मुंबई: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन १९ आणि २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत आयोजित करण्यात येणाऱ्या एआय इम्पॅक्ट समिटसाठी भारतात येत आहेत. मॅक्रॉन यांचा हा भारत दौरा चार दिवसांचा असून, आज म्हणजेच सोमवार १६ फेब्रुवारी रोजी मॅक्रॉन मुंबईला भेट देणार आहेत. त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित असतील. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे.अवजड वाहनांना बंदी:याबाबत मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार मंगळवारी (१७, फेब्रुवारी) सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत वाकोला उड्डाणपूल ते दहिसर टोल नाक्यापर्यंत अवजड वाहनांना प्रवेश मिळणार नाही. दोन्ही बाजूंकडील वाहतूक सामान्य वाहनांसाठी सुरू असली, तरी सुरक्षेमुळे काही ठिकाणी वेग मंदावण्याची शक्यता आहे. हे दोन्ही नेते मुंबईत एका संयुक्त निवेदनाद्वारे द्विपक्षीय सहकार्यावर भाष्य करणार आहेत.या वाहनांना बंदीतून सूट:- रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या- पोलीस आणि सुरक्षा व्यवस्थेतील सरकारी वाहने- अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी घेतलेली वाहनेनागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी दिला आहे.राफेल करार:शत्रुराष्ट्रांच्या कोणत्याही आक्रमक हालचालींना तात्काळ आणि चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकार मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि दारूगोळा खरेदी करण्याच्या तयारीत असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संरक्षण अधिग्रहण परिषद (डिफेन्स अक्विझिशन कौन्सिल – डीएसी) लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या क्षमतेत लक्षणीय वाढ करणारे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. संरक्षण अधिग्रहण परिषद (डीएसी) लष्करासाठी शंभरपेक्षा जास्त राफेल लढाऊ विमाने, पी-८ आय मरिटाइम पॅट्रोल आणि अंटी सबमरिन वारफेअर एअरक्राफ्ट तसेच मरिन गॅस टर्बाईन इंजिनसह विविध साहित्य खरेदी करण्याची तयारीत आहे.
उदयपूरमध्ये लग्नानंतर मार्च महिन्यात हैदराबादमध्ये भव्य रिसेप्शन आयोजित केले जाईल, अशीही चर्चा आहे. 4 मार्च रोजी मोठ्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा कार्यक्रम होऊ शकतो. या रिसेप्शनला साऊथ इंडस्ट्रीतील मोठे कलाकार तसेच बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध चेहरे उपस्थित राहू शकतात.
German Galushchenko: युक्रेनचे माजी ऊर्जामंत्री जर्मन गालुश्चेन्को यांना ताब्यात घेण्यात आले आहे. वृत्तानुसार, त्यांना देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली.
नवी दिल्ली: भारताच्या अर्थव्यवस्थेतील पुढील मोठ्या बदलात खासगी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. देशाला “विकसित भारत” बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उद्योग क्षेत्राने नवोन्मेष, क्षमता वाढ आणि जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी धाडसी गुंतवणूक करावी लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.रविवार १५ फेब्रुवारी रोजी माध्यमांना दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांच्या सरकारने ‘शब्दांमध्ये आणि भावनेतही’ सुधारणा (रिफॉर्म) यांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या मते, धोरणातील सातत्य आणि निर्णायक नेतृत्वामुळे देशात मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. त्यांनी म्हटले की, उत्पादकता वाढल्यावर खासगी क्षेत्रातील मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांबरोबर नफा न्याय्य पद्धतीने वाटून घ्यावा. तसेच उद्योगांनी कमी नफा सुरक्षित ठेवण्यावर भर न देता संशोधन व विकास (R&D), पुरवठा साखळी आणि गुणवत्तेत अधिक गुंतवणूक करावी.डिजिटल क्षेत्रात भारताची जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल:मोदी पुढे म्हणाले की; भारताचे मुक्त व्यापार करार (FTA) अशा प्रकारे तयार करण्यात आले आहेत की टेक्सटाईल, लेदर, केमिकल्स, हस्तकला आणि रत्न यांसारख्या क्षेत्रातील एमएसएमई उद्योगांना नवीन बाजारपेठा उपलब्ध होतील. त्यांनी म्हटले की भारत आज डिजिटल क्षेत्रात जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत आहे. व्यवहार करण्याच्या पद्धतीत झालेल्या मोठ्या बदलांमुळे, विशेषतः युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) प्लॅटफॉर्ममुळे हे शक्य झाले आहे.त्यांनी पुढे सांगितले की डेटा सेंटर्समुळे युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. भारत जगभरातील डेटा साठवण्यासाठी तयार आहे. तसेच देशात संगणकीय क्षमता आणि डेटा सेंटर पायाभूत सुविधा वाढवून मजबूत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) परिसंस्थेची पायाभरणी केली जात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न:संरक्षण क्षेत्राबाबत पंतप्रधानांनी सांगितले की बदलत्या परिस्थितीनुसार सैन्याचे आधुनिकीकरण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि देशाची संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील. पंतप्रधानांनी पुढे सांगितले की राजकीय स्थिरता आणि धोरणात्मक स्पष्टतेमुळे गुंतवणूकदारांचा भारतावर पुन्हा विश्वास निर्माण झाला आहे. त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या सरकारचा प्रत्येक निर्णय महिलांच्या कल्याणाचा विचार करून घेतला जातो आणि ‘विकसित भारत’ घडवण्यात महिलांची भूमिका सर्वात महत्त्वाची असेल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
NA Permission : नगररचना विभागाने मंजूर केलेला बांधकाम नकाशा हाच आता NA परवानगी म्हणून ग्राह्य धरला जाणार
AI Impact Summit 2026: नवी दिल्लीत आज एआय इम्पॅक्ट समिट २०२६ ला सुरुवात झाली. ही आंतरराष्ट्रीय परिषद भारत मंडपम याठिकाणी आयोजित केली जात आहे.
Satara: 'व्हॅलेंटाईन डे'ला चक्क शिक्षकाने विद्यार्थिनीला केला प्रपोज; 'तू का आली नाहीस म्हणत...'
सातारा: सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील मलकापूर शहरात 'व्हॅलेंटाईन डे' ला शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला एका शिक्षकानेच ‘प्रपोज’ करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी मलकापूर शहरातील एका शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.नेमकं प्रकरण काय?१४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलविले होते. भीतीपोटी मुलगी तीन मैत्रिणींना सोबत घेऊन बाहेर गेली. परंतु शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला थांबवले आणि म्हणाला, मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर ऑनलाईन का असतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो, एवढंच नाहीतर पीडित मुलीचा हात पकडल्याचा आरोप आहे.शिक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलघाबरलेल्या मुलीने हात झटकून वर्गात धाव घेतली. ही घटना तिने मैत्रिणी व कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रविवारी कराड शहर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धचा साखळी सामना भारताने ६१ धावांनी जिंकला. या विजयामुळे अ गटातून पुढील फेरीसाठी (सुपर एट) भारत पात्र झाला आहे. प्रेमदासा स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताने २० षटकांत सात बाद १७५ धावा केल्या. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानचा डाव १८ षटकांत ११४ धावांवर आटोपला. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात ४० चेंडूत ३ षटकार आणि १० चौकार मारत ७७ धावा करणारा ईशान किशन सामनावीर झाला.मात्र, टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये वाद झाल्याचं दिसून आलं. हार्दिक पांड्या कुलदीप यादववर चांगलाच भडकला होता.नेमकं काय झालं?मॅच संपवण्यासाठी सूर्यकुमार यादवने आपला स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याच्यावर पुन्हा विश्वास दर्शवला. हार्दिक पांड्याला 18 वी ओव्हर देण्यात आली होती. हार्दिक पंड्या या ओव्हरमध्ये शाहीन आफ्रिदीला बॉलिंग करत होता. ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर आफ्रिदीने एक हवेत शॉट मारला, जो सरळ कुलदीप यादवच्या दिशेने गेला. कुलदीपने तो सोपा कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या हातातून बॉल निसटला आणि थेट बाउंड्रीच्या बाहेर जाऊन पडला. पाकिस्तानला यामुळे सहा रन्स मिळाले अन् हार्दिक भडकला. Yesterday, Hardik Pandya and Kuldeep Yadav had a heated exchange after Kuldeep dropped a catch off Shaheen Afridi. Hardik was clearly unhappy with his reaction after the match, and his sharp reaction to Kuldeep was evident on the field.Kuldeep appeared upset by the… pic.twitter.com/KT8vPqYv7w— Shanu (@Shanu_3010) February 16, 2026हार्दिक भडकला सूर्यकुमारवर:ओव्हरच्या दुसऱ्या बॉलनंतर हार्दिकने कुलदीपला यावेळी काहीच बोललं नाही. हार्दिक सूर्यकुमारवर भडकला. कुलदीपला थर्ड मॅनला ठेव, असं हार्दिकने सूर्याला सांगितलं. त्यानंतर सूर्याने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हार्दिकने ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर 11 वा खेळाडू असणाऱ्या उस्मान तारिकचा बोल्ड काढला अन् टीम इंडियाने मॅच जिंकली. मात्र, इथंच राडा सुरू झाला.
Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराने आजच्या दिवसाची सुरुवात नकारात्मकतेने केली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५०, लाल रंगात उघडले.
Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ यांच्या या विधानानंतर भाजप आक्रमक. पुण्यात कॉँग्रेस-भाजपमध्ये जोरदार राडा देखील झाला.
Apurva Nemlekar: अपुर्वा नेमळेकरने चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का, पोस्ट करत...
मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी, म्हणजेच व्हॅलेंटाइन डेच्या दिवशीच, अपूर्वाने आपल्या आयुष्याच्या जोडीदारासोबत विवाहबंधनात अडकत प्रेमाला अधिकृत नाव दिले. समाज माध्यमावर लग्नाचे खास फोटो शेअर करत तिने ही गोड बातमी शेअर केली.झी मराठीवरील गाजलेल्या रात्रीस खेळ चाले या मालिकेत ‘शेवंता’ हे नकारात्मक पण लक्षवेधी पात्र साकारत अपूर्वा घराघरात पोहोचली. तिच्या अभिनयामुळे ‘शेवंता’ या भूमिकेचा स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण झाला. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत असतानाच अपूर्वाने आपल्या सरळ, स्पष्ट आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्वामुळेही प्रेक्षकांची मने जिंकली. यासोबतच, बिग बॉस मराठी ४ या पर्वात उपविजेती ठरल्यामुळे अपूर्वाची लोकप्रियता आणखी वाढली. बिग बॉसच्या घरात तिने दाखवलेली संयमशीलता, प्रामाणिकपणा आणि ठाम भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.लग्नानंतर शेअर केलेल्या भावनिक पोस्टमध्ये अपूर्वाने लिहिले की, आयुष्याने तिला अनेकदा कसोटीला लावले, तोडले आणि पुन्हा घडवले. पण, तिने प्रेमावरचा विश्वास कधीही सोडला नाही. अनेक वादळांनंतर देवाने तिला शांतता आणि सहवास दिला, असे सांगत तिने आपल्या नव्या आयुष्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आता ती अधिकृतपणे ‘सौ अपूर्वा तनुज गोवलकर’ झाली असल्याचे तिने अभिमानाने नमूद केले.
Narhari Zirwal: लाचखोरी प्रकरणाची गंभीर दखल; राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड
मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागामधील लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लाच घेताना पकडलेल्या लिपिकाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. संबंधित लिपिकाची केवळ चौकशीच नव्हे, तर त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. विभागातील दक्षता पथकाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. लिपिक राजू ढेरिंगे याच्याविरुद्ध वस्तुनिष्ठ आणि सर्वंकष अहवाल तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले आहे.लाच घेणारा कर्मचारी राजेंद्र ढेरिंगे याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी एसीबीने राजेंद्र ढेरिंगे याच्या नाशिक रोड येथील घराची झडती घेतली. या घरातून एसीबीच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात आता आणखी नवीन माहिती समोर येणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.राजेंद्र ढेरिंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी आहे. वर्षभरापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभाग येथे तो प्रतिनियुक्तीवर आला होता. तो मंत्र्यांच्या अपील विभागात कार्यरत असल्याची माहिती आहे. दरम्यान, आता राजेंद्र ढेरिंगेच्या घरातून एसीबीच्या हाती जी कागदपत्रे लागली आहेत त्यामुळे चौकशीला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. आज ही कागदपत्रं न्यायालयासमोर सादर केली जाऊ शकतात. तेव्हा एसीबीचे अधिकारी एखादी स्फोटक माहिती न्यायालयात सांगणार का, हे बघावे लागणार. राजेंद्र ढेरिंगे याच्या लाचखोरीचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.दरम्यान, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून अज्ञातवासात असलेल्या मंत्री नरहरी झिरवळ यांच्या हालचालींनाही वेग आल्याची माहिती आहे. नरहरी झिरवळ यांचा फोन सध्या स्वीच ऑफ आहे. ते आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत.नेमकं प्रकरण काय ?अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना मंत्रालयात सापळा रचून मोठी कारवाई केली. राजेंद्र ढेरिंगे असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. औषध दुकानाचा निलंबित परवाना पूर्वरत करून देण्यासाठी त्याने ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावर ही कारवाई झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. तक्रार आल्यानंतर मंत्री नरहरी िझरवाळ यांच्या कार्यालयात अँटी करप्शन ब्युरोचे सहा अधिकारी पोहोचले होते. कारवाई करताना झिरवाळ यांचं कार्यालय पूर्ण ताब्यात घेतले. तपास झाल्यानंतर मग या संबंधित लिपिकाला ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यालय उघडण्यात आले.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भारत भेट केवळ एक राजनैतिक कार्यक्रम नाही. यासोबत 3.60 लाख कोटी रुपयांच्या 114 राफेल फायटर जेट्सच्या संभाव्य कराराची चर्चा आहे, जो भारतीय वायुसेनेसाठी ऑक्सिजन ठरू शकतो. चीन-पाकिस्तानकडून दोन आघाड्यांवर मुकाबला करण्यासाठी भारतीय वायुसेनेसाठी 42.5 स्क्वाड्रन मंजूर करण्यात आले आहेत. सध्या भारताकडे सुमारे 29 स्क्वाड्रन कार्यरत आहेत, म्हणजे गरजेपेक्षा 13 कमी. यामध्येही पुढील 10 वर्षांत जग्वार, मिग-29 आणि मिराज-2000 सारखे अनेक सध्याचे ताफे निवृत्त होतील. त्यामुळे अनेक प्रश्न आहेत- 114 नवीन राफेलचा करार किती महत्त्वाचा आहे, 42.5 स्क्वाड्रन पूर्ण होण्यास किती वेळ लागेल आणि जेव्हा चीन सहाव्या पिढीच्या जेट्सवर पुढे सरकला आहे आणि पाकिस्तानलाही पाचव्या पिढीचे जेट्स मिळणार आहेत, तेव्हा भारताची रणनीती काय आहे. मंडे मेगा स्टोरीमध्ये संपूर्ण कथा... ***** ग्राफिक्स: द्रगचंद्र भुर्जी आणि अजित सिंग -------------------------
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत घसरण; चांदी ८,००० रुपयांनी खाली, जाणून घ्या आजचा भाव
Gold Silver Price Today: जागतिक बाजारातील घडामोडी आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेतील बदलांचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर दिसून येत आहे. बुलियन्स वेबसाइटनुसार,
Samuel Paparo: अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे कमांडर अॅडमिरल सॅम्युअल जे. पापारो यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे तोंडभरून कौतुक केले आहे.
Nagpur Crime: नागपूरात खळबळ! भाजप नगरसेविकेच्या पतीवर हल्ला
नागपूर: नागपुर जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये नितीन शिमले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास जुनी शुक्रवारी परिसरात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत अधिक तपास सुरु केला आहे. परंतु या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.नितीन शिमलेसह भाजप कार्यकर्ता गंभीर जखमीकोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन शिमले आणि आरोपी सोनू ठाकरे उर्फ पैलवान यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद होते. यावरून सोनू पैलवानने रविवारी रात्री जुनी शुक्रवारी चौकात नितीन शिमले याच्यावर चाकुने हल्ला केला. या हल्ल्यात शिमले गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस लगेच घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी जखमी नितीन यांना रुग्णालयात दाखल केले. तर मारेकरी सोनू ठाकरे हा घटनास्थळावरून फरार झाला असून सध्या पोलीस सोनू पैलवानचा शोध घेत आहे.दरम्यान, जुन्या वादातून मित्र महेश ठाकरेने भाजपाच्या नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. धारधार शस्त्राने हा हल्ला केल्याने शिमले गंभीर जखमी झाले आहेत. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनी शुक्रवारी परिसरातील ही घटना घडली. जुन्या हत्येच्या प्रकरणात नितीन शिमले व महेश ठाकरे आरोपी होते. सध्या नितीन शिमले यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिसांचा तपास सुरु आहे.
Gram Panchayat : राज्यातील सर्व ग्रामपंचायती एकदिवसीय लाक्षणिक संपावर जाणार असल्याची घोषणा
अफवांवर प्रतिक्रिया देताना मृणालने हसतच उत्तर दिलं. एका मुलाखतीत ती म्हणाली की, या अफवा तिला मजेदार वाटतात. “लोकांच्या मते तर माझं लग्नही झालं आहे,” असं ती गंमतीने म्हणाली. पुढे ती म्हणाली, “मी 3 कोटी, 6 कोटी किंवा 10 कोटी रुपये खर्च केले तरी एवढी प्रसिद्धी मिळाली नसती. त्यामुळे या खोट्या अफवा पसरवणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते.”
Top 10 news:
JEE Main 2026 Session 1 Result: जेईई मेनचा निकाल आज जाहीर होणार, 'या'वेबसाईटवर पाहू शकता अपडेट्स
JEE Main 2026 Session 1 Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) आज जेईई (मेन) २०२६ सत्र १ चा (JEE Main 2026 Session 1) निकाल जाहीर करणार आहे. मूळ निकाल १२ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार होता, तो १६ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. एकदा जाहीर झाल्यानंतर, उमेदवार त्यांचे जेईई मेन २०२६ चे निकाल आणि कट-ऑफ गुण अधिकृत वेबसाइट nta.ac.in आणि jeemain.nta.nic.inवर तपासू शकतील.जेईई मेन २०२६ सत्र १ च्या तात्पुरत्या उत्तर कीसाठी आक्षेप विंडो ६ फेब्रुवारी रोजी बंद झाली. उमेदवारांनी सादर केलेल्या आव्हानांचा आढावा घेतल्यानंतर, एनटीए अंतिम उत्तर की प्रकाशित करेल. जेईई मेन २०२६ चे गुण भारतातील सहभागी सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये बीई/बीटेक, बीएआरएच आणि बीप्लॅनिंगसारख्या पदवीपूर्व कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी वापरले जातील.जेईई मेन २०२६ सत्र १ परीक्षा (JEE Main 2026 Session 1 Exam)सत्र १ ची परीक्षा २१ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान संगणक-आधारित पद्धतीने घेण्यात आली. ही परीक्षा दररोज दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली - सकाळची शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारची शिफ्ट दुपारी ३ ते संध्याकाळी ६.बीई/बीटेक पेपर्ससाठी, परीक्षा २१ जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान घेण्यात आली. उमेदवार आणि तज्ञांनी एकूण अडचण पातळी मध्यम असल्याचे वर्णन केले, ज्यामध्ये शिफ्ट आणि विषयांमध्ये फरक होता. गेल्या वर्षी, २०२५ मध्ये, एनटीएने जानेवारी सत्राचे निकाल ११ फेब्रुवारी रोजी जाहीर केले. ही परीक्षा २२ जानेवारी ते ३० जानेवारी दरम्यान घेण्यात आली आणि एजन्सीने त्या सत्राच्या अंतिम उत्तर कीमधून १२ प्रश्न वगळले.इतर संस्थांकडून गुणांचा वापर (JEE Main 2026)जेईई मेन २०२६ ची गुणवत्ता यादी आणि गुण इतर केंद्र आणि राज्य सरकारी संस्था देखील त्यांच्या संबंधित पात्रता निकष, निकष, नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांच्या अधीन राहून वापरू शकतात.पुनर्मूल्यांकन आणि पुनर्तपासणी (JEE Main 2026)निकालांचे पुनर्मूल्यांकन किंवा पुनर्तपासणी करण्याची कोणतीही तरतूद नाही. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.कोणाचे निकाल जाहीर होणार नाहीत? (JEE Main 2026)अनुचित साधन पद्धती (UMP) वापरणाऱ्या उमेदवारांचे निकाल रद्द केले जातील आणि घोषित केले जाणार नाहीत. त्याचप्रमाणे, ज्या उमेदवारांनी त्यांना दिलेल्या केंद्राव्यतिरिक्त इतर केंद्रातून परीक्षा दिली किंवा त्यांच्या वतीने दुसऱ्या व्यक्तीला उपस्थित राहण्याची परवानगी दिली, त्यांचे निकाल रद्द केले जातील.लागू असलेल्या UFM मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एकाच सत्रात एकापेक्षा जास्त वेळा उपस्थित राहिलेल्या कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल आणि त्यांना निलंबित केले जाईल. या संदर्भात कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही.
Apurva Nemlekar : “आयुष्याची दुसरी सुरुवात…”अपूर्वा नेमळेकरने बांधली लग्नगाठ
Apurva Nemlekar : अपूर्वा नेमळेकरने तनुज गोवळकरशी लग्नगाठ बांधली आहे. लग्नसोहळ्यात अभिनेत्रीने पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं.
Nana Patole on Harshwardhan Sapkal : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुठल्याही राजाशी होऊ शकत नाही - नाना पटोले
Pune News : जिल्हा परिषदेत ‘राष्ट्रवादी’चे निर्विवाद वर्चस्व! आता गटनेतेपदासाठी कुणाची लागणार वर्णी?
Pune News : गटनेतेपदाची चुरस! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली विजयी उमेदवारांची भेट; वैयक्तिक आणि तालुकास्तरावर पदांसाठी मागणी वाढली.
Yerwada Murder Case : शनिवारी दुपारी कामराजनगर परिसरात दारू पिताना झाली वादावादी; शिवीगाळ केल्याच्या रागातून डोक्यात प्रहार.
17 फेब्रुवारी रोजी तारिक रहमान बांगलादेशात पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांचा पक्ष 20 वर्षांनंतर सत्तेत परतला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासह 13 देशांच्या नेत्यांना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे. भारताकडून पंतप्रधान मोदींच्या ऐवजी स्पीकर ओम बिर्ला समारंभात सहभागी होतील. शेवटी पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला का जाणार नाहीत, हा दुराव्याचा संकेत असेल का आणि भारत-बांगलादेश संबंध सुधारणे का आवश्यक आहे; हे आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया... प्रश्न-1: तारिक रहमान यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी का जाणार नाहीत?उत्तर: 13 फेब्रुवारी रोजी तारिक रहमान यांच्या निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी फोनवर बोलणे केले होते. अहवालानुसार, आता 17 फेब्रुवारीच्या शपथविधीसाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रण पाठवण्यात आले होते.तारिक रहमान यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार हुमायू कबीर यांनी एका टीव्ही मुलाखतीत या गोष्टीची पुष्टीही केली. ते म्हणाले की, प्रादेशिक सहकार्य हे त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे. भारतासोबतच 13 इतर देशांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यात चीन, सौदी अरेबिया, पाकिस्तान, तुर्की, संयुक्त अरब अमिराती, कतार, मलेशिया, ब्रुनेई, श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि भूतान यांचा समावेश आहे. ढाका येथे होणाऱ्या या समारंभात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सहभागी होण्याची शक्यता आहे. भारताकडून पंतप्रधान मोदींऐवजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला शपथविधी सोहळ्यात सहभागी होतील. खरं तर, 17 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक निश्चित आहे. ते मुंबईत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना भेटतील. दुपारी सव्वा 3 वाजल्यापासून ते उशिरा संध्याकाळपर्यंत पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांची भेट निश्चित आहे. याशिवाय, पंतप्रधान मोदींनी गेल्या 11 वर्षांत कोणत्याही पाकिस्तानी पंतप्रधानांची भेट घेतलेली नाही. मे 2025 मध्ये झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर' आणि भारत-पाक संघर्षानंतर हे अधिक कठीण झाले आहे. राजकीय दृष्टिकोनातून हेदेखील एक कारण असू शकते. प्रश्न-2: पंतप्रधान मोदी बांगलादेशात न गेल्याने संबंधांवर कसा परिणाम होईल?उत्तर: शपथविधी समारंभांमध्ये इतर देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करणे हे एक प्रकारचे राजनैतिक पाऊल असते. निमंत्रण देणारा देश हे दाखवू इच्छितो की तो संबंध सुधारण्यासाठी आणि मैत्रीचा हात पुढे करत आहे. शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधांमध्ये खूप घट झाली. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताचे पारंपरिक विरोधक पाकिस्तान आणि चीनसोबत मैत्री वाढवली. जून 2025 मध्ये बांगलादेश, चीन आणि पाकिस्तान यांच्यात परराष्ट्र सचिव स्तरावरील त्रिपक्षीय चर्चा झाली आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील व्यापार 2024-25 मध्ये 27% नी वाढला आहे. अशा परिस्थितीत भारतासाठी राजनैतिक संदेश देणे आवश्यक आहे. मात्र, बांगलादेशात भारताचे राजदूत राहिलेले जे. के. त्रिपाठी सांगतात की, पंतप्रधान मोदी बांगलादेशात न गेल्याने दोन्ही देशांच्या संबंधांवर त्याचा काही विशेष परिणाम होणार नाही. न जाण्याचे इतर कोणतेही अर्थ काढता येणार नाहीत, कारण फ्रान्सच्या राष्ट्रपतींसोबत पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम बांगलादेशच्या निवडणुकीपूर्वीच निश्चित झाला होता. प्रश्न-3: बीएनपीच्या जुन्या सरकारांमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात कसे संबंध होते?उत्तर: 1978 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती झियाउर रहमान यांनी बीएनपीची स्थापना केली. 1991 ते 1996 आणि 2001 ते 2006 पर्यंत त्यांच्या पत्नी खालिदा झिया यांचे दोन कार्यकाळ भारतासाठी आव्हानात्मक मानले जातात… प्रश्न-4: भारताबाबत रहमान यांची भूमिका त्यांच्या आईपेक्षा वेगळी असेल का?उत्तर: 2015 मध्ये एका भारतीय पत्रकाराने खालिदा झिया यांना 'भारतविरोधी' का मानले जाते असे विचारले असता, त्यांनी उत्तर दिले, 'मी भारतविरोधी का असेन?'त्यांनी सांगितले की अवामी लीग जाणूनबुजून त्यांना 'भारतविरोधी आणि हिंदूविरोधी' दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणूक जिंकल्यानंतर जेव्हा तारिक रहमान यांना बांगलादेशी माध्यमांनी भारत-बांगलादेश संबंधांबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही बांगलादेशच्या हितांना सर्वोच्च प्राधान्य देऊ. भारताबाबत रेहमान यांची भूमिका त्यांच्या आईपेक्षा वेगळी असू शकते. 1991 मध्ये बीएनपीला बहुमत मिळाले नव्हते. यानंतर खालिदा जमात-ए-इस्लामीच्या पाठिंब्याने पंतप्रधान बनू शकल्या होत्या, त्यांच्या सरकारांमध्ये जमातच्या कट्टर आणि भारतविरोधी विचारांचा प्रभाव दिसून येत राहिला. रेहमानसोबत असे नाही. बीएनपीला 2026 च्या निवडणुकांमध्ये 299 पैकी 212 जागांवर विजय मिळाला आहे. म्हणजे त्यांच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत आहे. जे. के. त्रिपाठी यांच्या मते, रेहमानलाही समजले आहे की आता काळ बदलत आहे. त्यांच्याकडे एक बोल्ड मॅन्डेट (मजबूत जनादेश) आहे. अशा परिस्थितीत जमात त्यांच्यावर थेट दबाव आणू शकणार नाही.बांगलादेशात निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भारताकडून संबंध सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले… 1 डिसेंबर 2025: पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट करून पहिल्यांदाच माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. 30 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले. तेव्हाही पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट करून शोक व्यक्त केला.31 डिसेंबर 2025: भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले. जानेवारीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयात पोहोचले आणि त्यांनी शोक व्यक्त केला. 13 फेब्रुवारी 2026: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी X वर रहमान यांचे अभिनंदन केले. काही तासांनंतर त्यांनी रहमान यांना फोनही केला. मोदींनी लिहिले, ‘भारत एका लोकशाही, प्रगतीशील आणि सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या बांगलादेशसोबत उभा राहील.’ मोदींनी असेही म्हटले की रहमान यांचा विजय दर्शवतो की बांगलादेशच्या लोकांना त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे.जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीचे भू-राजकीय विश्लेषक आसिफ बिन अली म्हणाले की, निवडून आलेल्या सरकारकडे भारतासोबत काम करण्याची मजबूत कारणे असतील, जरी ते शेख हसीना यांच्या काळासारखे खूप जवळचे राजकीय संबंध निर्माण करू शकले नाहीत. प्रश्न-5: भारत आणि बांगलादेश एकमेकांसाठी अत्यंत महत्त्वाचे का आहेत?उत्तर: भारत आणि बांगलादेशच्या संबंधांचा पाया सीमा, व्यापार, पाणी वाटप आणि कनेक्टिव्हिटीवर आधारित आहे. दोन्ही देशांच्या सत्तेत कोणताही पक्ष असो, या मुद्द्यांवर सहमती आवश्यक आहे…सर्वात आधी भारतासाठी बांगलादेश का महत्त्वाचा आहे… ईशान्येकडील राज्यांची सुरक्षा: बांगलादेशची 94% सीमा भारताशी जोडलेली आहे. ईशान्येकडील राज्यांना उर्वरित भारताशी जोडण्यात बांगलादेशची महत्त्वाची भूमिका आहे. शेख हसीना सत्तेत असताना भारताला ईशान्येकडील राज्यांबाबत बांगलादेशकडून कधीही अडचणींची चिंता करावी लागली नाही, परंतु त्यांच्या सत्तापालटानंतर एक सुरक्षा धोका निर्माण झाला आहे.कनेक्टिव्हिटी: ईशान्य भारताची भारताशी कनेक्टिव्हिटीसाठी सर्वात महत्त्वाचा सिलीगुडी कॉरिडॉर देखील एका बाजूने बांगलादेशशी जोडलेला आहे. फक्त 22 किमीचा हा मार्ग ईशान्य भारताला जोडतो. येथून चीन फक्त 200 किमी दूर आहे.पाकिस्तान-चीन घटक: ऐतिहासिकदृष्ट्या पाकिस्तान आणि बांगलादेशचे संबंध पारंपरिकरित्या चांगले राहिलेले नाहीत. परंतु युनूसच्या कार्यकाळात बांगलादेश, पाकिस्तान आणि चीन पहिल्यांदाच जवळ आले. चीन आणि पाकिस्तान पारंपरिक भारतविरोधी आहेत. दोघांसोबत जुना सीमावाद आहे. हसिनाच्या सत्तापालटानंतर युनूसने चीनला पहिली भेट दिली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी 3 वेळा भेट घेतली. अशा परिस्थितीत बांगलादेशचा कल जर चीन आणि पाकिस्तानकडे वाढला, तर भारतासाठी 3 आघाड्यांवर घेरले जाण्याचा धोका असू शकतो.बेकायदेशीर नागरिकांचा मुद्दा: बांगलादेशातून होणारे आर्थिक स्थलांतर भारतासाठी पश्चिम बंगालसह इतर राज्यांमध्ये राजकीय मुद्दा बनले आहे. याला संवेदनशीलपणे हाताळण्यासाठी बांगलादेशची मदत लागेल. बांगलादेशसाठी भारत का महत्त्वाचा आहे भारत-बांगलादेश गंगा पाणी करार: 1996 मध्ये स्वाक्षरी झालेल्या गंगा पाणी कराराअंतर्गत, भारत जानेवारी ते मे पर्यंत बांगलादेशात गंगेचे पाणी सोडतो. हे उन्हाळ्याच्या हंगामात बांगलादेशातील शेतीसाठी आवश्यक आहे. हा करार डिसेंबर 2027 मध्ये नूतनीकरण होणार आहे. भारताने पाकिस्तानसोबतच्या वादामुळे सिंधू पाणी करार रद्द केला होता. अशा परिस्थितीत, हा करार नूतनीकरण होण्यासाठी भारतासोबत चांगले संबंध असणे आवश्यक असेल.सर्वात मोठा व्यापारी भागीदार: भारत 2024 पर्यंत बांगलादेशचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. दोन्ही देशांमध्ये सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा व्यापार होत होता. सत्तापालट आणि दीर्घकाळ चाललेल्या तणावानंतर तारिक रहमानसाठी अर्थव्यवस्था सुधारणे आवश्यक असेल. यासाठी भारतासोबत पुन्हा व्यापार वाढवावा लागेल.वैद्यकीय आणि व्हिसा कनेक्शन: दरवर्षी लाखो बांगलादेशी नागरिक उपचारासाठी भारतात येतात. दोन्ही देशांमध्ये तणावानंतर अनेक व्हिसा केंद्रे बंद झाली होती. यानंतर लोक चीनला जाण्यास भाग पडले होते.शेख हसीना यांचे पुनरागमन: माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे भारतात राहणे बीएनपीसाठी देशांतर्गत दबावाचे कारण बनू शकते. जर भारतासोबतचे संबंध चांगले नसतील आणि हसीना सतत विधाने करत राहिल्या, तर जमात प्रत्यार्पणाची मागणी करू शकते. यामुळे बीएनपीच्या सरकारवर दबाव वाढेल.
IND vs PAK : पाकिस्तानचा पराभव होताच मोहसीन नक्वी मागच्या दाराने पळाला
मुंबई: श्रीलंकेच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारताने पाकिस्तानचा ६० धावांनी पराभव केला आहे. भारताने पाकिस्तानसमोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान १८ ओव्हरमध्ये १४४ धावांवर ऑल आऊट झाली होती.त्यामुळे भारताने हा सामना ६० धावांनी जिंकला होता. पाकिस्तानच्या या पराभवानंतर स्टेडिअममध्ये थाटात बसलेल्या पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीवर तोंड लपवून पळायची वेळ आली होती. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.खरं तर बहिष्काराच्या नाट्यानंतर आयसीसीने दोन्ही देशांच्या बोर्डाना स्टेडिअममध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. या दरम्यान मिटिंग ही होणार असल्याचे बोलले गेले होते. मात्र मिटिंग झाली की नाही? याची ठोस माहिती मिळू शकली नाही. परंतु पाकिस्तानच्या पराभवानंतर थाटात बसलेल्या मोहसीन नक्वीची विचित्र अवस्था झाली होती, हे मात्र नक्की आहे.मोहसीन नक्वीने मागच्या अनेक दिवसापासून बहिष्काराचा नाटकं सुरू केलं होतं.त्यामुळे तो अनेत आठवडे चर्चेच्या केंद्रस्थानी होता. तसेच या बहिष्काराने पाकिस्तान बोर्डाचे प्रचंड मोठं नुकसान होणार होतं. पण तरी देखील मोहसीन नक्बी बहिष्कारावर ठाम राहिला होता. त्यानंतर संभाव्य नुकसान लक्षात येऊन पाकिस्तानने माघार घेतली होती. त्यामुळेच आजचा भारत पाकिस्तानचा सामना पार पडला.दरम्यान आज ज्याप्रमाणे पीसीबी बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी मैदानात आले होते. ते पाहता त्यांना पाकिस्तानच्या खेळाडूंवर प्रचंड विश्वास होत होता. मात्र पोरांनी अध्यक्षांसमोर माती खाली. त्यामुळे मोहसीन नक्वींच नाकं कापलं. या पराभवानंतर मोहसीन नक्वीवर तोंड लपवून पळायची वेळ आली होती. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून भारतीय चाहत्यांना हसू आवरता येत नाही आहे.
शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर सुमारे दीड वर्षांनी बांगलादेशला निवडून आलेले सरकार मिळत आहे. 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत बीएनपी आघाडीने 212 जागा जिंकल्या आहेत. लंडनहून बांगलादेशला परतलेले बीएनपी नेते तारिक रहमान 17 फेब्रुवारी रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. पक्षातून 3 हिंदू खासदारही निवडून आले आहेत. यापैकी ढाका-3 मतदारसंघातून विजय मिळवणारे गोयेश्वर चंद्र रॉय मंत्री बनू शकतात. गोयेश्वर यापूर्वीच्या बीएनपी सरकारमध्येही मंत्री राहिले आहेत. ते भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याचे समर्थक आहेत, परंतु त्यांना भारताकडून अनेक तक्रारीही आहेत. दिव्य मराठीने हिंदूंना सुरक्षा, शेख हसीना यांचे पुनरागमन आणि भारतासोबत बांगलादेशचे संबंध यासह अनेक मुद्द्यांवर गोयेश्वर चंद्र रॉय यांच्याशी बातचीत केली. वाचा संपूर्ण मुलाखत… प्रश्न: मुस्लिमबहुल ढाका-3 मतदारसंघातून तुम्ही एकतर्फी जिंकला आहात. बदललेल्या वातावरणात निवडणूक लढण्याचा आणि जिंकण्याचा प्रवास कसा राहिला?उत्तर: आम्हाला जे हवे होते, तेच निकाल आले. आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवू अशी आमची आधीपासूनच तयारी होती. आम्ही फॅसिस्ट शेख हसीना यांच्या विरोधात लढा दिला आहे. निवडणुकीपूर्वी आम्ही बांगलादेशच्या लोकांसमोर आमची योजना मांडली होती. आम्ही तरुणांना केंद्रस्थानी ठेवून सरकार चालवू. कायदा व सुव्यवस्था राखू. अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा आणि निर्यात वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. निवडणुकीचे निकाल दर्शवतात की जनता आमच्या नियोजनावर समाधानी आहे. प्रश्न: तुम्ही विरोधी पक्षात राहून अवामी लीगच्या विरोधात 17 वर्षे संघर्ष केला आहे, हे किती कठीण होते?उत्तर: फक्त माझ्यावरच 61 खटले दाखल करण्यात आले. आम्ही हसीना सरकारच्या गगनाला भिडलेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. म्हणून मला दाबण्यासाठी अवामी लीगने हे बनावट खटले दाखल केले होते. बांगलादेशात प्रत्येक व्यक्ती भ्रष्टाचार आणि छळापासून मुक्ती मिळवू इच्छित होता, कोणालाही सुरक्षित वाटत नव्हते. या निवडणुकीत लोकांनी आपल्या मनातील गोष्ट मतपत्रिकेद्वारे सांगितली आहे. प्रश्न: बांगलादेशातील अल्पसंख्याकांबाबत तारिक रहमान यांच्याशी तुमची काय चर्चा झाली?उत्तर: बांगलादेशाची अशी विचारधारा आहे की आम्ही अल्पसंख्याक या शब्दात विश्वास ठेवत नाही. देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती या मातीतून जन्माला आला आहे. प्रत्येकाला संविधानानुसार समान अधिकार आहेत. सरकार आणि प्रशासन निष्पक्षपणे काम करते. हसीना सरकारच्या काळात अनेक हिंदूंना घरातून काढून छळण्यात आले. आमच्याकडे याचे पुरावे आहेत, पण भारताने कधीच कोणती कारवाई केली नाही. मला वाटत नाही की भारत कथित बांगलादेशी अल्पसंख्याक हिंदूंसाठी काही करू इच्छितो. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन सर्वांनी बीएनपीला मतदान केले आहे. लोकांना खात्री आहे की आमचे सरकार कायदा व सुव्यवस्था सुधारेल आणि लोकांची सुरक्षा सुनिश्चित करेल. प्रश्न: जनतेने कट्टरपंथी पक्ष जमातला का नाकारले, तुम्हाला काय वाटते?उत्तर: बांगलादेशचे लोक धार्मिक आहेत, पण कट्टर नाहीत. आमच्याकडे जातीय सलोखा आहे, हीच आमची हजारो वर्षांची जुनी परंपरा आहे. आम्ही पूजा आणि रोजा दोन्ही एकत्र करतो. प्रश्न: तुम्हाला काय वाटते की जमात लोकांना कधीच आवडणार नाही?उत्तर: जमातबद्दल आम्हाला माहीत आहे की ते किती कट्टर आहेत. तरीही, आता ते संवैधानिक मार्गावर आहेत आणि निवडणुका लढवत आहेत. जर जनता त्यांना निवडून पाठवत असेल तर आपण काय करू शकतो? आपण त्यांचा विरोध कसा करू शकतो? जर जमातला काही जागा मिळाल्या असतील तर याचा अर्थ असा नाही की बांगलादेशी कट्टर होत आहेत. अवामी लीगच्या मतदारांनी BNP ला मतदान केले आहे, जमातला नाही. प्रश्न: युनूस सरकारचा कार्यकाळ तुम्ही कसा पाहता? त्यांनी हिंदू अल्पसंख्याकांसोबत चुकीचे केले असे तुम्हाला वाटत नाही का?उत्तर: मी पुन्हा सांगेन की तुम्ही अल्पसंख्याकांवर लक्ष केंद्रित करू नका. प्रत्येकाला धोका होता, प्रत्येक समुदायाला धमक्या मिळाल्या आहेत. शेख हसीना सरकारच्या काळात प्रशासनाची कोणतीही जबाबदारी नव्हती कारण त्यांच्या आदेशाशिवाय काहीही होऊ शकत नव्हते. हसीना यांनी केवळ अल्पसंख्याकांनाच नाही तर सर्वांना त्रास दिला. मी हिंदू समुदायातील आहे, तुम्ही मला अल्पसंख्याकांचा नेता म्हणता. तरीही मला अल्पसंख्याकांचा नेता म्हटले जाणे आवडत नाही. हसीना सरकारने मला त्रास दिला, डझनभर खटले दाखल केले, तुरुंगात पाठवले. तेव्हा कोणीही म्हटले नाही की अल्पसंख्याकांना त्रास दिला जात आहे. तेव्हा भारतानेही काहीच म्हटले नाही. जर अवामी लीगच्या हिंदू नेत्यावरही राजकीय कारणांमुळे हल्ला झाला, तर तुम्ही अल्पसंख्याकांची गोष्ट करू लागता. 23 मार्च 1973 रोजी शेख मुजीबने रमणा कालीच्या ऐतिहासिक मंदिरावर हल्ला केला होता, पण तेव्हा भारताने कोणताही प्रश्न विचारला नाही. 2001 मध्ये पंतप्रधान असलेल्या खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखाली मी त्या मंदिराचे पुनर्निर्माण केले. तुम्ही जाऊन ते मंदिर पाहू शकता. अवामी लीगच्या नेत्यांनी अनेक मंदिरांवर हल्ले केले, हिंदूंच्या जमिनी बळकावल्या पण त्याची कधीच चर्चा झाली नाही. प्रश्न: गेल्या काही दिवसांत अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यांना कोण जबाबदार आहे?उत्तर: ज्या काही हत्या झाल्या आहेत, त्या राजकीय हत्या आहेत. कोणालाही धर्मामुळे मारले गेलेले नाही. निवडणुकीच्या वेळी दक्षिण आशियातील प्रत्येक देशात काही ना काही घडत असते. तुम्हालाही ही गोष्ट समजून घ्यायला हवी, जेणेकरून अल्पसंख्याकांबद्दलचा हा प्रचार थांबेल. राजकीय वैमनस्यातून होणारी हिंसा आपल्याकडे सामान्य बाब आहे. जेव्हा तुम्ही असे मुद्दे उपस्थित करता, तेव्हा मुस्लिम समुदाय अपमानित झाल्यासारखे वाटते. जर तुम्ही बातम्यांद्वारे मुस्लिमांना अपमानित झाल्यासारखे वाटायला लावले, तर अल्पसंख्याकांचे काय होईल? प्रश्न: तुमच्या दृष्टिकोनातून डॉ. युनूस यांचा दीड वर्षाचा कार्यकाळ कसा राहिला?उत्तर: ते राजकीय नव्हते, एक अंतरिम सरकार होते. मी त्यांचे कौतुक करेन की ते स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घडवून आणू शकले. अंतरिम सरकारसमोर अनेक आव्हाने होती, पण बांगलादेशातील आर्थिक अडचणी आणि कायदा व सुव्यवस्थेमुळे ते सोडवू शकले नाहीत. त्यांना जे करायचे होते, ते त्यांनी केले. आता आपल्या निवडून आलेल्या सरकारने कायद्यानुसार काम केले पाहिजे, पक्षाच्या हिशेबाने नाही. प्रश्न: बांगलादेशी लोकांसाठी तुमचे काय स्वप्न आहे आणि भारत त्यात कशी मदत करू शकतो?उत्तर: भारताने 1971 मध्ये आम्हाला मदत केली, पण त्याने हे समजून घेतले पाहिजे की फक्त एका पक्षाशी मैत्री करून काही होणार नाही. मैत्री देशांमध्ये, लोकांमध्ये आणि सरकारांमध्ये असली पाहिजे. आमची भाषा, संस्कृती, विचारसरणी सर्व काही सारखेच आहे. भारताला वाटत होते की बांगलादेशात फक्त हसीनाच सरकार आहे. बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री डॉ. मोमिन यांना कोणीतरी विचारले की भारत-बांगलादेश संबंध कसे आहेत? त्यांनी उत्तर दिले, पती-पत्नीसारखे आहेत. हे मैत्रीपूर्ण संबंधांबद्दल बोलणे आहे का? लोक त्यांना विचारत आहेत की पत्नी कोण आणि पती कोण? बांगलादेशचे लोक कधीही भारतविरोधी नव्हते, लोक अवामी लीगच्या विरोधात होते. भारताने नेहमी अवामी लीगला प्रोत्साहन दिले. प्रश्न: भारत आणि बांगलादेशचे संबंध कसे सुधारले जाऊ शकतात?उत्तर: भारताला हे मान्य करावे लागेल की त्यांनी जे केले ते चुकीचे होते. भारताच्या उच्चायुक्तांनी मला कधीही बोलावले नाही, पण ५ ऑगस्टनंतर संबंध सुधारण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी असे का केले हे आम्हाला माहीत नाही का? गेल्या १७ वर्षांत त्यांनी मला कधीही बोलावले नाही, त्यांना माझे नावही माहीत नव्हते. आता त्यांना वाटत आहे की माझ्याकडे सत्ता येत आहे, म्हणून ते मला भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना समजायला हवे की त्यांनी जे केले ते चुकीचे आहे. त्यांनी त्यांच्या परराष्ट्र धोरणात बदल करायला हवा. मला वाटते की शेजाऱ्यांशी चांगले संबंध असणे खूप महत्त्वाचे आहे. मैत्रीत मोठ्या किंवा लहान देशाचा प्रश्न नसतो, समान पातळीवर संबंध प्रस्थापित केले जातात. प्रश्न: शेख हसीना सध्या भारतात आहेत, तुम्ही त्यांच्या परत येण्याबद्दल बोलणार का?उत्तर: लोकशाहीची जननी, बेगम खालिदा झिया यांनी कधीही देश सोडला नाही. त्यांनी देशात राहून कायदा आणि न्यायालयाचा सामना केला. हसीना यांनी परत येऊन न्यायालयाचा सामना करायला हवा. भारताने दीर्घकाळासाठी हसीना यांना आश्रय देऊ नये. हे भारतासाठी लाजिरवाणे आहे. भारताने सर्व गुन्हेगारांना कोलकाता येथे आश्रय दिला आहे. त्या सर्वांनी परत येऊन न्यायालयाचा सामना करायला हवा. प्रश्न: अवामी लीगचे बांगलादेशात भविष्य काय आहे?उत्तर: लोक काय विचार करत आहेत, हे मला माहीत नाही. BNP चे नेहमीच मत राहिले आहे की कोणत्याही राजकीय पक्षावर बंदी घालणे हा उपाय नाही. अवामी लीगवरही बंदी घालू नये. आमच्या पक्षाने यावर निवेदनही जारी केले होते. जर अवामी लीगने निवडणूक लढवली असती तर BNP चा विजय आणखी मोठा झाला असता. प्रश्न: निवडणुकीसोबत सार्वमतावरही मतदान झाले आणि जुलै चार्टरच्या बाजूने मतदान झाले, हे कसे लागू होईल?उत्तर: सार्वमतामध्ये अनेक सुधारणांचे प्रस्ताव आहेत, आम्ही स्वतः अनेकदा या सुधारणा करण्याबद्दल बोललो आहोत. जर या सुधारणा झाल्या नाहीत तर लोक आमच्या विरोधातही जाऊ शकतात. आम्हाला खूप सावधगिरीने काम करावे लागेल. आम्हाला संविधानाच्या मार्गावर चालावे लागेल. आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आम्ही 16 वर्षांपासून न्यायासाठी लढत आहोत, जेणेकरून एक निष्पक्ष व्यवस्था निर्माण होऊ शकेल. प्रश्न: रेफरेंडम (जनमत संग्रह) नंतर बांगलादेश आता धर्मनिरपेक्ष राज्य राहणार नाही का? लोकांची ही भीती योग्य आहे का?उत्तर: नाही, असे नाही. आम्ही व्यावहारिकदृष्ट्या धर्मनिरपेक्ष आहोत. आम्ही केवळ इस्लामच्या विचारसरणीवर विश्वास ठेवत नाही, तर सर्वांच्या धार्मिक भावनांचा आदर करतो. आम्ही सर्वांच्या धार्मिक हक्कांचे समर्थन करतो. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर आम्ही तडजोड करू शकतो, परंतु आम्हाला एक असांप्रदायिक देश बनवायचा आहे. आम्ही जातीयवादी होऊ शकत नाही. मागील निवडणुकांमध्ये शेख हसीना यांना दोन तृतीयांश बहुमत मिळाले आणि विरोधक नाममात्र होते. तरीही त्यांनी संविधानातून ‘बिस्मिल्ला-ए-रहमान ए रहीम’ हटवण्याचा प्रयत्न केला नाही. प्रश्न: आता असे वाटते की बांगलादेशात स्थिरतेचा काळ येत आहे, तुमच्या मते 3 मोठी आव्हाने कोणती आहेत?उत्तर: सर्वात मोठे आव्हान राजकारण आहे. मला वाटते की अवामी लीग आणि जमात, सरकारविरोधात वातावरण निर्माण करतील आणि अस्थिरता आणण्याचा प्रयत्न करतील. जेव्हा हे घडेल, तेव्हा भारताची भूमिका काय असेल, हे पाहणे सर्वात महत्त्वाचे ठरेल. जमात आणि अवामी लीग सरकार पाडण्यासाठी एकत्र येऊ शकतात. प्रश्न: तुमच्या मते बीएनपी नेते तारिक रहमान यांचे 3 सर्वात मोठे गुणधर्म काय आहेत?उत्तर: ते झिया उर रहमान यांचे वंशज आहेत आणि खालिदा झिया यांचा वारसा पुढे नेत आहेत. ते लोकांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतात आणि त्यावर अंमलबजावणी करतात. ते खूप व्यावहारिक आहेत. त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान दुसऱ्या पक्षावर टीका केली नाही. प्रश्न: तुम्ही शेख मुजीब यांच्या वारशाचे संरक्षण कराल का?उत्तर: त्यांचे घर पाडल्याच्या घटनेचा मी निषेध करतो. ते शेख हसीना यांचे घर आहे. हसीना यांनी देशात परत येऊन आपल्या घरी जावे. जर त्यांना काही मदतीची गरज असेल, तर आम्ही त्यांना मदत करू. आम्ही कोणाचेही घर-इमारत पाडण्यावर विश्वास ठेवत नाही. चुकीची गोष्ट, चुकीचीच असते. बाकी वारशाच्या संरक्षणाचा प्रश्न आहे, तर ही आमची जबाबदारी नाही. मला वाटते की शेख मुजीब अवामी लीगचे जनक असू शकतात, ते राष्ट्रपिता नाहीत. प्रश्न: तुम्हाला भारतात जायचे आहे का?उत्तर: नक्कीच जायचे आहे, पण भारत मला व्हिसा आणि परवानगीच देत नाही. माझे कोलकाता, दिल्ली, मुंबई अशा प्रत्येक ठिकाणी खूप ओळखीचे लोक आहेत, मला त्यांना भेटायचे आहे.
Purandar Airport : राज्य सरकारकडून ६ हजार कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीस ग्रीन सिग्नल; राष्ट्रीयकृत बँकेसोबत लवकरच होणार करार.
Fee Regulating Authority : महाराष्ट्र अधिनियम २०१५ मधील कलम ५ नुसार एका वर्षापेक्षा जास्त फी घेतल्यास फौजदारी गुन्हा; मॅनेजमेंट कोट्यातील मनमानीलाही लगाम.
Flood Zone Survey : जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १२ तज्ज्ञांची समिती; दोन महिन्यांत सरकारला सादर करणार सविस्तर अहवाल.
अग्रलेख : या गावाचा आदर्श घ्या
महाराष्ट्राच्या व्यासपीठावर एकीकडे जातीय संघर्ष मोठ्या प्रमाणात तीव्रपणे समोर येत असताना या छोट्या गावाने घालून दिलेला आदर्श केवळ इतर गावांनी नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांनी अनुकरण करावा असा आहे.
SPPU News : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कडक पावले; ५० टक्के शिक्षक भरती अनिवार्य, अन्यथा संलग्नीकरण धोक्यात.
Pune Land Scam : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानंतर १३ तालुक्यांत तपासणी; ३४३ प्रकरणांत नियम धाब्यावर बसवून झाले जमिनींचे व्यवहार.
दिल्ली वार्ता : विश्वास-अविश्वासाचे चक्रव्यूह
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरील ‘विश्वास-अविश्वासा’च्या लढाईत भाजप आणि काँग्रेसच्या महिला खासदार रणांगणात उतरल्या आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा जेव्हा सुरू होईल तेव्हा महिला खासदारांमधली खडाजंगी बघायला मिळेल!
BJP vs Congress : काँग्रेस भवनावर 'जोडे मारा' आंदोलन, प्रत्युत्तर म्हणून अडाणी-मोदींचे पोस्टर; शाब्दिक चकमकीचे रूपांतर भीषण हाणामारीत.
Pune News : काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा फरासखाना पोलिसांत ठिय्या; धीरज घाटे आणि महापौरांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.
Harishchandragad Accident : जुन्नर दरवाज्याकडील कठीण पायवाटेने खाली उतरताना कड्यावरून सैल दगड डोक्यावर कोसळला; घोडेगावच्या ३८ वर्षीय तरुणाने गमावला जीव.
दखल : स्वच्छ पाण्यासाठी संघर्ष
श्रीमंत गटातील ग्राहकांत आरोग्य आणि चवीवरून वाढलेली जागरुकता पाहता प्रीमियम वॉटरची मागणी वाढत आहे. त्याचवेळी परकी ब्रँडस देखील भारताकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहत आहेत.
Sunetra Pawar : बारामतीतील नेतृत्व बदललं पण विश्वास तोच; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कार्यशैलीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांचे शिक्कामोर्तब.
Alandi News : इंद्रायणी घाटावर आता ‘तिसरा डोळा’! सुरक्षिततेसाठी नगरपरिषदेचा मोठा निर्णय; काय बदलणार?
Alandi News : नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखालील पहिल्याच सभेत १११ कामांना मंजुरी; ऐतिहासिक कुंडांच्या सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा.
Jejuri News : जेजुरी गडावरील मुख्य मंदिराच्या कळसात आणि गर्भगृहात दडलेल्या गुप्त शिवलिंगाचे दर्शन; महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनोखी परंपरा संपन्न.
Indapur News : कळसमध्ये पाझर तलाव कोरडाठाक! विहिरींनी तळ गाठला; आता खडकवासला कालवाच शेवटचा आधार?
Indapur News : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर! पाझर तलाव आटल्याने कळस गावच्या पाणीपुरवठा योजनेवर परिणाम; आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरतेय.
Dattatray Bharne : जिल्हा नियोजन मंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून उजनीसाठी २ कोटींची तरतूद; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मत्स्यबीज संचयन सोहळा संपन्न.
Bhimashankar : देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या हस्ते विधीवत पूजा संपन्न; विकासाचा घेतला आढावा.
Bhuleshwar Temple : भुलेश्वर गडावर भक्तीचा महासागर! २ लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन
Bhuleshwar Temple : पार्थ पवार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांची उपस्थिती; माळशिरस ग्रामपंचायतीकडून भाविकांना थंड पाणी व महाप्रसादाचे नियोजन.
Shirur News : रात्रभर शिवनामाचा जप आणि कीर्तनाचे आयोजन; मंदिर समितीकडून पिण्याचे पाणी, महाप्रसाद आणि आरोग्य सुविधेचे उत्कृष्ट नियोजन.
Chakan Murder Case : जुण्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी तरुणाचा बळी; चाकणगाव हद्दीतील नेहरू चौकाजवळ शनिवारी दुपारी घडला थरार.
Pimple Nilakh Accident : देहुगावच्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल; विशालनगर परिसरातील वाहतूक कोंडी आणि वेगाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.
Share Market Fraud : शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून महिलेची ४३.८७ लाखांची ऑनलाईन फसवणूक; सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
PCMC News : निवडणूक संपली तरी पीसीएमसीला कायमस्वरूपी आयुक्त मिळेना; प्रलंबित नागरी समस्यांमुळे नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये संतापाची लाट.
PCMC News : स्थायी समिती सदस्य निवडीपूर्वीच भाजपची फिल्डिंग; अपक्ष नगरसेवकाच्या एन्ट्रीने राष्ट्रवादीच्या एका सदस्याची संधी हुकली.
Wai Crime : पाचवडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; सीसीटीव्हीमध्ये चेहरा कैद, पण पोलीस अजूनही अंधारात?
Wai Crime : वाई तालुक्यातील पाचवड बाजारपेठेत सीसीटीव्ही असूनही चोरट्यांचा बिनदिक्कत धुमाकूळ; पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह.
दैनंदिन राशीभविष्य, सोमवार , १६ फेब्रुवारी २०२६
पंचांगआज मिती माघ कृष्ण चतुर्दशी १७.३३ पर्यंत नंतर अमावस्या शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग वरियान चंद्र राशी मकर.भारतीय सौर २६ माघ शके १९४७. सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२६.मुंबईचा सूर्योदय ०७.०६, मुंबईचा सूर्यास्त ०६.३८, मुंबईचा चंद्रोदय ०६.५६ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०५.४१ , राहू काळ ०८.३३ ते ०९.५९. सोमवती अमावास्या-प्रारंभ-सायंकाळी-०५;३५,चथुर्दशी वर्जदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
ISRO Study Tour : शिक्षणाचा वारसा नसलेल्या कुटुंबातील चार हिऱ्यांची चमक; महाराष्ट्र शासनाच्या विशेष अभियानांतर्गत 'इस्रो' अभ्यास सहलीसाठी निवड.
छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्यातील काम समकक्ष आहे असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी संताप व्यक्त केला आहे.
IND vs PAK : टी-२० विश्वचषक २०२६ मधील या महामुकाबल्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवला.
मान्यवरांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार मुंबई क्लायमेट वीक
मुंबई : देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ उपक्रमाची सुरूवात १७ फेब्रुवारीपासून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा जागतिक हवामान संवाद मुंबईत होणार आहे.शहराला ग्लोबल साऊथमधील नागरिक-आधारित हवामान मंचाचे केंद्रस्थान देणारा हा उपक्रम पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सहकार्याने प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थेने आयोजित केला आहे. यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे मुख्य सत्र जिओ कन्व्हेशन सेंटर, मुंबई येथे होणार आहे.या तीन दिवसीय उपक्रमात तळागाळातील संस्था, विविध क्षेत्रातील नेते, उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ आणि धोरणकर्ते भारत व ग्लोबल साऊथमधील हवामान उपायांवर चर्चा करणार आहेत. जागतिक व राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व या मंचावर एकत्र येणार असून माजी अमेरिकन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ सौम्या स्वामिनाथन, उद्योग क्षेत्रातील एस्थर फिनिदोरी, दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्यासह केंद्रीय मंत्री, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी यांच्यासह १०० हून अधिक संस्था आणि ४०० वक्ते सहभागी होणार आहेत. शहरी लवचिकता, अन्न व्यवस्था आणि ऊर्जा संक्रमण या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. नोंदणीद्वारे सर्व हवामानप्रेमींसाठी प्रवेश खुला ठेवण्यात आला आहे.हब-अँड-स्पोक मॉडेलमुंबई क्लायमेट वीक ‘हब-अँड-स्पोक’ पद्धतीने आयोजित केला आहे. मध्यवर्ती हबमध्ये नेतृत्व संवाद, विषयानुरूप सत्रे, एमसीडब्ल्यू इनोव्हेशन चॅलेंज, यूथ ग्रीन इनोव्हेशन चॅलेंज, ‘वातावरण’ या नागरिक व्यासपीठासह उपाययोजना प्रदर्शन भरवले जाणार आहे. या आठवड्यात शहरभर शाश्वत मेळावे, सार्वजनिक व्याख्याने, चित्रपट प्रदर्शन, कला-सांस्कृतिक कार्यक्रम आणि नागरिक कार्यशाळा आयोजित केल्या जातील.राष्ट्रीय व जागतिक नेतृत्वाची उपस्थितीकेंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह उद्योगविश्वातील नोवेल टाटा, व्ही विद्यानाथन, अमित चंद्रा, अंकूर गुप्ता, जमशेद गोदरेज, नादिर गोदरेज, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे मार्टिन क्लायूस, सिंथिया मॅककॅफरे, अंजली रविकुमार, प्रतिक अग्रवाल, समीर शिसोदीया यांसारखे नेते हवामान कृतीतील भांडवली प्रवाह व धोरणांवर मत मांडणार आहेत. त्याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातून रोहिणी निलकेणी, मनोज कुमार, सत्यजित भातखळ, मृदुला रमेश, सीमा पौल, शिशिर सिन्हा आणि वीणा श्रीनिवासन यांचीही उपस्थिती राहणार आहे. तसेच चित्रपट क्षेत्रातून पर्यावरणासाठी काम करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झा आणि भूमी पेडणेकर सहभागी होणार आहेत.नवोन्मेष, युवक नेतृत्व आणि नागरिक सहभागनवोन्मेष हा या आठवड्याचा केंद्रबिंदू आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज यांच्या भागीदारीत एमसीडब्ल्यू इनोव्हेशन चॅलेंज आयोजित होणार असून स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि नागरी संस्थांना हवामान उपाय मांडण्याची संधी मिळेल. युनिसेफ इंडिया आणि युवाह यांच्या सहकार्याने युवकांसाठी कॅम्पस रोडशो आणि स्पर्धा होणार आहेत. 16 ते 24 वयोगटातील युवकांचे प्रकल्प धोरणकर्त्यांसमोर सादर केले जातील.प्रदर्शन आणि समुदाय उपक्रमहबमध्ये भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनात उद्योग, स्टार्टअप्स आणि स्वयंसेवी संस्था हवामान उपाय सादर करतील. गोदरेज ग्रुप, आयडीएफसी फर्स्ट बँक, महिंद्रा ग्रुप, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि मिरिक टेक यांसारख्या संस्थांचा सहभाग अपेक्षित आहे. नागरिकांना प्रत्यक्ष प्रोटोटाइप व उपाय पाहण्याची संधी मिळणार आहे.भारत आणि ग्लोबल साऊथसाठी नवा हवामान मंचमुंबई क्लायमेट वीक हा नागरिक सहभाग, सार्वजनिक-खासगी-लोक भागीदारी आणि शहरस्तरीय अंमलबजावणीवर आधारित भारतीय मॉडेल सादर करतो. हवामान कृतीत भारताच्या नेतृत्वाची दिशा दाखवणारा हा उपक्रम वार्षिक स्वरूपात पुढे नेण्याचा मानस आहे. तीनही विषयक स्तंभ आणि सत्रांची सविस्तर माहिती https://www.mumbaiclimateweek.com/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Satara News : महाबळेश्वरमध्ये महाशिवरात्री भक्तिमय वातावरणात साजरी
महाबळेश्वर तालुक्यात (Satara News) महाशिवरात्रीचा उत्सव यंदा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तालुक्यातील विविध शिवमंदिरां मध्ये पहाटेपासूनच “हर हर महादेव”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
IND vs PAK : टीम इंडियाने रचला इतिहास! पाकिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषकात नोंदवला ‘हा’खास पराक्रम
IND vs PAK : टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध भारताने नोंदवलेली ही (१७५) आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे.
Aashna roy : एक हेअरकट आणि २५ लाखांचा धक्का; प्रसिद्ध मॉडेलसोबत नेमकं काय घडलं?
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी हॉटेलला २५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. आशना रॉय असे या महिलेचे नाव आहे.
Renuka Chowdhury : काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांना हक्क भंगाची नोटीस
संसदेच्या आवारात एका श्वानाला आणल्याबद्दल आणि खासदारांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रेणुका चौधरी (Renuka Chowdhury) यांना हक्क भंगाची नोटीस बजावण्यात आली आहे.
Ishan Kishan Record : इशान किशनने रॉबिन उथप्पा, गौतम गंभीर आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गज फलंदाजांच्या 'एलिट' यादीत दिमाखात प्रवेश केला आहे.
ईशान, सूर्या, शिवम, तिलक, रिंकूमुळे भारताने पाकिस्तानपुढे ठेवले मोठे लक्ष्य
कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताने ईशान, सूर्या, शिवम, तिलक, रिंकूमुळे पाकिस्तानपुढे मोठे लक्ष्य ठेवले आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने २० षटकांत सात बाद १७५ धावा केल्या आणि पाकिस्तानला २० षटकांत १७६ धावा करण्याचे लक्ष्य दिले.भारताकडून ईशान किशनने सर्वाधिक ७७ धावा केल्या. त्याने ४० चेंडूत ३ षटकार आणि १० चौकार मारत ही कामगिरी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवने २९ चेंडूत ३२ धावा केल्या. शिवम दुबेने (धावबाद) १७ चेंडूत २७ तर तिलक वर्माने २४ चेंडूत २५ धावा केल्या. रिंकु सिंगने फक्त ४ चेंडू खेळून एक षटकार आणि एक चौकार मारत नाबाद ११ धावा केल्या.आजारपणातून उठल्यानंतर थेट पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरलेल्या अभिषेक शर्माला पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने शाहीन आफ्रिदीकरवी शून्यावर झेलबाद केले. हार्दिक पंड्याही शून्य धावा करून परतला. त्याला सईम अयुबच्या चेंडूवर बाबर आझमने झेलबाद केले. अक्षर पटेल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर सईम अयुबकडे झेल देऊन परतला. भारताचे सात पैकी तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. पाकिस्तानकडून सईम अयुबने तीन तर सलमान आगा, उस्मान तारिक आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
वेस्ट इंडीजचे मिशन 'सुपर-८'फत्ते, नेपाळचे स्वप्न भंग
मुंबई : यजमान वेस्ट इंडीजने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत टी-२० विश्वचषकात विजयाची हॅट्ट्रीक साजरी केली आहे. रविवारी मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात वेस्ट इंडीजने नेपाळचा ९ गडी राखून धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासह वेस्ट इंडीज संघ चालू विश्वचषकाच्या 'सुपर-८' फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ बनला आहे.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेपाळची सुरुवात अत्यंत खराब झाली. अनुभवी जेसन होल्डरने (४/२७) आपल्या धारदार गोलंदाजीने नेपाळच्या वरच्या फळीचे कंबरडे मोडले. नेपाळची अवस्था ५ बाद ४६ अशी असताना दिपेंद्र सिंह ऐरीने (५८ धावा) एकाकी झुंज देत संघाला १३३ धावांपर्यंत पोहोचवले. मात्र, वानखेडेच्या फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर हे आव्हान वेस्ट इंडीजला रोखण्यासाठी पुरेसे नव्हते.१३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. कर्णधार साई होप (नाबाद ६१ धावा) याने फॉर्मात परतत ५ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांची आतषबाजी केली. त्याला शिमरॉन हेटमायर (नाबाद ४६ धावा) याने मोलाची साथ दिली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची अभेद्य भागीदारी करत केवळ १५.२ षटकांत विजयावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, ५९ चेंडू आणि २८ चेंडू राखून मिळवलेला हा विजय वेस्ट इंडीजचा आत्मविश्वास वाढवणारा ठरला.सामन्याची वैशिष्ट्ये:सुपर-८ मध्ये प्रवेश: वेस्ट इंडीज सलग ३ विजय मिळवून गट क मध्ये अव्वल स्थानी.मॅन ऑफ द मॅच: ४ बळी घेणारा जेसन होल्डर विजयाचा शिल्पकार.नेपाळचा संघर्ष: वानखेडेवर नेपाळी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती, मात्र अनुभवी गोलंदाजांपुढे नेपाळचे फलंदाज अपयशी ठरले.विक्रम: नेपाळने या विश्वचषकातील पॉवरप्लेमधील सर्वात निचांकी (२२ धावा) धावसंख्या नोंदवली.पुढील लक्ष्य: वेस्ट इंडीजचा संघ आता सुपर-८ मध्ये अधिक जोमाने उतरणार आहे, तर दुसरीकडे नेपाळच्या आव्हानासाठी आता इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
स्मृती-शेफालीच्या फटकेबाजीने ऑस्ट्रेलियाचा पराभव
सिडनी : भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करत यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात ९ गडी राखून मात दिली आहे. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा डाव १३३ धावांत आटोपला, त्यानंतर पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात सुधारित लक्ष्याचा पाठलाग करत भारताने दिमाखात विजय साजरा केला.प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारताच्या अरुंधती रेड्डीने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. तिने ४ षटकांत केवळ २२ धावा देत ४ महत्त्वाचे बळी घेतले. तिला रेणुका सिंग आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी २ बळी घेत उत्तम साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून जॉर्जिया वेअरहॅमने सर्वाधिक ३० धावा केल्या, मात्र इतर फलंदाज भारतीय माऱ्यापुढे हतबल दिसले. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ १८ षटकांत १३३ धावांत गारद झाला.पावसामुळे भारतासमोर डकवर्थ-लुईस नियमानुसार ५.१ षटकांत ५० धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते. हे आव्हान भारताने ५.१ षटकांतच १ गडी गमावून पूर्ण केले. सलामीवीर शेफाली वर्माने ११ चेंडूत २१ धावांची वादळी खेळी केली, तर स्मृती मानधनाने १७ चेंडूत १६ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. शेवटी जेमिमा रॉड्रिग्जने अवघ्या ३ चेंडूत २ चौकार मारत भारताचा विजय निश्चित केला.सामन्याचे आर्कषण:अरुंधती रेड्डी: ४ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.रेणुका सिंग: ३.५० च्या इकॉनॉमीने २ बळी घेत सुरुवातीलाच धक्का दिला.शेफाली वर्मा: १९० च्या स्ट्राईक रेटने धावा करत विजयाचा पाया रचला.मालिका स्थिती: या विजयामुळे भारताने ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
संजय कृष्णमूर्तीच्या वादळापुढे नामिबियाची शरणागती, अमेरिकेची 'सुपर'गर्जना
दुबई : टी-२० विश्वचषकात अमेरिका संघाने आपला विजयाचा धडाका कायम राखत नामिबियाचा ३१ धावांनी पराभव केला आहे. संजय कृष्णमूर्तीची स्फोटक फलंदाजी आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्याच्या जोरावर अमेरिकेने १९९ धावांचा डोंगर उभा केला आणि नामिबियाला १६८ धावांत रोखले.प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेची सुरुवात दमदार झाली. कर्णधार मोनांक पटेलने (५२ धावा) आक्रमक अर्धशतक ठोकत पाया रचला. मात्र, खऱ्या अर्थाने सामन्याचा नूर पालटला तो संजय कृष्णमूर्ती याच्या फलंदाजीने. संजयने केवळ ३३ चेंडूंत ६ षटकार आणि ४ चौकार ठोकत नाबाद ६८ धावांची 'बिलीझ' खेळी केली. त्याच्या २०६ च्या स्ट्राईक रेटमुळे अमेरिकेने निर्धारित २० षटकांत ४ बाद १९९ अशी भक्कम धावसंख्या उभारली.२०० धावांच्या मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना नामिबियाकडून लॉरेन स्टीनकॅम्पने (५८ धावा) झुंज दिली, पण इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. अमेरिकेच्या शॅडली व्हॅन शॉकविकने (२/३०) महत्त्वाचे बळी घेत नामिबियाच्या डावाला खिळ लावली. सौरभ नेत्रावळकर आणि अली खान यांनीही किफायतशीर गोलंदाजी करत नामिबियाला १८ षटकांत ६ बाद १६८ धावांवर रोखले.सामन्याचे प्रमुख आकर्षण:संजय कृष्णमूर्ती: ३३ चेंडूत नाबाद ६८ धावा (मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार).मोनांक पटेल: कर्णधारी खेळी करत ३० चेंडूत ५२ धावा केल्या.नामिबियाची हतबलता: २०० धावांचे लक्ष्य पार करताना नामिबियाच्या मधल्या फळीला वेग राखता आला नाही.या विजयाचे महत्त्व: या विजयामुळे अमेरिकेने आपल्या गटात भक्कम स्थान निर्माण केले असून, 'जायंट किलर' ही आपली ओळख पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
दिल्ली येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आराखड्याची होणार मांडणी
मुंबई : दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ मध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्वसमावेशक आराखडा मांडला जाणार आहे. राष्ट्रीय महिला आयोग (NCW), आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना (ITU) आणि संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण व संशोधन संस्था (UNITAR) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे सत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील संधी, कौशल्यविकास, डिजिटल उद्योजकता आणि आर्थिक स्वावलंबन या विषयांवर विशेष भर देण्यात येणार आहे. हे सत्र १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता भारत मंडपम, कक्ष क्रमांक नऊ येथे होणार आहे.या समिटमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, युनिटारच्या संचालिका (समृद्धी विभाग) मिहोको कुमामोटो, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या (आयटीयू) प्रादेशिक संचालिका (आशिया-पॅसिफिक) अत्सुको ओकुदा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संगीतकार निर्माता कार्तिक शाह यांच्यासह उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि महिला उद्योजिका सहभागी होणार असून महिलांच्या नेतृत्वाखालील आर्थिक प्रगतीस चालना देण्यासाठी ठोस उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत. विशेषतः ग्रामीण व वंचित घटकांतील महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करण्यावर भर राहणार आहे.या चर्चासत्राचे उद्घाटन एआय विषयावरील विशेष व्हिडिओ सादरीकरणद्वारे होणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या “आर्थिक शक्ती: सामायिक समृद्धीसाठी राष्ट्रीय अपरिहार्यता” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. युनिटारच्या संचालिका मिहोको कुमामोटो “समावेशक आणि समृद्ध भविष्यासाठी स्थानिक क्षमता विकास” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या (आयटीयू) प्रादेशिक संचालिका अत्सुको ओकुदा या “लैंगिक डिजिटल दरी कमी करण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण” या विषयावर उद्बोधन करणार आहेत. पॅनल चर्चेमध्ये विजया रहाटकर ह्या महानगरांबाहेरील महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्राधान्यक्रम, कौशल्यविकास, वित्तपुरवठा व सुरक्षिततेवरील भूमिका या विषयावर तर अत्सुको ओकुदा ह्या आशिया-पॅसिफिक अनुभवातून डिजिटल दरी कमी करण्याच्या उपाययोजना या विषयावर चर्चा करतील. तसेच ब्रिजेश सिंह हे “महिला वापरकर्त्यांसाठी सायबर धोके व सुरक्षिततेतील पोकळी” या विषयावर तर कार्तिक शाह हे “सर्जनशील क्षेत्रातील एआय संधी व आव्हाने” या विषयावर भूमिका मांडणार आहेत. परिसंवादानंतर उपस्थितांसोबत प्रश्नोत्तर सत्र होणार आहे.या चर्चासत्रात महानगरांपलीकडील महिलांना एआयच्या माध्यमातून आर्थिक सक्षमता कशी मिळवून देता येईल, महिला उद्योजिकांसाठी सायबर सुरक्षिततेतील कोणत्या त्रुटी तातडीने दूर करणे आवश्यक आहे, तसेच सर्जनशील अर्थव्यवस्थेत एआयमुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हानांचा कसा सामना करावा, या मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे.
दीड वर्षाच्या बलात्कार पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला पुढाकारनायर रुग्णालयातील डॉक्टरांना चिमुकलीवर तातडीने उपचार करण्याचे निर्देशशिवसेनेच्या शायना एनसी यांच्या मागणीची तातडीने घेतली दखलमुंबई : समाजाच्या काळ्याकुट्ट बाजूचे दर्शन घडवणारी एक हृदयद्रावक घटना दहिसर रेल्वे स्थानकाजवळ १० फेब्रुवारीच्या पहाटे घडली. दीड वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला. रस्त्यावर फुले विकून उदरनिर्वाह करणारे आणि जवळच्याच फूटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील ही मुलगी अज्ञात व्यक्तीने पळवून नेली, तिच्यावर अत्याचार करून तिला स्थानिक मासळी बाजाराजवळील कचऱ्याच्या गटारात फेकून दिले.त्या सकाळी कुटुंबाने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दहिसर येथील एमएचबी पोलीस ठाण्यात सकाळी ११ वाजता नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून दुपारी ३ वाजता गंभीर जखमी अवस्थेत मुलीचा शोध लावला. तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी मुंबई सेंट्रल येथील बीएमसी संचलित नायर रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती अजूनही अतिदक्षता विभागात उपचाराधीन आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तत्पर कारवाईही दुर्दैवी घटना एका सामाजिक कार्यकर्त्यामार्फत कळताच शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी तात्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्वरित दखल घेत पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यांनी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांशी समन्वय साधून मुलीला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत याची काळजी घेतली तसेच पोलीस आयुक्तांशी संवाद साधून तिच्या सुरक्षिततेला आणि तपासाला प्राधान्य देण्यास सांगितले.“आपल्या समाजात काही विकृत प्रवृत्तीचे लोक सर्वात असुरक्षितांवर अत्याचार करून सुटतील असे समजतात, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” असे शायना एनसी यांनी सांगितले. “परंतु यावेळी आपण सर्वजण एकत्र येऊन लढा देऊ. या निरपराध दीड वर्षांच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी तात्काळ हस्तक्षेप केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार.”संबंधित यंत्रणांनी तपासाला गती द्यावी, पीडितेला सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे. आम्ही पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे शायना एन सी यांनी स्पष्ट केले.
Ishan Kishan Record : पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात इशानने केवळ चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील पाकिस्तानविरुद्धचे सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे.
AI Summit Delhi 2026 : ‘एआय’परिषदेसाठी अनेक देशांचे वरिष्ठ अधिकारी भारतात येणार; वाचा संपूर्ण यादी…
नवी दिल्लीत होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेसाठी अनेक देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे भारतात आगमन होत आहे.
Alexei Navalny : नवालनी यांच्या हत्येसाठी बेडकाच्या विषाचा वापर; ब्रिटनची रशियावर टीका
रशियातील प्रमुख राजकीय विरोधी नेते ऍलेक्सी नवालनी (Alexei Navalny) यांच्याविरोधात रशियाने अत्यंत घृणास्पद विषारी बेडकाच्या विषाचा वापर केल्याबद्दल ब्रिटनने रशियावर टीका केली आहे.
IND vs PAK : नाणेफेकीच्या वेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हस्तांदोलन न करता 'नो हँडशेक' धोरण कायम ठेवले आहे.
संयुक्त राष्ट्र – भारत खूप यशस्वी उदयोन्मुख अर्थव्यवस्था असून कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर बैठक आयोजित करण्यासाठी हे अगदी योग्य ठिकाण असल्याचे गौरवोद्गार संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ॲन्टोनिओ गुटेरेस यांनी काढले आहेत. जगभरातील दोन महाशक्तींनाच कृत्रिम बुद्धिमत्तेचा फायदा होणे ही गोष्ट पूर्णपणे अमान्य आहे. याचा फायदा केवळ विकसित देशांनाच व्हायला पाहिजे, असे काही नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्व जगाला […]
India vs Pakistan : पाकिस्तानचा गोलंदाजीचा निर्णय
कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये आज म्हणजेच रविवार १५ फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजल्यापासून हाय व्होल्टेज भारत - पाकिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता झाली. नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला. पाकिस्तानने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.श्रीलंकेत कोलंबो येथे आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत - पाकिस्तान सामना होणार आहे. प्रेमदासाची खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे. त्यामुळे या सामन्यात भारत किती मोठी धावसंख्या उभारणार यावरून तर्कवितर्क सुरू आहेत.हस्तांदोलन नाहीचपाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी कारवायांचा निषेध म्हणून भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणे टाळले.अंतिम ११ खेळाडू :भारत : अभिषेक शर्मा , इशान किशन (यष्टीरक्षक) , तिलक वर्मा , सूर्यकुमार यादव (कर्णधार) , हार्दिक पांड्या , शिवम दुबे , रिंकू सिंग , अक्षर पटेल , कुलदीप यादव , वरुण चक्रवर्ती , जसप्रीत बुमराहपाकिस्तान : सईम अयुब , साहिबजादा फरहान , सलमान आगा (कर्णधार) , बाबर आझम , उस्मान खान (यष्टीरक्षक) , शादाब खान , मोहम्मद नवाज , फहीम अशरफ , शाहीन आफ्रिदी , अबरार अहमद , उस्मान तारिक
वैभव सूर्यवंशी देणार १० वीची परीक्षा देणार ?
मुंबई : भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख खेळाडू आणि अवघ्या १४ व्या वर्षी चर्चेत आलेला वैभव सूर्यवंशी याच्याबाबत एक बातमी समोर आली आहे. शैक्षणिक वर्षअखेर होणारी (CBSE) दहावीची परीक्षा तो यंदा देणार की नाही याविषयी त्याच्या वडिलांनी उत्तर दिलं आहे.सोशल मीडियावर हॉलतिकीट व्हायरलकाही दिवसांपासून एक हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परीक्षा केंद्रावर सुरक्षेची तयारी वाढवल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, शाळा प्रशासनाने कोणतीही विशेष सवलत दिली जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.बिहारमधील ताजपूर येथे राहणारा वैभव ताजपूर येथील मॉडेस्टी स्कूलचा विद्यार्थी आहे परीक्षेचा अर्जही त्याने भरला होता. परंतु तो सध्या सराव शिबिरे, राष्ट्रीय स्तरावरील सामने आणि विविध स्पर्धांमध्ये गुंतलेला आहे. सलग सामने आणि प्रवासामुळे त्याला अभ्यासाला पुरेसा वेळ देता आला नाही, अशी माहिती समोर आली आहे. कुटुंबीय आणि शाळा व्यवस्थापन यांच्यातील चर्चेनंतरच त्याने यंदा बोर्ड परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.अंडर-१९ विश्वचषकातील दमदार कामगिरी२०२६ मधील आयसीसी अंडर १९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत त्याने भारतीय संघासाठी उल्लेखनीय योगदान दिले. सात सामन्यांत ६२.७१ च्या सरासरीने ४३९ धावा करत तो सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अग्रक्रमावर राहिला. अंतिम सामन्यात इंग्लंड अंडर १९ क्रिकेट संघ विरुद्ध साकारलेली १७५ धावांची खेळी विशेष गाजली. १६९ पेक्षा अधिक स्ट्राईक रेटसह त्याने आक्रमक फलंदाजीचे दर्शन घडवले.
भोपाळमध्ये पत्नीने प्रेयसीला विकला पती, जुदाई सिनेमाची पुनरावृत्ती
भोपाळ : श्रीदेवी, उर्मिला मातोंडकर आणि अनिल कपूर यांचा जुदाई हा हिंदी सिनेमा ९० च्या दशकात प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या कथेशी मिळतीजुळती अशी घटना वास्तवात अलीकडेच मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये घडली.भोपाळमध्ये ४२ वर्षांचा सरकारी अधिकारी त्याचे काम व्यवस्थित करत होता. या अधिकाऱ्याच्या विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या ५४ वर्षीय महिलेला हा अधिकारी आवडू लागला. हळू हळू दोघांमधील जवळीक वाढली. कामाच्या निमित्ताने झालेल्या ओळखीचे रुपांतर आधी मैत्रीत नंतर प्रेमात झाले. या प्रेमापोटी सरकारी अधिकारी स्वतःच्या घरी कमी वेळ देऊ लागला. यातून घरी वाद वाढले. परिस्थिती बिघडत गेली. अखेर अधिकाऱ्याच्या १६ आणि १२ वर्षांच्या मुलींपैकी मोठ्या मुलीने न्यायालयात दाद मागितली.न्यायालयात सुनावणी सुरू झाली त्यावेळी ४२ वर्षीय अधिकाऱ्याने आपले कार्यालयातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यावर प्रेम असल्याची कबुली दिली तसेच पत्नीसोबत राहण्याची इच्छा नाही असेही सांगितले. त्याचवेळी मुलींवर प्रेम आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी आवश्यक ते सर्व काही करण्याची तयारी दाखवली. अधिकाऱ्याच्या प्रेमात असलेल्या महिलेनेही नात्याची कबुली दिली आणि प्रियकराने मुलींच्या भविष्यासाठी नियोजन केल्यास हरकत घेणार नसल्याचे स्पष्ट केले. अखेर अधिकाऱ्याच्या पत्नीने स्वतःच्या आणि मुलींच्या भविष्याचा विचार करून तडजोड केली. पत्नीने घटस्फोट घेण्याच्या बदल्यात स्वतःसाठी आणि पोटच्या दोन मुलींसाठी एक डुप्लेक्स फ्लॅट आणि २७ लाखांची रोख रक्कम अशा एकूण दीड कोटी रुपयांची मागणी केली. पतीच्या प्रेयसीने ही किंमत मोजण्याची तयारी दाखवली. यानंतर परस्पर सहमतीने घटस्फोट झाला.लग्नानंतरच्या प्रेमातून निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी भोपाळमध्ये दीड कोटी रुपयांत झालेला हा पहिलाच घटस्फोट आहे. यामुळे पत्नीने दीड कोटी रुपयांत प्रेयसीला पती विकल्याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे.श्रीदेवी, उर्मिला मातोंडकर आणि अनिल कपूर यांच्या जुदाई सिनेमात पैशांच्या लालसेतून श्रीदेवी पतीला दूर करते आणि नंतर तिला चुकीची जाणीव होते असे दाखवले होते. भोपाळच्या घटनेत पती आणि पत्नी यांच्या जुदाईचे कारण पती आणि त्याची प्रेयसी यांच्यातील नाते आहे. भोपाळच्या महिलेने वास्तवाचे भान राखून स्वतःच्या आणि मुलीच्या भविष्याच्या विचार करून घटस्फोट घेतला आहे. पण या घटनेच्या निमित्ताने बदलत्या कौटुंबिक नातेसंबंधांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
Kedarnath : केदारनाथचे दरवाजे २२ एप्रिलला उघडणार तर, १९ एप्रिलला निघणार पंचमुखी डोली
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील प्रसिद्ध केदारनाथ मंदिराचे दरवाजे यंदा २२ एप्रिल रोजी भाविकांसाठी उघडले जाणार आहेत.
Amit Patkar : गोवा फॉरवर्ड पक्षाशी कॉंग्रेस करणार हातमिळवणी; अमित पाटकर यांचे मोठे विधान
भाजपची सत्ता असणाऱ्या गोव्यातील विधानसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्या रणसंग्रामासाठी कॉंग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षाकडे (जीएफपी) मैत्रीचा हात पुढे केला आहे.
Harshwardhan Sapkal : प्रत्येक बाबतीत जात-धर्म आणणे भाजपचा फंडा; हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रत्युत्तर
महापुरुषांच्या नावावर राजकारण सुरू आहे. समाजात द्वेष पसरवला जात आहे. तसेच माध्यमांनी विचारला त्यासंबंधानी मी दिलेल्या उत्तराचा भाजपकडून ध चा मा करण्यात आला. जाती, धर्मावरुन राजकारण करण्याचा देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा हा जुनाच फंडा आहे.
Newasa News : महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले त्रिवेणीश्वर महादेवाचे दर्शन
महाशिवरात्रीच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव आणि सुरेशनगर यांच्या मध्यभागी वसलेल्या स्वयंभू श्री त्रिवेणीश्वर महादेव संस्थान येथे भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा झाला.
Mahashivratri 2026 : हरिचंद्रगड येथून दर्शन घेऊन परतताना भाविकाचा दगड अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू !
जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर पासून पुढे उंचावर असलेल्या हरिचंद्रगड ता. अकोले येथे पुरातन शिवलिंग आहे.
दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित
मुंबई :‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या चित्रपटात राम चरण आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असून, जगपति बाबू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.‘पेड्डी’च्या निर्मात्यांनी आपल्या दिग्दर्शक बुची बाबू सना यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर एक प्रभावी संदेश शेअर करत टीमने या दूरदर्शी चित्रपट निर्मात्याविषयीचा आदर व्यक्त केला आहे. निर्मात्यांनी शेअर केलेली ही विशेष पोस्ट आगामी चित्रपटाच्या भव्यतेची आणि मोठ्या दृष्टीकोनाची साक्ष देते.वाढदिवसानिमित्तची ही पोस्ट केवळ दिग्दर्शकांचा गौरव करत नाही, तर ‘पेड्डी’भोवती निर्माण झालेल्या चर्चेलाही अधिक उधाण देते. हा चित्रपट भव्य प्रमाणात साकारला जात असून, प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. आपल्या मातीतल्या कथा आणि भावनिक मांडणीसाठी ओळखले जाणारे बुची बाबू सना यांनी इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘पेड्डी’च्या माध्यमातून ते आपल्या मर्यादा आणखी विस्तारताना दिसत आहेत. हा चित्रपट रफ-अँड-टफ ड्रामासह जबरदस्त तीव्रता आणि मोठ्या स्केलचा अनुभव देण्याचे आश्वासन देतो.चित्रपटाची घोषणा झाल्यापासून पोस्टर्स आणि गाणी प्रदर्शित होताच कथेबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. ‘पेड्डी’मधील ‘चिकीरी’ हे गाणे, ज्यामध्ये राम चरण दिसतात, आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज पार करत मोठे यश मिळवले आहे.बुची बाबू सना लिखित व दिग्दर्शित ‘पेड्डी’मध्ये राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्या सोबत शिवा राजकुमार, जान्हवी कपूर, दिव्येंदू शर्मा आणि जगपति बाबू यांसारखे कलाकार झळकणार आहेत. वेंकट सतीश किलारू यांनी ‘वृद्धी सिनेमाज’ या बॅनरखाली आणि ‘मायथ्री मूव्ही मेकर्स’च्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 30 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
केव्हा मिळणार पीएम किसानचा २२वा हप्ता? केंद्राकडून अधिकृत घोषणा पण शेतकरी प्रतीक्षेत
नवी दिल्ली : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणाऱ्या प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये तीन टप्प्यांत थेट बँक खात्यात वर्ग केले जातात. आतापर्यंत २१ हप्त्यांचे वितरण पूर्ण झाले असून, आता २२व्या हप्त्याची उत्सुकता वाढली आहे. मागील रक्कम नोव्हेंबर २०२५ मध्ये जमा झाली होती.संभाव्य तारीख समोरप्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील हप्ता २४ फेब्रुवारी २०२६ रोजी खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, यासंदर्भात केंद्र सरकारकडून अधिकृत जाहीर वक्तव्य झालेले नाही. अधिकृत अधिसूचना आल्यानंतरच अंतिम तारीख स्पष्ट होणार आहे.योजनेची पार्श्वभूमी२०१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिची अंमलबजावणी सुरू झाली. थेट लाभ हस्तांतरण पद्धतीमुळे ही योजना जगातील मोठ्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर उपक्रमांपैकी एक मानली जाते.हप्ता मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया२२वा हप्ता खात्यात सुरळीत जमा व्हावा यासाठी लाभार्थ्यांनी खालील बाबी पूर्ण केलेल्या असाव्यात :ई-केवायसीची पडताळणी पूर्ण असणेजमीन नोंदणीची माहिती अद्ययावत असणेबँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणेखाते क्रमांक व IFSC तपशील अचूक नोंदवलेले असणेवरीलपैकी कोणतीही माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्यास रक्कम प्रलंबित राहू शकते.कोणाला लाभ मिळणार नाही?ज्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे, जमीन तपशीलात त्रुटी आहेत किंवा बँक व आधार माहितीमध्ये विसंगती आहे, अशा लाभार्थ्यांना पुढील हप्ता मिळण्यात अडथळे येऊ शकतात. संबंधित चुका दुरुस्त केल्याशिवाय निधी वर्ग होणार नाही.‘फार्मर आयडी’ अनिवार्यतेकडे पावलेउत्तर प्रदेश , बिहार , मध्य प्रदेश , महाराष्ट्र , राजस्थान , गुजरात , तामिळनाडू आणि तेलंगणा यांसह काही राज्यांत ‘Farmer ID’ नोंदणीसाठी मोहीम राबवली जात आहे. सेवा केंद्रे व शिबिरांच्या माध्यमातून ओळख क्रमांक तयार केला जात असून, तो नसल्यास योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.हप्त्याची स्थिती कशी पाहावी?लाभार्थी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘Know Your Status’ किंवा ‘Farmer Corner’ पर्यायातून आधार किंवा खाते क्रमांकाच्या आधारे आपली पेमेंट स्थिती तपासू शकतात. केंद्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यानंतरच २२व्या हप्त्याची निश्चित तारीख स्पष्ट होईल. तोपर्यंत शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे व तपशील अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे.
Mahashivratri : महादेवाचं गाणं गाऊन त्याने रचला विक्रम…पण अभिनेत्याचा अंत झाला खूपच दुर्दैवी !
देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिभावाने साजरा होत असताना मंदिरांमध्ये आणि सोशल मीडियावर भगवान शंकरावरील गाणी घुमताना दिसत आहेत.
Bangladesh PM Oath : तारिक रहमान यांच्या शपथविधीला भारताचा ‘हा’बडा नेता राहणार उपस्थित
बांगलादेशच्या १३व्या संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी)ने दणदणीत बहुमत मिळवले आहे. बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान हे नवनिर्वाचित पंतप्रधान (Bangladesh PM Oath) म्हणून १७ फेब्रुवारी २०२६ रोजी शपथ घेणार आहेत.
IND vs PAK : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली याने पावसासाठी केलेली प्रार्थना सध्या चर्चेचा आणि थट्टेचा विषय ठरली आहे.
‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती
मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व हल्ल्यांतून तावून सुलाखून सोमनाथ मंदिर आजही उभे आहे. वारंवार जीर्णोद्धार झाला पण सोमनाथावरील भाविकांची श्रद्धा तसूभरही कमी झाली नाही. सोमनाथावरील पहिल्या हल्ल्याला एक हजार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन झाले होते. याप्रसंगी पंतप्रधानांनी उपस्थितांना हिंदू धर्माचे महात्म्य आणि सोमनाथचा इतिहास याविषयी सोप्या भाषेत सविस्तर सांगितले होते. या पार्श्वभूमीवर आता बॉलिवूड एकटवटले आहे. सोमनाथ मंदिराचा इतिहास लवकरच हिंदी चित्रपटाच्या रुपाने मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. नियोजनानुसार हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.जय सोमनाथ या हिंदी चित्रपटासाठी लार्जन चॅन लाईफ चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून लोकप्रिय असलेल्या संजय लील भन्साळीनं माहितीपर क्षेत्रातील (डॉक्युमेंटरी) दिग्गज केतन मेहतांसोबत युती केली आहे. भारतीय सिनेसृष्टीतील दोन प्रभावशाली आणि सर्जनशील दिग्दर्शक – संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता हे दोघे संयुक्तपणे 'य सोमनाथ'वर काम करणार आहेत.‘जय सोमनाथ’ची कथा प्रेक्षकांना इ.स. १०२५ - १०२६ या कालखंडात घेऊन जाणार आहे. त्या वेळी गझनीच्या महमूदने गुजरातमधील सोमनाथ मंदिरावर आक्रमण करून त्याची लूट केली होती. भारतीय इतिहासातील हा प्रसंग विनाशानंतर पुन्हा उभे राहण्याच्या जिद्दीचे प्रतीक मानला जातो. विशेष म्हणजे या घटनेला यंदा एक हजार वर्षे पूर्ण होत आहेत. अशा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट प्रथमच मोठ्या पडद्यावर साकारला जात आहे.या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे भन्साळी आणि मेहता यांची सर्जनशील भागीदारी. भव्य सेट्स, नेत्रदीपक दृश्यरचना आणि भावनिक कथनशैलीसाठी ओळखले जाणारे भन्साळी, तर ऐतिहासिक दृष्टिकोन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले केतन मेहता – या दोघांची सांगड ‘जय सोमनाथ’मध्ये पाहायला मिळणार आहे. दोन्ही दिग्दर्शकांचा गुजरातशी असलेला संबंध लक्षात घेता, या कथेत वास्तव आणि भावनांचा प्रभावी संगम दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.‘जय सोमनाथ’ची निर्मिती भन्साळी प्रोडक्शन्स आणि केतन मेहता यांच्या माया मूव्हीज या बॅनरखाली होत आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी केतन मेहता स्वतः सांभाळणार आहेत. हा भव्य ऐतिहासिक चित्रपट २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
कुणकेश्वरच्या विकासासाठी कटीबद्ध ; अधिकाधिक निधी देणार -पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही
सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रवासात कुणकेश्वराचा मोठा आशीर्वाद मिळाल्याची भावनामुंबई : आज महाशिवरात्री निमित्त कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्राचीन व ऐतिहासिक श्री देव कुणकेश्वर मंदिर येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी विधिवत दर्शन घेऊन भगवान श्री महादेवांची मनोभावे पूजा केली.यावेळी बोलताना ते म्हणाले, श्री देव कुणकेश्वराच्या यात्रेला मी गेली अनेक वर्षांपासून नियमित दर्शनासाठी येत असून कुणकेश्वराचे दर्शन माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कुणकेश्वर हे केवळ धार्मिक स्थळ नसून कोकणाच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. या परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करणे ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी शासनाच्या मार्फत मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन यावेळी केले. यावेळी कुणकेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त, प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.कुणकेश्वर यात्रेसाठी राबविण्यात आलेल्या ‘प्लास्टिक मुक्त यात्रा’ या अभिनव उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला आहे. यात्रेदरम्यान प्लास्टिकचा वापर टाळून स्वच्छ, सुंदर आणि हरित कुणकेश्वर घडवण्याचा संकल्प प्रशासनाने कृतीतून दाखवला. भाविकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करत यात्रा यशस्वी व शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन व प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. पर्यावरण रक्षण आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन यांचा सुंदर समन्वय साधत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
Shrikant Shinde : वडिलांना नडणाऱ्या गणेश नाईकांना श्रीकांत शिंदेंनी दिले ओपन चॅलेंज; म्हणाले…
सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भूमिका घेत त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनमंत्री गणेश नाईक यांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी थेट खुले आव्हान दिले आहे.
भगवान शिवाला समर्पित आणि देशातील १२ वे ज्योतिर्लिंग मानले जाणारे हे मंदिर आहे.

31 C