Devendra Fadnavis: आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
▪️येत्या २-३ महिन्यांत भविष्योन्मुख धोरणे आणणार, अॅडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६नागपूर: येत्या काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर राहणार आहे. यासाठी आम्ही अनेक धोरणे आखली असली, तरी काही धोरणे जुनी झाली असल्याने भविष्यातील गरजा, बदल आणि आव्हाने लक्षात घेऊन येत्या दोन-तीन महिन्यात विविध क्षेत्रांतील भविष्योन्मुख (फ्युचर रेडी पॉलिसी) धोरणे आणली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (७ फेब्रुवारी) दिली.असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटद्वारे आयोजित अॅडव्हांटेज विदर्भ-खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी इंटरनॅशनल बिझनेस कॉनक्लेव्हचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे जागतिक अध्यक्ष जितेंद्र जोशी, असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांच्यासह तब्बल २२ देशांचे राजदूत, उच्चायुक्त व बिझनेस प्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे याच परिषदेत गुंतवणुकीचे तीन सामंजस्य करारही पार पाडण्यात आले.याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे सध्या वेगाने विकसित होणारे राज्य आहे. त्यातल्या त्यात विदर्भाचा प्रदेश झपाट्याने विकसित होत आहे. महाराष्ट्रात सामंजस्य करार केवळ कागदावर होत नसून ते प्रत्यक्षात साकारले जात आहेत. लॉजिस्टिक्स, एआय, सोलर क्षेत्रामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. सर्वाधिक विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांमध्ये जीसीसी पॉलिसी, जेम्स अँड ज्वेलरी पॉलिसी, बांबू पॉलिसी जाहीर केली आहे. नवे औद्योगिक धोरण आले आहे.यात भर घालून सात नवीन धोरणांची घोषणा येत्या दोन-तीन महिन्यांत होणार आहे. यामध्ये टेक्सटाइल्स अँड अॅपरल, लेदर अँड फूटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स अँड फॅब, एरोस्पेस अँड डीफेन्स, एमएसएमई, फार्मास्युटिकल बायोटेक अँड मेडिकल डीव्हायसेस, सर्क्युलर इकॉनॉमी, बायो प्लास्टिक या क्षेत्रांतील धोरणांचा समावेश असेल. या सातही धोरणांच्या निर्मितीचे काम सुरू असून येत्या तीन महिन्यांत ते जाहीर करण्यात येतील. यामुळे धोरणप्रेरित गुंतवणूक, उद्योगवाढ आणि आर्थिक विकास हेच महाराष्ट्राचं प्रमुख सूत्र ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.सोलर मॉड्यूलच्या क्षेत्रात नागपूर क्षेत्रात येणारी गुंतवणूक ही देशातील सर्वात मोठी सोलर मॉड्यूल प्रोड्यूसिंग इकोसिस्टीम असून अद्यापही गुंतवणुकीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरुच आहे. कृषी प्रक्रियेसह अनेक निर्मितीक्षम क्षेत्रात नागपूर आणि विदर्भाची मोठ्या प्रमाणात आगेकूच सुरु आहे, अनेक क्षेत्रात गुंतवणुकीच्या नव्या संधी येत आहेत. अगदी गडचिरोलीसारख्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित होत असून भारताचे स्टील हब म्हणून ते पुढे येत आहे. पुढील दहा वर्षांत गडचिरोलीत पोलादनिर्मितीची सर्वाधिक मोठी क्षमता उभी राहणार आहे. एवढेच नाही, तर गडचिरोलीला पर्यावरणपूरक ‘ग्रीन स्टील’ हब म्हणून विकसित करण्याच्या दिशेनेही आम्ही ठोस पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari presided over the MoU signing and exchange between the Government of Maharashtra and GR Infrastructure for setting up a telecom tower manufacturing plant in Nagpur. This partnership involves a total investment of ₹200… pic.twitter.com/C21fWfs63D— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 7, 2026अदानी समूहाकडून काल कोल गॅसीफिकेशनच्या क्षेत्रात मोठी गुंतवणुक झाली आहे. देशातील अशा स्वरुपाच्या पहिल्याच गुंतवणुकीमुळे विदर्भातील कोल इकोसिस्टीमचे चित्र संपूर्णपणे बदलणार आहे. ईलेक्ट्रीक व्हेईकल्सच्या क्षेत्रात पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये सर्वात मोठी गुंतवणूक येत आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांनी प्रास्ताविकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात विदर्भाचा झपाट्याने विकास होत असल्याचे सांगितले. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमने १५० देशांसोबत करार केला असून त्याचा लाभ विदर्भातील एमएसएमईंना स्वत:चा व्यवसाय वाढविण्यासाठी होणार असल्याची माहिती ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे जागतिक अध्यक्ष जितेंद्र जोशी यांनी दिली.दुसऱ्या दिवशी १०,८३१ कोटींचे सामंजस्य करारअॅडव्हांटेज विदर्भ-खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तीन महत्त्वाचे सामंजस्य करार झालेत. यामध्ये पहिला करार महामेट्रो आणि केअर हॉस्पिटलमध्ये झाला. यात कस्तुरचंद पार्कजवळ महामेट्रोच्या जागेवर पीपीपी मॉडेलवर आधारित सुमारे साडेतीनशेवर खाटांच्या बहुविशेषोपचार हॉस्पिटलचा समावेश असून त्यासाठी सुमारे सहाशे कोटींची गुंतवणूक होत आहे. या प्रकल्पातून सुमारे पंधराशे ते अठराशे रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे.दुसरा करार गॅलक्सी सोलर कंपनीसोबत झाला. कंपनीद्वारे १० हजार कोटींची गुंतवणूक करत सोलर सेल, बॅटरी स्टोअरेज सिस्टीमची निर्मिती होईल. या प्रकल्पाद्वारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असा सुमारे चार हजार रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे. तिसरा करार टेलिकॉम टॉवरची निर्मिती करणाऱ्या जीआर इन्फ्रास्ट्रक्चरसोबत झाला आहे. कंपनीने २०० कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली असून याद्वारे सुमारे पाचशे रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे.मुख्यमंत्र्याचे आर्थिक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी या करारांची माहिती दिली.
14 वर्षीय वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याने ICC अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर अविश्वसनीय १७५ धावांची खेळी साकारली.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहू मिल चौकात (Kolhapur Accident) आज एक हृदयद्रावक अपघात घडला. एका भरधाव क्रेटा कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार हवेत उडून लांब फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, क्रेटा कार अत्यंत वेगात होती. या कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर कारवरचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या मधोमध पलटी झाली. दुसरीकडे, धडक बसलेल्या दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत जाऊन कोसळल्याने त्यांना डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली.https://prahaar.in/2026/02/07/malegaon-mayor-election-2026-lift-of-malegaon-municipal-corporation-building-collapsed-from-fourth-floor-islam-party-leaders-escaped/बचावकार्य आणि पोलीस कारवाई#कोल्हापूर शाहू मिल कडून कोठे तीर्थ कडे जाणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघात pic.twitter.com/Ad8DAAGiyB— Kolhapur Survey (@KolhapurSurvey) February 7, 2026अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. जखमींना तातडीने उपचारासाठी सीपीआर (CPR) रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळी गर्दी केलेल्या बघ्यांना बाजूला केले. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने उलटलेली क्रेटा कार रस्त्यावरून हटवून वाहतूक व्यवस्था पुन्हा सुरळीत केली आहे.
Narendra Modi : मलेशियाने केलेलं असं स्वागत भारत लक्षात ठेवेल; कुआलालंपूरमध्ये मोदींनी जिंकली मने
कुआलालंपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या २०२६ मधील पहिल्या परदेश दौऱ्याची सुरुवात मलेशियातून केली आहे. कुआलालंपूर येथे भारतीय समुदायाशी संवाद साधताना त्यांनी दोन्ही देशांमधील घट्ट सांस्कृतिक संबंधांवर भाष्य केले. पंतप्रधान म्हणाले की, गेल्या वर्षी आसियान (ASEAN) परिषदेला मी उपस्थित राहू शकलो नव्हतो, परंतु माझ्या मित्राला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मी आज मलेशियात आलो आहे. मलेशियातील भारतीयांच्या उत्साहाचे कौतुक करताना मोदींनी एक महत्त्वाची माहिती दिली की, येथील सुमारे ५०० शाळांमध्ये भारतीय भाषांचे धडे दिले जात आहेत. तसेच, भारतीय संगीत आणि चित्रपटांची लोकप्रियता दोन्ही देशांना अधिक जवळ आणत असल्याचे त्यांनी नमूद केले. मलेशियाने दिलेला सन्मान आणि प्रेम भारत कधीही विसरणार नाही, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.https://prahaar.in/2026/02/07/a-horrific-accident-occurred-at-shahu-mill-chowk-in-kolhapur-a-creta-car-hit-a-motorcycle-resulting-in-the-death-of-two-people/पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशिया दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला आहे. भारत आणि मलेशिया हे केवळ मित्र नसून प्रगतीचे भागीदार आहेत. भारताने गाठलेलं प्रत्येक यशाचं शिखर हे मलेशियासाठीही तितकंच अभिमानास्पद आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी दोन्ही देशांच्या मैत्रीचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची तांत्रिक घोषणा केली. भारताची लोकप्रिय डिजिटल पेमेंट प्रणाली 'UPI' (युपीआय) लवकरच मलेशियामध्येही लाँच केली जाणार आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक व्यवहार अधिक सोपे होतील. यासोबतच, मलेशियातील स्वामी विवेकानंदांच्या अनुयायांचा आणि आपल्या 'मन की बात' कार्यक्रमातील मलेशियाच्या संदर्भाचा उल्लेख करत त्यांनी सामायिक सांस्कृतिक वारशाचा पुनरुच्चार केला.
Todays Top 10 News : वाचा आजच्या राज्य, देश-विदेशसह महत्वाच्या टाॅप 10 बातम्या
T20 World Cup 2026 : ‘सूर्या आम्ही येतोय…’, युएसएच्या कर्णधाराने सुर्यकुमार यादवला दिली चेतावणी
T20 World Cup 2026 : गतविजेता आणि भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आपल्या टायटल डिफेन्स मोहिमेला घरच्या मैदानावरून सुरुवात करणार आहे.
पाकिस्तानचा नेदरलँडवर निसटता विजय, फहीम अश्रफ ठरला तारणहार
कोलंबो : टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात फहीम अश्रफच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने नेदरलँडचे आव्हान ३ गडी राखून मोडीत काढले. ११४ धावांवर ७ गडी गमावलेला पाकिस्तान संघ संकटात असताना फहीमने केवळ ११ चेंडूत २९ धावा कुटून पाकिस्तानला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला.प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेदरलँडची सुरुवात आक्रमक झाली. मायकल लेविटने (२४) डावाला गती दिली, तर कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (३७) आणि बास डी लीडे (३०) यांनी मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी सामन्यावर नियंत्रण मिळवले. अबरार अहमद (२/२३) आणि सईम अयुब (२/७) यांनी मधल्या फळीला धक्के दिले, तर सलमान मिर्झाने (३/२४) तळाच्या फलंदाजांना बाद करून नेदरलँडचा डाव १४७ धावांवर रोखला.१४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर साहिबजादा फरहानने (४७ धावा, ३१ चेंडू) एका बाजूने किल्ला लढवला. मात्र, ९८ धावांवर फरहान बाद झाला आणि त्यानंतर पाकिस्तानच्या डावाला गळती लागली. बाबर आझम (१५) आणि शादाब खान (८) स्वस्तात परतल्याने पाकिस्तानची अवस्था ७ बाद ११४ अशी अत्यंत नाजूक झाली होती.शेवटच्या काही षटकांत पाकिस्तानला विजयासाठी मोठी धावसंख्या हवी होती. आठव्या क्रमांकावर आलेल्या फहीम अश्रफने डच गोलंदाजीची पिसं काढली. त्याने केवळ ११ चेंडूंत २ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार खेचत २६३ च्या स्ट्राईक रेटने नाबाद २९ धावा केल्या. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे पाकिस्तानने १९.३ षटकांत विजय साकारला. या विजयानंतर पाकिस्तानचा आत्मविश्वास उंचावला आहे.
U19 World Cup : बीसीसीआयकडून ७.५ कोटींच्या बक्षीसाची घोषणा
मुंबई : दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १६ व्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात ऐतिहासिक सहावे जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय युवा संघावर आता कौतुकाचा आणि बक्षीसांचा वर्षाव होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विश्वविजेत्या भारतीय संघासाठी ७.५ कोटी रुपयांच्या रोख बक्षीसाची अधिकृत घोषणा केली आहे.शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी धुव्वा उडवत विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियाद्वारे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी हे विशेष बक्षीस जाहीर केले. संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी २५ लाख रुपये दिले जाणार आहेत. तर मुख्य प्रशिक्षक आणि इतर सपोर्ट स्टाफला प्रत्येकी १५ लाख रुपये देऊन गौरविण्यात येईल.या संपूर्ण स्पर्धेत आणि विशेषतः फायनलमध्ये भारताच्या युवा खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. केवळ १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने अंतिम सामन्यात ८० चेंडूत १७५ धावांची वादळी खेळी करून विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्याच्या या कामगिरीमुळे भारताला ३५० हून अधिक धावांचा डोंगर उभा करता आला, जो इंग्लंडला सर करता आला नाही.आमच्या युवा खेळाडूंनी मैदानावर दाखवलेले कौशल्य आणि जिद्द अभिमानास्पद आहे. हे यश भारतीय क्रिकेटची मुळे किती मजबूत आहेत हे दर्शवते, असे गौरवोद्गार जय शाह यांनी काढले. या रोख बक्षीसाव्यतिरिक्त, मायदेशी परतल्यावर टीम इंडियाचे भव्य स्वागत आणि सत्कार समारंभ आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.सूर्यवंशी विश्वचषकाचा नवा 'विक्रमवीर'केवळ १४ वर्षांच्या वैभवने २०२६ च्या विश्वचषकात अशा काही खेळी केल्या ज्याने क्रिकेट विश्व थक्क झाले आहे. युवा विश्वचषकाच्या इतिहासात शतक झळकावणारा तो जगातील सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने केवळ ८० चेंडूत १७५ धावा कुटल्या. ही युवा विश्वचषक फायनलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
T20 World Cup 2026 : टीम इंडियाला मोठा धक्का ! भारताचा हुकमी एक्का पहिल्याच सामन्यातून बाहेर
गतविजेता आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी-२० विश्वचषक २०२६ (T20 World Cup 2026) मध्ये आज आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. पहिला सामना अमेरिकेविरुद्ध मुंबईतील
ठाणे: उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा अजितदादा पवार यांनी घ्यावी हा राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय होता परंतु शिवसेनेचे नेते रामदास कदम आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबाबत जी अभद्र टिप्पणी करत आहेत. आम्ही देखील रामदास कदम तुम्हाला त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विधिमंडळात आपल्यावर केलेले आरोप आणि तुमच्या कुटुंबांचे असलेले डान्सबार याबाबत आम्हाला बोलायला लावू नका.आम्ही नेहमी राष्ट्रवादी युती म्हणून पालन केले आहे. सुनील तटकरे यांनी देखील युतीधर्माचे पालन केले आहे. रामदास कदम आपण कुठलीही अभद्र टिप्पणी करू नये नाहीतर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतली आणि पक्ष एनडीएमध्ये सामील झाला त्यामुळे ज्यांना विलीनीकरणाची घाई लागली आहे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही आनंद परांजपे यांनी केली आहे.दरम्यान वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल असे सांगतानाच जितेंद्र आव्हाड यांनी काय भूमिका घ्यावी याबाबत शरद पवार गटाचा निर्णय असेल असेही आनंद परांजपे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.आमचे दैवत अजितदादा पवार आमच्यातून निघून गेल्याने आम्ही दुःखात आहोत.दुःखातून आम्ही सावरलेलो नाही. त्यामुळे राज्यसभेत जाण्यासाठी योग्य वेळी पक्ष नेतृत्व निर्णय घेईल असेही आनंद परांजपे म्हणाले.दादांच्या अपघाताची सीआयडीमार्फत चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावली असून ही संपूर्ण माहिती महाराष्ट्रासमोर येण्याची गरज आहे. खासदार बजरंग सोनावणे यांच्या मनात संशय असेल तर त्यांनी केंद्रीय मिनिस्टर ऑफ सिव्हिलिएशन यांची भेट घ्यावी.जबाबदार व्यक्तीने बेजबाबदार वक्तव्य करू नये असा टोला लगावतानाच केंद्र आणि महाराष्ट्रामार्फत चौकशी सुरू आहे याची आठवण आनंद परांजपे यांनी करुन दिली.सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे अशी सर्वांची भावना आहे. योग्य प्रक्रिया पूर्ण करून जबाबदारी घ्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही सर्व नेते करणार आहोत. राष्ट्रीय अध्यक्ष कोण व्हावा पक्षातील नेत्यांचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अधिकार आहे त्यामुळे आमचा पक्ष अंतिम निर्णय घेईल असेही आनंद परांजपे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता बसण्याचा जनाधार ठाण्यातील जनतेने आम्हाला दिला आहे. आम्ही कोकणभवन येथे गट निर्माण केला असून येणाऱ्या काळात महानगरपालिकेत पुढे कसे जायचे हा निर्णय गटनेते म्हणून नजिब मुल्ला हे आपल्या पातळीवर घेतील असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.कुठल्या मंत्र्याला कुठले खाते द्यावे हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो याची चर्चा राष्ट्रवादी पक्ष मुख्यमंत्र्याशी करणार आहे मात्र संजय राऊत यांनी यामध्ये नाक खूपसण्याची काही गरज नाही असा सबुरीचा सल्लाही आनंद परांजपे यांनी दिला.
राज्यसभेआधी बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक?
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे जागा रिक्तमुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपताच महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मात्र, राज्यसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक घेतली जाण्याची दाट शक्यता आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते शिवाजीरावर कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून, निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे.बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढवतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधानसभा वा विधानपरिषदेचे सदस्य होणे बंधनकारक असल्यामुळे ही पोटनिवडणूक आवश्यक ठरली आहे. बारामतीत अन्य कोणताही पक्ष उमेदवार देणार नाही, हेही स्पष्ट असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. सुनेत्रा पवार बारामतीतून पोटनिवडणूक लढवतील, तर पार्थ पवार राज्यसभेत जाण्याची शक्यता आहे.ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शिवाजीराव कर्डिले यांनी राष्ट्रवादीच्या (शरद पवार) प्राजक्त तनपुरे यांना पराभूत केले होते. राहुरीचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबवले, परंतु प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना काही काळ सार्वजनिक जीवनापासून दूर राहावे लागले. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर सहा महिन्यांत पोटनिवडणूक घेणे आयोगासाठी बंधनकारक आहे. आयोगाने यासाठी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्या जागी त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपकडून संधी मिळू शकते, तर राष्ट्रवादीकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे रिंगणात उतरतील, असे बोलले जात आहे. मात्र सहानुभूतीची लाट पाहता शरद पवार नेमका काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.विनोद तावडे राज्यसभेवर जाणार?महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत असून, खासदार होण्यासाठी मोठ्या नेत्यांकडून लॉबिंग सुरू झाले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काम सुरू केले. बिहार विधानसभा निवडणूक असो किंवा संघटनात्मक जबाबदाऱ्या, तावडे हे विश्वासू नेता ठरले आहेत. त्यामुळे या वेळी त्यांना राज्यसभेवर पाठवणे योग्य ठरेल, असे पक्षातील नेत्यांचे मत आहे. याशिवाय रामदास आठवले यांना पुन्हा संधी मिळू शकते, तसेच डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे नावही चर्चेत आहे. भाजपच्या चार जागांपैकी एक जागा महिला उमेदवारासाठी राखली जाऊ शकते, त्यामुळे विजया रहाटकर यांना पुन्हा संधी मिळेल, अशा चर्चा आहेत. या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांच्या पसंतीच्या नावांवर केंद्रात अंतिम निर्णय होईल.राज्यसभेची गणिते२ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदार निवृत्त होणार आहेत. यात शरद पवार, रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी, रजनी पाटील आणि फौजिया खान यांचा समावेश आहे. हे सर्व खासदार २०२० मध्ये निवडून गेले होते, तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. मात्र, तर आज राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत विधानसभेतील आमदार मतदान करतात. एका खासदारासाठी साधारणपणे ३७ आमदारांचा कोटा लागतो. सध्या शरद पवार गटाकडे १०, काँग्रेसकडे १६ आणि उबाठा गटाकडे २० आमदार आहेत. एकत्रितपणे ही संख्या फक्त ४६ आहे, त्यामुळे महाविकास आघाडीला फक्त एक जागा मिळण्याची शक्यता आहे.दुसरीकडे महायुतीची स्थिती बळकट आहे. भाजपकडे १३२, शिवसेनेकडे ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे ४० आमदार आहेत. मित्रपक्षांसह त्यांचे एकूण संख्याबळ २३५ होते. त्यामुळे महायुतीचे किमान सहा उमेदवार राज्यसभेत निवडून जाण्याची शक्यता आहे, त्यापैकी भाजपला चार जागा मिळतील.
Barking Deer: तुम्ही पाहिलंत का कधी 'भुंकणारं हरीण'?; जाणून घ्या भुकणाऱ्या हरणाबद्दल
जर तुम्ही जंगलात किंवा डोंगराळ भागात असाल आणि अचानक तुम्हाला कुत्र्यासारखा भुंकण्याचा आवाज ऐकू आला तर घाबरण्याची गरज आहे, कारण तो कुत्रा नसून 'भुंकणारा हरीण' असू शकतो, जो शिकार देखील करतो.गुजरात सरकारच्या वन विभागाच्या मते, भुंकणारा हरीण हा लहान पण अत्यंत सावध आणि मनोरंजक प्राणी भारतीय जंगलांचा एक खास भाग आहे. कोकणात याला भेकर असे म्हणतात तर इंग्लिशमध्ये या प्राण्याला 'बार्किंग डिअर' असे म्हणतात.भेकराचे दात तीक्ष्ण असतात जे त्याला आपल्या शिकारीसाठी उपयुक्त ठरतात. भेकराला भारतीय मुंटजॅक असेही म्हणतात. बार्किंग डिअर हे २० ते ३० इंच उंच आणि फक्त २२-२३ किलोग्रॅम वजनाचे असते. नरांना लहान शिंगे असतात, क्वचितच त्यांची लांबी ५ इंचांपेक्षा जास्त असते. त्यांच्या कपाळाचा आकार लहान असतो.प्रौढ नर भेकराचा रंग तपकिरी किंवा राखाडी असतो. त्यांच्या वरच्या जबड्यात चांगले विकसित झालेले लांब, तीक्ष्ण दात असतात. हे दात शिकार पकडण्यासाठी, शत्रूंशी लढण्यासाठी आणि अन्न गिळण्यासाठी वापरले जातात. भुंकणारे हरण हे सर्वभक्षी असतात. ते गवत, पाने, कोवळ्या कळ्या, फळे, बिया, साल आणि डहाळ्या खातात, तसेच पक्ष्यांची अंडी, तर लहान प्राणी देखील खातात. गुजरातच्या जंगलात ते सहज दिसतात. दक्षिण भारतातही ते दिसतात.या हरणांना धोका जाणवला की ते कुत्र्यासारखे मोठ्याने भुंकतात. कधीकधी हे भुंकणे एका तासापेक्षा जास्त काळ टिकू शकते. पूर्वी लोक असे मानत होते की ते प्रजनन काळात संवाद साधण्यासाठी किंवा इशारा देण्यासाठी भुंकायचे.हे हरीण बहुतेकदा एकटे, जोड्यांमध्ये किंवा लहान कुटुंबांसह राहतात. ते दिवसा आणि रात्री दोन्ही सक्रिय असतात. ते जंगलात, गवताळ प्रदेशात, झुडुपांमध्ये आणि हिमालयाच्या उतारावर देखील आढळतात. ते पाण्याच्या स्रोतापासून दूर जात नाहीत. बार्किंग डिअर भारतासह बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, चीन आणि इतर अनेक देशांमध्ये आढळून येतात.
सॅमसंग इंडियाचा 'गॅलेक्सी ए०७ ५जी'लाँच
मुंबई : सॅमसंग या भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज सॅमसंग गॅलेक्सी ए०७ ५जी लाँच केला. या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सल मेन कॅमेरा, ६००० एमएएच बॅटरी आहे. हा स्मार्टफोन ऑनलाइन मनोरंजनासाठी, कन्टेन्ट कॅप्चर करण्यासाठी आणि दिवसभर विना-व्यत्यय वापरासाठी डिझाइन करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन उद्योग-श्रेणीच्या डेटा सुरक्षिततेकरिता मापदंड देखील स्थापित करतो, ज्यामधून मन:शांती मिळते.''सॅमसंगमध्ये आम्हाला अधिक महत्त्वाकांक्षी असलेल्या तरूण ग्राहकांच्या गरजांबाबत माहित आहे. आजचे जनरेशन झेड अधिक सोशल कन्टेन्ट निर्माण करत आहेत, ते अधिकाधिक मोबाइल गेमिंगचा आनंद घेत आहेत, तसेच अधिक प्रमाणात ऑनलाइन कन्टेन्टचा वापर करत आहेत. सॅमसंग गॅलेक्सी ए०७ ५जी 'मोअर ऑसम' असण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामध्ये सर्जनशीलता, कार्यक्षमता व मनोरंजनाच्या संयोजनासह मोअर पॉवरफुल ५० मेगापिक्सल कॅमेरा, दीर्घकाळापर्यंत कार्यरत राहणारी ६००० एमएएच बॅटरी आणि अधिक आकर्षक १२० हर्ट्झ डिस्प्ले आहे. आम्हाला भारतातील तरूणांसाठी डिझाइन करण्यात आलेला हा परिपूर्ण स्मार्टफोन लाँच करताना आनंद होत आहे,'' असे सॅमसंग इंडियाच्या एमएक्स बिझनेसचे उपाध्यक्ष आदित्य बब्बर म्हणाले.हा स्मार्टफोन ४जीबी + १२८जीबी आणि ६जीबी + १२८जीबी (मायक्रोएसडीद्वारे २टीबीपर्यंत स्टोरेज वाढवता येणारे) अशा दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. सॅमसंगच्या सुमारे १८ महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआय पर्यायामुळे तो प्रतिदिन अंदाजे ३० रुपयांमध्ये परवडणारा ठरतो.सडपातळ व शक्तिशाली रचना: गॅलेक्सी ए०७ ५जी लाइट व्हायोलेट, लाइट ग्रीन आणि ब्लॅक या रंगांत उपलब्ध आहे. १९९ ग्रॅम वजन, ८.२ मिमी सडपातळ बॉडी आणि की आयलँड २.० फ्लॅट साइड फ्रेममुळे उत्तम ग्रिप मिळते. ६.७-इंच एफएचडी+ डिस्प्ले १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट व एचबीएम मोडमध्ये ८०० निट्स ब्राइटनेस देतो, ज्यामुळे तेज उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसते. २-स्टेप टेम्पर्ड ग्लास, आयपी५४ प्रमाणपत्र आणि जीएफआरपी बॅक पॅनलमुळे फोन अधिक मजबूत व टिकाऊ ठरतो.प्रगत कॅमेरा आणि बॅटरी: या स्मार्टफोनमध्ये ५०एमपी ऑटोफोकस वाइड कॅमेरा आणि २एमपी डेप्थ कॅमेरा असलेला ड्युअल रियर सेटअप आहे, जो आकर्षक बोकेह इफेक्टसह उच्च दर्जाचे फोटो देतो. ८एमपी फ्रंट कॅमेरा स्पष्ट सेल्फी व व्हिडिओसाठी उपयुक्त आहे. ६०००mAh क्षमतेची बॅटरी (२०% अधिक) आणि २५वॉट्स फास्ट चार्जिंगमुळे दिवसभर विनाव्यत्यय वापर शक्य होतो.मन:शांतीसाठी अद्वितीय सुरक्षितता: सॅमसंग वॉलेटद्वारे युपीआय पेमेंटसाठी फिंगरप्रिंट व फेस रेकग्निशन सपोर्ट देण्यात आला आहे. हार्डवेअर-आधारित सॅमसंग नॉक्स वॉल्ट संवेदनशील डेटा सुरक्षित ठेवतो. ऑटो ब्लॉकर आणि बिल्ट-इन थेफ्ट प्रोटेक्शन अतिरिक्त सुरक्षा प्रदान करतात.दीर्घकाळ विश्वासार्हता व कनेक्टिव्हिटी: गॅलेक्सी ए०७ ५जी वन युआय ८.० (अँड्रॉइड १६ आधारित) वर चालतो, ज्यात सोपे नेव्हिगेशन व अधिक वैयक्तिकरण पर्याय आहेत. सहा वर्षांचे ओएस अपग्रेड्स आणि सिक्युरिटी अपडेट्स हा फोन दीर्घकाळ सुरक्षित व अद्ययावत ठेवतात. १२ बँड्समधील ५जी सपोर्टमुळे संपूर्ण भारतात जलद व स्थिर कनेक्टिव्हिटी मिळते.
Young Cricketer Death : नियतीचा क्रूर खेळ ! सामना रंगात आला असताना क्रिकेटपटूचा हार्ट अटॅकने मृत्यू
स्थानिक क्रिकेट क्षेत्रातील परिचित नाव आणि 'युवा स्पोर्ट्स'चे मालक प्रवीण बबन पवार यांचे (Young Cricketer Death) क्रिकेट सामना खेळताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकाली निधन झाले.
मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचा दोन दिवसांचा अधिकृत दौरा सुरू केला आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पंतप्रधान मोदींचा हा तिसरा मलेशिया दौरा आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यामुळे भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणाला कशी गती मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.या भेटीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी मलेशियन समकक्षांसोबत द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंवर व्यापक चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मलेशियातील भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील, तसेच व्यापारी नेते आणि उद्योग प्रतिनिधींना भेट देतील. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही भेट १० व्या भारत-मलेशिया सीईओ फोरमच्या निमित्ताने होणार आहे. भारत आणि मलेशियाचे जुने संबंध आहेत जे सामायिक इतिहास, संस्कृती आणि सभ्यतेमध्ये खोलवर रुजलेले आहेत.भारताचे अॅक्ट ईस्ट धोरणाचे उद्देश आग्नेय आशिया, पूर्व आशिया आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशातील देशांशी भारताचे संबंध मजबूत करणे हा आहे. हे धोरण मूलतः १९९१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी स्वीकारलेल्या धोरणाशी संबंधित आहे.Landed in Kuala Lumpur.Deeply touched by the warm welcome extended by my friend, Prime Minister Anwar Ibrahim at the airport. I look forward to our conversations and to further strengthening the bonds of friendship between India and Malaysia.@anwaribrahim pic.twitter.com/z3NLyv4QGW— Narendra Modi (@narendramodi) February 7, 2026पंतप्रधान मोदींच्या मलेशिया भेटीमुळे या उपक्रमाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. आग्नेय आणि पूर्व आशियाई देशांसोबत व्यापार, गुंतवणूक आणि तांत्रिक सहकार्य वाढवणे हे पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारल्यापासूनचे प्रमुख ध्येय आहे. सरकारने अॅक्ट ईस्ट पॉलिसी अंतर्गत भारताला आसियान राष्ट्रांशी जोडण्यासाठी वाहतूक, पायाभूत सुविधा आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी (रस्ते, रेल्वे, बंदरे आणि डिजिटल नेटवर्क) विकसित करण्यासाठी सक्रियपणे काम केले आहे.ऑगस्ट २०२४ मध्ये भारत आणि मलेशियाने त्यांचे संबंध व्यापक धोरणात्मक भागीदारीपर्यंत वाढवले. पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान, दोन्ही नेते प्रगतीचा आढावा घेतील आणि या भागीदारीतील भविष्यातील प्राधान्ये निश्चित करतील. भारतात मलेशियन गुंतवणूकीला प्रोत्साहन देणे आणि सखोल आर्थिक सहकार्यासह व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्यावर चर्चा होणार आहे.
इनामदार कुटुंबाला शिवसेनेकडून पाच लाखांची मदतउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल करून केले मृत मुलांच्या कुटुबियांचे सांत्वनपुणे : शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या आफान अफसर ईनामदार ( वय १०) आणि रीफत अफसर ईनामदार ( वय ७) या चिमुकल्यांच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. नगरपालिका निवडणुकीवेळी जुन्नरमध्ये पचारासाठी आले असता त्यांना या दुर्दैवी घटनेबद्दल कळल्यानंतर त्यांनी ईनामदार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी त्यांना मदतीचा हात देऊ केला आहे.जुन्नरमध्ये २२ नोव्हेंबर रोजी घडलेल्या दुर्वेवी घटनेत अफसर इनामदार यांची दोन्ही मुले खेळत असताना शेततळ्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पूर्ण जुन्नर तालुका हळहळला, त्याच वेळी १ डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी जुन्नर येथे गेले असता स्थानिक शिवसेना नगरसेवक मयुर महाबरे यांनी ही घटना आमदार शरद सोनवणे यांना सांगितली. त्यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कानावर ही बाब घातली. यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारातून वेळात वेळ काढून ईनामदार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना मदतीचे आश्वासन दिले.त्यानुसार काल ६ फेब्रुवारी रोजी शिवसेनेच्या वतीने आमदार शरद सोनवणे, शिवसेना सचिव राम रेपाळे आणि युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, स्थानिक नगरसेवक मयुर महाबरे आणि स्थानिक शिवसैनिकांनी ईनामदार कुटुंबाची भेट घेऊन पाच लाखांची ही मदत त्यांना सुपुर्द केली.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून इनामदार कुटुंबीयांचे सांत्वन केले. झालेली घटना दुर्दैवी असून स्वतःची मुले गमावण्याचे दुःख काय असते ते मला चांगले माहिती आहे, गेलेली व्यक्ती परत आणता येणे शक्य नसले तरीही या दुःखातून सावरण्यासाठी शिवसेना आपल्याला लागेल ती सर्व मदत नक्की करेल असे सांगितले. आपली झालेली हानी भरून काढता येणे अशक्य असले, तरीही या दुःखातून सावरण्यासाठी आपल्याला मदत पाठवली असून ती आपण मोठ्या मनाने स्वीकारावी अशी विनंती शिंदे यांनी केली. दिल्या हाकेला धावणारी आणि दिलेला शब्द पाळणारी व्यक्ती अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. धर्माच्या भिंती ओलांडत एका बापाने दुसऱ्या बापाला दिलेला शब्द पाळत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यातील संवेदनशीलपणा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे.
Ladki Bahin Yojana e-KYC: बहिणींसाठी आनंदवार्ता! 'या'दिवसापर्यंत आता करता येणार ई-केवायसी
मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया चुकली असेल त्यांच्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत ही दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी (६ फेब्रुवारी) याची माहिती दिली आहे. त्या यावेळी म्हणाल्या की; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे राज्यातील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया करताना काही चुकीचे पर्याय निवडले गेल्याने काही महिलांना योजनेचा लाभ मिळणं बंद झालं होतं. पण आता या अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.काय म्हणाल्या आदिती तटकरे ?मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ३१ मार्च पर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी!e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप… pic.twitter.com/tggmXwgtOa— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) February 6, 2026e-KYC प्रक्रियेत नेमकी चूक काय झाली ?मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील खऱ्या लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी e-KYC प्रक्रिया राबवण्यात आली, ज्यामध्ये काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये एक प्रश्न असा होता: तुमच्या घरातले कोणी सरकारी नोकरीत नाही ना? या प्रश्नाचे उत्तर देताना असंख्य महिलांनी चूक केली. प्रश्न न समजल्याने काही महिलांने या प्रश्नाचे उत्तर 'नाही' ऐवजी 'हो' दिले होते. याचा अर्थ असा झाला की संबंधित महिलेनं मान्य केले की त्यांच्या घरातील एखादी व्यक्ती सरकारी कर्मचारी आहे. नियमानुसार घरातील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी असेल तर संबंधित महिलेला योजनेचा लाभ मिळत नाही, त्यामुळे संगणकीय प्रणालीनुसार लाखो महिलांच्या खात्यात योजनेचे हप्ते येणे आपोआप बंद झाले.“जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही” - देवेंद्र फडणवीस “निवडणुकांच्या काळात विरोधकांनी पसरवले की सरकार ही योजना थांबवेल. पण माझ्या बहिणींना मी स्पष्ट सांगतो, तुमचा ‘देवाभाऊ’ मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना कधीच बंद होऊ देणार नाही,” असे त्यांनी आश्वासन दिले.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गेल्या वर्षभरात सरकारने कोणतीही योजना बंद केली नाही; उलट लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, पिकविमा, आणि कृषीविषयक अनेक निर्णय सातत्याने राबवले जात आहेत. “आम्ही फक्त आश्वासनाची राजकारण करणारे नसून लोकांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवण्यावर आमचा भर आहे,” असे ते म्हणाले.
मुंबई : 'मेटा अँटी-स्कॅम' (Meta Anti-Scam) हा मेटा कंपनीचा (Facebook, WhatsApp, Instagram) ऑनलाईन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांपासून वापरकर्त्यांना (युझर) वाचवण्यासाठीचा एक उपक्रम आहे. भारतात मेटाने भारत सरकार आणि SEBI सोबत मिळून 'स्कॅम से बचो' (Scam Se Bacho) ही मोहीम सुरू केली आहे. मेटाने नीना गुप्ता आणि आयुष्मान खुराना या कलाकारांच्या मदतीने या मोहिमेद्वारे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.मेटाने दिलेले महत्त्वाचे अँटी-स्कॅम फीचर्स: व्हॉट्सॲप स्क्रीन-शेअरिंग अलर्ट: व्हिडिओ कॉल दरम्यान अनोळखी व्यक्तीसोबत स्क्रीन शेअर करण्याचा प्रयत्न केल्यास व्हॉट्सॲप आता युजर्सना चेतावणी (Warning) देते, जेणेकरून तुमचे बँकिंग डिटेल्स किंवा OTP चोरीला जाऊ नयेत. मेसेंजर एआय स्कॅम डिटेक्शन: मेसेंजरवर नवीन व्यक्तीकडून संशयास्पद संदेश आल्यास, मेटाची AI सिस्टीम युजरला अलर्ट करते आणि तो मेसेज ब्लॉक किंवा रिपोर्ट करण्याचा पर्याय देते. पासकी (Passkeys): पासवर्डऐवजी फिंगरप्रिंट, फेस लॉक किंवा पिन वापरून लॉग-इन करण्याची सुविधा दिली आहे, ज्यामुळे अकाउंट हॅक होण्याचा धोका कमी होतो. सुरक्षा तपासणी (Security Checkup): फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तुमचे अकाउंट सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यासाठी 'सिक्युरिटी चेकअप' टूल उपलब्ध आहे. अनोळखी ग्रुप्सपासून संरक्षण: व्हॉट्सॲपवर तुम्हाला अनोळखी व्यक्तींनी ग्रुपमध्ये ॲड करू नये यासाठी प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये बदल करता येतात. स्कॅमपासून वाचण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स:थांबा आणि विचार करा: कोणत्याही घाईच्या किंवा फायद्याच्या मेसेजला लगेच प्रतिसाद देऊ नका.माहिती शेअर करू नका: तुमचा OTP, पासवर्ड किंवा बँकेची माहिती कधीही कोणालाही सांगू नका.रिपोर्ट करा: कोणताही संशयास्पद मेसेज किंवा जाहिरात दिसल्यास Meta Help Center वर त्वरित रिपोर्ट करा.'मेटा अँटी-स्कॅम' मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात नीना गुप्ता यांच्यासह लोकप्रिय क्रिएटर्स सुकृती चतुर्वेदी, युवराज दुआ आणि श्रेयस मेंदिरत्ता असलेल्या या जाहिरातीमध्ये वास्तविक जीवनातील प्रसंग आणि दैनंदिन संवादांना दाखवण्यात आले आहे, ज्यामधून अनेक ऑनवलाइन घोटाळेबाज खोटी तत्परता, अधिकार किंवा विश्वास दाखवत करणाऱ्या ऑनलाइन घोटाळ्यांना निदर्शनास आणण्यात आले आहे. ही मोहिम व्यक्तींना स्वत:च्या व इतरांच्या संरक्षणासाठी कोणतीही कृती करण्यापूर्वी प्रश्न विचारण्याचे, उपलब्ध सुरक्षितता साधनांचा वापर करण्याचे आणि यंत्रणांकडे झालेल्या फसवणूकीची तक्रार करण्याचे आवाहन करते.मेटासोबत सहयोगाने घोटाळ्यांबाबत जागरूकतेला चालना देण्याची गरज व्यक्त करत सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)चे अध्यक्ष श्री. तुहिन कांता पांडे म्हणाले, ''मोठ्या प्रमाणात डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करत आर्थिक घोटाळे करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे, जेथे कायदेशीर खोटे दावे आणि मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे खोटे आश्वासन देत लोकांची दिशाभूल केली जात आहे. नागरिकांनी याबाबतीत सतर्क राहिले पाहिजे आणि आर्थिक गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सेबी-नोंदणीकृत कंपन्यांशी संपर्क साधला जात असल्याची खात्री घेतली पाहिजे. मेटाची अॅण्टी-स्कॅम मोहिम आर्थिक फसवणूकीच्या वाढत्या प्रमाणादरम्यान लोकांमध्ये जागरूकतेचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी महत्त्वाची आहे. यासारखे जनजागृती करणारे उपक्रम अशा फसवणूकांचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचे हित व लोकांनी मेहनतीने कमावलेल्या पैशाचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचे आहेत.या मोहिमेसोबत सहयोगाबाबत मत व्यक्त करत अभिनेत्री नीना गुप्ता म्हणाल्या, मला मेटाच्या अॅण्टी-स्कॅम उपक्रमाला पाठिंबा देण्याचा अभिमान वाटतो, कारण ऑनलाइन घोटाळ्यांपासून स्वत:चे व प्रियजनांचे संरक्षण करण्यासाठी जागरूकता हे पहिले पाऊल आहे. ही माहितीपूर्ण जाहिरात व्यक्तींना कोणतीही कृती करण्यापूर्वी थांबून विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि सत्यापन करण्याची आठवण करून देते, तसेच मेटाच्या सेफ्टी टूल्सचा वापर करण्याची आठवण करू देते, जे तुम्हाला तुमच्या सुरक्षिततेवर नियंत्रण ठेवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. मी आशा करते की हा संदेश भारतातील लाखो व्यक्तींपर्यंत पोहोचेल, तसेच लोकांना संशयास्पद स्थितींचा सामना करताना अधिक आत्मविश्वास व सुसज्ज असल्याचे वाटण्यास मदत होईल.स्कॅम से बचो मोहिमेच्या नवीन एडिशनच्या माध्यमातून मेटा डिजिटल सुरक्षिततेबाबत माहिती सहजसाध्य, सर्वसमावेशक व कृतीशील करण्यासाठी क्रिएटर्स आणि सरकारी भागधारकांसोबत सक्रियपणे सहयोग करत आहे. या मोहिमेमधून घोटाळ्यांबाबत तक्रार करण्याच्या महत्त्वाला देखील सादर करण्यात आले आहे, तसेच वापरकर्त्यांना फसवणूक झाल्यास राष्ट्रीय सायबरक्राइम हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक : मालेगावातून एक भयंकर घटना घडली आहे. मालेगावमधील महापालिका इमारतीमध्ये आज एक मोठा अपघात घडला असतानाच सुदैवाने जीवितहानी टळली आहे. आज मालेगावमधील महापालिकेच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लिफ्ट अचानकचं खाली कोसळल्याने धक्कादायक घटना घडली. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षग जास्त माणसांचा भार झाल्याने आणि लिफ्टची चैन तुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.https://prahaar.in/2026/02/07/live-voting-for-12-zilla-parishads-and-125-panchayat-samitis-in-maharashtra/१८ जणांसह लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळलीतब्बल १८ नागरिक असलेली एक लिफ्ट चौथ्या मजल्यावरून अचानक खाली कोसळली. मात्र, नशिबाची साथ आणि एका तांत्रिक अडथळ्यामुळे मोठा अनर्थ टळला. कोसळणारी लिफ्ट थेट जमिनीवर न आदळता पहिल्या मजल्याजवळ अडकली. लिफ्टचा दरवाजा पहिल्या मजल्यावरच अडकल्याने मोठा फटका बसला नाही आणि लिफ्टमधील सर्व १८ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले. या घटनेनंतर लिफ्टच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.भिंत तोडून १८ जणांना बाहेर काढलं अन्...लिफ्ट कोसळल्याच्या थरारक घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी युद्धपातळीवर बचावकार्य राबवले. पहिल्या मजल्यावर अडकलेल्या लिफ्टमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला चक्क भिंत तोडावी लागली. या विशेष प्रयत्नांनंतर सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. विशेष म्हणजे, या लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे आसिफ शेख, मुश्तकिन डिग्निटी यांच्यासह काही नगरसेवक आणि पाच पत्रकारही अडकले होते. या घटनेमुळे महापालिका परिसरात काही काळ भीतीचे वातावरण आणि गोंधळ निर्माण झाला होता, मात्र सर्वजण सुखरूप बाहेर आल्याने अखेर प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.
Sonia Gandhi: नागरिकत्वापूर्वी मतदार यादीत नाव ; सोनिया गांधींनी दाखल केले न्यायालयात उत्तर
Sonia Gandhi: काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राऊस अव्हेन्यू न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेबाबत न्यायालयात आपले उत्तर दाखल केला आहे.
Bhumika Chawla :अभिनेत्रीचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, चाहत्यांना चिंता वाटत आहे.
India-US Trade Deal: भारतावर १८% कर कधी लागू होणार? ; वाचा निवेदनातील १२ महत्त्वाचे मुद्दे
India-US Trade Deal: भारत आणि अमेरिकेने द्विपक्षीय व्यापाराला पुन्हा दिशा देण्यासाठी अंतरिम व्यापार करार आराखडा अंतिम केला आहे.
2000 मध्ये मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावणाऱ्या संघात युवराज सिंगचाही समावेश होता. त्यानंतर विराट, मनीष पांडे आणि सध्याचे भारतीय कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल यांसारखे अनेक खेळाडू पुढे आले, जे अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होते. यावेळी वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्या भारतीय अंडर-19 क्रिकेट संघाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला आहे. 14 वर्षे 8 महिन्यांचा वैभव ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' देखील बनला. अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले. या विजेतेपदामुळे भारतीय क्रिकेटचा टॅलेंट पूल किती मजबूत होईल, वैभवसारखे खेळाडू पुढील क्रिकेट स्टार बनतील का; हे आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया… प्रश्न-1: या विजयामुळे भारतीय क्रिकेटचा टॅलेंट पूल किती मजबूत होईल? उत्तर: बीसीसीआय भारताच्या मुख्य आंतरराष्ट्रीय संघासाठी खूप कमी वयापासूनच खेळाडूंवर लक्ष ठेवण्यास सुरुवात करते… वैभव तर 12 वर्षांच्या वयातच रणजी ट्रॉफी खेळला आहे. डिसेंबर 2025 मध्ये त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 84 चेंडूंमध्ये 190 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जलद 150 धावा करण्याचा विक्रमही नोंदवला. तसेच लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावणारा खेळाडू बनला. त्याचप्रमाणे आयुष म्हात्रेनेही 17 वर्षांच्या वयात रणजी ट्रॉफीमध्ये पहिले शतक केले. अंडर-19 विश्वचषक खेळल्याने खेळाडूंना देशांतर्गत मालिकांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटचा अनुभव मिळतो. यामुळे मुख्य संघात सामील होण्याची त्यांची दावेदारी मजबूत होते. जरी अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या संघातून काही मोजकेच खेळाडू मुख्य राष्ट्रीय संघात स्थान मिळवतात. तरीही यावेळी अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी सातत्याने उत्कृष्ट खेळ दाखवला आहे. प्रश्न-2: वैभव आणि आयुष व्यतिरिक्त, यावेळी अंडर 19 चे स्टार्स कोण होते? उत्तर: वैभव आणि आयुष व्यतिरिक्त, आणखी तीन खेळाडूंनी स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला… ऑरोन जॉर्ज: सलामी फलंदाजी करताना उपांत्य फेरीत अफगाणिस्तानविरुद्ध 115 धावांची शतकी खेळी केली. त्या सामन्यात भारताने विक्रमी 311 धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले होते. ऑरोन जॉर्जने 5 सामन्यांमध्ये 170 धावा केल्या. हेनिल पटेल: भारताच्या सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंमध्ये त्यांचा समावेश आहे. पहिल्याच सामन्यात USA विरुद्ध 5 बळी घेतले. स्पर्धेत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये 11 बळी घेतले. संपूर्ण स्पर्धेत त्याने किफायतशीर गोलंदाजी केली. त्याची इकोनॉमी 4.44 होती. आरएस अंबरीश: अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध 3 बळी घेतले. यात 115 धावा करणाऱ्या कालेब फॉल्कनरच्या विकेटचाही समावेश होता. स्पर्धेत 11 बळी घेऊन ते भारताच्या सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंमध्ये होता. त्याने 4.93 च्या इकोनॉमीने गोलंदाजी केली. यांच्या व्यतिरिक्त अभिज्ञान कुंडू आणि विहान मल्होत्रा यांनीही फलंदाजीत चांगली कामगिरी केली. प्रश्न-3: वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला? उत्तर: वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये वैभवची बॅट फारशी चालली नाही, पण त्याने अंतिम सामन्यात मोठा विक्रम केला. त्याने 80 चेंडूंमध्ये 175 धावांची स्फोटक खेळी केली, ज्यात 15 चौकार आणि 15 षटकारांचा समावेश होता. अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये कोणत्याही खेळाडूने केलेला हा सर्वोच्च स्कोअर आहे. संपूर्ण स्पर्धेत वैभवने एकूण 7 सामन्यांमध्ये 62.7 च्या सरासरीने 439 धावा केल्या. वैभवच्या नावावर हा विक्रमही नोंदवला गेला की अंडर 19 च्या इतिहासात संपूर्ण हंगामात त्याने आतापर्यंत सर्वाधिक 30 षटकार मारले आहेत. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसने 18 षटकार मारले होते. या स्पर्धेपूर्वी IPL 2025 मध्येही वैभवने उत्कृष्ट खेळ दाखवला होता. त्याने राजस्थान रॉयल्सकडून गुजरातविरुद्ध 35 चेंडूंमध्ये शतक ठोकले. तथापि, नंतर अनेक प्रसंगी तो स्वस्तात बाद झाला, ज्यामुळे त्याची टीकाही झाली. वैभवने विजय हजारे ट्रॉफीपासून रणजी, आयपीएल आणि आता विश्वचषकात स्वतःला सिद्ध केले आहे. वैभवच्या यशस्वी क्रिकेटपटू बनण्याच्या कथेमागे संघर्षही आहे. त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'आम्ही तर आमची जमीनही विकली. अजूनही खूप काही सुधारले नाही.' वैभवचे वडील सांगतात की, वैभव जेव्हा 4 वर्षांचा होता, तेव्हा त्यांनी वैभवला प्लास्टिकच्या चेंडूने खेळताना पाहिले. त्यानंतर त्यांनी वैभवसाठी घरामागे एक छोटे मैदान बनवले. जेव्हा वैभव 9 वर्षांचा झाला, तेव्हा संजीव त्याला आठवड्यातून 3 वेळा घरापासून 100 किमी दूर प्रशिक्षणासाठी पाटण्याला घेऊन जात होते. हा सिलसिला 4 वर्षे चालला. 2024 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी झालेल्या ट्रायलमध्ये फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर यांनी वैभवला एका षटकात 17 धावा बनवण्याचे आव्हान दिले. वैभवने 3 षटकार मारून हे आव्हान पूर्ण केले. ट्रायलमध्ये त्याने एकूण 8 षटकार आणि 4 चौकार मारले. लिलावात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात वैभवसाठी बोली 1.1 कोटींपर्यंत पोहोचली आणि त्याला आरआरने विकत घेतले. आयपीएलमध्ये शतक झळकावल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले. मुंबईतील नालासोपारा परिसरात राहणारा आयुष म्हात्रे एका मराठी कुटुंबातून येतो. आयुषने 6 वर्षांच्या वयापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. प्रशिक्षणासाठी आयुषला रोज मुंबईतील विरारहून चर्चगेटपर्यंत लोकल ट्रेनने सुमारे 80 किमीचा प्रवास करावा लागत असे. त्याचे आजोबा त्याला घेऊन जात असत. आयुषचे वडील योगेश म्हात्रे बँकिंग क्षेत्रात काम करत होते. त्यांनी आपले करिअर सोडून आयुषच्या क्रिकेट करिअरसाठी मेहनत घेतली. 2023 मध्ये, आयुषची एनसीएच्या टॉप-30 खेळाडूंमध्ये निवड झाली नाही, कारण त्याने इंटर-कॅम्प सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली नाही. यामुळे आयुष नैराश्यात होता. या काळात त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याला फलंदाजी तंत्र सुधारण्यास मदत केली. दिनेश हे रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर यांचेही प्रशिक्षक होते. आयुषने दिवसातून दोनदा सराव सुरू केला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कांगा क्रिकेट लीगमध्ये आयुषला संधी मिळाली. पहिल्या सामन्यात त्याने 51 धावा केल्या, पण तो यामुळे निराश होता कारण त्याचे शतक हुकले. मुंबईचे वरिष्ठ खेळाडू सूर्यकुमार यादव यांनी आयुषला बॅट भेट दिल्या आणि चांगल्या कामगिरीसाठी मार्गदर्शन केले. 2024-25 च्या हंगामातील रणजी ट्रॉफीमध्ये आयुषने 17 वर्षांच्या वयात मुंबईसाठी 176 धावांची खेळी केली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये नागालँडविरुद्ध 117 चेंडूंमध्ये 181 धावा केल्या. आणि लिस्ट ए2 सामन्यात यशस्वी जयस्वालचा विक्रम मोडला. आयपीएल 2025 मध्ये सीएसकेने ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे त्याला 30 लाख रुपयांना करारबद्ध केले. 20 एप्रिल 2025 रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या आयपीएल पदार्पणात आयुषने 15 चेंडूंमध्ये 32 धावा केल्या. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये संपूर्ण स्पर्धेत आयुषने 214 धावा केल्या. 3 अर्धशतके झळकावली आणि 7 बळी घेतले. अंतिम सामन्यात 51 चेंडूंमध्ये 53 धावा केल्या आणि वैभवसोबत 142 धावांची भागीदारी केली. तो संघाला विजय मिळवून देणारा सहावा कर्णधार ठरला. यापूर्वी मोहम्मद कैफ, विराट कोहली, उन्मुक्त चंद, पृथ्वी शॉ, यश धुल यांच्या नेतृत्वाखाली संघाने विजय मिळवला होता. या विजयानंतर वैभव आणि आयुष आयपीएलमध्ये महागडे विकले जाणे आणि कायमस्वरूपी खेळाडू बनणे जवळपास निश्चित आहे. त्यांना रणजीसारख्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्येही चांगल्या संधी मिळतील. याशिवाय लवकरच दोघांनाही टॉप भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळू शकते? प्रश्न-4: वर्ल्ड कप जिंकलेल्या संघातील खेळाडूंना सध्याच्या राष्ट्रीय संघात येण्यासाठी किती वेळ लागेल? उत्तर: अंडर-19 वर्ल्ड कप संघातील खेळाडूंना राष्ट्रीय संघात आणण्यासाठी कोणताही निश्चित नियम नाही. ते किती लवकर संघात येतील हे त्यांच्या कामगिरीवर, संघात उपलब्ध असलेल्या जागेवर आणि आधीपासून खेळत असलेल्या खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असते… कोणताही नियम निश्चित नसतानाही, गेल्या काही वर्षांपासून अंडर-19 संघातील खेळाडू भारतीय राष्ट्रीय संघात येण्याचा कल राहिला आहे. अंडर-19 वर्ल्ड कपवर राष्ट्रीय संघाच्या निवडकर्त्यांचेही लक्ष असते. 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टी-20 वर्ल्ड कपच्या संघातही 15 पैकी 5 खेळाडू ईशान किशन, अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा अंडर-19 संघाचा भाग राहिले आहेत. आयुष आणि वैभवसाठी आयपीएल ही पुढील मोठी स्पर्धा असेल. यासोबतच यावर्षी होणाऱ्या रणजी, विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली यांसारख्या देशांतर्गत स्पर्धांवरही निवडकर्ते आणि चाहत्यांचे लक्ष असेल. प्रश्न-5: अंडर-19 वर्ल्ड कप आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी किती महत्त्वाचा आहे? उत्तर: अंडर-19 वर्ल्ड कप आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी युवा खेळाडूंना एक मोठे व्यासपीठ देतो, जिथे ते आपली क्षमता दाखवू शकतात. क्रिकेटची 'नर्सरी' म्हणून ओळखली जाणारी आयसीसीची ही स्पर्धा 1988 पासून सातत्याने खेळली जात आहे, ज्यात 16 संघ सहभागी होतात. अंडर 19 मधून आलेले खेळाडू कसोटी कर्णधार बनले विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन आणि ब्रायन लारा यांसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी आपल्या देशाच्या अंडर-19 संघातून सुरुवात केली होती. इंग्लंडचा जो रूट 2010 च्या वर्ल्ड कप संघात होता, त्याचप्रमाणे पाकिस्तानचा बाबर आझम 2012, न्यूझीलंडचे ट्रेंट बोल्ट आणि टीम साउदी 2008, ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श 2010, श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आणि पाकिस्तानचा इंझमाम-उल-हक 1988 च्या त्यांच्या अंडर 19 वर्ल्ड कप संघात होते. यापैकी बहुतेक खेळाडू पुढे जाऊन त्यांच्या देशांच्या कसोटी संघाचे कर्णधारही बनले. खेळाडूंना जागतिक प्रतिभेची संधी या स्पर्धेतून नवीन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय अनुभवाची संधी मिळते. देशांना मजबूत बेंच स्ट्रेंथ तयार करण्यास मदत होते. 1988 ते 2022 पर्यंत 132 खेळाडूंनी भारतासाठी अंडर-19 वर्ल्ड कप खेळला, यापैकी 40 खेळाडू नंतर राष्ट्रीय संघात पोहोचले. क्रिकेट समालोचक आणि विश्लेषक हर्षा भोगले म्हणतात, 'ही एक अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे. अनेक खेळाडूंच्या आयुष्यात हा एक मोठा टप्पा असतो आणि काहींसाठी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा दिवसही. तथापि, खरे ध्येय याच्या खूप पुढे आहे. मला हे आवडते की खेळाडूंनी अंडर-19 वर्ल्ड कप खेळावा, जेणेकरून ते लवकर राष्ट्रीय संघाकडे वाटचाल करतील.' प्रश्न-6: भारताने गेल्या दोन दशकांत 6 विश्वचषक कसे जिंकले? उत्तर: भारत अंडर-19 विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. संघाने यापूर्वीही 5 वेळा-2000, 2008, 2012, 2018, 2022 मध्ये अंडर-19 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. तर ऑस्ट्रेलियाने 4 आणि पाकिस्तानने 2 वेळाच हा कप जिंकला आहे. याशिवाय वेस्ट इंडिज, इंग्लंड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेनेही प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकावले आहे. भारत गेल्या 13 पैकी 10 वेळा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यामागे अनेक घटक आहेत... बीसीसीआयची मजबूत स्काउटिंग बीसीसीआयने संपूर्ण भारतात प्रतिभेच्या शोधासाठी स्काउट्स ठेवले आहेत. ते देशभरात फिरून लहान-लहान शहरांमधून चांगले युवा क्रिकेटपटू शोधतात. त्यानंतर अंडर-16 आणि अंडर-19 साठी मोठ्या स्तरावर चाचण्या होतात. नागालँड, अरुणाचल, मणिपूर, मेघालय आणि सिक्कीमसारख्या राज्यांमध्येही ट्रायल कॅम्प लावले जातात. प्रत्येक कॅम्पमध्ये सुमारे 150 खेळाडूंना बोलावले जाते. राहुल द्रविडसारखे प्रशिक्षक संघाला उच्च स्तरावरील प्रशिक्षण मिळते. यासाठी बीसीसीआयने 2000 मध्ये बेंगळुरूमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची स्थापना केली होती. अंडर-19 संघाला राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसारख्या दिग्गज खेळाडूंनी प्रशिक्षण दिले आहे. 2016 मध्ये यासाठी राहुल द्रविडला 2.62 कोटी रुपये शुल्क देण्यात आले होते. 2025 मध्ये इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत अंडर-19 संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक राजीब दत्ता यांनी सांगितले की, विशेषतः खेळाडूंचे तंत्र, रणनीती, मानसिक सामर्थ्य आणि जीवन कौशल्यांवर काम केले जाते. दबावाखाली संयम आणि शिस्तीने खेळायला शिकवले जाते. त्यांचे 365 दिवस निरीक्षण केले जाते. मजबूत देशांतर्गत क्रिकेट पायाभूत सुविधा भारताने अंडर-19 आणि अंडर-16 क्रिकेट 38 संघांपर्यंत वाढवले आहे, ज्यामुळे प्रतिभेची कमतरता भासत नाही. देशांतर्गत स्पर्धा आणि वेगवेगळ्या मालिकांमध्ये खेळाडूंना सतत संधी मिळतात. आयपीएल स्काउटिंग आणि राज्यस्तरीय लीग जसे की मुंबईची एमपीएल आणि तामिळनाडूची टीएनपीएल यातूनही व्यासपीठ मिळते. 2016-18 दरम्यान 27 खेळाडू या प्रणालीचा भाग होते, ज्यामुळे संघाला मजबूत बॅकअप मिळतो।
एक काळ असा होता, जेव्हा मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या प्रेमाच्या चर्चा संपूर्ण इंडस्ट्रीत रंगत होत्या. मधुबाला सुरुवातीला दिलीप कुमार यांच्या चाहत्या होत्या. हळूहळू ही आवड प्रेमात बदलली आणि दोघांमधील नातं द्विपक्षीय झालं. या प्रेमाची सुरुवात मात्र एका गुलाबाने झाली होती.
मुंबई : एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल जलाशयाच्या ९०० मिलिमीटर व्यासाच्या आवक जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीची अत्यावश्यक कार्यवाही मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. ही कार्यवाही वांद्रे पश्चिम येथील कुरेशी नगर झोपडपट्टीजवळ, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मोकळ्या भूखंडातून तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गालगत जाणाऱ्या जलवाहिनीवर मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते मध्यरात्री १२ या एकूण १४ तासांच्या कालावधीत करण्यात येणार आहे. या दुरुस्ती कालावधीत एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा १४ तास बंद राहणार आहे. तर, काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.एच पश्चिम विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून-गाळून प्यावे. महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणारा परिसर :वांद्रे पश्चिमेकडील हिल मार्ग, पेरी मार्ग, मॅन्युअल गोन्साल्विस मार्ग, सेंट अँड्र्यूज मार्ग, सेंट पॉल मार्ग, कार्टर मार्ग, पाली गाव, चिंबई गाव, शेर्ली गाव, कांतवाडी परिसर.खार दांडा, कोळीवाडा, दांड पाडा, चुईम गावठाण, गझदरबंध झोपडपट्टी, खार पश्चिमेचा काही भागहनुमान नगर झोपडपट्टी, लक्ष्मी नगर, कार्टर मार्ग, युनियन पार्क रस्ता क्रमांक १ ते ४, पाली हिलडॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिसर, पाली पठार झोपडपट्टी, खारमधील १५ वा ते २० वा रस्ता परिसरवांद्रे पश्चिमचा काही भाग म्हणजे चॅपल मार्ग, वेरोनिका मार्ग, डॉ. पीटर डायस मार्ग, सेंट जॉन बॅप्टिस्ट मार्गमाउंट मेरी कॅथेड्रल, वांद्रे पश्चिम बाजूचे क्षेत्र रस्ता परिसर.वांद्रे पश्चिम के. सी. मार्ग, एल. के. मेहता मार्ग, बाजार रस्त्याचा काही भाग, ए. के. वैद्य मार्गझिगझॅग मार्ग, कोल डोंगरी, नर्गिस दत्त मार्ग, पाली माला मार्गपाणीपुरवठा कमी दाबाने होणारा परिसरहिल रोडच्या टोकापासून ताज लँड्स एन्ड, बी. जे. मार्ग, एच. के. भाभा मार्ग, काणे मार्ग आणि गणेश झोपडपट्टी. (मध्यरात्रीनंतर १ ते पहाटे ४.३० या वेळेत पाणीपुरवठा केला जाईल.)
Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई
पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च, तर दहावीच्या परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान होणार आहेत. या परीक्षेत गैरप्रकार होऊ नये यासाठी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे. त्यांनी यावर्षी परीक्षेसाठी नवीन नियमावली केली असून ते नियम पळाले नही तर कडक कारवाई करण्यात येणार आहे.नवीन नियमांनुसार; परीक्षा केंद्राच्या परिसरात १०० मीटर अंतरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच एका विद्यार्थी सोबत दोन किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी-आयएसडी बूथ, फॅक्स केंद्रे, झेरॉक्स सेंटर, ई-मेल सेंटर, इंटरनेट सुविधा, आणि कॅफे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात आणि त्यासभोवतालच्या १०० मीटरच्या अंतरात मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, रेडिओ, कॅलक्युलेटर, लॅपटॉप यांसारखी साधने जवळ बाळगणे किंवा वापरण्यावर पूर्णपणे मनाई आहे.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
Ola Uber Rapido Driver on Strike: जर तुम्ही या शनिवारी ओला, उबर किंवा रॅपिडोने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. देशभरातील गिग चालकांनी सामूहिक संपाची घोषणा केली आहे.
T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा'खेळाडू स्पर्धेतून बाहेर
मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्याआधीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. स्टार खेळाडू हर्षित राणा अनफिट असल्याची माहिती समोर आली आहे. ऑलराऊंडर हर्षित राणा दुखापतग्रस्त झाल्याने तो या स्पर्धेतून बाद झाला आहे.मोहम्मद सिराजला संधी:हर्षित राणाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात दुखापत झाली होती, ज्यानंतर मेडिकल टीमने त्याला अनफिट घोषित केले. बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, स्कॅन रिपोर्टनुसार राणा या टूर्नामेंटमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या जागी आता मोहम्मद सिराज भारतीय पेस अटॅकची धुरा सांभाळताना दिसेल. यामुळे बॉलिंग लाईनअपमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.कर्णधारपदी सूर्यकुमार यादव:भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अपेक्षेप्रमाणे सूर्यकुमार यादव याच्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. भारतीय संघात अभिषेक शर्मा, टिळक वर्मा आणि रिंकू सिंह यांसारख्या आक्रमक फलंदाजांना स्थान मिळाले आहे, तर यष्टीरक्षणाची जबाबदारी संजू सॅमसन आणि ईशान किशन यांच्यावर असेल. हार्दिक पंड्या अष्टपैलू खेळाडू म्हणून कणा असेल, तर गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव सांभाळतील.भारत आणि अमेरिका (T20 World Cup 2026) यांच्यातील ही महत्त्वाची लढत शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे.ऑस्ट्रेलियाला दुखापतीचा फटका:अंतिम संघ जाहीर करण्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू पॅट कमिन्स आणि मॅथ्यू शॉर्ट हे दुखापतीमुळे या विश्वचषकातून बाहेर पडले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाला आपली रणनीती बदलावी लागणार आहे.
मेकअप करणं सोपं असतं, पण नेमकं काय घालायचं, हा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी बॉलिवूड अभिनेत्रींकडून थोडी स्टाइल इन्स्पिरेशन घेतली, तर तुमचा लुक नक्कीच परफेक्ट होऊ शकतो. चला तर मग पाहूया, अनन्या पांडेपासून दीपिका पादुकोणपर्यंत रोज डे साठी खास आउटफिट आयडियाज.
Sanjay Ghadi: राज ठाकरे सोबत मैत्री ते थेट मुंबईचे उपमहापौर पद
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार, ७ फेब्रुवारी) महापालिका राजकारणात मोठी आणि निर्णायक घडामोड घडली. शहराच्या नेतृत्वाच्या शिखरावर कोण विराजमान होणार, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले असतानाच प्रभाग १३२ च्या नगरसेविका आणि भाजप महिला मोर्चा संयोजिका रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. तर उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.भारतीय विद्यार्थी सेना ते उपमहापौर:मुंबईच नवीन उपमहापौर संजय घाडी हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी, मित्र होते. भारतीय विद्यार्थी सेनेपासून ते राज ठाकरे यांच्यासोबत होते. राज ठाकरेंनी २००७ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, त्यावेळी ते मनसेमध्ये होते. त्यांनी मनसेकडून निवडणूकही लढवली होती. पण नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले. तिथून नगरसेवक बनले. संजय घाडी यांची पत्नी संजना घाडी सुद्धा नगरसेविका होत्या. मागच्यावर्षी एप्रिल महिन्यात संजय आणि संजना घाडी या दोघांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मागच्या महिन्यात संजय घाडी पुन्हा वॉर्ड क्रमांक ५ मधून नगरसेवक म्हणून निवडून आले. आता त्यांच्यावर मुंबईच्या उपमहापौर पदाची जबाबदारी असेल.रितू तावडे यांचा परिचय:रितू तावडे या घाटकोपर पूर्व मधील प्रभाग १३२मधून निवडून आल्या आहेत. सन २०१२ मध्ये प्रथम निवडून आल्यांनतर शिक्षण समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. आक्रमक आणि अभ्यासू असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. नगरसेवक काळात दुकानांबाहेर महिलांचे कपडे प्रदर्शित केले जाणारे पुतळे अर्थात मॅनीक्विन हटवण्याची जोरदार मागणी त्यांनी आपल्या नगरसेवक काळात केली होती, तसेच सध्या मुंबई भाजपाच्या महिला संयोजिकासंजय घाडी यांचा परिचय:संजय घाडी हे मागाठने विधानसभेतील नगरसेवक म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. पूर्वी शिवसेना आणि त्या नंतर मनसेमध्ये आणि पुन्हा उबाठा शिवसेना आणि तिथून पुन्हा शिवसेना असा त्यांचा प्रवास आहे. मागील काळात त्यांनी स्थायी समिती सदस्यत्व भूषवले होते.
Ritu Tawde and Sanjay Ghadi : महापौर पदासाठी रितू तावडे आणि उपमहापौर पदासाठी संजय घाडी कोण आहेत.
Obama Monkey Face Video: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा अपमानजनक व्हिडिओ शेअर केल्यानंतर ते पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडले आहेत.
जर तुमच्या एखाद्या मित्र किंवा नातेवाईकाला कर्जाची गरज असेल. तो तुम्हाला कर्ज हमीदार (Loan Guarantor) बनण्यास सांगतो, तर तुम्ही काय कराल? तुम्ही 'हो' म्हणण्याची दाट शक्यता आहे, कारण लोकांना सहसा असे वाटते की फक्त कागदावर सहीच तर करायची आहे. जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर थांबा. कर्ज हमीदार बनणे ही केवळ एक औपचारिकता नाही. यासोबत अनेक मोठ्या जबाबदाऱ्या येतात. जर कर्जदाराने वेळेवर EMI (इक्वेटेड मंथली इंस्टॉलमेंट) भरला नाही, तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. बँक किंवा फायनान्शियल कंपनी थेट तुमच्याकडून वसुली करू शकते. तुम्हाला कर्ज घेताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कर्ज हमीदार बनण्यापूर्वी त्याचे धोके समजून घेणे महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत, आज आपण तुमचा पैसा या कॉलममध्ये कर्ज हमीदार म्हणजे काय हे जाणून घेऊ. तसेच हे देखील जाणून घेऊ की- तज्ञ: राजशेखर, आर्थिक तज्ञ, देहरादून प्रश्न- कर्ज हमीदार होण्याचा अर्थ काय आहे? उत्तर- कर्ज हमीदार म्हणजे अशी व्यक्ती, जी एखाद्या कर्जाची जबाबदारी किंवा हमी घेते. याची हमी की, जर कर्ज घेणारा (कर्जदार) कोणत्याही कारणास्तव कर्जाची रक्कम फेडू शकला नाही, तर हमीदार ती संपूर्ण कर्जाची रक्कम फेडण्यासाठी कायदेशीररित्या जबाबदार असेल. प्रश्न- कर्जा हमीदार कोण बनू शकतो? उत्तर- कोणतीही व्यक्ती कर्जा हमीदार बनू शकते, जर ती बँकेने ठरवलेल्या पात्रता आणि अटी पूर्ण करत असेल. हमीदार बनणाऱ्या व्यक्तीलाही तेच क्रेडिट पात्रता (कर्ज घेण्याची योग्यता) निकष पूर्ण करावे लागतात, जे कर्ज घेणाऱ्यासाठी असतात. म्हणजे हमीदाराची क्रेडिट प्रोफाइल बँकेच्या दृष्टीने योग्य असावी. कर्जा हमीदार बनण्यासाठी सहसा जवळचे कुटुंबातील सदस्यच तयार होतात. प्रश्न- बँक कर्ज हमीदाराचे उत्पन्नाशी संबंधित कागदपत्रे का जमा करून घेते आणि KYC का करते? उत्तर- बँक हमीदाराच्या परतफेडीच्या क्षमतेशी संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी करते आणि ती जमा करून घेते. परतफेडीची क्षमता म्हणजे हमीदाराची कर्ज फेडण्याची आर्थिक क्षमता. हमीदार हा एक प्रकारचा असा कर्जदार असतो, जो नियमितपणे ईएमआय भरत नसतो. तथापि, जेव्हा कर्ज घेणारी व्यक्ती हप्ता भरू शकत नाही, तेव्हापासून हमीदाराची भूमिका सुरू होते. त्याला कर्ज फेडावे लागते. म्हणून हमीदारालाही नो युवर कस्टमर (KYC) आणि उत्पन्नाशी संबंधित कागदपत्रे जमा करावी लागतात, जेणेकरून कर्ज हमीदार हे कर्ज फेडण्यास सक्षम आहे की नाही हे तपासता येईल. प्रश्न- हमीदार बनल्यावर कोणत्या जबाबदाऱ्या येतात? उत्तर- हमीदार बनल्यावर तुमच्या जबाबदाऱ्या केवळ नाव किंवा स्वाक्षरीपुरत्या मर्यादित नसतात. ही एक कायदेशीर आणि आर्थिक जबाबदारी (कर्ज फेडण्याची जबाबदारी) आहे. चला, हे ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया. प्रश्न- तुम्ही ज्याचे कर्ज हमीदार आहात, जर त्याने वेळेवर कर्ज फेडले नाही तर बँक तुमच्यासोबत काय करू शकते? उत्तर- जर कर्जदाराने हप्ता भरला नाही, तर हमीदाराचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. बँक हमीदाराकडून वसुली करू शकते, नोटीस पाठवू शकते. त्याच्या बँक खात्यातून पैसे कापू शकते आणि गरज पडल्यास कायदेशीर कारवाई देखील करू शकते. हमीदाराला होणारे सर्व नुकसान ग्राफिकमध्ये पहा- प्रश्न- हमीदार बनण्यापूर्वी बँक कोणत्या आर्थिक पैलूंची तपासणी करते? उत्तर- हमीदार बनण्यापूर्वी बँक व्यक्तीच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करते. यात त्याचे उत्पन्न, नोकरी किंवा व्यवसायाची स्थिरता, सध्याचे कर्ज, क्रेडिट स्कोअर आणि परतफेडीचा इतिहास तपासला जातो. बँक हे सुनिश्चित करते की जर कर्जदार कर्ज फेडू शकला नाही, तर हमीदार ते फेडण्यास सक्षम असावा. प्रश्न- कोणाच्या कर्जाचा हमीदार बनण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? उत्तर- हमीदार बनण्यापूर्वी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची विश्वसनीयता आणि त्याची कर्ज फेडण्याची क्षमता नक्की जाणून घ्या. फक्त त्याच व्यक्तीचे हमीदार बनण्याचा प्रयत्न करा, ज्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे. त्याचबरोबर, तुम्ही गरज पडल्यास स्वतः फेडू शकाल अशाच कर्ज रकमेसाठी हमीदार व्हा. कर्जाच्या सर्व अटी आणि हमीदाराच्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे. चला, हे ग्राफिक्सद्वारे समजून घेऊया. प्रश्न- जर तुम्ही हमीदार असाल आणि कर्जाची परतफेड झाली नसेल (लोन डिफॉल्ट), तर स्वतःचे संरक्षण कसे कराल? उत्तर- जर कर्जदार कर्जाचा हप्ता भरू शकत नसेल, तर सर्वात आधी त्याच्याशी बोलून परतफेड सुरू करण्यास सांगा. जर समस्या येत असेल, तर त्वरित बँकेशी संपर्क साधून परिस्थिती स्पष्ट करा. तुम्ही बँकेकडून वन-टाइम सेटलमेंट (बँक आणि कर्जदार/हमीदार यांच्यात ठरलेली रक्कम देऊन कर्ज बंद करणे) किंवा कर्ज पुनर्रचना (कर्जाचा कालावधी, हप्ता किंवा परतफेडीच्या अटींमध्ये बदल) यापैकी कोणताही पर्याय मागू शकता. भविष्यात हमीदार होण्यापूर्वी कर्जाच्या सर्व अटी चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि गरज पडल्यास कायदेशीर सल्ला नक्की घ्या. प्रश्न- जर हमीदार म्हणून आपले नाव यादीतून काढायचे असेल तर काय मार्ग आहेत? उत्तर- जर तुम्ही हमीदार म्हणून स्वाक्षरी केली असेल, तर नाव काढणे सोपे नसते. यासाठी कर्ज घेणाऱ्याला कर्ज हस्तांतरित करावे लागेल किंवा नवीन हमीदार आणावा लागेल, तसेच यासाठी बँकेची परवानगी आवश्यक असते. तुम्ही बँकेकडे लेखी विनंती करू शकता, परंतु अंतिम निर्णय बँकेचा असतो. अनेक परिस्थितीत कर्जाचे सर्व हप्ते फेडल्यावरच नाव काढले जाते. प्रश्न- हमीदाराला कर्ज घेणाऱ्याच्या बँक स्टेटमेंट किंवा EMI पेमेंटची माहिती कशी मिळते? उत्तर- हमीदाराला सहसा कर्ज घेणाऱ्याच्या बँक स्टेटमेंटची किंवा EMI भरणा माहिती बँकेकडून थेट दिली जात नाही, कारण ही ग्राहकाची खाजगी माहिती मानली जाते. जर कर्ज घेणारी व्यक्ती स्वतः माहिती शेअर करते किंवा हमीदार त्या कर्जामध्ये सह-स्वाक्षरीकर्ता (अशी व्यक्ती, जी कर्ज करारावर कर्जदारासोबत स्वाक्षरी करून जबाबदारी वाटून घेते.) असेल, तर त्याला कर्जाशी संबंधित माहिती मिळू शकते. जर कर्जाचा हप्ता वेळेवर भरला नाही, तर बँक हमीदाराला नोटीस पाठवून डिफॉल्टची माहिती देते. म्हणून हमीदाराने वेळोवेळी कर्जदाराच्या संपर्कात राहून कर्जाच्या परतफेडीच्या स्थितीची माहिती घेत राहायला पाहिजे, जेणेकरून अचानक कोणतीही आर्थिक जबाबदारी येऊ नये.
Hasan Mushrif : विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केले आहे.
Uttar Pradesh accident: यमुना एक्सप्रेसवेवर एक मोठा अपघात झाला. मथुराजवळ एका कंटेनरने १५ प्रवाशांना धडक दिली, त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले.
मुंबई महापालिकेचे महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार जाहीर
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाला. निकालानंतर महायुतीचाच महापौर होणार असे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून वारंवार सांगितले जात होते. अखेर त्यावर शिक्कामोर्तब होत असल्याचे दिसू लागले आहे. मुंबई महापालिकेसाठी महायुतीने महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार जाहीर केले आहेत.भारतीय जनता पार्टीच्या अर्थात भाजपच्या रितू तावडे या महायुतीच्यावतीने महापौरपदाच्या उमेदवार आहेत. तसेच शिवसेनेचे दहिसर पूर्वचे नगरसेवक संजय घाडी हे महायुतीच्यावतीने उपमहापौरपदाचे उमेदवार आहेत. उपमहापौरपदाचा उमेदवार सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी असेल. घाडींचा उपमहापौरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर महायुतीच्यावतीने उपमहापौरपदासाठी नव्या उमेदवाराची योग्य वेळी घोषणा केली जाणार आहे.भाजप आणि शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांच्या तसेच मुंबई मनपातील महायुतीच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले.महत्त्वाचे शनिवारी महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मुंबईच्या महापौर पदासाठी महिला सर्वसाधारण गटाचे आरक्षणhttps://prahaar.in/2026/02/07/the-candidate-for-the-post-of-mumbai-mayor-will-be-decided-today/मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६ भाजप ८९ शिवसेना २९ राष्ट्रवादी काँग्रेस ३ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार १ उबाठा ६५ मनसे ६ काँग्रेस २४ समाजवादी पार्टी २ एमआयएम ८ इतर १३ एकूण २२७
मुंबई विशेष प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका राजकारणात मोठी आणि निर्णायक घडामोड घडली. शहराच्या नेतृत्वाच्या शिखरावर कोण विराजमान होणार, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले असतानाच प्रभाग १३२ च्या नगरसेविका आणि भाजप महिला मोर्चा संयोजिका रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. तर उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.महापालिकेतील भाजप पक्ष कार्यालयात पार पडलेल्या नगरसेवकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नगरसेविका रितू तावडे यांचे नाव महापौर पदाच्या उमेदवार म्हणून जाहीर केले. तावडे यांच्या नावाची घोषणा करताच उपस्थित नगरसेवकांनी जोरदार टाळ्या वाजवत पक्षाच्या या निर्णयाचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. भाजपच्या या पहिल्या महिला महापौर असून केल्याने राजकीय वर्तुळात उत्साहाची लाट निर्माण केली. या घोषणेमुळे सहकारी नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.घोषणेनंतर तावडे यांनी पक्षाने सोपवलेली जबाबदारी विश्वासाने पेलण्यासाठी पुढे पक्षाचा विश्वास अधिक दृढ करण्याचां निर्धार व्यक्त करत जय श्रीराम...भारत माता की जय... वंदे मातरम्... डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो.. भारतीय जनता पार्टीचा... देवा भाऊ आहे बढो .. अमित साटम आगे बढो.. या घोषणांच्या गजरात आपला उमेदवारी अर्ज महापालिका सचिव मंजिरी देशपांडे यांच्याकडे अधिकृतपणे सादर केला. याप्रसंगी महापालिका गटनेते गणेश खणकर, उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा..माजी खासदार मनोज कोटक.ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे, शिवसेनेचे गटनेते अमेय घोले, तसेच महायुतीचे नगरसेवक उपस्थित होते.महापौर पदासाठी ही उमेदवारी ही मुंबईच्या विकासाच्या आणि सक्षम नेतृत्वाच्या दृष्टीने महत्त्वाची महत्वाची मानली जात असून सातम यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानत त्यांच्या विश्वास मुंबईच्या विकासाचा रथ जलदगतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करत सार्थ ठरवेन अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.दरम्यान, उपमहापौर पदासाठीही एक महत्त्वपूर्ण नाव पुढे आले असून दहिसरमधील नगरसेवक संजय घाडी यांची शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. पक्षाचे सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी घाडी यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, हा कालावधी अडीच वर्षाऐवजी सेवा वर्षांचा असेल असे जाहीर केले. त्यानंतर महायुतीच्या सर्व नगरसेवकांसोबत जात त्यांनी उपमहापौर पदाचा आपला उमेदवारी अर्ज महापालिका सचिव मंजिरी देशपांडे यांच्याकडे सादर केला.https://prahaar.in/2026/02/07/candidates-for-the-posts-of-mayor-and-deputy-mayor-of-mumbai-municipal-corporation-have-been-announced/रितू तावडे यांचा परिचयरितू तावडे या घाटकोपर पूर्व मधील प्रभाग १३२मधून निवडून आल्या आहेत. सन २०१२मध्ये प्रथम निवडून आल्यांनतर शिक्षण समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. आक्रमक आणि अभ्यासू असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. नगरसेवक काळात दुकानांबाहेर महिलांचे कपडे प्रदर्शित केले जाणारे पुतळे अर्थात मॅनीक्विन हटवण्याची जोरदार मागणी त्यांनी आपल्या नगरसेवक काळात केली होती, तसेच सध्या मुंबई भाजपाच्या महिला संयोजिकासंजय घाडी यांचा परिचयसंजय घाडी हे मागाठने विधानसभेतील नगरसेवक म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. पूर्वी शिवसेना आणि त्या नंतर मनसेमध्ये आणि पुन्हा उबाठा शिवसेना आणि तिथून पुन्हा शिवसेना असा त्यांचा प्रवास आहे. मागील काळात त्यांनी स्थायी समिती सदस्यत्व भूषवले होते.
Pune News : उत्तम शिक्षकांमुळे चांगल्या शिक्षणसंस्था उभा राहतात: कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार
Pune News : फक्त पायाभूत सुविधांनी शिक्षण संस्था चांगली होत नाही, तर उत्तम शिक्षकांमुळे चांगल्या शिक्षण संस्था उभ्या राहतात, असे मत सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटीच्या प्र कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार यांनी व्यक्त केले.
Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पदासाठी नावाची घोषणा झाल्यानंतर रितू तावडेंची पहिली प्रतिक्रिया समोर
Ritu Tawde : भाजपकडून महापौर पदाच्या नावाची घोषणा झाल्यानंतर रितू तावडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदान करा, मंत्री नितेश राणेंचे आवाहन
मुंबई : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू आहे. मतदानाला सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.'मतदान करा, लोकशाही मजबूत करा...राज्यात आज सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक सन-२०२६ च्या पार्श्वभूमीवर विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आणि आपल्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनीच मतदान करने अत्यंत आवश्यक आहे...आज दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ वार शनिवार रोजी जि.प. व पंचायत समिती साठी सर्वत्र मतदान होत आहे, प्रत्येक नागरिकाने आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावला पाहिजे...मतदान करा व आपली लोकशाही मजबूत करा...मतदानाची वेळ :-सकाळी ०७:३० ते सायं ०५:३० वाजेपर्यंत...'अशी पोस्ट करून मंत्री नितेश राणे यांनी नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे.राज्यातील जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी मतदान सुरू आहे. रिंगणात असलेल्या एकूण ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य राज्यातील तब्बल २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार ठरवणार आहेत. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत मतदारांचा कल कोणाकडे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 'सर्व मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा,' असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.
Ritu Tawde : भाजपने मुंबईच्या महापौर पदासाठी रितू तावडेंच्या नावाची घोषणा केली आहे. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली असून, शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
बारामतीमध्ये ग्लोबल शुगर एआय समिटचे आयोजन
बारामती : फाइंडेबिलिटी सायन्सेसने जाहीर केले आहे की ग्लोबल शुगर एआय समिट 2026 हे ८ फेब्रुवारी २०२६ रोजी बारामती, महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात येणार आहे. या समिटचे सहआयोजन अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती, पँटालिऑन शुगर होल्डिंग्स आणि यूपीसीएससी (युनिव्हर्सिटी/प्लॅटफॉर्म फॉर कोलॅबोरेटिव्ह शुगरकेन सायन्स) यांच्या संयुक्त विद्यमाने होणार असून, स्टोमाटा लॅब्स आणि ऊर्जा बायो सिस्टीम्स यांचा प्रायोजक म्हणून पाठिंबा लाभणार आहे.हे समिट साखर उद्योगातील उत्पादक, कृषी-तंत्रज्ञान नवोन्मेषक, धोरणकर्ते आणि प्रत्यक्ष कार्यरत व्यावसायिकांना एकत्र आणून साखर मूल्य साखळीमध्ये व्यावहारिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) उपायांचे प्रभावी अंगीकरण कसे करता येईल, यावर केंद्रीत असेल.भारत हा जगातील प्रमुख साखर उत्पादक देशांपैकी एक असून, मराठवाड्यासारख्या अनेक भागांना पाण्याची टंचाई, बदलते हवामान आणि वाढता पर्यावरणीय ताण यांसारख्या सातत्यपूर्ण आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत, व्यावहारिक एआय तंत्रज्ञान शेतकरी आणि साखर गिरणी व्यवस्थापकांना उत्पादनक्षमता वाढवणे, संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर करणे, सिंचन नियोजन सुधारणे आणि एकूण कार्यक्षमता वाढवणे यासाठी सक्षम ठरू शकते. याचे थेट परिणाम मजबूत ग्रामीण अर्थव्यवस्था, अधिक टिकाऊ शेती पद्धती आणि ऊस उत्पादक जिल्ह्यांतील उपजीविकेच्या संधींमध्ये सुधारणा यामध्ये दिसून येतात.यासंदर्भात बोलताना फाइंडेबिलिटी सायन्सेसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद महुरकर म्हणाले, “ज्या काळात आपले कृषी समुदाय हवामान बदल आणि बाजारातील गुंतागुंतीच्या आव्हानांना सामोरे जात आहेत, त्या पार्श्वभूमीवर ग्लोबल शुगर एआय समिटचा भर प्रत्यक्ष आणि मोजता येणाऱ्या परिणामांवर आहे. हे समिट अत्याधुनिक एआय तंत्रज्ञान आणि शेतकरी व साखर गिरणी नेतृत्व यांच्या दैनंदिन गरजांमध्ये सेतू निर्माण करते — ज्यामुळे निर्णयप्रक्रिया अधिक सक्षम होते, उत्पादकता वाढते, टिकाऊपणा बळकट होतो आणि ग्रामीण समृद्धीला चालना मिळते.”समिटच्या कार्यक्रमाची रचना परिणाम-केंद्रित आणि कृती करण्यायोग्य कृत्रिम बुद्धिमत्ता अंतर्दृष्टींवर आधारित असून, त्या थेट मोजता येण्याजोगे मूल्य निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतात. यामध्ये उत्पादनक्षमता वाढवणे, पाण्याचा कार्यक्षम वापर, कृषी इनपुट्सचे अनुकूलन तसेच गिरणी-स्तरीय कार्यप्रणाली सुधारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एआय उपायांचे वास्तविक जगातील केस स्टडीज आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर केली जातील. यासोबतच, शेतकरी, साखर गिरणी व्यवस्थापक, कृषीशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञान भागीदार यांच्यातील सहयोगी गोलमेज चर्चांद्वारे अंमलबजावणीतील अडथळे, प्रत्यक्ष अनुभवातून शिकलेले धडे आणि मोठ्या प्रमाणावर विस्तारता येणाऱ्या पद्धतींवर व्यवसाय-नेतृत्वाखाली सखोल विचारमंथन होईल.समिटमध्ये डेटा तयारी, डेटा प्रशासन, संघटनात्मक बदल व्यवस्थापन तसेच पायलट प्रकल्पांच्या पलीकडे एआय उपाय यशस्वीरीत्या विस्तारण्यासाठी आवश्यक असलेल्या अंमलबजावणी धोरणांवर केंद्रित व्यावहारिक सत्रांचाही समावेश असेल. याशिवाय, सरकार, उद्योग संघटना, संशोधन संस्था, सह-आयोजक आणि प्रायोजक यांचा सक्रिय सहभाग असलेले परिसंस्था-स्तरीय संवाद आयोजित करण्यात येतील, ज्यांचा उद्देश समन्वित नवोन्मेषाला चालना देणे आणि साखर क्षेत्रात एआयच्या प्रभावी अंगीकरणासाठी सक्षम, दीर्घकालीन मार्ग विकसित करणे हा असेल.हे समिट भारताच्या कृषी क्षेत्राला होणाऱ्या व्यापक आणि दीर्घकालीन लाभांवरही ठामपणे लक्ष केंद्रित करते, ज्यामध्ये पाणी-वापर कार्यक्षमतेत सुधारणा, हवामान बदलांसमोर अधिक लवचिकता, रोजगारनिर्मितीला चालना तसेच पुढील पिढीच्या कृषी-तंत्रज्ञान समाधानांचे प्रभावी अंगीकरण यांचा समावेश आहे. हे सर्व परिणाम शेती उत्पादकता वाढवणे, साखर व कृषी पुरवठा साखळी अधिक सक्षम करणे आणि संपूर्ण ग्रामीण भारतात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या राष्ट्रीय स्तरावरील प्राधान्यक्रमांना थेट पाठिंबा देतात.
Pappu Yadav: पप्पू यादवची प्रकृती बिघडली ; ३१ वर्षे जुन्या प्रकरणी काल मध्यरात्री झाली अटक
Pappu Yadav: बिहारच्या राजकारणात शुक्रवारी मध्यरात्री मोठी घडामोड घडली. पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांना पोलिसांनी मध्यरात्री १२ वाजता अटक केली.
State Election Commission : अजित पवार यांच्या निधनाला आज १० दिवस पूर्ण झाले असून, अशातच निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे.
Paracetamol: घराघरातली ही गोळी ठरू शकते ‘सायलेंट किलर’! डोळे बंद करून गोळी खाणं ठरू शकत धोकादायक
आजकाल अनेक जण सर्दी-खोकला, वेदना यासाठी वेगवेगळ्या गोळ्या एकत्र घेतात. मात्र, या अनेक औषधांमध्ये आधीच पॅरासिटामोल असतं. त्यामुळे नकळत या औषधाचं प्रमाण खूप वाढतं.
राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान LIVE
मुंबई :महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू आहे. मतदानाला सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. मतदानासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे. यावेळी २ कोटी ८ लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निकाल सोमवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून जाहीर होणार आहे. मतमोजणी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे.जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी मतदान होत आहे. रिंगणात असलेल्या एकूण ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य राज्यातील तब्बल २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार ठरवणार आहेत. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत मतदारांचा कल कोणाकडे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 'सर्व मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा,' असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.Live Updateछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमधील नायगाव येथील मतदान केंद्रावर भाजप उमेदवाराला धक्काबुक्कीनिवडणुकीत समाधानकारक कामगिरी करू : जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारअकलूज : अर्जुनसिंह मोहिते पाटील मतदानावेळी सोबत मुलाला रुद्रराज मोहिते पाटीलला घेऊन आले. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यानं घेतला आक्षेप. थोडा वेळ तणावाचे वातावरण. वरिष्ठांनी चर्चेतून तोंडगा काढला.भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पडळकरवाडीमध्ये केले मतदानछत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकणार; संदिपान भुमरे यांना विश्वाससोलापुरात मोहिते पाटील कुटुंबियांनी केले मतदानआमदार रोहित पवारांनी केले मतदानराज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्कदौंडचे भाजप आमदार राहुल कुलनी बजावला मतदानाचा हक्कइंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील मतदान केंद्रावरती मतदारांच्या रांगाशिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे पाचोड मतदान केंद्रावर, पाचोड जिल्हा परिषद गटातून खासदार भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे आहेत उमेदवारकरमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथील २२४ मतदान केंद्रावर EVM बंदसोलापूर जिल्ह्यातील कोंडी जिल्हा परिषद गटात उमेदवाराकडून मतदान केंद्राची पूजाकाही भागात सकाळीच EVM बंद पडल्याने मतदानात व्यत्ययकराडमधील चचेगावमध्ये बूथ क्रमांक ७८ चे EVM बंदउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क :जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत मतदान करण्याचे आवाहन केले.सकाळी साडेसात वाजल्यापासून महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू
अजित पवारांच्या खासगी सचिवाची कसून चौकशी
मुंबई : अजित पवारांचे बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ विमान अपघातात निधन झाले. या प्रकरणी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अर्थात सीआयडीने अजित पवारांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची मंत्रालयात सुमारे ४ तास कसून चौकशी केल्याचे समजते. अजितदादांच्या अपघाताच्या आदल्या रात्री या संदर्भात अविनाश सोलवट यांना वारंवार उलटसुलट प्रश्न विचारण्यात आल्याचे वृत्त आहे.अजित पवार आधी कारने बारामतीला जाणार होते. आयत्यावेळी विमान प्रवासाचे नियोजन झाले. कार्यक्रमातला हा बदल नेमका कधी आणि का करण्यात आला. हा निर्णय कोणत्या व्यक्तीने घेतला आणि त्यापुढे आवश्यक ते नियोजन कोणी केले हे सीआयडीने जाणून घेतले. अविनाश सोलवट यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी सुरू आहे. तसेच विमानाच्या ब्लॅकबॉक्समधील माहितीचे विश्लेषण करण्याचे काम तज्ज्ञ करत आहेत. विमानाचा जमिनीवर आदळण्यापूर्वीचा मार्ग आणि त्यानंतरचा स्फोट या मागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.उड्डाणाआधी विमानाची तांत्रिक तपासणी तसेच आवश्यक ती देखभाल - दुरुस्ती करणाऱ्यांचीही कसून चौकशी होणार असल्याचे समजते. अजित पवारांच्या विमानाचा अपघात हा तांत्रिक कारणामुळे झाला की त्यामागे काही षडयंत्र होते या प्रश्नाचे उत्तर सीआयडी शोधत आहे. याआधीच नागरी विमान वाहतूक संचालनालयाने तज्ज्ञांच्या मदतीने अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू केली आहे. सीआयडी अजित पवारांच्या निवडक जवळच्या लोकांची कसून चौकशी करत असल्याचे समजते. तपासाचा भाग म्हणून ही प्रक्रिया सुरू आहे. अद्याप कोणावरही थेट संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. तसेच कोणालाही पकडण्यात आलेले नाही.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागरी विमान वाहतूक संचालनालयाने नेमलेल्या समितीचे तज्ज्ञ विमानाचा वेग, उंची, इंजिनचे तापमान आणि पायलटमधील संभाषणाचे तांत्रिक विश्लेषण करत आहे. विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून स्फोटाचं स्वरूप आणि आगीचं कारण जाणून घेतलं जाईल. अपघाताचे कारण मानवी चूक, तांत्रिक बिघाड की घातपात या शक्यतांचीही पडताळणी होणार आहे.
US-India Trade Deal: भारत -अमेरिकेतील अंतरिम व्यापार करार सुरू; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
US-India Trade Deal: अमेरिका आणि भारत यांनी अंतरिम व्यापार करारासाठी आराखडा जाहीर केला. या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापक आणि कायमस्वरूपी द्विपक्षीय व्यापार कराराच्या दिशेने प्रगती वेगवान होते.
Rohit Pawar :मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुंबई : रेल्वे रुळांची देखभाल आणि सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी उद्या, रविवारी मुंबईच्या तिन्ही मुख्य मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार दरम्यान आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. तसेच, पश्चिम रेल्वेवरही सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, धावणाऱ्या गाड्या १५ ते २० मिनिटे विलंबाने धावण्याची शक्यता आहे. रविवारी सुट्टीनिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेचे सुधारित वेळापत्रक पाहूनच आपला प्रवास नियोजित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.https://prahaar.in/2026/02/07/voting-is-being-held-today-for-12-zilla-parishads-and-panchayat-samiti/मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉकमध्य रेल्वेने उद्या, रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाउन अशा दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या ५ तासांच्या कालावधीत रेल्वे रुळांची आणि तांत्रिक कामांची देखभाल-दुरुस्ती केली जाणार आहे. या ब्लॉकमुळे धीम्या (Local) मार्गावरील सर्व फेऱ्या जलद (Fast) मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, उर्वरित गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील. प्रवासाचे नियोजन करताना या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.पनवेल-वाशी दरम्यान हार्बरचा ५ तासांचा ब्लॉकउद्या रविवारी हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत अप आणि डाउन मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे हार्बर आणि ट्रान्स-हार्बर अशा दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटी ते पनवेल आणि ठाणे ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या सर्व लोकल फेऱ्या रद्द राहतील. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, खारकोपर-उरण मार्गावरील वाहतूक मात्र आपल्या निर्धारित वेळापत्रकानुसारच सुरू राहील, त्यामुळे तिथल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.पश्चिम रेल्वेवर उद्या 'जम्बो ब्लॉकपश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी उद्याचा रविवार त्रासाचा ठरणार आहे. सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत धीम्या मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. या ब्लॉकचा सर्वात मोठा फटका विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकातील प्रवाशांना बसणार आहे. या दोन्ही स्थानकांवर जलद मार्गाचे फलाट उपलब्ध नसल्याने, ब्लॉक वेळेत येथे कोणतीही लोकल थांबणार नाही. या स्थानकांतील प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था म्हणून हार्बर रेल्वेच्या लोकलचा वापर करावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे. या तांत्रिक कामामुळे पश्चिम रेल्वेच्या काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, उर्वरित गाड्या विलंबाने धावणार आहेत.कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर 'बुलडोझर' फिरणारमध्य रेल्वेने आपल्या हद्दीतील जमिनी मोकळ्या करण्यासाठी कंबर कसली असून, कुर्ला-ट्रॉम्बे मार्गिकेलगत असलेल्या अतिक्रमणांवर कारवाईचा बगा बडवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने या भागातील तब्बल ३ हजार १५४ झोपडीधारकांना अधिकृतपणे नोटिसा बजावून जागा खाली करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान रेल्वे प्रशासनातर्फे या परिसरात एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत रेल्वे मार्गालगत असलेली सर्व बेकायदा अतिक्रमणे हटवली जातील. रेल्वेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील झोपडीधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. रेल्वे मार्गाच्या सुरक्षा आणि विस्तारीकरणासाठी ही जागा मोकळी करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
Top 10 news: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
आम्ही दहा वर्षं एकमेकांना डेट करत होतो, पण लग्नाआधी कधीच एकत्र राहिलो नाही. फिरायला जायचो, शूटिंगसाठी एकाच ठिकाणी असायचो, पण आमच्या रूम्स नेहमी वेगवेगळ्या असायच्या.
Sunetra Pawar : अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जात कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
‘चेतनकडे चांगले पैसे होते. फॉर्च्यूनर गाडी होती. तो गाड्यांच्या फायनान्सचे काम करत असे. जुनी घरे विकत घेऊन ती विकत असे. इथेच एकता पार्क (दिल्ली) जवळ शालीमार बिल्डिंगमध्ये राहत होता. मग काय झाले माहीत नाही… तो कर्जबाजारी होत गेला.… जर हे लोक मुलींना आपल्यासोबत झोपवत असते तर अशी गोष्ट थोडीच घडली असती.’ असे दिलीप कुमार यांचे म्हणणे आहे. ते निशिका, प्राची, पाखी या तीन मुलींचे आजोबा आहेत, ज्यांचा आता गाझियाबादमध्ये मृत्यू झाला आहे. दिलीप यांनी हे देखील सांगितले की, आजपासून सुमारे 6-7 वर्षांपूर्वी त्यांच्या आणखी एका मुलीचा मृत्यू देखील जावई चेतनच्या फ्लॅटमधून पडल्यामुळे झाला होता. मात्र, त्यावेळी कुटुंबाने याला अपघात मानले होते. अखेर कोणत्या परिस्थितीत दिलीप यांनी आपल्या दोन्ही मुलींची लग्ने चेतनशी केली? चेतनची त्यावेळी काय परिस्थिती होती? तो काय करत होता? परिस्थिती कशी बिघडत गेली, अशा प्रश्नांवर आम्ही त्याचे सासरे दिलीप यांच्याशी सविस्तर चर्चा केली. वाचा… 18 वर्षांपूर्वी लग्न केले, नंतर दुसरी मुलगीही लग्न करून दिली गाझियाबादमधील भारत सिटी सोसायटीमध्ये चेतन आपल्या दोन पत्नी आणि 5 मुलांसोबत राहत होता. 3 फेब्रुवारीच्या रात्री तीन मुलींचा मृत्यू झाला. नवव्या मजल्यावरून खाली पडल्यानंतर, जेव्हा या मुलींचे शवविच्छेदन झाले तेव्हा असे दिसून आले की शरीराचे बहुतेक अवयव फाटले होते. या प्रकरणात वडील चेतनने आधी सांगितले होते की या मुली कोरियन गेम खेळत होत्या, त्याच गेममधील टास्क पूर्ण करण्याच्या प्रयत्नात त्यांनी आत्महत्या केली. मात्र, पोलीस तपासात गेमचा कोणताही संबंध आढळला नाही. आता कुटुंब घराला कुलूप लावून कुठेतरी निघून गेले आहे. ‘दिव्य मराठी’ची टीम दिल्लीतील सीलमपूर येथे पोहोचली. चेतनच्या दोन पत्नी सुजाता आणि हिना एकमेकींच्या बहिणी आहेत, त्यांचे घर इथेच आहे. तिसऱ्या पत्नीचे घर दुसरीकडे आहे. शिव मंदिरावरून जात आम्ही सीलमपूरच्या त्या गल्लीत पोहोचलो, जिथे सुजाता आणि हिनाचे माहेर आहे. इथेच तिसऱ्या मजल्यावर सुजाताचे वडील दिलीप कुमार भेटले. या तीन मजली घरात दिलीपचे आणखी तीन भाऊ राहतात. सर्वांच्या वाट्याला एक-एक खोली आली आहे. दिलीप म्हणतात, आम्हाला एकूण 14 मुले आहेत. यात 11 मुली आणि 3 मुलगे आहेत. सर्वात मोठा मुलगा दीपू होता, जो 10-12 वर्षांपूर्वी कुठेतरी निघून गेला. त्याचा आजपर्यंत काही पत्ता लागलेला नाही. मी ऑटो चालवत होतो, पण गेल्या दोन वर्षांपासून पायात त्रास असल्यामुळे आता चालवत नाही. सुजाता माझी सर्वात मोठी मुलगी आहे. 17-18 वर्षांपूर्वी आम्ही तिचे लग्न चेतनशी केले होते. त्यावेळी चेतन छोटी-मोठी कामे करत होता. चेतनने पैसे कमावले, फॉर्च्यूनरमधून फिरत असे दिलीप म्हणतात, चेतनने यानंतर पैसे कमावले. आधी तो खजुरी परिसरात राहत होता. नंतर एकता पार्कच्या शालीमार गार्डनमध्ये फ्लॅटमध्ये राहू लागला. त्यावेळी तो चांगले पैसे कमवत होता. गाड्यांच्या फायनान्सचे काम करत होता. एखादे घर 15 लाखांत विकत घेतले तर ते दुरुस्त करून 20 लाखांत विकत असे. जमिनीचेही काम करत होता. पण काय झाले माहीत नाही, सर्व काही संपत गेले. गाडीही विकली गेली. ते दुसरी मुलगी हिनाच्या लग्नाबद्दल म्हणतात, सुजाताला मूल होत नव्हते, त्यानंतर आम्ही हिनाचे लग्नही चेतनशी लावून दिले. मुली आणि जावई त्यांच्या मुलांवर खूप प्रेम करत होते, शालीमारमध्ये राहत असताना त्यांना शाळेत पाठवत होते. चेतनच्या फ्लॅटमधून मेहुणीचा पडून मृत्यू सुमारे 6-7 वर्षांपूर्वी चेतन जेव्हा शालीमार गार्डनमध्ये राहत होता, तेव्हा त्याची मेहुणी आंचल तिथे गेली होती. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला. दिलीप म्हणतात, ‘माझ्या नात निशिकाचा वाढदिवस होता, त्याच कार्यक्रमात आंचल गेली होती. बाल्कनीमध्ये कपडे वाळत घातले होते, आंचल रेलिंगवर उभी राहून कपडे काढत होती, तिचा पाय घसरला आणि तिचा जागीच मृत्यू झाला.’ आंचल दिलीपची सहाव्या क्रमांकाची मुलगी होती, तिचे वय सुमारे 16-17 वर्षांचे होते. त्यावेळी कुटुंबाने याला अपघात मानले आणि कोणतीही कारवाई केली नाही. मुलींचे शिक्षण सोडण्याबद्दल दिलीप म्हणतात, आधी त्या मुली इथे यायच्या, पण नंतर चेतन त्यांना इथे आणत नव्हता. कुटुंबाची परिस्थिती खराब झाली होती, कदाचित म्हणूनच त्यांनी शाळाही सोडली होती. आम्ही जास्त लक्ष देऊ शकलो नाही, कारण आम्हाला आमचंही बघायचं होतं. पण मी हे म्हणतो की जर त्या मुलींना त्यांनी आपल्याजवळ झोपवले असते तर अशी गोष्ट घडली नसती. वेगळ्या खोलीत झोपल्या असतील तर हेच सगळं होणार. चेतनच्या घरी इतर मुलींचेही येणे-जाणे होते सुजाता आणि हिनाचे लग्न चेतनशी झाले होते. त्यांना आणखी ९ बहिणी होत्या. त्यापैकी ७ जणींची लग्ने झाली आहेत, पण नेहा आणि तान्या या दोघींची लग्ने झालेली नाहीत. नेहा सध्या गाझियाबादमध्ये चेतनच्याच घरी आहे. सर्वात लहान तान्या तिच्या वडिलांसोबत सीलमपूरमध्ये आहे. तान्या कॅमेऱ्यासमोर न येता सांगते की, आधी मुलींशी थोडीफार बोलणी व्हायची, पण नंतर त्यांच्याशी कोणीच बोलू देत नव्हते. त्या आल्या तरी इथे कोणाशी बोलत नसत. तान्या सांगते की, आधी दीदी रक्षाबंधन आणि भाऊबीज यांसारख्या सणांना यायची, पण नंतर नाही. जीजा चेतनवर कर्ज झाले होते, तो टाळू लागला होता. कोणाशीही बोलत नव्हता. मास्क लावूनच बाहेर पडायचा. मुलींनी शाळेत जाणे सोडून दिले होते, जीजाने दुसऱ्या शाळेत त्यांचे नावही नोंदवले नाही. त्यांच्या घरात बाकी काय चालले होते, हे मला माहीत नाही. सध्या या संपूर्ण प्रकरणात परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होत आहे. तीन मुलींच्या दोन्ही माता त्या रात्री रडताना आणि पतीला शिवीगाळ करताना दिसल्या होत्या, मात्र त्यानंतर त्या बाहेर आल्या नाहीत. चेतन आता माध्यमांशी बोलत नाहीये आणि कोणालाही बोलू देत नाहीये. पोलीस अधिकारी अधूनमधून जातात आणि जबाब नोंदवत आहेत. त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत.
Zilla Parishad Election 2026 : आज १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.
मुंबई : गेल्या काही काळापासून राज्यात सुरू असलेला निवडणुकांचा धडाका आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर पार पडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर, आता राज्याच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरणार आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. या महत्त्वाच्या टप्प्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, मतदानाची प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. शहरी भागातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता गावखेड्यांच्या विकासाची चावी कोणाकडे जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदान केंद्रांवर प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मतदारांच्या प्रतिसादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.https://prahaar.in/2026/02/07/zp-elections-2026-and-panchayat-samiti-elections-voting-2026/अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निर्माण झालेल्या राजकीय शोककळेनंतर, राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी अखेर आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. ५ फेब्रुवारी रोजी होणारे हे मतदान लांबणीवर पडल्यानंतर आज, शनिवारी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदारांनी केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी एकूण ७,४३८ उमेदवार नशीब अजमावत आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या एकूण जागांपैकी ३६९ जागा महिलांसाठी राखीव असून महिला शक्तीची मोठी कसोटी या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. रायगड, पुणे, कोल्हापूर, लातूर आणि छत्रपती संभाजीनगरसह १२ प्रमुख जिल्ह्यांमध्ये आज सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. प्रशासनाने मतदानासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला असून २ कोटी ८ लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आरक्षणाच्या गणितात अनुसूचित जातींसाठी ८३, जमातींसाठी २५ तर मागासवर्ग प्रवर्गासाठी १९१ जागांचे नियोजन करण्यात आले आहे. आजच्या या चुरशीच्या लढतीचा निकाल ९ फेब्रुवारीला सकाळी १० वाजल्यापासून स्पष्ट व्हायला सुरुवात होईल
पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखाली हे एक छोटेसे गाव. फेब्रुवारी 2024 मध्ये हे गाव चर्चेत आले, जेव्हा तीन महिलांनी ममता बॅनर्जी यांच्या TMC पक्षाचे नेते शाहजहां शेख यांच्यावर सामूहिक बलात्काराचे आरोप केले. महिलांची कहाणी हृदयद्रावक होती. आरोपांनुसार, शाहजहां आणि त्याच्या साथीदारांना जी स्त्री आवडायची, तिला ते पक्षाच्या बैठकीच्या बहाण्याने कार्यालयात बोलावून घेत असत. दोन दिवस, तीन दिवस, चार दिवस, जोपर्यंत त्यांची इच्छा असे, तोपर्यंत तिला कार्यालयातच ठेवत असत. जर एखादी महिला बोलावल्यावर आली नाही, तर तिला घरातून उचलून नेत असत. हे सर्व 13 वर्षांपासून सुरू होते. शाहजहां शेख आणि त्याचे जवळचे शिबू हाजरा, उत्तम सरदार यांना पोलिसांनी अटक केली. शाहजहांवर लैंगिक छळ, सामूहिक बलात्कार यासोबतच जमीन हडपल्याचेही आरोप लावण्यात आले. CBI ला सुमारे 50 तक्रारी मिळाल्या, परंतु काही महिन्यांतच दोन महिलांनी तक्रारी मागे घेतल्या. तरीही, तिन्ही आरोपी अजूनही कोलकाता येथील प्रेसिडेंसी कारागृहात आहेत. दोन वर्षे उलटून गेली आहेत. मार्च-एप्रिलमध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. संदेशखालीमध्ये काय बदलले, पीडित आणि त्यांचे कुटुंबीय कोणत्या स्थितीत आहेत, तिन्ही आरोपींची भीती किती कमी झाली आणि प्रकरण कुठपर्यंत पोहोचले आहे? हे जाणून घेण्यासाठी दिव्य मराठीची टीम कोलकातापासून सुमारे 90 किलोमीटर दूर असलेल्या संदेशखाली येथे पोहोचली. पीडित क्रमांक-१संदेशखालीत गीता पाठ आणि हनुमान चालिसा संदेशखाली गाव एका बेटावर वसलेले आहे. धमाखालीहून आम्ही बोटीने नदी पार करून येथे पोहोचलो. फेरीघाटावरून जाणारा रस्ता भाजप आणि टीएमसीच्या झेंड्यांनी भरलेला आहे. बेटावर वेगवेगळे पाडे म्हणजेच मोहल्ले आहेत. या प्रकरणातील एकमेव पीडित आता रेखा पात्राच आहेत. त्या माजेर पाडा येथे राहतात. येथूनच दोन वर्षांपूर्वी महिलांनी शाहजहां शेख यांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. रेखा आता कोलकाताला स्थलांतरित झाल्या आहेत. SIRच्या प्रक्रियेसाठी संदेशखालीला आल्या होत्या. येथे लायब्ररी मैदानावर 30 जानेवारी रोजी हिंदू जागरण मंचने गीता आणि हनुमान चालीसाचे पठण केले होते. रेखा वेगवेगळ्या पाड्यांमध्ये जाऊन त्याचीच पत्रके वाटत होत्या. त्या घरोघरी जाऊन सांगत होत्या, 'हा कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. यासाठी तुम्ही काही योगदान करा आणि कुटुंबासोबत याचा भाग बना. लाल काठाची पांढरी साडी घालून यायचे आहे. त्या दिवशी स्वयंपाक करण्याची गरज नाही, इथेच जेवण आहे. संदेशखालीतील महिलांसाठी हाच योग्य मार्ग आहे, ही आमची ताकद आहे.' आम्ही रेखा पात्रांना विचारले - यापूर्वीही अशा प्रकारचे आयोजन झाले होते का? त्यांच्या उत्तरात त्या म्हणतात, 'नाही, असे पहिल्यांदाच होत आहे.' रेखा पात्रांनी 2024 मध्ये भाजपच्या तिकिटावर बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण त्या हरल्या. ‘शाहजहां शेखला फाशी होईल, तेव्हाच न्याय मिळेल’संदेशखालीतील सध्याच्या परिस्थितीबद्दल विचारले असता, रेखा म्हणते, ‘संदेशखालीत पोलीस आजही लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवतात. भाजपला पाठिंबा देणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. काही दिवसांपूर्वीच दोन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्याची पोलीस आमच्या विरोधात आहे. भीतीचे वातावरण नाही असे कसे म्हणू शकतो. याच कारणांमुळे मी कोलकाताला स्थलांतरित झाले आहे.’ गेल्या दोन वर्षांबद्दल विचारले असता, त्या म्हणतात, 'माझ्या आयुष्यात बदल तेव्हाच येईल, जेव्हा शाहजहान शेख आणि त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा दिली जाईल. शाहजहान शेख म्हणाला होता की मी तुरुंगात गेलो तरी चालेल, पण मी हजारो शेख तयार केले आहेत, जे माझ्यासाठी काम करतील. काही दिवसांपूर्वीच, या प्रकरणातील एका मुख्य साक्षीदाराचा अपघात घडवून त्याला ठार मारण्यात आले. म्हणून भीती वाटते की काहीतरी वाईट घडू नये.' राजकीय जबाबदाऱ्यांबद्दल विचारले असता, रेखा म्हणतात, 'यामुळे काही विशेष फरक पडलेला नाही. पक्ष जे पद देईल, त्यानुसार मी काम करत राहीन.' विधानसभा निवडणुकीत पुन्हा नशीब आजमावणार का? त्या म्हणतात, 'पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य आहे.' संदेशखाली प्रकरणात तुमच्यासोबत तक्रार करणाऱ्या दोन महिलांनी गेल्या काही दिवसांत केस मागे घेतली. आरोप आहे की भाजपने त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या. यावर उत्तर देताना रेखा म्हणतात, 'त्या दोघी आधीपासूनच टीएमसीशी संबंधित होत्या. तरीही, एक दिवस त्यांना कळेल की त्यांनी काय केले आहे. दोघी हिंदू आहेत, एक ना एक दिवस त्यांना आमच्या आश्रयाला यावेच लागेल.' पीडित क्रमांक-२शाहजहानच्या गुंडांपासून सुटका झाली, आता परिस्थिती सुधारली आहेयानंतर आम्ही माझेपाडा येथे दुसऱ्या पीडित कविताला (बदललेले नाव) भेटायला पोहोचलो. आम्ही लोकसभा निवडणुकीदरम्यान येथे आलो होतो, तेव्हा मातीचे घर होते. त्याच्या बाहेर कविताच्या सुरक्षेसाठी पोलीस बसले होते. आता दीड वर्षानंतर चित्र वेगळे आहे. मातीच्या झोपडीऐवजी पक्के घर आहे. कविता आम्हाला घराच्या जवळच गल्लीत उभी दिसली. केसबाबत विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्या बोलण्यास तयार नव्हत्या. त्या बांग्लामध्ये म्हणत निघून गेल्या, ‘ऐखोन कौनो प्रॉब्लम नेई, ऐखोन सोब ठीक आछे.’ म्हणजे, सध्या कोणतीही अडचण नाही, सर्व ठीक आहे. यानंतर आम्ही संदेशखालीच्या बाजारात पोहोचलो, जिथे आंदोलनाचा भाग असलेल्या डॉली अधिकारी यांचे कपड्याचे दुकान आहे. डॉली खुश आहेत की शाहजहां शेखचे गुंड शिबू हाजरा आणि उत्तम सोदार तुरुंगात आहेत. त्या म्हणतात, ‘लोक यांच्या दहशतीमुळे त्रस्त होते. रोजगार मिळवणे कठीण झाले होते. शिबू आणि उत्तमने माझ्या पतीला बोलावून धमकी दिली होती की, जर त्यांचे ऐकले नाही, तर दुकान चालू देणार नाही.’ त्या पुढे म्हणतात, ‘यांनी सर्वांवर अत्याचार केले. मुली आणि महिलांशी गैरवर्तन केले गेले आणि पुरुषांना मारहाण केली. जर त्यांचे ऐकले नसते, तर त्यांच्या दहशतीला बळी पडावे लागले असते. आधी गावातील लोक आपापसात विभागले गेले होते. येथे आपापसात बोलणे देखील भाजप आणि टीएमसी पाहून केले जात होते. या लोकांच्या तुरुंगात गेल्यानंतर आता हे अंतर कमी झाले आहे आणि लोक प्रेमाने राहत आहेत.’ बळी क्रमांक-३लीजवर घेतो असे सांगून जमीन बळकावली, ना पैसे दिले ना जमीन परत मिळालीयानंतर आम्ही सुनीता सोदार (बदललेले नाव) यांना भेटलो. त्यांनी शाहजहां शेख आणि त्याच्या साथीदारांवर जमीन बळकावल्याचा आरोप केला होता. सुनीता सांगतात, ‘२०१० मध्ये आलेल्या आयला चक्रीवादळाने आम्हाला उद्ध्वस्त केले. शेतीच्या जमिनीत खारट पाणी भरले. येथे शेतीऐवजी मत्स्यपालन सुरू झाले. शाहजहां शेखच्या गुंडांनी आमच्या जमिनी लीजवर घेतल्या आणि पैसेही दिले नाहीत. त्यांची भीती इतकी होती की लोक ना पैसे मागू शकले ना जमीन परत घेऊ शकले.‘ ती पुढे सांगते, ‘वादळात माझे पूर्ण घर तुटून उद्ध्वस्त झाले होते. शाहजहाँचे गुंड उत्तम आणि त्याचे साथीदार अनेकदा घराचे फोटो काढून घेऊन गेले. बांधून देण्याचे वचन दिले, पण काहीच केले नाही. ते प्रत्येक वेळी सरकारी ताडपत्री देऊन फोटो काढून घेत, पण काहीच मिळत नव्हते. इतक्या वर्षांनंतर आता कुठे घराचा काही भाग तयार केला आहे.‘ शाहजहाँविरुद्ध दोन वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनाबद्दल सुनीता सांगते, ‘आधी अंधार झाल्यावर बाहेर पडू शकत नव्हते. आता तसे नाही. आधीपेक्षा दहशत थोडी कमी झाली आहे.’ बळी क्रमांक-4शाहजहान तुरुंगात गेला नसता, तर जमीन परत मिळाली नसती2024 मध्ये रेशन घोटाळ्यात शेख शाहजहानच्या घरी ईडीने छापा टाकला होता. त्यानंतर संदेशखालीतील महिलांनी त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचार आणि जमीन हडपल्याची तक्रार केली होती. या प्रकरणात सुमारे 50 महिलांनी याचिका दाखल केली होती, त्यानंतर TMC ने शाहजहान शेखला पक्षातून काढून टाकले होते. मात्र, आता अनेक पीडित कुटुंबे आपली जमीन परत घेत आहेत. यापैकी काहींना भाडेपट्ट्याचे पैसे मिळाले आहेत, तर काहींना नाही. पार्वती त्यापैकी एक आहे. पतीचे निधन झाले. ती संदेशखालीत मुलांसोबत राहते, जे शेती करतात. पार्वती सांगतात, ‘आमच्याकडे 3 एकर जमीन होती. शिबू हाजरा आणि उत्तमने त्यावर कब्जा केला होता. तीन वर्षे जमीन त्यांच्याच ताब्यात होती, ज्यात मत्स्यपालन केले जात होते. आम्हाला एक पैसाही दिला नाही. ते तुरुंगात गेल्यानंतर जमीन परत मिळाली. जर ते आत गेले नसते, तर कदाचित आजही मिळाली नसती.’ पार्वतीचा धाकटा मुलगा सांगतो, ‘काही महिन्यांपूर्वीच जमीन परत मिळाली आहे, पण ती शेती करण्यायोग्य नव्हती. आम्ही 30 हजार रुपये खर्च करून माती दुरुस्त केली आहे. अनेक दिवस मी स्वतःही काम करत राहिलो. आता जमीन भातशेतीसाठी योग्य झाली आहे.’ हाफीज्जुल रहमान गाझी देखील स्वतःला शाहजहां शेखचा बळी असल्याचे सांगतात. ते म्हणतात, ‘यांचे (शेख शेरजहां) गुंड आत गेल्यापासून, येथील लोक आरामात जीवन जगत आहेत. नाहीतर हे लोकांची जमीन सोडत नव्हते.’ त्यांच्याच शेजारी बसलेले श्यामल बारो म्हणतात, ‘संदेशखालीचे लोक आता स्वतंत्र झाले आहेत. यांच्या दहशतीमुळे लोकांनी जगणे सोडून दिले होते. हे लोक इतके नीच होते की एक गर्भवती महिला त्यांचे पाय पकडत राहिली, पण तरीही त्यांनी तिच्या पतीला सोडले नाही. प्रत्येक व्यक्तीला घाबरवून ताब्यात ठेवू इच्छित होते. आता सर्व शांत झाले आहे.‘ शाहजहांची आई म्हणाली…मी शिक्षिका होते, मी मुलाला बलात्कार शिकवेन काय?यानंतर आम्ही शेख शाहजहांच्या घरी पोहोचलो. हे संदेशखालीपासून सुमारे 7 किलोमीटर आधीच आहे. रस्त्याला लागून चार घरे बांधलेली आहेत. येथे शाहजहां शेखच्या कुटुंबासोबत त्याचे दोन भाऊ आणि आई राहतात. घरी काही मुले खेळताना दिसली. आमची पहिली भेट शाहजहांच्या भावाच्या पत्नीशी झाली. त्यांनी शाहजहांची आई रझिया शेख यांच्याशी भेट घालून दिली. शाहजहानला भेटलात की नाही, असे विचारताच 70 वर्षांची रझिया म्हणते, ‘आतापर्यंत तीन वेळा भेटले आहे. प्रत्येक वेळी तो एकच गोष्ट सांगतो - आई, माझ्यासाठी प्रार्थना कर, अल्लाह सर्व काही ठीक करेल. मलाही कायद्यावर विश्वास आहे. इतके दिवस तो तुरुंगात आहे, आम्हा सर्वांना न्यायाची अपेक्षा आहे.‘ रझिया पुढे म्हणते, ‘आमच्या कुटुंबाबद्दल काय काय बोलले गेले नाही, तर मी स्वतः शिक्षिका होते. आजूबाजूची अनेक मुले माझ्याकडे शिकायला येत होती. आता डोळे काम करत नाहीत, म्हणून शिकवणे सोडून दिले. तुम्हाला वाटते की मी माझ्या मुलांना बलात्काराचे शिक्षण देईन? मी दोनदा हज करून आले आहे. ज्या वर्षी ही घटना घडली, माझे मुलगे आणि सुनाही हजसाठी जाणार होते, पण देवाची काही वेगळीच इच्छा होती.’ शाहजहानला तुरुंगात यासाठी टाकले कारण तो मुसलमानआई रझिया शेख यांच्या शेजारी उभ्या असलेल्या शाहजहानच्या वहिनी कॅमेऱ्यावर यायला तयार झाल्या नाहीत, पण माध्यमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणाल्या, ‘ज्यावेळी शाहजहान शेख यांच्या विरोधात आंदोलन झाले, ते सर्व वाहिन्यांवर दाखवले गेले. त्याच्या बाजूने लोकांनी आंदोलन केले, ते कोणीही दाखवले नाही.’ शाहजहानने कोणाकडेही डोळे वर करून पाहिले नाही. ना त्याने मदत करताना कोणाची जात किंवा धर्म पाहिला, पण त्याला धर्म पाहून तुरुंगात टाकले आहे. ‘संदेशखाली आमच्या घरापासून इतके दूर आहे, तो तिथे काय करायला जाईल? आमचा सर्व व्यवसाय नदीच्या या बाजूला आहे. तिथून आमचा काहीही संबंध नाही. त्याला तुरुंगात टाकले कारण तो मुसलमान आहे. येथे आता फक्त हिंदू-मुसलमानच होते.‘त्या पुढे म्हणतात, ‘आमच्या कुटुंबात सर्वजण शिकलेले आहेत. पती डॉक्टर आहेत. आसपासच्या लोकांशी आमचे चांगले संबंध आहेत. आम्ही तर मदतही धर्म पाहून करत नाही. तरीही आमच्यासोबत असे घडत आहे.‘गेल्या दोन वर्षांत झालेल्या बदलांबद्दल विचारताच त्या रागाने म्हणतात, ‘आमचे जीवनच कठीण झाले आहे. सर्व काम घरातील महिलांनाच बघावे लागते. मुलांना शाळेत पोहोचवण्यापासून ते कोर्ट-कचेरीपर्यंत सर्व आम्हीच बघत आहोत. असे जीवन होईल असे कधीच वाटले नव्हते.‘ पोलिस म्हणाले- शाहजहान खून आणि हिंसाचाराच्या प्रकरणात तुरुंगातप्रकरणाचा तपास कुठपर्यंत पोहोचला, याची माहिती आम्ही संदेशखाली पोलिस स्टेशनच्या एसएचओकडे मागितली असता, त्यांनी सांगितले की आरोपपत्र न्यायालयात सादर झाले आहे. यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही. त्यामुळे आम्ही बशीरहाट एसपी कार्यालयाकडे गेलो.येथे एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, तो दोन प्रकरणांमध्ये तुरुंगात आहे. एक 2019 चे प्रकरण आहे, जेव्हा निवडणुकीनंतर प्रदीप मंडल, देवदास मंडल आणि सुकांता मंडल यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने शाहजहान शेखला मुख्य आरोपी ठरवले होते. याशिवाय दुसरे प्रकरण 2024 मध्ये ईडीच्या छाप्यात झालेल्या हिंसाचाराचे आहे. बलात्काराच्या प्रकरणाबद्दल विचारले असता, ते म्हणाले की त्यांना कोणतीही माहिती नाही.
Missing Link Project : १३.३ किमी लांबीच्या मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे अंतर कमी होणार; ८ पदरी रस्ता आणि दोन भव्य बोगद्यांचे काम पूर्ण.
PMC News : आजपासून नव्याने निवडून आलेले नगरसेवक घेणार पदभार; रखडलेले धोरणात्मक निर्णय आणि शहराच्या समस्या मार्गी लागणार का?
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
भाजप पहिला क्रमांक राखणार?राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर, आता भारतीय जनता पक्षाने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. आज होत असलेल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही 'नंबर १'चा क्रमांक टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे. शहरी भागात मतदारांनी भाजपला पसंती दिली असली, तरी ग्रामीण महाराष्ट्रात पक्षाचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष रणनीती आखली आहे. 'मिनी विधानसभा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुका फडणवीस यांच्या नेतृत्वाची आणि भाजपच्या ग्रामीण प्रभावाची खरी चाचणी ठरणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नागरी निवडणुकांमधील विजयाची लाट ग्रामीण भागातही कायम राहणार का आणि भाजप आपला पहिला क्रमांक राखणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.दिग्गज नेत्यांसह ६८० उमेदवारांची प्रतिष्ठा पणालागेल्या तीन आठवड्यांपासून परभणी जिल्ह्यात सुरू असलेला निवडणुकीचा धुरळा आज शमणार असून, मतदानाच्या रूपाने अंतिम निकालाची प्रक्रिया सुरू होत आहे. जिल्हा परिषदेच्या ५४ जागा आणि पंचायत समितीच्या १०८ जागांसाठी आज जिल्ह्यातील मतदार आपला कौल देणार आहेत. या निवडणुकीत एकूण ६८० उमेदवार (जिल्हा परिषद २४७ आणि पंचायत समिती ४३३) रिंगणात असून, त्यांच्या राजकीय भविष्याचा फैसला आज मतपेटीत बंद होईल. मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतून १,२७८ मतदान केंद्रांवर ईव्हीएम (EVM) मशीन आणि निवडणूक साहित्याचे वाटप पूर्ण करण्यात आले आहे. सर्व मतदान अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या केंद्रांवर पोहोचले असून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ही प्रक्रिया पार पडत आहे. गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचारतोफा थंडावल्यानंतर आता मतदारांच्या मनात नेमके काय आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदानाला थोड्याचवेळात सुरुवातराज्यातील राजकीय वातावरण तापवणारे १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांचे मतदान आज, ७ फेब्रुवारी रोजी पार पडत आहे. सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदार आपला कौल देतील. खरं तर या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होणार होत्या, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे पुकारण्यात आलेल्या राजकीय दुखवट्यामुळे निवडणूक आयोगाने मतदानाचा हा दिवस पुढे ढकलला होता. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कडेकोट तयारी केली असून, ज्या जिल्ह्यांत मतदान होत आहे तिथे शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आजच्या या चुरशीच्या लढतीचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असून, ग्रामीण भागाची सत्ता कोणाच्या हाती जाणार याचा फैसला अवघ्या ४८ तासांत होईल.१२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदानआज १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी प्रत्यक्ष मतदान पार पडत आहे. या निवडणुकीसाठी संपूर्ण राज्य निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून कडेकोट बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी मतदान होत आहे. रिंगणात असलेल्या एकूण ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य राज्यातील तब्बल २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार ठरवणार आहेत. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत मतदारांचा कल कोणाकडे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 'सर्व मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा,' असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.
Epstein Files Protest : एपस्टीन फाइल्समधील धक्कादायक खुलाशांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? युवक काँग्रेसचा केंद्र सरकारला थेट सवाल.
Ajit Pawar : दिवंगत अजित पवार यांना ‘जीवनसाधना गौरव’पुरस्कार जाहीर; पुणे विद्यापीठाची मोठी घोषणा
Ajit Pawar : राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्रांत भरीव कामगिरी करणाऱ्या पाच मान्यवरांची विद्यापीठाकडून निवड.
मार्च, 2025 ची गोष्ट आहे, बांगलादेशातील चांदपूरच्या पूरनबाजार येथील मंदिराबाहेर सुमारे 600 लोक पोहोचले. ते मंदिराचे पुजारी अनिक गोस्वामी यांना शोधत होते. गर्दीचा आरोप होता की अनिक गोस्वामी यांनी पैगंबरांचा अपमान केला आहे. अनिक तिथून पळून गेले. ते अजूनही लपून राहत आहेत. त्यांच्या मते, कट्टरपंथी पक्ष जमात-ए-इस्लामीचे सदस्य गर्दीचे नेतृत्व करत होते. ऑगस्ट, 2024 मध्ये शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर बांगलादेशात धार्मिक हिंसाचाराची 2000 हून अधिक प्रकरणे घडली आहेत. यामध्ये जमातशी संबंधित तौहिदी जनता ग्रुप आणि हिज्ब उत तहरीर यांचे नाव आले. आता बांगलादेशात निवडणुका आहेत. 12 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीग यावेळी निवडणूक लढवत नाहीये. जमात-ए-इस्लामी आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी यांच्यात लढत आहे. अल्पसंख्याकांना लक्ष्य करणारी जमात सत्तेची दावेदार आहे. या निवडणुका अल्पसंख्याकांसाठी, विशेषतः हिंदूंसाठी, परीक्षेसारख्या आहेत. त्यांच्यावर हल्ले होत आहेत. खंडणी मागितली जात आहे. धमक्या मिळत आहेत. अशा परिस्थितीत, 900 वर्षांपूर्वीच्या ढाकेश्वरी मंदिरात पूजा करणारे भाविक असोत किंवा ढाका विद्यापीठाच्या जगन्नाथ हॉल कॅम्पसमधील विद्यार्थी असोत, प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे - मतदान करण्यात जास्त धोका आहे की न करण्यात? या अहवालात वाचा आणि बघा बांगलादेशी हिंदूंची समस्या आणि मतदानाबाबत त्यांची द्विधा मनस्थिती. स्थळ: ढाकेश्वरी मंदिर, बख्शी बाजार, ढाका बांगलादेशची राजधानी ढाकाचे नाव ढाकेश्वरी मंदिरावरूनच पडले होते. निवडणुकीच्या कव्हरेजदरम्यान आम्ही येथे पोहोचलो. मंदिराबाहेर चांगलीच वर्दळ होती. आतमध्येही सुमारे ३०० भाविक होते. त्यावेळी दुपारच्या आरतीची तयारी सुरू होती. गीता पाठाचाही कार्यक्रम होता. आम्ही पूजा करण्यासाठी आलेल्या काही लोकांशी बोललो. त्यांना हे ५ प्रश्न विचारले… 1. बांगलादेशात होणाऱ्या निवडणुकांबद्दल त्यांना काय वाटते?2. बांगलादेशात हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत, यामागे कोण आहे?3. शेख हसीना यांच्या गेल्यानंतर देशातील परिस्थितीचा काय परिणाम झाला आहे?4. सुमारे 10% लोकसंख्या असलेला हिंदू समुदाय कोणाला मतदान करेल?5. त्यांना बांगलादेशात सुरक्षित वाटते की ते इतरत्र जाण्याचा विचार करत आहेत? ‘आम्ही हिंदू, आमच्या नशिबातच अत्याचार लिहिले आहेत’ढाका येथील निशा राणी दत्त ढाकेश्वरी मंदिरात वैदिक मंत्रांचे उच्चारण करत होत्या. निशा सरकारी बँकेत नोकरी करतात. आम्ही त्यांना विचारले की निवडणुकीत हिंदूंसाठी कसे वातावरण आहे? त्या उत्तर देतात, ‘निवडणुकीत काय करायचे हे आम्हाला समजत नाही. निवडणुका आल्या की इतर लोक आम्हाला त्रास देऊ लागतात. आम्ही हिंदू आहोत, आमच्या नशिबात छळले जाणेच लिहिले आहे.’ ‘मी ढाक्यात राहते. त्यामुळे फारशी अडचण येत नाही. चटगाव, खुलना, जॉयपूरहाट आणि लालमोनिरहाटमध्ये हिंदूंवर खूप अत्याचार होतात. तरीही हा देश आमचा आहे. आम्ही कधीही तो सोडून जाणार नाही.’ निशासोबत असलेली सोमा देखील म्हणते, ‘हा माझा देश आहे. माझा जन्म इथेच झाला. मला इथेच राहायचे आहे. मी दुसरीकडे जाण्याचा विचार करत नाहीये. कोणीही सरकारमध्ये येवो, पण आम्ही आमच्या धर्माला ज्या पद्धतीने मानत आलो आहोत, त्याच पद्धतीने मानू.’ ‘हिंदू जमात-ए-इस्लामीला मतदान करू शकत नाहीत, BNP लाच देतील’सुनीरमल रॉय व्यवसायाने डॉक्टर आहेत. ते ढाकेश्वरी मंदिरात पूजा करण्यासाठी येत असतात. ते म्हणतात, ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच BNP आणि जमात यांच्यात निवडणूक होणार आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीगवर बंदी घालण्यात आली आहे. आता कोण निवडणूक जिंकेल हे समजत नाहीये. निवडणुकीमुळे आमच्या लोकांना अडचणी येत आहेत. अनेकदा घरावर हल्ला होतो, धमक्या दिल्या जातात.’ हिंदू समुदाय यावेळी कोणाला मतदान करेल? सुनीरमल उत्तर देतात, ‘आम्हाला माहीत आहे की जमात-ए-इस्लामी इस्लामिक पक्ष आहे. BNP लोकशाहीवादी पक्ष आहे. बहुतेक हिंदू BNP ला पाठिंबा देतील. जमातला फारच कमी हिंदू मतदान करतील.’ अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसेची 2000 हून अधिक प्रकरणेबांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिल ही अल्पसंख्याकांची संघटना आहे. ही संघटना देशात धार्मिक आधारावर होणाऱ्या हिंसेची आकडेवारी गोळा करून अहवाल प्रसिद्ध करते. संघटनेच्या अहवालानुसार, ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांचे सरकार पडल्यापासून धार्मिक हिंसेची 2000 हून अधिक प्रकरणे घडली आहेत. यामध्ये 68 लोकांची हत्या झाली आहे. 28 प्रकरणे महिलांविरुद्धच्या हिंसेची आहेत. मंदिरांवरही हल्ले झाले आहेत. मात्र, डॉ. युनूस यांच्या अंतरिम सरकारने ही आकडेवारी फेटाळली आहे. कौन्सिलचे सरचिटणीस मनिंद्र कुमार नाथ म्हणतात, बांगलादेशमध्ये निवडणुका जवळ येत असताना परिस्थिती बिघडत आहे. अल्पसंख्याकांसाठी प्रत्येक दिवसागणिक भीती वाढत आहे. आम्ही आमच्या समस्यांवर पत्रकार परिषदा घेत असतो, पण सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. ‘अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार डॉ. मोहम्मद युनूस यांनी मान्य केले आहे की धार्मिक हिंसाचाराची ७१ प्रकरणे घडली आहेत. यापैकी फक्त एका प्रकरणात मृत्यू झाला आहे. आमच्या आकडेवारीनुसार धार्मिक हिंसाचारात ६६ लोकांचा मृत्यू झाला आहे. आम्हाला वाटते की या हत्या धार्मिक कारणांमुळेच झाल्या आहेत, पण सरकार ते मान्य करायला तयार नाही.’ ‘आमच्या देशाचा पाया धर्मनिरपेक्षतेवर आधारित आहे, पण आता कट्टर इस्लामिक शक्तींना तो जातीय बनवायचा आहे. जमात-ए-इस्लामी, बीएनपी आणि अवामी लीग देखील धार्मिक हिंसाचारामागे असतात. पक्ष आपल्या राजकारणासाठी धर्माचा आधार घेतात आणि अल्पसंख्याकांना लक्ष्य करतात.’ जरी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचे सल्लागार शफीकुल आलम यांनी भास्करला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, गेल्या वर्षी आम्ही हिंसाचारावर वार्षिक अहवाल जारी केला होता. जातीय आणि द्वेषपूर्ण गुन्हेगारीच्या बाबतीत गेल्या एका वर्षात फक्त एकच हत्या झाली आहे, ज्यात दीपू चंद्र दास यांचे प्रकरण आहे. त्यांनी दावा केला की इतर घटनांमध्ये जमीन आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न किंवा इतर काही कारणांमुळे हत्या झाल्या आहेत. अवामी लीग प्रत्येक हिंदूच्या हत्येला धार्मिक हिंसाचारात झालेला मृत्यू म्हणत आहे. ‘आम्ही मतदान केले तर अडचण, नाही केले तरी अडचण’ढाका येथील रहिवासी सुप्रिया भट्टाचार्य सरकारी शाळेत शिक्षिका होत्या. नोकरी सोडून त्या समाजकार्य करू लागल्या. त्या महिला एकता परिषदेच्या अध्यक्षा आहेत आणि बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांसाठी काम करतात. सुप्रिया भट्टाचार्य ढाकेश्वरी मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. सुमारे 300 लोकांसोबत त्या गीता पाठ करत होत्या. पाठ संपताच 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीवर चर्चा सुरू झाली. सुप्रिया म्हणतात की बांगलादेशात जेव्हा जेव्हा निवडणुका होतात, तेव्हा आमच्या मनात भीती घर करून राहते. सुप्रिया म्हणतात, ‘निवडणुकीच्या वेळी अल्पसंख्याक समाजातील लोक घाबरलेले आहेत. मी तर ढाक्यात राहते, त्यामुळे तितकी भीती नाही. दूरवरच्या भागांत आणि गावांमध्ये राहणारे हिंदू खूप जास्त भीतीत जगत आहेत. यावेळी हिंदू समुदायावर आणखी एक दबाव आहे. आम्हाला सार्वमताच्या बाजूने किंवा विरोधात मतदान करायचे आहे. आम्हाला समजत नाहीये की संविधान बदलण्यासाठी मतदान करावे की जे संविधान आहे, त्याच बाजूने राहावे.’ हिंदूंवर हल्ले कोण करतं? उत्तरादाखल सुप्रिया म्हणते, ‘स्पष्टपणे सांगू शकत नाही की हे कोण करत आहे. हे दहशतवादी मानसिकतेचे लोक आहेत. ते कोणत्याही पक्षाचे लोक असतीलच असे नाही, पण जर बांगलादेश सरकार अशा लोकांवर कारवाई करत नसेल, तर हे तिचं अपयश आहे.’ मंदिरात आलेल्या केएस सिन्हा डान्स टीचर आहेत. त्या म्हणतात, ‘बांगलादेशात खूप हिंदू राहतात. आम्हाला मतदान करायचं आहे. आम्हाला असं सरकार बांगलादेशात हवं आहे, जे सर्वांच्या सुरक्षेसाठी काम करेल, केवळ एका धर्मासाठी नाही.’ ठिकाण: जगन्नाथ हॉल कॅम्पस, ढाका विद्यापीठढाकेश्वरी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आम्ही ढाका विद्यापीठाच्या जगन्नाथ हॉल कॅम्पसमध्ये पोहोचलो. हा कॅम्पस अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आहे. वसतिगृहात राहणारे बहुतेक विद्यार्थी हिंदू आहेत. वसतिगृहात मंदिर, काली पूजेसाठी जागा आणि बुद्धाच्या मूर्ती आहेत. हॉल युनियनचे नेते सुदीप्तो प्रमाणिक म्हणतात, 'जेव्हा जेव्हा निवडणुका होतात, तेव्हा आम्हाला आमच्या सुरक्षेची चिंता वाटू लागते. आम्हाला असे सरकार हवे आहे, जे अल्पसंख्याकांना सुरक्षा देईल. 1971 पासूनच अल्पसंख्याकांसोबत भेदभाव होत आहे. सरकार ज्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देत आहे, त्यापैकी एकही हिंदू नाही.' 'मी धार्मिक ओळख म्हणून कडे घालतो. मला हे घालताना अडचण आली नाही, पण माझ्या एका ज्युनियरला वसतिगृहात एक वर्षापूर्वी कलावा घातल्यामुळे मारहाण करण्यात आली होती. मुलींना टिकली किंवा टिळा लावल्यामुळे लक्ष्य केले जाते. शेख हसीना यांच्या काळात असे होत नव्हते.' जानेवारीत जातीय हिंसाचाराची ४२ प्रकरणे१ ते २७ जानेवारी दरम्यान देशभरात जातीय हिंसाचाराची ४२ प्रकरणे नोंदवली गेली. यात ११ लोक मारले गेले. बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन एकता परिषदेने २९ जानेवारी रोजी ही आकडेवारी जाहीर केली होती. परिषदेने ढाका येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले की, अल्पसंख्याक समुदाय भीती आणि असुरक्षिततेच्या छायेत जगत आहे. ते निवडणुकीत कोणालाही मतदान न करण्यास मजबूर आहेत. सुदीप्तो प्रमाणिक यावर म्हणतात, ‘जर अशीच परिस्थिती राहिली आणि अल्पसंख्याक मतदान करण्यास कचरले, तर याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार, प्रशासन, निवडणूक आयोग आणि राजकीय पक्ष अल्पसंख्याकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत.’ मुस्लिम म्हणाले- हिंदूंशी कोणताही संघर्ष नाहीढाका येथील रहिवासी एएसएम फैजल फार्मासिस्ट आहेत. आम्ही त्यांना देशातील हिंदूंच्या स्थितीबद्दल विचारले. ते उत्तर देतात, ‘मी वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांना भेटतो. त्यापैकी काहींशी माझे चांगले संबंध आहेत. मी कधीही कोणाला कोणावर अत्याचार करताना पाहिले नाही. कदाचित लोकांमध्ये घरगुती किंवा जमिनीशी संबंधित वाद असतील, त्याच कारणांमुळे कधीकधी घटना घडत असतील. मला असे कधीच वाटले नाही की, एखाद्यावर केवळ तो अल्पसंख्याक आहे म्हणून हल्ला करण्यात आला असेल.’ हिंदूंना धमकी- 5 लाख टका द्या, नाहीतर दुर्गा पूजा करू देणार नाहीसप्टेंबर 2024 मध्ये दुर्गा पूजेपूर्वी हिंदूंना धमकीची पत्रे मिळाली होती. खुलना जिल्ह्यातील दाकोपमध्येही असेच पत्र पोहोचले होते. त्यात लिहिले होते की, जर गावकरी 5 लाख बांगलादेशी टका देणार नाहीत, तर दुर्गा पूजा साजरी करू दिली जाणार नाही. दाकोपमधील कमर खोला गावात शाळेचे शिक्षक सायकत गिलदार मंदिराचे प्रमुख आहेत. ते गावाचे मुखिया (सरपंच) देखील आहेत. ते सांगतात, ‘धमकीचे पत्र कोणी पाठवले होते, हे कळले नाही. त्यात लिहिले होते की, जर दुर्गा पूजेचा सण साजरा करायचा असेल, तर पैसे द्यावे लागतील, नाहीतर तुम्हाला मारून टाकू.’ हातात धमकीचे पत्र धरलेले सायकत अजूनही घाबरलेले आहेत. ते सांगतात की, आम्ही इतके घाबरलो होतो की दुर्गा पूजेचा उत्सव साजराच केला नाही. पत्रात लिहिले होते की, यावर्षी दुर्गा पूजेसाठी तुम्हाला 5 लाख टका (सुमारे 3.5 लाख रुपये) द्यावे लागतील, अन्यथा कोणत्याही परिस्थितीत पूजा करू देणार नाही. ही आमच्याकडून शेवटची चेतावणी आहे. जर तुम्ही याला हलके घेतले, तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. पैसे तयार ठेवा. आम्ही सांगू की कालीनगर बाजारात कुठे आणि कसे पैसे पोहोचवायचे आहेत. जर पोलिसांना सांगितले तर लक्षात ठेवा, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सोडले जाणार नाही. आसपासच्या सर्व मंदिरांना आमचे म्हणणे ऐकावे लागेल. दाकोपच्या रहिवासी तुलसी गलदार या सायकतच्या वहिनी आहेत. त्या म्हणतात की गावात कोणतीही अडचण नाही. सर्वजण मिळूनमिसळून राहतात, पण अशा बातम्या वाचल्यावर मला भीती वाटते. मला भीती वाटते कारण मी हिंदू आहे.
MSEDCL : सामान्यांच्या खिशाला ‘शॉक’! १.३५ लाख कोटींच्या वीज दरवाढीचा घाट; जनसुनावणीत १,०३७ हरकती
MSEDCL : २१ टक्के वीज गळतीचे खापर ग्राहकांवर? महावितरणने स्वतःच्या चुका सुधारण्याऐवजी दरवाढीचा बोजा लादल्याचा लोकप्रतिनिधींचा आरोप.
'द लॅन्सेट' ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये 3 फेब्रुवारी रोजी प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांनी गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना मिळणाऱ्या मदतीत कपात केली आहे. यात भारताचाही समावेश आहे. मदत थांबल्यामुळे 2030 पर्यंत या देशांमध्ये 2.26 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, जे टाळता आले असते. यात 5 वर्षांखालील 54 लाख मुलांचाही समावेश आहे. अखेर अमेरिका आणि ब्रिटन या देशांना मदत का थांबवत आहेत, आता हे मृत्यू थांबवता येणार नाहीत का, भारतावर किती परिणाम होईल, जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न-1: जगातील 2.3 कोटी लोकांचे जीव धोक्यात का आहेत? उत्तर: बार्सेलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ आणि अमेरिकन संस्था 'रॉकफेलर फाउंडेशन' यांनी गेल्या 20 वर्षांच्या 'ऑफिशियल डेव्हलपमेंट असिस्टन्स' म्हणजेच ODA चे विश्लेषण केले. ODA म्हणजे असे पैसे जे श्रीमंत देश गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना आरोग्य, पोषण, शिक्षण आणि मानवी मदतीसाठी देतात. अमेरिकन सरकारने USAID म्हणजेच 'युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट' या नावाने गरीब देशांच्या मदतीसाठी एक निधी तयार केला आहे. इतर श्रीमंत देशही निधी तयार करून ODA साठी पैसे देतात, ज्याद्वारे जगातील 133 देशांना मदत पोहोचवली जाते. लॅन्सेटमध्ये प्रकाशित ODA च्या विश्लेषणात्मक संशोधनात 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत... ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट म्हणजेच OECD च्या एका अहवालानुसार, 2024 मध्ये ODA मध्ये 7.1% घट झाली आहे, तर 2025 मध्ये सुमारे 17% घट होण्याचा अंदाज आहे. प्रश्न-2: अमेरिका, ब्रिटन इत्यादींच्या मदतीने या देशांमध्ये काय सुधारणा होत होती? उत्तर: 2002 ते 2021 पर्यंत श्रीमंत देशांनी ODA अंतर्गत गरीब देशांमध्ये लसीकरण, औषधे, आरोग्य व्यवस्था, स्वच्छता इत्यादींसाठी मदत म्हणून पैसे पाठवले होते. यामुळे या देशांमध्ये मृत्यूच्या संख्येत घट झाली. विशेषतः बालमृत्यू दरात मोठी घट दिसून आली… याव्यतिरिक्त, ODA द्वारे जगातील 75% लोकसंख्या असलेल्या एकूण 93 देशांमध्ये बालमृत्यू दरात 39% पर्यंत घट झाली आहे. या देशांमध्ये मलेरिया आणि कुपोषणाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये 56% घट झाली. जास्त उष्णता असलेल्या देशांमध्ये अतिसारासारख्या आजारांमुळे होणारे मृत्यू अर्धे झाले. प्रश्न-3: मदत थांबवल्यास कोणत्या देशांना सर्वाधिक नुकसान होईल? उत्तर: निधीतील कपातीचा सर्वाधिक परिणाम अफगाणिस्तान, बुर्किना फासो, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, चाड, काँगो, इथिओपिया, हैती, माली, मोझांबिक, सोमालिया, दक्षिण सुदान, सुदान आणि येमेन यांसारख्या 13 देशांवर होईल. जगभरातील लोकांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या 'इंटरनॅशनल रेस्क्यू कमिटी'नुसार, या देशांमध्ये 70 लाख मुले सध्या कुपोषणाशी झुंजत आहेत. लसीकरणाच्या बाबतीत जे 20 देश सर्वात मागासलेले आहेत, त्यापैकी या 13 पैकी 10 देशांचा समावेश आहे. हे देश मूलभूत आरोग्य गरजांसाठी ODA वर अवलंबून होते. प्रश्न-4: यापूर्वी जेव्हा श्रीमंत देशांनी एखाद्या देशाला मदत करणे थांबवले होते, तेव्हा त्याचे काय परिणाम झाले होते? उत्तर: मोठे आणि विकसित देश जेव्हाही लहान देशांना मदत करणे थांबवतात, तेव्हा रोगांमुळे होणारे मृत्यू वाढतात आणि दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते… 1. इथिओपियामध्ये दोन वर्षे भयंकर दुष्काळ 2. 1990 च्या दशकात उत्तर कोरियातील दुष्काळ 3. 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये मदत बंद केली प्रश्न-5: अमेरिका, ब्रिटन इत्यादी देश या देशांना मदत देणे का थांबवत आहेत? उत्तर: अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय देश 3 मुख्य कारणांमुळे इतर देशांना पाठवण्यात येणाऱ्या मदतीत कपात करत आहेत... 1. श्रीमंत देशांमध्ये आर्थिक संकट वाढत आहे 2. संरक्षण खर्चात मोठी वाढ 3. परदेशी मदत कमी करण्याची विचारसरणी प्रश्न-6: परदेशी मदत थांबल्यास भारतावरही वाईट परिणाम होईल का? उत्तर: 2021 मध्ये भारताला ODA अंतर्गत सुमारे 28,000 कोटी रुपयांची मदत मिळाली होती, जी 2023 मध्ये कमी होऊन 21,000 कोटी रुपये झाली. पुढील वर्षात यात 10–20% ची आणखी घट होऊ शकते. या घटीचे एक मोठे कारण USAID सारख्या अमेरिकन फंडांमध्ये केलेली कपात आहे. केरळमधील इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ. राजीव जयदेवन यांच्या मते, ‘भारताला काही आरोग्य प्रकल्पांमध्ये बदल करावे लागतील. मात्र, परदेशी मदत कमी झाल्याने आवश्यक आरोग्य सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण सध्या परदेशी मदत भारताच्या एकूण आरोग्य खर्चाच्या 1% पेक्षाही कमी आहे. भारत आपल्या मजबूत स्थानिक निधीवरच अवलंबून आहे.’ 2026-27 साठी भारताचे आरोग्य बजेट 1.05 लाख कोटी आहे. भारत स्वतः आता अनेक देशांना आर्थिक आणि मानवीय मदत पुरवतो. मात्र, भारताला यापूर्वी ODA अंतर्गत मिळालेल्या रकमेमुळे अनेक फायदे झाले आहेत.. प्रश्न-7: भारत इतर देशांना किती मदत करतो? उत्तर: भारत इतर देशांना आरोग्य, शिक्षण, आपत्कालीन मदत यासाठी कर्ज, मानवीय मदत आणि औषधे पुरवतो… संशोधन सहकार्य- नितीश कुमार
Medha Kulkarni : सध्याच्या गाड्यांमधील वेळेची अनिश्चितता आणि प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचे हाल; राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्याची जुनी मागणी पुन्हा ऐरणीवर.
Pune Crime : ससून रुग्णालयात थरार! उपचारासाठी आलेल्यांवरच कोयत्याने वार; १८ जणांवर गुन्हे दाखल
Pune Crime : जखमींवर उपचार सुरू असतानाच टोळीने ससूनमध्ये घातला राडा; सुरक्षारक्षक आणि रुग्णांमध्ये घबराटीचे वातावरण.
ST Bus for Election : निवडणुकीसाठी ‘लालपरी’सज्ज! ५३५ एसटी बसमधून होणार मतपेट्यांची वाहतूक
ST Bus for Election : शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील १० आगार मतपेट्यांच्या वाहतुकीसाठी सज्ज.
PMC News : महापालिकेला उच्च न्यायालयाचा दणका! अधीक्षक अभियंता पदाच्या सर्व पदोन्नती रद्द; पाहा कारण
PMC News : विभागीय पदोन्नती समिती आणि मुख्यसभेची मान्यता असूनही प्रक्रिया चुकीची ठरली; पुणे महापालिकेत पदोन्नतीचा नवा पेच.
SSC HSC Exam 2026 : परीक्षा केंद्रांच्या परिसरात झेरॉक्स सेंटर्स, फॅक्स आणि इंटरनेट कॅफे राहणार बंद; आदेश मोडल्यास भारतीय न्याय संहितेनुसार होणार कारवाई.
Groundnut Price : महिनाभरापूर्वी ११० रुपयांना मिळणारा शेंगदाणा आता १८० वर; किरकोळ बाजारात महागाईचा ग्राहकांना मनस्ताप.
Baramati Election : १९४५ कर्मचारी, ४० क्षेत्रीय अधिकारी आणि भरारी पथकांच्या निगराणीखाली बारामतीत पारदर्शक मतदानाचे नियोजन.
Pune ZP Election : सोशल मीडियाचा निवडणुकीत धुमाकूळ! हवेलीत उमेदवारांचा हायटेक प्रचार कसा चालतोय?
Pune ZP Election : घोंगडी सभा आणि पत्रके वाटप मागे पडले; व्हॉट्सअॅप स्टेटस आणि फेसबुक पोस्टच्या जोरावर हवेलीत विजयाचे गणित मांडले जात आहे.
Pune ZP Election : तिकीट वाटपातील नाराजी भाजपच्या पथ्यावर पडणार का? पूर्व हवेलीतील महत्त्वाच्या गटांमध्ये रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा.
Pune Crime : शेतात डांबून ठेवत तरुणाला अमानुष मारहाण; मोबदला न देता ऊसतोडणी करून घेतली
Pune Crime : वाघोलीच्या ३३ वर्षीय तरुणाला रोज १ हजार रुपयांचे आमिष दाखवून म्हाडा येथे नेले; काम करण्यास नकार देताच बांबू आणि केबलने बेदम मारहाण.
Junnar Election : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आज मतदान! ३ लाख ७ हजार मतदार बजावणार हक्क
Junnar Election : ९ फेब्रुवारीला १५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून, जिल्हा परिषद गटांची मोजणी एकाच वेळी सुरू करण्यासाठी ३२ टेबल सज्ज करण्यात आले आहेत.
PCMC News : पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपचे रवि लांडगे महापौर तर शर्मिला बाबर यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड झाली.
PCMC News : स्थायी समितीचे गठन लांबणीवर पडल्याने २० फेब्रुवारीची कायदेशीर मुदत पाळणे अशक्य; मुदतवाढीसाठी राज्य शासनाकडे धाव घेण्याचे आयुक्तांचे संकेत.
Underground Road : ३२ हजार कोटी खर्च करून पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणाऱ्या ५४ किमी लांबीच्या भुयारी मार्गांचा प्रस्ताव; 'पुम्टा'च्या मंजुरीकडे सर्वांचे डोळे.
Student Suicide : हॉल तिकीट आणून घरी परतल्यानंतर आई कामावर जाताच १७ वर्षीय विद्यार्थ्याचा टोकाचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर.
PCMC News : महापालिकेत पुन्हा चैतन्य! नागरिक अन कार्यकर्त्यांनी महापालिका फुलली
PCMC News : तिसऱ्या मजल्यावरील बंद दालने पुन्हा उघडली; महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर राजकीय हालचालींना वेग, कार्यकर्त्यांची मोठी वर्दळ.
PCMC News : शिवसेनेच्या विजयी उमेदवारांनी फेट्यावर 'किवळे पॅटर्न'चे स्टिकर्स लावून सभागृहात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा.
Ajit Pawar : ५९ एकर गायरान जमीन पिंपरी चिंचवड मनपाकडे विनामूल्य हस्तांतरित करण्यात अजित पवारांचा सिंहाचा वाटा; नगरसेवक पंकज भालेकर यांचे आयुक्तांना निवेदन.
Satara Crime : ॲपल कंपनीचा बनावट माल विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ‘या’४ व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
Satara Crime : शाहूपुरी पोलिसांची शाहू स्टेडियम आणि एसटी स्टँड परिसरात मोठी कारवाई; ॲपल कंपनीच्या हुबेहूब नक्कल केलेल्या बनावट मालाचा साठा जप्त.
Mahabaleshwar Election : महाबळेश्वरच्या दुर्गम भागातही निवडणूक यंत्रणा पोहोचली; चोख पोलीस बंदोबस्त आणि मशिनरीसह प्रशासन मतदानासाठी सज्ज.
Koregaon News : मोठी बातमी! कोरेगाव तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींचा कारभार आता प्रशासकाच्या हातात
Koregaon News : सरपंच आणि सदस्यांचा कार्यकाळ संपला; आता ग्रामपंचायत अधिकारी आणि विस्तार अधिकारी सांभाळणार गावाची धुरा.
Koregaon News : कोरेगाव तालुक्यातील आठवडा व जनावरे बाजार आज राहणार बंद
Koregaon News : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कोरेगाव तालुक्यातील सर्व आठवडा बाजार व जनावरे बाजार बंद ठेवण्याचे आदेश.
दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०७ फेब्रुवारी २०२६
पंचांगआज मिती माघ कृष्ण षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र चित्रा. योग शूल.चंद्र राशी कन्या.भारतीय सौर १७ माघ शके १९४७.शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ .मुंबईचा सूर्योदय ०७.१०, मुंबईचा सूर्यास्त ०६.३४, मुंबईचा चंद्रोदय ११.३२ मुंबईचा चंद्रास्त १०.३०, राहू काळ १०.०१ ते ११.२७. चांगला दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
Agni-3 Missile:
कराडमध्ये खळबळ! NCP नेत्याच्या मुलावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; उंडाळे येथील घटना
Leopard Attack : कराडमधील उंडाळे परिसरात राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव अधिराज पाटील यांच्यावर बिबट्याचा हल्ला

31 C