Phaltan Accident : विवाहाचा आनंद शोकात बदलला! बरडजवळ भीषण अपघात, पती-पत्नीचा जागीच मृत्यू
Phaltan Accident : विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल; पालखी महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट.
Ladki Bahin Yojana : ३४९ महिलांची ‘पुरुष’म्हणून नोंद! लाडकी बहीण योजनेत धक्कादायक प्रकार समोर
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी प्रक्रियेत ८५ हजार महिलांच्या चुका; ७८ हजार दुरुस्त्या पूर्ण, उर्वरित महिलांना प्रशासनाचा शेवटचा इशारा.
Satara IT Park : नागेवाडी येथील ४२ हेक्टर शासकीय जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश.
दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २३ एप्रिल २०२६
पंचांगआज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४८ षष्ठी.चंद्र नक्षत्र कृतिका. योग आयुष्यमान चंद्र राशी वृषभ भारतीय सौर २ वैशाख शके १९४८. गुरुवार दिनांक २३ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.१५ मुंबईचा चंद्रोदय ११.३३, मुंबईचा सूर्यास्त ०६.५८ मुंबईचा चंद्रास्त ०१.१५ राहू काळ ०२.१२ ते ०३.४७, गंगोत्पती ,गंगा पूजन,गुरुष्मृत २०;५७ नंतरदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
By-election : बारामती, राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामती आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. राहुरीच्या जागेवर शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे निवडणूक रिंगणात आहेत.बारामतीच्या जागेसाठी होणारी पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पण काँग्रेसने ही जागा लढवणार असल्याचा चंग बांधला होता. पण नंतर या येथे उभे असलेल्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला आहे. राहुरीच्या जागेसाठी २२ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक आता अनपेक्षितपणे रंगतदार व चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात तब्बल ५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही निवडणूक आता तितकी सोपी राहिलेली नाही. सहानुभूतीची लाट मिळेल आणि विरोधक मागे हटतील, अशी अपेक्षा होती. पण मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात उतरल्यामुळे लढत अधिकच कठीण बनली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील राजकीय वारसा टिकवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी सक्रिय पावले उचलली. त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देत राज्याच्या राजकारणात थेट प्रवेश केला. त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी बारामतीतील रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी, २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आणि ‘बिग बॉस’मधील माजी स्पर्धक अभिजित बिचुकले यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. बारामती पोटनिवडणूक आता केवळ औपचारिकता न राहता एक मोठी राजकीय लढत ठरणार आहे. विविध पक्ष, अपक्ष उमेदवार आणि स्थानिक मुद्दे यामुळे ही निवडणूक राज्याच्या राजकारणात विशेष लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे.भाजपने दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्यावर विश्वास दाखवत राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात तब्बल २२ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीप्रमाणेच वंचित बहुजन आघाडीनेही शेवटच्या क्षणी उमेदवार बदलत देवळाली प्रवराचे नगरसेवक संतोष चोळके यांना रिंगणात उतरवले आहे. याशिवाय शिवसेना (उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, शिंदे गटाचे रवींद्र मोरे तसेच सविता राजेंद्र शेटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून लढतीत रंग भरला आहे.बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतदान यंत्रे (ईव्हीएम), व्हीव्हीपॅट, प्रशिक्षित निवडणूक कर्मचारी तसेच पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सोय, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा तसेच विविध तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करून निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
Satara Water Scarcity : तब्बल १५५ वाड्यांची तहान टँकरवर; जिल्ह्यावर पाणीटंचाईचं सावट गडद
Satara Water Scarcity : जिल्ह्यातील २६ गावे आणि १५५ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा; भूजल पातळी घटल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर.
LSG vs RR : जोफ्रा आर्चरची भेदक गोलंदाजी आणि रवींद्र जडेजाची अष्टपैलू खेळी राजस्थानच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईतील भटक्या श्वानांची नसबंदी करण्यासाठी संस्थांच्या नेमणुकीला स्थायी समितीने मंजुरी दिली असून भटक्या श्वानांना खाऊपिऊ घालणाऱ्या प्राणिप्रेमींनीच या श्वानांची काळजीही घ्यायला हवी अशी सूचना सदस्यांनी केली आहे. विशेष म्हणजे श्वानांच्या निर्बिजीकरणाच्या कार्यक्रमाला १९९८ पासून सुरुवात झाली असून आतापर्यंत महापालिकेने सुमारे ७० हजार कोटी रुपये खर्च केल्याचा बारच एमआयएमच्या सदस्याने उडवून दिला. मात्र, एवढी रक्कम आतापर्यंत खर्चच झालेली नसूनही वस्तुस्थिती नसल्याचे सांगत त्यांच्या वक्तव्याची हवाच काढून टाकली.मुंबईतील वाढत्या भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी या श्वानाच्या निर्बिजीकरणाचा अर्थात नसबंदीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे या वर्षभरात ४५ हजार भटक्या श्वानांची नसबंदी केली जाणार असून पुढील तीन वर्षांमध्ये एकूण १ लाख ३५ हजार भटक्या श्वानांची नसबंदी करण्याचे लक्ष्य आहे. या तीन वर्षांच्या कालावधीत नसबंदी करण्यासाठी परळ येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयासह इतर ९ संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या तीन वर्षांत नसबंदीवर तब्बल सुमारे २३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी मुंबईत अशाप्रकारे श्वानांची कुठे नसबंदी केली जाते असा सवाल करत जर कोविड काळात म्हणजे २०२१मध्ये श्वानांची महापालिकेच्यावतीने सर्वांधिक नसबंदी झाली होती, तर मग आता खासगी संस्थेच्या माध्यमातून करण्याऐवजी आपण स्वत:च हा कार्यक्रम का राबवत नाही अशी विचारणा केली.तसेच जर श्वानांना रेबीजचे इंजेक्शन देत रेबीजमुक्त मुंबई बनवण्याचा संकल्प आहे तर मग याचे काय झाले असा सवाल केला. त्यानंतर यामिनी जाधव यांनी पकडून नेलेले श्वान पुन्हा नसबंदी झाल्यांनतर तिथेच नेवून सोडतात असे सांगत आपल्या रुग्णालयात तसेच दवाखान्यांमध्ये रेबीजची इंजेक्शनच उपलब्ध नसल्याबाबत चिंता व्यक्त केली. तर भाजपच्या शीतल गंभीर यांनी यासाठी २३ कोटी रुपये खर्च केले जात असून नसबंदी केल्यानंतरही सन २०३३ नंतर श्वानांची संख्या ४ लाखांवर असेल असे नमुद केल्याचे लक्ष केंद्रीत केले. तर भाजपचे तेजिंदर तिवाना यांनी सन २०२४मध्ये श्वानांचे सर्वेक्षण करण्यात आले होते, त्याचा अहवाल स्थायी समितीला सादर करण्यात यावा अशी मागणी केली.तर एमआयएमचे कुरेशी यांनी ९० हजार श्वान हा आकडा कुठून आणला असे सांगत १९९८ पासून हा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे ७० हजार कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले. तर मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी श्वानांची नसबंदी करण्यासाठी श्वानांचे किती वय लागते असा सवाल करत विभागात कोणती संस्था आहे याची माहिती मिळत नाही. पूर्वी नसबंदी झाल्यांनतर श्वानांच्या कानाला कट मारला जायचा, पण आता तोही नाही मग नसबंदी झालेल्या श्वानांचा कसे ओळखायचे असा सवाल व्यक्त करत यासाठी काहीतर खूणगाठ असावी अशी सूचना केली. तर काँग्रेसच्या तुलिफ मिरांडा यांनी रुग्णालय, महापालिका कार्यालयांमध्ये असणाऱ्या श्वानांना निवारा केंद्रात पाठवले जावे अशी सूचना केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस डॉ सईदा खान यांनी श्वानांने दंश केला तरी नागरिकांना रेबीजची लस मिळत नसून याबाबत यापूर्वीही मोठी चर्चा करण्यात आली होती,असे सांगितले.यावर अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी हा प्रस्ताव २० कोटी रुपयांचा असून आतापर्यंत ७० हजार कोटी रुपये यावर खर्च झाला आहे ही वस्तूस्थिती नसल्याचे स्पष्ट केले. तसेच श्वानांना पकडून आणून निर्बिजीकरण झाल्यानंतर पुन्हा तिथेच नेवून सोडणे हे न्यायालयाच्या निर्देशानुसारच चालते असे त्यांनी स्पष्ट केले. श्वानांना पकडण्यासाठी २०० रुपये आणि निर्बिजीकरणासाठी १४०० रुपये हा दर निश्चित केलेला आहे, त्यानुसारच दिला जातो,असे त्यांनी सांगितले. तसेच श्वान निवारा करता जागा मिळावी याकरता शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे,असे सांगितले. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.
BMC सभागृहनेत्यांचा पुन्हा आवाजावरून त्रागा
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्या सभागृहातील ध्वनी यंत्रणेतील दोष निवारण करण्यास अद्यापही महापालिका प्रशासनाला यश आले असून याचे तीव्र पडसाद बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. दोन महिने झाले तर महापालिका सभागृहातील माईकची व्यवस्था व्यवस्थित केली जात नसून सभागृहाच्या बाहेर डॉक्टर नियुक्त करणे, कार्डियाक रुग्णवाहिका तैनात ठेवणे तसेच सभागृहात उपस्थित केलेल्या प्रत्येक सदस्याला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधून ती समस्या जाणून घेण्याबाबत सूचनाही करूनही प्रशासनाचे अधिकार ऐकत नसल्याची खंत सभागृह नेत्यांनी बोलून दाखवत प्रशासनावर चांगले तोंडसूख घेतले.मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील जुन्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील महापालिका आयुक्तांच्या बैठक सभागृहातील ध्वनी यंत्रणा बदलण्याकरता आलेल्या खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव आला असता यशोधर फणसे यांनी तीन महिने हेात आले तरी सभागृहातील ध्वनी यंत्रणा चांगल्याप्रकारे केली जात नाही. तसेच स्थायी समितीच्या बैठकीतील ही यंत्रणाही अधून मधून बंद होत असते. त्यामुळे पुढील बैठकीपर्यंत हा प्रस्ताव राखून ठेवण्याची सूचना केली. यावर सभागृहनेते गणेश खणकर यांनी आपण पहिल्या बैठकीपासून सभागृहाचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातून मी येथील लटकते माईक काढून त्या ध्वनी यंत्रणा बदलण्यासाठी प्रयत्नही केला आहे. पण चार दिवसांमध्ये याबाबत निर्णय घेवू असे सांगितले जाते,पण अजुनही यात सुधारणा झालेली नाही. त्यानंतर मागील सभागृहात नगरसेवकांसाठी खानपान सुविधेसाठी कँटीनची जागा मोकळी करून दयावी तसेच सभागृहाबाहेर पिण्याची पाण्याची सुविधा, डॉक्टर आणि कार्डियाक रुग्णवाहिका तैनात करण्याची सूचना केली होती, पण त्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगत सभागृहनेत्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने आम्हाला गृहीत धरु नये, आणि आम्ही काय इथे टेंडर मंजुर करायला येत नाही असेही खडे बोल सुनावले. यावर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सभागृहनेत्यांनी मांडलेल्या भावना या तीव्र असून प्रशासनाने याबाबत त्वरीत कार्यवाही करावी. परंतु महापालिकेचे मेंटेनन्स विभाग याबाबत गंभीर नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केले.
BMC च्या तक्रारींचे होणार जलद निवारण
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांना नागरी सेवा-सुविधा पुरविताना नागरिकांचा सहभाग वाढवून त्यांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निराकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत ‘मार्ग प्रणाली’ (मॅनेजमेंट अॅण्ड रिड्रेसल ऑफ ग्रिव्हेन्सेस) कार्यान्वित करण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी २२ एप्रिल २०२६ रोजी या प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.मुंबईकर नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी महानगरपालिकेतर्फे www.mcgm.gov.in हे संकेतस्थळ, नागरी मदतसेवा क्रमांक १९१६, ‘माय बीएमसी’ मोबाईल अॅप, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, ‘खड्डे त्वरित दुरुस्ती’ प्रणाली, प्रत्यक्ष पत्राद्वारे तक्रारी तसेच सामाज माध्यमे (एक्स, फेसबूक, इन्स्टाग्राम) अशा विविध माध्यमांचा वापर करण्यात येतो. या सर्व सेवांना अधिक सक्षम करण्यासाठी व सर्व प्रकारच्या तक्रारी एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून जलद तसेच प्रभावी निराकरण करण्यासाठी महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत ‘‘मार्ग प्रणाली’ (Management and Redressal of Grievances) हा सर्वसमावेशक डिजिटल उपक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. या सेवेत पुढील टप्प्यात आरईटीएमएस पोर्टल, शासनाचे पीएमओपीजी , ‘आपले सरकार’ पोर्टल या सेवांचाही समावेश करण्यात येणार आहे.या उपक्रमामुळे विविध माध्यमांतून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे व्यवस्थापन एकाच प्रणालीतून करणे सुलभ होणार आहे. तक्रार नोंदणी, संबंधित विभागाकडे वर्गीकरण, कामाच्या प्रगतीची माहिती तसेच तक्रार निकाली काढण्यापर्यंतच्या सर्व टप्प्यांवर नागरिकांना स्वयंचलित सूचना प्राप्त होतील. यामुळे तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल. नागरिकांना त्यांच्या तक्रारींची अद्ययावत माहिती वेळेत मिळणे सुलभ होईल. तसेच, प्रणालीतील थेट माहिती दर्शविणाऱ्या डॅशबोर्डच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना विभागनिहाय प्रलंबित तक्रारींवर लक्ष ठेवणे व विहित कालमर्यादेत त्यांचे निवारण सुनिश्चित करणे सुलभ होणार आहे. तक्रारींचे स्वरूप व गांभीर्य लक्षात घेऊन प्राधान्यक्रम ठरविणेही अधिक परिणामकारक होईल.भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) च्या सहाय्याने तक्रारींच्या स्थळाची अचूक ओळख पटविणे व निरीक्षण करणे सुलभ होणार आहे. तसेच, तक्रार निवारणानंतर नागरिकांकडून अभिप्राय घेऊन सेवा गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करण्यास मदत होणार आहे.विविध स्रोतांमधून प्राप्त होणाऱ्या तक्रारी एकाच प्रणालीत एकत्रित केल्यामुळे प्रतिसादाचा वेग वाढणार आहे. विभागांमधील समन्वय अधिक सशक्त होणार आहे. तसेच तक्रार निवारण प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. यासोबतच, या उपक्रमामुळे नागरिकांसोबतचा संवाद अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण अधिक प्रभावी व जलद गतीने होणार आहे.सभागृह नेता गणेश खणकर, विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट) समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव, सुधार समिती अध्यक्ष संध्या दोशी (सक्रे), बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला, विधी समिती अध्यक्ष दीक्षा कारकर, महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष मीनल तुर्डे, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष संगीता शर्मा, समाजवादी पक्षाच्या गटनेता अमरीन अब्रहानी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच प्रशासनाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) एम देवेंदर सिंह, उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे तसेच संचालक (माहिती व तंत्रज्ञान) अरुण क्षीरसागर आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
BMC स्थायी समिती अध्यक्ष करणार मुंबईतील रस्त्यांची पाहणी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :पावसाळा जवळ आला असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे तसेच इतर प्रकल्पांची कामे सुुरु असतानाच नागरिकांची प्रचंड त्रास सहन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या तक्रारींच्या अनुषंगाने आता स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे गोरेगाव गोकुळधाममधील रस्ते कामांसह इतर भागांमधील रस्ते कामे तसेच इतर प्रकल्प कामांची पाहणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.मुंबईत सध्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून १५ एप्रिल नंतर कोणतेही खोदकाम करू नये अशाप्रकारचे निर्देश दिले असले तरी अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कामांमध्ये अनियमितता दिसून येत आहे. नागरिकांना सेवा देताना त्यांना गैरसोय निर्माण करण्याचा प्रकार सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यातच स्थायी समितीच्या बैठकी भाजपच्या नगरेसेविका प्रिती सातम यांनी गोरेगाव पूर्व येथील गोकुळधामधील साई कुटीर मार्ग,यशोधाम आदी रस्त्यांची कामे सुरु असून या रस्त्यांच्या कामांमध्ये योग्यप्रकारे काळजी घेत नसल्याने आपण स्वत: या रस्ते कामांची पाहणी करावी अशी मागणी केली. त्यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी गोकुळधाममधील रस्ते कामांची पाहणी केली जाईलच, याबरोबरच अन्य नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये अशाप्रकारच्या समस्या असतील आणि त्यांच्या तक्रारी असतील तर त्याठिकाणीही भेटी देवून प्रशासनाला योग्य ते निर्देश देत पावसाळ्यापूर्वी या सर्व रस्त्यांची तसेच प्रकल्पांची कामे व्यवस्थित करण्यास भाग पाडले जाईल,असे स्पष्ट केले.
Mithi नदीचा गाळ काढण्याच्या प्रस्तावांना मंजुरी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मिठी नदीमधील गाळ काढण्याच्या कंत्राट कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, ही सुरुवात झाली असली तरी याबाबतच्या तिन्ही भागांमधील कामांच्या प्रस्तावांना स्थायी समितीने मंजुरी दिली. मात्र, कोणत्याही कंपन्या पुढे येत नसल्याने दोन कंपन्यांनीच यामध्ये भाग घेतला असून त्यांना या तिन्ही भागांचे कंत्राट देण्यात आले आहे. पण या कंपन्यांना नाल्यातील गाळ काढण्याचा कोणताही अनुभव नाही, तसेच त्यांच्याकडे मशिनरी नाही, मग पावसाळ्यापूर्वी ते मिठी नदीतील गाळ कसा काढून पूर्ण करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे मिठी नदीस नाले सफाईच्या कामांचा अहवाल प्रत्येक सात दिवसांनी स्थायी समितीला सादर करण्यात यावा अशी निर्देश अध्यक्षांनी प्रशासनाला दिले.मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी यापूर्वी नेमण्यात आलेल्या कंत्राटदारांची चौकशी झाल्यामुळे त्यांचे कंत्राट रद्द करून नव्याने एक वर्षांसाठी कंत्राटदारांची निवड करण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती. या निविदेमध्ये पवई फिल्टरपाडा ते शिक्षक कॉलनी, शिक्षक कॉलनी ते बीकेसी कनेक्टर ब्रीज आणि बीकेेसी कनेक्टर ब्रीज ते माहिम ऑऊटफॉल टेल पर्यंत तीन भागांमध्ये विभागून याची निविदा मागवली होती. या तिन्ही भागांतील निविदेत कंत्राटदारांनी प्रतिसाद न दिल्यामुळे निविदा अटी रद्द केल्या, त्यानंतरही केवळ दोन कंपन्यांनीच भाग घेतला होता.त्यानुसार या कंत्राटदारांच्या निवडीचा प्रस्ताव आला असता शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी मिठी नदीच्या तळाशी खडक असून त्या फोडण्यात आला नसल्याने पुरपरिस्थती झाली आहे, यातच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.तर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी या मिठीनदीच्या कामाला सुरुवात झाली असून सध्या या कंत्राटदारांकडे यांत्रिक सुविधा नसल्यामुळे प्रशासनाने निश्चित केलेला गाळ ते कसा काढणर असा प्रश्न उपस्थित केला. या दोन्ही कंपन्यांना अनुभव नसून मिठी नदीच्या कामांसाठी ज्या कंपन्या होत्या, त्यांचे कंत्राट रद्द केले, त्या कंपन्या इतर विभागांमध्ये काम करत आहेत. त्यामुळ प्रत्येक सात दिवसांनी या कामांचा प्रगती अहवाला सादर करण्यात यावा,असे त्यांनी सांगितले.तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ सईदा खान यांनी मिठी नदीचे १२ ऑऊट फॉल असून त्यातील ४ ऑऊट फॉल हे खासगी जागेत आहेत आणि ते महापालिका साफ करत नाहीत. मग ही जबाबदारी कुणाची असा सवाल करत क्रॉनिट स्पॉटकडे जर आपण नाही बघितले तर आपण मिठी नदीपासून निर्माण होणाऱ्या पुरपरिस्थितीकडे कसे पाहणार असा सवाल कला. एमआयएमचे कुरेशी यांनी मिठी नदीची सफाई योग्य न केल्यास त्यांना ३०० टक्के दंड आकारण्यात यावा अशी मागणी केली. तर तुलिफ मिरांडा यांनी हरित लवादाने लागू केलेला महिन्याला १० हजारांचा दंड अजुनही आकारला जातो का असा सवाल केला. शिवसेनेच्या अंजली नाईक यांनी एम पूर्व विभागांत अजुनही नालेसफाईच्या कामाला सुरुवात झालेली नसून त्यांच्याकडे मशिनरीज न आल्याने त्यांनी कामाला सुरुवात केली नसल्याचे सांगितले.भाजपचे तेजिंदर तिवाना यांनी ११ महिन्यांसाठी हे कंत्राट आहे, मग एप्रिलमध्ये कामाला सुरुवात झाली, तर ११ महिने कसे होतात असा सवाल केला. तर माजी महापौर श्रध्दा जाधव यांनी रस्त्यांची कामे, संरक्षक भिंत उभारण्याचे करणारे मिठी नदीतील गाळ कसा काढणार असा सवाल केला. मिनाक्षी पाटणकर यांनीही पूर्व उपनगरातील चेंबूरमधील नाल्यांची सफाई न झाल्याचे सांगत चिंता व्यक्त केली.यावेळी प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी प्रत्येक अतिरिक्त आयुक्त हे नाल्यांची तसेच मिठी नदीस नदींच्या सफाईकडे लक्ष ठेवून आहोत असे सांगितले. यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी परिमंडळ पाचमधील नाल्यांच्या सफाई कामाला सुरुवात झालेली नाही, याची माहिती मलाही प्राप्त झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष द्यावा तसेच यापुढे स्थायी समितीच्या प्रत्येक बैठकीत सात दिवसांनी नालेसफाईच्या कामांचा अहवाल दिला जावा असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.पवई फिल्टरपाडा ते शिक्षक कॉलनीकंत्राटदार : प्रशांत प्रकाश लाडकंत्राट किंमत : ९.७५ कोटी रुपयेशिक्षक कॉलनी ते बीकेसी कनेक्टर ब्रीजकंत्राटदार : तुळजा भवानी कंस्ट्रक्शनकंत्राट किंमत : १०. ४६ कोटी रुपयेबीकेेसी कनेक्टर ब्रीज ते माहिम ऑऊटफॉल टेलकंत्राटदार : तुळजा भवानी कंस्ट्रक्शनकंत्राट किंमत : ९. ८९कोटी रुपये
Mumbai : सायकल ट्रॅक नाही, उद्यानही नाही आणि तरी कोट्यवधींचा देखभालीवर खर्च
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीभोवतीचा विळखा काढून दहा मीटर परिसर मोकळा करण्यात आल्यानंतर त्याठिकाणी सायकल ट्रॅक बनवण्यात आले होते. परंतु आता हे सायकल ट्रॅक अस्तित्वातच नसून आसपासच्या जागेवर उद्यानही नाही. तरीही महापालिका प्रशासन त्यावर सुमारे सात कोटी रुपयांचा खर्च करायला निघाली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत यावर सदस्यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर सर्व सदस्यांच्या सूचनांची दखल घेत त्याची उत्तरे देण्यात यावी असे निर्देश देत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव अखेर राखून ठेवला.मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणा-या मुख्य जलवाहिन्यांलगतच्या दोन्ही बाजूकडील १० मीटर पर्यंतचे अतिक्रमण हटवण्याचे आदेश न्यायालयाचे दिल्यानंतर त्यानुसार महानगरपालिकेच्या संबंधीत विभाग कार्यालयामार्फत जलवाहिन्यांलगतच्या १० मिटरपर्यंतचे अतिक्रमण हटविण्यात आले. या मोकळ्या झालेल्या जागेवर जल अभियंता खात्यामार्फत सायकल ट्रॅक, उद्यान, पदपथ, सेवा रस्ते व विद्युत कामे करण्यात आली. सदर प्रकल्पामध्ये टप्पा १ मध्ये मुलुंड ते सहार ९.५ कि.मी.. टप्पा २ अ मध्ये घाटकोपर ते शीव ५ कि.मी., टप्पा २ व मध्ये पवई ते साकीनाका ३ कि.मी. आणि पायलट प्रकल्प मुलुंड बी. आर. रोड ते एम.सी.सी चौकी १.१ कि.मी. असे एकूण १८.६ कि.मी.चे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे जल अभियंता खात्यांतंर्गत मुख्य जलवाहिन्यांलगत विकसीत करण्यात आलेल्या टप्पा १. २ अ आणि २ व मधील सायकल ट्रॅक. उद्यान, पदपथ आणि सेवा रस्ते यांची देखभाल करण्याबाबत कंत्राटदारांची निवड करण्यास आणि सुमारे सात कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आला असता सदस्यांनी यावर आक्षेप नोंदवला. उबाठाच्या नगरसेविका दिपमाला बढे यांनी या प्रस्तावावर बोलतांना आपण स्वत: याठिकाणी अधिकाऱ्यांसोबत भेट दिली. त्यावेळी तिथे सायकल ट्रॅक दिसून आले, तसेच उद्यानही नाही, मग हा देखभालीचा प्रस्ताव कशासाठी असा सवाल केला. त्यामुळे प्रशासनाचे अधिकारी दिशाभूल करत असून सन २०२३ पासून आतापर्यंत याठिकाणी किती वेळा सिव्हीलचे काम केले आहे याची माहिती देण्यात यावी अशी मागणी केली. यावर भाजपच्या राखी जाधव यांनी घाटकोपर येथील तानसा जलवाहिनी लगतच्या झोपड्या तोडल्या. तो परिसर मोकळा केला. पण अद्यापही तिथे सायकल ट्रॅक नाही की विकास नाही. त्यामुळे विकास करायचा नव्हता तर किमान भकास तरी करू नका असा सवाल केला. तर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी करावी असे सांगत प्रत्येक किलोमीटरसाठी ५० लाख रुपये खर्च केला जात असल्याचे सांगितले. तर भाजपच्या प्रिती सातम यांनी या सायकल ट्रॅकचा वापर आतापर्यंत किती जणांनी केला आणि करत आहेत याची माहिती देण्यात यावी अशी सूचना केली. तर वाकाेला येथील पाईपलाईनवर गुरे बांधून ठेवली आहेत, त्यावर कचरा जाळला जात आहे, मग आपल्या जलवाहिनी आपण कधी सुरक्षित केल्या जाणार आहेत असा सवाल तुलिफ मिरांडा यांनी केला. यशवंत किल्लेदार यांनीही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. त्यामुळे अखेर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे पुढील बैठकीत देण्यात यावी असे सांगत हा प्रस्ताव राखून ठेवला.
Mumbai : भटक्या श्वानांची नसबंदी, संस्थांची नेमणूक; एमआयएमच्या नगरसेवकाने मारला हवेत बाण
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईतील भटक्या श्वानांची नसबंदी करण्यासाठी संस्थांच्या नेमणुकीला स्थायी समितीने मंजुरी दिली असून भटक्या श्वानांना खाऊपिऊ घालणाऱ्या प्राणिप्रेमींनीच या श्वानांची काळजीही घ्यायला हवी अशी सूचना सदस्यांनी केली आहे. विशेष म्हणजे श्वानांच्या निर्बिजीकरणाच्या कार्यक्रमाला १९९८ पासून सुरुवात झाली असून आतापर्यंत महापालिकेने सुमारे ७० हजार कोटी रुपये खर्च केल्याचा बारच एमआयएमच्या सदस्याने उडवून दिला. मात्र, एवढी रक्कम आतापर्यंत खर्चच झालेली नसूनही वस्तुस्थिती नसल्याचे सांगत त्यांच्या वक्तव्याची हवाच काढून टाकली.मुंबईतील वाढत्या भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी या श्वानाच्या निर्बिजीकरणाचा अर्थात नसबंदीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे या वर्षभरात ४५ हजार भटक्या श्वानांची नसबंदी केली जाणार असून पुढील तीन वर्षांमध्ये एकूण १ लाख ३५ हजार भटक्या श्वानांची नसबंदी करण्याचे लक्ष्य आहे. या तीन वर्षांच्या कालावधीत नसबंदी करण्यासाठी परळ येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयासह इतर ९ संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या तीन वर्षांत नसबंदीवर तब्बल सुमारे २३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी मुंबईत अशाप्रकारे श्वानांची कुठे नसबंदी केली जाते असा सवाल करत जर कोविड काळात म्हणजे २०२१मध्ये श्वानांची महापालिकेच्यावतीने सर्वांधिक नसबंदी झाली होती, तर मग आता खासगी संस्थेच्या माध्यमातून करण्याऐवजी आपण स्वत:च हा कार्यक्रम का राबवत नाही अशी विचारणा केली.तसेच जर श्वानांना रेबीजचे इंजेक्शन देत रेबीजमुक्त मुंबई बनवण्याचा संकल्प आहे तर मग याचे काय झाले असा सवाल केला. त्यानंतर यामिनी जाधव यांनी पकडून नेलेले श्वान पुन्हा नसबंदी झाल्यांनतर तिथेच नेवून सोडतात असे सांगत आपल्या रुग्णालयात तसेच दवाखान्यांमध्ये रेबीजची इंजेक्शनच उपलब्ध नसल्याबाबत चिंता व्यक्त केली. तर भाजपच्या शीतल गंभीर यांनी यासाठी २३ कोटी रुपये खर्च केले जात असून नसबंदी केल्यानंतरही सन २०३३ नंतर श्वानांची संख्या ४ लाखांवर असेल असे नमुद केल्याचे लक्ष केंद्रीत केले. तर भाजपचे तेजिंदर तिवाना यांनी सन २०२४मध्ये श्वानांचे सर्वेक्षण करण्यात आले होते, त्याचा अहवाल स्थायी समितीला सादर करण्यात यावा अशी मागणी केली.तर एमआयएमचे कुरेशी यांनी ९० हजार श्वान हा आकडा कुठून आणला असे सांगत १९९८ पासून हा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे ७० हजार कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले. तर मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी श्वानांची नसबंदी करण्यासाठी श्वानांचे किती वय लागते असा सवाल करत विभागात कोणती संस्था आहे याची माहिती मिळत नाही. पूर्वी नसबंदी झाल्यांनतर श्वानांच्या कानाला कट मारला जायचा, पण आता तोही नाही मग नसबंदी झालेल्या श्वानांचा कसे ओळखायचे असा सवाल व्यक्त करत यासाठी काहीतर खूणगाठ असावी अशी सूचना केली. तर काँग्रेसच्या तुलिफ मिरांडा यांनी रुग्णालय, महापालिका कार्यालयांमध्ये असणाऱ्या श्वानांना निवारा केंद्रात पाठवले जावे अशी सूचना केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस डॉ सईदा खान यांनी श्वानांने दंश केला तरी नागरिकांना रेबीजची लस मिळत नसून याबाबत यापूर्वीही मोठी चर्चा करण्यात आली होती,असे सांगितले.यावर अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी हा प्रस्ताव २० कोटी रुपयांचा असून आतापर्यंत ७० हजार कोटी रुपये यावर खर्च झाला आहे ही वस्तूस्थिती नसल्याचे स्पष्ट केले. तसेच श्वानांना पकडून आणून निर्बिजीकरण झाल्यानंतर पुन्हा तिथेच नेवून सोडणे हे न्यायालयाच्या निर्देशानुसारच चालते असे त्यांनी स्पष्ट केले. श्वानांना पकडण्यासाठी २०० रुपये आणि निर्बिजीकरणासाठी १४०० रुपये हा दर निश्चित केलेला आहे, त्यानुसारच दिला जातो,असे त्यांनी सांगितले. तसेच श्वान निवारा करता जागा मिळावी याकरता शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे,असे सांगितले. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.
Pandya Brothers Fight : आयपीएल २०२६ च्या हंगामात पंड्या ब्रदर्समध्ये 'ऑल इज नॉट वेल' असल्याचे संकेत मिळत आहेत.
Marathi Language : रिक्षा-टॅक्सी चालकांना १ मे पासून मराठी सक्तीची! सरकार बनवणार खास अभ्यासक्रम
Marathi Language : महाराष्ट्र सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य केली आहे.
Cotton Price: यंदा देशात कापसाचे उत्पादन २९० लाख गाठी होण्याचा अंदाज असताना देशांतर्गत मागणी मात्र ३३० लाख गाठींची आहे. ही तूट भरून काढण्यासाठी मे ते ऑक्टोबर या कालावधीत ११ टक्के आयात शुल्क हटवण्याची मागणी उद्योगाकडून केली जात आहे.
Trent Q4FY26 Results: ‘ट्रेंट’च्या नफ्यात 26 टक्क्यांची झेप; बोनस शेअरसह लाभांशाचीही घोषणा
Trent Q4FY26 Results: टाटा समूहाचे अध्यक्ष नोएल एन. टाटा यांनी या निकालांवर समाधान व्यक्त करताना सांगितले की, जागतिक आणि आर्थिक आव्हाने असूनही कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भक्कम कामगिरी केली आहे.
Prajakt Tanpure : एकीकडे भाजप प्रवेशाच्या चर्चा अन् दुसरीकडे प्राजक्त तनपुरेंना मोठा दिलासा
Prajakt Tanpure : राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वी प्राजक्त तनपुरे यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे.
Metro : मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोनला मंजुरी
मुंबई : मुंबई मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोन अशा एकूण १८,१३०.५५ कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली आणि नागपूर-चंद्रपूर या तीन महत्त्वाकांक्षी द्रुतगती महामार्गांच्या कामांच्या भूसंपादनासाठी लागणारे कर्ज हुडकोकडून घेण्यास तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी टप्पा २ मधील १०६३ कोटी रूपयांच्या कामांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिली.मंत्रालयात मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, नगरविकासचे डॉ.एच गोविंदराज, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, कुंभमेळा विकास प्राधिकरणचे आयुक्त शेखर सिंह यावेळी उपस्थित होते.मुंबई मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोनचा सुमारे ६९ लाख लोकांना फायदा होणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोन अशा एकूण १८,१३०.५५ कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली. या मार्गिकेची लांबी ३४.२१ किमी आहे, ज्यामध्ये १९ स्थानकांचा समावेश आहे. टप्पा १ कापूरबावडी ते धामणकर नाका, टप्पा २ धामणकर नाका ते दुर्गाडी, मार्गिका ५अ दुर्गाडी - कल्याण – उल्हासनगर या प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या भागातील सुमारे ६९ लाख लोकांना फायदा होणार असून प्रवास वेळेत ४०-५०% बचत होईल. या प्रकल्पासाठीच्या आवश्यक परवानगीसाठी केंद्र शासन व संबधित विभागाकडे गतीने कार्यवाही करावी.तीन द्रुतगती महामार्ग प्रकल्पांचे 'प्रकल्प कार्यान्वित करण्याचे वेळापत्रक' निश्चित करण्याच्या सूचनामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली आणि नागपूर-चंद्रपूर या तीन द्रुतगती महामार्ग या प्रकल्पांचे 'प्रकल्प कार्यान्वित करण्याचे वेळापत्रक' निश्चित करण्याच्या सुचना तसेच निविदा प्रसिद्धी, निविदा अंतिम करणे आणि प्रकल्प पूर्णतेचा कालावधी निश्चित करावा. या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाकरिता हुडकोकडून कर्ज उभारण्याच्या प्रस्तावावर वित्त विभागाशी समन्वय साधून तातडीने मार्ग काढावा. विदर्भातील दळणवळण आणि उद्योगांना चालना देण्यासाठी हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असल्याने सहा वर्षात हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करावी.नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्ग या महामार्गाची एकूण लांबी १६२.५७७ कि.मी. असून, प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत १९,५८२.१९ कोटी रुपये आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ३,१६२.१८ कोटी रुपयांच्या खर्चास, भंडारा-गडचिरोली द्रुतगती महामार्ग ९४.२४१ कि.मी. लांबीच्या या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ९३१.१५ कोटी रूपये, नागपूर-चंद्रपूर द्रुतगती महामार्ग हा प्रकल्प २०४.७९९ कि.मी. लांबीचा असून याच्या भूसंपादनासाठी २,३५३.९४ कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला मंजुरी देण्यात आली.नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १०६३ कोटी रूपयांच्या कामांच्या प्रस्तावाला मंजुरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना उत्तम सोयी-सुविधा मिळण्यासाठी प्रस्तावित पायाभूत सुविधांची कामे गतीने करावीत. भाविकांसाठी वाहनतळ , पाणीपुरवठा, विद्युतविभाग, आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन, मुख्य नियंत्रण कक्ष यासाठी १०६३ कोटी रूपयांच्या कामांचे प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून ही कामे गतीने पूर्ण करावीत.
Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील चारही आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता
मुंबई : २००६ मधील बहुचर्चित आणि संवेदनशील असलेल्या मालेगाव साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पुराव्यांच्या अभावामुळे या चौघांविरुद्धचे दोषारोप न्यायालयाने रद्द केले असून, त्यांना या प्रकरणातून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे संबंधित आरोपींवरील खटल्याची प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे.८ सप्टेंबर २००६ रोजी मालेगावमध्ये शब-ए-बारातच्या दिवशी मशिदीजवळ भीषण साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या दुर्दैवी घटनेत ३७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो लोक गंभीर जखमी झाले होते. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास एटीएसकडून करण्यात आला होता आणि त्यात ९ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयनेही या तपासाला दुजोरा दिला होता. मात्र, नंतरच्या काळात एनआयएकडे हे प्रकरण सोपवण्यात आले होते. उच्च न्यायालयाने ज्या चार आरोपींवरील दोषारोप रद्द केले आहेत, त्यात लोकेश शर्मा, धन सिंह, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नरवारिया यांचा समावेश आहे. याआधीही याच प्रकरणातील ११ जणांना पुराव्याअभावी न्यायालयाने दोषमुक्त केले होते. आता या चौघांविरुद्धचे आरोपपत्रही न्यायालयाने रद्द केल्याने त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता तपास यंत्रणांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी नूरुल हुदा याने या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले असून, आता एनआयए या निर्णयाविरुद्ध पुन्हा दाद मागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अद्याप तपास यंत्रणेकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. २००६ च्या या बॉम्बस्फोटातील पीडितांसाठी आणि न्यायव्यवस्थेसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा कायदेशीर टप्पा मानला जात आहे.
राज्य सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी Rohit Pawar दोषमुक्त
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आणि इतर १६ आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून, न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले आहे. हा निर्णय आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील मूळ एफआयआर बंद करण्यासाठी दाखल केलेला 'क्लोजर रिपोर्ट' न्यायालयाने स्वीकारल्यानंतर न्यायालयाने घेतला आहे. शिखर बँकेने २००७ ते २०१७ दरम्यान साखर कारखाने आणि सूत गिरण्यांना दिलेल्या कर्जवाटपात २५ हजार कोटी रुपयांचा अनियमितता झाल्याचा आरोप होता. रोहित पवार यांच्या 'बारामती ॲग्रो' कंपनीने कन्नड सहकारी साखर कारखाना लिलावात खरेदी केल्याचा व्यवहारही ईडीच्या तपासाच्या कक्षेत होता.ज्यातून आता त्यांना दिलासा मिळाला आहे. सक्तवसुली संचालनालयाने या दोषमुक्ती अर्जाला विरोध केला होता आणि हा निर्णय गुणवत्तेच्या आधारे घेण्यात यावा, अशी मागणी केली होती. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश महेश जाधव यांनी सर्व १७ आरोपींचे दोषमुक्तीचे अर्ज स्वीकारले आणि हे प्रकरण पूर्णपणे निकालात काढले.यापूर्वीच या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवरील गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेने बंद केले होते. या निर्णयामुळे रोहित पवार यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला असून, गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे.
Mallikarjun Kharge : खर्गेंना नोटीस म्हणजे राज्यघटनेवर घाला; काँग्रेसची निवडणूक आयोगावर टीका
कॉंग्रेसने पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना नोटीस बजावण्यात आल्यावरून निवडणूक आयोगावर जोरदार टीकास्त्र सोडले. ती घडामोड म्हणजे राज्यघटनेवर घाला असल्याचे पक्षाने म्हटले.
Vaibhav Sooryavanshi Record : भारतीय क्रिकेटचा 'वंडर बॉय' मानल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान असा भीमपराक्रम केला आहे
Mallikarjun Kharge:
Actress Dies : लोकप्रिय अभिनेत्रीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; रील शूट करताना नेमकं काय घडलं?
Actress Dies : लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोही यांचे वयाच्या ३० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Pune News : संकल्प अभ्यासिकेची तिसऱ्या वर्षीही यशस्वी वाटचाल; १५ हून अधिक विद्यार्थी झाले अधिकारी
Pune News : कर्वेनगरच्या विकास चौकातील 'संकल्प' अभ्यासिकेच्या तीन विद्यार्थ्यांची सहाय्यक महसूल आणि नगरविकास अधिकारीपदी निवड.
Satara News : वीर जवान प्रफुल्ल जाधव अनंतात विलीन
वीर जवान प्रफुल्ल जाधव यांचेवर पुसेगाव (Satara News) येथील येरळा नदीकाठी स्मशानभूमीत शासकीय इतमामात सायंकाळी चार वाजता प्रशासकीय अधिकारी, विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
Beed Politics: खासदार बजरंग सोनवणेंनी आमदार धनंजय मुंडेंना डिवचलं; करूणा शर्मांचं नाव घेत म्हणाले….
Beed Politics : बारामती पोटनिवडणुकीत करुणा शर्मा यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच मुद्द्यावरून बजरंग सोनवणे यांनी मुंडेंना लक्ष्य केले.
PMMSY : मत्स्यपालन क्षेत्राला केंद्राचे बळ; 'प्रधानमंत्री मत्स्य संपदा'योजनेला मुदतवाढ
नवी दिल्ली : देशातील मत्स्यपालन क्षेत्राचा शाश्वत विकास साधण्यासाठी आणि 'नील क्रांती' अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 'प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला' (PMMSY) ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत तात्पुरती मुदतवाढ देण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील लाखो मच्छिमार आणि मत्स्य व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला असून, या संक्रमण काळासाठी १,२५० कोटी रुपयांच्या केंद्रीय अर्थसंकल्पीय तरतुदीला प्रशासकीय मान्यताही प्रदान करण्यात आली आहे.भारत सरकारच्या मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचे सहायक आयुक्त (मत्स्यपालन) जी. रामकृष्ण राव यांनी २२ एप्रिल २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. विशेष म्हणजे, १६ व्या वित्त आयोग चक्रातील 'PMMSY टप्पा-२' आणि 'फिशरीज अँड एक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड (FIDF) टप्पा-२' ला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. या दुसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेला तांत्रिक मान्यता मिळेपर्यंत योजनेतील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.योजनेची पार्श्वभूमी आणि विस्तारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून १२ जून २०२० रोजी ही योजना आर्थिक वर्ष २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती. यामध्ये एकूण २०,०५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानंतर या योजनेची व्याप्ती वाढवून ती ३१ मार्च २०२६ पर्यंत विस्तारित करण्यात आली होती. सध्या १६ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्याची प्रक्रिया खर्च वित्त समितीकडे (EFC) प्रलंबित आहे. ही तांत्रिक अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत ही विशेष मुदतवाढ दिली आहे.राज्यांसाठी कठोर आर्थिक नियमावलीकेंद्र सरकारने ही मुदतवाढ देतानाच सर्व राज्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना आणि मत्स्यपालन विभागांना कडक सूचनाही दिल्या आहेत. मुदतवाढीच्या काळात योजनेची व्याप्ती आणि खर्चाचे निकष १५ व्या वित्त आयोगाच्या नियमांनुसारच राहतील. तसेच, सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी ते पीएफएमएस (PFMS) आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्लॅटफॉर्मद्वारेच करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अंमलबजावणी संस्थांना खर्चाच्या नोंदीसाठी 'ईएटी' (EAT) मॉड्यूलचा वापर करावा लागणार असून, डिजिटल स्वरूपात नसलेली उपयोगिता प्रमाणपत्रे (UC) स्वीकारली जाणार नाहीत, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे.महाराष्ट्रातील प्रकल्पांना गती मिळणारया निर्णयाची अधिकृत प्रत महाराष्ट्राच्या कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन विभागाचे सचिव तसेच मत्स्यपालन आयुक्तांना (तारापोरवाला मत्स्यालय) पाठवण्यात आली आहे. या मुदतवाढीमुळे महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय विभागाला रखडलेल्या आणि सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून घेता येणार आहे. राज्यातील सागरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीला यामुळे नव्याने उभारी मिळण्याची चिन्हे आहेत.
Rain Updates: महाराष्ट्रात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; ‘या’जिल्ह्यांना अलर्ट जारी
Rain Updates: पुणे आणि सातारा जिल्ह्यात आज काही ठिकाणी पाऊस पडला. साताऱ्यात दुपारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.
Cyber Fraud : बँकेच्या अधिकाऱ्याची शेअर ट्रेडिंगमध्ये ९८ लाखांची फसवणूक
Cyber Fraud : चेंबूर येथील एका अग्रगण्य बँकेच्या सहाय्यक उपाध्यक्षाची ९७.७८ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे.
N. Bhaskar Rao : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.भास्कर राव यांचे निधन
अविभाजित आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.भास्कर राव (N. Bhaskar Rao) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. आंध्रमधील विद्यमान मंत्री आणि जनसेना पक्षाचे नेते नादेंदा मनोहर यांचे ते वडील होत.
K Srikkanth Apology : २०११ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २८ वर्षांनंतर विश्वचषक जिंकला. मात्र, आजचा स्टार फलंदाज रोहित शर्मा त्यावेळी या ऐतिहासिक क्षणाचा भाग नव्हता.
Bribe Case : महाराष्ट्रात खळबळ..! तब्बल ७ लाखांची लाच घेताना कर्मचारी अटकेत; अतिरिक्त तहसीलदार फरार
Bribe Case : वसई तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला ७ लाखांची लाच घेताना अटक. अनधिकृत बांधकाम आणि NA प्रकरणासाठी लाच मागितल्याचा आरोप
BJP : भाजपकडून २३ प्रदेश प्रवक्ते आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर
मुंबई : पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुखांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. यामध्ये अनुभवी नेत्यांसोबतच नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देत पक्षाने २३ प्रवक्त्यांची मोठी फौज मैदानात उतरवली आहे.प्रदेश प्रवक्त्यांच्या यादीत विश्वास पाठक, प्रमोद जठार, अजित चव्हाण, अवधूत वाघ, गणेश खणकर, श्वेता शालिनी, शिवराय कुलकर्णी, राम कुलकर्णी, अतुल शाह, विनोद वाघ, गणेश हाके आणि कुणाल टिळक यांचा समावेश आहे. यासोबतच विनायक आंबेकर, राजीव पांडे, पंकज मोदी, आसिफ भामला, जितेन गजारिया, प्रमोद राठोड, प्रीती गांधी, शिवानी दाणी, अजय पाठक, लक्ष्मण सावजी आणि समीर बाकरे अशा अनुभवी नेत्यांकडेही प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.स्थानिक स्तरावरही पक्षाचा प्रचार आणि प्रसिद्धी प्रभावी व्हावी, यासाठी सात विभागांमध्ये 'विभागीय प्रसिद्धी प्रमुख' नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये कोकण विभागाची धुरा सतीश धारप यांच्याकडे, तर ठाणे विभागाची जबाबदारी दीपेश म्हात्रे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पालघरसाठी समीर पाटील, पूर्व विदर्भासाठी कल्पना नालस्कर, पश्चिम विदर्भासाठी अन्नू शर्मा, उत्तर महाराष्ट्रासाठी गोविंद बोरसे आणि पश्चिम महाराष्ट्र विभागासाठी संजय मयेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Pankaja Munde : पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने ‘वसुंधरा रक्षका’ची भूमिका बजावावी
मुंबई : वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि वेगाने होणारे शहरीकरण याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने ‘वसुंधरा रक्षक’ म्हणून पुढे यावे, असे आवाहन राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ‘वसुंधरा रक्षक’ ही संकल्पना केवळ उपक्रम नसून एक जनआंदोलन बनवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.जागतिक वसुंधरा दिनानिमित्त राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित समारंभात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘वसुंधरा रक्षक अभियान २०२६’, ‘महा-आरपीईटी अभियान, राज्य वातावरणीय कृती कक्षाच्या संकेतस्थळाचे अनावरण तसेच ‘इमिशन ट्रेडिंग स्कीम प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. वसुंधरा रक्षक अभियानाच्या लोगोचेही यावेळी अनावरण करण्यात आले. या लोगोची निर्मिती स्वतः मंत्री पंकजा मुंडे यांनी तयार केली आहे.यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्यासह कोकाकोला कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते. ‘वसुंधरा रक्षक’ या संकल्पनेला मातृत्वाची जोड देत मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, वसुंधरा म्हणजे केवळ पृथ्वी नव्हे, तर आपली आई आहे. तिचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विकास, औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरणाबरोबर प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे संतुलित विकासाचा मार्ग स्वीकारत पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावले उचलावी लागतील.‘वसुंधरा रक्षक अभियाना’च्या माध्यमातून राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखे ‘वसुंधरा वॉरियर्स’ तयार केले जाणार आहेत. गावागावांत, वॉर्डावॉर्डात ही चळवळ पोहोचली पाहिजे. हे रक्षक प्रदूषणाविरुद्ध लढतील. प्रत्येक नागरिकाने झाडे लावणे, कचरा वर्गीकरण, प्लास्टिकचा वापर कमी करणे अशा कृतींमधून सर्व नागरिकांनीही वाटा उचलावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.प्रदूषणाचा परिणाम प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्याची तीव्रता जाणवत नाही. लोकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम पाहून बदलाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत असल्याचे सांगून आजच्या पिढीला पर्यावरणातील बदल समजावून सांगण्यासाठी ‘आज-काल-उद्या’ या संकल्पनेवर आधारित माहिती आणि डेटा उपलब्ध करून दिला जाईल. आजची पिढी तंत्रज्ञानात पुढे आहे; मात्र पर्यावरणाची जाणीवही तितकीच महत्त्वाची आहे. पुढच्या पिढीला संपत्ती नव्हे, तर स्वच्छ हवा आणि पाणी देणे ही आपली जबाबदारी आहे.‘महा-आरपीईटी’ अभियानाबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्वापरावर भर देत ‘रिड्यूस, रियूज, रिसायकल आणि रिथिंक’ या तत्वांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. अनावश्यक पॅकेजिंग कमी करणे, वस्तूंचा पुनर्वापर करणे आणि पुनर्निर्मितीला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून त्याचा उत्पादकांकडून पुन्हा वापर करण्याची संकल्पना पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. राज्यात या प्रकारचा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.औद्योगिक प्रदूषण नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या उत्सर्जन व्यापार योजना इमिशन ट्रेडिंग स्कीमबाबत मंत्री मुंडे यांनी सांगितले की, कार्बन ट्रेडिंगप्रमाणेच सल्फर डायऑक्साईड उत्सर्जन नियंत्रणासाठी ही योजना महत्त्वाची आहे. उद्योगांनी उत्सर्जन कमी करण्यासाठी परस्पर सहकार्याचा मार्ग स्वीकारल्यास पर्यावरण संरक्षणाला चालना मिळेल.वसुंधरा रक्षक अभियानाअंतर्गत वसुंधरा रक्षक व्हॉट्सअप कम्युनिटी तयार करण्यात आली आहे. या कम्युनिटीद्वारे या अभियानामध्ये सहभागी होता येणार आहे. या कार्यक्रमात क्यूआर कोडद्वारे मंत्री पंकजा मुंडे, एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम व सचिव जयश्री भोज यांनी या कम्युनिटीमध्ये सहभाग नोंदवत वसुंधरा रक्षक झालो असल्याचे जाहीर केले. तसेच वसुंधरा अभियानाच्या लिंक व क्यूआर कोडद्वारे या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.
Maharashtra : महाराष्ट्रात ₹२.५६ लाख कोटींची गुंतवणूक आणि एक लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य
मुंबई :राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल ₹२,५६,१३७.०१ कोटींच्या अठरा विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे एक लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची चौदावी बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी.अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू तसेच विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.या बैठकीमध्ये थ्रस्ट सेक्टर तथा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सोलर सेल, मॉडयुल, इग्नॉट, वेफर्स, ग्रीन स्टील, हरित अमोनिया, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, अवकाश व संरक्षण साहित्य, लिथियम आयन बैटरी, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती/साहित्य, स्टील व गॅस टू केमिकल निर्मितीचे विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्यासाठीच्या 18 प्रस्तावांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली.यामध्ये नाशिकमधील व्हर्च्युओसो कॉम्प्रेसर्स प्रा. लि. आठशे कोटींची गुंतवणूक करून पाचशे जणांना रोजगार देणार आहे. अमरावती येथे टेंबो डिफेन्स प्रोडक्ट प्रा. लि.एक हजार कोटींची गुंतवणूक करत आहे.तर छत्रपती संभाजीनगरमधील नायडेक ग्लोबल अप्लायन्सेस इंडिया प्रा. लि. एक हजार कोटींची गुंतवणूक करून एक हजार नवीन रोजगार निर्माण करेल.पुण्याच्या शिरूर भागात जबिल सर्किट इंडिया प्रा. लि. पंधराशे कोटींच्या गुंतवणुकीतून तीन हजार लोकांना संधी देणार आहे.गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात हरिओम पाईप इंडस्ट्रीज लि. ३,१३५ कोटींची गुंतवणूक करून आठ हजार जणांना रोजगार देणार आहे.अहिल्यानगरमध्ये निबे स्पेस चार हजार कोटींच्या गुंतवणुकीसह एक हजार रोजगार निर्माण करेल.पुण्याच्या तळेगाव भागात युरोबस इंडिया प्रा. लि. ४२०० कोटींची गुंतवणूक आणि १२ हजर रोजगार निर्मिती करेल. चंद्रपूरमध्ये मिलीयन स्टील प्रा. लि. २५६.०१ कोटींच्या गुंतवणुकीतून ३६० रोजगार देणार आहे.भंडारा जिल्ह्यात अशोक लेलँड लि. दहा हजार कोटींची मोठी गुंतवणूक करून एक हजार रोजगार उपलब्ध करेल. नागपूरच्या बुटीबोरी येथे अॅकमे क्लीनटेक सोल्युशन प्रा.लि. ११,४०० कोटींची गुंतवणूक आणि सात हजार रोजगार निर्माण करेल.तर याच कंपनीचा रायगड/पालघरमधील ग्रीन स्टील प्रकल्प अकरा हजार कोटींची गुंतवणूक आणि २५०० रोजगार देईल.नागपूरमधील सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लि. १२,७८० कोटींच्या गुंतवणुकीतून ६८२५ जणांना काम देणार आहे. ग्लोब फोर्ज लिमिटेड, अहिल्यानगर आणि धाराशिवमध्ये १५,४३० कोटींची गुंतवणूक करून ३६०० रोजगार निर्माण करेल. रायगड येथे बालासोर अलॉयज १७,४७९ कोटींची गुंतवणूक आणि 3३२०० रोजगार देणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गोदावरी न्यु एनर्जी प्रा. लि. २७,५१५ कोटींची गुंतवणूक करून चार हजार रोजगार निर्माण करेल. रायगड/पालघरमध्ये अॅकमे क्लीनटेक प्रा.लि.चा ग्रीन अमोनिया प्रकल्प ३७,८०० कोटींची गुंतवणूक आणि ४५०० रोजगार घेऊन येत आहे. गडचिरोलीत रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा. लि. ४० हजार कोटींची भव्य गुंतवणूक आणि २० हजार रोजगार निर्माण करेल. सर्वात मोठी गुंतवणूक एस्सार एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन लि. कडून रायगडमध्ये ५६,८५२ कोटींच्या रूपात होणार असून, त्यातून २५ हजार जणांना रोजगार मिळणार आहे.या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. तसेच तांत्रिक नवकल्पना, संशोधन-विकास आणि मजबूत पुरवठा साखळी निर्माण होण्यास मदत होईल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही याचा लाभ होणार आहे. याशिवाय, स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण व कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होणार आहे.
केंद्र सरकारच्या iGOT–‘Sadhana Saptah 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल
मुंबई : केंद्र सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत आयोजित ‘साधना सप्ताह २०२६ मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावत नवा मानदंड प्रस्थापित केला असून या अध्ययन सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील या उपक्रमात सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, या सर्वांच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानोपासना, क्षमताविकास आणि उत्तम सार्वजनिक सेवा देण्याच्या दृष्टीने मिशन कर्मयोगी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पाठबळ उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचेही आभार मानले आहेत.महाराष्ट्रातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ‘आयगॉट कर्मयोगी’ प्लॅटफॉर्मवर एकूण ४६ लाख ९४ हजार ५९७ अभ्यासक्रम पूर्ण करत ६ लाख ५९ हजार ७५९ एआय-विशिष्ट प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत. हे आधुनिक सुशासन आणि क्षमता विकासाबाबत राज्याच्या दृढ वचनबद्धतेचे द्योतक, असल्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.देशभरातील सुमारे ३३ लाख ४ हजार शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ‘साधना सप्ताहा’त सहभाग घेत ‘iGOT कर्मयोगी’ प्लॅटफॉर्मवर सुमारे चार तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. यामध्ये राज्यातील ५ लाखांहून अधिक अधिकारी - कर्मचारी सहभागी झाले होते. या उपक्रमात महाराष्ट्राने केलेली कामगिरी ही राज्याच्या प्रशासनिक कार्यक्षमतेचा उत्कृष्ट नमुना असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
MegaBlock: प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन रस्ते विकास महामंडळाने केले आहे. प्रवासादरम्यान कोणतीही अडचण किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वाहनचालकांनी नियंत्रण कक्षाच्या ९८२२४९८२२४ किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे सूचित करण्यात आले आहे.
Devendra Fadnavis : “पाणी टंचाईचा मुकाबला करता यावा, यासाठी पाणी जपून वापरा”– CM देवेंद्र फडणवीस
राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.
Legislative Council Election: उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा कार्यकाळ संपणार आहे.
माणूस धर्मासाठी जन्माला आलेला नाही, तर धर्माची निर्मिती मानवाच्या कल्याणासाठी करण्यात आली आहे. जोपर्यंत आपण हे वास्तव स्वीकारत नाही, तोपर्यंत समाजाची प्रगती होणे अशक्य आहे, असे परखड मत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी व्यक्त केले.
Axar Patel Captaincy : माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू कुलदीप आणि अक्षरसारखे प्रीमियर फिरकीपटू असताना पार्ट-टाईम ऑफ स्पिनर नितीश राणाकडून ४ षटके टाकून घेणे अनाकलनीय आहे.
टीम कुक हे नाव जगभर परिचित असलं तरी त्यांचं पूर्ण नाव 'टिमोथी डोनाल्ड कुक' असं आहे. डोनाल्ड हा शब्द त्यांच्या नावात का आहे?
Newasa: तेलकुडगावात तणावपूर्ण शांतता; गावाला पोलीस छावणीचे स्वरूप!
Newasa: 'पुतळा विटंबना' नाही, तर ती व्यथा होती; पीडित पत्नीचा ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप
Speak Marathi : मराठी बोला नाहीतर रिक्षा, टॅक्सी चालवणं सोडा; परिवहन खात्याचा इशारा
मुंबई : महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी तसेच ओला ,ऊबर इ-बाईक टॅक्सी सारख्या इतर व्यावसायिक अमराठी वाहनचालकांनी प्रवाशांशी मराठीतून संवाद साधणे अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक आयोजित केली आहे. गुरुवार २४ एप्रिल रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. परिवहन आयुक्तही उपस्थित राहणार आहेत.शासनाने २०१९ मध्ये घेतलेल्या निर्णयानंतरही अनेक ठिकाणी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. विशेषतः परप्रांतीय वाहनचालकांकडून प्रवाशांशी मराठीत संवाद साधला जात नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर हा विषय गांभीर्याने घेत राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.परिवहन विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधत या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मराठी भाषेला नुकताच ‘अभिजात भाषा’ दर्जा मिळाल्याने या उपक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून, हा निर्णय केवळ प्रशासकीय न राहता अमराठी वाहनचालकांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण करणारा ठरावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अमराठी वाहनचालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षा उज्ज्वला मेहेंदळे तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवण, महेश केळुसकर, संतोष राणे, अशोक बागवे, बाळ कांदळकर, सुनील तांबे, शिवाजी गावडे, सतीश सोळांकुरकर, अरुण म्हात्रे, एकनाथ आव्हाड, प्रसाद कुलकर्णी, प्राचार्य अशोक चिटणीस, ज्येष्ठ साहित्यिका अनुपमा उजगरे, दीपा ठाणेकर आणि मनीषा राजपूत आदी मार्गदर्शन करणार आहेत.
Nitesh Rane : महिला आरक्षण विधेयकामुळे विरोधकांचा खरा चेहरा समोर आला
मुंबई : महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून विरोधकांनी आपला महिलाविरोधी चेहरा पुन्हा एकदा उघड केला असून, हिंदुत्वाचा विचार सोडून लाचारी पत्करणारे उद्धव ठाकरे आता पुन्हा आमदारकीसाठी धडपडत आहेत, अशा शब्दांत मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांचा उल्लेख थेट ‘उद्धव खान’ असा करत, राणे यांनी त्यांच्या राजकीय भूमिकेवर आणि वर्तणुकीवर बोचरी टीका केली.मंत्रालयात बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे यांनी हिंदुत्व, महिला आरक्षण आणि ‘कॉर्पोरेट जिहाद’ यांसारख्या विषयांवरून विरोधकांना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याच्या वृत्ताचा संदर्भ देत राणे म्हणाले की, “उद्धव ठाकरे हा अत्यंत लाचार माणूस आहे. ज्यांनी एकेकाळी विधान परिषदेचा राजीनामा देण्याची भाषा केली होती, तेच आता त्याच पदासाठी नेत्यांचे उंबरठे झिजवत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांना ते चोरून फोन करत आहेत. उद्या हेच उद्धव ठाकरे सरपंच पदासाठीही उभे राहिले, तरी नवल वाटायला नको”, अशी बोचरी टीका राणे यांनी केली.विरोधकांना पाकिस्तानातून ‘स्क्रिप्ट’नितेश राणे म्हणाले, “ज्या खासदारांना 'फतव्यां'च्या जोरावर मते मिळाली आहेत, तेच या ऐतिहासिक विधेयकाला विरोध करत आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेसची संपूर्ण ‘स्क्रिप्ट’ पाकिस्तानातून येते,” असे ते म्हणाले. खासदार सुप्रिय सुळे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी, सुळे यांची भूमिका ही नेहमीच ‘लव्ह जिहाद’च्या समर्थनाची राहिली असल्याची टीकाही केली.‘भगवा कधीच दहशतवादी नसतो’मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या निर्दोष सुटकेच्या पार्श्वभूमीवर बोलताना राणे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “भगवा कधीच दहशतवाद करत नाही, हे आता न्यायालयानेही सिद्ध केले आहे. केवळ हिंदूंना बदनाम करण्यासाठी काँग्रेसने ‘भगवा दहशतवाद’ हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक पेरला होता. काँग्रेस आणि पाकिस्तानची विचारधारा एकच आहे, हेच यातून स्पष्ट होते,” असे त्यांनी नमूद केले.‘कॉर्पोरेट जिहाद’वर हल्लाबोलनाशिक आणि पुण्यातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये धार्मिक कारणांसाठी विश्रांती कक्षाचा गैरवापर होत असल्याचा मुद्द्यावरही नितेश राणे यांनी भाष्य केले. “शाळांप्रमाणेच कॉर्पोरेट कार्यालयांतही हिजाब आणि बुरख्यावर बंदी घातली पाहिजे. जर लेन्सकार्ट सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये कपाळाला टिळा लावण्यावर बंदी असू शकते, तर बुरख्याला परवानगी का? हा एक प्रकारचा ‘कॉर्पोरेट जिहाद’ असून याविरोधात हिंदुत्ववादी सरकार ठाम भूमिका घेणार आहे,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (ZP Election) शिवसेनेने आता कंबर कसली असून 'आर या पार'ची भूमिका घेत थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
Baramati By-election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान; साहित्य व कर्मचारी रवाना
Baramati By-election: उद्या सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीतील आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी केले आहे.
Home Minister Resignation : आर्थिक वादामुळे गृहमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ
Home Minister Resignation : नेपाळचे गृहमंत्री सुदान गुरुंग यांनी २२ एप्रिल २०२६ रोजी राजीनामा दिला. आर्थिक आरोपांच्या चौकशीसाठी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
Rinku Singh Video : दोघांनीही श्री काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन विधिवत पूजा-अर्चा केली. सुमारे अर्धा तास मंदिर परिसरात थांबून त्यांनी महादेवाचा आशीर्वाद घेतला.
Strait of Hormuz Crisis: एपामिनोड्स (Epaminodes) हे जहाज लायबेरियाच्या ध्वजाखाली कार्यरत असून ते दुबईहून भारताकडे येत होते. गुजरातच्या मुंद्रा बंदरात हे जहाज पोहोचण्यापूर्वीच इराणने ते ताब्यात घेतले. एमएससी फ्रांसेस्का (MSC Francesca) या जहाजावर पनामाचा ध्वज असून ते देखील इराणच्या ताब्यात आहे.
Maharashtra Cabinet :
Kagiso Rabada Smoking : गुजरात टायटन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
Satara IT Park : सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणार
मुंबई : सातारा जिल्ह्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी मौजे नागेवाडी (ता. सातारा, जि. सातारा) येथील गट क्रमांक ३०८/१ मधील सुमारे ४२.५५ हेक्टर आर (आरक्षित) शासकीय जमिनीवर अत्याधुनिक आयटी पार्क उभारण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी पुढाकार घेतला होता. उद्योगमंत्री उदय सामंतांशी चर्चा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळेच या महत्वपूर्ण कामाला गती मिळाली. आयटी पार्कमुळे सातारा जिल्हा तसेच परिसरातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. तसेच, पुणे-मुंबईसारख्या महानगरांवरील आयटी क्षेत्रातील ताण कमी करण्यास मदत होणार आहे.प्रस्तावीत आयटी पार्कमध्ये आयटी कंपन्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व आधुनिक पायाभूत सुविधा — प्रशस्त रस्ते, वीज, पाणीपुरवठा, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, तसेच कार्यालयीन इमारतींची उभारणी करण्यात येणार आहे. यासोबतच स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न सुरू आहे. या प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्याची ओळख एक उदयोन्मुख आयटी हब म्हणून निर्माण होण्याची शक्यता असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. तसेच, उद्योग, सेवा क्षेत्र आणि पायाभूत सुविधा विकासालाही या प्रकल्पामुळे बळकटी मिळणार आहे.
Harshwardhan Sapkal : भाजपला महिला आरक्षणावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी सर्वप्रथम मनुस्मृतीसह त्यांचे वैचारिक ग्रंथ नाकारावेत. भाजपची विचारसरणी याच ग्रंथांमध्ये रुजलेली आहे.
Iran : इराणचा तीन व्यापारी जहाजांवर गोळीबार
तेहरान : जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा एकदा तणाव पसरला आहे. बुधवारी इराणी सैन्याने आंतरराष्ट्रीय जलसीमेतून जात असलेल्या तीन व्यापारी जहाजांवर अंधाधुंद गोळीबार केला, त्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावरचे संकट अधिक गडद झाले आहे. हा हल्ला अशा वेळी झाला, जेव्हा अमेरिका आणि इस्रायलसोबत इराणच्या शांतता चर्चेसाठी प्रयत्न सुरू होते.इराणच्या अर्धलष्करी ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने बुधवारी सकाळी ही धाडसी कारवाई केली. वृत्तानुसार, इराणी सैन्याने प्रथम एका कंटेनर जहाजावर गोळीबार केला आणि त्यानंतर काही वेळातच दुसऱ्या जहाजालाही लक्ष्य केले. इराणी माध्यमांचा दावा आहे की, या जहाजांनी सैन्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले होते, त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या जहाजांची ओळख एमएससी फ्रान्सिस्का आणि एपामिनोंडस अशी झाली असून, ती इराणी सैन्याने ताब्यात घेतली आहेत. त्यानंतर काही वेळातच तिसऱ्या ‘युफोरिया’ जहाजावरही हल्ला करण्यात आला असून ते इराणी किनाऱ्यावर अडकले असल्याची माहिती आहे.हा हल्ला त्यावेळी झाला, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी संपणारा युद्धविराम अनिश्चित काळासाठी वाढवण्याची घोषणा केली होती. ट्रम्प यांनी यामुळे चर्चेचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा व्यक्त केली होती. मात्र, त्यांनी इराणच्या बंदरांवरील नाकेबंदी कायम राहील, हेही स्पष्ट केले. यामुळे इराण नाराज आहे. इराणी मुत्सद्द्यांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत अमेरिका नाकेबंदी हटवत नाही, तोपर्यंत कोणत्याही शांतता चर्चेसाठी ते चर्चेच्या टेबलावर येणार नाहीत. म्हणजेच युद्धविराम असूनही समुद्रातील हा संघर्ष थांबण्याची चिन्हे नाहीत.शांततेच्या प्रयत्नांदरम्यान पाकिस्तानचे अधिकारी अजूनही इराणकडून सकारात्मक प्रतिसादाची वाट पाहत आहेत. इस्लामाबाद पुढील चर्चेचे यजमानपद स्वीकारण्यास तयार आहे, मात्र इराणने अद्याप आपले प्रतिनिधीमंडळ पाठवण्याची पुष्टी केलेली नाही. इजिप्तमधील इराणी राजनयिक मुजतबा फिरदौसी पोर यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत अमेरिका नाकेबंदी हटवत नाही, तोपर्यंत कोणतेही इराणी शिष्टमंडळ पाकिस्तानला जाणार नाही. यावरून सध्या कूटनीती पूर्णपणे ठप्प झाली असून शस्त्रस्पर्धा वाढत असल्याचे दिसत आहे.२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांपासून सुरू झालेल्या या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेला आहे. आकडेवारीनुसार, इराणमध्ये किमान ३,३७५ लोकांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनमध्येही परिस्थिती भीषण असून, तेथे २,२९० हून अधिक लोकांनी जीव गमावला आहे. इस्रायलमध्ये २३ नागरिक आणि लेबनॉनमध्ये लढणारे १५ सैनिक मारले गेले आहेत. तसेच आखाती देशांमध्येही डझनभराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या भागात तैनात १३ अमेरिकन सैनिकांनीही या संघर्षात प्राण गमावले आहेत.रिव्होल्युशनरी गार्डने इशारा दिला आहे की, ते शत्रूच्या कल्पनेपलीकडे जाऊन कठोर प्रत्युत्तर देतील. इराणमध्ये कट्टर समर्थक मोर्चे काढत असून, क्षेपणास्त्र शक्तीचे प्रदर्शन करत आहेत. दुसरीकडे, लेबनॉनमध्ये इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातही संघर्ष सुरूच आहे. जरी तेथे १० दिवसांचा युद्धविराम लागू असला, तरी दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे आणि प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांमुळे तो कमकुवत झाला आहे. ठोस कूटनीतिक करार होईपर्यंत समुद्रापासून जमिनीपर्यंत मृत्यूचा हा खेळ सुरू राहण्याची शक्यता आहे.
Mohammed Ayaan : परतवाडा–अचलपूरमध्ये काढली आरोपी अयानची धिंड
अमरावती : परतवाडा–अचलपूर शहरांतील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण व अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात मुख्य आरोपी मोहम्मद अयान (Mohammed Ayaan) याच्या अडचणी कायम असून, न्यायालयाने त्याला पुन्हा सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून अद्याप ठोस व निर्णायक पुरावे सादर करण्यात अपयश आल्याची नोंद न्यायालयाने केली. त्यामुळे पुढील तपासासाठी व आवश्यक पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.या प्रकरणाने संपूर्ण अमरावती जिल्ह्यात खळबळ उडवली असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. न्यायालयीन सुनावणी दरम्यान पोलिसांनी तपास सुरू असल्याचे सांगितले, मात्र प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेता ठोस पुरावे सादर करणे अत्यावश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे तपास यंत्रणांवर आता अधिक जबाबदारी आली आहे.दरम्यान, कोठडीच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी आरोपीची परतवाडा व अचलपूर शहरातून धिंड काढत जनजागृती मोहीम राबवली. या कृतीमागील उद्देश नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे नसून, अशा गुन्ह्यांविरोधात सामाजिक जागरूकता वाढवणे हा असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या प्रकरणातील पीडित व संभाव्य साक्षीदारांनी पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे काही प्रमाणात समाजात चर्चा रंगली असून, गुन्हेगारांना कठोर संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त होत आहे. मात्र दुसरीकडे, आरोपीची धिंड काढण्याच्या पद्धतीवरही काही सामाजिक व कायदेशीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात डिजिटल पुरावे, मोबाईल डेटा, तसेच संबंधित ठिकाणांवरील माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषणालाही महत्त्व दिले जात आहे. आगामी काळात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, अयान प्रकरणाने केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला नसून, समाजातील सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर चिंता निर्माण केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास जलद गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.‘फंडिंग’च्या मागावर तपास; पडद्यामागचे सूत्रधार लवकरच उघड होणारया प्रकरणातील तपासाला आता वेग आला असून आरोपींचे बँक व्यवहार आणि संशयास्पद ‘फंडिंग’चे जाळे पोलिसांच्या रडारवर आले आहे. शहरातील आणखी काही पांढरपेशा चेहरे या चौकशीत अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचा निर्धार पोलिसांनी केला असून, लवकरच या गुन्ह्यामागील पडद्यामागचे खरे सूत्रधारांना बेड्या ठोकले जातील, अशी जोरदार चर्चा पोलीस वर्तुळात रंगू लागली आहे.
Rohit Pawar : रोहित पवारांची ‘त्या’खटल्यातून निर्दोष मुक्तता; कोर्टाने थेट आदेश दिले
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (एमएससीबी) कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या खटल्यातून एका विशेष न्यायालयाने बुधवारी राष्ट्रवादीचे(शप) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि इतरांची निर्दोष मुक्तता केली आहे.
Maharashtra Cabinet Decisions : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतले चार महत्त्वाचे निर्णय
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय झाले. या निर्णयांची माहिती शासनाच्यावतीने प्रसारमाध्यमांना देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या चार निर्णयांमुळे ग्रामीण क्षेत्राला सर्वाधिक लाभ होणार आहे.शासनाने राज्यासाठीचे कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण अर्थात सीबीजी जाहीर केले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झाल्यानंतर हे धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. बायोगॅस प्रकल्प पीपीपी, हायब्रीड अन्युईटी तत्वावर राबवले जाणार आहेत. बायोगॅस धोरण राबवण्यासाठी राज्य शासनाने यंदाच्या वर्षी पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. घनकचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन करणे आणि हरित गृह वायू उत्सर्जन कमी करणे यासाठी बायोगॅस धोरण लाभदायी ठरणार आहे.राज्यातील सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. लाभार्थी शिक्षकांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पद भरतीमध्ये अतिरिक्त गुण मिळणार आहेत.सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आय. टी. पार्कला जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास ४२. ५५ हेक्टर जमीन देण्यात येणार आहे. आय. टी. पार्कमुळे सातारा जिल्हा आणि परिसरातील आयटी क्षेत्राला प्रोत्साहन मिळणार आहे. स्थानिक युवकांना रोजगार - व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.राज्यातील कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसार भोगवटादार वर्ग – २ मधून भोगवटादार वर्ग – १ मध्ये रुपांतरणाच्या अधिमुल्याची पुनर्रचना करण्यासाठी अधिसूचना काढण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
Rajnath Singh : भारत भविष्यात इराण-अमेरिका यांच्यात मध्यस्थीची भूमिका निभावू शकतो - राजनाथ सिंह
नवी दिल्ली : जर्मनीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर गेलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इराण-अमेरिका यांच्यातील युद्धावर भविष्यात भारताच्या भूमिकेबाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की भारताने नेहमीच शांततेचा प्रयत्न केला आहे आणि भविष्यात इराण-अमेरिका यांच्यात मध्यस्थी करण्याची भूमिका निभावू शकतो. त्यांनी स्पष्ट केले की योग्य वेळ आल्यावर भारत पुढे येऊ शकतो. संरक्षण मंत्र्यांनी जर्मनीतील आपल्या तीन दिवसीय दौऱ्याच्या पहिल्या दिवशी बर्लिन येथे भारतीय समुदायाशी संवाद साधला.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मंगळवारी जर्मनीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर बर्लिन येथे पोहोचले. त्यांना जर्मन वायुदलाच्या विशेष विमानातून नेण्यात आले. म्युनिकहून बर्लिनकडे त्यांच्या उड्डाणादरम्यान लढाऊ विमानांनी त्यांना एस्कॉर्ट केले. बर्लिनमध्ये पोहोचल्यावर त्यांना लष्करी सन्मान देण्यात आला. या दौऱ्यात ते भारत आणि जर्मनी यांच्यातील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या दरम्यान ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत संयुक्त विकास आणि सहउत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जर्मनीतील उद्योग प्रतिनिधींशीही चर्चा होण्याची अपेक्षा आहे.https://prahaar.in/2026/04/22/us-iran-ceasefire-trump-extends-us-iran-ceasefire-credits-pakistan/जर्मनीत असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले की सध्याच्या परिस्थितीत भारत थेट मध्यस्थी करत नसला तरी भविष्यात याची शक्यता नाकारता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही पक्षांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे, मात्र प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. पुढे जाऊन असा वेळ येऊ शकतो, जेव्हा भारत आपली भूमिका पार पाडेल आणि त्यात यशही मिळेल. राजनाथ सिंह यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात संवाद साधण्याचे प्रयत्न विशेष यशस्वी होताना दिसत नाहीत.संरक्षण मंत्र्यांनी जर्मनीतील आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी बर्लिनमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला. त्यांनी सुमारे ३ लाख भारतीय प्रवासी समुदायाचे कौतुक केले आणि त्यांना दोन्ही देशांमधील सर्वात मजबूत दुवा असे संबोधले. त्यांनी सांगितले की व्यापार, तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, शिक्षण आणि कला अशा विविध क्षेत्रांत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी असेही नमूद केले की पूर्वी आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताच्या मतांकडे दुर्लक्ष केले जात असे, मात्र आज संपूर्ण जग भारताचे विचार लक्षपूर्वक ऐकते. त्यांनी जर्मनीतील भारतीयांना जागतिक स्तरावर भारताच्या दृष्टीकोनाचा प्रसार करण्याचे आणि आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.https://prahaar.in/2026/04/21/iran-us-conflict-will-jd-vance-visit-pakistan-uncertainty-persists-ahead-of-iran-us-talks/राजनाथ सिंह यांनी सांगितले की २०२६ हे जर्मनीसोबतच्या राजनैतिक संबंधांच्या ७५ वर्षांच्या पूर्णतेचे प्रतीक आहे, जे विश्वास, परस्पर सन्मान आणि समान लोकशाही मूल्यांवर आधारित आहेत. त्यांनी भारतीय प्रवाशांना आपल्या सांस्कृतिक वारशाशी जोडलेले राहून भारत-जर्मनी भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी योगदान देत राहण्याचे आवाहन केले. त्यांनी जगभरातील भारतीय प्रवाशांना सरकारकडून सतत पाठिंबा आणि संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिले आणि त्यांच्याप्रती देशाची बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली.संरक्षण मंत्र्यांनी भारताच्या जलद आर्थिक वाढीचा आणि तांत्रिक प्रगतीचा उल्लेख करत पायाभूत सुविधा, स्टार्टअप, अंतराळ आणि डिजिटल नवोपक्रमातील प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचा उद्देश देशांतर्गत क्षमता मजबूत करणे, उत्पादनाला चालना देणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा आहे. राजनाथ सिंह यांनी या संवादाला विशेष क्षण असल्याचे सांगत, व्यावसायिक जबाबदाऱ्यांनंतरही उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की त्यांचे आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळाचे झालेले उत्साही स्वागत भारत-जर्मनीच्या मजबूत आणि वाढत्या भागीदारीचे प्रतीक आहे. त्यांनी स्पष्ट केले की कूटनीतिक बाबींमध्ये भारताचा दृष्टिकोन नेहमी संतुलित राहतो, त्यामुळे भारत सतत हेच इच्छितो की अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपावे आणि शांतता प्रस्थापित व्हावी.
Share Market Update : जागतिक बाजारपेठांमध्ये कमजोरीची चिन्हे; आशियामध्ये संमिश्र व्यवहार
मुंबई : आज जागतिक बाजारपेठांमध्ये कमजोरीची चिन्हे दिसत आहेत. मागील सत्रात अमेरिकन बाजारपेठा घसरणीसह बंद झाल्या. तथापि, आज डाऊ जोन्स फ्युचर्समध्ये जोरदार व्यवहार होत आहे. मागील सत्रात युरोपियन बाजारपेठांवरही दबाव कायम होता. आज आशियाई बाजारपेठांमध्ये संमिश्र व्यवहार होत आहे.पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणने शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीचा प्रस्ताव नाकारल्यामुळे मागील सत्रात अमेरिकन बाजारपेठेवर दबाव कायम होता. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज २९२.९६ अंकांनी, म्हणजेच ०.५९ टक्क्यांनी घसरून ४९,१४९.६० अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे, एस अँड पी ५०० निर्देशांक ०.६३ टक्क्यांनी घसरून ७,०६४.०१ अंकांवर आला. याव्यतिरिक्त, नॅसडॅक १४४.४३ अंकांनी, म्हणजेच ०.५९ टक्क्यांनी घसरून २४,२५९.९६ अंकांवर बंद झाला. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज (DJIA) फ्युचर्स सध्या ४९,३६९.६५ वर व्यवहार करत असून, त्यात २२०.२७ अंकांची किंवा ०.४५ टक्क्यांची वाढ झाली आहे.https://prahaar.in/2026/04/22/rajnath-singh-india-could-play-the-role-of-a-mediator-between-iran-and-the-us-in-the-future-rajnath-singh/मागील सत्रात युरोपियन बाजारपेठांमध्येही कमजोरी कायम होती. एफटीएसई निर्देशांक ११०.९९ अंकांनी किंवा १.०६ टक्क्यानी घसरून १०,४९८.०९ वर बंद झाला. त्याचप्रमाणे, सीएसी निर्देशांक ९५.३३ अंकांनी किंवा १.१६ टक्क्यांनी घसरून मागील सत्र ८,२३५.७२ वर संपले. डॅक्स निर्देशांकही १४६.९३ अंकांनी किंवा ०.६१ टक्क्यांनी घसरून २४,२७०.८७ वर बंद झाला.आज आशियाई बाजारपेठांमध्ये संमिश्र व्यवहार होत आहेत. नऊ आशियाई बाजार निर्देशांकांपैकी पाच निर्देशांक घसरणीत आहेत, तर चार निर्देशांक वाढीत मजबूत आहेत. तैवान भारित निर्देशांक ३८,०१५.२७ वर व्यवहार करत असून, त्यात ४१०.१६ अंकांची किंवा १.०९ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, निक्केई निर्देशांक २३२.८३ अंकांनी, म्हणजेच ०.३९ टक्क्यांनी वाढून ५९,५८२ अंकांवर पोहोचला आहे. याशिवाय, शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.२४ टक्क्यांनी वाढून ४,०९५.०७ अंकांवर, तर एस अँड पी कंपोझिट निर्देशांक ०.१९ टक्क्यांनी वाढून १,४८६.३७ अंकांवर पोहोचला आहे.https://prahaar.in/2026/04/22/iaf-aircraft-lands-on-ups-purvanchal-expressway-to-test-wartime-preparedness/दुसरीकडे, गिफ्ट निफ्टी १७४ अंकांनी, म्हणजेच ०.७१ टक्क्यांनी घसरून २४,४०१ अंकांवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे, स्ट्रेट्स टाइम्स निर्देशांक ०.४६ टक्क्यांनी घसरून ४९९२.०५ अंकांवर आला आहे. हँग सेंग निर्देशांक आज मोठी कमजोरी दर्शवत आहे. सध्या, हा निर्देशांक २९९.४८ अंकांनी किंवा १.१४ टक्क्यांनी घसरून २६,१८८ अंकांवर आहे. त्याचप्रमाणे, जकार्ता कंपोझिट इंडेक्स ०.१३ टक्क्यांनी घसरून ७,५४९.२७ अंकांवर आला असून, कोस्पी इंडेक्स ०.०२ टक्क्यांच्या नाममात्र घसरणीसह ६,३८७.२४ अंकांवर व्यवहार करत आहे.
Shivsena : शिवसेनेकडून सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
आगामी २२ जिल्हा परिषद आणि २२५ पंचायत समिती निवडणुकांसाठी १२ मंत्र्यांवर २२ जिल्ह्यांची जबाबदारीमुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने आक्रमक मोर्चेबांधणी सुरू केली असून, २२ जिल्हा परिषदा आणि २२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी पक्षाने आपली ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार केली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा आपल्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत १२ प्रमुख मंत्र्यांकडे २२ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे.मागील निवडणुकांमध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवल्यानंतर, आता पहिल्या क्रमांकावर झेप घेण्याचे लक्ष्य पक्षाने ठेवले आहे. यासाठी प्रभावी प्रचारासह संघटनात्मक बांधणी, प्रशासनावर प्रभाव अशा त्रिस्तरीय रणनीतीवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याअंतर्गत ‘संपर्क मंत्री अभियान’ राबवण्यात येणार असून, प्रत्येक मंत्र्याला दोन जिल्ह्यांची जबाबदारी विभागून दिली आहे.https://prahaar.in/2026/04/22/mallikarjun-kharge-called-modi-a-terrorist-did-kharges-tongue-truly-slip-or-was-it-a-political-ploy/या नव्या जबाबदाऱ्यांनुसार, उत्तर महाराष्ट्रात गुलाबराव पाटील (जळगाव, नंदुरबार) आणि दादा भुसे (धुळे, बुलढाणा) खिंड लढवतील. उदय सामंत यांच्याकडे नाशिक व अहिल्यानगरची धुरा असेल, तर योगेश कदम ठाणे आणि पालघरमध्ये पक्षाचे वर्चस्व टिकवतील. मराठवाड्यात प्रकाश आबिटकर (नांदेड, हिंगोली) आणि आशिष जयस्वाल (जालना) काम पाहतील. विदर्भात संजय राठोड (यवतमाळ, वाशिम), संजय शिरसाट (भंडारा, गोंदिया), प्रतापराव जाधव (नागपूर, वर्धा) आणि शंभूराज देसाई (गडचिरोली, चंद्रपूर) यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर पश्चिम महाराष्ट्र व इतर भागांसाठी प्रताप सरनाईक (अमरावती, अकोला) आणि भरतशेट गोगावले (बीड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.https://prahaar.in/2026/04/21/struggle-will-not-cease-until-33-percent-reservation-for-women-is-secured-in-parliament-of-india/युतीधर्मातही मागे हटायचे नाहीया बैठकीत एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ज्या जिल्ह्यांमध्ये भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पालकमंत्री आहेत, तिथेही शिवसेनेने मागे न हटता शासकीय समित्यांमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना स्थान मिळवून द्यावे, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडिसी) निधीतून स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देणे आणि प्रशासनावर प्रभाव निर्माण करून शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.निवडणूक यंत्रणा सज्ज करण्यावर भर- संघटनात्मक बांधणीसाठी विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या, बीएलए याद्यांचे अद्ययावतीकरण आणि तालुका स्तरावर प्रशिक्षण शिबिरे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार शोधणे आणि त्यांना संपूर्ण ताकद देणे ही या संपर्क मंत्र्यांची प्राथमिक जबाबदारी असणार आहे.- या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आनंदराव अडसूळ, प्रकाश पाटील, सचिव संजय मोरे, भाऊसाहेब चौधरी यांसह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
Fighter Jets Landing : एक्सप्रेस वे वर उतरली लढाऊ विमानं, भारताच्या हवाई दलाचं शक्ती प्रदर्शन
सुलतानपूर : उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर येथे पूर्वांचल एक्सप्रेस वे वर भारताची लढाऊ विमानं एकामागून एक या पद्धतीने उतरली. नंतर या विमानांनी तिथून विमानतळाच्या दिशेने परत उड्डाण केले. हा प्रयोग करून आणीबाणीच्या प्रसंगी लढाऊ विमानं विमानतळाव्यतिरिक्त एक्सप्रेस वे वर पूर्वांचल एक्सप्रेस वे वर उतरवणे शक्य आहे याची चाचपणी करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाला. या निमित्ताने उपस्थितांना भारताच्या हवाई दलाचं सामर्थ्य बघण्याची संधी मिळाली. हवाई दलाची ताकद बघण्यासाठी पूर्वांचल एक्सप्रेस वे जवळ स्थानिकांनी तुफान गर्दी केली होती. एक्सप्रेस वे वर होणारे लँडिंग आणि तिथून थोड्या वेळाने होणारे टेक ऑफ हे बघून उपस्थितांनी वारंवार टाळ्यांचा कडकडाट केला. भारत माता की जय, जय हिंद, वंदे मातरम अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला.एक्सप्रेस वे वर चाचणीसाठी तीन तात्पुरत्या धावपट्ट्या तयार केल्या होत्या. या धावपट्ट्यांचा वापर हवाई दलाने प्रयोगासाठी केला. पूर्वांचल एक्सप्रेस वे तयार झाल्यापासून तिसऱ्यांदा हवाई दलाने यशस्वी प्रयोग केला आहे. यावेळी सुखोई, मिराज, जॅग्वार, LCA तेजस या विमानांनी पूर्वांचल एक्सप्रेस वे वरील तात्पुरत्या धावपट्ट्यांचा वापर केला. नंतर पूर्वांचल एक्सप्रेस वे वर एमआय १७ हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. सी २९५ आणि एएन ३२ ही दोन मालवाहक विमानंही पूर्वांचल एक्सप्रेस वे वर उतरवण्यात आली. या सर्व विमानांनी लँडिंग नंतर पूर्वांचल एक्सप्रेस वे वरून टेक ऑफचाही यशस्वी प्रयोग केला.युद्धकाळात शत्रूच्या हल्ल्यात विमानतळाचे नुकसान झाले तर एक्सप्रेस वे चा वापर करून विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग करता आले तर हवाई दलाला विमानतळ दुरुस्त करण्यास वेळ मिळतो आणि शत्रू विरोधातील हवाई कारवाया थांबत नाहीत. यामुळे पूर्वांचल एक्सप्रेस वे वरील चाचणी लष्करीदृष्ट्या महत्त्वाची होती. ही चाचणी तब्बल तीन वेळा यशस्वी झाल्यामुळे हवाई दलात आनंदाचे वातावरण आहे. शत्रूच्या चिंतेत भर पडली आहे.केंद्र सरकार विमानतळाव्यतिरिक्त वापरण्यासाठी देशात २० एक्सप्रेस वे सज्ज करत आहे. या नियोजनाचा भाग म्हणूनच पूर्वांचल एक्सप्रेस वे वर लँडिंग आणि टेक ऑफची चाचणी घेण्यात आली आहे. या चाचणीला टच अँड गो टेस्ट असेही म्हणतात. ही टेस्ट यशस्वी झाल्यामुळे हवाई दलाच्या सामर्थ्यात वाढ झाली आहे. आणखी काही काळ या चाचण्या सुरू राहणार आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार एक्सप्रेस वे चा ठराविक भाग पुढील कही दिवस अधूनमधून चाचणीसाठी वापरला जाणार आहे. यामुळे एक्सप्रेस वे च्या ठराविक भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. ही व्यवस्था २ मे पर्यंत असेल. या व्यवस्थेत काही बदल करण्याचा निर्णय झाल्यास प्रशासन त्याची माहिती सोशल मीडियाद्वारे तसेच प्रसारमाध्यमांद्वारे देईल, असेही सांगण्यात आले आहे.पंतप्रधान मोदींनी पूर्वांचल एक्सप्रेस वे चे उद्घाटन २०२१ मध्ये केले . उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत तिसऱ्यांदा हवाई दलाने प्रयोग करण्यासाठी पूर्वांचल एक्सप्रेस वे चा प्रभावी आणि यशस्वी वापर केला आहे.
Crude Oil Prices : शस्त्रसंधीच्या घोषणेनंतरही कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या जवळ
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी वाढवण्याचे निर्देश दिले असूनही, आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती आज वाढतच राहिल्या. आजच्या व्यवहारात ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल १०० डॉलरच्या अगदी जवळ पोहोचले. त्याचप्रमाणे, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूटीआय) क्रूड तेलानेही प्रति बॅरल ९० डॉलरचा टप्पा ओलांडला. तथापि, नंतर त्यात किंचित घसरण नोंदवली गेली.ब्रेंट क्रूड तेलाचा आजचा व्यवहार प्रति बॅरल ९९.२४ डॉलरवर, म्हणजेच १०० डॉलरच्या जवळ सुरू झाला. थोड्याच वेळात, त्यात वाढ होऊन ते प्रति बॅरल ९९.२९ डॉलरवर पोहोचले. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९:१५ वाजता, ब्रेंट क्रूड तेलाचा व्यवहार प्रति बॅरल ९८.३४ डॉलरवर सुरू होता.https://prahaar.in/2026/04/22/us-iran-ceasefire-trump-extends-us-iran-ceasefire-credits-pakistan/त्याचप्रमाणे, डब्ल्यूटीआय क्रूड तेलानेही आज ९० डॉलरचा टप्पा ओलांडला आणि ते प्रति बॅरल ९०.३८ डॉलरवर उघडले. त्यानंतर थोड्याच वेळात, त्यात वाढ होऊन ते प्रति बॅरल ९०.७१ डॉलरवर पोहोचले. तथापि, नंतर त्यात किंचित घसरण नोंदवली गेली. भारतीय वेळेनुसार सकाळी ९:१५ वाजता, डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल ८९.४७ डॉलर होता.तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली असली तरी, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी कायम राहील असेही त्यांनी म्हटले आहे. याचा अर्थ, युद्धविराम असूनही मालवाहू जहाजे आणि तेल टँकर या महत्त्वाच्या सागरी मार्गातून प्रवास करू शकणार नाहीत. परिणामी, जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात व्यत्यय सुरूच राहील.https://prahaar.in/2026/04/22/ai-labels-mandatory-social-media-platforms-must-label-ai-videos/केपेक्स गोल्ड अँड इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ राजीव दत्ता म्हणतात की, अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेची दुसरी फेरी स्थगित करण्यात आली आहे. शांतता चर्चेसाठी अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचा पाकिस्तानचा नियोजित दौराही पुढे ढकलण्यात आला आहे. या परिस्थितीत, पश्चिम आशियामध्ये लवकर शांतता प्रस्थापित होण्याच्या आशांनाही मोठा फटका बसला आहे.पश्चिम आशियातील सततच्या तणावाचा परिणाम कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर होत राहू शकतो. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा प्रति बॅरल १०० डॉलरच्या जवळपास पोहोचल्या आहेत. दिलासा देणारी एकच बाब म्हणजे अमेरिकेने युद्धविराम वाढवण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे, सध्या दोन्ही बाजूंनी कोणत्याही मोठ्या हल्ल्यांची अपेक्षा नाही.
US-Iran Ceasefire : ट्रम्प यांनी अमेरिका-इराण युद्धविराम वाढवला, पाकिस्तानला दिले श्रेय
वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाची मुदत संपण्यास काही तास बाकी असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम पुढे वाढवला आहे. बुधवारी ट्रम्प यांनी घोषणा केली की, इराणकडून अधिकृत प्रस्ताव सादर होईपर्यंत युद्धविराम कायम ठेवण्यात येईल. या युद्धविरामाचे श्रेय ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांना दिले आहे.ट्रम्प म्हणाले की, गंभीर अंतर्गत मतभेदांनी ग्रासलेल्या इराणी सत्तेला स्थायी शांतता करारासाठी एकसंघ प्रस्ताव सादर करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. अमेरिकेने प्रथमच इराणच्या पुढील भूमिकेसाठी कोणतीही निश्चित वेळमर्यादा ठेवलेली नाही. या धोरणातील बदलाचे श्रेय ट्रम्प यांनी पाकिस्तानी नेतृत्वासोबत झालेल्या चर्चेला दिले.ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ’वर लिहिले, “इराण सरकार गंभीरपणे विभागलेले आहे, हे अपेक्षितच होते. पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या विनंतीवरून आम्ही हल्ला थांबवला आहे. इराणचे नेते आणि प्रतिनिधी एकसंघ प्रस्ताव घेऊन समोर येईपर्यंत हा हल्ला स्थगित राहील.”https://prahaar.in/2026/04/21/iran-us-conflict-will-jd-vance-visit-pakistan-uncertainty-persists-ahead-of-iran-us-talks/मात्र, ट्रम्प यांनी स्पष्ट केले की होर्मूज सामुद्रधुनीत इराणच्या किनाऱ्यावरील बंदरांची नाकेबंदी कायम राहील, तर अमेरिकन सैन्य इतर सर्व बाबतीत सज्ज आणि सक्षम राहील. त्यांनी सांगितले की, प्रस्ताव सादर होईपर्यंत आणि चर्चा कोणत्यातरी निष्कर्षापर्यंत पोहोचेपर्यंत युद्धविराम वाढवला जाईल.दरम्यान, पाकिस्ताननेही युद्धविराम वाढवण्याच्या विनंतीला मान्यता दिल्याबद्दल आणि आपल्या राजनैतिक प्रयत्नांना पाठिंबा दिल्याबद्दल ट्रम्प यांचे आभार मानले. आसिम मुनीर यांनी ‘एक्स’वर लिहिले, “मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानतो की त्यांनी सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांना पुढे जाण्याची संधी देण्यासाठी युद्धविराम वाढवण्याच्या आमच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला. पाकिस्तान संघर्षाच्या चर्चात्मक तोडग्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवेल.”ते पुढे म्हणाले, “मला पूर्ण विश्वास आहे की दोन्ही बाजू युद्धविरामाचे पालन करतील आणि इस्लामाबाद येथे होणाऱ्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीत संघर्ष कायमस्वरूपी संपवण्यासाठी व्यापक शांतता करारापर्यंत पोहोचतील.”https://prahaar.in/2026/04/20/iran-america-war-irgcs-dominance-in-irans-decision-making-process-possibility-of-talks-with-america-low/जागतिक शांतिदूत म्हणून स्वतःची नवी प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान अमेरिका आणि इराणमधील मतभेद कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यामागे स्वतःची राजनैतिक प्रतिमा उंचावणे आणि परदेशी व्यापार व गुंतवणूक आकर्षित करणे हा उद्देश आहे. अलिकडच्या काळात पाकिस्तानची आर्थिक कमजोरी स्पष्टपणे समोर आली आहे. देशात खर्च वाचवण्यासाठी दररोज वीज कपातीचा सामना करावा लागत आहे, तसेच सौदी अरेबियाकडून ३ अब्ज डॉलर्सचे आपत्कालीन कर्ज घ्यावे लागले आहे. जर इस्लामाबादने खरोखरच इराणवरील पुढील हल्ले रोखण्यासाठी ट्रम्प यांच्यावर दबाव टाकला असेल, तर त्यामुळे पाकिस्तानच्या राजनैतिक प्रतिमेला मोठा फायदा होईल आणि जागतिक स्तरावर त्याची विश्वासार्हता अधिक मजबूत होईल.
Ashwini Bhave: ट्रॅक्टरची स्वारी अन् वडाच्या पारंब्यांचा झोका! अश्विनी भावे रमल्या शेतात; पाहा Video
Ashwini Bhave:
MI- CSK IPL 2026 : मुंबई-चेन्नई सामन्यात धोनी खेळण्याची शक्यता; विल जॅक्स मुंबई इंडियन्स संघात दाखल
मुंबई : वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणाऱ्या आयपीएल २०२६ च्या सामन्यात एम.एस. धोनी आणि विल जॅक्स मैदानात दिसू शकतात.मंगळवारी रात्री धोनी वानखेडेवर सराव करताना दिसला, तर विल जॅक्स मुंबईच्या संघात दाखल झाला आहे. चेन्नई सध्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर असून त्यांना विजयाची नितांत गरज आहे.हंगामापूर्वी एम.एस. धोनी पोटरीच्या स्नायूंच्या दुखापतीशी झुंज देत होता. मंगळवारी, त्याने वानखेडेवर अर्धा तास यष्टीरक्षण आणि ३० मिनिटे फलंदाजी केली. या दरम्यान, ४४ वर्षीय धोनी कोणत्याही त्रासाशिवाय मोठे फटके मारताना दिसला. जर तो उद्या खेळला, तर चेन्नईच्या फलंदाजीला बळ मिळेल. संघाने सहापैकी दोन सामने जिंकले आहेत.https://prahaar.in/2026/04/21/ipl-2026-tilak-varma-mumbai-indians-triumph-on-the-back-of-tilak-varmas-magnificent-century/इंग्लंडचा क्रिकेटपटू विल जॅक्स भारतात दाखल झाला आहे. वैयक्तिक कारणांमुळे तो पहिल्या सहा सामन्यांमधून बाहेर होता. २०२६ च्या टी२० विश्वचषकात चार वेळा 'सामनावीर' ठरलेल्या जॅक्सने सोमवारी आणि मंगळवारी मुंबईच्या नेट्समध्ये सराव केला. त्याने सुमारे एक तास फलंदाजी केली आणि ऑफ-स्पिन गोलंदाजीही केली. त्याच्या आगमनामुळे मुंबईची मधली फळी आणि फिरकी गोलंदाजी विभाग मजबूत होईल. तो अंतिम ११ खेळाडूंमध्ये मिचेल सँटनर किंवा अल्लाह गझनफर यांची जागा घेऊ शकतो.चेन्नईला काहीसा दिलासा मिळाला आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन संघात सामील झाला आहे. दुखापतग्रस्त नॅथन एलिसच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. जॉन्सनने मंगळवारी वानखेडेवर संघासोबत सराव केला. गेल्या आठवड्यात संघाबाहेर गेलेल्या खलील अहमदची जागा तो घेण्याची शक्यता आहे. गेल्या सामन्यात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आयुष म्हात्रे संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर गेल्याने, चेन्नईसाठी हा हंगाम कठीण ठरला आहे.https://prahaar.in/2026/04/20/bccis-new-plan-two-teams-will-play-simultaneously-in-t20-shreyas-iyer-to-be-captain/मुंबई इंडियन्सने आपल्या मागील सामन्यात गुजरात टायटन्सचा ९९ धावांनी पराभव केला. या विजयामुळे संघाचे मनोधैर्य वाढले आहे. विल जॅक्सच्या आगमनामुळे फिनिशिंग विभाग मजबूत होईल. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकावाच लागेल. धोनीच्या उपस्थितीमुळे संघाच्या धावसंख्येलाच नव्हे, तर त्याच्या कर्णधारपदालाही मदत होईल.
Vijay Verma माहितीनुसार, विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया जवळपास दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, मार्च २०२५ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले. त्यांच्या ब्रेकअपमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोघांनीही या विषयावर फारसे भाष्य केले नाही, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
Sachin Pilgaonkar and Madhurani Gokhale : ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात सचिन पिळगांवकर आणि मधुराणी गोखले एकत्र दिसले होते.
US-Iran ceasefire : इराण-अमेरिकेतील चर्चेसंदर्भातील चित्र अजूनही स्पष्ट नाही.
Genelia Deshmukh ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये एकाच वेळी तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. चित्रपटाची भव्यता आणि ऐतिहासिक विषय लक्षात घेता याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पहलगाम : २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस नागरिकांनी आपले प्राण गमावले. आज पहलगाम हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. पहलगाम हल्ल्याच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींनी प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिले, गेल्या वर्षी याच दिवशी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप लोकांचे स्मरण. त्यांना कधीही विसरले जाणार नाही. या दुःखाच्या प्रसंगी पीडितांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या संवेदना आहेत.एक राष्ट्र म्हणून, आपण दुःखात आणि निर्धारात एकजूट आहोत. भारत कोणत्याही स्वरूपातील दहशतवादापुढे कधीही झुकणार नाही. दहशतवाद्यांचे कुटील मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत.Remembering the innocent lives lost in the gruesome Pahalgam terror attack on this day last year. They will never be forgotten. My thoughts are also with the bereaved families as they cope with this loss.As a nation, we stand united in grief and resolve. India will never bow to…— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2026पंतप्रधान मोदींनी निःसंदिग्धपणे सांगितले की, भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला घाबरणार नाही. त्यांनी पुनरुच्चार केला की, दहशतवाद्यांचे कट कधीही यशस्वी होणार नाहीत आणि देश पूर्ण ताकदीनिशी त्यांचा सामना करेल.भारतीय लष्कराने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, भारतावर होणाऱ्या कोणत्याही आक्रमक कृत्याला निर्णायक आणि खंबीर प्रत्युत्तर दिले जाईल. लष्कराने ठामपणे सांगितले की, न्याय नेहमीच मिळेल आणि कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
Kedarnath Mandir : हर हर महादेवच्या गजरात उघडले केदारनाथ मंदिराचे द्वार
देहरादून : केदारनाथ धामाचे द्वार आज, बुधवारी सकाळी आठ वाजता शुभ मुहूर्तावर विधी-विधान आणि पूजा-अर्चना करून भाविकांसाठी खुले करण्यात आले. द्वार उघडताच मंदिर परिसर ‘हर हर महादेव’ आणि ‘जय बाबा केदार’च्या जयघोषांनी दुमदुमून गेला. हजारो भाविक या पवित्र क्षणाचे साक्षीदार ठरले. राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी धामात पोहोचून विशेष पूजा-अर्चना केली आणि राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.https://prahaar.in/2026/04/22/mallikarjun-kharge-called-modi-a-terrorist-did-kharges-tongue-truly-slip-or-was-it-a-political-ploy/बाबा केदार यांच्या धामाला सुमारे ५१ क्विंटल फुलांनी भव्य सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले. देश-विदेशातून हजारो भाविक आधीच धामात दाखल झाले होते आणि द्वार उघडण्याच्या या अद्भुत क्षणाचे साक्षीदार बनले.यापूर्वी बाबा केदार यांच्या पंचमुखी चल विग्रह उत्सव पालखीने मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता केदारनाथ धामात प्रवेश केला. ओंकारेश्वर मंदिर, उखीमठ येथून रवाना झालेली ही डोली १७ किलोमीटरची कठीण पायी यात्रा पूर्ण करत जंगलचट्टी, रामबाडा, लिनचोली आणि बेस कॅम्प मार्गे केदारपुरीत पोहोचली. धामात पोहोचताच भाविकांनी पुष्पवृष्टी करून डोलीचे भव्य स्वागत केले.https://prahaar.in/2026/04/21/kerala-massive-explosion-in-firecracker-warehouse-6-dead/पालखीने मंदिराची प्रदक्षिणा करून भंडारगृहात प्रवेश केला, जिथे विधिवत पूजा-अर्चना पार पडली. यावेळी ८वी सिखलाई रेजिमेंटच्या बँडच्या मधुर सुरांनी आणि डमरूच्या निनादाने संपूर्ण वातावरण शिवमय झाले.दरम्यान सुरक्षेचे कडक बंदोबस्त करण्यात आले होते आणि पोलीस तसेच आयटीबीपीचे जवान तैनात करण्यात आले होते. द्वार उघडताच केदारनाथ यात्रेचा विधिवत शुभारंभ झाला. देशाच्या विविध भागांतून आलेले भाविक बाबा केदार यांच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसून आले. या प्रसंगी अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
Harshvardhan Sapkal:
आयटी क्षेत्रातील अदृश्य बेड्या
प्रदेश सरचिटणीस - किरण मिलगीरभारताच्या आर्थिक प्रगतीचा कणा मानल्या जाणाऱ्या आयटी (Information Technology) क्षेत्रातून येणाऱ्या बातम्या अत्यंत चिंताजनक आहेत. नाशिक येथील टीसीसीमध्ये झालेल्या जबरदस्ती धर्मांतराच्या प्रयत्नांबरोबरच लैंगिक छळ आणि नोकरीतील असुरक्षितता ही केवळ गुन्हेगारी घटना नसून आधुनिक गुलामगिरी आणि सत्तेच्या गैरवापराचे भयावह रूप आहे.जेव्हा रक्षकच भक्षक बनतो कोणत्याही संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांच्या कल्याण व सुरक्षेची जबाबदारी एचआर विभागावर असते; परंतु नाशिकमध्ये या गंभीर गुन्ह्यांचे नेतृत्व स्वतः एचआर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले, ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. तेथे असे वातावरण निर्माण करण्यात आले की, कर्मचारी ना आपल्या श्रद्धेचे संरक्षण करू शकत होते, ना सन्मानाने काम करू शकत होते. नोकरी जाण्याची आणि करिअर उद्ध्वस्त होण्याची भीती दाखवून कर्मचाऱ्यांवर लैंगिक शोषण व धर्मांतरासाठी दबाव टाकणे हे लोकशाही देशासाठी लाजिरवाणे आहे.युनियनचा अभाव : शोषणाला खतपाणीआयटी क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मानवी हक्कांचे उल्लंघन का होत आहे? याचे मुख्य कारण म्हणजे या क्षेत्रात मजबूत कामगार संघटनांचा अभाव आहे.संघटित आवाजाचा अभाव : इतर क्षेत्रातील कामगारांकडे त्यांच्या समस्या मांडण्यासाठी सशक्त संघटना आहेत; परंतु आयटी कर्मचारी अनेकदा वैयक्तिक पातळीवर एकटे पडतात.तक्रार निवारण यंत्रणेचे अपयश :कंपन्यांमधील अंतर्गत तक्रार समित्या (आयसीसी) अनेकदा व्यवस्थापनाच्या हिताचे रक्षण करणारे साधन बनतात.भीतीचे वातावरण :नोकरी जाण्याच्या भीतीमुळे अनेकजण तक्रार करण्यास घाबरतात, कारण त्यामुळे त्यांचे करिअर धोक्यात येऊ शकते. नाशिकमध्ये घडलेली घटना ही एकट्या कंपनीपुरती मर्यादित नाही. जर तेथे मजबूत संघटना असती तर कर्मचारी अशा प्रकारच्या घटनांना सुरुवातीलाच आळा घालू शकले असते.व्यापक चौकशी आवश्यक : नाशिक प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे की, जिल्हा साधा एक बाब आहे. मात्र ही घटना केवळ एका कंपनीपूर्ती मर्यादित आहे का याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांमध्येही अशी प्रवृत्ती आहे का? याची चौकशी होणे आवश्यक आहे. सर्व विभागाच्या नेतृत्वाखाली आयटी कंपन्यांमध्ये आपक चौकशी आणि सोशल ऑडिट ही काळाची गरज आहे.भारतीय मजदूर संघाची भूमिकाभारतीय मजदूर संघ हा कामगारांच्या सन्मान व हक्कांच्या संरक्षणासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसमोरील अशा आव्हानांमध्ये त्यांच्यासोबत उभे राहून आवश्यक कायदेशीर मदत देण्यास बी. एम. एस. सज्ज आहे. नाशिक पिढीतांना न्याय मिळेपर्यंत आणि दोशींना योग्य शिक्षा होईपर्यंत बी एम. एस. चा लढा सुरूच राहील. हायटेक क्षेत्रातील चमकदार कार्यालयांमध्ये दडलेल्या काळ्या वास्तवाला समोर आणण्याची गरज आहे. प्रत्येक व्यवस्थापनाने हे समजून घ्यायला हवे की कामगार हे यंत्र नाहीत तर सन्मानाने जगणारे मानव आहेत.कार्यस्थळी सुरक्षितता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संघटित होण्याची हीच योग्य वेळ आहे, असे आवाहन भारतीय मजूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मुळे आणि प्रदेश सरचिटणीस किरण मिलगीर यांनी केले.
Jackfruit Pickle Recipe: उन्हाळ्यात करा खास फणसाचं लोणचं! एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल
Jackfruit Pickle Recipe लोणचं बनवण्यासाठी सर्वात आधी कच्चे फणस घ्यावे. तो आतून पांढरा आणि ताजा असावा. फणस स्वच्छ धुवून कोरडा पुसून घ्या. हाताला थोडं तेल लावून त्याची साल काढा आणि त्याचे छोटे-छोटे तुकडे करा. त्यानंतर हे तुकडे थोडे मऊ होईपर्यंत वाफवून घ्या.
थंडीच्या कुशीत वॉर्मीचं ऊबदार साम्राज्य
दी लेडी बॉस - अर्चना सोंडे२००९ साल. स्वित्झर्लंडमधील कडाक्याच्या थंडीत ‘ती’ आपल्या पती आणि मुलासोबत सुट्टीसाठी गेली होती. पण ती थंडी त्यांच्यासाठी बोचरी ठरली. बाहेर फिरण्याऐवजी त्यांना अनेकदा घरातच थांबावे लागत होते. त्याचवेळी एका कॅफेमध्ये बसलेल्या ‘ती’च्या मनात एक विचार चमकून गेला. “असं काही उत्पादन का नसावं, जे विजेशिवाय किंवा गरम पाण्याशिवाय लोकांना ऊबदार ठेवू शकेल?” हीच कल्पना पुढे ‘वॉर्मी’च्या रूपात साकार झाली. ही अनोखी कल्पना प्रत्यक्षात अवतरणारी ‘ती’ म्हणजे वॉर्मी’ (Warmee) या अनोख्या बॉडी वॉर्मर ब्रँडची सह-संस्थापिका भावना व्होरा.भावनाचे वडील आणि काका चारचाकी वाहनांच्या ॲक्सेसरीजचा व्यवसाय चालवत होते. त्यांची मुंबईभर सुमारे १७ दुकाने होती. मुंबईतील मालाड येथील पी. डी. लायन्स दालमिया कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर, भावनाने सुरुवातीला दुचाकी वाहनांचे डीलरशिप दुकान चालवले. या डीलरशिपचा विस्तार तिने मुंबईत पाच मल्टी-ब्रँड दुकानांपर्यंत केला. मात्र, तिने २००५ मध्ये व्यवसाय बंद केला. व्यवसायाची पार्श्वभूमी असल्याने, तिला उद्योजकतेची नेहमीच आवड होती. स्वतंत्र होण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन तिने लहान वयातच व्यवसाय सुरू केला. सिटीबँक आणि आयसीआयसीआय बँकेसाठी दुचाकींच्या बाबतीत मुंबईतील पहिली महिला डायरेक्ट सेलिंग एजंट म्हणून ती एक अग्रणी होती. वाहन वित्तपुरवठ्यासाठी तिने या बँकांचे प्रतिनिधित्व केले. मुलगा झाल्यावर, त्याला वेळ देण्यासाठी तिला व्यवसाय बंद करावा लागला. व्यवसाय बंद करेपर्यंत तिच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल सुमारे २ कोटी रुपये होती. डीलरशिप चालवणे थांबवले असले तरी भावनाने आपल्या मुलाचे संगोपन करत असताना स्वतःच्या शेअर गुंतवणुकीचे आणि ट्रेडिंगचे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या विश्लेषणात्मक कौशल्यांचा वापर सुरू ठेवला. याच काळात ती कुटुंब सहलीसाठी स्वित्झर्लंडला गेली आणि तिला कल्पना सुचली.भावनांचे पती केमिकल इंजिनिअर असल्याने त्यांनी या कल्पनेवर प्रयोग सुरू केले. विविध रसायनांवर संशोधन करत अखेर त्यांनी असे काही फॉर्म्युले विकसित केले, जे हवेच्या संपर्कात येताच उष्णता निर्माण करतात. २०१३ मध्ये त्यांनी वॉर्मी या उत्पादनांची अधिकृतपणे बाजारात सुरुवात केली. सुरुवातीला लोकांना ही संकल्पना समजावून सांगणे मोठे आव्हान होते, पण जसजसे लोकांनी याचा अनुभव घेतला, तसतशी त्याची लोकप्रियता वाढू लागली.‘वॉर्मी’ उत्पादने म्हणजे हँड वॉर्मर्स, बॉडी वॉर्मर्स, फूट वॉर्मर्स आहेत. ही सर्व उत्पादने विजेशिवाय काम करतात. हवेच्या संपर्कात येताच गरम होतात. सुमारे ८ तास उष्णता देतात. सहज बाळगता आणि वापरता येतात. आज ‘वॉर्मी’ केवळ एक उत्पादन नसून, प्रवास करणाऱ्या आणि थंड हवामानात राहणाऱ्या लोकांसाठी एक आवश्यक साधन बनले आहे. भावना आणि तिच्या पतीने पँथियन फार्मकेम’ अंतर्गत हा ब्रँड लाँच केला. वॉर्मी केवळ भारतात विकले जाते, जे थंड प्रदेशात राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या लोकांसाठी आहे. त्यांची बहुतेक विक्री मुंबई, बंगळूरु, चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि अहमदाबाद यांसारख्या शहरांमधून होते. ज्यांना थंड हवामानाची सवय नाही, पण सुट्टीमध्ये मौज करण्यासाठी, काम किंवा शिक्षणासाठी थंड प्रदेशात ज्यांना प्रवास करावा लागतो. ते ‘वॉर्मी’चे लक्षयित ग्राहक आहेत. सुरुवातीला, या जोडप्याने विविध दुकानांमध्ये आपल्या उत्पादनांचा प्रचार केला. वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात दिली. अनेक ठिकाणी पॉप-अप स्टोअर उभारले.भारतात ही एक नवीन संकल्पना असल्याने, ही उत्पादने कशी वापरायची हे लोकांना समजावून सांगण्यासाठी त्यांना अनेक प्रात्यक्षिके घ्यावी लागली. सुरुवातीला, त्यांची उत्पादने भारतातील सुमारे ४०० दुकानांमध्ये, प्रामुख्याने हिमाचल प्रदेश आणि हरियाणात उपलब्ध होती. पहिल्याच वर्षात कंपनीने २ कोटी रुपयांची उलाढाल केली. आज हा व्यवसाय सुमारे १५ कोटी रुपयांच्या वार्षिक महसुलापर्यंत पोहोचला आहे. २०२२ मध्ये त्यांनी ब्ल्यूहीट ही नवीन श्रेणी सुरू केली, जी शरीरातील वेदना कमी करण्यासाठी हीट थेरपी पॅचेस प्रदान करते. तसेच त्यांनी स्वतःचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Nysh.in सुरू करून व्यवसायाला डिजिटल दिशा दिली. दरमहा फक्त १०० ऑर्डर्स मिळायच्या आता त्यात ५०० पट वाढ झाली आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आपल्या उत्पादनांचा दबदबा निर्माण केला आहे. त्याचसोबत इतरही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर त्यांची उत्पादने उपलब्ध आहेत. मुंबईतील लोअर परळ येथे वॉर्मीचे कार्यालय आहे, तर त्यांचा उत्पादन कारखाना मुंबईपासून १२० किमी अंतरावर, बोईसर जिल्ह्यातील तारापूर येथे आहे. त्यांच्याकडे १०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.कोणतीही कल्पना छोटी नसते. त्या कल्पनेवर विश्वास ठेवून तिला जर कृतीची जोड दिली, तर कोटींचा व्यवसाय देखील उभारता येतो हे भावना व्होरा यांच्या ‘वॉर्मी’ने सिद्ध केले आहे.
Central Railway : मध्य रेल्वे सलग तिसऱ्या दिवशी ४५ मिनिटे उशिराने; प्रवाशांचे हाल
ठाणे : डोंबिवली स्थानकावर रिकाम्या रेल्वेचा डब्बा घसरला आणि संपूर्ण मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, त्या दिवसापासून लोकल या उशिराने धावत आहेत, आज तिसरा दिवस उजाडला तरी लोकल चे वेळापत्रक सुधारलेले दिसत नाही आहे, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोणताही अधिकृत मेगाब्लॉक जाहीर केलेला नसताना लोकलची वेळ बिघडल्यामुळे लोकलचा पुरता बोजवारा उडाला आहे.https://prahaar.in/2026/04/20/mumbai-local-empty-local-coach-derails-in-dombivli-train-schedule-disrupted/सोमवारची ती दुर्घटना आणि तीन दिवस मनस्तापसोमवारी डोंबिवली स्थानकात कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रिकाम्या लोकलचा एक डबा रुळावरून घसरला, आणि याच घटनेनंतर मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, काही लोकल रद्द झाल्या तर काही लोकलचा मार्ग बदलावा लागला, कमी काही तासातच पूर्ण होईल असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले होते परंतु काम पूर्ण झाले तरीही अद्याप रेल्वेचे वेळापत्रक सुधारलेले नाही. कल्याण ते ठाणे दरम्यान स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळत असून गाड्या अत्यंत धीम्या गतीने धावत आहेत.मेगाब्लॉकच्या वावड्या उठल्यासकाळची पहिलीच लोकल कासाराहून पाऊण तास उशिराने धावली. मिळालेल्या माहितीनुसार आसनगाव दरम्यान लोकल फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली होती. मात्र ठाण्यापासून पुन्हा ती स्लो ट्रॅकवर चालवण्यात आली. जेव्हा प्रवाशांनी याबाबत विचारणा केली असता रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉकचे कारण पुढे करण्यात आले.https://prahaar.in/2026/04/21/diagnostic-center-in-borivalis-punjabi-galli-handed-over-to-a-private-entity/प्रवाशांचा तीव्र संतापसलग तीन दिवस मध्य रेल्वेची वाहतूक गर्दीच्या वेळेला विस्कळीत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. या त्रासामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी दिसत आहे. आमच्या वेळेला किंमत नाही का ? असा सवाल प्रवासी विचारू लागले आहेत.
डॉ. दीपक शिकारपूर माणसाला सर्वात हवीशी वाटणारी आणि अत्यावश्यक असलेली एक बाब नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे. ती म्हणजे व्यक्तिगत गुप्तता उर्फ ‘प्रायव्हसी’! तसे पाहिले तर ती आताच हाताबाहेर जात आहे. दुकानांमध्ये, रस्त्यावर कॅमेरे असतातच. शिवाय संगणकांमध्ये, हँडसेटमध्ये, गाडीमध्ये ‘जीपीएस’ असते. पण स्मृतिभ्रंशासारख्या रोगांचे प्रमाणदेखील वाढत असल्याने आपले काय हरवले आहे, तेच बहुधा आपण विसरून जाऊ!माझ्याकडे १८८० मधले एक दुर्मीळ पुस्तक आहे!’ एखादा संग्राहक अभिमानाने सांगतो. आपल्यालाही त्याचे कौतुक वाटते, कारण इतकी जुनी वस्तू त्याने जीवापाड जपलेली असते आणि पुढच्या पिढ्यांना ऐतिहासिक संदर्भ म्हणून तिचा (कदाचित) उपयोग होणार असतो... ‘कदाचित’ असे म्हटले कारण चक्रावणाऱ्या वेगाने तांत्रिक प्रगती होण्याच्या या दिवसांमध्ये बदलती जीवनशैली आणि संकल्पनांमध्ये कोण जाणे किती व्यक्तींना अशा संग्राहकांचे आणि त्यांच्याकडे असलेल्या वस्तूंचे महत्त्व वाटेल! हे झाले वस्तूंचे उदाहरण. तंत्रज्ञानातील बदलांसोबत संबंधित उपकरणांचे दृश्य रूप आणि कार्यपद्धतीदेखील किती आणि कशी बदलते पाहा. तसेच होणारे सर्वच बदल चांगलेच असतील असेही नाही; परंतु त्या दिशेने प्रवास सुरू आहे हे नक्की!२०३५ पर्यंतच्या अत्याधुनिक काळात सर्वात आधी बळी पडणार आहे टपाल आणि तार खात्याचा म्हणजेच पोस्टाचा. गंमत पाहा, फक्त दहा-पंधरा वर्षांपूर्वी हे विधान अतिशयोक्तीपूर्ण वाटले असते. कारण शहरी भाग वगळला तरी खेड्यापाड्यांमधील लोक तोपर्यंत संवादाच्या विविध माध्यमांसाठी पोस्टावर अवलंबून असत; परंतु मोबाइल फोनच्या क्रांतीने हे भाकीत पार उलटे करून टाकले. शिवाय येणारा जमाना तत्काळ उर्फ ‘इंस्टंट’चा आहे. मोबाइल फोन, संगणक, इंटरनेटच्या वापराने लगेचच संभाषण आणि संदेशवहन होत असताना उशिराने मिळणाऱ्या टपालसेवेवर कोण अवलंबून राहील? तसेच तंत्रज्ञानाबरोबरच खासगी कुरियर सेवेने टपाल खात्याचा महसूल बऱ्यापैकी खाल्ला आहे. ही सेवा चालवणे सरकारला दिवसागणिक न परवडणारे होत चालले आहे, हे तर आपण पाहतोच आहोत. खरे तर, हळूहळू का होईना, पोस्ट ऑफिसचे रूपांतर बँकेमध्ये होऊ लागले आहे. बँकेवरून आठवले, चेकदेखील पोस्टाच्याच वाटेने जात आहे, हे वाचून बहुतेकांना आश्चर्य वाटेल; पण ते खरे आहे. चेकवरील प्रशासकीय प्रक्रिया करण्यामागचा खर्च अनेक बँका आणि वित्तसंस्थांना दिवसेंदिवस न पेलवणारा होत आहे. खुद्द ग्रेट ब्रिटनमध्ये २०२८ पर्यंत धनादेशाला त्याच्या सिंहासनावरून पायउतार करण्याबाबतची योजना कार्यान्वित झाली आहे. ‘प्लास्टिक मनी’ म्हणजेच विविध क्रेडिट-डेबिट-प्रीपेड कार्डे, फोन बँकिंग आणि इंटरनेट याद्वारे होणाऱ्या आर्थिक व्यवहारांची संख्या जगभर विलक्षण वेगाने वाढत असल्याचाही हा परिणाम आहे.या यादीमध्ये पुढचे नाव आहे वृत्तपत्रांचे. वाचक म्हणतील आता हे फारच झाले, आपल्याकडे असे होणे शक्यच नाही. शिवाय गरम चहाचे घुटके घेत पेपर वाचण्याची मजा कोण सोडेल? हे घडून येण्यासाठी कदाचित जरा वेळ लागेल (भारतामध्ये २०३५ पर्यंत वृत्तपत्रांचा खप उतरणीला लागलेला असेल असा काहीजणांचा अंदाज आहे.) पण जागतिक पातळीवरचा कल तसा आहे खरा. जगभरातील अनेक युवक-युवतींनी दररोजचे वृत्तपत्र विकत घेणे बंद केले आहे. (अर्थात आपल्याकडच्या तुलनेने बाहेरच्या देशांमध्ये वृत्तपत्रे खूपच महाग असतात हेदेखील तितकेच खरे.) त्यांचे म्हणणे बातम्या काय, इंटरनेट, रेडिओ किंवा मोबाइल फोनवर मिळतातच. शिवाय वृत्तपत्रांच्या मालकांनीही हे वारे ओळखून ई-आवृत्त्या सुरू केल्या आहेतच. त्यावर जास्त तत्परतेने ताज्या बातम्या कळण्याची शक्यता असल्याने त्या लोकप्रिय होत आहेत. छापील वृत्तपत्रांकडून आपला विषय पुस्तकांकडे जाणे नैसर्गिक आणि अपरिहार्य आहे, नाही का? वैयक्तिक तसेच सार्वजनिक पातळीवरचे छापील पुस्तकांचे साम्राज्य प्रचंड असले तरी त्याला दोन अंगभूत मर्यादा आहेत. पुस्तकांचे वजन आणि त्यांना लागणारी जागा. शिवाय देखभाल आहेच. दोन-तीन हजार पुस्तके सहज घरी बाळगणाऱ्या खऱ्या पुस्तकप्रेमींना या अडचणींचा चांगलाच अनुभव असतो. तसेच नव्या पिढीचे वाचन एकंदरीतच कमी झाले आहे, असेही दिसते. त्यामागची कारणे काहीही असोत.बरे, आजकाल पुस्तके ऑनलाइन खरेदी करता येतात. ‘अमेझॉन’वर मिळणाऱ्या ‘किंडल’ सारख्या इलेक्ट्रॉनिक साधनामध्ये हजारो पुस्तके मावतात. अशी साधने स्वतःच्या बॅटरीवर सात-आठ दिवसदेखील चालतात. कुठेही बसून कितीही वाचा! बोटांना पाने उलटण्याऐवजी ‘पेज डाउन’चे बटन दाबण्याची सवय लागली की झाले! दूरध्वनीच्या लँडलाइन जोडणीबाबत मात्र कोणाचे दुमत असेल, असे वाटत नाही. जगात तर सोडाच, भारतातदेखील अनेक कुटुंबांमध्ये मुले लहान असल्याने अशांनी लँडलाइन जवळजवळ नाइलाजानेच सांभाळली आहे. काहींनी तर कित्येक वर्षांची दोन पिढ्यांची सवय आहे म्हणूनच बहुधा लँडलाइन ठेवली असावी. मोबाइल फोनच्या सेवेतील तांत्रिक प्रगती, ‘नंबर पोर्टेबिलिटी’ अशा सुविधांमुळे लँडलाइनचे अस्तित्वच धोक्यात येणार हे उघड दिसते आहे.संगीत अर्थातच नष्ट होणार नाही; परंतु त्याच्या उपलब्धतेचे मार्ग आणि पद्धती बदलतील. खरे तर संगीत उद्योगातील फायदा दिवसेंदिवस कमी होत आहे. पायरसी उर्फ अनधिकृत वापर आणि वितरण, हे त्यामागील एक मोठे कारण आहेच; परंतु (जरा वादाचा मुद्दा असलेली) आणखी एक गंभीर बाबदेखील यात समाविष्ट आहे. संगीतातील सर्जनशीलता, उत्स्फूर्तता आणि नवनिर्मिती कमी होत आहे. सध्याच्या ‘रीमिक्स’च्या संख्येवरून हे सहज समजून येईल. शिवाय फाइल शेअरिंग आणि सुलभ डाउनलोडिंगच्या तंत्रामुळे ‘सीडी’च्या जमान्यात भरपूर व्यवसाय करणारा संगीतउद्योग, आता आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आला आहे.इंटरनेटमार्फत मिळणाऱ्या सुविधा आणि त्यांचा प्रसार अनंत असल्याने रेकॉर्ड्स, कॅसेट आणि सीडी असा प्रवास करून आलेला संगीत उद्योग- त्याने स्वतःचीच भविष्यकालीन धोरणे तपासून न पाहिल्याने सध्या तरी जरा गोंधळलेल्या अवस्थेत आहे. याबाबत ‘रोलिंग स्टोन्स’ या जगप्रसिद्ध वाद्यवृंदाशी संबंधित असलेल्या स्टीव्ह नॉपरने एक पुस्तकही लिहिले आहे. आपल्याकडे दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्या, डीटीएच आदींचे प्रस्थ सध्या वाढत असले तरी जागतिक पातळीवर पारंपरिक अर्थाने टीव्ही पाहणे कमी होत आहे. याची कारणे दोन. एक तर ‘लाइव्ह स्ट्रीमिंग’ सारख्या तंत्रांमुळे संगणकावर तसेच सेलफोनमार्फत थेट टीव्ही उपलब्ध होण्याचे प्रमाण आणि वेग वाढतो आहे. तसेच कॉम्प्युटर गेम्ससारखे करमणुकीचे इतर प्रकारही संगणकावर मिळत असल्याने त्यापासून दूर जाऊन वेगळे माध्यम वापरण्याची गरज कमी होत आहे. ‘नेटफ्लिक्स’सारख्या सुविधेमुळे प्रेक्षकाला काय पाहावे, याबाबतचे निर्णयस्वातंत्र्य मिळू लागले आहे. शिवाय टीव्हीवरील वाढत्या जाहिरातींमुळे मूळ कार्यक्रमाचा एकंदर कालावधी वाढत चालला आहे. बरे, जाहिराती न दाखवण्याने वाहिन्यांची पंचाईत होते. कारण प्रक्षेपणाचा वाढता खर्च. असे हे दुष्टचक्र किती काळ नीट चालते ते पहायचे!आता आपल्या ध्यानात आले असेल, की भविष्यात संगणक वा तत्सम सुविधा खरेदी करण्याची किंवा सीडीवरचे सॉफ्टवेअर, पुस्तके वा संगीत जवळ बाळगण्याची कदाचित गरजच भसणार नाही. विशिष्ट सेवाशुल्क देऊन आपण क्लाउडमध्ये मिळणारी सर्व पूरक साधने आणि उपकरणे वापरू शकू. कोणत्याही लॅपटॉप वा हँडसेटमार्फत आपण महाजालात ‘ठेवलेल्या’ आपल्या वस्तूंपर्यंत ‘पोहोचू’ शकू. ‘मायक्रोसॉफ्ट विंडोज’ आणि ‘ॲपल मॅक’ हे ओएसचे प्रमुख उत्पादक आणि ‘गूगल’ यांनी एकत्र येऊन, इंटरनेटच्या माध्यमाद्वारे, अशी सेवा पुरवण्याच्या दृष्टीने फार मोठी पावले यापूर्वीच टाकली आहेत. अर्थात यामुळे मानवी मनातल्या ‘हे माझे आहे!’ या स्वामित्वाच्या कल्पनेला कदाचित तडा जाईल. कारण महाजालावरच्या आपल्या वस्तू प्रत्यक्ष नाही, तर आभासी (व्हर्चुअल) स्वरूपात असतील! आत्तापर्यंतच्या भविष्यकथनात वर्णिलेल्या वस्तू गेलेल्या परवडल्या, असे म्हणण्याची पाळी कदाचित २०३५ पर्यंत येणार आहे. कारण माणसाला सर्वात हवीशी वाटणारी (आणि अत्यावश्यक असलेली) बाब नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे. ती म्हणजे व्यक्तिगत गुप्तता उर्फ ‘प्रायव्हसी’! तसे पाहिले तर ती आत्ताच जाऊ लागली आहे. दुकानांमध्ये, रस्त्यावर कॅमेरे असतातच. शिवाय संगणकांमध्ये, हँडसेटमध्ये, गाडीमध्ये ‘जीपीएस’ असते. पण याचीही चिंता करायचे फारसे कारण नाही. स्मृतिभ्रंशासारख्या (अल्झायमर्स) रोगांचे प्रमाणदेखील वाढत असल्याने आपले काय हरवले आहे, तेच बहुधा आपण विसरून जाऊ!
Iran US Conflict डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, होर्मुज सामुद्रधुनी बंद राहिल्यास इराणला मोठा आर्थिक फटका बसतो. त्यामुळे इराण फक्त राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी हा मार्ग बंद ठेवण्याची भाषा करत आहे.
Pahalgam Attack Anniversary : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला
Oily Skin Tips: ऑयली स्किनचा त्रास? या सोप्या टिप्सने मिळवा फ्रेश, चमकदार आणि तरुण त्वचा!
Oily Skin Tips तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात तापमान वाढल्याने त्वचेतील तेलनिर्मिती वाढते. हे अतिरिक्त तेल, घाम आणि धूळ यांच्यासोबत मिसळून त्वचेचे पोर्स ब्लॉक करतात. त्यामुळे त्वचा अधिक तेलकट दिसते आणि त्वचेच्या समस्या वाढतात.
Top 10 News: राज्य, देश-विदेश, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी....
Kritika Kamra: “मला कोणावर अवलंबून राहायचं नाही!”…कृतिका कामराचं करिअर आणि लग्नाबद्दल स्पष्ट मत
Kritika Kamra कृतिका कामराने ३७ व्या वर्षी गौरव कपूरसोबत लग्न केलं. उशिरा लग्न केल्याबद्दल ती म्हणते की, “लहान वयात लग्न न केल्याचा मला खूप आनंद आहे. त्या वयात आपली विचारसरणी पूर्ण विकसित झालेली नसते.” ती सांगते की, तिच्या कुटुंबाने कधीही लग्नासाठी दबाव टाकला नाही.
KEM Hospital in Parel : परळच्या केईएम रुग्णालयाचे नाव बदलणार, तरीही इंग्रजी संशिप्त नाव तेच राहणार
मुंबई :मुंबईतील ब्रिटीशकालिन रस्त्यांची तसेच वास्तूंची नावे बदलण्याचा सपाटा सुुर असतानाच आता केईएम रुग्णालयाचेही नाव बदलण्यात येणार आहे. परळ येथील किंग एडवर्ड मेमोरियल अर्थात के. ई. एम. रुग्णालय रुग्णालयाचे नामकरण 'कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय' केले जाणार आहे. मात्र हे नामकरण केले जाणार असले तरी इंग्रजीतील संशिप्त नाव हे के.ई.एम असेच राहणार आहे.राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षांना पत्र लिहून स्वदेशी वारसांच्या सुसंगततेसाठी केईएम रुग्णालयाचे पुनर्नामकरण करण्याची मागणी केली आहे. हे पत्र आता सार्वजनिक आरोग्य समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. या पत्रामध्ये लोढा यांनी असे म्हटले आहे की, स्वदेशी' या प्रेरणादायी संकल्पनेच्या प्रभावाखाली आपला देश समृध्द स्वदेशी वारसा पुनर्प्रस्थापित आणि गौरव करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक संस्थांच्या परकीय नावांचे पुनर्नामकरण करणे आवश्यक आहे. आजमितीपर्यंत अनेक संस्था वसाहतवादी काळातील नावांचा वापर करत आहे. जे दास्याच्या काळाची आठवण करून देतात. या वास्तुंना देण्यात येणाऱ्या नावांची जागा ही आपली संस्कृती, मुल्ये आणि प्रेरणादायी इतिहास जपण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक व्यक्तींना सन्मान देणाऱ्या नावांनी घेतली पाहिजे. याकरता , किंग एडवर्ड मेमोरियल (के.ई.एम.) रुग्णालय या मुंबईतील संस्थेचे पुनर्नामकरण झाल्यास भारतीय इतिहास आणि संस्कृतीतून निवडलेले नाव भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.त्यामुळे , किंग एडवर्ड मेमोरियल (के. ई. एम. रुग्णालय) रुग्णालयाचे 'कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय' (केईएम) असे पुनर्नामकरण करण्यात यावे,असे म्हटले आहे.
Mulnd Stray Dog Shelters : आणिक आणि मुलुंडमधील भूखंडांचे भटक्या श्वानांच्या निवारासाठी वगळणार आरक्षण
मुंबई :महापालिकेच्या एम पूर्व विभागातील आणिक भूखंडावरील रुग्णालय आणि टी विभागातील मुलुंडमधील घनकचरा व्यवस्थापन सुविधा ही आरक्षणे वगळून आता त्याठिकाणी जनावरांचे रुग्णालय तथा पशुनिवारा याबाबतचे आरक्षण टाकण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणचे आरक्षण वगळून त्याठिकाण भटक्या श्वान निवारा केंद्र आणि निर्बिजीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेले निर्णय आणि शासनाच्या निर्णयानुसार शैक्षणिक संस्था, रुग्णालये, रेल्वे स्थानके, बस स्थानके व आगार, क्रीडा संकुले इ. परिसरातील भटक्या श्वानांची नसबंदी करून श्वान निवारागृहात कायमस्वरूपी ठेवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार पशुवैद्यकीय आरोग्य खाते तथा देवनार पशुवधगृहाने आदींच्या परिसरातील भटक्या श्वानांची नसबंदी करून श्वान निवारागृहात कायमस्वरूपी ठेवण्यासंदर्भात महानगरपालिका विभागाअंतर्गत जागांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याप्रमाणे महापालिकेच्या एम पूर्व विभागातील आणिक भूखंडावरील रुग्णालय आणि टी विभागातील मुलुंडमधील घनकचरा व्यवस्थापन सुविधा ही आरक्षण वगळून आता त्याठिकाणी जनावरांचे रुग्णालय तथा पशुनिवारा याबाबतचे आरक्षण टाकण्याचा निर्णय घेतला आहे.https://prahaar.in/2026/04/21/bmc-news-live-telecast-of-house-proceedings-in-the-153-year-history-of-the-mumbai-municipal-corporation/क्षेत्रात भटक्या श्वानांसाठी निवारागृहे स्थापन करण्यासाठी महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या पि शोध घेण्यासाठी प्रमुख अभियंता (विकास नियोजन) कार्यालयास अवगत केले. मुंबई महापालिकेच्या मंजूर विकास आराखडा २०३४ नुसार जनावरांचे तथा गुरांचे रुग्णालय या करीता एक भूखंड एफ/ दक्षिण विभागात आरक्षित असून विकास नियोजन विभागाने ताब्यात घेतलेल्या भुखंडांपैकी या प्रयोजनाकरिता वापरता येऊ शकणार आहे. तसेच'पी/उत्तर' विभागातील ५ टक्के सुविधा भुखंड असुन हा भूखंड कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनाकरीता आरक्षित नाही. याशिवाय 'एम/पूर्व' विभागातील भुखंड रुग्णालयाकरिता आरक्षित असुन 'एम/पश्चिम' येथील भुखंड महानगरपालिका प्रसुतीगृह महानगरपालिका दवाखाना व आरोग्य केंद्र याकरीता आरक्षित आहे. त्यामुळे 'एम/पूर्व' किंवा 'एम/पश्चिम' येथील भूखंड श्वान निवारागृहाकरिता वापरावयाचा असल्याबाबत 'ना-हरकत' प्राप्त करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागास पत्रव्यवहार करण्यात आला असता, त्यानुसार 'एम/पूर्व' विभागातील आणिक येथील स्थित अंदाजे ८४११.५० चौ.मी. इतके क्षेत्रफळ असलेली जागा श्वान निवारागृहासाठी वापराबाबत 'ना-हरकत' दिलेली आहे.'टी' विभागातील न.भू.क्र. १३०८ मौजे मुलुंड (पुर्व) या आरक्षित भूखंडावर या पूर्वीच मा. महानगरपालिका आयुक्त ह्यांनी मंजूरी दिल्यानुसार ४२२ चौ. मी. इतके क्षेत्रफळ असलेल्या जागेत महापालिकेने श्वान निंबीजीकरण केंद्र व्ही- टिम या प्राणी कल्याण संस्थेमार्फत् स्थापित केले आहे. तेथेच लगत असलेल्या अंदाजे ३००० चौ.मी. इतके क्षेत्रफळ असलेला भूखंड महानगरपालिकेच्या श्वान निवारागृहे करिता पशुवैद्यकीय आरोग्य खाते तथा देवनार पशुवधगृहाला 'मा-हरकत' प्राप्त झाली आहेत.https://prahaar.in/2026/04/20/bmc-all-assistant-commissioners-must-prioritize-cleanliness-in-their-respective-zones-additional-commissioners-directive/भूखंडावर श्वान निवारागृहे महानगरपालिकेमार्फत बांधण्यास किंवा सार्वजनिक भागीदारी तत्वावर कमीत कमी १० वर्षासाठी स्वारस्य अभिव्यक्ती मागवून या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे 'टी' विभागातील न. भू. क्र. १३०१ ऐवजी न. भू. क्र. १३०८ हा भूखंड सद्यस्थितीतील वापरानुसार प्रस्तावित श्वान निवारागृह या प्रयोजनाकरिता योग्य असल्याचे सबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. परंतु, या भूखंडापर्यंत पोहचण्याकरिता थेट प्रवेश मार्ग अस्तित्वात नाही. त्यामुळे या भूखंडालगतचा भूखंड न.भू.क्र.१३०४ (भाग) व न.भू.क्र.१३०५ (भाग) हा २७.४५मी. रुंद प्रस्तावित विकास नियोजन रस्त्याने बाधित असल्याकारणाने मुलुंड पूर्व येथील हे तीनही भूखंड मिळून एकूण ३०००.०० चौ. मी. क्षेत्रावर श्वानांचे निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे.
Bhabha hospital : वांद्रे भाभा, कुर्ला भाभा आणि भगवती रुग्णालयांत कॅथलॅब
पुढील ३० वर्षांसाठी संस्थांची केली निवडरुग्णालयातील जागा भाडेतत्वावर देण्यात येणारमुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे के. बी. भाभा रुग्णालय, कुर्ला के. बी. भाभा रुग्णालय, आणि बोरीवलीतील हरीलाल भगवती रुग्णालय या तीन उपनगरीय रुग्णालयांमध्ये कॅथ लॅब सुरु करण्यात येणार आहे. यासाठी अनुक्रमे रुबी ऐल केअर सर्विसेस प्रा. लिमिटेड व सुराना चेरीटेबल ट्रस्ट या संस्थेची निवड करण्यात आली असून प्रत्येकी दहा याप्रमाणे तीस वर्षांकरता या संस्थेच्यावतीने कॅथ लॅब चालवण्यासाठी जागा भाडेतत्वावर दिली जाणार आहे.मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे के. बी. भाभा रुग्णालय, कुर्ला के. बी. भाभा रुग्णालय, आणि बोरीवलीतील हरीलाल भगवती रुग्णालय या ३ उपनगरीय रुग्णालयांमध्ये कॅथ लँब या रुग्णोपयोगी सुविधा सार्वजनिक खाजगी सहभाग प्रोत्साहन धोरणांतर्गत प्रथम १० वर्षाकरिता व नंतर सेवा समाधानकारक असल्यास दहा अधिक दहा वर्षासाठी नूतनीकरणास सापेक्ष अशा एकूण ३० वर्षाकरिता सुरु करण्याबाबत महापालिकेच्यावतीने निविदा मागण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त संस्थेची कॅथलॅब करता निवड करून संबंधित रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी ही जागा देण्याबाबत प्रशासनाच्यावतीने प्रस्ताव सुधार समितीत सादर करण्यात आला अहे.केईएम, शीव, नायर, आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमध्ये कॅथलॅब सुविधा उपलब्ध आहेत. केईएम रुग्णालयात नुकतीच 'रॅडियल लाऊंज'सह अत्याधुनिक सुविधा सुरू करण्यात आली आहे.कॅथलॅब ही हृदयविकाराचे निदान आणि उपचारांसाठी वापरली जाणारी अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे, जिथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि स्टेंटिंग यांसारख्या प्रक्रिया कमीत कमी चिरफाड करून केल्या जातात. वाढत्या हृदयविकार रुग्णांमुळे सरकारी रुग्णालयांमध्ये पीपीपी तत्त्वावर कॅथलॅब सुरू करण्यात येत आहेतया कॅथ लॅबसाठी अशाप्रकारे केली संस्थांची निवडके. बी. भाभा रुग्णालय, वांद्रेएकूण क्षेत्रफळ : ४८९.१० चौरस मीटरवार्षिक शुल्क : १३ लाख १२ हजार ०९० रुपयेसंस्थेची नेमणूक : रुबी ऐल केअर सर्विसेस प्रा. लि.के. बी. भाभा रुग्णालय, कुर्लाएकूण क्षेत्रफळ : २१०.६१ चौ. मीटरवार्षिक शुल्क : २ लाख ८५ हजार रुपयेसंस्थेची नेमणूक : रुबी ऐल केअर सर्विसेस प्रा. लिबोरीवली हरीलाल भगवती रुग्णालय, बोरीवलीएकूण क्षेत्रफळ : ७३०.७३ चौ. मीटरवार्षिक शुल्क : ९ लाख रुपयेसंस्थेची नेमणूक : सुराना चेरीटेबल ट्रस्ट

29 C