प्रभात वृत्तसेवा पिरंगुट – मुळशी तालुक्यातील औद्योगिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पिरंगुट पंचायत समिती गणात येणार्या निवडणुकीत चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजप या चारही पक्षांचे इच्छुक प्रचारयुद्धासाठी सज्ज झाले आहेत.2017 च्या निवडणुकीत या गणात अटीतटीची लढत झाली […] The post Mulshi Politics : पिरंगुट गणात सत्तेसाठी चुरस! चारही प्रमुख पक्ष मैदानात, उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची फिल्डिंग सुरू appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची 512 कोटी रुपये किमतीची 99.27 एकर जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीला विकून, बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप व कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्यासह दोन्ही संस्थांच्या संचालक मंडळाने स्वतःच्या आर्थिक लाभासाठी अत्यल्प किमतीला विक्री केली आहे. यासाठी त्यांनी शासनाकडे खोटी कागदपत्रे सादर करून 36 […] The post Pune News : ’यशवंत’च्या जमीन व्यवहारात खोटी कागदपत्रे, 36 कोटी रुपये लाटले? राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा खेड शिवापूर – मागील आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शिवगंगा खोऱ्यातील भात उत्पादन शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. भात पिके काढणीच्या अवस्थेत आले असताना आठवडाभर पडत असलेल्या पावसाने भात पिके शेतात आडवी पडल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.दरम्यान भात शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे पिके काही ठिकाणी पाण्यामध्ये आडवी पडली आहे. तसेच […] The post Farmers Crisis : शिवगंगा खोऱ्यातील भात उत्पादकांवर दुहेरी संकट ; एकीकडे पावसाचा मार, दुसरीकडे रोगराईचा प्रादुर्भाव appeared first on Dainik Prabhat .
Rajgad Politics : राजगड तालुक्यात इच्छुकांची भाऊगर्दी! राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच
प्रभात वृत्तसेवा वेल्हे ( विलास बांदल ) – जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यासाठी काही कालावधी शिल्लक असताना दुर्गम व विकासापासून वंचित असलेला आणि राज्यातील सर्वात छोटा तालुका म्हणून ओळख असलेल्या राजगड तालुक्यामध्ये सर्वत्र इच्छुकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. एका एका पक्षात वेगवेगळ्या गटात व गणात मोठ्या प्रमाणात इच्छुक निवडणुकीच्या कामाला लागले […] The post Rajgad Politics : राजगड तालुक्यात इच्छुकांची भाऊगर्दी! राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा कोयनानगर – हेळवाक जिल्हा परिषद गटासाठी पक्षनिष्ठ, जनसंपर्कात आघाडीवर आणि सामाजिक कार्यात नेहमी पुढे असणारे लक्ष्मण झोरे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी ठाम मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून झोरे ओळखले जातात. पक्ष संघटन बळकट करणे, कार्यकर्त्यांना जोडून ठेवणे आणि विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेणे या बाबींमध्ये […] The post ZP Election : हेळवाक जिल्हा परिषद गट: लक्ष्मण झोरेंच्या नावावर कार्यकर्त्यांचे एकमत; उमेदवारीसाठी बैठकीत एकमुखी ठराव मंजूर appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा सातारा – राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजपचे आक्रमक नेते जयकुमार गोरे यांच्यापुढे म्हसवड नगरपालिकेवर भाजपचा एक हाती झेंडा रोवण्याचे आव्हान आहे. मात्र विरोधकांनी महायुतीला काटशह देण्यासाठी प्रचंड तयारी केल्याने म्हसवड पालिकेचा रणसंग्राम रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.म्हसवड पालिकेत पंधरा वर्ष सत्ताधारी सत्तेत असूनही म्हसवड च्या नागरिकांना काय मिळाले अशी हाळी देत गोरे विरोधक सत्तेत […] The post Mhaswad News : मंत्री जयकुमार गोरेंची प्रतिष्ठा पणाला; म्हसवड पालिकेत भाजपचा झेंडा फडकणार की विरोधकांची एकजूट देणार शह? appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी स्वबळावर तयारी करणाऱ्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ नेत्यांनी हवा काढून घेतली आहे. महापालिकेसाठी मैत्रीपूर्ण लढती करणार असून ज्या प्रभागात युती होईल तिथे युती तर बाकीच्या प्रभागात स्वबळावर अशी हायब्रिड युती करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकांसाठी महायुती म्हणूनच […] The post PCMC Elections : भाजपमध्ये मोठा ट्विस्ट! स्वबळावर लढायचं की युतीत? चंद्रकांत पाटलांच्या विधानाने सगळंच चित्र पालटलं appeared first on Dainik Prabhat .
Pimpri Crime : चिंचवडमध्ये पुन्हा कोयत्याचा थरार! जुन्या वादातून अल्पवयीन मुलावर दिवसाढवळ्या हल्ला
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घसटना गुरुवारी (दि. ६) दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास दत्तनगर, चिंचवड येथे घडली.छैया पातरे, करण दोढे (दोघेही रा. विद्यानगर, चिंचवड) आणि त्यांचा एक साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अजय देवप्पा हेळवाळ […] The post Pimpri Crime : चिंचवडमध्ये पुन्हा कोयत्याचा थरार! जुन्या वादातून अल्पवयीन मुलावर दिवसाढवळ्या हल्ला appeared first on Dainik Prabhat .
शैक्षणिक संस्था, बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि क्रीडा संकुलात भटक्या कुत्र्यांना ‘नो एण्ट्री’
सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेशनवी दिल्ली : शैक्षणिक संस्था, बस-रेल्वे स्थानके आणि क्रीडा संकुलांच्या आसपास फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना त्वरित हटवून त्यांना आश्रयस्थानात हलवावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. तसेच, सर्व शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि शासकीय संस्था योग्यरित्या कुंपणबंद आहेत का? हे तपासण्याचे आदेशही न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, भटकी कुत्री ‘पशू जन्म नियंत्रण नियमां’नुसार लसीकरण आणि नसबंदी केल्यानंतरच आश्रयस्थानात ठेवली जावीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, न्यायालयाने आदेश दिला आहे की, कुत्र्यांना ज्या ठिकाणांहून पकडले जाईल, त्याच ठिकाणी त्यांना परत सोडले जाऊ नये.न्यायालयाने नमूद केले की, त्यांना त्याच ठिकाणी परत सोडण्याची परवानगी देणे, म्हणजे अशा संस्थांना मोकाट कुत्र्यांपासून मुक्त करण्याच्या मूळ उद्देशालाच निष्फळ ठरेल. मोकाट कुत्र्यांमुळे लहान मुलांना चावण्याच्या घटना आणि रेबीजच्या रुग्णसंख्येतील वाढ यावर माध्यमांनी प्रकाश टाकल्यानंतर २८ जुलै रोजी न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली होती, त्याच खटल्याचा एक भाग म्हणून हा आदेश देण्यात आला आहे.जिल्हाधिकाऱ्यांना कठोर निर्देशकुंपण बंधनकारक: सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना तातडीने सार्वजनिक व खासगी शैक्षणिक संस्था आणि क्रीडा संकुलांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जिल्हाधिकारी यांना आदेश दिला आहे की, सर्व शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, क्रीडा मैदाने आणि शासकीय संस्थांना योग्य कुंपण आहे का? याची करावी.नियमित तपासणी: या परिसरांमध्ये भटकी कुत्रे नाहीत याची खात्री करण्यासाठी नियमित तपासणी करणे बंधनकारक असेल.स्थलांतर आवश्यक: बस स्थानकांसह अशा परिसरांमध्ये आढळलेली सर्व भटकी कुत्री हटवून त्यांना आश्रयस्थानात हलवली जावीत आणि पुन्हा त्याच जागेवर सोडले जाऊ नये, असे न्यायालयाने सांगितले.भटक्या कुत्र्यांमुळे देशाची प्रतिमा मलीनयापूर्वी, खंडपीठाने मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवावर कार्यवाही न केल्याबद्दल पश्चिम बंगाल आणि तेलंगणा वगळता इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना फटकारले होते. पशू जन्म नियंत्रण नियमांच्या अंमलबजावणीवर प्रतिज्ञापत्र दाखल न केल्यामुळे मुख्य सचिवांना समन्सही बजावले होते. पालन न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना न्यायालयाने म्हटले होते की, मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमुळे आपल्या देशाची प्रतिमा परदेशी राष्ट्रांसमोर खराब होत आहे.
ICC Big Decisions for Womens World Cup 2029 : भारताच्या यजमानपदाखाली आणि श्रीलंकेच्या सह-यजमानपदाखाली नुकताच महिला वनडे वर्ल्डकप २०२५ नुकताच पार पडला. ज्यामधील अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ५८ धावांनी धूळ चारत पहिल्यांदाच आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरलं. या विजयानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने महिला विश्वचषक २०२९ च्या स्वरूपाबाबत एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय […] The post ICC Big Decisions : भारताच्या विश्वविजयानंतर ICC चा ऐतिहासिक निर्णय! पुढील विश्वचषकात दिसणारा ‘हा’ मोठा बदल appeared first on Dainik Prabhat .
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना ‘काळजी’, म्हणाले, 10 आमदारांवर…
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राज्यसभा खासदारकी येत्या २०२६ मध्ये संपुष्टात येत असताना त्यांच्या पुनरागमनाची ‘चिंता’ चक्क भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना सतावत आहे. माळशिरस येथील भाजप प्रवेश कार्यक्रमात पडळकर यांनी अप्रत्यक्षपणे पवार कुटुंबीयांवर निशाणा साधताना म्हटले, शरद पवार पुन्हा राज्यसभेत कसे येतील? केवळ १० आमदारांवर राज्यसभा जिंकता येत […] The post शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना ‘काळजी’, म्हणाले, 10 आमदारांवर… appeared first on Dainik Prabhat .
Pune Gramin : बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ झालेल्या रास्ता रोको प्रकरणी गुन्हा दाखल
शिरूर : मौजे पिंपरखेड (ता. शिरूर) येथे १३ वर्षीय रोहन विलास बोंबे या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर जनतेच्या रोषाला उधाण आले. या घटनेच्या निषेधार्थ ३ नोव्हेंबर रोजी विविध पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्गावरील नंदी चौक, भोरवाडी (ता. आंबेगाव) येथे रास्ता रोको आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त […] The post Pune Gramin : बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ झालेल्या रास्ता रोको प्रकरणी गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat .
Ravindra Jadeja’s video shared by CSK : आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यास आणि खेळाडूंच्या लिलावाला (ऑक्शन) अजून बराच वेळ असला तरी, सोशल मीडियावर आयपीएल फ्रँचायझींची सक्रियता कायम आहे. अशात आता सीएसके फ्रँचायझींने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा एक व्हिडिओ पोस्ट करून क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडीओमध्ये नेमकं काय आणि त्याची इतकी […] The post Ravindra Jadeja : सीएसकेने जड्डूचा ‘तो’ VIDEO पोस्ट केल्याने उडाली खळबळ! नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
महायुतीत भडका..! पालकमंत्र्यांनी भान ठेवावे; दीपक केसरकरांचा नितेश राणेंना घरचा आहेर
सिंधुदुर्ग : आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अंतर्गत कलह उफाळून आला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा भाजप नेते नितेश राणे यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा केल्यानंतर शिंदे गटाच्या माजी मंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार प्रतिकार केला. “नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवले पाहिजे. महायुती म्हणून लढलो असतो तर कणकवलीसारखी परिस्थिती निर्माण झाली नसती,” असे खडे बोल […] The post महायुतीत भडका..! पालकमंत्र्यांनी भान ठेवावे; दीपक केसरकरांचा नितेश राणेंना घरचा आहेर appeared first on Dainik Prabhat .
उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस; व्हीव्हीपॅट नाही, तर मतपत्रिका हवी!
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर याचिकानागपूर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन न वापरण्याच्या महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांनी ॲड. पवन दहात आणि ॲड. निहाल सिंग राठोड यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. गुडधे यांनी मतदार पडताळणी कागद ऑडिट ट्रायल मशीन (व्हीव्हीपॅट) पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे.निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट वापरले नाही, तर निवडणुका मतपत्रिकांद्वारे घेण्यात याव्यात, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. मतदाराला आपले मत व्यवस्थित नोंदवले गेले की नाही, हे तपासण्यासाठी व्हीव्हीपॅट आवश्यक आहेत.याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयाला आगामी निवडणुका मतपत्रिकांद्वारे घेण्याचे किंवा व्हीव्हीपॅट न वापरण्याचा आयोगाचा निर्णय रद्द करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे. तसेच, व्हीव्हीपॅटशिवाय इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यापासून आयोगाला रोखण्याची मागणीही केली आहे.न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला या याचिकेवर पुढील आठवड्यापर्यंत प्रतिसाद देण्यास सांगितले आहे.
वाघोली : वाघोलीतील गावठाण भागात पिढ्यान पिढ्या राहणाऱ्या ३८ मतदारांची नावे वाघोलीच्या मतदार यादीतून वगळून स्थलांतरित करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा प्रकार समोर आला आहे. या नागरिकांनी मतदान दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा कोणताही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केला नसताना त्यांच्या नावे बनावट अर्ज केला गेला असल्याने वाघोलीतील संबधित मतदारांनी आक्षेप घेऊन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. […] The post Video : वाघोली गावठाणात पिढ्यान पिढ्या राहणाऱ्या मतदारांचे वाघोलीच्या मतदार यादीतून नावे वगळण्याचा प्रयत्न appeared first on Dainik Prabhat .
Rajeev Shukla : बिहारमधील डझनभर मंत्र्यांचा पराभव निश्चित; राजीव शुक्ला यांनी वर्तवले भाकीत
पाटणा : बिहारमधील मतदानाचा वाढलेला टक्का एनडीएला सत्तेबाहेर जावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेत देतो. यावेळच्या निवडणुकीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांचा पराभव निश्चित आहे, असे भाकीत कॉंग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी केले. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आजवरच्या सर्वोच्च मतदानाची नोंद झाली. त्या घडामोडीचा आधार शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत बोलताना घेतला. मतदानाची टक्केवारी वाढल्यास जनतेने परिवर्तनासाठी […] The post Rajeev Shukla : बिहारमधील डझनभर मंत्र्यांचा पराभव निश्चित; राजीव शुक्ला यांनी वर्तवले भाकीत appeared first on Dainik Prabhat .
पुणे – गुलटेकडीतील टीएमव्ही कॉलनीत ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या घराचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या उपस्थितीत झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून अनावश्यक हस्तक्षेप केल्याप्रकरणी पोलीस शिपायाला थेट सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संबंधीत कर्मचार्याची नियुक्ती मुख्यालयात आहे. मात्र, स्वारगेट येथील पाडकाम प्रकरणात त्याची उपस्थिती अन् हस्तक्षेप आढळून आल्याने […] The post Pune News : ज्येष्ठ नागरिकाच्या घरावर कब्जा घेण्याचा प्रयत्न पोलिसाला पडला भारी; थेट निलंबनाची कारवाई ! appeared first on Dainik Prabhat .
Andhra Govt Rewards Sri Charani with 2.5 Crore : आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ जिंकून देशासाठी इतिहास रचणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघावर सध्या जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकणारी जगातील चौथी टीम बनण्याचा बहुमान मिळवला. या अभूतपूर्व यशानंतर खेळाडूंना विविध प्रकारचे पुरस्कार आणि बक्षिसे मिळत […] The post Sri Charani Rewards : आंध्र सरकारकडून श्री चरणीचा मोठा सन्मान! 2.5 कोटी, सरकारी नोकरी अन् भूखंडाची केली बरसात appeared first on Dainik Prabhat .
Tej Pratap Yadav : तेजप्रताप यांची भाजपशी जवळीक? रविकिशन यांच्याशी झाली भेट
पाटणा : जनशक्ती जनता दलाचे (जजद) संस्थापक तेजप्रताप यादव आणि भाजपचे खासदार रविकिशन शुक्रवारी पाटणा विमानतळावर एकत्र दिसले. त्यांच्या भेटीने भुवया उंचावल्या गेल्या. भाजपशी राजकीय जवळीक साधण्याचे तेजप्रताप यांचे मनसुबे आहेत का, असा प्रश्न त्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.विधानसभा निवडणुकीमुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापले आहे. त्या रणसंग्रामाच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरूवारी बिहारमधील आजवरच्या सर्वांधिक मतदानाची नोंद […] The post Tej Pratap Yadav : तेजप्रताप यांची भाजपशी जवळीक? रविकिशन यांच्याशी झाली भेट appeared first on Dainik Prabhat .
निष्ठावंत कार्यकर्ता..! भाजप जिल्हाध्यक्षांना दिली फोर्च्युनर गाडी गिफ्ट, राज्यभर होतेय चर्चा
मंगळवेढा (सोलापूर) : भारतीय जनता पक्षात तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्हा भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण. तब्बल ३२ वर्षे पक्षासाठी झोकून देऊन काम केल्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळाले आणि आता वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी आलिशान टोयोटा फोर्च्युनर गाडी भेट देऊन त्यांचा सन्मान द्विगुणित केला. हा कार्यक्रम राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. ७ […] The post निष्ठावंत कार्यकर्ता..! भाजप जिल्हाध्यक्षांना दिली फोर्च्युनर गाडी गिफ्ट, राज्यभर होतेय चर्चा appeared first on Dainik Prabhat .
पावसाच्या खेळात भारताचा दणदणीत विजय! पाकिस्तानला अवघ्या २ धावांनी लोळवले
मोंग कोक : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळतो. काही दिवसांपूर्वी आशिया चषक २०२५ स्पर्धेचा थरार रंगला. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ३ वेळा आमनेसामने आले होते. या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला.दरम्यान हाँगकाँग सिक्सेज क्रिकेट स्पर्धेत 'क' गटातील एका महत्त्वपूर्ण भारत सुपर सिक्सेस लीग स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत-पाक हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळाला. आशिया चषक २०२५ मधील वर्चस्वानंतर, या स्पर्धेतही भारतीय संघाने पाकिस्तानचा डकवर्थ लुईसने नियमानुसार २ धावांनी धुव्वा उडवत आपला दबदबा कायम ठेवला.भारतीय संघ यंदा कर्णधार दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली खेळला असून पाकिस्तान संघाची धुरा यंदा कर्णधार अब्बास अफरीदीच्या खांद्यावर होती. तसेच हा सामना पूर्ण षटकांचा खेळला जाऊ शकला नाही आणि अखेरीस डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर भारताला विजयी घोषित करण्यात आले. या अटीतटीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला २ धावांनी पराभूत केले. भारताचा सलामीचा फलंदाज रॉबिन उथप्पा याला त्याच्या आक्रमक खेळीसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले.या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ६ षटकांमध्ये ४ गडी गमावून ८६ धावा फटकावल्या आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी ८७ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, पाकिस्तानच्या संघाने दुसऱ्या डावात ३ षटकांमध्ये १ गडी गमावून ४१ धावा केल्या होत्या, पण त्याच वेळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर पुढील खेळ होऊ शकला नाही. अखेरीस, डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताला विजयी घोषित करण्यात आले.पाकिस्तानविरुद्धच्या या डावाची सुरुवात करण्यासाठी रॉबिन उथप्पा आणि भरत चिपली मैदानात उतरले. या दोन्ही सलामीच्या फलंदाजांमध्ये पहिल्या गड्यासाठी ४२ धावांची भागीदारी झाली आणि त्यानंतर उथप्पा बाद झाला. उथप्पाने अवघ्या ११ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २८ धावांची जलद खेळी साकारली. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट २५४.५५ होता. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला स्टुअर्ट बिन्नी फारशी चमक दाखवू शकला नाही आणि तो २ चेंडूंमध्ये एका चौकाराच्या सहाय्याने ४ धावा करून तंबूत परतला.चौथ्या क्रमांकावर कर्णधार दिनेश कार्तिक स्वतः फलंदाजीसाठी उतरला. त्याने ६ चेंडूंमध्ये एक षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने नाबाद १७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट २८३.३३ होता. भारतासाठी भरत चिपलीने १३ चेंडूंमध्ये २ षटकार आणि २ चौकारांसह २४ धावांचे योगदान दिले, तर अभिमन्यू मिथुनने ५ चेंडूंमध्ये एका चौकाराच्या मदतीने ६ धावा केल्या आणि तो धावबाद झाला. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शहजादने सर्वाधिक २ बळी घेतले, तर अब्दुल समदला एक यश मिळाले.पावसामुळे थांबलेल्या दुसऱ्या डावात पाकिस्तानने ३ षटकांमध्ये १ गडी गमावून ४१ धावा केल्या होत्या.पाकिस्तानसाठी ख्वाजा नफे आणि माज सदाकत यांनी डावाची सुरुवात केली होती. माजने ३ चेंडूंमध्ये ७ धावा केल्या आणि तो स्टुअर्ट बिन्नीचा बळी ठरला, तर ख्वाजा नफे ९ चेंडूंमध्ये २ षटकार आणि एका चौकारासह १८ धावा काढून नाबाद राहिला. अब्दुल समदने ६ चेंडूंमध्ये एक षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने १६ धावा काढल्या आणि तो देखील नाबाद राहिला.
Brazil Conference : वातावरण बदल परिषदेसाठी जागतिक नेते ब्राझीलमध्ये दाखल
बेलेम : वातावरण बदल विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जगभरातून अनेक नेते ब्राझीलमधील बेलेम शहरात दाखल होत आहेत. या परिषदेमध्ये जगभरातील उष्णकटिबंधीय जंगलांचे संरक्षण करण्याचा एक प्रमुख प्रस्ताव निश्चितच चर्चेचा एक प्रमुख विषय असणार आहे. उष्णकटिबंधीय वनांचा सुरू असलेला नाश थांबवण्यासाठी आणि मागील शिखर परिषदेत दिलेली अनेक अपूर्ण आश्वासने पुढे नेण्यासाठी निधी उभारण्याचा प्रयत्न केला […] The post Brazil Conference : वातावरण बदल परिषदेसाठी जागतिक नेते ब्राझीलमध्ये दाखल appeared first on Dainik Prabhat .
उन्नती, प्रगती, विकासासाठी मुंबईवर महायुतीचा भगवा फडकलाच पाहिजे!
भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहनमुंबई (खास प्रतिनिधी) : महापालिकांच्या निवडणुकांमध्ये विरोधक आता रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींना परावृत्त केले पाहिजे आणि मुंबईत उन्नती, प्रगती आणि विकास करण्यासाठी मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकलाच पाहिजे. महापालिकेवर आपला महापौर यायला हवा, यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी अंधेरीतील एका विशेष कार्यक्रमात केले.बहिण लाडकी, भाऊबिज देवाभाऊंची असे मुंबईत सहा जिल्ह्यामध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली कायक्रम आयोजित करण्यात येत असून त्यातील पहिला विशेष कार्यक्रम अंधेरी पूर्व येथील शेरे पंजाब येथील महापालिका मैदानात पार पडला. उत्तर पश्चिम महिला मोर्चाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा, प्रतिक कर्पे, महायुतीचे आमदार मुरजी पटेल, उत्तर पश्चिम जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा प्रीती सातम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी तसेच महिला मोठ्या संख्येन उपस्थित होत्या.या कार्यक्रमात बोलतांना अमित साटम म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहिण आपली याचा कार्यक्रम याच मैदानावर पार पडला होता आणि सर्वांचे लाडके देवाभाऊंना सर्वाधिक आशिर्वाद दिला होता. त्याच मैदानावर आज बहिण लाडकी भाऊबिज देवाभाऊंची हा कार्यक्रम पार पडला जात आहे. त्यामुळे देवाभाऊंच्या वतीने मी आपले आशिर्वाद स्वीकारण्यासाठी आलो आहे,असे सांगितले. त्यामुळे भ्रष्टाचार विरहित सत्ता मुंबईत आणण्याची गरज आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला सुरक्षित शहर बनवण्याचा संकल्प केला आहे. मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर शहरात सीसी टिव्ही कॅमेरा लावण्याची केवळ घोषणा केली. पण आधीच्या सरकारला हे काम करता आलेले नाही, पण सन २०१४मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर मुंबईत २०१६मध्ये सहा हजार सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्यामुळे महिला आजही रात्री अपरात्री सुरक्षितपणे अंगावर दागिने घालून फिरत आहेत,असे साटम यांनी सांगत फडणवीस यांच्यामुळे मुंबई शहराला गतीमान दिवस आले आहेत. आज अनेक प्रकल्प सुरु असून मुंबईच्या विकासाची दूरदृष्टी असणारा हे मुख्यमंत्री आहेत.नुकत्याच एका सर्वेमध्ये मुंबई शहर हे प्रथा, परंपरा आणि सुरक्षितता यामध्ये सर्वात सुरक्षित शहर म्हणून पहिल्या क्रमांकावर दर्शवले गेले आहे.याप्रसंगी भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा महिला मोर्चाचा अध्यक्षा प्रीती सातम यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती देत आज आपल्या सर्व महिलांसाठी देवाभाऊंनी भाऊबीजेचा विशेष कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. याप्रसंगी सातम यांच्या संकल्पनेतून भाजपा महिला मोर्चावर आधारीत ध्वनी चित्रणाच्या गाण्याचे अनावरण अमित साटम यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी शर्मा आणि मुरजी पटेल यांचीही भाषणे झाली. या जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रभागांमधील महिलांना ओवाळणी म्हणून साडी भेट देण्यात आली. सुरुवातीला विभागातील विविध वर्गातील महिलांच्यावतीने साटम यांची ओवाळणी करण्यात आली.
ऋतिकच्या नोकरीची जबाबदारी माझी; माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील
जांबुत : मागील वीस दिवसांत पिंपरखेड (ता. शिरूर ) येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला आहे. साडेपाच वर्षीय चिमुरडी शिवन्या बोंबे व तेरा वर्षीय शालेय विद्यार्थी रोहन बोंबे यांच्या बिबट हल्ल्यातील दुर्दैवी मृत्यूनंतर शुक्रवार (दि. ०७) रोजी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पिंपरखेड येथील घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. मृत […] The post ऋतिकच्या नोकरीची जबाबदारी माझी; माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील appeared first on Dainik Prabhat .
अन् दिलीप वळसे पाटलांना रडू कोसळले…
जांबुत : राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवार (दि. ०७) रोजी पिंपरखेड येथील बिबट हल्ल्यात मयत झालेल्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. साहेब, माझ्या बाळाला पोलीस व्हायचं होत ओ, पण माझं स्वप्न तो अपुर ठेवून आपल्यातून गेला, आता मी जगायचं कोणासाठी, साहेब मला सरकाराचं पैसं नको, पण मला माझा रोहन परत द्या. माझा रोहन […] The post अन् दिलीप वळसे पाटलांना रडू कोसळले… appeared first on Dainik Prabhat .
Pune Gramin : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी बोंबे कुटुंबीयांचे केले सांत्वन
जांबूत : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय शालेय विद्यार्थी रोहन विलास बोंबे याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवार (दि. ०७) रोजी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. रोहन याच्या मोठ्या भावाचे ऋतिक याच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्यासोबतच कुटुंबाला नवीन घर बांधण्यासाठी वैयक्तिक पातळीवर मदत करणार […] The post Pune Gramin : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी बोंबे कुटुंबीयांचे केले सांत्वन appeared first on Dainik Prabhat .
Bihar Election 2025 : ‘दिल्लीतील नाव हटवून बिहारचा मतदार बनलो…’; भाजप नेत्याचा अजब कारनामा
Bihar Election 2025 – दुहेरी मतदानावरून भाजपचे नेते राकेश सिन्हा वादंगात सापडले. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील नाव हटवून बिहारचा मतदार बनल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच, दुहेरी मतदानाचा आरोप राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचे म्हणत तो फेटाळून लावला. बिहारमध्ये गुरूवारी विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी मतदान झाले. त्यावेळी सिन्हा यांनीही मतदानाचा हक्क बजावला. त्याबाबतचा फोटो त्यांनी सोशल मीडियावरून प्रसिद्ध केला. […] The post Bihar Election 2025 : ‘दिल्लीतील नाव हटवून बिहारचा मतदार बनलो…’; भाजप नेत्याचा अजब कारनामा appeared first on Dainik Prabhat .
पार्थ पवार जमीन घोटाळा: अजितदादा काय म्हणतात, प्रत्यक्ष 'ऐका'!
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले असताना, अजित पवार यांनी या प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामुळे या प्रकरणाला एक नवे 'ट्विस्ट' मिळाले आहे.पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यात १८०० कोटी रुपये किंमतीची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर, नियमानुसार ६ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरणे अपेक्षित असताना, फक्त ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचेही उघड झाले होते.https://youtu.be/w83bsZuXcGAया आरोपांनंतर सुरुवातीलाच आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यांनी आता जो खुलासा केला आहे, त्याने विरोधकांनाही विचार करायला लावला आहे.अजित पवार यांनी स्पष्ट केले, माझा या व्यवहाराशी काही संबंध नाही आणि मला याबद्दल कोणतीही माहिती नाही. पण आता मी सांगतोय, या व्यवहारामध्ये आतापर्यंत एकही रुपया कोणालाही देण्यात आलेला नाही.त्यांनी पुढे मोठी घोषणा करत सांगितले की, या प्रकरणातील सर्व व्यवहार रद्द करण्यात आले आहेत. सर्व दस्तऐवज (डॉक्युमेंट्स) देखील रद्द करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती गठीत करण्यात आली असून, महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितीला देण्यात आले आहेत.यावेळी अजित पवार यांनी अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला. माझ्या नावाचा वापर केला तर ते मला चालणार नाही, असे ते म्हणाले. कोणही असो, अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली येऊ नये, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.पुण्याच्या १८०० कोटींच्या जमिनीचा ३०० कोटींमध्ये झालेला हा कथित व्यवहार आता अजितदादांनी पूर्णपणे रद्द केल्यामुळे, विरोधकांनी लावलेले आरोप आणि शासकीय नियमांचे उल्लंघन या दोन्ही गोष्टींवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Indian Women Team : विश्वविजेत्या महिला संघाला दिली जाणारी Sierra SUV कार कशी असणार? जाणून घ्या
Tata Motors to gift new Sierra SUV Indian Women Team : भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यापासून त्यांच्यावर पुरस्कारांचा वर्षाव होत आहे. गेल्या ५२ वर्षांत संघाचे हे पहिले विश्वचषक विजेतेपद आहे. आता टाटा मोटर्सने देशाच्या लेकींच्या या यशाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे. टाटा मोटर्सने सर्व खेळाडूंना एक कार भेट देण्याची घोषणा […] The post Indian Women Team : विश्वविजेत्या महिला संघाला दिली जाणारी Sierra SUV कार कशी असणार? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
Pune News : संतोष हॉलजवळ रिक्षा- कारचा अपघात; जीवितहानी नाही
पुणे : राजाराम ब्रिज ते वडगाव ब्रिज दरम्यान संतोष हॉल परिसरात आज सकाळी रिक्षा आणि चारचाकी वाहनामध्ये किरकोळ अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही. अपघातानंतर काही काळ वाहतूक मंदावली होती. मात्र, पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेने दोन्ही वाहनं रस्त्यावरून हटवण्यात आली असून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. दरम्यान, […] The post Pune News : संतोष हॉलजवळ रिक्षा- कारचा अपघात; जीवितहानी नाही appeared first on Dainik Prabhat .
माझ्या नवऱ्याला दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं, आरोपी अमोल खुणेच्या पत्नीचा धक्कादायक दावा
बीड : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटक झालेल्या अमोल खुणे यांच्या कुटुंबीयांनी धक्कादायक दावा केला आहे. “मागील एक महिन्यापासून माझ्या नवऱ्याला दारू पाजून नशेत ठेवले आणि जरांगे पाटीलांविरोधात षडयंत्र रचायला लावले. अमोल हे तर जरांगे पाटीलांचे जुने कार्यकर्ते आहेत, त्यांना देव मानतात. त्यांचा यात काहीही संबंध नाही, त्यांना फसवून […] The post माझ्या नवऱ्याला दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं, आरोपी अमोल खुणेच्या पत्नीचा धक्कादायक दावा appeared first on Dainik Prabhat .
नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्होटर व्हेरियबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) मशीनशिवाय घेण्याचा घेतलेल्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. ही याचिका काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुढधे पाटील यांनी दाखल केली. या याचिकेत आयोगाने व्हीव्हीपॅटशिवाय निवडणुका घेणे हे संविधानिक […] The post Notice to the Election Commission : हीव्हीपॅट’वरून वाद पेटला! नागपूर खंडपीठानं निवडणूक आयोगाला केला थेट सवाल appeared first on Dainik Prabhat .
US government shutdown : अमेरिकेतल्या शटडाऊनमुळे विमानसेवेमध्ये मोठी कपात
US government shutdown – अमेरिकेत लागू असलेल्या शटडाऊनच्या परिणामामुळे अमेरिकेतून होणाऱ्या विमानांच्या उड्डाणांमध्ये कपात करण्यात आली आहे. फेडरल एव्हिएशन एजन्सीने याबाबतची घोषणा आज केली. विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आल्यामुळे आता देशांतर्गत लांब पल्ल्याचे प्रवास करण्यासाठी प्रवाशांना पर्यायी विमान उड्डाणांची व्यवस्था शोधावी लागणार आहे. फेडरल एव्हिएशन एजन्सीने दोन डझन प्रांतांमधील देशांतर्गत विमान प्रवासासाठीच्या ४० विमानतळांची यादी […] The post US government shutdown : अमेरिकेतल्या शटडाऊनमुळे विमानसेवेमध्ये मोठी कपात appeared first on Dainik Prabhat .
Mahar Vatan Jamin : महार वतन जमिनीची खरेदी-विक्री करता येते का? काय आहे नेमका कायदा?
Mahar Vatan Jamin : दोन दिवसांपूर्वी महार वतन जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या एका प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली. या घटनेनंतर या जमिनींच्या कायदेशीर स्थितीबाबत पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सामान्य नागरिकांना या जमिनींच्या व्यवहारांबाबत मोठा संभ्रम असल्याने, महार वतन जमीन नेमकी काय आहे ? तिचा सध्याचा कायदेशीर दर्जा काय आहे? आणि तिच्या हस्तांतरणासाठी कोणत्या प्रक्रिया पाळाव्या […] The post Mahar Vatan Jamin : महार वतन जमिनीची खरेदी-विक्री करता येते का? काय आहे नेमका कायदा? appeared first on Dainik Prabhat .
How did Pratika Rawal get the medal : महिला क्रिकेट विश्वचषकात उत्कृष्ट फलंदाजी करणाऱ्या सलामीवीर प्रतिका रावलला अखेरीस विश्वचषक विजेतेपदाचे पदक मिळाले आहे. गुरुवारी जेव्हा प्रतिका रावल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी पोहोचली, तेव्हा तिच्या गळ्यात हे पदक लटकलेले होते. विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना न खेळल्यामुळे प्रतिकाला सुरुवातीला पदक मिळाले नव्हते. मग त्यानंतर ते […] The post Pratika Rawal Medal : प्रतिका रावलसाठी जय शाहांनी मोडला ICC चा मोठा नियम! कधीही विसरता येणार नाही अशी दिली भेट appeared first on Dainik Prabhat .
मोठी बातमी..! पुण्यातील वादग्रस्त जमीन व्यवहार अखेर रद्द; अजित पवारांची माहिती
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीने खरेदी केलेल्या पुण्यातील मुंढवा-कोरेगाव पार्क येथील ४० एकर महार वतन जमिनीचा वादग्रस्त व्यवहार अखेर रद्द करण्यात आला आहे. अजित पवार यांनी स्वतः याची माहिती देताना सांगितले की, “हा व्यवहार रद्द झाला आहे. मी तीन-चार महिने आधीच सांगितले होते की असले प्रकार […] The post मोठी बातमी..! पुण्यातील वादग्रस्त जमीन व्यवहार अखेर रद्द; अजित पवारांची माहिती appeared first on Dainik Prabhat .
रांजणी येथील ड्रायपोर्टसाठी सकारात्मक काम करा - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
मुंबई : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट व्हावा अशी मागणी या भागातील लोकप्रतिनिधी, उद्योजक व शेतकरी नागरिकांची आहे. ही मागणी सकारात्मक असून मागणीचा केंद्रीय स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट व्हावा या मागणी संदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपकुमार, उपस्थित होते. आमदार गोपीचंद पडळकर व सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.मंत्री राणे म्हणाले, रांजणी येथे ड्रायपोर्ट झाल्यास या भागाचा औद्योगिक विकास गतीने होईल. या ठिकाणी ड्रॉयपोर्ट होण्यासाठी सर्वांनी सकारात्मक काम करावे. तसेच संबधित शासकीय विभागांनी त्यांची जबाबदारी यशस्वीपणे पार पडावी. या ड्रायपोर्टसाठी राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडेही पाठपुरावा केला जाईल. व याबाबतचा नियमित आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, राधा यादव यांना प्रत्येकी २ कोटी २५ लाख, तर प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना २२ लाख ५० हजार आणि सर्व सहकारी यांना प्रत्येकी ११ लाख रुपये व सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.आयसीसी महिला विश्वचषक 2025 मध्ये प्रथमच भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचा वर्षा या शासकीय निवासस्थानी सत्कार केला. गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार साळवी, पद्मश्री डायना एडल्जी, ॲनालिस्ट अनिरुद्ध देशपांडे, लॉजिस्टिक सपोर्ट अपर्णा गंभीरराव, ऑपरेशन मॅनेजर मारुफ फजानदार, मिहिर उपाध्याय, पूर्वा काटे, ममता शिरसुल्ला यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, प्रधान सचिव संजय खंदारे, आयुक्त शितल तेली, उपसचिव सुनील पांढरे उपस्थित आहेत.सत्कारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विश्वचषकात भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. याचा संपूर्ण भारतीयांना अभिमान आहे. या विजयाने भारताचा गौरव वाढवला आहे. सुरुवातीच्या काही पराभवानंतर संघाने केलेली पुनरागमनाची कामगिरी उल्लेखनीय आहे. प्रत्येक खेळाडूने कुठल्या ना कुठल्या सामन्यात निर्णायक भूमिका बजावली. प्रशिक्षक आणि संपूर्ण संघाचे विशेष अभिनंदन करावे लागेल. या संघातील एकजूट आणि संघभावना महत्वाची असून यामुळे विजय मिळविणे शक्य झाले.स्मृती मानधना सध्या भारतातील आयकॉनिक खेळाडूंमध्ये गणली जाते. तिचा सुरुवातीपासून ते आजपर्यंतचा प्रवास उल्लेखनीय आहे. ती लवकरच दहा हजार धावांचा टप्पा गाठेल. जेमिमाह रॉड्रिग्ज ने ही सेमीफायनलमध्ये अप्रतिम खेळी सादर केली. राधा यादवने संघर्षमय प्रवास करत आपले अस्तित्व निर्माण केले असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑलिम्पिक मध्ये भारतीय महिला संघ विजय मिळवेल अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी संघासाठी घेतलेली मेहनत आणि क्रिकेटमधील त्यांची कामगिरी प्रेरणादायी आहे. क्रिकेटला लोकप्रिय करणाऱ्या जुन्या पिढीतील सर्व खेळाडूंमुळे आज क्रिकेट या उंचीवर पोहोचले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचेही अभिनंदन करताना ते महणाले की, महिला क्रिकेटला त्यांनी स्वतंत्र ओळख आणि दर्जा मिळवून दिला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महिला क्रिकेटच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक क्षण आहे. पद्मश्री डायना एडल्जी यांनी लावलेले रोपटे आज मोठे झाले आहे. ग्रामीण भागातील मुलींना संधी मिळाली तर त्या जागतिक स्तरावर यश प्राप्त करू शकतात हे या क्रिकेट संघातील खेळाडूंनी सिद्ध केले आहे.या विजयाने क्रीडा रसिकांच्या अपेक्षा वाढल्या असून, भविष्यातही आपण असेच यश प्राप्त कराल अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केली.स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, राधा यादव, प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी आभार मानत, सर्व संघाचे आणि क्रिकेट प्रेमींचे आभार मानले. बीसीसीआयच्या अखंड पाठिंब्यामुळे आणि खेळासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे हे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
Rahul Gandhi : दिल्लीनंतर भाजपच्या काही नेत्यांचे बिहारमध्येही मतदान; राहुल गांधी यांचा मोठा दावा
पाटणा : दिल्लीनंतर भाजपच्या काही नेत्यांनी बिहारमध्येही मतदान केले, असा सनसनाटी दावा कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. मात्र, त्यांनी कुणाचा नामोल्लेख केला नाही. बिहारच्या बांकामधील प्रचारसभेत बोलताना राहुल यांनी कथित मतचोरीचा मुद्दा लावून धरला. भाजपच्या काही नेत्यांनी आधी दिल्लीत, तर आता बिहारमध्ये मतदानाचा हक्क बजावल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, अधिक तपशील दिला नाही. […] The post Rahul Gandhi : दिल्लीनंतर भाजपच्या काही नेत्यांचे बिहारमध्येही मतदान; राहुल गांधी यांचा मोठा दावा appeared first on Dainik Prabhat .
sanjay khan wife | zarine katrak : अभिनेता संजय खान यांच्या पत्नी झरीन कतरक यांचे वयाच्या ८१व्या वर्षी निधन झाले आहे. शुक्रवारी, म्हणजेच ७ नोव्हेंबरच्या सकाळी, त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर संपूर्ण खान कुटुंब दुःखात बुडाले आहे. १२ जुलै १९४४ रोजी जन्मलेल्या झरीन कतरक या एक भारतीय अभिनेत्री, […] The post zarine katrak : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीचे निधन; ‘झरीन कतरक’ यांनी राहत्या घरी अखेरचा घेतला श्वास appeared first on Dainik Prabhat .
China : चीनच्या नौदलात तिसरी विमानवाहू युद्धनौका दाखल
बीजिंग : चीनच्या नौदलामध्ये फुजियान ही तिसरी विमानवाहू युद्धनौका दाखल झाली आहे. ही अत्यंत आधुनिक युद्धसामुग्रीने सुससज्ज असलेली युद्धनौका इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षमतांनी सज्ज आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या उपस्थितीत अत्यंत गुप्तपणे झालेल्या समारंभात या विमानवाहक युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले. चीनच्या दक्षिणेकडील हैनान प्रांतात सान्या बंदरात फुजियान नौकेचा जलावतरण समारंभ शुक्रवारी झाल्याचे अधिकृत माध्यमांनी म्हटले आहे. […] The post China : चीनच्या नौदलात तिसरी विमानवाहू युद्धनौका दाखल appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका संघाचा ५२ धावांनी दणदणीत पराभव करत प्रथमच हे जेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशात खेळाडूंचा सन्मान करण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने विश्वचषक विजेत्या संघातील राज्यातील खेळाडूंना विशेष सन्मानित करण्याची महत्त्वाची घोषणा केली होती, ज्याची पूर्तता आता करण्यात आली आहे. भारतीय महिला संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन प्रमुख खेळाडूंना राज्य सरकारने रोख रक्कम देऊन गौरवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, स्टार फलंदाज स्मृती मानधना, अष्टपैलू खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज आणि उत्कृष्ट फिरकीपटू राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी रुपये इतके बक्षीस देण्यात आले आहे. या तिन्ही खेळाडूंनी विश्वचषक विजयात मोलाची कामगिरी बजावली होती. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन दिलेला हा सन्मान राज्यातील इतर खेळाडूंसाठीही मोठा प्रेरणास्रोत ठरणार आहे.https://prahaar.in/2025/11/07/bihar-does-not-want-katta-sarkar-prime-minister-narendra-modis-dunaali-rangdaari-jibe-at-opposition/स्मृती, जेमिमा आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटींचा चेक प्रदानराज्यातील या तीन स्टार खेळाडूंना प्रत्येकी २.२५ कोटी रुपयांची रोख रक्कम प्रदान करून गौरवण्यात आले. यावेळी कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या अनुपस्थितीत खेळाडूंचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. या कार्यक्रमात केवळ खेळाडूच नव्हे, तर टीम इंडियाच्या यशात मोठे योगदान देणाऱ्यांचेही कौतुक करण्यात आले. महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचाही २२.५ लाख रुपये मानधन स्वरूपात देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे, भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल माजी क्रिकेटपटू डायना एडुल्जी आणि टीम इंडियाच्या यशात पडद्याआड राहून मदत करणाऱ्या सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला. सत्कारादरम्यान या खेळाडूंनी विश्वचषकात केलेल्या कामगिरीची आठवण ताजी झाली. तिने उपांत्य फेरीत (Semi-Final) ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १२७ धावांची धडाकेबाज खेळी करत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. संपूर्ण स्पर्धेत स्मृती ही भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होती. फिरकीपटू राधा यादव ही सेमीफायनल आणि फायनल अशा दोन्ही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी खेळाडूंच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.'हा विजय म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा क्षण!' - उपमुख्यमंत्री अजित पवार“भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकून देशाचं नाव जगभर उज्ज्वल केलं आहे. हा विजय फक्त क्रिकेटमधला नाही, तर प्रत्येक भारतीयासाठीच्या अभिमानाचा क्षण आहे. महिला क्रिकेट संघानं मनं आणि हृदयं दोन्ही जिंकली आहेत. महिला क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीची तुलना त्यांनी भारताच्या पहिल्या विश्वचषक विजयाशी केली. ते पुढे म्हणाले, १९८३ साली श्री. कपिल देव यांनी देशाला मिळवून दिलेलं विश्वविजेतेपद आज आपल्या महिला क्रिकेटपटूंनी नव्या पर्वात नोंदवलं आहे. हा दिवस म्हणजे पुन्हा एकदा दिवाळीचा उत्सवच!” उपमुख्यमंत्री महोदयांनी या विजयाचे सामाजिक महत्त्वही अधोरेखित केले. त्यांच्या मते, या यशाचा मोठा परिणाम ग्रामीण भागातील मुलींवर होणार आहे. त्यांनी लिहिले, “ग्रामीण भागातील अनेक मुलींना या यशानं प्रेरणा मिळेल. योग्य संधी मिळाल्यास त्या देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करू शकतात, याचा मला मनापासून अभिमान आहे.” अजित पवार यांनी शेवटी, भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Hasin Jahan Demands : शमी-हसीनचा वाद पुन्हा तापला: १० लाख पोटगीसाठी सुप्रीम कोर्टाकडे धाव
Hasin Jahan Demands : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या त्याच्या मैदानाबाहेरील वादामुळे चर्चेत आहेत. भारतीय संघात त्यांची निवड न झाल्यामुळे तो आधीच चर्चेत होता, त्यात आता त्यांची पत्नी हसीन जहाँ यांच्यासोबतचा त्याचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. शमीपासून वेगळ्या राहत असलेल्या हसीन जहाँने तिला देण्यात येणाऱ्या पोटगीची (गुजारा भत्ता) रक्कम वाढवून […] The post Hasin Jahan Demands : शमी-हसीनचा वाद पुन्हा तापला: १० लाख पोटगीसाठी सुप्रीम कोर्टाकडे धाव appeared first on Dainik Prabhat .
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा निवडणुकीपूर्वी भाजपला दे धक्का, बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
अकोला : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात पक्षांतराचा सपाटा सुरू आहे. महायुतीतील घटक पक्ष असूनही अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या युवती आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा चंचल पितांबरवाले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षाचे उपनेते तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या उपस्थितीत हा […] The post Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा निवडणुकीपूर्वी भाजपला दे धक्का, बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश appeared first on Dainik Prabhat .
Sulakshana Pandit : बॉलिवूडवर शोककळा.! प्रसिद्ध अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे निधन
Sulakshana Pandit – बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे गुरुवारी रात्री निधन झाले आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. सुलक्षणा या अभिनेत्री विजेता पंडित आणि संगीत दिग्दर्शक जतिन-ललित यांच्या बहीण होत्या. अभिनेत्रीचा भाऊ ललित पंडित यांनी निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ललित पंडित यांनी […] The post Sulakshana Pandit : बॉलिवूडवर शोककळा.! प्रसिद्ध अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे निधन appeared first on Dainik Prabhat .
पाकिस्तानात 'Gen Z'चा भडका! युवा पिढी रस्त्यावर उतरल्याने शाहबाज शरीफ आणि मुनीर यांची धाकधूक वाढली
नेपाळ, मादागास्करनंतर आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये युवा पिढीचा रोषइस्लामाबाद : नेपाळ आणि मादागास्करसारख्या देशांमध्ये 'जनरेशन झेड' (Gen Z)ने केलेल्या आंदोलनानंतर आता पाकिस्तानमध्येही Gen Zच्या रोषाचा भडका उडाला आहे. पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये सध्या हे आंदोलन सुरू असून, शाहबाज शरीफ सरकार आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांची चिंता वाढली आहे.वाढलेले शैक्षणिक शुल्क, शिक्षण धोरणातील दोष आणि विद्यापीठांच्या परीक्षा व्यवस्थेतील मोठ्या घोळाविरुद्ध युवा पिढी संतापली असून तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे.या आंदोलनाची ठिणगी मुजफ्फराबाद येथील एका विद्यापीठात पडली. विद्यार्थ्यांनी फीमध्ये झालेली मोठी वाढ आणि 'डिजिटल मूल्यांकन प्रणाली' (Digital Evaluation System) मधील गंभीर त्रुटींविरुद्ध आवाज उठवला. विद्यार्थ्यांचा मुख्य आरोप आहे की, परीक्षेचा निकाल तब्बल सहा महिन्यांनी लागला आणि यात अनेक विद्यार्थ्यांचे गुण खूपच कमी आले. तर काही विद्यार्थ्यांना त्यांनी ज्या विषयांची परीक्षा दिलीच नव्हती, त्यातही पास दाखवण्यात आले.जेव्हा विद्यार्थ्यांनी या निकालाची फेरतपासणी (Re-evaluation) करण्याची मागणी केली, तेव्हा प्रशासनाने प्रत्येक विषयासाठी तब्बल १५०० रुपये शुल्क आकारले. या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. या सगळ्या गोंधळातच विद्यापीठातील विद्यार्थी संघटना आणि राजकीय घडामोडींवर बंदी घालण्यात आल्याने युवा पिढीतील असंतोष आणखी वाढला.त्यातच आठवड्याच्या सुरुवातीला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गोळीबार झाल्याची बातमी आली आणि आंदोलन अधिक चिघळले. स्थानिक माध्यम 'कश्मीर डिजिटल'नुसार, राजा मामून फहद नावाच्या व्यक्तीने पोलिसांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. धक्कादायक म्हणजे, प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी हल्लेखोराला थांबवण्याचा कोणताही गंभीर प्रयत्न केला नाही आणि तो घटनास्थळावरून पळून गेला.या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण POK मधील विद्यार्थी, नागरिक संघटना आणि शिक्षकांनी एकत्र येऊन सरकार आणि पाकिस्तानच्या लष्कराच्या विरोधात जोरदार निदर्शने सुरू केली आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सरकार कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन POKच्या बाहेर पसरू नये यासाठी प्रयत्न करत आहे. जर परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तर आंदोलनाची ही लाट पाकिस्तानच्या इतर भागांमध्येही पसरू शकते, अशी भीती सरकारला वाटत आहे. POK मध्ये हे या वर्षातील दुसरे मोठे आंदोलन आहे. यापूर्वी काही महिन्यांपूर्वीच महागाई, वीज दर आणि कर सवलतींविरुद्ध लोकांनी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले होते, ज्यामुळे सरकार आधीच धास्तावलेले आहे.
मोठी घडामोडी..! उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मनोमिलन; दोन्ही पक्षांची एकत्रित बैठक
सिंधुदुर्ग : राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत टोकदार राजकीय संघर्ष होत असताना कोकणात मात्र नाट्यमय घडामोडी समोर आली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कणकवलीत एकत्रित बैठक झाल्याची माहिती समोर आली असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच तळकोणाच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. तळकोकणात […] The post मोठी घडामोडी..! उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मनोमिलन; दोन्ही पक्षांची एकत्रित बैठक appeared first on Dainik Prabhat .
श्रीनगर : सध्या जम्मू आणि काश्मीर राज्य एका नवीन युगाकडे वाटचाल करत आहे. इथे विकास जमिनीवर दिसतो. आदर, समान संधी आणि स्वाभिमानाने भरलेल्या भविष्याकडे वाटचाल करत, काश्मीर आता नवीन भारताची ओळख बनत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी गुरुवारी सांगितले. काश्मीर विद्यापीठात विश्वग्रामने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित करताना […] The post Gajendra Singh Shekhawat : नव्या भारताची ओळख नवे काश्मीर; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केले मत appeared first on Dainik Prabhat .
सुपर हायटेक फिचर्स, जबरदस्त लुक्स.! नव्या तंत्रज्ञानासह ‘या’ SUV भारतीय बाजारात करणार एन्ट्री
Best Suv cars in India : भारतीय मिडसाईज SUV सेगमेंटमध्ये आतापर्यंत ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta) चे वर्चस्व कायम आहे. सतत अपडेट्स, नवीन जनरेशन मॉडेल्स आणि अत्याधुनिक फिचर्समुळे क्रेटा देशातील सर्वाधिक लोकप्रिय SUV बनली आहे. मात्र, आता या SUV ची बादशाहत धोक्यात येण्याची शक्यता आहे, कारण येत्या काही महिन्यांत देशातील आणि जागतिक पातळीवरील अनेक मोठ्या ऑटो […] The post सुपर हायटेक फिचर्स, जबरदस्त लुक्स.! नव्या तंत्रज्ञानासह ‘या’ SUV भारतीय बाजारात करणार एन्ट्री appeared first on Dainik Prabhat .
पार्थ पवार ते जरांगेचे धनंजय मुंडेंवर आरोप; वाचा आजच्या टॉप १० बातम्या एका क्लीकवर…
१) पार्थ पवारांचा पाय आणखी खोलात; आणखी एक मोठा जमीन गैरव्यवहार उघड : मुंढवा येथील जमिनीच्या गैरव्यवहारानंतर आता पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्ज कंपनीचा आणखी एक जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. बोपोडी येथील शासनाच्या मालकीच्या ५ हेक्टर जमिनीचा अपहार करून बेकायदेशीररीत्या खाजगी ताबा दर्शविण्याच्या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात तहसीलदारासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला […] The post पार्थ पवार ते जरांगेचे धनंजय मुंडेंवर आरोप; वाचा आजच्या टॉप १० बातम्या एका क्लीकवर… appeared first on Dainik Prabhat .
Jahanara Alam accuses ex-manager Manjurul Islam of sexual harassment : बांगलादेश महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार जहाँआरा आलम हिने संघाचे माजी मुख्य निवडकर्ता आणि व्यवस्थापक मंजरुल इस्लाम यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या धक्कादायक आरोपांनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती स्थापन केली आहे. बीसीसीबीने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, बोर्डाने […] The post Jahanara Alam Accuse : बांगलादेशच्या क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा; माजी मॅनेजरवर लैंगिक छळाचे गंभीर आरोप! appeared first on Dainik Prabhat .
नेवासा : नेवासे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, मुरकुटे यांच्या पाठोपाठ एक माजी मंत्री आणि चार माजी आमदार लवकरच राष्ट्रवादीत सामील होणार असल्याची विश्वासार्ह माहिती सूत्रांनी दिली. […] The post Newasa Politics : नेवासात राजकीय भूकंप होणार? माजी मंत्र्यांसह चार माजी आमदार एकत्र लढविणार राष्ट्रवादीची खिंड appeared first on Dainik Prabhat .
दादरच्या 'स्टार मॉल'मध्ये भयंकर आग!
सेनाभवनसमोर असलेल्या मॉलमध्ये मॅकडोनाल्ड्सच्या किचनमध्ये आग!मुंबई : दादर पश्चिम येथील गजबजलेल्या स्टार मॉलमध्ये आज (७ नोव्हेंबर २०२५) दुपारी मोठी दुर्घटना होता होता टळली. मॉलच्या आत असलेल्या प्रसिद्ध मॅकडोनाल्ड्स (McDonald's) रेस्टॉरंटच्या किचनमध्ये अचानक आग लागल्याची माहिती मिळताच एकच धावपळ उडाली. या घटनेची नोंद दुपारी ३ वाजून ३२ मिनिटांनी झाली.एन. सी. केळकर मार्गावरील, थेट सेनाभवनाच्या समोर असलेल्या या मॉलमधील मॅकडोनाल्ड्सच्या किचनमध्ये आग लागल्याची तात्काळ अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. मुंबई अग्निशमन दलाने (MFB) त्वरित कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली.आगीची बातमी मिळताच अग्निशमन दल, पोलीस, १०८ ॲम्ब्युलन्स आणि स्थानिक वॉर्ड कर्मचारी (Ward Staff) लगेचच घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कसलीही दिरंगाई न करता आग विझवण्याच्या कामाला सुरुवात केली.अवघ्या १६ मिनिटांत, म्हणजेच दुपारी ३ वाजून ४८ मिनिटांनी, अग्निशमन दलाने ही आग 'लेव्हल १' (L-1) अर्थात किरकोळ स्वरूपाची असल्याचे घोषित करून पूर्णपणे नियंत्रणात आणली.सुदैवाने, या घटनेत कोणतीही जखमी होण्याची किंवा जीवितहानीची नोंद झालेली नाही. व्यस्त परिसरात आणि एका मोठ्या मॉलमध्ये आग लागल्याने सुरुवातीला भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादाने मोठा अनर्थ टळला. या आगीमागील नेमके कारण काय होते, याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे.
SEBI Update: ऑनलाईन घोटाळे रोखण्यासाठी सेबीकडून सोशल मिडिया नेटवर्कला दिले मोठे निर्देश
प्रतिनिधी:सेबीने आपल्या नव्या निवेदनात नमूद केले आहे की, नियामक मंडळ सेबीने (Sebi) सगळ्या महत्वाच्या सोशल मिडिया व्यासपीठाला त्यांच्या व्यासपीठाचा ऑनलाईन घोटाळ्यासाठी वापर केल्या जाणाऱ्या घटनांपासून प्रतिरोध केला पाहिजे '. सेबीने यावर परिपत्रक काढले असून सोशल मिडिया व सर्च इंजिन या ऑनलाईन टूल्सचा वापर अनैतिक कारवायांपासून रोखला पाहिजे यासाठी पावले उचलण्याचे निर्देश सेबीने दिले आहेत. यापूर्वी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ सिक्युरिटीज कमिशन (IOSCO) यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक धोरण आखले गेले होते याचं धोरणाशी सुसंगत राहून सेबीने हा निर्णय घेतला आहे या अनुपालनामुळे सोशल मिडिया नेटवर्कला घोटाळेबाजावर करडी नजर ठेवणे अनिवार्य असेल.सेबीने आणखी काय म्हटले?सेबीने सेबीशी नोंदणीकृत असलेल्या संस्था व आस्थापनांना गुंतवणूकीच्या जाहीराती करायची परवानगी असणार आहे. त्यासाठी हे ऑनलाईन टूल्स व सोशल नेटवर्कर त्यांना पडताळणी (Verification) करणे सोशल मिडिया व्यासपीठाला अनिवार्य असणार आहे.२) रजिस्ट्रार मध्यस्थ अँपवर पडताळणी - अँप स्टोअरवर उपलब्ध असलेल्या व सेबीने पडताळणी केलेल्या अँप्ससाठी नवीन डिस्ट्रिक लेबल फ्रेमवर्क आणणार३) सेबीने गुंतवणूकदारांनाही कुठलीही गुंतवणूक करताना सावधगिरीचा सल्ला दिला- गुंतवणूकदारांनी कुठलीही गुंतवणूक करताना सेबीच्या संकेतस्थळावर संबंधित पार्टीची पडताळणी तपासून पहावी असे सेबीने स्पष्ट केले आहे.
Bihar Election 2025 : बिहारमध्ये दहशतीचे सरकार नको.! पंतप्रधान मोदींचा आरजेडीवर हल्ला
Bihar Election 2025 – सध्या काँग्रेस पक्षालाही आरजेडीच्या आश्वासनांवर विश्वास नाही, म्हणूनच ते आरजेडीच्या जाहीरनाम्याचा उल्लेखही करत नाही. बिहारमधील जनता आणि तरुणांनीही आरजेडीच्या खोट्या गोष्टी नाकारल्या आहेत. पण काहीही झाले तरी बिहारमध्ये आता बंदुकीच्या धाकावरचे (कट्टा सरकार) सरकार नको आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. बिहारच्या औरंगाबादमध्ये प्रचारासाठी पोहोचलेल्या पंतप्रधानांनी एका जाहीर सभेला […] The post Bihar Election 2025 : बिहारमध्ये दहशतीचे सरकार नको.! पंतप्रधान मोदींचा आरजेडीवर हल्ला appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : मतदार यादीचे संपूर्ण भारतभरातील विशेष सघन पुनरावृत्ती (एसआयआर) करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर ११ नोव्हेंबर रोजी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सहमती दर्शवली. न्या. सूर्यकांत आणि न्या. जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने ११ नोव्हेंबरपासून याचिकांवर सुनावणी सुरू करण्याचे सांगितले. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेकडून वकील प्रशांत भूषण यांनी […] The post Supreme Court : एसआरआयविरोधी याचिकांची 11 नोव्हेंबरला होणार सुनावणी; सर्वोच्च न्यायालयाने दर्शवली सहमती appeared first on Dainik Prabhat .
IND vs PAK : पावसाच्या खेळात भारताचा रोमांचक विजय! पाकिस्तानला अवध्या २ धावांनी लोळवले
IND vs PAK India beat Pakistan by 2 runs : हाँगकाँगमध्ये रंगलेल्या सुपर सिक्सेस लीग स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत-पाक हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळाला. आशिया चषक २०२५ मधील वर्चस्वानंतर, या स्पर्धेतही भारतीय संघाने पाकिस्तानचा डकवर्थ लुईसने नियमानुसार २ धावांनी धुव्वा उडवत आपला दबदबा कायम ठेवला. भारताची पाकिस्तानवर २ धावांनी मात! भारत आणि पाकिस्तान हे […] The post IND vs PAK : पावसाच्या खेळात भारताचा रोमांचक विजय! पाकिस्तानला अवध्या २ धावांनी लोळवले appeared first on Dainik Prabhat .
त्रावणकोर : शबरीमला सोने चोरीप्रकरणी विशेष तपास पथकानेत्रावणकोर देवस्वम बोर्ड (टीडीबी) तिरुवाभरणमच्या माजी आयुक्तांना अटक केली. तिरुअनंतपुरम येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात तपास अधिकाऱ्यांनी के. एस. बैजू यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील सातवा आरोपी म्हणून बैजू यांचे नाव आहे. त्यांच्याविरुद्ध आरोप असा आहे की, त्यांनी २०१९ मध्ये शबरीमला येथील सोन्याचे पत्रे मुख्य […] The post K.S.Baiju : तिरुवाभरणमचे माजी आयुक्त के. एस. बैजू यांना अटक; शबरीमाला सोने चोरी प्रकरणात SIT ची कारवाई appeared first on Dainik Prabhat .
काँग्रेसमध्ये 'सपकाळ विरुद्ध केदार'वाद शिगेला!
नागपूरमध्ये गटबाजीचा स्फोट; प्रदेशाध्यक्षांनी इच्छुकांच्या 'मुलाखती'ची बैठकच ठरवली 'अवैध'!नागपूर : नागपूर जिल्हा काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्यातील राजकीय संघर्ष आता थेट चव्हाट्यावर आला आहे. आगामी निवडणुकांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष अश्विन बैस यांनी घेतलेली बैठक प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी अवैध ठरवल्यामुळे पक्षाच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमधील ही गटबाजी उघड झाल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम अश्विन बैस यांनी शुक्रवारी जाहीर केला होता. विशेष म्हणजे, बैस यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती ही केदार यांच्याच पुढाकाराने झाली होती आणि या बैठकीमागेही केदार गटाचाच हात असल्याची चर्चा आहे.नागपूर काँग्रेसमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुनील केदार यांच्या कार्यपद्धतीवर रोष आहे. जिल्हा काँग्रेसची सारी सूत्रे ते आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अलीकडेच, जिल्हाध्यक्ष निवडीतही त्यांनी अनुभवी बाबा आष्टनकर यांना केवळ सात महिन्यांत पदावरून हटवून, नवखे आणि एकही निवडणूक न लढलेले अश्विन बैस यांना अध्यक्ष केल्याने नाराजी वाढली होती.या गटबाजीला खतपाणी मिळू नये म्हणून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कठोर भूमिका घेतली. त्यांनी नागपूरचे निवडणूक निरीक्षक माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यामार्फत ही बैठक रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, तरीही स्थानिक नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांचे आदेश धुडकावून लावत मुलाखतीचा कार्यक्रम पुढे रेटला, ज्यामुळे हा संघर्ष चव्हाट्यावर आला.या बैठकीचा प्रोटोकॉल पूर्णपणे पायदळी तुडवण्यात आला होता. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, माजी आमदार, माजी अध्यक्ष किंवा पक्षाने नेमलेल्या जिल्हा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांपैकी कोणालाही या बैठकीसाठी बोलावले नव्हते. फक्त सुनील केदार, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे आणि माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्यासह केदार समर्थकांनाच बोलावून मुलाखती घेण्यात येणार होत्या.याची माहिती मिळताच काही पदाधिकाऱ्यांनी तत्काळ प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केली. सपकाळ यांनी यावर तातडीने दखल घेत उदय मेघे आणि अशोकराव बोबडे यांना निरीक्षकांसोबत नागपूरला पाठवले.मेघे आणि बोबडे यांनी ग्रामीण काँग्रेसच्या कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीत जाऊन ती अवैध ठरवली. त्यांनी उपस्थित स्थानिक नेत्यांना अध्यक्षांचा स्पष्ट निरोप कळवला: परस्पर, नियमबाह्य बैठका घेऊ नका आणि गटबाजीला खतपाणी घालू नका, तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना डावलू नका. विशेष म्हणजे, हा निरोप देऊनही बैठकीवर कोणताही परिणाम झाला नाही आणि त्यानंतरही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्याची माहिती आहे.सुनील केदार यांच्या मनमानी कारभाराची ही काही पहिलीच वेळ नाही. रामटेक लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी परस्पर रश्मी बर्वे यांचे नाव जाहीर केले होते. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांचा उघडपणे प्रचार केला होता. रामटेक आणि हिंगणा हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीने मित्रपक्षांसाठी सोडले असतानाही, केदार यांनी आपले समर्थक उमेदवार रिंगणात उतरवले होते. आता निवडणुकीच्या तोंडावरच गटबाजीचा हा नवीन अंक सुरू झाल्याने, काँग्रेसची डोकेदुखी वाढणार हे नक्की.
मोहित सोमण:आज आठवड्याची अखेर शेअर बाजारात घसरणीनेच झाली आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात मात्र घसरण आटोक्यात आली आहे. मिडकॅप व मेटल, बँक निर्देशांकांच्या जोरावर शेअर बाजारातील सकाळची घसरण आटोक्यात आली आहे. सकाळी बीएसईत ५०० पूर्णांकापर्यंत व निफ्टीत २५० पूर्णांकाहून अधिक घसरण झाली होती. मात्र या शेअर्सच्या जोरावर व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या वाढत्या विक्री तुलनेत घरगुती गुंतवणूकदारांनी खरेदी वाढवत नफा बुकिंग केल्यामुळे आज शेअर बाजारात किरकोळ घसरणीवर निर्देशांक बंद झाला आहे. सेन्सेक्स ९४.७३ अंकाने कोसळत ८३२१६.२८ व निफ्टी १७.४० अंकांने घसरत २५४९२.३० पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात आज १९९.२२ व बँक निफ्टीत आज ३२२.५५ अंकांनी वाढ झाल्याने आज बाजाराला सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली आहे.दुसरीकडे निफ्टी व्यापक निर्देशांकातही मिडकॅप ५० (०.५९%) व, मिडकॅप १०० (०.६३%), मिडकॅप ५० (०.५९%) निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली आहे तर निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) सर्वाधिक वाढ मेटल (१.४१%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (१.२२%), ऑटोमोबाईल (०.५७%), फायनांशियल सर्विसेस (०.७६%), बँक (०.५६%) निर्देशांकात वाढ झाली आहे तर सर्वाधिक घसरण आयटी (०.६२%), एफएमसीजी (०.४९%), फार्मा (०.३६%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.७२%), आयटी (०.६२%) निर्देशांकात झाली आहे.आज जागतिक अस्थिरतेच्या तोंडावर कमोडिटीतही हालचाल तेज झाल्याचे पहावयास मिळाले आहे. तर आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात घसरणीकडे कल पहायला मिळत आहे. गिफ्ट निफ्टी (०.०४%) सह, निकेयी २२५ (१.४८%), हेंगसेंग (०.९६%), कोसपी (१.८४%), सेट कंपोझिट (०.८०%) निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली असून वाढ जकार्ता कंपोझिट (०.६९%), स्ट्रेट टाईम्स (०.१६%) निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स सपाट राहिला असून उर्वरित एस अँड पी ५०० (१.१२%),नासडाक (१.९०%) घसरण झाली आहे. काल शेअर बाजारात मोठे कंसोलिडेशन व सेल ऑफ झाले होते. प्रोव्हिजनल आकडेवारीनुसार, काल गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) भारतीय शेअर्सचे निव्वळ विक्रेते होते, त्यांनी ३२६३ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. दरम्यान, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) बाजाराला पाठिंबा देत राहून ५२८४ कोटी रुपयांच्या खरेदीसह निव्वळ खरेदीदार बनले.आजही ती पुनरावृत्ती झाली आहे. अमेरिका व भारत यांच्यातील डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक वक्तव्यानंतरही अद्याप टॅरिफ कपात करण्यावरून अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे अस्थिरता आणखी वाढली असून अद्याप परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. दुसरीकडे रशियन तेल खरेदी मुद्यावर भारत व युएस यांच्यातील दरी वाढलेली असताना काही भारतीय कंपन्यानी रशियन तेल खरेदीत कपात करण्याचे ठरवले होते. त्यामुळे कमोडिटीतही अस्थिरता निर्माण झाली आहे.आज अखेरच्या सत्रात एल अँड टी फायनान्स (१०.३२%),बीएसई (९.०७%), स्वान कॉर्पोरेशन (७.६३%), एजंल वन (५.२२%), सीसीएल प्रोडक्ट (५.३५%) केफिन टेक्नॉलॉजी (४.६०%), सीपीसीएल (४.१५%), नेटवेब टेक्नॉलॉजी (३.९७%) समभागात झाली आहे.आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण अंबर एंटरप्राईजेस (७.३३%), लेटंट व्ह्यू (७.२१%), इ क्लर्क सर्विसेस (६.३५%), साई लाईफ (५.०८%), देवयानी इंटरनॅशनल (४.९६%), गोदरेज अँग्रोवेट (४.७४%), रिलायन्स पॉवर (४.५८%), चोला फायनांशियल (४.४९%), भारती एअरटेल (४.२७%), बजाज होल्डिंग्स (४.२५%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (३.९६%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'मुख्य आधार पातळीवर खरेदी सुरू झाल्याने सुरुवातीच्या तोट्यातून देशांतर्गत शेअर बाजार पुन्हा वधारला, जरी मिश्र उत्पन्न सावध जागतिक संकेत आणि सततचा एफआयआय बहिर्गमन असे असले तरी विशेषतः पीएसयू बँकांमुळे एफडीआय कॅप वाढ आणि क्षेत्र एकत्रीकरणाभोवतीच्या अटकळांमुळे गुंतवणूकदारांच्या वाढत्या हितामुळे याला उलटा ट्रेंड म्हणणे अकाली ठरेल. दुसऱ्या तिमाहीच्या निकालांमधून काही निवडक विभागांना पाठिंबा मिळाला, व्यापक निर्देशांकांनी चांगली कामगिरी केली, ज्याचे नेतृत्व वित्तीय क्षेत्रातील तीक्ष्ण तेजीने केले.पुढे जाऊन, बाजार सध्याच्या गतीच्या टिकाऊपणाचे मूल्यांकन करण्यासाठी यूएस शटडाऊन आणि यूएस-भारत आणि यूएस-चीन करारांसह टॅरिफ-संबंधित घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवतील.'आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'आठवड्यादरम्यान रुपया ८८.४०-८८.७५ च्या दरम्यान अस्थिर श्रेणीत व्यवहार करत होता, परंतु एफआयआयकडून विक्रीचा दबाव कायम राहिल्याने तो त्याच्या खालच्या पातळीजवळ राहिला. कच्च्या तेलाच्या किमतीत किरकोळ वाढ आणि डॉलर निर्देशांक मजबूत झाल्याने देशांतर्गत चलनात अलिकडच्या काळात झालेली कमकुवतपणा आणखी वाढला, जो १०० च्या जवळ गेला. अधूनमधून खरेदीला पाठिंबा असूनही, जागतिक अनिश्चितता आणि सतत परकीय बाहेर जाण्याच्या प्रवाहात रुपयाची भावना कमकुवत राहिली. पुढील आठवड्यात, रुपयाची हालचाल अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये विस्तृत व्यापार श्रेणी ८८.२५-८८.९० च्या दरम्यान दिसून येईल.'
मोहित सोमण:पहिल्या दिवशी पाईन लॅब्स लिमिटेड (Pine Labs Limited) कंपनीचा शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल झाला आहे. ३८९९.९१ कोटींच्या आयपीओला पहिल्या दिवशी ०.११ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. त्यापैकी विभागवार किरकोळ गुंतवणूकदारांना (Retail Investors) ०.५० पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ० वेळा, व विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.०६ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. बाजारातील माहितीनुसार, पहिल्या दिवशी किरकोळ गुंतवणूकदारांकडून उपलब्ध असलेल्या १७६३४१४३ समभागातील (Stocks) ८७७२५११ समभाग सबस्क्राईब केले असून विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII)२६४५१२१४ समभागापैकी ४९६००१ शेअरला सबस्क्राईब (बिडिंग/बोली) केले गेले आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ९७१०७४४० समभागापैकी १०६७३५०२ समभागाला सबस्क्राईब केले गेले आहे.३८९९.९१ कोटी रूपयांच्या आयपीओसाठी २०८० कोटी मूल्यांकनाचे शेअर व ऑफर फॉर सेल (OFS) १८१९.९१ कोटी मूल्यांकनाचे शेअर बाजारात उपलब्ध आहेत. आज ७ ते ११ नोव्हेंबरपर्यंत कंपनीचा शेअर गुंतवणूकदारांसाठी खुला राहणार आहे. माहितीनुसार, या आयपीओत गुंतवणूकीसाठी किरकोळ गुंतवणूकदारांना १४८०७ रूपये (६७ शेअर) गुंतवणे अनिवार्य असणार आहे. कंपनीने आपला प्राईज बँड २१० ते २२१ रूपये प्रति शेअर निश्चित केला होता. Axis Capital Limited ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून Kfin Technologies Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात शेअर खरेदी करता येइल उपलब्ध माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना प्रति शेअर २१ रूपयांची सवलत मिळू शकते. बीएसई व एनएसईवर हा शेअर १४ नोव्हेंबरला बाजारात सूचीबद्ध होणार आहे तर पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) करण्यात येणार आहे.कंपनीया यापूर्वी इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २८% अधिक महसूल मिळाला होता. तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) इयर ऑन इयर बेसिसवर ५७% वाढ झाली आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नात जून २०२५ पर्यंत ६५३.०८ कोटींवर पोहोचले आहे जे मार्च महिन्यात २३२७.०९ कोटी होते त्यामुळे उत्पन्नात घट झाल्याचे निकालात स्पष्ट होते. कंपनीच्या करोत्तर तोटा तिमाही बेसिसवर (QoQ) मार्च महिन्यातील १४५.४९ कोटी मात्र जून २०२५ ४.७९ कोटी निव्वळ नफ्यात बदलला आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी देयके चुकती करण्यासाठी, आगाऊ चुकते करण्यासाठी, उपकंपनीत गुंतवणूकीसाठी, आयटी व इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करण्यासाठी, दैनंदिन कामकाजासाठी व इतर व्यवसाय सोलूशनसाठी करण्यात येणार आहे.पाइन लॅब्स लिमिटेड (पीएलएल) ही एक तंत्रज्ञान कंपनी आहे जी व्यापारी, ग्राहक ब्रँड आणि उपक्रम आणि वित्तीय संस्थांसाठी डिजिटल पेमेंट आणि सोल्यूशन्स जारी करून वाणिज्य डिजिटलायझेशनवर लक्ष केंद्रित करते. तिची प्रगत तंत्रज्ञान पायाभूत सुविधा भारत आणि मलेशिया, युएई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि आफ्रिका यासारख्या वाढत्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये त्यांच्या डिजिटायझेशन प्रवासाला गती देण्यास मदत करते.पीएलएलच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अँड ट्रान्झॅक्शन प्लॅटफॉर्म मध्ये इन-स्टोअर आणि ऑनलाइन पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर, परवडणारी क्षमता, मूल्यवर्धित सेवा (व्हीएएस) जसे की डायनॅमिक चलन रूपांतरण आणि व्यवहार प्रक्रिया आणि वित्तीय तंत्रज्ञान (Fintech) पायाभूत सुविधा उपाय आणि सॉफ्टवेअर अनुप्रयोग समाविष्ट आहेत. त्याच्या इश्यूइंग अँड अक्वायरिंग प्लॅटफॉर्म मध्ये प्रीपेड सोल्यूशन्स आणि एंगेजमेंट सोल्यूशन्स जारी करणे, प्रक्रिया करणे आणि वितरण करणे, तसेच त्याच्या एकत्रित इश्यूइंग अँड अक्वायरिंग प्रोसेसिंग प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. त्याच्या क्लाउड-आधारित सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाद्वारे ते व्यापारी, ग्राहक ब्रँड आणि उपक्रम आणि वित्तीय संस्थांच्या इकोसिस्टमसाठी वाणिज्य डिजिटायझेशन, सरलीकृत करणे आणि वाणिज्य अधिक सुरक्षित बनविण्यास मदत करते तसेच शेवटी त्यांना ग्राहकांना सेवा देण्यासाठी आणि उपभोग सक्षम करण्यासाठी सक्षम करते.एचडीएफसी सिक्युरिटीजने या आयपीओवर काय म्हटले?पाइन लॅब्स लिमिटेड (पीएलएल) ही एक तंत्रज्ञान कंपनी आहे जी डिजिटल पेमेंटद्वारे व्यापाराचे डिजिटलायझेशन करण्यावर आणि भारतातील व्यापारी, ग्राहक ब्रँड आणि उद्योग आणि वित्तीय संस्थांसाठी उपाय जारी करण्यावर लक्ष केंद्रित करते, जे मलेशिया, युएई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि आफ्रिका सारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विस्तार करतात. पीएलएलचे प्लॅटफॉर्म प्रगत क्लाउड-आधारित पायाभूत सुविधांवर आधारित आहे, जे स्टोअरमध्ये आणि ऑनलाइन पेमेंट स्वीकृती, परवडणारी सोल्यूशन्स, मूल्यवर्धित सेवा(व्हीएएस) आणि फिनटेक पायाभूत सुविधा सक्षम करते. कंपनीच्या ऑफरिंग्ज त्यांच्या इकोसिस्टम भागीदारांसाठी व्यापार सुलभ करण्यासाठी आणि सुरक्षित करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत, व्यापारी, ग्राहक ब्रँड आणि वित्तीय संस्थांसाठी डिजिटल परिवर्तनास समर्थन देतात.पीएलएलचे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रान्झॅक्शन प्लॅटफॉर्म व्यापाऱ्यांना पेमेंट पद्धतींची विस्तृत श्रेणी स्वीकारण्यास, बिलिंग सिस्टमसह एकत्रित होण्यास, बक्षिसे आणि निष्ठा कार्यक्रम व्यवस्थापित करण्यास आणि त्वरित कॅशबॅक आणि लवचिक हप्ते योजना यासारख्या परवडणारी उपाययोजना ऑफर करण्यास सक्षम करते. हे प्लॅटफॉर्म व्यवसाय सॉफ्टवेअर अनुप्रयोगांना देखील समर्थन देते, व्यापाऱ्यांना त्यांचे स्टोअर डिजिटायझेशन करण्यास आणि ऑर्डरिंग, बिलिंग, इन्व्हेंटरी आणि जीएसटी अनुपालन यासारख्या प्रमुख ऑपरेशन्स व्यवस्थापित करण्यास अनुमती देते. इश्यूइंग अँड अक्वायरिंग प्लॅटफॉर्ममुळे ग्राहक ब्रँड आणि उद्योगांना भेटवस्तू, जाहिराती, कॅशबॅक, परतफेड, बक्षिसे आणि कर्मचारी प्रोत्साहनांसाठी प्रीपेड कार्ड जारी करण्याची परवानगी मिळते, तसेच वित्तीय संस्थांना क्रेडिट, डेबिट, प्रीपेड आणि फॉरेक्स कार्ड जारी करण्यास आणि व्यापारी खरेदी व्यवस्थापित करण्यास सक्षम केले जाते.पीएलएलची वाढीची रणनीती तिच्या विद्यमान ऑफरिंग्जचे स्केलिंग, भागीदारांच्या इकोसिस्टमचा विस्तार, तंत्रज्ञानात गुंतवणूक, नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश आणि धोरणात्मक अधिग्रहणांवर लक्ष केंद्रित करते. कंपनीचे प्लॅटफॉर्म स्केलेबल, क्लाउड-नेटिव्ह, एपीआय-चालित आणि सुरक्षित असण्यासाठी डिझाइन केलेले आहे, जे भागीदारांसाठी जलद एकात्मता आणि कस्टमायझेशनला समर्थन देते. पीएलएलचा तंत्रज्ञान स्टॅक त्याला मोठ्या व्यवहार व्हॉल्यूमवर प्रक्रिया करण्यास, मजबूत सुरक्षा प्रदान करण्यास आणि त्याच्या इकोसिस्टमसाठी मॉड्यूलर, लवचिक उपाय प्रदान करण्यास सक्षम करते. पीएलएलची इकोसिस्टम व्यापारी, ग्राहक ब्रँड, उपक्रम आणि वित्तीय संस्थांना एकत्र आणते, नेटवर्क इफेक्ट्स तयार करते जे उच्च व्यवहार व्हॉल्यूम,पाइन लॅब्स लिमिटेड (पीएलएल) ही एक तंत्रज्ञान कंपनी आहे जी डिजिटल पेमेंटद्वारे व्यापाराचे डिजिटलायझेशन करण्यावर आणि भारतातील व्यापारी, ग्राहक ब्रँड आणि उद्योग आणि वित्तीय संस्थांसाठी उपाय जारी करण्यावर लक्ष केंद्रित करते, जे मलेशिया, युएई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि आफ्रिका सारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विस्तार करतात. पीएलएलचे प्लॅटफॉर्म प्रगत क्लाउड-आधारित पायाभूत सुविधांवर आधारित आहे, जे स्टोअरमध्ये आणि ऑनलाइन पेमेंट स्वीकृती, परवडणारी सोल्यूशन्स, मूल्यवर्धित सेवा (व्हीएएस) आणि फिनटेक पायाभूत सुविधा सक्षम करते. कंपनीच्या ऑफरिंग्ज त्यांच्या इकोसिस्टम भागीदारांसाठी व्यापार सुलभ करण्यासाठी आणि सुरक्षित करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत, व्यापारी, ग्राहक ब्रँड आणि वित्तीय संस्थांसाठी डिजिटल परिवर्तनास समर्थन देतात.आर्थिक वर्ष २०२५ मध्ये, पीएलएलने ११,४२५ अब्ज रुपयांचे एकूण व्यवहार मूल्य (जीटीव्ही) आणि ५.६८ अब्ज व्यवहारांवर प्रक्रिया केली, ज्यामुळे ९८८,३०४ व्यापारी, ७१६ ग्राहक ब्रँड आणि उपक्रम आणि १७७ वित्तीय संस्थांना सेवा मिळाली. व्यवहार मूल्यानुसार कंपनी भारतातील सर्वात मोठी क्लोज्ड आणि सेमी-क्लोज्ड लूप गिफ्ट कार्ड जारी करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते आणि डिजिटल चेकआउट पॉइंट्सवर डिजिटल परवडणारी सोल्यूशन्सची आघाडीची सक्षम करणारी कंपनी आहे.पीएलएलची वाढीची रणनीती तिच्या विद्यमान ऑफरिंग्जचे स्केलिंग, भागीदारांच्या इकोसिस्टमचा विस्तार, तंत्रज्ञानात गुंतवणूक, नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश आणि धोरणात्मक अधिग्रहणांवर लक्ष केंद्रित करते. कंपनीचे प्लॅटफॉर्म स्केलेबल, क्लाउड-नेटिव्ह, एपीआय-चालित आणि सुरक्षित, भागीदारांसाठी जलद एकात्मता आणि कस्टमायझेशनला समर्थन देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. पीएलएलचा तंत्रज्ञान स्टॅक त्याला मोठ्या व्यवहार व्हॉल्यूमवर प्रक्रिया करण्यास, मजबूत सुरक्षा प्रदान करण्यास आणि स्पर्धात्मक ताकदीसाठी मॉड्यूलर, लवचिक उपाय वितरित करण्यास सक्षम करतो.आर्थिक वर्ष २०२२ पासून, कंपनीने तिच्या परिसंस्थेत सातत्याने वाढ पाहिली आहे: ३० जून २०२५ पर्यंत,श पीएलएलने अंदाजे ९८८३०४ व्यापाऱ्यांना (आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ५३०३१८ वरून),७१६ ग्राहक ब्रँड आणि उपक्रमांना (आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ४४४ वरून) आणि १७७ वित्तीय संस्थांना (आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ८० वरून) सेवा दिली. ही वाढती घनता आणि सहभाग पीएलएलच्या स्पर्धात्मक खंदकाला बळकटी देतो, त्याच्या फिनटेक पायाभूत सुविधांमध्ये स्केलेबल आणि वैविध्यपूर्ण महसूल प्रवाहांना समर्थन देतो.पाइन लॅब्स लिमिटेड (पीएलएल) ही एक तंत्रज्ञान कंपनी आहे जी डिजिटल पेमेंटद्वारे व्यापाराचे डिजिटलायझेशन करण्यावर आणि भारतातील व्यापारी, ग्राहक ब्रँड आणि उद्योग आणि वित्तीय संस्थांसाठी उपाय जारी करण्यावर लक्ष केंद्रित करते, जे मलेशिया, युएई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि आफ्रिका सारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विस्तार करतात. पीएलएलचे प्लॅटफॉर्म प्रगत क्लाउड-आधारित पायाभूत सुविधांवर आधारित आहे, जे स्टोअरमध्ये आणि ऑनलाइन पेमेंट स्वीकृती, परवडणारी सोल्यूशन्स, मूल्यवर्धित सेवा(व्हीएएस) आणि फिनटेक पायाभूत सुविधा सक्षम करते. कंपनीच्या ऑफरिंग्ज त्यांच्या इकोसिस्टम भागीदारांसाठी व्यापार सुलभ करण्यासाठी आणि सुरक्षित करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत, व्यापारी, ग्राहक ब्रँड आणि वित्तीय संस्थांसाठी डिजिटल परिवर्तनास समर्थन देतात.पीएलएलचे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रान्झॅक्शन प्लॅटफॉर्म व्यापाऱ्यांना पेमेंट पद्धतींची विस्तृत श्रेणी स्वीकारण्यास, बिलिंग सिस्टमसह एकत्रित होण्यास, बक्षिसे आणि निष्ठा कार्यक्रम व्यवस्थापित करण्यास आणि त्वरित कॅशबॅक आणि लवचिक हप्ते योजना यासारख्या परवडणारी उपाययोजना ऑफर करण्यास सक्षम करते. हे प्लॅटफॉर्म व्यवसाय सॉफ्टवेअर अनुप्रयोगांना देखील समर्थन देते, व्यापाऱ्यांना त्यांचे स्टोअर डिजिटायझेशन करण्यास आणि ऑर्डरिंग, बिलिंग, इन्व्हेंटरी आणि जीएसटी अनुपालन यासारख्या प्रमुख ऑपरेशन्स व्यवस्थापित करण्यास अनुमती देते. इश्यूइंग अँड अक्वायरिंग प्लॅटफॉर्ममुळे ग्राहक ब्रँड आणि उद्योगांना भेटवस्तू, जाहिराती, कॅशबॅक, परतफेड, बक्षिसे आणि कर्मचारी प्रोत्साहनांसाठी प्रीपेड कार्ड जारी करण्याची परवानगी मिळते, तसेच वित्तीय संस्थांना क्रेडिट, डेबिट, प्रीपेड आणि फॉरेक्स कार्ड जारी करण्यास आणि व्यापारी खरेदी व्यवस्थापित करण्यास सक्षम केले जाते. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये, पीएलएलने ११४२५ अब्ज रुपयांचे एकूण व्यवहार मूल्य (जीटीव्ही) आणि ५.६८ अब्ज व्यवहारांवर प्रक्रिया केली, ज्यामुळे ९८८३०४ व्यापारी, ७१६ ग्राहक ब्रँड आणि उपक्रम आणि १७७ वित्तीय संस्थांना सेवा मिळाली. व्यवहार मूल्यानुसार कंपनी भारतातील सर्वात मोठी क्लोज्ड आणि सेमी-क्लोज्ड लूप गिफ्ट कार्ड जारी करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते आणि डिजिटल चेकआउट पॉइंट्सवर डिजिटल परवडणारी सोल्यूशन्सची आघाडीची सक्षम करणारी कंपनी आहे. पीएलएलच्या प्लॅटफॉर्मने उच्च अपटाइम (स्टोअरमध्ये आणि ऑनलाइन पेमेंटसाठी ९९.९३%, प्रीपेड जारी करण्यासाठी ९९.९९%) साध्य केले आहे आणि पीसीआय-डीएसएस आणि आयएसओ प्रमाणपत्रांसह प्रमुख सुरक्षा मानकांचे पालन करते.पीएलएलची वाढीची रणनीती तिच्या विद्यमान ऑफरिंग्जचे स्केलिंग, भागीदारांच्या इकोसिस्टमचा विस्तार, तंत्रज्ञानात गुंतवणूक, नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश आणि धोरणात्मक अधिग्रहणांवर लक्ष केंद्रित करते. कंपनीचे प्लॅटफॉर्म स्केलेबल, क्लाउड-नेटिव्ह, एपीआय-चालित आणि सुरक्षित, भागीदारांसाठी जलद एकात्मता आणि कस्टमायझेशनला समर्थन देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. पीएलएलचा तंत्रज्ञान स्टॅक त्याला मोठ्या व्यवहार व्हॉल्यूमवर प्रक्रिया करण्यास, मजबूत सुरक्षा प्रदान करण्यास आणि स्पर्धात्मक ताकदीसाठी मॉड्यूलर, लवचिक उपाय वितरित करण्यास सक्षम करतो. इकोसिस्टम जे व्यापारी, ग्राहक ब्रँड आणि उपक्रम आणि वित्तीय संस्थांना एकत्र आणते जे वाणिज्य व्यवहार सक्षम करते आणि नेटवर्क प्रभाव निर्माण करते: पीएलएल त्याच्या वाणिज्य परिसंस्थेतील अनेक प्रमुख घटकांना थेट गुंतवून ठेवते आणि जोडते, ज्यामध्ये व्यापारी, ग्राहक ब्रँड आणि उपक्रम, वित्तीय संस्था, ग्राहक आणि व्यवसाय सॉफ्टवेअर अनुप्रयोग प्रदाते यासारख्या भागीदारांचा विस्तार होत आहे. जसजसे इकोसिस्टम अधिक सहभागी आणि व्यवहारांसह घन होत जाते, तसतसे पीएलएलचे प्लॅटफॉर्म प्रभावीतेत सुधारते आणि मजबूत नेटवर्क प्रभाव निर्माण करते. प्रत्येक अतिरिक्त सहभागी व्यवहार व्हॉल्यूम, डेटा अंतर्दृष्टी आणि प्रक्रिया कार्यक्षमता वाढवते,प्रमाणित स्केल आणि ऑपरेटिंग नफ्यात वाढ असलेले प्लॅटफॉर्म: पीएलएल त्याच्या डिजिटल पायाभूत सुविधा आणि व्यवहार प्लॅटफॉर्म आणि त्याच्या जारी आणि अधिग्रहण प्लॅटफॉर्मद्वारे सेवांची एक व्यापक श्रेणी प्रदान करते.तंत्रज्ञान प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक: पीएलएल आयटी मालमत्ता, क्लाउड पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान विकासात सतत गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्ध आहे. विक्री केंद्रांवर आपली उपस्थिती वाढविण्यासाठी आणि मुख्य तंत्रज्ञान पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अतिरिक्त डिजिटल चेकआउट पॉइंट्स (डीसीपी) खरेदी करण्याची योजना आखत आहे. नाविन्यपूर्ण प्रयत्नांमध्ये सेतूद्वारे अलिकडेच यूपीआय स्विच लाँच करणे समाविष्ट आहे, ज्यामुळे वित्तीय संस्थांना यूपीआय-आधारित सेवा देता येतील. याव्यतिरिक्त, सेतूच्या अकाउंट अॅग्रीगेटर सेवेने कर्जदार आणि फिनटेकसाठी एक इनसाइट्स उत्पादन सादर केले आहे जे क्रेडिट अंडररायटिंग, फसवणूक शोधणे आणि कर्ज देखरेख वाढविण्यासाठी प्रगत लार्ज लँग्वेज मॉडेल्स (एलएलएम) आणि पारंपारिक मशीन लर्निंग एकत्र करते. कंपनीचे संशोधन, विकास, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संघ, ज्यामध्ये २८९ कर्मचारी आहेत, विद्यमान तंत्रज्ञान सुधारण्यावर आणि नवीन उत्पादने तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतात. पीएलएलचे तांत्रिक नेतृत्व राखण्यासाठी आणि बाजारपेठांमध्ये त्याच्या वित्तीय उत्पादन ऑफरची स्केलेबिलिटी आणि सुरक्षिततेला समर्थन देण्यासाठी हे उपक्रम महत्त्वपूर्ण आहेत.नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेशआणि विद्यमान आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विस्तार: पाईन लॅब्स लिमिटेड (PLL) ने आग्नेय आशिया, युएई, युएस आणि ऑस्ट्रेलिया सारख्या बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करून निवडक जागतिक विस्ताराची योजना आखली आहे. त्याच्या जारी आणि अधिग्रहण प्लॅटफॉर्मला व्यापक आंतरराष्ट्रीय आकर्षण आहे आणि कंपनीचे उद्दिष्ट या प्रदेशांमधील ग्राहकांना एकत्र आणणे आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने आग्नेय आशियामध्ये त्याच्या परवडणाऱ्या उपाययोजनांचा विस्तार करण्यासाठी एका प्रमुख नेटवर्क प्लेअरसोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय वाढीला चालना मिळते.धोरणात्मक अधिग्रहण आणि गुंतवणूकीचा पाठपुरावा: PLL आपला व्यवसाय वाढविण्यासाठी, स्पर्धात्मक स्थिती वाढविण्यासाठी, नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादने मिळविण्यासाठी आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी धोरणात्मक अधिग्रहण आणि गुंतवणूकीचा पाठपुरावा करते. उल्लेखनीय अधिग्रहणांमध्ये Qwikcilver, Fave, Mosambee, QFix, Setu, Saluto आणि Credit+ यांचा समावेश आहे.Qwikcilver साठी, PLL ने ग्राहक ब्रँड आणि व्यापाऱ्यांसाठी प्रीपेड कार्ड जारी करण्याचे उपाय वाढवण्यासाठी गुंतवणूक केली. Mosambee आणि QFix मधील गुंतवणूक लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांपर्यंत पोहोच वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते. सेतू पीएलएलला पेमेंट, डेटा इनसाइट्स आणि ओळख यासारख्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी एपीआय-चालित तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म ऑफर करण्यास सक्षम करते. हे अजैविक वाढीचे प्रयत्न बोर्डाद्वारे मार्गदर्शन केले जातात आणि पीएलएलच्या शाश्वत वाढीच्या धोरणाला पाठिंबा देण्यासाठी कौशल्य, क्षमता आणि बाजारपेठेतील पोहोच मिळवण्याचे लक्ष्य ठेवतात.कार्ड व्यवहार आणि को-ब्रँडेड कार्ड वेगाने विस्तारत आहेत, युपीआयवरील क्रेडिटला महत्त्व मिळत आहे. निवडक आंतरराष्ट्रीय भौगोलिक क्षेत्रांमध्ये संधी आग्नेय आशिया (SEA), युएई, ऑस्ट्रेलिया आणि युएसमधील एकूण अँड्रेसेबल मार्केट (TAM) २०२४ मध्ये २ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे आणि २०२८ पर्यंत १०-११% सीएजीआर (Compound Annual Growth Rate CAGR) ने वाढून ३ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. उच्च इंटरनेट प्रवेश (८४%) द्वारे समर्थित SEA ची डिजिटल पेमेंट इकोसिस्टम, DCPs आणि परवडणाऱ्या सोल्यूशन्सद्वारे व्यवहार मूल्ये विस्तारत असताना वेगाने वाढत आहे.युएई मार्केटची वाढ मजबूत रिटेल, कॅशलेस उपक्रम आणि वाढत्या डिजिटल वॉलेट स्वीकारामुळे चालते. एसईएआणि युएसई दोन्ही बाजारपेठांमध्ये प्रीपेड कार्ड आणि परवडणाऱ्या सोल्यूशन्सचा विस्तार होत आहे. ऑस्ट्रेलिया आणि यूएसएमध्ये स्थिर प्रीपेड कार्ड मार्केट वाढ दिसून येते, ज्यामध्ये पेरोल आणि खर्च व्यवस्थापन सोल्यूशन्समध्ये अमेरिका आघाडीवर आहे.स्पर्धात्मक लँडस्केप -भारताच्या डिजिटल पेमेंट्स आणि फिनटेक क्षेत्रात असंख्य खेळाडू आहेत, जरी व्यापारी, ब्रँड आणि वित्तीय संस्थांना सेवा देणाऱ्या पाइन लॅब्सच्या व्यापक ओम्नीचॅनेल सोल्यूशन सूटशी जुळणारे कोणीही नाही. देशांतर्गत समवयस्कांमध्ये पेटीएम, रेझरपे, पेयू, फोनपे, बिलडेस्क, सीसीएव्हेन्यू आणि झॅगल यांचा समावेश आहे, जे प्रत्येकी वॉलेट्स, पेमेंट गेटवे, कर्ज देणे आणि व्यापारी वित्तपुरवठा सोल्यूशन्स यासारखे विविध उत्पादन संयोजन प्रदान करतात. जागतिक स्पर्धकांमध्ये एडियन, शॉपिफाय, ब्लॉक आणि मार्केटा यांचा समावेश आहे जे विस्तृत फिनटेक पायाभूत सुविधा आणि वाणिज्य उपाय प्रदान करतात.पाइन लॅब्सचा क्लोज्ड आणि सेमी-क्लोज्ड लूप गिफ्ट कार्ड प्रोसेसिंग, डीसीपीमध्ये परवडणारे समाधान यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे आणि ते टॉप इन-स्टोअर डिजिटल प्लॅटफॉर्म आणि भारत कनेक्ट पेमेंट प्रोसेसरमध्ये आहे.उद्योग आव्हाने आणि जोखीमांवर एचडीएफसी सिक्युरिटीजने काय म्हटले?मुख्य जोखमींमध्ये ग्राहकांच्या खर्चावर परिणाम करणारी आर्थिक मंदी, कार्ड-आधारित पेमेंट मॉडेल्स आणि कर्ज देण्याच्या पद्धतींवर परिणाम करणारे नियामक बदल, पेमेंट्सचे आकार बदलू शकणारे सीबीडीसी सारखे विकसित तंत्रज्ञान, ग्राहकांचा विश्वास कमी करणारे सायबरसुरक्षा धोके आणि कर्ज देणे आणि परवडणारे समाधानांवर परिणाम करणारे वाढणारे गुन्हेगारी यांचा समावेश आहे. सरकार-समर्थित डिजिटल उपक्रम पारंपारिक व्यवसाय मॉडेल्समध्ये व्यत्यय आणू शकतात. आणि प्रतिसादात चपळता आवश्यक आहे. स्पर्धात्मक दबावांमध्ये सतत नावीन्य सुनिश्चित करणे आणि स्केलेबल, सुरक्षित प्लॅटफॉर्म राखणे महत्वाचे आहे.प्रमुख चिंताअलीकडच्या वर्षांत पीएलएलला लक्षणीय तोटा सहन करावा लागला आहे, ज्यामध्ये आर्थिक वर्ष २०२५ मध्ये १४५४.८७ दशलक्ष रुपये, उच्च खर्चामुळे झाले आहेत. सतत होणारे नुकसान नफ्यावर परिणाम करू शकते आणि अतिरिक्त निधीची आवश्यकता असू शकते.कंपनीला नकारात्मक ऑपरेटिंग रोख प्रवाहाचा अनुभव आला आहे, अंशतः वाढत्या व्यापार प्राप्ती आणि प्रीपेड कार्ड देयतेमुळे ज्यामुळे तरलता जोखीम निर्माण होते. विविध ग्राहक आधार राखणे आणि संपादन करणे गंभीर आहे. ग्राहकांचे नुकसान किंवा इकोसिस्टम भागीदार वाढविण्यात अयशस्वी होणे व्यवसाय वाढीस अडथळा आणू शकते.महसूल एकाग्रतेचा धोका अस्तित्वात आहे, ज्यामध्ये शीर्ष १० ग्राहक आर्थिक वर्ष २०२५ मध्ये अंदाजे ३०.९५% महसूल देतात, ज्यामुळे पीएलएल त्यांच्या व्यवसाय निर्णयांसाठी असुरक्षित बनतो. लेखापरीक्षकांच्या अहवालात गेल्या काही वर्षांत अंतर्गत आर्थिक नियंत्रणांमध्ये महत्त्वाच्या कमकुवतपणाची नोंद झाली आहे जरी सुधारणा चालू आहेत.पीएलएल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि रिबिट यांच्याकडून तीव्र नियामक देखरेखीखाली आहे. अनुपालन न करणे किंवा प्रतिकूल नियामक निष्कर्षांमुळे दंड किंवा व्यवसायात व्यत्यय येऊ शकतो.संरक्षण, उल्लंघनाचे दावे आणि मालकी तंत्रज्ञानाचा अनधिकृत वापर यांसंबंधी बौद्धिक संपदा जोखीम अस्तित्वात आहेत हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि क्लाउड सेवांसाठी थर्ड पार्टी विक्रेत्यांवर अवलंबून राहिल्याने पीएलएलला पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि संबंधित ऑपरेशनल जोखीमांना सामोरे जावे लागते.थर्ड पार्टी प्रणाली आणि प्लॅटफॉर्मसह एकत्रीकरण आणि इंटरऑपरेबिलिटी महत्त्वपूर्ण आहे; कोणत्याही तंत्रज्ञानाच्या विसंगतीमुळे ग्राहकांच्या समाधानावर परिणाम होऊ शकतो.पेमेंट कार्ड नेटवर्क एकाग्रतेमुळे नियम, मानके किंवा व्यवहार प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या संबंधांमध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण होते.व्यापारी आणि ग्राहकांच्या खर्चावर परिणाम करणाऱ्या व्यापक-आर्थिक मंदीमुळे व्यवहाराचे प्रमाण कमी होऊ शकते, ज्यामुळे पीएलएलचे उत्पन्न कमी होऊ शकते.व्यापाऱ्यांना लवकर सेटलमेंट सुविधा जारी केल्याने क्रेडिट जोखीम उद्भवते, ज्यामुळे निधीचे गैरव्यवस्थापन किंवा पुनर्प्राप्तीमध्ये विलंब होण्याची शक्यता असते.बाजारतज्ञ व आयपीओतज्ज्ञ दिलीप दावडा यांनी काय म्हटले?पीएलएल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर डिजिटल पेमेंट आणि संबंधित उपाय प्रदान करण्यात गुंतलेली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २५ पर्यंतच्या कालावधीत तिच्या टॉप लाईन्समध्ये वाढ नोंदवली आहे, परंतु तोटा सहन करावा लागला आहे. आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीतच कंपनीने वळण घेतले. सरकारच्या डिजिटल इंडियाच्या हालचाली लक्षात घेता, पीएलएल दीर्घकाळात उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज आहे. अशाप्रकारे, ही एक पूर्णपणे दीर्घकालीन कथा आहे. त्याच्या अलीकडील आर्थिक डेटाच्या आधारे हा मुद्दा आक्रमक किंमतीचा दिसतो. केवळ सुज्ञ/जोखीम शोधणारे/कॅश सरप्लस गुंतवणूकदारच दीर्घकालीन कालावधीसाठी या आयपीओत मध्यम प्रमाणात निधी ठेवू शकतात.
CM Devendra Fadnavis honoured Maharashtra players : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदाच जेतेपद पटकावले आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी धूळ चारून हा अविस्मरणीय विजय मिळवला. या ऐतिहासिक क्षणानंतर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. यानंतर शुक्रवारी महाराष्ट्राच्या […] The post CM Devendra Fadnavis : विश्वविजेत्या लेकींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव! अमोल मुझुमदारांबद्धल केलं मोठं भाकीत appeared first on Dainik Prabhat .
Anil Deshmukh : भाजपने मध्य प्रदेशातून कार्यकर्ते आणले; माजी गृहमंत्री देशमुखांचा आरोप
नागपूर : विधानसभा २०१९ ते लोकसभा २०२४ निवडणुकीदरम्यान मतदारांची झालेली वाढ १ हजार ९५२ इतकी होती. मात्र, लोकसभा २०२४ ते विधानसभा २०२४ या पाच महिन्यांच्या कालावधीत ८ हजार ४०० मते वाढली. इतकेच नाही तर, लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी मतदान केले होते, त्यांची व कुटुंबीयांची नावे विधानसभा २०२४च्या निवडणुकीच्या वेळी मतदारयादीमध्ये नव्हती. मुलाचे आणि वडिलांचे […] The post Anil Deshmukh : भाजपने मध्य प्रदेशातून कार्यकर्ते आणले; माजी गृहमंत्री देशमुखांचा आरोप appeared first on Dainik Prabhat .
“वंदे मातरम गीतावर अन्याय झाला, या गीताची काही कडवी काँग्रेसने वगळली होती…”–पंतप्रधान मोदी
Vande Mataram song । Congress । Prime Minister Modi – ७ नोव्हेंबर २०२५ हा एक अतिशय ऐतिहासिक दिवस आहे. आज आपण ‘वंदे मातरम’ची १५० वी वर्धापन दिन साजरा करत आहोत. हा शुभ प्रसंग आपल्याला नवीन प्रेरणा देईल आणि लाखो देशवासीयांना नवीन उर्जेने भरेल. इतिहासात या दिवसाचे स्मरण करण्यासाठी, आज ‘वंदे मातरम’ ला समर्पित एक विशेष […] The post “वंदे मातरम गीतावर अन्याय झाला, या गीताची काही कडवी काँग्रेसने वगळली होती…” – पंतप्रधान मोदी appeared first on Dainik Prabhat .
Dhananjay Munde : मनोज जरांगेंच्या आरोपावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, सगळंच सांगून टाकलं
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसणारे मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कट रचल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जालना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणात एका बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला होता. आज मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी […] The post Dhananjay Munde : मनोज जरांगेंच्या आरोपावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, सगळंच सांगून टाकलं appeared first on Dainik Prabhat .
असं चकवलं कांगारुंना, शिवम दुबेने दिली माहिती
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघाला केवळ ११९ धावांवर रोखले आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.या विजयात शिवम दुबेने महत्त्वाची भूमिका बजावली. फलंदाज म्हणून त्याने १८ चेंडूत २२ धावा करत संघाला मजबूत स्थितीत नेले, तर गोलंदाज म्हणून फक्त दोन षटकांत २० धावा देत मिचेल मार्श आणि टीम डेव्हिड या दोन प्रमुख खेळाडूंना माघारी पाठवले. त्याच्या या डावाने सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकवले.सामन्यानंतर दुबेने आपल्या यशामागील गोष्ट उघड केली. त्याने सांगितले की प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सतत आत्मविश्वास वाढवला आणि आक्रमक गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. गोलंदाज प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांच्या सूचनांमुळे त्याच्या बॉलिंगमध्ये सुधारणा झाली. तसेच मोठ्या सीमारेषेचा फायदा घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मोठे शॉट खेळण्यास प्रवृत्त करण्याची रणनिती त्याने वापरली.दरम्यान, त्याने मारलेल्या एका षटकाराची विशेष चर्चा रंगली. एडम झाम्पाच्या चेंडूवर त्याने स्टंपबाहेरचा बॉल अचूक टायमिंगने १०६ मीटर लांब पाठवला की बॉल थेट मैदानाच्या बाहेरच गेला.
मेट्रो प्रवाश्यांसाठी महत्वाची बातमी ! राज्य सरकार दरवाढीच्या तयारीत
मुंबई : रेल्वे प्रमाणे मेट्रोलाही मुंबईकरांच्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. मुंबईत २०१४ पासून सुरू झालेले मेट्रोचे जाळे आता विस्तारत जात आहे. आणि त्याला मुंबईकरांचा भरभरून प्रतिसादही मिळत आहे. नुकत्याच सुरु झालेल्या भुयारी मेट्रोला ही मुंबईकरांनी पसंती दर्शवली. मात्र आता हा प्रतिसाद कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे राज्य सरकार मेट्रोच्या भाड्यात वाढ करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. दरवाढ लक्षणीय असेल, तर मुंबईकरांना इतर पर्यायांचा विचार करावा लागू शकतो. सध्या मेट्रो 2A आणि 7 मार्गिकांवर 3 ते 12 किलोमीटर प्रवासासाठी 20 रुपये भाडे आकारले जाते, तर भुयारी मेट्रोसाठी हेच अंतर 40 रुपयांपर्यंत जाते. मेट्रो 1 वरही 8 ते 11.4 किलोमीटरसाठी 40 रुपये आकारले जातात.दरवाढ कोणत्या मार्गिकांसाठी होणार?राज्य सरकारने मेट्रोच्या भाडे निर्धारण समितीच्या स्थापनेसाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. त्यामुळे मेट्रो 2A (अंधेरी पश्चिम–दहिसर) आणि मेट्रो 7 (गुंदवली–दहिसर) या मार्गिकांवरील भाडेवाढ जवळपास निश्चित मानली जात आहे. एमएमआरडीएने हा प्रस्ताव मागील ऑगस्टमध्येच राज्य सरकारकडे पाठवला होता. राज्य सरकारने त्यास मंजुरी देऊन केंद्राच्या सॉल्ट पॅन विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. केंद्राच्या परवानगीनंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली भाडे निर्धारण समिती स्थापन केली जाणार आहे.दरवाढीमागील कारण काय आहे?सध्या एमएमआरडीएच्या मेट्रो मार्गिकांवर दररोज सुमारे 3 लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, प्रकल्प अहवालानुसार पहिल्या वर्षी प्रवासी संख्या 9 लाखांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात प्रवासी संख्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याने उत्पन्नात तुटवडा जाणवतो आहे, आणि खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे एमएमआरडीएला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. तसेच, मुंबईतील इतर मेट्रो मार्गिकांचे भाडे या मार्गिकांपेक्षा जास्त आहे. या तफवातीबरोबरच वाढत्या आर्थिक तुटीमुळे मेट्रो 2A आणि 7 मार्गिकांच्या भाडेवाढीचा प्रस्ताव प्रशासन गांभीर्याने विचारात घेत आहे.
बुलढाणा : नात्यांना काळीमा फासणारी एक हादरवणारी आणि हृदयद्रावक घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे घडली आहे. शेतीच्या वादातून एका मुलाने दारूच्या नशेत आपल्या जन्मदात्या आई आणि वडिलांची क्रूर हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव डुकरे येथील एका कुटुंबात शेतीच्या तुकड्यावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. गुरुवारी रात्रीच्या सुमारास मुलगा दारूच्या नशेत घरी आला. त्याने याच वादातून आपल्या आई-वडिलांवर कुऱ्हाडीने वार केले. वार इतके क्रूर होते की आई आणि वडिलांचा जागीच मृत्यू झाला. जन्मदात्यांची निर्घृण हत्या केल्यानंतर, या कृत्याच्या धक्क्याने किंवा पश्चात्तापाने त्याने घरामध्येच गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://prahaar.in/2025/11/07/important-news-for-metro-passengers-state-government-preparing-for-fare-hike/व्यसनाच्या विळख्याने घडवले तिहेरी हत्याकांडअत्यंत शांत आणि साधे म्हणून ओळखले जाणारे चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे हे गाव गुरुवारी रात्री एका भीषण तिहेरी हत्याकांडाने हादरले. दारूच्या व्यसनामुळे एका कुटुंबाचे अस्तित्वच एका क्षणात संपले आहे. या हादरवून टाकणाऱ्या घटनेत वडील सुभाष दिगंबर डुकरे (६७) आणि आई लता सुभाष डुकरे (५५) यांची निर्घृण हत्या झाली आहे, तर आरोपी मुलगा विशाल सुभाष डुकरे (३२) याने स्वतः गळफास घेऊन आपले जीवन संपवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण कृत्यामागे विशाल डुकरेचे दारूचे व्यसन हेच मूळ कारण होते. विशालला दारूचे व्यसन जडल्यापासून घरात वारंवार वाद आणि भांडणे होत होती. या व्यसनाने कुटुंबाची शांतता हिरावून घेतली होती. गावकरी सांगतात की, विशाल लहानपणी अत्यंत हुशार आणि शाळेत पहिला येणारा विद्यार्थी होता. मात्र, हळूहळू तो दारूच्या नादी लागून बिघडत गेला. कामधंदा सोडून तो दिवसभर दारूच्या नशेत असायचा. आई-वडिलांना शिवीगाळ आणि मारहाण करणे हे त्याचे रोजचे झाले होते. व्यसनाच्या या विळख्यामुळे त्याचे लग्न मोडले, मित्र दूर झाले आणि कुटुंबातील शांतता कायमची हरपली. अखेर दारूच्या नशेतच त्याने कुऱ्हाडीने वार करत जन्मदात्यांची क्रूर हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवले. या भीषण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ चिखली घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. व्यसनाच्या विळख्यात अडकून कुटुंबाचे झालेले हे भीषण हत्याकांड संपूर्ण जिल्ह्याला चटका लावून गेले आहे.चिमुकल्यांचा जीव थोडक्यात बचावलाया भीषण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या काही वेळातच पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अमोल गायकवाड आणि सुधीर पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तपासाला गती देण्यासाठी फॉरेन्सिक टीमने तातडीने तपासणी सुरू केली आहे. मृतांमध्ये वडील सुभाष दिगंबर डुकरे (६७), आई लता सुभाष डुकरे (५५) आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे (३२) यांचा समावेश आहे. या संपूर्ण घटनेतील एक दिलासा देणारी बाजू समोर आली आहे, ती म्हणजे मृतांच्या कुटुंबातील दोन लहान मुले सुदैवाने वाचली. मृतक आरोपी विशालचा मोठा भाऊ शरद पाटील यांचा ११ वर्षांचा मुलगा युवराज आणि ६ वर्षांची मुलगी आर्या, हे दोघेही 'त्या' रात्री घरी नव्हते. गावात बोलले जाते की, या दोन्ही चिमुकल्यांना आजी-आजोबांवर (सुभाष आणि लता) खूप लळा होता आणि ते रोज रात्री त्यांच्याकडेच झोपायला जात असत. परंतु, गेल्या दोन-तीन दिवसांपासून ते आजी-आजोबांकडे गेले नव्हते. त्यांच्या याच अनुपस्थितीमुळे त्यांच्यावरील मोठे संकट टळले आणि त्यांचे प्राण थोडक्यात बचावले. या घटनेमुळे सावरगाव डुकरे गावात खोलवर शोककळा पसरली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
मुंबई : भारतातील मनोरंजन व्यासपीठ प्राइम व्हिडिओने आज मुंबईत चाहत्यांसाठी आणि माध्यमांसाठी आयोजित एका कार्यक्रमात ‘द फॅमिली मॅन’ सीझन ३चा ट्रेलर लाँच केला.राज आणि डीके यांनी त्यांच्या D2R Films या बॅनरखाली निर्मित केलेली ही बहुचर्चित, गुप्तहेर मालिका पुन्हा एकदा परत येत आहे. यात मनोज बाजपेयी साकारत असलेला गुप्तहेर श्रीकांत तिवारी याची कथा या वेळी नव्या वळणावर असलेली बघायला मिळणार आहे.https://youtu.be/jsauQx_Fwrg?si=SriF85UHUYe8zEp0नेहमीप्रमाणेच विनोदी संवाद, जबरदस्त अॅक्शन, थरारक पाठलाग आणि वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याची गुंतागुंत – या सर्व घटकांनी भरलेला हा नवीन सीझन चाहत्यांना पुन्हा एकदा खिळवून ठेवणार आहे.या सीझनचे लेखन राज, डीके आणि सुमन कुमार यांनी केले असून, संवाद सुमित अरोरा यांचे आहेत. दिग्दर्शनाची जबाबदारी राज आणि डीके यांच्यासोबत सुमन कुमार आणि तुषार सेठ यांनी सांभाळली आहे.या सीझनमध्ये मनोज बाजपेयींसोबत जयदीप अहलावत आणि निम्रत कौर हे नव्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. तसेच आधीच्या सीझनमधील प्रिय कलाकार पुन्हा एकत्र येणार आहेत — शारिब हाशमी (जे.के. तलपदे), प्रियमणी (सुचित्रा तिवारी), अश्लेशा ठाकूर (ध्रुती तिवारी), वेदांत सिन्हा (अथर्व तिवारी), श्रेय धन्वंतरी (झोया) आणि गुल पनाग (सलोनी).‘द फॅमिली मॅन’ सीझन ३ प्राइम व्हिडिओवर २१ नोव्हेंबरपासून भारतासह जगभरातील २४० पेक्षा अधिक देश आणि प्रदेशांमध्ये पाहायला मिळणार आहे.राज आणि डीके म्हणाले , “या सीझनमध्ये श्रीकांतचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य पूर्णपणे उलथून गेले आहे. तो आपल्या कुटुंबासह एका नव्या आणि भीषण संकटात सापडतो. रुक्मा आणि मीरा या भूमिकांसाठी जयदीप आणि निम्रत ही परिपूर्ण जोडी आहे. या सीझनमधून प्रेक्षकांना अधिक ताण, थरार आणि भावनिक संघर्ष अनुभवायला मिळेल.”मनोज बाजपेयी म्हणाले, “गेल्या चार वर्षांपासून चाहते मला विचारत होते — ‘श्रीकांत तिवारी केव्हा परत येणार?’ आणि अखेर त्याचे उत्तर मिळाले आहे! नवीन सीझन आधीपेक्षा मोठा, धाडसी आणि अधिक रोमांचक आहे. राज आणि डीके यांच्या दृष्टीकोनामुळे आणि प्राइम व्हिडिओच्या साथीनं ‘द फॅमिली मॅन’ आज देशातील सर्वाधिक प्रिय मालिकांपैकी एक बनली आहे. मला खात्री आहे की प्रेक्षक या सीझनलाही तितकंच प्रेम देतील.”जयदीप अहलावत म्हणाले, “‘द फॅमिली मॅन’सारख्या उत्कृष्ट मालिकेचा भाग होणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. राज आणि डीके यांच्यासोबत काम करणे ही एक आनंददायक अनुभूती आहे. माझी भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आश्चर्यचकित करेल.” निम्रत कौर म्हणाल्या, “मी ‘द फॅमिली मॅन’ची चाहती आहे आणि या सीझनमध्ये एक ताकदवान नवा पात्र म्हणून सामील होणे हे माझ्यासाठी स्वप्नवत अनुभव आहे. मनोज आणि जयदीप यांच्यासोबत काम करणे आव्हानात्मक पण अतिशय समाधानकारक होते. कथानकातील अप्रत्याशित वळणांमुळे प्रेक्षक हा सीझन एकाच वेळी बघून संपवतील, यात शंका नाही.”‘द फॅमिली मॅन’ सीझन ३ – २१ नोव्हेंबरपासून फक्त प्राइम व्हिडिओवर!
Parth Pawar – मुंढवा येथील जमिनीच्या गैरव्यवहारानंतर आता पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्ज कंपनीचा आणखी एक जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. बोपोडी येथील शासनाच्या मालकीच्या ५ हेक्टर जमिनीचा अपहार करून बेकायदेशीररीत्या खाजगी ताबा दर्शविण्याच्या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात तहसीलदारासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजून ४१ […] The post Parth Pawar : पार्थ पवारांचा पाय आणखी खोलात.! आणखी एक मोठा जमीन गैरव्यवहार उघडकीस; ९ जणांवर गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat .
BSE Stock Surge: निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यावर बीएसई शेअर ८% उसळला
प्रतिनिधी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फ्युचर अँड ऑप्शन्स (F&O) बद्दल केलेल्या वक्तव्यावर शेअर बाजाराने बीएसई (Bombay Stock Exchange BSE)शेअरला मोठा प्रतिसाद दिला आहे. सकाळी सत्र सुरूवातीला शेअर ४% व दुपारपर्यंत ८% पातळीवर उसळला आहे. विशेषतः कालच्या वक्तव्यानंतर शेअर बुलिश पँटर्नवर गेल्याचे स्पष्ट झाले. काल निर्मला सीतारामन यांनी एका कार्यक्रमात एफ अँड ओ वरील बंदीचा कुठलाही विचार नसल्याचे अथवा निर्बंध घालण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र याविषयी गुंतवणूकदारांमध्ये सजगता आवश्यक आहे असे म्हटले आहे.डेरीएटीव गुंतवणूकीत गुंतवणूकदारांना रोखण्याचा विचार नाही असे सीतारामन म्हणाल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भाग घेताना डेरिएटीव प्रकारातील गुंतवणूकीत जोखीम लक्षात घेण्याची गरज असल्याचेही विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी केले. 'सजगता' अत्यंत महत्वाची असल्याचे निर्मला सीतारामन यांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे सरकारने केलेल्या सकारात्मक विधानानंतर डेरिएटिव गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्यामध्ये आज बाजारात मोठा प्रतिसाद बीएसई शेअरला मिळाला आहे. दुपारी १.५६ वाजेपर्यंत शेअर्समध्ये थेट ८% उसळत २६५१.८० पातळीवर पोहोचला आहे.सेबीच्या ताज्या आकडेवारीनुसार,आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ९१% वैयक्तिक एफ अँड ओ व्यापाऱ्यांना निव्वळ तोटा झाला आहे. जो एकूण १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होता. अहवालात असे नुकसान अन्यथा जबाबदार गुंतवणूक आणि दीर्घकालीन भांडवल निर्मितीला कारणीभूत ठरू शकले असते असे अधोरेखित करण्यात आले आहे.हेजिंग, सट्टेबाजी आणि मध्यस्थीसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या या एफ अँड ओ साधनांमध्ये उच्च जोखीम असते. गुंतवणूकदारांना बाजाराची स्पष्ट समज आवश्यक असते. वाढत्या सट्टेबाजीला तोंड देण्यासाठी, बाजारात सेबीने यापूर्वी स्थिती मर्यादा आणि मार्जिन आवश्यकतांबद्दल कडक नियम लागू केले होते. आतापर्यंत बीएसई शेअरने बाजारात चांगली कामगिरी केली आहे.उपलब्ध माहितीनुसार, गेल्या एक महिन्यापासून या शेअरने १४% परतावा दिला असून महिन्यातील आधारे २०% घसरण झाली आहे. तर या आर्थिक वर्षात शेअरने गुंतवणूकदारांना ६१% परतावा (Returns) दिले आहेत.
अक्षर पटेलची दमदार कामगिरी ! विराट आणि ख्रिस गेलशी बरोबरी
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना क्वीन्सलँडच्या कॅरारा ओव्हल मैदानावर रंगला. या सामन्यात भारतीय संघाने 48 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आणि मालिकेतील पराभवाचा धोका दूर केला. या विजयात अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलचा मोलाचा वाटा होता. फलंदाजीत त्याने नाबाद 21 धावा केल्या, तर गोलंदाजीत दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.या शानदार कामगिरीमुळे अक्षरला सामनावीराचा किताब मिळाला. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हा त्याचा तिसरा सामनावीर पुरस्कार आहे. यासह, अक्षरने विराट कोहली आणि ख्रिस गेल यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. तिघेही आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक सामनावीर ठरलेले खेळाडू ठरले आहेत.सामन्यानंतर अक्षर म्हणाला, “सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना मला विकेट समजली. फलंदाजांशी बोलल्यावर जाणवलं की चेंडू वेगाने येत नव्हता, त्यामुळे विकेट थोडी मंद होती. म्हणूनच मी माझ्या शैलीत फलंदाजी केली आणि गोलंदाजीत फलंदाजांना संधी न देता विकेट-टू-विकेट लांबी राखण्याचा प्रयत्न केला.” आता टीम इंडिया या मालिकेचा निर्णायक आणि शेवटचा सामना 8 नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळणार आहे.
जसप्रीत बुमराहचा पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्वीन्सलँडच्या कॅरारा ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपली गोलंदाजीची ताकद दाखवून दिली. या सामन्यात त्याने चार षटकांत २७ धावा देत एक विकेट घेतली आणि टीम इंडियाला ४८ धावांनी विजय मिळवून देण्यात हातभार लावला. या विजयासह भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आणि मालिका गमावण्याचा धोका टाळला.या सामन्यातील कामगिरीमुळे बुमराहने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनत त्याने पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमलला मागे टाकले. अजमलने ११ डावांमध्ये १९ बळी घेतले होते, तर बुमराहने १६ डावांत २० बळी मिळवले आहेत.या यादीत पाकिस्तानचा मोहम्मद अमीर १७ बळीसह तिसऱ्या क्रमांकावर असून, न्यूझीलंडचा मिशेल सँटनरही १७ बळींसह चौथ्या स्थानावर आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या टी-२० मालिकेचा शेवटचा सामना ८ नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेनमधील गाब्बा स्टेडियमवर खेळला जाईल, जिथे जसप्रीत बुमराहला आणखी एक मोठी कामगिरी करण्याची संधी मिळेल. बुमराह एक बळी घेऊन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० बळी पूर्ण करेल, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात १०० किंवा त्याहून अधिक बळी घेणारा पहिला भारतीय खेळाडूही बनेल.
होंडाने EICMA २०२५ मध्ये त्यांची पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल Honda WN7 लाँच केली
मुंबई / मिलान: होंडाने त्यांची पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल Honda WN7 प्रथमच बाजारात लाँच केली आहे. मिलान, इटली येथे ईआयसीएमएस (इटालियन भाषेत Esposizione Internazionale Del Ciclo Motocicolo e Accssori EICMA २०२५) (मिलान मोटरसायकल शो- प्रेस डे: ४-५ नोव्हेंबर, सार्वजनिक डे: ६-९ नोव्हेंबर) येथे ही सादर करण्यात आली आहे. जाणून घेऊयात या मोटारसायकलची वैशिष्ट्ये -होंडा WN7 ची प्रमुख वैशिष्ट्ये● विकास संकल्पनाहोंडा WN7 हे होंडाच्या नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल ब्रँडच्या दिग्दर्शनाखाली विकसित केलेले FUN श्रेणीतील पहिले इलेक्ट्रिक नेकेड मॉडेल आहे. त्याची विकास संकल्पना, बी द विंड, इलेक्ट्रिक वाहनासारखीच शांतता असलेल्या हवेतून मुक्तपणे चालवण्याचा आनंद व्यक्त करते. रायडर्स त्यांच्या सभोवतालचे आवाज आणि वातावरण थेट अनुभवू शकतात उदाहरणार्थ रस्त्यावरील लोकांचे संभाषण आणि हास्य, ICE (अंतर्गत ज्वलन इंजिन) मॉडेल्ससह शक्य नसलेले अनुभव आहेत. त्याच्या डेव्हलपर्सच्या आवडीचे प्रतिबिंबित करणारे, WN7 चे गुळगुळीत पण मजबूत टॉर्क अँक्सलरेशन आणि चपळ हाताळणी रायडर्सना वाऱ्याप्रमाणे सायकल चालवण्याची मुक्त भावना अनुभवण्यास अनुमती देते.● डिझाइनकार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि सार व्यक्त करण्याच्या उद्देशाने, डिझाइनमध्ये रायडर स्पर्श करत असलेल्या भागांवर एक निर्बाध, गुळगुळीत पृष्ठभाग आहे, तर एक विशिष्ट आणि शक्तिशाली सिल्हूट एकत्र केले आहे. त्याचा सिग्नेचर लाइट बार होंडाच्या भविष्यातील इलेक्ट्रिक मोटारसायकलींसाठी एक सामान्य डिझाइन ओळख म्हणून काम करेल.WN7 ने होंडाच्या इलेक्ट्रिक मोटारसायकलींसाठी एक समर्पित रंग थीम देखील सादर केली आहे. सिग्नेचर लाइटिंगप्रमाणे, ही रंग थीम आगामी जागतिक इलेक्ट्रिक मॉडेल्समध्ये स्वीकारली जाईल.● फ्रेमलेस चेसिसपारंपारिक मोटारसायकलींपेक्षा ज्या बॉडीच्या पुढील आणि मागील भागांना जोडणारी फ्रेम वापरतात, WN7 फ्रेमलेस स्ट्रक्चर स्वीकारते ज्यामध्ये मध्यवर्ती स्थितीत अँल्युमिनियम बॅटरी केस मुख्य फ्रेमचा भाग बनतो. स्टीअरिंगला आधार देणारा हेड पाईप आणि मागील भागाला आधार देणारा पिव्होट ब्रॅकेट दोन्ही थेट मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पॉवर युनिटशी जोडलेले आहेत. पारंपारिक फ्रेम काढून टाकून, WN7 केवळ वजन कमी करत नाही तर लेआउटची लवचिकता देखील वाढवते, ज्यामुळे त्याच्या स्लिम आणि कॉम्पॅक्ट प्रमाणात लक्षणीय योगदान मिळते.याव्यतिरिक्त, चेसिसच्या मध्यभागी जड बॅटरी पॅक ठेवल्याने वस्तुमान केंद्रीकरण आणि चपळ हाताळणी देखील वाढते.● एकात्मिक मोटर-इन्व्हर्टर युनिट -एकात्मिक इन्व्हर्टरसह नवीन विकसित, कॉम्पॅक्ट आणि हलके वॉटर-कूल्ड मोटर WN7 ला शक्ती देते. ते जास्तीत जास्त 50 kW आउटपुट देते, जे ६०० cc ICE मोटरसायकलच्या समतुल्य आहे आणि १००० cc श्रेणीच्या ICE मोटरसायकलच्या तुलनेत जास्तीत जास्त १०० Nm टॉर्क देते. हे शहरी राइडिंग आणि मोकळ्या रस्त्यावर दोन्ही ठिकाणी शक्तिशाली परंतु संयोजित कामगिरी सुनिश्चित करते.मोटरमधून पॉवर नवीन डिझाइन केलेल्या गिअरबॉक्सद्वारे बेल्ट-ड्राइव्ह सिस्टममध्ये प्रसारित केली जाते, जी ऑपरेशनमध्ये योगदान देत मागील चाक चालवते.● ड्राइव्ह बॅटरी आणि चार्जिंग मानकेWN7 नवीन विकसित ९.३ kWh फिक्स्ड लिथियम-आयन बॅटरीने सुसज्ज आहे. हे CCS2 जलद चार्जिंग १ आणि टाइप २ सामान्य चार्जिंग दोन्हींना समर्थन देते.जलद चार्जरसह, बॅटरी अंदाजे ३० मिनिटांत २०% ते ८०% पर्यंत चार्ज केली जाऊ शकते, ज्यामुळे प्रवासात जलद रिचार्जिंग शक्य होते आणि प्रतीक्षा वेळेचा ताण कमी होतो.याव्यतिरिक्त, सामान्य चार्जिंग बॅटरीला २.४ तासांपेक्षा कमी वेळेत ०% ते १००% पर्यंत पूर्णपणे चार्ज करते. पूर्ण चार्जवर १४० किमी (WMTC मोड) क्रूझिंग रेंज प्रदान करते.● पुननिर्माण ब्रेकिंग, डिसीलेरेशन सिलेक्टर आणि वॉकिंग स्पीड मोडथ्रॉटल बंद असताना डिसीलेरेशन दरम्यान, WN7 ची मोटर रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रदान करताना ऊर्जा पुनः जिवीत होते डाव्या हँडलबार स्विचवरील डिसीलेरेशन सिलेक्टर वापरून रायडर्स डिसीलेरेशनची पातळी समायोजित (Adjust) करू शकतात. ज्यामुळे कमीत कमी ब्रेक ऑपरेशनसह गुळगुळीत कमी-वेग नियंत्रण किंवा कमी डिसीलेरेशनसह ग्लाइडिंग संवेदना सक्षम होते - ICE मोटरसायकलपेक्षा वेगळी नवीन रायडिंग फील मिळते.WN7 मध्ये वॉकिंग स्पीड मोड देखील आहे, ज्यामुळे रायडर डाव्या हाताच्या स्विच आणि थ्रॉटलचा वापर करून बाईक हळूहळू पुढे किंवा मागे हलवू शकतो जे अरुंद शहरी जागांमध्ये पार्किंग किंवा युक्ती चालविण्यासाठी उपयुक्त आहे.होंडा WN7 चे उत्पादन होंडाच्या कुमामोटो फॅक्टरीमध्ये केले जाईल - कंपनीचे मोटरसायकल उत्पादनाचे जागतिक केंद्र. होंडा हे मॉडेल जागतिक बाजारपेठेत क्रमाने सादर करेल जिथे विद्युतीकरण शिफ्ट होत आहे, कारण कंपनी जागतिक स्तरावर मोटारसायकलींचे विद्युतीकरण वेगवान करते.CCS२: संयुक्त चार्जिंग सिस्टम प्रकार २, इलेक्ट्रिक वाहन जलद चार्जरसाठी वापरले जाणारे कनेक्टर मानक (Standard)२००V पॉवर सप्लाय आणि चार्जिंग गन वापरताना चार्जिंग वेळ चार्जिंग वातावरणानुसार (जसे की तापमान) बदलू शकतो. होंडाच्या मोजमापांवर आधारित चार्जिंग वेळ असेलउर्वरित बॅटरी क्षमतेनुसार पुनर्जन्म ब्रेकिंग सक्रिय केले जाऊ शकत नाही.
Rahul Gandhi on Parth Pawar। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे पार्थ पवार आरोपांच्या चक्रव्यूहात सापडलेले आहेत. पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुणे शहरातील मुंढवा परिसरात ४० एकर जमिनीशी संबंधित प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून पार्थ पवार यांना लक्ष्य करत महायुती सरकावर हल्लाबोल केला आहे. त्यातच आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देखील या प्रकरणावर […] The post “‘मत चोरी’तून सत्तेत आलेल्या सरकारची ‘जमीन चोरी’ ; पार्थ पवार प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी, फडणवीसांवर निशाणा appeared first on Dainik Prabhat .
पत्रकाराने ‘तो’प्रश्न विचारला अन् साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा पाराचं चढला, सुनावले खडेबोल म्हणाली…
Actress Gauri Kishan : दक्षिण सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री गौरी किशन तिच्या ‘अदर्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चेन्नई येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा ती चित्रपटाचे दिग्दर्शक अबीन हरिहरन आणि सह-कलाकार आदित्य माधवन यांच्यासोबत माध्यमांशी संवाद साधत होती. त्यावेळी एका पत्रकाराने तिला असा एक प्रश्न विचारला ज्यामुळे गौरी त्याच्यावर चांगलीच भडकली. तिचा हा व्हिडीओ सोशल […] The post पत्रकाराने ‘तो’ प्रश्न विचारला अन् साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा पाराचं चढला, सुनावले खडेबोल म्हणाली… appeared first on Dainik Prabhat .
“ज्याला बहुमत मिळेल त्याच्यासोबत जाऊ” ; तेज प्रताप यादव यांचे मोठे विधान
Tej Pratap Yadav। बिहार विधानसभा निवडणुकीत प्रत्येक राजकीय विधान नवीन समीकरणांना जन्म देत आहे. या संदर्भात, राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांनी आज एक महत्त्वाचे विधान केले.त्यांनी राज्यात ज्या पक्षाला बहुमत मिळेल त्या पक्षाला आपण साथ देणार असल्याचे मोठे विधान केले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना तेज प्रताप […] The post “ज्याला बहुमत मिळेल त्याच्यासोबत जाऊ” ; तेज प्रताप यादव यांचे मोठे विधान appeared first on Dainik Prabhat .
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा यांच्या अडचणीत वाढ ; जमीन घोटाळ्याप्रकरणी होणार कारवाई
Bhupinder Hooda। हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते भूपिंदर सिंग हुडा यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. मानेसर जमीन घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर खटला चालवला जाणार आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हुडा यांची याचिका फेटाळून लावत हा आदेश जारी केला आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुडा यांनी याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये म्हटले होते की […] The post हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा यांच्या अडचणीत वाढ ; जमीन घोटाळ्याप्रकरणी होणार कारवाई appeared first on Dainik Prabhat .
अभिनेता पुष्कर जोग दुबईला होणार स्थायिक! मुलीच्या भविष्यासाठी घेतला भारत सोडण्याचा निर्णय
मुंबई: दुबई हे सध्या अनेक भारतीयांच्या पर्यटनाचे आकर्षण ठरले आहे. त्यात भारतीय कलाकार केवळ सुट्ट्यांसाठी नव्हे, तर कायमस्वरूपीच्या वास्तव्यासाठी दुबईला शिफ्ट होतानाची संख्या वाढली आहे. ज्यात दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमार, बॉलिवूड अभिनेता आर. माधवन, संजय दत्त, विवेक ओबेरॉय , अभिनेत्री मौनी रॉय यांचा समावेश आहे. यासोबतच आता मराठी अभिनेता पुष्कर जोगसुद्धा दुबईला स्थायिक होणार आहे.पुष्करने याबाबत त्याच्या सोशल मीडीया अकाऊंटवरून माहिती दिली आहे. सोशल मीडीयावरील पोस्टच्या कॅप्शनमध्ये पुष्करने, आज मला माझा गोल्डन व्हिसा मिळाला… आता मी अधिकृतपणे यूएईचा रहिवासी झालो आहे. हे सगळं माझ्या मुलीसाठी, तिच्या आनंदासाठी आणि कल्याणासाठी आहे. तिच्या भविष्यासाठी, असे लिहले आहे.गोल्डन व्हिसा म्हणजे काय?गोल्डन व्हिसा हा एखाद्या देशाने रिअल इस्टेट, सरकारी बाँड किंवा स्थानिक व्यवसाय यासारख्या महत्त्वपूर्ण आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना दीर्घकालीन निवास परवानासाठी दिला जातो. या गुंतवणुकीच्या बदल्यात, व्हिसा धारक आणि त्यांच्या कुटुंबाला देशात राहण्याचा, काम करण्याचा आणि अभ्यास करण्याचा अधिकार मिळतो आणि नंतर ते नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास पात्र ठरू शकतात.https://prahaar.in/2025/11/07/rashmika-and-vijay-deverakonda-to-tie-the-knot-soon/या नियमानुसार, पाहायला जाता, पुष्कर हा दुबईतील गिप्सी चायनिज या हॉटेलचा ब्रॅड अॅम्बेसिडर झाला आहे. याबद्दल त्याने हॉटेलची जाहिरात करत माहिती दिली आहे. पुष्करच्या या प्रोजेक्टमुळे त्याच्या मुलीला दुबईमध्ये अभ्यास करण्याचा आणि भविष्यात काम करण्याचा अधिकार मिळाला आहे.बालकलाकार म्हणून नावारूपास आलेल्या पुष्करने फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे एक वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. पुष्करने १९९२ पासून बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकीर्द सुरू केली. बालकलाकार म्हणून त्याने १० चित्रपट केले. या कारकिर्दीत त्याने २००० मध्ये राज्य सरकारचा 'सर्वोत्कृष्ट बालकलाकार' म्हणून पुरस्कारही पटकावला. मात्र त्यानंतर त्याने शिक्षणासाठी ब्रेक घेतला. यानंतर २००७ मध्ये 'जबरदस्त' चित्रपटातून कमबॅक करत पुन्हा सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले.
देशभरातील SIR विरुद्धच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात ‘या’दिवशी होणार सुनावणी
Supreme Court on SIR। निवडणूक आयोगाच्या देशभरात SIR प्रक्रिया राबवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर ११ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी SIR प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या पश्चिम बंगाल सरकारच्या नवीन याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने घेतला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) […] The post देशभरातील SIR विरुद्धच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात ‘या’ दिवशी होणार सुनावणी appeared first on Dainik Prabhat .
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील ब्रदरचा मृतदेह रस्त्यावर पडलेल्या संशयास्पद अवस्थेत आढळून आला. तसेच मृतदेहाच्या बाजूला इंजेक्शनही आढळून आले. ही घटना शुक्रवारी (दि. 7) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली. ऋषिकेश अभिमन्यू माळी (वय 25, रा. लोहगाव, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो वायसीएम रुग्णालयात ठेकेदारामार्फत ब्रदरचे […] The post वायसीएम रुग्णालयातील ब्रदरचा संशयास्पद मृत्यू; रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू appeared first on Dainik Prabhat .
पुणे : “आमचा कुठल्याही गुन्हेगाराशी संबंध नाही. भाजप कधीही गुन्हेगारांना पाठबळ देत नाही,” असे स्पष्ट शब्दांत विधानसभा सदस्य तथा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत पाटील यांनी विविध आरोप, पोलिस यंत्रणा, तसेच कोथरूडमधील सुरक्षेच्या मुद्द्यांवर भाष्य केले. “मला दररोज हजारो लोक भेटतात; त्यांच्यापैकी काहींसोबत अनवधानाने फोटो घेतले जातात. त्यामुळे कोणाशी संबंध जोडणे योग्य […] The post Pune News : गुन्हेगारांशी आमचा संबंध नाही; पोलिसांनी गुन्हेगारांवर धाक निर्माण करावा : चंद्रकांत पाटील appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) गुरुवारी सकाळी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. येथील एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) सिस्टीममध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानतळावरील उड्डाणांना मोठा विलंब होत आहे. गुरुवारी सकाळी ८:३४ वाजता दिल्ली विमानतळ प्रशासनाने प्रवाशांसाठी अधिकृत सूचना जारी केली. या सूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, ATC-संबंधित तांत्रिक समस्येमुळे विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळच्या व्यस्त वेळेत अनेक विमानांचे टेक-ऑफ आणि लँडिंग रखडल्यामुळे विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ वाढला होता. दिल्ली विमानतळ प्रशासन या गंभीर समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी कामाला लागले आहे. विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, ATC सिस्टीममधील ही तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी विशेष तांत्रिक पथक तात्काळ सक्रिय करण्यात आले आहे. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड आणि इतर संबंधित एजन्सीज एकत्र काम करत आहेत. विमानसेवा लवकरात लवकर सामान्य स्थितीत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांनी विमान कंपन्यांकडून आपल्या उड्डाणांची स्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे.https://prahaar.in/2025/11/07/no-muslim-shops-at-kumbh-mela-minister-nitesh-ranes-firm-stand/दिल्ली विमानतळावर प्रवाशांना 'संयम राखण्याचा' सल्लाविमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सर्व विभाग सध्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि ATC सिस्टीममधील तांत्रिक समस्येचे निराकरण करणे हेच त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. लवकरात लवकर विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांनी या परिस्थितीत कोणताही गोंधळ न करता, आपल्या संबंधित एअरलाइन्सशी नियमित संपर्क साधत राहण्याचे आवाहन विमानतळ अधिकाऱ्यांनी केले आहे. तांत्रिक दुरुस्ती सुरू असल्याने, उड्डाणांचे वेळापत्रक कोणत्याही क्षणी बदलू शकते. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळाकडे येण्यापूर्वी आपल्या विमानाची नेमकी स्थिती तपासून घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. या सहकार्यामुळे प्रवाशांना होणारा मनस्ताप कमी होण्यास मदत होईल.एअरलाईन काउंटरवर प्रचंड गर्दीFlight operations at Delhi Airport are experiencing delays due to a technical issue in the Automatic Message Switching System (AMSS), which supports Air Traffic Control data. Controllers are processing flight plans manually, leading to some delays. Technical teams are working to… pic.twitter.com/5vfII2qnvV— Press Trust of India (@PTI_News) November 7, 2025एटीसी सिस्टीममध्ये बिघाड झाल्याची बातमी कळताच, उड्डाण अद्यतने मिळवण्यासाठी प्रवाशांनी एअरलाईन काउंटरवर मोठी गर्दी केली. विलंब कधीपर्यंत राहील, याबद्दल स्पष्ट माहिती नसल्यामुळे प्रवाशांचा संताप वाढत होता. या गर्दीमध्ये अनेक प्रवाशांनी आपल्या कनेक्टिंग फ्लाईट्स चुकण्याची तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांचे पुढील प्रवास आणि नियोजन या बिघाडामुळे धोक्यात आले होते. विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी (Apology) व्यक्त केली आहे. प्रशासनाने परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगितले असून, 'ही तांत्रिक समस्या लवकरच सोडवली जाईल,' अशी आशा व्यक्त केली आहे. सध्या तांत्रिक पथक युद्धपातळीवर काम करत असले तरी, विमानसेवा सामान्य होईपर्यंत प्रवाशांनी शांतता राखावी आणि एअरलाईनच्या संपर्कात रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.'ATS' म्हणजे काय? विमानतळ प्रशासनाकडून प्रवाशांना महत्त्वाचा सल्लाविमानतळ प्रशासनाने प्रवाशांना संयम राखण्यास सांगत, फक्त अधिकृत अपडेट्सवरच अवलंबून राहण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडिया किंवा इतर अनधिकृत स्त्रोतांवर येणाऱ्या अफवांवर लक्ष न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने आश्वासन दिले आहे की, सिस्टीम सामान्य होताच, उड्डाण ऑपरेशन्स सुरळीतपणे सुरू होतील. प्रवाशांना त्यांच्या उड्डाणांच्या वेळापत्रकातील बदल त्वरित कळावेत यासाठी, विमानतळ प्रशासनाने लोकांना वारंवार एअरलाइन वेबसाइट्स, मोबाइल ॲप्स आणि एसएमएस अलर्ट तपासण्याचा सल्ला दिला आहे. वेळापत्रकात बदल होऊ शकत असल्याने, विमानतळावर येण्यापूर्वी आपली फ्लाईट स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे. यावेळी, विमानतळ प्रशासनाने ज्या सिस्टीममध्ये बिघाड झाला, त्या एटीएस म्हणजे एअर ट्रॅफिक सर्व्हिसेस (Air Traffic Services) चे महत्त्वही स्पष्ट केले आहे. एटीएस म्हणजे विमानतळांमध्ये हवाई वाहतूक सेवा, जी विमानांची सुरक्षित आणि सुव्यवस्थित हालचाल सुनिश्चित करते. हवाई क्षेत्रात वाहतुकीचा सुरळीत प्रवाह तसेच सुरक्षित आणि कार्यक्षम उड्डाण ऑपरेशन्स सुनिश्चित करण्यासाठी एटीएस सिस्टीम अत्यंत आवश्यक असते. या आवश्यक सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानेच विमानांच्या सुरक्षित हालचालीसाठी उड्डाणे थांबवावी लागली, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
प्रतिनिधी: प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी भारतीय शेअर बाजारांमध्ये विक्रीचा वेग वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात झालेल्या घसरणीचा फटका गुंतवणूकीत परिवर्तित झाला आहे. साप्ताहिक नुकसान वाढवले असून कमकुवत गुंतवणूकदारांच्या भावना आणि बहुप्रतिक्षित भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल स्पष्टतेचा अभाव यामुळे सुमारे १% बाजारात घसरण झाली आहे. आज सकाळी निफ्टी ५० निर्देशांक २५४३३.८० वर उघडला, ७५.९० अंकांनी किंवा ०.३०% घसरला, तर बीएसई सेन्सेक्स ८३१५०.१५ वर उघडला, १६०.८६ अंकांनी किंवा ०.१९% घसरला आहे. बाजार तज्ञांनी नोंदवलेल्या मतानुसार, देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये सततचा दबाव मुख्यत्वे बाह्य प्रतिकूल परिस्थिती आणि मजबूत संकेतांच्या अभावामुळे आहे.बँकिंग आणि बाजार तज्ञ अजय बग्गा यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की भारतीय बाजारपेठांमध्ये सतत दबाव आणि दिशाहीनता दिसून येत आहे.' भारतीय बाजारपेठांमध्ये सतत दबाव आणि संकेतांचा अभाव दिसून येत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे एक विधान आहे की ते लवकरच भारत भेट देण्याची अपेक्षा करतात. यामुळे भारत-अमेरिका व्यापार कराराची आशा निर्माण झाली आहे; तथापि, एप्रिलपासून, विशेषतः जूनमध्ये ही कहाणी आशादायक परंतु दिशाभूल करणारी आहे. आम्ही यावर काही अधिक स्पष्टतेची वाट पाहत आहोत, विशेषतः कालच भारतीय व्यापार मंत्र्यांनी भारत-अमेरिका वाटाघाटींमध्ये 'गंभीर आणि संवेदनशील मुद्द्यांवर' मात करणे बाकी आहे.' असे ते म्हणाले आहेत.व्यापक बाजारातही सर्व निर्देशांकांवर विक्रीचा दबाव दिसून आला. निफ्टी १०० मध्ये ०.५२% घट झाली, निफ्टी मिडकॅप १०० मध्ये ०.३७% घट झाली आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० मध्ये ०.७१% घट झाली आहे. क्षेत्रीय निर्देशांकांपैकी, बहुतेकांचे व्यवहार लाल रंगात झाले. निफ्टी ऑटो ०.३% घसरला, निफ्टी एफएमसीजी ०.५१% घसरला, निफ्टी आयटी ०.६७% घसरला, निफ्टी मेटल ०.७३% घसरला, तर निफ्टी पीएसयू बँक ०.३९% घसरला. किरकोळ वाढ दाखवणारा एकमेव क्षेत्र म्हणजे निफ्टी फार्मा, ०.१५% वाढला आहे.प्राथमिक बाजारात, ग्रो आयपीओसाठी बोलीच्या शेवटच्या दिवशी जोरदार सहभाग दिसून आला. आतापर्यंत, बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेंचर्स (ग्रो) द्वारे सार्वजनिक इश्यू दुसऱ्या दिवशी १.६ पट सबस्क्राइब झाला, ज्यामध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २.३ पट, किरकोळ गुंतवणूकदारांनी ५ पट आणि पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी (क्यूआयबी) २०% सहभाग घेतला. स्टड्स आयपीओची यादी देखील आज होणार आहे.एआय मूल्यांकनांवरील चिंतेमुळे अमेरिकन बाजार पुन्हा एकदा दबावाखाली आल्याने जागतिक संकेत कमकुवत राहिले. टेस्लाच्या शेअरहोल्डर्सनी अलीकडेच एलोन मस्कसाठी १ ट्रिलियन डॉलर्सच्या भरपाई पॅकेजला मंजुरी दिली आहे, ही एक पाऊल नेतृत्व सातत्य राखण्यासाठी आत्मविश्वास वाढवणारी आहे, परंतु तंत्रज्ञान मूल्यांकनात संभाव्य बुडबुड्याबद्दल चिंता देखील वाढवत आहे.याव्यतिरिक्त, अमेरिकन सरकारच्या शटडाऊनमुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम होत आहे, असे अहवाल दर्शवितात की शुक्रवारपासून अनेक अमेरिकन विमानतळांवर सुमारे १० टक्के उड्डाणे कमी करण्यात आली आहेत, ज्यामुळे जवळजवळ १८०० उड्डाणे प्रभावित झाली आहेत.आशियाई बाजारपेठांनी वॉल स्ट्रीटच्या कमकुवत भावनांचे प्रतिबिंब दाखवले. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक २.२३% हाँगकाँगचा हँग सेंग १%, तैवानचा वेटेड इंडेक्स ०.६२% आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी २.४३% घसरला. तथापि, सिंगापूरचा स्ट्रेट्स टाईम्स ०.१३% किंचित 'हिरव्या' रंगात व्यवहार करत होता.एकूणच, जागतिक अनिश्चितता, विलंबित व्यापार स्पष्टता आणि सतत बाह्य अडथळे यांचे संयोजन भारतीय बाजारपेठेतील गुंतवणूकदारांच्या भावनांवर मोठा परिणाम करत आहे.
Air India plane crash। मृत एअर इंडिया पायलट सुमित सभरवाल यांचे वडील पुष्कर राज सभरवाल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात अपघाताची निष्पक्ष चौकशी करण्याची विनंती केली. सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर नोटीस जारी करून केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) यांच्याकडून उत्तर मागितले. या याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की आतापर्यंत झालेल्या अपघाताची चौकशी निष्पक्ष […] The post “दु:खी होऊ नका, तुमच्या मुलाची चूक नाही,” ; ‘त्या’ विमान अपघातातील पायलटच्या वृद्ध वडिलांना न्यायालयाचा भावनिक आधार appeared first on Dainik Prabhat .
Shefali Shah : बॅालिवूड इंडस्ट्रीत आठ तासांच्या कामाच्या शिफ्टबद्दल अनेक अभिनेत्री आपली मतं मांडताना दिसत आहेत. नुकतेच एका मुलाखतीवेळी अभिनेत्री शेफाली शहा हिने देखील याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. सध्या शेफाली तिच्या आगामी दिल्ली क्राइम सीझन ३ या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. तिने सिरीजच्या प्रमोशवेळी दिलेल्या मुलाखतीत आठ तासांच्या शिफ्टबद्दल मत मांडत पुरुष कलाकारांच्या सेटवर […] The post “…त्यामुळे तुम्ही माझ्याकडून चांगल्या कामाची..”; आठ तासांच्या कामाच्या शिफ्टबद्दल अभिनेत्री शेफाली शाह स्पष्टचं बोलली appeared first on Dainik Prabhat .
कुंभमेळ्यात मुसलमानांची दुकानं नको! मंत्री नितेश राणेंची ठाम भूमिका
नाशिक: ज्वलंत हिंदुत्वाचे राज्यातले केंद्र नाशिकमध्ये आहे. या नाशिक जिल्ह्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळा हा हिंदूंचा महाकुंभ आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात फक्त हिंदू व्यावसायिकांचीच दुकानं लागली पाहिजेत. कुंभमेळ्यात मुसलमानांची दुकानं नको; अशी ठाम भूमिका मंत्री नितेश राणे यांनी घेतली आहे. मुसलमान व्यापाऱ्यांची दुकानं महाकुंभ परिसरात नसावीत, असेही ते पुढे म्हणाले.आम्ही त्यांच्या देवस्थानांवर विक्रीसाठी जात नाही, मग आमच्या धार्मिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती का ? हिंदू समाजाने सतर्क राहून कुंभमेळ्यात हिंदूंचीच दुकाने लागतील, याची काळजी घ्यावी, असे मंत्री नितेश राणे म्हणाले. या देशात राहून जर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान न मानता शरियत कायदा चालवायचा विचार असेल, तर अशांना या देशात राहण्याचा अधिकार नाही; असेही मंत्री नितेश राणे यांनी सुनावले.https://prahaar.in/2025/11/07/is-there-any-objection-to-voting-14-times-while-wearing-a-burqa/भारतात राहून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा पुरेपूर लाभ घ्यायचा आणि मतदानाच्या वेळी इस्लामचा विचार करायचा , हे कसे चालेल ? या शब्दात मंत्री नितेश राणेंनी 'वंदे मातरम'ला विरोध करणाऱ्यांचासमाचारघेतला.
कल्याणमधील रिंगरोड प्रकल्प लवकर होणार पूर्ण! आयुक्तांचे आश्वासन
कल्याण: शहरातील वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून कल्याणमध्ये रिंगरोड तयार करण्यात येत आहे. या प्रस्तावित रिंगरोडचे उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्यासाठी या मार्गातील अडथळ्याची महापालिका आयुक्तांसह 'एमएमआरडीए' च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी पुढील दोन महिन्यांत सगळे अडथळे दूर झाल्यास सात महिन्यांत दुर्गाडी ते मोठागाव माणकोली या सर्वात मोठ्या टप्प्याचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन 'एमएमआरडीए' कडून देण्यात आले.मागील अनेक वर्षांपासून कल्याण, डोंबिवली शहरांतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित रिंगरोडचे काम सुरू आहे. या कामाचा वेग वाढवून नागरिकांना लवकरात लवकर हा रोड वापरण्यास द्यावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. त्यामुळे आता हे काम लवकर मार्गी लावण्यासाठी आयुक्तांनी रिंगरोडची पाहणी केली.https://prahaar.in/2025/11/07/tesla-ceo-musk-will-become-a-trillionaire-the-biggest-package-for-a-ceo-in-the-companys-history/या पाहणी दौऱ्याच्या दरम्यान रिंगरोड प्रकल्पात रेल्वे प्रशासनासह स्थानिक नागरिकांच्या जागा बाधित होत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. यावर बाधित चाळधारकांचे तातडीने पुर्नवसन करत भूखंडधारकांना टीडीआर स्वरूपात मोबदला देण्याची प्रक्रिया पूर्ण करून पुढील दोन महिन्यात सर्व जागा हस्तांतरित कराव्यात, अशा सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांनाकेल्याआहेत.
कतरिनाने दिली गुडन्यूज! विकी कौशलच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, पोस्ट शेअर करत म्हणाला…
Actress Katrina Kaif : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कतरिना कैफच्या गरोदरपणाच्या चर्चा सुरू होत्या. कतरिना आणि विकी कौशलने २३ सप्टेंबरला सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती. अखेर कतरिनाने एका गोंडस बाळाला आज ७ नोव्हेंंबर रोजी जन्म दिला आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे कतरिना आणि विकी दोघांचाही आनंद गगणात मावेनसा झाला आहे. दोघांनी सोशल […] The post कतरिनाने दिली गुडन्यूज! विकी कौशलच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, पोस्ट शेअर करत म्हणाला… appeared first on Dainik Prabhat .

28 C