SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

25    C
... ...View News by News Source

धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, मुलगी ईशा देओलने दिली माहिती

मुंबई: बॉलिवूडचा हीमॅन धर्मेंद्र यांच्यां प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, अशी माहिती त्यांची मुलगी ईशा देओलने दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र काल रात्रीपासून धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे सिनेसृष्टीतही चिंतेचे वातावरण दिसत होते. मात्र आता ईशा देओल आणि हेमा मालिनी यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 10:30 am

अभिनेते प्रेम चोप्रा रुग्णालयात दाखल; तब्येतीबाबत महत्वाची माहिती

मुंबई : सुपरस्टार धर्मेंद्र यांच्यानंतर आणखी एक ज्येष्ठ कलाकार रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आली आहे. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांना प्रकृती बिघडल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या जावयाने, अभिनेता विकास भल्ला यांनी माहिती दिली असून त्यांनी सांगितलं की प्रेम चोप्रा यांची तब्येत पूर्णपणे स्थिर आहे आणि चिंता करण्यासारखं काहीही कारण नाही. काही दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. वयोमानामुळे हे फक्त एक नियमित तपासणीचं कारण असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.प्रेम चोप्रा यांनी आपला ९०वा वाढदिवस २३ सप्टेंबर रोजी साजरा केला होता. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, वयोमानानुसार येणाऱ्या आरोग्याच्या काही किरकोळ तक्रारींमुळे त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आणलं होतं, मात्र आता उपचारासाठी त्यांना तात्पुरते दाखल करण्यात आलं आहे.प्रेम चोप्रा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय खलनायकांपैकी एक मानले जातात. त्यांनी ‘उपकार’, ‘बॉबी’, ‘दो अनजाने’, ‘क्रांती’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. तब्बल ६० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं असून, २०२३ मध्ये त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.लाहोरमध्ये जन्मलेल्या प्रेम चोप्रा यांनी करिअरची सुरुवात पत्रकार म्हणून केली होती. त्यानंतर काही पंजाबी चित्रपटांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत त्यांनी बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. ‘शहीद’ या चित्रपटातून त्यांना पहिली मोठी भूमिका मिळाली. पुढे ‘उपकार’ आणि ‘बॉबी’सारख्या चित्रपटांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. खलनायकाच्या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपडा’ हा त्यांचा प्रसिद्ध डायलॉग आजही लोकांच्या लक्षात आहे.राजेश खन्नासोबत तब्बल वीसहून अधिक चित्रपटप्रेम चोप्रा यांनी राजेश खन्नासोबत तब्बल वीसहून अधिक चित्रपट केले आहेत. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगितलं जात आहे.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 10:30 am

फरिदाबादच्या छापेमारीनंतर घाईत दहशतवादी डॉ. उमरने दिल्ली स्फोटांचा प्लॅन आखला? ; तपासात ‘हे’१० खुलासे उघड

Terrorist Dr. Umar। दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनबाहेर झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला होता. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २० जण जखमी झाले आहेत. तपास यंत्रणांचे म्हणणे आहे की एका कारमध्ये स्फोटके ठेवून स्फोट घडवण्यात आला होता. एजन्सींच्या मते, हा एक आत्मघाती हल्ला होता. आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की दिल्ली लाल […] The post फरिदाबादच्या छापेमारीनंतर घाईत दहशतवादी डॉ. उमरने दिल्ली स्फोटांचा प्लॅन आखला? ; तपासात ‘हे’ १० खुलासे उघड appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 10:18 am

शोलेचा 'वीरू'गेला, बॉलिवूडवर शोककळा

मुंबई: बॉलिवूडचा हीमॅन धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे त्यांच्या निधनाविषयी बऱ्याच अफवा पसरत होत्या. अखेर आज त्यांच्या निधनाची बातमी आली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाने आता बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.शोलेमधील आयकॉनिक सीन साकारणाऱ्या असरानी यांनी काही दिवसांपूर्वी जगाचा निरोप घेतला. असरानी यांच्या मागून आता लागोपाठ वीरूनेही निरोप घेतल्याने बॉलिवूड जगतात पोकळी निर्माण झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधील दिग्गजांची एका पाठोपाठ एक करत प्राणज्योत मावळली आहे. ज्यात पंकज धीर, असरानी, सतीश शाहा आणि आता धर्मेंद्र या नामवंतानी जगाचा हात सोडला आहे.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 10:10 am

Stock Market Update: सकाळच्या सत्रात शेअर बाजारात घसरणच आयटी शेअर्सने घसरण मर्यादित केली तर इतर शेअर्समध्ये घसरणच

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. मजबूत फंडामेंटल असताना शेअर बाजारातील जागतिक अस्थिरतेचा दबाव आज बसल्याने शेअर बाजारातील सुरूवातीच्या कलात घसरण झाली आहे. प्रामुख्याने गिफ्ट निफ्टी उंचावला असला तरी जागतिक घडामोडीआधारे अनिश्चितता कायम असल्याने गुंतवणूकदारांनी सावधतेचा इशारा बाजारात दिला. सेन्सेक्स २६४.२४ अंकांने व निफ्टी ८१.५५ अंकाने घसरण झाली आहे. सुरूवातीच्या सत्रात मिडकॅप, व स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात इतर सगळ्याच निर्देशांकात घसरण झाली असली तरी आयटी शेअर्समध्ये झालेल्या तेजीमुळे निर्देशांकातील घसरण विशिष्ट पातळीवर मर्यादित राहिली आहे.सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एससीआय (६.५२%), एचईजी (५.३७%), डेटा पँटर्न (३.५७%), ज्योती सीएनसी ऑटो (३.१८%), क्राफ्ट्समन (२.४७%), न्यूजेन सॉफ्टवेअर (२.१६%), एम अँड एम (१.६५%) समभागात वाढ झाली आहे.सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण टीआरआयएल (१०%), बजाज फायनान्स (६.७६%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (५.७६%), एचबीएल इंजिनिअरिंग (३.९३%), बजाज होल्डिंग्स (२.४३%), शिंडलर इलेक्ट्रॉनिक्स (२.३६%), सारेगामा इंडिया (२.३४%), रिलायन्स पॉवर (२.०७%), स्विगी (२.०७%) समभागात झाली आहे.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 10:10 am

धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमी अफवा; मुलगी ईशा देओलने पोस्ट शेअर करत सांगितले सत्य

Esha On Dharmendra | ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमी खोटी… काही वेळापूर्वी त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर पसरली होती. परंतु याच दरम्यान त्यांची मुलगी ईशा देओल हिने आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या बातम्या अफवा असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत खोट्या बातम्या पसरवू नयेत, अशी विनंती केली आहे. View this […] The post धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमी अफवा; मुलगी ईशा देओलने पोस्ट शेअर करत सांगितले सत्य appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 9:46 am

Khalapur : पहिल्याच दिवशी निवडणूक विभागात शुकशुकाट

खालापूर – राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने निवडणूक विभागात शांतता होती. युती, आघाडी आणि पक्षांतर्गत तिकीटवाटपाच्या चर्चेमुळे इच्छुक उमेदवार संभ्रमावस्थेत असून, अर्ज दाखल प्रक्रियेवर त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून आला आहे. खोपोली नगरपरिषदेच्या १५ प्रभागांमधील ३१ जागांसाठी […] The post Khalapur : पहिल्याच दिवशी निवडणूक विभागात शुकशुकाट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 9:19 am

Delhi Blasts: दिल्ली स्फोटावर रवीना टंडनची प्रतिक्रिया, सोनू सूद आणि अनेक सेलिब्रिटींनी व्यक्त केल्या संवेदना

Delhi Blasts: सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भयानक स्फोटाने देश हादरला आहे. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून पोलिसांकडून सर्व कोनातून तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत या स्फोटामागे दहशतवादी कटाचा संशय व्यक्त केला जात आहे. या दुर्दैवी घटनेवर बॉलिवूडसह साउथ इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केले आहे. रवीना टंडनची प्रतिक्रिया बॉलिवूड अभिनेत्री […] The post Delhi Blasts: दिल्ली स्फोटावर रवीना टंडनची प्रतिक्रिया, सोनू सूद आणि अनेक सेलिब्रिटींनी व्यक्त केल्या संवेदना appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 9:18 am

दिल्लीतील कार स्फोटानंतर लाल किल्ला तीन दिवसांसाठी बंद ; ASI ने जारी केला आदेश

Delhi Car Blast। सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका चालत्या कारमध्ये अचानक मोठा स्फोट झाल्याने दिल्ली हादरली. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. पार्क केलेल्या अनेक वाहने जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान या स्फोटानंतर आता […] The post दिल्लीतील कार स्फोटानंतर लाल किल्ला तीन दिवसांसाठी बंद ; ASI ने जारी केला आदेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 9:15 am

लगीनसराईत नववधूच्या सौंदर्याची चमक!

सौंदर्य तुझं : प्राची शिरकरआली लगीनसराई...लग्नसमारंभ म्हणजे केवळ एक विधी नव्हे, तर तो आनंदाचा, उत्साहाचा आणि सोहळ्याचा उत्सव असतो. सध्या सर्वत्र लग्नसराईची लगबग सुरू झाली आहे. घराघरांत मंगलमय वातावरण, खरेदीची धावपळ आणि तयारीचे जोरदार नियोजन सुरू आहे. या सर्व धावपळीमध्ये, ज्या व्यक्तीकडे सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात, ती म्हणजे 'वधू'... प्रत्येक वधूला तिच्या आयुष्यातील या सर्वात महत्त्वाच्या दिवशी सर्वात सुंदर दिसायचे असते. वधूच्या चेहऱ्यावर असलेले नैसर्गिक तेज, तिची शांत आणि आनंदी मुद्रा, हेच तिच्या सौंदर्याचे खरे गमक असते; परंतु, लग्नाच्या तयारीतील ताण, अपुरी झोप आणि धावपळीमुळे अनेकदा त्वचेवर निस्तेजपणा येतो. म्हणूनच, लग्नाच्या दिवसापर्यंत वधूने आपल्या चेहऱ्याची आणि त्वचेची खास काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मेकअप आणि ड्रेससोबतच त्वचेचे नैसर्गिक तेज हा वधूसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. हा नैसर्गिक ग्लो कसा टिकवायचा, कोणत्या गोष्टी टाळायच्या आणि कोणत्या खास ब्युटी टिप्स फॉलो करायच्या, याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.१. तयारी कधीपासून सुरू करावी?त्वचेला नैसर्गिक चमक आणण्यासाठी कमीत कमी २ ते ३ महिने आधीपासून स्किन केअर सुरू करणे योग्य ठरते. हे केल्याने त्वचा हळूहळू तजेलदार, मऊ आणि चमकदार होते.२. दैनंदिन त्वचा काळजीची दिनचर्यासकाळची काळजीक्लेंझर : आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार सौम्य फेसवॉश वापरा.टोनर : रोमछिद्र बंद होण्यासाठी आणि त्वचा टाईट ठेवण्यासाठी.मॉइश्चरायझर : त्वचेला हायड्रेशन देण्यासाठी हलका क्रीम वापरा.सनस्क्रीन : किमान एसपीएफ ३० असलेली सनस्क्रीन रोज वापरणे अत्यावश्यक आहे.रात्रीची काळजीचेहरा सौम्य क्लेंझरने धुवा.सीरम : व्हिटॅमिन सी किंवा हायलुरोनिक अॅसिड असलेला सीरम वापरल्यास त्वचेला चमक येते.नाईट क्रीम : त्वचेची दुरुस्ती रात्री होते म्हणून हलका नाईट क्रीम लावणं गरजेचं आहे.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 9:10 am

प्लेसेंटा प्रिव्हिया

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटीलगर्भधारणेदरम्यान बाळाच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी प्लेसेंटा (अपरा) हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. तो गर्भाशयाच्या आतील भिंतीवर चिकटलेला असतो आणि नाळेद्वारे भ्रूणाला अन्नद्रव्ये व ऑक्सिजन पुरवतो. सामान्यतः प्लेसेंटा गर्भाशयाच्या वरच्या भागात स्थित असतो; परंतु काही स्त्रियांमध्ये हा प्लेसेंटा गर्भाशयाच्या खालच्या भागात, गर्भमुखाजवळ किंवा त्यावर येतो. या स्थितीला ‘प्लेसेंटा प्रिव्हिया’असे म्हणतात. ही अवस्था गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात गंभीर रक्तस्रावास कारणीभूत ठरू शकते व आई-बाळ दोघांसाठी धोकादायक असते.प्लेसेंटा प्रिव्हियाचे प्रकार : अल्ट्रासाऊंड तपासणीतून प्लेसेंटा प्रिव्हिया खालील प्रकारांमध्ये वर्गीकृत केला जातो.१. कम्प्लीट प्रिव्हिया : प्लेसेंटा संपूर्ण गर्भमुख झाकून टाकतो.२. पार्शियल प्रिव्हिया : प्लेसेंटा गर्भमुखाचा काही भाग झाकतो.३. मार्जिनल प्रिव्हिया : प्लेसेंटा गर्भमुखाच्या कडेला असतो.४. लो-लाइंग प्लेसेंटा : प्लेसेंटा गर्भमुखाजवळ असतो पण त्यावर येत नाही.या प्रकारांपैकी “कम्प्लीट” आणि “पार्शियल” प्रिव्हिया हे अधिक धोकादायक मानले जातात कारण प्रसूतीदरम्यान प्रचंड रक्तस्राव होऊ शकतो.कारणे आणि जोखमीचे घटक :प्लेसेंटा प्रिव्हिया होण्यामागे अनेक कारणे आणि जोखमीचे घटक आढळतात :पूर्वी सिझेरियन सेक्शन झालेली स्त्री. एकापेक्षा जास्त गर्भधारणा. पूर्वी प्लेसेंटा प्रिव्हिया झाल्याचा इतिहास. गर्भाशयातील शस्त्रक्रिया किंवा डिलेशन आणि क्यूरेटेज (डी अॅण्ड सी) प्रक्रियाबहुगर्भधारणाधूम्रपान किंवा वयोवृद्ध माता (३५ वर्षांपेक्षा जास्त वय) या सर्व घटकांमुळे गर्भाशयाच्या आतील अस्तरात बदल होतात, ज्यामुळे प्लेसेंटा खालच्या भागात बसण्याची शक्यता वाढते.लक्षणे : प्लेसेंटा प्रिव्हियाचे सर्वात मुख्य लक्षण म्हणजे गर्भधारणेच्या तिसऱ्या तिमाहीत अचानक होणारा, वेदनारहित पण जास्त प्रमाणातील रक्तस्राव.काही रुग्णांना खालील लक्षणेही जाणवू शकतात : पोटात हलका ताण किंवा अस्वस्थता. बाळाच्या हालचाली कमी होणे. रक्तस्रावानंतर फिकटपणा, चक्कर येणे, धडधड वाढणे, वेदनाशून्य रक्तस्राव हे प्लेसेंटा प्रिव्हियाचे वैशिष्ट्य आहे, जे त्याला अब्रप्शन प्लेसेंटीपासून (Placental abruption) वेगळे करते.तपासणी : रुग्णाच्या इतिहासावरून व अल्ट्रासाऊंड तपासणीवरून निदान निश्चित करता येते.अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी : सर्वात विश्वासार्ह तपासणी, जी प्लेसेंटा गर्भमुखावर आहे का ते दर्शवते.ट्रान्सव्हॅजायनल सोनोग्राफी (टीव्हीएस) : सुरक्षित आणि अधिक स्पष्ट चित्र देते.रक्त तपासणी : हिमोग्लोबिन व रक्तगट ठरविण्यासाठी.फिटल मॉनिटरिंग : भ्रूणाची स्थिती आणि हृदयगती तपासण्यासाठी.डिजिटल योनी तपासणी टाळावी, कारण त्यामुळे तीव्र रक्तस्राव होऊ शकतो.उपचार : उपचार हे गर्भधारणेच्या आठवड्यांनुसार, रक्तस्रावाच्या तीव्रतेनुसार आणि भ्रूणाच्या स्थितीनुसार ठरवले जातात.१. रुग्णालयात दाखल करणे : कोणत्याही प्रमाणातील रक्तस्राव असल्यास तात्काळ हॉस्पिटलायझेशन आवश्यक.२. बेड रेस्ट व निरीक्षण : सौम्य प्रकरणात पूर्ण विश्रांती, रक्तदाब व भ्रूणावर सतत लक्ष ठेवणे.३. रक्तपुरवठा : रक्तस्राव जास्त झाल्यास.४. औषधे : गर्भाशय आकुंचन थांबवण्यासाठी टोकोलिटिक्स, तसेच भ्रूणाच्या फुफ्फुसांच्या प्रौढतेसाठी स्टेरॉइड इंजेक्शन्स.५. सिझेरियन सेक्शन : जर प्लेसेंटा गर्भमुख झाकत असेल (कम्प्लीट/पार्शियल प्रिव्हिया) किंवा प्रसूतीदरम्यान रक्तस्राव वाढत असेल, तर सुरक्षित प्रसूतीसाठी सिझेरियन शस्त्रक्रिया आवश्यक ठरते. नैसर्गिक प्रसूती केवळ “मार्जिनल” किंवा “लो-लाइंग” प्रकरणांमध्ये, आणि रक्तस्राव नियंत्रित असेल तरच करता येते.जटिलता : प्रचंड रक्तस्रावामुळे मातृ मृत्युचा धोका, भ्रूणाला ऑक्सिजनअभावी त्रास, अकाली प्रसूती, प्लेसेंटा अडकून राहणे, प्रसूतीनंतर रक्तस्राव, म्हणून प्लेसेंटा प्रिव्हिया ही उच्च जोखमीची गर्भधारणा म्हणून गणली जाते.प्रतिबंध आणि सल्ला : गर्भधारणेदरम्यान नियमित अल्ट्रासाऊंड तपासणी करून प्लेसेंटा स्थिती तपासणे. पूर्वी सिझेरियन झालेल्या किंवा जास्त गर्भधारणेचा इतिहास असलेल्या स्त्रियांनी विशेष दक्षता घ्यावी. रक्तस्राव झाल्यास घरी न थांबता तत्काळ रुग्णालयात जाणे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय प्रवास, शारीरिक ताण, किंवा लैंगिक संबंध टाळणे.निष्कर्ष : प्लेसेंटा प्रिव्हिया ही गर्भधारणेतील गंभीर पण नियंत्रित करता येणारी स्थिती आहे. वेळेवर निदान, योग्य उपचार, आणि अनुभवी प्रसूतीतज्ज्ञांच्या देखरेखीखाली प्रसूती केल्यास आई व बाळ दोघांचेही प्राण सुरक्षित ठेवता येतात. प्रत्येक गर्भवतीने नियमित तपासण्या करून, स्वतःच्या व बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 9:10 am

समाजदायित्वाची तेजस्विनी वाटचाल

कर्तृत्ववान ती राज्ञी : डॉ. जयश्री कुलकर्णीवैशाली गायकवाडनमस्कार मैत्रिणींनो ! २०२५ या वर्षात सुरू झालेल्या या लेखमालेचे आजचे हे ४६ वे पुष्प. विद्यार्थिनी असल्यापासूनच समाजकार्याचा वसा घेतलेल्या विद्यार्थी परिषद कार्यकर्त्या, लेखिका, स्त्रीशक्ती संशोधिका, प्राध्यापिका डॉ. जयश्री कुलकर्णी यांच्या सर्जनशील प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.पुण्यनगरीत एका सुशिक्षित आणि संस्कारवेलींनी नटलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात जयश्रीताईंचा जन्म झाला. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जाण या त्रिवेणीने सजलेले घर त्यांना लाभले. सहा भावंडांमध्ये वाढत असताना शिकण्याची ओढ आणि समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी लहानपणापासूनच त्यांच्यात दिसत होती.बारावीनंतर त्यांनी गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. तेथे विद्यार्थिनी म्हणूनच नव्हे, तर नेत्रदीपक नेतृत्वगुणांनी सजलेली युवती म्हणून ओळख निर्माण केली. एफ. वाय. मध्येच त्यांच्या कवितेला ज्येष्ठ कवी वसंत बापट यांच्या हस्ते पारितोषिक मिळाले. महाविद्यालयीन मासिक ‘मिसेलनी’च्या संपादक मंडळावर, वादविवाद मंडळाच्या सचिवपदी आणि भित्तिपत्रक संपादनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. विद्यार्थी परिषदेच्या कार्यातून त्यांची सामाजिक वाटचाल सुरू झाली. गरीब विद्यार्थ्यांसाठी “पंडित मदन मोहन मालवीय पुस्तक पेढी” फक्त एका रुपयात पुस्तकांचा संच देण्याच्या विद्यार्थी परिषदेच्या उपक्रमात तसेच सुट्टीतील रोजगार योजना, यात त्यांनी मनापासून सहभाग दिला. स्वतःच्या कल्पकतेमधून वसाहतीत मुलांसाठी अभ्यासिका सुरु केली तसेच परिषद कार्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी सामाजिक प्रश्नावर आधारित ‘दृष्टी’ भित्तिपत्रक सुरू केले. त्या काळात गाजलेले 'मीनाक्षीपुरमचे धर्मांतर' या विषयावर परिसंवाद आयोजित करून नागरिकांमध्ये संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण केली. हे उपक्रम खूपच लोकप्रिय झाले.१९८३ मध्ये 'आसाम बचाव' आंदोलनात गुहाटी येथे जाऊन त्यांनी सत्याग्रहात सहभाग घेतला. देशभक्तीची ही ज्योत त्यांच्या संपूर्ण कार्यात तेजाळत राहिली. नाशिक येथे विद्यार्थी परिषद शहर संघटन मंत्री म्हणून कार्य करताना त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांविषयी जागरूक केले. केळकर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून अध्यापनास सुरुवात केली. नंतर ठरवून वनवासी भागामध्ये राहायचे आणि महिलांवरती काम करायचे या उद्देशाने शहापूर कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. त्याच काळात समविचारी प्राध्यापक विजय कुलकर्णी यांच्याशी त्यांचा विवाह झाला.समाजाप्रित्यर्थ असणारी त्यांची निष्ठा, समर्पित भावनेने काम करण्याचा स्वभाव यामुळे त्यांच्या सासरच्यांचाही त्यांच्या कार्याला भक्कम पाठिंबा मिळाला. प्रसिद्ध विचारवंत आणि लेखिका कै. दुर्गाबाई भागवत यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व कार्याच्या प्रेरणेने त्यांनी वनवासी महिलांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास सुरू केला. केळकर कॉलेजमधील नोकरी सांभाळत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेमध्ये ग्रंथालयात त्या अध्ययन करत असत. तसेच सुनंदाताई पटवर्धन यांच्या सोबत जव्हार, मोखाडा, तलासरी येथे प्रत्यक्ष जाऊन तेथील महिलांशी संवाद साधण्याचे भाग्यही त्यांना मिळाले.त्या दरम्यान दोन जुळ्या मुलींना सांभाळून त्यांची नोकरी, समाजकार्य हे अविरत चालूच होते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रियांनी आपली सपोर्ट सिस्टीम तयार केली, तर उत्तम वाटचाल करता येत असल्याचे जयश्रीताई सांगतात. केळकर, बेडेकर, पोदार, एन.के.टी. अशा नामांकित महाविद्यालयांत प्राध्यापक म्हणून सेवा बजावताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाण रुजवली. जाहिरात विषयात नवे प्रयोग, सामाजिक प्रकल्प आणि पथनाट्य यांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलतेचा जागर फुलविला.२०१४ मध्ये त्यांनी “शहापूर तालुक्यातील वनवासी महिलांचे बचत गट” या विषयावर पीएच.डी. प्राप्त केली. “परिषदेच्या लेकी” हे संपादित पुस्तक त्यांच्या संवेदनशील नेतृत्वाचे प्रतीक ठरले. लातूर येथे झालेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याने अनेक विद्यार्थिनी कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली..त्यांचे ३५ पेक्षा अधिक संशोधनपर लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर झाले असून २०१५ मध्ये पॅरिस येथील परिषदेत शोधनिबंध सादर करण्यासाठी त्यांना केंद्र सरकारने प्रायोजित केले होते..‘जीवन संवर्धन फाऊंडेशन’ या बेघर मुलींच्या पुनर्वसन संस्थेच्या ठाणे येथे चालणाऱ्या केंद्रात प्रमुख म्हणून त्यांचे कार्य आजही सुरू आहे. बेघर मुलींना शिक्षण देऊन, त्यांचे जीवन सुरक्षित करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना स्वावलंबी बनवण्याचं पवित्र कार्य या संस्थेमार्फत जयश्री कुलकर्णी करत आहेत. ‘तेजस्विनी महिला संमेलन’ यशस्वीपणे पार पाडण्यात मोलाचा वाटा दिला, तसेच ज्येष्ठ व आदर्श समाजसेविका सुनंदाताई पटवर्धन यांच्या जीवनावर “वनवासींच्या वहिनी” हा चरित्रग्रंथ लिहून प्रकाशित केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांनी व्याख्याने दिली, स्त्रीशक्ती आणि सामाजिक परिवर्तनाचे संदेश दिले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून “कर्तृत्ववान राज्ञी” या सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले. महिलांनी पैसा, प्रसिद्धी, मानमरातब याच्यामागे न लागता स्वत्व टिकवून ठेवणे आवश्यक आहे. हे लक्षात घेता यशस्वी वाटचाल करणाऱ्या जयश्री कुलकर्णी यांचे कार्य हे सगळ्यांसाठीच अत्यंत प्रेरणादायी असे आहे.Vaishu.gaikwad78@gmail.com

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 9:10 am

सुंदर मी होणार - भाग १

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबकेसख्यांनो, हे शीर्षकच किती आकर्षक आहे नाही ? सुंदर कोणाला व्हावंसं वाटत नाही ? चार जणांचं लक्ष आपल्याकडं वेधलं जावं अशी बहुतांश लोकांची इच्छा असते ? पण सौंदर्य म्हणजे नेमकं काय ? योग आणि सौंदर्य यांचाकाय संबंध ?सौंदर्य पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं असं म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीला जे सुंदर वाटेल ते दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीला सुंदर दिसेलच असं नाही. अर्थात प्रत्येकाची सौंदर्याची कल्पना वेगवेगळी असते. देशकाळानुसारही सौंदर्याच्या कल्पना बदललेल्या आपल्याला दिसतात. तरीही आपल्या देशाचा विचार करता सौंदर्याचे काही निकष ठरलेले आहेत. हे निकष प्रामुख्यानं बाह्यसौंदर्याविषयी अर्थातच देहाच्या सौंदर्याविषयी आहेत असं दिसतं. जसं प्रमाणबद्ध शरीर, नितळ गोरा रंग, लांब केस इत्यादी. दूरदर्शनवरील अधिकाधिक जाहिराती शारीरिक सौंदर्य वाढवण्यासाठीच असतात असं दिसतं; परंतु आपल्या व्यक्तित्वाचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं अंतरंग. अंतरंगाचंही सौंदर्य असतं. खरं तर ते अधिक महत्त्वाचं, प्रभावी आणि आजीवन आपल्यासह राहतं.बाह्यसौंदर्य वाढत्या वयानुसार कमी कमी होत जाणारं अल्पजीवी असतं. ते टिकवायचा कितीही प्रयत्न केला तरी व्यर्थ.अंतरंग सौंदर्य म्हणजे नक्की काय? अंतरंग सौंदर्य म्हणजे संतुलित मन, नियंत्रित भावना, संतुलित बुद्धी, आणि प्रिय व सत्य बोलणारी वाणी. हे अंतरंग सौंदर्य मनुष्याच्या वर्तणुकीतून, बोलण्यातून, त्याच्या चेहऱ्यावरील समाधान आणि हास्यातून प्रतीत होतं. आपल्या संस्कृतीत या आंतरिक सौंदर्याचं महत्त्व अनेक प्रकारे पटवून दिलं आहे.परंतु अलीकडच्या काळात, पाश्चिमात्य विचारसरणी आणि सौंदर्याच्या कल्पनांचा पाठपुरावा करणाऱ्या आपण आंतरिक सौंदर्याकडे जणू पाठ फिरवली आहे. शारीरिक सौंदर्यासाठी नित्य नियमित योगसाधना, शुद्धिक्रिया, प्राणायाम, शवासन, आहार-नियंत्रण यांचा पुष्कळ उपयोग होतो. सर्व प्रकारच्या योगासनांच्या साधनेनं शरीर बांधेसूद, डौलदार आणि चपळ होतं. ब्रह्ममुद्रा, सिंहमुद्रा यांसारख्या मुद्रांमुळे चेहऱ्याचं सौंदर्य खुलून येतं. नेत्रशुद्धी आणि नेत्रशक्ती त्राटकासारख्या क्रियांनी प्राप्त होते. आपल्या दैनिक वेळापत्रकात थोडा वेळ योगसाधनेसाठी दिला तरी हे शारीरिक सौंदर्य प्राप्त करणं तितकंकठीण नाही.मनाचं सौंदर्य वाढवण्यासाठी मात्र जाणीवपूर्वक विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. मन ही मोठी अजब आणि जादुई गोष्ट माणसाला परमेश्वरानं दिली आहे. संकल्प आणि विकल्प ही मनाची कार्यं आहेत. आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींची जाणीव आपल्याला मनामुळे होत असते.कल्पनाशक्ती हाही मनाचा खूप मोठा गुण आहे. मनामुळेच आपण अनेक बरेवाईट प्रसंग अनुभवत असतो. म्हणूनच सृष्टीमध्ये जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी संस्कारित, सुंदर मनाची आवश्यकता आहे. विश्वातल्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आणि सद्गुण पाहण्याची दृष्टी जाणीवपूर्वक निर्माण करायला लागते आणि जोपासायलाही लागते. हे काम मनाचं आहे. मनाचा आणखीन एक गुणधर्म म्हणजे एखाद्या गोष्टीची गोडी मनाला लावली की मन त्या गोष्टीशी नेहमीच जोडलं जातं. चांगलंच पाहण्याची गोडी मनाला लावली की मन सगळ्या वस्तूंमध्ये आणि अनुभवांमध्ये चांगलं पाहू लागतं. आपोआप सकारात्मक, स्थिर आणि पर्यायानं समाधानी आणि आनंदी होतं. मात्र आनंददायी आणि चांगल्या गोष्टींची गोडी मनाला लावणं आपल्याला जमलं पाहिजे. यासाठी आपल्या मनाशी आपली मैत्री झाली पाहिजे. ही मैत्री करायची असेल, तर आपलं मन आपल्याला कळलं पाहिजे.आपलं मन आपल्याला कळण्यासाठी ते स्थिर व्हायला हवं. आणि मन स्थिर करायचं तर प्राणायाम ही पहिली पायरी आहे. प्राणायामानं मन स्थिर झालं की धारणा, ध्यान इत्यादी उपायांनी ते अधिक सक्षम आणि संवेदनाशील करता येतं. संवेदनाशील मनाला खऱ्या अर्थानं सौंदर्याचा सहज साक्षात्कार होतो. अशा संवेदनशील मनाला लहान लहान गोष्टींमध्ये आणि लहान लहान कृती करतानासुद्धा सौंदर्य दिसू लागतं. लहानसहान गोष्टींत होणारी सौंदर्याची जाणीव मनाला पराकोटीचं समाधान आणि नित्य आनंद देते. मनातला आनंद स्वाभाविकपणे आपल्या चेहऱ्यावर, शारीरिक हालचाली आणि कृतींमध्ये आविष्कृत व्हायला लागतो. अशी नित्य आनंदी, समाधानी असणारी व्यक्ती बाह्यसौंदर्याच्या निकषांमध्ये बसणारी नसेल कदाचित पण तरीही ती सुंदर दिसते. तिचं सौंदर्य, तिच्या समाधानी चेहऱ्यात, आनंदी स्मितहास्यात आणि कृतींच्या सहजतेत असतं. हे सौंदर्य मनातूनच फुलून आल्यामुळे त्याला स्थळ, काळ आणि वयाची मर्यादा नसते.मनाचं सौंदर्य सांगणारी एक सुंदर कथा आहे. श्रीमंतीची इच्छा असणारा एक मनुष्य परिसाच्या शोधात होता. एकदा त्याला कळलं की एका स्वामींकडे परिस आहे. तो त्या स्वामींकडे परिस मागायला गेला. मागताक्षणी स्वामींनी त्याला परिस दिला. परिसासारखी मूल्यवान गोष्ट स्वामींनी तत्काळ आपल्याला द्यावी यांचं त्याला मोठं आश्चर्यच वाटलं. अत्यानंदानं स्वामींना नमस्कार करून तो तिथून निघाला; परंतु थोड्याच वेळात त्याच्या मनात आली की ज्या अर्थी स्वामींनी आपल्याला परिस इतक्या सहजतेनं दिला त्याअर्थी त्यांच्याकडे याहूनही अधिक काहीतरी मूल्यवान असलं पाहिजे. तो पुन्हा त्या स्वामींकडे गेला आणि त्यांनी हा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले परिसापेक्षा अधिक मूल्यवान गोष्ट माझ्याकडे आहे ती म्हणजे माझं मन.ते पुढे म्हणाले खरंतर मन सगळ्यांनाच दिलेलं आहे; परंतु कस्तुरीमृगाला ज्याप्रमाणे आपल्यामध्ये असलेल्या कस्तुरीची जाणीव नसते त्याप्रमाणे ईश्वरानं दिलेल्या परिसापेक्षाही अधिक मूल्यवान असलेल्या मनरूपी देणगीची जाणीव आपल्याला नाही. परिसानं केवळ लोखंडाचं सोनं होतं पण सुंदर मनाचा ज्या गोष्टीला स्पर्श होतो त्या सगळ्याच गोष्टी सुंदर होत जातात. हे ऐकून परिस तिथेच ठेवून तो मनुष्य परत निघून गेला. अशा मूल्यवान मनाचं सौंदर्य ओळखण्याचं प्रभावी साधन म्हणजे योग हे सांगायला नको.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 9:10 am

पनीर पकोडा पराठा!

मुलांना रोजच्या पराठ्यात नवा बदल हवा असतो आणि पनीरसारखी हेल्दी गोष्ट दिली, तर त्यांच्या वाढीला सर्वात चांगला फायदा होतो. पण पनीर दिसलं की अनेक मुलं तोंड वाकडं करतात. म्हणूनच पनीरला दिला आहे एक मजेशीर ट्विस्ट-पकोडा बनवून तो पराठ्यात लपवला! बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, चीजी-पनीरी चव, टिफिनमध्ये थंड झाला तरी तितकाच टेस्टी! प्रोटीन, कॅल्शियमने भरलेला हा पराठा मुलांची उंची, हाडांची ताकद आणि दैनंदिन ऊर्जा यासाठी खास उपयुक्त. खेळात, अभ्यासात किंवा इतर उपक्रमात दम न लागता मुलांनी धावावे, हसावे, खेळावे यासाठी...(टिफिनसाठी परफेक्ट - बाहेर कुरकुरीत, आतून चीजी-पनीर!)साहित्य : सारणासाठी : पनीर १ कप(क्युब्स/लहान चौकोनी तुकडे)मीठ चवीनुसार,लाल तिखट मिरची पावडर – अर्धा टीस्पून,हळद – चिमूटभरआमचूर/लिंबाचा रस –अर्धा टीस्पूनशिमला मिरची /कॉर्नचाट मसाला – पाव टीस्पूनबेसन – पाऊण कपतांदळाचे पीठ – १ टेबलस्पून,मीठ – चवीनुसार, थोडीशी हळद, पाणीपराठ्यासाठी : गव्हाचे पीठ – २ कपतूप/बटर – शेकायलाथोडे दूध – पीठ मऊ होण्यासाठीकृती :गव्हाचे पीठ + दूध + पाणी + मीठ घालून मऊ आणि लवचिक कणिक करा.पनीर + मसाले + शिमला मिरची/कॉर्न एकत्र हलके मिक्स करा.पनीरचे मसाले लावलेले तुकडे बेसन बॅटरमध्ये बुडवा.तव्यावर हलके तूप/तेल घालून शॅलो फ्राय करा.डीप फ्रायची गरज नाही –पराठा बनवण्यासाठी पीठाची पोळी लाटून त्यात पनीर पकोडे ठेवा.चारही बाजूंनी फोल्ड करून चौरस पाकीट बनवा.हलक्या हाताने लाटून घ्या.तव्यावर तूप/बटर घालून दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या.सर्व्हिंग : केचप + दही मिंट डिपमुलांच्या टिफिनमध्ये छोटी बाईट साइज पट्ट्या कापून द्या.टिप्स :मुलांना खायला सोपे जावेम्हणून मिनी-पराठे करा.चीज घातल्यास आणखी टेस्टी होईल.हवे असल्यास बॅटरमध्ये थोडेतिळ घालू शकता – चव व प्रोटीनदोन्ही वाढतं.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 9:10 am

“माझी देशाचे पंतप्रधान व गृहमंत्र्यांना….”; दिल्लीतील स्फोटानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar Post : काल देशाला हादरून सोडणारी घटना देशाची राजधानी दिल्लीत घडल्याने देशभरात एकच खळबळ उडाली. देशाची राजधानी दिल्लीत लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक बाहेर एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, १० ते १२ जणाांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालायत उपचार […] The post “माझी देशाचे पंतप्रधान व गृहमंत्र्यांना….”; दिल्लीतील स्फोटानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 8:47 am

दिल्ली स्फोटानंतर फडणवीसांनी राज्यातील सुरक्षेचा घेतला आढावा; पोलिसांना सतर्कतेचा आदेश

Mumbai-Pune High Alert | दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी देशातील सर्व प्रमुख शहरांना हाय अलर्ट जारी केला आहे. या घटनेच्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मुंबई पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा घेतला आहे. तसेच राज्यातील सर्व प्रमुख शहर आणि जिल्ह्यांतील पोलीस यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याची सूचना केली आहे. मुंबईतील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी […] The post दिल्ली स्फोटानंतर फडणवीसांनी राज्यातील सुरक्षेचा घेतला आढावा; पोलिसांना सतर्कतेचा आदेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 8:33 am

तिरुपती लाडू प्रसादासाठी ६८ लाख किलो बनावट तूप

नवी दिल्ली : देशातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या तिरुमला देवस्थान येथे लाडूच्या नैवेद्यात वापरल्या जाणाऱ्या भेसळयुक्त तुपाच्या संदर्भात एक महत्त्वाचा खुलासा सीबीआयने उत्तराखंडमधील एका डेअरीने कोणत्याही स्रोताकडून दूध न घेता मंदिरात ६८ लाख किलो बनावट तूप पुरवले. ज्याची किंमत अंदाजे २५० कोटी रुपये आहे.भोले बाबा ऑरगॅनिक डेअरीला मोनोडायग्लिसराइड्स आणि एसिटिक अॅसिड एस्टरसारखी विविध रसायने पुरवणाऱ्या अजय कुमार सुगंधला अटक केल्यानंतर सीबीआयला फसवणुकीची माहिती मिळाली. तिचे प्रवर्तक पोमिल जैन आणि विपिन जैन यांनी चालवलेल्या या डेअरीने २०१९ मध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानमकडून कंत्राट मिळवले आणि ते २०२४ पर्यंत सुरू राहिले. सीबीआयच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) उघड केले की, २०१९ ते २०२४ पर्यंत तूप पुरवणाऱ्या 'भोले बाबा ऑरगॅनिक डेअरीने' कधीही खरे दूध किंवा बटर खरेदी केले नाही, तर त्याऐवजी मोनोडायग्लिसराइड्स आणि एसिटिक अॅसिड एस्टरसारख्या रसायनांचा वापर करून कृत्रिम तूप तयार केले. डेअरीला ही रसायने पुरवणाऱ्या आरोपी अजय कुमार सुगंधला अटक केल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ही माहिती उघड केली आहे.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 8:30 am

मन रे, तू काहे ना धीर धरे...

- डॉ. शुभांगी पारकर, प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञरोहित आर्य यांच्या कृतीतून दिसणारी हिंसक निराशा आणि फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण अलीकडच्या काळात विशेष चर्चेत राहिले. या घटना मानसिक आरोग्य, वैद्यकीय क्षेत्रातील दबाव आणि प्रशासनातील संवेदनहीनता यावर थेट बोट ठेवतात. न्याय मिळण्याची आशा संपते, तेव्हा नैराश्य येते. पण या नैराश्येच्या मुळाशी आणखी काय दडले आहे, याचे हे सखोल विश्लेषण.आज महाराष्ट्रात आणि देशात जे काही घडत आहे, ते पाहून मन केवळ दुःखी होत नाही, तर एका गंभीर सामाजिक आणि मानसिक संकटाची जाणीव होते. नुकतेच घडलेले रोहित आर्य याचे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना ओलीस ठेवण्याचे प्रकरण असो वा याच वर्षी घडलेली हर्षल पाटील या कॉन्ट्रॅक्टरची आत्महत्या. ही केवळ दोन नावे नाहीत, तर सरकारी यंत्रणेच्या अपयशाचे आणि मानवी वेदनेचे बळी आहेत. या दोन्ही व्यक्तींनी टोकाचे पाऊल उचलले, कारण त्यांना हव्या असलेल्या मदतीला शासकीय पातळीवर प्रतिसाद मिळाला नाही. सरकारी यंत्रणेकडून होणारा विलंब आणि उदासीनता या एकाच समस्येने त्यांना ग्रासले होते. आर्थिक विवंचनेने त्यांना टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले. एखाद्या व्यक्तीवर पैशांचे असह्य ओझे येते, तेव्हा तिची विचारशक्ती भावनिकदृष्ट्या एका भोवऱ्यात अडकते. कर्जाचा डोंगर, बेरोजगारी आणि सामाजिक भीती यामुळे तणावाची पातळी इतकी वाढते की व्यक्तीचे मन निष्क्रिय आणि आशाहीन होते. आर्थिक विवंचना आणि त्यातून येणारी निराशा हे मनोविकारांना खतपाणी घालतात. जगातील अनेक संशोधनांनी हे सिद्ध केले आहे की, आर्थिक विवंचना हे नैराश्याच्या सर्वात महत्त्वाच्या कारणांपैकी आहे. तणाव अति होतो, तेव्हा व्यक्तीच्या मेंदूतील विचारांचा ताबा सुटतो. तर्कशुद्धता लोप पावते आणि ती अतर्क्य विचार करू लागते. व्यक्तीच्या मेंदूतील विचारांवर तणावाचा थेट परिणाम होतो. त्यामुळे माणूस विचारांचा ताबा गमावून बसतो.अनेकदा टोकाचा संघर्ष अनुभवणाऱ्या व्यक्ती आत्महत्येचे पाऊल उचलतात पण, रोहित आर्यने हिंसेचा मार्ग निवडला. याकडे केवळ नैराश्यातून आलेली कृती म्हणून पाहता येणार नाही. हा प्रकार वैफल्य आणि आक्रमकतेचा भाग आहे. एखादी व्यक्ती वैफल्यग्रस्त होते, तेव्हा आपला संताप जगावर व्यक्त करण्यासाठी काही वेळा ती प्रयत्न करते. याला आपण प्रतिक्रियात्मक आक्रमकता म्हणू शकतो. नियंत्रण गमावलेल्या अवस्थेत ती व्यक्ती इतरांना नुकसान पोहोचवून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करू शकते. ही टोकाची आणि हिंसक भूमिका घेण्यास व्यक्तिमत्त्वाचा इम्पल्सिव्ह भागही कारणीभूत ठरतो. याच स्वरूपाचे दुसरे एक प्रकरण म्हणजे फलटणमधील महिला डॉक्टरची आत्महत्या. डॉक्टर आत्महत्या प्रकरणात वारंवार मदतीची याचना करूनही कायदेशीर रक्षण मिळत नव्हते. अशा वेळी पीडित व्यक्तीच्या मनात अत्यंत निराशेची भावना निर्माण झाली. कारण आतून हेलावलेल्या व्यक्ती असुरक्षित वाटत असताना कुठूनही आधार न मिळाल्यास निराशेच्या गर्तेत जातात. बऱ्याच वेळा ही मदतीची असहाय्य हाक असू शकते. एखाद्या व्यक्तीला असहाय्यता, निराशा आणि निरर्थकता या तिन्ही भावनांनी घेरले जाते, तेव्हा आत्महत्येचे विचार पक्के होतात. पीडितेला वाटते की आता काहीही बदलणार नाही, आपण यातून कधीही बाहेर पडणार नाही आणि मग आत्महत्येचे पाऊल उचलले जाते.फलटणच्या आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाकडून पत्रकार परिषदेत मृत महिलेच्या वैयक्तिक आयुष्याचे तपशील सार्वजनिक करण्यात आले. कोणत्याही व्यक्तीला आपल्या वैयक्तिक गोपनीयतेचा अधिकार असतो. पीडित महिलेच्या बाबतीत तो पाळला गेलाच पाहिजे. आपल्याकडे ‘पॉश’सारख्या कायद्याचे संरक्षण असताना पीडितेला संरक्षण का मिळाले नाही याचे आश्चर्य वाटते. पॉश कायदा अस्तित्वात असताना महिलांना इतर कोणत्याही कायद्याची गरज पडूच नये, इतके या कायद्याचे उत्तम संरक्षण आहे. बरेचदा ‘मला मरावंसं वाटतं’ अशी एखादी व्यक्ती बोलते तेव्हा बरेचदा फार गांभीर्याने घेतले जात नाही. ती व्यक्ती नाटक किंवा ढोंग करत आहे हाच साधारण सामान्य दृष्टिकोन असतो. पण मानसोपचार क्षेत्रात आत्महत्येविषयी वाटणारे कोणतेही संकेत हे प्रचंड गांभीर्याने घेतले जाते. कारण आत्महत्या करण्यामागे जितका मनोविकार कारणीभूत असतो, तितकीच मेंदूमधील रसायनांची त्या वेळेची स्थितीही कारणीभूत असते. मानसिक आरोग्य हे मन आणि विचारांपुरतेच मर्यादित नसून तुमच्या शरीरात, मुख्यत्वे तुमच्या मेंदूत होणारे रासायनिक बदलही याला कारणीभूत असतात. आत्महत्या करण्यापूर्वी अशा व्यक्ती काही संकेत देत असतात. ते ओळखणे आणि त्यावर वेळीच उपचार करणे हे महत्वाचे आहे.हे संकेत म्हणजे मृत्यूची इच्छा व्यक्त करणे, अपराधीपणा वाटणे किंवा इतरांवर ओझे असण्याची भावना असणे. निराश, हताश वाटणे, अधिक चिंताग्रस्त, अस्वस्थ किंवा रागाने ग्रस्त असणे. असह्य मानसिक किंवा शारीरिक वेदना व्यक्त करणे. वागण्यात बदल जाणवणे, जसे की मृत्यूची योजना आखणे किंवा शोध घेणे, एकाकी वाटणे. मित्रांपासून दूर जाणे, निरोपाची भाषा करणे, महत्त्वाच्या आवडत्या वस्तू देऊन टाकणे. अत्यंत वेगाने गाडी चालवण्यासारखे धोके पत्करणे, अत्यंत मूड स्विंग्ज दाखवणे, कमी किंवा अधिक झोपणे, ड्रग्ज किंवा अल्कोहोल सेवनाचे प्रमाण वाढणे, आत्मसन्मान कमी होणे वगैरे. अशा वेळी संबंधित व्यक्तीला काही मानसिक प्राथमिक उपचार द्यावे लागतात. संकटाच्या क्षणी आधार द्यावा लागतो. वर नमूद केलेली लक्षणे आढळल्यास ज्या पद्धतीने आपण शारीरिक इजेच्या वेळी प्रथोमोपचार देतो तसेच मानसिक प्राथमिक उपचार देण्याचे हे कौशल्य प्रत्येकाने शिकले पाहिजे. एखादी व्यक्ती आत्महत्येचा विचार करत असल्याचे लक्षात आल्यास त्वरित मदत करणे आवश्यक आहे. हा उपचार म्हणजे त्या व्यक्तीला संकटाच्या क्षणी भावनिक आधार देणे. त्यासाठी तिचे म्हणणे शांतपणे ऐकावे लागते. कोणताही तर्क न देता, त्या व्यक्तीला काय वाटते आहे ते शांतपणे समजून घ्यायची गरज असते. तिच्या भावनांना मान्यता द्यावी लागते. अशा प्रसंगी तिला एकटे सोडता येत नाही. तिला आशा दाखवत सध्याचा तणाव काही काळासाठीच आहे आणि परिस्थिती बदलू शकते, हे उलगडून द्यावे लागते.असा त्रास दिसताच संबंधित व्यक्तीला त्वरित मानसोपचारतज्ज्ञ किंवा मानसिक आरोग्य हेल्पलाईनकडे घेऊन जावे लागते. आत्महत्या हा नैराश्यातून आलेला टोकाचा निर्णय नव्हे, तर एक मदतीची हाक आहे, हे या वळणावर समजून घ्यायला हवे. हा संकटाचा क्षण असतो. तेव्हा योग्य आधार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. रुग्णांच्या मनामध्ये सतत आत्महत्येचे विचार येत असतील तर त्यातून बाहेर पडण्यासाठी आवडीची गोष्ट करायला सांगणे, हा एक उपाय ठरतो. उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाला मोहमद रफीचे ‘मन रे तू काहे ना धीर धरे’ गाणे आवडत होते. मी त्याला आत्महत्येचे विचार आल्यास ते गाणे गुणगुणायला सांगितले. ती व्यक्ती आत्महत्येच्या विचारातून सुखरूप बाहेर पडली. आपल्या भावनांचे नियमन करणे हा प्रत्येक व्यक्तीचा गुण असू शकत नाही. अशावेळी ‘माईंडफुलनेस’ अर्थात सकारात्मक विचारांची जोड नैराश्यासारख्या मनोविकारांपासून लांब नेऊ शकते. म्हणूनच मनोविकारांना कलंक न मानता त्याबद्दल जागरूक होऊन वेळीच तज्ज्ञांची मदत घेणे महत्त्वाचे ठरते. सध्या आर्थिक मंदी, बेरोजगारी, अशा समस्यांमुळे मनोविकारांचे प्रमाण वाढते. या काळात सर्वांनी मिळून अधिक संवेदनशील, आधार देणारा आणि मानसिकदृष्ट्या कणखर समाज निर्माण करण्याची गरज आहे.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 8:30 am

भारतावर हल्ल्यासाठी बांगलादेशमध्ये नवीन दहशतवादी तळाची उभारणी

‘मोस्ट वाँटेड’ हाफिज सईदचा कुटिल डावनवी दिल्ली : पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा व जमात-उद-दावा दहशतवादी संघटनाचा म्होरक्या आणि मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याने भारतावर हल्ला करण्याचा कट रचत आहे. भारतावर हल्ल्यासाठी आता तो बांगलादेशमध्ये नवीन दहशतवादी तळच उभारले आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ३० ऑक्टोबर रोजी पाकिस्तानातील खैरपूर तामेवाली येथे झालेल्या एका सभेतील व्हिडीओ रेकॉर्डिंगवरून हा खुलासा झाला आहे.खैरपूर तामेवाली येथे झालेल्या सभेत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्लाह सैफने म्हटले की, ‘हाफिज सईद निष्क्रिय बसलेला नाही; तो बांगलादेशमार्गे भारतावर हल्ला करण्याची तयारी करत आहे. लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी बांगलादेशमध्ये सक्रिय होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. यावेळी हा दहशतवादी तळ भारतावर हल्ला करणार होता, असेही त्याने म्हटले आहे. व्हिडीओ रेकॉर्डिंगवरून सईद बांगलादेशमधील तरुणांना ‘जिहाद’च्या नावाखाली भारताविरोधात वापर करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.सैफुल्लाह सैफ हा उघडपणे भारताविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी चिथावणी देत असल्याचेही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये बदल झाल्याचा दावा करत म्हटले, ‘आता, अमेरिका आमच्यासोबत आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानमधील मैत्री पुन्हा एकदा वाढली आहे, असा दावाही त्याने केला आहे. विशेष म्हणजे या सभेतला लहान मुलेही उपस्थित होती. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा भारताविरुद्ध ‘जिहाद’ करण्याच्या उद्देशाने अल्पवयीन मुलांचे शोषण सुरू असल्याचेही स्पष्ट होत आहे. बांगलादेश-पाकिस्तान संबंधातून निर्माण होणाऱ्या या नवीन, गुंतागुंतीच्या धोक्याबाबत सुरक्षा एजन्सी आता सतर्क आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीवर देखरेख वाढवण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 8:30 am

उत्तर प्रदेशमधील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये वंदे मातरम् सक्ती

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणालखनौ : ‘वंदे मातरमला विरोध करणे हे केवळ अन्याय्यच नाही तर भारताच्या फाळणीमागील एक दुर्दैवी कारण आहे,’ असे स्पष्ट करत उत्तर प्रदेशमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत सक्तीचे केले जाईल, अशी घोषणा सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. गोरखपूर येथे ‘एकता यात्रा’ आणि वंदे मातरम् सामूहिक गायन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले की, राष्ट्रीय गीत असणाऱ्या वंदे मातरमबद्दल आदराची भावना असली पाहिजे. आम्ही उत्तर प्रदेशातील प्रत्येक शाळा आणि शैक्षणिक संस्थेत त्याचे गायन सक्तीचे करू. वंदे मातरमला विरोध करणे हे राष्ट्रविरोधी मानसिकतेचे प्रतीक आहे. असे विचार आता सहन केले जाणार नाहीत.देशात जिना प्रवृत्तीने पुनर्जन्म घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला येथे जिवंत गाडून टाकू, असा इशाराही त्यांनी दिला. १८९६-९७ मध्ये याच काँग्रेस अधिवेशनात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी स्वतः संपूर्ण वंदे मातरम् गायले होते आणि १८९६ ते १९२२ पर्यंत प्रत्येक काँग्रेस अधिवेशनात वंदे मातरम् गायले जात होते.तथापि, १९२३ मध्ये, जेव्हा मोहम्मद अली जौहर काँग्रेसचे अध्यक्ष झाले, तेव्हा वंदे मातरम गायला सुरुवात होताच ते उभे राहिले आणि निघून गेले. त्यांनी वंदे मातरम म्हणण्यास नकार दिला. वंदे मातरमला अशा प्रकारचा विरोध भारताच्या फाळणीचे दुर्दैवी कारण बनले. काँग्रेसने त्यावेळी मोहम्मद अली जौहर यांना राष्ट्रपती पदावरून काढून टाकले असते आणि वंदे मातरमद्वारे भारताच्या राष्ट्रवादाचा आदर केला असता, तर भारताचे विभाजन झाले नसते, असा दावा त्यांनी केला.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 8:30 am

नेत्यांमधीलच खुन्नस दिसू लागली

दक्षिण महाराष्ट्र - वार्तापत्रस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे राजकारण नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्याबाबतीत सध्या जोरावर आहे. कार्यकर्त्यांची ही निवडणूक मानली जात असली तरी प्रत्यक्षात जिल्ह्याचे नेते म्हणून होणाऱ्या विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये खुन्नस इतकी दाटून भरली आहे, की त्यांची कृती आणि वक्तव्ये याची साक्ष देऊ लागलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीतून विधान परिषदेच्या आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे राजकारणही केले जात आहे.महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता नेमक्याच टप्प्यात पोहोचल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२६ पर्यंत या निवडणुका पूर्ण करण्याचे बंधन असताना, राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात २४६ नगर परिषदा आणि ४२ नगरपंचायतींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदान २ डिसेंबरला होणार असून, निकाल ३ डिसेंबरला येणार आहे. यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर ही तीन जिल्हे प्रमुख भूमिकेत आहेत. या भागातील ४३ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (नगर परिषदा आणि नगरपंचायती) चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. येथील राजकीय पक्षांच्या युती आघाड्या आणि त्यांच्यातील अंतर्गत कलह यामुळे दक्षिण महाराष्ट्र हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेश आहे. येथे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती आणि काँग्रेस-शिवसेना (उद्धव ठाकरे गट)-राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांची महाविकास आघाडी (मविआ) या दोन प्रमुख आघाड्या आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर गटबाजी आणि स्वबळाची मागणी यामुळे युतींमध्ये फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.शिवेंद्रराजे आणि देसाई वादसातारा जिल्ह्यात चार मंत्री आहेत. यात दोन भाजप, एक शिंदेसेना व एक राष्ट्रवादीचा आहे. शिंदेसेनेतील मंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मेढा येथील सभेत बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांना 'शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मान राखावा, अन्यथा वेगळी भूमिका घेऊ असा इशारा दिला होता. हाच धागा पकडत शिवेंद्रसिंहराजे यांनी पालकमंत्र्यांना त्यांच्याच शैलीत उत्तर दिले. पालकमंत्र्यांना आम्ही कधीच कमी लेखत नाही, पण जसा पाटणमध्ये निर्णय ते घेतील तसाच मेढ्यात होईल, असे ते म्हणाले. दोन मंत्र्यांच्या या राजकीय जुगलबंदीमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शिवाय सातारा नगरपालिकेला शिवेंद्रराजे आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यात सत्ता स्पर्धा आहे ती वेगळीच. कराड आणि साताऱ्यामध्ये नगराध्यक्ष पद प्रदीर्घ काळानंतर खुले झाल्याने पुरुष नगराध्यक्ष होणार म्हणून इच्छुकांची प्रचंड गर्दी नेत्यांचा कस लावणारी ठरणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील ३८ नगर परिषदा आणि ५ नगरपंचायतींमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय नेते सक्रिय झाले आहेत.यड्रावकरांच्या विरोधात रणनीतीकोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण तर वेगळ्याच वळणावर चालले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपतात कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती देणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीची गणितेही आखली जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मंत्र्यांची वाढती संख्या, प्रत्येक पक्षात फूट पडून झालेले दोन गट यामुळे इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यांचे पुनर्वसन कसे करायचे आणि शब्द कोणता द्यायचा हा नेत्यांपुढे प्रश्न आहे. त्यामुळे तडजोड, युती, आघाडी यापेक्षा 'अंडरस्टँडिंग'ला महत्त्व येण्याची शक्यता आहे. अर्थातच हे पीक हायब्रीड असेल. जो सक्षम असेल तो निवडून येईल या तत्त्वावर नेते आपापल्याच मित्र पक्षाचा घात करायलाही कमी करणार नाहीत याची चिन्हे दिसत आहेत. चंदगडचे उदाहरण यापूर्वीच्या वार्तापत्रात होतेच. आता सध्या शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे पारडे जड होऊ नये म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील इतर मातब्बर मंडळी एक होऊन यड्रावकर यांची ताकद कमी करण्यास पुढे सरसावले आहेत. आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिडकर, खा. धैर्यशिल माने, रामचंद्र डांगे, हे नेते एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आ.सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, भाजपचे शिरोळ तालुक्याचे नेते माधवराव घाटगे, दत्त साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक गणपतराव पाटील हे नेते असणार आहेत. आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिरोळ जयसिंगपूर आणि कुरूंदवाड नगरपालिका निवडणुकीत विरोध करण्यासाठी आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, खा. धनंजय महाडिक हे कट्टर विरोधक दोन नेते एकत्रित येत आहेत अशी चर्चा आहे. गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक या निवडणुकीची निर्णायक मते राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे आहेत. शिवाय विधान परिषद निवडणुकीत आ. डॉ. यड्रावकर यांची भूमिका निर्णयक राहू नये म्हणून ही तजवीज आहे. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत २१ वरून २५ इतकी संचालक संख्या होऊ नये म्हणून ताराराणी आघाडीचे नेते महादेवराव महाडिक प्रयत्न करत होते. मात्र सत्ता पक्षातीलच इतर घटकांनी त्यांची मोहीम हाणून पाडून संचालक संख्या वाढवून आणल्याने महाडिकांना इतर पक्ष मिळून धक्का देण्याची तयारी करत आहेत हेही स्पष्ट झाले आहे. पुढच्या दहा दिवसांत संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण कसे एकमेकांविरोधात लढवले जाते ते पाहणे जनतेला अचंबित करणारे असू शकते.चंद्रकांतदादा बोलले जयंतराव खुललेसांगली जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे वक्तव्य म्हणजे भाजपच्या नेत्यांना एक डोकेदुखी झाली आहे. दादा बोले दल हाले असे आतापर्यंत सांगलीची परिस्थिती होती. पण आता दादा बोलले आणि जयंतराव पाटील फुलले अशी परिस्थिती झाली आहे. राजकारणात काय सांगावे आणि काय सांगायचे टाळावे हे ठरवून बोलावे लागते. चंद्रकांत दादा सगळेच बोलून जातात आणि मग पक्षात लोक नाराज होतात. दिवाळीत काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्या जयश्री पाटील यांच्या घरी भेट देताना त्यांनी महापालिका निवडणुकीत त्यांच्या २२ लोकांना भाजपचे तिकीट देण्याचे सूतोवाच केले. त्यामुळे दादांसाठी रणनीती आखणारी मंडळी अडचणीत आली. आमदार सुधीर गाडगीळ यांना टोकाची भाषा बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी जयश्री पाटील यांच्या उमेदवारांना तेवढ्या जागा सोडण्यास विरोध केला आणि भाजपच्या निष्ठावंतांना न्याय देण्याची मागणी केली. मग चंद्रकांतदादांनी त्यावर बोलताना जयश्री पाटील यांच्याकडे आलेले लोक २२ नव्हे तर केवळ सहाच आहेत आणि त्या सहा लोकांना तिकीट देऊ असे शब्द फिरवले. भाजपकडे येऊ घातलेली मंडळी वरमली. महापालिका निवडणुका अद्याप दृष्टिपथातही नसताना दादांनी केलेल्या या गडबडीमुळे जयंत पाटील यांना नगरपालिका नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा राजकारण करणे सोयीचे झाले. इतके दिवस संधीची वाट पाहत बसलेले आणि जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडलेले जयंत पाटील दादांच्या या बोलाने खुलले. त्यांनी भाजपविरोधात जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी सहित विविध पक्षातील नाराज मंडळींना एक करून आपल्यासोबत जोडले. काँग्रेसमध्ये खासदार विशाल पाटील यांच्याशी असणारा दुरावा विश्वजीत कदम यांच्या मदतीने संपवला आणि महाविकास आघाडीचे दमदार पॅनल होईल, इतर पक्षांचे लोक भाजपला आव्हान देतील अशी रणनीती आखण्यास सुरुवात केली. विखुरलेल्या आघाडीला एकजूट होण्याची संधी लाभली. आता भाजपवर मित्र पक्षांची डारडूर सुरू झाली आहे. दादांचे बोलणे भाजपला अडचणीत आणणारे ठरले आहे. आता पुन्हा जयंत रावांचा खेळ उद्ध्वस्त करण्यासाठी नेत्यांना नव्याने इतरांची म्हणून धरणी करण्याची वेळ आली आहे.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 8:30 am

satara news: जनतेचा विकास डोळ्यासमोर ठेवूनच सुनील माने यांची घरवापसी उपमुख्यमंत्री अजित पवार; रहिमतपूरमध्ये सुनील मानेंसह असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

रहिमतपूर : सुनील माने यांचा पक्षप्रवेश नाही, ती घरवापसी आहे. जनतेची कामे करण्यासाठी सत्ता आवश्यक असते. विरोधी पक्षात असताना आंदोलन आणि उपोषण करता येतात, पण जनतेची कामे सत्तेतूनच पूर्ण होतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे माजी नगराध्यक्ष सुनील माने, शहाजीराव क्षीरसागर, संभाजीराव गायकवाड व परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी सोमवारी राष्ट्रवादी […] The post satara news: जनतेचा विकास डोळ्यासमोर ठेवूनच सुनील माने यांची घरवापसी उपमुख्यमंत्री अजित पवार; रहिमतपूरमध्ये सुनील मानेंसह असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 8:20 am

Pune District : कळंब गटात ‘मविआ’चा वरचष्मा? भाजपच्या मदतीने बाजी मारण्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रयत्न

रांजणी : आंबेगाव तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कळंब – चांडोली जिल्हा परिषद गट महिला सर्वसाधारण राखीव घोषित झाला आहे. या मतदारसंघात महिला इच्छुकांचा उत्साह ओसंडून वाहत असून हा गट महिला राखीव झाल्याने अनेकांनी आपल्या सौभाग्यवतींसाठी राजकीय दालने खुली केली असल्याचे दिसून येते. दरम्यान हा जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण […] The post Pune District : कळंब गटात ‘मविआ’चा वरचष्मा? भाजपच्या मदतीने बाजी मारण्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रयत्न appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 8:16 am

दिल्ली स्फोटात १३ जणांचा मृत्यू

४० हून अधिक जखमी, एका संशयितास अटक, शरीराच्या चिंधड्या उडाल्या, डझनभर गाड्या जळून खाक, दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांना ‘हायअलर्ट’, दहशतवादी हल्ला असण्याची शक्यतानवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ हाय सेक्युरिटी झोन असलेल्या भागात एका इको व्हॅनमध्ये हा स्फोट झाला. हा आयईडीचा स्फोट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागल्याची घटना घडली. या स्फोटानंतर जवळपासच्या गाड्यांनी पेट घेतल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटानंतर अग्निशमन दल आणि पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या स्फोटात किमान १३ जणांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जण जखमी झाल्याची महिती मिळत आहे. मृताचे व जखमींचे आकडे वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान या स्फोटानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती घेतली आहे. घटनास्थळी डॉग स्कॉडच्या मदतीने तपास केला जात आहे. हा स्फोट खूप भीषण होता. परिसरात गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी गाड्यांचे केवळ सांगाडे उरले आहेत. एवढंच नाही तर काही ठिकाणी मानवी शरीराचे अवयव अस्ताव्यस्थ पडलेले बघायला मिळत आहेत. या घटनेमागे नेमके कारण काय आहे? हा दहशतवादी हल्ला होता की दुसरे काही होते? ते अद्याप समजू शकलेले नाही.मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ जवळ एका कारमध्ये स्फोट झाला. यानंतर कारने पेट घेतला आणि आगीचे लोण लगतच्या वाहनांपर्यंत पोहोचले. दरम्यान अग्निशमन दलाच्या सुमारे सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. स्फोटाचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट नंबर १ च्या बाहेर पार्किंगमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोटानंतर गाडीला भीषण आग लागली. आग इतकी मोठी होती की, बाजूच्या दोन गाड्यांनादेखील आग लागली. गाडीत स्फोट झाल्यानंतर परिसरात मोठा आवाज आला. अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. परिसरातील दुकानांची काच फुटली. या स्फोटात पार्किंगमधील गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. स्फोटानंतर घटनास्थळी काही गाड्यांचा केवळ सांगाडा दिसत आहे. ही घटना खूप भीषण आहे. हा परिसर अत्यंत रहदारीचा परिसर आहे. पोलिसांनी तत्काळ परिसर रिकामा करून लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या आसपास सुरक्षा वाढवली आहे. इथे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची यावेळी गर्दी असते. गर्दीच्या वेळी हा स्फोट झाल्याने हा दहशतवादी कट होता का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. केंद्र सरकारने या हल्ल्याची गंभीर दखल घेतली असून शोध तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. या स्फोटाने देशभर खळबळ उडाली असून भीतीचे वातावरणही निर्माण झाले आहे.सगळ्याच गोष्टींच्या तपासाचे आदेश : अमित शहालाल किल्ला परिसरातील कार स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माध्यमांना आपण घटनास्थळी लगेच जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या स्फोटाच्या सर्वच संभावनांचा तपास करत असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. घटनास्थळाबरोबरच अमित शहा रुग्णालयातही जाणार आहेत. तसेच या संपूर्ण घटनेचा तपास करण्यात येईल, अशी माहिती शहा यांनी दिली. सध्या तपासाकरिता स्फोटाच्या ठिकाणचे सर्वच अवशेष एकत्र करण्यात येत आहेत, अशी माहितीही शहा यांनी दिली. दिल्ली क्राईम ब्रँच तसेच दिल्ली पोलीस, एनएसजी, एएफएस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी तपासाला सुरुवातही केली आहे. या घटनास्थळाजवळच्या तसेच आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेरा आणि सगळ्याच गोष्टींच्या तपासाचे आदेश दिले आहेत, अशीही माहिती अमित शहा यांनी दिली. स्पेशल ब्रँच, तसेच सीपी दिल्ली घटनास्थळी आहेत. या पूर्ण तपासाची संपूर्ण माहिती जनतेला देण्यात येईल, असे शेवटी शहा यांनी सांगितले.दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट दिल्लीतील लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी कारमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली असून या घटनेने दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचे सात बंब पोहोचले असून पोलिसांनी परिसराला वेढा घालताना घटनास्थळावरून गर्दी हटवण्यात येत आहे एनआयए आणि एनएसजी कमांडोदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. पण या स्फोटात गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झालेला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चार दिवसांत, ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान दिल्ली पोलिसांनी काही संशयितांना पकडले आहे. त्यामध्ये आयसिसच्या चार दहशतवाद्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकंही जप्त करण्यात आली आहेत. लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटामुळे घातापाताचा संशय अधिक बळावला आहे.स्फोट झालेली आय २० गाडी हरयाणातील... दिल्लीमध्ये लाल किल्ल्यापासून काही अंतरावर एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. यात दहा लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. ज्या कारमध्ये हा स्फोट झाला, त्याबद्दल दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी स्फोट झालेल्या कारबद्दल माहिती दिली. स्फोटानंतर माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त सतीश गोलचा म्हणाले, सोमवारी सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी एक हळूहळू आलेले एक वाहन रेड लाईटजवळ येऊन थांबले होते. त्यात हा स्फोट झाला आहे. त्यावेळी गाडीमध्ये काही प्रवासी होते. या स्फोटामुळे आजूबाजूला असलेल्या वाहनांचेही नुकसान झाले आहे. जशी याबद्दल माहिती मिळाली, तसे सगळ्या यंत्रणा घटना स्थळी आले. परिस्थितीची पाहणी करत आहे. या स्फोटाचा तपास केला जात आहे. या घटनेचा तपास करून जे काही आढळून येईल, ते माध्यमांना सांगितले जाईल. या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत. काही लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या परिस्थितीचा आढावा घेतला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त गोलचा यांनी दिली. ज्या गाडीत स्फोट झाला, ती आय २० होती. या गाडीची पासिंग गुरुग्रामची होती म्हणजे ती हरयाणातील होती. सध्या पोलीस ज्या ठिकाणी स्फोट झाला, त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आहे.दिल्लीत स्फोट होताच मुंबईत खाकी वर्दीची गस्तदिल्लीतील स्फोटानंतर मुंबईतही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील प्रमुख ठिकाणांवर पोलिसांनी गस्त वाढवली आहे. मुंबईच्या सीसीएसटी परिसरात पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. मुंबई पोलीस सध्या हायअलर्टवर आहेत. या शहरात जिथे-तिथे पोलीस दिसत आहेत. खबरदारी म्हणून सर्व रेल्वे स्थानकांवर पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. संशयित व्यक्तींची झाडाझडती घेतली जात आहे. पोलिसांची पथकंच्या पथकं सर्वत्र फिरताना दिसत आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या शहरात काही दुर्घटना घडली तर त्याचा परिणाम संपूर्ण देशात पडतो. त्यामुळेच आता खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी हायअलर्ट जारी करत खबरदारी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लातील स्फोटानंतर मुंबईसह पुणे शहरातही हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 8:10 am

भारत - द. आफ्रिका कसोटी मालिकेत आधी टी, मग लंच ब्रेक!

क्रिकेटची सुमारे १५० वर्षांची परंपरा मोडीतमुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिली कसोटी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळली जाईल, तर दुसरा सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे रंगणार आहे. या दुसऱ्या कसोटीत एक अनोखा बदल पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे लंचपूर्वी टी ब्रेक घेतला जाणार आहे. भारतात कसोटी सामन्यांमध्ये असा बदल प्रथमच होणार आहे.टॉस, लंच, चहा, स्टंप (दिवसाचा खेळ संपला)… कसोटी सामन्यांमध्ये हा नेहमीचा क्रम आहे, परंतु २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात हा क्रम बदलणार आहे. पहिल्यांदाच खेळाडूंना लंचच्या आधीच टी ब्रेक मिळेल. देशाच्या पूर्व भागात सूर्योदय आणि सूर्यास्त लवकर होता, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियममध्ये खेळाचा पहिला सत्र सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत असेल. त्यानंतर ११ ते ११.२० वाजेपर्यंत टी ब्रेक दिला जाईल. दुसरे सत्र ११.२० ते दुपारी १.२० या वेळेत खेळले जाईल आणि मग १.२० ते २ वाजेपर्यंत लंच ब्रेक असेल. अखेरचे सत्र दुपारी २ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पार पडेल. मैदानावर अतिरिक्त खेळण्यासाठी वेळ मिळावा यासाठी टी ब्रेकच्या सत्रात बदल करण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ असेल.गुवाहाटीत सूर्यास्त लवकर होतो, त्यामुळे सामना सकाळीच लवकर सुरू करावा लागतो. खेळाचा वेळ वाढवण्यासाठी लंचपूर्वी टी ब्रेक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कसोटी सामन्यामध्ये दोन तासांचा खेळ होतो, त्यानंतर ४० मिनिटांचा लंच ब्रेक होतो. यानंतर पुन्हा दुसरे सत्र २ तासांचे असते. त्यानंतर २० मिनिटांचा टी ब्रेक होतो.रणजी ट्रॉफीत आधीच झालेला प्रयोगसामान्यतः भारतातील कसोटी सामने सकाळी ९.३० वाजता सुरू होतात. ४० मिनिटांचा लंच ब्रेक (११.३० ते १२.१०) आणि २० मिनिटांचा टी ब्रेक (२.१० ते २.३०) असा असतो. तिसरे सत्र २.३० ते ४.३० चालते. दिवसाला ९० षटके पूर्ण करण्यासाठी अर्धा तास अतिरिक्त वेळ दिला जाऊ शकतो. याआधीही बीसीसीआयने रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये सूर्यास्ताच्या वेळेनुसार सत्रांचे वेळापत्रक बदलले आहे आणि आता तोच प्रयोग आंतरराष्ट्रीय कसोटीत पहिल्यांदाच होणार आहे.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 8:10 am

एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक

प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकरांसह अन्य उमेदवारांची माघारमुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांचा आपल्या पदावर कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘एमसीए’च्या बुधवारी (१२ नोव्हेंबर) होणाऱ्या त्रैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदासाठी एकूण आठ जणांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, सोमवारी (१० नोव्हेंबर) अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात आलेल्या अखेरच्या दिवशी अजिंक्य नाईक वगळता सर्वच उमेदवारांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे नाईक यांना ‘एमसीए’ अध्यक्ष म्हणून सलग दुसरा कार्यकाळ मिळणार हे स्पष्ट झाले.‘एमसीए’ अध्यक्षपदासाठी नाईक यांच्यासह भारताच्या माजी कर्णधार डायना एडल्जी, भाजप आमदार प्रसाद लाड, शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र आणि मुंबई टी-२० लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक, ‘एमसीए’चे माजी सहसचिव शाह आलम शेख आणि कार्यकारी परिषदेचे सदस्य सुरज समत यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, सोमवारी नाईक वगळता सर्व उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले.आ. जितेंद्र आव्हाड उपाध्यक्षपदासाठी उत्सुक आहे. या पदासाठी त्यांच्यासमोर ठाण्याच्या यंग स्टार्स क्रिकेट क्लबकडून अर्ज दाखल केलेल्या नवीन शेट्टी यांचे आव्हान असेल.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 8:10 am

‘वंदे मातरम्’चा विवाद

वंदे मातरम् हे आपले राष्ट्रगीत होणार होते. स्वातंत्र्यपूर्वीपासून तसेच ठरले होते. पण पंडित नेहरू यांनी जे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान राहिले त्यांनी मुस्लिमांना खूश करण्यासाठी आणि मुस्लीम व्होट बँक जपण्यासाठी वंदे मातरम् हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आणि मग जनगनमन हे आपले राष्ट्रगीत झाले. पण तो वाद तेव्हाही तसाच होता, तो अद्यापही सुटला नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभर भाजपच्या वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले आहे. अर्थात यास ममता बॅनर्जी यांनी विरोध केला आहे आणि त्यामागे कारण हे निव्वळ राजकीय आहे. वास्तविक वंदे मातरम् हे भारतमातेचे गायन आहे आणि त्याबद्दल कुणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही. पण मुस्लिमांनी या गीताला १९३७ मध्येही आक्षेप घेतला होता आणि आजही मुस्लिमांना या गीताबद्दल आक्षेप असल्यामुळे देशभर नाही तर किमान बंगालमध्ये वंदे मातरमवरून वाद निर्माण झाला आहे. ममता बॅनर्जी यांनी आणि त्यांच्या संपूर्ण पक्षाने या वादावर मौन पाळले आहे. ममता यांच्या या मौनाचा अर्थ उघड आहे. कारण ममता यांची सारी मदार मुस्लीम आणि रोहिंग्य मतदारांवर आहे.वंदे मातरम् हे गीत लिहिले होते बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आणि त्यामुळे भाजपने या प्रकरणी बंगाली अस्मितेचा मुद्दा जोडून आगामी विधानसभा निवडणुका लढवण्याची खेळी खेळली आहे. ही खेळी ममता यांना अडचणीत आणू शकते. म्हणूनच त्यांनी या मुद्द्यावर सोयीस्कर मौन पाळले आहे. हे गीत बंगाली अस्मितेशी जोडले गेले आहे आणि ते बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले असले तरीही ते गायले आहे रवींद्रनाथ टागोर यांनी. १९०५ मध्ये बंगालची फाळणी झाली तेव्हा वंदे मातरम् हेच गीत राष्ट्रवाद्यांचा आवाज बनला होता. पण ममता यांनी गीताच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या वादावर मौन पाळले आहे. त्याचे कारण आहे की या गीताचा मूळ स्वरूपातील स्वीकार किंवा विरोध करणे तृणमूल काँग्रेसला शक्य नाही. बंगालमध्ये आज ३७ टक्के मुस्लीम आहेत. भारतमातेचे दैवतीकरण करण्यास आणि हे गीत मुस्लीम विरोधी आहे असे भासवण्याचा प्रयत्न अल्पसंख्याकांनी सातत्याने केला आहे. या विरोधाचे मूळ इस्लाम धर्मात आहे कारण मुसलमान अल्लाशिवाय कुणाचीही पूजा करत नाही. तसे करण्यास त्याला मनाई आहे. या विरोधातून अल्पसंख्याकांचा वंदे मातरम् गीताला विरोध झाला आहे. आणि काँग्रेस इतकी वर्षे अल्पसंख्याकांच्या मतांवरच निवडून येत होती त्यामुळे अल्पसंख्याकांच्या विरोधाला डावलून काँग्रेसला काहीच करता येणे शक्य नव्हते. अर्थात अल्पसंख्याकांच्या विरोधाचा मुद्दा बाजूला ठेवला तरीही वास्तविक पहाता वंदे मातरम् गीताला आदर देण्यात काहीच आक्षेपार्ह नाही. कारण यात भारत मातेची प्रार्थना आहे. पहिल्या प्रथम हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीत अवतीर्ण झाले आणि त्यानंतर प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाचा तो श्वास बनला. याच वादामुळे काँग्रेसचे देशात अधिवेशन भरले तेव्हा १९३७ मध्ये वंदे मातरमचे पहिली दोन कडवी फक्त स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. अनेक मुस्लिमांचा या गीताला आक्षेप आहे पण अब्दुल रहेमान अंतुले यांच्यासारखे काही मुस्लीम असेही नेते होते की ज्यांनी मातृभूमीसाठी हे देशभक्तीपर गीत आहे, असे मानत होते. ममता यांची अडचण वेगळीच आहे. मुस्लीम लीगने सर्वप्रथम या गीताला विरोध केला होता. ममता यांनीच वास्तविक वंदे मातरम् शाळा आणि सार्वजनिक स्थळांवर गायन करणे अनिवार्य करण्याची मागणी केली होती पण आज त्यांनी या वादावर सोयीस्कर मौन पाळले आहे. कारण एक तर हे गीत बंगाली अस्मितेशी जोडले गेले आहे. दुसरे म्हणजे ममता यांचा भर मुख्यतः मुस्लीम आणि रोहिंग्य मतदारांवर आहे. त्यामुळे त्या दोघांनाही दुखवता येत नाही. हे गीत आज भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वादविवादाचे कारण बनले आहे. पंडित नेहरू यांनी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, की या गीतामुळे अल्पसंख्याकांच्या नाराजीचे कारण होऊ शकते. राष्ट्राला प्रेरणा देणाऱ्या गीतावरून वाद निर्माण व्हावा यासारखे दुर्दैव नाही. कारण काँग्रेसने गेली कित्येक वर्षे हिंदू धर्माचे प्रेरणास्त्रोत आणि हिंदू धर्माला नेहमीच दुय्यम लेखले आहे. अल्पसंख्याकांच्या एकगठ्ठा मतांवर सत्ता हस्तगत केली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तास्थानी येताच हिंदू जागा झाला आणि काँग्रेसने येथील इतिहास कसा दडपून टाकला याचा पर्दाफाश करण्यास सुरुवात केली, म्हणून काँग्रेस असो की तृणमूल काँग्रेस असो की अल्पसंख्याक असोत, याच्या देशद्रोही कारवाया जनतेसमोर आल्या आहेत आणि त्याचमुळे ही मंडळी बॅकफुटवर गेली आहेत.काँग्रेस आणि वंदे मातरमचा हा वाद जुनाच आहे. पंडित नेहरूंनी जाणीवपूर्वक वंदे मातरमची दोन कडवी वगळली होती. कारण त्यात माँ दुर्गादेवीची स्तुती केली आहे. नेहरूंच्या निधर्मी राजकारणाला हे साजेसे नव्हते त्यामुळे ही कडवी वगळण्याचा त्यांच्या कार्यकाळात सरकारने हा निर्णय घेतला. हा आरोप भाजपने केला म्हणून तो राजकीय आहे असे नाही, तर त्यात वास्तव आहे. वंदे मातरम गीत कोणत्याही एका धर्माचे नाही. या गीतावरून आताच वाद होण्याचे कारण म्हणजे बंगालमध्ये होऊ घातलेल्या २०२६ मधील निवडणुका. त्यात ममता यांचा पक्षाची थेट लढत भाजपशी होत आहे आणि त्यामुळेच ममता यांनी विरोधी नेत्यांना कठोर शब्द बाण वापरत टीका करण्याचे धोरण अवलंबिले आहे. ममता यांनी आपण हिंदू असल्याचे विधानसभेत जाहीर केले होते. पण त्यांनी वेळोवेळी अल्पसंख्याक आणि रोहिंग्यांच्या हिताची भूमिका घेतली. त्यामुळे यावेळी त्यांना काय भूमिका घ्यावी हा पेच पडला असावा. ममता यांची दुटप्पी भूमिका तेव्हाच उघड झाली होती जेव्हा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वंदे मातरम गीत गाऊ नका असे सांगितले. वंदे मातरम राष्ट्राला स्फूर्ती देणाऱ्या गीताला आज १५० वर्षे साजरी होत असताना केवळ अल्पसंख्यांकांना खुश करण्यासाठी विरोध केला जात आहे हे देशाची प्रतिमा उंचावणारी बाब नाही. वंदे मातरम हे राष्ट्राचे प्रेरक गीत आहे आणि त्याचे स्थान तसेच राहिले पाहिजे.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 8:10 am

अॅड. पल्लवी पूरकायस्थ हत्या प्रकरण; आरोपीची जन्मठेप हायकोर्टातही कायम

मुंबई : वकील पल्लवी पूरकायस्थ (२५) हिच्या २०१२ मध्ये झालेल्या हत्या प्रकरणातील दोषसिद्ध आरोपी सज्जाद मुघल याला सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी कायम ठेवली. सज्जादला जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी या मागणीसाठी राज्य सरकार आणि पूरकायस्थ हिच्या वडिलांनी केलेले अपील फेटाळत, न्यायालयाने सज्जाद याची जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.सत्र न्यायालयाने जुलै २०१४ मध्ये पुरकायस्थ राहत असलेल्या इमारतीतील सुरक्षा रक्षक सज्जादला खून, विनयभंग आणि घरात घुसल्याच्या आरोपप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हे प्रकरण ‘‘दुर्मिळातील दुर्मीळ’’ श्रेणीत मोडत नसल्याचे नमूद करून सज्जादला फाशीची शिक्षा सुनावण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने त्यावेळी फेटाळली. राज्य सरकारने २०१५ मध्ये सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील दाखल करून सज्जादला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. त्यानंतर, पूरकायस्थ हिचे वडील अतनू यांनीही सज्जादला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी फेरविचार याचिका केली होती, तर सज्जाद यानेही शिक्षेच्या निर्णयाला आव्हान दिले होते. हायकोर्टाने सोमवारी या प्रकरणी निर्णय देताना सज्जादसह राज्य सरकारचे अपील आणि पूरकायस्थ हिच्या वडिलांची याचिकाही फेटाळून लावली.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 8:10 am

अपघात रोखण्यासाठी समन्वयाने कृती गरजेची !

रस्ता सुरक्षा समितीची राज्य सरकारला सूचनामुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश तथा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील रस्ता सुरक्षा उपाययोजनांबाबत उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीस मुख्य सचिव राजेशकुमार तसेच गृह, परिवहन, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य आणि शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.सनितीचे अध्यक्ष अभय सप्रे ९ ते १४ नोव्हेंबरदरम्यान मुंबई–पुणे दौऱ्यावर असून, रस्ता सुरक्षा सुधारणा आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली.बैठकीत रस्ता अपघात रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच ब्लॅक स्पॉट्स दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी सूचना करण्यात आली. केंद्र सरकारच्या आयआरएडी पोर्टलचा प्रभावी वापर, आयटीएमएस, एटीएस आणि एडीटीटी प्रकल्पांची गतिमान अंमलबजावणी, तसेच हेल्मेटचा अनिवार्य वापर या विषयांवरही समितीने भर दिला. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनीही दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक असल्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच जिल्हास्तरावर नियमितपणे रस्ता सुरक्षा समित्यांच्या बैठका घेऊन अपघात प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याचे निर्देशही देण्यात आले. रस्ता सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अपघात आणि अपघाती मृत्यू रोखण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 8:10 am

आठव्या मजल्यावरून पडून मजुराचा जागीच मृत्यू

मालाड : मालाड पूर्व येथील शांती नगर भागात सुरू असलेल्या एका नवीन इमारतीच्या बांधकाम साईटवर आठव्या मजल्यावरून खाली पडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ईशराफूल नावाचा हा मजूर सोमवारी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास काम करत असताना ही घटना घडली.बांधकाम सुरू असलेल्या साईटच्या आठव्या मजल्यावरून खाली पडून मजूर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णवाहिकेने जोगेश्वरी येथील ट्रामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.दरम्यान, काही दिवसांपूर्वीच याच परिसरात १९०० किलो वजनाची एक क्रेन कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नव्हती, परंतु क्रेन १८ टायरच्या एका ट्रकवर पडल्यामुळे ट्रकाचे दोन तुकडे झाले होते

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 8:10 am

Pune District : तीन प्रभागांत समस्यांचा डोंगर; मंचर नगरपंचायत निवडणुकीत ठरणार कळीचा मुद्दा?

मंचर :येथील नव्याने स्थापन झालेल्या मंचर नगरपंचायतीच्या एकूण 17 प्रभागांपैकी किमान तीन प्रभागांमध्ये नागरी समस्या कायम असून त्या आगामी निवडणुकीत ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. पथदिवे नसल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य, ड्रेनेज व्यवस्थेचा अभाव, आणि रस्त्यांची दुरवस्था या प्रमुख समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून रस्त्यांवर चिखलाचे दलदलीचे स्वरूप निर्माण होते. नागरी समस्या प्रलंबित […] The post Pune District : तीन प्रभागांत समस्यांचा डोंगर; मंचर नगरपंचायत निवडणुकीत ठरणार कळीचा मुद्दा? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 8:10 am

Pimpri : आज होणार आरक्षणाचा फैसला; इच्छुकांची धाकधूक वाढली

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२६ मध्ये होणार आहे. त्यासाठी १२८ जागा असून त्‍यापैकी निम्म्या जागा या महिलांसाठी राखीव आहेत. कोणत्या प्रभागात महिलांचे आरक्षण पडणार याबाबत आज (दि. ११) फैसला होणार आहे. महिलांच्या जागा या खुल्या गटातील जांगाच्या बरोबरीने आहेत. कुटुंबात पर्यायी योग्य महिला उमेदवार नसल्याने काहीजणांना निवडणूक रिंगणातून माघार घ्यावी लागणार […] The post Pimpri : आज होणार आरक्षणाचा फैसला; इच्छुकांची धाकधूक वाढली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 8:07 am

स्फोटाचा कट कोणी रचला? ; पुलवामा घटनेचा दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंध, महत्वाची माहिती समोर

Delhi Blast । सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका चालत्या कारमध्ये अचानक मोठा स्फोट झाल्याने दिल्ली हादरली. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. पार्क केलेल्या अनेक वाहने जळून खाक झाल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, गर्दीच्या वेळी […] The post स्फोटाचा कट कोणी रचला? ; पुलवामा घटनेचा दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंध, महत्वाची माहिती समोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 8:05 am

Pune District : कामशेतमध्ये भीषण अपघात; पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीमध्ये कंटेनर घुसला : दोघांचा मृत्यू, सहा जखमी

कामशेत : पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीमध्ये मंगळवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भरधाव कंटेनर घुसल्याने दोन वारीकरी जागीच ठार झाले, तर पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले. ही भीषण घटना मावळ तालुक्यातील कामशेत परिसरात घडली. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून, संतप्त नागरिकांनी जुना पुणे–मुंबई महामार्ग रोखून धरत तीव्र आंदोलन सुरू केले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या […] The post Pune District : कामशेतमध्ये भीषण अपघात; पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीमध्ये कंटेनर घुसला : दोघांचा मृत्यू, सहा जखमी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 8:03 am

satara news: मुलाखत सत्रानंतर खासदार उदयनराजे थेट सुरुचीवर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची घेतली भेट

satara news: साताऱ्यात सुरू असलेले मनोमिलनाचे हेलकावे अखेर सोमवारी संपले. मुलाखती रात्री उशिरा संपल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट सुरूचीवर जाऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. त्यामुळे साताऱ्यात पुन्हा दोन्ही राजांचे मनोमिलन होऊन नगरपालिका एकत्र लढल्या जाणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले. इच्छुकांच्या मुलाखतीचा खलिता घेऊन शिवेंद्रसिंहराजे मंगळवारी मुंबईला रवाना होत आहेत. त्यापूर्वी […] The post satara news: मुलाखत सत्रानंतर खासदार उदयनराजे थेट सुरुचीवर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची घेतली भेट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 8:01 am

Satara News : मुलाखत सत्रानंतर खासदार उदयनराजे थेट सुरुचीवर ; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची घेतली भेट

प्रभात वृत्तसेवा सातारा – साताऱ्यात सुरू असलेले मनोमिलनाचे हेलकावे अखेर सोमवारी संपले. मुलाखती रात्री उशिरा संपल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट सुरूचीवर जाऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. त्यामुळे साताऱ्यात पुन्हा दोन्ही राजांचे मनोमिलन होऊन नगरपालिका एकत्र लढल्या जाणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले. इच्छुकांच्या मुलाखतीचा खलिता घेऊन शिवेंद्रसिंहराजे मंगळवारी मुंबईला रवाना होत […] The post Satara News : मुलाखत सत्रानंतर खासदार उदयनराजे थेट सुरुचीवर ; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची घेतली भेट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 8:00 am

Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेसची जम्बो कार्यकारणी जाहीर

पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सोमवारी (दि. १० ) जाहीर केली. यामध्ये १९१ जणांना विविध पदांवर संधी देण्यात आली आहे. सर्व जाती-धर्मांच्या कार्यकर्त्यांना यामध्ये सामावून घेत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या कार्यकारिणीमध्ये शहराध्यक्ष म्हणून योगेश बहल यांचे पद तसेच ठेवण्यात […] The post Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेसची जम्बो कार्यकारणी जाहीर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 8:00 am

Pune District : वैभव धाडवे तुतारी फुंकणार; भोंगवली गटात शरद पवार गट बेरजेत : मोठी राजकीय उलथापालथ

कापूरहोळ : कामथडी- भोंगवली जिल्हा परिषद गटात येणाऱ्या निवडणुकीत वैभव धाडवे पाटील यांनी हाती तुतारी घेत रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या घोषणेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. धाडवे हे तुतारी फुंकणार असल्याने भोंगवली गटात शरद पवार गटाने बेरजेचे राजकारण यशस्वी केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ होणार आहे. वैभव धाडवे […] The post Pune District : वैभव धाडवे तुतारी फुंकणार; भोंगवली गटात शरद पवार गट बेरजेत : मोठी राजकीय उलथापालथ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 7:58 am

दिल्ली स्फोटाचा अमोनियम नायट्रेट आणि फरिदाबादशी काय संबंध?:20 सप्टेंबरला 25 km अंतरावर एक चालान झाले; छाप्याच्या भीतीने स्फोटके घेऊन पळून गेले का?

१० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २४ जण जखमी झाले आहेत. या स्फोटाची चौकशी करणाऱ्या सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरिदाबादशी संबंधित अनेक दुवे तपासले जात आहेत. ९ नोव्हेंबर रोजी, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणातील फरीदाबाद येथील धौज गावात पुलवामा येथील रहिवासी डॉ. मुझमिल शकीलच्या घरावर छापा टाकला. त्याच्या खोलीतून ३६० किलो स्फोटके आणि एक असॉल्ट रायफल जप्त करण्यात आली. चार किलोमीटर अंतरावर, फतेहपूर तगा गावात, एका मौलवीच्या घरातून २,५६३ किलो संशयास्पद अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले. दिल्ली बॉम्बस्फोट आणि या छाप्यामध्ये चार संबंध समोर येत आहेत: १. स्फोटाचे कारण आयईडी नसून अमोनियम नायट्रेट असल्याचा संशय आहे. २. ज्या कारचा स्फोट झाला त्याचे फरीदाबादमध्ये चालान जारी करण्यात आले. ३. छाप्यांच्या भीतीमुळे स्फोटके लपवण्यासाठी कारमध्ये नेल्याच्या दृष्टिकोनाचा तपास. ४. सलमानची गाडी, तो गुरुग्राममध्ये राहतो, ती पुलवामा येथील तारिकला विकण्यात आली होती. कार स्फोटाचे कारण अमोनियम नायट्रेट होते का?दिल्ली स्फोटाची चौकशी करणाऱ्या सुरक्षा संस्थांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचे स्वरूप पाहता अमोनियम नायट्रेट हे कारण असू शकते असे सूचित करते. अमोनियम नायट्रेट हे आरडीएक्ससारखेच एक स्फोटक आहे आणि ते खाणींमध्ये स्फोट करण्यासाठी वापरले जाते. फरीदाबादमध्ये आढळलेल्या ३६० किलोग्रॅम अमोनियम नायट्रेटमुळे सुमारे १०० मीटर परिसरात विनाश झाला असता. दिल्लीतील स्फोटामुळे झालेल्या नुकसानीमुळे, सुरक्षा संस्था अमोनियम नायट्रेट अँगलचा तपास करत आहेत. स्फोटाच्या व्हिडिओमध्ये कारला लागलेल्या आगीतून नारिंगी रंगाचा धूर येत असल्याचे दिसून आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोनियम नायट्रेटचा स्फोट होतो तेव्हा नारिंगी रंगाचा धूर निर्माण होतो कारण स्फोटातून नायट्रोजन ऑक्साईड आणि अमोनिया सारखे वायू बाहेर पडतात. नायट्रोजन डायऑक्साइडमुळे हवेत मिसळल्यावर धूर नारंगी दिसतो. तथापि, घटनास्थळी घेतलेल्या नमुन्यांच्या फॉरेन्सिक चाचणीनंतरच याची पुष्टी करता येईल. सप्टेंबरमध्ये फरिदाबादमध्ये स्फोट झालेल्या कारचे चालान करण्यात आले लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेली कार हरियाणा नोंदणी क्रमांक असलेली आय२० होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार हरियाणातील गुरुग्राममध्ये सलमानच्या नावावर नोंदणीकृत होती. पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. २० सप्टेंबर २०२५ रोजी फरीदाबादमधील तिकोना पार्क येथे चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्याबद्दल कारला १,५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा परिसर डॉ. मुझम्मिल शकीलच्या घरापासून फक्त २५ किमी अंतरावर आहे. गाडीतील स्फोटके नेण्याचा प्रयत्नपोलिस आणि केंद्रीय एजन्सींच्या तपासातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फरिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट सापडणे. याची दोन टप्प्यांवर चौकशी केली जात आहे. पहिला: संशयित पकडले जाण्याच्या किंवा छाप्याच्या भीतीने स्फोटके दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात होते, पण वाटेतच गाडीचा स्फोट झाला. दुसरे: संशयितांना पकडले जाण्याचा धोका असू शकतो आणि ते स्फोटके विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत असतील. एक दृष्टिकोन असा आहे की हा स्फोट जाणीवपूर्वक गर्दीच्या ठिकाणी करण्यात आला होता, म्हणजेच तो लक्ष्यित स्फोट होता. तथापि, ही शक्यता अशक्य मानली जात आहे. स्फोटाच्या वेळी कार खूप कमी वेगाने जात होती. अमोनियम नायट्रेट असल्याने खबरदारी म्हणून कारचा वेग कमी ठेवण्यात आला होता का, याचा तपास सुरक्षा संस्था करत आहेत. गुरुग्राममध्ये राहणाऱ्या सलमानची कार पुलवामा येथील तारिकला विकण्यात आली होती सुरक्षा एजन्सींच्या मते, स्फोटात सहभागी असलेली कार वारंवार विकली गेली होती. तिचा आरसी देखील उघड झाला आहे. त्यावर मोहम्मद सलमान असे नाव आहे आणि तारीख १८ मार्च २०१४ आहे. ती एकदा दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील सांबोरा गावातील रहिवासी तारिकला विकली गेली होती. कारसोबत एक माणूस दिसत आहे, जो तारिक असल्याचा दावा केला जात आहे. तपासात समाविष्ट केलेले महत्त्वाचे मुद्दे१. स्फोटाचे स्वरूप पाहता, जैश-ए-मोहम्मद आणि इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत या दहशतवादी संघटनांशी संबंधित एक दृष्टिकोन असू शकतो. दोन्ही संघटना आत्मघातकी हल्लेखोरांवर लक्ष केंद्रित करतात आणि ब्रेनवॉशिंगद्वारे दहशतवादी हल्ले करतात. तपास संस्था या दृष्टिकोनातून तपास करत आहेत आणि पुरावे शोधत आहेत. २. अशीही शक्यता आहे की स्फोट i20 मध्ये नाही तर दुसऱ्या वाहनात झाला असेल. कारण अमोनियम नायट्रेटचे प्रमाण अनेक टन असेल किंवा त्याला आग लागली तरच त्याचा स्फोट होऊ शकतो. म्हणूनच, दुसऱ्या वाहनात सीएनजी स्फोट झाल्यामुळे संशयित वाहनात स्फोट झाला असण्याची शक्यता देखील विचारात घेतली जात आहे. ३. स्फोटानंतर बळी गंभीर भाजले. यामुळे हा स्फोट आयईडीमुळे झाला नसल्याचा संशय निर्माण होतो. मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट वापरण्यात आले असावे. या घटनेत दिसून आल्याप्रमाणे, अमोनियम नायट्रेटचा वापर केल्याने ५० ते १०० मीटरच्या परिघात मोठे नुकसान होऊ शकते. ४. स्फोटानंतर १० मिनिटांच्या आत, दिल्ली गुन्हे शाखा, विशेष कक्ष आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी उपस्थित होते. त्यानंतर एनआयए, एनएसजी आणि फॉरेन्सिक पथकेही घटनास्थळी पोहोचली. या प्रकरणात फॉरेन्सिक पुरावे महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे स्फोटाचे खरे कारण उघड होऊ शकते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले - हा सिलेंडरचा स्फोट नव्हता, तर शरीराचे तुकडे झाले होते दिल्लीतील यमुना पार्कमध्ये राहणारे चंद्रशेखर १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६:५० वाजता लाल किल्ल्यासमोरील चांदणी चौक गुरुद्वाराजवळ होते. त्याच क्षणी चालत्या कारमध्ये स्फोट झाला. चंद्रशेखर म्हणतात, मी लाजपत नगर मार्केटच्या पायऱ्या उतरत होतो. गौरी शंकर मंदिर अगदी समोर आहे. मग मला दोन स्फोटांचे आवाज ऐकू आले. मला काही समजण्यापूर्वीच सर्वजण पळू लागले. सर्वजण म्हणत होते की गाड्यांचे सिलेंडर फुटले आहेत. मी बाहेर आलो तेव्हा मला मोठ्या ज्वाळा दिसल्या. छोटे स्फोट झाले. इतर गाड्यांनाही आग लागली. चंद्रशेखरसोबत उभे असलेले अभिजीत सिंग नुकतेच गुरुद्वारातून बाहेर आले होते. ते म्हणतात, हा सिलेंडरचा स्फोट नव्हता. तुमच्याशी बोलताना मी सर्व काही पाहू शकतो. गाड्या जळून खाक झाल्या होत्या. वाहतुकीत लाल सिग्नलवर धावणाऱ्या कारमध्ये स्फोटस्फोट झाला तेव्हा घटनास्थळी मोठी वाहतूक होती. जवळच गर्दी होती. त्यानंतर हरियाणा नोंदणी क्रमांक असलेल्या आय२० कारचा स्फोट झाला. जवळच्या वाहनांना आग लागली. सुमारे २४ जण जखमी झाले. त्यांना दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चांदणी चौक व्यापारी संघटनेने एका व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये एका वाहनावर मृतदेह पडलेले दिसत आहेत. रस्त्यावर आणखी एक मृतदेह पडलेला दिसला. प्रत्यक्षदर्शींनी मृतदेहांचे तुकडे इकडे तिकडे विखुरलेले दिसल्याचेही सांगितले. दिल्ली अग्निशमन सेवेनुसार, घटनास्थळी १० अग्निशमन गाड्या पाठवण्यात आल्या. स्फोट इतका शक्तिशाली होता की काही मीटर अंतरावर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फुटल्या आणि आवाज आयटीओपर्यंत ऐकू आला. संध्याकाळी ७:२९ वाजता आग विझवण्यात आली. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला. स्फोटानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला. सीमा चौक्यांवर सुरक्षा वाढवण्यात आली. वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली. दिल्ली पोलिस, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, एनआयए आणि एनएसजीचे पथक घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचे तुकडे ५० मीटर अंतरावर पडलेस्फोटाच्या ठिकाणापासून सुमारे ५० मीटर अंतरावर एक जैन मंदिर आहे. तिथे काम करणारे गिरिजेश सिंह म्हणतात, स्फोटानंतर असे वाटले की सगळेच बेशुद्ध होतील. गिरिजेश दाखवत असलेला मृतदेहाचा तुकडा एक डोके आहे. लांब केसांवरून असे दिसते की ते एखाद्या महिलेचे असू शकते. गिरिजेश स्पष्ट करतात, मंदिरातील काच फुटली आणि पडली. पोलिस आले होते, म्हणून आम्ही मंदिर सोडले नाही. कारमध्ये तीन लोक होतेस्फोटानंतर घटनास्थळी पोहोचलेले दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी सांगितले की, स्फोट झालेल्या कारमध्ये काही लोक होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कारमध्ये तीन लोक होते. जखमींच्या शरीरावर गोळी किंवा पंचरचे कोणतेही निशान आढळले नाहीत. बॉम्बस्फोटांमध्ये हे असामान्य आहे. सर्व कोनातून तपास केला जात आहे. गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, आम्ही सर्व शक्यतांचा विचार करत आहोत. आम्ही सर्व शक्यता विचारात घेऊन सखोल चौकशी करू. या स्फोटासंदर्भात, दिल्ली पोलिसांनी कोतवाली पोलिस ठाण्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (UAPA), स्फोटक कायदा आणि BNS च्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तथापि, पोलिस आणि तपास यंत्रणांनी अद्याप या स्फोटाचे वर्णन दहशतवादी हल्ला म्हणून केलेले नाही किंवा कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटापूर्वी वाहनाच्या हालचालींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. जवळपासचे रहिवासी आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात आहे. संशयित दहशतवाद्यांचा मोबाईल डंप डेटा आणि फाइल्स तपासल्या जात आहेत. या स्फोटानंतर दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे. दहशतवादाशी संबंधित असलेल्या ३ डॉक्टरांना उत्तर प्रदेश-हरियाणा येथून अटकगेल्या १५ दिवसांपासून, जम्मू आणि काश्मीर पोलिस हरियाणा पोलिसांसोबत दहशतवादी मॉड्यूलला पकडण्यासाठी संयुक्त मोहीम राबवत आहेत. या कारवाईदरम्यान, फरिदाबाद ते लखनऊ येथे २९०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली. डॉ. मुझम्मिल शकील यांना फरिदाबाद येथून आणि डॉ. शाहीन शाहिद यांना लखनऊ येथून अटक करण्यात आली. ९ नोव्हेंबर रोजी मुझम्मिल शकीलच्या खोलीतून ३६० किलो स्फोटके आणि एक असॉल्ट रायफल जप्त करण्यात आली. दुसऱ्या दिवशी, १० नोव्हेंबर रोजी शाहीनच्या कारमधून एके-४७ रायफल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 11 Nov 2025 7:43 am

पवना धरण परिसरात तणाव! बांधकाम पाडल्यास अधिकाऱ्यांसमोरच फाशी घेण्याचा शेतकऱ्याचा इशारा

प्रभात वृत्तसेवा पवन मावळ – पवना धरण परिसरात गेल्या काही वर्षांपासून धरणाच्या संपादित जागांवर मोठ्या प्रमाणात बंगले, फार्महाऊस आणि हॉटेल व्यवसाय उभारून अतिक्रमणे केली आहेत. या बेकायदेशीर बांधकामांवर अखेर पाटबंधारे विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वारु हद्दीतील अतिक्रमित बांधकामे पाडण्याची कारवाई सुरू केली आहे.गेल्या दोन महिन्यांपासून अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र प्रतिसाद न […] The post पवना धरण परिसरात तणाव! बांधकाम पाडल्यास अधिकाऱ्यांसमोरच फाशी घेण्याचा शेतकऱ्याचा इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 7:30 am

कोस्टल रोडवरील वायूवीजनमध्ये सुधारणा, वाढला ३० कोटींचा अतिरिक्त खर्च

बोगद्यातील हवा खेळती आणि तापमान संतुलित राखण्यासाठी घेतला निर्णयमुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अंतर्गत बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गातील वायूविजन व्यवस्थेत बदल केल्यामुळे तब्बल ३० कोटी रुपयांचा खर्च वाढल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकल्पांतर्गत बांधलेल्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ सकार्डो नोझल प्रकारची वायूवीजन व्यवस्था करण्यात आली होती. परंतु जमिनीवर कुठलेही बांधकाम करण्यास निर्बंध असल्यामुळे उभ्या प्रकारच्या शाफ्ट बसवण्याचे काम झाले नाही. त्यामुळे या ऐवजी दुहेरी नोझर बसवण्यात आले. वायूवीजन पंखे दोन्ही दिशेने चालतील असे बनवले गेले, जेणेकरून आगीच्या प्रसंगी व द्विमार्गी वाहतुकीस ते कार्यक्षम राहत आहेत.मुंबई किनारी रस्ता प्रकल्प दक्षिण प्रिन्सेस स्ट्री उड्डणपूल ते वांद्रे वरळी सेतूच्या वरळी भागातील टोक या कामातील भाग चार अंतग्रत प्रकल्पातील बोगद्यांत सुधारीत वायूवीजन प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पातील बोगद्यातील प्रणालीमध्ये सकार्डो नोझर प्रकारची वायूवीजन व्यवस्था फक्त बोगद्याच्या प्रवेशद्वारावर करण्यात आली होती. या व्यवस्थेमध्ये ताज्या हवेच्या प्रवोशद्वारावर करण्यात आली होती. या व्यवस्थेमध्ये ताज्या हवेच्या प्रवेशासाठी उभ्या प्रकारच्या शाफ्ट बसवण्यात येणार होता. पण जमिनीवर कुठलेजही बांधकाम करण्यास निर्बंध असल्यामुळे उभ्या प्रकारचा शाफ्ट करणे शक्य झाले नाही. त्योएवजी बोगद्याच्या रँपमधून हवा खेचण्यासाठी बोगदा आणि कट अँड कव्हर यांच्या जंक्शनवर सकार्डो नोझर बसवण्यात आले होते. त्यामुळे बोगद्यातील वायूवीजन प्रणाली कार्यक्षम बनवण्यासाठी बदल करण्यात आला आहे.आपत्कालिन स्थितीत अर्थात आगीच्या वेळेस धूर उलट्या दिशेने जाऊ नये याकरता पंखे दोन्ही दिशेने करण्यात आले आहे. आगीच्या घटनांमध्ये बोगद्यातील उच्च तापमान सहन करण्यासााठी आग क्षमता २५० अंश सेल्सियसवरून ४०० अंश सेल्सियस करण्यात आली आहे. पंख्याचा आकार आणि क्षमता वाढवल्यामुळे व्हेरिएबल वारंवारता ड्राईव्ह पॅनेल क्षमता वाढवावी लागली. त्यामुळे वायूवीजनवरील खर्च विविध करांसह ३०.२१ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आली. त्यामुळे सर्व प्रकल्पांचा एकूण खर्च आता १४ हजार ८०९ कोटींवर जावूनापोहोचलाआहे.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 7:30 am

मुंबई महापालिकेच्या घरांच्या लॉटरीसाठी अर्ज भरण्याकरता उरले शेवटचे चार दिवस

नोंदणी केली सुमारे २४ हजार, अनामत रक्कम भरली केवळ ८८५ अर्जदारांनीमुंबई(खास प्रतिनिधी):सर्वसामान्य माणसांना मुंबईत घर घेणे शक्य व्हावे म्हणून महापालिकेच्यावतीने ४२६ घरांसाठी काढलेल्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून आतापर्यंत २३ हजार ७०४ अर्जदारांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. मात्र,यापैंकी ११ हजार अनामत केवळ ८८५ अर्जदारांनी भरलेली आहे. मात्र, भायखळा आणि कांदिवलीतील घरांना अल्प प्रतिसाद लाभताना दिसत आहे. या घरांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १४ नोव्हेंबर २०२५ असून आता फक्त शेवटचे चार दिवस उरले आहेत.मुंबईचा विकास आराखडा तयार करून परवडणारी घरे बांधण्याचा संकल्प केल्यानंतर आता ही प्रत्यक्षात याचा लाभ मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्यावतीने ४२६ घरांच्या विक्रीसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु झाली आहे. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्राप्त झालेल्या ऑनलाईन अर्जांच्या नोंदीनुसार, आतापर्यंत २३,७०४ अर्जदारांनी ऑनलाईन नोंदणी केलीआहे. मात्र,ही नोंदणी केल्यानंतर त्यासोबत नोंदणी शुल्क भरल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाते. त्यासाठी ११८० रुपये नोंदणी शुल्क आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या अर्जदारांपैंकी केवळ ७७२ अर्जदारांनीच नोंदणी शुल्क भरले आहे. तर घरांच्या किंमतीनुसार अर्जासोबत अनामत ११ हजार रुपये अनामत रक्कम भरणे आवश्यक असते. अशाप्रकारे केवळ २२९ अर्जदारांनीच अर्जासोबत अनामत भरलेली आहे. कांजूरमार्ग, विक्रोळी,भायखळा तसेच भांडुप आदी भागांमध्ये या सदनिका असून या सदनिकांची रक्कम कमीत कमी ५४ लाख ते जास्तीत जास्त १ कोटी १० लाखांपर्यंत आहे.अंधेरी मरोळ, जोगेश्वरी मजास गाव, कांदिवली पश्चिम, भांडुप पश्चिम, गोरेगाव पूर्व पिरामल नगर आदी भागांमधील सदनिकांना चांगल्याप्रकारे प्रतिसाद लाभलेला असून यासर्व भागांतील सदनिकांसाठी सरासरी एक हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०२५ असून पुढील चार दिवसांमध्ये अनामत रक्कम भरणाऱ्या अर्जदारांची संख्या वाढेल असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनावाटतआहे.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 7:30 am

तळेगाव दाभाडेत महायुतीचा फॉर्म्युला! भाजप-राष्ट्रवादी एकत्र, नगराध्यक्षपदाची समान वाटणी

प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीतर्फे संयुक्तपणे निवडणूक लढविण्याची घोषणा करण्यात आली. ही घोषणा भाजपचे माजी राज्यमंत्री संजय भेगडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.सोमवारी (दि. १०) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महायुतीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी […] The post तळेगाव दाभाडेत महायुतीचा फॉर्म्युला! भाजप-राष्ट्रवादी एकत्र, नगराध्यक्षपदाची समान वाटणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 7:15 am

आजचे एक्सप्लेनर:दिल्ली बॉम्बस्फोट 'ऑपरेशन सिंदूर'चा बदला आहे का? हाफिज सईदची धमकी, 2900 किलो स्फोटके आणि कनेक्टिंग डॉट्स

१० नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्लीत झालेला कार बॉम्बस्फोट हा मोठ्या कटाचा भाग होता का? गेल्या काही महिन्यांतील घटना हेच दर्शवतात. प्रथम लष्कर कमांडरकडून मिळालेली धमकी, नंतर काश्मीरमध्ये जप्त केलेली शस्त्रे, गुजरातमध्ये पकडलेले 'रिसिन' विष आणि अलिकडच्या काळात जप्त केलेले २९०० किलो स्फोटके. सप्टेंबर २०२५: लष्कर दहशतवाद्याने पंतप्रधान मोदींना गंभीर परिणामांची धमकी दिली सप्टेंबर २०२५: बॉम्बस्फोटाच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याला अटक ऑक्टोबर २०२५: पीओकेमध्ये उच्चस्तरीय बैठक ऑक्टोबर २०२५: जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी शस्त्रे आणि स्फोटके सापडली ऑक्टोबर 2025: हाफिज सईदने ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्याची तयारी केली नोव्हेंबर २०२५: दहशतवादी हल्ल्याची योजना आखणाऱ्याला स्फोटकांसह अटक नोव्हेंबर २०२५: दिल्लीजवळ स्फोटके सापडली. निवृत्त लेफ्टनंट जनरल राज शुक्ला यांना सोमवार सकाळच्या घटना आणि त्या संध्याकाळी लाल किल्ल्यावरील स्फोट यांच्यात संबंध दिसतो. ते म्हणतात,एक विश्लेषक म्हणून, मला यात काही शंका नाही की हा धमाका असीम मुनीरने भारताला दिलेली भेट आहे. स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,स्फोटाचे कारण अद्याप अज्ञात आहे. आम्ही सर्व संभाव्य कोनांची तपासणी करत आहोत. आम्ही लवकरच कारण निश्चित करू. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाला भेट दिली.

दिव्यमराठी भास्कर 11 Nov 2025 7:03 am

Mundhwa Land Deal : मुंढवा जमीन घोटाळ्याचे धागेदोरे सुटणार? उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत तपासाची दिशा ठरली

प्रभात वृत्तसेवा पुणे – मुंढवा येथील सुमारे 40 एकर शासकीय जमीन खरेदी प्रकरणात जमिनीचा सातबारा उतारा, प्रॉपर्टी कार्ड, फेरफार नोंदी आणि खरेदी दस्त याची स्वतंत्र विभागनिहाय तपासणी होणार आहे. त्यामुळे या तपासणीसाठी जिल्हाधिकारी, जमाबंदी आयुक्त आणि नोंदणी महानिरीक्षक या तिघांनाही स्वतंत्र तपास करून तो समितीच्या अध्यक्षांकडे द्यावा लागणार आहे. याबाबत राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष व महसूल […] The post Mundhwa Land Deal : मुंढवा जमीन घोटाळ्याचे धागेदोरे सुटणार? उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत तपासाची दिशा ठरली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 7:00 am

अग्रलेख : उत्सुकतेचा टप्पा

बिहारची निवडणूक यंदा खूपच हाय व्होल्टेज ठरली आहे. या निवडणुकीचा दुसरा आणि अंतिम टप्पा मंगळवारी पार पडत आहे. त्यानंतर 14 तारखेला निकाल लागेल. त्या निकालाचे भवितव्य उद्याच्या मतदानाने ठरणार असल्याने हा दुसरा टप्पा कमालीचा उत्सुकतेचा ठरला आहे. या टप्प्यात जो काही कौल येईल त्यातून बिहारमध्ये कोणाचे सरकार असेल हे स्पष्ट होईलच; पण याचे परिणाम केवळ […] The post अग्रलेख : उत्सुकतेचा टप्पा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 6:55 am

विशेष : शिक्षण –आव्हाने आणि दिशा

– प्रा. डॉ. सुभाष राठोड दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस फक्त औपचारिक नाही; तो शिक्षणाच्या मूलभूत उद्दिष्टांचा, मूल्यांचा आणि दिशा निश्‍चित करण्याचा दिवस आहे. भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी केली जाते. मौलाना आझाद हे स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणविचारांचे प्रणेते, […] The post विशेष : शिक्षण – आव्हाने आणि दिशा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 6:35 am

UGC : यूजीसीचा शिक्षण संस्थांना कडक इशारा; शुल्क परतावा न दिल्यास होणार दंडात्मक कारवाई

प्रभात वृत्तसेवा पुणे – विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शुल्क परतावा धोरण जाहीर केले आहे. यामध्ये कोणताही बदल न करता २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी लागू केलेले धोरणच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क परतावा मिळण्यास पात्र ठरणार आहे.याचबरोबर यूजीसीने २०२१-२२ पासून ते […] The post UGC : यूजीसीचा शिक्षण संस्थांना कडक इशारा; शुल्क परतावा न दिल्यास होणार दंडात्मक कारवाई appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 6:30 am

Pune Crime : गुंड निलेश घायवळ आता ‘ईडी’च्या रडारवर; गुन्हेगारीतून जमवलेल्या कोट्यवधींच्या संपत्तीची होणार चौकशी

प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून संगठित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख निलेश घायवळच्या आर्थिक व्यवहारांचा तपास अंमलबजावणी संचालनालयाला (ED) करण्याची शिफारस करण्यात आली आहे. घायवळविरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्याने गुन्हेगारीतून मोठी संपत्ती कमावल्याचा संशय आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीविरुद्ध एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये खंडणी, गुन्हेगारी कट, […] The post Pune Crime : गुंड निलेश घायवळ आता ‘ईडी’च्या रडारवर; गुन्हेगारीतून जमवलेल्या कोट्यवधींच्या संपत्तीची होणार चौकशी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 6:15 am

Pune News : सायकल स्पर्धेच्या रस्त्यांसाठी १३६ कोटी ; पालिकेने प्रथमच एका कामासाठी तब्बल ३३८ कामांचा निधी वळवला

प्रभात वृत्तसेवा पुणे : जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुणे द ग्रॅण्ड टूर सायकल स्पर्धेसाठी महापालिका शहरातील ७५ किलोमीटर लांबीचे रस्ते विकसित करणार आहेत. यासाठी १३६ कोटी खर्च होणार असून, हा निधी उपलब्ध करण्यासाठी पालिकेने तब्बल ३३८ विकासकामांचा निधी वळवला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पथ विभागाने वर्गीकरणाद्वारे हा निधी वळविला आहे. या […] The post Pune News : सायकल स्पर्धेच्या रस्त्यांसाठी १३६ कोटी ; पालिकेने प्रथमच एका कामासाठी तब्बल ३३८ कामांचा निधी वळवला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 6:00 am

Pune News : मुंढवा जमीन घोटाळ्याचा इफेक्ट! आता मुद्रांक शुल्क माफीच्या प्रत्येक दस्ताची दरमहा होणार तपासणी

प्रभात वृत्तसेवा पुणे – मुंढवा येथील सुमारे 40 एकर शासकीय जमिनीचा खरेदी दस्त करून त्यामध्ये मुद्रांक शुल्कामध्ये सवलत मिळाल्याचा दावा करत मुद्रांक शुल्क चुकविण्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक विभागाने मुद्रांक शुल्कामध्ये शासनाकडून देण्यात येणाऱ्या माफी किंवा सवलतीचा गैरवापर रोखण्यासाठी आता कठोर भूमिका घेतली आहे. यापुढे मुद्रांक शुल्कात माफी मिळालेल्या प्रत्येक दस्ताची दरमहा […] The post Pune News : मुंढवा जमीन घोटाळ्याचा इफेक्ट! आता मुद्रांक शुल्क माफीच्या प्रत्येक दस्ताची दरमहा होणार तपासणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 5:45 am

बोपोडीतील त्या जागेचे आम्हीच मालक! कृषी महाविद्यालय मालक नाही तर भाडेकरू –हेमंत गवंडे यांचा दावा

प्रभात वृत्तसेवा पुणे – मौजे बोपोडी येथील सीटीएस नं. ३ व ४, प्लॉट नं. १४ (सर्व्हे नं. ६२) ही जमीन पेशवे काळापासून विद्वांस यांच्याकडे आहे. मोडी लिपीमध्ये याचे कागदपत्र उपलब्ध आहेत. १९३० पासून या जागेचा सात-बारा विद्वांस यांच्या नावावर आहे. विद्वांस यांचे इनाम कधीही काढलेले नसून, ते आतापर्यंत कायम आहे. विद्वांस यांच्याकडून ही जागा विकत […] The post बोपोडीतील त्या जागेचे आम्हीच मालक! कृषी महाविद्यालय मालक नाही तर भाडेकरू – हेमंत गवंडे यांचा दावा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 5:30 am

Kharadi Accident : खराडी बायपासवर भीषण अपघात ; डंपरखाली चिरडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

प्रभात वृत्तसेवा पुणे – खराडी बायपास परिसरात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विमाननगर येथील टाटा गार्डरूम बस स्टॉपसमोर ही घटना घडली. मृताचे नाव सचिन वसंत धुमाळ (२८, रा. मल्हारनगर, वडगाव शेरी, पुणे) असे आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल भानुदास माने (२५, रा. सोमनाथनगर, पुणे) आणि त्याचा मित्र सचिन धुमाळ हे दोघे […] The post Kharadi Accident : खराडी बायपासवर भीषण अपघात ; डंपरखाली चिरडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 5:15 am

पीएमपीएमएलमध्ये घोटाळा! दोन मार्केटिंग एक्झिक्युटिव्हनी केली संस्थेची दिशाभूल; गुन्हा दाखल

प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळात (पीएमपीएमएल) करारावर नियुक्त दोन मार्केटिंग एक्झिक्युटिव्हनी संस्थेची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएमपीएमएलचे विधी अधिकारी ज्ञानोबा दिगंबर जाधव (५५, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादी ज्ञानोबा जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजन मधुकर लिंगायत (रा. धनकवडी, पुणे) आणि […] The post पीएमपीएमएलमध्ये घोटाळा! दोन मार्केटिंग एक्झिक्युटिव्हनी केली संस्थेची दिशाभूल; गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 5:00 am

Pune News : आमचीच संगीत खुर्ची का? महापालिकेतील खातेबदलाने अधिकारी संतप्त, अंतर्गत वाद पेटला

प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात सुधारणा आणि गतिमानता आणण्यासाठी आयुक्त नवल किशोर राम यांनी अधिकारी बदलांचे संकेत दिल्यानंतर आता सुमारे २० विभागप्रमुखांचे खातेबदल करण्यात आले आहेत. मात्र, या बदल्यांमध्ये शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना प्राधान्य दिल्याचा आरोप करत महापालिकेतील कायम अधिकारी नाराज झाले आहेत.महापालिकेत उपायुक्त पदांच्या १८ जागा आहेत. त्यापैकी ९ जागा शासनाकडून आलेल्या […] The post Pune News : आमचीच संगीत खुर्ची का? महापालिकेतील खातेबदलाने अधिकारी संतप्त, अंतर्गत वाद पेटला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 4:30 am

Muralidhar Mohol : पुस्तकांवरील जीएसटी कमी करा –राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे अर्थमंत्री सीतारामन यांना निवेदन

प्रभात वृत्तसेवा पुणे – पुस्तक आणि कागदावर लागू असलेला वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दर कमी करण्याची मागणी प्रकाशन आणि शैक्षणिक क्षेत्राकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे खासदार, तसेच केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना याबाबत औपचारिक पत्र पाठविले आहे.मोहोळ यांनी दिलेल्या पत्रानुसार, कागद आणि संबंधित साहित्यावरील […] The post Muralidhar Mohol : पुस्तकांवरील जीएसटी कमी करा – राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे अर्थमंत्री सीतारामन यांना निवेदन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 4:15 am

पिंपरी-चिंचवडचा दिल्लीत डंका! महापालिकेला केंद्र सरकारचा ‘शहरी वाहतूक उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिकेने शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. या उपक्रमांसाठी महापालिकेला केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयामार्फत शहरी वाहतूक उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या अर्बन मोबिलिटी परिषदेत केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री […] The post पिंपरी-चिंचवडचा दिल्लीत डंका! महापालिकेला केंद्र सरकारचा ‘शहरी वाहतूक उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 4:00 am

अनेकांची धाकधूक वाढली! महापालिकेच्या आरक्षण सोडतीकडे शहराचे लक्ष; आज होणार फैसला

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत कार्यक्रम मंगळवारी (दि ११) सकाळी ११ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या आरक्षण सोडतीच्या कामासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ही सोडत त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून या […] The post अनेकांची धाकधूक वाढली! महापालिकेच्या आरक्षण सोडतीकडे शहराचे लक्ष; आज होणार फैसला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 3:45 am

Kartiki Wari :पांडुरंगराय येणार माऊलींच्या भेटीला! कार्तिकी वारीसाठी आळंदीत जय्यत तयारी, सोहळ्यासाठी लाखो भाविक जमणार

प्रभात वृत्तसेवा आळंदी ( ज्ञानेश्वर फड ) – चला आळंदीला जाऊ। ज्ञानेश्वर डोळा पाहू॥1॥ होतील संतांचिया भेटी। सांगू सुखाचीया गोष्टी ॥2॥ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर। मुखी म्हणता चुकती फेर॥3॥ जन्म नाही रे आणिक। तुका म्हणे माझी भाक॥4॥ श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 729व्या संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रेची जय्यत तयारी आळंदीत सुरु आहे. यावर्षी मोठ्या संख्येने […] The post Kartiki Wari :पांडुरंगराय येणार माऊलींच्या भेटीला! कार्तिकी वारीसाठी आळंदीत जय्यत तयारी, सोहळ्यासाठी लाखो भाविक जमणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 3:30 am

PCMC Election : राष्ट्रवादी काँग्रेसची नवी ‘फौज’निवडणुकीसाठी सज्ज! वाचा कोणाला कोणतं पद मिळालं?

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सोमवारी (दि. १० ) जाहीर केली. यामध्ये १९१ जणांना विविध पदांवर संधी देण्यात आली आहे. सर्व जाती-धर्मांच्या कार्यकर्त्यांना यामध्ये सामावून घेत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.या कार्यकारिणीमध्ये शहराध्यक्ष म्हणून योगेश बहल यांचे पद तसेच […] The post PCMC Election : राष्ट्रवादी काँग्रेसची नवी ‘फौज’ निवडणुकीसाठी सज्ज! वाचा कोणाला कोणतं पद मिळालं? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 3:15 am

Manchar News : रात्री १० नंतर प्रचाराला ‘ब्रेक’! सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर; उमेदवारांना कडक सूचना

प्रभात वृत्तसेवा मंचर – आंबेगाव तालुक्यातील मंचर नगरपंचायत निवडणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच रात्री 10 पर्यंतच प्रचार करता येईल. सभा, मिरवणुका आयोजित करण्यासाठी किमान 48 तास आधी आणि जास्तीत जास्त पाच दिवस आधी परवानगी घेणे अनिवार्य आहे, असे आवाहन मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी केले. […] The post Manchar News : रात्री १० नंतर प्रचाराला ‘ब्रेक’! सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर; उमेदवारांना कडक सूचना appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 3:00 am

Baramati Election : शरद पवार गटाची भूमिका काय? बारामती निवडणुकीत ‘तलवार म्यान करणार’की लढत घेणार?

प्रभात वृत्तसेवा बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पहिल्यांदाच बारामती नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पॅनेलच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि स्थानिक आघाडी यांच्यात रंगत असणार आहे. शरद पवार यांच्या गटात अद्याप शांतता दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीत शरद पवार गट कोणती भूमिका घेणार की तलवार म्यान करणार, याकडे लक्ष […] The post Baramati Election : शरद पवार गटाची भूमिका काय? बारामती निवडणुकीत ‘तलवार म्यान करणार’ की लढत घेणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 2:45 am

‘खाकी’वर्दीतील ‘नटवरलाल’! पोलीस अधिकारी असल्याचे भासवून महिलांची फसवणूक करणारा गजाआड

प्रभात वृत्तसेवा भिगवण – पोलीस अधिकारी असल्याचे सांगून महिलांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून त्यांची फसवणूक करणार्‍या सराईत गुन्हेगाराला भिगवण पोलिसांनी जेरबंद केले आहे.गणेश शिवाजी कारंडे (वय 43, रा. श्रीपूर, ता. माळशिरस) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीने स्वतःचे नाव बदलून ‘संग्राम पाटील’ […] The post ‘खाकी’ वर्दीतील ‘नटवरलाल’! पोलीस अधिकारी असल्याचे भासवून महिलांची फसवणूक करणारा गजाआड appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 2:15 am

Baramati News : निवडणूक लढवायचीय? मग दंड भरा! बारामती पालिकेच्या भूमिकेमुळे इच्छुकांची कोंडी

प्रभात वृत्तसेवा बारामती – राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी क्षेत्रांमधील थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी अभय योजना लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना दंड व शास्ती माफ करून थकबाकी रक्कम भरण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र, बारामती नगरपालिकेत या योजनेची अंमलबजावणी वेगळ्या पद्धतीने होत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.अभय योजनेनुसार दंड […] The post Baramati News : निवडणूक लढवायचीय? मग दंड भरा! बारामती पालिकेच्या भूमिकेमुळे इच्छुकांची कोंडी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 2:00 am

कराड पालिकेची निवडणूक बहुरंगी होणार? महायुतीत फूट, महाविकास आघाडीची मोट; भाजपच्या भूमिकेने राजकारण तापलं

प्रभात वृत्तसेवा कराड – येथील पालिका निवडणुकीसाठी भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर आधी लोकशाही आणि नंतर लगेचच महाविकास आघाडीने मेळावा घेत समविचारी पक्षांना बरोबर घेणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या एकत्रिकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच भाजपने महायुती म्हणून निवडणूक न लढता ‘एकला चलो […] The post कराड पालिकेची निवडणूक बहुरंगी होणार? महायुतीत फूट, महाविकास आघाडीची मोट; भाजपच्या भूमिकेने राजकारण तापलं appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 1:45 am

Ajit Pawar : ‘सुनील मानेच्या मागे मी स्वतः उभा’; अजित पवारांकडून रहिमतपूरसाठी विकासकामांचा शब्द, कर्जमाफीवरही मोठं विधान

प्रभात वृत्तसेवा रहिमतपूर : सुनील माने यांचा पक्षप्रवेश नाही, ती घरवापसी आहे. जनतेची कामे करण्यासाठी सत्ता आवश्यक असते. विरोधी पक्षात असताना आंदोलन आणि उपोषण करता येतात, पण जनतेची कामे सत्तेतूनच पूर्ण होतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेरहिमतपूर, ता. कोरेगाव येथे माजी नगराध्यक्ष सुनील माने, शहाजीराव क्षीरसागर, संभाजीराव गायकवाड व परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी सोमवारी […] The post Ajit Pawar : ‘सुनील मानेच्या मागे मी स्वतः उभा’; अजित पवारांकडून रहिमतपूरसाठी विकासकामांचा शब्द, कर्जमाफीवरही मोठं विधान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 1:30 am

Pimpri Crime : पोलिसांची ‘स्पा’वर सर्जिकल स्ट्राइक; वेश्याव्यवसाय चालवणारे दोन मोठे सेंटर सील

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – सांगवी आणि वाकड पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात बेकायदेशीर वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन स्पा सेंटरवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी धडक कारवाई केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा यांनी टाकलेल्या छाप्यानंतर ‘न्यू ओम स्पा’ (पिंपळे सौदागर) आणि ‘रुपेन स्पा’ (वाकड) ही दोन स्‍पा सेंटर एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनय […] The post Pimpri Crime : पोलिसांची ‘स्पा’वर सर्जिकल स्ट्राइक; वेश्याव्यवसाय चालवणारे दोन मोठे सेंटर सील appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 1:15 am

PCMC : महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त कधी मिळणार ? आयुक्तपदावरून महायुतीत रस्सीखेच, शहराचा विकास वाऱ्यावर

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिकेत गेल्या चार वर्षांपासून लोकप्रतिनिधी नाहीत. प्रशासकीय राजवट नावालाच असून अधिकाऱ्यांमार्फत सरकार आणि सत्ताधारी नेतेच महापालिका चालवत असल्याचा आरोप होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर नेमलेले आयुक्त पुढे तीन वर्ष तरी राहणार आहेत. त्यामुळे नवीन आयुक्त आपल्या विचाराचे असावेत, असा प्रयत्न नेत्यांचा आहे. त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार असून नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ […] The post PCMC : महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त कधी मिळणार ? आयुक्तपदावरून महायुतीत रस्सीखेच, शहराचा विकास वाऱ्यावर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 1:00 am

Pimpri Accident : मिक्सर ट्रक ठरला ‘यमराज’! भरधाव वेगात तरुणाला चिरडले; जागीच मृत्यू

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – भरधाव वेगातील मिक्सर ट्रकने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. ८) दुपारी दोनच्या सुमारास महिंद्रा कंपनी गेट नं. ८ आणि ९ दरम्यान, खेड तालुक्‍यातील निघोजे येथे घडली.ज्ञानेश्वर धनपाल खांडेकर (वय ३४) असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या तरुणाचे नाव आहे. राकेश विजय शंकर (वय ५६, रा. रामनगर, उन्नाव, उत्तर प्रदेश) […] The post Pimpri Accident : मिक्सर ट्रक ठरला ‘यमराज’! भरधाव वेगात तरुणाला चिरडले; जागीच मृत्यू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 12:45 am

आज ठरणार आरक्षण! महापालिका निवडणूक आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष; अनेकांचे भवितव्य पणाला

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२६ मध्ये होणार आहे. त्यासाठी १२८ जागा असून त्‍यापैकी निम्म्या जागा या महिलांसाठी राखीव आहेत. कोणत्या प्रभागात महिलांचे आरक्षण पडणार याबाबत आज (दि. ११) फैसला होणार आहे. महिलांच्या जागा या खुल्या गटातील जांगाच्या बरोबरीने आहेत. कुटुंबात पर्यायी योग्य महिला उमेदवार नसल्याने काहीजणांना निवडणूक रिंगणातून माघार […] The post आज ठरणार आरक्षण! महापालिका निवडणूक आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष; अनेकांचे भवितव्य पणाला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 12:30 am

Pimpri News : निळ्या पूररेषेचा प्रश्‍न सहा महिन्‍यात सोडवू –आमदार जगताप यांचे पुन्हा आश्वासन

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – चिंचवडमधील निळ्या पूररेषेतील अधिकृत इमारतींना अतिरिक्त टीडीआर देण्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. नागरिकांनी रविवारी (दि. ९) चिंचवड येथे झालेल्या मेळाव्यात संताप व्यक्त करत आगामी महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र आमदार शंकर जगताप यांनी पुन्हा एकदा […] The post Pimpri News : निळ्या पूररेषेचा प्रश्‍न सहा महिन्‍यात सोडवू – आमदार जगताप यांचे पुन्हा आश्वासन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 11 Nov 2025 12:15 am

Delhi Blast : २ तासांतच एक संशयित ताब्यात! दिल्ली स्फोट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ सोमवारी सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी झालेल्या भीषण स्फोटाने मोठी खळबळ उडाली आहे. या स्फोटामुळे पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांना आग लागली आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हा स्फोट इतका भीषण होता की, यामध्ये आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून, ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गंभीर घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी अतिशय जलद गतीने कारवाई केली आहे. स्फोट झाल्यानंतर केवळ दोन तासांच्या आतच एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. सध्या सुरक्षा यंत्रणांना या स्फोटामागे केवळ अपघात नसून घातपात (Sabotage) असल्याचा तीव्र संशय आहे. तपासाचे धागेदोरे जोडले जात असतानाच, याच दिवशी सकाळी हरियाणातील फरिदाबाद येथे सात दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या स्फोटाचा फरिदाबादमध्ये अटक झालेल्या दहशतवाद्यांशी काही संबंध आहे का, या दिशेने तपास करण्यात येत आहे. या संशयिताच्या अटकेमुळे स्फोटामागील कटाचा लवकरच पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.स्फोटानंतर २ तासांत 'संशयित' ताब्यातया स्फोटाच्या घटनेनंतर पोलिसांनी अतिशय जलद गतीने कारवाई केली आहे. स्फोट घडल्यानंतर अवघ्या दोन तासांच्या आतच एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयिताला ताब्यात घेतल्यामुळे आता या संपूर्ण तपासाला मोठी गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्फोटामागील कारणे आणि त्यामागील व्यक्तींचा लवकरच उलगडा होऊ शकतो. दिल्ली स्फोटानंतर या घटनेमागे केवळ अपघात नसून घातपात (Sabotage) असल्याचा गंभीर संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे. ताब्यात घेतलेल्या संशयिताची कसून चौकशी सुरू आहे. फरिदाबादमध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांशी या संशयिताचे काही कनेक्शन आहे का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. दिल्लीत तणावाचे वातावरण असून, पोलीस यंत्रणांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.लाल किल्ला स्फोटात ११ जणांचा बळी! गृहमंत्री अमित शहांकडून तातडीने माहितीहा स्फोट इतका तीव्र होता की, दोनदा मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत पार्किंगमध्ये असलेली काही वाहने जळून खाक झाली. या अत्यंत दुर्दैवी घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून, ३० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. स्फोटात जखमी झालेल्या सर्व नागरिकांवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. तसेच, त्यांनी या घटनेबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले. गृहमंत्री म्हणाले की, स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र या प्रकरणातील सर्व शक्यतांची चाचपणी सुरू आहे. तपास यंत्रणांना या घटनेमागील कारणे आणि शक्तींचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.https://prahaar.in/2025/11/10/mumbai-on-high-alert-as-delhi-quake-hits-night-patrols-increased-tight-security-at-railway-stations-airports-and-markets/लाल किल्ला स्फोटात हरियाणाची 'i२०' कारगृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात वापरण्यात आलेली ही गाडी i२० मॉडेलची होती आणि तिचा क्रमांक गुरुग्राम (Gurugram), म्हणजेच हरियाणातील होता. गाडीच्या या क्रमांकावरून आता तपास यंत्रणांना तपासाची दिशा मिळाली असून, स्फोटामधील गुंता सोडवण्यासाठी तपासाला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील कोणतीही शक्यता वगळता सर्व बाजूंची कसून चाचपणी करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासत आहेत, ज्यामुळे स्फोटाच्या आधी आणि नंतरच्या घडामोडींची माहिती मिळू शकेल. हा स्फोट घातपाती आहे की अपघात, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत.फरिदाबाद मेडिकल कॉलेजमधून ७ दहशतवादी अटकेतया कारवाईमुळे दिल्ली स्फोटामागे असलेले दहशतवादी कनेक्शन अधिक गडद झाले आहे. सोमवारी सकाळी सुरक्षा यंत्रणांनी फरिदाबाद मेडिकल कॉलेजमधून मोठी कारवाई करत एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन डॉक्टरांसह एकूण सात दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय, त्यांच्या ताब्यातून तब्बल ३५० किलो स्फोटक आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईचे सर्वात चिंताजनक कारण म्हणजे, हे फरिदाबाद मेडिकल कॉलेज दिल्लीतील लाल किल्ला स्फोटस्थळापासून अवघ्या एका तासाच्या अंतरावर आहे. त्यामुळे, सकाळी फरिदाबादमध्ये पकडलेल्या या सात दहशतवाद्यांचा आणि सायंकाळी दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटाचा काही संबंध आहे का, याचा कसून तपास तपास यंत्रणा करत आहेत. ही कारवाई देशातील सुरक्षेसाठी मोठी आणि महत्त्वाची मानली जात आहे.

फीड फीडबर्नर 11 Nov 2025 12:10 am

Ranji Trophy 2025 : रणजीच्या चौथ्या फेरीत एकाच दिवशी तीन संघांचा डावांनी विजय! सूचित, मुलानी, मावी ठरले दिवसाचे हिरो

Ranji Trophy 2025 Updates : रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या चौथ्या फेरीतील तिसऱ्या दिवसाचा (११ नोव्हेंबर) खेळ अनेक मोठ्या निकालांसह संपुष्टात आला. ८ नोव्हेंबरला सुरू झालेल्या या फेरीत सहभागी झालेल्या ३८ संघांपैकी अनेक सामन्यांचे निकाल लागले आहेत. या दिवशी उत्तराखंड, मुंबई आणि उत्तर प्रदेश या संघांनी एक डाव राखून दणदणीत विजय नोंदवले, तर एका रोमांचक लढतीत […] The post Ranji Trophy 2025 : रणजीच्या चौथ्या फेरीत एकाच दिवशी तीन संघांचा डावांनी विजय! सूचित, मुलानी, मावी ठरले दिवसाचे हिरो appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 10 Nov 2025 10:56 pm

आता चांदीवरही मिळणार कर्ज! रिझर्व बँकेचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे नियम

मुंबई – व्यवसायिक बँकांबरोबरच सहकारी बँका बिगर बँकिंग वित्तीय संस्था 1 एप्रिल 2026 पासून चांदीचे दागिने आणि नाण्याच्या तारणावर कर्ज ग्राहकांना उपलब्ध करणार आहेत. यासंदर्भात रिझर्व बँकेने नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. रिझर्व बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार सोन्याच्या एक किलोग्रॅम पेक्षा जास्त दागिन्याच्या तारणावर आणि चांदीच्या दहा किलोग्रॅमपेक्षा जास्त दागिन्याच्या कारणावर कर्ज घेता येणार […] The post आता चांदीवरही मिळणार कर्ज! रिझर्व बँकेचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे नियम appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 10 Nov 2025 10:47 pm

2047 पर्यंत घरांचे दर दुपटीहून अधिक वाढणार! रिअल इस्टेट क्षेत्रात प्रचंड उभारीचा अंदाज

नवी दिल्ली – घर उभारणी आणि खरेदीसाठी देशात कमालीचे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. विस्तारणारा मध्यमवर्ग घर खरेदी करण्यासाठी उत्सुक आहे. अशा परिस्थितीत पुढील काही वर्ष वार्षिक पातळीवर घरांच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता एका अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय उद्योग महासंघ व कॉलीअर्स इंडिया यांनी या संदर्भात आढावा घेतला […] The post 2047 पर्यंत घरांचे दर दुपटीहून अधिक वाढणार! रिअल इस्टेट क्षेत्रात प्रचंड उभारीचा अंदाज appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 10 Nov 2025 10:44 pm

विषारी हवेमुळे दिल्‍लीकरांचे आरोग्‍य धोक्‍यात

नवी दिल्ली : दिल्लीतील हवेच्या वाढत्या प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. याच पार्श्वभूमीवर, इंडिया गेट येथे मोठ्या संख्येने पालक, महिला आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार आंदोलन केले. राजधानीतील नागरिकांना स्वच्छ हवा मिळावी, यासाठी सरकारने तातडीने कठोर पाऊले उचलावीत, अशी त्यांची मागणी आहे. अनेक महिला आपल्या लहान मुलांना घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. एका […] The post विषारी हवेमुळे दिल्‍लीकरांचे आरोग्‍य धोक्‍यात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 10 Nov 2025 10:44 pm

James D. Watson : डीएनएचे शोधकर्ते जेम्स वॉटसन यांचे निधन

न्यूयॉर्क : डीएनएचे शोधकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले. १९५३ मध्ये वॉटसन यांनी डीएनएची ट्विस्टेड लॅडर रचना (डबल हेलिक्स) शोधून काढली होती. या शोधामुळे वैद्यकशास्त्र, गुन्हे अन्वेषण, वंशावळ आणि नीतिशास्त्रात क्रांती घडली. १९५३ मध्ये, जेम्स वॉटसन यांनी ब्रिटिश शास्त्रज्ञ फ्रान्सिस क्रिक यांच्यासमवेत डीएनएची दुहेरी हेलिक्स रचना […] The post James D. Watson : डीएनएचे शोधकर्ते जेम्स वॉटसन यांचे निधन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 10 Nov 2025 10:42 pm

2030 पर्यंत भारतातील तीन बँका जागतिक पातळीवर! एसबीआयचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांचा मोठा दावा

मुंबई – अर्थ मंत्रालय आणि रिझर्व बँक भारतातील काही बँका जागतिक पातळीवरील बँका बनविण्याबाबत काही वर्षापासून प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत 2030 पर्यंत भारतातील किमान तीन बँका जागतिक पातळीवरच्या होण्याची तयारी सुरू असल्याचे मत स्टेट बँकेचे अध्यक्ष सी एस शेट्टी यांनी व्यक्त केले. बाजार मूल्याच्या आधारावर ज्या तीन बँका 2030 मध्ये जागतिक पातळीच्या होतील त्यामध्ये […] The post 2030 पर्यंत भारतातील तीन बँका जागतिक पातळीवर! एसबीआयचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांचा मोठा दावा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 10 Nov 2025 10:41 pm

ऑनलाइन खरेदीत मोठा बदल! ई-कॉमर्स साइट्सवर ‘Made in India’ आणि मूळ देशाची माहिती अनिवार्य; जाणून घ्या नवीन नियम!

नवी दिल्ली – ग्राहक व्यवहार मंत्रालयाने कायदेशीर मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटीज) (दुसरी) सुधारणा नियमावली, 2025 चा मसुदा जारी केला आहे. त्यात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना ऑनलाइन विकल्या जाणार्‍या आयात केलेल्या वस्तूंच्या पॅकेजवर मूळ देशाची यादी अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे. ग्राहक व्यवहार विभागाचे म्हणणे आहे की यामुळे ऑनलाइन खरेदीमध्ये ग्राहक सक्षमीकरण आणि पारदर्शकता वाढेल. विभागाच्या मते, या दुरुस्तीचा उद्देश […] The post ऑनलाइन खरेदीत मोठा बदल! ई-कॉमर्स साइट्सवर ‘Made in India’ आणि मूळ देशाची माहिती अनिवार्य; जाणून घ्या नवीन नियम! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 10 Nov 2025 10:32 pm

भारताचा 'त्रिशूल'सराव यशस्वी!

३०,००० हून अधिक जवानांचा सहभाग, सर्वात मोठी संयुक्त लष्करी कवायतनवी दिल्ली: भारताची सर्वात मोठी त्रि-सेवा लष्करी कवायत, 'त्रिशूल' राजस्थान, गुजरात आणि उत्तर अरबी समुद्रात अभूतपूर्व संयुक्त लढाऊ क्षमता प्रदर्शित करत संपन्न झाली.नौदल प्रवक्त्याने आज जारी केलेल्या निवेदनात, ३ ते ७ नोव्हेंबर दरम्यान हा संयुक्त सराव आयोजित करण्यात आला होता. भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलाच्या ३०,००० हून अधिक कर्मचाऱ्यांनी यात भाग घेतला होता. तसेच, भारतीय तटरक्षक दल, सीमा सुरक्षा दल आणि इतर केंद्रीय संस्थांच्या सहभागाने आंतर-एजन्सी समन्वय अधिक मजबूत झाला.या सरावाचा भाग म्हणून, भारतीय सैन्याने 'रण' आणि 'क्रीक' क्षेत्रात 'ब्रह्माशिर' नावाचा सरावही आयोजित केला. या सरावाने बहु-डोमेन ऑपरेशन्स टिकवून ठेवण्यासाठी संयुक्त टास्क फोर्स, अत्याधुनिक संयुक्त नियंत्रण केंद्र आणि मजबूत कार्यान्वयन पायाभूत सुविधांना समाविष्ट केले.

फीड फीडबर्नर 10 Nov 2025 10:30 pm

राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'बाहेर कडेकोट बंदोबस्त!

'मातोश्री'वर ड्रोन दिसल्यानंतर पोलिसांची खबरदारीमुंबई: शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील 'मातोश्री' निवासस्थानावर एक ड्रोन दिसल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, आज दादर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थान 'शिवतीर्थ' परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी 'शिवतीर्थ'ला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि त्यानंतर तात्काळ सुरक्षा वाढवण्यात आली. परिसरात पोलिसांची वाहनेही तैनात करण्यात आली आहेत.'मातोश्री'वरील ड्रोन घटनेनंतर सत्ताधारी भाजपकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. तथापि, पोलीस चौकशीत तो ड्रोन एमएमआरडीएचा होता आणि तो पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी वैध परवानगीने वापरला जात असल्याचे उघड झाले होते.राज ठाकरे यांच्या निवासस्थानी वाढवलेली सुरक्षा केवळ खबरदारीचा उपाय आहे की मुंबई पोलिसांना गुप्तचर माहिती मिळाली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

फीड फीडबर्नर 10 Nov 2025 10:30 pm

तंबाखू, सिगारेट आणि पान मसाला होणार महाग! सरकार आणणार नवीन कर

नवी दिल्ली – सप्टेंबर 2025 मध्ये केंद्र सरकारने नवीन जीएसटी दर लागू केला. या कर कपातीचा वापर आरोग्यासाठी हानिकारक मानल्या जाणार्‍या तंबाखू, सिगारेट आणि पान मसाला यासह अनेक उत्पादनांवरील कर कमी करण्यासाठी करण्यात आला. या प्रयत्नांमुळे आरोग्यासाठी हानिकारक मानल्या जाणार्‍या उत्पादनांवरील कर कमी करण्यात आला. सरकार आता ही चूक दुरुस्त करण्याची तयारी करत आहे. 2026-27 […] The post तंबाखू, सिगारेट आणि पान मसाला होणार महाग! सरकार आणणार नवीन कर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 10 Nov 2025 10:29 pm

आयातीमुळे घसरतात दर; कमी दराने आयात झाली तर शुल्क लावा: शेतकऱ्यांची मागणी

नवी दिल्ली – भारत सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीचा कृषी उत्पादनांना अनेकदा लाभ होत नाही. कारण आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने आयात केल्यानंतर देशातील कृषी उत्पादनाचे भाव कमी होतात. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने आयात झाली तर त्यावर आयात शुल्क लावले जावे अशी मागणी शेतकर्‍यांच्या संघटनांनी अर्थ मंत्रालयाकडे केली आहे. अर्थसंकल्प […] The post आयातीमुळे घसरतात दर; कमी दराने आयात झाली तर शुल्क लावा: शेतकऱ्यांची मागणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 10 Nov 2025 10:25 pm

यवतमाळमध्‍ये कॅनालमध्‍ये बुडून दोन चिमुकल्‍यांचा मृत्यू

यवतमाळ : तालुक्यातील निमगांव येथील एका कुटुंबांतील दोन चिमुकल्‍यांचा घरासमोर असलेल्या कॅनालमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या दोन बालकांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. निमगांव येथील राम राठोड यांची मुलगी दिपावली सणानिमित्त माहेरी निमगांव येथे आली होती. त्याच दरम्यान त्यांच्‍या मुलीची मुलगी श्रावणी चव्हाण (३ […] The post यवतमाळमध्‍ये कॅनालमध्‍ये बुडून दोन चिमुकल्‍यांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 10 Nov 2025 10:22 pm

सरकारचा मोठा निर्णय! तब्बल 15 लाख टन साखर निर्यातीला परवानगी, मळीवरील शुल्कही रद्द

नवी दिल्ली – चालू साखर वर्षात केंद्र सरकारने 15 लाख टन साखर निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर मळीच्या निर्यातीवरील 50% निर्यात शुल्क रद्द करण्यात आले आहे. यावर्षी साखरेचे उत्पादन देशातील गरजेपेक्षा जास्त होणार असल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र एकूण साखरेच्या साठ्याची परिस्थिती पाहता अपेक्षेपेक्षा कमी साखर निर्यातीला परवानगी दिली असल्याचे साखर उत्पादकांचे […] The post सरकारचा मोठा निर्णय! तब्बल 15 लाख टन साखर निर्यातीला परवानगी, मळीवरील शुल्कही रद्द appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 10 Nov 2025 10:20 pm

जागतिक ऑटो इंडस्ट्रीत भारताचा डंका; टाटाचे शैलेश चंद्र ओआयसीएचे अध्यक्ष

नवी दिल्ली – जागतिक मोटार उत्पादक संघटनेच्या (ओआयसीए) अध्यक्षपदावर टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश चंद्र यांची निवड झाली आहे. त्यांनी 1 नोव्हेंबर 2025 पासून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. भारतातील मोटार उत्पादकाची संघटना असलेल्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स या संघटनेचे शैलेश चंद्र अध्यक्ष आहेत. जागतिक मोटार उत्पादक संघटनेच्या अध्यक्षपदी […] The post जागतिक ऑटो इंडस्ट्रीत भारताचा डंका; टाटाचे शैलेश चंद्र ओआयसीएचे अध्यक्ष appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 10 Nov 2025 10:17 pm

IPL Trade Window Rules : आयपीएलमध्ये कशी होती खेळाडूंची ट्रेडिंग? काय आहेत नियम? जाणून घ्या

IPL Trade Window Rules Information : आयपीएल 2026 चा लिलाव जवळ येत असताना, ‘ट्रेडिंग विंडो’ (खेळाडूंची अदलाबदल करण्याची मुदत) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही एक अशी खास प्रणाली आहे, जी फ्रँचायझींना लिलावापूर्वी त्यांची टीम मजबूत करण्याची संधी देते. या विंडोमुळे लिलावात न जाताही खेळाडू एका संघातून दुसऱ्या संघात जाऊ शकतात, ज्यामुळे संघांच्या रणनीतीत मोठे […] The post IPL Trade Window Rules : आयपीएलमध्ये कशी होती खेळाडूंची ट्रेडिंग? काय आहेत नियम? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 10 Nov 2025 10:16 pm

नफा घसरला पण महसूल वाढला! केपीआयटी टेक्नॉलॉजीजच्या तिमाही निकालांनी गुंतवणूकदारांना दिला मिश्र संकेत

नवी दिल्ली – वाहन क्षेत्राला तंत्रज्ञान पुरवठा करणार्‍या पुण्यातील केपीआयटी टेक्नॉलॉजीज या कंपनीने सोमवारी दुसर्‍या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला. या ताळेबंदातील माहितीनुसार या तिमाहीत कंपनीचा नफा 17 टक्क्यांनी कमी होऊन 169 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत या कंपनीला 203 कोटी रुपयांचा नफा झाला होता, अशी माहिती कंपनीने शेअर बाजारांना सोमवारी कळविली. […] The post नफा घसरला पण महसूल वाढला! केपीआयटी टेक्नॉलॉजीजच्या तिमाही निकालांनी गुंतवणूकदारांना दिला मिश्र संकेत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 10 Nov 2025 10:14 pm

Jitendra Singh : स्वच्छता अभियानातून 800 कोटींची कमाई; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती

नवी दिल्ली : सरकारी कार्यालयात ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या स्वच्छता अभियानात सरकारला भंगार विकून ८०० कोटीहून अधिक कमाई झाली आहे. ही रक्कम इतकी जास्त आहे की त्यातून ७ वंदे भारत ट्रेन खरेदी केल्या जाऊ शकतात. या अभियानातून जवळपास २३३ लाख वर्ग फूट जागा रिकामी झाली आहे. मागील ५ वर्षात अशा अभियानातून सरकारने भंगार विकून एकूण ४१०० […] The post Jitendra Singh : स्वच्छता अभियानातून 800 कोटींची कमाई; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 10 Nov 2025 10:12 pm

भारताची मोठी चाल! अमेरिकेच्या शुल्काला उत्तर देत रशियात ‘इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट मिशन’, 15,000 कोटींच्या निर्यातीचा नवा मार्ग खुला!

नवी दिल्ली – भारताने आपली निर्यात मर्यादीत देशाऐवजी जास्तीत जास्त देशांना करण्याचे ठरविले आहे. अशा परिस्थितीत विविध देशांबरोबर मुक्त व्यापार करार करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. अशातच रशियाला होणारी अभियांत्रिक वस्तूची निर्यात वाढविण्यासाठी पुढील आठवड्यात भारतीय निर्वातदारांचे शिष्टमंडळ रशियाला भेट देणार आहे. पुढील आठवड्यामध्ये मास्को येथे चार दिवसाचे अभियांत्रिकी विषयावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन होणार आहे. या […] The post भारताची मोठी चाल! अमेरिकेच्या शुल्काला उत्तर देत रशियात ‘इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट मिशन’, 15,000 कोटींच्या निर्यातीचा नवा मार्ग खुला! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 10 Nov 2025 10:10 pm