 चिंचवड: 6.5 हडपसर: 5.0 वडगावशेरी: 4.0 लवळे: 4.0 पाषाण: 2.7 इतर भागांत 0.5 ते […] The post Pune News : शिवाजीनगरला सर्वाधिक पावसाची सरी; पुण्यात काही भागांत हलका पाऊस appeared first on Dainik Prabhat .
E-Peek Pahani : ‘ई-पीक अॅप’मध्ये बिघाड; राज्यातील अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित
मुंबई : शासनाने कृषी विभागाच्या विविध योजनांचा व नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी ई-पीक पाहणी करणे अनिवार्य केले आहे. पण गेल्या पंधरा दिवसांपासून ई-पीक अॅपमध्ये बिघाड आल्याने त्यात नोंदणी होत नसल्याने राज्यातील रब्बी धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. रब्बी हंगामातील धान, मका व इतर पिकांची कापणी व मळणी काहीच दिवसांत सुरू […] The post E-Peek Pahani : ‘ई-पीक अॅप’मध्ये बिघाड; राज्यातील अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित appeared first on Dainik Prabhat .
आमदार अमित देशमुखांच्या साखर कारखान्याला राष्ट्रीय हरित लवादाकडून कोट्यवधींचा दंड
नांदेड : काँग्रेस आमदार अमित देशमुख यांना राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम खंडपीठाने दणका दिला आहे. देशमुखांच्या मालकीच्या साखर कारखान्यातून राख आणि दूषित पाणी शेतांमध्ये सोडले जाते. यामुळे शेतीचे नुकसान होत असल्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने कारखान्याला एक कोटी तेरा लाख चाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावला.नांदेड जिल्ह्यातील शिवणी जामगा येथे २१ शुगर फॅक्टरी युनिट नंबर ३ कार्यरत आहे. हा साखर कारखाना काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या मालकीचा आहे. या कारखान्यातून निघणारी राख आणि दूषित पाणी शेतात सोडल्यामुळे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. मनोहर धोंडगे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०२३ रोजी हरित लवादाकडे याचिका केली. याचिकेवर ३० एप्रिल २०२५ रोजी निर्णय आला. या निकालाची माहिती प्रा. मनोहर धोंडगे यांनी निकालपत्र हाती आल्यावर प्रसारमध्यमांना दिली.राष्ट्रीय हरित लवादाने अमित देशमुखांच्या साखर कारखान्याला एक कोटी तेरा लाख चाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच ३१ शेतकऱ्यांना ५४ लाख ४३ हजार ९५५ रुपयाचा निधी नुकसान भरपाई म्हणून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले.