SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
... ...View News by News Source

Anand Dubey : उबाठा पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबेंना मिळाल्या धमक्या; अदखलपात्र गुन्हा दाखल

मुंबई : बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानला कोलकाता नाइट रायडर्सच्या 2026 च्या आयपीएल संघातून वगळण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचे कौतुक केल्याबद्दल ठाकरेसेना प्रवक्ते आनंद दुबे यांनी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा दावा केला आहे. दुबे यांना त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर धमकीचे संदेश आणि अज्ञात व्यक्तींकडून फोनही आले असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […] The post Anand Dubey : उबाठा पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबेंना मिळाल्या धमक्या; अदखलपात्र गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 7:10 pm

ऐन निवडणुकीत लाडकी बहीण योजनेवर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य

अकोला : ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात लाडकी बहीण योजनेवर मोठं विधान केलं आहे. जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना कुणीही बंद करू शकणार नाही, असा पुनरुच्चार फडणवीसांनी केला. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या प्रचार सभेसाठी देवेंद्र फडणवीस अकोल्यात आले होते. क्रिकेट क्लब मैदानावर झालेल्या या सभेला […] The post ऐन निवडणुकीत लाडकी बहीण योजनेवर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 7:09 pm

“उद्धव ठाकरेंनी ३ लाख कोटींचा घोटाळा केला आहे…”; ठाकरेंवर कोणी केला मोठा आरोप? पाहा…

मुंबई – ठाकरेसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवत, त्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आणि आपल्या वक्तव्यांमधून मराठी समाजाचा अपमान केल्याचा आरोप भाजपच्या मुंबई युनिटचे प्रमुख अमित साटम यांनी केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे खर्चाचे बजेट १५,००० कोटी रुपये असताना, विविध कामांसाठी कंत्राटदारांना आगाऊ मोबिलायझेशन म्हणून द्यावी लागणारी रक्कम ३ लाख कोटी […] The post “उद्धव ठाकरेंनी ३ लाख कोटींचा घोटाळा केला आहे…”; ठाकरेंवर कोणी केला मोठा आरोप? पाहा… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 6:55 pm

Sports Minister Announce : क्रीडा मंत्र्यांची मोठी घोषणा; खेळाडूंची चांदी! पदक जिंकण्यापूर्वीच मिळणार ५ लाखांची मदत

Bihar Sports Minister Shreyasi Singh announcement : बिहारमधील खेळाडूंच्या कल्याणासाठी राज्य सरकार अनेक महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्ष जमिनीवर उतरवत आहे. आता प्रतिभावान युवा खेळाडूंना शिष्यवृत्ती (Scholarship) आणि प्रायोजकत्व (Sponsorship) देऊन त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी दिली जाईल, अशी घोषणा बिहारच्या क्रीडा आणि आयटी मंत्री श्रेयसी सिंह यांनी केली आहे. पदक जिंकण्यापूर्वीच मिळणार आर्थिक मदत – पत्रकारांशी […] The post Sports Minister Announce : क्रीडा मंत्र्यांची मोठी घोषणा; खेळाडूंची चांदी! पदक जिंकण्यापूर्वीच मिळणार ५ लाखांची मदत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 6:53 pm

“काँग्रेसच्या हट्टामुळेच 16 जागांवर उमेदवार दिले नाहीत”; सुजात आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी 16 जागांवर उमेदवार न उभा करण्यामागचं कारण स्पष्ट करत काँग्रेसवर थेट आरोप केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला एकूण 62 जागा दिल्या होत्या. मात्र, ऐनवेळी वंचितने त्यापैकी 16 […] The post “काँग्रेसच्या हट्टामुळेच 16 जागांवर उमेदवार दिले नाहीत”; सुजात आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 6:50 pm

Amit Thackeray : अमित ठाकरेंनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट; सोलापुरातील हत्याप्रकरणावरुन व्यक्त केला संताप

सोलापूर : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्याची हत्या घडल्याचा प्रकार घडला होता. या हत्याकांडानंतर सोलापूरातील स्थानिक भाजप नेत्यांवर टीका होत आहे. दरम्यान, मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आज सोलापुरात मृत मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र […] The post Amit Thackeray : अमित ठाकरेंनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट; सोलापुरातील हत्याप्रकरणावरुन व्यक्त केला संताप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 6:40 pm

Mumbai News : ‘वचननामा नव्हे हा तर अपचननामा’; ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यावर भाजपचा हल्लाबोल

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेचा जाहीरनामा रविवारी प्रसिद्ध झाला. या जाहीरनाम्यावर सत्ताधारी भाजपकडून जोरदार टीका झाली आहे. भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ठाकरे बंधूंनी दिलेली आश्वासने नागरिकांच्या पचनी पडण्यासारखी नाहीत. त्यामुळे हे वचननामा नव्हे तर अपचननामा आहे. त्यांनी म्हटले की, […] The post Mumbai News : ‘वचननामा नव्हे हा तर अपचननामा’; ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यावर भाजपचा हल्लाबोल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 6:24 pm

उत्तर आणि दक्षिण कोरियामधील तणाव वाढला; डागली दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे

सेऊल – उत्तर कोरियाने आज दक्षिण कोरियाच्या दिशेने समुद्रात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जेएई-म्युंग चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. उत्तर कोरियाच्या अणू कार्यक्रमासंदर्भात ते चीनच्या नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. ते चीनला रवाना होण्यापुर्वीच उत्तर कोरियाच्या राजधानीतून ही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या क्षेपणास्त्रांनी तब्बल ९०० किलोमीटरचा प्रवास केला आणि समुद्रात कोसळली. दक्षिण […] The post उत्तर आणि दक्षिण कोरियामधील तणाव वाढला; डागली दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 6:19 pm

DA Hike : ‘या’कर्मचाऱ्यांचा वर्षातून 2 वेळा DA वाढणार ! राज्य सरकारचा मोठा निर्णय

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी ३ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तामिळनाडू अ‍ॅश्युअर्ड पेन्शन स्कीम (टीएपीएस) ची (DA Hike) घोषणा केली. ही योजना २००३ मध्ये बंद झालेल्या जुन्या पेन्शन योजनेला (ओपीएस) समान फायदे देणारी असून, राज्यातील सहा लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता मिळणार आहे. ही घोषणा राज्यातील कर्मचारी संघटनांच्या गेल्या […] The post DA Hike : ‘या’ कर्मचाऱ्यांचा वर्षातून 2 वेळा DA वाढणार ! राज्य सरकारचा मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 6:11 pm

भारत सरकारच्या BHEL मध्ये नोकरीची मोठी संधी; महिन्याला १ लाखांपर्यंत पगार, वाचा सविस्तर

मुंबई : इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी भारत सरकारच्या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारत हॅव्ही इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अर्थात BHEL मार्फत प्रोजेक्ट इंजीनिअर आणि प्रोजेक्ट सुपरवायझर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मॅकेनिकलसह विविध तांत्रिक शाखांमध्ये ही भरती होणार असून अनुभवी उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.या भरतीसाठी इच्छुक उमेदवार १२ जानेवारी २०२६ पर्यंत BHEL च्या अधिकृत careers.bhel.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. प्रोजेक्ट इंजीनिअर पदासाठी उमेदवारांकडे फुलटाइम इंजीनिअरिंग किंवा टेक्नोलॉजीमधील पदवी किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. जनरल आणि OBC उमेदवारांसाठी किमान ६० टक्के गुणांची अट असून SC आणि ST उमेदवारांसाठी ५० टक्के गुण ग्राह्य धरले जातील. यासोबतच किमान पाच वर्षांचा कामाचा अनुभव अनिवार्य आहे.प्रोजेक्ट सुपरवायझर पदासाठी संबंधित शाखेतील इंजीनिअरिंग पदवी आवश्यक असून उमेदवारांकडे किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा. या दोन्ही पदांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा २५ ते ३२ वर्षांदरम्यान निश्चित करण्यात आली आहे.पगाराच्या बाबतीत ही भरती आकर्षक मानली जात आहे. प्रोजेक्ट इंजीनिअर पदासाठी दरमहा ९५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहे, तर प्रोजेक्ट सुपरवायझर पदासाठी ४५ हजार ते ४८ हजार रुपये मासिक पगार मिळणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना २३६ रुपये अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे.या भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती आणि अधिकृत जाहिरात BHEL च्या वेबसाइटवर उपलब्ध असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ती काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 6:10 pm

देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार, मुंबई पालिकेत ‘उबाठा’चा तीन लाख कोटींपेक्षा अधिक भ्रष्टाचार

मुंबई : रस्ते, कचरा, कोविड सेंटर, टॅब खरेदी, नाफेसफाई आदी मुंबई महानगरपालिकेच्या कामांमध्ये गेल्या 25 वर्षात उद्धव ठाकरे यांच्या उबाठा पक्षाने तब्बल साडेतीन लाख कोंटी रुपयांच्या पैशावर डल्ला मारला आहे. ‘उबाठा’ने केलेला घोटाळा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, असा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार अमीत साटम यांनी केला आहे. तसेच मुंबईकर यावेळी ‘उबाठा’ नेत्यांना घरी बसवेल, असा विश्वास आमदार अमीत साटम यांनी व्यक्त केला.‘उबाठा’ने मुंबई महापालिका निवडणुकीचा जाहीरनामा रविवारी प्रकाशित केला. त्यातील विसंगतीवर बोट ठेवताना आमदार अमीत साटम यांनी 'उबाठा’ विरुद्ध 'आरोपपत्र' प्रकाशित केले.रस्ते निविदा प्रक्रियेतील अनियमिततायावेळी बोलताना आमदार अमीत साटम म्हणाले की, एकवीस हजार कोटी रुपये खर्चून सुद्धा मुंबईकरांच्या नशिबी खड्डेमुक्त रस्ते आले नाहीत. निविदा प्रक्रियेतील अनियमित्ता, अधिकच्या दराने निविदा देणे, काळ्या यादीतील कंपन्यांना निवेदन देणे.. या मार्गाने गेली 25 वर्षे ‘उबाठा’ने मुंबईकरांचे पैसे लुटले आहेत.कोविड-१९ घोटाळा आणि ईडीची कारवाईलाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेसला बनावट कागदपत्रांच्या आधारे कोविड काळात कंत्राट दिले गेले. ‘उबाठा’चे प्रवक्ते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांचा यामध्ये सहभाग होता. पाटकर यांच्यावर ‘ईडी’ने मनी लॉन्ड्रींचा गुन्हा दाखल केला. कोविड काळातील ‘उबाठा’चा घोटाळा शंभर कोटीचा आहे. पंधराशे रुपयांना मिळणारी बॉडी बॅग मुंबई महापालिकेने 6721 रुपयांना खरेदी केली. ऑक्सिजन प्लांटमध्ये 320 कोटींचा घोटाळा केला. इतका खर्च होवूनही महाराष्ट्रात कोविडचा मृत्युदर अधिक राहिल्याचे आमदार अमीत साटम म्हणाले.'उबाठा’चा मराठी भाषेबद्दल खोटा कळवळा आणि शिक्षणात घोटाळाउबाठा’चा मराठी भाषेबद्दल खोटा कळवळा उघड करताना आमदार अमीत साटम म्हणाले, मागील दहा वर्षात मुंबईतील 114 मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडल्या असून आज मराठी माध्यमांच्या केवळ 254 शाळा शिल्लक आहेत. टॅब खरेदीत 40 कोटी खाल्ले. शिक्षण क्षेत्रातला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा घोटाळा 182 कोटींचा असल्याचे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.धरण प्रकल्प रद्द आणि पाणी दरात वाढगारगाई, पिंजाळ पाणी प्रकल्प यांनी रद्द केले. जलकरात दरववर्षी 8 टक्के वाढ केली. अशा प्रकारे ‘उबाठा’ने पाणी प्रकल्पात मुंबईकरांना 680 कोटींना चुना लावल्याचे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.नालेसफाईत घोटाळे, पूर आणि मिठी नदीचे अपयशनालेसफाई मध्ये गाळ न काढताच गाळाचे वजन वाढवून कंत्राटदारांना पैसे दिले. ‘कॅग’ने अहवालामध्ये बाराशे कोटींच्या अनियमिततेवर कोरडे ओढले आहेत. दहा हजार कोटी खर्च करूनही ‘उबाठा’ला मुंबईतील पूर नियंत्रण करण्यात अपयश आले. दोन हजार कोटी खर्च करून मीठी नदीचा प्रकल्प 20 वर्षानंतर अपूर्णच राहिल्याचा आरोपही आमदार अमीत साटम यांनी केला.कचरा वाहतूक आणि बेस्ट बस घोटाळे; मेट्रो थांब्याच्या कामांमुळे आणि भोगवटा प्रमाणपत्र शुल्कामुळे नुकसानकचरा वाहून येणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये घोळ घालून 900 कोटींचा घोटाळा केला. बेस्टसाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करताना 3600 कोटींचे कंत्राट नियमबाह्य पद्धतीने दिले. पत्राचाळ प्रकल्पात 1034 कोटीचा तर दत्तक वस्ती योजनेमध्ये सहा हजार कोटी रुपये ‘उबाठा’ कार्यकर्त्यांनी लाटले. पेंग्विन देखभालीमध्ये 15 कोटींचा तर भोगवटा प्रमाणपत्र शुल्क माफीत पालिकेला पाच हजार कोटींचा फटका बसला. मेट्रो प्रकल्पाच्या कामांना स्थगिती देऊन राज्याचे 10,000 कोटीचे ‘उबाठा’ने नुकसान केल्याचे आमदार अमीत साटम म्हणाले.मुंबईकर 'उबाठा'ला घरी बसवणार :गेल्या पंचवीस वर्षांपासून महापालिकेवर ‘उबाठा’ची सत्ता होती. प्रामाणिक मुंबईकरांच्या कष्टाने कमावलेल्या पैशांनी ‘उबाठा’च्या मंडळींनी स्वतःची तिजोरी भरली. यावेळी मुंबईकर त्यांना घरी बसवणार आहे, असा विश्वासही आमदार अमीत साटम यांनी व्यक्त केला.'उबाठा’ मुंबईच्या रंग बदलण्याच्या आंतरराष्ट्रीय षडयंत्राचे भागीदारमतांसाठी ‘उबाठा’ने मुंबईची सुरक्षितता धोक्यात आणली आहे. ‘मामूं’ची टोळी या शहराचा रंग बदलण्यासाठी सज्ज झाली आहे. पाकिस्तानचे झेंडे यांच्या प्रचारफेरीत फडकले होते, बॉम्बस्फोटाच्या आरोपींनी यांचा प्रचार केला होता, पाकिस्तान झिंदाबाद घोषणा देणाऱ्या रशीद मामूला यांनी पक्षात प्रवेश दिला, विनयभंग आणि फसवणुकीचे आरोप असणाऱ्या चंगेज मुलतानीला यांनी प्रवेश दिला, देशद्रोही असणाऱ्या उमर खालिदच्या कार्यक्रमाला यांनी मुख्यमंत्री असताना परवानगी दिली होती, त्यामुळे 'उबाठा’ मुंबईच्या रंग बदलण्याच्या आंतरराष्ट्रीय षडयंत्राचे भागीदार आहे, असा आरोपही आमदार अमीत साटम यांनी केला.उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक मध्यमवर्गीय मराठी माणूस, कोकणी माणूस आणि मालवणी माणसाला शिवी घातलीआजच्या पत्रकार परिषदेत आमदार अमीत साटम यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी वापरलेल्या शिवीबाबत आमदार अमीत साटम म्हणाले, मी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून येतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी केवळ मलाच नाही, तर प्रत्येक मध्यमवर्गीय मराठी माणूस, कोकणी माणूस आणि मालवणी माणसाला शिवी घातली आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 6:10 pm

मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळांचा उबाठाला 'जय महाराष्ट्र'

मुंबई : उद्धव आणि राज यांनी संयुक्त जाहीरनामा प्रकाशित केला. पण आजच्या दिवशी उबाठाला मोठा धक्का बसला. मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी उबाठा सोडण्याचा निर्णय घेतला. शुभा राऊळ कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे अद्याप समजलेले नाही. पण त्या महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. माजी महापौर शुभा राऊळ यांनी उबाठाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंकडे शुभा राऊळ यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. राजीनामा दिल्यानंतर शुभा राऊळ यांनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. भाजप नेते प्रविण दरेकरांच्या निवासस्थानी राऊळ आणि शेलार यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. कोण आहेत शुभा राऊळ ?शुभा राऊळ या २००७ ते २००९ या कालावधीत मुंबईच्या महापौर होत्या. त्या उबाठाच्या महिला नेत्या पण होत्या. दहिसरमधून अनेक टर्म नगरसेविका झालेल्या शुभा राऊळ यांनी महापौर असताना हुक्का पार्लर बंदीचा निर्णय घेतला. उबाठातील विनोद घोसाळकरांच्या राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या शुभा राऊळ यांनी २०१४ मध्ये मनसेत प्रवेश केला होता. पण अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी घरवापसी केली होती. एकनाथ शिंदे यांनी वेगळा विचार केल्यानंतरही शुभा राऊळ उद्धव ठाकरेंसोबतच होत्या. पण मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर शुभा राऊळ यांनी उबाठा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उबाठा सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना भाजपने मुंबईच्या वॉर्ड क्रमांक दोनमधून उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर काही दिवसांनी शुभा राऊळ यांनी उबाठा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 6:10 pm

India Bangladesh Tensions : बांगलादेशचा टी-२० वर्ल्ड कपसाठी भारत दौऱ्यावर बहिष्कार! BCB ने घेतला मोठा निर्णय

India Bangladesh Tensions about Cricket : भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली असून, याचे रूपांतर आता कूटनैतिक संघर्षात झाले आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने अधिकृतपणे मागणी केली आहे की, पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमधील बांगलादेशचे सर्व साखळी सामने भारताऐवजी श्रीलंकेत आयोजित करावेत. बांगलादेशचा खेळाडू मुस्तफिजुर रहमानची आयपीएलमधून हकालपट्टी केल्याने बांगलादेशने ही […] The post India Bangladesh Tensions : बांगलादेशचा टी-२० वर्ल्ड कपसाठी भारत दौऱ्यावर बहिष्कार! BCB ने घेतला मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 6:06 pm

Mental patients : “भारतातील ८० टक्के मानसिक रुग्ण उपचारांपासून वंचित”; ‘आयपीएस’ने व्यक्त केली चिंता

India | Mental patients – भारतात मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील मोठ्या उपचार अंतराबाबत इंडियन सायकियाट्रिक सोसायटीने (आयपीएस) गंभीर चिंता व्यक्त केली आहे. देशात मानसिक विकारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींपैकी जवळपास ८० ते ८५ टक्के लोकांना वेळेवर किंवा योग्य उपचार मिळत नाहीत, असे आयपीएसने निदर्शनास आणून दिले.ही धक्कादायक वास्तविकता भारतीय मानसोपचार समाजाच्या ७७व्या राष्ट्रीय वार्षिक परिषदेच्या (एएनसीआयपीएस २०२६) […] The post Mental patients : “भारतातील ८० टक्के मानसिक रुग्ण उपचारांपासून वंचित”; ‘आयपीएस’ने व्यक्त केली चिंता appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 6:04 pm

महागाईचा भडका उडणार? राज ठाकरे सेना भवनात ते प्रियांका गांधीकडे मोठी जबाबदारी..; वाचा आजच्या टॉप १० बातम्या

१) मुंबईचा महापौर मराठी माणूसच होणार मुंबईचा महापौर महायुती, हिंदू आणि मराठीच होणार असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. मुंबईतील वरळी डोम येथे महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पारदर्शकता आणि प्रामाणिकपणे नव्याने घडवू, कोणत्याही धर्माशी वैर नसून, भारतविरोधी भूमिकेला विरोध असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच मुंबईतील सामान्य […] The post महागाईचा भडका उडणार? राज ठाकरे सेना भवनात ते प्रियांका गांधीकडे मोठी जबाबदारी..; वाचा आजच्या टॉप १० बातम्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 5:41 pm

Devendra Fadnavis : “विरोधक कोर्टात गेले तरी आमचाच विजय”– देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis – महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत महायुतीने मिळवलेल्या बिनविरोध विजयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना कडेकोट प्रत्युत्तर दिले . विरोधकांनी खुशाल न्यायालयात जावे, मात्र जनतेच्या न्यायालयात आमचा विजय झाला आहे आणि कोर्टातही जनतेचाच कौल जिंकेल, असा ठाम विश्वास त्यांनी रविवारी येथे व्यक्त केला. येत्या १५ जानेवारीला राज्यातील महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजप […] The post Devendra Fadnavis : “विरोधक कोर्टात गेले तरी आमचाच विजय” – देवेंद्र फडणवीस appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 5:33 pm

Pune News : निर्भय कन्या अभियानाअंतर्गत व्याख्यान, स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या येरवडा येथील डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियानाअंतर्गत व्याख्यान व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर यशस्वीरीत्या राबविण्यात आले. डॉ.आंबेडकर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गौतम बनसोडे हे होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणुन पुणे जिल्हा न्यायालयातील ॲड.अश्विनी […] The post Pune News : निर्भय कन्या अभियानाअंतर्गत व्याख्यान, स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 5:30 pm

RCB Players Injured : IPL 2026 पूर्वी RCB ला मोठा धक्का! कर्णधारासह ४ स्टार खेळाडू जखमी; संघाची चिंता वाढली

RCB Players Injured ahead IPL 2026 : टी-२० वर्ल्ड कप २०२६ संपल्यानंतर लगेचच जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचा म्हणजेच आयपीएल २०२६ चा (IPL 2026) थरार रंगणार आहे. सर्व १० संघांनी गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात आपला ताफा तयार केला आहे. मात्र, प्रत्यक्ष मैदानात उतरण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. संघातील चार […] The post RCB Players Injured : IPL 2026 पूर्वी RCB ला मोठा धक्का! कर्णधारासह ४ स्टार खेळाडू जखमी; संघाची चिंता वाढली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 5:20 pm

संभाजीनगरात बाईक व्यवहाराचा वाद जीवावर बेतला; ७ जणांच्या टोळीकडून १७ वर्षीय विद्यार्थ्याचं सिनेस्टाईल अपहरण

संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात शुक्रवारी मध्यरात्री सिनेस्टाईल अपहरणाची धक्कादायक घटना घडली आहे. स्पोर्ट्स बाईकच्या खरेदी-विक्री व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाचा शेवट थेट अपहरणात झाला. बजरंग चौक परिसरात ७ जणांच्या टोळीने पाठलाग करून १७ वर्षीय बारावीतील विद्यार्थ्याला जबरदस्तीने कारमध्ये कोंबून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. मात्र, सिडको पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अवघ्या दोन तासांत विद्यार्थ्याची सुखरूप सुटका करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी आणि आरोपी यांच्यात काही दिवसांपासून स्पोर्ट्स बाईकच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. शुक्रवारी मध्यरात्री विद्यार्थी बजरंग चौक परिसरात असताना दोन कारमधून आलेल्या आरोपींनी त्याला अडवले. काही कळायच्या आतच त्याला उचलून कारमध्ये टाकण्यात आले आणि आरोपींनी घटनास्थळावरून धूम ठोकली. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. कंट्रोल रूमच्या मदतीने शहरभर नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी आरोपींच्या कारचा माग घेत वाळूज परिसरापर्यंत थरारक पाठलाग केला. अखेर दोन तासांच्या आत पोलिसांनी कार अडवून विद्यार्थ्याची सुखरूप सुटका केली.या प्रकरणी विवेक गणेश सोनवणे, पांडुरंग माधवराव सोनवणे आणि रोहन सुनील ढवळे या तिघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर तिन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, या गुन्ह्यात सामील असलेले इतर चार आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 5:10 pm

माजी क्रिकेटपटू केदार जाधवमुळे आमदार रोहित पवार अडचणीत ? 

पुणे : पुण्यातील क्रिकेट राजकारण सध्या चांगलंच तापले असून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा वाद निर्माण झाला आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या एमसीए निवडणुकीत माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप पदाधिकारी केदार जाधव यांनी गंभीर आरोप केले असून यामुळे रोहित पवार अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.केदार जाधव यांच्या आरोपानुसार, २५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या नव्या मतदार यादीत अचानक ४०१ नवीन आजीव सभासदांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जनरल बॉडीची सदस्यसंख्या १५० वरून थेट ६०० च्या पुढे गेली आहे. या नव्या सदस्यांपैकी २५ जण हे माजी कौन्सिल सदस्यांचे नातेवाईक असून १८ जण रोहित पवार यांचे नातेवाईक असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. याशिवाय ५६ सदस्य हे रोहित पवार यांच्या व्यवसायाशी किंवा वैयक्तिक कामाशी संबंधित असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाशी संबंधित ३७ नेत्यांचा समावेश असल्याचेही सांगितले जात आहे.एप्रिल महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या केदार जाधव यांनी ‘कॅटेगरी ए’ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोढा समितीच्या शिफारसींचे उल्लंघन करत क्रिकेट प्रशासनावर काही मोजक्या घराण्यांचे वर्चस्व निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नवीन सभासदांचा समावेश करताना असोसिएशनच्या घटनेत आवश्यक सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत, तसेच सर्वोच्च न्यायालयाची परवानगीही घेतली नसल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला आहे.या प्रकरणात केदार जाधव आणि लातूर क्रिकेट असोसिएशनचे कमलेश ठक्कर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या वादाला कायदेशीर वळण लागले आहे.दरम्यान, रोहित पवार यांचे समर्थक आणि एमसीएतील सध्याचे पदाधिकारी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नव्या सभासदांची नियुक्ती ही नियमांनुसार करण्यात आली असून उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील समितीने ही प्रक्रिया पूर्ण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना विनाकारण राजकारण केलं जात असल्याचा आरोप माजी पदाधिकाऱ्यांनी केला आहे.या मतदार यादीत रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार, सासरे सतीश मगर, खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि बारामती ॲग्रोचे सुभाष गुळवे यांसारख्या नावांचा समावेश असल्याने पुणे मुख्यालय असलेल्या एमसीएची ही निवडणूक आता प्रतिष्ठेची बनली आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 5:10 pm

BMC Election : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’फायरब्रॅन्ड महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीला (BMC Election) अवघे १० दिवस बाकी असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ला मोठा धक्का बसला आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या शुभा राऊळ यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा राजीनामा पक्षासाठी धक्कादायक ठरला असून, त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या अंतर्गत […] The post BMC Election : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ फायरब्रॅन्ड महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 5:00 pm

“कुटुंबातील घट्ट नाते ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना थांबवू शकतात..”–मोहन भागवत

love jihad | Mohan Bhagwat – एका कुटुंबात पालक आणि मुलांमधील संवाद आणि त्यांच्यातील घट्ट नाते लव्ह जिहाद सारख्या घटना थांबवू शकतात. जेव्हा घरात आणि कुटुंबात मुलांशी तुम्ही नियमित संवाद साधणार तेव्हा अशा घटनांवर अंकुश लागले. मुलांच्या भावना समजून घेता येतील. त्यामुळे या घटनांना आळा बसेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी […] The post “कुटुंबातील घट्ट नाते ‘लव्ह जिहाद’ सारख्या घटना थांबवू शकतात..” – मोहन भागवत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 4:37 pm

Mitchell Starc Record : मिचेल स्टार्कचे ऐतिहासिक ‘त्रिशतक’! ‘ही’कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा तिसराच वेगवान गोलंदाज

Mitchell Starc Play 300 International Matches : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या ॲशेस कसोटीत मैदानात उतरताच ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क एक मोठा पराक्रम केला आहे. मिचेल स्टार्क सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पाय ठेवताच आपल्या कारकिर्दीतील ३०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा तो ऑस्ट्रेलियाचा तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. याआधी केवळ ग्लेन मॅकग्रा आणि ब्रेट ली या दिग्गज वेगवान गोलंदाजांनाच हा टप्पा […] The post Mitchell Starc Record : मिचेल स्टार्कचे ऐतिहासिक ‘त्रिशतक’! ‘ही’ कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा तिसराच वेगवान गोलंदाज appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 4:33 pm

नाशिकमध्ये राजकीय उलथापालथ; सुजाता डेरे भाजपच्या गळाला

मुंबई : मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच नाशिकमधील राजकारणात भाजपने मोठी खेळी खेळल्याचं चित्र आहे. मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता डेरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असून या पक्षप्रवेशामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. सुजाता डेरे यांच्या निर्णयामुळे मनसेला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजाता डेरे यांनी नाशिकमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मनसेकडून अधिकृत एबी फॉर्म मिळाल्यानंतरही त्यांनी ऐनवेळी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर त्यांच्या भाजप प्रवेशामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.दरम्यान, मनसेने नाशिकमधील महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असून विविध प्रभागांतील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधील ड आरक्षणातून कोंबडे सुदाम विश्राम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग १ अ मधून गांगुर्डे प्रिया बाळकृष्ण, तर प्रभाग ३ ब मधून मंडलिक शितल विपुल आणि त्याच प्रभागातील ड आरक्षणातून भवर संदीप सुभाष निवडणूक लढवणार आहेत. प्रभाग ४ मध्ये ब आरक्षणातून दौदे निकिता सागर आणि ड आरक्षणातून कुलकर्णी कविता हर्षल यांना संधी देण्यात आली आहे.प्रभाग ५ ड मधून जाधव नवनाथ जिवराम, प्रभाग ७ अ मधून खंडाळे सत्यम चंद्रकांत, तर प्रभाग ८ मध्ये क आरक्षणातून कोरडे भाग्यश्री संतोष आणि ड-ब आरक्षणातून गुंबाडे विशाल सुरेश हे मनसेचे उमेदवार असतील. प्रभाग १० मध्ये ब आरक्षणातून जाधव किरण नामदेव आणि ड आरक्षणातून शेख फरीदा सलीम निवडणूक रिंगणात उतरले आहेत.याशिवाय प्रभाग ११ अ मधून भावले विशाल संपत, क आरक्षणातून काळे माया आणि जाधव गीता संजय, प्रभाग १२ अ मधून तेजाळे किशोर विनायक, प्रभाग १३ ब मधून पवार मयुरी अंकुश, तर प्रभाग १६ क मधून सहाणे मिरा बाळासाहेब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग १८ ब मधून पिल्ले रोहिणी संतोष आणि प्रभाग २३ ड मधून उपासनी स्वागता रमेश यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.प्रभाग २४ मध्ये ब-ड आरक्षणातून जगताप तुषार पुंडलिक, क आरक्षणातून रोजेकर सावित्री भिकन आणि दौदे संदीप गोपीचंद, तर प्रभाग २५ मध्ये ड-ब आरक्षणातून पाटील राहुल सुदाम निवडणूक लढवणार आहेत. प्रभाग २६ क मधून पवार निर्मला भास्कर आणि बगडे अर्चना ज्ञानेश्वर, तर प्रभाग २७ मध्ये अ आरक्षणातून मोकळ शैला दीपक, क मधून खाडम किरण गंगाराम आणि ब मधून कोदे श्री सुधाकर तसेच वेताळ वर्षा अरुण यांना संधी देण्यात आली आहे. प्रभाग २९ मधील ड आरक्षणातून माळी नितीन जगन्नाथ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 4:30 pm

लग्नाच्या दहा दिवसांतच मोठा धक्का; हनिमूनऐवजी जेलवारी, मराठी बिग बॉस फेम जय दुधाणेला अटक

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणेला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. सुमारे ५ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली जयला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. हनिमूनसाठी निघालेल्या जयची थेट जेलवारी झाल्याने संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.ठाण्याचा रहिवासी असलेला जय दुधाणे हा अभिनेता असण्यासोबतच व्यावसायिकही आहे. प्राथमिक तपासात जिम व्यवसायाच्या नावाखाली बनावट कागदपत्रे तयार करून दुकानांची बेकायदेशीर विक्री केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. एकाच दुकानाची विक्री वेगवेगळ्या व्यक्तींना करून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.या प्रकरणात जयने अनेक नागरिकांची सुमारे ५ कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याची सांगितले जात आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकरणात आर्थिक फसवणुकीचे गंभीर कलम लावले असून पुढील तपास सुरू आहे.या गुन्ह्यात केवळ जयच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयांचाही समावेश करण्यात आला आहे. दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये जयची आई, बहीण, आजी आणि आजोबांची नावे असून पोलिसांकडून त्यांच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. अटकेनंतर जयला न्यायालयात हजर करण्यात आले असून या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, जय दुधाणेच्या वैयक्तिक आयुष्यातही या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. २४ डिसेंबर २०२५ रोजी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटील हिच्याशी त्याने थाटामाटात विवाह केला होता. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असतानाच अवघ्या दहा दिवसांतच जयवर अटकेची कारवाई झाल्याने त्याच्या पत्नीला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.जयने आपल्या करिअरची सुरुवात स्प्लिट्सविला १३ या रिअलिटी शोमधून केली होती. या शोचा विजेता ठरल्यानंतर त्याने बिग बॉस मराठी ३ मध्ये उपविजेतेपद मिळवलं. त्यानंतर 'गडद अंधार' आणि 'वेडात मराठे वीर दौडले सात' यांसारख्या चित्रपटांतून त्याने आपली ओळख निर्माण केली.पोलीस तपासात आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 4:30 pm

Priyanka Gandhi : काँग्रेसमध्ये वाढत आहे प्रियांका गांधींचे महत्व; दिली ‘ही’सर्वात मोठी जबाबदारी

Priyanka Gandhi | Congress – या वर्षी देशभरात तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुका होणार आहेत. त्यासाठी काॅंग्रेस पक्षाने तयारी सुरू केली आहे. आसाममध्ये उमेदवार निवडीच्या स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी प्रियांका गांधी-वाड्रा यांची निय्क्ती पक्षाने केली आहे. गांधी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला राज्याच्या स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रत्येक राज्य […] The post Priyanka Gandhi : काँग्रेसमध्ये वाढत आहे प्रियांका गांधींचे महत्व; दिली ‘ही’ सर्वात मोठी जबाबदारी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 4:12 pm

वैभव सूर्यवंशीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रचला इतिहास

बेनोनी : दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचे नेतृत्व वैभव सूर्यवंशीने केले. कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्या सामन्यात, तो १२ चेंडूत फक्त ११ धावा करू शकला, पण असे असूनही, हा सामना त्याच्या कारकिर्दीतील एक ऐतिहासिक कामगिरी ठरला.सूर्यवंशीने विक्रम केलावयाच्या १४ व्या वर्षी, सूर्यवंशी युवा एकदिवसीय सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला. यासोबतच, तो १६ वर्षांच्या आधी कोणत्याही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय १९ वर्षांखालील सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा पहिला क्रिकेटपटू बनला...त्याने इतिहास रचला. या कामगिरीसह त्याने पाकिस्तानच्या अहमद शहजादचा १९ वर्षांचा विक्रम मोडला.नियमित कर्णधार आयुष म्हात्रे आणि उपकर्णधार विहान मल्होत्रा ​​दुखापतीमुळे खेळू शकणार नव्हते. यामुळे सूर्यवंशीला तीन सामन्यांच्या मालिकेसाठी कर्णधारपद देण्यात आले. तथापि, १५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी दोन्ही खेळाडू पुनरागमन करतील अशी अपेक्षा आहे.वैभव सतत खळबळ उडवत आहेवैभव सूर्यवंशी विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याच्या विक्रमी आणि स्फोटक फलंदाजीने चर्चेत आला होता. रांची येथे अरुणाचल प्रदेशविरुद्ध बिहारकडून खेळताना त्याने फक्त ३६ चेंडूत शतक झळकावले. त्याने ८४ चेंडूत १६ चौकार आणि १५ षटकारांसह १९० धावांची धमाकेदार खेळी केली. यामुळेच बिहारने अरुणाचल प्रदेशवर ३९७ धावांचा मोठा विजय मिळवला... या ऐतिहासिक खेळीदरम्यान, वैभव सूर्यवंशीने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० धावा करण्याचा एबी डिव्हिलियर्सचा जुना विक्रमही मोडला...त्याने ही कामगिरी १० चेंडू आधी केली.शिवाय, त्याने त्याच्या डावात मारलेले १५ षटकार हे लिस्ट ए फॉरमॅटमध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाने मारलेले सर्वाधिक षटकार आहेत.ज्युनियर आणि डोमेस्टिक क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या आधारे, सूर्यवंशीची अलीकडेच २०२५-२६ रणजी ट्रॉफी हंगामाच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये संघाचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली. तसेच २०२० च्या १९ वर्षांखालील संघासाठी बिहारचा उपकर्णधार म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय, अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याचा सन्मान केला. त्याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) देखील प्रदान करण्यात आला. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा भारतातील १८ वर्षांखालील मुलांसाठीचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, जो विविध क्षेत्रात अपवादात्मक कामगिरी आणि उत्कृष्टतेसाठी ५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना दिला जातो.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 4:10 pm

मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकवल्यानंतर १५ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

डहाणू : तलासरीच्या वेवजी येथील लोकभारती संस्थेच्या भारती अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव सुरू होता. यामध्ये विविध स्पर्धांचा समावेश होता .मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान दुःखद घटना घडली . मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. विद्यार्थिनीने मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेला . शर्यत पूर्ण केल्यानंतर आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने या मुलीचा जीव गेल्याचे समजते.विजयाचा आनंद साजरा करण्यापूर्वीच काळाने मुलीवर झडप घातली. शर्यत संपल्यानंतर तिला धाप लागत होती. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ती मैदानात बसली आणि काही क्षणातच बेशुध्द पडली. शिक्षकांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालायत दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणाची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली. ताज्या घटनेमुळे विद्यार्थाच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.कडक उन्हात होणारे क्रीडा स्पर्धांचे आयोजन आणि त्यामुळे होणार त्रास , पिण्याच्या पाण्याची गैरसोय आणि उपाशीपोटी स्पर्धत सहभागी होणे . यामुळे विद्यार्थी आजारी पडतात , त्यांना चक्कर येते किंवा बेशुध्द देखील पडतात. या घटनेमुळे केवळ औपचारिकतेसाठी स्पर्धेांच आयोजन न करता शाळांनी विद्यार्थांच्या आरोग्याची आणि सुरक्षतेची जबाबदारी घेतली पाहिजे; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 4:10 pm

Raj Thackeray : मुख्यमंत्री फडणवीसांनी एकनाथ शिंदेबाबत केलेल्या ‘त्या’वक्तव्यावर राज ठाकरेंकडून प्रत्युत्तर

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज एक ऐतिहासिक प्रसंग घडला. तब्बल २० वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दादर येथील शिवसेना भवनात पाऊल ठेवले. यानिमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्या युतीचा संयुक्त जाहीरनामा ‘शिवशक्ती वचननामा’ ठाकरे बंधूंच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद […] The post Raj Thackeray : मुख्यमंत्री फडणवीसांनी एकनाथ शिंदेबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर राज ठाकरेंकडून प्रत्युत्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 3:56 pm

Joe Root Record : जो रूटचा ऐतिहासिक पराक्रम! महेला जयवर्धनेला मागे टाकत कसोटीत केला खास विक्रम

Joe Root broke Mahela Jayawardene record : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित ‘ॲशेस २०२५-२६’ मालिकेतील अंतिम कसोटी सामन्याला सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (SCG) सुरुवात झाली आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट याने आपल्या बॅटने नवा इतिहास रचला आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा (५०+) करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत […] The post Joe Root Record : जो रूटचा ऐतिहासिक पराक्रम! महेला जयवर्धनेला मागे टाकत कसोटीत केला खास विक्रम appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 3:55 pm

“माझे पप्पा मला आणून द्या…”, अमित ठाकरेंसमोर सरवदेच्या चिमुकल्यांचा हृदयद्रावक टाहो

सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. या प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका व प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवारासह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. बाळासाहेब सरवदे यांच्या पार्थिवावर मोठ्या पोलीस […] The post “माझे पप्पा मला आणून द्या…”, अमित ठाकरेंसमोर सरवदेच्या चिमुकल्यांचा हृदयद्रावक टाहो appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 3:37 pm

First supermoon : २०२६ चा पहिला सुपरमून देशभर दिसला; ‘सुपरमून’नक्की काय असतो?

First supermoon of 2026 – शनिवारी रात्री देशभरात सर्वात मोठा चंद्र किंवा सुपरमून दिसला. हा २०२६ चा पहिला सुपरमून आहे. गुवाहाटी, भुवनेश्वर, कोलकाता आणि लखनऊ सारख्या शहरांमध्ये सूर्यास्तानंतर लगेचच तेजस्वी चंद्र दिसला. वुल्फ मून म्हणून ओळखला जाणारा हा सुपरमून सामान्य पौर्णिमेपेक्षा जास्त तेजस्वी आणि मोठा दिसला. या काळात, चंद्र पौर्णिमेपेक्षा सुमारे ३० टक्के जास्त तेजस्वी […] The post First supermoon : २०२६ चा पहिला सुपरमून देशभर दिसला; ‘सुपरमून’ नक्की काय असतो? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 3:31 pm

Amit Shah : अंदमान-निकोबार हे ओझे नाही; अमित शाह यांचे मोठे विधान

नवी दिल्ली : विजयपुरमच्या याच भूमीवर ब्रिटिशांनी बांधलेल्या सेल्युलर जेलमध्ये अनेक शहीद स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी बराच काळ घालवला होता. येथे अनेक लोकांनी आपले प्राण दिले, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला बळकटी दिली आणि अनेक शूर सैनिकांना येथे फाशी देण्यात आली. आज वीर सावरकरांचे स्मारक आणि सेल्युलर जेलमध्ये बांधलेली ज्वलंत मशाल संपूर्ण जगाला सांगते की येथे अनेक महान आत्म्यांनी […] The post Amit Shah : अंदमान-निकोबार हे ओझे नाही; अमित शाह यांचे मोठे विधान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 3:31 pm

ऐन निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं टिपू पठाण कनेक्शन उघड; जाचाला कंटाळून 'मोक्का'तील फरार आरोपीने स्वत:ला संपवलं

पुणे : पुण्याच्या राजकीय वर्तुळातून उमेदवारा बाबत एक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका व्यक्तीने अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच नाव सादिक कपूर असून तो मकोकामधील फरार आरोपी होता.प्रशांत जगताप यांना लिहिलेलं पत्र २० डिसेंबर रोजी सादिक कपूर यांनी आत्महत्येपूर्वी पुरावा म्हणून एक पत्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे ) माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप याना लिहिल्याचं समोर आलं आहे. पत्रात अनेक खुलासे केले आहेत. जीवाला असलेला धोका आणि दबावाबाबत लिहिले आहे.पत्रातील खुलासे पत्रातील आरोपांनुसार राष्ट्रवादी उमेदवार फारुख इनामदार (शेख) हा टिपू पठाण टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्याकडून प्रचंड त्रास दिला जात आहे. वरिष्ठांनी हस्तक्षेप करून याला वेळीच रोखा अशी कळकळीची विनंती या पत्राद्वारे केली होती.का उचलले टोकाचे पाऊल?दुर्दैवाने या पत्राची वेळीच दखल न घेतल्याने त्रास अधिकच वाढला आणि सादिक कपूर यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे स्पष्ट झाले आहे. लिहिलेल्या ३० पानांच्या सुसाईड नोट मध्ये आणि हातावर लिहिलेल्या मजकुरात फारूक इनामदार यांचे नाव आढळल्याने आता पोलिसांवरही दबाव वाढला आहे. या पत्रामुळे सादिक आणि फारूक यांच्यातील वाद केवळ जमिनीपुरता नसून त्याला गुन्हेगारी आणि राजकीय पदरही असल्याचे स्प्ष्ट होत आहे.पोलिस तपास दरम्यान, पुणे पोलीस आता या जुन्या पत्राचा आणि सुसाईड नोटचा आधार घेऊन तपासाची चक्रे फिरवत आहेत. निवडणुकांच्या धामधुमीत एका उमेदवाराचे नाव अशा प्रकारे गुन्हेगारी टोळीशी जोडले गेल्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिक कपूर हा हडपसर परिसरातील कुख्यात गुंड टिपू पठाण याच्यासोबतच्या 'मोक्का' गुन्ह्यात पाहिजे होता.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 3:30 pm

पुन्हा एकदा पोट धरून हसवणार; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नव्या सीझनसह सज्ज

मुंबई : नवीन वर्षाची सुरुवात हास्य आणि आनंदाने करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम म्हणजेच तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा एकदा नव्या दमात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबांना एकत्र बसून मनमुराद हसवणारा हा शो आता नव्या सीझनसह परतत असून ५ जानेवारीपासून दर सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.महाराष्ट्रातील लाखो घरांमध्ये हसण्याचं वातावरण निर्माण करणाऱ्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्यात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दिवसभराच्या धावपळीतून थोडा वेळ काढून प्रेक्षक या शोसोबत ताणतणाव विसरून हसण्याचा आनंद घेतात. त्यामुळेच नवीन वर्षात हास्यजत्रेच्या पुनरागमनाची घोषणा होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.या नव्या सीझनमध्ये पूर्णपणे नवीन संकल्पनांवर आधारित स्किट्स, नव्या व्यक्तिरेखा आणि काही खास ट्विस्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मराठमोळ्या विनोदाची ओळख कायम ठेवत सामाजिक विषयांवर आधारित प्रहसनं, नव्या कल्पना आणि ताज्या सादरीकरणामुळे हा सिझन अधिक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांचा आवडता कलाकार ओंकार भोजने याचं पुनरागमन याआधीच चर्चेत आलं असून त्याच्या नव्या प्रहसनांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.कलाकारांची परस्पर केमिस्ट्री, अचूक टाइमिंगचे पंचेस, लोकजीवनाशी नातं सांगणारे विषय आणि भावनांना हात घालणारा विनोद हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य राहिलं आहे. कुटुंबांना एकत्र आणून हास्याच्या माध्यमातून सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न हा शो सातत्याने करत आला आहे. नवीन सिझनमध्ये प्रेक्षकांना दुप्पट मजा आणि अधिक मनोरंजन मिळेल, असा विश्वास कलाकारांनी व्यक्त केला आहे.५ जानेवारीपासून दर सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 3:10 pm

व्हेनेझुएला नंतर ट्रम्पचे नवे टार्गेट ठरले, या देशाला दिल्या धमक्या

वॉशिंग्टन डीसी : ड्रग्जचे कारण देत अमेरिकेने तेलासाठी व्हेनेझुएला विरोधात लष्करी कारवाई केली. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष चर्चेसाठी तयार असताना अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी सैन्याला कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर अमेरिकेच्या सैनिकांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक करुन न्यूयॉर्कमध्ये आणले. या घटनेला २४ तासही उलटत नाहीत तोच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबिया या देशाला धमकीवजा इशारा दिला आहे. कोलंबियात तयार होत असलेले कोकेन मोठ्या प्रमाणात अमेरिकेत येत असल्याचे कारण देत ट्रम्प यांनी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांना धमकीवजा इशारा दिला आहे.अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या कोकेनला आळा घाला, स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या; असा धमकीवजा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांना दिल या इशाऱ्यामुळे व्हेनेझुएला नंतर ट्रम्पचे नवे टार्गेट कोलंबिया हा देश असेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.व्हेनेझुएला प्रमाणेच कोलंबिया हा पण लॅटिन अमेरिका भागातील एक देश आहे. अधूनमधून अमेरिकेचे सैन्य समुद्रात कोलंबियात जात - येत असलेल्या बोटींची अडवणूक करुन जबरदस्तीने चौकशी करत असल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. आता व्हेनेझुएला प्रमाणेच कोलंबियावर दबाव टाकण्यासाठी त्यांच्या देशात जात - येत असलेल्या बोटींची मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.कॅरेबियात डॅग्ज तस्करीला आळा घालण्यासाठी अमेरिकेच्या जहाजांची नियुक्ती करण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयावर कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी टीका केली होती. यानंतर ट्रम्प यांनी आवश्यकता भासल्यास ड्रग्जच्या निर्मितीलाच आळा घालण्यासाठी कोलंबियावर विमानातून बॉम्बफेक करण्याचा विचार ट्रम्प यांनी बोलून दाखवा होता. यामुळे व्हेनेझुएला नंतर अमेरिका कोलंबियावर हल्ला करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वीच पेट्रोने कोलंबियाच्या हवाई हद्दीत अमेरिकेच्या लष्करी विमानांना बंदी घातली आहे. ही बंदी लागू झाल्यापासून अमेरिका आणि कॅरेबिया यांच्यातील तणाव वाढत आहे. हा तणाव आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 3:10 pm

शिवाजीराव गायकवाड पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला? नायक चित्रपटाचा सिक्वल येणार? मोठी अपडेट समोर

Nayak 2 sequel : अभिनेते अनिल कपूर यांचा २००१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘नायक’ एक कल्ट चित्रपट म्हणून ओळखला जातो. हा चित्रपट आजही टेलिव्हिजनवर लागल्यावर प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. गेल्या काही दिवसांपासून नायक चित्रपटाचा सिक्वल बनणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या असून, त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलीवूड हंगामाच्या एका वृत्तानुसार, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल […] The post शिवाजीराव गायकवाड पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला? नायक चित्रपटाचा सिक्वल येणार? मोठी अपडेट समोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 3:03 pm

काँग्रेसची रणनीती तयार; आसाममध्ये महत्त्वाच्या पदी प्रियांका यांची निवड, गांधी कुटुंबातील ठरल्या पहिल्याच व्यक्ती

Priyanka Gandhi | यंदाचे 2026 हे वर्ष राजकीय वर्तुळात निर्णायक ठरणार आहे. देशातील तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यातील निवडणुका होणार आहेत. त्यासाठी काॅंग्रेस पक्षाने तयारी सुरू केली आहे. आसाममध्ये उमेदवार निवडीच्या स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी प्रियांका गांधी-वाड्रा यांची नियुक्ती पक्षाने केली आहे. गांधी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला राज्याच्या स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून […] The post काँग्रेसची रणनीती तयार; आसाममध्ये महत्त्वाच्या पदी प्रियांका यांची निवड, गांधी कुटुंबातील ठरल्या पहिल्याच व्यक्ती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 3:01 pm

नगरपरिषद निवडणुकीनंतर राणे कुटुंब पहिल्यांदाच मंचावर दिसणार, कणकवलीत महारॅली करणार

​कणकवली : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर आज रविवार ४ जानेवारी रोजी माजी मुख्यमंत्री आणि कोकणचा बुलंद आवाज खासदार नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आगमन होत आहे. विशेष म्हणजे, नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या राजकीय धुरळ्यानंतर खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि शिवसेना आमदार निलेश राणे हे संपूर्ण 'राणे कुटुंब' एकत्रितपणे जिल्ह्यात येत असल्याने समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.​गेल्या काही तासांपासून जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर मी राणे समर्थक, एकच ना रा, आमची ओळख राणे कुटुंबिय आणि जय नारायण अशा आशयाचे पोस्टर झळकत आहेत. २००५ मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर जी भावनिक लाट कार्यकर्त्यांमध्ये होती, तसेच वातावरण पुन्हा एकदा दिसत आहे.​राणे समर्थकांनी स्वागतासाठी जय्यत तयारी केली असून, उद्या बांदा ते कणकवली अशी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. हजारो गाड्यांचा ताफा या रॅलीत सहभागी होण्याची शक्यता असून, बांदा येथे राणे कुटुंबियांचे जोरदार स्वागत होईल. त्यानंतर ही रॅली कणकवलीकडे कूच करेल. सायंकाळी ५ वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणावर कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या सभेत खा. नारायण राणे काय भूमिका मांडणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 2:30 pm

अभिनेत्री कृती सॅननची बहीण नूपुर अडकणार विवाहबंधनात; शेअर केले खास फोटो

Nupur Sanon | अभिनेत्री कृती सॅननची बहीण अभिनेत्री नुपूर सॅननने अखेर तिच्या नात्याची कबुली दिली आहे. नुपूरने प्रपोजलचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नुपूरने बॉयफ्रेंड स्टेबिन बेन सोबत नात्यात अडकल्याचे जाहीर केले आहे. हा प्रपोजल एका सुंदर बोटीवर पार पडला. या खास क्षणासाठी नुपूरने सुंदर फुलांचा ड्रेस घातला होता. तर […] The post अभिनेत्री कृती सॅननची बहीण नूपुर अडकणार विवाहबंधनात; शेअर केले खास फोटो appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 2:23 pm

मुलीच्या जन्मानंंतर कियारा आणि सिद्धार्थ दिसले एकत्र; शूटिंग सेटवरचा व्हिडीओ व्हायरल

Kiara Siddharth Video : गेल्या काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री कियारा अडवाणीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. दोघांनेही मुलीचे स्वागत मोठ्या उत्साहात केले होते. त्यानंतर पहिल्यांदाच ती तिचा पती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत शूटिंगच्या सेटवर दिसली आहे. सोशल मीडियावर दोघांचा एकत्र आले असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. १५ जुलै २०२५ या दिवशी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या […] The post मुलीच्या जन्मानंंतर कियारा आणि सिद्धार्थ दिसले एकत्र; शूटिंग सेटवरचा व्हिडीओ व्हायरल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 2:21 pm

सुषमा पाटील विद्यालय व ज्युनियर, सीनिअर (नाईट) कॉलेज (कामोठे)

कै. बाळाराम धर्मा पाटील शिक्षण संस्था या संस्थेची स्थापना जून २००५ मध्ये करण्यात आली. कामोठे वसाहतीतील व ग्रामीण वसाहतीतील विद्यार्थ्यांना माफक फीमध्ये शिक्षणाची उत्तम सुविधा देणे हे उद्दिष्ट्य उराशी बाळगून संस्थेचे संस्थापक दिलीप पाटील साहेबांनी ही शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.सुरुवातीला मराठी माध्यमाचे छोटा शिशू ते दहावी इंग्रजी माध्यमाचे नर्सरी ते दहावी वर्ग चालू करण्यात आले. कालांतराने मराठी व इंग्रजीबरोबर सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले. या शिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिस्त, सुसंस्कार व शिक्षण या संस्थेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे सुसंस्कारीत व सशक्त बनवून शिक्षित केले व करीत आहोत.उत्तम िशक्षण व पालकांचा उत्तम प्रतिसाद यामुळे कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना झाली. कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांमधून विद्यार्थ्यांना बारावीपर्यंतचे शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न अलौकिक ठरला. हे सर्व शिक्षणाचे अविरत कार्य सुरू असताना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आदिवासी मुलांसाठी आदिवासी नामांकित शाळा सुरू करण्यात आली. अतिशय गरीब व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देण्याचा शासनाचा उपक्रम आम्ही यशस्वीपणे राबवीत आहोत.नामांकित इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा शैक्षणिक वर्षे २०१६-१७ पासून सुरू केली. या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता १ली ते १२ वीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध आहे.२०१६ साली नामांकित इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा सुरू केल्यापासून आजपर्यंत शेकडो विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. सुरुवातीला शाळा सुरू केली तेव्हा शाळेत ७५ विद्यार्थी होते. सध्याच्या स्थितीला ४८७ विद्यार्थी शाळेत प्रवेशित आहेत. सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, निवास, उत्तम राहण्याची व्यवस्था, उत्तम भोजन या सुविधा उपलब्ध आहेत.या शाळेत शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थी आहेत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प 'जव्हार, डहाणू, पेण व घोडेगाव या प्रकल्पाचा हा उपक्रम नामांकित इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा सुषमा पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज' कामोठे येथे यशस्वीपणे कार्यरत आहे.शाळेची आव्हाने वास्तवात आणण्यासाठी, त्यांना मूर्त स्वरूप देण्यासाठी व त्यातून शाळेचा उत्कर्ष साधण्यासाठी अविरतपणे कार्य करत असणारे संस्थेचे संस्थापक दिलीप पाटील साहेब यांचे मोलाचे योगदान आहे.विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण घेता यावे म्हणून सुसज्ज विद्यालयाची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये प्रशस्त संगणक कक्ष, प्रयोगशाळा ग्रंथालय, क्रीडांगण, सेमिनार हॉल व ई-लर्निंगची उत्तम सोय करण्यात आली आणि याचीच पोहोचपावती की काय, म्हणून मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, इ. १० वी व १२ वीचा निकाल मागील सलग पाच वर्षं १०० टक्के इतका लागत आहे. रंगोत्सव सेलिब्रेशन ऑफ नॅशनल व इंटरनॅशनल लेव्हल चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यार्थी नेहमीच अग्रस्थानी आहेत.शासनाचे विविध नियमांचे पालन करून R.T.E विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुद्धा होत आहे. तसेच जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत किंवा परिस्थितीअभावी शिक्षण घेता येत नाही. अशा दरवर्षी २५ ते ३० विद्यार्थ्यांचे मोफत शिक्षण आपल्या संस्थेमार्फत चालू आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजनकेले जाते.विविध शैक्षणिक उपक्रम संस्थेतर्फे विद्यालयातर्फे घेतले जातात. जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा त्यामागचा हेतू सफल होईल. त्याचप्रमाणे दरवर्षी कला, क्रीडा, सांस्कृतिक कामोठे या महोत्सवात विविध प्रकारचे ४० खेळांचे आयोजन केले जाते. जेणेकरून कामोठे पंचकृषीतील अनेक खेळाडू व विद्यार्थी या महोत्सवात सामील होतात. कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विकास व्हावा यासाठी सालाबादप्रमाणे संस्थेमार्फत कामोठे महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये फक्त आपल्याच विद्यार्थ्यांचा नाही, तर नवी मुंबईच्या इतर शाळांचाही उत्तम प्रतिसाद आम्हाला लाभतो.विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी व जाण्यासाठी बसची सुविधा आहे. त्यामुळे विद्यार्थी दूरहूनसुद्धा शाळेत बसच्या माध्यमातून येऊन शिक्षण घेतात. या आपल्या संस्थेमध्ये एकूण ५५०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.शालेय वाटचाल करत असताना सामाजिक भान म्हणून नोकरी करणाऱ्या महिलांना किंवा परिस्थितीमुळे अर्धवट शिक्षण सोडणाऱ्या महिलांसाठी S.N.D.T महिला मुक्त विद्यापीठ हे अभ्यास केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यालाच जोड म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र सुद्धा सुरू केले गेले. जेणेकरून महिलांबरोबर पुरुषांनाही आपले शिक्षणाचे स्वप्न पूर्णत्वास नेता येईल.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात सुषमा पाटील सीनिअर नाईट कॉलेजच्या अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केली. त्यात िवद्यापीठ स्तरावर िद्वतीय क्रमांक पटकावला. तसेच लांब उडी, भाला फेक, १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत आमच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक घेऊन विद्यापीठ स्तरावर क्रीडा महोत्सवात भाग घेतला व कॉलेजचे प्रतिनिधित्व केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना दिवसा नोकरी करून आपले डिग्रीचे शिक्षण पूर्ण करायचे असेल, तर त्यांच्यासाठी मुंबईविद्यापीठाचे (रात्रशाळा) नाईट कॉलेज सुरू करण्यात आले. सुषमा पाटील सीनिअर नाईट कॉलेज कामोठे हे आमचे युनिट १५ सप्टेंबर २०२१ रोजी कै. बाळाराम धर्मा पाटील शिक्षण संस्थेअंतर्गत सुरू झाले. संपूर्ण महाराष्ट्रात अटल करंडक (नाट्यक्षेत्र) स्पर्धा जोरात सुरू आहे. आमच्या महािवद्यालयात अटल करंडक एकांकिका स्पर्धेत सलग दोन वर्षं सहभाग घेऊन उत्साह कायम राखला आहे.िवद्यार्थ्यांचा सर्वांगीण िवकास व्हावा यासाठी शैक्षणिक वर्षभरात अनेक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये िवज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, िचत्रकला, वत्कृत्व स्पर्धा, स्नेह संमेलन व M.T.S., N.T.S., स्कॉलरशिप व ऑलिम्पियाड स्पर्धेचादेखील यामध्ये समावेश आहे.क्रीडा क्षेत्रातील युनिफाईड, किक बॉक्सिंगमध्ये आपल्या िवद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळवून आपल्या संस्थेचे नाव भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर उंचावले आहे आिण याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.आमचा िवद्यार्थी उद्योगशील, आत्मनिर्भर व वैज्ञानिक दृष्टिकोन असे आदर्श गुण आत्मसात करून देशाचा एक उत्तम नागरिक व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सदैव राहतील.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 2:10 pm

ओडिशात दगड खाणीत भीषण स्फोट! दोन मजुरांचा मृत्यू; अनेक मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती

Odisha News | ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील एका दगडखाणीत भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे खाणीचा भाग कोसळला असून अनेक मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गोपाळपूर गावाजवळील एका बेकायदेशीर खाणीत हा स्फोट झाला. स्फोटानंतर खाणीतील मातीचा काही भाग कोसळल्याचा दावा केला जात आहे. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या या स्फोटात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू […] The post ओडिशात दगड खाणीत भीषण स्फोट! दोन मजुरांचा मृत्यू; अनेक मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 1:48 pm

आलियाने शेअर केली खास पोस्ट; चाहत्यांना दिल्या नवीन वर्षांच्या शुभेच्छा, फोटोने घेतले लक्ष वेधून

Alia Bhatt : नवीन वर्ष सुरू झाले असून, या वर्षांच्या निमित्ताने कलाविश्वातील कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. काही कलाकारांनी २०२५ हे वर्ष कसे गेले या संदर्भात पोस्ट केली होती. आता नवीन वर्षांच्या शुभेच्छा देणारी एक खास पोस्ट अभिनेत्री आलिया भटने केली आहे. या पोस्टमध्ये आलियाने एक फोटो देखील शेअर केला आहे. आलिया ही नेहमीच […] The post आलियाने शेअर केली खास पोस्ट; चाहत्यांना दिल्या नवीन वर्षांच्या शुभेच्छा, फोटोने घेतले लक्ष वेधून appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 1:45 pm

केकेआरच्या ताफ्यातून मुस्तफिझूर रहमानची एक्झिट

मुंबई : भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या वाढत्या राजकीय तणावाचा थेट परिणाम इंडियन प्रीमियर लीग २०२६ वर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कोलकाता नाईट रायडर्स संघाला बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान याला आपल्या संघातून मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.गेल्या महिन्यात झालेल्या मिनी-लिलावात केकेआरने मुस्तफिझूरला तब्बल ९.२० कोटी रुपयांना विकत घेतले होते. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात महागडा बांगलादेशी खेळाडू ठरला होता. मात्र, बांगलादेशमधील अल्पसंख्याकांवरील कथित हल्ल्यांच्या बातम्यांमुळे भारतात राजकीय आणि धार्मिक संघटनांकडून मुस्तफिझूरच्या समावेशाला विरोध वाढत होता.सध्याच्या परिस्थितीचा आणि सर्वत्र घडत असलेल्या घडामोडींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले की, बीसीसीआयच्या निर्देशांनुसार केकेआरने मुस्तफिझूरला संघातून वगळले आहे. केकेआरने विनंती केल्यास त्यांना लिलावात मोजलेली संपूर्ण रक्कम (९.२० कोटी) परत केली जाईल आणि त्याजागी नवीन खेळाडू निवडण्याची परवानगी दिली जाईल. राजकीय परिस्थितीमुळे खेळाडूवर बंदी घालण्याची ही घटना आयपीएलमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.अलीकडे बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे भारतात असंतोष पसरला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो-व्हिडीओंमुळे संताप वाढला आणि अनेक संघटनांनी बांगलादेशी खेळाडूंना आयपीएल २०२६ मध्ये खेळू देऊ नये, अशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर मुस्तफिझूर रहमानला केकेआरमधून वगळण्याचा दबाव वाढला. या मुद्द्यावरून काही राजकीय नेत्यांनीही थेट शाहरुख खान आणि केकेआर व्यवस्थापनावर टीका केली होती. त्यामुळे हा विषय केवळ क्रिकेटपुरता मर्यादित न राहता राजकीय चर्चेचा मुद्दा बनला.आयपीएलमधील अनुभवमुस्तफिझूर रहमान २०१६ पासून आयपीएल खेळत आहे. सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स अशा अनेक संघांकडून तो खेळला आहे. आतापर्यंत ६० आयपीएल सामन्यांत त्याने ६५ विकेट घेतल्या आहेत.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 1:30 pm

युवा भारताचा द. आफ्रिकेवर विजय

बेनोनी : पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीचा वापर करून लावण्यात आलेल्या निकालात, भारतीय १९ वर्षांखालील युवा संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा २५ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या युवा वन-डे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.भारताने सुरुवातीच्या पडझडीतून सावरत ५० षटकांत सर्वबाद ३०० धावांचा डोंगर उभा केला. हरवंश पंगालियाने (९३ धावा) आणि आर. एस. अंबरीशने (६५ धावा) केलेल्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे भारताला हा आव्हानात्मक स्कोअर करता आला. ३०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनेही चांगली सुरुवात केली. जोरिच व्हॅन शॉकविक (नाबाद ६० धावा) आणि अरमान मनॅक (४६ धावा) यांनी डाव सावरला.नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर साहिलने डावाची सकारात्मक सुरुवात केली, मात्र तो ३२ धावांवर बाद झाला. तसेच अभिषेकने उपयुक्त २८ धावांचे योगदान देऊन मधल्या फळीत हरवंशला साथ दिली. मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या हरवंश पंगालियाने ९३ धावांची वादळी खेळी केली. त्याचे शतक अवघ्या ७ धावांनी हुकले असले, तरी त्याच्या या खेळीने भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. त्याला आर. एस. अंबरीशने ६५ धावांचे मोलाचे योगदान देऊन उत्तम साथ दिली. दक्षिण आफ्रिकेकडून जे. जे. बॅसन आपल्या यशस्वी गोलंदाजीने १० षटकांत ४ बळी टिपले आणि भारतीय धावगतीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. भारतीय डावाच्या अखेरीस विजांच्या कडकडाटामुळे खेळ काही काळ थांबवण्यात आला होता, मात्र सुदैवाने षटकांची कपात करण्यात आली नाही. विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर भारतीय युवा खेळाडूंनी दाखवलेला हा आत्मविश्वास भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे.आता भारताचे गोलंदाज या धावसंख्येचा बचाव करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ या ३०१ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्नशील होता. हा सामना अत्यंत चुरशीच्या वळणावर असून भारतीय गोलंदाजांना ठराविक अंतराने बळी मिळवावेलागणार आहेत.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 1:30 pm

शेकाप उमेदवार करुणा नाईक समर्थकांसह भाजपमध्ये

पनवेल : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उबाठा पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील शेकाप उमेदवार करुणा नाईक यांच्यासह माजी सरपंच आणि अनेक पदाधिकार्यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला, तर प्रभाग २ मधील ‘उबाठा’ पदाधिकार्यांनीही भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले.या पक्षांतरामुळे पनवेलमध्ये भाजपची ताकद अधिक वाढली असून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. महापालिका प्रभाग क्रमांक ९ मधील शेकापच्या उमेदवार करुणा नाईक, आसुडगावचे माजी सरपंच नंदकुमार नाईक, माजी सरपंच विजय भोपी, माजी नगरसेवक सुनील नाईक यांंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे प्रभाग २ मधील शिवसेना उबाठाचे तळोजा उपविभागप्रमुख हरेश पाटील, तोंडरे उपशाखाप्रमुख वासुदेव पाटील, सुशांत नाईक, नरेंद्र नाईक, तेजस घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी पक्षात स्वागत केले. भाजपच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस तथा विनविरोध विजयी झालेले नगरसेवक नितीन पाटील, भाजप महायुतीचे प्रभाग क्रमांक ९चे उमेदवार शशिकांत शेळके, प्रतिभा भोईर, महादेव मधे; प्रभाग क्रमांक २ चे उमेदवार कृष्णा पाटील, महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास भोईर, शंकुनाथ भोईर, सुरेश भोईर, महेश पाटील, अमर उलवेकर, निलेश भोईर, संज्योत शेळके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या या पक्षांतरामुळे शेकाप आणि शिवसेना उबाठाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 1:10 pm

भाजपचं ठरलंय; आता थांबायचं नाय!

गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेमध्ये महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी भाजप सर्व प्रकारे व्युहरचना करीत आहे. आमदार राजन नाईक, खासदार डॉ हेमंत सवरा यांच्याकडे निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींची जबाबदारी दिल्यानंतर, त्यात आणखी भर म्हणून राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि भाजप नेत्या पूनम महाजन यांच्याकडे सुद्धा या महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली. प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी वसई-विरारमध्ये येत गटबाजी न करता निवडणुकीला सामोरे जा, कोणतेही हेवेदावे होता कामा नये असा इशाराच मुख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला आहे. आणि मुख्यमंत्री विशेष लक्ष ठेवून आहेत याची जाणीव सुद्धा करून दिली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे दिसून येते.तर दुसरीकडे काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा लढविलेले आणि कुठल्याही परिस्थितीत बहुजन विकास आघाडी सोबत आघाडी करूनच काँग्रेसने निवडणूक लढवावी अशी ठाम भूमिका घेणारे काँग्रेस नेते विजय पाटील यांनी आपल्याच कुटुंबातील सदस्यांच्या हाती बहुजन विकास आघाडीचा झेंडा दिला आहे. तर बहुजन विकास आघाडी सोबत आघाडी झाल्याबाबत गवगवा करणाऱ्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांचाच त्यांच्या प्रभागात गेम झाला आहे. एवढच काय, काँग्रेसच्या १० उमेदवारांपैकी ९ उमेदवारांसमोर बहुजन विकास आघाडीचे उमेदवारच प्रतिस्पर्धी आहेत. परिणामी विजय पाटील यांचे आप्पासोबत जमल्याचे चित्र असून, जिल्हाधक्ष ओनिल आलमेडा हे मात्र उमेदवार, कार्यकर्ते आणि पक्षश्रेष्ठींना काय सांगावे याचीच उत्तरे शोधत आहेत.वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडी सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांनी यापूर्वी सुद्धा विविध निवडणुकांमध्ये केलेला आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस किंवा महाविकास आघाडी सोबत लढली असती तर बोईसर आणि वसई हे दोन मतदारसंघ या आघाडीला राखता आले असते. असा कयास अद्यापर्यतही लावल्या जात आहे. त्यामध्ये तथ्यसुद्धा आहे कारण वसई विधानसभा मतदारसंघात ७४ हजार ४०० एवढे मतदान माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांना मिळाले होते, तर काँग्रेसच्या विजय पाटील यांनी सुद्धा ६२ हजार ३२४ एवढे मतदान मिळवले होते. दरम्यान, विधानसभेमध्ये झालेली चूक वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये होऊ नये, यासाठी विजय पाटील यांनीच यावेळी पुढाकार घेतला. काँग्रेस पालिकेच्या सत्तेत हवी असल्यास बहुजन विकास आघाडी सोबत आघाडी करून लढणे हा एकच पर्याय काँग्रेस समोर असल्याचे त्यांनी पक्षश्रेष्ठींना पटवून दिले आणि प्रत्यक्षात मात्र त्यांनी त्यांच्या कन्या आणि सुनेला बहुजन विकास आघाडी कडून निवडणूक रिंगणात उतरविले. तथापि, प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य आहे असे गृहीत धरले तरी, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीची आघाडी करण्यात मात्र ते यशस्वी ठरले नाहीत.दुसरीकडे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीपर्यंत काँग्रेस बहुजन विकास आघाडीसोबत निवडणूक लढवीत असल्याचे ठामपणे सांगणारे काँग्रेस जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांच्यासह काँग्रेसच्या ९ उमेदवारांसमोर बहुजन विकास आघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. त्यामुळे या आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा वसई विधानसभा प्रभारी जोजो थॉमस यांनी आम्ही आघाडी धर्म पाळला, बहुजन विकास आघाडीलासुद्धा पाळावा लागेल असा आशावाद व्यक्त करीत आहेत.परिणामी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया झाल्यानंतरही काँग्रेस नेत्यांना बहुजन विकास आघाडीकडून वेगळी आशा असल्याने, तुझे माझे जमेना आणि...करमेना अशीच अवस्था बहुजन विकास आघाडीबाबत काँग्रेसची झाली आहे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार : जोजो थॉमसगेल्या वर्षी झालेल्या वसई विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक प्रभागात काँग्रेस नंबर वन राहिली आहे. काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज केल्यास हजारो मतांचा फरक भाजप उमेदवाराला मिळालेल्या मतांमध्ये आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी आम्ही बहुजन विकास आघाडी सोबत महापालिका निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे आम्ही १०५ जागांवर उमेदवार दिले नाहीत. त्यामुळे आम्ही आघाडी धर्म पाळला आहे. बहुजन विकास आघाडी सोबत चर्चा करून , त्यांनी सुद्धा काँग्रेसने उमेदवार दिलेल्या ९ जागांवर आघाडी धर्म पाळावा अशी मागणी आम्ही करणार आहात. तसे न झाल्यास येत्या दोन दिवसात काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल. असे काँग्रेसचे वसई विधानसभा प्रमुख तथा प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जोजो थॉमस यांनी सांगितले आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 1:10 pm

भाजपकडून नगर परिषद गटनेत्यांची निवड

पालघर : जिल्ह्यातील तीन नगर परिषद व एका नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष, सभापती आणि स्वीकृत सदस्य निवडणुकीच्या आनुषंगाने भारतीय जनता पक्षाने चारही गटनेत्यांची निवड केली आहे.पालघर, डहाणू, जव्हार या नगर परिषद आणि वाडा या नगरपंचायतीची निवडणूक २ डिसेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीचा निकाल जाहीर २१ डिसेंबर रोजी झाला आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांसह थेट जनतेतून नगराध्यक्ष सुद्धा निवडण्यात आले आहेत. दरम्यान, नगर परिषद आणि नगरपंचायती मधील कामकाज आपल्या राजकीय पक्षाच्या ध्येय धोरणानुसार करण्यासाठी गट नेत्यांची भूमिका महत्त्वाची राहते. आता लवकरच चारही ठिकाणी नगर परिषद उपाध्यक्ष, विषय समिती सभापती आणि स्वीकृत सदस्यांची निवड करावी लागणार आहे. या निवडणुकीसाठी सुद्धा राजकीय पक्षातील गटनेत्याची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्या अानुषंगाने भाजप गटनेत्यांची निवड केलेली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या मार्गदर्शनात चारही गटनेत्यांची निवड केली आहे. याप्रसंगी आमदार हरिश्चंद्र भोये, वाडा नगराध्यक्ष रिमा गंधे, जवाहर नगराध्यक्ष पूजा उदावंत, कैलाश म्हात्रे, निवडणूक प्रमुख बाबाजी काठोळे तसेच पक्षाचे इतर वरिष्ठ पदाधिकारी व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.असे आहेत गटनेतेडहाणू नगर परिषद -जगदीश राजपूत.पालघर नगर परिषद - भावानंद संखे.जव्हार नगर परिषद -कुणाल उदावंत.वाडा नगरपंचायत -रामचंद्र भोईर.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 1:10 pm

वसई-विरारकरांचा रेल्वे प्रवास जीवघेणा, वर्षभरात १७० जणांचा अपघाती मृत्यू

वसई : वसई-विरार आणि मीरा-भाईंदर शहरांचे झपाट्याने होणारे नागरीकरण आता प्रवाशांच्या जीवावर बेतू लागले आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये वाढणाऱ्या बेसुमार गर्दीमुळे गेल्या वर्षभरात मीरा-रोड ते वैतरणा दरम्यान तब्बल १७० प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही आकडेवारी रेल्वे प्रवासाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. मुंबईतील वाढत्या महागाईमुळे अनेकांनी वसई-विरार आणि नालासोपारा पट्ट्यात घरे घेण्याला पसंती दिली आहे. यामुळे या भागातील लोकसंख्या प्रचंड वाढली असून त्याचा थेट भार रेल्वे सेवेवर पडत आहे. विरार, नालासोपारा, वसई, नायगाव आणि मीरा-भाईंदर या स्थानकांतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. विशेषतः नालासोपारा स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून, येथील गर्दी आता नियंत्रणाबाहेर जात आहे.लोकलमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नसल्याने शेकडो प्रवासी दारात लटकून प्रवास करतात. धावत्या लोकलमधून तोल जाऊन पडल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. लोकल उशिराने आल्यास प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी जीवघेणी ठरते. यामुळे गाडीत चढण्याच्या चढाओढीत अनेक अपघात होतात. घाईघाईत रेल्वे रूळ ओलांडण्याच्या नादात अनेक प्रवासी भरधाव एक्स्प्रेस गाड्यांच्या कचाट्यात सापडतात. ही प्रवाशांची निष्काळजीपणाची कृती त्यांच्या जीवावर बेतत आहे.वाढते बळी पाहता, रेल्वे प्रशासनाने फेऱ्या वाढवाव्यात, पादचारी पुलांची संख्या वाढवावी आणि प्रवाशांनीही रूळ ओलांडण्यासारखे धोके पत्करू नयेत, असे आवाहन सामाजिक संस्थांकडून केले जात आहे. पश्चिम रेल्वेवरील हा 'डेथ ट्रॅप' कधी संपणार, असा संतप्त सवाल आता सामान्य प्रवासी विचारत आहेत. दिवसेंदिवस गर्दी इतकी वाढली आहे की, लोकलमध्ये नीट चढता आणि उतरता येत नाही. लोकल फेऱ्या वाढविणे, नियमित वेळेत गाड्या उपलब्ध करून देणे अशा उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.मृत्यूचा आकडा कमी झाल्याचा दावारेल्वे प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांमुळे २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी झाले असल्याचा दावा रेल्वे पोलिसांनी केला आहे. २०२५ या वर्षात मृत्यूचा आकडा ५७ ने घटला असल्याचे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले आहे.प्रवाशांना पोलिसांचे आवाहनलोकल प्रवासादरम्यान होणारे अपघात रोखण्यासाठी प्रवाशांसाठी पादचारी पूल, सरकते जिने, संरक्षक जाळ्या, भुयारी मार्ग अशी व्यवस्था केली आहे; परंतु रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करणे, संरक्षक जाळ्यांवर चढून रूळ ओलांडणे, चालती गाडी पकडणे अशा हलगर्जीपणामुळे अपघात होत आहेत. प्रवाशांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 1:10 pm

भारतात केएफसी आणि पिझ्झा हट एकत्र येणार

मुंबई : भारतात केएफसी आणि पिझ्झा हटसारख्या लोकप्रिय ब्रँड चालवणाऱ्या सॅफायर फूड्स आणि देवयानी इंटरनॅशनल या दोन प्रमुख कंपन्याचे विलीनीकरण होणार आहेत. विलीन झाल्यानंतर कंपनीचे ३ हजार हून अधिक आउटलेट असतील. नुकतेच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दोन्ही कंपन्यांनी या निर्णयाला मान्यता दिली. नवीन कंपनीची एकूण वार्षिक उलाढाल अंदाजे ₹ ८ हजार कोटी असेल. हे विलीनीकरण अशा वेळी झाले आहे जेव्हा भारतातील फास्ट-फूड क्षेत्र मंदावत आहे आणि मागणीत फारशी वाढ दिसून येत नाही.या विलीनीकरणानंतर, नवीन कंपनीचे कामकाज भारताबाहेर नायजेरिया, नेपाळ, थायलंड आणि श्रीलंकेपर्यंत विस्तारेल. केएफसी, पिझ्झा हट आणि टाको बेल व्यतिरिक्त, कंपनीकडे कोस्टा कॉफी, टी लाईव्ह, न्यू यॉर्क फ्राईज आणि सनूक किचनसारख्या जागतिक ब्रँडसाठी परवाने देखील असतील. या हालचालीमुळे भारतात केएफसी आणि पिझ्झा हटसाठी एकच प्रमुख फ्रँचायझी तयार होईल.विलीनीकरणाच्या अटींनुसार, गुंतवणूकदारांना सॅफायर फूड्सच्या प्रत्येक १०० शेअर्ससाठी देवयानी इंटरनॅशनलचे १७७ शेअर्स मिळतील. देवयानी इंटरनॅशनलची एक समूह कंपनी सॅफायर प्रवर्तकांकडे असलेल्या २५.३५% हिस्सेदारीपैकी १८.५% हिस्सेदारी खरेदी करेल आणि उर्वरित हिस्सेदारी शेअर्समध्ये बदलली जाईल. अमेरिकेतील यम! ब्रँड्सने विलीनीकरणाला मान्यता दिली आहे. सरकारी आणि कायदेशीर मान्यता मिळविण्यासाठी १२ ते १५ महिने लागू शकतात. त्यानंतरच विलीनीकरण पूर्णपणे प्रभावी होईल.सध्या, जुबिलंट फूडवर्क्स ही भारतातील सर्वात मोठी फास्ट-फूड ऑपरेटर आहे, ज्याचे सहा देशांमध्ये ३,४८० स्टोअर्स आहेत. देवयानी इंटरनॅशनल या विलीनीकरणाद्वारे जुबिलंटला कठीण स्पर्धा देण्याची आणि नफा वाढवण्याची तयारी करत आहे. देवयानीचे अध्यक्ष रवी जयपुरिया म्हणाले की, या विलीनीकरणामुळे कंपनीचा खर्च कमी होईल, तंत्रज्ञान सुधारेल आणि पुरवठा साखळी मजबूत होईल, ज्यामुळे भागधारक आणि ग्राहकांना फायदा होईल. केएफसी, पिझ्झा हट, कोस्टा कॉफी आणि टाको बेल सारखे जागतिक ब्रँड एकाच छताखाली एकत्र येतील, ज्यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी या सर्व उत्पादनांचा आनंद घेता येईल.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 1:10 pm

‘एक्स’वर महिलांचे आक्षेपार्ह फोटो, 'एआय'च्या गैरवापराबद्दल खासदारांचं मोदी सरकारला पत्र!

नवी दिल्ली : शिवसेना (उबाठा)च्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकतेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट खात्यांचा वापर करून महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे पोस्ट करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांच्या कथित गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली. अशा प्रकारच्या कृतींमुळे महिलांच्या गोपनीयतेचे गंभीर उल्लंघन होते. त्यामुळे केंद्र सरकारने महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.प्रियांका चतुर्वेदी यांनी पत्रात लिहिले आहे की, सोशल मीडियावर, विशेषतः 'एक्स'वर, एआय ग्रोकचा गैरवापर केला जात आहे. यामध्ये पुरुष बनावट खात्यांचा वापर करून महिलांचे फोटो पोस्ट करत आहेत. ग्रोकला चुकीच्या सूचना करून आक्षेपार्ह फोटो तयार करत आहेत. हे केवळ बनावट खात्यांद्वारे फोटो शेअर करण्यापुरते मर्यादित नाही, तर ज्या महिला स्वतःचे फोटो पोस्ट करतात त्यांनाही लक्ष्य केले जात आहे. हे अस्वीकार्य आहे आणि एआयचा हा घोर गैरवापर आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. याहून वाईट गोष्ट म्हणजे, ग्रोक अशा विनंत्या मान्य करून या वर्तनाला प्रोत्साहन देत आहे, असे त्या म्हणाल्या.सदर प्रकार हा महिलांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. तसेच महिलांच्या फोटोचा अनधिकृत वापर केला जात आहे, जो केवळ अनैतिकच नाही, तर गुन्हेगारी देखील आहे, असे त्यांनी म्हटले. प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'विरुद्ध निर्णायक कारवाई करण्याची आणि महिलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी एआय-आधारित साधनांमध्ये सुरक्षा उपाय लागू करण्याची विनंती केली आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 1:10 pm

“दहशतवादी मसूद अजहरला भारतात आणा, ट्रम्प करू शकतात, तर…”; ओवैसींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन

Asaduddin Owaisi | व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो व त्यांच्या पत्नी सीलिया फ्लोरेस यांना अमेरिकेच्या डेल्टा फोर्सने शनिवारी पहाटे ताब्यात घेतले. अमेरिकेने मोहीम सुरू असताना व्हेनेझुएलावर हवाई हल्लाही केला होता. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे. जर डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्याच देशातून ताब्यात घेऊन अमेरिकेला नेऊ शकतात, तर […] The post “दहशतवादी मसूद अजहरला भारतात आणा, ट्रम्प करू शकतात, तर…”; ओवैसींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 12:53 pm

राज ठाकरेंना मोठा धक्का! विश्वासू मनसैनिक भाजपमध्ये जाणार; ‘या’महापालिकेतील समीकरणे बदलली

नाशिक : राजकारणात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. सध्या राज्यात महापालिका निवडणुकीचा माहोल आहे. सध्याच्या घडीचे राजकारण पाहता अनेक मोठ्या घडामोडी निवडणुकीत घडताना दिसत आहेत. आज ठाकरे बंधू यांचा मुंबई महापालिका निवडणुकसाठीचा वचननामा जाहीर होणार आहे. अशातच दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता डेरे आज […] The post राज ठाकरेंना मोठा धक्का! विश्वासू मनसैनिक भाजपमध्ये जाणार; ‘या’ महापालिकेतील समीकरणे बदलली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 12:41 pm

कडोंमपाच्या १०२ जागांसाठी ४९० उमेदवार रिंगणात

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर बिनविरोध निवडून आलेल्या २० जागांव्यतिरिक्त १०२ जागांसाठी निवडणूक रिंगणात एकूण ४९० उमेदवार शिल्लक राहिले असून, २०५ उमेदवारांनी आपली उमेदवारी माघार घेतली आहे.त्यात निवडणुकीपूर्वीच महायुतीचे २० उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महायुतीचा उत्साह द्विगुणित झाला आहे. अशामध्ये आता उर्वरित १०२ प्रभागातही आपले उमेदवार निवडून येण्यासाठी शिवसेना आणि भाजपचा प्रयत्न असणार आहे.उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपचे १४ आणि शिवसेनेचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांमध्ये वकील, डॉक्टर, व्यावसायिक, उपहारगृह चालक, ठेकेदार, कंत्राटदार, वाहतूकदार व्यावसायिक, कल्याण डोंबिवलीत खाडी किनारे, पालिकेची आरक्षणे हडप करून बेकायदा चाळी आणि इमारती उभारणारे भूमाफिया, काही उच्चशिक्षित यांचा समावेश आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेत एकूण १२२ नगरसेवक आहेत. ३१ पॅनलमधून ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी नऊ निवडणूक अधिकारी कार्यरत आहेत. डोंबिवलीत एका उच्चशिक्षित वकील असलेल्या अभ्यासू माजी नगरसेवक आणि एक पक्षीय पदाधिकाऱ्याने अचानक युतीच्या उमेदवाराविरूद्ध माघार घेतल्याने कल्याण-डोंबिवलीत चर्चेचा विषय ठरला आहे.निवडणूक निर्णय अधिकारी एक यांच्या कार्यालयातून १३, निवडणूक अधिकारी दोन यांच्या कार्यालयातून २३, निवडणूक अधिकारी तीन यांच्या कार्यालयातून १४, निवडणूक अधिकारी चार यांच्या कार्यालयातून १९, ५ विभागातून ३२, सहा विभागातून १७, सात विभागातून २२, ८ विभागातून २८, निवडणूक निर्णय अधिकारी ९ विभागातून ३७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत, अशी माहिती पालिका निवडणूक जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 12:30 pm

मीरा-भाईंदरमध्ये काँग्रेस-शिवसेना छुपी युती

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेने छुपी युती करून हिंदुत्व नया नगरला विकले आहे असा आरोप भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केला असून, शिवसेनेला मत म्हणजे काँग्रेसला मत देणे आहे. त्यामुळे अशा युतीला मतदारानी त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन केले.भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने अनेक ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तसेच शिवसेनेने सुद्धा काही ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. जिथे शिवसेनेचे प्रभुत्व आहे त्या जागेवरील उमेदवारी अर्ज काँग्रेसने मागे घेतले आहेत. तसेच ज्या ठिकाणी काँग्रेसचे प्रभुत्व आहे अशा भागातून शिवसेनेने आपल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास लावले असल्याचे चित्र पाहता शिवसेना आणि काँग्रेसमध्ये छुपी युती झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.९५ जागांसाठी ४३५ उमेदवार रिंगणातमीरा-भाईंदर महापालिकेच्या ९५ जागांसाठी ५४८ नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती. त्यातील ११३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता निवडणुकीच्या मैदानात ४३५ उमेदवार राहिले आहेत. मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी २५०० अर्जांची विक्री झाली होती. त्यापैकी फक्त ६०० फॉर्म दाखल झाले. त्यातील काही अर्ज बाद झाल्यामुळे ५४८ अधिकृत उमेदवारांची यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली होती; परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ११३ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आणि रिंगणात ४३५ उमेदवार राहिले आहेत. यात सर्वाधिक भाजपचे ८६, शिवसेनेचे ८१, उबाठाचे ५६, काँग्रेसचे २६, राष्ट्रवादी काँग्रेस ३३, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १४ आणि मनसे ११ अशा प्रमुख पक्षांच्या ३०७ आणि १२८ अपक्षांचा समावेश आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या काही जणांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. भाजप आमदार नरेंद्र मेहता तसेच शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी त्यांची समजूत काढल्यावर अर्ज मागे घेण्यात आले.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 12:30 pm

“एकतर्फी हल्ला करणे हे युद्धाचे कृत्य”; मादुरो यांच्या अटकेवरून न्यूयॉर्कचे महापौर ममदानी भडकले

US Venezuela action | अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये बॉम्ब हल्ले करून व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले. अमेरिकेच्या या कारवाईने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अनेक देशांनी अमेरिकेच्या या कृतीवर हल्लाबोल केला आहे. यातच आता न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांनी या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला आहे. ममदानी यांनी ही कारवाई म्हणजे युद्धाचे कृत्य […] The post “एकतर्फी हल्ला करणे हे युद्धाचे कृत्य”; मादुरो यांच्या अटकेवरून न्यूयॉर्कचे महापौर ममदानी भडकले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 12:14 pm

ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला नवी उभारी!

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेला ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला संवर्धनासाठी केंद्र सरकारने लक्ष घातले आहेत. किल्ल्याच्या दर्या बुरुजाच्या तटबंदीच्या भिंतीच्या तुटलेल्या भागाच्या दुरुस्तीसाठी भारत सरकारच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) ८६ लाखांच्या निधीला मंजुरी दिली आहे. राज्याचे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.समुद्राच्या सततच्या लाटांमुळे आणि नैसर्गिक झिजेमुळे दर्या बुरुजाच्या तटबंदीचा काही भाग कमकुवत झाला होता. तसेच भिंतीखाली अंडरकट पोकळी निर्माण झाली होती. ही ऐतिहासिक रचना जतन करण्यासाठी आता तांत्रिकदृष्ट्या शास्त्रीय पद्धतीने पुनर्संचयितीचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामासाठी एमडब्ल्यू (संवर्धन) आरसीपी अंतर्गत मुंबई मंडळ व विजयदुर्ग उप मंडळामार्फत काम राबवले जाणार आहे.सदर आरसीपीला पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक यदुबीर सिंग रावत यांनी मान्यता दिली आहे. विजयदुर्ग किल्ला हा मराठा आरमाराचा कणा मानला जातो. अशा ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह असून, पर्यटनाच्या दृष्टीनेही याचा मोठा फायदा होणार आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 12:10 pm

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणूक?

मुंबई : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यात या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची अपेक्षा आहे. ६ जानेवारी रोजी, एसईसी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेईल.या आढावा बैठकीत आयोग तिसऱ्या टप्प्यातील तयारी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) उपलब्धता व निवडणूक यंत्रणेची स्थिती यांचे मूल्यांकन करेल. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी मतदान तारखांवर अंतिम निर्णय घेतला जाईल. १० फेब्रुवारी रोजी बारावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी एसईसीने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी. एसईसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला अंदाजे २८ दिवस लागतील. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून नवीन ईव्हीएमचा पुरवठा १५ जानेवारीनंतर सुरू होण्याची अपेक्षा आहे.कर्मचाऱ्यांना महापालिका निवडणुकीच्या कामातून मुक्त होताच, त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी तैनात केले जाईल.दुसऱ्या एका एसईसी अधिकाऱ्याने सांगितले की, ३५ हजार मतदान केंद्रांसाठी किमान ७० हजार ईव्हीएम व १.५ लाखांहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल.८ जानेवारीपूर्वी तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका जाहीर करणे शक्य नसल्याने, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 12:10 pm

मुंबई वगळता इतर ठिकाणी रिपाइंचा महायुतीला पाठिंबा

मुंबई : भाजपने मुंबईत कोणत्याही जागा न सोडल्याने रिपाइंने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, भाजपशी मैत्रीपूर्ण लढती होतील असे सांगत अन्य सर्वत्र महायुतीला रिपाइंचा पाठिंबा असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घोषित केले. महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. जेथे महायुतीचे एकत्रित उमेदवार आहेत तेथे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, असे त्यांनी स्पष्ट केलेे. भाजप व शिंदे सेनेचे उमेदवार समोरासमोर उभ्या असलेल्या वाॅर्डांमधील रिपाइंची भूमिका मात्र अद्याप स्पष्ट झालेली नाही. महायुतीत मुंबईत एकत्र जागावाटप झाले तरी रिपाइंला जागा मिळाल्या नाहीत. याबद्दल नाराजी व्यक्त केली जात होती. ती दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास आठवले यांच्या स्वतंत्र बैठकाही घेतल्या. मात्र, त्यातून काही निष्पन्न झाले नसल्याचे स्पष्ट होते आहे. मुंबईत दलित-मुस्लिम मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. काँग्रेस-वंचित एकत्रपणे निवडणुकांना सामोरे जात आहेत, तर ठाकरे बंधूंनाही विशेषतः उबाठाना दलित मते मिळतील असे वाटते आहे. या तिहेरी लढतीत भाजपला रिपब्लिकन पक्षासाठी स्वतंत्रपणे जागा देणे उचित वाटले नसावे. तथापि, जागावाटप योग्यप्रकारे झाले नसले तरी आमची युती अभंग आहे. युतीत जिंकून येईल, असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 12:10 pm

निवडणूक आयोगाने मागविला ‘बिनविरोध’चा अहवाल

मुंबई : महाराष्ट्रातील २९ नगरपालिकांमध्ये २ हजार ८६९ जागांसाठी निवडणूक होत आहे. ३३ हजार ६०६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ६६ नगरसेवक आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. विरोधकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगानेही हे प्रकरण गांभीर्याने घेत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.राज्यात नऊ वर्षांनी महापालिका निवडणुका होत आहेत. राज्यात ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.बहुतेक विजयी हे सत्ताधारी पक्षाचे आहेत. यावर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. सत्ताधारी पक्षानेही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने ज्या नगरपालिकांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्याकडून अहवाल मागवले आहेत.उमेदवारांनी उमेदवारी अर्ज कधी मागे घेतले? त्यांच्यावर दबाव होते का? त्यांना आमिष दाखवण्यात आले होते का? की त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणण्यात आला होता? राज्य निवडणूक आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने अहवाल मागवला आहे. अहवाल सादर झाल्यानंतर आणि त्याची तपासणी केल्यानंतरच निवडणूक आयोग बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे अधिकृतपणे जाहीर करेल.मुंबईतील कुलाबा येथील तीन वॉर्डमध्ये उमेदवारांना अर्ज दाखल करण्यापासून रोखण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. निवडणूक अधिकारी, निवडणूक प्रभारी व पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवण्यात आला आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 12:10 pm

‘ठाकरेंचा वचननामा नव्हे, अपचननामा!’

मुंबई : पालिका निवडणुकीच्या अानुषंगाने उबाठा-मनसेने संयुक्त वचननामा प्रसिद्ध केला. त्यात ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचे आश्वासन देण्यात आलेे. भाजपचे मंत्री आशीष शेलार यांनी त्यावर आक्षेप घेतला असून, मुंबईतील घरांना मालमत्ता करमाफी देण्याचा मुद्दा भाजपचा आहे. हा मुद्दा आता उबाठा आणि मनसेने चोरल्याचा आरोप करत, या वचननाम्याला त्यांनी ‘अपचननामा’ असे नाव दिले. शेलार म्हणाले, भाजपच्या नगरसेवकांनी ५०० ऐवजी ७०० चौरस फुटांपर्यंतची माफी देण्याची आग्रही मागणी केली होती. मात्र, तेव्हा पालिकेत सत्तेत असलेल्या उबाठाने फक्त ५०० चौरस फुटांचाच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला. ७ मार्च २०१८ रोजी आम्ही ७०० ते ७५० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचा प्रस्ताव पालिकेकडून घेण्याची मागणी केली होती. उबाठाने मात्र ७०० ते ७५० चौरस फुटांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यासच विरोध केला, ' असा आरोप आशीष शेलार यांनी केला. आता निवडणुकीच्या तोंडावर उबाठा आश्वासनांचा दिखावा करीत मुंबईकरांना फसवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमच्या जुन्या मागण्या चोरून वचननामा काढलात, तर तो वचननामा नव्हे, तर चोरलेल्या मागणीचा ‘अपचननामा’ होईल, असा टोला आशीष शेलार यांनी लगावला.https://www.youtube.com/shorts/yLY5-w0zCvI

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 12:10 pm

तिरुपती गोविंदराजस्वामी मंदिरात मद्यपीचा धिंगाणा

तिरुपती : मद्याच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने तिरुपतीमधील श्री गोविंदराजस्वामी मंदिरात धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना चुकवून मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर ही व्यक्ती मंदिराच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत असताना दक्षता कर्मचाऱ्यांच्या वेळीच लक्षात आले. तिरुपती संकुलात प्रवेश केल्यानंतर मद्यपी गोपुरमवर चढून कळसापर्यंत गेला. हे पाहून मंदिरातील अधिकारी आणि कर्मचारी गोळा झाले.कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंदिर प्रशासनाने तत्काळ पोलीस आणि अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. मद्यपीने गोंधळ घातल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.मंदिरातील दक्षता अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यपीचे नाव कुट्टाडी तिरुपती (४५) असल्याचे सांगितले जाते. तो तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यातील कुर्मवाडा येथील पेद्दामल्ला रेड्डी कॉलनीतील रहिवासी आहे. इतर भाविकांप्रमाणेच त्यानेही मंदिरात प्रवेश केला होता. यानंतर तंबूच्या खांबांचा वापर करून नदीमी गोपुरमवर चढला.गोपुरमच्या कळसावर चढल्यानंतर मद्यपीने मद्याची बाटली मागितली. मद्याची बाटली आणून दिली तरच खाली उतरेन, अशी अट त्याने ठेवली होती. मंदिरातील दक्षता अधिकाऱ्यांनी त्याची मागणी मान्य केल्यानंतर तो स्वतःहून सुरक्षितपणे खाली उतरला.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 12:10 pm

“मुलुंडचे ना*** पोपटलाल बिनविरोध..”; राऊतांची सोमय्यांवर आक्षेपार्ह शब्दांत टीका; म्हणाले “मुंबईवर…”

Sanjay Raut : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होण्याअगोदरच भाजपचे विविध ठिकाणी ४० हून अधिक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. निडणूक होण्याअगोदर भाजपला मिळालेले यश चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक्सवरून त्यांचा मुलगा नील सोमय्या ही निवडणूक बिनविरोध जिंकणार असल्याच्या आशयाचे ट्वीट केले होते. त्यानंतर आता उबाठा गटाचे […] The post “मुलुंडचे ना*** पोपटलाल बिनविरोध..”; राऊतांची सोमय्यांवर आक्षेपार्ह शब्दांत टीका; म्हणाले “मुंबईवर…” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 11:58 am

फायर आजीची 'श्रध्दा'आटली, 'विजय'कुणाचा?

मुंबई :मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक २०२मध्ये उबाठाच्यावतीने माजी महापौर श्रध्दा जाधव यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यामुळे शाखाप्रमुख विजय इंदुलकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु ज्या चंद्रभागा शिंदे श्रध्दा जाधव यांनी फायर आजीची ओळख मिळवून दिली होती,त्या आता जाधव यांच्याऐवजी इंदुलकर यांच्यासोबत आहे. फायर आजीची 'श्रध्दा' आता आटली गेल्यामुळे या प्रभागात 'विजय' कुणाचा होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.महापालिकेच्या एफ दक्षिण प्रभाग कार्यालयाच्या हद्दीतील शिवडीतील प्रभाग क्रमांक २०२ हा प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गाकरता आरक्षित झाल्यानंतर याठिकाणी विद्यमान नगरसेविका श्रध्दा जाधव यांची प्रथम दावेदारी होती. तर हा प्रभाग खुला झाल्याने या शाखेचे शाखाप्रमुख विजय इंदुलकर यांनीही आपला दावा ठोकला, तर युवा सेनेचे नेते आणि श्रध्दा जाधव यांचे पुत्र पवन जाधव यांनीही या प्रभागासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. परंतु तिकीट वाटपाच्यावेळी जाधव कुटुंबांमध्ये एकच उमेदवारी देण्याची वेळ आल्यानंतर पवन जाधव हे बाजुला झाले आणि श्रध्दा जाधव या प्रमुख दावेदार म्हणून उभ्या राहिल्या. तर दुसरीकडे शाखाप्रमुख विजय इंदुलकर हेही शिवसैनिकांच्या बळावर उमेदवारी मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि नाही मिळाली तर बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार यावर ठाम होते. अखेर श्रध्दा जाधव यांच्या झोळीत उमेदवारी पडल्यानंतर इंदुलकर यांनी आपला अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत बंडखोरी केली.विशेष म्हणजे इंदुलकर यांनी फायर आजी म्हणून ज्यांची ठाकरेंनी ओळख निर्माण केली होती, त्या चंद्रभागा शिंदे यांना पुढे केले. त्यामुळे फायर आजीने आपला किल्ला लढवून इंदुलकर यांनाच उमेदवारी मिळावी अशी आक्रमक भूमिका मांडतानाच श्रध्दा जाधव यांच्या उमेदवारीला विरोध केला. विशेष म्हणजे मातोश्रीवर हनुमान चालिसा पठन करण्याचा इशारा देणाऱ्या नवनीत राणा यांना शिवडीतील शिवसैनिक आजी असलेल्या चंद्रभागा शिंदे यांनी एप्रिल २०२२मध्ये मातोश्रीबाहेर जमा होत वरूण सरदेसाई, साईनाथ दुर्गे, पवन जाधव यांच्यासमवेत बसत माध्यमांशी बोलतांना पुष्पा स्टाईल झुकेगा नहीं साला अशाप्रकारची प्रतिक्रिया दिली होती. आजीने दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर त्यांना फायर आजी असे नाव देण्यात आले. श्रध्दा जाधव यांच्या शाखेतील ८० वर्षीय आजीची ही प्रतिक्रिया माध्यमांनी दाखवून त्यांना उचलून धरल्यानंतर त्यांना मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या भेटीला नेण्यात आले होते. तसेच त्यानंतर तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या उध्दव ठाकरे यांनी शिवडीतील त्यांच्या घरीही भेट दिली होती. त्यामुळे फायर आजी अशी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. श्रध्दा जाधव यांच्यामुळे फायर आजीची ओळख निर्माण झाली असली तरी आता याच आजी श्रध्दा जाधव यांच्या विरोधात आणि उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बोलू लागल्या आहेत. त्यामुळे बंडखोर विजय इंदुलकर यांना फायर आजीचा पूर्ण पाठिंबा असल्याने जाधव यांनी आजवर विजयाचा षटकार ठोकला असला तरी यंदाचा विजयी रथ त्यांचा रोखला जाणार आहे. यंदा जाधव यांच्यासमोर विजयच प्रमुख अडसर असल्याने विजयाचे सप्तक खरोखरच जाधव पार करू शकतात का आणि त्यांना त्यापासून बंडखोर विजय इंदूलकर आणि भाजपाचे पार्थ बावकर हे रोखतात का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 11:30 am

‘बिग बॉस मराठी’फेम अभिनेत्याला अटक; लग्नाच्या काही दिवसांतच ठोकल्या बड्या

Jay Dudhane | ‘बिग बॉस मराठी’ सीजन ३ चा उपविजेता आणि अभिनेता जय दुधानेला अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळळा जवळ पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. ५ कोटींच्या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी जयला लग्नाच्या 11 दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली आहे. जयने बनावट कागदपत्रे तयार करून काही दुकानं बेकायदेशीरपणे व्यक्तींना विकल्याचा आरोप आहे. यामुळे अनेक खरेदीदारांचं आर्थिक […] The post ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याला अटक; लग्नाच्या काही दिवसांतच ठोकल्या बड्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 11:23 am

आशियाई चित्रपट महोत्सवात बहुचर्चित ‘मयसभा’

मुंबई : चित्रपटप्रेमींचं लक्ष लागून राहणाऱ्या २२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला मुंबईमध्ये शुक्रवार ९ जानेवारी पासून सुरुवात होत आहे. पन्नासहून अधिक देशांमधील वेगवेगळ्या भाषांतील सिनेमांचा यंदा महोत्सवात समावेश असल्यानं सिनेप्रेमींसाठी ही मेजवानी ठरेल.यंदाच्या महोत्सवाच्या मुख्य आकर्षण आहे ते मराठमोळ्या कलावंताचे सिनेमे. यात दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा बहुचर्चित आगामी हिंदी सिनेमा ‘मयसभा' आणि नुकताच प्रदर्शित झालेला दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांचा ‘उत्तर’ आणि दिग्दर्शक संतोष डावखर यांचा ‘गोंधळ’ आदी कलाकृतींचा समावेश आहे. सान चित्रपट महोत्सवात FIPRESCI ज्युरी पुरस्कार पटकावलेल्या ‘ऑन यूअर लॅप’ (पांगकू) या इंडोनेशियन चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.निवडलेले चित्रपट प्रभादेवीतील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील मिनी थिएटर आणि ठाण्यातील लेक शोर मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात दाखवले जाणार आहेत. ९ दिवसांच्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे सशुल्क रजिस्ट्रेशन आजच करा आणि एकापेक्षा एक लक्षणीय चित्रपटांचा आनंद घ्या. अतिशय वाजवी शुल्कात प्रतिनिधी नोंदणीकरण्यासाठी www.thirdeyeasianfilmfestival.com या संकेतस्थळाला भेट द्या. तुम्ही जर प्रभात चित्र मंडळाचे सभासद असाल तर तुम्हाला खास सवलत आहेच. महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शिका पद्मभुषण सई परांजपे यांना 'आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार' देण्यात येणार आहे. आणि दिग्दर्शिका उमा दा कुन्हा यांना 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' देऊन सन्मानित केले जाणार आहे. दिवंगत सुधीर नांदगांवकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार चित्रपट अभ्यासक आणि क्युरेटर मिनाक्षी शेड्डे यांना प्रदान करण्यातयेणार आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 11:10 am

“काही दिवसांत राजकीय बॅाम्ब फुटणार”; भाजपच्या बड्या नेत्याचं सर्वांत मोठं विधान

Ashish Shelar : काही दिवसांवर राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका येवून ठेपलेल्या आहेत. या निवडणुकीत अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष हे मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागलेले आहे. कालच मुंबईतील वरळी येथे भाजप आणि शिवसेनेने महायुतीच्या प्रचाराचा पहिला नारळ फोडला. या पहिल्याच जाहीर सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर बसणार […] The post “काही दिवसांत राजकीय बॅाम्ब फुटणार”; भाजपच्या बड्या नेत्याचं सर्वांत मोठं विधान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 11:07 am

उबाठाने ‘युवा सेने’ला दाखवला कात्रजचा घाट!

मुंबई : उबाठाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी एक घोषणा करून ज्येष्ठांना बाजुला करून नवीनांना संधी दिली जाईल असे सांगत एकप्रकारे उबाठाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना अधिकाधिक उमेदवारी देण्याचा प्रयत्न राहिल असे अप्रत्यक्ष संकेत दिले होते. पण प्रत्यक्षात महापालिका निवडणुकीत उमेदवारी द्यायची वेळ आली तेव्हा युवा सेनेच्या पदाधिकारयांचा विसर पडलेला दिसून आला. युवा सेनेच्या कोअर कमिटीचे अंकित प्रभू, राजोल पाटील, धनश्री कोलगे यांच्यासह शशिकांत झोरे यांच्या सारीका झोरे, रियान मेंडिस यांची पत्नी आणि मयुर कांबळे यांची पत्नी रेखा आदींना वगळता कुठल्याही युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना उबाठाने संधी दिलेली नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना एकप्रकारे गाजरच दाखवल्याचे स्पष्ट होत आहे.मुंबईत उबाठाच्या युवा सेनेचे अंकित प्रभू यांन प्रभाग क्रमांक ५४, राजोल पाटील यांना प्रभाग ११४ आणि धनश्री कोलगे यांना प्रभाग क्रमांक २मधून उमेदवारी देण्यात आली. यातील अंकित हे सुनील प्रभू यांचे पुत्र आहेत, तर राजोल या खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या आहेत. त्यामुळे या दोघां वडिलांच्या ताकदीवर उमेदवारी मिळाली आहे. तर धनश्री कोलगे यांना प्रभाग क्रमांक २मधून तसेच सिनेट सदस्य शशिकांत झोरे यांच्या कुटुंबातील सारीका झोरे यांना प्रभाग क्रमांक १२मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच मयुर कांबळे यांची पत्नी रेखा यांना प्रभाग क्रमांक २०१मधून आणि रियान मेंडिस यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. हे अपवाद वगळता युवा सेनेच्या अन्य कोअर कमिटीच्या सदस्यांसह पदाधिकाऱ्यांची घोर निराशा केली आहे. वरळीतील युवा सेनेचे अभिजित पाटील यांच पत्नी आकर्षिता तसेच संदीप वरखडे हे आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. तर प्रभाग क्रमांक १९२मधून साईनाथ दुर्गे, प्रभाग क्रमांक २०२मधून पवन जाधव यांच्यासह युवा सेनेच्या शितल देवरुखकर, सुप्रभा फातर्पेकर, प्रथमेश पांडुरंग सकपाळ, जय सरपोतदार, समृध्द शिर्के यांची घोर निराशाच केली आहे. तर काही शाखाप्रमुखांनी निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पत्नीला युवा सेनेचे पदाधिकारी बनवले होते. त्यामुळे यातील काही उमेदवार हे युवा सेनेचे पदाधिकारी दाखवले गेले असले तरी युवा सेनेचे सक्रिय कार्यकर्ते नसून केवळ उमेदवारीसाठी पदधारणा करून दिल्याचे काही उबाठाच्या शिवसैनिकांचे म्हणणे आहे. प्रभाग क्रमांक ५१मधून उबाठाच्या युवा सेनेच्या कोअर कमिटी सदस्य शितल देवरुखकर-शेठ या इच्छुक होत्या. परंतु तिथे दुसऱ्याच उमेदवाराची नाव घोषित केल्यामुळे शितल देवरुखकर यांनी उबाठाला राम राम करत भाजपात प्रवेश केला. शितल देवरुखकर या उबाठाच्या उपनेत्या होत्या आणि फायरब्रँड नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्यासारख्या पत्ता कापला जाणे हे उबाठा शिवसैनिकांच्या जिव्हारी लागलेले पहायला मिळत आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 10:30 am

एन् डी स्टुडिओत 'कार्निव्हल'

कर्जत : नितीन देसाई यांनी २००५ मध्ये मुंबईजवळच्या कर्जत इथे एनडी स्टुडिओची निर्मिती केली होती. ५२ एकरवर हा एनडी स्टुडिओ पसरलेला आहे. आतापर्यंत ऐतिहासिक सिनेमांसह अनेक चित्रपटांचं इथे शूटिंग झालं आहे. अमिर खानचा मंगल पांडे सिनेमा चित्रित झाला. त्यानंतर मधुर भांडरकर यांच्या ट्रॅफिक सिग्नल सिनेमाचं शूटिंग याच स्टुडिओत झालं. त्यानंतर आशुतोष गोवारिकरचा जोधा अकबर इथेच शूट झाला. त्यावेळी ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशन या सेटवर ६ महिने राहिले होते. सलमानचा प्रेम रतन धन पायो या सेटवर शूट झालेला. सिनेमादरम्यान सलमान जवळपास ९० दिवस या सेटवर राहिला होता. सलमानच्या अनेक सिनेमांचं शूटिंग या एनडी स्टुडिओत झालं आहे. किक, बॉडीगार्ड, वॉन्टेड सिनेमे याच सेटवर शूट झालेत.आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातकीर्त कलाकाराचे एखादे कार्य जर अपूर्ण राहीले असेल तर शासनाची जवाबदारी असते की त्या कार्याला पूर्णत्वास नेण्यात मदत करावी. त्यामुळेच याच दृष्टिकोनातून स्व. नितीन चंद्रकांत देसाई या मराठी कलाकाराच्या कर्जत येथील, एन् डी स्टुडिओची जवाबदारी महाराष्ट्र शासनाने स्वीकारून तेथे नवोन्मेष उपक्रमांची सुरुवात केली आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती स्वाती म्हसे-पाटील यांची संकल्पना, आणि महामंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या पुढाकारातून तसेच एन् डी ज् आर्ट वर्ल्ड मधील कर्मचारी यांच्या सहकार्यातून, सात दिवस मराठी मनोरंजन क्षेत्रातील नामवंत व लोकप्रिय वेगवेगळ्या सिने कलाकारांच्या उपस्थितीत २५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत एन् डी ज् आर्ट वर्ल्ड मध्ये अतिशय आनंदात व खेळीमेळीच्या वातावरणात 'कार्निव्हल' हा उपक्रम संपन्न झाला. ३१ डिसेंबरला कार्निव्हल समारोप कामशेत, लोणावळे येथील 'मायेचा हात सोशल फौंडेशन' या संस्थेतील अनाथ मुलांच्या तसेच महामंडळाचे पदाधिकारी, कर्मचारी आणि उपस्थितीत पर्यटकांच्या समवेत करण्यात आला. , स्पर्धा इत्यादी गोष्टींची धम्माल होती. या पुढेही २०२६ वर्षातील वेगवेगळ्या महिन्यातील वेगवेगळ्या दिवशी असे विशेष विविध उपक्रम, कार्यशाळा, निवासी अभ्यासक्रम पर्यटकांसाठी, पाहुण्यांसाठी आयोजित करण्यात येतील.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 10:30 am

चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी!

वीज पुरवठ्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्याकडून अडीच कोटींचा निधीकणकवली : सिंधुदुर्गातील चीपी विमानतळाने आज विमान वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. डीसीजीएकडून आयएफआर लायसन्स आणि ऑपरेशन्सना मंजुरी मिळाल्यामुळे, या विमानतळावर २४७, रात्रंदिवस, सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित विमानसेवा उपलब्ध होणार आहे. विमानतळावरील पार्किंगची क्षमता ३ वरून ६ विमानांपर्यंत वाढवण्यात आली असून, यामुळे विमानतळाची कार्यक्षमता दुप्पट झाली आहे. डिसेंबर महिन्यात ११ हजार प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला असल्याने सिंधुदुर्ग विमानतळ देशातील ७५ प्रमुख विमानतळांच्या यादीत मानाने स्थान मिळवेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.नाईट लँडिंगच्या परवानगीसाठी खासदार नारायण राणे व मंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. चिपी विमानतळ येथे नाईट लँडिंगसाठी आवश्यक असणारा वीज पुरवठा करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणेंनी जिल्हा नियोजनमधून अडीच कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यामुळे चिपी विमानतळाला आवश्यक असलेला वीज पुरवठा सुरळीत झाला आणि पुढील परवानगी मिळण्यास सोईचे ठरले.खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्यामुळे निर्णय : आमदार निलेश राणेचिपी विमानतळाला ‘नाईट लँडिंग’ची ऐतिहासिक मंजुरी मिळाली आहे. चिपी विमानतळाला आयएफआर लायसन्स प्राप्त झाल्यामुळे सर्व ऋतूंमध्ये नाईट लँडिंग शक्य झाले आहे. विमान पार्किंग क्षमता ३ वरून ६ विमानांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. खा. नारायण राणे यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभाग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. याबद्दल खा. नारायण राणे व नागरी विमान वाहतूक महासंचालनालय विभागाचे आमदार निलेश राणे यांनी आभार मानले आहेत. चिपी विमानतळ येथे नाईट लँडिंगसाठी पाठपुरावा करून नाईट लँडिंगसाठी जिल्हा नियोजन निधीतून २ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आमदार निलेश राणे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 10:10 am

भ्रष्टाचाराच्या मगरमिठीतून मुंबईला सोडवायचं आहे!

उपमुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकामुंबई : राज्याच्या राजकारणात २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी महायुतीचा आज मुंबईतील वरळीत मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ‘बकासुराच्या तावडीतून मुंबईला सोडवायचं आहे, मुंबईला भ्रष्टाचाराच्या मगरमिठीमधून सोडवायचं आहे’, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?“आजची सभा ही मुंबईतील भ्रष्टाचाराच्या विरोधातील उठावाच्या ललकाराची सभा आहे. गेल्या एवढ्या वर्षांपासून मुंबईला भ्रष्टाचाराची मगरमिठी पडली होती. पण आता आपल्याला या मगरमिठीतून मुंबई आणि मुंबईकरांना सोडवायचं आहे. बकासुराच्या तावडीतून मुंबई बाहेर काढायची आहे. त्यासाठी महायुतीचा बलभीम सज्ज झाला आहे. लाडके मुंबईकर, या मुंबईवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत, मुंबई महापालिकेवर आपल्याला भगवा फडकवायचा आहे आणि मुंबई महापालिकेचा महापौर मराठीच होणार”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.“काही लोकांना निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो. मात्र, या मराठी माणसांसाठी तुम्ही काय केलं? हे सांगा. एक काम तरी तुम्ही मराठी माणसांसाठी केलं का? त्यांचा (उद्धव ठाकरे यांचा) म मराठीचा नाही, म मलिद्याचा आहे, म मतलबाचा आहे, म मुजोरीचा आहे, वरून किर्तन आणि आतून तमाशा, असं त्यांचं काम आहे. मात्र, आमचा म मराठीचा आहे, आमचा म महाराष्ट्राचा आहे, आमचा म महायुतीचा आहे. त्यांच्यामधील आणि आमच्यामधील हा फरक आहे”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.“मग तुम्ही २० वर्षांसाठी वेगवेगळे का आणि कोणासाठी झाला होतात? (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे), आता जनतेने तुमचा बॅड वाजवल्यानंतर तुम्हाला ब्रँडची आठवण आली. मात्र, खरा ब्रँड बाळासाहेब ठाकरेच आहेत, त्यानंतर महायुतीचा कार्यकर्ता खरा ब्रँड आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, शिवसेनेचा विचार आम्ही जपला आहे”, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 10:10 am

रिपब्लिकन पक्ष यंदा स्वबळावर खाते उघडणार?

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने रिपब्लिकन पक्षाला एकही जागा सोडलेली नाही. तरीही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाचा करिश्मा असल्यामुळे भाजप शिवसेना महायुतीने रिपब्लिकन पक्षाला महायुतीसोबत घेतले आहे. एकही जागा न देता भाजपने महायुतीच्या प्रचाराचे प्रमुख शिर्ष नेतृत्वात केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांना स्थान दिले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील २९ महापालिकांमध्ये महायुतीचा प्रचार करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या फोटोचा वापर होणार आहे. मुंबईत रामदास आठवले यांच्या नेतृत्वात महायुतीचा प्रचार होत असतांना मुंबईतच १३ जागांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आठवलेंच्याच पक्षाचे १३ उमेदवार स्वबळावर रिपब्लिकन पक्षाच्या अस्तित्वाचा निळा झेंडा बुलंद करणार आहेत.केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबईत रिपब्लिकन पक्ष स्वबळावर लढवत असलेल्या १३ जागांपैकी वॉर्ड क्र. २८ मधील यशदा कोंडे, गोरेगांव मधील वॉर्ड क्र. ३८ दिडोंशी मधुन वंदना बोरोडे, वॉर्ड क्र. ५४ मधुन रेशमा खान, बांद्रा पूर्वेत, वार्ड क्र. ९३ मधुन सचिन कासारे, मुलुंड वॉर्ड क्र. १०४ मधुन विनोद जाधव, घाटकोपर पूर्व, रमाबाई कॉलनी वॉर्ड क्र. १२५ मधुन राजा गांगुर्डे आणि वडाळा कोरबा मिठागार वॉर्ड क्र. १८१मधुन बाबा काळे, हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार स्वबळावर चांगली लढत देणार असून यांच्यातील काही लोक उमेदवार निश्चित विजयी होवुन रिपब्लिकन पक्षाचे स्वबळावर मुंबई महापालिकेत यंदा खाते खोलले जाईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे प्रसिध्दी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी व्यक्त केला आहे. तसेच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्या प्रज्ञा सुनिल सदाफुले या चेंबुर पांजरापोळ येथुन महायुतीच्या उमेदवार म्हणून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणुक लढत आहे. हे ऐकमेव जागा महायुतीच्या वतीने शिवसेनेच्या वतीने रिपब्लिकन पक्षाला सोडण्याचा दिलदारपणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला आहे.दिनांक ०२ जानेवारी २०२६ रोजी हदय विकाराचा त्रास झाल्याने त्यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या पत्नीने सोमा राजेश सरकार यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं दाखल केलेला अर्ज मागे घेतला. विक्रोळी (प) सुर्या नगर या भागात राजेश सरकार हे रिपब्लिकन पक्षाचे लोकप्रिय कार्यकर्ते आहेत. रिपब्लिकन पक्षाचे विक्रोळी तालुका अध्यक्ष आहेत. या भागात मागील निवडणुकीत सोमा राजेश सरकार यांनी रिपब्लिकन तर्फे निवडणुक लढुन चांगली मते मिळवली होती. यंदाच्या निवडणुकीत उ.बा.ठा. च्या नगरसेविका यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. व त्यांनी शिंदे शिवसेना गटाची उमेदवारी मिळवली. त्यामुळे स्थानिक वॉर्ड क्र. १२० मधील शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते नाराज आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांनी नाराजगीचे पत्र शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. त्यामुळे वॉर्ड क्र. १२० मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार सोमा राजेश सरकार यांचे पारडे जड मानले जात होते. यंदा सोमा राजेश सरकार हया निश्चित विजयी होतील असे वातावरण होते. मात्र सोमा सरकार यांचे पती राजेश सरकार यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी झाल्यामुळे त्यांनी निवडणुक लढण्याचा निर्णय रद्द केला. निवडणुकीपेक्षा पतीचे आरोग्य महत्वाचे असल्याने त्यांनी निवडणुकीतुन माघार घेतली.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 10:10 am

उबाठामध्ये अंतर्गत कलह, उमेदवारी देण्यावरुन वरुण विरुद्ध अनिल असा संघर्ष

मुंबई : वांद्रे पूर्व येथील प्रभाग क्रमांक ९५मधून उबाठाने हरी शास्त्री हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. परंतु हरी शास्त्रीला उमेदवारी देण्यात आल्याने माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर हे नाराज होत अपक्ष उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केली. हरी शास्त्री यांना युवा सुनेचे सरचिटणीस आणि आमदार वरुण सरदेसाई यांचा आशिर्वाद आहे, तर वायंगणकर यांना उबाठाचे नेते अनिल परब यांचा आशिर्वाद आहे. त्यामुळे या दोघांच्या चढाओढीत नक्की कुणाचा आशिर्वाद योग्य ठरतो आणि कुणाचा मारक ठरतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ९५मधून भाजपचे सुहास आडिवरेकर हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर त्यांच्यासमोर उबाठाचे हरि शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आली. हरि शास्त्री यांना उमेदवारी देत आपला पत्ता कापल्याने माजी नगरसेवक आणि अनिल परब यांचे खंदे समर्थक असलेल्या चंद्रशेखर वायंगणकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. मात्र, शेवटच्या दिवसापर्यंत वायंगणकर यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे वांयगणकर आणि हरि शास्त्री यांच्या जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. हरि शास्त्री हे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे जावई असून युवा सेना सरचिटणीस आणि वांद्रे पूर्व विधानसभेचे उबाठा आमदार वरुण सरदेसाई यांचे समर्थक आहेत.तसेच विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे सरदेसाई यांनी माजी नगरसेवक वायंगणकर यांचा पत्ता कापून हरि शास्त्री यांना उमेदवारी जाहीर केली होती. या उमेदवारीवरून अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये तू तू मै मै झाल्याचेही वृत्त आहे. हरि शास्त्रीचा पराभव करत वरूण सरदेसाई यांचे महत्त्व कमी करण्याचा परब यांचा प्रयत्न असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. वरुण सरदेसाई यांचा हा हस्तक्षेप परब यांना सहन झालेला नाही. अशाचप्रकारे आपला पत्ता कापला जाईल याची भीती उबाठाचे दिनेश कुबल यांना आल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तेथील शाखाप्रमुखाला आपली ताकद दिली. त्यामुळे हरी शास्त्री यांना निवडणून आणण्यासाठी वरुण सरदेसाई आणि वायंगणकर यांना निवडून आणण्यासाठी अनिल परब यांच प्रतिष्ठापणाला लागलेली आहे. वायंगणकर यांनी माध्यमांशी बोलतांना, मी जिंकल्यानंतर विजयाचा गुलाल घेवून मातोश्रीवर जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे वायंगणकर यांच्या विजयासाठी परब हे अप्रत्यक्षपणे प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होत असून विभागातील नागरिकांमध्येही तशाप्रकारची चर्चा आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 10:10 am

गोपीचंद पडळकरांना अंगावर घेणारा आव्हाडांचा कार्यकर्ता भाजपमध्ये दाखल

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार गोपीचंद पडळकर यांना अंगावर घेणारा जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याने भाजपत प्रवेश केला आहे. शुक्रवारी रात्री मंत्री आशीष शेलार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.विक्रोळी येथील प्रभाग क्रमांक १२४ मधून देशमुख आपल्या पत्नीच्या तिकिटासाठी प्रयत्नशील होता. त्यासाठी त्याने आव्हाडांकरवी लॉबिंग देखील केले होते. मात्र, उबाठा-मनसे आणि शरद पवार गटाच्या जागावाटपात हा प्रभाग उबाठाच्या वाट्याला आला. तेथून सकीना अयुब शेख यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नितीन देशमुख नाराज होता. आता त्याने थेट राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधान भवनातील राड्यानंतर नितीन देशमुख याला शरद पवार पक्षाचे प्रवक्ते पद देण्यात आले होते. मात्र, नाराजीनाट्यानंतर त्याने प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. या संपूर्ण प्रक्रियेत माझ्यावर अन्याय झाल्याची तीव्र भावना आहे”, अशी प्रतिक्रिया त्याने भाजप प्रवेशानंतर दिली.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 10:10 am

दहिसरमध्ये घोसाळकरांना सुनेपेक्षा मुलाच्या विजयाची चिंता?

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच दहिसरमधील प्रभाग क्रमांक १मधील माजी नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्या सध्या प्रभाग क्रमांक २मधून निवडणूक रिंगणात उभ्या आहेत.तर दुसरीकडे त्यांचे दीर सौरभ विनोद घोसाळकर हे प्रभाग क्रमांक ७मधून उबाठाच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत.त्यामुळे एकाच घरातील दोन उमेदवारी विरुध्द पक्षांमध्ये वेगवेगळ्या प्रभागांमध्ये नशीब आजमावत आहेत. मात्र,एका बाजुला सुनबाई भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत असल्याने माजी आमदार आणि उबाठाचे उपनेते विनोद घोसाळकर यांना त्यांची चिंता नसून त्यांना आता केवळ चिंता आहे ती प्रभाग क्रमांक ७मधून निवडणूक लढवणाऱ्या मुलगा सौरभची. कारण या प्रभागात भाजपाच्यावतीने पक्षाचे प्रवक्ते गणेश खणकर हे समोर असल्याने सौरभच्या विजयाची चिंता वडिल म्हणून विनोद घोसाळकर यांना अधिक असल्याचे दिसून येत आहे.मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उबाठाकडून न्याय न मिळाल्याने माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या पतीची अर्धवट इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा राजकारणात आपले पाऊल सक्षमपणे रोवण्याचा निर्णय घेत भाजपात प्रवेश केला. तेजस्वी घोसाळकर यांना भाजपाचा गड असलेल्या प्रभाग क्रमांक २मधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उबाठाचे उपनेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांची सुनबाई भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत. तर घोसाळकर यांच्या वाट्याला एकमेव प्रभाग क्रमांक ७ येणार असल्याने याठिकाणी त्यांच्या दोन्ही सुनबाईंच्या नावाची चर्चा होती. पण तेजस्वी घोसाळकर यांनी उबाठाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केल्यामुळे प्रभाग सातमधून घोसाळक यांची दुसरी सुनबाई निवडणूक रिंगणात उतरेल अशी चर्चा होती; परंतु शेवटच्या क्षणाला प्रभाग सातमधून विनोद घोसाळकर यांचे दुसरे पुत्र सौरभ घोसाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि यामाध्यमातून घोसाळकर यांच्या दुसऱ्या पुत्रानेही राजकारणात अधिकृत प्रवेश केला आहे. त्यामुळे आपल्या दुसऱ्या पुत्राला राजकारणात आणल्यानंतर त्यांना निवडणुकीत जिंकून आणण्याचा निर्धार करत विनोद घोसाळकर हे अधिक कामाला लागल्याचे दिसून येत आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 10:10 am

'भाजपकडे पाहून संघाचे आकलन करणे चूक'

भोपाळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गणवेशाचा वापर करण्यात येत असला आणि शारीरिक कसरतींना प्राधान्य दिले जात असले तरीसुद्धा संघ ही काही निमलष्करी संघटना नाही. भाजपकडे पाहून संघाचे आकलन करून घेण्याचा प्रयत्न करणे हीदेखील एक मोठी चूक ठरेल,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा.स्व.संघ) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी केले.‘रा.स्व.संघ हा समाजाचे संघटन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असून त्यामध्ये काही निश्चित मूल्ये आणि विचार यावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. भारत पुन्हा परकीय शक्तीच्या तावडीमध्ये सापडू नये असे आम्हाला वाटते,’ असे प्रतिपादनही भागवत यांनी केले. भोपाळ येथे आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते. ‘आम्ही एक गणवेश घालतो, संचलन करतो आणि काठ्या हाती घेऊन कसरतीही करतो. पण केवळ त्यावरून जर कुणी आम्हाला निमलष्करी संघटना समजत असेल तर ती मोठी चूक ठरेल.’संघ समजून घेणे ही कठीण गोष्ट असून ती एक सर्वसमावेशक संघटना आहे. संघाच्या विरोधात चुकीचा प्रचार करण्यात येतो. हल्ली लोक योग्य माहिती गोळा करण्यासाठी मुळापर्यंत जातच नाहीत. ते विकीपीडियावर त्याचा शोध घेऊ लागतात. तिथे सगळीच माहिती बरोबर नसते, असे भागवत यांनी यावेळी सांगितले.संघ बाहेरील देणग्यांवर अवलंबून नाही : ‘संघाची आर्थिक स्थिती आता कोठे बरी आहे. आमचे संघटन हे बाहेरून येणारा निधी व देणग्यांवर अवलंबून नाही. मागील शंभर वर्षांच्या काळामध्ये आम्हाला असंख्य आव्हानांना सामोरे जावे लागले. स्वातंत्र्यानंतर प्रखर विरोध, हल्ले सहन करावे लागले. अनेक स्वयंसेवक त्यात मृत्युमुखी पडले. आम्हाला दडपण्याचे प्रयत्न हे आतापर्यंत सुरू होते पण ते सगळे निष्फळ ठरले,’ असे भागवत यांनी सांगितले.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 9:30 am

यंदाच्या वर्षात ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक ते महायुद्धाचा इशारा; एका क्लिकवर वाचा Top 10 News

१. राज्यात १५ हजार १५,९३१ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात राज्यातील २९ महापालिकांसाठी होणाऱ्या निवडणुकीत २,८६९ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यासाठी १५,९३१ उमेदवार रिंगणात आहेत. मुंबईमध्ये २२७ जागांसाठी १७०० उमेदवार रिंगणात आहेत. त्या पाठोपाठ १६५ जागांच्या निवडणुकीत ९६८ उमेदवारांनी माघार घेऊन देखील ११६६ उमेदवार रिंगणात आहेत. तर सर्वात कमी २३० उमेदवार इचलकरंजीमध्ये असून तेथे ६५ जागांसाठी […] The post यंदाच्या वर्षात ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक ते महायुद्धाचा इशारा; एका क्लिकवर वाचा Top 10 News appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 9:14 am

US attack on Venezuela : हातात बेड्या, डोळ्यावर पट्टी बांधून राष्ट्राध्यक्षाला आणलं उचलून, ट्रम्प यांच्याकडून Photo जारी

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक असा फोटो शेअर केला आहे, ज्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. व्हेनेझुएलाची राजधानी कराकसवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर, आता ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' प्लॅटफॉर्मवर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचा फोटो प्रसिद्ध केला आहे. ज्यात मादुरो यांच्या हातात हातकडी आणि डोळ्यावर पट्टी बांधल्याचं दिसत आहे.बेडरुममधून ओढत केली अटकमिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन 'डेल्टा फोर्स'ने एका गुप्त मोहिमेअंतर्गत मादुरो यांना त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. ज्यावेळी ही कारवाई झाली, तेव्हा मादुरो त्यांच्या बेडरुममध्ये झोपलेले होते. अमेरिकन सैन्याने त्यांना तिथून ओढत बाहेर काढले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अमेरिकन युद्धनौका 'USS Iwo Jima' वर ठेवण्यात आले असून त्यांना तिथून थेट न्यूयॉर्कला नेण्यात आले आहे. मादुरो यांना घेऊन अमेरिकन सैन्यदल न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहे.मी त्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले होते - ट्रम्पडोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं. ते म्हणाले, मी आठवड्याभरापूर्वी मादुरो यांच्याशी स्वतः संवाद साधला होता. मी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की तुम्हाला सरेंडर करावं लागेल. पण त्यांनी ऐकले नाही, अखेर आम्हाला ही कारवाई करावी लागली. तर दुसरीकडे, व्हेनेझुएलातील अनेक नेत्यांनी अमेरिकेच्या कारवाईचा निषेध केल्याचे वृत्त आहे. व्हेनेझुएलातील अनेक नेत्यांनी अमेरिकेच्या कृतीला 'थेट आक्रमण' असे संबोधले आहे. व्हेनेझुएलाने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची मागणी केली आहे. अमेरिका अनेक दिवसांपासून मादुरो सरकारवर ड्रग्ज तस्करीचे आरोप करत होती. अखेर ३ जानेवारी रोजी कॅराकस येथे अमेरिकेने हवाई हल्ले केले. अमेरिकन सैन्याने 'फुएर्ते तिउना' आणि 'ला कार्लोटा' सारख्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. या कारवाईमुळे दक्षिण अमेरिकेसह संपूर्ण जगात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 9:10 am

मादुरो यांना तातडीने सोडा, अन्यथा महायुद्ध

नवी दिल्ली : अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना ताब्यात घेतल्यामुळे उत्तर कोरियाचे किम जोंग-उन यांनी मादुरो हे आपले ‘मित्र’ असल्याचे सांगत अमेरिकेला उघडपणे महायुद्धाचा इशारा दिला आहे.किम जोंग-उन यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन नेतृत्वाकडे मागणी केली आहे की, त्यांनी तातडीने निकोलस मादुरो यांची सद्यस्थिती जाहीर करावी. ते म्हणाले की, अमेरिकेचे हे पाऊल जागतिक संघर्षाला जन्म देऊ शकते. व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना तातडीने सोडा अन्यथा याचे गंभीर आंतरराष्ट्रीय परिणाम होतील.रशियानेही अमेरिकेच्या या कारवाईचा कडक शब्दांत निषेध केला आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करून म्हटलं आहे की, अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या विरोधात ‘सशस्त्र आक्रमकता’ दाखवली आहे, जी अत्यंत चिंताजनक आणि निंदनीय आहे. अमेरिकेने दिलेले तर्क निराधार असून हे पाऊल मुत्सद्देगिरीऐवजी वैचारिक शत्रुत्वाने प्रेरित आहे. मॉस्कोने सर्व बाजूंना तणाव वाढवणे टाळण्याचे आणि चर्चेद्वारे मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 9:10 am

'मुंबईत १६ जानेवारीला महायुतीचा महाविजय होणार'

मुंबई : ‘१६ जानेवारी ही तारीख धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तिथी आहे. त्यादिवशी मुंबईत महायुतीचा महापौर बसवायचा आहे. त्यासाठी भाजप-शिवसेना-रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे. १६ तारखेचा विजय हा महाविजय असेल, हा माझा शब्द आहे’, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिला. त्याचप्रमाणे मुंबईला देशातील पर्यावरणपूरक शहर बनवण्यासाठी अर्थसंकल्पात १७ हजार कोटींची विशेष तरतूद करण्याचे आश्वासन दिले.मुंबई पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी वरळी येथे आयोजित महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशीष शेलार, नितेश राणे, यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मुंबईच्या डबेवाल्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. डबेवाल्यांच्या वतीने महायुतीला विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईत आज महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण तिथीनुसार माँसाहेब जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. १४ आणि १५ ही संक्रमणाची तारीख आहे, यावेळी आपल्याला चमत्कार घडवायचा आहे. १६ तारीख ही धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तिथी आहे. त्यादिवशी या मुंबईत महायुतीचा महापौर बसवायचा आहे. मुंबईकरांनी ही महापालिका आमच्या हातात द्यावी, पारदर्शी, प्रामाणिक कारभार करून आम्ही नवीन मुंबई घडवून दाखवू. आम्हाला केवळ पायाभूत सुविधा बदलायच्या नाहीत, तर मुंबईतील गोरगरीबांच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे. त्यासाठी मुंबईकरांचे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत”, असे आवाहन त्यांनी केले.‘वंदे मातरम्’ला विरोध करणाऱ्यांना थारा नाहीफडणवीस यांनी सांगितले की, आमचा कुठल्याही धर्माला विरोध नाही. आमचा त्या ताकदीला विरोध आहे, जी या हिंदुस्थानात, महाराष्ट्रात वंदे मातरम म्हणायला विरोध करते. या भारतात आमची कोणाशीही दुष्मनी नाही. पण, ज्याची भारताशी दुष्मनी आहे, त्याला आम्ही सोडणार नाही, ही आमची मानसिकता आहे. मुंबईतील सामान्य मराठी माणसाचे स्वप्न आम्हाला पूर्ण करायचे आहे. मराठी माणूस हद्दपार कोणामुळे झाला? तुम्ही सांगता मुंबई पालिकेत आम्ही ७० हजार कोटींच्या ठेवी जमा केल्या. पण, त्याच्या पावत्या आम्ही चाटायच्या का? ज्यावेळी गिरणी कामगार मुंबईच्या बाहेर जात होता, त्यावेळेस ७० हजार कोटीतले २-३ हजार कोटी खर्च केले असते, तरी माझ्या गिरणी कामगाराला याच मुंबईत हक्काचे घर मिळाले असते, असे फडणवीस म्हणाले.बुरखेवाली महापौर होणार म्हटल्यावर भोंगे बंदआदित्य आणि अमित ठाकरे यांच्या वचननाम्यावर टीका करताना ते म्हणाले, मुंबईत श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. त्यात काही अबोल बालके आहे. मेट्रो, कोस्टल रोड आम्ही केला, असा दावा ते करतात. पण, कोणत्याही मुंबईकराला अर्ध्या रात्रीत उठवून विचारा, ते सांगतील ही सगळी कामे महायुतीने केली. मुंबईचा महापौर कोण होणार, हा देखील मुद्दा आला. पण, मी पुन्हा सांगतो, मुंबईचा महापौर हा हिंदूच होणार, मराठीच होणार, महायुतीचाच होणार, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. वारीस पठाण म्हणाले, बुरखेवाली महापौर होणार. त्यावर एकही भोंगा बोलायला तयार नाही. त्यांच्या बॅटरीमधले सेल डाऊन झाले, असा टोलादेखील त्यांनी लगावला.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 9:10 am

“मुंबईचा महापौर महायुती, हिंदू आणि मराठीच होणार”; CM फडणवीसांची मोठी घोषणा, ठाकरे बंधूंवर झोंबणारी टीका म्हणाले…

Devendra Fadnavis : मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. काल मुंबई येथील वरळीतील भाजप आणि शिवसेनेच्या वतीने आयोजित मेळाव्यातून महायुतीच्या प्रचाराचा पहिला नारळ फुटला. मुंबईचा महापौर कोण होणार याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंचावरून थेट घोषणा करत मुंबईचा महापौर महायुती, हिंदू आणि मराठीच होणार असल्याचे मोठं विधान केले. तसेच यावेळी बोलताना फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर […] The post “मुंबईचा महापौर महायुती, हिंदू आणि मराठीच होणार”; CM फडणवीसांची मोठी घोषणा, ठाकरे बंधूंवर झोंबणारी टीका म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 8:44 am

संडे भावविश्व- कंगना रनोटने माझी 100 रुपये किंमत लावली:केस लढण्यासाठी जमीन विकली, 7.5 लाखांचे कर्ज, समोर आल्यावर कळेल खरी वाघीण कोण आहे

वाहेगुरु गुरुजीं का खालसा. वाहेगुरु जी की फतह. मी तीच महिंदर कौर आहे जिचे वर्णन कंगना रनोटने शेतकऱ्यांच्या आंदोलनात १०० रुपयांना जाणारी महिला म्हणून केले होते. कंगना बीबीने माझा फोटोही शेअर केला आणि लिहिले, ही तीच आजी आहे जी १०० रुपयांत आंदोलन करण्यासाठी उपलब्ध आहे. बीबीला हे माहिती असले पाहिजे की ही ८०-८२ वर्षांची महिला पैशासाठी निषेधार्थ गेली नव्हती, तर तिच्या मुलाचे आणि इतर पंजाबी लोकांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी गेली होती. मी स्वतः भटिंडातील महेंद्रगड जांडियन गावातील एका शेतकरी कुटुंबातून येते. मी गेल्या पाच वर्षांपासून भाजप खासदार कंगना रनोटविरुद्ध खटला लढत आहे आणि तिला शिक्षा होईपर्यंत मी लढत राहीन. तिला धडा शिकवेपर्यंत मी न्यायालयात जात राहीन. कंगनाच्या शब्दांनी माझ्यासह अनेक पंजाबी लोकांचे मन दुखावले आहे. कंगना प्रकरणामुळे माझ्यावर एकूण ७.५ लाख रुपयांचे कर्ज आहे. एका सावकाराचे आणखी ६२,००० रुपये देणे बाकी आहे. बँकेने माझ्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. माझ्याकडे ट्रॅक्टर नाही; मी दरवर्षी एक भाड्याने घेते. राजस्थानमध्ये माझी काही जमीनदेखील आहे, जी माझ्या स्वतःच्या नातेवाईकांनी बळकावली आहे. त्याबाबतही खटला सुरू आहे. कंगनाचा खटला असो किंवा माझ्या मालमत्तेचा खटला असो, मला दोन्ही ठिकाणी वकिलाला पैसे द्यावे लागतात. तो फक्त बोलण्यासाठी पैसे घेतो. मी माझी जमीन विकली आहे आणि त्याला लाखो रुपये दिले आहेत. मी कर्ज काढून काही जमीन विकली आहे. कंगनाच्या बाबतीत, शेतकरी गटांनीही मला मदत केली. मी अशिक्षित आहे. मला माझे वयही माहिती नाही. स्वातंत्र्याच्या वेळी मी दोन वर्षांची होते, त्यामुळे आता मी सुमारे ८२ वर्षांची असेन. जेव्हा आम्हाला माध्यमांमधून कळले की कंगनाने असे म्हटले आहे, तेव्हा पंजाबी संतापले. सर्वजण एकत्र आले. आमच्या संपूर्ण गावाने याबद्दल बैठक घेतली. गावाने तिच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला. तिला बोलण्याची काही शिष्टाचार शिकवली पाहिजेत. अन्यथा, सर्वजण उठून आम्हाला काहीही बोलतील. ज्यांनी हा निर्णय घेतला ते माझ्या मुलांसारखे होते; त्यांनी मला आईसारखे वागवले. या मुद्द्यावर संपूर्ण पंजाब एक झाला. शेतकरी संघटनांना परदेशातून मानहानीचे खटले दाखल करण्याचे फोन आले. मी पंजाब आणि पंजाबींसाठी लढत आहे. शेतकरी संघटनेची मुळे परदेशात पसरली आहेत आणि मदतही पोहोचली आहे. परदेशात आमची मुले संतापली होती. म्हणूनच मी खटला दाखल केला. मला तीन मुली आहेत; त्यांनी मला जाण्यापासून परावृत्त केले, पण मी थांबले नाही. तेव्हा मला कोणीही रोखले नाही. या सोमवारी, ५ जानेवारी रोजी कोर्टाची तारीख आहे. कंगना न्यायालयात हजर होईल. मी तिला अजून पाहिलेले नाही. मला तिला भेटायचे आहे. मला पाहायचे आहे की ती किती मोठी शेरनी आहे, जिने एका शेतकऱ्याच्या मुलाच्या शेरनी आईबद्दल अपशब्द वापरले. ती तरुण आहे, भाजप खासदार आहे, श्रीमंत आहे आणि एक अभिनेत्री आहे. तरीही, ती माझ्यासमोर का हजर होत नाही? तिला कशाची भीती आहे? ती सुरक्षिततेत फिरते. मी गरीब, म्हातारी आणि शेतकरी कुटुंबातील आहे, पण गेल्या पाच वर्षांत मी हार मानलेली नाही. मी रिकाम्या हाताने न्यायालयात जाते. मला तिची किंवा तिच्या सरकारची भीती वाटत नाही. मी तिला विचारू इच्छिते की, १०० रुपयांसाठी कोणताही शेतकरी निषेध करेल का? तिला वाटते का की आपण तिला मारू? जर ती शेरनी असेल तर तिने पुढे यावे; ती का मागे हटत आहे? ती लपून बसली आहे, मी नाही. इतके शिक्षित असूनही, ती फक्त मोठ्या नेत्यांना खूश करण्यासाठी आणि तिकीट मिळवण्याच्या लोभात आम्हाला दहशतवादी आणि माओवादी म्हणते याचा मला राग येतो. ती म्हणाली की इंदिराजींच्या दंगलींमध्ये आम्हाला डासांसारखे चिरडले गेले. आम्ही अन्नदाते आहोत. आम्ही पिकवतो ते अन्न संपूर्ण देश खातो, अगदी कंगना देखील. तरीही, ती आम्हाला कीटक मानते. शेतीबद्दल थोडेसेही माहिती नसलेली व्यक्ती महिला शेतकऱ्यांविरुद्ध अशा गोष्टी बोलते याचे मला दुःख आहे. कंगनाला भरभराटीचा पंजाब आवडत नाही. कंगनाने माझी माफी मागावी. त्याने किमान मला विचारावे की मी त्याला माफ करेन का. त्याने न्यायाधीशांची माफी मागितली, पण मी मान्यही केले नाही. पाच वर्षे न्यायालयात एकट्याने ढकलल्यानंतर, माफीचा प्रश्नच उद्भवत नाही. माफीची वेळ संपली आहे. मी जेव्हा जेव्हा तिथे गेलो तेव्हा त्याने न्यायालयात यावे. त्याने मला भेटावे, त्याने माझ्यासमोर यावे. मला त्याला धडा शिकवायचा आहे. मला त्याला धडा शिकवायचा आहे. कंगनाला हे माहिती असायला हवे की अशा समुदायाला चिथावणी देणे सोपे नाही. बीबी कंगना, कृपया तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवा आणि कठोर शब्द वापरणे टाळा. सावधगिरीने बोला, पण शहाणे राहा. मी तिला पुन्हा सांगेन: बीबी, तिला जगू द्या, पण किमान न्यायालयात या. माझ्याकडे एकूण १२ किल्ले (जमीन मोजण्याचे एकक) जमीन आहे. माझा एक मुलगा आहे. मी त्याला रात्री शेतात काम करताना आणि त्यांना पाणी देताना पाहिले आहे. या वयात मी स्वतः भात पेरतो. माझा मुलगा पीक वाढवण्यापासून ते बाजारात नेण्यापर्यंत सर्व काही करतो. इतके कष्ट कोण सहन करू शकेल? या वयातही मी स्वतः सर्वकाही करते. मी चहा बनवते आणि अन्न शिजवते. महिंदर कौर घरी चहा बनवत आहेत. पाऊस असो, वादळ असो, थंडी असो किंवा उष्णता असो, आपण शेतातच राहतो. शेतकरी कधीच थांबत नाही. चार महिन्यांपूर्वी, शेतात भात पेरताना माझ्या एकुलत्या एका मुलाला साप चावला. विष त्याच्या रक्तात शिरले. तो अंथरुणाला खिळला आहे. चार महिन्यांनंतर, डॉक्टरांनी अखेर सांगितले की कोणताही धोका नाही. मी माझ्या सुनेसोबत शेतकऱ्यांच्या आंदोलनात गेलो होतो. ती माझ्यासोबत २०० दिवस तिथेच बसली. तिला तीव्र सर्दी झाली आणि तिला न्यूमोनिया झाला, ज्यातून ती बरी होऊ शकली नाही. अखेर ती मरण पावली. माझा मुलगा अंथरुणाला खिळलेला आहे आणि माझी सून मरण पावली आहे. त्यांना मुले नाहीत. माझे घर पहा; ते अजून बांधलेले नाही. आम्ही अशिक्षित असू शकतो, पण आम्ही सिंहीणी आहोत. खरं तर, जेव्हा मोदी सरकारने हे काळे कायदे लागू केले, तेव्हा आमच्या गावातील गुरुद्वारात दररोज घोषणा होऊ लागल्या. गाव परिषद आणि शेतकरी संघटनेच्या प्रमुखांनी हे कायदे आणि त्यांचा शेतकऱ्यांवर होणारा परिणाम पंजाबीमध्ये अनुवादित केला आणि आम्हाला सांगितले. तेव्हाच आम्हाला काय घडत आहे हे समजले. आम्ही दररोज गुरुद्वारात जाऊ लागलो, जिथे आम्हाला या कायद्यांबद्दल सांगितले जात असे. आम्हाला सांगण्यात आले की आमच्या मुलांना त्यांच्या जमिनींवरून हाकलून लावले जात आहे. आम्हाला आमच्या स्वतःच्या जमिनीवर रोजंदारी कामगार म्हणून काम करण्यास भाग पाडले जाईल. तुम्हाला वाटते का आम्ही शेतकरी रोजंदारी कामगार म्हणून काम करू शकतो? एकदा आम्हाला या कायद्याची संपूर्ण व्याप्ती समजली की, आम्ही सर्वजण दिल्लीला निघालो. जेव्हा आमचे मुलगे निषेध करत असतात, तेव्हा आई घरी कशी राहू शकतात? आम्ही शुद्ध पंजाबी आहोत. मुले आणि महिला सारखेच, प्रत्येकजण आपल्या मुलांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी घराबाहेर पडला. तिथे आम्हाला उष्णता, पाऊस, धुके आणि थंडी अनुभवायला मिळाली. आम्हाला कोणते त्रास सहन करावे लागले नाहीत? पावसाळ्यात आम्ही ट्रॉलीमध्ये बसून प्रवास केला. वादळामुळे आमचे तंबू उडून गेले, पण आम्ही ते पुन्हा उभारले. त्रास आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे होता, पण आम्ही चिकाटीने टिकून राहिलो. तिथे आमच्याकडे कोणतेही वाडे नव्हते, पण आम्ही महिला नेहमीच त्या पुन्हा बांधायचो. सरकारांनी आमच्या वृद्धापकाळाचा त्रास सहन केला, पण देवाने आम्हाला साथ दिली. या सरकारने आमच्यावर लादलेला त्रास आम्ही कधीही विसरणार नाही आणि कंगना म्हणते की ती फक्त काहीशे रुपये घेऊन निषेधाला आली होती. आम्ही तिथे फिरायला किंवा ऐषोआराम करण्यासाठी गेलो नव्हतो. उलट, आमच्यावर वेळ आली होती. कंगना स्वतः प्रेमाच्या सावलीत होती आणि पैशाशी खेळत होती. आपल्याकडे कसली सावली आणि पैसा आहे? आपण धान्य पिकवू, ते खाऊ आणि देशाला पोसू. मला माहित नाही की कंगना पंजाबचे वाईट का इच्छिते. सरकारने लोकांचे कल्याण सुनिश्चित करावे; जर जनता असेल तरच ते राज्य करू शकतील. हे माझ्यासमोर आहे, मी २०० दिवसांपासून शेतकऱ्यांच्या निषेधात बसलो आहे. माझ्यासमोर इतके शेतकरी मरण पावले. मी रडणाऱ्या माता पाहिल्या आहेत. त्या सर्व मला विसरत नाहीत. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कोर्टात कंगनाशी लढेन. मी मागे हटणार नाही. कंगना रनोटला कोर्टात आव्हान देणाऱ्या महिंदर कौर. (महिंदर कौरने दिव्य मराठीच्या रिपोर्टर मनीषा भल्लासोबत शेअर केल्या या भावना)

दिव्यमराठी भास्कर 4 Jan 2026 8:38 am

सबरीमाला मंदिरातून चोरी 6 कोटींचे सोने कुठे गेले:आंतरराष्ट्रीय रॅकेट-अंडरवर्ल्डच्या सहभागाचा संशय, साक्षीदार-पुरावे पण चार्जशीट नाही

केरळमधील सबरीमाला मंदिरातून चोरी झालेल्या 4.5 किलो सोन्यावरून वाद वाढत आहे. एसआयटी (SIT) तपासात असे पुरावे मिळाले आहेत, ज्यामुळे आता हे प्रकरण मंदिराच्या द्वारपालकांच्या मूर्तींमधून सोने चोरी होण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. केरळ पोलिसांचा दावा आहे की, या चोरीमध्ये मंदिर प्रशासन आणि अनेक प्रभावशाली राजकीय व्यक्ती सामील असू शकतात. यात मोठ्या आंतरराष्ट्रीय मूर्ती तस्करी रॅकेट आणि अंडरवर्ल्ड नेटवर्कचा सहभाग असण्याचीही शक्यता आहे. आता ज्यांच्या देखरेखीखाली ही गडबड उघडकीस आली, ते लोक प्रश्नांच्या घेऱ्यात आहेत. 12 डिसेंबर रोजी केरळच्या विशेष न्यायालयाने त्रावणकोर देवस्वोम बोर्ड (TDB) चे माजी अध्यक्ष आणि सीपीआय (एम) (CPI(M)) नेते ए. पद्मकुमार यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. तर, 17 डिसेंबर रोजी मंदिर मंडळाशी संबंधित प्रशासकीय अधिकारी श्रीकुमार यांना अटक करण्यात आली आहे. तपासात असे समोर आले आहे की, मंदिराच्या गर्भगृहाच्या मुख्य दरवाजातून आणि द्वारपालकांच्या मूर्तींमधून सोन्याचे थर काढून बाहेर पाठवण्यात आले. केरळ पोलिसांनी एका अनिवासी भारतीय (NRI) व्यक्तीलाही अटक केली आहे, ज्याने चौकशीत तामिळनाडूच्या दिंडीगुलमध्ये राहणारे डी. मणि आणि केरळचे रहिवासी उन्नीकृष्णन पोट्टी यांना चोरीचे सूत्रधार (मास्टरमाइंड) सांगितले. तर, केरळ भाजप अध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांचा आरोप आहे की, LDF सरकारच्या कार्यकाळात मंदिरातील 4 पंचधातूंच्या मूर्ती बाहेर काढून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कला विकण्यात आल्या. आतापर्यंत या प्रकरणात TDB चे माजी अध्यक्ष पद्मकुमार यांच्यासह 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप आरोपपत्र (चार्जशीट) दाखल झालेले नाही. या प्रकरणात केरळ आणि तामिळनाडूचे दोन सोन्याचे व्यापारीही रडारवर आहेत. दिव्य मराठीने या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या तपासाचा शोध घेतला आणि घटनेसाठी जबाबदार असलेल्यांची यादी केली आहे. तज्ज्ञ आणि केरळ पोलिसांच्या सूत्रांकडून हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न केला की शबरीमला येथील चोरीमागे अंडरवर्ल्ड नेटवर्कचा हात असू शकतो का. केरळमधील राजकीय पक्षांचे मतही जाणून घेतले. संपूर्ण रिपोर्ट वाचा… सर्वात आधी त्या पात्रांकडे वळूया, जे केरळ पोलिसांच्या रडारवर आहेत… शबरीमला मंदिरातून 4.5 किलो सोने चोरी झाल्याप्रकरणी केरळचा नंबूदरी उन्नीकृष्णन पोट्टी हा मुख्य आरोपी आहे. पोट्टीला दोन प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे.1. मंदिर प्रशासनासोबत मिळून द्वारपालांच्या मूर्तींवर लावलेल्या सोन्याच्या प्लेट्स चोरल्या.2. TDB बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार गर्भगृहाचे सोन्याने मढवलेले दरवाजे तांब्याच्या प्लेट्स असल्याचे सांगून हटवले. प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, उन्नीकृष्णन पोट्टी यांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी द्वारपालक मूर्तींवर सोन्याचा मुलामा चढवण्यासाठी चेन्नईतील 'स्मार्ट क्रिएशन्स' नावाच्या फर्मकडे नेले होते. त्यावेळी तिरुवभरणम आयुक्त आरजी राधाकृष्णन यांनी महाजर (सरकारी दस्तऐवज) मध्ये सांगितले होते की, सोन्याचा मुलामा चढवण्यापूर्वी 38,258 ग्रॅम तांब्याच्या पॅनल्सची तपासणी करण्यात आली होती. या संबंधित दस्तऐवजावर पोट्टी यांची स्वाक्षरी देखील आहे. अशा परिस्थितीत, 1999 मध्ये व्यावसायिक विजय मल्ल्या यांनी ज्या पॅनल्सवर सोन्याचा मुलामा चढवला होता, ते पॅनल्स 2019 पर्यंत तांब्याचे कसे झाले, हा मोठा प्रश्न आहे. एसआयटीच्या सूत्रांनी सांगितले की, 'या प्रकरणात एका मल्याळी एनआरआय व्यावसायिकाची चौकशी करण्यात आली, ज्याने कबूल केले आहे की मंदिरात झालेल्या चोरीत पोट्टी यांचा मोठा हात होता. सबरीमालामध्ये 2019 आणि 2020 दरम्यान मोठ्या प्रमाणावर मूर्तींची तस्करी झाली. याच दरम्यान पंचधातूच्या 2 मूर्ती एका आंतरराष्ट्रीय मूर्ती तस्करी करणाऱ्या टोळीला विकण्यात आल्या. त्या तामिळनाडूचे रहिवासी डी. मणी यांनी विकत घेतल्या होत्या.' ’एनआरआय व्यक्तीने खुलासा केला आहे की उन्नीकृष्णन पोट्टी खरेदीदार आणि मंदिर प्रशासन यांच्यातील वाटाघाटीत मध्यस्थ होता, कारण त्यावेळी सबरीमालामध्ये प्रशासकीय जबाबदारी सांभाळणाऱ्या एका उच्च अधिकाऱ्याने मूर्ती उपलब्ध करून देण्यात मोठी भूमिका बजावली होती.’ एसआयटीला दिलेल्या निवेदनात एनआरआय व्यापाऱ्याने सांगितले की, मूर्तींच्या खरेदीवेळी उन्नीकृष्णन पोट्टीसोबत डी. मणी आणि सबरीमालाचे शीर्ष अधिकारी उपस्थित होते. आता केरळ पोलीस त्यांना एकेक करून पकडत आहे. या प्रकरणात 17 डिसेंबर रोजी टीडीबीचे (TDB) माजी प्रशासकीय अधिकारी एओ श्रीकुमार आणि 29 डिसेंबर रोजी मंदिर मंडळाचे सदस्य राहिलेले एन. विजयकुमार यांना अटक करण्यात आली आहे. उन्नीकृष्णन पोट्टी व्यतिरिक्त, या प्रकरणातील दुसरा सूत्रधार तामिळनाडूचा मूर्ती व्यापारी डी. मणी आहे. त्याचे खरे नाव बालमुरुगन आहे. केरळ पोलिसांमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, डी. मणीपर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण काम होते. मात्र, केरळ काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला यांनी 14 डिसेंबर रोजी स्वतः एसआयटीशी संपर्क साधून त्यासंबंधीची महत्त्वाची माहिती दिली. 'त्याच माहितीच्या आधारावर SIT टीमला चेन्नईला पाठवण्यात आले. जिथे अनेक दिवसांच्या पाळत ठेवल्यानंतर आणि पाठलाग केल्यानंतर डी मणिचा शोध लागला. चेन्निथला व्यतिरिक्त डी मणिचे नाव NRI व्यावसायिकानेही घेतले होते. त्याने आरोप केला की डी मणि त्या टोळीचा भाग होता, जी दक्षिणेकडील मंदिरांमधील मूर्तींच्या तस्करीचे मोठे नियोजन करत होती. त्यांच्या निशाण्यावर तिरुवनंतपुरमचे पद्मनाभस्वामी मंदिरही होते.’ 'व्यावसायिकाने आपल्या निवेदनात हे उघड केले की आंतरराष्ट्रीय बाजारात डी मणि याला लोक 'डायमंड मनी' आणि 'दाऊद मनी' यांसारख्या नावांनी ओळखत होते. त्याची टोळी केरळमधील मंदिरांमधून सुमारे 1000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे नियोजन करत होती.' एसआयटी सूत्रांनुसार, आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात सोन्याच्या पत्र्या आणि दुर्मिळ मूर्ती मोठ्या किमतींना खरेदी-विक्री केल्या जातात. विशेषतः जेव्हा त्यांची अंडरवर्ल्ड नेटवर्कद्वारे विक्री केली जाते. चौकशीत असेही समोर आले आहे की, ही टोळी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि आखाती देशांमध्ये कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय तस्करांना मूर्ती पुरवत होती. ते या दुर्मिळ कलाकृतींसाठी कोट्यवधी रुपये देण्यास तयार होते. या प्रकरणी एसआयटीने 30 आणि 31 डिसेंबर रोजी डी. मणीची चौकशी केली. या चौकशीत त्यांना कोणताही मोठा पुरावा मिळालेला नाही. मणीने केरळ पोलिसांना सांगितले की तो तिरुवनंतपुरममध्ये फक्त दोनदा आला होता. तो एनआरआय व्यावसायिकाला ओळखत नाही आणि उन्नीकृष्णन पोट्टीलाही ओळखत नाही. मणीच्या चौकशीनंतर एसआयटी या निष्कर्षावर पोहोचली आहे की तो इरिडियम फसवणूक टोळीचा भाग असू शकतो. सध्या डी. मणीला सोडून देण्यात आले आहे, परंतु त्याची पुढील चौकशी होऊ शकते. सबरीमाला सोने चोरी प्रकरणात सर्वात मोठे नाव माजी TDB अध्यक्ष आणि CPI(M) आमदार ए पद्मकुमार यांचे आहे. पद्मकुमार 2019 मध्ये मंदिर मंडळाचे अध्यक्ष होते. आरोप आहे की 19 मार्च 2019 रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर मंडळाची बैठक झाली होती. यानंतर गर्भगृहाच्या मुख्य दरवाजावर लावलेल्या सोन्याच्या प्लेट्स उन्नीकृष्णन पोट्टी यांना सोपवण्याचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला. SIT ला संशय आहे की याच प्रक्रियेदरम्यान मंदिरातून सोने गायब झाले असावे. SIT सूत्रांनी सांगितले, '29 डिसेंबर रोजी चोरीच्या या प्रकरणात पद्मकुमार यांची भूमिका योग्य असल्याचे सिद्ध झाले. जेव्हा TDB चे माजी सदस्य एन विजयकुमार यांनी SIT ला सांगितले की त्यांनी पद्मकुमार यांच्या सांगण्यावरूनच सोन्याचा मुलामा चढवण्याच्या कामाशी संबंधित महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली होती.' 69 वर्षांचे पद्मकुमार सध्या केरळ पोलिसांच्या न्यायिक कोठडीत आहेत. गेल्या 12 डिसेंबर रोजी कोल्लम न्यायालयात पद्मकुमार यांचे वकील राजन यांनी त्यांचे वाढते वय आणि आरोग्याच्या समस्यांचा हवाला देत जामीन अर्ज दाखल केला होता, जो फेटाळण्यात आला. आता PMLA-मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ईडीकडे त्यांच्या झडतीचे आणि जप्तीचे अधिकार आहेत. अशा परिस्थितीत पद्मकुमार यांच्या जामिनावर अनेक महिन्यांपर्यंत बंदी कायम राहू शकते. केरळ आणि तामिळनाडूचे 2 सोन्याचे व्यावसायिकही रडारवर केरळ एसआयटीने या प्रकरणात कर्नाटकचे सोन्याचे व्यापारी गोवर्धन आणि चेन्नईचे व्यावसायिक पंकज भंडारी यांनाही तितकेच दोषी मानले आहे. आरोप आहे की दोघांनी चौकशीदरम्यान केरळ पोलिसांकडून केवळ महत्त्वाचे पुरावेच लपवले नाहीत, तर अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. 24 डिसेंबर रोजी कर्नाटकच्या बेल्लारी येथील गोवर्धनच्या 'रोड्डम ज्वेलरी' शोरूमवर छापा टाकण्यात आला. यावेळी पोलिसांनी दुकान बंद करून अनेक तास स्टॉक रजिस्टर, खरेदी-विक्रीचे रेकॉर्ड आणि लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांची तपासणी केली. तपास पथकाचे असे मत आहे की मंदिराच्या सोन्याच्या मूळ प्लेट्स अजूनही गायब आहेत, ज्या परत मिळवण्यासाठी गोवर्धनच्या ठिकाणांवर दुसऱ्यांदा छापेमारी करण्यात आली. पहिल्या कारवाईत बेल्लारीतून 470 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले होते, परंतु त्या सोन्याचा संबंध सबरीमाला मंदिराशी आढळला नाही. आता आरोपी गोवर्धनने केरळ उच्च न्यायालयात धाव घेत एसआयटीवर छळाचे आरोप केले आहेत. मंदिरातून 500 कोटी रुपयांचे सोने चोरी झाल्याचा दावाजसजशी चौकशीची व्याप्ती वाढत आहे, तसतसे केरळ उच्च न्यायालयही एसआयटी चौकशीच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे. मंदिरातून बेपत्ता झालेल्या सोन्याचा शोध घेण्यास होणारा विलंब, चौकशी आणि साक्षीदारांच्या कमतरतेबद्दल न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयाने हा प्रश्नही उपस्थित केला आहे की, सोन्याच्या मूळ सळ्यांची तस्करी करून त्याऐवजी सोन्याचा मुलामा दिलेल्या तांब्याच्या सळ्या ठेवण्यात आल्या आहेत का. उच्च न्यायालयाच्या कठोरतेनंतर शबरीमाला मंदिरात ठेवलेले सोने वैज्ञानिक चाचणीसाठी विक्रम साराभाई अंतराळ केंद्र (VSSC) येथे पाठवण्यात आले आहे. चाचणीचा निकाल आल्यानंतर सोन्यात खरोखरच भेसळ झाली आहे का, हे सिद्ध होईल. सोने घोटाळ्याप्रकरणी एसआयटीला महत्त्वाची माहिती देणारे काँग्रेस नेते रमेश चेन्निथला म्हणतात, ‘उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, भारतातील मंदिरांमधून धातूच्या दुर्मिळ मूर्तींच्या अवैध खरेदी-विक्रीमध्ये यापूर्वीही सुभाष कपूरसारखे परदेशी तस्कर सामील होते. अशा परिस्थितीत हे शक्य आहे की शबरीमाला मंदिरातून जे सोने आणि मौल्यवान वस्तू काढण्यात आल्या, त्यांना जुन्या मौल्यवान वस्तू म्हणून विकले गेले असावे.‘ ‘मंदिरातील सोन्याच्या चोरीत टीडीबी बोर्डाच्या जुन्या अधिकाऱ्यांच्या संगनमताला नाकारता येणार नाही. माझा अंदाज आहे की गायब झालेल्या मालमत्तेची किंमत सुमारे 500 कोटी असू शकते.‘ या प्रकरणात माजी TDB अध्यक्ष पद्मकुमार यांच्यासह 10 जणांना अटक करण्यात आली आहे. तपासाला गती देण्यासाठी 30 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने SIT मध्ये दोन सर्कल इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी 14 जानेवारी 2026 रोजी होईल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की - प्रकरणाच्या तपासाची दिशा योग्य आहे, पण गती मंद आहेकेरळचे ज्येष्ठ पत्रकार केए शाजी सबरीमाला सुवर्ण घोटाळा प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांचे मत आहे की प्रकरणाचा तपास योग्य दिशेने नक्कीच आहे, पण गती खूप मंद आहे. एसआयटीने डी. मणी आणि उन्नीकृष्णन पोट्टी यांसारख्या महत्त्वाच्या नावांना पकडले आहे, पण अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की चोरी झालेले सोने कुठे आहे आणि कोणाला विकले गेले आहे. आरोपपत्रही दाखल झालेले नाही. जोपर्यंत पैशांचा माग (मनी ट्रेल) समोर येत नाही, तोपर्यंत हे प्रकरण केवळ अटकेपुरतेच मर्यादित राहील. केए शाजी म्हणतात, ‘दक्षिण भारतातील मोठ्या मंदिरांमध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे दान आणि मौल्यवान वस्तू अर्पण केल्या जातात, पण त्याचा अचूक तपशील सामान्य जनतेसमोर कधीही पारदर्शकपणे ठेवला जात नाही. जर मंदिरांना दरवर्षी मिळणाऱ्या देणग्या आणि अर्पणांचे सार्वजनिक लेखापरीक्षण (ऑडिट) केले गेले आणि भक्तांना त्याचा तपशील दिला गेला तर याचे दोन मोठे फायदे होतील.’ 1. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक देणगीचा अचूक आणि दस्तऐवजीकरण केलेला हिशेब ठेवला जाईल.2. मंदिर प्रशासन आणि टेंपल बोर्डची जबाबदारी वाढेल, ज्यामुळे खजिना आणि मौल्यवान मालमत्तांबाबतची निगरानी आणि सतर्कता अधिक मजबूत होईल. राजकीय पक्ष काय म्हणत आहेत… भाजप: मूर्ती आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कला विकल्या गेल्या, CBI चौकशी व्हावीकेरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर म्हणतात, 'हे प्रकरण भगवान अयप्पा मंदिरातून लुटलेल्या 4.5 किलो सोन्यापुरते मर्यादित नाही. यात काही लोकांच्या अटकेने काम होणार नाही. हे एक मोठे राजकीय षड्यंत्र आहे, जे काँग्रेस-UDF च्या राजवटीत सुरू झाले आणि माकप-LDF च्या राजवटीत खूप वाढले. त्यामुळे या प्रकरणात केवळ SIT चौकशी पुरेशी नाही. CBI कडे हे प्रकरण लवकरात लवकर सोपवले पाहिजे.' 'हा केवळ आर्थिक गुन्हा नाही, तर एक धार्मिक आणि राजकीय षड्यंत्र आहे. 2015 मध्येही UDF राजवटीत बदललेल्या पवित्र 'पठिनेट्टम पदी' (मंदिराकडे जाणाऱ्या सोन्याच्या 18 पायऱ्या) च्या काही भागांशी छेडछाड करण्यात आली. या प्रकरणातही चोरी झाली. भाजप अयप्पा भक्तांसाठी न्यायाची लढाई सुरू ठेवेल.' काँग्रेस: चौकशीतील त्रुटी उघड करूकेरळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन म्हणतात, 'शबरीमला सोने चोरी प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी सर्वात आधी काँग्रेसनेच केली होती. आम्ही यावर जास्त जोर दिला नाही कारण केरळ उच्च न्यायालयाने स्वतः या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली होती. जर न्यायालयाने हस्तक्षेप केला नसता तर ही चोरी आजही सुरू राहिली असती. 2019 मध्ये झालेली चोरी 2026 मध्येही झाली असती.' 'मुख्यमंत्री कार्यालयाच्या इशाऱ्यावर दोन वरिष्ठ आयपीएस अधिकारी एसआयटीवर खूप दबाव टाकत आहेत. मला त्यांची नावे घ्यायची नाहीत. या दोघांना या प्रकरणातून काढून टाकले पाहिजे, अन्यथा या अधिकाऱ्यांची नावे उघड केली जातील.' LDF: शबरीमलावर UDF आणि BJP खोटे पसरवत आहेतLDF मध्ये समाविष्ट असलेल्या CPM चे प्रदेश सचिव एम.व्ही. गोविंदन् म्हणतात, 'शबरीमला प्रकरणाची चौकशी सुरू आहे, तरीही विरोधी पक्ष याला निवडणुकीचा मुद्दा बनवत आहेत. काँग्रेस याचा फायदा घेऊ इच्छिते. UDF आणि BJP ने शबरीमलासारख्या मुद्द्यांवर खोटा प्रचार केला. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.' केसमध्ये आरोपी बनवलेल्या पद्मकुमारवर पक्ष कारवाई करेल का? या प्रश्नावर गोविंदन् म्हणतात, 'CPM असा पक्ष नाही जो बातम्यांच्या आधारावर कारवाई करतो. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच आम्ही कोणताही निर्णय घेऊ.' UDF: एसआयटी चौकशी सुरू झाल्यानंतर प्रकरण मंदावले UDF मध्ये समाविष्ट असलेल्या रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी (RSP) चे ज्येष्ठ नेते शिबू बेबी जॉन यांनी या प्रकरणाच्या चौकशीच्या दिशेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केरळ उच्च न्यायालयात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, एसआयटी चौकशी सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांपासून हे प्रकरण खूप संथ गतीने पुढे सरकत आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Jan 2026 8:23 am

आपापसात सेटिंग करू नका, रविंद्र चव्हाणांचा इशारा

पिंपरी चिंचवड : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शहरातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला. तसेच अंतर्गत सेटिंग करणाऱ्या नेत्यांचे कान टोचले आहेत.सेटिंग करणाऱ्यांना इशाराशहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि राष्ट्रवादीचे नाना काटे यांच्यातील कथित छुप्या युतीवरही त्यांनी निशाणा साधला आहे. एकाच प्रभागातून लढताना दोन भाजप आणि दोन राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्याच्या सेटिंगच्या चर्चेवर चव्हाण चांगलेच संतापले आहेत. या विधानामुळे स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि छुप्या युतीला चाप बसणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.अजिबात शायनिंग मारायची नाही, सेटिंगही करायची नाही, रविंद्र चव्हाण यांची तंबीभाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा असलेल्या नाना काटे यांच्याविरोधात निवडणूक लढवणे टाळले. नाना काटे हे पिंपळे सौदागरच्या प्रभाग क्रमांक २८ मधून निवडणूक लढवित आहेत. मात्र त्यांच्यासमोर निवडणूक लढवणे शत्रुघ्न काटे यांनी मुद्दाम टाळल्याची चर्चा आहे. त्याचवेळी पॅनेलच्या बाहेर जाऊन कुणीही स्वतंत्रपणे प्रचार करण्याचा प्रयत्न करू नये. अजिबात शायनिंग मारायची नाही. सेटिंगही करायची नाही. पॅनेलच्या उमेदवारच निवडून आणायचे, अशी तंबी रविंद्र चव्हाण यांनी दिली. त्यांचा रोख शत्रुघ्न काटे यांच्याकडे होता, अशी चर्चा सध्या शहराच्या राजकीय वर्तुळात आहे.

फीड फीडबर्नर 4 Jan 2026 8:10 am

बस चालवायचे मादुरो, सत्य साईबाबांचे भक्त होते:व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती कसे बनले; अमेरिकेवर 3 जीवघेण्या हल्ल्यांचे आरोप, आता कैदेत

8 डिसेंबर 2012 चा दिवस. व्हेनेझुएलाचे कर्करोगग्रस्त अध्यक्ष ह्यूगो चावेझ आणि त्यांचे जवळचे निकोलस मादुरो लोकांसमोर टीव्ही स्क्रीनवर आले. चावेझ दोन महिन्यांपूर्वीच हेन्रिक कॅप्रिल्स यांना हरवून चौथ्यांदा व्हेनेझुएलाचे अध्यक्ष बनले होते. निवडणुकीदरम्यान त्यांनी कर्करोगाची गोष्ट लपवली होती. टीव्हीवर त्यांनी संविधानाची एक प्रत हातात फिरवत जनतेला सांगितले, 'माझा कर्करोग परत आला आहे आणि पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे माझा अगदी स्पष्ट, अटल आणि दृढ सल्ला आहे की तुम्ही निकोलसला अध्यक्ष म्हणून निवडा. मी तुम्हाला मनापासून विनंती करत आहे, जर मी राहिलो नाही, तर फक्त निकोलस त्या तरुण नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांच्यात सत्ता सांभाळण्याची प्रचंड क्षमता आहे.' 3 महिन्यांनंतर चावेझ यांचा मृत्यू झाला आणि मादुरो पुढील राष्ट्रपती बनले. राष्ट्रपतिपदाच्या रांगेत चावेझचे जावई देखील होते. आता 12 वर्षे सत्तेत राहिल्यानंतर मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकन सैनिकांनी काल राजधानी कराकस येथून उचलून आणले आहे. त्यांच्यावर अमेरिका कैद्याप्रमाणे खटला चालवेल.शेवटी एका सामान्य बस चालकापासून व्हेनेझुएलाचे ‘अजेय राष्ट्रपती’ मादुरो कसे बनले, ते खरोखरच धोकादायक ड्रग कार्टेल चालवत होते का, अमेरिकेचे शत्रू कसे बनले, दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया… 1960 चे दशक. या काळात जर अमेरिकेतील प्रत्येक व्यक्ती सरासरी 100 रुपये कमवत असेल, तर व्हेनेझुएलामधील प्रत्येक व्यक्ती 82 रुपये कमवत होता. तेल उत्पादनाने व्हेनेझुएलाला इतका श्रीमंत देश बनवले होते की त्याला ‘लॅटिन अमेरिकेचे सौदी अरेबिया’ म्हटले जाऊ लागले होते. याच काळात व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये 13 नोव्हेंबर 1962 रोजी निकोलस मादुरो यांचा जन्म झाला. बाहेरून व्हेनेझुएलाची जी चकाचौंध दिसत होती, आतील वास्तविकता त्यापेक्षा खूप वेगळी होती. तेलातून मिळणारे उत्पन्न फक्त उच्चभ्रू वर्गाला मिळत असे, देशातील बहुतेक लोक खूप गरीब होते. मादुरोचे वडील जीसस निकोलस कामगारांच्या ट्रेड युनियनचे नेते होते. आई टेरेसा गृहिणी होत्या, ज्या व्हेनेझुएलाच्या शेजारील देश कोलंबियाच्या रहिवासी होत्या. येथेच त्यांचे जीसस निकोलस यांच्याशी लग्न झाले आणि दोघेही व्हेनेझुएलाला आले. पुढे जाऊन ही गोष्ट मादुरोच्या राजकीय कारकिर्दीतील एक मोठा अडथळा ठरणार होती. रॉक म्युझिक आणि बेसबॉल व्यतिरिक्त, लहानपणापासूनच मादुरोला आणखी एक आवड होती - राजकारण. मादुरोने हायस्कूलचे शिक्षण अर्धवट सोडले. 21 वर्षांच्या वयात ते व्हेनेझुएलाचे डावे नेते जोस विसेंट रेंगल यांचे अंगरक्षक बनले. त्यानंतर त्यांनी बस चालवायला सुरुवात केली. पुढे ते ट्रेड युनियनचे नेतेही बनले. 1980 च्या दशकात मादुरो यांनी क्युबाला जाऊन पॉलिटिकल स्टडीजचा कोर्स केला. येथे लॅटिन अमेरिकेतील डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना शिक्षण दिले जात असे. त्यांचे राजकीय विरोधक आरोप करतात की क्युबामध्ये राहत असताना तेथील गुप्तचर संस्थेने मादुरो यांना एजंट म्हणून कामावर ठेवले होते. हा तो काळ होता, जेव्हा तेलाच्या किमती घसरल्यामुळे व्हेनेझुएलामध्ये आर्थिक अस्थिरता आली होती. याविरोधात ह्यूगो चावेझ यांनी क्रांती सुरू केली, जे पुढे व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती आणि मादुरो यांचे गुरु बनले. 1992 मध्ये चावेझ यांनी व्हेनेझुएलामध्ये सत्तापालट करण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले. यावेळी मादुरो देखील त्यांच्या संपर्कात आले होते. 1999 मध्ये चावेझ व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती बनले आणि त्याच्या पुढच्याच वर्षी मादुरो देखील व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य बनले. हळूहळू मादुरो चावेजचे विश्वासू बनत गेले. ते 2005 मध्ये व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेंब्लीचे प्रमुख बनले आणि नंतर 2006 मध्ये चावेजने त्यांना आपले परराष्ट्र मंत्री बनवले. याच काळात एकदा ते भारतात आले होते. कोणत्याही राजकीय दौऱ्यावर नाही, तर आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेण्यासाठी. निकोलस मादुरो सत्य साईं बाबांना आपले गुरु मानत होते. 2005 मध्ये ते आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथील 'प्रशांती निलयम आश्रमा'च्या दर्शनासाठी आले होते. मादुरो यांच्या जवळचे लोक सांगतात की सत्य साईं बाबांचे एक मोठे चित्र त्यांच्या कार्यालयातही लावले होते. 2011 मध्ये जेव्हा सत्य साईं बाबांचे निधन झाले, तेव्हा व्हेनेझुएलाने एक दिवसाचा राष्ट्रीय शोक घोषित केला होता. यावेळी मादुरो परराष्ट्र मंत्री होते. नोव्हेंबरमध्ये सत्य साईंच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांनी एक संदेश जारी केला होता, 'मला त्यांची भेट नेहमी आठवते... महान गुरूंचे ज्ञान आपल्याला नेहमी प्रकाशित करत राहो.' मादुरो यांची पत्नी सीलिया फ्लोरेस या देखील चावेज यांच्या निकटवर्तीय होत्या. आंदोलनाच्या दिवसांत त्या मादुरो यांना भेटल्या होत्या. सीलिया व्यवसायाने वकील होत्या आणि मादुरो यांच्यासह इतर नेत्यांचा कायदेशीर बचाव करत होत्या. नंतर त्या सत्य साईं बाबांच्या भक्त बनल्या. दोघांनी आपापल्या जोडीदारांकडून घटस्फोट घेऊन 2013 मध्ये लग्न केले होते. पुढे जाऊन सीलिया व्हेनेझुएलाच्या ॲटर्नी जनरल देखील बनल्या. मादुरो यांच्या राजकारणात सीलिया सक्रिय असतात. त्यांना व्हेनेझुएलामध्ये 'फर्स्ट लेडी' (पहिली महिला) नव्हे, तर 'फर्स्ट कॉम्बॅटंट' म्हणजेच 'पहिली लढवय्यी' म्हटले जाते. जून 2011 मध्ये चावेझ यांना त्यांच्या कर्करोगाचे निदान झाले. चावेझ म्हणायचे की त्यांनी त्यांच्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष केले. ते रात्री उशिरापर्यंत जागे राहायचे आणि दिवसातून 40 कप कॉफी प्यायचे. क्यूबामध्ये चावेझची केमोथेरपी सुरू झाली. त्यांच्या डोक्यावरील केस गळून पडले, पेल्विक शस्त्रक्रिया करण्यात आली, पण त्यांना कोणता कर्करोग होता हे त्यांनी कधीच सांगितले नाही. 2012 मध्ये निवडणुका होणार होत्या. चावेझच्या पार्टीडो सोशलिस्टा युनिडो डी व्हेनेझुएला म्हणजेच PSUV या पक्षाने चावेझला अध्यक्षपदाचा उमेदवार बनवले. यादरम्यान चावेझने खोटे सांगितले की डॉक्टरांनी म्हटले आहे की त्यांचा कर्करोग आता पूर्णपणे बरा झाला आहे. त्यांना असे नको होते की त्यांच्या आजारामुळे त्यांचे प्रतिस्पर्धी हेनरिक कॅप्रिल्स निवडणूक जिंकू शकतील. 7 ऑक्टोबर रोजी निवडणूक झाली, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय निवडणूक परिषदेने सांगितले की चावेझ यांना 74 लाख म्हणजेच 54% पेक्षा जास्त मते मिळाली, तर कॅप्रिल्स यांना सुमारे 61 लाख म्हणजेच जवळपास 45% मते मिळाली. चावेझ पुढील 6 वर्षांसाठी राष्ट्राध्यक्ष बनले होते. त्यांनी परराष्ट्र मंत्री मादुरो यांना आपले उपाध्यक्ष बनवले. अवघ्या 2 महिन्यांनंतर चावेझ यांची तब्येत पुन्हा बिघडली. 8 डिसेंबर रोजी त्यांनी मादुरो यांना आपला उत्तराधिकारी घोषित केले आणि त्यानंतर त्यांना कर्करोगाच्या चौथ्या शस्त्रक्रियेसाठी क्युबाला जावे लागले. विमानात चढताना चावेझ यांनी लोकांना फ्लाइंग किस दिली. फेब्रुवारी 2013 मध्ये सरकारने सांगितले की चावेझ व्हेनेझुएलाला परतले आहेत आणि कराकस येथील लष्करी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्यानंतर त्यांना सार्वजनिकरित्या कधीही पाहिले गेले नाही. 5 मार्च 2013 रोजी त्यांच्या निधनाची बातमी आली. व्हेनेझुएलाच्या संविधानानुसार, जर राष्ट्राध्यक्ष 6 वर्षांच्या कार्यकाळातून 4 वर्षे कोणत्याही कारणामुळे पदावर नसतील, तर 30 दिवसांच्या आत नवीन निवडणुका घ्याव्या लागतील. PSUV कडून मादुरोच राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होते. त्यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना म्हटले, 'मी चावेज नाही, पण त्यांचा मुलगा आहे.' त्यांच्या निवडणूक रॅलींमध्ये लाउडस्पीकरमधून चावेजच्या आवाजात गायलेले व्हेनेझुएलाचे राष्ट्रगीत घुमत असे. एका रॅलीत मादुरो म्हणाले, 'चावेज मला एका लहान चिमणीसारखे दिसले आणि त्यांनी सांगितले की मी तुझ्यासोबत आहे.' एप्रिल 2013 मध्ये निवडणुका झाल्या. निवडणूक परिषदेने 50.8% मतांसह मादुरो यांना विजयी घोषित केले. तर त्यांच्या विरोधात लढलेल्या हेन्रिक कॅप्रिल्स यांना 49% मते मिळाली. कॅप्रिल्स यांनी PSUV वर मतांच्या मोजणीत गडबड केल्याचा आरोप केला. PSUV चे ट्विटर खाते हॅक करून त्यात PSUV वरच निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला. तथापि, मादुरो आणि PSUV ने हे आरोप फेटाळून लावले. व्हेनेझुएलाच्या कायद्यानुसार, तिथे जन्मलेला व्यक्तीच देशाचा राष्ट्राध्यक्ष बनू शकतो. मादुरो यांच्या आईचा जन्म आणि त्यांच्या आई-वडिलांचे लग्न कोलंबियामध्ये झाल्यामुळे विरोधकांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्ष बनण्यावर आक्षेप घेतला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आणि 2016 मध्ये न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले की मादुरो यांचा जन्म कोलंबियामध्ये नाही, तर कराकसमध्येच झाला आहे. विरोधकांनी निवडणुकीत गैरव्यवहाराचे आरोप केले यानंतर मादुरो यांनी आणखी तीन राष्ट्रपती निवडणुका जिंकल्या. प्रत्येक वेळी विरोधी पक्षांनी निवडणुकांमध्ये हेराफेरी आणि बेकायदेशीरपणे सत्ता बळकावल्याचा आरोप केला. 2018 च्या निवडणुकीत मादुरो यांच्या विरोधात जुआन गुआइदो हे विरोधी उमेदवार होते. तेव्हा अमेरिकेसह 50 हून अधिक देशांनी जुआन गुआइदो यांना व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती म्हणून मान्यता दिली, परंतु व्हेनेझुएलावर मादुरो यांचेच शासन सुरू राहिले. व्हेनेझुएलाच्या विरोधी नेत्या आणि 2025 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार जिंकणाऱ्या मारिया मचाडो यांनी चावेझ आणि मादुरो यांच्या काळात सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आवाज उठवला होता. मारिया यांची संस्था 'सुमाते' देशात निष्पक्ष निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी निदर्शने करत असे. 'सुमाते'ला लोकशाहीला प्रोत्साहन देणाऱ्या अमेरिकन संस्था नॅशनल एंडोमेंट फॉर डेमोक्रेसी (NED) कडून लाखो डॉलर्सचा निधी मिळत राहिला आहे. 2002 मध्ये सुमातेच्या बॅनरखाली मारियाने चावेझच्या भ्रष्टाचाराविरोधात आघाडी उघडली, ज्यामुळे तिच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. असे म्हटले गेले की उच्चभ्रू वर्गातून आलेल्या मारिया जॉर्ज बुश म्हणजेच तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. मे 2005 मध्ये मारिया बुश यांना भेटल्या आणि त्यांनी स्वतः सांगितले की त्यांना एक लाख डॉलरची रक्कम मिळाली आहे. यानंतर मारिया चावेझ सरकारच्या निशाण्यावर आल्या. तेव्हापासून त्यांचे दोन मुलगे आणि एक मुलगी अमेरिकेतच राहतात. गेल्या काही दिवसांपूर्वी ऑस्लोमध्ये त्यांचे नोबेल घेण्यासाठी त्यांची मुलगीच पोहोचली होती. 2023 मध्ये मारियाला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवायची होती, परंतु तिला अपात्र घोषित करण्यात आले. तिच्या जागी एडमंडो गोंजालेज विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनले. शासनाने मारियाच्या उड्डाणांवर बंदी घातली, तेव्हा मारियाने एडमंडोसाठी देशभरात पायी निवडणूक प्रचार केला. 2024 च्या निवडणुकीतही मादुरो यांनी निवडणुकीत हेराफेरी करून अध्यक्षपद मिळवले, तर युरोपियन युनियन आणि इतर अनेक देशांनी एडमंडो गोन्झालेझ यांना अध्यक्ष म्हणून मान्यता दिली. निवडणूक हरल्यानंतर गोन्झालेझ यांना धमक्या मिळू लागल्या, तेव्हा ते स्पेनला निघून गेले. तर मारिया व्हेनेझुएलामध्येच राहत राहिली. मादुरोच्या पोलिसांकडून अटक होण्याच्या भीतीने मारिया लपून राहत असे. मादुरो यांच्यावर 2018 पासून 2024 पर्यंत तीन वेळा जीवघेणे हल्ले झाले… अमेरिका, एकेकाळी व्हेनेझुएलामधून तेल खरेदी करत असे, परंतु ह्यूगो चावेझ यांच्या काळापासून अमेरिकेवर व्हेनेझुएलाच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप केल्याचे आरोप होत राहिले. 2002 मध्ये ह्यूगो यांचा सत्तापालट करण्याचा प्रयत्न झाला, यात अमेरिकेचे नाव आले. मादुरो यांच्या काळात अमेरिका व्हेनेझुएलाबाबत अधिक कठोर झाला. 2017 मध्ये अमेरिकेने व्हेनेझुएलावर अनेक निर्बंध लादले. 2019 पासून अमेरिका मादुरो यांना व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मानत नाही. याच वर्षी अमेरिकेने मादुरो यांना नार्को-टेररिस्ट म्हणजेच अवैध ड्रग्जचा धंदा करणारा दहशतवादी घोषित करून त्यांच्यावर बक्षीस ठेवले होते. याच वर्षी ट्रम्प यांनी बक्षिसाची रक्कम दुप्पट केली होती. अमेरिकेने मादुरो यांच्यावर आरोप केले की ते अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सामील आहेत. गेल्या काही महिन्यांत अमेरिकेच्या नौदल आणि हवाई दलाच्या जवानांनी व्हेनेझुएलामधून येणाऱ्या जहाजांवर सुमारे २५ हल्ले केले. यामध्ये किमान ९० लोकांचा मृत्यू झाला. मारियाने या कारवाईचे कौतुक करताना म्हटले की, हे व्हेनेझुएलामध्ये लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक आहे. हे गट अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत. अमेरिकन सैन्य तेल घेऊन जाणाऱ्या जहाजांवर हल्ले करत होते, तर ट्रम्प यांचे म्हणणे होते की वेनेझुएलामधून अमेरिकेत फेंटानिल आणि कोकेनसारखे ड्रग्ज पाठवले जात आहेत. ट्रम्प यांनी वेनेझुएलामधील दोन टोळ्या - 'ट्रेन दे अरागुआ' आणि 'कार्टेल दे लोस सोलेस' यांना दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकले होते. यासोबतच त्यांनी हे देखील म्हटले होते की 'लोस सोलेस'चे नेते स्वतः मादुरो आहेत. तर 'कार्टेल दे लोस सोलेस' ही कोणत्याही टोळीच्या नेत्याद्वारे चालवली जाणारी संघटित टोळी नाही. उलट, हा शब्द कोकेनला व्हेनेझुएलातून जाण्याची परवानगी देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. मात्र, मादुरो यांचे म्हणणे होते की, अमेरिका 'ड्रग्जविरोधातील युद्ध' हे निमित्त करून त्यांना सत्तेवरून हटवू इच्छितो आणि व्हेनेझुएलाच्या विशाल तेलसाठ्यावर कब्जा करू इच्छितो. ड्रग्ज प्रकरणातील तज्ज्ञ देखील म्हणतात की, व्हेनेझुएला जगभरातील ड्रग्ज तस्करीमध्ये खूप छोटा खेळाडू आहे. तो एक संक्रमण देशासारखा (ट्रान्झिट देश) काम करतो. येथून इतर देशांमध्ये बनवलेल्या ड्रग्जची तस्करी होते. जेएनयूमध्ये आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे प्रा. अमिताभ सिंह म्हणतात, ‘अमेरिकेची नजर व्हेनेझुएलाच्या तेलसाठ्यावर आहे. तो व्हेनेझुएलातील विरोधी पक्षाची सर्वात मोठी नेत्या आणि नोबेल पुरस्कार विजेती मारिया मचाडो हिला सत्तेत आणू इच्छित होता, जेणेकरून तो व्हेनेझुएलाच्या सत्तेवर नियंत्रण ठेवू शकेल.’ ट्रम्प देखील मारियाला व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षाचा चेहरा मानत होते. जानेवारी 2025 मध्ये मादुरो तिसऱ्यांदा व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार होते. मारिया ऑगस्ट 2024 पासून लपून बसल्या होत्या, पण त्यांनी मादुरो यांच्या विरोधात मोठे आंदोलन केले, त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावर ट्रम्प यांनी त्यांना ‘फ्रीडम फायटर’ म्हणत त्यांच्या सुरक्षेची मागणी केली होती. अमेरिकेने मारियाला राजकीय आश्रय देण्याबद्दलही सांगितले. रणनीतिकदृष्ट्या मारिया अमेरिका आणि ट्रम्प यांचेही कौतुक करतात. 2024 मध्ये ट्रम्प यांनी पुन्हा अध्यक्षीय निवडणूक जिंकल्यावर, मारियाने त्यांना विजयाच्या शुभेच्छा देताना X वर लिहिले होते, 'आम्ही नेहमी तुमच्यावर विश्वास ठेवतो. अमेरिकेची लोकशाही व्हेनेझुएलासाठी प्रेरणा आहे.' आता मादुरो यांना पकडल्यानंतर ट्रम्प यांनी म्हटले आहे की, सध्या हे स्पष्ट नाही की व्हेनेझुएलाचा पुढील नेता कोण असेल. जोपर्यंत तेथील परिस्थिती पूर्णपणे ठीक होत नाही आणि सत्तेचे योग्य प्रकारे हस्तांतरण होत नाही, तोपर्यंत व्हेनेझुएलाची जबाबदारी अमेरिका आपल्या हातात ठेवेल.ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अमेरिका सध्या व्हेनेझुएलाचे कामकाज चालवेल. ते म्हणाले की, मादुरो सरकार दुसऱ्या कोणत्याही नेत्यामार्फत पुन्हा सत्तेत राहावी अशी त्यांची इच्छा नाही. ते म्हणाले की, जुनी व्यवस्था नव्या चेहऱ्यासह सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही. जानकारांचे म्हणणे आहे की, मादुरो यांना ट्रम्प यांनी दहशतवाद्यांच्या यादीत टाकले आहे. अशा परिस्थितीत त्यांना दीर्घकाळासाठी तुरुंगात टाकून त्यांच्यावर खटला चालवला जाऊ शकतो. तर व्हेनेझुएलामध्ये मारिया अमेरिकेच्या मदतीने विरोधी पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन निवडणुका घेऊ शकतात.

दिव्यमराठी भास्कर 4 Jan 2026 8:07 am

Pune Weather: शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर कमी झाला; तापमानात वाढ झाल्याने पारा १२ अंशावर

प्रभात वृत्तसेवा पुणे – हवामान बदलामुळे शहरासह जिल्ह्यातील थंडीची लाट ओसरली आहे. गेल्या ४८ तासांत किमान तापमानात लक्षणीय वाढ झाल्यामुळे पारा १२ अंशाच्या पुढे गेला. परिणामी थंडीचा जोर कमी झाला असून, ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव पाहायला मिळत आहे.नवीन वर्षात थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. मात्र, हवामानातील बदलामुळे मागील तीन […] The post Pune Weather: शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर कमी झाला; तापमानात वाढ झाल्याने पारा १२ अंशावर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 8:00 am

आजचे एक्सप्लेनर:ट्रम्प यांनी राष्ट्रपती मादुरोंना पत्नीसह बेडरूममधून उचलले, व्हेनेझुएलात घुसून कशी केली मोहीम, आता सत्ता कोण सांभाळणार?

व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमध्ये 2 जानेवारीच्या रात्री एक विशेष लष्करी ऑपरेशन करण्यात आले. काही तासांनंतर, एक धक्कादायक घोषणा करण्यात आली. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी आता अमेरिकेच्या ताब्यात आहेत. हे एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखे वाटते, परंतु हा दावा स्वतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. प्रश्न-1: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना अमेरिकेने कसे उचलले? उत्तर: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 3 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ'वर घोषणा केली की अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठा हल्ला केला आहे. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला पकडून देशाबाहेर नेण्यात आले. प्रश्न-2: ट्रम्पने व्हेनेझुएलावर हल्ला करण्याचा आदेश का दिला? उत्तर: व्हेनेझुएलावर हल्ला करण्यामागे ट्रम्पचे दोन उद्देश होते: व्हेनेझुएलामध्ये कार्यरत असलेल्या ड्रग कार्टेलचा नाश करणे आणि मादुरोला हटवून सत्ता परिवर्तन करणे. अमेरिका मादुरोला हुकूमशहा मानते. यासाठी, गेल्या काही दिवसांपासून सतत लष्करी तयारी सुरू होती... प्रश्न-3: अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील तणावाचे मूळ काय आहे, ट्रम्प मादुरोच्या मागे का लागले? उत्तर: ईशान्य अमेरिका आणि व्हेनेझुएला दरम्यानच्या तणावाचा दीर्घ इतिहास आहे... अमेरिका सातत्याने मादुरोवर अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप करत आहे. अलीकडील हल्ल्यापूर्वी, यूएस नेव्ही आणि एअरफोर्सच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांत व्हेनेझुएलामधून येणाऱ्या जहाजांवर सुमारे 25 हल्ले केले होते, ज्यात किमान 90 लोक मारले गेले होते. 13 नोव्हेंबर रोजी, अमेरिकन युद्धनौकांनी व्हेनेझुएलाला वेढा घातला होता आणि सुमारे 15,000 सैनिक तैनात केले होते. अमेरिकन सैन्य तेल वाहून नेणाऱ्या जहाजांवर हल्ला करत होते, जेव्हा ट्रम्प यांनी आरोप केला होता की फेंटॅनाइल आणि कोकेनसारखी ड्रग्ज व्हेनेझुएलामधून अमेरिकेत पाठवली जात आहेत. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलातील दोन टोळ्या - ट्रेन डी अरागुआ आणि कार्टेल डी लॉस सोलेस यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. त्याचबरोबर असेही म्हटले होते की मादुरो स्वतः लॉस सोलेस चे नेते आहेत. मादुरो यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मादुरो यांनी दावा केला होता की ड्रग्जविरुद्धच्या युद्धाच्या नावाखाली अमेरिका त्यांना सत्तेवरून हटवू इच्छितो आणि व्हेनेझुएलाच्या विशाल तेल साठ्यावर कब्जा करू इच्छितो. मादुरो बेकायदेशीर ड्रग्जच्या व्यापारात सामील आहेत, परंतु ड्रग्ज तज्ञांचे म्हणणे आहे की व्हेनेझुएला जागतिक ड्रग्ज तस्करीमध्ये एक छोटा खेळाडू आहे. तो एक संक्रमण देश म्हणून काम करतो, येथून इतर देशांमध्ये उत्पादित ड्रग्जची तस्करी करतो. व्हेनेझुएलाचा शेजारी देश कोलंबिया कोकेनचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आहे, परंतु बहुतेक कोकेन व्हेनेझुएलामधून नव्हे, तर इतर मार्गांनी अमेरिकेत पाठवले जाते. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेची नजर व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यांवर आहे. ते व्हेनेझुएलाच्या दीर्घकाळ विरोधी पक्षनेत्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो यांच्यामार्फत व्हेनेझुएलाची सत्ता नियंत्रित करू इच्छितात. प्रश्न-4: व्हेनेझुएलामध्ये आता सत्ता कोण सांभाळेल, मादुरोसोबत ट्रम्प काय करतील? उत्तर: मारिया मचाडो यांच्यासह व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्यांचे अमेरिकन नेत्यांशी चांगले संबंध राहिले आहेत... ट्रम्प देखील मारियाला व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षाचा चेहरा मानत होते. मादुरो जानेवारी 2025 मध्ये तिसऱ्यांदा व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार होते. मारिया ऑगस्ट 2024 पासून लपून राहत होती, परंतु तिने मादुरोविरुद्ध एका मोठ्या निषेध प्रदर्शनाचे आयोजन केले होते, त्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले. ट्रम्प यांनी तिला स्वातंत्र्य सेनानी म्हटले होते आणि तिच्या संरक्षणाची मागणी केली होती. अमेरिकेने मारियाला राजकीय आश्रय देण्याबद्दलही बोलले होते. मारिया अमेरिकेचे आणि ट्रम्पचे धोरणात्मक कौतुकही करते. जेव्हा ट्रम्पने 2024 ची राष्ट्रपती निवडणूक पुन्हा जिंकली, तेव्हा मारियाने त्यांना त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करताना X वर लिहिले, आम्ही नेहमी तुमच्यावर विश्वास ठेवतो. अमेरिकेची लोकशाही व्हेनेझुएलासाठी प्रेरणा आहे. जेव्हा अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाच्या प्रदेशावर हल्ले सुरू केले, तेव्हा मारियाने या कारवाईचे कौतुक केले आणि म्हटले की व्हेनेझुएलामध्ये लोकशाही पुनर्संचयित करणे आवश्यक आहे. या टोळ्या अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोका आहेत. अलीकडेच, रॉयटर्सने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिले होते की ट्रम्प प्रशासन व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या विरोधात बंड करू शकते. ट्रम्पने मादुरोला व्हेनेझुएला सोडण्यासाठी अल्टिमेटम दिले होते, ज्यामुळे त्यांना सुरक्षित मार्ग मिळाला असता. मादुरोने ते नाकारले. तज्ञांचे म्हणणे आहे की ट्रम्पने मादुरोला दहशतवादी म्हणून सूचीबद्ध केले आहे आणि त्याला दीर्घकाळ तुरुंगवास आणि खटल्याला सामोरे जावे लागू शकते. दरम्यान, मारिया अमेरिकेच्या पाठिंब्याने निवडणुका घेण्यासाठी व्हेनेझुएलामधील विरोधी नेत्यांना एकत्र आणू शकते. तोपर्यंत एडमंडो अंतरिम अध्यक्ष बनू शकतो. प्रश्न-5: व्हेनेझुएलावर नियंत्रण ठेवल्याने अमेरिकेला काय फायदा होईल? उत्तर: 2026 पर्यंत व्हेनेझुएलाकडे अंदाजे 303 अब्ज बॅरल कच्च्या तेलाचा साठा आहे. हे तेल आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 60 पैसे प्रति लिटर, म्हणजेच पाण्यापेक्षाही स्वस्त विकले जाते. सध्या चीन व्हेनेझुएलाच्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. रॉयटर्सच्या एका अहवालानुसार, व्हेनेझुएलाच्या तेलामध्ये चीनचा वाटा सुमारे 70 ते 90 टक्क्यांपर्यंत आहे. जर डोनाल्ड ट्रम्प यांची योजना यशस्वी झाली, तर अमेरिका देखील व्हेनेझुएलामधून लाखो बॅरल तेल आयात करू शकते. यामुळे अमेरिकेचा तेलावरील खर्च कमी होईल आणि चीनचा प्रभावही कमी होईल. व्हेनेझुएलाच्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे 90 टक्के हिस्सा तेल निर्यातीतून येतो, तरीही देश जागतिक तेल उत्पादनाचा केवळ 0.8 टक्केच उत्पादन करू शकतो. अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेलावर निर्बंध लादले आहेत, तरीही अमेरिकेला व्हेनेझुएलाच्या तेलाची गरज आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, ऑक्टोबरमध्ये राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या सरकारने अमेरिकेसमोर प्रस्ताव ठेवला होता की व्हेनेझुएलाचे सर्व तेल आणि सोन्याचे प्रकल्प अमेरिकन कंपन्यांसाठी खुले केले जातील, परंतु ट्रम्प यांनी हा करार नाकारला, कारण त्यांना मादुरो यांना सत्तेतून दूर करायचे होते. दुसरीकडे, व्हेनेझुएलाच्या नेत्या मारिया मचाडो यांनी जून महिन्यात अमेरिकेला सुमारे 1.7 लाख कोटींची ऑफर दिली होती. या प्रस्तावात सध्याच्या 10 लाख बॅरल प्रति दिवसावरून तेल उत्पादन वाढवून 47 लाख बॅरल प्रति दिवस करणे समाविष्ट आहे. यासोबतच, शेवरॉनसारख्या अमेरिकन कंपन्यांना व्हेनेझुएलाच्या पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि खाणकाम प्रकल्पांमध्ये मोठे करार मिळू शकतात. याव्यतिरिक्त, व्हेनेझुएलावर नियंत्रण मिळवल्याने अमेरिकेला आणखी दोन मोठे फायदे मिळतील...

दिव्यमराठी भास्कर 4 Jan 2026 7:54 am

Uday Samant: दखल घेण्याएवढे शिवसेनेचे नगरसेवक येतील; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा

प्रभात वृत्तसेवा पुणे – युतीतील जागावाटपाचा अध्याय संपला आहे. महापालिका निवडणुकीच्या इतिहासात शिवसेना पहिल्यांदाच ११९ जागांवर निवडणूक लढवत आहे. येत्या १६ जानेवारीला दखल घेण्याएवढे शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील आणि पुण्याचा महापौर ठरविताना आम्हाला विश्वासात घ्यावे लागेल असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. आज पुण्यात सर्वत्र शिवसेनेचे भगवे वातावरण असून, शिवसेनेने सत्तेच्या माध्यमातून केलेला […] The post Uday Samant: दखल घेण्याएवढे शिवसेनेचे नगरसेवक येतील; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 7:45 am

Pune : थकबाकी असूनही उमेदवारांना ना हरकत प्रमाणपत्र ?

कात्रज/धनकवडी– महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पालिकेच्या कर विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. नियमांचे उल्लंघन करून चक्क लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या उमेदवारांना ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सदर प्रकार घडल्याची चर्चा असल्याने एकुणच पालिकेच्या अन्य क्षेत्रीय कार्यालयाच्या कामकाजावरही यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर क्षेत्रीयांतर्गत […] The post Pune : थकबाकी असूनही उमेदवारांना ना हरकत प्रमाणपत्र ? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 4 Jan 2026 7:43 am