राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची अशी झाली निवड
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनस महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची गुरुवारी एकमताने निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला. उपस्थित सर्व नेत्यांनी हात उंचावून आणि टाळ्यांच्या कडकडाटात या प्रस्तावाला संमती दिली.मुंबईत पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, पार्थ पवार यांच्यासह देशभरातील पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना प्रफुल्ल पटेल भावूक झाले. ते म्हणाले, अजितदादा वेगळ्या मातीचे बनले होते. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आणि पक्षाला राष्ट्रीय ओळख मिळवून दिली. २८ जानेवारीचा तो दिवस आपल्या सर्वांसाठी धक्कादायक होता. दादा आपल्यातून निघून गेले, पण त्यांनी शिकवलेला लढा आणि त्यांचा निश्चय आपल्याला पुढे न्यायचा आहे. आता सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली हा पक्ष अधिक जोमाने काम करेल, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.मागच्या काही दिवसांत पक्षांतर्गत घडामोडींवरून टीका करणाऱ्यांनाही पटेल यांनी प्रत्युत्तर दिले. काही लोक पोटात एक आणि ओठात एक ठेवून बोलत होते. मात्र, आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करून आम्ही आमची दिशा स्पष्ट केली होती. आता त्या पक्षाच्या सर्वोच्च पदी विराजमान झाल्या आहेत, असे पटेल म्हणाले.https://prahaar.in/2026/02/26/sunetra-pawar-elected-as-ncp-president-by-voice-vote/बैठकीत काय घडले?प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. सर्व प्रांतांतील प्रतिनिधींनी त्याला पाठिंबा दिला. या बैठकीत पार्थ पवार यांच्याकडेही लवकरच मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष आता नव्या जोमाने कामाला लागणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.अजितदादांनी माझ्यावर विश्वास टाकून मला कार्याध्यक्ष केले होते. आज त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. सुनेत्रा पवार या सक्षमपणे ही जबाबदारी पेलतील. - प्रफुल्ल पटेल, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
मुंबई : प्रलोभने दाखवून किंवा बळजबरीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. राज्यात लवकरच ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करण्याचे संकेत गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी गुरुवारी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना दिले.धर्मांतराच्या तक्रारींची दखल घेत सरकार यासंदर्भातील कायद्याचा मसुदा आणि अंमलबजावणीबाबत गांभीर्याने विचार करत आहे. कोणाचेही नुकसान करण्याचा आमचा हेतू नाही, मात्र कायद्याचा धाक असणे आवश्यक आहे, असे भोयर म्हणाले. राज्यातील मदरशांमध्ये चालणाऱ्या उपक्रमांबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. मदरशांमधील कामाची आणि तिथे घडणाऱ्या प्रकारांची सखोल पडताळणी केली जाईल. त्यानंतर पुढील योग्य तो कायदेशीर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका मदरशात दोन लहान मुलांना अमानुष मारहाण होत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळण्याचे आदेश सिंधुदुर्ग पोलिसांना देण्यात आले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.ऑर्केस्ट्रा बारचा परवाना जप्त करणारराज्यात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालणाऱ्या अवैध धंद्यांवर सरकारने चाप बसवण्याचे ठरवले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारचा परवाना पहिल्यांदा काही दिवसांसाठी निलंबित केला जाईल. मात्र, वारंवार नियमांची पायमल्ली होत असल्याचे आढळल्यास, संबंधित बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा भोयर यांनी दिला.मंत्रालय हे अन्यायाचे केंद्र नाहीमराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्रालयाबाबत केलेल्या विधानांचाही पंकज भोयर यांनी समाचार घेतला. मंत्रालय हे कोणाच्या विरोधात कट रचण्याचे ठिकाण नसून सर्वसामान्यांना न्याय देणारे केंद्र आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी मंत्रालयाविषयी चुकीची विधाने करणे टाळावे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
पिंट्या’ फेम रोहन गुजर होणार बाबा; आठ वर्षांनंतर आयुष्यातआला आनंद
मुंबई : 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पिंट्या म्हणजेच अभिनेता रोहन गुजर लवकरच बाबा होण्याचा आनंद अनुभवणार आहे. लग्नानंतर तब्बल आठ वर्षांनी त्याच्या कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची गोड बातमी त्याने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या खास क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.डोहाळे जेवणाचा सोहळारोहनची पत्नी स्नेहल हिच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. स्नेहलने पारंपरिक साडी आणि फुलांचे दागिने परिधान केले होते, तर रोहनने देखील समारंभाला साजेसा पोशाख केला होता. कुटुंबीय आणि जिवलग मित्रांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला.सोशल मीडियावरून दिली खुशखबरअभिनेत्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर व्हिडिओ शेअर करत या विशेष क्षणाबद्दल भावना व्यक्त केल्या. “हा दिवस आणखी खास बनवणाऱ्या सगळ्यांचे आभार,” असे कॅप्शन देत त्याने चाहत्यांचे प्रेम स्वीकारले. पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.रोहन आणि स्नेहल यांनी २०१७ मध्ये विवाह केला होता. कोरोनाकाळात स्नेहलने आरोग्याशी संबंधित गंभीर लढा दिला होता. त्या कठीण काळात रोहन तिच्यासोबत ठामपणे उभा राहिला. आता या नव्या टप्प्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट उगवली आहे.कारकिर्दीचा प्रवासरोहनने 'होणार सून मी या घरची' या मालिकेत साकारलेल्या पिंट्याच्या भूमिकेमुळे लोकप्रियता मिळवली. नंतर लव्ह लग्न लोचा, सांग तू आहेस ना, नवी जन्मेन मी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं . एकांकिकेपासून मालिका, चित्रपट असा प्रवास करणारा अभिनेता रोहन गुजर 'आमने सामने' नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत उत्पन्नाचा कायमस्वरूपी स्रोत निर्माण करून तोट्याकडून नफ्याकडे वळावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. तसेच कंपनीने आपल्या कारभारात ' कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.विधानभवनात आयोजित महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या बैठकीत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, ऊर्जा विभागाने एमएसईबी सोलर अॅग्रो पॉवर लिमिटेड कंपनी निर्माण केली आहे. नवीन कंपनीमुळे कृषी क्षेत्राच्या दायित्वापोटी सध्या तोट्यात असलेल्या महावितरण कंपनीचे विभाजन झाल्यामुळे कंपनी नफ्यात आलेली दिसेल. या कंपनीचे कार्यान्वयन सुरू करण्याची सूचनाही त्यांनी दिली.कृषी क्षेत्राच्या राज्य शासनाच्या हमीची रक्कम कंपनीला येणाऱ्या वित्त आयोगाच्या निधीतून देण्यात यावी. नवीन सोलर ॲग्रो पावर लिमिटेड कंपनीला ठराविक मर्यादेपर्यंत आणि कालावधीसाठी शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येईल. त्यानंतर कंपनीला स्वतःच्या उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करावे लागतील. जेणेकरून भविष्यात शासनाकडे निधी मागणीची वेळ येणार नाही, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.फायदा काय होणार?- भांडवली बाजारात कंपनीने ' आयपीओ' च्या माध्यमातून प्रवेश केल्यास मोठ्या प्रमाणावर समभाग धारकांकडून गुंतवणूक होऊन कंपनीसाठी निधी उपलब्ध करता येईल. सध्या कंपनीची ७६ हजार १८९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये ५९ हजार ५२७ कोटी रुपये कृषी क्षेत्राशी सबंधित आहेत. कंपनीला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आर्थिक पुनर्रचनेची गरज आहे.- शासनाकडून हमी स्वरूपात असलेल्या ३२ हजार ६७९ कोटी देण्याबाबत टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात यावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. भारत सरकारच्या प्रस्तावित योजनेनुसार राज्य शासन जीएसडीपीच्या (सकल राज्य देशांतर्गत उत्पादन) ०.५ टक्के रक्कम महावितरणला मिळण्यासाठी प्रयत्न करावे.- प्रस्तावित पुनर्रचना योजनेच्या अंमलबजावणीनंतर निधी मागण्याची आवश्यकता राहणार नसल्याने शासनाची बचत होणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून कार्यवाही पूर्ण करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात महिलेच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना नेवासे पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत जेरबंद केले आहे. ही चोरी सुकळी (ता. नेवासे) गावाजवळील चारोटी पाट (पाटाच्याकडेला) येथे घडली होती.
IND vs ZIM : संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीने ४८ धावांची सलामी देत या स्पर्धेतील भारताची सर्वात मोठी ओपनिंग पार्टनरशिप नोंदवली आहे.
Anil Ambani : अनिल अंबानी ईडीसमोर हजर; मनी लॉंड्रिंग प्रकरणी दुसऱ्यांदा चौकशी
रिलायन्स ग्रुपचे माजी अध्यक्ष अनिल अंबानी हे आज दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले.
मुंबई : मनोरंजन क्षेत्रातील सर्वांची आवडती जोडी आणि चाहते ज्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते असे दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मीका मंदाना अखेर विवाह बंधनात अडकले आहेतआज २६ फेब्रुवारी २०२६ ला राजस्थानच्या उदयपूरमध्ये दोघांनी आयटीसी मेमेंटोज येथे लग्नगाठ बांधली. विवाह सोहळा हा दोघांच्या रितीरिवाजने संपन्न झाला आहे. सकाळी पारंपरिक तेलगू पद्धतीने तर संध्याकाळी रश्मिकाचा कोडवा पद्धतीने करण्यात आला. लग्न अगदीच जवळच्या मोजक्या पाहुण्यांच्या उपस्तिथीत पार पडले. अत्यंत साध्या आणि पारंपरिक पद्धतीने, शांततेत विवाह सोहळा संपन्न झाला.
सरकारी पदांवर भरतीसाठी दबाव वाढत असताना आणि निषेध तीव्र होत असताना, राज्य सरकार जवळजवळ ६०,००० रिक्त जागा भरण्याची योजना आखत (Protest of Unemployed People) आहे आणि नेमकी संख्या अंतिम करण्यासाठी विविध विभागांसोबत काम करत आहे.
NCERTच्या पुस्तकात “न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार”धडा; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय
NCERT: दरम्यान, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने सदर पाठ्यपुस्तकाच्या पुढील मुद्रण, प्रकाशन तसेच डिजिटल प्रसारावर संपूर्ण बंदी घातली आहे.
Rajya Sabha elections : महाराष्ट्र विधानसभेतील पक्षबळाच्या आधारे भाजप चार उमेदवार निवडून आणू शकतो, तर मित्रपक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (राकाँप) प्रत्येकी एक जागा मिळवू शकतो.
SA vs WI : दक्षिण आफ्रिकेच्या या विजयाचा मोठा फायदा भारतीय संघाला झाला असून, भारतासाठी आता सेमीफायनलची समीकरणे सोपी झाली आहेत.
Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही'ट्रेन
मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी जाण्याच्या धावपळीत असतो. पण यात पंचाईत होते ते तिकीट आरक्षणाची, आयत्या वेळी अनेकांना आरक्षण मिळतच नाही आणि ट्रेनमध्ये गर्दीही असते.कोकणात सणासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिव्याहुन चिपळूणपर्यंत कोकण रेल्वे मार्गावर मेमू ट्रेन चालवली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणतंही तिकीट बुक न करता थेट ट्रेनने प्रवास करू शकता. मेमु स्पेशल ट्रेन १ मार्च ते ८ मार्च २०२६ पर्यन्त दोन्ही मार्गांवर धावणार आहे.मेमु ट्रेनचे थांबेही ट्रेन दिवा, निळजे, तळोजे, कळंबोली, पनवेल, सोमठाणे, आपटा, जिते, कासू, नागोथाने, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगांव, गोरेगांव रोड, वीर, सापे वामने, करंजडी, विन्हेरे, दीवानखावटी, कलंबनी बुद्रुक, खेड़, अंजनी आणि चिपळूनसारख्या अनेक स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे. या ट्रेनमध्ये राखीव जागा नसल्यामुळे कोकणात जाणाऱ्या नागरिकांना प्रवास करणं सोपं होईल. यादरम्यान रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि मडगाव जंक्शनदरम्यान स्पेशन ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस ट्रेन नंबर ०१००४ मडगाव जंक्शनहून लोकमान्य टिळक टर्मिनससाठी सायंकाळी ४.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन १ ते ८ मार्चपर्यंत सुरू असेल. याशिवाय ट्रेन नंबर ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव जंक्शनदरम्यान एक स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येईल. ही ट्रेन २ मार्च ते ८ मार्चपर्यंत दररोज सकाळी ८.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.
दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय
अहमदाबाद : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ अंतर्गत सुपर ८ फेरीचा सामना दक्षिण आफ्रिकेने नऊ विकेट राखून जिंकला. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचे सेमी फायनलच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल पडले आहे. वेस्ट इंडिजच्या सेमी फायनल खेळण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत. भारताची सेमी फायनल खेळण्याची आशा जिवंत राहिली आहे.सुपर ८ मध्ये सुरुवातीला झिम्बाब्वे विरुद्धचा सामना १०७ धावांनी तर दक्षिण आफ्रिकेने भारताविरूद्धचा सामना ७६ धावांनी जिंकला आहे. यामुळे वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला तरच भारताची सेमी फायनल खेळण्याची आशा जिवंत राहणार होती. आता टीम इंडियाला झिम्बाब्वे विरुद्धचा सामना जिंकल्यास रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवत सेमी फायनल गाठणे शक्य होणार आहे.वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने २० षटकांत आठ बाद १७६ धावा केल्या तर दक्षिण आफ्रिकेने १६.१ षटकांत एक बाद १७७ धावा करून सामना ९ विकेट राखून आरामात जिंकला. दक्षिण आफ्रिकेने २३ चेंडू आणि ९ विकेट राखून वेस्ट इंडिज विरुद्ध विजय मिळवला. या विजयामुळे सुपर ८ फेरीत चार गुण आणि दोन विजयांसह दक्षिण ग्रुप एकमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्यांची धावगती +२,८९० आहे. भारताने झिम्बाब्वे विरुद्धचा सामना जिंकल्यास दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी पात्र होणार आहे.दक्षिण आफ्रिकेने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन वेस्ट इंडिजला २०० चा टप्पा ओलांडू दिला नाही. कागिसो रबाडा आणि लुंगी न्गिडीने वेस्ट इंडिजला हुशारीने सापळ्यात अडकवले. याउलट वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला आळा घालणे जमले नाही. दक्षिण आफ्रिकेने सर्वांगीण खेळ कायम राखत टी२० वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजवर ९ विकेटनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनल फेरीतले स्थान जवळपास पक्कं केलं आहे.गुरुवारी वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने एकच विकेट गमावत १६.१ षटकात पूर्ण केला. दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार एडेन मार्करमने अर्धशतकी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून मार्करम आणि क्विंटन डी कॉक यांनी आक्रमक सुरुवात केली होती. डी कॉकने स्फोटक फलंदाजी करताना मार्करमसोबत पहिल्या विकेटसाठी ८ षटकातच ९५ धावांची भागीदारी केली. ८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डी कॉकला रोस्टन चेसने जेसन होल्डरच्या हातून झेलबाद केले. डी कॉकने २४ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ४७ धावांची खेळी केली. त्यानंतरही रायन रिकल्टनने कर्णधाराची दमदार साथ देत संघाला विजयापर्यंत पोहचवले. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना विकेट्स पटकावणं आणि धावा रोखणं या दोन्ही आघाड्यांवर अपयश आलं. एडन मारक्रमलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र त्यांच्या गोलंदाजांनी अत्यंत शिस्तबद्ध मारा करत वेस्ट इंडिजच्या ताकदवान फटकेबाजांना रोखलं. कर्णधार शे होपने चांगली सुरुवात केली होती. मात्र कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना सापळ्यात रचलं. शिमोरन हेटमायरला पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले. मात्र तो त्याच षटकात तंबूत परतला.टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीतील अत्यंत महत्त्वाच्या लढतीत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी आपल्या जिद्दीचे दर्शन घडवले. दक्षिण आफ्रिकेच्या भेदक माऱ्यामुळे ७१ धावांवर ६ गडी गमावलेल्या वेस्ट इंडिजने जेसन होल्डर आणि रोमॅरियो शेफर्ड यांच्या ‘रेस्क्यू ऑपरेशन’च्या जोरावर २० षटकांत ८ बाद १७६ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली.नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात एखाद्या दुस्वप्नासारखी झाली. सलामीवीर शाई होप (१६) आणि आक्रमक ब्रँडन किंग (२१) स्वस्तात बाद झाले. पाठोपाठ शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल आणि रोस्टन चेस हे तंबूत परतल्याने विंडीजचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळणार असे वाटत होते. आफ्रिकेच्या लुंगी एनगिडी आणि कागिसो रबाडा यांनी विंडीजच्या फलंदाजीला खिंडार पाडले होते.जेव्हा विंडीजची अवस्था ६ बाद ७१ अशी बिकट होती, तेव्हा अनुभवी जेसन होल्डर मैदानात उतरला. त्याने केवळ बचाव न करता आफ्रिकेच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. होल्डरने ३१ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला रोमॅरियो शेफर्डने मोलाची साथ दिली. शेफर्डने २३ चेंडूत नाबाद ३७ धावा फटकावत धावगती वाढवली. या दोघांनी आठव्या गड्यासाठी अवघ्या ५७ चेंडूत ८९ धावांची ऐतिहासिक भागीदारी करत सामन्याचे चित्र पालटले.
Yashwant Varma : न्या. वर्मांवरील चौकशी समितीची पुनर्रचना; ‘एवढ्या’महिन्यांची दिली मुदतवाढ
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा (Yashwant Varma) यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या तीन सदस्यीय समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.
‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत.
Mayor Ritu Tawde: दरम्यान, या प्रकरणावर महापौर रितू तावडे यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या एकमेव जागेवरून घटक पक्षांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
Teacher died in road accident: ट्रॅक्टरच्या धडकेत शिक्षिकेचा जागीच मृत्यू; सहा वर्षांचा मुलगा गंभीर
Teacher died in road accident: पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ट्रॅक्टर जप्त केला आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. स्थानिक रहिवाशांनी त्या वळणावर तातडीने दिशादर्शक फलक लावण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
City Name Change : केरळनंतर आता ‘या’शहराचे नाव बदलणार? थेट अमित शहांकडे केली मागणी
केंद्र सरकारने दक्षिण भारतातील केरळ राज्याचे अधिकृत नाव 'केरळ' वरून 'केरळम' असे बदलण्याच्या (City Name Change) प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव स्वतः केरळ राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला होता.
Aprilia Tuono bike : स्ट्रीटवरचा राजा, पॉवरचा बादशहा.! ‘Aprilia Tuono 457’ची किंमत आणि फीचर्स पाहाच…
ही बाईक केवळ वेगासाठीच नाही तर दररोजची राइडिंग रोमांचक बनवण्यासाठी देखील डिझाइन केलेली आहे.
WI vs SA : या जोडीने आठव्या विकेटसाठी ८९ धावांची विश्वविक्रमी भागीदारी करत वेस्ट इंडिजचा डाव सावरला आणि संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली.
Devendra Fadanvis : विरोधी पक्ष हा गोंधळलेल्या अवस्थेत; देवेंद्र फडणवीस यांची टीका
दावोसमध्ये भारतीय कंपन्यांसोबत सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यावरून झालेल्या टीकेचे खंडन करत, आर्थिक जगात प्रासंगिक राहण्यासाठी उपस्थिती आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी म्हटले आहे.
दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार
मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. दहिसर (मुंबई) नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नास उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, दहिसर नदी परिसरातील गोठ्यांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. महसूल विभागाने संबंधित नकाशा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला असून आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. गोठे हलविण्याबाबत मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात आले असून, नोटिस देऊन स्थलांतराची कारवाई सुरू आहे.विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी, मुंबई प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषण रोखण्यासाठी आतापर्यंत कोणती कारवाई केली, याची माहिती सभागृहात सादर करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, मंडळाने त्वरित जबाबदारी घ्यावी आणि एका आठवड्यात अहवाल सादर करावा.राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी माहिती दिली की, दहिसर, पोयसर, ओशिवरा आणि वालभट नद्या यांचे पुनरुज्जीवन कार्य सुरू आहे. दहिसर नदीसाठी दोन मलजल प्रक्रिया केंद्रांचे काम पूर्ण झाले असून प्रकल्प ३१ मार्च २०२६ पर्यंत कार्यान्वित होईल. पोयसर नदीसाठी १० मलजल प्रक्रिया केंद्रांपैकी नऊ केंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे. ओशिवरा आणि वालभट नदीसाठी पाच प्रक्रिया केंद्रांची कामे सुरू असून तीही प्रगतीपथावर आहेत.राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, नदीकिनारी असलेल्या गोठ्यांवर आत्तापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तथापि, अनेक गोठ्यांची नोंदणी अद्याप न झाल्याने कारवाईत विलंब होत आहे. दहिसर नदी प्रकल्पात १३०, पोयसरमध्ये २,५५४ आणि ओशिवरा नदी प्रकल्पात ७०० घरे व दुकाने बाधित असून, पात्र बांधकामांच्या पर्यायी सदनिकांअभावी अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.या चर्चेत विधानसभा सदस्य मनिषा चौधरी, योगेश सागर, दिलीप लांडे, अस्लम शेख यांनी सहभाग घेतला.
बारावीचा पेपर दिला आणि आत्महत्या केली; चिठ्ठीत केले 'ते'खुलासे
कल्याण : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात परीक्षेचा काळ सुरु आहे. वर्षभर अभ्यासासाठी केलेल्या मेहनतीची परीक्षा चालू आहे. लाखोंच्या संख्येने विविध राज्यातून विद्यार्थी पेपर देत आहेत. अशातच आपण नापास होणार या भीतीने घाबरून कल्याणमधील एका मुलीने आपले जीवन संपवले आहे.कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात बुधवारी ही घटना उघडकीस आली. संबंधित विद्यार्थिनी वाणिज्य शाखेत बारावीचे शिक्षण घेत होती. नुकतेच दिलेले पेपर अपेक्षेप्रमाणे न झाल्याची खंत तिच्या मनात होती. ‘आपण परीक्षेत नापास होऊ’ या भीतीसोबतच घरच्यांची नाराजी सहन करावी लागेल, या विचारांनी ती तणावाखाली होती, अशी माहिती समोर येत आहे.परीक्षेच्या निकालाबाबत सतत मनात चाललेल्या भीतीमुळे विद्यार्थिनी मानसिकदृष्ट्या खचली होती. याच अवस्थेत तिने घरातच गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊलघटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत विद्यार्थिनीने, “माझे पेपर चांगले गेले नाहीत. मला आई-वडिलांना त्रास द्यायचा नाही,” असे शब्द लिहिले होते. या ओळींमधून तिच्या मनातील भीती आणि अपराधीपणाची भावना स्पष्ट होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.या घटनेमुळे परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक दबाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गुण, निकाल आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.
Holi School Holiday: होळीनिमित्त शाळेला सुट्टी कधी? 2, 3 की 4 मार्च…. जाणून घ्या
Holi School Holiday: यंदा होळी 2 मार्च रोजी साजरी होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्च, मंगळवारी रंगपंचमी (धुलीवंदन) निमित्त सार्वजनिक सुट्टी असेल.
Manoj Jarange : माझ्याविरोधात मंत्रालयात स्टिंग ऑपरेशन सुरू आहे; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
माझ्या विरोधात कट रचला जात आहे. कारण काय तर मी गरिबांसाठी लढा देत आहे. मंत्रालयात स्टिंग ऑपरेशन सुरू आहे, असा खळबळजनक दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे.
नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण
नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा कॉलेजच्या मेस मधून. मात्र याच मेसमधील जेवण तुमच्या आरोग्यासाठी धोक्याचं ठरलं तर ?नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या मेसच्या जेवणात चक्क अळ्या आणि वेगवेगळे छोटे किडे आढळून आले आहेत. त्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे मेडिकल कॉलेजच्या पदवीधर विद्यार्थ्यांच्या जेवणात हे कीडे आढळून आले .नेमका आरोप काय?२५ फेब्रुवारी रोजी दुपारच्या जेवणादरम्यान काही विद्यार्थ्यांच्या ताटात अळी दिसल्याचा आरोप आहे. फळांच्या तुकड्यांवर मृत किडा आढळल्याचेही सांगितले जात आहे. भाजीमध्ये अळ्या तसेच मशरूमच्या पदार्थात किडे असल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये रंगली. विशेष म्हणजे, काहींना जेवण संपल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.महाविद्यालय प्रशासनाचे स्पष्टीकरणमहाविद्यालय प्रशासनाने या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांच्याकडे अद्याप कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंची सत्यता तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. संस्थेतील प्राध्यापक, डीन आणि वरिष्ठ अधिकारीही त्याच मेसमध्ये जेवण घेतात, असेही प्रशासनाने नमूद केले. स्वच्छतेबाबत संस्थेचे धोरण कठोर असल्याचे सांगत, मेस व्यवस्थापन करणाऱ्या कंत्राटदाराकडून त्रुटी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.विद्यार्थी परिषदेची भूमिकाविद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी प्रशासनाला कळवले की, त्यांच्या पातळीवर अधिकृत तक्रार आलेली नाही. काही विद्यार्थ्यांनी मात्र मेसमधील मर्यादित जागा आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे वाढणाऱ्या गर्दीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनानेही एका काउंटरवर कर्मचारी अनुपस्थित असल्याची बाब मान्य केली असून संबंधित कंत्राटदाराला तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.सध्या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली जात असून, आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही? याचा तपास सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न असल्याने या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. अंतिम अहवालानंतरच पुढील कारवाई स्पष्ट होणार आहे.
डिजिटल माध्यमांनी आता केवळ मध्यस्थ म्हणून न राहता एका शक्तिशाली माध्यम संस्थेचे रूप धारण केले आहे. त्यामुळे, आपल्या प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या मजकुराची पूर्ण जबाबदारी या कंपन्यांनी स्वीकारलीच पाहिजे, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी केले.
DY Patil T20 Cup 2026 : या दोघांनी मिळून केवळ ४८ चेंडूंमध्ये ११८ धावा कुटत डी.वाय. पाटील 'ब्लू' संघाला 'इंडियन नेव्ही' विरुद्ध अविश्वसनीय विजय मिळवून दिला.
Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या महत्वाच्या बैठकीत आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची पार्टीच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून औपचारिक घोषणा करण्यात आली आहे.
घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार
मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य सरकारने गंभीरपणे घेतली आहे. महारेराने घरखरेदीदारांच्या नुकसानभरपाईपोटी जारी केलेल्या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या आणि वसुलीस दाद न देणाऱ्या विकासकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. फसवणूक करणाऱ्या अशा बिल्डरांची मालमत्ता जप्त करून त्यातून ग्राहकांची थकीत रक्कम वसूल केली जाईल, अशी घोषणा प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी विधानसभेत केली.आमदार अतुल भातखळकर, जितेंद्र आव्हाड, सुलभा खोडके, प्रताप पाटील चिखलीकर यांसह अन्य सदस्यांनी महारेराच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. मुंबई, ठाणे आणि पुण्यात सुमारे १ हजार २०० ग्राहकांची ७९२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक आकडेवारी सभागृहात मांडण्यात आली. महारेरा स्थापन झाल्यापासून १ हजार २९१ तक्रारदारांच्या बाजूने ७९२ कोटींचे वसुली आदेश देण्यात आले. मात्र, यातील २०० कोटींचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी 'वसुली शक्य नाही' असे कारण देत परत पाठवले आहेत. यावरून सदस्यांनी संताप व्यक्त करत, 'महारेरा हे घरखरेदीदारांना न्याय देण्याऐवजी विकासकांना मुदतवाढ देणारे एक्स्टेंशन काउंटर झाले आहे का?' असा संतप्त सवाल केला.सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी वस्तुस्थिती मान्य केली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही तांत्रिक कारणांमुळे वसुली रखडल्याचे त्यांनी सांगितले. लिलाव यशस्वी न होणे, मालमत्ता न सापडणे, बँकांकडे तारण असलेली मालमत्ता किंवा न्यायालयीन स्थगिती यामुळे वसुलीत अडथळे येत आहेत. मात्र, यावर आता ठोस उपाययोजना केली जाईल, असे देसाई म्हणाले.अशी होणार कारवाईप्रभारी मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, ज्या विकासकांनी ग्राहकांचे पैसे परत केलेले नाहीत, त्यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव केला जाईल. थकीत वसुलीच्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. करारातील नमूद क्षेत्रापेक्षा कमी जागा देणाऱ्या बिल्डरांचीही चौकशी केली जाणार आहे. घरखरेदीदारांची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. वसुलीसाठी लवकरच व्यापक मोहीम हाती घेऊन सर्वसामान्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Daisy Shah : तो खूप चांगला माणूस आहे..! वादात अडकलेल्या ‘पलाश मुच्छल’ला अभिनेत्री डेझी शाहचा पाठिंबा
संगीतकार पलाश मुच्छल याच्या वैयक्तिक आयुष्याभोवती निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह हिने त्याला उघड पाठिंबा दिला आहे.
Mahabaleshwar Shri 2026 : सांगलीचा अर्षद मेवेकरी ठरला ‘महाबळेश्वर श्री 2026’चा मानकरी
महाबळेश्वर येथील सुभाषचंद्र बोस चौक येथे आयोजक नगरसेवक ॲड. संजय जंगम व मसल फॅक्टरी यांच्या वतीने भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा ‘महाबळेश्वर श्री २०२६ (Mahabaleshwar Shri 2026) पर्व ६ वे’ उत्साहात पार पडले.
मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर'पूल
- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पणमुंबई : विकासकामांची गुणवत्ता राखत कामे गतीने पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. त्याच पद्धतीने बृन्हमुंबई महानगरपालिकेने गती आणि गुणवत्तेसह विहीत मुदतीच्या चार महिने आधीच मुंबई सेंट्रल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम केवळ १५ महिन्यात पूर्ण केले आहे, ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.बृन्हमुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या कामाच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. लोकार्पण कार्यक्रमस्थळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अमिन पटेल, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह लोकप्रतिनिधी, महापालिका पदाधिकारी व अन्य संबंधित मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई सेंट्र्ल रेल्वेस्थानकाजवळच्या या १३० वर्ष जुन्या पुलाची कालमर्यादा संपली होती आणि वाहतूकीच्या दृष्टीने अतिशय उपुयक्त असलेल्या या पुलाचे पुनर्बांधणी काम गतीने पूर्ण करणे गरजेचे होते. हे लक्षात घेऊन बृहृन्मुंबई महानगरपालिकेने कालबद्ध नियोजनद्वारे अतिशय वेगाने या पुलाची पुर्नबांधणी विहीत मुदतीच्या चार महिने आधी पूर्ण केल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी वर्ग यांचे अभिनंदन मुख्यमंत्री यांनी केले. मुंबईतील अजून जवळपास सहा पूल आता तयार होत असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या दोन तीन महिन्यात इतर सहा पुलांचे लोकार्पण ही महानगर पालिकेच्या माध्यमातून होईल. महानगरपालिकेत निर्वाचित प्रतिनिधी आल्याने महानगरपालिकेच्या कामाला अधिक गती आणि अधिक लोकाभिमुखता येईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्यात येणारमुख्यमंत्री म्हणाले की, महानगरपालिकेशी चर्चा करुन आपण या पुलाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे करणार आहोत, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पुण्यश्लोक अहिल्यामाता यांनी या देशामध्ये एक उत्कृष्ट प्रशासक कसा असला पाहिजे याचा आदर्श आपल्या कामातुन निर्माण केला आहे. त्यांची संवेदनशीलता, धर्मपरायणता, कार्यकुशल प्रजाहितदक्ष राज्यकारभार, कायदा सुव्यवस्थेवर असेलली पकड, त्यांनी तयार केलेली मंदीरे आणि महिलांची पहिली तुकडी, त्यांनी तयार केलेले कारखाने, लघुउद्योग, त्यांनी निर्माण केलेले मंदिरे, घाट, या सर्व कामातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे तीन दशकांनंतरही त्यांचे नाव आपण घेतो कारण त्यांच्यासारखे जे उत्कृष्ट प्रशासक आपल्याकडे होऊन गेले त्यांच्या कामातून आपली संस्कृती आणि आपली गुणवत्ता आपल्याला आजही पाहायला मिळते.मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकालगतच्या पुलाच्या पुनर्बांधकामाच्या (ऑनलाईन) लोकार्पण कार्यक्रमातील संबोधन...(मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकालगतच्या पुलाच्या पुनर्बांधकामाचे लोकार्पण | मुंबई | 26-02-2026)#Maharashtra #Mumbai #Infrastructure pic.twitter.com/TbF4fw2O3G— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 26, 2026म्हणूनच पुण्यश्लोक अहिल्यामातेचे नाव या पुलाला देण्याचा निर्णय आपल्या सर्वानाचं अतिशय गौरन्वावित आहे. त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन यापुढे राज्य शासन आणि महानगरपालिका कार्य करतचं राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेने विहीत मुदतीच्या आत यशस्वरित्या या पुलाचे काम पूर्ण केले आहे.नागरिकांसाठी हा पूल खुप उपयुक्त ठरणारा आहे. सुरळित वाहतुकीसाठी या पुलाची आवश्यकता आहे. त्यापार्श्वभूमीवर महानगरपालिकेने या पुलाचे काम गतीने पूर्ण केले आहे. यासाठी महानगरपालिकेचे अभिनंदन करत उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील अनेक रखडलेले प्रकल्प या शासनाने वेगाने पूर्ण केलेली आहेत. मुंबईकरांना अपेक्षित विकासकामे यापुढेही महानगरपालिका करत राहिल,असा विश्वास व्यक्त करत महानगरपालिकेने अशाच पद्धतीने गतीने आणि दर्जदार कामे करावीत.
११ वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तिपटीने वाढवली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील विरोधी पक्ष भ्रमित आणि संभ्रमित असल्याचा टोलामुंबई : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०१२-१३ साली १३ लाख कोटी होती. गेल्या ११ वर्षांत ती ५१ लाख कोटींपर्यंत आली. आम्ही राज्याची अर्थव्यवस्था तिपटीने वाढवली. आता ९० लाख कोटींचा टप्पा गाठायचा आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, ज्याने ६६० बिलियनचा टप्पा पार केला आहेत. इतर कुठलेही राज्य अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपल्याइतके पुढे नाही. त्यामुळे राज्य दिवाळखोरीत निघाल्याचे सांगून विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केला.राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या जीडीपीमधील महाराष्ट्राचा वाटा सातत्याने वाढत आहे. २०२१-२२ मध्ये हा वाटा १३.१ टक्के होता, २०२३-२४ मध्ये १३.५ टक्के, २०२४-२५ मध्ये १३.८ टक्के झाला असून आता तो १४ टक्क्यांच्या जवळपास जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे. राज्याचे जीएसटी संकलन जवळपास ३ लाख ६० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असून कृषी निर्यातीत १२ टक्के आणि सेवा क्षेत्रात २४ टक्के वाटा आहे. जीडीपीच्या तुलनेत कर्जाचे प्रमाणही नियंत्रित ठेवण्यात महाराष्ट्र यशस्वी ठरल्याचा दावा त्यांनी केला.२०२९-३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर आणि २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उभारण्याचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. या आराखड्यासाठी ३ लाख ८० हजार नागरिकांचा सहभाग आणि ७ लाखांहून अधिक सूचनांचा विचार करण्यात आला. प्रगतशीलता, शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि सुशासन या चार तत्वांवर १६ प्रमुख थीम आणि १०० उपक्रम निश्चित करण्यात आले आहेत. दरवर्षी १० लाख रोजगारनिर्मिती, दरडोई उत्पन्नात दहापट वाढ आणि मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट त्यांनी स्पष्ट केले.दावोसबाबतच्या टीकेला दिले सडेतोड उत्तर- दावोस येथे होणाऱ्या करारांवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, दावोसमध्ये होणाऱ्या करारांबद्दलही बरेच बोलले गेले. अनेकवेळा तिथे जाऊन करार का करता, इथेच का करत नाही, असे सांगितले जाते. दावोस छोटे गाव आहे. पण दोन-दोन दिवस तिथे ट्रम्प येऊन राहतात. त्याकाळात जगातील सगळ्या अर्थव्यवस्था, सगळे व्यवसाय तिथे असतात. जर तुम्हाला आर्थिक जगात प्रासंगिक राहायचे असेल, तर तिथे असले पाहिजे. दावोसमध्ये असलेल्या वेगवेगळ्या चर्चांमध्ये महाराष्ट्राची चर्चा असते. आपण त्यांना इथे बोलवूनही गुंतवणूकीचे करार करू शकतो. पण आपण हे दावोसला करावे अशी त्यांची अपेक्षा असते. आजूबाजूच्या सगळ्या युरोपीय देशांमध्ये असलेल्या सगळ्या परदेशी व्यावसायिक दावोसमध्ये आपली वार्षिक मिटींग ठेवतात. ज्यामध्ये परकीय गुंतवणूक नाही तो करार दावोसला करणार नाही असा निर्णय आम्ही केला होता. उत्सव केला की, जास्त लोक येतात, आपल्या राज्याची ताकद लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे आपण दावोसला करार करतो.लोढांच्या मुलासोबत दावोसला करार का केले?मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मंत्री मंगलप्रभत लोढा यांच्या सुपुत्रांसोबत केलेल्या करारावरही अनेकांनी प्रश्न उपस्थित केला. पण त्यांचे सुपुत्र हे देशातील एक मोठे उद्योजकही आहेत. आपण त्यांच्यासोबत डेटा सेंटरमधील गुंतवणूकीचा १ लाख कोटींचा करार केला आहे. जागा आणि सगळ्या व्यवस्था करणे, हे लोढा यांचे काम आहे. मात्र, जगातील सगळ्यात मोठ्या कंपन्या यात गुंतवणूक करणार आहेत. त्यामुळे हा त्यांच्यासोबत केलेला करार आहे. मंगलप्रभात लोढांसोबत केलेला करार नाही. टीका होत असली तरी जागतिक गुंतवणूकदार एकत्र येतात त्या मंचावर उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले.८८ टक्के करारांची अंमलबजावणीदावोसमध्ये २०२३ साली १९, २०२४ मध्ये २४ आणि २०२५ मध्ये ४८ करार झाले असून त्यापैकी ८८ टक्के करारांची अंमलबजावणी विविध टप्प्यांवर आहे. २०२६ साली ३१ लाख २५ हजार कोटी रुपयांचे करार झाले असून त्यापैकी ८३ टक्के परकीय गुंतवणूक आहे. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी ३९ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.बेरोजगारीचा दर कमी करण्यात यश- बेरोजगारीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, २०२१-२२ मध्ये बेरोजगारी दर ४ टक्के होता, २०२३-२४ मध्ये तो ३.३ टक्क्यांवर आला आणि २०२५ मध्ये ३.१ टक्के आहे. महायुती सरकारच्या कार्यकाळात १ लाख २० हजार ४४९ जणांना सरकारी नियुक्त्या देण्यात आल्या असून लवकरच हा आकडा दीड लाखांवर जाईल.- गडचिरोलीतील स्टील हबसंदर्भात २ लाख ६१ हजार ८३९ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे ७० हजार ८९५ रोजगारनिर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जल, जमीन आणि जंगलाचे संवर्धन करत ५ कोटी झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्थानिक आदिवासींना प्राधान्य देत विकास साधला जात असल्याने नक्षलवाद आटोक्यात आल्याचा दावा त्यांनी केला.- स्टार्टअप क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर असून देशातील नोंदणीकृत स्टार्टअपपैकी २० टक्के महाराष्ट्रात आहेत. १४६ पेक्षा अधिक इन्क्युबेटरचे जाळे उभारण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला ‘स्टार्टअप कॅपिटल’ म्हणून ओळख मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.कुंभमेळा हा केवळ धार्मिक मेळा नव्हेनाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, हा केवळ धार्मिक मेळा नसून शाश्वत पायाभूत सुविधांच्या उभारणीची संधी आहे. गोदावरी स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया, रस्ते रुंदीकरण आणि रिंगरोड यांसारख्या कामांमुळे दीर्घकालीन विकास साधला जाईल आणि नाशिकचे जागतिक ब्रँडिंग होईल.शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?- शेतकऱ्यांसाठी पीक विमा पद्धतीत बदल करण्यात आला असून अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना १५ हजार ४७२ कोटी रुपये थेट खात्यात जमा करण्यात आले. कर्जमाफीसंदर्भात समिती स्थापन केली असून अॅग्रीस्टॅकद्वारे डिजिटल नोंदींच्या आधारे निर्णय घेतला जाईल. कर्जमाफी आम्ही करणारच आहोत, त्याबाबतचा निर्णय योग्यवेळी जाहीर करून, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मागेल त्याला कृषीपंप योजनेत ८५ टक्के मागण्या पूर्ण केल्या असून २०२२ ते २०२५ दरम्यान १० लाख ६३ हजार पंप बसवले. एका महिन्यात ५० हजार पंप बसवण्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले.- भ्रष्टाचाराविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण अवलंबले असून एसीबीला स्वतंत्र कारवाईचे अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी वारंवार टीका करण्याऐवजी शांतपणे अभ्यास करून मते मांडावीत, असे आवाहन करत “महाराष्ट्र देशातील पहिली ३ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनेल आणि भारत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनेल, याबाबत शंका नाही,” असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासनमुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. संसदीय कार्यमंत्र्यांनी तसा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठवावा आणि सभापतींनी हा ठराव एकमताने संमत करून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.या मागणीवर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले, ‘‘शासनाला असा प्रस्ताव आणावा लागेल. मी या परिषदेत असा प्रस्ताव मांडतो आणि त्यानंतर सभापतींनी त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा’’, असे त्यांनी नमूद केले.गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून केंद्रात आणि राज्यातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारांवर चालणारे सरकार सत्तेत आहे. असे असूनही अद्याप विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळालेला नाही. याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून वारंवार खंत व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकोत्सवी कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही या विषयावर भाष्य केले होते. आता विधान परिषदेत ही मागणी झाल्याने सावरकरप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
India Deaf Team : अंतिम सामन्यात भारताने श्रीलंका डेफ संघाचा ६ गडी राखून पराभव करत या स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावले
Amit Shah : “पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार येणार”–अमित शाह
बंगालमध्ये सत्ता स्थापन होताच राज्यातील प्रत्येक घुसखोराला बाहेर काढण्याचे काम भाजप सरकार प्राधान्याने करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन एका अशा व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
Samsung Galaxy S26 Ultra 5G भारतात लॉन्च; किंमत, फिचर्स जाणून घ्या सर्वकाही
Samsung Galaxy S26 Ultra 5G: थोडक्यात, हा फोन प्रायव्हसी, AI आणि कॅमेरा या तिन्ही बाबतीत एक पाऊल पुढे आहे, मात्र किंमतही तेवढीच जास्त आहे.
Russia’s attack on Ukraine : जिनिव्हा चर्चेपूर्वीच रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला
रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता चर्चेसाठी राजनैतिक हालचाली सुरू असतानाच, रशियाने (Russia's attack on Ukraine) युक्रेनवर ४२० ड्रोन आणि ३९ क्षेपणास्त्रांचा भीषण मारा केला आहे.
The Kerala Story 2 : चित्रपटाच्या प्रदर्शनाला आव्हान देणाऱ्या याचिकांमध्ये याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे की.
Stock Market: सेन्सेक्स-निफ्टी सपाट बंद, तरीही गुंतवणूकदारांनी कमावले तब्बल 1.08 लाख कोटी रुपये
Stock Market: आज बीएसईवर एकूण ४,३५६ शेअर्समध्ये व्यवहार झाले. यापैकी २,१७० शेअर्स वाढीसह, तर २,०३० शेअर्स घसरणीसह बंद झाले. १५६ शेअर्स सपाट राहिले. १०९ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला, तर २५८ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नवा नीचांक नोंदवला.
महाराष्ट्राची विकासयात्रा थांबणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही
मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले अडथळ्यांचे राजकारण आता पूर्णपणे संपले असून, महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर सुसाट धावत आहे. विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, प्रगत आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवणे हेच सरकारचे अंतिम ध्येय आहे. भाषणाची सुरुवात करताना त्यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी व्यक्त करत, दादांनी नेहमीच विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिल्याचे नमूद केले.गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा 'नंबर वन' :औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राचा दबदबा कायम असून, राज्य आजही देशात गुंतवणुकीसाठी पहिल्या क्रमांकावर आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा १३.५% इतका मोठा आहे. २०२४-२५ या वर्षात राज्याने १ लाख ६४ हजार ८७५ कोटींची परकीय गुंतवणूक खेचून आणली, जी देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या ३९% आहे. ही आकडेवारी महाराष्ट्रावरील जागतिक विश्वासाचे प्रतीक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.दावोस करारांची यशस्वी अंमलबजावणी :केवळ कागदावर करार न करता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर सरकारचा भर आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यात ९१ हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आली आहे. दावोस येथे झालेल्या ३० लाख कोटींच्या ऐतिहासिक करारांपैकी तब्बल ८२% करार आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यावर आहेत. यामुळे आगामी काळात एआय (AI), सेमीकंडक्टर्स आणि ग्रीन एनर्जी यांसारख्या आधुनिक क्षेत्रांत महाराष्ट्र क्रांती करेल.पायाभूत सुविधा आणि 'गेमचेंजर' प्रकल्प :मुंबईसह संपूर्ण राज्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची माहिती देताना उपमुख्यमंत्र्यांनी 'वाढवण बंदर' आणि 'जागतिक क्षमता केंद्रा'चा उल्लेख केला. पालघरमधील वाढवण बंदर हे भविष्यात ५० लाख रोजगार निर्माण करणारे ठरेल. समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड आणि अटल सेतू यांसारख्या प्रकल्पांमुळे दळणवळण वेगवान झाले असून, उद्योगांसाठी आवश्यक असलेली कनेक्टिव्हिटी राज्याला मिळाली आहे.घराघरात पोहोचणार उद्योग :विकास केवळ मुंबई-पुण्यापुरता मर्यादित न ठेवता तो राज्याच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे धोरण सरकारने आखले आहे. उत्तर महाराष्ट्रात ५० हजार कोटींची, तर अहिल्यानगरमध्ये ११ हजार कोटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर हे शहर 'स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी' म्हणून विकसित होत असून, ते भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचे (EV) सर्वात मोठे हब बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.२०२६ हे 'भरती वर्ष'; तरुणांसाठी रोजगाराची संधी :राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी उपमुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. २०२६ हे वर्ष 'भरती वर्ष' म्हणून साजरे केले जाणार असून, रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल. आतापर्यंत ८५ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्त्या देण्यात आल्या असून, सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांत रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण केल्या जात आहेत. 'जीपीआर २.०' सारख्या उपक्रमांतून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची (Vinayak Damodar Savarkar) पुण्यतिथी आहे. त्यांना भारतरत्न द्यावा यासाठी ठराव करावा आणि तो एकमताने संमत करण्यात यावा, अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत केली आहे.
Nilesh Sable: नवा दिवस… नवा विचार… चला…; निलेश साबळे नव्या प्रोजेक्टमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Nilesh Sable: 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठी लोकप्रियता मिळाली. या शोच्या माध्यमातून निलेश साबळेला घराघरात लोकप्रियता मिळाली. झी मराठीवर या नव्या पर्वाची सुरुवातही झाली.
अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा अभाव असल्याचा मुद्दा आज विधानपरिषदेत चांगलाच गाजला. सुमारे ९० कोटी रुपये खर्चून खरेदी केल्या जाणाऱ्या या किटचा दर्जा आणि पुरवठादारांचे 'रॅकेट' पाहता, शासन या निर्णयाचा पुनर्विचार करणार का? असा थेट सवाल भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी सभागृहात उपस्थित केला.सदस्या उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना प्रवीण दरेकर यांनी अंगणवाड्यांच्या सद्यस्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले की, डिजिटल शिक्षणाचे उद्दिष्ट चांगले असले तरी अनेक अंगणवाड्यांमध्ये साध्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत महागड्या इलेक्ट्रॉनिक किटची खरेदी करणे किती संयुक्तिक आहे? या किटच्या देखभालीची कोणतीही व्यवस्था नसून पुरवठादारांकडून अनेकदा निकृष्ट दर्जाचे साहित्य दिले जाते. या सर्व प्रक्रियेचा एखाद्या त्रयस्थ संस्थेमार्फत (Third Party) अभ्यास करून त्याचा अहवाल सभागृहासमोर ठेवणार का, अशी मागणीही त्यांनी केली.आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सविस्तर स्पष्टीकरण देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाड्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी माहिती दिली की, अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी मिळणाऱ्या निधीत मोठी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. पूर्वी ७-८ वर्षांपूर्वी अंगणवाडी बांधकामासाठी केवळ ८ लाख रुपये मिळायचे, जे नंतर साडेबारा लाखांपर्यंत गेले. मात्र, आता शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर ही रक्कम १५ लाख रुपयांपर्यंत नेण्याचा निर्णय अर्थ विभागाच्या मान्यतेने प्रस्तावित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, खरेदी प्रक्रियेतील विलंबाबाबत बोलताना तटकरे म्हणाल्या की, जिल्हा परिषद स्तरावरील बांधकाम विभागामार्फत प्रचलित नियमांनुसारच निविदा (Tender) प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत साधारणपणे ४ ते ५ महिने जातात, ज्यामुळे साहित्य वेळेवर पोहोचण्यास अडथळे येतात. हा वेळ वाचवण्यासाठी आणि अंगणवाड्यांना दर्जेदार सुविधा तातडीने मिळाव्यात यासाठी शासन सकारात्मक पावले उचलत असून, निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणली जाईल, अशी ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.
Budget Session : पोलादपूर एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागणार; अधिवेशन काळातच विशेष बैठकीचे आयोजन
मुंबई : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे औद्योगिक वसाहत (MIDC) स्थापन करण्याच्या मागणीने आता जोर धरला आहे. भाजप गटनेते आणि पोलादपूरचे सुपुत्र आमदार प्रवीण दरेकर यांनी आज (२६ फेब्रुवारी) विधानपरिषदेत या प्रश्नावर विचारणा केली. पोलादपूरमध्ये एमआयडीसी स्थापन करण्याबाबतचा निर्णय शासन कधीपर्यंत घेणार, असा थेट सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला.जालना जिल्ह्यातील मंठा येथील एमआयडीसी संदर्भात सदस्य राजेश राठोड यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सहभागी होताना दरेकर यांनी पोलादपूरचा विषय मांडला. पोलादपूरमध्ये एमआयडीसीसाठी आवश्यक असलेली जमीन उपलब्ध आहे, पाण्याची मुबलक सोय आहे, वाहतुकीची उत्तम साधने आणि स्थानिक मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात आहे. सर्व निकष पूर्ण होत असतानाही उद्योग विभाग यावर कधी निर्णय घेणार? असा प्रश्न दरेकर यांनी विचारला. तसेच एमआयडीसी स्थापन करण्याचे नेमके निकष काय आहेत, याची स्पष्टताही त्यांनी मागितली.आमदार प्रवीण दरेकर यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी एमआयडीसी स्थापन करण्याबाबतचे तांत्रिक निकष स्पष्ट केले. पोलादपूरच्या औद्योगिक विकासाबाबत शासन सकारात्मक असून, या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी चालू अधिवेशन काळातच एक विशेष बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या निर्णयामुळे पोलादपूर तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम मिळण्याच्या आणि स्थानिक उद्योगांना चालना मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
योग्य इतिहास शिकवला असता तर औरंगजेब एकाही मुसलमानाचा हिरो नसता! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- ७५ हजार हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपूची शिवरायांशी बरोबरी खपवून घेणार नाहीमुंबई : देशाचा खरा इतिहास ७० वर्षे जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आला. जर योग्य वेळी नीट आणि वस्तुनिष्ठ इतिहास शिकवला गेला असता, तर आज या देशातील एकाही मुसलमानाने क्रूरकर्मा औरंगजेबाला आपला 'हिरो' मानले नसते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (२६ फेब्रुवारी) विधानसभेत विरोधकांवर प्रहार केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी इतिहासाच्या विकृतीकरणाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीवर निशाणा साधला.आमदार विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या टिपू सुलतानच्या मुद्द्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, टिपू सुलतान चांगले होते की, वाईट यावर आमचा आक्षेप नाही. पण ज्यावेळी टिपू सुलतान हे छत्रपती शिवरायांऐवढे मोठे राजे होते, असे कुणीतरी म्हणतो, त्याला आमचा आक्षेप आहे. दुर्दैवाने, या देशाच्या इतिहासाशी जी छेडछाड करण्यात आली, त्यात वर्षानुवर्षे आम्हाला टिपू सुलतान हे महान राजे होते हेच शिकवण्यात आले. पण ७५ हजार हिंदूंची आणि ३३ हजार नायरांची कत्तल करणारेही टिपू सुलतानच होते, हे आम्हाला कधीच शिकवले नाही. आता खरा इतिहास सापडतो आहे.We will certainly fight against those who consider the invaders of this nation as their heroes...जे लोक या देशावर आक्रमण करणाऱ्यांना आपला हिरो मानतील त्यांच्या विरुद्ध आम्ही लढाई करूच...(विधानसभा, मुंबई | दि. 26 फेब्रुवारी 2026)#Maharashtra #Mumbai #MahaBudget2026 pic.twitter.com/gst3pn4zVV— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 26, 2026या देशात सरकारने ७० वर्षे एनसीईआरटीच्या पुस्तकात मुघल साम्राज्याला १७ पाने दिली आणि छत्रपती शिवरायांना एक परिच्छेद दिला. आता मोदी सरकारने एनसीईआरटीमध्ये छत्रपती शिवरायांच्या मराठ्यांच्या इतिहासाला २० पाने दिली. योग्यवेळी नीट इतिहास शिकवला असता तर या देशातील एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपाला हिरो म्हटले नसते. पण आपण खरा इतिहास कधी शिकवलाच नाही. या देशात अनेक राष्ट्रभक्त मुस्लीम आहेत आणि त्यांच्याबद्दल आमचा कुठलाच आक्षेप नाही. जे लोक देशाच्या विरोधातील लोकांना आपला हिरो म्हणतील त्यांच्याविरुद्ध आम्ही लढाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- हिंदी सक्तीच्या निर्णयावर सही उद्धव ठाकरेंचीमुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदी सक्तीबाबत निर्णय झाला आणि त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सही होती. आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले :नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना २१ सप्टेंबर २०२० रोजी तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन झाला. या समितीने १४ सप्टेंबर २०२१ रोजी सादर केलेल्या १०१ पानांच्या अहवालात पहिलीपासून इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याची शिफारस केली होती. ३० जानेवारी २०२२ रोजी हा अहवाल मंत्रिमंडळासमोर आला आणि तत्कालीन सरकारने या शिफारसी स्वीकारल्या. ज्यांनी स्वतः या निर्णयावर स्वाक्षरी केली, तेच आज आम्हाला 'ठोकून' काढत आहेत. विशेष म्हणजे यात राज ठाकरेही सहभागी झाले. माझ्यामुळे दोन्ही भाऊ एका मुद्द्यावर एकत्र आले याचा मला आनंद असून त्याचे श्रेय मला घ्यायला आवडेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.मराठी शाळांच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीनिशी बाजू मांडली. आजही राज्यातील ८४ टक्के शाळा मराठी माध्यमाच्या असून ७० टक्के विद्यार्थी त्यात शिक्षण घेत आहेत. मराठी शाळा बंद पडत असल्याची आकडेवारी कपोलकल्पित आहे. आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवतो आणि इथे मराठी शाळांवरून केवळ भावनिक राजकारण करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण मातृभाषेत उपलब्ध करून दिले, ही खरी मराठीची, भाषेची सेवा आहे, असेही त्यांनी नमूद केले.सीमावादाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, या विषयावर संपूर्ण सभागृहाचे एकमत आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात तांत्रिक अडचण येत आहे. जेव्हा जेव्हा हे प्रकरण सुनावणीला येते, तेव्हा तीन न्यायाधीशांपैकी एक न्यायाधीश महाराष्ट्र किंवा कर्नाटकचे असतात. नियमानुसार तिन्ही न्यायाधीश त्रयस्थ राज्याचे असणे आवश्यक आहे. त्यामुळे हे प्रकरण लांबणीवर पडत आहे. मात्र, सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी सवलती आणि जागा वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Pune: अजित पवार यांच्या विमान अपघाताचा सीआयडी तपास योग्य दिशेने –अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद
Pune: सदर अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्याचा तपास अत्यंत बारकाईने व काटेकोरपणे करण्यात येत असल्याचे अपर पोलीस महासंचालक रामानंद यांनी स्पष्ट केले.
- सहा महिन्यांत अहवाल सादर करणारमुंबई : राज्यातील शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी आणलेल्या आरोपींनी पलायन केल्याच्या वाढत्या घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. पुणे येथील ससून रुग्णालयातून एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळून गेल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे ‘सेफ्टी ऑडिट’ (सुरक्षा परीक्षण) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या सहा महिन्यांत हे ऑडिट पूर्ण केले जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी (२६ फेब्रुवारी) विधानसभेत दिली.काँग्रेसचे आमदार हारून खान यांनी शासकीय रुग्णालयांतून आरोपी पळून जाण्याच्या घटनांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना कदम बोलत होते. पुण्यातील ससून रुग्णालयात १९ फेब्रुवारी रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने पलायन केले होते. रुग्णालयाला रंगकाम करण्यासाठी लावलेल्या बांबूच्या साहाय्याने हा आरोपी पसार झाला होता. या गंभीर हलगर्जीपणाबद्दल संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्यांची विभागीय चौकशीही सुरू असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.सुरक्षा नियमावलीत बदल होणार :आरोपींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याबाबतची नवीन नियमावली तयार करण्यात आली असून ती सर्व रुग्णालयांना वितरित केली आहे. सेफ्टी ऑडिटचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, रुग्णालयांच्या रचनेत आणि आरोपींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ते तांत्रिक बदल केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.कारागृहातच मिळणार वैद्यकीय सुविधा :आमदार हरिश पिंपळे यांनी आरोपींना न्यायालयात नेताना होणारा अफाट खर्च आणि त्या दरम्यान त्यांना मिळणाऱ्या बेकायदेशीर सवलतींचा (मोबाईल, नातेवाईकांशी भेट) मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्र्यांनी सांगितले की, आरोपींना न्यायालयात नेण्याची गरज पडू नये, यासाठी सुनावणी 'व्हिडिओ कॉन्फरन्स'द्वारे घेण्याचे प्रमाण वाढवले जात आहे. येत्या दीड वर्षात राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत ही सुविधा उपलब्ध होईल. नवीन बांधण्यात येणाऱ्या कारागृहांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा कारागृह परिसरातच उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून आरोपींना बाहेर नेण्याची वेळ येणार नाही. रुग्णालयांचे 'सेफ्टी ऑडिट' केवळ औपचारिकता न राहता, त्यातून ठोस सुरक्षा उपाययोजना अंमलात आणल्या जातील. आरोपींच्या पलायनाच्या घटनांना पूर्णविराम देणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
ब्राझीलमध्ये पावसाचा कहर; आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
ब्राझीलमध्ये निसर्गाचा भीषण कहर पाहायला मिळत आहे. दक्षिण-पूर्व ब्राझीलमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि अचानक आलेल्या पुरामुळे मृतांचा आकडा सातत्याने वाढत असून आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. शेकडो नागरिकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. दक्षिण-पूर्वेकडील मिनास गेरैस राज्यात पुरस्थिती गंभीर झाली आहे.ब्राझीलच्या दक्षिण भागात मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. हवामान तज्ज्ञांनी पुढील काही दिवसांत या भागात आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे. मिनास गेरैस राज्यात बचावकार्य वेगाने सुरू असून बचाव पथके परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक घरे आणि वसाहती चिखल व ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या आहेत.यापूर्वी बुधवारी ब्राझीलच्या अग्निशमन विभागाने सुधारित आकडेवारी जाहीर करत मृतांचा आकडा ४६ झाल्याची माहिती दिली. सुमारे २१ जण अद्याप बेपत्ता आहेत. राज्य अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, जुईज दे फोरा आणि उबा या शहरांमध्ये पूर व भूस्खलनामुळे सुमारे ३,६०० लोक विस्थापित झाले आहेत. ही दोन्ही शहरे सुमारे ११० किलोमीटर अंतरावर आहेत.मृतांमध्ये ११ वर्षीय बर्नार्डो लोपेस दुत्रा याचाही समावेश आहे. मुसळधार पावसामुळे त्याचे घर कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याची आई आणि बहीण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वा यांनी मंगळवारी सांगितले की, बचावकार्यासाठी सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले असून पावसामुळे प्रभावित नागरिकांना तातडीची मदत पुरवली जात आहे. तसेच, डोंगराळ भाग, दऱ्या आणि उतारांजवळील भागात आरोग्य पथकेही पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या प्रसूती प्रकरणाचे पडसाद आज (२६ फेब्रुवारी) विधानपरिषदेत उमटले. आमदार प्रवीण दरेकर यांनी डहाणूतील आरोग्य केंद्रांमधील अपुऱ्या सुविधा, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि रिक्त पदांबाबत सरकारला धारेवर धरले. याला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दोषींवर कडक कारवाई केल्याची आणि रिक्त पदे भरण्यासाठी विशेष पावले उचलल्याची घोषणा केली.प्रवीण दरेकर यांनी आरोग्य केंद्राच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात ३८ हजार आदिवासी लोकसंख्या असतानाही डॉक्टर का नसतात? परिचारिकांनी प्रसूती करणे हे रुग्णांच्या जीवाशी खेळणे नाही का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसेच, मागील वर्षभरात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तवणुकीच्या किती तक्रारी आल्या आणि त्यावर काय चौकशी केली, असा जाबही त्यांनी विचारला. यासोबतच त्यांनी पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदांचा मुद्दाही मांडला.आमदार दरेकर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री मेघना बोर्डीकर यांनी माहिती दिली की, सुदैवाने माता आणि बालकाची प्रकृती स्थिर आहे. मात्र, या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता, आशागड केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे (MO) तातडीने निलंबन करण्यात आले आहे, तर कंत्राटी तत्त्वावरील दोन डॉक्टरांची सेवा खंडित (Terminate) करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी २७ फेब्रुवारी पासून नवी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, ज्यामुळे रिक्त पदांचा प्रश्न सुटेल. पालघरमध्ये नवीन २०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, १०० खाटांचे स्त्री रुग्णालय आणि क्रिटिकल केअर ब्लॉकला मंजुरी मिळाली असून त्याचे काम लवकरच पूर्ण होईल. तसेच, ४६ पैकी २८ प्राथमिक आरोग्य केंद्रे ही 'कायाकल्प' योजनेसाठी पात्र ठरली असून तेथे दर्जेदार सुविधा दिल्या जात आहेत.
'अजित पवारांच्या विमान अपघातावरून राऊत, रोहित पवारांची स्टंटबाजी'
- भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची प्रखर टीकाअजितदादांच्या निधनानंतर प्रसिद्धी मिळवण्यासाठी संजय राऊत आणि रोहित पवार रोज उठून तेचतेच मुद्दे मांडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. अपघातामागचे सत्य समोर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार अतिशय गांभीर्यपूर्वक प्रयत्न करत आहे. मात्र सत्य समोर आणतोय असा आव आणून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि रोहित पवार करत आहेत असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी (२६ फेब्रुवारी) केला.भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार आणि डीजीसीए स्तरावर अपघाताची चौकशी सुरूच आहे, सीबीआय चौकशीच्या केलेल्या मागणीवर देखील सकारात्मकरित्या विचार सुरू आहे, असेही नवनाथ बन यांनी नमूद केले.अजितदादांची मविआमध्ये यायची इच्छा होती असे सांगणा-या राऊतांना खडे बोल सुनावत नवनाथ बन म्हणाले की अजितदादांनी भाजपा महायुतीची साथ दिली, महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, एनडीएमध्ये सामील झाले होते याचे भान राऊतांनी ठेवावे. बाष्कळ दावे प्रतिदावे करण्यापेक्षा राऊतांनी उबाठा गटाची प्रवक्तेगीरी बंद करून वेब सीरीजचे लेखन सुरू करावे, त्यांचा तो धंदा चांगला चालेल असा टोमणा बन यांनी लगावला.अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असून त्याच्या माध्यमातून सत्य बाहेर येण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. रोहित पवारांच्या पुढाकाराने आता संजय राऊत राज्यसभेमध्ये हा मुद्दा उचलून तो मार्गी लावणार आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये खासदार असताना त्यांच्याऐवजी रोहित यांना राऊतांची गरज का भासली असा सवाल करीत बन म्हणाले की, शरद पवार गटाच्या खासदारांना हा मुद्दा लोकसभा आणि राज्यसभेत उचलायला सांगण्याऐवजी प्रसिद्धीच्या हव्यासापायी रोहित हे रोज उठून पत्रकार परिषदांमधून बेफाम आरोप करत आहेत. स्टंटबाजीपेक्षा व्हीएसआर कंपनी संदर्भात असतील तर ते पुरावे तपास यंत्रणांना द्यावे असेही ते म्हणाले.अपघात झाल्यानंतर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला जात नाही तर अपघाती मृत्यू अहवाल दाखल केला जातो. असा अहवाल यापूर्वीच दाखल झालेला आहे अशी माहिती देत बन यांनी रोहित यांना लक्ष्य केले. अपघाताची चौकशी संबंधित यंत्रणा करत आहेत हे ही अनेकदा सरकारने सांगूनही रोहित पवार प्रसिद्धीसाठी उतावीळ झाले आहेत. त्यासाठीच मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचा बालहट्ट रोहित पवारांनी धरला, या शब्दांत बन यांनी त्यांची खिल्ली उडवली.
मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : मुंबईत आणि महानगर परिसरात घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी जलद गतीने पोहोचणे, १०० आणि ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर आलेल्या तक्रारीच्या कॉलवर विनाविलंब पोहोचणे यासाठी मुंबई पोलीस दलात १२९० नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला आहे.नरिमन पॉईंट येथील मुरली देवरा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.कार्यक्रमाला गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (प्रशासन) एस. जयकुमार यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते.या वाहनांमध्ये ६५७ दुचाकी ६३३ चार चाकी वाहनांचा समावेश आहे. चार चाकी वाहनांमध्ये स्कॉर्पिओ आणि मोठी अर्मेनिया वाहने आहेत. सध्या मुंबई पोलिसांचा हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारीचा प्रतिसाद वेळ ५.३० मिनिटे आहे. हा प्रतिसाद वेळ या वाहनांच्या समावेशामुळे निश्चितच आणखी कमी होणार आहे. गुन्ह्याची जलद गतीने उकल करून पीडितांना तातडीने न्याय देणे या वाहनांमुळे शक्य होणार आहे.मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत एकूण ९० पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. या प्रत्येक पोलीस स्टेशनला पाच दुचाकी, चार स्कॉर्पिओ आणि मोठी अर्मेनिया वाहने एक अशाप्रकारे एकूण दहा वाहने देण्यात येणार आहेत. ही चार चाकी वाहने मोबाईल डाटा टर्मिनल, जीपीएस यंत्रणा, व्हेईकल ट्रेकिंग यंत्रणा आधी आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहेत.
Amit Shah on Demography: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कालपासून बिहारच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्य अधिकारी, सशस्त्र सीमा दल (एसएसबी) आणि इतर सुरक्षा एजन्सींसोबत बैठका घेणार आहेत.
Rohit Pawar : “कबुतरांच्या चोरीचा FIR होतो, मग दादांच्या मृत्यूचा का नाही?”; रोहित पवार आक्रमक
Rohit Pawar : 'आम्ही सर्व कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे नियम सांगितले, तरीही पोलीस एफआयआर घेण्यास तयार नाहीत'
HIV India: ‘या’राज्यात एचआयव्हीचा वाढता धोका; उपचारात दोन मोठी आशादायी पावले
HIV India जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २०२३ मध्ये जगभरात सुमारे ३९.९ दशलक्ष लोक एचआयव्हीसह जीवन जगत होते. यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे. एचआयव्ही हा विषाणू शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो.
कॅनडातील हिंसक घटनांशी भारताचा संबंध नाही, कार्नी सरकारची अधिकृत भूमिका
ओटावा : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कार्नी भारत दौऱ्यात मोदींना भेटणार आहेत. ही भेट होण्याच्या काही तास आधीच कॅनडा सरकारने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मागील काही महिन्यांमध्ये कॅनडात खलिस्तान समर्थक असलेल्यांचा मृत्यू झाला. अज्ञातांच्या हल्ल्यांमध्ये खलिस्तान समर्थक असलेल्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणांमध्ये तपास सुरू आहे. आतापर्यंच्या तपासातून भारताचा या कारवायांमध्ये हात असल्याचा एकही ठोस पुरावा मिळालेला नाही. यामुळे कॅनडातील हिंसक घटनांशी भारताचा संबंध नाही असे कार्नी सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.कॅनडातील हिंसक घटनांमध्ये भारताचा हात असता तर कार्नी सरकारने भारत दौऱ्याचे नियोजनच केले नसते. आता पंतप्रधान कार्नी भारत दौरा करत आहेत याचाच दुसरा अर्थ कॅनडातील हिंसक घटनांमध्ये भारताचा हात नाही, असे कार्नी सरकारच्या उच्चाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. कॅनडा सरकार भारतासोबत मैत्री दृढ करण्यास इच्छुक आहे. भारत - कॅनडा यांच्यातील व्यापार वाढावा आणि दोन्ही देशांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी चर्चा होणार असल्याचे संकेत कार्नी सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्याआधी राजधानी ओटावात सरकारच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यात पत्रकार परिषदेत कॅनडा सरकारने पंतप्रधान कार्नी यांच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला. भारतासोबत व्यापार आणि संरक्षणाच्या क्षेत्रातले सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा करत असल्याची माहिती कार्नी सरकारने पत्रकार परिषदेत दिली.
Kalyan-Ahilyanagar highway : कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील आणे येथे पिकअप व बुलेरो या दोन वाहनांच्या मध्ये समोर समोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर नऊ जण जखमी झाल्याची घटना बुधवार दि.२५ रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पिकअप एम.एच.१६ डी पी.०१०३ हि गाडी अहिल्यानगर जिल्ह्यातील नांदूर पठार या ठिकाणाहून कलिंगड […]
Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली
पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने सत्तेच्या समीकरणांना सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये नवनिर्वाचित सदस्यांमधून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापती निवडण्याची प्रक्रिया आता प्रशासकीय स्तरावर वेग धरत आहे. ग्रामविकास विभागाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित केले असून, यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. २० मार्च २०२६ पूर्वी पुणे जिल्हा परिषद आणि त्यांतर्गत येणाऱ्या सर्व पंचायत समित्यांची पहिली अधिकृत बैठक आयोजित करणे अनिवार्य आहे. ‘महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१’ मधील कायदेशीर तरतुदींचा हवाला देत प्रशासनाने हे स्पष्ट केले आहे की, नवीन सदस्यांचा अधिकृत कार्यकाळ हा या पहिल्या बैठकीच्या दिनांकापासूनच मोजला जातो. त्यामुळे ही बैठक वेळेत होणे केवळ प्रशासकीय गरज नसून ती एक वैधानिक अट आहे. निवडणूक निकालानंतर आता जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणावर वर्चस्व गाजवण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २० मार्चची मुदत जवळ येत असल्याने पुढील काही दिवसांत फोडाफोडीचे राजकारण किंवा युतीचे नवे समीकरण पाहायला मिळू शकते.निवड प्रक्रियेचे प्रशासकीय नियोजन आणि अधिकारपुणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणारी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. या निवडीसाठी विशेष बैठक बोलावण्याचे सर्व कायदेशीर अधिकार पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची सभा पार पडणार असून, याच धर्तीवर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती पदांसाठीची निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल. या प्रक्रियेमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या रिक्त असलेल्या सत्तास्थानी आता नवनिर्वाचित प्रतिनिधींची वर्णी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.ग्रामविकास विभागाचे अवर सचिव बा. म. आसोले यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. या आदेशाची प्रत राज्य निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना पुढील तातडीच्या कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोणाचे पारडे जड ठरणार आणि सत्तेसाठी कोणती नवीन समीकरणे उदयाला येणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी रस्सीखेचजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षीय स्तरावर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. प्रत्येक गट आपली रणनीती आखण्यात व्यस्त असून, सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. प्रशासनाकडून अधिकृत घोषणा कधी होणार, याकडे नवनिर्वाचित सदस्यांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्याची स्थिती पाहता, येत्या सोमवारपर्यंत अध्यक्षपदाचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात 'वेट अँड वॉच'ची भूमिका पाहायला मिळत आहे.राष्ट्रवादीत अध्यक्षपदासाठी ‘सव्वा वर्षाचा’ प्लॅन?अध्यक्षपदाची पहिली अडीच वर्षे सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुली असल्याने या पदासाठी इच्छुकांची मोठी फळी तयार झाली आहे. सर्वांना संधी मिळावी आणि पक्षात नाराजी नाट्य घडू नये, यासाठी राष्ट्रवादी आता 'सव्वा-सव्वा वर्षांचा' विशेष फॉर्म्युला अमलात आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अध्यक्षपदाचा एकूण कार्यकाळ मोठा असला तरी, अंतर्गत तडजोडीनुसार अडीच वर्षांच्या कालावधीचे दोन भाग करून दोन वेगवेगळ्या नेत्यांना संधी देण्याबाबत पक्षीय पातळीवर खलबते सुरू आहेत. या नव्या सूत्रामुळे जास्तीत जास्त चेहऱ्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असला तरी, पक्षश्रेष्ठी अखेर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Taliban on Pakistan: “‘लज्जास्पद कृत्याला’योग्य उत्तर देणार” ; तालिबानचा पाकिस्तानला थेट इशारा
Taliban on Pakistan: अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत केलेल्या हवाई हल्ल्यानंतर, तालिबानने जोरदार लष्करी प्रत्युत्तराचे संकेत दिले आहेत.
Anupama Singh: संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या ५५ व्या अधिवेशनात, पाकिस्तान आणि इस्लामिक सहकार्य संघटनेने (आयओसी) जम्मू आणि काश्मीरबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले.
Walmik Karad : न्यायमूर्ती एम एम सुंदरेश यांच्यासमोर आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.
Panvel Karjat Local Train: पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार; प्रवाशांचा वेळ वाचणार
मुंबई: पनवेल आणि कर्जत या दोन्ही स्थानकांना जोडणारा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. तसे पाहिले तर पनवेल आणि कर्जत रेल्वे स्थानके ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून दोन दिशेला असलेली शेवटची रेल्वे स्थानके आहेत. पनवेल हे मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील शेवटचे रेल्वे स्थानक आहे. तर, कर्जत हे मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय रेल्वेचे शेवटचे स्थानक आहे. त्यामुळे एका स्थानकातून दुसऱ्या स्थानकात जायचे असेल तर आधी ठाणे स्थानकात येऊन ट्रान्स हार्बर मार्गाने पुढे जावे लागते. परंतु आता नवीन कॉरिडोरमुळे पनवेल आणि कर्जतच्या मध्ये थेट लोकल रेल्वे केनक्टिव्हिटी मिळणार आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पा अंतर्गत मुंबई रेल विकास महामंडळ हे पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडोरची निर्मिती करत आहे.या कॉरिडोरवर एकूण पाच स्थानके असणार आहेत. पनवेल, चिखले, पोयंजे, चौक आणि पनवेल अशी स्थानके असतील. पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा बोगदा या प्रकल्पाअंतर्गत तयार केला जात आहे. या नव्या रेल्वे मार्गावर तीन बोगदे तयार करणार असून, तिन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा स्थानका दरम्यान सध्या १.६ किमी पारसिक बोगदा हा सर्वात मोठा बोगदा आहे. मात्र पनवेल - कर्जतदरम्यानच्या वावर्ले येथील २.६ किमी लांबीचा बोगदा उभारला आहे. वावर्ले येथील बोगदा सर्वाधिक लांबीचा आहे. या बोगद्यात अनेक नवीन तंत्रज्ञानाचा आणि खडी नसलेला क्राँक्रिटचा ट्रॅक बनवण्यात येत आहे. आधुनिक स्काडा सिस्टीम यात लावली आहे.प्रवाशांसाठी मोठा फायदा, प्रवासात ३० मिनिटांची बचत
Orange Benefits: रोज एक संत्रे खाल तर शरीर म्हणेल धन्यवाद! जाणून घ्या ‘५’जबरदस्त फायदे
Orange Benefits दररोज एक संत्रे खाल्ल्याने इम्युनिटी वाढते. संत्र्यातील व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्तपेशींचे उत्पादन वाढवते. या पेशी शरीराला व्हायरस आणि बॅक्टेरियांपासून संरक्षण देतात. बदलत्या हवामानात सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी संत्रे उपयुक्त ठरते.
उंदीर फळे खातात म्हणून फळविक्रेत्याने फळांना चक्क 'रॅट किलर'औषध लावलं; दोघांना अटक
मुंबई: मुंबई शहरात जर तुम्ही रस्त्यावर फळ घेत असाल तर सावधान! कारण मालाड परिसरात फळ विक्रेताचा एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. यात मालाडमध्ये एका परप्रांतीय फळ विक्रेताचा बेजबाबदारपणा लोकांच्या जीवावर बेतू शकतो अशीच एक घटना समोर आली आहे. यात फळ विक्रेत्याकडून फळांवर चक्क उंदीर मारण्याचं औषध (Ratol) सारखी क्रीम लावून थेट मुंबईकरांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता कारवाई करत फळांना 'रॅट किलर' औषध लावणाऱ्या दोघांना अटक केली आहे.मुंबईकरांच्या जीवाशी खेळदरम्यान, या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे कि, फळ विक्रेता कच्च्या फळांना पिकवण्यासाठी थेट विषारी क्रीम लावून पकवत आहे. फळविक्रेताजे Ratol सारखे विषारी पदार्थ वापरात आहे ते वापरल्याने उलटी, पोटदुखी, विषबाधा, लिव्हर नुकसान आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, या फळविक्रेताकडून मुंबईकरांची आरोग्याची चिंता नसून तो सर्रासपणे मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून फळविक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी पालिका आणि पोलिसांकडे केली. त्यांनतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ कारवाई केली आहे. यात उंदीर मारण्याचे औषध फळांवर लावणाऱ्या दोघांना मालाड पोलिसांनी अटक केली असून मनोजकुमार केसरवाणी, बिपीन केसरवाणी अशी या आरोपींची नावे आहेत.खरंतर मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अनधिकृत फळवाले स्टॉल लावून फळ विकतात. कच्चे फळ लवकर पिकण्यासाठी चक्क विषारी पदार्थ लावून फळ लवकर पिकवून मग विकतात. मात्र, अशामध्ये मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडत असल्याचे देखील नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे मुंबईकरांचा जीवाशी खेळणारे असे फळविक्रेतांवर तात्काळ पोलिसांनी आणि मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी सुरू आहे.तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली असता उंदरांपासून बचावासाठी प्रयोग केल्याचा अजब दावा फळविक्रेत्याने केला आहे. 'उंदीर फळे खातात, म्हणून आम्ही त्यावर औषध लावत होतो' अशी कबुली फळविक्रेत्याने दिल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन फळांचे नमुने घेत जप्त केले आहेत.
Budget Session : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आलेल्या प्रश्नांची उत्तरं हे दोन मंत्री देणार
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार २३ फेब्रुवारी पासून सुरु झाले आहे. सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्पीय सादर करतील.अशातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अधिवेशन काळापुरता आपल्याकडील खात्यांचा कार्यभार सहकारी मंत्र्यांकडे सोपवला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वतीने दोन मंत्री प्रश्नांची उत्तरं देतील.राज्य उत्पादन शुल्क या विभागाच्या संबंधित प्रश्नांची उत्तर मंत्री हसन मुश्रीफ (वैद्यकीय शिक्षण मंत्री), क्रीडा आणि युवक कल्याण विभागाशी संबंधित प्रश्नांची उत्तरं मंत्री दत्तात्रय भरणे (कृषी मंत्री), आणि अल्पसंख्याक आणि औकाफ विभागाशी संबंधित प्रश्नांची उत्तरं मंत्री दत्तात्रय भरणे (कृषी मंत्री) देतील.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून सुनेत्रा पवार यांनी पदभार अन्य मंत्र्यांकडे सोपवत असल्याची माहिती दिली.
CJI Surya Kant on NCERT: सर्वोच्च न्यायालयाने आज आठवीच्या एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातील एका प्रकरणावरील वादावर सुनावणी केली.
Saiyami Kher Mumbai Air Pollution Post : 'मला तो जुना आनंद पुन्हा अनुभवायचा आहे, पण परिस्थिती बदलली आहे. आता धावण्यापूर्वी मला मास्क घालावा लागतो'
Boost Immunity इम्युनिटी एका दिवसात वाढत नाही. ती आपल्या रोजच्या आहार आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. योग्य अन्नपदार्थांचा समावेश केल्यास शरीर संसर्गांपासून चांगल्या प्रकारे लढू शकते.
Benjamin Netanyahu: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इस्राईल दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांसाठी महत्वाचे करार होणारे आहेत.
Sanjay Raut : संजय राऊतांची निर्दोष मुक्तता, सत्र न्यायालयाचा निकाल; काय आहे नेमकं प्रकरण?
Sanjay Raut : माझगाव कोर्टाने २५ हजारांचा दंड आणि १५ दिवसांची कैद अशी ही शिक्षा होती. या शिक्षेला संजय राऊत यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.
PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान
- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधानतेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यासाठी रवाना झाले. हा त्यांचा दुसरा इस्रायल दौरा आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः अमेरिका आणि इराणमधील बिघडत चाललेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर, भारत-इस्रायल धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी इस्रायली संसदेला संबोधित केले.‘स्पीकर ऑफ द नेसेट’ने सन्मानित :दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी इस्रायली संसद नेसेटला संबोधित केले. यावेळी त्यांना इस्रायलच्या ‘स्पीकर ऑफ द नेसेट’ पदकाने सन्मानित करण्यात आले. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.बुधवारी (२५ फेब्रुवारी) इस्रायली संसद नेसेटमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर नेसेटचे सभापती अमीर ओहाना यांनी त्यांना इस्रायलचा सर्वोच्च बहुमान प्रदान केला. पंतप्रधानांना ओहाना यांनी स्पीकर ऑफ द नेसेट हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला. हा सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी याला भारत आणि इस्रायली मैत्रीचे प्रतीक संबोधले. नेसेटमधील भाषणानंतर पंतप्रधान मोदींचे टाळ्यांच्या कडकडाटात इस्रायली खासदारांनी स्वागत केले. तसेच त्यांच्यासोबत अनेकांनी सेल्फी आणि फोटोही काढले.I am deeply honoured to receive the Medal of the Knesset.I accept it with humility and gratitude.This honour is not a tribute to an individual, but to the enduring friendship between India and Israel.It reflects the shared values that guide our two nations.@KnessetENG https://t.co/OGtBMTsLuC pic.twitter.com/6H6Dt9sP6v— Narendra Modi (@narendramodi) February 25, 2026पॅलेस्टाईनकडूनही मिळाला आहे सन्मान :यापूर्वी २०१८ मध्ये पंतप्रधान मोदींना पॅलेस्टाईनने ग्रॅंड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन या पुरस्काराने गौरवले होते. इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही शत्रू देशांकडून त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे.इस्रायली पंतप्रधानांनी केले स्वागत :पंतप्रधान मोदी तेल अवीवमध्ये दाखल झाल्यानंतर स्वत: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रोटोकाल बाजूला ठेवून त्यांचे स्वागत केले. यावेळी एअरपोर्टवर दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताची धुन वाजवण्यात आली. तसेच पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी हिंदीमध्ये ‘नमस्ते’ आणि हिब्रूमध्ये ‘शालोम’ लिहून एक ऐतिहासिक संदेश देण्यात आला. शालोमचा अर्थ शांतता असा होतो. जो आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये भारताच्या भूमिकेचे वर्णन करतो.
DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे. वाढत्या महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत असताना कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण वाढत होता. त्यामुळे महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून वारंवार केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत अधिकृत निवेदन सादर करत महागाई भत्ता वाढीची घोषणा केली. राज्य सरकारने महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ मंजूर केली आहे. यामुळे सध्या ५५ टक्के असलेला महागाई भत्ता थेट ५८ टक्क्यांवर गेला आहे. ही वाढ केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात लक्षणीय फरक पडणार आहे.विशेषतः मध्यम व कनिष्ठ वेतन गटातील कर्मचाऱ्यांना याचा अधिक लाभ होणार आहे. सुमारे ५ लाख १६ हजार शासकीय कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होईल. धुळवडीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मिळालेली ही भेट कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक रंगांची उधळण करणारी ठरली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही वाढ जुलै २०२५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. म्हणजेच जुलै २०२५ पासून वाढीव दराने महागाई भत्ता ग्राह्य धरला जाईल. जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जमा झालेली थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना अदा केली जाणार आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, ही थकबाकी मार्च २०२६ मध्ये गुढीपाडव्याच्या सुमारास देण्यात येईल. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक दिलासा मिळणार आहे.वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी २०२६ पासून नियमितपणे रोखीने देण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र शासकीय आदेश काढले जाणार असून, संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले जातील. या निर्णयामुळे केवळ कार्यरत कर्मचारीच नव्हे तर सुमारे ८ लाख ७२ हजार सेवानिवृत्त कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांनाही फायदा होणार आहे. त्यांच्या निवृत्तीवेतनातही वाढ होणार असल्याने हा निर्णय व्यापक स्वरूपाचा ठरतो. दरम्यान, केंद्र सरकार आठव्या वेतन आयोगाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पुढील दोन वर्षांत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनरचनेत मोठे बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही भविष्यात वेतनवाढीची मागणी होण्याची शक्यता आहे. सध्या मात्र महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आणि आर्थिक स्थैर्य देणारा टप्पा मानला जात आहे.
R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन
स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे बुधवारी (२५ फेब्रुवारी) राजीव गांधी सरकारी जनरल रुग्णालयात निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते आणि बऱ्याच काळापासून वृद्धापकाळाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते.रुग्णालयाच्या निवेदनानुसार, १ फेब्रुवारी रोजी त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले होते. तज्ञांच्या देखरेखीखाली उपचार करूनही त्यांची प्रकृती सुधारली नाही आणि त्यांची प्रकृती चिंताजनक राहिली. बुधवारी दुपारी १:५५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.कॉम्रेड आरएनके म्हणून प्रसिद्ध असलेले नल्लाकन्नू यांनी त्यांच्या जवळजवळ आठ दशकांच्या सक्रिय राजकीय कारकिर्दीत साधेपणा, प्रामाणिकपणा आणि निःस्वार्थ सेवेचे उदाहरण दिले. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९२५ रोजी तुतीकोरिन (आता थूथुकुडी) जिल्ह्यातील पेरुम्पाथु गावात झाला. लहानपणीच त्यांनी गरिबी आणि शोषण जवळून पाहिले.कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित होऊन ते १९४६ मध्ये सीपीआयमध्ये सामील झाले, जेव्हा देश अजूनही वसाहतवादी राजवटीखाली होता. १९४८ मध्ये त्यांना नेल्लई कट प्रकरणात अटक करण्यात आली आणि सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तुरुंगवासादरम्यान त्यांनी अमानुष छळ सहन केला. एका घटनेत, एका पोलिसांनी त्यांच्या मिशा सिगारेटने जाळल्या, त्यानंतर त्यांनी आयुष्यभर कधीही मिशा वाढवल्या नाहीत.नल्लाकन्नू यांनी शेतकरी आणि शेतमजुरांच्या हक्कांसाठी अथक लढा दिला. त्यांनी शोषण करणाऱ्या जमीनदारांना विरोध केला, तामिळनाडूच्या नद्यांमध्ये बेकायदेशीर वाळू उत्खननाविरुद्ध मोहीम राबवली आणि सामान्य लोकांशी संबंधित प्रत्येक मुद्दा उपस्थित केला. ते पर्यावरण संरक्षणाचेही कट्टर समर्थक होते आणि कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पासारख्या प्रकल्पांविरुद्ध आवाज उठवला.१३ वर्षे सीपीआयचे राज्य सचिव म्हणून काम करूनही, त्यांनी अतिशय साधे जीवन जगले. त्यांच्या ८० व्या वाढदिवशी, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना एक कार आणि १ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली, जी त्यांनी व्यासपीठावरून परत केली आणि सांगितले की ही रक्कम जनतेची आहे.२०२२ मध्ये, राज्य सरकारने त्यांना थगैसाल तमिझर पुरस्कार देऊन सन्मानित केले आणि त्यांना 15 लाख रुपये दिले. त्यांनी ही रक्कम परत केली आणि स्वतःच्या खिशातून ५,००० रुपये मुख्यमंत्री मदत निधीत जमा केले. २००८ मध्ये आंबेडकर पुरस्कार आणि २०२३ मध्ये थगैसाल तमिझर पुरस्कारासह त्यांना अनेक सन्मानांनी सन्मानित करण्यात आले.
Chabahar Port: भारताच्या नवीन अर्थसंकल्पात चाबहार बंदरासाठी निधी उपलब्ध नसल्याबद्दल इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी निराशा व्यक्त केली. त्यांनी म्हटले की हा निर्णय भारत आणि इराण दोघांसाठीही निराशाजनक आहे.
Iftar Meal Plan: रोजा सोडताना काय खावं? जाणून घ्या इफ्तारसाठी योग्य आहारक्रम!
Iftar Meal Plan तज्ज्ञांच्या मते, इफ्तारचा उद्देश फक्त पोट भरून समाधान मिळवणे नसून शरीरातील पाणी, मीठ आणि प्रोटीनची कमतरता भरून काढणे हा असावा. चुकीच्या पद्धतीने इफ्तार केल्यास अॅसिडिटी, डोकेदुखी, बेचैनी आणि दुसऱ्या दिवशी आळस जाणवू शकतो.
Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त
ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने कटक सर्कलमधील खाणींचे उपसंचालक देवव्रत मोहंती यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल चार कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. राज्याच्या इतिहासातील दक्षता विभागाने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी रोख जप्ती असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कटक सर्कलमध्ये कार्यरत असलेले खाणींचे उपसंचालक देवव्रत मोहंती यांनी एका परवानाधारक कोळसा व्यापाऱ्याकडून त्याचा कोळसा डेपो सुरळीत चालवण्यासाठी आणि कोळशाच्या वाहतुकीला परवानगी देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या तक्रारीनंतर ओडिशा दक्षता विभागाने सापळा रचत मंगळवारी (२४ फेब्रुवारी) कारवाई केली आणि मोहंती यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून लाचेची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली असून तत्काळ त्यांना अटक करण्यात आली.अटकेनंतर दक्षता विभागाने एकाच वेळी तीन ठिकाणी धाडी टाकल्या. भुवनेश्वर येथील त्यांच्या निवासस्थानी, भद्रक जिल्ह्यातील मथासाही येथील वडिलोपार्जित घरी तसेच कटक येथील कार्यालयातील दालनात झडती घेण्यात आली. भुवनेश्वरमधील पाटिया परिसरातील श्रीविहार नेचर क्रेस्ट अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. ही रक्कम ट्रॉली बॅग आणि कपाटांमध्ये लपवून ठेवण्यात आली होती. प्राथमिक माहितीनुसार, जप्त केलेली रक्कम चार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.सध्या जप्त केलेल्या रोकड रकमेची मोजणी सुरू असून अंतिम आकडा मोजणी पूर्ण झाल्यानंतर जाहीर केला जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, राज्यातील सतर्कता विभागाच्या कारवाईत इतक्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे.या धाडीतून मोहंती यांच्या इतर संपत्तीबाबतही माहिती समोर आली आहे. भुवनेश्वरमधील पहाला परिसरात त्यांचे दुमजली घर असल्याचे उघड झाले आहे. याशिवाय सुमारे १३० ग्रॅम सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांकडून इतर मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असून बेहिशोबी संपत्तीबाबत अधिक तपास केला जात आहे.या कारवाईमुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेला अधिक वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दक्षता विभागाच्या या मोठ्या कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर
- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्टमुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने राबविलेल्या सातत्यपूर्ण उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून जानेवारी २०२६ मध्ये अपघाती मृत्यूंमध्ये ८.०५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. जानेवारी २०२५ मध्ये १,४२७ अपघाती मृत्यू झाले होते, तर जानेवारी २०२६ मध्ये ही संख्या १,३१२ वर आली आहे. म्हणजेच ११५ मृत्यूंनी घट झाली आहे. त्याचप्रमाणे अपघातांची एकूण संख्या ३,१६४ वरून ३,१०० वर आली असून त्यात २ टक्क्यांची घट झाली आहे.रस्ता सुरक्षा उपायांमुळे अनेक जिल्ह्यांत मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे. नंदूरबार येथे ५० टक्के, सोलापूर शहर व वाशिम येथे प्रत्येकी ३६ टक्के, सिंधुदुर्ग येथे २९ टक्के, वर्धा येथे २८ टक्के, धाराशिव येथे २४ टक्के, गोंदिया व अमरावती ग्रामीण येथे प्रत्येकी २२ टक्के, तर नांदेड व नागपूर शहर येथे प्रत्येकी २१ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.राज्यातील अपघातांची संख्या सन २०३० पर्यंत ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून परिवहन विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्य व जिल्हास्तरावर रस्ता सुरक्षा कक्ष स्थापन करण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र रस्ता सुरक्षा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट्स’वर सुधारणा करण्यात येत आहेत.नियमभंगाविरोधात कारवाईसाठी राज्यात ३३२ पथके कार्यरत असून रडार व इंटरसेप्टर वाहनांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. हेल्मेट नसलेल्या ८९,६५१ चालकांवर , मागे बसलेल्या व हेल्मेट न घातलेल्या १३,३४८ प्रवाशांवर, वेगमर्यादा उल्लंघनाच्या ८,५२० तसेच सीटबेल्ट न वापरणाऱ्या चालकांवर ८,०२४ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. तसेच अवैध पीयूसी, अवैध विमा व ट्रिपल रायडिंगविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. हेल्मेट व सीटबेल्ट सक्तीकरिता एआय आणि रडार तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे.वाहनांची तांत्रिक स्थिती योग्य राहावी यासाठी ५३ शासकीय व १३ खाजगी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे (एटीएस) सुरू करण्यात येत आहेत. कुशल वाहनचालकांनाच परवाना देण्यासाठी ३८ स्वयंचलित वाहन चाचणी पथ (एडीटीटी) सुरू होणार आहेत. राज्यातील सुमारे २५ हजार किलोमीटर रस्त्यावर आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर अपघातांत १९ टक्क्यांची घट झाल्याचा दावा विभागाने केला आहे.अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये तात्काळ उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारची ‘पीएम राहत’ योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र अपघातग्रस्तांना सात दिवसांपर्यंत व दीड लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहेत. अपघाताच्या वेळी ११२ या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका व जवळच्या रुग्णालयाची माहिती मिळू शकते. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ‘जीवनदूत’ व्यक्तींना २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.परिवहन विभागाच्या मते, तंत्रज्ञानाधिष्ठित अंमलबजावणी, कडक कारवाई आणि जनजागृती मोहिमांमुळे राज्यात अपघाती मृत्यू कमी करण्यास यश मिळत असून २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याच्या उद्दिष्टाकडे राज्याची वाटचाल सुरू आहे, असे परिवहन विभागाचे अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी कळविले आहे.
Rohit Pawar At Baramati Police Station: पोलिस स्टेशनबाहेर बारामतीकरांनी मोठी गर्दी केली असून एफआयआर दाखल करून घेण्यासाठी बारामतीकर आक्रमक झाले आहेत.
Devdas Movie: ‘मार डाला’च्या शूटिंगवेळी माधुरी-शाहरुख जखमी! भव्य गाण्यामागचं लपलेलं दुःख उघड
Devdas Movie ‘देवदास’मध्ये चंद्रमुखीची भूमिका साकारणाऱ्या माधुरी दीक्षित यांनी अलीकडेच या गाण्याच्या शूटिंगबद्दल एक खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, ‘मार डाला’चं चित्रीकरण त्यांच्या करिअरमधील सर्वात कठीण अनुभवांपैकी एक होतं.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे'नवे नियम लागू
नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर नियमांमध्ये मोठे बदल सुचवले आहेत. सहा दशकांहून अधिक काळ लागू असलेल्या जुन्या कायद्याची जागा घेणारा नवा ‘आयकर कायदा, २०२५’ येत्या १ एप्रिलपासून अंमलात येणार असून, त्यासोबतच कर विवरणपत्रे, लेखा परीक्षण आणि विविध कर दाव्यांसाठी नवे मसुदा अर्ज (फॉर्म्स) प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या मसुद्यांवर हितधारकांकडून मते मागवण्यात आली असून, पुढील महिन्यात अंतिम नियम अधिसूचित होण्याची शक्यता आहे.नव्या कायद्याअंतर्गत कर वजावटीवर अधिक काटेकोर लक्षनव्या तरतुदीनुसार, कर वजावटीचा दावा करताना भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील संबंधांची सविस्तर माहिती आता प्राप्तिकर विवरणपत्रात उघड करावी लागणार आहे. आतापर्यंत केवळ भाड्याची रक्कम आणि घरमालकाचा पॅन देणे पुरेसे होते. मात्र नव्या प्रणालीत नातेवाईकांमधील व्यवहारांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. यामुळे खोटे किंवा फुगवून सांगितलेले घरभाडे भत्ता (HRA) दावे प्राथमिक टप्प्यातच हेरले जातील, असा कर प्रशासनाचा उद्देश आहे.लेखा परीक्षकांची जबाबदारी वाढणारया नव्या मसुद्यांमुळे सनदी लेखापाल (CA) आणि लेखा परीक्षकांवर अधिक जबाबदारी येणार आहे. विशेषतः परदेशी उत्पन्नावर घेतल्या जाणाऱ्या फॉरेन टॅक्स क्रेडिट (FTC) दाव्यांसाठी स्वतंत्र आणि सखोल पडताळणी बंधनकारक केली जाणार आहे. ‘फॉर्म ४४’ अंतर्गत लेखा परीक्षकांना परदेशी कर कपात प्रमाणपत्रे, प्रत्यक्ष पेमेंटचे पुरावे, चलन विनिमय दराचे अचूक रूपांतर आणि दुहेरी कर टाळण्यासाठी लागू असलेल्या कर करारांच्या अटी तपासाव्या लागणार आहेत.बनावट दावे ओळखण्यासाठी नवे निकषप्रशासकीय दृष्टीने पाहता, या बदलांचा खऱ्या करदात्यांना त्रास होणार नाही, असा दावा तज्ज्ञ करतात. ‘Nangia Global Advisors’चे भागीदार संदीप झुनझुनवाला यांच्या मते, मालकी हक्क किंवा प्रत्यक्ष पेमेंटचा ठोस पुरावा नसलेल्या बनावट दाव्यांची अचूक ओळख पटवणे आता सोपे होईल. आवश्यक असल्यास असे दावे थेट फेटाळले जाऊ शकतील.पॅन कार्ड आणि कर लेखा परीक्षणात कडक नियमनव्या नियमांनुसार, कंपन्यांना पॅन कार्डसाठी अर्ज करताना प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल की, त्यांच्याकडे आधीपासून कोणताही पॅन अस्तित्वात नाही. एकापेक्षा अधिक पॅन वापरून होणारी फसवणूक रोखणे आणि डेटाबेसची विश्वासार्हता वाढवणे, हा यामागचा उद्देश आहे.तसेच ‘फॉर्म २६’ अंतर्गत कर लेखा परीक्षणात वैधानिक लेखा अहवालातील कोणत्याही प्रतिकूल निरीक्षणांचा कंपनीच्या नफा-तोट्यावर नेमका काय परिणाम झाला आहे, हे स्पष्ट करणे बंधनकारक असेल.डिजिटल माहितीवरही सरकारची नजरकंपन्यांना आता त्यांच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरची माहिती, डेटा ज्या क्लाउड सर्व्हरवर साठवला आहे त्याचा आयपी पत्ता, डेटा कोणत्या देशात संग्रहित आहे आणि भारतातील बॅकअप सर्व्हरचा पत्ता देणेही अनिवार्य केले जाणार आहे.एकूणच, नव्या आयकर कायद्याअंतर्गत पारदर्शकता, जबाबदारी आणि डिजिटल नियंत्रण वाढवण्यावर सरकारचा भर असून, कर वजावटीतील त्रुटींना आळा घालण्याचा हा मोठा प्रयत्न मानला जात आहे.
Share Market Today: आठवड्याच्या चौथ्या व्यापारी दिवशी म्हणजेच आज देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात जोरदार झाली. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स २०० अंकांनी म्हणजेच ०.२७% ने वाढून ८२,४१८ वर पोहोचला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर १०० दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. १०० दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा ओलांडणारे नरेंद्र मोदी हे जगातले पहिले राजकारणी ठरले आहेत.मोदी यांनी २०१४ मध्ये इंस्टाग्रामवर आपलं अकाउंट उघडलं होतं. मोदींच्या फॉलोअर्सची संख्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा दुप्पट आहे. ट्रम्प ४३.२ दशलक्ष फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
PM Modi New Record: पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रसिद्धी ही जगात पसरली आहे. आता त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर इतिहास रचला आहे.
Ajit Pawar: “आम्हीही दुःखी आहोत, पण सुनेत्रा पवार यांचं दुःख डोंगराएवढं”…नाना पाटेकर भावूक
Ajit Pawar अभिनेते नाना पाटेकर हे नुकतेच सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेले होते. अजित पवार आणि नाना पाटेकर यांच्यात अनेक वर्षांची घट्ट मैत्री होती. त्यामुळे या घटनेने नाना पाटेकर यांनाही मोठा धक्का बसला.
Ajit Pawar : आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आक्रमक पवित्रा घेतला.

27 C