BMC News : नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक नामंजूर, महापालिका सभागृहात तीव्र पडसाद
विरोधी पक्षांचा तीव्र शब्दांत केला निषेधमुंबई :महिलांना योग्य प्रमाणात सर्व विधी मंडळात, विधानसभा, लोकसभा या ठिकाणी प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी नारी शक्ती वंदन अधिनियम या विधेयकाला बहुमताने नामंजूर करण्यात आल्याने याचा निषेध करण्यात आले. काँग्रेस आणि उबाठासह इतर विरोधी पक्षांचा समाचार घेत भाजपने तीव्र निषेध करत महिलांच्या सक्षमीकरणा प्रवाह आम्ही रोखू शकत नाही. आम्ही महिलांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा सभागृहात देण्यात आला.मुंबई महापालिका सभागृहात सभागृहनेते गणेश खणकर यांनी संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम या विधेयकाला बहुमताने नामंजूर करण्यात आल्याने तसेच तसेच विधेयकाला विविध कारणे पुढे कयन विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा निषेधाचे निवेदन सभागृहात केले. यावर काँग्रसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी विधेयक का नामंजूर करण्यात आले याची कारण देत पक्षाने महिलांना प्राधान्य दिले.म्हणून काँग्रेसचे नेतृत्व आले होते,असे सांगण्याचा प्रयत्न केला. यावर भाजपच्या राजेश्री शिरवडकर यांनी देश महासत्तेच्या दिशेने जात असल्याने हा विरोध असल्याचे सांगितले. तर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी नारी वंदनीय आहे, नंदनीय करू नका असे सांगत हे आरक्षण आले तरी वरळीत आरक्षण झाले तर मलाच उमेदवारी मिळेल असाही विश्वास व्यक्त केला.राखी जाधव यांनी महिलेला संधी मिळाली तर ती नेतृत्व करते असे सांगितले, तर बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी उबाठाला कांग्रेसच्या मांडीवर बसल्याचा आरोप केला. तर प्रिती सातम यांनी हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे पुढील महिला शिक्षा भोगणार असल्याचे सांगत मुस्लिम महिलांची तलाकमधून सुटका देशाच्या पंतप्रधानांनी केली असे सांगत ज्या पक्षाला घराणेशाहीच्या गाद्या उबवायच्या आहेत, म्हणून त्यांनी विरेाध केल्याचे सांगितले. शीतल गंभीर यांनी २७ वर्षांपूर्वी जर काँग्रेसने यावर निर्णय घेतला असता तर आज ही चर्चा करावी लागली नसती,असे सांगितले.https://prahaar.in/2026/04/20/bmc-news-massive-enforcement-drive-in-the-bandra-to-santacruz-east-area-water-pipeline-encroachments-cleared-in-bandra/विशाखा राऊत यांनी उबाठाच्या महिला आघाडीचे स्वर्गीय सुषमा स्वराज यांनी कौतुक केल्याचे सांगितले. तर श्रध्दा जाधव यांनी महिला सक्षम असून हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे पंतप्रधानांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन महिलेला पंतप्रधान करावे अशी सूचना केली. तर तेजस्वी घोसाळकर यांनी विधेयक मंजूर न होणे हा काळा दिवस असल्याचे सांगितले. तर स्वप्ना म्हात्रे यांनी महिलेसारखी ताकद कुणाकडेच नसल्याचे सांगितले.यावर महापौर रितू तावडे यांनी आपण महापौर किंवा पिठासीन अधिकारी म्हणून बोलत नसून एक महिला म्हणून बोलत असल्याचे सांगत हा राजकीय नैतिक दिवाळखोरीचा हा ठसठसीत पुरावा असल्याचे सांगितले. हीच का विरोधी पक्षाची महिला सक्षमीकरणाची व्याख्या का असा सवाल करत रितू तावडे यांनी विरोधकांना याची किंमत मोजावीच लागेल असा इशाराही दिला. हे विधेयक मंजूर झाले नसले तरी महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रवाह रोखला जावू शकत नाही,असे सांगत त्यांनी तीव्र शब्दांत याचा निषेध केला.यावेळी चर्चत संध्या दोशी, विजय उबाळे,मेहेर हैदर,दिक्षा कारकर, विशाखा राऊत, तुलिफ मिरांडा, अंकित प्रभू, नवनाथ बन, मिनल तुर्डे, प्रकाश दरेकर,संगिता शर्मा, प्रमोद सावंत, राणी दि्वेदी, आशा मराठे, साईनाथ दुर्गे,हेतल गाला, सिध्दार्थ शर्मा, तेजिंदर तिवाना, विजेंद्र शिंदे, सचिन पडवळ आदींनी चर्चेत भाग घेतला होता.https://prahaar.in/2026/04/20/bmc-all-assistant-commissioners-must-prioritize-cleanliness-in-their-respective-zones-additional-commissioners-directive/
BMC News : मुंबई महापालिकेच्या १५३ वर्षांत सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण
महापालिका अधिनियमांमध्ये तरतूद नाही तरीही सत्ताधारी पक्षाने उचलले पाऊलमुंबई : मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे. महापालिकेचे सोमवारी पार पडलेले अर्थसंकल्पीय चर्चेचे यू ट्युब लाईव्ह करण्यात आले. अशाप्रकारे महापालिकेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने नगरसेवकांसह त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हे थेट प्रक्षेपण करताना महापालिकेच्या अधिनियमांचे उल्लंघन झाले असून अधिनियमांमध्ये स्पष्ट तरतूद नसतानाही या सभागृहाचे कामकाज लाईव्ह करण्यात आल्याने सर्व माजी नगरसेवकांसह निवृत्त सचिवांकडूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.https://prahaar.in/2026/04/20/bmc-all-assistant-commissioners-must-prioritize-cleanliness-in-their-respective-zones-additional-commissioners-directive/मुंबई महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर महापालिका सभागृहाचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी झाली होती. त्यानंतर महापौर आणि सभागृहनेत्यांनी सभागृहाचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सोमवारपासून महापालिकेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे.https://prahaar.in/2026/04/20/bmc-news-massive-enforcement-drive-in-the-bandra-to-santacruz-east-area-water-pipeline-encroachments-cleared-in-bandra/महापालिकेचे पहिले सभागृह ४ सप्टेंबर १८७३मध्ये भरले होते. त्यानंतर मागील १५ वर्षांपासून महापालिकेचे कामकाज लाईव्ह करण्यात यावे अशी मागणी सातत्याने नगरसेवकांकडून केले जात आहे. परंतु आजवर केवळ आणि केवळ अधिनियमांमध्ये तरतूद नसल्याची कारणे देत अशाप्रकारची सुविधा महापालिका सभागृहात देण्यास येत नव्हती.अशाप्रकारे सभागृहाचे कामकाज लाईव्ह करण्यासाठी धोरणात्मक निर्णय नसल्यामुळे मागील महिन्यात माजी महापौर व नगरसेविका श्रध्दा जाधव आणि नगरसेवक अंकित प्रभू यांनी सभागृहाचे कामकाज लाईव्ह करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वार केली. परंतु याबाबतचेही ठरावही सभागृहात मंजूर झालेले नाही. मात्र, महापालिकेच्या इतिहासात सभागृहाचे कामकाज लाईव्ह होताना ते नियमांचे उल्लंघन करून सुुरु करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. महापौर आणि सभागृह नेत्यांनी केवळ प्रायोगिक तत्वावर सभागृहाचे कामकाज लाईव्ह करताना अधिनियमातील तरतुदींचा विचार केलेला दिसून येत नाही. त्यामुळे जोवर अधिनियमांमध्ये तरतूद होत नाही तोवर प्रायोगिक तत्वावरही याचे थेट प्रक्षेपण करता येत नाही. तरीही हा प्रकार घडल्यामुळे प्रत्यक्षात नियमांचे उल्लंघन झाल्याची चर्चा सर्वच स्तरावर सुरु आहे.
Nitesh Rane : प्रशासकीय गतिमानतेत मंत्री नितेश राणेंच्या खात्याचा पहिला क्रमांक
मत्स्यव्यवसाय विभागाच्या उपक्रमांना राज्यस्तरीय ‘प्रगती’ पुरस्कार; ‘ड्रोन’ गस्त आणि कृत्रिम भित्तिका प्रकल्प ठरले अव्वलमुंबई : राज्याच्या सागरी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि कृत्रिम भित्तिकांच्या माध्यमातून मत्स्यसंपदेचे संवर्धन करणाऱ्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या दोन महत्त्वाकांक्षी उपक्रमांनी राज्य सरकारचा मानाचा ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान २०२५-२६’ पुरस्कार पटकावला आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभागांतून राबविण्यात आलेल्या ‘ड्रोन आधारित देखरेख’ यंत्रणेला प्रथम, तर क्षेत्रीय कार्यालयांच्या श्रेणीत ‘शाश्वत मत्स्यव्यवसाय विकास’ उपक्रमाला अव्वल स्थान मिळाले आहे.https://prahaar.in/2026/04/21/nitesh-rane-joint-coastal-management-makes-its-mark-in-the-state-through-the-pragati-campaign-minister-nitesh-rane-praises-the-initiative/राज्यातील किनारपट्टीवर होणारी अवैध मासेमारी आणि घुसखोरी रोखण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने जानेवारी २०२५ पासून ड्रोन गस्त सुरू करण्यात आली होती. या प्रणालीमुळे अरबी समुद्रातील हालचालींवर नियंत्रण मिळवणे सुलभ झाले आहे. विशेषतः एलईडी दिव्यांचा वापर करून केली जाणारी बेकायदेशीर पर्ससीन मासेमारी आणि परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी रोखण्यात या तंत्रज्ञानाने मोठी भूमिका बजावली आहे. या यशामुळे मत्स्यव्यवसाय विभागाची प्रशासकीय गतिमानता सिद्ध झाली असून, त्याला राज्यस्तरीय प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे.https://prahaar.in/2026/04/21/nitesh-rane-a-major-leap-in-marine-fisheries-management-under-the-pragati-initiative-minister-nitesh-rane-lauded-with-a-%e2%82%b910-lakh-award/‘शाश्वत मत्स्यव्यवसाय विकास व मत्स्यसंपदेचे संरक्षण’ या उपक्रमांतर्गत अरबी समुद्र किनारपट्टीवरील १८२ गावांमध्ये कृत्रिम भित्तिका उभारण्यात आल्या आहेत. या भित्तिकांमुळे माशांसाठी सुरक्षित प्रजनन अधिवास निर्माण झाला असून, ५० मीटरचे संरक्षण क्षेत्र विकसित झाले आहे. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम मत्स्योत्पादनावर झाला असून, उत्पादनात तब्बल २९ हजार किलोची वाढ नोंदवली गेली आहे.पारंपरिक मच्छीमारांच्या आर्थिक उत्पन्नात वाढया कृत्रिम भित्तिकांच्या देखभालीसाठी स्थानिक मच्छीमार सहकारी संस्थांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय, समुद्रातील प्लास्टिक कचरा आणि ‘घोस्ट नेट’ संकलनावरही भर देण्यात आला आहे. यामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली असून सागरी पर्यावरणाचे रक्षण झाले आहे.मत्स्यव्यवसाय विभागाने ड्रोन तंत्रज्ञान आणि डिजिटल डेटा मेंटनन्समध्ये केलेले काम कौतुकास्पद आहे. या यशामुळे मच्छीमार बांधवांची आर्थिक उन्नती आणि सागरी सुरक्षेला बळ मिळाले आहे. या यशाचे श्रेय विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि मच्छीमार बांधवांचे आहे. - नितेश राणे, मंत्री, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर चालणाऱ्या या मोहिमेद्वारे जनजागृती आणि सामाजिक सहभाग वाढवण्याचा उद्देश – मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटमसरकार, स्वयंसेवी संस्था, शाळा आणि नागरिक मिळून अंमली पदार्थांविरुद्ध लढा उभारणार – आमदार अमीत साटमवाढत्या अतिसेवनाच्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर मुंबईत व्यापक अंमली पदार्थविरोधी चळवळ – आमदार अमीत साटममुंबई: अंमली पदार्थांच्या व्यसनाविरुद्ध जनआंदोलन उभे करण्याच्या उद्देशाने “Mumbai Against Drugs” ही विशेष मोहीम १ मे २०२६ पासून मुंबईत एक वर्षासाठी राबविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी दिली.मुंबई उपनगर सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम उपस्थित होते. या मोहिमेचे नियोजन व आराखडा ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, क्रीडा अधिकारी, महानगरपालिका अधिकारी तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.‘Mumbai Against Drugs’ ही मोहीम १ मे २०२६ पासून सुरू करण्यात येईल. ही मोहीम सलग १२ महिने (३६५ दिवस) चालणार आहे, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.https://prahaar.in/2026/04/14/%e2%82%b930-crore-drugs-racket-busted-in-mumbai-md-factory-operating-in-a-room-rented-for-just-%e2%82%b913000/अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे होत असलेल्या अलीकडील मृत्यू ही गंभीर इशारा देणारी बाब आहे की, केवळ पोलीस कारवाईने हा प्रश्न सुटणार नाही. या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून व्यापक अंमली पदार्थविरोधी जनआंदोलन उभारण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे आपण प्रभावीपणे अंमली पदार्थांच्या विरोधात लढा उभारू शकतो, असे आमदार साटम यांनी पुढे सांगितले.https://prahaar.in/2026/04/14/goregaons-nesco-drugs-party-mastermind-of-the-nesco-drugs-party-in-goregaon-finally-in-police-custody/या मोहिमेत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था (NGOs), धार्मिक संस्था व प्रमुख उपासना स्थळे, रहिवासी संघटना (RWAs), विविध क्षेत्रातील मान्यवर (सेलिब्रिटी), पालक-शिक्षक संघटना (PTAs), विविध कॉर्पोरेट संस्था तसेच सर्व शासकीय कार्यालयांचा सहभाग राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.या मोहिमेचा मुख्य उद्देश विशेषतः तरुणांमध्ये अंमली पदार्थांविषयी जागृती निर्माण करणे हा आहे. महाविद्यालये, शाळा, शैक्षणिक संस्था आणि जिथे तरुणांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात येतील. जनजागृती, समुदाय सहभाग आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यावर भर देत अंमली पदार्थांच्या विरोधात प्रभावी लढा उभारण्यात येईल, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.
Sunetra Pawar : आज सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ बारामतीत सांगता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला शरद पवार उपस्थित राहणार का याविषयी सगळ्यानांच उत्सुकता आहे.
Gut Health: तुमचं पोट खरंच हेल्दी आहे का? हे टेस्ट सांगतील आतड्यांची खरी स्थिती
Gut Health आपल्या आतड्यांमध्ये लाखो-कोट्यवधी “गुड” आणि “बॅड” बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया अन्न पचवण्यास, शरीराला आवश्यक पोषक घटक शोषून घेण्यास, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे गट हेल्थ व्यवस्थित असेल तर शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.
Aneet Padda: आजोबांच्या आठवणींनी भावूक झाली अनीत पड्डा; पोस्ट वाचून चाहत्यांचे डोळे पाणावले
Aneet Padda पोस्टच्या शेवटी तिने अतिशय भावूक शब्द लिहिले, “आज मी आकाशात सर्वात तेजस्वी तारा पाहिला आणि मला समजलं की तुम्ही तिथे आहात. आजोबा, मी तुम्हाला कायम प्रेम करत राहीन.” या ओळींनी अनेक चाहत्यांना भावूक केले आहे.
TOP 10 News : राज्य, देश, विदेश, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोड... !
मुंबई : महाराष्ट्र अनेक पावसाच्या सारी कोसळत आहेत, कुठे गारपीठ तर कुठे सोसाट्याचा वारा आणि वीज, शिवाय भारतीय हवामान विभागाने आणि महाराष्ट्र हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार २० ते २४ एप्रिल या याकाळात मुंबईसह इतर शहरात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी मेघगर्जना आणि वीजा पडण्याच्या शक्यता वर्तवण्यात आली आहे.या शहरात पावसाची हजेरीहवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईला मंत्रालयाकडूनही सतर्कतेचा इशारा हा देण्यात आला आहे. पुढील ३ तासांत मुंबईसह, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे या शहरात पावसाची शक्यता आहे.बदलापूरमध्ये पावसाची हजेरीआज सकाळच्या सुमारास बदलापूरमध्ये पावसाने हजेरी लावली. अचानक आलेय पावसाने चाकरमान्यांची धांदल उडाली. दोन दिवसापासून बदलापूर आणि ग्रामीण भागात पारा ४० अंशापर्यंत गेला आणि आज पावसाने हजेरी लावली.नागरिकांची तारांबळवातावरणात होणाऱ्या हा बदलामुळे कडक उन्हाळ्यात नागरिकांना काही काळ थंडावा मिळणार असून ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या या पावसामुळे नागरिकांनी तारांबळ उडणार आहे हे निश्चित त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेत सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पुढील ४ दिवस या भागात जोरदार पावसाची शक्यताभारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार २० ते २४ एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि कोकण विभागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.प्रशासनाच्या उपाययोजनाग्रामपंचायत, पोलीस आणि आरोग्य विभागांनी तातडीने जनजागृती करावीरुग्णवाहिका, अग्निशमन दल, आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवावीतशाळा, सभागृह व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवाव्यातहवामान खात्याचे अद्ययावत इशारे गावतळीपर्यंत त्वरित पोहोचवावे
Weather update : पुन्हा अवकाळीचे संकट! पुढील चार दिवस महत्वाचे; या जिल्ह्यांना अलर्ट जारी
Weather update : पुढील पाच दिवस हवामान विभागाने विविध जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून, गारपीटसह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
Bollywood Movies : ‘आखरी सवाल’चा पोस्टर रिलीज: संजय दत्त यांचा इंटेन्स अवतार ठरतोय चर्चेचा विषय
मुंबई : निर्माते निखिल नंदा आणि संजय दत्त यांच्या निखिल नंदा मोशन पिक्चर्स बॅनरखाली बनलेला ‘आखरी सवाल’ हा चित्रपट दमदार स्टारकास्टसह सज्ज आहे. यात संजय दत्त, अमित साध, नमाशी चक्रवर्ती, समिरा रेड्डी, त्रिधा चौधरी आणि नीतू चंद्रा यांची प्रमुख भूमिका आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वरांग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.संजय दत्त मुख्य भूमिकेत असलेला ‘आखरी सवाल’ हा 2026 मधील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक म्हणून समोर येत आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतरपासूनच याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरने या उत्साहात आणखी भर घातली आहे. टीझरमधून मिळालेली झलक ही प्रभावी आणि विचार करायला लावणारी असून, हा चित्रपट खऱ्या घटनांवर आधारित असल्याचे संकेत मिळतात. तो काही अत्यंत चर्चित आणि वादग्रस्त विषयांना स्पर्श करतो.https://prahaar.in/2026/04/19/sachin-pilgaonkar-and-madhurani-gokhale-reunite-after-22-years-in-the-film-kapuskonda/आता चित्रपटाच्या बहुप्रतीक्षित रिलीजपूर्वी निर्मात्यांनी एक प्रभावी नवीन पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये संजय दत्त पुढच्या बाजूला बसलेले दिसतात, त्यांच्या मागे लोकांनी भरलेली एक खोली आहे, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अधिकार आणि रहस्य जाणवते. विशेष म्हणजे त्यांच्या समोर “RSS – An Antinational Organisation” नावाचे पुस्तक दिसते, जे चित्रपटाच्या धाडसी कथानकाचा आणि त्यांच्या गुंतागुंतीच्या, प्रभावी भूमिकेचा संकेत देते. हे दृश्य चित्रपटाच्या गंभीर आणि थरारक वातावरणाची झलक देत असून, विविध स्तरांवर उलगडणारी आणि वादग्रस्त विषयांवर भाष्य करणारी कथा दर्शवते.पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले,https://www.instagram.com/p/DXV6839jBWW/?igsh=MWE1dGw3Y3R2ZmszbQ==नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून असेही सूचित होते की चित्रपट भारताच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटनांवर आधारित असेल, जसे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घातलेला बंदी आदेश, बाबरी मशीद पाडण्याची घटना आणि महात्मा गांधी यांच्या हत्येचा प्रसंग. हा चित्रपट जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनांपैकी एकाच्या प्रवासावर प्रकाश टाकत, त्याचा एक वेगळा दृष्टिकोन सादर करतो. विचार करायला लावणारे प्रश्न उपस्थित करत, हा चित्रपट प्रेक्षकांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सत्याच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करतो.https://prahaar.in/2026/04/19/ranveer-and-deepika-ranveer-and-deepika-to-become-parents-for-the-second-time-check-out-the-photo-sharing-the-good-news/‘आखरी सवाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वरांग यांनी केले आहे. निखिल नंदा प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती निखिल नंदा आणि संजय दत्त यांनी केली असून, सहनिर्माते म्हणून पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंग, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद यांचा सहभाग आहे. उत्कर्ष नैठाणी यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. हा चित्रपट 8 मे 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Vijay Deverakonda And Shouryuv हा चित्रपट ‘हाय नन्ना’ फेम दिग्दर्शक शौर्युव यांचा दुसरा चित्रपट आहे. त्यामुळे त्यांच्या या नव्या प्रोजेक्टकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. मुहूर्ताच्या वेळी नानी आणि विजय देवरकोंडा एकमेकांना भेटले आणि त्यांनी एकमेकांना मिठी मारत आनंद व्यक्त केला. हा क्षण चाहत्यांसाठी खास ठरला.
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील राज्यस्तरीय निकाल जाहीर.मुंबई : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२५-२६ अंतर्गत राज्यातील विविध विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना राज्य शासनाने गौरविले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयाद्वारे राज्यस्तरीय पारितोषिक विजेत्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यस्तरावर थेट प्राप्त प्रस्तावांमध्ये संयुक्त सागरी मत्स्यव्यवस्थापन या शाश्वत मत्स्यव्यवसाय प्रकल्पाला १० लाखांचे पारितोषिक मिळाले. याबद्दल राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे कौतुक होत आहे.या स्पर्धेत मंत्रालयीन विभागापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत विविध स्तरांवरून आलेल्या प्रस्तावांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट उपक्रमांची निवड करण्यात आली. ड्रोन आधारित देखरेख व डिजिटल डेटा मेंटेनन्स प्रणाली या उपक्रमाला प्रथम क्रमांक मिळत सुमारे १० लाखापर्यंत पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. तर कार्यालयीन कामकाजातील सुधारणा उपक्रमालाही उच्च स्थान मिळाले आहे.https://prahaar.in/2026/04/21/nitesh-rane-joint-coastal-management-makes-its-mark-in-the-state-through-the-pragati-campaign-minister-nitesh-rane-praises-the-initiative/राज्यस्तरावर थेट प्राप्त प्रस्तावांमध्ये संयुक्त सागरी मत्स्यव्यवस्थापन या शाश्वत मत्स्यव्यवसाय प्रकल्पाला १० लाखांचे पारितोषिक मिळाले. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या तंत्रज्ञानाधारित संवाद उपक्रमालाही सन्मानित करण्यात आले.
Bachu Kadu : शेतकरी नेते आणि प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांना शिवसेना शिंदे गटाकडून विधानपरिषदेची अॅाफर मिळाल्याची चर्चा आहे.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स आणि त्यांची टीम 17 तासांच्या उड्डाणानंतर आणि सुमारे 11,500 किलोमीटरच्या प्रवासानंतर इस्लामाबादला पोहोचत आहेत. मात्र, इराण शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीत भाग घेण्यास नकार देत आहे. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदी केली आहे आणि इराणी जहाज तुस्काला जप्त केले आहे, त्यामुळे इराण संतप्त झाला आहे. इराण खरंच पाकिस्तानात चर्चेसाठी जाणार नाही का, अमेरिका-इराण करार कुठे अडकला आहे आणि या युद्धात पुढे काय होईल? आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया... प्रश्न-1 : पाकिस्तानात दुसऱ्या टप्प्यातील शांतता चर्चेसाठी कोण कोण पोहोचत आहे?उत्तर : अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर सोमवारी संध्याकाळी शांतता चर्चेसाठी इस्लामाबादला पोहोचणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी सांगितले होते की, उपाध्यक्ष जे.डी. व्हेन्स सुरक्षा चिंतेमुळे पाकिस्तानला जाणार नाहीत. मात्र, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी नंतर पुष्टी केली की व्हेन्स यात सहभागी होतील. अल जझीराने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, वाटाघाटींबाबतच्या अनिश्चिततेमुळे विटकॉफ आणि कुशनर आधी इस्लामाबादला पोहोचतील. जर वाटाघाटी पुढे सरकल्या, तर व्हेन्स देखील नंतर पाकिस्तानला जातील. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यापूर्वी सांगितले होते की, जर कोणताही करार निश्चित झाला, तर ते स्वतः पाकिस्तानला जातील, परंतु त्यांच्या आगमनाची अद्याप पुष्टी झालेली नाही. अमेरिकन शिष्टमंडळाच्या आगमनापूर्वी इस्लामाबादला पोहोचण्याची अपेक्षा असलेले एक अग्रीम पथक रविवारी दोन C-17 मालवाहू विमानांनी इस्लामाबादला पोहोचले होते, ज्यात अमेरिकन शिष्टमंडळाचे सुरक्षा उपकरणे आणि ताफ्याची वाहने होती. दुसरीकडे, इराणने अद्याप इस्लामाबाद भेटीची पुष्टी केलेली नाही. सरकारी माध्यम IRNA नुसार, इराणने वाटाघाटींमध्ये भाग घेण्यास नकार दिला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बागाई यांनी सांगितले की, शांतता चर्चेत जायचे की नाही याबद्दल आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. वाटाघाटींमध्ये जाण्याची आमची कोणतीही योजना नाही. प्रश्न-2 : खरंच इराण चर्चेत सहभागी होणार नाही का?उत्तर : 15 एप्रिल रोजी, पाकिस्तानी फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी तेहरानला भेट दिली होती. त्यांच्या तीन दिवसांच्या भेटीदरम्यान, त्यांनी इराणच्या सर्वोच्च नेतृत्वासोबत भेट घेतली होती. पहिल्या फेरीची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्याशी 45 मिनिटे चर्चा केली होती. असे मानले जात होते की इराण अमेरिकेसोबतच्या कराराबाबत सकारात्मक होता. मात्र, इराणचे सरकारी माध्यम IRNA आता म्हणते की इराणी शिष्टमंडळ चर्चेसाठी इस्लामाबादला जाणार नाही. वाटाघाटींच्या आसपासच्या संकटात, ट्रम्प आणि असीम मुनीर यांनी फोनवर बोलणे केले. पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांनुसार, असीम मुनीर यांनी ट्रम्प यांना सांगितले होते की, जर होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नाकेबंदी सुरू राहिली, तर इराणसोबतच्या वाटाघाटी पुढे सरकणार नाहीत. ट्रम्प यांनी उत्तर दिले की ते यावर विचार करतील. सध्या पाकिस्तानात वाटाघाटींसाठी इस्लामाबादमधील दोन 5-स्टार हॉटेल्स रिकामी करण्यात आली आहेत. त्यांच्याकडे जाणारे रस्ते सील करण्यात आले आहेत. सरकारी कार्यालये आणि दूतावासांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इराणची राजधानी तेहरानहून अडीच तासांत इस्लामाबादला पोहोचता येते. त्यामुळे, अमेरिकेच्या शिष्टमंडळाच्या आगमनानंतरही इराणची भूमिका बदलू शकते. अल जझीराने सूत्रांच्या हवाल्याने असेही वृत्त दिले आहे की, इराणी शिष्टमंडळ मंगळवारी सकाळपर्यंत इस्लामाबादला पोहोचेल. यामध्ये स्पीकर मोहम्मद बाघर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तेहरानमधील आंतरराष्ट्रीय संबंधांचे तज्ज्ञ सय्यद मोजतबा जलालझादेह यांच्या मते, इराण देशांतर्गत कठोर भूमिका घेत आहे. परंतु, चर्चेसाठी आपले पथक पाठवून ते हे देखील दाखवून देईल की इराण राजनैतिक कारवाईपासून मागे हटले नाही. प्रश्न-3 : अमेरिका-इराणच्या करारात अडचण कुठे आहे?उत्तर : अमेरिका आणि इराण यांच्यातील करारात 3 मुद्द्यांवर अडचण आहे... अमेरिकेला इराणचा अणुकार्यक्रम 20 वर्षांसाठी बंद करायचा आहे इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अमेरिकेला हटवायचे आहे इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले थांबवावेत प्रश्न-4 : चर्चेपूर्वी इराणी जहाजावर हल्ला करून अमेरिकेने चूक केली का? उत्तर : रविवारी रात्री सुमारे 2:30 वाजता यूएस सेंट्रल कमांड (CENTCOM) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले की यूएस नेव्हीने ओमानच्या आखातात इराणी ध्वज असलेल्या मालवाहू जहाजाला ताब्यात घेतले आहे... या घटनेनंतर ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले की, इराणी जहाज टूस्का पूर्ण नियंत्रणात आहे आणि त्यातील मालाची तपासणी केली जात आहे. ट्रम्प यांनी असेही म्हटले की, यूएस ट्रेझरी डिपार्टमेंटने त्याच्या बेकायदेशीर कारवायांमुळे टूस्कावर आधीच अनेक निर्बंध लादले आहेत. दरम्यान, इराणच्या हजरत खातम अल-अंबिया लष्करी मुख्यालयाने एक निवेदन जारी करून म्हटले की, अमेरिकेने युद्धविरामाचे उल्लंघन केले आहे. ही चाचेगिरी आहे आणि इराण लवकरच प्रत्युत्तर देईल. किंग्स कॉलेज लंडनचे प्राध्यापक अँड्रेस क्रिग सांगतात की, शांतता चर्चेपूर्वी इराणी जहाजावर हल्ला करून अमेरिकेने IRGC ला असा दावा करण्याची संधी दिली आहे की, अमेरिकेवर विश्वास ठेवता येत नाही. मिडल ईस्ट इन्स्टिट्यूटमधील इराणी कार्यक्रमाचे संचालक ॲलेक्स वाटांका म्हणतात की, जहाजावरील गोळीबारामुळे इराणमधील त्या संघटनेला प्रोत्साहन मिळाले आहे, जी इराणने 90% पर्यंत युरेनियम समृद्ध करावे आणि अणुबॉम्ब बनवण्याच्या दिशेने पुढे जावे अशी इच्छा बाळगते. प्रश्न-5 : 22 एप्रिलला युद्धविराम संपेल, त्यानंतर युद्धात काय परिस्थिती निर्माण होत आहे?उत्तर : इराण आणि अमेरिका यांच्यातील दोन आठवड्यांचा तात्पुरता युद्धविराम 22 एप्रिल रोजी संपेल. अमेरिकेने इराणी जहाज जप्त केल्याने आणि शांतता चर्चेत भाग घेण्यास नकार दिल्याने पुढील परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. आता तीन युद्धाचे 3 सिनेरिओ उदयास येत असल्याचे दिसते... सिनेरिओ-1 : युद्धविराम कायम राहील सिनेरिओ-2 : मर्यादित लष्करी कारवाई सिनेरिओ-3 : पूर्ण युद्धाची पुनरावृत्ती
रात्री 8 वाजताची वेळ. गावातील एक घर रंगीबेरंगी बल्ब आणि हॅलोजन दिव्यांनी उजळून निघाले आहे. ढोल वाजत आहेत. अंगणात महिला एका रांगेत जमिनीवर बसल्या आहेत. सर्वांसमोर पानांपासून बनवलेले द्रोण ठेवले आहेत. येथे कोणताही पुरुष नाही. डोक्यावर माठ घेऊन एक महिला येते. या माठात दारू आहे. ज्याला ‘लंदा’ आणि ‘इड्डिकुल’ म्हणतात. लंदा शिळ्या भातापासून आणि इड्डिकुल महुव्यापासून बनवली जाते. महिला डोक्यावरून माठ खाली ठेवते आणि द्रोणात सर्व महिलांना दारू वाढते. दुसरी महिला सर्वांच्या द्रोणात भाजलेली सोयाबीन वाढते. गाणी गात येथे वृद्ध-तरुण, सर्व वयोगटातील महिला दारू पीत आहेत. येथे महिला पाहुण्या आहेत आणि यजमानही. दिव्य मराठीच्या ‘आम्ही लोक’ या मालिकेत मी मनीषा भल्ला यावेळी कोया समुदायाची कथा घेऊन आले आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये त्यांची एकूण लोकसंख्या 9 लाख आहे. यापैकी दीड लाख ओडिशाच्या मलकानगिरीमध्ये स्थायिक झाले आहेत… वर मी ज्या मेजवानीचा उल्लेख केला आहे, ती एका लग्नाची आहे. चमकदार पिवळी साडी, ओठांवर हलकी गुलाबी लिपस्टिक, गळ्यात चांदीच्या नाण्यांची माळ घातलेल्या वधूची पाऊले हळूहळू पुढे पडत आहेत. दुसरीकडे, पांढऱ्या पोशाखातील वर तिची वाट पाहत आहे. तेव्हा पुरोहित पुढे येऊन दोघांना जवळजवळ उभे करतो. वराच्या मनगटावर गवताची एक गाठ बांधतो. मंत्र म्हणतो, मग वधूचा हात वराच्या हातात देतो. तेव्हा तिथे उपस्थित महिला वधूच्या स्वागतासाठी कोया गाणी गाऊ लागतात. हे लग्न ओडिशातील नक्षलग्रस्त जिल्हा मलकानगिरीपासून सुमारे 35 किलोमीटर दूर असलेल्या राखेलगुडा गावात होत आहे. येथील आदिवासी नेते अडमा राखा यांचा मुलगा निरंजन आणि नवीन सून बासंती यांच्या लग्नाचा उत्सव साजरा केला जात आहे. लग्न होताच महिला पुन्हा दारू पिऊ लागतात. थोड्या वेळाने त्या एकमेकींच्या कमरेत हात घालून नाचायला सुरुवात करतात. सुमारे 15 मिनिटांनंतर त्या थकून बसतात. यानंतर, पुरोहित नवरदेव-नवरीला बेडरूममध्ये सोडून येतात आणि बाहेरून दरवाजाला कडी लावतात. बाहेर बसलेल्या महिला पुन्हा गाणी गाऊ लागतात. आत्याच्या मुलीशी लग्न न केल्यास शिक्षा मिळते याच दरम्यान, अडमा राखा येतात, ज्यांच्या मुलाचे लग्न आहे. मी त्यांना म्हणालो- ‘वधू खूप सुंदर आहे.’ ते म्हणू लागले की माझी सून बासंती तर घरचीच मुलगी आहे. जवळजवळ संपूर्ण बालपण आमच्यासमोर गेले आहे. मी आश्चर्यचकित होऊन विचारले- ‘घरची मुलगी म्हणजे काय?’ ते म्हणाले- ‘माझ्या मुलगा निरंजनचे लग्न, माझ्या बहिणीच्या मुलीशी म्हणजे त्याच्या सख्ख्या आत्याच्या मुलीशी झाले आहे. हीच आमची प्रथा आहे.’ सख्ख्या आत्याची मुलगी नसेल तर? ‘तर वडिलांच्या दूरच्या बहिणीच्या मुलीशीही लग्न होते.’ मी विचारले- ‘काही खास कारण?’ अडमा सांगतात- ‘ती घरची मुलगी आहे. तिला आमच्या कुटुंबाच्या चालीरीतींची समज आहे. ती आम्हाला कधीही नुकसान पोहोचवणार नाही, म्हणूनच ही परंपरा चालत आली आहे.’ ‘जर कोणी असे केले नाही तर मग काय करतात?’ ‘समाजातून बहिष्कृत केले जाते. जिवंत असतानाही पिंडदान करतात. कोया लोकांमध्ये बाहेरील समुदायात विवाह कोणत्याही परिस्थितीत स्वीकार्य नाही.’ आता अडमा मला इरमा पवासी नावाच्या महिलेशी भेट घालून देतात. त्या सांगतात की, ‘आमच्या लोकांमध्ये जेव्हाही लग्न किंवा कोणत्याही विधीमध्ये मोठी मेजवानी असते, तेव्हा जेवणाची जबाबदारी संपूर्ण गावाची असते. गावातील लोक लग्न असलेल्या घरी महुआची दारू, कोंबडी, बकरी आणि मासे पोहोचवतात. जसे आज तुम्ही ज्या लग्नात आला आहात, त्यासाठीही महिला अनेक दिवसांपासून जंगलातून महुआ गोळा करून दारू बनवण्यात गुंतल्या होत्या.’ इरमा मला आणि माझ्या साथीदार मुन्नाला जेवण करण्यासाठी सांगतात. पत्रावळीत माशाचे डोके, मटण, चिकन, भात, रायता आणि पनीर वाढले जाते. काही वेळाने गावातील सर्व लोक जेवण करून आपल्या घरी परत येऊ लागतात, पण महिलांची मैफिल तशीच चालू राहते. कच्चे घर, पण स्वच्छता अशी की प्रत्येक कोपरा चमकतो दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा माझा साथीदार मुन्नासोबत गावाकडे निघाले. येथे प्रत्येक घर मातीचे बनलेले आहे, पण ते व्यवस्थित सजवले आहेत. पुढे बांबूचे कुंपण आणि लहान गेट्स आहेत. घरांची छप्परं ताडाच्या पानांनी झाकलेली आहेत. हवेत महुव्याचा सुगंध मिसळलेला आहे. जवळपास प्रत्येक घरासमोर महुआ वाळत आहे. मुन्ना सांगतो की- ‘आमच्याकडे महुव्याच्या दारूशिवाय कोणताही विधी पूर्ण होत नाही.’ मुन्ना मला सर्वात आधी त्याच्या घरी घेऊन गेला. बाहेर कडक ऊन होते, पण घरात थंडी जाणवत होती. स्वच्छताही अशी होती की जमिनीवर पडलेली वस्तू न संकोचता उचलून खाता येईल. आंगणाच्या एका कोपऱ्यात, उघड्यावर जेवण बनत होते. हीच त्यांची स्वयंपाकघर आहे. स्वयंपाकघरात भांडीही तेवढीच आहेत, जेवढी जेवण बनवण्यासाठी आवश्यक आहेत. आतमध्ये फक्त एकच खोली आहे. समोर ठेवलेल्या खुर्चीवर मला बसायला सांगितले. खाटेवर धान्य ठेवले आहे. जेवण शिजण्याचा सुगंध येत आहे. मुन्ना सांगतो की, ‘आमच्या घरांमध्ये एकच खोली असते. इथेच खातो, इथेच झोपतो. आज जेवणात भात, डाळ आणि माशांच्या अंड्यांची भुर्जी बनत आहे.’ काही वेळ इथे थांबल्यानंतर आम्ही अडमा राखाच्या घराकडे निघालो. इथे अडमा राखा आमची वाट पाहत होते. मी त्यांच्याकडे प्रत्येक घराबाहेर सुकत असलेल्या महुव्याचा उल्लेख केला. ते म्हणाले - ‘नाते घेऊन जायचे असो, लग्नाचा प्रसंग असो किंवा कोणाचा मृत्यू, प्रत्येक विधीमध्ये आमच्याकडे दारू आवश्यक आहे. याच कारणामुळे महुआ मोठ्या प्रमाणात वापरला जातो. जेव्हा मुलाकडचे लोक मुलीच्या घरी स्थळ घेऊन जातात, तेव्हा दारू म्हणजे लंदा आणि इड्डिकुल नक्की घेऊन जातात. याशिवाय बोलणी पुढे सरकत नाही. समजा, स्थळ निश्चित करण्यासाठी मुलाकडच्या लोकांना मुलीच्या घरी पाच वेळा जावे लागले, तर प्रत्येक वेळी दारूचे प्रमाण वाढवले जाते. पहिल्यांदा एक बाटली, दुसऱ्यांदा दोन, तिसऱ्यांदा तीन. लग्न निश्चित झाल्यावर मुलाकडचे लोक आपल्या ऐपतीनुसार मुलीच्या कुटुंबाला रोख रक्कम, तांदूळ आणि दारू भेट देतात.’ दुसरी कोणतीही दारू प्यायल्यास 10 हजार रुपयांचा दंड अडमा सांगतात- ‘आमच्या लोकांमध्ये जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दारूला महत्त्व आहे. बाळाचा जन्म झाल्यावर सर्वात आधी दारू चाखायला दिली जाते. मृत्यूच्या वेळीही तोंडात दारू टाकली जाते. तरीही, आमचे काही नियम खूप कडक आहेत. समुदायाबाहेर लग्न केल्यास आणि पारंपरिक दारू सोडून दुसरी दारू प्यायल्यास 10 हजार रुपये दंड भरावा लागतो. महिलांच्या दारू पिण्याबद्दल विचारले असता, ते हसू लागले. ते म्हणाले- ‘ही आमची परंपरा आहे. आमच्या समाजात स्त्रिया आणि पुरुष समान आहेत, सर्वांचा आनंद सारखाच आहे.’ दिवसानुसार मुलांचे नाव ठेवले जाते अडमाच्या घरात उपस्थित गौरी कवासी सांगतात- ‘येथे मुलांच्या नामकरणाची पद्धतही अनोखी आहे. येथे नावे, दिवसाच्या आधारावर ठेवली जातात- जसे, शुक्रवारी जन्मलेल्या मुलाला ‘शुक्री’ आणि गुरुवारी जन्मलेल्याला ‘गुरु’ म्हटले जाते.’ वादावर पोलीस ठाण्यात जात नाहीत, स्वतःच निर्णय घेतात मुन्ना सांगतात- कोया लोक, आपले घरगुती आणि सार्वजनिक वाद कधीही पोलीस ठाण्यात घेऊन जात नाहीत. समाजाच्या बाबतीत कोणत्याही बाहेरील व्यक्तीला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. ते तारखांच्या व्यवस्थेला मानत नाहीत. निर्णय घेण्यासाठी आमच्याच समाजातील एका वृद्ध व्यक्तीची निवड केली जाते, ज्यावर कधीही कोणताही आरोप लागलेला नसावा. यांना आम्ही पेद्दा म्हणतो. पेद्दाच दंडाचा निर्णय घेतात. या मालिकेत पुढील आठवड्यात वाचा अशाच अनोख्या गालो लोकांची कहाणी….
भारतात उन्हाळ्याचा अर्थ आता फक्त दुपारच्या भाजणाऱ्या उन्हापुरता मर्यादित राहिलेला नाही. आता सूर्य मावळल्यानंतरही दिलासा मिळत नाही. रात्री 11 वाजताही भिंती गरम राहतात, पंखे गरम हवा फेकतात आणि कूलर-एसीदेखील अनेकदा निरुपयोगी वाटतात. वैज्ञानिक याला ‘वॉर्म नाईट्स’ (गरम रात्री) म्हणतात. या गरम रात्रींचा थेट परिणाम हृदय, किडनी आणि झोपेवर होत आहे. देशातील 734 जिल्ह्यांपैकी 57% जिल्हे आता उच्च किंवा खूप उच्च उष्णता धोका क्षेत्रात आले आहेत, जिथे सुमारे 76% लोकसंख्या राहते. तर, या 'वॉर्म नाईट्स' म्हणजे काय, त्या का वाढत आहेत आणि त्यापासून वाचण्याचा मार्ग काय आहे; दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये 6 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे… प्रश्न-1: ‘वॉर्म नाइट’ म्हणजे काय आणि ती पूर्वीपेक्षा वेगळी का आहे? उत्तर: भारतीय हवामान विभाग, म्हणजेच IMD नुसार, जेव्हा रात्रीचे किमान तापमान सामान्यपेक्षा 4.5 ते 6.4 अंश सेल्सिअसने जास्त होते, तेव्हा त्याला 'वॉर्म नाईट' म्हणतात. जर हे अंतर यापेक्षाही जास्त असेल, तर प्रकरण 'अत्यंत गंभीर' श्रेणीत येते. पूर्वी उष्णतेच्या लाटेचा अर्थ होता- दिवसा 40C पेक्षा जास्त तापमान असलेली उष्ण हवा. त्यापासून वाचण्याचे उपाय होते - सावली, पाणी, घरात राहा. पण उष्ण रात्रीत घरही शत्रू बनते. दिवसभर सिमेंटच्या भिंती आणि सिमेंटचे छत सूर्यप्रकाश स्वतःमध्ये शोषून घेतात. जेव्हा सूर्य मावळतो, तेव्हा तीच उष्णता हळूहळू बाहेर पडू लागते. अगदी त्याच वेळी जेव्हा तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करत असता. परिणाम? रात्री 11 वाजताही भिंतीला हात लावला, तर ती गरम लागते आणि पंखे आग ओकतात. गेल्या काही वर्षांत उष्ण रात्री वेगाने वाढल्या आहेत… प्रश्न-2: वाढत्या 'वॉर्म नाइट्स'मागे (उष्ण रात्रींमागे) खरी कारणे काय आहेत?उत्तरः रात्रीची वाढती उष्णता यासाठी 3 मोठी कारणे जबाबदार आहेत… 60% जबाबदारी काँक्रीटच्या इमारती आणि रस्त्यांची हवेतील वाढती आर्द्रता आणि दमटपणा जागतिक तापमानवाढ आणि झाडांची कमतरता प्रश्न-3: रात्री उष्ण झाल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो? उत्तर: CEEW म्हणजेच कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटरनुसार, रात्रीची उष्णता 'सायलेंट किलर'प्रमाणे काम करते… शरीराची शीतकरण प्रणाली ठप्प होते: मानवी शरीराचे तापमान 37C असते. रात्री बाहेर थंडी असते, तेव्हा शरीराला पूर्ववत होण्यासाठी वेळ मिळतो. पण जर रात्रीचे तापमान 25C च्या खाली आले नाही, तर शरीर स्वतःला पूर्ववत करू शकत नाही. याला 'हीट स्ट्रेस' म्हणतात. शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की 2100 पर्यंत, जास्त उष्ण रात्रींमुळे मृत्यूचा धोका जवळपास सहा पटीने वाढेल. हृदयावर थेट हल्ला: जेव्हा शरीर रात्री थंड होत नाही, तेव्हा हृदयाला शरीराचे तापमान कमी करण्यासाठी सतत अतिरिक्त मेहनत करावी लागते. यामुळे रक्तदाब वाढतो आणि झोपेदरम्यान 'सायलेंट हार्ट अटॅक' किंवा हृदय निकामी होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. झोपेची नासाडी: जेव्हा रात्रीचे तापमान 27C च्या वर जाते, तेव्हा झोपेचे सर्वात महत्त्वाचे भाग - REM स्लीप आणि डीप स्लीप - खराब होऊ लागतात. दिवसाच्या तीव्र उष्णतेनंतर, उष्ण रात्री झोपेच्या शरीरविज्ञानाला थेट बाधा पोहोचवतात, ज्यामुळे आरोग्यासाठी गंभीर धोके निर्माण होतात. स्मरणशक्ती कमी होणे, चिडचिडेपणा, नैराश्य… हे सर्व उष्ण रात्रींचे दीर्घकालीन परिणाम आहेत. प्रश्न-४: उष्ण रात्रींमुळे आर्थिक परिणाम काय होतील? उत्तर: उष्ण रात्री आरोग्यासोबतच आपल्या आणि देशाच्या आर्थिक विकासात अडचणी निर्माण करू शकतात… प्रश्न-5: उष्ण रात्रींपासून कूलर-एसी आपल्याला वाचवतील का? उत्तर: नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेच्या आकडेवारीनुसार, भारतात फक्त 24% घरांमध्ये एसी किंवा कूलर आहेत. शहरांमध्ये हे प्रमाण 40% आहे, तर गावांमध्ये केवळ 15%. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये तर फक्त 5% घरांमध्ये एसी आहेत. ही तीच राज्ये आहेत जिथे उष्णता सर्वाधिक कहर करते. पण एसी काही जादूची काठी नाही. एसी खोलीला थंड करतो, पण बाहेरची हवा आणखी गरम करतो. म्हणजेच, एसी चालवल्याने आपण स्वतः तर वाचतो, पण संपूर्ण शहराची उष्णता वाढत जाते. प्रश्न-6: उष्ण रात्रींचा सामना करण्यासाठी काय करावे? उत्तर: CEEW ने आपल्या अहवालात भारत सरकारला शिफारस केली आहे की काही महत्त्वाच्या सूचना त्यांच्या उष्णता कृती आराखड्यात समाविष्ट कराव्यात… 1. बहुतेक योजना फक्त दिवसाच्या उष्णतेवर लक्ष केंद्रित करतात. तर आता उष्ण रात्री, जास्त आर्द्रता देखील योजनेत समाविष्ट करावी लागेल. राज्यांनी हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणि आकडेवारीचा वापर करून विजेची मागणी आणि रोगांशी लढण्याची तयारी केली पाहिजे. 2. 2024 पासून, उष्णतेच्या लाटेला राज्य आपत्ती निवारण निधी (SDMF) अंतर्गत निधीसाठी समाविष्ट करण्यात आले आहे. राज्ये या पैशाचा वापर करून शीतकरण निवारा आणि अलर्ट प्रणाली तयार करू शकतात. याव्यतिरिक्त, शहरांमध्ये झाडे आणि हिरवळ वाढवण्यावर भर देऊ शकतात. 3. ज्या राज्यांचे अर्ध्याहून अधिक जिल्हे उष्णतेमुळे उच्च-जोखीम असलेल्या श्रेणीत आहेत, त्या भागांना 'राज्य-विशिष्ट आपत्ती' म्हणून घोषित केले पाहिजे. असे केल्याने SDRF चा अतिरिक्त 10% निधी उपलब्ध होतो, ज्याचा वापर उष्णतेमुळे होणारे मृत्यू, शेतीचे नुकसान आणि आपत्कालीन प्रशिक्षणासाठी केला जाऊ शकतो. 4. तापमान एका निश्चित मर्यादेपलीकडे जाताच, मजुरांच्या खात्यात त्वरित पैसे जमा केले जावेत जेणेकरून त्यांना तीव्र उष्णतेत काम करावे लागणार नाही. नागालँड आणि अहमदाबाद (SEWA) येथे हा प्रयोग यशस्वी झाला आहे. 5. जर भारताने पुढील 10 वर्षांत AC ची ऊर्जा कार्यक्षमता दुप्पट केली, तर ग्राहकांचे 2.2 लाख कोटी रुपये वाचू शकतात. यामुळे केवळ लोकांची वीज बिले कमी होणार नाहीत, तर पॉवर ग्रिडवरील दाबही कमी होईल आणि गंभीर वीज कपातीची परिस्थिती टाळता येईल. उष्ण रात्रींमध्ये तुम्हाला ओआरएस (ORS), लिंबू पाणी आणि ताक यांसारखी पेये पित राहायला पाहिजे, जेणेकरून शरीराच्या शीतकरण प्रणालीला मदत मिळेल. रात्री झोपण्यापूर्वी छत आणि भिंतींवर पाणी शिंपडा, यामुळे काँक्रीटमधील साठलेली उष्णता लवकर बाहेर पडते. सुती आणि हलके कपडे घाला. वृद्ध आणि मुलांवर विशेष लक्ष द्या. ही बातमी दैनिक भास्करमध्ये फेलोशिप करत असलेल्या आकाश कुमार यांनी लिहिली आहे.
Fake Police Verification : बनावट पोलीस व्हेरिफिकेशन प्रकरणी पुण्यात एकाला अटक, पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.
तमिळनाडूमधील 234 जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सरकार स्थापन करण्यासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. DMK आणि AIADMK यांच्यात लढत आहे. एकीकडे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे द्रविडियन मॉडेल आणि त्यांच्या लोकप्रिय योजना आहेत, तर दुसरीकडे जयललितांचा वारसा सांभाळणारी AIADMK आणि हिंदुत्वाच्या आधारावर पाय रोवण्याचा प्रयत्न करणारी भाजपची युती आहे. 20 दिवसांच्या निवडणूक कव्हरेजदरम्यान, दिव्य मराठीची टीम उत्तर तमिळनाडूमधील चेन्नई आणि वेल्लोर, पश्चिमेकडील तिरुपूर, दक्षिणेकडील मदुराई, रामनाथपुरम आणि मध्य भागातील त्रिची येथे पोहोचली. सामान्य लोक, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय तज्ञांच्या माध्यमातून या 3 गोष्टी समजून आल्या… 1. तमिळनाडूमध्ये स्टॅलिन सरकार पुन्हा सत्तेत येऊ शकते. DMK युतीला 120 ते 140 जागा मिळू शकतात. यापैकी DMK ला 100 ते 110, काँग्रेसला 10 ते 15 आणि युतीमधील इतर पक्षांनाही 10 ते 15 जागा मिळू शकतात. 2. दुसरी मोठी पार्टी AIADMK च्या आघाडीला 90 ते 100 जागा मिळण्याची शक्यता आहे. AIADMK ला 70 ते 80 जागा मिळू शकतात. 27 जागांवर लढणाऱ्या भाजपचे खाते उघडणे कठीण आहे, परंतु पक्षाने खूप चांगली कामगिरी केली, तर 5 पर्यंत जागा मिळू शकतात. कोईम्बतूर दक्षिण, तिरुनेलवेली, नागरकोइल, मोडाकुरिची आणि कारैकुडी या जागांवर विजयाची अधिक शक्यता आहे. आघाडीतील इतर पक्षांना 5 ते 10 जागा मिळू शकतात. 3. तमिळ चित्रपटांमधील सुपरस्टार थलापती विजयच्या नवीन पक्ष TVK ची एंट्री फिकी दिसत आहे. पक्षाला 5 ते 15 जागा मिळू शकतात. तथापि, पक्षाचा मतांचा वाटा 12% राहू शकतो. स्टॅलिन यांच्या परतण्याची कारणे मजबूत युती, महिलांमध्ये लोकप्रिय योजना आणि स्टॅलिन यांची प्रतिमा AIADMK-भाजप का मागे पडले? AIADMK मधील वाद, हिंदुत्व कार्ड अयशस्वी, स्टॅलिनला घेरण्यात अपयश थलापती विजयचे किंगमेकर बनणे का कठीण आहे तज्ज्ञांचे मतस्टॅलिन यांनी निवडणुकीला तामिळनाडू विरुद्ध दिल्ली असे स्वरूप दिले
Land Division Fees : मोठी बातमी! शेतजमीन वाटणीपत्रासाठी नोंदणी शुल्क माफ; सरकारकडून परिपत्रक जारी
Land Division Fees : जमिनीचे वाटप करताना आकारले जाणारे नोंदणी शुल्क आता पूर्णपणे माफ; महसूल विभागाने जारी केले सुधारित परिपत्रक.
PMC News : पालिकेच्या ४ हजार २३ जागांवर जाहिरात फलक लावण्याच्या प्रस्तावावरून आयुक्त आणि श्रीनाथ भिमाले यांच्यात थेट शाब्दिक युद्ध.
Chandrakant Patil : मुलींसाठी उच्च शिक्षण आता पूर्णपणे मोफत होणार; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा
Chandrakant Patil : विद्यार्थिनींना आता शिक्षण आणि परीक्षा शुल्कासोबतच 'इतर शुल्कात' मिळणार १०० टक्के सवलत; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे संकेत.
अग्रलेख : मुद्दा एकच, भूमिका दोन
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या प्रश्नावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने चौकशी करण्याचा जो आदेश दिला होता, तो आदेश उच्च न्यायालयाने स्वतःच रोखून धरण्याचा प्रकार घडला आहे.
PMC News : ‘निवासी घरांवर हातोडा, मग पब-हॉटेल्सवर मेहेरबानी का?’नगरसेवकांचा प्रशासनाला सवाल
PMC News : केवळ निवासी घरांवर अतिक्रमण विरोधी पथकाचा हातोडा, मोठ्या पब आणि हॉटेल्सकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; नगरसेवकांचा संताप.
दिल्ली वार्ता : राजकीय फायदा महत्त्वाचा!
महिला आरक्षणाचा (Women’s Reservation) मुद्दा बारगळला असला तरी आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप याचा वापर करणार यात किंचितही शंका उरली नाही.
Ayush Komkar Case : जामीन दिला तर पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध भडकेल; सरकारी वकिलांचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभ्यासू, शांत व तथ्यांवर आधारित बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात. पण सध्या ते एका वेगळ्याच चर्चेत गुरफटलेले दिसतात. पूर्वी आकडेवारी, कायदे व वास्तव यावर युक्तिवाद करणारे फडणवीस आता महिला आरक्षण व डिलिमिटेशनच्या मुद्यावर आपल्या पक्षाचे राजकीय कथानक अधिक आक्रमकपणे रेटताना दिसत आहेत. त्यांच्यात झालेला हा बदल केवळ शैलीतला आहे की, विचारसरणीतला हा प्रश्न आता अधिक ठळकपणे उपस्थित होत आहे. सध्या महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या देशाचे राजकारण महिला आरक्षण विधेयक व डिलिमिटेशन या दोन मुद्यांभोवती फिरत आहे. महिला आरक्षण विधेयकाचा उद्देश संसद व विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के प्रतिनिधित्व देण्याचा आहे. तर डिलिमिटेशन ही लोकसंख्येनुसार मतदारसंघांची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया आहे. घटनात्मक व प्रशासकीय दृष्टीने हे दोन्ही विषय स्वतंत्र आहेत. राजकीय क्षेत्रातील जाणकारांना हे माहिती आहे. पण त्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारच्या पत्रकार परिषदेत या दोन्ही गोष्टींना एकमेकांना जोडण्याचा कथित केवीलवाणा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांची ही भूमिका केवळ राजकीय रणनीतीचा भाग आहे की जाणीवपूर्वक निर्माण केलेला गोंधळ? असा प्रश्न विचारला जात आहे. आधुनिक राजकारणात मुद्दे सोप्या भाषेत मांडले जातात. हे खरे आहे. पण त्या प्रक्रियेत संदर्भ बदलले गेले किंवा चुकीची जोडणी केली गेली, तर ते केवळ स्पष्टीकरण राहत नाही. ते जनतेची दिशाभूल करण्याकडे झुकते. त्यामुळेच फडणवीस यांच्या अलीकडील भूमिकांकडे केवळ विरोधक नव्हे, तर सामान्य नागरीकही प्रश्नार्थक नजरेने पाहत आहेत. फडणवीसांची भूमिका भाजपच्या अजेंड्याचा भाग विरोधकांच्या मते, फडणवीस यांनी महिला आरक्षण व डिलिमिटेशनवर मांडलेली भूमिका केवळ मुद्यापुरती मर्यादित नाही. तो भाजपच्या एका व्यापक राजकीय अजेंड्याचा भाग आहे. मुद्यांचे असे सादरीकरण करणे की त्यातून जनमत विशिष्ट दिशेने वळेल, ही आजच्या राजकारणातील सामान्य पद्धत बनत चालली आहे. पण फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडून राजकारणाला एक वेगळी अपेक्षा असते. कारण, त्यांनीच यापूर्वी तथ्याधारित राजकारणाची ओळख निर्माण केली. त्यामुळे त्यांच्याविषयी सोशल मीडियात 'खोटं बोलण्याचं गोल्ड मेडल फडणवीसांना द्यायला हवं' अशी उपरोधिक विशेषणे वापरली जाण्याकडे केवळ विनोद म्हणून पाहता येत नाही. तो लोकांच्या मनात निर्माण झालेल्या शंकेचा व असंतोषाचा संकेत आहे. एखाद्या नेत्याच्या वक्तव्यांवर वारंवार प्रश्न उपस्थित होतात, तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्या विश्वासार्हतेवर होतो. लोकशाहीत विश्वास ही सर्वात मोठे भांडवल असते आणि तेच जर कमी होऊ लागले, तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. फडणवीस खरोखर बदलले आहेत का? हा प्रश्न सरळ असला तरी त्याचे उत्तर तितकेच गुंतागुंतीचे आहे. एकीकडे राजकारणातील वाढती स्पर्धा, तात्काळ प्रतिक्रिया देण्याचा दबाव आणि सत्तेचे समीकरण यामुळे नेत्यांची भाषा सध्या अधिक आक्रमक झाली आहे. दुसरीकडे, याच प्रक्रियेत तथ्यांचा वापर कसा आणि किती प्रमाणात केला जातो, यावरही प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे हा बदल परिस्थितीजन्य आहे की जाणीवपूर्वक, हे प्रत्येकाने आपल्या आकलनानुसार ठरवावे लागेल. राजकारण तथ्यांवरच आधारित असायला हवे लोकशाही केवळ मतदानावर टिकत नाही. ती माहितीवर आधारित निर्णयांवर टिकते. त्यामुळे माहितीच संदिग्ध किंवा अर्धवट असेल, तर जनतेचे निर्णयही प्रभावित होऊ शकतात. म्हणूनच कोणत्याही नेत्याने, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याने आपल्या वक्तव्यांची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. राजकारणात आक्रमकता असू शकते, मतभेद असू शकतात, पण ते तथ्यांच्या आधारावरच असले पाहिजेत. शेवटी प्रश्न एकाच गोष्टीवर येऊन ठेपतो तो म्हणजे, राजकारणासाठी सत्याशी तडजोड करणे योग्य आहे का? देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रभावी नेत्यांनी या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या कृतीतून दिले, तरच त्यांचा ‘खरेपणा’ टिकून राहील. अन्यथा, ‘राजकारण’ आणि ‘सत्य’ यांच्यातील अंतर वाढतच जाईल, आणि त्याचा परिणाम केवळ एका नेत्यावर नव्हे, तर संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवर होईल. फडणवीसांच्या पत्रकार परिषदेची चिरफाड महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांवर अत्यंत आक्रमक टीका केली. त्यांनी विरोधकांवर '70 कोटी महिलांचा विश्वासघात' केल्याचा आरोप केला. त्यात त्यांनी वापरलेली भाषा, ‘भ्रूणहत्या’, ‘तांडव’, ‘आनंदोत्सव’ आदी शब्द ही केवळ राजकीय टीका नाही. ती एक तीव्र भावनिक व आक्रमक राजकीय रणनीती असल्याचे स्पष्ट दिसते. या भाषेमुळे त्यांच्या भूमिकेला धार मिळते, पण त्याचवेळी प्रश्नही निर्माण होतो की, ही मांडणी पूर्णतः तथ्यांवर आधारित आहे का? की ती राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी केलेली अतिशयोक्ती आहे? महिला आरक्षण विधेयक हा विषय देशातील महिलांच्या प्रतिनिधित्वाशी संबंधित आहे. त्यामुळे ही गोष्ट फार संवेदनशील आहे. फडणवीसांनी विरोधकांवर हे विधेयक पाडण्याचा आरोप केला. त्यांनी त्याला महिलांविरोधी मानसिकतेचे उदाहरण ठरवले. पण इथेच वादाची खरी सुरुवात होते. कारण विरोधकांचे म्हणणे वेगळे आहे. त्यांच्या मते, हा मुद्दा केवळ महिला आरक्षणाचा नाही. तो डिलिमिटेशन, जनगणना व अंमलबजावणीच्या वेळापत्रकाशी जोडलेला आहे. फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात डिलिमिटेशनचा इतिहास मांडत 1976 पासून 2002 आणि पुढे 2023 पर्यंतच्या विविध घटनादुरुस्त्यांचा संदर्भ दिला. त्यांनी असा युक्तिवाद केला की, महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी डिलिमिटेशन आवश्यक आहे आणि त्यामुळेच सरकारने संबंधित विधेयके मांडली. ही मांडणी तांत्रिकदृष्ट्या काही अंशी योग्य वाटते. कारण 2023 च्या घटनादुरुस्तीत जनगणना आणि परिसीमनानंतरच आरक्षण लागू होईल, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, विरोधकांनी सरकारच्या या भूमिकेमागे राजकीय गणित असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणी ‘सत्य विरुद्ध राजकारण’ हा वाद निर्माण होतो. मुख्यमंत्र्यांची शैली पाहिली, तर ती स्पष्टपणे आक्रमक व जनमत तयार करणारी आहे. त्यामुळे ‘भ्रूणहत्या’ सारखा शब्द वापरणे हे भावनिक प्रतिक्रिया निर्माण करण्यासाठी प्रभावी ठरते, पण त्याचवेळी तो अतिशयोक्तीपूर्णही वाटू शकतो. कारण संसदीय प्रक्रियेत एखादे विधेयक नाकारले जाणे ही लोकशाहीतील सामान्य बाब आहे. त्याला अशा तीव्र शब्दांत मांडणे म्हणजे मुद्द्याला वेगळ्या पातळीवर नेणे होय. फडणवीसांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली, हेही राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. समाजसुधारकांच्या वारशाचा संदर्भ देऊन नैतिक आधार मिळवण्याचा प्रयत्न यात दिसतो. मात्र, यावरही प्रश्न उपस्थित होतो की, सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांना राजकीय संघर्षात अशा प्रकारे वापरणे कितपत योग्य आहे? भाजप आणि महायुतीकडून 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा करण्याचा निर्णय हा केवळ आंदोलन नसून स्पष्टपणे जनमत घडवण्याचा प्रयत्न आहे. लोकशाहीत हे पूर्णपणे वैध असले तरी त्यामागे राजकीय दबाव निर्माण करण्याची रणनीती स्पष्ट दिसते. ‘महिलांना संघटित करू, जनमताचा रेटा तयार करू’ हे विधान 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीकडे अंगुलीनिर्देश करणारे आहे. काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीस यांनी जनगणना आणि 2011 च्या आकडेवारीचा संदर्भ देत आपली बाजू स्पष्ट केली. त्यांनी विरोधकांचा प्रश्न ‘बाळबोध’ असल्याचे म्हटले, यावरून त्यांच्या भूमिकेतील आत्मविश्वास दिसतो. मात्र, अशा प्रकारची भाषा राजकीय संवाद अधिक तीव्र करते आणि संवादाची दरी वाढवते, हेही तितकेच खरे आहे. शेवटी, या वादातून एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो, तो म्हणजे लोकशाहीत सत्य किती महत्त्वाचे आहे? जर प्रत्येक पक्ष आपापल्या सोयीने तथ्ये मांडू लागला, तर सामान्य नागरिकाला खरे-खोटे ओळखणे कठीण होईल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडून अपेक्षा हीच आहे की, त्यांनी केवळ राजकारण न करता तथ्यांवर आधारित स्पष्टता कायम ठेवावी. कारण शेवटी राजकारणात जिंकणे महत्त्वाचे असते, पण विश्वास गमावणे हे कोणत्याही नेत्यासाठी सर्वात मोठ्या पराभवाचे कारण ठरू शकते.
Water Cut Pune : गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद; ‘या’भागांवर होणार मोठा परिणाम
Water Cut Pune : शहरातील जलशुद्धीकरण केंद्रे आणि पंपिंग स्टेशनमध्ये तातडीच्या दुरुस्तीचे काम; गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार.
Knife Attack : गोळेवस्तीत पती-पत्नीचा राडा! शेजाऱ्यांवर चाकूने जीवघेणा हल्ला, परिसरात खळबळ
Knife Attack : उरुळी कांचनच्या गोळेवस्तीत शिवीगाळीच्या वादातून चाकू हल्ला; तरुणाच्या कपाळावर वार करून दांपत्याने दिली जीवे मारण्याची धमकी.
माता मृत्यूदरात (Maternal Mortality) 86 टक्क्यांची घट झाल्याचे सकारात्मक चित्र आहे. मात्र गरीब, दुर्गम, ग्रामीण भागातील मातांसाठी हेच चित्र नकारात्मक आहे.
Shikrapur Accident : शिक्रापूरात तीन वाहनांचा भीषण अपघात! कंटेनरची दोन कारला धडक, दोघे जखमी
Shikrapur Accident : दुभाजक तोडून समोरून आलेल्या कंटेनरने दिला मोठा तडाखा; संभाजीनगरच्या प्रवाशांची कार अपघातात उद्ध्वस्त, आरोपी चालकावर गुन्हा दाखल.
Neera River Ghat : पालखी सोहळ्यातील महत्त्वाच्या 'नीरा स्नाना'साठी भाविकांची मोठी गर्दी होते, मात्र घाटाअभावी वारकऱ्यांची सुरक्षितता धोक्यात.
Akluj Animal Market : आता आठवड्यातून दोनदा भरणार जनावरांचा बाजार! अकलूज बाजार समितीचा मोठा निर्णय
Akluj Animal Market : माळशिरस तालुक्यातील जनावरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना मिळणार बळ; व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर बाजार समितीने उचलले महत्त्वपूर्ण पाऊल.
Dowry Harassment : वाघोली हादरली! एकाच दिवशी दोन विवाहितांच्या आत्महत्या; आरोपी पती जेरबंद
Dowry Harassment : माहेरून सोन्याची अंगठी आणि रोख १० लाखांसाठी छळ; दोन विवाहितांच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल.
Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्यातील प्रलंबित कामे तत्परतेने मार्गी लावण्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रशासनाला सक्त निर्देश.
Anganwadi Accident : धक्कादयक! अंगणवाडीच्या छताचं प्लास्टर कोसळलं; चिमुकले थोडक्यात वाचले
Anganwadi Accident : अवघ्या चार वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीची दुरवस्था; संतापलेल्या पालकांनी प्रशासनाला धरले धारेवर, दुरुस्तीची केली मागणी.
BJP Protest In PCMC : महिला आरक्षणावरील आघाताचा निषेध करण्यासाठी एप्रिल महिन्याची सभा ५ मे पर्यंत तहकूब; योगिता नागरगोजे यांनी मांडला निषेधाचा ठराव.
Temple Theft : पांडवकालीन सिद्धेश्वर मंदिरात चोरी! यात्रेचा उत्साह संपताच चोरट्यांचा डल्ला
Temple Theft : भोपाळबुवा आणि सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनंतर अवघ्या काही तासांतच चोरी; अज्ञात चोरट्यांनी दोन दानपेट्या फोडून रोकड केली लंपास.
Red Cliff School : चोविसावाडी येथील रेड क्लिप शाळेच्या शुल्कवाढी विरोधात संताप; आरटीई विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची मागणी.
Attack On Farmer : हप्ते भरले नसल्याच्या रागातून चाकूने वार करून शेतकऱ्याला केले जखमी; एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तीन एजंटना केली अटक.
PCMC BJP Slogan : “अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय..”भाजप नगरसेवकांची जीभ घसरली
PCMC BJP Slogan : महापालिका प्रवेशद्वारावर रंगलेल्या आंदोलनात प्रशांत शितोळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा गोंधळ; चूक लक्षात येताच बदलली घोषणा.
Pimpri Chinchwad : काटे वस्ती परिसरातील मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण; एका लेनच्या कामामुळे धूळ आणि चिखलाचे साम्राज्य.
Khalapur News : बाजारपेठेत माकडांचा थरार! घरात घुसून वस्तूंची फेकाफेक; नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण
Khalapur News : चौक बाजारपेठ परिसरात माकडांच्या टोळ्यांचा घरांमध्ये शिरकाव; अन्नधान्य पळवणे आणि भांडी फोडण्याच्या प्रकारांमुळे गृहिणींमध्ये संतापाची लाट.
Eknath Shinde : साताऱ्यात बालकांसाठी हृदय शस्त्रक्रिया शिबिर; चिमुकल्यांसाठी एकनाथ शिंदेंची मोठी भेट
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे मोफत हृदय तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.
Pangolin Smuggling : खवले मांजराच्या तस्करीचं ‘डोंबिवली कनेक्शन’! एकाला अटक, मोठं रॅकेट उघड होणार
Pangolin Smuggling : चिपळूणहून आलेल्या बसमध्ये दबा धरून बसलेला डोंबिवलीचा तस्कर वन विभागाच्या जाळ्यात; ५.९८० किलो खवले जप्त.
Jaykumar Gore : राजकारणात नवी खेळी! स्वीकृत सदस्यांचा मार्ग मोकळा; आठ दिवसांत होणार मोठा निर्णय
Jaykumar Gore : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार; विधानसभेच्या मंजुरीनंतर आता शासन निर्णयाची प्रतीक्षा.
GT vs MI : या सामन्यात मुंबईने गुजरातचा ९९ धावांनी धुव्वा उडवत हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला आहे.
BMC News : सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या विभागातील स्वच्छतेवर भर द्या, अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाच्या सहायक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील रस्ते स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नाले स्वच्छता, बस थांबे आदी ठिकाणच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देऊन परिसर स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी आज दिल्या आहेत. त्यांनी पश्चिम उपनगरातील ३ विभाग कार्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणांची आकस्मिक पाहणी केली.अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज (दिनांक २० एप्रिल २०२६) पश्चिम उपनगरांतील एच पूर्व, पी उत्तर आणि पी दक्षिण या विभागांमधील विविध ठिकाणांना आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विभागांमधील परिसर स्वच्छता आणि नाले स्वच्छतेच्या कामांचा पाहणी केली. त्यानंतर त्यांनी 'एच पूर्व' विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे, 'पी उत्तर' विभागाचे सहायक आयुक्त कुंदन वळवी आणि 'पी दक्षिण' विभागाचे सहायक आयुक्त अनिरूद्ध कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनी संवाद साधला. या दूरध्वनी संवादा दरम्यान त्यांनी संबंधित सहाय्यक आयुक्त यांना विविध बाबींच्या अनुषंगाने निर्देश दिले आहेत.पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरु आहेत. कंत्राटदाराने काढलेला ओला गाळ ४८ तासानंतरच त्याचे वहन होत आहे की नाही, याकडेही संबंधित अभियंत्यांनी प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे. तसेच सहायक आयुक्तांनी संबंधित अभियंत्यांकडून या सर्व कामाचा दररोज आढावा घ्यावा, अशा सूचनाही डॉ. शर्मा यांनी आजच्या आकस्मिक पाहणीनंतर संबंधित सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.'पी दक्षिण' विभागातील दाजीवाडी भाजी मंडई, राणीसती मार्ग मंडी परिसरातील स्वच्छता कामांचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच तिनही विभागातील उड्डाणपुलांखालील आणि परिसरातील कचरा हटवून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रभावी कार्यवाही करावी, असे निर्देशही शर्मा यांनी आजच्या आकस्मिक पाहणीनंतर दिले आहेत.
Kagiso Rabada Record : २० एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात रबाडाने पॉवरप्लेमध्येच मुंबईच्या तीन दिग्गज फलंदाजांना बाद करून श्रीलंकेचा महान गोलंदाज लसिथ मलिंगा याचा एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे.
Satara News : धक्कादायक ! 10 दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्यावर काळाचा घाला
कराड– चिपळूण मार्गावर येरफळे गावच्या हद्दीत गारवा हॉटेलसमोर सोमवारी दुपारी (Satara News) दोन वाजण्याच्या सुमारास ट्रकला ओलांडून पुढे जात असताना समोरून येणाऱ्या पिकअप गाडीची दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक झाल्याने अपघात झाला.
US - Iran Talk 2nd Round: दोन्ही देशांमध्ये गेल्या ४९ वर्षांपासून नसलेला संवाद आता सुरू झाला आहे. दोन्ही बाजूंनी चर्चेची तयारी दर्शवली असली तरी, अनेक दशकांपासूनचा अविश्वास हा या प्रक्रियेतील सर्वात मोठा अडथळा आहे.
Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय! शरद पवारांच्या खासदारावर सोपवली महत्त्वाची जबाबदारी
Narendra Modi : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.
India - South Korea:
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रच्या नफ्यात 35 टक्क्यांची भरघोस वाढ
Bank of Maharashtra : सोमवारी एनएसईवर, या बँकेचा शेअर 3.86 टक्क्यांनी वाढून 75.54 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे बाजारमूल्य 2,261.32 कोटी रुपयांनी वाढून 58,194.30 कोटी रुपयांवर पोहोचले.
Water Cut : दक्षिण मुंबईत बुधवारी पाणीकपात होणार, नागरिकांचे हाल होणार
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर हाजीबंदर मार्ग एफ दक्षिण विभागात दोन नग १५०० मिलीमीटर व्यासाचे बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार आहे. ही कार्यवाही बुधवार, २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून गुरूवारी, २३ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत एकूण १८ तास सुरु राहणार आहे. परिणामी, ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.कृपया संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, तसेच नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून - गाळून प्यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.कोणत्या परिसरात असेल कपात ?‘ए’ विभाग - पी.डि'मेलो मार्ग रहिवासी, रामगड झोपडपट्टी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), सेंट जॉर्ज रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), नौदल डॉकयार्ड‘बी’ विभाग - उमरखाडी, नूरबाग, चिंचबंदर, वालपाखाडी, कारागृह मार्ग (जेल रोड), रामचंद्र भट्ट मार्ग, आनंदराव सुर्वे मार्ग, समंतभाई नानजी मार्ग, डॉ. महेश्वरी मार्ग, केशवजी नाईक, भाग एस. व्ही. पी., शायदा मार्ग, फ्लँक रोड नवरोजी हिल, टंडेल (उ), निशाणपाडा स्ट्रीटटँडेल, तंतनपुरा, सॅम्युएल मोहम्मद उमर कोकील मार्ग, आय. एम. एम., वाय. एम. रोड, डोंटाड, खडक, इस्तायल मोहल्ला, धोबी मार्ग, शेरिफ देवजी, व्ही. व्ही. चंदन, दरियास्थान, काजी सय्यद, सय्यद मुखरी, इस्साजी, नृसिंहनाथ, जंजीकार, रघुनाथ महाराज, जुना बंगालीपुरा, भंडारी, अभयचंद गांधी मार्ग, लोकमान्य टिळक मार्ग (एल. टी. रोड), निशाणपाडा, मशिद बंदर.इमामवाडा, आय. आर. मार्ग, मोहम्मद अली, मेमनवाडा, पिरु गल्ली, कंबेकर, नखोडा, कोलसा, नारायण धुरु, अब्दुल रहमान स्ट्रीटनंदलाल जानी मार्ग, लीलाधर साह मार्ग, दाणाबंदर, संत तुकाराम मार्ग, पी.डिमेलो मार्ग, वाडीबंदररेल्वे परिसर , मुंबई बंदर परिसरसी’ विभाग -बॅनियन स्ट्रीट, इस्माईल कर्टे रोड, एसबीयूटी क्षेत्र, बोरा बाजार रस्ता, सरदार वल्लभभाई रस्ता, काजी रस्ता, अली उमर रस्ता, बापू कोटे मार्ग, झाम रस्ता, मशीद रस्ता, चिमना बुचर रस्ता, मटन रस्ता, धाबू रस्ता, पाकमोडिया स्ट्रीटई’ विभाग - १. नेसबिट रोड, एन. एम. जोशी मार्ग, मदनपुरा, बदलूपुरा, नागपाडा, शेख हाफिझुद्दीन मार्ग, मेघराज शेट्टी मार्ग, गणेश हरि पारुंडेकर मार्ग, पाईस रस्ता, मुसा किल्लेदार रस्ता, सोफिया जुबेर मार्ग, डिमटिमकार मार्ग, एम. ए. मार्ग, टँकपाखाडी मार्ग, क्लिअर रोड, बी. जे. मार्ग, के. के. रोडडिमटिमकर मार्ग, उंद्रिया रस्ता, खंडिया रस्ता, टेमकर रस्ता, शेख कमरूद्दीन रस्ता, मस्तान टँक मार्ग, टँक रस्ता, काझीपुरा, डंकन मार्ग, जे. जे. रस्ताम्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी मार्ग, नेसबिट मार्ग, ताडवाडी, रेल्वे संकुल, शिवदास चापसी मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी ६.३५ ते ८.१५ वा.)एम. एस. अली मार्ग, बेलासिस मार्ग, कामाठीपुरा, एस. पी. मार्ग, शुक्लाजी रस्ता, मनाजी राजूजी मार्ग, आग्रीपाडादत्ताराम लाड मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भाई बाल मुकुंद मार्ग, काळाचौकी, चिंचपोकळी, टी. बी. कदम मार्गमाझगाव कोळीवाडा, नरसू नाखवा विठोबा मार्ग, ब्रह्मदेव खोद मार्ग, दरगाह गली, बॅ. नाथ पै मार्ग, दिलीमा स्ट्रीट, रुग्णालय गल्ली, चर्च लेन, बेकर्स लेन, नवाब टँक पूल, गन पावडर मार्ग, नवा नगर, डॉकयार्ड रोडहाथीबाग जागा, शेठ मोतिशाह गल्लीमुंबई बंदर क्षेत्रजे. जे. रुग्णालयरामभाऊ भोगले मार्ग, फरबंदर नाका, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय, घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, शेठ मोतिशाह गल्ली, टी. बी. कदम मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. मस्कारहन्स मार्ग, डी. पी. वाडी, काळाचौकी, नारियल वाडी, संत सावता मार्ग, चंपी भिमजी मार्ग, ए. जी. पवार गल्ली, वीर तानाजी मालुसरे मार्गबॅ. नाथ पै मार्ग, मोदी कंपाउंड, अँटलस मिल कंपाउंड, घोडपदेव क्षेत्रशिवदास चापशी मार्गदारूखाना, लाकूड बंदर, कोळसा बंदर, दरगाह गली, क्वे स्ट्रीटकस्तुरबा रुग्णालय नायर रुग्णालय‘एफ दक्षिण’ विभाग - अभ्युदय नगर , शिवडी, वडाळा (पूर्व) , डॉ. ई. बोर्जेस मार्ग, बुस्टिंगलालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चिवडा गल्ली, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्लीदादर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, हिंदमाता जेरबाई वाडिया मार्ग, स्प्रिंग मिल चाळ, गं. द आंबेकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेटे मार्केट, भोईवाडा गाव, हाफकीन इन्स्टिट्यूट गं. द आंबेकर मार्ग ते ५० टेनामेंट्स, एकनाथ घाडी मार्ग, परळ गाव मार्ग, नाना भाई परळकर मार्ग, भगवानराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळींबे मार्ग, एस. पी. कंपाऊंड (काही भागात)आचार्य दोंदे मार्ग, टी. जे. रोड, झकेरिया बंदर मार्ग, शिवडी छेद मार्ग, शिवडी किल्ला मार्ग, गाडी अड्डा, शिवडी कोळीवाडा,मुंबई बंदर परिक्षेत्रपरशुराम नगर, जिजामाता नगर, अंबेवाडी (काही भाग), साईबाबा मार्ग, मिंट वसाहत, राम टेकडीके. ई. एम. रुग्णालय, टाटा रुग्णालय, जेरबाई वाडिया रुग्णालय, एमजीएम रुग्णालय
BMC : महापालिका आयुक्तांच्या भेटीनंतर अतिरिक्त आयुक्तांची रुग्णालयात धाव
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिका आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर आश्विनी भिडे यांनी महापालिका रुग्णालयाला भेटी देवून तेथील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांना रुग्णालयात जाण्याची इच्छा प्रकट झाली. अतिरिक्त आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी सोमवारी एम.व्ही.देसाई रुग्णालयाला भेटी देवून तेथील रुग्णांशी संवाद साधला आहे.मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी २० एप्रिल २०२६ रोजी मालाड पूर्व परिसरात असणाऱ्या महानगरपालिकेच्या मनोहर वामन देसाई रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग आणि रुग्णालयातील विविध विभागांना भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्या रुग्णांशीही संवाद साधला. त्याचबरोबर रुग्णालयात कार्यरत असणारे डॉक्टर, परिचारिका आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधून तेथील परिस्थितीची माहिती घेतली.डॉ विपिन शर्मा यांच्याकडे मागील अनेक महिन्यांपासून आरोग्य विभागचा पदभार असून आजवर या रुग्णलयांना कधीही त्यांनी भेटी दिल्या नाहीत.पण आयुक्तांनी आता भेटी देवून आढावा घेण्यास सुरुवात केल्यानंतरही त्यांनाही आता रुग्णालयात जाण्याची वेळ आली.अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या या दौ-या दरम्यान त्यांच्या समवेत महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख डॉक्टर चंद्रकांत पवार हे देखील उपस्थित होते. डॉ. शर्मा यांनी आजच्या भेटीदरम्यान रुग्णालयातील यंत्रसामग्री, रुग्णवाहिका तसेच रुग्णालयाशी संबंधित विविध बाबींचा आढावा घेऊन तेथील परिस्थिती बाबत संबंधितांशी सविस्तर चर्चा केली. तसेच डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय सेवा सुविधा देणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधताना डॉ. शर्मा यांनी आवर्जून निर्देशित केले की, रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा सुविधा देणारे संबंधित कर्मचारी या सर्वांनी रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांशी अधिकाधिक सौहार्दपूर्ण पद्धतीने संवाद साधावा आणि रुग्णांचे समुपदेशन योग्य रीतीने करावे. रुग्णालयातील स्वच्छता व सेवा सुविधा याबाबत डॉ. शर्मा यांनी समाधान व्यक्त केले.मनोहर वामन देसाई रुग्णालय हे मालाड पूर्व परिसरात असणारे महानगरपालिकेचे एक महत्त्वाचे रुग्णालय आहे. १८० खाटांचे हे रुग्णालय सन १९७६ पासून मुंबईकरांना वैद्यकीय सेवा सुविधा देत आहे. या रुग्णालयाची बाह्य रुग्ण नोंदणी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ८ ते ११ यादरम्यान सुरू असते, अशी माहिती देखील रुग्णालय प्रशासनाद्वारे या निमित्ताने कळविण्यात आली आहे.
India-US FTA: अमेरिकेसोबतचा मुक्त व्यापार करार जवळपास अंतिम; वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माहिती
India-US FTA: गेल्या आर्थिक वर्षात देशाची अमेरिकेला होणारी निर्यात 0.92 टक्क्यांनी वाढून 87.3 अब्ज डॉलर्सवर पोहोचली, तर आयात 15.95 टक्क्यांनी वाढून 52.9 अब्ज डॉलर्स झाली.
Infrastructure sector : फेब्रुवारी 2026 मध्ये, आठ मुख्य पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये 2.8 टक्क्यांनी वाढ झाली होती.
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा भाजपला जबर धक्का; ‘या’बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
Maharashtra Politics : कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Chandukaka Saraf: 19 एप्रिल ते 9 मे 2026 या कालावधीत ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 60% पर्यंत, तर हिर्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100% पर्यंत सूट मिळणार आहे.
IRAN : इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला इराणचा ताबा
तेहरान : इराणमध्ये पडद्यामागे सुरू असलेल्या हालचाली आता समोर आल्या आहेत. अमेरिकेने केलेली युद्धबंदी बुधवारी संपत असताना आणि पाकिस्तानात चर्चेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत असताना इराणमध्ये 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स' राजसत्तेवर पूर्णपणे कब्जा मिळविला आहे. आयआरजीसीचे मेजर जनरल अहमद वाहिदी हे इराणचे सर्वात शक्तिशाली नेते बनले आहेत. यामुळे जगावर महायुद्धाचे संकट घोंघावू लागले आहे. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदी केल्यानंतर इराणने पुन्हा एकदा ही सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष नव्या वळणावर पोहोचला आहे. दोन्ही देशांतील हा संघर्ष मिटवण्यासाठी पाकिस्तानात चर्चेची दुसरी फेरी आयोजित करण्यात आली आहे. परंतु या बैठकीचे भवितव्य अधांतरीच आहे. इराणने यावेळी होर्मुझच्या सामुद्रधुनीत आक्रमक पवित्रा धारण केलेला असतानाच आता इराणमधून जगाला हादरवून टाकणारी एक माहिती समोर आली आहे.इराणची सत्ता आता कट्टरंपती इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात आयआरजीसीच्या हाती आल्याचा दावा केला जात आहे. आता इराणमध्ये सर्व महत्त्वाचे निर्णय आयआरजीसीकडून घेतले जात आहेत, असे या वृत्तात सांगण्यात आले आहे. गेल्या आठवड्याभरात हा बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बदलाअंतर्गत आयआरजीसीचे कमांडर अहमद वाहिदी आणि त्यांचे जवळचे सहकारीच आता देशाचे प्रमुख नेतृत्त्व म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. अमेरिकेने होर्मुझमध्ये इराणच्या जहाजावर हल्ला करून पुन्हा युद्धाला तोंड फोडले आहे. अमेरिकेचा अशाप्रकारे चीनहून इराणला येत असलेल्या जहाजावर ताबा मिळविणे इराणला पटलेले नाही. अमेरिकन थिंक टँक ‘इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर’च्या मते, जनरल वाहिदी यांनी इराणच्या लष्करी तंत्रासह राजनैतिक वाटाघाटींची सूत्रेही आपल्या हाती घेतली आहेत. याला सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांची मूक संमती असल्याचे सांगितले जात आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे हॉर्मुझचा समुद्री मार्ग उघडण्यास अनुकूल होते. मात्र, आयआरजीसीने हा निर्णय धुडकावून लावत उलट आपल्या 'फास्ट अटॅक शिप्स'च्या माध्यमातून हा मार्ग पूर्णपणे ब्लॉक केला आहे.परराष्ट्रमंत्र्यांना केले बाजूला?वॉशिंग्टन येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ द स्टडी ऑफर वॉर’च्या मतानुसार आयआरजीसीने इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांना बाजूला केले आहे. तसेच वरिष्ठ पातळीवर घेतले जाणारे सर्व निर्णय आता आयआरजीसीकडून घेतले जात आहेत. अमेरिकेसोबतच्या पहिल्या बैठकीनंतर अराघची यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खोलण्याची घोषणा केली होती. परंतु हा निर्णय बदलून अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी होर्मुझ बंदच असणे गरजेचे आहे, अशी भूमिका आयआरजीसीकडून घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.शेवटच्या क्षणी इराणचा अमेरिकेसोबतच्या चर्चेत सहभागी होण्यास नकारपाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इरान यांच्यातील शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण इस्लामाबादला छावणीचे स्वरूप आले असून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मात्र, या सगळ्यात इराणने पाकिस्तान आणि अमेरिकेला मोठा झटका दिला आहे. सध्या या चर्चेत सहभागी होण्याची कोणतीही योजना नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सोमवारी सांगितले की, ‘इराण अद्याप अमेरिकेसोबतच्या या चर्चेसाठी कोणताही विचार केलेला नाही’. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविराम संपण्यासाठी ४८ तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना हा मोठा पेच निर्माण झाला आहे. इराणनने चर्चेत मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला आहे. नव्या फेरीसाठी आपले प्रतिनिधी इस्लामाबादला पाठवण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचे संकेत इराणने दिले आहेत. मात्र, असे असले तरी आपला मित्र देश असलेल्या पाकिस्तानला इराणने १० कलमी प्रस्ताव पाठवला आहे. पाकिस्तान निष्पक्ष राहण्याऐवजी अमेरिका आणि सौदी अरेबियाकडे झुकत असल्याची भीती इराणला आहे. यातच भर म्हणून, अमेरिकन नौदलाने इराणी मालवाहू जहाजे जप्त केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
मुंबई : कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या आणि सीएसएमटी- हुजूर साहेब नांदेड 'वंदे भारत'च्या वेळेत बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या वेळेत बदल : मडगाव जिल्ह्यातील रावणफोंड येथे पुलाच्या बांधकामासाठी कंपोझिट गर्डर टाकण्याकरिता मंगळवार (२१ एप्रिल) ते २४ एप्रिल दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मंगळवारी गाडी क्र. २०६४६ मंगळूरू सेंट्रल - मडगाव जंक्शन वंदे भारत एक्सप्रेस बल्ली स्थानकावर १० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. बुधवारी (२२ एप्रिल) गाडी क्र. १२६१९ लो.टि.टर्मिनस- मंगळूरू सेंट्रल एक्सप्रेस मडगाव जंक्शन स्थानकावर २० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. गाडी क्र. २०९३२ इंदूर - तिरुवनंतपुरम नॉर्थ एक्सप्रेस मडगाव जंक्शन स्थानकावर ३५ मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. गुरूवारी २३ एप्रिल गाडी क्र. १६३३८ एर्नाकुलम जंक्शन- ओखा एक्सप्रेस बल्ली स्थानकावर २० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल, असे कोकण रेल्वेतर्फे कळवण्यात आले आहे.सीएसएमटी- हुजूर साहेब नांदेड 'वंदे भारत'च्या वेळेत बदल : मध्य रेल्वेने गाडी क्रमांक २०७०५/२०७०६ सीएसएमटी- हुजूर साहेब नांदेड ते सीएसएमटी 'वंदे भारत एक्सप्रेस'च्या वेळेत बदल केला आहे. सुधारित वेळा ३ मे २०२६ पासून लागू होतील. ही गाडी सीएसएमटी, दादर, संभाजी नगर, जालना, परभणी, हुजूर साहेब नांदेड येथे थांबेल तसेच हुजूर साहेब नांदेडहून पुन्हा सीएसएमटी असा प्रवास करेल. ठाणे, कल्याण, नाशिक आणि मनमाड येथे वेळेत कोणताही बदल होणार नाही. गाडी क्रमांक १२१४२ पाटलीपुत्र ही गाडी लो.टि.टर्मिनस स्थानकावर दुपारी २:१० ऐवजी २:२० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक २२१८०एम. जी. रामचंद्रन चेन्नई ही गाडी लो. टि. टर्मिनस येथे दुपारी २:२५ ऐवजी २:३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ११०१२ धुळे -सीएसएमटी एक्सप्रेस सीएसएमटी येथे २.१५ ऐवजी २.२५ ला पोहोचेल.
Gold-Silver : ‘या’कारमाणुळे सोने-चांदीच्या दरात झाली वाढ; पहा ताजे दर
Gold-Silver : दिल्ली सराफात चांदीचा दर 4 हजार 300 रुपयांनी वाढून 2 लाख 57 हजार 300 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. दिल्ली सराफात सोन्याचा दर 800 रुपयांनी वाढून 1 लाख 57 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
Newasa: रेशनच्या धान्याचा नवा भ्रष्टाचार; नेवासा गोदामात धक्कादायक प्रकार उघड
Newasa: केवळ पाणी मारून वजन वाढवणे एवढ्यावरच हा भ्रष्टाचार थांबत नाही, तर रेशनच्या पोत्यांमधील धान्याची चोरी ही दुसरी मोठी समस्या आहे. कागदोपत्री ५० किलोचा असलेला गव्हाचा कट्टा प्रत्यक्षात ४८ ते ४९ किलोच भरत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
Tilak Varma Century : तिलकने मैदानाच्या चहूबाजूला फटकेबाजी करत अवघ्या ४५ चेंडूंमध्ये आपले धमाकेदार शतक पूर्ण केले.
Corporator Salary : समाजवादी पक्षाच्या नगरसेविका अमरीन अब्राहानी यांनी मुंबई महापालिका नगरसेवकांसाठी १ लाख रुपये मानधनाची मागणी केली आहे.
Delhi High Court:
Rahul Gandhi : ट्रम्प यांच्या सूचनेवरून मोदींचा इस्त्रायल दौरा; राहुल गांधी यांचा दावा
Rahul Gandhi : पश्चिम आशियातील युद्धाला तोंड फुटण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलचा दौरा केला. तो दौरा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेवरून झाला, असा आरोपवजा दावा कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला.
‘विकसित महाराष्ट्र २०४७’साठी ठोस कृती आराखडा; प्रादेशिक तफावत कमी करण्यावर सरकारचा भर
राज्यातील प्रादेशिक तफावत कमी करून सर्व जिल्ह्यांचा समतोल आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रत्येक विभागाने निश्चित कालमर्यादेत ठोस कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या व्हिजन मॅनेजमेंट नियामक मंडळाच्या आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या कामांचा सखोल आढावा घेतला आणि पुढील टप्प्यात प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्याचे स्पष्ट केले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल (ऑनलाइन), तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असले तरी ११ जिल्हे अजूनही मागे आहेत. या जिल्ह्यांना ‘विकासाचे इंजिन’ मानून त्यांचा वेगाने विकास केल्यास राज्याच्या एकूण प्रगतीला चालना मिळेल. केंद्राच्या आकांक्षी जिल्ह्यांच्या धर्तीवर राज्यात १० आकांक्षी जिल्हे आणि १७४ आकांक्षी तालुके निश्चित करण्यात आले असून, स्थानिक पातळीवर विकासाचे मापदंड उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे.https://prahaar.in/2026/04/20/mumbai-crime-fake-fakir-arrested-in-mumbai-accused-of-torturing-women-in-the-name-of-treatment/शाश्वत विकास उद्दिष्टांच्या निर्देशांकात महाराष्ट्राला पुन्हा आघाडीवर आणण्यासाठी विभागनिहाय कृती आराखडे तयार करण्यावर त्यांनी भर दिला. नियोजन विभागाने तत्काळ मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, तर वित्त विभागाने ३० एप्रिलपर्यंत प्रकल्पांचे आर्थिक मूल्यमापन पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले. निधी उभारणीसाठी केंद्र-राज्य योजना, जिल्हा योजना, वित्त आयोग अनुदान आणि कर्ज पर्यायांचा योग्य समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले.‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ सुधारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी आणि जमीन मूल्य धोरणांचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला. केंद्राकडील निधी मिळवण्यासाठी उपयोगिता प्रमाणपत्रे वेळेत सादर करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच खाजगी गुंतवणूक, निर्यात आणि उपभोग वाढवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.https://prahaar.in/2026/04/20/chhattisgarh-plane-crashes-into-mountain-pilot-dies/विभागांमध्ये समन्वय वाढवून जबाबदारीने काम करण्याचे निर्देश देत त्यांनी प्रगतीचे नियमित मूल्यमापन करण्याची गरजही अधोरेखित केली. ‘विकसित महाराष्ट्र’ या उद्दिष्टाशी सुसंगत असलेले प्रस्तावच पुढे स्वीकारले जातील आणि प्रत्येक प्रस्तावास त्याचे स्पष्टीकरण जोडणे बंधनकारक राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, मंत्री अतुल सावे यांनी निधी वेळेत खर्च होण्यासाठी स्पष्ट नियमावलीची गरज व्यक्त केली. मंत्री नितेश राणे यांनी भविष्यातील क्षेत्रांचा विचार करून थेट परकीय गुंतवणुकीचे नियोजन करण्याचा सल्ला दिला. तसेच प्रादेशिक समतोल राखत किल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली. वित्त राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी अनुसूचित जाती-जमातींच्या गरजांनुसार जिल्हानिहाय निधी नियोजन करण्याचे सुचवले.बैठकीत विविध विभागांच्या सचिवांनी पुढील चार वर्षांच्या विकास आराखड्यांचे सादरीकरण केले.
मुंबई : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देत राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क संपूर्ण माफ केले आहे. याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाकडून आज जारी करण्यात आले आहे.आता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ८५ अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांसह, आपसातील संमतीने थेट दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी येणाऱ्या वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीपत्रांनाही नोंदणी शुल्कातून पूर्णपणे माफी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री ददेवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.शासनाने २३ जून २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, कलम ८५ अन्वये एकाच कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही, अशी तरतूद करण्यात आली होती. या कलमांतर्गत वाटणीपत्राचे अधिकार तहसीलदारांना आहेत. परंतु, अनेक नागरिक तहसीलदारांकडे न जाता थेट दुय्यम निबंधक कार्यालयात आपसातील संमतीने वाटणीपत्र नोंदणीसाठी सादर करत होते. अशा वेळी मूळ अधिसूचनेत स्पष्ट तरतूद नसल्याचे कारण देत दुय्यम निबंधक कार्यालयांकडून नोंदणी शुल्क आकारले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते.शेतकऱ्यांचा होणारा हा गोंधळ दूर करण्यासाठी शासनाचे महत्वाचे पाऊल उचलले असून महसूल विभागाने आता याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. नवीन स्पष्टीकरणानुसार कलम ८५ अंतर्गत तहसीलदार स्तरावरून होणाऱ्या वाटणीपत्रांच्या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. वडिलोपार्जित शेतजमिनीबाबत वारसा हक्क प्राप्त झालेल्या सर्व सहधारकांनी एकत्र येऊन थेट नोंदणी कार्यालयात सादर केलेल्या वाटणीपत्रालाही आता नोंदणी शुल्कातून सूट मिळेल.https://prahaar.in/2026/04/20/mumbai-crime-fake-fakir-arrested-in-mumbai-accused-of-torturing-women-in-the-name-of-treatment/एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये झालेल्या शेतजमिनीच्या वाटप दस्तावरही कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या निर्णयामुळे शेतजमिनीच्या वाटणीसाठी होणारा खर्च वाचणार असून प्रलंबित वादांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.राज्यातील सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे : चंद्रशेखर बावनकुळेएकाच कुटुंबातील सदस्यांनी आपसात वडिलोपार्जित जमीनीचे वाटप केल्यास त्याचे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे अधिकार तहसीलदारांना होते. पण, काही लोक थेट दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदणी करत होते. त्यासाठीच्या नियमात स्पष्टता नसल्याने नोंदणी फी आकारली जात होती. ही अडचण दूर करण्यासाठी नव्याने हे स्पष्टीकरण देण्यात आले असून आता तहसीलदार किंवा नोंदणी कार्यालयात कुठेही गेला तरी नोंदणी फी भरावी लागणार नाही. याचा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
Mumbai Crime : मुंबईत भोंदू फकीर अटकेत; उपचाराच्या नावाखाली महिलांवर अत्याचाराचा आरोप
मुंबई : नाशिक आणि संगमनेरमधील भोंदूबाबांच्या प्रकरणांची चर्चा अजून थंड झालेली नसतानाच मुंबईतही अशाच प्रकारचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. स्वतःला फकीर बाबा म्हणवून महिलांची फसवणूक करणाऱ्या एका भोंदू फकीराला पोलिसांनी अटक केली आहे. महिलांना त्यांच्या वैयक्तिक समस्या आणि दुःखावर उपाय सांगण्याच्या नावाखाली जाळ्यात ओढून त्यांना बेशुद्ध करून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप या आरोपीवर करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव इरफान नियाज अहमद (वय ३४) असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील बहराइच येथील रहिवासी आहे.मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईत वास्तव्यास होता. कांदिवली परिसरात स्वतःला फकीर बाबा म्हणून ओळख निर्माण करून लोकांचा विश्वास संपादन करत होता. विशेषतः महिलांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर धार्मिक विधी आणि उपचार करण्याचे आमिष दाखवत तो त्यांना फसवत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.कांदिवलीत राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्या पतीच्या मृत्यूबाबत अचूक माहिती सांगून तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर तिच्यावर काही दोष असल्याचे सांगत तो दोष दूर करण्यासाठी विशेष विधी करण्याची गरज असल्याचे सांगितले. या बहाण्याने आरोपीने त्या महिलेला आणि तिच्या दोन मुलींना एका ठिकाणी बोलावून धार्मिक विधी सुरू केला. या विधीदरम्यान तिघींनाही बेशुद्ध करण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे.https://prahaar.in/2026/04/20/uae-demands-compensation-from-us-for-war-costs-due-to-iran-war/बेशुद्ध अवस्थेचा फायदा घेत आरोपीने एका मुलीचा विनयभंग केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित महिलेनं तात्काळ कांदिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कलम ७४, ७८, १२३ तसेच ३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी इरफान नियाज अहमद याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणामागे आणखी काही पीडित महिला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून अधिक तपास सुरू आहे. आरोपीने अशा प्रकारे किती जणांना फसवले आहे, याचा शोध घेतला जात आहे.या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिक श्रद्धा आणि अंधविश्वासाचा गैरफायदा घेऊन महिलांची फसवणूक करणाऱ्या अशा भोंदूबाबांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून अशा प्रकारच्या व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, असेही सांगितले आहे.
Nida Khan : निदा खान TCS मधून निलंबित, अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी २७ एप्रिलला
नाशिक : कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी संशयित आरोपी निदा खानला टीसीएसने सेवेतून निलंबित केले आहे. पोलीस निदाला शोधत आहे. निदाच्या घरच्यांकडे तिचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर निदाने नाशिक सत्र न्यायालयात (नाशिक सेशन्स कोर्ट) अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. निदाच्या अर्जावर सत्र न्यायालयात सोमवारी २० एप्रिल रोजी सुनावणी झाली पण निर्णय झाला नाही. पुढील सुनावणी २७ एप्रिलच्या सोमवारी होणार आहे.न्यायालयात सुनावणी प्रलंबित असली तरी टीसीएसने निदा खानला सेवेतून निलंबित केले आहे आणि तिचे कंपनीशी संबंधित सर्व अॅक्सेस काढून घेतले आहेत. पोलिसांनी निदाचा शोध सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.सोमवारी २० एप्रिल रोजी झालेल्या सुनावणी निदाच्या वकिलाने आणि सरकारी वकिलाने आपापली बाजू मांडली तसेच युक्तिवादाचे आणखी मुद्दे मांडण्यासाठी वेळ मागितला. न्यायालयाने पुढील सुनावणी २७ एप्रिलच्या सोमवारी ठेवली आहे.निदा खान टीसीएसमध्ये प्रोसेस असोसिएट पदावर कार्यरत होती, तिला निलंबित करताना कंपनीने टीसीएसशी संबंधित असलेले तिचे सर्व अॅक्सेस काढून घेतले आहेत. कंपनीशी संबंधित ज्या वस्तू निदाकडे आहेत त्या सर्व तिच्याकडून परत मागण्यात आल्या आहेत. तसेच तिला पुढील आदेशापर्यंत कंपनीसाठी काम करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. हा निलंबनाचा आदेश टीसीएसच्या पुणे, नाशिक, गोवा ब्रँचचे एचआर प्रमुख शेखर कांबळे यांनी काढला आहे.टीसीएस नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी आतापर्यंत नऊ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. एक गुन्हा पुरुष कर्मचाऱ्याने तर आठ गुन्हे हे महिला कर्मचाऱ्यांनी नोंदवले आहेत. शारीरिक, मानसिक, बौद्धिक छळ तसेच विशिष्ट पदार्थ खाणे, विशिष्ट पोशाख करणे यासाठी वरिष्ठांनी दबाव टाकणे, धर्मांतराची सक्ती, अश्लील आणि आक्षेपार्ह वर्तन, अत्याचार अशा विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद टीसीएस प्रकरणी झाली आहे.
BCCI Two Teams Plan : वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका एकाच वेळी पार पडणार असल्याने, मंडळाने ३० ते ३५ खेळाडूंचा एक तगडा 'पूल' तयार केला आहे.
Kolhapur : कोल्हापूरमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणार
मुंबई : कोल्हापूर शहरातील राजोपाध्येनगर येथे आधुनिक मासळी बाजार उभारण्यासाठी आवश्यक मदत आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल. मासळी बाजाराची इमारत अर्थात फिश मार्केट बिल्डिंग उभारण्यासाठी आवश्यक प्रकिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात मत्स्य व्यवसायात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार अमल महाडिक, आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूरच्या मासळी बाजाराला मत्स्य व्यवसाय विभागाकडील अन्य योजनांचाही लाभ मिळवून देण्यासाठी काय करता येईल याची चाचपणी करण्याचे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी दिले.बैठकीत प्रस्तावित भव्य, आधुनिक इमारतीच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच विक्रेत्यांना सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे मार्केट उभारण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कामास गती देण्यासाठी लवकरात लवकर भूमिपूजन करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या.प्रस्तावित मार्केटमध्ये स्वच्छता, कोल्ड स्टोरेज, पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन आणि ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिक विक्रेत्यांना नियोजित बाजारपेठ मिळणार असून ग्राहकांनाही दर्जेदार सेवा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीनंतर गिरगाव चौपाटी येथे मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या समस्यांसंदर्भात बैठक झाली. या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि मत्स्यव्यवसाय विभागाने एकत्रित बैठक घ्यावी आणि प्रश्न सोडवावे अशी सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिली.
Vasai : वसईत मत्स्य प्रशिक्षण केंद्रासाठी जागा निश्चिती करण्याचे मंत्री नितेश राणेंचे निर्देश
मुंबई : पालघर जिल्ह्यातील वसई येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जागा निश्चित करावी. या केंद्रासाठी आवश्यक जागा मागणीचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवावावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.पालघर जिल्ह्यातील वसई येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे या विषयी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस आमदार स्नेहा दुबे, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आदी उपस्थित होते.वसईतील केंद्रामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील यासाठी प्रकल्पाची अंमलबजावणी लवकर होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना ही एक महत्त्वाची योजना असून या योजनेच्या जनजागृतीसाठी शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त लाभार्थी पर्यंत ही योजना पोचवावी, अशा सूचना ही मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. यानंतर मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीत कोळी समाजाच्या विविध मागण्या संदर्भात मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश गाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीस पर्यटन विभागाचे सचिव संजय खंदारेही उपस्थित होते. बैठकीत मच्छी सुकविण्यासाठी जागा, जाळी व बोटी दुरुस्ती केंद्रे, कोळी खेड्यांचा विकास तसेच पर्यटनाला चालना देणारे प्रकल्प यावर चर्चा झाली. यावेळी 'बॅक वॉटर' प्रकल्पाच्या माध्यमातून आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पर्यटन विभाग व मत्स्य व्यवसाय विभागाकडे प्रस्ताव सादर करावा. याबाबत जिल्हाधिकारी रायगड यांनी सर्व संबंधितांची बैठक घ्यावी असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. मच्छीमार संस्थांना मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहिती देण्यात यावी. त्यासाठी शिबिरांचेही आयोजन करण्यात यावे अशा सूचनाही मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांनी दिल्या.
Nashik TCS Case : निदा खानच्या अडचणीत वाढ ! अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार
नाशिक येथील टीसीएस कंपनीमध्ये (Nashik TCS Case) घडलेल्या लैंगिक छळ आणि धार्मिक सक्तीच्या प्रकरणात आरोपी असलेल्या निदा खानला स्थानिक न्यायालयाने सोमवारी अटकेपासून कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला.
IPS Tushar Doshi : साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी मोठा गदारोळ झाला होता. या गोंधळात साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला होता.
Transfers of IPS Officer : पुण्यातील 2 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बदली
राज्यातील पोलिस प्रशासनात महत्त्वाच्या बदल्या (Transfers of IPS Officer) जाहीर करण्यात आल्या असून, पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांची सातारा जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Blessing Muzarabani Statement : पीएसएल (PSL) सोडून आयपीएलला पसंती दिल्याने संतापलेल्या पीसीबीने मुजरबानीवर २ वर्षांची बंदी घातली आहे, ज्याला आता मुजरबानीच्या एजंटने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
BJP : भाजपा युवा मोर्चाची युवा शक्ती जागर यात्रा
मुंबई : राज्यातील युवावर्गासह शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या युवक - युवतींशी संवाद साधण्यासाठी 21 एप्रिलपासून राज्यव्यापी युवा शक्ती जागर यात्रेचा प्रारंभ होत असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी घोषित केले. या यात्रेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महाडिक बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम प्रमुख गोविंद येतयेकर, सहमाध्यम प्रमुख ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते.युवा शक्ती जागर यात्रेसंदर्भात माहिती देताना महाडिक म्हणाले, दीड महिन्यापूर्वी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राज्यातील सर्व मंत्री, आमदार, केंद्रातील मंत्र्यांची भेटी घेतल्या. त्याचप्रमाणे दिल्ली विद्यापीठासह अनेक ठिकाणच्या विद्यार्थी आघाड्यांना आमंत्रण दिले. युवा मोर्चाच्या माध्यमातून युवा पिढी जोडण्यासाठी आपल्याला फार मोठी संधी असल्याचे लक्षात आल्याने युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि भाजपा नेत्यांनी परिश्रम घेऊन या राज्यव्यापी युवा शक्ती जागर यात्रेची आखणी केल्याची माहिती महाडिक यांनी दिली.युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांना भेटतो तेव्हा मला त्यांच्यात उत्साह आणि उर्जा पाहायला मिळत असल्याने या दौऱ्याचे नाव युवा शक्ती जागर यात्रा ठेवले. या संपूर्ण दौऱ्याचे नियोजन विचारपूर्वक केले आहे. त्यात केवळ पदाधिकाऱ्यांना भेटणार नसून शेतकरी, महिलांशी चर्चा करणार आहोत. विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या युवक युवतींना भेटणार आहोत. या सर्व लोकांच्या समस्या जाणून घेत आम्हाला विद्यार्थी, युवा आणि सरकारमधला सेतू व्हायचे आहे. पुढील एक वर्षात संपूर्ण राज्यातील एक लाख युवकयुवतींना या माध्यमातून युवा मोर्चा आणि पक्षाशी जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे महाडिक यांनी सांगितले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात नवी मुंबई, पनवेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असा संपूर्ण कोकण पट्टा पूर्ण केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
भारत आणि दक्षिण कोरिया यांनी त्यांच्या व्यापक आर्थिक भागीदारी कराराला (सीईपीए) अद्ययावत करण्यासाठी चर्चा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. जागतिक स्तरावर वाढत्या भूराजकीय तणाव आणि व्यापारातील अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या आर्थिक सहकार्याला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांच्यात सोमवारी हैदराबाद हाऊसमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक सामंजस्य करार (एमओयू) आणि इतर महत्त्वपूर्ण करारांची देवाणघेवाण करण्यात आली.हैदराबाद हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “चिप्सपासून जहाजांपर्यंत, कौशल्यापासून तंत्रज्ञानापर्यंत, मनोरंजनापासून ऊर्जेपर्यंत—भारत आणि कोरिया मिळून सहकार्याच्या नव्या संधी साकार करतील.” त्यांनी या भेटीला द्विपक्षीय संबंधांसाठी “महत्त्वपूर्ण टप्पा” असे संबोधत सांगितले की दोन्ही देश आपली भागीदारी “भविष्योन्मुख” दिशेने पुढे नेत आहेत.https://prahaar.in/2026/04/20/share-market-stock-market-plunges-investors-lose-rs-19000-crore-in-a-single-day/पंतप्रधानांनी सांगितले की भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील द्विपक्षीय व्यापार सध्या सुमारे 27 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे आणि 2030 पर्यंत तो 50 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दोन्ही देशांनी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यावर सहमती दर्शवली असून त्यामध्ये “भारत-कोरिया वित्तीय मंच” स्थापन करण्याचाही समावेश आहे.डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी “इंडिया-कोरिया डिजिटल ब्रिज” ही पुढाकार योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि माहिती तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांत संयुक्त प्रयत्न केले जाणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंधांचा उल्लेख करत सांगितले की भारत आणि कोरिया यांच्यात हजारो वर्षांपासून ऐतिहासिक संबंध आहेत. त्यांनी अयोध्येची राजकुमारी सूरीरत्ना आणि कोरियाचे राजा किम-सुरो यांची कथा सांगत ती सामायिक सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असल्याचे नमूद केले. त्यांनी असेही सांगितले की भारतात कोरियन पॉप संस्कृती आणि मालिका यांची लोकप्रियता वाढत आहे, तर कोरियामध्ये भारतीय चित्रपट आणि संस्कृतीबद्दल आकर्षण वाढत आहे. दोन्ही देशांनी 2028 मध्ये “भारत-कोरिया मैत्री महोत्सव” आयोजित करण्याची घोषणा केली असून यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक वाढीस लागेल.https://prahaar.in/2026/04/20/uae-demands-compensation-from-us-for-war-costs-due-to-iran-war/जागतिक मुद्द्यांवर चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की सध्याच्या काळात जागतिक शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की भारत आणि कोरिया इंडो-पॅसिफिक प्रदेशात समान दृष्टिकोन ठेवतात आणि प्रादेशिक शांतता, स्थैर्य तसेच सर्वसमावेशक विकासासाठी एकत्रितपणे कार्य करतील.या प्रसंगी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांनी सांगितले की दोन्ही देशांचे उद्दिष्ट 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 50 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे आहे. त्यांनी असेही नमूद केले की दोन्ही नेत्यांनी मध्य पूर्वेतील परिस्थितीवर चर्चा केली आणि तेथे शांतता व स्थैर्य पुनर्स्थापित करणे जागतिक अर्थव्यवस्था आणि सुरक्षेसाठी अत्यावश्यक असल्याचे मान्य केले. राष्ट्राध्यक्ष ली यांनी माहिती दिली की दोन्ही देशांदरम्यान इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणाली जोडण्यासाठी करार करण्यात आला असून यामुळे दोन्ही देशांतील नागरिकांना एकमेकांच्या देशात प्रवास करताना स्थानिक क्यूआर कोडद्वारे पेमेंट करता येईल.दोन्ही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय मंचांवर सहकार्य वाढवण्यावर आणि जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याच्या गरजेवरही भर दिला. बदलत्या जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी समन्वित प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
Kolhapur : भिंत कोसळून प्राध्यापिकेसह विद्यार्थिनीचा अंत
Kolhapur : ४५ वर्षीय प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार आणि सहावीत शिकणारी १४ वर्षीय विद्यार्थिनी वैष्णवी तुकाराम भोसले यांच्या अंगावर अचानक भिंतीचा मोठा भाग आणि मातीचा ढिगारा कोसळला.
Pune Crime : लोणीकाळभोर परिसरात दहशत माजविणाऱ्या दोघांना अटक
लोणीकाळभोर परिसरातील माईल्सस्टोन हॉटेलजवळ दहशत माजवणाऱ्या दोन सराईत आरोपींना खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर (Pune Crime) यांनी धाडसी कारवाई करत शस्त्रांसह अटक केली आहे.
Maharashtra Politics : कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी आपण मूळचे भाजपचे असल्याचे सांगत शिवसेनेतील प्रवेशावर मोठे विधान केले आहे.
Share Market : शेअर बाजारात दाणादाण; गुंतवणूकदारांचे एका दिवसात १९ हजार कोटींचे नुकसान
अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीच्या पार्श्वभूमीवर, देशांतर्गत शेअर बाजारात दिवसभर सतत चढ-उतार दिसून आले. व्यवहारांची सुरुवात वाढीने झाली. बाजार उघडल्यानंतर तेजीवाले आणि मंदीवाले यांच्यात रस्सीखेच सुरू झाली, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये चढ-उतार झाले. दिवसअखेरीस, सेन्सेक्स ०.०३ टक्क्यांच्या आणि निफ्टी ०.०५ टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह बंद झाला.ऑटोमोबाइल आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये स्थिर खरेदी सुरू राहिली. त्याचप्रमाणे, भांडवली वस्तू, टिकाऊ ग्राहक वस्तू, तेल आणि वायू, आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम निर्देशांकही वाढीसह बंद झाले. दरम्यान, आयटी, रिअल्टी आणि टेलिकॉम शेअर्सवर विक्रीचा दबाव कायम होता. त्याचप्रमाणे, एफएमसीजी, आरोग्यसेवा, धातू आणि तंत्रज्ञान निर्देशांकही घसरणीसह बंद झाले. आज व्यापक बाजारात विक्रीचा दबाव कायम राहिल्याने, निफ्टी मिडकॅप निर्देशांकात सामान्य घसरण झाली आणि तो ०.१८ टक्क्यांनी खाली बंद झाला. त्याचप्रमाणे, स्मॉलकॅप निर्देशांक ०.४५ टक्क्यांनी खाली येऊन बंद झाला.आज शेअर बाजारात माफक वाढ होऊनही, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समधील विक्रीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत अंदाजे २०,००० कोटी रुपयांची घट झाली. आजच्या व्यवहारानंतर बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४६५.४५ लाख कोटी रुपयांपर्यंत (तात्पुरते) घसरले. गेल्या आठवड्यातील शेवटचा व्यवहार दिवस असलेल्या शुक्रवारी, त्यांचे बाजार भांडवल ४६५.६४ लाख कोटी रुपये होते. परिणामी, आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना अंदाजे १९ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले.https://prahaar.in/2026/04/20/uae-demands-compensation-from-us-for-war-costs-due-to-iran-war/दिवसभरातील व्यवहारादरम्यान, बीएसईवर ४,५७८ शेअर्सचा सक्रियपणे व्यापार झाला. यापैकी १,८४० शेअर्स वाढीसह बंद झाले, २,५४८ शेअर्समध्ये घट झाली आणि १९० शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. आज एनएसईवर सक्रिय व्यवहार झाले, ज्यात २,९७८ शेअर्समध्ये वाढ झाली. यापैकी १,१२३ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर १,८५५ शेअर्स घसरणीसह बंद झाले. त्याचप्रमाणे, सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी १२ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर १८ शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २३ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर २७ शेअर्स घसरणीसह बंद झाले.बीएसई सेन्सेक्स १३९.३६ अंकांच्या वाढीसह ७८,६३२.९० अंकांवर उघडला.व्यवहार सुरू होताच, खरेदीदार आणि विक्रेत्यांमध्ये जोरदार लढाई सुरू झाली. खरेदीच्या जोरावर सेन्सेक्स ४४८.९१ अंकांनी वाढून ७८,९४२.४५ अंकांवर पोहोचला. विक्रीच्या दबावामुळे २९०.२४ अंकांची घसरण झाली, ज्यामुळे तो ७८,२०३.३० अंकांवर पोहोचला. दिवसभराच्या व्यवहारानंतर, सेन्सेक्स २६.७६ अंकांच्या किरकोळ वाढीसह ७८,५२०.३० अंकांवर बंद झाला.https://prahaar.in/2026/04/20/iran-america-war-did-america-seize-an-iranian-cargo-ship/सेन्सेक्सप्रमाणेच, एनएसई निफ्टीने ३७.९५ अंकांच्या वाढीसह २४,३९१.५० अंकांवर दिवसाची सुरुवात केली. बाजार उघडल्यानंतर लगेचच तेजीवाले आणि मंदीवाले यांच्यात रस्सीखेच सुरू झाली, ज्यामुळे निफ्टीमध्ये चढ-उतार झाला. खरेदीच्या पाठिंब्याने, निफ्टी १२७.१० अंकांनी वाढून २४,४८०.६५ अंकांवर पोहोचला. विक्रीच्या दबावामुळे ११२.३० अंकांची घसरण होऊन तो २४,२४१.२५ अंकांवर पोहोचला. दिवसभराच्या व्यवहारानंतर, निफ्टी ११.३० अंकांच्या किरकोळ वाढीसह २४,३६४.८५ अंकांवर बंद झाला.दिवसभरातील खरेदी-विक्रीनंतर, शेअर बाजारातील मोठ्या शेअर्सपैकी, ट्रेंट लिमिटेड (३.२९ टक्के वाढ), जेएसडब्ल्यू स्टील (२.७६ टक्के वाढ), स्टेट बँक ऑफ इंडिया (२.५५ टक्के वाढ), एशियन पेंट्स (२.१४ टक्के वाढ) आणि ग्रासिम इंडस्ट्रीज (१.४६ टक्के वाढ) यांचा आजच्या टॉप ५ सर्वाधिक वाढ झालेल्या शेअर्सच्या यादीत समावेश होता. दुसरीकडे, जिओ फायनान्शियल (२.७५ टक्के घट), हिंडाल्को इंडस्ट्रीज (२.२९ टक्के घट), टीएमपीव्ही (१.२२ टक्के घट), कोटक महिंद्रा (१.१५ टक्के घट) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स (१.१२ टक्के घट) यांचा आजच्या टॉप ५ सर्वाधिक घसरण झालेल्या शेअर्सच्या यादीत समावेश होता.
Chandrashekhar Bawankule: यापूर्वी शेतजमिनीच्या वाटणीचा दस्त तयार करताना जमिनीच्या एकूण बाजारमूल्याच्या १ टक्का इतके नोंदणी शुल्क आकारले जात होते. ही रक्कम मोठी असल्याने अनेक शेतकरी अधिकृत दस्तनोंदणी करणे टाळत असत.
Chris Gayle Team : वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल याने युरोपियन टी-२० प्रीमियर लीगमध्ये या संघाचा सह-मालक म्हणून क्रिकेटच्या मैदानातून आता 'बिझनेस'च्या मैदानात एन्ट्री घेतली आहे.
Umar Khalid : उमर खालिदला सर्वोच्च न्यायालयाचा दणका! ‘ती’याचिका फेटाळली
२०२० मधील दिल्ली दंगल कटाप्रकरणी अटकेत असलेला कार्यकर्ता उमर खालिद (Umar Khalid) याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.
Strait of Hormuz: 48 तासांत दोन भारतीय जहाजांवर इराणकडून गोळीबार; हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास कठीण
Strait of Hormuz: या हल्ल्यामुळे ही दोन्ही जहाजे मार्ग सोडून पुन्हा इराणच्या आखातात (पर्शियन गल्फ) परतली आहेत.
El Nino : 'एल निनो’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘टास्क फोर्स’
मुंबई : यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ‘एल निनो’चा प्रभाव वाढण्याची शक्यता असून पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या संभाव्य नैसर्गिक आपत्तीचे सौम्यीकरण करण्यासाठी सर्व विभागांनी तत्काळ पूर्वतयारी आणि प्रभावी अंमलबजावणी करावी. विशेषतः पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन यावर भर द्यावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.राज्यातील संभाव्य एल निनोच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आशिष जयस्वाल यांच्यासह विविध विभागांचे सचिव आणि हवामान विभागाचे तज्ज्ञ उपस्थित होते. पावसातील संभाव्य घट लक्षात घेता पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी, सिंचन विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. केवळ चालू वर्षाचा नव्हे, तर पुढील उन्हाळ्याचाही विचार करून आतापासूनच पाणी साठवणुकीचे नियोजन करावे, असेही त्यांनी अधोरेखित केले.कमी पावसात पिके वाचवण्यासाठी संरक्षित सिंचन हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे ‘जलयुक्त शिवार’ आणि ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ या योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जुन्या जलस्त्रोतांच्या दुरुस्तीवर भर दिल्यास कमी खर्चात जास्त पाणी साठा उपलब्ध होईल. या कामांसाठी वित्त विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.वैरण विकासासाठी बॅक वॉटरचा वापर : पशुधनासाठी चारा टंचाई भासू नये म्हणून बाहेरील राज्यांवर अवलंबून न राहता राज्यातच वैरण विकास कार्यक्रम राबवावा. विशेषतः धरणांच्या बॅक वॉटर क्षेत्रात चारा लागवडीवर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोलापूर, सांगली आणि मराठवाडा या भागांकडे चारा उपलब्धतेसाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.खत वितरणावर ‘एआय’ची नजर : खते आणि बियाण्यांची कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी ‘अॅग्रीस्टॅक’ प्रणालीचा वापर केला जाणार आहे. खत वितरणामध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि तपासणी यंत्रणा मजबूत करण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला.

29 C