SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

29    C
... ...View News by News Source

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १७ वर्षांची जेल; भ्रष्टाचार प्रकरणात पत्नी बुशरा बीबीलाही मोठी शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना भ्रष्टाचाराच्या एका मोठ्या प्रकरणात जबरदस्त धक्का बसला आहे. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (FIA) विशेष न्यायालयाने तोशाखाना-II भ्रष्टाचार प्रकरणात दोघांनाही १७-१७ वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.काय आहे नेमके प्रकरण?https://prahaar.in/2025/12/20/sairang-new-delhi-rajdhani-express-hit-elephants-killed-in-assam-coaches-derailed/हे प्रकरण २०२१ मधील आहे, जेव्हा सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सने इम्रान खान यांना एक अत्यंत महागडा 'बुल्गारी ज्वेलरी सेट' भेट म्हणून दिला होता. नियमानुसार, अशा महागड्या भेटवस्तू सरकारी तोशाखान्यात जमा करणे किंवा त्यांची वाजवी किंमत मोजून स्वतःकडे ठेवणे बंधनकारक असते. तपासात असे समोर आले की, या दागिन्यांची मूळ किंमत ७ कोटी १५ लाख पाकिस्तानी रुपये होती, मात्र इम्रान खान यांनी ती अवघ्या ५८ लाख रुपयांमध्ये विकत घेऊन नियमांचे उल्लंघन केले. न्यायालयाने याला सरकारी विश्वासार्हतेशी केलेली फसवणूक आणि भ्रष्ट आचरण मानले आहे. विशेष न्यायाधीश शाहरुख अर्जुमंद यांनी रावळपिंडीच्या अदियाला जेलमध्ये तयार केलेल्या विशेष कोर्ट रूममध्ये हा निकाल दिला. इम्रान खान यांना गुन्हेगारी विश्वासघातासाठी १० वर्षे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ७ वर्षे अशा एकूण १७ वर्षांच्या शिक्षेची सुनावणी झाली. याशिवाय, दोघांवर १ कोटी ६४ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास त्यांना अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.इम्रान खान यांच्या अडचणीत वाढइम्रान खान ऑगस्ट २०२३ पासून विविध गुन्ह्यांखाली तुरुंगात आहेत. यापूर्वी जानेवारी २०२५ मध्ये अल-कादिर ट्रस्ट प्रकरणातही त्यांना १४ वर्षांची शिक्षा झाली होती. तोशाखाना-१ प्रकरणात इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती, मात्र आता तोशाखाना-२ मध्ये सुनावलेल्या या मोठ्या शिक्षेमुळे त्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. इम्रान खान यांच्या कायदेशीर टीमने या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे संकेत दिले आहेत.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 12:30 pm

Pune District : शिरूर तालुका विज्ञान प्रदर्शनात शिक्षक गटात दत्तात्रय चिकटे यांची सलग चौथ्यांदा बाजी

शिरूर :विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन,संशोधन वृत्ती आणि सर्जनशीलतेला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ५३ व्या शिरूर तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात शिक्षक गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,उचाळे वस्ती येथील आदर्श शिक्षक दत्तात्रय अनंतराव चिकटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे त्यांनी सलग चौथ्या वर्षी प्रथम क्रमांकाचा मान मिळवत आपल्या गुणवत्तेची आणि सातत्याची ठसा उमटवला आहे. […] The post Pune District : शिरूर तालुका विज्ञान प्रदर्शनात शिक्षक गटात दत्तात्रय चिकटे यांची सलग चौथ्यांदा बाजी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 12:26 pm

कोकाटे प्रकरणावर सुप्रिया सुळेंनी तीव्र शब्दांत व्यक्त केला संताप; म्हणाल्या “दिल्लीत मला जो भेटत होता तो…”

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. काल शुक्रवारी १९ डिसेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात पार पडली. या सुनावणीत कोकाटे यांना अंशत: दिलासा मिळाला असून, १ लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला […] The post कोकाटे प्रकरणावर सुप्रिया सुळेंनी तीव्र शब्दांत व्यक्त केला संताप; म्हणाल्या “दिल्लीत मला जो भेटत होता तो…” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 12:12 pm

बॉलीवूडचा जलवा हॉलिवूडमध्ये, धुरंधर गाण्यावर थिरकले जोनस ब्रदर्स

मुंबई : सध्या सर्वत्र धुरंधर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची विक्रमी कमाई, रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाच्या अभिनयाचं कौतुक आणि शरारत या गाण्याची लोकप्रियता यामुळे धुरंधर सतत चर्चेत आहे. आता हीच चर्चा देशाबाहेरही पोहोचली असून थेट हॉलिवूडपर्यंत धुरंधरची भूरळ पडल्याचं पाहायला मिळत आहे.ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राचा पती आणि प्रसिद्ध गायक निक जोनस याने आपल्या भावांसोबत आणि जोनस ब्रदर्स बँडसह एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये निक आणि त्याचे भाऊ धुरंधर चित्रपटातील शरारत या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.व्हायरल व्हिडीओमध्ये निक जोनस शरारत गाण्याच्या तालावर हात वर करत डान्स करताना दिसतो, तर त्याच्या मागे त्याचे भाऊही त्याच जोशात थिरकत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना निक जोनसने कॅप्शनमध्ये नवा प्री शो हाइप साँग अनलॉक झाला आहे, असं लिहिलं आहे.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 12:10 pm

राजधानी एक्स्प्रेसच्या अपघातात आठ हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले

Assam Train Accident | आसाममध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला. सैरांगहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या ‘राजधानी एक्स्प्रेस‘ रेल्वेच्या अपघातात आठ हत्ती ठार, तर एक हत्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघातात इतका भयानक होता की, रेल्वेचे इंजिन आणि पाच डब्बे रुळावरून घसरले. ही घटना आसाममधील होजाई जिल्ह्यातील छंगजुराई भागात मध्यरात्री 2 वाजून 17 मिनिटांच्या सुमारास […] The post राजधानी एक्स्प्रेसच्या अपघातात आठ हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 11:56 am

Zeenat Aman: जीनत अमानने शेअर केले हेलेन आणि बादशाहसोबतचे खास फोटो; चाहत्यांना विचारला खास प्रश्न

Zeenat Aman: दिग्गज अभिनेत्री जीनत अमान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नुकतीच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर इंडियन आयडलच्या सेटवरील काही खास फोटो शेअर करत चाहत्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. या पोस्टमध्ये त्यांनी हेलेन आणि रॅपर बादशाहसोबतचे सुंदर क्षण शेअर करत आपली भावना व्यक्त केली आहे. जीनत अमान यांनी शेअर केलेले हे तीन फोटो इंडियन आयडल सीझन […] The post Zeenat Aman: जीनत अमानने शेअर केले हेलेन आणि बादशाहसोबतचे खास फोटो; चाहत्यांना विचारला खास प्रश्न appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 11:51 am

….म्हणून उद्धव ठाकरेंची साथ सोडली! संजोग वाघेरे भाजप पक्षप्रवेशासाठी मुंबईच्या दिशेने रवाना; ‘हा’मोठा दावा करत म्हणाले

Sanjog Waghere : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या घोषणेनंतर मोठ्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. महायुती भक्कम करण्यासाठी विरोधी पक्षातील नेते सामील करून घेतले जात आहेत. ही निवडणूक आणखी सोपी करण्यासाठी राजकीय गणित आखणी करून बेरीजचे राजकारण करण्याचा मानस महायुतीचा आहे. पण महायुतीमध्ये मोठा भाऊ म्हणून पाहिले जाणाऱ्या भाजपमध्ये जाण्याचा कल सर्वाधिक आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला […] The post ….म्हणून उद्धव ठाकरेंची साथ सोडली! संजोग वाघेरे भाजप पक्षप्रवेशासाठी मुंबईच्या दिशेने रवाना; ‘हा’ मोठा दावा करत म्हणाले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 11:31 am

Unhealthy Eating Habits: घाईघाईत जेवण करणं आरोग्यासाठी धोकादायक; पोटात गॅससह वाढू शकतात गंभीर समस्या

Unhealthy Eating Habits: धावपळीच्या जीवनात अनेक जण वेळेअभावी घाईघाईत जेवण करतात. मात्र, अशी सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. नीट न चावता, लवकर जेवण केल्यामुळे पचनसंस्थेवर ताण पडतो आणि त्याचा थेट परिणाम पोटातील गॅस, अपचन आणि पोट फुगणे यांसारख्या तक्रारींवर होतो. चांगल्या आरोग्यासाठी योग्य वेळी आणि शांतपणे जेवण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा अन्न नीट पचत […] The post Unhealthy Eating Habits: घाईघाईत जेवण करणं आरोग्यासाठी धोकादायक; पोटात गॅससह वाढू शकतात गंभीर समस्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 11:19 am

अमेरिकेकडून सीरियावर मोठा हवाई हल्ला; ट्रम्प यांचा दहशतवाद्यांना कडक इशारा

Operation Hawkeye | अमेरिकेने सिरियात मोठा हवाई हल्ला केला आहे. सीरियामध्ये १३ डिसेंबर रोजी झालेल्या एका हल्ल्यात अमेरिकेच्या दोन जवानांसह एका अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यासाठी अमेरिकेने इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेला जबाबदार धरत सीरियातील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ला केला. यात ISISचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. दरम्यान, अमेरिकन सैन्याने ‘ऑपरेशन हॉकआय’ […] The post अमेरिकेकडून सीरियावर मोठा हवाई हल्ला; ट्रम्प यांचा दहशतवाद्यांना कडक इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 11:16 am

मुंबई महापालिका रणधुमाळीत ठाकरे गटासमोर काँग्रेस की मनसे असा पेच?

मुंबई : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून स्थानिक राजकीय समीकरणं लक्षात घेऊन रणनिती आखली जात आहे. यातच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे.मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी सत्ताधारी भाजपसह सर्वच प्रमुख पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सोबत घेतल्याने मुंबईतील राजकीय गणितं बदलल्याची चर्चा आहे. मनसेसोबतच्या युतीमुळे ठाकरे गटाची ताकद वाढताना दिसत असली, तरी निवडणूक जवळ येत असताना पक्षातील अंतर्गत अस्वस्थतेच्या चर्चांना उधाण आलं आहे.मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने एकला चलोची भूमिका जाहीर केली आहे. तर शरद पवार हे ठाकरे गट आणि मनसेसोबत एकत्र निवडणूक लढवण्याच्या भूमिकेत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तिन्ही पक्ष एकत्र आले, तरी ठाकरे गटातील काही नेत्यांना अल्पसंख्यांक मतदार नाराज होण्याची भीती सतावत आहे. मनसेला सोबत घेण्याबाबत उद्धव ठाकरे ठाम असले, तरी काँग्रेसला बाजूला ठेवायचं की नाही, यावरून पक्षात संभ्रमाचं वातावरण आहे.मुंबईत काँग्रेसची पारंपरिक ताकद लक्षात घेता हा निर्णय ठाकरे गटासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्यांक मतांच्या पाठिंब्यावर ठाकरे गटाला मोठा फायदा झाला होता. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी तीन जागा जिंकण्यात आल्या होत्या, तर वायव्य मुंबईची जागा अवघ्या ४८ मतांनी हातातून गेली होती. अशा परिस्थितीत काँग्रेसपासून फारकत घेतल्यास अल्पसंख्यांक मतांमध्ये घट होण्याची शक्यता असून मतविभागणीचा फटका ठाकरे गटाला बसू शकतो. त्यामुळे काँग्रेससोबतच राहावं, अशी भूमिका ठाकरे गटातील काही नेते अजूनही घेत असल्याचं समोर येत आहे.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 11:10 am

पुलाच्या कामामुळे कल्याणमध्ये वाहतूक मार्गात २० दिवस बदल , वालधुनी उड्डाणपुलावर काम सुरू

कल्याण : कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्वेला जोडणारा वालधुनी उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुलाच्या डांबरीकरणासह आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्यामुळे वाहनचालकांना पुढील काही दिवस वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार २० डिसेंबरच्या रात्रीपासून हा पूल पुढील २० दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून १० जानेवारी २०२६ पर्यंत वाहतूक बंद असणार आहे. यासंदर्भात वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.शाळांना नाताळच्या सुट्ट्या सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वाहतुकीवर कमी परिणाम व्हावा, या उद्देशाने या कालावधीत दुरुस्तीचे काम नियोजित करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या काळात नागरिकांनी नियोजित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.या कालावधीत कल्याण पूर्वेकडून स्व. आनंद दिघे उड्डाणपुलावरून शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सम्राट चौकातून वालधुनी पुलाकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संबंधित वाहनांनी सम्राट चौकात उजवीकडे वळून शांतीनगर-उल्हासनगर मार्गे आपल्या इच्छित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उल्हासनगरकडून वालधुनी पुलाच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेकडे येणाऱ्या वाहनांनाही सम्राट चौकात प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. ही वाहने डावीकडे वळवून स्व. आनंद दिघे उड्डाणपुलाच्या दिशेने वळवली जाणार आहेत.तसेच कल्याण पश्चिमेकडून वालधुनी पुलावरून उल्हासनगर किंवा स्व. आनंद दिघे उड्डाणपुलामार्गे कल्याण पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांना सुभाष चौकात थांबवण्यात येणार आहे. ही वाहने पुढे कर्णिक रोडने जात प्रेम ऑटो परिसरात उजवे वळण घेऊन शहाड पुलामार्गे मार्गस्थ केली जाणार आहेत. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 11:10 am

मल्लिका शेरावतची व्हाईट हाऊस ख्रिसमस डिनरला हजेरी, सोशल मीडियावर चर्चा

मुंबई : बॉलिवूडमधील ‘मर्डर’ चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मल्लिका शेरावत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या व्हाईट हाऊस ख्रिसमस डिनरला मल्लिकाने उपस्थिती लावली असून तिच्या या उपस्थितीमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.अत्यंत मोजक्या आणि खास पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमातील काही खास क्षण मल्लिकाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. तिचे व्हाईट हाऊस सोबत काढलेले फोटो आणि कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.या खास प्रसंगासाठी मल्लिकाने गुलाबी रंगाचा स्लिप ड्रेस परिधान केला होता. त्यावर तिने फर जॅकेट मॅच केले असून तिचा हा लूक सोशल मीडियावर विशेष पसंतीस उतरला आहे. चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.मल्लिकाने केवळ फोटोच नाही तर कार्यक्रमादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या भाषणाचे काही व्हिडिओही शेअर केले आहेत. यासोबतच तिला मिळालेल्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेचा फोटो पोस्ट करत तिने हा अनुभव स्वप्नवत असल्याची भावना व्यक्त केली आहे. व्हाईट हाऊसच्या ख्रिसमस डिनरला आमंत्रण मिळणे हे माझ्यासाठी मोठा सन्मान असल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.मात्र, मल्लिकाच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेक चाहत्यांनी तिचे अभिनंदन करत जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केल्याचे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला हे आमंत्रण नेमके कशामुळे मिळाले, असा सवाल उपस्थित केला आहे. काहींनी थेट प्रश्न विचारत कुतूहल व्यक्त केले, तर काहींनी या पोस्टला दिखावा असल्याची टीकाही केली आहे.दरम्यान, मल्लिकाचा व्हाईट हाऊसशी संबंध नवा नाही. यापूर्वी २०११ साली बराक ओबामा यांच्या कार्यकाळात तिने व्हाईट हाऊस करस्पॉडंट्स डिनरला हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्या ‘पॉलिटिक्स ऑफ लव्ह’ या चित्रपटामुळे तिला हे विशेष निमंत्रण मिळाले होते.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 11:10 am

एकाच प्रभागातून तीन जिवलग मित्र निवडणुकीच्या रिंगणात! राजकारणापलीकडच्या मैत्रीची राज्यभरात जोरदार चर्चा कारण…

Fursungi-Uruli Deva Municipal Council Election : आज २० डिसेंबर रोजी राज्यातील २३ नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान पार पडत आहे. उद्या २१ डिसेंबर रोजी या मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी निवडणुकीच्या मैदानात असलेल्या उमेदवारांकडून करण्यात आली. या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असल्याने यास एक वेगळे महत्व असते. निवडणुकीच्या काळात सभांच्या माध्यमातून […] The post एकाच प्रभागातून तीन जिवलग मित्र निवडणुकीच्या रिंगणात! राजकारणापलीकडच्या मैत्रीची राज्यभरात जोरदार चर्चा कारण… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 10:54 am

अमेरिकेने दहशतवाद्यांच्या ७२ ठिकाणांवर केले हल्ले; सीरियात युद्धसदृश परिस्थिती

सीरिया : सीरियामध्ये अमेरिकन सैन्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने मोठी लष्करी कारवाई करत इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन हॉकआय’ अंतर्गत सीरियातील दहशतवाद्यांच्या सुमारे ७० ठिकाणांवर बॉम्बहल्ले करण्यात आले.गेल्या आठवड्यात मध्य सीरियातील पालमीरा भागात अमेरिका आणि सहयोगी दलांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिक आणि एक स्थानिक अनुवादकाचा मृत्यू झाला, तर तीन अमेरिकन सैनिक जखमी झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी स्पष्ट केले आहे.हेगसेथ यांनी सांगितले की, ही कारवाई इसिसच्या थेट ठिकाणांवर केंद्रित होती. ही नवीन युद्धाची सुरुवात नसून अमेरिकन सैनिकांवर झालेल्या हल्ल्याचा ठोस बदला आहे. जगात कुठेही अमेरिकन नागरिक किंवा सैन्यावर हल्ला झाला, तर अमेरिका हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करेल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मध्य सीरियामध्ये करण्यात आलेली ही हवाई कारवाई अत्यंत अचूक आणि व्यापक होती. इसिसशी संबंधित डझनभर तळ, साठवणूक केंद्रे आणि हालचालींच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे.दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. इसिसकडून अमेरिकन सैनिकांची क्रूर हत्या झाल्यानंतर आता प्रत्युत्तर कारवाई सुरू झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. शहीद सैनिकांना लष्करी सन्मानानं मायदेशी आणण्यात आले असून त्यांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या हवाई हल्ल्यांमुळे सीरियातील परिस्थिती आणखी तणावपूर्ण होण्याची शक्यता असून मध्यपूर्वेत घडामोडींवर आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष ठेवले जात आहे.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 10:30 am

मतदान कर्मचाऱ्यांना ‘ती’शंका आली अन्…; सिन्नर नगरपरिषद मतदान केंद्रावरील घटनेने खळबळ, नेमकं काय घडलं?

Sinnar Municipal Council : आज २० डिसेंबर रोजी राज्यातील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी विविध जिल्ह्यात मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरूवात झाली असून, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतच्या वेळेत मतदारांना मतदान करता येणार आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार २० डिसेंबरला या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर नगरपरिषद निवडणुकीसाठी एका मतदान केंद्रावर खळबळ उडवून देणारी […] The post मतदान कर्मचाऱ्यांना ‘ती’ शंका आली अन्…; सिन्नर नगरपरिषद मतदान केंद्रावरील घटनेने खळबळ, नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 9:35 am

महुआ मोइत्रांविरोधात सीबीआय आरोपपत्र दाखल करणार नाही

दिल्ली उच्च न्यायालयाकडून लोकपालचा आदेश रद्दनवी दिल्ली : पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात सीबीआय सध्या टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी लोकपालने आरोपपत्र दाखल करण्यास दिलेली मंजुरी रद्द केली आहे.न्यायमूर्ती अनिल क्षतरपाल आणि हरीश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने लोकपालला सांगितले आहे की, त्यांनी लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियमच्या कलम २० अंतर्गत एका महिन्याच्या आत कायद्यानुसार पुन्हा निर्णय घ्यावा. सुनावणीदरम्यान महुआ मोइत्रा यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, लोकपालने मंजुरी देताना कायदेशीर प्रक्रियेचे योग्य प्रकारे पालन केले नाही. कायद्यानुसार, कोणत्याही लोकप्रतिनिधीविरुद्ध मंजुरी देण्यापूर्वी त्यांची टिप्पणी घेणे आवश्यक असते, जे घेतले गेले नाही. सीबीआयने या युक्तिवादाला विरोध करत म्हटले की, लोकपालच्या कार्यवाहीत महुआ मोइत्रा यांना कागदपत्रे सादर करण्याचा आणि तोंडी सुनावणीचा कायदेशीर अधिकार नव्हता. त्या केवळ लेखी टिप्पणी करू शकत होत्या.महुआंवर पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. २०२३ मध्ये भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोइत्रावर महागड्या भेटवस्तू आणि पैसे घेऊन व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी लोकसभेत प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. महुआंवर राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केल्याचाही आरोप होता.महुआ मोइत्रा यांचे संसदेत ६२ प्रश्नांपैकी ९ अदानींशी संबंधित२०१९ मध्ये खासदार झाल्यापासून महुआ मोइत्रा यांनी संसदेत २८ केंद्रीय मंत्रालयांशी संबंधित ६२ प्रश्न विचारले आहेत. यात पेट्रोलियमपासून कृषी, शिपिंग, नागरी विमान वाहतूक, रेल्वे इत्यादींचा समावेश आहे. संसद इनच्या वेबसाइटनुसार, ६२ प्रश्नांपैकी सर्वाधिक ९ प्रश्न पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयासाठी होते, त्यानंतर वित्त मंत्रालयासाठी आठ प्रश्न होते. एकूण ६२ पैकी ९ प्रश्न अदानी समूहाशी संबंधित होते. यापैकी सहा प्रश्न पेट्रोलियम मंत्रालयासाठी आणि प्रत्येकी एक प्रश्न वित्त, नागरी विमान वाहतूक आणि कोळसा मंत्रालयासाठी होता.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 9:30 am

वनजमीन शेतीसाठी भाड्याने देणे बेकायदेशीर

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयनागपूर : वनसंरक्षण अधिनियम, १९८० च्या कलम २ अंतर्गत केंद्र सरकारची पूर्वपरवानगी न घेता वनजमीन शेतीसाठी भाड्याने देता येणार नाही, तसेच अशा प्रकारे दिलेला कोणताही भाडेपट्टा बेकायदेशीर असून तो सुरू ठेवता येणार नाही, असा ठाम निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, वनजमीन शेतीसाठी वापरण्यास परवानगी देणे म्हणजे प्रत्यक्षात जंगलतोडीस प्रोत्साहन देणे होय. वनसंरक्षण अधिनियम, १९८० च्या कलम २ नुसार केंद्र सरकारची पूर्वपरवानगी नसताना वनजमीनचे ‘डि-रिझर्वेशन’ किंवा गैर-वन उद्देशांसाठी वापर निषिद्ध आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच बेकायदेशीररीत्या दिलेला भाडेपट्टा पुढे सुरू ठेवण्याची कोणतीही परवानगी देता येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. या निरीक्षणांच्या आधारे, कर्नाटक उच्च न्यायालयाचा तो आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला, ज्यात एका सहकारी संस्थेला वनजमिनीवरील भाडेपट्टा सुरू ठेवण्यासाठी निवेदन सादर करण्याची मुभा देण्यात आली होती.न्यायालयाने ठरवले की, १३४ एकरांहून अधिक क्षेत्रफळाच्या वनजमिनीवर शेतीसाठी भाडेपट्टा देणे हेच मुळात बेकायदेशीर होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड व पर्यावरणाची हानी झाली. दहा वर्षांहून अधिक काळ या वनक्षेत्रावर शेती करून लाभ घेतलेल्या सहकारी संस्थेला पुढील मुदतवाढ देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सध्याच्या कायद्यांनुसार शेतीसह कोणताही गैर-वन उपयोग वनजमिनीवर करता येत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 9:10 am

नोकरशहांसाठी 'माननीय'शब्द वापरणे अयोग्य

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णयप्रयागराज : नोकरशहांसाठी आणि राज्य सरकारी अधिकाऱ्यांसाठी 'माननीय' शब्द वापरण्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे. न्यायालयाने महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना या संदर्भात वैयक्तिक शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले, ज्यामध्ये अधिकाऱ्यांच्या नावांमध्ये किंवा पदनामांमध्ये 'माननीय' हा शब्द कोणत्या कायद्यानुसार जोडला जात आहे असा प्रश्न विचारला आहे.न्यायाधीश अजय भानोत आणि गरिमा प्रसाद यांच्या खंडपीठाने योगेश शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला. 'अतिरिक्त आयुक्त, अपील' यांना 'माननीय अतिरिक्त आयुक्त, अपील' असे का संबोधले जात आहे असा प्रश्न न्यायालयाने विचारला. न्यायालयाने म्हटले आहे की ही प्रवृत्ती घटनात्मक अधिकाऱ्यांचा आणि न्यायालयांचा दर्जा कमी करण्याचा एक मार्ग आहे. अलिकडच्या काळात, विविध राज्य विभागांमध्ये अधिकृत पत्रव्यवहार आणि आदेशांमध्ये सर्वात खालच्या ते सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या पदनामांमध्ये 'माननीय' जोडण्याची पद्धतीमध्ये वाढ होत आहे. 'माननीय' हा शब्द फक्त मंत्री आणि इतर सार्वभौम अधिकाऱ्यांसाठीच योग्य आहे, नोकरशहा किंवा राज्य सरकारी अधिकाऱ्यांसाठी नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. इटावाच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पत्रव्यवहारात कानपूरच्या विभागीय आयुक्तांना 'माननीय आयुक्त' असे संबोधले आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. पुढील सुनावणी १९ डिसेंबर रोजी होईल.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 9:10 am

एकांकिकांचे विश्व आणि बोलीभाषांचे प्रयोग...!

राजरंग : राज चिंचणकरमराठी नाट्यसृष्टीच्या अवकाशात एकांकिका स्पर्धांचे वेगळे विश्व सामावलेले आहे. एकांकिका स्पर्धांचे हे व्यासपीठ नवीन लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींसाठी महत्त्वाचे आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांतूनच अनेक युवा रंगकर्मी रंगभूमीवर येत असतात. महाराष्ट्रात संपूर्ण वर्षभरात अनेक एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या जातात. याच एकांकिकांच्या दुनियेत २०१६ या वर्षी एक अनोखा प्रयोग केला गेला आणि तो म्हणजे बोलीभाषा एकांकिका स्पर्धांचा...! 'बोलीभाषा' हा या प्रयोगाचा केंद्रबिंदू होता आणि याद्वारे महाराष्ट्रातल्या विविध बोलीभाषांचे चांदणे रंगभूमीवर दृश्यमान झाले. यानिमित्ताने, महाराष्ट्राच्या खेडोपाडी संवादाचे माध्यम असलेल्या बोलीभाषा रंगमंचावर आल्या आणि शहरी भागातल्या रसिकांना या बोलीभाषांची ओळख झाली.मराठी रंगभूमीवर एकेकाळी 'वस्त्रहरण' या नाटकाने धुमशान घातले होते. या नाटकाची अनेक वैशिष्ट्ये असली, तरी या नाटकात वापरली गेलेली बोलीभाषा महत्त्वाची ठरली आणि तिने या नाटकाला खास रुची बहाल केली. या नाटकाचे कर्ताकरविता गंगाराम गवाणकर यांची बोलीभाषेवर विशेष माया होती आणि त्यांनी रचलेल्या या नाटकात त्याचे पुरेपूर प्रतिबिंब पडले होते. आता 'वस्त्रहरण'कारांचा संदर्भ यात द्यायचे कारणही तसेच आहे. सध्या नाट्यसृष्टीत गाजत असलेली बोलीभाषा एकांकिका स्पर्धा केवळ त्यांच्या निमित्तानेच रंगभूमीवर मूर्त स्वरूपात अवतरलेली आहे.बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची मुहूर्तमेढ 'वस्त्रहरण'कार गंगाराम गवाणकर यांच्या एका भाषणाने रोवली गेली आहे. ठाणे येथे ९६ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. गंगाराम गवाणकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणात, त्यांनी नाट्यसृष्टीत केलेल्या कार्याचे आणि यशाचे श्रेय बोलीभाषेतल्या त्यांच्या 'वस्त्रहरण' या गाजलेल्या नाटकाला दिले होते. बोलीभाषेबद्दल बोलताना त्यांनी त्यावेळी, बोलीभाषेतली नाटके रंगभूमीवर यायला हवीत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. वास्तविक, यानंतर हा विषय तिथेच संपला असता. पण तसे झाले नाही. कारण त्यांच्या या भाषणातून प्रत्यक्ष काहीतरी घडणे विधिलिखित होते. त्यावेळी तिथे नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण उपस्थित होते आणि त्यांनी गंगाराम गवाणकर यांच्या त्या अपेक्षेला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे ठरवले.मराठी नाट्यसृष्टी अनेक नाट्यनिर्मात्यांनी गाजवली आणि त्यातलेच एक नाव म्हणजे नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण. त्यांनी त्यांच्या 'सुप्रिया प्रॉडक्शन' या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारची नाटके रंगभूमीला दिली. 'यू टर्न', 'हिमालयाची सावली', 'कथा', 'चॉईस इज युवर्स', 'दुधावरची साय', 'टाइम प्लीज', 'यू टर्न २', 'मदर्स डे', 'जाऊ द्या ना भाई' अशी अनेक नाटके त्यांनी रंगभूमीवर आणली. त्यांचे 'यू टर्न' हे नाटक रंगभूमीवर खूप गाजले. 'नाट्य निर्माता' म्हणून गोविंद चव्हाण यांना या नाटकाने खरी ओळख मिळवून दिली. रंगभूमीवर अनेक उदयोन्मुख युवा कलाकारांना या नाट्यसंस्थेने प्रकाशात आणले. याच गोविंद चव्हाण यांच्या कानी गंगाराम गवाणकर यांचे 'ते भाषण' पडल्यावर त्यांच्या मनात बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची संकल्पना चमकून गेली आणि त्यांनी तिला मूर्त स्वरूप देण्याचे नक्की केले. या पार्श्वभूमीवर, सन २०१६ या वर्षी त्यांनी बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली. एक राज्यस्तरीय आगळीवेगळी बोलीभाषा एकांकिका स्पर्धा भरवून आपली बोली आणि संस्कृती जपण्याची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. 'हृदयाची भाषा बोलीभाषा' ही या एकांकिका स्पर्धेची टॅग-लाईन...! या स्पर्धेला पहिल्या वर्षापासूनच रंगकर्मींचा उत्तम प्रतिसाद मिळत गेला.त्यानंतर चार वर्षे ही स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू होती; मात्र नंतरच्या काळात उद्भवलेल्या कोरोना प्रादुर्भावात गोविंद चव्हाण यांचे निधन झाले. स्पर्धेचा कर्ताच काळाच्या पडद्याआड गेल्यावर, यापुढे ही स्पर्धा खंडित होते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. पण गोविंद चव्हाण यांची कन्या सुप्रिया चव्हाण हिने एकूणच बांधिलकी लक्षात घेऊन ही स्पर्धा पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यंदा या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेचे नववे वर्षं आहे. आतापर्यंत या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा केंद्रबिंदू मुंबई हाच होता. पण यंदाच्या वर्षापासून मुंबईसह नागपूर येथे सुद्धा ही स्पर्धा घेण्यात येत आहे. यंदा या स्पर्धेची प्राथमिक फेरी १९ व २० डिसेंबर रोजी मुंबईत आणि २७ डिसेंबर रोजी नागपूर अशा दोन केंद्रांवर होत आहे. अंतिम फेरी येत्या जानेवारी महिन्यात मुंबईत रंगणार आहे. या स्पर्धेच्या गेल्या आठ वर्षांच्या काळात तब्बल ४०० हून अधिक नाट्यसंघ यात सहभागी झाले आहेत. पूर्णपणे मराठीच्या प्रादेशिक बोलीभाषांवर आधारित अशी ही एकमेव एकांकिका स्पर्धा आहे.बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मालवणी, कोकणी, घाटी, वऱ्हाडी, आगरी, कोळी, सातारी, खानदेशी, झाडी आदी मराठीच्या जवळजवळ ५६ बोलीभाषा महाराष्ट्राच्या विविध प्रांतांमध्ये बोलल्या जातात. या बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्वाचे कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. या स्पर्धेत पारितोषिके देतानाही, ज्येष्ठ रंगकर्मींच्या स्मृतींची जपणूक करत त्यांच्या स्मरणार्थ पारितोषिके दिली जातात. हीच स्पर्धा आता दशकाच्या मार्गावर वाट चालू लागली आहे. मराठी बोलीभाषा आणि नाट्यसृष्टीसाठी ही आनंदाची व अभिमानाची गोष्ट म्हणायला हवी.या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर व्यक्त होताना सुप्रिया चव्हाण म्हणते, सन २००० ते २०२२ या काळात 'सुप्रिया प्रॉडक्शन'ने उत्तमोत्तम नाट्यकृती रंगभूमीला दिल्या. या २२ वर्षांमध्ये मला खूप काही शिकायला मिळाले. बोलीभाषा एकांकिका स्पर्धा सन २०१६ पासून आम्ही सुरू केली. सन २०२० या वर्षी बाबा आम्हाला सोडून गेले; पण त्यांच्या नाट्यसृष्टीवरच्या प्रेमाने आणि आमच्यावरच्या आशीर्वादाने आमची संस्था आजही काम करत आहे. यापुढेही याच जोमाने नवीन आव्हाने स्वीकारत आम्ही काम करत राहू.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 9:10 am

आईला सर्व प्रश्नांचे ‘उत्तर’ माहीत असते

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमलऋता दुर्गुळेने अभिनयाच्या क्षेत्रात आपला चांगलाच ठसा उमटविला आहे. 'उत्तर ' हा तिचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे. 'ठरलंय फॉरेव्हर' हे नाटक देखील ती करतेय. नाटकाची सहनिर्माती देखील ती आहे. चित्रपट व नाटक यामध्ये काम करताना तिला अगदी तारेवरची कसरत करावी लागत आहे.घरात अभिनयाच्या क्षेत्रात कोणीही नव्हतं, तरीदेखील ती आजची आघाडीची अभिनेत्री बनली आहे. दादरच्या किंग जॉर्ज शाळेत तिचे शालेय शिक्षण झालंय. शिशुवर्गात असताना तिने समूह नृत्यात भाग घेतला होता. नंतर तिने रुईया कॉलेजमधून मास मीडिया केलं. त्याच वेळी तिला पहिली मालिका मिळाली होती. तिचे नाव होते 'दुर्वा'.'दुर्वा' मालिकेपासून तिच्या अभिनयाला सुरुवात झाली. या मालिकेत तिला खूप मोठ्या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाली, त्यामध्ये विनय आपटे, मुग्धा शहा, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, सृजा प्रभुदेसाई हे सर्व कलाकार होते. या मालिकेचे दिग्दर्शक दीपक नलावडे व गिरीश वसईकर यांच्याकडून भरपूर गोष्टी तिला शिकायला मिळाल्या. जवळपास चार वर्षे ही मालिका सुरू होती. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळाला. 'दादा एक गुड न्युज' हे तिचं पहिलं नाटक होय.'अनन्या' हा तिचा पहिला मराठी चित्रपट होता. तो चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला. त्या चित्रपटासाठी तिला भरपूर शारीरिक मेहनत घ्यावी लागली. हा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर तिच्यावर खूप दडपण होतं, परंतु चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रेमाने ती भारावून गेली.'सिंगिंग स्टार' या कार्यक्रमाचे तिने सूत्रसंचालन केले होते. लॉक डाऊन संपत असताना या कार्यक्रमाचे शूटिंग सुरू झाले होते. सगळेजण मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाचे शूटिंग करीत होते. एक वेगळा अनुभव तिला मिळाला.क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित 'उत्तर' हा तिचा चित्रपट हल्लीच प्रदर्शित झालेला आहे. आईला साऱ्याच प्रश्नाची उत्तरं माहीत असतात, अशी या चित्रपटाची टॅगलाइन होती. घराघरात आईला गृहीत धरलं जातं, मात्र तिच्या प्रश्नाची उत्तरं तिलाच शोधावी लागतात. आई आणि मुलाच्या नातेसंबंधाची गोष्ट धरत तंत्रज्ञानावर पूर्ण आरूढ होऊन त्यातच हरवू पाहणाऱ्याना नव्याने स्वतःशी संवाद साधायला लावणारा हा चित्रपट आहे. एआय या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं दर्शन या चित्रपटामध्ये घडत आहे. रेणुका शहाणे यांनी आईची भूमिका साकारली आहे. क्षिप्राची व्यक्तिरेखा ऋताने साकारली आहे. खूप इंटरेस्टिंग पात्र आहे. त्यासाठी तिला तिच्या लूकवर काम करावे लागले. जेनजी पात्र आहे ते.आई ही कधीच थकत नाही. तिच्या जिद्दीला सलाम करावासा तिला वाटतो. तिचं तिच्या आईसोबत भाडंण होतं आणि लवकर मिटतं देखील. कारण दोघांच्या नात्यांमध्ये गोडवा असतो. खरोखर आईला सर्व प्रश्नांची उत्तर माहीत असतात, असे ती मानते. टर्निंग पॉइंट अजून तिच्या आयुष्यात यायचा आहे, असे तिला वाटते. भावी आयुष्यासाठी तिला हार्दिक शुभेच्छा!

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 9:10 am

निर्मिती सावंत - प्रार्थना बेहरे झळकणार सासू-सुनेच्या भूमिकेत

झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओजचा बहुचर्चित मराठी चित्रपट 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरने या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. पाठमोऱ्या दिसणाऱ्या सासू-सुनेच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण केला होता, तो म्हणजे ही जोडी नेमकी कोणाची? आणि आता या प्रश्नाचं उत्तर देत, मनोरंजनाची पूर्ण तयारी करत चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित झाला आहे. नुकत्याच या चित्रपटाच्या टिमने मुंबईतील महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन देवीचे आशीर्वाद घेत, चित्रपटाच्या टिझरचे आणि पोस्टरचे अनावरण केले.या चित्रपटाच्या निमित्ताने प्रार्थना बेहरे आणि निर्मिती सावंत पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर झळकणार असून, सासू-सुनेची एक हटके, ताकदवान आणि तितकीच खमंग जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. टीझरमध्येच दोघींची जुगलबंदी, टोमणे, मिश्कील संवाद आणि भावनिक क्षण यांचा सुरेख मेळ पाहायला मिळतोय. प्रार्थना बेहरे आधुनिक, आत्मविश्वास आणि स्पष्टवक्ती सून म्हणून दिसत आहे, तर निर्मिती सावंत पारंपरिक, ठाम मतांच्या आणि अनुभवसंपन्न सासूबाईंच्या भूमिकेत लक्ष वेधून घेत आहेत. समाजात नेहमी म्हटलं जातं की, ''प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते'', परंतु एका स्त्रीच्या मागे दुसरी स्त्री ठामपणे उभी राहिली तर, ती नाती किती बळकट होऊ शकतात, हाच विचार हा चित्रपट अतिशय सहज आणि प्रभावीपणे मांडतो. दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात,''ही कथा आजच्या काळातील सासू–सुनेच्या नात्याची आहे. दोघीही स्वतंत्र विचारांच्या आहेत, स्वतःच्या मतांवर ठाम आहेत. त्यामुळे मतभेद होतात, नोकझोक होते, परंतु त्याचबरोबर दोघींच्या समजूतदारपणाची आणि त्यांच्या तरल नात्याची सुंदर कहाणी यात आहे. सासू आणि सून एकमेकींच्या आयुष्यात आधार बनू शकतात, ही भावना या चित्रपटाचा गाभा आहे.”झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून सना शिंदे, उमेश कुमार बन्सल यांची निर्मिती आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक व ओमकार मंगेश दत्त यांची असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. तसेच चित्रपटाचे छायाचित्रण व संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. येत्या १६ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 9:10 am

६ फेब्रुवारीला लागणार 'लग्नाचा शॉट'!

लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि तयारी... …पण कधी कधी हाच आनंद गोंधळात बदलला तर? अशाच एका गोंधळावर आधारित ‘लग्नाचा शॉट’ हा चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यातून चित्रपटाचा हलकाफुलका, मजेशीर मूड स्पष्टपणे दिसून येतो. चित्रपटाच्या नावावरूनच हा प्रकार काहीसा वेगळा आणि धमाल असणार, याची कल्पना येते. लग्नाच्या धावपळीमध्ये घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी, चुकीचे अंदाज, गैरसमज आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ याभोवती या चित्रपटाची गोष्ट फिरते. दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणतात, 'लग्नाचा शॉट' हा चित्रपट म्हणजे लग्नाच्या गोंधळाकडे मजेशीर पद्धतीने पाहणारी गोष्ट आहे. कोणालाही कंटाळा न येता, संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून पाहता येईल, असा हा निव्वळ मनोरंजनाचा अनुभव आहे. कुठलाही संदेश देण्याचा अट्टहास नाही, कुठलाही गंभीर सूर नाही, केवळ हलकंफुलकं, स्वच्छ आणि प्रामाणिक मनोरंजन हेच या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 9:10 am

नारळ लागवडीतून कोकणच्या अर्थव्यवस्थेला बळ

समुद्रकिनारी असलेल्या नागरिकांनी जास्तीत जास्त नारळाची लागवड करावी. यामुळे नारळ प्रक्रिया उद्योगाला चालना मिळून स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना जोडधंदा मिळणार आहे. कामगारांच्या रिकाम्या हातांना काम मिळणार आहे. नारळ विक्रीमुळे व्यापारी वर्ग निर्माण होणार असून नवनवीन नारळ उद्योजक निर्माण होणार आहेत. त्यामुळे कोकणची वेगळी ओळख जगात होणार आहे.जगामध्ये जवळजवळ ९३ देश नारळाचे उत्पादन घेतात. आपल्या महाराष्ट्र राज्यात नारळ उत्पादनाचा विचार करता राज्यात ३३ हजार हेक्टरवर नारळाचे लागवडीखाली क्षेत्र असून १७ हजार ९२९ हेक्टर सर्वाधिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, तर कोकणात दरवर्षी अंदाजे नारळाचे रुपये १८.६३ कोटींचे उत्पादन होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुपये १ हजार ४५७ लाख नारळाचे उत्पादन होत असते. ही माहिती प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कृषी विद्यावेत्ता डॉ. किरण मालशे यांनी २०२३ साली दिली होती. म्हणजे अजून चांगल्या प्रकारे नारळाची लागवड केल्यास नारळाच्या उत्पादनात वाढ होऊन कोकणच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळ मिळेल.आज नारळाचा विचार केल्यास नारळाच्या उत्पादनात घट होऊन नारळाच्या किमती जवळजवळ तिप्पट झालेल्या दिसत आहेत. तर नारळाच्या तेलाची किंमत रुपये ६०० प्रति लिटर झाली आहे. याला कारण रोगराई, बदलते हवामान, अपुरे पाणी आणि माकडांचा वावर होय. असे असले तरी कोकणात चांगले नारळाचे उत्पादन होते. तेव्हा नारळ उत्पादनाकडे व्यवसायाच्या दृष्टीने पाहिल्यास उत्तम प्रकारे बळ कोकणच्या अर्थव्यवस्थेला मिळू शकते. त्यासाठी योग्य प्रकारे नारळाची लागवड करायला हवी. म्हणजे नारळाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे कोकणच्या उत्पन्नात अधिक चांगल्याप्रकारे वाढ होऊ शकते. तेव्हा नारळ कितीही महाग झाला तरी कोकणी माणूस खोबऱ्याशिवाय जेवण करीत नाही. नारळाचा विचार केल्यास अनेक लोकांचा संसार नारळाच्या व्यवसायावर अवलंबून असतो. सध्यातरी हा व्यवसाय कोकणात शेतकऱ्यांचा पूरक जोडधंदा म्हणून ओळखला जातो. काही शेतकरी शेतीच्या बाजूने नारळाची रोपे लावतात. काहींची तर नारळाची स्वतंत्र बाग आहे. एक माड जरी असला तरी त्याचा अनेक प्रकारे उपयोग होऊ शकतो. तेव्हा नारळाच्या व्यवसायामुळे अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यासाठी नारळाची अधिक प्रमाणात लागवड करणे गरजेचे आहे. आपण नारळ जरी म्हणालो असलो तरी त्याच्या विविध भागांचा उपयोग नागरिकांच्या उपयोगासाठी होत असतो. त्यामुळे नारळाच्या झाडाला ‘कल्पवृक्ष’ म्हणतात. असे आपण प्राथमिक शाळेत शिकलो आहोत. तेव्हा नारळाच्या झाडाचे योग्य प्रकारे संगोपन आपल्याला करावे लागेल. कारण त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. आता आपण नारळाच्या झाडांच्या विविध भागांचा उपयोग कसा केला जातो किंवा नागरिकांना होतो याविषयी माहिती घेऊ. त्यामुळे नारळाच्या झाडाला खऱ्या अर्थाने कल्पवृक्ष म्हणतात हे वाचक वर्गाच्या लक्षात येईल.घाटमाथ्यावर आवडीने शेंगदाणे जेवणात वापरतात त्याप्रमाणे कोकणात ओल्या खोबऱ्याचा जेवणात वापर केला जातो. कोवळ्या नारळाचे पाणी लोक आवडीने पितात. कोकणात त्याला शहाळे असेही म्हणतात. खोबऱ्यापासून तेल व दुधसुद्धा तयार करतात. तेल काढल्याने सुखी पेंडसुद्धा मिळते. करवंटीचा वापर डवली व कोळशासाठी केला जातो. नारळ सोलल्यानंतर त्यांची सोडणा मिळतात ती पाण्यात फुगत घातली जातात. त्यानंतर त्याचा काथ्या तयार केला जातो. त्यापासून दोरी, ब्रश, जाळी, चटई इत्यादी वस्तू तयार केले जातात. नारळाच्या पानापासून सुंदर छप्पर किंवा जाळी बनवली जातात. त्याच्या हिरापासून झाडू बनवितात. हिराच्या झाडूलासुद्धा बाजार पेठेत बऱ्यापैकी मागणी असते. नारळाचे जे खोड असते त्यापासून घरासाठी वासे तयार केले जात असून आकर्षक फर्निचरसुद्धा तयार करतात. कोकणात खाडीशेजारी जी बैठी घरे आहेत त्यांना सर्रास माडाचे वासे दिसतील. खारी हवा असल्यामुळे वासेसुद्धा जास्त दिवस टिकतात. तेव्हा नारळाचा विचार केल्यास शेतकऱ्यांसाठी उपयुक्त शेतीला जोडधंदा आहे. तसेच उपजीविकेचे प्रमुख साधन आहे असे म्हणावे लागेल.कोकणात नदी-नाल्यांच्या कडेला, खाडी व समुद्राच्या काठावर डोलणारी नारळाची झाडे दिसतील तशी त्याची काळजीसुद्धा घेतली जाते. विशेष म्हणजे खारी हवा नारळाला पोषक असते. समुद्र किंवा खाडीच्या कडेला जी नारळाची झाडे डोलताना पाहिल्यावर कल्पना येते. तेव्हा सध्याच्या काळात नारळाची किंमत विचारात घेता नारळाची लागवड करणे फायदेशीर ठरणार आहे. नारळाच्या बटू व उंच जातीचा विचार केल्यास बटू जात ३ ते ५ वर्षांत, तर उंच जाती ५ वर्षांनंतर नारळ धरायला लागतात. बटू नारळाला कमी, तर उंच नारळाला जास्त आयुष्य असते. माडाला नारळ लागल्यावर जवळजवळ ९ महिन्यांत नारळ परिपक्व होतात. मात्र त्या आधी सुद्धा नारळ काढू शकतो. जमीन, योग्य खत, पाणी आणि माडाची काळजी घेतल्यास नारळाचे उत्पादन वाढण्याला मदत होते. आज जे शेतकरी संकटात आहेत त्यांनी नारळाची लागवड बिनधास्तपणे करावी. आजच्या घडीला कोकणात शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे.समुद्र किनारी असलेल्या नागरिकांनी जास्तीत जास्त नारळाची लागवड करावी. यामुळे नारळ प्रक्रिया उद्योगाला चालना मिळून स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना जोडधंदा मिळणार आहे. कामगारांच्या रिकाम्या हातांना काम मिळणार आहे. नारळ विक्रीमुळे व्यापारी वर्ग निर्माण होणार असून नवनवीन नारळ उद्योजक निर्माण होणार आहेत. त्यामुळे कोकणची वेगळी ओळख जगात होणार आहे. त्यासाठी केवळ घरापुरते नारळाचे उत्पादन न करता व्यावसायिक दृष्टिकोनातून नारळाच्या उत्पादनाकडे कोकणवासीयांनी पाहावे. तसेच शासन स्तरावर नुकसानग्रस्त नारळ बागायतदारांना योग्य सुरक्षा विमा कवच आणि नारळ प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन वेळीच दिले गेले पाहिजे. त्यामुळे नारळ लागवडीतून कोकणच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळ मिळेल हे मात्र निश्चित.- रवींद्र तांबे

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 9:10 am

काँग्रेसचा नारा कितपत खरा?

पक्षाच्या विचारधारेवर आणि नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेऊन पक्षासाठी समर्पितपणे काम करणारा मोठा वर्ग आजही काँग्रेसमध्ये आहे. त्याला काँग्रेसमधील ‘निष्ठावंत’ असे म्हणतात. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यातील अशा निष्ठावंत घराण्यांना म्हणूनच राजकीय वर्तुळात किंमत होती. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याचा उल्लेख झाला, की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे घराणे डोळ्यांसमोर येते. एकेकाळचा काँग्रेसचा नांदेडचा गड आता भाजपचे सत्ताकेंद्र म्हणून ओळखला जात आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि त्यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनी नांदेडच्या गडावर कमळ फुलविले आहे. खासदारकी आणि आमदारकी पिता-पुत्रीकडे असल्याने काँग्रेसच्या 'हाता'ला आधार देण्यासाठी नवे नेतृत्व शोधण्याची वेळ काँग्रेसवर आली. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील यांनी एक वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला; मराठवाड्यातीलच हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसचे एकनिष्ठ घराणे म्हणून सातव घराणे परिचित होते. विधान परिषदेच्या काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन थेट भाजपमध्ये प्रवेश केला. सातव यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये किती अस्वस्थता पसरली, हे लपून राहिले नाही. 'निष्ठावंत' प्रज्ञा सातव यांनी भाजप प्रवेशानंतर दिलेली प्रतिक्रियाही बोलकी आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात जो विकासाचा रथ सुरू आहे त्यामुळे विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नाही, 'असे त्यांनी म्हटल्याने काँग्रेसच्या निष्ठावंत घराण्यातील व्यक्तींनाही यापुढे देशात भाजपशिवाय भवितव्य नाही, असे वाटू लागले हे निश्चितच. त्यातून सर्वसामान्य तळागाळातील काँग्रेस कार्यकर्ता नक्कीच बिथरला असणार, हे अर्थातच नव्याने सांगायला नको.देशपातळीवर देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्ष टिकविण्यात यश आले असले, तरी पुढील १० वर्षांत काँग्रेस सत्तेवर येईल का, याची चिंता काँग्रेसच्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वच नेत्यांना सतत सतावत असते. २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला साधा विरोधी पक्ष नेतेपदावर दावा करता येईल, एवढे संख्याबळ मिळवता आले नाही. तेव्हापासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे 'काँग्रेसमुक्त भारत' होण्याची प्रकिया सुरू झालेली दिसते. त्यात वैचारिक भूमिकेत संभ्रम असल्याने बहुसंख्य हिंदू मतदार काँग्रेसपासून दुरावला. अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या सोहळ्यापासून काँग्रेसने स्वत:ला वेगळे करण्याचा प्रयत्न केल्याचा फटका काँग्रेसला बसला. या सोहळ्याला हजेरी लावली, तर मुस्लीम वर्ग नाराज होईल, अशी गणिते काँग्रेसचे धुरंधर मांडत राहिले. रामजन्मभूमीचा कडवा विरोध करूनच आपण सत्तेवर येऊ शकतो, असे काँग्रेसच्या धुरिणांना वाटले. म्हणून त्यांनी न्यायालयाचे खटले कसे दीर्घकाळ चालतील, ते बघितले. न्यायालयामध्ये रामाच्या अस्तित्वावरच शंका उपस्थित केल्या. मंदिर बाबराने पाडले, याला ऐतिहासिक पुरावा नाही, असा युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयात दहा-बारा वकिलांची फौज उभी केली आणि सोनिया गांधी जेव्हा काँग्रेसच्या सर्वेसर्वा झाल्या, त्यावेळी त्यांनी 'बाबरी ढाचा' पडल्याबद्दल मुसलमान समाजाची माफीसुद्धा मागितली; परंतु १९९२ नंतर एवढी सगळी मुस्लीमधार्जिणी भूमिका घेऊनही काँग्रेसला लोकसभेत निर्विवाद बहुमत मिळविता आले नाही, हे वास्तव आहे. काँग्रेसची हक्काची मुस्लीम मते वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांत विभागली गेली. दिल्लीत केजरीवाल, उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यादव, बिहारमध्ये नितीश कुमार, बंगालमध्ये ममता बॅनर्जी आदी मुस्लीम मतांचे ठेकेदार बनले. तरीही काँग्रेस पक्षाला मुस्लीम मते आपल्यापासून दूर जाऊ नये असे वाटते.दलित, मुस्लीम मतांच्या राजकारणामुळे राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने मुंबईसह प्रमुख महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा निर्धार काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. उबाठा सेना आणि मनसे एकत्र आल्यामुळे त्यांच्यासोबत आपल्याला जाता येणार नाही, असे पोकळ कारण दिले असले, तरी मुस्लीम व्होट बँक भविष्यात आपल्या हातून जाऊ नये ही काँग्रेसची भीती आहे. जात, धर्म यांच्यात द्वेष निर्माण करणाऱ्या पक्षांबरोबर आपण जाणार नाही, असे सांगणाऱ्या मुंबई काँग्रेसने उबाठा सेनेसोबत महाराष्ट्राच्या सत्तेत येण्यासाठी कशी तडजोड केली, हे सांगत नाहीत. काँग्रेसमध्ये आता 'राम' राहिलेला नाही, याची खात्री पटल्यामुळेच मुंबई शहरातील काँग्रेसच्या निष्ठावंतापैकी एक असलेल्या मुरली देवरा यांच्या घराण्याने काँग्रेसपासून फारकत घेतली. २० वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या मुरली देवरा यांचा मुलगा मिलिंद देवरा यांनी महायुतीतील मित्रपक्षात प्रवेश केला ते सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. वांद्रे येथे एक वर्षापूर्वी ज्यांची हत्या झाली ते बाबा सिद्दिकी हे काँग्रेसच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांपैकी एक मानले जात होते. त्यांनीसुद्धा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई महापालिकेतील अभ्यासू नगरसेवक रवी राजा यांच्यासह चार नगरसेवकांनी काँग्रेसला सोडून भाजपमध्ये आधीच प्रवेश केला आहे. पक्षातील निष्ठावंत एकामागोमाग भाजप आणि अन्य पक्षात प्रवेश करत असताना मुस्लीम आणि दलित मतदार आपल्या पाठिशी आहे, असा भाबडा समज करून काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा कितपत योग्य आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. त्यासाठी महापालिका निवडणुकींच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 9:10 am

‘या’महापालिकेसाठी भाजप मोठा निर्णय घेणार? वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केली भूमिका

Ganesh Naik : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, १५ जानेवारी २०२६ ला मतदान तर १६ जानेवारी २०२६ रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्याअनुषंगाने सर्वच महापालिकांसाठी राजकीय पक्षांकडून रणनिती आखली जात आहे. भारतीय जनता पार्टीने देखील या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी २० जणांच्या दिग्गज नेत्यांची टीम पक्षाने मैदानात उतरवली […] The post ‘या’ महापालिकेसाठी भाजप मोठा निर्णय घेणार? वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केली भूमिका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 8:50 am

Flop Movies Of 2025: २०२५ मधील हे बिग बजेट बॉलीवूड चित्रपट ठरले फ्लॉप; ‘इमर्जन्सी’ ते ‘वॉर २’चा समावेश

Flop Movies Of 2025: २०२५ हे वर्ष बॉलीवूडसाठी फारसं अनुकूल ठरलं नाही. यंदा अनेक मोठ्या स्टार्स आणि कोट्यवधींच्या बजेटमध्ये तयार झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. प्रेक्षकांची उत्सुकता असूनही कथा, दिग्दर्शन, सेन्सॉर अडचणी आणि रिलीज डेट क्लॅश यांचा फटका या चित्रपटांना बसल्याचं पाहायला मिळालं. कंगना रणौत दिग्दर्शित आणि अभिनीत ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाबाबत […] The post Flop Movies Of 2025: २०२५ मधील हे बिग बजेट बॉलीवूड चित्रपट ठरले फ्लॉप; ‘इमर्जन्सी’ ते ‘वॉर २’चा समावेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 8:47 am

Shashikant Shinde: “आम्हाला अजून प्रस्तावच आला नाही”; राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणावर शशिकांत शिंदेंचा मोठा खुलासा

प्रभात वृत्तसेवा पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकत्रित लढण्यासंदर्भात अद्याप प्रस्तावच आलेला नाही. त्यामुळे एकत्रित लढण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीतील अन्य पक्षांशी चर्चा करून २३ डिसेंबरला पहिली यादी जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी शिंदे पुण्यात आले होते. महापालिकेच्या […] The post Shashikant Shinde: “आम्हाला अजून प्रस्तावच आला नाही”; राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणावर शशिकांत शिंदेंचा मोठा खुलासा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 8:30 am

पनवेल पालिका भाजप निवडणूक प्रभारीपदी रामशेठ ठाकूर

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची निवडणूक प्रभारीपदी तर आमदार महेश बालदी यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देदीप्यमान विजय आणि लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार महेश बालदी हे समीकरण कायम राहिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पनवेल महापालिकेत भाजपच्या मोठ्या विजय होणार आहे.आपल्या संघटन कौशल्याने भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्याकरिता सर्वांना सोबत घेऊन अथक परिश्रम कराल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या दोघांच्याही नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आलेला आहे. दरम्यान, पक्षाच्या या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी नियुक्ती झाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले आहेत. पक्षाने टाकलेला विश्वास प्रामाणिक मेहनत व नियोजनातून निश्चितच सार्थ ठरवू तसेच पक्षाच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरिकांच्या सहकार्याने ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्याचा संकल्प लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्ष संघटनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 8:30 am

'महाविस्तार ॲप'जिल्ह्यातील शिवारात क्रांती घडविणार

कृषी विभागाचा एआय तंत्रज्ञानावर विशेष भर ; १८ हजार वापरकर्तेअलिबाग : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानावर आधारित आणि शेतकऱ्यांसाठी डिजिटल सल्लागार म्हणून महाविस्तार अॅप कृषी क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवत आहे. हे महाविस्तार अॅप सध्या शेतकऱ्यांसाठी डिजिटल सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असून, रायगड जिल्ह्यातील १८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी याचा वापर करीत शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची कास धरली आहे.हे अॅप शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत चालले आहे. या अॅपचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचाही दिवसेंदिवस कल वाढत चालला असून, त्यामुळे हे महाविस्तार अॅप कृषी क्रांतीत शेतकऱ्यांचा डिजिटल फ्रेंड बनले आहे, या अॅपच्या माध्यमातून कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना शेतीविषयक आवश्यक सल्ले देत त्यावर विविध उपाययोजना सांगून कृषी क्रांतीत आमूलाग्र बदल घडवला जात आहे. रायगड जिल्ह्यातील १८ हजार ६४५ शेतकऱ्यांनी हे अॅप डाऊनलोड करून त्याचा वापर सुरू केला आहे. रोहा तालुक्यात सर्वाधिक १ हजार ९८० शेतकरी याचा वापर करीत आहेत. शेतकऱ्यांना सुलभ मार्गदर्शन लाभावे म्हणून कृषी विभागातर्फे महाविस्तार एआय हे अॅप विकसित करण्यात आलेले आहे. गेल्या २१ मेपासून हे अॅप कार्यान्वित झाले आहे. या अॅपद्वारे शेतकऱ्यांसाठी पीक सल्ला, हवामानाचा अचूक अंदाज, मृद आरोग्य पत्रिका, खत मात्रा गणक, माहितीपूर्ण व्हिडीओ आणि शेतीशाळा, हवामान अनुकूल तंत्रज्ञान आदींची इत्यंभुत माहिती आणि कृषीविषयक माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. अॅपविषयी अधिक माहितीशेतकऱ्यांना वापर करण्याच्या दृष्टीने हे अॅप सुलभ व सोपे आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन महाविस्तार एआय अॅप डाउनलोड करता येतो. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अॅपचा वापर करावा म्हणून कृषी विभागातर्फे जनजागृती मोहीम राबवली जात आहे. शेतकऱ्यांनी या अॅपचा वापर करून कृषी क्षेत्रातील या डिजिटल क्रांतीत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी डिजिटल सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणारे महाविस्तार एआय हे अॅप शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत असून, शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 8:30 am

भारत-ओमानची मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी

करारामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जामस्कत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी चर्चा केल्यानंतर भारत आणि ओमानने गुरुवारी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट झाली. आपल्या तीन देशांच्या दौऱ्यात ओमानमध्ये दाखल झालेल्या मोदींचे द्विपक्षीय बैठकीपूर्वी मस्कतमधील अल बराका पॅलेसमध्ये सुलतान हैथम यांनी स्वागत केले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांनी संरक्षण, सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, कृषी, तंत्रज्ञान, नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रे, संस्कृती आणि लोकांमधील संबंध यासह विविध विषयांवर विचारविनिमय केला. त्यांनी प्रादेशिक आणि जागतिक हिताच्या मुद्द्यांवरही चर्चा केली.भारत आणि ओमान यांच्यातील राजनैतिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण होणे हा द्विपक्षीय भागीदारीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे दोन्ही नेत्यांनी नमूद केले. दोन्ही नेत्यांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी झाल्याचे स्वागत केले आणि हा द्विपक्षीय संबंधांमधील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले. यामुळे भारत-ओमान धोरणात्मक भागीदारी लक्षणीयरीत्या मजबूत होईल, असेही त्यांनी सांगितले. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस बिन मोहम्मद अल युसेफ यांनी स्वाक्षरी केलेल्या या ‘सेपा’ करारामुळे बाजारपेठेत प्रवेश वाढेल, गुंतवणुकीला चालना मिळेल आणि प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे.जागतिक आर्थिक पुनर्रचनेच्या काळात हा करार व्यापार विविधीकरण आणि पुरवठा साखळीची लवचिकता यांना पाठिंबा देईल. हा ओमानचा एखाद्या देशासोबतचा दुसरा मुक्त व्यापार करार आहे आणि सुमारे २० वर्षांनंतर त्यांनी केलेला हा पहिला मुक्त व्यापार करार आहे.तत्पूर्वी, भारत आणि ओमान यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामुळे (सीईपीए) द्विपक्षीय संबंधांना नवीन आत्मविश्वास आणि ऊर्जा मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. येथे आयोजित भारत-ओमान व्यवसाय परिषदेत बोलताना, ओमान दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी सांगितले की, ही परिषद भारत-ओमान भागीदारीला एक नवीन दिशा देईल. आज आपण एक असा ऐतिहासिक निर्णय घेत आहोत, ज्याचा प्रतिध्वनी येणाऱ्या अनेक दशकांपर्यंत ऐकू येईल. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार, म्हणजेच सीईपीए, आपल्या भागीदारीला २१ व्या शतकात नवीन आत्मविश्वास आणि नवीन ऊर्जा देईल, असे पंतप्रधान म्हणाले.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 8:30 am

उमेदवारांनो सावधान! फुकटात सभा घ्याल तर कारवाई अटळ; पालिकेने जारी केले नवे दरपत्रक

प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिकेच्या परवानगीविना प्रचारासाठी कोपरा, चौक सभा घेणे उमेदवारांना महागात पडणार आहे. या सभांसाठी पालिकेने जागांचे दर निश्चित केले आहेत. दर भरल्याशिवाय सभा घेतल्याची माहिती क्षेत्रीय कार्यालय निवडणूक अधिकाऱ्यास देणार असून त्यानुसार कारवाई होईल. सभेसाठी प्रती चौरसमीटर ९ रूपये शुल्क पालिकेने निश्चित केले आहे. चौक सभेसाठी किमान २० हजार तर कोपरा सभेसाठी […] The post उमेदवारांनो सावधान! फुकटात सभा घ्याल तर कारवाई अटळ; पालिकेने जारी केले नवे दरपत्रक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 8:20 am

MVA Alliance Pune: काँग्रेसच्या भूमिकेमुळे आघाडीत बिघाडी? दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाची चर्चा जोरात

प्रभात वृत्तसेवा पुणे : महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी महापालिका निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू असतानाच, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र, ही घडामोड घडणार की नाही याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने थेट काँग्रेसकडे बोट दाखवले आहे. महाविकास आघाडीमध्ये […] The post MVA Alliance Pune: काँग्रेसच्या भूमिकेमुळे आघाडीत बिघाडी? दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाची चर्चा जोरात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 8:10 am

राज्यातील २४ नगर परिषदांमध्ये आज मतदान

उद्या मतमोजणीमुंबई : राज्यातील १६ जिल्ह्यांमधील २४ नगर परिषदांमध्ये २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुका अशा नगरपालिका व नगर परिषदांमध्ये होत आहेत, जिथे अध्यक्ष, सदस्य किंवा काही ठिकाणी फक्त सदस्यांच्या निवडणुका न्यायालयीन कारणांमुळे यापूर्वी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.या सर्व ठिकाणी २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकांच्या ठिकाणी २० डिसेंबर रोजी सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.या निवडणुकीत अंबरनाथ, कोपरगाव, बारामती, अक्कलकोट, महाबळेश्वर, फुलंब्री, मुखेड, निलंगा, अंजनगाव सुर्जी, वसमत, बाळापूर, यवतमाळ, वाशीम, देऊळगाव राजा, देवळी, रत्नागिरी व गुऱ्हाळ या नगरपरिषदांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी राज्यातील २४६ नगरपालिका व ४२ नगर परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. काही ठिकाणी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी आवश्यक वेळ न देता निवडणूक चिन्हे वाटप करण्यात आली. हे नियमांविरुद्ध असल्याचे लक्षात घेऊन आयोगाने त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया स्थगित केली.२४ नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या अध्यक्षपदासह सर्व सदस्य पदांसाठी व ७६ नगरपालिका, नगरपंचायतींमधील १५४ सदस्य पदांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २१ डिसेंबर रोजी सर्व ठिकाणी मतमोजणी होईल.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 8:10 am

मतदार याद्यांच्या सखोल तपासणीतून तामिळनाडूत ९८ लाख नावे हटविली

मृत, स्थलांतरीत, तसेच दुबार-तिबार नावांचा समावेश२६ लाख ९४ हजार मृत मतदारांचा समावेश , ६६ लाख ४४ हजार मतदार कायमस्वरूपी स्थंलातरीत , ३ लाख ३९ हजार २७८ दुबार मतदारनवी दिल्ली : सध्या देशातील काही राज्यांत सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणादरम्यान, तामिळनाडूमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एसआयआरनंतर तयार करण्यात आलेल्या तामिळनाडूमधील मतदार यादीच्या मसुद्यामधून तब्बल ९७ लाख ३७ हजार ८३२ नावे हटववण्यात आली आहेत. तर नव्या मतदार यादीच्या मसुद्यामध्ये ५ कोटी ४३ लाख, ७६ हजार ७५५ मतदारांचा समावेश आहे.तामिळनाडूच्या मुख्य निवडणूक अधिकारी अर्चना पटनायक यांनी सांगितले की, मतदार याद्यांच्या पुनरीक्षणानंतर तयार करण्यात आलेल्या राज्यातील मतदार याद्यांच्या मसुदा यादीमध्ये ५ कोटी ४३ लाख, ७६ हजार ७५५ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये २ कोटी ६६ हजार महिला आणि २ कोटी ७७ लाख पुरुषांचा समावेश आहे. एसआयआर पूर्वी तामिळनाडूमध्ये सुमारे ६ कोटी ४१ लाख नोंदणीकृत मतदार होते. तसेच या प्रक्रियेनंतर त्यापैकी तब्बल ९७ लाख ३७ हजार ८३२ मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत.नोंदणीकृत पत्त्यावर मतदार आढळलेच नाहीहटवण्यात आलेल्या मतदारांमध्ये २६ लाख ९४ हजार मृत मतदारांचा समावेश आहे. तर ६६ लाख ४४ हजार मतदार असे आहेत; जे कायमस्वरूपी स्थलांतरीत झालेले आहेत. ३ लाख ३९ हजार २७८ दुबार मतदारांची नावेही यादीतून हटवण्यात आली आहेत. या मतदारांची नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदवलेली आहेत. ज्या मतदारांना स्थलांतरीत म्हणून चिन्हांकित करण्यात आले होते. त्यातील ६६ लाख ४४ हजार ८८१ मतदार राज्यात घरोघरी जाऊन करण्यात आलेल्या पडताळणीच्या तीन टप्प्यांनंतरही नोंदणीकृत पत्त्यावर आढळून आले नसल्याची माहिती अर्चना पटनायक यांनी दिली.मतदारांना हटवण्याचा कटदरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केलेल्या तीव्र विरोधानंतरही तामिळनाडूमध्ये एसआरआयची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाने एसआयआरविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिकादेखील दाखल केली होती. आता एसआयआरवर टीका करताना स्टॅलिन यांनी त्याचा लोकशाहीविरोधी पाऊल असा उल्लेख केला आहे.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 8:10 am

सातारा अमली पदार्थ प्रकरणात शिंदे कुटुंबीयांचा सहभाग नाही

विरोधकांनी केलेले आरोप चुकीचे; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून निर्वाळामुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा सातारा अमली पदार्थ प्रकरणात कोणताही सहभाग नाही. पोलिसांनी आजवर केलेल्या तपासात कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. विरोधकांनी केवळ राजकीय स्वार्थापोटी सातारा अमली पदार्थ प्रकरणात शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शिंदे यांच्यावरील आरोप फेटाळून लावत त्यांची पाठराखण केली.महापालिका निवडणुकांमधील जागावाटपाची चर्चा व एकमेकांच्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश देण्याच्या घटनेमुळे ताणलेल्या राजकीय संबंधाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी शिंदे यांची पाठराखण केली. कसल्याही प्रकारचा संबंध नसताना विरोधकांनी आरोप करणे चुकीचे आहे, असेही फडणवीस म्हणाले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील, असे म्हणत माणिकराव कोकाटे यांच्याबाबत अधिक बोलणे मुख्यमंत्र्यांनी टाळले.बिबट्या पुनर्वसन केंद्रांची संख्या वाढविणार :राज्यात बिबट्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अधिवासातून बाहेर येऊन मानवी वस्तीतील हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे बिबट्यांच्या पुनर्वसन केंद्रांची युद्ध पातळीवर निर्मिती केली जात आहे. मानवी वस्तीत आलेल्या बिबट्यांना पकडून त्यांना केंद्रात ठेवले जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 8:10 am

चिखलदऱ्यात रेकॉर्ड ब्रेक थंडी

चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळावरील पारा घसरलेला आहे. गुरुवारी पहाटे ३ ते ५ दरम्यान ५ अंश सेल्सिअसची नोंद घेण्यात आली. यावर्षी सर्वात कमी ३ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला होता. तेव्हापासून कायम एक अंकी आकड्यावर चिखलदऱ्याचे तापमान स्थिरावले आहे. स्थानिक ऊबदार कपड्यांसह शेकोटी पेटवून बचाव करीत आहेत. आठवडाभर थंडीची लाट जाणवणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आह

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 8:10 am

जागावाटपात सन्मान न ठेवल्यास शिवसेनेची स्वबळाची तयारी!

भाजपच्या 'त्या' प्रस्तावानंतर मुंबईसाठी मास्टरप्लान तयारमुंबई : भाजप आणि शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा करत जागावाटपाची चर्चा सुरु केली आहे. शिवसेनेने भाजपकडे १२५ जागांची मागणी केली. पण भाजपने त्यांना जागावाटपाच्या पहिल्या टप्प्यात केवळ ५० ते ६० जागा देऊ केल्या आहेत. त्यामुळे आता शिवसेनेने निवडणुक लढविण्यासाठी प्लान बी तयार करुन तशी तयारीही सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने सन्मानजनक जागा न दिल्यास शिवसेनेनं पर्यायी योजना आखली असून स्वबळावर निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.१५ जानेवारीला मुंबई महापालिकेसाठी मतदान होईल. दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. २०२२ ला महापालिका सभागृहाची मुदत संपुष्ठात आल्यानंतर तीन वर्षे प्रशासकीय राजवट होती. शिवसेनेने गेल्या काही महिन्यांमध्ये उबाठा गटातील माजी नगरसेवक मोठ्या प्रमाणावरआपल्याकडे खेचले आहेत. याच संख्याबळाच्या आधारे शिवसेनेने भाजपकडे १२५ जागांची मागणी केली. पण भाजपने त्यांना केवळ ५० ते ६० जागा देऊ केल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेने पर्यायी योजना म्हणून २२७ जागांवर तयारी केल्याची माहिती आहे. युती करुन संख्याबळ घटण्याचा धोका लक्षात घेता, स्वबळावर ताकद आजमावून शंभरच्या आसपास नगरसेवक निवडून आणण्यासाठी शिवसेनेकडून चाचपणी सुरु झाली आहे.मुलाखतीसाठी तीन निरीक्षकांची नियुक्ती : 'महायुतीमधील पक्ष म्हणून शिवसेना मुंबई महापालिकेची निवडणूक लढवेल. सर्वोत्तम उमेदवार देण्यावर आमचा भर आहे. त्यामुळेच आम्ही सगळ्या प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ही प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक राहावी यासाठी तीन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे,' अशी माहिती शेवाळे यांनी दिली. अन्य पक्षांपेक्षा शिवसेनेच्या मुलाखतींना मिळणारा प्रतिसाद जास्त मोठा आहे. यातून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना केलेले काम अधोरेखित होतं, असे शेवाळे म्हणाले. शिवसेनेतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या मुलाखतींना देणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेशी संबंध राहिलेल्यांचा समावेश आहे. महापालिका निवडणूक लढवण्यासाठी ही मंडळी उत्सुक आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना पहिल्यांदाच मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरी जात आहे.२७०० इच्छुकांच्या मुलाखतीमुंबई महापालिकेत एकूण २२७ प्रभाग येतात. या सगळ्या प्रभागांमध्ये स्वबळावर लढण्याची चाचपणी शिवसेनेने तयारी सुरु केली आहे. शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी २७०० इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. प्रत्येक प्रभागात मजबूत आणि जिंकण्याची खात्री असलेला उमेदवार शोधण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 8:10 am

विक्रोळीत उबाठाचे खाते रिकामेच राहणार?

िचत्र पालिकेचे :विक्रोळी िवधानसभासचिन धानजी मुंबई : विक्रोळी विधानसभेत सलग तिसऱ्यांदा निवडून येत उबाठा शिवसेना नेते संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी बांधला आहे. या प्रभागात महायुतीचे नगरसेवकांचे प्राबल्य असूनही विजयाचा तिलक महायुतीच्या उमेदवाराच्या कपाळी लावता आलेला नाही. विशेष म्हणजे या प्रभागातून निवडून आलेले तिन्ही नगरसेवक आता शिवसेनेत गेल्यामुळे या विधानसभेत उबाठाचे खाते रिकामी झाले आहे. त्यामुळे नगरसेवक निवडून आणत पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न उबाठाचा असेल, परंतु महायुती सर्वच नगरसेवक निवडून आणत सुनील राऊतांची डोकेदुखी अधिक वाढवणार का यावर सर्वांचे लक्ष असेल. विक्रोळी विधानसभेमध्ये भाजपाचे दोन, शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शप यांचे एक अशाप्रकारे सहा नगरसेवक असून उबाठाकडील तिन्ही नगरसेवक हे शिवसेनेत गेले आहे. त्यामुळे या विधानसभेत नगरसेवक संख्याबळानुसार शिवसेनेची ताकद मोठी असल्याने जागा वाटपांत चार जागा शिवसेनेला सुटल्या जातील आणि दोन जागांवर भाजपाचे उमेदवार असतील अशी शक्यता आहे. तर महाविकास आघाडीमध्ये प्रभाग १११ आणि प्रभाग ११८वर मनसेचा दावा असेल. यातील प्रभाग ११८ हा शंभर टक्के मनसेला सोडला जाण्याची शक्यता आहे. तर उबाठा चार जागांवर आणि एक जागा मनसे व एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस शप यांना सोडली जाण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीतील विक्रोळी मतदार संघातील निकालसंजय दिना पाटील, उबाठा : ६८,६७२मिहिर कोटेचा, भाजपा : ५२,८०७विक्रोळी विधानसभेतील निकालसुनील राऊत, उबाठा : ६६,०९३सुवर्णा करंज, शिवसेना : ५०,५६७प्रभाग क्रमांक ११०(ओबीसी)हा प्रभाग पूर्वी महिलांकरता राखीव होता आणि या प्रभागातून भाजपाच्या सारीका मंगेश पवार या निवडून आल्या होत्या. परंतु आता हा प्रभाग ओबीसी राखीव झाला आहे. त्यामुळे भाजपाकडून पुन्हा सारीका पवार यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. तर उबाठाकडून दत्ताराम पालेकर, प्रणय पवार आणि सचिन चोरमले यांच्यात स्पर्धा आहे. यातील प्रणय पवार हे सारीका मंगेश पवार यांचे पुतणेच असून सचिन चोरमले हा त्यांचा स्वीय सहायक होता आणि त्यानंतर पवार कुटुंबाला सोडून आमदार सुनील राऊत यांच्याकडे गेला होता. तर काँग्रेसकडून परशुराम कोपरकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय पिसाळ आणि मनसेकडून पृथ्वीराज येरुणकर आणि सचिन घागरे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र याठिकाणी भाजपा, उबाठा आणि काँग्रेस यांच्यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.प्रभाग क्रमांक ११७ ( ओबीसी महिला)हा प्रभाग यापूर्वी ओबीसी महिलाकरता राखीव होता आणि या प्रभागातून शिवसेनेच्या सुवर्णा करंजे या निवडून आल्या होत्या. आता पुन्हा हा प्रभाग ओबीसी महिलाकरता राखीव झाल्याने शिवसेनेकडून सुवर्णा करंजे यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. या प्रभागातून उबाठामधून श्वेता पावसकर आणि मामी मंचेकर यांची नावे चर्चेत आहेत. भाजपाकडून रजनी कदम यांचे नाव चर्चेत असले तरी महायुती झाल्यास ही जागा शिवसेनेला सोडली जावू शकते. त्यामुळे याठिकाणी शिवसेना विरुध्द उबाठा अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे.प्रभाग क्रमांक ११८ (एस सी महिला)हा प्रभाग पूर्वी खुला असल्याने या मतदार संघातून शिवसेनेचे उपेंद्र सावंत निवडून आले होते. आता उपेंद्र सावंत हे शिवसेनेत असले तर प्रभाग एस सी महिला राखीव झाल्याने त्यांना दुसऱ्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे . त्यामुळे एस सी महिला प्रभागातून सिंड्रेला गवळी तर उबाठातून माधुरी दोडके यांच्या नावाची चर्चा आहे. तर मनसेकडून माजी नगरसेविका प्रियंका श्रुंगारे यांच्या नावाची चर्चा आहे. हा प्रभाग ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मनसेला सोडला जावू शकतो. त्यामुळे मनसे विरुध्द शिवसेना अशी लढत या प्रभागात होवू शकते.प्रभाग क्रमांक ११९ (सर्वसाधारण)हा प्रभाग यापूर्वी ओबीसी महिलाकरता राखीव होता आणि आता हा प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गाकरता राखीव झाला आहे. याप्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनिषा रहाटे या निवडून आल्या होता. परंतु हा प्रभाग खुला झाल्याने या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस (शप)कडून मनिषा रहाटे यांना पुन्हा संधी आहे. तर शिवसेनेचे माजी नगरसेवक या प्रभागातून इच्छुक आहेत तर उबाठाकडून चंद्रशेखर जाधव यांचेही नाव इच्छुकाच्या यादीत आहे. उबाठा , राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्या युतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली जाणार असल्याने उबाठाच्या उमेदवाराला प्रभाग खुला होवूनही डोक्यावर हात मारत बसावे लागणार आहे.प्रभाग क्रमांक १२०( सर्वसाधारण)हा प्रभाग पूर्वी महिला आरक्षित होता आणि या प्रभागातून शिवसेनेच्या राजराजेश्वरी रेडेकर या निवडून आल्या होत्या. परंतु आता हा प्रभागा सर्वसाधारण प्रवर्गकरता राखीव झाला आहे. या प्रभागातून शिवसेनेकडून राजराजेश्वरी रेडेकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. तर उबाठाकडून निलेश पोहोकर आणि माजी नगरसेवक विश्वास शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, या प्रभागात काँग्रेस तसेच मनसेच्य इच्छुक उमेदवाराची चर्चा नाही. त्यामुळे या प्रभागात शिवसेना विरुध्द उबाठा अशीच थेट लढतहोणार आहे.प्रभाग क्रमांक १२२( सर्वसाधारण)हा प्रभाग यापूर्वी ओबीसी महिला करता राखीव होता आणि या प्रभागातून भाजपच्या वैशाली पाटील या निवडून आल्या होत्या . परंतु आता या प्रभागाचे आरक्षण हे सर्वसाधारण झाले असून हा प्रभाग खुला झाल्याने भाजपाकडून विद्यमान नगरसेविका वैशाली पाटील यांच्यासह श्रीनिवास त्रिपाटी यांच्या नावाची चर्चा आहे. तर उबाठाकडून विजय कुरकुटे, सचिन मदने आणि निलेश साळुंखे यांच्या नावाची चर्चा आहे. तर या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून माजी नगरसेवक चंदन शर्मा यांच्याही नावाची चर्चा होती. परंतु चंदन शर्मा यांनीही आता भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजपामधील इच्छुकांच्या यादीतील एक नाव वाढले आहे. चंदन शर्मा यांच्या प्रवेशामुळे वैशाली पाटील आणि श्रीनिवास त्रिपाटी यांच्या उमेदवारीवर काट मारली जाण्याची शक्यता आहे. चंदन शर्मा यांच्या माध्यमातून या प्रभागावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा होता. पण चंदन शर्मा यांच्या भाजपा प्रवेशामुळे आता या प्रभागातील उबाठाची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदन शर्मा यांना भाजपात प्रवेश दिल्याचे बोलले जात आहे.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 8:10 am

पूर्व द्रुतगती महामार्गासह पुलांची डागडुजी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने बांधण्यात आलेली पूल आता महापालिकेला हस्तांतरीत झाली आहे. त्यामुळे हस्तांतरित झालेल्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील सहा पुलांची डागडुजी आता महापालिकेच्यावतीने केली जाणार आहे. या मार्गावरील सर्व पुलांची दुरवस्था झाल्याने या पुलांवरील पृष्ठभागाची मास्टिकचा वापर करून त्याची डागडुजी केली जाणार आहे. मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून महानगरपालिकेस सुधारणा देखभाल करण्यासाठी आहे तशा स्थितीत २९ नोव्हेंबर २०२२ रोजी हस्तांतरीत करण्यात आलेला आहे. एकूण १९ किलोमीटर आणि सरासरी ६० मीटर रुंद असलेल्या पूर्व द्रुतगती महामार्गाची देखभाल महापालिकेच्या माध्यमातून केली जात आहे. तसेच पावसाळ्यात या मार्गावर तसेच पुलांवर खड्डे पडू नये यासाठीचीही काळजी घेतली जात आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील एमएमआरडीएच्या अखत्यारित असलेली पुलही महापालिकेला हस्तांतरित करण्यात आली आहे.यामध्ये ऐरोली, जे. व्ही. एल. आर, विक्रोळी, ए. जी. एल. आर, छेडा नगर, अंधेरी कुर्ला लिंक रोड आदी पुलांचा समावेश आहे. या पुलांची व इतर दुरवस्था झाल्याने या पुलांच्या पृष्ठभागाची मास्टिक वापरून सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या पावसाळ्यात पूर्व द्रुतगती मार्गावर खड्डे पडणार नाहीत व त्यावरील प्रवास सुखकर होईल. या अानुषंगाने पुलांच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आल्याचे रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेच्यावतीने पूर्व द्रुतगती महामार्गावरील दुरवस्था झालेल्या काही भागांची आणि पुलांच्या पुष्ठभागाची सुधारणा मास्टिक डांबराचा वापर करण्याकरता सुमारे ६५कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या डागडुजीच्या कामांसाठी स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची निवड करण्यातआली आहे.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 8:10 am

'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा':विकासाबद्दल बोलायचे झाले की 'ते' पळ काढतात; भाजप–एमआयएममध्ये रंगला वादाचा जोरदार सामना VIDEO

दिव्य मराठी ॲपने आयोजित केलेल्या ‘लढाई मनपाची, आवाज नागरिकांचा' टॉक शोला प्रभाग १९ मध्ये उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी 'भाजप आणि महायुतीचे लोक विकासाबद्दल बोलायचे झाले की ते पळ काढतात,' अशी टीका एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यावर प्रत्युत्तर देताना करत भाजपच्या उमेदवारांनी 'एमआयएमने सत्तेत असताना कोणते ठोस काम केले,' असा सवाल केला. महापालिका निवडणुका जाहीर होताच छत्रपती संभाजीनगर शहरातील राजकीय तापमान वाढू लागले आहे. तब्बल दहा वर्षांनंतर १५ जानेवारी रोजी महापालिका निवडणुका होत असून, यानिमित्ताने यावेळी तरी नागरिकांचे प्रश्न सुटणार का, असा सवाल शहरभरातून उपस्थित केला जात आहे. एकीकडे सत्ताधारी आणि इच्छुक उमेदवारांनी आपण केलेल्या कामांची यादी मांडण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे विरोधकांकडून त्यावर जोरदार टीका होत आहे. ‘दिव्य मराठी ॲप’ने आयोजित केलेल्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या संवादात प्रभाग क्रमांक १९ मधील नागरिकांनी आपल्या प्रलंबित प्रश्नांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. असा आहे प्रभाग छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १९ हा क्रांती चौकापासून सुरू होऊन बाळासाहेब ठाकरे चौक, श्रीराम चौक, वीर सावरकर चौक, शाहनूरमिया दर्गाह परिसर मार्गे बीड बायपासपर्यंत विस्तारलेला आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या ३९,०९२ इतकी आहे. मात्र, इतक्या मोठ्या लोकसंख्येला आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे या संवादातून स्पष्ट झाले. यावेळी विष्णू शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 'आमच्या प्रभागात भाजपचे नगरसेवक होते, मात्र आजही पायी चालण्यासाठी नीट रस्ते नाहीत. पाण्याची टाकी असूनही ती पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. ड्रेनेज लाइनचे पाणी अक्षरशः रस्त्यावर तुंबते, पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. निवडणुकीच्या वेळी मतं मागायला सगळे येतात, मात्र निवडून गेल्यानंतर नागरिकांचे प्रश्न दुर्लक्षित केले जातात,' असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, इतर नागरिकांनीही प्रभागातील समस्यांचा पाढा वाचला. अनेक भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा, स्वच्छतेचा अभाव आणि कचरा उचलण्यास होणारा विलंब यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. विकास कमी आणि जातीयवाद जास्त संवादादरम्यान एमआयएम आणि भाजप यांच्यात शाब्दिक वादही रंगला. एमआयएमच्या उमेदवारांनी भाजपवर जात-धर्माच्या राजकारणाचा आरोप करत, 'भाजप विकासापेक्षा जातीय मुद्द्यांवर निवडणुका लढते. विकासाबद्दल बोलायचे झाले की ते पळ काढतात,' अशी टीका केली. त्यावर पलटवार करत भाजपच्या उमेदवारांनी निशाणा साधत, 'एमआयएमने सत्तेत असताना कोणते ठोस काम केले? आज रस्ते, ड्रेनेज, पाणी आणि सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर आहेत. वाढती गुन्हेगारी आणि महिलांची असुरक्षितता याला कोण जबाबदार?' असा सवाल उपस्थित केला. मोकळी जागा म्हणजे कचऱ्याचा ढिगार समस्यांबाबत बोलताना रिझवान पठाण यांनी कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा उपस्थित केला. 'आठ वर्षांपूर्वी जशी रस्त्यावर कचऱ्याची समस्या होती, तशीच ती आजही कायम आहे. तसेच निवास कॉलनी आणि देवा नगरीतील पुलाचा प्रश्न गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे,' असे ते म्हणाले. अशोक तुपे यांनी प्रभागातील गरजांकडे लक्ष वेधताना प्रत्येक चौकात स्पीड ब्रेकर, २४ तास ऍम्ब्युलन्स सेवा, रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे, नवीन सिमेंट रस्त्यालगत पेव्हर ब्लॉक बसवणे, पाण्याचा वेळ सकाळी आठ ते दुपारी एक या कालावधीत ठेवणे, सर्व स्ट्रीट लाइट्स कार्यरत करणे आणि अनावश्यक वाढलेली झाडे छाटण्याची मागणी केली. तसेच वीज बंद होणार असल्यास किमान १२ तास आधी एसएमएसद्वारे माहिती देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. यावेळी संवादात उपस्थित नागरिकांनी दोन्ही पक्षांवर नाराजी व्यक्त करत थेट भूमिका मांडली. 'सत्ता कुणाचीही असो, आमच्या समस्या मात्र तशाच आहेत. निवडणूक आली की सगळे विकासाची भाषा करतात, पण निवडून गेल्यानंतर कोणीच फिरकत नाही,' अशी प्रतिक्रिया सतीश सातपुते यांनी दिली. एकंदरच, या संवादातून प्रभाग क्रमांक १९ मधील वास्तव समोर आले असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा नागरिकांचे दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जाती-धर्माच्या राजकारणापेक्षा प्रत्यक्ष काम करणाऱ्या, उत्तरदायित्व स्वीकारणाऱ्या आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या उमेदवारालाच संधी देण्याचा सूर प्रभागातील मतदारांकडून उमटताना दिसत आहे.

दिव्यमराठी भास्कर 20 Dec 2025 8:01 am

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! खडकवासल्याचे पाणी सुटले; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा

प्रभात वृत्तसेवा पुणे – खडकवासला धरणातून रब्बी हंगामातील पहिले आर्वतन सोडण्यास मागील आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. सद्यः स्थितीत कालव्यातून एक हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत असून, हे आर्वतन सुमारे 40 ते 50 दिवस सुरू राहणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. या आर्वतनचा फायदा हवेली, इंदापूर, दौंड आणि बारामती तालुक्यांतील शेतीला फायदा होणार आहे. […] The post शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! खडकवासल्याचे पाणी सुटले; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 8:00 am

लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:रस्त्यांची अवस्था चिंताजनक, पावसाळ्यात तळे साचते, नंतर धुळीचा मारा; प्रभाग क्रमांक 19 ला असमान विकासाचा फटका Video

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनेक मूलभूत नागरी समस्यांना रोज सामोरे जावे लागत आहे. शहरातील महत्त्वाच्या प्रभागांपैकी एक असलेल्या या भागात विकासाच्या घोषणा ऐकू येतात. मात्र, प्रत्यक्षात अनेक प्रश्न अद्याप कायम असल्याची खंत दिव्य मराठी ॲपच्या 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा' टॉक शोमध्ये व्यक्त केली. प्रभाग क्रमांक १९ हा क्रांती चौकापासून सुरू होऊन बाळासाहेब ठाकरे चौक, श्रीराम चौक, वीर सावरकर चौक, शाहनूरमिया दर्गाह परिसर मार्गे बीड बायपासपर्यंत विस्तारलेला आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या ३९,०९२ इतकी आहे. मात्र, इतक्या मोठ्या लोकसंख्येला आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. खराब रस्त्यांमुळे अपघातात वाढ प्रभागातील रस्त्यांची अवस्था चिंताजनक आहे. अनेक अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून काही रस्त्यांचे काम अर्धवट अवस्थेत आहे. पावसाळ्यात या रस्त्यांवर पाणी साचते, तर उन्हाळ्यात धूळ उडते. त्यामुळे वाहनचालक, पादचारी, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपघातांची शक्यता वाढत असून वाहतूकही वारंवार विस्कळीत होते. यावर बोलताना प्रभागातील सुरैया बेगम पठाण म्हणतात की, 'मी शहानूरवाडी झोपडपट्टीमधील रहिवासी असून रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आम्हाला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. या रस्त्यामुळे आमच्या भागात अपघात झाल्यावर अनेकांचे जागीच जीव गेले आहेत. आमच्या भागाकडे ना कोणी फिरकत पण नाही. आम्ही कस जगावं हा प्रश्न आम्हाला कधी - कधी पडतो.' या भागातील रस्त्यांची दुरवस्था ही केवळ वाहतुकीपुरती मर्यादित नसून तिचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. रुग्णवाहिकांना अनेक वेळा अरुंद आणि खड्डेमय रस्त्यांमुळे उशीर होतो. तर खुल्या ड्रेनेजमुळे लोकांना भागात जाताना त्रास होतो. एवढच नवे तर सुरैया बेगम म्हणतात की भटक्या कुत्र्यांचा आम्हाला प्रचंड त्रास होतो. बाहेर कामासाठी पडलं की, ते अंगावर अटॅक करतात. ज्योतीनगर सुंदर आहे का? ज्योतीनगरमध्ये राहणाऱ्या दीपाली श्रीखंडे म्हणतात की, 'आपण आपलं घर सुंदर ठेवतो तसा आपला भागही सुंदर असावा अशी साधी अपेक्षा आम्हा नागरिकांची असते. आमच्याकडे मध्यंतरी घंटा गाडी व्यवस्थित येत नव्हती. पण आता ती सुरळीत आहे. मात्र, गाडीवाल्यांचा टाइम एक नाही. त्यामुळे कचरा जमा होतो आणि रस्त्यावरती कचऱ्याचे ढिगारे साचतात. लोक अक्षरशः चांगल्या रस्त्यांना कचरा कुंडी बनून टाकतात. केवळ कचराच नाही तर आमच्याकडे पाण्याची समस्याही तितकीच गंभीर आहे.' दुसरीकडे याच भागाबद्दल बोलताना 'सपर्णा चिंचवाल' म्हणतात की, 'येणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांना काय अपेक्षा आहेत. हा मुख्य प्रश्न आहे. आमच्या भागात रस्ते चांगले आहेत. आम्हाला पाणी मिळत आणि आमच्याकडे घंटा गाडी देखील व्यवस्थित येते. त्यामुळे माझ्या मते आमच्या भागात कोणत्या समस्या आम्हाला तीव्र होतो असं मला वाटत नाही. पण ज्या भागात विकास पोहचू शकला नाही तिथे तो पोहोचला गेला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे.' या विविध प्रतिक्रिया पाहता, प्रभाग क्रमांक १९ मधील वास्तव वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे असल्याचे स्पष्ट होते. काही परिसरांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध असल्या तरी काही भागांत अद्याप रस्ते, पाणी, स्वच्छता आणि सुरक्षिततेसारख्या मूलभूत प्रश्नांशी नागरिकांना झगडावे लागत आहे. त्यामुळे या प्रभागातील विकास असमान असल्याचे चित्र समोर येत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, प्रभागातील काही ठराविक भागांपुरता विकास मर्यादित न राहता सर्व भागांपर्यंत समान पद्धतीने पोहोचणे आवश्यक आहे. यावर बोलताना ज्येष्ठ नागरिक म्हणतात की, राजकारणी लोकांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ते नागरिकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी स्वतःच्या विकासाकडे लक्ष न देता नागरिकांच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. या प्रभागातील नागरिकांनी रस्ते, पाणी, गटार आणि स्वच्छता या प्रश्नांबरोबरच एक मुद्दा वारंवार उपस्थित केला आहे, तो म्हणजे समान विकासाचा अभाव. काही भागांमध्ये सुविधा उपलब्ध असताना काही भागांमध्ये आजही नागरिकांना मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, विकास कामे करताना संपूर्ण प्रभागाचा विचार होणे आवश्यक आहे. केवळ निवडक भागांमध्येच कामे न करता, ज्या भागांमध्ये अजूनही समस्या कायम आहेत, तिथे तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. या संदर्भात अनेक नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रारी केल्याचे सांगितले जाते. मात्र तक्रारी करूनही समस्यांमध्ये फारसा बदल झालेला नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रभाग क्रमांक १९ मधील रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा सुधारणा, गटार स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन या कामांकडे प्रशासनाकडून लक्ष दिले जाते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मधील नागरिकांना मूलभूत सुविधा केव्हा मिळणार, हा प्रश्न अद्यापही कायम आहे. कचऱ्याची समस्या सर्वात गंभीर रिजवान पठान म्हणाले की, 8 वर्षांपासून लोक रस्त्यावर कचरा फेकतात आमच्या प्रभागात गेली 8 वर्षे ही समस्या आहे. याकडे कुणाचेी लक्ष नाही. तर दुसरीकडे निवास कॉलनी ते देवानगरीला जोडणारा पुल आहे त्याला कठडे नाहीत, त्यावर कचरा फेकलेला असतो या पुलावरुन पायी जाणे तर सोडाच पण दुचाकी आणि चारचाकी घेऊन जाताना सुद्धा खूप त्रास होतो.

दिव्यमराठी भास्कर 20 Dec 2025 8:00 am

आजचे एक्सप्लेनर:कोण आहे उस्मान हादी? ज्याच्या हत्येने पेटला बांगलादेश; हिंदू तरुणाला मारून झाडावर निर्वस्त्र लटकवले, भारतावर होत आहेत आरोप

बांगलादेशचे भारतविरोधी युवा नेते मानले जाणारे 31 वर्षीय उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर हिंसाचार उसळला आहे. राजधानी ढाका येथे जाळपोळ आणि हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांनी माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या अवामी लीग पक्षावर हत्येचा आरोप केला आहे. हादी यांना गोळी मारल्यानंतर हल्लेखोर सीमा ओलांडून भारतात लपले असल्याचा आरोप आहे. हिंसक जमावाने एका हिंदू तरुणाला मारहाण करून ठार केले आणि त्याचा मृतदेह विवस्त्र करून फाशीवर लटकवले. अखेर हा हादी कोण आहे, ज्याच्या हत्येमुळे बांगलादेशात संताप उसळला आहे, हत्येच्या कटाचा संबंध भारताशी का जोडला जात आहे, फेब्रुवारीमध्ये बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होऊ शकतील का, आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया… प्रश्न-1: रिक्षातून जात असताना हादी यांची गोळी मारून हत्या कशी झाली?उत्तर: बांगलादेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या शुक्रवारी म्हणजेच 12 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उस्मान हादी बॅटरी रिक्षातून ढाका येथील फकिरापूल येथून विजयनगरकडे जात होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले की, एक बाईक मागून रिक्षाजवळ आली, नंतर उजव्या बाजूला येऊन थांबली आणि बाईकवर मागे बसलेल्या व्यक्तीने अगदी जवळून हादीवर गोळी झाडली. बाईकवरील दोन्ही हल्लेखोरांनी हेल्मेट घातले होते. संपूर्ण घटना काही सेकंदात घडली आणि ते लगेच घटनास्थळावरून पळून गेले. गोळी डोक्यात लागल्याने हादी गंभीर जखमी झाला होता. इन्कलाब मंचाचे कार्यकर्ते मोहम्मद रफी, हादीच्या मागे दुसऱ्या रिक्षात होते. त्यांनी सांगितले की, ढाका येथील एका मशिदीत शुक्रवारच्या नमाजानंतर ते उच्च न्यायालयाच्या दिशेने जात होते, तेव्हा विजयनगरला पोहोचताच त्यांच्यावर हल्ला झाला. हादीला 15 डिसेंबर रोजी एअरलिफ्ट करून उपचारासाठी सिंगापूरला नेण्यात आले होते, जिथे 18 डिसेंबर रोजी सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. आज 19 डिसेंबर रोजी हादीचा मृतदेह ढाका येथे आणण्यात आला आहे, परंतु त्यापूर्वीच रात्री ढाकामध्ये हिंसाचार उसळला होता. हादीची भारतविरोधी प्रतिमा आणि शेख हसीना सरकारच्या विरोधाला यामुळे तो बांगलादेशातील विद्यार्थी आणि विरोधकांचा नेता बनला. प्रश्न-2: हादी बांगलादेशात आंदोलक विद्यार्थ्यांचा नेता कसा बनला?उत्तर: उस्मान हादीचा जन्म दक्षिण बांगलादेशातील झालाकाठी जिल्ह्यातील नलचिटी गावात झाला होता. हादी इस्लामी धार्मिक वातावरणात मोठा झाला. 2011 मध्ये ढाका विद्यापीठातून राज्यशास्त्राचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर, त्याने खाजगी विद्यापीठांमध्ये शिकवले आणि बांगलादेशातील परिस्थितीवर पुस्तके लिहिली. गेल्या वर्षी शेख हसीना सरकारविरोधातील निदर्शनांदरम्यान हादीचे राजकीय महत्त्व वाढले. ऑगस्ट 2024 मध्ये सत्तापालटानंतर ‘इन्कलाब मंच’ नावाचे नवीन संघटन उभे राहिले, हादी त्याचा मुख्य संयोजक आणि प्रवक्ता होता. हा मंच कट्टरपंथी इस्लामिक संघटना जमात-ए-इस्लामीच्या जवळचा मानला जातो. हादीने फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत ढाका-8 जागेवरून अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची घोषणा केली होती. लेखिका तस्लिमा नसरीन यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, 'एका जिहादीच्या मृत्यूनंतर हजारो जिहादी संपूर्ण बांगलादेशात दंगल करत आहेत. जे मिळेल ते तोडत आहेत, सर्व काही जाळून राख करत आहेत.' प्रश्न-3: हादीच्या हत्येचा कट कोणी रचला?उत्तर: हादीच्या हत्येमध्ये आवामी लीगशी संबंधित व्यक्तींची नावे समोर येत आहेत. असे म्हटले जात आहे की हादीची हत्या केल्यानंतर दोन्ही हल्लेखोर भारतात पळून गेले होते. बांगलादेश पोलिसांनी फैजल करीम मसूद उर्फ ​​दाऊद खानला अटक केली आहे. फैजलला हादीवर गोळीबार करणारा मुख्य शूटर मानले जाते. तो अवामी लीगच्या विद्यार्थी शाखा, छात्र लीगशी संबंधित आहे. शेख हसीना यांच्या बंडानंतर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार बनलेल्या मुहम्मद युनूस यांनी दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत छात्र लीगवर बंदी घातली होती. बांगलादेशातील वृत्तपत्र प्रोथोमालोनुसार, हादीवर हल्ला झाला तेव्हा आलमगीर शेख नावाचा दुसरा एक व्यक्ती फैजलसोबत होता. बांगलादेश पोलिसांनी या दोघांना अटक करण्यासाठी माहिती देणाऱ्याला 50 लाख टाका (सुमारे 37 लाख रुपये) चे बक्षीस जाहीर केले होते. 15 डिसेंबर रोजी, बांगलादेशच्या रॅपिड ॲक्शन बटालियन (RAB)ने नारायणगंज परिसरातून फैजलचा आणखी एक साथीदार, 30 वर्षीय कबीर याला अटक केली. RAB च्या मीडिया विंगचे कमांडर MZM एन्तेखाब चौधरी यांनी सांगितले की कबीर या हल्ल्यात थेट सामील होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की फैजल 4 डिसेंबर रोजी कबीर आणि इतर दोघांसोबत इन्किलाब मंच सांस्कृतिक केंद्रात घुसला होता, जिथे तो हादीसोबत बोलताना दिसला. फैजलने 9 डिसेंबर रोजी त्याच केंद्रात हादीसोबतच्या बैठकीलाही हजेरी लावली होती. यापूर्वी, RAB ने हादीच्या गोळीबाराच्या संदर्भात फैजलची पत्नी सामिया, तिची मैत्रीण मोनिका आणि तिचा मेहुणा शिपु यांना ताब्यात घेतले होते. प्रोथोम आलोनुसार, हादीच्या हत्येनंतर फैजल आणि आलमगीर भारतात घुसले होते. घटनेदरम्यान त्यांनी पाच वेळा वाहने बदलली होती. त्यांनी त्यांच्या बाईकवर बनावट लायसन्स प्लेट लावली होती आणि त्यांचे फोन व सिम कार्ड फेकून दिले होते. कतारस्थित झुल्करनैन सैयर नावाच्या पत्रकाराने सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला होता की, फैजल आणि आलमगीर १२ डिसेंबर रोजी हलुआघाट सीमा ओलांडून भारतात घुसले होते आणि सध्या ते आसाममधील गुवाहाटीमध्ये आहेत. झुल्करनैन सैयरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, भारतात प्रवेश केल्यानंतर, बांगलादेश सरकारचे माजी मंत्री जहांगीर कबीर नानक यांच्या खाजगी सचिवाने फैजलला एक भारतीय नंबर, +91-00-39-0 दिला होता. याच सिमचा वापर करून, फैजलने हादीवर हल्ल्याच्या रात्री अनेक फोन नंबरवर सेल्फी पाठवली होती. यापैकी एक फोटो गुवाहाटीमध्ये काढण्यात आला होता. ट्रूकॉलरवर हा नंबर शोधल्यास एक बंगाली संदेश दिसतो ज्यात लिहिले होते की, 'हा दहशतवाद्याचा मुलगा हादीचा मारेकरी आहे.' हादीने स्वतः अवामी लीगवर त्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. 13 नोव्हेंबर रोजी एका फेसबुक पोस्टमध्ये, हादीने लिहिले होते की, गेल्या तीन तासांत, अवामी लीगच्या मारेकऱ्यांनी किमान 30 परदेशी नंबरवरून माझ्या नंबरवर फोन आणि मेसेज केले आहेत. मी सतत पाळत ठेवलेल्या स्थितीत आहे. ते माझे घर जाळून टाकतील. ते माझ्या आई, बहीण आणि पत्नीवर बलात्कार करतील आणि मला मारून टाकतील. तथापि, ढाकास्थित JagoNews24 च्या अहवालानुसार, 14 डिसेंबर रोजी, ढाका पोलिसांनी सांगितले होते की, हल्लेखोर भारतात घुसले असल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही. अनेक बांगलादेशी राजकारणी आणि पत्रकार हादीच्या हत्येसाठी भारताला दोषी ठरवत आहेत. प्रश्न-4: हादीच्या हत्येप्रकरणी भारतावर कोणते आरोप केले जात आहेत?उत्तर: गेल्या वर्षी बांगलादेशात झालेल्या बंडानंतर, नॅशनल सिटीझन्स पार्टी नावाच्या दुसऱ्या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. त्याचे नेते, युनूस सरकारमधील माजी मंत्री नाहिद इस्लाम यांनी हादीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या होत्या. या पोस्टमध्ये नाहिदने लिहिले होते की, हादी बांगलादेशसाठी लढताना शहीद झाले. भारताने हादीचे मारेकरी आणि हसीनाला आमच्याकडे सोपवावे. 13 डिसेंबर रोजी बांगलादेश ट्रिब्यूनला दिलेल्या एका मुलाखतीत नाहिदने आरोप केला होता की भारताने हादीवर हल्ला केला होता. ढाका येथील वृत्तपत्र डेली सन नुसार, ढाकाच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशमधील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना समन्स बजावले होते आणि भारत सरकारला विनंती केली होती की, हादीचे हल्लेखोर भारतीय हद्दीत प्रवेश केल्यास त्यांना अटक करून आमच्याकडे सोपवावे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने असेही म्हटले होते की, पळपुट्या शेख हसीना यांना भडकाऊ विधाने करू देण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे, ज्यात त्या आपल्या समर्थकांना बांगलादेशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी चिथावत आहेत. त्यांचा उद्देश बांगलादेशातील आगामी निवडणुका निष्फळ करणे हा आहे.' प्रश्न-5: हादीच्या हत्येनंतर बांगलादेशात काय परिस्थिती आहे?उत्तर: हादीच्या मृत्यूच्या बातमीनंतर, 18 डिसेंबर रोजी रात्री उशिरा ढाकासह बांगलादेशातील अनेक भागांमध्ये उस्मान हादीचे समर्थक आणि विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार आणि जाळपोळ केली. भारतीय उच्चायुक्तांच्या निवासस्थानासमोर मोठा जमाव जमला होता. उच्चायुक्तांवरही दगडफेक करण्यात आली होती. हादीच्या हत्येच्या आणि अवामी लीगविरोधी घोषणांच्या साथीने अवामी लीगच्या कार्यालयातही तोडफोड आणि आग लावण्यात आली होती. बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती आणि शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांच्या निवासस्थानाची तोडफोड करण्यात आली होती. या घरावर फेब्रुवारी 2024 मध्ये आणि पुन्हा ऑगस्ट 2024 मध्ये दोनदा हल्ला करण्यात आला होता. शेख हसीना यांच्या अवामी लीग सरकारमधील माजी शिक्षण मंत्री मोहिबुल हसन चौधरी यांच्या घराची तोडफोड करून आग लावण्यात आली होती. बांगलादेशातील सर्वात मोठ्या वृत्तपत्रांच्या, डेली स्टार आणि प्रथम आलोच्या कार्यालयांची तोडफोड करून आग लावण्यात आली होती. सुमारे 25 पत्रकार अनेक तास या इमारतीत अडकले होते. विरोधकांच्या जमावाने एका हिंदू तरुणाला मारहाण करून ठार केले, नंतर त्याचे कपडे काढून त्याला झाडावर लटकवले आणि आग लावली. पोलिसांनी मृताची ओळख दीपू चंद्र दास अशी केली. तस्लिमा नसरीनने लिहिले, एका हिंदू तरुणाला झाडावर लटकवून जाळण्यात आले, पण कोणीही थरथरले नाही. सर्वांनी 'नारा-ए-तकबीर अल्लाह-ओ-अकबर'च्या घोषणा दिल्या. हा जिहादीस्तानचा खरा चेहरा आहे. प्रशासनाने हादीच्या सन्मानार्थ 20 डिसेंबर रोजी राज्य शोक दिन घोषित केला. युनूसने सांगितले की, शहीद उस्मान हादीचा मृत्यू देशाच्या राजकीय आणि लोकशाही जीवनासाठी मोठे नुकसान आहे. सरकार त्याच्या पत्नीची आणि एकुलत्या एक मुलाची जबाबदारी घेईल. दरम्यान, इन्कलाब मंचाने सांगितले की, दंगलखोर कोण होते हे त्यांना माहीत नाही. जमात-ए-इस्लामी आणि बीएनपी देखील हिंसाचारापासून दूर राहिले आहेत. सैन्याने ढाका आणि चितगावच्या बहुतेक भागांवर नियंत्रण मिळवले आहे. प्रश्न-6: हादीच्या हत्येचा बांगलादेशच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल?उत्तर: शेख हसीना यांच्या बंडानंतर दीड वर्षांनी, 12 फेब्रुवारी 2026 रोजी बांगलादेशमध्ये संसदीय निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयुक्त एएमएम नसीरुद्दीन यांनी हादीवरील हल्ल्याच्या एक दिवस आधी ही घोषणा केली होती. मे 2025 मध्ये, हसिनाच्या पक्षाला, अवामी लीगला नोंदणीतून निलंबित करण्यात आले होते, ज्यामुळे तो पुढील वर्षाच्या निवडणुकीत भाग घेऊ शकणार नाही. दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष, बीएनपीचे नेते आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया गंभीर आजारी आहेत. बीएनपीला लवकर निवडणुका हव्या होत्या. तिसरा पक्ष, जमात-ए-इस्लामी बांगलादेशला भारतविरोधी मानले जाते. जमातने अप्रत्यक्षपणे युनुसला पाठिंबा दिला होता आणि युनुसने पक्षावरील बंदी उठवली होती. हादीला जमातच्या जवळचा देखील मानले जात होते. चौथी आघाडी नॅशनल सिटीझन्स पार्टी आहे. भारतविरोधी राजकारण बांगलादेशात प्रभावी आहे. त्यामुळे हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशात शांततापूर्ण निवडणुका घेणे कठीण वाटत आहे. मोहम्मद युनूसने हादीच्या हत्येला निवडणुकीपूर्वी हिंसा भडकवण्याचे षडयंत्र म्हटले आहे. युनूसने सांगितले की, कोणत्याही प्रकारची उदारता दाखवली जाणार नाही. हादीच्या हत्येत सामील असलेल्या सर्व लोकांना लवकरच न्यायव्यवस्थेसमोर आणले जाईल आणि त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल. जेएनयूचे प्राध्यापक आणि परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ राजन कुमार म्हणतात की, युनूससमोर बांगलादेशातील परिस्थिती सामान्य करण्याचा मुख्य आव्हान आहे, जे कठीण वाटते. त्यामुळे, शांततापूर्ण निवडणुका होतील आणि लोकशाही सरकार स्थापन होईल की नाही, हे सांगणे कठीण आहे. प्रश्न-7: बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीचा भारतावर काय परिणाम?उत्तर: तज्ज्ञांच्या मते, हादीच्या मृत्यूमुळे बांगलादेशात भारतविरोधी भावना आणखी मजबूत होतील. भारतासाठी सर्वात मोठी चिंता ‘चिकन नेक’ किंवा सिलीगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेची आहे. भारताचा ईशान्य भाग केवळ 22 किमीच्या अरुंद पट्ट्याने उर्वरित भारताशी जोडलेला आहे, जो बांगलादेशने वेढलेला आहे. बांगलादेशात भारतविरोधी सरकार किंवा अस्थिरता या भागाच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान ठरू शकते.

दिव्यमराठी भास्कर 20 Dec 2025 7:57 am

‘गांधी’नावावरून वाद! मनरेगा योजनेतील बदलांविरोधात पुणे काँग्रेस आक्रमक

प्रभात वृत्तसेवा पुणे – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) या जनहितकारी योजनेच्या तरतुदींमध्ये अत्यंत चुकीचे बदल केल्याचा आरोप करत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने शुक्रवारी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले.काँग्रेस प्रणित केंद्र शासनाने आपल्या कार्यकाळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही जनहितकारी योजना निश्चित केली होती. मात्र केंद्र शासन […] The post ‘गांधी’ नावावरून वाद! मनरेगा योजनेतील बदलांविरोधात पुणे काँग्रेस आक्रमक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 7:45 am

Pune News: पुणे-महाबळेश्वर ई-शिवाई बस सुरू; पहा वेळापत्रक आणि आरक्षणाची संपूर्ण माहिती

प्रभात वृत्तसेवा पुणे – महाबळेश्वर, पाचगणी पर्यटनस्थळ हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण. आता हिवाळा सुरू झाल्यामुळे महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. प्रवाशांना आरामदायी, वातानुकुलीत पर्यावरणपुरक प्रवासासाठी स्वारगेट आगारातर्फे महाबळेश्वरसाठी वातानुकूलित ई-शिवाई बस सेवा सुरू केली आहे.स्वारगेट-महाबळेश्वर-स्वारगेट मार्गावर ई-शिवाई वातानुकूलित बसच्या एकूण चार फेऱ्या नियोजित आहेत. स्वारगेटला सकाळी साडेपाच, साडेसहा तर दुपारी तीन, चार वाजता […] The post Pune News: पुणे-महाबळेश्वर ई-शिवाई बस सुरू; पहा वेळापत्रक आणि आरक्षणाची संपूर्ण माहिती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 7:30 am

पुण्यात आज राजकीय भूकंप! तब्बल २२ माजी नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश

प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकांची घोषणा झाली असून, सर्वच राजकीय पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती संपवून उमेदवारांची यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे. असे असतानाच शहरातील शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच काॅग्रेसमधील माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. उद्या (शनिवारी) मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे […] The post पुण्यात आज राजकीय भूकंप! तब्बल २२ माजी नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 7:15 am

शहरात थंडीची लाट! पारा ७ अंशांवर घसरला; शिवाजीनगर, पाषाणमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी

प्रभात वृत्तसेवा पुणे – सलग दुसऱ्या दिवशी शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाल्यामुळे थंडीचा पारा ७ अंशापर्यंत खाली आला आहे. परिणामी जिल्ह्यातील बारामती, माळीण तर शहरातील पाषाण आणि शिवाजीनगर परिसरात पुन्हा थंडीची लाट आली .मागील आठवड्यात शहरासह उपनगरातील किमान तापमान १० ते ११ अंशाच्या पुढे गेल्यामुळे थंडीचा जोर ओसरला होता. मात्र, […] The post शहरात थंडीची लाट! पारा ७ अंशांवर घसरला; शिवाजीनगर, पाषाणमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 7:00 am

अग्रलेख : काँग्रेसची आशा

काही वर्षांपूर्वी एका एकपात्री कार्यक्रमात एका कलाकाराने बहुतेक राजकीय नेत्यांची खिल्ली उडवली होती. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा राजकारणात सक्रिय झाल्या असल्यामुळे त्यांचाही विषय आला. प्रियंका गांधी यांना काँग्रेसमध्ये प्रमुख भूमिका मिळाली पाहिजे अशी काँग्रेसमधील नेत्यांची मागणी आहे. त्याचे कारण काय तर त्या त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसतात. तसे तर मग जयराम रमेशही दिसतात […] The post अग्रलेख : काँग्रेसची आशा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 6:55 am

PMC Election: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंच्या बैठकीत स्थानिक नेत्यांनी मांडली स्पष्ट भूमिका

प्रभात वृत्तसेवा पुणे – भाजप पुण्यात शिवसेनेसोबत युती करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करताना राष्ट्रवादी काँग्रेससोबत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता भाजप आमच्या माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश देत आहे, ही कसली मैत्री? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी आघाडी करण्यास आमची […] The post PMC Election: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंच्या बैठकीत स्थानिक नेत्यांनी मांडली स्पष्ट भूमिका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 6:50 am

Nagar Parishad Election: मतदानाला जाताय ना? बारामती, फुरसुंगीसह ‘या’भागांत आज सार्वजनिक सुटी जाहीर

प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार लोकशाहीचा पवित्र उत्सव साजरा करताना मतदान अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्ये जबाबदारीने बजाविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मतदारांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीकरिता उर्त्स्फूतपणे मतदान करावे, नागरिक व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसहिंतेचे पालन करून शांततेत पूर्ण प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. राज्य […] The post Nagar Parishad Election: मतदानाला जाताय ना? बारामती, फुरसुंगीसह ‘या’ भागांत आज सार्वजनिक सुटी जाहीर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 6:40 am

Pune News: शिक्षण मंडळाचा कारभार ठप्प? कनिष्ठ लिपिकांची पदे रिक्त असल्याने कर्मचारी बेमुदत संपावर

प्रभात वृत्तसेवा पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयांतील रिक्त पदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी महाराष्ट्र शिक्षण बोर्ड कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन पुकारले आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व विभागीय मंडळांमधील कर्मचारी गेल्‍या तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेअंतर्गत कार्यरत असलेल्या ९ विभागीय मंडळ कार्यालयांमध्ये […] The post Pune News: शिक्षण मंडळाचा कारभार ठप्प? कनिष्ठ लिपिकांची पदे रिक्त असल्याने कर्मचारी बेमुदत संपावर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 6:30 am

Pune News: ‘हे गीत म्हणजे महासागराला अर्ध्य’! ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अधिकृत गीत प्रकाशित

प्रभात वृत्तसेवा पुणे – गीत लिहिणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. एकवेळ चित्रपटाचे गीत लिहिणे सोपे आहे. संमेलनगीत लिहिणे ही फार वेगळी बाब आहे. ९९ व्या साहित्य संमेलनाच्या गीतामधून संमेलनासारख्या महासागराचा कार्यविस्तार, रूपरेषा, संमेलन भूमीचा इतिहास, परंपरा, भवताल यांना मुठीत पकडले आहे. हे गीत म्हणजे महासागरातून दोन ओंजळी पाणी घेऊन त्या सागरालाच अर्ध्य अर्पण […] The post Pune News: ‘हे गीत म्हणजे महासागराला अर्ध्य’! ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अधिकृत गीत प्रकाशित appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 6:15 am

Chakan Accident: तळेगाव-चाकण रोडवर भीषण अपघात; ट्रक-रिक्षा धडकेत दोन ठार, दोघे गंभीर

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. १८ डिसेंबर) सकाळी वाघजाईनगर येथील तळेगाव चाकण रोडवर घडली.या प्रकरणी देशराज साहब सिंगलोधी (वय ३५, रा. महाळुंगे इंगळे) यांनी गुरुवारी (दि. १८) उत्‍तर महाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली […] The post Chakan Accident: तळेगाव-चाकण रोडवर भीषण अपघात; ट्रक-रिक्षा धडकेत दोन ठार, दोघे गंभीर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 6:00 am

सांगवीत रात्रीचा थरार! ‘कोयता गँग’चा पुन्हा धुमाकूळ; तरुणाला गाठून भररस्त्यात केला जीवघेणा हल्ला

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – जुन्या भांडणाच्या रागातून एका टोळक्याने कोयता आणि दांडक्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला करून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना गुरुवारी (दि. १८ डिसेंबर) रात्री जुनी सांगवी येथील सी.क्यु.ए.ई. मेन गेट शेजारील गणपती मंदिराजवळ घडली.या प्रकरणी प्रथमेश प्रशांत कवडे (वय २१, रा. जुनी सांगवी) यांनी गुरुवारी (दि. १८) सांगवी पोलीस ठाण्‍यात फिर्याद […] The post सांगवीत रात्रीचा थरार! ‘कोयता गँग’चा पुन्हा धुमाकूळ; तरुणाला गाठून भररस्त्यात केला जीवघेणा हल्ला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 5:50 am

PCMC Election: भाजप-राष्ट्रवादीत जोरदार फिल्डिंग; बंडखोरी रोखण्यासाठी नेत्यांची नवी चाल..जाणून घ्या

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच पक्षांतील इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्‍यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना या प्रमुख पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बंडखोरीची भीती वाढली आहे. ही बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्ष उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम […] The post PCMC Election: भाजप-राष्ट्रवादीत जोरदार फिल्डिंग; बंडखोरी रोखण्यासाठी नेत्यांची नवी चाल..जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 5:40 am

नागरिक श्वास कसा घेणार? आकुर्डीतील प्रदूषण रोखणारी यंत्रणा बंद; डॉक्टरांचा गंभीर इशारा

प्रभात वृत्तसेवा रावेत – आकुर्डी परिसरातील खंडोबा चौकात बसविण्यात आलेली ड्राय मिस्ट बेस्ड फाउंटन ही हवेतील धूलिकण नियंत्रित करणारी महत्त्वाची यंत्रणा अनेक आठवड्यांपासून बंद आहे. परिसरात वेगाने सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे या यंत्रणेच्या दुरुस्तीस विलंब झाल्याचे समोर येत असून त्याचा थेट परिणाम स्थानिक हवेच्या गुणवत्तेवर होत आहे. गत काही महिन्यांपासून प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत असून […] The post नागरिक श्वास कसा घेणार? आकुर्डीतील प्रदूषण रोखणारी यंत्रणा बंद; डॉक्टरांचा गंभीर इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 5:30 am

Revenue Officers Strike: महसूल अधिकाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन स्थगित; शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद

प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील गौण खनिज उत्खनन प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या निलंबनाबाबत राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निलंबनाची कारवाई तीन दिवसांच्या आत मागे घेण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. […] The post Revenue Officers Strike: महसूल अधिकाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन स्थगित; शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 5:15 am

Pune Election: राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांचा ‘फायनल राऊंड’! १४३ जागांसाठी आज मतदान

प्रभात वृत्तसेवा पुणे – नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची यांसह 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 143 सदस्यपदांच्या जागांसाठी आज (20 डिसेंबर) मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबर रोजी झालेले मतदान व उद्या होणाऱ्या मतदानाची मतमोजणी […] The post Pune Election: राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांचा ‘फायनल राऊंड’! १४३ जागांसाठी आज मतदान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 5:00 am

Rajgurunagar: नगरपरिषदेसाठी उद्या मतमोजणी! चिठ्ठीद्वारे ठरणार समान मतांचा निकाल; वाचा महत्त्वाच्या सूचना

प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – राजगुरुनगर नगर परिषद निवडणूक मतमोजणी येत्या रविवारी (दि 21) रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार असून त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीच्या रविवारी दि. 21 रोजी होणार्‍या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शैलजा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मतमोजणी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी […] The post Rajgurunagar: नगरपरिषदेसाठी उद्या मतमोजणी! चिठ्ठीद्वारे ठरणार समान मतांचा निकाल; वाचा महत्त्वाच्या सूचना appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 4:45 am

Baramati Crime: सासरा आणि मेहुणीच्या मारेकऱ्यांना जन्मठेप! बारामती कोर्टाचा ऐतिहासिक निकाल..वाचा सविस्तर

प्रभात वृत्तसेवा बारामती – सासरकडील शेतजमीन मिळविण्याच्या उद्देशाने कट रचून सासरा आणि मेहुणीचा खून केल्याप्रकरणी बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाच्या तदर्थ न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी जावयासह तिघांना जन्मठेप तसेच प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.विशाल सोपान वत्रे (रा. मसनरवाडी, ता. दौंड), जयदीप जयराम चव्हाण (रा. येडेवाडी, लिंगाळी, ता. दौंड) आणि केरबा नारायण मेरगळ […] The post Baramati Crime: सासरा आणि मेहुणीच्या मारेकऱ्यांना जन्मठेप! बारामती कोर्टाचा ऐतिहासिक निकाल..वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 4:30 am

Khed News: महाळुंगे इंगळे गावाला मिळाली नवी ओळख; प्रशासकीय इमारत व शाळेचे लोकार्पण

प्रभात वृत्तसेवा महाळुंगे इंगळे – श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथे नूतन प्रशासकीय ग्रामपंचायत इमारत तसेच नूतन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारतीचे उद्घाटन खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.खेड तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या महाळुंगे इंगळे ग्रामपंचायतीची जुनी इमारत मोडकळीस आली होती. त्या जागी उभारण्यात आलेली नवी प्रशासकीय ग्रामपंचायत इमारत […] The post Khed News: महाळुंगे इंगळे गावाला मिळाली नवी ओळख; प्रशासकीय इमारत व शाळेचे लोकार्पण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 4:15 am

पुणे-सातारा हायवेवर मध्यरात्री थरार! भरधाव कारने दोन दुचाकींना उडवले; ४ तरुण जखमी

प्रभात वृत्तसेवा नसरापूर – पुणे-सातारा महामार्गावर वेळू गावाच्या हद्दीत (ता. भोर) शुक्रवारी (दि. १९) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भरधाव कारने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चार तरुण जखमी झाले असून सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भूषण किरण गिरीगोसावी (वय २२, सध्या रा. कोथरूड, पुणे) यांनी राजगड पोलीस […] The post पुणे-सातारा हायवेवर मध्यरात्री थरार! भरधाव कारने दोन दुचाकींना उडवले; ४ तरुण जखमी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 4:00 am

Indapur News: राजू शेट्टी, सदाभाऊ खोतांना कोर्टाचा मोठा दिलासा; इंदापूर ऊस आंदोलनाचा निकाल जाहीर

प्रभात वृत्तसेवा इंदापूर – इंदापूरमध्ये ऊसदराच्या मागणीसाठी सन २०१२ मध्ये झालेल्या तीव्र ऊस आंदोलनाशी संबंधित दाखल गुन्ह्यांप्रकरणी तब्बल १३ वर्षांनंतर मोठा न्यायालयीन दिलासा मिळाला आहे. या आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेल्या एकूण आठ गुन्ह्यांपैकी तीन गुन्ह्यांत माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह सतिशभैय्या काकडे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, निलेश देवकर यांच्यासह ५१ आंदोलकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. […] The post Indapur News: राजू शेट्टी, सदाभाऊ खोतांना कोर्टाचा मोठा दिलासा; इंदापूर ऊस आंदोलनाचा निकाल जाहीर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 3:30 am

उरुळी कांचन हादरले! ६० वर्षीय वृद्धाचा दिवसाढवळ्या थरारक खून; रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

प्रभात वृत्तसेवा उरुळी कांचन – पेठ (ता. हवेली) येथील एका 60 ते 62 वयोगटातील व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 19) उघडकीस आली. ही घटना पेठ-वडाचीवाडी ग्रामपंचायत हद्दीतील म्हसोबा मंदिर परिसरात घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.संपत चौधरी (वय अंदाजे 60 ते 62, रा. पानमळा, वडाचीवाडी, पेठ) […] The post उरुळी कांचन हादरले! ६० वर्षीय वृद्धाचा दिवसाढवळ्या थरारक खून; रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 3:15 am

पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! हायवेवरील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड

प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रसिद्ध हॉटेल जयश्री रेस्ट्रो, बार आणि लॉजिंग येथे खुलेआम सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ शुक्रवारी (दि. 19) दुपारी साडे दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. हॉटेलमध्ये बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना […] The post पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! हायवेवरील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 3:00 am

Shaurya Din 2026: शौर्य दिनासाठी लोणी काळभोर पोलिसांचा मास्टर प्लॅन; २४ तास राहणार करडी नजर

प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – 1 जानेवारी रोजी शौर्य दिनासाठी येणा-या नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये अशा पद्धतीने पोलिस प्रशासन काम करणार असून या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्रामसुरक्षा दलाच्या सहाय्याने पोलीस प्रशासन 24 तास गस्त घालणार आहे अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ […] The post Shaurya Din 2026: शौर्य दिनासाठी लोणी काळभोर पोलिसांचा मास्टर प्लॅन; २४ तास राहणार करडी नजर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 2:45 am

Wagholi News: महिला शक्तीचा जागर! ८०० रणरागिनींनी गाजवलं क्रिकेटचं मैदान; पाहा कोण ठरलं विजेते?

प्रभात वृत्तसेवा वाघोली – वाघोली-खराडी वूमन्स प्रीमियर लीग सीझन 2 ही भव्य महिला क्रिकेट स्पर्धा प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. महिलांच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणार्‍या या स्पर्धेत तब्बल 60 संघांनी सहभाग घेतला असून 800 पेक्षा अधिक महिला खेळाडूंनी आपल्या क्रिकेट कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. त्यामुळे वाघोली-खराडी परिसरात ही स्पर्धा विशेष चर्चेचा विषय ठरली. […] The post Wagholi News: महिला शक्तीचा जागर! ८०० रणरागिनींनी गाजवलं क्रिकेटचं मैदान; पाहा कोण ठरलं विजेते? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 2:30 am

३० वर्षांची दारूबंदी फक्त नावापुरतीच? पारगावच्या मुख्य चौकात ‘हे’दृष्य पाहून ग्रामस्थ हादरले

प्रभात वृत्तसेवा पारगाव – सुमारे ३० वर्षांपासून दारूबंदीसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असणाऱ्या पारगावामध्ये मुख्य चौकाच्या कडेला रिचवून टाकलेल्या मोकळ्या प्लॅस्टिक पिशव्यांचा (फुगे) खच पडत आहे.पारगाव हे तालुक्यातील एक मोठे गाव असून ३० वर्षांपूर्वी स्व. आबासाहेब करमरकर, वसुधा सरदार व काही तरुणांनी दारूबंदीसाठी उभ्या केलेल्या चळवळीमुळे आजतागाईत गावात वाईन्स किंवा परमिट रूमची दुकाने निर्माण झाली नाहीत. म्हणून […] The post ३० वर्षांची दारूबंदी फक्त नावापुरतीच? पारगावच्या मुख्य चौकात ‘हे’ दृष्य पाहून ग्रामस्थ हादरले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 2:15 am

‘भाईगिरी’भोवली! बारामतीत खंडणी उकळणारा तिसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

प्रभात वृत्तसेवा बारामती – कटफळ (ता. बारामती) येथील अवजारे बनवणाऱ्या एका उद्योजकाकडून स्वतःला ‘बारामतीचा डॉन’ असल्याचे सांगत वारंवार धमक्या देऊन ८५ हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी फरार असलेला तिसऱ्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.फिर्यादी हे बारामती एमआयडीसी परिसरात अवजारे बनवणारी कंपनी चालवतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, […] The post ‘भाईगिरी’ भोवली! बारामतीत खंडणी उकळणारा तिसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 2:00 am

Bhor News: सारोळ्यात ४३ लाखांचा दारू साठा जप्त; पुणे-सातारा महामार्गावर मोठी कारवाई, दोघांना अटक

प्रभात वृत्तसेवा सारोळा – गोवा राज्यात उत्पादित आणि महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क, सासवड विभागाने पर्दाफाश केला आहे. पुणे-सातारा महामार्गावरील सारोळे (ता. भोर) येथे सापळा रचून केलेल्या या कारवाईत ट्रक, स्कॉर्पिओ आणि मद्यसाठ्यासह एकूण ४३ लाख ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना […] The post Bhor News: सारोळ्यात ४३ लाखांचा दारू साठा जप्त; पुणे-सातारा महामार्गावर मोठी कारवाई, दोघांना अटक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 1:45 am

Manchar Election: मंचरचा ‘बाजीगर’कोण? रविवारी फुटणार विजयाचे फटाके, शहरात उत्सुकता शिगेला

प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी रविवार, दि.२१ रोजी होणार असून, ती तारीख जशी जशी जवळ येत आहे.तशी तशी नगराध्यक्ष पदाचे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धडधड वाढत चालली आहे.संपूर्ण शहराचे लक्ष आता केवळ मतमोजणी आणि विजय उमेदवाराच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे. मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत एका नगराध्यक्ष पदासाठी तसेच सोळा प्रभागांमधील […] The post Manchar Election: मंचरचा ‘बाजीगर’ कोण? रविवारी फुटणार विजयाचे फटाके, शहरात उत्सुकता शिगेला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 1:15 am

वाईकरांचे लक्ष निकालाकडे! सकाळी १० वाजता उघडणार मतपेट्या; ‘असा’आहे प्रशासनाचा प्लॅन

प्रभात वृत्तसेवा वाई : वाई नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालासाठी प्रशासनाने सर्व पातळ्यांवर तयारी पूर्ण केली असून, मतमोजणी प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून योग्य त्या सूचना केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मतमोजणीसाठी एकूण 11 टेबलांची व्यवस्था […] The post वाईकरांचे लक्ष निकालाकडे! सकाळी १० वाजता उघडणार मतपेट्या; ‘असा’ आहे प्रशासनाचा प्लॅन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 1:00 am

Vidrohi Sahitya Sammelan: ‘घालमोड्या दादांचे संमेलन’नक्की कोणाचे? ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले उलगडणार गुपित

प्रभात वृत्तसेवा सातारा – सातारा येथे होणाऱ्या नियोजित १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या निमित्ताने विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.” घालमोड्या दादांचे संमेलन व आमची भूमिका ” या विषयावर ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत निरंजन टकले (नाशिक) यांचे व्याख्यान मंगळवार, दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दैवज्ञ सांस्कृतिक भवन, यादव गोपाळ पेठ, सातारा येथे […] The post Vidrohi Sahitya Sammelan: ‘घालमोड्या दादांचे संमेलन’ नक्की कोणाचे? ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले उलगडणार गुपित appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 12:45 am

Satara News: औंध-गणेशवाडी रोड ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’; अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार?

प्रभात वृत्तसेवा औंध – औंध ते गणेशवाडी रस्त्यावरील अरुंद वळण व पुल वाहनधारकांसाठी जीवघेणा व मृत्यूचा सापळा पडला आहे. औंध येथील कोल्हाटी वस्ती नजीकच्या पुलाचे व रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने रुंदीकरण करावे व हा मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा अशी मागणी केली जात असून मागील दोन दिवसांपूर्वी एका दुचाकी वाहनधारकाचा हकनाक बळी या अरूंद रस्ता व […] The post Satara News: औंध-गणेशवाडी रोड ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’; अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 12:30 am

Satara Election: शिंदे गटाचा भाजपला ‘दे धक्का’! साताऱ्यातील ‘त्या’प्रभागाचा वाद आता थेट हायकोर्टात

प्रभात वृत्तसेवा सातारा – सातारा नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 5 (ब) साठी दि. 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार निलेश मोरे यांनी दाखल केली असून, भ्रष्टाचार, धमकावणे, हिंसाचार तसेच आदर्श आचारसंहितेच्या गंभीर उल्लंघनामुळे ही निवडणूक रद्द ठरविण्याची मागणी […] The post Satara Election: शिंदे गटाचा भाजपला ‘दे धक्का’! साताऱ्यातील ‘त्या’ प्रभागाचा वाद आता थेट हायकोर्टात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 20 Dec 2025 12:15 am

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५

पंचांगआज मिती मार्गशीर्ष अमावस्या ०७.१५ पर्यंत शके १९४७,चंद्र नक्षत्र मूळ,योग गंड चंद्र राशी धनु, भारतीय सौर २९ मार्गशीर्ष शके १९४७, शनिवार दिनांक २० डिसेंबर २०२५ .मुंबईचा सूर्योदय ०७.०६, मुंबईचा सूर्यास्त ०६.०५ मुंबईचा चंद्रोदय ०७.१७ मुंबईचा चंद्रास्त ०६.०५ राहू काळ ०९.५१ ते ११.१३ .मार्गशीर्ष अमावास्या-समाप्ती-सकाळी-०७;१२,संत गाडगे महाराज पुण्यतिथिदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : दैनंदिन महत्त्वाची कामे पूर्ण होतील. वृषभ : विरोधक तसेच इतर शत्रूंवर विजय मिळवू शकाल.मिथुन : कुटुंबातील तरुण-तरुणींच्या एक समस्या सुटतील.कर्क : विचारवंत व्यक्तींच्या सहवासाचा लाभ मिळेल.सिंह : एखादी महत्त्वाची घटना घडू शकते.कन्या : कुटुंबात सुसंवाद राहील.तूळ : नवीन कामे उत्साहाने हाती घ्याल. वृश्चिक : मनोरंजनाकडे कल राहील.धनू : अपेक्षित महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.मकर : नोकरीतील परिस्थिती उत्तम राहील. कुंभ : व्यापार विस्तार करू शकाल.मीन : व्यवसायात भागीदाराची मदत होऊ शकेल.

फीड फीडबर्नर 20 Dec 2025 12:10 am

IND vs SA : भारताचा आफ्रिकेवर ‘विराट’विजय! मालिका ३-१ ने खिशात; हार्दिक-तिलकसह वरुण ठरला विजयाचा शिल्पकार

IND vs SA India beat South Africa T20I Series : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने ५ सामन्यांची ही मालिका ३-१ अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे. टी-२० विश्वचषक २०२४ नंतर भारतीय संघाचा या फॉरमॅटमधील हा सलग सातवा द्विपक्षीय […] The post IND vs SA : भारताचा आफ्रिकेवर ‘विराट’ विजय! मालिका ३-१ ने खिशात; हार्दिक-तिलकसह वरुण ठरला विजयाचा शिल्पकार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 19 Dec 2025 11:33 pm

India vs South Africa, 5th T20I : अहमदाबादमध्ये तिरंगा फडकला! भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय; मालिका ३-१ ने खिशात

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली आहे. भारताने विजयासाठी दिलेल्या २३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव ८ बाद २०१ धावांवर मर्यादित राहिला. भारताचा हा १४ वा टी-२० मालिका विजय असून, २०२५ या वर्षाचा शेवट टीम इंडियाने दणक्यात केला आहे.https://prahaar.in/2025/12/19/india-in-the-final-of-the-u19-asia-cup/भारताचा विजय : ३० धावांनी विजय मिळवून मालिका ३-१ ने जिंकली.स्टार परफॉर्मर्स : हार्दिक पंड्या (६३ धावा, १ विकेट), तिलक वर्मा (७३ धावा), वरुण चक्रवर्ती (४ विकेट).विक्रमी धावसंख्या : भारताने ५ बाद २३१ धावांचा डोंगर उभारला होता.फलंदाजीचा थरार : हार्दिक-तिलकची शतकी भागीदारीनाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताची सुरुवात वादळी झाली. अभिषेक शर्मा (३४) आणि संजू सॅमसन (३७) यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. कर्णधार सूर्यकुमार यादव (५) स्वस्तात बाद झाल्यानंतर, हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा या जोडीने आफ्रिकन गोलंदाजांची पिसं काढली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी अवघ्या ४९ चेंडूत १०५ धावांची तुफानी भागीदारी केली. अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावत एकूण ६३ धावा केल्या. ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण करत ७३ धावांची झुंजार खेळी केली.दक्षिण आफ्रिकेचा पाठलाग : डिकॉकच्या विकेटने फिरला सामनामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर क्विंटन डिकॉकने (६५ धावा, ३५ चेंडू) आक्रमक सुरुवात केली. त्याने हेंड्रिक्ससोबत ६९ धावांची सलामी दिली. मात्र, वरुण चक्रवर्तीने हेंड्रिक्सला बाद करून ही जोडी फोडली. डिकॉक जोपर्यंत खेळत होता, तोपर्यंत आफ्रिकेच्या आशा जिवंत होत्या. जसप्रीत बुमराहने डिकॉकला बाद करताच आफ्रिकेचा डाव गडगडला. यानंतर वरुण चक्रवर्तीने पुन्हा एकदा आपली जादू दाखवत एडन मार्कराम आणि डोनोव्हन फरेरा यांना सलग चेंडूंवर बाद करून आफ्रिकेचे कंबरडे मोडले. डेव्हिड मिलर (१८) बाद झाल्यावर भारताचा विजय निश्चित झाला.

फीड फीडबर्नर 19 Dec 2025 11:30 pm

National Herald case : नॅशनल हेराॅल्ड प्रकरणी ईडी उच्च न्यायालयात

Sonia Gandhi | Rahul Gandhi – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. विशेष न्यायालयाने त्या प्रकरणात नुकताच कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांना दिलासा दिला. त्या निर्णयाला ईडीने आव्हान दिले आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातील मनी लॉण्डरिंग संदर्भात ईडीकडून याआधी आरोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र, त्या आरोपपत्राची […] The post National Herald case : नॅशनल हेराॅल्ड प्रकरणी ईडी उच्च न्यायालयात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 19 Dec 2025 10:45 pm

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? राजकीय वातावरण तापलं, कुठे घडला प्रकार?

ठाणे : अंबरनाथ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाने काटेकोर तयारी केली असून, सुमारे १५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली आहे. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शिंदे गटाच्या नेत्यांनी EVM मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप करून राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. या प्रकरणात शिंदे गटाचे […] The post मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? राजकीय वातावरण तापलं, कुठे घडला प्रकार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 19 Dec 2025 10:44 pm

Pune News : पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने डिफॉल्ट जामीन

पुणे – वानवडी परिसरात ऑक्टोबर महिन्यामध्ये रोहन प्रकाश अंगारके नामक व्यक्तीकडे पोलिस तपासा दरम्यान मेफेड्रॉन (एम डी) नामक अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आला होता. हा अमली पदार्थ आरोपी विकण्यासाठी जात असताना पोलिसांनी आरोपीस अटक केली व त्या सदर्भात वानवडी पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. आरोपीने ॲड अजित पवार व ॲड […] The post Pune News : पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने डिफॉल्ट जामीन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 19 Dec 2025 10:33 pm

IND vs SA : सॅमसनचा मोठा धमाका! टी-२० क्रिकेटमध्ये केला खास पराक्रम; विराट-रोहितच्या क्लबमध्ये मारली एन्ट्री

Sanju Samson double milestone in IND vs SA 5th T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात संजू सॅमसनने आपल्या नावावर खास पराक्रम केला आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या संजूने या सामन्यात केवळ ३७ धावांची खेळी केली, तरीही त्याने टी-२० क्रिकेटमधील दोन मोठे टप्पे पार करत दिग्गजांच्या यादीत प्रवेश केला आहे. […] The post IND vs SA : सॅमसनचा मोठा धमाका! टी-२० क्रिकेटमध्ये केला खास पराक्रम; विराट-रोहितच्या क्लबमध्ये मारली एन्ट्री appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 19 Dec 2025 10:18 pm

ठाकरेंच्या खासदाराचं अमित शाहांना पत्र, थेट एकनाथ शिंदेंना पदावरून हटवण्याची केली मागणी

मुंबई : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने १३ डिसेंबर रोजी छापा टाकून एका दुर्गम भागातील शेडमध्ये सुमारे ४५ किलो एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ जप्त केले. या ड्रग्जची बाजारकिंमत अंदाजे १४५ कोटी रुपये आहे. या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली असून, हे शेड “तेज यश” नावाच्या रिसॉर्टपासून अवघ्या १२०० मीटर अंतरावर […] The post ठाकरेंच्या खासदाराचं अमित शाहांना पत्र, थेट एकनाथ शिंदेंना पदावरून हटवण्याची केली मागणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 19 Dec 2025 10:17 pm

IND vs SA : संजूचा नादच खुळा! १००० धावांचा टप्पा पार करत अभिषेक-सूर्याच्या पंगतीत पटकावले स्थान

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या फलंदाजीने मैदानात वादळ निर्माण केले. मिळालेल्या संधीचे सोने करत संजूने केवळ धावांचा पाऊस पाडला नाही, तर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या १,००० धावांचा टप्पाही दिमाखात पूर्ण केला. विशेष म्हणजे, सर्वात जलद १,००० धावा करण्याच्या बाबतीत त्याने अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.सर्वात वेगवान १००० धावा: संजूने मोडले राहुल आणि तिलकाचे रेकॉर्डटी-२० कारकिर्दीत १००० धावा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या चेंडूंच्या संख्येनुसार, संजू सॅमसनने आता हार्दिक पांड्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. संजूने ही कामगिरी करण्यासाठी फक्त ६७९ चेंडू घेतले. यादरम्यान त्याने केएल राहुल आणि तिलक वर्मा यांसारख्या खेळाडूंना पिछाडीवर टाकले आहे.https://prahaar.in/2025/12/19/ahmedabad-t20-tilak-hardiks-stormy-innings-helps-india-post-232-runs-against-south-africa/भारताच्या सर्वात कमी चेंडूत १००० टी-२० धावा ५२८ – अभिषेक शर्मा ५७३ – सूर्यकुमार यादव ६७९ – हार्दिक पंड्या ६७९ – संजू सॅमसन ६८६ – केएल राहुल ६९० – तिलक वर्मासंथ सुरुवात पण ऐतिहासिक षटकार!या सामन्यापूर्वी संजूला १००० धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी फक्त ५ धावांची गरज होती. डावाची सुरुवात त्याने अत्यंत संयमाने केली आणि तिसऱ्या चेंडूवर खाते उघडले. मात्र, दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मार्को जॅन्सनला मारलेला खणखणीत षटकार ऐतिहासिक ठरला. याच षटकारासह त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या १००० धावा पूर्ण केल्या. भारतासाठी हा टप्पा गाठणारा तो १४ वा भारतीय फलंदाज आणि तिसरा यष्टीरक्षक-फलंदाज ठरला आहे.भारतीय संघात तीन मोठे बदलनाणेफेकीदरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादवने टीम इंडियामध्ये तीन महत्त्वाचे बदल केल्याचे जाहीर केले. शुभमन गिलच्या जागी संजू सॅमसनला सलामीची संधी देण्यात आली. गोलंदाजीमध्ये हर्षित राणाच्या जागी अनुभवी जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले. फिरकीपटू कुलदीप यादवच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदरला अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने हा सामना आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मालिका जिंकण्यापेक्षा, संघ म्हणून आम्हाला नक्की काय हवे आहे, हे अजमावण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे, असे सूर्यकुमारने यावेळी स्पष्ट केले.दोन्ही संघातील खेळाडूभारत : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन.

फीड फीडबर्नर 19 Dec 2025 10:10 pm

Election News : आपची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई – आम आदमी पक्षाने (आप) आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्व २२७ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा करताना २१ उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली. भारताचे प्रमुख शहर असतानाही मुंबईची अवस्था बिकट आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वार्षिक बजेट 75 हजार कोटी रुपये असूनही नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सेवा मिळत नाहीत. देशातील सर्वाधिक कर भरणाऱ्या मुंबईकरांना निकृष्ट सुविधा […] The post Election News : आपची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 19 Dec 2025 9:45 pm

सेवागिरी रथावर ८७ लाख ४० हजार रुपये अर्पण

पुसेगाव : श्रीसेवागिरी महाजांच्या रथोत्सवासाठी विविध भागातून आलेल्या भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने यावेळी रथावर ८७ लाख ४० हजार रुपयांच्या नोटा अर्पण केल्या. यावर्षी ७५ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. गुरुवार सकाळी दहा वाजता कृष्णा खारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते रथ पुजन झाले. यावेळी मठाधिपती […] The post सेवागिरी रथावर ८७ लाख ४० हजार रुपये अर्पण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 19 Dec 2025 9:38 pm

IND vs SA : संजू सॅमसनचा कडक स्ट्रेट ड्राइव्ह, पण चेंडू अंपायरला लागला अन् सामनाच थांबला, पाहा VIDEO

Sanju Samson hit Umpire during IND vs SA 5th T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना तिलक आणि हार्दिकच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेसमोर २३२ धावांचे भले मोठे लक्ष्य ठेवले आहे, दरम्यान या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली. नेमकं […] The post IND vs SA : संजू सॅमसनचा कडक स्ट्रेट ड्राइव्ह, पण चेंडू अंपायरला लागला अन् सामनाच थांबला, पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 19 Dec 2025 9:32 pm

अहमदाबाद टी-२०: तिलक-हार्दिकची तुफानी खेळी भारताचा दक्षिण आफ्रिकेसमोर धावांचा २३२ डोंगर

अहमदाबाद : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत २० षटकांत ५ बाद २३१ धावांची विशाल धावसंख्या उभारली आहे. या डावाचे मुख्य आकर्षण ठरला तो अष्टपैलू हार्दिक पांड्या. त्याने अवघ्या १६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे कोणत्याही भारतीय फलंदाजाकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावलेले दुसरे वेगवान अर्धशतक आहे. युवराज सिंगच्या (१२ चेंडू) नावावर अजूनही अव्वल स्थान आहे. हार्दिकने आपल्या ६३ धावांच्या खेळीत ५ चौकार आणि ५ उत्तुंग षटकार खेचले.मालिकेत आधीच दोन शतके झळकावलेल्या तिलक वर्माने आपला फॉर्म कायम राखत ४० चेंडूंत नाबाद ६८ धावांची संयमी पण आक्रमक खेळी केली. त्याने ३० चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. तिलक आणि हार्दिक यांच्यात चौथ्या विकेटसाठी नाबाद ९९ धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे भारताला २०० पार मजल मारता आली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा दक्षिण आफ्रिकेला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी २३१ धावांचे कठीण आव्हान पार करावे लागणार आहे.डावातील महत्त्वाचे टप्पे:संजू सॅमसनचे पुनरागमन: शुभमन गिलच्या जागी संघात आलेल्या संजू सॅमसनने पॉवरप्लेमध्ये फटकेबाजी करत ३७ धावा केल्या.अभिषेक शर्माची सलामी: अभिषेकने २१ चेंडूंत ३४ धावांची वेगवान सुरुवात करून दिली.सूर्याची अपयशी मालिका: कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला, तो अवघ्या ५ धावांवर बाद झाला.दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉशने २ बळी घेतले, तर जॉर्ज लिंडेने संजू सॅमसनचा महत्त्वाचा बळी टिपला.भारतीय संघ सध्या मालिकेत २-१ ने आघाडीवर असून, हा सामना जिंकल्यास भारत ही मालिका ३-१ ने खिशात घालेल.भारताच्या फलंदाजांची आक्रमकता:हार्दिक पांड्या : ६३ (२५ चेंडू) (५ चौकार, ५ षटकार)तिलक वर्मा : ६८ (४० चेंडू) (३ चौकार, ४ षटकार)संजू सॅमसन : ३७ (२२ चेंडू)अभिषेक शर्मा : ३४ (२१ चेंडू)शिवम दुबे नाबाद : ३ (१० चेंडू)जितेश शर्मा नाबाद : ०

फीड फीडबर्नर 19 Dec 2025 9:30 pm

SIR तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा, ३२०० कोटींचे प्रकल्प सुरू

मुंबई : सध्या पश्चिम बंगालमध्ये SIR मुद्द्यावरून तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राज्य दौरा होत असल्याने राजकीय व प्रशासकीय पातळीवर विशेष हालचालींना वेग आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी २० डिसेंबर रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी सुमारे ११.१५ वाजता ते नादिया जिल्ह्यातील राणाघाट येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.या दौऱ्यात पंतप्रधान सुमारे ३२०० कोटी रुपयांच्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये नादिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४ वरील ६६.७ किलोमीटर लांबीच्या बाराजागुली ते कृष्णनगर या मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश आहे.तसेच उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४ वरील १७.६ किलोमीटर लांबीच्या बारासात ते बाराजागुली या मार्गाच्या चौपदरीकरणाची पायाभरणीही पंतप्रधान मोदी करणार आहेत.हे दोन्ही प्रकल्प कोलकाता आणि सिलीगुडी यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहेत. या महामार्गांमुळे प्रवासाचा वेळ सुमारे दोन तासांनी कमी होण्याची शक्यता असून वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत होणार आहे. त्यामुळे वाहनांचा परिचालन खर्च कमी होण्यास मदत होईल तसेच कोलकाता, पश्चिम बंगालमधील इतर जिल्हे आणि शेजारील देशांशी संपर्क अधिक मजबूत होणार आहे.या प्रकल्पांमुळे परिसरातील आर्थिक विकासाला चालना मिळणार असून पर्यटन क्षेत्रालाही मोठी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

फीड फीडबर्नर 19 Dec 2025 9:10 pm

पंतप्रधान येत्या २० आणि २१ डिसेंबरला आसाम दौऱ्यावर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २० आणि २१ डिसेंबरला आसामला भेट देणार आहेत. दिनांक २० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता पंतप्रधान गुवाहाटी येथे पोहोचतील. तेथे ते लोकप्रिय गोपीनाथ बरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीची पाहणी आणि उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत.दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास पंतप्रधान गुवाहाटी येथील बोरागाव येथे असलेल्या शहीद स्मारक क्षेत्रापाशी जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहतील, त्यानंतर ते दिब्रुगडमधील नामरुप येथे पोहोचतील आणि तेथे आसाम व्हॅली खते आणि रसायने कंपनीच्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाचे भूमिपूजन करतील. या ठिकाणी देखील पंतप्रधान सभेला संबोधित करतील.दिनांक २० डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते लोकप्रिय गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन होईल. ही नवी इमारत म्हणजे आसाममधील जोडणी व्यवस्था, आर्थिक विस्तार आणि जागतिक सहभाग याबाबतीत एक परिवर्तनकारी टप्पा ठरेल.नुकत्याच बांधून पूर्ण झालेल्या आणि सुमारे १ .४ लाख चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेल्या या नव्या टर्मिनल इमारतीची रचना दर वर्षी १ .३ कोटी प्रवाशांची हाताळणी करू शकेल अशा पद्धतीने करण्यात आली असून या कामाला धावपट्ट्या, हवाई क्षेत्र विषयक प्रणाली, अॅप्रोन्स तसेच टॅक्सीवे यांच्या संदर्भातील महत्त्वाच्या अद्यायावतीकरणाचे पाठबळ लाभले आहे.निसर्ग संकल्पनेवर आधारित असलेल्या भारताच्या पहिल्या विमानतळ टर्मिनलचे डिझाईन आसामच्या जैवविविधता आणि सांस्कृतिक वारशातून प्रेरणा घेऊन, बांबू ऑर्किड्स या संकल्पनेपासून प्रेरित आहे. या टर्मिनलमध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या सुमारे १४० मेट्रिक टन ईशान्येकडील बांबूचा नाविन्यपूर्ण वापर करण्यात आला आहे. काझीरंगापासून प्रेरित हिरवीगार लँडस्केप, जापी नक्षीकाम, प्रतिष्ठित गेंड्याचे प्रतीक आणि कोपोऊ फुलांचे प्रतिबिंब दर्शवणारे ५७ ऑर्किड-प्रेरित स्तंभ या रचनेला वेगळेच सौंदर्य देतात. जवळपास एक लाख स्थानिक प्रजातींच्या वनस्पतींनी सजलेले एक अनन्यसाधारण आकाश वन आगमन करणाऱ्या प्रवाशांना वनाचा अनुभव देते.हे टर्मिनल प्रवाशांची सुविधा आणि डिजिटल नवोन्मेषाच्या बाबतीत नवीन मापदंड स्थापित करते. जलद सुरक्षा तपासणीसाठी फुल-बॉडी स्कॅनर, डिजीयात्रा-सक्षम संपर्कविरहित प्रवास, स्वयंचलित सामान हाताळणी, फास्ट-ट्रॅक इमिग्रेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विमानतळ संचालन यांसारखी वैशिष्ट्ये अखंड, सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवासाची खात्री देतात.२१ डिसेंबरच्या सकाळी नामरूपला जाण्यापूर्वी, पंतप्रधान ऐतिहासिक आसाम आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद स्मारक क्षेत्राला भेट देतील. सहा वर्षे चाललेले हे जनआंदोलन परकीयमुक्त आसाम आणि राज्याच्या अस्मितेच्या संरक्षणासाठीच्या सामूहिक संकल्पाचे प्रतीक होते.दिवसाच्या उत्तरार्धात, पंतप्रधान आसाममधील दिब्रुगड येथील नामरूप येथे, ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सध्याच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या नवीन ब्राउनफील्ड अमोनिया-युरिया खत प्रकल्पाचे भूमिपूजन करतील.पंतप्रधानांच्या शेतकरी कल्याणाच्या दृष्टिकोनाला पुढे नेत, १०,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त अंदाजित गुंतवणुकीचा हा प्रकल्प आसाम आणि शेजारील राज्यांच्या खतांची गरज पूर्ण करेल, आयातीवरील अवलंबित्व कमी करेल, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करेल आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देईल. हा प्रकल्प औद्योगिक पुनरुज्जीवन आणि शेतकरी कल्याणाचा आधारस्तंभ आहे.

फीड फीडबर्नर 19 Dec 2025 9:10 pm