मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला शेवटच्या दिवसापर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद लाभलेला नाही. एकही कंत्राटदार पुढे आलेला नाही. त्यामुळे मिठी नदीची सफाई कशी होणार असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, मिठी नदीची सफाई न झाल्यास कुर्ल्यासह अर्धी मुंबई पाण्याखाली जाण्याची भीती वर्तवली जात असून जर कुर्ला परिसर पाण्याखाली गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ सईदा खान यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यामुळे मिठी नदीच्या सफाईबाबत प्रशासनाच्यावतीने पुढील कार्यवाही कोणत्या प्रकारे होणार आहे, कंत्राटदार येत नसतील तर काय केले जाणार याची माहिती घेवून पुढील स्थायी समितीच्या सभेपुढे निवेदन करावे अशाप्रकारचे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनाला दिले आहे.मुंबई महापालिकेच्या छोट्या आणि मोठ्या नाल्यांच्या दोन वर्षांच्या सफाईसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. त्यात मिठी नदीच्या सफाईसाठी नेमलेल्या कंत्राटदारांवर कारवाई झाल्याने त्यांना बद करण्यात आले. त्यामुळे मिठी नदीच्या कामांसाठी नव्याने निविदा मागवण्यात येत आहे. परंतु १७ मार्च ही शेवटची तारीख असूनही एकही कंत्राटदार मिठी नदीच्या सफाई कामासाठी पुढे आलेला नाही. काँग्रेसचे महापालिका गटनेते अश्रफ आझमी यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे ही बाब स्थायी समितीच्या निदर्शनास आणून देत जर मिठी नदीची स्वच्छता झाली नाही तर मुंबईला बुडण्यापासून कसे वाचवणार असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे कुर्ला भागाला डुबण्यासाठी कोणीही वाचवू शकणार नाही अशी भीती व्यक्त केली.या हरकतीच्या मुद्दयाला शिवसेनेच्या नगरसेविका अंजली नाईक यांनी पाठिंबा देत एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील मोठ्या नाल्यांसाठी एकही कंत्राटदार पुढे आला नसल्याचे सांगत प्रशासनाने याबाबत भूमिका स्पष्ट करायला हवी. तर शिवसेना महापालिका गटनेते अमेय घोले यांनी मिठी नदीची सफाई न झाल्यास अर्धी मुंबई पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली. तर काँग्रेसच्या मिरांडा यांनी यापूर्वी नगरसेवक नसल्यामुळे कंत्राटदारांचे चांगलेच फावले होते, पण आता नगरसेवक आल्यामुळे त्यांना गाळातील हातसफाई करता येणार नसल्यामुळे ते घाबरले असून त्यामुळेच त्यांनी निविदेत भाग घेतला नसल्याचे सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या डॉ सईदा खान यांनी मिठी नदी ही नाला नाही तर नदी आहे हे २ ६ जुलैच्या महापुराने मुंबईकरांना दाखवून दिले. मिठी नदीला जोडणारे ११ ऑऊटफॉल असून त्यांची सफाईही योग्यप्रकारे झालेली नाही. त्यामुळे ही सफाई कधी होणार असा सवाल करत त्यांनी जर कुर्ला परिसर पाण्याखाली गेल्यास मी उपोषणाला बसेन असा इशारा दिला. तर एमआयएमआयएचे सलीम कुरेशी यांनी मिठी नदीमुळे कुर्लाच नाहीतर एम पूर्व भागही पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली. भाजपचे प्रकाश दरेकर यांनी यापूर्वी भाजपचे नगरसेवक पहारेकरी होते आणि आता आम्ही सेवेकरी असून नाल्यातील गाळ तळापासून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे सांगितले. तर मिनाक्षी पाटणकर यांनी विभागातील नाले अरुंद असल्यामुळे लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरत असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत हरिष भांदिर्गे, यशोधर फणसे, शिवकुमार झा, दिपमाला बढे तसेच श्रध्दा जाधव आदींनी चर्चेत भाग घेतला होता.यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी नालेसफाईचा हा मुद्दा गंभीर असून मिठीनदीच्या निविदेबाबत प्रशासनाने स्वत:हून निवेदन करायला हवे होते. नालेसफाईच्या मुद्दयाबाबत महापौरांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली आहे. त्यानुसार आम्ही प्रशासनाला सूचना केल्याच आहेत. पण या मुद्दयाच्या अनुषंगाने पुढील स्थायी समितीच्या बैठकी प्रशासनाने सविस्तर निवेदन करून माहिती द्यावी असे निर्देश दिले. मुंबईत पुरसदृश्य स्थिती होणार नाही याची काळजी घ्यावी अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.
मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी नववर्ष प्रारंभ अर्थात गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या या संदेशात म्हटले आहे की,' नववर्ष आपल्या सर्वांसाठी सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा- आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण करणारे ठरावे. नवसंकल्पना साकार व्हाव्यात यासाठी ऊर्जा देणारे ठरावे त्यासाठी सर्वांना निरामय आरोग्य लाभो, हीच प्रार्थना. यातून लाभणाऱ्या नवचैतन्यातून महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा... मराठीची गुढी आणखी उंच उभी करण्याचा निर्धार करुया !'
मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड पर्यंतविस्तारित पुलाच्या कामाचा खर्च तब्बल ४० कोटींनी वाढला गेला. आतापर्यंत या विस्तारित पुलाच्या वाढीव खर्च तीन वेळा वाढवला गेला आहे. २०९ कोटी रुपयांवरून या प्रकल्पाचा खर्च २४८ कोटी रुपयांवर पोहोचला गेला आहे. मात्र, या वाढीव कामांबाबत कंत्राटदार आणि सल्लागारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याने आता अखेर स्थायी समितीच्यावतीने या विस्तारीत पुलाची प्रत्यक्षात जावून पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि सल्लागार कंपनी यांनाच पाचारण करून स्थायी समितीचे सदस्य हे त्यांची शाळा घेणार आहे.गोरेगाव पूर्व येथील मृणालताई गोरे उड्डाणपूलाच्या विस्तारीत बांधकामातील कंत्राट कामांच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मागील चर्चेला आला असता शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी जुना आणि नवीन पुलाच्या बांधकामाचा हा प्रस्ताव असून जुना पूल वापरात नाही, त्यामुळे याचा खुलासा करावा अशी मागणी केली. तर हे काम आठ वर्षांपसाून सुरु आहे. अंधेरी ते गोरेगाव जाण्यासाठी अर्धा ते पाऊणतासाचा वेळ जात आहे. त्यामुळे याचे जर तीन वेळा व्हेरिएशन येत असेल तर याची प्रत्यक्ष जागी जावून पाहणी करावी अशी मागणी यशोधर फणसे यांनी केली.तर भाजपच्या प्रिती सातम यांनी कंत्राट कामाच्या वाढीव खर्चाला दिलेल्या कारणावर आक्षेप नोंदवला. जागेची उपलब्धता आणि कार्यपध्दतीमुळे हा खर्च वाढल्याचे कारण देण्यात आले. त्यामुळे सल्लागार डोळे बंद करून आराखडा बनवतात का असा सवाल करून कंत्राटदारांच्या वाढीव खर्चावर सल्लागारांना वाढीव शुल्क देण्यात येवू नये, सल्लागारांना मुळ कंत्राट कामाचेच शुल्क देण्यात यावे अशी सूचना केली. शिवसेना महापालिका गटनेते अमेय घोले यांनीही याची प्रत्यक्ष पाहणीची मागणी केली, तर अश्रफ आझमी यांनी सल्लागारांच्या माध्यमातून अभियंत्यांमधील कौशल्य डॅमेज केले जात असल्याचा आरोप केला. त्यामुळे अखेर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव राखून ठेवत याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल असे जाहीर केले.महापालिकेतील रावसाहेब आणि भाऊसाहेबमहापालिकेत अधिकारी आणि सल्लागारांचा उल्लेख रावसाहेब आणि भाऊसाहेब असा करत सभागृहनेते गणेश खणकर यांनी पुलाच्या विस्तारीत कामाची पाहणी दरम्यान या रावसाहेब आणि भाऊसाहेबांनाच तिथे बोलावले जावे,अशी सूचना केली. त्यामुळे कंत्राटदाराला तिथे न बोलावता रावसाहेब आणि भाऊसाहेबांना तिथे बोलावतून त्यांच्याकडून या वाढीव खर्चाची कारणे जाणून घेतली जावीत अशी सूचना केली.
सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला
मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने अत्यंत घाईघाईत स्थायी समिती मंजुरीसाठी सादर केलाहोता. मागील स्थायी समितीमध्ये प्रशासनाने हा प्रस्ताव राखून ठेवला होता. मात्र, बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाने स्वत:च हा प्रस्ताव मागे घेतल्यामुळे आता महापालिका शाळांमधील मुलांची सहल नवीन शैक्षणिक वर्षांतच होणार आहे. विशेष म्हणजे सध्या परिक्षा सुरु असल्यामुळे केवळ ३१ मार्च रोजी यासाठी निधी संपवण्यासाठी या सहलीचा घाट घातला गेला असल्यामुळे शिक्षण विभागाचे वाभाडे काढल्यानंतर प्रशासनालाच हा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की आली. त्यामुळे भाजपने हा डाव एकप्रकारे उधळवून लावत कोणतेही नियबाह्य कामकाज केले जाणार नाही हे दाखवून दिले आहे.मुंबई महापालिका स्थायी समितीच्या मागील सभेच्या आदल्या दिवशी महापालिका शाळांमधील इयत्ता ४थी व ७वीच्या मुलांची सहल भायखळा राणीबाग आणि बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अर्थात नॅशनल पार्कमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. तब्बल ६६०० मुलांची ०९ ते २७ मार्च दरम्यान ही सहल आयोजित श्रीयांश एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली होती. यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात येणार होता. याबाबत मागील सभेमध्ये हा प्रस्ताव आला असता सभागृहनेते गणेश खणकर यांनी हरकत घेत हा प्रस्ताव राखून ठेवण्याची सूचना केली होती. तसेच शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांच्याह डॉ सईदा खान, यशवंत किल्लेदार. अश्रफ आझमी, जमीर कुरेशी यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव राखून ठेवला होता. मात्र, हा सहलीचा घाट मुलांच्या मनोरंजनासाठी नव्हेतर कंत्राटदाराचे खिसे भरण्यासाठीच असल्याचे स्पष्ट आरोप झाल्यानंतर आणि ३१ मार्चपूर्वी याचा प्रस्ताव मंजूर न केल्यास यासाठीचा निधी वाया जावू शकतो याच भीतीने आणल्याचेही बोलले गेले होते.त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या सभेपुढे पुन्हा येताच यावर चर्चा करण्यापूर्वी प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी हा प्रस्ताव स्वत:हून मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अखेर हा प्रस्ताव मागे घेण्यात आल्यामुळे महापालिका शालेय मुलांची सहल आता नवीन शैक्षणिक वर्षांतच जाण्याची दाट चिन्हे आहे.कुठल्या ठिकाणी किती मुले जाणार होती सहलीला
IPL 2026 Key Players : दाच्या हंगामात अनेक खेळाडूंच्या बदल्या झाल्या असून, काही नवीन चेहरे संघाचे नशीब बदलण्यासाठी सज्ज आहेत.
शिक्षण क्षेत्रात खळबळ! बनावट कागदपत्रांच्या आधारे २ कोटींचा घोटाळा; संस्थाचालकांवर फौजदारीचे आदेश
Hingoli school scam :
Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्राच्या मातीतील अस्मितेचा खेळ असलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा भव्य शुभारंभ आज (१८ मार्च) 'स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी'त पार पडला.
रेडिओ क्लब जेट्टीमुळे प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळणार
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया येथील पर्यटकांची वाढती गर्दी आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता, प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी 'रेडिओ क्लब जेट्टी' विकसित करण्यात येत आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि शिस्तबद्ध सुविधा देण्यास आमचे प्राधान्य आहे, अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी विधानसभेत दिली.शिवसेना आमदार अशोक पाटील यांनी गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टी क्रमांक ५ आणि रॉयल बॉम्बे यॉट क्लबला दिलेल्या परवानगीबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना राणे बोलत होते.गेटवे ऑफ इंडिया हा परिसर नौदलाच्या 'हाय सिक्युरिटी झोन'मध्ये येतो. जेट्टी क्रमांक ५ वर होणारी अनियंत्रित गर्दी अपघातांना निमंत्रण देणारी ठरत होती. त्यामुळे मुंबई पोर्ट प्राधिकरणाने सुरक्षेच्या कारणास्तव येथे तरंगता तराफा (फ्लोटिंग पॉन्टून) उभारण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार पाटील यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टला १७ टक्के आणि खासगी संस्थेला मिळणाऱ्या ८३ टक्के दराबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर स्पष्टीकरण देताना मंत्री राणे म्हणाले की, दर ठरवण्याचे अधिकार मुंबई पोर्ट ट्रस्टकडे आहेत. तरीही, मुंबईचे मूळ भूमीपुत्र असलेल्या कोळी बांधवांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मी स्वतः केंद्रीय शिपिंग मंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिले असून, स्थानिकांना सवलती देण्यापेक्षा त्यांना आधुनिक बोटी उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे.दरम्यान, आमदार अशोक पाटील यांनी यावेळी गेटवे ऑफ इंडिया येथील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मंत्री नितेश राणे म्हणाले, हे अतिक्रमण नसून, ती छोट्या कंटेनरमधील एक पोलीस चौकी आहे. ती गरजेची आहे. पण, यावर लोकांची अडचण होत असेल, तर त्याबाबत पर्यायी व्यवस्था करण्याबाबत सूचना केली जाईल.वरुण सरदेसाईंना मावस भावसह निमंत्रणआमदार वरुण सरदेसाई यांनी उपप्रश्न उपस्थित केला की, या ५ नंबरच्या जेट्टीवर जर अतिरिक्त दर आकारले जात असतील, तर त्या दर्जाची सुविधा दिली जाते का? त्याला उत्तर देताना मंत्री नितेश राणे म्हणाले, अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी आम्ही रेडिओ क्लब जेट्टी उभारत आहोत. स्वीडनवरून 'कँडेला' नावाची अत्याधुनिक बोट लवकरच मुंबईत येत आहे. ती आली की माझा पहिला फोन वरुण सरदेसाईंना असेल. तुम्ही माझ्यासोबत त्या बोटीने फिरायला या. वाटल्यास सोबत तुमच्या 'मावस भावाला' (आदित्य ठाकरे) देखील घेऊन या. तुम्हाला 'मातोश्री'चा कोणताही त्रास होणार नाही, याची पूर्ण खबरदारी मी घेईन, असा खोचक टोला राणे यांनी लगावला. राणे यांच्या या विधानामुळे सभागृहात एकच हशा पिकला.
Gas Shortage: क्विक कॉमर्स कंपन्यांना याचा जास्त फायदा होत असून दिल्ली, बंगलोरसारख्या शहरातून अशा पदार्थांची मागणी 20 टक्क्यांनी वाढली आहे.
Mallikarjun Kharge : राज्यसभेत खासदारांच्या निरोप समारंभात मल्लिकार्जुन खर्गे यांनी एच.डी. देवेगौडा आणि रामदास आठवले यांची फिरकी घेतली.
Thalapathy Vijay : आगामी निवडणुकीत कोणाशीही तडजोड करणार नाही; विजय यांनी केले स्पष्ट
आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात रंगलेल्या युतीच्या चर्चांना तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे अध्यक्ष आणि सुपरस्टार विजय (Thalapathy Vijay) यांनी पूर्णविराम दिला.
Petrol-Diesel: तेल शुद्धीकरण कंपन्यांना किती नफा मिळतो याचे मूल्यांकन करणारा सिंगापूर ग्रॉस रिफायनिंग मार्जिन हा निर्देशांक आहे. हा निर्देशांक मार्चच्या सुरुवातीला प्रतिपिंप 40 ते 45 डॉलर इतका होता. तो आता उणे 5 ते उणे 10 डॉलर या पातळीवर गेला आहे.
राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा
मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी हडपणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच राज्यात असा प्रकार आणखी कुठे झाला याची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश दिले असून, आता पुणे जिल्ह्याप्रमाणेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील मागील पाच वर्षांतील कलम १५५ च्या आदेशांची चौकशी करून दोन महिन्यांत अहवाल सादर केला जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत केली.सध्या पुणे विभागातीलच गैरव्यवहार पुढे आला असून, महाराष्ट्रातील अशा नोंदी तपासण्याचे आदेश सर्व विभागीय आयुक्तांंना दिले आहेत. त्यानंतर हा प्रकार किती मोठा आहे, याची कल्पना येईल. पुणे विभागातील या अतिगंभीर प्रकरणांवर पुढील सात दिवसांत प्राथमिक कारवाई केली जाईल. हा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर सुरू असलेल्या अधिवेशनाचे कामकाज संपण्यापूर्वीच यावर केलेल्या कारवाईचा सविस्तर ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’ (एटीआर) सभागृहासमोर ठेवला जाईल, असे आश्वासनही महसूलमंत्री बावनकुळेयांनी सभागृहात दिले.प्राथमिक माहितीनुसार, राज्यातील सुमारे दीड ते दोन लाख कुटुंबांवर परिणाम झाल्याची शक्यता असून नागरिकांना न्याय मिळवून देणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचे स्पष्ट करून दोषी अधिकारी कितीही मोठ्या पदावरील असले तरी त्यांच्यावर कारवाई टाळली जाणार नाही, असेही मंत्री बावनकुळे यांनी सभागृहात ठामपणे सांगितले.ॲड. अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, महसूल विभागातील कलम १५५ चा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याच्या तक्रारी शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत. शुद्धलेखन दुरुस्तीसाठी असलेल्या तरतुदीचा वापर करून काही ठिकाणी जमिनीच्या मालकीत फेरफार करणे, क्षेत्रफळ कमी-जास्त करणे किंवा नोंदीत बदल करणे असे गंभीर प्रकार घडल्याचे तपासात आढळले आहे.चौकशी अहवालातील धक्कादायक वास्तवविभागीय आयुक्त, नाशिक यांच्या समितीने पुणे जिल्ह्यातील ३८,०२७ प्रकरणांपैकी २,३८३ प्रकरणांची प्रत्यक्ष तपासणी केली. त्यामध्ये ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन अर्ज स्वीकारून घाईघाईने घेतलेले निर्णय. हितसंबंधितांना नोटिसा न बजावता दिलेले आदेश, भोगवटदार वर्ग-२ ची जमीन वर्ग-१ करणे आणि क्षेत्रफळात वाढ करणे, इतर हक्कातील व्यक्तींची नावे बेकायदेशीरपणे कमी करणे अशा बाबी निदर्शनास आले आहे. तपासात १५ अधिकारी अतिगंभीर, ८२ गंभीर आणि ५५ अधिकारी मध्यम स्वरूपाच्या अनियमिततेत दोषी आढळले असल्याची माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली.दोषींवर कठोर कारवाईचा बडगासमितीच्या शिफारशीनुसार शासनाने कारवाई निश्चित केली आहे.'अ' वर्ग (अतिगंभीर) १३ प्रकरणांत फौजदारी कारवाई आणि कठोर विभागीय चौकशी होईल. 'ब' वर्ग (गंभीर) २४७ प्रकरणांत विभागीय चौकशी आणि संबंधित अधिकाऱ्यांची पुणे विभागाबाहेर अकार्यकारी पदावर बदली. 'अ' वर्गातील सर्व जबाबदार अधिकारी व कर्मचारी तसेच ३० पेक्षा जास्त अनियमितता आढळलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात येणार आहे. ज्या प्रकरणांच्या संचिका (फाईल्स) गहाळ आहेत, त्यांच्यावर सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ नुसार फौजदारी कारवाई केली जाईल.राज्यासाठी नवीन धोरण आणि कायदा सुधारणामहसूल मंत्र्यांनी सांगितले की, या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता राज्यातील सर्वच जिल्ह्यांत मागील ५ वर्षांतील कलम १५५ च्या आदेशांची तपासणी करण्याचे आदेश १३ फेब्रुवारी २०२६ रोजी देण्यात आले आहेत. तसेच, भविष्यात अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १५५ मध्ये कायदेशीर सुधारणा प्रस्तावित करण्यात येत आहे. सदोष आढळलेले सर्व फेरफार कलम २५७ नुसार पुनरिक्षणात घेऊन तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी पुणे यांना देण्यात आले आहेत.
मंत्री नितेश राणे यांच्या 'व्हिजन'वर विधिमंडळात कौतुकाची मोहोर
मुंबई: कोकणच्या निसर्गसंपदेला आधुनिकतेची जोड देऊन या भूमीचा कायापालट करण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी राबविलेल्या कार्यपद्धतीचे जाहीर कौतुक बुधवारी विधिमंडळात झाले. कोकणच्या प्रश्नांवर झालेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान, मंत्री नितेश राणे यांनी अल्पावधीत घेतलेले लोकहिताचे निर्णय आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या त्यांच्या 'धडाक्या'चे आमदारांनी मुक्तकंठाने कौतुक केले.या चर्चेत सहभागी होताना आमदार संजय केळकर यांनी मंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टीचा गौरव केला. ते म्हणाले की, कोकणात पर्यटनाच्या अथांग संधी आहेत. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी कोकण विकासाचे जे स्वप्न पाहिले, तेच व्हिजन पुढे नेत मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकणासाठी योजनांची भक्कम पायाभरणी केली आहे. विशेषतः मच्छीमारांना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि जलवाहतूक सक्षम करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सातत्यपूर्ण आहेत. जलवाहतुकीच्या क्षेत्रात सुरू असलेले वेगाचे काम कोकणच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आमदार शेखर निकम यांनी नितेश राणे यांच्या कार्यतत्परतेचे विशेष अभिनंदन केले. मंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच राणे यांनी मच्छीमारांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, पर्ससीन बोटींचा वाद आणि जेट्टींच्या रखडलेल्या कामांना गती दिल्याचे निकम यांनी नमूद केले. रोपॅक्सच्या माध्यमातून अत्याधुनिक जलवाहतूक सुरू करून त्यांनी कोकणच्या दळणवळणात क्रांती घडवली आहे, असेही ते म्हणाले.'नॅशनल वॉटर वे - २८'ला चालना देण्याची मागणीयावेळी आ. निकम यांनी एक महत्त्वाची सूचनाही मांडली. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या दाभोळ ते पेडे गोळकोट (नॅशनल वॉटर वे - २८) या मार्गाला गती दिल्यास रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल. ट्रकची वाहतूक बोटीमार्गे होऊन ते थेट लोटे औद्योगिक क्षेत्रापर्यंत पोहोचू शकतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
Stock Market: स्वस्त झालेल्या ‘या’शेअरची गुंतवणूकदारांकडून खरेदी
Stock Market: इन्फोसिस, महिंद्रा, टीसीएस, अॅॅक्सिस बँक, अदानी पोटॅस आघाडीवर
IND vs PAK : पुरुष गटात भारताला आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत पूल-डी मध्ये ठेवण्यात आले आहे.
Supreme Court : आता वडिलांनाही मिळणार पितृत्व रजा.! सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
पितृत्व रजेमुळे कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे योग्य वाटप होईल आणि मुलाशी वडिलांचे भावनिक नाते अधिक घट्ट होईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
दिल्लीत आगीचे तांडव! पालममधील इमारतीला भीषण आग; ९ जणांचा होरपळून मृत्यू
Delhi fire news : दिल्लीच्या पालम भागातील साध नगरमध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीत ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
Shivam Dube : शिवम दुबेने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतरच्या रेल्वे प्रवासाबद्दल खुलासा केला आहे.
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा चीन दौरा लांबणीवर; स्वत: सांगितले कारण
Donald Trump: मार्चअखेर नियोजित चीन भेट आता एप्रिल मध्यावर ढकलली; हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेसाठी चीनने मदत नाकारली
Neelkanth Jewellers: नीळकंठ ज्वेलर्सला प्रतिष्ठेचे ‘आयएजीईएस’प्रमाणपत्र
Neelkanth Jewellers: या प्रसंगी एस. एस. धामणे अँड कंपनीचे भागीदार सीए शुभदा धामणे, सीए अभिषेक धामणे, सीए प्रसाद धामणे आदी उपस्थित होते.
Parinay Phuke : महाराष्ट्रातही समान नागरी कायदा? आमदार परिणय फुके यांची विधान परिषदेत मोठी मागणी
Parinay Phuke :
Vehicle Tax: दुचाकीसाठी २ हजारांवरून ४ हजार, पेट्रोल वाहनांसाठी ३ हजारांवरून ६ हजार, डिझेल वाहनांसाठी ३५०० वरून ७ हजार रुपये; राज्याला वार्षिक १६० कोटींचा अतिरिक्त महसूल अपेक्षित
Satara ZP: मतदारांनी भाजपला नाकारूनही 'ऑपरेशन लोटस'चे प्रयत्न; राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीच्या सत्तास्थापनेवर मात्र कोणताही परिणाम नाही
Newasa News : भेंडा येथे पाटात बुडून बँड गायकाचा मृत्यू; अपघात की घातपात? तपास सुरू
Newasa News : भेंडा परिसरात आंघोळीसाठी गेलेल्या स्वप्नील मगरे या ३२ वर्षीय गायकाचा बुडून मृत्यू झाला.
Pune News : पुण्यातील धायरी परिसरात चोरट्यांनी घराबाहेर लपवलेली चावी शोधून दीड लाखांचे दागिने चोरले आहेत.
Pune Crime News : कुत्र्यांच्या भुंकण्यावरून संशय; टोळक्याच्या मारहाणीत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Pune Crime News : पुण्यातील वानवडी परिसरात धक्कादायक घटना. कुत्रे भुंकल्याने संशय बळावला आणि टोळक्याने पाठलाग करून १९ वर्षीय रुपेश शिंदेची बॅटने मारहाण करत हत्या केली.
Allah Ghazanfar statement : युवा फिरकीपटू अल्लाह गझनफरने या घटनेवर शोक व्यक्त करत भारताकडे मदतीचे साकडे घातले आहे.
मुंबईच्या नैसर्गिक संरक्षणाशी तडजोड करून विकास साधला जाऊ नये, असा इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिला.
US-Israel-Iran war: युद्धग्रस्त इराणला भारताने पाठवली मोठी मदत; तेहरानने मानले आभार
US-Israel-Iran war: इराणचे राजदूत म्हणाले — भारत आमचा मित्र देश; दोन्ही देशांचे हित समान
Rupali Chakankar: महिला आयोगाच्या अध्यक्षा खरातच्या संस्थेवर सदस्या; सुषमा अंधारे, वडेट्टीवार, दमानिया यांनी मागितला राजीनामा.. चाकणकर म्हणाल्या, आरोपांबाबत मला कल्पना नव्हती
महाराष्ट्रात अवकाळीचा कहर! गारपीट-वादळी पावसाने पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल
Unseasonal Rain :
सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी भारतीय सायबर क्राईम समन्वय केंद्र स्थापन करण्यात आले असून, ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सायबर फॉरेन्सिक प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
Sanju Samson explain : यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी बातमी म्हणजे संजू सॅमसन आता सीएसकेकडून खेळताना दिसणार आहे.
कोणतेही कल्याणकारी किंवा विकासात्मक लाभ न देताच, या सरकारने (YS Jagan Mohan Reddy) विक्रमी पातळीवर कर्ज जमा केले आहे.
Revenue Department Biggest Scam: शुद्धलेखन दुरुस्तीच्या नावाखाली जमिनीच्या मालकी हक्कातच बदल; महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, महसूल खात्याच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घोटाळा
या विधेयकावर सखोल चर्चा आणि कायदेशीर पैलू तपासण्यासाठी समितीला अधिक वेळ मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला.
Teachers News : शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द; काय आहे कारण?
Teachers News :
MS Dhoni Jersey : आता मैदानातील सामन्यांपेक्षा सध्या एमएस धोनीच्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे
महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा (Jishnu Dev Varma) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच सर्व कुलगुरूंशी संवाद साधला.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्षांनी सरकारला या घटनेवर तातडीने सविस्तर निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत.
Baramati Assembly Election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू
रायगड :मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच वाहने एकमेकांना धडकली असून अपघाताची तीव्रता मोठी होती.पुण्यावरून मुंबईला जाताना नव्या सुरू झालेल्या बोगद्याच्या खोपोलीकडील एक्झिटवर हा अपघात झाला. यावेळी पाच वाहनांच्या धडकेत कंटेनर एका चारचाकीवर पलटल्यामुळे गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने येताना ९.४० च्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या वाहनांमध्ये अचानक ब्रेक लागल्याने मागून येणाऱ्या वाहनांनी एकमेकांना जोरदार धडक दिली. या साखळी अपघातात एक कंटेनर अनियंत्रित होऊन समोरच्या चारचाकी वाहनावर उलटला. त्यामुळे चारचाकीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६ मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी'जहाज दाखल
गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी' गुजरातच्या मुंद्रा बंदरात यशस्वीरित्या दाखल झाले असून, ऊर्जा संकटाच्या काळात दिलासा मिळाला आहे. हे जहाज अंदाजे ८०,८८६ मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन बंदरात दाखल झाले. हे कच्चे तेल संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधून आयात करण्यात आले आणि जहाज फुजैराह बंदर येथे भरले गेले होते.या जहाजाची एकूण लांबी २७४.१९ मीटर आणि रुंदी ५०.०४ मीटर आहे. या टँकरचे डेडवेट टनेज (एकूण भार वाहून नेण्याची क्षमता) अंदाजे १,६४,७१६ टन आणि ग्रॉस टनेज अंदाजे ८४,७३५ टन आहे.या जहाजाचे मुंद्रा बंदरातील आगमन, मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात हाताळण्यात अदानी पोर्ट्सच्या सुविधांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते. अशा प्रकारची वाहतूक प्रमुख रिफायनरी कंपन्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण त्या आपले कामकाज अखंडित ठेवण्यासाठी आणि भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी या मालवाहतुकीवर अवलंबून असतात.यापूर्वी, भारतीय ध्वज असलेल्या दोन एलपीजी वाहक जहाजांनी १६ आणि १७ मार्च रोजी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करून भारतात आगमन केले होते. एमटी शिवालिक आणि एमटी नंदा देवी या जहाजांनी, अंदाजे ९२,७१२ मेट्रिक टन एलपीजी घेऊन शुक्रवारी (१३ मार्च) सकाळी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास केला.आपल्या व्यावसायिक हितांचे रक्षण करण्यासाठी, भारत ऑपरेशन संकल्प अंतर्गत या प्रदेशातील सागरी हद्दीत सतत नौदल उपस्थिती राखतो. हा उपक्रम महत्त्वाच्या सागरी मार्गांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि जग लडकीसारख्या जहाजांचे सुरक्षित आगमन शक्य होते.
दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. पीडित कुटुंबांसाठी आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे.पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी दोन्ही घटनांना दुःखद म्हटले असून, या कठीण काळात शोकाकुल कुटुंबांप्रति आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. इंदूरमधील घटनेबाबत, पंतप्रधान कार्यालयाने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, आगीमुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीमुळे पंतप्रधान अत्यंत दुःखी आहेत. पंतप्रधान म्हणाले की, ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती माझ्या संवेदना आहेत. मी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. तसेच, पंतप्रधान राष्ट्रीय सुरक्षा दलाकडून (PMNRF) प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची सानुग्रह मदत जाहीर करण्यात आली आहे.दिल्लीतील पालम भागातील राम मार्केटमधील एका चार मजली इमारतीला आग लागली. इमारतीच्या तळघर, तळमजला आणि पहिल्या मजल्यावर कपडे आणि सौंदर्यप्रसाधनांचे शोरूम होते, तर वरच्या दोन मजल्यांवर एक कुटुंब राहत होते. आग इतक्या वेगाने पसरली की रहिवाशांना बाहेर पडता आले नाही, यात किमान सहा जणांचा बळी गेला आहे.मध्य प्रदेशातील इंदूरमध्येही अशीच एक दुःखद घटना घडली. बंगाली स्क्वेअरमधील ब्रिजेश्वरी कॉलनीत कार चार्ज करताना शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. आगीने संपूर्ण घराला वेगाने वेढले. घरात ठेवलेल्या गॅस सिलिंडरलाही आग लागली, ज्यामुळे एकापाठोपाठ एक स्फोट झाले आणि घराचा काही भाग कोसळला. या घटनेत किमान आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
Ishan Kishan SRH Captain : ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू पॅट कमिन्स दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे एसआरएच संघाचा कर्णधार बदलण्यात आला आहे.
Rupee at Record Low: रुपयाच्या घसरणीचा फटका केवळ परकीय चलन बाजारापुरता मर्यादित नाही; महागाई, गुंतवणूक, व्यापार आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही त्याचा खोल परिणाम होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
बहुप्रतिक्षित 'धुरंधर रेव्हेंज' हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या रसिक प्रेक्षकांना आज मनस्तापाला सामोरे जावे लागले.
Ravi Pujari Arrest : कुख्यात गुंड रवी पुजारीला ठाणे पोलिसांकडून अटक
कुख्यात गुंड रवी पुजारी (Ravi Pujari Arrest) याला २०१७ मधील एका बांधकाम व्यावसायिकाकडून १० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी आणि त्याच्या कार्यालयावर गोळीबार केल्याच्या आरोपाखाली ठाणे पोलिसांनी अखेर अटक केली.
मोठी बातमी..! काँग्रेस खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश; राज्यातील राजकारणात खळबळ
Congress MP : आसाम विधानसभा निवडणुकीपूर्वी खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
'उबाठा'गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर
- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेगमुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचे दोन अंक पूर्ण झाल्यानंतर आता तिसऱ्या अंकाची म्हणजेच फुटीच्या 'पार्ट-३'ची तयारी सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 'उबाठा' गटाचे लोकसभेतील ९ पैकी निम्म्याहून अधिक खासदार सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून, ते लवकरच सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.एकनाथ शिंदे यांनी आपली पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि संसदेत शिवसेनेचे वजन वाढवण्यासाठी हे विशेष 'मिशन' हाती घेतल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उबाठा गटाचे ५ ते ६ खासदार शिवसेनेच्या संपर्कात असून त्यांनी सत्ताधारी पक्षात येण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दिल्ली दौऱ्यानंतर या राजकीय हालचालींना वेग आला. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून, संभाव्य पक्षप्रवेशावर सविस्तर चर्चा केल्याचे शिवसेना सूत्रांकडून समजते.या भेटीनंतर शिंदे यांनी इच्छुक खासदारांच्या नावांची यादी तपासून पाहिली असून, त्यांच्या प्रवेशाबाबत कायदेशीर पेच निर्माण होऊ नये, यासाठी नामवंत तज्ज्ञांशी सल्लामसलत सुरू केली आहे. पक्षांतरादरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी अत्यंत गुप्तता पाळून ही रणनीती आखली जात आहे.कायदेशीर सल्लामसलत सुरूसध्या शिवसेकडून या सर्व खासदारांच्या अधिकृत प्रवेशासाठी कायदेशीर सल्लामसलत सुरू आहे. अपात्रतेची टांगती तलवार टाळून हे कसे शक्य होईल, याचा सखोल आढावा घेतला जात आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच मोठा राजकीय 'धमाका' होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल
बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटूविराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील झाला आहे. कोहली बुधवारी बंगळूरुमध्ये दाखल झाला. संघ व्यवस्थापन, क्रिकेटपटू आणि चाहते त्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. बंगळूरुमध्ये येण्यापूर्वी कोहली लंडनमध्ये सराव करत होता. कोहलीने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरावाचा एक फोटो देखील पोस्ट केला, जो आरसीबीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर शेअर केला. कोहलीच्या संघात सामील झाल्यामुळे सराव सत्रांना आणखी गती मिळणार आहे.आरसीबी चॅम्पियन म्हणून आयपीएल २०२६ मध्ये प्रवेश करेल. आपले विजेतेपद टिकवणे हे संघाचे मुख्य ध्येय असेल. आरसीबीने आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सला पराभूत करत आपले पहिले विजेतेपद पटकावले होते. आरसीबीच्या विजयात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. फ्रँचायझीसाठी डावाची सुरुवात करणाऱ्या कोहलीने गेल्या हंगामात १५ सामन्यांमध्ये ५४.७५ च्या सरासरीने आणि १४४.७१ च्या स्ट्राइक रेटने ६५७ धावा केल्या. या काळात त्याने आठ अर्धशतके झळकावली. कोहलीने ६६ चौकार आणि १९ षटकारही मारले.जर आरसीबीला आयपीएल २०२६ मध्ये आपले विजेतेपद टिकवायचे असेल, तर विराट कोहली महत्त्वाची भूमिका बजावेल. संघ व्यवस्थापन पुन्हा एकदा त्याच्याकडून डावाच्या सुरुवातीला सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीची अपेक्षा करेल.विराट कोहली आरसीबीच्या पहिल्या हंगामापासूनच संघाशी जोडलेला आहे. त्याची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली आहे. तो जवळपास प्रत्येक वर्षी संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू राहिला आहे. कोहली लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. सर्वाधिक धावा आणि शतकांचा विक्रम त्याच्या नावावर आहे. कोहलीने २६७ सामन्यांमध्ये आठ शतके आणि ६३ अर्धशतकांसह ८,६६१ धावा केल्या आहेत. विराटने २०१३ ते २०२१ पर्यंत आरसीबीचे कर्णधारपदही भूषवले होते. कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबी २०१६ च्या अंतिम फेरीत पोहोचली होती, पण त्यांना विजेतेपद मिळवता आले नाही.मागील हंगामात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने आपले पहिले विजेतेपद पटकावले. आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीचे चाहते पाटीदारच्या कर्णधारपदावर आणि फलंदाजीवर लक्ष ठेवून असतील. बंगळुरु आणि हैदराबाद यांच्यातील हंगामातील पहिला सामना २८ मार्च रोजी खेळला जाणार आहे.
Stock Market: भारती एअरटेल, एल अँड टी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समधील वाढीनेही बाजाराला आधार दिला; ब्रेंट क्रूडच्या किमती घसरल्या
Maharashtra Politics : महायुतीत बिघाडी! “भाजपने केसाने गळा कापला”; शिवसेनेच्या आमदाराचा आरोप
Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजपने शिवसेनेला (शिंदे गट) डावलून सत्ता स्थापन केली.
नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश
मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी विधानसभेत केला. त्यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले.चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदारसंघात तस्करांना पकडणार्या वनविभागाच्या प्रामाणिक अधिकार्यांना एका स्थानिक नेत्याकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जाते आणि तस्करांना सोडवण्यासाठी दबाव टाकला जातो, असा आरोप वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केला. याला उत्तर देतांना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, ज्या अधिकार्यांनी राजकीय दबावाखाली येऊन तस्करांना सोडून दिले, त्यांची सखोल चौकशी करून त्यांना कठोर शासन केले जाईल.या घटनेतील परिसरातील ‘सीसीटीव्ही’ फुटेज आणि संशयितांचे ‘सीडीआर’ पडताळून या संपूर्ण रॅकेटचा शोध घेतला जाईल. जर या तस्करीमागे एखादी टोळी किंवा गुंडांच्या फौजा असतील, तर त्यांचा कायमचा बंदोबस्त करून हे रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त केले जाईल, असेही वनमंत्र्यांनी सांगितले.
‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी आज प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे, ज्येष्ठ गायिका पद्मश्री डॉ.अश्विनी भिडे-देशपांडे, कॉफीटेबल बुकचे निर्माते विनोद पवार, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे तसेच शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अतिशय सुंदर अशा कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करता आले याबद्दल अतिशय आनंद आहे. महाराष्ट्राचे प्रतिबिंब हे आपल्याला आपल्या वारीमध्ये दिसते, ते पंढरपुरात दिसते, ते विठ्ठलाच्या आराधनेत आपल्याला पाहायला मिळते. इतक्या वेगवेगळ्या कथा, प्रत्येक वारीमध्ये तयार होतात. ते सर्व कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येणार आहे.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तीर्थ आणि त्या तीर्थातला जो देव आहे, हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. त्याची माहिती, इतिहास किंवा त्यातल्या प्रमुख गोष्टी या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून मिळाले. माहिती आणि छायाचित्रे यामुळे हे कॉफी टेबल बुक संग्रहणीय झाले आहे. आपली सांस्कृतिक माहिती जर कोणाला द्यायची असेल, तर काय द्यावे तर यामध्ये या पुस्तकाचा समावेश झाला आहे. इन्टॅन्जिबल हेरिटेजमध्ये युनेस्कोला आता ही पंढरीची वारी सादर करण्यात येईल, यासाठी हे कॉफी टेबल बुक महत्त्वाचे ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगतिले.
महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर
मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे “महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक, २०२६” आज विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाद्वारे वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.त्यानुसार दुचाकी वाहनांसाठी पर्यावरण कर ₹२,००० वरून ₹४,०००, पेट्रोल वाहनांसाठी ₹३,००० वरून ₹६,०००, तर डिझेल वाहनांसाठी ₹३,५०० वरून ₹७,००० करण्यात आला आहे. हा कर दर पाच वर्षांसाठी एकरकमी आकारला जाणार आहे. या सुधारित कर रचनेमुळे राज्याला दरवर्षी सुमारे ₹१६० कोटींपेक्षा अधिक अतिरिक्त महसूल मिळणार असून हा निधी रस्ता सुरक्षा, आधुनिक परिवहन सुविधा, ATS प्रणाली आणि प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे.तसेच, औद्योगिक क्षेत्राला दिलासा देत क्रेन वाहनांवरील मोटार वाहन करासाठी ₹३० लाखांची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.विधेयकामुळे नागरिकांना बीएस-६ आणि इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन मिळणार असून राज्याच्या पर्यावरणीय धोरणाला बळकटी मिळेल. याशिवाय ग्रामीण आणि आदिवासी भागात दरवर्षी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.महत्त्वाचे म्हणजे, या विधेयकामुळे राज्याच्या एकत्रित निधीवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नसून उलट महसूल वाढीस मदत होणार आहे. सभागृहातील सर्व पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकाचे स्वागत करत एकमताने मंजुरी दिली, त्यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
Acident News :
मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला आहे. याप्रकरणी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी केली जाईल आणि चौकशीचा अहवाल आल्यानंतरच या प्रकल्पाचे काम सुरू केले, अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली.मालाड पूर्व मधील पीएपी प्रकल्पाबाबत जागेसंबंधी आमदार अस्लम शेख यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, मालाड (पूर्व) येथील प्रकल्पग्रस्तांच्या (पीएपी) पुनर्वसन प्रकल्पासाठी महापालिकेने ४७० कोटी रुपयांचे क्रेडिट नोट आणि १००टक्के टीडीआर देऊनही संबंधित विकासकाने अद्याप बांधकामाचा कोणताही प्लॅन सादर केलेला नाही. याची सखोल चौकशी करण्यात येईल. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने निश्चित केलेल्या दरापेक्षा या भूखंडाला जास्त दर लावण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला. ही जागा 'इको-सेन्सिटिव्ह' झोनमध्ये येते का आणि त्यासाठी वन विभागाच्या ना-हरकत प्रमाणपत्राची गरज आहे का सर्व बाबींची चौकशी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. या प्रश्नाच्या चर्चेत आमदार योगेश सागर, मुरजी पटेल यांनी सहभाग घेतला.
मोठी बातमी..! भाजप आमदार अडचणीत? कोर्टानं दिले चौकशीचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
Mla Rajesh Pawar : नांदेडचे भाजप आमदार राजेश पवार यांच्याविरोधात नायगाव न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
Helicopter Crashed: नेपाळमध्ये विमान अपघात झाला आहे. खेतांगमध्ये उतरताना हेलिकॉप्टर कोसळले. मात्र, प्रवासी सुखरूप असल्याचे वृत्त आहे.
PAN Card Rules नवीन नियमांनुसार ही प्रक्रिया अधिक कडक केली जाणार आहे. सरकारने डिजिटल पडताळणी अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
मुंबई : शिर्डी जवळील लोणी येथे १३ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याच्या घटनेने राज्य हादरले असून, याचे तीव्र पडसाद बुधवारी विधिमंडळात उमटले. या संतापजनक कृत्यातील आरोपीला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, त्याला कठोरातील कठोर शासन केले जाईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, पीडित मुलीला 'मनोधैर्य' योजनेतून तातडीने आर्थिक मदत देण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.लोणी परिसरात शाळेत जाणाऱ्या चिमुकलीवर भररस्त्यात अॅसिड फेकून आरोपी पसार झाला. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण असून राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर भाष्य करताना अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, ही घटना अत्यंत निंदनीय आहे. ग्रामीण भाग असल्याने घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, मात्र प्राथमिक अंदाजानुसार आरोपी स्थानिकच असण्याची शक्यता आहे. पोलिसांचा तपास जलद गतीने सुरू असून आज सायंकाळपर्यंत आरोपीला अटक केली जाईल. अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, हे माझे वैयक्तिक मत आहे.पीडितेवर उपचार सुरूमहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबीय सध्या प्रचंड धक्क्यात आहेत. तिच्यावर लोणी येथे उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिची चौकशी केली जाईल. शासनाच्या 'मनोधैर्य' योजनेतून तिला तात्काळ आर्थिक सहाय्य देण्याबाबतचा प्रस्ताव मागवण्यात आला आहे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत आज विधान परिषदेत आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासकीय वस्तुस्थिती स्पष्ट करत सरकार या विषयावर गंभीर असल्याचे सांगितले.विधान परिषदेच्या कामकाजादरम्यान आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांमध्ये निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याचा मुद्दा उचलून धरला. रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचत असून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने रुग्ण आणि सामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याकडे नार्वेकर यांनी लक्ष वेधले. विशेषतः केईएम, नायर आणि कूपर यांसारख्या मोठ्या रुग्णालयांमधील विदारक परिस्थिती त्यांनी सभागृहात मांडली.या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे यांनी वस्तुस्थिती मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, रुग्णालयातील कचरा व्यवस्थापनासाठी निविदा प्रक्रिया आणि संबंधित कंत्राटदारांच्या कामावर सरकारचे बारीक लक्ष आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. ज्या ठिकाणी त्रुटी आढळतील, तिथे कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले. तसेच, पालिका प्रशासनाला या संदर्भात कडक निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
Strait of Hormuz: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण जगाला हादरवून टाकणारी एक बातमी समोर आली आहे.
धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी
इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया यांनी घराजवळच असलेल्या कनेक्शनचा वापर करून ईव्हीचे चार्जिंग सुरू ठेवले होते. चार्जिंग सुरू असताना शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. ईव्हीने पेट घेतला. आग वेगाने पसरली आणि थोड्याच वेळात पुगालिया यांच्या घरालाही आगीनं वेढले. घरातल्यांना सावरण्याची संधी मिळण्याआधीच आग घरात असलेल्या सिलेंडरच्या साठ्यापर्यंत पोहोचली. घरात दहा सिलेंडर ठेवले होते. हे सर्व सिलेंडर फुटल्यामुळे आगीची तीव्रता वाढली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला.घरात एकूण दहा जण होते. यापैकी सात जणांचा होरपळून मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मनोज पुगालिया यांनी रात्री झोपताना कनेक्शनचा वापर करून ईव्हीचे चार्जिंग सुरू ठेवले होते. हे चार्जिंग सुरू असताना पहाटे ४ च्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. आग वेगाने पसरली आणि घरातला सिलेंडरचा साठा मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरला. दुर्घटनेत पुगालिया यांच्या घराचा काही भाग कोसळला.पोलीस आयुक्त संतोष कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज पुगालिया यांचा पॉलिमरचा व्यवसाय होता. व्यवसायानिमित्त त्यांनी घरामध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील रसायने साठवून ठेवली होती. कारची आग, गॅस सिलेंडरचे स्फोट आणि रसायने या तिन्ही घटकांमुळे घरात आगडोंब उडाला. घरात झोपलेल्या लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.घराला इलेक्ट्रॉनिक डिजिटल लॉक बसवण्यात आलं होतं. आगीमुळे घराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने हे डिजीटल लॉक उघडलं नाही. परिणामी, कुटुंबातील सदस्य आतच अडकून पडले. अग्निशमन दलाच्या जवानांना घरात प्रवेश करण्यासाठी दरवाजे तोडावे लागले. तोपर्यंत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी पुढील पोलीस कारवाई सुरू आहे.
मुनगंटीवारांच्या पुढाकारामुळे मजूर व महिला सहकारी संस्थांना मिळणार बळ
मुंबई : आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे राज्यातील मजूर सहकारी संस्था सोबतच प्राधान्याने महिला सहकारी संस्थांना शासनाच्या विविध कामांमध्ये अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली. सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सहकार क्षेत्र अधिक सक्षम करणे, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती वाढवणे तसेच कामांचे पारदर्शक व न्याय्य वाटप सुनिश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी या विषयाचा सखोल अभ्यास करून व्यवहार्य धोरण निश्चित करण्यासाठी ५ सदस्यीय समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस सहकार विभागाचे सचिव, उपसचिव नितीन गायकवाड, अप्पर निबंधक डॉ. पी. एल. खंडागळे, जिल्हा उपनिबंधक तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनीही सहभाग नोंदवला.बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मजूर सहकारी संस्था सोबतच प्राधान्याने महिला सहकारी संस्थांना शासनाच्या विविध कामांमध्ये संधी देण्याची ठाम भूमिका मांडली. या दोन्ही संस्थांना अधिक कामे मिळाल्यास त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर स्थानिक रोजगारनिर्मिती होईल, असे त्यांनी अधोरेखित केले. तसेच सहकाराच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी महिला सहकारी संस्थांना प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आ. मुनगंटीवार यांच्या या भूमिकेला प्रतिसाद देत सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मजूर सहकारी संस्था सोबतच यापुढे प्राधान्याने महिला सहकारी संस्थांना देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची ग्वाही दिली. राज्यात विविध यंत्रणांमार्फत १० लाख रुपयांपर्यंतची कामे, ई-निविदा पद्धतीद्वारे मिळणारी कामे तसेच जिल्हा परिषद स्तरावरील कामे मजूर सहकारी संस्थांना दिली जातात. या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी आ. मुनगंटीवार यांनी कामांचे वाटप अधिक पारदर्शक करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज अधोरेखित केली. त्यानुसार ई-निविदा पद्धतीद्वारे व जिल्हा परिषदेमार्फत मजूर संस्थांना देण्यात आलेल्या कामांची माहिती जिल्हा उपनिबंधक स्तरावर संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सर्व कामांची ऑनलाइन नोंद अनिवार्य करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.सदर विषयाचा सखोल अभ्यास करून व्यवहार्य धोरण निश्चित करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार ५ सदस्यीय समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. समितीने लवकरात लवकर अहवाल सादर करावा आणि त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शिष्यवृत्ती थेट संस्थांच्या खात्यात जमा करण्याबाबत शासन सकारात्मक
शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लागणार; मंत्री संजय शिरसाट यांचे विधानपरिषदेत आश्वासन!मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांनी राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीचा प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे अत्यंत आक्रमकपणे मांडला. अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक), फार्मसी आणि आर्किटेक्चर अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गेल्या नऊ वर्षांपासून थकीत असल्याचा खळबळजनक मुद्दा त्यांनी सभागृहात उपस्थित केला. यामुळे केवळ विद्यार्थ्यांचेच नुकसान होत नसून, विनाअनुदानित शिक्षण संस्था आर्थिक गर्तेत सापडल्या असून त्या बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे दराडे यांनी निदर्शनास आणून दिले.आमदार किशोर दराडे यांनी सभागृहात माहिती दिली की, विशेषतः OBC आणि NT प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. तसेच, महा-डीबीटी (Maha-DBT) पोर्टलवरील तांत्रिक गोंधळामुळे २०२१-२२ मधील ५८ कोटी रुपयांचा निधी अद्याप वितरित झालेला नाही. संस्थांना बँकांचे हप्ते, वीज बिले आणि शिक्षकांचे पगार देणे कठीण झाले आहे, असे सांगत त्यांनी या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याची मागणी केली. शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढण्यासाठी १५ दिवसांची कालमर्यादा निश्चित करावी आणि नूतनीकरणासाठी पुन्हा संपूर्ण फॉर्म भरण्याची अट रद्द करून ती प्रक्रिया सोपी करावी, अशा महत्त्वाच्या मागण्या त्यांनी यावेळी केल्या.या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री संजय शिरसाट यांनी सरकारची बाजू मांडली. त्यांनी मान्य केले की, तांत्रिक कारणांमुळे काही प्रमाणात निधी प्रलंबित असून तो त्वरित वितरित करण्यासाठी विभाग स्तरावर तातडीने कार्यवाही केली जाईल. दराडे यांच्या मागणीनुसार, SC प्रवर्गाची शिष्यवृत्ती थेट संस्थांच्या खात्यात जमा करण्याबाबत शासन सकारात्मक असून, यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शिरसाट यांनी दिले. तसेच, प्रलंबित अर्जांचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरावरील समाजकल्याण आणि तंत्रशिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावली जाईल, जेणेकरून पात्र असणारा एकही विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बलात्कार प्रकरणी ज्योतिषी खरातला अटक
नाशिक : राजकीय नेत्यांचा ज्योतिषी असलेल्या अशोककुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन (वय ६७) याला पोलिसांनी बलात्काराच्या प्रकरणात अटक केली. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नोव्हेंबर २०२२ मध्ये पीडित ३५ वर्षीय विवाहित महिला खरातला कॅनडा कॉर्नरवरील ओंकार प्रॉपर्टीज येथे भेटली होती. त्या ठिकाणी अशोककुमार खरात उर्फ कॅप्टन याने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत मंत्रतंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली पीडित महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. या ज्योतिषाची नाशिक, ठाणे, अहिल्यानगर आदी ठिकाणी कोट्यवधीची मालमत्ता आहे.
Healthy Diet Tips: “दीर्घायुष्य हवंय? तर रोजच्या ताटात या ५ गोष्टी ठेवा; तज्ज्ञांचा सल्ला”
Healthy Diet Tips विशेषज्ञ सांगतात की, काही ठराविक पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास आयुष्याची गुणवत्ता सुधारू शकते आणि दीर्घायुष्य मिळण्यास मदत होते. यात प्रोटीन, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेले पदार्थ महत्त्वाचे असतात.
Massive Fire Delhi: दिल्लीतील भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू ; मदत आणि बचावकार्य सुरु
Massive Fire Delhi: देशाची राजधानी दिल्लीत आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आलीय. पालममधील एका इमारतीला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत
लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला होता. त्याप्रमाणे अचानक ढग निर्माणहोऊन अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाच्या उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीसाठी तयार असलेली गहू, हरभरा, ज्वारी तसेच द्राक्ष पिकांना या पावसाचा फटका बसलआहे. अनेक ठिकाणी शेतात कापणी करून ठेवलेले पीक भिजल्याने उत्पादनाची गुणवत्ता घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत वाढ होत असतानाच अचानक ढगाळ वातावरण तयारहोऊन पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली असून, साठवणूक न झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.
PM Modi Farewell Speech: संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, आज ३७ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी खासदारांना निरोप समारंभाचे भाषण दिले.
Kangana Ranaut माध्यमांशी बोलताना कंगना रणौत म्हणाल्या की, “राहुल गांधी संसदेत टपोरीसारखे येतात आणि कुणाशीही ‘तू-तडाक’ करून बोलतात.” त्यांनी असा आरोप केला की, त्यांच्या या वागण्यामुळे सभागृहातील वातावरण बिघडतं आणि विशेषतः महिला सदस्यांना अस्वस्थता जाणवते.
Sharyu Sonawane : 'पारू' मालिकेचा शेवटचा भाग काही तांत्रिक अडचणी आणि प्रॉडक्शनच्या समस्येमुळे प्रसारित झाला नाही.
Ram Gopal Verma : धुरंधर २ पाहिल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे.
दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या आगीत एका कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर इमारतीमध्ये एका कुटुंबातील नऊ जण अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, दिल्ली पोलिस आणि रुग्णवाहिकांच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जखमी झालेल्या तिघांना पालम येथील दिव्यप्रस्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.घटनास्थळी तीन रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या, तर परिसर अरुंद आणि गर्दीचा असल्यामुळे इतर रुग्णवाहिका काही अंतरावर उभ्या ठेवण्यात आल्या. चार मजली इमारतीच्या एका भागात आग लागल्यानंतर धूर वेगाने संपूर्ण इमारतीत पसरला आणि कुटुंबातील सदस्य आतमध्येच अडकून पडले.अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सध्या आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. संपूर्ण घटनेची सविस्तर चौकशी झाल्यानंतरच आगीमागील कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमेरिकेकडून होर्मुज सामुद्रधुनीजवळील इराणी भागात ५,००० पौंडांचा बॉम्ब हल्ला
वॉशिंग्टन : अमेरिकेने बुधवारी पहाटे इराणवर अनेक मोठे हल्ले केले आहेत. अमेरिकन सैन्याने सांगितले की या हल्ल्यांमध्ये ५,००० पाउंड (सुमारे २,२६७ किलोग्रॅम) वजनाचे डीप पेनेट्रेटर बॉम्ब वापरण्यात आले. अमेरिकन सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार, या कारवाईत होर्मुज सामुद्रधुनीजवळील इराणच्या किनारी भागांमध्ये असलेल्या कडेकोट सुरक्षा असलेल्या क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य करण्यात आले. अमेरिकन सैन्याच्या निवेदनात म्हटले आहे की या तळांवर तैनात अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्रे आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी धोका ठरत होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.दरम्यान, इराणने इस्रायलच्या मध्य भागावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ले केले असून त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलची आपत्कालीन सेवा मॅगन डेविड अडोम (एमडीए) यांच्या माहितीनुसार, रमत गन शहरात एका पुरुष आणि एका महिलेचा गंभीर शेलच्या तुकड्यांमुळे मृत्यू झाला. तसेच तेल अवीवच्या उत्तरेला असलेल्या बेनी ब्राक शहरात क्षेपणास्त्राचे तुकडे पडल्यामुळे एक व्यक्ती जखमी झाला आहे. दुसरीकडे, संयुक्त अरब अमिरातीमध्येही इराणकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे.संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की देशातील विविध भागांमध्ये हवाई संरक्षण प्रणालींनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे अडवली असून लढाऊ विमानांनी इराणी ड्रोन पाडले. राष्ट्रीय आपत्कालीन संकट व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण देशात सायरन वाजल्याचे ऐकू आले असून ते यशस्वी इंटरसेप्शन कारवाईचे परिणाम असल्याचे सांगण्यात आले.बहरेनच्या गृह मंत्रालयानेही सायरन वाजल्याची पुष्टी करत नागरिक आणि रहिवाशांना शांत राहून सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले. कुवैतमध्येही सैन्याने सांगितले की त्यांच्या हवाई संरक्षण प्रणाली शत्रूच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहेत आणि ऐकू आलेले स्फोटांचे आवाज हे इंटरसेप्शनमुळेच आहेत.दरम्यान, इस्रायलनेही इराणवर सातत्याने हवाई हल्ले सुरू ठेवले आहेत. मंगळवारी इस्रायली सैन्याच्या हल्ल्यांमध्ये इराणचे वरिष्ठ नेते अली लारीजानी आणि बसीज फोर्सचे कमांडर गुलामरेजा सुलेमानी यांचा मृत्यू झाला. तसेच इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूत येथेही जोरदार हवाई हल्ले केले आहेत.
Warm Water: “गरम पाणी पिऊन पोट कमी होते का? तज्ज्ञांनी सांगितलं खरं सत्य!”
Warm Water आहारतज्ज्ञ यांच्या मते, कोमट पाणी पिणे फायदेशीर असले तरी ते एकटं पोट कमी करण्यासाठी पुरेसं नाही. त्या सांगतात की, रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याने शरीरातील साचलेली चरबी कमी होण्यास काही प्रमाणात मदत होते. विशेषतः त्यात लिंबू किंवा मध घातल्यास त्याचा फायदा अधिक होऊ शकतो.
Ali Larijani Death: कोण होते अली लारीजानी? ; ज्यांच्या जाण्याने इराणला बसला मोठा धक्का , जाणून घ्या
Ali Larijani Death: इस्रायल आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, सर्वोच्च नेत्यांनंतर देशातील दुसरे सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्व मानले जाणारे अली लारीजानी एका हल्ल्यात मारले गेले आहेत.
गुढी पाडवा स्टाइलमध्ये साजरा करा: नववर्षाच्या स्वागतासाठी आकर्षक फॅशन निवडी
मुंबई : मराठी नववर्षाच्या आगमनासोबत गुढी पाडवा सण आनंद, नवचैतन्य आणि उत्साह घेऊन येतो. या खास दिवशी आपल्या वॉर्डरोबला नवा लूक देण्यासाठी ही उत्तम संधी असते. पारंपरिक आणि आधुनिक स्टाइलचा सुंदर संगम साधत, तुम्ही या सणासाठी खास फॅशन निवडू शकता. कुटुंबासोबत पूजा असो, नातेवाईकांना भेट देणे असो किंवा सणासुदीच्या कार्यक्रमांना हजेरी लावायची असो—या फॅशन आयडियाज तुम्हाला कम्फर्ट आणि एलिगन्स दोन्ही देतील.गुढी पाडव्याच्या निमित्ताने सहज आणि स्टायलिश लूकसाठी काही खास आउटफिट आयडियाज:
पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...
ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून घरात असलेले थिनर पिऊन टाकले आहे. ही थरकाप उडवणारी घटन सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडल्याने कुटुंबात घबराट पसरली.खेळता खेळता प्रकार घडला.मिळालेल्या माहितीनुसार, यादव कुटुंब हे वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहेत. सोमवार सायंकाळी चिमुकला घरात खेळत होता. दरम्यान त्याच वेळी घरात एका डब्यात असलेले थिनर त्याला पाणी असल्याचे वाटले आणि त्याने ते पिऊनही टाकले. अवघ्या काही मिनिटांनी त्याच्या घशाला त्रास होऊन जळजळ होऊ लागली आणि पोटातही दुखू लागल्याने त्याने लगेच जाऊन आईला माहिती दिली.पोराने सर्व सांगितल्यानंतर कुटुंबियांनी कोणताही उशीर न करता त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवले. सध्याच्या स्थितीला चिमुकल्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
नवी दिल्ली : देशांतर्गत शेअर बाजाराने आज सुरुवातीच्या व्यवहारात चढ-उतार असूनही तेजीचा कल कायम ठेवला. व्यवहारांची सुरुवात जोरदार झाली. बाजार उघडल्यानंतर, खरेदीदार आणि विक्रेते एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करू लागले, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये चढ-उतार झाला. या चढ-उतारांनंतरही, बाजारात तेजी कायम राहिली. सकाळी १० वाजेपर्यंत, सेन्सेक्स ०.४७ टक्क्यांनी आणि निफ्टी ०.४७ टक्क्यांनी वधारला होता.शेअर बाजारातील दिग्गज कंपन्यांमध्ये, टीसीएस, जिओ फायनान्शियल, टेक महिंद्रा, विप्रो आणि इन्फोसिस यांचे शेअर्स २.९५ टक्के ते २.३८ टक्क्यांपर्यंतच्या वाढीसह व्यवहार करत होते. दुसरीकडे, कोल इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, हिंडाल्को इंडस्ट्रीज आणि टाटा स्टील यांचे शेअर्स १.१७ टक्के ते ०.२९ टक्क्यांपर्यंतच्या वाढीसह व्यवहार करत होते.आजच्या व्यवहारानुसार, शेअर बाजारात २,७०८ शेअर्सचा सक्रिय व्यवहार सुरू होता. यापैकी २,३३१ शेअर्समध्ये वाढ झाली, तर ३७७ शेअर्समध्ये घट झाली. त्याचप्रमाणे, सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी २५ शेअर्स खरेदीच्या पाठिंब्याने वाढले होते. दुसरीकडे, विक्रीच्या दबावामुळे ५ शेअर्स घसरले होते. निफ्टीमधील ५० शेअर्सपैकी ४१ शेअर्स वाढले होते, तर ९ शेअर्स घसरले होते.बीएसई सेन्सेक्स आज २९६.७१ अंकांच्या वाढीसह ७६,३६७.५५ अंकांवर उघडला. व्यवहार सुरू होताच, खरेदीच्या पाठिंब्यामुळे निर्देशांक ७६,६०९.४६ अंकांपर्यंत पोहोचला. तथापि, विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्सची वाढ कमी होऊन ७६,१८७.९२ अंकांवर आली. बाजारात सुरू असलेल्या खरेदी-विक्रीच्या पार्श्वभूमीवर, सकाळी १० वाजता सेन्सेक्स ३५५.५९ अंकांनी वाढून ७६,४२६.४३ अंकांवर व्यवहार करत होता.सेन्सेक्सप्रमाणेच, एनएसई निफ्टी ५१.७५ अंकांनी उसळी घेऊन २३,६३२.९० अंकांवर उघडला. बाजार दोन उघडताच खरेदीदार आणि विक्रेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली, ज्यामुळे निर्देशांकात चढ-उतार झाला. खरेदीच्या पाठिंब्याने निफ्टी २३,७५४.६५ अंकांपर्यंत वाढला. तथापि, विक्रीच्या दबावामुळे त्याची वाढ २३,६१८.४५ अंकांपर्यंत कमी झाली. बाजारात सतत खरेदी-विक्री झाल्यानंतर, सकाळी १० वाजेपर्यंतच्या व्यवहारानंतर, निफ्टी १०८.४० अंकांच्या वाढीसह २३,६८९.५५ अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.तत्पूर्वी आदल्या दिवशी, मंगळवारी, सेन्सेक्स ५६७.९९ अंकांच्या म्हणजेच ०.७५ टक्क्यांच्या वाढीसह ७६,०७०.८४ अंकांच्या पातळीवर बंद झाला होता. तर निफ्टी मंगळवारी १७२.३५ अंकांच्या म्हणजेच ०.७४ टक्क्यांच्या वाढीसह २३,५८१.१५ अंकांच्या पातळीवर बंद झाला होता.
सौदी अरेबियाकडून भारताला रेड सी मार्गे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू
नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरातील संकट अधिक गडद होत आहे. दरम्यान, भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सौदी अरेबियाने आता रेड सी मार्गे भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू केला आहे. सौदी अरेबियातील यानबू बंदर येथून अनेक तेलवाहू टँकर भारताच्या दिशेने रवाना झाले आहेत. होर्मुज मार्गाने जहाजांची वाहतूक धोकादायक बनलेल्या परिस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे.अहवालानुसार, सध्या चार मोठे टँकर भारताकडे येत असून त्यामध्ये सुमारे ६० लाख बॅरल कच्चे तेल आहे. महिन्याच्या अखेरीपर्यंत अतिरिक्त ९० लाख ते १ कोटी बॅरल तेल भारतात पोहोचण्याची अपेक्षा आहे.सामान्यतः जगातील एकूण तेल व्यापारापैकी सुमारे २० टक्के तेल वाहतूक स्ट्रेट ऑफ होर्मुजमार्गे होते. भारतही खाडी देशांकडून मोठ्या प्रमाणात तेल याच मार्गाने आयात करतो. मात्र, इराणकडून जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमुळे हा मार्ग असुरक्षित झाला आहे. त्यामुळे सौदी अरेबियाने पर्यायी मार्गाचा अवलंब केला आहे.तेल प्रथम सुमारे १,२०० किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनद्वारे यानबूपर्यंत आणले जाते आणि त्यानंतर तेथून टँकरद्वारे भारताकडे पाठवले जाते. मात्र, या नव्या मार्गालाही काही मर्यादा आहेत. पाइपलाइनची क्षमता मर्यादित असल्यामुळे होर्मुज मार्गाइतका तेलपुरवठा करणे शक्य नाही.इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुज व्यतिरिक्त बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीजवळ देखील धोका कायम आहे. येथे हूती बंडखोरांनी यापूर्वी जहाजांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे रेड सी मार्गही पूर्णपणे सुरक्षित मानला जात नाही. तरीही सध्याच्या परिस्थितीत हा निर्णय भारतासाठी दिलासादायक ठरत आहे, कारण त्यामुळे तेलपुरवठा सुरू राहून संभाव्य ऊर्जा संकट कमी होण्यास मदत होणार आहे.दरम्यान, मंगळवार (१७ मार्च २०२६) रोजी अमेरिकेने स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरात इराणच्या अँटी-शिप क्षेपणास्त्र तळांवर बॉम्बहल्ला केला आहे. या कारवाईद्वारे स्ट्रेट ऑफ होर्मुजवरील इराणचे नियंत्रण कमी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
नोराच्या 'सरके चुनर'वर कंगना रणौत यांची परखड टीका; हे गाणे सर्व मर्यादा ओलांडत...
मुंबई: रॅपर बादशाहच्या 'तेत्तिरी' गाण्यानंतर आता नोरा फतेही आणि संजय दत्त यांचे 'सरके चुनर तेरी सरके' हे गाणे वादात सापडले आहे. 'केडी: द डेव्हिल' या कन्नड चित्रपटातील या गाण्याचे बोल आणि नृत्याच्या स्टेप्समुळे सोशल मीडियावर एक नवीन वाद निर्माण झाला आहे. गाण्याचे बोल आणि अश्लील नृत्याच्या स्टेप्समुळे केवळ सामान्य जनताच नाही, तर अनेक सेलिब्रिटींचाही रोष ओढवला आहे, ज्यामुळे गाण्याची हिंदी आवृत्ती यूट्यूबवरून काढून टाकण्यात आली आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांचीही या गाण्यावरील प्रतिक्रिया चर्चेत आहे, कारण त्यांनी गाण्याच्या अश्लील बोल आणि नृत्याच्या स्टेप्सवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.कंगना राणौतची सरके चुनार तेरी सरकेवर नाराजी व्यक्तनोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यावर कंगना रणौतने जोरदार टीका केली आहे. बॉलिवूडने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असे ती म्हणाली. अशा गाण्यांवर कठोर नियमनाची मागणी करत, अभिनेत्री म्हणाली की चित्रपट आणि गाण्यांमध्ये अश्लील आणि आक्षेपार्ह सामग्री सादर करण्यावर कठोर नियम असले पाहिजेत. अभिनेत्री म्हणाली की, आता अशी सामग्री सादर केली जात आहे की कुटुंबांना एकत्र बसून टीव्ही पाहणे कठीण झाले आहे.'अश्लीलतेने सर्व मर्यादा ओलांडल्या'कंगना रणौतने 'सरके चुनर' या गाण्यावरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, बॉलिवूडने अश्लीलता, प्रसिद्धीचे डावपेच आणि लक्ष वेधून घेण्याच्या बाबतीत सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. संपूर्ण देश त्यांचा निषेध आणि टीका करत आहे, पण मला नाही वाटत की त्यांना याची काही लाज वाटत असेल. यात काही नवीन नाही, कारण आपण लहानपणापासून अशी गाणी ऐकत आलो आहोत. मात्र, अशा आशयावर वेळोवेळी बंदी घालण्यात आली आहे आणि मला वाटते की आता आणखी कठोर कारवाई केली पाहिजे.कंगना पुढे म्हणाली, ज्या प्रकारे ही अश्लीलता सादर केली जात आहे, त्याचा सामाजिक संस्कृतीवरही परिणाम होत आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की कुटुंबांना एकत्र बसून टीव्ही पाहणेही अवघड झाले आहे. मला वाटते की बॉलिवूडला लगाम घालण्याची गरज आहे.अरमान मलिकनेही केली नाराजी व्यक्तकंगनाच्या आधी, गायक अरमान मलिकनेही या गाण्यावर उघडपणे टीका केली होती. त्याने या गाण्याला व्यावसायिक गीतलेखनाचा नीचतम स्तर म्हटले होते आणि हे गाणे आपण कधीच ऐकले नसते तर बरे झाले असते, असे म्हटले होते. या गाण्यावर प्रतिक्रिया देताना त्याने लिहिले, हे गाणे माझ्या टाइमलाइनवर आले आणि मी ते बरोबर ऐकले आहे याची खात्री करण्यासाठी मला ते पुन्हा ऐकावे लागले. व्यावसायिक गीतलेखन इतक्या खालच्या पातळीवर गेलेले पाहून वाईट वाटते. दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्याने पुढे म्हटले, मला खरोखरच धक्का बसला आहे. मी याकडे दुर्लक्ष करू शकलो असतो तर बरे झाले असते.काय आहे सरके चुनार तेरी सरके वाद?'सरके चुनार तेरी सरके' हे नोरा फतेही आणि संजय दत्त अभिनीत, कन्नड पॅन-इंडिया चित्रपट केडी: द डेव्हिल मधील एक गाणे आहे. या गाण्यात, नोरा एका डान्स बारमध्ये संजय दत्त आणि काही बॅकग्राउंड डान्सर्ससोबत नाचताना दिसते. या गाण्याचा प्रोमो १३ मार्च रोजी प्रदर्शित झाला, ज्यामध्ये ती घागरा-चोली घालून गर्दीत नाचताना दिसत आहे. तथापि, १४ मार्च रोजी गाणे प्रदर्शित होताच, त्याच्या अश्लील गीतांमुळे आणि असभ्य नृत्यशैलीमुळे त्यावर टीका झाली. लोकांनी या गाण्याला द्व्यर्थी आणि अश्लील म्हटले आणि ते काढून टाकण्याची मागणी केली. व्यापक टीका आणि सीबीएफसीकडे (CBFC) केलेल्या तक्रारीनंतर, गाण्याची हिंदी आवृत्ती यूट्यूबवरून काढून टाकण्यात आली आहे, तर तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम आवृत्त्या उपलब्ध आहेत.
सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'
मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थितीसातारा : लाखो वर्षांपासून हिंदु धर्माची आधारशीला असलेली मंदिरे ‘सेक्युलर’वादाच्या नावाखाली विविध आघात सहन करत आहेत. मंदिरांचे सरकारीकरण, सरकारीकरण झालेल्या मंदिरात भ्रष्टाचार, मंदिरांची भूमी बळकावणे, तिरुपती बालाजीसारख्या मंदिराच्या प्रसादात भेसळ, मंदिरांच्या भूमीवर ‘वक्फ’चे वाढते अतिक्रमण अशा समस्यांच्या निराकरणासाठी मंदिर महासंघ कार्यरत आहे. त्या दृष्टीने एकूणच अशा समस्यांवर व्यापक चर्चा व्हावी, मंदिरांचे संघटन व्हावे, मंदिरांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी पुढाकार घेणे, यांसाठी २२ मार्चला सातारा येथील स्वराज मंगल कार्यालय, कोरोगाव रस्ता, सातारा येथे चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून एक हजारहून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘मंदिर महासंघा’चे महाराष्ट्र राज्य संघटक संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.ही परिषद महाराष्ट्र मंदिर महासंघ, मुंबई येथील श्री जिवदानी देवी संस्था, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित करण्यात आली आहे.उपरोक्त पत्रकार परिषदेसाठी पू. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, अधिवक्ता जनार्दन करपे, ‘मंदिर महासंघा’चे सातारा जिल्हा संयोजक श्री. शिवाजीराव तुपे, भुईंज महालक्ष्मी मंदिराचे श्री. गजानन भोसले, हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. हेमंत सोनावणे उपस्थित होते.या वेळी शिवाजीराव तुपे म्हणाले ‘‘मंदिर महासंघाचे १७ हजारहून अधिक विश्वस्त, पुरोहित, धार्मिक संस्था, भक्त यांचे संघटन असून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक इ. राज्यांतील २ हजार ४०० हून अधिक मंदिरांत वस्रसंहिता लागू करण्यात आली आहे. मंदिर महासंघाने महाराष्ट्रातील मंदिरांची शेकडो एकर भूमी घोटाळेबाजांपासून वाचवली आहे. कर्नाटकात मंदिर महासंघाच्या विरोधामुळे मंदिरांकडून धन घेणारे ‘मंदिर अन् धर्मादाय संस्था कर सुधारणा विधेयक २०२४’ संमत होऊ शकले नाही. कर्नाटकातून गायब झालेल्या ४ हजार १७० मंदिरांच्या पुनर्भस्तित्वासाठी आंदोलन केले. यांसह मंदिरांच्या विविध प्रश्नांसाठी मंदिर महासंघ सातत्याने लढत आहे.’’परिषदेला अनेक मान्यवरांची उपस्थिती !श्री. हेमंत सोनवणे म्हणाले , ‘‘या परिषदेला राज्याचे फलोत्पादनमंत्री भरतसेठ गोगावले, जैन मंदिराचे श्री. गिरीश शहा, मंदिर क्षेत्रात कार्यरत लेखक-अभ्यास श्री. संदीप सिंह, श्रीक्षेत्र आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ महाराज, देहू-आळंदी येथील मंदिरांचे विश्वस्त, ११ मारुति मंदिरांचे विश्वस्त,‘मंदिर महासंघा’चे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांसह श्री अष्टविनायक मंदिरांचे विश्वस्त, महाराष्ट्रातील जोतिर्लिंग देवस्थानांचे विश्वस्त, सतानन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, संत पिठांचे प्रतिनिधी, अन्य मंदिरांचे विश्वस्त आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.’’मंदिरांची सुरक्षा यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर परिषदेत चर्चा !या मंदिर परिषदेत मान्यवरांचे मार्गदर्शन, तसेच मंदिरांशी निगडीत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. यात मंदिरांची सुरक्षा, ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’, ‘मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे’, ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय’, ‘मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे. ही परिषद केवळ निमंत्रितांसाठी असून यामध्ये सहभागी होण्यासाठी ७०२०३८३२६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर महासंघाने केले आहे.
Namo Shetkari Yojana 8th Installment : राज्यातील पात्र 90 लाख 34 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे
Shah Rukh Khan: किंग खान शाहरुखच्या एका जुन्या रोमँटिक चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Gold Silver Price Today: देशांतर्गत वायदे बाजारात सोने आणि चांदीच्या दरात आज घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
शोले आणि मुघल-ए-आझम पेक्षा १०० पट चांगला आहे 'धुरंधर २'
मुंबई : 'धुरंधर २' हा बहुचर्चित हिंदी चित्रपट गुरुवार १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट शोले आणि मुघल-ए-आझम पेक्षा १०० पट चांगला आहे असे मत प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी व्यक्त केले आहे.After last nights watch of #Dhurandhar2 in terms of it’s sheer cumulative impact in every which way , whether on it’s expected collections , audience euphoria , social influences , cinematic grammar breaking , and above all the psychological audio visual impact , it will be a…— Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 18, 2026'धुरंधर २' च्या निमित्ताने नवीन चित्रपटयुगाचा जन्म आहे. आणि चित्रपटसृष्टीच्या पूर्वीच्या जगात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा हा निर्दयी अंत आहे. आता 'दिग्दर्शक' या शब्दाचे स्पेलिंगसुद्धा आदित्य धर असे असेल. आणि स्टीव्हन स्पीलबर्ग व क्रिस्टोफर नोलन यांनी आपली सर्व कामे सोडून 'धुरंधर २' चा प्रदर्शनाच्या दिवशीचा पहिला शो पाहणे हेच शहाणपणाचे आणि योग्य ठरेल; या शब्दात प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक्स पोस्ट (ट्विटर) करून 'धुरंधर २'चे कौतुक केले. याआधी 'धुरंधर २' मधील 'आरी आरी' या गाण्याच्या लाँचवेळी खरे धुरंधर हे प्रेक्षक असल्याचे मत अभिनेत्री साराने व्यक्त केले होते.राम गोपाल वर्मा हा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी तसेच नवनवे धाडसी प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेला निर्माता दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्याने हिंदी, कन्नड, तेलुगु भाषेच चित्रपट आणि टीव्ही मालिकांची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, नंदी पुरस्कार, फिल्मफेअर, दाक्षिणात्य फिल्मफेअर, आय.आय.एफ.ए. असे अनेक पुरस्कार त्याने मिळवले आहेत. शिवा, रंगीला, सत्या, शूल, जंगल, कंपनी, भूत, अब तक छप्पन, सरकार हे राम गोपाल वर्माचे प्रचंड लोकप्रिय झालेले निवडक चित्रपट आहेत.

26 C