NCMC Card: एनसीएमसी कार्ड असेल तरच मिळणार एसटी बस प्रवासात सवलत; जाणून घ्या एनसीएमसी कार्ड बद्दल
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांना पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्यासाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच 'एनसीएमसी' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता हे स्मार्ट कार्ड आवश्यक असेल.एनसीएमसी कार्ड अनिवार्य:हा केवळ तांत्रिक बदल नाही तर प्रवाशांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी उचलेलं एक पाऊल आहे. हे कार्ड सवलती, कॅशलेस पेमेंट आणि पारदर्शक प्रणालीचे अचूक रेकॉर्ड सुनिश्चित करेल. या प्रकल्पासाठी एसटीने एबिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि एनएसडीएल पेमेंट्स बँकेसोबत भागीदारी केली आहे.सर्व डेपोमध्ये लवकरच नोंदणी मोहीम सुरू होईल. प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनंतर, आता प्रत्येकाकडे हे कार्ड असणे आवश्यक असेल.कोणाला मिळणार एनसीएमसी कार्ड ?मिळालेल्या माहितीनुसार, या नवीन योजनेत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांचा समावेश आहे. अपंग प्रवासी, स्वातंत्र्यसैनिक, मान्यताप्राप्त पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना एनसीएमसी कार्ड दिले जातील. विद्यार्थ्यांचे कार्ड त्यांच्या शाळेच्या क्रमांकाशी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे कार्ड त्यांच्या आधार क्रमांकाशी आणि अपंग प्रवाशांचे कार्ड त्यांच्या UDID क्रमांकाशी जोडले जातील. या कार्डची किंमत ₹१९९ आहे (GST सह), परंतु जुने स्मार्ट कार्ड सादर केल्यावर ते ₹१४९ मध्ये उपलब्ध असेल.प्रवास सोपा आणि सुरक्षित होण्याकडे भर:कार्डमध्ये किमान १०० रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करू शकता. हा रिचार्ज तुम्हाला ईटीआयएम मशीन, वेबसाइट, मोबाईल अॅप किंवा अधिकृत एजंटद्वारे करता येईल. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी ३,००० हून अधिक एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागातील प्रवाशांनाही बसस्थानकावर नोंदणी करण्याच्या सुविधेचा फायदा होईल. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (एसटी) या उपक्रमामुळे प्रवास सोपा आणि सुरक्षित होईल.
Crime: प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार, नात्याला काळिमा फासणारी घटना समोर
मुंबई: नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित पदावर काम करणाऱ्या महिलेला स्वत:च्याच घरात ज्या छळाचा सामना करावा लागला, ते ऐकून कोणाचेही मन विषण्ण होईल. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा भयानक प्रकार आता चव्हाट्यावर आला असून, यामुळे शिक्षण क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे. एका महिलेने तिच्याच सासर्यावर अत्यंत गंभीर आणि संतापजनक आरोप केले आहेत.नेमकं प्रकरण काय ?हे संतापजनक प्रकरण कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगलुरु शहरातून समोर आले आहे. येथील नॉर्थ बेंगलुरु भागात राहणाऱ्या एका खाजगी शाळेच्या महिला प्रिन्सिपलने आपल्या सासर्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार नोंदवली आहे. मागील ६ वर्षांपासून आपला शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचे या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.मागील ६ वर्षांपासून छळही पीडित महिला २००७ पासून शिक्षण क्षेत्रात सक्रिय असून एका प्रसिद्ध शाळेत प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे. तिच्या तक्रारीनुसार, लग्नानंतरची सुरुवातीची काही वर्षे सुखात गेली, मात्र २०२० पासून तिच्या सासर्याने तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. संपूर्ण कुटुंब एकाच अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये वेगवेगळ्या घरात राहत होते. पीडित महिला घरी एकटी असायची, तेव्हा तिचा सासरा घरात घुसून तिच्याशी अश्लील चाळे आणि शारीरिक शोषण करायचा, असा गंभीर आरोप तिने केला आहे.पीडित महिला गप्प का होती?आपल्यासोबत घडणारा हा प्रकार कोणाला सांगितल्यास मुलांना इजा पोहचवू, अशी धमकी आरोपी सासरा वारंवार देत होता. आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी आणि घराची अब्रू वाचवण्यासाठी ही महिला इतके दिवस गप्प राहिली. परिस्थिती कधीतरी सुधारेल अशी तिला आशा होती, परंतु सासर्याचा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच गेला. अखेर सहनशक्ती संपल्यावर तिने हा सर्व प्रकार नवऱ्याला सांगितला. त्यानंतर घरातील मोठ्या व्यक्तींनी मध्यस्थी करून आरोपीला ताकीद दिली होती, ज्यामुळे काही काळ हा त्रास थांबला होता.सासर्याची मजल इतकी वाढली होती की, त्याने घरच नाही तर पीडित महिलेच्या कामाच्या ठिकाणी म्हणजेच शाळेत जाऊनही तिला त्रास देण्यास सुरुवात केली. शाळेच्या केबिनमध्ये आणि अपार्टमेंटच्या लिफ्टजवळ सासर्याने अनेकदा छळ केल्याचे महिलेने तक्रारीत स्पष्ट केले आहे. आरोपी तिला वारंवार अश्लील मजकूर असलेली हाताने लिहिलेली पत्रे द्यायचा आणि ती वाचायला लावून पुन्हा स्वतःकडे परत घ्यायचा. हा सर्व प्रकार २०२० पासून डिसेंबर २०२५ पर्यंत सातत्याने सुरू होता.या प्रकरणाने गंभीर वळण १५ डिसेंबर २०२५ रोजी घेतले. सकाळी ७.३० च्या सुमारास महिला जेव्हा कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडली, तेव्हा अपार्टमेंटच्या लिफ्टजवळ सासर्याने पुन्हा तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा महिलेने याला कडाडून विरोध केला, तेव्हा संतापलेल्या सासर्याने तिच्या पोटावर जोरात ठोसा मारला आणि तिथून पळ काढला. या शारीरिक हल्ल्यानंतर महिलेने अखेर पोलिसांत धाव घेण्याचा निर्णय घेतला.याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील गंभीर स्वरूप लक्षात घेता राज्य महिला आयोगानेही या घटनेची दखल घेतली आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या महिलेला जर घरातच अशा संकटाचा सामना करावा लागत असेल, तर सामान्य महिलांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणातील संबंधित व्यक्तींची चौकशी करत आहेत.
Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद
मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्या कामगार कायद्यांविरोधात आणि काही आर्थिक धोरणांच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे.संपामध्ये देशातील १० प्रमुख केंद्रीय ट्रेड युनियनचा सहभाग असून INTUC, AITUC, HMS, CITU यांसह इतर संघटनांनी कामगारांच्या हक्कांबाबत चिंता व्यक्त केली आहे. नव्या लेबर कोडमुळे नोकरीची सुरक्षितता कमी होईल, कंपन्यांना कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे स्वातंत्र्य वाढेल आणि किमान वेतन तसेच सामाजिक सुरक्षेवर परिणाम होईल, असा आरोप संघटनांनी केला आहे.केंद्र सरकारने गेल्या वर्षी २९ कामगार कायद्यांच्या जागी लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान सभा यांसारख्या शेतकरी संघटनांनी या संपाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. तर ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनसह प्रमुख बँक संघटनांनी या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी २ वाजता देशभरात संघटनांकडून आंदोलन केलं जाणार आहे.संपामागील कारणं आणि मागण्या काय?- केंद्र सरकारने गेल्यावर्षी २९ कामगार कायद्यांच्या जागी लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांविरुद्ध कामगार संघटनांनी हा एल्गार पुकारला आहे.- नवीन संहितांमुळे कामगारांचे हक्क कमकुवत होणार असून नोकरीची सुरक्षितता धोक्यात येणार आहे.- याव्यतिरिक्त, खासगीकरण, वेतनातील तफावत, वीज दुरुस्ती विधेयक, बियाणे विधेयकाचा मसुदा आणि 'पीस' कायदा रद्द करावा.- मनरेगा योजना पुनर्संचयित करण्याची मागणीही लावून धरण्यात आली आहे.'या' सेवांवर होणार मोठा परिणाम:१) बँकिंग सेवाः प्रमुख बँक संघटना संपात सामील झाल्यामुळे बँक व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, बँका अधिकृतपणे बंद नसून ऑनलाईन व्यवहार आणि एटीएम सेवा सुरू राहतील.२) वाहतूक सेवाः बस, रिक्षा आणि ट्रक चालक संघटनांच्या सहभागामुळे प्रमुख शहरांमध्ये वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.3) बाजारपेठ आणि व्यापारः घाऊक आणि किरकोळ बाजारपेठांमधील व्यापारी संघटनांनी संपाला नैतिक पाठिंबा दिल्याने अनेक ठिकाणी दुकाने बंद राहू शकतात.४) शिक्षण संस्थाः वाहतुकीच्या समस्या आणि सुरक्षिततेचे कारण लक्षात घेता, काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली.काय सुरू राहणार?- रुग्णवाहिका आणि रुग्णालये- अग्निशमन दल- विमान सेवा- दूध आणि भाजीपाला पुरवठा
Pak on UNSC: : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) १२६७ प्रतिबंध देखरेख समितीच्या नवीन अहवालात पाकिस्तानबद्दल महत्त्वाची माहिती उघड झाली आहे.
Jamkhed News : भाग्यश्री गोरे लोकसेवा आयोग MPSC मार्फत तालुका कृषी अधिकारीपदी
Jamkhed News : भाग्यश्री चे वडील आरटीओ चे काम करत असून चुलते अशोक गोरे शेतकरी यांनीही, मोठ्या कष्टाने व त्यागाने त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी दिलेले पाठबळ निश्चितच प्रेरणादायी आहे.
Ritu Tawde : मुंंबई महापालिकेचा महापौर पदाचा पदभार स्विकारल्यानंतर रितू तावडेंकडून पाच मोठ्या घोषणा
Ritu Tawde :मुंबई महापालिकेच्या महापौर पदाचा पदभार स्विकारल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी पाच मोठ्या घोषणा जाहीर केल्या आहेत.
Allergy Awareness: खाद्यपदार्थांतील रसायने आणि वाढती ऍलर्जी; सतर्क राहणं का गरजेचं?
साखर शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत काही रसायनांचा वापर केला जातो. काही संवेदनशील व्यक्तींमध्ये यामुळे त्वचेवर पुरळ, खाज, लाल चट्टे किंवा श्वसनाचा त्रास दिसू शकतो. तसेच वनस्पती तूप, हायड्रोजेनेटेड तेल (डालडा) किंवा रिफाइंड तेल तयार करताना विविध रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. या तेलांचा अतिरेक केल्यास पचनाच्या तक्रारी, घशात खवखव किंवा अॅसिडिटीसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो ताजं, घरगुती आणि कमी प्रक्रियायुक्त तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो.
मुंबई: प्रसिद्ध मराठमोळा रीलस्टार प्रथमेश कदम याचं २६ जानेवारी रोजी निधन झालं. प्रथमेश कदमच्या अकाली निधनाच्या बातमीने त्याचे चाहते आणि फॉलोअर्सना मोठा धक्का बसला होता. त्याच्या अकाली झालेल्या निधनामुळे प्रथमेशला नेमकं काय झालं होतं? त्याच्या मृत्यूमागील नेमकं काय कारण आहे? यासह काही लोक तर प्रथमेशने आत्महत्या केल्याचंही म्हणत आहेत. समाज माध्यमांवर होणाऱ्या या सर्व चर्चांणा प्रथमेशच्या आईने पूर्णविराम दिला आहे. तसेच त्यांनी प्रथमेशच्या मृत्यूचं कारण सांगितलंय. प्रथमेशच्या आईने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे.प्रथमेशच्या आईने त्याच्या मृत्यूचं कारण सांगितलं?प्रथमेशच्या आईने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, नमस्कार मी प्रज्ञा प्रकाश कदम, प्रथमेशची मम्मी. काही दिवसांपासून मला खूप म्हणजे खूप त्रास होत होता, म्हणजे असे व्हिडीओ येत होते की प्रथमेशने आत्महत्या केली, प्रथमेशला हे झालं, प्रथमेशला ते झालं. त्याला असं काहीही झालं नव्हतं. त्याचं खरं कारण एकच होतं, त्याच्या ब्लडमध्ये रक्ताची कावीळ मिसळली होती. ती कावीळ म्हणजे सफेद कावीळ असते, ती कोणालाही कळत नाही. जेव्हा मी त्याला अॅडमिट केलं डॉक्टरांनी मला गॅरेंटी दिली होती, डॉक्टर म्हणाले दोन-तीन दिवसांत तो कव्हर होऊन जाईल, रिपोर्ट सर्व नॉर्मल आहेत, पण कावीळने माझ्या मुलाचा घात केला.चाहत्यांना अफवा न पसरवण्याचे केले आवाहनपुढे बोलताना, डॉक्टरांनाही कळलं नाही , शेवटच्या क्षणी डॉक्टरांना कळतंय की त्याच्या रक्तामध्ये व्हाइट कावीळ मिसळली. त्याच्या पूर्ण शरीरात रक्ताची कावीळ मिसळली, तेव्हा डॉक्टर मला म्हणाले की, आता तुम्ही देवाला प्रार्थना करा. तेव्हा मी खचून गेले की आता माझ्या मुलाची काही गॅरेंटी नाही. ती कावीळ रक्तात मिसळली की माणूस शेवटी एंडच होतो आणि तेच झालं. २६ जानेवारीला सकाळी प्रथमेशने या जगाचा निरोप घेतला. खूप त्रास झाला मला. मी सर्वांना हात जोडून विनंती करते, कोणतीही खोटी अफवा पसरवू नका. कोणीही काहीही बोलेल त्यावर लक्ष ठेवू नका. काय झालं, कसं झालं हे मला आणि माझ्या मुलीला मेसेज करून विचारू नका. गैरसमज दूर करण्यासाठी हा व्हिडीओ केला.
Amol Mitkari : 'रोहित पवारांनी मागणी केल्याप्रमाणे तत्काळ एका बाह्य संस्थेकडून सदर प्रकरणाची चौकशी ही झालीच पाहिजे'
Bangladesh Election 2026: बांगलादेशमध्ये अनेक महिन्यांच्या हिंसाचार, रस्त्यावरील निदर्शने आणि राजकीय गोंधळानंतर, अखेर निवडणुकांची वेळ आलीय. २०२४ च्या सत्तापालटानंतर आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारत भेटीनंतर, बांगलादेशात आज निवडणुका पार पडत आहेत.
Radha Yadav : चेक बाऊन्स प्रकरणामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अभिनेता राजपाल यादव याच्या पत्नी राधा यादव यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरातील एका नामांकित इंग्रजी शाळेमध्ये चार मुलांनी त्यांच्याच वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे सर्व विद्यार्थी सहावीच्या वर्गात शिकत घेत आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये ही घटना घडल्याची माहिती पीडित मुलाच्या पालकांनी दिली. याप्रकरणी चार मुलांविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी सुरू केली. दुसरीकडे, शाळेने मात्र संबंधित मुलांवर कोणतीही कारवाई केली नाही. उलट पालकांवरच दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी सुरू केली. मात्र शाळेकडून संबंधित मुलांवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित मुलाच्या वडिलांनी केला. उलट पीडित मुलावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित मुलाच्या वडिलांनी केला.राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसेंनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. दादा भुसे म्हणाले की, या संदर्भात मी स्वत: माहिती घेणार आहे आणि त्यावर योग्य ती कारवाई करेन. शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत.शाळकरी मुलांमध्ये अशा प्रकारची विकृत मानसिकता येते कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर मानसोपचार तज्ज्ञ किशोर शितोळे यांनी सांगितलं की, मोबाईलचा अतिवापर, पॉर्न व्हिडीओ पाहणे, एका विशिष्ट विचारसरणीच्या मुलांचा एकत्र ग्रुप होणे, अशा कारणामुळे या घटना घडू शकतात. यावर उपाय म्हणजे पालकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे.सध्या आरोप असलेल्या चार अल्पवयीन मुलांवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेत घडणारे असे प्रकार भविष्यात थांबावेत यासाठी शाळा प्रशासन, शिक्षण विभाग काय कारवाई करणार, हे पाहावं लागेल.
काँग्रेसने पहिल्याच सभागृहात उबाठाचा मीटर केला डाऊन
मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठा पक्ष हा प्रमुख विरोधी पक्षनेता असला प्रत्यक्षात उबाठाला विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावण्याची संधी दिली नाही. सभागृहात बसण्यास जागा नसल्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर निवडीच्या प्रक्रियेपासूनच घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि काँग्रेसच्या या घोषणाबाजीला उबाठाला बळ देत होते. परंतु काँग्रेसला बळ देतानाच आपलाच मीटर कधी डाऊन कधी टाकला हेच उबाठाला कळले नाही.मुंबई महापालिका सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या विशेष सभेमध्ये काँग्रेसचे २४ नगरसेवक सभागृहात वंदे मातरमचे गीत संपल्यानंतर दाखल झाले. परंतु तोपर्यंत सभागृहात सर्वच पक्षांच्या नगरसेवक हे आसनांवर बसलेले होते. त्यामुळे त्यांना बसण्यास जागा शिल्लक राहिले नाही. त्यामुळे बसण्यास जागाच नसल्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक हे मधल्या रांगेत प्रथम उभे राहत त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक महापौरांच्या भाषणावेळी महापौरासमोरील जागेमध्ये जावून तिथे उभे राहून घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनीही त्यांना विरोध दर्शवल्यानंतर त्यांना मागे सरायला लागले.त्यानंतर काँग्रेसच्या मेहेरअली हैदरसह काही नगरसेवकांनी सभागृहात जमिनीवर बसण्यास सुरुवात केली. आपले सदस्य जमिनीवर बसल्याचे दाखवून काँग्रेसच्या नगरसेवकांनीही मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिण खुर्चीवर आणि लाडकी बहिण जमिनीवर अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतरही काँग्रेसचे नगरसेवक हे घोषणाबाजी देत होते आणि उपमहापौरांच्या भाषणा दरम्यान गोंधळ निर्माण करण्याचा डाव रचणाऱ्या उबाठाचा डावच काँग्रेसने उधळवून लावला. त्यामुळे उबाठाला सभागृहात विरोधक आक्रमक झाल्याचे चित्रच निर्माण करता न आल्यामुळे अखेर उपमहापौरपदाच्या भाषणादरम्यान त्यांनी सभात्याग केला. त्यानंतरही काँग्रेसचे नगरसेवक घोषणा देत राहिले.विशेष म्हणजे काँग्रेसने, शिवसेनेला प्रमुख विरोधक होवू न देता प्रमुख विरोधक आपण आहोत हे दाखवण्यासाठी ते उशिरा सभागृहात दाखल झाले आणि बसायला जागा नाही या मुद्दयावरून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुरुवातीपासूनच काँग्रेसने उबाठाला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून न स्वीकारता आपणच विरोधी पक्ष आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत विरोधी पक्षाची प्रतिमा आणि त्यांचा विरोध झाकोळण्याचा प्रयत्न केला.
Priyanka Chopra: अचानक मावशी आल्या आणि सगळं उघड झालं! प्रियंकाचा शाळेतील किस्सा
त्या वेळी प्रियांका अमेरिकेत तिची मावशी किरण यांच्याकडे राहत होती. आई-वडील कामानिमित्त दूर होते. शाळेत असतानाच तिला एका मुलावर क्रश आला. पुस्तकात तिने त्याचं खरं नाव न सांगता ‘बॉब’ असं नाव दिलं आहे. तो मुलगा १०वीत शिकत होता. तो मजेदार स्वभावाचा होता आणि प्रियांकाला लहानसहान गिफ्ट देत असे. दोघं शाळेत भेटायचे, बोलायचे. मात्र मावशींनी डेटिंगला परवानगी दिली नव्हती.
Shambhuraj Desai : “अति तिथे माती, योग्य संधीची…”; शंभूराज देसाईंचा थेट भाजपवर निशाणा
Shambhuraj Desai : जिल्हा परिषदच्या निकालानुसार साताऱ्यात भाजप 27 जागेवर सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, बहुमतासाठीचा आवश्यक असलेला आकडा गाठण्यात भाजप अपयशी.
Sunil Tatkare :आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांचा विमान अपघात घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता, यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आता शाळांमध्ये ‘जन गण मन’ आधी ‘वंदे मातरम्’ देखील गायले जाईल. तीदेखील पूर्ण 6 कडवी, ज्यांना गाण्यासाठी 190 सेकंद लागतील. गृह मंत्रालयाने 28 जानेवारी 2026 रोजी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, ज्यात राष्ट्रगीताशी संबंधित असे अनेक नियम बनवण्यात आले आहेत. शेवटी राष्ट्रगीताशी संबंधित नवीन नियम काय आहेत, ते कुठे लागू होतील, कोणाला सूट मिळाली, न पाळल्यास शिक्षा काय असेल आणि या गीतावरून दशकांपासून वाद का निर्माण होत आहेत; जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये… प्रश्न-1: वंदे मातरम् गाण्याचे नवीन नियम कुठे-कुठे लागू होतील, कुठे सूट देण्यात आली आहे?उत्तर: केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार… कुठे लागू होणार नाहीत हे नियम प्रश्न-2: ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम्’मध्ये आता काय फरक राहिला?उत्तर: 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, ऑल इंडिया रेडिओवर जे पहिले गाणे वाजले ते वंदे मातरमच होते. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या शेवटच्या सत्रात अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी घोषणा केली-'रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत असेल. स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या वंदे मातरम् गीतालाही तेवढाच दर्जा दिला जाईल.' यानंतर संविधान सभेच्या सर्व सदस्यांनी जन गण मन आणि वंदे मातरम् ही दोन्ही गीते गायली. अधिकृतपणे राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये, जसे की- राष्ट्रपती आणि राज्यपालांना सलामी, परेड, राष्ट्रध्वज फडकवणे इत्यादी प्रसंगी राष्ट्रगीत गाण्याचा नियम आहे. वंदे मातरम् साठी अशी कोणतीही सक्ती नव्हती. आधी फक्त राष्ट्रगानासाठी उभे राहणे अनिवार्य होते, परंतु आता राष्ट्रगीताच्या सन्मानार्थही तसे करण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मात्र, राष्ट्रगानाबाबत स्पष्ट कायदेशीर प्रोटोकॉल आहे. अपमान केल्यास 3 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. सध्या राष्ट्रगीताबाबत असे काही नाही. 2019 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने वंदे मातरमला जन गण मन इतका दर्जा देणारी याचिका फेटाळून लावली होती. प्रश्न-3: राष्ट्रगीताशी संबंधित नियम न पाळल्यास काय होईल?उत्तर: वंदे मातरमला घेऊन सरकारने सध्या फक्त मार्गदर्शक तत्त्वे (गाइडलाइन्स) जाहीर केली आहेत. सध्या यात नियम न पाळल्यास शिक्षा किंवा दंडाची तरतूद करण्यात आलेली नाही. जर सरकारने कोणताही कायदा बनवला किंवा नियम जाहीर केला, तेव्हा हे स्पष्ट होईल की राष्ट्रगीताशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे न पाळल्यास काय होईल. दुसरीकडे, राष्ट्रगानाला ‘प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट, 1971’ अंतर्गत समाविष्ट केले आहे. राष्ट्रगानाचा अपमान केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंडाची तरतूद आहे. 2017 मध्ये ‘अश्विनी कुमार उपाध्याय विरुद्ध भारत संघ’ या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, संविधानात 'राष्ट्रगीता'ची कोणतीही अनिवार्य संकल्पना नाही. त्यामुळे शाळा किंवा कार्यालयांमध्ये ते सक्तीने गाण्यासाठी कोणालाही भाग पाडले जाऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी करताना सांगितले की, अनुच्छेद 51A (मूलभूत कर्तव्ये) मध्ये केवळ राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगानाच्या सन्मानाचा उल्लेख आहे. त्यात 'राष्ट्रगीत'चा उल्लेख नाही. प्रश्न-4: ‘वंदे मातरम्’ला मुसलमानांचा काय आक्षेप आहे, त्याला मुस्लिमविरोधी का म्हटले जाते?उत्तर: प्रसिद्ध बंगाली लेखक आणि कवी बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे वंदे मातरम् गीत पहिल्यांदा 7 नोव्हेंबर 1875 रोजी 'बंगदर्शन' या साहित्य मासिकात प्रकाशित झाले होते. तथापि, त्यावेळी त्याची विशेष चर्चा झाली नव्हती. 7 वर्षांनंतर 1882 मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे गीत त्यांच्याच 'आनंदमठ' या कादंबरीत समाविष्ट केले. कादंबरीत संन्यासी वंदे मातरम्चा नारा देतात, ज्याचा अर्थ आहे - आईला नमन. हे संन्यासी देशाच्या भूमीलाच आपली आई मानत होते. यानंतर हे गीत खूप लोकप्रिय झाले, परंतु मुस्लिम नेत्यांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली… मुस्लिम लीगला वंदे मातरम्मुळे दोन समस्या होत्या...पहिली: यात हिंदू देवी-देवतांचा उल्लेख आहे आणि मूर्ती पूजेला प्रोत्साहन दिले जात आहे, जे इस्लाममध्ये अस्वीकार्य आहे आणि धर्मनिरपेक्ष नाही.दुसरी: ज्या आनंदमठ कादंबरीतून हे घेतले आहे, त्यात मुसलमानांना देशाचे शत्रू मानून मारले गेले आहे. इतिहासकार आर. सी. मजुमदार वंदे मातरम्ला मुस्लिमविरोधी मानत नाहीत, परंतु ते म्हणतात, 'आनंदमठमध्ये बंकिमचंद्र यांनी ज्या प्रकारे देवी कालीचे चित्रण केले आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की त्यांचा राष्ट्रवाद हिंदू होता, भारतीय नाही.' इतिहासकार राम पुनियानी सांगतात, 'मुसलमानांच्या एका गटाला वंदे मातरम्मुळे त्रास त्याच्या नंतरच्या 4 श्लोकांमुळे आहे, ज्यात हिंदू देवी-देवतांचा उल्लेख आहे. याशिवाय आनंदमठमध्ये मुसलमानांप्रती ज्या प्रकारचे हिंसेचे भाव लिहिले आहेत, ते त्रासदायक आहेत.' वर्ष 1998 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये वंदे मातरम् गाण्याचा आदेश जारी केला. विरोध म्हणून मुसलमानांनी आपल्या मुलांना शाळेतून काढायला सुरुवात केली. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या हस्तक्षेपानंतर हा आदेश मागे घेण्यात आला. 2006 मध्ये इस्लामिक संघटना जमात उलमा-ए-हिंदने म्हटले होते की, कोणताही खरा मुसलमान वंदे मातरम कधीही गाऊ शकत नाही. उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये वंदे मातरम गाण्याविरुद्ध एक फतवा देखील जारी करण्यात आला होता. प्रश्न-5: वंदे मातरम गाण्यावर किंवा वाजवण्यावर कधी बंदी घालण्यात आली होती का?उत्तर: 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा आदेश दिला, तेव्हा हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. फाळणीच्या विरोधात उतरलेल्या लोकांनी 'वंदे मातरम'चा नारा दिला होता आणि त्याचा 'युद्धघोष' म्हणून वापर केला होता. ब्रिटिश सरकार या गाण्यामुळे इतकी घाबरली होती की, त्यांनी विशेष आदेश काढून 'वंदे मातरम' बोलण्यावर आणि गाण्यावर बंदी घातली होती. हे गाणाऱ्यांना लाठीने मारले जात असे आणि तुरुंगात टाकले जात असे. इंग्रजांच्या या दडपशाहीच्या निर्णयामुळेच हे गाणे स्वदेशी आंदोलनाचा आधार बनले आणि घरोघरी प्रचलित झाले. तथापि, यानंतर धार्मिक कारणांमुळे 1920-30 च्या दशकात वंदे मातरमचा विरोध झाला. 1937 मध्ये याच्या विरोधात एक ठराव देखील मंजूर करण्यात आला. त्यावेळी रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, अबुल कलाम आझाद आणि जवाहरलाल नेहरू यांनी एकत्र येऊन एक काँग्रेस समिती स्थापन केली. सर्वांनी असा निर्णय घेतला की राष्ट्रीय कार्यक्रमात वंदे मातरमचे पहिले दोन कडवेच गायले जातील. इतिहासकार सब्यसाची भट्टाचार्य त्यांच्या ‘वंदे मातरम: बायोग्राफी ऑफ अ सॉन्ग’ या पुस्तकात लिहितात की, शेवटचे चार श्लोक काढून टाकल्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी नेहरू यांना सल्ला दिला की, याचे सुरुवातीचे दोन श्लोक खूप प्रभावी आहेत आणि त्यामुळे कोणालाही समस्या येऊ शकत नाही. मात्र, यानंतरही त्याच्या पार्श्वभूमीमुळे वंदे मातरम नेहमीच वादात राहिले, जे आजही कायम आहे. वंदे मातरमची 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारने यासंबंधी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आणि ते गाणे अनिवार्य केले. राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. कारण वंदे मातरम्चे रचयिता देखील बंगाली होते, त्यामुळे त्याला बंगाल निवडणुकीपर्यंत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरे म्हणजे, या गीताची ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील भाजपला राजकीय फायदा मिळवून देऊ शकते.
मुंबईतील भायखळ्यात लिफ्ट कोसळून पाच जण जखमी
मुंबई: भायखळ्यातील जयकृपा टॉवरमध्ये लिफ्ट कोसळली आहे. या लिफ्ट अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ११ फेब्रुवारी रोजी रात्री भायखळ्यातील जयकृपा टॉवरमधील घोडापदेव क्रॉस लेन क्रमांक १ येथे ही दुर्घटना घडली आहे.भायखळ्यातील जयकृपा टॉवरमध्ये केबल तुटल्यामुळे लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळली. यानंतर तात्काळ मुंबई अग्निशमन दल, पोलिस, बेस्ट, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि बीएमसीचे वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.भायखळ्यातील लिफ्ट अपघातात एकूण पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमींपैकी तीन जणांना जे.जे. रुग्णालयात, एकाला बालाजी रुग्णालयात तर एकाला जसलोक रुग्णालयात हलवण्यात आले. जे. जे रुग्णालयात कल्पिता पवार, यश बालविकर आणि उषा गुप्ता यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. बालाजी रुग्णालयात जमुना प्रसाद शिवहरे तर जसलोक रुग्णालयात शिल्पा मोरे यांच्यावर उपचार केले जात असून त्यांचीही प्रकृती ठिक असल्याची माहिती मिळाली आहे.
तीन दिवस सीतादेवींचा मृतदेह अंथरुणावर पडून होता. त्यांचा 38 वर्षांचा मनोरुग्ण मुलगा शेजारी बसून ओरडत राहायचा - आई, जेवण बनव. तो आपल्या आईला हलवून पाहायचा, पण काही वेळ हालचाल न झाल्यावर त्याला वाटायचे की आई गाढ झोपेत आहे. मग तो घरातून निघून जायचा. रात्री घरी परतल्यावर तो पुन्हा आईला उठवायचा. काही वेळाने थकून तो आईच्या मृतदेहाशेजारी झोपून जायचा. सीतादेवींच्या मृतदेहावर माश्या घोंघावू लागल्या. मुंग्यांनी मृतदेहाचे हात-पाय आणि चेहरा खाल्ला. सुमारे तीन महिन्यांपूर्वी ही घटना उत्तराखंडमधील श्रीनगर येथील लोयगड नावाच्या भुताटकीच्या गावात घडली. या घटनेने आसपासच्या गावांनाही हादरवून सोडले. रिकाम्या झालेल्या लोयगड गावात सीतादेवी आपल्या मनोरुग्ण मुलासोबत राहत होत्या. सरकारी आकडेवारीनुसार, उत्तराखंडमध्ये अशा ओसाड गावांची संख्या 1700 आहे. ब्लॅकबोर्डच्या या भागात उत्तराखंडमधील अशाच रिकाम्या झालेल्या ओसाड गावांची भयाण कथा, जिथे लोकांनी आपले घर, शेती-वाडी सर्व सोडून दिले आहे… ही संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी मला लोयगड गावी जायचे होते. ज्याचा रस्ता अस्वल आणि वाघांनी भरलेल्या घनदाट जंगलातून जातो. रस्त्याचा तर काही नामोनिशाण नाही. चालण्यासाठी पायवाटही नाही. श्रीनगरहून मोठ्या मुश्किलीने एक टॅक्सी चालक मलछोडा गावी जाण्यास तयार झाला. खरं तर, महामार्गावरून खाली उतरल्यावर मलछोडा गाव आहे. हे गाव ओलांडून एक डोंगर चढावा लागतो, ज्याच्या पलीकडे लोयगड गाव आहे. महामार्गावर टॅक्सीतून उतरून एक लांबचा रस्ता पायीच कापायचा होता. काटेरी झुडपे ओलांडत मी ड्रायव्हरसोबत पायीच निघाले. पायवाटेने खाली उतरण्यास सुरुवात केली. जिथेपर्यंत नजर जाईल तिथे फक्त डोंगरच दिसत होते. चालता-चालता मी एका ठिकाणी थांबले तेव्हा ड्रायव्हर म्हणाला- येथे थांबणे धोक्याचे आहे. वाघ हल्ला करू शकतात. म्हणून आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. सुमारे अर्ध्या तासानंतर आम्ही मलछोडा गावात पोहोचलो. येथील गावकऱ्यांनी सांगितले की लोयगड गावात वाघही असू शकतात. कारण जी गावे रिकामी होतात, वाघ त्याला आपले ठिकाण बनवतात. सीतादेवीबद्दल विचारल्यावर गावकऱ्यांनी सांगितले की तिथे फक्त सीतादेवीचा मुलगा भीरू राहतो. बाकी प्रत्येक घराला कुलूप आहे. काही वेळ इथे बसल्यानंतर आम्ही लोयगडसाठी निघालो. मलछोडा पार केल्यानंतर आम्ही लोहगडाकडे डोंगर चढू लागलो. जंगल घनदाट होत चालले होते आणि चढण एकदम उभी होती. चढता चढता दम लागू लागला, पण इथे थांबता येत नव्हते. शेवटी एक छोटी सपाट जागा आली, जिथे गवत उगवले होते. ड्रायव्हरने सांगितले की ही लोहगड गावातील लोकांची शेती आहे, जी आता पडीक झाली आहे. आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. थोडे आणखी वर गेल्यावर एक पाण्याची पाईप दिसली. घनदाट झुडपे आली की ड्रायव्हर मोठ्या आवाजात बोलू लागला किंवा शिट्टी वाजवू लागला. त्याचे म्हणणे होते की अशा आवाजांनी वाघ दूर जातात. सुमारे 45 मिनिटे चढण चढल्यानंतर एक घर दिसले. हे लोहगड गावातील पहिले घर आहे. या घराच्या जवळ पोहोचल्यावर पाहिले की, पडझड झालेल्या घराशेजारी एक पांढऱ्या रंगाने रंगवलेले दोन मजली घर खूप सुंदर बनवले आहे. दगडाचे छत आणि बाहेर मोकळे अंगण आहे. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या दरवाजाला कुलूप लावले आहे. थोडे पुढे गेल्यावर एकाच वेळी दोन घरे दिसली. येथेही कुलूप लावले आहे. एका घरात डिश अँटेना देखील लावलेला आहे. काही घरे पडझड झाली आहेत. त्यांच्या छतांवर आणि भिंतींवर तर झाडे-झुडपे उगवली आहेत. काही घरे पडण्याच्या मार्गावर आहेत. हे सर्व बघत मी गावातील शेवटच्या घरात पोहोचले. जिथे चुलीत राख आहे. लाकडे ठेवली आहेत. अंगणात उखळ आहे. घराच्या भिंतीवर एक मळके जॅकेट टांगलेले आहे. घर उघडे आहे, दरवाजा उघडून मी पाहिले की तिथे काही भांडी ठेवली आहेत. अंगणात माल्ट्याचे झाड आहे. वांग्याची रोपेही लावलेली आहेत. हेच सीतादेवींचे घर आहे. त्यांचा मनोरुग्ण मुलगा भीरू इथेच राहतो. सध्या भीरू घरी नाही. याशिवाय गावात सुमारे दहा घरे आहेत. सर्वांना गंज लागलेली कुलुपे लावलेली आहेत. येथे स्थलांतराचे सर्वात मोठे कारण म्हणजे येण्या-जाण्यासाठी रस्ता नाही. कुणी आजारी पडल्यास त्याला बरे होण्यासाठी एखाद्या चमत्काराची वाट पाहावी लागते. गावात पाण्याची पाईपलाईन आहे पण पाणी नाही. ना शाळा आहे, ना दुकान, ना अंगणवाडी आणि ना प्राथमिक आरोग्य केंद्र. या संपूर्ण गावात आम्हाला एकही माणूस भेटला नाही. आम्ही परत मलछोडा गावाकडे निघालो. येथे आमची भेट स्थानिक पत्रकार गंगाशी झाली. लोयगडबद्दल विचारल्यावर गंगा सांगते, 'त्या गावात फक्त भीरू नावाचा माणूस उरला आहे. तोही लोकांना पाहून लपून बसतो. त्याची आई सीतादेवीचा मृतदेह अशा स्थितीत सापडला होता की त्यावर माश्या घोंघावत होत्या. मृतदेहाचे हात-पाय आणि चेहरा मुंग्यांनी खाल्ले होते. भीरू मनोरुग्ण आहे, त्यामुळे त्याला कळलेच नाही की आई जिवंत आहे की मेली. आईच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी तो मलछोडा येथे आला आणि येथील महिलांना म्हणाला की, माझ्या आईने तीन दिवसांपासून जेवण केले नाही. गावकऱ्यांना संशय आला. तिथे जाऊन पाहिले असता कळले की सीतादेवी मरण पावली होती. भीरूची पत्नीही त्याला सोडून आपल्या चार मुलांसोबत हरिद्वारला गेली आहे.‘ मी विचारले- ‘भीरूच्या जेवणाची व्यवस्था कशी होते?’ यावर गंगा म्हणते की, ‘जवळच एक छोटेसे डोंगराळ बाजार आहे. दिवसभर तो तिथेच असतो. त्याची पत्नी तिथे एका दुकानदाराला पैसे देऊन जाते, जेणेकरून तो भीरूला जेवण देईल.’ गंगा पुढे म्हणते की, ‘लोक आपली जमीन सोडून गेले आहेत. काही लोकांच्या जमिनीवर पाइनची झाडे उगवली आहेत. सरकारने ती जमीन वन विभागाकडे सोपवली आहे. जेव्हा ते लोक परत येऊ लागले, तेव्हा सरकारने त्यांना झाडे तोडण्याची परवानगीही दिली नाही. म्हणून आता कोणीही परत येऊ इच्छित नाही.’ गंगा नंतर माझी भेट मलछोडा गावातील गुड्डी देवी यांच्याशी झाली. त्या सांगतात की, ‘आम्ही लयोगढमध्ये गवत कापायला जात होतो. सीतादेवींना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्या आजारी होत्या, पण त्यांना ना औषध मिळाले ना अन्न. त्यांना कोणी बघायला नव्हते. सीतादेवीच्या मृत्यूची बातमी मिळाल्यावर आमच्या गावातील लोकच गेले होते. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा भीरूच्या आईच्या मृतदेहाला मुंग्या लागल्या होत्या, माश्या घोंघावत होत्या. तो आपल्या आईचा मृतदेह सोडून फिरायला निघून जात असे. पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे झुडपे अधिकच दाट झाली होती. खांद्यावर तिचा मृतदेह ठेवून स्मशानात घेऊन गेले होते. मृत्यूनंतरही त्यांची सून आली नाही.’ मलछोडा गावाचे रहिवासी सतीशचंद्र पांडे सांगतात की, 'लोयगड गावापर्यंत जाण्यासाठी ना रस्ता आहे ना गावात पाणी आहे. अशा परिस्थितीत तिथे कोण राहणार? गरजेच्या कामासाठी पाणी घेण्यासाठी डोंगर उतरून नदीजवळ जावे लागते. काही वर्षांपूर्वीपर्यंत लोक आपले घर बघायला येत असत पण आता तेही बंद झाले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर लवकरच मलछोडा गावही रिकामे होईल. मलछोडा गावाचे राकेश पांडे सांगतात की, आमच्या गावातही आता बहुतेक वृद्धच राहतात. आमचे गावही रिकामे होण्याच्या मार्गावर आहे. कोणी आजारी पडल्यास रुग्णालयात नेणे कठीण आहे. डोकेदुखीची गोळी घेण्यासाठीही चार किलोमीटर पायी जावे लागते.’
Non-Agricultural Tax : नगर रचना विभागाची परवानगी हीच आता अधिकृत 'एनए' परवानगी; ७/१२ उताऱ्यात संगणकीय प्रणालीद्वारे होणार थेट फेरफार.
Illegal Hoardings Pune : अनधिकृत होर्डिंगविरोधात पुन्हा कारवाई; तपासणीसाठी पाच पथकांची नियुक्ती
Illegal Hoardings Pune : पहिल्याच दिवशी पथकाने पाडले ७ अनधिकृत होर्डिंग; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता आर्थिक कारवाईचा बडगा.
Pune Traffic Police : बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.
PMC Property Tax : मुदत संपण्यापूर्वी करवाढ मंजूर करण्यासाठी प्रशासनाची घाई; गेल्या ३ वर्षांपासून फेटाळलेला प्रस्ताव यंदा मान्य होणार का?
बांगलादेशमध्ये निवडणुकीपूर्वी राजधानी ढाका जवळजवळ रिकामी आहे. रस्त्यांवर वाहतूक नगण्य आहे. देशभरातून मोठ्या संख्येने लोक कामासाठी ढाक्यात येतात. ते 12 फेब्रुवारी म्हणजे आज होणाऱ्या मतदानासाठी परत जात आहेत. अंतरिम सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना 3 दिवसांची सुटी दिली आहे. खासगी कर्मचाऱ्यांना 4 दिवसांची सुटी देण्यात आली आहे. ट्रेन्स खचाखच भरल्या आहेत. लोक छतांवर बसून प्रवास करत आहेत. बांगलादेशमध्ये दोन दिवसांपूर्वी निवडणूक प्रचार संपला आहे. यावेळी माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) सरकार स्थापनेच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. या पक्षाने यापूर्वी 2001 मध्ये सरकार स्थापन केले होते. तज्ज्ञांच्या मते, BNP ला एकूण 300 पैकी 130-140 जागा मिळू शकतात. दुसऱ्या क्रमांकावर जमात-ए-इस्लामीची युती आहे, ज्यांना 90 ते 100 जागा मिळण्याची शक्यता आहे. सलग 4 वेळा निवडणुका जिंकणारा शेख हसीना यांचा अवामी लीग पक्ष यावेळी निवडणुकीच्या रिंगणात नाही. दिव्य मराठीने निवडणुकीचे मुद्दे आणि पक्षांची स्थिती यावर सामान्य लोकांव्यतिरिक्त तज्ज्ञांशी चर्चा केली. 9 तास मतदान, 13 फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत निकालनिवडणुकीसाठी मतदान 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत चालेल. त्यानंतर मतमोजणी सुरू होईल. बांगलादेशात मतपत्रिकांद्वारेच निवडणुका होतात. त्यामुळे मतांची मोजणी करण्यासाठी जास्त वेळ लागतो. बांगलादेश निवडणूक आयोगाच्या मते, 300 जागांवर मतदानासाठी 64 जिल्ह्यांमध्ये 42,761 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. बांगलादेशात सुमारे 12.7 कोटी मतदार आहेत. पहिल्यांदाच टपाल मतदानाची सुविधा देण्यात आली आहे. याचा फायदा सुमारे 1.5 कोटी मतदारांना होईल, जे कामासाठी घरापासून दूर गेले आहेत. 350 जागांच्या संसदेत 300 खासदारांसाठी निवडणुका होतात. उर्वरित 50 जागा महिलांसाठी राखीव आहेत. राखीव जागा निवडणुकीच्या निकालांनुसार मिळतात, उदाहरणार्थ, जर BNP ला 120 जागा मिळाल्या, तर त्यांना महिलांसाठी राखीव असलेल्या 20 जागा मिळतील. अवामी लीग नसल्यामुळे बीएनपीला फायदाबांगलादेशात सुमारे 10% हिंदू लोकसंख्या आहे. हिंदू मतदार अवामी लीगचे मतदार राहिले आहेत. अवामी लीगने 2024च्या निवडणुकीत 272 जागा जिंकल्या होत्या. त्यांना 30 ते 40% मते मिळत राहिली आहेत. यावेळी हे मतपेढी कोणाच्या वाट्याला जाईल, हाच प्रश्न आहे. अवामी लीगला निवडणूक लढवण्यावर बंदी असल्याचा फायदा बीएनपीला होताना दिसत आहे. हिंदू मतदार जमातपासून दूर राहताना दिसत आहेत, कारण जमातचे नाव अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांमध्ये येत राहिले आहे. अशा परिस्थितीत त्यांचा कल बीएनपीकडे दिसत आहे. ढाका येथील ढाकेश्वरी मंदिरात भेटलेले डॉ. सुनीरमल रॉय म्हणतात, ‘आम्हाला माहीत आहे की जमात-ए-इस्लामी एक इस्लामिक पक्ष आहे. बीएनपी एक लोकशाही पक्ष आहे.’ व्यवसायाने व्यावसायिक असलेले मोहम्मद शौकत अजीज बीएनपी कार्यालयाबाहेर उभे दिसले. ते म्हणाले, ‘बांगलादेशच्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी मुक्तिसंग्राम लढला होता. तो संग्राम याच मतदानाच्या अधिकारासाठी आणि लोकशाहीसाठी होता. आशा आहे की निवडणुकीत हीच भावना दिसेल. लोक मताद्वारे चुकीच्या गोष्टींना विरोध करतील. जे पक्ष खोटे बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना लोक उत्तर देतील.’ ऑटो रिक्षा चालवणारे अन्वर हुसेन म्हणतात, ‘निवडणुकीत चांगले वातावरण आहे. मला विश्वास आहे की बीएनपी मोठ्या फरकाने जिंकेल.’ तज्ज्ञ म्हणाले- सर्वात मोठी चिंता निवडणूक निष्पक्ष होईल की नाहीढाका विद्यापीठातील प्राध्यापक आणि राजकीय तज्ज्ञ सैफुल इस्लाम चौधरी म्हणतात, ‘निवडणुकीचे निकाल काय लागतील, यापेक्षा मला या गोष्टीची जास्त चिंता आहे की निवडणूक निष्पक्ष होईल की नाही. लोक मोकळेपणाने मतदान करू शकतील की नाही. एक रात्र आधीच ढाकाच्या बाहेर अनेक घटना घडल्या आहेत.’ ‘काहीतरी गडबड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उमेदवार धमकी देत आहेत की जर ते जिंकले नाहीत तर विरोधकांच्या घरांची तोडफोड करतील. म्हणूनच सुरक्षा ही सर्वात मोठी चिंता आहे. जर लोकांना सुरक्षेचा विश्वास नसेल, तर ते भीतीमुळे मतदान केंद्रापर्यंत जाणार नाहीत.’ चौधरी पुढे म्हणतात, ‘जर निवडणुकीत काही गडबड झाली नाही, तर कोण किती जागा जिंकेल हे सांगणे कठीण आहे. मला या देशातील लोकांचे मतदान वर्तन (वोटिंग बिहेवियर) माहीत आहे. येथे लोक उमेदवाराऐवजी पक्षाला मतदान करतात. अवामी लीग यावेळी नाही. मला वाटते की बरेच लोक BNP ला मतदान करतील. निवडणुकीत धांदली झाली नाही, तर BNP सत्तेत येऊ शकते.’ हिंदू आणि अवामी लीगचे मतदार कोणाला मतदान करतील? चौधरी उत्तर देतात, ‘जर अवामी लीगचे 10% मतदारही मतदान करतील आणि त्यापैकी 8 ते 9% BNP ला मतदान करतील, तरीही BNP सहज जिंकू शकते. जर ते जमातला मतदान करतील, तर जमात जिंकू शकते. तथापि, सैफुल इस्लाम चौधरी मानतात की कोणत्याही पक्षाला बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 151 जागा मिळताना दिसत नाहीत. ते म्हणतात, ‘या स्थितीत कदाचित जमात आणि बीएनपी यांच्यात पडद्यामागे समझोता होऊ शकतो. हे थोडे विचित्र असेल, पण दोघे मिळून सरकार बनवू शकतात.’ ‘जनमत संग्रह केवळ दिखावा, घटनात्मक बदल निश्चित’बांगलादेशात निवडणुकीसोबतच संविधानात सुधारणा करण्यासाठी जनमत संग्रहही होणार आहे. डॉ. मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने याच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. निवडणुकीचे कव्हरेज करताना आम्ही पाहिले की सरकारी कर्मचारीही जनमत संग्रहाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन करताना दिसले. चौधरी म्हणतात, सरकार स्वतःच बाजू घेते, तेव्हा विरोधी पक्षाच्या जिंकण्याची शक्यता नसते. त्यामुळे असे वाटते की संविधानात बदलाच्या बाजूने जास्त मते येतील.‘जनमत संग्रह एक दिखावा वाटतो. सरकार आधीच संविधानात बदल करण्याच्या बाजूने आहे. बांगलादेशसारख्या देशात सरकारच्या इच्छेविरुद्ध निकाल येणे खूप कठीण आहे. समजा एक हजार मतदार आहेत, तर सरकार 900 मते ‘होय’ म्हणून दाखवू शकते. हा एक प्रकारचा खेळ आहे, पैशांची उधळपट्टी आहे. सरकारला हवे असल्यास अध्यादेशाद्वारेही निर्णय घेऊ शकते. जनमत-संग्रहाची गरज नाही.’‘गैरव्यवहार झाला, तरच जमात सत्तेत येईल’ज्येष्ठ पत्रकार मोन्जुरुल आलम पन्ना यांचे मत आहे की, पूर्वीच्या तुलनेत जमातचे मतदार आणि समर्थक वाढले आहेत. मात्र, त्यांना स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करण्याइतका पाठिंबा मिळाला आहे असेही नाही. जर निवडणुका निष्पक्ष झाल्या, तर BNP खूप पुढे राहील. ते इतक्या जागा जिंकू शकतात की सरकार स्थापन करू शकतील. जर काही हेराफेरी झाली, तर परिस्थिती वेगळी असू शकते. अशा परिस्थितीत जमातही पुढे येऊ शकते.यावेळी बांगलादेश निवडणुकीत कोणते मुद्दे प्रभावी ठरले? मोन्जुरुल सांगतात, ‘पक्षांनी एक कोटी नोकऱ्या, फॅमिली कार्ड, 5 कोटी झाडे लावण्यासारखी आश्वासने दिली आहेत. बीएनपी असो किंवा जमात, त्यांची आश्वासने ऐकायला चांगली वाटतात. अनुभव सांगतो की सत्तेत आल्यानंतर पक्ष मुश्किलने 10 ते 20% आश्वासनेच पूर्ण करतात. आश्वासन देण्यात कोणताही खर्च येत नाही. त्यामुळे या घोषणांना मी जास्त महत्त्व देत नाही. माझ्यासाठी त्यांचा मागील रेकॉर्ड जास्त महत्त्वाचा आहे.’‘5 ऑगस्ट 2024 रोजी शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर 18 महिन्यांत बीएनपीवर वसुली, सूड आणि दडपशाहीचे आरोप झाले आहेत. यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. जमातने थेट संघर्ष कमी केला आहे, तरीही त्यांच्यावर टोकनद्वारे देणगी वसुली आणि जमिनी बळकावल्याचे आरोप आहेत. तरीही अशी प्रकरणे कमी आहेत.’अवामी लीगचे मुख्य मतदार काय करतील? मोन्जुरुल यांचे मत आहे की अवामी लीगचे काही मतदार मतदान करायला जाणार नाहीत, पण कोणीही जाणार नाही असे म्हणता येणार नाही. एखाद्या पक्षाला बहुमत मिळाले नाही तर काय होईल? मोन्जुरुल म्हणतात, ‘त्रिशंकू संसदेची शक्यता नाकारता येत नाही. समजा, BNP ला 125–130 जागा मिळतात आणि जमातला 120–125. तेव्हा युतीच्या राजकारणाशिवाय दुसरा पर्याय नसेल. जर BNP इतर पक्षांशी समझोता करू शकली नाही, तर तिला जमातवर अवलंबून राहावे लागू शकते. अशा स्थितीत मिली-जुली सरकारही बनू शकते. सध्या काहीही सांगता येत नाही.’जागा, ज्यांवर लक्ष राहीलढाका-८ : येथे विद्यार्थी पक्ष NCP चे संयोजक नासिरुद्दीन पटवारी BNP च्या मिर्झा अब्बास यांच्या विरोधात आहेत.ढाका-९: याच जागेवर BNP चे हबीबुर रशीद यांचा सामना अपक्ष डॉ. तस्मीन जारा यांच्याशी आहे.ढाका-११: येथे शेख हसीना यांच्या विरोधात आंदोलन करणारे नाहिद इस्लाम यांचा सामना BNP चे अनुभवी नेते एमए कय्यूम यांच्याशी आहे. ही ढाक्यातील सर्वात 'हॉट सीट' बनली आहे.ढाका-१५: येथे BNP चे शफीकुल इस्लाम यांचा सामना जमातचे डॉ. शफीकुर रहमान यांच्याशी आहे. येथे हिंसा होण्याची शक्यता आहे.ढाका-१७: येथून BNP अध्यक्ष तारिक रहमान निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना जमातचे एसएम खालिदुज्जमां यांच्याशी आहे.खुलना-1: येथून जमातचे एकमेव हिंदू उमेदवार कृष्णा नंदी निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढत बीएनपीचे आमिर एजाज खान यांच्याशी आहे.गोपालगंज-3: माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पारंपरिक जागेवरून बीएनपीचे एसएम जिलानी निवडणूक लढवत आहेत. जमातने येथून एमएम रेझाउल करीम यांना उमेदवारी दिली आहे.
Pune News : जिल्ह्यातील ७३१ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमता येणार नाहीत; नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय
Pune News : राज्य सरकारच्या २३ जानेवारीच्या परिपत्रकाला न्यायालयात आव्हान; ७२१ ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत अद्याप संभ्रम कायम.
Pune Crime :
Pune Crime : ड्रेनेज लाईनच्या कामापासून सुरू झालेला खेळ थेट 'न्यायाधीशांच्या' बनावट फोनपर्यंत; वर्षभर चाललेल्या या फसवणुकीने पोलीसही चक्रावले.
भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा
नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. 'अ' गटातील दुसऱ्या सामन्यात भारताचा सामना नामिबिया विरुद्ध गुरुवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. अमेरिकेने पहिल्या सामन्यात भारताला दिलेली कडवी झुंज पाहता, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कंपनी आता नामिबियाला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात अमेरिकेने भारताच्या तोंडचे पाणी पळवले होते. एका क्षणी भारताची अवस्था ६ बाद ७७ अशी बिकट झाली होती. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत ८४ धावांची झंझावाती खेळी करत भारताला ९ बाद १६१ धावांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर मोहम्मद सिराज (३ बळी), अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने २९ धावांनी विजय मिळवला. वानखेडेच्या खेळपट्टीवर भारताच्या फलंदाजीतील त्रुटी समोर आल्या होत्या. नामिबियाचा संघ अनपेक्षित धक्का देण्यासाठी ओळखला जातो, त्यामुळे भारतीय संघ आपली 'बॅटिंग ऑर्डर' अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नात असेल. दिल्लीची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते, त्यामुळे येथे मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे. तसेच भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून आपले 'सुपर ८' मधील स्थान अधिक भक्कम करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.अभिषेक शर्मा सामन्याला मुकणार?दरम्यान भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याला पोटाच्या तीव्र संसर्गामुळे दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आजारपणामुळे गुरुवारी होणाऱ्या नामिबीयाविरुद्धच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता धूसर आहे. अभिषेक शर्माला मंगळवारी रात्री प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात हलवण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यावेळीही त्याला ताप होता, मात्र तरीही तो मैदानात उतरला होता. त्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणासाठीही मैदानात येऊ शकला नव्हता. सध्या त्याची प्रकृती स्थिर असली तरी डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी अभिषेक पूर्णपणे तंदुरुस्त व्हावा, यासाठी संघ व्यवस्थापन त्याला नामिबीयाविरुद्ध विश्रांती देण्याच्या विचारात आहे.भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदरनामिबिया : गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), झेन ग्रीन, बर्नार्ड स्कोल्ट्झ, रुबेन ट्रम्पेलमन, जेजे स्मित, जॅन फ्रायलिंक, लॉरेन स्टीनकॅम्प, मालन क्रुगर, निकोल लॉफ्टी-ईटन, जॅक ब्रासेल, बेन शिकोंगो, जेसी बाल्ट, डिलन लीच्टर, डब्ल्यूपी मायबर्ग, मॅक्स हिंगो.नामिबियाविरुद्ध भारताचे ‘मिशन रन रेट’टी-२० विश्वचषक २०२६ मधील आपल्या दुसऱ्या लढतीसाठी भारतीय संघ सज्ज झाला असून आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारताचा सामना नामिबियाशी होणार आहे. पहिल्या सामन्यात अमेरिकेने दिलेल्या कडव्या झुंजीमुळे भारताने आता सावध पवित्रा घेतला असून, नामिबियाला ‘दुबळा’ समजण्याची चूक संघ करणार नाही. नेट रन रेट सुधारण्याचे मोठे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून भारत संघ आज मैदानात उतरेल.सलामीवीर अभिषेक शर्मा पोटाच्या विकारामुळे आजच्या सामन्याला मुकण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या सामन्यात ‘गोल्डन डक’वर बाद झाल्यामुळे त्याच्या फॉर्मवरही चर्चा होती. त्याच्या जागी अनुभवी संजू सॅमसनला संधी मिळण्याचे संकेत आहेत. जर संजू खेळला, तर तो इशान किशनसोबत डावाची सुरुवात करेल, ज्यामुळे भारताची सलामी अधिक भक्कम होईल. भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह आता पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याचे संघात पुनरागमन निश्चित मानले जात आहे. यामुळे अर्शदीप सिंग आणि बुमराह अशी जोडी नामिबियाच्या फलंदाजांवर तुटून पडेल. तसेच, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर संघात परतल्याने रिंकू सिंगला विश्रांती दिली जाऊ शकते. सुंदरच्या समावेशामुळे भारताला फलंदाजीसोबतच फिरकीचा एक अतिरिक्त आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे नामिबियाने आपला पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध गमावला असला, तरी भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध चांगली कामगिरी करून आत्मविश्वास मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, भारताला केवळ विजयच नको, तर तो मोठ्या फरकाने विजय मिळवून आपला नेट रन रेट उंचावायचा आहे, जेणेकरून ‘सुपर-८’चा रस्ता सोपा होईल. मात्र कर्णधार सूर्यकुमार यादव याही सामन्यात झंझावती खेळी कायम राहतो का ते पाहण्यासारखे असेल. फलंदाजित कर्णधार सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ईशांत किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अशी मजबूत फलंदाजी भारताकडे आहे. गोलंदाजीत अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर असे चांगले गोलंदाज भारताकडे आहेत. नामिबिया हा नवखा संघ असून त्याच्याकडे गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), झेन ग्रीन, बर्नार्ड स्कोल्ट्झ, रुबेन ट्रम्पेलमन, जेजे स्मित, जॅन फ्रायलिंक, लॉरेन स्टीनकॅम्प, मालन क्रुगर, निकोल लॉफ्टी-ईटन, जॅक ब्रासेल असे खेळाडू आहेत. भारतीय संघाला आजच्या सामन्यात विजय मिळवून नेट रनरेट वाढवावा लागेल.
Ranjangaon Accident : पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कारच्या धडकेत तरुण डॉक्टरचा मृत्यू
Ranjangaon Accident : हॉटेल अमर इन जवळ दुभाजकातून वळताना पाठीमागून येणाऱ्या कारने दुचाकीला चिरडले; कार चालक विद्यानंद राऊत पोलिसांच्या ताब्यात.
लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली असल्याने आगामी कालावधीमध्ये या विषयावर चर्चा होणे अपेक्षित आहे
Mulshi News : भाजप, काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांची पाटी कोरीच; राष्ट्रवादी काँग्रेसने मुळशीत प्रस्थापित केले वर्चस्व.
Indapur Crime : वडापुरीत दहशतीची रात्र ! शेळी मालकावर जीवघेणा हल्ला; ४ जनावरे केले लंपास
Indapur Crime : ग्रामीण भागात शेळीचोरीच्या घटनांमध्ये वाढ; तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींचा शोध घेण्याची ग्रामस्थांची मागणी.
विशेष : युगद्रष्टा महर्षी दयानंद
वेदांचे खरे स्वरूप लोकांसमोर आणून अंधश्रद्धा आणि कर्मकांडावर प्रहार करणारे युगद्रष्टा समाजसुधारक म्हणजे दयानंद सरस्वती. एकेश्वरवादाचा पुरस्कार करणारे दयानंद यांची आज जयंती.
Alandi News : मे २०२३ मध्ये मंजुरी मिळूनही आळंदीत सीसीटीव्हीचा पत्ता नाही; ५० लाखांच्या ड्रोन कॅमेऱ्यांचा खरेदीचा निर्णयही बासनात.
Leopard Cubs : डोळे न उघडलेली पिल्ले सुखरूप; आईच्या स्वाधीन करण्यासाठी वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरे आणि शीघ्र कृती दलाची तैनाती.
Jejuri News : ७८८ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मल्हारसागर धरणात साचला कचरा; स्वच्छतागृहांच्या अभावामुळे जलाशयाकाठी प्रचंड दुर्गंधी.
Bapu Pathare : स्मशानभूमीतील मातीचे ढिगारे आणि खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; आमदार बापू पठारे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना सुनावले.
Mulshi Accident : रिक्षा, हायरायडर कार आणि दुचाकीला एकापाठोपाठ धडक; लवळेफाटा चौकातील बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.
Shirur News : अफाट खर्चामुळे निवडणूक स्तराबाहेर गेली; भाजप नेत्या पलांडे यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर भ्रष्टाचाराचा आरोप.
Chinchwad Crime : अपहरण करून मारहाण करणाऱ्या घोलप गँगच्या ४ सदस्यांना काही तासांत अटक; मुख्य आरोपींचा शोध सुरू.
Service Tax Online : सेवाकर बिलावर देण्यात आला विशेष QR कोड; महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन विभागाचा नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी पुढाकार.
PCMC Crime : शाळकरी वयातच गुन्हेगारीची ‘चटक’! शिवीगाळ, अश्लील हावभाव आणि दहशत; वाचा धक्कादायक वास्तव
PCMC Crime : गुन्हे घडण्याची वाट न पाहता प्रतिबंधात्मक कारवाईची गरज; शाळा, पालक आणि पोलीस यांच्यात समन्वयाचा अभाव शहरासाठी धोक्याची घंटा.
PCMC News : महोत्सवांच्या नावाखाली इव्हेंट कंपन्यांचे खिसे भरले; आयुक्त हर्डीकर यांचा संताप, महापौर आणि पक्षनेत्यांच्या उपस्थितीत झाली बैठक.
PCMC Smart City : मार्च २०२६ अखेर स्मार्ट सिटी कंपनीचे अस्तित्व संपणार; 'आहे त्या स्थितीत' प्रकल्प संबंधित विभागांकडे हस्तांतरित करण्याचे आदेश.
Police Transfer : विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बदल्यांवर शिक्कामोर्तब; पुणे, सांगली आणि साताऱ्याला मिळाले नवे अधिकारी.
Satara Crime : शाळांच्या बाहेर नेमकं काय विकलं जातंय? रक्षक प्रतिष्ठानचा धक्कादायक खुलासा
Satara Crime : साताऱ्यातील शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात गांजा आणि एमडी गोळ्यांची राजरोस विक्री; रक्षक प्रतिष्ठानने दिला आंदोलनाचा इशारा.
ENG vs WI : टी-२० विश्वचषक २०२६ च्या हाय-व्होल्टेज सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडचा ३० धावांनी पराभव करत दिमाखदार विजय मिळवला.
कांदळवन बफर झोनमधील भराव प्रकरणी सरकारी अभियोक्त्यांच्या सूचनांनुसार कारवाई
मुंबई : क्षेत्र विकासाच्या कामांदरम्यान काही खाजगी विकासकांनी कांदळवनापासून ५० मीटर अंतराच्या बफर झोनमध्ये अनधिकृत भराव टाकून कांदळवन वृक्षांचे नुकसान केल्याचे निष्पन्न झाल्या. या प्रकरणी सरकारी अभियोक्त्यांच्या सूचनांनुसार अपील सुनावणी घेऊन उच्च न्यायालयातील स्थगिती आदेशाबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.मंत्रालयात आढावा बैठकीस पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका, महसूल व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, कांदळवन क्षेत्रातील वृक्षतोड आणि अनधिकृत भराव प्रकरणी संबंधित विकासकावर लावण्यात आलेल्या ८७ कोटी रुपयांच्या दंडाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे. संबंधित जागा ही बफर झोनमध्ये येत असल्याने पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई आवश्यक आहे.या प्रकरणी चौकशीअंती २१ एप्रिल २०२५ रोजी ८७ कोटी २६ लाख २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच अनधिकृत भराव टाकणाऱ्यांविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. मौजे पहाडी, गोरेगाव (ता. बोरीवली) येथील खासगी जागेवरील सुमारे ३०० एकरपेक्षा अधिक क्षेत्र समुद्रकिनारी तसेच कांदळवन क्षेत्रात येत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
'गिल्बर्ट हिल नियम उल्लंघन प्रकरणी अहवाल सादर करा'
मुंबई : गिल्बर्ट हिल हा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व महत्त्वपूर्ण आहे. हा भाग हरित क्षेत्रात मोडत असून, येथे प्रकल्प विकसित करताना नियमांचे उल्लंघन झाल्याच्या अनुषंगाने संबंधित सर्व विभागांनी समन्वय साधून वस्तुस्थितीची माहिती घेऊन कार्यवाही करावी, अहवाल सादर करावा, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीस पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका, महसूल विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल परिसरात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर हा भाग हरित क्षेत्रात मोडत असून आवश्यक परवानग्या व नियमांची पूर्तता अनिवार्य आहे. या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बृहन्मुंबई महानगरपालिका , झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि संबंधित विभागांनी एकत्रित पाहणी करुन कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे, असे निर्देश त्यांनी दिले.
वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय
रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायकमुंबई : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या घरच्या मैदानावर इंग्लंडचा ३० धावांनी पराभव करत दिमाखदार विजय नोंदवला. शेरफेन रदरफोर्डचे नाबाद अर्धशतक आणि गुडाकेश मोटीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विंडिजने १९६ धावांचे रक्षण करत इंग्लंडला १६६ धावांत गुंडाळले.प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. सलामीवीर शाई होप आणि ब्रँडन किंग स्वस्तात बाद झाल्याने विंडिजची २ बाद ८ अशी अवस्था बिकट झाली होती. मात्र, शेरफेन रदरफोर्डने ४२ चेंडूंत ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावांची झंझावाती खेळी केली. त्याला जेसन होल्डरने (३३ धावा, १७ चेंडू) मोलाची साथ दिल्याने वेस्ट इंडीजने २० षटकांत ६ बाद १९६ धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडकडून आदिल रशीद आणि जेमी ओव्हरटनने २-२ बळी घेतले.१९७ धावांच्या आव्हांनाचा पाठलाग करताना इंग्लंडचे फलंदाज एकामागून एक तंबूत परतले. फिल सॉल्टने (३०) आक्रमक सुरुवात केली खरी, पण वेस्ट इंडीजच्या फिरकीपटूंनी सामन्यावर पकड मिळवली. गुडाकेश मोटीने ३३ धावांत ३ महत्त्वाचे बळी घेत इंग्लंडच्या मधल्या फळीचा कणा मोडला. रोस्टन चेसने २ बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. इंग्लंडकडून सॅम करनने सर्वाधिक नाबाद ४३ धावा केल्या, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. १९ व्या षटकात १६६ धावांवर इंग्लंडचा संपूर्ण संघ बाद झाला.सामन्याची गुणतालिका:वेस्ट इंडीज: १९६/६ (२० षटके) - रदरफोर्ड ७६, रोस्टन चेस ३४; आदिल रशीद २/१६.इंग्लंड: १६६/१० (१९ षटके) - सॅम करन ४३, जेकब बेथेल ३३; गुडाकेश मोटी ३/३३, रोस्टन चेस २/२९.
Usman Tariq Bowling Action : भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन मात्र पाकिस्तानच्या या खेळाडूच्या समर्थनार्थ धावून आला आहे.
Pune News : पुण्यातील कोथरूड परिसरात झाड तोडणीचे काम सुरू असताना कंत्राटी कामगारांच्या निष्काळजीपणामुळे एका दुचाकीस्वाराच्या गळ्याला दोरी अडकून भीषण अपघात झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापौरांची निवड पाहण्यासाठी प्रथमच बसले सभागृहाच्या गॅलरीत
मुंबई विशेष प्रतिनिधी :मुंबई महापालिका सभागृहाच्या गॅलरीत मी पहिल्यांदाच बसलो आहे. अशा प्रकारे मी पहिल्यांदाच सभागृहाचे कामकाज पाहिले आहे. अशा ऐतिहासिक व वारसा असलेल्या वास्तूमध्ये महत्त्वाच्या सोहळ्याचे साक्षीदार होणे हे महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या निवडीनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रितू तावडे व उप महापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड झाली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,महापौर, उपमहापौर व सर्व पदाधिकारी या महापालिकेला दिशा देतील व सामान्य मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करतील. त्यांना पूर्ण ताकद देण्याचे काम आम्ही करू. त्यांच्या माध्यमातून नवीन मुंबई घडविण्याच्या कामाला गती देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.रितू तावडे यांच्याकडे एक अनुभवी व अस्सल मराठी चेहरा म्हणून पाहिले जाते. त्यांनी यापूर्वीही मुंबईकरांच्या प्रश्नांकरिता आक्रमक भूमिका घेतली आहे. यापुढेही त्यांच्या माध्यमातून महायुती सरकारने सुरू केलेला मुंबईच्या विकासाचा कार्यक्रम महापालिकेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने राबविला जाईल. तसेच उपमहापौर संजय घाडी यांच्या अनुभवाचा फायदा महापालिकेला मिळेल. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचे प्रशासन महापालिकेच्या माध्यमातून चालविले जाईल,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.मागील साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालनामुंबईला अतिशय कार्यक्षम महापौर व उपमहापौर मिळाले आहेत. गेल्या साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना दिली. त्या कामाची पोचपावती मुंबईकरांनी दिली. विकासाला प्राधान्य व विकासाला मुंबईकरांनी स्वीकारले असल्याचा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. मुंबई जागतिक दर्जाचे शहर करण्याची भूमिका आहे. मुंबई शहरासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करण्याचे काम आम्ही करू. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सरकार करणार आहे. त्यांचे झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. मुंबई खड्डेमुक्त रस्ते, प्रदूषणमुक्त करण्याची आमची भूमिका आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईला फिनटेक कॅपिटल करण्याचे स्वप्न पाहिले आहे, ते पूर्ण करण्याचे काम शासन करेल, असेही त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.महापालिका सभागृहात प्रथमच उपस्थित राहिले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीमहापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात महापालिका सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहिले होते. सभागृहातील प्रेक्षा गॅलरीमध्ये बसून भाजपचे ४४ वर्षांनंतरचे स्वप्न साकार होताना पाहिले. प्रेक्षा गॅलरीमध्ये भाजपच्या महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर निवडीची प्रक्रिया याचि देही याचि डोळा पाहिली. अशाप्रकारे महापौर निवडीच्यावेळी महापालिका सभागृहात उपस्थित राहणारे पहिले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असून प्रेक्षा गॅलरीमध्ये बसूनही ही निवड प्रक्रिया न्याहाळणारेही पहिले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ठरले
मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करणार
उपमहापौर संजय घाडी यांची घोषणामुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई शहरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्यास प्लास्टिकचा बेसुमार वापर कारणीभूत आहे . पर्यावरणाची हानी करण्यात प्रमुख घटक ठरलेल्या प्लास्टिकवर राज्य सरकारने मागील मार्च २०१८ पासून बंदी लागू केली. मुंबईतील बहुतांश भागात प्लास्टिकबंदी परिणामकारक ठरली आहे. मात्र ही बंदी १०० टक्के अंमलात आली नसल्याने ठिकठिकाणी जाणवते. छुप्या पध्दतीने काही प्रमाणात प्लास्टिकचा वापर अजूनही सुरुच आहे. प्लास्टिक बंदीची परिणामकारकता वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्यातील त्रुटी शोधून दंडात्मक कारवाईची तीव्रता वाढविण्याची गरज असल्याचे सांगत नवनिर्वाचित उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलली जावीत असेही पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.मुंबई महापालिकेत उपमहापौर पदी निवड झाल्यानंतर संजय घाडी यांनी महापालिका सभागृहात भाषण करताना तसेच बृहन्मुंबई महानगर पालिका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित सत्कारानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी प्लास्टिक मुक्तीचा निर्धार व्यक्त केला.मुंबईतील करदात्या नागरीकांना सुरळीत पाणी पुरवठा करणे, मुंबईमध्ये स्वच्छता राखणे, मलनिःसारण व्यवस्था पाहणे, आरोग्य सेवा पुरविणे, रस्ते व वाहतूक ह्यांचे नियोजन करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, शैक्षणिक सुविधा देणे इत्यादी आवश्यक नागरी सुविधा सुरळीत मिळतील यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे मी नियमित पाठपुरावा करेन.,असे त्यांनी स्पष्ट केले.शाळांमधील मुलांची गळती थांबवणारशहराच्या नागरिकांना विविध नागरी सुविधा पुरवितांना वित्तव्यवस्थेवर ताण येणार नाही अशारितीने या विकास नियोजन आराखडयाची अंमलबजावणी सन २०३४ पर्यंत महापालिका प्रशासनाने काटेकोरपणे करावी. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने, शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ह्याकरिता महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याच्यादृष्टीने व पटसंख्येमध्ये वाढ होण्याच्यादृष्टीने प्रशासनाने नेटाने प्रयत्न केला जाईल,असेही स्पष्ट केले.भटक्या कुत्र्यांच्या उत्पत्तींवर मर्यादाशहरातील भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना होणारा उपद्रव टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करुन भटक्या कुत्र्यांसाठी मुंबई महानगरपालिकेने निवारा केंद्र उभारावीत. तसेच, भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून त्यांच्या वाढत्या उत्पत्तीवर मर्यादा आणण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात.,अशा सूचना करतानाच आपण यासाठी प्रयत्नशील असू असेही स्पष्ट केले.स्त्रीभ्रूण हत्येस बळी पडू नकामुलगी वाचवा, मुलगी शिकवा असा संदेश आपण सर्वत्र ऐकतो, पण तरीही समाजात स्त्रीभ्रुण हत्या है एक भीषण वास्तव आहे. गर्भजल चिकित्सा करुन जगामध्ये येऊ इच्छिणाऱ्या मुलींचा श्वास रोखू पाहणाऱ्या स्त्रीभ्रुण हत्या पूर्णपणे थांबविण्याची काळाची गरज आहे. आपल्या देशातील पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आजही कुटुंब, समाज घडवणारी स्त्रीच आहे. त्यामुळे तीचे अस्तित्व अबाधित ठेवण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे. ह्याकरिता गर्भजल चिकित्सा करुन स्त्रीभ्रूण हत्येस किंवा कोणत्याही अपप्रवृत्तीस बळी पडू नये असे असेही आवाहन त्यांनी केले.अवयव दानाचे महत्व रुजवाअवयवदान ही काळाची गरज आहे. जनजागृतीअभावी अवयवदात्यांचे प्रमाण अत्यल्प असून, अवयवदानामुळे जीवनदान मिळू शकते ही बाब जनमानसांमध्ये रुजविण्याची आवश्यकता आहे. तरी, महानगरपालिका प्रशासनाने आगामी वर्षात ही संकल्पना सर्वसामान्यांमध्ये रुजविण्यासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी. तसेच मुंबईतील दुरावस्थेतील व अपुऱ्या सोयी-सुविधा असलेल्या स्मशानभूमी / दफनभूमींची तातडीने दुरुस्ती करुन तेथे आवश्यक त्या सेवा-सुविधा पुरविण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.समुद्राचे पाणी खारे करण्याऐवजी धरण बांधाआज शहरातील फेरीवाल्यांबरोबरच पार्किंगकरिता मोठ्या प्रमाणावर जागा व्यापली जात आहे. स्वतंत्र पार्किंग झोन ही काळाची गरज आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. बेस्ट, मेट्रो, मोनो, रेल्वे लोकल अशा सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय एकमेकांशी जोडणे महत्वाचे ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याऐवजी मुंबई शहराला अधिक पाणीपुरवठा व्हावा ह्यासाठी प्रशासनाने नवीन धरणांची निर्मिती करून पाणीपुरवठ्याचे नियोजन कराये. तसेच, पाण्याची गळती आणि चोरी रोखण्याकरिता प्रशासनाने कठोर उपाययोजना करावी अशाप्रकारच्या सूचना केल्या आहेत.झाडे मारण्यांवर कारवाई करामुंबईतील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आज वृक्षसंवर्धनाची नितांत गरज आहे. शहरात अस्तित्वात असलेली झाडे व वृक्षांची निगा राखणे व त्यांचे यथोचित संवर्धन करणे गरजेचे झाले असून, त्यांची हानी टाळण्यासाठी व ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी महानगरपालिकेने स्वतः वृक्ष प्राधिकरण व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने विशेष योजना कार्यान्वित करावी व मुंबईत अधिकाधिक वृक्ष लागवड करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच काही ठिकाणी झाडे जाणीवपूर्वक मारण्याचे प्रकार घडत आहेत त्यांच्यावरही कडक कारवाई करावी अशीही विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे .
भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात
मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया विरोधात होणार आहे. हा सामना होण्याआधीच भारतीय संघ व्यवस्थापनाची चिंता वाढवणारी एक बातमी आली आहे. भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा याला तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे नामिबिया विरोधात अभिषेक खेळण्याची शक्यता धूसर झाली आहे.अभिषेक शर्मा ताप आला आहे आणि अशक्तपणा जाणवत आहे. अमेरिकेविरुद्धच्या सामन्याआधीपासूनच तो आजारी होता. पण त्यावेळी औषधं घेऊन खेळलेला अभिषेक आता तब्येत खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल झाला आहे. डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अभिषेकवर उपचार सुरू आहेत. तब्येतीला लगेच आराम पडावा यासाठी अभिषेकला सलाईनवर ठेवले आहे.आजारी असल्यामुळे डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्मा नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये संघाच्या सराव सत्राला गैरहजर होता. त्याचे पोट बिघडले आहे आणि औषधोपचार सुरू आहेत असे सुरुवातीला सांगितले जात होते. पण आता अभिषेकला रुग्णालयात दाखल केल्यामुळे तो नामिबिया विरोधात खेळण्याची शक्यता कमी झाली आहे.सध्या आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये ए ग्रुप अर्थात अ गटात पाकिस्तान पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत आणि त्यांच्याकडे चार गुण आहेत. भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना जिंकला आहे. यामुळे भारत दोन गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. नेदरलँडने त्यांचा दोन पैकी एक सामना जिंकला आहे. यामुळे ते तिसऱ्या स्थानावर आहेत. नामिबिया चौथ्या तर अमेरिका पाचव्या स्थानावर आहे.
भारतातील पहिला संगीत मार्ग मुंबईकरांच्या सेवेत
कोस्टल रोड प्रमाणे संगीत मार्गाची संकल्पना यापुढेही राबवणारमुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावर (मुंबई कोस्टल रोड) साकारण्यात आलेली संगीत रस्त्याची संकल्पना वाहनधारकांना आनंद देणारी आहे. हंगेरियन तंत्रज्ञानावर आधारित ही अभिनव संकल्पना यापुढेही राबविण्याचा मानस आहे, असे उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. तर समृद्धी महामार्गावरही प्रायोगिक तत्त्वावर ही संकल्पना राबविण्याचा विचार करू.मुंबई किनारी रस्त्यावर साकारलेल्या संगीत मार्गाचा मुंबईकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.मुंबई किनारी रस्त्यावर नरिमन पॉईंटकडून वरळीकडे जाणाऱ्या उत्तर मार्गिकेवर साकारलेल्या संगीत मार्गाचे (मेलोडी रोड) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज बुधवारी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वाहनात बसून ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटातील ‘जय हो’ या गीताची धून ऐकत संगीत मार्गाचा आनंद घेतला.हंगेरीचे वाणिज्य दूत फॅरेन जारी, माजी खासदार राहुल शेवाळे, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.मुंबई किनारी रस्त्यावर नरिमन पॉईंटकडून वरळीकडे जाणाऱ्या उत्तर मार्गिकेवर संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. या पट्ट्यांवरून वाहन गेल्यावर ‘जय हो’ हे गाणे ऐकू येते. हा जगातील पाचवा आणि भारतातील पहिलाच प्रयोग आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम साकारण्यात आला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई किनारी रस्त्यावरील पहिल्या टप्प्यात ५०० मीटर अंतराच्या रस्त्यावर ही संकल्पना राबविण्यात आली आहे. यापुढेही संगीत मार्ग ही संकल्पना राबविण्याचा मानस आहे.यानंतरही अशाप्रकारे संगीत मार्ग साकारण्यात...उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सध्या मुंबई किनारी रस्त्यातील ५०० मीटर अंतरावर संगीत पट्ट्या बसविण्यात आल्या आहेत. यानंतरही अशाप्रकारे संगीत मार्ग साकारण्यात येतील. समृद्धी महामार्गावरही प्रायोगिक तत्त्वावर ही संकल्पना राबविण्याचा विचार करू. मुंबई किनारी रस्त्यावर साकारलेला संगीत मार्ग मुंबईकरांच्या मनात देशभक्ती जागृत करणारा आहे. हा भारतातील पहिलाच संगीत रस्ता, असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
मुलुंड स्टेशन परिसरातील एस व्ही पी मार्ग क्लिअर
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुलुंड (पश्चिम) येथील सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरील ६१ अनधिकृत बांधकामे मुंबई महानगरपालिकेच्या ‘टी’ विभागाकडून बुधवारी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर सुमारे ११०० चौरस मीटर परिसर मोकळा झाला. यामुळे मुलुंडचा एस व्हि पी मार्ग क्लिअर झाला आहे.मुंबई महापालिका उपायुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे यांच्या देखरेखीत, सहायक आयुक्त (टी विभाग) योगिता कोल्हे यांच्या नेतृत्वात ‘टी’ प्रशासकीय विभाग अंतर्गत कार्यरत विविध विभागांकडून संयुक्तपणे ही कारवाई हाती घेण्यात आली होती. या मार्गावरील अनधिकृत बांधकामावरोधात महापालिकेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, तसेच लोकप्रतिनिधीही अनधिकृत बांधकामे हटवण्याबाबत आग्रही होते.या कारवाईत ०४ जेसीबी, ०७ डम्पर आणि अन्य मशीनची मदत घेण्यात आली. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे ७० अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता. दरम्यान, यापुढेही अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई सुरूच राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.
Earthquake News : नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात आज दुपारी ३.१५ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
Ishan Kishan Injured : एकीकडे जसप्रीत बुमराह पुनरागमन करत असतानाच, सराव सत्रात सलामीवीर इशान किशन दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या अडचणींत वाढ ! ‘त्या’प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याविरोधात जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोठी बातमी..! ‘या’आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवारांचं नाव; नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
Ajit Pawar Cricket Stadium : कोल्हापूर जिल्ह्यातील विकासवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीने घेतला आहे.
Jamkhed News : प्रशासनाचे दुर्लक्ष की ठेकेदाराची मनमानी? जामखेडमधील ‘ट्रॅफिक जॅम’मुळे नागरिक हैराण
Jamkhed News : जामखेड-सौताडा महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून अपूर्ण असल्याने जामखेड शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
महापालिकेवर भाजपचा भगवा अखेर फडकलाचमुंबई :मुंबईच्या महापौरपदी अखेर भाजपचा महापौर विराजमान झाला. मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रतिस्पर्धी पक्षाकडून उमेदवारी अर्ज सादर न केल्याने निवडणुकीची औपचारिकता पार पडत पिठासीन अधिकारी डॉ भूषण गगराणी यांनी महापौरपदी भाजपच्या नगरसेविका रितू तावडे आणि उपमहापौर पदी संजय घाडी यांची निवड झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे तब्बल ४४ वर्षांनी भाजपचा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान होत खऱ्या अर्थाने महापालिकेवर भाजपचा भगवा डौलाने फडकला गेला. मुंबईचे ७८ वे महापौर म्हणून भाजपच्या रितू तावडे हे निवडले गेल्या असून मागील चार दशकांचे भाजपचे स्वप्न साकार झाले आहे.मुंबई महापालिका सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बुधवारी दुपारी पार पडली. या निवडणुकीत पिठासीन अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी कामकाज पाहिले. महापालिका सचिव यांनी प्रत्येक विभागाच्या संख्याबळानुसार जागा निश्चित केल्यानंतर सर्व प्रथम भाजपचे नगरसेवक हे पिठासीन अधिकाऱ्यांच्या उजव्या बाजुला जावून बसले, त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक आणि मनसे, एमआयएम, समाजवादी पक्षाचे नगरसवेक सभागृहात दाखल झाल्यानंतर उबाठाचेही नगरसेवक घोषणाबाजी देत सभागृहात दाखल झाले. त्यामुळे भाजप आणि उबाठाच्या नगरसेवकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात झाली. भाजपकडून मोदी.. मोदी... अशी घोषणा होत असतानाच उबाठाकडून ठाकरे... ठाकरे... अशाप्रकारच्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. या घोषणाबाजीतच दुपारी १२.०७ वाजता पिठाासीन अधिकारी डॉ भूषण गगराणी यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली. वंदे मातरमने सभागृहाला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात दाखल झाले.प्रतयक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात होतात उबाठा गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे पिठासीन अधिकारी म्हणून प्रधान सचिव दर्जाचा अधिकारी आणि डॉ भूषग गगराणी यांची नेमणूक करण्याचा अध्यादेश नगरविकास खात्याने जारी केल्याने या अध्यादेशाचा निषेध व्यक्त करत आजवरच्या प्रथा आणि परंपरेला छेद दिल्याचा आरोप केला. पण पिठासीन अधिकारी यांनी यावर उत्तर देत त्यांचा मुद्दा उडवून लावला. त्यानंतर पिठासीन अधिकारी यांनी निवडणुकीला सुरुवात करत, महापौर पदासाठी एकमेव अर्ज आल्याने रितू तावडे यांची निवड महापौर पदासाठी करत असल्याचे घोषित केले. त्यानंतर पिठासीन अधिकारी यांनी उपमहापौर पदासाठी एकमेव अर्ज आल्याने संजय घाडी यांची निवड उपमहापौर पदासाठी करत असल्याचे घोषित केले. या दोघांच्या निवडीनंतर सर्व सदस्यांनी बाके वाजवत त्यांचे स्वागत केले. तर भाजपच्या नगरसेवकांनी भारत माता की जय... वंदे मातरम... भारत माँ का एकही नारा, जय श्रीराम जय श्रीराम.. अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी पिठासीन अधिकारी आणि महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी पुष्पगुष्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्री,उपमुख्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहत दिल्या शुभेच्छायाचवेळी महापालिका सभागृहातील प्रेक्षागॅलरीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसून हा या निवडणुकीचा कार्यक्रम अनुभवला. त्यानंतर सभागृहामध्ये येत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी महापौरपदी निवड झाल्यामुळे रितू तावडे आणि उपमहापौरपदी निवड झाल्यामुळे संजय घाडी यांना पुष्पगुच्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या.सभागृहात उबाठाच्या नगरसेवकांनी महापौरांसह उपमहापौरांच्या भाषणाच्या प्रती फाडून फेकल्यामहापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड झाल्यानंतर महापौर आणि उपमहापौरांनी सभागृहात भाषण करत आगामी संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. या भाषणाच्या प्रती सभागृहात सदस्यांना वाटण्यात आल्या होत्या. परंतु काँग्रेसच्या गोंधळातही महापौरांनी आपले भाषण उरकून घेतले तर उपमहापौर संजय घाडी हे भाषणाला सुरुवात करताच उबाठाच्या नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर उबाठाने त्यांच्या भाषणांच्या प्रती फाडून सभागृहात फेकत सभात्याग केला. त्यामुळे पहिल्याच सभेत उबाठाच्या नगरसेवकांनी गैरवर्तन करत पुढील पाच वर्षांमधील रणनिती स्पष्ट केली.
पदपथ अतिक्रमण मुक्त, बांग्लादेशी फेरीवाल्यांना हटवणार - नवनियुक्त महापौरांचा निर्धार पक्का
मुंबई:मुंबईतील रोहिंग्या आणि बेकायदेशीर बांग्लादेशींना मुंबईतून हटवणे हेच आमचे महत्वाचे उद्दिष्ट असे. डिजिटल सिस्टीम आणि एआयचा वापर करून मुंबईत सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढवण्याकरता प्राधान्य दिले जाईल तसेच मुंबईमध्ये विविध ठिकाणी पदपथांवर अनिधकृतरित्या अतिक्रमण केलेल्या बांग्लादेशींचे जात प्रमाणपत्र व बोगस आधारकार्ड शोधून त्यावर त्वरीत कारवाई करून त्यांना पोलिसांच्य हवाली करण्यात येईल. त्यामुळे महापौर हे सभागृहात खुर्चीवर बसवणारे नसणार तर जनतेमध्ये सहभागी होवून महापौर म्हणून काम करणार असे नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी स्प्ष्ट केले. तसेच ही पदपथ अतिक्रमणमुक्तीच्या दिशेने पहिली बैठक महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्यावतीने संयुक्तपणे घेवून यावरील कारवाईला गती देणार असल्याचेही तावडे यांनी आपल्या भाषणासह पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड झाल्यानंतर त्यांनी सभागृहात भाषण केल्यानंतर प्रथेप्रमाणेच बृहन्मुंबई महानगरपालिका पत्रकार कक्षात येत आपला सत्कार स्वीकारला. याप्रसंगी माध्यमांशी बोलतांना महापौर रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महापौर हा मराठीच असेल असे जाहीर केले होते, त्यानुसार त्यांनी माझ्या रुपात मराठीच महापौर दिला आहे. सन २०१४च्या पूर्वीची मुंबई आणि आताची मुंबई आपण पाहतच आहोत. त्यामुळे स २०१४नंतर मुंबई गतिशील बनली असून पुढेही ती अधिक गतिशिल केली जाणार आहे. सभागृह हे निपक्षपातीपणे चालवले जाणार असून गोंधळ न घालता जर विरोधक कामकाजात भाग घेत असतील तर त्यांच्या चांगल्या सूचनाही विचार केला जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.मुंबईतील प्रदुषित वातावरणाबाबत सहकाऱ्यांशी चर्चा तसेच त्यांच्या सूचनांनुसार उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न केला जाईल. मी स्वत: संवेदनशील महापौर असून महिला म्हणून महिलांसाठीची कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. एवढेच नाहीतर महापौरांपर्यंत जनतेला जाण्याची गरज नसून हा महापौर जनतेपर्यंत जाणारा आहे,असेही स्पष्ट केले. मुंबईतील घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय हे एम्सच्या धर्तीवर करण्याचा प्रयत्न राहिल.मुंबईकरांवरील पाणी दरवाढ रोखणार, टँकर माफिया फ्रीदरवर्षी होणाऱ्या ८ टक्के पाणी दरवाढीला स्थगिती देवून पाण्याचा दर स्थिर ठेवण्याकरता मी प्रयत्न करेन तसेच मुंबईमध्ये टँकर माफियांचे वाढलेले प्रस्थ व त्यांची मक्तेदारी बंद करण्याकरता टँकर माफिया फ्री मुंबई हे धोरण राबवण्यात येईल. नवीन इमारतींप्रमाणे जुन्या इमारतींनाही रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरु करण्यासाठी नगरसेवक निधी किंवा विशेष अर्थसंकल्पीय तरतूद करून हे प्रकल्प राबवण्यात येतील.आरोग्याच्या प्रश्नाकडे महापौरांचा अधिक कलमहापालिका रुग्णालयांचा दर्जा एम्सच्या धर्तीव सुधारण्याकरता तसेच प्रत्येकी प्रशासकीय विभागात डायलिसीस सेंटर आणि केमोथेरेफी सेंटर उभारण्याचा तसेच ज्येष्ठ नागरिकांना माहपालिकेच्या रुग्णालयात वर्षातून एकदा पूर्ण शरीत तपासणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. याशिवाय ह्दयविकाराच्या रुग्णांसाठी समर्पित रुग्णालयांमध्ये अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी सवलतीच्या दरात उपलब्ध होईल असाही पूर्णपणे प्रयत्न केला जाईल.महापौरांनी केले व्हर्च्युअल क्लासरुमचे कौतूकमहापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रशासनाने उचलावित असे आवाहन करतच रितू तावडे यांनी महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासरुम योजना सुरु करण्यात आली आहे. ती अत्यंत प्रशासनीय आहे. ही योजना अधिकाधिक विस्तारीत करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल याकरता मी प्राधान्य देणार असल्याचे सांगत यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी राबवलेल्या योजनेचे कौतुक केले.महापौर निधी ५० हजारांपर्यंत वाढवणारमुंबई महापालिकेच्यावतीने महापौर निधी गरीब रुग्णांना उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीप्रमाणे महापौर निधी पाच हजार रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे महापौर निधीमध्ये अधिक वाढ केली जाणार असून यासाठी भविष्यात महापौरांना पुष्पगुच्छ तसेच शाल श्रीफळ न देता यासाठीचे पैसै महापौर निधीला उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून या महापौर निधीतून गरीब रुग्णांना अधिकाधिक वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिला जाईल असे त्यांनी स्पष्ट करत महापौर निधीला सढळ हस्ते मदत करावी असेही आवाहन नवनिर्वाचित महापौरांनी केली.महापौरांना दिल्या शुभेच्छामहापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, आमदार प्रविण दरेकर,माजी खासदार आणि शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे, आमदार संजय उपाध्याय, योगेश सागर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांच्यासह अनेकांनी महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय उपाध्याय यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.
Thailand : थायलंडच्या शाळेमध्ये बंदुकधाऱ्याचा थरार; गोळीबारात एक विद्यार्थी जखमी
शाळेमध्ये गोळीबार करणाऱ्या आणि शिक्षकांना ओलीस धरणाऱ्या एका बंदुकधाऱ्याला थायलंडमध्ये पकडण्यात आले आहे.
Rohit Pawar : मुख्य वैमानिकाच्या भूमिकेवर संशय; रोहित पवार यांच्याकडून चौकशीची मागणी
अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी मुख्य वैमानिक सुमित कपूर यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी बारामतीमधील विमान अपघाताबाबत सादरीकरण करत अनेक प्रश्न उपस्थित केले.
द. आफ्रिकेचा डबल सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय, अफगाणिस्तानची झुंज अपयशी
अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी क्रिकेट इतिहासातील सर्वात नाट्यमय आणि चित्तथरारक सामना पाहायला मिळाला. टी-२० विश्वचषक २०२६ मधील या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा 'डबल सुपर ओव्हर'मध्ये पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी १८-१८ धावा केल्याने सामना पुन्हा टाय झाला. त्यानंतर दुसरी ओव्हर खेळवली गेली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मात्र अखेरच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना रहमानुल्ला गुरबाज झेलबाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात दोन वेळा सुपर ओव्हर खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरली. फॉर्मात असलेल्या एडन मार्करमनला (५) स्वस्तात माघारी पाठवल्यानंतर अफगाणिस्तानी आनंदात होती. पण, क्विंटन डी कॉक व रायन रिकेल्टनच्या ११२ धावांच्या भागीदारीने सामना आफ्रिकेच्या बाजूने फिरवला. राशिद खानने १३ व्या षटकात मॅच पुन्हा अफगाणिस्तानच्या बाजूने झुकवली. त्याने दोन्ही सेट फलंदाजांना एकाच षटकात बाद केले. क्विंटनने ४१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारासह ५९ धावांवर, तर रिकल्टन २८ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६१ धावांवर बाद झाला.डेव्हॉल्ड ब्रेव्हिस (२३), मार्को यान्सने (१६) व डेव्हिड मिलर (२०) यांच्या योगदानाच्या जोरावर आफ्रिका ६ बाद १८७धावांपर्यंत पोहोचले. अझमतुल्लाह ओमारझाईने ३, तर राशिदने दोन विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने ५२ धावांवर ३ विकेट्स गमावल्या. सलामीवीर रममनुल्लाह गुरबाझ मैदानावर उभा राहिला आणि त्याने ४२ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांसह ८४ धावांची दमदार खेळी केली. अझमतुल्लाह (२२) व राशिद (२०) यांनी चांगले योगदान दिले.शेवटच्या षटकात विजयासाठी १३ धावा हव्या असताना कागिसो रबाडाने नो बॉल व व्हाईड बॉल फेकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर नूर अहमदने षटकार खेचून सामना ४ चेंडूंत ५ धावा असा जवळ आणला. चौथ्या चेंडूवर नो बॉल पडला अन् दोन धावा मिळाल्या. २ चेंडू ३ धावा असा सामना जवळ आला. चौथ्या चेंडूवर दुसरी धाव घेताना फझलहक फारूकी रन आऊट झाला आणि १८७ धावांवर अफगाणिस्तान संघ सर्वबाद झाला.सुपर ओव्हर काय घडले?अझमतुल्ला ओमारझाईने पहिल्या दोन चेंडूवर ४ व ६ खेचला. पुढील दोन चेंडूंवर एकेक धाव आली. त्यानंतर चौकार व एक धाव घेताना अफगाणिस्तानने १७ धावा फलकावर चढवल्या. आफ्रिकेला ६ चेंडूंत १८ धावा करायच्या होत्या. डेव्हिड मिलर आणि डेव्हॉल्ड ब्रेव्हिस ही जोडी मैदानावर आली. मिलरने पहिला फुलटॉस चेंडू मिस केला आणि एक धाव मिळाली. ब्रेव्हिसने दुसरा चेंडू पुल शॉटवर सीमापार पाठवला. तिसऱ्या चेंडूवर फझलहक फारूकी स्लोव्हर बाऊन्सर फेकला अन् ब्रेव्हिस पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. तर आफ्रिकेला ३ चेंडूंत ११ धावा करायच्या होत्या. त्रिस्तान स्तब्सने चौकार खेचला, परंतु पुढचा चेंडू निर्धाव राहिला. १ चेंडू ७ धावा असा सामना आलेला असताना स्तब्सने षटकार खेचला आणि सामना दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला.दुसरी सुपर ओव्हरअझमतुल्लाह ओमारझाईचा पहिलाच चेंडू त्रिस्तान स्तब्सने षटकार खेचला, नंतर एक धाव काढून डेव्हिड मिलरला स्ट्राईक दिली. मिलरने तिसऱ्या चेंडूवर चतुराईने दोन धावा काढल्या. त्यानंतर मिलरने सलग दोन षटकार हाणले. शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत आफ्रिकने २४ धावांचे लक्ष्य ठेवले. मिरलने ४ चेंडूंत १६ धावा, तर स्तब्सने २ चेंडूंत ७ धावा केल्या. तर कर्णधार एडन मार्करमने चेंडू केशव महाराजच्या हाती दिला. हा मोठा जुगार होता, परंतु महाराजने दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद नबीला झेलबाद केले. त्याने पहिला चेंडू निर्धाव टाकला होता. ४ चेंडूं २४ धावा अफगाणिस्तानला हव्या होत्या. रहमनुल्लाह गुरबाजने सलग तीन चेंडू सीमापार पाठवून अफगाणिस्तानला सामन्यात ठेवले होते. महाराजने शेवटचा चेंडू व्हाईड टाकून आणखी एका सुपर ओव्हरची संधी निर्माण केली होती, परंतु सहाव्या चेंडूवर विकेट घेऊन अफगाणिस्तानने बाजी मारली.विश्वचषकातून अफगाणिस्तान बाहेर नाहीदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ऐतिहासिक 'डबल सुपर ओव्हर'मध्ये निसटता पराभव पत्करावा लागल्याने अफगाणिस्तानचा संघ सध्या गुणतालिकेत पिछाडीवर आहे. सलग दोन पराभवांमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले, तरी तांत्रिकदृष्ट्या अफगाणिस्तान अजूनही विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर पडलेला नाही. मात्र, त्यांचा 'सुपर ८' मधील प्रवेश आता 'दोरीवरची कसरत' ठरला आहे. अफगाणिस्तानला पुढील फेरीत मजल मारण्यासाठी आता स्वतःच्या कामगिरीसह इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. अफगाणिस्तानला यूएई आणि कॅनडा विरुद्धचे त्यांचे उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. दक्षिण आफ्रिका किंवा न्यूझीलंड यांपैकी एका संघाने त्यांचे उर्वरित दोन्ही सामने गमावणे आवश्यक आहे. अशा स्थितीत ४ गुणांवर बरोबरी होऊन 'नेट रन रेट'चा खेळ सुरू होईल. सध्या अफगाणिस्तानचा नेट रन रेट उणे (-१.१६२) आहे. तो सुधारण्यासाठी त्यांना आगामी सामन्यांत दणदणीत विजय मिळवावे लागतील. जर १४ फेब्रुवारीला होणारा न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द झाला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळाला, तर अफगाणिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. कारण अशा स्थितीत दोन्ही मोठे संघ ५ गुणांवर पोहोचतील, जिथे अफगाणिस्तान पोहोचू शकत नाही. सलग दोन पराभवानंतरही अफगाणिस्तानने ज्या प्रकारे आफ्रिकेला झुंजवले, ते पाहता हा संघ शेवटपर्यंत हार मानणार नाही हे स्पष्ट आहे. आम्ही हार मानलेली नाही, शेवटच्या सामन्यापर्यंत सर्वस्व पणाला लावू, असा विश्वास अफगाण संघातून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता १६ फेब्रुवारीला होणाऱ्या यूएई विरुद्धच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर
कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य फिरकीपटू आणि मॅचविनर खेळाडू वानिंदू हसरंगा हॅमस्ट्रिंगच्या गंभीर दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आयसीसीच्या तांत्रिक समितीने त्याच्या जागी अष्टपैलू दुशान हेमनथा याच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. आयर्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात गोलंदाजी करताना हसरंगाच्या डाव्या पायाचे स्नायू दुखावले होते. प्रचंड वेदना होत असूनही त्याने मैदान सोडले नाही आणि ४ षटकांत २५ धावा देत ३ महत्त्वाचे बळी टिपले. मात्र, सोमवारी झालेल्या एमआरआय रिपोर्टमध्ये त्याच्या स्नायूंना गंभीर इजा झाल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी त्याला किमान ४ ते ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. हसरंगाची उणीव भरून काढण्यासाठी ३१ वर्षीय लेग-स्पिनर दुशान हेमनथा याला तातडीने पाचारण करण्यात आले आहे. हेमनथाने आतापर्यंत ५ एकदिवसीय आणि ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आहे. घरगुती क्रिकेटमधील त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला ही मोठी संधी मिळाली आहे. केवळ श्रीलंकाच नव्हे, तर न्यूझीलंड संघालाही दुखापतीचा फटका बसला आहे. किवी संघाचा अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेल पायाच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेला आहे. न्यूझीलंडने अद्याप त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. तसेच हसरंगाच्या अनुपस्थितीत श्रीलंका गुरुवारी ओमान विरुद्ध मैदानात उतरणार आहे. हसरंगा हा केवळ गोलंदाज नसून खालच्या क्रमांकावर उपयुक्त फलंदाजीही करतो, त्यामुळे त्याची जागा भरून काढण्याचे मोठे आव्हान आता दुशान हेमनथा आणि कर्णधारासमोर असेल.
विद्यापीठांमधील अध्यापक भरती प्रक्रियेस मान्यता; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
भरतीची सविस्तर कार्यपद्धती जाहीरमुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक विद्यापीठांमधील अध्यापक भरतीची संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी उमेदवारांना मिळालेल्या गुणदानाची यादी त्यांच्या गुणांसह विद्यापीठांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार आहे. अशा विविध अनुषंगिक नाविन्यपूर्ण बदलांचा समावेश करून भरतीची सविस्तर कार्यपद्धती जाहीर करून भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तासिका तत्वावरील, कंत्राटी तसेच ॲडहॉक तत्वावर कार्यरत असणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या कालावधीत केलेल्या कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे. अनेक सहाय्यक प्राध्यापक जे वर्षोनुवर्षे तासिका, कंत्राटी आणि ॲडहॉक तत्वावर काम करतात अशांचा अनुभव पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार आहे.तसेच पूर्वीच्या शासन निर्णयामधील मानवविज्ञान शाखेअंतर्गत प्राध्यापकांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी प्रकाशनसाठी स्कोपस, वेब ऑफ सायन्स मध्ये प्रकाशनाची जी अट होती, ती या शासन निर्णयामुळे काही अंशी शिथिल करण्यात आली. मानवविज्ञान शाखेतील प्राध्यापकांसाठी ही जमेची बाजू ठरली आहे. या शाखेत कार्यरत असणाऱ्या अध्यापकांचे पुस्तक प्रकाशनांचेही गुण ग्राह्य धरले जाणार असून समान संधीच्या तत्वाचा अवलंब करण्यात आला आहे. मात्र हे करत असताना उत्कृष्टतेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. मागील शासन निर्णयाच्या तुलनेने एनआयआरएफ, क्युएस आणि टाईम्स हायर एज्युकेशन अशा अनुषंगिक रँकिंगच्या नुसार गुणदानातही सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना समान संधीच्या तत्वामुळे या शासन निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.सहाय्यक आणि प्राध्यापक पदासाठीही त्यांचे अनुभव, विविध संशोधन प्रकल्प, विविध शिखर संस्थांकडून मिळालेला निधी आदी निकषांवर भर देण्यात आला आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अपेक्षित अध्ययन आणि अध्यापन पध्दतीत शिक्षकांची भूमिका ही महत्वाची असल्याने भरती प्रक्रिये दरम्यान मुलाखतीसाठी गुणदानाची प्रक्रिया विषद करण्यात आली आहे. यामध्ये अध्यापकांना आयसीटी कौशल्य, प्रगत तांत्रिक कौशल्य आणि को-करिक्युलर एक्टीव्हिटीज यास महत्व देत कार्यपध्दती निश्चित करून अध्यापकांची निवडप्रक्रिया पूर्ण करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असेही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
आदिवासी विकास विभाग व टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स यांच्यात सामंजस्य करार
२४० विद्यार्थ्यांना विशेष औद्योगिक प्रशिक्षणमुंबई : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे, उद्योगसुसंगत आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (टीआयआयएस), मुंबई यांच्यात मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये २४० आदिवासी विद्यार्थ्यांना प्रगत औद्योगिक तंत्रज्ञान विषयक विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे मुख्य वित्त अधिकारी (सीएमओ) मयंक पलन यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये प्रशिक्षण, प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण आणि उद्योगमानक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निश्चित रोजगारसंधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्समार्फत पार पाडली जाणार आहे.सचिव विजय वाघमारे म्हणाले, आदिवासी युवांना प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक स्तरावरील प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा विभागाचा प्राधान्यक्रम आहे. टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्ससोबत करण्यात आलेला हा करार केवळ कौशल्य विकासापुरता मर्यादित नसून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्यातील रोजगारक्षमतेसाठी भक्कम व टिकाऊ पाया निर्माण करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या संयुक्त सहभागातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नव्या संधी निर्माण होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.या करारांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिक व्हेईकल्स (EV), रोबोटिक्स, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, ३ डी प्रिंटिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि ईव्ही बॅटरी तंत्रज्ञान या प्रगत आणि भविष्योन्मुख औद्योगिक क्षेत्रांतील सात विशेष अभ्यासक्रमांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून आदिवासी तरुणांना आधुनिक उद्योग क्षेत्राशी सुसंगत कौशल्ये प्राप्त करून रोजगारक्षम बनविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.यावेळी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक चंचल पाटील, सदन अधिकारी विजय गुण्ड, नविन, पृथ्वी, युएनडीपीचे प्रतिनिधी उज्ज्वल पहुरकर, उदयन मोहापात्रा व टीम, तसेच टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे अधिकारी श्रेयस पाटकर, राधेश्याम उपस्थित होते. या सहकार्य कराराचे संकल्पनात्मकरण आणि सुलभीकरण यूएनडीपी प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट (पीएमयू) यांच्या सहाय्याने करण्यात आले आहे.
१७०० कोटी प्रस्तावीत करण्याच्या पालकमंत्री शिंदे यांनी दिल्या सूचनापावसाळ्यापूर्वी ठाणे जिल्हा अलर्ट मोडवरठाणे : ठाणे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत सन २०२६ - २७ च्या वार्षिक योजनांना मंजुरी देण्यात आली असून सर्वसाधारण योजना ६६० कोटी, आदिवासी उपयोजना १४० कोटी, अनुसूचित जाती उपयोजना १०७ कोटी अशा तरतुदींसह सुमारे १७०० कोटी प्रस्तावीत करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री आता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. जिल्हा नियोजन मंडळाची आज बैठक पार पडल्यानंतर ते पत्रकाराची संवाद साधताना बोलत होते.जिल्ह्यातील सर्व विकासकामे नियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण पूर्ण झाली पाहिजेत आणि १०० टक्के निधी खर्च झाला पाहिजे. कोणताही विभाग हलगर्जीपणा करत असल्यास संबंधितांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला.तांत्रिक मान्यता, आराखडा तयार करणे, प्रस्ताव सादर करणे व निधी वेळेत खर्च करण्यावर भर देण्यात आला असून पीपीपी माध्यमातून होणाऱ्या कामांची विभागप्रमुखांनी प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता सुनिश्चित करावी असे निर्देश दिले.पावसाळ्यापूर्वी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून रस्तेदुरुस्ती, खड्डे भरणे, डांबरी पॅचवर्क मे अखेरपर्यंत पूर्ण करावे, नागरिकांना गैरसोय होऊ नये व अपघात टळावेत यासाठी खबरदारी घ्यावी असे आदेश देण्यात आले. धोकादायक इमारतींना क्लस्टर पुनर्विकासात प्राधान्य देण्यास सांगण्यात आले असून जिल्हाधिकारी, महापालिका, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यांच्यात समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या. भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नासाठी कायमस्वरूपी शेल्टर उभारणे, निर्बीजीकरण आणि ॲनिमल ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर विशेष लक्ष ठेवून साथीचे आजार टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क राहावी असे सांगण्यात आले तसेच सिव्हिल हॉस्पिटल लवकर सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात आले. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचे आदेश देण्यात आले.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यास सांगण्यात आले असून शेणखत स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, कुरण लागवड व नाविन्यपूर्ण शेती प्रयोगांना चालना द्यावी अशा सूचना शिंदे यांनी दिल्या.शाहापूर परिसरातील प्रगत शेती पद्धतींचा विस्तार करण्यावर भर देण्यात आला. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे अंतर्गत मेट्रोचा डीपीआर मंजूर झाला असून लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, वॉटर टॅक्सी, छेडा नगर ते गायमुख एलिव्हेटेड रस्ता, साकेत-कोलशेत-मीरा भाईंदर जोडणी, नाशिक रोड फ्लायओव्हर आदी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांशी समन्वय साधून खारेगाव पूल लवकर सुरू करण्यात येणार असून मेट्रो प्रकल्पातील अडचणी सोडवण्याचा पाठपुरावा सुरू आहे.पाणीपुरवठ्यासाठी धरणातून मीरा-भाईंदर व वसईला पाणी देऊन उर्वरित 100 एमएलडी पाणी ठाण्यासाठी मिळणार आहे तसेच काळू धरणाचे काम वेगाने सुरू असून पुनर्वसन व मोबदल्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. महिला पत्रकाराचा अपमान झाल्याच्या घटनेचा निषेध करत पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई महापौर निवडणुकीत महायुतीला मिळालेला कौल हा रस्ते, मेट्रो, कोस्टल रोडसह विकासकामांवरील विश्वास असल्याचा दावा त्यांनी केला. पावसाळ्यापूर्वी संपूर्ण ठाणे जिल्हा अलर्ट ठेवून नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व यंत्रणांना कामाला लावले असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित होते.
Tempest Advertising:भारतातील आघाडीची क्रिएटिव्ह जाहिरात एजन्सी असलेल्या ‘टेम्पेस्ट ॲडव्हर्टायझिंग’ने आपल्या सर्जनशीलतेची मोहोर पुन्हा एकदा उमटवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठित ‘बिग बँग अवॉर्ड्स २०२५’ मध्ये टेम्पेस्टने तीन महत्त्वाचे पुरस्कार जिंकून आपली यशस्वी घोडदौड कायम राखली आहे. शेतीपासून ते मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील ब्रँड्ससाठी प्रभावी आणि अर्थपूर्ण संवाद साधण्यात टेम्पेस्टने मिळवलेले हे यश जाहिरात क्षेत्रात कौतुकाचा […]
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच दिल्ली दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आधी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ‘चाय पे चर्चा’ झाल्यानंतर त्या पार्थ आणि जय पवार यांच्यासह संसद भवनात पोहोचल्या. दरम्यान, या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याचे तर्क लावले जात असताना, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्या रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाल्या. बुधवारी सकाळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पार्थ पवार, जय पवार, खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.संसदेतील पंतप्रधान कार्यालयात झालेल्या भेटीत पंतप्रधान मोदी आणि सुनेत्रा पवार यांच्यात सुमारे ४० मिनिटे चर्चा झाली, तर अमित शाह यांच्यासोबत जवळपास अर्धा तास संवाद झाला. उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडताना भाजप ठामपणे सोबत राहील, असा शब्द पंतप्रधानांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच अजित पवार यांच्या अकाली निधनाबद्दल त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.पंतप्रधान-गृहमंत्र्यांसोबत राजकीय चर्चा नाही - तटकरे- दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. “अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर अत्यंत कठीण परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. स्वतःच्या दुःखासोबत जनतेचे दुःख स्वीकारत पक्ष आणि राज्याच्या हितासाठी त्यांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी संवेदना व्यक्त केल्या,” असे तटकरे म्हणाले.- या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाली का, असा प्रश्न विचारला असता तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. ते म्हणाले, “आमच्या पक्षाच्या विलिनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही सामूहिक निर्णयाने अजित पवार यांच्या नेतृत्वात एनडीएमध्ये सहभागी झालो होतो. तो निर्णय कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एनडीएसोबत येण्याची तयारी दर्शविल्यास स्वागत कराल का, या प्रश्नावर “जर-तरवर बोलणे योग्य नाही,” असे उत्तर देत त्यांनी प्रत्येक पक्षाला आपली भूमिका ठरवण्याचा अधिकार असल्याचे नमूद केले.रोहित पवार यांची दिल्लीत पत्रकार परिषददरम्यान, सुनेत्रा पवार दिल्लीत असताना, रोहित पवार यांनीही दिल्ली गाठल्याने चर्चांना उधाण आले. बुधवारी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. “अजित पवारांच्या विमानप्रवासात शेवटच्या क्षणी काय घडले, हे शोधून काढण्याची गरज आहे. ट्रान्सपॉन्डर का बंद करण्यात आला? धावपट्टी क्रमांक ११वर उतरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न का करण्यात आला? जर विमान धावपट्टी २९वर उतरले असते तर कदाचित इतका मोठा अपघात झाला नसता”, असा दावा रोहित यांनी केला.
मुंबई : राज ठाकरे यांच्या पोस्टची दखल घ्यावी असे विशेष त्यात काही नाही. पण काही तरी घडत असताना.. आपल्या स्वभावाप्रमाणे स्वतःची दखल घेतली जावी, मी कसा यात नाही? आणि म्हणूनच तर ही पोस्ट लिहिली गेली नाही ना? असे वाटावे अशीच ती पोस्ट आहे. असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र स्वीकारण्याकरता आणि युनेस्को मुख्यालयात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे उभारण्यात आलेल्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी फ्रान्सला जाताना तसेच बर्लिन येथे होणाऱ्या जागतिक फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी सिनेमा घेऊन जात असताना, माझ्या लक्षात आले की, मराठी भाषा, महाराष्ट्रातील कला लोककला, लोक परंपरा, समृद्ध बोली भाषा, लोकसंस्कृती, लोकदैवते, महाराष्ट्राची आद्य व वंदनीय प्रतीके, जाज्वल्य इतिहास आणि अखंड परंपरा.... यांच्यासाठी काही करुन दाखवले का? की फक्तपोस्ट लिहून प्रसिद्धी मिळवणारे ही महाराष्ट्रातील नेते आणि पक्ष आहेत, याची जाणीव काही संवेदनशील मनांना करुन द्यावी म्हणून आज थोडे लिहूनच टाकावे असे ठरवले म्हणून हा अक्षरप्रपंच.आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या वर्षात देशभरात चालणाऱ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने मुंबईतल्या व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवतजी यांचे निमंत्रितांच्या नियोजित कार्यक्रमात व्याख्यान झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्षे नेमके काय काम करतोय, आमच्यासमोर उद्दिष्टे काय आहेत, देशाची आजची आवश्यकता काय आहे, देशाची मार्गक्रमणा कशी झाली पाहिजे, या विषयावरच्या व्याख्यानमालेचा होता.म्हणूनच सुरुवातीला हे स्पष्ट करावं लागेल की, मोहन भागवतजी यांनी ठळकपणे मांडले की, मातृभाषेतच शिक्षण दिले गेले पाहिजे, घरातदेखील मातृभाषेतच बोललं गेलं पाहिजे.आता राज ठाकरे तुम्ही खरेच मराठी भाषेचे प्रेमी असता तर तुम्ही या विषयावर संघाच्या या भूमिकेचे कौतुकच करायला हवे होते. पण.एवढा मनाचा मोठे पणा कुठून आणणार ? हाही प्रश्न आहे. खरं तर आज जगातील सर्वात मोठी तसेच शंभर वर्षे पूर्ण करणारी, देशसेवा करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना महाराष्ट्राच्या मराठी मातीत प्रथम सरसंघचालक महान, द्रष्टे केशव बळीराम हेडगेवार जी यांनी जन्माला घातली.आज त्या संस्थेची शंभरी साजरी होत असताना सरसंघचालक या आमच्या श्रध्देय जागी अत्यंत नम्र, विद्वान आणि वैचारिक श्रीमंती असलेले मोहन भागवत जी हे महाराष्ट्राचे मराठी मातीचे सुपुत्र विराजमान झाले आहेत तुम्ही त्यांचे कौतुक करावे एवढे मोठे नसलात तरी आदराने अभिमान बाळगावे एवढे तर दिलदार असायला काय हरकत आहे ?राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जन्मशताब्दी सुरु करतानाच तीन गोष्टी महत्त्वपूर्ण रित्या मांडल्या.1) आत्मचिंतन करणार2) संपूर्णतः समाजाला संपर्क करणार व आभार मानणार.3) पुन्हा एकदा देशाला समर्पित करण्याच्या भावनेने कामाला लागणार.आत्मचिंतन, संवाद आणि समर्पण या तिन्ही गोष्टी शताब्दी पूर्ण केल्यानंतर संघाचे देशभरात कार्यक्रम होत आहेत, त्यात कुठल्याही भाषेला, प्रांतवार रचनेला विरोध करणं आणि कोणताही प्रश्न उभा करणं येत नाही. तरीही प्रश्न उपस्थित केला असेल तर त्याचं उत्तर स्पष्ट आहे. संघ परिवार किंवा भारतीय जनता पक्ष नेहमीच मातृभाषेबद्दल आग्रही आणि महाराष्ट्रात मराठीबद्दल आग्रही आहेच.महाराष्ट्रात असो किंवा जगात असो, प्रत्येक मराठी माणूस मराठीतच बोलेल ज्याची मातृभाषा मराठी आहे. देशपातळीवर इंग्रजी नको तिच्या पेक्षा भारतीय भाषेत संवाद व्हावा, असा प्रयत्न असेल तर केवळ छिद्रान्वेशी वृत्तीने आपण त्याचं विश्लेषण करण्याच्या भानगडीत पडला नसतात तर बरं झालं असते.आता तुमच्या दृष्टीने रटाळ होणे याचा अर्थ काय ? कोणाच्या व्याख्यानाला आपण रटाळ म्हणताय? ज्यांच्या आशिर्वादाने आणि विचारधारेने जगभरातले मोठे संघटन उभं राहिलेलं आहे त्यांना?मोफत मनोरंजन होते म्हणून काही जाणांच्या सभांना लोक गर्दी करतात, टाळ्या आणि शिट्या वाजवून मनोरंजन करणाऱ्या कलाकाराला खूश ही करतात पण त्याला मते देत नाहीत. जनता किती हुशार आहे हे माहिती आहे ना? ताजेताजे जे घडलेय ते आठवते ना?या सगळ्या बाबतीमध्ये भाषावार प्रांतरचना आणि आमचे स्वत्व हेच आमचे मराठी आणि महाराष्ट्र आहे. म्हणून आता थेट प्रश्न तुम्हाला...१) सन २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडी (INDIA ) ज्यांचे नेतृत्व राहुल गांधी आणि परिवार करीत होते. त्या आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे तुम्ही समर्थन करीत सभा घेत होतात. ज्या काँग्रेसने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, असा आग्रह करीत आंदोलन करणाऱ्या हुतात्म्यांवर, मराठी माणसांवर गोळ्या झाडल्या, मराठी माणसाच्या छाताडावर गोळ्या झाडल्या त्या काँग्रेससोबत तुम्ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कसे गेलात? म्हणून तुमच्या हेतूबद्दल शंका आहे2) नुकत्याच झालेल्या राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांमध्ये आपण आपले बंधुराज उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन निवडणूक लढली. हीच उबाठा सेना मराठी माणसाच्या छातीत गोळ्या घालणाऱ्या काँग्रेसची तळी राखते आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस सोबत सत्तेत सहभागी झाली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान मराठी भाषेसाठी केलेले योगदान हे आपणाला ज्ञात नाही का मग जर हे ज्ञात होते तर मग आपल्या बंधू राजांना याबाबत कधी तुम्ही प्रश्न विचारलेत का ? म्हणून तुमच्या हेतू बद्दल आमच्या मनात शंका आहेविषय आमचा तर पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट करतो, आम्ही मराठीबद्दल आग्रहीच आहोत, आणि हिंदुत्वाबद्दल कट्टर आहोत. आम्हाला कुठल्याही प्रकारची पोस्ट लिहून हे सांगावे लागत नाही.पण केवळ आपण आपल्याच शहरात बेदखल झाल्यामुळे कुणीतरी दखल घेण्यासाठी एखादी सोशल मिडियावरील पोस्ट म्हणून फार मोठी कामगिरी केली असे वाटणाऱ्यांंच्या हातून आई भवानी देशासाठी, हिंदुत्वासाठी, मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी अधिक योग्य भरीव, सकारात्मक, सुयोग्य काम करुन घेईलच अशी प्रार्थना करतो.
Rahul Gandhi : “सततच्या पराभवांमुळे मनात द्वेष भरला”; भाजपचा राहुल गांधींना टोला
सततच्या पराभवांमुळे त्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या मनात द्वेष भरला आहे, असा पलटवार भाजपकडून करण्यात आला.
Tropical Storm Gezani : मादागास्करला गेझानी वादळाचा तडाखा; 9 जणांचा मृत्यू
उष्णकटिबंधिय गेझानी वादळाने मादागास्करमधील महत्वाचे बंदर तोमासिना शहराताला तडाखा (Tropical Storm Gezani) दिला असून घरे कोसळल्यामुळे किमान ९ जण ठार झाले आहेत.
माहिमजवळ रेल्वे मार्गावर घडली धक्कादायक घटना
मुंबई : माहिमजवळ रेल्वे मार्गावर धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने धावत्या लोकलमधून उडी मारली. लोकलमधून उडी मारणारी व्यक्ती शेजारच्या मार्गावरून वेगाने जात असलेल्या ट्रेन खाली आली. या अपघातात लोकलमधून उडी मारणाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस नियमानुसार पुढील कारवाई करणार असल्याचे समजते.लोकलमधून उडी मारणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत. प्रवाशाने लोकलमधून उडी मारण्याचे कारण अद्याप समजलेले नाही.मुंबई उपनगरीय रेल्वेवर दररोज सरासरी सहा जण अपघात किंवा आत्महत्येमुळे आपला जीव गमावत आहेत. जीआरपीच्या आकडेवारीनुसार २०२५ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेवर २२८७ प्रवाशांनी अपघात किंवा आत्महत्येमुळे आपला जीव गमावला आहे.
AUS vs IRE : टी-२० विश्वचषक २०२६ च्या १४ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आयर्लंडवर ६७ धावांनी मात करत आपल्या मोहिमेची दिमाखदार सुरुवात केली आहे.
CBSC Board : सीबीएसई बोर्डाचा निर्णय ! उत्तरपत्रिकांचे करणार ऑन-स्क्रीन मूल्यांकन
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSC Board) आपल्या परीक्षा प्रणालीत पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी २०२६ च्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १२ वीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आता पारंपारिक पद्धतीऐवजी 'ऑन-स्क्रीन मार्किंग' म्हणजेच डिजिटल पद्धतीने केले जाणार आहे.
Hardeep Singh Puri On Rahul Gandhi:
Hardeep Singh Puri On Rahul Gandhi:
•बांधकाम नकाशा हीच एन. ए. परवानगी•जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची संपली गरज•महसूलमंत्र्यांची जमीन महसूल कायद्यात महत्वाची सुधारणामुंबई : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. एन. ए. करताना आता नगर रचना विभाग आणि स्थानिक प्राधिकरणाने दिलेली बांधकाम नकाशा परवानगी हीच आता एन. ए. परवानगी असणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून स्वतंत्र बांधकाम परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून राजपत्र जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आली. आता वार्षिक अकृषक कर देखील रद्द करण्यात आला आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची गरज संपलीआतापर्यंत नागरिकांना नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम नकाशाला मंजूरी घेतल्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे अकृषक परवानगीसाठी चकरा माराव्या लागत होत्या. नव्या नियमानुसार, जर एखाद्या जमिनीचा वापर विकास आराखड्यानुसार अनुज्ञेय असेल, तर नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम परवानगी हीच 'अकृषक परवानगी' मानली जाईल. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची किंवा सनदेची गरज राहणार नाही.बँक कर्जासाठी सनदेची अट रद्दअनेक बँका कर्ज देताना अकृषक सनदेचा आग्रह धरतात. मात्र, शासनाने स्पष्ट केले आहे की, नियोजन प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यावर बँकांनी सनदेसाठी आग्रह धरू नये. जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश सर्व बँकांच्या निदर्शनास आणून द्यावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.जुन्या थकबाकीतून मुक्तताज्या नागरिकांचा अकृषक कर थकीत आहे, त्यांना दिलासा देताना शासनाने या सुधारणेच्या दिनांकापर्यंतचा थकीत कर वसूल करण्यापासून सूट दिली आहे. मात्र, ज्या जमिनी २००१ पूर्वी किंवा त्यानंतर बिनशेती झाल्या आहेत, त्यांच्या मालकांना या शासन निर्णयापासून एक वर्षाच्या आत विहित दराने एकरकमी अधिमूल्य भरावे लागेल.या नव्या नियमांबरोबरच बांधकाम परवानगीसाठी BPMS किंवा Auto DCR द्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल.बांधकाम परवानगी मिळताच महसूल विभागाच्या संगणकीय प्रणालीद्वारे ७/१२ उताऱ्यात आपोआप फेरफार नोंद घेतली जाणार आहे. केवळ बांधकाम परवानगी मिळाली म्हणून 'भोगवटादार वर्ग-२' (कमी श्रमाच्या जमिनी) च्या दर्जा मध्ये बदल होणार नाही; त्यांच्यासाठी आवश्यक असलेले नजराणा शुल्क भरावेच लागेल.एकवेळचा रुपांतरण दरदरवर्षी भरावा लागणारा अकृषक कर रद्द करून त्याऐवजी जमिनीच्या बाजारमूल्यानुसार टप्पा निहाय एकरकमी 'रुपांतरण अधिमूल्य' (Conversion Premium) आकारले जाईल. त्याचे दर खालीलप्रमाणे असतील.भूखंडाचे क्षेत्रफळ एकरकमी अधिमूल्य दर :१००० चौ.मी. पर्यंत - चालू बाजार मूल्याच्या ०.१०%१००१ ते ४००० चौ.मी. - चालू बाजार मूल्याच्या ०.२५%४००० चौ.मी. पेक्षा जास्त - चालू बाजार मूल्याच्या ०.५०%सर्वसामान्य जनतेला यामुळे दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मी हा निर्णय घेतला. यासाठी आवश्यक त्या सर्व सुधारणा महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत करण्यात आल्या. हिवाळी अधिवेशातच याबाबतची रूपरेषा ठरली होती. फडणवीस सरकार जनतेच्या कल्याणासाठी काम करते, याचे प्रत्यंतर देणारा हा निर्णय आहे. आता वार्षिक अकृषक कर देखील रद्द करण्यात आला आहे.
सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार : कामगार मंत्री आकाश फुंडकर
मुंबई : सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार असून, नियमावलीचा मसूदा तयार झाल्यानंतर कला क्षेत्रातील अभ्यासू व संबंधित घटकांकडून सूचना मागविण्यात येतील. प्राप्त सूचनांचा सकारात्मक विचार करून अंतिम नियमावली तयार केली जाईल, अशी माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली.कामगार मंत्री श्री. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कामगार संहिता (Labour Code) च्या अनुषंगाने सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.या बैठकीस कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुन्मोड, उपसचिव रोशनी पाटील, प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, पुनम ढिल्लो यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.सिने क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ व कामगारांच्या सामाजिक सुरक्षा, वेतन, विमा, कामाचे तास, कल्याणकारी योजना तसेच कामगार संहितेतील तरतुदींची अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सिने कलाकारांच्या हितासाठी स्वतंत्र नियमावली तयार करून त्यांना कायदेशीर संरक्षण देण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले की, नवीन कामगार संहितेच्या चौकटीत सिने क्षेत्रातील कलाकार व संबंधित कामगारांच्या हितासाठी स्पष्ट व प्रभावी नियमावली तयार करण्यात येईल. त्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.यावेळी Cintaa (सिंटा) सिने एंड टेलीविज़न आर्टिस्ट एसोसिएशन वतीने अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि पुनम ढिल्लो यांनी चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ, सहाय्यक व विविध विभागांतील कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या.बैठकीदरम्यान नियमावली संदर्भात सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
Swargate Metro Station : स्वारगेट मेट्रो हबला अजित पवारांचे नाव? रोहन सुरवसे पाटील
Swargate Metro Station : पुण्यातील स्वारगेट येथील मल्टी हब मेट्रो स्टेशनला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.
Success Story
Sanjay Raut : चंद्रपूरमधील गोंधळाला काँग्रेसच जबाबदार; संजय राऊतांची टीका
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असूनही सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मित्रपक्ष काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले.
युरोपमध्ये रंगणार मराठी नाट्यकलेचा जागर
मुंबई :मराठी रंगभूमी ही महाराष्ट्रातील नाट्यपरंपरेचा अत्यंत समृद्ध आणि महत्त्वाचा भाग आहे. भारतातील सर्वांत प्रभावी नाट्यचळवळींपैकी एक म्हणून मराठी रंगभूमीकडे पाहिले जाते. या महान परंपरेचा वारसा लाभलेल्या मराठी रंगभूमीचे पडसाद आता युरोपमध्येही उमटू लागले आहेत. याच नाट्यप्रेमाने आणि आपल्याला लाभलेल्या नाट्यकलेच्या समृद्ध परंपरेने प्रेरित होऊन ४ आणि ५ एप्रिल २०२६ रोजी नेदरलँड्स येथे युरोपमधील पहिली एकांकिका स्पर्धा अभिमंच थिएटरतर्फे आयोजित करण्यात येत आहे.या स्पर्धेसाठी इंग्लंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, बेल्जियम आणि नेदरलँड्समधूनही उत्तुंग प्रतिसाद मिळाला आहे. या २ दिवसांमध्ये तब्बल १४ एकांकांची मेजवानी नाट्यप्रेमींना अनुभवता येणार आहे. सर्व टीममध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून, सर्व कलाकारांनी उत्तमोत्तम सादरीकरण करण्यासाठी कंबर कसली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नाट्यप्रेमी माननीय विजय केंकरे यांच्यासोबत सुप्रसिद्ध अभिनेते संजय मोने हे या स्पर्धेच्या परीक्षकांची भूमिका बजावणार आहेत.या एकांकिका स्पर्धेविषयी बोलताना अभिमंच थिएटरचे संस्थापक मिलिंद चव्हाण, प्रसाद सावंत आणि अमोल कोर्डे म्हणाले की , परदेशात वास्तव्यास असलेला मराठी समाज आपल्या भाषा, संस्कृती आणि कलेशी घट्ट नाते जपत आहे. त्याचाच एक भाग म्हणून युरोपमध्ये मराठी नाट्यकलेचा जागर घडवून आणण्याचा प्रयत्न आम्ही अभिमंच थिएटरच्या माध्यमातून सातत्याने करत आहोत. एकांकिका स्पर्धा या नेहमीच नाट्यरसिकांसाठी तसेच होतकरू कलाकारांसाठी एक महत्त्वाच व्यासपीठ ठरल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या एकांकिकांचे आयोजन करण्यात आले आहे. अभिमंच गेली ७–८ वर्षे नाट्यकलेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक एकांकिका आणि दोन अंकांचे मराठी तसेच हिंदी नाट्यप्रयोग नेदरलँड्समध्ये अभिमंचने यशस्वीरित्या सादर केले आहेत, आणि नाट्यप्रेमींनी या प्रयोगांना नेहमीच भरघोस प्रतिसाद दिला आहे.स्पर्धेत विजयी ठरलेल्या पहिल्या तीन एकांकिकांना स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. त्याशिवाय सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा विविध गटातील सात विजेत्यांनाही पुरस्कार मिळणार आहे. मराठी रंगभूमीची परंपरा जपत, तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. यामुळे युरोपमधील नव्या पिढीला मराठी नाट्यकलेशी जोडण्याची संधी मिळणार असून, मराठी संस्कृतीचा ठसा अधिक ठळकपणे उमटणार आहे.
नागपूर : शिक्षण आणि परीक्षेचे वय असलेल्या तरुणांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. ११ वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला असून, यात एका १२ वीच्या विद्यार्थ्याचा मुख्य सहभाग असल्याचे समोर आले आहे. या घटनेच्या धक्क्याने आरोपीच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी आणि त्याच्या दोन मित्रांनी पीडित मुलीवर अत्याचार केला आणि या कृत्याचा व्हिडिओ चित्रीत केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांनी पीडितेचे वारंवार शोषण केले. अखेर पीडित मुलीने हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर या भीषण कृत्याचा पर्दाफाश झाला. सध्या १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा १२ वीचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी त्याला तातडीने अटक केल्यामुळे त्याला परीक्षेचा पेपर देता आला नाही. आपल्या मुलाने असे घृणास्पद कृत्य केल्याचे आणि त्याला अटक झाल्याचे समजताच त्याच्या वडिलांना जबर मानसिक धक्का बसला आणि त्यांना 'हार्ट अटॅक' आला.नंदनवनमध्ये ११ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचारनागपूरमध्ये नंदनवन इथे राहणाऱ्या एका ओळखीच्या तरुणाने अल्पवयीन तरुणीचा विश्वासघात करून तिच्यावर दोन मित्रांची मदत घेऊन सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. इतकंच काय तर त्या पीडितेला अत्याचारानंतर तुझा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी देऊन शोषण तिचं करण्यात आलं. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींना अटक केली आहे. पीडित तरुणी ११ वीत शिकत असून मुख्य आरोपी तिच्या ओळखीचा होता. तो गेल्या काही दिवसांपासून तिला अश्लील मेसेज करून भेटण्यासाठी दबाव टाकत होता. 'घरी सर्वजण आहेत' असे खोटे सांगून त्याने पीडितेला आपल्या घरी बोलावले. मात्र, तिथे आधीच त्याचे दोन मित्र दबा धरून बसले होते. पीडिता घरी पोहोचताच आरोपीने तिला खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हे घृणास्पद कृत्य सुरू असताना दोन्ही मित्रांनी त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची भीती दाखवून त्या दोघांनीही पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेमुळे पूर्णपणे हादरलेल्या पीडितेने चार दिवस प्रचंड मानसिक दडपणाखाली मौन पाळले होते. अखेर धीर एकवटून तिने कुटुंबीयांना आपबिती सांगितली. पीडितेच्या कुटुंबाला या घटनेची माहिती मिळताच कुटुंबाने नंदनवन पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली.पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तातडीने चक्र फिरवली आणि मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मा घटनेतील २ तरुण हे अल्पवयीन आहेत. मंगळवारी त्यांना अटक करण्यात आली. आता त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. पोलीस कोठडीत असल्याने बारावीला असलेल्या विद्यार्थ्याला आपला पेपर देता आला नाही. आपल्या मुलाच्या कृत्याची माहिती त्याच्या वडीलांना मिळताच त्यांना हार्ट अटॅक आला. त्यांनाही तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या प्रकरणात खरोखर व्हिडीओ बनवला गेला का याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यासाठी आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (Naravane Memoir Row) यांनी लिहिलेल्या अप्रकाशित पुस्तकाच्या कथित प्रसारणाबद्दल दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने बुधवारी पेंग्विन रँडम हाऊस इंडियाला नोटीस बजावली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
देशातील पहिला क्लायमेट वीक मुंबईत
मुंबई : हवामान बदलाच्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर भारतातील पहिला मुंबई क्लायमेट वीक (एमसीडब्ल्यू) १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून ग्लोबल साऊथ देशांसाठी हवामान नेतृत्वाचा नवा मंच उभारला जाणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या क्लायमेट वीकच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील शासन नेते , उद्योग क्षेत्रातील प्रमुख, हवामान तज्ज्ञ, विविध संस्था, युवक आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येणार आहेत. हा उपक्रम ‘प्रोजेक्ट मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केला असून, महाराष्ट्र शासन, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, ‘एमएमआरडीए’ आणि मुंबई महापालिका सहकार्य करणार आहे.जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे या क्लायमेट वीकचे मुख्य केंद्र (हब) उभारण्यात येणार असून, शहरभर महाविद्यालये, समुदाय व सांस्कृतिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांची ‘हब-अँड-स्पोक’ पद्धतीने आखणी करण्यात आली आहे. हवामानाशी निगडित प्रत्यक्ष उपाययोजना प्रदर्शित व विस्तार करण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती या उपक्रमाचे आयोजक प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी दिली. या उपक्रमाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबई क्लायमेट वीक भारताची हवामान विषयक कृतीशील भूमिका अधोरेखित करतो. शासन, उद्योग, वित्त, तज्ज्ञ आणि युवक यांना एकत्र आणून महाराष्ट्र स्वच्छ, सुरक्षित व शाश्वत भविष्य घडवण्यासाठी सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश याद्वारे जाईल.”प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी म्हणाले, “मुंबईची जिद्द आणि कल्पकता हवामान संकटांसमोर ठामपणे उभी राहील. नागरिकांच्या सहभागातून उभा राहणारा हा भारतातील पहिला व्यापक हवामान चळवळीचा प्रयोग ठरणार आहे.”विविध परिसंवाद, इनोव्हेशन चॅलेंज, युवक हरित नवकल्पना स्पर्धामुंबई क्लायमेट वीकच्या मुख्य हबमध्ये नेतृत्व संवाद, विविध परिसंवाद, इनोव्हेशन चॅलेंज, युवक हरित नवकल्पना स्पर्धा आणि उपाययोजना प्रदर्शन भरवले जाणार आहे. पहिल्या दिवशी प्रिन्स विल्यम यांच्या संकल्पनेतील अर्थशॉट प्राईज सादरीकरणाचा विशेष कार्यक्रम होणार असून, निसर्ग, अन्नप्रणाली व लोककेंद्रित उपायांवर भर असेल. या उपक्रमात अंतराळवीर राकेश शर्मा आणि शुभांशु शुक्ला विद्यार्थ्यांशी संवाद साधून विज्ञान, अवकाश आणि हवामान जबाबदारी यावर मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमाची मांडणी अन्नप्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरी शाश्वतता या तीन स्तंभांवर आधारित आहे. नवकल्पनांना चालना देण्यासाठी ‘एनएसई’च्या सहकार्याने इनोव्हेशन चॅलेंज आयोजित करण्यात आले असून अंतिम फेरीत निवडलेल्या कल्पनांना धोरणकर्ते व गुंतवणूकदारांसमोर सादरीकरणाची संधी मिळणार आहे.मुंबई शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक व्याख्याने, चित्रपट प्रदर्शन, कला-संस्कृती कार्यक्रम आणि नागरिक कार्यशाळांद्वारे हवामान कृती लोकाभिमुख करण्यात येणार आहे. प्रदर्शन क्षेत्रात स्टार्टअप, उद्योग, विद्यापीठे आणि स्वयंसेवी संस्था प्रत्यक्ष उपाययोजना मांडतील, असे आयोजकांनी कळविले आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक या कार्यक्रमाचा प्रमुख भागीदार असून डेलॉइट धोरणात्मक ज्ञान भागीदार आहे. टीआयएसएस व आयआयटी मुंबई शैक्षणिक भागीदार आहेत. या मंचातून नागरिकांना कविता, कथा, गीत आणि अनुभवांच्या माध्यमातून हवामान बदलावरील मते मांडण्याची संधी मिळणार आहे. युनिसेफच्या यु वाह उपक्रमाद्वारे युवक नेतृत्वाला चालना दिली जाणार आहे. या उपक्रमात 30 हून अधिक देशांतील प्रतिनिधी, केंद्र-राज्य शासनाचे प्रतिनिधी, वित्त संस्था, उद्योग, सामाजिक क्षेत्र व अकादमिक जगतातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.जागतिक स्तरावरील हिलरी क्लिंटन, बिल गेट्स, राजीव शाह (रॉकफेलर फाउंडेशन), आयएफसीचे इमाद फखुरी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, यांसारखे आंतरराष्ट्रीय मान्यवर या उपक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, उद्योग मंत्री पियूष गोयल यांसह विविध राज्यांचे नेते, उद्योग व वित्त क्षेत्रातून जमशेद गोदरेज, नादिर गोदरेज, अमित चंद्रा, व्ही. वैद्यनाथन, स्वयंसेवी संस्था व संशोधन क्षेत्रातून रोहिणी निलेकणी, सौम्या स्वामीनाथन, मृदुला रमेश आणि पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झा आणि भूमी पेडणेकर या उपक्रमात होणार आहेत.

30 C