Matka King : विजय वर्माच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना सरप्राईज, १७ एप्रिलला रिलीज होणार ‘मटका किंग’
मुंबई : अभिनेता विजय वर्माच्या वाढदिवसानिमित्त भारतातील सर्वात लोकप्रिय प्राईम व्हिडिओनं विजयच्या आगामी ओरिजिनल ड्रामा सीरिज ‘मटका किंग’ वर्ल्डवाइड प्रीमियरची तारीख जाहीर केली असून येत्या १७ एप्रिल २०२६ रोजी ही सिरीज रिलीज होणार आहे.अभय कोरन्ने यांनी लिहिलेली आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी तयार करून दिग्दर्शित केलेली ही सिरीज १९६० च्या दशकातील बदलत्या बॉम्बेवर आधारित आहे. ही कथा एका कापूस व्यापाऱ्याभोवती फिरते, जो ‘मटका’ नावाची नवी जुगार प्रणाली सुरू करतो आणि श्रीमंतांच्या या छंदाला संपूर्ण देशभर पसरवतो.ही सिरीज सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज पोपटराव मंजुळे, गार्गी कुलकर्णी, अश्विनी सिदवानी आणि आशीष आर्यन यांनी ‘रॉय कपूर फिल्म्स’, ‘आटपाट’ आणि ‘SMR प्रोडक्शन्स’च्या बॅनरखाली निर्मित केली आहे.या सिरीजमध्ये विजय वर्मा, कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जादावत आणि गुलशन ग्रोवर मुख्य भूमिकांमध्ये झळकणार आहेत.यांच्यासोबत विनीत कुमार सिंह, भरत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लीवर, किशोर कदम, सायरस साहूकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्तियाक खान, संजीव जोटांगिया आणि सिमरन अश्विनी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.या सिरीजमद्ये १९६० च्या दशकातील बदलत्या बॉम्बेमध्ये स्वतःची ओळख आणि मान-सन्मान मिळवण्यासाठी झटणारा एक हुशार आणि मेहनती कापूस व्यापाऱ्याची कथा आहे.ज्याची भूमिका विजय वर्मा यांनी साकारली आहे.गर्दीने गजबजलेले बाजार, चाळी आणि बदलणारी सत्ता यांच्यात ही कथा उभी राहते. एका महत्त्वकांक्षी कल्पनेपासून सुरू होणारी ही कथा हळूहळू स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांना आकर्षित करते.जसजशी अपेक्षा आणि जोखीम वाढत जाते, तशी ही सीरिज महत्त्वाकांक्षा, सत्ता आणि स्वतःची जागा निर्माण करण्याच्या रोमांचक प्रवासात रूपांतरित होते. ही सिरीज १७ एप्रिलपासून भारतासह जगभरातील २४० पेक्षा अधिक देशांमध्ये फक्त प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे.
३,५०० मरीन सैनिकांसह अमेरिकेची यूएसएस त्रिपोली युद्धनौका युद्धक्षेत्रात दाखल
वॉशिंग्टन : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक भीषण होत चालला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या तीव्र हल्ल्यांवर इराणदेखील इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार प्रत्युत्तर देत आहे. हा संघर्ष आता ३०व्या दिवशी पोहोचला असून या तणावपूर्ण परिस्थितीत अमेरिकेने आपले विशाल युद्धनौक यूएसएस त्रिपोली तैनात केले आहे. सुमारे ३,५०० मरीन सैनिकांसह ते अमेरिकन सेंट्रल कमांड (सेंटकॉम) क्षेत्रात दाखल झाले आहे.ही युद्धनौका जपानमधील आपल्या मूळ बंदरातून रवाना झाली असून आता सेंटकॉम क्षेत्रात सक्रिय झाली आहे. यूएसएस त्रिपोली ही अमेरिका-श्रेणीतील उभयचर हल्लेखोर युद्धनौका असून आकाराने ती जवळपास विमानवाहू नौकेइतकी मोठी आहे. या जहाजावर हेलिकॉप्टर, MV-22 ऑस्प्रे विमान तसेच F-35B जॉइंट स्ट्राइक फायटर जेट्स तैनात करता येतात. जहाजावर त्रिपोली उभयचर तत्पर गट आणि 31वी मरीन एक्स्पिडिशनरी युनिट तैनात आहे.हा संघर्ष सुरू होऊन एक महिना झाल्यानंतर अमेरिकेचे हे पाऊल केवळ लष्करी ताकदीचे प्रदर्शन नसून संभाव्य मोठ्या लष्करी कारवाईची तयारी मानली जात आहे. आधुनिक शस्त्रसामग्री आणि लढाऊ विमानांनी सज्ज असलेली ही नौका अमेरिकेची युद्धक्षमता अनेक पटींनी वाढवते. यावरून अमेरिका या संघर्षात आपला प्रभाव आणि पकड अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकद लावत असल्याचे स्पष्ट होते.या जहाजाच्या पश्चिम आशियात आगमनानंतर अमेरिकेची लष्करी उपस्थिती आणखी मजबूत झाली आहे. आधीपासूनच या प्रदेशात यूएसएस निमित्झ आणि यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड या विमानवाहू नौका तैनात आहेत. मात्र, यूएसएस जेराल्ड आर. फोर्डला अलीकडे लागलेल्या आगीमुळे आणि दुरुस्तीच्या कामामुळे पोर्ट ऑफ स्प्लिट येथे थांबवण्यात आले असून ते सुमारे एक वर्ष युद्ध क्षेत्रात कार्यरत राहू शकणार नाही.याशिवाय यूएसएस जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश ही विमानवाहू नौकाही नॉरफोकहून पश्चिम आशियाकडे रवाना झाली आहे. ती तैनात झाल्यास या भागातील अमेरिकन विमानवाहू नौकांची संख्या तीन होईल.दरम्यान, सेंटकॉमने आपल्या पोस्टमध्ये इराणविरोधातील अमेरिकेच्या कारवायांची माहिती दिली आहे. पोस्टनुसार २८ फेब्रुवारीनंतर अमेरिकन सैन्याने इराणच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले केले असून ११,००० हून अधिक युद्धविमान उड्डाणे करण्यात आली आणि १५० पेक्षा जास्त इराणी जहाजांचे नुकसान किंवा विनाश करण्यात आला. तसेच अमेरिकेने इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स, क्षेपणास्त्र तळ, नौदल जहाजे आणि शस्त्रनिर्मिती केंद्रांना लक्ष्य केले आहे.
विवोचा व्ही70 एफई स्मार्टफोन २ एप्रिलला होणार लाँच
मुंबई : विवो कंपनीनं आपल्या व्ही70 सिरीज अंतर्गत व्ही70 एफई हा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली असून हा फोन २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सादर केला जाणार आहे. मिड-रेंज सेगमेंटमध्ये येणाऱ्या या फोनमध्ये दमदार कॅमेरा, मोठी बॅटरी आणि आधुनिक फीचर्स दिल्यामुळे सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी हा एक आकर्षक पर्याय ठरण्याची शक्यता आहे. कंपनीनं आधीच या फोनसाठी टीझर आणि मायक्रोसाइट सुरू केली असून, फोनचा फोकस ऑल-डे परफॉर्मन्स आणि यूजर-फ्रेंडली डिझाइनवर असल्याचं स्पष्ट केलं आहे.व्ही70 एफई हा स्मार्टफोन भारतात ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असून अमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स साइट्सवर त्याची विक्री होईल. तसेच विवोच्या अधिकृत स्टोअर्समधूनही हा फोन खरेदी करता येणार आहे. इंडोनेशियामध्ये आधीच लाँच झालेल्या या मॉडेलच्या भारतीय व्हर्जनमध्ये काही नवीन रंग पर्याय दिले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मॉन्सून ब्लू या रंगात ग्लो-इन-द-डार्क फिनिश देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या फोनची किंमत अंदाजे ३०,००० ते ४०,००० रुपयांच्या दरम्यान असू शकते.डिझाइन आणि डिस्प्लेच्या बाबतीत व्ही70 एफईमध्ये ६.८३ इंचाचा १.५के फ्लॅट अमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे. या डिस्प्लेमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १९०० निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस मिळेल, ज्यामुळे वापरकर्त्यांना स्मूथ आणि ब्राइट व्हिज्युअल अनुभव मिळेल. एचडीआर१० प्लस सपोर्ट आणि ९४.४ टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशोमुळे व्हिडिओ पाहताना आणि गेमिंग करताना उत्कृष्ट अनुभव मिळेल. याशिवाय फोन आयपी६८ आणि आयपी६९ वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट असल्यामुळे तो पाण्यातही सुरक्षित राहील. फोनमध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि ड्युअल स्टिरिओ स्पीकर्ससारखी आधुनिक फीचर्सही देण्यात आली आहेत.कॅमेरा विभागात हा फोन विशेष लक्ष वेधून घेतो. यामध्ये २०० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, जो सॅमसंग एचपी५ सेन्सरवर आधारित आहे. या कॅमेरामध्ये ओआयएस आणि एफ/१.८८ अपर्चर असल्यामुळे कमी प्रकाशातही चांगले फोटो काढता येतात. त्यासोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स दिला आहे. विवोचं सिग्नेचर ऑरा लाईट फीचर पोर्ट्रेट फोटोग्राफी अधिक चांगली बनवतं. याशिवाय ३०एक्स टेलिफोटो झूम सपोर्ट असल्यामुळे दूरच्या वस्तूंचे फोटो स्पष्टपणे टिपता येतात. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामध्ये आय ऑटोफोकससारखी सुविधा आहे.परफॉर्मन्सच्या दृष्टीने व्ही70 एफईमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७३६० टर्बो प्रोसेसर दिला आहे, जो ४ एनएम प्रोसेसवर आधारित आहे. यामुळे फोन वेगवान आणि स्मूथ परफॉर्मन्स देण्यास सक्षम ठरतो. यामध्ये ८ जीबीपर्यंत एलपीडीडीआर५ रॅम आणि ५१२ जीबीपर्यंत यूएफएस ३.१ स्टोरेज मिळेल. त्यामुळे मल्टिटास्किंग आणि दैनंदिन वापर सहज पार पडतो. या फोनमध्ये ७००० एमएएचची मोठी बॅटरी दिली असून ती ९० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे कमी वेळात फोन चार्ज होतो आणि पूर्ण दिवस बॅटरी टिकते.सॉफ्टवेअरच्या बाबतीत हा स्मार्टफोन अँड्रॉइड १६ आधारित ओरिजिनओएस ६ वर चालणार आहे. विवो कंपनी या फोनसाठी ४ वर्षे ओएस अपडेट्स आणि ६ वर्षे सिक्युरिटी अपडेट्स देणार असल्याचं सांगितलं आहे. यामध्ये एआय फीचर्सचाही समावेश असणार आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना अधिक स्मार्ट आणि वैयक्तिक अनुभव मिळेल. एकूणच, व्ही70 एफई हा स्मार्टफोन आपल्या प्राइस रेंजमध्ये कॅमेरा, बॅटरी आणि परफॉर्मन्स यांचा उत्तम समतोल साधणारा पर्याय ठरण्याची शक्यता आहे.
आर. अश्विन आता अमेरिकेत खेळणार क्रिकेट : सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससोबत करार
नवी दिल्ली : भारताचा माजी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आता अमेरिकेच्या टी-२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने आगामी मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) हंगामासाठी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससोबत करार केला असून, या स्पर्धेत खेळणारा तो पहिला माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे.अश्विनने २०२४ च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर तो २०२५ च्या आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळला, पण तो हंगाम त्याच्यासाठी फारसा खास नव्हता. आयपीएल संपल्यानंतर त्याने त्या लीगमधूनही निवृत्ती जाहीर केली होती. आता निवृत्तीनंतर तो जागतिक लीगकडे वळत आहे.आपल्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत अश्विनने भारताबाहेरील कोणत्याही टी-२० लीगमध्ये भाग घेतलेला नाही. आयपीएल व्यतिरिक्त जागतिक फ्रँचायझी स्पर्धेत खेळण्याची ही त्याची पहिलीच वेळ असेल. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग (बीबीएल) मध्ये सिडनी थंडरसोबत करार केला होता, पण गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे तो त्यावेळी खेळू शकला नव्हता.अमेरिकेत खेळण्यासाठी अश्विन खूप उत्सुक आहे. तो म्हणाला, मी नुकताच डॅलसमध्ये एक प्रदर्शनीय सामना खेळलो. तेथील आशियाई अमेरिकन लोकांमध्ये क्रिकेटबद्दल असलेली आवड पाहून मी थक्क झालो. तिथे क्रिकेटसाठी खूप मोठी क्षमता आहे. त्याने पुढे सांगितले की, अमेरिकेत राहणाऱ्या लोकांची, विशेषतः मुलांची आवड प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी त्याला एमएलसीचा भाग व्हायचे होते.१२८ वर्षांनंतर २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. त्यानिमित्ताने, अमेरिका एक प्रमुख क्रिकेट केंद्र म्हणून स्वतःला स्थापित करत आहे. एमएलसीचे मुख्य कार्यकारी जॉनी ग्रेव्ह म्हणाले, अश्विनसारख्या क्रिकेटपटूचा समावेश हे दाखवतो की गेल्या तीन वर्षांत आमची लीग किती वाढली आहे. अमेरिकेतील लोक आता क्रिकेटबद्दल शिकत आहेत.आयपीएलचे मेजर लीग क्रिकेटशी घनिष्ठ संबंध आहेत. लीगच्या सहा संघांपैकी तीन संघ त्याच समूहांच्या मालकीचे आहेत जे आयपीएल संघांचे मालक आहेत. यामध्ये एमआय न्यूयॉर्क (MI), टेक्सास सुपर किंग्स (CSK) आणि एलए नाइट रायडर्स (KKR) यांचा समावेश आहे. शिवाय, राजस्थान रॉयल्स संघ अलीकडेच एनएफएल (NFL) संघांच्या मालकांसह प्रमुख अमेरिकन गुंतवणूकदारांनी विकत घेतला आहे.एमएलसीचा २०२६ चा हंगाम, १८ जून रोजी सुरू होईल. ही स्पर्धा टेक्सास, लॉस एंजेलिस आणि ओकलंड येथे खेळवली जाईल. अंतिम सामना १८ जुलै रोजी ओकलंड कोलिझियम येथे होईल. अश्विनच्या सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघाने अद्याप एकही विजेतेपद जिंकलेले नाही. २०२४ मध्ये, ते अंतिम फेरीत पोहोचले होते, पण वॉशिंग्टन फ्रीडम संघाकडून त्यांचा पराभव झाला होता.
USA No Kings Protest: अमेरिका सध्या दोन प्रमुख आघाड्यांवर संघर्ष करत आहे. पश्चिम आशियामध्ये इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत
Matka King Teaser : गेल्या काही दिवसांपासून चर्चा असलेल्या मटका किंग वेबसिरीजचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
Ashok Kharat Case: अशोक खरात महिलांना कसं भुलवायचा?; तपासात धक्कादायक माहिती समोर
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात महिलांना टार्गेट करुन त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने पोलीस तपासात स्पष्ट केले की, तो महिलांशी गोड बोलून त्यांचे कौतुक करत होता. तसेच भावनिक जवळीक वाढवून त्यांना जाळ्यात ओढत होता. 'तू खूप सुंदर आहेस', 'तुझा पती तुला समजून घेत नाही', 'तुझी खरी क्षमता कोणालाच कळत नाही' अशा वाक्यांनी तो महिलांवर प्रभाव पाडत होता, असे समोर आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात माइंड रीडिंगमध्ये स्वत:ला पटाईत असल्याचे भासवत होता. परंतु प्रत्यक्षात तो समोरच्या भावनिकतेचा, मानसिकतेचा आणि देहबोलीचा अभ्यास करुन त्यांच्याशी संवाद साधत होता. पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मनातील भीती, असुरक्षितता आणि भावनिक कमकुवत बाजू ओळखून त्यावर तो संवाद साधत असे. या पद्धतीने तो महिलांना मानसिकदृष्ट्या जखडून ठेवत असल्याचा आरोप आहे. चौकशीत त्याने भावनिक जाळं विणून विश्वास मिळवल्याची कबुली दिल्याचीही माहिती समोर आली आहे.किती महिलांना फसवले?दरम्यान, किती महिलांचे शोषण केले याबाबत विचारले असता खरातने स्पष्ट उत्तर देण्यास टाळाटाळ केली. नेमका आकडा सांगता येणार नाही, असा दावा खरातने केल्याचे सूत्रांकडून समजले आहे. आतापर्यंत त्याच्याविरोधात १० गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ८ गुन्हे महिलांवरील अत्याचारासंदर्भात तर २ गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत.
Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
नाशिक : महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातला (Ashok Kharat) न्यायालयाने १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) दिली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्यामुळे आज म्हणजेच रविवार २९ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली. तपास व्यवस्थित व्हावा या उद्देशाने अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. याआधी त्याला २९ मार्चपर्यंत न्यायालयाने अशोक खरातला पोलीस कोठडी दिली होती.सुनावणीदरम्यान एसआयटीच्यावतीने तपासाची थोडक्यात माहिती देऊन तपासाकरिता आणखी अवधी आवश्यक असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. न्यायालयाने एसआयटीचा मुद्दा समजून घेतल्यानंतर पोलीस कोठडीत वाढ केली.संशयित आरोपी अशोक खरात स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत होता. तो महिलांना गुंगी येणारा पदार्थ मिसळून तीर्थ प्रसाद देत होता. यामुळे महिलांना थोड्या वेळाने ग्लानी यायची. या स्थितीचा अशोक खरात गैरफायदा घेत होता. तो महिलांचा लैंगिक छळ करत होता, असा आरोप होत आहे. या प्रकरणी एसआयटीने सीसीटीव्ही कॅमेरा, मोठी रोख रक्कम, लॅपटॉप, रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे जप्त केली आहेत. आर्थिक व्यवहार, कथित धार्मिक विधी आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.अशोक खरात स्वतःला ‘सिद्ध पुरुष’ सांगत लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप आहे. भीती निर्माण करण्यासाठी तो वन्यजीव कायद्याचे उल्लंघन करत होता. काही वेळा सापाचा वापर करत होता; असाही आरोप होत आहे.
Ashok Kharat Case Update: खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
नाशिक: अशोक खरातच्या भोंदूगिरीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण बाहेर आल्यापासून नवनवे खुलासे समोर येत आहेत. खरातला २९ मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करुन १ एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खरातची चौकशी करण्यासाठी एसआयटीला (SIT) अधिक कालावधीची गरज असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.पोलिसांच्या कडक बंदोबस्तात खरातला आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एसआयटीचे तपास अधिकारी किरण सुर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी खरातच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपी हा तपासात सहकार्य करत नाही. त्याने मोबाईलमध्ये अनेक नावे 'डमी' किंवा 'कोडवर्ड'मध्ये सेव्ह केली असण्याची शक्यता आहे, ज्यात काही राजकीय व्यक्तींचाही समावेश असू शकतो. तसेच, पीडित महिलांना तो जे 'द्रव्य' किंवा पाणी पाजत होता, त्याबाबतही सखोल तपास करायचा आहे.दुसऱ्या बाजूला आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला विरोध दर्शवला आहे. मोबाईल जप्त केला आहे, क्लोन कॉपी मिळाली आहे, मग पुन्हा कोठडीची गरज काय? रिव्हॉल्व्हरचा परवानाही आरोपीकडे होता, असा दावा त्यांनी केला. परंतु पीडित महिलेचे वकील एम.वाय.काळे यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे आणि आरोपीच्या कृत्यामुळे पीडितेचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून समाजाला न्याय मिळण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.दरम्यान आतापर्यंत खरातविरोधात १० गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ८ गुन्हे महिलांवरील अत्याचारासंदर्भात तर २ गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत.
'Mann Ki Baat': पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑल इंडिया रेडिओवर प्रसारित झालेल्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारत आणि परदेशातील लोकांशी आपले विचार व्यक्त केले.
मुंबई : पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित, रेमंड ग्रूपचे माजी अध्यक्ष आणि उद्योगविश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉ. विजयपत सिंघानिया (vijay singhania) यांचं शनिवारी सायंकाळी मुंबईत दुख:द निधन झालं. त्यांच्या निधनानं उद्योग आणि समाजकारण, विमानचालन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालीयं.'द कम्प्लीट मॅन' आणि 'फील्स लाइक हेवन' यांसारख्या सिनेमांच्या माध्यमातून शून्यातून सुरुवात करून अब्जावधींची संपत्ती कमावणारे आणि आपली कंपनी जगभरात पोहोचवणारे रेमंडचे मालक विजयपत सिंघानिया यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं उद्योग आणि समाजकारण, विमानउद्योग क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालीयं.भारताचे 'टेक्सटाईल टायकून' म्हणून ओळखले जाणारे विजयपत सिंघानिया यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर २९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. ही घोषणा त्यांचे पुत्र आणि रेमंडचे सध्याचे मालक, गौतम सिंघानिया यांनी केली. आपल्या ८७ वर्षांच्या आयुष्यात विजयपत सिंघानिया यांनी अनेक चढ-उतार अनुभवले. त्यांनी यशाची सर्वोच्च पायरी चढली आणि प्रेमातील विश्वासघातही सहन केला. जेके हाऊसचे मालक आणि अब्जाधीश असलेल्या या व्यक्तीला एकेकाळी भाड्याच्या घरात राहण्यास भाग पडले होते.१९२५ मध्ये ठाण्यातील वाडिया मिल या लोकरीच्या गिरणीत सैन्यासाठी गणवेश शिवण्यापासून रेमंडची सुरुवात झाली. १९८० मध्ये रेमंडचा ताबा घेतल्यानंतर, विजयपत सिंघानिया यांनी रेमंडला मोठ्या उंचीवर नेलं. रेमंड केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही पोहोचला होता. त्यांनी भारताच्या वस्त्रोद्योगाला ओळख मिळवून दिली, पण एक वेळ अशी आली की, ज्या विजयपत यांनी आपल्या कपड्यांनी जगाला परिपूर्ण बनवलं होतं, त्यांनाच त्यांच्या लोकांनी बेघर केलं. एका सहीमुळे ते केवळ त्यांच्या कंपनीतूनच नव्हे, तर त्यांच्या ३४ मजली आलिशान घरातूनही बेघर झाले.रेमंडला यशाच्या शिखरावर नेल्यानंतर, त्यांनी २०१५ मध्ये कंपनी आपला मुलगा गौतम सिंघानिया याच्याकडे सोपवली. त्यांनी आपले सर्व शेअर्स, ज्यांचे मूल्य तेव्हा १००० कोटी रुपये होते, आपल्या मुलाला दिले आणि १२,००० कोटी रुपये किमतीची रेमंड कंपनी त्याच्या हवाली केली. कंपनी आणि शेअर्सवर ठेवलेल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा त्यांना तितकाच मोठा विश्वासघात अनुभवायला मिळाला. याच एका कृत्यामुळे केवळ आपली संपूर्ण बचतच नव्हे, तर घर, गाडी आणि ड्रायव्हरसुद्धा गमवावा लागेल, याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती.विजयपत सिंघानिया यांनी स्वतःच आपल्या मुलावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी मुंबईत ३४ मजली जेके हाऊस बांधले, पण कंपनी मुलगा गौतमच्या हवाली करताच त्यांनी त्याच्या आई-वडिलांना त्याच घरातून जबरदस्तीने बाहेर काढले. त्यांनी केवळ घरच नाही, तर गाडी आणि ड्रायव्हर यांसारख्या मूलभूत सुविधाही काढून घेतल्या. इतकेच नाही, तर आपल्या नावापुढे 'चेअरमन एमेरिटस' ही उपाधी लावण्याचा हक्कही त्यांनी काढून घेतला.रेमंडप्रमाणे अब्जावधींची संपत्ती कमावून एक बहुराष्ट्रीय कंपनी उभी करणाऱ्या आपल्याच मुलाने विश्वासघात केल्यामुळे, त्यांना आपल्या पत्नीसोबत दोन भाड्याच्या घरांमध्ये राहण्यास भाग पाडले. त्यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचा मुलगा गौतम त्यांना रस्त्यावर पाहून आनंदी झाला होता. सर्व काही त्याच्या हाती सोपवणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती.५,००० तासांचा उड्डाणाचा अनुभव असलेल्या विजपत सिंघानिया यांना उड्डाणाची प्रचंड आवड होती. वयाच्या ६७ व्या वर्षीही त्यांनी जगातील सर्वात उंच हॉट एअर बलून उड्डाणाचा विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी रेमंडला यशाच्या शिखरावर नेले. त्यांनी १२,००० कोटी रुपयांची मालमत्ता, अब्जावधी डॉलर्सची रेमंड कंपनी आणि मुंबईतील मलबार हिल परिसरातील ३७ मजली जेके हाऊस आपल्या मुलाच्या नावावर केले. त्यानंतर ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचं त्यांनी म्हटलं.
Iran US War: येमेनच्या हुथी बंडखोरांनी आज इस्रायलला लक्ष्य करून दुसऱ्या लष्करी कारवाईची घोषणा केली.
Rupali Chakankar : खरात प्रकरण रुपाली चाकणकरांच्या अंगलट; SITकडून बजावले समन्स, चौकशी होणार
Rupali Chakankar : एसआयटीने 'शिवनिका' संस्थेचे बँक खात्यांचे तपशील आणि मागील काही वर्षांतील व्यवहारांची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
Kriti Sanon : अभिनेत्री क्रिती सेनॅान हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कॅाकटेल 2 मध्ये मिळालेल्या रोलवर भाष्य केले आहे.
भरधाव वेगाने येत थारने तीन जणांना उडवले; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद
नवी दिल्ली: गुरुग्राममध्ये एक मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या थार कारने तिघांना चिरडले. तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष, एक १० वर्षाचा मुलाचा आणि एक ८ वर्षाचा मुलगा आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.नेमकं प्रकरण काय?गुरुग्राममध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या थार कारने तीन जणांना चिरडले आहे. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना पटौदीच्या खोड गावात घडली. थार गाडीचा चालक, तिघांना धडक दिल्यानंतर गाडी सोडून घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांच्या अहवालानंतर, थार गाडी जप्त करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात ठेवले आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममधील पटौदीजवळच्या खौद गावात रात्री सुमारे ११ वाजता एक व्यक्ती दोन मुलांसोबत प्रवास करत होता. तिघांनाही एका थार गाडीने धडक दिली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. त्यांनी थार गाडीही जप्त करून पोलीस ठाण्यात उभी केली.थार गाडीचा धक्का इतका जोरदार होता की, तिघेही सुमारे तीस फूट दूर फेकले गेले. चालकाने गाडी सोडून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गाडी ताब्यात घेतली. त्यांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातील. पोलिसांनी थार गाडी पोलीस ठाण्यात उभी केली असून आता आरोपीचा शोध घेत आहेत. पोलीस प्रवक्ते संदीप कुमार यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आता आरोपीला अटक केली. अटक केलेल्या आरोपीची ओळख दीपांशु (वय २५) अशी असून तो गोरियावासचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाईसाठी त्याला लवकरच जिल्हा न्यायालयात हजर केले जाईल.
मुंबई : उद्योगविश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉ. विजयपत सिंघानिया (vijay singhania) यांचं शनिवारी सायंकाळी मुंबईत दुख:द निधन झालं. विजयपत सिंघानिया यांच्या निधनानं उद्योग आणि समाजकारण, विमानचालन क्षेत्रात पोकळी निर्माण झालीय.प्रसिद्ध उद्योजक विजयपत सिंघानिया हे एक यशस्वी उद्योगजक असण्याबरोबरच ते पद्मभूषण पुरास्काराने समान्मित रेमंड ग्रूपचे माजी अध्यक्ष, वैमानिक आणि 'द कम्प्लीट मॅन' या ब्रँडचे निर्मातेही होते. त्यांनी रेमंड कंपनी एका जागतिक दर्जाच्या ब्रँडमध्ये रूपांतरित केली, परंतु आयुष्याच्या अखेरच्या वर्षांत त्यांना कौटुंबिक आणि व्यावसायिक आव्हानांना सामोरं जावं लागलं. त्यांचा जीवनप्रवास म्हणजे यश, धैर्य, उत्कटता आणि दुःखद असं अनोखं मिश्रण असलेलं जगाला शिकवण देणारा आहे. चला तर जाणून घेऊयात दिवंगत विजयपत सिंघानिया यांच्या जीवनप्रवासातील या १० शिकवणींबद्दलविजयपत सिंघानिया यांचा प्रेरणादायी जीवनप्रवासवारसा जपणं आणि काळानुसार बदलणंविजयपत यांनी रेमंड या सामान्य कंपनीचं रूपांतर एका जगप्रसिद्ध ब्रँडमध्ये केलं असून त्यांच्या जीवनप्रवासातून ही शिकवण मिळते की वारशाचा आदर केला पाहिजे, पण त्याचबरोबर प्रयोग करणं आणि काळानुसार बदलणंदेखील महत्त्वाचं आहे.कामाला महत्वं देण्याबरोबरोच छदं जोपासणंविजयपत सिंघानिया यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी हॉट एअर बलूनमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केला आणि लंडन ते दिल्ली मायक्रोलाइट विमान उडवलं. यातून ही प्रेरणा मिळते की आपल्याला शिकवतात की कामासोबतच आपण आपले छंद आणि आवड जोपासली पाहिजे. यामुळे जीवनातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.मेहनत आणि संयमला महत्व देणंरेमंडला नव्या उंचीवर नेण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि दूरदृष्टी आपल्याला शिकवते की यश एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत आणि संयम आवश्यक आहेत.चूकांचा स्वीकार करणंविजयपत सिंघानिया यांनी कंपनीमधील त्यांचा ३७ टक्के भाग मुलगा गौतमला भेट म्हणून दिला. यानंतर त्यांनी याला आपली सर्वात मोठी चूक म्हटलं. यावरून आपल्याला आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना सावधगिरी बाळगण्याची शिकवणं मिळते.धैर्य आणि आत्मविश्वासानं आव्हानावर मात करणंज्या वयात अनेक लोक साधारणपणे निवृत्तीची योजना आखतात, त्या वयात विजयपत सिंघानिया यांनी एक नवा विक्रम रचला. यातून आपल्याला अशी शिकवण मिळते की, आपलं वय हे फक्त आकडा आहे. धैर्य आणि आत्मविश्वासानं कोणत्याही आव्हानावर मात करता येते.अपूर्ण गोष्टींचा स्वीकार करून पुढे जाणंविजयपत सिंघानिया यांनी त्यांच्या 'अॅन इनकम्प्लीट लाईफ' या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, आयुष्य कधीच पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. आयुष्यात नेहमीच काहीतरी अपूर्ण राहतं आणि ते स्वीकारून पुढे जायला हवं.यशाच शिखर गाठूनही नम्रपणा जपणंविजयपत सिंघानिया यांनी आपल्या जीवनात मोठी कामगिरी केलीय. मात्र, यशाच शिखर गाठूनही त्यांनी आपली नम्रता कधीही सोडली नाही. आपणही साधेपणा आणि नम्रता यांना आपल्या जीवनाचा पाया बनवलं पाहिजे.चुकीच्या निर्णयांची जबाबदारी घेणंविजयपत सिंघानिया यांनी ज्या पद्धतीनं आपल्या चुकीच्या निर्णयांची जाहीरपणे जबाबदारी स्वीकारली, त्यातून आपल्याला हा धडा मिळतो की आपण आपल्या चुका मान्य कराव्यात आणि इतरांना सावध करावं, जेणेकरून ते त्या चुकांची पुनरावृत्ती करणार नाहीत.विजयपत सिंघानिया यांचं आयुष्य चढ-उतारांनी भरलेलं होतं. त्यांनी श्रीमंतीतून गरिबीकडे आणि पुन्हा श्रीमंतीकडे असा प्रवास अनुभवला. २८ मार्च २०२६ रोजी त्यांचं निधन झालं असून त्यांनी आपली जीवनकथा सर्वांसाठी मागे ठेवली आहे. शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना विजयपत सिंघानिया यांच्या जीवनातून प्रेरणा मिळणार आहे.
Sunil Tatkare : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केला असून, यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Volodymyr Zelensky:युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केलेल्या एका खळबळजनक दाव्याने एकच गोंधळ उडाला आहे.
IPL 2026 : पहिला सामना हरण्याची मुंबई इंडियन्स परंपरा राखणार?
मुंबई : आयपीएल २०२६ (IPL 2026) मधील दुसरा सामना मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध कोलकता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता रंगणार आहे. आयपीएलमध्ये तब्बल पाच वेळा विजेतेपद मिळवणारा संघ अशी मुंबईची ख्याती आहे. पण २०२० पासून मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळविता आलेले नाही. आतापर्यंत झालेल्या १८ हंगामांपैकी सलग १३ आणि एकूण १४ वेळा मुंबई इंडियन्सच्या त्यांच्या साखळी फेरीतील सलामीच्या सामन्यात पराभव झाला आहे. यंदाच्या सलामीच्या सामन्यात हरल्याल मुंबई इंडियन्स सलग चौदाव्यांदा आणि एकूण १५ वेळा त्यांचा साखळी फेरीतील सलामीचा सामना गमावल्याचा नवा विक्रम नोंदवणार आहेत. हा नको असलेला विक्रम टाळण्यात मुंबईची टीम यशस्वी होणार का याकडे अनेकांचे लक्ष आहे.साखळी सामन्यांमध्ये असलेल्या गटामध्ये अन्य संघांच्या तुलनेत मुंबई इंडियन्सचे पारडे कागदावर तरी प्रभावी दिसत आहे. वानखेडे स्टेडियम या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्स पहिला विजय मिळवते का पाहुया. या सामन्यात मुंबईचे पारडे जड वाटते. विश्वचषक २०२६ मधील ४ हुकमी एक्के मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळताना दिसतील. कर्णधार हार्दिक पांड्या, विश्वचषक २०२६ भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार याादव, तिलक वर्मा, विश्वचषक २०२६ गाजवलेला गोलंदाज जसप्रीत बुमराह. त्याशिवाय रोहित शर्मा, क्विंटन डीकॉक, नमन धीर, रायन रिकल्टन, शेरफेन रुदरफोर्ड , कॉर्बीन बॉश असे चांगले फलंदाज मुंबई इंडियन्सकडे आहेत. मुंबईची पलटन फलंदाजीत काय कमाल करते, याची उत्सुकता राहील. गोलंदाजीत बुमराह, टेंट बोल्ट, दिपक चहर, शार्दुल ठाकुर, मयांक मारकंडे, कॉर्बीन बॉश असे गोलंदाज आहेत. कोलकता नाइट रायडर्स संघात कर्णधार अजिंक्य रहाणे, कॅमरुन ग्रीन, फिन एलेन, टिम सेफर्ट, यष्टीरक्षक, मथीशा पथिराना रिंकू सिंग, सुनील नारायण असे नामांकीत खेळाडू आहेत फलंदाजीत अजिंक्य रहाणे, कॅमरुन ग्रीन, फिन एलेन, रचिन रविंद्र, रिंकू सिंग, रोवमॅन पॉवेल, अंगरीश रघुवंशी असे नामाकिंत फलंदाज आहेत. गोलंदाजीत सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती, मथीशा पथिराना, उमरान मलिक, ब्लेसिंग मुझारबानी असे नामांकित गोलंदाज आहेत. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. मुंबईचे वानखेडे स्टेडियम फलंदाजीसाठी अनुकूल मानले जाते. मुंबई इंडियन्सला कोलकता नाइट रायडर्स कशी काय टक्कर देते पाहूया.
Viraj Jagtap : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा अपघात झाला असून, त्याच्या हातावर शस्त्रक्रिया पार पडली.
आयआरजीसीचा मोठा दावा; इराणने अमेरिकेचे एफ-१६ लढाऊ विमान पाडले
नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणने अमेरिकेचे लष्करी तळ आणि त्यांची एफ-१६ लढाऊ विमाने लक्ष्य केल्याचा मोठा दावा केला आहे. इराणच्या निमलष्करी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचा हवाला देत, स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे की, त्यांनी एक एफ-१६ लढाऊ विमान आणि एक अमेरिकन एमक्यू-९ ड्रोन पाडले आहे. मात्र, अमेरिकेने याबाबत कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.इराणच्या तसनीम वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार ( Tasnim News Agency), इराणी नागरिक आणि औद्योगिक स्थळांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. आयआरजीसीचा (IRGC) दावा आहे की, त्यांनी 'व्याप्त प्रदेशां'मधील अमेरिकी-इस्रायली तळांना लक्ष्य केले.आयआरजीसीकडून एफ-१६ जेट पाडल्याचा दावाआयआरजीसीने दावा केला आहे की, त्यांनी दक्षिण इराणमधील शिराझ शहरावरून उडणारा एक अमेरिकन MQ-9 ड्रोन यशस्वीरित्या पाडला. आयआरजीसीने एका अमेरिकन F-16 लढाऊ विमानावर हल्ला केल्याचाही दावा केला आहे, मात्र झालेल्या नुकसानीचा किंवा त्याच्या ठिकाणाचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.अमेरिकेने या दाव्यांना दुजोरा दिलेला नाहीमात्र, अमेरिकेकडून या दाव्यांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. लष्करी तज्ज्ञांच्या मते, अशा दाव्यांची स्वतंत्र पुष्टी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण सध्या दोन्ही बाजूंनी माहिती युद्धही (Information War) सुरू आहे.मध्य पूर्वेतील तणाव सातत्याने वाढत आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका एकमेकांवर हल्ले करत आहेत. हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या, इराणसोबत सुरू असलेले इस्रायल-अमेरिकेचे युद्ध केव्हा आणि कोणत्या टप्प्यावर संपेल यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणने अमेरिकेचे लष्करी तळ आणि त्यांची एफ-१६ लढाऊ विमाने लक्ष्य केल्याचा मोठा दावा केला आहे. इराणच्या निमलष्करी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचा हवाला देत, स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे की, त्यांनी एक एफ-१६ लढाऊ विमान आणि एक अमेरिकन एमक्यू-९ ड्रोन पाडले आहे. मात्र, अमेरिकेने याबाबत कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.इराणच्या तसनीम वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार ( Tasnim News Agency), इराणी नागरिक आणि औद्योगिक स्थळांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. आयआरजीसीचा (IRGC) दावा आहे की, त्यांनी 'व्याप्त प्रदेशां'मधील अमेरिकी-इस्रायली तळांना लक्ष्य केले.आयआरजीसीकडून एफ-१६ जेट पाडल्याचा दावाआयआरजीसीने दावा केला आहे की, त्यांनी दक्षिण इराणमधील शिराझ शहरावरून उडणारा एक अमेरिकन MQ-9 ड्रोन यशस्वीरित्या पाडला. आयआरजीसीने एका अमेरिकन F-16 लढाऊ विमानावर हल्ला केल्याचाही दावा केला आहे, मात्र झालेल्या नुकसानीचा किंवा त्याच्या ठिकाणाचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.अमेरिकेने या दाव्यांना दुजोरा दिलेला नाहीमात्र, अमेरिकेकडून या दाव्यांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. लष्करी तज्ज्ञांच्या मते, अशा दाव्यांची स्वतंत्र पुष्टी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण सध्या दोन्ही बाजूंनी माहिती युद्धही (Information War) सुरू आहे.मध्य पूर्वेतील तणाव सातत्याने वाढत आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका एकमेकांवर हल्ले करत आहेत. हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या, इराणसोबत सुरू असलेले इस्रायल-अमेरिकेचे युद्ध केव्हा आणि कोणत्या टप्प्यावर संपेल यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
रेमंड समुहाच्या विजयपत सिंघानियांचे मुंबईत निधन
मुंबई : रेमंड समुहाचे (Raymond Group) माजी अध्यक्ष (चेअरमन) विजयपत सिंघानिया (Vijaypat Singhania) यांचे मुंबईत (Mumbai) निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. विजयपत सिंघानिया यांचे पुत्र उद्योगपती गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांनी ही माहिती दिली. मुंबईच्या चंदनवाडी स्मशानभूमीत रविवारी दुपारी विजयपत सिंघानिया यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.विजयपत सिंघानिया हे एक दूरदृष्टी असलेले उद्योगपती, नेता, समाजसेवक होते. त्यांचा वारसा पुढील पिढीला प्रेरणा देईल, असा विश्वास उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी व्यक्त केला.भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रात रेमंड हा एक नावाजलेला उद्योग समूह आहे. या समुहाचे नेतृत्व अनेक वर्षे विजयपत सिंघानिया यांनी केले. सिंघानिया यांनीच निवृत्ती होत काही वर्षांपूर्वी समुहाची जबाबदारी मुलाकडे अर्थात गौतम सिंघानिया यांच्याकडे सोपवली. पण लवकरच मुलाचे आणि त्यांचे वाद सुरू झाले. संपत्तीच्या मुद्यावरून वाद विकोपाला गेला. यानंतर विजयपत सिंघानिया आणि गौतम सिंघानिया या पितापुत्रात कायमचा दुरावा निर्माण झाला.मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोकउद्योगपती विजयपत सिंघानिया यांच्या निधनाचे वृत्त कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक प्रकट केला.Deeply saddened to know about the demise of former Chairman of Raymond Group, Padma Bhushan Dr. Vijaypat Singhania ji.His contribution to the textile industry, his philanthropy and adventurous spirit will continue to inspire generations together.‘Raymond - The Complete Man’ is… pic.twitter.com/le9Zfgi6wb— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 28, 2026कोण होते विजयपत सिंघानिया ?श्रीमंत व्यक्ती. रेमंड समुहाचे माजी अध्यक्ष (चेअरमन). विमान वाहतूक आणि चित्रपट उद्योगातही प्रभाव होता.सुटिंग आणि शर्टिंगसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या रेमंडची स्थापना १९२५ मध्ये आणि पहिले रिटेल शोरूम १९५८ साली मुंबईतवस्त्रोद्योग, अभियांत्रिकी आणि विमान वाहतूक क्षेत्रात विजयपत सिंघानिया यांच्या नेतृत्वात समुहाने चांगली कामगिरी केली.विजयपत सिंघानिया यांनी १९८० पासून रेमंड समुहाचे नेतृत्व केले आणि या समुहाला आधुनिक उद्योगसमुहाच्या रुपात विकसित केले.रेमंड समुहाने १९८६ मध्ये 'पार्क अव्हेन्यू' हा प्रीमियम ब्रँड सादर केला. फॅशनेबल ब्रँड्स आणि नवीन शैलींच्या शोधात असलेल्या पुरुषांसाठी कपड्यांची संपूर्ण श्रेणी उपलब्ध करून दिली.मायक्रोलाइट विमानातून लंडन ते नवी दिल्ली असा एकट्याने २३ दिवसांत प्रवास करून 'वेग आणि वेळेचा उत्कृष्ट ताळमेळ राखण्याचा विक्रम विजयपत सिंघानिया यांनी १९८८ मध्ये केला.रेमंड समुहाने १९९० मध्ये ओमानमध्ये पहिली परदेश शोरूम सुरू केली. समुहाने १९९६ मध्ये देशात एअर चार्टर सेवा सुरू केली.भारतीय हवाई दलाने ५००० तासांहून अधिक उड्डाणाच्या अनुभवाबद्दल विजयपत यांना १९९४ मध्ये मानद एअर कमोडोर या पदाने गौरविले.विजयपत सिंघानिया यांना पद्मभूषण, तसेच तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.नोव्हेंबर २००५ मध्ये, वयाच्या ६७ व्या वर्षी, विजयपत यांनी हॉट एअर बलूनमधून सुमारे ६९,००० फूट उंची गाठून जागतिक विक्रम केला.विजयपत २००६ मध्ये मुंबईचे शेरिफ झाले.विजयपत यांनी 'ॲन एंजल इन अ कॉकपिट' नावाचे एक पुस्तक लिहिलेविजयपत सिंघानिया यांनी कंपनीची सूत्रे २०१५ मध्ये मुलाकडे सोपवली. पण लवकरच त्यांचे मुलाशी टोकाचे वाद सुरू झाले. अखेर विजयपत यांनी २०१७ मध्ये एका मुलाखतीत स्वतःच सांगितले की, मुलगा गौतम सिंघानिया याने त्यांना जेके हाऊसमधून बाहेर काढले होते. अनेक माध्यमांच्या वृत्तांनुसार ते भाड्याच्या घरात राहत होते.
Mumbai BMC Commissioner: मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाची वर्णी? ‘या’नावांची होतेयं चर्चा
Mumbai BMC Commissioner: मुंबई महापालिका आयुक्तपदाच्या निवडीसंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार
Rohini Khadse : अकोल्यात गॅस सिलिंडेरसाठी रांगेत उभे असलेल्या वृद्धाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेवरुन रोहिणी खडसे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
US Iran War: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाने आता वेगळे वळण घेतले आहे. त्यातच आता इराणमध्ये अंतर्गत कलहाला सुरुवात झाली असल्याचे समोर येत आहे.
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे सकल हिंदू समाजाकडून विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या विराट हिंदू संमेलनाला मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती लावली. यावेळी हिंदू बांधवांना संबोधित करण्याची संधी लाभली. या संमेलनात दिसलेली हिंदू एकतेची ऊर्जा आणि धर्माभिमान खरोखर प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.विराट हिंदू संमेलनात बोलताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्षांची व्यक्ती निर्माण आणि राष्ट्रनिर्माणाची अखंड यात्रा आजही समाजाला दिशा देणारी आहे. संघाने दिलेले संस्कार, शिस्त आणि राष्ट्रप्रेम यामुळे हिंदू समाज अधिक सक्षम व संघटित होत आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.मंत्री राणे म्हणाले, राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाम हिंदुत्ववादी नेतृत्व असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली लागू झालेला धर्मांतर विरोधी कायदा आपल्या माता-भगिनींच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी एक मजबूत कवच ठरत आहे.पुढे बोलताना, चला, हिंदू एकतेच्या या शक्तीला अधिक बळकट करूया आणि आपल्या धर्म, संस्कृती व राष्ट्रासाठी संघटित होऊया असे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले.
Rain Alert: 'या'राज्यांमध्ये पावसाची शक्यता, मुंबईसह गुजरातमध्ये उष्णतेची लाट
नवी दिल्ली: देशभरात हवामानात बदल दिसून येत आहे. देशाची राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात आज पावसाची शक्यता आहे. सकाळ आणि संध्याकाळी सौम्य गारवा जाणवतो, पण दुपारपर्यंत कडक ऊन आणि उष्ण वाऱ्यांमुळे लोकांना त्रास होत आहे. हवामान विभागाने (आयएमडी) आज दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, विभागाने असा इशाराही दिला आहे की, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात मोठी वाढ होईल, ज्यामुळे सुरुवातीच्या दिवसांतच उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये सध्या हवामान पूर्णपणे कोरडे आहे. या प्रदेशात धुळीने भरलेले वारे अपेक्षित आहेत, यामुळे केवळ उष्णता वाढणार नाही, तर दृश्यमानता आणि हवेच्या गुणवत्तेवरही परिणाम होईल. उत्तराखंडसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये, खालच्या भागात अधिक प्रखर सूर्यप्रकाश मिळत आहे, ज्यामुळे बर्फ वितळण्याची प्रक्रिया वेगवान होत आहे आणि दिवसाचे तापमान वाढत आहे.जैसलमेर आणि बारमेरमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारादरम्यान, राजस्थानमध्ये उष्णतेची लाट तीव्र होऊ लागली आहे. जैसलमेर, बारमेर आणि बिकानेरसारख्या पश्चिम जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचत असून, त्यामुळे उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजधानी जयपूरमध्येही उष्ण वाऱ्यांमुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडलेले असतात. प्रशासनाने लोकांना दुपारच्या वेळी अनावश्यक बाहेर फिरणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.गुजरात आणि मुंबईमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्रगुजरातमध्ये उष्णतेचा सर्वाधिक त्रास जाणवत असून, तापमान ३५ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. उष्ण वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मुंबईत समुद्राच्या आर्द्रतेमुळे निर्माण झालेल्या दमट उष्णतेने नागरिकांना त्रास होत आहे. येथील तापमान ३०-३३ अंश सेल्सिअस असले तरी, जाणवणारी उष्णता खूपच जास्त तीव्र आहे.मान्सूनपूर्व पावसामुळे दक्षिण भारताला दिलासादरम्यान, दक्षिण भारतात हवामान अनुकूल दिसत आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये मान्सूनपूर्व हालचाली सुरू झाल्या आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. ढगांच्या हालचालीमुळे तापमान कमी होईल.
Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातला आज 29 मार्चला न्यायालयात हजर केले जाणार असून, चौकशीतून एक मोठी माहिती समोर आली आहे.
Rinku Rajguru Romeo post : रिंकू राजगुरूने ‘डार्लिंग’म्हणत शेअर केली खास पोस्ट
Rinku Rajguru Romeo post : रिंकूने या पोस्टला 'आय एम सो इन लव्ह विथ यू' हे रोमँटिक इंग्रजी गाणे जोडले आहे.
मुंबईत मूर्तिकारांना निशुल्क मंडप परवानगी, तात्पुरती विनामुल्य जागा
मुंबई: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच मुंबई महानगरात पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याकरीता प्रोत्साहन मिळावे म्हणून महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना तात्पुरता मंडप उभारण्यासाठी नि:शुल्क परवानगी दिली जाणार आहे. तसेच महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या जागेनुसार ‘प्रथम अर्जदारास, प्रथम प्राधान्य ’ या तत्वावर फक्त पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांनाच आवश्यक ती जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासोबतच पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना शाडू माती विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.मूर्तिकारांना हव्या असलेल्या विविध परवानग्यांसाठी संगणकीय प्रणालीवर ‘एक खिडकी योजना’ ही शुक्रवार, २७ मार्च २०२६ पासून महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे श्रीगणेशोत्सवासह नवरात्रौत्सवातील मूर्ती घडविण्यासाठी देखील १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर मूर्तिकार अर्ज करू शकणार आहेत. तसेच दिनांक २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत या परवानगीची कालमर्यादा राहणार आहे. मूर्तिकारांना तात्पुरते मंडप उभारण्याकरीता मार्गदर्शक बाबी स्पष्ट करणारे परिपत्रक बृहन्मुंबई महानगरपालिकेने नुकतेच निर्गमित केले आहे.श्रीगणेशोत्सव सन २०२६ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यावर महानगरपालिकेचा संपूर्ण भर आहे. यासाठी आतापासून नियोजन व कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून निरनिराळ्या सेवा-सुविधा पुरवितांना पर्यावरणपूरक बाबींना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १२ मे २०२० रोजी प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला दिले आहेत. हे लक्षात घेता सन २०२६ मधील श्रीगणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी उत्सवांच्या अनुषंगाने महानगरपालिकेने मूर्तिकारांसाठी तात्पुरते मंडप उभारणे व अन्य बाबींकरीता परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, अशी माहिती महानगरपालिकेचे उपायुक्त (परिमंडळ २) तथा श्रीगणेशोत्सवाचे समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी दिली आहे.कुठल्या संकेतस्थळावर जावून माहिती घ्याल- सार्वजनिक अथवा खासगी जागेवर मूर्ती घडविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात मंडप उभारण्याकरीता परवानगीची प्रक्रिया एक खिडकी योजनेद्वारे संगणकीय प्रणालीमार्फत (ऑनलाईन) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर (https://portal.mcgm.gov.in) विभागीय सहायक आयुक्त व परिमंडळ उप आयुक्त यांच्यामार्फत पार पाडण्यात येईल.- सार्वजनिक अथवा खासगी जागेवर मंडपांकरीता अर्ज सादर करताना मागील वर्षांची परवानगीची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक.-पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून विभाग स्तरावर महानगरपालिकेच्या उपलब्ध असलेल्या जागेनुसार ‘प्रथम अर्जदारास, प्रथम प्राधान्य’ या तत्वावर केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांस आवश्यक ती जागा विनामूल्य, पण त्यासाठी अर्जदार स्वत: मूर्तिकार असणे अनिवार्य.- पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्याकरिता मूर्तिकारांना विनामूल्य शाडू माती तसेच पर्यावरण विभागामार्फत मूर्तिकारांना विनामूल्य नैसर्गिक /पर्यावरणपूरक रंग उपलब्धतेनुसार पुरविण्यात येणार.- मूर्तिकारांना मंडपाची परवानगी देताना सदर परवानगी केवळ मूर्तिकारांसाठी असेल. या ठिकाणी केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्यात येईल. तेथे 'पीओपी मूर्ती घडविता येणार नाही. तसेच सदर परवानगीचा उपयोग कोणत्या प्रकारची मूर्ती विक्रीसाठी करता नाही. तसे स्वयंघोषित हमीपत्र देखील महानगरपालिकेकडे सादर करावे लागणार.- मूर्तिकारांना मंडप उभारण्यासाठी रस्ते / फूटपाथवर खड्डे खणण्यास प्रतिबंध असेल.
Saba Azad Hospitalised: हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद रुग्णालयात दाखल; चाहत्यांना केलं ‘हे’आवाहन
Saba Azad Hospitalised:
Bhooth Bangla : बॅाक्स अॅाफिसवर धुरंधर 2 चा बोलबाला! ‘भूत बंगला’ची टीम मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Bhooth Bangla : बॅाक्स अॅाफिसवर धुरंधर 2 ची मोठी क्रेझ आहे. या पार्श्वभूमीवर भूत बंगला चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा विचार सुरू आहे.
Top 10 News :राज्यात नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना भावनिक आवाहन करत त्यांचे पक्ष सोडण्याच्या निर्णयाचे मत परावर्तित केले होते,
Onion Price crash : शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरी केवळ ३०० ते ८०० रूपये प्रति क्विंटल इतका कमी दर
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. ११ हजार २०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या विमानतळाचा पहिला टप्पा दरवर्षी सुमारे १.२ कोटी प्रवाशांना हाताळू शकेल. हे उत्तर प्रदेशातील ५ वे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. हे विमानतळ केवळ नोएडा आणि ग्रेटर नोएडासाठीच नव्हे, तर दिल्ली, गाझियाबाद आणि फरिदाबाद तसेच अलीगढ, मथुरा आणि आग्रासाठीही खूप महत्त्वाचे ठरेल. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दिल्ली-एनसीआरसाठी दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून विकसित करण्यात आले आहे. याआधी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे संपूर्ण प्रदेशातील एकमेव विमानतळ होते.प्रवाशांसह पहिले उड्डाण केव्हा होईल?केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरपू राममोहन नायडू यांच्या म्हणण्यानुसार, विमानतळाचा परवाना जारी झाल्यानंतर विमानसेवा सुरू होण्यामध्ये साधारणपणे ४५ ते ६० दिवसांचे अंतर असते. नोएडा विमानतळाला या महिन्याच्या ६ तारखेला विमानतळाचा परवाना मिळाला आहे. यावरून असे सूचित होते की, आजच्या उद्घाटनानंतर एप्रिलच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक सेवा सुरू होतील. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो या विमानतळावरून पहिले उड्डाण करेल. इंडिगो व्यतिरिक्त, अकासा एअर आणि एअर इंडिया देखील नोएडा विमानतळावरून सेवा चालवतील.कोणत्या शहरांसाठी सेवा सुरू होतील?नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरुवातीला मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद यांसारख्या प्रमुख शहरांसाठी सेवा सुरू करेल, त्यानंतर लखनौ, अहमदाबाद, पुणे, गोवा आणि जयपूरसाठी सेवा सुरू होतील अशी अपेक्षा आहे.नोंदणी कधी सुरू होईल?नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या व्यावसायिक उड्डाणाच्या अंदाजे ४-६ आठवडे आधी बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे.नोएडा विमानतळाची वैशिष्ट्येनोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पांपैकी एक आहे. या विमानतळावर ३ हजार ९०० मीटर लांबीची धावपट्टी असून, ती मोठ्या आकाराची विमाने हाताळण्यास सक्षम आहे. येथे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम (ILS) आणि प्रगत एअरफिल्ड लायटिंगसह आधुनिक नेव्हिगेशन प्रणालीदेखील आहे, ज्यामुळे सर्व प्रकारच्या हवामानात दिवस-रात्र कार्यक्षमतेने कामकाज करणे शक्य होते. या विमानतळावर एक मजबूत कार्गो प्रणाली देखील आहे, ज्यामध्ये मल्टी-मोडल कार्गो हब, एक एकात्मिक कार्गो टर्मिनल आणि एक लॉजिस्टिक्स झोन यांचा समावेश आहे. ही कार्गो सुविधा दरवर्षी २,५०,००० मेट्रिक टनपेक्षा जास्त माल हाताळण्यासाठी तयार करण्यात आली आहे, आणि ही क्षमता अंदाजे १.८ दशलक्ष मेट्रिक टनपर्यंत वाढवण्याची क्षमता आहे.
मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित करत हा प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवल्यानंतर अखेर कंत्राटदार कंपनी वरमली. ज्या कंत्राटदार कंपनीने तीन वेळा वाटाघाटींमध्ये केवळ ५७. ७३ कोटी रुपयांची सूट देत हे काम ९ टक्क्यांमध्ये करण्याची तयारी दर्शवली हाती, तिथे स्थायी समितीच्या मागणीनंतर संबंधित कंत्राटदाराने गारगाई धरणाचे काम १.९० टक्क्यांमध्ये करण्यास तयार दर्शवली आहे. त्यामुळे अखेर पुन्हा एकदा गारगाई धरणाचा सुधारीत प्रस्ताव स्थायी समितीला सादर झाला आहे. त्यामुळे महापालिकेचे निव्व्ळ कंत्राटात २६९ कोटी तर विविध करांसहच्या कंत्राटात ३४४ कोटी रुपयांची बचत झाली आहे. त्यामुळे उबाठाच्या काळात अव्वाच्या सव्वा दरात कंत्राटे मंजूर करून महापालिकेच्या निधीची उधळपट्टी केली जात होती, तिथे भाजप शिवसेना महायुतीच्या काळात कंत्राटदाराला दर कमी करायला लावून कोट्यवधी रुपयांचा निधी वाचवला जात आहे.मुंबई महापालिकेच्यावतीने मागील अनेक वर्षांपासून बहुप्रतिक्षेत असलेल्या गारगाई प्रकल्पासाठी सुमारे ६७ मीटर उंच आणि सुमारे ७०० मीटर लांबीचे रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट तंत्रज्ञानावर आधारित धरण उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. या धरणाचे बांधकाम २.२ मीटर व्यासाचा आणि सुमारे १.६ किलोमीटर लांबीचा जलवाहन बोगदा बांधण्यात येणार असून त्यामध्ये पाच रेडियल गेट्ससह स्पिलवे, स्टॉपलॉग, टर्बाइन तसेच अंतर्गत काँक्रीट रस्ते आणि पूल यांचा समावेश असेल. या प्रकल्पातून किमान १.२ मेगावॅट वीज निर्मिती करण्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्प कामासाठी महापालिकेच्यावतीने सोमा इंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली. महापालिकेच्या कार्यालयीन अंदाजापेक्षा ११ टक्के अधिक बोली लावणारी कंपनी पात्र ठरली असून या कामासाठी विविध करांसह ५४०० कोटी रुपये एवढा खर्च केला जाणार आहे.या बाबतचा प्रस्ताव प्रथम स्थायी समितीच्या बैठकीपुढे आल्यानंतर सभागृहनेते गणेश खणकर यांनी महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा अधिक दरात हे काम मिळवलेले असून प्रशासनाने पुन्हा वाटाघाटी करून कंपनीला अंदाजित दरातच काम करण्यास भाग पाडावे अशी सूचना केली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव सभागृहनेत्यांच्या उपसूचनेनुसार केलेल्या मागणीनुसार स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी फेरविचारासाठी परत पाठवला होता. पण हा प्रस्ताव पुन्हा एकदा हा मंजुरीसाठी स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. नव्याने सादर केलेल्या प्रस्तावामध्ये संबंधित सोमा कंपनीने कार्यालयीन अंदाजापेक्षा ८.९८ टक्के अधिक दराने कंत्राट काम करण्याऐवजी १. ९६ टक्के अधिक दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे तब्बल ७ टक्के दर कमी केला आहे. त्यामुळे जिथे हे कंत्राट पूर्वी विविध करांसह ५३९६. ४३ कोटी रुपयांचे होते, तिथे आता स्थायी समितीने प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर कंत्राटदाराने दर कमी विविध करांसह ५०५१.८२ कोटींमध्ये हे काम करण्यास तयारी दर्शवली आहे. त्यामुळे तब्बल ३४४ कोटी रुपयांची बचत होणार आहे. तर विविध कर वगळता या कंपनीने महापालिकेच्या अंदाजित दर ३००६.७५ कोटी रुपयांच्या तुलनेत पूर्वी ३३३४. ३८ कोटींमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आता स्थायी समितीने दणका दिल्यानंतर हे काम विविध करत वगळता निव्वळ कंत्राट ३०६५.६८ कोटींमध्ये काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे निव्वळ कंत्राट कामांत २६८.८० कोटी रुपयांची बचत झाली आहे.
Weather Alert : 1 ते 4 एप्रिल दरम्यानच्या काळात राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भासह विविध ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मी अरुणाचल प्रदेशातील इटानगरची रहिवासी मरीना नीडो आहे- नीडो तानियाची आई, ज्याला दिल्लीत जमावाने मारहाण करून ठार केले. जर असा द्वेष वाढत राहिला, तर एके दिवशी परिस्थिती धोकादायक होऊ शकते. आम्हाला फक्त एवढेच हवे आहे की- तुम्ही आम्हाला समजून घ्या. आम्ही वेगळे दिसतो, पण वेगळे नाही. आम्हीही याच देशाचे आहोत. माझ्या मुलाला फक्त यासाठी मारण्यात आले, कारण त्याचा चेहरा तुमच्यापेक्षा वेगळा होता. तो ओरडत होता- ‘मी भारतीय आहे…’ पण जमावाने त्याचे एकही ऐकले नाही. विचार केला होता- माझा मुलगा शिकून मोठा माणूस बनेल, पण त्याचे प्रेत विमानाने परत आले. नीडो इतर मुलांसारखा नव्हता. अनेकदा माझ्याकडे 5-10 हजार मागायचा. मी विचारायचे- एवढे पैसे कुठे जातात? तो हसून टाळायचा. नंतर कळले- तो गरजूंची मदत करायचा. मित्रांची फी भरायचा. मला न सांगता घरातील ड्रायव्हर्सना पैसे द्यायचा. त्याच्या मनात माणुसकी भरलेली होती. तो माझ्या शेजारी बसून म्हणायचा- मम्मी, मोठा झाल्यावर अशी एक जागा बनवेन, जिथे मंदिर, गुरुद्वारा, चर्च आणि मशीद- सर्व असतील… आणि प्रत्येकजण तिथे येऊन एकत्र प्रार्थना करू शकेल. मी त्याला बघतच राहिले… आणि विचार करत होते- हे बाळ मोठे होऊन शेवटी काय बनेल? नीडो पाच मुलांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. इटानगरच्या छोट्याशा शाळेतून शिकून जेव्हा त्याला हरियाणाच्या डीपीएस पानिपतमध्ये पाठवत होते, तेव्हा मनात भीती होती… पण एक विश्वासही होता की- माझा मुलगा काहीतरी मोठे करेल. पानिपतमध्ये विज्ञानाचे शिक्षण घेतले. १२वीनंतर म्हणाला- मम्मी, मी समाजशास्त्र शिकेन आणि परदेशात जाईन. मी विचारले- तुला काय बनायचे आहे? तो फक्त हसला. आता समजते आहे- त्याला काही बनायचे नव्हते, तर काहीतरी बदलायचे होते. 12वी नंतर त्याने लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. वार्षिक शुल्क 68 हजार रुपये होते. पण जेव्हा त्याची मार्कशीट पाहिली गेली, तेव्हा युनिव्हर्सिटी म्हणाली - इतका हुशार मुलगा आमच्याकडे शिकेल, हेच आमच्यासाठी पुरेसे आहे. त्यांनी शुल्क कमी करून 13 हजार केले. त्या दिवशी मला वाटले - माझा मुलगा खरोखरच काहीतरी वेगळा आहे. पण एक भीती मनात होती. मी वर्णद्वेष अनुभवला होता, म्हणून मी त्याला नेहमी समजावत असे - सावध रहा, सगळीकडे लोक सारखे नसतात, पण त्याने कधीच तक्रार केली नाही - ना डीपीएसमध्ये, ना युनिव्हर्सिटीमध्ये. सुट्ट्यांमध्ये घरी यायचा तेव्हा रिकाम्या हाताने यायचा नाही. सर्वांसाठी काहीतरी घेऊन यायचा. आमच्या घरचे ड्रायव्हर मुस्लिम आहेत - ईदला त्यांच्यासाठी टोपी आणायचा. त्यांच्यासाठी ख्रिसमस आणि नवीन वर्षाला पार्टी करायचा. तो सगळ्यांना हसवायचा, घराचे वातावरण हलके करायचा. नीडो मला कधीच उदास पाहू शकत नव्हता. चेहऱ्यावर थोडी जरी उदासी दिसली की, तो लगेच काहीतरी विनोद करायचा. एक दिवस हसत-हसत म्हणाला - मम्मी, मी दोन लग्न करेन. मी दचकले - काय? तो हसून म्हणाला- जेणेकरून मी तुला नेहमी आनंदी ठेवू शकेन… मग घरात कोणत्याही नोकराची गरज पडणार नाही. हे त्याचे बालिश बोलणे होते, पण हेतू खरा होता- मला आनंदी पाहणे. कधीकधी तो स्वयंपाकघरात जायचा, काहीतरी बनवून स्वतःच चाखायचा आणि म्हणायचा- मम्मी, एक दिवस मी सगळं सांभाळून घेईन. खरं सांगायचं तर, मला त्याच्यावर विश्वास होता. मग एक दिवस असा आला, जेव्हा सगळं काही बदललं. त्या दिवशी तो दिल्लीत त्याच्या बहिणीच्या घरी होता. बॅग पॅक होती, गाडी खाली उभी होती. तो वाकून बुटाचे फीत बांधत होता… तेवढ्यात फोन वाजला. दुसऱ्या बाजूने एका मुलीचा घाबरलेला आवाज होता- भैया, माझ्या भावाची तब्येत खूप खराब आहे. आम्ही लाजपत नगरमध्ये, चौथ्या मजल्यावर आहोत… कृपया या. मी एकटी आहे. नीडोने एक सेकंदही विचार केला नाही. ड्रायव्हरला म्हणाला- थांब, कॉलेजला नंतर जाऊ. त्याने लगेच ॲम्ब्युलन्स बोलावली आणि लाजपत नगरसाठी निघाला. अरुंद गल्ल्यांमध्ये तो भटकत राहिला- घर मिळत नव्हते. फोन कानाला लावला होता- तिकडून घाईघाईने आवाज येत होता- लवकर या, तब्येत आणखी खराब होत आहे… जवळ एक मिठाईचे दुकान आहे, तिथून पत्ता विचारून घ्या. तो थेट त्याच दुकानात पोहोचला- अंकल, एक पत्ता विचारायचा आहे. दुकानदाराने न पाहताच सांगितले- माहीत नाही. तो पुन्हा गल्लीत भटकू लागला. फोन पुन्हा वाजला- यावेळी आवाज अधिक घाबरलेला होता- भैया, लवकर ये. थकून तो त्याच मिठाईच्या दुकानात परत गेला. तो म्हणाला- अंकल, प्लीज, माझ्या मित्राचा जीव जाऊ शकतो. दुकानदार चिडला- स्वतःला काय समजतोस? सलमान खान, अक्षय कुमार? वारंवार का येतोयस? एवढे बोलून त्याने त्याला धक्का दिला. बस इथूनच सर्व काही बदलले. नीडोने मागे वळून काहीही म्हटले नाही, फक्त रागाने दुकानाच्या काउंटरवर हात मारला- काचेला हलकी भेग पडली. पुढच्याच क्षणी आजूबाजूचे दुकानदार जमा झाले. एकाने कॉलर पकडली, एकाने ठोसा मारला. तो काही बोलूही शकला नाही. मग पोलिसांना बोलावण्यात आले. तिकडे, लाजपत नगरला जाताना त्याने मला फोनवर सांगितले होते आणि 10 हजार रुपये मागितले होते. मी पैसे पाठवले होते. तेच पैसे त्याने पोलिसांना दिले. पोलिसांनी त्यातून 6 हजार दुकानदाराला दिले आणि 4 हजार स्वतःकडे ठेवले. पोलिस त्याला आपल्यासोबत घेऊन गेली. पोलीस ठाण्यात बसवून ठेवले- जखमी झाला होता, तरीही रुग्णालयात नेले नाही. थोड्या वेळाने पोलिस त्याला पुन्हा त्याच दुकानावर घेऊन गेली- म्हटले, 'समझोता करायचा आहे.' पण तिथे पुन्हा गर्दी जमली. एकाने म्हटले- हाच आहे, काच फोडणारा मुलगा! आणि गर्दीने पुन्हा हल्ला केला. त्याला पुन्हा निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. मी सतत फोन करत होते, पण तो उचलू शकत नव्हता. जेव्हा गर्दीने त्याला सोडले, तेव्हा त्याने कॉल उचलला. आवाज खूप हळू होता- 'सर्व ठीक आहे मम्मी… फक्त थोडी जखम आहे… औषध घेतले… बाय बाय…,' फोन कट झाला. कदाचित त्याला स्वतःलाही माहीत नव्हते- हेच त्याच्या आयुष्यातील शेवटचे बोलणे असेल. दुसऱ्या दिवशी फोन आला. स्क्रीनवर मोठ्या मुलीचे नाव होते. आवाज थरथरत होता- 'मम्मी… नीडो एम्समध्ये आहे… आता तो… राहिला नाही.' एवढे ऐकताच माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला. मी बेशुद्ध पडले. शुद्धीवर आले तेव्हा स्वतःला रुग्णालयात पाहिले. इकडे, मुलाचा मृतदेह हेलिकॉप्टरने गुवाहाटीला आणण्यात आला. आम्ही हेलिकॉप्टरने पोहोचलो. ताबूतमध्ये त्याला पाहिले तेव्हा वाटले - हा तोच मुलगा नाही जो हसत हसत घरातून गेला होता. माझे शरीर थरथरत होते. आम्ही कसेबसे त्याला इटानगरला घेऊन आलो आणि अंत्यसंस्कार केले. सुमारे 15 दिवसांनंतर आम्ही 300 लोक एकत्र जमून दिल्लीला पोहोचलो. रस्ते, कार्यालये, न्यायालये - प्रत्येक ठिकाणी एकच आवाज घुमत होता - नीडोसाठी न्याय हवा आहे. मी जंतर-मंतरवर भाषण दिले. ‘मरीना नीडो स्पीच’ या नावाने तो व्हिडिओ यूट्यूबवर आहे. त्यावर जगभरातील विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळाला - जपान, आफ्रिका, काश्मीर… प्रत्येक ठिकाणाहून आमच्या बाजूने आवाज उठला. लोक लिहीत होते- आंटी, आम्हीही हे सोसले आहे… मागे हटू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. हे वाचून मला नीडोची ती गोष्ट आठवली- मम्मी, मी मोठा झाल्यावर असे काहीतरी करेन की जग मला लक्षात ठेवेल. त्याने खरंच काहीतरी मोठं केलं होतं. संपूर्ण जग त्याला ओळखले होते. फक्त फरक इतकाच होता की तो स्वतः हे पाहण्यासाठी जिवंत नव्हता. काही दिवसांनी लंडनहून बीबीसीची टीम आली. कॅमेरा माझ्यासमोर होता, पण मला फक्त माझ्या मुलाचा चेहरा दिसत होता. अशा प्रकारे नीडो गेल्यानंतर मला रडायला वेळच मिळाला नाही. मी त्याच्या न्यायाच्या लढाईत गुंतले. अश्रू यायचे, पण प्रत्येक वेळी ते पुसून मी एक नवीन फाईल उचलत असे. दिल्लीचे रस्ते, कार्यालयांच्या बाहेर, कोर्टाचे कॉरिडॉर- फक्त कागदपत्रांसह भटकत राहिले. सरकारने वकील दिला, दोषींना शिक्षा मिळेल असे आश्वासनही दिले. पण सत्य वेगळे होते- कार्यवाही संथ, फाईल्स सरकत राहिल्या, तारखा वाढत राहिल्या. काहीच झाले नाही. मी अनेक वकील बदलले. अशा प्रकारे एक वकील जायचा, दुसरा यायचा. करोडो रुपये खर्च केले. शेवटी मी खाजगी वकील केला. तेव्हा केस थोडी पुढे सरकली. या दरम्यान प्रकरण सीबीआयपर्यंत पोहोचले. आशा निर्माण झाली, पण तिथेही माझ्या मुलावरच प्रश्न उपस्थित झाले- म्हटले गेले की त्याचे कागदपत्र नाहीत, त्याचे एससीचे प्रमाणपत्र नाही. तेव्हाच ठरवले- जर मुलाला न्याय मिळत नसेल, तर निदान त्याची कहाणी देशापर्यंत पोहोचावी. मी सरकारला एक मागणीपत्र दिले. त्यात मागणी होती- दिल्लीतील कोणत्याही व्यस्त रस्त्याच्या कडेला नीडोचा उंच पुतळा उभारण्यात यावा, ज्यावर लिहिलेले असावे- त्याला फक्त वेगळा दिसत असल्यामुळे मारण्यात आले. चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांपूर्वी इशारा दाखवण्यात यावा- ईशान्येकडील लोकही याच देशाचे आहेत. रेल्वे स्टेशन, विमानतळ यांसारख्या सार्वजनिक ठिकाणीही हा संदेश लिहिलेला असावा. शाळा आणि विद्यापीठांमध्ये आपल्या संस्कृतीबद्दल शिकवले जावे. सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम चालवले जावेत. पण आजपर्यंत यावर कोणतेही काम झाले नाही. बरं, तिकडे, न्यायालयात पहिल्या सुनावणीचा दिवस आला. न्यायालयीन कक्ष खचाखच भरलेला होता. विरोधी वकील उभा राहिला आणि म्हणाला की नीडो ड्रग्स घेत असे. तो खूप रागीट होता. हे ऐकताच माझं रक्त सळसळलं. मी स्वतःला थांबवू शकले नाही. कटघऱ्यातून बाहेर पडून वकिलाजवळ पोहोचले आणि त्यांची कॉलर पकडली. मी म्हणाले- माझ्या मुलाबद्दल असं काही बोलू नका. कोर्टात एकच गोंधळ उडाला. वकील हसला आणि म्हणाला- यांना बघा... यांचा मुलगाही असाच तापट होता. तेव्हाच न्यायाधीशांनी वकिलाला थांबवले आणि म्हणाले- त्या आई आहेत, त्यांचा राग स्वाभाविक आहे. नंतर माझ्याकडे पाहून त्यांनी मला पुढील सुनावणीला येण्यापासून रोखले. यानंतर प्रकरण लांबतच गेलं - खूप लांब, थकवणारं होतं. मग एक दिवस निकाल आला. कोर्टरूममध्ये शांतता होती. न्यायाधीशांनी दोषींना 10 वर्षांची शिक्षा सुनावली. लोक म्हणत होते- न्याय मिळाला आहे. पण मी तिथेच उभी राहून विचार करत होते- 10 वर्षे एका आयुष्याएवढी असू शकतात का? 12 वर्षांनंतर मिळालेला हा निकाल... माझ्यासाठी आजही अपूर्ण आहे. मी आजही माझ्या मुलासाठी लढत आहे. माझ्या टेबलावर नेहमी एक फाईल असते - ज्यावर 'बेजवाडा समिती' असं लिहिलेलं आहे. 2014 मध्ये सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी ही समिती स्थापन केली होती. समितीने आपल्या तपासणीनंतर शिफारस केली होती- वंशभेदाविरोधात कठोर कायदे बनवले जावेत. ईशान्य भारतासाठी पोलिसांमध्ये स्वतंत्र कक्ष असावा. ईशान्येकडील लोकांसाठी हेल्पलाइन सुरू करावी आणि लोकांना सांगावे की ईशान्य भारत देखील भारताचाच एक भाग आहे. पण या शिफारसी कागदावरच राहिल्या. आज १२ वर्षे झाली, पण नीडो कुठेही गेला नाहीये. तो कोणत्या ना कोणत्या रात्री, माझ्या स्वप्नात परत येतो. मी पाहते- तो उभा आहे, अगदी तसाच, निरागस. स्वप्नात म्हणतो- मम्मी, तिकीट मिळवून दे, मला जायचं आहे. मी झोपेतच त्याला थांबवू इच्छिते, काही विचारू इच्छिते, पण तो निघून जातो. जणू तो विचारत असेल- मम्मी, तुम्ही माझ्यासाठी काही का करत नाहीये? झोप मोडते आणि रात्र पुन्हा लांब होते. आजही त्याची सर्व प्रमाणपत्रे माझ्याकडे आहेत- ओळखपत्र, एटीएम कार्ड, गुणपत्रिका सर्व. कधीकधी मी ती काढून पाहते आणि वाटते, जणू तो आताच दारातून आत येईल. आत्ताच देहरादूनमधून बातमी आली- त्रिपुराच्या एंजेल चकमाची हत्या करण्यात आली. बातमी वाचताच नीडोची आठवण ताजी झाली. जणू तोच प्रसंग पुन्हा समोर उभा राहिला- नीडो गर्दीत ओरडत होता- 'मी भारतीय आहे...' आणि गर्दी... फक्त त्याचा चेहरा पाहत होती, काही ऐकत नव्हती. एंजेलच्या आईबद्दल विचार करते- तीही कदाचित कुठेतरी बसून रडत असेल, अगदी माझ्यासारखीच. अनेकदा त्रिपुराला जाऊन तिला भेटावे असे वाटले, पण हिंमत गोळा करू शकत नाही. आता तर एंजेलही स्वप्नात येऊ लागली आहे, जरी मी त्याला कधी पाहिलेही नाही. ईशान्येकडील लोकांना फक्त एवढेच सांगेन- मी इथपर्यंत लढून आले आहे, आता आणखी कोणीतरी पुढे यावे... नाहीतर आपल्यासोबत हे असेच घडत राहील. एंजेलच्या बातमीनंतर मी सोशल मीडिया पाहणे सोडून दिले आहे. प्रत्येक फोटोत मला माझा नीडो दिसू लागतो. आज नीडो असता, तर तो 31 वर्षांचा असता. कदाचित त्याचे लग्न झाले असते, घरात मुले खेळत असती. तो माझ्या शेजारी बसून म्हणायचा- मम्मी, काळजी करू नकोस, मी आहे. पण डोळ्यासमोर आजही तेच चित्र फिरते- विमानतळ, एक पांढरी शवपेटी… आणि त्यात माझा मुलगा. मी त्याला माझ्या हातांनी स्वीकारले होते, मग अग्नी दिला होता. इटानगरमध्ये आमच्या घरांमध्ये आणि कार्यालयांमध्ये उत्तर भारतातील लोक काम करतात. आम्ही त्यांना पाहुणे मानतो, आदर देतो. पण मनात एक प्रश्न अडकतो- आमच्यासोबत असे का केले जात नाही? जर आम्हीही तुमच्या लोकांशी नीडोसारखं वागलो तर काय होईल? आम्ही ठरवलं तर एका फोन कॉलवर नॉर्थ-ईस्टच्या लोकांना एकत्र करू शकतो - नागालँड, गुवाहाटी, सिक्कीम... प्रत्येक ठिकाणाहून. मग तुमच्यासोबत तेच होईल, जे आमच्यासोबत होतं. त्यांनी माझ्या मुलाला मारून हेलिकॉप्टरने पाठवलं, आम्हीही ठरवलं तर ट्रेनच्या डब्यांना प्रेतांनी भरून पाठवू शकतो. तेव्हा मेनलँड इंडियाच्या लोकांना समजणार नाही की अचानक काय झालं. म्हणून वंशभेदाविरोधात कठोर कायदे बनवा. हे थांबवलं नाही, तर माझ्यासारखाच जखम खाल्लेला दुसरा कोणीतरी एक दिवस उभा राहील. मला या गोष्टी बोलायच्या नाहीत. पण नीडोच्या आठवणीने राग येतो. आमची मुलं दिल्लीत फुकट शिकायला जात नाहीत. ते भाडं देतात, फी भरतात. आमच्याकडे यूपीएससीची कोचिंग नाही, म्हणून आम्ही त्यांना बाहेर पाठवतो - शिकण्यासाठी, जगण्यासाठी... मरण्यासाठी नाही. आमचे डोळे आणि चेहरा वेगळे आहेत - हे आम्ही नाही, देवाने बनवले आहे. देवाला विचारा, त्याने आम्हाला वेगळे का बनवले आहे. जर तुम्हाला सर्वजण सारखे दिसावेत असे वाटत असेल, तर सरकारला सांगा - सर्व कपड्यांच्या फॅक्टऱ्या फक्त साड्या बनवतील, संपूर्ण देशात फक्त गहू पिकवला जाईल. मग सर्वजण सारखे कपडे घालतील, सारखे खातील. तेव्हा कदाचित आम्हीही तुमच्यासारखे दिसू लागू. पण खरंच असं शक्य आहे का, तरीही आमचा चेहरा बदलणार नाही? (मरीना नीडोने आपल्या या भावना भास्कर रिपोर्टर मनीषा भल्ला यांच्याशी शेअर केल्या)
अमेरिकी सैनिकांना शवपेट्यांमध्ये पाठवणार; इराणची अमेरिकेला धमकी
नवी दिल्ली: इराणच्या इंग्रजी दैनिक 'तेहरान टाइम्स'च्या पहिल्या पानावर आज 'नरकात आपले स्वागत आहे' (Welcome To Hell) या मथळ्याखाली अमेरिकेला एक तीव्र इशारा देण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, इराणी भूमीवर पाऊल ठेवणारा कोणताही अमेरिकन सैनिक 'शवपेटीतून परत येईल' असा इशारा देण्यात आला आहे. जेव्हा अमेरिकन माध्यमांनी शुक्रवारी वृत्त दिले होते की, अमेरिका मध्य-पूर्वेत १० हजार अतिरिक्त सैन्य तैनात करण्याचा विचार करत आहे आणि इराणमध्ये जमिनीवरील कारवाईची तयारी करत आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, संघर्ष संपवण्यासाठी तेहरान अमेरिकेसोबत शांतता चर्चेत गुंतले असल्याचा वारंवार दावा केला असला तरी, ही संभाव्य अमेरिकी सैन्य तैनाती इराणमधील एक मोठी तैनाती ठरेल. वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, या अतिरिक्त अमेरिकी सैन्याचा उद्देश ट्रम्प यांना मध्य-पूर्वेत अधिक व्यापक लष्करी पर्याय उपलब्ध करून देणे हा आहे. २८ फेब्रुवारी रोजी इराणवर अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यांपासून मध्य-पूर्वेत युद्ध सुरू आहे.अमेरिकेचे अतिरिक्त सैन्य, या प्रदेशात आधीच पाठवलेल्या हजारो पॅराट्रूपर्स आणि मरीन सैनिकांमध्ये सामील होईल. एका इराणी अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, अमेरिकेच्या कोणत्याही भू-आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून तेहरान येमेनमधील आपल्या हुथी मित्रपक्षांना सक्रिय करेल. हुथींना तांबड्या समुद्रातील जहाजांवर पुन्हा हल्ले सुरू करण्याचे निर्देश दिले जातील, ज्यामुळे युद्धात एक नवीन मार्ग उघडला जाईल, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.इराणविरुद्धच्या लढाऊ कारवाईत भूदल पाठवण्याचा आपला कोणताही हेतू नाही, असे ट्रम्प यांनी सातत्याने म्हटले आहे. अतिरिक्त अमेरिकी सैन्य कोठे तैनात केले जाईल हे अद्याप अस्पष्ट आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांना इराण आणि खारग बेटाजवळ तैनात केले जाईल; जे इराणच्या किनाऱ्यालगत असलेले एक महत्त्वाचे तेल निर्यात केंद्र आहे.
३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचे नवीन सत्र
मुंबई: ३० मार्चपासून राज्यात आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ३० मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो.३० मार्चच्या तुलनेत ३१ मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो.त्यानंतर १ ते ४ एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील ठिकठिकाणी आभाळी हवामान, दुपारनंतरचा वादळी पाऊस, आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.
Sinhagad Road : सिंहगड रस्ता ट्रॅफिकमधून सुटका? ‘या’नव्या मार्गासाठी नगरविकास विभागाचे मोठे आदेश
Sinhagad Road : सिंहगड रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी विठ्ठलवाडी ते नांदेड सिटी उन्नत (Elevated) मार्गाचा प्रस्ताव; महापालिकेला तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश.
पेट्रोल-डिझेलबाबत अफवा पसरत आहेत आणि लोक गाड्या घेऊन रांगेत उभे राहत आहेत. गेल्या काही दिवसांत अहमदाबाद, भोपाळ, इंदूर, लखनऊ, प्रयागराज यांसारख्या अनेक शहरांमध्ये अशी दृश्ये दिसली. कुणी म्हणत आहे की देशात फक्त 6 दिवसांचे तेल शिल्लक आहे, तर कुठे 74 दिवसांचा आकडा सांगितला जात आहे. शेवटी 6 दिवस विरुद्ध 74 दिवसांच्या तेल साठ्याचे संपूर्ण गणित काय आहे आणि खरोखरच भारतातील पेट्रोल पंप कोरडे पडण्याची वेळ येईल का; जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये... प्रश्न-1: पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजे नेमके काय? उत्तर: पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजे क्रूड ऑइल किंवा पेट्रोल-डिझेलचा साठा, जो कोणताही देश भविष्यातील पुरवठ्यासाठी जपून ठेवतो. जसे तुम्ही घरात धान्य साठवता, तसेच देश तेलाचा साठा ठेवतो. भारतात प्रामुख्याने 2 प्रकारचे पेट्रोलियम रिझर्व्ह आहेत... 1. स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम साठा याला पेट्रोलियमच्या तिजोरीसारखं समजा. याला सरकारद्वारे आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवलं जातं. याचा वापर सामान्य दिवसांमध्ये होत नाही. युद्ध, तेल संकट किंवा पुरवठा थांबल्यास याचा वापर होतो. मंगळूर, पादूर आणि विशाखापट्टणममध्ये भारताचे 3 स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह आहेत. जिथे जमिनीखाली मोठ्या-मोठ्या गुहेसारख्या टाक्यांमध्ये तेल साठवले जाते. 2. व्यावसायिक पेट्रोलियम साठा इंडियन ऑइलसारख्या तेल कंपन्या स्वतःकडे व्यावसायिक साठा ठेवतात, जेणेकरून पेट्रोल पंपांवर पुरवठा कायम राहील. हा रोजच्या गरजांसाठी असतो. हा बहुतेक जमिनीवर मोठ्या टाक्यांमध्ये ठेवला जातो. प्रश्न-2: भारताकडे 6 दिवसांचे तेल आहे की 74 दिवसांचे, सत्य काय आहे? उत्तर: भारताच्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हची एकूण क्षमता 53.3 लाख मेट्रिक टन आहे. भारतात दरमहा सुमारे 2 कोटी मेट्रिक टन कच्च्या तेलाचा वापर होतो, म्हणजे दररोज सुमारे 6.7 लाख मेट्रिक टन. या हिशोबाने भारताच्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमध्ये एकूण 9 दिवसांच्या खर्चाचे तेल असावे. मात्र, राज्यसभेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सांगितले आहे की, सध्या हे रिझर्व्ह त्यांच्या क्षमतेच्या केवळ 64% भरलेले आहेत. म्हणजे भारताकडे 33.7 लाख मेट्रिक टन स्ट्रॅटेजिक कच्चे तेल साठवलेले आहे. हे 5-6 दिवसांचा खर्च भागवू शकते. सुरेश गोपींच्या म्हणण्यानुसार, भारताच्या स्ट्रॅटेजिक आणि कमर्शियल ऑइल रिझर्व्हमध्ये एकूण 74 दिवसांचे तेल साठवले जाऊ शकते. 26 मार्च रोजी पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले की भारताकडे एकूण 60 दिवसांचे स्ट्रॅटेजिक आणि कमर्शियल रिझर्व्ह आहे. यात कच्चे तेल आणि तयार पेट्रोल-डिझेल समाविष्ट आहे. प्रश्न-3: इतर देशांकडे किती दिवसांचे पेट्रोलियम रिझर्व्ह उपलब्ध आहे? उत्तर: भारत जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार आणि वापरकर्ता देश आहे. परंतु सर्वाधिक तेल वापरणाऱ्या अमेरिका आणि चीनच्या तुलनेत त्याच्याकडे खूप कमी रिझर्व्ह आहे… याशिवाय पाकिस्तानकडे 27 दिवसांचे पेट्रोल, 21 दिवसांचे डिझेल आणि 11 दिवसांचे कच्चे तेल (क्रूड ऑइल) शिल्लक आहे. भारताला बांगलादेशला 5,000 टन डिझेल पाठवायचे आहे. श्रीलंकेकडे 25 दिवसांचा साठा शिल्लक आहे. भारतात दरवर्षी स्ट्रॅटेजिक रिझर्व्हसाठी (धोरणात्मक साठा) जेवढे बजेट मंजूर होते, त्याच्या अर्धेही खर्च होत नाही. यामुळे वर्षागणिक रिझर्व्हसाठी मिळणारे बजेट कमी होत आहे. 2025-2026 मध्ये स्ट्रॅटेजिक रिझर्व्हसाठी मंजूर झालेल्या बजेटपैकी आतापर्यंत केवळ 17.7% खर्च झाले आहे. 2023-24 मध्ये तर केवळ 2.7% वापर झाला होता. याचा परिणाम असा झाला की 2026-27 च्या बजेटमध्ये स्ट्रॅटेजिक रिझर्व्हसाठी केवळ 200 कोटी रुपयांचे बजेट मंजूर झाले, जे मागील 5 वर्षांतील सर्वात कमी आहे. 2021 मध्ये सरकारने आणखी 2 स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह (सामरिक साठे) बनवण्यास मंजुरी दिली होती. 40 लाख टन क्षमतेचा एक साठा ओडिशातील चंडीखोलमध्ये बनवला जाणार होता आणि 25 लाख टन क्षमतेचा एक साठा तामिळनाडूतील पादूरमध्ये. यामुळे आणखी 11-12 दिवसांचा साठा वाढेल. परंतु अजूनही या साठ्यांचे काम प्राथमिक स्तरावर आहे. आता जेव्हा तेलाची कमतरता जाणवत आहे, तेव्हा चंडीखोलमध्ये साठा बनवण्यासाठी निविदा काढण्याची तयारी आहे आणि पादूरचे काम वेगाने केले जात आहे. प्रश्न-4: भारतात पेट्रोल पंप कोरडे पडण्याची वेळ येईल का? उत्तर: केंद्र सरकार आणि IOCL, BPCL, HPCL सारख्या तेल कंपन्यांनी सांगितले आहे की देशात पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीची कोणतीही कमतरता नाही. सर्व 1 लाख पेट्रोल पंप पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत. सरकारने म्हटले आहे की भारतीय तेल कंपन्यांनी पुढील 60 दिवसांसाठी पुरेसा पुरवठा सुनिश्चित केला आहे. सर्व रिफायनरी 100% क्षमतेने कार्यरत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या पॅनिक खरेदीमुळे (घाबरून खरेदी) आणि पेमेंट पॉलिसीमध्ये झालेल्या बदलांमुळे पेट्रोल पंपांच्या बाहेर 'स्टॉक नाही' असे फलक दिसत आहेत. अमेरिकन वृत्तसंस्था ब्लूमबर्गनुसार, एप्रिलसाठी भारतीय रिफायनरीजनी रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी केले आहे. त्याचबरोबर HPCL ने पश्चिम आफ्रिकन देश अंगोलाकडून 20 लाख बॅरल तेल खरेदी केले आहे, जे मे महिन्यात वितरित केले जाईल. डेटा इंटेलिजन्स फर्म केप्लरनुसार, भारतीय कंपन्या पुढील महिन्यात व्हेनेझुएलाकडून 80 लाख बॅरल तेल खरेदी करू शकतात, जे ऑक्टोबर 2020 नंतरचे सर्वाधिक आहे. याशिवाय अमेरिका, आफ्रिका इत्यादी देशांकडून तेल खरेदी केले जात आहे. इराणसोबतही कराराची तयारी आहे. केप्लरचा अंदाज आहे की या खरेदीमुळे एका महिन्यात भारताकडे दररोज 50 लाख बॅरल तेल उपलब्ध होईल, परंतु यामुळे मध्य पूर्वेतून होणाऱ्या पुरवठ्यातील कमतरता भरून काढता येणार नाही. दीर्घकाळासाठी भारताला तेलाची खरेदी वाढवावी लागेल.
Rushikesh Vaidya : फेसबुकवरून ओळख वाढवून 'दैवी शक्ती' असल्याचा बनाव; गुंगीचे औषध देऊन अत्याचार करणाऱ्या ऋषीकेश वैद्यला ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी.
Pune Crime : बलात्कारी सुटतायेत मोकाट! कोर्टात ‘असं’घडतंय फितूर होण्याचं कारस्थान; मोठा गौप्यस्फोट
Pune Crime : पुणे विशेष न्यायालयात साडेचार हजार पास्को गुन्हे प्रलंबित; आरोपींकडून जामिनासाठी पीडित कुटुंबाला फितूर करण्याचे सत्र सुरूच.
PMC News : समाविष्ट ३२ गावांमधील पाणी प्रश्नावर पालिकेचे कडक पाऊल; २०२० ते २०२५ दरम्यान हमीपत्र दिलेल्या बिल्डरांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध.
Adarsh Shala Yojana : राज्यातील ४०५ शाळांचा होणार कायापालट; पाहा तुमच्या गावातील शाळेचा नंबर आहे का?
Adarsh Shala Yojana : शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; दुसऱ्या टप्प्यात ४०५ शाळांना 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा' म्हणून मान्यता.
PMC News : फेरीवाल्यांनाच्या खिशाला कात्री लागणार? वार्षिक कराचा ‘हा’प्रस्ताव महापालिकेने का फेटाळला
PMC News : नगरसेविका नंदिनी धेंडे आणि हर्षल टिंगरे यांचा वार्षिक कर आकारणीचा प्रस्ताव फेटाळला; श्रेणीनिहाय शुल्कच राहणार लागू.
आज माणसाने सर्वच क्षेत्रांत चमकदार कामगिरी केली आहे. पण या चमकदार प्रगतीच्या पडद्यामागे अंधश्रद्धेचा एक भयावह अंधार अजूनही जिवंत आहे. मोबाईलच्या स्क्रीनवर जग पाहणारा माणूस, त्याच स्क्रीनच्या बाहेर मात्र भोंदूगिरीच्या जाळ्यात अडकलेला दिसतो. देवाच्या नावावर भीती विकली जाते, चमत्कारांच्या नावावर फसवणूक उघडपणे चालते आणि विवेक गहाण ठेवून श्रद्धेचा बाजार भरतो. यातूनच भोंदूगिरीचे खेळ व अवैज्ञानिक विधींना खतपाणी मिळते. हे वास्तव जेवढे अस्वस्थ करणारे आहे, तेवढेच लाजिरवाणेही. अशा या गोंधळलेल्या काळात विवेकाचा दिवा हातात घेऊन अंधाराशी दोनहात करणारे अनेक जिद्दी लोक या महाराष्ट्राने पाहिलेत. नरेंद्र दाभोलकर हे त्यापैकीच एक दाभोलकरांची अंधश्रद्धेची लढाई ही केवळ काही चुकीच्या प्रथांविरोधातील मोहीम नव्हती, तर ती माणसाच्या विचारस्वातंत्र्याची व विवेकाची लढाई होती. आज देशात सर्वत्र अशोक खरातसारख्या भोंदू बाबांचे स्तोम माजले असताना आजही दाभोलकरांचे विचार मार्गदर्शक म्हणून उभे राहतात. त्यामुळेच अंधश्रद्धेविरोधातील लढा आज अत्यावश्यक ठरतो. चला तर मग आज 'धुरंधर'मध्ये आज पाहूया नरेंद्र दाभोलकरांचा संघर्षमय व प्रेरणादायी जीवनप्रवास... कुटंबात शिक्षण अन् संस्काराची शिदोरी महाराष्ट्राच्या मातीने अनेक क्रांतिकारी विचारवंत घडवले. समाजाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात शिरून तिथे उजेड करण्याचे धाडस दाखवणारे हे लोक केवळ व्यक्ती नव्हते, तर ते एक विचार होते. अशाच विचारांचा दीप घेऊन जन्माला आले होते नरेंद्र दाभोलकर. साताऱ्याच्या माहुली गावात एका सर्वसामान्य कुटुंबात 1 नोव्हेंबर 1945 रोजी दाभोलकरांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अच्युत, तर आईचे नाव ताराबाई असे होते. घरात शिक्षणाची व संस्काराची शिदोरी होती. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यांच्यापुढे डॉक्टर म्हणून करिअर करण्याची संधी होती. पण त्यांनी केवळ एक ध्येय निवडले. समाजात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धेच्या मुळावर प्रहार करण्याचे ध्येय. राष्ट्रीय पातळीवरील कबड्डीपटू नरेंद्र दाभोलकर एक उत्तम क्रीडापटू होते. त्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक कबड्डी स्पर्धांत सहभाग घेतला होता. त्यावेळी ते नरूभाऊ म्हणून ओळखले जात. प्रतिस्पर्ध्यांच्या हाती न लागण्यासाठी पायात स्प्रिंग लावल्यासारखी उडी मारण्याची कसब त्यांच्यात होती. कबड्डीत ही उडी हनुमान उडी म्हणून प्रसिद्ध झाली. कबड्डीतल्या कामगिरीसाठी राज्य सरकारने दाभोलकरांचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मान केला. दाभोलकरांना लढण्याची प्रेरणा कबड्डीतूनच मिळाली. त्यांनी केवळ कबड्डीपटूच नव्हे, तर क्रीडा संघटक, क्रीडा स्तंभलेखक आदी विविध भूमिका त्यांनी निभावल्या. क्रीडा क्षेत्रात ते जवळपास 20 वर्षे रमले. त्यांनी कबड्डीवरील मराठीतील पहिले पुस्तकही लिहिले. ...अन् दाभोलकरांनी दिले प्रस्थापित समजुतींना आव्हान दाभोलकरांनी कबड्डीत त्यांनी चमकदार कामगिरी केली. पण मैदानावर जिंकलेल्या सामन्यांपेक्षा समाजात हरवत चाललेला विवेक त्यांना अधिक अस्वस्थ करत होता. लोकांच्या डोळ्यांसमोर घडणाऱ्या फसवणुकीकडे ते शांतपणे पाहू शकत नव्हते. 1980 च्या दशकात महाराष्ट्रात अंधश्रद्धेचे प्रमाण प्रचंड वाढलेले होते. भोंदू बाबा, चमत्कारांचे दावे, झाडफूक, जादूटोणा या सर्वांनी सामान्य माणसांचे आयुष्य जखडून गेले होते. लोक भीतीने, अज्ञानाने व निराशेने या सापळ्यात अडकत होते. या सर्वाविरोधात उभे राहणे म्हणजे समाजाच्या प्रस्थापित समजुतींना थेट आव्हान देणे होते. पण दाभोलकरांनी हे आव्हान स्वीकारले. अस्वस्थतेतून झाली अनिंसची स्थापना नरेंद्र दाभोलकर 1971 पासून परिवर्तनाच्या चळवळीत होते. सामाजिक न्याय, आर्थिक शोषण, भ्रष्टाचार व राजकारण असे लढे लढत होते. काही कारणाने 1985 मध्ये या कामात आले. त्यांनी सुरुवातीला श्याम मानव यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत काम केले. पण काही कारणांमुळे त्यांना वेगळी वाट निवडावी लागली. त्यानंतर 1989 मध्ये त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. अंनिस हा केवळ एक संघटनात्मक उपक्रम नव्हता. ती एका सामाजिक आंदोलनाची सुरुवात होती. गावोगावी जाऊन लोकांशी संवाद साधणे, चमत्कारांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देणे, भोंदूगिरीचे पर्दाफाश करणे हे त्यांचे काम होते. दाभोलकरांच्या कार्यपद्धतीत एक खास गोष्टी होती. ते कधीही लोकांच्या श्रद्धेवर थेट प्रहार करत नसत. ते श्रद्धा व अंधश्रद्धा यांच्यातील फरक शांतपणे, तर्काने व संयमाने समजावू सांगत. प्रश्न विचारणे हीच खरी प्रार्थना आहे, हा त्यांचा संदेश होता. पण हा मार्ग सोपा नव्हता. दाभोलकरांच्या कार्यामुळे ज्यांच्या स्वार्थावर गदा येत होती, त्या शक्तींनी त्यांना कडवा विरोध केला. धमक्या, आरोप, बदनामी हे सर्व त्यांच्या मागे लागले. पण ते थांबले नाही. आपला लढा व्यक्तीचा नव्हे, तर विचारांचा आहे हे त्यांना ठावूक होते. शनिशिंगणापूरला वेगळाच किस्सा घडला होता डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आपल्या एका लेखात म्हणतात, माझ्या वाट्याला अपमान आले नाहीत, सन्मान योग्यतेपेक्षा जास्तच लाभले अशी माझी प्रामाणिक भावना आहे. बेसावधपणे घेतलेला निर्णय घोडचूक ठरू शकतो व त्याचा फटका जबरदस्तपणे बसू शकतो हे मी जाणतो. विशेषतः मी ज्या क्षेत्रात काम करतो, ते कमालीचे संवेदनशील आहे. अशी मोठी घोडचूक अजून घडलेली नाही. पण माझ्या क्षेत्राच्या संवेदनशीलतेमुळे अथवा माझ्या विरोधकांच्या कावेबाज चलाखीमुळे तसे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक उदाहरण देतो. 'शनिशिंगणापूर येथे घरांना दारे नाहीत. तरीही तिथे चोऱ्या होत नाहीत, हा चमत्कारच नाही का?' चमत्कार न मानणाऱ्या तुमच्या समितीचे याविषयी काय मत आहे? असा प्रश्न मला एका वार्ताहराने विचारला. मी त्याला उत्तर दिले, 'चोरी करण्याची जबाबदारी आमची, शिक्षा देण्याची जबाबदारी देवाची. पोलिसांनी व ग्रामस्थांनी मध्ये पडायचे नाही अशी चाचणी घेता येईल.' खरे तर मी हे उत्तर गमतीत वैयक्तिकपणे दिले. पण त्या वार्ताहराने मसालेदार शीर्षक देऊन ती बातमी छापली. बातमीचे शीर्षक होते, दाभोलकर म्हणाले, 'चला शनिशिंगणापूरला, चोरी करायला' असे आंदोलन आम्ही चालवणार आहोत. यामुळे नगर जिल्ह्यात प्रक्षोभक स्थिती निर्माण झाली. ती सोसावी लागली. अंधश्रद्धा निर्मूलन देव - धर्मविरोधी दाभोलकर म्हणतात, वस्तू अचानकपणे जागेवरून हलवणे, कपडे आपोआप जळणे व फाटणे, अंगवर बिब्याच्या फुल्या उठणे, असे भानामतीचे प्रकार घडतात कसे याचा शास्त्रीय उलगडा अंनिसने केला. बाईच्या अंगात देवीचा संचार होतो कसा? एखाद्याला भूत झपाटते म्हणजे काय? याची मानसशास्त्रीय मीमांसा केली. फलज्योतिष हे विज्ञानाच्या निकषांवर शास्त्र म्हणून कसे टिकू शकत नाही याची सप्रमाण मांडणी केली. बुवाबाजीचे विविध प्रकार व त्यामागची समाजशास्त्रीय चिकित्सा उलगडून दाखवली. या स्वरुपाच्या सर्व प्रकाराविषयी जे अमाप कुतूहल लोकांमध्ये असते, त्यामुळे चळवळ जनमानसात प्रवेश करू शकली. पण समितीचे वैचारिक काम त्याच्या कितीतरी पुढे जाणीवपूर्वक नेण्यात आले. श्रद्धा व अंधश्रद्धा याची चिकित्सा जनमानसात सतत करण्याचे काम समितीने जोखीम पत्करून केले. एकाची श्रद्धा दुसऱ्याची अंधश्रद्धा असते आणि तिसऱ्याला जी बाब निखालस अंधश्रद्धेची वाटते, ती चौथ्याला जीवन-मरणाच्या श्रद्धेची वाटते. ह्या बाबतीत समाजात चर्चा सतत चालू ठेवणे ही बाब सोपी नसते. समितीच्या कार्यात ही वैचारिक घुसळण शक्य झाली आहे. श्रद्धेचा संबंध अटळपणे व बहुधा सर्वप्रथम धर्मश्रद्धेशी येतो. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन हे धर्मश्रद्धा निर्मूलन आहे व देव - धर्मविरोधी आहे असे भासवले जाते. थोर बसव प्रेमानंदांपासून घेतली प्रेरणा दाभोलकरांना बसव प्रेमानंद यांनी आजारी समाजाला बरे करण्यासाठी प्रवृत्त केले. आता बसव प्रेमानंद कोण हा काही छोटा विषय नाही. ते एक विवेकवादी विचारवंत होते. त्यांनी बुवाबाजी उघड करण्याचा जणू ध्यासच घेतला होता. त्यांनी देशभर फिरून विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रसार केला. पुण्यातील लोकविज्ञान संघटनेने प्रेमानंद यांना आमंत्रित केले होते. तिथे त्यांनी बुवाबाजीच्या चमत्कारांची केलेली भांडाफोड पाहून दाभोलकारांनीही आपल्या मित्रांच्या मदतीने पुण्यात व आजूबाजूच्या परिसरात असे प्रयोग करू लागले. बुवाबाजीचे चमत्कार व त्यांची भांडाफोड पाहण्यासाठी बरीच गर्दी जमत असे. महाराष्ट्रात हे काम रुजवायला हवे ती महाराष्ट्राची गरज आहे, असा विचार करून दाभोलकरांनी या कामाला स्वतःला झोकून दिले. 1985 नंतर 2 वर्षे दाभोलकर महाराष्ट्र फिरले आणि 1989 साली त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संस्थात्मक कामास सुरुवात केली. बुवाबाजीमुळे प्रयत्न अन् पुरुषार्थावरचा विश्वास उडतो दाभोलकर म्हणायचे की, चमत्कारावर विश्वास ठेवणे व ते करणाऱ्या बुवाबाबाला मान्यता देणे यातील मुख्य तोटा हा आहे की, अशी माणसे प्रयत्न व पुरुषार्थ यावरचा स्वतःचा विश्वास गमावतात आणि इतरांनीही तो गमवावा असे वातावरण तयार करतात. त्यामुळे दाभोलकर या बुवाबाजीच्या जोखडात होरपळून निघालेल्या शोषितांना न्याय व श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या कुप्रवृत्तीला कायद्याचा धाक बसावा म्हणून जादूटोना विरोधी कायदा अंमलात आणण्यासाठी नेटाची अविरत लढाई लढत होते. त्यांचे कार्य केवळ अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामापुरते मर्यादित नव्हते. त्यांची दृष्टी त्या पलिकडील होती. अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरू झालेला लढा त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन ते वैज्ञानिक दृष्टिकोन ते धर्मचिकित्सा, धर्मचिकित्सा ते धर्मनिरपेक्षता व धर्मनिरपेक्षता ते विवेकवादी समाजनिर्मिती या मार्गाने पुढे न्यायचा होता. अर्थातच ते प्रामाणपणे हे ही कबूल करायचे की, मी ज्या कार्यक्षेत्रात आहे तिथे कामाचा विचार दशकांच्या नव्हे तर शतकांच्या कालावधीत करावयास हवा याची मला जाणीव आहे. पण त्यांच्या लिखाणातून त्यांच्या अफाट वैचारिक दृष्टेपणाची जाण आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. दाभोलकरांच्या मते, धर्म व राजकारण यांच्या एकत्र करण्याच्या घातक कृतीला हिंसेची जोड देण्याचा प्रयत्न झाला, तर लोकशाही संपुष्टात येण्याचा धोका वाढतो. त्यामुळे देशात एका बाजूला सारासार विवेक गहाण ठेवून कट्टर धर्मांध शक्तीच्या धर्माधिष्टित राष्ट्राच्या कारवाया वाढत चाललेल्या असताना दुसऱ्या बाजूला याविरोधात धर्मनिरपेक्ष, लोकशाही, लोकशाही, विवेकवादी देशाच्या उभारणीसाठी तयार राहण्याची सुपिक जमिनीची मशागत ते आपल्या कामातून करत होते. धर्म अन् वैज्ञानिक दृष्टिकोनातील फरक दाभोलकरांच्या मते, वैज्ञानिक दृष्टिकोन हा विनम्र असतो. तो आपल्या स्वतःच्या निष्कर्षांना किंवा शब्दांना कधीही अंतिम सत्य मानत नाही. पण धर्म मात्र नेहमीच असा आदेश देतो की, मी विश्वातील रहस्ये उलगडी आहेत, आता केवळ माझ्या आज्ञांचे पालन करा. याऊलट वैज्ञानिक दृष्टिकोन असा आग्रह् धरतो की, वस्तू आणि घटनांची कसून छाननी झालीच पाहिजे व अज्ञात गोष्टींचा शोध अविरतपणे सुरूच राहिला पाहिजे. तथापि, आचार व विचार हे केवळ अशा सत्यांनीच मार्गदर्शित झाले पाहिजेत, ज्यांची अनुभवजन्य कसोटीवर सिद्धता झाली आहे. जर धर्मग्रंथांमधील पूर्वग्रह सत्याच्या कसोटीवर टिकू शकले नाहीत, तर आपण निर्भयपणे त्यांचा त्याग केला पाहिजे. अशा दृष्टिकोनाला स्वतःच्या विनाशाची कोणतीही भीती वाटत नाही. कोणत्याही धर्माकडे किंवा कोणत्याही पुरस्कर्त्याकडे अशी निर्भयता नसते. मराठवाड्यातील भानामतीचे प्रकार दाभोलकर मागे वळुन पाहताना या आपल्या लेखात म्हणतात, मराठवाड्यात भानामतीचे प्रकार हे एक वेगळे प्रकरण आहे. स्त्रियांच्या अंगात येते. त्या घुमतात, किंचाळतात, गडबडा लोळतात. काही वेळेला कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज काढतात. हा प्रार समूहाने घडतो आणि गावात अंधश्रद्धेचा जबरदस्त ताण निर्माण करतो. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात 8 जत्थ्यांद्वारे आम्ही जवळपास 250 कार्यक्रम करून मराठवाडा पिंजून काढला. मराठवाड्यातील भानामतीचे प्रकार अजूनही बंद झालेले नाहीत, परंतु निश्चितच कमी झाले आहे. संरक्षण नाकारले अन् हत्या झाली अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात कार्य करताना दाभोलकरांचे अनेक शत्रू निर्माण झाले होते. त्यांना अनेकदा जिवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या. त्यामुळे सरकारने खबरदारी म्हणून त्यांना संरक्षण पुरवले होते. पण मला माझ्याच देशात स्वतःच्या लोकांकडून संरक्षण कशाला? असे म्हणत त्यांनी हे पोलिस संरक्षण नाकारले. संरक्षण नाकारल्यानंतर त्यांच्या जिवाला धोका वाढला होता. अंनिसच्या जनजागृतीमुळे दुखावलेले लोक केव्हाही त्यांच्यावर हल्ले करतील अशी शक्यता होती. पण दाभोलकरांच्या दिनचर्येत थोडाही फरक पडला नव्हता. त्या दिवशीही म्हणजे 20 ऑगस्ट 2013 रोजीही ते सकाळी 7.30 वा. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या महर्षी शिंदे पुलावरून ओंकारेश्वर मंदिराच्या विरुद्ध बाजूला असलेल्या कडेने साधना साप्ताहिक कार्यालयाच्या दिशेने निघाले. पुलावर असताना 2 हल्लेखोरांनी 4 गोळ्या त्यांना घातल्या. एक गोळी त्यांच्या पाठीच्या बाजूला लागली, तर दुसरी चुकीच्या दिशेने गेली. इतर 2 गोळ्या त्यांच्या डोक्याला लागल्या. यामुळे ते जागीच कोसळले. त्यानंतर हल्लेखोर आपल्या दुचाकीवरून पसार झाले. त्या दोघांपैकी एकाने टोपी घातली होती. दुसऱ्याच्या पाठीवर बॅग होती. ते रविवार पेठेच्या दिशेने पळून गेले. पोलिसांनी तत्काळ दाभोलकरांना रुग्णालयात हलवले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या खिशातील एक छायाचित्र व 2 धनादेशावर त्यांचे नाव लिहिले होते. त्यांचे छायाचित्र व साधना साप्ताहिकाच्या कार्यकर्त्यांनी ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाल्याची घोषणा केली. शेवटी आपण आधुनिक आहोत की अंधश्रद्धाळू? आजही माणूस संकटात सापडला की डॉक्टरांपूर्वी भोंदू बाबांकडे जातो. परीक्षेआधी ताईत, नोकरीसाठी नवस, आजारासाठी अंगारा ही उदाहरणे दुर्मिळ नाहीत. विशेष म्हणजे हे सर्वकाही करणारे लोक पदवीधर, अधिकारी व अगदी डॉक्टरसुद्धा असतात. मग प्रश्न पडतो, शिक्षण व विवेक यात नक्की फरक काय? शिक्षण म्हणजे फक्त डिग्री नव्हे. शिक्षण म्हणजे प्रश्न विचारण्याची ताकद. परिणाम समजून घेण्याची वृत्ती आणि पुराव्यांवर विश्वास ठेवण्याची सवय. पण दुर्दैवाने ही मूल्ये आजची स्थिती पाहता दुय्यम ठरली आहेत. कारण, आपण सद्सद्विवेक बुद्धीने विचार करण्यास अद्याप शिकलो नाहीत. अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानातून जन्मानाला येत नाही. ती भीतीतून जन्माला येते. माणसाला असहाय्य वाटू लागले की, तो अदृश्य शक्तींवर विश्वास ठेवू लागतो. आजच्या अस्थिर समाजात नोकरी, भविष्य व आरोग्याची भीती वाढली आहे. या भीतीचे भांडवल करून अंधश्रद्धा फोफावते. यात माध्यमांचीही मोठी भूमिका आहे. टीव्हीवरील बाबांचे कार्यक्रम, भविष्यवाणीचे शो, चमत्कार दाखवणाऱ्या कथा या सगळ्यांना प्रचंड प्रसिद्धी दिली जाते. वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणारे कार्यक्रम मात्र दुय्यम ठरतात. परिणामतः समाजात विज्ञान नव्हे, तर अंधश्रद्धाच मनोरंजन बनते. अंधश्रद्धेचा सर्वात मोठा फटका दुर्बल घटकांना बसतो. ग्रामीण भागातील गरीब, अशिक्षित लोकांना भोंदूबाबांना लुटतात. महिलांवर चेटकीन ठरवून अत्याचार होतात. आजार बळावतात. कारण, वैद्यकीय उपचाराऐवजी मंत्र-तंत्रावर विश्वास ठेवला जातो. ही फक्त श्रद्धा नाही तर ही हिंसा आहे. अखेर चला विवेकाचा दिवा पेटवूया... समाज बदलायचा असेल तर अंधश्रद्धेवर हसून चालणार नाही, तिच्याशी संवाद साधावा लागेल. वैज्ञानिक दृष्टिकोन सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवावा लागेल. प्रश्न विचारणाऱ्या मुलांना उंच आवाज शांत करण्याऐवजी प्रोत्साहन द्यावे लागेल. कारण, खरा आधुनिक समाज तोच असतो, जो अंधाराला शिव्या देत बसत नाही, तर दिवा पेटवतो. विवेकाचा दिवा. प्रश्नांचा दिवा. कारण विज्ञान हे प्रयोगशाळेत नसते, तर ते माणसाच्या विचारात असते. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य वेचले. त्यांनी सांगितले होते की, अंधश्रद्धा ही वैयक्तिक बाब नसून, एक सामाजिक समस्या आहे. कारण, एका व्यक्तीचा भ्रम संपूर्ण समाजाला घातक ठरू शकतो. त्यांच्या हत्येनंतरही समाज फार काळ अस्वस्थ राहिला नाही हीच खरी शोकांतिका आहे एवढे मात्र खरे... धुरंधर मालिकेतील खालील स्टोरीज वाचा… धुरंधर-68; सुखदेव थापर:भगत सिंग अन् राजगुरू सोबत हसत फासावर जाणाऱ्या क्रांतिकारी शहीद सुखदेव यांची प्रेरणादायी गोष्ट धुरंधर-67; गोपाळबाबा वलंगकर:विटाळलेले भांडे जाळले की शुद्ध होते, मग माणूस विटाळला तर त्यालाही भाजायचे का? असा सवाल करणारा दलितांचा आधारवड धुरंधर-66; मुक्ता साळवे:वेद आपले 'धर्मपुस्तक' नाही असे ठणकावून सांगणाऱ्या गावकुसाबाहेरील दलित महिलेचा पहिला विद्रोही हुंकार धुरंधर-65; भाऊ दाजी लाड:भारताच्या प्राचीन वारशाचा शोध घेत कुष्ठरोगावर औषध शोधून पाश्चात्यांना जबर धक्का देणाऱ्या जिद्दी तरुणाची गोष्ट धुरंधर-64; दुर्गाबाई देशमुख:राष्ट्रसेवेची अखंड ज्योत असणाऱ्या फ्रॉकवाल्या छोट्या शिक्षिकेची निष्ठा अन् निडरपणाची गोष्ट धुरंधर-63; वासुदेव सीताराम बेंद्रे:शिवजयंतीची तारीख निश्चित करणारा अन् शंभूराजांचे ऐतिहासिक पुनर्वसन करणारे मराठ्यांच्या इतिहासाचे भीष्माचार्य धुरंधर-62; गुरुवर्य केळूसकर:'दादोजी कोंडदेव अन् रामदास स्वामी शिवरायांचे गुरू नाहीत' असे ठामपणे सांगणारा महाराष्ट्राचा उपेक्षित वाङ्मयमहर्षी धुरंधर-61; सी. व्ही. रामन:आकाशाचा अन् समुद्राच्या पाण्याचा रंग निळाच का? या प्रश्नाचे उत्तर प्रकाशाच्या गुणधर्मातून देणारा भौतिकशास्त्रज्ञ धुरंधर-60; अलेक्झांडर कनिंगहॅम:काशी लगत स्वर्गात जाणाऱ्या पायऱ्यांचा शोध लावणारा अन् बुद्धांचा भारत शोधणारा इंग्रजी लष्करी अधिकारी धुरंधर-59; संत बंका:देव आमचाही असेल तर मंदिर का नाही? असा प्रश्न करणारे मोठ्या ग्रंथांचे नव्हे, तर मोठ्या प्रश्नांचे संत! धुरंधर-58; अँटोनियो ग्राम्शी:तुरुंगाच्या 4 भिंतीत जग बदलण्याची शक्ती शोधणारा अन् वैचारिक क्रांती शस्त्रांपेक्षा वरचढ असल्याचे सांगणारा विचारवंत धुरंधर-57; डॉ. श्रीराम लागू:'देवाचे अस्तित्व हीच मोठी अंधश्रद्धा' असल्याचे ठणकावून सांगत समाजाला अस्वस्थ करणारा बुद्धिवादी माणूस धुरंधर-56; राणी गाइदिन्ल्यू:झाशीच्या राणीची गोष्ट माहिती असणाऱ्यांना इंग्रजांना आव्हान देणाऱ्या आदिवासी कन्येची गोष्ट माहिती आहे का? धुरंधर-55; पां. म. बापट:सशस्त्र क्रांतिकारक ते अहिंसक सत्याग्रहाचा सेनापती अन् अखेर झाडू उचलून ग्राम स्वच्छता करणारा सुधारक धुरंधर-54; नाना पाटील:म्हार, मांगांना लांब का ठेवता? ते घान कामं करत्यात म्हणून? तुमचा डावा हातही तेच करतो, असे सांगणारा क्रांतिसिंह धुरंधर-53; नेल्सन मंडेला:भारताला दुसरे घर मानणाऱ्या आफ्रिकन गांधींची कहाणी; 27 वर्षे कैद भोगूनही मनात कटूता न ठेवणारा मदिबा धुरंधर-52; शकुंतला देवी:शाळेचे तोंड न पाहता संगणकाची परीक्षा पाहणाऱ्या अन् गणिताला खेळ मानणाऱ्या कानडी महिलेची जादूई कहाणी धुरंधर-51; केशवराव जेधे:ब्राह्मणेतर चळवळीचा प्रमुख चेहरा अन् सामाजिक न्यायासाठी झगडणारा ठसकेबाज दृढनिश्चयी मराठी लढवय्या धुरंधर-50; डॉक्टर सलीम अली:पक्ष्यांच्या जगाचे रहस्य उलगडून मानवाला निसर्गाच्या दिशेने जाण्यास प्रेरित करणारा पक्ष्यांचा 'चालता फिरता विश्वकोश' धुरंधर-49; सर रोनाल्ड रॉस:'साला एक मच्छर'! मलेरिया अन् डास यांच्यातील परस्पर संबंध शोधून मानवतेची सेवा करणारा थोर वैज्ञानिक धुरंधर-48; होमी जहांगीर भाभा:दगडधोंड्यांच्या भारतात अणुज्योत पेटवून अज्ञानाचा अंधःकार दूर करणारा श्रीमंत घरातला बंडखोर तरुण धुरंधर-47; बिंदेश्वरी प्रसाद मंडल:ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या इमारतीचा सर्वात मजबूत पाया रचणाऱ्या बिहारच्या जमीनदाराची कथा धुरंधर-46; कार्ल बुशबी:ना ट्रेन ना प्लेन ना बाईक, तब्बल 27 वर्षांच्या अन् 58 हजार किलोमीटरच्या पदयात्रेची अनोखी कथा जी आजही सुरूय धुरंधर-45; जाईबाई चौधरी:स्त्री जीवन फुलवणारी अन् दलित महिलांना शैक्षणिक, सांस्कृतिक संजीवणी देणारी विदर्भातील थोर सेविका धुरंधर-44; ओशो रजनीश:पापाला पुण्याचे अन् हिंसेला अहिंसेचे कपडे घालावे लागतात असे सांगत ईश्वरापूर्वी स्वतःला शोधण्याचा सल्ला देणारा थोर दार्शनिक धुरंधर-43; अमृता प्रीतम:मैं तेनु फिर मिलांगी, कित्थे? किस तरह? पता नहीं; प्रेम, वेदना अन् स्वातंत्र्याचा सूर छेडत बाईचे जगणे मांडणारी लेखिका धुरंधर-42; दगडाबाई शेळके:स्वतःच्या नवऱ्याचे दुसरे लग्न लावून मराठवाडा मुक्तिसंग्रामात स्वतःला झोकून देणारी जालन्याची 'झाशीची राणी' धुरंधर-41; यशवंत घाडगे:दुसऱ्या महायुद्धात मर्दुमकी दाखवत ब्रिटिशांकडून इटलीच्या सैनिकांना कंठस्नान घालणारा मराठी सैनिक धुरंधर-40; शाहीर अमर शेख:धग, रग, आग, धुंदी अन् बेहोशीची जिवंत बेरीज असणारा तथा 'बर्फ पेटला हिमालयाला विझवायला चला' म्हणणारा शाहीर धुरंधर-39; टी. एन. शेषन:'नेत्यांना नाश्त्यात खाणारे' तथा EC ला अभूतपूर्व ताकद अन् प्रतिष्ठा मिळवून देणारे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त धुरंधर-38; डॉ. एम एस स्वामीनाथन:उपासमारीच्या सावटाखाली झुरणाऱ्या भारताला स्वावलंबनाचे स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवणारा शास्त्रज्ञ धुरंधर-37; मेजर शैतान सिंह:1962 च्या भारत - चीन युद्धात 120 जवानांच्या जोरावर शत्रूचा फडशा पाडणारा अन् पोट फाटले तरी मैदान न सोडणारा बहाद्दर धुरंधर-36; राणी वेलू नाचियार:महिलांची फौज तयार करून ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांना पहिल्यांदा धूळ चारणारी शिवगंगाची 'वीर मंगई' धुरंधर-35; अय्यनकाली:महिलांना छाती झाकण्याची परवानगी मिळवून देणारा अन् दलितांनी पिकवलेले धान्य चालते, मग ते का चालत नाहीत? असा प्रश्न करणारा सुधारक धुरंधर-34; जगन्नाथ शंकरशेठ:लोकांचा विश्वास जिंकणारी श्रीमंती गरिबांवर उधळणारा अन् परकियांनाही आपला वाटणारा मुंबईचा खरा शिल्पकार धुरंधर-33; अण्णाभाऊ साठे:दीड दिवस शाळेत जाऊन साहित्याचा सूर्य झालेला लोकशाहीर; जात, धन अन् धर्मदांडग्यांना आव्हान देणारा अण्णा धुरंधर-32; धीरूभाई अंबानी:गरिबीवर मात करत कोट्यवधी भारतीयांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे भारताचे एक अप्रतिम उद्योग रत्न धुरंधर-31; राजर्षी शाहू महाराज:अस्पृश्याला मानाचे पान अन् नांगरासाठी तोफा वितळवून लोखंड देणारे शाहू महाराज ग्रेट का होते? धुरंधर-30; चे गेव्हारा:अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द जागवून अवघ्या जगातील क्रांतीचा चेहरा बनलेला तुमच्या 'T शर्ट'वरील क्रांतिदूत धुरंधर-29; संत कबीर:पैशांच्या मागे पळणाऱ्यांचा देव कसा? असा परखड सवाल करत समस्त मानवतेला साधेपणाचा संदेश देणारा महानायक धुरंधर-28; राणी चेन्नम्मा:स्वकियांची फंदफितुरी जमिनीत गाडून 1857 च्या सशस्त्र उठावापूर्वी इंग्रजांना धूळ चारणारी 'कर्नाटकची लक्ष्मीबाई' धुरंधर-27; अहिल्याबाई होळकर:न्यायबुद्धीने स्वतःच्या नवऱ्याला धारेवर धरत चोराच्याही पोटाचा प्रश्न सोडवणाऱ्या दूरदृष्टीच्या शासक धुरंधर-26; डॉ. जयंत नारळीकर:ब्रह्मास्त्र होते तर रामाच्या राज्यात वीज होती का? असा झोंबणारा प्रश्न करणारा भारताचा मराठमोळा शास्त्रज्ञ धुरंधर-25; मुथुलक्ष्मी रेड्डी:महिला हक्क अन् आईचे 'देवदासी'पण पाहून त्याविरोधात लढा पुकारणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला आमदार धुरंधर-24; कुलदीपसिंग चांदपुरी:पाकच्या 2000 हून अधिक सैनिकांना 120 जवानांच्या बळावर धूळ चारणारा लढवय्या; '1971' ची अमर गाथा धुरंधर-23; चंद्रप्रभा सैकियानी:पडदा प्रथेवर लाथ घालून महिलांना आभाळ खुले करणारी आसामची हिरकणी; कुमारी माता झाली तरी डगमगली नाही धुरंधर-22; कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील:महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणाचा सूर्य पेरून उपेक्षितांच्या झोपडीत ज्ञानाचे पीक काढणारा खरा 'धुरंधर' धुरंधर-21; प्रबोधनकार ठाकरे:मराठी समाज मनात मोक्याच्या ठिकाणी पक्क्या गाठी मारून जातिभेदांच्या जखमांचा खोलवर शोध घेणारा बहुजन हिंदुत्त्ववादी धुरंधर-20; भीमराव रामजी आंबेडकर:चवदार तळ्याला ताळ्यावर आणणारा दलितोद्धारक अन् सामाजिक समरसतेचा खरा विवेकी शिल्पकार धुरंधर-19; जिगर मुरादाबादी:'शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ खुदा नहीं,' असे म्हणत मौलवींकडून टाळ्या पिटवून घेणारा सूफी शायर धुरंधर-18; आनंदीबाई जोशी:'पृथ्वीच्या पाठीवर हिंदुस्तान इतका दुसरा रानटी देश नाही', असे ठणकावून सांगणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर धुरंधर-17; भगतसिंग:'बॉम्ब अन् पिस्तुले क्रांती आणत नाहीत, क्रांती लोकांच्या मनात जन्मते', असे ठामपणे सांगणारा 'शहीद ए आझम' धुरंधर-16; शहाजीराजे भोसले:छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रेरणास्थान अन् बृहन्महाराष्ट्राची स्थापना करणारा धोरणी राजा धुरंधर-15; ई. व्ही. रामासामी:देव आहे हे सिद्ध करण्याचे आव्हान देत तर्कशुद्ध अन् निर्भय मतांद्वारे समाजात क्रांती घडवणारा भारताचा 'पेरियार' धुरंधर-14; कार्नेलिया सोराबजी:रूढी परंपरांना आव्हान देत शिक्षण, समानता अन् मानवी हक्कांसाठी अथक झगडणारी भारताची पहिली महिला बॅरिस्टर धुरंधर-13; खासेराव जाधव:बहुजन समाजाच्या खांद्यावरील निरक्षरतेचे 'जू' काढून त्यांना उच्च शिक्षणाच्या गंगेचे पाणी पाजणारा अवलिया धुरंधर-12; तंट्या भिल्ल:आदिवासींमध्ये राष्ट्रीयत्व जागवणारा 'रॉबिनहूड', थोर स्वातंत्र्यसैनिक; वाचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचे सोनेरी पान धुरंधर-11; विठ्ठल सखाराम पागे:उकिरड्याला खरकटे माहिती नसल्याच्या काळात 'भूकबळी'वर नामी उपाय शोधणारा राजकारणी धुरंधर-10; मोहन हिराबाई हिरालाल:विनोबा भावेंचे 'सर्वायतन' नक्षलग्रस्त गडचिरोलीत रुजवणारा अन् गरिबांना लक्ष्मीदर्शन घडवणारा अवलिया धुरंधर-9; फातिमा शेख:सावित्रीमाईंची मैत्रीण अन् भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका; फातिमा एक काल्पनिक पात्र होत्या का? तुम्हीच ठरवा धुरंधर-8; एकनाथ दगडू आवाड:बापाचा बुचडा कापून 'पोतराज' प्रथेवर घाव घालणारा पोरगा; कथित गुन्हेगारीने बदनाम झालेल्या बीडचा थोर माणूस धुरंधर-7; स्वामी विवेकानंद:मानवतेचा उत्कृष्ट प्रेमी, महान निधर्मी तत्ववेत्ता; नरेंद्रनाथ दत्त यांचे अखेरचे काही तास कसे होते? धुरंधर-6; कंदुकुरी वीरेशलिंगम पंथुलु:अंधश्रद्धेवर लाथ घालून विधवा पुनर्विवाह अन् ज्ञानाची वात पेटवणारा आंध्रचा 'लेखणी'सम्राट धुरंधर-5; भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड:दोन वेळा वाचवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राण धुरंधर-4; डॉ. विश्राम रामजी घोले:महिला उत्थानासाठी पेटून उठलेला सुधारक, ज्यांची 'बाहुली' ठरली स्त्री शिक्षणाची पहिली बळी धुरंधर-3; पार्वतीबाई आठवले:वैधव्य अन् परावलंबन दैवी भोग मानणारी, पण पोटच्या गोळ्याच्या काळजीने असामान्य झालेली एक निरक्षर स्त्री धुरंधर-2; बसव प्रेमानंद:अंधश्रद्धेच्या खाटेवर आजारी पडलेल्या समाजाला विज्ञानाचे औषध देऊन चमत्कारांची पुरती हवा काढणारा थोर दार्शनिक धुरंधर-1; नरहर अंबादास कुरुंदकर:विचारांची श्रीमंती वाढवणारा अन् आजच्या किर्र वैचारिक काळोखात प्रकाशवाट दाखवणारा थोर विचारवंत
SPPU News : आता उत्तरपत्रिकांचे ‘ऑनस्क्रीन’मूल्यांकन होणार! पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय
SPPU News : प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांची मोठी घोषणा; मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी आता 'क्लाउड'वर होणार उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग.
SPPU News : पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प जाहीर! ८३ कोटींची तूट, पण विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर
SPPU News : डॉ. नितीन घोरपडे यांनी मांडला २०२६-२७ चा अर्थसंकल्प; निवृत्तीवेतन आणि वेतनाच्या खर्चामुळे विद्यापीठाच्या तिजोरीवर ताण.
Bhimashankar News : भीमाशंकर-राजगुरुनगर मार्गासाठी कंपन्यांमध्ये ‘टेंडर वॉर’; ‘या’कंपनीने मारली बाजी
Bhimashankar News : केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन मंत्रालयाचा ७६०.५१ कोटींचा प्रकल्प; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कामाला गती.
Patas News : पाटसमध्ये संतापजनक प्रकार! आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक स्तंभाची तोडफोड; परिसरात तणाव
Patas News : अज्ञात व्यक्तींकडून इलेक्ट्रॉनिक फलकाचे नुकसान; सोमनाथ खोमणे आणि समाज बांधवांनी काढला पोलीस चौकीवर मूक मोर्चा.
Bhor News : भोर नगरपालिकेचा मोठा निर्णय! जलतरण तलाव आणि व्यापारी संकुलाला मिळणार ‘हे’ऐतिहासिक नाव
Bhor News : भोर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
Indapur News : नगराध्यक्ष भरत शहा यांच्या हस्ते कांबळे बंधूंच्या मानाच्या कावडीचे पूजन; इंदापूर शहरात उत्साहाचे वातावरण.
अक्कलहुशारीने दृश्याचे चित्रीकरण
स्मृतिपटल : अनिल तोरणे‘बाजी’, ‘जाल’, ‘आरपार’, ‘सीआयडी’, ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘चौदहवीं का चांद’, ‘काला बाजार’, ‘साहिब बीबी और गुलाम’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारे सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक आणि नृत्यदिग्दर्शक गुरू दत्त हे एक अत्यंत चांगले गृहस्थ होते. इतकेच नव्हे तर आपल्यासमवेत काम करणारे इतर कलावंत आणि कनिष्ठ कलावंतांच्या समस्यांचीही ते घरातील प्रमुख व्यक्तीसारखी दखल घेत असत. चित्रपट निर्माण होत असताना जर कोणी व्यवस्थित काम करीत नसेल किंवा चूक करीत असेल तर ते त्या व्यक्तीवर सर्वांदेखत रागावत नसत किंवा तिला अपमानित करत नसत. उलट तो विशिष्ट अभिनेता किंवा अभिनेत्री एकच चूक पुन:पुन्हा का करीत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असत. ‘प्यासा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी नवोदित अभिनेत्री वहिदा रहमान एका दृश्याचे चित्रीकरण करत असताना आपले संवाद नीट म्हणू शकत नव्हत्या. पुन:पुन्हा चित्रीकरण करावे लागत असल्याने (रिटेक) गुरू दत्त यांनी चित्रीकरण थांबविले आणि...१९५७ साली प्रदर्शित झालेल्या ‘प्यासा’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असतानाच्या काळातील ही घटना आहे. त्या चित्रपटात गुरू दत्त यांच्या व्यतिरिक्त माला सिन्हा, वहिदा रहमान, कुमकुम, लीला मिश्र, महमूद, जॉनी वॉकर आदी कलावंतांच्या भूमिका होत्या. दिग्दर्शन गुरू दत्त यांचेच होते. एका दृश्याचे चित्रीकरण केले जात होते. त्यानुसार प्रथमच गुलाबो (वहिदा रहमान) चित्रपटाचा नायक विजयला (गुरू दत्त) भेटते. नंतर विजय निघून जातो पण त्याचे काही कागद गुलाबोकडे असतात. ते घेऊन ती त्याच्या मागे विजय, विजय, विजय अशा हाका मारीत जिन्यावरून धावत खाली येते. त्यावेळी तिची मैत्रीण जूही (कुमकुम) मागून येते. जूही तिला विचारते, काय झाले? त्यावर गुलाबो तिला म्हणते की मी हे जे गीत गात होते ते विजयने लिहिलेले आहे...! या दृश्याचे चित्रीकरण केले जात असताना वहिदा रहमान जेव्हा जिन्यावरून धावत खाली येते तेव्हा धावल्यामुळे त्यांना दम लागत असे आणि त्यामुळे त्या आपले संवाद व्यवस्थित म्हणू शकत नव्हत्या. हे एकच दृश्य पुन:पुन्हा चित्रित करावे (रिटेक) लागत होते. यामुळे नवोदित वहिदा रहमान मनातून कमालीच्या खजिल झाल्या होत्या. त्यांना वाटत होते, की संवाद लांबलचक नसतानाही आपण तो म्हणू शकत नाही, असे सेटवर उपस्थित असलेल्या लोकांना वाटेल. तुम्हाला कोठे अडचण वाटत आहे, असे गुरू दत्त त्यांना वारंवार विचारीत होते पण वहिदा रहमान काहीच उत्तर देत नव्हत्या. गप्पच बसत होत्या. या दृश्याचे बरेचदा चित्रीकरण केल्यानंतर बऱ्याच वेळाने गुरू दत्त म्हणाले, थोडा वेळ थांबू या.काही त्रास होत असेल तर मला सांगा, असे म्हणून गुरू दत्त सेटवर असलेल्या वहिदा रहमान यांच्या मातोश्रींच्या जवळ जाऊन त्यांना म्हणाले, मम्मी हे दृश्य फार अवघड तर नाही; पण त्यांना (वहिदा) कसला त्रास होतोय? गुरू दत्त यांनी अशी पृच्छा केल्यावर मातोश्री त्यांना म्हणाल्या, की कधी कधी तिचा श्वास अडतो त्यामुळे ती संवाद म्हणू शकलेली नाही. वहिदा रहमान यांना अॅलर्जीमुळे दम्याचा त्रास होतो हे समजल्यावर गुरू दत्त त्यांच्या मातोश्रींना म्हणाले, मम्मी आपण हे मला आधीच सांगावयास हवे होते. बिचाऱ्या उगीचच पुन:पुन्हा वरून खाली धावत येत आहेत आणि यामुळे मी पुरता त्रासून गेलो आहे! इतक्या वेळा चित्रीकरण होऊनही हे दृश्य अद्याप व्यवस्थित चित्रित (ओके) झालेले नाही.वहिदा रहमान यांच्या मातोश्रींशी बोलणे झाल्यावर नेमके काय होत आहे हे गुरू दत्त यांच्या लक्षात आले. ते वहिदा रहमान यांच्या जवळ गेले आणि त्यांना म्हणाले, अहो तुम्हाला कसला त्रास होत असेल तर मला सांगा. तुम्ही सांगितले नाही तर मला कसे कळणार की तुम्हाला काय होते आहे ते! चला आता जेवणाची सुट्टी घेऊ आणि त्यानंतरच हे दृश्य चित्रित करू!जेवणाची सुट्टी आटोपल्यावर पुन्हा चित्रीकरण सुरू झाले. वहिदा रहमान जिन्यावरून धावत खाली येतात ते दृश्य गट्रू दत्त यांनी चित्रित करून त्या ठिकाणी ते कापले. त्या दृश्याचे चित्रीकरण झाल्यावर ते वहिदा यांना म्हणाले, तुम्ही चार पायऱ्या वर चढून जा आणि त्या ठिकाणी थांबा. मी ‘अॅक्शन’ असे म्हटले की त्या चार पायऱ्यांवरून धावत खाली या आणि तुमचा संवाद म्हणा. असे केल्याने तुमचा श्वास अडकणार नाही ! गुरू दत्त यांनी तसे सांगितल्यावर वहिदा रहमान चार पायऱ्या वर चढून त्या ठिकाणी उभ्या राहिल्या. गुरू दत्त यांनी ‘अॅक्शन’ असे म्हणताच त्या चार पायऱ्यांवरून धावत खाली आल्या आणि त्यांनी अत्यंत सहजपणे आपला संवाद म्हटला. अशा तऱ्हेने पुन:पुन्हा चित्रित करावे लागलेले ते दृश्य गुरू दत्त यांनी आपले डोके लढवून अगदी सहजगत्या चित्रित केले.
Nitin Gadkari : पालखी मार्गावरील निकृष्ट कामांची आता खैर नाही; नितीन गडकरी करणार प्रत्यक्ष पाहणी
Nitin Gadkari : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची नागपुरात नितीन गडकरींशी भेट; पालखी मार्गावरील त्रुटींचा पाढा वाचला.
Junnar Crime : जुन्नरमध्ये महिलांच्या टोळीचा धुमाकूळ! गोडाऊन फोडून १०० हांडे लंपास; ३ जणींना बेड्या
Junnar Crime : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि जुन्नर पोलिसांची संयुक्त कारवाई; तांत्रिक तपासाच्या जोरावर महिला चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.
कृत्रिम बुद्धिमत्ता : शाप की वरदान?
तंत्रज्ञान : प्रा. प्रवीण पांडेमित्रांनो संगणक आणि यंत्रमानव या विषयांवर सातत्यपूर्णतेने होणाऱ्या संशोधनाने फार मोठ्या प्रमाणात उत्क्रांती होत आहे. रोज याबद्दल नवनवीन वार्ता कानावर येत आहेत. सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा संगणक क्षेत्रातील परवलीचा शब्द आहे. त्यासोबतच मशीन लर्निंग (एमएल), डीप लर्निंग (डीएल), नॅचरल लँगवेज प्रोसेसिंग (एनएलपी), नॉलेज, बेस सिस्टीम्स(केबीएस) न्यूरल नेटवर्क्स हे एआयचे उपसंच म्हणविले जातात.एआयद्वारे कोणती कामे करता येऊ शकतात?ओळख आणि वर्गीकरण एआय स्पॅम कॉल्स किंवा प्रतिमा ओळखण्यात पटकन आणि अचूकपणे मदत करते. फोन कंपन्या आणि बँकांसारख्या संस्था एआयचा वापर करून अनावश्यक किंवा घातक संभाषण/फोन कॉल्स वर्गीकृत करतात.पूर्वानुमान आणि विश्लेषणएआय भविष्यातील घटनांचा अंदाज लावू शकते, जसे की विमान उड्डाणांचा विलंब किंवा रोगांची शक्यता. आरोग्य क्षेत्रात ते लक्षणांपूर्वी आजार ओळखते आणि वैद्यकीय प्रतिमा विश्लेषित करते.स्वयंचलन आणि कार्यक्षमता एआय कंटाळवाणी कामे ऑटोमेट करते, जसे ग्राहक सेवा, डेटा एंट्री किंवा इन्व्हेंटरी व्यवस्थापन.कारखाने, ऑफिसेस आणि सेवा क्षेत्रात ते कार्यक्षमता वाढवते.सर्जनशीलता आणि उत्पादनक्षमता एआय इमेज, टेक्स्ट, ऑडिओ किंवा व्हिडीओ तयार करू शकते, जसे चॅटजीपीटी किंवा इमेज जनरेटर्स. स्मार्टफोन वापरताना किंवा गुगल असिस्टंटसारखे सहायक वापरून दैनंदिन जीवन सुलभ झाले आहे.इतर अनुप्रयोग सुरक्षा : सायबर हल्ले रोखणे किंवा आपत्ती व्यवस्थापन.शिक्षण आणि व्यवसाय : वैयक्तिक शिक्षण किंवा नवीन उत्पादने सुचवणे.पर्यावरण : वाहन उत्सर्जन कमी करणे किंवा नैसर्गिक आपत्तींचा अंदाज लावणे.अचूकता आणी अथकपणे कार्यरत असण्याची क्षमता एआयद्वारे केलेली कामे ही अत्यंत अचूक असतील. तसेच एआय हे तंत्रज्ञान मशीनद्वारे वापरले जाणार आहे. त्यामुळे मशीन थकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे अति श्रमामुळे होणाऱ्या त्रुटी किंवा चुकांची शक्यता अत्यंत नगण्य असेल. इथे सांगितलेले उपयोग हे एआयचे अगदी जुजबी उपयोग आहेत. एआय हे असे तंत्रज्ञान आहे ज्यांची व्याप्ती फार मोठी आहे, असे म्हणू या की येणाऱ्या काळात एआय वापरावर कोणत्याही मर्यादा असू शकणार नाहीत. वरील सर्व मुद्दे हे एआयची भलावणं करणारे आहेत. पण एआयच्या वापराने काय नुकसान असू शकते किंवा त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात यावर देखील ऊहापोह व्हायला पाहिजे.संगणक क्षेत्रात झालेली प्रचंड उत्क्रांती पाहता एकदिवस हे संगणक मानवाचा रोजगार हिरावून घेतील अशी एक भीती लोकांमध्ये निर्माण झाली होती आणि सध्या देखील आहे. काही अंशी यांचे परिणाम हे सकृतदर्शनी त्याच दिशेने जाताना दिसून येत आहेत. या विषयावर मंथन देखील नित्य सूरू असते. त्यात काल्पनिक बाबींवर जास्त भर असल्याचे दिसून येते. भरीस भर म्हणून रोबोट्स,(Robotics), कृत्रिम बुद्धिमत्ता (Artifisial Intiligence), ज्ञानावर आधारित प्रणाली (Knoledge Based Systems, KBS) मशीन शिक्षण ( ML) Deep लर्निंग (DL) अशा नवनवीन शोधामुळे तर अजूनच आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. मानवी बुद्धिमत्तेच्या मदतीने करावयाची अनेक कामे या अत्याधुनिक प्रणलींच्या माध्यमातून आपण करून घेत आहोत. यात मुख्यत्वे करून (एआय) प्रणाली अत्यंत प्रभावीपणे वापरण्यात येत आहे.अनेक लहान लहान AAPS वापरून कठीण वाटणारी अनेक कामे मानव मशिन्सकडून करवून घेत आहे. अशा या परिस्थितीत वर दर्शविलेली भीती ही अगदीच अनाठायी आहे, असे म्हणणे हे धरिष्ट्याचे होईल. उलटपक्षी नित्य नूतन प्रकट होणाऱ्या अशा आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही भीती बऱ्याच अंशी सार्थ ठरत आहे. येणाऱ्या काळात ह्या प्रश्नातून सोडणूक कशी व्हावी यावर अनेक विचारवंत चिंतन करीत आहेत. सर्वात भयंकर मुद्दा असा आहे की, यामुळे संगणक किंवा यांत्रिक क्षेत्रातील रोजगार निर्मितीचे प्रमाण अत्यंत कमी होईल. त्यामुळे बेरोजगारी वाढीस लागेल.आजमितीला या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पाहिजे तितक्या प्रमाणात उपलब्ध नाहीत.अनेक संगणकीय प्रणालीमध्ये असणाऱ्या कपंन्यातून सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना एआय स्किल्स आत्मसात करण्याबद्दल सूचना (तंबी) देण्यात येत आहे. अन्यथा त्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकते. म्हणजे या सर्व मनुष्यबळास नवीन कौश्यल्ये शिकणे क्रमप्राप्त ठरेल. त्याकरिता लागणारा वेळ आणि पैसा हा एक वेगळाच विषय आहे. तसेच वयाने प्रौढत्वाकडे वाटचाल होत असणाऱ्या सर्वांनाच हे कौश्यल्य आत्मसात करणे कितपत शक्य होईल हा मुद्दा देखील कळीचा ठरू शकेल. महत्त्वाचा एक मुद्दा असा की एआय प्रणालीचा होऊ शकणारा गैरवापर. याकरिता अनेक विचारवंत निरंतर उपाययोजना करण्याबद्दल क्रियाशील आहेत.मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक व मालक असणाऱ्या बिल गेट्स या संगणक क्षेत्रातील ज्ञानवंत संशोधकाने नुकतेच भविष्यातील नोकऱ्यांच्या विषयी भविष्यवाणी केली.सन २०२५ मध्ये, बिल गेट्सने एक धाडसी भविष्यवाणी केली ज्याने कर्मचाऱ्यांना हादरवून टाकले.कृत्रिम बुद्धिमत्ता प्रत्येक उद्योगात बँकिंगपासून ते ग्राहक सेवेपर्यंत आणि अगदी कलाक्षेत्रात देखील पसरत असताना, गेट्सने खुलासा केला की तीन रोजगार खरोखरच मानवी राहतील, असा त्यांचा विश्वास आहे. ती कामे एआय करू शकत नाहीत म्हणून नाही - परंतु आम्हाला ते नको आहे म्हणून.१. अध्यापन.गेट्सचा असा विश्वास आहे, की महान शिक्षक अपरिवर्तनीय आहेत. एआय निश्चितपणे धडे देऊ शकते.परंतु मानवी कनेक्शन - शिक्षकाला ज्या प्रकारे एखाद्या मुलाची बुद्धिमत्ता समजते, शिक्षक हा विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करू शकतो किंवा अपयशानंतर त्यांना सांत्वन देतो - असे या प्रणालीकरिता कोणतेही अल्गोरिदम प्रतिकृती बनवू शकत नाही. भावनिक मार्गदर्शन आणि मानवी मार्गदर्शन हे शिक्षणाचा आत्मा राहतील.२. आरोग्य सेवा.एआय निदान आणि शल्यक्रिया सुस्पष्टतेमध्ये क्रांती घडवून आणेल; परंतु गेट्सचा आग्रह आहे की, लोकांना अजूनही मानवी डॉक्टर आणि परिचारिका हव्या असतील.सहानुभूती, विश्वास आणि बेडसाइड काळजी डाउनलोड केली जाऊ शकत नाही.सर्वात शक्तिशाली औषध म्हणजे, करुणा - आणि कोणत्याही मशीनने कधीही त्यात प्रभुत्व मिळवले नाही.३. बांधकाम आणि दुरुस्ती.टेक ब्रेकथ्रू असूनही, गेट्सचा असा विश्वास आहे की प्लंबिंग, इलेक्ट्रिकल काम आणि इमारत यासारखे व्यापार वाढतील. घरे, रस्ते आणि शहरे अजूनही हातांनी आवश्यक आहेत. अशी अनेक क्षेत्रे असू शकतील.ते काहीका असेना, तरुणांनी ही सर्व आव्हाने स्वीकारून सर्व नवनवीन कौशल्ये आत्मसात करून या क्षेत्रात देखील भरारी घेऊन आपली यशस्विता सिद्ध करून राष्ट्राच्या प्रगतीस हातभार लावणे आवश्यक वाटते.
Jejuri News : नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांची घोषणा; नगरपरिषदेच्या आगामी सर्वसाधारण सभेत नामकरणाचा ठराव मांडणार.
नक्षत्रांचे देणे; डॉ. विजया वाडमी विश्वकोशाची अध्यक्षा होते,तेव्हा वाईला प्रत्येक महिन्यात माझा दहा दिवस मुक्काम असे. तिथे एक वसतिगृह होते. त्यात माझी खोली विशेष आवडती होती. त्या खोलीची उबच न्यारी होती. खरे तर पंखा नि एक पलंग, एक लिहिण्यासाथही टेबल नि एक खुर्ची. पण मला तो जामानिमा पुरेसा वाटे. मुख्य म्हणजे विश्वकोशाच्या कार्यालयाला लागून, जवळच ती खोली होती. खिडकीतून माझे टेबल सहज दिसे. मला आनंद होई. मराठी विश्वकोशाचे १७, १८, १९, २०, २१ हे ५ खंड मज हातून लिहिले गेले आणि ते सर्वच्या सर्व प्रकाशित झाले. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांचा मानाने समावेश होता. आमचे मित्र आणि विश्वकोशाचे सदस्य मधुकर भावे साहेब सीएम साहेब यांना मिळवून देण्यासाठी मजसाठी खूप प्रयत्न करीत असत.वाई येथील १० दिवसांच्या (३-३-४ असे टप्पे) मुक्कामात मी पुढील कामाची आखणी आणि वाटणी करीत असे. माझे यजमान डॉ. वाड घराची जबाबदारी उतम सांभाळीत असत. त्यांचे उपकार न फिटणारे आहेत.तर मुक्काम पोस्ट वाई!एक दिवस मी माझ्या लाडक्या खोलीत आराम करीत होते. विश्वकोशाचे नोंद वाचन करून जरा थकले होते. चहा पिऊन जरा तरतरी येईल असे वाटले. मी गृहरक्षकांना विनंती केली की, मला कपभर गरमागरम चहा हवासा वाटतो आहे. करता का?’... “आत्ता देतो.” तो आनंदाने म्हणाला. तेवढ्यात खोलीत एक साधेसे गृहस्थ आले. त्यांच्या अंगावर पांढरी शुभ्र वस्त्रे होती. (मीही पांढऱ्या साड्याच वापरीत असे. अगदी कायम)“ मला विश्रांतीची गरज आहे फार.” ते सद्गृहस्थ म्हणाले.“अहो, पण मी ही खोली वापरते आहे ना.” मी म्हणाले.“आपण ना बाईसाहेब, माझी रूम वापरा.”“पण तुम्ही वापर न तुमची रूम.”“या खोलीची मला सवय आहे. तिची ऊबच न्यारी.”“क्षमा करा. मी ही रूम सोडणार नाही.” मी म्हटले.ते गृहस्थ थोडे घुटमळले. मग रुसून निघून गेले. पण मला चुटपूट लागली. तेवढ्यात माझा गृहरक्षक गाणे गुणगुणू लागला. पुन्हां पुन्हां!“असुनि खास माळक घरचा, म्हणति पावणा त्याला,परशता पाश दैवे ज्यांच्या, गळा लागला.”“हे एकच गाणे तुका गुणगुणत आहेस रे?” मी त्याला कुतुहलाने विचारले.“अहो बाईसाहेब, आपल्याकडे कोण आले होते? ठाऊक आहे का?”“कोण रे?”“प्रत्यक्ष सांगली कोल्हापूरचे महाराज आले होते हो आप्ळूआकडे.”“अरे पण मला कसं कळणार? मी त्यांना कधी पाहिलं नाही रे. कसं ओळखणार रे?” मी चुकचुकले.“अहो बाईसाहेब, ही सर्व मालमता महाराजांचीच आहे. त्यांनी मराठी विश्वकोशाला ती दान केली आहे.”“अरे बापरे! मला हे कसं कलावं?”मी चुटपुटले. फार अस्वस्थ झाले.रात्रीचे साडेअकरा झाले होते. महाराज कुठे आहेत?”“ते बाहेर रुसून बसले आहेत.” गृहरक्षक म्हणाला. मी पलंगावरून उठले. बाहेर गेले.“महाराज, क्षमा असावी. मी आपल्याला ओळखले नाही.” मी नम्रपणे म्हटले.“असू डे, असू डे. कशा ओळखणार तुम्ही? आता राजे मुकुट घालीत नाहीत की उत्तरीय परिधान करीत नाहीत.”“महाराज, आपण झोपा त्या खोलीत, जिथे मी निद्रा घेत होते.”“तुम्ही माझ्या खोलीत झोपाल?”“आनंदाने”ही गोष्ट उत्तम झाली.” ते आनाडले.कुठे आहे तुमची खोली?” मी विचारले.“चला बाईसाहेब, मी दाखवितो आपणांस.” गृहरक्षक आता उत्साहाने, आनंदाने तयार झाला.आणि मी महाराजांच्या खोलीकडे वळले.खोली कसली?महालच होता तो. संपूर्ण वातानुकूलित असा प्रशस्त, सुंदर महाल! तो बघून मी खुशम खुश झाले. “महाराजांना तुम्ही जिथे विश्राम करीत होता, तिच रूम खूप खूप आवडते.” गृहरक्षक म्हणाला. माझी गादी फटाफट स्वच्छ आणि घालून तो म्हणाला, “ झोपा बाईसाहेब निवांत.”आणि मी सुखे सुखे निद्राधीन झाले. अशी ही गोड आठवण !
तुमचं छोटंसं हसू बदलू शकतं मुलांचं आयुष्य
आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानूआपलं सौंदर्य खुलवण्यासाठी आपण चांगले कपडे घालतो. स्त्रिया आकर्षक अलंकार घालतात, पण सौंदर्याचा खरा परिमाण काय ठाऊक आहे, तर ते आहे तुमच्या चेहऱ्यावरचे दिलखुलास हास्य. तुमचा हसरा चेहरा मुलांना एक प्रकारची सकारात्मकता देतो. माणसाचा चेहरा सगळ्यात सुंदर केव्हा दिसतो, तर त्या चेहऱ्यावरती जेव्हा असतं हास्य. त्या हास्याच्या प्रकाशाने तो आपल्या अवतीभवतीचे वातावरणही आनंदित करून टाकतो. पालकांनो तुमची मुलं समाधानी आणि आनंदी दिसावी असं तुम्हाला वाटत असतंच मात्र कधी-कधी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात ताण-तणाव भरपूर असतो, पण लहान मुलं, किंबहुना आपली मुलं ही स्ट्रेसबस्टर असतात असं म्हणतात. त्यामुळे घरातून बाहेर पडताना आपण जर त्यांना एक स्मितहास्य जरी दिलं तरी त्यांचा पूर्ण दिवस कसा सुगंधित होऊन जातो. असं म्हणतात की या जगामध्ये कोणाचंही स्वागत करायचं असेल, तर तुमचं एक हास्य पुरेसं असतं. हास्य हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला पूर्णत्व देतं. तुमचं हास्य मुलांच्या डोळ्यांत आश्वासकतेचं दीप उजळवून टाकतं.हास्याची रेषा वक्र असली तरी हास्याने आयुष्य सुरळीत होऊन जातं. मुलं आणि पालक यांच्यातील अंतर हास्याने कमी होतं. मुलांच्या हृदयाचे दरवाजे उघडतात पालकांनो तुमच्या एका हास्याने. म्हणूनच मूल घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्याच्याकडे हसून पाहिलंत, तर तुमच्या दोघांचाही दिवस खूप आनंदात जातो.कधी तुम्ही विचार केला आहे का, की एक छोटंसं हसू आपल्या आयुष्यात किती मोठा बदल घडवू शकतं? मुलांकडे पाहून हसणे आई-वडील आणि मुलांसाठी खूप महत्त्वाचे आहे. हास्य हे मुलांसाठी खूप चांगले असते. तसं पाहिलं तर हसणे हा एक साधा भाव आहे, पण त्याचे फायदे खूप मोठे असतात. मुले, आई-वडील आणि त्यांची काळजी घेणारे लोक जर रोजच्या आयुष्यात मुलांकडे पाहून हसले, तर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होतो. हसल्यामुळे तुमच्या दोघांचेही मन आनंदी आणि हलके होते.पालकहो तुमच्या चेहऱ्यावरचे हसू काय करू शकते ते समजून घेऊ :१. मन आनंदी होते :हसल्यामुळे मन हलके आणि आनंदी वाटते. मुलांना अजून त्यांच्या भावना सांभाळायला शिकायचे असते. तेव्हा हसल्यामुळे त्यांना राग, दुःख किंवा निराशा कमी वाटू शकते. आई-वडीलही काम आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे ताणात असतात. अशा वेळी हसल्यामुळे त्यांना थोडा आराम मिळतो आणि ताण कमी होतो.२. नातेसंबंध मजबूत होतात :आई-वडील जेव्हा मुलांकडे पाहून हसतात तेव्हा मुलांना प्रेम, आपुलकी आणि आधार वाटतो. मुलेही परत हसली तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो. यामुळे कुटुंबात प्रेमळ आणि सुरक्षित वातावरण तयार होते.३. इतरांशी चांगले संबंध बनतात :मुलं इतरांशी हसून बोलायला शिकली, तर त्यांना मित्र बनवणे सोपे जाते. हसणारी मुले बाकीच्या मित्रांना अधिक मैत्रीपूर्ण आणि जवळची वाटतात. आई-वडीलही हसून लोकांशी बोलले, तर नवीन ओळखी आणि संधी मिळू शकतात. हे जेव्हा मुलं पाहतात तेव्हा त्यांना हे समजते की दोस्ती करताना हास्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होऊ शकतो.४. आरोग्य चांगले राहते :अभ्यासानुसार हसल्यामुळे ताण कमी होतो, रक्तदाब कमी राहू शकतो आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. हसल्यामुळे आई-वडील आणि मुले दोघांचेही शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.५. चांगल्या सवयी वाढतात :हसणे अनेकदा दुसऱ्यांनाही हसायला प्रेरित करते. घरात सगळे जास्त हसले तर घरातील वातावरण अधिक आनंदी आणि सकारात्मक बनते. आई-वडील हसतमुख राहिले, तर मुलेही सकारात्मक विचार करायला शिकतात आणि अडचणींना चांगल्या पद्धतीने सामोरे जातात. म्हणून रोजच्या आयुष्यात जास्त हसा. मुलं हसून बोलायला शिकली, तर त्यांना मित्र बनवणं सोपं जातं. हसणारी मुलं जास्त मैत्रीपूर्ण आणि जवळची वाटतात. आणखी एक खास गोष्ट म्हणजे हसणे संसर्गासारखे पसरते. एखादी व्यक्ती हसली, की आजूबाजूचे लोकही हसायला लागतात. घरात सगळे जास्त हसले, तर घरचे वातावरण अधिक आनंदी, सकारात्मक आणि प्रेमळ बनते. म्हणूनच, आपल्या रोजच्या आयुष्यात जास्तीत जास्त हसण्याचा प्रयत्न करा.कधी-कधी एक छोटंसं हसू एखाद्याचा संपूर्ण दिवस सुंदर बनवू शकतं. तुमच्या हास्याने मुलांच्या चेहऱ्यावर जणू काही प्राजक्ताच्या फुलांसारखा आनंद पसरेल. उत्साह, आनंद, समाधानाने त्यांचे मन भरून जाईल. हसल्याने आपल्या आजूबाजूचे वातावरण आनंदित होते हे त्यांना समजते आणि वातावरणामध्ये एक प्रकारची सकारात्मकता निर्माण करण्यात ते यशस्वी होतात, पण हे सगळं ते तुमच्याकडूनच शिकणार आहेत, म्हणून मूल घरातून बाहेर पडत असताना एक हास्य किती मोठी किमया करून दाखवू शकते हे मुलांच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला कळेल. हसरी आणि आनंदी मुले सगळ्यांनाच खूप आवडतात कारण त्यांच्या यशामध्ये या हास्याचा मोठा वाटा असतो. म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला ताण वाटला, तर एकदा हसून बघा. कदाचित तेच तुमचा दिवस उजळवेल.
नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरेवर्ष होते १९६६, म्हणजे बरोबर ६० वर्षांपूर्वीचे! सिनेमाचे नाव अत्यंत गूढ आणि उत्सुकता वाढवणारे - ‘ये रात फिर ना आयेगी.’ दिग्दर्शक होते ब्रिज सदाना आणि निर्माते - महेश आणि मुकेश भट. प्रमुख भूमिकेत विश्वजीत (सुरज), शर्मिला टागोर,(किरण) मुमताज, (रिता) पृथ्वीराज कपूर, हेलन, असित सेन (अभिनेता) आणि बी. एम. व्यास. कथा पुनर्जन्माची म्हणता येईल अशी पण चमत्कारिक किंवा खरे तर अतृप्त आत्म्याच्या अगदी वेगळ्याच जीवनप्रवासाची.रिता आणि राकेशला पुराणवस्तूसंशोधन खात्याच्या उत्खननात एक मानवी सांगाडा सापडतो. नंतर रीताचे त्याच विषयातील प्राध्यापक असलेले वडील (पृथ्वीराज कपूर) यांना कळते की तो सांगाडा २००० वर्षांपूर्वी मृत झालेल्या किरण नावाच्या मुलीचा आहे. नंतर मात्र अत्यंत गूढरीत्या किरण या जगात सदेह अवतीर्ण होते आणि रीताच्या आसपास वावरू लागते. याचे कारण म्हणजे तिचे तिच्या तत्कालीन प्रियकराशी पूर्ण होऊ न शकलेले मिलन! तिचा अतृप्त आत्मा प्रियकराला शोधत परत आलेला असतो. तिचा त्या जन्मातील प्रियकर आता एक चित्रकार ‘सुरज’, असतो. तोच रिताचा प्रियकर निघतो! असे हे गुंतागुंतीचे कथानक. गूढ आणि उत्कंठा वाढवणारे! मुळात सिनेमा एक अधुरी राहून गेलेली प्रेमकथा, संपूर्ण चित्रीकरण जुनी हवेली, हिरवेगार डोंगर-दऱ्या अशा पार्श्वभूमीवर झालेले आणि त्यात मुद्दाम कृष्णधवल रंगात केल्याने पुनर्जन्म, मृत व्यक्तीचे पुन्हापुन्हा दर्शन या गोष्टी सहज प्रस्थापित झाल्या. ओ.पीं.चे संगीतही एकंदर वातावरणाला पोषक ठरले.सिनेमात हेलन आणि मुमताज इतक्या सुंदर दिसत होत्या, की दोघींवरून नजर हटत नाही. गाणी होती एस. एच. बिहारी आणि अजीझ कश्मिरींची. नेहमीप्रमाणे ‘ठेके’दार संगीत होते ओ. पी. नय्यर यांचे. ‘ये रात फिर ना आयेगी’ची आठही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली. त्यात आशाताईनी गायलेले ‘यही वो जगह हैं, यही वो फिझा हैं, यहाँपर कभी आप हमसे मिले थे’, आणि ‘मेरा प्यार वो हैं, मरकर भी तुमको, जुदा अपनी बाहोसे होने ना देगा’ रसिकांना विशेष आवडली. मधुमती आणि हेलनवरचे ‘हुजुरेवाला, जो होंगी इजाजत, तो हम ये सारे जहांसे कह दे?’ हे आशाताई आणि मिनू पुरुषोत्तम यांनी गायलेले गाणे तर ‘वार्षिक बिनाका’त सर्वात लोकप्रिय गाण्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर वाजले. सिनेमाबद्दल दोन गमंतीशीर आठवणी सांगितल्या जातात. एका दृश्यात शर्मिला टागोर विश्वजीतला थप्पड मारते असा प्रसंग होता. त्याचे चित्रीकरण सुरळीत पार पडलेही! पण नंतर दुपारच्या जेवण्याच्या वेळेस चित्रीकरणाच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या एका लहान मुलाने येऊन शर्मिलाला थप्पड लगावून दिली. नंतर कळले तो विश्वजीतचा ४ वर्षांचा मुलगा ‘प्रोसेनजीत’ होता. वडिलांच्या अपमानाचा बदला त्या बंगाली सुपुत्राने ‘जशास तसा’ घेतला होता. (नक्की त्याचे खरे नाव प्रसन्नजीत असायला हवे, पण बंगाली नावांच्या उच्चारांचे कुणी सांगावे?) पुढे प्रोसेनजीत एक लोकप्रिय बंगाली अभिनेता झाला. दुसरी आठवण म्हणजे दिग्दर्शकाना शेवटच्या दृश्यात शर्मिलासाठी पांढरी साडी हवी होती. ती ऐनवेळी मिळेना. मग निर्मात्यांच्या बहिणीची साडी शर्मिलाला उसनी मागून देण्यात आली. असे गंमतीने सांगितले जाई की ती साडी मूळ मालकिणीला कधीच परत मिळाली नाही.एका जुन्या शानदार हवेलीच्या आसपास आणि प्रचंड खोल डोंगरदऱ्यांच्या पार्श्वभूमीवरच किरण सुरजला भेटत असते. एकदा तो तिला थांबण्याचा खूप आग्रह करतो, पण ती उद्या भेटेन असे सांगून निघू लागते. त्यावेळी रफीसाहेबांच्या रोमँटिक रेशमी आवाजात दिग्दर्शकांनी त्याच्या तोंडी एक सुंदर गाणे दिले होते. सोबत किरणसाठी आशाताईंचा मधाळ आवाज होता. आपल्या सुंदर प्रियेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियकराचे हळवे भाव अजिझ कश्मिरींनी लीलया कागदावर उतरवलेले होते-‘फिर मिलोगे कभी इस बातका वादा कर लो.हमसे इक और मुलाकातका वादा कर लो.’खरे तर ही प्रत्येक प्रेमकथेतल्या सुरुवातीच्या मंतरलेल्या दिवसांची कहाणी असते. जगातली अनेक बंधने पाळून होणाऱ्या त्या भेटींना वेळेची मर्यादा असल्याने सतत एक ओढ, एक अतृप्ती ठेवूनच प्रत्येक निरोप होतो. वेळेच्या या मर्यादेमुळेच तर दोघांनाही ‘भेटीत तुष्टता मोठी’ वाटत असते. पण हे सगळे लक्षात येण्याची ती वेळच नसते. दोघेही प्रत्येक भेटीसाठी आतुरच असतात, म्हणून एका भेटीच्या शेवटी प्रत्येकवेळी एकमेकांकडून पुढच्या भेटीचे वचन मागत असतात. कितीही बोलणे झाले तरी मनाचे समाधान झालेले नसते. दोघानाही मनातून भेट पूर्ण झाली नाही असेच वाटत असते. देव आनंद, साधनाच्या ‘हम दोनो’(१९६१) मधील महंमद रफी आणि आशाताईंच्या खेळकर आवाजातल्या ‘अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही.’ सारखी हुरहूर प्रियकर प्रेयसीला जतावून सांगत असतो आणि प्रेयसी मात्र आपल्याही मनात त्याच भावना असल्या तरी त्या व्यक्त न करता ‘त्याने’ केलेल्या अजीजीमुळे सुखावत असते. किरणच्या त्या भेटीत मात्र बिचारा सुरज उद्या ‘अगदी थोडा वेळ का होईना पण नक्की भेटशील असे वचन मला दे’ म्हणून तिला विनवत असतो -‘दिलकी हर बात अधूरी है, अधूरी है अभी,अपनी एक और मुलाकात जरूरी है अभी.चंद लम्होंके लिये साथका वादा कर लो,फिर मिलोगे कभी...’किरण मात्र सुरजला विचारते ‘तू मला तुझ्या हृदयातले इतके सुंदर रहस्य आताच कशाला सांगतोस? रोज मला एक नवे प्रेमगीत, इतके मधुर संगीत का ऐकवतोस? अरे मी तर तुझ्या प्रेमाच्या समुद्रात अगदी बुडाले आहे आणि तू मात्र मला दूर किनाऱ्यावरून साद घालतो आहेस.’ तिने नकळत अशी प्रेमाची उघड कबुली दिली तरीही तिचे स्त्रीसुलभ सावधपण लपत नाही. ती धीटपणे विचारते, ‘जिवलगा, तुझ्या प्रेमाची आजसारखी ही उत्कटता नंतरही अशीच राहील का? तसे मला आजच वचन देशील ना?’‘आप क्यों दिलका हसीं राज़ मुझे देते हैं,क्यों नया नग्म़ा, नया साज मुझे देते हैं,मैं तो हूँ डूबी हुई प्यारके तूफ़ानोंमें,आप साहिलसेही आवाज़ मुझे देते हैं.कल भी होंगे यही जज़बात ये वादा कर लो.हमसे इक और मुलाकातका वादा कर लो.’जुन्या काळातले निवांत वातावरण, सुखीशांत जीवन कल्पनेने अनुभवायचे असेल, तर रहस्याचा ताण निर्माण करतानाही मनाला सैलावणारे असे चित्रपट पाहावेत.
Koyta Attack : पिंपरीतील ग्रीन पार्क परिसरात जुन्या भांडणाचे पर्यवसान रक्तरंजित हल्ल्यात; १९ वर्षीय तरुणाची पोलीसात तक्रार.
Traffic Update : पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी जारी केली अधिसूचना; भाविकांची सुरक्षितता आणि मिरवणुकीसाठी प्रशासनाचे चोख नियोजन.
गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकरआजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान जीवनात व्यक्तिमत्त्व आकर्षक असणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यात माधुर्य असणेही अत्यंत आवश्यक आहे. केवळ बाह्य देखावा किंवा ज्ञान यावर व्यक्तिमत्त्वाची ओळख होत नाही, तर आपल्या बोलण्यात, वागण्यात, विचारांमध्ये आणि इतरांशी असलेल्या नात्यांमध्ये असलेले माधुर्य हेच खरे व्यक्तिमत्त्व उजळवते.माधुर्य म्हणजे काय?माधुर्य म्हणजे सौम्यता, नम्रता, प्रेमळपणा आणि सकारात्मकता. ज्या व्यक्तीच्या शब्दांत गोडवा असतो, वागण्यात आदर असतो आणि मनात सहानुभूती असते, त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आपोआपच आकर्षक बनते.माधुर्य का आवश्यक आहे?माधुर्य असलेली व्यक्ती सर्वांना आवडते. अशा व्यक्तीभोवती सकारात्मक वातावरण निर्माण होते. तणावपूर्ण परिस्थितीतही शांततेने मार्ग काढण्याची ताकद माधुर्य देत असते. नातेसंबंध टिकवण्यासाठी आणि समाजात सन्मान मिळवण्यासाठी माधुर्य अत्यंत महत्त्वाचे आहे.माधुर्य कसे आणावे?१. गोड आणि संयमी भाषा वापरा : बोलताना शब्दांची निवड विचारपूर्वक करा. कटू शब्द टाळा.२. नम्रता जोपासा : अहंकार टाळून साधेपणा आणि विनम्रता अंगी बाणवा.३. इतरांचा आदर करा : लहान असो वा मोठा, प्रत्येकाशी सन्मानाने वागा.४. ऐकण्याची सवय लावा : फक्त बोलणेच नव्हे, तर समोरच्याचे शांतपणे ऐकणेही तितकेच महत्त्वाचे आहे.५. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा : परिस्थिती कशीही असली तरी सकारात्मक विचार ठेवल्यास वागण्यात आपोआप माधुर्य येते.६. स्वतःवर नियंत्रण ठेवा : राग, मत्सर, द्वेष या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.शिक्षण आणि संस्कारांची भूमिकामाधुर्य हे एका दिवसात येत नाही. ते लहानपणापासून मिळालेल्या संस्कारांमुळे आणि शिक्षणामुळे विकसित होते. घर आणि शाळा या दोन्ही ठिकाणी मुलांना नम्रता, सहकार्य, आदर यांचे मूल्य शिकवणे गरजेचे आहे.व्यक्तिमत्त्वातील माधुर्य हेच खरे सौंदर्य आहे. ते व्यक्तीला केवळ यशस्वीच बनवत नाही, तर समाजात आदरणीय स्थानही मिळवून देते. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या व्यक्तिमत्त्वात माधुर्य आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गोड बोलणे, नम्र वागणे आणि सकारात्मक विचार ठेवणे या छोट्या गोष्टींमधून मोठा बदल घडू शकतो.“गोड बोलणे हीच खरी संपत्ती आहे. ज्याने हृदय जिंकता येते, तेच खरे व्यक्तिमत्त्व.”शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे। शिवरायांचे सलगी देणे, कैसे असे॥ - संभाजी महाराजांना पत्रआपले चालणे, आपले बोलणे आणि लोकांशी व्यवहार करणे हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा फार महत्त्वाचा भाग आहे. माणूस बोलण्याद्वारे स्वतःला उघडे करत असतो. शब्द हे शस्त्र आहे. बोलताना ते कात्रीसारखे न वापरता सुईसारखे वापरावे. कात्री कापते, सुई जोडते. माणसाचे चालणे तडफदार असले पाहिजे. त्याचे लोकांशी व्यवहार अत्यंत सौहार्द, प्रसन्न आणि सौजन्यपूर्ण हवेत. नोकरीसाठी जी मुलाखत घेतली जाते त्यामध्ये उमेदवाराचे चालणे, बोलणे आणि वागणे लक्षात घेतले जाते. समर्थ रामदासांनी त्या काळात संपन्न व्यक्तिमत्त्व असलेला उत्तम पुरुष पाहिला व त्याचे यथार्थ वर्णन केले. हा उत्तम पुरुष म्हणजे राजा शिवछत्रपती. शिवाजी महाराज कसे बोलत याची एक गोड कथा उपलब्ध आहे.महाराज गोवळकोंड्याला गेले होते. तेथील कुतूबशहाने महाराजांना मुद्दाम आमंत्रित केले होते. महाराजांच्या स्वराज्याच्या तुलनेने कुतूबशहाचे वैभव प्रचंड होते. त्याने महाराजांना आपला प्रचंड हत्तीखाना दाखविला. शेकडो हत्ती रांगेत उभे होते. त्याने महाराजांना विचारले, “आपल्याकडे किती हत्ती आहेत?” महाराज मोठ्या धीराने म्हणाले – “आमच्या सर्व लढाया डोंगरात असतात. त्यामुळे आम्हाला हत्तीचा उपयोग नाही. मात्र हत्तीबळ असलेली हजारो माणसे आमच्याकडे आहेत.” कुतूबशहाला त्यातील काही कळले नाही. त्याने महाराजांना विचारले, “असा एखादा माणूस आम्हाला पाहायला मिळेल का?” त्या वेळी महाराजांच्या शेजारी येसाजी कंक उभा होता. त्याच्याकडे हात करून महाराज म्हणाले – “हा त्यातलाच आहे.” येसाजी कंकची बारीक आकृती पाहून त्याच्या पराक्रमाची परीक्षा घ्यावी असे कुतूबशहाला वाटले. कुतूबशहाने महाराजांची अनुमती घेतली आणि पिसाळलेल्या हत्तीशी येसाजी कंकला झुंज देण्यास सांगितले. येसाजी कंकने अवघ्या दोन मिनिटांत हत्तीची सोंड कापली आणि चित्कार करत हत्ती जमिनीवर कोसळला. कुतूबशहा थक्क झाला. त्याने आपल्या गळ्यातील सोन्याचा कंठा येसाजी कंकला बक्षीस दिला. ते बक्षीस कुतूबशहाला परत करत येसाजी कंक म्हणाला – “माझ्या गुणांचे कौतुक करायचे असल्यास आमचे महाराज समर्थ आहेत.” अशी निष्ठावान माणसे महाराजांनी तयार केली. याचे कारण त्यांच्या बोलण्यातले माधुर्य, त्यांच्या चालण्यातले शौर्य आणि त्यांच्या वागण्यातले औदार्य होय.
मनस्विनी; पूर्णिमा शिंदेशैक्षणिक वर्ष जून ते मार्च, एप्रिल. प्रत्येक वर्षी नेहमीच येतो पावसाळा! तशा प्रत्येक वर्षी नेहमीच येतात परीक्षा. परीक्षा आणि आपलं जुनं नातं कायमचंच! पुन्हा पुन्हा परीक्षेची तयारी करायची असतेच सर्वांनाच! बालपणापासूनच ध्यानीमनी बसलेली, आठवणीत रुजलेली, परीक्षा आणि त्यात भीती, पोटात गोळा येण्यासारखी कसं होईल? काय होईल? कधी होईल? ही चिंता भेडसावणारी समस्या. आई-बाबा नव्हतो तेव्हाही आणि आता आई-बाबा झालो तेव्हाही. आपल्या मनाच्या तळघरात कायमची भीती बसलेली. आपली मुलं, त्यांचा अभ्यास त्यावर भवितव्य, भविष्य. खरं घरच जणू शाळा होऊन जातं. परीक्षेच्या दरम्यान सर्वांना अभ्यासाचे वेध लागतात. एक विलक्षण न दिसणारं पण जाणवणारं परीक्षेचं वातावरण निर्माण होऊन जातं. मुलांच्या उनाडक्या थांबतात, मुलांची मस्ती थांबते अशी परिस्थिती होते की शांत, अभ्यासमय आदर्श वातावरण, सारखं सतत अभ्यास करत राहणारी मुलं आणि त्यांच्या मागे लागणारे पालक. आज परीक्षेसाठी सगळे काम सोडून परीक्षामय होतात. परीक्षेचा राक्षस सगळ्यांनाच भेडसावतो.तसे पाहिले तर कधीकाळी आपण सुद्धा जेव्हा जन्माला आलो, त्या पहिल्या श्वासापासून आजपर्यंत नेहमी परीक्षा देत आलोय. पावलोपावली! परीक्षा मग ती परिस्थितीची असेल, माणसांची असेल किंवा कोणती? आज, उद्या निवळेल ती भीती. मेहनत तसे फळ! असे आपण आपल्या स्वतःला समजावून सांगत असतो. अरे अभ्यास कर! अभ्यास कर तो शिळा होत नाही. रोज करत जा. पण बऱ्याचदा तहान लागल्याशिवाय विहीर खणत नसतात. मग शाळा असते. शिकवणी असते. सराव असतो. काही छंद असतात. अभ्यास असतो. मग आयत्यावेळी )घाबरायचं का? येऊन येऊन तरी काय येणार आहे? पुस्तकाबाहेरची नाहीच येणार? मग हे प्रश्न किती मोठे असतात. सुरुवातीला ते काही न सुटणारी कोडी नाहीच बुवा! या परीक्षेचा बागुलबुवा करू नका! सर्वप्रथम परीक्षेचे भूत, राक्षस डोक्यातून काढून टाका. भीती, पोटचा गोळा गेला की धाकधूक संपली. लांब दीर्घ श्वास घ्या, ध्यान करा. दोन मिनिटं डोकं शांत ठेवा. मग ती ऊर्जा आली की हातात पेपर आला रे आला की सोपे सोपे पहिले सोडवा! बरं ते सोडून झालं की मग मात्र कठीण प्रश्न सोडवू लागा. सातत्याने करत राहिलं तर कोणतीच गोष्ट अवघड नाही. यासाठी सराव महत्त्वाचा, परीक्षेपूर्वी सुंदर हस्ताक्षर आणि उजळणीची तयारी असायला हवी. सरावासाठी नमुना प्रश्नपत्रिका सोडवाव्यात आणि तेही वेळ लावून. मोजक्या शब्दांत संदर्भ, मुद्दे लिहा. प्रश्नांचे क्रमांक व्यवस्थित घाला. त्याचे उपप्रश्नही लिहा. डायरेक्ट उत्तरे लिहू शकता. ते लिहिताना विसरून काही शिल्लक ठेवू नका. तिथल्या तिथेच लिहा. उगाच अवांतर, फापटपसारा नको. मोजक्या शब्दांत मुद्देसूद मांडणी, संदर्भासहित स्पष्टीकरण उदाहरणे, दाखले द्या. प्रश्न क्रमांक घाला आणि चटकन सरासर उत्तर लिहीत जा. अवघड प्रश्न सोप्यानंतर हाताळा. जमेल तितका वेळ वाचवा. वेळेचे भान असू द्या. वाचून पाहा.विसरून काही राहिले का? मुद्दे नीट लिहिलेत का? जर वेळ बोललास शिल्लक तर अजून एक-दोन जास्तीचे प्रश्न उत्तरे सुद्धा लिहा. काय असतं कधी एखादा चुकलाच तर गुण कमी पडायला नको. परीक्षा वेळेपूर्वी पुरवण्या बांधून घ्या. त्या पुरवण्यांवर आपला परीक्षा नंबर व्यवस्थित लिहा. बोर्डाची परीक्षा असेल तर हॉल तिकीटवरील नंबर पाहून घ्या. केंद्र लिहा. क्रमाने सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे व्यवस्थित टापटीतपणे मांडा. अक्षर समजेल असेच लिहा. पर्याय प्रयत्न करणे.थांबला तो संपला. वर्षभर तयारी करत असाल, तर नक्कीच लागू होईल अन्यथा परीक्षा पूर्वीची तयारी असेल. तरी चालेल पण तयारी असायलाच हवी. परीक्षेला तोंड देताना रात्री-अपरात्री अभ्यास करणे, पहाटे उठून अभ्यास करणे यांनीही तब्येत बिघडते. भूक, झोप मंदावते आणि मानसिक, शारीरिक शक्ती कमी होते. यांच्यावर परिणाम होतो आणि अनेक आजारांना आपण निमंत्रण देतो. त्यामुळे आपले लक्ष केंद्रित करा. जास्तीत जास्त पाणी प्या, ऊर्जा राहते, चैतन्य राहते, स्फूर्ती राहते आणि उन्हामध्येच परीक्षा आल्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपले रक्षण होते. स्वतःचे रक्षक बना. मोठी होताना आत्मनिर्भर बनताना स्वावलंबी बना. हे सारं शिक्षकांना, आई-वडिलांना मोठे झाल्यावर विसरू नका. सर्व व्याप सहन करून ते आपल्या पाठी खंबीरपणे, आधार बनून मार्गदर्शक असतात. म्हणून प्रश्नपत्रिकेतील उत्तरांशिवाय जीवनातील परीक्षा सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. जीवनामध्ये ठाम उभे राहायचे असेल, तर प्रयत्न, यश, विश्वास यांची तितकीच गरज असते. सर्वांना परीक्षेच्या शुभेच्छा! यशस्वी व्हा.
Water Scarcity : माजगाव, पौध, आंबिवली आणि वारद गावांसाठी महत्त्वाचा असलेला खरसुंडी कालवा गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे.
Food Safety : तुम्ही खात असलेलं चिकन-मासे सुरक्षित आहेत का? शहरातील ‘या’धक्कादायक प्रकारामुळे खळबळ
Food Safety : पिंपरी-चिंचवडमध्ये चिकन-मासळी विक्री व्यवसायाची मोठी झेप, मात्र अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेचे नियम वाऱ्यावर.
Pimpri Chinchwad News : समाजप्रबोधन, वास्तुशास्त्र, शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; जैन महासंघाची मोठी घोषणा.
कथा;रमेश तांबेनमस्कार बालमित्रांनो. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, एका क्रिकेटपटूची. आपल्या भारत देशाच्या दक्षिणेला श्रीलंका हा देश आहे. त्या देशात एक क्रिकेटपटू होऊन गेला. त्याचं नाव मार्वन अटापट्टू. मित्रांनो ही गोष्ट आहे त्याच्या जिद्दीची, मेहनतीची, त्याच्या ध्येयसक्तीची आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची.तर मित्रांनो, त्याचं असं झालं. मार्वनला क्रिकेट खेळायला खूप आवडायचं. तो तासनतास क्रिकेट खेळायचा. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने भरपूर धावा केल्या. त्याचं नाव संपूर्ण देशात झळकू लागलं. जसं प्रत्येक खेळाडूला आपल्या देशाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करायचं असतं तसंच मार्वनलाही करायचं होतं. तो त्याच ध्येयाने, ध्यासाने झपाटलेला होता. श्रीलंकेच्या सर्वोच्च अकरा खेळाडूंत त्याला स्थान मिळवायचं होतं आणि शेवटी त्याला ती संधी लवकरच मिळाली. अखेर श्रीलंकेच्या संघात कसोटी खेळण्यासाठी त्याची निवड झाली. नव्हे नव्हे त्याने ती जागा स्वतःच्या जिद्दीवर आणि परिश्रमावर मिळवली.पण नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते. मार्वनला कसोटी खेळण्याची संधी मिळाली, पण दुर्दैवाने तो दोन्ही डावांत शून्यावर बाद झाला. दोन्ही डावांत अपयशी ठरल्याने त्याने लगेचच संघातले स्थान गमावले. कारण त्यावेळी श्रीलंका संघात स्थान मिळवण्यासाठी जबरदस्त स्पर्धा होती. मग मार्वन पुन्हा स्थानिक क्रिकेटकडे वळला, पण त्याला लवकर संधीच मिळाली नाही. पुढे संधी मिळाली ती तब्बल एकवीस महिन्यांनी! याही वेळी तो अपयशी ठरला. पहिल्या डावात शून्यावर, तर दुसऱ्या डावांत एक धाव करून माघारी परतला. आता मात्र अपयशी असा शिक्काच त्याच्या कपाळावर मारला गेला आणि तो संघाच्या बाहेर फेकला गेला. आता स्थानिक क्रिकेट खेळण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पुढे त्याला सतरा महिन्यांनी परत एकदा खेळण्याची संधी मिळाली, तर पुन्हा तो दोन्ही डावात शून्यावर बाद झाला आणि पुन्हा संघाच्या बाहेर फेकला गेला.आता मात्र त्याची मित्रमंडळी, हितचिंतक, त्याच्या घरातले त्याला सल्ला देऊ लागले. क्रिकेट सोडून दे. तुला त्यात यश नाही. स्वतःचं जीवन असं वाया घालवू नकोस. दुसरे काहीतरी कर, असा फुकटचा सल्ला देऊ लागले. या सगळ्या अपयशाने आणि फुकटच्या सल्ल्याने मार्वन निराश जरूर झाला. पण खचला नाही. कारण क्रिकेट हा त्याचा ध्यास होता. क्रिकेट हेच त्याचे जीवन होते. क्रिकेटच त्याचा श्वास होता. अपयशावर मात करत, टीका आणि फुकटच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत तो स्थानिक क्रिकेट खेळू लागला आणि पुन्हा एकदा जिद्दीच्या, परिश्रमाच्या जोरावर त्याने संघात स्थान मिळवलं, तेही तब्बल छत्तीस महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर! तेव्हा त्याने पहिल्या डावात शून्य आणि दुसऱ्या डावांत पंचवीस धावा केल्या.तर बालमित्रांनो, लोकांची टीका सहन करीत, क्रिकेट सोडून देण्याचे सल्ले, टोमणे ऐकत तो जिद्दीने क्रिकेट खेळत राहिला. पुढे याच मार्वनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत नव्वद कसोटी सामन्यात तब्बल पाच हजार धावा केल्या. सोळा शतके, सहा द्विशतके आणि त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यात साडेआठ हजार धावादेखील केल्या आणि श्रीलंकेचा एक यशस्वी कर्णधार म्हणून तो निवृत्त झाला. हे सगळं यश त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसरी धाव काढण्यासाठी सहा वर्षे लागल्यानंतर! सतत येणाऱ्या अपयशावर मात करत तो अथक प्रयत्न करत राहिला. लोक म्हणतात म्हणून त्याने क्रिकेटचा ध्यास सोडला नाही. लोकांच्या निंदेला कंटाळून नवीन क्षेत्र निवडलं नाही. मार्वनची जीवनकथा आपल्याला हेच सांगते की, जो स्वतःचं ऐकतो तोच जीवनात यशस्वी होतो.
Maval News : लोणावळा ते कान्हे…मावळच्या सरकारी रुग्णालयांचे रुपडे पालटणार; काय आहेत नव्या सूचना?
Maval News : आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत कान्हे येथे आढावा बैठक; तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सक्षमीकरणावर भर.
Patan Granthotsav : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन; शिवेंद्रसिंहराजे, जयकुमार गोरे आणि मकरंद पाटलांची प्रमुख उपस्थिती.
Satara News : सातारकरांना मिळणार शुद्ध हवा! पालिकेचा ‘मास्टर प्लॅन’तयार; शहरात होणार मोठा बदल
Satara News : 'माझी वसुंधरा'चा वारसा पुढे नेण्यासाठी सातारा पालिकेचा पुढाकार; कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी सौर ऊर्जेवर भर.
साप्ताहिक भविष्य, २९ मार्च ते ४ एप्रिल
साप्ताहिक भविष्य, २९ मार्च ते ४ एप्रिल मनाप्रमाणे कार्यभाग साधणार आहातमेष : शिक्षण, संस्था, नोकरी-व्यवसाय, यात अनुकूल काळ आहे.ज्या व्यक्तीचा खूप मोठ्या कालावधीमध्ये अपेक्षित ठिकाणी बदली झाली नसेल तर आता होण्याची शक्यता आहे .नवीन कलाकारांना संधी प्राप्त होणार आहे चांगल्या कलाकारांचे सिने मे बॉक्स ऑफिस वर यशस्वी होणार आहेत. स्टॉक मार्केट मध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू नये अन्यथा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात झालेली चहाच्या पेल्यातील वादळे आता संपणार आहेत. अपेक्षित व्यक्तींकडून सहकार्य मिळणार आहे. आपल्या मनाप्रमाणे कार्यभाग साधणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण होणार आहे. जोडीदार आपल्याला समजून घेणार आहे.जीवन सुखमय होणार आहेवृषभ : शुभ ग्रहांची मोठ्याप्रमाणावर साथ लाभणार आहे त्यामुळे भौतिक जीवन सुखमय होणार आहे पैशाची आवक वाढल्यामुळे खरेदी होईल घरातील वातावरण आनंदी राहणार आहे. अशुभ ग्रहांच्या गोचर भ्रमणामुळे कमी वेळात जास्त पैसा मिळविण्याची इच्छा होऊ शकते. शॉर्टकटने पैसे कमवू नका. त्याचे परिणाम निश्चितच वाईट होतील.सट्टा किंवा लॉटरी मध्ये पैसे लावल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात कुठल्याही प्रकारची वादळे येऊ देऊ नका. विद्यार्थ्यांना पण मनोरंजन करावेसे वाटेल.जुन्या मित्र-मैत्रिणींशी गाठीभेटी होतील त्यामुळे आनंद द्विगुणित होईल. महिलांना खरेदीचा आनंद लुटता येईल. आनंदाचे वातावरण असणार आहे.कामावर लक्ष केंद्रित करावेमिथुन : नोकरी व्यवसायात खूप ताण निर्माण होणार आहे. जास्त काम आणि कमी पैसे, आउटपुट ही कमी मिळणार आहे.उत्पन्नापेक्षा खर्च वाढणार असल्यामुळे बचतीचे बजेट गडबड होऊन जाणार आहे.व्यापार-व्यवसायात दुकानाचे किंवा शोरूमचे रेंट अचानक वाढल्यामुळे अधिक भार पडल्यामुळे ,आर्थिक दृष्ट्या ताण तणाव निर्माण होणार आहे.या कालावधी मध्ये तुम्हाला स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल, तरच तुमचे ध्येय पूर्ण होईल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तसेच तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा.भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. व्यवहार लक्षात ठेवूनच निर्णय घ्या. कौटुंबिक बाबतीत अनुकूल काळ.महत्वपूर्ण बदलकर्क : आपल्या नोकरी आणि व्यवसायात किंवा करिअरमध्ये महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतो. आपले प्रत्येक निर्णय आपल्या बुद्धिचातुर्याने आणि विवेकाने घ्यावे, तरच आपल्या जबाबदार्या तुम्ही पूर्ण करू शकाल. बेरोजगार व्यक्तींना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळण्याची संभावना आहे. काही व्यक्तींना मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक करायची असल्यास थोडा काळ वाट बघा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल, विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करण्यासाठी मेडिटेशन चा आधार घ्यावा. त्यामुळे आपल्याला चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता आहे. कुठल्या एखाद्या गोष्टींमध्ये चांगली कलाकारी दाखवाल. जे विद्यार्थी मेडिकल ला आहे त्यांना विशेष यश मिळणार आहे.जनसंपर्कात वाढसिंह : आपल्या राशीमध्ये शुभ ग्रहांचे भ्रमण चांगल्या प्रकारे होणार आहे. यामुळे व्यापार व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगले बदल होतील. व्यापार व्यवसाय वाढवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. भागीदारीमध्ये किंवा नोकरी व व्यवसायात आपला जनसंपर्क खूप वाढणार आहे. मात्र सर्व दृष्टिकोनातून आपल्याला लक्ष देऊन काम करावे लागेल. घाईगडबडीने नुकसान होऊ शकते, इम्पोर्ट एक्सपोर्ट च्या व्यवसाय मध्ये फायदा होऊ शकतो. कमिशन त्यासारख्या व्यवसायात पण आर्थिक लाभ होतील. प्रेमसंबंधात नवीन आशा उत्पन्न होतील. प्रेमिकांना सफलता. भागीदारी व्यवसायात आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात मिळतील भागीदाराची सलोख्याचे संबंध राहतील.स्थिरता येईलकन्या : आपणास निश्चितच स्थिरता मिळणार आहे. चहूकडून आपल्याला चांगल्या बातम्या समजतील त्यामुळे मनामध्ये उत्साह व आनंद असेल. ज्या लोकांना परदेशगमनाची अपेक्षा आहे त्यांना परदेशगमन निश्चित होईल. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी ज्या परीक्षा दिली आहेत त्याचे रिझल्ट चांगले येतील. कोर्टकचेरीची काही कामे चालली असल्यास ते निकाल आपल्या बाजूने लागतील.शेजारी किंवा जोडीदार यांच्याकडून या तक्रारी निर्माण होतील मनस्ताप होऊ शकतो सबुरीने निर्णय घ्या .वाद-विवाद वाढवू नका अपशब्द वापरू नका.सकारात्मक बदलतूळ : आपल्या मित्रांच्या मदतीने थांबलेला पैसा पुन्हा तुम्हाला प्राप्त होईल. ज्या व्यक्ती बेरोजगार आहेतत्यांना चांगल्या नोकरी चालून येतील. आर्थिक बाबतीमध्ये चांगले आणि सकारात्मक बदल होणार आहेत कौटुंबिक जीवनात नाती मजबूत होतील. पण सासू सुने मध्येवाद जास्त वाढू देऊ नका.विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात पुढे जात असतील पण इंजिनिअर किंवा टेक्निकल साईड मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र जास्त कष्ट करावे लागणार आहेत कॉन्सन्ट्रेशन कडे लक्ष देणे.आपण भाग्या पेक्षा कर्म करण्याला महत्त्व दिले तर यश आपलेच आहे.ज्यांना लग्न करण्याची इच्छा आहे त्यांना योग्य जीवनसाथी मिळेल.पूर्ण विचारांती निर्णय घ्यावृश्चिक : स्थान परिवर्तन होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये बदल होतील. धार्मिक क्षेत्रात किंवा अध्यात्मामध्ये आपली आवड निर्माण होईल.या कालावधीमध्ये आपल्याकडे ज्या काम करणाऱ्या व्यक्ती होत्या, त्या सोडून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला नवीन कामगारांची भरती करावी लागेल .आपल्या व्यवसायामध्ये अचानक आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी शांततापूर्वक मार्ग काढावा लागेल ,पूर्ण विचारांती निर्णय घ्या .नोकरी व्यवसायामध्ये पुरुषांनी स्त्रियां पासून लांबच राहावे. घरामध्ये जे गढूळ लेले वातावरण असेल,त्यामध्ये बहिणीची मध्यस्ती योग्य राहील.नवीन संधी प्राप्त होतीलधनु : प्रॉपर्टी डीलर, बिल्डिंग मटेरियल सप्लायर, यांच्याशी संबंधित असलेले व्यवसाय यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आपल्या करिअर साठी हा खूपच चांगला योग आहे. जे जातक नोकरीच्या शोधात होते त्यांना उत्तम नोकरी मिळेल. ज्यांना सरकारी नोकरीत बदली हवी आहे त्यांना बदली मिळेल, बदली इच्छित ठिकाणी होईल .नोकरी व्यवसाया संबंधी लांबचे प्रवास होवु शकतात चांगली गोष्ट आहे की या प्रवासाचे परिणाम चांगले मिळतील.नवीन संधी प्राप्त होतील. मोठ्या ठिकाणी मोठ्या जागेवर काम करावयास मिळेल.
Wai News : मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच जागे व्हा; जिल्हा पोलीस प्रशासनाकडे अतिरिक्त बंदोबस्त वाढवण्याची वाईकरांची मागणी.
Satara News : शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष पाठपुराव्याला यश; इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून १ कोटींचा निधी मंजूर.
RCB vs SRH : आरसीबीने सनरायझर्स हैदराबादचा (SRH) ६ गडी राखून पराभव केला आणि १९० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करत नवा विक्रम प्रस्थापित केला.
Ishan Kishan Record : सनरायझर्स हैदराबादचा (SRH) नवा कर्णधार ईशान किशन याने आपल्या फलंदाजीने चिन्नास्वामी स्टेडियमवर अक्षरशः वादळ निर्माण केले
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ होणार; ‘या’नेत्याचा मोठा दावा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात फोडाफोडीचे संकट (Maharashtra Politics) अद्याप पूर्णपणे टळलेले नाही.
Iran and US-Israel Conflict:
India-China: भारत -चीन देशांमध्ये व्यापार वाढणार; दोन्ही देश तयार
India-China: विशेष म्हणजे सरहद्दीवरील तणावानंतर भारताने चीनमधील गुंतवणूकीला मर्यादा आणल्या होत्या. मात्र आता ह्या मर्यादा भारत सरकारकडून कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून लवकर चीनमधील थेट परकीय गुंतवणूक भारतात वाढेल असे समजले जात आहे.
Maharashtra Politics : ‘राजकारणात मोठा भूकंप होणार’, शिवसेना खासदाराच्या दाव्याने खळबळ
Maharashtra Politics : शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी नांदेडमध्ये राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत.
Jacob Duffy Debut : एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात आरसीबीच्या एका नव्या शिलेदाराने आपल्या धारदार गोलंदाजीने सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) फलंदाजीचे कंबरडे मोडले.
Rupee – Dollar: डाॅलरच्या तुलनेत रुपया 95 च्या जवळ; महागाई वाढणार
Rupee - Dollar: दरम्यान अधिक सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलर आणि अमेरिकेच्या कर्जरोख्यामध्ये गुंतवणूक वाढल्यामुळे डॉलर इंडेक्स या एका महिन्यामध्ये 2.7 टक्क्यांनी वाढवून जवळजवळ 100 अंकावर गेला आहे.
स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल
नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी राज्यभर चर्चेत असलेला स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्यावर शुक्रवारी (दि. २७) रात्री उशिरा आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा आर्थिक फसवणुकीचा आहे. अशोक खरातविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात आतापर्यंत एकूण १० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी २ आर्थिक फसवणुकीचे तर ८ महिला अत्याचाराचे आहेत. राजेंद्र जासूद व राजेंद्र भागवत यांनी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत.लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात, खरातने पीडित महिलेला आपण दैवी अवतार असल्याचे सांगत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. संबंधित महिला आपल्या वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात, या उद्देशाने खरातकडे गेली होती. माहितीनुसार, पती-पत्नीचे २०१३ साली लग्न झाले होते. मात्र, त्यांच्यात सतत वाद होत असल्याने ते वेगळे राहत होते. एका व्यक्तीच्या सल्ल्याने त्यांनी आपला संसार सुरळीत करण्यासाठी २०२२ मध्ये प्रथमच खरातचा संपर्क साधला. त्यानंतर २०२४ मध्ये ते पुन्हा त्याच्याकडे गेले. या वेळी खरातने पतीला केबिनबाहेर बसवून पत्नीला आत बोलावले. तिला तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्यास देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.यापूर्वी २०२२ मध्ये भेटीदरम्यान खरातने दाम्पत्याकडून त्यांच्या लग्नाची तारीख विचारून चुकीच्या तारखेमुळे वाद होत असल्याचे भासवले होते. त्यानंतर हे दाम्पत्य सुमारे ६ ते ७ वेळा त्याच्याकडे गेले होते. ऑगस्ट २०२४ मध्ये नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातही महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत तिच्यावर चार वेळा जबरदस्तीने गैरकृत्य करण्यात आले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रकरणात व्यवसायातील अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवत नेवाशातील एका व्यापाऱ्याकडून अडीच लाख रुपये व सोन्याच्या अंगठ्या घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.व्हिडिओ व्हायरल प्रकरणी ७४ जणांवर कारवाई : या प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी कठोर कारवाई करताना नव्याने ६५ जणांवर गुन्हे दाखल केले असून, एकूण कारवाईचा आकडा ७४ वर पोहोचला आहे. यापूर्वी कोपरगाव येथे ३ तर नाशिक पोलिसांनी ६ जणांवर गुन्हे दाखल केले होते. अवघ्या तीन दिवसांत ७४ जणांवर कारवाई करण्यात आल्याने पोलिसांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमुळे मुंबई महापालिका, मुंबई मेट्रो, कोकण आणि अमरावती विभाग तसेच सांगली जिल्ह्याला नवे प्रशासकीय नेतृत्व मिळाले आहे.मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांची कोकण विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची आता महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे. महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांची अमरावतीच्या नव्या विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची मुंबईतील महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या (एमएआयडीसी) व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे.सांगलीच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी आता डॉ. मैनाक घोष यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. डॉ. घोष हे मूळचे पश्चिम बंगालचे असून २०१९ च्या बॅचचे अधिकारी आहेत. संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे डॉ. घोष यापूर्वी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जागी प्रियमवदा म्हाडदळकर यांची धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मूळच्या रत्नागिरीच्या असलेल्या प्रियमवदा या २०२२ च्या बॅचच्या अधिकारी असून त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून १३ वा क्रमांक पटकावला होता. याचबरोबर, एम. देवेंद्र सिंग यांची मुंबई महापालिकेत सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून राहुल रेखावार यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव पदी वर्णी लागली आहे.
Crude Oil: एका महिन्यात 45 टक्क्यांनी वाढले खनिज तेलाचे दर
Crude Oil:
Stock Market: शेअर गुंतवणूकदार झाले हवालदिल; 4 आठवड्यात निर्देशांक कोसळले 9 टक्क्यांनी
Stock Market: युद्ध सुरू झाल्यापासून म्हणजे 27 फेब्रुवारीपासून जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजाराचे अतोनात नुकसान झाले आहे. या कालावधीत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 81,287 अंकावरून 9.4 टक्क्यांनी कमी होऊन 73,583 अंकावर आला आहे.
Beed News : धक्कादायक ! बीडमध्ये कारागृहात एका कैद्याचा मृत्यू
बीड जिल्हा (Beed News) कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे कारागृह परिसरात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात
मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे. १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांसाठी प्रति युनिट दरात सुमारे एक रुपयाची कपात करण्यात आली असून, आता त्यांना ८.१४ रुपयांऐवजी ७.१० रुपये मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या पाच वर्षांच्या वीजदर कपात याचिकेला मंजुरी दिल्याने हा मार्ग मोकळा झाला आहे.गेल्या वर्षभरापासून ही याचिका न्यायालयीन प्रक्रियेत अडकली होती. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, तांत्रिक बाबींची पूर्तता करून आयोगाने आता नवा आदेश प्रसिद्ध केला आहे. या निर्णयामुळे आगामी पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने वीजदर कमी होणार आहेत.नवीन दरपत्रकानुसार, घरगुती ग्राहकांसाठी १०० ते ३०० युनिटपर्यंतचा दर १३.२३ रुपयांवरून १२.९४ पैसे इतका कमी झाला आहे. औद्योगिक ग्राहकांसाठीही दिलासा मिळाला असून, त्यांचा दर १०.८८ रुपयांवरून १०.७१ पैसे करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांच्या सवलती महावितरणने कायम ठेवल्या आहेत. दरम्यान, पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी आयोगाने ई-वाहन चार्जिंग स्टेशनसाठी २०२६-२७ या वर्षासाठी ९.५० रुपये प्रति युनिट दर निश्चित केला आहे. हा दर २०२८-२९ पर्यंत स्थिर राहणार आहे. यामुळे मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना आपल्या आवारात लघुदाब चार्जिंग केंद्र सुरू करणे अधिक परवडणारे होणार आहे.

30 C