दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २८ जानेवारी २०२६
पंचांगआज मिती माघ शुद्ध दशमी शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग ब्रह्मा. चंद्र राशी वृषभ भारतीय सौर ८ माघ शके १९४७. बुधवार दिनांक २८ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१३ मुंबईचा चंद्रोदय ०१.४५ ,मुंबईचा सूर्यास्त ०६.२९ मुंबईचा चंद्रास्त ०३.४० उद्याचीराहू काळ १२.५१ ते ०२.१५ , ९ नंतर चांगलादैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : व्यवसायिक नफा वाढेल.वृषभ : लोकसंग्रह वाढेल नवीन ओळखी होतील.मिथुन : नोकरीत व्यवसायात जबाबदार्या वाढतील.कर्क : जनमानसात सुसंवाद राहील.सिंह : महत्वाची कामे होतील.कन्या : लहान मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा.तूळ : अनुकूल घटना घडल्यामुळे उत्साहवाढेल.वृश्चिक : तरुण-तरुणींना अपेक्षीत संधी मिळतील.धनू : नोकरीत वरिष्ठांचा जाच सहन करावा लागेल.मकर : अनुकूल दिवस आहे.कुंभ : आर्थिक बाजू बळकट राहील.मीन : कुटुंबातील मुला मुलीं बरोबर सुसंवाद साधा.
सावंतवाडी तालुक्यात एक जिल्हा परिषद तर एक पंचायत समिती सदस्य बिनविरोध
शेर्ले पंचायत समिती गणातून भाजपचे महेश धुरी बिनविरोध,तालुक्यात तब्बल ४८ जणांनी अर्ज घेतले मागेसावंतवाडी : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ४८ जणांनी आपले अर्ज माघारी घेतले. यात जिल्हा परिषदेसाठी बांदा व पंचायत समितीसाठी शेर्ले बिनविरोध ठरल्याने जि.प. ८ व पंचायत समितीच्या १७ जागांवर लढत होणार आहे. यातील आंबोली व मळेवाड जि.प. तर, आंबोली, कोलगाव, विलवडे, इन्सुली, मळेवाड, न्हावेलीत शिवसेना व भाजपने एबी फॉर्म कायम ठेवल्याने मैत्रीपूर्ण लढत होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.यात जिल्हा परिषद ९ मतदारसंघातील बांदा जिल्हा परिषद मतदारसंघ बिनविरोध झाला. याठिकाणी भाजपचे प्रमोद कामत बिनविरोध ठरले. तर माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातून ३ अपक्षांनी माघार घेतल्याने भाजपच्या सुप्रिया रविंद्र मडगावकर विरुद्ध अपक्ष शिवानी नाईक यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून मंगेश तळवणेकर यांच्यासह ३ अपक्षांनी माघार घेतली. यामुळे भाजपचे महेश सारंग विरूद्ध भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा यांच्यात लढत होणार आहे. माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून गुणाजी गावडे व चंद्रकांत कुबल यांनी अर्ज माघारी घेतल्याने भाजपचे विक्रांत सावंत विरुद्ध उबाठा शिवसेनेचे दिनेश सावंत यांच्यात थेट लढत होणार आहे. बहुचर्चित आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीतील घटक पक्ष भाजप विरुद्ध शिवसेना आमनेसामने आलेत. दोन्ही पक्षांनी एबी फॉर्म कायम ठेवल्याने येथे महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. शिवसेनेच्या सुप्रिया गावडेंच्या विरोधात भाजपच्या शोभा गावडेंनी दंड थोपटले आहेत.तळवडे मतदारसंघातून तब्बल ६ अपक्षांनी माघार घेतली. भाजपच्या बंडखोर प्रमोद गावडेंनी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकाणातून बाजूला होण्याचे संकेत देत लढतीतून माघार घेतली. त्यामुळे या ठिकाणी भाजपचे संदीप गावडे, उबाठाचे रूपेश राऊळ यांच्यासह भाजपचे बंडखोर अपक्ष गंगाराम ऊर्फ अमेय पै यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. इन्सुलीत उबाठाच्या फिलीप रॉड्रिग्ज, माजी सभापती मानसी धुरी अशा तिघांनी माघार घेतली. यामुळे शिवसेनेचे झेवियर फर्नांडिस, अपक्ष नितिन राऊळ व भाजपचे मंडळ अध्यक्ष तथा बंडखोर अपक्ष उमेदवार स्वागत नाटेकर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून एका अपक्षाने माघार घेतली असून प्रियांका नारोजी शिवसेना, भाजपच्या अपर्णा सातोसकर व अपक्ष सानिका शेवडे यांच्यात लढत होणार आहे. महायुतीत या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातून अमेय आरोंदेकर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे शिवसेनेचे सुदन कवठणकर यांच्यासह भाजपच्या बंडखोर माजी सभापती शर्वाणी गांवकर व अपक्ष सिद्धेश नाईक यांच्यात थेट लढत होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल २२ जाणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर ९ पैकी लढत होणाऱ्या ८ जिल्हा परिषद मतदारसंघातून २० जण आपल नशीब आजमावत आहेत.
लांजा (संतोष कोत्रे) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या २७ जानेवारी रोजी अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या तेरापैकी चार तर पंचायत समितीच्या पाच उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी ९ तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात राहिले.लांजा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणासाठी होत असलेल्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ जागांसाठी दाखल केलेले ४४ पैकी सर्वच्या सर्व अर्ज हे छाननीमध्ये वैध ठरले होते. जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी यापूर्वी शिवसेना भाजपा युतीकडून ४, शिवसेना उबाठा पक्षाकडून ६, रिपाई पक्षाकडून १, बसपा १, काँग्रेस १ असे एकूण १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या आठ जागांसाठी शिवसेना भाजप युती ८, उबाठा ८, काँग्रेसकडून ३, मनसे १, रिपाई १, बसपा ४, वंचित १ आणि अपक्ष पाच असे एकूण ३१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मंगळवारी अखेरच्या दिवशी दाखल असलेल्या जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठीच्या १३ पैकी चार उमेदवारांनी उमेदवार अर्ज मागे घेतले. तसेच पंचायत समितीच्या ३१ उमेदवारांपैकी पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी ९ तर पंचायत समितीच्या ८ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे-आसगे जि.प. गट - अनन्या राजेशिर्के (उबाठा), मनिषा लाखण (शिवसेना), भांबेड जि.प. गट विनिता गांगण (शिवसेना), अचला विश्वासराव (उबाठा). साटवली जि.प.गट लीला घडशी (शिवसेना), मनिषा जाधव (काँग्रेस), गवाणे जि.प. गट- आनंद कांबळे( बसपा), चेतन दळवी (उबाठा) आणि संतोष रेवाळे (शिवसेना).त्याचप्रमाणे पंचायत समिती गणासाठी रिंगणातील उमेदवार पुढीलप्रमाणे- आसगे पंचायत समिती- मानसी आंबेकर (शिवसेना), श्रावणी कांबळे (बसपा), आसावरी मांडवकर (उबाठा). वेरवली खुर्द पंचायत समिती - साक्षी चव्हाण (शिवसेना), निलिमा जाधव (उबाठा) आणि मानसी पवार (अपक्ष), प्रभानवल्ली पंचायत समिती गण- आनंद कांबळे (बसपा), राजेंद्र घडशी (उबाठा), उमेश पत्की (शिवसेना) आणि संकेत घाग (अपक्ष). भांबेड पंचायत समिती गण- शैलेश खामकर (भाजपा), किरण रेवाळे (मनसे), युवराज हांदे (उबाठा) आणि सचिन बेर्डे (अपक्ष), वाकेड पंचायत समिती गण- रसिका मेस्त्री (शिवसेना) दक्षता राजापकर (उबाठा). साटवली पंचायत समिती गण- आदेश आंबोळकर (शिवसेना), रमेश कदम ( उबाठा) आणि उज्ज्वल पवार (बसपा). गवाणे पंचायत समिती गण- दिपाली साळवी (शिवसेना) आणि पायल साळवी (उबाठा), खानवली पंचायत समिती गण- चंद्रकांत गीतये (बसपा), प्रथमेश बोडेकर (काँग्रेस), लक्ष्मण मोर्ये (उबाठा), यशवंत वाकडे (शिवसेना) आणि संजय रेवाळे (अपक्ष). याप्रमाणे उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.पेंडखळे पंचायत समितीचे अपक्ष उमेदवार प्रफुल्ल सुर्वे यांची माघार; महायुतीला पाठिंबारत्नागिरी जिल्ह्यात भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी यांची महायुती झाल्याने पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार तसेच आ. प्रसाद लाड, आ. किरण सामंत यांच्या सूचनेनुसार व ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल करंगुटकर, जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस स्वप्नील गोठणकर याच्या विनंतीस मान देऊन पेंडखळे पंचायत समिती गणातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रफुल्ल सुर्वे यांनी मंगळवारी उमेदवार अर्ज मागे घेतला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच आपण आपल्या सहकाऱ्यांसह मतदार संघात मतदारांचा अभिप्राय घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी मतदार संघातील मतदारांनी मागील निवडणुकीत आमच्याकडून प्रयत्न कमी पडले याची आठवण करून देत यावेळी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली व तुम्ही निवडणूक लढवा, असा आग्रह धरला. माझ्या मतदार संघातील लोकांचा आग्रह व प्रतिसाद पाहून त्यांच्या विनंतीला मान देत मी मतदार संघाच्या विकासासाठी या पंचायत समिती गणातुन अपक्ष उमेदवारी दाखल केला होता. महायुतीचा धर्म पाळत आपण माघार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
BIS's new standards diamond:या मानकाद्वारे नैसर्गिक हिरे आणि प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेले हिरे यांच्यात ठोस फरक स्पष्ट करण्यात आला आहे.
India-EU FTA: कापड उद्योगाला मोठा दिलासा; युरोपात 0% शुल्कावर निर्यातीची संधी
India-EU FTA: भारतातील कापड व तयार कपड्यांना युरोपात आता 0% आयात शुल्क लागेल.
Maharashtra Rain Update : राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; ढगाळ हवामानामुळे थंडी ओसरली
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण निर्माण झाले असून १३ जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Mercedes-Benz: भारत–युरोप मुक्त व्यापार करारामुळे वाहन क्षेत्रातील तंत्रज्ञान विकासाला चालना
Mercedes-Benz: दरम्यान हा करार झाल्यानंतर युरोपातील कंपन्यांच्या भारतातील वाहनाची दरकपात होईल का याबाबत त्यांनी नकारात्मक उत्तर दिले.
India’s growth rate: भारताचा विकासदर 7.4% पार जाण्याचे संकेत
India's growth rate : सरलेल्या 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये भारताचा विकासदर 6.3 ते 6.8% इतका राहील असे भाकीत करण्यात आले आहे.
Embraer-Adani sign MoU: भारतातच नागरी विमाने तयार होणार; अदानी–एम्ब्रेअर संयुक्त प्रकल्पाला सुरुवात
Embraer-Adani sign MoU:
Night sleep problems : रात्री चांगली झोप मिळत नाही? ‘हे’जबरदस्त ड्रिंक एकदा प्याच, मूड होईल….
झोप आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पुरेशी झोप झाली नाही तर आपल्या आरोग्याचे अनेक प्रश्न उभे राहतात.
Rajnath Singh : संरक्षण मंत्र्यांनी घेतली युरोपियन संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आज नवी दिल्ली येथे युरोपियन युनियन आयोगाच्या उच्च प्रतिनिधी/उपाध्यक्ष काजा कल्लास यांच्यासमवेत एक बैठक घेतली. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी (Rajnath Singh) विविध द्विपक्षीय सुरक्षा आणि संरक्षण मुद्द्यांवर चर्चा केली.
राजापुरात जि.प. गटातून चार जणांची तर पंचायत समिती गणातुन १६ जणांची माघार
राजापूर : :राजापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरीता मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी पंचायत समिताच्या १२ गणातून १६ उमेदवारांनी तर जिल्हा परिषदाच्या ६ गटातून चार उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. जुवाठी जि.प. गटातुन दीपक बेंद्रे यांनी तर धोपेश्वर पंचायत समिती गणातुन अरविंद लांजेकर यांनी आमदार निलेश राणे व आमदार किरण सामंत यांच्या विनंतीला मान देत आपले अर्ज मागे घेतले आहेत.राजापूर तालुक्यात वडदहसोळ, जुवाठी, धोपेश्वर, साखरीनाटे व कातळी या सहा जिल्हा परिषद गट व वडदहसोळ, रायपाटण, तळवडे, ताम्हाणे, केळवली, जुवाठी, धोपेश्वर, पेंडखळे, नाटे, साखरीनाटे, अणसुरे व कातळी या बारा पंचायत समिती गणाकरीता निवडणूक होत आहे. या निवडणुकीकरीता जिल्हा परिषदाया सहा गटांसाठी १९ तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ५२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. या अर्जांची छाननी होऊन जिल्हा परिषद गणातील १७ अर्ज वैध तर पंचायत समिती गणातील ४९ अर्ज वैध ठरविण्यात आले होते.दरम्यान,उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषद वडदहसोळ गटातून संदिप कोलते, जुवाठी गटातून दीपक बेंद्रे, अनाजी गोटम तर साखरीनाटे गटातून श्वेता कोठारकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता वडदहसोळ जिल्हा परिषद गटातून राजेश चव्हाण (उबाठा ),प्रतीक मटकर (शिवसेना), तळवडे गटातून समिक्षा चव्हाण (उबाठा), सिध्दाली मोरे (शिवसेना), जुवाठी गटातून दिनेश जैतापकर (उबाठा), रमेश सूद (शिवसेना), धोपेश्वर गणातून प्रकाश कुवळेकर (शिवसेना),अभिजीत तेली (उबाठा),साखरीनाटे गटातून कोमल नवाळे (शिवसेना), नलिनी शेलार (उबाठा ), कातळी गटातून सोनाली ठुकरूल (शिवसेना), लक्ष्मी शिवलकर (उबाठा),सावित्री कणेरी (अपक्ष) यांच्यामध्ये लढत होणार आहे.तालुक्यातील १२ पंचायत समिती गणातून तब्बल १७ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामध्ये वडदहसोळ - सुनील म्हादये, अनिल गुरव, रायपाटण - शंकर पटकारे, संदिप कोलते, तळवडे - स्नेहा नारकर, ताम्हाणे-मधुरा सुतार, केळवली - वैष्णवी कुळये, पभावती कानडे, धोपेश्वर - अरविंद लांजेकर, विलास गुरव, पेंडखळे - सुनील जठार, प्रफुल्ल सुर्वे, साखरीनाटे - आश्विनी शेगुलकर, कातळी - अक्षयकुमार कार्शिंगकर, सुहास कुवरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.त्यामुळे आता वडदहसोळ गणातून विनोद शिंदे (उबाठा), राजेश पवार (मनसे), गौतम जाधव (शिवसेना), रायपाटण गणातून उमेश पराडकर (शिवसेना), विश्वनाथ लाड (उबाठा), तळवडे गटातून भामिनी सुतार (उबाठा), अपेक्षा मासये (शिवसेना), ताम्हाणे गणातून समिक्षा वाफेलकर (शिवसेना), योगी डांगे (उबाठा),केळवली गणातून भाग्यश्री लाड (शिवसेना), छाया कोकाटे (उबाठा), जुवाठी गणातून प्रकाश भिवंदे (अपक्ष), दिवाकर मयेकर (उबाठा), प्रसाद मोहरकर (शिवसेना), धोपेश्वर गणातून अभिजीत गुरव (भाजपा), कृष्णाजी नागरेकर (उबाठा), सिध्देश मराठे (काँग्रेस), योगेश नकाशे (अपक्ष), पेंडखळे गणातून राजेश गुरव (शिवसेना), गणेश बाईंग (उबाठा ), पणाली माळी (अपक्ष), नाटे गणातून सुवर्णा बांदकर (भाजपा), नमिता नागले (उबाठा), नंदिनी कदम (अपक्ष), साखरीनाटे गणातून अलमिनाब म्हसकर (काँग्रेस), स्पृहा गुरव (शिवसेना), अणसुरे गणातून दिपाली मेढेकर (उबाठा), जान्हवी गावकर (शिवसेना), कातळी गणातून पंढरीनाथ मयेकर (शिवसेना), अजय कार्शिंगकर (उबाठा) यांच्यामध्ये लढत होणार आहे.मांडकी गणातून माघार घेत अपक्ष उमेदवार प्रमोद खेडेकर यांचा शिवसेनेत प्रवेशजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या धामधुमीत मंगळवारी मांडकी पंचायत समिती गणाचे अपक्ष उमेदवार प्रमोद खेडेकर यांनी माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून थेट शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. मांडकी गणातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेऊन सावर्डे गटातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय होऊ, असे खेडेकर यांनी यावेळी सांगितले. सावर्डे जिल्हा परिषद गटातील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. या गटात शिवसेकडून माजी सभापती धनश्री शिंदे तर राष्ट्रवादीकडून आ. शेखर निकम यांच्या पत्नी माजी सभापती पूजा निकम आमने सामने आहेत. दोन माजी सभापतींमधील ही लढत चांगलीच लक्षवेधी ठरते आहे. तर सावर्डे पं.स.गणातून माजी उपसभापती युवराज राजेशिर्के तर मांडकी गणातून विद्यमान सरपंच अनंत खांबे लढत आहेत. शिवसेना उपनेते माजी आ. सदानंद चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारांच्या भेटी घेत त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा धडाका लावला. अनंत खांबे यांच्यासारख्या एका होतकरू कार्यकर्त्यांच्या विजयाचे शिल्पकार होण्याची सदानंद चव्हाण यांनी केलेली विनंती मान्य करून प्रमोद खेडेकर यांनी सदानंद यांच्या नेतृत्वाखाली थेट शिवसेनेत जाहीर प्रवेश केला व मांडकी गणातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांची निवडणूक रणनिती यशस्वी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये ४२ जागांसाठी निवडणूक; ११६ जणांची माघार, ११५ उमेदवार रिंगणातजिल्ह्यातील ८ पंचायत समितीमध्ये ८३ जगांसाठी निवडणूक, १५४ जणांचची माघार, ३५९ उमेदवार रिंगणातसिंधुनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी आणि पंचायत समितीच्या १०० जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक होत असून होत असून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मंगळवारी अखेरच्या दिवशी ११६ एवढ्या जिल्हा परिषद तर १५४ एवढ्या पंचायत समिती सदस्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. या निवडणुकीच्या पूर्वीच भारतीय जनता पक्षाने करिष्मा केला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समिती सदस्य बिनविरोध करण्यात यश मिळाले तर शिंदे गटाचा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यामध्ये प्रत्येकी एक सदस्य बिनविरोध झाला आहे.तब्बल नऊ वर्षानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठही पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे तर सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मंगळवार २८ जानेवारी अंतिम तारीख होती.या दिवसापर्यंत जिल्हा परिषदेसाठीच्या एकूण पन्नास जागांसाठी पात्र ठरलेल्या २३१उमेदवारांपैकी ११६ एवढ्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत आणि पंचायत समित्यांसाठी वैध ३९८ पैकी १५४ एवढ्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ५० जागांपैकी ८जागा बिनविरोध होऊन शिल्लक राहिलेल्या ४२ जागांसाठी ११५ एवढे उमेदवार रिंगणात राहिले आहेत तर पंचायत समितीच्या एकूण शंभर जागांपैकी १७ जागा बिनविरोध झाल्याने ८३ जागांसाठी २४४ एवढे उमेदवार रिंगणात आहेत ही सर्व स्थिती पाहता काही ठराविक मतदारसंघ वगळता बाकी सर्व ठिकाणी दुहेरी लढत निश्चित झाली आहे. आता या दुहेरी लढतीमध्ये मतदार कोणाला पसंती दाखवतात हे ७ फेब्रुवारीलाच समजणार आहे. मात्र, निवडणूक होण्यापूर्वीच महायुतीने एकूण १५० उमेदवारांपैकी २५ उमेदवार बिनविरोध निवडून आणत आपली ताकद दाखवली आहे.पालकमंत्री नितेश राणे यांची निवडणूक रणनिती५० सदस्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे ७ सदस्य तर शिवसेनेचा ( शिंदे) एक असे जिल्हा परिषदेत एकूण ८ उमदेवार बिनविरोध झाले. तर शंभर पंचायत समिती सदस्यांमधून भाजपचे १६ सदस्य बिनविरोध झाले आहेत आणि शिंदे शिवसेनेचा एक सदस्य बिनविरोध असे एकूण १७ सदस्य बिनविरोध झालेला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नियोजनबद्ध निवडणूक रणनीतीमुळे सर्वाधिक जागा बिनविरोध झाल्या आहेत.बिनविरोध झालेल्या जिल्हा परिषद सिंधुदुर्ग( बिनविरोध )१) खारेपाटण; प्राची इस्वलकर(भाजप)२)बांदा; प्रमोद कामत (भाजप)३)जाणवली; रुहिता राजेश तांबे ( शिंदे शिवसेना)४)पडेल ;सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)५)बापर्डे ;अवनी अमोल तेली (भाजप)६) पोंगुर्ले; अनुराधा महेश नारकर (भाजप)७)किंजवडे-सावी गंगाराम लोके (भाजप)८) कोळपे; प्रमोद पुंडलिक रावराणे (भाजप)पंचायत समिती कणकवली( ६ बिनविरोध)१)वरवडे ; सोनू सावंत (भाजप)२)नांदगाव; हर्षदा हनुमंत वाळके (भाजप)३) जाणवली महेश्वरी महेश चव्हाण (भाजप)४) बिडवाडी; संजना संतोष राणे (भाजप)५) हरकुळ बुद्रुक; दिव्या दिनकर पेडणेकर (भाजप)६) नाटळ ; सायली संजय कृपाळ (भाजप)देवगड तालुक्यातील पंचायत समिती(६ बिनविरोध)१)पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)२)नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप)३)बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)४) फणसगाव - समृद्धी संतोष चव्हाण (भाजप)५) शिरगाव - शितल सुरेश तावडे (भाजप)६) कोटकामते -ऋतुजा राकेश खाजनवाडकर (भाजप)पंचायत समिती वैभववाडी( बिनविरोध)कोकिसरे; सौ.साधना सुधीर नकाशे (भाजप)पंचायत समिती वेंगुर्ले (बिनविरोध)आसोली; संकेत धुरी (भाजप)मालवण पंचायत समिती ( बिनविरोध)अडवली मालडी; सीमा सतीश परुळेकर (भाजप)सावंतवाडी पंचायत समिती (बिनविरोध)शेरले; महेश धुरी (भाजप)दोडामार्ग पंचायत समिती (बिनविरोध)कोलझर; गणेश प्रसाद गवस (शिंदे सेना)
वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपची अधिकृत उमेदवारी मागे घेतली. भाजपचे सच्चा कार्यकर्ता या नात्याने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचे काम करण्यासाठी आपण खासदार नारायण राणे यांच्या आदेश स्वीकारले असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सांगितले. वेंगुर्ले तालुक्यात आडेली जिल्हा परिषद मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष होते. या मतदारसंघात एकूण दहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मनीष दळवी यांच्यासह आप्पा गावडे,विष्णू खानोलकर,ललितकुमार ठाकूर, जनार्दन कुडाळकर,ओंकार नाईक व नित्यानंद शेणई यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. दरम्यान या ठिकाणी आता समिधा नाईक, उबाठाचे विजय नाईक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सखाराम उर्फ दादा सारंग यांच्यात लढत होणार आहे.
Union Budget 2026–27: हलवा समारंभ संपन्न, 1 फेब्रुवारीला डिजिटल अर्थसंकल्प सादर होणार
Union Budget 2026–27: चा अर्थसंकल्प बनविण्याची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे.
School: शिरोली बुद्रुकच्या न्यू इंग्लिश स्कूलला राज्यस्तरीय ‘पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार’
School: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शिरोली विद्यालयाचा गौरव; संतोष देवकुळे यांनाही उत्कृष्ट उपक्रम पुरस्कार
पनवेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत इ गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल २६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाला. यामध्ये पनवेल महानगरपालिकेचे बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. राज्यातल्या एकूण २९ महानगरपालिकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता. नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई अश्या मोठ्या व अनुभवी महानगरपालिका स्पर्धेत असताना पनवेल महानगरपालिकेने आपला झेंडा फडकवला असून याबाबत पनवेलचे विशेष कौतुक होत आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या नेतृत्वात परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे व संगणक विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या टीमने अथक मेहनत करीत हा बहुमान पटकावला. पनवेल महानगरपालिकेने यापूर्वीही १०० दिवसांचा प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमामध्ये उत्तम कामगिरी बजावत तिसरा क्रमांक पटकावला होता.इ गव्हर्नन्स सुधारणा१५० दिवसांच्या इ गव्हर्नन्स सुधारणामध्ये महानगरपालिकेचे संकेतस्थळ वापरण्यास सुलभ, सुरक्षित, अद्ययावत असणे, महानगरपालिकेचे डॅशबोर्ड विकसित करणे, आपले सरकार अंतर्गत नागरिकांना विहित वेळेत सुलभतेने सेवा पुरवणे, कार्यालयात ई ऑफिसचा प्रभावी वापर करणे, व्हाॅटस अप चॅटबोटचा वापर करणे, एआयचा वापर करणे, जीआरएसचा वापर करणे अशा घटकांचा समावेश होता. आयुक्त मंगेश चितळे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यावर लगेचच कार्यालयात ई ऑफिस सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे आयुक्तांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या 'पनवेल कनेक्ट ॲप' द्वारे नागरिकांना सुलभ सेवा प्रदान करता आल्या. याचा मोठ्या प्रमाणात फायदा या स्पर्धेसाठी झाला. या सर्व घटकांचे सादरीकरण दिनांक १० जानेवारी रोजी महानगरपालिकेने सादर केले होते. या स्पर्धेचे मूल्यांकन क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया (Quality Council Of India) (QCI) या राष्ट्रीय संस्थेने पारदर्शकपणे केले होते. तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांची प्रेरणा व आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त (संगणक) स्वरूप खारगे यांच्या नेतृत्वाखाली विभागप्रमुख वर्षा पालवे व कर्मचारी यांनी या यशासाठी विशेष मेहनत घेतली
मराठी न शिकविणाऱ्या शाळांची होणार तपासणी
अहवाल सादर करण्याचे शिक्षण आयुक्तांना निर्देशमुंबई : महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे अनिवार्य असतानाही आयसीएसई, सीबीएसई आणि आयबी बोर्डाच्या शाळांसह काही खासगी शाळांमध्ये त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यासंदर्भात मराठी न शिकविणाऱ्या शाळांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला केली होती. याची गंभीर दखल घेत अशा शाळांबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्यापन सक्तीचे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्य सरकारने यासंदर्भातील अधिसूचनाही जारी केली होती. या अधिसूचनेच्या आधारे शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी करीत सर्व शाळांमध्ये याची अंमलबजावणी करण्याची सूचनाही केल्या. मात्र त्याकडे अनेक शाळांचे दुर्लक्ष सुरु असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्य सरकारला निवेदन देत याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली होती. या निवेदनाची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तालय कार्यालयाला यासंदर्भात त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मराठी भाषा न शिकविणाऱ्या शाळांची तपासणी करून त्यासंदर्भातील स्वयंस्पष्ट अहवाल राज्य सरकारला सादर करावा, असे निर्देश शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहेत.
परळी वैजनाथमध्ये १३ फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन
मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे तेरा ते पंधरा फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचे' आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये देशभरातील विविध प्रजातीच्या एक हजाराहून अधिक पशू प्रदर्शन होणार असून प्रदर्शनाची तयारी वेगात सुरू आहे.या प्रदर्शनात पशुपालकांना गायी, म्हशी, घोडे, शेळ्या-मेंढ्या आणि विविध पक्ष्यांच्या दर्जेदार प्रजाती पाहायला मिळतील. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशातील प्रगतशील पशुपालक व शेतकरी या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. पशुपालकांना आधुनिक पशुपालन, आहार व्यवस्थापन आणि आरोग्याविषयी सविस्तर माहिती या माध्यमातून मिळणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुसंवर्धन विभागाचे सचिव (पदुम) डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे नियोजन प्रभावीपणे करण्यात येत आहे. परळी वैजनाथ येथे प्रदर्शनासाठी भव्य मैदान व पशुधनासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून पशुपालकांना पशुसंवर्धनाविषयीची संकीर्ण व अद्ययावत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होईल. याचा फायदा पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी होईल, असा विश्वास पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी व्यक्त केला.नवीन तंत्रज्ञान व दर्जेदार पशुधनाची माहिती घेण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. बीड जिल्ह्यासह राज्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी या तीन दिवसीय प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राज्यातील आयटीआयमध्ये पीएम–सेतू योजना राबविणार
मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे पीएम सेतू योजनेंतर्गत आधुनिकीकरण करण्याच्या योजनेला मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कुशल मनुष्य़बळाची मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी पीएम सेतू योजनेतून आयटीआयचे आधुनिकीकरण करण्याची योजना आहे. या योजनेच्या पहिल्या टप्पात नागपूर, छत्रपती संभाजी नगर आणि पुणे येथील आयटीआयचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी हब अँड स्पोक प्रारूप विकसित केले जाणार आहे.कंत्राटदारांच्या थकीत बिलांसाठी नवी यंत्रणासार्वजनिक बांधकाम विभागामधील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक, कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ट्रेड प्लँटफाँर्मचा अवलंब करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील सर्वच विभागांनी या यंत्रणेचा अवलंब करावा. प्रत्येक विभागाने आपल्या विभागाच्य़ा कार्यपध्दतीशी आणि कामकाजाच्या आवश्यकतेनुसार आदर्श कार्य प्रणाली निश्चित (एसओपी) करावी. त्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.शत्रू मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क माफ करणारशत्रू मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क प्रथम नोंदणी करताना माफ करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यात एकूण ४२८ शत्रू मालमत्ता आहेत. त्यापैकी छत्रपती संभाजी नगर २, जालना २, मुंबई ६२, मुंबई उपनगर १७७, नागपूर ६, पालघर ७७, पुणे ४, रत्नागिरी ११, सिंधुदुर्ग १, ठाणे येथे ८६ मालमत्तांचा समावेश आहे. युद्धकाळात भारत सोडून शत्रू देशात स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या या मालमत्ता आहेत. सेपीकडून अशा प्रकारच्या मालमत्तांची विक्री करण्यासाठी लिलाव करण्यात येतो. मात्र या लिलावांस कमी प्रतिसाद मिळतो. सेपीव्दारे विक्री प्रमाणपत्र जारी केल्यानंतर मालमत्तेच्या पहिल्या नोंदणीवेळी मुद्रांक शुल्क माफ केल्यास शत्रू मालमत्ता खरेदीचा खर्च कमी होऊन खरेदीस प्रतिसाद मिळेल.शासकीय जमिनीच्या भाडेपट्टीच्या कालावधीत वाढविविध समाजोपयोगी कारणांसाठी शासकीय जमीन ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येतात. त्यांचा कालावधी पुढे ४९ वर्षांपर्यंत वाढवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. शासनाच्या विविध प्रशासकीय विभागाच्या मालकीच्या अथवा महसूल विभागाने विशिष्ट प्रयोजनासाठी त्या विभागाकडे हस्तांतरीत केलेल्या तसेच त्यांच्या अख्यत्यारितील महामंडळ, मंडळ, प्राधिकरणे यांच्या मालकीच्या अथवा हस्तांतरित केलेल्या शासकीय जमिनी महामंडळ, मंडळ, प्राधिकरणे यांच्या उत्पन्न वाढीसाठी विविध व्यावसायिक प्रयोजनास्तव विविध संस्थांना ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्यांवर दिल्या जात होत्या. अशा जमिनी आता आवश्यकतेनुसार प्रथमतः जास्तीत जास्त ४९ वर्षापर्यंत व त्यानंतर कोणत्याही अटी व शर्तीचे उल्लंघन झालेले नसल्यास, संबंधित विभागाला आवश्यकतेनुसार या भाडेपट्ट्याचे पुन्हा एकवेळ जास्तीत जास्त ४९ वर्षांच्या मर्यादेत नुतनीकरण करुन, योग्य तो भाडेपट्टा आकारुन जमीन भाडेपट्ट्याने देता येतील.
वांद्र्यात वाहतुकीची गर्दी टाळण्यासाठी पादचाऱ्यांना स्कायवॉकचा पर्याय
मुंबई : वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील वेड्या वाकड्या उभ्या केलेल्या रिक्षा, कचऱ्याचे साम्राज्य तसेच चालण्यास योग्य पदपाथ नसल्याने एकमेकांवर आदळत आपटत चालावे लागते. त्यामुळे रिक्षाशिवाय पर्याय नसल्याने चार पैसे खर्च करतानाच वाहतूक कोंडीत अधिक तास मोजावे लागण्याची वेळ आलेल्या नागरिकांची आता यातून सुटका होणार आहे. महापालिकेच्यावतीने वांद्रे (पूर्व) येथील वांद्रे न्यायालय, वांद्रे - कुर्ला संकुल , म्हाडा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात ये -जा करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी नवीन आकाश मार्गिका खुली करण्यात आली आहे. त्यामुळे आता वांद्र्यातून जिल्हाधिकारी कार्यालय, म्हाडा, न्यायालय तसेच शासकीय वसाहतींमध्ये राहणाऱ्यांना आता आकाशातून चालत घर गाठता येणार आहे.मुंबई महापालिकेच्यावतीने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते न्यायालय आणि म्हाडा कार्यालय याठिकाणी जाण्यासाठी आकाश मार्गिका अर्थात स्कायवॉकचे बांधकाम केले असून याचे लोकार्पण राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्यास स्थानिक आमदार वरुण सरदेसाई, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगरआदी मान्यवर उपस्थित होते. या स्कायवॉकचे कामकाज विक्रमी वेळेत पूर्ण करणारे कार्यकारी अभियंता नामदेव रावकाळे, सहायक अभियंता प्रशांत जावळे, दुय्यम अभियंता अमित दसूरकर यांचा पालकमंत्री शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कणेकर मार्गावरील गर्दी होणार कमीरेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाशी थेट जोडणी असल्यामुळे तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे सुरक्षित रस्ता ओलांडण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या आकाश मार्गिकेमुळे वांद्रे (पूर्व) परिसरातील पादचारी वाहतूक अधिक सुरक्षित होईल. प्रवासाचा वेळ वाचेल आणि अनंत काणेकर रस्त्यावरील गर्दी लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रचंड वाहतूक आणि अनंत काणेकर रस्त्यावरील गर्दीमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अडचणी व अपघाताचा धोका निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर पादचाऱ्यांसाठी सुरक्षित, सुलभ आणि वेळ बचत करणारी सुविधा म्हणून या आकाश मार्गिकेची उभारणी करण्यात आली आहे असे अॅड.आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.स्कायवॉकची वैशिष्ट्ये आकाश मार्गिका एकूण ६८० मीटर लांबीची व सरासरी ५.४० मीटर रूंदीची पादचाऱ्यांच्या विविध ठिकाणांहून सहज प्रवेशासाठी ४ जिने सुलभ मार्गक्रमण करण्यासाठी २ स्वयंचलित सरकत्या जिन्यांची जोड सुरक्षितता आणि निगराणीसाठी १४ सीसीटीव्ही कॅमेरे
'आनंद दिघेंचे स्वप्न पूर्ण करत आहोत, ठाणे महापालिकेवर भगवा कायम फडकत राहील'
ठाणे : आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यातील त्यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गुरुवर्य आनंद दिघे यांना कृतज्ञता व्यक्त करत, आनंद दिघेंचे स्वप्न असणारा ठाणे महापालिकेवरील भगवा झेंडा कायम फडकत ठेवण्याचे कार्य आपण पूर्ण करत आहोत, असे ठामपणे सांगितले.या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी समाजोपयोगी आणि लोकाभिमुख उपक्रम राबवले जातात. समाजकारण आणि लोकहित हेच त्यांच्या विचारांचे केंद्र होते. त्यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने ठाणे महापालिकेवर कर्मवीरांनी लावलेला भगवा यंदा अधिक तेजाने फडकत असून, यापूर्वीचे सर्व विजयाचे विक्रम या निवडणुकीत मोडीत काढले गेले आहेत.ते पुढे म्हणाले की, ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो कायम राखण्याचे काम आपण केले आहे. कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांवरही भगवा झेंडा फडकला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत शिवसेना पुढे जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरली, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्येही शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावला, यामुळे पक्षाची ताकद राज्यभर वाढताना दिसत आहे.काही लोक म्हणत होते की शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहे, पण आज शिवसेना चांदा ते बांधापर्यंत पसरली आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे, असे सांगत त्यांनी विजयाची गोडी पुढेही कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.शिंदे यांनी शिवसेनेचा मूलमंत्र स्पष्ट करत सांगितले की, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा गुरुमंत्र घेऊन पक्ष वाटचाल करत आहे. आपत्तीत शिवसेना, संकटात शिवसेना हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे, असेही त्यांनी नमूद केले.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या योजनेमुळे महिलांना मोठा आधार मिळाला आहे. अनेक कुटुंबांनी या योजनेच्या मदतीने छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. दुर्गम भागातील एका गरीब कुटुंबाचा अनुभव सांगताना ते म्हणाले की, महिन्याला मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या मदतीतून त्या कुटुंबाने तेल, मीठ, मसाला घेऊन घर चालवले असून त्यांना मोठा आधार मिळाला आहे.याशिवाय लखपती योजना, एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत, मुलींसाठी उच्च शिक्षणाच्या योजना आणि महिला बचत गटांना मदत अशा अनेक लोककल्याणकारी योजना सरकारने राबवल्याचे त्यांनी सांगितले. महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे स्वप्न आनंद दिघे साहेबांनी नेहमी पाहिले होते आणि त्याच मार्गावर आपण चालत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.आपल्या भाषणाचा समारोप करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवसेनेच्या वाढीमागे आनंद दिघे यांचे आशीर्वाद, त्यांची शिकवण आणि जनतेचे प्रेम व पाठिंबा हीच खरी प्रेरणा आणि ऊर्जा आहे. ठाणे महापालिकेवर भगवा कायम फडकत ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी खासदार नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेविका नम्रता भोसले जाधव आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई महापालिकेत पक्ष कार्यालयासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांची कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी होवून पुढील प्रक्रिया महापालिका सचिव कार्यालयात पार पाडली जात आहे. त्यामुळे निवडून आलेले उमेदवार हे महापालिका सदस्य म्हणून नोंद होत असल्याने प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांना महापालिका मुख्यालयात बसण्यासाठी कार्यालय मिळावे यासाठी पक्षाच्यावतीने प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे उबाठाला मागील वेळेस दिलेल्या कार्यालयाच्या जागेवर शिवसेनेचा डोळा असून उबाठाला दिलेल्या या कार्यालयाचा काही हिस्सा आपल्या पक्ष कार्यालयासाठी उपलब्ध करून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ८९ आणि शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, शिवसेना आणि भाजप हे गट तयार करून नोंदणी करतात की स्वतंत्र यावर चर्चा सुरु असली तरी शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आल्याने त्यांना पक्ष कार्यालय उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. त्यामुळे आपल्या नगरसेवकांसाठी पक्ष कार्यालयाची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. महापालिकेतील मागील संख्याबळानुसार दिलेल्या कार्यालयानुसार शिवसेनेच्या वाट्याला काँग्रेसचे कार्यालय येवू शकते. परंतु काँग्रेसचेही २४ नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांनाही तेवढ्याच क्षमतेचे कार्यालय द्यावे लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी नवीन कार्यालयाचा शोध सुरु आहे. उबाठा शिवसेनेला मागील वेळेस ९० ते पुढे १०० सदस्य संख्ये आधारे पक्ष कार्यालय देण्यात आले होते. परंतु आता त्यांची संख्या ६५ झाल्यामुळे त्यांना दिलेल्या पक्ष कार्यालयाचे क्षेत्रफळ अधिक आहे. हे क्षेत्रफळ कमी करून शिवसेनेला तिथे कार्यालय देता येवू शकते.उबाठाला दिलेल्या पक्ष कार्यालयाचे क्षेत्रफळ अधिक असल्याने भाजपच्या लगत असलेल्या उबाठाच्या कार्यालयात तात्पुरती भिंत उभारुन शिवसेनेला कार्यालय उपलब्ध करून देता येवू शकते. यामुळे उबाठाला देण्यात येणाऱ्या कार्यालयाचा आकार कमी होणार आहे. त्यामुळे उबाठाच्या कार्यालयाचा आकार कमी करून तिथे शिवसेनेचे कार्यालय उपलब्ध करून देण्याची मागणी असून प्रशासन आता त्याबाबत सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेनेचे संख्याबळ पाहता काँग्रेसचे कार्यालय त्यांना देवू शकते, अन्यथा भाजप आणि शिवसेनेच्या मध्यभागी उबाठाच्या कार्यालयाचा काही भाग कमी करून तिथे शिवसेनेचे कार्यालय तयार करता येवू शकते. अर्थात शिवसेनेला कोणती जागा हवी आहे किंवा नको याचा विचार पुढे होवू शकतो. तुर्तास काँग्रेस कार्यालयाच्या क्षेत्रफळाएवढी दुसरे कार्यालय नसल्याने उबाठा शिवसेनेला दिलेल्या पक्ष कार्यालयाचा काही भाग कमी केल्याशिवाय पर्यायच राहणार नसल्याचे बोलले जात आहे.
सांताक्रूझ ते चेंबूर- लिंक रोड कनेक्टरचे काम दोन महिन्यात होणार
मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्ग (वेस्टर्न एक्सप्रेस हायवे) आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा प्रवास वेगवान होणार आहे. कारण सांताक्रूझ ते चेंबूर- लिंक रोड (एससीएलआर) या कनेक्टर आर्मचे काम पूर्णत्वास आले आहे. या कनेक्टरमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार असून प्रवाशांचा वेळ वाचणार आहहा बहुप्रतिक्षित कनेक्टर पश्चिम द्रुतगती महामार्ग ते मुंबई विद्यापीठ आणि बीकेसीला थेट जोडणार आहे. ज्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल. हा कनेक्टर एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि बीकेसी मधील दोन्ही दिशांना प्रवास वेळ जवळजवळ ३० ते ३५ मिनिटांनी कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.एससीएलआर कनेक्टरच्या दोन्ही महत्त्वाच्या भागांचे बांधकाम सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. लेव्हल १ वर पश्चिम द्रुतगती महामार्ग बीकेसीला जोडण्यासाठी विद्यमान वाकोला पुलाचा वापर करणाऱ्या कनेक्टर आर्म २ वर सध्या डेक स्लॅबचे काम सुरू आहे. दरम्यान, लेव्हल २ वर बीकेसीला एससीएलआर १ ला जोडणाऱ्या कनेक्टर आर्म ३ मध्ये फक्त ५४ मीटरचा एकच स्पॅन उभारायचा आहे. यासोबतच, वॉटरप्रूफिंग, वेअरिंग कोट्स, अँटी-क्रॅश बॅरीयर्स बसवणे आणि रंगकाम करणे यासारखी फिनिशिंगची कामे संपूर्ण स्ट्रक्चरवर शेवटच्या टप्प्यात आहेत.
Joe Root Record : जो रूटने मोडला रोहित शर्माचा ‘तो’रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला चौथा फलंदाज
Joe Root Record : इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने आपल्या सातत्यपूर्ण आणि दर्जेदार फलंदाजीने वनडे क्रिकेटमध्ये आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला आहे. सध्या श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड संघाने
KRA Jewellers: केआरए ज्वेलर्सच्या वतीने हस्ताक्षर विकास कार्यशाळांचे आयोजन
KRA Jewellers:
ममतांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे ४० मिनिटे चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ममता यांच्या पद्धतीनेच भाजपचा प्रभावीपणे विरोध केला जाऊ शकतो.
Chandrakant Patil : भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत विरोधी उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आवाहन केल्याप्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
Arijit Singh: मोठ्या पडद्यावर आता अरिजीतचा आवाज पुन्हा ऐकू येणार नाही, या विचारानेच त्याचे चाहते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद १९ तर पंचायत समिती ३० उमेदवार रिंगणात
कर्जत : कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ४७ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र वैध ठरली होती. त्यापैकी २८ उमेदवारांनी माघार घेतल्याने १९ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समिती निवडणुकीसाठी ७४ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र वैध ठरली होती त्यापैकी ४४ उमेदवारांनी माघार घेतल्याने ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काही ठिकाणी एकास एक उमेदवार निवडणूक लढावीत असून काही ठिकाणी तिरंगी, चौरंगी व पंचरंगी सामना रंगणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या एकूण ७२ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने एकूण ४९ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या माणगाव तर्फ वरेडी गटात पंचरंगी, मोठे वेणगाव व पाथरज गटात तिरंगी आणि कळंब व नेरळ गटात दुरंगी लढत होणार आहे. तर पंचायत समितीच्या नेरळ गणात चौरंगी. कळंब, कशेळे, उकरूळ व दामत गणात तिरंगी तर पोशीर, पाथरज, माणगाव तर्फ वरेडी, वाकस, कडाव, मोठे वेणगाव व बीड बुद्रुक गणात एकास एक लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.कर्जत तालुकाजिल्हा परिषद गटकळंब.. २पाथरज.. ३माणगावतर्फे वरेडी..५नेरळ..२कडाव..४मोठे वेणगाव..३कर्जत पंचायत समिती अंतिम उमेदवार..पोशीर..२कळंब..३पाथरज..२कशेळे..३माणगावतर्फे वरेडी..२उकरूळ..३नेरळ..४दामत.. ३वाकस..२कडाव..२मोठे वेणगाव..२बीड बुद्रुक..२
रत्नागिरी जिल्हयातील ५६ जिल्हा परिषद गट व ११२ पंचायत समिती गणांसाठी ग्रामीण भागात प्रचाराचा धुरळा
महायुतीची वर्चस्वासाठी तर महाविकास आघाडीची अस्तीत्वासाठी लढाईनरेंद्र मोहिते रत्नागिरी :तब्बल आठ वर्षांनी अखेर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. रत्नागिरी जिल्हयातील नऊ तालुक्यातील ५६ जिल्हा परिषदेचे गट, ११२ पंचायत समितीचे गण यामध्ये या निवडणूकीच्या प्रचाराचा धुरळा सध्या सुरू आहे. जिल्हयात शिवसेना भाजपा महायुती झाली असून महायुती विरूध्द अन्य पक्ष असाचा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने अनेक ठिकाणी उबाठा, काँग्रेससह अन्य घटकपक्षांना उमेदवारांची शोधाशोध करावी लागली असून नगर परिषद निवडणूकीप्रमाणेच याही निवडणूकीत महायुती बाजी मारणार काय याबाबत साऱ्यानांच उत्सुकता लागून राहिलेली आहे. ही निवडणूक महायुतीची वर्चस्वासाठी लढाई तर महाविकास आघाडीची अस्तित्वासाठी लढाई सुरू असल्याचे जिल्हयात चित्र पहावयास मिळत आहे.रत्नागिरी जिल्हयावर कायमच महायुतीचे वर्चस्व राहिलेले आहे. खास करून हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख आहे. मात्र, सन २०२२ मध्ये शिवसेना दुभंगल्यानंतर प्रथमच ही निवडणूक होत असल्याने या निवडणूकीकडे राजकिय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. जिल्हयातील नऊ तालुक्यात असलेल्या राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड व गुहागर या पाच विधानसभा मतदारसंघात मिळून ही निवडणूक होत आहे. या पाच विधानसभा मतदार संघात राजापूर,रत्नागिरी व खेड मतदार संघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. तर चिपळूण विधानसभा मतदार संघातही महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम प्रतिनिधीत्व करत आहेत. तर केवळ गुहागर या एका मतदार संघात उबाठाचे आमदार आहेत. त्यामुळे जिल्हयावर महायुतीचेच वर्चस्व असल्याचे लोकसभा, विधानसभा व त्यानंतर झालेल्या नगर परिषद निवडणूकीत स्षष्ट झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद व पंचायत समितवर वर्चस्व प्रस्थापीत करण्यासाठी महायुती सज्ज झाली आहे.जिल्हयातील ५६ जिल्हा परिषद गटात व ११२ पंचायत समिती गटात होत असलेल्या या निवडणूकीत तालुका निहाय गट गणांची संख्या ही पुढील प्रमाणे आहे. जिल्हा परिषदेच्या ५६ गटांमध्ये मंडणगड-२, दापोली-६, खेड -७, चिपळूण -९, गुहागर-५, रत्नागिरी – १०, संगमेश्वर -७, लांजा- ४ व राजापूर-६ गटांचा समावेश आहे.तर ११२ पंचायत समिती गणांमध्ये मंडणगड-४, दापोली-१२, खेड -१४, चिपळूण -१८, गुहागर-१०, रत्नागिरी – २०, संगमेश्वर -१४, लांजा- ८ व राजापूर-१२ गणांचा समावेश आहे.जिल्हयातील या एकूण ५६ गट व ११२ गणांमध्ये होणाऱ्या निवडणूकीत एकूण ११ लाख ७३ हजार ८९९ इतके मतदार असून यामध्ये ५ लाख ६४ हजार ४७६ पुरूष तर ६ लाख ८ हजार ९१३ महिला मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे विजयी उमेदवारांचे भवितव्य हे महिला मतदार ठरविणार आहेत. या निवडणूकीसाठी जिल्हयात १ हजार ६९३ इतकी मतदान केंद्र असणार आहेत.जिल्हा परिषद अध्यक्ष पदासह तालुका पंचायत समितींच्या सभापती पदांची आरक्षण सोडत यापुर्वीच झालेली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव झालेले आहे. तर नऊ पंचायत समितींमध्येही सभापती पदाची आरक्षण सोडत झालेली असून यातील राजापूर पंचायत समितीचे सभापती पद हे नागरिकांच्या मागस प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित आहे. तर दापोली पंचायत समितीचे सभापती पद हे नगरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. तर उर्वरित मंडणगड, खेड, संगमेश्वर व लांजा पंचायत समितीचे सभापती पद हे सर्वसाधारण महिला आरक्षित असून चिपळूण, गुहागर व रत्नागिरीचे सभापतीपद सर्वसाधारण आहे.या निवडणूकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवारी संपली असुन जिल्हयातील एकूणच लढतीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे आता सर्वच राजकिय पक्ष व उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटींवर जोर दिला आहे.जिल्हयात महायुतीच्या माध्यमातुन महायुती निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे. राज्याचे उद्योगमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री ना. उदय सामंत व राज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून महायुतीच्या वर्चस्वासाठी या दोन्ही मंत्र्यांसह महायुतीचे आमदारही निवडणूकीच्या प्रचारात सक्रिय झालेले आहेत. नगर परिषद निवडणूकीतील अपयशानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र जिल्हयात असून काहीशा दिशाहीन झालेली महाविकास आघाडी व त्यातील घटक पक्ष हे अस्तीत्वासाठी धडपडत असल्याचे चित्र जिल्हयात पहावयास मिळत आहे. या निवडणूकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. सध्या मात्र ग्रामीण भागात प्रचाराचा चांगलाच धुरळा उडत आहे.
IND vs ZIM : विजयी घोडदौड कायम; टीम इंडियाचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय
IND vs ZIM : आयसीसी अंडर-19 क्रिकेट वर्ल्डकप 2026 मधील सुपर सिक्स फेरीत भारतीय संघाची विजयी (IND vs ZIM) मालिका कायम आहे. कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय अंडर-19 संघाने
India-EU FTA : या करारामुळे अमेरिका आणि विशेषतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन कमालीचे संतापले असून, त्यांनी युरोपवर टीकेची झोड उठवली आहे.
US snow storm : हिमवादळामुळे अमेरिकेत तब्बल २५ मृत्यू; दक्षिणेकडील काही भागांमध्येही बर्फवृष्टी सुरू
अमेरिकेच्या उत्तर आणि इसान्येकडील भागात आलेल्या हिमवादळामुळे आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे
निवडणूक नियमांचे काटेकोर पालन अनिवार्य
अलिबाग : राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील १३ जानेवारी २०२६ च्या आदेशान्वये रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-२०२६ जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत नियमांचे पालन काटेकोरपणे करणे अनिवार्य असल्याचे नमुद करुन, काय करावे व काय करु नये याबाबतची मार्गदर्शक सुचना जिल्हाधिकारी तथा. जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी जारी केल्या आहेत. चालू असलेले कार्यक्रम, योजना पुढे सुरु ठेवता येतील. ज्याविषयी शंका निर्माण होईल अशा बार्बीच्या संबंधात, राज्य निवडणूक आयोग, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण, मान्यता प्राप्त करण्यात यावी. पूर, अवर्षण, साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी साह्यकारी व पुनर्वसनाच्या उपाययोजना चालू करता येतील व या संदर्भात चालू असलेल्या योजना पुढे सुरु ठेवता येतील.मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रक्कम किंवा वैद्यकीय सवलती देण्याचे समुचित मान्यतेने पुढे चालू ठेवता येईल. मैदानासारख्या सार्वजनिक जागा सर्व पक्षांना, निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना निवडणूक सभा घेण्यासाठी निःपक्षपातीपणे उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व पक्षांना, निवडणुकीस उभे असलेल्या उमेदवारांना हेलिपॅडच्या वापर निःपक्षपातीपणे उपलब्ध करुन दिला पाहिजे. विश्रामगृहे,डाकबंगले व इतर शासकीय निवासस्थाने वगैरेबाबतीत निवडणूक आयोगाने व त्या अनुषंगाने शासनाने काढलेल्या आदेशास संपूर्णतः अधीन राहून सर्व राजकीय पक्षांना व निवडणुकीस उभे असलेल्या सर्व उमेदवारांना समानतेच्या तत्वावर उपलब्ध करुन देता येणे अनुज्ञेय असल्यास त्याप्रमाणे देण्यात यावेत. इतर राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्यावर करण्यात येणारी टीका ही त्यांची धोरणे, कार्यक्रम, पूर्वीची कामगिरी, पार पडलेली कामे, केवळ या बाबींशी संबंधित असावी. शांततामय व उपद्रवरहित गृहस्थ जीवन जगण्याच्या प्रत्त्येक व्यक्तीच्या अधिकाराचे पूर्णपणे जतन करण्यात यावे. प्रस्तावित सभेची जागा व वेळ याविषयी स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना पूर्ण माहिती देण्यात यावी आणि त्यांसाठी आवश्यकत्या सर्व परवानग्या मिळविण्यात याव्यात. प्रस्तावित सभेच्या जागी निबंधात्मक व प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्यांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. आवश्यक असल्यास त्याबाबत सवलत मिळण्याविषयी सवलत मिळविली पाहिजे.वैमनस्य वाढवणारी कृती करु नये : परस्परातील वैमनस्य वाढेल किंवा त्यांच्यात तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये. खाजगी जीवनातील कोणत्याही पैलूवर टीका करण्यात येऊ नये.
मच्छिमारांच्या संघटनेचा महायुतीला पाठिंबा
पनवेल : नांदाई माता मच्छिमार सहकारी संस्था कोंबडभुजे आणि राधा राम मच्छिमार सहकारी संस्था खारकोपर या मच्छिमारांच्या संघटनेने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमधील गव्हाण जिल्हा परिषद आणि गव्हाण व वहाळ पंचायत समितीच्या भाजप महायुतीच्या उमेदवारांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. या संदर्भातील पाठिंबा पत्र नांदाई माता मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष सतीश रमेश कोळी व राधा राम मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष नामदेव ठाकूर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, वहाळ साईबाबा मंदिरचे प्रमुख रविंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष विजय घरत, निलेश खारकर, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. गव्हाण जिल्हा परिषद गटातून निकिता निलेश खारकर, वहाळ गणामध्ये वितेश त्रिंबक म्हात्रे तर गव्हाण गणातून जिज्ञासा मनोहर कोळी भाजप महायुतीचे उमेदवार आहेत. या उमेदवारांना नांदाई माता आणि राधा राम मच्छिमार सहकारी संस्थांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
Maharashtra Tur Procurement : केंद्र सरकारने महाराष्ट्रात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीस मंजुरी दिली आहे. ८ हजार रुपये प्रति क्विंटल हमीभावाने ही खरेदी केली जाणार आहे.
Siddaramaiah : डीके, डीके ओरडणारे कोण आहेत?; सिद्धरामय्या यांचा संतप्त सवाल
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्या समर्थनार्थ युवक कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) भडकले. डीके, डीके ओरडणारे कोण आहेत, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
Shashi Tharoor: सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या पक्षनेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीला ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर अनुपस्थित राहिल्याने, पक्षात पुन्हा एकदा 'नाराजी नाट्य' सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.
ऐतिहासिक भारत-EU करारामुळे महाराष्ट्रातील कापड अभियांत्रिकी आणि औषध निर्मितीला मोठी संधी
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत–युरोपियन संघ (India–EU) मुक्त व्यापार करार हा भारताच्या जागतिक व्यापार प्रवासातील ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. ‘मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या करारामुळे 27 युरोपीय देशांशी भारताचे आर्थिक एकत्रीकरण होत असून 99% पेक्षा अधिक भारतीय निर्यातीला सवलत मिळणार आहे. ₹6.41 लाख कोटींच्या निर्यातीला चालना देणारा हा करार महाराष्ट्रातील कापड, औषधनिर्मिती, ऑटोमोबाईल आणि कृषी क्षेत्रातील वेगवान निर्यातीला बळ देण्यासाठी मैलाचा दगड ठरेल. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मनापासून अभिनंदन!
मराठा कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी प्राप्त अर्ज प्रलंबित राहू नयेत
जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलमंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्देशमुंबई, दि. २७ : मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेटिअरच्या संदर्भात सप्टेंबर २०२५ मध्ये जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानंतर मराठवाडा महसूल विभागातील आठही जिल्ह्यांत प्रमाणपत्रांसाठी अर्ज प्राप्त होत असून, हे अर्ज प्रलंबित राहू नयेत यासाठी कार्यवाहीस गती देण्यात यावी, असे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. गावपातळीपर्यंत जाऊन शासकीय यंत्रणेने सक्रियपणे प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.मंत्रालयात जलसंपदा मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीच्या झालेल्या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, माजी न्यायमूर्ती संभाजी शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव गणेश पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज, उपसमितीचे सदस्य, विविध विभागांचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर व मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.यावेळी जलसंपदा मंत्री श्री. राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, उपसमिती तसेच माजी न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांनी दिलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करून जात दाखले व वैधता प्रमाणपत्र वितरणातील अडथळे दूर करावेत. मराठा कुणबी जात दाखले व वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने स्पष्ट आदेश दिले असून, हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात यावी, जिल्हा प्रशासनामार्फत सुरू असलेल्या कार्यवाहीचा नियमित आढावा विभागीय आयुक्तांनी घ्यावा,असेही त्यांनी सांगितले.दाखले वितरणाचा वेग वाढविण्यासाठी माजी न्यायमूर्ती शिंदे यांनी दिलेली महत्त्वपूर्ण माहिती उपयुक्त ठरणार असून, ते मराठवाडा विभागातील विविध जिल्ह्यांना भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत. सप्टेंबर २०२५ नंतर प्राप्त अर्ज व वितरित दाखल्यांचे प्रमाण सध्या कमी असून, ते वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री विखे-पाटील यांनी सूचित केले.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध शैक्षणिक लाभ दिले जात आहेत. शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती आदींसाठी ओबीसी विभाग, वैद्यकीय शिक्षण व कृषी विभागाशी समन्वय साधून कार्यवाही करण्यात यावी. या दृष्टीने बैठकीचे आयोजन करावे.शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मराठा कुणबी उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र अर्जांवर तातडीने कार्यवाही करताना प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या.बैठकीत सचिव गणेश पाटील तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जात प्रमाणपत्र वितरणाची सद्यस्थिती सादर केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रहिवासी पुरावे, वंशावळ व १९६७ पूर्वीच्या पुराव्यांच्या आधारे करण्यात येत असलेल्या नियमानुसार कार्यवाहीची माहिती दिली.
मुंबई पालिकेतील महत्त्वाच्या समित्यांची गणिते जुळवून गट नोंदणी करणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; शिवसेनेची नोंदणी थांबवण्यासाठी हस्तक्षेप केला नाहीमुंबई : मुंबई महापालिकेतील स्थायी समितीसह विविध महत्त्वाच्या समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी गट नोंदणी करताना संख्याबळाच्या टक्केवारीचे गणित लक्षात घेतले जाईल. त्यानंतरच भाजप आणि शिवसेनेची एकत्र नोंदणी करायची, की स्वतंत्र, याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केली.राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाल्यानंतर मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना वगळता अन्य सर्व पक्षांनी त्यांच्या नगरसेवक गटांची नोंदणी पूर्ण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असल्याने भाजपची गट नोंदणी रखडल्याचे सांगण्यात येत होते. मात्र मुख्यमंत्री परतल्यानंतरही भाजप आणि शिवसेनेची गट नोंदणी अद्याप झालेली नाही.दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नगरसेवकांची गट नोंदणी मंगळवारी (२७ जानेवारी) होणार होती. मात्र, अचानक घडलेल्या घडामोडींमुळे ही नोंदणी पुढे ढकलण्यात आली. यासंदर्भात विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी गट नोंदणीमागील गणित स्पष्ट केले. ते म्हणाले, “गट स्थापन करताना केवळ संख्या नव्हे, तर टक्केवारीचा विचार करावा लागतो. कधी एकत्रित गट नोंदणी केल्यास फायदा होतो, तर कधी वेगवेगळे गट स्थापन केल्याने अधिक लाभ मिळतो. काही वेळा एखादा छोटा गट दुसऱ्या गटासोबत जोडल्यासही फायदा होतो. महापौर आणि उपमहापौरपद वगळता उर्वरित पदांचे वाटप हे एकूण संख्येच्या टक्केवारीवर ठरते. त्यामुळे सर्व पर्यायांचा अंदाज घेऊनच निर्णय घेतला जातो”, असे त्यांनी सांगितले............चर्चेतून निर्णय घेणारभाजपच्या हस्तक्षेपामुळे शिवसेनेची गट नोंदणी थांबवण्यात आल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हस्तक्षेप असा काही प्रकार नसतो. आम्ही एकत्र काम करणारे असून चर्चेतूनच निर्णय घेतले जातात. शिवसेनेची नोंदणी ठरल्याप्रमाणे होईल आणि त्यानुसार भाजपचीही गट नोंदणी केली जाईल. गट नोंदणीत केवळ टक्केवारीचे राजकीय गणित महत्त्वाचे असून स्थायी समितीत जास्तीतजास्त सदस्य कसे मिळतील, यासाठी योग्य संयोजन केले जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
बांठिया आयोगाच्या कायदेशीर वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर (SC Notice to Maharashtra Government) सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला मंगळवारी नोटीस बजावली आहे.
केंद्र सरकार 10, 20 आणि 50 रुपयांसारख्या लहान मूल्याच्या नोटांची उपलब्धता वाढवण्यावर भर देत आहे.
ZP Election : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानापूर्वीच महायुतीने राज्यात मोठे खाते उघडले आहे. सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतून महायुतीचे तब्बल २२ उमेदवार बिनविरोध
“बाळासाहेबांचा स्वाभिमान विकणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी छातीचा कोट केला!”
“लाडक्या बहिणींच्या ताकदीवर 232 आमदार निवडून आणण्याचा इतिहास रचला; त्यामुळे विरोधकांची पोटदुखी वाढली!”“बोंडारवाडी धरण होणारच; आडवा कोण येतो ते बघतो!”केळघर-मेढ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सज्जड इशारासातारा, ता. : बाळासाहेब ठाकरे यांचा स्वाभिमान आणि विचार सोडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठीच मी छातीचा कोट करून राज्यात सत्तांतर घडवून आणले आणि बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार महाराष्ट्रात स्थापन केले, असा घणाघाती हल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला.सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, महिला आणि गोरगरिबांसाठी सातत्याने काम करत असल्यामुळेच विरोधकांच्या पोटात गोळा उठत असल्याची बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.सातारा जिल्ह्यातील केळघर-मेढा येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला ‘लाडक्या बहिणीं’सह हजारो नागरिकांची उस्फूर्त उपस्थिती होती. कमी वेळेत एवढ्या मोठ्या संख्येने जनसमुदाय लोटल्याबद्दल शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.महायुतीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करताना शिंदे म्हणाले, “ही निवडणूक केवळ उमेदवारांची नाही, तर विकास, स्वाभिमान आणि बाळासाहेबांच्या विचारांची आहे.”नोकरी आणि रोजगारासाठी तरुणांचे मुंबई, पुणे, ठाणे, वसई, नालासोपारा यांसारख्या शहरांकडे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांच्या हाताला काम देण्याचा निर्धार मी केला आहे, असे ठणकावून शिंदे म्हणाले. “या भूमीतच रोजगार निर्माण करणार, ही माझी गॅरंटी आहे,” असा शब्द त्यांनी दिला.“बोंडारवाडी धरण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणारच. आडवा कोण येतो ते मी बघतो,” असा सज्जड इशारा देत शिंदे यांनी स्पष्ट केले. या धरणामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि जिल्ह्यात हजारो रोजगार निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.“लाडकी बहीण योजना फसवी आहे, निवडणूक जुमला आहे, असे म्हणणारे कोर्टात गेले आणि फटकारले गेले. पण मी शब्द देतो ही योजना कधीही बंद होणार नाही. दर महिन्याला माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जाणारच,” असा ठाम शब्द शिंदे यांनी दिला.“15,00 रुपये असो वा 21,00 रुपये आम्ही दिलेला शब्द पूर्ण करणार. योग्य वेळी योग्य निर्णय होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.“महिलांनी विधानसभेत विरोधकांचा असमान दाखवले. 232 आमदार निवडून आणले. महाराष्ट्राच्या इतिहासात हा चमत्कार आहे. विरोधकांना विरोधी पक्षनेताही मिळू दिला नाही,” असा टोला शिंदे यांनी लगावला.एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेनंतर सरकारने 100 टक्के शिक्षण फी माफ करण्याचा निर्णय घेतल्याची आठवण करून देताना शिंदे म्हणाले, “सरकार जर सर्वसामान्यांसाठी नसेल, तर त्याचा उपयोग काय?”शेतकरी सन्मान योजनेतून केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांन व्यतिरिक्त राज्य सरकारनेही 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई देण्याचे कामही सरकार करत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्षांत केवळ चार सिंचन प्रकल्प मंजूर झाले, तर शिंदे सरकारने अवघ्या अडीच वर्षांत 180 प्रकल्प मंजूर केल्याचा दावा त्यांनी केला.महाबळेश्वर, तापोळा, केळघर, मेढा, प्रतापगड परिसरात नवीन रस्ते, पूल आणि पर्यटन मार्ग विकसित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतापगडाच्या विकासासाठी 27 कोटी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले.केळघर-मेढा, जावळी खोरे, प्रतापगड परिसरात इको-टुरिझम, अॅग्रो-टुरिझम, होम-स्टे, फार्म-स्टे आणि ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे शिंदे यांनी सांगितले.साताऱ्यात 100 खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय उभारण्याची घोषणा करतानाच, महिला बचत गटांसाठी ‘उमेद मॉल’ उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पापड, लोणची, बांबू उत्पादने यांसारख्या ग्रामीण उत्पादनांचे ब्रँडिंग करून महिलांना उद्योजक बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.“मी निवडणुकीपुरता नेता नाही. मी कायम तुमच्यासोबत आहे. जो शब्द देतो, तो पाळतो. बाळासाहेब आणि आनंद दिघेसाहेबांनी मला हेच शिकवले आहे,” असे सांगत शिंदे यांनी विरोधकांवर टीकेचा भडिमार केला.“पाच तारखेला धनुष्यबाण आणि महायुतीच्या निशाणीवर बटन दाबा. तुमचं मत म्हणजे विकासाला मत, तुमचं मत म्हणजे लाडक्या बहिणींच्या सन्मानाला मत,” असे आवाहन करत त्यांनी भाषणाचा शेवट केला.यावेळी माजी आमदार दगडूदादा सकपाळ, अंकुश कदम, सातारा संपर्कप्रमुख शरद कणसे, माजी सभापती बापुराव पार्ते, एकनाथ ओंबळे, सविता ओंबळे, संदीप पवार, अतिश कदम, विठ्ठल गोळे, शिल्पा शिंदे, शशिकांत शिंदे, रेश्मा जगताप सर्व नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक,शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, उमेदवार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये (BMC Mayor Election) एकूण २९ महापालिकांसाठी मतदान झाले असून, बहुतेक ठिकाणी भारतीय जनता पक्ष (भाजपा) हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे
Solapur Accident : सोलापूर जिल्ह्यातील देगावजवळ ट्रक आणि व्हॅनच्या भीषण अपघातात डोंबिवलीतील एका बालकासह ४ भाविकांचा मृत्यू झाला आहे.
महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल : महाराष्ट्रात देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू
मुंबई: महिलांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवत, राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये माननीय राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत.या अभिनव उपक्रमाला राज्यभरातील महिलांकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, महिलांनी समाधान व कृतज्ञता व्यक्त केली आहे.मेनोपॉज म्हणजे महिलांच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा व संवेदनशील टप्पा.या काळात होणारे शारीरिक बदल, मानसिक ताण, हॉर्मोनल असंतुलन, हाडांचे आजार, झोपेचे विकार व नैराश्य याकडे आजवर दुर्लक्ष होत होते.हीच गरज ओळखून राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी महिलांसाठी विशेष ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला.या क्लिनिकच्या माध्यमातून✔ तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला✔ मानसिक आरोग्य समुपदेशन✔ हाडे, हृदय व हॉर्मोन तपासणी✔ औषधोपचार व मार्गदर्शनएकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.महत्वाची बाब म्हणजे, देशात प्रथमच अशा प्रकारचे मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.महिलांच्या आरोग्याबाबत महाराष्ट्राने घेतलेले हे पाऊल इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.मकरसंक्रांतीनिमित्त महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून,खऱ्या अर्थाने महिलांच्या आरोग्याची गोड भेटराज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सर्व महिलांना दिली आहे, अशी भावना महिलांकडून व्यक्त होत आहे.या उपक्रमाबद्दलसंवेदनशील महिला, आरोग्यदृष्टी असलेले नेतृत्व व धाडसी निर्णययासाठी महिलांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे कौतुक केले असून,त्यांच्याप्रती आभार देखील व्यक्त केले आहेत.माननीय राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे कोटेशन:“मेनोपॉज हा आजार नाही, तर महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे.मात्र या टप्प्यात महिलांना शारीरिक आणि मानसिक आधाराची अत्यंत गरज असते.राज्यातील प्रत्येक महिलेला या काळात योग्य सल्ला, उपचार आणि सन्मान मिळावा,यासाठीच मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत.महिलांचे आरोग्य मजबूत झाले, तर कुटुंब, समाज आणि राज्य नक्कीच सक्षम होईल.”
सलग दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दांडी
मुंबई : मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांतील महापौर पदावरून महायुतीत तणाव असल्याच्या चर्चा झडत असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणुकीच्या निकालानंतरच्या सलग दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.एकनाथ शिंदे ज्या ज्या वेळी नाराज असतात, तेव्हा ते साताऱ्यातील आपल्या गावी जातात, अशी कूजबूज असते. मंगळवारी देखील ते साताऱ्यात होते. सकाळच्या सत्रात त्यांच्या वेळापत्रकात सातारा जिल्ह्यासह अन्य कोणत्याही ठिकाणचा जाहीर कार्यक्रम नमूद नव्हता. दुपारी सव्वा दोन वाजता जावळी येथे त्यांची प्रचारसभा होती. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित नव्हते, अशी माहिती शिवसेनेच्या मंत्र्यांकडून देण्यात आली.राज्यातील आयटीआयमध्ये पीएम – सेतू योजना राबविणारराज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे पीएम सेतू योजनेंतर्गत आधुनिकीकरण करण्याच्या योजनेला मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कुशल मनुष्य़बळाची मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी पीएम सेतू योजनेतून आयटीआयचे आधुनिकीकरण करण्याची योजना आहे. या योजनेच्या पहिल्या टप्पात नागपूर, छत्रपती संभाजी नगर आणि पुणे येथील आयटीआयचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी हब अँड स्पोक प्रारूप विकसित केले जाणार आहे.कंत्राटदारांच्या थकीत बिलांसाठी नवी यंत्रणासार्वजनिक बांधकाम विभागामधील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक, कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ट्रेड प्लँटफाँर्मचा अवलंब करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील सर्वच विभागांनी या यंत्रणेचा अवलंब करावा. प्रत्येक विभागाने आपल्या विभागाच्य़ा कार्यपध्दतीशी आणि कामकाजाच्या आवश्यकतेनुसार आदर्श कार्य प्रणाली निश्चित (एसओपी) करावी. त्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.शत्रू मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क माफ करणार- शत्रू मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क प्रथम नोंदणी करताना माफ करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यात एकूण ४२८ शत्रू मालमत्ता आहेत. त्यापैकी छत्रपती संभाजी नगर २, जालना २, मुंबई ६२, मुंबई उपनगर १७७, नागपूर ६, पालघर ७७, पुणे ४, रत्नागिरी ११, सिंधुदुर्ग १, ठाणे येथे ८६ मालमत्तांचा समावेश आहे.- युद्धकाळात भारत सोडून शत्रू देशात स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या या मालमत्ता आहेत. सेपीकडून अशा प्रकारच्या मालमत्तांची विक्री करण्यासाठी लिलाव करण्यात येतो. मात्र या लिलावांस कमी प्रतिसाद मिळतो. सेपीव्दारे विक्री प्रमाणपत्र जारी केल्यानंतर मालमत्तेच्या पहिल्या नोंदणीवेळी मुद्रांक शुल्क माफ केल्यास शत्रू मालमत्ता खरेदीचा खर्च कमी होऊन खरेदीस प्रतिसाद मिळेल.शासकीय जमिनीच्या भाडेपट्टीच्या कालावधीत वाढविविध समाजोपयोगी कारणांसाठी शासकीय जमीन ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येतात. त्यांचा कालावधी पुढे ४९ वर्षांपर्यंत वाढवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. शासनाच्या विविध प्रशासकीय विभागाच्या मालकीच्या अथवा महसूल विभागाने विशिष्ट प्रयोजनासाठी त्या विभागाकडे हस्तांतरीत केलेल्या तसेच त्यांच्या अख्यत्यारितील महामंडळ, मंडळ, प्राधिकरणे यांच्या मालकीच्या अथवा हस्तांतरित केलेल्या शासकीय जमिनी महामंडळ, मंडळ, प्राधिकरणे यांच्या उत्पन्न वाढीसाठी विविध व्यावसायिक प्रयोजनास्तव विविध संस्थांना ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्यांवर दिल्या जात होत्या. अशा जमिनी आता आवश्यकतेनुसार प्रथमतः जास्तीत जास्त ४९ वर्षापर्यंत व त्यानंतर कोणत्याही अटी व शर्तीचे उल्लंघन झालेले नसल्यास, संबंधित विभागाला आवश्यकतेनुसार या भाडेपट्ट्याचे पुन्हा एकवेळ जास्तीत जास्त ४९ वर्षांच्या मर्यादेत नुतनीकरण करुन, योग्य तो भाडेपट्टा आकारुन जमीन भाडेपट्ट्याने देता येतील.
Todays TOP 10 News: वाचा आजच्या राज्य देश विदेशासह महत्वाच्या बातम्या...
Shivendrasinhraje Bhosale : सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.
कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही निवड केवळ दहावीच्या गुणवत्तेवर आधारित असेल.
Australian Open 2026 : आर्यना सबालेंका-अलेक्जेंडर ज्वेरेव ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये दाखल
जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या आर्यना सबालेंकाने ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ (Australian Open 2026) च्या क्वार्टरफायनलमध्ये दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; ‘सातारा गॅझेटियर’ लवकरच लागू होणार
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने 'सातारा गॅझेटियर' लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
Vikhroli Accident :अंगावर स्पिकरवर कोसळून लहान मुलीचा मुत्यु; थरकाप उडवणारी घटना..!
मुंबई: २६ जानेवारीनिमीत्त लावण्यात आलेले २ स्पिकर लहान मुलीवर कोसळल्यामुळे मुलीचा जागेवरच मृत्यु झाला आहे. विक्रोळीतील या घटनेमुळे तेथील परिसरामध्ये वेगळीच खळबळ उडाली आहे. हा प्रकार मुंबईतील विक्रोळी येथील टागोर नगर मध्ये घडली आहे.हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाल्यामुळे समोर आला आहे.नक्की घडलं काय ?मिळालेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त आंबेडकर नगर परिसरात सार्वजनिक कार्यक्रमासाठी मोठा स्पीकर उभारण्यात आला होता. कार्यक्रमानंतरही हा स्पीकर तसाच उभा असल्याचे सांगितले जात आहे. याच दरम्यान तीन वर्षांची चिमुरडी परिसरात खेळत आणि धावत असताना अचानक स्पीकर तिच्या अंगावर कोसळला. स्पीकरचा जोरदार आघात बसल्याने ती गंभीर जखमी झाली.अपघातानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त आंबेडकर नगर परिसरात सार्वजनिक कार्यक्रमासाठी मोठा स्पीकर उभारण्यात आला होता. कार्यक्रमानंतरही हा स्पीकर तसाच उभा असल्याचे सांगितले जात आहे. याच दरम्यान तीन वर्षांची चिमुरडी परिसरात खेळत आणि धावत असताना अचानक स्पीकर तिच्या अंगावर कोसळला. स्पीकरचा जोरदार आघात बसल्याने ती गंभीर जखमी झाली.अपघातानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.या प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांसाठी लावण्यात येणाऱ्या साहित्याच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. निष्पाप चिमुरडीचा बळी जाणे ही अत्यंत दुर्दैवी घटना असून जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
ISRO jobs recruitment : ‘इस्रो’मध्ये काम करण्याची मोठी संधी; घसघशीत पगार मिळणार, असा करा अर्ज…
भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) कायदेशीर सल्लागार पदासाठी अर्ज मागवले आहेत. सरकारी विभागांशी संबंधित कायदेशीर बाबींचे मूलभूत ज्ञान देखील असले पाहिजे.
आयसीसी अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकप २०२६ मधील सुपर सिक्स फेरीतील रोमांचक सामन्यात (Vaibhav Suryavanshi World Record) भारत अंडर-१९ संघाने झिम्बाब्वे अंडर-१९ संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना जबरदस्त सुरुवात केली.
India-EU FTA: मर्सिडीज, BMW, ऑडी कार होणार स्वस्त! देशांतर्गत ऑटो क्षेत्रावर काय परिणाम होईल?
India-EU FTA: या निर्णयामुळे आगामी काळात प्रीमियम कारच्या किमतीत मोठी घट अपेक्षित असून, हा करार २०२७ पासून लागू होण्याची शक्यता आहे.
UBT Shivsena : ठाकरेंचा नगरसेवक अडचणीत! विजयी होताच गुन्हा दाखल, काय आहे कारण?
UBT Shivsena : मुंबईतील प्रभाग १८२ चे नवनिर्वाचित ठाकरेसेना नगरसेवक मिलिंद वैद्य आणि त्यांच्या ४० समर्थकांविरुद्ध माहीम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Nalasopara Crime : पोटच्या मुलीला आईन संपवलं;नालासोपऱ्यातील भंयकर घटना
मुंबई :आई लेकीच्या नात्याला काळिमा फासनारी गोष्ट नालासोपारा येथे घडली आहे.आईने स्वताच्या मुलीच्या डोक्यात वरवंटा घालून तिला ठार मारले आहे.या घटने मुळे तेथील परिसरामध्ये खळखळ उडाली आहे.मृत मुलीचे नाव अंबिका प्रजापत्ती (वय १५) व आईचे नाव कुमकुम प्रजापती असं आहे.प्रजापती कुटुंब नालासोपारा येथील संतोषभवन परिसरातील तांडापाडा भागात, विद्या विकासने चाळीत येथे राहण्यास होते. शनिवारी दुपारच्या वेळी घरात आई आणि मुलगी यांच्यात वाद झाला. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अंबिका ही पाच भावंडांमध्ये सर्वात मोठी बहीण होती. तिने लहान भावंडांना मारहाण केल्याने आईने तिला विरोध केला. याच कारणावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. वादाच्या भरात आई कुमकुम हिचा राग अनावर झाला आणि तिने घरातील वरवंट्याने थेट अंबिकाच्या डोक्यात घातला . या हल्ल्यात अंबिकाचे डोके गंभीररीत्या ठेचले गेले आणि तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मीरा–भाईंदर वसई–विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ ३ च्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
Pune News : आधी बेडरूममध्ये CCTV लावले मग दीर आणि सासरा मिळून... नाशिकमध्ये विवाहितेवर जीवघेणा हल्ला
पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. विशेषतः विवाहित महिलांना सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाचे प्रमाण वाढले असून, दोन भीषण घटनांनी समाजमन सुन्न झाले आहे. हुंडा आणि मानसिक छळाचा बळी पुण्यातील तरुण इंजिनीअर दीप्ती चौधरी हिने सासरच्या जाचाला कंटाळून आपले आयुष्य संपवले. उच्चशिक्षित असूनही तिला सासरच्यांकडून होणारा छळ सहन करावा लागला, हे या घटनेचे सर्वात दुर्दैवी पैलू आहे. माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार नाशिकमध्ये एका पतीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर तिला बळजबरीने विषारी औषध पाजले. धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीची प्रकृती खालावल्यावर तिला रुग्णालयात दाखल करून नवरा तिथून पसार झाला आहे. सध्या पीडितेवर उपचार सुरू असून तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली आहे.https://prahaar.in/2026/01/27/pandhapur-accident-a-terrible-accident-occurred-in-a-vehicle-carrying-devotees-who-had-left-from-mumbai-for-the-vitthurai-festival-four-people-died-in-the-accident/नाशिकमध्ये उच्चशिक्षित विवाहितेला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्ननेमकं प्रकरण काय?पुण्यातील इंजिनीअर दीप्ती चौधरीच्या आत्महत्येची जखम ताजी असतानाच, नाशिकमधूनही अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिमा मॉन्टी राजदेव या उच्चशिक्षित विवाहितेवर सासरच्या मंडळींनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप होत आहे. महिमा आणि मॉन्टी राजदेव यांचा एप्रिल २०२५ मध्ये प्रेमविवाह झाला होता. मात्र, सुरुवातीपासूनच या विवाहाला सासरच्या लोकांचा विरोध होता की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कुटुंबात झालेल्या वादानंतर महिमाला घरी बोलावण्यात आले. तिथे तिला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर बळजबरीने विषारी औषध पाजून तिला संपवण्याचा प्रयत्न झाला. प्रेमविवाह केल्यामुळेच सासरच्या मंडळींकडून महिमाचा सातत्याने छळ केला जात होता आणि याच छळातून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.विष पाजून पतीचा रुग्णालयातून पळ...नाशिकच्या महिमा राजदेव प्रकरणात आता माहेरच्यांनी केलेल्या आरोपांमुळे या छळाचे भीषण स्वरूप समोर आले आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून, समोर आलेले मुद्दे सुन्न करणारे आहेत. महिमाच्या सासरच्यांनी तिच्यावर चोरीचा खोटा आक्षेप घेतला होता. या बहाण्याने चक्क तिच्या बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते, असा खळबळजनक दावा महिमाच्या आईने केला आहे. हा तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावरचा मोठा घाला मानला जात आहे. लग्नाला केवळ आठ महिने झाले असतानाच सासू, सासरे आणि दीर यांच्याकडून तिचा सतत छळ सुरू होता. मारहाण करून विष पाजल्यानंतर पतीने महिमाला जिल्हा रुग्णालयात दाखल तर केले, मात्र कारवाईच्या भीतीने तो तिथून फरार झाला आहे. विषारी औषध शरीरात गेल्यामुळे महिमाची प्रकृती सध्या अत्यंत गंभीर असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.
Kane Richardson Retirement : आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला सुरुवात होण्याच्या काही दिवस आधी ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनने (Kane Richardson Retirement) व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
India-EU FTA:याला 'मदर ऑफ ऑल डील्स' संबोधले जात असून, यामुळे भारताच्या कापड, रसायने आणि पादत्राणे यांसारख्या प्रमुख क्षेत्रांतील ९३ टक्क्यांहून अधिक वस्तूंना २७ युरोपीय देशांच्या बाजारपेठेत विनाशुल्क (झिरो ड्युटी) प्रवेश मिळणार आहे.
मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत व युरोपियन युनियन यांच्यातील द्विपक्षीय करार झाला असताना दुसरीकडे इराण आणि युएस यांच्यातील अस्पष्टता कायम राहिल्याने एकूणच युएस व जागतिक गुंतवणूकदार साशंक राहिल्याने आज चांदीच्या दरात नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला गेला आहे. म्हणजेच २००८ जागतिक मंदी असलेल्या दरानंतर आज प्रथमच ऐतिहासिक वाढ झाल्याने चांदीने नवी रेकॉर्ड ब्रेक वाढ नोंदवली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १० रूपयाने, प्रति किलो दरात १०००० रूपयाने वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम चांदी ३७० रूपयांवर, प्रति किलो चांदी ३७०००० रूपयांवर पोहोचली आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, मुंबईसह प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी प्रति १० ग्रॅम दर ३७०० व प्रति किलो दर ३७००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) चांदीचे दर थेट ८% उसळल्याने भारतीय सराफा बाजारात चांदीचे दर ३६१५५५ रूपयांवर पोहोचले.जागतिक स्तरावर चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.८९% घसरण झाली आहे. गेल्या पाच दिवसांत चांदीच्या दरात तुफान वाढ झाली आहे. आज दिवसभरात चांदीच्या किमतींमध्ये तुफान वाढ झाली आहे. जगभरात चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाली असताना पुरवठ्यातील सततची कमतरता भासल्याने चांदीत तुफान वाढ झाली आहे.दुसरीकडे ग्रीनलँडवरील अमेरिका-युरोप भूराजकीय संबंधांमधील बदलांमुळे अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्याने आणि युरोप आपल्याकडील अमेरिकन मालमत्तेचा मोठा साठा वापरू शकतो या चिंतेमुळे, गुंतवणूकदारांची प्रत्यक्ष मालमत्तेतील गुंतवणूक करण्याची इच्छा वाढली. पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व्ह व्याजदर बँक अपरिवर्तित ठेवेल का या चिंतेने गुंतवणूकदारांमध्ये अस्पष्टता आहे.दुसरीकडे वर्षाच्या उत्तरार्धात दोन संभाव्य व्याजदर कपातींच्या बाजारातील अंदाजामुळे सोन्याचांदीला आणखी आधार मिळाला आहे. युएस राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अधिक उदारमतवादी फेड अध्यक्षांची नियुक्ती करू शकतात या अटकळांमुळेही व्याजदर कपातीच्या अपेक्षा वाढल्या असे तज्ञांनी स्पष्ट केले.अनिश्चिततेमुळे रिटेल अथवा किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवल्याने ईटीएफ गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. युएस मध्ये तिसऱ्या तिमाहीत अमेरिकेचा जीडीपी वार्षिक ४.४% च्या मजबूत गतीने वाढला. दुसरीकडे गुंतवणुकीची मागणी, कमकुवत डॉलर आणि पुरवठा-मागणीतील संरचनात्मक तूट लक्षात घेऊन दीर्घकालीन किमतींचे अंदाज वाढवले गेले असताना गुंतवणूकदारांनी भावना प्रधान होऊन मोठा कौल सोन्याचांदीच्या दरात दर्शवला आहे.
Chitra Wagh : 'आमच्याकडे संविधनाचं शस्त्र आहे ...'अंजली भारतीच्या वक्तव्यावर चित्रा वाघ संतापल्या
गायिका अंजली भारती यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या त्या विधानावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. आमच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधनाचं शस्त्र आहे, कायदेशीर प्रहार कसा करायचा हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. अशा शब्दांमध्ये त्यांनी उत्तर दिलं आहे. एक्सवर पोस्ट करून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.काय म्हणाल्या चित्रा वाघ ?अंजली भारती नावाच्या बाईचा आताच एक व्हिडीओ पाहिला आणि तळपायाची आग मस्तकात गेली. राजकीय विरोध असू शकतो पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करा.. अशी चिथावणी देणं.. ती सुद्धा एका बाईने? अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी कमी आहे. अशी भाषा मानसीक विकृती असून या बाईवर आणि ज्याने हा कार्यक्रम आयोजित केला त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे. पुढे त्या म्हणाल्या; श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभं राहून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करण्याची चिथावणी, त्यावर टाळ्या-पैसे? हे समाजाच्या अधःपतनाचं भयावह चित्र आहे. पण आपल्याकडे श्रध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाचं शस्त्र आहे. कायदेशीर प्रहार कसा करायचा ते आम्हाला माहितीये. जय हिंद| जय महाराष्ट्र| जय भीम.श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभं राहून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करण्याची चिथावणी, त्यावर टाळ्या-पैसे?हे समाजाच्या अधःपतनाचं भयावह चित्र आहे.पण आपल्याकडे श्रध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाचं शस्त्र आहे. कायदेशीर प्रहार कसा करायचा ते… pic.twitter.com/qaipTJLw97— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 27, 2026नेमक प्रकरण काय ?भंडारा येथील भीम मेळाव्यात गायिका अंजली भारती यांनी अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. बलात्काराच्या संदर्भात वक्तव्य करताना गायिका अंजली भारती यांनी अत्यंत खालच्या स्तराला जाऊन मिसेस मुख्यमंत्री यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. त्यानंतर खासदार संजय निरुपम यांनी हा व्हिडिओ शेअर करत टीका केली होती. या घटनेवर राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशातच चित्रा वाघ यांनी गायिका अंजली भारती आणि कार्यक्रमाचे आयोजक यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Share Market Today: सेन्सेक्स 320 अंकांनी वधारला, निफ्टी 25,150च्या पार
Share Market Today: बीएसईमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (Market Cap) ४५१.५६ लाख कोटींवरून वाढून ४५४.५८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
Farmers Long March : नाशिकहून निघालेला किसान सभेचा भव्य लाँग मार्च मुंबईत दाखल होत आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता आंदोलक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
Actress Kavya Gowda काव्या गौडा ही कन्नड टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिनं ‘राधा रमणा’ आणि ‘गांधारी’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.
मुंबई इंडियन्सने वूमन्स प्रीमियर लीग 2026 मधील 16व्या सामन्यात (MI Eliminator Scenario) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ला 15 रनने पराभूत करून मोठा धक्का दिला आहे. हा विजय मुंबईसाठी टर्निंग पॉइंट ठरला
जम्मू-काश्मीर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी काळाने भीषण घाला घातला. उधमपूर जिल्ह्यात एक प्रवासी बस आणि पिकअप ट्रक यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत सीआरपीएफ (CRPF) जवानासह एकूण चार जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.#WATCH | Udhampur, J&K | Four, including one CRPF personnel, die in a road accident on the Jammu-Srinagar National Highway. pic.twitter.com/hH26LJPfv6— ANI (@ANI) January 27, 2026मिळालेल्या माहितीनुसार, उधमपूर परिसरात बस आणि पिकअप ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सीआरपीएफच्या १३७ व्या बटालियनचे सेकंड-इन-कमांड करतार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ५२ व्या बटालियनच्या एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले आणि मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दुसरीकडे, डोडा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी खराब हवामानामुळे लष्कराचे वाहन घसरून झालेल्या अपघातात जवान रिंकिल बालियान यांच्यासह नऊ सैनिक शहीद झाले होते. या दुःखद घटनेनंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.आज भाजप खासदार अरुण गोविल आणि भाजप नेते संजीव बालियान यांनी शहीद रिंकिल बालियान यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांनी शहीद जवानाच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. कठीण प्रसंगात सरकार आणि पक्ष शहीद कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही यावेळी नेत्यांनी दिली.
Maharashtra Cabinet Decisions : महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत कंत्राटदारांची ८९ हजार कोटींची प्रलंबित देयके 'ट्रेड्स' प्लॅटफॉर्मद्वारे देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
रायगड : महिलांच्या सुरेक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे.महिलांवरील अत्याचार थांबत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एका विधवा महिलेसोबत अत्याचाराची संतापजनक घटना घडली असून त्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे.रोहा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावालगत असलेल्या बेलवाडी शेजारील रानात ही घटना २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. घरगुती वापरासाठी जळणाचे लाकूड गोळा करण्यासाठी गेलेली ही विधवा महिला एकटी असल्याची संधी साधून त्याच गावातील एका इसमाने तिचा विनयभंग केला. ग्रामीण भागात महिलांना दैनंदिन कामासाठीही सुरक्षितता नसल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पीडित महिला रानात लाकडी फाटे गोळा करत असताना आरोपी तिच्याजवळ आला. त्याने अचानक तिचा हात पकडत “तुझा नवरा मेला आहे, मग तुझं कसं काय?” असे अत्यंत नीच, अपमानास्पद आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर आरोपीने जबरदस्तीने महिलेला जवळ ओढून तिच्या स्त्रीसन्मानाला आणि लज्जेला धक्का पोहोचवणारे कृत्य केले. या प्रकारामुळे महिला प्रचंड घाबरून गेली असून तिला मानसिक धक्का बसला आहे. घटनेनंतर पीडित महिलेने धैर्य दाखवत रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक १७/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.या घटनेनंतर नागरिक, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. ही घटना रायगड जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.
राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्राची मान्यता - मंत्री जयकुमार रावल
मुंबई : महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत पणन मंत्री जयकुमार रावल यांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचा थेट लाभ राज्यातील लाखो तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, सन २०२५-२६ या हंगामासाठी महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. तुरीची खरेदी ८,००० रुपये प्रति क्विंटल या किमान हमीभावाने केली जाणार आहे. या खरेदीसाठी २० जानेवारी २०२६ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे.ही खरेदी प्रक्रिया नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या केंद्रीय संस्थांमार्फत राज्य सरकारच्या समन्वयाने राबविण्यात येणार असून, त्यासाठी राज्यभरात ९३४ खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.यावर्षी राज्यातील तूर उत्पादनाचा अंदाज १३.५१ लाख मेट्रिक टन इतका आहे. तसेच मागील हंगामात राज्यातील ८५ हजार शेतकऱ्यांकडून १३ लाख ३३ हजार १२८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली होती, अशी माहितीही मंत्री रावल यांनी दिली.तूर खरेदी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खरेदी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व जलद गतीने राबवावी, अशा स्पष्ट सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. आवश्यकता भासल्यास राज्यातील १०० टक्के तूर खरेदीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, असेही मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
मोहित सोमण: आज भारत व ईयु यांच्यातील करारानंतर अखेरच्या सत्रात शेअर बाजाराने बाजी पालटली आहे. त्यामुळे इक्विटी बेंचमार्क निर्देशांकातील सकाळच्या घसरणीची जागा तेजीने घेतली असून शेअर बाजार अखेरच्या सत्रात सकारात्मक पातळीवर बंद झाला आहे. सेन्सेक्स ३१९.७८ अंकांनी उसळत ८१८५७.४८ पातळीवर व निफ्टी १२६.७५ अंकांने उसळत २५१७५.४० पातळीवर स्थिरावला आहे.सेन्सेक्स व निफ्टीत सकाळच्या सत्रातील अस्थिरतेची जागा स्थिरतेनी घेतल्याने बाजाराला आधाराभूत पातळी मिळणे सोपे झाले. प्रामुख्याने मजबूत तिमाही फंडा मेंटलमुळे बँकेच्या शेअरला गुंतवणूकदारांनी सकारात्मक कौल दिला. विशेषतः सकाळच्या सत्रातील १३% अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा १.८३% उसळणीवर घसरल्याने बाजाराला याचा निश्चितच फायदा झाला. आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ मेटल,प्रायव्हेट बँक, पीएसयु बँक,आयटी, फायनांशियल सर्विसेस २५/५० निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण मिडिया,ऑटो,एफएमसीजी,हेल्थकेअर निर्देशांकात झाली आहे. सकाळी घसरलेले मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजारात सेल ऑफ रोखले गेल्याचे स्पष्ट झाले.आलं लार्ज कॅप शेअर्समध्येही वाढ झाल्याने दरपातळी उंचावली. तसेच जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर नवा इराण व युएस मधील ट्रिगर आला नसल्याने बाजाराला स्थिरता मिळण्यास मदत झाली. दरम्यान रूपया डॉलरच्या तुलनेत घसरत नव्या निचांकी स्तराजजवळ येऊन ठेपल्याने काही प्रमाणात बाजारातून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतली. युएस बाजारात डाऊ जोन्स वगळता दोन्ही शेअर बाजारात वाढ झाली तीच परिस्थिती युरोपियन बाजारात राहिल्याने युरोपात व आशियाई शेअर बाजारात एकही बाजारात घसरण झाली नाही. एकूणच टेक्निकल स्थिती खूप चांगली नसली तरी फंडामेंटली बाजाराने समाधानकारक स्थिती अस्थिरतेत नोंदवली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ होम फर्स्ट फायनान्स (१२.४८%), करूर वैश्य बँक (१०.१९%), एजिस (९.५२%), जिंदाल स्टेन (८.५९%), एमसीएक्स (५.९६%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण वन सोर्स स्पेशालिटी (१९.६२%), एसबीएफसी फायनान्स (११.६७%), सिंजेन इंटरनॅशनल (९.९५%), जेएसडब्लू एनर्जी (७.८७%), ग्राविटा इंडिया (५.३९%), वालोर इस्टेट (४.६८%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'सकारात्मक जागतिक संकेतांच्या आणि वॉल स्ट्रीटवरील रात्रभरातील तेजीच्या पाठिंब्याने भारतीय शेअर बाजारांनी मंगळवारच्या सत्राची सुरुवात उच्च पातळीवर केली, परंतु सत्राच्या अखेरीस बाजारात अस्थिरता दिसून आली. बेंचमार्क निफ्टी ५० २५०६३ अंकांवर उघडला, त्याने २५१८४ अंकांची इंट्राडे उच्चांकी पातळी गाठली, परंतु सत्रादरम्यान झालेल्या तीव्र चढ-उतारांमुळे तो २५९३२ पातळीच्या नीचांकी पातळीवर घसरला. भारत- युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराबद्दलचा आशावाद आणि अमेरिका भारताच्या रशियन तेलाच्या आयातीशी संबंधित शुल्कविषयक उपाययोजना शिथिल करू शकते या अपेक्षांमुळे बाजारातील भावनांना चालना मिळाली. या सकारात्मक वातावरणात भर घालत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारत-युरोपियन युनियन यांच्यातील एका महत्त्वपूर्ण मुक्त व्यापार कराराच्या निष्कर्षाची घोषणा केली. या करारामध्ये अशा अर्थव्यवस्थांचा समावेश आहे, ज्यांचा एकत्रित वाटा जागतिक जीडीपीच्या जवळपास एक चतुर्थांश आणि जागतिक व्यापाराच्या सुमारे एक तृतीयांश आहे. युरोपियन आयोगाच्या अध्यक्षांनी या कराराला एक ऐतिहासिक यश म्हटले आणि त्याचे वर्णन 'सर्व करारांची जननी' असे केले. त्यांनी नमूद केले की भारत आणि युरोपियन युनियन चाचेगिरीचा सामना करण्यासाठी संयुक्त नौदल सराव देखील करतील. या करारामुळे दोन्ही प्रदेशांमध्ये लाखो नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास आणखी वाढेल.तथापि, हे सत्र जानेवारी २०२६ च्या मासिक डेरिव्हेटिव्ह्जच्या मुदतपूर्तीशी जुळल्यामुळे, बेंचमार्क निर्देशांकात दोन्ही बाजूंनी हालचालींसह तीव्र अस्थिरता दिसून आली. क्षेत्रीय आघाडीवर, धातू, कमोडिटीज, सीपीएसई, पीएसई आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये खरेदीचा ओघ दिसून आला, तर मीडिया, ऑटो, रिअल्टी, एफएमसीजी आणि हेल्थकेअरच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव होता.'
Pune Crime News : रुपाली चाकणकर यांनी घेतली इंजिनिअर दीप्ती चौधरीच्या कुटुंबियांची भेट
पुणे : पुण्यातील सोरतापवाडी (ता. हवेली) येथे इंजिनिअर दीप्ती चौधरी (२८ वर्षीय) या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी दीप्तीचा पती, सरपंच सासू, शिक्षक सासरे आणि दीर अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हुंड्यासाठी छळ आणि मुलगी नको म्हणून जबरदस्तीने केलेला गर्भपात यामुळे दीप्ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती समोर आली आहे.अशातच आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरयांनी दीप्तीच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. रूपाली चाकणकर यांच्यासोबत उरुळी कांचन पोलिसांनी देखील दीप्तीच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दीप्तीच्या कुटुंबीयांच्या मागण्या ऐकून घेतल्या. राजकीय हस्तक्षेप वाढत असल्यामुळे आरोपींवर कारवाई होत नसल्याचा आरोप दीप्तीच्या कुटुंबियांनी यावेळी केला आहे. या भेटीनंतर रुपाली चाकणकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे.काय म्हणाल्या रुपाली चाकणकर ?कुठल्याही महिलेला किंवा लेकीला त्रास झाला तर तिने तातडीने कळवायला हवे. तसेच आपणही ठामपणे तिच्या पाठीशी उभे राहायला हवे. तुम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केली त्यासाठी अनेक पथकं आहेत. सासरी नांदणाऱ्या लेकीला त्रास झाला तर तिच्यासाठी काय? तर तिच्यासाठी काही व्यासपिठ आहेत. वन स्टॉप सेंटर पासून अगदी तिचे आणि तिच्या कुटुंबियांचे काऊंसिलिंग करणे, तिला वकील देण्यापासून शेवटच्या क्षणापर्यंतची तिची लढाई लढण्यासाठी मोफत वकील असतात. हे सर्व गोपनिय ठेवलं जातं. अगदी आई-वडिलांशिवाय कोणालाही माहिती नसतं. ती वन स्टॉप सेंटरमध्येही जाऊन तक्रार करु शकते.पुढे त्या म्हणाल्या, आमची टीम वेगळ्या पद्धतीने काम करते. कायदा हा खूप कठोर आहे. कायद्याच्या चौकटीतून या सगळ्या प्रक्रिया होत राहतात. महाराष्ट्रातील कायदा हा भारतातील सर्वात सक्षम कायदा आहे. म्हणून तुम्हाला काही शंका असतील तर जरुर सांगा. आपणच आपल्या लेकींच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू. आता आपणच ही शपथ घेऊ.नेमकं प्रकरण काय ?दीप्तीचा विवाह २०१९ मध्ये रोहन चौधरी याच्याशी मोठ्या थाटामाटात झाला होता. लग्नात ५० तोळे सोने देऊनही सासरच्यांची पैशांची हाव संपली नाही. माहेरून १० लाख रुपये रोख आणि चारचाकी गाडीसाठी २५ लाख रुपये देऊनही तिचा छळ सुरूच होता. तू दिसायला सुंदर नाहीस, तुला घरातील कामे येत नाहीत, असे टोमणे मारून दीप्तीचे सतत मानसिक खच्चीकरण केले जात होते. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारहाण केली जात होती, अशी तक्रार दीप्तीच्या आईने दिली आहे. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दीप्तीला झालेली गर्भपाताची सक्ती. दीप्तीला पहिली मुलगी होती. दुसऱ्यांदा ती गरोदर असताना, 'वंशाला दिवा हवा' या हट्टातून सासरच्यांनी तिची जबरदस्तीने गर्भलिंग तपासणी केली. पोटातील बाळ मुलगी असल्याचे समजताच, तिची इच्छा नसतानाही तिला गर्भपात करण्यास भाग पाडले गेले. या अमानुष प्रकारामुळे दीप्ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडली होती. विशेष म्हणजे, दीप्तीची सासू सुनीता चौधरी या सोरतापवाडीच्या विद्यमान सरपंच आहेत, तर सासरे कारभारी चौधरी हे शिक्षक पेशात आहेत. समाजात जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींनीच अशा प्रकारे हुंडा आणि स्त्रीभ्रूण हत्येसारखे गुन्हे केल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Anjali Bharti on Amruta Fadnavis : भंडारामधील एका आयोजित कार्यक्रमातील अंजली भारती यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
नवी मुंबई विमानतळाला मुंबई विमानतळाशी मेट्रोने जोडणार
महायुती सरकारचा निर्णय; 'मेट्रो-८'च्या जोडणीस मान्यता, २२ हजार ८६२ कोटींचा खर्च अपेक्षितमुंबई : जगातील प्रमुख विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला मेट्रोने जोडण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा मेट्रो लाईन ८ चा मार्ग उभारण्यास मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली असून, या प्रकल्पामुळे दोन्ही विमानतळांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पायाभूत सुविधांशी संबंधित विविध प्रकल्पांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले.'मेट्रो लाईन ८'ची एकूण लांबी ३५ किलोमीटर असून, त्यापैकी ९.२५ किलोमीटर मार्ग भूमिगत तर २४.६३६ किलोमीटर मार्ग उन्नत स्वरूपाचा असणार आहे. या मार्गावर एकूण २० स्थानके प्रस्तावित असून, त्यामध्ये ६ भूमिगत आणि १४ उन्नत स्थानकांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ स्थानक ते घाटकोपर पूर्वपर्यंतचा मेट्रो मार्ग भूमिगत असणार आहे, तर घाटकोपर पश्चिम स्थानकापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ स्थानकापर्यंतचा मार्ग उन्नत स्वरूपाचा असेल. दोन स्थानकांमधील सरासरी अंतर १.९ किलोमीटर इतके ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३०.७ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता असून, त्यासाठी ३८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण २२ हजार ८६२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.........समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामांना गतीसमृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर–गोंदिया तसेच भंडारा–गडचिरोली महामार्गाच्या कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व पायाभूत प्रकल्पांची कामे विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावीत आणि कोणताही प्रकल्प रेंगाळू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो लाईन ८ संदर्भातील भूसंपादनासह सर्व प्रकारच्या मंजुरीची कामे पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानंतर हा प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त करून घेण्यावर भर देण्यात आला आहे........नाशिक शहर परिक्रमा मार्ग गतिमान- याच बैठकीत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाला गती देण्यास मान्यता देण्यात आली. या मार्गाची एकूण लांबी ६६.१५ किलोमीटर असून, या प्रकल्पासाठी ३ हजार ९५४ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.- तसेच गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे–कोनसरी–मूळचेरा–हेदरी–सुरजागड या ८५.७६ किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. हा महामार्ग चार पदरी सिमेंट काँक्रिटकरणाचा असणार असून, त्यामुळे औद्योगिक आणि खनिज वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.
मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
मुखमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे निर्दश समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर - गोंदिया, भंडारा - गडचिरोली महामार्ग कामास गती द्यावी प्रकल्पांचे कामेत विहित कालावधीत पूर्ण करावी, प्रकल्प रेंगाळू नये, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो लाईन 8 चे भूसंपादनासह विविध मंजुरीचे कामे पुढील सहा महिन्यात पूर्ण करावी. त्यानंतर प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्यात यावा. प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच सर्व परवानगी प्राप्त करून घ्याव्यात.प्रकल्प मान्यताछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो लाईन 8 जोडणीस मान्यता, मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किलोमीटर, भूमिगत मार्ग 9.25 किलोमीटर, उन्नत मार्ग 24.636 किमी, एकूण 20 स्थानके, 6 स्थानके भूमिगत, 14 स्थानके उन्नत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानक ते घाटकोपर पूर्व पर्यंत भूमिगत स्थानके, घाटकोपर पश्चिम स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानकापर्यंत उन्नत स्थानके, दोन स्थानकांतील सरासरी अंतर 1.9 किलोमीटर, 30.7 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता, भूसंपादनासाठी 388 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण 22 हजार 862 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित.नाशिक शहर परिक्रमा मार्गकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाला गती, मार्गाची एकूण लांबी 66.15 किलोमीटर, या प्रकल्पासाठी एकूण 3 हजार 954 कोटीच्या खर्चास मान्यता.गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे - कोनसरी - मूळचेरा - हेदरी - सुरजागड महामार्गाच्या सुधारित 85.76 किलोमीटर लांबीस मान्यता, चार पदरी सिमेंट काँक्रिटकरणाचा महामार्ग.
Accident News : ओतूर जवळ झालेल्या भीषण अपघातात दोन ठार
Accident News : ओतूरजवळ झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.
Homemade Facial: आजकाल त्वचेच्या काळजीसाठी लोक महागड्या पार्लर ट्रीटमेंट्स आणि केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सकडे धाव घेतात. पण तुमच्या स्वयंपाकघरातच अशा काही गोष्टी आहेत, ज्यांच्या मदतीने त्वचेला नैसर्गिक आणि सुंदर निखार देता येतो. संत्र्याची साले आणि उरलेली कॉफी यांचा वापर करून तुम्ही घरच्या घरी सोपं आणि झिरो वेस्ट फेशियल करू शकता.
Santos Costa : युरोपियन कौन्सिलचे दोन वरिष्ठ नेते सध्या भारत दौऱ्यावर आहेत. मंगळवारी युरोपियन कौन्सिल आणि भारत यांच्यात एक ऐतिहासिक व्यापार करार झाला.
Dhamal 4 : चाहत्यांंचा हिरमोड! धमाल 4 ची रिलीज डेट पुढे ढकलली; आता ‘या’दिवशी होणार प्रदर्शित
Dhamal 4 : धमाल ४ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.
Varun Dhawan : वरुण धवन पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर; मेट्रोमधील व्हिडिओ व्हायरल
Varun Dhawan : वरुण धवनने मेट्रो प्रवासादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याने त्याला सोशल मिडियावर ट्रोल केले जात आहे.
मोहित सोमणजगभरात असे म्हणतात प्राथमिक सेवा गावोगावात असतील की नाही याची शाश्वती नाही. परंतु प्रत्येक स्त्रीच्या अंगावर दागिना लागतोच. इतके महत्व दागिन्यांचे भारतीय संस्कृतीत मानले जाते. दागिन्यांना भारतात तर अनन्य साधारण महत्त्व आहे ती केवळ सौंदर्य प्रसाधने नाही तर आयुष्यातील कमाईची पुंजीही असते. अशाच महत्वाच्या दागिन्यांतील किंमतीत जागतिक अस्थिरतेच्या दृष्टीने खूप मोठा फरक पडला आहे. खरे दागिने विंडो शॉपिंगपुरते उरले आहेत. दागिन्यांच्या आवरणातही एक मजा असते. ती प्रत कशीही असो पण सगळ्या वर्गातल्या लोकांना दागिने हवेहवेसे वाटतात यातच खरं दागिन्यांच्या मौल्याचे यश आहे. मात्र तत्पूर्वी सामान्य माणसांचा दृष्टिकोन हा दागिन्यांसाठी केवळ 'पारंपरिक सोने चांदी' इतकाच राहिला आहे. प्रत्यक्षात त्यात अनेक तंत्रज्ञान अस्तित्वात आहेत. पूर्वी प्रत्येकाला खरे सोने परवडेल का याची शाश्वती नव्हती. किंमतीच्या दृष्टीने ते परवडण्यासारखे नव्हते शिवाय खरेदी केले तरी ते प्रवास करताना जोखमीचे असायचे त्यामुळे अनेकांनी विशेषतः स्त्रियांनी प्रत्यक्ष दागिने घराबाहेर घालताना कायम बेंटेक्स अथवा तत्सम दागिन्यांनाच प्राधान्य दिले. किंबहुना या प्रकारच्या दागिन्यांचा बोलबाला होता जो नंतर रिवाज झाला. कालांतराने गरजा वाढू लागल्या उत्पन्न वाढले तसतसे दागिन्यांच्या दर्जालाही महत्व प्राप्त झाले. कालांतराने त्यात नवनवीन संशोधन झाले व संक्रमणे आली. त्यातील एक असेच एक संक्रमण जे आम्ही प्रत्यक्ष पाहिले. बोरिवली पश्चिम येथे सुरु झालेल्या मिलो जेवेल्स (Milo Jewels) या नव्या सीवीडी डायमंड ज्वेलरी तंत्रज्ञानाच्या दालनाला भेट दिली.खूप नव्या गोष्टी पुढे आल्या.अनेकदा अपारंपारिक अथवा पर्यायी ज्वेलरी खरेदी म्हणजे एक तर अत्यंत स्वस्त अथवा अत्यंत कमी दर्जाची बेंटेक्स प्रमाणे असलेली ज्वेलरी हा आपला सर्वसाधारणपणे कौल असतो. पण याला प्रत्यक्ष छेद देत मिलो जेवेल्स संस्थापक भव्य शहा यांनी दिली आहे. नव्वदच्या दशकात सीवीडी (Chemical Vapour Deposition) हे तंत्रज्ञान हिरा निर्मितीसाठी सुरु झाले. पारंपरिक ज्वेलरी बनवण्यासाठी विशेषतः हिऱ्यांसाठी उत्खनन खाणीतून होते. मूळ स्वरूपात असलेल्या या हिऱ्याचे कटिंग, पॉलिशिंग हे प्रत्यक्षात करूनच त्यावर प्रक्रिया केली जाते आणि मगच तो हिरा विकला जातो. एकतर दुर्मिळ हिरा व त्यातून त्याला पैलू पाडण्याचा अवास्तव खर्च यामुळे प्रचंड महाग किंमतीत विकला जाणारा हिरा हा सामान्यांच्या आवाक्याबाहेर जातो. त्याला पर्याय म्हणून सीवीडी हे तंत्रज्ञान पर्याय ठरले. नव्वदच्या दशकात या सीवीडी तंत्रज्ञानात सुरुवात झाली असली तरी त्याला उभारी ही २००० नंतर आली. सीवीडी हे तंत्रज्ञान प्रामुख्याने असे तंत्रज्ञान आहे ज्यात हा हिरा खाणीतून न काढता केमिकल्स प्रक्रियेद्वारे हा हिरा बनवला जातो.पारंपारिक एचपीएचटी (HPHT) विपरीत सीवीडी तंत्रज्ञानामध्ये हिऱ्यांच्या थरात वाढवण्यासाठी व्हॅक्यूम चेंबर, हायड्रोकार्बन वायू आणि प्लाझ्माचा वापर केला जातो. तज्ञांच्या मते यामुळे उत्कृष्ट गुणवत्ता आणि शुद्धता मिळते. अर्थातच त्या अपारंपारिक हिऱ्यातही विविध दर्जाच्या स्तराची उत्पादने अथवा हिरे बाजारात उपलब्ध होतात. केवळ हिराच नाही तर या तंत्रज्ञानाच्या आवरणातून सोन्याप्रमाणे दागिनेही बनवले जातात. तुम्ही जर अमेरिकेन डायमंड अथवा स्वस्तातील अपारंपारिक प्रकियेतील दागिने पाहिल्यास त्यांचा दर्जा अतिशय सुमार अथवा सरासरीच असतो. पण अशा अपारंपारिक दागिन्यांसाठी असलेल्या सीवीडी तंत्रज्ञानातील सर्वात प्रिमियम दर्जाचे हिरे व दागिने मिलो जेवेल्स बाजारात घेऊन ग्राहकांसाठी पुन्हा एकदा दाखल झालेले आहेत. केमिकल्स सहाय्याने लॅब्स मध्ये बनवलेल्या प्रिमियम दागिन्यांचे कलेक्शन सादर करुन मिलो जेवेल्सने बोरिवली पश्चिम येथे आपले तिसरे दालन मुंबईत उघडले आहे.जेव्हा आम्ही भेट दिली त्यावेळी अनेक मान्यवरही उपस्थित होते. माजी मिस इंडिया व कलाकार शिल्पा कटारिया या देखील उद्घाटनात उपस्थित होत्या. यावेळी संस्थापक भव्य शहा यांनी आपल्या दागिन्यांचे सादरीकरण करत इत्यंभूत माहिती उपस्थितांना दिली. प्रामुख्याने यामध्ये रेडी सीवीडी तंत्रज्ञानातील हिरे व दागिने यांचे शेकडो प्रकार येथे उपलब्ध असल्याचे पहायला मिळाले. भव्य शहा यांनी स्थापन केलेली, मिलो ज्वेल्स ही कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरते. दागिन्यांच्या कारागिरीत सीवीडी (CVD) डायमंड तंत्रज्ञानाचा वापर करताना त्यामधील प्रिमियम रेंजचे दागिने ग्राहकांना उपलब्ध करून देते. जर प्रत्यक्षात तुम्ही हे दागिने पाहिल्यास पारंपारिक पद्धतीने असलेल्या हिरे व सीवीडी लॅब्समध्ये बनवलेले हिरे यांच्याकडे डोळ्यातून पाहिल्यास तुम्हाला फरक आढळून येणार नाही इतक्या काटेकोरपणे हे दागिने बनवले गेले आहेत. उद्घाटन प्रसंगी पाहुण्यांना दागिन्यांचे दोन नमुने दाखवण्यात आले त्यातूनच उत्पादनातील दर्जा तरी आम्हाला सकारात्मक दिसला. आम्ही जेव्हा एक प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्याने बनवलेला आणि दुसरा नैसर्गिक हिऱ्याने बनवलेला बहुतेक उपस्थितांना त्यातील फरक ओळखता आला नाही,ज्यामुळे प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांविषयी आणि त्यांच्या गुणवत्तेबद्दल चर्चा सुरू झाली आणि आमचे शंकानिरसनही करण्यात यावेळी आले.स्वाभाविकपणे या तंत्रज्ञानातही स्वस्त ते महाग दागिने उपलब्ध असले तरी मिलोने तर सीवीडी तंत्रज्ञानातील 'प्रिमियम' रेंज बाजारात आणली आहे. तरीही जर खाणीतील हिरा व सीवीडी हिरा यांच्यातील प्रिमियम दरातही तुलना केल्यास कोट्यावधी रूपयांना येत असलेल्या हिऱ्यांच्या तुलनेत प्रिमियम दरातील सीवीडी हिरा खूप किफायतशीर दरात मिळतो. उदाहरणार्थ या ज्वेलरीत ३००० रूपयांपासून २०-२५ लाखांपर्यंतचे हिरे व दागिने उपलब्ध आहे.प्रत्यक्षात पारंपरिक हिरो कोट्यावधीचा असतो.इतका मोठा फरक या दोन्ही प्रकारात प्रकर्षाने आढळतो. त्यामुळेच या तंत्रज्ञानात स्वाभाविकपणे ग्राहकांचा ओढा वाढत आहे. बाजारातील हीच गरज ओळखून कंपनीने आपल्या उत्पादन पोर्टफोलिओत विस्तारासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे मुंबईतील हे तिसरे स्टोअरचे उद्घाटन केले आहे. कंपनीला दोन दशकांचा अनुभव असताना मिलो जेवेल्सचे लॅब्समधील उत्पादन मुंबईत होत असताना ६०० हून अधिक सीवीडी मशीन्स असलेल्या आणि वार्षिक ५ दशलक्ष कॅरेटपेक्षा जास्त उत्पादन क्षमता असलेला कारखानाही नवसारी गुजरात येथेही कंपनीचा कारखाना आहे. १००० हून अधिक कुशल कारागीर आणि मुंबईतील सिपझ (SEEPZ) येथील अत्याधुनिक उत्पादन केंद्राच्या सहाय्याने मिलो ज्वेल्स हिऱ्यांच्या निर्मितीपासून ते तयार दागिन्यांपर्यंत पूर्णपणे अनुभव ग्राहकांना थेट उपलब्ध करून देतो.प्रगत हिरे निर्मिती परिसंस्थांपैकी एक म्हणून या ब्रँडला वाढती उत्पादन क्षमता, गुणवत्ता नियंत्रण आणि पुरवठा साखळीच्या अखंडतेचा फायदा होतो. मुंबई व गुजरात येथे मिलो जेवेल्सचे नेटवर्क असल्यामुळे कच्च्या मालाचा पुरवठा अपुरा पडत नाही. अत्याधुनिक लॅब्समधून केल्या जाणाऱ्या कटिंगमुळे या सीवीडी तंत्रज्ञानातील प्रिमियम दरही नियंत्रणात राहतो ज्यामुळे काही हजारात हिरा घेणे शक्य होते. याशिवाय आम्ही त्यांच्या कँटलॉगमध्ये असलेली विविध उत्पादनेही पाहिली.त्यातून आमच्या निरिक्षणासह आलेल्या महत्वाच्या नोंदीनुसार जागतिक स्तरावरील म्हणून हा ब्रँड सुलभ लक्झरी,शाश्वत डिझाइन आणि समकालीन कारागिरीमध्ये रुजलेला दिसला. केवळ सणांसाठी नाही तर दैनंदिन जीवनात हे दागिने वापरले जाण्यासाठी त्यांची रचनाच तशी केली असल्याचे जाणवले.विविध प्रकारच्या डिझाईन्ससह विविध शैलीतील हिरे व दागिने तुम्हाला येथे पहायला मिळतात. खडे, हिरे अथवा तत्सम उत्पादन कुठलंही असो आवरण हे सीवीडी तंत्रज्ञानानुसार बनवले जाते त्यामुळे उत्पादनाचा खर्चही मर्यादित राहून त्यांच्या फिनिशिंगमध्ये प्रिमियम ठेवण प्रकर्षाने दिसते असे आम्हाला जाणवले.उदाहरणार्थ एमराल्ड कोर्ट डायमंड अर्निंग, इंटरलॉग डायमंड रिंग, डायमंड ब्रेसलेट,ब्लू सफायर पिअर ड्रॉप नेकलेस, ओवल कट रिंग अशी शेकडो प्रकारची ज्वेलरी डिझायन आपल्याला तिथे पहायला मिळते. मुंबई, दिल्ली, बंगलोर, हैद्राबाद, चेन्नई, कोलकाता, पुणे चंदीगड, इंदोर, अहमदाबाद, जयपूर अशा विविध ठिकाणी कंपनीची दालने पसरलेली आहेत. आणखीही कंपनी विस्तारासाठी भव्य शहा प्रयत्न करत आहेत असे बोलताना जाणवून आले.अर्थातच हे तंत्रज्ञान नवे नसले तरी ते पुन्हा नव्याने रिडिझाईन व रिफायनिंग करत मिलो जेवेल्सने बाजारात आणले आहे. प्रिमियम रेंजमधील सीवीडी आभूषणे ही मुंबईकरांसाठी अधोरेखित करण्याजोगी नवी बाब आहे. यासाठीच आम्ही दालनात भेट दिली. प्रामुख्याने लार्ज कलेक्शन असलेल्या या दालनात तुम्हाला विविध स्तरांवरील (किंमत व साईजनुसार) पाहायला मिळतील. सीवीडी तंत्रज्ञानाचा आणखी एक फायदा म्हणजे यातून खाणीसारख्या नैसर्गिक संसाधनावरील ताण कमी पडतो.पाणी, जमीनीची धूप, इतर वारेमाप खर्च, निसर्गातील असंतुलन यासारख्या बाबी टाळता येतात. शाश्वत विकासातील ही एक महत्वाची बाब आहे ती ओळखून मिलो जेवेल्सने हे पाऊल उचलले असे म्हटले जात आहे.दागिन्यांचे नवे ट्रेंड व तंत्रज्ञान पाहता मुंबईकरांसाठी ही स्वस्तात दागिने खरेदीची ही संधी असेल यात शंकाच नाही. अशातच दागिन्यांच्या विक्रीसाठी कंपनीने आणखी रिटेल ज्वेलरी ब्रँड घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले. त्यातील पहिली पायरी म्हणून बोरिवली येथील स्टोअर शांत अंतर्गत सजावट, निवडक संग्रह आणि आकर्षक खरेदीच्या वातावरणाद्वारे मिलोच्या दालनात एक वातावरण निर्मिती होत खरेदीसाठी आवश्यक ती वातावरण निर्माणही आढळली. विशेषतः सोप्या भाषेत ग्राहकांना येथे या तंत्रज्ञानाचे व उत्पादनांचे विवेचन येथील कर्मचारी करतात ही जमेची बाब वाटते.आर्थिकदृष्ट्या पाहिल्यास कंपनीने सध्या विस्तार प्रक्रियेत असल्याचे यावेळी म्हटले. भविष्यात कंपनीचा आयपीओ येण्याचीही शक्यता आहे.एकूणच कंपनीच्या ताळेबंद व विस्तार व्याप्तीबाबत भाष्य करताना स्पष्ट वाढीचा आराखडा असलेल्या मायलो ज्वेल्सने लॅब-ग्रोन डायमंड ज्वेलरी क्षेत्रात एक अग्रगण्य नाव म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करण्याचे ध्येय ठेवले आहे असे यावेळी म्हटले. आर्थिक वर्ष २०३० पर्यंत संपूर्ण भारतात १०० स्टोअर्स उघडण्याच्या मानस कंपनीचा आहे. खास बाब म्हणजे या दागिन्यांवर ट्रेडिंग करता येणे आगामी काळात शक्य होणार आहे. जसे आपण पारंपरिक दागिन्यांसाठी ट्रेडिंग करतो किंवा खरेदी विक्री करतो तसे या दागिन्यांवरही करता येणार आहे. अडीअडचणीला संकटप्रसगी या दागिन्यांची संबंधित स्टोअर मध्ये विक्री अथवा एक्सचेंज करता येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार,या आठवड्यात कंपनी यासंबंधी ऑनलाईन व्यासपीठ बाजारात दाखल करणार आहे. सध्या या मिलो जेवेल्समधून खरेदी केलेल्या दागिने भविष्यात विकायचे झाल्यास त्याच पूर्वीच्या खरेदी किंमतीच्या पावतीवर म्हणजेच पूर्वीच्या खरेदी किंमतीवर हे दागिने विकता येणार आहेत. हा व्यवहार मिलोच्या संबंधित दालनात करता येऊ शकतो.भव्य शहा यांनी आपल्या 'प्रहार' ला दिलेल्या प्रतिक्रियेत अधिक आर्थिक माहिती दिली नसली तरी ते आपल्या कंपनीच्या विस्ताराबाबत म्हटले,'प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे हे विज्ञान आणि भावना यांचा संगम आहे. ज्या पिढीसाठी शैलीइतकेच पृथ्वीचे महत्त्व आहे, त्यांच्यासाठी हे हिरे हा एकमेव तर्कसंगत पर्याय आहे. मिलो ज्वेल्समध्ये,आम्ही ही 'लक्झरीची भविष्यकालीन संकल्पना' भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी, सर्वत्र सुलभ आणि परवडणारी बनवण्यासाठी सर्वसमावेशकपणे कार्यरत आहोत.त्यासाठी आपली कक्षा रुंदावत आहोत' असे म्हटले.सीवीडी तंत्रज्ञान हिरे यांच्यासाठी सर्वात मोठी बाजारपेठ सुरत गुजरात येथे आढळते.सर्वाधिक प्रमाणात सुरत, गुजरात येथे प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांच्या उत्पादनात केंद्रात टाइप IIa हिरे तयार करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते असे मानले जाते. किरा, भंडेंरी, ग्रीनलॅब्स, फिंगरग्रोन, रिद्धी कॉर्पोरेशन, मैत्री असे इतर प्लेअर देखील या उद्योगात कार्यरत आहेत.भारत केमिकल व्हेपर डिपॉझिशन (CVD) हिरा तंत्रज्ञानामध्ये जागतिक आघाडीवरचा प्लेअर या उद्योगात मानला जातो. या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेचे २०२८ पर्यंत ६०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज तज्ञ वर्तवतात.उच्च-गुणवत्तेसह शाश्वत आणि परवडणारे कृत्रिम अथवा अपारंपारिक हिरे तयार करण्यावर या उद्योगाचे लक्ष केंद्रित असताना भारत व बाहेरही या उद्योगाला सध्याच्या कालखंडात बहारी येत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वाढत्या मागणीमुळे बाजारपेठेत इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या २ वर्षात वार्षिक १०५% वाढ या प्रकारात दिसून आली. यापूर्वी उपलब्ध माहितीनुसार,२०२३ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांच्या बियाणे असलेल्या कच्च्या मालातील ५% आयात शुल्क काढून टाकण्यात आले आणि तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीसाठी आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने आयआयटी मद्रासला संशोधनासाठी २४२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले ज्याचा फायदा सुरत सारख्या ज्वेलरी इंडस्ट्रीला होत आहे. दागिन्यांव्यतिरिक्त, भारतात तयार होणाऱ्या या सीवीडी प्रकारच्या हिऱ्यांचा वापर थर्मल मॅनेजमेंट (हीट स्प्रेडर्स), इलेक्ट्रॉनिक्स आणि वैद्यकीय निदान यांसारख्या उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या उद्योगात भरारी घेतली जात असताना या नव्या प्रिमियम व किफायतशीर दरात दागिने हिरे उपलब्ध करून देण्यासाठी मिलो जेवेल्सने घेतलेला उपक्रम मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरू शकतो.
Amisha Patel : गदर 3 बाबत आमिषाने दिली हिंट; चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वीच वर्तवलं ‘हे’भाकित
Amisha Patel : अभिनेत्री आमिषा पटेल हिने गदर ३ बाबत हिंट दिली असून, हा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच बॅाक्स अॅाफिस कलेक्शनच्या आकड्यांचे भाकित वर्तवले आहे.
Mother of All Deals : भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यातील ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (FTA) बद्दल जागतिक स्तरावर तीव्र चर्चा सुरू आहे.
जम्मू काश्मीर : बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरील सर्व विमानसेवा रद्द
श्रीनगर विमानतळावरील येणारी - जाणारी सर्व उड्डाणे सततच्या बर्फवृष्टीमुळे आणि खराब हवामानामुळे रद्द करण्यात आली आहेत. नवीन बर्फवृष्टी झाल्याने श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग देखील बंद झाला आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे.मंगळवार २७ जानेवारी रोजी काश्मीरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारी आणि जाणारी ५० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले. खराब हवामान आणि श्रीनगर विमानतळावर सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे, विमान कंपन्यांनी आजची बहुतेक उड्डाणे रद्द केली आहेत, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले. श्रीनगर विमानतळावर आज चार विमाने येण्याचे नियोजित होते परंतु खराब हवामानामुळे हे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ताज्या अपडेट्स आणि पर्यायी व्यवस्थांसाठी प्रवाशांना त्यांच्या संबंधित विमान कंपन्यांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.जम्मू-कश्मीर | एयरपोर्ट अधिकारियों के मुताबिक, बर्फबारी के कारण अब तक श्रीनगर आने-जाने वाली 25 फ्लाइट्स कैंसिल कर दी गई हैं। pic.twitter.com/QZ04pzCesh— ANI_HindiNews (@AHindinews) January 27, 2026विमानांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे काश्मीरमध्ये हजारो पर्यटक अडकून पडले आहेत. नवयुग बोगदा आणि आसपासच्या परिसरात सुरू असणाऱ्या सततच्या बर्फवृष्टीमुळे मंगळवारी तेथील काही महामार्ग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त मुघल रोड, एसएसजी रोड आणि सिंथन रोड देखील निसारड्या रस्त्यामुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत जम्मूहून श्रीनगर पर्यंत आणि श्रीनगरवरून जम्मू पर्यंत कोणत्याही वाहनांना प्रवास करण्याची परवानगी नसेल असे वाहतूक अधिकारींनी सांगितले.सोमवार २६ जानेवारी संध्याकाळपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता श्रीनगर येथील हवामान खात्याने वर्तवली होती. तसेच काही डोंगराळ भागात दरड कोसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
पुणे : विद्यमान सरपंच सासू आणि शिक्षक पेशात असलेल्या सासर्यांच्या घरात एका उच्चशिक्षित इंजिनिअर विवाहितेचा छळापोटी करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना सोरतापवाडी येथे घडली आहे. दीप्ती मगर-चौधरी या २८ वर्षीय महिलेने शनिवारी रात्री सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, सुशिक्षित कुटुंबातील ही विकृती पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.दीप्तीच्या आईने उरुळी कांचन पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर दीप्तीचा सतत छळ केला जात होता. तिला घरची कामे येत नसल्याचे टोमणे मारणे, तिच्या रूपावर टीका करणे आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेणे असे प्रकार सुरू होते. मुलीचा संसार वाचावा म्हणून माहेरून लाखो रुपये आणि गाडी देऊनही सासरच्यांची पैशांची हाव शमली नाही.https://prahaar.in/2026/01/27/deepti-magar-choudhari-ends-her-life-rohan-choudhari-pune-crime/माझी इच्छा नसताना गर्भलिंग तपासणीची सक्ती केली अन्...आईने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीतून सासरच्या मंडळींच्या विकृत मानसिकतेचा नवा पुरावा समोर आला आहे. पहिली मुलगी असल्यामुळे दुसऱ्या वेळी वंशाच्या दिव्याच्या हट्टापायी दीप्तीवर अमानुष अत्याचार करण्यात आले. नोव्हेंबर २०२५ मध्ये जेव्हा दीप्ती माहेरी आली होती, तेव्हा तिने रडत रडत आपल्या आईकडे पतीच्या क्रूर वागणुकीचा पाढा वाचला होता. दीप्ती पाच महिन्यांची गरोदर असताना, तिच्या पोटातील बाळ मुलगा आहे की मुलगी, हे तपासण्यासाठी पतीने तिच्यावर जबरदस्ती केली. पहिली मुलगी असल्याने यावेळी मुलगाच हवा, असा सासरच्यांचा अट्टहास होता. जेव्हा दीप्तीने या बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीला स्पष्टपणे नकार दिला, तेव्हा पती रोहन चौधरी याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. माहेरी आल्यावर दीप्ती प्रचंड दहशतीखाली होती. माझी इच्छा नसताना पतीने मला मारहाण केली, असे सांगताना ती धाय मोकलून रडत होती, असे तिच्या आईने तक्रारीत नमूद केले आहे.वंशाला दिवा हवा, नाहीतर घर सोड; सासर्यांनी सुनेला दिली होती धमकीआम्हाला वंशाला दिवाच हवा, तू तपासणी करणार नसेल तर घरातून चालती हो, अशा शब्दांत सरपंच सासू आणि शिक्षक सासर्यांनी दीप्तीला घराबाहेर काढण्याची धमकी दिली होती. या मानसिक दडपणाखाली तिची इच्छा नसतानाही तिची गर्भलिंग तपासणी करण्यात आली आणि पोटातील बाळ मुलगी असल्याचे समजताच सासरच्यांनी निर्दयीपणे तिचा गर्भपात घडवून आणला. दीप्ती गरोदर असताना सासू सुनीता आणि सासरे कारभारी यांनी तिला वंशाच्या दिव्यासाठी गर्भलिंग तपासणी करण्याची सक्ती केली. तिने नकार दिल्यावर तिला घरातून हाकलून देण्याची आणि ही गोष्ट माहेरी न सांगण्याची धमकी दिली.सासरच्यांच्या सततच्या दबावामुळे दीप्तीने नाईलाजाने तपासणी केली. मात्र, पोटातील बाळ मुलगी असल्याचे निष्पन्न होताच पती रोहन, सासू, सासरे आणि दीर रोहित या सर्वांनी मिळून दीप्तीची इच्छा नसतानाही तिचा जबरदस्तीने गर्भपात केला. माहेरी आल्यावर दीप्तीने रडत रडत हा सर्व भयानक अनुभव आपल्या आईला सांगितला होता. सासरच्या या विकृत वागणुकीमुळे दीप्ती पूर्णपणे मानसिक धक्क्यात होती, असे तिच्या आईने पोलीस तक्रारीत नमूद केले आहे.हुंडा, छळ आणि सक्तीचा गर्भपात...माहेरून लाखो रुपये आणि हुंडा देऊनही सासरच्यांची हाव संपली नव्हती. उलट, चारचाकी गाडीसाठी माहेरून अधिक पैसे आणण्यासाठी दीप्तीचा छळ केला जात होता. या मानसिक आणि शारीरिक जाचाला कंटाळूनच दीप्तीने टोकाचे पाऊल उचलले असून, तिच्या मृत्यूला सासरचे चारही सदस्य जबाबदार असल्याचा थेट आरोप तिच्या आईने केला आहे. पती रोहन, सासू सुनीता, सासरे कारभारी आणि दीर रोहित चौधरी यांनी वेळोवेळी दीप्तीकडे माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. चारचाकी गाडी घेण्याच्या बहाण्याने तिला सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता. केवळ पैसेच नाही, तर दीप्तीला टोचून बोलणे आणि तिची इच्छा नसताना तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडणे, यामुळे ती पूर्णपणे खचली होती. सासरच्यांच्या या सततच्या छळामुळे आणि अमानुष वागणुकीमुळे दीप्तीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून सासरच्या चौघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. तीन वर्षाच्या मुलीसमोरच इंजिनियर विवाहितेनं गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. पती, दीर आणि सासू-सासरे यांच्या विरोधात याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रोहन चौधरी असे पतीचे नाव आहे तर सुनीता चौधरी सासूचे नाव आहे, कारभारी चौधरी सासरे तर रोहित चौधरी दिराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेनं आत्महत्या केल्याचं बोलंल जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. अधिकचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.५० तोळे सोने आणि ३५ लाख रुपये देऊनही सुनेचा छळदरम्यान, दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी सरपंच सासू सुनीता चौधरी आणि पती रोहन चौधरी यांना अटक केली आहे. २०१९ मध्ये झालेल्या विवाहात दीप्तीच्या कुटुंबाने ५० तोळे सोने देऊनही सासरच्यांची पैशांची भूक शमली नव्हती. मुलीचा संसार सुखाचा व्हावा या आशेने माहेरच्यांनी वेळोवेळी १० लाख रुपये रोख आणि गाडीसाठी २५ लाख रुपये दिले, मात्र इतकी मोठी रक्कम स्वीकारूनही दीप्तीचा छळ थांबला नाही, ज्याचा अंत अखेर तिच्या आत्महत्येने झाला. केवळ पैशांसाठीच नाही, तर दीप्तीच्या रूपावरून तिला टोमणे मारणे, ती सुंदर नसल्याचे म्हणणे, तिला घरकाम येत नसल्याचे आरोप करणे आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेणे अशा विविध मार्गांनी तिचे मानसिक खच्चीकरण केले जात होते. आरोपी सासू सुनीता चौधरी या अवघ्या काही महिन्यांपूर्वीच सोरतापवाडीच्या सरपंच झाल्या होत्या, तर सासरे शिक्षक पेशात आहेत. समाजातील प्रतिष्ठित पदांवर असूनही या कुटुंबाने केलेल्या क्रूर वागणुकीमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. लोणी काळभोर पोलिसांनी याप्रकरणी वेगाने तपास चक्रे फिरवत सासू आणि पतीला अटक केली असून, या गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
पंढरपूर : मुंबईहून विठ्ठलाच्या दर्शनासाठी रवाना झालेल्या भाविकांच्या गाडीचा भंयकर अपघाताची घटना मंगळवेढ्याजवळ येथे घडली आहे.या झालेल्या भीषण अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या भीषण अपघातात १४ वर्षाची लहान मुलीसह तीन महिलांचा ही समावेश आहे व पाच ते सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता पंढरपूर–सोलापूर महामार्गावर मंगळवेढ्याजवळील शरद नगर, मल्लेवाडी परिसरात घडला.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणारे भाविक क्रुझर गाडीने मंगळवेढा मार्गे जात होते. याच दरम्यान ढेकळेवाडी गावाजवळ समोरून येणाऱ्या एका कंटेनर ट्रकने भरधाव वेगात व चुकीच्या दिशेने येत क्रुझर जीपला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे क्रुझर गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात योगिनी केकाणे, सोनम अहिरे, आदित्य गुप्ता आणि सविता गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला. तर अंजली यादव, सोहम घुगे यांच्यासह इतर सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.अपघाताची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी ती लवकरच सुरळीत केली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनर ट्रकचा क्रमांक hh ४६ bu-६६५१ असून चालक युवराज यशवंत गळवे याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

23 C