अशोक खरात आणि रुपाली चाकणकर तसेच खरात आणि चाकणकरांची बहीण यांच्यात अनेकदा झालेले फोन कॉल ?
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात आणि रुपाली चाकणकर तसेच खरात आणि चाकणकरांची बहीण यांच्यात अनेकदा फोन कॉल झाल्याचा आरोप उबाठाच्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.फसवणूक करून महिलांवर अत्याचार करणे, समोरच्या व्यक्तीच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणे, राजकीय लागेबांधे यांचा वापर करून कायदे धाब्यावर बसवणे, गरज पडल्यास दहशत बसवून पैसे उकळणे हे प्रकार अशोक खरात करत होता का ? करत असल्यास कसे आणि कोणकोणत्या प्रकरणात हे घडले आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. अशोक खरात आणि चाकणकर भगिनी यांच्यातील लागेबांधे याचाही तपास सुरू आहे. पोलिसांचे विशेष तपास पथक अर्थात एसआयटी चौकशी करत आहे.महिलांचे लैंगिक शोषण, जादूटोणा, आर्थिक फसवणूक, दमदाटी आणि धमकी आदी प्रकरणांमध्ये अशोक खरात विरोधात नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये पोलिसांत अनेक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सध्या अशोक खरातला एका प्रकरणात न्यायालयीन आणि दुसऱ्या प्रकरणात पोलीस कोठडी झाली आहे. एसआयटीचे अधिकारी खरातची चौकशी करत आहेत. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात १७७ फोन कॉल झाले. दोघांमध्ये ३३ हजारांपेक्षा जास्त सेकंदांसाठी बोलणे झाले आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा यांच्याशीही अशोक खरातचे २३६ फोन कॉल झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. या प्रकरणातही तपास सुरू आहे.
Petrol Diesel Prices: जगातील या मोठ्या चढ-उतारांच्या दरम्यान, भारताची राजधानी नवी दिल्लीत पेट्रोलचा दर ९४.७७ रुपये आणि डिझेलचा दर ८७.६७ रुपये प्रति लिटर इतका आहे.
Russian Plane Crash : रशियाचे लढाऊ विमान क्रिमियामध्ये कोसळले
रशियाच्या हवाई दलाचे सुखोई-३० हे लढा विमान आज क्रिमियामध्ये (Russian Plane Crash) कोसळले. प्रशिक्षणाच्या नियमित उड्डाणादरम्यान हे विमान कोसळले असल्याचे माध्यमांनी सांगितले.
Kevin Pietersen Predictions : अवघ्या ६ सामन्यांनंतरच इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज केविन पीटरसन याने प्लेऑफच्या शर्यतीबाबत एक खळबळजनक भाकीत वर्तवले आहे
निवडणूक आयोगाला पाठवलेल्या ‘त्या'पत्रावरून राष्ट्रवादीत ठिणगी?
मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत वादाचे वारे वाहू लागले असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि आमदार शिवाजीराव गर्जे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या एका पत्रात ज्येष्ठ नेत्यांच्या पदांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचा ठपका ठेवत तटकरे यांनी गर्जे यांना झापल्याचे समजते.अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली. पक्षाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर १० मार्च रोजी त्यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले होते. या पत्रात सुनेत्रा पवार यांच्या नावासमोर 'अध्यक्षा' आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावासमोर 'खजिनदार' असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. मात्र, याच पत्रात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नावांचा उल्लेख असताना त्यांच्या पदांचा उल्लेख करण्यात आला नव्हता. हे पत्र कार्यालयीन जबाबदारी सांभाळणारे शिवाजीराव गर्जे यांनीच तयार केल्याचे समोर आल्यानंतर तटकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नेमका वाद काय? :२६ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीतील कागदपत्रांमध्ये केवळ 'राष्ट्रीय अध्यक्ष' आणि 'कोषाध्यक्ष' या दोनच पदांचा उल्लेख करण्यात आला होता. याच तांत्रिक मुद्द्यावरून तटकरे आणि गर्जे यांच्यात वादाची ठिणगी पडली. पक्षातील सर्वोच्च नेत्यांची पदे डावलल्याने तटकरे नाराज असल्याचे बोलले जात आहे.
अमित ठाकरेंकडे पुणे, यशवंत किल्लेदारांकडे कोल्हापूर
मनसेकडूनही जिल्हा संपर्क अध्यक्षांची घोषणामुंबई : शिवसेनेपाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जिल्हावार संपर्क अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या संपर्क अध्यक्षांची शुक्रवारी घोषणा केली.पक्षाने जाहीर केलेल्या या यादीत अमित ठाकरेंकडे पुणे, बाळा नांदगावकर यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर, संदीप देशपांडे यांच्याकडे रायगड आणि नितीन सरदेसाई यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, कोल्हापूर जिल्ह्यासाठी पक्षाचे मुंबईतील नगरसेवक यशवंत किल्लेदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमुख नेत्याकडे संपर्काची जबाबदारी सोपविताना अन्य पदाधिकाऱ्यांनाही त्यात सामावून घेण्यात आले आहे.मनसेच्या नव्या संपर्क अध्यक्षांची यादी पुढील प्रमाणे : संदीप देशपांडे, योगेश परुळेकर, राजेश येरुणकर (रायगड); शिरीष सावंत, संदीप दळवी (सिंधुदुर्ग); नितीन सरदेसाई, शिरीष सावंत (रत्नागिरी); मनोज चव्हाण, संजय नाईक (ठाणे); राजू पाटील, केतन नाईक(पालघर); अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, अमेय खोपकर(पुणे); किशोर शिंदे, सुधीर पाटणकर(सोलापूर); रणजित शिरोळे, गणेश सातपुते(सातारा); यशवंत किल्लेदार, नंदकुमार चिले (कोल्हापूर); दिलीप धोत्रे(लातूर); राजेंद्र वागसकर(धाराशिव); बाळा नांदगावकर, विनायक म्हशीलकर, दिलीप चितलंगे, बिपिन नाईक (छत्रपती संभाजी नगर); जयप्रकाश बाविस्कर(जालना); संतोष नगरगोजे, सतनामसिंग गलोटी(नांदेड); प्रकाश भोईर(धुळे); कर्णबाळा दुनबळे(नंदुरबार); संदिप पाचंगे, आशिष साबळे(जळगाव); अविनाश जाधव, अभिजित पानसे(नाशिक); नयन कदम(अहिल्यानगर); हेमंत संभूस(नागपूर); राजू उंबरकर(अमरावती); हेमंत गडकरी(अकोला); प्रशांत कनोजिया(यवतमाळ); बाळा शेडगे(बुलढाणा).
School News: ‘इंटरनॅशनल’किंवा ‘ग्लोबल’नाव लावणाऱ्या शाळांवर सरकारची करडी नजर; नवा GR जारी
School News: जर तुमची शाळा आंतरराष्ट्रीय बोर्डाची नसेल, तर तुम्हाला 'इंटरनॅशनल' असे बोर्ड लावता येणार नाही. तसे केल्यास आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
Nashik: नाशिकमध्ये एकापाठोपाठ एक अशा घटना समोर येत असल्याने सोशल मीडियावर याला 'खरात पॅटर्न २' असे म्हटले जात असून, सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
Congress Leader Death : ट्रकची कारला जोरदार धडक; बड्या काँग्रेस नेत्यासह चालकाचा जागीच मृत्यू
Congress Leader Death : हरियाणातील सोनीपतमध्ये केजीपी एक्सप्रेसवेवर झालेल्या रस्ते अपघातात काँग्रेस नेते खुशबाज सिंह जट्टाना आणि त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला आहे.
Sanjiv Goenka Controversy : आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनी लखनऊ सुपर जायंट्सचे (LSG) मालक संजीव गोयनका यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका करत, त्यांना थेट 'जोकर' संबोधले आहे.
जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण
जळगाव : एकीकडे आखाती देशांमधील युद्धामुळे एलपीजी, पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत असताना दुसरीकडे सोन्याच्या दरावर मात्र वेगळाच परिणाम होताना दिसत आहे. इराण-अमेरिका युद्धामुळे सोने-चांदीचे दर घसरले आहेत.जळगावच्या सुवर्णबाजारात दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी २१६३ रुपयांची घट झाल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर पुन्हा २५७५ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५१ हजार २०४ रुपयांपर्यंत घसरले जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी दिवसभरात ६१८० रुपयांची घट झाल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी ६१८० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ४१ हजार २० रुपयांपर्यंत घसरलेआखाती देशांमधील या युद्धांमुळे सोन्याचे दर आतापर्यंत १२४८९ रुपयांची घसरण झाली आहे. तर युद्धाच्या कालावधी चांदीचे दर ४०,००० रुपयांनी घसरले आहेत. दरम्यान, जागतिक पातळीवर तणाव असला तरीही सोने-चांदीची मागणी वाढताना दिसत आहे. ही गुंतवणूक सुरक्षित असल्याने अनेक लोक सोने-चांदी खऱेदी करताना दिसत आहेत.
पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती १०९ डॉलरच्या पुढे
नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये तीव्र चढ-उतार होत आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल पुरवठ्यात व्यत्यय आल्यामुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती जवळपास आठ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल १०९.२४ डॉलरवर पोहोचल्या आहेत.शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणविरुद्ध संभाव्य लष्करी कारवाईचा इशारा दिल्यानंतर कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड फ्युचर्सच्या किमती जवळपास आठ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल १०९.२४ डॉलरवर पोहोचल्या आहेत. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूटीआय) क्रूड फ्युचर्स प्रति बॅरल १११.५४ डॉलरवर व्यवहार करताना दिसले.पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संकटामुळे साप्ताहिक आधारावरही कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार होत आहेत. गेल्या शुक्रवारच्या तुलनेत यूएस डब्ल्यूटीआय क्रूडच्या किमतींमध्ये तब्बल ११.९४ टक्क्यांची वाढ झाली. मात्र, याच कालावधीत ब्रेंट क्रूडच्या किमती ३.१४ टक्क्यांनी घसरल्या, जे बाजारातील अस्थिरता दर्शवते.
आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल
विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही अणु पाणबुडी आणि आयएनएस तारागिरी ही युद्धनौका नौदलात दाखल झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटर (एक्स) संदेशात “शब्द नाही, शक्ति आहे, ‘अरिदमन’!” असे नमूद करत कौतुक केले आहे.आयएनएस अरिदमन भारताची तिसरी अणुउर्जित बैलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (एसएसबीएन) आहे. ही के-१५ आणि के-४ सारख्या प्राणघातक बैलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे आणि पाण्याखाली सुमारे ४४ किलोमीटर प्रति तास वेगाने हालचाल करू शकते. तिची अदृश्यता आणि उच्च मारक क्षमता भारतीय नौदलाच्या अणु-प्रतिरोधक शक्ती आणि सामरिक क्षमतेत महत्त्वपूर्ण वाढ करते. आकार आणि क्षमता या दृष्टीने अरिदमन तिच्या श्रेणीतील पहिल्या दोन पाणबुड्यांपेक्षा मोठी आणि अधिक शक्तिशाली आहे. यासोबतच चौथी पाणबुडीही या श्रेणीची आहे, जी सध्या समुद्री चाचण्यांमध्ये (सी ट्रायल) आहे आणि पुढील वर्षी नौदलात समाविष्ट होण्याची शक्यता आहे.पाणबुडीसोबतच नौदलात आईएनएस तारागिरी देखील सहभागी झाली. आयएनएस तारागिरी प्रोजेक्ट 17-ए ची चौथी आधुनिक आणि स्वदेशी फ्रिगेट आहे. तब्बल ६६७० टन वजनाचे हे युद्धजहाज ‘मेक इन इंडिया’ क्षमतेचे आणि भारतीय शिपयार्ड्सच्या प्रगत अभियांत्रिकी कौशल्याचे प्रतीक आहे. हे युद्धजहाज ७५ टक्क्यांपेक्षा अधिक स्वदेशी साहित्य वापरून तयार केले आहे आणि प्रादेशिक सुरक्षा परिस्थितींमध्ये जलद बदलत्या वातावरणात भारतीय नौदलाच्या सामरिक क्षमतांना बळकटी देईल.तज्ज्ञांच्या मते, अरिदमन आणि तारागिरीच्या कमीशनिंगचा वेळ सध्या अत्यंत महत्वाचा आहे. कारण हिंद-प्रशांत क्षेत्रातील भारताची भूमिका वाढत आहे आणि देशाच्या पूर्व किनाऱ्याचे रणनीतिक महत्त्व सतत वाढत आहे. या समारंभातून भारतीय नौदलाची सामरिक स्वावलंबनता आणि आधुनिकता यांचा स्पष्ट संदेश मिळाला.
पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर उपाययोजना राबविण्याचे निर्देश
पुणे : पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील सुरू असलेली खोदकामे,अपूर्ण कामे,खड्डे तसेच अपुऱ्या निचऱ्यामुळे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आणि नागरिक,वाहनचालक व पादचारी यांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांनी तातडीने या परिस्थितीची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाला सर्वसमावेशक आणि परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. महापौरांनी स्पष्ट केले की,अशा प्रकारच्या परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तात्काळ,मध्यमकालीन आणि दीर्घकालीन अशा तीन स्तरांवर नियोजनबद्ध उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.शहरातील सर्व प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविणे व रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. सुरू असलेली सर्व खोदकामे सुरक्षितरीत्या बंदिस्त करून रस्ते पूर्वस्थितीत आणण्यावर भर दिला जाणार आहे. साचलेले पाणी तातडीने काढण्यासाठी पंपिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल तसेच प्रमुख चौक,पुल,अंडरपास व सखल भागात विशेष पथके नियुक्त करून सतत देखरेख ठेवली जाईल. नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद मिळावा यासाठी २४x७ नियंत्रण कक्ष अधिक सक्षम केला जाणार आहे.पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व गटार स्वच्छतेची कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जातील. वारंवार पाणी साचणाऱ्या ठिकाणांची यादी तयार करून त्या ठिकाणी स्वतंत्र निचरा आराखडा तयार केला जाईल. विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी विशेष समन्वय समिती स्थापन केली जाणार असून रोड कटिंग परवानग्यांवर कडक अंमलबजावणी केली जाईल. तसेच रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी तृतीय पक्ष तपासणी यंत्रणा लागू केली जाणार आहे.दीर्घकालीन उपाययोजना : शहरासाठी एकात्मिक पर्जन्यजल व्यवस्थापन आराखडा तयार करून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाईल. स्मार्ट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पूरस्थितीचे रिअल-टाइम मॉनिटरिंग सुरू करण्यात येणार आहे. अंडरग्राउंड युटिलिटी डक्ट प्रणाली विकसित करून वारंवार होणारी खोदकामे टाळली जातील तसेच सखल भागांमध्ये कायमस्वरूपी पंपिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येईल. यासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती मोहिम राबवून नाल्यात कचरा टाकण्याचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.
आगामी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी (BJP Candidate List) भाजपने जाहीर केलेल्या २७ उमेदवारांच्या यादीत अन्नामलाई यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Toll Free : राज्यातील ‘या’वाहनांना टोल माफ; कुठे-कुठे मिळणार सूट?
Toll Free : महाराष्ट्र ईव्ही धोरण २०२५ अंतर्गत इलेक्ट्रिक कार आणि बसना प्रमुख महामार्गांवर १००% टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे.
CSK vs PBKS : चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात होणारा सामना केवळ दोन संघांमधील लढत नसून एकाच घरातील दोन भावांमधील 'हाय-व्होल्टेज' युद्ध ठरणार आहे.
Crude Oil: इराणचे तेल घेऊन भारताकडे निघालेले जहाज चीनकडे वळवले; ‘हे’कारण आले समोर
Crude Oil: तज्ज्ञांच्या मते, जहाजाचा मार्ग बदलणे ही सामान्य प्रक्रिया आहे. जर भारत आणि विक्रेता यांच्यातील पेमेंटचा विषय सुटला, तर हे जहाज पुन्हा भारताकडे वळवले जाऊ शकते.
NCP News : सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद धोक्यात? पटेल- तटकरेंच्या सहीने झाली कोंडी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP News) अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे.
Raghav Chadha : राघव चढ्ढा भाजपमध्ये प्रवेश करणार? आतिशींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Raghav Chadha : आम आदमी पार्टीत मोठी फूट! राघव चढ्ढा यांना पदावरून हटवल्यानंतर आतिशी यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत.
शाळांना 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल'नाव वापरण्यास मज्जाव!
राज्य सरकारचा मोठा निर्णय; पालकांची दिशाभूल थांबवण्यासाठी निर्बंधमुंबई : आपल्या पाल्याला 'आंतरराष्ट्रीय' दर्जाचे शिक्षण मिळावे, या पालकांच्या ओढीचा फायदा घेत शाळांच्या नावांत सर्रास वापरल्या जाणाऱ्या 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल' यांसारख्या शब्दांना आता राज्य सरकारने चाप लावला आहे. स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या नावात अशा दिशाभूल करणाऱ्या शब्दांचा वापर करण्यास शिक्षण विभागाने मज्जाव केला असून, नुकताच यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला.राज्यात अनेक खासगी शाळांच्या नावामध्ये 'इंटरनॅशनल' किंवा 'ग्लोबल' शब्द असल्याने संबंधित शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याचा समज पालकांमध्ये निर्माण होतो. या नावांच्या आधारे अभ्यासक्रम, शिक्षणाची गुणवत्ता आणि भरमसाट शुल्क आकारणी याबाबत पालकांची दिशाभूल केली जात असल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शाळांच्या नामकरणाबाबत स्पष्ट नियमावली तयार करण्यात आली आहे.शासनाच्या नवीन निर्णयानुसार, केवळ आय.बी., केंब्रिज किंवा आय.जी.सी.एस.ई. यांसारख्या आंतरराष्ट्रीय मंडळांशी संलग्न असलेल्या किंवा तशी प्रक्रिया सुरू असलेल्या शाळांनाच आपल्या नावात 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल', 'युनिव्हर्सल', 'वर्ल्ड' किंवा 'युरो' या शब्दांचा वापर करता येईल. राज्य मंडळ, सीबीएससी किंवा आयसीएसई यांसारख्या आंतरदेशीय मंडळांशी संलग्न असलेल्या शाळांना आता हे शब्द वापरता येणार नाहीत.'कॉन्व्हेंट’ आणि ‘सैनिकी’ शब्दांवरही मर्यादानावांच्या या शुद्धीकरण मोहिमेत 'कॉन्व्हेंट' आणि 'सैनिकी' या शब्दांबाबतही सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार, केवळ ख्रिस्ती धर्मसंघाद्वारे किंवा ख्रिश्चन नन्स (भिक्षुणी) समुदायाद्वारे संचालित शाळांनाच 'कॉन्व्हेंट' शब्द वापरता येईल. त्याचप्रमाणे ज्या शाळांना शासनाची अधिकृत 'सैनिकी शाळा' म्हणून मान्यता आहे, त्यांनाच या शब्दाचा वापर नावामध्ये करता येणार आहे.अंमलबजावणी कधीपासून?शासनाने घेतलेला हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही. म्हणजेच, ज्या शाळांनी यापूर्वीच ही नावे धारण केली आहेत आणि ज्यांची नोंदणी जुनी आहे, त्यांना यातून तूर्तास सवलत मिळण्याची शक्यता आहे. मात्र, यापुढे सुरू होणाऱ्या नवीन शाळांना किंवा नाव बदलू इच्छिणाऱ्या संस्थांना या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. या निर्णयामुळे शाळांच्या नावावरून होणारी पालकांची फसवणूक थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
दहिसर मेट्रो आणि पॉड टॅक्सीच्या उदघाटनाची तारीख ढकलली, काय आहे कारण ?
मुंबई : मुंबईच्या लोकलवरचा भार कमी व्हावा आणि नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन नव्या मेट्रो मार्गिकेची घोषणा केली. एप्रिलच्या सुरुवातीला या मार्गिकांचे उद्घाटन होणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या. पण हे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे.मुंबईतील २ नव्या मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन गेले पुढेमुंबईतील दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ आणि अंधेरी ते मंडाले ( मानखुर्द ) मेट्रो २बी या दोन महत्वाच्या मार्गिकांचे उद्घाटन होणार होते. दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण झाले असून गेले काही दिवस निवडणूक आचारसंहिता आणि इतर प्रशासकीय कामांमुळे उद्घाटन शक्य झाले नव्हते.ठाणे - बोरिवली बोगदा तसेच ठाणे - बोरिवली हा प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे. ठाणे ते बोरिवली या मार्गावर प्रवास करताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, पण बोगदा सुरू झाल्यानंतर ठाणे आणि बोरीवली दरम्यानचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होऊन वाहतूक कोंडीचा त्रास ही कमी होणार आहे. ३ एप्रिलला भूमिपूजन करून ठाणे-बोरिवली बोगद्याच्या खोदकामालाही सुरुवात होणार होती. मात्र तो ही कार्यक्रम आता पुढे ढकलण्यात आला आहे.पॉड टॅक्सीचे भूमिपूजनवांद्रे ते कुर्ला दरम्यान सुमारे ८.८ किमी लांबीचा पॉड टॅक्सीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन आणि पॉड टॅक्सीचे भूमिपूजन ३ एप्रिल रोजी होणार होते. पण सध्या सत्तेतील सर्व प्रमुख मंत्री पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात गुंतले आहेत.केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तामिळनाडू या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. देशातील अनेक प्रमुख नेते या राज्यांचे धावते दौरे करत आहेत आणि प्रचारसभा, रोड शो यात गुंतले आहेत. यामुळेच मेट्रोचे उद्घाटन आणि पॉड टॅक्सीचे भूमिपूजन लांबणीवर पडले आहे. लवकरच नव्या तारखेची घोषणा होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
Congress News : काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’खासदाराचा तडकाफडकी राजीनामा
Congress News : तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ पूर्वी खासदार मणिकम टागोर यांनी काँग्रेसच्या निवडणूक समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
झपाट्याने विस्तारत असलेल्या पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने आणखी पाच नवीन पोलीस ठाणी आणि स्वतंत्र ‘परिमंडळ ४’ स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा
मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार यांनी संयुक्तपणे केली आहे. कथा लेखन चंदन कुमार यांचे असून दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे.पाचव्या पर्वात ‘पंचायत’ची तीच लोकप्रिय कलाकारांची टीम पुन्हा दिसणार आहे, ज्यांनी पहिल्याच पर्वापासून प्रेक्षकांची मने जिंकली. भारताचा सर्वाधिक पसंतीचा मनोरंजन मंच प्राइम व्हिडिओ आज ३ एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित झालेल्या ‘पंचायत’च्या पहिल्या पर्वाच्या सहाव्या वर्धापनदिनाचा उत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने त्यांनी मालिकेच्या सर्वाधिक प्रतिक्षित पाचव्या पर्वाच्या चित्रीकरणाची अधिकृत घोषणा केली आहे. २०२० मध्ये सुरुवात झाल्यापासून ‘पंचायत’ सातत्याने भारतातील सर्वाधिक आवडत्या मालिकांपैकी एक ठरली आहे आणि प्रत्येक पर्वासह तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.विशेषतः चौथ्या पर्वाने प्रेक्षकांना पूर्वी कधी न पाहिलेल्या पद्धतीने खिळवून ठेवले. पहिल्याच महिन्यात चौथ्या पर्वाने विक्रमी यश मिळवले आणि प्रदर्शित आठवड्यात मालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी सुरुवात केली. प्रदर्शित झालेल्या पहिल्याच दिवशी चौथे पर्व अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि संयुक्त अरब अमिरातीसह ४२ पेक्षा अधिक देशांमध्ये अव्वल दहा शीर्षकांमध्ये झळकले. प्रदर्शित आठवड्यात भारतातील ९५ टक्के पिनकोडमध्ये आणि १८० पेक्षा अधिक देशांतील प्रेक्षकांनी ही मालिका पाहिली. चाहत्यांच्या या प्रेमामुळे नव्या पर्वाची उत्सुकता आणखी वाढली आहे—जे पुन्हा एकदा हृदयाला भिडणारी कथा आणि उत्कृष्ट अभिनयासह सुंदर प्रवासाचे आश्वासन देते.चौथ्या पर्वाच्या प्रभावी शेवटानंतर चाहत्यांना फुलेराच्या धुळीच्या रस्त्यांमध्ये आणि तिथल्या राजकारणात परतण्याची उत्सुकता आहे. मागील पर्व तिथे संपले होते जिथे सचिवजी आपल्या व्यवस्थापन प्रवेश परीक्षेच्या निकालानंतर पुढील पाऊल ठरवत होते, मंजू देवी पंचायत निवडणुकीतील पराभवातून सावरत होत्या आणि प्रधानजी या निकालाने हादरले होते. पाचवे पर्व या तणावपूर्ण टप्प्यापासून पुढे सुरू होणार असून फुलेरा शैलीतील विनोद, नाट्य आणि भावनिक क्षणांसह अनेक नवीन वळणे पाहायला मिळतील.द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार यांनी संयुक्तपणे केली आहे. लेखन चंदन कुमार यांचे असून दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे. या पर्वात जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सांविका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार आणि पंकज झा हे लोकप्रिय कलाकार पुन्हा एकत्र दिसणार आहेत.प्रत्येक नव्या पर्वासह ही मालिका प्रेक्षकांशी आपले नाते अधिक घट्ट करत आहे आणि त्यांना फुलेरा गावाच्या जगात आणखी खोल नेत आहे. भारताच्या हृदयात वसलेले हे काल्पनिक छोटे गाव आता जागतिक सांस्कृतिक घटना बनले आहे. ग्रामीण साधेपणातून सुरू झालेली ही कथा आता सीमांच्या पलीकडे जाऊन जगभरातील कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.
मुंबईतील प्रलंबित एलआयसी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार, शेकडो कुटुंबांना दिलासा
कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांची घेतली भेटतीन महिन्यात सकारात्मक मार्ग काढण्याचे सीतारामन यांचे आश्वासनमुंबई : दक्षिण मुंबईतील जीर्ण झालेल्या आणि मोडकळीला आलेल्या एलआयसी इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. सातत्याने या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढाजी यांच्या प्रयत्नांना यश आले असून यासंदर्भात लवकरच सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती. निर्मला सीतारामनजी यांनी दिले आहे. एलआयसी टेनंट्स अँड ऑक्युपंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या मागणीचे पत्र घेऊन मंत्री लोढा यांनी गुरुवारी नवी दिल्लीत सीतारामनजी यांची भेट घेतली. यासंदर्भात त्यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे.दक्षिण मुंबईतल्या विविध भागात एलआयसी आणि देना बँकेच्या अनेक जुन्या जीर्ण झालेल्या इमारती आहेत. या इमारतीतले शेकडो भाडेकरू जीव मुठीत घेऊन राहत आहेत. त्यातल्या अनेक इमारती सुमारे ९० वर्ष जुन्या आहेत. तर म्हाडाच्या नोटिस नंतर त्यातल्या अनेक भाडेकरूनी इमारती रिकाम्या केल्या आहेत.गेली चार वर्ष सातत्याने मंत्री मंगलप्रभात लोढा हे या इमारतीतल्या रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. म्हाडा, एलआयसी आणि केंद्रीय स्तरावरही त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. आता थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांच्याशी संपर्क करून त्यांच्या समोर भाडेकरूंचे प्रश्न मांडले आहेत. टेनंट्स संघटनेच्या निवेदनानुसार, या इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेत मोठा विलंब होत असून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्तीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. एलआयसी अधिकाऱ्यांकडून ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी विलंब लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुमारे दोन वर्षे लागू शकतात, असे सांगण्यात आले आहे. तसेच पावसाळा जवळ येत असताना ही विलंबाची स्थिती भाडेकरूंमध्ये भीती आणि असुरक्षितता निर्माण करत असल्याचे मंत्री लोढा यांनी अर्थमंत्र्यांच्या निदर्शनाला आणले आहे. या सर्व मुद्द्यांचा विचार करून पुढील तीन महिन्यात सकारात्मक मार्ग काढणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले असल्याचे मंत्री लोढा यांनी नमूद केले आहे.या संदर्भात संघटनेने काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार( PMC) नियुक्तीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे, म्हाडाच्या निकषांनुसार भाडेकरूंना अंतरिम पर्यायी निवास उपलब्ध करून देणे, पुनर्विकासासाठी अनुभवी विकासकांची निवड करताना भाडेकरूंचा सहभाग सुनिश्चित करणे, रिक्त करण्यात आलेल्या इमारतीचे भाडे तात्पुरते स्थगित करणे आणि भाडेकरूंवर कोणतीही अतिरिक्त आर्थिक किंवा कायदेशीर जबाबदारी टाकू नये, यांचा समावेश अर्थमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. दरम्यान मंत्री लोढा यांनी सीतारामन जी यांचे आभार व्यक्त केले असून लवकरच एलआयसी आणि बँकांच्या भाडेकरूंना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
Raghav Chadha Wealth: राघव चड्ढा यांची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या सविस्तर माहिती
Raghav Chadha Wealth: राजकारणात सक्रिय असलेले राघव चड्ढा यांची वैयक्तिक संपत्ती तुलनेने मर्यादित आहे, तर त्यांच्या पत्नी परिणीती चोप्रा ही बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री असल्याने आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. दरम्यान, ‘आप’च्या या निर्णयामुळे राघव चड्ढा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Khokya Bhosle Update : सतीश भोसले उर्फ खोक्याची जेलमधून सुटका; बाहेर येताच म्हणाला…
वर्षभरापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अमानुष मारहाणीच्या व्हिडिओमुळे राज्यभरात चर्चेत आलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या (Khokya Bhosle Update) याला मोठा दिलासा मिळाला आहे.
Rinku Singh Record : रिंकू सिंगने केकेआरच्या इतिहासात एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.
Bacchu Kadu : मोठी बातमी..! बच्चू कडूंना अटक होणार? ‘या’भाजप आमदाराच्या भावाला संपवण्याचा रचला कट?
Bacchu Kadu : प्रहार नेते बच्चू कडू यांच्यावर चांदूर बाजार पोलीस ठाण्यात हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा, किंबहून विज्ञानाचा आत्मा हा अध्यात्म आहे हे अधोरेखित करणाऱ्या तसेच श्री स्वामी समर्थ महाराज आणि वैज्ञानिक यांच्या भोवती फिरणाऱ्या कथेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली त्यामुळे आजही देऊळ बंद आवर्जून बघितला जातो. देऊळ बंदचा अजून एक भाग यावा अशी इच्छा अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली होती आणि या इच्छेचा मान राखत लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांनी देऊळ बंद २ ची घोषणा केली होती. आज वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित देऊळ बंद २ चे डिजिटल पोस्टर समाज माध्यमांवर (सोशल मीडियावर) प्रदर्शित करण्यात आले आणि चित्रपट २१ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर झाले.लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत वाजणारं खणखणीत नाणं आहे. त्यांनी लेखन आणि दिग्दर्शित केलेले देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, धर्मवीर २ या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले त्यामुळे या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आणि देऊळ बंद २ हा त्यांचा सहावा चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंकाच नाही व त्याचीच एक झलक डिजिटल पोस्टर मध्ये दिसून येते आहे. आता परीक्षा देवाची असे उपशीर्षक असल्याने भक्तांसाठी देवाला कोणती परीक्षा द्यावी लागणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे तसेच कोणते कलाकार कुठल्या भूमिकेत असणार आहेत? हे गुलदस्तात असल्याने ते जाणण्यासाठी रसिकांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.२१ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित देऊळ बंद २ चे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले असून निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी सूर्यवंशी यांनी केली आहे.
शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधानभवन परिसरात त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना आजही अत्यंत प्रेरणादायी आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांना शक्ती व बळ मिळावे, तसेच तुळजाभवानीचे आशीर्वाद लाभावेत, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.विधानमंडळात थोर विभूतींच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्याची परंपरा सातत्याने जपली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींच्या कार्याची आठवण करून देणारे हे क्षण समाजाला नवी दिशा देणारे ठरतात, असे त्या म्हणाल्या.यावेळी विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, खासगी सचिव अविनाश रणखांब, विशेष कार्यकारी अधिकारी संतोष उडतेवार तसेच विधिमंडळ कर्मचारी उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराजांचे पुण्यस्मरण महाराष्ट्रासह देश-विदेशात मोठ्या प्रमाणात होत असून, त्यांच्या कार्यातून पुढील पिढ्यांना प्रेरणा, ऊर्जा आणि स्फूर्ती मिळत राहील, असा विश्वासही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
स्थापना दिनानिमित्त ५१ लाख घरांवर फडकणार भाजपचा झेंडा
मुंबई : भाजपच्या स्थापना दिनानिमित्त दि. ५ ते १२ एप्रिल याकाळात रोजी राज्यभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन होणार असून, ६ एप्रिलला ५१ लाख घरांवर भाजपचा झेंडा फडकावला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते, मंत्री या कार्यक्रमात सहभागी होतील, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी दिली.भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. स्थापना दिनानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, अन्य लोकप्रतिनिधी जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या निमिताने राष्ट्रवादी विचारांचा उत्सव साजरा होईल, असेही उपाध्ये यांनी नमूद केले.दि. एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन आहे. या निमित्त २८८ विधानसभा मतदारसंघात, ३६ जिल्ह्यात आणि राज्यातील १ लाख बुथवर स्थापना दिनाचे कार्यक्रम होणार आहेत. प्रत्येक बुथवर वॉल पेंटिंग, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार, सक्रीय कार्यकर्त्यांचे मेळावे, समाजातील नामवंत व्यक्तींशी संपर्क, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संपर्क असे कार्यक्रम होणार आहेत. वॉल पेंटिंग मध्ये प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते आपापल्या मतदारसंघात वॉल पेंटिंग मध्ये सहभागी होणार आहेत. त्याबरोबरच केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती घरोघरी पोहचवण्यात येणार आहे. पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आपल्या घरावर पक्षाचा झेंडा फडकवणार आहेत.एकूण ५१ लाख घरांवर फडकणार भाजपचा झेंडा :यंदा ६ एप्रिल रोजी राज्यातील ५१ लाख घरांवर भाजपचा झेंडा फडकावला जाईल. तसेच पक्षाच्या आजवरच्या वाटचालीनिमित्त तयार करण्यात आलेला माहितीपट दाखविण्यात येणार आहे. दोन खासदारांपासून जगातील सर्वात मोठ्या पक्षापर्यंतचा भारतीय जनता पार्टीचा प्रवास यातून उलगडला जाणार आहे. पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील १ हजार २०० मंडलांमध्ये हे कार्यक्रम होणार आहेत. या बरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व अन्य प्रमुख नेते, मंत्री ६ व ७ एप्रिल रोजी पक्ष कार्यकर्ते व जनतेशी संवाद साधतील. सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम होईल. गाव चलो, वस्ती चलो या कार्यक्रमांतून पक्षाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते जनसंपर्क अभियान राबविणार आहेत, अशी माहिती केशव उपाध्ये यांनी दिली.
Burgman 2026 Maxi-Scooter : भारतामध्ये सुझुकीची नवीन बर्गमन 2026 मॅक्सी स्कूटर लॉन्च
मुंबई : जपानी वाहन निर्माता कंपनी सुझुकीने भारतात आपली नवीन बर्गमन 2026 मॅक्सी स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 1.02 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली असून टॉप व्हेरिएंटसाठी ग्राहकांना सुमारे 1.13 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. विशेष बाब म्हणजे हे नवीन मॉडेल जुन्या बर्गमन स्ट्रीट एक्ससोबतच विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे आणि जुन्या मॉडेलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.नवीन बर्गमन 2026 मध्ये सर्वात मोठा बदल त्याच्या डिझाइनमध्ये करण्यात आला आहे. या स्कूटरमध्ये आता ड्युअल-पॉड एलईडी हेडलाइट्स देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे स्कूटरला अधिक मॉडर्न आणि प्रीमियम लुक मिळतो. हे डिझाइन कंपनीच्या आंतरराष्ट्रीय मॉडेलवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय नवीन कलर ऑप्शन्स, टॉप व्हेरिएंटमध्ये ड्युअल-टोन पेंट स्कीम आणि अधिक आकर्षक बॉडी डिझाइनमुळे ही स्कूटर विशेषतः तरुण ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.फीचर्सच्या बाबतीतही बर्गमन 2026 मध्ये मोठे अपग्रेड करण्यात आले आहेत. या स्कूटरमध्ये की-लेस स्टार्ट, ईझी स्टार्ट, सायलेंट स्टार्ट, सर्व एलईडी लाईट्स आणि 4.2 इंचाचा टीएफटी डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये नेव्हिगेशन सपोर्टसारखे आधुनिक फीचर्सही उपलब्ध आहेत. तसेच दोन फ्रंट स्टोरेज स्पेस आणि 24.6 लिटरचे अंडर-सीट स्टोरेज दिल्यामुळे ही स्कूटर रोजच्या वापरासाठी अधिक सोयीस्कर ठरते. विशेषतः या सेगमेंटमध्ये टीएफटी डिस्प्ले आणि नेव्हिगेशन फीचर ही मोठी वैशिष्ट्ये मानली जात आहेत.इंजिन आणि परफॉर्मन्सच्या बाबतीतही ही स्कूटर सक्षम आहे. बर्गमन 2026 मध्ये 124cc इंजिन देण्यात आले असून ते सुझुकी इको परफॉर्मन्स (एसईपी) प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. हे इंजिन 8 हॉर्सपावर पॉवर आणि 10.2 Nm टॉर्क निर्माण करते. स्कूटरमध्ये फ्रंटला टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि रिअरला स्विंग आर्म सस्पेंशन देण्यात आले आहे. ब्रेकिंगसाठी पुढील चाकाला डिस्क ब्रेक आणि मागील चाकाला ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. 12 इंच अलॉय व्हील्स आणि 5.5 लिटरचा फ्यूल टँक यामुळे ही स्कूटर शहरातील रोजच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरते.एकूणच पाहता, स्टायलिश लुक, आरामदायक राइडिंग अनुभव आणि आधुनिक फीचर्स यांचा संगम असलेली बर्गमन 2026 स्कूटर ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. विशेषतः डेली कम्युटसाठी एक प्रीमियम आणि फिचर-लोडेड स्कूटर शोधणाऱ्यांसाठी ही स्कूटर आकर्षक ठरण्याची शक्यता आहे.
रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'
मुंबई :मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. प्रसिद्ध कलाकारांना एकत्र घेऊन चित्रपट निर्माण करण्याचा ट्रेंड अलीकडे मराठी चित्रपटसृष्टीत प्रचलित होताना दिसतो आहे. त्यामुळे लोकप्रिय कलाकारांना एकत्र घेऊन निर्माण केलेल्या या कलाकृतींना प्रेक्षकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. ‘सालबर्डी’ या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या रहस्यमय मराठी चित्रपटातून पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी या कलाकारांची दमदार फळी एकत्र पहायला मिळणार आहे.‘नेब्यूला फिल्म्स’ बॅनरखालील ‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून ‘गुल्हर’, ‘बाबो’, ‘पाणीपुरी’ यासारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी ‘सालबर्डी’ हा मल्टीस्टारर थरारपट रसिकांसाठी आणला आहे.‘सालबर्डी’ या एका छोट्याशा गावात घडणाऱ्या विचित्र घटनांनी निर्माण झालेली भीती आणि त्या भीती मागचं सत्य शोधण्याची धडपड ही आहे ‘सालबर्डी’ची मध्यवर्ती कथा. भय आणि भ्रमाच्या छायेत घडणाऱ्या भीतीदायक घटनांमागचं गूढ उलगडण्याचा थरारक प्रवास ‘सालबर्डी’ या चित्रपटातून येत्या १७ एप्रिलला प्रेक्षकांसमोर येणार आहे.चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे असून, गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे.रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट यांचा एकत्रित संगम असलेला ‘सालबर्डी’ प्रेक्षकांसाठी रंजक सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.
Rupali Chakankar : अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर आणि एकनाथ शिंदे यांच्या कॉल डिटेल्सचा खुलासा केला आहे.
Sanjay Raut : संजय राऊत उद्धव ठाकरेंना देणार सर्वात मोठा धक्का? राजकीय वर्तुळात खळबळ
चंद्रकांत पाटील (Sanjay Raut) यांनी संजय राऊत भविष्यात ठाकरे गट फोडणार असल्याचा मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. यासोबतच त्यांनी राऊत यांच्यावर तीव्र टीकाही केली आहे.
Abhishek Sharma Fined : केकेआरविरुद्धच्या सामन्यानंतर एसआरएचचा सलामीवीर अभिषेक शर्मा याला बीसीसीआयने मोठा दणका दिला आहे.
संगमनेर रोडवरील मॉर्डन चायनीज दुकानावर दगडफेक; पाण्याच्या बाटलीच्या पैशांवरून वाद
श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड परिसरात महाराष्ट्र वाईनच्या समोरील मॉर्डन चायनीज दुकानावर किरकोळ कारणावरून दगडफेक झाली आणि तोडफोड करण्यात आली. हनुमान जयंती निमित्त काढण्यात आलेली मिरवणूक संपल्यानंतर ही घटना घडली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानात पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद झाला. या किरकोळ वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीने आपल्या १५ ते २० साथीदारांसह दुकानावर हल्ला चढवला. यावेळी दुकानासमोरील काऊंटरची काच फोडण्यात आली तसेच खुर्च्या, प्लेट्स यांची तोडफोड करण्यात आली. दुकानातील मालाची नासधूस करून नुकसान करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले की, ही घटना पाण्याच्या बाटलीच्या किमतीवरून झालेल्या वादातून घडली असून यामागे कोणताही पूर्वीचा वाद नाही. तसेच या घटनेला जातीय किंवा धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.
नवी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ५८ वर्षेच
शासनाने फेटाळला निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा प्रस्तावनवी मुंबई : नवी मुंबई महापालिका मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय आता ५८ वर्षेच कायम राहणार असून, या निर्णयामुळे प्रशासन आणि कर्मचारी वर्गाला मोठा धक्का बसला आहे.महापालिकेच्या स्थायी समितीने नव्याने तयार केलेल्या सेवा विनियमात निवृत्ती वय ६० वर्षे करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव २० मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावावर प्रशासनाने त्यावेळी स्पष्ट भूमिका घेतली नव्हती.दरम्यान, या प्रस्तावासाठी राज्य शासनाची पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नसल्याचे तसेच तयार करण्यात आलेले सेवा विनियम विद्यमान कायदे व शासन नियमांशी विसंगत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर महापालिका प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यानुसार नगरविकास विभागाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील तरतुदींचा आधार घेत हा ठराव प्रथमदर्शनी निलंबित केला आहे.प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. येत्या सहा महिन्यांत मोठ्या संख्येने कर्मचारी सेवानिवृत्त होणार असल्याने प्रशासनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, हा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडला होता. प्रस्ताव फेटाळल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष ला राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सागर नाईक यांनी, “या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू,” असा इशारा दिला आहे. या घडामोडींमुळे नवी मुंबईतील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.
'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया'
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठकमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आणि त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम दरवर्षी अधिक उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत असून, यावर्षीही विविध विभागांच्या समन्वयातून तो अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरा करूया असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल, २०२६ रोजीच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस बैठकीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी राज्यमंत्री भाई गिरकर, माजी आमदार प्रकाश गजभिये, मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, प्रधान सचिव श्रीकर परदेशी, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, भन्ते डॉ. राहूल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी यांच्यासह विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यामागील उद्देश केवळ औपचारिकता नसून त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे असा आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक असून, त्यातील समावेशकतेच्या तत्त्वामुळे भारत विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत आहे. समाजाला मिळणाऱ्या संधी, हक्क आणि प्रगती यामागे कोणाचे योगदान आहे, हे नव्या पिढीला समजणे आवश्यक आहे. त्यामुळे जयंती सोहळा हा केवळ उत्सव न राहता विचारांचा प्रसार करणारा पर्व ठरतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायी आणि नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधांची सर्वंकष व्यवस्था करण्यात यावी. उष्णतेपासून संरक्षण मिळावे यासाठी ठिकठिकाणी मंडप उभारण्यात यावेत. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध ठेवावी. तसेच, दादर आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करून नियंत्रण ठेवावे,असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांना मार्गदर्शन होण्यासाठी विविध ठिकाणी सूचना फलक लावावेत. बेस्ट प्रशासनाने दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी दरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांची ये-जा अधिक सुलभ होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशासह जगभर मोठ्या प्रमाणावर साजरी होत असल्याचा उल्लेख करत, हा सोहळा अधिक उत्तम पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.भारतीय संविधान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम विभागामार्फत हाती घेण्यात आला असून, जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. नागरिकांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचा “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वसतिगृहांची उभारणी करण्यात येत आहे. जयंती सोहळ्याच्या निमित्ताने यावर्षी काही विशेष उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ड्रोनच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित भव्य ड्रोन शो चैत्यभूमी परिसरात सादर करण्यात येणार आहे, असे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, लोकराज्य मासिकाचा विशेषांक, शासकीय जाहिरात व प्रसिध्दी याबाबत चर्चा झाली व याबाबत निर्देश देण्यात आले. बैठकीत मुंबई महापालिकेच्यावतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणातून देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.
Congress MLA : रात्री सचिवालय उघडून काँग्रेस आमदाराची आमदारकी रद्द; राजकीय वर्तुळात खळबळ
Congress MLA : काँग्रेस आमदार राजेंद्र भारती यांची विधानसभा सदस्यता रद्द करण्यात आली आहे.
Attack by Wild Elephants : रानटी हत्तींच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू; झारखंडच्या रामगढमधील घटना
झारखंडच्या रामगढ जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये, रानटी हत्तींनी (Attack by Wild Elephants) एका वृद्धासह तीन जणांचा बळी घेतला.
Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला आहे. या गर्दीचा थेट परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर दिसून येत असून अनेक ठिकाणी कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.माणगाव परिसरात प्रचंड ट्रॅफिक झाले आहे. बाजारपेठेतील अरुंद रस्ते, स्थानिक वर्दळ आणि महामार्गावरील वाहनांचा वाढलेला ताण यामुळे येथे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी परिस्थिती इतकी बिकट झाली की वाहनांच्या रांगा या अनेक किलोमीटरपर्यंत लागलेल्या दिसल्या.कोकणाकडे जाणाऱ्या मार्गांवरही अशीच स्थिती असून प्रवाशांना तासन्तास प्रवास करावा लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी हा प्रवास अधिकच त्रासदायक ठरत आहे. दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहे.प्रशासनाकडून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि शक्य असल्यास प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जोपर्यंत माणगाव बायपास चे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पर्यटकांना भेडसावणारी ट्रॅफिकची हे समस्या कायम राहणार आहे.
कोरोनावर लस तयार करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एका पेंटिंगमुळे चर्चेत
मुंबई : शहरात पार पडलेल्या एका भव्य कला लिलावाने कला विश्वासह उद्योग क्षेत्रातही मोठी चर्चा रंगवली आहे. एका ऐतिहासिक पेंटिंगने कोट्यवधींची बोली लावत विक्रमी किंमत गाठली असून, हा व्यवहार आधुनिक भारतीय कलेतील सर्वात महागड्या लिलावांपैकी एक ठरला आहे.राजा रवी वर्मा यांची प्रसिद्ध कलाकृती ‘यशोदा आणि कृष्ण’ ही Saffronart च्या स्प्रिंग लाईव्ह लिलावात तब्बल १६७.२० कोटी रुपयांना विकली गेली. विशेष म्हणजे, मॉडर्न इंडियन आर्टमधील आतापर्यंतची ही सर्वात महागडी विक्री ठरली आहे.या लिलावात ही प्रतिष्ठित कलाकृती खरेदी करून डॉ. पूनावाला यांनी केवळ नवा विक्रमच केला नाही, तर भारतीय कलेबद्दलचा आपला जिव्हाळाही अधोरेखित केला.मुळात ८० ते १२० कोटी रुपये असा अंदाज असलेल्या या पेंटिंगने सर्व अपेक्षा ओलांडल्या.१८९०च्या दशकात साकारलेले हे तैलचित्र भगवान श्रीकृष्ण आणि माता यशोदा यांच्यातील वात्सल्याचे अप्रतिम चित्रण करते. यामध्ये यशोदा गाईचे दूध काढत असताना लहान कृष्ण त्यांच्या मागून दुधासाठी हात पुढे करताना दाखवले आहेत, जे भारतीय संस्कृतीतील मातृत्व आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते.या खरेदीनंतर प्रतिक्रिया देताना डॉ. पूनावाला यांनी या कलाकृतीचे जतन करून ती जनतेसाठी उपलब्ध करून देणार असलयाचे सांगितले.
West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते मोफक्करुल इस्लाम याला आज, शुक्रवारी बागडोगरा विमानतळाहून अटक करण्यात आली. मोफक्करूल पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.देशाच्या इतर राज्यांप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये देखील मतदारयादी पुनर्निरीक्षणाचे (एसआयआर) सुरू आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध मतदार आणि बांगलादेशी घुसखोरांची नोंद मतदार यादीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रिया सुरळीतपणे होऊ दिली जात नसल्याचा आरोप केला जातो. अशातच राज्याच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक येथे सुनियोजित पद्धतीने हिंसाचार घडवून एसआयआर करणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांना 9 तास ओलिस ठेवण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने देखील या घटनेची गंभीर दखल घेत पश्चिम बंगालच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली. हिंसाचाराच्या प्रारंभिक चौकशीत असे आढळून आले की, पेशाने वकील असलेला एआयएमआयएमचा नेता मोफक्करुल इस्लाम हा या हिंसाचाराचा मुख्य सुत्रधार आहे. हिंसाचाराच्या व्हायरल व्हिडिओमध्ये इस्लाम अतिशय आक्रमक भूमिकेत दिसून येतो, जिथे तो जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना उघडपणे आव्हान देताना दिसतो. व्हिडिओमध्ये तो कॅमेऱ्यासमोर ओरडताना ऐकू येतो: “ओए डीएम, एसपी… सीआयडी कुठे आहे ? आयबी कुठे आहे ? तुम्ही सगळे कुठे आहात? इथे या…” प्रशासनाविरोधातील अशा वक्तव्यांमुळे आणि लोकांना भडकावल्याच्या आरोपांमुळे तो पोलिसांच्या रडारवर आला होता. तपासात असेही समोर आले आहे की सुजापूर आणि कालियाचक परिसरातील अलीकडील हिंसक आंदोलनांचे नेतृत्वही त्याच्याकडे होते.यापूर्वी 2021 साली झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोफक्करूल इस्लामने उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इताहर मतदारसंघातून एआयएमआयएमच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. इस्लामच्या विरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. तर अटक टाळण्यासाठी मोफक्करूल भूमीगत झाला होता. अशातच पोलिसांना माहिती मिळाली की, सिलीगुडीच्या बागडोगरा विमानतळाहून इस्लाम कुठेतरी पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांच्या विशेष पथकाने सापळा रचून विमानतळ्याचा टर्मिनल जवळ त्याला अटक केली.पोलिसांच्या माहितीनुसार, इस्लामच्या हिंसाचारातील भूमिकेची सखोल चौकशी सुरू आहे. सुजापूरमधील आंदोलनाचे नियोजनबद्ध नेतृत्व त्यानेच केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या हिंसाचारामागे कोणती मोठी साखळी किंवा कट होता का, याचा पोलीस घेत शोध घेत आहेत.
Sanjay Singh on Raghav Chadha:
Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने आपल्या बाळाची झलक पोस्टद्वारे शेअर केली आहे.
Eye Care: डोळ्यांत जळजळ आणि खाज? उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी या सोप्या टिप्स जरूर वापरा
Eye Care तज्ज्ञांच्या मते, डिजिटल स्क्रीनचा अतिवापर आणि उन्हात जास्त वेळ राहणं यामुळे डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे डोळ्यांना विश्रांती देणं आवश्यक आहे. यासाठी ‘20-20-20 नियम’ खूप उपयुक्त ठरतो.
मातृभूमी’मधील ‘चांद देख लेना’ गाण्याचा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित
मुंबई : सलमान खान फिल्म्स संगीतने सर्वांच्या आवडीच्या ‘चांद देख लेना’ या गाण्याचा एक विशेष पडद्यामागील व्हिडीओ सादर केला आहे, ज्यातून या गाण्याच्या निर्मितीमागील खास क्षणांची झलक पाहायला मिळते. हे गाणे आधीच प्रेक्षकांच्या मनाला भिडले आहे. या व्हिडीओमध्ये चित्रीकरणादरम्यानचे अनेक खास आणि संस्मरणीय क्षण दाखवले आहेत. दृश्यांची बारकाईने केलेली तयारी ते सलमान खान आणि चित्रांगदा सिंह यांच्यातील सुंदर केमिस्ट्रीपर्यंत सर्व काही यात दिसते. तसेच नृत्यदिग्दर्शक वैभवी मर्चंट कलाकारांना पावले शिकवत मार्गदर्शन करताना दिसत आहेत.हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे प्रेम आणि तडफडीचा पारंपरिक हिंदी चित्रपट शैलीतील अनुभव देते. ‘चांद देख लेना’ या गाण्याला युवा गायक निहाल ताउरो आणि अंकोना मुखर्जी यांनी आवाज दिला आहे.‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ ही निर्मिती सलमा खान यांनी केली असून दिग्दर्शन अपूर्व लाखिया यांनी केले आहे. ही कथा शौर्य, त्याग आणि जिद्दीची प्रभावी कहाणी सादर करणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात चित्रांगदा सिंह महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Bhagwant Maan: ‘राघव चढ्ढा यांची भाजपसोबत…’ ; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा गंभीर आरोप
Bhagwant Maan: आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून हटवण्याच्या निर्णयावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
Janhvi Kapoor: “दारूचं व्यसन ही सवय नाही, मानसिक आजार आहे”…जान्हवी कपूरचे ठाम मत
Janhvi Kapoor जान्हवी कपूरने दारूच्या व्यसनासारख्या गंभीर विषयावर समाजाला विचार करायला भाग पाडलं आहे. तिच्या या वक्तव्यामुळे मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होऊ शकते.
मार्चमध्ये युपीआयमधून नागरिकांनी केले कोटींचे व्यवहार; युपीआय ठरतोय वरदान
मुंबई : भारताने सुरु केलेली यूपीआय ही डिजिटल प्रणाली आज जगभर पोहोचली आहे. हातात कॅश नसेल तर आता घाबरून न जात आपण बिनधास्तपणे डिजिटल प्रणाली वापरत आहोत. अगदी किराणा मालापासून ते लाखोंचे व्यवहार करण्यापर्यंत युपीआय वापरले जाते आहे. सणासुदीच्या काळात तर या व्यवहारांत अधिक भर पडते.प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार मागच्या मार्च महिन्यात युपीआयने पेमेंट करणाऱ्यांची संख्या ही कोटींपर्यंत पोहोचली आहे. आणि एकट्या मार्च महिन्यात २२.६४ अब्ज असे विक्रमी संख्येने व्यवहार पार पडले आहेत. मार्च २०२५ महिन्याची तुलना करता, मार्च २०२६ मध्ये या व्यवहारांमध्ये १९ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तसेच फेब्रुवारीत एकूण २६.८४ लाख रुपये इतके व्यवहार झाले असून मार्च महिन्यात त्यात १० टक्क्यांनी वाढले आहेत.मार्च महिन्यातील सणमार्च महिन्यात होळी, धूलिवंदन, रंगपंचमी, गुढीपाडवा, ईद असे अनेक सण तसेच देवतांच्या यात्रा - जत्रा, उत्सव असतात. या निमित्ताने देशात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी होते. या खरेदीसाठी यूपीआयचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. दररोज सरासरी ७३ कोटी व्यवहार झाले आहेत असे निदर्शनास आले. ज्यांचे दैनिक मूल्य हे ९५,२४३ कोटी रुपये इतके आहे.आजच्या काळात भारतात डिजिटल पेमेंट्सवर जास्त भर दिला जात आहे. एकूण डिजिटल व्यवहारांपैकी जवळपास ८५ टक्के व्यवहार हे पूर्णपणे युपीआयच्या आधाराने केले जातात.
भारतीय बाजारात रेडमी, विवो आणि रिअलमीचे स्मार्टफोन लॉन्च
फीचर्स आणि किंमतींमध्ये जोरदार स्पर्धामुंबई : भारतीय स्मार्टफोन बाजारात सध्या स्पर्धा अधिकच तीव्र होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शाओमीच्या उपकंपनी रेडमी, तसेच विवो आणि रिअलमी या कंपन्यांनी आपले नवीन स्मार्टफोन लॉन्च करत ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.रेडमीने आपला नवीन रेडमी नोट १५ एसई ५जी स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला आहे. हा फोन विशेष एडिशन म्हणून लॉन्च करण्यात आला असून तो 7 एप्रिलपासून फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.77 इंचाचा कर्व्ड AMOLED डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट, 3200 निट्स पीक ब्राइटनेस आणि TV Rheinland सर्टिफिकेशन दिले आहे. Qualcomm Snapdragon 6 Gen 3 प्रोसेसरसह 8GB RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळते. कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास, 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. 5800mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंगमुळे हा फोन अधिक प्रभावी ठरतो. या फोनची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली असून विविध बँक ऑफर्समुळे ग्राहकांना सवलतीचाही लाभ मिळणार आहे.दुसरीकडे, विवोने आपला नवीन विवो व्ही७० एफई स्मार्टफोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये सादर केला आहे. या फोनमध्ये 6.23 इंचाचा OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट दिला आहे. MediaTek Dimensity 7360-Turbo प्रोसेसरसह 12GB RAM आणि 512GB स्टोरेजपर्यंत सुविधा मिळते. या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे 200 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असून OIS सपोर्टसह उत्कृष्ट फोटोग्राफीचा अनुभव देतो. याशिवाय 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील दिला आहे. 7000mAh ची मोठी बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंग यामुळे हा फोन जास्त काळ वापरासाठी उपयुक्त ठरतो. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 37,999 रुपये असून 9 एप्रिलपासून विक्री सुरू होणार आहे. विविध बँक ऑफर्स आणि EMI पर्यायांमुळे ग्राहकांसाठी हा फोन अधिक आकर्षक बनला आहे.दरम्यान, रियलमीने देखील आपला रियलमी १६ ५जी स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनमध्ये 6.57 इंचाचा AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 4200 निट्स ब्राइटनेस दिला आहे. MediaTek Dimensity 6400 Turbo प्रोसेसरसह हा फोन येतो, जो दैनंदिन वापरासाठी योग्य असला तरी उच्चस्तरीय गेमिंगसाठी मर्यादित मानला जातो. कॅमेऱ्याच्या बाबतीत 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. विशेष म्हणजे, रियर कॅमेरासोबत सेल्फी मिररची सुविधा देण्यात आली आहे. 7000mAh बॅटरी आणि 60W फास्ट चार्जिंगमुळे दीर्घकाळ वापर शक्य आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 31,999 रुपये असून 5 एप्रिलपासून विक्री सुरू होणार आहे.एकूणच पाहता, रेडमी, विवो आणि रिअलमी या तिन्ही कंपन्यांनी वेगवेगळ्या किंमत आणि फीचर्ससह स्मार्टफोन बाजारात उतरवले आहेत. कॅमेरा, बॅटरी, डिस्प्ले आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत प्रत्येक फोन आपली वेगळी ओळख निर्माण करत असून ग्राहकांसाठी आता अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या गरजेनुसार आणि बजेटनुसार योग्य स्मार्टफोन निवडण्याची संधी या लॉन्चमुळे निर्माण झाली आहे.
Deul Band 2 poster : आता परीक्षा देवाची ….देऊळ बंद 2 चे लक्षवेधक पोस्टर समोर; ‘या’दिवशी होणार रिलीज
Deul Band 2 poster : देऊळ बंद 2 सिनेमाचे लक्षवेधक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात PSI गोपाळ बदनेला जामीन
कोल्हापूर : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी मागील पाच महिन्यांपासून तुरुंगात असलेला निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. यामुळे पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने तुरुंगाबाहेर येणार आहे.काय आहे प्रकरण ?फलटणमधील एका हॉटेलच्या रूममध्ये महिला डॉक्टरने गळफास घेऊन स्वतःचा जीवनप्रवास संपवला. या महिला डॉक्टरने मृत्यूपूर्वी स्वतःच्या हातावर पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे लिहिली होती. या प्रकरणात तपास करून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. यानंतर पोलिसांनी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना अटक केली. दोघांवर महिला डॉक्टरचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला.मागील पाच महिन्यांपासून गोपाळ बदने तुरुंगात होता. जामीन मिळवण्यासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे अर्ज केला होता. या प्रकरणात सुनावणीअंती कोल्हापूर सर्किट बेंचने आरोपी पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
Gold and Silver Price Today: गेल्या काही दिवसांत झालेल्या तीव्र वाढीनंतर आज देशात सोन्याच्या दरात थोडा दिलासा मिळाला आहे.
Pooja Sawant: पहाटे ५ ला दिवसाची सुरुवात, रात्री १० ला झोप! पूजा सावंतची शिस्तबद्ध दिनचर्या चर्चेत
Pooja Sawant पूजा सावंतने सांगितलं की, गेली अनेक वर्ष ती पहाटे उठून व्यायाम करण्याची सवय पाळते. तिच्या मते, व्यायाम हा सूर्योदयापूर्वीच व्हायला हवा. त्यामुळे तिची मानसिकताच तशी तयार झाली आहे. ती रोज सकाळी ५ वाजता उठते आणि साडेपाच वाजल्यापासून तिचा वर्कआऊट सुरू होतो. सूर्योदय होईपर्यंत तिचा व्यायाम पूर्ण होतो.
Kalpana Kharat : एसआयटीचे पथक कल्पना खरातच्या माहेरी चौकशीसाठी गेले असताना त्यांना धक्कादायक माहिती मिळाली आहे.
US Iran War: इराणने आपल्या सुरू असलेल्या युद्धात अमेरिका आणि इस्रायल या दोघांचेही मोठे नुकसान केले आहे. या युद्धाचा परिणाम आखाती देशांवरही झाला आहे.
विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या आयएनएस अरिदमन पाणबुडीचे आणि आयएनएस तारागिरी स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण होणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हिंदीत एक एक्स पोस्ट (X Post or Tweet) केली आहे. 'शब्द नहीं शक्ति है अरिदमन' अशा स्वरुपाची सूचक पोस्ट संरक्षणमंत्र्यांनी केली आहे. अरिदमन हा केवळ एक शब्द नाही, ती शक्ती आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.शब्द नहीं शक्ति है, ‘अरिदमन’!— Rajnath Singh (@rajnathsingh) April 3, 2026एल अँड टीने विशाखापट्टणम येथील गुप्त जहाजबांधणी केंद्रात अणुऊर्जेवर चालणाऱ्या आयएनएस अरिदमन पाणबुडीची निर्मिती केली आहे. मागील अनेक महिन्यांपासून समुद्रात या पाणबुडीच्या चाचण्या सुरू होत्या. नौदलात सहभागी झाल्यावर ही पाणबुडी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अंतर्गत कार्यरत राहणार आहे. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अंतर्गत २०१६ पासून आयएनएस अरिहंत आणि २०२४ पासून आयएनएस अरिघात कार्यरत आहे. आता स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अंतर्गत आजपासून आयएनएस अरिदमन ही तिसरी पाणबुडीही कार्यरत होणार आहे. विशेष म्हणजे या तिन्ही पाणबुड्या अणुऊर्जेवर चालत असल्यामुळे दीर्घकाळ खोल समुद्रात लपून शत्रूच्या हालचालींचा वेध घेणे आणि योग्य वेळी घातक प्रहार करणे यासाठी सक्षम आहेत.अणुऊर्जेवर चालणारी आयएनएस अरिदमन ही सात हजार टन वजनाची पाणबुडी आहे. आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघात या सहा हजार टन वजनाच्या पाणबुड्या होत्या. या दोन्ही पाणबुड्यांपेक्षा आयएनएस अरिदमन महाकाय आणि शक्तिशाली आहे. पूर्वीच्या पाणबुड्यांवरील चारच्या तुलनेत, या पाणबुडीमध्ये आठ व्हर्टिकल लॉन्च सिस्टीम (VLS) ट्यूब आहेत, ज्यामुळे ती चोवीस के-१५ सागरिका ही कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे (७५० किमी) आणि आठ के-४ मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे (३५०० किमी) तैनात करू शकते. तसेच, ती सहा हजार किमी पल्ल्याची के-५ क्षेपणास्त्रे देखील पाणबुडीत सामावून घेऊ शकते.तब्बल ८३ मेगावॅट क्षमतेच्या कॉम्पॅक्ट लाईट वॉटर रिअॅक्टरवर चालणारी ही पाणबुडी तिच्या रचनेमुळे रडारला चकवू शकते. कमीत कमी आवाज करत ही पाणबुडी दीर्घकाळ प्रभावीरित्या कार्यरत राहू शकते. या पाणबुडीत सात पात्यांचा प्रोपेलर आहे, ज्यामुळे पृष्ठभागावर १२-१५ नॉट्स (सागरी मैल) आणि पाण्याखाली २४ नॉट्सचा (सागरी मैल) वेग मिळतो. प्रगत स्वदेशी सोनार प्रणाली उशूस (USHUS) आणि पंचेंद्रिय, तसेच अॅनेकोइक टाइल्समुळे या पाणबुडीची गुप्तता आणि शोध क्षमता वाढते.Tomorrow, 03 April, I shall be in Visakhapatnam to attend the Commissioning Ceremony of the advanced stealth Frigate ‘Taragiri’.This commissioning highlights the strategic and maritime importance of India’s eastern seaboard as well as the Indian Navy’s sustained focus on… pic.twitter.com/rOSxZ9Ftuz— Rajnath Singh (@rajnathsingh) April 2, 2026संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते आज आयएनएस तारागिरी स्टेल्थ फ्रिगेटचेही जलावतरण होणार आहे. याप्रसंगी गोदीचे (डॉकमधील) वरिष्ठ अधिकारी तसेच अनेक नौदल अधिकारी उपस्थित असतील.प्रोजेक्ट १७ ए अंतर्गत विकसित करण्यात आलेली तारागिरी ही चौथी स्टेल्थ फ्रिगेट आहे. ही मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधलेली ६,६७० टन वजनाची युद्धनौका आहे. तिच्या रचनेमुळे ती रडारला चकवू शकते. या क्षमतेमुळे दीर्घकाळ ही फ्रिगेट समुद्रातील कठीण परिस्थितीतही सुरक्षित राहू शकते. ही नौका ७५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीने बांधली आहे. आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या या फ्रिगेटमध्ये सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहेत. समुद्रातून समुद्रात तसेच समुद्रातून आकाशात आणि समुद्रातून जमिनीवर हल्ला करण्याची क्षमता या फ्रिगेटमध्ये आहे.
गुड फ्रायडे निमित्त आज शेअर बाजार बंद; सोमवारी पुन्हा व्यवहार होतील सुरू
नवी दिल्ली : गुड फ्रायडे निमित्त आज देशांतर्गत शेअर बाजार बंद आहे. साप्ताहिक सुट्टीमुळे या शनिवार आणि रविवारीही शेअर बाजार बंद राहील. आता पुढील आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी व्यवहार पुन्हा सुरू होतील.https://prahaar.in/2026/04/02/12-6-percent-increase-in-maharashtra-gst-revenue/गुड फ्रायडे निमित्त भारतीय शेअर बाजार बंद असल्यामुळे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) या दोन्ही प्रमुख निर्देशांकांवर व्यवहार होणार नाहीत. पुढील शनिवार आणि रविवार हे आठवड्याचे शेवटचे दिवस (वीकेंड) असल्याने, शेअर बाजार सलग तीन दिवस बंद राहील.https://prahaar.in/2026/03/28/the-stock-market-will-operate-for-only-three-days-next-week/याव्यतिरिक्त, आज इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, एसएलबी, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज आणि इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह्ज या सर्व विभागांमध्ये व्यवहार होणार नाहीत, म्हणजेच संपूर्ण दिवसभर एक्सचेंजवरील व्यवहार पूर्णपणे स्थगित राहतील. देशांतर्गत शेअर बाजारातील पुढील व्यवहार सत्र सोमवार, ६ एप्रिल रोजी सकाळी ९:१५ वाजता सुरू होईल.
PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या'महिन्यात मिळण्याची शक्यता
मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नाही. या शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना एक मजबूत आर्थिक कवच म्हणून उदयास आली आहे, जी दरवर्षी थेट त्यांच्या बँक खात्यात ६ हजार रुपये जमा करते. सरकार ही रक्कम दर चार महिन्यांनी२ हजारांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वितरित करते.ही रक्कम थेट डीबीटीद्वारे हस्तांतरित केली जाते. २२ वा हप्ता मिळाल्यानंतर, शेतकरी आता २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल, तर पुढील हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही घरबसल्या तुमच्या हप्त्याची स्थिती कशी तपासू शकता, हे समजून घ्या.२३ वा हप्ता कधी येईल?पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत हप्ते दर चार महिन्यांनी दिले जातात आणि २२ वा हप्ता मार्चमध्ये मिळाला होता. त्यामुळे, २३ वा हप्ता जुलै २०२६ च्या सुमारास दिला जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. तथापि, सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. अधिकृत माहिती जाहीर झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.'या' शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणारया हप्त्याचा लाभ केवळ त्या शेतकऱ्यांनाच मिळेल ज्यांनी आपली ई-केवायसी आणि जमीन पडताळणीची औपचारिकता वेळेवर पूर्ण केली आहे. जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नसेल किंवा तुमची केवायसी अपूर्ण असेल, तर जुलैमध्ये मिळणारा हा आनंद हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे, धोका पत्करण्याऐवजी आताच तुमची स्थिती अद्ययावत करणे शहाणपणाचे ठरेल.हप्त्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टीपुढचा हप्ता जुलै महिन्यात येण्याची दाट शक्यता आहे. ई-केवायसी आणि आधार सीडिंग न केल्यास तुमचे पेमेंट थांबवले जाऊ शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जमीन पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे देखील आवश्यक आहे. आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना ४.२७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वाटप केले आहे. लाभार्थी यादीमध्ये आपले नाव कसे तपासावे. तुमचे नाव नवीन लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासायचे असल्यास, कुठेही धावपळ करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपचा वापर करून घरबसल्या ते तपासू शकता. सर्वप्रथम, pmkisan.gov.in या अधिकृत पीएम किसान वेबसाइटला भेट द्या आणि 'लाभार्थी यादी' (Beneficiary List) या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचा तपशील भरावा लागेल.तुम्ही 'अहवाल मिळवा' वर क्लिक करताच, तुमच्या संपूर्ण गावाची यादी स्क्रीनवर दिसेल. तुम्ही तुमचे नाव तपासू शकता आणि तुमच्या मागील हप्त्यांची स्थिती पाहू शकता. ही डिजिटल पद्धत केवळ तुमचा वेळच वाचवत नाही, तर तुम्हाला मध्यस्थांच्या त्रासापासूनही वाचवते.
Donald Trump on irani people:अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या कृतींपेक्षा त्यांच्या विचित्र वक्तव्यांसाठी अधिक प्रसिद्ध आहेत.
Nashik News : भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच आता नाशिकमधून आणखी एक खळबळ उडवून देणारा प्रकार समोर आला आहे.
Vikrant Massey: वॉशरूमबाहेर मिळालेल्या संधीने बदललं आयुष्य; विक्रांत मॅसीचा संघर्षातून यशाकडे प्रवास
Vikrant Massey सुरुवातीला त्याला एका टीव्ही शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्याला एका भागासाठी सुमारे ६ हजार रुपये मिळायचे. महिन्याला चार भागांमधून २४ हजार रुपये मिळत होते.
Sanjay Raut : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवार दिला जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी मोठी प्रतिक्रिया यावर दिली आहे.
पूर्व काँगोमध्ये आयएसआयएसशी संबंधित बंडखोरांनी केला मोठा हल्ला; ४३ जण ठार
नवी दिल्ली: इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी गटाशी संलग्न असलेल्या बंडखोरांनी पूर्व काँगोमध्ये एक मोठा हल्ला केला असून, त्यात किमान ४३ जण ठार झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.अलाईड डेमोक्रॅटिक फोर्सेसच्या (एडीएफ) तरुणांनी बुधवारी रात्री बाफवाकोआ गावातील नागरिकांना लक्ष्य केले. युगांडातील इस्लामिक स्टेट गटाशी संलग्न असलेला हा बंडखोर गट, सहज ओलांडता येणाऱ्या सीमेच्या दोन्ही बाजूंना सक्रिय आहे. त्यांनी गावातील घरांना आग लावली, असे एका नागरी समाज संघटनेचे सदस्य सॅम्युअल बानापिया यांनी फोनवरून सांगितले. काँगोच्या लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, ४३ लोक ठार झाले, तर स्थानिक अधिकाऱ्यांनी मृतांचा आकडा किमान ५६ असल्याचे सांगितले. अनेक लोक बेपत्ता असून किमान दोन जणांना ओलीस ठेवण्यात आले आहे.एम२३ हा मुख्य बंडखोर गटकाँगोचे सैन्य पूर्व भागात एडीएफसह इतर अनेक बंडखोर गटांशी लढत आहे. यातील सर्वात प्रमुख गट म्हणजे रवांडा-समर्थित एम२३, ज्याने गेल्या वर्षी पूर्व भागातील प्रमुख शहरे ताब्यात घेतली. पूर्व काँगोमधील लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट ज्युल्स न्गोंगो म्हणाले, एडीएफ लष्कराशी थेट संघर्ष टाळते आणि नागरिकांना लक्ष्य करते. यामुळे शांततेच्या प्रयत्नांना बाधा येते. काँगोमधील एडीएफ तरुणांची संख्या अस्पष्ट आहे, परंतु या प्रदेशात त्यांचे मोठे अस्तित्व आहे आणि ते वारंवार नागरिकांवर हल्ले करतात. अलिकडच्या वर्षांत, युगांडाच्या सीमेजवळ एडीएफचे हल्ले तीव्र झाले आहेत. गेल्या वर्षी, एडीएफने शेजारच्या प्रदेशात ६६ लोकांना ठार केले आणि इतर अनेकांना ओलीस ठेवले.
होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा खुली करा, भारताची मागणी
ब्रिटनने बोलावलेल्या 60 देशांच्या बैठकीत मांडले मतनवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या नियंत्रणात गेलेली होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची भारताने मागणी केली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ब्रिटनच्या पुढाकाराने आयोजित बहुपक्षीय बैठकीत ही भूमिका मांडली. या संघर्षात जलमार्गावर आपले नागरिक गमावणारा भारत हा एकमेव देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ब्रिटनने आयोजित केलेल्या या आभासी बैठकीत 60 हून अधिक देश सहभागी झाले होते. बैठकीचा मुख्य उद्देश होर्मुज सामुद्रधुनीत सुरक्षित आणि निर्बाध जहाजवाहतूक सुनिश्चित करणे हा होता. या संकटामुळे जागतिक तेलाच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, मिस्री यांनी आंतरराष्ट्रीय जलमार्गांमध्ये मुक्त नौवहनाच्या तत्त्वावर भर दिला. तसेच या संघर्षाचा भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर होत असलेला परिणामही त्यांनी अधोरेखित केला.बैठकीत त्यांनी सांगितले की, होर्मुज परिसरातील व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमध्ये भारतानेच सर्वाधिक नुकसान सोसले आहे. डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंगच्या माहितीनुसार, विदेशी ध्वज असलेल्या जहाजांवर कार्यरत किमान तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. काही जहाजे अद्यापही या सामुद्रधुनीत अडकलेली आहेत.मिस्री यांनी इशारा दिला की, या प्रदेशातील अस्थिरतेचा थेट परिणाम भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर होत आहे. भारत हा जगातील प्रमुख कच्चे तेल आयात करणाऱ्या देशांपैकी एक असल्याने पश्चिम आशियातील परिस्थितीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडत आहे. या संकटावर तोडगा काढण्यासाठी तणाव कमी करणे आणि सर्व पक्षांमध्ये संवाद व कूटनीती हाच एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले की व्यापारी जहाजांवरील हल्ले अस्वीकार्य आहेत आणि आंतरराष्ट्रीय जलमार्गांमध्ये मुक्त वाहतूक सुनिश्चित केलीच पाहिजे.आखाती देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व भारतीय नागरिक सुरक्षित असून भारतीय दूतावास त्यांच्या सतत संपर्कात आहेत. आतापर्यंत या संघर्षात 8 भारतीयांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे.
Raghav Chadha: आम आदमी पार्टीचे (आप) नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी उपनेतेपदावरून हटवल्याबद्दल पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केले आहे.
Pakistan: पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या किती रुपयांची वाढ?
नवी दिल्ली: पाकिस्तानने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात ४३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून, त्यामुळे पेट्रोलचा दर प्रति लिटर ४५८.४ रुपये ($१.६४) झाला आहे. पेट्रोलसोबतच डिझेलचा दरही प्रति लिटर ५२०.३५ रुपये ($१.८६) पर्यंत वाढवण्यात आला आहे. पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी गुरुवारी ही घोषणा केली आहे. मलिक म्हणाले की, मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे केवळ संपूर्ण प्रदेशातच नव्हे, तर संपूर्ण जगात तेलाचे संकट निर्माण झाले आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे नवीन दर आज सकाळपासून लागू झाले आहेत.पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती झाले?पाकिस्तानने गुरुवारी डिझेल आणि पेट्रोलच्या दरात वाढ केली. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ही दुसरी वेळ आहे. पाकिस्तानमध्ये डिझेलच्या दरात ५४.९ टक्के वाढ होऊन तो ५२०.३५ पाकिस्तानी रुपये ($१.८८) प्रति लिटर झाला आहे, तर पेट्रोलच्या दरात ४२.७ टक्के वाढ होऊन तो ४५८.४० पाकिस्तानी रुपये प्रति लिटर झाला आहे.दुचाकीस्वार आणि शेतकऱ्यांना दिलासामध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षानंतर आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. मात्र, पाकिस्तानी सरकार दुचाकी वापरकर्त्यांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रति लिटर १०० रुपयांचे अनुदान देणार असून, याची कमाल मर्यादा दरमहा २० लिटर असेल.गेल्या महिन्यातच किमती २० टक्क्यांनी वाढल्या होत्या.गेल्याच महिन्यात पाकिस्तानने डिझेल आणि पेट्रोलच्या दरात जवळपास २० टक्क्यांनी वाढ केली. पाकिस्तान तेल आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे, जी प्रामुख्याने सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे केली जाते.
अमेरिका- इस्रायलचा तेहरानच्या सर्वात उंच पुलावर बॉम्ब हल्ला; आठ जणांचा मृत्यू, ९५ जखमी
तेहरान : पश्चिम आशियामध्ये इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. शांतता चर्चांसाठी प्रयत्न सुरू असतानाही दोन्ही बाजूंनी हल्ले कायम आहेत. दरम्यान, गुरुवारी अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील सर्वात उंच पुल मानल्या जाणाऱ्या बी-१ ब्रिजवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात किमान आठ नागरिकांचा मृत्यू झाला असून ९५ जण जखमी झाले आहेत.इराणी माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, लष्करी कारवाईचे मुख्य लक्ष्य करज शहरातील बी-१ ब्रिज होते. या हल्ल्यामुळे आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये इराणी प्रवासी तसेच स्थानिक गावकरी यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यावेळी हे लोक पुलाजवळ उपस्थित होते.वृत्तानुसार, मृतांमध्ये निसर्ग दिन निमित्त त्या परिसरात गेलेली काही कुटुंबेही होती. या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले होते.हल्ल्याच्या एक दिवस आधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा देत म्हटले होते की, तेहरानने लवकर करार केला नाही तर त्याच्यावर भीषण हल्ले करण्यात येतील. या हल्ल्यांमध्ये ऊर्जा केंद्रे आणि पाणी प्रकल्प लक्ष्य केले जातील, असेही त्यांनी सांगितले होते. बी-१ ब्रिजवरील हल्ला हा त्याच धोरणाचा भाग मानला जात आहे.या पुलावर हल्ला झाल्यामुळे तेहरानचा शेजारील करज शहराशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. अमेरिका इराणला कोणत्याही वेळी त्याच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करू शकते, हा संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे.दरम्यान या हल्ल्यानंतर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध इराण आपल्या संपूर्ण क्षमतेने बचाव करेल, अशी शपथ घेतल्याचे सांगितले. तेहरानने या संघर्षाला विनाकारण आक्रमकतेचे युद्ध म्हटल्यापासून एक महिन्याहून अधिक काळ झाला असताना त्यांचे हे वक्तव्य समोर आले आहे.गुरुवारी अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेदरम्यान पेजेशकियन यांनी या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, वॉशिंग्टनने हल्ले आणि बॉम्बहल्ले सुरू केले त्या वेळी तेहरान अमेरिका सोबत अप्रत्यक्ष चर्चेत सहभागी होते.
मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू
नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला. रायगड जिल्ह्यातील नागोठणे जवळील सुकळी खिंडीत शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण बस अपघाताने मुंबई गोवा महामार्गवर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खाजगी ट्रॅव्हल्स बस पलटी झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला असून ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी ८ ते ९ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अपघात इतका गंभीर होता की बस पूर्णपणे उलटून रस्त्याच्या कडेला फेकली गेली. जखमींना तातडीने कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जात आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, बस सुकळी खिंडीतून जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि काही क्षणांतच बस पलटी झाली. अपघातानंतर प्रवाशांचा आक्रोश ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या प्रवाशांची सुटका केली.दरम्यान, बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का, चालकाचा वेग किंवा निष्काळजीपणा कारणीभूत होता का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
Malda Violence: पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील कालिआचक याठिकाणी नुकत्याच झालेल्या हिंसाचार आणि तणावाच्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
Malda Violence: पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील कालिआचक याठिकाणी नुकत्याच झालेल्या हिंसाचार आणि तणावाच्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
Satish Khokya Bhosale : सतीश उर्फ खोक्या भोसले याला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याची एका मारहाण प्रकरणातून न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
US military reshuffle: इराणच्या सैन्यानंतर, ट्रम्प प्रशासनाने आता आपल्याच सैन्यावर निशाणा साधला आहे.
Raw Onion: सावधान! कच्चा कांदा खाणं सगळ्यांसाठी फायदेशीर नाही; या ‘५’परिस्थितींमध्ये होऊ शकतो त्रास
Raw Onion कच्चा कांदा आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी तो सर्वांसाठी योग्य नाही. आपल्या शरीराच्या स्थितीनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्याचे सेवन करणे अधिक सुरक्षित ठरते.
Jaya Prada: जया प्रदा यांचा वादग्रस्त प्रवास: तीन मुलांच्या वडिलांशी लग्न, तरीही यशाची उंच भरारी
Jaya Prada जया प्रदा यांचं खरं नाव ललिता राणी होतं. त्यांच्या वडिलांचा चित्रपट क्षेत्राशी संबंध होता. लहानपणापासूनच त्यांना डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. मात्र त्यांच्या आईने त्यांना नृत्य आणि संगीताचं प्रशिक्षण दिलं आणि त्यातूनच त्यांचा कल चित्रपटसृष्टीकडे वळला.
पुण्यात CNG च्या दरात वाढ; या तारखेपासून होणार नवे दर लागू
पुणे : इराण आणि इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशात तेलाच्या गॅसच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोलच्या किमतीतही लक्षणीय वाढ झालेली आहे. पण पुण्यात पेट्रोल आणि एलपीजीच्या वाढीनंतर आता CNG च्या दरातही वाढ झालेली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. आणि काहीच दिवसात हे नवीन दर लागू होणार आहेत.दरवाढीचे कारणइराण आणि इस्त्रायल यांच्यात युद्ध सुरु झालं आणि जिथून मोठ्या प्रमाणात तेलाची वाहतूक केली जाते ती होर्मूझची सामुद्रधुनी जलवाहतुकीसाठी बंद करण्यात आली. त्यामुळे जगभरात कच्या तेलाच्या किमती ,गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला. एलपीजी आणि पेट्रोलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याच पाठोपाठ आता सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे.सीएनजीचे नवे दर युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सीएनजीच्या किमतीत वाढ झाली आहे.. पुण्यात सीएनजीच्या किमतीत २ रुपयांची वाढ झाली असून नवा दर ९४.५० रुपये प्रति किलो असा असणार आहे . झालेल्या दरवाढीमुळे सार्वजनिक वाहतूक आणि खाजगी वाहनधारकांचे बजेट कोलमडणार हे निश्चित आहेपुण्यात सीएनजी महागलेला असतानाच, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOCL) देखील आपल्या प्रीमियम श्रेणीतील इंधनांच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. कंपनीने बुधवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू केली आहे. तर 'XP100' पेट्रोलच्या दरात तब्बल ११ रुपयांची वाढ होऊन तो प्रति लिटर १४९ रुपयांवरून १६० रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तर 'एक्स्ट्रा ग्रीन' डिझेलही ९१.४९ रुपयांवरून वाढून ९२.९९ रुपये प्रति लिटर झाले आहे. या वाढीमुळे प्रीमियम इंधन वापरणाऱ्या वाहनधारकांच्या खर्चात मोठी वाढ होणार असून, विशेषतः हाय-एंड गाड्यांचा वापर करणाऱ्यांना याचा थेट आर्थिक फटका बसणार आहे. भविष्यात या दरवाढीचा वापरावर आणि मागणीवर काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.
Baramati and Rahuri By Election : बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार देणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या चालवण्यात येणारे सेव्हन हिल्स रुग्णालय हे आता खासगी संस्थेच्या ताब्यात देण्याचा घाट असून या रुग्णालयाचे खासगीकरण करण्यात येवू नये. त्यामुळे यासाठी मुंबईकरांना चांगल्याप्रकारची आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी महापालिकेच्या ताब्यात घेवून त्याचा विकास एम्सच्या धर्तीवर करण्यात यावा अशी मागणी स्थायी समितीत करण्यात आला आहे.स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेस नगरसेवक अश्रफ आझमी यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे या प्रश्नाला वाचा फोडत हे रुग्णालय खासगी संस्थेच्या ताब्यात देण्याचा डाव प्रशासनाचा असल्याचा आरोप केला.अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णलयाची सरकारी मूल्यानुसार ५ हजार कोटी तर बाजार भावानुसार ७ हजार कोटी रुपये किंमत आहे. एनसीएलटी प्रक्रियेअंतर्गत झालेल्या समझोत्यानंतर, रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्याशी संबंधित असलेल्या खाजगी कॉर्पोरेट संस्थेकडे सोपवले जाऊ शकते. “जर खाजगी अधिग्रहणासाठी ४७६ कोटी रुपये उभे केले जाऊ शकतात, तर महानगरपालिका सार्वजनिक आरोग्यसेवेसाठी हे रुग्णालय ताब्यात घेण्यासाठी तीच रक्कम का वापरू शकत नाही?” “जेव्हा मुंबईकर रुग्णालयातील खाटांच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत, तेव्हा कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी सार्वजनिक पैशाचा वापर करु नये.”हे रुग्णालय सार्वजनिक जमिनीवर उभे आहे, १५०० खाटा, ३६ ऑपरेशन थिएटर्स, १२० बाह्यरुग्ण विभाग आहेत आणि तरीही, गरीब जनतेची सेवा करण्याऐवजी, ते खाजगी नियंत्रणाखाली उभे केले जात आहे. सेव्हन हिल्सच्या हस्तांतरणाची घाई का केली जात आहे. महानगरपालिका मुंबईकरांसाठी काम करत आहे की कॉर्पोरेट कंपन्यांसाठी? मुंबईत एका अद्ययावत रुग्णालयाची गरज आहे, मुंबईतील सरकारी व बीएमसीची रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे, रुग्णांच्या नातेवाईकांना खाटांसाठी धावपळ कराली लागते अशावेळी एक अद्ययावत जागतिक दर्जाचे रुग्णालय खाजगी लोकांच्या घशात का घातले जात आहे असा आरोप अशरफ आझमी यांनी केला आहे.सेव्हनहिल्स रुग्णालय उद्योगपतीच्या घशात घालण्याचे षडयंत्र दिसत असून कोणत्याही परिस्थितीत या रुग्णालयाचे खाजगीकरण करू नये. मुंबईकरांना चांगल्या व दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने हे रुग्णालय ताब्यात घेऊन चालवावे, आणि वैद्यकीय, नर्सिंग आणि संशोधन सुविधांसह त्याचा एम्स पातळीवर याचा विकास करावा, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी केली आहे. त्यामुळे याची संपूर्ण माहिती देण्यात यावी असे निर्देश देत हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.
Top 10 News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसून येतायेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात दिल्लीत एक बैठक झालीय.
मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने जाहीर केले आहे की, यावर्षी होणाऱ्या प्रचंड गर्दीचा अंदाज घेऊन मुंबई आणि पुणे येथून २,१०० हून अधिक उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जातील. यामुळे लाखो प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळवणे सोपे होईल आणि प्रतीक्षेचा त्रास लक्षणीयरीत्या कमी होईल.किती गाड्या धावतील आणि त्यात विशेष काय आहे?रेल्वेच्या माहितीनुसार, २,१०० हून अधिक विशेष गाड्यांपैकी ७३५ अनारक्षित, तर ६२४ आरक्षित असतील. या गाड्या विशेषतः उन्हाळ्यात घरी परतणाऱ्या किंवा सुट्टीवर जाणाऱ्या प्रवाशांसाठी आहेत.महाराष्ट्रांतर्गत कोणत्या मार्गांवर रेल्वे उपलब्ध असतील?राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्या लोकांसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या विशेष गाड्या मुंबई/दौंड - सोलापूर, पुणे - कोल्हापूर, नाशिक रोड - बडनेरा आणि हडपसर - हरंगुल या मार्गांवर धावतील. दरवर्षी या मार्गांवर प्रचंड गर्दी असते, त्यामुळे यंदा अतिरिक्त गाड्या चालवण्यात येत आहेत.महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्यांनाही दिलासाजर तुम्ही इतर राज्यांमध्ये प्रवास करण्याची योजना आखत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. मुंबई-बलिया, मुंबई-गोरखपूर, दौंड-कलबुर्गी आणि सोलापूर-कलबुर्गी/अनाकापल्ले या मार्गांवरही विशेष गाड्या धावणार आहेत. यामुळे उत्तर प्रदेश, बिहार आणि दक्षिण भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होईल.'मागणीनुसार प्रशिक्षण' देण्याचा फायदाहीरेल्वेने सांगितले की, या विशेष गाड्यांमध्ये सध्याच्या 'ट्रेन ऑन डिमांड' सेवेचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, प्रचंड गर्दीला प्रतिसाद म्हणून, प्रवाशांना त्यांच्या प्रवासात कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी अतिरिक्त नवीन गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.बिग डेटा आणि रेल्वेची तयारीभारतीय रेल्वेने गेल्या आर्थिक वर्षात (२०२५-२६) विक्रमी ७६,३५२ विशेष गाड्या चालवल्या. देशभरात दररोज सुमारे २५,००० गाड्या धावत आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, रेल्वे प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.प्रवाशांना काय फायदा होईल?कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल.गर्दी आणि दीर्घ प्रतीक्षा वेळेपासून दिलासा मिळेल.लांब पल्ल्याचा प्रवास सोपा होईलतुमच्या सुट्ट्यांचे नियोजन करणे सोपे होईल
Mumbai: राजावाडी रुग्णालयाच्या होणारा विलंब खपवून घेणार नाही; महापौरांनी भरला अधिकाऱ्यांना दम
मुंबई: घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयावर रुग्णसेवेचा भार अधिक आहे. अशा स्थितीत रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम रखडणे हे कोणत्याही स्थितीत परवडणारे नाही. पुनर्विकास टप्पा एक मधील इमारत उभारणीचे काम पुढील आठवड्यात कोणत्याही परिस्थितीत सुरू करावे, प्रलंबित असलेल्या परवानगी युद्ध पातळीवर प्रयत्न करून प्राप्त कराव्यात, असे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत. आवश्यक सर्व परवानगी प्राप्त करणे हे कंत्राटदाराचे काम असून त्यासाठी प्रत्यक्ष कामास विलंब होणे खपवून घेणार नाही, अशी सक्त सूचना करत महापौरांनी अधिकाऱ्यांना दम भरला.घाटकोपर (पूर्व) येथील सेठ व्ही.सी. गांधी आणि एम. ए. व्होरा महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय अर्थात राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यात येत आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे ६०० रुग्णशय्या क्षमता असलेली इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासंदर्भात महापौर श्रीमती रितू तावडे यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी जाऊन गुुरुवारी २ एप्रिल २०२६ रोजी पाहणी केली. नगरसेवक धर्मेश गिरी, राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती राजूलवाला, रुग्णालये पायाभूत सुविधा कक्षाचे उपप्रमुख अभियंता मनोज राणे, एन विभागाचे सहायक आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) मारुती पवार यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.प्रारंभी माहिती देताना उपप्रमुख अभियंता राणे म्हणाले की, राजावाडी रुग्णालय पुनर्विकास टप्पा एक अंतर्गत उभारण्यात येणारी इमारत ही निम्न तळघर, तळघर, तळमजला अधिक १० मजले या स्वरूपाची राहणार आहे. ६०० रुग्णशय्या क्षमतेच्या या इमारतीमध्ये सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील. यासाठी सुमारे ३३ हजार १७९ चौरस मीटर इतके बांधकाम क्षेत्रफळ राहणार आहे. डिसेंबर २०२५ मध्ये टप्पा एक इमारतीचे भूमिपूजन झाले आहे. गौण खनिज आणि राडारोडा संदर्भातील परवानगी प्राप्त होताच तत्काळ इमारत उभारणीचे काम सुरू केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यातील इमारत पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण रुग्णालय स्थलांतरित केले जाईल आणि पुढील टप्प्यात दुसरी इमारत उभी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.भूमिपूजन होऊन चार महिने लोटल्यानंतरही प्रत्यक्ष इमारत उभारणी कार्यवाही सुरू न झाल्याबद्दल महापौर श्रीमती रितू तावडे यांनी नापसंती व्यक्त केली. प्रशासनाला जिथे जिथे अडचणी वाटत असतील, त्या बाबी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत. तसेच लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेतल्यास अशा अडचणी मार्गी लागू शकतात. आवश्यक सर्व परवानगी प्राप्त करणे हे कंत्राटदाराचे काम असून त्यासाठी प्रत्यक्ष कामास विलंब होणे खपवून घेणार नाही, अशी सक्त सूचना महापौरांनी केली.पुढील आठवड्यात इमारत उभारणीचे काम सुरू करावे. इमारत उभारणीचे काम सुरू असताना शेजारी रुग्णालयामध्ये रुग्णांना बांधकामाचा आवाज, धूळ आदींचा त्रास होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. कामाच्या प्रत्येक टप्प्यात घाटकोपर परिसरातील सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन सातत्याने माहिती द्यावी. रुग्णालय पुनर्विकास संदर्भात महानगरपालिका मुख्यालयात संयुक्त सभेमध्ये सविस्तर सादरीकरण करावे, असे निर्देशही महापौर तावडे यांनी दिले.
Weather alert : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसाने पुणेकरांची चांगलीच दैणा केली आहे. आजही पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Rashmika Mandanna या व्हिडिओमध्ये रश्मिका एकटीच एअरपोर्टवर दिसते. तिने हलक्या पिवळ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला होता, जो तिच्या लुकला फ्रेश आणि ब्राइट टच देत होता. यासोबत तिने निळ्या रंगाची हाय-वेस्ट वाइड-लेग जीन्स घातली होती.
Rain Alert: दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पाऊस आणि गारपिटीची शक्यता
नवी दिल्ली: दिल्ली एनसीआरमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार वाऱ्यांमुळे हवामान बदलले. हवामान विभागाने संपूर्ण उत्तर भारतात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) म्हटले आहे की, आज उत्तर मध्य भारतात पावसासोबत गारपिटीची शक्यता आहे. आयएमडीने जम्मू आणि काश्मीर, दिल्ली एनसीआर, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही पावसाची शक्यता आहे.भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, सध्याची पश्चिमी प्रणाली आणि पुढील प्रणाली ५ एप्रिलपर्यंत वायव्य भारतात पाऊस आणू शकतात. यानंतर, आणखी एका पश्चिमी प्रणालीमुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यताअरुणाचल प्रदेशात ५ आणि ६ तारखेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाब आणि डोंगराळ राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. पुढील दोन आठवड्यांत तीन पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे हवामानावर परिणाम होऊ शकतो. एका वाऱ्यांचा प्रभाव सध्या आहे, दुसरा ७ तारखेपासून सक्रिय होईल आणि त्यानंतर तिसऱ्या वाऱ्यांचा प्रभाव येईल. सुरू असलेल्या पावसामुळे देशाच्या बहुतांश भागांमध्ये तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. परिणामी, कुठेही उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही.राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी हलका पाऊसपश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे गेल्या २४ तासात राजस्थानच्या अनेक भागांमध्ये हलका पाऊस झाला. हवामान केंद्रानुसार, देवगड (राजसमंद) येथे सर्वाधिक १२ मिमी पावसाची नोंद झाली. याच काळात चित्तोरगडमध्ये सर्वाधिक कमाल तापमान (३८.६ अंश सेल्सिअस) आणि अलवरमध्ये सर्वात कमी किमान तापमान (१८.२ अंश सेल्सिअस) नोंदवले गेले. हवामान केंद्रानुसार, २ एप्रिल रोजी जैसलमेर, बारमेर, फलोदी आणि बिकानेर विभागांतील जिल्हे आणि आसपासच्या परिसरात पश्चिमी वाऱ्यांमुळे मेघगर्जना आणि पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने असेही म्हटले आहे की, ३ आणि ४ एप्रिल रोजी आणखी एका पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव राहील. यामुळे जोधपूर, बिकानेर, अजमेर, जयपूर, भरतपूर आणि कोटा विभागांच्या काही भागांमध्ये मेघगर्जना आणि पावसाची शक्यता आहे. या काळात काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे. त्याचप्रमाणे, ७ आणि ८ एप्रिल रोजी राज्याच्या काही भागांमध्ये आणखी एक पश्चिमी प्रणाली सक्रिय राहील.झारखंडमध्ये ४ एप्रिलपासून वादळ आणि पावसाची शक्यता४ एप्रिलपासून झारखंडच्या १४ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा तडाखा बसेल. हवामान विभागाने सांगितले की, ४ आणि ५ एप्रिल रोजी काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचीही शक्यता आहे. विभागाने म्हटले आहे की, ४ आणि ५ एप्रिल रोजी झारखंडच्या वायव्य आणि मध्य भागात मेघगर्जना, वीज, गारपिटीसह ताशी ५० किमी वेगापर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता आहे. सतर्कतेचा इशारा देताना विभागाने सांगितले की, गरवा, पलामू, चत्रा, लातेहार, लोहरदगा, हजारीबाग, कोडरमा, रामगड, रांची, खुंटी, गिरीडीह, धनबाद, बोकारो आणि गुमला या जिल्ह्यांना वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने इशारा दिला आहे की, सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे उभ्या पिकांचे नुकसान होऊ शकते.
मुंबई: शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे. २ एप्रिल २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या सूचनेवरून व गणेश बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर रोडवरील मौजे खोजेवाडी शिवारात धाड टाकण्यात आली.हॉटेल साईयश परिसरात केलेल्या या कारवाईदरम्यान एलपीजी टँकरचे सील तोडून गॅस चोरी करताना दोन व्यक्ती रंगेहात आढळून आले. तपासात एचपी कंपनीचे दोन कॅप्सूल टँकर (क्रमांक MH43 K 5921 व MH43 CK 5747) आढळले. या टँकरमध्ये अनुक्रमे १७,५९० किलो व १७,६३० किलो एलपीजी गॅस साठवलेला होता.याशिवाय घटनास्थळावरून १९.२ किलो क्षमतेचे १७ भरलेले व ६ रिकामे सिलेंडर, १४.२ किलोचा १ भरलेला सिलेंडर तसेच ५ किलोचे २ भरलेले सिलेंडर जप्त करण्यात आले. एकूण ३५,२२० किलो एलपीजी गॅस, २ टँकर आणि २६ सिलेंडर असा सुमारे १ कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दक्षता पथकाच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या गॅसचा घरगुती वापरासाठी उपयोग केला असता सुमारे २४८० कुटुंबांची गरज भागू शकली असती.या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात छत्रपती संभाजी नगर,एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Accident on Mumbai-Goa highway : मुंबई- गोवा महामार्गावर खाजगी बस उलटून भीषण अपघाताची घटना घडली आहे.

30 C