फेरीवाल्यांवरील कारवाईत सहायक आयुक्तांची बोटचेपी भूमिका
ठरावीक भागांमध्ये कारवाई, इतर ठिकाणी फेरीवाल्यांचे धंदे तेजीतमुंबई : मुंबईतील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी दिल्यानंतर प्रत्यक्षात मुंबईतील अनेक भागांमध्ये कारवाईमध्ये दुटप्पी भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील रेल्वे स्थानक परिसर तसेच गर्दीच्या ठिकाणी फेरीवाल्यांवरील कारवाई तीव्र करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही महापालिकेचे काही सहायक आयुक्त हे या कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईतील काही भागांमध्ये फेरीवाल्यांवरील कारवाईचा परिणाम दिसून येतो, तर काही भागांमध्ये सर्रासपणे फेरीवाले रस्ते आणि पदपथ अडवून व्यवसाय करताना दिसून येत आहे. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशाचे नक्की पालन होते का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.मुंबई महानगराची वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि पदपथांवरील अतिक्रमण यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालणे अवघड होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत अनधिकृत फेरीवाला मुक्त रस्ते व पदपथ धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रमुख रस्ते, अरुंद पदपथ, उड्डाणपुलाखालील जागा तसेच रुग्णालये, शाळा व रेल्वे स्थानकांच्या आसपासचे परिसर अतिक्रमणमुक्त करून नागरिकांसाठी मोकळी व सुरक्षित सार्वजनिक जागा उपलब्ध करून देणे असून अनधिकृत फेरीवाल्यांमुळे रस्त्यावर व पदपथांवर होणारी गर्दी, वाहतुकीला होणारे अडथळे आणि अपघातांची शक्यता लक्षात घेता काही भाग 'फेरीवाला मुक्त क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी सांगत कारवाई तीव्र करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. परंतु त्यानंतरही काही भागांमध्ये फेरीवाल्यांवरील कारवाई तीव्र झालेली नाही. नेमक्या दादर, बोरीवली, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड तसेच अन्य काही भाग वगळले तरी मुंबईतील काही भागांमध्ये आजही कारवाई होताना दिसत नाही, तसेच याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.काही दिवसांपूर्वी कुलाबा कॉजवेवरील बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच माजी नगरसेवक ऍड मकरंद नार्वेकर यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिकेच्या ए विभागाने अखेर या अतिक्रमणावर कारवाई केली होती. परंतु दादरमध्ये केवळ ६० टक्केच कारवाई दिसून येत आहे. तर याशिवाय विलेपार्ले,गोरेगाव, वांद्रे पूर्व, कांदिवली, अंधेरी, सांताक्रुझ, ग्रँटरोड, माटुंगा, विक्रोळी, भांडुप, कांजूर मार्ग, चेंबूर आणि गोवंडी भागांमध्ये फेरीवाल्यांवरील कारवाई संथ गतीने सुरु आहे.मुंबईत कुठे आणि कशी कारवाई : न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानक पासून १५० मीटरचा परिसर फेरीवाला मुक्त करणे आवश्यक आहे. तसेच रेल्वे स्थानक परिसर आणि गर्दीची ठिकाणे फेरीवाला मुक्त करण्याचे आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त याचे निर्देश असताना महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस हे जाणीवपूर्वक १०० मीटर पुढील फेरीवाल्यांवर कारवाई करत आहे. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक परिसरात भाडोत्री फेरीवाला असून १०० मीटरच्या पुढील भागात परंपरागत दोन ते तीन पिढ्या फेरीचा व्यवसाय करणारे आहेत; परंतु या पिढीजात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांकडून चिरीमिरी मिळत नसल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि अधिकाऱ्यांचे हात ओले केले जात असल्याने स्टेशन परिसरता केवळ कारवाईचे नाटक निर्माण करून भाडोत्री फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास अप्रत्यक्ष मदत केली जाते. मनसे नगरसेवक आणि महापालिका गटनेते यशवंत किल्लेदार यांनी स्थायी समितीच्या सभेत स्टेशन परिसरात कारवाई व्हावी, पण जे परंपरागत व्यवसाय करत आहेत, जे वसई, कल्याणचा पुढील गावातून भाजी विकण्यास येत आहे आणि ते न्यायालयांच्या निर्देशानुसार १५० मीटरच्या पुढील भागात व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर कारवाई का केली जाते असा सवाल करत त्यांचावर कारवाई करू नये अशी सूचना केली.
वरळी बीडीडीतील ८४५ घरांचे एप्रिल महिन्यात वितरण
मुंबई : म्हाडामार्फत मुंबईतील नायगाव, वरळी आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. यातील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन घरांचे वितरण नुकतेच करण्यात आले. आता वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पअंतर्गत ८४५ घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून, महिनाभरात म्हणजेच एप्रिलमध्ये या घरांचा ताबा देण्याचे नियोजन म्हाडाने केले आहे. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पअंतर्गत ५५६ पुनर्वसन घरांचा ताबा यापूर्वीच देण्यात आला आहे.वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत एप्रिलमध्ये ८४३, मे मध्ये ५७४, जुलैमध्ये २७१ अशा एकूण २२४६ सदनिका या वर्षअखेरीस वितरित करण्याचे नियोजन आहे. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात मे-२०२६ मध्ये ५३७ पुनर्वसन सदनिका वितरित करण्याचे तर परळ येथील ५४७ पुनर्वसन सदनिका जून - २०२६, तर ऑक्टोबर- डिसेंबर २०२६ मध्ये ३४२ सदनिकांचे वितरण प्रस्तावित आहे.डिसेंबर २०२६ पर्यंत म्हाडातर्फे तीनही प्रकल्पांतील ४८८८ पुनर्वसन सदनिकांचा ताबा देण्याचे नियोजन आहे. डिसेंबर २०२७ पर्यंत तीनही बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ६२४६ पुनर्वसन सदनिकांचा ताबा देण्याचे नियोजन आहे. तिनही बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील १५,५९३ पुनर्वसन सदनिकांची उभारणी पूर्ण करून सदनिकांचा ताबा डिसेंबर २०२९ पर्यंत देण्याचे नियोजन आहे. तसेच वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात ४ हजार ८९३, नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात १ हजार ७४, ना.म.जोशी मार्ग पुनर्विकास प्रकल्पात १ हजार ५८२ अशा एकूण ७ हजार ५५० पुनर्वसन सदनिका बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तीनही बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात ९ हजार ८१५ पुनर्वसन सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर असून, एकूण ६३ टक्के काम झाले आहे. पुनर्विकास प्रकल्पात ऑक्टोबर २०२६ मध्ये उर्वरित ५७७८ पुनर्वसन सदनिकांच्या बांधकामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे.
नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी मोहन जोशी
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बुधवारी झालेल्या नियामक मंडळ सभेत नियोजित १०१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. याच बैठकीत ऐतिहासिक अशा १०० व्या नाट्यमहोत्सवाच्या सांगता समारंभाची घोषणाही करण्यात आली आहे. या शताब्दी महोत्सवाचा दिमाखदार सांगता सोहळा शुक्रवार, २४ एप्रिल ते रविवार, २६ एप्रिल २०२६ या कालावधीत रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे. कोकणच्या भूमीत होणाऱ्या या तीन दिवसीय सोहळ्यातनाट्यकर्मींची उपस्थिती असणार आहे.
...तर गारगाई धरणाचा प्रस्ताव रद्द होणार?
नव्याने निविदा मागवून कंपनीची निवड केली जाण्याची शक्यतामुंबई : गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले असून यावर प्रशासनाच्यावतीने अद्यापही उत्तरे देण्यात आलेली नाहीत. मात्र, हे कंत्राट काम प्रशासनाने अंदाजित केलेल्या दरापेक्षा ११ टक्के अधिक दराने बोली लावत काम मिळवले. त्यामुळे महापालिकेने अंदाजित केलेल्या दरातच हे कंत्राट दिले जावे अशाप्रकारची मागणी स्थायी समितीने केली; परंतु आजवर दोन ते तीन वेळा वाटाघाटी करण्यात आलेल्या असून कंपनीने दर कमी करून महापालिकेच्या अंदाजित दरातच काम करण्यास तयार न झाल्यास हा प्रस्तावच फेटाळला जाऊ शकतो, आणि पर्यायाने नव्याने निविदा मागवून नवीन कंपनीची निवड केली जावू शकते, याची दाट शक्यता आहे.मुंबई महापालिकेच्यावतीने मागील अनेक वर्षांपासून बहुप्रतीक्षेत असलेल्या गारगाई प्रकल्पासाठी सुमारे ६७ मीटर उंच आणि सुमारे ७०० मीटर लांबीचे रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट तंत्रज्ञानावर आधारित धरण उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. या धरणाचे बांधकाम २.२ मीटर व्यासाचा आणि सुमारे १.६ किलोमीटर लांबीचा जलवाहन बोगदा बांधण्यात येणार असून त्यामध्ये पाच रेडियल गेट्ससह स्पिलवे, स्टॉपलॉग, टर्बाइन तसेच अंतर्गत काँक्रीट रस्ते आणि पूल यांचा समावेश असेल. या प्रकल्पातून किमान १.२ मेगावॅट वीज निर्मिती करण्याची तरतूद करण्यात आली आहे.बांधकामाच्या काळात नदीचा प्रवाह वळविण्यासाठी दोन टप्प्यांत कॉफर डॅम उभारले जाणार आहेत. तसेच धरणाच्या भागात भूगर्भीय तपासणीसाठी किमान २० बोअरहोल घेऊन सविस्तर जिओटेक्निकल तपासणी करण्यात येणार आहे. भूजल पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी पीझोमेट्रिक ट्यूब बसविण्याचीही योजना आहे. याशिवाय प्रकल्प क्षेत्रात कंटूर सर्वेक्षण व टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या प्रकल्पात सुमारे ३.१० लाख झाडे बाधित होणार आहेत.याबाबतचा प्रस्ताव प्रथम स्थायी समितीच्या बैठकीपुढे आल्यानंतर सभागृहनेते गणेश खणकर यांनी महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा अधिक दरात हे काम मिळवलेले असून प्रशासनाने पुन्हा वाटाघाटी करून कंपनीला अंदाजित दरातच काम करण्यास भाग पाडावे अशी सूचना केली आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने पाणी पुरवठा प्रकल्प विभागाच्यावतीने कंपनीनीशी वाटाघाटी झाल्यानंतर प्रथम २० कोटी आणि त्यानंतर झालेल्या वाटाघाटीमध्ये ३५.१९ कोटींची सूट देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर पुन्हा एकदा झालेल्या वाटाघाटीमध्ये ३५.१९ कोटी रुपयांऐवजी ५७. ७३ कोटी रुपयांची सूट देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र,आजवर या कंपनीसोबत तीन वेळा झालेल्या वाटाघाटीमध्ये प्रत्येक वेळी सरासरी २० कोटी रुपयांची सवलत देण्याची तयारी दर्शवलेली आहे. त्यामुळे ही कंपनी प्रशासनाने अंदाजित केलेल्या ३००६ कोटींमध्ये काम करण्यास तयार होणार नाही असे दिसून येत आहे. प्रशासनाच्या अंदाजित दरामध्ये काम केल्यास कंत्राटदार कंपनीला सुमारे ३३० कोटी रुपये कमी करावे लागणार आहे. त्यामुळे आजवरचा इतिहास पाहता एवढ्या मोठ्याप्रमाणात दर कमी करण्यास कंत्राट कंपनी तयार होणार नाही. त्यामुळे संबंधित कंपनीकडून वाटाघाटीमध्ये जर अंदाजित दरात काम करण्यास असमर्थता दर्शवली तर स्थायी समितीमध्ये गारगाई पाणी प्रकल्पाचा प्रशासनाकडे परत पाठवल्याशिवाय पर्यायच राहणार नाही. तसेच अंदाजित दरात काम करण्यास तयार नसल्यास पात्र कंपनीची निवड बाद करून पुन्हा निविदा मागवल्या जावू शकतात असेही बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने कंत्राट कंपनीशी कशाप्रकारे वाटाघाटी करून त्यांचे मन वळवले जात आणि अंदाजित दरात काम करायला भाग पाडले जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
फेब्रुवारी ते जूनदरम्यान मुंबईच्या फळ मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या विक्रीला मोठी गती मिळत असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल झाली. रत्नागिरी व देवगड हापूसची आवक अवकाळी पाऊस आणि कीड हल्ल्यांमुळे घटली असून त्यामुळे दर गगनाला भिडले आहेत. आखाती युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्याने यंदा स्थानिक बाजारात हापूस आंबा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला आहे.फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांच्या कालावधीत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमधील उलाढालीला कमालीची गती मिळालेली असते. फळ मार्केटमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यांतून तसेच परराज्यातूनही फळे विक्रीला येत असतात. या मार्केटमध्ये देशाच्या अनेक राज्यांतून आंबे विक्रीला येत असले तरी कोकणचा हापूस हा आंबा खवय्यांच्या पसंतीचा असतो. वर्षभर वाट पाहिलं, पण खाल्ला तर हापूसच खाईन, असे आंबाप्रेमी अभिमानाने सांगत असतात. गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, राम नवमी व अन्य सणांना घराघरांमध्ये हापूस आंब्याच्या रसाचा कार्यक्रम ठरलेलाच असतो. त्यामुळे अन्य दिवसांच्या तुलनेत या दिवसांसाठी आंबा विक्रीच्या उलाढालीचा आलेख कमालीचा उंचावलेला असतो. कोकणच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा तीन जिल्ह्यांतून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल येथील नागरिकांसाठी आंबा विक्रीला येत असला तरी रायगडच्या तुलनेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूसला अधिक मागणी असते व चवीचा दर्जाही काही वेगळाच असतो. भाज्या आणि फळभाज्या मार्केटमध्ये विक्रीला शेतकऱ्यांकडून थेट येत असतात. हापूस आंब्याचे गणित त्या तुलनेत वेगळे असते. मार्केटमध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आंबा थेट विक्रीला पाठविण्याचे प्रमाण नगण्य असते. मार्केटमधील व्यापारीच कोकणात जाऊन थेट बागांचाच सौदा करत असल्याने फळांचे पैसे शेतकऱ्याला जागेवरच उपलब्ध होत असतात. गुढीपाडव्याच्या दिनी मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल आंबा विक्रीतून झालेली आहे. खवय्यांची आंब्याला असलेली पसंती पाहून अन्य राज्यातील आंबा उत्पादक महाराष्ट्रातील शहरी भागातील मार्केटमध्ये आंबा विक्रीला पाठवत असतात. कोकणच्या हापूसच्या खालोखाल कर्नाटकच्या आंब्याने मार्केट व्यापलेले असते. एपीएमसी मार्केटमधील प्रत्येक विंगमधील गाळ्यागाळ्यावर हापूस आंब्यांनी जागा व्यापलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून रत्नागिरी, लांजा, राजापूर भागातून तर सिंधुदुर्गचा देवगड हापूस विक्रीला आला आहे. रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागातूनही हापूस आंबा विक्रीला आला आहे. जानेवारी महिन्यापासूनच हापूस आंब्याची मार्केटला तुरळक आवक येण्यास सुरुवात होते, एप्रिलच्या मध्यापासून हापूस आंब्याची आवक वाढून दररोज लाखांच्या संख्येने हापूस आंब्याच्या पेट्या मार्केटमध्ये विक्रीला येत असतात. आवक वाढल्यावर याच कालावधीत हापूस आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतात. मार्केटमध्ये कोकणच्या हापूस आंब्याव्यतिरिक्त केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही काही प्रमाणात ‘हापूस’ सदृश आंबा विक्रीसाठी येत असतो. दरवर्षीच्या तुलनेत हापूस आंब्याची आवक कमी झालेली आहे. फुलोऱ्याच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि कीड हल्ल्यांमुळे आंब्याच्या काढणीला विलंब झाला असून, रत्नागिरी आणि देवगड हापूसची आवक घटली आहे आणि शहरभरातील हंगामाच्या सुरुवातीच्या पुरवठ्याचे स्वरूप बदलले आहे. आंबा आवकच मंदावल्याने किमती गगनभरारी घेत आहेत. हापूसचे दर ५ ते ९ डझनाच्या पेटीचे २ ते ८ हजार रुपये आहेत. आखाती युद्ध सुरू असल्याने हापूस आंब्याची हक्काची बाजारपेठ ओळखली जाणाऱ्या आखाती देशांमध्ये हापूसची निर्यात अजून सुरू झालेली नाही व युद्धामुळे लवकर निर्यात होण्याची शक्यताही नाही. त्यामुळे स्थानिक बाजारातील मार्केटमध्ये आंबा विकला जाणार असल्याने यंदा खवय्यांना आंबा मुबलक प्रमाणावर उपलब्ध होणार आहे.गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई शहर व उपनगरामध्ये जवळपास ३२ कोटी ५० लाख रुपयांच्या आंब्याची विक्री झाली आहे. यामध्ये १० कोटी रुपयांच्या कर्नाटक आंब्याची, तर उर्वरित २२ कोटी ५० लाख रुपयांच्या कोकणमधून आलेल्या हापूस आंब्याची विक्री झालेली आहे. युरोपीय देशांमधून हापूस आंब्याला फारशी मागणी नसल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आखाती देशांमधील बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागत आहे. आखाती युद्धामुळे रमजानचा महिना असतानाही अन्य फळांची विक्री न झाल्याने फळ उत्पादकांना यंदा प्रचंड फटका बसला आहे. इराण आपला फळांचा मुख्य ग्राहक असून कलिंगड, डाळिंबसह अन्य भारतीय फळांना रमजानच्या महिन्यात इराणमधून सर्वांधिक मागणी असते. त्याखालोखाल अन्य आखाती देशांतून विशेषत: दुबईतून अधिक मागणी असते. सध्या आखाती युद्ध सुरू असल्याने निर्यातदार व्यापाऱ्यांचे नुकसान प्रचंड झाले आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या बागा विकत घेऊन त्यातील आंबे आता स्थानिक बाजारांमध्ये विकण्याची वेळ आलेली आहे. हापूसला असलेली मागणी व मिळणारा दर पाहून देशातील अन्य आंबा हापूसच्या नावाखाली विकण्याचा प्रकारही काही ठिकाणी होत असतो. खऱ्या खवय्यांना हापूस आंबा लगेच ओळखता येतो आणि इतरांच्या नशिबी फसगत येते. कोकणचा हापूस हा रंगावरून नाही तर गंधावरून ओळखता येतो. त्यामुळेच हापूस घेताना आधी वास घ्या, रंग पाहू नका. खऱ्या कोकण हापूसला एक तीव्र, नैसर्गिक सुगंध असतो जो दुरूनही जाणवतो, अशी माहिती आंबा खवय्यांकडून देण्यात येते. पिकल्यावर हापूस आंबे गडद केशरी-पिवळे असतात. ते कधीही निस्तेज किंवा डागाळलेले नसतात. आंब्याची पातळ, नाजूक त्वचा जी स्पर्शाला मऊ आणि मुलायम वाटते. हापूसच्या नावाखाली स्थानिक बाजारामध्ये अधिक नफा कमविण्यासाठी अन्य जातीचे आंबे बनावट हापूस म्हणून विकण्याचा प्रकार घडत असतो. जाड साल, अधिक टणकपणा, अधिक तंतुमय पोत आणि लक्षणीयरीत्या कमी सुगंध ही अल्फोन्सो नावाने विकल्या जाणाऱ्या दक्षिणेकडील जातींची वैशिष्ट्ये आहेत. एपीएमसी मार्केट, दादर मार्केट, क्रॉफर्ड मार्केट आणि मुंबई शहर व उपनगरातील आंबा व्यापारी ग्राहकांची आंबा मागणी पूर्ण करण्यासाठी दक्षिणेकडील आंब्यांच्या जातीचा साठा करत आहेत, तर दुसरीकडे अस्सल देवगड हापूस दुर्मीळ, महागडा असून खरेदीदारांना तो ओळखणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. फुलोऱ्याच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि कीड हल्ल्यांमुळे काढणीला विलंब झाला असून, रत्नागिरी आणि देवगड हापूसची आवक घटली आहे. आंबा उत्पादनात घट झालेली असतानाही सुरू असलेल्या आखाती युद्धामुळे स्थानिक बाजारांमध्ये हापूस आंबा विक्रीसाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला आहे.
विदर्भ साहित्य संघाचा नवा अध्याय
वार्तापत्र : विदर्भविदर्भातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित अशा विदर्भ साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत डॉ. गिरीश गांधी यांची अध्यक्ष पदी निवड झाली असून त्यांच्या पॅनलने बहुमत मिळवले आहे. नव्या नेतृत्वासमोर संस्थेची सांस्कृतिक परंपरा पुनर्स्थापित करणे आणि पारदर्शक कारभार उभा करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.गेल्या दीड महिन्यापासून विदर्भात गाजत असलेल्या विदर्भ साहित्य संघाची पंचवार्षिक निवडणूक अखेर पार पडली. या निवडणुकीने गेले काही दिवस संपूर्ण विदर्भाचे सांस्कृतिक आणि साहित्यिक वातावरण पूर्णतः ढवळून टाकले होते. गेल्या शनिवारी पोस्टाने मतपत्रिका पाठवण्याचा अखेरचा दिवस होता. रविवारी सकाळपासून मतमोजणी सुरू झाली आणि सोमवारी रात्रीपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले आहेत.अपेक्षेनुसार सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक मान्यवर नाव असलेले डॉ. गिरीश गांधी हे विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले, तर कार्यकारिणीच्या २२ जागांवर गिरीश गांधींच्या पॅनलपैकी २१ उमेदवार विजयी झाले. विदर्भ साहित्य संघ ही विदर्भातील सर्वात जुनी साहित्यिक संघटना असून ती आता १०३ वर्षांची झालेली आहे. या संघटनेचे नेतृत्व आतापर्यंत अनेक मान्यवर सारस्वतांनी केलेले असून या संघटनेला त्यांनीच एक वाङमयीन चेहरा देखील दिलेला होता. त्यात प्राचार्य राम शेवाळकर, प्रा. सुरेश द्वादशीवार, डॉ. मधुकर आष्टीकर, डॉ. वि. भी. कोलते, कवी अनिल, कवी भवानीशंकर पंडित, कवयित्री कुसुमावती देशपांडे अशा अनेक मान्यवरांचा समावेश आहे. मात्र गेल्या ३५ वर्षांपासून ही संस्था कायम वादाच्या भोवऱ्यातच सापडलेली आहे.विदर्भ साहित्य संघाचे काम संपूर्ण विदर्भात अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेले आहे. लहान लहान खेड्यांमध्ये देखील साहित्य संघाच्या शाखा सुरू झालेल्या आहेत. तिथे काही ना काही साहित्य कार्यक्रम कायम होतच असतात. त्यामुळे संपूर्ण विदर्भाची प्रातिनिधिक साहित्य संस्था म्हणून ही ओळखली जाते. त्यामुळेच ही निवडणूक संपूर्ण विदर्भात चर्चेचा विषय ठरणे स्वाभाविकच आहे. या संस्थेचे काम बघून जुन्या मध्य प्रांत (सेंट्रल प्रॉव्हिन्स अँड बेरार) सरकारने संस्थेला अगदी मोक्याच्या जागी एक भूखंड दिला होता. तिथे संस्थेने सुसज्ज अशी इमारत आणि एक भव्य असे रंगमंदिरही उभारले होते. मात्र १९९४-९५ मध्ये तत्कालीन कार्यकारिणीने ही इमारत जुनी झाल्याचे कारण देत आणि पुनर्विकासाचा प्रकल्प सदस्यांसमोर मांडत मंजुरी घेऊन पाडली आणि तिथे व्यावसायिक संकुल उभे केले. त्या संकुलाची इमारत आज तीस वर्षे झालीत, तरी पूर्ण झालेली नाही. म्हणजेच व्यावसायिक गाळे पूर्ण करून ते विकलेदेखील गेले, पण तिथे होणार असलेले रंगमंदिर आज तीस वर्षे झाली तरी पूर्ण झालेले नाही. त्यात गेली वीस वर्ष साहित्यिक नसलेल्या व्यक्तींकडे या संघटनेचे नेतृत्व राहिले आहे. त्यामुळे इथल्या साहित्यिक गतीविधी देखील थांबल्या आहेत. मधली वीस वर्षे इथे बिनविरोध निवडणुका होत होत्या. यावेळी प्रथमच चार पॅनल्स रिंगणात उतरले. त्यात दोन साहित्यिक तर दोन गैर साहित्यिक अध्यक्ष पदासाठी रिंगणात होते. त्यातील साहित्याशी काहीही संबंध नसलेले व्यावसायिक आणि राजकीय नेते डॉ. गिरीश गांधी हे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यावरून निवडणूक प्रक्रियेत तर बरेच वाद झाले, पण नंतरही आता बरेच वाद होणार हे चित्र स्पष्ट दिसत आहे.डॉ. गिरीश गांधी हे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे उमेदवार म्हणून ओळखले जातात. सुरुवातीच्या काळात गांधी हे शाळेत शिक्षक होते. तेव्हा नितीन गडकरी त्यांचे विद्यार्थी होते. परिणामी दोघांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे भाजपचा या निवडणुकीत हस्तक्षेप आहे असा आरोप सुरुवातीपासून होत होता. गडकरींनी खुलासा करून देखील हा आरोप होण्याचे थांबले नव्हते. कारण असा हस्तक्षेप असल्याचे वेळोवेळी संकेत मिळत होतेच. या निवडणुकीत पोस्टाने मतदारांकडे मतपत्रिका पाठवायच्या आणि मतदारांनी त्या मतपत्रिका भरून साहित्य संघाकडे परत पाठवायच्या अशी पद्धत आहे. इथे सर्वच पॅनलच्या उमेदवारांनी गावोगावी फिरून मतदारांकडून कोऱ्या मतपत्रिका गोळा केल्या आणि स्वतःच टिकमार्क करून मतपेटीत टाकल्या असा आरोप होत आहे. त्यातही अनेक मतपत्रिका या पोस्टातून परस्पर पळवल्या गेल्या. त्या मतदारांपर्यंत पोहोचल्याच नाहीत, तर आधीच कोणीतरी पळवून त्यावर टिक करून दुसऱ्याच व्यक्तीने मतपेटीत टाकल्या, असे प्रकारही उघडकीस आले आहेत. या सर्व कामात भाजपने स्वतःची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटना यंत्रणा मोठ्या प्रमाणात वापरली. तसेच आर्थिक गैरव्यवहार देखील केले असा आरोप वारंवार केला जात आहे. मतदार यादीदेखील सदोष असल्याचे आढळून आले. अनेक मृत व्यक्तींची नावे अजूनही कायम आहेत, तर अनेक उमेदवारांचे आणि मतदारांचे वीस वर्षांपूर्वीचे जुने पत्ते तसेच आहेत. त्यात सुधारणा करण्याचे कष्टही साहित्य संघाच्या कार्यालयाने घेतलेले नाही. त्याचाच फायदा घेऊन या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे बोलले जात आहे. रविवारी निकाल लागल्यानंतर नियमानुसार आठवड्याभरात लवादासमोर दाद मागावी लागते आणि तरीही समाधान झाले नाही, तर न्यायालयात दाद मागता येते. इथे बहुतेक सर्व पराभूत उमेदवार न्यायालयात जाणारच हे चित्र स्पष्ट दिसते आहे.गिरीश गांधी साहित्य संघाचे अध्यक्ष झाले तरी त्यांच्यासमोर आव्हाने बरीच राहणार आहेत. ज्या ठिकाणी साहित्य संघाचे जुने कार्यालय होते तिथे व्यावसायिक संकुल झाले आहे. त्या ठिकाणी नव्याने सांस्कृतिक संकुल उभे राहावे आणि १९९५ पूर्वी त्या परिसरात जे सांस्कृतिक वातावरण होते ते पुन्हा निर्माण व्हावे अशी अपेक्षा गिरीश गांधींचे चालू राजकीय गॉडफादर नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ती पूर्ण करण्याचे खरे आव्हान गांधींसमोर आहे. त्याशिवाय पंधरा वर्षांत साहित्य संघातील थांबलेल्या सांस्कृतिक गतीविधी पुन्हा सुरू करण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. दुसरे म्हणजे तिथला प्रशासनिक गलथानपणा संपवून यापुढे लोकशाही पद्धतीने पारदर्शी निवडणुका कशा होतील ही व्यवस्था करण्याचे खरे आव्हान त्यांना पेलायचे आहे. म्हणजेच आज जसा गिरीश गांधींवर भाजपची आणि संघाची यंत्रणा वापरून आणि गैरप्रकार करून विजयी झाल्याचा आरोप मोठ्या आवाजात केला जात आहे तसा आरोप भविष्यात कोणीही करू शकणार नाही ही काळजी त्यांना घ्यायची आहे. विदर्भ साहित्य संघ ही मराठी भाषिकांची साहित्यिक संस्था म्हणून ओळखली जाते. त्यामुळे गिरीश गांधी सर्वांना प्रेमाने जवळ करून काम पुढे नेतात यावर त्यांचे यशापयश अवलंबून राहणार आहे.
गुढीपाडव्याला ९० हजार डझन हापूस मुंबईकरांनी केला फस्त!
कोकणातून हापूसची १३ हजार ९२५ पेट्यांची आवकपरराज्यातील हापूसची १० कोटींना विक्रीकोकणच्या हापूसमुळे २२ कोटी ५० लाखांची उलाढालनवी मुंबई : हापूसने मुंबईकरांचा गुढीपाडव्याचा गोडवा चांगलाच वाढवला. सुमारे ३२ कोटींच्या हापूसची गेल्या आठवडाभरात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारातून मुंबईसह, ठाणे, नवी मुंबईत विक्री झाली आहे. अंदाजे ९० हजार डझन हापूस मुंबईकरांनी गुढीपाडव्याला फस्त केल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.गुरुवारी कोकण हापूसची १३ हजार ९२५ पेट्यांची आवक फळ बाजारात झाली, तर गेल्या दहा दिवसांत एपीएमसीतून ९० हजार डझन कच्च्या हापूसची विक्री झाली होती. तोच पिकलेला हापूस आंबा गुरुवारी बाजारात अडीच हजार रुपये डझन दराने विक्री केला असून यातून २२ कोटी ५० लाख रुपयांची उलाढाल झाली, तर परराज्यातील कर्नाटक हापूसची १० कोटींची अशी एकूण ३२ कोटी ५० लाख रुपयांचे हापूस मुंबईकरांनी आज गुढीपाडव्याला फस्त केले, अशी माहिती घाऊक व्यापारी व मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक तब्बल ४० हजार पेट्यांनी यंदा घटली आहे.गुढीपाडव्याला फळबाजारात कोकण हापूसच्या १३ हजार ९२५ पेट्यांची, तर परराज्यातील १० हजार ८७५ क्रेट मिळून एकूण २४ हजार ८०० पेट्या दाखल झाल्या होत्या. हापूसचे दर ५ ते ९ डझनाच्या पेटीचे २ ते ८ हजार रुपये असल्याचे घाऊक व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले. गेल्या १५ दिवसांत कोकण हापूसच्या केवळ २६ हजार २७३ पेट्यांची, तर परराज्यातील हापूसचे १ लाख ७ हजार ७१२ क्रेडची आवक झाली होती. त्यापैकी मागील दहा दिवसांत कोकणातून झालेल्या आवकचे ९० हजार डझन कच्चे आंबे किरकोळ व्यापारी, घाऊक व्यापाऱ्यांनी पिकवले आणि मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी गुढीपाडव्याला तयार माल विकला. मुंबईसह उपनगरात तीन दिवसांत तब्बल २२ कोटी ५० लाख रुपयांचा कोकण हापूस विकला गेला असल्याची माहिती घाऊक व्यापारी नरेंद्र हांडे यांनी दिली.बाजार समितीमध्ये २० ते २५ व्यापारी तयार माल विक्री करतात. तीन दिवस आधीच काही व्यापाऱ्यांनी माल तयार करून ऑर्डरनुसार मॉल मोठ्या व्यापाऱ्यांना पाठवला. साधारणत: २० एप्रिलपर्यंत देवगड, राजापूर हापूसची आवक होईल. त्यानंतर १५ एप्रिलपासून रत्नागिरी गावदरीतील आंबा विक्रीसाठी बाजारात येईल. २० एप्रिलपासून श्रीवर्धन, बागमांडला, मुरुड, अलिबाग, दापोली, बाणकोटच्या आंब्यांची आवक सुरू होईल. गुढीपाडव्याला अडीच हजार रुपये डझन दराने मुंबईसह उपनगरात हापूस विकला आहे. कच्चा हापूसपेक्षा ३० ते ४० टक्के अधिक दर फिकवलेल्या हापूसच्या पेटीचे होते, तर एपीएमसीतील व्यापाऱ्यांकडे तयार हापूस नसल्याने अनेक ग्राहकांना परत जावे लागले असल्याची माहिती घाऊक व्यापारी शिवाजी महाडिक यांनी दिली.
पुढील ४८ तासांमध्ये राज्यातील सात जिल्ह्यांत पावसाचा इशारा
मुंबई : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम असून, आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागात गारपीटीसह पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस गारपीटसह पावसाचे संकट काय आहे. २१ मार्च ते २५ मार्चदरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्य स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला. विदर्भात काही जिल्ह्यात गारपीटसह अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडल्याने ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली. पुढील दोन दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.
धारावीच्या कुंभारवाड्यातील महिलांना कौशल्य प्रशिक्षणातून नवी संधी
पारंपरिक कुंभार कामाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोडमुंबई : धारावीतील कुंभारवाडा परिसरातील ३० महिलांना मातीची भांडी बनविण्याच्या (पॉटरी) प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल धारावी सोशल मिशन (डीएसएम) यांच्यावतीने इलेक्ट्रिक पॉटरी व्हील (विद्युतचलित चाक) प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. कौशल्य विकासाला चालना देत महिलांसाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.धारावी सोशल मिशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून पारंपरिक कुंभार कामाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुंभारवाडा हा पारंपरिक मातीच्या भांड्यांसाठी देशभ र प्रसिद्ध असून अनेक पिढ्यांपासून येथील कुटुंबे या व्यवसायाशी निगडित आहेत. मात्र, या प्रक्रियेत महिलांचा सहभाग प्रामुख्याने सहाय्यक भूमिकांपुरताच मर्यादित राहिला होता. इलेक्ट्रिक पॉटरी व्हीलच्या माध्यमातून हा व्यवसाय अधिक सुलभ, कमी श्रमाचा आणि वेळ वाचविणारा ठरणार असून त्यामुळे महिलांचा सक्रिय सहभाग वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ही प्रशिक्षण कार्यशाळा कुंभारवाड्यातील अनुभवी कुंभार आणि प्रशिक्षक नरसी रामजी वाला यांनी घेतली. गेल्या १५ वर्षांपासून ते कुंभारकामाचे प्रशिक्षण देत आहेत.प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांनी या कार्यशाळेमुळे कुंभारकामाच्या बारकाव्यांची अधिक चांगली समज झाल्याचे सांगितले. कुंभारवाड्यातील रहिवासी जिग्निशा जेठवा हिने सांगितले की, माझे वडील कुंभारकाम करतात; मात्र मला या कामाबद्दल फारशी माहिती नव्हती. या कार्यशाळेमुळे मातीला योग्य आकार कसा द्यायचा, बोटांचा वापर कसा करायचा आणि प्रत्येक टप्प्यावर किती दाब द्यायचा याचे प्रशिक्षण मिळाले. तसेच विविध प्रकारचे दिवे बनविण्याचेही कौशल्य आत्मसात करता आले. कुंभारवाड्यात तयार होणाऱ्या मातीच्या वस्तूंना देशभरातून मागणी असते. विशेषतः दिवाळीच्या काळात रंगीबेरंगी मातीच्या दिव्यांना मोठी मागणी असते.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लीना मेहेंदळे यांची निवड
मुंबई : नवी दिल्ली येथे आयोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी लीना मेहंदळे यांची एकमताने निवड करण्यात आल्याची घोषणा संमेलनाच्या निमंत्रक महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला तसेच स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी यांनी केली.सरहद संस्था, पुणे आणि नवीन महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने हे दोन दिवसीय संमेलन ११ व १२ एप्रिलला होणार आहे. छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंतीचे औचित्य साधून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील १९७४ बॅचच्या लीना मेहेंदळे यांचा जन्म जळगांव जिल्ह्यातील धरणगांव येथे झाला. त्या महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन या पदावरून निवृत्त झाल्या आहेत. त्यांनी गोवा राज्याच्या मुख्य माहिती अधिकारी पदाची जबाबदारीही सांभाळली आहे. महसूल, प्रशासन, प्रशासकीय कायद्याची अंमलबजावणी, विकास प्रशासन, कार्यालयीन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असे सर्वच महत्वाचे विषय त्यांनी हाताळले आहेत. त्यांनी राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.लीना मेहेंदळे यांचे विविध विषयांवर ५०० पेक्षा अधिक लेख आणि २४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचा हिंदी भाषेत अनुवाद केला आहे. त्यांची १९ पुस्तके अनुवादाचीच आहेत. एका मराठी नाटकाचा व एका कादंबरीचाही त्यांनी अनुवाद केला आहे. द लास्ट पास ही इंग्रजी भाषेतील कादंबरी त्यांनी मराठीत अनुवादित केली. लहान मुलांसाठी देखील त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. पक्षीनिरीक्षण, निसर्गोपचार, प्रशासकीय सुधारणा हे त्यांचे आवडते विषय आहेत, संगीचाचीही त्यांना आवड आहे.
Deepika Padukone: दीपिका पादुकोण सासू-नणंदेसोबत कॉन्सर्टमध्ये रंगली; चाहत्यांसोबत सेल्फीने जिंकले मन
Deepika Padukone या कार्यक्रमासाठी दीपिकाने पारंपरिक लाल, सोनेरी आणि काळ्या रंगाचा सलवार-सूट परिधान केला होता. केसांचा नीटसा बांधलेला जुडा आणि मिनिमल मेकअपमुळे तिचा लूक अधिकच उठून दिसत होता. तिचा हा ट्रेडिशनल अंदाज सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये होळीच्या दिवशी २६ वर्षीय तरुणचा खून झाला. आरोपी मुस्लिम समाजाचे आहेत. हिंदू रक्षा दल नावाच्या संघटनेने धमकी दिली की, जर आमच्या घरी होळी साजरी झाली नाही, तर त्यांच्या घरी ईद साजरी होऊ देणार नाही. आज, म्हणजेच २१ मार्च रोजी ईद आहे. उत्तम नगरमध्ये गेल्या १५ दिवसांपासून तणाव आहे. दैनिक भास्करची टीम येथे पोहोचली आणि लोकांशी बोलली. त्यांना विचारले की ते या तणावपूर्ण वातावरणात कसे राहत आहेत आणि त्यांच्यावर याचा काय परिणाम होत आहे. गल्ल्यांमध्ये बॅरिकेडिंग, जागोजागी पोलिसांचा पहाराउत्तम नगरच्या जेजे कॉलनीत शिरताच पोलीस आणि बॅरिकेडिंग दिसू लागते. आतमध्ये पोलिसांची कडकपणा वाढत जातो. ज्या गल्लीत तरुणची हत्या झाली, तिथे आणि त्याच्या आसपासच्या गल्ल्यांमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्त मनाई आहे. २० मार्चच्या संध्याकाळपासून येथे पोलीस दलाची तैनाती वाढवण्यात आली आहे. हिंसा झालेल्या ठिकाणी माध्यमांना जाण्याची परवानगी नाही. आम्ही बॅरिकेडिंग ओलांडून तरुणच्या घरापर्यंत पोहोचलो. तिथे तरुणचे वडील, काका आणि काही नातेवाईक बसले होते. वडील आणि काका कॅमेऱ्यावर आले नाहीत. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी कॅमेऱ्यावर मुलाखत देण्यास मनाई केली आहे. तरुणचे काका म्हणाले- कोणाशीही भांडण नाहीमात्र, काका टेकचंद म्हणाले की, तुम्ही माझे बोलणे लिहू शकता. परिसरातील वातावरणावर टेकचंद म्हणाले की, आम्हाला इथे तणाव नको आहे, कोणत्याही निर्दोष व्यक्तीला शिक्षा मिळू नये. आमची अशी विचारसरणी नाही. तरुणच्या हत्येत जे लोक सामील होते, त्यांचीच नावे आम्ही नोंदवली. त्याचे मारेकरी सुटायला नकोत. आरोपींच्या कुटुंबाशी आमचे कोणतेही भांडण नव्हते. हिंदू संघटनांच्या विधानांवर टेकचंद म्हणतात, ‘आम्ही या गोष्टींच्या बाजूने नाही. फक्त सोशल मीडियावर पाहिले आहे. इथे तर कोणाला येऊच दिले जात नाहीये.’ लोक म्हणाले- इथे शीख दंगलींच्या वेळीही वातावरण बिघडले नव्हतेपोलिसांच्या कठोरतेमुळे बहुतेक लोक कॅमेऱ्यासमोर येणे टाळत आहेत. आम्ही हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायातील लोकांशी बोललो. प्रॉपर्टीचे काम करणारे वरुण चौधरी यांचे मत आहे की, या मुद्द्यावर प्रत्येकजण आपले राजकारण चमकवत आहे. ईदपूर्वीच्या तणावावर वरुण म्हणतात, ‘असं काही नाहीये. एखादी संघटना काही बोलत असली तरी, त्याचा परिणाम इथे नाहीये. इथे यापूर्वी कधीच असं वातावरण नव्हतं. 1984 च्या शीखविरोधी दंगलींमध्येही नाही. सोशल मीडियावर दिशाभूल केली जात आहे. प्रत्येक माणसाला आपला सण साजरा करण्याचा हक्क आहे. एखादी घटना घडल्यास, त्यासाठी प्रत्येकाला जबाबदार धरता येत नाही. मी पण हिंदू आहे, जे घडलं त्यासाठी सगळ्यांनी एकत्र बसून प्रशासनासोबत बैठक करायला हवी होती.’ वरुण पुढे म्हणतात, ‘मी स्वतः ईद साजरी करायला जाईन. जे म्हणत आहेत की रक्ताची होळी खेळू, ते मूर्खांसारख्या गोष्टी करत आहेत.’ भाजीपाला दुकान चालवणारे कल्लू म्हणतात की, विनाकारण या मुद्द्याला महत्त्व दिले जात आहे. आमचा सण येतो, ते (मुस्लिम) साजरा करतात. त्यांचा सण येतो, आम्हीही साजरा करतो. आम्ही कशाला आपसात भांडू. ईदला मुसलमान आमच्याकडे येतील. आम्हीही त्यांच्याकडे जाऊ. मी दरवर्षी ईद साजरी करतो. येथे पोलिसांच्या बंदोबस्तामुळे काहीच फायदा होत नाहीये. सर्व दुकाने बंद आहेत. मुस्लिम म्हणाले- मशिदीसमोर होळी खेळतात, काही अडचण नाहीमोहम्मद ताजिम कासमी मोठ्या मशिदीसमोर मुलासोबत बसलेले दिसले. ते मशिदीचे इमामही आहेत. कासमी म्हणतात की, इथे सर्व गल्ल्यांमध्ये हिंदू आणि मुस्लिम राहतात. शेजाऱ्यांच्या भांडणांना बाहेरील लोकांनी मोठे रूप दिले. ते वातावरण बिघडवत आहेत. भांडणात दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या होत्या. बाहेरील लोकांनी चिथावणी देण्याचा खूप प्रयत्न केला, पण इथे कोणीही चिथावणीला बळी पडले नाही. कासमी सांगतात, ‘आम्ही डीसीपींशी बोललो होतो. त्यांनी सांगितले की, ईद साजरी करा, सुरक्षेची व्यवस्था केली जाईल. आमचे हिंदू बांधवही इथे मशिदीसमोर होळी खेळतात. ईदची नमाज होणार नाही अशा अफवा पसरत आहेत. असे काहीही नाही. इथे शांततेत ईद साजरी केली जाईल.’ कपड्याचे दुकान चालवणारे मोहम्मद मेहताब देखील म्हणतात की, गेल्या 50 वर्षांत या परिसरात अशी कोणतीही घटना घडलेली नाही. मी घरोघरी जाऊन कपडे विकतो. बाहेरचे काही लोक गोंधळ व्हावा आणि आम्ही आपापसात लढावे अशी इच्छा बाळगतात. असं काहीही होणार नाही.’ 25 हजार लोकसंख्येत सुमारे 30% मुस्लिम लोकसंख्या जेजे कॉलनीत सुमारे 2600 घरे आहेत. लोकसंख्या सुमारे 25 हजार. बहुतेक घरांमध्ये भाडेकरू आहेत. हा परिसर तीन सेक्टरमध्ये विभागलेला आहे. स्थानिक वॉर्ड पार्षद साहिब कुमार आसीवाल सांगतात की, या परिसरात सुमारे 30% मुस्लिम लोकसंख्या आहे. साहिब कुमार म्हणतात, आम्ही अशीच अपेक्षा करतो की वातावरण शांत राहील. कोणीही कोणाच्या भाषेवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मला इतके माहीत आहे की येथील लोकांमध्ये असे काही नाही. मध्ये बॅरिकेडिंग कमी झाली होती, तरीही कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. रंगाच्या वादातून हत्या, हिंदू संघटनांची धमकीकॉलनीतील एका अरुंद गल्लीत तरुणचे 4 मजली घर आहे. होळीच्या दिवशी तरुणच्या कुटुंबात आणि त्यांच्या शेजाऱ्यांमध्ये रात्री सुमारे 10:30 वाजता भांडण झाले होते. आरोप आहे की एका लहान मुलीने बाल्कनीतून पाण्याचा फुगा फेकला, जो एका मुस्लिम महिलेला लागला. याच गोष्टीवरून दोन्ही कुटुंबे समोरासमोर आली. याच दरम्यान आरोपींनी तरुणवर हल्ला केला. उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी तरुणचा मृत्यू झाला. यानंतर परिसरात तणाव पसरला. दिल्ली महानगरपालिकेने आरोपींच्या घराच्या एका भागावर बुलडोझर चालवला. हिंदुत्ववादी संघटनांच्या वक्तव्यांमुळे परिस्थिती आणखी बिघडली. या संघटना सतत निदर्शने करत आहेत. 15 मार्च रोजी ‘सर्व हिंदू समाज’ नावाच्या संघटनेने उत्तम नगर येथील अयप्पा पार्कमध्ये मोठे आंदोलन केले होते. हिंदू रक्षा दलाकडून सातत्याने जातीय विधानं केली जात आहेत. संघटनेचे उत्तराखंड अध्यक्ष ललित शर्मा यांनीच रक्ताची होळी खेळण्याची धमकी दिली होती. 20 मार्च रोजी संघटनेच्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट करण्यात आली. यात संघटनेचे राष्ट्रीय संयोजक संकेत कटारा म्हणत आहेत, ‘होळीच्या दिवशी आमच्या भावाला जीवे मारले आणि आम्ही गप्प बसलो. ललित शर्मा यांनी अगदी बरोबर म्हटले होते की ज्या लोकांनी तरुणला मारले आहे, आम्ही त्यांना ईद साजरी करू देणार नाही.’ पोलिसांनी तरुणच्या हत्येच्या आरोपाखाली 16 जणांना पकडले होते. यात दोन अल्पवयीनही आहेत. तरुणच्या कुटुंबाचे वकील अमित चौहान यांनी सांगितले की, तक्रारीत 22 जणांची नावे दिली होती. आम्ही पोलिसांना अर्ज दिला आहे की, ईदच्या दिवशी घरासमोर सुरक्षेची कडक व्यवस्था करावी. ईदगाह तरुणच्या घरापासून काही अंतरावर आहे. तिथे मोठ्या संख्येने लोक नमाज पठण करण्यासाठी जातील. 20 मार्चच्या संध्याकाळी दिल्ली पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर अफवा, अपुष्ट माहिती किंवा दिशाभूल करणारी माहिती शेअर करणे टाळावे. ईद सुरक्षित, शांततापूर्ण आणि सलोख्याच्या वातावरणात साजरी करण्यासाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक शांतता आणि जातीय सलोखा भंग करणाऱ्या प्रकरणांमध्ये पोलीस कठोर कायदेशीर कारवाई करेल. आम्ही या प्रकरणी द्वारकाचे डीसीपी कुशल पाल सिंह यांच्याशीही संपर्क साधला. त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही.
Wanawadi Murder Case : पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या चारही सख्ख्या भावांनी चौकशीच्या फेऱ्यात कबुली दिली; चोरीचा संशय बेतला जीवावर.
Budhwar Peth Case : तब्बल २० वर्षे पुण्यात राहून मानवी तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्या 'बाबू'चे राजकीय आणि प्रशासकीय लागेबंधे चव्हाट्यावर येणार?
SPPU News : प्रशासकीय पारदर्शकतेसाठी अनावश्यक विभाग बंद करण्याचा सिनेट सदस्यांचा आग्रह.
Pune Traffic Updates : शनिवारी सकाळी ६ ते ११:३० वाजेपर्यंत लष्कर भागातील प्रमुख चौक राहतील बंद; वाहनचालकांनी 'या' सूचनांचे पालन करावे.
PMC News : सावधान! चेक बाऊन्स झाला तर थेट कोर्टाची पायरी चढावी लागणार; पुणे महापालिकेचा मोठा निर्णय
PMC News : २०२५-२६ या आर्थिक वर्षातच ४ हजारांहून अधिक धनादेश तांत्रिक कारणांमुळे फेटाळले; ३२ कोटी रुपयांची वसुली अद्याप प्रलंबित.
SPPU Results : पुणे विद्यापीठाच्या निकालांचा तिढा सुटला! आज होणार सर्व निकाल जाहीर…वाचा सविस्तर
SPPU Results : निकाल जाहीर न होताच उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक आल्याने उडालेला गोंधळ समोर आणल्यानंतर प्रशासनाला जाग; निकालांचा मार्ग मोकळा.
Pune Water Supply : अपुऱ्या पडणाऱ्या पाणीपुरवठ्यावर मात करण्यासाठी राज्य सरकार आणि टाटा हायड्रो पावर कंपनीचा महत्त्वपूर्ण पुढाकार.
PMC News : स्पर्धा संपली अन उत्साह मावळला! चेंबर दुरुस्तीबाबत आयुक्तांनी झापलं, वाचा काय घडलं?
PMC News : सायकल स्पर्धेसाठी दाखवलेली तत्परता आता गायब; चेंबर दुरुस्तीच्या संथ गतीवर नवल किशोर राम यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी.
Pune Water Cut : थकबाकी न भरल्यास मंगळवारपासून पाणीपुरवठा बंद करण्याचा जलसंपदा विभागाचा इशारा; आयुक्त नवल किशोर राम यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली बाजू.
Shirur Gun Firing : शिरूरमध्ये खळबळ! क्रिकेट मैदानावर बॅनरवरून राडा अन् थेट गोळीबार; पाहा काय घडलं?
Shirur Gun Firing : मांडवगण फराटा येथील भैरवनाथ क्रिकेट स्पर्धेत वादाचे रूपांतर गोळीबारात; मिथुन उर्फ अमोल चौगुले यांच्यावर जीवघेणा हल्ला.
Stray Dog News : आळे आणि वडगाव ग्रामपंचायतींच्या हद्दीत जबाबदारीचा पेच; भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे आळेफाटा परिसरात संतापाची लाट.
Fraud Case : लोणी काळभोरमध्ये कोट्यवधींची फसवणूक! नातेवाईकांनीच लावला चुना; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Fraud Case : पाण्याच्या बॉटलिंग व्यवसायात भागीदारीच्या नावाखाली नातेवाईकांनीच लावला २ कोटी ३४ लाखांचा चुना; लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल.
Ranjangaon MIDC : रांजणगाव एमआयडीसीत खळबळ! गॅस टंचाईने कामगारांचे ‘पलायन’; उद्योगांना घरघर लागणार?
Ranjangaon MIDC : घरगुती गॅस उपलब्ध होत नसल्याने रांजणगाव एमआयडीसीतील कामगारांचे पलायन; कंपन्यांची उत्पादन प्रक्रिया मंदावली.
ST Bus Accident : एसटी बसचा भीषण अपघात! पहाटेच्या सुमारास घडली थरारक घटना; ४४ प्रवाशांचा काय झालं?
ST Bus Accident : बारामती फाटा बनला अपघाताचे केंद्र; महामार्ग प्रशासन आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात.
Bhimashankar News : जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्याकडून २८ लाख रुपयांचा निधी मंजूर; ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाला मिळणार गती.
Chakan News : सावधान! चाकणमध्ये उघड्यावर कचरा टाकला तर..; नगरपरिषदेने उचललं मोठं पाऊल
Chakan News : चाकण शहरात सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही आणि हाय-मास्ट दिवे बसवणार; आरोग्य विभागाचे विशेष पथक तैनात.
Vehicle Sale :
Chemical Smoke : हाल गावाजवळील भंगार दुकानाला लागलेल्या आगीचा ५ दिवसांनंतरही नागरिकांना त्रास; केमिकलयुक्त धुराने श्वसनाचे विकार वाढण्याचा धोका.
PCMC News : पिंपरी-चिंचवडमधील ८ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३२ प्रभागांमध्ये 'वेस्ट टू वंडर' स्पर्धेचे आयोजन; टाकाऊ वस्तूंना मिळणार नवसंजीवनी.
Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कधी धावणार? नवी डेडलाईन आली समोर
Pune Metro : ९४ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण, सिग्नलिंग चाचणी सुरू; हिंजवडी आयटी पार्कला जोडणारी 'मेट्रो ३' अंतिम टप्प्यात.
PCMC News : महापालिकेला लवादाचा दणका! ठेकेदाराला द्यावे लागणार ५२८ कोटी; धक्कादायक माहिती समोर
PCMC News : मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या (BSE) नियमावलीमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती उघड; थकबाकी आणि दायित्वाचा आकडा ५ हजार कोटींच्या पार.
Illegal Banners : सांगवीत अनधिकृत बॅनरचा वाढता विळखा; रामनवमी-जत्रेपूर्वी तातडीने कारवाईची मागणी
Illegal Banners : वेताळ महाराज जत्रा आणि रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगवीत अनधिकृत बॅनरचा सुळसुळाट; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
PCMC News : अभय योजनेला शहरवासीयांचा प्रतिसाद! महापालिकेच्या तिजोरीत १० दिवसांत ८० कोटी जमा
PCMC News : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मालमत्ता कर विलंब शुल्कावर ९० टक्के सवलत; अभय योजनेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद.
Dhangar Vithoba Yatra : महिलांसाठी 'होम मिनिस्टर' खेळ पैठणीचा तर पुरुषांसाठी निकाली कुस्त्यांचे मैदान; भाविकांमध्ये उत्साहाचे उधाण.
Phaltan Crime : गावच्या यात्रेला गालबोट! अळजापुरात दोन गटात तुफान हाणामारी; नेमकं काय घडलं?
Phaltan Crime : फलटण तालुक्यातील अळजापूर गावात यात्रा कमिटीच्या निवडीवरून दोन गट भिडले; परिसरात तणावाचे वातावरण.
Mahesh Shinde : आमदार महेश शिंदे यांच्याकडून मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधीचे आश्वासन; कोरेगावात सामाजिक ऐक्याचे दर्शन.
Factory Fire : दक्षिण कोरियाच्या डेजॉन शहरातील कारखान्यात लागलेल्या आगीत ५५ जण जखमी झाले असून १४ जण बेपत्ता आहेत.
Maharashtra Kesari 2026 : वाघोली येथे रंगलेल्या महाराष्ट्र केसरी मैदानात गतविजेत्या सिकंदर शेख, शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ, पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन सदगीर यांनी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत मजल मारली आहे.
Pune Police Bharti : पुणे शहर पोलीस भरती प्रक्रियेत उद्या लेखी परीक्षा
पुणे शहर पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेचे आयोजन रविवारी (२२ मार्च) आयोजन करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेचा ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
मुंबई : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग विविध अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीची कामं करण्यासाठी रविवार २२ मार्च २०२६ रोजी ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ‘ट्रान्स हार्बर’ मार्गावर 'मेगा ब्लॉक' घेणार आहे. ट्रान्स-हार्बर मार्गावरील ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान 'अप' आणि 'डाऊन' मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान 'अप' आणि 'डाऊन' ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ०४.०७ वाजेपर्यंत वाशी / नेरुळ / पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या 'डाऊन' मार्गावरील सेवा, तसेच पनवेल / नेरुळ / वाशी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ०४.०९ वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या 'अप' मार्गावरील सेवा रद्द राहतील.पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हा 'मेगाब्लॉक' अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
विक्रोळी पूर्व - पश्चिम उड्डाणपुलावर तेल गळती, दुचाकीस्वार घसरून पडले; महापौरांनी केली मदत
महापौरांनी ताफा थांबवून यंत्रणांना केल्या सूचनामुंबई (विशेष प्रतिनिधी) :विक्रोळी पूर्व - पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर वाहनातील तेल गळती झाल्याने तेथून जाणाऱ्या काही दुचाकी घसरून पडण्याच्या घटना शुक्रवारी संध्याकाळी घडल्या. या घटनेमध्ये दुचाकीस्वारांना किरकोळ इजा झाली असून. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. विशेष म्हणजे मुंबईच्या महापौर रितू तावडे या एका सोहळ्यासाठी विक्रोळी येथून पवईकडे जात असताना त्यांच्या वाहनाच्या ताफ्यापासून काही अंतरावर ही घटना घडली.पुलावरील तेल गळतीच्या घटनेमुळे संभाव्य मोठ्या अपघाताची शक्यता लक्षात घेता, महापौर रितू तावडे यांनी ताबडतोब वाहनांचा ताफा थांबवून या दुचाकीस्वारांची विचारपूस केली. तसेच वाहतूक पोलिसांना तत्काळ पाचारण करून त्यावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून वाहतूक सुरक्षित करण्याचे निर्देश दिले. तसेच, संबंधित दुचाकीस्वारांना आवश्यक ते प्रथमोपचार त्वरीत करण्यासाठीच्याही सूचना केल्या.त्याचप्रमाणे, महानगरपालिकेचे प्रशासकीय विभाग कार्यालय, अग्निशमन दल आणि पूल विभाग यांच्याशी महापौरांनी संपर्क साधला. सर्व संबंधित खात्यांनी आपसात समन्वय साधून, पुलावरून वाहतूक निर्धोक व्हावी, यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचेही निर्देश महापौरांनी दिले. यांनतर या पुलावरील निसरडा झालेला भाग कोरडा करून स्वच्छ करण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे.
सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला चाकणकर यांचा राजीनामा
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानंतर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपला राजीनामा सोपवला. सुनेत्रा पवार यांनी हा राजीनामा स्वीकारला असून, आता तो औपचारिक मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे.https://prahaar.in/2026/03/20/cm-fadnavis-orders-rupali-chakankar-to-resign-orders-issued-after-few-video-goes-viral/नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव आल्यापासून राजकीय वातावरण तापले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनाम्याचे आदेश दिल्यानंतर चाकणकर तातडीने उपमुख्यमंत्र्यांच्या 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्या. या भेटीत चाकणकर यांनी प्रकरणाबाबत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रकरणाचे गांभीर्य आणि वाढता दबाव पाहता, पक्ष आणि सरकारची प्रतिमा जपण्यासाठी त्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय सुनेत्रा पवार यांनी घेतला.https://prahaar.in/2026/03/20/resign-chief-minister-orders-rupali-chakankar/सुनेत्रा पवार यांनी स्वीकारलेला हा राजीनामा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत राज्यपालांकडे पाठवला जाईल. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा अधिकृतपणे मंजूर होईल.
Dhananjay Munde : धनंजय मुंडेही भोंदूबाबाच्या संपर्कात? ‘या’महिलेच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Dhananjay Munde :
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हा दावा फेटाळून लावत हा प्रकल्प प्रवासाचा वेळ आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनिवार्य असल्याचे सांगितले.
Maharashtra Kesari 2026 : या स्पर्धेत पुण्याच्या अमोल वालगुडेने सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे, तर सोलापूरच्या बिरुदेव बनसोडेने शेवटच्या क्षणी बाजी मारत सुवर्णपदक पटकावले.
Apps banned : कायदा जुगार आणि सट्टेबाजीच्या ३०० वेबसाइट आणि ॲप्सवर बंदी
ऑनलाइन गेमिंग कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीनंतर सरकारने आतापर्यंत एकूण ८,४०० हून अधिक संशयास्पद वेबसाइट बंद केल्या आहेत.
केंद्र सरकारचा बेटिंग आणि जुगाराच्या अॅप्सवर स्ट्राईक
नवी दिल्ली : देशातील वाढत्या बेकायदेशीर ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने एका मोठ्या कारवाईत ३०० हून अधिक बेकायदेशीर बेटिंग वेबसाइट्स आणि मोबाइल अॅप्सवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या या धडक कारवाईमुळे ऑनलाइन जुगार चालवणाऱ्या जाळ्यांचे कंबरडे मोडले असून, डिजिटल माध्यमांतून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीला लगाम बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.केंद्र सरकारकडून बेकायदेशीर सट्टेबाजींविरोधातील मोहीम गेल्या काही काळापासून सातत्याने राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ८ हजार ४०० वेबसाइट्सवर कारवाई करण्यात आली आहे. विशेषतः सरकारने लागू केलेल्या नवीन 'ऑनलाइन गेमिंग' नियमानंतर ही प्रक्रिया अधिक गतिमान झाली आहे. या नव्या कायद्याचा आधार घेत प्रशासनाने तब्बल ४,९०० वेबसाइट्स आणि अॅप्स पूर्णपणे ब्लॉक केली आहेत. यामध्ये अनेक परदेशी अॅप्सचाही समावेश असून, जे भारतीय चलनामध्ये सट्टा लावण्यासाठी प्रवृत्त करत होते.सरकारने केलेल्या या कारवाईची व्याप्ती मोठी आहे. यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन स्पोर्ट्स बेटिंग प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे, जे क्रिकेट, फुटबॉल आणि इतर मोठ्या क्रीडा स्पर्धांवर सट्टा लावण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत होते. यासोबतच ऑनलाइन कॅसिनो, स्लॉट्स, रूलेट आणि लाईव्ह डीलर गेम्स चालवणाऱ्या वेबसाइट्सवरही बंदी घालण्यात आली आहे.
अमेरिकेच्या लढाऊ विमानांना जागा देण्यास श्रीलंकेचा नकार
कोलंबो : मध्य पूर्वेतील युद्धामुळे स्ट्रेट होर्मुझवरील तेल वाहतुकीला फटका बसला आहे. होर्मुझ मार्ग सुरळीत करण्यासाठी अमेरिकेकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. परंतु ट्रम्प यांना हवं तसे यश मिळत नाही. या युद्धात श्रीलंकेने अमेरिकन लढाऊ विमानांना त्यांच्या जमिनीवर उतरवण्यास नकार दिला आहे. श्रीलंकेच्या दक्षिण पूर्वेकडील मट्टाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेला २ लढाऊ विमाने उतरवायची होती. परंतु राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसनायके यांनी अमेरिकेची ही मागणी धुडकावली.शुक्रवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती यांनी संसदेत ही घोषणा केली. संसदेत राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके म्हणाले की,जिबूतीहून आलेल्या दोन अमेरिकी लढाऊ विमानांनी ४ आणि ८ मार्च रोजी श्रीलंकेत उतरण्याची परवानगी मागितली. मात्र दोन्ही विनंत्या नाकारण्यात आल्या. अनेक दबावानंतरही आम्ही तटस्थ भूमिका कायम ठेवली. आम्ही झुकणार नाही. मध्य पूर्वेतील युद्धामुळे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. परंतु तटस्थ भूमिका कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रत्येक प्रयत्न करू असं त्यांनी सांगितले. अमेरिकेला जिबूतीमधील एका तळावरून आठ अँटीशिपविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेली दोन लढाऊ विमाने मट्टाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणायची होती, पण श्रीलंकेने स्पष्टपणे नकार दिला
मुंबईतील १३ नवीन मराठी शाळांना अनुदान मंजूर
प्रथमच अनुदान मंजूर झालेल्या २२ शाळांमध्ये १३ मराठी माध्यमांच्या शाळांचा समावेशमुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीच्या माध्यमातून मनपा शाळांच्या अनुदान प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री राजेश शिरवडकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर २२ शाळांना प्रथमच अनुदान मंजूर करण्यात आले, त्यात १३ मराठी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. या माध्यमातून एकप्रकारे मराठी माध्यमाच्या शाळांना आधार देत प्रकारे मराठी शाळांची संख्या अधिकाधिक वाढवण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.मुंबई महापालिकेच्या वतीने प्राथमिक शाळांना अनुदान देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी शिक्षण समितीमार्फत टप्प्याटप्प्याने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ७ शाळांना अनुदान मंजूर करण्यात आले, त्यापैकी ३ शाळा या मराठी माध्यमाच्या आहेत. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर आणि शिक्षण समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर पहिल्या शिक्षण समितीच्या बैठकीत २२ शाळांना प्रथमच अनुदान मंजूर करण्यात आले, यामध्ये १३ शाळा मराठी माध्यमाच्या असल्याने मराठी माध्यमाच्या शिक्षणाला मोठा आधार मिळाला आहे.तसेच १२ शाळांच्या मान्यता मुदतवाढ प्रस्तावांना शिक्षण समितीने मंजुरी दिली असून, त्यामध्ये ५ शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. यामुळे या शाळांच्या शैक्षणिक कामकाजाला आवश्यक स्थैर्य आणि पाठबळ मिळणार आहे.याशिवाय सध्या ४५ शाळांचे प्रस्ताव प्रशासकीय तसेच शिक्षण समितीच्या मंजुरीसाठी प्रक्रियेत असून, ते लवकरच मंजुरीसाठी ठेवले जाणार आहेत.महापालिका शिक्षण विभागाकडून ही संपूर्ण प्रक्रिया नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून, पात्र शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि महापालिका शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षण समिती सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी दिली.
Assembly Election 2026 : पुद्दुचेरीत एनडीएचे जागावाटप फायनल! एआयएनआरसी १६ तर भाजप १० जागा लढवणार
Assembly Election 2026 : पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक २०२६ साठी एआयएनआरसी आणि भाजपमध्ये जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे.
काळजाचा थरकाप! चेंडू काढायला गेला अन् खड्ड्यात पडला; ८ वर्षांच्या चिमुकल्याचा अंत
Mumbai News : मुंबईतील मालाड पूर्व परिसरात बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दिव्यांश मौर्य या ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
Nitish Kumar : नितीश कुमार पुन्हा बनणार जेडीयूचे अध्यक्ष; पुढील राजकीय वाटचालीविषयी उत्सुकता
नितीश यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. त्याविषयीची औपचारिक घोषणा पुढील काही दिवसांत होईल.
Mohan Bhagwat : नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी जागतिक शांतता आणि भारताच्या नैतिक जबाबदारीवर भाष्य केले
IPL Ranked Third : वर्ल्ड क्रिकेट असोसिएशनच्या (WCA) रँकिंगमध्ये आयपीएलला अनपेक्षित निकालाचा सामना करावा लागला आहे.
British naval base : ब्रिटनच्या नाविक तळावर घुसखोरीचा प्रयत्न; एक पुरुष आणि एका महिलेला अटक
ब्रिटनच्या नविक तळावर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एक पुरुष आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
युद्धबंदीसाठीची ही चर्चा रखडवल्याचा आरोप पाश्चात्य आणि युरोपातल्या देशांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यावर केला आहे.
Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकरांना भोवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश
खरातच्या 'पाद्यपूजे'चे व्हिडीओ Viral, चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश
मुंबई : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात ऊर्फ 'कॅप्टन' याच्या अघोरी कृत्यांचे आणि लैंगिक शोषणाचे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. महिलांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या घटनात्मक पदावर असताना एका अत्याचार प्रकरणातील संशयित व्यक्तीशी इतके घनिष्ठ संबंध असणे नैतिकदृष्ट्या अयोग्य असल्याने मुख्यमंत्र्यांनी ही कठोर भूमिका घेतल्याचे समजते.भोंदूबाबा अशोक खरात विरोधातील तक्रारींनंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून पोलिसांना सखोल तपासाचे निर्देश दिले होते. पुराव्यांची खातरजमा झाल्यानंतरच पोलीस महासंचालकांच्या आदेशाने खरातवर अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिसांनी खरातच्या ताब्यातून काही महत्त्वाच्या चित्रफिती आणि माहिती आधीच जप्त केली होती. त्यामुळे तपासाला गती मिळाली. दरम्यान, मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झालेला अशोक खरात सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे ‘श्री शिवानिका संस्थान’ नामक ट्रस्ट चालवत होता. या संस्थेच्या कार्यकारी मंडळात रुपाली चाकणकर यांचा समावेश असल्याचे समोर आले. चाकणकर या खरातच्या मागे छत्री धरून उभ्या असतानाचे फोटो आणि त्याची 'पाद्यपूजा' करतानाचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहेत. याशिवाय, त्यांनी खरातचा ‘पितृतुल्य गुरूमाऊली’ असा उल्लेख केल्याचेही समोर आले आहे.दरम्यान, अशोक खरातच्या कार्यालयातून पोलिसांनी ५८ आक्षेपार्ह चित्रफिती जप्त केल्या आहेत. यामध्ये राजकीय क्षेत्रातील मंडळींसह विविध क्षेत्रांतील नामांकित महिलांची माहिती असल्याने पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. या प्रकरणाची वाढती व्याप्ती आणि आंतरराज्य लागेबांधे पाहता, राज्य सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली 'विशेष तपास पथक' (एसआयटी) स्थापन केले आहे.https://prahaar.in/2026/03/20/resign-chief-minister-orders-rupali-chakankar/अनेक बड्या नेत्यांशी संबंधअंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगणाऱ्या खरातकडे महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील अनेक उच्चपदस्थांची ये-जा होती. २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि दीपक केसरकर यांनीही या मंदिरात भेट दिली होती. मात्र, चाकणकर या थेट संस्थेच्या विश्वस्त असल्याने त्यांना हे प्रकरण भोवले आहे. खरातवर अत्याचार, खंडणी आणि धमकी दिल्याप्रकरणी नाशिक, वावी आणि शिर्डी पोलीस ठाण्यात एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. त्याला २४ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.चाकणकर यांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेटरुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी पोलीस महासंचालकांची भेट घेऊन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. मी माझी भूमिका लवकरच पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करेन, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादीच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आपण सध्या भेट घेणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राजीनामा द्या, मुख्यमंत्र्यांचा रुपाली चाकणकरांना आदेश
मुंबई : बलात्कार, महिलांचे लैंगिक शोषण, महिलांची फसवणूक अशा गंभीर आरोपांमध्ये भोंदू बाबा आणि स्वयंघोषीत कॅप्टन अशोक खरात याला अटक झाली आहे. अशोक खरातसोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. अशोक खरातचे पाय धुतानाचे तसेच त्याच्या सोबत कार्यक्रमस्थळी वावरत असतानाचे रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे व्हायरल होत असताना चाकणकरांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे.पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करावी अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे. तर पोलीस कारवाई निःपक्षपाती व्हावी यासाठी रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे.
बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व ‘मॅग्नेट’ प्रकल्पासाठी एडीबी सहकार्य करणार
मुंबई : महाराष्ट्रातील कृषी बाजार व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी आशियाई विकास बँकेचे (एडीबी) सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने पणन मंत्री जयकुमार रावल यांचा मनीला दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे. आशियाई विकास बँकेच्या मुख्यालयात आयोजित ‘आशिया आणि पॅसिफिक अन्न प्रणाली मंच २०२६’ मध्ये सहभागी होत मंत्री जयकुमार रावल यांनी राज्यातील महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प, मुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजार (एमआयएएम) आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) बळकटीकरणावर लक्ष केंद्रित केले. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक व मॅग्नेट प्रकल्पाचे संचालक विनायक कोकरे यावेळी उपस्थित होते.
Laxman Sivaramakrishnan : आयपीएल २०२६ चा हंगाम अवघ्या आठवड्यावर आलेला असताना भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.
Pune Police : पुण्यातील आंबेगाव पोलिसांनी कात्रज बोगद्याजवळील डोंगराच्या कड्यावरून एका महिलेचा जीव वाचवला आहे.
भारतातील विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आलेल्या नौदल ताफ्याच्या संचलन सरावानंतर ते जहाज मायदेशी परतत होते.
Pune Crime News : पुण्यात वाहनचोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; चोरीची युनिकॉर्न जप्त
Pune Crime News :
Matthew Short Injured : वेगवान गोलंदाज नाथन एलिस स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, आता आणखी एका अष्टपैलू खेळाडूच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
१८ मार्च रोजी कॅप्टन सिंह यांची प्रकृती अचानक खालावली. जहाजावरील अधिकाऱ्यांनी तात्काळ दुबई एटीसीशी संपर्क साधून एअर अॅम्ब्युलन्सची विनंती केली, पण युद्धजन्य परिस्थितीमुळे परवानगी नाकारण्यात आली.
मुंबई : क्रेडिट सुईस दिवाळखोरीत निघाली. नंतर यूबीएस या बँकिंग कंपनीने क्रेडिट सुईस विलीन करून घेतली. ही प्रक्रिया झाल्यानंतर 'क्रेडिट सुईस'चे बाँड रद्द करण्यात आले. पण याच बाँड्सच्या खरेदी - विक्रीवरून एचडीएफसी बँकेत गदारोळ माजला आहे.एचडीएफसी बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी “मूल्ये आणि नैतिकते”वरून झालेल्या मतभेदांचे कारण देत राजीनामा दिला. या नंतर एचडीएफसी बँकेच्या व्यवस्थापनाने तडकाफडकी तीन उच्चाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बाँड्सच्या खरेदी - विक्रीची अंतर्गत चौकशी सुरू आहे. एचडीएफसी बँकेने बँकिंगचे समूह प्रमुख संपत कुमार, मध्य पूर्व, आफ्रिका आणि एनआरआय ऑनशोर व्यवसायाचे कार्यकारी उपाध्यक्ष हर्ष गुप्ता आणि वरिष्ठ उपाध्यक्ष पायल मनध्यान यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.बाँड्सच्या खरेदी - विक्री घोटाळ्याप्रकरणी दुबई वित्तीय सेवा प्राधिकरणाने एचडीएफसी बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. ही बंदी असतानाच एचडीएफसी बँकेने तीन उच्चाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बाँड्सच्या खरेदी - विक्रीची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम 'एचडीएफसी बँक लिमिटेड' या शेअरवर झाला आहे. आज (शुक्रवार २० मार्च २०२६) हा शेअर २.१५ टक्के घसरून अर्थात १७.२० अंकांनी घसरून ७८१ रुपयांवर बंद झाला आहे.एचडीएफसी बँकेत गदारोळ माजला असला आणि पश्चिम आशियात युद्ध सुरू असले तरी बीएसई सेन्सेक्स आज (शुक्रवार २० मार्च २०२६) संध्याकाळी ०.४४ टक्क्यांनी (३२५.७२ अंकांनी) वधारला आणि ७४,५३२.९६ वर बंद झाला. निफ्टी फिफ्टी आज (शुक्रवार २० मार्च २०२६) संध्याकाळी ०.४९ टक्क्यांनी (११२.३५ अंकांनी) वधारला आणि २३,११४.५० वर बंद झाला.१ अमेरिकन डॉलर - ९३.५७ रुपये२४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम (१ तोळा) सोने - १,५०,९३० रुपये (गुरुवारच्या तुलनेत ६५० रुपयांची वाढ)२२ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम (१ तोळा) सोने - १,३८,३५० रुपये (गुरुवारच्या तुलनेत सहाशे रुपयांची वाढ)१ किलो चांदी - २,५५,००० रुपये (गुरुवारच्या तुलनेत पाच हजार रुपयांची घट)
Rupali Chakankar : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आहे.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होईल, असा कयास बांधला जात असताना, काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार देण्याची भूमिका घेतली आहे. शरद पवार गट ही निवडणूक लढवणार नसेल, तर त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, आमच्याकडे पर्याय तयार आहे, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.महाड येथील चवदार तळे सत्याग्रह दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. सपकाळ म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने लढवली होती. त्यामुळे पोटनिवडणूक लढवण्याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. ते जर लढत नसतील, तर आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. अंतिम निर्णय हा महाविकास आघाडी घेईल, असेही त्यांनी सांगितले. केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली असून, ६ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. २३ एप्रिलला मतदान होईल, तर ४ मे रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उमेदवार असतील, हे निश्चित आहे. त्याचबरोबर काँग्रेससह ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही ही पोटनिवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. “सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्यावे आणि बारामतीत पवार घराण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही उमेदवार द्यावा”, असे हाके म्हणाले.
पाकिस्तानातही धुरंधरची क्रेझ,बंदी असूनही टीव्हीवर झळकतोय धुरंधर २
जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा रणवीर सिंहचा 'धुरंधर २' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या रणवीरच्या या सिनेमानं पहिल्याच दिवशी १०० कोटींहून अधिक कमाई करून ऐतिहासिक विक्रम रचला आहे.रणवीर सिंहच्या धुंरधर द रिव्हेंज सिनेमाचं भारतात कौतुक होतच आहे. मात्र, आता पाकिस्तानमध्येही या सिनेमाची क्रेझ पाहायला दिसून येत आहे.सध्या पाकिस्तानात भारतीय सिनेमांच्या प्रदर्शनावर अधिकृतपणे बंदी आहे. विशेषतः 'धुरंधर २' हा सिनेमा पाकिस्तानातील दहशतवादावर आधारित असल्यानं हा सिनेमा पाकिस्तानात रिलीज झालेला नाही. पण, असं असतानाही पाकिस्तानातील प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.या सिनेमाला अधिकृतपणे बंदी असतानाही पाकिस्तानमधील लोक या सिनेमाचं 'पायरेटेड व्हर्जन' डाऊनलोड करून धुरंधर २ सिनेमा पाहत असल्याचं ट्विट एका पाकिस्तानी पत्रकारानं केलं आहे.सध्या ट्विटरवर एका पाकिस्तानी पत्रकाराचे ट्विट व्हायरल झालं असून यामध्ये हा पत्रकार लाहोरमधील आपल्या घरी बसून टीव्ही स्क्रीनवर 'धुरंधर २' चा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. तसेच, या ट्विटमध्ये पत्रकारनं म्हटलं आहे की, हे अत्यंत दुर्दैवी आहे की सिनेमाच्या प्रदर्शनाच्या दिवशीच त्याचं पायरेटेड व्हर्जन पाकिस्तानमध्ये पोहोचलं असून पाकिस्तानी लोक भारतीय सिनेमाशिवाय राहू शकत नाहीत, मग तो सिनेमा पाकिस्तानशी संबंधित दहशतवादावर आधारित असला तरीही ही तो सिनेमा ते बघतीलच.''त्यामुळे आता 'धुरंधर'नंतर धुरंधर द रिव्हेंज पाहण्यासाठी जगभरातील प्रेक्षक उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' या सिनेमानं भारतात पहिल्याच दिवशी १०२.५५ कोटी रुपयांची जबरदस्त ओपनिंग केली असून रणवीर सिंहच्या या सिनेमानं पाकिस्तानमधील प्रेक्षकांनाही भूरळ पाडली आहे.
Petrol Price Hike : मध्यपूर्वेतील संघर्षामुळे पुणे शहरात प्रीमियम पेट्रोलचे दर ११३.७७ रुपयांवर पोहोचले आहेत.
Iran hits Kuwait refinery : कुवेतच्या तेल प्रकल्पांवर इराणचा मारा; युद्धाची तीव्रता अधिक वाढली
दुबईमधअये हवाई संरक्षण प्रणालीने हवेतच ड्रोन पाडल्यामुळे स्फोटांचे आवाज घुमले. ईद उल-फित्रच्या निमित्ताने लोक मशिदीमध्ये प्रार्थनेसाठी एकत्र आले असताना हे स्फोट झाले.
या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम आमदार अमोल मिटकरी यांच्या सोशल मीडिया पोस्टने केले.
Baramati By Election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
IPL 2026 : तब्बल ७ दिग्गज वेगवान गोलंदाज दुखापत आणि वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
Top 10 News : पेट्रोलच्या दरात मोठी वाढ, अशोक खरातचा धक्कादायक मोडस ऑपरेंडी उघड ते इराणला मोठा धक्का..; वाचा आजच्या टॉप १० बातम्या
भोंदू बाबा अशोक खरातशी संबंधित नेत्यांवर कारवाई करणार, प्रफुल्ल पटेलांनी दिली माहिती
मुंबई : भोंदू बाबा अशोक खरातप्रकरणी राज्यातील विविध नेत्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी भूमिका स्पष्ट केली असून, याप्रकरणात ज्यांची नावे आहेत, त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.माध्यमांशी संवाद साधताना पटेल म्हणाले, “याप्रकरणी चौकशी केली जाईल. चौकशीदरम्यान ज्या कोणाची नावे समोर येतील, त्यांच्यावर तातडीने आणि सक्तीने कारवाई केली जाईल. काही राजकीय नेत्यांची नावे त्यांच्याशी (भोंदू बाबा अशोक खरात) जोडली गेली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून कारवाई केली जाईल. ही कारवाई पुढील दोन-तीन दिवसांत दिसेल”, असेही त्यांनी स्पष्ट केले.नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्या पेन ड्राईव्हमध्ये सापडलेल्या ५८ व्हिडिओमुळे खबळबळ उडाली आहे. बलात्काराच्या आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली असून, २४ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. ज्योतिष, अंकशास्त्र, तंत्रमंत्राच्या आडून त्याने महिलांचे शोषण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सिन्नर तालुक्यातील त्याच्या मंदिर ट्रस्टवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर संचालक आहेत. चाकणकर या अशोक खरातसाठी छत्री पकडून उभ्या असल्याचे फोटो सुरुवातीला समोर आले. त्यानंतर अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
Jharkhand : झारखंड हादरलं.! उत्खननात सापडला अमेरिकन बॉम्ब; सांकेतिक खुणांनी वाढलं रहस्य
अशा जड आणि जुन्या स्फोटकाला हाताळणे हे एक जोखमीचे काम आहे. दोन स्तरांवर तयारी सुरू आहे.
भोंदू बाबा प्रकरणात दोषींवर कारवाई होणारच !
मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या प्रतिमेला डाग लावण्याचे काम झाले. “वाझे काय लादेन आहे का...” हे वाक्य कोणाच्या तोंडचे आहे हे संजय राऊत विसरले असले तरी महाराष्ट्र विसरलेला नाही. मविआ सरकारच्या कार्यकाळात प्रसिद्ध उद्योगपतीच्या घराच्या बाहेर बॉम्ब ठेवण्याची हिंमत पोलिसांना झाली होती, गिरीश महाजनांना अटक करण्याची योजना आखली गेली होती. आता गुन्हेगारांना पाठीशी घालणारे सरकार नसल्यामुळे खरात बाबा प्रकरणी सर्व दोषींवर कठोर कारवाई होईल, याची संजय राऊतांनी खात्री बाळगावी, अशी खोचक टिप्पणी भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत बन बोलत होते. यावेळी बन म्हणाले की, फडणवीस मंत्रीमंडळातील मंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप करण्याचा अधिकार राऊतांना नाही. एखाद्या मंत्र्याचे त्या भोंदू बाबा सोबत फोटो आहेत म्हणून लगेच तो मंत्री दोषी ठरतो असे नाही. कसून तपास केला जाईल आणि दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल.अपुऱ्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर टीका करू नये असे सुनावत श्री. बन म्हणाले की, संपूर्ण माहिती राज ठाकरे यांनी करून घ्यावी. केवळ कर्ज किती आहे हे न बघता त्या कर्जाच्या तुलनेमध्ये आपली अर्थव्यवस्था तिपटीने मोठी झाली आहे हे ही बघावे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था साडेसोळा लाख कोटी इतकी होती मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात गेल्या दहा वर्षात अर्थव्यवस्थेत तिपटीने वाढ होत तब्बल ५४ लाख कोटींवर पोहोचली आहे. आता २०२९ पर्यंत ‘ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेचे लक्ष्य डोळ्यासमेर ठेवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार काम करत आहे. सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आज महाराष्ट्रात होत आहे याचे स्मरण राज ठाकरे यांना करून देत, बन यांनी राज्याच्या या विकास यात्रेमध्ये राज ठाकरे यांचेही स्वागत आहे असा टोला लगावला.राज्यातील मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधाविकासाचा फायदा सर्वांनाच होत असतो. पायाभूत सुविधा कोणत्याही एका भाषिक गटासाठी नसतात, तर सर्व नागरिकांसाठी असतात याचा विसर राज ठाकरे यांना पडला आहे म्हणूनच यामध्येही भाषिक मुद्दा आणून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे अशी टीका बन यांनी केली. राज यांनी आधी कोस्टल रोड आणि पुणे मेट्रोवर टीका केली होती, पण प्रत्यक्षात पुणे मेट्रोला मोठा प्रतिसाद मिळत असून ती भरगच्च धावते आहे. त्याचप्रमाणे कोस्टल रोडमुळे मुंबईत प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचला आहे. बिनबुडाची टीका न करता वास्तव पाहण्याची गरज असून राज ठाकरे यांनी स्वतः मेट्रोने प्रवास करून जनतेचा अनुभव समजून घ्यावा, अशी खोचक विनंती ही त्यांनी केली.बन यांनी सांगितले की, खरात प्रकरणाची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस गृहखात्याने जी मोहीम राबवली त्याबद्दल संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. राऊतांना हे उशिराने का होईना सुचलेले शहाणपण आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राऊतांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडल्याचे दिसत आहे, म्हणूनच राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले असावे असा टोमणा बन यांनी लगावला. खरात फाईल्स असो अथवा पाटकर फाईल्स असोत, कोणाचे कितीही राजकीय लागेबांधे असले तरी दोषींवर कठोर कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केली जाईल असेही त्यांनी नमूद केले.
लवकरच 'तुंबाडची मंजुळा'प्रेक्षकांच्या भेटीला येणार
- सिनेमाचं दुसरं पोस्टर रिलीजगुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झी स्टुडिओजनं आपल्या आगामी सिनेमा 'तुंबाडची मंजुळा'चं दुसरं पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरमध्ये दिसत असणारे डोळेआणि एका व्यक्तीच्या डोक्यावर बसलेला रहस्यमय काळा पोपट याबाबतची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.नुकताच होळीच्या मुहूर्तावर या सिनेमाचे एक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं असून त्यामध्ये एका दारावर काहीजणांचे हात आणि दाराआड दिसणाऱ्या एका आकृतीनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर आता एका गावातील काही गावकऱ्यांचे डोळे आणि एका व्यक्तीच्या डोक्यावर बसलेला काळया रंगाचा पोपट असं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.यातील डोळे कोणाचे आहेत? तसेच हे कलाकार कोण आहेत? या काळ्या पोपटाचे रहस्य काय? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.'तुंबाडची मंजुळा' या सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओजच्या वतीने उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी केली असून विविध कोरगांवकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच, लवकरच म्हणजेच येत्या ५ जून २०२६ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी सिनेसृष्टीला 'बाईपण भारी देवा' आणि 'अगंबाई...अरेच्चा!' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्गज दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा एकदा एका अनोख्या विषयावर 'प्रहार' करायला सज्ज झाले आहेत. नेहमीच स्त्रीप्रधान आणि कौटुंबिक विषयांना आपल्या खास शैलीत मांडणाऱ्या केदार शिंदेंनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक जाहीर केले असून, संपूर्ण महाराष्ट्रात या नावाची चर्चा रंगली आहे. ‘आई भाड्याने हवी?’ असे या चित्रपटाचे नाव असून, यातील ‘भाड्याने’ या शब्दाने प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न आणि उत्सुकता निर्माण केली आहे. नात्यांमधील ओलावा आणि सामाजिक विषयांची उत्तम सांगड घालणारे शिंदे यावेळी पडद्यावर नक्की काय नवीन मांडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.https://prahaar.in/2026/03/20/tumbadchi-manjula-will-soon-be-coming-to-meet-the-audience/सनफ्लॉवर स्टुडिओ निर्मित या चित्रपटाची कथा आणि लेखन वैशाली शशी नाही आणि ओंकार वसुंधरा दत्त यांनी केलं आहे, तर या चित्रपटाचं छायांकन आणि संकलनाची जबाबदारी मयूर संजीवनी हरदास यांनी सांभाळली आहे. विशेष म्हणजे, ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’नंतर निर्माती सना शिंदे, दिग्दर्शक केदार शिंदे, लेखिका वैशाली शशी नाईक आणि लेखक ओंकार वसुंधरा दत्त ही यशस्वी टीम पुन्हा एकदा एकत्र येत असल्याने चित्रपटाकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.'आई भाड्याने हवी?' मधून उलगडणार नात्यांमधील भावनिक गुंताकेदार शिंदे यांच्या मते, जोपर्यंत कथा काळजाला भिडत नाही, तोपर्यंत ती पडद्यावर आणण्यात अर्थ नाही. या चित्रपटात प्रेक्षकांना प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटांची झलक अनुभवायला मिळेल. म्हणजेच, पोट धरून हसवतानाच हा चित्रपट प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणेल आणि एक अत्यंत प्रभावी सामाजिक संदेश देऊन जाईल. ‘आई’ या नात्यातील मायेचा ओलावा आणि सध्याच्या पिढीतील या नात्याची उणीव यावर हा चित्रपट भाष्य करेल. चित्रपटाची निर्माती सना शिंदे हिने या चित्रपटाबद्दल मोठी माहिती दिली आहे. हा एक 'मल्टीस्टारर' चित्रपट असून, यात मनोरंजनासोबतच भावना आणि विनोदाचा त्रिवेणी संगम पाहायला मिळेल. आधुनिक जीवनशैलीत माणसांमधील संवाद हरवत चालला आहे आणि अशा परिस्थितीत एका 'आई'ची गरज कशी भासते, हे या वेगळ्या शीर्षकातून अधोरेखित करण्यात आलं आहे. सध्या या बिग बजेट चित्रपटासाठी कलाकारांची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, विविध वयोगटातील 'आई'च्या भूमिकांसाठी मोठे चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या जून-जुलै महिन्यापासून सुरुवात होणार आहे. 'बाईपण भारी देवा'च्या ऐतिहासिक यशानंतर केदार शिंदे पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड रचणार का? याकडे संपूर्ण सिनेसृष्टीचे डोळे लागले आहेत.
Pune News : रमजान ईदनिमित्त पुण्यातील ‘या’चौकातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल
रमजान ईदनिमित्त शनिवारी (२१ मार्च) लष्कर भागातील ईदगाह मैदान येथे सामुहिक नमाज पठण करण्यात येणार आहे.
Glenn Phillips Flying Aircraft : फिलिप्सने ऑकलंडच्या आकाशात स्वतः विमान उडवल्याचा एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याच्या अष्टपैलू प्रतिभेने चाहते थक्क झाले आहेत.
Mumbai Press Club : ‘मुंबई प्रेस क्लब’ला बॉम्बची धमकी; ई-मेलमुळे मोठी खळबळ, पोलिस यंत्रणा सतर्क
मुंबईतील 'मुंबई प्रेस क्लब'ला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे.
ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान मोदींचे जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी भारतात उत्पादन, गुंतवणूक, नवकल्पना आणि ऊर्जा क्षेत्राचा व्यापक विस्तार करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करत, “विकासासाठी विद्युतीकरण आणि शाश्वततेसाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत,” असे नमूद केले.इंडियन इलेक्ट्रिसिटी समिट २०२६ मध्ये गुरुवारी केंद्रीय ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल यांनी वाचून दाखवलेल्या लिखित संदेशात पंतप्रधानांनी सांगितले की, भारत आपल्या ऊर्जा प्रवासातील निर्णायक टप्प्यावर उभा आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून भारत ऊर्जा क्षेत्रात मोठ्या बदलांच्या दिशेने वाटचाल करत आहे. या शिखर परिषदेचे उद्दिष्ट संपूर्ण ऊर्जा परिसंस्थेला एका मंचावर आणून विचारांची देवाणघेवाण करणे आणि ऊर्जा विकासासाठी सामूहिक मार्ग निश्चित करणे आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, देशात पायाभूत सुविधा मजबूत केल्या जात असून सर्वांसाठी विश्वासार्ह ऊर्जा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली असून २०३० पर्यंत ५०० गीगावॅट क्षमतेचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी ५० टक्क्यांहून अधिक गैर-जीवाश्म इंधन क्षमता आधीच साध्य करण्यात आली आहे.“एक सूर्य, एक जग, एक ग्रिड” यांसारख्या उपक्रमांद्वारे जागतिक सहकार्याचा दृष्टिकोन स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत मजबूत पुरवठा साखळी निर्माण करत विश्वासार्ह ऊर्जा भागीदार म्हणून उदयास येत आहे. बॅटरी उत्पादन, रोजगारनिर्मिती आणि सुधारित धोरणांमुळे गुंतवणुकीला चालना मिळत आहे.तसेच, ‘शांती अधिनियम २०२५’मुळे अणुऊर्जा क्षेत्रात नवीन संधी निर्माण होत असून ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’मुळे वितरित ऊर्जा उत्पादन आणि शाश्वत वापराला प्रोत्साहन मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Maharashtra Kesari 2026 : नेक मल्लांनी १०-० आणि ११-० अशा एकतर्फी गुणफरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे, तर काही ठिकाणी दुखापतीमुळे मल्लांना माघार घ्यावी लागली.
पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन राकेश रंजन सिंह (Rakesh Ranjan Singh) यांचे निधन झाले आहे. २८ फेब्रुवारीपासून जहाज समुद्रात अडकले होते आणि तब्बल १८ दिवस तेथेच थांबावे लागले.मूळचे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील रहिवासी असलेले सिंह यांचे कुटुंब सध्या रांची येथे राहते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.माहितीनुसार, १८ मार्च रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. जहाजावरील अधिकाऱ्यांनी दुबई एटीसीकडे एअर अॅम्ब्युलन्सची मागणी केली, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे परवानगी मिळू शकली नाही. त्यानंतर बोटीने किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न झाला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. अखेरीस हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.‘अवाना’ जहाजावर कॅप्टन सिंह यांच्यासह सुमारे ३५ कर्मचारी अडकले होते. या काळात त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळू शकल्या नाहीत, ज्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे.
उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा
मुंबई : रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता लोकभवन येथील ऐतिहासिक दरबार हॉल येथे होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणाऱ्या या विद्यापीठाचा हा पहिलाच दीक्षांत समारंभ आहे. या समारंभाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. शनिवारी होत असलेला दीक्षांत सोहळा म्हणजे राज्यातील कौशल्य विकास क्षेत्रातील एक नवा टप्पा असल्याचे लोढा म्हणाले.पंतप्रधान मोदींनी देशातल्या तरुण पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी कौशल्य विकासावर विशेष भर दिला आहे. मोदी यांच्या नेतृत्वात देश महासत्तेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. कौशल्याधारित शिक्षण आणि प्रशिक्षण या वाटचालीत महत्वाचे योगदान देणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या रूपात राज्याला दूरदृष्टीचे नेतृत्व लाभले असून त्यांच्या मार्गदर्शनात राज्यातील कौशल्य विभाग तरुणांसाठी विविध रोजगाराभिमुख उपक्रम राबवत आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ हे उद्योगाभिमुख शिक्षण देणारे अग्रगण्य संस्थान म्हणून ओळखले जाते. या विद्यापीठात विविध अत्याधुनिक विषयांवरील अभ्यासक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा मिळत आहे, असे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची जुलै २०२२ मध्ये स्थापना झाली आहे. उच्च दर्जाचे कौशल्यपूर्ण आणि रोजगारक्षम तरुण घडवण्यासाठी, रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी हे विद्यापीठ कार्यरत आहे. स्टार्टअप्स, इनक्युबेशन, रोजगारक्षमता, प्रशिक्षण, समुपदेशन या विशेष बाबींवर विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले आहे. लवकरच पनवेल येथे विद्यापीठाची भव्य इमारत उभी राहत असून विद्यापीठाची नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात आणि खासगी आस्थापनेत केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. या केंद्रात खालील अभ्यासक्रम शिकविले जातात.* स्कूल ऑफ सायन्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कौशल्य* व्यवस्थापन आणि वाणिज्य कौशल्य शाळा* डिझाईन आणि सर्जनशील कौशल्ये विद्यालय* अल्प कालावधीचे कौशल्य प्रमाणपत्रे* आंतरराष्ट्रीय नोकऱ्या आणि त्यासंदर्भातील कौशल्यया सगळ्या अभ्यासक्रमांना उद्योगांची जोड देण्यात आली आहे. यात विद्यापीठाची पार्टनरशिप ही पर्सिस्टन्ट सिस्टिम, किर्लोस्कर ग्रुप, मायक्रोसॉफ्ट इत्यादी कंपन्यांशी केलेली आहे. अत्याधुनिक कौशल्याधारित 'बॅचलर ऑफ डीझाईन' हा अभ्यासक्रम 'रुबिक फ्रांस' या युरोपातील प्रख्यात संस्थेसोबत करार करुन चालविण्यात आला आहे. याचप्रमाणे विद्यापीठात आरोग्य सेवेतील वैद्यकीय सहाय्यक कौशल्य अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभरात आयटीआयसाठी सहकार्य करणाऱ्या संस्थांच्या उपक्रमाचे प्रदर्शन याठिकाणी होणार आहे. भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी जयंत सहस्रबुद्धे यांनी जीवन समर्पित केले. लेखक आणि विज्ञान प्रसारक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचे कार्य स्वदेशी विज्ञान आणि राष्ट्र उभारणीसाठी तरुणांना प्रेरित करण्यावर केंद्रीत होते, ज्यात भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान आणि पारंपरिक ज्ञानाचा समावेश होता. अशा महान विभुती जयंतराव सहस्रबुद्धे यांचे नाव या प्रदर्शनाला देण्यात आल्याची माहिती मंत्री लोढा यांनी यावेळी दिली. तसेच विभागाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप्स योजनेतील लाभार्थी युवतींच्या यशाचे प्रतिबिंब या सोहळ्यात उमटणार असून त्यांच्या उपक्रमांचाही या प्रदर्शनात समावेश असणार आहे. विद्यापीठाच्या उल्लेखनीय कौशल्य उपक्रमांसह उद्योगक्षेत्रात आघाडीच्या कंपन्यांचे मिळून एकूण बारा स्टॉल्स या ठिकाणी लागणार आहेत. यात टोयोटा किर्लोस्कर , ऍटलास, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, दासयू एव्हिएशन तसेच प्रसिद्ध फिल्म निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्या स्वदेश फॉऊंडेशनचा ही यात समावेश असणार आहे. त्याचबरोबर अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टचाही यात समावेश असणार आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्य कक्षा वाढवण्यासाठी या प्रदर्शनाचा लाभ होणार असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.त्याचबरोबर विद्यापीठात उद्योगस्नेही अशा विविध विषयांतर्गत पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाची आखणी केलेली आहे. यासाठी प्रयोग शाळाही उभारण्यात आल्या आहेत. तसेच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ द्वारा कोड विदाउट बॅरियर उपक्रमांतर्गत “मायक्रोसॉफ्ट इंडिया ” च्या सहकार्याने राज्यातील दहा हजार महिला शिक्षक आणि विद्यार्थिनींना “एआय कौशल्य” प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील महिलांना जनरेटिव्ह एआय कौशल्ये प्रदान करून, उच्च शिक्षणातील शिक्षक, उच्च शिक्षणातील महिला विद्यार्थी आणि महिला उद्योजकांवर लक्ष केंद्रित करून त्यांना सक्षम करण्यासाठी हा कार्यक्रम उपक्रमात संरेखित केलेला होता. या दीक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यासोबतच मान्यवरांच्या हस्ते आदिवासी, ग्रामीण भागातील उत्कृष्ट औद्योगिक संस्थांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. याप्रसंगी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्यविद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्व पालकर आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक श्री. सतीश सूर्यवंशी यांनी दीक्षांत कार्यक्रमाची रूपरेषा आणि विविध उपक्रमाची माहिती यावेळी दिली. विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा हा केवळ विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान नसून, आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या कौशल्यांच्या बळावर आपल्या युवकांना देश-विदेशात रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे ही कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

26 C