Accident News : ताम्हिणी घाटात भीषण अपघात; थार दरीत कोसळून ४ जणांचा मृत्यू
पुणे/रायगड: पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात एक अत्यंत दुर्दैवी अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. घाटातील एका अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक थार (Thar) गाडी सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अपघातस्थळी दरीत कोसळलेल्या गाडीचा व मृतदेहांचा ड्रोनच्या माध्यमातून शोध घेण्यात […] The post Accident News : ताम्हिणी घाटात भीषण अपघात; थार दरीत कोसळून ४ जणांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
नितीशकुमारांनी घेतली १० व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ ; २६ मंत्र्यांमध्ये कोणाचा समावेश ? वाचा
Bihar NDA government। बिहारमध्ये नवीन एनडीए सरकार स्थापन झाले आहे. जनता दल (युनायटेड) चे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर झालेल्या भव्य शपथविधी समारंभात विक्रमी १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीश कुमार यांच्यासोबत त्यांच्या नवीन मंत्रिमंडळातील २६ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये […] The post नितीशकुमारांनी घेतली १० व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ ; २६ मंत्र्यांमध्ये कोणाचा समावेश ? वाचा appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : सोशल मीडियावर अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतर सुरु असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अंधेरी रेल्वे स्टेशन लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा नवीन अड्डा झाला आहे' असा दावा करत हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला. मात्र पोलिसांच्या तपासानंतर संपूर्ण प्रकरणाची खरी पार्श्वभूमी समोर आली असून व्हिडिओमध्ये केलेले दावे पूर्णतः खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहेत.काय होता नक्की व्हिडीओएका प्रवाशाने अंधेरी रेल्वे स्थानकावर एक मुलगी प्लॅटफॉर्मवर बसलेली आणि तिच्या बाजूला एक वयस्कर माणूस काही मंत्रोउच्चार सदृश करत असल्याचे व्हिडीओ यामध्ये दिसत आहे . आणि हेच दृश्य सोशल मीडियावर व्हायरल करून त्याचा धर्मांतराशी संबंध जोडण्यात आला. आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला गेला, तो व्हायरल झाला आणि वातावरण तापले.पोलिसांकडून तातडीची दाखलव्हिडिओ व्हायरल होताच अंधेरी जीआरपी आणि आरपीएफने तत्काळ तपास सुरू केला. व्हिडिओतील दोन्ही व्यक्तींचा शोध घेण्यात आला आणि काही तासांतच त्यांना ताब्यात घेऊन जबाब नोंदवण्यात आला.तपासात काय समोर आले? मुलगी आणि वयस्कर पुरुष दोघांचाही कोणताही ख्रिश्चन धर्माशी संबंध नाही. दोघेही जैन हिंदू धर्मीय असून एकमेकांचे परिचित आहेत. वयस्कर नागरिक त्या मुलीला जपानी मेडिटेशन तंत्र शिकवत होते. त्यांच्या मते, हा कोणताही धार्मिक विधी नव्हता आणि धर्मांतराशी तर काहीही संबंध नव्हताच.मुलीची पोलिसांकडे तक्रारव्हिडिओला चुकीचा अर्थ लावून त्याचा प्रसार केल्याने आपली बदनामी होत असल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. तसेच, व्हिडिओ शूट करून खोटी माहिती पसरवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत तिने अंधेरी जीआरपीकडे औपचारिक तक्रार दिली आहे.
अनिल अंबानी यांच्या आणखी १४०० कोटींची मालमत्ता जप्त ईडीकरून आणखी एक धक्कादायक कारवाई
मुंबई: उद्योगपती अनिल अंबानी यांची आणखी १५०० कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचनालय (Enforcement ED) संस्थेने जप्त केली आहे. यापूर्वी त्यांची कथित घोटाळ्याप्रकरणी ७५०० कोटी रूपयांच्या मालमत्तेची जप्ती करण्यात आली होती आता एकूण ९००० कोटींची ही जप्ती करण्यात आली आहे. सध्या अनिल अंबानी व अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहाला अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र कंपनीकडून ही एका जुन्या परकीय चलन व्यवस्थापना कायद्याअंतर्गत (Foreign Exchange Management Act FEMA) चौकशी सुरू असल्याचे म्हटले होते. मात्र नियामकांनी (Regulatory Authorities) अनिल अंबानी यांच्या कर्ज निधी उभारणीत व त्यांच्या विनियोगात अनियमितता आढळून आली होती. त्याचाच पुढील अध्याय म्हणून अनिल अंबानी यांच्यावर नवी कारवाई करण्यात आली आहे.३ नोव्हेंबरला दिलेल्या आदेशानुसार, ७५०० कोटींच्या जप्तीची घोषणा करण्यात आली होती ज्यात आणखी १४०० कोटींच्या मालमत्तेची भर पडली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन (Rcom), रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL), रिलायन्स पॉवर (Reliance Power) या अनिल अंबानी यांच्या समुहातील कंपन्यांनी विविध बँकांकडून घेण्यात आलेल्या कर्ज निधीचा वापर उद्देशित कारणासाठी न वापरता तो गैरप्रकार करत शेल कंपनीमार्फत वळवण्यात आला असा आरोप ईडी व सीबीआयने यापूर्वी केला होता. त्यातील १६६९४ कोटींचे कर्ज अद्याप फेडले गेले नसल्याने बँकांनी अनिल अंबानी व समुहाने घेतलेल्या कर्जांना 'फ्रॉड' घोषित करण्यात आले होते. मात्र अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्यांनी सारे आरोप फेटाळून हे जुने प्रकरण असल्याचे म्हणत पत्रकारांनी चुकीची माहिती देत दिशाभूल केल्याचे म्हटले होते.आरोपातील माहितीनुसार,१३६०० कोटींची फेरफार करण्यात आली होती. त्यातील १२६०० कोटींचा वापर आपल्या संस्थांसह संबंधित संस्थांमध्ये गुंतवले असल्याचे नियामकांनी आपल्या आरोपपत्रात म्हटले होते. ३१ ऑक्टोबरला ईडीने पीएमएलए (Prevention on Money Laundering Act PMLA) कायद्याअंतर्गत अनिल अंबानी यांच्या ठिकाणी धाडी टाकल्या होत्या व कंपनीच्या ४२ पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी करत या मालमत्ता जप्त केल्या होत्या. ३ नोव्हेंबरच्या नव्या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अधिकच चर्चेत असून नव्या घडामोडींच्या माहितीच्या आधारे ईडीने आणखी १४०० ते १५०० कोटींच्या मालमत्तेवर धाड टाकली आहे.
पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते आता १० व्यांदा मुख्यमंत्री पदावर येण्याचा अनोखा विक्रम करणार आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले असले तरी, ते सातत्याने राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. राजकीय यश आणि सत्तेचा मोठा काळ उपभोगूनही नितीश कुमार यांच्या साधेपणाची चर्चा नेहमीच होते. गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ ते बिहारच्या सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत, तरीही त्यांच्याकडे फारमोठी संपत्ती नसल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वी नितीश कुमार यांनी अनेकवेळा आमदार, खासदार आणि अगदी केंद्रात मंत्री म्हणूनही काम केले आहे. असे असले तरी, त्यांच्या जीवनशैलीत कोणताही मोठा फरक पडला नाही. त्यांची राहणीमान आजही अगदी साधे आणि सोपे आहे. या साधेपणामुळेच नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेमध्ये एक वेगळे आणि आदराचे स्थान निर्माण केले आहे.https://prahaar.in/2025/11/20/video-of-religious-conversion-at-andheri-railway-station-goes-viral-on-social-media-police-investigation-reveals-wrong-information/प्रत्येक वर्षी सार्वजनिक करतात संपत्तीचे विवरणबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे केवळ आपल्या साधेपणामुळेच नव्हे, तर राजकीय पारदर्शकतेच्या नियमांमुळेही ओळखले जातात. त्यांनी बिहारमध्ये एक महत्त्वपूर्ण नियम लागू केला आहे, ज्यानुसार प्रत्येक मंत्र्याला त्याच्या संपत्तीचे विवरण दरवर्षी सार्वजनिक करणे अनिवार्य आहे. या नियमाचे पालन स्वतः नितीश कुमार हे दरवर्षी करतात. बिहार सरकारच्या संकेतस्थळानुसार, गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी दिलेल्या विवरणानुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे एकूण चल-अचल संपत्ती जवळपास १.६५ कोटी रुपये इतकी आहे. दोन दशकांहून अधिक काळ राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असूनही, त्यांची संपत्ती अत्यंत नियंत्रित असल्याचे दिसून येते. नितीश कुमार यांनी लागू केलेल्या या नियमानुसार, मंत्र्यांना त्यांच्या संपत्तीचे विवरण सादर करताना खालील गोष्टींचा समावेश करणे बंधनकारक आहे, कमाईचा स्त्रोत, त्यांच्यावरील कर्ज, वर्षभरातील व्यवहाराचे विवरण पत्र यामुळे बिहारच्या राजकारणात पारदर्शकता टिकून राहण्यास मदत झाली आहे.साधी जीवनशैली असलेल्या नितीश कुमार यांच्याकडे जमीन नाही, पण...बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपल्या साधेपणामुळे राजकारणात ओळखले जातात. दरवर्षी संपत्तीचे विवरण सार्वजनिक करण्याच्या त्यांच्या नियमानुसार, त्यांच्याकडील चल संपत्तीचे तपशील समोर आले आहेत. नितीश कुमार यांच्याकडे फोर्ड इकोस्पोर्ट ही एकच कार आहे. रोख रकमेबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांच्याकडे २१,०५२ रुपये इतकी रोख रक्कम उपलब्ध आहे. विविध बँकांमध्ये त्यांची एकूण ६०,८११.५६ रुपये इतकी रक्कम जमा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नितीश कुमार यांच्या संपत्तीत १३ गायी आणि १० वासरं यांचाही समावेश आहे. या सर्व संपत्तीची एकूण किंमत जवळपास १६,९७,७४१.५६ रुपये इतकी आहे. दोन दशकांहून अधिक काळ राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर राहिलेल्या नितीश कुमार यांची ही संपत्ती, त्यांचा साधेपणा आणि पारदर्शकतेचा नियम अधोरेखित करते.दिल्लीत फ्लॅट, बिहारमध्ये जमीननितीश कुमार यांच्या अचल संपत्तीत सर्वात महत्त्वाची मालमत्ता म्हणजे दिल्लीतील द्वारका परिसरात असलेला त्यांचा एक फ्लॅट आहे. हा फ्लॅट सुमारे १००० चौरस फुटाचा असून, तो त्यांनी २००४ मध्ये खरेदी केला होता. सध्या याच सदनिकेला त्यांच्या अचल संपत्तीत सर्वाधिक किंमत आहे. या सदनिकेशिवाय त्यांच्याकडील अचल संपत्तीची एकूण किंमत जवळपास १.४८ कोटी रुपये इतकी आहे. नितीश कुमार यांनी जाहीर केलेल्या २०१९ च्या विवरणानुसार, त्यांची एकूण संपत्ती जवळपास १.६४ कोटी रुपये इतकी होती. त्यांच्या या संपत्तीचा तपशील, राजकीय जीवनातील त्यांची साधेपणा आणि पारदर्शकता अधोरेखित करतो.नितीश कुमार १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ७५ वर्षीय नितीश कुमार यांनी १० व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासोबतच ते देशात सर्वाधिक वेळा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा विक्रम करणाऱ्या नेत्यांपैकी एक ठरले आहेत. शपथविधीचा हा भव्य सोहळा पाटणा येथील गांधी मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या महत्त्वाच्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः उपस्थित होते. पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याचे महत्त्व आणखी वाढले. सोहळ्याला राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर जनसमुदायाची गर्दी जमली होती. नितीश कुमार यांच्यासोबत आज दोन उपमुख्यमंत्री आणि २० आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीमुळे बिहारमध्ये राजकीय स्थिरता आणि नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. या शपथविधीमुळे नितीश कुमार यांचा बिहारच्या राजकारणातील दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.
Geyser Safety Tips: थंडी वाढली की घराघरांत गीजरचा वापरही वाढतो. पण गीजर वापरताना अनेकजण नकळत काही चुका करतात आणि यामुळे गंभीर अपघात होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते गीजरशी संबंधित सुमारे 70% अपघात हे चुकीच्या पद्धतीने वापर, खराब इंस्टॉलेशन आणि दुर्लक्ष यामुळे होतात. या चुका वेळेवर लक्षात येत नाहीत आणि मोठा धोका निर्माण करतात. येथे अशा ६ […] The post Geyser Safety Tips: गीजर सुरक्षितपणे वापरण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स : हिवाळ्यात या चुका टाळा, मोठ्या अपघातांपासून रहा दूर appeared first on Dainik Prabhat .
मुन्नाभाई का कमाल ! चिमुकल्याच्या डोळ्याजवळची जखम डॉक्टरने फेविक्विक चिकटवली ; चौकशीचे दिले आदेश
Fevikwik on the injury। मेरठमधील एका डॉक्टरचा धक्कादायक निष्काळजीपणा समोर आला आहे. एका अडीच वर्षांच्या मुलाच्या डोळ्याच्या दुखापतीवर अशा पद्धतीने उपचार करण्यात आले की त्याबद्दल ऐकणाऱ्या सर्वांनाच आश्चर्य वाटले. मुलाला टाके घालावे लागले होते, परंतु डॉक्टरांनी जखमेवर पाच रुपयांचे फेविकॉल लावले असा आरोप आहे. परिणामी, मुलाला रात्रभर वेदना होत राहिल्या आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रुग्णालयात […] The post मुन्नाभाई का कमाल ! चिमुकल्याच्या डोळ्याजवळची जखम डॉक्टरने फेविक्विक चिकटवली ; चौकशीचे दिले आदेश appeared first on Dainik Prabhat .
कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण
कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे कर्नाटकातही वेगळ्याच राजकारणाची गडबड सुरू आहे. गलुरू येथे इंदिरा गांधी जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात डीके शिवकुमार यांनी महत्त्वाचे विधान केले. ज्याचे अनुमान यापूर्वी शिवकुमार यांनी स्वत: डावलून टाकले होते. ते म्हणाले की, मी या पदावर कायम नाही राहू शकत. या पदावर राहून मला साडेपाच वर्षे झाली आहेत. यावर्षी मार्चमध्ये सहा वर्षे पूर्ण होतील. कोणतेच पद नेहमीसाठी नसते.आजपर्यंत अनेकदा डीके शिवकुमार हे मुख्यमंत्री बनणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतू या चर्चांना खुद्द डीके शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पूर्णविराम दिला होता. मात्र आता डीके शिवकुमार यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा मुख्यमंत्री पदाचा विषय केंद्रस्थानी आला आहे. मुख्यमंत्री पदासोबत शिवकुमार आता लवकरच कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हे पद सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे डीके शिवकुमार यांनी स्वतः सांगितले की, आता या पदासाठी दुसऱ्या नेत्यांनाही संधी दिली गेली पाहीजे. याचबरोबर ते हेही म्हणाले की ते काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते म्हणून कायम राहतील.https://prahaar.in/2025/11/20/anmol-bishnoi-remanded-in-custody-for-11-days-a-thorough-investigation-will-be-conducted-into-all-the-crimes/बिहार विधानसभेच्या निकालानंतर देशभरात बऱ्याच राजकीय घटनांना वेग आला. यानंतर कर्नाटकातील डीके शिवकुमार यांच्या विधानानंतर कर्नाटकातील राजकारणात मोठा धमाका होणार का? याबाबत चर्चांना वेग आला आहे. डीके शिवकुमार हे कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री आहेत.
एसीएमई सोलारकडून १०० मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पातील पुढील १६ मेगावॅटचा दुसरा टप्पा सुरू
गुरुग्राम: एसीएमई सोलर होल्डिंग्ज लिमिटेडने गुजरातमधील सुरेंदरनगर येथे असलेल्या त्यांच्या १०० मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पापैकी अतिरिक्त १६ मेगावॅट प्रकल्प कार्यान्वित केला असल्याचे त्यांनी आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटले आहे. यापूर्वी प्रकल्पाचा पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्यात सुरू झाला होता. २८ मेगावॅटच्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्प सुरु झाल्यानंतर आता पुढील विस्तारीत प्रकल्पाचे काम सुरू झाले असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (GDA) आणि पश्चिम गुजरात विज कंपनी लिमिटेड (PGVL) अधिकाऱ्यांनी प्रकल्प सुरू झाल्याची साक्ष दिली असून अधिकृतपणे या प्रकल्पाची पुष्टीही केली गेली असल्याचे कंपनीने म्हटले.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,लवकरच औपचारिक प्रमाणपत्र जारी केले जाण्याची अपेक्षा आहे. नुकत्याच कार्यान्वित झालेल्या प्रकल्पाची क्षमता टप्प्याटप्प्याने (Phase Wise) कार्यान्वित होणाऱ्या १०० मेगावॅटपैकी ४४ मेगावॅटवर पोहोणार आहे. या टप्प्यामुळे एसीएमई सोलरची एकूण कार्यान्वित क्षमता आता २९३४ मेगावॅटपर्यंत वाढली आहे.अलीकडेच, वीज खरेदी करार (PPA) अंतर्गत फोर्स मॅज्योर इव्हेंट्सना मान्यता मिळाल्यानंतर, गुजरात वीज नियामक आयोगाने (GERC) या प्रकल्पाला त्याच्या शेड्यूल्ड कमर्शियल ऑपरेशन डेट (SCOD) मध्ये वाढ दिली. सुधारित एससीओडी (SCOD) तारीख ५ मार्च २०२६ आहे आणि अधिकृत माहितीप्रमाणे पहिल्या दोन टप्प्यात ४४ मेगावॅट क्षमतेसह हा प्रकल्प लवकर कार्यान्वित करण्यात आला आहे.या पवन ऊर्जा प्रकल्पाला पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) द्वारे वित्तपुरवठा करण्यात आला आहे आणि SANY च्या ४ मेगावॅट टर्बाइन तैनात करून इन-हाऊस ईपीसी (EPC) द्वारे बांधण्यात आले आहे. प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ACME इको क्लीन आणि गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेड यांच्यात स्वाक्षरी केलेल्या २५ वर्षांच्या वीज खरेदी कराराद्वारे (PPA) विकली जाईल. एसईएमई सोलार होल्डिंग्ज लिमिटेड ही अक्षय ऊर्जा (Renewable Energy) कंपनी आहे. सौर, पवन, साठवणूक, FDRE आणि हायब्रिड सोल्यूशन्सचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आहे आणि त्याची ऑपरेशनल क्षमता २९३४ मेगावॅट असून ४४५६ मेगावॅटची बांधकाम करण्याजोगी क्षमता असल्याचे कंपनीने यापूर्वीच स्पष्ट केले होते.
Huma Qureshi: बॉलीवूडमध्ये मोठ्या बजेटच्या चित्रपटांभोवतीच बहुधा चर्चा फिरत असते. मात्र, या गदारोळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर एका अभिनेत्रीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. लोकप्रियता दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा यांच्या चित्रपटांभोवती केंद्रित असताना हुमा कुरैशीने मात्र ओटीटीवर सलग दोन मोठ्या मालिकांमधून आणि एका चित्रपटातून प्रभावी उपस्थिती नोंदवली आहे. दिल्लीतील सुरुवात, मुंबईत मिळवलेले […] The post Huma Qureshi: OTT विश्वातील नवी ‘राणी’! प्रियंका–दीपिकाच्या चर्चेतही ओटीटीवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री appeared first on Dainik Prabhat .
ठरलं तर मग ! डिसेंबरमध्ये धावणार पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ ; चाचणीनंतर ‘हे’बदल केले
Vande Bharat Sleeper Train। वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी,”देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये किरकोळ सुधारणा सुरू आहेत. या सुधारणांनंतर (रेट्रोफिटिंग) ही ट्रेन डिसेंबरमध्ये प्रवाशांसाठी सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. रेल्वे मंत्र्यांनी याविषयी बोलताना,”पहिल्या ट्रेनच्या चाचणी दरम्यान, काही किरकोळ समस्या आढळून आल्या, विशेषतः […] The post ठरलं तर मग ! डिसेंबरमध्ये धावणार पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ ; चाचणीनंतर ‘हे’ बदल केले appeared first on Dainik Prabhat .
Shraddha Bhosale : कोकणातील सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा होती आहे. शिवसेना आणि भाजपने स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय येथील वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत भोसले चर्चेत आल्या आहेत. त्यांनी नुकतेच […] The post मुंबईतला जन्म, अमेरिकेत शिक्षण, मराठी बोलण्यावरून ट्रोल; भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत भोसले कोण? appeared first on Dainik Prabhat .
डिसेंबर २०२६ पर्यंत सेन्सेक्स १०७००० पातळी पार करणार - मॉर्गन स्टॅनले
प्रतिनिधी: अर्थशास्त्रातील नव्या संचरनेसह अर्थव्यवस्थेतील व शेअर बाजारातील तेजीचे नवे संकेत मिळत असल्याचे 'इंडिया स्ट्रॅटेजी' या नव्या अहवालात मॉर्गन स्टॅनले जागतिक गुंतवणूक रिसर्च संस्थेने म्हटले आहे. 'सेन्सेक्स डिसेंबर २०२६ पर्यंत १०७००० पातळी पार करेल व बेस लाईन टार्गेट किमान ९५००० पातळी असेल' असे अहवालात म्हटले गेले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२८ या कालावधीत कंपाऊंड ग्रोथ (वाढ) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १९% वाढेल असे म्हटले गेले आहे. घरगुती गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओतील वाढवलेली गुंतवणूक स्थितप्रज्ञच राहिल व आहे त्याच वेगात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणूक न राहता ती मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. दरम्यान संस्थेचे विश्लेषक रिधम देसाई, नयंत पारेख यांनी नाममात्र वाढीत (Nominal Growth) व कॉर्पोरेट उत्पन्नात मजबूत वाढ पुन: प्राप्तीसाठी मधल्या सायकल मंदीनंतर झालेले धोरणात्मक बदल वाढ करतील असे स्पष्ट केले आहे.गेल्या काही दिवसांपासून आरबीआयच्या, बँकिंगच्या, वित्त मंत्रालयाने केलेल्या सकारात्मक धोरणात्मक बदलांचा परिणाम आर्थिक निकालात भविष्यात होऊ शकतो. रेपो दरासह सीआर आर दरात (Cash Reserve Ratio CRR), जीएसटी दरातील कपात इत्यादी मुद्दे अर्थकारणातील वाढीसाठी व अंतिमतः शेअर बाजारातील वाढीसाठी मूलभूत ठरतील असा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला आहे. 'चीनसोबतच्या संबंधांमध्ये होणारी घसरण आणि चीनची घुसखोरीविरोधी मोहीम या तेजीच्या मिश्रणात भर घालत आहे. भारत-अमेरिका व्यापार करारामुळे भावना आणखी वाढतील. अशाप्रकारे, कोविडनंतरचा भारताचा आक्रमक मॅक्रो सेटअप आता उलगडत आहे'असेही मॉर्गन स्टॅनलीने एका अहवालात नमूद केले आहे.'आमच्या बेस केसमध्ये, येत्या आठवड्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील टॅरिफ परिस्थितीवर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. आम्ही अल्पकालीन व्याजदरांमध्ये आणखी २५ बेसिस पॉइंट्स (bps) कपात आणि सकारात्मक तरलता वातावरण हे चलनविषयक धोरणासाठी बेस केस म्हणून वापरतो' असे नयंत पारेख व अहवालात मॉर्गन स्टॅनलीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य भारतीय इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट रिधम देसाई यांनी लिहिले आहे.अहवालात पुढे म्हटले आहे की,भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार परिस्थितीत घट, आर्थिक वर्ष २५-२८ मध्ये सेन्सेक्सच्या कमाईचा दर वार्षिक १५% राहू शकतो मात्र आर्थिक वर्ष २६ मध्ये बाजारातील कमी झालेली वाढ आणि खराब मॅक्रो इकॉनॉमिक परिस्थिती विशेषतः भूराजकीय परिस्थिती दर्शविणारे इक्विटी मल्टीपल डीरेट मधील घटक देसाईंच्या मते बाजारातील घसरण वाढवू शकतात आणि डिसेंबर २०२६ पर्यंत सेन्सेक्स सध्याच्या पातळीपासून सुमारे १०% कमी होऊन ७६००० पातळीवर बेसलाईनवर पोहोचू शकतात असे म्हटले आहे.तेजीच्या बाबतीत (३०% शक्यता Upside) धरल्यास प्रति बॅरल तेल $६५ पेक्षा कमी राहिल्यास रिफ्लेशन धोरणांमुळे मजबूत वाढ होईल आणि जागतिक व्यापार तणाव कमी होईल असे गृहीत धरले तर सेन्सेक्सचे लक्ष्य १०७००० पातळीवर ठेवले आहे. आर्थिक वर्ष २५-२८ मध्ये उत्पन्न वाढ दरवर्षी १९% वाढण्याची अपेक्षा आहे.' असेही अहवालाने नमूद केले आहे.तर मंदीबाबत भाकीत नोंदवताना, 'मंदीच्या बाबतीत (२०% Downside शक्यता), सेन्सेक्सचे लक्ष्य ७६००० आहे, प्रति बॅरल $१०० पेक्षा जास्त तेलाचा समावेश, मॅक्रो स्थिरता राखण्यासाठी आरबीआयचे कडक नियमन, अमेरिकेच्या मंदीसह जागतिक मंदी, भारत-अमेरिका व्यापार संबंध बिघडणे आणि इक्विटी मल्टीपलचे डी-रेटिंग अशा गोष्टीचा परिणाम होऊ शकतो या परिस्थितीत, आर्थिक वर्ष २५-२८ मध्ये सेन्सेक्सच्या उत्पन्नात दरवर्षी १५% वाढ होण्याचा अंदाज आहे, तर आर्थिक वर्ष २६ मध्ये वाढ कमकुवत होईल.' असे म्हटले आहे.
सहकारी संस्थांना ९२५०० कोटींचा निधी वितरित - अमित शहा
नवी दिल्ली: एनसीडीसीने गेल्या आर्थिक वर्षात सहकारी संस्थांना ९२५०० कोटी रुपये वितरित केले आहेत' असे वक्तव्य केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केले आहे. आर्थिक २०२०-२१ च्या पातळीपेक्षा जवळजवळ निधी चौपट दिला गेला आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (NCDC) ९२ व्या सर्वसाधारण परिषदेच्या बैठकीत बोलत होते.एका अधिकृत निवेदनानुसार, शहा म्हणाले की या मंत्रालयाच्या स्थापनेनंतर सहकारी क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती झाली आहे.त्यांनी सांगितले की एनसीडीसी या परिवर्तनाचा प्रमुख पाया म्हणून उदयास आला आहे. 'सहकार चळवळीद्वारे शेतकरी, ग्रामीण कुटुंबे, मच्छीमार, लघु उत्पादक आणि उद्योजकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे आणि स्वावलंबी होण्याच्या दिशेने देशाच्या प्रयत्नांमध्ये सहकार महत्त्वाची भूमिका बजावत आहे' असेही शहा म्हणाले आहेत.सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एनसीडीसीने २०२०-२१ मध्ये २४७०० कोटी रुपयांवरून २०२४-२५ मध्ये ९५२०० कोटी रुपयांपर्यंत एकूण वितरण वाढवले आहे असे सरकारी आकडेवारी सांगते. याचप्रमाणे विकसित भारत या उद्दिष्टाकडे नेण्यासाठी अमित शहा यांनी यावेळी सहकार्य (Co Operation) हे विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी नमूद केले आहे की, भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सहकार्य हे एक उत्कृष्ट मॉडेल आहे कारण ते ग्रामीण भागात सहभाग आणि उपजीविकेच्या संधी सुनिश्चित करते. आकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांत, एनसीडीसीने ४०% अधिक सीएजीआर (Compound Annual Growth Rate CAGR) नोंदवला आहे महत्वाची बाब म्हणजे यावेळी एनसीडीला शून्य निव्वळ एनपीए (Non Performing Assets NPA,k दर राखण्यास यश आले आहे. यामुळे कोणी कर्ज बुडवले नाही हे देखील स्पष्ट होते. नुकत्याच प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, संस्थेला तब्बल ८०७ कोटी रुपयांचा सर्वाधिक निव्वळ नफा मिळाला आहे.एनसीडीसीने डीसीसीबी, राज्य सहकारी बँका आणि राज्य विपणन महासंघांद्वारे दुग्धव्यवसाय, अन्न प्रक्रिया, वस्त्रोद्योग आणि विपणन क्षेत्रात प्रभावीपणे काम केले आहे असे शहा यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये खोल समुद्रात मासेमारीसाठी ट्रॉलर्स खरेदी करण्यासाठी देण्यात आलेल्या आर्थिक सहाय्यामुळे ब्लू इकॉनॉमीला चालना मिळाली आहे आणि मासेमार समुदायाला, विशेषतः महिलांना, आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शहा यांनी सहकारावर अधिक भर देत ते म्हणाले की नफा वाढवण्यासाठी साखर आणि दुग्धजन्य क्षेत्रात वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिले पाहिजे.सहकारी साखर कारखान्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी देण्यात आलेल्या १००० कोटी रुपयांच्या सरकारी अनुदानावर आधारित, एनसीडीसीने ५६ साखर कारखान्यांना इथेनॉल प्लांट, सह-उत्पादन आणि खेळत्या भांडवलासाठी आतापर्यंत १०००५ कोटी रुपये वितरित केले आहेत.३१ जुलै २०२५ रोजी मंजूर झालेल्या २००० कोटी रुपयांच्या सरकारी अनुदानाच्या आधारित माहितीनुसार, एनसीडीसी दुग्धव्यवसाय, पशुधन, मत्स्यव्यवसाय, साखर, कापड, अन्न प्रक्रिया, साठवणूक, शीतगृह, कृषी आणि महिला सहकारी संस्थांना सवलतीच्या दरात दीर्घकालीन आणि कार्यरत भांडवल कर्ज देण्यासाठी २०००० कोटी रुपये जमवत आहे. सहकारी विकास, कृषी, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि संबंधित क्षेत्रांना वित्तपुरवठा करण्यासाठी धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी जबाबदार असलेली एनसीडीसी देशातील सर्वोच्च संस्था आहे.
Shaurya Pradeep Patil : देशाची राजधानी दिल्लीत घडलेल्या एका घटनेमुळे महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिल्लीतील राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनवरून प्लॅटफॅार्मवर उडी मारून दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षांच्या विद्यार्थ्यांने आपले आयुष्य संपवले आहे. ही घटना १८ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता घडली. शौर्य प्रदीप पाटील असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेतील […] The post शिक्षकांचा जाच असह्य झाला अन्…; दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं, सुसाईड नोटमध्ये मन सुन्न करणारे शब्द appeared first on Dainik Prabhat .
शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या
दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला कंटाळून दिल्लीतील मेट्रो स्थानकावरून उडी मारत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी घडली. घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी शौर्यच्या शाळेतील प्राचार्यांसह तीन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.शौर्य पाटील हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर गावचा रहिवासी होता. त्याचे वडील प्रदीप पाटील सोने-चांदी गाळण्याच्या व्यवसायानिमित्त कुटुंबासह अनेक वर्षांपासून दिल्लीतील राजीव नगर भागात राहतात. शौर्य इथल्या सेंट कोलंबस या शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता.१८ नोव्हेंबरला शौर्यने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून खाली उडी मारली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून त्याला रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.घटनेमागील कारणशौर्यच्या स्कूल बॅगमध्ये पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली. त्यामध्ये त्याने स्पष्टपणे नमूद केले आहे की, तो अनेक दिवसांपासून शाळेतील काही शिक्षकांच्या मानसिक छळाला, अपमानाला आणि दबावाला कंटाळला होता. नोटमध्ये त्याने आपले नाव, पालकांना दिलगिरी, तसेच अवयवदानाची इच्छा व्यक्त केली आहे. त्याच्या आत्महत्येसाठी त्याने संपूर्णत: शिक्षकांना दोषी ठरवले आहे.या नोटच्या आधारावर पोलिसांनी सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल, तसेच शिक्षक मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली वर्गीस यांच्यावर मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेदरम्यान शौर्यचे वडील गावाकडे गेले होते. मुलाच्या मृत्यूची बातमी मिळताच ते तातडीने दिल्लीला रवाना झाले. शौर्यचा अंत्यसंस्कार त्याच्या मूळ गावी ढवळेश्वर येथे करण्यात येणार आहेत.
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी! सर्व गुन्ह्यांची होणार सखोल चौकशी
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार अनमोल बिश्नोईला भारताने ताब्यात घेतले आहे. अनमोल हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. खोट्या पासपोर्टच्या आधारे तो अमेरिकेत वास्तव्य करत होता. त्याला आता अमेरिकेमधून भारताने ताब्यात घेतले आहे. १९ नोव्हेंबर रोजी आयजीआय विमानतळावर एनआयए आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाच्या कडक सुरक्षेत त्याला थेट पटियाला हाऊस कोर्टात नेण्यात आले. जिथे न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली आहे.२०२२ पासून बनावट पासपोर्टवर अमेरिकेत लपून बसलेल्या अनमोलवर १८ हून अधिक गंभीर प्रकरणांचे आरोप आहे. ज्यात बाबा सिद्दीकी आणि पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची हत्या, सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार आणि परदेशातून ऑनलाइन धमक्या यांचा समावेश आहे. तो अमेरिकेतून गुन्हेगारी कारवाया आणि खंडणी रॅकेट चालवत होता.अनमोलच्या बाबतीत असा युक्तिवाद करण्यात आला आहे की, त्याची कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे कारण तो अनेक गंभीर प्रकरणांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कमध्ये सामील आहे. एनआयए अनमोल बिश्नोईविरुद्ध न्यायालयात तपशीलवार आरोप सादर करत आहे, ज्यामध्ये दहशतवादी सिंडिकेट चालवणे, खंडणी, शस्त्रास्त्र पुरवठा आणि परदेशी नेटवर्क चालवणे यासारख्या कारवाया समाविष्ट आहेत.https://prahaar.in/2025/11/20/mulund-is-100-bjp-not-a-single-ward-will-go-to-shiv-sena/तर अनमोल बिश्नोईच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की एनआयएकडे आधीच सर्व पुरावे आहेत. त्यामुळे कोठडीची आवश्यकता नाही. अनमोल तपासात पूर्ण सहकार्य करणार असून पळून जाण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे त्याला कोठडी नको अशी मागणी वकिलांनी न्यायालयाकडे केली आहे. पर्यायी, त्यांनी असा युक्तिवाद केला की जर कोठडी मंजूर झाला तर डीके बसूच्या अटकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे.न्यायालयाचा निर्णयन्यायालयाने मान्य केले की आरोप अत्यंत गंभीर असून खटल्याची व्याप्ती खूप मोठी आहे. न्यायालयाने अनमोलला त्याची भाषा, अटक मेमो आणि वैद्यकीय तपासणीबद्दल प्रश्न विचारले आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रियांचे पालन करण्यात आल्याची पुष्टी केली. आरोपीने न्यायालयात सांगितले की त्याला हिंदी आणि इंग्रजी समजते आणि त्याला अटक मेमोची प्रत मिळाली आहे. त्यानंतर, न्यायालयाने आरोपीला ११ दिवसांसाठी एनआयए कोठडीत पाठवले.
मुंबईतील १० पैकी जवळपास ९ एसएमबी एआयला प्राधान्य देतात: लिंक्डइन संशोधन
मुंबई: मुंबईतील लघु व मध्यम आकाराचे व्यवसाय (एसएमबी) त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात आत्मविश्वासपूर्ण दशकामध्ये प्रवेश करत आहेत. नवीन लिंक्डइन (LinkedIn) संशोधनामधून निदर्शनास येते की, मुंबईतील १० पैकी जवळपास ९ (८९%) एसएमबी एआय अवलंबनामध्ये गुंतवणूक करत आहेत किंवा एआय अवलंबनाचे नियोजन करत आहेत. तंत्रज्ञान प्रयोगावरून पायाभूत सुविधेपर्यंत पोहोचले आहे. यासोबत, ८७% एसएमबी धोरणकर्त्यांना पुढील १२ महिन्यांमध्ये व्यवसाय वाढीची अपेक्षा आहे, ज्यामधून क्षेत्र आशावादी असण्यासोबत स्मार्ट सिस्टम्स, कुशल टॅलेंट आणि विश्वसनीय डिजिटल प्लॅटफॉर्म्ससह पुन्हा विकसित होईल असे दिसून येते.मुंबईतील एसएमबींसाठी उत्क्रांती पर्याय नसून अस्तित्व टिकवण्याचे साधन -एसएमबींचा तत्परतेवर विश्वास असला तरी एआयबाबत आता फक्त चर्चा केली जात नसून ते विकासासाठी नवीन बेसलाइन बनले आहे. संशोधनामधून निदर्शनास येते की, मुंबईतील ५९ एसएमबी मार्जिन्सच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे म्हणून ऑपरेशनल कार्यक्षमतेला महत्त्व देतात, ५७% एसएमबी स्पर्धात्मक राहण्यासाठी आवश्यक म्हणून एआय आणि ऑटोमेशनला प्राधान्य देतात आणि ५१% एसएमबींचे मत आहे की, डिजिटल परिवर्तन अस्तित्व कायम राहण्यासाठी महत्त्वाचे आहे.लिंक्डइन इंडियाचे कंट्री मॅनेजर कुमारेश पट्टाबिरामण (Kumaresh Pattabiraman, Country Manager, LinkedIn India) म्हणाले आहेत की,'मुंबईतील एसएमबी स्मार्टपणे काम करत आणि अधिक धोरणात्मकरित्या एआयमध्ये गुंतवणूक करत व्यवसाय विकास मानकांना नव्या उंचीवर घेऊन जात आहेत. उद्योजक व्यवसाय निर्माण करण्याच्या पद्धतींना आव्हान देत आहेत, एआयचा वापर करत कार्यक्षमतेला चालना देत आहेत, क्षमता वाढवण्यासाठी कुशल व्यक्तींना हायर करत आहेत आणि विश्वसनीय डिजिटल परिसंस्थांच्या माध्यमातून त्यांची बाजारपेठेतील उपस्थिती वाढवत आहेत. लिंक्डइनमध्ये आम्ही विकासाच्या या पुढील टप्प्याला सक्षम करण्याप्रती कटिबद्ध आहोत, जेथे प्रत्येक उद्योजकाला एकाच ठिकाणी योग्य नेटवर्क, योग्य ग्राहक आणि योग्य टॅलेंटसह सक्षम करत आहोत, ज्यामुळे ते आजच्या वाढत्या डिजिटल-केंद्रित अर्थव्यवस्थेमध्ये आत्मविश्वासाने प्रगती करू शकतील.'एआय विकासासाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम -एआय मुंबईतील एसएमबीच्या हायर, विपणन व विकास करण्याच्या पद्धतींमागील प्रेरक स्रोत बनले आहे. जवळपास सर्वेक्षण करण्यात आलेले सर्व व्यवसाय म्हणतात की, ते कार्यप्रवाह स्वयंचलित करण्यासाठी (८८%), विश्लेषण व व्यवसाय उत्कृष्टता दृढ करण्यासाठी (८८%) आणि कर्मचाऱ्यांना अधिक कुशल करण्यासाठी (८७%) एआयचा वापर करतात किंवा एआयचा वापर करण्याचे नियोजन करत आहे.हायरिंग मॉडेल्सना पुन्हा निर्माण करण्यात येत आहे, पदवींपेक्षा कौशल्यांना महत्त्व दिले जात आहे. शहरातील अर्ध्याहून अधिक एसएमबी आता पारंपारिक पात्रतांच्या तुलनेत नेतृत्व व टीम व्यवस्थापन (५८%), समस्या निवारण व महत्त्वपूर्ण विचारसरणी (५५ टक्के) आणि डिजिटल साक्षरता व एआय निपुणता (५३%) या गुणांना महत्त्व देतात. ही कौशल्ये असलेल्या टॅलेंटचा शोध घेण्यासाठी ५३% एसएमबी आधीच एआय हायरिंग टूल्सचा वापर करत आहेत, ज्यामधून सुधारित उमेदवार दर्जा आणि उच्च सहभाग दिसून येतो.मुंबईमध्ये विपणन (Marketing) व विक्री देखील उत्कृष्टता-संचालित बनत आहेत. ६९% एसएमबी एआय मार्केटिंग टूल्सचा वापर करत आहेत, त्यांच्यापैकी ९४% एसएमबी याकरिता त्यांचा जवळपास अर्धा बजेट वापरत आहेत. ६६% एसएमबी आता स्पष्ट लक्ष्य आणि ऑटोमेटेड फॉलोअप्ससाठी विक्रीमध्ये एआयवर अवलंबून आहेत, ज्यामुळे त्यांना मोठ्या अत्याधुनिक उद्योगांसह काम करता येते.स्केलरचे चीफ मार्केटिंग ऑफिसर राहुल कार्तिकेयन (Rahul Karthikeyan, Chief Marketing Officer, Scaler) म्हणाले आहेत की,'स्केलरच्या अलिकडील मोहिमांनी अचूक ग्राहक लक्ष्य आणि डेटा-संचालित ऑप्टिमायझेशनच्या माध्यमातून उत्तम कामगिरी केली आहे. प्रायोजित कनेन्ट, विशेषत: व्हर्टिकल फॉर्मेट्सनी इतर चॅनेल्सवरील स्थिर फॉर्मेट्सच्या तुलनेत २०% उच्च लीड-टू-पेमेंट रूपांतरण दिले. ऑगस्टमध्ये लिंक्डइनने जवळपास ७० ते ८० नवीन पेमेंट्स निर्माण केले, ज्यामध्ये रिटर्न ऑन स्पेण्ड (आरओएस) २.२ आहे. आमची या उच्च-प्रभावी चॅनेलला अधिक विकसित करण्याची, तसेच प्रति विक्री खर्चासहित कार्यक्षमता कायम ठेवण्याची योजना आहे.'विश्वास नवीन स्पर्धात्मक फायदा -एसएमबी झपाट्याने एआयचा अवलंब करत असले तरी विश्वास कोणावर ठेवावा याबाबत सतर्कता राखत आहेत. ९६% एसएसमबी म्हणतात की, खर्च किंवा सोयीसुविधेपेक्षा विश्वसनीयता महत्त्वाची आहे. ते डेटा सुरक्षा (८३%), विनासायास एकीकरण (७८%) आणि व्याजदराबाबत (ROI) स्पष्टता (७६%) यांना अधिक प्राधान्य देत आहेत. या बदलांमधून स्मार्ट अधिक स्थिर एसएमबी परिसंस्थेचा (Ecosystem) उगम दिसून येतो.
नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार ; पंतप्रधानांसह दिग्गज नेते राहणार उपस्थित
Bihar CM Oath Ceremony। बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या प्रचंड विजयानंतर, आज पाटणामधील गांधी मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभाची तयारी सुरू आहे. नितीश कुमार शपथविधी सोहळ्यासाठी गांधी मैदानावर पोहोचले आहेत. तर थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी याठिकाणी दाखल होणार आहेत. यासोबतच अमित शहा, अनेक केंद्रीय मंत्री तसेच एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. शपथविधी समारंभाची […] The post नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार ; पंतप्रधानांसह दिग्गज नेते राहणार उपस्थित appeared first on Dainik Prabhat .
Prajakta Patil : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अनगर नगरपंचायतची बिनविरोध झालेली निवडणुकीची मोठी चर्चा संबंध राज्यात होत आहे. येत्या काही दिवसांवर नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. निवडणुका होण्याअगोदरच अनगर नगरपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपचे १७ उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर या नगरपंचायत निवडणुकीत नाट्यमयरित्या घडामोडी घडल्या. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्राजक्ता पाटील बिनविरोध निवडून […] The post अनगर नगरपंचायत निवडणूक बिनविरोध जिंकल्यानंतर राजन पाटलांच्या सुनबाईंची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या “मी उज्ज्वला थिटे…” appeared first on Dainik Prabhat .
जामखेड नगरपरिषदेत धक्कातंत्र: नगराध्यक्षपदाचे ९ तर नगरसेवकपदाचे तब्बल ८२ अर्ज बाद
जामखेड – अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापासून सस्पेन्समध्ये राहिलेल्या जामखेड नगरपरिषदपदासाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर तब्बल ८२ उमेदवारांचे अर्ज त्रुटीमुळे रद्द करण्यात आले. नगराध्यक्षपदासाठी १३ तर नगरसेवक पदासाठी २४ जागांसाठी १२१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. […] The post जामखेड नगरपरिषदेत धक्कातंत्र: नगराध्यक्षपदाचे ९ तर नगरसेवकपदाचे तब्बल ८२ अर्ज बाद appeared first on Dainik Prabhat .
Karnataka Chief Minister। मागील काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदावरून नाराजीनाट्य सुरु आहे. या नाट्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी शिवकुमार यादव यांचा समावेश आहे.मुख्यमंत्री पदावरून सुरु असलेला वाद आता आणखी तीव्र होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ते त्यांच्या पदावर कायम राहणार असून पुढील वर्षी त्यांचा विक्रमी १७ वा अर्थसंकल्प सादर करणार असल्याचं म्हटलंय. […] The post “पुढच्या वर्षी मीच अर्थसंकल्प सादर करणार” ; ‘रोटेशनल सीएम’ बद्दलच्या चर्चांना सिद्धरामय्याकडून पूर्णविराम? appeared first on Dainik Prabhat .
सचिन वरच्या प्रेमासाठी पाकिस्तानातून पळून आलेल्या सीमा हैदरप्रमाणेच, एका भारतीय महिलेने आता एका पाकिस्तानी पुरुषाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न केले आहे. तथापि, दोघेही आता फरार आहेत आणि पाकिस्तानमध्ये त्यांचा शोध सुरू आहे. सोशल मीडियाद्वारे ही प्रेमकहाणी कशी सुरू झाली हे जाणून घेण्यासाठी, वरील प्रतिमेवर क्लिक करा आणि व्हिडिओ पाहा...
शेअर बाजार तेजीत उघडला ! सेन्सेक्स २५५ अंकांनी वधारला ; निफ्टीने २६,१०८ वर पोहोचला
Stock Market Today। भारतीय शेअर बाजाराने गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी, आठवड्यातील चौथे ट्रेडिंग सत्र, सकारात्मक सुरुवात केली. बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५० हिरव्या रंगात उघडले. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक २८४.४५ अंकांनी म्हणजेच ०.३३ टक्क्यांनी वाढून ८५,४७०.९२ वर पोहोचला, तर एनएसई निफ्टी ५० ७९.४५ अंकांनी म्हणजेच ०.३० टक्क्यांनी वाढून २६,१३२.१० वर उघडला. […] The post शेअर बाजार तेजीत उघडला ! सेन्सेक्स २५५ अंकांनी वधारला ; निफ्टीने २६,१०८ वर पोहोचला appeared first on Dainik Prabhat .
शेअर बाजारात प्री ओपन सत्रात सकारात्मक संकेत सेन्सेक्स ३०० व निफ्टी ७३ अंकाने उसळला 'या'कारणामुळे
मोहित सोमण:जागतिक पातळीवरील रॅलीचा फायदा आजही भारतात कायम राहू शकतो. प्री ओपन सत्रात सेन्सेक्स ३०० अंकांने व निफ्टी ७३ अंकाने उसळला आहे. अनुकुल वातावरण प्री ओपन बाजारात दिसत आहे. प्रामुख्याने बाजारातील चढउताराचा 'सिलसिला' आज मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढच अपेक्षित आहे. विशेषतः जागतिक बाजारपेठेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेअर व त्यातील बुडबड्याबद्दल हवा निर्माण झाल्याने बाजारात आयटी शेअर सलग दोन दिवस घसरले असले तरी सलग दोन दिवसात पुन्हा एविडिया व इतर आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या मजबूत वाढीमुळे कालही युएस बाजारात रॅली झाली आहे. एनविडिया शेअर अतिरिक्त ५% उसळल्याने बाजारात आणखी वाढ झाली. तीच परिस्थिती भारतीय बाजारात राहिल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेलच तत्पूर्वी फेड व रेपो दरात कपातीचे संकेत मिळत असल्याने बँक शेअरही तेजीत दिसत आहे. काही प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली रोख विक्रीही कमी केल्याने निर्देशांकात स्थैर्य मिळत असले तरी आगामी आर्थिक आकडेवारी, निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील कंपन्यांची कामगिरी यांचा परिणाम बाजारात प्रभावी ठरू शकतो.प्री ओपन सत्रात मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारातील सपोर्ट लेवल दिवसभरात कायम राहण्याची चिन्हे आहेत कारण आज सकाळी गिफ्ट निफ्टीतही समाधानकारक वाढ झाली होती.प्री ओपन बाजारात डीसीएम श्रीराम (६.०४%), नेटवेब टेक्नॉलॉजी (४.९३%), एनबीसी (४.२९%), चोला इन्व्हेसमेंट अँड फायनान्स (३.५७%),जेपी पॉवर वेंचर (३.४०%), पीसीबीएल केमिकल्स (३.२८%), अदानी एनर्जी सोल्यूशन (२.८६%), सोनाटा सॉफ्टवेअर (२.६९%), क्लीन सायन्स (२.५१%), टाटा कम्युनिकेशन (२.३४%), झेंसार टेक्नॉलॉजी (२.३३%) समभागात वाढ झाली आहे.प्री ओपन बाजारात आयनॉक्स इंडिया (३.३६%), अदानी एंटरप्राईजेस (३.२१%), क्रिष्णा इन्स्टिट्यूट (१.७७%), फिनोलेक्स इंडस्ट्रीज (१.२२%), ग्राफाईट इंडिया (१.१५%), रेनबो चाईल्ड (१.१३%), ब्लू स्टार (१.११%), सेंच्युरी फ्लायबोर्ड (१.०३%), भारती एअरटेल (१.०१%), आय आयएफएल फायनान्स (१%), त्रिवेणी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज (०.९५%) समभागात झाली आहे.
ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड संस्थेत घोटाळा! सर्वसामान्यांच्या बचतीचा पदाधिकाऱ्यांनी घेतला फायदा
अकोला: अकोल्यातली ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड या संस्थेमध्ये ठेवी केलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संस्थेकडून ठेवी परत न मिळाल्याने तब्बल १६ हून अधिक ठेवीदारांनी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवायला सुरुवात केली आहे. या तक्रारींमध्ये, संस्थेने परतावा न देता आर्थिक विश्वासघात केल्याची माहिती ठेवीदारांनी दिली आहे. तक्रारदार विलास महादेवराव हनुमंते यांनी केलेल्या विस्तृत तक्रारीत संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष तुषार हुने, उपाध्यक्ष निलेश गावंडे, तसेच सदस्य प्रकाश जोशी आणि राजीव गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.तक्रारीनुसार, ठेवीदारांनी जमा केलेली रक्कम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने वापरून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याचे सांगितले. संस्थेकडून कोणताही स्पष्ट हिशोब न देणे, ठेवी परत न करणे आणि चौकशी टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे ठेवीदारांचा रोष वाढला. या प्रकरणामुळे संस्थेच्या कार्यप्रणालीवर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. मिळालेल्या प्राप्त तक्रारींच्या आधारे पोलिसांनी प्राथमिक पडताळणी पूर्ण करून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया गतीने सुरू केली आहे.https://prahaar.in/2025/11/20/army-chiefs-statement-and-pakistans-fear-he-said-india-can-intrude-anytime/पोलिसांचे पथक संबंधित कागदपत्रे, व्यवहार नोंदी आणि संस्थेच्या आर्थिक हालचालींची तपासणी करत असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. दरम्यान, स्वतःच्या आयुष्यभराची बचत संस्थेत जमा केलेल्या अनेक ठेवीदारांमध्ये मोठी चिंता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा वेगाने तपास होऊन ठेवीदारांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड संस्थेत गुंतवणूक करणारे ठेवीदार सर्व सामन्य वर्गातील आहेत. त्यामुळे छोटी रक्कम बुडणे हे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आमचे पैसे आम्हाला परत मिळाले पाहिजेत अशी मागणी ते करत आहे.
शुभमन गिल बाहेर; साई सुदर्शनला मिळणार कसोटीची संधी
गुवाहाटी : पहिल्या कसोटी दरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीनंतर शुभमन गिलची मैदानात पुनरागमन करण्याची शक्यता कमी होत चालली आहे. फलंदाजीसाठी उतरल्यानंतर काहीच चेंडूत त्याची मान लचकली आणि वेदना वाढत गेल्याने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवावे लागले. उपचारासाठी ICU मध्ये दाखल करण्यात आलेल्या शुभमनला आता बरं वाटत असलं तरी दुसऱ्या कसोटीसाठी तो फिट नाही, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.भारतीय संघाच्या व्यावसायिक डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण दुखापतीमुळे शुभमन पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावातही मैदानात उतरू शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष होते.सूत्रांच्या माहितीनुसार शुभमन गिलच्या जागी इंग्लंड दौऱ्यावर खेळलेला डावखुरा फलंदाज साई सुदर्शनला स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संघाचे नेतृत्व ऋषभ पंतकडे जाणार असल्याचेही संकेत आहेत. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळणार आहे. पहिली कसोटी हातातून गेल्यानंतर टीम इंडिया आता मालिकेत परतण्यासाठी दुसऱ्या कसोटीमध्ये कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजपा, शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग
मुंबई (सचिन धानजी):उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपाचा बालेकिल्ला असून या विधानसभेत भाजपाचे सहा नगरसेवक आहेत. या विधानसभेत भाजपा शतप्रतिशत आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपाची युती झाल्यास या विधानसभेत शिवसेनेला कुठेच शिरकाव करण्याची संधी नाही. या विधानसभेत युती नसल्यासच शिवसेनेला जागा मिळवता येतील. परंतु मुलुंडमधील विधानसभेत सहा प्रभागांमध्ये उबाठाच्या वाट्याला चार ते पाच जागा जाण्याची शक्यता असून मनसेला एका किंवा अधिक ताणल्यास दुसऱ्या जागेवर उमेदवार उभा करण्याची संधी मिळेल . मात्र, या सहाही प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता आहे.शिवसेना भाजपा युती असताना मुलुंड पश्चिमेला भाजपाची दावेदारी आणि मुलुंड पुर्वेचे प्रभाग शिवसेनेच्या वाट्याला येत होते. पण सन २०१७च्या निवडणुकीत शिवसेना भाजपा युती तुटली आणि भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवताना मुलुूंडमधील सहाही प्रभागांमध्ये आपले उमेदावार उभे केले आणि सहाही उमेदवार निवडून आणले. भाजपाचे सहा नगरसेवक असल्याने या विधानसभेत युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा येणार नाही. तर याठिकाणी शत प्रतिशत भाजपाच दिसून येणार आहे.प्रभाग क्रमांक १०३हा प्रभाग आता महिला राखीव झाला असून मागील दोन निवडणुकांमध्ये तो सर्वसाधारण खुला प्रवर्गाकरता आरक्षित झाला होता. त्याआधी तो महिला आरक्षित होता. या मतदार संघातून भाजपाचे मनोज कोटक दोन वेळा निवडून आले होते. पण हा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने याठिकाणी भाजपा महिला पदाधिकारी हेतल जोबनपुत्रा यांचे नाव चर्चेत आहे. तर या प्रभागावर उबाठाचा दावा असल्याने माजी नगरसेविका हेमलता सुकाळे यांचे नाव चर्चेत आहे. तर काँग्रेसच्यावतीने माजी महापौर आर आर सिंह यांच्या कुटुंबातून त्यांची सून निवडणूक रिंगणात उतरण्याचीही शक्यता आहे.प्रभाग १०४हा प्रभाग सर्वसाधारण खुला प्रवर्गकरता राखीव झाला आहे. या प्रभाग मागील दोन निवडणूक ओबीसीकरता राखीव झाला असून सन २००७ नंतर प्रथमच हा प्रभाग खुला झाला आहे. या मतदार संघातून भाजपाचे प्रकाश गंगाधरे हे निवडून येत आहेत. यंदाही त्यांची पक्की दावेदारी असली तरी किरीट सोमय्यांच्या मुलाचा प्रभाग ओबीसी महिला झाल्याने निलसाठी हा प्रभाग मोकळा करून तर दिला जाणार नाही ना असा स्थानिकांना प्रश्न पडला आहे. या प्रभागात उबाठाची प्रबळ दावेदारी असून त्यांच्याकडून सिताराम खांडेकर, शैलेश पवार यांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेसच्यावतीने माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचे पुत्र अमित किंवा अन्य सदस्य निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे.प्रभाग क्रमांक १०५या प्रभागातून भाजपाच्या रजनी केणी निवडून आल्या होत्या, परंतु काही महिन्यांपूर्वीच त्यांचे देहावसान झाले. पण हा प्रभाग आता ओबीसी महिला करता राखीव झाला आहे. सन २०१२ वगळता हा प्रभाग महिला राखीव झालेला आहे. सन २०१२मध्ये हा प्रभाग ओबीसी करता राखीव झाला होता. या प्रभागातून भाजपाच्यावतीने दिपिका घाग आणि नम्रता वैती यांच्या नावाची चर्चा आहे, हा प्रभाग उबाठालाच जाणार असून याठिकाणी त्यांच्याकडून ज्योती वैती, रसिका तोंडवळकर यांच्या नावाची चर्चा आहे . या प्रभागात शिवसेनेची दावेदारी असली तरी भाजपाची परंपरागत जागा असल्याने सोडली जाणार नाही. मात्र, शिवसेनेकडून माजी नगरसेविका सुजाता पाठक यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत आहे.प्रभाग १०६हा प्रभाग सर्वसाधारण खुला प्रवर्गकरता राखीव झाला आहे. हा प्रभाग सन २०१२ ओबीसी झाला होता. पण इतर प्रत्येक निवडणुकीत तो खुलाच झालेला आहे. या प्रभागातून मनसेचे सत्यवान दळवी यांचा प्रबळ दावेदारी असली तरी उबाठाकडे इच्छुकांची मोठी यादी आहे. यात मनसेतून उबाठात आलेले सागर देवरे, खासदा संजयभाऊ पाटील यांचे अत्यंत विश्वासू अभिजित चव्हाण तसेच अमोल संसारे, अनिष शेडगे यांची नावे चर्चेत आहे. पण देवरे हे आदित्य आणि वरुण सरदेसाई यांचे अतिविश्वासू आणि मित्र असल्याने देवरे यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. तर काँग्रेसच्यावतीने संजय घरत आणि कैलास पाटील यांची नावे चर्चेत आहेप्रभाग १०७हा प्रभाग सर्वसाधारण खुला प्रवर्गकरता राखीव झाला.यापूर्वी दोन निवडणुकीत हा प्रभाग महिला आरक्षित झाला. भाजपाच्या समिता कांबळे या प्रभागातून निवडून आल्या असून महापालिका शाळांमध्ये योगा वर्ग सुरु करण्याची मागणी केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. हा प्रभाग खुला झाल्याने याठिकाणांहून समिता कांबळे यांची पक्की दावेदारी असली तरी खुला प्रवर्ग झाल्याने निल सोमय्या आणि माजी खासदार मनोज कोटक यांचे भाऊ केतन कोटक यांच्याही नावाची चर्चा आहे. तर उबाठाच्यावतीने दिनेश जाधव हे इच्छुक आहेत. या प्रभागातून शिवसेनेचे जगदीश शेट्टी हे इच्छुक असले तरी युतीमध्ये हा प्रभाग भाजपाकडे राखला जाणार आहे. युती न झाल्यास शेट्टी हे शिवसेनेकडून प्रबळ दावेदार ठरतील . तर काँग्रेसच्यावतीने अनु शेट्टी हे इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.प्रभाग १०८या प्रभागातून भाजपाचे किरीट सोमय्या यांचे पुत्र निल सोमय्या हे निवडून आले आहे. पण प्रभाग आता ओबीसी महिला करता राखीव झाला. मागील चार निवडणुकीत सर्व प्रकारची अनुसूचित जाती आणि जमाती वगळता सर्व प्रकारची आरक्षण पडली आहेत. हा प्रभाग भाजपाचा असल्याने भाजपाकडून जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष दिपिका घाग यांचे नाव आघाडीवर आहे. तर उबाठाकडून शुभांगी केणी, नंदिनी सावंत यांची नावे चर्चेत आहेत.लोकसभेतील मुलुंड विधानसभेतील मतदानविद्यमान खासदार संजय पाटील : ५५,९७९पराभूत उमेदवार मिहिर कोटेचा : १, १६, ४२१विधानसभेतील मतदानआमदार मिहिर कोटेचा : १, ३१,५४९पराभूत उमेदवार काँग्रेसचे राकेश शेट्टी : ४१,५१७विधानसभा क्षेत्रातील संभाव्य उमेदवारप्रभाग क्रमांक १०३(महिला प्रवर्ग)भाजपा : हेतल जोबनपुत्रा, उबाठा : हेमलता सुकाळेप्रभाग क्रमांक १०४(सर्व साधारण खुला प्रवर्ग)भाजपा : प्रकाश गंगाधरे, उबाठा : सिताराम खांडेकर, शैलेश पवार, काँग्रेस: उत्तम गीते, राष्ट्रवादी काँग्रेस : अमित सुरेश पाटीलप्रभाग क्रमांक १०५ (ओबीसी महिला प्रवर्ग)भाजपा : नम्रता वैती, दिपिका घाग, उबाठा : ज्योती वैती, रसिका तोंडवळकर, शिवसेना : सुजाता पाठक, काँग्रेस: मालती पाटीलप्रभाग क्रमांक १०६(सर्वसाधारण खुला प्रवर्ग)भाजपा :प्रभाकर शिंदे, उबाठा : सागर देवरे, अभिजित चव्हाण, अमोल संसारे, अनिष शेडगे, मनसे: सत्यवान दळवी, काँग्रेस : संजय घरत, कैलास पाटीलप्रभाग क्रमांक १०७ (सर्वसाधारण खुला प्रवर्ग)भाजपा: समिता कांबळे, निल सोमय्या, केतन कोटक, उबाठा : दिनेश जाधव, काँग्रेस : अनु शेट्टी, अपक्ष : विरल शाहप्रभाग क्रमांक १०८ (ओबीसी महिला प्रवर्ग)भाजपा : दिपिका घाग, उबाठा : शुभांगी केणी, नंदिनी सावंत, मनसे: राजेंद्र देशमुख
नाशिक : नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात घडलेल्या भीषण अपघातात एका ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. १८ तारखेला बुधवारी दुपारी २ च्या सुमारास हा प्रकार घडला असून, स्थानकात प्रवेश करताना बसचा ब्रेक अचानक निकामी झाला आणि नियंत्रण सुटल्याने बस थेट फलाटावर चढली. या धडकेत फलाटावर उभ्या असलेल्या नागरिकांना स्वतःचा बचाव करता न आल्याने मोठी दुर्घटना घडली.मृत मुलाचे नाव आदर्श बोराडे असून, तो आपल्या कुटुंबासोबत देवदर्शनासाठी गेला होता. दर्शन आटोपून गावाकडे परत जाण्यासाठी त्याचे कुटुंब सिन्नर बस स्थानकात बसची वाट पाहत उभे होते. मात्र अचानक बस फलाटावर धडकली आणि या धडकेत आदर्शचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या इतर प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त करत स्थानकाबाहेर रास्ता रोको केला. त्यांनी वाहतूक व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि बसच्या तांत्रिक तपासणीतील त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील तपास सुरू केला आहे.
BMC साठी ठाकरे बंधूंचा युतीचा नारळ फुटला? जागावाटपाची झाली प्राथमिक चर्चा; महत्वाची माहिती समोर
Thackeray brother : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी अवघे काही दिवस उरलेले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीसाठी निवडणुका होणार आहेत. यानंतर दुसरा आणि त्यानंतर तिसरा टप्पा अर्थात महापालिका निवडणुकांचा असणार आहे. यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष […] The post BMC साठी ठाकरे बंधूंचा युतीचा नारळ फुटला? जागावाटपाची झाली प्राथमिक चर्चा; महत्वाची माहिती समोर appeared first on Dainik Prabhat .
भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णीआपल्या देदिप्यमान तेजाने आसमंतात अखंड झळकणाऱ्या सप्तर्षींपैकी एक ऋषी म्हणजे महर्षी भारद्वाज. आपल्या पुण्यभूमी भारतातल्या अलकनंदा आणि भागिरथीच्या पावन संगमावर, देवप्रयाग येथे महर्षी भारद्वाजांचा आश्रम होता. त्या आश्रमाच्या परिसरात धरित्रीवर उदात्त तत्त्वांचे बिजारोपण करणारे आणि आकाशाच्या हृदयात भरून जाणारे विलक्षण नादमधुर आणि ओजस्वी असे वेदमंत्रांच्या सामगायनाचे सूर प्रत्यही निनादत असत. महर्षी भारद्वाज हे बृहत्साम या सामगायन प्रकाराचे आचार्य होते. सामवेदात रुची असणारे, म्हणजेच वेदमंत्रांच्या शास्त्रशुद्ध व स्वरबद्ध गायनाची आवड असणारे शेकडो शिष्य भारद्वाजांच्या आश्रमात सामवेदाचे अध्ययन करीत असत.ऋग्वेदातील सहाव्या मंडलाच्या मंत्राचे द्रष्टे महर्षी भारद्वाज आहेत. त्यांची एक काव्यमय ऋचा बघू या,न अहं तन्तुं न वि जानामि ओतुं न यं वयन्ति समरे अतमानाः।कस्य स्वित् पुत्रः इह वक्त्वानि परः वदाति अवरेण पित्रा।।ऋ.मं६सू९.२या जीवनरूपी वस्त्रपटलाच्या सरळ धाग्यांना मी जाणत नाही, तसेच तिरक्या धाग्यांनाही मी जाणत नाही. या वस्त्रनिर्मितीच्या उद्योगात जो नवनवीन मनोहर रंगीत वस्त्रे विणीत असतो त्यालाही मी जाणत नाही. या पृथ्वीतलावर असा कोणता थोर पुत्र असेल, की जो आपल्या पित्याशी याबाबत चर्चा करून आपल्याला उपदेश करेल? अशा अर्थाची ही ऋचा आहे, यात जीवनरहस्य जाणून घेण्याची नुसतीच इच्छा नाही, तर तळमळ आहे. सद्गुरूच्या भेटीची आस आहे. आपल्या आयुष्याला दिवसरात्रींच्या धाग्यांनी विणणारा कोण असेल? त्यात सुखाचे सरळ धागे वा दुःखाचे तिरपे धागे केव्हा येतील, हे आपल्याला माहीत नसते. या वस्त्राच्या विणकऱ्याला जाणून जीवनाचे रहस्य उलगडून सांगणारा श्रेष्ठ गुरू आपल्याला केव्हा भेटेल? या भावार्थाची ही ऋचा, “एक धागा सुखाचा... या वस्त्राते विणते कोण...’’ या सुप्रसिद्ध गीताची आठवण करून देते. असे आत्मचिंतन करणाऱ्या महर्षी भारद्वाजांना सत्कर्मरूप यज्ञातील वैश्वानर ज्योतीत आत्मदर्शन झालेले दिसून येते.ध्रुवं ज्योतिः निहितं दृशये कं मनः जविष्ठं पतयत्सु अन्तः ।विश्वेदेवाः समनसः सकेताः एकं ख्रतुं अभि विदन्ति साधु ।।ऋ.मं.६सू९.५स्थिर असूनही गतिशील, चलनवलनाला शक्ती देणारी अशी ही वैश्वानर ज्योती सर्व प्राणिमात्रांत आत्मसुखदर्शनास्तव स्थापन केलेली आहे. सर्व देवस्वरूप मानव एक मनाने, एक विचाराने या वैश्वानर ज्योतीची उपासना करीत असतात, असे महर्षी भारद्वाज म्हणतात.अाध्यात्माप्रमाणे महर्षी भारद्वाज धनुर्वेद, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र यांचेही विशेषज्ञ होते. भौतिक विज्ञानातही त्यांची स्पृहणीय कामगिरी असून यंत्रसर्वस्व नावाच्या महान ग्रंथाचे ते निर्माते होते. अथर्ववेदातही त्यांचे २३ मंत्र आहेत. महर्षी अंगिरस हे भारद्वाजांचे पितामह होते. भारद्वाजांचे पिता बृहस्पती व माता ममता. कौरवपांडवांचे गुरू द्रोण हे भारद्वाजांचे पुत्र होत. भारद्वाजांनी इंद्राकडून व्याकरणशास्त्राचे अध्ययन केले व ते अनेक ऋषींना शिकवले. तसेच इंद्राकडून भारद्वाज आयुर्वेद शिकले आणि आयुर्वेद संहितेची रचना केली. त्यांनी महर्षी भृगूंकडून धर्मशास्त्राचा उपदेश घेतला व भारद्वाजस्मृती लिहिली.महर्षी भारद्वाजांच्या बाबतीत एक गोष्ट तैत्तिरिय ब्राह्मग्रंथात अशी आहे की, त्यांनी संपूर्ण वेदाच्या अध्ययनाचा प्रयत्न केला. त्यांच्या अध्ययन तपस्येने इंद्र प्रसन्न झाला. त्याच्याकडून भारद्वाजांनी तीन वेळा १००, १०० वर्षांचे आयुष्य वेदाध्ययनासाठी मागून घेतले. पण अखेरीस इंद्राने त्यांना सांगितले की वेदरूपी तीन पहाडापुढे तुझे अध्ययन मुठ्ठीभरच्या वाळूइतके आहे. वेद अनंत आहेत तेव्हा तू अग्नीला जाणून घे. त्यामुळे सर्व ज्ञान तू स्वतःच होशील. तेव्हा भारद्वाजांनी इंद्राकडूनच अग्नीतत्त्वाला जाणून घेतले आणि ते ज्ञानाशी तादात्म्य पावले. आयुर्वेदनिपूण असल्याने भारद्वाज हे सर्वांपेक्षा दीर्घायू आहेत. त्यांनी देवतांकडून बृहत्साम प्राप्त केले. बृहत्साम म्हणजे ऋचांचे असे गायन की ज्याच्या तेजोमय आलापातून स्वर्गलोकीची, आदित्याची दिव्यता प्रतीत होते. ते मनात भरून उरते. गौतम, वामदेव, कश्यप आणि भारद्वाज या ऋषीश्रेष्ठांना प्रमुख सामगायक म्हणतात. भारद्वाज म्हणतात, अग्नी हा मर्त्य मानवातील अमर ज्योती आहे, अग्नी विश्वव्यापी आहे, कर्मप्रेरक आहे अग्नीच्या धारणेसाठी दृढ साहसशक्ती हवी. स्वतःतली ही शक्ती जाणून घ्या. कोणापुढेही लाचारीने झुकू नका. आपल्या विद्येने सर्वांचे पोषण व्हावे, असा अनमोल उपदेश महर्षी भारद्वाजांनी केला आहे.?anuradha.klkrn@gmil.com
आत्मज्ञान : प्राची परचुरे - वैद्यआजच्या तंत्रज्ञानप्रधान धावपळीच्या युगात माणसाचे चित्त खूपच अस्थिर झाले आहे. विचारांची गोंधळलेली गर्दी, सततचे विचलन, डिजिटल माध्यमांचे आकर्षण यामुळे चित्ताची एकाग्रता हरवलेली दिसते. पण जीवनात यश, समाधान आणि आत्मविकासासाठी ‘चित्ताची एकाग्रता’ अत्यंत आवश्यक आहे.चित्ताची एकाग्रता म्हणजे मनाच्या विचारधारेचं एका गोष्टीवर किंवा उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करणं. यामध्ये बाह्य विचलनांपासून स्वत:ला सावरून, अंतर्मनातून एका विचारात पूर्णपणे तल्लीन होणं अपेक्षित असतं. एकाग्रतेचे महत्त्व करणे आवश्यक आहे. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता ही शस्त्रासारखी असते. साधना करणाऱ्या साधकासाठी ती अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग असते. व्यावसायिकांसाठी एकाग्रता म्हणजे निर्णयक्षमता आण परिणामकारकता वाढवणारा मूलभूत गुण असतो. कोणत्याही कलाक्षेत्रात, खेळात किंवा विज्ञानात यश मिळवण्यासाठीही एकाग्रता अत्यावश्यक आहे. सतत बदलणारे सोशल मीडियाचे अपडेट्स, माहितीचा अतिरेक, असंतुलित आहार आणि झोप, मानसिक ताण, उद्दिष्टाचा अभाव या गोष्टी माणसाच्या चित्ताला विचलित करतात आणि त्याचा परिणाम एकाग्रतेवर होतो. या सर्व गोष्टी मनाला अस्थिर करतात.चित्ताची एकाग्रता वाढवण्यासाठी उपाय : ध्यान आणि श्वसन : दररोज काही मिनिटे ध्यान आणि श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन शांत होते. निश्चित दिनचर्या : नियमित वेळेवर झोप, उठणं आणि काम केल्याने मनाला स्थैर्य लाभतं. डिजिटल डिटॉक्स : मोबाइल, टीव्ही आणि इंटरनेटचा मर्यादित वापर करणे. स्वतःचे उद्दिष्ट निश्चित करणं : जेव्हा आपल्याला ठाम माहिती असतं की आपल्याला काय करायचं आहे, तेव्हा मन अधिक एकाग्र राहतं. वाचन आणि लेखन : सतत चांगलं वाचन आणि स्वतःचं मन मांडणं हे मनाला एकत्र करायला मदत करतं. योगासने आणि व्यायाम : शारीरिक स्वास्थ्यामुळे मानसिक एकाग्रता वाढते.चित्ताची एकाग्रता ही साध्य होते, पण ती अचानक घडत नाही. सातत्य, संयम आणि आत्मनिरीक्षणाच्या सहाय्याने ती विकसित करता येते. जीवनातील कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल, तर सर्वप्रथम चित्ताला एकाग्र करावं लागेल. शांतचित्त, एकाग्र मन आणि स्पष्ट दिशा यांमुळेच माणूस आत्मसाक्षात्कारी आणि समाधानी होतो.
लष्कर प्रमुखांचे विधान आणि पाकिस्तानचा उडाला थरकाप! म्हणाले, भारत कधीही घुसखोरी करू शकतो...
लाहोर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यानंतर झालेल्या दिल्ली बॉम्ब स्फोटामुळे भारत सरकार दहशतवादाला कसे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. पण यापूर्वीच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा भारत पाकिस्तान युद्ध सुरू होणार असल्याचे विधान केले आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लाल किल्ला बॉम्ब स्फोटाच्या प्रकरणात पाकिस्तानचे नाव समोर येत आहे. या हल्ल्याच्या सखोल तपासणीमधून लक्षात आले की, हा खूप मोठा घातपात होता. ज्याचे रॅकेट मोठे होते. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्फोटात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही असा इशारा दिला आहे.दरम्यान, भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक ट्रेलर होता आणि हा भाग ८८ तासांनंतर संपला. द्विवेदी यांनी स्पष्टपणे सांगितले की जर पाकिस्तानने आम्हाला संधी दिली तर भारत त्यांना एका जबाबदार राष्ट्राने आपल्या शेजाऱ्यांशी कसे वागावे याबद्दल धडा शिकवेल.https://prahaar.in/2025/11/20/mumbai-police-summons-social-media-influencer-ori-in-drug-case-many-bollywood-actors-attend-that-party/या पार्श्वभूमीवर, एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आसिफ म्हणाले की, आम्ही भारताकडे दुर्लक्ष करत नाही. मी युद्ध किंवा भारताकडून कोणत्याही शत्रुत्वाच्या रणनीतीची शक्यता नाकारू शकत नाही. यामध्ये सीमापार घुसखोरी किंवा हल्ल्यांचा समावेश असू शकतो. त्यामुळे पाकिस्तानला पूर्णपणे सतर्क राहावे लागेल.भारताचा सर्वात मोठा शत्रू देश असलेला पाकिस्तान सतत काहीना काही कुरघोड्या करत असतो. मात्र आता भारत कधीही दिल्ली हल्ल्याचे उत्तर देऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानच्या मनात निर्माण झाली असल्याचे आसिफ यांच्या विधानांवरून लक्षात येते.
जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पैसगळ्या ठिकाणी ज्ञान हे कार्य करते व त्याच्याच वापरांतून प्रयोगांतून मिळणारे परिणाम हे चांगले किंवा वाईट ठरतात. म्हणजेच ज्ञान नाही, तर त्याचे प्रात्यक्षिक हे चांगले अथवा वाईट ठरवणारा निर्धारक घटक आहे. उदाहरणार्थ काळा पैसा असे म्हटले जाते मात्र प्रत्यक्षात हा पैसा काळाही नसतो व गोराही नसतो. पण पैशाचा वापर करणारे तो काळा की गोरा हे ठरवत असतात. काळा धंदा वा काळा व्यवसाय करणारे जे आहेत त्यांच्याकडचा पैसा तो काळा पैसा. त्यामुळे भ्रष्टाचार बोकाळतो आहे आणि त्यामुळे आपला सगळा देश गुदमरतो आहे. हा भ्रष्टाचार जितक्या लवकर नष्ट होईल तेवढे आपण लवकर सुखी होऊ. सांगायचा मुद्दा भ्रष्टाचार करणाऱ्यांकडे ज्ञानच आहे व भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणाऱ्यांकडे ज्ञानच आहे, म्हणजेच जीवनविद्या जेव्हा ‘देतो तो देव’ असे म्हणते तेव्हा चांगले देतो तेव्हा तो देव व तोच जेव्हा दुःख देतो तेव्हा तो सैतान. जीवनविद्येचा अमृततुषारच आहे,‘शरीर साक्षात परमेश्वर व सैतान सुद्धा’. शरीराने सैतान व्हायचे की, परमेश्वर व्हायचे हे तुझ्या हातात आहे. आज शरीर सैतान झालेले आहे कारण पैसा हाच देव झालेला आहे. पैशासाठी वाटेल ते करायचे अशी परिस्थिती झालेली आहे. माणसे पैशासाठी सैतानसुद्धा होतात. परमेश्वर की सैतान या दोन्ही गोष्टी ज्ञानानेच ठरतात.मुळात ज्ञान हाच देव किंवा ज्ञान हाच विठ्ठल असे म्हणतात तेव्हा ज्ञान म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. ज्ञान हे आपल्या ठिकाणी मुळातच असते. आपले स्वरूपच ज्ञान आहे. सत् चित् आनंद म्हणतात तेव्हा त्यात चित् म्हणजे जाणीव. सत् व आनंदाच्यामध्ये चित् असते. चित् म्हणजेच दिव्य ज्ञान, चित् म्हणजेच दिव्य जाणीव एवढे लक्षांत ठेवले, तर चित् म्हणजे दिव्य जाणीव व हेच आपले स्वरूप आहे व ते आज गढूळ झालेले आहे. किती व कसे गढूळ झालेले आहे हे उदाहरण देऊन सांगतो. गंगा नदी किती गढूळ झालेली आहे. हरिद्वारला गेलो, तर गंगेचे पाणी पिऊ नये इतके गढूळ झालेले आहे. पंढरपूरला भीमा नदी व चंद्रभागा यांचे पाणी इतके गढूळ झालेले आहे की, लोक त्यात स्नान कसे करतात हे देवालाच ठाऊक. गंगा असो भीमा वा चंद्रभागा किंबहुना हिंदुस्थानातल्या सर्वच नद्या गढूळ झालेल्या आहेत. कारणे तुम्हाला माहीतच आहेत. कारखान्यांचे दूषित पाणी त्यात सोडले जाते. प्रेते सोडली जातात. नदीत सगळे घाण करतात. त्याचा परिणाम नद्यांचे पाणी गढूळ झालेले आहे. ज्या गंगेत स्नान केले असता आपण पवित्र होणार असे म्हणत होतो त्या गंगेत स्नान करण्याची आता सोय राहिलेली नाही. पाणी तेच पण ते पूर्वी शुद्ध होते व आज ते गढूळ झालेले आहे. अगदी तशीच आपल्या ठिकाणी जी दिव्य जाणीव होती ती दिव्य जाणीव आज गढूळ झालेली आहे. त्यामुळे ते ज्ञान देव राहिलेल नाही, तर ते दैत्य झालेले आहे. म्हणून जीवनविद्येने ही गोष्ट स्पष्ट केली की तुम्ही जे ज्ञान, विज्ञान व अज्ञान म्हणता त्यात ज्ञान हे महत्त्वाचे आहे. यासाठी शुद्ध सुंदर ज्यामुळे लोकांचे भले होईल असे ज्ञान मिळणे व अशा ज्ञानाचा सदुपयोग करणे महत्त्वाचे आहे. या अशा शुद्ध ध्यानाची उपासना केली पाहिजे, कारण जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत जग सुखी होणार नाही. हे करायचे की नाही हे आपणच ठरवायचे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
भारत-अमेरिकेत शस्त्रांसंबंधी मोठा करार ; ९३ दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी पॅकेजला मंजुरी
US-India defence deal। भारत आणि अमेरिका यांच्यात मागील काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. रशियाकडून तेल खरेदीचा भारताला ट्रम्प टॅरिफच्या माध्यमातून फटका बसला. मात्र आता दोन्ही देशात एक मोठा करार झाल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेने भारतासाठी ९३ दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी पॅकेजला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे भारताला अत्यंत धोकादायक शस्त्रे मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या […] The post भारत-अमेरिकेत शस्त्रांसंबंधी मोठा करार ; ९३ दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी पॅकेजला मंजुरी appeared first on Dainik Prabhat .
गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य
म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ'मुंबई : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने २०३० पर्यंत आठ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या आठ लाख घरांमध्ये भाडेतत्त्वावरील घरांचाही समावेश आहे. खासगी विकासकांनी २०३० पर्यंत मोठ्या संख्येने भाडेतत्वावरील गृहप्रकल्प राबवावेत यासाठी म्हाडाने स्वतंत्र धोरण तयार केले आहे. या धोरणाअंतर्गत विकासकांना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत.मुंबईत असे प्रकल्प राबवणाऱ्या विकासकांना ०.५, तर एमएमआरमधील प्रकल्पासाठी अतिरिक्त ०.३ असा प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मालमत्ता करात पहिल्या पाच वर्षांमध्ये १०० टक्के, तर पुढील पाच वर्षांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. भाडेतत्वावरील गृहनिर्मितीचे धोरण म्हाडाने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविले आहे. मुंबईसह राज्यातील अपुऱ्या घरांचा प्रश्न गंभीर बनला असून भाडेतत्वावरील गृहनिर्मिती त्यावर चांगला पर्याय ठरू शकतो असा मुद्दा उपस्थित करीत राज्य सरकारने नव्या गृहनिर्माण धोरणात भाडेतत्वावरील घरांच्या निर्मितीला प्राधान्य दिले. त्यानुसार म्हाडाने एमएमआर ग्रोथ हबअंतर्गत आठ लाख घरांपैकी काही घरांची निर्मिती भाडेतत्त्वावरील गृहनिर्मितीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे.एमएमआरसह राज्यभरातही भाडेतत्त्वावरील गृहनिर्मिती करण्याचाही निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार म्हाडाने भाडेतत्वावरील गृहनिर्मितीसाठी स्वतंत्र धोरण तयार केले आहे. या धोरणाच्या प्रारुप मसुद्याचे सादरीकरण बुधवारी एका चर्चासत्रात म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी केले. या मसुद्यावर विकासकांच्या सूचना जाणून घेऊन धोरणात आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.या धोरणानुसार खासगी विकासकांना भाडेतत्वावरील गृहनिर्मितीकडे आकर्षित करण्यासाठी अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. मुंबईत भाडेतत्वावरील गृहप्रकल्प राबविणाऱ्या विकासकाला अतिरिक्त ०.५, तर एमएमआरमध्ये असा प्रकल्प राबविणाऱ्या विकासकाला अतिरिक्त ०.३ चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळणार आहे.बांधकाम शुल्क कमीत कमी लागावे आणि विकासकांना असे प्रकल्प परवडावे या उद्देशाने त्यांना अनेक सवलती देण्यात आल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले. त्यानुसार विकासकांसाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क नाममात्र, केवळ ५०० रुपये ठेवण्यात आले आहे, तर राज्य वस्तू आणि सेवा कर पूर्णपणे माफ करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त पहिल्या १० वर्षांसाठी १०० टक्के आयकर सवलत लागू होणार आहे. विकासकांना सहा टक्के व्याजदराने या प्रकल्पासाठी कर्ज देण्याचीही शक्यता आहे. त्याचवेळी मालमत्ता करात पहिल्या पाच वर्षांसाठी १०० टक्के, तर पुढील पाच वर्षांकरिता ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. यासंबंधीचे धोरण राज्य सरकारने मंजूर केल्यानंतर त्याची म्हाडाकडून राज्यभर अंमलबजावणी केली जाणार आहे.
मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष लोकल
मुंबई : पश्चिम नौदल कमांड (डब्ल्यूएनसी) नेव्ही हाफ मॅरेथॉननिमित्त मध्य रेल्वेने शनिवारी रात्री विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला असून मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरून प्रत्येकी एक लोकल धावणार आहे. यामुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना दिलासा मिळेल. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कल्याण – सीएसएमटी विशेष लोकल शनिवारी रात्री २.३० वाजता कल्याण येथून सुटेल. ही लोकल सीएसएमटी येथे पहाटे ४ वाजता पोहोचेल, तर हार्बर मार्गावरील पनवेल – सीएसएमटी विशेष लोकल शनिवारी रात्री २.४० वाजता पनवेल येथून सुटेल. ही लोकल सीएसएमटी येथे पहाटे ४ वाजता पोहोचेल. या दोन्ही विशेष लोकल धीम्या असून सर्व स्थानकांमध्ये थांबतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. पश्चिम रेल्वेवरील विरार येथून शनिवारी रात्री २.३० वाजता विशेष लोकल सुटेल. ही लोकल चर्चगेट येथे पहाटे ४.१२ वाजता पोहचेल. ही लोकल धीम्या मार्गावर धावणार असून सर्व स्थानकात थांबा घेतील, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.
युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभागसचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपचा बालेकिल्ला असून या विधानसभेत भाजपचे सहा नगरसेवक आहेत. या विधानसभेत भाजप शतप्रतिशत आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपची युती झाल्यास या विधानसभेत शिवसेनेला कुठेच शिरकाव करण्याची संधी नाही. या विधानसभेत युती नसल्यासच शिवसेनेला जागा मिळवता येतील; परंतु मुलुंडमधील विधानसभेत सहा प्रभागांमध्ये उबाठाच्या वाट्याला चार ते पाच जागा जाण्याची शक्यता असून मनसेला एका किंवा अधिक ताणल्यास दुसऱ्या जागेवर उमेदवार उभा करण्याची संधी मिळेल. मात्र, या सहाही प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता आहे.शिवसेना भाजप युती असताना मुलुंड पश्चिमेला भाजपची दावेदारी आणि मुलुंड पुर्वेचे प्रभाग शिवसेनेच्या वाट्याला येत होते. पण सन २०१७च्या निवडणुकीत शिवसेना भाजप युती तुटली आणि भाजपने स्वबळावर निवडणूक लढवताना मुलुंडमधील सहाही प्रभागांमध्ये आपले उमेदावार उभे केले आणि सहाही उमेदवार निवडून आणले. भाजपचे सहा नगरसेवक असल्याने या विधानसभेत युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा येणार नाही, तर याठिकाणी शतप्रतिशत भाजपच दिसून येणार आहे.विधानसभा क्षेत्रातील संभाव्य उमेदवार : मुलुंड विधानसभासंभाव्य आणि इच्छुक उमेदवारप्रभाग क्रमांक १०३ (महिला प्रवर्ग)भाजप : हेतल जोबनपुत्रा, उबाठा : हेमलता सुकाळे,प्रभाग क्रमांक १०४ (सर्व साधारण खुला प्रवर्ग)भाजपा : प्रकाश गंगाधरे, उबाठा : सिताराम खांडेकर, शैलेश पवार, काँग्रेस: उत्तम गीते, राष्ट्रवादी काँग्रेस : अमित सुरेश पाटीलप्रभाग क्रमांक १०५ (ओबीसी महिला प्रवर्ग)भाजपा : नम्रता वैती, दिपिका घाग, उबाठा : ज्योती वैती, रसिका तोंडवळकर, शिवसेना : सुजाता पाठक, काँग्रेस: मालती पाटीलप्रभाग क्रमांक १०६ (सर्वसाधारण खुला प्रवर्ग)भाजपा : प्रभाकर शिंदे, उबाठा : सागर देवरे, अभिजित चव्हाण, अमोल संसारे, अनिष शेडगे, मनसे: सत्यवान दळवी, काँग्रेस : संजय घरत, कैलास पाटील,प्रभाग क्रमांक १०७ (सर्वसाधारण खुला प्रवर्ग)भाजपा : समिता कांबळे, निल सोमय्या, केतन कोटक, उबाठा : दिनेश जाधव, काँग्रेस : अनु शेट्टी, अपक्ष : विरल शाहप्रभाग क्रमांक १०८ (ओबीसी महिला प्रवर्ग)भाजपा : दिपिका घाग, उबाठा : शुभांगी केणी, नंदिनी सावंत, मनसे: राजेंद्र देशमुखलोकसभेतील मुलुंड विधानसभेतील मतदान :विद्यमान खासदार संजय पाटील : ५५,९७९पराभूत उमेदवार मिहिर कोटेचा : १,१६, ४२१विधानसभेतील मतदान :आमदार मिहिर कोटेचा : १,३१,५४९पराभूत उमेदवार काँग्रेसचे राकेश शेट्टी : ४१,५१७प्रभाग क्रमांक १०३हा प्रभाग आता महिला राखीव झाला असून मागील दोन निवडणुकांमध्ये तो सर्वसाधारण खुला प्रवर्गाकरता आरक्षित झाला होता. त्याआधी तो महिला आरक्षित होता. या मतदार संघातून भाजपचे मनोज कोटक दोन वेळा निवडून आले होते. पण हा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने याठिकाणी भाजप महिला पदाधिकारी हेतल जोबनपुत्रा यांचे नाव चर्चेत आहे, तर या प्रभागावर उबाठाचा दावा असल्याने माजी नगरसेविका हेमलता सुकाळे यांचे नाव चर्चेत आहे, तर काँग्रेसच्यावतीने माजी महापौर आर. आर. सिंह यांच्या कुटुंबातून त्यांची सून निवडणूक रिंगणात उतरण्याचीही शक्यता आहे.प्रभाग १०४हा प्रभाग सर्वसाधारण खुला प्रवर्गकरता राखीव झाला आहे. या प्रभाग मागील दोन निवडणूक ओबीसीकरिता राखीव झाला असून सन २००७ नंतर प्रथमच हा प्रभाग खुला झाला आहे. या मतदार संघातून भाजपचे प्रकाश गंगाधरे हे निवडून येत आहेत. यंदाही त्यांची पक्की दावेदारी असली तरी किरीट सोमय्यांच्या मुलाचा प्रभाग ओबीसी महिला झाल्याने निलसाठी हा प्रभाग मोकळा करून तर दिला जाणार नाही ना असा स्थानिकांना प्रश्न पडला आहे. या प्रभागात उबाठाची प्रबळ दावेदारी असून त्यांच्याकडून सिताराम खांडेकर, शैलेश पवार यांच्या नावाची चर्चा आहे, तर काँग्रेसच्यावतीने माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचे पुत्र अमित किंवा अन्य सदस्य निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे.प्रभाग क्रमांक १०५या प्रभागातून भाजपच्या रजनी केणी निवडून आल्या होत्या; परंतु काही महिन्यांपूर्वीच त्यांचे देहावसान झाले. पण हा प्रभाग आता ओबीसी महिलाकरीता राखीव झाला आहे. सन २०१२ वगळता हा प्रभाग महिला राखीव झालेला आहे. सन २०१२ मध्ये हा प्रभाग ओबीसी करता राखीव झाला होता. या प्रभागातून भाजपच्यावतीने दिपिका घाग आणि नम्रता वैती यांच्या नावाची चर्चा आहे, हा प्रभाग उबाठालाच जाणार असून याठिकाणी त्यांच्याकडून ज्योती वैती, रसिका तोंडवळकर यांच्या नावाची चर्चा आहे. या प्रभागात शिवसेनेची दावेदारी असली तरी भाजपची परंपरागत जागा असल्याने सोडली जाणार नाही. मात्र, शिवसेनेकडून माजी नगरसेविका सुजाता पाठक यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत आहे.प्रभाग १०६हा प्रभाग सर्वसाधारण खुला प्रवर्गकरता राखीव झाला आहे. हा प्रभाग सन २०१२ ओबीसी झाला होता. पण इतर प्रत्येक निवडणुकीत तो खुलाच झालेला आहे. या प्रभागातून मनसेचे सत्यवान दळवी यांचा प्रबळ दावेदारी असली तरी उबाठाकडे इच्छुकांची मोठी यादी आहे. यात मनसेतून उबाठात आलेले सागर देवरे, खासदा संजयभाऊ पाटील यांचे अत्यंत विश्वासू अभिजित चव्हाण तसेच अमोल संसारे, अनिष शेडगे यांची नावे चर्चेत आहे. पण देवरे हे आदित्य आणि वरुण सरदेसाई यांचे अतिविश्वासू आणि मित्र असल्याने देवरे यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. तर काँग्रेसच्यावतीने संजय घरत आणि कैलास पाटील यांची नावे चर्चेत आहेप्रभाग १०७हा प्रभाग सर्वसाधारण खुला प्रवर्गकरीता राखीव झाला. यापूर्वी दोन निवडणुकीत हा प्रभाग महिला आरक्षित झाला. भाजपाच्या समिता कांबळे या प्रभागातून निवडून आल्या असून महापालिका शाळांमध्ये योगा वर्ग सुरु करण्याची मागणी केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. हा प्रभाग खुला झाल्याने याठिकाणांहून समिता कांबळे यांची पक्की दावेदारी असली तरी खुला प्रवर्ग झाल्याने निल सोमय्या आणि माजी खासदार मनोज कोटक यांचे भाऊ केतन कोटक यांच्याही नावाची चर्चा आहे. तर उबाठाच्यावतीने दिनेश जाधव हे इच्छुक आहेत. या प्रभागातून शिवसेनेचे जगदीश शेट्टी हे इच्छुक असले तरी युतीमध्ये हा प्रभाग भाजपकडे राखला जाणार आहे. युती न झाल्यास शेट्टी हे शिवसेनेकडून प्रबळ दावेदार ठरतील . तर काँग्रेसच्यावतीने अनु शेट्टी हे इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.प्रभाग क्रमांक १०८या प्रभागातून भाजपचे किरीट सोमय्या यांचे पुत्र निल सोमय्या हे निवडून आले आहे. पण प्रभाग आता ओबीसी महिला करता राखीव झाला. मागील चार निवडणुकीत सर्व प्रकारची अनुसूचित जाती आणि जमाती वगळता सर्व प्रकारची आरक्षण पडली आहेत. हा प्रभाग भाजपचा असल्याने भाजपकडून जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष दिपिका घाग यांचे नाव आघाडीवर आहे. तर उबाठाकडून शुभांगी केणी, नंदिनी सावंत यांची नावे चर्चेत आहेत.
पाणी भरण्याच्या वादातून तोंडावर 'स्प्रे'मारलेल्या व्यक्तीचे निधन
विरार : पाणी भरण्याच्या क्षुल्लक वादातून एका महिलेने आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मच्छर मारण्याचा स्प्रे फवारल्याची घटना विरारच्या जेपी नगरमध्ये मंगळवारी रात्री घडली. या घटनेत स्प्रे फवारलेल्या व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला आहे. अर्नाळा सागरी पोलिसानी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून स्प्रे फवारणाऱ्या महिलेला अटक केली आहे.विरार पश्चिमेच्या जेपी नगर येथील १५ क्रमांकाच्या इमारतीमध्ये उमेश पवार (५७) राहत होते. त्यांच्यासमोर राहणाऱ्या कुंदा तुपेकर (४६) यांच्याशी त्यांचा पाणी भरण्यावरून वाद होता. मंगळवारी रात्री या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी संतापलेल्या कुंदा यांनी मच्छर मारण्याचा स्प्रे उमेश पवार यांच्या तोंडावर मारला. त्यामुळे पवार हे बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अवघ्या दीड तासांमध्ये त्यांचा मृत्यू झाला. कुंदा तुपेकर या पेशाने परिचारिका आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हा प्रकार घडल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे.या प्रकरणी अर्नाळा पोलिसांनी सदोस्य मनुष्यधाचा गुन्हा दाखल करून कुंदा तुपेकर यांना अटक केली आहे. अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली. तसेच अनेक ठिकाणी नळाला कमी दाबाने पाणी येते. पाणी भरण्याच्या वेळेचा भंग किंवा जास्त भांडी भरण्यावरूळावन दररोज नर वादावादी होते. हे वाद कधी कधी इतके विकोपाला जातात की, शेजारी एकमेकांच्या अंगावर धावून ताजात. ज्यामुळे क्षुल्लक वादातून गंभीर घटना घडतात.
रशिया भारताला एसयू - ५७ लढाऊ विमाने देणार
मॉस्को : रशियाने भारताला एसयू-५७ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. रशियन कंपनी रोस्टेकचे सीईओ सर्गेई चेमेझोव्ह यांनी दुबई एअर शोमध्ये सांगितले की ते कोणत्याही अटीशिवाय या लढाऊ विमानांसाठी तंत्रज्ञानदेखील हस्तांतरित करतील.रशियन एसयू-५७ विमाने अमेरिकेच्या एफ-३५ ला टक्कर देणारी मानली जातात. एसयू-५७ प्रमाणेच, एफ-३५ हे पाचव्या पिढीतील लढाऊ विमान आहे. अमेरिका बऱ्याच काळापासून भारताला एफ-३५ विकण्याचा प्रयत्न करत आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच मॉस्कोमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतल्यानंतर रशियाकडून हे आश्वासन देण्यात आले आहे.सीईओ सर्गेई चेमेझोव्ह म्हणाले की, भारत आणि रशिया हे दशकांपासून विश्वासार्ह संरक्षण भागीदार आहेत. भारत आंतरराष्ट्रीय निर्बंधाखाली असतानाही, रशियाने भारताच्या सुरक्षेसाठी शस्त्रे पुरवणे सुरू ठेवले. ते म्हणाले, आम्ही आजही तेच धोरण अवलंबत आहोत. आम्ही भारताला त्याच्या गरजेनुसार सर्व प्रकारची लष्करी उपकरणे पुरवत आहोत आणि भविष्यातील सहकार्य आणखी मजबूत करत आहोत. रशियाने असा युक्तिवाद केला आहे की, एसयू-५७ तंत्रज्ञानावर कोणतेही बंधने राहणार नाहीत. इंजिन, रडार, स्टेल्थ तंत्रज्ञान आणि आधुनिक शस्त्रास्त्रांविषयी माहिती सामायिक केली जाऊ शकते.रशियाने असेही म्हटले आहे की जर भारताची इच्छा असेल, तर एसयू-५७ भारतात तयार केले जाऊ शकते. रशियाने भारताला दोन आसनी एसयू-५७ साठी संयुक्त नियोजन प्रस्तावित केले आहे, असे म्हटले आहे की हे कोणत्याही परदेशी निर्बंधांशिवाय भारतात केले जाऊ शकते.संपूर्ण तंत्रज्ञान हस्तांतरणाची तयारीरशियाकडून १० हजार कोटी रुपयांच्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीची तयारी भारत त्यांच्या विद्यमान एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीला पूरक म्हणून रशियाकडून ₹ १० हजार कोटी किमतीची क्षेपणास्त्रे खरेदी करण्याची तयारी करत आहे. यासाठी रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय हवाई दलाच्या एस-४०० प्रणालीने महत्त्वाची भूमिका बजावली. ३०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या पाच ते सहा पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक गुप्तचर विमान पाडल्याचे वृत्त आहे. हवाई दलाने एस-४०० हे भारताच्या हवाई संरक्षण रणनीतीमध्ये गेम-चेंजर म्हणून वर्णन केले आहे. युक्रेननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्र खरेदीदार देश आहे. तथापि, अलीकडच्या काळात, सरकार शस्त्रास्त्र निर्यातीवरही भर देत आहे. यासाठी, भारत निर्यात-आयात बँकेद्वारे शस्त्रास्त्र खरेदीसाठी कर्ज देत आहे.एसयू-५७ भारतासाठी का महत्त्वाचे? रडारला जवळपास अदृश्य अतिवेगवान सुपरक्रूझ क्षमता प्रगत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणाली उच्च पेलोड क्षमता अत्याधुनिक एआय-आधारित फायर कंट्रोल
वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क
ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपयेनवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून 'केंद्रीय मोटार वाहन नियम' अंतर्गत देशभरातील वाहनांच्या फिटनेस चाचणी शुल्कात बदल करण्यात आला असून, यामुळे, वाहनांच्या फिटनेस चाचणी शुल्कात जवळपास १० पट वाढ झाली आहे. हे नवीन शुल्क दुचाकी, तीन चाकी, क्वाड्रिसायकल, हलकी मोटार वाहने, मध्यम आणि जड वस्तू/प्रवासी वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनांना लागू होतात. ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० करण्यात आला आहे. पूर्वी १५ वर्षांपेक्षा जुनी गाडी असेल तरच फिटनेस टेस्टसाठी जास्त फी आकारली जात होती. मात्र नवे नियम लागू झाल्यानंतर गाडी १० वर्षांची झाली की वाढीव फी लागू होणार आहे. नवीन व्यवस्थेनुसार गाड्यांना तीन गटांमध्ये विभागण्यात आले असून, १० ते १५ वर्ष, १५ ते २० वर्ष, २० वर्षांपेक्षा जास्त गाडीचे वय वाढेल तसा फिटनेस टेस्टचा खर्चही वाढत जाणार आहे.या नवीन नियामांचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे उच्च फिटनेस शुल्क लागू करण्यासाठी वाहनाच्या वयाचे निकष १५ वर्षांवरून १० वर्षे करण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वाहनांनाही आता वाढीव शुल्क आकारले जाईल.सरकारने आता वाहनांच्या वयानुसार (१० ते १५ वर्षे, १५ ते २० वर्षे आणि २० वर्षांपेक्षा जास्त) शुल्क आकारण्यासाठी तीन वेगवेगळ्या श्रेणी लागू केल्या आहेत. वाहनाचे वय वाढत असताना, शुल्क त्या प्रमाणात वाढेल, १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना एकच शुल्क लागू करण्याच्या मागील पद्धतीपेक्षा वेगळे.दोन चाकीपासून ट्रकपर्यंत सर्व वाहनांसाठी दर वाढले असून, २,५०० वरून थेट २५,००० रुपये करण्यात आल्याने हा सर्वात मोठा धक्का व्यावसायिक वाहनांना बसणार आहे. यात २० वर्ष जुने ट्रक/बस २,५००-२५,०००रुपये, २० वर्ष जुने मीडियम कमर्शियल वाहन असेल तर १,८००-२०,००० रुपये असेल. २० वर्ष जुने लाइट मोटर वाहनाला १५,००० रुपये तर २० वर्ष जुनी ऑटोरिक्षा ७,००० रुपये आकारले जाणार आहे. २० वर्ष जुनी मोटरसायकल ६००- २,००० रुपये, १५वर्षांखालील गाड्यांचीही फी वाढली असून, यात मोटरसायकल ४०० रुपये, लाइट मोटर वाहन (LMV) ६०० रुपये, मीडियम/हेवी कमर्शियल वाहनासाठी १,००० रुपये आकारले जाणार असून, ही फीही आधीपेक्षा जास्त आहे.
नाव असेल ना पत्ता, फोटोसोबत असेल क्युआर कोडनवी दिल्ली : सर्व आर्थिक व्यवहारांसाठी आधारकार्डशिवाय पर्याय नाही. इतकं महत्त्वाचं कागदपत्र असल्यामुळे, त्याचा गैरवापर होण्याचा धोका लक्षात घेऊन, तुमच्या आधारकार्डला अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकारनं पुन्हा एकदा बदल केला आहे. नवीन आधारकार्डवर फक्त तुमचा फोटो आणि एक क्यूआर कोड असेल. यामध्ये सध्या छापलेले नाव, पत्ता आणि आधार क्रमांक यांसारखे तपशील काढून टाकले जातील. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण लोकांच्या माहितीचा गैरवापर रोखण्यासाठी आणि ऑफलाइन पडताळणीला प्रोत्साहन मिळू नये यासाठी, कार्डधारकाच्या फोटोसह आणि क्यूआर कोडसह आधारकार्ड जारी करण्यावर विचार करत आहे.आधार अधिनियमानुसार, कोणत्याही व्यक्तीचा आधार क्रमांक किंवा बायोमेट्रिक माहिती ऑफलाइन पडताळणीसाठी जमा केले जाऊ शकत नाही, वापरली जाऊ शकत नाही किंवा संग्रहित केली जाऊ शकत नाही. तरीसुद्धा अनेक संस्था, जसे की हॉटेल, कार्यक्रम आयोजक इत्यादी, आधारकार्डच्या फोटोकॉपी गोळा करतात आणि स्टोअर करतात. यामुळे त्यांच्यासोबत फसवणूक होण्याची किंवा या आधार माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता कायम राहते. यापासून बचाव करण्यासाठी, आधारमधील सर्व माहिती आता गोपनीय ठेवण्याची तयारी सुरू आहे, जेणेकरून ऑफलाइन पडताळणी थांबवून लोकांच्या माहितीचा गैरवापर रोखता येईल.आधार कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीचा आधार क्रमांक किंवा बायोमेट्रिक माहिती ऑफलाइन पडताळणीसाठी एकत्र केली, वापरली किंवा साठवली जाऊ शकत नाही. तरीही, अनेक संस्था आधार कार्डच्या छायाप्रती गोळा आणि साठवतात. यामुळे फसवणूक किंवा गैरवापर होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी, आधार माहिती गोपनीय ठेवली जात आहे.आधार पडताळणीचे नियम काय? देशात आधारची पडताळणी धारकाच्या सहमतीशिवाय केली जाऊ शकत नाही. कोणतीही संस्था असं केल्यास, तिच्यावर ₹१ कोटींपर्यंतचा दंड लावला जाऊ शकतो. ही सहमती बायोमेट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातच घेतली जाईल, जी धारकाकडून ओटीपी, फिंगरप्रिंट, आयरिस इत्यादीद्वारे घेतली जाऊ शकते. फक्त यूआयडीआयद्वारे अधिकृत संस्था आणि बँकाच आधारची पडताळणी करू शकतात. युजरला हवं असल्यास, तो आपला बायोमेट्रिक डेटा लॉक करू शकतो आणि तेव्हा फक्त ओटीपीच काम करेल. जर कोणी आधारच्या डेटाचा गैरवापर केला, तर त्याच्यावरही मोठा दंड लावला जाऊ शकतो
माँ नर्मदा... एक अध्यात्मिक परिक्रमा!!
मनाचा गाभारा : अर्चना सरोदेत्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे!!आजच्या भागात आपण नर्मदा परिक्रमा कोणकोणत्या प्रकारे करता येते हे जाणून घेणार आहोत. खरं सांगायचं झालं तर मला पण नर्मदा परिक्रमा करायची आहे किंवा मी नर्मदा परिक्रमा करणार आहे असं म्हटलं आणि लगेच आपण परिक्रमेला निघालो किंवा परिक्रमा केली असं होतं नाही, तर त्यासाठी तुम्हाला ती इच्छा मनापासून व्हायला हवी. तुमच्या मनाच्या गाभाऱ्यातून जेव्हा ही इच्छा ध्वनी निघते ती मय्याने ऐकायला हवी, त्यासाठीची तुमची जी तळमळ असते ती मय्यापर्यंत पोहोचायला हवी. कारणं जोपर्यंत मय्याला भेटण्याची ओढ मय्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तिचं बोलावणं तुम्हाला येत नाही आणि जोपर्यंत तिचं बोलावणं येतं नाही तोपर्यंत तुम्ही परिक्रमेला जाऊ शकत नाही. मग तुम्ही कितीही ठरवलं तरी या ना त्या कारणाने ते लांबणीवर पडतं. असो. दुसरं म्हणजे तुमच्या मनात समर्पित भाव असायला हवा. तुम्ही स्वतःला जेव्हा तिच्या चरणी समर्पित करता तेव्हा तिची तुमच्यावर भरभरून कृपा होते.नर्मदा मय्याची परिक्रमा कोणकोणत्या प्रकारे करता येते ते बघूया. पहिल्या प्रकारात तुम्ही ही परिक्रमा अमरकंटक, ओंकारेश्वर, नेमावर किंवा अन्य कोणत्याही घाटापासून उचलू शकता. तसं बघायला गेलं तर अमरकंटक हे मय्याचे उद्गम स्थान असल्याने खरी परिक्रमेची सुरुवात तिथूनच करतात; परंतु अमरकंटक ते अमरकंटक परिक्रमा केल्यानंतर जल अर्पण करायला पुन्हा ओंकारेश्वरला यावे लागत असल्याने सोयीस्करदृष्ट्या बहुतेक जण ओंकारेश्वराहून परिक्रमा सुरू करतात आणि तिथेच संकल्प सोडून परिक्रमा पूर्ण करतात. तुम्हाला नर्मदा मैय्याला न ओलांडता संपूर्ण परिक्रमा पूर्ण करावी लागते. तुम्हाला ओंकारेश्वर दक्षिण तट इथून परिक्रमा सुरु केल्यावर मिठीतलाई वरुन समुद्र तट परिवर्तन करुन परत उत्तर तटावर ओंकारेश्वर इथेच परिक्रमा पूर्ण करावी लागते. या परिक्रमे दरम्यान तुम्ही जर नर्मदा मय्याला ओलांडून परिक्रमा केलीत तर तुमची परिक्रमा खंडित होते.दुसरा प्रकार म्हणजे जलहरी परिक्रमा. जलहरी परिक्रमा ही दोन्ही तटांची दोन वर्तुळात केली जाते. ती सामान्यतः अमरकंटकपासून सुरू होते. जलहरी परिक्रमा करणारे बहुतेक लोक अमरकंटकपासून सुरुवात करतात. या परिक्रमेत प्रथम अमरकंटकपासून सुरुवात करून दक्षिण तीरावरून अमरकंटकहून विमलेश्वरपर्यंत किनाऱ्याने पुढे जातात; परंतु समुद्र ओलांडत नाहीत आणि तिथून परत अमरकंटकला परत येतात. त्यानंतर अमरकंटकहून उत्तरतटावर समुद्राकडे जाऊन नंतर मिठी तलाई मार्गे अमरकंटकला परत येतात. तेव्हा सुद्धा समुद्र ओलांडत नाहीत. ही प्रदक्षिणा दोनदा पूर्ण होते. याला जलहरी परिक्रमा म्हणतात.तिसरा प्रकार म्हणजे खंड परिक्रमा. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना वेळेअभावी परिक्रमा करता नाही येत. म्हणून यात तुमच्या वेळेनुसार किंवा सुट्टीनुसार तुम्ही ही परिक्रमा करू शकता. अगदी आठ, पंधरा दिवस किंवा महिनाभर सुट्टी काढून तुम्ही ही परिक्रमा करून परत कामावर जाऊ शकता. त्यानंतर, जेव्हा जेव्हा तुम्हाला सुट्टी मिळेल तेव्हा तुम्ही जिथे परिक्रमा अर्धवट सोडली होती तिथून परत तेवढ्या दिवसांसाठी पुढे ती परिक्रमा सुरू करू शकता. ही परिक्रमा टप्प्याटप्प्यात होते, म्हणूनच या परिक्रमेला ‘खंड परिक्रमा’ असे नाव पडले आहे.नर्मदा परिक्रमेच्या उप परिक्रमासुद्धा आहेत. पंचक्रोशी आणि उत्तरवाहिनी परिक्रमा. पंचक्रोशी यात्रेबद्दल बोलायचे झाले, तर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक पंचक्रोशी आहेत. प्रत्येक ठिकाणची वेगळी पंचक्रोशी आहे. उदाहरणार्थ, अमरकंटकला वेगळी पंचक्रोशी आहे, दिंडोरीला वेगळी पंचक्रोशी आहे, मंडाला येथे वेगळी पंचक्रोशी आहे आणि जबलपूरला वेगळी पंचक्रोशी आहे. पंचक्रोशी यात्रा वेगवेगळ्या पंचक्रोशी प्रदेशांमध्ये आयोजित केली जाते. ही यात्रा पाच दिवसांची असते. विशेष म्हणजे ती एकादशीला सुरू होते आणि पाच दिवसांनी पौर्णिमेला किंवा अमावस्येला संपते. यामध्ये दररोज ५ गाव ५ दिवसांत चालणे व २५ कोस अंतर पार करणे समाविष्ट आहे. ही एक छोटीशी यात्रा असते आणि साधारणपणे अशी मान्यता आहे की, ज्यांना नर्मदा मय्याची मोठी परिक्रमा करता येत नाही ते पंचक्रोशी परिक्रमा करतात. उत्तर वाहिनी परिक्रमा ही एक किंवा दोन दिवसांची असते. जरी नर्मदा सामान्यतः पश्चिमेकडे वाहते, तरी काही ठिकाणी ती सर्व दिशांना वाहते. अंदाजे पाच ते सहा ठिकाणी नर्मदा उत्तरेकडे अनेक किलोमीटर वाहते. शास्त्रांमध्ये असे नमूद आहे की, उत्तरेकडे वाहत जाणारी नर्मदा नदी एका काठापासून ५ कोसापेक्षा जास्त अंतरावर वाहते. उत्तरेकडे वाहून जाणारी नर्मदा नदी तीन ठिकाणी प्रवास करू शकते. यापैकी एक ठिकाण मंडाला येथील व्यास नारायणपासून संपूर्ण अंतरावर पसरलेले आहे. दुसरे ठिकाण नर्मदा बांध प्रकल्पात पाण्याखालचा भाग म्हणून घोषित केले आहे आणि तिसरे ठिकाण हे गुजरातमधील तिलकवाडा येथे आहे, जिथे उत्तरवाहिनी यात्रा केली जाते. टिळकवाड्यातील उत्तरवाहिनी यात्रा सर्वात प्रसिद्ध आहे. उत्तरवाहिनी यात्रा चैत्र महिन्यात केली जाते. असे मानले जाते की, उत्तरवाहिनी नर्मदा नदीला परिक्रमा केल्याने पूर्ण प्रदक्षिणा केल्यासारखेच पुण्य मिळते. चैत्र महिन्यात, गुजरातमधील तिलकवाडा येथे लाखो लोक उत्तरवाहिनी परिक्रमा करण्यासाठी जमतात. गेल्या चार वर्षांपासून मंडाला येथे उत्तरवाहिनी परिक्रमा आयोजित केली जात आहे. गेल्या ४ वर्षांपासून मांडला येथे उत्तरवाहिनी परिक्रमा सुरू झाली आहे. कारण यावर्षी सुमारे १४ ते १५ राज्यांमधून, सुमारे २५०० ते ३००० लोक मोठ्या संख्येने मांडला येथे आले होते. ज्यांनी उत्तरवाहिनी परिक्रमा केली आहे. ती चैत्र महिन्यात दोन दिवसांत होते. मंडालापासूनचा उत्तरवाहिनी परिक्रमा मार्ग ३९ किलोमीटर आहे. एकाच दिवसात पार करणे शक्य नाही म्हणून ते दोन दिवसांत पूर्ण केले जाते. गुजरातच्या रामपुरापासून तिलकवाड्यापर्यंत उत्तरवाहिनी परिक्रमेचे अंतर २२ कि.मी. आहे, तर अशा प्रकारे नर्मदा नदीची परिक्रमा आपण करू शकतो.नर्मदे हर... नर्मदे हर... नर्मदे हर
Madhuri Dixit: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सध्या तिच्या आगामी वेब सीरिज ‘मिसेस देशपांडे’मुळे चर्चेत आहे. या शोमधील तिचा फर्स्ट लुक समोर आला असून तो पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. फर्स्ट लुकमध्ये माधुरीचा अनफिल्टर्ड लूक फर्स्ट लुकमध्ये माधुरी आपला मेकअप आणि दागिने काढताना दिसते. पुढच्या फ्रेममध्ये तिचा एक साधा, अनफिल्टर्ड आणि नैसर्गिक अवतार दिसतो. […] The post Madhuri Dixit: ‘मिसेस देशपांडे’मध्ये दिसणार माधुरी दीक्षित; धकधक गर्लचा नवा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस appeared first on Dainik Prabhat .
Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल सायंकाळी दिल्लीत जावून भेट घेतली. शिंदे आणि शाह यांच्यात ५० मिनिटे चर्चा झाली असून, शिंदेंनी अमित शाह यांच्यापुढे तक्रारींचा पाढा वाचला, अशी माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील मंत्र्यांच्या रंगलेल्या नाराजी नाट्यानंतर ही भेट अत्यंत महत्वपूर्ण मानली जात […] The post शिंदेंनी वाचला तक्रारींचा पाढा; ‘या’ दोन बड्या नेत्यांचं घेतलं नाव, राजधानीत काय घडलं? आतली ‘चर्चा’ समोर appeared first on Dainik Prabhat .
देशात 5 बॉम्बस्फोट घडवून आणणारा दहशतवादी मिर्झा शादाब बेग हादेखील फरिदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या एका अहवालातून हा खुलासा झाला आहे, ज्याची प्रत भास्करकडे आहे. १० नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट घडवून आणणारा दहशतवादी डॉ. उमर नबी देखील येथे प्राध्यापक होता. भास्करने विद्यापीठाची चौकशी केली तेव्हा असे आढळून आले की गेल्या १८ वर्षांपासून फरार असलेला दहशतवादी मिर्झा शादाब बेगने २००७ मध्ये याच विद्यापीठातून बी.टेक केले होते. तपासादरम्यान, आम्हाला दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाकडून मिळालेला एक गुप्तचर अहवाल मिळाला, ज्यामध्ये शादाबच्या दहशतवादी कारवायांची माहिती आहे. या स्फोटानंतर दिल्ली पोलिसांनी विद्यापीठाविरुद्ध दोन एफआयआर दाखल केले आहेत. ईडीचे छापे सुरू आहेत. एनएएसीकडून कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. अटक करण्यात आली आहे आणि ७० हून अधिक लोकांची चौकशी सुरू आहे. बेग कोणत्या दहशतवादी घटनांमध्ये सहभागी होता हे क्रमाने जाणून घ्या जयपूर बॉम्बस्फोट, मे २००८ बेग स्फोटके गोळा करण्यासाठी उडुपीला गेला होता. उत्तर प्रदेशातील आझमगड येथील रहिवासी मिर्झा शादाब बेग हा इंडियन मुजाहिदीनचा एक प्रमुख सदस्य होता आणि २००८ च्या जयपूर मालिकेतील स्फोटांमध्ये त्याचा सहभाग होता. बेगने स्फोटांसाठी स्फोटके गोळा करण्यासाठी कर्नाटकातील उडुपी येथे प्रवास केला. उडुपीमध्ये, बेगने रियाज भटकळ आणि यासीन भटकळ यांना मोठ्या प्रमाणात डेटोनेटर्स आणि बेअरिंग्ज पुरवले, जे आयईडी असेंबल करण्यासाठी वापरले जात होते. बेगला बॉम्बच्या अभियांत्रिकीचे चांगले ज्ञान होते, त्यांनी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते, असेही म्हटले जाते. अहमदाबाद-सुरत स्फोट, जुलै २००८ १५ दिवसांपूर्वी अहमदाबादला पोहोचला २००८ मध्ये गुजरातमधील अहमदाबाद आणि सुरत येथे बॉम्बस्फोट झाले. बेगचाही यामध्ये सहभाग होता. तो बॉम्बस्फोटांच्या १५ दिवस आधी अहमदाबादमध्ये आला होता. त्याने प्रथम संपूर्ण शहराची रेकी केली. त्याने कयामुद्दीन कपाडिया, मुजीब शेख आणि अब्दुल रझीक यांच्यासह तीन पथके तयार केली. अब्दुल रझीकच्या टीममध्ये आतिफ अमीन आणि मिर्झा शादाब बेग यांचाही समावेश होता. बेगने स्फोटांसाठी सर्व रसद व्यवस्था केली. स्फोटांपूर्वी बेगने बॉम्ब तयार केले आणि प्रशिक्षण दिले. गोरखपूर बॉम्बस्फोट, २००७ स्फोटांची मालिका २००७च्या गोरखपूर बॉम्बस्फोटात बेगचा सहभाग होता, ज्यामध्ये सहा लोक जखमी झाले होते. इंडियन मुजाहिदीन (आयएम) शी त्याचे नाव जोडल्यानंतर गोरखपूर पोलिसांनी त्याची मालमत्ता जप्त केली. सप्टेंबर २००८ मध्ये इंडियन मुजाहिदीनचा पर्दाफाश झाल्यापासून बेग फरार आहे, देशभरात बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोप आहे. दिल्ली, जयपूर, अहमदाबाद आणि गोरखपूर येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात त्याच्या सहभागाबद्दल १,००,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. सूत्रांचे म्हणणे आहे की बेग शेवटचा २०१९ मध्ये अफगाणिस्तानात होता आणि तो अद्याप सापडलेला नाही. दिल्लीतील बॉम्बस्फोटांचा संबंध अफगाणिस्तानशी गुप्तचर अहवालांवरून दिसून येते की, बेग नवीन भरती करणाऱ्यांना कट्टरपंथी बनवण्यातही पटाईत होता. १० ऑक्टोबर २०२५ रोजी दिल्ली बॉम्बस्फोटाप्रकरणी अटक करण्यात आलेले डॉ. मुझम्मिल शकील हे देखील प्रशिक्षणासाठी अफगाणिस्तानला गेले होते. दोघेही अल-फलाहचे पदवीधर आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, दिल्ली बॉम्बस्फोटात बेगचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. २००७ आणि २००८ च्या बॉम्बस्फोटांचा आणि अलिकडच्या लाल किल्ल्यावरील स्फोटाचा संबंध असू शकतो. अभियांत्रिकी बंद, २०१९ मध्ये एमबीबीएस कार्यक्रम सुरू झाले अल-फलाहची सुरुवात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाळेपासून झाली, ज्याला नंतर हरियाणा खाजगी विद्यापीठ सुधारणा कायदा, २०१४ अंतर्गत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. त्याच्या ७० एकरच्या कॅम्पसमध्ये वसतिगृहे, प्रयोगशाळा आणि एक वैद्यकीय महाविद्यालय आहे. या वर्षी जानेवारीमध्ये त्याच्या नवीन रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. २०१९ मध्ये येथे एमबीबीएस कार्यक्रम सुरू झाले. शेवटची बॅच २०२२ मध्ये पदवीधर झाली. त्यानंतर विद्यापीठात अभियांत्रिकी शिक्षण बंद करण्यात आले. काश्मीर, मेवात आणि अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने विद्यापीठात प्रवेश घेतला. विद्यापीठाच्या अध्यक्षांना अटक अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अल फलाह ग्रुपचे अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी यांना अटक केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) २००२ च्या कलम १९ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन एफआयआर नोंदवले होते. त्यांचा आरोप आहे की फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठाने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (एनएएसी) द्वारे मान्यताप्राप्त असल्याचा खोटा दावा केला होता, परंतु तो तसा नव्हता. विद्यापीठाने असाही खोटा दावा केला की ते यूजीसीच्या कलम १२(ब) अंतर्गत मान्यताप्राप्त आहेत आणि सरकारी अनुदान मिळवू शकतात. तथापि, यूजीसीने स्पष्ट केले की विद्यापीठ फक्त कलम २(फ) अंतर्गत नोंदणीकृत आहे आणि त्यांनी १२(ब) साठी अर्ज केलेला नाही. या खोट्या दाव्यांमुळे विद्यार्थी, पालक आणि जनतेची फसवणूक झाली. लाखो आणि कोट्यवधी रुपयांचे शुल्क वसूल केले गेले. अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना १९९५ मध्ये झाली. जवाद अहमद सिद्दीकी हे त्याचे पहिले विश्वस्त आणि व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. ते सर्वकाही नियंत्रित करतात. अनेक दहशतवादी पकडले गेले पण बेग पळून जाण्यात यशस्वी झाला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे माजी डीसीपी एलएन राव म्हणतात, इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी मिर्झा शादाब बेग देशभरात झालेल्या अनेक बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी होता. २००७ मध्ये त्याने फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्याच वर्षी देशभरात झालेल्या मालिकेतील स्फोटांमध्ये त्याचे नाव समोर आले. स्फोटांमध्ये सहभागी असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या अनेक दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती, परंतु मिर्झा शादाब बेग फरार होता. एल. एन. राव यांच्या मते, अफगाणिस्तान हे दीर्घकाळापासून दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र राहिले आहे. आतापर्यंत पकडलेल्या बहुतेक प्रमुख दहशतवाद्यांनी तेथे शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतले होते. दिल्ली बॉम्बस्फोटांच्या तपासातही हाच दृष्टिकोन समोर येत आहे, त्यामुळे मिर्झा शादाब बेगशी संबंध असण्याची शक्यता आहे, कारण दोघेही एकाच महाविद्यालयात शिकले होते. विद्यापीठाचे अध्यक्ष, दोन डॉक्टर आणि धर्मगुरूंना अटक आतापर्यंत अल फलाह विद्यापीठातून डॉक्टर डॉ. मुझम्मिल शकील, डॉ. शाहीन सईद, विद्यापीठ कॅम्पसमधील मशिदीचे इमाम मौलवी इश्तियाक, डॉ. जावेद अहमद सिद्दीकी, लॅब असिस्टंट बशीद आणि इलेक्ट्रिशियन शोएब यांना अटक करण्यात आली आहे. दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित असलेल्या डॉ. निसार उल हसन यांच्या डॉक्टर पत्नी आणि एमबीबीएस मुलीला तपास यंत्रणांनी विद्यापीठ कॅम्पसमध्ये नजरकैदेत ठेवले आहे. याव्यतिरिक्त, ७० हून अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. (संपूर्ण घटनेची सुरुवात १९ ऑक्टोबर रोजी नौगाममध्ये जैश-ए-मोहम्मदच्या पोस्टरने झाली. तपासादरम्यान, काश्मीरमधील शोपियान येथील एका मशिदीचे इमाम मौलवी इरफान अहमद यांना प्रथम अटक करण्यात आली. त्यांची चौकशी केल्यानंतर, जम्मू-काश्मीर पोलिस फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठात कार्यरत असलेल्या दहशतवादी मॉड्यूलपर्यंत पोहोचले.)
पाकिस्तानवरील हवाईक्षेत्र रोखले गेल्याने एअर इंडिया आर्थिक अडचणीत
पहलगाम घटनेनंतर संबंध विकोपाला गेल्याचा फटकानवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबध विकोपाला गेले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांचा थेट परिणाम विमान कंपन्यांवर होत आहे. दोन्ही देशांनी एकमेकांसाठी एअरस्पेस बंद केल्याने एअर इंडियासहित अनेक आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. लांब पल्ल्याच्या मार्गांवर प्रवास वेळ तीन तासांपर्यंत वाढला असून इंधन खर्चात २९% वाढ झाली आहे.एअरस्पेस बंदीमुळे एअर इंडियाला वर्षाकाठी ४५५ मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमारे ३ हजार ८०० कोटी इतके नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे नुकसान २०२४-२५ मधील ४३९ मिलियन डॉलरच्या तुलनेत अधिक आहे. या वाढत्या आर्थिक ताणातून सुटण्यासाठी एअर इंडियाने केंद्र सरकारकडे चीनच्या शिनजियांग प्रांतातील हॉटन, काश्गर, उरुमकी मार्गे ‘इमर्जन्सी एअर एक्सेस’ मिळण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य झाल्यास अमेरिका, कॅनडा आणि युरोपकडे जाणाऱ्या उड्डाणांचे अंतर कमी होईल. यामुळे प्रवासाच्या कालावधीत बचत होईल आणि इंधन खर्चातही मोठी कपात होईल.लांब पल्ल्याचा प्रवासात तीन तासांनी वाढ, इंधन खर्चात २९ टक्के वाढ, वर्षाला ३,८०० कोटींचे नुकसान होण्याचा अंदाजचीनच्या शिनजियांग प्रांतातील ‘इमर्जन्सी एअर एक्सेस’ची मागणीएअर इंडियाच्या मागणीला चीन मान्यता देण्याची शक्यता कमीएअर इंडिया मागत असलेला शिनजियांगचा रुट जगातील सर्वात उंच पर्वतरांगांमधून जातो. येथे पर्वतांची उंची २० हजार फुटांपेक्षा जास्त आहे. या क्षेत्रात डीकंप्रेशनचा (केबिनमधील वायुदाब अचानक कमी होणे) धोका अत्यंत गंभीर मानला जातो. यामुळे, प्रवाशांना श्वास घेण्यास अडचण, खिडक्या वा दरवाजे अचानक उघडणे, विमानाच्या संरचनेला नुकसान होणे अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. ही जोखीम पाहून अनेक आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स हा मार्ग टाळतात. याशिवाय हा भाग चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी वेस्टर्न थिएटर कमांडच्या अधिकारात येतो. त्यामुळे हा संवेदनशील ‘मिलिटरी एअरस्पेस’ आहे. अशा परिस्थितीत, चीन या मार्ग वापरण्याची परवानगी देईल का? असा प्रश्न आहे.
१५ दिवसांत तोडगा न निघाल्याने जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा
सरकारला २० नोव्हेंबरपर्यंतची मुदतमुंबई : मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या जैन समाजाने मुनी नीलेश चंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणी १५ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. राज्य सरकारच्या एकाही प्रतिनिधीने १५ दिवसांत आपल्याशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे आता दादरच्या कबुतरखान्यावर आंदोलन करण्याचा इशारा जैन मुनींनी दिला.मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या जैन समाजाने जैन मुनी नीलेश चंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली ३ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर आमरण उपोषण केले. त्यावेळी आझाद मैदानावर जाऊन पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन मुनींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हेही आझाद मैदानावर जैन मुनींची भेट घेण्यासाठी गेले होते. या प्रकरणी १५ दिवसांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन नार्वेकर यांनी दिले. त्यानंतर जैन मुनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण सोडले.जैन मुनी नीलेश यांनी ३ नोव्हेंबरला आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जैन समाजाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. मुंबईकरांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यासाठी पर्यायी जागांचा शोध घेऊन त्या उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. पालिका प्रशासनाने दोन दिवसांत मुंबईतील चार जागांची निवड करून त्या ठिकाणी सकाळी ७ ते ९ या वेळेत नियंत्रित पद्धतीने खाद्य देण्याची परवानगी दिली. दादरच्या कबुतरखान्याबाबत काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे जैन मुनी नीलेश यांनी सरकारला २० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली असून त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असा इशारा दिला आहे. कबुतरखान्यांमुळे नागरिकांना धोका निर्माण होणार नाही व कबुतरांचाही जीव वाचेल अशा पद्धतीने तोडगा काढण्याचे आश्वासन नार्वेकर यांनी दिले होते.
मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू
मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट सोल्यूशन्स लिमिटेड या फिनटेक कंपनीने बुधवारी १२ मुंबई मेट्रो वन स्थानकांवर आपली नावीन्यपूर्ण स्मार्ट लॉकर प्रणाली यशस्वीरीत्या सुरू केल्याचे जाहीर केले. हा पहिलाच उपक्रम असून मुंबई मेट्रो वनच्या सहयोगाने राबविल्या जात असलेल्या या उपक्रमात मुंबईतील वाहतूक नेटवर्कमध्ये अत्याधुनिक अशी ९९६ पेक्षा जास्त डिजिटल लॉकर्स दाखल करण्यात आली आहेत. व्यापक प्रमाणात बसवलेली ही स्मार्ट लॉकर्स म्हणजे सुमारे ५ लाख प्रवाशांसाठी दैनंदिन प्रवासातील सुविधा, लास्ट-माईल लॉजिस्टिक्स आणि ई-कॉमर्स डिलिव्हरीमध्ये परिवर्तनाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.ही लॉकर्स केवळ सुरक्षित स्टोरेजची सुविधा देत नाहीत, तर शहरी गतिशीलतेच्या भविष्यातील एक महत्त्वपूर्ण दुवा ठरतात. ती कार्यक्षम ई-कॉमर्स डिलिव्हरी सक्षम बनवतात, लॉजिस्टिक्समधील फर्स्ट अँड लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी वाढवतात आणि आधुनिक शहरवासीयांसाठी डोअर-टू-डोअर लॉजिस्टिक्स अधिक कार्यक्षम आणि शाश्वत बनवतात. या सेवा आणखी वाढवण्यासाठी ऑटोपे सध्या भारतातील मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांसोबत चर्चा करत आहे. मुंबईत केलेला हा विस्तार देशभरात स्मार्ट मोबिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याच्या ऑटोपेच्या धोरणात्मक योजनेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये मुंबई मेट्रो वन सोबतच्या भागीदारीला पुढे नेले आहे. ऑटोपे पेमेंट टेक्नॉलॉजीसह वाहतूक संचालनाच्या एकीकरणाला प्रोत्साहन देण्यास आणि देशभरात सुधारित कार्यक्षमता आणि प्रवाशांच्या अनुभवासाठी डेटा अॅनालिटिक्सचा फायदा करून घेण्याबाबत वचनबद्ध आहे. ऑटोपे स्मार्ट लॉकर्स अशा प्रकारे डिझाईन करण्यात आली आहेत की, मेट्रोच्या गजबजलेल्या ईकोसिस्टममध्ये ती सहज समाविष्ट होऊ शकतील आणि प्रवासी व शहरी हितधारकांसाठी अनेक सुविधा आणि लाभ प्रदान करतील.५ लाख प्रवाशांसाठी दैनंदिन प्रवासातील सुविधामुख्य वैशिष्ट्ये : डिजिटल अॅक्सेस : यूझर-फ्रेंडली अॅप, एसएमएस किंवा क्यूआर कोड स्कॅनिंग द्वारे प्रवासी सहजतेने ही लॉकर्स अॅक्सेस करू शकतात, ज्याचा इंटरफेस आधुनिक आणि सुरक्षित आहे. लॉकरच्या वेगवेगळ्या साईझ : लॉकर्स दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत : छोटा खण (सुमारे ५ किलो क्षमता) आणि मध्यम आकाराचा खण (सुमारे १० किलो क्षमता), जो पार्सल, वाणसामान किंवा व्यक्तिगत वस्तूंसाठी योग्य आहे. किफायतशीर आणि लवचिक वापर : छोट्या खणांसाठी ताशी २० रु आणि मध्यम आकाराच्या लॉकर्ससाठी ताशी ३० रु. शुल्क आहे, ज्यामुळे सर्व प्रवासी त्याचा उपयोग करू शकतात. सुरक्षित आणि निरीक्षणांतर्गत : मनःशांती देणाऱ्या या लॉकर्समध्ये २४x७ सीसीटीव्ही देखरेख आणि वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ती परत मिळवण्यासाठी ओटीपी -आधारित प्रमाणिकरणाची सुविधा आहे. बहुविध उपयोग : तात्पुरते स्टोरेज, सुरक्षित ई-कॉमर्स आणि कुरियर डिलिव्हरी, मिडल्-माईल लॉजिस्टिक्सचे समर्थन तसेच वाहतूक केंद्रात ब्रॅंड सॅम्पलिंग साठी आदर्श.प्रवासी आणि शहरी ईकोसिस्टमसाठी फायदे : प्रवाशांची वाढीव सुविधा : मेट्रोच्या प्रवाशांना प्रवास करताना सहजपणे ऑनलाइन ऑर्डर घेणे किंवा आपल्या व्यक्तिगत गोष्टी सुरक्षित ठेवणे शक्य होते. शाश्वतता : मेट्रो स्थानकांवर डिलिव्हरीज एकत्र करून स्मार्ट लॉकर्स लास्ट-माईल उत्सर्जन कमी करण्यात, हरित शहरी लॉजिस्टिक्सला प्रोत्साहन देण्यात आणि शहरी वाहतूक कोंडी कमी करण्यात योगदान देतात. ब्रँड एंगेजमेंट : ही ईकोसिस्टम रिटेल आणि डिलिव्हरी पार्टनर्ससाठी एक दृश्यमान आणि उच्च-फुटफॉल असलेले टचपॉइंट उभे करते आणि मेट्रो ईकोसिस्टममध्ये नवीन व्यावसायिक संधी निर्माण करते. प्रवाशांच्या अनुभवात सुधारणा : मेट्रोच्या सेवेच्या ईकोसिस्टममध्ये भर घालते आणि अशाप्रकारे, सार्वजनिक वाहतुकीस अधिक आकर्षक, कार्यक्षम आणि नागरिकांसाठी एकीकृत पर्याय बनवते.“आमच्या मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सेवा आणण्यासाठी ऑटोपे सोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. हा उपक्रम मुंबई मेट्रो लाइन-१ आधुनिक करण्याच्या आणि आमच्या प्रवाशांचा दैनंदिन अनुभव उन्नत करण्याच्या दिशेने उचललेले आणखी एक पाऊल आहे. प्रवाशांना, चिंतामुक्त होऊन, जास्त सामान सोबत न नेण्यासाठी सक्षम करून आम्ही मुंबईसाठी एक सोयीची, टेक-सक्षम आणि भविष्यासाठी तत्पर असलेली शहरी मोबिलिटी इकोसिस्टम उभारण्याचे आमचे व्हिजन दृढ करत आहोत.” - श्यामंतक चौधरी, मुंबई मेट्रो वनचे सीईओऑटोपेमध्ये आमचे मुख्य ध्येय वाहतूक आणि आर्थिक टेक्नॉलॉजीमधील दरी भरून काढून देशभरातील शहरी प्रवाशांसाठी निर्बाध, एकीकृत अनुभव निर्माण करण्याचे आहे. या व्हिजनच्या दृष्टीने, १२ मुंबई मेट्रो वन स्थानकांवर ९९६ पेक्षा जास्त स्मार्ट लॉकर्सची उभारणी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. दिल्ली मेट्रो स्थानकांवर लॉकर्सच्या उभारणीत मिळालेले यश आणि अनुभव यांचा उपयोग करत हे प्रगत अनोख्या प्रकारचे सोल्यूशन मुंबईत आणताना आम्ही रोमांचित आहोत.- अनुराग बाजपेयी, ऑटो पे पेमेंट्स सोल्यूशन्स लि.चे संस्थापक आणि मॅनिजिंग डायरेक्टर
मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे समन्स अँटी-नार्कोटिक्स सेलच्या वतीने जारी करण्यात आले असून आज सकाळी १० वाजता अँटी-नार्कोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटसमोर चौकशीसाठी हजर राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.दाऊद इब्राहिम टोळीतील प्रमुख सदस्य ड्रग्ज किंगपिन सलीम डोला याचा निकटवर्तीय सहकारी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेख याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या चौकशीमध्ये त्याने धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितलं की, तो भारतात आणि परदेशात ड्रग्ज पार्ट्या आयोजित करतो आणि त्या पार्ट्यांना ड्रग्ज पुरवतो.https://x.com/ANI/status/1991165255716921348?s=20शेखच्या पार्टीत कोणाकोणाचा सहभाग?मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेख आयोजित पार्टीमध्ये दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसीना पारकरचा मुलगा अलीशाह,अभिनेत्री नोरा फतेही,श्रद्धा कपूर आणि तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर सहभागी झाले होते. पोलिसांनी मुंबईतील एका न्यायालयासमोर सादर केलेल्या रिमांड अर्जात असेही म्हटले आहे की चित्रपट निर्माते अब्बास-मस्तान यांच्यासह रॅपर लोका, ओरी आणि एनसीपी नेते जिशान सिद्दीकी यांसारख्या काही इतर व्यक्ती देखील उपस्थित होत्या.https://prahaar.in/2025/11/20/nitish-kumars-oath-taking-ceremony-today/अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मित्र सलीम डोला हा ड्रग्ज सिंडिकेट चालवत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. या सिंडिकेटनं देशभरातील सात ते आठ राज्यांमध्ये मेफेड्रोन (एमसीएटी), म्याऊ म्याऊ आणि आइस सारख्या ड्रग्जचा पुरवठा केला आणि मोठ्या प्रमाणात परदेशातही त्यांची तस्करी केली. मुंबई गुन्हे शाखेव्यतिरिक्त, अंमलबजावणी संचालनालय देखील या संपूर्ण नेटवर्कची चौकशी करत आहे. या ड्रग्ज तस्करीतून मिळणारे पैसे हवाला आणि रिअल इस्टेटद्वारे लाँडरिंग केले जात असल्याचा ईडीला संशय आहे. मुंबई गुन्हे शाखा लवकरच या सर्व व्यक्तींना समन्स बजावेल आणि त्यांचे जबाब नोंदवेल.
PMC Election : महायुतीत ‘बिघाडी’? भाजप ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत, शिवसेना-राष्ट्रवादीची कोंडी
प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असताना भाजपकडून शहरात बैठकींचा जोर वाढला आहे. स्वबळावर लढण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीला दूर ठेवण्याची भूमिका भाजपकडून घेतली जात आहे. त्यामुळे महायुतीत लढण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या शिवसेनेची कोंडी झाली आहे. त्याच वेळी भाजपला राजकीयदृष्ट्या कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने समविचारी पक्षांसोबत […] The post PMC Election : महायुतीत ‘बिघाडी’? भाजप ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेत, शिवसेना-राष्ट्रवादीची कोंडी appeared first on Dainik Prabhat .
satara news: एकजुटीने काम करून विजय मिळवावा: खासदार उदयनराजे
satara news: सातारा नगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी एकजुटीने काम करून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. एकजुटीने काम केल्यास विजय आपलाच आहे, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी जलमंदिरातील बैठकीत व्यक्त केला. मनोमिलनाच्या धर्माला जागताना काही लोकांना मी न्याय देऊ शकलो नाही. परंतु, अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी माझी ताकद कायमच राहील, अशी स्पष्ट ग्वाही […] The post satara news: एकजुटीने काम करून विजय मिळवावा: खासदार उदयनराजे appeared first on Dainik Prabhat .
Pune News : पोलीस आयुक्तांच्या आश्वासनानंतर पेट्रोल पंप चालकांचा बंदचा निर्णय मागे
प्रभात वृत्तसेवा पुणे – पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात सायंकाळी सात वाजल्यानंतर पेट्रोलपंप बंद ठेवणार असल्याचा इशारा ऑल इंडिया पेट्रोल ड्रीलर्स असोसिएशनने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आश्वासन दिल्यानंतर मागे घेतला आहे. संबंधित पेट्रोल पंपांना संरक्षण देणार आणि मारहाण करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी असोसिएशनच्या प्रतिनिधींना दिले आहे. पुणे पेट्रोल डीलर्स […] The post Pune News : पोलीस आयुक्तांच्या आश्वासनानंतर पेट्रोल पंप चालकांचा बंदचा निर्णय मागे appeared first on Dainik Prabhat .
शिरूर : शिरुर शहरातील कॅनरा बँकेच्या पाठीमागील स्टीमरूम कॅफे वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. कॉलेजमधील काही विद्यार्थी-विद्यार्थिनी येथे येऊन सेपरेट पार्टिशनचा फायदा घेत अश्लील चाळे करत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. कॅफेमध्ये दोन ते तीन जणांसाठी वेगवेगळे केबिनसदृश पार्टिशन तयार करण्यात आले […] The post Shirur News : शिरूर शहरात स्टीमरूम कॅफेमध्ये विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; पालक वर्ग संतप्त, पोलिस कारवाईची मागणी appeared first on Dainik Prabhat .
दिल्लीभेटीत भाजपच्या शिवसेनाविरोधी ऑपरेशन लोटसवर आक्षेप?
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दुपारी दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत जावून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अमित शहा यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास १ तास चर्चा झाली असून शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नाराजीनाट्याच्या घडामोडी सुरू आहेत. भाजपकडून शिवसेनेच्या नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि इतर कार्यकर्त्यांना जो पक्षप्रवेश देण्यात आला, त्यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. तसेच अनेक ठिकाणी शिवसेनेच्या मंत्र्यांना आव्हान देणाऱ्या राजकीय नेत्यांना भाजपने प्रवेश देत बळ दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्या पक्षप्रवेशांवर शिवसेनेच्या मंत्र्यांचा आक्षेप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत त्यावर तोडगा काढला. आता सत्ताधारी महायुतीच्या पक्षांचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी फोडायचे नाहीत, असे ठरले. पण यानंतरही एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झाली नसल्याने एकनाथ शिंदे बुधवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्याची चर्चा आहे. शिंदे यांनी शहा यांच्या भेटीत कोणत्याही प्रकारची नाराजी व्यक्त केलेली नाही. तसेच तक्रारही केलेली नसल्याचे सांगितले. तसेच, मी आतमध्ये बसलोय आणि बाहेर तुमच्या बातम्या सुरू आहेत, तुम्ही पतंग उडवता. युतीतल्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळली पाहिजे. भाष्य करताना प्रत्येकाने संयमाची आणि सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे, असे मुद्दे शिंदेंनी शह यांच्यापुढे दिल्ली भेटीत मांडले.अभिनंदन करण्यासाठी भेट, मी रडणारा नाही तर लढणारा आहेबिहारच्या यशाबाबत अभिनंदन करण्यासाठी ही भेट होती. स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर आम्ही दिल्लीत चर्चा करत नाही. चव्हाण यांच्याबाबत निर्णय त्यांचे पक्षश्रेष्ठी घेतील. अमित शहा यांच्यासोबतच्या चर्चेत नाराजीचा विषय नव्हता. तक्रारींचा पाढा वाचून मी रडणारा नाही तर लढणारा आहे. महायुतीला गालबोट लागेल असे आम्ही करणार नाही. मतभेद होणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशहा यांच्या भेटीत शिंदे यांच्याकडून नाराजी व्यक्त?खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात ऑपरेशन लोटस राबवले जात असल्याची खंत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांनी ज्यांचा पराभव केला, त्यांना पक्षप्रवेश देत भाजपने त्यांची ताकद वाढवली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीत लढवल्या जातील, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते. पण सध्या राज्यात अनेक ठिकाणी भाजपने वेगळी चूल मांडल्याचे बघायला मिळाले आहे. त्यावरूनही एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.
लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत हल्ले आम्हीच केले!
नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याबाहेर १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोटात १५ लोक ठार व डझनहून अधिक जखमी झाले होते. या स्फोटात पाकिस्तानचाच हात आहे, अशी कबुली पाकव्याप्त काश्मीर विधानसभेत चौधरी अन्वरुल हक याने दिली आहे. दिल्लीतील कार बॉम्बस्फोट हा पाकिस्ताननेच घडविल्याचे हक याच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे.विधानसभेत बोलताना चौधरी अन्वरुल हक म्हणाला की, मी आधीही म्हटले होते की, जर तुम्ही (भारताने) बलुचिस्तानला रक्तबंबाळ करणे सुरू ठेवले, तर आम्ही तुम्हाला लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत धडा शिकवू. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटापासून ते जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममधील हल्ल्यापर्यंत भारताला लक्ष्य करणे हे पाकिस्तानने बदला म्हणून केलेले कृत्य होते. अल्लाहच्या कृपेने, आम्ही ते करून दाखवले आहे.पाकव्याप्त काश्मीरमधील विधानसभेत चौधरी अन्वरुल हकने ओकली गरळपहलगाममधील हल्ल्याचाही केला उल्लेख : हकने पहलगाममधील एप्रिलमध्ये भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख केला. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. बलुचिस्तानमध्ये भारताच्या कथित हस्तक्षेपाचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान भारतीय शहरांमध्ये हल्ले करत आहे, असा पोरकट आरोपही त्याने केला.
दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपचेचनवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल संयुक्त (जेडीयू) आणि भाजपने अभूतपूर्व विजय मिळवला. आता पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार गुरुवारी स्थापन होत आहे. पुढील सरकारमध्ये भाजपच्या कोट्यातून सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा उपमुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य मंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.‘जेडीयू’चे प्रमुख नितीश कुमार यांची पाटणा येथे झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ गटाचे नेते म्हणून निवडण्यात करण्यात आली. त्यामुळे ते पुढील मुख्यमंत्री असल्याचे स्पष्ट झाले आहे. जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील आठवे एनडीए सरकार शपथ घेणार आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील हे दहावे सरकार असेल.भाजपने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना निरीक्षक म्हणून आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि माजी केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांना पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेते निवडण्यासाठी सह-निरीक्षक म्हणून पाटणा येथे पाठवले होते. बैठकीनंतर केशव मौर्य यांनी औपचारिकपणे सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांची नेते आणि उपनेते म्हणून निवड जाहीर केली. भाजपने उपमुख्यमंत्रीपदासाठी आपल्या जुन्या चेहऱ्यांवर विश्वास ठेवताना सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. भाजप आमदारांच्या बैठकीत दोघांनाही त्यांच्या पदांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत, बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारमध्ये सुशील कुमार मोदी, तारकिशोर प्रसाद, रेणू देवी, सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा यांनी वेगवेगळ्या टर्मसाठी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.
जवाद सिद्दिकीला १३ दिवसांची ईडी कोठडी
नवी दिल्ली : दिल्लीतील एका न्यायालयाने बुधवारी अल फलाह विद्यापीठाचे प्रमुख व संस्थापक जवाद अहमद सिद्दिकी यांना १३ दिवसांसाठी ईडी कोठडीत पाठवले आहे. केंद्रीय तपास संस्थेने दावा केला आहे की, जवाद यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांची फसवणूक करून ४१५ कोटी कमावले आहेत. इतकंच नाही तर, त्यांच्या कुटुंबाचे आखाती देशांमध्ये संबंध असल्यामुळे ते पळून जाण्याची देखील शक्यता आहे.सिद्दिकी व त्यांच्या नियंत्रणाखालील अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टने विद्यार्थी व पालकांना नॅक मान्यता व यूजीसीच्या ओळखपत्रांबद्दल खोटे दावे करून दिशाभूल केली आणि ४१५.१० कोटींची रक्कम गोळा केली. १० नोव्हेंबरला लाल किल्ल्याजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर हे विद्यापीठ तपासणीच्या कक्षेत आले. हा हल्ला करणाऱ्या दहशतवादी मॉड्यूलचे अनेक सदस्य अल फलाह विद्यापीठाशी संबंधित होते.एजन्सीने दावा केला की, ट्रस्टने फसवणुकीच्या मार्गाने फी व शिक्षण शुल्काच्या नावाखाली ४१० कोटींहून अधिक रक्कम गोळा केली व ही रक्कम सिद्दिकी यांच्या वैयक्तिक व खासगी फायद्यासाठी वळवली.
महिला राखीव जागेवर पुरुषाचे नामनिर्देशन अर्ज छाननीत वैध
मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये ३ ब सर्वसाधारण महिलासाठी राखीव असून या जागेवर एका पुरुषाने नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. आज छाननीतही हा अर्ज वैध झाल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. सध्या अर्जाची छाननी सुरू आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात देखील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.प्रभाग क्रमांक तीनमध्ये ३ ब सर्वसाधारण महिला राखीव जागा आहे. या जागेसाठी एकूण ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ६ महिला असून त्यात एका पुरुषाचा उमेदवार अर्ज दाखल झाल्याची बाब भाजपचे माजी शहराध्यक्ष व नगरपालिका प्रभारी यांनी निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे एका पुरुषाचा महिला राखीव जागेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल होत असताना निवडणूक निर्णय अधिकारी नेमके करत होते काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वसाधारण महिलेसाठी ही जागा आरक्षित असताना एका पुरुषाचा अर्ज दाखल करून घेणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यातच सर्व उमेदवारांची प्रभाग निहाय छाननी झाली आहे. मात्र, या छाननीमध्ये ही बाब निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात न आल्याने नेमकी चूक कोणाची झाली? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेवासे : नेवासे शहरातील नगरपंचायत चौकात बुधवार (दि.१९) रोजी सायंकाळी रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास एका व्यावसायिक दुकानाला आग लावून एका मागोमाग एक असे दहा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून सर्वच्या सर्व दुकाने आगीत जळून बेचिराख झाल्याची संतापजनक दुर्देवी घटना पुन्हा एकदा शहरात घडली. या व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे प्रचंड नुकसान या लागलेल्या आगीमध्ये झालेले आहे. मागच्या वर्षी […] The post Nevase News : नेवासे नगरपंचायत चौकात पुन्हा एकदा अग्नितांडव; दहा व्यावसायिक दुकाने आगीत भस्मसात, व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान appeared first on Dainik Prabhat .
सीसीटीव्ही प्रकल्पाला ब्रेक? आधी दुरुस्ती, मगच पुढचं काम; नियम मोडणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेचा दणका
प्रभात वृत्तसेवा पुणे : पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी शहरात सुरू असलेले खोदकाम तातडीने थांबवण्याचे आदेश महापालिकेने ठेकेदाराला दिले आहेत. पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी पालिकेने दिनेश इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीस खोदकामाची परवानगी दिली आहे. मात्र, ठेकेदाराने खोदकामाच्या नियमाचे उल्लंघन करत एकाचवेळी शहरभर खोदकाम सुरू केले आहे. शहरभर सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याची दखल […] The post सीसीटीव्ही प्रकल्पाला ब्रेक? आधी दुरुस्ती, मगच पुढचं काम; नियम मोडणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेचा दणका appeared first on Dainik Prabhat .
Pune railway : प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-मिरज रेल्वे दुहेरीकरण पूर्ण, आता प्रवास होणार सुपरफास्ट
प्रभात वृत्तसेवा पुणे – मध्य रेल्वे विभागातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला पुणे-मिरज या २८० किलोमिटर लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे या मार्गावरील गाड्यांचा वेग वाढणार असून, या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्यामुळे प्रवाशांची अधिक सोय होणार आहे.पुणे ते मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. आता भविष्यात […] The post Pune railway : प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-मिरज रेल्वे दुहेरीकरण पूर्ण, आता प्रवास होणार सुपरफास्ट appeared first on Dainik Prabhat .
Pune News : समाविष्ट ३२ गावांतील करवसुली थांबवा; नगरविकास विभागाचा महापालिकेला पुन्हा आदेश
प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिकेत समाविष्ट ३२ गावांमधील शास्तीकर आकारणी तसेच कर वसुली करण्यास स्थगिती दिली आहे. या गावांत पालिके ग्रामपंचायतीच्या करापेक्षा दुप्पट दराने मिळकत कर आकारणी करावी असे आदेश शानाने दिले होते. याबाबत पुनर्विलोकन होईपर्यंत पालिकेने करवसुली थांबवावी असे आदेश नगरविकास विभागाने पत्राद्वारे पालिकेस बुधवारी पाठविले आहे.उपसचिव प्रियंका छापवाले यांनी हे पत्र पाठविले असून […] The post Pune News : समाविष्ट ३२ गावांतील करवसुली थांबवा; नगरविकास विभागाचा महापालिकेला पुन्हा आदेश appeared first on Dainik Prabhat .
व्यसनाधीनतेचा दुर्दैवी अंत! पत्नीने मदतीसाठी पोलिसांना बोलावले, पण त्याने मृत्यूलाच कवटाळले
प्रभात वृत्तसेवा पुणे – पोलीस ठाण्यात समुपदेशनासाठी बोलावलेल्या व्यक्तीने कृषी महामंडळाच्या बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. १८) सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास घडली. समीर हमीद शेख (४०, रा. गल्ली नं. १३, आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. समीर शेख हा रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शेख […] The post व्यसनाधीनतेचा दुर्दैवी अंत! पत्नीने मदतीसाठी पोलिसांना बोलावले, पण त्याने मृत्यूलाच कवटाळले appeared first on Dainik Prabhat .
अखेर कुटुंबीयांना झुकावे लागले. नवीन लग्नपत्रिका छापण्यात आल्या, ज्यावर लिहिले होते, टिळा, हुंडा आणि शोषणाच्या वाईट प्रथांपासून मुक्त, आणि हार आणि आशीर्वाद वगळता इतर कोणत्याही भेटवस्तूंची देवाणघेवाण केली जाणार नाही. नितीश कुमार आज १०व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. या कथेत आपण त्यांच्या प्रेमकथेबद्दल जाणून घेऊ... बख्तियारपूरमध्ये सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर, नितीश कुमार यांनी १९६७ मध्ये पाटणा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. नितीश लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते आणि श्रीमंत कुटुंबातून आले होते, त्यामुळे कुटुंबाची इच्छा होती की त्यांनी अभियंता व्हावे. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात असताना नितीश यांच्या कुटुंबाने त्याचे लग्न मंजू कुमारी सिन्हासोबत ठरवले. त्यावेळी मंजू पाटणा येथील मगध महिला महाविद्यालयात समाजशास्त्राचे शिक्षण घेत होत्या. नितीश यांचे कॉलेज मित्र उदय कांत यांच्या 'नितीश कुमार: थ्रू द आइज ऑफ इंटिमेट फ्रेंड्स' या पुस्तकात मंजू यांचे वडील कृष्णनंदन बाबू म्हणतात, ' माझ्या समुदायाबद्दल विसरून जा, त्या वेळी बिहारमधील कोणत्याही जातीत, मंजूसारख्या हुशार मुलीसाठी नितीशजींपेक्षा चांगला मुलगा सापडला नसता.' नितीश कुमार यांनी मंजू यांना पहिल्यांदा लग्नाच्या मंडपात पाहिलेजेव्हा नितीश आणि मंजू यांचे लग्न ठरले तेव्हा दोघेही पाटण्यात शिकत होते. नितीश कुमार: थ्रू द आयज ऑफ इंटीमेट फ्रेंड्समध्ये, नितीश यांचे मित्र कौशल सांगतात, 'आमच्यापैकी कोणीही तोपर्यंत मंजू यांना पाहिले नव्हते, पण आम्हाला माहिती होते की त्या पाटणा विद्यापीठात समाजशास्त्र शिकत आहेत. आम्ही तिघे खोडकर मित्र कोणालाही न सांगता त्यांना भेटण्यासाठी समाजशास्त्र विभागात पोहोचलो.' जेव्हा नितीश यांच्या मित्रांनी विद्यापीठात मंजू यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या फक्त हसल्या आणि निघून गेल्या. नितीश यांच्या मित्रांच्या कृतीवरून त्यांना समजले की ते त्यांना भेटायला आले आहेत, म्हणून त्या लाजल्या आणि पळून जाऊ लागल्या. नितीश यांचे मित्र मंजू यांच्या पुढे गेले होते आणि नितीश यांना याबद्दल खूप आनंद झाला. त्यांच्या मित्रांनी मंजू यांना पाहिले असले तरी, नितीश यांनी त्यांना लग्नाच्या ठिकाणी पहिल्यांदाच पाहिले होते. नितीश यांच्या अटी- मी हुंडा घेणार नाही आणि लग्न मंजूच्या संमतीनेच होईल नितीश यांचे लग्न त्यांच्या कुटुंबाने ठरवले होते. त्यांनी मंजूला न भेटताही लग्नाला संमती दिली होती. लग्नाची पत्रिका वाटल्यानंतर नितीश यांना कळले की टिळा समारंभात २२,००० रुपये देण्याचे ठरवण्यात आले आहे. नितीश यांनी लग्नात हुंडा न घेण्याची खूप आधीपासून प्रतिज्ञा केली होती आणि त्यांच्या कुटुंबालाही हे माहिती होते. म्हणून जेव्हा त्यांना टिळा समारंभात पैसे घेतल्याचे कळले तेव्हा ते खूप संतापले. त्यांनी त्यांच्या आणि मंजूच्या कुटुंबाला स्पष्टपणे सांगितले की ते टिळ्याच्या नावावर कोणतेही पैसे किंवा हुंडा घेणार नाही. लग्नासाठी त्यांनी दोन अटीही घातल्या. पहिली, ज्याप्रमाणे मंजूसाठी त्यांची संमती घेण्यात आली होती, त्याचप्रमाणे त्यांच्यासाठीही मंजू यांची संमती घेण्यात यावी. दुसरी, जर मंजूला काही अडचण नसेल, तर ते कोणत्याही थाटामाटात, पारंपरिक मिरवणुकीशिवाय आणि फक्त जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्न करतील. मंजू यांना यावर कोणताही आक्षेप नव्हता. त्यानंतर नवीन लग्नपत्रिका छापण्यात आल्या. लग्नाच्या वेळी, विद्यार्थी राजकारणामुळे नितीश कॉलेजमध्ये खूप लोकप्रिय झाले होते. त्यांचे लग्न कॉलेजमधील संस्मरणीय लग्नांमध्ये गणले जाते. उदय कांत त्यांच्या पुस्तकात लिहितात, 'मी भाड्याने घेतलेल्या अॅम्बेसेडर कारमधून संपूर्ण विद्यापीठ फिरलो आणि सर्वांना एका बंडखोराच्या लग्नाचे आमंत्रण दिले.' लग्नाच्या एका वर्षातच नितीश तुरुंगात गेले लग्नानंतरही मंजू यांनी त्यांचे शिक्षण सुरू ठेवावे अशी नितीश यांची इच्छा होती. म्हणून काही दिवस सासरच्या घरी राहिल्यानंतर, ती पाटण्याला परतली आणि जीडी हॉस्टेलमध्ये राहून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. नितीश अनेकदा कॉलेज किंवा हॉस्टेलच्या बाहेर मंजू यांना भेटायला जायचे. बऱ्याचदा ते त्यांना रिक्षात चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जायचे. 'इंटिमेट फ्रेंड्स' या पुस्तकानुसार, 'त्या काळात नितीश अनेक रोमँटिक गाणी गुणगुणत असे. जसे की- जो बात तुझमे है, तेरी तस्वीर में नहीं... आणि आम्ही त्या डोळ्यांचा सुगंधित वास पाहिला आहे...' एकीकडे नितीश वैवाहिक जीवनात प्रवेश करत होते, तर दुसरीकडे बिहारमध्ये जेपी चळवळ जोर धरत होती. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नितीश यांनी नोकरी करण्यास नकार दिला होता. ते राजकारणात येऊ इच्छित होते. त्यांच्या वडिलांनीही त्यांना यामध्ये पाठिंबा दिला. या काळात विद्यार्थी चळवळीदरम्यान नितीश यांना तुरुंगात जावे लागले. मंजू अनेकदा तुरुंगात त्यांना भेटायला येत असत. त्यावेळचा एक प्रसंग आठवताना नितीश म्हणतात, 'गया मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक खूप कडक होते. ते आठवड्यातून एकदाच कुटुंबाला भेटण्याची परवानगी देत असत. तेही जाळ्याद्वारे. मंजू मला भेटायला येत असे. पण दुर्दैवाने आमच्यासाठी जाळे इतके जाड होते की करंगळीही त्यातून जाऊ शकत नव्हती.' नितीश कुमार सतत निवडणुका गमावत होते नितीशच्या राजकारणातील व्यग्र वेळापत्रक आणि त्याच्या वारंवार तुरुंगात जाण्याने मंजूला त्रास होत होता. स्वतःला व्यग्र ठेवण्यासाठी, बीए पूर्ण केल्यानंतर, मंजूने बीएड आणि नंतर एमए केले. नितीशशी लग्न करण्यापूर्वी, मंजूला कधीही पैशाची कमतरता भासली नव्हती, परंतु जेव्हा नितीशला १२ वर्षांच्या लग्नात योग्य नोकरी मिळाली नाही आणि ती सलग दोन निवडणुका गमावली तेव्हा तिला घर चालवणे कठीण झाले. १९८२ मध्ये मंजू बिहार सरकारमध्ये शिक्षिका झाल्या. त्यांची पहिली नियुक्ती माहेरच्या सेवादाह येथील हायस्कूलमध्ये झाली. मंजू यांच्या नोकरीमुळे कुटुंब चालवण्याचा प्रश्न सुटला, परंतु नितीश यांचे कुटुंब दोन भागांत विभागले गेले. मंजू आणि मुलगा निशांत सेवादाह येथे राहत होते आणि नितीश कधी पाटण्याला, तर कधी बख्तियारपूरला राहत होते. दोघेही बराच काळ भेटू शकले नाहीत. नितीश राजकारण सोडण्याच्या बेतात होते, मंजूने त्यांना अडीच वर्षांची बचत दिली १९८५च्या विधानसभा निवडणुकीत नितीश यांनी ठरवले होते की हा त्यांचा शेवटचा प्रयत्न असेल. जर ते जिंकले नाहीत तर ते पुन्हा कधीही निवडणूक लढवणार नाहीत. 'नीतीश कुमार: इंटिमेट फ्रेंड्स व्ह्यूपॉइंट' या पुस्तकात, मैत्रीण मीता सांगते की नितीशकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नव्हते. मग भाभी मंजूने तिची अडीच वर्षांची बचत काढून नितीशला दिली. त्यावेळी, हे २० हजार रुपये नितीशसाठी आधार ठरले. दोन निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर, नितीश यांनी १९८५ मध्ये लोकदलाच्या वतीने हरनौत विधानसभा जागा जिंकली. निवडणूक जिंकल्यानंतर, नितीश बख्तियारपूर येथील त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले, परंतु त्यांच्या नजरा त्यांच्या पत्नी मंजूला शोधत होत्या ज्या त्यावेळी सेवादाह येथील त्यांच्या माहेरी होत्या. नितीश मध्यरात्री त्यांच्या मोटारसायकलवरून पत्नीला भेटण्यासाठी निघाले पत्नीला भेटण्यासाठी उत्सुक असलेले नितीश रात्री एका मित्रासोबत मोटारसायकलवरून सेवादाहला निघाले. होळीच्या आदल्या रात्रीची वेळ होती. दंगलीच्या भीतीने अनेकांनी नितीश यांना जाण्यास मनाई केली, पण त्यांनी ऐकले नाही. नितीश यांच्यासोबत सेवादाह येथे गेलेला त्यांचा मित्र मुन्ना सरकार यांच्या म्हणण्यानुसार, भाभीजी काल रात्रीपासून नेताजींची वाट पाहत होत्या. नेताजी घरी पोहोचताच भाभीजींनी प्रथम त्यांच्याकडे पाहून हसल्या, नंतर आमच्या स्वागताची तयारी सुरू केली. आमदार झाल्यानंतर नितीश यांना पाटण्यात राहण्यासाठी एक फ्लॅट मिळाला. त्यानंतर मंजू यांनीही स्वतःची पाटण्याला बदली केली. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर नितीश, मंजू आणि त्यांचा मुलगा निशांत एकत्र राहू लागले. दररोज व्यस्त असूनही, नितीश स्वतः मंजू यांना शाळेत सोडत असत. दिल्लीत पत्नीला नोकरी मिळवून देण्यात अनियमिततेचे आरोप उदय कांत त्यांच्या 'नीतीश कुमार: इंटिमेट फ्रेंड्स व्ह्यूपॉइंट' या पुस्तकात लिहितात- '५ वर्षे एकत्र राहिल्यानंतर, नितीश आणि मंजू यांना पुन्हा एकमेकांपासून दूर राहावे लागले. खरं तर, १९८९ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर नितीश दिल्लीला पोहोचले. मंजू या बिहार माहिती केंद्र, नवी दिल्ली येथे प्रतिनियुक्तीवर गेल्या. ही बातमी बिहारच्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आणि नितीश यांच्यावर पत्नीला दिल्लीला बोलावण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपांमुळे त्रस्त होऊन नितीश यांनी तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना पत्र लिहून मंजू यांचे प्रतिनियुक्ती रद्द करण्याची विनंती केली. त्यानंतर मंजू पाटण्याला परतल्या. जेव्हा जेव्हा नितीश यांना दिल्लीतील कामातून सुट्टी मिळायची तेव्हा ते आपल्या पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी पाटण्याला जायचे. जेव्हा जेव्हा मंजू यांना सुट्टी असायची तेव्हा त्या मुलासोबत दिल्लीला जायच्या. कामामुळे वारंवार घर बदलणे आणि पुन्हा घर वसवणे यामुळे मंजू नेहमीच नितीशवर नाराज असायच्या. नितीश २००५ मध्ये मुख्यमंत्री झाले, पण चार महिन्यांनंतर त्यांना मुख्यमंत्री निवासस्थान मिळाले. तोपर्यंत मंजू त्यांचा मुलगा निशांतसोबत माहेरी राहत होत्या आणि नितीश सरकारने ठरवलेल्या घरात एकटे राहत होते. मंजू म्हणाल्या, आपण निवृत्तीनंतर एकत्र राहू, पण ते होऊ शकले नाही २००७ मध्ये, जेव्हा मंजू यांना न्यूमोनिया झाला, तेव्हा नितीश त्यांना उपचारासाठी दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. नितीश नेहमीच मंजूसोबत राहिले. रुग्णालयात, नितीश अनेकदा मंजूजवळ बसायचे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवू न शकल्याबद्दल पश्चात्ताप करायचे. मग मंजू म्हणायच्या की माझ्या निवृत्तीनंतर आपण सर्व एकत्र राहू. त्यावेळी मंजू यांच्या निवृत्तीसाठी पाच वर्षे शिल्लक होती. त्या २०१२ मध्ये निवृत्त होणार होत्या, पण निवृत्तीपूर्वी, १४ मे २००७ रोजी, मंजू यांनी या जगाचा निरोप घेतला. पत्रकार अरुण पांडे यांच्या मते, 'पत्नीच्या निधनावर नितीश कुमार खूप रडले.' नंतर, नितीश यांनी मंजू कुमारी स्मृती पार्क आणि पाटणाच्या कंकरबागमध्ये मंजू यांच्या नावाने स्मारक बांधले. आता दरवर्षी नितीश त्यांच्या पत्नीच्या पुण्यतिथीला या स्मारकाला भेट देतात आणि फुले अर्पण करतात. यावेळी बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. एनडीए त्यांना आपला नेता म्हणत आहे. जर नितीश जिंकले तर ते विक्रमी १०व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. दिव्य मराठीच्या निवडणूक मालिकेतील 'लव्ह स्टोरी'च्या उद्या म्हणजेच ७ सप्टेंबर रोजी तिसऱ्या भागात, लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान आणि रीना यांची कहाणी वाचा... , लव्ह स्टोरीचा पहिला भाग देखील वाचा... साध्वी उमा यांनी शाहनवाजचे लग्न त्याच्या हिंदू प्रेयसीसोबत लावले: डीटीसी बसमध्ये प्रेम झाले; भाजप नेते वऱ्हाडी झाले, विरोधक त्यांना अडवाणींचे जावई म्हणत एके दिवशी भाजप खासदार उमा भारती यांनी युवा मोर्चाचे सय्यद शाहनवाज हुसेन यांच्यावर टीका केली आणि म्हणाल्या, शानवाज, दिल्लीतील मुलींपासून सावध राहा. शाहनवाज लाजून उत्तरले, दीदी, मी पळून जाऊ शकलो नाही. माझ्या आयुष्यात कोणीतरी आहे. मुलीचे नाव ऐकून उमा म्हणाली, तुमचे लग्न भव्य होणार नाही. संपूर्ण कथा वाचा.
पुण्यात जमिनीला फुटले पाय? मुंढवा जमीन घोटाळ्यात निलंबित निबंधकाचा प्रताप, वाचा घोटाळ्याची नवी कहाणी
प्रभात वृत्तसेवा पुणे – मुंढवा येथील सुमारे 40 एकर शासकीय जमीन खरेदी- विक्रीचा दस्त नोंदविताना केलेल्या अनेक भानगडी आता उघड होत आहे. दस्त नोंदणी झाल्यावर तो ऑनलाइन ई-म्युटेशन म्हणजेच ई-फेरफारसाठी पाठवायचा होता. तेव्हा जुना सातबारा वापरल्याचा घोळ उघडकीस येऊ नये म्हणून या जमीन व्यवहाराला चक्क स्थावर मानण्याऐवजी, जंगम मालमत्ता म्हणजेच मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणून नोंदवले! म्हणजेच […] The post पुण्यात जमिनीला फुटले पाय? मुंढवा जमीन घोटाळ्यात निलंबित निबंधकाचा प्रताप, वाचा घोटाळ्याची नवी कहाणी appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – सामाजिक कामे संवेदनशीलतेने केले पाहिजे,असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उच्च शिक्षण संचालनालय आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे शिवाजीनगरमधील मॉडर्न कॉलेजतर्फे संकटातून संकल्पाकडे हा कार्यक्रम झाला. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू […] The post Pune News : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत २० महाविद्यालयांचा गौरव appeared first on Dainik Prabhat .
नितीश कुमार हे विक्रमी १०व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्यांनी एकदा कॉलेजमध्ये लालू यादव यांचे पोस्टर चिकटवले होते, पोलिसांच्या गोळीतून थोडक्यात बचावले होते आणि एकदा ते त्यांच्या पत्नीला भेटण्याच्या उत्सुकतेने मध्यरात्री सायकलवरून निघून गेले होते; आम्ही नितीश यांच्या आयुष्यातील या आकर्षक कथा १२ ग्राफिक्समध्ये संकलित केल्या आहेत... , ग्राफिक्स: ड्रॅगचंद्र भुर्जी, अजित सिंग आणि अंकुर बन्सल
नितीश कुमार यांनी निवडणुकीपूर्वी ४० हजार कोटी रुपयांच्या योजनांचे आश्वासन दिले होते. आता ते १०व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत, त्यामुळे बिहारच्या तिजोरीचे आरोग्य तपासणे आवश्यक आहे. २०२२-२३ च्या कॅग (नियंत्रक आणि महालेखा परीक्षक) च्या राज्य वित्त अहवालानुसार बिहार नवीन कर्ज कारखाने, रस्ते किंवा रुग्णालये बांधण्यासाठी नाही तर जुन्या कर्जांवरील उत्पन्न आणि व्याज भरण्यासाठी घेत आहे. बिहार सरकारचे उत्पन्न आणि खर्च किती आहे, कर्जाचा हिशेब काय आहे आणि नितीश महागडी निवडणूक आश्वासने कशी पूर्ण करणार; आजच्या एक्सप्लेनरमध्ये अगदी सोप्या भाषेत जाणून घ्या... प्रश्न-१: बिहार सरकारचे उत्पन्न आणि खर्च किती आहे?उत्तर: २०२४-२५ या आर्थिक वर्षात बिहारचा एकूण खर्च सुमारे ₹३.२७ लाख कोटी होता. तर उत्पन्न फक्त ₹२.४४ लाख कोटी होते. याचा अर्थ बिहार सरकारने आपल्या उत्पन्नापेक्षा ₹८२ हजार कोटी जास्त खर्च केले. ही जबाबदारी काही प्रमाणात पूर्ण करण्यासाठी सरकारने ₹६३ हजार कोटींचे कर्ज घेतले होते. जेव्हा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असते तेव्हा त्याला वित्तीय तूट म्हणतात. २०२४-२५ मध्ये बिहारची वित्तीय तूट राज्याच्या जीडीपीच्या ९.२% होती, तर भारताची ४.८% म्हणजे केवळ निम्मी होती. याचा अर्थ बिहार सरकारच्या उत्पन्न आणि खर्चात मोठी तफावत आहे, जी आर्थिक दृष्टिकोनातून धोकादायक आहे असे मानले जाते. तथापि, या वर्षीच्या अर्थसंकल्पात बिहारने ही तूट निम्म्याने कमी करून ३% करण्याचा दावा केला आहे. सरकारच्या २०२५-२६च्या अर्थसंकल्पानुसार त्यांना यावर्षी २.६१ लाख कोटी रुपये मिळतील आणि २.९४ लाख कोटी रुपये खर्च होतील. यावेळीही सरकार तूट भरून काढण्यासाठी कर्ज घेईल. ₹१च्या उदाहरणाने सरकारचे उत्पन्न आणि खर्च समजून घ्या... प्रश्न-२: सध्या बिहार सरकारचे एकूण कर्ज किती आहे?उत्तर: २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस बिहार सरकारवर एकूण ₹३.४८ लाख कोटी कर्ज होते. हे राज्याच्या जीडीपीच्या ३८.९% आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे - बिहारमध्ये उत्पादित होणाऱ्या ₹१०० किमतीच्या वस्तू/सेवांसाठी, त्यावर सुमारे ₹४० कर्ज आहे. बिहारची लोकसंख्या १३ कोटींहून अधिक आहे. यानुसार, प्रत्येक बिहारीवर सुमारे ₹२७,००० कर्ज आहे. कॅगच्या अहवालानुसार, भारतात फक्त ११ राज्ये अशी आहेत ज्यांचे कर्ज-जीडीपी प्रमाण बिहारपेक्षा जास्त आहे. बिहार हे पाचवे सर्वात कर्जदार राज्य आहे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे हे कर्ज नवीन गोष्टी निर्माण करण्यासाठी वापरले जात नाही, तर जुने कर्ज फेडण्यासाठी वापरले जात आहे. आणि ते स्थिर खर्च चालवण्यासाठी वापरले जात आहे. २०२५-२६ मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार पुढील ३ वर्षांत यामध्ये कोणताही महत्त्वाचा बदल होणार नाही. अंदाजानुसार, २०२७-२८ मध्ये बिहारचे कर्ज राज्याच्या जीडीपीच्या ३४.९% असेल. जर निवडणूकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली तर हे कर्ज आणखी वाढू शकते. प्रश्न-३: बिहार सरकार या कर्जावर दरमहा किती व्याज देत आहे?उत्तर: २०२५-२६च्या अर्थसंकल्पानुसार, बिहार सरकारला दरवर्षी २३,०१४ कोटी रुपयांचे व्याज द्यावे लागते. त्यानुसार, नितीश सरकार दररोज फक्त ६३ कोटी रुपयांचे व्याज देत आहे. सरकारवरील कर्ज आणि व्याज दोन्ही वर्षानुवर्षे वाढत आहेत. गेल्या वर्षी बिहार सरकारने वार्षिक ₹ २०,५२६ कोटी म्हणजेच दररोज ₹ ५६ कोटी व्याज दिले होते. यावर्षी बिहार सरकारने गेल्या वर्षीच्या तुलनेत १२% जास्त व्याज दिले आहे. प्रश्न-४: निवडणुकीपूर्वीच्या घोषणा पूर्ण करण्यासाठी किती खर्च येईल?उत्तर: बिहार निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांनी ४ सर्वात महागड्या जाहिराती केल्या: वित्तीय सेवा कंपनी एमकेवाय ग्लोबलच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ माधवी अरोरा यांच्या मूल्यांकनानुसार, हे वचन पूर्ण करण्यासाठी बिहार सरकारला ₹ 40,000 कोटी अधिक खर्च करावे लागतील. यापैकी १५,००० कोटी रुपये फक्त महिलांना १०,००० रुपये देण्यासाठी खर्च करण्यात आले. एका अंदाजानुसार, सरकारला या आर्थिक वर्षात केवळ वाढीव पेन्शन आणि मोफत विजेतून ८,५०० कोटी रुपये लागतील. ४,००० कोटी रुपये अधिक खर्च केले जातील. यापूर्वी केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये मिळत होते. एनडीएने त्यात ३,००० रुपये अधिक वाढ केली आहे, ज्यामुळे सरकारचा खर्च २,६०० कोटी रुपयांनी वाढेल. प्रश्न-५: सरकार हे पैसे कसे आणेल?उत्तर: व्यवसाय तज्ज्ञ शिशिर सिन्हा म्हणतात की बिहार सरकार त्यांच्या निवडणूक आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करत आहे. पैसे 3 मुख्य मार्गांनी उभे केले जाऊ शकतात: राजकीय विश्लेषक अमिताभ तिवारी म्हणतात, 'एनडीएने जाहीर केलेली सर्वात मोठी योजना महिलांसाठी ₹१०,००० आहे. हा फक्त एकदाच होणारा खर्च आहे. यापैकी फक्त ५८% महिलांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे खर्च केले आहेत. जरी त्या २ लाख रुपयांचे कर्ज घेण्यासाठी गेल्या तरी, सरकारच्या महसुलातून कर्ज घेतले जाणार नाही. सरकार फक्त एक सुविधा देणारे म्हणून काम करेल जे या लोकांना बँकांकडून कर्ज देईल. उर्वरित योजना पूर्ण करण्यासाठी, सरकारने शिक्षण आणि आरोग्य यासारख्या क्षेत्रांमध्ये काही टक्के बजेट कमी करणे शक्य आहे.' ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीचे असोसिएट प्रोफेसर दीपांशू मोहन लिहितात की जर बिहारमध्ये खरा बदल झाला तर नवीन रस्ते, कारखाने आणि रुग्णालये बांधण्यावरील भांडवली खर्च २०% ने कमी होईल. आपल्याला अनुदान आणि पगार बिलांवर नियंत्रण ठेवावे लागेल आणि आपले कर संकलन वाढवावे लागेल. अन्यथा बिहारची अर्थव्यवस्था वाढेल, परंतु जमिनीवर कोणतीही सुधारणा दिसणार नाही.
प्रभात वृत्तसेवा पुणे – एका प्लॅटफाॅर्मवरून दुसऱ्या प्लॅटफाॅर्मवर जाण्यासाठी धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडून शाॅर्टकट मारतात. मात्र, हाच शाॅर्टकट जीवावर बेततो, मागील दहा महिन्यांत २९७ प्रवाशांना असा शाॅर्टमुळे जीव गमवावा लागला आहे. तर मागील पाच वर्षांत तब्बल जवळपास दीड हजार प्रवाशांना जीव गमवावा लागल्याची घटना दरवर्षी घडत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर आरपीएफकडून सुरक्षा वाढविण्याची आवश्यकता […] The post पुणे रेल्वे स्टेशनवर मृत्यूचा सापळा! १० महिन्यांत २९७ जणांचा जीव गेला, तर मागील पाच वर्षांत..धक्कादायक आकडेवारी समोर appeared first on Dainik Prabhat .
Pune News : रुबी हॉलजवळ हॉटेलचा स्लॅब कोसळला, अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले दोघांचे प्राण
प्रभात वृत्तसेवा पुणे – ढोले-पाटील रस्त्यावर रूबी हॉस्पिटलजवळ हाॅटेलच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना स्लॅब कोसळून दोन जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी भिंतीच्या ढिगाऱ्या खालून त्यांना बाहेर काढले. दोघे जखमी असून, उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची चर्चा दिवसभर शहरात होती.रुबी हाॅल हाॅस्पिटलशेजारी एका हाॅटेलचे नूतनीकरणाचे काम सुरू होते. भिंत पाडण्याचे […] The post Pune News : रुबी हॉलजवळ हॉटेलचा स्लॅब कोसळला, अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले दोघांचे प्राण appeared first on Dainik Prabhat .
दखल : विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे वास्तव
– प्रसाद पाटील भारतात एकाच वर्षात 14 हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव एका ताज्या माहितीने समोर आले आहे. हे वास्तव हृदय पिळवटून टाकणारे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आकडेवारीनुसार, जगभरात दरवर्षी सुमारे 8 लाख लोक आत्महत्या करून आपले जीवन संपवतात. भारतात आत्महत्येचे प्रमाण 2017 मधील प्रति लाख लोकसंख्येतील 9.9 वरून वाढून 12.4 पर्यंत पोहोचले आहे. […] The post दखल : विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे वास्तव appeared first on Dainik Prabhat .
थंडीचा कहर! पुणेकर गारठले, किमान तापमान ७.७ अंशावर; वेधशाळेचा काय आहे अंदाज?
प्रभात वृत्तसेवा पुणे – सलग दुसऱ्या दिवशी शहरासह उपनगरात थंडीचा जोर कायम होता. बहुतांश परिसरातील किमान तापमान १० अंशाच्या खाली नोंदविले गेले. तर पुढील दोन दिवस थंडीचा जोर कायम राहणार असून, दि. २२ नोव्हेंबरनंतर शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात वाढ होऊन थंडी काहीशी कमी होईल. तर ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाच्या अति हलक्या सरींची शक्यता पुणे […] The post थंडीचा कहर! पुणेकर गारठले, किमान तापमान ७.७ अंशावर; वेधशाळेचा काय आहे अंदाज? appeared first on Dainik Prabhat .
लक्षवेधी : भारतीय शेतीमालाला दिलासा
– हेमंत देसाई ट्रम्प यांच्या वाढीव करशुल्कामुळे अमेरिकेत भारतातून होणारी शेतीमालाची निर्यात घटली होती. आता वाढीव शुल्क हटवण्याच्या निर्णयामुळे भारताला अडीच ते तीन अब्ज डॉलर इतक्या मूल्याचा फायदा होऊ शकतो. देशातील कंपन्यांची तिमाही कामगिरी सरस ठरलेली आहे. त्याचबरोबर स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदार आणि परकीय गुंतवणूकदार हे भारतात जोरदार शेअर खरेदी करत आहेत. अमेरिकेशी संभाव्य व्यापार करार […] The post लक्षवेधी : भारतीय शेतीमालाला दिलासा appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील सुमारे १ लाख विद्यार्थ्यांची सत्र पूर्तता संपल्यामुळे या विद्यार्थ्यांचे पीआरएन क्रमांक ब्लॉक करून ठेवण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची एक संधी द्यावी,असा निर्णय विद्यापीठाच्या विद्यापरिषद व व्यवस्थापन परिषदेत झाला. याला पंधरा दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला तरी अद्याप त्यावर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने […] The post पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय! PRN ब्लॉक झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची एक शेवटची संधी..वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरातील खड्डेमुक्त अभियानात निकृष्टपणे केलेले काम दोन अभियंते, तसेच ठेकेदाराला चांगलेच भोवले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांनी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अमित हेरकर आणि उपअभियंता विनायक शिंदे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय हे काम करणाऱ्या जय शिवशंकर कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास १ लाख रुपयांचा दंड […] The post PMC News : आयुक्तांचा दणका! निकृष्ट खड्डे दुरुस्ती भोवली, दोन अभियंते निलंबित, ठेकेदाराला लाखोंचा दंड appeared first on Dainik Prabhat .
बिबट्याच्या दहशतीमुळे मोठा निर्णय! अहिल्यानगरच्या ६०० गावांमधील शाळांची वेळ बदलली
प्रभात वृत्तसेवा पुणे – अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी अहिल्यानगरमधील ज्या गावांमध्ये अलिकडच्या काळात बिबट्या संघर्षाची नोंद झाली आहे, त्या गावांमध्ये शाळांच्या वेळा बदलण्याचे आदेश जारी केले आहेत.अहिल्यानगरमधील ६०० गावांमधील शाळांसाठी आदेश जारी करण्यात आला असून, त्याच्या अंमलबजावणीला १८ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. याविषयी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी ही माहिती दिली. […] The post बिबट्याच्या दहशतीमुळे मोठा निर्णय! अहिल्यानगरच्या ६०० गावांमधील शाळांची वेळ बदलली appeared first on Dainik Prabhat .
Pune News : “स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचार आवश्यक,”राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिला मोलाचा सल्ला
प्रभात वृत्तसेवा पुणे – निसर्गोपचार, आयुर्वेद, पूर्वीची जीवनशैली, नैसर्गिक शेती, जीवनमूल्यांचा अंगीकार केल्यास स्वस्थ भारत बनू शकतो, असा विश्वास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला. यासाठी निसर्गोपचार वैद्यक, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही ते म्हणाले.राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे येवलेवाडीतील निसर्गग्राम येथे आठव्या निसर्गोपचार दिनी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, […] The post Pune News : “स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचार आवश्यक,” राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिला मोलाचा सल्ला appeared first on Dainik Prabhat .
Malegaon : ‘पॅनेल उभे करतोस काय?’माळेगावात शरद पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला
प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे राज्यात चर्चा सुरू असतानाच, माळेगावात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष नितीन तावरे यांना बुधवारी (दि. १९) सायंकाळी मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे माळेगावातील राजकीय वातावरण तापले आहे.मारहाणीमागे राजकीय कारणे असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.माळेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी एकूण १० अर्ज दाखल झाले […] The post Malegaon : ‘पॅनेल उभे करतोस काय?’ माळेगावात शरद पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला appeared first on Dainik Prabhat .
इंदापुरात ‘महाभारत’! भरणेंचा विकासाचा ‘मास्टरस्ट्रोक’की पाटील-गारटकरांची नवी आघाडी ठरणार वरचढ?
प्रभात वृत्तसेवा इंदापूर – इंदापूर नगरपरिषद निवडणुकीने तालुक्यातील राजकीय वातावरणाला अक्षरशः उकळी आणली आहे. यंदाची निवडणूक केवळ उमेदवारांची नसून, दोन भिन्न राजकीय शक्तींच्या वैचारिक, संघटनात्मक आणि प्रतिष्ठेच्या आमनेसामने झुंजीची बनली आहे.एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादीचा त्याग करून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजप नेते प्रवीण माने यांना एकत्र आणत ‘कृष्णा-भीमा विकास आघाडी’ […] The post इंदापुरात ‘महाभारत’! भरणेंचा विकासाचा ‘मास्टरस्ट्रोक’ की पाटील-गारटकरांची नवी आघाडी ठरणार वरचढ? appeared first on Dainik Prabhat .
सासवडमध्ये राजकीय भूकंप! नगराध्यक्षपदाचे ९ अर्ज बाद, भाजप न्यायालयात जाण्याच्या तयारीत
प्रभात वृत्तसेवा सासवड – सासवड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया मंगळवारी (ता. १८) संथगतीने सुरू झाली. ही प्रक्रिया अखेर बुधवारी रात्री उशिरापर्यंत चालु राहिली. निवडणूक निर्णय अधिकारी सतीश थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या काटेकोर छाननीत अनेक अर्जांवर आक्षेप घेतल्यामुळे मोठी उलथापालथ दिसून आली.नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या एकूण १५ अर्जांपैकी ६ अर्ज वैध, तर […] The post सासवडमध्ये राजकीय भूकंप! नगराध्यक्षपदाचे ९ अर्ज बाद, भाजप न्यायालयात जाण्याच्या तयारीत appeared first on Dainik Prabhat .
Manchar Election : मंचर राजकारण तापलं! महायुती-मविआ दोन्ही आघाड्यांमध्ये गोंधळ, बंडखोरांचे फावणार?
प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस –भाजप विरुद्ध शिवसेना, अशी लढत रंगण्याचे संकेत आहेत. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीत शरदचंद्र पवार पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांनी एकत्र येत आघाडीची घोषणा केली आहे. काँग्रेस आय पक्षाने स्वतंत्र भूमिका घेतल्याने राजकीय समीकरणे अधिकच जटील […] The post Manchar Election : मंचर राजकारण तापलं! महायुती-मविआ दोन्ही आघाड्यांमध्ये गोंधळ, बंडखोरांचे फावणार? appeared first on Dainik Prabhat .
Bhor News : पारवडीत नेमकं काय घडलं? बेपत्ता महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ
प्रभात वृत्तसेवा नसरापूर – भोर तालुक्यातील पारवडी गावातील अलका किसन लिमण या महिलेचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सकाळपासून त्या बेपत्ता असल्याने नातेवाईक व गावकरी यांनी शोधमोहीम सुरू केली होती. शोध लागल्यावर हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाला बोलावण्यात आले. खबर देणारे लहु बापुराव लिमण (वय 35) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांचे चुलत […] The post Bhor News : पारवडीत नेमकं काय घडलं? बेपत्ता महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ appeared first on Dainik Prabhat .
Indapur News : अतिक्रमण हटवण्यासाठी शेतकरी कुटुंबं रस्त्यावर, तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण
प्रभात वृत्तसेवा इंदापूर – रुई (पिंपळाचा मळा) येथील मारकड, पारेकर आणि चोरमले कुटुंबीयांनी गट क्रमांक ४१६ मधील आपल्या कायदेशीर हिश्याप्रमाणे जमीन मिळावी, तसेच अतिक्रमण तात्काळ हटवावे, या ठाम मागणीसाठी सोमवार (दि. १७) पासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरू केले आहे. महसूल विभागाकडून गेल्या काही वर्षांपासून केवळ आश्वासने मिळत असल्याने संतप्त शेतकरी शेवटचा उपाय म्हणून […] The post Indapur News : अतिक्रमण हटवण्यासाठी शेतकरी कुटुंबं रस्त्यावर, तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण appeared first on Dainik Prabhat .
Alandi News : भाविकांसाठी आनंदाची बातमी! पांडुरंगाची पालखी आज थोरल्या पादुका मंदिरात मुक्कामी
प्रभात वृत्तसेवा आळंदी – श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्यावतीने विठ्ठल महाराज वासकर यांच्या नियंत्रणाखाली पंढरपूर ते आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील वारीच्या परतीच्या प्रवासात श्रीपांडुरंगरायांचा पालखी सोहळा आज (दि. २०) रोजी श्रीज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर, वडमुखवाडी येथे मुक्कामी विसावणार आहे. ही माहिती देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी दिली. श्रीपांडुरंगरायांच्या पालखी सोहळ्याचे […] The post Alandi News : भाविकांसाठी आनंदाची बातमी! पांडुरंगाची पालखी आज थोरल्या पादुका मंदिरात मुक्कामी appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर नगरपरिषद निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. १८) झालेल्या छाननीमध्ये नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेले सर्व नऊ अर्ज वैध ठरले आहेत, तर नगरसेवकपदासाठीच्या एकूण १९३ अर्जांपैकी पाच अर्ज अवैध ठरले आहेत. यामुळे आता अर्ज माघारीच्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपद इतर मागासवर्ग प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने ही स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. आमदार माऊली […] The post Shirur election : शिरूरमध्ये महायुतीत उभी फूट! भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना स्वतंत्रपणे भिडणार, निवडणूक चुरशीची appeared first on Dainik Prabhat .
पुणे जिल्ह्यात बिबटांचा कहर! गेल्या ५ वर्षांतील धक्कादायक आकडेवारी समोर..जाणून घ्या
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – सध्या पुणे जिल्ह्यातील शिरूर, जुन्नर, खेड आणि आंबेगाव या तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून, बिबट-मानव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऊसाचे क्षेत्र मोठे असल्याने आणि पीक दोन-दोन वर्षे शेतात उभे राहत असल्याने, बिबटे या पिकांमध्येच प्रजनन करून आपला अधिवास बनवत आहेत.गेल्या पाच वर्षांत या तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात २२ नागरिकांचा आणि […] The post पुणे जिल्ह्यात बिबटांचा कहर! गेल्या ५ वर्षांतील धक्कादायक आकडेवारी समोर..जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा राहू – राहू बेट परिसरात दिवाळी पूर्वीची व आत्ताची सकाळची शैक्षणिक गुणवत्ता यात मोठा फरक दिसून येत आहे.”पदवीधर शिक्षक”च्या गोंडस नावाखाली प्रत्येक शाळेतील एक एक शिक्षक कमी करण्यात आला आहे. त्यामुळे “आधीच उल्हास,त्यात फाल्गुन मास”या म्हणी प्रमाणे फक्त दिवस भरविण्याचे काम चालू आहे. उदाहरणच घ्यावे झाले तर बेट परिसरातील टाकळी येथील सातवीपर्यंत असलेल्या […] The post Daund News : बेट परिसरात मराठी शाळांच्या गुणवत्तेचे तीन तेरा; पदवीधर सारख्या कारणाखाली शिक्षकांची संख्या रोडावली appeared first on Dainik Prabhat .
निवडणुका जाहीर होईपर्यंत नकली डरकाळ्या फोडणाऱ्या उबाठाला प्रत्यक्ष मैदान दिसू लागताच कसा घाम फुटला आहे, हे गेल्या दोन-चार दिवसांतल्या त्यांच्या प्रयत्नांतून, त्यांच्या मुखपत्रांच्या माध्यमांतून दिसू लागलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपलं पुरतं वस्त्रहरण होणार हे ओळखून त्यांनी पूर्वीच मोठ्या प्रयासाने मनसेला मनवलं आणि आपल्याबरोबर घेतलं. मनसेसोबत येताच यांनी यांच्याच बाजूने दर दोन दिवसांनी एकीची ग्वाही द्यायला सुरुवात केली. 'आम्ही एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठीच', हे पालुपद दोन-चार कार्यक्रमांत लावून त्यांनी उरल्यासुरल्या शिवसैनिकांना रोखण्याचे प्रयत्न केले. बेजान नेतृत्वामुळे हिंमत हरलेल्या शिवसैनिकांना शिवसेनेच्या उंबऱ्याआड रोखण्याचा तो प्रयत्नही फारसा यशस्वी झाला नाही. त्यामुळे, दिवाळीचं निमित्त साधून कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे देखावे करण्यात आले. कोणतीही दुरावलेली कुटुंबं एक होत असतील, तर ती चांगलीच गोष्ट आहे. पण, तुमची कुटुंबं म्हणजेच तुमचे पक्ष नव्हेत. सैनिकांच्या कुटुंबांचा विचार कोणी करायचा? संपूर्ण पक्ष म्हणजेच कुटुंब असण्याचे वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचे दिवस कधीच सरले. आता शिवसैनिकाला पोरकं करून, त्याला झिडकारून 'माझे कुटुंब हीच माझी जबाबदारी'चे दिवस सुरू झाल्याने उबाठाच्या ताकदीला इतकी उतरती कळा लागली आहे, की प्रत्येक निवडणुकीत त्यांचं अधिकाधिक वस्त्रहरण होत चाललं आहे. येत्या मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, विरार, नवी मुंबई या महामुंबईतल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी निवडणूक लढवतील असे उमेदवारही त्यांना मिळायला तयार नाहीत, अशी परिस्थिती झाल्यानंतर आता 'महाविकास आघाडी'चं कातडं पांघरून त्याआड लाज झाकण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक न लढवता 'आघाडी'त राहावं आणि 'आघाडी' म्हणूनच निवडणूक लढवावी, यासाठी विविध मार्गांनी वेगवेगळे युक्तिवाद केले जात आहेत.उबाठाची ही केविलवाणी स्थिती व्हायला जबाबदार तेच आहेत. ते आणि त्यांच्या प्रवक्त्यांची मुद्दाम वक्तव्यं. मनसेला सोबत आणण्याचं मिशन मोठ्या प्रयासाने यशस्वी केल्यानंतर जणू 'घोडं गंगेत न्हालं' या आनंदात त्यांनी आघाडीतल्या इतर पक्षांच्या दिशेने लाथा झाडायला सुरुवात केली. उबाठाच्या प्रवक्त्यांनी तर जुलै महिन्यात सातत्याने 'महाराष्ट्रात आता आघाडीची गरज राहिलेली नाही', 'मनसे आणि उबाठा सोबत असतीलच. इतरांनी आपापल्या भूमिकांचा विचार करावा' यासारखी वक्तव्यं केली होती. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी तीच वक्तव्यं लक्षात घेऊन आता महापालिका निवडणुकीसाठी 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. जुलैपासूनच्या बातम्यांची कात्रणं दाखवून त्यांनी त्यांच्या दिल्लीतल्या नेत्यांनाही त्यासाठी राजी केलं आहे. काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची भाषा सुरू केली, तेव्हा आघाडीतल्या कोणत्याच पक्षाने ती गांभीर्याने घेतली नाही. मनसेची हिंदी भाषिकांविरोधातली, अल्पसंख्याक समुदायांविरोधातली भूमिका जगजाहीर असल्याने महाराष्ट्रात मनसेला आघाडीत घेतलं, त्यांच्याबरोबर बसलो, तर बिहारच्या निवडणुकीत त्याचा फटका बसेल, या विचाराने काँग्रेसचे नेते ही विधानं करत असतील. बिहारची निवडणूक झाली की, त्यांची भाषा आपोआप बदलत जाईल, असा उबाठा आणि मनसेचा विश्वास होता. पण, तो सपशेल फसलेला दिसतो. बिहारमध्ये भुईसपाट होऊनही काँग्रेसच्या इथल्या नेत्यांचा आत्मविश्वास जराही कमी झालेला दिसत नाही! स्वतंत्र लढण्याच्या विचारांवर ते ठाम दिसताहेत. बिहारमधल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतले अन्य घटक पक्ष काँग्रेसची किंमत कमी करणार, जागा वाटपात त्यांना दुय्यम स्थान देणार. असं दुय्यम स्थान घेऊन वाटाघाटीत सहभागी होण्याऐवजी आपणच 'एकला चलो रे'चा नारा द्यावा आणि अन्य पक्षांना मनधरणी करायला लावावी; त्यातून आपलं महत्त्व वाढवून घ्यावं, असा काँग्रेसचा डाव असल्याचं काही जण मानतात. त्यामुळे, काँग्रेसच्या या भूमिकेवर अन्य सगळे पक्ष म्हणूनच मौन बाळगून आहेत. घायकुतीला आला आहे, तो फक्त उबाठा. काँग्रेसने खरोखरच असा काही निर्णय घेतला आणि तो प्रत्यक्षात आणला, तर आपल्या नव्या मतपेढीला खिंडार पडेल; आपला संसार उघड्यावर येईल, अशी भीती त्यांना सतावू लागली आहे. 'विचारसरणी', 'वारसा', 'संस्कृती' या सगळ्या बाबींवर नंतर विचार करू. भाजपला रोखण्यासाठी आधी निवडणुकीत एकत्र राहू, अशी काकुळतीची भाषा त्यामुळेच त्यांनी सुरू केली आहे.लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मुस्लीम मतं मिळवली. विधानसभा निवडणुकीवेळी 'लाडक्या बहिणीं'नी पारडं फिरवलं. आता इतक्या महिन्यांनंतर ते पूर्ण फिरलं आहे. पण म्हणतात ना, 'बुडत्याला काठीचा आधार'. ही मतं अजूनही आपल्या बाजूने आहेत, या गैरसमजात उबाठा आहे. काँग्रेस स्वतंत्र लढली, तर या मतांत विभागणी होईल, त्याचा फायदा महायुतीला; विशेषतः भाजपला मिळेल आणि उबाठाच्या ताकदीचा भोपळा फुटेल!! ते होऊ नये, यासाठी त्यांना काँग्रेस कसंही करून बरोबर हवी आहे. काँग्रेसला हे कळत नाही असं नाही. इतर वेळी नाकाने कांदे सोलणाऱ्यांचं नाक रगडायची हीच वेळ आहे, हे ओळखलेल्या काँग्रेसने त्यामुळेच 'धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांशी तडजोड करता येणार नाही' हा राग आळवायला सुरुवात केली आहे. मनसेला बरोबर घेतलं, तर लोकसभेवेळची मतं दूर जातात आणि नाही घेतलं, तर मराठी मतं दूर जातात, अशा कात्रीत सध्या उबाठा सापडला आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत त्यांचं कुठेच एक धोरण दिसत नाही. पक्ष संघटनेवर कुणाचंच नियंत्रण नाही. स्थानिक पातळीवर जो जे करेल, त्याला मैदान मोकळं आहे. पक्ष त्यांच्याच हाती, अशी अवस्था आहे. त्यामुळे, निष्ठावान शिवसैनिकांनी स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी आपलं अस्तित्व, पक्ष संघटनेची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी स्थानिक पातळीवर आपापली गणितं जुळवली आहेत. दुबळ्या नेतृत्वाला त्यांना 'मम म्हणण्या'शिवाय दुसरा पर्याय नाही. नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका निम्म्यावर आल्या, तरी ज्यांना आपल्या उमेदवारांची नक्की संख्या माहीत नाही, आपल्या पक्षाने किती ठिकाणी किती जणांबरोबर कशी युती केली आहे ते माहीत नाही, ते भारतीय जनता पक्षाच्या शिस्त आणि नियोजनबद्ध निवडणूक रणनीतीला कसं तोंड देणार?
जेजुरीत शिवशाही बसचा थरार! ब्रेक फेल झाल्याने बस थेट घरात घुसली, पण…
प्रभात वृत्तसेवा जवळार्जुन – एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचा ब्रेक फेल झाला. मात्र, तरही प्रसंगावधान राखून बसचालकाने सतर्कता बाळगल्याने मोठा अपघात टळला. ब्रेक फेल ‘शिवशाही’ बस डिव्हायडरवरून थेट समोर असलेल्या घरात घुसली. जेजुरी शहरातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावर जेजुरी बस स्थानकासमोरील तीव्र उतारावर ही घटना घडली. घराच्या भिंतीला मोठे भगदाड पडले. मात्र, घरात कोणी उपस्थित नसल्याने […] The post जेजुरीत शिवशाही बसचा थरार! ब्रेक फेल झाल्याने बस थेट घरात घुसली, पण… appeared first on Dainik Prabhat .

31 C