Purandar News : महामार्गासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांवरच टोलचा भार कशासाठी? संदीप जगताप यांचे स्थानिकांना टोल न भरण्याचे आवाहन.
Water Crisis : जलसंपदा विभागाकडून आदेश नसल्याने विसर्ग रखडला; लोकप्रतिनिधींच्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी कधी?
Bhavaninagar News : बारामती-इंदापूर मार्गावर नीरा डाव्या कालव्यालगत रस्त्याची दुरवस्था; अरुंद रस्ता आणि खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा विळखा.
Shirur Police Station : पोलिसांच्या डोळ्यादेखत हाणामारी सुरू झाल्याने परिस्थिती हाताबाहेर; अखेर जादा बंदोबस्त बोलावून जमाव पांगवला.
Dilip Mohite Patil : “या आमदारांचे पद रद्द होणार”..दिलीप मोहितेंचा मोठा दावा; खेडच्या राजकारणात खळबळ
Dilip Mohite Patil : कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह आणि मोजक्याच ठेकेदारांना झुकते माप; निष्पक्ष चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा.
Jowar Price Hike : मागणी अधिक अन् पुरवठा कमी असल्याने ज्वारीची भाकरी झाली दुर्मिळ; सर्वसामान्य ग्राहकांची मोठी ओढाताण.
Stone Pelting in Saswad : अशोकनगर आणि साठेनगर मधील जमाव आमनेसामने; सासवडच्या जेजुरी नाका परिसरात दगडफेकीने दहशत.
National Flag Insult : चाकणमध्ये तिरंगा जाळून कचऱ्यात फेकणाऱ्याला पोलिसांनी केली अटक, ठाकरवस्ती चौकातील धक्कादायक घटना.
PCMC News : १०० कोटींची ‘मलई’कोणी खाल्ली? महापालिकेच्या आखाड्यात आज सत्ताधारी-विरोधक भिडणार
PCMC News : कचरा विलगीकरणाच्या नावाखाली ठेकेदारांवर मेहेरनजर; सलग ८ वेळा मुदतवाढ दिल्याने प्रशासनावर गंभीर प्रश्न.
Khandala Lake : पर्यटनाच्या नावाखाली केवळ लूट? खंडाळा बोटिंग क्लब परिसरात मूलभूत सुविधांचा बोजवारा, महिला आणि लहान मुलांची मोठी गैरसोय.
PCMC News : महापालिका कायद्याला बगल देण्याचा प्रयत्न; लोकप्रतिनिधींच्या हट्टापुढे आयुक्त नमणार की सभागृहात रणकंदन माजणार?
PCMC School : अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन; महापालिकेच्या शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह.
PCMC News : स्वीकृतचा ‘सस्पेन्स’आज संपणार! भाजपच्या ७ जागांवर कोणाची वर्णी? इच्छुकांची धाकधूक वाढली
PCMC News : संख्याबळानुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला ३ जागा; सीमा सावळे, फजल शेख आणि राजेंद्र जगताप यांच्या नावांची चर्चा.
Talegaon Dabhade : रस्ते रुंद, पण नशिबी कोंडीच! तळेगावात वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त
Talegaon Dabhade : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज; अतिक्रमणे आणि अनधिकृत पार्किंगवर कधी होणार कारवाई?
Koynanagar News : कोयनानगरच्या सांस्कृतिक वारशाला घरघर! करमणूक केंद्र इतिहासजमा होण्याच्या मार्गावर
Koynanagar News : बालक मंदिर, व्यायामशाळा आणि बॅडमिंटन कोर्टवर शांततेचे सावट; स्थानिक नागरिकांकडून पुनरुज्जीवनाची आर्त साद.
Satara School : साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘शाळा गुणवत्ता मूल्यांकनात’जिल्हा राज्यात नंबर १
Satara School : सीईओ याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने मिळवला बहुमान; ८७ टक्के शाळांनी भरली पारदर्शक माहिती.
Eknath Shinde : सातार्यात शिंदेंची तोफ धडकणार! अंतर्गत बंडाळी शमणार की वाद आणखी पेटणार?
Eknath Shinde : मेळावा केवळ गर्दीसाठी नाही तर पक्षांतर्गत मरगळ झटकण्यासाठी; निष्क्रिय कार्यकर्त्यांवर गाजणार का कारवाईची कुऱ्हाड?
PBKS vs LSG : पंजाबने लखनौचा धुव्वा उडवत यंदाच्या हंगामातील आपला सलग पाचवा विजय नोंदवत गुणतालिकेतील आपले स्थान मजबूत केले आहे.
Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'
रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज लक्ष्मी नारायणाचे दर्शन मिळेल आणि त्याद्वारे गावाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही, सर्वांना उत्तम आरोग्य, सुख समृद्धी लाभेल,भरभराट होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तळे जवळील बोरीचा माळ गावातील नव्याने बांधण्यात आलेल्या श्री लक्ष्मी नारायण मंदिराचा लोकार्पण सोहळा आज अक्षय्य तृतीयेच्या शुभ त्यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी शिंदे यांनी उपस्थित स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, खरं तर गावात मंदिर आले म्हणजे एक मांगल्य आले पवित्र वातावरण आले. घरी पूजा केली तरी आपण मंदिरात अजून देवाचे दर्शन घेतो आणि या सुंदर मंदिरात देवाचे दर्शन घेण्याची संधी मिळवून दिली ती आमदार तुकाराम काते, ग्रामस्थ, देवजी काते यांचे मनापासून अभिनंदन करतो असे सांगितले. या मंदिरातील मूर्ती ३०० वर्षापूर्वी मुंबईहून पायी चालत या गावी आणण्यात आल्या. ज्यांनी त्या काळी हे करून दाखवले त्यांचेही आभार मानायला हवेत. त्याकाळच्या लोकांनी प्रचंड हालअपेष्टा सोसलेल्या आहेत. त्या तुलनेत आता सर्वच ठिकाणी विकास झालेला आपल्याला दिसत असल्याचे सांगितले.रायगड हा जिल्हा निसर्ग संपदेने समृद्ध असा जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या भूमीत घडलेला आहे. त्यामुळेच या मातीतला मावळा भरतशेठ आज मंत्री झाले आहेत. रायगड ही पुण्यभूमी आहे. या मातीत येणाऱ्या प्रत्येकाला समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी शिंदेंनी नमूद केले. मंदिर बांधण्याचे एक वेगळे समाधान माणसाला असते. या मंदिराचे पावित्र्य जपणे, दररोज दिवा बत्ती करणे, पूजा अर्चा करणे, स्वच्छता टापटीपणा ठेवणे हे आपल्या गावकऱ्यांचे काम आहे. हे काम करण्यासाठी तळा नगर पंचायतीला मी १६ कोटी दिले होते, आता पुन्हा पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी ६ कोटींची मागणी आली आहे. हा निधी देखील नक्की देईन असेही त्यांनी यावेळी सांगितले.माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मी ५६७ निर्णय घेतले. लाडकी बहिण योजना सुरू करण्याचा निर्णय त्यात महत्त्वाचा होता, अनेक जण ती योजना होऊ नये यासाठी कोर्टात गेले. मात्र तरीही ही योजना यशस्वी करून दाखवली. दीड हजारात काय होते असे विरोधक म्हणाले, पण माझ्या लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले, स्वतःचे पैसे स्वतः काढून घेण्याचा अधिकार मिळाला. कुणीही कितीही प्रयत्न केले तरीही ही योजना कधीही बंद होणार नाही. काही महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाली नसल्याने पैसे येत नव्हते तेव्हा मी महिला आणि बालकल्याण विभागाला सांगून या ई-केवायसीला एक महिन्याची मुदतवाढ देण्यास सांगितले. त्यामुळे पात्र लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नाहीत ही जबाबदारी आमची राहील असे यावेळी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले. लेक लाडकी लखपती योजना केली, एका मुलीने शिक्षणासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केल्याचे समजल्यावर मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अडीच वर्षात ४७० कोटींची मदत देण्यात आली, महात्मा फुले योजनेत दीड लाखांची मदत वाढवून पाच लाख करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.ग्रामीण भागातील ब वर्ग तीर्थक्षेत्र मंदिराना दिले जाणारे दोन कोटीचे अनुदान वाढवून मी पाच कोटी करण्याचा निर्णय घेतला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. हे सरकार सर्वसामान्यांचे असून त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस यायला हवेत यासाठी मी काम करत आहे. मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलोय, शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री होण्याचा प्रवास मी पूर्ण केला आहे. आई आणि पत्नीची काटकसर मी पहिली होती, त्यामुळेच माझ्या कारकिर्दीत महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले.याठिकाणी हे लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे, इथे गोर गरीब येऊन दर्शन घेतील, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होईल असे नमूद केले. माझ्या आयुष्यात पैसे, प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा तमाम जनतेचे प्रेम किती कमावले ते जास्त महत्त्वाचे असते. सत्ता खुर्ची यापेक्षा राज्यातील तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख आज माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे असे सांगितले. मी मुद्दाम या छोट्या गावात आलो आहे, कारण तुकाराम काते हा आमच्या पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे. त्याने या छोट्याशा गावात एवढे भव्य मंदिर उभारले याचा मला सार्थ अभिमान आहे असे यावेळी नमूद केले. अतिशय सुंदर मंदिर उभे राहिले आहे आता फक्त गावकऱ्यांनी मिळून या मंदिराची योग्य निगा राखणे गरजेचे आहे, स्वच्छता,पावित्र्य, मांगल्य टिकवावे एवढीच अपेक्षा असल्याचे सांगितले. तळा नगरपंचायतीला या परिसराचा विकासासाठी निधी लागला तर तो नक्की उपलब्ध करून देऊ असे यावेळी सांगितले. या गावात अजून काही सुविधा निर्माण करायच्या असतील तर त्याही नक्की निर्माण केल्या जातील असेही यावेळी स्पष्ट केले. यावेळी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, आमदार तुकाराम काते, अनिल नवगणे, प्रमोद घोसाळकर, जिल्हाधिकारी किसनकुमार जावळे, पोलीस अधीक्षक आचल दलाल, सुवर्णा करंजे, समृद्धी काते, अरुण चाळके, विपुल उभारे, राकेश वडके, रमेश मोरे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Riyan Parag Statement : केकेआरविरुद्धच्या पराभवानंतर राजस्थानचा कर्णधार रियान पराग याने आपली चूक कबूल केली आहे.
Missing Girls :
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नियंत्रण आहे. त्याचे अनुकरण मोदी करू इच्छितात.
PBKS vs LSG : 6,6,6,Wd,1,6,6…प्रियांश-कूपरने मार्क्रमच्या एकाच षटकात पाडला धावांचा पाऊस, पाहा VIDEO
PBKS vs LSG : या सामन्यात पंजाबने प्रियांश आर्य आणि आणि कूपर कोनोली या दौघांच्या भागीदारीच्या जोरावर लखनौसमोर २५५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Iran vs USA war : इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला असून होर्मूझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आली आहे.
Ukraine-Russia war : रशियातल्या ड्रोन फॅक्टरीवर युक्रेनचा हल्ला; दोन जण ठार !
रशियाच्या सैन्याने रात्रीच्या वेळी युक्रेनची २७४ ड्रोन, तसेच गायडेड एरियल बॉम्ब आणि युक्रेनमध्ये बनवलेले एक नेपच्यून क्षेपणास्त्र पाडले.
Dhruv Jurel Stumping : जुरेलच्या या चपळाईने क्रिकेट चाहत्यांना थेट एमएस धोनीची आठवण करून दिली.
Weather Update : देशात तीव्र उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अशांपर्यंत
Weather Update : भारतीय हवामान विभागाने उत्तर आणि मध्य भारतासाठी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
Iran America War : करार न मानल्यास इराणचा वीज प्रकल्प-पूल उद्ध्वस्त करण्याचा ट्रम्प यांचा इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नवी धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आमचे प्रतिनिधीमंडळ (सोमवार, २० एप्रिल) पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे जाणार आहे. त्यांनी दावा केला की, त्यांनी एक नवा पारदर्शक आणि न्याय्य करार प्रस्तावित केला आहे. जर इराणने हा करार मान्य केला नाही, तर आम्ही त्यांच्या वीज प्रकल्पांना आणि पुलांना उद्ध्वस्त करू. असं सांगत ट्रम्प यांनी इराणला धमकीवजा इशारा दिला आहे.इराण नकळत आमच्याच कामी येत आहे :डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सांगितले की, “इराणने काल होर्मुज सामुद्रधुनीत गोळीबार केला. हा आमच्या युद्धविराम कराराचा पूर्ण भंग आहे. यातील अनेक गोळ्या एका फ्रेंच जहाजावर आणि ब्रिटनच्या मालवाहू जहाजावर डागण्यात आल्या. हे चांगले नव्हते, बरोबर ना? आमचे प्रतिनिधी पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे जात आहेत. ते उद्या संध्याकाळपर्यंत तेथे पोहोचतील, जिथे चर्चा होणार आहे.”ते पुढे म्हणाले, “इराणने अलीकडेच होर्मुज सामुद्रधुनी बंद करत असल्याची घोषणा केली. हे विचित्र आहे, कारण आमच्या नाकेबंदीमुळे ती आधीच बंद आहे. ते नकळत आमच्याच कामी येत आहेत. हा मार्ग बंद असल्यामुळे त्यांचे दररोज सुमारे ५० कोटी डॉलरचे नुकसान होत आहे.”... तर प्रत्येक पूल उद्ध्वस्त करू :ट्रम्प यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले, “अमेरिकेला यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. उलट अनेक जहाजे अमेरिकेकडे येत आहेत. टेक्सास, लुइझियाना आणि अलास्का येथे तेल भरण्यासाठी ती येत आहेत. हे सर्व आयआरजीसीच्या कृपेने घडत आहे, जे नेहमीच स्वतःला ‘शक्तिशाली’ दाखवण्याचा प्रयत्न करतात.”ते पुढे म्हणाले, “आम्ही अतिशय निष्पक्ष आणि न्याय्य करार देत आहोत. मला आशा आहे की ते तो स्वीकारतील. कारण जर त्यांनी तो स्वीकारला नाही, तर संयुक्त राज्य अमेरिका इराणमधील प्रत्येक वीज प्रकल्प आणि प्रत्येक पूल उद्ध्वस्त करेल.”https://prahaar.in/2026/04/19/meta-to-lay-off-8000-employees/आता नरम भूमिका संपली!“आता नरम भूमिका संपली! ते वेगाने कोसळतील, सहज कोसळतील. जर त्यांनी करार स्वीकारला नाही, तर जे करणे आवश्यक आहे ते करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल. मागील ४७ वर्षांत इराणबाबत जे इतर राष्ट्राध्यक्षांनी करायला हवे होते, ते आता करण्याची वेळ आली आहे.”“आता इराणच्या हत्या मशीनचा अंत करण्याची वेळ आली आहे.”
KKR Won : कोलकाता नाईट्स रायडर्सने अखेर पहिला विजय मिळवला
कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला चार गडी राखून पराभूत करून आयपीएल २०२६ मध्ये आपला पहिला विजय नोंदवला. केकेआरसाठी हा हंगाम चांगला गेला नाही, पण रिंकू सिंग आणि अनुकूल रॉय यांनी सातव्या विकेटसाठी भक्कम भागीदारी करून केकेआरला विजय साकारुन दिला. प्रथम फलंदाजी करताना, राजस्थानने २० षटकांत नऊ विकेट्स गमावून १५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, केकेआरने १९.४ षटकांत सहा विकेट्स गमावून १६१ धावा करत सामना जिंकला.लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची फलंदाजी खराब झाली आणि संघाने ८५ धावांत सहा विकेट्स गमावल्या होत्या. जोफ्रा आर्चरने पहिल्याच चेंडूवर टिम सेफर्टला बाद केले आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात नंद्रे बर्गरने कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद केले. केकेआरचे दोन्ही सलामीवीर आपले खाते उघडण्यात अपयशी ठरले. त्यानंतर संघाने नियमित अंतराने कॅमेरॉन ग्रीन (२७), अंगक्रिश रघुवंशी (१०), रोव्हमन पॉवेल (२३) आणि रमणदीप सिंग (१०) यांच्या विकेट्स गमावल्या.रिंकू सिंग या मोसमात धावा करण्यासाठी झगडत होता. पण त्याला मोक्याच्या क्षणू सूर गवसला. रिंकू केकेआरसाठी फिनिशर म्हणून ओळखला जातो आणि राजस्थानविरुद्ध तो त्यात यशस्वी ठरला. सहा विकेट्स गमावल्यानंतर, रिंकू सिंगने अनुकूल रॉयसोबत मिळून सातव्या विकेटसाठी ३७ चेंडूंमध्ये ७६ धावांची नाबाद भागीदारी केली. आयपीएलमध्ये यशस्वी धाव-पाठलाग करताना सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावरील फलंदाजाने केलेली ही दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे.रिंकू सिंगने अर्धशतक झळकावले आणि संघाला विजय मिळवून दिल्यानंतरच तो पॅव्हेलियनमध्ये परतला. केकेआरसाठी रिंकू सिंगने ३४ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ५३ धावा केल्या. यशस्वी धाव-पाठलागात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना केकेआरची ही चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे. दरम्यान, अनुकूल १६ चेंडूंमध्ये एक चौकार आणि दोन षटकारांसह २९ धावांवर नाबाद राहिला. राजस्थानसाठी रवींद्र जडेजाने दोन विकेट्स घेतल्या, तर जोफ्रा आर्चर, नंद्रे बर्गर, रवी बिश्नोई आणि यशराज पुंजा यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.तत्पूर्वी, राजस्थानचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी राजस्थानला आश्वासक सुरुवात करून दिली. या दोन फलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये केकेआरला एकही धाव करू दिली नाही आणि पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. राजस्थानकडून वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी शानदार फलंदाजी केली, तर इतर कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. वैभवने सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २८ चेंडूंमध्ये ४६ धावा केल्या, तर यशस्वी चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २९ चेंडूंमध्ये ३९ धावा करून बाद झाला. या दोघांव्यतिरिक्त केवळ शिमरॉन हेटमायर (१२) आणि रियान पराग (१२) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. राजस्थानने एक आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. पण रिंकू आणि अनुकूलने त्यांच्या हातून विजय हिसकावून घेतला. केकेआरकडून कार्तिक त्यागी आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. सुनील नरेनला दोन विकेट्स घेण्यात यश आलं.
Iran vs US : व्हायरल ऑडिओवरून नवा वाद; इराणने ट्रम्प यांना ‘इडियट’ संबोधल्याचा दावा
तेहरान : पश्चिम आशियात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतील इराणी दूतावासाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका केली आहे. एका व्हायरल समुद्री ऑडिओ क्लिपवरून दूतावासाने ट्रम्प यांच्यावर निशाणा साधत वाद निर्माण केला आहे. हा संपूर्ण वाद त्या कथित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर सुरू झाला, ज्याला इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (आयआरजीसी) नौदलाचा रेडिओ संदेश असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओमध्ये ‘इडियट’ हा शब्द ऐकू येतो, ज्यावरून सोशल मीडियावर विविध दावे करण्यात आले. काहींनी तो शब्द इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसाठी वापरला असल्याचे म्हटले, मात्र इराणी दूतावासाने हे दावे फेटाळून लावले.प्रिटोरिया येथील इराणी मिशनने ट्रम्प यांनाच ‘इडियट’ संबोधले असल्याचा दावा केला आहे. दूतावासाच्या मते, व्हायरल संदेशातील हा शब्द ट्रम्प यांच्यासाठी वापरण्यात आला होता, इराणच्या कोणत्याही अधिकाऱ्यासाठी नव्हता. व्हायरल ऑडिओमध्ये आयआयजीसी नौदलाने जहाजांना इशारा दिला आहे की होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे इराणच्या नियंत्रणाखाली आहे. समुद्री चॅनेल 16 वर जारी करण्यात आलेल्या संदेशात म्हटले आहे की, हा महत्त्वाचा मार्ग खुला करण्याचा निर्णय केवळ इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या आदेशानुसारच होईल, बाह्य दबावामुळे नाही. तसेच, या मार्गाने प्रवास करू इच्छिणाऱ्या जहाजांना इराणी नौदलाची परवानगी घ्यावी लागेल, असेही सांगण्यात आले आहे.आयआरजीसी ने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, कोणतेही जहाज परवानगीशिवाय सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर हल्ला केला जाऊ शकतो. विशेषतः इराणविरोधी देशांशी संबंधित जहाजांना हा इशारा देण्यात आला आहे. इराणने आरोप केला आहे की अमेरिकेने युद्धविरामाच्या अटींचे पालन केले नाही आणि इराणी जहाजे व बंदरांवरील निर्बंध हटवले नाहीत. याच प्रत्युत्तरात होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. यापूर्वी इराणने मर्यादित स्वरूपात गैर-लष्करी जहाजांना मार्ग देण्याची परवानगी दिली होती, मात्र आता ती व्यवस्थाही संपुष्टात आली आहे.सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर आयआरजीसी ने परिसरातील सर्व जहाजांना हाय अलर्टवर राहण्याचा इशारा दिला आहे. फारसच्या आखातातून किंवा ओमान समुद्रातून पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा ते शत्रूला सहकार्य मानले जाईल, असे सांगण्यात आले आहे.इराणने पुन्हा एकदा स्पष्ट केले की या भागातील नियम ठरवण्याचा अधिकार फक्त त्यांच्या नौदलाकडे आहे. होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक आहे, जिथून जागतिक ऊर्जा पुरवठ्याचा मोठा हिस्सा जातो. त्यामुळे येथे वाढणारा तणाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि समुद्री व्यापारासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला.मिळालेल्या माहितीनुसार, लोखंडी शिगांनी भरलेला ट्रक, आयशर टेम्पो, आंबा वाहतूक करणारी बोलेरो आणि एक कार अशी चार वाहने एकमेकांवर आदळली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चार वाहनांना धडक देऊन महामार्गाजवळ विहिरीत कोसळला.या अपघातात ट्रकमधील क्लिनर गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू असून अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
Pune News : पुणे हादरलं.! झेड ब्रिज परिसरात ३२ वर्षीय तरुणाचा गळा चिरून खून
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Mumbai News : ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह बोगद्याच्या आराखड्यात बदल
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे बांधण्यात येणाऱ्या ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह बोगद्याच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. आता हा बोगदा वानखेडे स्टेडियम येथे न संपता गिरगाव चौपाटीजवळ मफतलाल जलतरण तलाव येथे संपेल. ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह या ९ हजार कोटींच्या प्रकल्पाला महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे मंजुरी देण्यात आली होती; मात्र आता या प्रकल्पाचा सुधारित आराखडा प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. जुन्या आराखड्यानुसार बोगदा बांधल्यास तो वानखेडे स्टेडियम येथे संपेल. त्यामुळे मरिन ड्राइव्ह येथील क्वीन्स नेकलेस या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होईल. बांधकामादरम्यान मरिन ड्राइव्ह येथे होणारी वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण यांमुळे ऐतिहासिक वारसा असलेल्या या परिसरातील वातावरण खराब होऊ शकते. हे टाळण्यासाठी बोगदा प्रकल्पाच्या संरेखनात बदल करण्याची मागणी मरिन ड्राइव्ह सिटीझन्स असोसिएशनने केली आहे. पूर्वमुक्त मार्ग आणि अटल सेतू यांच्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ऑरेंज गेट बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामुळे ४५ मिनिटांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.
META : मेटा कंपनी आठ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार
न्यूयॉर्क : फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटा या वर्षी मे महिन्यात सुमारे ८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची योजना आखत आहे. २०२२च्या अखेरीस आणि २०२३ च्या सुरुवातीला झालेल्या पुनर्रचनेनंतर कंपनीचे हे सर्वात मोठे पाऊल असेल. रॉयटर्सच्या अहवालानुसार, मोठ्या प्रमाणावर होणारी ही कर्मचारी कपात २० मे च्या आसपास सुरू होऊ शकते.सुरुवातीच्या टप्प्यात मेटा आपल्या एकूण जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १० टक्के कमी करण्याच्या तयारीत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत आणखी काही कर्मचाऱ्यांची कपात करू शकते. तथापि, कपातीची नेमकी तारीख आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येत अजूनही बदल होण्याची शक्यता आहे.मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांचे मत आहे की एआयच्या वाढत्या क्षमतांमुळे भविष्यात व्यवस्थापन स्तर कमी होतील आणि एआय-सहाय्यित कर्मचाऱ्यांद्वारे कामात अधिक कार्यक्षमता येईल. यापूर्वी असे अहवालही आले होते की मेटा आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के किंवा त्याहून अधिक भाग कमी करू शकते.टेक आणि मीडिया क्षेत्रातून कर्मचाऱ्यांची कपात केवळ मेटापुरती मर्यादित नाही. गेल्या काही महिन्यांत ॲमेझॉननेही आपल्या सुमारे ३० हजार कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना (सुमारे १० टक्के व्हाईट-कॉलर स्टाफ) कामावरून काढले आहे. तर, डिस्नेचे सीईओ जोश डी'अमारो यांनीही टीव्ही व्यवसाय, ईएसपीएन आणि तंत्रज्ञान विभागातून सुमारे १ हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याची घोषणा केली आहे.
तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील कट्टनारपट्टी परिसरात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत किमान १६ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी याच जिल्ह्यातील दुसऱ्या एका कारखान्यातही स्फोट झाला होता.हा स्फोट इतका भीषण होता की कारखान्याचे अनेक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव आणि मदत पथक घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत ढिगाऱ्यातून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.कारखान्यात कर्मचारी काम करत असताना हा स्फोट झाला. अचानक झालेल्या या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला. आग वेगाने पसरली आणि अनेक जण आतच अडकून पडले. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे काम सुरू केले आणि बचावकार्य हाती घेतले.अग्निशमन आणि बचाव विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत अनेक मृतदेह सापडले असून इतरांचा शोध सुरू आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला असून स्फोट नेमका कसा झाला याची चौकशी सुरू केली आहे.https://prahaar.in/2026/04/19/meta-to-lay-off-8000-employees/या दुर्घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आणि या कठीण काळात सरकार त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. तसेच प्रशासनाला मदत आणि बचावकार्य वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत.https://prahaar.in/2026/04/19/dmk-and-congress-did-not-allow-womens-reservation-bill-to-be-passed-amit-shah/राष्ट्रपतींनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त करत हा अपघात अत्यंत वेदनादायक असल्याचे म्हटले. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केली आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. दोन्ही नेत्यांनी या कठीण काळात प्रभावित कुटुंबीयांसोबत उभे राहण्याचा विश्वास दिला.
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
Eknath Shinde : सातारा शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष निलेश मोरे यांनी पदाधिकाऱ्यांसह राजीनामा दिला आहे.
KKR vs RR : ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या या थरारक लढतीत कोलकात्याने राजस्थान रॉयल्सचा ४ गडी राखून पराभव केला.
Jofra Archer : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'!
कोलकाता : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात १५५ धावांचा बचाव करताना जोफ्रा आर्चरने राजस्थान रॉयल्सच्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने टिम सिफर्टला शून्यावर माघारी धाडले. आयपीएलच्या हंगामात सलग तिसऱ्या सामन्यात जोफ्रा आर्चरने पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. या कामगिरीसह त्याने आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळा पहिल्या चेंडूवर विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर टिम सिफर्टला पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचित करण्याआधी जोफ्रा आर्चरनं सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला 'गोल्डन डक'सह तंबूचा रस्ता दाखवला होता. आरसीबीच्या सामन्यात त्याने फिल सॉल्टवर हीच वेळ आणली होती. जोफ्रा आर्चरने आयपीएलमध्ये पहिल्या चेंडूवर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. मोहम्मद शमीने १२४ सामन्यात पाच वेळा पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्याचा रेकॉर्ड आहे. यंदाच्या हंगामात सलग तीन सामन्यात पहिल्या चेंडूवर विकेट घेत जोफ्रा आर्चरने ५८ व्या सामन्यात पाच वेळा ही कामगिरी करून दाखवली आहे.
Varun Chakaravarthy Record : कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) या 'मिस्ट्री स्पिनर'ने केवळ विकेट्स घेतले नाहीत, तर टी-२० क्रिकेटमध्ये एक मोठा भारतीय विक्रमही आपल्या नावावर केला.
Factory fire news : विरुधुनगर जिल्ह्यातील फटाका कारखान्यात रविवारी झालेल्या भीषण स्फोटात १६ जणांचा मृत्यू झाला आहे.
Women’s Reservation Bill : महिला आरक्षणावरून राजकीय तणातणी; मोदी सरकारने दिली प्रश्नांची उत्तरे…
जनगणना, फेररचना प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा केल्यास महिलांना वर्ष २०२९ मधील लोकसभा निवडणुकीतही आरक्षण मिळणे अवघड बनेल.
High Commissioner : माजी रेल्वे मंत्री झाले बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त
नवी दिल्ली : देशाचे माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी आता बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त झाले आहेत. त्यांनी प्रणय वर्मा यांच्याकडून बांगलादेशमधील भारताच्या उच्चायुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. प्रणय वर्मा आता ब्रुसेल्समध्ये युरोपीयन संघात भारताचे राजदूत म्हणून काम करणार आहेत.दिनेश त्रिवेदी एकेकाळी तृणमूल काँग्रेसचे प्रभावी नेते होते. ते ममता बॅनर्जींचे विश्वासू म्हणून यूपीए सरकारच्या काळात १३ जुलै २०११ ते १८ मार्च २०१२ दरम्यान देशाचे रेल्वेमंत्री होते. पण रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून वाद झाला. यानंतर दिनेश त्रिवेदी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हळू हळू त्यांचे तृणमूलमधील महत्त्व कमी होत गेले. अखेर १२ फेब्रुवारी २०२१ रोजी तृणमूलचा राजीनामा देऊन दिनेश त्रिवेदी बाहेर पडले. त्यांनी ६ मार्च २०२१ रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आता ७५ वर्षांचे असलेल्या यांनी बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नवी जबाबदारी स्वीकारली आहे.कोणत्याही देशात उच्चायुक्त, राजदूत अशा पदांवर परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती होते. या पदावर एका ज्येष्ठ नेत्याची नियुक्ती करून केंद्र सरकारने बांगलादेश सोबतच्या राजकीय संबंधांना भारत विशेष महत्त्व देतो याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बंगाली संस्कृतीची जाण असलेल्या दिनेश त्रिवेदी यांना बांगलादेशमध्ये उच्चायुक्त म्हणून काम करणे सोपे जाईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.उच्चायुक्त नियुक्तीची माहिती मिळताच पश्चिम बंगालमधील भाजपचे सहप्रभारी अमित मालवीय यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आणि दिनेश त्रिवेदींचे नव्या जबाबदारीसाठी अभिनंदन केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी द्रमुक आणि काँग्रेसवर महिला आरक्षण विधेयकाबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, या दोन्ही पक्षांनी संसदेत महिलांना सक्षम करणारे महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ दिले नाही.तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इरोड जिल्ह्यातील मोडक्कुरिची मतदारसंघात भाजप उमेदवार कृतिका यांच्या प्रचारसभेत बोलताना अमित शाह यांनी विरोधकांवर टीका केली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्यांचा रोडशो शिवगिरी शासकीय रुग्णालय परिसरातून सुरू होऊन थिरुन चिन्नमलाई यांच्या पुतळ्याजवळ संपला.https://prahaar.in/2026/04/19/start-kamgar-hospital-in-andheri-at-full-capacity/अमित शाह यांनी आपल्या भाषणात एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक सरकारवरही निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, एम. करुणानिधी यांच्यापासून सुरू झालेली घराणेशाही आजही सुरू असून स्टॅलिन आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.https://prahaar.in/2026/04/19/public-itself-will-finish-off-the-congress-raut-should-worry-about-his-own-party-says-navnath-ban/तसेच, एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूमध्ये मजबूत आघाडी उभी राहत असल्याचा दावा शाह यांनी केला. राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यास भ्रष्टाचार संपुष्टात येईल आणि तामिळनाडूची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित होईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर
Ajit Pawar : २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास आता राज्य CID कडे सोपवण्यात आला आहे.
CSK Complaint Letter : या घटनेनंतर सोशल मीडियावर चेन्नई सुपर किंग्सच्या लेटरहेडसारखे दिसणारे एक पत्र व्हायरल झाले.
US-Iran War : अमेरिका-इराण शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी पाकिस्तानात कडेकोट सुरक्षा
अमेरिका आणि इराणमधील थेट चर्चेची पहिली फेरी दिनांक ११ आणि १२ एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये पार पडली होती. मात्र त्या चर्छेमधून कोणताही ठोस निष्कर्ष निघू शकला नव्हता.
Nagpur News : नागपुरात गॅस गळतीमुळे स्फोट, एकाचा मृत्यू, 10 जण जखमी
Nagpur News : कामठी येथील गांधीनगर भाजी मंडी परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन अतुल पानतावणे यांचा मृत्यू झाला.
Sona Pappu syndicate case : सोना पप्पू सिंडिकेट प्रकरणात ईडीची कोलकाता डीसीपींच्या घरावर छापा
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत कोलकाता पोलिसांचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) शांतनू सिन्हा बिस्वास यांच्या निवासस्थानी छापा टाकला. ईडीची टीम आज म्हणजेच रविवार १९ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ७ वाजता बालीगंज येथील फर्न रोडवरील त्यांच्या घरी पोहोचली आणि झडती मोहीम सुरू केली.माहितीनुसार, डीसीपी बिस्वास यापूर्वी कालीघाट पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी होते, जे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघात येते. याचदरम्यान, ईडीने दक्षिण कोलकात्यातील बेहाला भागात व्यापारी जॉय कामदार यांच्या घरावरही छापा टाकला. सूत्रांच्या माहितीनुसार, या व्यापाऱ्याच्या घरातून यापूर्वीही रोख रक्कम जप्त करण्यात आली होती आणि तपास यंत्रणेने त्यांना चौकशीसाठी दोन वेळा समन्स पाठवले होते, मात्र ते हजर झाले नव्हते.https://prahaar.in/2026/04/19/iran-america-war-as-many-as-180-drones-shot-down-iran-claims-to-have-also-targeted-an-american-f-35/ही कारवाई अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा राज्याच्या राजधानीत अवैध बांधकाम किंवा सिंडिकेट प्रकरणात शुक्रवारी अनेक ठिकाणी झडती घेण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच ईडीने माजी राज्यमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातही त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. याशिवाय, आयकर विभागाने नुकतेच बहिरा येथील आमदार आणि तृणमूल काँग्रेसचे उमेदवार देबाशीष कुमार यांच्या घरावरही छापा टाकला होता.उल्लेखनीय म्हणजे, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २१३ जागांसह दणदणीत विजय मिळवला होता. भारतीय जनता पक्षाने ७७ जागांसह मुख्य विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळवले होते. आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये कडवी लढत होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक राज्याच्या राजकीय दिशेला आकार देणारी ठरणार आहे. पश्चिम बंगालमधील २९४ जागांसाठी २३ आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार असून, ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
Navnath Ban PC : जनताच काँग्रेसला संपवेल, राऊतांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी, नवनाथ बननी सुनावले
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काँग्रेसचा उल्लेख मोजण्यापेक्षा संजय राऊत यांनी ते ज्या पक्षात आहे त्या पक्षाच्या दयनीय अवस्थेची चिंता करावी. देशभरात काँग्रेसला जनतेने नाकारले आहे. लोकसंख्येनुसार खासदारांची संख्या वाढवणे आवश्यक असताना दक्षिणेकडील राज्यांच्या वाढीला विरोध का केला याचे उत्तर राऊतांनी द्यावे, असा रोकडा सवाल भाजपच्या नवनाथ बन यांनी केला.जनतेने राऊतांचा झेल घेऊन त्यांची विकेट काढली आहे. विधानसभा, महापालिका आणि इतर निवडणुकांत पराभव झाल्याने कोण फेल आहे हे स्पष्ट झाले आहे. मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा विश्वास दाखवला आहे. जनतेनेच राऊतांना राजकीयदृष्ट्या पांगळं केलं आहे. पंतप्रधान मोदी हे देशाचा आधारस्तंभ आहेत. मोदींच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर गेला आहे. सलग तीन वेळा जनतेने त्यांना पंतप्रधानपदी निवडून दिलं, हेच त्यांच्या कार्याचं मोठं प्रमाण आहे. मोदी सरकारने महिलांना सन्मान देण्यासाठी विधेयक आणले, मात्र त्याला विरोध करून नारी शक्तीचा अपमान करण्यात आला. याचा हिशेब जनता नक्कीच घेईल, असे बन म्हणाले. उत्तर दक्षिण असा वाद घालण्यापेक्षा विरोधकांनी वस्तुस्थिती स्वीकारावी, असेही ते म्हणाले.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर गेलेल्या लोकांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. राज्यात धर्मांतराच्या घटनांवर ठाकरे गट गप्प दिसतो. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादवर उबाठा काहीच बोलत नाही. उबाठाने मतपेढीसाठी कॉर्पोरेट जिहादकडे दुर्लक्ष केले आहे, असा घणाघात भाजपच्या नवनाथ बन यांनी केला.भाजप कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. पण अफझल खानाच्या विचारांचा विरोध करतो. देशासाठी योगदान देणाऱ्या मुस्लिमांचा आम्हाला अभिमान आहे, मात्र राऊत जाणीवपूर्वक चुकीचा प्रचार करत आहेत, असा आरोप नवनाथ बन यांनी केला.विधान परिषदेच्या जागेसाठी ठाकरे गटाला काँग्रेससमोर झुकावे लागत असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला. एकेकाळचा स्वाभिमानी पक्ष आज सत्तेसाठी तडजोड करत असल्याची टीका करत त्यांनी जनतेच्या विरोधात भूमिका घेतल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे ते म्हणाले.
Top 10 news :
Iran - America War : तब्बल १८० ड्रोन पाडले, अमेरिकन एफ-३५लाही लक्ष्य केल्याचा इराणचा दावा
इराणने पुन्हा एकदा आपल्या लष्करी क्षमतेबाबत मोठा दावा केला आहे. इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ यांनी सांगितले की, त्यांच्या दलांनी सुमारे १८० ड्रोन निष्क्रिय केले असून अमेरिकेच्या एफ-३५ स्टेल्थ फायटर जेटलाही लक्ष्य केले. ही एखादी एकदाच घडलेली घटना नसून, इराणच्या तांत्रिक आणि रणनीतिक क्षमतेचे उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले.इराणच्या वृत्तसंस्थेनुसार, गालिबाफ यांनी वॉशिंग्टनसोबत सुरू असलेल्या अप्रत्यक्ष चर्चेच्या सध्याच्या स्थितीबाबत अधिकाऱ्यांना माहिती देताना हे वक्तव्य केले. गालिबाफ म्हणाले की, एफ-३५ सारख्या आधुनिक फायटर जेटला लक्ष्य करणे म्हणजे संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इराण वेगाने पुढे जात असल्याचे द्योतक आहे. त्यांच्या मते, ही कारवाई अनेक स्तरांवर नियोजनबद्ध करण्यात आली होती.https://prahaar.in/2026/04/16/iran-america-war-is-iran-attacking-american-bases-with-the-help-of-china-shocking-information-from-secret-documents/मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही आणि यापूर्वीही अमेरिकेने असे दावे फेटाळून लावले आहेत. काही अहवालांमध्ये असे समोर आले होते की, एका अमेरिकन एफ-३५ ला मोहिमेदरम्यान नुकसान झाले होते आणि त्याला आपत्कालीन लँडिंग करावी लागली होती.इराणने असा दावाही केला की, त्यांनी अमेरिका आणि तिच्या सहयोगींशी संबंधित सुमारे १८० ड्रोन पाडले. यापूर्वीही इराणने मोठ्या संख्येने ड्रोन अडविल्याचा दावा अनेकदा केला आहे. हा दावा अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा या प्रदेशात ड्रोन आणि हवाई कारवाया युद्धाचा महत्त्वाचा भाग बनल्या आहेत.https://prahaar.in/2026/04/19/israel-vs-arab-country-israel-in-big-trouble-16-muslim-countries-unite/गालिबाफ यांनी असेही सांगितले की, अमेरिकेसोबतच्या चर्चेत काही मुद्द्यांवर सहमती झाली आहे, मात्र अनेक मोठे मतभेद अजूनही कायम आहेत. त्यांनी दावा केला की, पाश्चात्य देशांचा दबाव निष्फळ ठरला असून आता चर्चेचा मार्ग स्वीकारला जात आहे.इराणी संसदेच्या अध्यक्षांनी अलीकडील युद्धविरामाबाबत म्हटले की, हा इराणच्या रणनीतिक विजयाचा परिणाम आहे, तर अमेरिकेने तो वेगळ्या दृष्टिकोनातून स्वीकारला. त्यांनी असेही म्हटले की, शासन बदल घडवून आणणे किंवा इराणची लष्करी क्षमता संपवणे यांसारख्या आपल्या उद्दिष्टांत अमेरिका यशस्वी ठरली नाही.
Fan Black Magic : हैदराबादच्या एका चाहत्याने चक्क 'काळी जादू' केल्याचा दावा सध्या इंटरनेटवर केला जात आहे.
Gas cylinder shortage : पिझ्झा सेंटरमध्ये अवैध एलपीजीचा वापर; चेंबूर, देवनार येथे दोन गुन्हे नोंद
डॉमिनोज पिझ्झा सेंटरमध्ये अवैधरित्या एलपीजीचा वापर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबई : चंदेरी दुनियेत ब्रेक मिळायला अनेक ऑडिशन्स द्याव्या लागतात. पण हा असा पहिला कलाकार आहे ज्याला ऑडिशन्स न देता थेट सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासोबत चित्रपटात काम करण्याची लॉटरी लागली आहे ते पण हिरो म्हणून. कोण आहे हा हिरो? या हिरोच नाव आहे कापूसकोंडा. हा एक गोंडस भुभु - कुत्रा आहे. आणि हेच या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे. आज अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर कापूसकोंडा’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. नवरा माझा नवसाचा या गाजलेल्या चित्रपटात अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले दिसले होते. आता तब्बल २२ वर्षांनंतर कापूसकोंडा या आगामी चित्रपटातून पुन्हा एकदा एकत्र आले असून, बऱ्याच काळानंतर या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री मधुराणी गोखले चित्रपटात कमबॅक करत आहे.https://prahaar.in/2026/04/19/ayan-ahmed-and-uzer-there-was-a-financial-dispute-between-ayan-ahmed-and-uzer/जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा. लि. निर्मित कापूसकोंडा चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांचं आहे. सचिन मोहिते, गणेश पंडित, ऋषिकेश तुरई यांनी चित्रपटाची पटकथा, संवादलेखन केलं आहे. सचिन पाटेकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे सुमधुर संगीत या चित्रपटाला लाभले असून चित्रपटाच्या गाण्यांना गायक अवधूत गुप्ते, पद्मनाभ गायकवाड यांचा स्वरसाज लाभला आहे. सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर व अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासह नवीन पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण कथानकाची गरज समजून लातूर जिल्ह्यातील अंधोरी या गावी करण्यात आले आहे.कापूसकोंडा चित्रपटाची कथा अत्यंत अनोखी आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर प्रेरित आहे. चित्रपटाचा खरा हिरो हा पोस्टरवर दिसत असलेला एक ‘कुत्रा’ असून चित्रपटाचे रंजक कथानक हे एका फॅमिली आणि त्या कुत्र्याच्या भोवती गुंफण्यात आले आहे. मानवी नाते संबंध, कुटुंब, भाव-भावनांवर आधारित ही हळवी गोष्ट प्रत्येकाला आपलीशी वाटणारी आहे. म्हणूनच या चित्रपटाला ए फॅमिली डॉग फिल्म अशी टॅग लाईन देण्यात आली आहे. लेखक, दिग्दर्शक सचिन मोहिते या पुढे मराठीत पहिल्यांदाच एक ‘डॉगव्हर्स करण्यास उत्सुक आहेत, कामही सुरु आहे.https://prahaar.in/2026/04/19/nashik-dwarka-chowk-this-intersection-in-nashik-will-remain-closed-for-three-months-plan-your-travel-accordingly/या चित्रपटाचं कथानक हे अतिशय वेगळे आहे. इतक्या वर्षांच्या माझ्या कारकिर्दीत असे कथानक मी कधी केले नाही. माझ्या भावनानसोबत या चित्रपटाचे कथानक मिळते जुळते असल्याचे मला जाणवले. त्याचप्रमाणे या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक सचिन मोहिते हा मला पहिल्या भेटीतच कमालीचा हुशार वाटला आणि त्याच्यावर विश्वास ठेऊन मी या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला असे सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी सांगितले.चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक सचिन मोहिते सरांनी चित्रपटाची कथा जेव्हा मला ऐकवली तेव्हाच मी या कथेच्या प्रेमात पडली. इतकी गोड, निरागस अशी ही कथा ऐकताना माझ्या मनाला भिडली सोबत वेगळी भूमिका करण्याची संधी मला मिळाली यासाठी मी या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. कथानक खुपच वेगळ्या धाटणीचं असुनही अगदी सहजपणे मांडलं आहे. सोबत सचिन पिळगांवकर सरांसोबत काम करण्याची मला संधी २२ वर्षांनी मिळणार होती.सचिन सरांसोबत काम करताना अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या असे अभिनेत्री मधुराणी गोखले यांनी सांगितले.उत्तम कथानकाला तितक्याच सक्षम अभिनयाची जोड असल्यानं हा चित्रपट मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे परंतु त्यासाठी अजून प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार असून लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे, तेव्हा भेटूया कापूसकोंड्याला लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.
women’s reservation bill : ही लोकशाही आहे, हिटलरशाही नाही.! उपमुख्यमंत्री शिवकुमार यांची जोरदार टीका
ही लोकशाही आहे; ही काही हिटलरशाही नाही. निवडणुका सुरू असताना मध्येच हे विधेयक आणून, संपूर्ण मतदारसंघांची रचना बदलण्याचा प्रयत्न त्यांना करता येणार नाही.
Kamgar Hospital : अंधेरीतील 'कामगार रुग्णालय'पूर्ण क्षमतेने सुरू करा
- घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे तसेच रुग्णालय लवकरच सुरु करण्याचे केंद्रीय मंत्री यांचे आश्वासनमुंबई : अंधेरी (पूर्व) येथील ईएसआयसी (ESIC) कामगार रुग्णालय गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. या रुग्णालयाचे गेल्या अनेक वर्षापासून कोट्यावधी रुपये खर्च करूनही अद्याप अपूर्ण अवस्थेत असलेल्या नूतनीकरणाचे काम तातडीने पूर्ण करून ते पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी आग्रही मागणी मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवियांची भेट घेऊन पत्राद्वारे केली आहे. केंद्रीय मंत्री यांनी देखील याची गंभीर दाखल घेऊन या संपूर्ण कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे तसेच रुग्णालयाचे अपूर्ण असलेले काम लवकरच पूर्ण करून ते पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे आश्वासन दिले.https://prahaar.in/2026/04/19/ashok-kharat-case-sit-investigation-increases-bhondubaba-kharats-problems-police-custody-extended-again/खासदार वायकर यांनी ९ एप्रिल २०२६ रोजी या रुग्णालयाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी १९८५ मध्ये राज्य सरकारने सुरू केलेले हे रुग्णालय २००८ मध्ये केंद्राच्या अखत्यारीत आले. मात्र, गेल्या १५ वर्षांपासून याचे नूतनीकरण प्रलंबित आहे. ८ वेळा निविदा प्रक्रिया बदलूनही काम पूर्ण झालेले नाही. विलंबामुळे या प्रकल्पाचा खर्च आता मूळ २५४ कोटी रुपयांवर टेंडर पेक्षा जास्त वाढत गेल्याची माहिती, रुग्णालय प्रशासन यांनी खासदार यांना दिली. नियमानुसार केवळ २ मजल्यांची परवानगी असताना तिथे ८ मजल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. या तांत्रिक त्रुटीमुळे रुग्णालयाला अद्याप ताबा प्रमाणपत्र' (OC) मिळालेले नाही, असे हि चर्चे दरम्यान खासदारांच्या निदर्शनास आले. १८ डिसेंबर २०१८ रोजी या रुग्णालयात लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू झाला होता. इतकी मोठी दुर्घटना होऊनही प्रशासनाने सुरक्षेच्या बाबतीत आणि नूतनीकरणात कमालीची उदासीनता दाखवली असल्याने हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी लवकरच केंद्रीय कामगार मंत्री यांची भेट घेण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले होते. त्यानुसार खासदार वायकर यांनी शुक्रवारी केंद्रीय कामगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची दिल्ली येथे लोकसभेत भेट घेत याप्रश्नी निवेदन दिले.खासदारांनी केलेल्या प्रमुख मागण्या :१. रुग्णालयातील 'अंत:रुग्ण सेवा' (IPD) युद्धपातळीवर सुरू करावी.२. ९०% काम पूर्ण झालेला ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स तातडीने कार्यान्वित करावा.३. मुख्य इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर प्रशासकीय कार्यालयांऐवजी स्त्री-पुरुष रुग्ण कक्ष (Wards) सुरू करावेत.४. किमान एक आपत्कालीन ऑपरेशन थिएटर आणि ५ आयसीयू बेड्स त्वरित सुरू करावेत.५. जुन्या कर्मचारी वसाहतीची दुरुस्ती करून नवीन कर्मचाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था करावी.https://prahaar.in/2026/04/19/ayan-ahmed-and-uzer-there-was-a-financial-dispute-between-ayan-ahmed-and-uzer/अशा मागण्याचा हि या निवेदनात समावेश करण्यात आला आहे. करोडो रुपये खर्च होऊनही केवळ नियोजनाच्या अभावामुळे कामगारांना उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे. याप्रकरणी तातडीने बैठक बोलावून दोषींवर कारवाई करावी आणि रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी मागणी खासदार रवींद्र वायकर यांनी केली. त्यानुसार हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने लवकरच सुरु करण्याचे तसेच नुतनीकरणाच्या कामात झालेल्या दिरंगाई तसेचघोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन हि केंदीय मंत्री खासदार यांना दिले.
Nashik Dwarka Chawk : नाशिकमधील हे चौक ३ महिने राहणार बंद; प्रवासाचे वेळेत करा नियोजन
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात आणि TCS कंपनी नंतर नाशिक आणखी एक कारणाने चर्चेत आहे ते म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा या कुंभमेळ्यासाठी गोदावरीच्या काठावर १२ नवीन घाट, ४०० एकर जागा आरक्षित करणे आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे आजपासून पुढील तीन महिने शहरातील द्वारका सर्कल बंद राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.https://prahaar.in/2026/04/19/ashok-kharat-case-sit-investigation-increases-bhondubaba-kharats-problems-police-custody-extended-again/द्वारका चौक ३ महिने बंदनाशिकमध्ये लवकरच सिंहस्थ कुंभमेळा सुरु होणार आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांनी वेग धरला आहे. कुंभमेळा सुरु होण्याच्या आधी सगळी कामे पूर्ण व्हावीत असा हेतू आहे. त्यामुळे नाशिकचे प्रवेशद्वार समजला जाणारा 'द्वारका सर्कल' आजपासून पुढील तीन महिन्यांसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. १८ जुलै पर्यंत हा परिसर निर्बंधाखाली राहणार असून, यामुळे नाशिकरांसह महामार्गावरील प्रवाशांची अडचणीत वाढ होणार आहे.https://prahaar.in/2026/04/19/ayan-ahmed-and-uzer-there-was-a-financial-dispute-between-ayan-ahmed-and-uzer/द्वारका सर्कल वरील कायमस्वरूपी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अंडरपासचे काम संथगतीने सुरु होते. मात्र कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनसमोर असल्याने आता या कामाला युद्धपातळीवर गती दिली जात आहे.दरम्यान मुंबई - आग्रा महामार्ग आणि पुणे महामार्गावरून येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असून नागरिकांनी त्याचा वापर करावा असे प्रशासनसह आवाहन करण्यात आले आहे.
Ajit Agarkar Contract : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्याबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Yamaha Fascino : भारतात लॉन्च झाली नवी २०२६ यामाहा फॅसिनो १२५
मुंबई : दुचाकी वाहन निर्माता कंपनी यामाहा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने आपल्या लोकप्रिय स्कूटर यामाहा फॅसिनो १२५ ला २०२६ साठी अपडेट करत बाजारात सादर केले आहे. या नव्या मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ७५,६०० रुपये ठेवण्यात आली असून, विविध व्हेरिएंटनुसार किंमत ९५,२०० रुपयांपर्यंत जाते. यापूर्वी ऑगस्ट २०२५ मध्ये या स्कूटरमध्ये बदल करण्यात आले होते, मात्र यावेळचा अपडेट मुख्यतः कॉस्मेटिक स्वरूपाचा आहे.नवीन २०२६ फॅसिनो १२५ स्कूटर कंपनीने ड्रम, डिस्क आणि एस अशा तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध करून दिला आहे. या अपडेटनंतर सर्व व्हेरिएंट्सच्या किंमतीत साधारण ९०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ड्रम व्हेरिएंटची किंमत ७५,६०० रुपये, डिस्क व्हेरिएंटची किंमत ८८,००० रुपये, तर एस व्हेरिएंटची किंमत ९५,२०० रुपये ठेवण्यात आली आहे.https://prahaar.in/2026/04/18/ultra-electric-scooter-simple-energy-launches-the-ultra-electric-scooter/या अपडेटमधील सर्वात मोठा बदल स्कूटरच्या मागील भागात म्हणजेच टेल सेक्शनमध्ये करण्यात आला आहे. आता टेल लॅम्प आणि टर्न इंडिकेटर्स स्वतंत्र युनिटमध्ये देण्यात आले असून, यापूर्वी ते इंटिग्रेटेड हाऊसिंगमध्ये होते. या बदलामुळे स्कूटरची एकूण लांबी कमी झाली असून, नवीन मॉडेलची लांबी १,७८० मिमी इतकी झाली आहे, जी आधी १,९२० मिमी होती. मात्र, एकूण डिझाइनमध्ये मोठा बदल करण्यात आलेला नाही.फीचर्सच्या बाबतीत पाहता, या स्कूटरमध्ये आधीप्रमाणेच कलर टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे, जो टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनला सपोर्ट करतो. याशिवाय टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ, सीटखाली २१ लिटर स्टोरेज आणि स्मार्ट मोटर जनरेटर (एसएमजी)सह हायब्रिड सेटअप यांसारखी फीचर्स कायम ठेवण्यात आली आहेत. तसेच सायलेंट स्टार्ट, स्टॉप अँड स्टार्ट सिस्टम आणि आन्सर बॅक फंक्शनसारख्या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत.https://prahaar.in/2026/04/18/salberdi-movie-manorama-ulgadnar-salberdibottom-mystery/इंजिनच्या बाबतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या स्कूटरमध्ये १२५ सीसीचे एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे ८ बीएचपी पॉवर आणि १०.३ एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन सीव्हीटी गिअरबॉक्सशी जोडलेले असून, एसएमजी हायब्रिड सिस्टममुळे सुरुवातीच्या एक्सेलरेशनवेळी हलका इलेक्ट्रिक असिस्ट मिळतो. एकूणच, २०२६ यामाहा फॅसिनो १२५ मध्ये डिझाइनमध्ये छोटे बदल करत कंपनीने त्याला अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
El Nino : अल निनोच्या पार्श्वभूमीवर यंदाचा खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा
मुंबई :“खरीप हंगाम २०२६ शेतकऱ्यांसाठी यशस्वी आणि उत्पादनक्षम ठरावा, तसेच सन २०२६-२७ मध्ये सुमारे १४५.२० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, भात, मका, तूर, उडीद, कापूस व ऊस या प्रमुख पिकांच्या पेरणीचा लक्षांक निश्चित करण्यात आला असून त्यादृष्टीने कृषी विभागाने पूर्वतयारी सुरू केली आहे. खते व बियाण्यांच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात येत आहे. यंदा एल निनोच्या पार्श्वभूमीवर हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्याचा शेती क्षेत्रावर होणारा संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीक पद्धती यावर चर्चा करण्यासाठी खरीप हंगाम २०२६ च्या नियोजनासाठी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे,” अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.कार्यशाळा सोमवारी सकाळी साडेदहा वाजता शिवाजीनगर, बालचित्रवाणी शेजारील नव्याने बांधण्यात आलेल्या सारथीच्या सभागृहात सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे,फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांच्यासह नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक, स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक, कृषी विभागाचे सर्व उपसचिव, सर्व कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक, हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्थेचे संचालक, सर्व कृषी संचालक, सर्व विभागीय कृषी संचालक, सर्व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, आत्माचे सर्व प्रकल्प संचालक, सर्व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, सोलापुर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी आयुक्तालयातील सर्व सह संचालक, कृषी उप संचालक, काही शेतकरी उपस्थित राहणार आहेत.कृषी विभागाने तयारीला सुरुवात केली असून या अनुषंगाने राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत खरीप हंगामासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावेत, यासाठी आवश्यक नियोजनाबाबत चर्चा होणार आहे. तसेच जिल्हानिहाय खते व बियाण्यांचा साठा, वितरण व्यवस्था आणि संभाव्य मागणी याचाही आढावा घेतला जाणार आहे. यंदा एल निनोच्या पार्श्वभूमीवर हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्याचा शेती क्षेत्रावर होणारा संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीक नियोजनाबाबतही कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.बियाण्यांची गरज २०.१७ लाख क्विंटल असून २८.०५ लाख क्विंटल (१३९%) बियाणे उपलब्ध आहे. खरीप हंगाम २०२६ करिता राज्यास ४८.८० लाख मे.टन खतांचे आवंटन मंजूर असून आतापर्यंत २५.१७ लाख मे.टन खते उपलब्ध आहेत.भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा देशातील पर्जन्यमान हे दीर्घकालीन सरासरीच्या ९२% इतके राहण्याची शक्यता असून ‘एल निनो’ स्थितीमुळे पावसात अनियमितता व दुष्काळ परिस्थिती उद्भवू शकते. या पार्श्वभूमीवर राज्यात हवामान प्रतिरोधक बियाण्यांचा वापर, उताराला आडवी पेरणी, बीबीएफ तंत्राचा अवलंब, शेततळ्यांची निर्मिती, मल्चिंग व सेंद्रिय खतांचा वापर तसेच पाणी बचत करणाऱ्या सिंचन पद्धतींवर विशेष भर दिला जाणार आहे. याकरिता महाकृषि अॅपच्या माध्यमातून हवामानास अनुकूल कृषि तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके कृषि विभागामार्फत घेणे सुरु आहे. तसेच महाविस्तार अॅप, कृषि विभागाचे यु ट्यूब, फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम, व्हाट्सअॅप चॅनेल या सोशल मिडियाच्या माध्यमातूनही हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे सुरू आहे.खरीप हंगामपूर्व तयारी करिता क्षेत्रीय पातळीवरील अधिकारी/कर्मचारी यांच्या विभागस्तरीय व उपविभागस्तरीय कार्यशाळा राज्यात सुरू आहे. विभागीय व उपविभागीय कार्यशाळांद्वारे कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ, केव्हीके शास्त्रज्ञ व प्रगतशील शेतकऱ्यांच्या सहभागातून Hands on Training दिली जात आहे. या सर्व उपाययोजनांच्या माध्यमातून कृषि विभाग खरीप हंगाम २०२६ मध्ये हवामानातील अनिश्चिततेशी सामना करण्यास शेतक-यांमध्ये जागरुकता निर्माण करीत आहे.
Ashok Kharat Case : SIT च्या तपासामुळे भोंदूबाबा खरातच्या अडचणीत वाढ! पोलीस कोठडीत झाली पुन्हा वाढ
नाशिकमधील भोंदूबाबा Ashok Kharat अशोक खरात याच्याविरोधात एकामागून एक गुन्हे दाखल होत असून, प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महिला अत्याचार, फसवणूक, अमली पदार्थांचा वापर आणि धार्मिक भावना दुखावण्यासारखे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत.अशातच आता नाशिकमधील भोंदूबाबा Ashok Kharat याच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाने (SIT) ताबा घेतल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी अशोक खरातला २३ एप्रिलपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.https://prahaar.in/2026/04/19/this-years-kharif-season-is-extremely-crucial-due-to-el-nino/विशेष म्हणजे ही सुनावणी ऑनलाईन माध्यमातून झाली. यावेळी सरकारी वकिलाकडून खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. पुढे सरकारी वकिलाने आपली बाजू मांडताना सांगितले की, खरातची गुन्हा करण्याची पद्धत जरी एकसारखी असली तरीही पीडित महिला प्रत्येकवेळी वेगवेगळी होती. मात्र महिलांना गुंगीचे पदार्थ देऊन आणि फसवणूक करून अत्याचार करण्यात आले असल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील द्रव्यांचा वापर आणि संपूर्ण कटाचा तपास करण्यासाठी कोठडी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.https://prahaar.in/2026/04/19/dagdusheth-temple-grand-offering-of-11000-mangoes-to-shrimant-dagdusheth-halwai-ganpati/महिनाभरातील घटनाक्रम :या प्रकरणात गेल्या महिनाभरात अनेक घडामोडी घडल्या असून त्या खालील प्रमाणे आहेत.१७ मार्च - रात्री उशिरा अशोक खरातला अटक१८ मार्च - न्यायालयात हजर, ७ दिवसांची पोलीस कोठडी२० मार्च - प्रकरण SIT कडे वर्ग२२ मार्च - तीन महिलांच्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल२५ मार्च - अमली पदार्थांचा वापर आणि धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप वाढले२६ मार्च - ५ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा नोंद३० मार्च - तिसऱ्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडी८ एप्रिल - आठ महिलांच्या तक्रारी, महत्त्वाचे पुरावे हाती१३ एप्रिल - नाशिक, पुणे, शिर्डी येथे ED चे छापे१५ एप्रिल - चौथ्या गुन्ह्यात पोलीस कोठडी१८ एप्रिल - न्यायालयीन कोठडी१९ एप्रिल - पाचव्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडीसध्या अशोक खरात पोलीस कोठडीत असून, २३ एप्रिल रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Ayush Mhatre : चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का; आयुष म्हात्रेला हॅमस्ट्रिंगची गंभीर दुखापत
हैदराबाद : चेन्नई सुपर किंग्सचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांनी युवा फलंदाज आयुष म्हात्रेच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले केली की, आयुषची हॅमस्ट्रिंगची दुखापत गंभीर असल्याचे दिसते.शनिवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चेन्नईच्या सामन्यादरम्यान आयुषला धावताना त्रास झालेला दिसला. उत्कृष्ट फलंदाजी करताना, म्हात्रेने १२ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या होत्या, पण दोन धावांसाठी धावताना तो थांबला आणि त्याला वेदना होत असल्याचे दिसत होते. त्याला मैदानावरच तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज होती.https://prahaar.in/2026/04/19/ipl-2026-hyderabad-defeats-chennai-by-10-runs/मैदानावर उपचार मिळाल्यानंतर, म्हात्रेने खेळणे सुरू ठेवले आणि जवळजवळ लंगडत एक धावही घेतली. त्यानंतर त्याने पुढच्याच चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जोरदार फटका मारला, जिथे हेनरिक क्लासेनने एक उत्कृष्ट झेल घेतला.पराभवानंतर, सीएसकेचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, आयुषची दुखापत किती गंभीर आहे हे मला माहीत नाही. आम्ही त्याला उद्या किंवा परवा स्कॅनसाठी घेऊन जाऊ. ते पुढे म्हणाले, मला पूर्ण खात्री नाही, पण हो, दुर्दैवाने, दुखापत खूप गंभीर दिसत आहे आणि त्याची अनुपस्थिती आमच्यासाठी खूप मोठे नुकसान असेल, कारण तो आमच्यासाठी खूप चांगल्या फॉर्ममध्ये होता.https://prahaar.in/2026/04/19/ajit-agarkar-will-chief-selector-ajit-agarkar-receive-an-extension-until-june-2027/हसी म्हणाला, तो एक उत्कृष्ट तरुण प्रतिभावान क्रिकेटपटू आहे, पण यामुळे दुसऱ्या क्रिकेटपटूला संधी मिळेल. ही गोष्टच मुळात उत्साहवर्धक आहे. आमच्याकडे काही खूप चांगले क्रिकेटपटू आहेत ज्यांना अजून संधी मिळालेली नाही. आता, त्यांच्यापैकी एकासाठी ही एक उत्तम संधी असेल.फलंदाजी प्रशिक्षक पुढे म्हणाले, आयुषला गमावल्याबद्दल आम्ही खूप निराश आहोत. तो किती काळ संघाबाहेर राहील हे मला माहीत नाही, पण एका नवीन क्रिकेटपटूला ही संधी मिळणे तितकेच उत्साहवर्धक आहे.हैदराबाद येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सचा १० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने ९ गडी गमावून १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, चेन्नई सुपर किंग्स ८ गडी गमावून केवळ १८४ धावाच करू शकली. चेन्नई सुपर किंग्सचा पुढील सामना २३ एप्रिल रोजी मुंबईत मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.
Ayan Ahmed and Uzer : अयान अहमद व उजेरमध्ये होता पैशाचा वाद
अमरावती : परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरू झाल्यानंतर आता तपासात नवनवीन तथ्ये पुढे येत आहेत. कटातील मुख्य सूत्रधार अयान अहमद व उजेर खान इक्बाल खान या दोघांमध्ये पैशाचा वाद सुरू होता. त्यातून उजेरने अयानच्या मोबाईलमधील डेटा स्वत:कडे घेतला, अशी कबुली सूत्रधार अयानने एसआयटीच्या तपास पथकापुढे दिली. लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ व फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत:हून परतवाडा ठाण्यात पोक्सो, सार्वजनिक बदनामी केल्याप्रकरणी अयान व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास ४२ सदस्यीय एसआयटीकडे वर्ग करण्यात आला. सुरवातीला पाच दिवस कोणतिही पीडित पोलिसांकडे जबाब नोंदविणे किंवा तक्रार देण्याकरिता आलेली नव्हती. अखेर नजीकच्याच जिल्ह्यातील एक अल्पवयीन पीडित पोलिसांपर्यंत पोहोचली. पीडित ही अल्पवयीन असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तिच्या जबाबातून जी फॅक्ट पुढे येईल, त्यानुसार पुढील कारवाई केल्या जाईल, असेही त्यांनी सांगितले. अयानचे पैसे उजेरने घेतले होते. त्यानंतर उजेरनेच अयानच्या मोबाईलमधील डेटा स्वत:कडे घेऊन तो इतरांना फॉरवर्ड केला. त्या साखळीत सहा जण केवळ फॉरवर्ड करणारे निघाले. त्या टोळीचा दुसरा उद्देश अद्याप सर्वांची प्राथमिक चौकशी केली असता पुढे आलेला नाही, असेही विशाल आनंद यांनी स्पष्ट केले.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता प्रत्येक मुद्दा बारकाईने तपासल्या जात आहे. चौकशीच्या अधीन राहून ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्पुरते निलंबित केले, ते चौकशी अहवालात दोषी आढळले नाही तर त्यांचे निलंबन मागे घेतल्या जाईल.फ्लॅट मालक व अयानच्या पालकांची चौकशीयाप्रकरणात ज्या अल्पवयीन पीडित मुलींसोबत अयान अहमद याने अमरावतीच्या फ्लॅटवर शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे व्हिडिओ तयार केले, त्या फ्लॅट मालकाला वेळ पडेल तेव्हा चौकशीसाठी बोलविल्या जात आहे. शिवाय संशयित अयान याच्या पालकांची देखील पोलिसांकडून टप्प्याटप्याने चौकशी सुरू असल्याचे एसपी यांनी सांगितले.९० टक्के मुली सोशल मीडिया फ्रेंडअयान अहमद हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होता. अनेकांना रील तयार करून देणे व मोबाईल विक्रीतून तो पैसे कमवित होता. अयानच्या संपर्कात आतापर्यंत जेवढ्या मुली आल्या त्यापैकी ९० टक्के मुलींची त्याच्यासोबत सोशल मीडियावरून ओळख झाली होती, अशी कबुली अयानने बयानात दिली.सोशल मीडिया फॉलोअर्स वाढलेअयान काही वर्षांपासून सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होता. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत जवळपास सतरा ते साडेसतरा हजार फॉलोअर्स होते. आता गुन्हा दाखल होऊन एसआयटी चौकशी सुरू झाल्यावर अयान अहमदचे फॉलोअर्ससुद्धा वाढल्याचे दिसून येते.
BJP Leader Death : भाजपचे माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार बलबीर पुंज यांचे १८ एप्रिल २०२६ रोजी निधन झाले.
Women’s Reservation Bill : पंतप्रधानांचे राष्ट्रसंबोधन वादात.! कम्युनिस्ट खासदारांची आयोगाकडे तक्रार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार पी. संतोष कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पत्र लिहून आरोप केला आहे.
Dagdudsheth Mandir : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य
पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला रविवारी ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे गणपती मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गणरायाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. आंब्यांचे प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवालेचे संचालक मंदार देसाई कुटुंबियांच्यावतीने हा नैवेद्य देण्यात आला.मंदिरात रविवारी पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक झाला. त्यानंतर प्रसिद्ध गायिका मंजूषा पाटील यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. सकाळी आठ वाजता गणेशयाग झाला. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना तसेच वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व मंदिरात भाविकांना देण्यात येणार आहे.
Israel vs Arab Country : इस्त्रायल मोठ्या संकटात; १६ मुसलमान देशांची एकजूट
इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्त्रायलला मोठा राजनैतिक धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. अनेक देशांनी इस्त्रायलच्या भूमिकेविरोधात उघडपणे भूमिका घेतली असून तब्बल १६ देश एकत्र येत कडवा विरोध नोंदवला आहे. शनिवार १८ एप्रिल २०२६ रोजी दोहा येथे इस्लामिक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्त निवेदन जारी करत इस्त्रायलच्या निर्णयांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.इस्रायलच्या विरोधात १६ अरब देश :इस्रायलच्या विरोधात १६ अरब देशांनी एक संयुक्त निवेदन काढून इस्रायलने सोमालीलँडला सार्वभौम राष्ट्र म्हणून दिलेल्या मान्यतेचा निषेध केला आहे. ही राजनैतिक कारवाई एप्रिल २०२६ मध्ये झाली असून, या देशांनी इस्रायलच्या या कृतीला सोमालियाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन म्हटले आहे.https://prahaar.in/2026/04/19/lenskart-clarifies-on-tikli-and-tila-controversy-its-an-old-training-file-not-an-official-policy/या १६ मुसलमान देशांची एकजूट :अल्जेरिया , कोमोरोस , जिबूती , इजिप्त , जॉर्डन , कुवेत , लेबनॉन , लिबिया , मॉरिटानिया , ओमान , पॅलेस्टाईन , कतार , सौदी अरेबिया , सोमालिया , सुदान आणि येमेन.सोमालियामध्ये इस्त्रायलच्या राजदूत नियुक्तीला अवैध ठरवत, ही एकतर्फी कारवाई असल्याचे मुस्लिम देशांनी म्हटले. आंतरराष्ट्रीय समुदायाने सोमालियाच्या सार्वभौमत्वाचा आदर करावा, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक तणाव वाढला असून या पार्श्वभूमीवर इस्त्रायलची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
Navneet Rana : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला माजी खासदार नवनीत राणांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
Supreme Court : कलम १४२ अंतर्गत असलेल्या आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून न्यायालयाने हा आदेश जारी केला आहे.
Mamata Banerjee : “महिलांना आरक्षण न मिळणे दुर्दैवी..”; ममता बॅनर्जी यांचा पंतप्रधानांवर आरोप
पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित करताना काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांवर गर्भहत्येचे पाप केल्याचा आरोप केला होता.
BMC News : बांधकामांमधील पाणी गटारात, सुकलेल्या चिखलाने भरले गटार
- विकासकांच्या बांधकामांचा भुर्दंड महापालिकेलामुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या नालेसफाईच्या अनुषंगाने रस्त्यालगतच्या नाल्यांमधील गाळ काढण्यात येत असून या रस्त्यालगतच्या नाल्यांमधून गाळ,कचरा ऐवजी चक्क चिखल माती मिश्रीत गाळाचे प्रमाण अधिक आहे. रस्त्यालगतच्या सर्व पर्जन्य जलवाहिनी या बांधकामांमधील चिखलाने भरुन गेल्या असून हा सुकलेला गाळच सध्या काढण्यात येत आहे. त्यामुळे बांधकामांमधील चिखलमाती मिश्रित पाणी गटारांमध्ये सोडले जात असल्याने त्यातील चिखल सुकून ही गटारे मातीने व्यापून गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बांधकामांमधील चिखलमिश्रित मातीचे पाणी सोडण्यात आले नसते तर या पर्जन्य जलवाहिन्यांमधील गाळ काढण्याचीही गरज नव्हती. त्यामुळे बांधकांमामधील चिखलमिश्रित पाण्याचा महापालिकेला भुर्दंड अधिक दिसून येत आहे.मुंबई महापालिकेच्यावतीने छोट्या आणि मोठया नाल्यांसह रस्त्यांलगतच्या पेटीका नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. रस्त्यांलगतच्या पेटीका नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी विभाग स्तरावर कंत्राटदार किंवा संस्थांची नेमणूक करून त्यांच्या माध्यमातून गाळाची सफाई केली जात आहे. त्यानुसार सध्या रस्त्यांलगतच्या पेटीका नाल्यांमधील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, अनेक ठिकाणी वाहून येणारा गाळ काढल्यानंतर ४८ तास सुकल्यानंतर त्या गाळाची विल्हेवाट नेमून दिलेल्या डम्पिंग ग्राऊंडवर लावली जाते.https://prahaar.in/2026/04/19/lenskart-clarifies-on-tikli-and-tila-controversy-its-an-old-training-file-not-an-official-policy/मात्र, या गाळांमध्ये यंदा चिखलमिश्रित मातीचे प्रमाण अधिक दिसून आले असून सुकलेल्या चिकट मातीचे कालेच गाळ म्हणून काढले जात आहेत. गाळ काढणाऱ्या मजूरांच्या म्हणण्यानुसार हा नाल्यातील निव्वळ गाळ नसून बांधकामांचे चिखल माती मिश्रित पाणी सोडले जाते,त्यामुळे नाले गाळाने पूर्ण भरलेले आहेत. आणि ते चिकट मातीनेच भरुन गेलेले आहेत. एकेका पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये पाऊण ते एक फुटापर्यंत या चिकट मातीचे थर जमा झालेले आहेत. त्यामुळे सध्या या मातीचे काले बाहेर काढण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे.मुंबईत अनेक विकासक बांधकामांच्या खोदकामांमधील पाणी हे महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सोडतात आणि ते चिखल मिश्रित पाणी या पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सोडल्याने ही वाहिनी कोरडी झाल्यानंतर हा चिखल सुकून जातो. परिणामी पर्जन्य जलवाहिन्या या चिखल मिश्रित मातीनेच अधिक भरलेल्या आहेत. त्यामुळे विकासक कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बांधकामांमधील पाणी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सोडतात आणि त्यातील चिखलामुळे आपल्या पर्जन्य जलवाहिन्यांत ती माती जमा होवून ती माती बाहेर काढण्यासाठी महापालिकेला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात.ऊस तोड कामगार उपसतात गाळ :सध्या पेटीका नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी सध्या ऊस तोड कामगारांची मदत घेतली जात आहे. लातुर जिल्ह्यातील अनेक गावांमधील ऊस तोड कामगार मोठ्याप्रमाणात मुंबईत दाखल होऊन ते पेटीका नाल्यांमधील गाळ काढत आहेत. या कामगारांना जोडी ८०० रुपये एवढे मानधन दिले जात असल्याची माहिती कामगारांकडून प्राप्त झाली आहे.
Iran-US Peace Talks : इराण-अमेरिका शांतता चर्चेत प्रगती, पण अंतिम करार अजून दूर- मोहम्मद गालिबाफ
तेहरान : इराण आणि अमेरिका यांच्यात दुसऱ्या टप्प्यातील शांतता चर्चेची लवकरच शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, इराणने सांगितले की अमेरिकेसोबतच्या शांतता चर्चेत काही प्रगती झाली आहे, मात्र अंतिम करार अद्याप खूप दूर आहे. कारण दोन आठवड्यांचा युद्धविराम बुधवारी संपणार आहे.इराणी संसदेचे सभापती मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी शनिवारी दूरदर्शनवरील संबोधनात सांगितले की, अजूनही अनेक उणिवा आहेत आणि काही मूलभूत मुद्दे प्रलंबित आहेत. गालिबाफ म्हणाले, “आपण अजूनही अंतिम चर्चेपासून खूप दूर आहोत.” गत शनिवारी पाकिस्तानमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातील चर्चेत इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्वही गालिबाफ यांनीच केले होते. त्यांनी असेही सांगितले की, अनेक आठवडे चाललेल्या युद्धात इराण रणांगणावर विजयी राहिला आणि वॉशिंग्टनसोबत केवळ आपल्या मागण्या मान्य झाल्यामुळेच तात्पुरत्या युद्धविरामास सहमती दिली.https://prahaar.in/2026/04/14/iran-us-israel-war-us-destroy-158-iranian-naval-ships-donald-trumps-big-claim/अमेरिकेचा उल्लेख करताना ते म्हणाले की, “आम्ही युद्धविराम स्वीकारला, कारण त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या होत्या.” गालिबाफ यांनी दावा केला की अमेरिका आपले उद्दिष्ट साध्य करू शकली नाही आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण कायम आहे.ते पुढे म्हणाले की, शत्रूचा प्रत्येक प्रयत्न आमच्यावर त्याच्या मागण्या लादण्याचा होता. त्यामुळे आपल्या हक्कांची नोंद करून देणे आवश्यक आहे आणि म्हणूनच येथे चर्चा हा संघर्षाचाच एक मार्ग आहे. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, इराणमध्ये सत्तांतर घडवून आणणे आणि त्याची लष्करी क्षमता संपवणे हे ट्रम्प यांचे उद्दिष्ट पूर्णपणे अपयशी ठरले. गालिबाफ यांनी असेही म्हटले की, “इराण हा व्हेनेझुएला नाही,” म्हणजेच बाहेरील दबावामुळे येथे सरकार बदलता येणार नाही.इराणी संसदेच्या अध्यक्षांनी मान्य केले की लष्करी ताकदीच्या बाबतीत अमेरिका इराणपेक्षा अधिक बलवान आहे. मात्र त्यांनी ठामपणे सांगितले की, केवळ शस्त्रे, पैसा आणि संसाधने यावर विजय ठरत नाही. त्यांच्या मते, इराणने ‘असिमेट्रिक वॉरफेअर’ म्हणजेच वेगळी रणनीती अवलंबून शक्तिशाली शत्रूला मागे हटवले. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेबाबत त्यांनी सांगितले की, काही मुद्द्यांवर सहमती झाली आहे, पण अजूनही अनेक मोठे मतभेद कायम आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, इराण आपल्या राष्ट्रीय हितांशी कोणतीही तडजोड करणार नाही आणि कूटनीतीत झुकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.https://prahaar.in/2026/04/10/big-shock-to-iran-former-foreign-minister-kamal-kharrazi-passes-away-he-died-after-us-airstrikes/मोहम्मद गालिबाफ यांनी असा आरोपही केला की, अमेरिका ‘अमेरिका फर्स्ट’ची भाषा करते, पण प्रत्यक्षात ती इस्रायलच्या हितांना प्राधान्य देते आणि त्याच आधारावर निर्णय घेते. तथापि, प्रत्यक्ष परिस्थिती अजूनही तणावपूर्णच आहे. अलीकडील घडामोडींमध्ये होर्मुज सामुद्रधुनीबाबत वारंवार भूमिका बदलताना दिसत आहे. कधी ती खुली करण्याची घोषणा केली जाते, तर कधी पुन्हा बंद करण्याची चर्चा समोर येत आहे.गालिबाफ आणि त्यांच्या शिष्टमंडळाने ११ एप्रिल रोजी इस्लामाबाद येथे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली होती. १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर इराण आणि अमेरिका यांच्यात झालेला हा आतापर्यंतचा सर्वात उच्चस्तरीय संपर्क मानला जात आहे. मात्र, या चर्चेत कोणताही अंतिम करार होऊ शकला नाही. इराणचे उपपरराष्ट्र मंत्री सईद खतीबजादेह यांनी सांगितले की, अमेरिकेसोबतच्या पुढील चर्चेच्या फेरीसाठी अद्याप कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.
Darshan Kumar : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर आठवड्याभरात संगीत इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
- पीयूष बन्सल यांनी मागितली माफीमुंबई : लेंस्कार्टचे (Lenskart) संस्थापक आणि सीईओ पीयूष बंसल यांनी सोशल मीडियावर सुरु असलेल्या वादावर महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हा दस्तावेज कंपनीची अधिकृत एचआर पॉलिसी नसून एक जुनी अंतर्गत ट्रेनिंग फाइल होती, जी चुकीच्या संदर्भात शेअर करण्यात आली आहे.बंसल यांनी मान्य केले की त्या फाइलमध्ये बिंदी आणि तिलक संदर्भात एक अयोग्य ओळ समाविष्ट होती. मात्र, ही चूक १७ फेब्रुवारीलाच लक्षात येऊन ती दुरुस्त करण्यात आली होती. संबंधित मजकूर हटवण्यात आला होता, म्हणजेच हा मुद्दा सार्वजनिक होण्याच्या काही आठवडे आधीच कंपनीने आवश्यक कारवाई केली होती.https://prahaar.in/2026/04/19/underground-railway-lines-to-be-constructed-from-csmt-to-kalyan-and-churchgate-to-virar/या प्रकरणात ही त्रुटी आधी लक्षात न आल्याची जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारली. “ही चूक आमच्या लक्षात यायला हवी होती,” असे सांगत त्यांनी पारदर्शक भूमिका मांडली.We have heard you. Clearly and openly. Over the past few days, our community and customers have spoken - and we have listened.Today, we are standardizing our In-Store Style Guide and sharing it publicly and transparently: https://t.co/lC8KlLLUZmThese guidelines explicitly and…— lenskart (@Lenskart_com) April 18, 2026तसेच, लेंस्कार्टमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक प्रतीकांचा आदर केला जातो, असेही त्यांनी अधोरेखित केले. कंपनीच्या संस्कृतीत विविधतेला महत्त्व असून प्रत्येक कर्मचाऱ्याची ओळख जपणे हीच लेंस्कार्टची भूमिका असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
gold-silver price today: सोने -चांदी महाग झाले की स्वस्त? ; जाणून घ्या नवीन किमती काय?
gold-silver price today:
Vijay Wadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माजी खासदार नवनीत राणांवर जोरदार शाब्दिक हल्ला केला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Ashok Kharat : अशोक खरातचे पाय खोलात; पाचव्या गुन्ह्यात २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Ashok Kharat nashik, court : अशोक खरातला 23 एप्रिलपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
PMKMY : शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून दरमहा मिळणार तीन हजार रुपये, असा करा अर्ज
नवी दिल्ली : शेती ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख आधार आहे. पण बदलते हवामान, ओला आणि कोरडा दुष्काळ, वादळ, चक्रीवादळ अशा वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांमुळे अनेकदा शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकर्यांचे उत्पन्न अस्थिर असते. वय वाढले की शेतकऱ्यांना पहिल्यासारखी शेती करणे कठीण होते, अशा वेळी त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होतो. या सर्व बाबींचा विचार करून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकर्यांना वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळतो.अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांना वृद्धापकाळात निश्चित उत्पन्न मिळावे या हेतूने पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू करण्यात आली आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांना नियमित पेन्शन मिळाल्यास त्यांना दैनंदिन खर्च भागवणे, औषधोपचार करणे आणि कुटुंबाचा सांभाळ करणे यासाठी मदत होईल असा विचार त्यामागे आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षेचे कवच आहे.पंतप्रधान किसान मानधन योजनेत पात्र लाभार्थ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये निवृत्तीवेतन अर्थात पेन्शन मिळते. वर्षभरात शेतकऱ्याच्या बँक खात्यात केंद्र सरकार थेट ३६ हजार रुपये जमा करते. हे पैसे अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांना वृद्धापकाळात उदरनिर्वाहासाठी आर्थिक आधार ठरतात. उत्पन्नाचे इतर साधन नसलेल्या अनेक अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी योजना आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना दरमहा ठराविक प्रीमियम भरावा लागतो. हा प्रीमियम शेतकऱ्यांच्या वयानुसार ५५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत आहे.शेतकऱ्यांनी जितकी रक्कम भरली तितकीच रक्कम केंद्र सरकार त्यांच्या खात्यात जमा करते. त्यामुळे ही योजना दुहेरी लाभ देते. कमी वयात योजनेत सहभागी झाल्यास प्रीमियम कमी भरावा लागतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या महा ई-सेवा केंद्रावर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी अर्जदार शेतकऱ्याने महा ई-सेवा केंद्रात जाताना सोबत आधार कार्ड, वयाचा पुरावा आणि बँक पासबुक नेणे आवश्यक आहे.
Ranveer and Deepika : रणवीर- दीपिका दुसऱ्यांदा होणार आई बाबा, गुड न्यूजचा फोटो पाहाच
मुंबई : दीपिकाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, धुरंधरबाबत नाही, कोणत्या नवीन सिनेमाची नाही तर, दीपिका पुन्हा आई होणार असून सिंग परिवारात पून्हा एका आनंदाचे क्षण येणार आहेत.अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात काही न बोलता एका फोटोनेच समजलं आहे, की दुआ मोठी ताई होणार आहे. दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वाना दिली. पोस्ट मधील फोटो मध्ये दुआ दिसते आहे आणि दुआच्या हातात प्रेग्नेंसी टेस्ट किट आहे, जे पॉजिटीव्ह आहे. या पोस्ट वर कौतुकाचा वर्षाव होत असून अनेकांनी या जोडीचे अभिनंदन केले आहे. फॅन्स आणि अनेक सेलिब्रिटींनी मिळून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
Akshay Kumar : बॅालिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार त्याच्या भूत बंगला चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने मोठा खुलासा केला आहे.
Railway : CSMT ते कल्याण आणि चर्चगेट ते विरार भुयारी रेल्वे करणार
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे ही मुंबई महानगर क्षेत्राची जीवनवाहिनी आहे. वाजवी दरात वेगाने प्रवास करण्याचा पर्याय म्हणून लाखो मुंबईकर रेल्वेची निवड करतात. दररोज पश्चिम रेल्वेद्वारे सुमारे ३० लाख तर मध्य रेल्वेद्वारे सुमारे ६२ लाख प्रवासी प्रवास करतात. पश्चिम रेल्वे चर्चगेट ते डहाणू आणि मध्य रेल्वे ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, कर्जत, खोपोली, गोरेगाव, पनवेल आणि उरण अशी आडवीतिडवी पसरली आहे. कार्यालयीन वेळांमध्ये गाड्यांच्या दारांवर लटकत शेकडो प्रवासी जीव धोक्यात टाकून प्रवास करतात पण रेल्वेचाच पर्याय निवडतात. रेल्वेच्या सर्व गाड्या १२ डब्यांच्या आहेत. मोजक्या गाड्या १५ डब्यांच्या आहेत. पण ही व्यवस्था अपुरी पडत आहे. गर्दी हाताळणे आजही रेल्वेसाठी आव्हान आहे. यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि चर्चगेट ते विरार या दोन मार्गांसाठी भुयारी रेल्वेबाबत विचार सुरू आहे. सध्याची व्यवस्था सुरू ठेवून ही अतिरिक्त व्यवस्था सुरू करता येईल का याचीही चाचपणी सुरू आहे.मुंबईत जागेची टंचाई आहे. रेल्वेचा विस्तार करायचा तर भूसंपादनासाठीच अब्जावधींचा खर्च होईल अशी स्थिती आहे. शिवाय अतिक्रमण हटवणे, नागरिकांचे पुनर्वसन करणे हे सर्व खर्चिक काम आहे. या खर्चात बचत करण्यासाठीच भुयारी मार्गांचा विचार सुरू आहे. या प्रकारात सामान्य रेल्वे विस्तार योजनेच्या तुलनेत कमी भूसंपादन करुनही रेल्वेचा विस्तार शक्य होईल. यामुळेच भुयारी मार्गाच्या व्यावहारिकतेची चाचपणी सुरू आहे.सध्या पश्चिम रेल्वेद्वारे सुमारे ३० लाख तर मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, कर्जत पर्यंत सुमारे ३८ लाख प्रवासी प्रवास करतात. या गर्दीला सुयोग्य पद्धतीने हाताळण्यासाठी तसेच प्रवास अधिक सुरळीत करण्यासाठी भुयारी रेल्वे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. भुयारी रेल्वेमुळे रुळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासही मदत होणार आहे. भुयारी मार्ग तयार झाल्यास प्रवाशांना सुरक्षित प्रवेश किंवा बाहेर पडण्याची व्यवस्था करता येईल आणि लोकल, मेल-एक्सप्रेस, मालगाड्यांसाठीही स्वतंत्र मार्ग करण्यास मदत होईल. या सर्व बाबींचा विचार करून मुंबई रेल्वे विकास महामंडळाने चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या पहिल्या टप्प्याच्या भुयारी रेल्वेच्या तांत्रिक तसेच आर्थिक गोष्टींचाही अभ्यास सुरू केला आहे. अंतिम निर्णय केंद्र आणि राज्य सरकार रेल्वेशी समन्वय राखून घेणार आहेत.
Women Reservation : अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना महिला-विरोधी ठरवल्याबद्दल तीव्र टीका केली. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण पक्षपाती असल्याचे म्हटले.
Deepika Padukone Good news : गुड न्यूज ! रणवीर सिंग आणि दीपिका दुसऱ्यांदा होणार आई-बाबा
Deepika Padukone Good news :
Anjali Damania : मंत्रिमंडळात महिला किती? अंजली दमानियांनी आकडेवारीसह केली सरकारची कानउघडणी
Anjali Damania : महाराष्ट्रात ३९ मंत्र्यांमध्ये केवळ ४ महिला मंत्री
Tabu : बॅालिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूने मुंबईतील वर्साेवा भागात आलिशान अपार्टमेंटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
Strait Of Hormuz : इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) काल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका भारतीय जहाजाला अडवले
तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी होण्याची शक्यता वाढल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली असल्याचे जाहीर केले होते. पण काही दिवसांतच पुन्हा एकदा इराणने होर्मुझ सामुद्रधुनी केली आहे. इराणकडून भारताच्या दोन तेलवाहक जहाजांच्या दिशेने गोळीबारही करण्यात आला. सुदैवाने इराणच्या गोळीबारात जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही. गोळीबाराच्या घटनेची भारत सरकारने गंभीर दखल घेतली. परराष्ट्र मंत्रालयाने इराणचे राजदूत मोहम्मद फथाली यांना बोलावून आपली चिंता व्यक्त केली. इराणच्या राजदूताने भारताचे म्हणणे आपल्या सरकारच्या कानी घालण्याचे आश्वासन दिले आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा इराणचेच होर्मुझ सामुद्रधुनीवर पूर्ण नियंत्रण असल्याचे तसेच होर्मुझमार्गे होणारी जलवाहतूक ही इराणच्या परवानगी आणि सहकार्याविना अशक्य असल्याचे सिद्ध झाले आहे.इराण होर्मुझ सामुद्रधुनी खुली करणार नसेल तर अमेरिका बाहेरून कोंडी करून इराणमधून येणाऱ्या जहाजांना अडवेल असे अमेरिकेने जाहीर केले होते. प्रत्यक्षात अमेरिका त्यांच्या या प्रयत्नात अयशस्वी झाली आहे आणि इराण होर्मुझ सामुद्रनीवर नियंत्रण ठेवण्यात सातत्याने यशस्वी होताना दिसत आहे.इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यात आली असून सर्व जहाजांची वाहतूक होईल असे जाहीर केले होते. तरी भारताच्या तेलवाहक जहाजांच्या दिशेने गोळीबार झाला. यामुळे इराणी सैन्य आणि IRGC च्या अधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.अमेरिका आणि इस्रायलने इराणवर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी हवाई हल्ले सुरू केले आणि पश्चिम आशियात युद्धाची ठिणगी पडली. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी शत्रू देश आणि त्यांना युद्धात थेट मदत करणाऱ्यांना बंद केली. यानंतर ८ एप्रिल रोजी होर्मुझ सामुद्रधुनी फक्त दहा मिनिटांसाठी खुली करण्यात आली, नंतर पुन्हा बद करण्यात आली. यानंतर थेट १७ एप्रिल रोजी इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी झाल्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सर्वांसाठी खुली करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. पण इराणचे परराष्ट्र मंत्री, अब्बास अराघची यांनी एक्स (X) वर पोस्ट केले की लेबनॉनमध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा उघडली जात आहे. नेमक्या याच पोस्टमुळे गोंधळ झाला.सरकारी निर्णयाची माहिती IRGC च्या अधिकाऱ्यांना मिळाली नाही अथवा त्यांची या निर्णयाला सहमती नव्हती. यामुळेच इराणचे परराष्ट्र मंत्री, अब्बास अराघची यांनी जाहीर करूनही IRGC च्या अधिकाऱ्यांनी होर्मुझ सामुद्रधुनी व्यावसायिक जलवाहतुकीसाठी खुली केलेली नाही. शिवाय होर्मुझमार्गे प्रवास करणाऱ्या जहाजांच्या दिशेने गोळीबार केला.धक्कादायक म्हणजे भारताच्या दोन तेलवाहक जहाजांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही. पण ज्या जहाजांवर गोळीबार झाला त्यातील एकात सुमारे २० दशलक्ष आणि दुसऱ्या जहाजात पाच दशलक्ष बॅरल कच्चे तेल आहे.
DA HIKE : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 'अच्छे दिन', डीएमध्ये २ टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली : महागाईच्या काळात सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळाला. केंद्र करकारने त्यांना अक्षय्य तृतीयानिमित्त मोठे गिफ्ट दिले. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात म्हणजे डीएमध्ये २ टक्क्यांनी वाढ केली. त्यामुळे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्तीवेतनात मोठी वाढ होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना फक्त आर्थिक दिलासा मिळाला नाही तर वाढत्या महागाईच्या काळात त्यांचे बजेट कोलमडणार नाही. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे एक कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनर्सना फायदा होणार आहे. देशात सध्या ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६४ लाख पेन्शनर्स आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात २ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. कर्मचारी संघटना ८व्या वेतन आयोगाअंतर्गत सॅलरी स्ट्रक्चर बदलण्याची मागणी करत असतानाच सरकारने महागाई भत्त्यात वाढीचा निर्णय घेतला आहे.केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढीच्या घोषणेला पहिल्यांदाच इतका उशीर झाला आहे. सर्वसामान्यपणे सरकारकडून जानेवारी ते जूनच्या सहामाहीसाठी होळीच्या दरम्यान, म्हणजेच मार्च महिन्यात निर्णय घेते. पण यंदा यासाठी उशीर झाला आहे. १० वर्षात पहिल्यांदाच सरकारने महागाई भत्त्याची घोषणा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात केली आहे. महागाई भत्त्यात वाढीची घोषणा ही जानेवारी महिन्यापासून लागू असणार आहे. एप्रिल महिन्याच्या वेतनासोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा महागाई भत्ता मिळणार आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यात २०२५च्या दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्त्याची घोषणा केली होती.कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता त्यांच्या बेसिक सॅलरीनुसार ठरवला जातो. जर एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी ६०,००० रुपये असेल तर त्याला पूर्वी ५८ टक्के महागाई भत्त्यानुसार ३४८०० रुपये महागाई भत्ता मिळत होता. आता त्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ झाली आहे म्हणजे त्यांना ६० टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. त्यानुसार महागाई भत्ता ३६,००० रुपये असेल. म्हणजेच कर्मचाऱ्याच्या पगारात दरमहा १२०० रुपयांची वाढ झाली.
Pan card new rules 2026: गाडी ते घर खरेदीपर्यंत…; पॅन कार्ड नसेल तर अडकतील तुमची महत्त्वाची कामे
Pan card new rules 2026 : पॅन कार्ड तुमच्या प्रत्येक आर्थिक पावलाचा रेकॉर्ड ठेवते, ज्यामुळे सरकारला उत्पन्नाचे योग्य आकलन करण्यास मदत होते.
IPL 2026 : हैदराबादची चेन्नईवर १० धावांनी मात
हैदराबाद : अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांच्या स्फोटक फलंदाजी आणि इशान मलिंगाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सचा १० धावांनी पराभव केला. उप्पल येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, चेन्नईला केवळ १८४ धावाच करता आल्या आणि त्यांना सामना गमवावा लागला.या विजयामुळे हैदराबाद आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. सहा सामन्यांमधील संघाचा हा तिसरा विजय आहे. दुसरीकडे, चेन्नईने या हंगामातील आपला चौथा सामना गमावला आहे. सध्या हा संघ सातव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्स अव्वल स्थानावर आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.https://prahaar.in/2026/04/18/smriti-mandhana-the-indian-cricketer-with-the-most-runs-in-t20-cricket/१९५ धावांचे लक्ष्य गाठताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला नाही आणि त्याने तीन चेंडूंमध्ये केवळ सात धावा केल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडने त्यानंतर आयुष म्हात्रेसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. ऋतुराज १३ चेंडूंमध्ये १९ धावा करून बाद झाला. दरम्यान, म्हात्रेने पाच चौकार आणि एका षटकारासह १३ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या. मॅथ्यू शॉर्टने ३४ धावांचे योगदान दिले. सरफराज खानला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही आणि तो १९ चेंडूंमध्ये २५ धावा करून इशान मलिंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला.देवाल्ड ब्रेविस खाते न उघडताच शिवांग कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. दरम्यान, शिवम दुबे २१ धावांवर शकिब हुसेनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. जेमी ओव्हरटन १५ चेंडूंमध्ये १६ धावा करून प्रफुल्ल हिंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. अंशुल कंबोज ८ चेंडूंमध्ये १३ धावा करून नाबाद राहिला. SRH ची गोलंदाजी प्रभावी ठरली, ज्यात इशान मलिंगाने २९ धावांत तीन बळी घेतले, तर नितीश कुमार रेड्डीने दोन विकेट्स घेतल्या. शिवांग कुमार आणि शकिब हुसेन यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.https://prahaar.in/2026/04/18/ipl-2026-gujarat-defeats-kolkata-by-five-wickets/तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर हैदराबादने दमदार सुरुवात केली. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या सलामीच्या जोडीने अवघ्या ५.५ षटकांत पहिल्या विकेटसाठी ७५ धावा जोडल्या. अभिषेकने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या १५ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. अभिषेकने २२ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि चार षटकारांसह ५९ धावा केल्या. मात्र, हेड लयीत नसल्याचे दिसत होते आणि त्याला क्रीजवर टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्याने २० चेंडूंचा सामना करून केवळ २३ धावा केल्या. कर्णधार इशान किशन शून्यावर बाद झाला.अनिकेत वर्मालाही फलंदाजीत फारसा प्रभाव पाडता आला नाही, त्याने केवळ दोन धावा केल्या. दरम्यान, नितीश कुमार रेड्डी १२ धावांवर जेमी ओव्हरटनच्या गोलंदाजीवर मॅथ्यू शॉर्टकरवी झेलबाद झाला. मात्र, हेनरिक क्लासेनने या सामन्यातही आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत ३२ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. क्लासेनने एक बाजू सांभाळत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३९ चेंडूंमध्ये ५९ धावा केल्या.सलील अरोराने १३ धावा केल्या, तर शिवांग कुमारने १२ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत, अंशुल कंबोजने सीएसकेसाठी शानदार गोलंदाजी करत २२ धावांत तीन विकेट्स घेतल्या. जेमी ओव्हरटननेही एसआरएचच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. मुकेश चौधरीने दोन बळी आणि गुर्जपनीत सिंगने एक विकेट घेतली.

28 C