दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ६ डिसेंबर २०२५
पंचांगआज मिती मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष ०८.४९ नंतर आर्द्रा. योग शुभ.चंद्र राशी मिथुन.भारतीय सौर १५ मार्गशीर्ष १९४७. शनिवार दिनांक ६ डिसेंबर २०२५ मुंबईचा सूर्योदय ०६.५८ , मुंबईचा सूर्यास्त ०६.०० , मुंबईचा चंद्रोदय ०७.२७ , मुंबईचा चंद्रास्त ०८.२० राहू काळ ०९.४३ ते ११.०६. भारतरत्न डॉ. आंबेडकर महापरीनिर्वाण दिन,शुभ दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : महत्त्वाच्या कामांमध्ये गैरसमज, वादविवाद टाळणे.वृषभ : प्रगतीतील अडथळे दूर होतील. भाग्योदय होईल.मिथुन : भावंडांबरोबर असलेले मतभेद संपुष्टात येतीलकर्क : महत्त्वाचा कामासाठी योग्य व्यक्तीच्या संपर्कात यालसिंह : घेतलेल्या परिश्रमाचे अपेक्षित फळ मिळेलकन्या : प्रवासाची शक्यता.तूळ : प्रसिद्धी बरोबर उत्पन्नात वाढ.वृश्चिक : अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागेलधनू : प्रकृतीस्वास्थ्य सांभाळा.मकर : नोकरीत वरिष्ठांशी जुळवून घेणे गरजेचे ठरेलकुंभ : स्वतःसाठी मनपसंत वस्तूंची खरेदी होईल.मीन : नोकरदारांना दिलासा मिळेल
जय भीम' अशी कोणी साद घातली, तर तो 'आंबेडकरवादी' असा पूर्वी समाजाचा दृष्टिकोन होता. दलित, वंचिताच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग हा आज एका विशिष्ट समाजापुरता मर्यादित नाही, तर समतावादी विचार करणारा प्रत्येक भारतीयांचे डॉ. आंबेडकर हे प्रेरणास्थान आहेत. अभिनेत्री चिन्मयी सुमित हिने अलीकडेच एका कार्यक्रमात 'मी जय भिमवाली' आहे असे म्हटल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. संविधानाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांनी स्त्रियांसाठी केलेले विशेष कायदे आणि दिलेल्या सवलतींमुळे प्रत्येक भारतीय स्त्रियांनी स्वत:ला 'जय भिमवाली' म्हणायला हवे, असे चिन्मयी म्हणाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमी परिसरात त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंची गर्दी उसळते, त्यात सर्वच जाती-धर्मांच्या व्यक्तींचा सहभाग पाहायला िमळतो. बाबासाहेबांचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व नव्या पिढीला भुरळ घालते. समाजातील उपेक्षित, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांचे कार्य अद्वितीय असे होतेच; पण त्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांत दिलेल्या प्रचंड योगदानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आधुनिक भारताला त्यांची सर्वात मोठी देणगी म्हणजे ’भारतीय राज्यघटना.’ जगातील श्रेष्ठ घटनांमध्ये आपल्या देशाच्या घटनेचा समावेश होतो. समता, बंधुभाव आणि न्याय ही तत्त्वे आपल्या घटनेचा भक्कम पाया आहेत. भारतीय संविधानामुळे देशाला लोकशाही व्यवस्था मिळाली. समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना विकास आणि प्रगती साध्य करण्यासाठी समान संधी राज्यघटनेमुळेच मिळाली. आपल्या देशाचे अखंडत्व आणि एकता टिकून ठेवण्याच्या संदर्भात भारतीय राज्यघटनेचे फार मोठे योगदान आहे, ही गोष्ट कोणालाही नाकारता येणार नाही.डॉ. आंबेडकर हे एक श्रेष्ठ संविधानतज्ज्ञ होते. त्यांनी ६० पेक्षा जास्त देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला होता. जगातील कोणत्याही राज्यघटनेत तरतूद नसलेली कलमे, म्हणजे मूलभूत हक्काची कलम १४ ते ३२ आपल्या संविधानात समाविष्ट करण्यात आली. 'कलम ३२’ तर डॉ. आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचे हृदय म्हटलेे आहे. कारण, या कलमाद्वारे आपल्या हक्कांवर कोणीही गदा आणत असेल, तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क दिला आहे. मग ती व्यक्ती कोणत्याही धर्माची, पंथाची, जातीची असो, त्यांना समान हक्काचे जीवन बहाल केले आहे. स्त्री-पुरुषांना समान अधिकार मिळवून दिला आहे. म्हणूनच आज मुख्यमंत्री, राज्यपाल, न्यायाधीश, लोकसभाध्यक्ष, पंतप्रधान, राष्ट्रपती आदी उच्चपदावर महिलांना मान मिळतो आहे. हे केवळ संविधानामुळेच शक्य झाले आहे. आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे, असे नमूद करून डॉ. आंबेडकरांनी कायद्यापुढे सर्व नागरिक समान आहेत, असे स्पष्ट केले होते. भारतीय राज्यघटनेचेे उगमस्थान भारतीय जनताच आहे, असा उल्लेख राज्य घटना सोपविताना त्यांनी केला होता. 'एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य’ हे तत्त्वच मुळात आपल्या राजघटनेने स्वीकारलेले आहे. त्याच वेळेस काही इशारेदेखील दिले आहेत. डॉ. आंबेडकरांनी असे म्हटले होते की, 'घटना कितीही चांगली असली तरी राबवणारे लोक जर वाईट असतील, तर त्या घटनेचा उपयोग होणार नाही.' त्यामुळे भारतीय संविधानाची अंमलबजावणी जोपर्यंत प्रामाणिकपणे होणार नाही, तोपर्यंत आपण महासत्ता म्हणून जगाला मान्य होणार नाही. सामान्य माणसाच्या हाती ती सत्ता जाणार नाही. श्रीमंत व्यक्ती अधिक श्रीमंत होत राहील व कालांतराने सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिकदृष्ट्या पराकोटीची विषमता माजेल. संविधानाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होणे म्हणून अत्यंत महत्त्वाचे आहे, हे द्रष्ट्या डॉ. बाबासाहेबांनी तेव्हाच ओळखले होते. डॉ. आंबेडकरांचा हा दृष्टिकोन लक्षात घेऊनच दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला यांनी आणि नेपाळने आपली राज्यघटना लिहिताना डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा सखोल अभ्यास केला होता. भारतीय राज्यघटनेत प्राचीन भारतीय परंपरा आणि सर्वंकष परिवर्तन यांचा समतोल साधण्याचे फार अवघड काम बाबासाहेबांनी केले होते. खरंतर हे भीमधनुष्य पेलणे सोपे नव्हते. संविधानाच्या रूपाने एक राजकीय-सामाजिक क्रांतिकारी विधानच त्यांनी अस्तित्वात आणले. त्यातून भारताच्या आधुनिकीकरणाला जोरदार चालना मिळाली, हे सत्य कोणीही नाकारत नाही.भारतीय राज्यघटना ही भारतीय समाजाच्या आधुनिकीकरणाची शक्तिशाली प्रेरणा ठरावी हा प्रमुख राजकीय उद्देश डोळ्यांपुढे ठेऊन त्यांनी संविधानाची सगळी उभारणी केली. लोकशाही जीवनपद्धती आणि सामाजिक क्रांती यांच्यात एकसंधता आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्याचाच भाग म्हणून, लोकशाही, प्रातिनिधिक सरकार, व्यक्तिस्वातंत्र्य, कायद्यापुढे सर्वांची समानता या गोष्टी फार क्रांतिकारी ठरल्या. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या वैश्विक मूल्यांवर आधारित नवभारताची जडणघडण करण्याची कामगिरी त्यातूनच साकारली गेली. राष्ट्रीय एेक्य आणि एकात्मता अबाधित राखण्याचे आव्हान संविधानाने पेलले आहे. डॉ. आंबेडकर हे आधुनिक भारताच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक आहेत. देशाची प्रगती मोजण्याची फूटपट्टी काय असावी, याबाबत मत मांडताना बाबासाहेब नेहमी सांगायचे, ज्या देशात स्त्रियांची प्रगती झाली असेल, तोच देश प्रगत मानला पाहिजे. राजकारणात व पक्षसंघटनेत स्त्रियांना अग्रक्रम दिला पाहिजे याबाबत ते नेहमी आग्रही होते. आज डॉ. बाबासाहेब हे सामाजिक न्याय, ज्ञाननिर्मिती आणि लोकशाही विचारधारेचे प्रतीक बनले आहेत. डॉ. आंबेडकर हे कायदेतज्ज्ञ होते, राजकीय विचारवंत होते, जागतिक राजकीय विचारांचा आणि राजकारणाचा त्यांचा गाढा व्यासंग होता. भारतात जे लोकोत्तर पुरुष जन्मले, त्यापैकीच बाबासाहेब एक हाेते. सगळं जग आज ज्यांच्या विद्वत्तेने स्तिमित होते, जसा द्रष्टा देशाला घटनाकार म्हणून लाभला हे या देशाचे खरोखरच अहोभाग्य आहे.
मतमोजणी पुढे ढकलल्याने राजकीय वर्तुळात नाराजी
अविनाश पाठकमतमोजणी १९ दिवस पुढे ढकलली गेल्यामुळे सर्व ठिकाणच्या ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये बंद झालेल्या आहेत. आता त्या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी पहारे देत असल्याचे दिसून येत आहेत. गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्यात वादावादी झाल्याने राडे देखील झाल्याचे दिसून आले आहेत. नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख यांनी देखील या स्ट्राँग रूमच्या सुरक्षेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. मतमोजणी होईपर्यंत असे प्रकार आता होतच राहणार आहेत. मात्र आता सर्वांचे लक्ष २१ डिसेंबरकडे लागलेले दिसून येत आहे. त्यादिवशी गुलाल कुणाचा हे निश्चित होणार आहे.महाराष्ट्रात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्या. त्यात विदर्भातील ८० नगर परिषदा आणि २० नगरपंचायती यांचाही समावेश होता. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली. अर्ज भरले गेले अर्ज मागे घेण्याची तारीख उलटून सर्व उमेदवारांचे प्रचारही सुरू झाले. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह राजकीय नेत्यांची विदर्भात वर्दळ सुरू झाली. एकूणच विदर्भातील राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली होती. मात्र अचानकच मतदानाला अवघे २ दिवस उरले असताना काही ठिकाणी या प्रचाराला ब्रेक लागला. विदर्भातील ७ नगर परिषदांमध्ये निवडणुकांना निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. याशिवाय विविध नगर परिषदांमधील ५१ जागांवरील निवडणुकांना देखील स्थगिती देण्यात आली.स्थगिती मिळालेल्या नगर परिषदांमध्ये यवतमाळ, वाशिम, बाळापूर, देवळी, घुगुस, अंजनगाव सुर्जी, आणि देऊळगाव राजा यांचा समावेश होता. तर रामटेकमध्ये १ सदस्य, नरखेडमध्ये २, कोंढाळी २, कामठी २, वर्धा २, पुलगाव २, हिंगणघाट ३, वणी १, दिग्रस ३, पांढरकवडा २, गोंदिया ३, गडचांदूर १, मूल १, बल्लारपूर १,वरोरा १, रिसोड २, दर्यापूर १, अचलपूर २ वरूड १, धारणी २ गडचिरोलीतील आरमोरी १, खामगाव ४, शेगाव २, जळगाव जामोद ३ आणि भंडारा २ अशा नगर परिषदांमध्ये सदस्यांच्या निवडणुकांना देखील स्थगिती देण्यात आली. या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जशी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली, तशीच विदर्भातही सर्वत्र खळबळ उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत कोणत्या कायद्याच्या आधारे या निवडणुका स्थगित केल्या ते कळत नाही अशी शंका व्यक्त करत राज्य शासनातर्फे याबाबत निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली जाईल असेही त्यांनी जाहीर केले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांच्यासह सर्वच नेत्यांनी या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे. उर्वरित नगर परिषदांमध्ये आणि नगरपंचायतींमध्ये ठरल्याप्रमाणे २ डिसेंबरला मतदान पार पडले. काही किरकोळ घटना वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडल्याची बातमी आहे.हे मतदान शांततेत पार पडत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एका याचिकेवर सुनावणी सुरू होती. ही याचिका शकील अहमद अन्सारी, अश्विनी बुरडे आणि सचिन सुटे यांनी दाखल केली होती. राज्यातील ज्या ठिकाणच्या निवडणुका स्थगित केल्या असून त्या २० डिसेंबरला होणार आहेत, त्यांचे मतदान पार पडेपर्यंत उर्वरित निवडणुकांचे निकाल जाहीर केले जाऊ नयेत अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती.न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि रजनीश व्यास यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करत महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायती येथे होणाऱ्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी करण्यात यावी आणि त्यानंतरच निकाल जाहीर करावे असे आदेश दिले. या दरम्यान एक्झिट पोलचे निकाल देखील जाहीर करू नये असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. या निकालामुळे देखील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालाबद्दल देखील नाराजी व्यक्त केली आहे. राज्य शासनाने याबाबत सर्वोच्च न्यायालयात अपील देखील दाखल केले असून हे वार्तापत्र लिहीत असताना त्यावर सुनावणी होत असल्याची माहिती आहे. वार्तापत्र प्रसिद्ध होईल तेव्हा या प्रकरणात न्यायालयाचा काही निकालही आलेला असू शकतो. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे आता मतमोजणी १९ दिवस पुढे ढकलली गेली आहे. त्यामुळे सर्वांचेच ताबूत आता थंडावलेले दिसत आहेत. फक्त ज्या ठिकाणी मतदान होत आहे त्या ठिकाणी आता पुन्हा प्रचाराला सुरुवात झालेली दिसते आहे. या सर्व ठिकाणी उमेदवारांचा आतापर्यंत पैसा वेळ आणि मेहनत वाया गेली आहे. त्यामुळे या काळातील झालेला खर्च निवडणूक खर्चात जमा केला जाऊ नये अशी मागणीदेखील पुढे येते आहे. निवडणूक केंद्रांवर मतदान रद्द झाले होते, त्या ठिकाणच्या उमेदवारांना पूर्वी मिळालेले निवडणूक चिन्ह कायम राहणार आहे. मात्र, निवडणूक रद्द झाल्यामुळे वाढलेले निवडणूक खर्चाचे मर्यादेचे प्रस्ताव कोर्टाने नाकारले आहेत. निवडणूक प्रक्रियेत एकसंधता राहील आणि पुढे ढकललेल्या निवडणुकांच्या परिणामावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे आदर्श आचारसंहिता २० डिसेंबरपर्यंत लागू राहील, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर मोठा भार येणार आहे. ईव्हीएम आणि स्ट्राँग रूम व्यवस्था, जवळपास २८० मतमोजणी केंद्रे आणि स्ट्राँग रूम २१ डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावी लागतील. ईव्हीएम सुरक्षिततेसाठी सलग पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल. नेमके याच दरम्यान नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आहे. त्यामुळे विदर्भातील बराचसा पोलीस फौजफाटा नागपुरात व्यस्त राहणार आहे. परिणामी पोलीस यंत्रणेची चांगलीच ससेहोलपट होणार हे स्पष्ट दिसते आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी यांना दररोज स्ट्राँग रूमची पाहणी करून स्वाक्षरी करावी लागेल. या संपूर्ण प्रकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष ठेवून असलेल्या मतदारांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारांनी महिनोंमहिने केलेल्या प्रचारानंतर निकाल पुढे ढकलल्याने त्यांच्यातही नाराजीचे वातावरण आहे. या सर्व घडामोडींमुळे विदर्भात राजकीय वातावरण तापले असून २१ डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
रवींद्र तांबेभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६९ वा महापरिनिर्वाण दिन. १४ एप्रिल १८९१ रोजी जन्मलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झाले. ७ डिसेंबर १९५६ रोजी संध्याकाळी ७.५० वाजता दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आताची चैत्यभूमी) त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी पंधरा लाखांपेक्षा जास्त आंबेडकरी अनुयायी देशभरांतून अंत्ययात्रेत सामील झाले होते. दरवर्षी २५ लाखांपेक्षा जास्त आंबेडकरी अनुयायी स्वखर्चाने देश-विदेशातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर येतात. त्यामुळे चैत्यभूमी ही आंबेडकरी जनतेचे प्रेरणास्थान झाले आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय तत्त्वज्ञान म्हणजे आंबेडकरवाद म्हणून ओळखले जाते. जे देशातील समानता, लोकशाही आणि सामाजिक न्यायावर आधारित आहे. त्यांचे तत्त्वज्ञान हे समाज परिवर्तन करणारे आहे. यामध्ये देशातील जातीयता नष्ट करणे आणि त्यांचे मूलभूत अधिकार प्राप्त करून देणे होय.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समता, स्वातंत्र्य, बंधुत्त्व आणि न्याय या मूल्यांवर आधारित आहेत. मात्र अजूनही आपल्याला घटनेची मुल्ये समजली नाहीत. त्यामुळे भारतीय राज्य घटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने देशातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची वेळ आली. त्यामुळे आपल्या देशात अजूनही दलित शोषित समाजाला न्यायापासून वंचित राहावे लागत आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाचा पाया समता व न्यायावर आधारित आहे. तेव्हा राजकीय स्वातंत्र्यासाठी सामाजिक समानता असणे गरजेचे आहे. त्यांनी देशातील जातीयता व आर्थिक विषमतेविरुद्ध लढा देऊन त्यांच्या हक्कांची जाणीव करून त्यांना त्यांचे हक्क घटनेच्या माध्यमातून मिळवून दिले. मात्र त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली असती तर महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी राजकीय तत्त्वज्ञानाचा आढावा घेण्याची वेळ आली नसती. आपल्या देशात लोकशाही आहे. सामाजिक लोकशाहीपासून लोकशाहीला सुरुवात होते. समाजात समानता नसेल तर लोकशाही नांदणार कशी? कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचे कट्टर समर्थक होते. भारतीय राज्यघटनेचा विचार केल्यास त्यांनी भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार दिले आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला समानतेचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देऊन भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशातील दुर्बल घटकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून राजकीय शास्त्रज्ञ राघवेंद्र राव यांच्या मते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार हे उदारमतवादावर आधारित आहे. त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक व राजकीय बदल घडविण्याचा प्रयत्न केला.आधुनिक भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील एक प्रभावी राजकीय व्यक्तिमत्त्व होते. यांच्या मते, तुमची तुमच्या ध्येयाच्या पावित्र्यावर अटळ निष्ठा असली पाहिजे. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांची सेवा करण्यासाठी कर्तव्यपूर्ती हेतूने जे लोक आत्मप्रेरित होतात ते धन्य होत. तुमचे ध्येय उच्च, उदात्त आणि महान आहे आणि तुमचा दृष्टिकोन तेजस्वी व गौरवशाली आहे. जे आपला वेळ, बुद्धी व आपले सर्वस्व गुलामीच्या निदर्शनासाठी पणाला लावतात ते धन्य होत. जे गुलामगिरीत जखडलेल्यांना स्वतंत्र करण्यासाठी महान संकटे, हृदयविदारक मानहानी, वादळे आणि धोक्याची पर्वा न करता, जोपर्यंत पददलित जनतेला आपले मानवी अधिकार प्राप्त होत नाहीत, तो पर्यंत संघर्ष करीत राहतात. या त्यांच्या विचाराचे आजच्या महापरिनिर्वाण दिनी दादरच्या चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करावे. समाजसुधारक म्हणून त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दलित समाजाची दुरवस्था पाहून चिंता वाटत होती. त्याचा अभ्यास केल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांतिकारी विचारधारा लोकांच्या संघर्षांचे नेतृत्व करत होती.यातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक राजकीय तत्त्वज्ञानी म्हणून उदयास आले. आपल्या देशाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीचा अभ्यास करून दलित समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी अशिक्षित भारतीयांना राजकीय दडपशाही विरुद्ध प्रभावीपणे एकत्र केले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलित चळवळीतील एक महत्त्वपूर्ण राजकीय तत्त्वज्ञानी म्हणून ओळखले जातात.स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय तत्त्वज्ञान हे सामाजिक लोकशाहीचा पाया आहे. कारण राजकीय लोकशाहीचा आधार सामाजिक लोकशाहीत असल्याशिवाय टिकू शकत नाही. सामाजिक लोकशाही जीवनपद्धती समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही जीवनाची तत्त्वे त्यांनी संविधान सभेला संबोधित करताना सभागृहात स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन असून त्यांच्या लिखाणात व भाषणात तर्काची भूमिका दिसून येते. हितसंबंध कायद्याद्वारे सुरक्षित नसून समाजाच्या सामाजिक आणि नैतिक चेतनेद्वारे सुरक्षित केले जातात आणि सरकारची लोकशाही म्हणजे लोकशाही समाज म्हणजे लोकशाहीचा एक प्रकारचा समुदाय किंवा संबंधित जीवन पद्धती म्हणून त्यांचे मत होते. तसेच, सुसंस्कृत, स्वातंत्र्याचे रहस्य हे सामाजिक संबंध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक उदारमतवादी लोकशाहीवादी होते. लोकशाही तत्त्वज्ञानाचे अनन्यसाधारण योगदान सामाजिक लोकशाहीच्या कल्पनेसह समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्त्वाचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा मूलभूत आधार ओळखला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय तत्त्वज्ञानाची आपल्यापासून सुरुवात केली. आपल्या समाजासाठी वकिली करण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला. २० जुलै १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन करून समाजाच्या उन्नतीसाठी सामाजिक चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. २० मार्च १९२७ रोजी महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे यासाठी सत्याग्रह केला.२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले. २० मार्च १९३० रोजी नाशिक येथील काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली मंदिराबाहेर मोठे आंदोलन केले होते. भारतीय संस्कृतीतील त्यांच्या कार्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक प्रभावशाली विचारवंत बनले. तेव्हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनी त्यांचे राजकीय तत्त्वज्ञान समजून घेणे ही आजच्या काळाची खरीगरज आहे.
टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज
कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९ डिसेंबरला होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या टी-२० सामन्याच्या तिकिटांसाठी चाहत्यांनी बाराबती स्टेडियमबाहेर अक्षरशः जनसागर उसळवला. तिकीट खरेदीसाठी एवढी अभूतपूर्व गर्दी झाली की, परिस्थिती हाताबाहेर गेली. अखेरीस, जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना नाईलाजाने सौम्य लाठीमार करावा लागला.ओडिशा क्रिकेट असोसिएशनने गुरुवारी (४ डिसेंबर) तिकीट विक्रीची घोषाणा केली होती. त्यानुसार शुक्रवारी (५ डिसेंबर)पासून सकाळी ९ वाजता तिकीट विक्री सुरू झाली. त्यामुळे उत्सुक हजारो चाहत्यांनी ‘भारतीय संघा’ला पाहण्याच्या ओढीने शुक्रवारी पहाटे ६ वाजण्यापूर्वीच बाराबती स्टेडियमच्या गेटवर गर्दी करण्यास सुरुवात केली. रात्री रांगा लावण्यास अधिकाऱ्यांनी मनाई केली असतानाही, काउंटर उघडण्यापूर्वीच गर्दीने प्रचंड रूप धारण केले होते. सकाळी ९ वाजता तिकीट विक्री सुरू होताच, गर्दीचे व्यवस्थापन करणे अधिकाऱ्यांसाठी एक मोठे आव्हान बनले.‘एक्स’वर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, परिस्थिती अत्यंत बिघडल्याचे दिसून येते. मैदानाबाहेर जवळजवळ चेंगराचेंगरीसदृश वातावरण निर्माण झाले होते. चाहत्यांची गर्दी अनियंत्रित होताना पाहून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. अखेर, जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना सौम्य लाठीमार करावा लागला. यावरून हे स्पष्ट होते की, या मैदानावर होणाऱ्या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये किती तीव्र उत्साह आहे. बाराबती स्टेडियमवर या वर्षातील हा दुसरा आंतरराष्ट्रीय सामना आहे. यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने इंग्लंडविरुद्ध येथे एकदिवसीय सामना खेळला होता, ज्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता.दरम्यान, एकीकडे टी-२० सामन्यासाठी इतकी उत्सुकता असताना, भारतीय संघ ६ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. रांची येथे रोमांचक विजय मिळवल्यानंतर, केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चार गडी राखून दारूण पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे, विशाखापट्टणम येथे विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्यास भारतीय संघाला संघर्ष करावा लागणार आहे. २-० अशा मानहानिकारक फरकाने कसोटी मालिकेत पराभव पत्करल्यानंतर, ही एकदिवसीय मालिका जिंकणे संघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक, २०२५' सादर करून एक महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा केली आहे. या विधेयकाचा उद्देश देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि सार्वजनिक आरोग्याच्या खर्चासाठी कायमस्वरूपी निधीचा स्रोत उपलब्ध करणे आहे. या विधेयकानुसार, हा नवीन उपकर केवळ पान मसाला, गुटखा आणि अधिसूचित केलेल्या इतर हानिकारक उत्पादनांवर लावला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली. कारगिल युद्धाच्या वेळेस भारतीय सैन्याकडे शस्त्रास्त्रे आणि युद्धसामग्रीची मोठी कमतरता होती, हे अनेक सैन्य अधिकाऱ्यांनी नंतर स्पष्ट केले होते. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासून संरक्षण बजेटमध्ये सातत्याने होणाऱ्या कपातीमुळे ही परिस्थिती ओढवली होती. सैन्याकडे अधिकृतपणे मंजूर असलेल्या गरजेच्या तुलनेत केवळ ७० ते ८० टक्केच शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि उपकरणे उपलब्ध होती. यामुळे युद्धाच्या तयारीवर आणि सुरुवातीच्या टप्प्यात कारवाई करण्यावर थेट परिणाम झाला होता. ही परिस्थिती पुन्हा ओढवू नये म्हणून या कराचा पैसा देशाच्या सुरक्षेवर, सैन्याला सक्षम करण्यासाठी वापरला जाणार असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले.पान मसाल्यावर आतापर्यंत विक्री-आधारित जीएसटी आणि क्षतिपूर्ती उपकर लागत होता. मात्र, नवीन विधेयकानुसार, पान मसाला बनवणाऱ्या मशीनच्या उत्पादन क्षमतेवर आधारित मासिक उपकर लावला जाईल. उत्पादन क्षमतेवर कर लावल्यामुळे कंपन्यांना उत्पादन लपवून करचोरी करणे कठीण होईल, ज्यामुळे महसूल गळती थांबेल. पान मसाल्यावर ४०% जीएसटी (जीएसटीचा सर्वोच्च दर) आणि या नवीन उपकराची एकत्रित रक्कम पूर्वीच्या कराइतकीच राहणार आहे.
भारताकडील परकीय चलन साठा 1.8 अब्ज डॉलरने घटला
मुंबई – रिझर्व बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 28 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 1.8 अब्ज डॉलरने कमी होऊन 686.2 इतका झाला आहे. या अगोदरच्या आठवड्यातही भारताकडील परकीय चलन साठा 4.4 अब्ज डॉलरने कमी झाला होता. जगातील इतर मुख्य चलनाच्या स्वरूपात भारत आपल्याकडे परकीय चलन साठा करत असतो. संबंधित आठवड्यामध्ये या चलनाच्या विनिमय […] The post भारताकडील परकीय चलन साठा 1.8 अब्ज डॉलरने घटला appeared first on Dainik Prabhat .
Rupee falls: व्याजदर कपातीनंतर घसरला रुपया…
मुंबई – रुपयाचे मूल्य बर्याच प्रमाणात घसरूनही रिझर्व बँकेने व्याजदरात कपात केल्यानंतर शुक्रवारी रुपयाचे मूल्य कालच्या तुलनेत पाच पैशांनी कमी होऊन 89.94 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेले. रिझर्व बँकेने भांडवल सुलभता मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या उपाययोजना केल्यामुळे रुपयाच्या मूल्यात जास्त घसरण झाली नसल्याचे विश्लेषकांनी नमूद केले. सकाळी रुपयाचा भाव 20 पैशांनी वधारला होता. पतधोरण जाहीर […] The post Rupee falls: व्याजदर कपातीनंतर घसरला रुपया… appeared first on Dainik Prabhat .
गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक
मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाहीमुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी शनिवारी ते रविवारी सकाळी ००:३० ते दुपारी ४:३० पर्यंत गोरेगाव आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर चार तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लॉक कालावधीत गोरेगाव आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर धावतील. रविवारी पश्चिम रेल्वे उपनगरीय विभागात दिवसा ब्लॉक राहणार नाही. महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– कल्याण मुख्य मार्ग तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– पनवेल हार्बर मार्गासह ट्रान्स-हार्बर व पोर्ट मार्गावर मध्य रेल्वेचा साप्ताहिक मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. सर्व मार्गांवरील नियमित उपनगरी सेवा रविवारी लागू असलेल्या वेळापत्रकानुसारच चालू राहतील.
ICC Nomination : विश्वचषक विजेती नायिका शफाली वर्माला ICC प्लेयर ऑफ द मंथसाठी नामांकन!
ICC Nomination Player of the Month November 2025 : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची सदस्य असलेल्या सलामीवीर शफाली वर्माला आयसीसीच्या नोव्हेंबर महिन्याच्या ‘महिला प्लेयर ऑफ द मंथ’ साठी नामांकन मिळाले आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शफालीने नाबाद ८७ धावांची खेळी साकारली, तसेच २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेत भारताला पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकून दिला. या सामन्यात […] The post ICC Nomination : विश्वचषक विजेती नायिका शफाली वर्माला ICC प्लेयर ऑफ द मंथसाठी नामांकन! appeared first on Dainik Prabhat .
Reserve Bank cuts interest rates: दुसर्या तिमाहित विकास दर वाढून 8.2% झाला असला तरी महागाई एक टक्क्यापेक्षा कमी आहे. रुपया घसरत असल्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीने शुक्रवारी अनपेक्षितरित्या आपल्या रेपो या मुख्य व्याजदरात पाव टक्का कपात केली आहे. एवढेच नाही तर रिझर्व बँकेने आगामी काळातही परिस्थिती पूरक राहिली तर […] The post रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात पाव टक्के कपात; विकास दर वाढण्याबरोबरच महागाई कमी पातळीवर राहण्याचा अंदाज appeared first on Dainik Prabhat .
Vladimir Putin In India : भारत आणि रशिया यांच्यात फार पूर्वीपासून अनेक आघाड्यांवर सौहार्दपूर्ण संबंध राहिले आहेत. पंतप्रधान मोदींनी भारताचे हे परराष्ट्र धोरण कायम राखले. हे नाते फक्त ऐतिहासिक नव्हे, गेल्या काही वर्षांत अधिक मजबूत आणि आधुनिक झाले आहे. आता दोन्ही देशांनी उच्च-तंत्रज्ञान, अवकाश क्षेत्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नव्या पिढीच्या तंत्रज्ञानांमध्ये सहकार्य वाढवले आहे. ही […] The post “ही भागीदारी खऱ्या प्रगतीचे प्रतीक”; व्लादिमीर पुतिन यांचे प्रतिपादन, दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करार ! appeared first on Dainik Prabhat .
बहरीन: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या धाकट्या मुलाचा, जय पवार यांचा विवाह सोहळा सध्या बहरीनमध्ये शाही पद्धतीने पार पडत आहे. या शाही सोहळ्यात अजित पवारांचा ‘झिंगाट’ गाण्यावरील ठेका सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. बहरीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या लग्नसोहळ्याच्या वरातीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या लेकाच्या आनंदात सहभागी होत डान्स […] The post Jay Pawar wedding: अजित पवारांनी मुलाच्या लग्नासाठी बहरीन का निवडलं? उपमुख्यमंत्र्या ‘झिंगाट’ डान्स, लग्नाचे फोटो व्हायरल… appeared first on Dainik Prabhat .
IndiGo Crisis : इंडिगोच्या संकटामुळे BCCI ची धावपळ; SMAT चे नॉकआऊट सामने इंदूरहून पुण्यात हलवले!
Indigo Flights Cancellation BCCI to Shift SMAT 2025 : विमान कंपनी इंडिगोमधील कर्मचारी संकटाचा आणि विमानसेवा रद्द होण्याच्या वाढत्या घटनांचा परिणाम आता थेट बीसीसीआयच्या कामकाजावरही दिसू लागला आहे. या इंडिगो संकटामुळे बीसीसीआयला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-२० स्पर्धेच्या नॉकआऊट फेरीच्या सामन्यांचे ठिकाण तातडीने बदलावे लागले आहे. इंदूरमध्ये १२ ते १८ डिसेंबर या कालावधीत होणारे हे […] The post IndiGo Crisis : इंडिगोच्या संकटामुळे BCCI ची धावपळ; SMAT चे नॉकआऊट सामने इंदूरहून पुण्यात हलवले! appeared first on Dainik Prabhat .
Sunil Narine : केकेआरसाठी IPL 2026 मध्ये ‘हा’खेळाडू ठरु शकतो एक्स फॅक्टर ; सुनील नरेनचा दावा
Sunil Narine backs Umran Malik as KKR’s new X-factor : कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार फिरकीपटू सुनील नरेनने आगामी आयपीएल हंगामाबद्दल मोठे विधान केले आहे. आंद्रे रसेलने निवृत्ती घेतल्यामुळे मैदानावरील त्याची पॉवर हिटिंगची उणीव संघाला निश्चितच जाणवेल, पण उमरान मलिक त्याच्या १५० किमी प्रतितास वेगाच्या गोलंदाजीमुळे संघासाठी ‘एक्स फॅक्टर’ ठरू शकतो, असे मत नरेनने व्यक्त केले […] The post Sunil Narine : केकेआरसाठी IPL 2026 मध्ये ‘हा’ खेळाडू ठरु शकतो एक्स फॅक्टर ; सुनील नरेनचा दावा appeared first on Dainik Prabhat .
‘मंदिराचा पैसा देवाचा, बँका वाचवण्यासाठी नाही’; सुप्रीम कोर्टने सुनावले सहकारी बँकांना सुनावले
नवी दिल्ली – मंदिराला दान मिळालेले पैसे हे देवाचे असतात आणि त्यांचा वापर सहकारी बँकेला वाचवण्यासाठी किंवा समृद्ध करण्यासाठी केला जाऊ शकत नाही अशी टिप्पणी एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केली. केरळ उच्च न्यायालयाने थिरुनेली मंदिर देवस्वोमला त्यांच्या ठेवी परत करण्याचे आदेश दोन सहकारी बँकांना दिले आहेत. त्याला आव्हान देणाऱ्या बँकांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सरन्यायाधीश […] The post ‘मंदिराचा पैसा देवाचा, बँका वाचवण्यासाठी नाही’; सुप्रीम कोर्टने सुनावले सहकारी बँकांना सुनावले appeared first on Dainik Prabhat .
डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू
डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत. माहिती मिळताच अनेक जण घटनास्थळी पक्ष्यांना पाहण्यासाठी गोळा होऊ लागले. परिसरातील रस्ता आणि झाडाझुडपांमध्ये मेलेल्या पक्ष्यांचा खच आहे. इतक्या मोठ्या संख्येने तेही एकाच ठिकाणी मृत पक्षी आढळल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पोलिस तसेच वनविभागाला ही माहिती मिळताच अधिकारी, कर्मचारी आणि पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने सर्व मृत पक्ष्यांना ताब्यात घेत पंचनामा केला. सर्व पक्षी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या पक्षांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. काही नागरिकांना रस्त्याच्या दुतर्फा काही मृत पक्षी पडलेले आढळले. अशाचप्रकारे अन्य ठिकाणीही पक्षी मृतावस्थेत पडल्याच्या बातम्या स्थानिकांमध्ये पसरल्या. एकाला माहिती मिळताच अन्य लोकही लगेच त्यांच्या कुटुंबियांना ही बातमी सांगू लागले. हे मृत्यू नैसर्गिक आहेत का या पक्ष्यांवर कुठल्या रोगाचा फैलाव झाला आहे की विषबाधा याची चाचपणी केली जाईल. कोणी हेतूपुरस्सर त्यांना विषारी पदार्थ दिला का ? ही शक्यता तपासण्यात येत आहेत. या प्रकरणाचा तपास ठाणे उपवनसंरक्षक सचिन रेपाले, ठाणे वन्यजीव अधिकारी सोनल वळवी आणि इतर अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वन विभागाने घटनास्थळ आणि आसपासच्या परिसराची तपासणी केली असून माती, अन्नाचे नमुने तसेच पक्ष्यांचे ऊतक नमुने गोळा करण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.
'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट
नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस स्टँडसारखी झाली असून, प्रवाशांची मोठी गर्दी विमानतळावर पाहायला मिळत आहे. इंडिगाने पत्रक जारी करत प्रवाशांची माफी देखील मागितली. मात्र, अचानक विमानसेवा खंडीत झाल्याने पुणे, मुंबई, कोलकाता, दिल्ली, बंगळुरू येथील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या विमातळावरुन दुसरीकडे मार्गस्थ होणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यातच, पुण्याहून मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर गगनाला भिडल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे ते मुंबई विमान प्रवास करण्यासाठी तब्बल ६१ हजार रुपये प्रवाशांना मोजावे लागले. या वाढीनुसार, पुणे ते दिल्ली विमानाचे तिकीट २७ हजार आणि पुण्याहून बंगळुरूसाठी ४९ हजार रुपये प्रवाशांना मोजावे लागले.दरम्यान, मुंबईहून लंडनला जाण्यासाठी किमान प्रिमियम इकॉनॉमीचे तिकीट ५० हजार ते ७० हजार रुपयांपर्यंत आहेत. तर, मुंबईहून थायलंडसाठी १५ ते ३० हजार रुपयांपर्यंत विमान भाडे आकारले जाते. मात्र, इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेमुळे पुणे ते मुंबई विमानाचे तिकीट चक्क ६१ हजार रुपयांपर्यंत पोहोचले.सलग चौथ्या दिवशी इंडिगो कंपनीला ऑपरेशनल समस्यांशी गंभीरपणे झुंजावे लागत असून प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत आहे. विमान उड्डाणाची संख्या कमी झाल्यामुळे इतर विमान कंपन्यांची तिकिटे मात्र चौपट दराने विकली जात आहेत. देशभरातून इंडिगोची तब्बल ६०० हून अधिक विमाने शुक्रवारी रद्द करण्यात आली आहेत. त्यामध्ये राजधानी दिल्लीतून आज रात्री ११.५९ वाजेपर्यंत इंडिगोचे एकही विमान उड्डाण होणार नाही, असे निवेदन कंपनीने जारी केले.दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांना घालून दिलेल्या नवीन नियमांमुळे इंडिगो या देशातील सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीला मोठा फटका बसला आहे. या कंपनीची वाहतूक सेवा पूर्णपणे कोलमडून पडली. नवीन ‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन’च्या (एफडीटीएल) नियमांमुळे कर्मचाऱ्यांची (क्रू) कमतरता निर्माण झाली आहे. मात्र, आता डीजीसीएने एफडीटीएलशी संबंधित सर्व निर्देश मागे घेतले. त्यामुळे आता इंडिगोसह देशभरातील विमान वाहतूक कंपन्यांची सेवा सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Anil Ambani: अनिल अंबानींच्या रिलायन्सवर ईडीची पुन्हा कारवाई, 1120 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
मुंबई: उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स ग्रुपभोवती ईडीचा फास अधिकाधिक आवळत चालला आहे. येस बँक आणि ग्रुप कंपन्यांशी संबंधित कथित फसवणूक प्रकरणात ईडीने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत 1,120 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या 18 मालमत्ता जप्त केल्या आहेत. या ताज्या कारवाईमुळे अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या आहेत. यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांसह आतापर्यंत 10,117 कोटी […] The post Anil Ambani: अनिल अंबानींच्या रिलायन्सवर ईडीची पुन्हा कारवाई, 1120 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त appeared first on Dainik Prabhat .
Indigo Flight Crisis: इंडिगोची परिस्थिती कधी सुधारेल? सीईओंचे निवेदन
Indigo Flight Crisis: इंडिगो एअरलाइन (Indigo Airline) गेल्या आठवड्यापासून मोठ्या ऑपरेशनल (Operational) संकटाचा सामना करत आहे. तांत्रिक बिघाड, कर्मचाऱ्यांची (Crew) कमतरता आणि नवीन FDT (Flight Duty Time) नियमांमुळे देशभरात शेकडो विमाने रद्द (Cancelled) होत आहेत किंवा उशिराने धावत (Delayed) आहेत. प्रवाशांना होणाऱ्या त्रासामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पीटर एल्बर्स (Pieter Elbers) यांनी जाहीरपणे माफी […] The post Indigo Flight Crisis: इंडिगोची परिस्थिती कधी सुधारेल? सीईओंचे निवेदन appeared first on Dainik Prabhat .
बिग बॉस १९ स्पर्धकांना दाखवली ट्रॉफीची पहिली झलक, टॉप ५ स्पर्धकांचे डोळे दिपले
मुंबई : बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना घरातील पाच फायनलिस्ट निश्चित झाले आहेत. बिग बॉसने या सीझनच्या ट्रॉफीची पहिली झलक दाखवून घरातील स्पर्धकांना रोमांचित केले. यंदाची ट्रॉफी विशेष आहे कारण तिचा लूक अगदी तसा आहे जसा सलमान खान शोच्या प्रोमोमध्ये पोज देताना दिसतो.पाच फायनलिस्ट जाहीरफायनल फेरीसाठी निवडले गेलेले पाच स्पर्धक आहेत गौरव खन्ना, अमल मलिक, तान्या मित्तल, फरहाना आणि प्रणित मोरे. मालतीची शोमधून एक्झिट झाली. असेम्बली रूममध्ये बिग बॉसने यंदाच्या सीझनच्या ट्रॉफीचं अनावरण केलं. दोन हात जोडलेल्या डिझाइनमधील ही खास ट्रॉफी पाहताच स्पर्धकांना आनंद गगनात मावेनासा झाला.बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले ७ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. यात विजेत्याला मिळणार आहे एक सोनेरी स्वप्नांची ट्रॉफी.. खास डिझाईन केलेली आणि विजेत्यांना अविस्मरणीय ठरेल अशी ही ट्रॉफी आहे. ही ट्रॉफी एक खास प्रतीक आहे. यंदाच्या सीझनची थीम घरवालों की सरकार अशी आहे. ट्रॉफीचा वरचा भाग दोन हातांच्या आकाराचा आहे जो बोटांनी एकत्र जोडलेला आहे. ही ट्रॉफी आहे सिल्व्हर क्रॉस हातांची आणि हिऱ्यांनी मढवलेली आहे. त्यामुळे ती चमकदार दिसतेय. याच हातांच्या खाली BB हा लोगो आहे. ही आकर्षक अशी ट्रॉफी घराच्या आकारासारखी आहे. महत्त्वाचं म्हणजे ही ट्रॉफी सलमान खान ज्याप्रमाणे हात जोडतो त्या प्रतिमेशी मिळतीजुळती आहे.आता लक्ष सात डिसेंबरच्या रात्रीकडे...रात्री नऊ वाजता बिग बॉसचा लाईव्ह फिनालेचा महाप्रसंग रंगणार आहे. त्यातच या आकर्षक ट्रॉफीवर नाव कोण कोरणा र? स्टारडम कोणाच्या वाट्याला येणार? बस... काही तास शिल्लक आहेत...आणि त्यानंतर ठरणार आहे बिग बॉस सीझन १९ चा खरा बॉस...
वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध
मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही. वरळीतील एका खासगी हॉटेलमध्ये भाजपप्रणित युनियनचा फलक लावण्यावरून शिउबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी राडा घातला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.वरळीतील हॉटेल सेंट रेजिसमध्ये भाजपने आपली कामगार संघटना स्थापन केली असून, त्याबाबतचा फलक लावण्याचे काम शुक्रवारी सुरू होते. मात्र, शिउबाठाच्या कार्यकर्त्यांना दादागिरी करीत, फलक लावण्यास विरोध केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही त्याला जशासतसे उत्तर दिल्यामुळे हॉटेलच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करावा लागला.याविषयी माहिती देताना स्थानिक पदाधिकारी समीर कदम म्हणाले, “आमच्या युनियनचा बोर्ड लावण्याकरिता आम्ही तेथे जमलो होतो. कामगारांचा युनियनशी चांगला संपर्क राहील आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी आम्हालाही आवाज उठवता येईल, हा त्यामागचा हेतू होता. मात्र, शिउबाठाच्या काही कार्यकर्त्यांनी उगाच गोंधळ घालायला सुरवात केली. भाजपने कोणतीही संघर्षाची भूमिका घेतलेली नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. याविषयी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, “सगळ्यांना कामगार युनियनमध्ये त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे काम करण्याचा पूर्ण हक्क आहे. संविधानानुसार सगळ्यांना मनाप्रमाणे काम करू द्यावे”, असे त्यांनी स्पष्ट केले.
Nashik Tapovan News । Sayaji Shinde – प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे नाशिकच्या तपोवनात आले असता त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली असून ‘निवडून दिले म्हणजे सगळे अधिकार तुमच्याकडे आहेत असे नाही. सर्वसामान्य माणसाचा विचार केला पाहिजे. मोठी झाडे तोडायची आणि नवीन झाडं लावायची हे चूक आहे. काही माणसे मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचे, […] The post Nashik Tapovan News : “हे म्हणजे, माणसं मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचे…”; वृक्षतोडीवरून सयाजी शिंदे पुन्हा भडकले appeared first on Dainik Prabhat .
सातारा: उसाच्या ट्रॉलीचा डाबर तूटला; ट्रॅक्टर थेट पुलावर लोंबकळला…
कराड – ओंड ते उंडाळे यादरम्यान असलेल्या तुळसण पुलावर शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. अचानक पाठीमागील ट्रॉलीचा डाबर तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वेगात असलेला ट्रॅक्टर सरळ पुलाच्या कठड्यावर जाऊन अडकला. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शेवाळेवाडी- म्हासोली येथील अथणी- रयत कारखान्याकडे ऊस घेऊन […] The post सातारा: उसाच्या ट्रॉलीचा डाबर तूटला; ट्रॅक्टर थेट पुलावर लोंबकळला… appeared first on Dainik Prabhat .
Vaibhav Suryavanshi : नाद करा पण वैभवचा कुठं! विराट-रोहितलाही मागे टाकत ठरला २०२५ चा ‘गूगल किंग’
Vaibhav Suryavanshi Trend in Google Search in 2025 : भारतीय क्रिकेटमधील युवा स्टार वैभव सूर्यवंशीने एक खास विक्रम आपल्या नावावर करत २०२५ मध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मासह सर्व दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. २०२५ हे वर्ष वैभवच्या कारकिर्दीसाठी अत्यंत यशस्वी ठरले, ज्यात त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि त्याने शतकी खेळी देखील साकारली. […] The post Vaibhav Suryavanshi : नाद करा पण वैभवचा कुठं! विराट-रोहितलाही मागे टाकत ठरला २०२५ चा ‘गूगल किंग’ appeared first on Dainik Prabhat .
Vladimir putin | Narendra modi | Akhilesh Yadav – समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पुतिन यांच्या भारत भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रशियन अध्यक्ष तुम्हाला मदत करण्यासाठी नाही तर व्यवसाय करण्यासाठी आले आहेत. रशिया आणि चीनमधील संबंध खूप मजबूत आहेत असे अखिलेश यांनी म्हटले आहे. आज डॉलर कुठे पोहोचला आहे? टेरिफ लादण्यात आले […] The post Vladimir Putin In India : “पुतिन तुम्हाला मदत करण्यासाठी नाही तर…”; अखिलेश यांनी मोदी सरकारला केले लक्ष्य appeared first on Dainik Prabhat .
ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग! भाजप अन् अजित पवार गटाला धक्का; संभाजीनगरमधील राजकीय समीकरणे बदलणार?
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात प्रक्षप्रवेशाची राजकीय घडामोड समोर आली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने धक्का दिला आहे. केवळ राष्ट्रवादीचेच नव्हे, तर भारतीय जनता पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनीही ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील राजकीय समीकरणे बदलणार का, असा प्रश्न […] The post ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग! भाजप अन् अजित पवार गटाला धक्का; संभाजीनगरमधील राजकीय समीकरणे बदलणार? appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३ व्या शिखर परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. पुतिन आणि मोदी यांच्यात हैदराबाद हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी हशतवादापासून ते युक्रेनमधील शांततेपर्यंतच्या मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी रशियाच्या नागरिकांना तीस दिवसांचा विनामूल्य पर्यटन व्हिसा देणार असल्याचेही जाहीर केले. ई टुरिस्ट व्हिसा आणि ग्रुप टुरिस्ट व्हिसा अशा दोन प्रकारात रशियाच्या नागरिकांना तीस दिवसांचा विनामूल्य पर्यटन व्हिसा मिळेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. रशिया भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी सहकार्य करत असल्याची माहिती मोदींनी दिली.मोदींनी सांगितलेले सात महत्त्वाचे मुद्दे भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण. पुतिन यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या मैत्रीत सातत्य राहिले आणि विश्वासार्हता वृद्धिंगत झाली. जगाने अनेकच-उतार बघितले पण भारत आणि रशियाची मैत्री ध्रुव ताऱ्यासारखी राहिली. भारत-रशिया दरम्यान २०३० पर्यंतच्या आर्थिक सहकार्यासाठी विशेष करार पुतिन आणि मोदी इंडिया रशिया बिझनेस फोरमला मार्गदर्शन करणार अलीकडेच दोन नवीन रशियन-भारतीय वाणिज्य दूतावास उघडण्यात आले आहेत, यामुळे तुमची जवळीक वाढेल. या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाखो यात्रेकरूंनी काल्मिकियामध्ये भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांना भेट दिली. आता भारत रशियाच्या नागरिकांना तीस दिवसांचा विनामूल्य पर्यटन व्हिसा देणार. ई टुरिस्ट व्हिसा आणि ग्रुप टुरिस्ट व्हिसा अशा दोन प्रकारात रशियाच्या नागरिकांना तीस दिवसांचा विनामूल्य पर्यटन व्हिसा मिळेल. भारताने सुरुवातीपासूनच युक्रेन मुद्द्यावर शांततेचा पुरस्कार केला आहे. या प्रकरणाच्या शांततापूर्ण आणि कायमस्वरूपी तोडग्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशियाने सहकार्य केले आहे. पहलगाम असो किंवा क्रोकस सिटी हॉलवरील हल्ला असो, या सर्वांचे मूळ एकच आहे. दहशतवाद हा मानवतेच्या मूल्यांवर थेट हल्ला आहे आणि यामध्ये जागतिक एकता ही आपली ताकद आहे.पुतिननी सांगितलेले सात महत्त्वाचे मुद्दे रशिया आणि भारत यांच्यातील परस्पर संबंध खूप मजबूत आहेत. विविध क्षेत्रात एकमेकांना पुरेपूर सहकार्य सुरू आहे. ट्रेन, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढीसाठी चर्चा सुरू आहे तेल आणि वायू क्षेत्रात रशिया आणि भारत एकमेकांना गरज ओळखून सहकार्य करत आहे रशियामध्ये भारतीय चित्रपट खूप लोकप्रिय आहेत. रुपयाच्या वापराची व्याप्ती देखील वाढली आहे. ब्रिक्स देशांसोबतचे भारत आणि रशियाचे सहकार्य सर्वांना पूरक आणि विकासाला चालना देणारे असे आहे.व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्राधान्याने सहकार्य वाढत आहे. रशिया भारताला देशातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी सहकार्य करत आहे. आतापर्यंत तीन अणुभट्ट्या ऊर्जा जाळ्याशी जोडल्या आहेत. आणखी चार भट्ट्यांचे काम सुरू आहे. या अणुभट्ट्यांमुळे भारताच्या औद्योगिक क्षेत्राला तसेच नागरी वस्त्यांना स्वच्छ ऊर्जा मिळेल. रशिया आणि भारत ब्रिक्स, एससीओ आणि इतर आंतरराष्ट्रीय मंचांवर इतर देशांमधील समान विचारसरणीच्या देशांसह स्वतंत्र आणि स्वावलंबी परराष्ट्र धोरण राबवत आहेत... आम्ही संयुक्त राष्ट्रांमध्ये समाविष्ट असलेल्या कायद्याच्या राज्याच्या मुख्य तत्त्वाचे रक्षण करत आहोत.भारत आणि रशिया यांच्यातील महत्त्वाचे सहकार्य करार भारत आणि रशिया यांच्यात कामगार सहकार्य करार भारत आणि रशियातील नागरिकांच्या एकमेकांच्या देशात होणाऱ्या स्थलांतरातून निर्माण होणारे प्रश्न हाताळण्यासाठीचा करार भारत आणि रशिया यांच्यात आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि विज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी करार अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि अन्न सुरक्षिततेच्या क्षेत्रात ग्राहक हक्क संरक्षण आणि मानवी कल्याणावरील देखरेखीसाठी भारत आणि रशिया दरम्यान सहकार्य करार ध्रुवीय पाण्यात कार्यरत जहाजांवरील तज्ज्ञांच्या प्रशिक्षणासाठी करार खतांसाठी भारत आणि रशियाचा सहकार्य करार मालवाहतूक आणि आयात - निर्यातीवरील करांसाठी भारत आणि रशियाच्या संबंधित कर वसुली विभागांचा सहकार्य करार भारत आणि रशियात टपाल आणि दूरसंचार क्षेत्रात सहकार्य करार डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, पुणे आणि फेडरल स्टेट ऑटोनॉमस एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ऑफ हायर एज्युकेशन नॅशनल टॉम्स्क स्टेट युनिव्हर्सिटी यांच्यात वैज्ञानिक आणि शैक्षणिक सहकार्याचा करार मुंबई विद्यापीठ, लोमोनोसोव्ह मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी आणि जॉइंट-स्टॉक कंपनी मॅनेजमेंट कंपनी ऑफ रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांच्यात सहकार्याबाबत टॉम्स्क करार प्रसार भारती, भारत आणि जॉइंट स्टॉक कंपनी गॅझप्रॉम-मीडिया होल्डिंग, रशियन फेडरेशन यांच्यातील प्रसारणावर सहकार्य आणि सहकार्यासाठी सामंजस्य करार. प्रसार भारती, भारत आणि नॅशनल मीडिया ग्रुप, रशिया यांच्यातील प्रसारणावर सहकार्य आणि सहकार्यासाठी सामंजस्य करार प्रसार भारती, भारत आणि बिग एशिया मीडिया ग्रुप यांच्यातील प्रसारणावर सहकार्य आणि सहकार्यासाठी सामंजस्य करार प्रसार भारती, भारत आणि एएनओ टीव्ही-नोवोस्ती यांच्यातील प्रसारणावर सहकार्य आणि सहकार्यासाठी सामंजस्य कराराची परिशिष्ट टीव्ही ब्रिक्स संयुक्त स्टॉक कंपनी आणि प्रसार भारती (पीबी) यांच्यातील सामंजस्य करार भारताच्या धोरणात्मक क्षेत्रांच्या विकासासाठी कार्यक्रम - रशिया २०३० पर्यंत आर्थिक सहकार्याची रशियन बाजूने आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (आयबीसीए) मध्ये सामील होण्यासाठी फ्रेमवर्क करार स्वीकारण्याचा निर्णय राष्ट्रीय हस्तकला संग्रहालय आणि हस्तकला अकादमी (नवी दिल्ली, भारत) आणि त्सारित्सिनो राज्य ऐतिहासिक, वास्तुकला, कला आणि लँडस्केप संग्रहालय-रिझर्व्ह (मॉस्को, रशिया) यांच्यातील इंडिया. फॅब्रिक ऑफ टाइम या प्रदर्शनासाठी करार रशियन नागरिकांना परस्पर आधारावर ३० दिवसांचा ई-टूरिस्ट व्हिसा मोफत देणे आणि रशियन नागरिकांना मोफत समूह पर्यटक व्हिसा देणे
इंडिगो एअरलाइन्सच्या दर 10 पैकी 9 विमानांना उशीर होत आहे किंवा ती रद्द झाली आहेत. गेल्या 72 तासांत 1200 हून अधिक विमानांवर परिणाम झाला आहे आणि लाखो प्रवासी त्रस्त आहेत. इंडिगोचे म्हणणे आहे की, 'फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन'च्या (Flight Duty Time Limitation) नवीन नियमांची अंमलबजावणी करताना इतकी मोठी अव्यवस्था निर्माण झाली. सध्या, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत नियमांमध्ये तात्पुरती सूट दिली आहे, परंतु परिस्थिती सामान्य होण्यास वेळ लागेल. हजारो विमानांच्या थांबण्यामागचे खरे कारण काय आहे, समस्येची सुरुवात कशी झाली, इंडिगोवरच सर्वाधिक परिणाम का झाला, नियमांमध्ये सूट का द्यावी लागली आणि आता पुढे काय होईल; दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घ्या 6 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे... प्रश्न-1: गेल्या 2-3 दिवसांत असे काय घडले की देशभरातील हजारो विमाने थांबली? उत्तरः खरं तर, पायलट युनियनने जास्त कामाचे तास आणि थकवा यामुळे जानेवारी 2024 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर, DGCA ने फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांमध्ये बदल केले. पायलटला आराम देण्यासाठी 1 जुलै 2025 रोजी 'फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL)' चे नियम लागू करण्यात आले होते. यानुसार, एअरलाइन कंपन्यांसाठी पायलटना आठवड्यातून 36 तासांऐवजी 48 तास आराम, म्हणजेच दोन दिवसांची साप्ताहिक सुट्टी देणे बंधनकारक केले होते. या काळात कोणतीही सुट्टी साप्ताहिक सुट्टी म्हणून मोजण्यावर बंदी घालण्यात आली होती. FDTL च्या दुसऱ्या टप्प्यात, 1 नोव्हेंबरपासून नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) पायलट आणि इतर क्रू मेंबर्सच्या सलग रात्रीच्या शिफ्टवरही बंदी घातली होती. या नवीन नियमांमुळे इंडिगो पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करू शकले नाही आणि गेल्या 4 दिवसांत इंडिगोने 1200 हून अधिक उड्डाणे रद्द केली... DGCA ने म्हटले आहे की, FDTL फेज 2 च्या नियोजनातील कमतरतेमुळे क्रूची कमतरता निर्माण झाली आहे. इंडिगो काही ना काही कारणे देत राहिली. जेव्हा एक हजारहून अधिक विमानांची उड्डाणे रद्द झाली, तेव्हा इंडिगोने अखेर आपली चूक मान्य करत प्रवाशांची माफी मागितली आहे. प्रश्न-2: इंडिगो उपायांच्या ऐवजी सतत कारणे का देत राहिले? उत्तर: 2 डिसेंबर रोजी विमान रद्द झाल्यापासून इंडिगोने अनेक वेळा अधिकृत निवेदन जारी करून याची वेगवेगळी कारणे सांगितली, परंतु स्पष्टपणे हे सांगितले नाही की नवीन नियमांनुसार पायलट आणि क्रूला अधिक आराम देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही… इंडिगोने कबूल केले की, क्रूची आवश्यकता अंदाजित प्रमाणापेक्षा जास्त होती. इंडिगोने सांगितले की, नवीन क्रू रोस्टरिंग नियम आणि इतर तांत्रिक कारणे, हवामान इत्यादींच्या एकत्रित परिणामामुळे त्यांच्या विमानांवर परिणाम झाला. अहवालानुसार, इंडिगोला नवीन पायलट आणि इतर कर्मचारी नियुक्त करण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता, परंतु इंडिगोने गरजेनुसार नवीन भरती केली नाही. इंडिगोने एक लांब नोट लिहून प्रवाशांची माफी मागितली आहे आणि लवकरच सेवा पूर्ववत करण्याची ग्वाही दिली आहे. प्रश्न-3: पायलट-क्रूच्या विश्रांतीचा संपूर्ण नियम काय आहे? उत्तर: FDTL च्या नियमांनुसार… एअरलाईन्सना दरमहा थकवा-धोका अहवाल सादर करावा लागेल. असे न केल्यास 1 कोटी रुपयांपर्यंत दंड लागू शकतो. प्रश्न-4: सरकारने हे नियम का बनवले आणि त्यांची अंमलबजावणी करणे का आवश्यक होते? उत्तरः DGCA ने वैमानिकांच्या थकव्याशी संबंधित अहवालांचे पुनरावलोकन केल्यानंतर हे नियम लागू केले आहेत. गेल्या 3-4 वर्षांत वेळोवेळी अनेक वैमानिक संघटनांनी DGCA ला पत्र लिहून या नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती, जेणेकरून वैमानिकांना आवश्यक विश्रांती मिळू शकेल. दिल्ली उच्च न्यायालयात 2019 पासून सुरू असलेल्या या याचिकांनंतर DGCA ने हे नियम बनवले आहेत. DGCA चे म्हणणे आहे की, वैमानिकांचा थकवा मोठ्या अपघातांना जन्म देऊ शकतो. जगभरातील एअरलाईन्सही याला एक मोठा धोका मानतात. थकव्यामुळे खराब परिस्थितीत निर्णय घेण्याची आणि रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याची क्षमताही प्रभावित होऊ शकते. इकोनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, DGCA ने 2023 मध्ये 1,622 व्यावसायिक वैमानिकांना परवाने जारी करण्याची घोषणा केली होती, परंतु तरीही पुढील 5 वर्षांत 2,375 वैमानिकांची कमतरता राहील. 2029 पर्यंत एकूण 22,400 वैमानिकांची गरज असेल, तर सध्या फक्त 11,745 वैमानिक आहेत. 2022 ते 2025 दरम्यान उड्डाणे वाढल्यामुळे वैमानिकांवर, विशेषतः कॅप्टनवर कामाचा ताण वाढला आहे. भारतातील वैमानिक प्रशिक्षण संस्थांची क्षमताही कमी आहे. दरवर्षी फक्त 1200-1500 वैमानिकांनाच प्रशिक्षणानंतर परवाना मिळू शकतो. तर गरज यापेक्षा खूप जास्त आहे. प्रश्न-5: अमेरिका आणि यूकेमध्ये वैमानिकांना किती विश्रांती मिळते? उत्तरः अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FFA) आणि युरोपच्या युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (EASA) ने वैमानिकांना आवश्यक विश्रांती देण्यासाठी असेच काही नियम बनवले आहेत, जे अमेरिका आणि युरोपातील जवळपास सर्व एअरलाईन्सना लागू होतात… प्रश्न-6: नवीन नियमांमुळे सर्वाधिक इंडिगोलाच का फटका बसला? उत्तरः नवीन नियमांमुळे इंडिगो सर्वाधिक प्रभावित झाली आहे, कारण भारताच्या एअरलाइन्स मार्केटमध्ये तिचा सर्वाधिक 60% वाटा आहे. एअरलाइन दिवसभरात सुमारे 2,300 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवते. ही संख्या एअर इंडियाच्या एका दिवसात चालवल्या जाणाऱ्या उड्डाणांच्या जवळपास दुप्पट आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर जर 10–20 टक्के उड्डाणे देखील उशिराने धावली किंवा रद्द झाली, तर याचा अर्थ 200–400 उड्डाणे प्रभावित होणे असा होतो. इंडस्ट्री इनसाइडरच्या अहवालानुसार, इंडिगो भारतात मोठ्या प्रमाणावर काम करते. एअरलाइन्स मार्केटमध्ये तिचे वर्चस्व आहे. इंडिगोच्या सर्वाधिक आणि सातत्याने विमानांच्या फेऱ्या असतात. रात्री उशिराच्या आणि सकाळच्या उड्डाणांवर इंडिगो सर्वाधिक लक्ष केंद्रित करते. इंडस्ट्री इनसाइडरनुसार, या तुलनेत इतर एअरलाइन्स कंपन्या नवीन विमानांच्या वितरणातील विलंब आणि दुरुस्तीसाठी थांबलेल्या विमानांशी झगडत आहेत. अशा परिस्थितीत त्यांची उड्डाणे कमी आणि कर्मचारी जास्त आहेत. या एअरलाइन्स नवीन नियमांनुसार पायलट्सच्या ड्युटीचे वेळापत्रक सहजपणे तयार करू शकत आहेत. सध्या इंडिगोकडे 5,456 पायलट आणि 10,212 केबिन क्रू सदस्य आहेत. 41 हजारांहून अधिक कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. इंडिगोचे म्हणणे आहे की नवीन फ्लाइट टाइम लिमिटेशन नियमांमुळे पायलट आणि क्रूची कमतरता निर्माण झाली आहे. नवीन नियमांनुसार, पायलटांच्या उड्डाणाच्या वेळेची मर्यादा दररोज 8 तासांपर्यंत कमी करण्यात आली आहे. रात्रीच्या लँडिंगची संख्या 6 वरून 2 पर्यंत कमी करण्यात आली आहे. क्रूसाठी 24 तासांत 10 तास विश्रांतीची वेळ ठेवण्यात आली आहे. प्रश्न-7: या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होऊ शकते? उत्तरः एव्हिएशन तज्ज्ञ अनंत सेठी म्हणतात की, इंडिगोने विचारपूर्वक संप केला आहे. नवीन नियम अचानक लागू केले गेले नव्हते. कर्मचाऱ्यांची कमतरता पूर्ण करण्यासाठी इंडिगोकडे पुरेसा वेळ होता, परंतु भारतीय एव्हिएशन क्षेत्रात इंडिगोचा वाटा सुमारे 65% आहे. त्यांनी आपला खर्च कमी करण्यासाठी नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली नाही आणि दबाव निर्माण करण्यासाठी उड्डाणांवर परिणाम केला. अनंत म्हणतात, ‘सध्या सरकारकडे प्रवाशांची समस्या दूर करण्याचा पर्याय नाही, त्यामुळे सध्या इंडिगोशी बोलणी सुरू आहेत. DGCA ने इंडिगोला विचारले आहे की, ते किती टप्प्यांत आणि कोणत्या प्रकारे नवीन नियम लागू करतील. कदाचित काही दिवसांत इंडिगो नवीन वेळापत्रक जारी करून काही उड्डाणे कमी करेल, कारण हाच एक उपाय आहे, अचानक पायलट वाढवणे सोपे काम नाही.’ अनंत यांच्या मते, पायलटला 48 तास आराम देणे आवश्यक आहे, त्यामुळे सरकार त्यांचे कामाचे तास कमी करण्यास सहजासहजी तयार होणार नाही.
Baramati : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; विदेशी दारूचा साठा आणि वाहन ताब्यात
बारामती – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत मद्य वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत सुमारे 6 लाख 97 हजार रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा आणि एक चारचाकी वाहन जप्त केले आहे. अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. तालुक्यातील मौजे शिरवली गावाच्या हद्दीत सांगवी–बारामती रोड, माळेगाव फाटा […] The post Baramati : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; विदेशी दारूचा साठा आणि वाहन ताब्यात appeared first on Dainik Prabhat .
Fakhar Zaman : पाकिस्तानच्या खेळाडूला पंचांशी पंगा घेणं पडलं महागात! ICC ने केली मोठी कारवाई
ICC Fakhar Zaman fined 10% match fee : पाकिस्तान संघाने नुकतीच आपल्या मायदेशात खेळल्या गेलेल्या टी-२० तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयात पाकिस्तानने अष्टपैलू कामगिरी केली होती. मात्र, आता या सामन्यातील एका चुकीमुळे पाकिस्तानचा फलंदाज फखर झमानवर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला असून, […] The post Fakhar Zaman : पाकिस्तानच्या खेळाडूला पंचांशी पंगा घेणं पडलं महागात! ICC ने केली मोठी कारवाई appeared first on Dainik Prabhat .
राज्यात अपघाताचे सत्र सुरूच.! अंबा घाटात प्रवासी बसला अपघात; थेट १०० फूट खोल दरीत कोसळली
Bus accident – राज्यात अपघाताचे सत्र सुरू असून अंबा घाटात आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास प्रवासी बसचा अपघात घडला आहे. हा अंबा घाट महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि रत्नागिरीला या मुख्य शहरांना जोडतो. याच घाटात एका खासगी बसचा आज दुर्दैवी अपघात झाला आहे. मध्यप्रदेशचे पासिंग असलेली ही खासगी बस तब्बल ७० ते १०० फूट खोल दरीत कोसळली […] The post राज्यात अपघाताचे सत्र सुरूच.! अंबा घाटात प्रवासी बसला अपघात; थेट १०० फूट खोल दरीत कोसळली appeared first on Dainik Prabhat .
मुंबई: महायुती सरकारने आज सत्तेत एक वर्ष पूर्ण केले असून, या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची महत्त्वपूर्ण कामगिरी आणि भविष्यातील धोरणे स्पष्ट केली आहेत. “मला रात्रीची झोप यासाठी येत नाही, कारण मला महाराष्ट्रासाठी अनेक गोष्टी करायच्या आहेत,” अशा शब्दांत त्यांनी राज्याप्रतीची आपली बांधिलकी व्यक्त केली. वर्षपूर्तीनिमित्त बोलताना फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आणि […] The post ‘महाराष्ट्राच्या विकासासाठी रात्रीची झोपही नाही’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण appeared first on Dainik Prabhat .
indigo flight cancellation : भारतातील आघाडीची विमान वाहतूक कंपनी इंडिगो एअरलाइन्सच्या ऑपरेशनल समस्यांमुळे देशभरातील अनेक फ्लाईट्स रद्द केल्याने बहुतांश विमानतळांवर प्रवाशांना अडचणी येत आहेत. या समस्येमुळे अन्य विमान कंपन्यांनी भाडेवाढ केली असून सध्या विमानतळ प्रशासन इंडिगोच्या अकार्यक्षमतेमुळे हतबल झाले आहे. या सगळ्यामध्ये प्रवाश्यांना होत असलेल्या त्रासाची कुणाला पर्वा आहे की नाही, असे चित्र निर्माण झाले […] The post indigo flight cancellation : इंडिगो समस्येचे मूळ काय आहे? कंपनीने प्रवाशांना काय सांगितलं, वाचा सविस्तर घटनाक्रम… appeared first on Dainik Prabhat .
रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई : रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या आगामी चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टिझरमध्ये ‘बाई अडलीये म्हणून नडलीये’ ही प्रभावी टॅगलाईन आणि सायकलवरून गावागावांत फिरणाऱ्या आरोग्य सेविकेची झलक दाखवत चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधले होते. टिझरमधील वास्तववादी दृश्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात आशाच्या प्रवासाबद्दल वेगळे कुतूहल निर्माण झाले.या कुतूहलाला उधाण आले ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चालत रहा पुढे’ या प्रेरणादायी गाण्यामुळे. आशाच्या संघर्षाला बळ देणारे हे गीत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, प्रेक्षकांनी तिच्या जिद्दीचे आणि धैर्याचे कौतुक केले आहे. यानंतर प्रदर्शित झालेला दमदार ट्रेलर तर प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढवणारा ठरला आहे.चित्रपटाचा ट्रेलर लाँच आयुष्यमान भारत – मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, ज्येष्ठ साहित्यिक व ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू मंगलप्रभात लोढा आणि आशा सेविका यांच्या उपस्थितीत पार पडला.‘आशा’ हा महिलांच्या संघर्षाचा वास्तववादी प्रवास मांडणारा चित्रपट आहे. ट्रेलरमध्ये रिंकूने साकारलेली आशा गावोगावी आरोग्याची जबाबदारी पेलताना, कुटुंबातील ताणतणावांचा सामना करताना, अन्यायासमोर ठामपणे उभी राहताना दिसते. तिच्या आयुष्यातील वेदना, तळमळ आणि न थकणारी धडपड ट्रेलरमधून स्पष्टपणे जाणवते.रिंकूसोबत सयंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते या कलाकारांनी चित्रपटाला अधिक बळ दिले आहे. महिलांच्या आयुष्यातील कठोर निर्णय, सामाजिक वास्तव, भावनिक दडपण आणि अस्मितेची सतत सुरू असलेली लढाई या सर्वांचा प्रभावी संगम चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘आशा’ ही कथा एका सेविकेपुरती मर्यादित नसून दररोज जीवनाशी दोन हात करणाऱ्या लाखो महिलांची कहाणी आहे.दीपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’चे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दीपक पाटील असून मुरलीधर चटवानी आणि रवींद्र औटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओज या बॅनरखाली प्रदर्शित होणारा हा चित्रपट १९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. टिझर, गाणे आणि ट्रेलरमुळे ‘आशा’विषयीची उत्सुकता सध्या उच्चांक गाठत आहे.
पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती
पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मानवी वस्त्यांच्या जवळपास हे वन्य प्राणी मुक्तपणे फिरताना दिसत असून, गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी हल्ल्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.नारायणगाव–जुन्नर रस्त्यालगत साकार नगरी सोसायटीजवळ एका तरुणावर झालेला हल्ला चिंताजनक ठरला आहे. तनिष नवनाथ परदेशी हा १८ वर्षीय तरुण रात्री फोनवर बोलत उभा असताना बिबट्याने अचानक झडप घातली. त्याच्या पोटरीवर खोल ओरखडे झाले. तातडीची वैद्यकीय मदत मिळाल्याने तो सुदैवाने बचावला असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.घटनेनंतर वन विभागाने रात्रीच शोधमोहीम सुरू केली. ड्रोनच्या मदतीने जवळच्या मीनाक्षी कृपा वसतीगृह परिसरात तब्बल तीन बिबटे फिरताना दिसले. याच भागात एका दिवसात चार पाळीव जनावरांवर हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. धोक्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने परिसरात आठ पिंजरे लावले आहेत. जुन्नर तालुक्यात मागील काही वर्षांत अशा घटना सातत्याने घडत असल्याने मानव–वन्यजीव संघर्ष तीव्र होऊ लागला आहे.जुन्नर तालुक्यातील धोलवडमध्येही अशीच भीतीची घटना घडली. निसर्गरम्य परिसरात बिबट्यांचा वावर स्थिरपणे वाढत असून नागरिकांना अधिक सतर्क राहण्याची गरज भासते आहे. वन विभागाने नागरिकांना अंधारात बाहेर पडू नये, एकट्याने फिरणे टाळावे आणि कोणतीही हालचाल दिसल्यास त्वरित कळवावे, असे आवाहन केले आहे.
दीड वर्षांच्या जलतरणपटू 'वॉटर बेबी'वेदाने इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड वर कोरलं नाव
रत्नागिरी : वय फक्त दीड वर्ष… आणि कामगिरी थेट राष्ट्रीय स्तरावर! रत्नागिरीच्या वेदा सरफरेने देशातील सर्वात लहान भारतीय जलतरणपटू होण्याचा मान पटकावत इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं आहे. अवघ्या ९ महिन्यांची असताना पाण्यात हातपाय मारून तिने आपली क्षमता दाखवून ती कोकणची ‘जलपरी’ ठरली आहे.वेदाचा मोठा भाऊ रूद्र हा राज्यस्तरीय जलतरणपटू. त्याच्या सरावासाठी आई पायल सरफरे रोज शासकीय जलतरण तलावावर जायची. त्या दरम्यान तलावाजवळ बसणारी वेदा पाण्याकडे आवडीने पाहायची. एके दिवशी प्रशिक्षक महेश मिलके यांनी तिला पाण्यात सोडलं; पण अपेक्षेप्रमाणे ती रडली नाही. उलट पाण्यात सहज हातपाय मारत तिने सर्वांना आश्चर्यचकित केलं.१०० मीटरचा वेगवान विक्रमनित्य सरावामुळे वेदा काही महिन्यांतच पोहण्यात पारंगत झाली. वयाच्या १ वर्ष ९ महिन्यांत तिने १०० मीटर पोहण्याचं अंतर फक्त १० मिनिटे ८ सेकंदांत पूर्ण करत विक्रम रचला. इतक्या लहान वयात इतकं मोठं अंतर पूर्ण करणारी वेदा देशात प्रथम ठरली आहे.वेदा जलतरण तलावाच्या कठड्यावरून सहज पाण्यात झेपावते. पाण्याशी झालेली तिची ‘मैत्री’च तिला थेट रेकॉर्ड बुकपर्यंत घेऊन गेली आहे. तिच्या या यशाने रत्नागिरीचे नाव देशभरात झळकले आहे.
पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'
मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत सुविधेपासून वंचित आहेत. त्यांना या मुलभूत सुविधा देण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने आरे कॉलनी तसेच दिंडोशी वन क्षेत्रात राहणाऱ्या रहिवाश्यांना पंतप्रधान आवास योजनांच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभा नियम ३७७ अन्वये मागणी केली.पंतप्रधान आवास योजने अतंर्गत राज्य तसेच संघ राज्य येथील सर्व पत्र लाभार्थी यांना मुलभूत सुविधांनी युक्त असलेली पक्की घरे बांधून देण्यासाठी केंद्र सरकार राज्य तसेच संघ राज्य यांना सर्वतोपरी मदत करीत आहे. या व्यतिरिक्त भारत सरकारने पंतप्रधान आवास योजना-शहर नव्या रुपात सुरु केली असून त्यानुसार या सुधारती पंतप्रधान आवास योजना-शहर २.० (पीएमएवाई-यु २.०) योजनेला १ सप्टेंबर २०२४ पासून सुरुवात झाली. या योजनेच्या माध्यमातून राज्य तसेच संघ राज्य क्षेत्र यांनी प्राधिकरणा मार्फत शहरी भागांसाठी गरीब, मध्यमवर्गातील कुटुंबांतील लाभार्थी यांच्यासाठी माफक दरात घरे (एएचपी) , माफक दरात घरे (एआरएच) तसेच व्याज सबसिडी योजनेच्या (आईएसएस) माध्यमातून योजनेसाठी मदत करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज जमा करण्यासाठी पीएमएवाई-२.० च्या संकेतस्थळावरून (https://pmay-urban.gov.in) करावे लागणार असल्याची माहिती, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी लेखी पत्राद्वारे खासदार वायकर यांना कळवले आहे.तसेच राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणामार्फत पीएमएवाई-यु २.० मधील नियम व तरतुदीला अनुसरून योजना तयार करून राज्य सरकारच्या तसेच निरीक्षण समिती यांच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पुढील मंजुरीसाठी पाठवण्यात यावा, अशी सूचना हि केंद्रीय गृहनिर्माण तसेच शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी खासदार वायकर यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.
नगरपरिषद, नगरपंचायतचा निकाल 21 डिसेंबरलाच – नागपूर उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून कायम – नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार आहे. नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशावर आज सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. सोबतच विरोधातली याचिकाही फेटाळून लावली. त्यामुळे मतदारांचे लक्ष आता आगामी मतमोजणीकडे लागले असून अनेक शहरांतील सत्तांतराविषयीची उत्सुकता वाढली आहे. राज्यातील नगरपरिषद आणि […] The post Today Top 10 News: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा निर्णय; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये ‘प्रवेशबंदी’, वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या… appeared first on Dainik Prabhat .
Pimpri-Chinchwad : लाखोंची लूट करणाऱ्या टोळीला चोविस तासांत अटक; गुंडा विरोधी पथकाची कारवाई
Pimpri-Chinchwad – चिंचवडमध्ये कोयत्याचा वार करीत रोकड लुटणाऱ्या टोळीला अवघ्या २४ तासांत गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली. यश रमेश अंधारे (वय १८, रा. थेरगाव, मूळ रा. भोनजे ता. बार्शी, सोलापूर), रितेश मुकेश चव्हाण (वय १८, रा. जगताप नगर, थेरगाव), रुपेंद्र रुपबसंत बैद (वय १९, रा. सुभाष नगर झोपडपट्टी, रिव्हर रोड, आंबेडकर कॉलनी, पिंपरी) […] The post Pimpri-Chinchwad : लाखोंची लूट करणाऱ्या टोळीला चोविस तासांत अटक; गुंडा विरोधी पथकाची कारवाई appeared first on Dainik Prabhat .
फिनटेक कंपनी झॅगलकडून रिव्पे टेक्नॉलॉजीचे ९७ कोटीला १००% अधिग्रहण
मोहित सोमण: झॅगल (Zaggle Prepaid Services Limited) या फिनेटक व सास (SaaS) कंपनीने रिव्पे टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (Rivpe Technology Private Limited) कंपनीचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली आहे. ९७ कोटीला हे अधिग्रहण पूर्ण झाल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संचालक मंडळाने या अधिग्रहणाला मान्यता दिली आहे . एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, फिनटेक कंपनीपैकी प्रसिद्ध असलेल्या स्टार्टअप कंपनी रिव्पे कंपनीचे १००% अधिग्रहण केले असून कंपनी कंज्यूमर क्रेडिट कार्ड व युपीआय आधारित या कंपनीचे अधिग्रहण केल्याने कंपनीचा विस्तार केल्याचे कंपनीने दिलेल्या माहितीत म्हटले.माहितीनुसार पहिले कंपनी २२ कोटींची गुंतवणूक या स्टार्टअप कंपनी रिव्पेमध्ये करणार असून उर्वरित ७५% गुंतवणूक कंपनी त्या कंपनीचा ब्रँड रिओ मनी (Rio.Money) मध्ये करणार आहे असे कंपनीने म्हटले. उत्पादनातील दर्जा वाढवण्यासाठी व आपल्या उत्पादनातील पोर्टफोलिओत वाढ करण्यासाठी हे अधिग्रहण (Acquisition) करण्यात आल्याचे कंपनीने नमूद केले.एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत,'आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस लिमिटेडच्या संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत रिव्पे टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या विद्यमान भागधारकांकडून २२ कोटी रुपयांपर्यंतच्या विचारार्थ ८१४२९ इक्विटी शेअर्स आणि १६४०७ अनिवार्य परिवर्तनीय (Compulsory Preference Share) पसंती शेअर्सच्या अधिग्रहणाला मान्यता दिली आहे. पूर्णपणे सौम्य आधारावर जे रिव्पेच्या जारी केलेल्या आणि भरलेल्या भांडवलाच्या १००% प्रतिनिधित्व करतात' या शब्दात कंपनीने स्पष्ट केले आहे.हे अधिग्रहण १००% कॅशमध्ये होणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे शेअर खरेदी करारासह १२० दिवसांच्या आत कंपनी हा व्यवहार पार पाडणार आहे. कंपनी पायाभूत सुविधेत भर टाकण्यासाठी ७५ कोटींची भांडवली गुंतवणूक करणार आहे. खरेदी केल्यावर रिव्पे झॅगलची उपकंपनी (Subsidiary) बनेल. डिजिटल क्रेडिट कार्डसह इतकं आधुनिक फिनटेक उत्पादनात आपला पोर्टफोलिओ वाढण्याचे कंपनीने ठरवले आहे. रिव्पेने आर्थिक वर्ष २०२५ कंपनीने ०.९८ कोटींचा महसूल मिळवला होता.झॅगलचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. राज पी. नारायणम म्हणाले,'रिओ.मनीचे संपादन हा भारताला सर्वात व्यापक फिनटेक परिसंस्थेपैकी एक तयार बनविण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षेतील एक धोरणात्मक आधारस्तंभ अनुरूप पडलेले पाऊल आहे. रिओ.मनी आज भारतातील दोन सर्वात परिवर्तनकारी देयक उपायांपैकी एक असलेल्या यूपीआय आणि ग्राहक क्रेडिट कार्ड यामध्ये आम्हाला अपवादात्मक क्षमता प्रदान करणारी ठरेल.'झॅगलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोडखिंडी म्हणाले आहेत की,'रिओ.मनीची ग्राहक क्रेडिट कार्ड आणि यूपीआय व्यवसायातील क्षमता आमच्या वाढीच्या धोरणाशी अखंडपणे जुळणारी आहे. झॅगलचे ३५ लाख वापरकर्ते आणि ३६०० कॉर्पोरेट ग्राहकांचा फायदा घेऊन ताजे संपादन हे आमच्या एंटरप्राइझ खर्च व्यवस्थापन आणि वित्तीय तंत्रज्ञानातील भक्कम पायाला जमेस धरून एकत्रितपणे नवीन ग्राहक विभाग आणि बाजारपेठांमध्ये आमचा विस्तार वाढवण्यास नक्कीच फायदेशीर ठरेल.'रिओ.मनीच्या संस्थापक रिया भट्टाचार्य यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,'झॅगलमध्ये सामील होणे रिओ.मनीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. ग्राहक क्रेडिट कार्ड आणि यूपीआय व्यवसायामधील आमची कौशल्ये, झॅगलच्या विस्तृत वापरकर्ता आधार आणि मजबूत एंटरप्राइझ संबंधांसह एकत्रितपणे जलद प्रमाणात एक शक्तिशाली पाया तयार करतील. भविष्यात लाखो लोकांसाठी आर्थिक प्रवेश आणि सुविधा वाढवणारे प्रभावी उपाय तयार करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाला गती देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.'दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे दिलेल्या माहितीत एंटरप्राईजेस वाढीसाठी लागणारा खर्च, ग्राहक क्रेडिट कार्ड उत्पादन पोर्टफोलिओ वाढ, व्यापक विस्तार SaaS आधारित आर्थिक फ्लो कायम राखण्यासाठी, युपीआय डिजिटल पेमेंट प्रणाली विकसित करण्यासाठी केला जाणार आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये झॅगलचा आयपीओ (Initial Public Offerings IPO) बाजारात दाखल झाला होता. ५६३ कोटींच्या या आयपीओला १२.८६ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. १६४ प्राईज असलेला शेअर १६४ रूपयालाच सूचीबद्ध (Listed) झाला होता. दुसऱ्या तिमाहीत कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ७२% निव्वळ नफा (Net Profit) मिळाला होता. तर कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) इयर ऑन इयर बेसिसवर दुसऱ्या तिमाहीत ४२.९% वाढ झाली आहे. कंपनीच्या ऑपरेटिंग खर्चातही इयर ऑन इयर बेसिसवर ४५.६% वाढ झाली होती. कंपनीने तिमाही निकालानंतर ईओपी (Employee Stock Options) अंतर्गत १३४४५१९६७ शेअरचे वाटप (Allotment) केले होते. त्यावेळीही कंपनीने नवीन वित्तीय उत्पादन निर्मितीसाठी निधी प्राप्त केला होता. २०११ साली कंपनीची (Zaggle) स्थापना झाली होती. आज कंपनीचा शेअर ४.०७% कोसळत ३५१.२० रूपये प्रति शेअरवर स्थिरावला आहे. गेल्या ५ दिवसात कंपनीचा शेअर १०.२४% घसरला असून इयर टू डेट (YTD) बेसिसवर ३५.५८% घसरला आहे. तर गेल्या ५ वर्षांत कंपनीने १२१.७९% परतावा गुंतवणूकदारांना दिला.
प्राजक्तानं नंदीवरुन घेतलेली एन्ट्री योग्य की अयोग्य ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
मुंबई : नुकताच स्वराज्यरक्षक संभाजी फेम येसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा विवाह सोहळा झाला. लग्नाच्या अनेक सुखद आठवणी प्राजक्ताने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केल्या होत्या.पण चर्चा रंगली ती प्राजक्ताच्या विवाह सोहळ्यातील एन्ट्रीची, या विवाह सोहळ्याचं खास आकर्षण होतं ते म्हणजे शिव आणि गणांचं... यात प्राजक्ता आणि शंभूराज एका नंदीवर बसून मंडपात आले होते. यावर काही लोकांनी आक्षेप घेतला. त्यांनी विवाह सोहळ्यातील देखाव्यावर आक्षेप नोंदवला होता. देवांचा अपमान होतो आहे असेही काही लोकांचे म्हणणे होते.पण ज्योतिषी आनंद पिंपळकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत लग्नातील शिव आणि गणांच्या तसेच प्राजक्ताच्या एन्ट्री संदर्भात त्यांचे मत मांडले. ज्यांना पूर्ण माहिती नाही अशांकडूनच वाद घातला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.धर्मशास्त्रानुार जोडपं नर नारी न राहता, विवाहप्रसंगी विष्णू आणि लक्ष्मी असतात. ब्रह्मवैवर्थ पुराणात लक्ष्मी आणि विष्णूच्या विवाहात शिव आणि त्यांच्या गणांनी भाग घेतल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे हा शिवात्मक देखावा दाखवणं हे अज्ञान नसून देवांचा अपमान नसून तो क्षण पुन्हा सादर करायचा आणि प्राचीन परंपरेचं मूर्त स्वरुप समोर आणायचं हा हेतू होता. अगदी विवाह विधींमध्ये सुद्धा ब्राह्मण मंत्रोउच्चारातून शिव आणि त्याचा गणांचा उल्लेख करतात. त्यामुळे प्राजक्ताने नंदीवरुन लग्नाच्या ठिकाणी केलेली एन्ट्री वादग्रस्त नाही, असेही ते म्हणाले.
नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत यांच्या दरम्यान जहाज उद्योग, बंदरे, वाहतूक, आरोग्य, संरक्षण आणि आर्थिक क्षेत्रात सहकार्यासाठी महत्त्वाचे करार झाले. राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. यानंतर करारांवर सह्या झाल्या.रशिया आणि भारत यांच्यात झालेल्या २३ व्या शिखर परिषदेनंतर दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना उर्जा क्षेत्रात, प्रामुख्याने नागरी वापराच्या अणुऊर्जेच्या क्षेत्रात सहकार्यासाठी करार झाल्याची माहिती दोन्ही देशांकडून देण्यात आली. दुर्मिळ खनिजांच्या पुरवठा साखळीचे संरक्षण करणे आणि या खनिजांचा सुयोग्य वापर करण्यासाठी नियोजन करणे याकरिता रशिया आणि भारत एकमेकांच्यात समन्वय राखतील, असेही संयुक्त पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. विनाअडथळा शुद्ध ऊर्जेचा पुरवठा, उच्च दर्जाची औद्योगिक निर्मिती आणि उच्च तंत्रज्ञानशी संबंधित उद्योग या क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करणार आहेत. चला तर मग, जाणून घेऊ रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे... जहाज बांधणीतील सहकार्यामुळे भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने आणखी दमदाल पावलं टाकणार आहे. रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे; असे पंतप्रधान मोदी म्हणाले. जहाज बांधणीत कौशल्याधारित रोजगारांना प्राधान्य असेल, असेही ते म्हणाले. रशिया आणि भारत यांनी आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी व्हिजन २०३० दस्तऐवजावर स्वाक्षरी केली. लवकरच दोन्ही देश युरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबत मुक्त व्यापार करार करणार आहेत. मागील आठ दशकांत जगाने अनेक चढ-उतार बघितले. पण भारत-रशिया मैत्री ध्रुव ताऱ्यासारखी स्थिर आणि मार्गदर्शक राहिली आहे. हे नाते परस्पर आदर आणि विश्वासावर बांधलेले आहे. आजच्या चर्चेत हे नाते आणखी मजबूत करणाऱ्या सर्व पैलूंवर चर्चा झाली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पुतिन यांचे स्वागत करताना पंतप्रधान म्हणाले की, २३ व्या भारत-रशिया द्विपक्षीय शिखर परिषदेत उपस्थित राहून त्यांना आनंद झाला. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी २५ वर्षांपूर्वी या धोरणात्मक भागीदारीचा पाया रचल्याची आठवण मोदींनी करून दिली. पुतिन यांच्या कार्यकाळात रशिया आणि भारत मैत्री संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहेत. रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी वृद्धिंगत होत आहे; असे मोदी म्हणाले.
Smriti Mandhana post video after wedding postponed : टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा २३ नोव्हेंबर रोजी लग्न सोहळा पार पडणार होता. मात्र, लग्नाच्या दिवशी सकाळी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडली आणि लग्न अचानक स्थगित करण्यात आले. यानंतर सोशल मीडियावर पलाश मुच्छलबद्दल अफवा पसरल्या होत्या. आता या सर्व […] The post Smriti Mandhana : ‘…हे मला खरंच वाटत नव्हतं’, लग्न स्थगित झाल्यानंतर स्मृतीने पहिल्यांदाच केली पोस्ट; म्हणाली, ‘मी देवाची.. appeared first on Dainik Prabhat .
Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आणखी एक विक्रम केला आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर, नितीश कुमार १० वेळा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नियुक्तीमुळे आता त्यांना ‘लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये स्थान मिळाले आहे. लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने नितीश कुमार यांना दहाव्यांदा शपथ घेतल्याबद्दल पत्र लिहून या कामगिरीबद्दल अभिनंदन केले […] The post Nitish Kumar : नितीश कुमारांचे नाव आता ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये; १० वेळा मुख्यमंत्री झाल्याबद्दल केले अभिनंदन appeared first on Dainik Prabhat .
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; खात्यात येणार 3000 रुपये?
मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाखो लाभार्थ्यांसाठी वर्षाअखेरीस मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात ₹1500 नाही, तर थेट ₹3000 सन्माननिधी जमा होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून जमा न झाल्याने, सरकार नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे दोन हप्ते एकत्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची शक्यता आहे, अशी […] The post Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; खात्यात येणार 3000 रुपये? appeared first on Dainik Prabhat .
Leopard Rescue : हुलकावणी देणारा बिबट्या अखेर जेरबंद; पाच दिवसांच्या मोहिमेला यश!
Leopard Rescue : दौंड तालुक्याच्या पूर्व भागात दिवसेंदिवस नागरी वस्ती सह पाळीव जनावरांवर बिबट्यांचे हल्ले होत असल्याने, हिंगणीबेर्डी येथे मागील पाच दिवसांपूर्वी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. आज पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यातील शिकार टिपण्यासाठी आलेला बिबट्या जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले आहे. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढत असून शेतातील गोट्यांमधील […] The post Leopard Rescue : हुलकावणी देणारा बिबट्या अखेर जेरबंद; पाच दिवसांच्या मोहिमेला यश! appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: रेपो दरातील कापणीनंतर बँक निर्देशांकातील जबरदस्त वाढीमुळे शेअर बाजारात अखेरच्या सत्रात वाढ झाली आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाल्याने सेन्सेक्स ४३७.०५ व निफ्टी १५२.७० अंकाने वाढ झाली आहे. परिणामी सेन्सेक्स ८५७१२.३७ व निफ्टी २६१८६.४५ पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स बँक ५७१.५२ व बँक निफ्टी ४८८.५० अंकाने उसळला. आज आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात करण्याचा निर्णय घेतल्याने रेपो दर ५.२५% पातळीवर स्थिरावला आहे. त्यामुळेच बँकेच्या कर्जाचे व्याजदर कमी होण्याची शाश्वती निर्माण झाल्याने बँक, एनबीएफसी कंपनीच्या शेअर्ससह रियल इस्टेट,ऑटो जिथे रोख प्रवाह महत्वाचा ठरतो या ठिकाणी शेअर्समध्ये वाढ झाली आहे. निफ्टी व्यापक निर्देशांकातील अखेरच्या सत्रात स्मॉलकॅप १०० (०.५७%), स्मॉलकॅप ५० (०.५३%) निर्देशांकात घसरण झाली असली तरी इतर निर्देशांकात वाढ झाली ज्यात सर्वाधिक वाढ निफ्टी १०० (०.५३%), मिडकॅप १०० (०.४९%), निफ्टी २०० (०.५२%) निर्देशांकात वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ बँक (०.८२%),फायनांशियल सर्विसेस (०.९८%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (१.४८%) व्यतिरिक्त पीएसयु बँक (१.५१%), प्रायव्हेट बँक (०.४९%),आयटी (०.९०%), मेटल (०.६७%),ऑटो (०.७४%), रिअल्टी (०.३४%) या शेअर्समध्ये वाढ कायम राहिली आहे. सकाळी गुंतवणूकदारांनी सावधगिरीची भावना बाळगल्याने घसरलेले आयटी, रिअल्टी, ऑटो, मेटल शेअर्समध्ये निकालानंतर मोठी वाढ झाली आहे.अखेरच्या सत्रात खासकरुन शेवटच्या सत्रात चढउतारात घसरण झाल्याने सेन्सेक्स ३०० ते ४०० अंकामध्ये परावर्तित होत होता तर निफ्टीतील तेजी कायम होती. दुसरीकडे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक वाढवल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने बाजारातील भावनांना आधार मिळाला. अर्थात आज डॉलरच्या तुलनेत रूपयात घसरण झाली असली तरी लवकरच रिकवर होण्यास सुरुवात होऊ शकते. कमोडिटी बाजारातील अस्थिरता आजही कायम असल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली. डॉलरच्या किंमती वाढत रूपयांची किंमत आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरल्याने भारतीय सराफा बाजारातील सोने वाढले असून चांदीच्या मागणीत मात्र घसरण झाल्याने व फेड दरातील कपात अपेक्षित असल्याने चांदी आज स्वस्त झाली. याशिवाय मोठ्या प्रमाणात लार्जकॅप शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांना त्यांचा फायदा अखेरच्या सत्रात झाला.अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातील बहुतांश निर्देशांकात वाढ झाली आहे. गिफ्ट निफ्टी (०.५४%) सह हेंगसेंग (०.५२%), कोसपी (१.७४%) शांघाई कंपोझिट (०.६९%) निर्देशांकात वाढ झाली आहे तर सर्वाधिक घसरण निकेयी २२५ (१.२७%), स्ट्रेट टाईम्स (०.०८%), जकार्ता कंपोझिट (०.०९%) निर्देशांकात घसरण झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात तिन्ही डाऊ जोन्स (०.०२%), एस अँड पी ५०० (०.११%), नासडाक (०.१३%) निर्देशांकात वाढ झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ एम अँड एम फिनसर्व्ह (५.९२%), आरसीएफ (४.८०%), पतांजली फूड (४.१३%), सुंदरम फायनान्स (३.८७%), सुंदरम फायनान्स (३.४२%), एसबीआय कार्ड (३.४२%), इंडस (३.४१%), पीटीसी इंडस्ट्रीज (३.३७%), श्रीराम फायनान्स (३.२३%), एल अँड टी फायनान्स (३.०५%) समभागात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण कँमस सर्विसेस (८०.०४%), काईन्स टेक (१२.५५%), हिन्दुस्तान युनिलिव्हर (५.०२%), डेटा पँटर्न (४.५१%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (४.३४%), बंधन बँक (४.१३%), सफायर फूडस (३.६९%), नेटवेब टेक्नॉलॉजी (३.६५%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'भारतीय बाजारपेठांनी आरबीआयच्या अनपेक्षित २५ बीपीएस दर कपातीला उत्साहाने प्रतिसाद दिला आहे, जी दुसऱ्या तिमाहीतील मजबूत जीडीपी डेटामुळे अशक्य वाटत होती. या आश्चर्याने, महागाईच्या तीव्र घटीच्या अंदाजांसह आणि सहाय्यक तरलता उपायांसह, समभागांमध्ये जोखीम-संवेदनशीलता निर्माण केली आहे. खर्चात घट झाल्यामुळे ऑटो, रिअल इस्टेट आणि एनबीएफसी सारख्या दर-संवेदनशील क्षेत्रांमध्ये वाढ होत आहे. खाजगी बँकांनाही ट्रेझरी नफ्याच्या अपेक्षेपेक्षा वाढ झाली आहे, तर निव्वळ व्याज मार्जिन (एनआयएम) बद्दलच्या चिंतेमुळे त्यांची वाढ मर्यादित झाली आहे. एकूणच, डिसेंबरमध्ये मजबूत कॉर्पोरेट कमाईवर लक्ष केंद्रित करून अल्पकालीन दृष्टीकोन सावधपणे सकारात्मक राहिला आहे. तथापि, वाढती चालू खात्यातील तूट आणि जागतिक व्यापार तणाव यासारख्या जवळच्या जोखमी आव्हाने निर्माण करत आहेत. महिन्यासाठी देशांतर्गत कल राखण्यासाठी यूएस फेडचा दर कपातीचा पवित्रा महत्त्वपूर्ण असेल.'आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'भारतीय शेअर बाजारांमध्ये आज अस्थिर पण उत्साही सत्र दिसून आले, कारण आरबीआयने २५-बीपीएस रेपो दर ५.२५% पर्यंत कमी केला. बेंचमार्क निफ्टी २५९९९.८० पातळीवर उघडला, काही काळासाठी २५९८५ पातळीवर घसरला आणि नंतर २६२०० पातळीच्या पातळीची चाचणी घेण्यासाठी तीक्ष्ण पुनरागमन केले. बँक निफ्टीनेही धोरणात्मक हालचालींना त्वरित प्रतिसाद दिला, दिवसाच्या ५९१०६.५५ पातळीच्या नीचांकी पातळीवरून ५९,७७७.३५ पातळीच्या उच्चांकावर पोहोचला. क्षेत्रीय हालचाली मिश्रित होत्या, ज्यामध्ये पीएसयू बँका, आयटी, वित्तीय सेवा आणि धातूंनी आघाडी घेतली, तर मीडिया, एफएमसीजी, ऊर्जा आणि फार्मा कमकुवत नोटवर बंद झाले. एफ अँड ओ सेगमेंटमध्ये, इंडिगो, केनेस, एम्बर, पॉवरइंडिया आणि युनोमिंडा मध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट बिल्डअप दिसून आले, जे या काउंटरमध्ये वाढलेल्या डेरिव्हेटिव्हचे संकेत देते.'आजच्या बाजारातील बँक निफ्टीतील परिस्थितीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'शुक्रवारच्या सत्रात, बँक निफ्टीने एक दीर्घ तेजीची कॅंडलस्टिक तयार केली, त्याने त्याचा १० दिवसांचा एसएमए (Simple Moving Average SMA) यशस्वीरित्या परत मिळवला आणि चालू सकारात्मक गतीला बळकटी दिली. तथापि, आरएसआय (Relative Strength Index RSI) अद्याप तेजीच्या क्रॉसओवरमध्ये प्रवेश केलेला नाही, ज्यामुळे काही पुष्टीकरण अद्याप प्रलंबित आहे असे सूचित होते. एकंदरीत, तांत्रिक सेटअप दर्शवितो की बँक निफ्टी निर्देशांकात प्रचलित अपट्रेंड कायम आहे. वरच्या बाजूला, प्रतिकार (Resistance) ६०००० पातळीच्या जवळ आहे, तर तात्काळ समर्थन (Support) ५९२५० पातळीच्या आसपास ओळखले जाते, ज्यामुळे निर्देशांक एका परिभाषित ट्रेडिंग रेंजमध्ये चांगल्या स्थितीत राहतो.'आजच्या बाजारातील रूपयावर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'डॉलर निर्देशांक स्थिर राहिल्याने रुपया ०.०८ पैशांनी किंचित कमकुवत होऊन ८९.९२ वर व्यवहार करत होता, परंतु सततच्या एफआयआय विक्रीमुळे चलनावर दबाव राहिला. आरबीआयच्या २५ बीपीएस दर कपातीमुळे वित्तीय क्षेत्रांना काही स्थिरता मिळू शकते, परंतु भारत-अमेरिका व्यापार करारातील विलंब आणि वाढत्या सोन्या-चांदीच्या आणि धातूच्या किमती भावनांवर परिणाम करत आहेत. रुपया ८९.७५-९०.२५ रूपयांच्या श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे.'आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,' शुक्रवारी निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली, कारण त्याला चलनविषयक धोरणाचे निकाल मिळाले आहेत. ट्रेंड सकारात्मक राहिला आहे, निर्देशांक २१ ईएमए (Exponential Moving Average EMA) पातळीच्या वर टिकून आहे. तासिक चार्टवर निर्देशांकाने अलिकडच्या एकत्रीकरणातून ब्रेकआउट दिला आहे, जो वाढती आशावाद दर्शवितो. आरएसआय (RSI) ने पुन्हा एकदा तेजीचा क्रॉसओवर मिळवला आहे, जो मजबूत गतीकडे निर्देश करतो.अल्पावधीत, ट्रेंड मजबूत राहू शकतो, निफ्टी २६,३००/२६४४० पातळीच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. २६०६०-२६००० पातळीवर आधार आहे. जोपर्यंत निर्देशांक २६००० पातळीच्या वर टिकत आहे तोपर्यंत घसरणीवर खरेदी करणे अनुकूल असू शकते.'सोन्यातील टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'कॉमेक्स सोन्याचा भाव ४२०० डॉलर्सच्या महत्त्वपूर्ण समर्थनाच्या वर स्थिरावल्याने आणि ४२२४ डॉलर्सच्या वर गेल्याने सोन्याचा भाव ५२५ रुपयांनी वाढून १३०६५० रुपयांवर सकारात्मक व्यवहार झाला. आज नंतर यूएस कोअर पीसीई किंमत निर्देशांक रांगेत असल्याने, फेडरल रिझर्व्हकडून १० डिसेंबर रोजी दर कपातीच्या अपेक्षेनुसार सहभागींनी त्यांची तेजीची स्थिती कायम ठेवली आहे. सोन्याला ४,१८० डॉलर्सवर मजबूत समर्थन मिळत आहे, तर प्रतिकार ४२५५ $ च्या जवळ आहे. एमसीएक्समध्ये समर्थन १२८००० रुपये आणि प्रतिकार १३१५०० रुपयांच्या जवळ दिसत आहे.'
फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवादमुंबई : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन निश्चित करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार दिशेने पावले उचलत आहे. शेती, पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, रोजगार निर्मिती, सामाजिक न्याय, सुरक्षा या प्रत्येक क्षेत्रात महायुती सरकारने क्रांतीकारी निर्णय घेऊन विकासाची गती वाढवली आहे. महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू आहे”, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, रघुनाथ पांडे, प्रतिक करपे आदी उपस्थित होते.बावनकुळे म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्तांना ३२ हजार कोटींचे पॅकेज, दुष्काळी उपाययोजना लागू तसेच पीककर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश देऊन सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला. पीकविमा आणि भरपाई प्रक्रियेला गती देण्यात आली. पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला. सिंचनक्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला. नदीजोड प्रकल्पांना मान्यता देऊन निधीची तरतूद करण्यात आली. उपसा सिंचन प्रकल्पांना कोट्यवधींचे निधी मंजूर करण्यात आले. जलयुक्त शिवार २.० अंतर्गत वर्षभरात ३७ हजार १६६ कामे पूर्ण करण्यात आली.पायाभूत सुविधांवर सर्वाधिक भरपायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून पायाभूत यंत्रणा सक्षम करण्याला प्राधान्य दिले. समृद्धी महामार्ग पूर्णत: खुला करण्यात आला. शक्तीपीठ महामार्ग, वाढवण बंदर, ऑफशोअर विमानतळ यांचे नियोजन करण्यात आले. १०० गावांत सौरग्राम योजना, नागपूरमध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था, मेट्रो ११ ला मान्यता, मुंबईत २३८ लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी ४ हजार ८२६ कोटींचा निधी, रेल्वे सेवेच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला असेही बावनकुळे यांनी नमूद केले.
Modi-Putin: भारत-रशियामध्ये कोणते करार झाले; पीएम मोदींनी पत्रकार परिषदेत दिली माहिती, जाणून घ्या
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात आज, शुक्रवारी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे झालेल्या 23 व्या शिखर परिषदेनंतर अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना भारत-रशिया संबंधांना बळकट करण्याची आणि 2030 पर्यंत आर्थिक सहकार्याचा नवा टप्पा गाठण्याची ग्वाही दिली. रशियन नागरिकांसाठी मोफत व्हिसा सुविधा – पंतप्रधान […] The post Modi-Putin: भारत-रशियामध्ये कोणते करार झाले; पीएम मोदींनी पत्रकार परिषदेत दिली माहिती, जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
Marnus Labuschagne 1st Batter to reach 1000 runs in Day-Night Tests : ॲशेस मालिका २०२५-२६ चा दुसरा डे-नाइट कसोटी सामना ब्रिसबेनमध्ये खेळला जात असताना, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लाबुशेन याने एक मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तो डे-नाइट कसोटी क्रिकेटमध्ये एक खास पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. लाबुशेनने रचला इतिहास – मार्नस लाबुशेन […] The post AUS vs ENG : मार्नस लाबुशेन ठरला पिंक बॉलचा बादशहा! डे-नाईट टेस्टमध्ये ‘हा’ पराक्रम जगातील पहिलाच खेळाडू appeared first on Dainik Prabhat .
मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे रेपो दरात कपातीच्या ऐतिहासिक निर्णयामुळे आज, शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी शेअर बाजारामध्ये जोरदार तेजी दिसून आली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) दोन्ही प्रमुख निर्देशांक सुमारे ०.५० टक्क्यांच्या दमदार वाढीसह बंद झाले. रेपो रेट कपातीचा परिणाम – आरबीआयने आज रेपो रेटमध्ये २५ आधार अंकांची कपात करण्याची घोषणा […] The post आरबीआयच्या रेपो रेट कपातीमुळे शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स 447 अंकांनी वाढला, निफ्टी 26186 वर बंद appeared first on Dainik Prabhat .
शिरूर पोलिसांचा कौतुकास्पद पराक्रम.! १८ गुन्ह्यांचा गुंता सोडवून १२.३६ लाखांचा मुद्देमाल परत मिळवला
शिरूर – शिरूर पोलिसांनी घरफोडी, जबरी चोरी आणि चोरी अशा क्लिष्ट गुन्ह्यांमागील सराईत आरोपींचा पाठपुरावा करत अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून तब्बल १२ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल शोधून काढत १८ गुन्ह्यांचे फिर्यादींना परत केला. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुद्देमालामध्ये साडे सोळा तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख रक्कम […] The post शिरूर पोलिसांचा कौतुकास्पद पराक्रम.! १८ गुन्ह्यांचा गुंता सोडवून १२.३६ लाखांचा मुद्देमाल परत मिळवला appeared first on Dainik Prabhat .
रिलायन्स इंडस्ट्रीजला एस अँड पी ग्लोबलकडून कौतुकाची थाप, BBB+ वरून A- वर वाढ
मुंबई: जागतिक रेटिंग एजन्सी एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) वरील श्रेणीत (Ratings) मध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ग्राहक-केंद्रित कंज्यूमर व्यवसायातील व्यवसायात वाढलेल्या रोख प्रवाह (Cash Flow) स्थिरता सुधारण्याची अपेक्षा असताना संस्थेने दीर्घकालीन श्रेणीत 'बीबीबी+' वरून 'ए-' अशी सुधारणा केली आहे. एस अँड पी ग्लोबलने नुकतीच ही घोषणा केली. यासह एजन्सीने स्थिर दृष्टीकोन देखील निश्चित केल्याचे रेटिंग एजन्सीने स्पष्ट केले आहे.एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज त्यांच्या चक्रीय रोख प्रवाह वाढवत राहील. ज्यामुळे उत्पन्नाची गुणवत्ता मजबूत होईल असे निरिक्षण अहवालाने नोंदवले आहे इतकेच नाही तर त्यात म्हटले आहे की 'आम्ही रिलायन्स इंडस्ट्रीजवरील आमचे दीर्घकालीन क्रेडिट रेटिंग 'बीबीबी+' वरून 'ए-' केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कमी चक्रीय वाढीतील व्यवसायांमधून रोख प्रवाह वाढवत राहील ज्यामुळे त्यांची कमाईची गुणवत्ता सुधारेल.' असे म्हटले आहे.रेटिंग एजन्सीने अधोरेखित केले की, कंपनीच्या विविध व्यवसायांमधील स्पर्धात्मक स्थितीमुळे उत्पन्न आणि रोख प्रवाह निर्मितीला आणखी चालना मिळेल, ज्यामुळे ती प्रमुख विभागांमधील मोठ्या गुंतवणुकीला पुरेसे कव्हर करू शकेल.'स्थिर रेटिंग आउटलुक पाहता आमच्या मते प्रतिबिंबित रिलायन्स कंपनी त्याच्या प्रमुख व्यवसायांमध्ये आघाडीचे स्थान बाजारपेठेतील कायम ठेवेल आणि त्यांचे उत्पन्न पुढील १२-२४ महिन्यांत भांडवली खर्च कव्हर करण्यासाठी पुरेसे असेल असे रेटिंग एजन्सीने पुढे म्हटले आहे.एस अँड पीने म्हटले आहे की डिजिटल सेवा आणि किरकोळ विक्रीसह अधिक स्थिर ग्राहक व्यवसायांमध्ये कंपनीच्या चालू विस्तारामुळे उत्पन्न आणि रोख प्रवाह स्थिरता वाढण्याची अपेक्षा आहे.डिजिटल सेवा विभागातून वाढत्या कमाईमुळे समूहाचे अधिक अस्थिर हायड्रोकार्बन व्यवसायावरील अवलंबित्व कमी होण्याची शक्यता आहे.एजन्सीचा अंदाज आहे की डिजिटल सेवा आणि किरकोळ व्यवसाय एकत्रितपणे आर्थिक वर्ष २०२६ (३१ मार्च २०२६ रोजी संपणारे वर्ष) मध्ये ऑपरेटिंग कॅश फ्लोमध्ये जवळजवळ ६०% योगदान देतील, तर तेल-ते-रसायन (O2C) आणि तेल आणि वायू विभाग उर्वरित ४०% वाटा देतील. भारतातील दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजची मजबूत स्थिती पुढील दोन वर्षांत नफ्याला चालना देत राहील, असे त्यात पुढे नमूद केले आहे.एजन्सीने म्हटले आहे की, कंपनीचे वायरलेस ग्राहक पुढील १२-२४ महिन्यांत ३-६% वाढू शकतात, ज्याला मर्यादित नेटवर्क गुंतवणुकीमुळे ग्राहकांचे नुकसान सहन करणाऱ्या इतर दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होऊ शकते. दरम्यान, अधिकाधिक ग्राहक उच्च किमतीच्या (Consumers High Price) योजनांमध्ये अपग्रेड करत असल्याने आणि भारतात डेटा वापर वाढत असल्याने रिलायन्स जिओसाठी एआरपीयु (Average Revenue per User ARPU) वाढू शकतो. उल्लेखनीय म्हणजे, कंपनीने गेल्या दोनदा भारतात दरांमध्ये वाढ केली आहे.S&P ग्लोबल रेटिंग्जने असेही म्हटले आहे की पुढील १२-२४ महिन्यांत कमाईची वाढ उच्च भांडवली खर्च (High Capital Expenditure Capex) पेक्षा जास्त असू शकते. त्यांच्या बेस केसनुसार, समूह आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत समायोजित कर्ज (Adjusted Loan) ते ईबीटा (EBITDA) गुणोत्तर (Ratio) १.५x-१.६x राखेल जे गेल्या दोन वर्षांत नोंदवलेल्या १.७x पेक्षा किंचित कमी आहे.आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत कॅपेक्स सुमारे १.४ ट्रिलियन रुपयांवर राहू शकते, तर आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १.५ ट्रिलियन रुपयांच्या सर्वोच्च रोख भांडवली खर्चाच्या तुलनेत ओ२सी विस्तार, ५जी नेटवर्कची सतत तैनाती आणि विस्तार आणि किरकोळ दुकानांच्या पुढील अंमलबजावणीमुळे एजन्सीला सकारात्मक मुक्त ऑपरेटिंग रोख प्रवाह सुरू राहण्याची अपेक्षा आहे असे संस्थेने पुढे म्हटले.एस अँड पीने कंपनीच्या मजबूत बॅलन्स शीट आणि त्याच्या ऊर्जा-संबंधित व्यवसायांमधून अमेरिकन डॉलरच्या महसुलात लक्षणीय एक्सपोजरचा हवाला देत रिलायन्स इंडस्ट्रीजवरील त्यांचे रेटिंग भारतावरील सार्वभौम रेटिंगपेक्षा दोन स्थानांनी वर असल्याचे अधोरेखित केले.पुढे पाहता, एस अँड पीने म्हटले आहे की स्थिर दृष्टीकोन रिलायन्स इंडस्ट्रीज त्यांचे मजबूत नेतृत्व कायम ठेवेल अशी अपेक्षा अधोरेखित करते.'
Russian President Putin | Smartphone : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे त्यांच्या भारत भेटीमुळे चर्चेत आहेत, परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक मोठी गोष्ट पुन्हा एकदा समोर आली आहे: ते स्मार्टफोन वापरत नाहीत. डिजिटल युगात, जागतिक नेत्यांसाठी अनेक फोन असणे सामान्य आहे, परंतु पुतिन पूर्णपणे उलट आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उघडपणे त्यांचा वैयक्तिक आयफोन […] The post Russian President Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन स्मार्टफोन का वापरत नाहीत? त्यांनी स्वतः सांगितलं मोठं कारण…. appeared first on Dainik Prabhat .
रणवीर सिंहचं मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक! ‘धुरधरं’च्या रिलीजच्या दिवशीच मोठी घोषणा, २०२६ मध्ये…
Dhurandhar Sequel : आज बहुप्रतिक्षित अभिनेता रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेला धुरंधर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर धुरंधर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून अभिनेता रणवीर सिंह याने मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक केले आहे. अशातच धुरंधरच्या टीमने सिक्वलची घोषणा […] The post रणवीर सिंहचं मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक! ‘धुरधरं’च्या रिलीजच्या दिवशीच मोठी घोषणा, २०२६ मध्ये… appeared first on Dainik Prabhat .
वसई - विरारमध्ये ८० हजार दुबार मतदार?
मतदारयादीत सुधारणा करण्याची बविआची मागणीवसई : वसई - विरार महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये ५२ हजार दुबार मतदार असल्याचे समोर आले. त्यामुळे पालिकेने अशा मतदारांकडून मतदान कुठे करणार? याबाबतचे हमीपत्र लिहून घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुबार मतदारांची ही संख्या मोठी असून ती ८० हजारांच्या घरात असल्याचा दावा बहुजन विकास आघाडीने केला आहे. यासह एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत. त्यामुळे या सर्वांची नावे पूर्ववत करावी आणि दुबार मतदार वगळावे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.वसई - विरार महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना पार पडली. महापालिका क्षेत्रात २९ प्रभाग असून चार स्तरीय प्रभाग रचनेनुसार चार सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. प्रभाग रचना पार पडल्यानंतर आरक्षण सोडत प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली.त्यानंतर मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. यासाठी बुधवारपर्यंतची मुदत हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी देण्यात आली होती. १ जुलै २०२५ पर्यंतच्या गृहीत धरलेल्या विधानसभा मतदार यादीनुसार पालिका हद्दीत ११ लाख २७ हजार ६४० मतदारांची नोंद आहे. यामध्ये ५२ हजार ३७८ मतदारांची नावे ही दुबार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून मिळाली होती. त्यानंतर पालिकेने दुबार असलेल्या मतदारांकडून मतदान कुठे करणार? याबाबतचे हमीपत्र लिहून घेणार असल्याचे सांगत प्रक्रिया सुरु केली आहे.मात्र दुसरीकडे हरकती आणि सूचना नोंदविण्याच्या शेवटच्या दिवशी बहुजन विकास आघाडीने महापालिका हद्दीत ८० हजार दुबार मतदार असल्याचा दावा केला आहे. तसेच एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्याचे देखील त्यांना निदर्शनास आले आहे. यासह अनेक मतदारांची नावे सारखीच आहेत, फोटो एका मतदाराचा दुसऱ्या मतदाराला एक सारखाच देण्यात आला आहे तर काही ठिकाणी फोटोच नसल्याचे देखील आढळून आल्याचा दावा बविआने केला असून याबाबत त्यांनी महापालिकेला लेखी निवेदन दिले आहे. तसेच या दुबार मतदारांची नावे वगळण्याची मागणी केली आहे.शोध मोहीम सुरू : वसई-विरार महापालिका हद्दीत मतदारांपैकी ५२ हजार दुबार मतदारांची नावे आयोगाने दिली होती. तसेच आता बविआने देखील ८० हजार मतदार दुबार असल्याचा दावा केला आहे. यासाठी आता नऊ प्रभागात नऊ पथके नेमण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत ५२ हजारांहून अधिक असलेल्या दुबार मतदारांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतली जाणार आहेत. दुबार मतदारांबाबत आयोगाने जो कार्यक्रम ठरवून दिला आहे त्यानुसार आमचे कामकाज सुरु असल्याचे पालिका उपायुक्त स्वाती देशपांडेयांनी सांगितले.मतदार याद्यांवर ८ हजार हरकती - सूचनावसई - विरार महानगरपालिकेने मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ३ डिसेंबर पर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याची मुदत दिली होती. मंगळवार सायंकाळी उशिरापर्यंत पालिकेकडे ८ हजार ४१६ हरकती आणि सूचना मतदार याद्यांवर नोंदविण्यात आल्या होत्या. बुधवारी सुद्धा हरकती स्वीकारण्यात आल्या आहेत.
गटशिक्षण अधिकाऱ्यांसह तीन अधिकारी निलंबित !
जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेशपालघर : शाळेत यायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली. या प्रकारानंतर उठाबशा काढल्याने प्रकृती बिघडलेल्या एका विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना वसईत मागील महिन्यात घडली होती. या प्रकरणी तत्काळ वरिष्ठ कार्यालयात माहिती न देणे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यासोबतच, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी तीन अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये वसई तालुका गटशिक्षण अधिकारी, वसई शिक्षण विस्तार अधिकारी आणि वालिव केंद्र प्रमुख यांचा समावेश आहे.सातिवली येथील श्री हनुमंत विद्या मंदिर या शाळेत शिकविणाऱ्या एका शिक्षिकेने उठाबशा काढण्याची शिक्षा काही विद्यार्थ्यांना दिली होती. त्यानंतर तब्येत खालावल्याने इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या काजल (अंशिका) गौड या मुलीचा मृत्यू उपचारादरम्यान झाला होता. या प्रकरणी वालिव पोलिसांनी संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करत अटक देखील केली होती. मात्र याच दरम्यान शाळेच्या इमारतीत अनधिकृतरित्या इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग भरत असल्याचे देखील शिक्षण विभागाला निदर्शनास आले आहे. तर शाळाच अनधिकृत जागेवर भरत असल्याची बाब देखील चौकशीमध्ये समोर आली होती.दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून या शाळेत अनधिकृत वर्ग सुरु असल्याची आणि शाळा अनधिकृत जागेवर भरत असल्याबाबत तालुका शिक्षण विभागाने कोणतीही कारवाई केलेली नसल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी या सर्व प्रकरणाची दखल घेत वसई प्रभारी गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलांगे, वसईतील वालिव केंद्र प्रमुख कैलास चव्हाण आणि वसई पंचायत समिती विस्तार अधिकारी ( शिक्षण ) राजेंद्र उबाळे यांना निलंबित केले आहे.शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण तात्काळ वरिष्ठ कार्यालयात न कळविणे, शाळा बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकारी नियमातील तरतुदीचे पालन न करणे असे कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या तीनही अधिकाऱ्यांवर लावण्यात आला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील आणि समितीने केली आहे.
महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन
तांत्रिक किचकट अडचणी दूर होणारमुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’ पद्धतीच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यात येणार आहे. महावितरणमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहभागातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे 'एआय' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रात पर्यावरणपूरक शाश्वत आर्थिक विकासाची सुरूवात होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) 'द रॉकफेलर फाउंडेशन- आरएफ', 'ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट-जीईएपीपी' आणि ऊर्जा विभाग यांच्या सहकार्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय) आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबविणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेतील रॉकफेलर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजीव शाह यांची यावर्षी जानेवारीमध्ये यासंदर्भात चर्चा झाली. यामध्ये वीज वितरण प्रणालीमध्ये डिजिटल ट्वीन वापर करण्याची अतिशय नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे आली. ऊर्जा विभागही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असून त्यांनी महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्राच्या दृष्टीने हा क्रांतिकारी निर्णय घेतला.आरएफ आणि जीईएपीपीसारख्या संस्थांच्या सहकार्यातून अत्याधुनिक एआय आधारित जागतिक दर्जाचा प्लॅटफॉर्म हा देशातील इतर वीज कंपन्यांसाठी आदर्श ठरेल, वीज वितरण क्षेत्रातील कंपन्यासाठी हा एक आदर्श मानदंड असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. महावितरण कंपनीसाठी विकसित होणाऱ्या उपाययोजना वीज वितरण क्षेत्रातील दीर्घकालीन, शाश्वत आणि परिणामकारक सहाय्यभूत असतील. तसेच वीज वितरणमध्ये 'डिजिटल ट्वीन' पद्धती विकसित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील शेतकरी आणि वीज ग्राहक यांना या नवीन डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक विश्वसनीय व विजेची सहज उपलब्धता मिळणार आहे. जागतिक स्तरावरील ए आय तंत्रज्ञान व ऊर्जा क्षेत्रातील थेट भागीदारीच्या मदतीने, महाराष्ट्रात प्रगत डिजिटल प्रणाली लागू होइल. या उपक्रमामध्ये, वीज नेटवर्कचे डिजिटल मॉडेल तयार केले जात आहे. जेणेकरून वीज प्रवाहाचे विश्लेषण, ग्रीडची ऑप्टिमायझेशन, वीज आउटेज नियोजन, नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांचे (आरई) अधिक चांगले होईल. विद्युत वाहिन्यांच्या देखभालीसाठी अधिक जागरूक नियोजन तसेच शेतकऱ्यांसाठी सौर उर्जा वापर यासाठी ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली काम करेल. ही डिजिटल प्रणाली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये लागू केली जात आहे, ज्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार आहेत.पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरुवातहरित ऊर्जा प्रणालीकडे वाटचाल या डिजिटल रूपांतरणामुळे प्रकल्प व्यवस्थापनात जलद निर्णय घेता येतात. यामुळे ग्रीडच्या कार्यक्षमतेत वाढ झाली असून, सौर ऊर्जा अधिक प्रमाणात उपयोगात आली आहे. या हरित ऊर्जा वापराने प्रदूषणात मोठी घट होणार आहे. या नव्या प्रणालीमुळे विद्युत वितरणामध्ये कमीत कमी एक टक्का जरी वीज गळती घटली तरी वर्षाला सुमारे १०००-१५०० कोटी रुपयांची बचत होऊन नुकसानीत मोठी घट होणार आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वउपक्रमात जागतिक सहभागामुळे याप्रकारच्या डिजिटल उपाययोजना, विशेषतः भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या देशांत, वीजविषयक स्थिरता, अखंड उपलब्धता व ग्रामीण भागांत विद्युत सेवांची गुणवत्ता सुधारण्यात महत्त्वाचा बदल ठरू शकतो. भारतात वीज वितरण व्यवस्थेत एआय डिजिटल प्रणाली वापराचा महत्त्वपूर्ण प्रयत्न होत असून, आधुनिक भारताला शाश्वत स्वयंपूर्ण, पर्यावरणपूरक कार्यक्षम ऊर्जा प्रणालीची गरज आहे.
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू
गडकरी यांची लोकसभेत माहितीमुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत केली. गडकरी यांनी सांगितले की, देशातील सध्याची टोल वसुली प्रणाली एका वर्षाच्या आत पूर्णपणे बंद केली जाईल आणि त्याऐवजी नवी इलेक्ट्रॉनिक टोल प्रणाली लागू करण्यात येईल. या नवीन प्रणालीमुळे महामार्गावर वाहने न थांबता, विनाअडथळा प्रवास करणे शक्य होणार आहे.नितीन गडकरी म्हटले की, हायवे पूर्णपणे डिजिटल करण्याच्या उद्देशाने वाहन थांबवून शुल्क घेण्याची सध्याची पद्धत बंद करण्यात येत आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे देशभरातील टोल प्लाझा अदृश्य होतील आणि वाहने टोल भरण्यासाठी न थांबता वेगात पुढे जाऊ शकतील. यामुळे टोलवरील लांब रांगा आणि वेळेची बचत होईल.सध्याच्या फास्टॅग तंत्रज्ञानावर आधारित ही नवी प्रणाली राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (एनईटीसी) अंतर्गत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केली आहे. यात आरएफआयडी आधारित फास्टॅग उपकरण वाहनाच्या विंडस्क्रीनवर (समोरच्या काचेवर) लावले जाते. वाहन टोल प्लाझातून जाताना, हे उपकरण थेट चालकाच्या बँक खात्यातून टोलची रक्कम आपोआप कापते. यामुळे रोख व्यवहार किंवा थांबण्याची आवश्यकता भासत नाही. सध्या ही नवीन प्रणाली देशभरातील सुमारे १० ठिकाणी चाचणी आणि देखरेखीसाठी लागू करण्यात आली आहे. पुढील एका वर्षात ती संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कवर लागू होण्याची अपेक्षा आहे.
डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार
मुंबई (विशेष प्रतिनिधी) -मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी शुक्रवारी ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी पदभार स्वीकारला. मावळते अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्याकडून ढाकणे यांनी हा पदभार स्वीकारला.मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी यांनी डॉ. ढाकणे यांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. ढाकणे यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेतली.डॉ. ढाकणे यांच्या प्रशासकीय सेवेची सुरुवात सन १९९४ मध्ये नाशिक येथे उप जिल्हाधिकारी म्हणून झाली. डॉ .ढाकणे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २०१० च्या तुकडीचे अधिकारी आहेत. आजवरच्या ३१ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केंद्र शासनाच्या वित्त व उद्योग मंत्रालयात अतिरिक्त खासगी सचिव, सोलापूर महानगरपालिका आयुक्त, जळगाव जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक या पदांची जबाबदार पार पाडली आहे.तसेच अहिल्यानगर (अहमदनगर) आणि मालेगाव येथे उप विभागीय अधिकारी, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात खासगी सचिव, ऊर्जा मंत्रालयात खासगी सचिव, ‘महानिर्मिती’चे कार्यकारी संचालक, वित्त मंत्री यांचे खासगी सचिव, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळात सह व्यवस्थापकीय संचालक, मुंबईत अपर जिल्हाधिकारी व नियंत्रक (अतिक्रमण निर्मूलन / निष्कासन), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात उप मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. अलीकडे ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत होते.
सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत
मुंबई : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी साईबाबांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट तेव्हाच्या आणि नंतर आलेल्या पिढ्यांनाही प्रेरणा देणारा ठरला.८६ वर्षीय सुधीर दळवी सध्या एका दुर्धर आजाराने ग्रस्त असून ते ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांच्या कुटुंबियांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला होता. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे त्यांना शिर्डी संस्थानाकडून ११ लाख रुपयांची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अभिनेते सुधीर दळवी यांना आर्थिक अडचण असल्याचे लक्षात येताच श्री साई बाबा संस्थान ट्रस्टने (शिर्डी) त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी संस्थेच्या वतीने नियमात बदल करून त्यांना मदत करण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल केले. यावर झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने ११ लाख रुपयांची मदत देण्यास हिरवा झेंडा दाखवला.न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि हितेन एस वेणेगावकर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत म्हटले, लोकांची श्रद्धा आणि ज्येष्ठ अभिनेत्याने साकारलेली भूमिका पाहता. ट्रस्ट त्यांना आर्थिक मदत देऊ शकते. श्री साई बाबांनी आयुष्यभर इतरांना मदत केली होती.त्यांच्या आयुष्याचा सार पाहता ही मदत योग्य आहे. खंडपीठाने म्हटले की, ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांना आर्थिक मदत हवी असल्याची माहिती समोर आली. त्यांच्या उपचारासाठी ११ लाख रुपये देण्यास आम्ही संस्थेला परवानगी देण्यात आली असून श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट (शिर्डी), कायदा २००४ च्या कलम १७ (२) (२) (ओ) च्या तरतुदीनुसार ही मदत मानवी कल्याणाच्या उद्देशाने देण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
मोहित सोमण: इंडिगो विमाने शेकडोंच्या संख्येने रद्द झाल्याने उपलब्ध असलेल्या विमानाचे तिकिट अव्वाच्या सव्वा दराने सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात ग्राहकांची लूटमार सुरू असल्याने प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण आहे. एका तिकिटाचे दर ३००० ते ४००० पासून ६०००० रूपयांपर्यंत गगनाला भिडले आहेत. काल आणि परवा १९१ पेक्षा अधिक विमाने इंडिगो (IndiGo) एयरलाईनने रद्द केल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय झाली आहे. सर्वात मुख्य बाब म्हणजे सरकारच्या हवाई उड्डाण विभागाच्या डीजीसीएने स्पष्टपणे तिकीट न वाढवण्याची ताकीद दिल्यानंतरही कंपनीच्या मोबाईल अँप किंवा पोर्टलवर अथवा इतर थर्ड पार्टी अँपवरली तिकिट दर महागड्या दरात विकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित प्रवाशांनी ही तक्रार करताना प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीने तिकिटाचे दर ६०००० रुपयांवर वाढवले आहेत.'एअरलाइन्सने लवकरात लवकर कायद्याचे पालन करूनच व्यवस्था पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे. यापूर्वीच सरकारने अधिसूचनेत सांगितलेल्या नियामांचे पालन करताना व्यवस्था सुनिश्चित राहिल याची खात्री करण्यासाठी सांगितले होते. मात्र तांत्रिक कारणांमुळे, कमी मनुष्यबळामुळे व बदलेल्या पायलट नियमांची पूर्तता करताना पायलटांचेही मनुष्यबळ कमी पडल्याने अनेक विमाने आजही रद्द झाल्याचा खुलासा प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परतावा (Refund) घेण्यासाठी लांब रांगा लागल्याचे चित्रही प्रसारमाध्यमांनी दाखवले आहे.डीजीसीए (Directorate of Civil Aviation DGCA) या नियामक आयोगाने मोठ्या प्रमाणात यासाठी इंडिगो कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाची चौकशी सुरू केली असून व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. काल संध्याकाळी कंपनीने पुढील ४८ तासात व्यवस्था पूर्ववत होईल असे म्हटले होते. इंडस्ट्रीतील सुत्रांच्या माहितीनुसार, इंडिगोची गेल्या १ महिन्यात ६२% विमाने रद्द करण्यात आली होती ज्यामुळे मोठा फटका प्रवाशांना बसला. तरीही व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी अद्याप यंत्रणेला यश न आल्याने या निमित्ताने कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कालही उपलब्ध विमानाचे तिकिट दर ४३००० रूपयांवर पोहोचले होते.याउलट, अनेक परदेशी शहरांना जाणाऱ्या विमानांचा खर्च अनेक व्यस्त देशांतर्गत मार्गांपेक्षा कमी झाला आहे कारण या संकटात आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर कोणताही परिणाम झालेला नाही. जगातील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक असलेल्या दिल्ली आणि मुंबई दरम्यान परतीच्या विमानांचा खर्च आता इकॉनॉमी श्रेणीत सुमारे ६०००० रुपये सुरू असल्याचे रिपोर्टिंग प्रसारमाध्यमांनी केले आहे.इंडिगोने दिल्ली विमानतळावरून मध्यरात्रीपर्यंत सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द केली आहेत जी आजपर्यंतच्या एकूण ५२३ रद्द झालेल्या विमानांपैकी केवळ एक भाग आहे. कोणताही पर्याय नसल्यामुळे, प्रवाशांना दुसऱ्या एअरलाइनसह शेवटच्या क्षणी बुकिंग करायचे असल्यास अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत दिल्ली- कोलकातासाठी आज उपलब्ध असलेल्या विमानाची किंमत सुमारे ३२००० रुपये आहे. उद्याच्या फेरीसाठी, त्याच मार्गावर ८५००० रुपये आहेत ज्यामुळे ते युरोपला जाण्यापेक्षा महाग झाले आहे. माहितीनुसार, सर्वात स्वस्त दिल्ली-लंडन विमान प्रवासाचे भाडे २५००० रुपयांच्या आसपास आहे, तर दिल्ली-पॅरिसचे भाडे २५००० रुपयांपेक्षा कमी आहे. दोन्ही ठिकाणांसाठी राउंड-ट्रिपचा खर्च ६०००० रुपयांपेक्षा कमी आहे.मुंबई आणि चेन्नई दरम्यानचा सर्वात स्वस्त विमान प्रवासाचा भाडा सुमारे ६०००० रुपयांचा आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-श्रीनगर विमानाचे तिकीट ज्याची किंमत इतर दिवशी १०००० रुपयांपेक्षा जास्त नाही त्या किमान ६२००० रुपयांना विकल्या जात आहेत. आणि ती फक्त एक मार्ग आहे. दुसऱ्या दिवसासाठी बुक केलेले परतीचे तिकीट ९२००० रुपयांपेक्षा जास्त आहे. यामुळे तिकिट न वाढवण्याचा सूचना दिल्या असतानाही आदेशाचे उल्लंघन करून सरास प्रवाशांची लूट सुरू असल्याचे प्रवासी सांगत आहेत.नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांमुळे कर्मचाऱ्यांसाठी जास्त विश्रांती कालावधी अनिवार्य करणाऱ्या वैमानिक आणि विमान कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे इंडिगोला शेकडो उड्डाणे रद्द करावी लागली अशी प्राथमिक माहिती मिळाली होती. इंडिगोने कबूल केले आहे की नवीन FDTL नियमांनुसार आवश्यक असलेल्या वैमानिकांची संख्या त्यांनी चुकीची ठरवली ज्यामुळे हे संकट निर्माण झाले.
Mangal Prabhat Lodha : भाजपच्या वर्षपूर्ती मेळाव्यात कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. या मेळाव्यातून मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. भाजप देवाभाऊमय तर आहेच. मात्र, महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देखील देवाभाऊच ठरवतात, असे मोठं वक्तव्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे […] The post “राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात”; भाजपच्या बड्या मंत्र्यांचं खळबळजनक विधान appeared first on Dainik Prabhat .
live-in relationship | court – राजस्थान उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की, एकत्र राहू इच्छिणा-या दोन प्रौढ व्यक्ती त्यांच्या लग्नाच्या वयाच्या नसल्या, तरीही ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतात. केवळ लग्नासाठी कायदेशीर वय गाठले नसल्याच्या आधारावर एखाद्याचे घटनात्मक अधिकार मर्यादित केले जाऊ शकत नाहीत, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. जयपूर उच्च न्यायालयातील न्या. अनुप […] The post दोन प्रौढ व्यक्ती लिव्ह-इनमध्ये राहू शकतात.! लग्नाचे वय पूर्ण असण्याची अट नाही? न्यायालयाने स्पष्ट सांगितले appeared first on Dainik Prabhat .
“भारत तटस्थ नसून जागतिक शांततेच्या बाजूने” ; द्विपक्षीय चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
putin modi bilateral talks। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी हैदराबाद हाऊसमध्ये पुतिन यांचे स्वागत केले. द्विपक्षीय बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती पुतिन यांचे भारत भेटीबद्दल आभार मानले. त्यासोबतच अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी युक्रेन संघर्षावर भारताची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी, भारत तटस्थ […] The post “भारत तटस्थ नसून जागतिक शांततेच्या बाजूने” ; द्विपक्षीय चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन appeared first on Dainik Prabhat .
Pune : उड्डाणपूलासाठी शासनाने प्रस्ताव पाठवावा
प्रभात वृत्तसेवा पुणे : औंधपासून खडकी पोलिस स्टेशनदरम्यानच्या रस्त्यावर अनेक समस्या असल्याने येथे उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग उभारण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केल्या आहेत. या समस्येबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ता सुनील माने यांनी दिल्लीत गडकरी यांची भेट घेऊन मागणी केली […] The post Pune : उड्डाणपूलासाठी शासनाने प्रस्ताव पाठवावा appeared first on Dainik Prabhat .
अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’
सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवादमुंबई : लहान वयात आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांच्या नशीबात अतिशय हालाखीचे दिवस येतात. शिक्षण आणि रोजगार दूरच, ही मुले कायमस्वरुपी प्रवाहाबाहेर फेकली जातात. ही बाब गंभीरपणे विचारात घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. १७ जानेवारी २०१८ रोजी अनाथांना शिक्षण आणि नोकरीत एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. या ऐतिहासिक निर्णयामुळे आतापर्यंत ८०० हून अधिक अनाथ मुले शासकीय सेवेत दाखल झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आपल्या तिसऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाची पहिली वर्षपूर्ती अनाथ मुलांसोबत साजरी करत, त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.यानिमित्ताने वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘कृतज्ञतेचा आनंद’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या अनाथ लाभार्थी मुला-मुलींसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जवळून संवाद साधला. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेऊन आज एक वर्ष पूर्ण झाले. वर्षपूर्तीच्या निमित्ताने अनेक चांगले कार्यक्रम आयोजित केले, पण सगळ्यात जास्त आनंद या मुलांसोबत साजरा करताना येतोय. निःशब्द भाव खूप काही बोलून जातो. कार्यातून समाजपरिवर्तन घडवणे, हेच खरे समाधान आहे”, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
चौलच्या पर्वतवासी श्री दत्तात्रेय देवस्थानच्या यात्रेला सुरुवात
सोमवारी, ८ डिसेंबरला पाच दिवसाच्या यात्रेचा होणार समारोपअलिबाग : चौलच्या पर्वतवासी श्रीदत्तात्रेय देवस्थानच्या पाचदिवसीय यात्रेला श्री दत्तजयंतीपासून ४ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून, या यात्रेसाठी रायगडसह मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली आदी भागातून भाविक येण्याची शक्यता असल्याने या पाचदिवसीय यात्रेत लाखोंची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोमवारी ८ डिसेंबरला या पाचदिवसीय यात्रेचा समारोप होणार आहे.इतिहास काळात विदेश व्यापारांशी संलग्न असलेल्या चौल चंपावती नगरीत प्रसिद्ध अशी ३६० मंदिरांची नोंद सापडते. चौल रामेश्वर, चौल शितळादेवी, हिंगुळजा देवी, मुखरी गणपती, महालक्ष्मी, चंपावतीदेवी, चौल कुंडेश्वर मंदिर, रेवदंडा हरेश्वर मंदिर, रेवदंडा मारूती मंदिर आदी मंदिरे अद्यापी इतिहासाची साक्षीदार आहेत, त्यापैकीच चौलचे भोवाळे येथील पर्वतवासी श्रीदत्तात्रयांचे स्वयंभू देवस्थान होय. चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्तात्रयांचे स्वयंभू देवस्थान संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.या यात्रेला रायगड जिल्ह्यासह मुंबई, पुणे, ठाणे या भागांतून असंख्य भाविक यात्रेच्या पाच दिवसात उपस्थिती लावत श्रीदत्तात्रेयाचे दर्शन घेण्याबरोबरच यात्रेचा मनमुराद आनंद लुटत असतात. या वर्षातील ही अलिबाग तालुक्यातील शेवटची यात्रा असून, हा दत्त नवसाला पावतो व त्याच्या दर्शनाने भाविकांच्या अडीअडचणीचे निवारण होते अशी लोकांची श्रध्दा आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी नगरीतील पाठारे क्षत्रिय पाचकळशी समाजापैकी मुंबईत राहणाऱ्या मंडळीनी सुमारे ४० ते ६० वर्षापूर्वी तयार केलेला चांदीचा मुखवटा चौल थेरोंडा येथून पालखीतून वाजतगाजत श्रीदत्त मंदिरात आणला जातो. मुळ दत्तमूर्तीची यथासांग पुजा करून हा मुखवटा मुळ दत्तमूर्तीला लावला जातो. यात्रेपूर्वी श्रीदत्त मंदिरात सात दिवस सप्ताह चालतो.हे मंदिर पुरातन नसले तरी ऐतिहासिक निश्चितच आहे. कारण आग्रेंच्या उत्तरकालीन इतिहासात या दत्तमंदिराचा उल्लेख वरचेवर आढळतो, तसेच आंग्रे घराण्यातील पुरूषांची या पर्वतवासी दत्तावर अतिशय श्रध्दा होती असे समजले.चौलला येण्यासाठी खासगी वाहनाने वडखळ, पोयनाड, अलिबाग, नागावमार्गे चौलला येता येते. एसटीने आल्यास बोरिवली-रेवदंडा या एसटीने किंवा गेटवे ऑफ इंडिया येथून पीएनपी, अंजठा, पीएनपीने लॉचने मांडवा (अलिबाग) आल्यानंतर त्यांच्या खासगी बसने अलिबागला आल्यानंतर अलिबाग-रेवदंडा एसटीने, तसेच खासगी रिक्षाने चौल नाका येथे उतरून यात्रेच्या ठिकाणी पायी जाता येते. चौलमध्ये राहावयाचे झाल्यास या परिसरात लॉजिंग-बोर्डीगची सोय आहे. उपहारगृहेही आहेत.
Lifestyle: हिवाळ्याच्या दिवसांत शरीराची काळजी घेणे आवश्यक असते. थंडीमुळे सर्दी-खोकला, थकवा आणि कमजोरी लवकर जाणवते. अशा वेळी आहारात सूप समाविष्ट करणे उत्तम मानले जाते. पण बाजारातील बहुतेक सूप पावडरमध्ये मैदा, एमएसजी, प्रिझर्व्हेटिव्ह आणि कृत्रिम फ्लेवर असतात. त्यामुळे घरच्या घरी व्हेजिटेबल सूप पावडर बनवणे सर्वात सुरक्षित आणि पौष्टिक पर्याय आहे. घरच्या घरी सोप्या पद्धतीने व्हेजिटेबल सूप […] The post Lifestyle: हिवाळ्यात घरच्या घरी बनवा हेल्दी व्हेजिटेबल सूप पावडर… प्रत्येक घोटात चव आणि भरपूर पौष्टिकता appeared first on Dainik Prabhat .
कूपर रुग्णालयाची रुग्णसुरक्षा रामभरोसेच!
कधी रुग्णांना उंदरांचा चावा, तर कधी रुग्ण खाटेवरून पडतातमुंबई : महापालिकेच्या कूपर रुग्णालयात रुग्णांना कधी उंदीर चावत आहेत तर कधी रुग्ण खाटेवरून पडत आहेत. या घटना सुरूच आहेत. महिनाभरात तीन रुग्ण खाटांवरून पडले आहेत. चार दिवसांपूर्वीही अशीच घटना घडली आहे. त्यामुळे रुग्ण सुरक्षेचा प्रश्न कायम आहे. मात्र मिरगीचा झटका आल्याने ही महिला पडल्याचे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आले. तर रुग्णाच्या नातेवाईकांनी सुरक्षेसाठी रेलिंग बसवण्याची मागणी केली आहे. कूपर रुग्णालयातील ८० वर्षांच्या झिन्नत रसूल अहमद यांना ३० नोव्हेंबर रोजी उपचारासाठी दाखल केले होते. रात्री उशिरा त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईक महिला थंडी वाढल्याने पंखा बंद करण्यासाठी दोन पावले दूर गेल्या आणि इतक्यात झिन्नत या अचानक बेडवरून थेट जमिनीवर कोसळल्या.रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, झिन्नत यांना उच्च रक्तदाब, फिट्स येणे आणि मनोविकार असे आजार असून त्या मिरगीच्या झटक्यामुळेच त्या पडल्या. हा अपघात असून रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीशी संबंधित आहे. तसेच या रुग्णाला रेलिंग बेड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया प्रशासनाकडून सांगण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात एक ज्येष्ठ महिला रुग्ण अशीच पडल्याची घटना घडली होती. वॉर्डमध्ये रात्री नातेवाईकांना वॉर्डमध्ये राहू दिले जात नाही. तसेच अनेक बेड ला सेफ्टी ग्रील नसतात. त्यामुळे किमान बेडवर सेफ्टी ग्रिल अनिवार्य करावी किंवा गंभीर रुग्णांसोबत एक नातेवाईक राहण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.सुरक्षेसाठी अतिरिक्त रक्षकांची मागणीकूपर रुग्णालयातील वाढत्या सुरक्षेच्या गरजेनुसार अतिरिक्त सुरक्षारक्षक उपलब्ध होणार आहेत. मुंबई महापालिकेकडून आलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने अतिरिक्त सुरक्षारक्षक नियुक्त करण्यास तत्त्वतः सहमती दिली आहे. महामंडळाच्या ई-पोर्टलवर कोटेशन नोंदविणे, शुल्क तपशील अपलोड करणे आणि अधिकृत मागणी नोंदविणे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सुरक्षारक्षकांची प्रत्यक्ष नियुक्ती होणार आहे. तसेच, सुरक्षारक्षक नियुक्तीसाठी लागणारा निधी महापालिकेकडून उपलब्ध झाल्यावरच संबंधित रुग्णालयात रक्षक पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. महामंडळाच्या दरपत्रकानुसार शुल्क अंमलात असून, कोणत्याही अडचणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने माहिती द्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. सर्व आवश्यक कागदपत्रे व प्रशासनिक मंजुरी मिळाल्यानंतरच कूपर रुग्णालयात अतिरिक्त सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत. त्यामुळे ही समस्या लवकरच सुटणार आहे.२० रेलिंग बेडसाठी लवकरच निविदासध्या महिला वॉर्डमध्ये एकूण १० बेडला रेलिंग आहे. आम्ही लवकरच अजून २० रेलिंग बेडसाठी निविदा काढणार असून, याची प्रक्रिया देखील सुरू आहे. त्यामुळे एकूण ३० रेलिंग बेड्स आमच्याकडे उपलब्ध होतील. वॉर्डची क्षमता ८० आहे. त्यामुळे किमान ४० रेलिंग बेड असणे गरजेचे आहे. ३० बेड लवकर होतील, त्यानंतर आणखी १० रेलिंग बेड्ससाठी देखील प्रयत्न करणार आहोत.
मुख्याध्यापक, शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आज ‘शाळा बंद’
एक दिवसाचे वेतन कापण्याचा संचालनालयाचा इशारामुंबई : शिक्षकांचे समायोजन, टीईटी सक्ती, ऑनलाईन व अशैक्षणिक कामांचा बोजा थांबवा, सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करावी, शिक्षण क्षेत्रातील कंत्राटीकरण थांबवा अशा अनेक मागण्यासाठी राज्यातील खासगी अनुदानित, अंशत अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी ५ डिसेंबर रोजी ‘शाळा बंद’ आंदोलन पुकारले आहे. मात्र शिक्षकांनी ५ डिसेंबर रोजी शाळा बंद ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला आहे.राज्यातील शिक्षकांच्या विविध संघटनांनी विविध मागण्यांसाठी ५ डिसेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील खासगी अनुदानित, अंशत अनुदानित, विनाअनुदानित अशा जवळपास २५ हजार शाळा शुक्रवारी बंद राहणार आहेत. हे प्रमाण राज्यातील एकूण शाळांच्या जवळपास २५ टक्के इतके आहे. त्यामुळे याचा मोठा परिणाम शुक्रवारी राज्यामध्ये दिसून येण्याची शक्यता आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ‘शाळा बंद’ आंदोलन मोडीत काढण्यासाठी शिक्षण संचालनालयाने शाळा बंद ठेवणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.विद्यार्थी हित लक्षात घेता ५ डिसेंबर रोजी शाळा बंद राहणार नाही दक्षता घ्यावी. तसेच आंदोलनात सहभागी शाळा बंद ठेवणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले.राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण निरीक्षक यांना आदेश दिले. या आदेशानुसार राज्यातील सर्वच शाळा प्रशासनाला आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांचे एक दिवसांचे वेतन कपात करण्याचे निर्देश शिक्षण कार्यालयांकडून देण्यात आले आहेत. राज्यामध्ये २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी सक्ती रद्द करण्यात यावी, संचमान्यतेसंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय रद्द करून जुने निकष लागू करावेत, शिक्षकांवरील ऑनलाइन व अशैक्षणिक कामांचा बोजा थांबवावा, शिक्षणसेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तत्काळ पदभरती करावी, सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करावी, अल्पसंख्याक शाळांना संचमान्यतेबाबत विशेष सवलती द्याव्या, शिक्षण क्षेत्रातील कंत्राटीकरण थांबवावे, अशा विविध मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून ‘शाळा बंद’ आंदोलन करण्यात येणार आहे.खालील प्रमुख मागण्या१. टीईटी निर्णयावरील पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करावी.२. टीईटी निकालाचा चुकीचा अर्थ काढून विविध कार्यालयांकडून सुरू असलेली कार्यवाही तत्काळ थांबवावी.३. म.ना.से. नियम १९८२ व ८४ अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी.४. शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी.५. शिक्षकांनाही १०, २०, ३० वर्षांनंतरची सुधारित तीन वेतन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करावी.६. १५ मार्च २०२४ चा संचमान्यता विषयक शासन निर्णय रद्द करावा.७. राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बंद असलेली पदभरती तत्काळ सुरू करावी.८. शिक्षकांवरील विविध अशैक्षणिक व ऑनलाइन उपक्रम तात्काळ थांबवावेत.९. विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी भेदभाव न करता मंजूर करावी.१०. वस्तीशाळेतील शिक्षकांची सेवा मूळ नियुक्ती तारखेपासून सर्व लाभांसाठी ग्राह्य धरावी.११. आश्रमशाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे धोरण रद्द करण्यात यावे.१२. कमी पटाच्या शाळा बंद न करता शिक्षणक्रम सुरू ठेवावा.१३. शिक्षकांचे इतर सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत.
बुरख्याच्या परवानगीसाठी आंदोलन
मुंबई : गोरेगावमधील विवेक एज्युकेशन सोसायटीच्या विवेक विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालयाने कपड्यांबाबत आचारसंहिता जाहीर केली असून विद्यार्थ्यांना धार्मिक पेहराव करून येण्यास बंदी घातली आहे. त्यानुसार महाविद्यालयात बुरखा-नकाब घालून येण्यास बंदी घातली आहे. या निर्णयाविरोधात मुस्लम विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थ नगर येथे असलेल्या विवेक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी आचारसंहिता लागू केली. त्यात महाविद्यालयात येण्याच्या वेळा, प्रवेशद्वार बंद होण्याच्या वेळा याचबरोबर विद्यार्थ्यांनी कोणते पोशाख घालणे टाळावे, हे नमूद केले. या पत्रकात धार्मिक पोशाख परिधान करण्यावर बंदी घातली आहे. त्यानुसार मुस्लिम मुलींना बुरखा आणि नकाब परिधान करण्यास बंदी घातली आहे. मात्र हिजाब घालण्यास परवानगी दिली आहे.या निर्णयाविरोधात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. यावेळी आम्ही येथे शिकायला येतो. आम्ही नकाब किंवा बुरख्यात जास्त सहजपणे वावरू शकतो. आमचा पोशाख आमच्या शिक्षणाच्या आड कसा येऊ शकतो, असा प्रश्न या विद्यार्थिनींनी उपस्थित केला.एमआयएमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला, तसेच मनसेने सुद्धा महाविद्यालयामध्ये धार्मिक बाबी आणू नयेत अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला. एमआयएमच्या आणि मनसेच्या सहभागामुळे या मुद्द्याने राजकीय स्वरूप धारण केले आहे. याबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्य शिजा मेनन यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. तसेच आमच्या वकिलांनी आंदोलनकर्त्या मुलींनाही उत्तर दिले असल्याचे सांगितले.
मेट्रो २ ‘ब’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा कायम
मुंबई : मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याच्या संचलनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. मात्र मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होऊन एक महिना उलटला तरी या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा कायम आहे. राज्य सरकारला लोकार्पणासाठी मुहूर्त मिळालेला नाही. यामुळे प्रवाशांना या टप्याची प्रतीक्षा कायम आहे. अनेकदा नियोजन करूनही या मेट्रोचे लोकार्पण अद्याप होऊ शकलेले नाही. गुरुवारी नियोजित असलेला कार्यक्रमही घोषणा होण्याआधीच रद्द करण्यात आला आहे.अंधेरी पश्चिम ते मंडाळे या मेट्रो २ बी मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात डायमंड गार्डन ते मंडाळे या ५.६ किमीच्या मार्गिकेचा समावेश आहे. भुयारी मेट्रोच्या अंतिम टप्प्यासोबतच मेट्रो २ बी मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे ८ ऑक्टोबर रोजी लोकार्पण केले जाणार होते. मात्र तोपर्यंत सीएमआरएस प्रमाणपत्र न मिळाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाले व ऑक्टोबरच्या अखेरीस लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र लोकप्रतिनिधींची वेळ न मिळाल्याने पुन्हा हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला होता. यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लोकार्पण करण्याची तयारीही करण्यात आली. मात्र हे लोकार्पणही पुढे ढकलण्यात आले.
कल्याण - डोंबिवलीतील विकासकामांसाठी निधी उपलब्ध
डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीतील कामांना गती देण्यासाठी राज्य नगर विकास विभागाच्या माध्यमातून तब्बल १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पायाभूत सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय व नागरी सोयीसुविधा मजबूत करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण कामांना मंजुरी देण्यात आली आहे. जलकुंभ, पूल, सभागृह विकास, रस्ते कॉंक्रिटीकरण अशा कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनि त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षात पायाभूत सुविधांनी सर्वसमान्यांना मोठा दिलासा दिला आहे. नगरविकास विभागाच्या माध्यमातून ५ विकासकामांसाठी तब्बल १६ कोटींचा निधी मिळवण्यात यश आले आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी खा.श्रीकांत शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला.जुनी डोंबिवली परिसरातील प्रभाग क्रमांक ६४ साठी उंच जलकुंभ आणि पंप हाऊस बांधण्यासाठी ७ कोटी २४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. कल्याण पूर्वेतील वालधुनी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी १.७६ कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर डोंबिवली पश्चिमेतील देविचा पाडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृह विकसित करण्यासाठी १.५० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. तर गोग्रासवाडी येथील रस्ते कॉंक्रिटीकरणासाठी ५० लाख, गरिबाचा वाडा ते ४५ मीटर रिंगरोड जोडणारा रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी ५ कोटींची निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या उपलब्धतेमुळे महत्वाच्या रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या आणि पूल बांधणीचा कामाला गती मिळणार आहे.
भाईंदरमध्ये मराठी माणसाला घर देण्यास नकार !
बिल्डर लॉबीची अजब वागणूकभाईंदर : मराठी विरुद्ध अमराठी वादाचे भाईंदरमध्ये पडसाद उमटले आहेत. भाईंदरमध्ये एका सोसायटीत मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार देण्यात आला आहे, असा आरोप एका तरुणाने केला. त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. सतत मराठी-अमराठी वाद निर्माण होत आहे. भाईंदर प., येथील स्कायलाईन या सोसायटीत घर खरेदी करण्यास गेलेल्या रवींद्र खरात नामक युवकाने हे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांनुसार, ते फ्लॅटची माहिती घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना स्पष्ट सांगण्यात आले की, येथे फक्त जैन, मारवाडी किंवा ब्राह्मण समाजातील लोकांनाच फ्लॅट दिले जातील. खरात यांनी म्हटले की, आम्ही मराठी, नॉनव्हेज खातो आणि आमची जात ब्राह्मण, जैन किंवा मारवाडी नसेल, तर आम्हाला फ्लॅट दिला जाऊ शकत नाही, असे तिथे स्पष्टपणे सांगण्यात आले. संबंधित बांधकाम व्यावसायिकावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी खरात यांनी केली आहे.संबंधित बांधकाम व्यावसायिक हा जैन समाजाचा आहे. तो फक्त जैन बांधवांसाठीच इमारती बांधणार आहे का? स्थानिक आमदार आणि बांधकाम व्यावसायिकदेखील जैन असल्याने भाईंदरमध्ये मराठी माणसाला डावलले जात आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या हक्काची आणि भाषेची गळचेपी सुरू आहे, असा संताप या प्रकरणी व्यक्त होत आहे. काँग्रेसने संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या प्रोजेक्टवर स्टिंग ऑपरेशन करून हे धक्कादायक वास्तव उघड केल्याचा दावा केला आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये बिल्डरची माणसे मराठी माण्साला फ्लॅट देण्यास नकार देत असल्याचे समोर आले आहे. या पट्ट्यामध्ये ८५ टक्के गुजराती, मारवाडी लोक आहेत. कोणाशीही बोलून फायदा नाही. बिल्डरसुद्धा जैन आहे, असे प्रकल्पाचा प्रतिनिधी बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
“मशिदी अन् मदरशांमध्येही सीसीटीव्ही अनिवार्य करावे” ; भाजप खासदार अरुण गोविल यांची मागणी
Arun Govil on Mosques। लोकसभेत शून्य प्रहरात, मेरठचे भाजप खासदार अरुण गोविल यांनी मशिदी आणि मदरशांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली. त्यांनी,”ही मोठी सार्वजनिक आणि सामुदायिक जागा आहेत जिथे सुरक्षा सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” असे सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट करताना, त्यांचे विधान कोणत्याही धर्मावर टीका करण्यासाठी नाही, तर देशातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी होते” असे […] The post “मशिदी अन् मदरशांमध्येही सीसीटीव्ही अनिवार्य करावे” ; भाजप खासदार अरुण गोविल यांची मागणी appeared first on Dainik Prabhat .
Asha Upcoming Marathi Movie Official Trailer: अभिनेत्री रिंकू राजगुरुने चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासून सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारताना दिसते. तसेच ती सोशल मीडियावर तिच्या फोटोशूटमुळे सतत चर्चेत असते. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. आपल्या चाहत्यांशी रिंकूने एक प्रकारचे घट्ट नाते तयार केले असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संपर्कात असते. रिंकू आता एका नव्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला […] The post रिंकू राजगुरु एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला; ‘आशा’ चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित appeared first on Dainik Prabhat .
देवेंद्र फडणवीस ३.० ची यशोगाथा
महाराष्ट्रासाठी ‘गोल्डन इयर’सुहास शेलार मुंबई : ५ डिसेंबर २०२४ चा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरला. हजारो नागरिकांच्या साक्षीने देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. शुक्रवारी या घटनेला वर्ष पूर्ण होत आहे. २०१४ ला ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून २०२४ पर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास हा प्रचंड संघर्षांचा राहिला. अनेकांनी त्यांना चक्रव्युहात अडकवण्याचा प्रयत्न केला. महाभारतातील अभिमन्यू चक्रव्यूह भेदण्यात अपयशी ठरला होता. पण, महाराष्ट्रातील या आधुनिक अभिमन्यूने चक्रव्यूह अचूक भेदला आणि भल्याभल्यांना गारद केले. या काळात फडणवीसांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची मोलाची साथ लाभली. गेल्या वर्षभरात त्यांनी लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. आज वर्षपूर्तीनिमित्त फडणवी ३.० सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा...पर्यटन क्षेत्रातील गुंतवणूक महाराष्ट्र पर्यटन धोरण २०२४ - ५ हजार कोटी नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन – १ हजार कोटी नाशिक कुंभ २०२७ तयारी – २५ हजार कोटी महिलांसाठी व्यवसाय योजना – ५०० कोटी मुंबई क्रूज टर्मिनल – २ हजार कोटीसामाजिक क्षेत्रात भरीव काम मराठा आरक्षणाबाबत ऐतिहासिक निर्णय आणीबाणी बंदी सन्मान योजना (पेन्शन वाढ) संत सेवालाल महाराज योजना (बंजारा समाजासाठी) डबेवाले आणि चर्मकार समाजासाठी घरे झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी स्वयं आणि समूह पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना‘इन्फ्रा मॅन’ देवेंद्रदेवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षात पायाभूत सुविधांवर सर्वाधिक ४ लाख कोटी रुपये खर्च केले. ही रक्कम महाराष्ट्राच्या सकल राज्य उत्पन्नाच्या एकूण १५ टक्के आहे. वांद्रे-कुर्ला संकुल ते विमानतळ भुयारी मार्ग, उत्तन ते विरार सागरी सेतू, समृद्धी महामार्ग थेट वाढवण बंदराला जोडणाऱ्या प्रकल्पांचा यात आवर्जून उल्लेख करावा लागेल.सप्टेंबर २०२५ मध्ये फडणवीस सरकारने ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यात मुंबई मेट्रो लाइन-११ (२४ हजार कोटी) आणि नागपूर आऊटर रिंग रोडचा समावेश आहे. मार्च २०२५ मध्ये ‘हायब्रिड एन्युइटी मॉडल’ फेज-१ अंतर्गत ६ हजार किमी रस्त्यांसाठी ४१ हजार ७३० कोटींची गुंतवणूक जाहीर करण्यात आली.महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने ऑक्टोबर २०२५ मध्ये १५ सामंजस्य करार (५६ हजार कोटी) करण्यात आले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मोलाचे योगदानफडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मोलाची भूमिका बजावत आहेत. शिंदे यांनी नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सांभाळत मुंबईसह महानगरातल्या पायाभूत सुविधांवर भर दिला. त्यांच्या पुढाकाराने सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडसारखे प्रकल्प पूर्ण झाले. परिणामी, पूर्व आणि पश्चिम महामार्गांची कनेक्टिव्हिटी सुधारली. शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील ग्रामीण भागात रस्ते आणि पाणीपुरवठा प्रकल्पांना प्राधान्य मिळाले.दुसरीकडे, अजित पवार यांनी अर्थ आणि नियोजन विभागाचा कारभार सांभाळत राज्याच्या आर्थिक स्थिरतेवर लक्ष केंद्रित केले. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात त्यांनी महिला, तरुणवर्ग आणि शेतकऱ्यांसाठी ६ लाख १२ हजार कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले. पवार यांच्या कठोर आर्थिक शिस्तीमुळे राज्याची आर्थिक तूट कमी करण्यात यश मिळाले.आजवरची सर्वाधिक परकीय गुंतवणूक आणण्यात यशदि. २० ते २४ जानेवारी २०२५ या कालावधीत दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने सर्वाधिक १५ लाख ७० हजार कोटींचे सामंजस्य करार केले. त्यातून जवळपास १६ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. या परिषदेत एकूण ६१ प्रकारचे करार झाले. त्यातील ५४ करार हे गुंतवणुकीचे आणि ७ करार हे स्ट्रॅटिजिक कॅटेगरीतले होते. यामध्ये स्टील, आयटी, ग्रीन एनर्जी, इन्फ्रास्ट्रक्चर आदी सेक्टरमध्ये गुंतवणूक झालेली आहे. पैकी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ६ ते ७ लाख कोटी, विदर्भामध्ये ५ लाख कोटी, उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमध्ये ३० ते ३५ हजार कोटी, त्याचबरोबर मराठवाडा विभागामध्ये २५ ते ३० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.शेतकऱ्यांना आधार कृषी पायाभूत विकास योजना : २५ हजार कोटी रुपयांची योजना जाहीर; हवामान बदल, आपत्ती आणि बाजार अस्थिरतेच्या काळात शेतकऱ्यांना आधार. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना : हवामान अनुकूल प्रकल्प; पावसाच्या अनियमिततेपासून शेतकऱ्यांचे संरक्षण. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना : सिंचनासाठी सौर पंप आणि दिवसा वीज पुरवठा. पीएम किसान सन्मान निधी : २१ व्या हप्त्यात १ हजार ८०८ कोटी रुपये लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. अतिवृष्टीग्रस्तांना मदत : ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज. देशी गोवंश रक्षण : शेती आणि सांस्कृतिक संवर्धनासाठी.
मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब
नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये एकीकडे दुबार मतदार आणि आरक्षण मर्यादेमुळे वाद निर्माण झाला. तर ऐन मतदानाच्या दिवशी नागपूर खंडपीठाने नगरपरिषदेची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय दिल्याने मतमोजणी लांबणीवर पडली. या पार्श्वभूमीवर नागपूर खंडपीठाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. ज्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून मतमोजणी २१ डिसेंबरलाच होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. आता या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत मतदानानंतर तातडीने निकाल जाहीर करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता २ डिसेंबर आणि २० डिसेंबर या दोन दिवशी होणाऱ्या मतदानाचा निकाल एकत्रितपणे २१ डिसेंबर रोजीच जाहीर होणार हे निश्चित झाले आहे.https://prahaar.in/2025/12/05/bjps-election-steering-committee-for-mumbai-municipal-corporation-announced/तसेच यावेळी न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला अत्यंत स्पष्ट निर्देश दिले आहेत. जर २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानात काही तांत्रिक अडचण आली किंवा ते मतदान पूर्णपणे पार पडू शकले नाही, तरीही निकालाची तारीख ही २१ डिसेंबरच असेल. ती पुढे ढकलली जाणार नाही. या सक्त निर्देशांमुळे आयोगावरील निकालाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी वाढली आहे.
अवधूत साठे 'धर्मसंकटात'६०१ कोटींच्या दंडासह बाजारातूनही बंदी सेबीने आदेशात दिली विस्तृत माहिती
मुंबई: सेबीच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अवधूत साठे यांच्याकडून ६०१ कोटीचा दंड वसूली केला जाणार असून सेबीने त्यांच्यावर खटला चालवून पुढील आदेशापर्यंत शेअर बाजारात भाग घेण्यास प्रतिबंध लागू केले आहेत. १२५ पानी अंतरिम आदेशात सेबीने बाजार तज्ञ व अवधूत साठे ट्रेडिंग अॅकेडमी यांच्यावर गंभीर आरोप केले असून शिकवणीच्या नावाखाली अनाधिकृतपणे शेअरची नावे सूचवून विद्यार्थ्यांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचे आढळले असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे. सेबीचे पूर्ण वेळ अधिकारी व सदस्य कमलेश वर्षनी यांनी आर्थिक २०२४-२०२५ कालावधीत यावर सखोल तपास करून आपले निष्कर्ष आरोपपत्रात दाखल केले आहेत. सेबीचे नोंदणीकृत नसूनही गुंतवणूकीचे सल्ले देणे यामुळे साठेंना महाग पडले आहे. अधिकाऱ्यांनी यापूर्वी २० ते २१ ऑगस्टला कर्जत येथील त्यांच्या क्लासेसच्या जागांवर धाडी टाकून काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती.इतकेच नाही तर सेबीने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२४ पर्यंत अवधूत साठे यांना ताकीद (Warning) देऊनही साठे व त्यांच्या क्लासेसने यावर गांभीर्याने विचार केला नसल्याचे सेबीने आरोपपत्रात म्हटले आहे. त्यामुळे हे सल्ले न थांबवल्याने सेबीने ही कारवाई केली. विशिष्ट शेअर सूचवून व त्यातून गुंतवणूक गोळा करुन अथवा झटपट पैसे कमावण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकीच्या नावाखाली 'माया' जमावण्यात आली असा आरोप सेबीने केला आहे. सेबी कायद्याच्या (SEBI Act) या कायद्याचे उल्लंघन करत हे कार्य साठेंनी सुरू ठेवल्याचेही नियामकांनी यावेळी स्पष्ट केले.तांत्रिकदृष्ट्या साठे यांची अकादमी केवळ ट्रेडिंग कोर्सेसच शिकवत नव्हती तर लाईव्ह मार्केट सत्रादरम्यान खरेदी-विक्री कॉल्स देखील देत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर सेबीने मोठ्या पातळीवर या प्रकारांची चौकशी सुरू केली. खासकरून चौकशी दरम्यान काहींना गुंतवणूकीत नुकसान झाल्याचे लक्षात आल्यानंतर सेबीने कारवाईला वेग वाढवला. चौकशी सुरू झाल्यानंतर, सेबीने व्हिडिओ, व्हॉट्सअँप संदेश, सोशल मीडिया कंटेंट, पेमेंट स्ट्रक्चर्स आणि सहभागींच्या साक्षींचे सखोल विश्लेषण केले त्या आधारे हे आरोपपत्र दाखल केले होते.आदेशात, नियामकाने म्हटले आहे की मार्च २०२४ मध्ये चुकीची माहिती आणि निवडक खुलासे केल्याबद्दल प्रशासकीय इशारा जारी करूनही, अकादमीने केवळ अभ्यासक्रम सहभागींच्या यशस्वी व्यवहारांचे प्रदर्शन करणारी दिशाभूल करणारी जाहिरात सामग्री प्रकाशित करणे सुरूच ठेवले. अनेक तक्रारदारांनी आरोप केला की प्रशिक्षण कार्यक्रमांनी असाधारण परताव्याचे आश्वासन दिले परंतु त्यामुळे मोठे नुकसान झाले आणि अकादमीने थेट बाजार व्यापार सत्रे आयोजित केली जिथे थेट व्यापार शिफारसी दिल्या गेल्या. सेबीच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या विश्लेषणात असे आढळून आले की थेट वर्गांदरम्यान विशिष्ट स्टॉक,लक्ष्य (Target Price) स्टॉप-लॉस पातळी आणि दिशात्मक दृश्ये (Directional Advice) नियमितपणे प्रदान केली जात होती. अवधूत साठे यांनी स्वतःचे एमटीएम पोझिशन्स देखील प्रदर्शित केले. सहभागींनी त्यांच्या सूचनांवर आधारित व्यवहार केल्याचे कबूल करताना पाहिले.तपासात पुढे असे दिसून आले की, ६.७५ लाख रुपयांपर्यंतच्या शुल्कासह मार्गदर्शन बॅचसाठी तयार केलेले अनेक खाजगी व्हॉट्सअँप ग्रुप स्टॉक शिफारसी, पर्याय धोरणे, प्रवेश आणि निर्गमन पातळी आणि निर्देशांक अंदाज सामायिक करण्यासाठी वापरले जात होते. सेबीने असे नमूद केले की असे वर्तन नोंदणीशिवाय गुंतवणूक सल्ला देण्यासारखे आहे यामुळे सेबी कायदा, गुंतवणूक सल्लागार नियम, संशोधन विश्लेषक नियम आणि PFUTP नियमांचे प्रथमदर्शनी उल्लंघन झाले आहे.सेबीने अंतरिम निर्देश लागू केले आहेत ज्यात (ASTAPL),अवधूत साठे आणि गौरी अवधूत साठे यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सिक्युरिटीज मार्केटमध्ये प्रवेश करण्यापासून यापुढे रोखले आहे. पुढील आदेशापर्यंत सिक्युरिटीज खरेदी, विक्री किंवा व्यवहार करण्यापासून शेअर बाजारातून पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आले आहे, त्यांच्या विद्यमान होल्डिंग्जचे लिक्विडेशन वगळता नोटिसींना कोणत्याही गुंतवणूक सल्लागार किंवा संशोधन सेवा देण्यास, थेट ट्रेडिंग किंवा स्टॉकविशिष्ट मार्गदर्शन, स्टॉकमार्केट प्रशिक्षण घेण्यास किंवा सोशल मीडिया, व्हॉट्सअँप ग्रुप्स किंवा इतर प्लॅटफॉर्मद्वारे अथवा माध्यमातून स्टॉकशी संबंधित कोणताही सल्ला देण्यास जारी मनाई केली आहे.सेबीने त्यांना गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले कोणतेही पैसे वळवू नयेत किंवा विल्हेवाट लावू नयेत आणि अशी रक्कम एस्क्रो खात्यातही ठेवू नये असे निर्देश दिले आहेत. सेबीने प्रथमदर्शनी बेकायदेशीर नफा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रकमा जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत आणि ही रक्कम १५ दिवसांच्या आत सेबीच्या बाजूने चिन्हांकित (Notified) करून मुदत ठेवींमध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे.याव्यतिरिक्त बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत की त्यांनी नोटिसधारकांच्या खात्यांमधून चिन्हांकित ठेवींमध्ये हस्तांतरण वगळता कोणत्याही डेबिट व्यवहारांना परवानगी देऊ नये. पुढील २१ दिवसांत आर्थिक दंड अर्थात व्याजासह ६०१ कोटी रुपये आणि परतफेड देणींसह असे आदेश सेबीने दिले आहेत. व कारणे दाखवा नोटीसही बजावली असल्याचे सेबीने स्पष्ट केले. सेबी आपली कार्यवाही पूर्ण करत नाही आणि अंतिम आदेश देत नाही तोपर्यंत अंतरिम निर्देश लागू राहतील असे सेबीने अंतिमतः आपल्या निरिक्षणात म्हटले.
राष्ट्रपती भवनात पुतिन यांना देण्यात आलेला ‘गार्ड ऑफ ऑनर’नेमका काय असतो? ; वाचा सविस्तर
Guard of Honour। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. पुतिन काल संध्याकाळी दिल्लीत पोहोचले. प्रोटोकॉल तोडत पंतप्रधान मोदी स्वतः पालम विमानतळावर पुतिनचे स्वागत करण्यासाठी पोहोचले. पुतिन उतरताच पंतप्रधानांनी त्यांचे आलिंगन देऊन स्वागत केले. त्यानंतर त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदी त्यांना खाजगी जेवणासाठी त्यांच्या निवासस्थानी घेऊन गेले. आज […] The post राष्ट्रपती भवनात पुतिन यांना देण्यात आलेला ‘गार्ड ऑफ ऑनर’ नेमका काय असतो? ; वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .
Lifestyle: आता बदाम नव्हे, ‘हा’नाश्ता करा! वैज्ञानिकांचा दावा – ‘शेंगदाणे वाढवते मेमरी पॉवर’
Lifestyle: हिवाळ्यात स्नॅक्स म्हणून खाल्ली जाणारी शेंगदाणे फक्त चवीला चांगली आणि शरीराला ऊब देणारीच नाही, तर मेंदूच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. एका नव्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की शेंगदाण्याचे नियमित सेवन केल्याने मेमरी पॉवर वाढू शकते आणि मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतो. फिजिकल हेल्थसोबत मेंटल हेल्थमध्येही आहाराचा मोठा वाटा बॅलन्स डाएट आणि योग्य जीवनशैली मानसिक आरोग्य […] The post Lifestyle: आता बदाम नव्हे, ‘हा’ नाश्ता करा! वैज्ञानिकांचा दावा – ‘शेंगदाणे वाढवते मेमरी पॉवर’ appeared first on Dainik Prabhat .
ईव्हीएम हॅक करण्यासाठीच मतमोजणी लांबवली; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
Vijay Vadettiwar : राज्यात पहिल्या टप्प्यातील २ डिसेंबर रोजी झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मतदानात मोठा गोंधळ झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. यापैकी उर्वरित २४ नगरपरिषदांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, त्यानंतर २१ डिसेंबर रोजी एकत्रितपणे निकाल जाहीर करण्यात येणार आहे, असा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने घेतला. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वेाच्च […] The post ईव्हीएम हॅक करण्यासाठीच मतमोजणी लांबवली; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ appeared first on Dainik Prabhat .
रशिया-युक्रेन युद्ध संपणार ? ; मोठी अपडेट देत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले,”मी युद्ध…”
Trump on Russia-Ukraine war। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचा आपला संकल्प पुन्हा व्यक्त केला. याविषयी बोलताना त्यांनी,”तीन वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध संपेल आणि युद्धबंदीची वेळ जवळ आली आहे. आपण जगभरात शांतता प्रस्थापित करत आहोत. आपण अशा प्रकारे युद्धे सोडवत आहोत की कोणीही यापूर्वी कधीही केले नाही. मी आठ युद्धे थांबवली आहेत […] The post रशिया-युक्रेन युद्ध संपणार ? ; मोठी अपडेट देत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले,”मी युद्ध…” appeared first on Dainik Prabhat .
मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची निवडणूक संचालन समिती जाहीर
मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. ज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाले असून मतमोजणी बाकी आहे. तर इतर दोन टप्प्यातील निवडणूकीसाठी सर्व पक्ष रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. दरम्यान तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपने मोठी घोषणा केली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ करिता भारतीय जनता पक्षाची मुंबई निवडणूक संचालन समिती घोषित केली आहे.अमित साटम यांच्या अध्यक्षतेखाली जाहिर करण्यात आलेल्या निवडणूक संचालन समितीमध्ये पक्षातील अनेक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ज्यात आशिष शेलार, अॅड. मंगलप्रभात लोढा, अॅड. राहुल नार्वेकर, प्रकाश मेहता, किरीट सोमैय्या, कालिदास कोळंबकर, मिहिर कोटेचा, पराग शाह, राम कदम, प्रसाद लाड, चित्रा वाघ या महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मिळून एकूण १४४ जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.https://prahaar.in/2025/12/05/modi-governments-special-gift-for-mumbaikars-additional-local-services-will-start-soon-in-nerul-uran-belapur-belt/दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या मुंबई निवडणूक संचालन समितीमधील निमंत्रितांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांचा समावेश आहे.
Dollar Rupee Rate: पतधोरण समितीच्या पार्श्वभूमीवर एका तासात ४० पैशाने रूपया घसरला 'ही'आहेत कारणे !
मोहित सोमण:आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद बाजारात दिलाच परंतु याचा फटका रूपयाला बसला आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी ८९.४९ रूपये प्रति डॉलर असलेला ८९.६९ रूपयावर पोहोचला होता जो तब्बल २० पैशाने वाढला होता. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दर ५.५०% वरून ५.२५% दरकपात केल्याने रूपया आणखी २० पैशाने वाढला असून ८९.६९% वरून ८९.८९ रूपये प्रति डॉलरवर पोहोचला असल्याने एका तासात ४० पैशाने घसरला असल्याचे बाजारात दिसले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना अद्याप आपल्या गुंतवणूकीत अपेक्षित वाढ केली नसली तरी मोठ्या प्रमाणात डॉलरच्या गुंतवणूकीत भारतीय बाजारात वाढ सुरु झाल्याने रूपया आणखी घसरला आहे.उपलब्ध माहितीनुसार, सकाळी आंतरबँकिंग परकीय चलन बाजारात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८९.८५ वर उघडला तो सकाळच्या व्यवहारात ८९.६९ रूपयावर सावरला. तरी देखील त्याच्या मागील बंदपेक्षा २० पैशांनी वाढला. परंतु यापूर्वीच तज्ञांनी यापूर्वीच दरकपातीतील पार्श्वभूमीवर चलनाची आधीच नाजूक स्थिती पाहता कोणतेही संकेत रुपयावर नवीन दबाव आणू शकतात असे म्हटले होते.परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा (Sale off) दबाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि भारत-अमेरिका व्यापार कराराच्या घोषणेस झालेला विलंब यामुळे असलेली भूराजकीय स्थितीचा आढावा घेता यामुळे रुपयावर परिणाम झाला आहे. काल रुपया त्याच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवरून २६ पैशांनी वाढून ८९.८९ वर बंद झाला होता.याविषयी सत्राच्या सुरुवातीला निर्णय जाहीर होण्यापूर्वी, 'आज सकाळी, सर्वांच्या नजरा आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीकडे आहेत. भारताच्या अत्यंत कमी महागाईमुळे दर कपात किंवा भविष्यात संभाव्य कपातीचा संकेत रुपयावर अधिक परिणाम करू शकतात' असे सीआर फॉरेक्स अॅडव्हायझर्सचे एमडी अमित पाबारी म्हणाले होते.
Supreme Court : राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींचा निकालाबाबत महत्वाचा निर्णय सर्वेाच्च न्यायालने घेतला आहे. २ डिसेंबर आणि २० डिसेंबर या दिवशी मतदान झालेल्या निवडणुकांचा निकाल एकत्रितपणे २१ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याचा नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वेाच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. याबाबत आज सुप्रीम कोर्टात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. बातमी अपडेट होत आहे. […] The post निर्णय कायम! नगरपरिषद नगरपंचायतींचा निकाल २१ डिसेंबरलाच; आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी appeared first on Dainik Prabhat .
ईडीची आणखी एक मोठी कारवाई ; अनिल अंबानींची कोट्यवधींची मालमत्ता जप्त
ED on Anil Ambani। रिलायन्स अनिल अंबानी समूहाशी संबंधित बँक फसवणूक प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १८ हून अधिक मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. ज्यामध्ये मुदत ठेवी, बँक बॅलन्स आणि न उद्धृत केलेल्या गुंतवणुकीतील शेअर्स यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य अंदाजे १,१२० कोटी रुपये आहे. ही कारवाई रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL), […] The post ईडीची आणखी एक मोठी कारवाई ; अनिल अंबानींची कोट्यवधींची मालमत्ता जप्त appeared first on Dainik Prabhat .
इंडिगो विमानसेवेचा खासदार अमोल कोल्हेंनाही फटका; पोस्ट शेअर करत म्हणाले “ही अपेक्षा नव्हती, यापुढे…”
Amol Kolhe : इंडिगो एअरलाईन्सच्या विमानांच्या वेळापत्रकात झालेल्या मोठ्या गोंधळामुळे पुणे विमानतळावर विमानसेवा पूर्णपणे विस्कळित झाली असून, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांत पुणे विमानतळावरून इंडिगोची १६ हून अधिक उड्डाणे रद्द झाली आहेत. तर १९ हून अधिक विमानांना प्रचंड विलंब झाला आहे. या गोंधळाचा फटका खासदार डॅा. अमोल कोल्हे यांना देखील […] The post इंडिगो विमानसेवेचा खासदार अमोल कोल्हेंनाही फटका; पोस्ट शेअर करत म्हणाले “ही अपेक्षा नव्हती, यापुढे…” appeared first on Dainik Prabhat .

26 C