ज्येष्ठ संगीतकार ओ. पी नय्यर यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर
मंत्री आशिष शेलार यांची घोषणा; गायिका उत्तरा केळकर यांना मोहम्मद रफी पुरस्कारमुंबई: हिंदीमधील अजरामर गाण्यांना चाली देऊन संगीत जगतात आपले अढळ स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार ओ. पी. नय्यर यांना यावर्षीचा मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार, तर सुप्रसिध्द गायिका उत्तरा केळकर यांना सन २०२५ चा मोहम्मद रफी पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज केली आहे.आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे १९ वे वर्ष असून एक लाख रूपयांचा धनादेश स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, ५१ हजार रूपयांचा धनादेश आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे. रफी यांच्या जयंतीनिमित्त २४ डिसेंबरला दरवर्षी हा पुरस्काराचा शानदार सोहळा रंगशारदा येथे पार पडतो.https://prahaar.in/2025/12/15/black-magic-performed-on-bulls-participating-in-a-race-this-act-of-superstition-was-discovered-in-a-crematorium-in-kolhapur/रंगशारदामध्ये २४ डिसेंबरला वितरणवांद्रे पश्चिम रंगशारदा येथे २४ डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे हा पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी ६.०० वा. सुरू होणार असून मान्यवरांच्या हस्ते यावर्षी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यापूर्वी संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, गीतकार आनंदजी, गायक अमीत कुमार यांच्यासह ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, शमशाद बेगम, संगितकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, पॅरेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, खय्याम, मरणोत्तर श्रीकांत ठाकरे, अशा विविध मान्यवर कलावंतासह ख्यातनाम निवेदक अमिन सयानी यांनांही यापुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
मोहित सोमण: आजचे टॉप स्टॉक जाणून घेऊयात एका क्लिकवर! मजबूत फंडामेंटल व टेक्निकल पोझिशनआधारे जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज (JMFL) व मोतीलाल ओसवालने (Motilal Oswal Financial Services) या ब्रोकरेज कंपन्यांनी चांगल्या रिटर्न्ससाठी काही शेअर खरेदीसाठी सुचवले आहेत. जाणून घेऊयात कुठले शेअर खरेदी करावे ते पुढीलप्रमाणे -जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज -१) Hindalco Industries- ब्रोकरेज कंपनीने या शेअरची खरेदी कारण राखण्यासाठी (Maintain Buy) बाय कॉल दिला असून ब्रोकरेजने लक्ष्य किंमत (Target Price) ९५५ रूपयांचे गुंतवणूकदारांना दिले आहे. जेएमएफएलने चाकण येथील प्रकल्पाला भेट दिली आहे. कंपनीकडून वाढलेल्या तांत्रिक प्रगतीआधारे कंपनीवर सकारात्मक मत नोंदवले. ब्रोकरेजच्या मते, कंपनीने आपल्या उत्पादनातील ऑटोमेशनमध्ये मोठ्या प्रमाणात पातळी वाढवली आहे. यामध्ये हिंदाल्कोची औद्योगिक उत्पादकता वाढली असून कंपनी महिंद्राची एकमेक पुरवठादार (Supplier) म्हणून आपले स्थान अढळ राखण्यासाठी यशस्वी ठरली.यासह त्रैमासिक LME-संबंधित किंमत निर्धारण (LME सरासरी अधिक रूपांतरण प्रीमियम) आणि कोणत्याही नवीन ओईएम (Original Equipment Manufacturer OEM) ला सामील करून घेण्यासाठी कंपनीने चांगली कामगिरी केली. १५-२०% अंतर्गत परतावा दराची (IRR) किमान मर्यादा कंपनीची वाढली असून ब्रोकरेज मते ही आणखी वाढीची शक्यता डिसेंबरपर्यंत वर्तवली जात आहे. क्षमता विस्तारामुळे (सुमारे ८० हजार वरून १ लाख युनिट्सपर्यंत) ही वाढ होणार असून मार्च २०२७ पर्यंत दुसऱ्या टप्प्याच्या तयारीमुळे, तसेच स्टेनलेस स्टीलऐवजी ॲल्युमिनियममध्ये १४-१५ अतिरिक्त घटक बदलण्यात OEM कंपन्यांच्या स्वारस्यामुळे ही वाढ अधोरेखित होते असे कंपनीने म्हटले. यासह कंपनीच्या पॅकेजिंग, ऑटोमोटिव्ह, HVAC फिनस्टॉक आणि औद्योगिक मूल्य साखळ्यांमध्ये हिंदाल्कोचे स्थान आणखी मजबूत होते. त्यामुळेच कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदीची शिफारस आम्ही कायम ठेवतो असे ब्रोकरेजने म्हटले.२) TBO Tek- या कंपनीच्या शेअर्समध्येही ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून लक्ष्य किंमत १९२० रूपये प्रति शेअर निश्चित केली आहे. ब्रोकरेजने दिलेल्या माहितीप्रमाणे, दुबईमध्ये झालेल्या TBO च्या पहिल्या गुंतवणूकदार बैठकीत लक्झरी ट्रॅव्हल मार्केटमधील कंपनीच्या जागतिक वितरणातील सामर्थ्यावर आणि उत्कृष्ट पुरवठादार संबंधांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या टुरिझम कंपनीच्या सीईओ यांनी स्पष्ट केले की, प्रीमियम एअरलाइन्स, हॉटेल्स आणि सल्लागारांसोबतच्या या धोरणात्मक भागीदारीमुळे एक उच्च दर्जाची सेवा देणारी ऑफर शक्य होते. ज्यामुळे ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी (OTAs) आणि बेड बँक्सच्या तुलनेत कंपनीला फायदा मिळतो. प्रस्थापित बाजारपेठांमधील 'कन्सोर्टिया' संबंधांचे महत्त्व हा देखील चर्चेचा एक महत्त्वाचा मुद्दा होता. यासह ब्रोकरेजने आपल्या अहवालात TBO ने तंत्रज्ञानातील काही अलीकडील गुंतवणुकींवरही प्रकाश टाकला आहे ज्यामुळे ती स्पर्धात्मक प्लॅटफॉर्मपेक्षा स्वतःला वेगळे ठरवू शकते आणि खर्चही अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकत आहे. एकूणच, व्यवस्थापनाने नमूद केले की, तंत्रज्ञानातील मोठ्या गुंतवणुकी आणि विशेष पुरवठादार नेटवर्कच्या जोरावर TBO लक्झरी ट्रॅव्हल क्षेत्रातील संधी साधण्यासाठी सुसज्ज आहे. ब्रोकरेजने दिलेल्या माहितीनुसार, नजीकच्या काळातील अंदाज साधारणपणे ब्रोकरेज कायम आहे. असे असले तरी डिसेंबर २०२६ पर्यंतच्या अंदाजानुसार लक्ष्य किंमत (TP) वाढवून १९२० रुपये ब्रोकरेजने वाढवली आहे.मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस -१) Amber Enterprises- मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज कंपनीने अंबर एंटरप्राईजेस शेअर खरेदी करण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला असून कंपनीच्या मते या शेअर्समध्ये २१% संभाव्य (Upside Potential) असून लक्ष्य किंमत ६६२६ रूपये प्रति शेअर ठेवण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. ब्रोकरेजने कंपनीने अंबर एंटरप्राईजेस कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली होती. त्यातील निष्कर्षातील माहितीनुसार, कंपनीच्या उत्पादनाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या कामगिरीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आगामी काळात ब्रोकरेजने दिलेल्या माहितीनुसार, व्यवस्थापनाने रेल्वे उत्पादन व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल अशी आशा या आर्थिक वर्षात व्यक्त केली आहे.तसेच आरएसी (RAC) उद्योगावर सध्या रेटिंग मानकांमधील बदलाचा परिणाम निश्चितच झाला आहे असे ब्रोकरेजने म्हटले. यामुळेच कंपनीच्या खर्च आणि उत्पादनांच्या किमती वाढल्या आहेत. या उद्योगावर तांब्याच्या किमतींमधील तीव्र वाढीचाही परिणाम झाला आहे, ज्याचा भार ग्राहकांवर एका तिमाहीच्या विलंबानंतरच टाकला जाऊ शकतो. आर्थिक वर्ष २६ मध्ये, अंबरला आरएसी (RAC) सेगमेंटमध्ये १०-१५% आणि इलेक्ट्रॉनिक्स सेगमेंटमध्ये ३५-४०% वार्षिक वाढीची अपेक्षा आहे. ब्रोकरेजने म्हटले आहे की,आम्ही आमचे मार्जिनचे अनुमान कमी करत आहोत आणि आर्थिक वर्ष २६/२७/२८ साठी आमचे अंदाज १०%/९%/५% ने कमी करत आहोत. सुधारित DCF-आधारित दोन वर्षांच्या फॉरवर्ड लक्ष्य किंमत ८००० रुपये (पूर्वी ८४०० रुपये) सह 'बाय' (BUY) रेटिंग कायम (Maintain Buy) ठेवले आहे असेही अहवालाने अंतिमतः म्हटले आहे.२) Simens- कंपनीच्या शेअर्समध्ये ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ३१४५ रूपये (Common Market Price CMP) खरेदीसह ३% संभाव्य वाढीसह लक्ष्य किंमत ३२५० रूपये प्रति शेअर दिली आहे. ब्रोकरेजने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने (SIEM) आपल्या विश्लेषकांचा बैठकीत स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर सेगमेंटमध्ये चांगल्या वाढीचा कल आणि लोकोमोटिव्हची डिलिव्हरी सुरू झाल्यामुळे मोबिलिटी सेगमेंटसाठी महसूल वाढ आणि मार्जिन प्रोफाइलमध्ये सुधारणेची शक्यता अधोरेखित केली आहे. तसेच सरकारकडून, विशेषतः रेल्वेकडून, मिळणाऱ्या ऑर्डर्सच्या वेळेबद्दल आणि खाजगी भांडवली खर्चाच्या पुनरुज्जीवनाबद्दल अनिश्चितता मात्र अद्याप कायम आहे असे अहवालात ब्रोकरेजने म्हटले. अहवालातील माहितीनुसार, मोतीलाल ओसवालने म्हटले आहे की,'डिजिटल इंडस्ट्रीजमधील कमी मार्जिन लक्षात घेऊन आम्ही आमचे अंदाज 18MFY26E/12MFY27E/12MFY28E साठी १%/४%/४% ने कमी केले आहेत. आम्हाला FY24 (सप्टेंबर अखेर) FY28 (मार्च-अखेर) या कालावधीत महसूल/ईबीटा (EBITDA) / करोत्तर नफा (PAT) अनुक्रमे मध्ये ११%/ १३%/८% च्या पातळीवर सीएजीआरने (Compound Annual Growth Rate CAGR) ने वाढ अपेक्षित आहे.ब्रोकरेजने आपल्या अहवालात म्हटले आहे की आम्ही 45x Dec’27E कमाईवर आधारित, ३२५० (पूर्वीच्या ३३५० वरून) सुधारित लक्ष्य किमतीसह स्टॉकवरील आमचे 'न्यूट्रल' रेटिंग कायम ठेवतो. व्यापक भांडवली खर्चाचे पुनरुज्जीवन आणि मार्जिनमधील सुधारणा हे कमाई आणि मूल्यांकनाच्या रेटिंगसाठी प्रमुख चालक (Catlayst) असतील असे अहवालाने आपल्या निरीक्षणात नोंदवले.३) Endurance Technologies- ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून १५% अपसाईड संभाव्य वाढीसह २६४१ रुपये सीएमपीला खरेदी करण्याचा सल्ला ब्रोकरेजने दिला असून कंपनीने या शेअरची लक्ष्य किंमत ३०५० रुपयांवर निश्चित केली आहे. आपल्या अहवालातील निरिक्षणात नोंदवल्या माहितीनुसार, कंपनीला मिळालेल्या नव्या ऑर्डर मुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे.अहवालातील माहितीनुसार ब्रोकरेजने एंड्युरन्स टेक्नॉलॉजीजच्या (ENDU) व्यवस्थापनाशी त्यांच्या प्रमुख विभागांच्या भविष्यातील दृष्टिकोनाबद्दल चर्चा केली आहे. त्यातील निरीक्षणातील माहितीनुसार सर्व दुचाकी वाहनांवर एबीएस (ABS) अनिवार्य करण्याच्या शिफारशीवर सरकारकडून स्पष्टतेची कंपनी वाट पाहत असली तरी१) बिडकिन येथील नवीन अलॉय व्हील प्लांट; २) ड्युअल-चॅनल एबीएस आणि चेन्नईमधील नवीन ब्रेक सुविधा; आणि ३) इन्व्हर्टेड फ्रंट फोर्क्स व्यवसाय या कारणामुळे कंपनीच्या कामगिरीत मजबूत होण्याची शक्यता आहे. यासह ब्रोकरेज मते, ही कारणे भविष्यात चारचाकी वाहनांतील वाढीचा एक चालक (Catlayst) म्हणून काम करू शकतो. कंपनी या विभागाचे योगदान सध्याच्या ३०% वरून ४५% पर्यंत वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.यासह अहवालानुसार, कंपनीने यापूर्वीच डाय कास्टिंग्ज, ब्रेक्स आणि ट्रान्समिशनमध्ये ऑर्डर मिळवल्या आहेत आणि सस्पेंशनमधील पहिल्या ऑर्डरच्या प्रतीक्षेत आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने संलग्न विभागांमध्ये क्षमता विकसित केली आहे, आणि सोलर डॅम्पर्स, बॅटरी पॅक असेंब्ली आणि ॲल्युमिनियम फोर्जिंगसाठी पुरवठा लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. स्टोफरलेच्या अधिग्रहणामुळे आणि नवीन ऑर्डर मिळाल्यामुळे, प्रतिकूल व्यापक आर्थिक वातावरण असूनही ब्रोकरेज मते, युरोपीय व्यवसायात स्थिर वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे दिलेल्या माहितीत ब्रोकरेजने म्हटले आहे की,'आम्ही आर्थिक वर्ष २५-२८ दरम्यान एकत्रित महसूल (Consolidation) /ईबीटा (EBITDA)/ करोत्तर नफ्यात (PAT) मध्ये सुमारे १६%/१७%/१६% च्या सीएजीआरचा (CAGR) अंदाज लावतो .ब्रोकरेज कंपनीने ३०५० रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह 'बाय' (BUY) कॉल रेटिंग कायम राखतो असे म्हटले.
२ वर्षीच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीच ; राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळली
Jalna mercy petition। राज्यात 2012 साली घडलेल्या अत्यंत अमानुष घटनेतील दोषी आरोपीची दयेची याचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अखेर नामंजूर केली आहे. जालनाच्या या प्रकरणात दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार व नंतर हत्या केल्याबद्दल आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुर्मू यांनी फेटाळलेली ही तिसरी दयेची याचिका ठरली आहे. या […] The post २ वर्षीच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीच ; राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळली appeared first on Dainik Prabhat .
शिवागाळ केल्याने मित्रांकडूनच मित्राची हत्या; भानावर येताच दोन्ही आरोपींचे आत्मसमर्पण
बारामती – दारूच्या नशेत असलेल्या दोन मित्रांनी तिसऱ्या मित्राचा निर्घृण खून केल्याची घटना मोरगाव रोड येथे घडली. नशेतून भानावर आल्यावर दोन्ही आरोपींनी थेट पोलीस स्टेशन गाठले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील जुन्या मोरगाव रोड येथे तीन मित्र दारू पीत बसले होते. किरकोळ कारणावरून त्यांच्यात शिवीगाळ झाली. त्यानंतर त्याचे रूपांतर भांडणात झाले. अविनाश उर्फमाऊली […] The post शिवागाळ केल्याने मित्रांकडूनच मित्राची हत्या; भानावर येताच दोन्ही आरोपींचे आत्मसमर्पण appeared first on Dainik Prabhat .
घरगुती ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नाही : मुख्यमंत्री
नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र, सामान्य घरगुती ग्राहकांना प्रीपेड मीटर लावले जाणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी विधानसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात मुख्यमंत्री म्हणाले, सुरुवातीला प्रत्येक ग्राहकाला प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवण्यात आल्याने राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात फिडर मीटर आणि डिस्ट्रीब्युशन मीटर बसवण्यात आले असून, सध्या शासकीय कार्यालये व आस्थापनांमध्येच प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. सामान्य ग्राहकांसाठी मात्र पोस्टपेड स्मार्ट मीटरच बसवले जात आहेत.स्मार्ट मीटर स्वीकारणाऱ्या ग्राहकांच्या वीजबिलात १० टक्के सवलत देण्यात आली असल्याने आतापर्यंत स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना प्रत्यक्ष लाभ झाला आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना मोबाईल अॅपच्या माध्यमातून तासागणिक वीज वापराचा तपशील मिळतो, त्यामुळे वापराची पडताळणी करणे सोपे झाले आहे. याशिवाय २४ तास तक्रार निवारण व्यवस्था उपलब्ध असून, आतापर्यंत पाच वेगवेगळ्या कंपन्यांनी बसवलेल्या स्मार्ट मीटरमध्ये केवळ एक टक्क्यांपेक्षा कमी त्रुटी आढळल्या आहेत. पुढील पाच वर्षे स्मार्ट मीटर पोस्टपेड स्वरूपातच राहणार असून, प्रीपेड मीटर सक्तीचा कोणताही निर्णय झालेला नाही. विधानसभा सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा विचार केला जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
मोहित सोमण: कोरोना रेमिडीज आयपीओचे आज जबरदस्त प्रिमियम दरात सूचीबद्ध (Listing) झाले आहे. सकाळी सत्राच्या सुरुवातीलाच शेअर ३८% प्रिमियम दराने यशस्वी ठरला. मूळ प्राईज बँड १०६२ तुलनेत ३८% प्रति शेअर दरासह शेअर १४७० रूपयांना सूचीबद्ध झाला. ८ ते १० डिसेंबर दरम्यान उपलब्ध असलेल्या आयपीओला (IPO) १३७.०४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. ११ डिसेंबरला पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) करण्यात आले. आज १५ डिसेंबरला शेअर सूचीबद्ध झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४८६८ रूपये गुंतवणूक करणे आयपीओसाठी अनिवार्य करण्यात आले होते. या फार्मा उत्पादन कंपनीला एकूण १४४.५४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते ज्यामध्ये किरकोळ अथवा रिटेल गुंतवणूकदारांकडून ३०.३९ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २९३.८० पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २२०.१८ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले. कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १८% वाढ झाली असून करोत्तर नफ्यात (PAT) ६५% वाढ नोंदवली गेली.शेअर सूचीबद्ध होण्यापूर्वी शेवटची ग्रे मार्केट किंमत (GMP) ३२.२५% होती. या अपेक्षेलाही मागे टाकत दमदार पदार्पण शेअरने बाजारात केले आहे. एकूण ६५५.३७ कोटी बूक व्हॅल्यु मूल्यांकन असलेल्या या आयपीओत नवीन शेअर भांडवल ऑफर करण्यात आले नव्हते तर संपूर्ण आयपीओत ०.६२ कोटीचे शेअर गुंतवणूकदारांसाठी दाखल झाले होते. आयपीओपूर्वी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून १९४.८६ कोटी निधी प्राप्त केला होता.ऑगस्ट २००४ मध्ये स्थापन झालेली कोरोना रेमेडीज लिमिटेड ही महिला आरोग्यसेवा, हृदयरोग, वेदना व्यवस्थापन, मूत्रविज्ञान आणि इतर उपचारात्मक क्षेत्रांमध्ये उत्पादने विकसित करणारी, उत्पादन करणारी आणि विपणन करणारी एक औषध कंपनी आहे. उपलब्ध माहितीनुसार ३० जून २०२५ पर्यंत, कंपनीच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये महिला आरोग्यसेवा, हृदयरोग-मधुमेह, वेदना व्यवस्थापन, मूत्रविज्ञान आणि मल्टीस्पेशालिटी फार्मास्युटिकल्स ,जीवनसत्त्वे/खनिजे/पोषण, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि श्वसन यासारख्या उपचारात्मक क्षेत्रांमध्ये ७१ ब्रँड समाविष्ट आहेत.
Sara Arjun: ‘छोटी ऐश्वर्या’ सारा अर्जुनचा ग्लॅमरस जलवा; काळ्या गाऊनमधील लूकने चाहते झाले फिदा
Sara Arjun: बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच अवघ्या २० वर्षांच्या सारा अर्जुनने आपल्या अदांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तिची झलक पाहून तिला ‘छोटी ऐश्वर्या’ म्हणून ओळख मिळाली होती. आता मोठ्या पडद्यावर मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसल्यानंतर ती सोशल मीडियावरही जोरदार चर्चेत आहे. सारा अर्जुनने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणाऱ्या ‘धुरंधर’ चित्रपटातून हिरोईन म्हणून डेब्यू […] The post Sara Arjun: ‘छोटी ऐश्वर्या’ सारा अर्जुनचा ग्लॅमरस जलवा; काळ्या गाऊनमधील लूकने चाहते झाले फिदा appeared first on Dainik Prabhat .
‘छडी लागे छमछम’बंद ! विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक शिक्षा दिल्यास होणार थेट कारवाई
Education Department | मागील काही काळापासून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना होणारी मारहाण, मानसिक छळ या घटना सातत्याने समोर येत आहेत. अलीकडेच वसई येथील एका शाळेतील सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेत उशिरा आल्याने शिक्षा म्हणून शंभर उठाबशा करायला लावल्या यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकाराची सरकारने दखल घेत वसई येथील या शाळेची नोंदणी रद्द केली. त्यानंतर आता शालेय […] The post ‘छडी लागे छमछम’ बंद ! विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक शिक्षा दिल्यास होणार थेट कारवाई appeared first on Dainik Prabhat .
Mohammad Mukeem Letter। काँग्रेस पक्षाने ओडिशाचे माजी आमदार मोहम्मद मुकीम यांना पक्षविरोधी कारवायांचे कारण देत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून काढून टाकले आहे. हा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस समितीने (एआयसीसी) घेतला आहे. ओडिशा प्रदेश काँग्रेस समितीने (ओपीसीसी) हा आदेश जारी केला आहे. पक्षविरोधी कारवायांच्या तक्रारीनंतर मुकीम यांना काढून टाकण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. सोनिया गांधींना पत्र लिहिल्यानंतर […] The post “तीन वर्षांपासून राहुल गांधींना भेटलो नाही…” ; सोनिया गांधींना पत्र लिहिल्यानंतर मुकीम यांची हकालपट्टी appeared first on Dainik Prabhat .
जून 2024 मध्ये टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला. बीसीसीआयने गौतम गंभीरला नवीन प्रशिक्षक बनवले, ज्याने 2 महिन्यांपूर्वीच केकेआरला आयपीएल विजेतेपद मिळवून दिले होते. गेल्या 17 महिन्यांत टीम इंडियाने मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकला, तर घरच्या मैदानावर दोन कसोटी मालिका गमावण्याचा लाजिरवाणा विक्रमही केला. या काळात टीम इंडियासोबत प्रशिक्षक गौतम गंभीरचे अनोखे प्रयोग वादात राहिले. गौतम गंभीर टीम इंडियाला उद्ध्वस्त करत आहेत का, मंडे मेगा स्टोरीमध्ये 5 निकषांवर संपूर्ण विश्लेषण… **** ग्राफिक्स: द्रगचंद्र भुर्जी आणि अंकित द्विवेदी
Health Tips: हिवाळ्यात रोज सकाळी कोमट पाणी प्या; पचन सुधारेल, सर्दी-खोकल्यातूनही मिळेल दिलासा
Health Tips: हिवाळ्यात बहुतेक लोक सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. मात्र आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे ही एक सोपी, स्वस्त आणि अत्यंत फायदेशीर सवय आहे. आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोन्हीही याला चांगली सवय मानतात. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीराचे आतले तापमान हळूहळू वाढते. त्यामुळे पचनसंस्था सक्रिय होते आणि शरीरातील घाण (टॉक्सिन्स) बाहेर […] The post Health Tips: हिवाळ्यात रोज सकाळी कोमट पाणी प्या; पचन सुधारेल, सर्दी-खोकल्यातूनही मिळेल दिलासा appeared first on Dainik Prabhat .
हिंगोली : पोतरा शिवारात सलग चौथ्या दिवशी बिबट्याचा वावर; पिंजऱ्याजवळ येऊनही बिबटे निसटले
शिवशंकर निरगुडे हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील पोतरा शिवारात दोन शेळ्या, एका वासराची शिकार केलेल्या बिबट्याचा चौथ्या दिवशी याच भागात वावर असल्याचे दिसून आले. या ठिकाणी एका एका कुत्र्याची शिकार केल्याचे सोमवारी दि १५ सकाळी स्पष्ट झाले. तर ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये दोन बिबटे आल्याचे दिसून आले, मात्र ते पिंजऱ्यात गेलेच नाहीत. आता त्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी […] The post हिंगोली : पोतरा शिवारात सलग चौथ्या दिवशी बिबट्याचा वावर; पिंजऱ्याजवळ येऊनही बिबटे निसटले appeared first on Dainik Prabhat .
सोन्याच्या किमतीत मोठी वाढ ; आज किती दर वाढले?, जाणून घ्या
Gold Price Today। देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत आज वाढ दिसून येत आहे. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर एक्सपायर असलेले सोन्याचे वायदा १,३४,२०४ रुपये (प्रति १० ग्रॅम) वर उघडले. शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, MCX वर सोने १,३३,६२२ रुपयांवर बंद झाले होते. आज सकाळी १०:१० वाजता एक्सपायर असलेले सोने MCX वर १,३४,६६९ रुपयांवर व्यवहार करत होते, […] The post सोन्याच्या किमतीत मोठी वाढ ; आज किती दर वाढले?, जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
Uddhav Thackeray | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई, ठाकरेंचे पक्षाचे दिवंगत माजी नगरसेवक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज दादरच्या वसंत स्मृतीमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश […] The post ठाकरे गटाच्या महिला नेत्याचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’; भाजपची वाट धरत शेअर केली भावनिक पोस्ट; ‘नाती बदलू शकतात, पण…’ appeared first on Dainik Prabhat .
बदलापूर: महाराष्ट्रातील बदलापूर येथे तीन वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या काँग्रेस महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. नीरजा यांचा कथित मृत्यू नैसर्गिक असल्याचे दाखवण्यात आले होते. पोलीस तपासात सुद्धा हेच सत्य असल्याचे सांगितले होते. मात्र नीरजाचे पती रूपेश आंबेकर यांनी हा पूर्वनियोजित खून केल्याचे उघड झाले आहे. काँग्रेस महिला नेत्या नीरजा आंबेकर यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी हा खळबळजनक खुलासा समोर आल्याने सर्वांना धक्का बसला आहे.नीरजा आंबेकर यांच्या हत्येतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या मृत्यूवेळी आत्महत्या किंवा नैसर्गिक मृत्यू असे भासवण्यासाठी विषारी सापाचा वापर करणे. आरोपी ऋषिकेश चाळकेने दिलेल्या जबाबानुसार, हत्या करण्याची पद्धत अत्यंत क्रूर आणि नियोजित होती. आरोपीने नीरजाच्या घरातील स्वयंपाकघरात एका पोत्यात विषारी साप आधीच लपवून ठेवला होता. यानंतर नीरजाचे पती रूपेशने पायांना मालिश करण्याच्या बहाण्याने तिला हॉलमध्ये झोपवले. सर्पप्रेमी असलेला आरोपी चेतन दुधानेने पोत्यातून साप बाहेर काढला आणि ऋषिकेश चाळकेला दिला. त्यानंतर, नीरजाला डाव्या घोट्याजवळ सापाने तीन वेळा चावा घेतल्याने तिचा मृत्यू झाला.हा खून झाल्यानंतर, संपूर्ण प्रकरण नैसर्गिक मृत्यू असल्याचे घोषित करण्यात आले आणि पोलिसांनी फक्त एडीआर (अपघाती मृत्यू अहवाल) दाखल केला. तीन वर्षांनंतर, जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा पोलिसांनी नीरजा यांचा पती रूपेश आंबेकर, चेतन दुधाणे, कुणाल चौधरी आणि ऋषिकेश चाळके या आरोपींना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, खोटे मृत्युपत्र देणाऱ्या डॉक्टरांचीही चौकशी केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.https://prahaar.in/2025/12/15/good-news-for-home-buyers-cidco-has-significantly-reduced-house-prices-learn-the-details/प्रकरण कसे आले समोर?काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये एका तरुणावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी ऋषिकेश चाळके याला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक राजेश गज्जल हे या प्रकरणाचा तपास करत असताना, चौकशीदरम्यान ऋषिकेशला 'तू आणखी काय-काय केलं आहेस?' असा प्रश्न विचारला. तेव्हा ऋषिकेशने बोलता बोलता तीन वर्षांपूर्वीच्या एका हत्येचा खुलासा केल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
पालिका निवडणुकीच्या घोषणाची शक्यता ते ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला; जाणून घ्या TOP 10 News
१. महापालिका निवडणुकांची घोषणा आज होण्याची शक्यता राज्य निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील प्रलंबित असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जर आज आयोगाने घोषणा केली तर आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू होऊ शकते, अशी माहिती समोर […] The post पालिका निवडणुकीच्या घोषणाची शक्यता ते ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला; जाणून घ्या TOP 10 News appeared first on Dainik Prabhat .
Vidya Balan: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत वयाच्या ७५व्या वर्षीही तितक्याच जोमाने काम करताना दिसतात. सध्या ते त्यांच्या बहुचर्चित चित्रपट ‘जेलर २’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. अशातच या चित्रपटाबाबत एक मोठी आणि उत्सुकता वाढवणारी बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जेलर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर […] The post Vidya Balan: रजनीकांत यांच्या ‘जेलर २’मध्ये विद्या बालनची एन्ट्री; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट appeared first on Dainik Prabhat .
पंतप्रधान मोदी ३ देशांच्या दौऱ्यावर होणार रवाना ; जाणून घ्या वेळापत्रक
PM Modi। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी सोमवारी जॉर्डनला राजे अब्दुल्लाह द्वितीय बिन अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून पोहोचतील. हाशेमाइट किंगडमच्या त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी राजे अब्दुल्लाह द्वितीय बिन अल हुसेन यांची भेट घेतील आणि भारत-जॉर्डन संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतील, तसेच प्रादेशिक […] The post पंतप्रधान मोदी ३ देशांच्या दौऱ्यावर होणार रवाना ; जाणून घ्या वेळापत्रक appeared first on Dainik Prabhat .
शिवाजीनगर येथे झाड कोसळले; कोणतीही जीवितहानी नाही
पुणे : शिवाजीनगर येथील शिमला ऑफिस परिसरात मध्यरात्री अचानक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी चैन सॉ, कुऱ्हाड आदी उपकरणांच्या सहाय्याने झाडाच्या मोठ्या फांद्या कापून झाड बाजूला केले. सुमारे काही वेळातच रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात […] The post शिवाजीनगर येथे झाड कोसळले; कोणतीही जीवितहानी नाही appeared first on Dainik Prabhat .
Pune : कात्रज–कोंढवा रस्त्यावर कंटेनर-स्कूटरचा अपघात; महिला जखमी
पुणे – कात्रज–कोंढवा रोडवरील गगन उन्नती इमारतीसमोरील डायव्हर्शनच्या ठिकाणी आज सकाळी साडेसातच्या सुमारासकंटेनर आणि होंडा स्कूटर यांच्यात अपघात झाला. कंटेनर क्रमांक TG 08 V 3323 च्या मागील चाकाखाली स्कूटर आल्याने हा अपघात घडला. या अपघातात स्कूटरवरून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. तिला तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी भारतीय हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. […] The post Pune : कात्रज–कोंढवा रस्त्यावर कंटेनर-स्कूटरचा अपघात; महिला जखमी appeared first on Dainik Prabhat .
VI Share Today: वीआय शेअर गगनाला! सर्वोच्च न्यायालयाच्या दिलाश्यानंतर सुसाट शेअर तेजीतच सुरू
मोहित सोमण: सर्वोच्च न्यायालयाने वीआयला मोठा दिलासा दिला आहे. सुनावणीत केंद्र सरकारला वीआयसाठी एजीआर थकबाकीवर पुनर्विचार करण्याचे आदेश दिल्याने कंपनीच्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सुटकेचा निःश्वास टाकला आहे. प्रामुख्याने केंद्र सरकार कंपनीचे ८३००० कोटी रूपयांची थकबाकी असलेले एजीआर (Adjusted Gross Revenue AGR) स्थगिती देऊ शकते. यामध्ये व्याजदरासहित रकमेचा समावेश आहे. टेलिकॉम विभागाने (Department of Telecommunication DoT) विभागाने कंपनीच्या वोडाफोन आयडिया यांच्या विलीनीकरणानंतर कंपनीच्या स्पेक्ट्रम व लायसन्स फी प्रलंबित असताना कंपनीची आर्थिक स्थिती खालावली होती. या वादातून प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले होते.त्यामुळे सरकारला आता मोठ्या प्रमाणात लवचिकता मिळाली असून सरकार हप्ता हप्त्यांत ही रक्कम विना व्याजासह भरण्याची सवलत मिळणार आहे. मात्र जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप टेलिकॉम विभाग (DoT) आणि टेलिकॉम कंपन्यांचे नियामक मंडळ ट्राय (TRAI) यांच्यातील वाद सोडवला गेला नसल्याने यात आणखी काही घडामोडी घडू शकतात.टेलिकॉम कंपनीचा महसूल व नफा घसरत असताना एप्रिलमध्ये, कंपनीच्या सीईओंनी दूरसंचार सचिवांना पत्र लिहून असे सुचवले होते की जर कंपनीला एजीआर मुद्द्यावर सरकारकडून वेळेवर पाठिंबा मिळाला नाही तर ती कंपनी (VI) आर्थिक वर्ष २६ नंतर काम करू शकणार नाही. त्यानंतर केंद्र सरकारने कंपनीला नोटीस बजावली होती. मात्र न्यायालयात वोडाफोन आयडिया (VI) सुनावणीत यश मिळवल्यानंतर सरकार आता कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलातून ६ टप्यात (6 Installments) माध्यमातून हे एजीआर थकबाकी वसूल करू शकते. खरं तर या प्रकरणामुळे कंपनीच्या २० कोटी सबस्क्राईबरला दिलासा मिळाला होता. गेल्या वर्षीच्या सुनावणीदरम्यान सरकारने वीआय, एअरटेल, जिओ कंपन्यांना विना टेलिफोन सुविधा (OTT) व इतर सुविधावरील महसूलातून एजीआर थकबाकी चुकण्याचे सांगितले होते यावर टेलिकॉम कंपन्यांनी विरोध केला होता. आता ६ टप्यात अँरियर भरल्यानंतर कंपनीला नवीन २५००० कोटींची भांडवली गुंतवणूक कंपनीच्या पुनः जिवित करण्यासाठी मदत होणार आहे. सध्या भारत सरकारच वोडाफोन आयडिया कंपनीच्या एकूण भागभांडवलापैकी ४८.९९% हिस्सा (Stake) ग्रहण करतो.डिसेंबरच्या सुरुवातीला, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या एका अहवालानुसार, केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की,'दूरसंचार विभाग व्होडाफोनकडून औपचारिक विनंतीची वाट पाहत आहे. व्होडाफोन आयडियाच्या प्रस्तावाचे मूल्यांकन केल्यानंतर सरकार शिफारस करेल. तसेच ते म्हणाले आहेत की,'मंत्रालय सध्या न्यायालयाने निश्चित केलेल्या कायदेशीर मर्यादांची तपासणी करत आहे.न्यायालयाच्या निर्णयाचे मूल्यांकन या दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे की काय केले जाऊ शकते आणि काय केले जाऊ शकत नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची मर्यादा ओलांडू शकत नाही.'सरकार पुढील काही आठवड्यांत आपले मूल्यांकन पूर्ण करून शिफारसी जारी करू शकते आणि मदत पॅकेजचे तपशील वर्षाच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.दरम्यान २०१९ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कंपनीला थकबाकी भरावी लागेल. एजीआर महसूल माफी मिळणार नसल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले असले तरी आता टप्प्यात भरण्याची सवलत न्यायालयाने दिली आहे. ज्यामध्ये दूरसंचार कंपन्यांनी स्पेक्ट्रम आणि परवाना शुल्कासारखे वैधानिक देयके त्यांच्या समायोजित (Adjusted) एकूण महसुलावर आधारित भरावी लागतील ज्यात त्यांच्या गैर-दूरसंचार उत्पन्नाचाही (Non Telecom Revenue) समावेश आहे, असा दूरसंचार विभागाचा (DoT) दृष्टिकोन न्यायालयाने कायम ठेवला होता.तज्ञांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आगामी मदत पॅकेज अंतर्गत व्होडाफोन आयडियाची (Vi) थकबाकीची रक्कम निश्चित केली जाईल आणि भविष्यात त्यावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. भारती एअरटेलला तिचे हप्ते नियोजित वेळापत्रकानुसार भरावे लागतील, कारण ही मदत केवळ व्होडाफोन आयडियासाठी आहे.यापूर्वी व्होडाफोन आयडियाने एजीआरची देणी देण्यास असमर्थता दर्शविली आहे आणि सरकारकडे मदत मागितली असताना सरकारने आपले शेअर होल्डिंग वाढवले होते. देशातील क्रमांक ३ असलेली वीआयमध्ये सरकार सर्वात मोठे भागभांडवलधारक आहे. मदतीचे स्वरूप म्हणून सरकारने कंपनीची काही पूर्वीची देणी समभागांमध्ये (Converted into Equity) रूपांतरित केली आहेत. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयानेही केंद्राला रोखीच्या संकटात सापडलेल्या या दूरसंचार कंपनीच्या संपूर्ण एजीआर दायित्वांसाठी एक विशेष पॅकेज तयार करण्यास परवानगी दिली होती.आदित्य बिर्ला समूह आणि यूकेच्या व्होडाफोन ग्रुप पीएलसीकडे या दूरसंचार कंपनीमध्ये अनुक्रमे ९.५०% आणि १६.०७% हिस्सा आहे.त्यामुळे नव्या योजनेनुसार समभागांची यशस्वी विक्री झाल्यास सरकारचा हिस्सा कमी होईल ज्यामुळे केंद्राला अतिरिक्त देणी समभागांमध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय मिळेल आणि कंपनीला आणखी दिलासा मिळू शकतो असे म्हटले जात आहे.कंपनीच्या भविष्यातील कामगिरीसाठी हा मोठा दिलासा मानला जात असल्याने गुंतवणूकदारांनी शेअरला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यावर सरकार लवकरच काहीतरी निश्चित भूमिका घेऊ शकते ज्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी अद्याप कायम राहू शकते. सकाळच्या सत्रात एकदम सुरूवातीला ९% उसळला असून १२.१० रूपये प्रति शेअरवर इंट्राडे उच्चांकावर (All time High) पोहोचला होता. कंपनीचा शेअर सकाळी १० वाजेपर्यंत ०.४३% उसळत ११.६९ रूपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या ५ दिवसात कंपनीचा शेअर १४.७३% उसळला असून गेल्या महिनाभरात ६.८६% व वर्षभरात ४६.१८% उसळला होता.
काठापुर खुर्द परिसरातील बिबट्याला अखेर जेरबंद; वनविभागाला यश
जांबुत – शिरूर तालुक्यातील काठापुर खुर्द परिसरातील शेतकरी संतोष दशरथ वाव्हळ यांचे शेतात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात 7 वर्षीय मादी संवर्गातील बिबट्याला सोमवारी (दि. १५) रोजी पहाटे वनविभागाकडून जेरबंद करण्यात आले. मागील दोन महिन्यापासून या भागात बिबट्याचे वास्तव्य नेहमीच स्थानिकांच्या निदर्शनास येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काठापुर खुर्द येथे सरपंच सिमा थिटे […] The post काठापुर खुर्द परिसरातील बिबट्याला अखेर जेरबंद; वनविभागाला यश appeared first on Dainik Prabhat .
घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! सिडकोने केली घरांच्या किमतीमध्ये लक्षणीय घट, जाणून घ्या सविस्तर
नवी मुंबई: जर तुम्ही घर खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूश खबर आहे. कारण सिडकोने माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत २६ हजार घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. ही घरं नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर (प), खारघर (पू), तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये उपलब्ध होती. या योजनेसाठी घरांच्या किंमती जाहीर झाल्यानंतर अनेकांनी अर्ज मागे घेतली. तर काहींनी घराची लॉटरी लागल्यावरही रद्द केले होते. या पार्श्वभूमीवर आता सिडकोने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सिडकोने घरांच्या किंमतींमध्ये दहा टक्के घट केली असून पून्हा संधी दिली आहे. तसेच लॉटरी विज्येत्यांपैकी घर रद्द केलेल्यांनाही एक संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.सिडकोने जाहीर केलेल्या माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या योजनेमध्ये अगदी २५ लाखांपासून ते ९७ लाखांपर्यंत घरं उपलब्ध होती. या घरांच्या किंमती आता १० टक्क्यांनी कमी होणार आहेत. म्हणजेच २५ लाखाचे असलेले घर आता अडीच लाखांनी कमी होणार आहे. म्हणजेच हे घर आता २२ लाख ५० हजारांना मिळणार आहे. शिवाय जर हे घर आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गमध्ये असेल तर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अडीज लाखांची सबसीडीदेखील मिळणार आहे. ज्यामुळे हे घर २० लाखात मिळणार आहे. सिडकोच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.https://prahaar.in/2025/12/15/relief-for-navi-mumbai-residents-the-railways-fulfill-their-promise-of-more-trains-and-a-new-station/आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील कळंबोली बस डेपो येथे विक्रीस असलेली घर सर्वात महाग होती. ज्याची किंमत साधारणत: ४२ लाखांच्या घरात होती. पण आता १० टक्के किंमत कमी झाल्यानंतर हेच घर आता ३६ लाखात मिळणार आहे. शिवाय यावर अडीच लाखांची सबसीडी लागू झाल्यानंतर त्याची किंमत ३४ लाखांपर्यंत झाली आहे. त्यामुळे या वर्गातील लॉटरी धारकांना त्याचामोठा दिलासा मिळणार आहे. तर खारघर बस डेपो मध्ये याच वर्गातील घरांची किंमत ४८ लाखांपर्यंत होती. हे घर ही नव्या किंमतीनुसार जवळपास ४३ ते ४४ लाखापर्यंत मिळणार आहे. इथेसुद्धा अडीच लाखांची सबसीडी लागू होणार आहे.सिडकोने १० टक्के दर कमी केल्यामुळे अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील घरे लक्षणीयरीत्या अधिक परवडणारी ठरणार आहेत. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील घर खरेदीदारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अडीज लाखांच्या अनुदानासोबतच १० टक्के स्वस्त किंमतींचा एकत्रित लाभ मिळणार आहे. त्यामुळे एकूण आर्थिक भार कमी होऊन घर घेणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच, या योजनेच्या १९ फेब्रुवारी २०२५ रोजी काढलेल्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या परंतु घरे परत केलेल्या अर्जदारांना देखील सुधारित अटींनुसार पुन्हा एकदा योजनेत सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी या अर्जदारांना वाटप झालेले घर निश्चित करण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदती दरम्यान संबंधित अर्जदारांना https://cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट देऊन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
Stock Market Crash। परदेशी शेअर बाजार गोंधळाच्या स्थितीत आहेत. जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँग सेंग आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी हे सर्व निर्देशांक तीव्र घसरणीसह व्यवहार करत आहेत. आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी आशियाई बाजारांमध्ये झालेल्या या भीतीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक घसरले आणि रेड झोनमध्ये उघडले. बीएसईच्या ३० पैकी अठ्ठावीस […] The post जपान, हाँगकाँगपासून कोरियापर्यंत हाहाकार ! सेन्सेक्स आणि निफ्टी उघडताच कोसळले ; ‘या’ शेअर्समध्ये मोठी घसरण appeared first on Dainik Prabhat .
पुतिन मायदेशी परतल्यानंतर आता भारताची ३०० वस्तूंची यादी तयार ; काय आहे प्लॅन? वाचा
India-Russia Relationship। भारत आणि रशियाचे संबंध दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण आहेत, ज्याचा त्यांच्या व्यापारावर परिणाम होतो आणि आता त्यांचा विस्तार करण्याचा विचार केला जात आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, भारताने अभियांत्रिकी, औषधनिर्माण, कृषी आणि रसायनांमधील सुमारे ३०० उत्पादने ओळखली आहेत, ज्यामुळे भारतीय निर्यातदारांना रशियन बाजारपेठेत त्यांची उपस्थिती वाढवण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळेल” असे म्हटले आहे. भारत […] The post पुतिन मायदेशी परतल्यानंतर आता भारताची ३०० वस्तूंची यादी तयार ; काय आहे प्लॅन? वाचा appeared first on Dainik Prabhat .
बिहार निवडणुकीच्या निकालानंतरच नितीन नवीन यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनवण्याची तयारी सुरू झाली होती. 202 जागांच्या प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या भाजपने आता येथूनच एक मोठे व्यक्तिमत्त्व शोधायला सुरुवात केली होती. निवडणूक प्रचारादरम्यान नितीन नवीन यांच्या वचनबद्धतेने पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले. शीर्ष नेतृत्वाने जेव्हा नाव पुढे केले, तेव्हा संघानेही नकार दिला नाही. प्रस्तावात नितीन नवीन यांची कार्यक्षमता, लोकांशी असलेले संबंध, संघटनेची चांगली समज यांची उदाहरणे दिली होती. त्याचबरोबर बिहारमधील विजय, छत्तीसगडमधील व्यवस्थापनाचाही उल्लेख होता. नितीन नवीन यांना अध्यक्षपदापर्यंत पोहोचवण्यात RSS च्या दोन शीर्ष नेत्यांचे आणि क्षेत्राच्या प्रभारींचे सहकार्य मानले जात आहे. विशेष अहवालात वाचा, संघ आणि मोदी-शाह यांनी नितीन नवीन यांना का निवडले…। बिहारमध्ये RSS ची पकड शहरी भागांमध्ये आहे. पाटणा, गया, मुझफ्फरपूर, भागलपूर यांसारख्या शहरांमध्ये संघाच्या शाखा बऱ्याच काळापासून लागत आहेत. नितीन नवीन यांची राजकीय ओळखही याच शहरी भागातून तयार झाली आहे. पाटणासारख्या शहरात जिथे मध्यमवर्ग, व्यापारी आणि व्यावसायिक मते निर्णायक आहेत, तिथे संघाची वैचारिक उपस्थिती भाजपसाठी आधार बनते. नितीन नवीन यांच्या राजकारणात आक्रमकता कमी, संयम, संवाद आणि संघटना जास्त दिसते. याच व्यवहारामुळे नितीन सतत संघाच्या जवळ येत गेले. सूत्रांनुसार, बिहार निवडणुकीनंतरच नितीन नवीन यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांचा निर्णय व्हायचा होता, त्यामुळे उशीर झाला. 2 मुद्द्यांमध्ये RSS नितीन नवीन यांच्या नावावर का सहमत झाला 1. ‘डाउन टू अर्थ’ प्रतिमा: संघाच्या विस्तारासाठी उपयुक्त संघाशी संबंधित नेत्यांबद्दल एक गोष्ट सांगितली जाते - ते लो प्रोफाइल राहतात, पण काम मात्र सातत्याने करतात. नितीन नवीन यांची प्रतिमा देखील अशीच काहीशी बनली आहे. ते सोशल मीडियावर अतिसक्रिय नसतात आणि मोठ्या राजकीय वादांमध्येही वक्तव्ये करत नाहीत. त्यांची ओळख अशा नेत्याची आहे, जो कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधतो, सार्वजनिक व्यासपीठांवर संतुलित भाषा वापरतो आणि सत्तेत असतानाही स्वतःला वेगळे ठेवत नाही. ही शैली भाजपमध्ये संघ-समर्थित नेत्यांमध्ये सामान्य मानली जाते. याचा फायदा असा होतो की नेता विरोधापेक्षा जास्त स्वीकारार्हता मिळवतो. 2. पब्लिक कनेक्ट: सेवा आणि पोहोचचे राजकारण संघाच्या राजकारणाचा एक मोठा आधार सेवाकार्य राहिला आहे. आपत्कालीन परिस्थिती, सामाजिक कार्यक्रम, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम - या सर्वांमध्ये स्वयंसेवकांची भूमिका असते. नितीन नवीन यांच्या राजकीय प्रवासातही हे तत्व दिसते. पाटण्याच्या शहरी भागात ते नागरिक समस्यांवर हस्तक्षेप करताना दिसले, प्रशासनाशी संवाद साधत राहिले आणि कार्यकर्त्यांद्वारे अभिप्राय घेत राहिले. याच कारणामुळे त्यांना केवळ 'निवडणुकीतील चेहरा' न म्हणता 'लोकांशी जोडलेला नेता' म्हटले जाते. 5 मुद्द्यांमध्ये मोदी-शाह यांनी का निवडले 1: मोदी-शाह यांचे आज्ञाधारक, हाताळण्यास सोपे नितीन नवीन हे पक्षाच्या सूचना 'पण-परंतु' न करता जशाच्या तशा लागू करणारे नेते आहेत. बिहार सरकारमध्येही ते समन्वय साधून चालतात जेणेकरून कोणी नाराज होऊ नये. त्यांचे सर्व पक्षांमध्ये चांगले संबंध आहेत. नितीन बहुतांश काळ बिहारमध्येच राहिले आहेत. यामुळे त्यांची ओळख देशभरात नाही. राजकीय विश्लेषक अभिरंजन कुमार म्हणतात, 'नितीन नवीन यांची उंची अशी नाही की ते मोदी-शाह यांच्या मर्जीशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकतील. ते कोणताही निर्णय घेतील तो त्यांच्या हिशोबानेच घेतील. असे म्हणा की ते आज्ञाधारक नेत्याच्या भूमिकेत राहतील.' राजकीय विश्लेषक प्रियदर्शी रंजन म्हणतात, 'नवीन यांची एक खासियत अशीही आहे की ते महत्त्वाकांक्षी नाहीत. त्यांना जेवढे मिळते तेवढ्यात समाधान मानणारे नेते आहेत. अशा परिस्थितीत ते शीर्ष नेतृत्वासाठी आव्हान ठरू शकत नाहीत.' 2: लो प्रोफाइल नेते, कधीही भेटू शकतात 5 वेळा आमदार आणि 3 वेळा मंत्री असूनही नवीन खूप लो-प्रोफाइल नेते आहेत. त्यांना भेटणे कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत सर्वांसाठी सोपे असते. कोणताही व्यक्ती रात्र असो वा दिवस, कधीही त्यांना भेटू शकतो. राजकीय विश्लेषक प्रियदर्शी रंजन म्हणतात, ‘नितीन नवीन खूप मनमिळाऊ नेते आहेत. ओळखीशिवायही ते लोकांना सहज भेटतात. कार्यकर्त्यांसाठी त्यांचे दार 24 तास उघडे असते. त्यांचे वडीलही खूप मनमिळाऊ नेते होते.’ नवीन यांचे संपूर्ण कुटुंब RSS च्या जवळचे राहिले आहे. ते सध्या 45 वर्षांचे आहेत. त्यांना पुढे करून भाजपने युवा पिढीला पुढे आणले आहे. 3ः ओबीसींना सत्ता, फॉरवर्डना पक्ष यावेळीही भाजपने पक्ष आणि सत्तेत ओबीसी-फॉरवर्ड संयोजनाची पुनरावृत्ती केली आहे. जेपी नड्डा ब्राह्मण समाजातून येतात. त्यांच्या जागी पक्षाने कायस्थ समाजातून येणाऱ्या नबीन यांना आणून फॉरवर्ड-ओबीसी संयोजनाला मजबूत केले आहे. मोदी ओबीसी समाजातून येतात, अशा परिस्थितीत पक्षाची कमान फॉरवर्ड (उच्चवर्णीय) समाजाला दिली आहे. प्रियदर्शी रंजन म्हणतात, ‘भाजपने योग्य रणनीतीनुसार समीकरण साधले आहे. त्यांना माहीत आहे की आपल्या मूळ मतदारांना कसे जपायचे. भाजप जेव्हा शून्य होता, तेव्हा त्याची ताकद फॉरवर्ड (उच्चवर्णीय) होते. आता जेव्हा तो आपल्या शिखरावर आहे, तेव्हा त्यांना सोडू इच्छित नाही.’ 4ः नबीन यांच्या मदतीने बंगाल आणि ईशान्य भारत या दोघांनाही साधले नबीन हे बिहारचे पहिले नेते आहेत, ज्यांना भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. हा मोठ्या रणनीतीचा भाग असू शकतो. पक्षाचे लक्ष पूर्वेकडील म्हणजेच बंगाल आणि ईशान्य भारताला साधण्यावर आहे. 5: छत्तीसगड निवडणूक जिंकवली छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीन नवीन यांना छत्तीसगडचे प्रभारी बनवण्यात आले होते. काँग्रेसचा मजबूत गड असलेल्या या राज्यात सरकार स्थापन करण्यात नितीन नवीन यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी अनेक मोठे संघटनात्मक बदल केले होते, ज्याचा फायदा भाजपला मिळाला. नितीन नवीन यांनी एका बाजूला बूथ स्तरावर मजबूत कार्यकर्ते नेटवर्क तयार केले. दुसऱ्या बाजूला मोहल्ला बैठका, छोटे कार्यक्रम आणि वैयक्तिक संपर्काद्वारे पक्षाची प्रतिमा मजबूत केली. हेच काम त्यांना बिहार-बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये करायचे आहे.
आजपासून अमेरिका भारतीयांवर करणार कारवाई? ; H-1B आणि H-4 व्हिसासाठी करावा लागणार गोपनीयतेचा त्याग
American Visa। अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने H-1B आणि H-4 व्हिसा अर्जदारांसाठी सोशल मीडिया प्रोफाइल पडताळणी अनिवार्य केली आहे. हा नवीन नियम आजपासून लागू होत आहे. पूर्वी, ही पडताळणी फक्त F, M आणि J व्हिसावरील विद्यार्थी आणि एक्सचेंज अभ्यागतांसाठी लागू होती. आता, ती H-1B (कुशल कामगार) व्हिसावरील आणि H-4 व्हिसावरील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी वाढविण्यात आली आहे. सोशल […] The post आजपासून अमेरिका भारतीयांवर करणार कारवाई? ; H-1B आणि H-4 व्हिसासाठी करावा लागणार गोपनीयतेचा त्याग appeared first on Dainik Prabhat .
विक्रमगडमधील १५० आदिवासी मुलांनी अनुभवली मुंबई; सनदी तसेच आयपीएस अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन
मुंबई (प्रतिनिधी):आजवर कधीही रेल्वेने प्रवास न केलेल्या आणि मुंबईही न पाहिलेल्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील ओंदे येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील १५० आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी प्रथमच मुंबई अनुभवली. ग्रामीण व आदिवासी समुदाय जनसंपर्क कार्यक्रम अंतर्गत काश फाऊंडेशनच्यावतीन मुंबई शैक्षणिक व एक्स्पोजर टूर आयोजित केली. सनदी अधिकारी निधी चौधरी, निवृत्त सनदी अधिकारी विवेक अत्रेय,आयपीएस अधिकारी डॉ. प्रविण मुंडे, सीमाशुल्क विभागाचे अधिकारी समीर वानखेडे आदींनी या आदिवासी मुलांना संबोधित करत मार्गदर्शन केले.काश फाउंडेशन, मुंबई यांनी झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट , केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय यांच्या सहयोगाने हा दौरा आयोजित केला होता. या विद्यार्थ्यांनी पालघर येथून फ्लाइंग राणी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण केल्यानंतर मुंबई सेंट्रल येथे उतरल्यानंतर सर्वांनी प्रथम गिरगाव चौपाटी येथे भेट देऊन समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य अनुभवले. यानंतर विद्यार्थ्यांनी “समावेशक या विषयावरील २०वी राष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग नोंदवला. त्यानुसार नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट यांच्या २१व्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात सहभाग घेतला. यात थायलंडचे कॉन्सुल जनरल, इजिप्तच्या कॉन्सुल जनरल, अर्जेंटिनाच्या डेप्युटी कॉन्सुल जनरल, तसेच भारतातील अधिकारी तज्ज्ञांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केले.https://prahaar.in/2025/12/15/the-municipal-corporation-will-maintain-accurate-records-of-the-stray-dog-population/नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए), मुंबई यांच्या संचालिका निधी चौधरी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठी मार्गदर्शनपर आणि प्रेरणादायी संदेश दिला. भारताच्या समृद्ध आधुनिक कलाविश्वाचा अनुभव घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी एनजीएमए ला अवश्य भेट द्यावी, असेही आवाहन केले. आजची तरुण पिढी संधींनी भरलेल्या अशा महत्त्वाच्या टप्प्यावर उभी आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना जिज्ञासा जपा, शिकत रहा आणि नवनवीन गोष्टी आत्मसात करा, असे आवाहन माजी सनदी अधिकारी विवेक अत्रेय यांनी केले. काश फाऊंडेशनचे प्राध्यापक डॉ. अवकाश जाधव यांनी “सरदार वल्लभभाई पटेल यांची विलक्षण परंपरा” या विषयावर मुख्य व्याख्यान दिले.
चेंबूरमधील हंडोरेंच्या बालेकिल्ल्याला आरक्षणाचा फटका, हंडोरे कुटुंबाशिवाय असणार काँगेसचा उमेदवार?
शिवसेनेला विधानसभेत खाते खोलण्याची संधीमुंबई (सचिन धानजी):मागील पाच ते सहा निवडणुकांमध्ये चेंबूरमधील एकाच प्रभागातून सातत्याने चंद्रकांत हंडोरे आणि त्यांची पत्नी निवडून येत आहे. परंतु यंदा प्रथमच हंडोरे यांना आपल्या घरात नगरसेवक टिकवून ठेवण्यासाठी हा प्रभाग शिल्लक राहिलाच नाही. हंडोरे कुटुंबाकडे मागील अनेक वर्षांपासून असणारा प्रभाग क्रमांक १५० हा ओबीसी महिला आरक्षित झाल्याने हंडोरे कुटुंबाला अन्य प्रभागाचा शोध घेण्याची वेळ आली आहे, तसेच आपला गड राखण्यासाठी कुटुंबातील अन्य सदस्यांचा किंवा मर्जीतील पदाधिकाऱ्यांला निवडणूक रिंगणात उतरवण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे या चेंबूर विधानसभेतून मनसेच्या वाट्याला एखादी जागा लागू शकते, तर शिवसेनेचा आमदार असले तरी त्यांच्याकडे पाच पैंकी दोन जागा जाण्याची शक्यता आहे.चेंबूर विधानसभेत मागील दोन विधानसभांमध्ये शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर हे निवडून येत असले तरी दोन शिवसेना स्वतंत्र झाल्यानंतर या प्रभागातून उबाठाचे तुकाराम काते हे निवडून आले आहेत. त्यामुळे चेंबूरमध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आला असला तरी भाजपाच्यावतीने तीन जागा लढवल्या जाण्याची शक्यता आहे. चेंबूर विधानसभेत काँग्रेसचा एक, भाजपा दोन आणि उबाठाचे दोन अशाप्रकारे पाच नगरसेवक निवडून आलेले आहेत. परंतु प्रभाग क्रमांक १५०ची जागा भाजपा आपल्याकडे घेवून रिपाइंला देण्याची शक्यता आहे. शिवसेनेसाठी प्रभाग क्रमांक १५३ आणि प्रभाग क्रमांक १५५ हे दोनच प्रभागांचे पर्याय असून एकही नगरसेवक या विधानसभेत नसल्याने या प्रभागात विजय मिळवून शिवसेनेला आपले खाते उघडण्याची संधी प्राप्त झाली आहे.लोकसभेत चेंबूर विधानसभेतून झालेले मतदानअनिल देसाई उबाठा : ६१,३५५राहुल शेवाळे, शिवसेना : ५८,४७७चेंबूर विधानसभेतील मतदानतुकाराम काते, शिवसेना : ६३,१९४प्रकाश फातर्पेकर, उबाठा : ५२,४८३आनंद जाधव, वंचित : ८,८५४माऊली थोरवे, मनसे : ७,८२०दिपकभाऊ निकाळजे, रिपाइं: ७,४४०प्रभाग क्रमांक १५० (ओबीसी महिला)हा प्रभाग यापूर्वी खुला झाल्याने या मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर माजी महापौर आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या पत्नी संगीता हंडोरे या निवडून आल्या होत्या. परंतु, यंदा या प्रभागात ओबीसी महिला आरक्षण पडल्याने याठिकाणी प्रथमच काँग्रेसच्यावतीने हंडोरे यांच्या घरातील कोणीही उमेदवान नसेल असे बोलले जात आहे. चेंबूरमधील काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे हा चेहरा असल्यामुळे आरक्षणाच फटका त्यांना बसला आहे. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने हंडोरे यांच्या पत्नी संगीता या आता प्रभाग क्रमांक १५५मध्ये जिथे एससी महिला आरक्षित झाला आहे, तिथे जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हंडोरे आपल्या पत्नीला प्रभाग १५५मधून उमेदवारीसाठी इच्छुक असले तरी आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजे प्रभाग १५०मध्ये कोणाला उतरवतात हा प्रश्न जनतेला पडला आहे. या प्रभागात हंडोरे यांची ताकद पाहता यंदा मात्र आरक्षणामुळे त्यांच्या कुटुंबातील अगदी जवळची व्यक्ती कुणी निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, या प्रभागात काँग्रेसचे प्राबल्य असून हा प्रभाग शिवसेनेला सोडला जावू शकतो. परंतु याठिकाणी शिवसेना किंवा भाजपा तसेच उबाठाकडेही तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे भाजपाकडे ही जागा जाईल आणि ही जागा रिपाइं आठवले गटासाठी सोडली जावू शकते असेही बोलले जात आहे.प्रभाग क्रमांक १५२ (अनुसूचित जाती )हा प्रभाग पुन्हा एक अनुसचित जातीकरता आरक्षित झाला आहे. त्यामुळे या प्रभागातून निवडून आलेल्या भाजपाच्या आशा मराठे यांचा वॉर्ड शाबूत राहिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपाच्यावतीने आशा मराठे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळे या प्रभागातून उबाठाकडून पुन्हा उमेदवाराचा शोध सुरु झाला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक १५५मधील माजी नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांना या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी विनंती केली जात आहे. त्यामुळे या प्रभागात उबाठाच्यावतीने श्रीकांत शेट्ये यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. मात्र, त्यांनी ही उमेदवारी नाकारल्यास पुन्हा एकदा डॉ सोनाली साळवे यांना निवडणूक रिंगणात उतरवावे लागणार आहे. त्यामुळे उबाठा विरुध्द भाजपा अशीच लढत याठिकाणी होणार आहे. सुमारे १४०० मतांनी आशा मराठे यांचा सन २०१७मध्ये निवडून आल्या होत्या. पण आता हा मतदार संघ भाजपाने एवढा बांधला की उबाठाला आता मागील वेळेपेक्षा अधिक मतदानही घेता येणार नाही अशी स्थिती आहे.प्रभाग क्रमांक १५२ (ओबीसी महिला)हा प्रभाग पूर्वी ओबीसी होता, परंतु आबीसी महिला राखीव झाल्याने या प्रभागातून निवडून आलेल्या उबाठाचे नगरसेवक अनिल पाटणकर यांना घरी बसण्याची वेळ आली आहे. हा प्रभाग ओबीसी महिला राखीव झाल्याने अनिल पाटणकर यांनी उबाठाच्यावतीने आपली पत्नी मिनाक्षी पाटणकर यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचार केला आहे. तर हा प्रभाग शिवसेनेच्या वाट्याला जाणार असून चेंबूरचे आमदार तुकाराम काते हे आपल्या मोठ्या सुनेला या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. काते यांचे ज्येष्ठ पुत्र तुषार यांची पत्नी तन्वी काते ही या प्रभागातून इच्छुक आहेत. त्यामुळे या प्रभागात काते विरुध्द पाटणकर अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, काँग्रेसकडून कुणाही ठोस उमेदवाराचे नाव पुढे आलेले नाही. अनिल पाटणकर हे पूर्वी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते, पण त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि शिवसेनेकडून पोटनिवडणूक लढवून ते विजयी झाले होते.त्यानंतर शिवसेनेकडून ते विजयी झाले होते. पण शिवसेना फुटल्यानंतर ते उबाठा शिवसेनेतच राहिले. अनिल पाटणकर हे तब्बल ७८६७ मतांनी विजयी झाले होते.त्यामुळे या प्रभागात पाटणकर यांनी मजबूत पाय रोवलेले असल्याने शिवसेनेला हा उबाठाचा गड फोडण्यासाठी मोठी शर्थीची लढाई द्यावी लागणार आहे.प्रभाग क्रमांक १५४(सर्वसाधारण)हा प्रभाग पुन्हा एकदा खुलाच राहिल्याने भाजपचे विद्यमान नगरसेवक महादेव शिवगण यांच्यासमोरे उमेदवारीचे मोठे आहे. प्रभाग पुन्हा खुला झाल्याने महादेव शिवगण हे प्रबळ दावेदार असले तरी या प्रभागातून टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे राहुल वाळुंज, भूपेन लालवानी यांचीही इच्छुक म्हणून नावे पुढे सारली जात आहेत. त्यामुळे भाजपा कुणाला उमेदवारी देणार हे स्पष्ट नाही. तर उबाठातही उमेदवारीबाबत स्पर्धा आहे. मागील निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर गेलेले उबाठाचे शेखर चव्हाण हे पुन्हा इच्छुक आहेत. तर त्यांच्यासोबत निलेश गवळीही इच्छुक आहे. तर काँग्रेसकडूनही उमेदवाराचे नाव निश्चित किंवा चर्चेतून ऐकायला मिळत नाही. तर काँग्रेसच्यावतीने राजेंद्र माहुलकर यांचेही नाव चर्चेत आहे.शिवगण यांनी सन २०१७मध्ये तब्बल २४१० मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे राजेंद्र माहुलकर निवडणूक लढवल्यास याठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.प्रभाग क्रमांक १५५( अनुसूचित जाती महिला)हा प्रभाग यापूर्वी अनुसूचित जाती करता राखीव होता, परंतु यावेळी तो अनुसूचित जाती महिला याकरता राखीव झाला आहे. त्यामुळे या प्रभागातून विजयी झालेले उबाठाचे श्रीकांत शेट्ये यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे. या प्रभाग अनुसूचित जाती महिलाकरता राखीव झाल्याने श्रीकांत शेट्ये हे पत्नी वर्षा शेट्ये यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या विचारात आहेत. मात्र हा प्रभाग एस सी महिलाकरता राखीव झाल्याने हंडोरे यांच्या पत्नी संगीता हंडोरे याठिकाणाहून इच्छुक असल्याचे ऐकायला मिळत आहे. या प्रभागातून श्रीकांत शेट्ये २८१४ मतांनी विजयी झाले होते आणि दुसऱ्या क्रमांकावर कांग्रेसचे नगराळे होते. त्यांनी ५१९९ मते मिळवली होती. काँग्रेससाठी हा मतदार संघ पुरक असल्याने संगीता हंडोरे यांच्या नावाची या प्रभागातून चर्चा ऐकायला मिळत आहे. मात्र, शिवसेना आणि भाजपाकडून या प्रभागातील इच्छुक नाव पुढे आलेले नसून नक्की या प्रभागावर कोण दावा करतो याचीच उत्सुकता जनतेला आहे.
नवी मुंबईकरांना दिलासा; रेल्वेकडून अधिक गाड्या आणि नवीन स्थानकाचे आश्वासन पूर्ण
नवी मुंबई: बेलापूर/नेरूळ–उरण मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बेलापूर/नेरूळ–उरण मार्गावर पाच अतिरिक्त रेल्वे फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी याबाबत रेल्वे प्रशासनाने आश्वासन दिले होते. अतिरिक्त रेल्वे सेवेमुळे बेलापूर/नेरूळ–उरण मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या प्रवासापासून दिलासा मिळणार आहे. या नवीन गाड्या आणि विस्तारित वेळेमुळे प्रवाशांचा प्रवास आता जलद आणि अधिक सोयीचा होणार आहे.A promise fulfilled.From tomorrow 5 additional pairs of trains will ply between Belapur/Nerul–Uran section also 2 new stations Targhar and Gavan on Uran lines will be operationalised.• Targhar – Located near the upcoming Navi Mumbai International Airport will add significant…— Central Railway (@Central_Railway) December 14, 2025रेल्वेच्या या अतिरिक्त सेवेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिरिक्त गाड्यांसोबतच, या मार्गावर दोन नवी रेल्वे स्थानकं सुरू करण्यात येणार आहेत. ज्यात तारघर आणि गव्हाण या दोन स्थानकांचा समावेश आहे. यापैकी तारघर हे महत्त्वाचे स्थानक समजले जाते. कारण तारघर स्थानक थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ आहे. त्यामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे.https://prahaar.in/2025/12/15/the-reservation-policy-has-impacted-handores-stronghold-in-chembur-will-the-congress-candidate-be-someone-other-than-a-member-of-the-handore-family/रेल्वेच्या या अतिरिक्त सेवेमुळे बेलापूर/नेरूळ–उरण मार्गावर आता एकूण ५० गाड्या धावणार आहेत. ज्यासाठी १०० कोटी खर्च करण्यात आला आहे. नव्या लोकल गाड्यांमुळे लोकलचे वेळापत्रक बदलले जाणार आहे. त्यानुसार आता उरण मार्गावर प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत सेवा मिळणार आहे. उरणहून पहिली ट्रेन सकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी तर शेवटची रेल्वे रात्री १० वाजून ५ मिनिटांनी सुटणार आहे. तर बेलापूरहून शेवटची रेल्वे रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटणार आहे.
भटक्या कुत्र्यांच्या संख्येची अचूक माहिती महापालिका ठेवणार
संख्येचे व्यवस्थापन करणारी प्रणाली महापालिकेकडून विकसितमुंबई (सचिन धानजी):मुंबईतील भटक्या श्वानांच्या संख्येचे व्यवस्थापन करण्यादृष्टीकोनातून महापालिकेच्यावतीने एआय तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने भटक्या कुत्र्यांबाबतचा तपशील मिळू शकणार आहे. या प्रणालीचा वापर महापालिकेचे शेल्टरस, एनजीओ, पशु काळजीवाहक, पशु वैद्य इत्यादींना एकत्र जोडण्यासाठी व भटक्या कुत्र्यांची माहिती गोळा करण्यासाठी महत्वाची ठरणार आहे.मुंबईमध्ये सध्या भटक्या कुत्र्यांचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत असून गोरेगाव पश्चिम येथे एका भटक्या कुत्र्यांने आठ ते दहा जणांवर बिबट्या स्टाईलने हल्ला करत त्यांच्या तोंडाचे लगदे काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या हल्लेखोर भटक्या कुत्र्यांचा शोध घेण्यासाठी दोन दिवस पी दक्षिण विभागासह पशु वैद्यकीय विभागाचे पथक तळ ठोकून होते. भटक्या कुत्र्यांचीही नसबंदी करूनही त्यांची संख्या आणि त्यांचा उपदव्याप वाढत असला तरी प्राणीप्रेमी संस्थेपुढे कारवाई करण्यास महापालिका प्रशासन हतबल ठरत आहे. याच दृष्टीकोनातून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्यानंतरही ही संख्या वाढत असल्याने या वाढत्या संख्येचे व्यवस्थापन करण्याच्यादृष्टीकोनातून महापालिकेने एक ए आय तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म प्रणाली विकसित केली आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने या प्रणालीद्वारे १० हजार भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ११ महिन्यांच्या कालावधीसाठी या प्रणालीचा वापर करण्यात येणार असून पुढील तीन वर्षांची देखभाल करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर पावणे दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. ही प्रणाली स्टार्टअप मार्फत तयार केलेली आहे. यासाठी इंडिकेअर एआय सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्माईल कौन्सिल बिझनेस इन्क्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून तयार होणारी विविध उत्पादने, सेवा व सुविधा यांना प्रोत्साहन देण्यासाठी निविदा न मागवता प्रायोगिक तत्वावर खरेदी व वापरात आणण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. स्माईल कौन्सिलच्या या तुकडीमध्ये इंडिकेअर एआय सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या इक्युवेटीचा सामावेश करण्यात आला आहे. या नवउदमीं इंडीकेअर एआय सोल्यूशन्य प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने भटक्या श्वानांच्या संख्येचे व्यवस्थापन करण्यास मदत करण्यासाठी एआय तंत्रज्ञान प्रणाली विकसित केलेली आहे.
Sydney shooting। ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये बोंडी बीचवर झालेल्या सामूहिक गोळीबारात एका नागरिकाच्या धाडसाने अनेकांचे जीव वाचवले आहे. अहमद अल अहमद असे त्याचे नाव आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अहमद एका निःशस्त्र बंदूकधारी व्यक्तीवर मागून हल्ला करत, त्याची रायफल हिसकावून घेत त्याला जमिनीवर ढकलत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या धाडसी कृत्याबद्दल त्याचे देशभर कौतुक केले जात […] The post दोन गोळ्या लागल्यावरही त्याने दहशतवाद्याकडून बंदूक हिसकावली ; कोण आहे सिडनीचा हा धाडसी अहमद अल अहमद? वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .
शिउबाठाला मोठा धक्का! ऐन निवडणूकीच्या तोंडावर तेजस्वी घोसाळकर यांचा राम राम
मुंबई: आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. दरम्यान उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण, ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असून आज त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून तेजस्वी घोसाळकर या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राजीनामाही दिला होता. त्यानंतर मातोश्रीवर बोलावून त्यांची समजूत काढण्यात आली होती. अखेर तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला राम राम ठोकला आहे. उबाठानंतर त्यांनी आता सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.कोण आहे तेजस्वी घोसाळकर?तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवकर अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या.दरम्यान, आज सकाळी १० वाजता वसंत स्मृती येथे हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष, आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठासाठी हा मोठा धक्का आहे.
प्रभात वृत्तसेवा पुणे – सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचे प्रेमात रूपांतर होऊन पुण्यातील दोन अल्पवयीन मुली कोणालाही न सांगता थेट राजस्थानात पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काळेपडळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत तब्बल ३३०० किलोमीटरचा पाठलाग करून दोन्ही मुलींना सुखरूप पुण्यात परत आणले. याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करून त्यांच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या […] The post इन्स्टाग्रामवरील प्रेम पडलं महागात! पुण्यातून थेट राजस्थान गाठलं, पण पुढे जे झालं ते वाचून धक्का बसेल appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – मुळशी परिसरात कुंपणाच्या तारेत अडकलेल्या बिबट्याची रविवारी सकाळी सुखरूप सुटका करून त्याला पुण्यातील रेस्क्यू वन्यजीव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात आले. सध्या बिबट्याची सखोल वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक उपचार करण्यात येणार आहेत.रविवारी सकाळी सुमारे ११ वाजता कुंपणात बिबट्या अडकल्याची माहिती माहिती वन विभागाला मिळाली. त्यानंतर वन विभागाने रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या पथकाला तात्काळ […] The post Leopard Rescue: अंगावर काटा आणणारा प्रसंग! कुंपणात अडकलेल्या बिबट्याची सुटका कशी झाली? पाहा संपूर्ण घटनाक्रम appeared first on Dainik Prabhat .
'बस्तरमध्ये नक्षलवादी आता उखडले आहेत. नक्षलविरोधी अभियानाच्या यशाची गाथा लिहिण्याच्या अगदी जवळ फोर्स आहे. मात्र, १५ वर्षांपूर्वी आमच्यासाठी सर्वात मोठा प्रश्न हा होता की जवान बस्तरच्या घनदाट जंगलात कसे प्रवेश करतील? नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात पोलीस ठाणी कशी बांधली जातील? असे रस्ते कसे बनतील ज्यामुळे जवान कमी वेळेत लांबचा पल्ला गाठू शकतील?' 'किल्लेवजा पोलीस ठाणी आणि रस्त्यांसाठी सरकारने निधी तर जारी केला होता, पण प्रश्न हा होता की ते कोण बांधणार? एकावर एक निविदा काढण्यात आल्या, पण छत्तीसगडमधील एकही कंत्राटदार पोलीस ठाणी बांधण्यासाठी किंवा रस्ते बांधण्यासाठी पुढे आला नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि अगदी सीमा रस्ते संघटनेने (BRO) देखील हात वर केले होते.' २०१२च्या डिसेंबरमध्ये पोलीस कॉर्पोरेशन हाऊसचे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणारे डी.एम. अवस्थी सांगतात की, पोलीस ठाणी आणि रस्ते बांधण्याचे काम खूप कठीण झाले होते. ते न करण्याचा पर्यायही नव्हता. १७ वेळा निविदा काढल्यानंतरही जेव्हा कोणताही अर्ज आला नाही, तेव्हा आम्ही ही निविदा राज्याबाहेरील लोकांसाठीही खुली केली. सर्वात आधी हे आव्हान उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे रहिवासी भाजप नेते राजीव मिश्रा यांनी स्वीकारले. ते जिल्हा भाजप अध्यक्ष होते आणि आमदारकीची निवडणूकही लढले होते. त्यांनी बस्तरमधील सर्वात कठीण पोलीस ठाणी बांधण्याचे पहिले कंत्राट घेतले. नक्षलवाद्यांचा गड असलेल्या विजापूर आणि सुकमामध्ये हे काम किती आव्हानात्मक होते, हे दैनिक भास्करच्या टीमने ही पोलीस ठाणी बांधण्याची जबाबदारी घेणाऱ्या कंत्राटदारांशी बोलून समजून घेतले. पोलीस ठाणे बांधण्यासाठी 17 वेळा निविदा काढल्या, पण कोणीही पुढे आले नाहीकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी 31 मार्च 2026 ची अंतिम मुदत निश्चित केली आहे. नक्षलविरोधी मोहीम याच्या जवळ पोहोचली आहे. हे सर्व कसे शक्य झाले, हे समजून घेण्यासाठी आम्ही छत्तीसगडचे माजी डीजीपी आणि पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष राहिलेल्या डीएम अवस्थी यांच्याशी बोललो. जे बस्तरमध्ये रस्ते बांधणीची संपूर्ण कहाणी सांगतात. ते म्हणतात, '2010 मध्ये ताडमेटलाची घटना घडली. यात नक्षलवाद्यांनी 78 जवानांना घेरून ठार केले होते. राणीबोदलीमध्ये गाढ झोपेत असलेल्या जवानांना मारण्याची घटना घडली. त्या दिवसांत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जवानांचा मृत्यू होणे ही रोजचीच बाब झाली होती.' 'आमचे एसपी विनोद चौबे यांना ठार मारण्यात आले. या अशा घटना होत्या, जेव्हा पाणी डोक्यावरून गेले होते. केंद्र सरकारने नक्षलग्रस्त राज्यांसाठी एक निधी जारी केला. यातून तटबंदीयुक्त पोलीस ठाणी आणि रस्ते बांधायचे होते. आदेशही जारी झाला होता.' '2010 मध्ये अर्थसंकल्प मंजूर झाला. या कामात एकच अडचण येत होती की बस्तरमध्ये रस्ते आणि पोलीस ठाणी बांधण्यासाठी कंत्राटदार कुठून आणायचे, कारण छत्तीसगडमधील कोणताही ठेकेदार कंत्राट घेण्यासाठी तयार नव्हता.' छत्तीसगडबाहेरील लोकांसाठी निविदा उघडण्यात आली, तेव्हा कंत्राटदार मिळालेडीएम अवस्थी पुढे म्हणतात, '2012 डिसेंबरमध्ये मला पोलीस गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष बनवण्यात आले. रस्ते आणि पोलीस ठाण्यांची कामे करण्याची जबाबदारी मिळाली. मी विभागाला सांगितले की छत्तीसगडमधील कोणताही कंत्राटदार पुढे येणार नाही. आम्हाला इतर राज्यांतील कंत्राटदारांसाठी निविदा उघडाव्या लागतील. मंजुरी मिळाली. आम्ही यूपी, बिहार, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या वर्तमानपत्रांमध्ये निविदेची जाहिरात केली.' 'मी वैयक्तिक पातळीवरही काही कंत्राटदारांशी संपर्क साधला. त्यात एक श्रीवास्तवजी होते, ते रेल्वेचे कंत्राट घेत असत. आता त्यांचे पूर्ण नाव आठवत नाही, पण त्यांनीच मला गोरखपूरमधील एक कंत्राटदार राजीव मिश्राजी यांचे नाव दिले. राजीव भाजपचे जिल्हास्तरीय नेते होते. त्यांनी आमदारकीची निवडणूकही लढवली होती. मी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना निविदेसाठी (टेंडरसाठी) तयार केले.' आम्ही विचारले की ते सहज तयार झाले का? यावर डीएम अवस्थी म्हणतात, सहजासहजी तयार झाले नाहीत कारण भीती तर सगळ्यांनाच होती. ही 2013 सालची गोष्ट होती. राजीव खूप बोलणी केल्यानंतर तयार झाले. त्यांना सुरुवातीला 5 पोलीस ठाण्यांचे कंत्राट देण्यात आले. पोलीस ठाण्यांनंतर काही किलोमीटर रस्त्याचेही कंत्राट देण्यात आले. ‘ही आमच्यासाठी आशेची पहिली किरण होती. राजीव मिश्रा यांनी आपले काम वेळेवर पूर्ण केले. 2015 मध्ये आम्हाला रस्ते बनवताना पुन्हा अडचणी आल्या. तेव्हा आम्हाला प्रमोद राठोड नावाचे एक कंत्राटदार भेटले. योगायोगाने तेही यूपीचेच होते. रायबरेलीमध्ये त्यांचे वडिलोपार्जित घर होते. तरीही ते छत्तीसगडमध्ये बऱ्याच काळापासून बांधकाम करत होते. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला तेही कचरले, पण नंतर तयार झाले.’ एकूण किती पोलीस ठाणी बांधायची होती? उत्तर मिळाले, ‘75 पोलीस ठाणी बांधायची होती. यापैकी 50-55 पोलीस ठाणी बस्तरमध्ये बांधायची होती. याच पोलीस ठाण्यांच्या आणि येथील रस्त्यांच्या बांधकामात अडचणी होत्या.’ कंत्राटदार म्हणाले- सर्वात मोठा धोका बिजापूरमधील बेदरे पोलीस ठाणे होतेबस्तरमध्ये पोलीस ठाणी आणि रस्ते बांधणारे कंत्राटदार, गोरखपूरचे राजीव मिश्रा म्हणतात, 'डीएम अवस्थी यांच्याशी माझी भेट झाली आणि चर्चा झाली. त्यांनी आम्हाला हे धोकादायक काम करण्यास सांगितले. सुरुवातीला 3 पोलीस ठाणी बांधायला दिली, जी बस्तरमध्ये होती. तथापि, ती इतकी धोकादायक नव्हती. त्यानंतर दोन पोलीस ठाण्यांचे बांधकाम व्हायचे होते.' 'बेदरेचे नाव आजही आठवते. हे बिजापूरमध्ये बांधायचे होते आणि दुसरे सुकमामध्ये. अवस्थीजी (पोलीस कॉर्पोरेशनचे अध्यक्ष) म्हणाले- आम्ही तुम्हाला पथक देऊ. मी म्हणालो की, तुम्ही आम्हाला मारू इच्छिता का? मी माझ्या पद्धतीने काम करून घेईन. जवानांसोबत गेलो तर मृत्यू निश्चित आहे.' ते पुढे म्हणतात, 'मी छत्तीसगडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये यापूर्वीही काम केले होते. मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि विचारले की सुकमा आणि बिजापूरमध्ये त्यांचे कोणी नातेवाईक राहतात का. काही लोक भेटले आणि त्यांच्याकडून काम करून घेतले, जेणेकरून मी त्यांच्यात मिसळून जाऊ शकेन.' कधी कोणती धमकी किंवा धोका जाणवला का? यावर राजीव म्हणतात, 'यासाठी मोठी रणनीती आखावी लागली. मी कधीही बांधकाम स्थळावर राहत नव्हतो. ना कधी थेट घटनास्थळी पोहोचत होतो. गाड्या बदलून-बदलून जात होतो. मग मला आणखी एक काम सोपवण्यात आले. ते आणखी कठीण होते. आता बेदरेमध्ये पोलीस ठाण्यासमोर 5 किलोमीटर रस्ता बनवण्याची जबाबदारी मिळाली. नक्षलवादी रस्त्यांच्या पूर्णपणे विरोधात होते. थोडा वेळ लागला, पण ते कामही पूर्ण केले.' तुम्हाला कधी नक्षलवाद्यांची भीती वाटली नाही का, जर त्यांनी हल्ला केला असता तर? राजीव उत्तरात म्हणतात, 'त्यावेळी हल्ले तर सामान्य गोष्ट होती, पण गोरखपूरचा माणूस घाबरतो का?' तुम्ही तेव्हा भाजपमध्ये कोणत्या पदावर होता? उत्तर मिळाले- 'मी त्यावेळी भाजपचा जिल्हाध्यक्ष होतो. त्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) मंडल अध्यक्ष होतो. आता तब्येत ठीक नसल्यामुळे सक्रिय राजकारणात नाही.' बस्तरमध्ये रस्ते बांधणारे कंत्राटदार म्हणाले...पिस्तूल नेहमी जवळ ठेवत असे, जर नक्षलवाद्यांनी पकडले तर स्वतःला मारून घेईनयानंतर आम्ही रायबरेलीच्या प्रमोद राठोड यांच्याशी बोललो. त्यांनी बस्तरमध्ये रस्त्यांचे जाळे विणले. त्यांनी नक्षलवाद्यांच्या गडावर रस्ते बांधण्याबद्दलच्या धोकादायक पण रंजक गोष्टी सांगितल्या. ते सांगतात, 'बस्तरमध्ये एक रस्ता आहे ज्याला 'इंजरम भेजी' रस्ता म्हणतात. हा सुकमामध्ये आहे. बुर्कापाल हल्ला असो, ताडमेटला किंवा रानीबोदली हल्ला. हे सर्व याच रस्त्याच्या आसपास झाले होते.' '2015-16 मध्ये इथे 20 किलोमीटर लांब रस्त्यापैकी 13 किलोमीटरचे कंत्राट आम्हाला मिळाले. आम्हाला हा रस्ता बनवायला 2 वर्षे लागली. 2018 मध्ये जाऊन काम पूर्ण होऊ शकले.' आम्ही विचारले, 13 किलोमीटरचा रस्ता बनवायला 2 वर्षांचा वेळ? राठोड म्हणतात, 'किती दिवसांत रस्ता बनेल, हा प्रश्न नव्हता. प्रश्न हा होता की हा रस्ता बनवण्यासाठी कोणी कंत्राट घेईल का?' 'त्यानंतर याच रस्त्याला पुढे 6 किलोमीटरपर्यंत वाढवण्यासाठी आणखी एक कंत्राट मिळाले. आम्ही तेही पूर्ण केले. हा परिसर कुख्यात नक्षलवादी रमन्नाचा होता. फक्त 20 किलोमीटर दूर त्याची सासरवाडी होती.' मग कंत्राट घेताना भीती वाटली नाही का? उत्तर मिळालं, 'भीती का वाटणार नाही, पण मग वाटलं की कोणीतरी हे काम करणारच आहे तर मग मी का नाही?' ते हसत म्हणाले, 'तेव्हा मी नेहमी माझ्यासोबत एक पिस्तूल ठेवत असे की जर नक्षलवाद्यांनी हल्ला केला तर आधी सामना करेन. जर वाटलं की त्यांच्या हाती सापडेन तर स्वतःला गोळी मारेन. मला नक्षलवाद्यांच्या हातून मरण पत्करणं मान्य नव्हतं.' तुम्ही नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर तर आलाच असाल? 'हो, नक्षलवाद्यांनी जेव्हा भिंतींवर माझ्या नावाचे पोस्टर लावले होते आणि धमकी दिली होती. तेव्हा मी कोणतंही कायमस्वरूपी ठिकाण बनवू शकत नव्हतो. बनवलं असतं तर हल्ला निश्चित होता. मी अनेक ठिकाणं बदलली.' घरातून एका गाडीत बसायचो, मग वाटेत दुसरी गाडी, मग तिसरी गाडी बदलून साइटवर पोहोचायचो, जेणेकरून जर कोणी बातमीदार लागला असेल तर नक्षलवाद्यांपर्यंत खरी बातमी पोहोचू नये. कोंटाकडे जायचे असेल तर आधी जगदलपूरला जायचो, मग परत येऊन कोंटाला परत यायचो. लालगढला शहराशी जोडणारा धोकादायक महामार्ग बनवलाराठोड पुढे सांगतात, '2018-19 मध्ये 'दोरनापाल जगरगुंडा' येथे सुमारे 76 किलोमीटर लांबीचा रस्ता बनवण्याचे कंत्राट घेतले. हा दुसरा सर्वात धोकादायक रस्ता होता. तुम्ही बघू शकता की, जेवढे मोठे हल्ले झाले, ते सर्व याच्या आसपासच झाले होते. 2015 पासून 2018 पर्यंत इंजरम भेजी रोडच्या आसपास 40 पेक्षा जास्त हल्ले झाले. ही गोष्ट अधिकृत आकडेवारी देखील सांगते.' 'हा रस्ता बनवताना 2018 मध्ये माझी 13 वाहने (ट्रॅक्टर, हायवा आणि रस्ता बनवण्यासाठी वापरली जाणारी इतर वाहने) नक्षलवादी हल्ल्यांमध्ये जाळण्यात आली. 15-20 IED आणि प्रेशर कुकर बॉम्ब तर रोज रस्ता बनवताना पुलाखाली आणि वळणांवर मिळत होते. त्यामुळे बांधकामालाही उशीर झाला.' 'जो रस्ता बनणार होता, तिथे आधी सुरक्षा दलाचे डॉग येऊन 2-3 तास जागेची तपासणी करत. मग तिथे सापडलेले प्रेशर बॉम्ब किंवा IED निकामी करत किंवा त्यांना दूर नेऊन नष्ट करत. आमच्या ट्रॅक्टरखाली अनेकदा बॉम्ब आणि IED येऊन फुटत होते. अनेकदा आमचे सहकारी जखमीही झाले. हा रस्ता अजूनही पूर्ण झालेला नाही. 10-12 किलोमीटरचे काम बाकी आहे.' राठोड म्हणतात, 'जगदलपूर ते कोंटापर्यंत महामार्ग होता. 3 कंत्राटदारांना आळीपाळीने कंत्राट देण्यात आले, पण कोणीही ते पूर्ण करू शकले नाही. मग हे कंत्राट मला देण्यात आले. मी आणि माझ्या दोन साथीदार कंत्राटदारांनी मिळून ते जवळजवळ पूर्ण केले आहे.' तुम्ही हे सर्व कसे व्यवस्थापित केले? 'आम्ही एक रणनीती बनवली होती. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही साइटवर जास्त वेळ थांबत नव्हतो. जेव्हाही आम्ही तिथून निघायचो, तेव्हा मार्ग बदलून निघायचो. ज्या गाडीत बसून तिथून निघायचो, ती गाडी थोड्याच वेळात सोडून द्यायचो, मग दुसरी आणि मग थोड्या अंतरावर तिसरी गाडी बदलायचो. प्रत्येक वेळी आमच्यासोबत जवान असायचे.'
कॅन्सर रुग्णांसाठी संजीवनी! महापालिकेच्या पेट स्कॅन सेंटरचे आज लोकार्पण..वाचा सविस्तर
प्रभात वृत्तसेवा पुणे – कर्करोगाचे निदान करणाऱ्या आणि महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या पेट स्कॅन सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (दि. १५) होणार आहे. माजी खासदार दिवंगत गिरीश बापट यांचे नाव या सेंटरला देण्यात येणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून सुरू होत असलेला देशातील अशा स्वरुपाचा हा पहिलाच प्रकल्प आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज […] The post कॅन्सर रुग्णांसाठी संजीवनी! महापालिकेच्या पेट स्कॅन सेंटरचे आज लोकार्पण..वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .
13 डिसेंबर रोजी कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये इंडिया टूरवर आलेल्या लिओनेल मेस्सीचे 50,000 चाहते हजारो रुपयांची तिकिटे घेऊन त्याची वाट पाहत होते. येथे मीडिया आणि VVIP लोकांनी मेस्सीला घेरले. प्रचंड गर्दीमुळे मेस्सी फक्त 22 मिनिटे थांबून निघून गेला आणि कार्यक्रम रद्द करावा लागला. संतप्त चाहत्यांनी स्टेडियममधील खुर्च्या, कार्यक्रमाचे बॅनर-होर्डिंग्ज तोडले. यानंतर मेस्सी राहुल गांधींना भेटला, तेलंगणाच्या CM रेवंत रेड्डींसोबत फुटबॉल सामना खेळला आणि 15 डिसेंबर रोजी PM मोदींनाही भेटणार आहे. अखेर कोण आहे लिओनेल मेस्सी, ज्याच्यासाठी भारतात इतकी क्रेझ आहे, जग त्याला GOAT का म्हणते, आजच्या एक्सप्लेनरमध्ये आपण संपूर्ण कथा जाणून घेऊया... 4 वर्षांच्या मेस्सीला आजीच्या सांगण्यावरून पहिला सामना खेळायला मिळाला लिओनेल मेस्सीचा जन्म 24 जून 1987 रोजी अर्जेंटिनाच्या रोझारियो शहरात झाला होता. इटालियन वंशाचे हे कुटुंब फारसे श्रीमंत नव्हते. वडील जॉर्ज मेस्सी रोझारियोमधील एका स्टील फॅक्टरीत व्यवस्थापक होते. आई सेलिया कुचिटिनी चुंबक बनवण्याच्या कारखान्यात क्लीनर म्हणून काम करत होती. घरात मेस्सीचे दोन मोठे भाऊ रॉड्रिगो आणि माटियास आणि एक लहान बहीण मारिया सोल होती. जॉर्ज स्थानिक पातळीवर 'क्लब ग्रँडोली' नावाचा एक फुटबॉल क्लबदेखील चालवत होते. 4 वर्षांच्या मेस्सीला त्याच्या वयामुळे आणि खूप लहान उंचीमुळे मैदानावर दुर्लक्षित केले जात होते. एक दिवस 'ग्रँडोली'च्या एका सामन्यापूर्वी संघात एक खेळाडू कमी होता. मेस्सीच्या आजी सेलियाने प्रशिक्षक म्हणजेच मेस्सीच्या वडिलांना मेस्सीला संघात घेण्यास सांगितले. जॉर्ज यांनी संकोच करत मेस्सीला संधी दिली. त्या सामन्यात 4 वर्षांच्या मेस्सीने जो खेळ दाखवला, त्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले. 2000 मध्ये आजीच्या मृत्यूनंतर, मेस्सी आजपर्यंत प्रत्येक गोल केल्यानंतर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपली बोटे आकाशाकडे वर करतो. ग्रोथ हार्मोनचा आजार, नॅपकिनवर साइन झाला पहिला करार मेस्सी जेव्हा 7 वर्षांचा झाला, तेव्हा त्याला रोझारियोच्या स्पोर्ट्स क्लब 'न्यूवेल्स ओल्ड बॉईज'च्या यूथ अकादमीमध्ये प्रवेश मिळाला. येथे मेस्सी ज्या संघाचा भाग बनला, त्याचे नाव त्याच्या जन्माच्या वर्षावरून 'द मशीन ऑफ 87' असे ठेवण्यात आले आहे. रोझारियो फुटबॉल असोसिएशनच्या अहवालानुसार, मेस्सीने या क्लबकडून खेळताना 176 सामन्यांमध्ये 234 गोल केले. मेस्सी जेव्हा 10 वर्षांचा झाला, तेव्हा त्याला ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी (GHD) बद्दल माहिती मिळाली. त्याचे शरीर वाढीसाठी पुरेसे हार्मोन बनवत नव्हते. वयानुसार शरीर वाढत राहावे यासाठी हार्मोन थेरपी सुरू करण्यात आली. दररोज रात्री एक महागडे इंजेक्शन घ्यावे लागत होते. त्याचा मासिक खर्च सुमारे 1000 अर्जेंटिनियन पेसो होता. जॉर्ज आपल्या विमा पॉलिसीतून फक्त 2 वर्षांपर्यंत मेस्सीवर उपचार करू शकले. 'न्यूवेल्स ओल्ड बॉईज'नेही उपचाराचे वचन देऊन माघार घेतली. बाकीच्या क्लब्सनीही मदत करण्यास नकार दिला. त्यावेळी स्पेनचा प्रसिद्ध फुटबॉल क्लब 'FC बार्सिलोना' उदयोन्मुख फुटबॉलपटूंवर लक्ष ठेवत असे आणि त्यांना संधी देत असे. 2000 मध्ये, 13 वर्षांच्या वयात मेस्सी ट्रायलसाठी बार्सिलोनाच्या युवा अकादमी 'ला मासिया'मध्ये पोहोचला. अकादमीचे संचालक कार्ल्स रेक्सेक मेस्सीला खेळताना पाहून समजले की हा मुलगा असाधारण आहे. ट्रायलनंतर, बार्सिलोनाच्या बोर्डला मेस्सीवर निर्णय घेण्यास विलंब होत होता. जॉर्ज मेस्सीच्या उपचारांबद्दल चिंतित होते, अस्वस्थ होऊन त्यांनी सांगितले की ते परत अर्जेंटिनाला जातील. 14 डिसेंबर 2000 रोजी, रेक्साच आणि मेस्सीचे वडील एका टेनिस क्लबच्या रेस्टॉरंटमध्ये भेटले. रेक्साच यांच्याकडे त्यावेळी अधिकृत कागदपत्रे नव्हती, त्यामुळे त्यांनी एका कागदी नॅपकिनवर लिहिले की बार्सिलोना मेस्सीला करारबद्ध करेल आणि त्याच्या उपचाराचा खर्च उचलेल. हा 'नॅपकिन करार' आजही फुटबॉलच्या जगात प्रसिद्ध आहे. या करारामुळे मेस्सी वडिलांसोबत स्पेनला आला आणि बार्सिलोनाच्या 'ला मासिया' अकादमीमध्ये सामील झाला. परदेशी खेळाडू असल्यामुळे सुरुवातीला मेस्सीला फक्त मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये खेळण्याची परवानगी होती. मेस्सी खूप लाजाळू होता आणि स्पॅनिश बोलू शकत नव्हता. तो एकटा खोलीत फुटबॉलशी बोलत असे. क्लबमध्ये एक वर्ष घालवल्यानंतर, फेब्रुवारी 2002 मध्ये त्याला रॉयल स्पॅनिश फुटबॉल फेडरेशन (RFEF) मध्ये प्रवेश मिळाला. आता तो सर्व स्पर्धांमध्ये खेळू शकत होता. 14 वर्षांचा असताना ग्रोथ हार्मोन थेरपी पूर्ण झाल्यानंतर मेस्सी बार्सिलोनाच्या 'बेबी ड्रीम टीम'मध्ये सामील झाला आणि 2002-03 च्या सत्रात 'कॅडेट्स A' साठी 30 सामन्यांमध्ये 36 गोल करून तो टॉप स्कोअरर बनला. यानंतर 2004 मध्ये बार्सिलोना यूथ टीमसाठी त्याने यूथ कपच्या फायनलमध्ये 2 गोल केले. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर दुखापतीमुळे प्रोटेक्टिव्ह मास्क लावलेले होते. याच काळात त्याला इंग्लंडच्या आर्सेनल फुटबॉल क्लबकडून ऑफर मिळाली, परंतु मेस्सीने बार्सिलोनाची साथ सोडली नाही. बार्सिलोनासाठी पहिली प्रोफेशनल मॅच सब्स्टिट्यूट म्हणून खेळला मेस्सीने 17 वर्षांचा असताना बार्सिलोनासाठी आपल्या प्रोफेशनल कारकिर्दीतील पहिली मॅच खेळली. एका खेळाडूच्या दुखापतीमुळे, सब्स्टिट्यूट म्हणून मेस्सीला संधी मिळाली, परंतु तो फक्त 8 मिनिटे मैदानावर राहिला. सीनियर टीमसोबत ट्रेनिंगदरम्यान बार्सिलोनाचा स्टार खेळाडू रोनाल्डिन्हो मेस्सीच्या तंत्राने प्रभावित झाला आणि म्हणाला की त्याला विश्वास आहे की 16 वर्षांचा हा मुलगा त्यांच्यापेक्षाही चांगला खेळाडू बनेल. रोनाल्डिन्हो लवकरच मेस्सीचा मित्र बनला आणि त्याला 'छोटा भाऊ' म्हणू लागला. 2004 मध्ये, त्याच्या पहिल्या वाढदिवशी, मेस्सीने 2010 पर्यंत बार्सिलोनासोबत वरिष्ठ खेळाडू म्हणून 150 दशलक्ष युरोचा करार केला. मे 2005 मध्ये, मेस्सीने त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीतील पहिला गोल केला. 17 वर्षे, तीन महिने आणि 22 दिवसांचा मेस्सी स्पॅनिश क्लब 'अल्बासेटे' विरुद्ध गोल करून बार्सिलोनाकडून कोणत्याही अधिकृत स्पर्धेत गोल करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू बनला. 2006-07 दरम्यानही मेस्सीने बार्सिलोनासाठी 36 सामन्यांमध्ये 17 गोल केले. तो गोल ज्यानंतर मेस्सी 'मॅराडोनाचा वारसदार' बनला 2007 मध्ये मेस्सीने स्पॅनिश लीगमध्ये स्पॅनिश क्लब 'गेटाफे' विरुद्ध एक शानदार गोल केला. मेस्सीने आपल्या संघाकडून अर्ध्या मैदानातून फुटबॉल हवेत उचलला, 60 मीटरपेक्षा जास्त धावला आणि 4 डिफेंडर्सना ड्रिबल करून पार केले. यानंतर गोलकीपरलाही चकमा दिला आणि गोल केला. असाच गोल 1986 च्या विश्वचषकात मेस्सीचे आदर्श आणि अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघाचे कर्णधार 'डिएगो मॅराडोना' यांनी इंग्लंडविरुद्ध केला होता, ज्याला 'गोल ऑफ द सेंच्युरी' म्हटले गेले. यानंतर मेस्सीला 'मॅराडोनाचा उत्तराधिकारी' म्हटले जाऊ लागले. 2008-09 च्या सत्रापासून मेस्सी 10 नंबरची जर्सी घालून खेळतो. या सत्रात त्याने बार्सिलोनासाठी 'कोपा डेल रे', नंतर 'ला लीगा' आणि त्यानंतर चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकले आणि स्पॅनिश फुटबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच तिहेरी विजेतेपद पटकावणारा खेळाडू बनला. 2008 मध्ये पेप गार्डिओला बार्सिलोनाचे नवीन प्रशिक्षक बनले, त्यांनी मेस्सीला सेंटर-फॉरवर्डऐवजी मैदानावर उजव्या बाजूने खेळायला सुरुवात केली, ज्याला 'फॉल्स 9' म्हटले जात होते. या नवीन पोझिशनने मेस्सीला अधिक धोकादायक बनवले आणि क्लबने 2009 मध्ये ऐतिहासिक 'सिक्स-ट्रेबल' म्हणजेच एका कॅलेंडर वर्षात 6 मोठे खिताब जिंकले. याच वर्षी मेस्सीला पहिल्यांदा फुटबॉल जगातील सर्वात मोठा खिताब 'बॅलन डी'ओर' मिळाला. 2012 पर्यंत त्याला चार वेळा हा खिताब मिळाला. फुटबॉलच्या आजपर्यंतच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले होते. फायनलमध्ये पराभवामुळे निवृत्तीचा निर्णय, चाहत्यांच्या विरोधामुळे पुनरागमन 2014च्या फुटबॉल विश्वचषकाच्या फायनलमध्ये अर्जेंटिनाला जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला. याव्यतिरिक्त, 'कोपा अमेरिका' लीगच्या सलग 3 फायनलमध्ये म्हणजेच 2007, 2015 आणि 2016 मध्ये पराभव झाल्यानंतर मेस्सी खचून गेला. 2016 च्या कोपा अमेरिका फायनलमध्ये चिलीविरुद्ध हरल्यानंतर, निराश झालेल्या मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. तो म्हणाला, 'हे माझ्यासाठी नाही. मी चार फायनल खेळलो आहे, हे दुःखद आहे.' यानंतर संपूर्ण अर्जेंटिनात त्याच्या निर्णयाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली, लाखो लोकांनी त्याला संघात परत येण्याचे आवाहन केले. दबावाखाली मेस्सीने आपली निवृत्ती मागे घेतली. तो म्हणाला की तो आपल्या देशावर प्रेम करतो आणि रिकाम्या हाताने परत येऊ इच्छित नाही. अर्जेंटिनाच्या सर्व स्पर्धा जिंकून मेस्सी बनला GOAT GOAT चा अर्थ आहे - ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. 17 ऑगस्ट 2005 रोजी मेस्सीने हंगेरीविरुद्ध अर्जेंटिनाच्या वतीने आपली पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. तेव्हापासून सलग 15 वर्षे त्याने उत्कृष्ट खेळ दाखवला आणि जगातील अव्वल खेळाडूंमध्ये आपले स्थान कायम राखले. मेस्सीने 2012 मध्ये एका सत्रात सर्वाधिक 91 गोल करण्याचा विक्रम केला. त्यानंतर आतापर्यंत 6 'ला लीगा', 5 'कोपा डेल रे' आणि 2 चॅम्पियन्स लीग जिंकल्या. बार्सिलोनासाठी त्याने आतापर्यंत सर्वाधिक 672 गोल केले आहेत. मेस्सीला मॅराडोनाचा उत्तराधिकारी मानले जात होते. मेस्सीच्याच काळातील पोर्तुगालचा खेळाडू रोनाल्डो आणि मेस्सीला जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू सिद्ध करण्याबद्दल चर्चा सुरू होती. मात्र, दोघांमध्ये एक उणीव होती - खरं तर GOAT त्याला म्हणतात, जो आपल्या देशासाठी आणि स्वतःसाठी सर्व किताब जिंकतो. मेस्सीची कारकीर्द सुरू होण्यापूर्वी अर्जेंटिनाने 1978 आणि 1986 मध्ये दिएगो मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 36 वर्षे अर्जेंटिनासाठी किताब जिंकण्याची कमतरता राहिली. नंतर संघाचा कर्णधार मेस्सीने अर्जेंटिनाला 2021 मध्ये कोपा अमेरिका आणि डिसेंबर 2022 मध्ये फिफा विश्वचषक जिंकवून GOAT म्हणवण्याची शेवटची अडचणही दूर केली. मेस्सी अटॅकिंग मिडफिल्डर म्हणून खेळत होता. त्याने संघासाठी केवळ स्वतःच गोल केले नाहीत, तर त्याला गोल असिस्ट करणारे म्हणजेच इतर खेळाडूंना फुटबॉल पास करून गोल घडवून आणणारे जगातील सर्वात सक्षम खेळाडूंपैकी एक मानले जाते. ऑगस्ट 2021 मध्ये आर्थिक समस्यांमुळे मेस्सीने बार्सिलोना सोडून फ्रान्सचा फुटबॉल क्लब पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) जॉईन केला. नोव्हेंबर 2022 मध्ये त्याला विक्रमी आठव्यांदा बॅलन डी'ओर मिळाला. नंतर 2023 मध्ये मेस्सीने PSG सोडून अमेरिकन मेजर लीग सॉकर क्लब 'इंटर मियामी' मध्ये सामील झाला. जेव्हा मेस्सीवर तीन महिन्यांची बंदी घालण्यात आली नेदरलँड्सविरुद्धच्या एका सामन्यादरम्यान मेस्सीने नेदरलँड्सच्या खेळाडू वूट वेघॉर्स्टला मैदानावर म्हटले, 'तू काय बघतोयस बोबो (मूर्ख मुला), तुझी नजर कोणावर आहे? येथून जा.' नंतर मेस्सीने यावर स्पष्टीकरण दिले, परंतु संघाला वाटले की मेस्सीला शांत ठेवण्याची गरज आहे, कारण आगामी विश्वचषकाची तयारी सुरू होती. 2019 मध्ये कोपा अमेरिका कप दरम्यान व्हेनेझुएला विरुद्धच्या सामन्यात मेस्सीने पहिल्यांदा अर्जेंटिनाच्या राष्ट्रगीताचे गायन केले होते. हे संकेत होते की त्याच्यासोबत काहीतरी नवीन घडत आहे. यानंतर उपांत्य फेरीत ब्राझीलने अर्जेंटिनाला हरवले. ब्राझीलचे तत्कालीन राष्ट्रपती जायर बोल्सोनारो हाफ टाइम दरम्यान मैदानात उतरले आणि ब्राझीलचे चाहते 'मितो-मितो' म्हणजेच 'बेस्ट-बेस्ट' ओरडत होते. ब्राझीलपेक्षा चांगली टीम असूनही, अर्जेंटिनाच्या हातून पेनल्टी शूटआउटच्या दोन संधी निसटल्या. अर्जेंटिनाची टीम खूप निराश होती. टीमला वाटत होते की व्हिडिओ पाहणाऱ्या रेफरीने त्यांच्या बाजूने निर्णय द्यायला हवा होता. यादरम्यान मेस्सीने मैदानाजवळ येऊन म्हटले, ‘मला वाटत नाही की फेडरेशन या प्रकारच्या रेफरींबद्दल काही करेल, कारण सर्व काही ब्राझीलच्या नियंत्रणात आहे.’ यानंतर दक्षिण अमेरिकेतील फुटबॉल प्रशासकीय संघटना CONMEBOL ने मेस्सीवर 3 महिन्यांसाठी बंदी घातली. त्यानंतर चिलीविरुद्धच्या सामन्यात मेस्सीला एका विरोधी खेळाडूशी वाद घातल्याच्या आरोपावरून मैदानाबाहेर काढण्यात आले. अर्जेंटिनाच्या संघाकडून खेळताना मेस्सीला रेड कार्ड दाखवण्याची ही दुसरी वेळ होती. मेस्सीने बेस्ट फ्रेंडच्या चुलत बहिणीशी लग्न केले मेस्सी 2008 पासून त्याची बालपणीची मैत्रीण अँटोनेला रोक्कुझोसोबत रिलेशनशिपमध्ये होता. ती त्याचा बेस्ट फ्रेंड लुकास स्काल्गियाची चुलत बहीण होती. 2009 मध्ये दोघांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले. मेस्सी म्हणतो की ते अँटोनेलासोबत मोठे झाले आहेत. अँटोनेला सध्या तिचा चाइल्ड फॅशन ब्रँड 'एनफेंस' चालवते आणि ती एक इन्फ्लुएन्सर देखील आहे. 30 जून 2017 रोजी मेस्सी आणि ॲन्टोनेलाने त्यांच्या मूळ गावी रोझारियो येथे लग्न केले. चाहत्यांसाठी मोठ्या पडद्यावर या समारंभाचे स्क्रीनिंग करण्यात आले. आर्जेन्टिनामध्ये या लग्नाला 'वेडिंग ऑफ द सेंच्युरी' असे म्हटले जाते. मेस्सी आणि ॲन्टोनेलाला लग्नापूर्वीच दोन मुलगे होते - थियागो आणि माटेओ. लग्नानंतर 2018 मध्ये तिसरा मुलगा सिरोचा जन्म झाला. मेस्सीचे संपूर्ण कुटुंब त्याच्या करिअरचे आणि वैयक्तिक आयुष्याचे व्यवस्थापन करते. वडील जॉर्ज 14 वर्षांच्या असल्यापासून त्याचे व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत. भाऊ रॉड्रिगो दैनंदिन वेळापत्रक आणि प्रसिद्धी सांभाळतो, मोठा भाऊ माटियास आणि आई 'लिओ मेस्सी फाउंडेशन' चालवतात. मेस्सी आपल्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे आणि अनेकदा पार्ट्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. त्याला मोकळ्या वेळेत मुलांसोबत व्हिडिओ गेम्स खेळायला आणि चित्रपट पाहायला आवडते. त्याच्याकडे 'फ्रेंच मास्टिफ हल्क' आणि 'गोल्डन रिट्रीव्हर' जातीचे दोन कुत्रे देखील आहेत. प्रायव्हेट जेट, 15 लक्झरी कार आणि कोट्यवधींची घड्याळे मेस्सीची एकूण संपत्ती सुमारे ₹7,055 कोटी आहे. त्याच्याकडे 'गल्फस्ट्रीम V' नावाचे एक लक्झरी प्रायव्हेट जेट आहे, जे त्याने 2018 मध्ये खरेदी केले होते. मेस्सी अनेकदा या जेटने प्रवास करतो. मेस्सीला गाड्यांचाही शौक आहे. त्याच्याकडे 'फेरारीपासून मर्सिडीज'पर्यंत एकूण 15 लक्झरी गाड्या आहेत. मेस्सीकडे फ्लोरिडा, मियामी, बार्सिलोना, रोझारियो येथे घरे आणि मालमत्ता आहेत. तो सध्या त्याच्या फ्लोरिडा येथील घरात राहतो. 'जेकब अँड कंपनी'ने मेस्सीसाठी एक खास घड्याळ डिझाइन केले, ज्याची किंमत दीड कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. याशिवाय त्याच्याकडे अनेक घड्याळे आहेत. मेस्सीच्या इंडिया टूरदरम्यान काय वाद झाला? 13 डिसेंबर रोजी मेस्सी भारताच्या 4 शहरांमध्ये आपल्या 'GOAT इंडिया टूर'साठी 14 वर्षांनंतर भारतात पोहोचला. यापूर्वी तो 2011 मध्येही कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये अर्जेंटिनाकडून व्हेनेझुएलाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी आला होता. कोलकाता इव्हेंटची तिकिटे 3,500 ते 12,000 रुपयांपर्यंत होती. मेस्सी सकाळी 11:15 वाजता स्टेडियममध्ये पोहोचला. वेळापत्रकानुसार, 45 मिनिटांचा कार्यक्रम होता. तो मैदानावर फिरून चाहत्यांचे अभिवादन करत होता, त्याचवेळी व्हीआयपी लोक, स्थानिक नेते आणि सुरक्षारक्षकांनी त्याला अशा प्रकारे घेरले की चाहते त्याला नीट पाहू शकले नाहीत. फक्त 22 मिनिटे थांबून मेस्सीची टीम त्याला घेऊन स्टेडियमबाहेर गेली. मेस्सी गेल्याने चाहते संतापले आणि स्टेडियममध्ये तोडफोड करू लागले. सुमारे 2 तास चाहत्यांनी पाण्याच्या बाटल्या आणि स्टेडियमच्या खुर्च्या उपटून मैदानावर फेकल्या. शेकडो चाहते बॅरिकेड्स तोडून मैदानावर घुसले. सायंकाळपर्यंत X वर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून आलेले चाहते आयोजकांना जबाबदार धरत होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले, 'मी मेस्सी आणि चाहत्यांची मनापासून माफी मागते. हे गैरव्यवस्थापन धक्कादायक आहे. चौकशी समिती स्थापन केली जाईल, तिकिटाचे पैसेही परत मिळतील.' कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सताद्रू दत्ता यांना कोलकाता विमानतळावरून अटक करण्यात आली. या घटनेनंतर मेस्सी राहुल गांधी आणि नंतर हैदराबादमध्ये तेलंगणाच्या मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना भेटले. मेस्सी 15 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना भेटणार आहे. यानंतर अरुण जेटली स्टेडियममध्ये एका मोठ्या कार्यक्रमासह मेस्सीचा भारताचा दौरा समाप्त होईल.
EVM Machine Rules: निवडणुकीपूर्वी मोठी खळबळ! आता मतदान यंत्रावर राष्ट्रीय पक्षांनाच अग्रक्रम? वाचा..
प्रभात वृत्तसेवा पुणे – यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील उमेदवारांची नावे अद्याक्षरांच्या क्रमानुसार मतदान यंत्रांवर घेतली जात होती. आता यामध्ये बदल करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू असून, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना मतदान यंत्रावर पहिले स्थान मिळणार आहे. त्यानंतर राज्य स्तरावरील पक्षातील उमेदवारांचे नाव असणार आहे. लवकरच निवडणूक […] The post EVM Machine Rules: निवडणुकीपूर्वी मोठी खळबळ! आता मतदान यंत्रावर राष्ट्रीय पक्षांनाच अग्रक्रम? वाचा.. appeared first on Dainik Prabhat .
पुण्यात पुस्तकांचा पूर! कोट्यवधींची उलाढाल आणि तरूणाईची झुंबड; तुम्ही अजून भेट दिली नाही का?
प्रभात वृत्तसेवा पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला नागरिकांनी पहिल्या दोन दिवसांतच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या दोन दिवसांत तब्बल दीड लाखांपेक्षा अधिक पुस्तकप्रेमींनी महोत्सवाला भेट देऊन पुस्तक खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. परिणामी काही कोटींची उलाढाल झाल्याची माहिती महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली.महोत्सवाचे शनिवारी […] The post पुण्यात पुस्तकांचा पूर! कोट्यवधींची उलाढाल आणि तरूणाईची झुंबड; तुम्ही अजून भेट दिली नाही का? appeared first on Dainik Prabhat .
पुणेकरांना हुडहुडीपासून दिलासा? पण ‘या’भागात पारा अजूनही ७ अंशावर! वाचा वेधशाळेचा अंदाज
प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात एक अंशाने वाढ झाल्यामुळे मागील आठवडाभरापासून कडाक्याच्या थंडीने गारठलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. रविवारी (दि. १४) हवेली परिसरात सर्वात कमी ७.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर अन्य परिसरात किमान तापमान ९ अंशाच्या पुढे नोंदविले गेले. त्यामुळे थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे. मागील आठ ते […] The post पुणेकरांना हुडहुडीपासून दिलासा? पण ‘या’ भागात पारा अजूनही ७ अंशावर! वाचा वेधशाळेचा अंदाज appeared first on Dainik Prabhat .
PMC Election: पुण्यात ठाकरे गट आणि मनसे एकत्र? महापालिकेसाठी ठरला ‘हा’मोठा फॉर्म्युला..
प्रभात वृत्तसेवा पुणे – अगामी पुणे महापालिका निवडणुकीला आपण एकत्र लढायचे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत घडलेलो सैनिक आहोत. त्यामुळे सर्वांनी एकजूट दाखवत महापालिकेवर पुन्हा विजय मिळवायचा, असा निश्चय पुणे शहर शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये करीत, जे आपल्याबरोबर येतील त्यांना घेऊन पुढे जायचे असेही एकमताने ठरल्याचे शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात […] The post PMC Election: पुण्यात ठाकरे गट आणि मनसे एकत्र? महापालिकेसाठी ठरला ‘हा’ मोठा फॉर्म्युला.. appeared first on Dainik Prabhat .
पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहराचा चेहरामोहरा बदलणार? वाचा ३ हजार कोटींचा ‘मेगा’प्लॅन’
प्रभात वृत्तसेवा पुणे – केंद्र आणि राज्य सरकारसह पुणे महापालिकेच्या वतीने आखलेल्या सुमारे ३,०६३ कोटी रुपयांच्या विकासकामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (दि. १५) एकाचवेळी पायाभरणी होत आहे. यात प्रामुख्याने पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया, रस्ते विकास, आरोग्य, शालेय शिक्षण, सुशासन या विभागांचा समावेश आहे. यातील काही महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे शहराचा कायापालट होईल, असा विश्वास पुणे महापालिकचे […] The post पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहराचा चेहरामोहरा बदलणार? वाचा ३ हजार कोटींचा ‘मेगा’ प्लॅन’ appeared first on Dainik Prabhat .
BJP Pune: भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखतीचे सत्र पूर्ण; पक्षाकडून २३०० हून अधिक अर्ज भरून सादर
प्रभात वृत्तसेवा पुणे – आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे रविवारी सुमारे १२०० इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखतीचे सत्र पूर्ण झाले. त्यानंतर रविवारी सायंकाळपासून सोमवारी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीवर भर देण्यात आला. दरम्यान, सोमवारच्या कार्यक्रमात इतर पक्षातील बड्या पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांचे प्रवेश होणार की नाही, ही बाब गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.भारतीय […] The post BJP Pune: भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखतीचे सत्र पूर्ण; पक्षाकडून २३०० हून अधिक अर्ज भरून सादर appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जल्लनिसारण विभागाच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयानुसार जलनिस्सारण वाहिन्या (ड्रेनेज लाईन) दुरुस्त व देखभाल करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यामध्ये ठराविक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून अटी व शर्ती टाकण्यात आल्या आहेत. तसेच काही ठेकेदारांनी सर्वात कमी दर दिल्याने कामाच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित केली जात आहे. तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांनी […] The post PCMC News: ड्रेनेज विभागाचा अजब कारभार! ‘त्या’ एका अटीमुळे बाकीचे ठेकेदार बाद; कोणाला मिळतेय रेड कार्पेट? appeared first on Dainik Prabhat .
मावळ हादरले! शिरगाव मध्ये ५ वर्षीय मुलीचे अपहरण आणि खून..नराधम पोलिसांच्या ताब्यात
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – मावळ तालुक्यातील शिरगाव येथे एक धक्कादायक घटना रविवारी (दि. १४ डिसेंबर) रोजी सकाळी उघडकीस आली. एका पाच वर्षीय मुलीचे तिच्या घराजवळ राहणाऱ्या व्यक्तीने चॉकलेटच्या आमिषाने अपहरण केले. त्या मुलीचा खून करून तिचा मृतदेह फेकून दिला. दरम्यान, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. समीर कुमार मंडल (वय […] The post मावळ हादरले! शिरगाव मध्ये ५ वर्षीय मुलीचे अपहरण आणि खून..नराधम पोलिसांच्या ताब्यात appeared first on Dainik Prabhat .
‘प्रभात’च्या बातमीचा दणका! सासवड आगाराचे अधिकारी थेट वाल्हे उड्डाणपुलावर..पाहा काय घडले
प्रभात वृत्तसेवा वाल्हे – ‘दैनिक प्रभात’ मध्ये उड्डाणपुलावरून जाणाऱ्या एसटी रोखल्या’ या मथळ्याखाली रविवार (दि.१४) वृत्त प्रसिद्ध होताच सासवड आगारा व्यवस्थापनाकडून वाल्हे (ता. पुरंदर) येथील उड्डाणपुलावर दुपारपासून सायंकाळपर्यंत थांबून उड्डाणपुलावरून येणाऱ्या एसटी बस सेवा रस्त्यावरून जाण्यास सांगून पुन्हा उड्डाणपुलावरून आल्यास, कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी सासवड आगारातील वाहतूक निरीक्षक जयेश साळुंखे, वाहतूक […] The post ‘प्रभात’च्या बातमीचा दणका! सासवड आगाराचे अधिकारी थेट वाल्हे उड्डाणपुलावर..पाहा काय घडले appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पळसदेव – राज्यात सध्या शेतकरी कर्जमाफी मिळेल याची जोरदार चर्चा सुरू असून, सहकारी सोसायट्यांनी शेतकऱ्यांकडून कागदपत्रे मागवण्यास सुरुवात केल्यामुळे कर्जमाफीची आशा बळावली आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच शेतकऱ्यांना योग्य ती कर्जमाफी मिळेल असे वक्तव्य केले होते, ज्यामुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे. सहकारी सोसायट्या शेतकऱ्यांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, […] The post Dattatray Bharne: कर्जमाफीबाबत मोठी अपडेट समोर; कृषी मंत्र्यांच्या ‘या’ विधानाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत appeared first on Dainik Prabhat .
Gas Cylinder Blast: जावळेवाडी गॅस सिलिंडरचा स्फोट! एक युवक भाजला, घराचे मोठे नुकसान
प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – खेड तालुक्यातील जावळेवाडी-मंदोशी येथे शनिवारी (दि.१३) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन एक युवक भाजला. तसेच संबंधित घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, घटनेला दोन दिवस उलटूनही अद्याप पंचनामा न झाल्याने तसेच गॅस एजन्सीचे प्रतिनिधी, गॅस कंपनीचे अधिकारी, ग्रामसेवक व तलाठी यांनी घटनास्थळी भेट न दिल्याने पीडित […] The post Gas Cylinder Blast: जावळेवाडी गॅस सिलिंडरचा स्फोट! एक युवक भाजला, घराचे मोठे नुकसान appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा उदापूर – पुणे-नाशिक रेल्वे मार्ग जुन्नर तालुक्यातूनच जावा, या मागणीसाठी जुन्नर तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आणि ग्रामस्थांनी ओतूर येथील अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील मोनिका चौकात रविवारी (दि. १४) सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन केले. केंद्र सरकारने हा मार्ग रद्द करून आता शिर्डी-अहिल्यानगर मार्गे रेल्वे करण्याचा निर्णय घेतल्याने जुन्नर तालुक्यातील जनतेत तीव्र रोष निर्माण झाला आहे. […] The post Pune Nashik Railway: अहिल्यानगर-कल्याण हायवे जॅम! पुणे-नाशिक रेल्वेसाठी जुन्नरमध्ये एल्गार, पाहा काय घडले appeared first on Dainik Prabhat .
इंदापूरमध्ये पारा ९ अंशांवर! कडाक्याच्या थंडीने जनजीवन विस्कळीत, दूध उत्पादनालाही फटका
प्रभात वृत्तसेवा लोणी देवकर – तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडीची लाट निर्माण झाली असून, तापमानाचा पारा ९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्याने नागरिक अक्षरशः गारठले आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या तीव्र थंडीमुळे सकाळ, संध्याकाळ बाजारपेठांतील गर्दीवर परिणाम झाला आहे. बाजारपेठा सकाळी उशिराने सुरू होत असून, ग्राहकांच्या कमी प्रतिसादामुळे रात्री लवकर बंद होत […] The post इंदापूरमध्ये पारा ९ अंशांवर! कडाक्याच्या थंडीने जनजीवन विस्कळीत, दूध उत्पादनालाही फटका appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा इंदापूर – राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या असताना ग्रामीण भागाचे लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे लागले आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी घेणे अपेक्षित असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगूल कधी वाजणार, याबाबत इंदापूर तालुक्यात मोठी उत्सुकता निर्माण झाली […] The post Indapur ZP Election: इंदापुरात पुन्हा ‘दादा’ विरुद्ध ‘पाटील’ संघर्ष? जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु appeared first on Dainik Prabhat .
Shirur News: शाळेत आता बिबट्या घुसणार नाही; दिलीप वळसे पाटलांनी दिला ५७ लाखांचे ‘सुरक्षा कवच’
प्रभात वृत्तसेवा जांबूत – पिंपरखेड (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून पिंपरखेड येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांच्या संरक्षणासाठी ५७.५० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या निधीमुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.या निधीतून गावठाण शाळा, […] The post Shirur News: शाळेत आता बिबट्या घुसणार नाही; दिलीप वळसे पाटलांनी दिला ५७ लाखांचे ‘सुरक्षा कवच’ appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा मंचर – खेड, आंबेगाव,जुन्नर मार्गाने जाणारी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा मार्ग बदलल्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. हा रेल्वे मार्ग पूर्वीच्या मार्गाने होण्यासाठी आपल्या सगळ्यांना लढा देऊन ताकद लावावी लागणार आहे,असे मत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवार, दि.१४ रोजी व्यक्त केले. पुणे–नाशिक रेल्वे मार्गाचा मार्ग अहिल्यानगर […] The post Dilip Walse Patil: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प खेड-आंबेगाव-जुन्नर मार्गानेच झाला पाहिजे- दिलीप वळसे पाटील appeared first on Dainik Prabhat .
धक्कादायक! शिक्रापुरात कॅफेमध्ये महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार, तरुणावर गुन्हा दाखल
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – महाविद्यालयीन युवतीवर तिच्या ओळखीच्या तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवतीला महाविद्यालयातून येत असताना स्विफ्ट कारमधून गावातील एका कॅफेमध्ये नेऊन, तिच्या आई-वडिलांना व भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन हा अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयीन युवती महाविद्यालयातून येत असताना तिच्या ओळखीचा अभिराज प्रमोद चव्हाण (रा. निमगाव म्हाळुंगी, ता. […] The post धक्कादायक! शिक्रापुरात कॅफेमध्ये महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार, तरुणावर गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat .
Indapur Politics: आरक्षण ठरले, गट-गण बदलले! इंदापुरात ‘आयात’उमेदवारांमुळे कोणाचे वाढले टेंशन?
प्रभात वृत्तसेवा वडापुरी – जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत झाल्याने इंदापूर तालुक्यात आगामी निवडणुकीच्या तारखेकडे इच्छुकांचे डोळे लागले आहेत. राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकांमुळे लांबणीवर पडल्या आहेत. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने तत्पूर्वीच गट, गण रचना, आरक्षण सोडत, जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समित्यांच्या सभापतींचे […] The post Indapur Politics: आरक्षण ठरले, गट-गण बदलले! इंदापुरात ‘आयात’ उमेदवारांमुळे कोणाचे वाढले टेंशन? appeared first on Dainik Prabhat .
शिरूरचा ‘तो’सराईत गुन्हेगार थेट नागपूर जेलमध्ये! निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कठोर कारवाई
प्रभात वृत्तसेवा शिरूर – आगामी निवडणुका शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने गुन्हेगारीविरोधात कडक पावले उचलली आहेत. याच अनुषंगाने शिरूर तालुक्यातील गोलेगाव येथील सराईत आणि धोकादायक गुन्हेगार दीपक बबन गुंजाळ (वय ३३) याला महाराष्ट्र प्रतिबंधक नजरकैद कायदा (एम.पी.डी.ए.) अंतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप […] The post शिरूरचा ‘तो’ सराईत गुन्हेगार थेट नागपूर जेलमध्ये! निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कठोर कारवाई appeared first on Dainik Prabhat .
दीड महिन्यात ६८ बिबटे पिंजऱ्यात! जुन्नर पॅटर्नची राज्यभर चर्चा, पण वनविभागापुढील ‘हे’संकट वाढले
प्रभात वृत्तसेवा बेल्हे – जुन्नर वनविभागात बिबट्यांचा वाढलेला प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १३ कोटी रुपयांची तरतूद केली. या निधीतून ४०० पिंजरे खरेदी करण्यात आले आणि त्या पिंजऱ्यांच्या मदतीने अवघ्या दीड महिन्यात तब्बल ६८ बिबटे जेरबंद करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. मात्र, आता पकडलेल्या या बिबट्यांना ठेवायचे कुठे, असा प्रश्न वन […] The post दीड महिन्यात ६८ बिबटे पिंजऱ्यात! जुन्नर पॅटर्नची राज्यभर चर्चा, पण वनविभागापुढील ‘हे’ संकट वाढले appeared first on Dainik Prabhat .
Shevga Market Rate: सफरचंद स्वस्त, पण शेवगा महाग! भाव ऐकून ग्राहकांचे डोळे विस्फारले; पहा दर
प्रभात वृत्तसेवा रांजणी – गेल्या काही दिवसांपासून शेवग्याच्या शेंगांचा तुटवडा निर्माण झाला आहे शेवग्याच्या शेंगांचे बाजारभाव गगनाला भिडले असून बाजार समितीमध्ये शेवगा 180 ते 220 रुपये किलो व किरकोळ मार्केटमध्ये 300 ते 400 रुपये किलो दराने विकला जात आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेवग्याच्या शेंगांना दोनशे वीस रुपये घाऊक दर मिळत असुन किरकोळ […] The post Shevga Market Rate: सफरचंद स्वस्त, पण शेवगा महाग! भाव ऐकून ग्राहकांचे डोळे विस्फारले; पहा दर appeared first on Dainik Prabhat .
कोलकात्यातील विवेकानंद युवा क्रांती मैदानात अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार लियोनेल मेसी याचे आगमन झाल्यावर त्याला पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली होती. त्यामुळे शानदार समारंभाचे रूपांतर अभूतपूर्व गोंधळात आणि निषेध निदर्शनांत झाले. प्रचंड रक्कम भरून हजारो प्रेक्षकांनी मेसीच्या एका दर्शनासाठी या मैदानात गर्दी केली होती पण त्यांच्या पदरी अखेर निराशाच आली आणि चाहत्यांचा संताप झाला. नंतर जे झाले ते कधीही न कल्पना केलेले होते. बकेट, सीट्स, व्हीआयपी सोफ्यांची मोडतोड आणि जेथे हा कार्यक्रम होता तेथे नासधूस आणि काही ठिकाणी तर आग लावण्यात आली. अखेर आयोजकांना मेसीची भेट थोड्या वेळातच आटोपती घ्यावी लागली. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी चौकशी जाहीर केली आणि कार्यक्रमाची गैरव्यवस्था आणि गोंधळ का झाला याचा तपास सुरू आहे. पण या प्रकारात भारताची अब्रू गेली आणि जो देश विकासाच्या वाटेवर आहे त्याची लक्तरे कोलकात्यात निघाली. लोकांनी एका तिकिटासाठी तब्बल दहा हजार आणि १२ हजार इतके प्रचंड पैसे मोजले होते. पण त्यांना मेसीचे दर्शनही नीट होऊ शकले नाही. ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी चौकशी जाहीर करताना मेसीची मनापासून माफी मागितली आणि या दुर्दैवी प्रकाराबद्दल आयोजकांना दोषी ठरवले. पण मुळात आपल्याकडे अशा कार्यक्रमांसाठी चाेख व्यवस्था नाही? मेसीसारखे लोकप्रिय खेळाडू आपल्याकडे येत असताना आपल्याकडे अशा वेळेस प्रचंड गर्दी कशी हाताळायची त्याचे तंत्रच नाही? मुळात हे साल्ट लेक स्टेडियम इतक्या सेलेब्रिटीचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुरेसे होते का हा प्रश्न आहे. त्या ऐवजी इडन गार्डन या स्टेडियमवर हा कार्यक्रम ठेवला असता, तर अशी गर्दी आणि ममता सरकारची बेअब्रूही झाली नसती. आता मेसीचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकाला पोलिसांनी विमानतळावर अटक केली आहे. त्याच्याविरोधात आता कडक कारवाई केली जाणार असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. आता या गोंधळाचा अपरिहार्य परिणाम म्हणजे भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध जुंपले आहे. या गैरव्यवस्थेबद्दल दोघांनीही एकमेकांवर जबाबदार असल्याचे आरोप केलेत. पण सर्वात जास्त जबाबदारी ही तृणमूल काँग्रेसची होती. कारण तो पक्ष सत्ताधारी आहे. पश्चिम बंगालमध्ये २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्यादृष्टीने ममतांसाठी हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडणे हे महत्त्वाचे होते. पण कोलकाता प्रशासन त्याबाबतीत अपयशी ठरले.कोलकाता, गोवा या शहरात फुटबॉल हा खेळ लोकप्रिय आहे. त्यामुळे या शहरांना वेगळाच दर्जा आहे. हे लक्षात घेऊन तरी निदान कोलकात्यात तरी फुटबॉल इव्हेंट असला तर तो व्यवस्थित पार पडावा अशी तेथील राज्य सरकारांनी दक्षता घ्यायला हवी. पण राज्य सरकारने आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागते. या सर्व प्रकारात एकच गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे गर्दी व्यवस्थापन आणि तिचे तंत्र याबाबतीत आपण अजून खूप मागे आहोत. गर्दीचे व्यवस्थापन आणि राजकारण यांची सरमिसळ यात आपण कुशल नाही हे या घटनेवरून सिद्ध झाले. जी घटना कोलकात्यासाठी ऐतिहासिक प्रसंग होऊ शकली असती ती या गैरव्यवस्थेमुळे आणि चाहत्यांच्या गोंधळामुळे बाजूला पडली आणि राजकीय युद्ध सुरू झालेे. आता यातून मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा घटना घडतात तेव्हा त्यांची जबाबदारी निश्चित केली जाणे आवश्यक आहे. कायदा आणि सुव्यवस्था कोसळण्यास जे प्रसंग घडले ते भविष्यात पुन्हा घडू नयेत अशी उपाययोजना आपण करायला हवी. आता राज्यपालांनीही सी. व्ही.आनंदा बोस यांनी आयोजकांवर प्रखर टीका केली आणि ते म्हणाले की अत्यंत निष्ठूरपणे आयोजकांनी लियोनेल मेसीची गोट इंडिया टूर आयोजित केली आणि फुटबॉल प्रेमींच्या भावनांकडे दुर्लक्ष केले. आयोजकांनी या प्रकरणी केवळ आपल्या तुंबड्या भरून घेण्याकडे लक्ष दिले आणि त्यात प्रेक्षकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या भावनांचा खेळ केल्याचा आरोप केला जात आहे.आपल्याकडे परदेशी खेळाडू आणि अभिनेत्यांचे आकर्षण आहे आणि याचेच प्रत्यंतर आले. त्यामुळे अनेक मंत्री, खासदार आणि आमदारांनी मेसीला पाहण्यासाठी गर्दी केली होती. हजारो लोक मेसीला पाहण्यासाठी आले होते पण त्याची झलकही पाहू शकले नाही. काही प्रेक्षकांनी हा गैरव्यवहार असल्याचा आरोप केला. सुरक्षा व्यवस्थेचे या सर्व प्रकारात तीनतेरा वाजलेच. लियोनेल मेसीच्या आगमनाने फुटबॉल प्रेमी आनंदित झाले होते पण त्यांना निराशाच पदरी आली. आता बऱ्याच फुटबॉल प्रेमींनी विश्वासघात झाल्याचे जाणवते अशी प्रतिक्रिया दिली आहे आणि ती योग्य आहे. कारण या गोंधळाला जबाबदार सर्वस्वी आयोजकांचे गैरव्यवस्थापन आणि सावळागोंधळ होता. मेसीच्या कार्यक्रमाला साल्ट लेक स्टेडिमवर ८० हजार लोक जमले होते. त्यांनी गैरव्यवस्थापनामुळे तोडफोड केली. कोलकाता म्हणजे सिटी ऑफ जॉय म्हटले जाते, पण ८० हजार प्रेक्षकांसाठी सिटी ऑफ डिसॅस्टर ठरले. फुटबॉल चाहत्यांसाठी ही सायंकाळ म्हणजे मोडतोडीचा कार्यक्रम ठरला. साल्ट लेक स्टेडियमवरील आसनव्यवस्था मोडीत काढण्यात आली. चाहत्यांचा अमूल्य वेळ आणि अफाट पैसा यात वाया गेला आणि त्याची आयोजकांना ना खंत ना खेद. त्यामुळे असे प्रकार होऊ नयेत असे वाटत असेल तर आयोजकांनी अतिदक्षता घेतली पाहिजे. बहिष्कार हा उपाय नाही पण लोकांनीही अशा कार्यक्रमांना जाण्यापूर्वी हजारवेळा विचार केला पाहिजे. मेसीचे दर्शन दुर्मीळ पण जेव्हा घडतो तो प्रसंग आयुष्यातला यादगार प्रसंग बनला पाहिजे. मेसी मानिया हे सांगतो, की कोलकात्यात मेसीचे दर्शन ज्यांना घडले नाही, त्यांना पैसे मोजूनही काहीच पदरी पडले नाही. कोलकात्यातील लोक निश्चितच असे कमनशिबी नाहीत.
इंदापूर ते वर्ल्ड चॅम्पियनशिप! शेतकरी कन्येचा थक्क करणारा प्रवास..जाणून घ्या
प्रभात वृत्तसेवा इंदापूर – इंदापूरची श्रावणी प्रशांत शितापने गुजरातच्या गांधीनगर येथे झालेल्या ऑल इंडिया कॅम्पमध्ये हरियाणा,पंजाब व दिल्ली येथील बलाढ्य स्पर्धकांना पराभूत करत कुराश वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी आपली निवड निश्चित केली. जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत श्रावणी ५७ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या यशामागे कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव व इंटरनॅशनल वन […] The post इंदापूर ते वर्ल्ड चॅम्पियनशिप! शेतकरी कन्येचा थक्क करणारा प्रवास..जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा मंचर – केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी लोकसभेत पुणे – अहिल्यानगर-नाशिक रेल्वे मार्ग शिर्डी तीर्थक्षेत्राच्या महत्त्वामुळे त्या मार्गे नेण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र, यामुळे पूर्वी प्रस्तावित असलेला पुणे-नाशिक थेट रेल्वे मार्ग रद्दबातल ठरल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हा जुना मार्ग श्रीक्षेत्र भीमाशंकर, अष्टविनायकातील लेण्याद्री व ओझर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान […] The post Pune Nashik Railway: शिवरायांचे जन्मस्थान रेल्वेच्या नकाशावरून गायब? नवीन मार्गामुळे ‘या’ महत्त्वाच्या ठिकाणांना फटका appeared first on Dainik Prabhat .
अखेर तो ‘नरभक्षक’जेरबंद! सिद्धेशचा बळी घेणाऱ्या बिबट्याला वनविभागाने कशी घातली गवसणी?
प्रभात वृत्तसेवा संगमनेर – तालुक्यातील जवळे कडलग येथील चार वर्षांचा चिमुकला सिद्धेश सूरज कडलग याचा बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण परिसर सुन्न झाला होता. या हृदयद्रावक घटनेनंतर गावासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर या घटनेला कारणीभूत ठरलेला बिबट्याला वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. घटनेनंतर वनविभागाने तत्काळ हालचाली करत परिसरात पिंजरे लावले. ड्रोन व […] The post अखेर तो ‘नरभक्षक’ जेरबंद! सिद्धेशचा बळी घेणाऱ्या बिबट्याला वनविभागाने कशी घातली गवसणी? appeared first on Dainik Prabhat .
अधिवेशनात शेवगावचा आवाज! भव्य इमारतीसाठी आमदार राजळेंची आग्रही मागणी, वाचा सविस्तर
प्रभात वृत्तसेवा शेवगाव – शेवगाव नगरपरिषदेला स्वतंत्र प्रशासकीय इमारत नसल्याने सध्या नगरपरिषदेचे कामकाज शहरातील पैठण रस्त्यावरील क्रीडा संकुलामध्ये सुरू आहे. हे ठिकाण शहरापासून दूर असल्याने नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने शहरात भव्य व सुसज्ज प्रशासकीय इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी हिवाळी अधिवेशनात केली […] The post अधिवेशनात शेवगावचा आवाज! भव्य इमारतीसाठी आमदार राजळेंची आग्रही मागणी, वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .
‘आधार कार्ड नाही म्हणून मदत थांबवू नका!’; सिद्धेशच्या मृत्यूनंतर आ. अमोल खताळ यांची मागणी
प्रभात वृत्तसेवा संगमनेर – तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सिद्धेश कडलग या बालकाच्या कुटुंबियांची प्रस्तुती अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, तसेच कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत समावेश होण्याबाबत विचार व्हावा तसेच त्या मयत बालकाचे आधार कार्ड नसल्या मुळे त्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी अडचण येऊ नये. अशी […] The post ‘आधार कार्ड नाही म्हणून मदत थांबवू नका!’; सिद्धेशच्या मृत्यूनंतर आ. अमोल खताळ यांची मागणी appeared first on Dainik Prabhat .
मुंबई शहराच्या वाढत्या जडणघडणावेळी इतर वास्तूंप्रमाणेच एक प्रत्यक्ष साक्षीदार असलेले कुलाब्यातील ससून डॉक आज स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत चर्चेचा विषय ठरले आहे. आज येथील कोळी बांधव व व्यापारी आज हे बंदर वाचवण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरले असून आता मुंबईकरांनी हा अनमोल ठेवा वाचवण्यासाठी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.ससून डॉक मत्स्य खवय्ये प्रेमींसाठी एक मुंबईतील मोठी बाजारपेठ असून दररोज करोडो रुपयांची उलाढाल या बंदरातील मासेमारीमुळे होते. ससून डॉक हे मुंबईतील सर्वात जुन्या बंदरांपैकी एक असून, १८७५ मध्ये बांधलेले हे पश्चिम भारतातील पहिले व्यावसायिक ओले डॉक होते, जे बगदादी ज्यू कुटुंबातील डेव्हिड ससून अॅण्ड कंपनीने बांधले. कुलाबा येथे असलेले हे डॉक, मुंबईच्या कोळी समाजासाठी ‘म्हावरे बाजार’ म्हणून ओळखले जाते आणि आजही मुंबईतील मासेमारी उद्योगाचे केंद्र आहे, जिथे दररोज मोठ्या प्रमाणात मासे येतात आणि मुंबईची माशांची गरज भागते. आज इतर बंदरातील म्हणजे भाऊचा धक्का, वर्सोवा, मढ, अलिबाग, उत्तन येथील चांगल्या दर्जाची कोलंबी येथे आणली जाते. येथे ती कोलंबी सोलून ती निर्यात करण्यासाठी ससून डॉक येथील गोदामात ठेवली जाते. या गोदामातून परदेशात मोठ्या प्रमाणात कोलंबी निर्यात केली जाते. त्यात अमेरिका युरोपीय देश, चीन, जपान या देशांचा समावेश होतो. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होतेच त्याचप्रमाणे देशी व आंतरदेशीय व्यापारामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळून देशाच्या अर्थव्यवस्थेला चांगली चालना मिळत आहे. सध्या या ससून डॉकचा विषय चर्चेत येण्याचे कारण तेथील अर्ध्याधिक गोदामांना आज टाळे लागले आहे. ही गोदामे व त्यांच्या जागा म्हणजेच हे ससून डॉक आज ज्या धरतीवर वसले आहे ती त्याचे मूळ मालक हे मुंबई पोर्ट ट्रस्ट हे आहे. विशेष म्हणजे मुंबईत जेवढी मच्छीमारांची बंदरे आहेत तिथे कोणतेही गोदाम नाही. मात्र ससून डॉक एक मात्र असे आहे की, जिथे गोदामे बसवलेली आहेत. याचे मूळ मालक मुंबई पोर्ट ट्रस्टने ही जागा महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कार्पोरेशन यांना दिली होती. त्यांनी ती मच्छीमार व्यवसायिकांना व्यापार करण्यासाठी भाडेतत्त्वावर दिली. येथील मच्छीमार व्यावसायिक हे नियमित महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे याचे भाडे भरत असतात. मात्र या महाराष्ट्र पिशवीत डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ही भाडे मुंबई पोर्ट ट्रस्टला दिली नाही, तर स्वतःकडेच ठेवून दिली. त्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टने ही जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालवला. यातील कोर्टकचेऱ्या झाल्यानंतर ही जागा सर्वोच्च न्यायालयाने रिकामी करण्याचे आदेश दिले. मात्र १४ वर्षांपासून जागेचा हा मूळ मुद्दा कायम असून कोणाकडेच याचे उत्तर नाही. त्यामुळे आता येथील गोदामांना टाळे मारण्यात आले,असून तेथील हजारो मच्छीमार व व्यावसायिक देशोधडीला लागला आहे.सर्वोच्च न्यायालयात पोट भाडेकरू हा प्रकारच अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आणून दिल्याने आज या मच्छीमार संघटनांवर ही विस्थापित होण्याची पाळी आली. आज येथील गोदामं ६० ते ७० टक्के बंद आहेत सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताना त्रिपक्षी करार करण्याचे आदेश दिले होते, मात्र २०१४ ते २०२५ दरम्यान कोणताही त्रिपक्ष करार करण्यास मुंबई पोर्ट ट्रस्टने वा महाराष्ट्र डेव्हलपमेंट कार्पोरेशनने प्रयत्न केले नाहीत त्यामुळे हा जाणून-बुजून तू मार मी रडण्याचा प्रयत्न करतो असा प्रयत्न सुरू असल्याचा मच्छिमार संघटनांचा आरोप आहे. येथील मच्छीमार व्यवसायावर साधारण एक लाख लोकांचा रोजगार अवलंबून आहे याच कुलाबा परिसरात बॅकबे मच्छीमार नगर यासारखे मच्छीमार वसाहती तसेच मोठमोठ्या झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत त्यातील बहुतांश कामगार हा या ससून डॉकवर उदरनिर्वासाठी ससून डॉकवर अवलंबून आहे. उद्या जर ससून डॉक बंद पडले तर त्यातील ८० टक्के कामगार देशोधडीला लागेल. इतकेच नव्हे तर आता नवीन कायद्याप्रमाणे १९६२ सालची झोपडपट्टी अधिकृत करण्याचे शासकीय स्तरावर आदेश निघाले आहेत. ही झोपडपट्टी तर नंतर वसलेली आहे. म्हणजे संपूर्ण झोपडपट्टीचा परिसरच आता खाजगी विकासकांच्या दावणीला बांधला जात आहे की काय अशी शंका मच्छीमार संघटनांना येऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनी याचा जोरदार विरोध करून ससून डॉक कशाप्रकारे वाचवता येईल यासाठी मोठ्या आंदोलनाची तयारी केली असून त्याचाच एक भाग म्हणून येत्या मंगळवारी ससून डॉक आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यात सर्व मच्छीमार तसेच व्यापारी संघटना सहभागी होणार आहेत. या व्यवसायात ससून डॉकमध्ये भारतातील ओरिसा कर्नाटक बिहार यूपीमधील हजारो कामगार या व्यवसायात गुण्यागोविंदाने काम करत आहेत. त्यामुळे रोजगार देणाऱ्या हा व्यवसाय बंद झाल्यास मोठी अराजकता माजेल. मागील अधिवेशनात लक्षवेधीवर यावर प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्यावर मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ससून डॉक कधीही बंद पडणार नाही याची हमी दिली होती. मात्र वरिष्ठ पातळीवर व स्थानिक राजकारणावर अशी काही सूत्रे हल्ली की तेथील गोदामांना मुंबई पोस्ट ट्रस्टने आता टाळी मारली. आजही तेथील जागा ही मुंबई पोर्ट ट्रस्टकडे आहे. मात्र तेथे त्या जागेचा कोणताही वापर करीत नाही. मग अशावेळी ससूनडाक ताब्यात घेऊन ते कोणासाठी मोकळे केले जात आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे. तेथे थीम पार्क उभारण्याची एका बड्या उद्योगपतींची योजना असल्याचे कळत आहे. असे झाले तर मुंबईतील एक ऐतिहासिक ठेवा नामशेष होईल. मच्छीमार संघटनांनी लक्ष वेधले की सध्या अमेरिकेने भारतावर मोठ्या प्रमाणात कर आकारणी सुरुवात केली आहे. त्याचा मोठा फटका कोळंबीला बसला आहे. त्यातच मच्छीमारीमध्ये आता अनेक संकटे उद्भवत असून व्यापार ही आता कमी होत चालला आहे. त्यामुळे मुंबईचा मूळ मालक असलेला कोळी समाज आज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तरी आता मुंबईकरांनीच या लढ्यात उतरून ससून डाक कशा पद्धतीने वाचवता येईल यासाठी लढा उभारण्याची गरज आहे.- अल्पेश म्हात्रे
Crime News: ‘थांब थोडे दिवस, तुझा काटा काढावा लागेल…’; सोनईत माजी सरपंचाची हॉटेल चालकाला उघड धमकी
प्रभात वृत्तसेवा सोनई – माजी सरपंचाने सोनई येथील हाॅटेल व्यावसायिकास तू आमच्या विरोधात बोलतो काय? तुझ्याकडे व तुझ्या भावाकडे बघावे लागेल. थांब थोडे दिवस तुमच्या दोघांचा काटा काढावा लागेल, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सोनई येथील हॉटेल व्यवसायिक अनिल पोपटराव शेटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सरंक्षण देण्याची मागणी निवेदनातून केली आहे. मी गेल्या […] The post Crime News: ‘थांब थोडे दिवस, तुझा काटा काढावा लागेल…’; सोनईत माजी सरपंचाची हॉटेल चालकाला उघड धमकी appeared first on Dainik Prabhat .
मंगला गाडगीळ ।mgpshikshan@gmail.comदेशभरात ‘डिजिटल अरेस्ट’च्या घटना वाढत असताना बदलापूर पश्चिमेतही एका महिलेची ४६ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी चार संशयितांविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र सातत्याने असे गुन्हे समोर येत असतानाही नागरिक या फसवणुकीच्या प्रकारांना बळी पडत आहेत. अनोळखी व्यक्तीच्या फोनवर विश्वास ठेवू नका. डिजिटल अरेस्ट ही संकल्पना खोटी असून असे फोन आल्यास पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले जाते. त्यामुळे थोडे सावध रहाल तरच सुरक्षित असाल.प्रोफेसर डॉ. सनी थॉमस फर्नांडिस वांद्रे येथील सेंट अँड्रूज कॉलेजमध्ये शिकवायचे. आता ते रिटायर्ड झाले असून चेंबूर येथे राहतात. यांना २ नोव्हेंबर रोजी एक अनोळखी नंबरवरून फोन येतो. फोन करणारी व्यक्ती स्वतःची ओळख टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी (ट्राय) ऑफिसर अशी करून देतो. तो सांगतो की तुमच्या फोनवरून काही बेकायदेशीर मेसेज पाठवले गेले आहेत. जेंव्हा प्रोफेसर मान्य करत नाहीत तेंव्हा त्यांना खोट्या एफआयआरची कॉपी व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात येते. प्रोफेसर बुचकळ्यात पडतात. कधी? कसे? तेवढ्यात दुसरा फोन येतो. तो माणूस सायबर क्राईम ऑफिसर असल्याचे सांगतो. तो आणखीच वेगळी गोष्ट सांगतो. तुमच्याकडून मनी लॉन्ड्रिंग झाले आहेत. नरेश गोयल यांच्या 'जेट एअर वेजशी संबंधित व्यवहार आहेत. नंतर तिसऱ्या तपास ऑफिसरचा फोन येतो. तो सांगतो दर तासातासाला आम्हाला मेसेज करायचा की 'मी ठीक आहे. जय हिंद.' ही तक्रार राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. त्यामुळे या बाबतीत कोणाला काही सांगायचे नाही. फोन करणारा प्रत्येक वेळी वेगळाच मुद्दा पुढे करत होता. जवळपास १३ दिवस हे प्रकरण चालू होते. १४ नोव्हेंबरला आणखी एक कॉल येतो. कॉल करणारा सांगतो की व्हेरिफिकेशन करण्यासाठी ७ लाख ६८ हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये पाठवा नाही तर... दहा दिवसांनी परत एक व्हिडीओ कॉल आला त्यात एक पोलीस, न्यायाधीश आणि रडत असलेली महिला दाखवली गेली. त्यात न्यायाधीश महिलेला २५ लाख रुपयांचा बॉण्ड लिहून देण्याची सूचना करत होते. अत्यंत घाबरलेल्या प्रोफेसरांनी त्यांच्या एका विद्यार्थ्याला हे सांगितल्यावर या सर्व घटना तद्दन खोट्या आणि नाटक असल्याचे समजले.अशा प्रकारच्या डिजिटल अरेस्टच्या फसवाफसवीच्या घटना अलीकडे फारच वाढल्या आहेत. बळी पडलेले बहुतेक जण ज्येष्ठ नागरिक आहेत. गेल्या महिन्यात एका ज्येष्ठ नागरिक जोडप्याने सर्वोच्च न्यायालयात पत्र लिहून म्हटले होते की, १ ते १६ सप्टेंबर दरम्यान सीबीआय, आयबी आणि न्यायव्यवस्थेचे अधिकारी म्हणून काम करणाऱ्या घोटाळेबाजांनी त्यांची १.५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक करणाऱ्यांनी फोन आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला होता, अटकेची धमकी देऊन पैसे जबरदस्तीने मागवण्याचे बनावट आदेश दाखवले होते. त्यानंतर अंबाला येथील सायबर गुन्हे शाखेत दोन एफआयआर नोंदवण्यात आले होते, ज्यात ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून अशा गुन्ह्यांचा संघटित नमुना उघड झाला. अनेक राज्यांमध्ये असे घोटाळे झाल्याचे दिसून आल्याच्या माध्यमांच्या वृत्तांची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच दखल घेतली. देशभरात डिजिटल अटक घोटाळ्यांच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी १७ ऑक्टोबर रोजी स्वतःच सुरू केलेल्या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली. सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना डिजिटल अटक घोटाळ्यांबाबत दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालांची (एफआयआर) माहिती दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. न्या. सूर्यकांत आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) अशा घोटाळ्यांशी संबंधित देशभरातील सर्व प्रकरणे हाताळण्यासाठी सीबीआयकडे संसाधने आहेत का असा प्रश्न विचारला. त्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी खंडपीठाला सांगितले की सीबीआय आधीच अशा काही प्रकरणांवर काम करत आहे. अखेर न्यायालयाने म्हटले की सर्व प्रकरणांची एकत्र चौकशी व्हावी.सायबर फसवणूक करून गोळा केलेली रक्कम जमा करण्यासाठी कोणत्यातरी बँकेच्या अकाऊंटची गरज असते. त्यासाठी ही ठक मंडळी गरीब गरजू लोकांचा उपयोग करून घेतात. त्यांच्या नावाने बँकेत अकाउंट उघडले जाते. त्याच्या इंटरनेट सुविधेची सूत्रे मात्र स्वतःकडे ठेवली जातात. या अकाउंटला फोन नंबर स्वतःचा दिला जातो. या अकाउंटमध्ये पैसे आले रे आले की लगेचच इतर वेगळ्या अकाउंट यामध्ये फिरवले जातात, इतके की त्याचा माग ठेवणे कठीण होऊन बसते. फारच कमी वेळा हे पैसे परत मिळवता येतात. अशा अकाउंटला 'म्यूल अकाउंट' म्हणतात. आपले आधार आणि पॅन नंबर वापरायला दिल्याबद्दल त्यांना थोडासा मोबदला दिला जातो. मात्र लाखो रुपये इतर अकाउंटमध्ये फिरवले जातात. या म्यूल अकाउंटचे कागदोपत्री असलेले मालक एकतर अंगठा छाप असतात किंवा थोड्याश्या पैशासाठी हे उद्योग करायला तयार असतात. असे करणे बेकायदेशीर असते हे त्यांच्या गावीही नसते.महाराष्ट्राचा विचार करायला गेल्यास जवळपास सर्व ठिकाणी अशी म्यूल अकाउंट पोलिसांना दिसून आलेली आहेत. अशा प्रकारच्या फसवणुकीची प्रकरणे वाढत असल्याने पोलिसांनी अशी खाती शोधून काढायला सुरुवात केली आहेत. सोलापूर, नागपूर, सातारा, जुन्नर, विरार, नालासोपारा, जोगेश्वरी या ठिकाणी अशी खाती उघडलेली पोलिसांना आढळली. या खात्यात अचानक लाखो रुपये जमा होत असतात. आता मात्र या म्यूल अकाउंटवाल्यांची खैर नाही. सायबर पोलिसांनी आतापर्यंत म्यूल अकाउंट असणाऱ्या आणि लुबाडणुकीला मदत करणाऱ्या १३ जणांना अटक केली आहे.'आहान फाऊंडेशन' आणि 'रिस्पॉन्सिबल नेटिझन्स' च्या अंतर्गत 'सायबर वेलनेस केंद्र ठिकठिकाणी सुरु आहेत. याचे सह संस्थापक श्री उन्मेष जोशी आहेत. सायबर वेलनेस केंद्राचा हेल्पलाईन नंबर ७३५३१०७३५३ असा आहे. येथे विनामूल्य मार्गदर्शन आणि मदत केली जाते. त्याचप्रमाणे सायबर पोलिसांचा हेल्पलाईन नंबर १९३० असा आहे. सायबर पोलिस आपले काम चोखपणे करत आहेत. तरी ग्राहकांनी मात्र सावध राहायला हवे. ‘डिजिटल अरेस्ट’ हे केवळ आभासी प्रकरण असते. असा कोणी फोन केला तर त्याकडे दुर्लक्ष करावे किंवा त्यांनाच पोलिसांची भीती घालावी. हा नंबर पोलिसांकडे कळवावा. शेवटी सावध तोच सुरक्षित.
निर्देशांक तेजीत; पण सावधानता आवश्यक
डॉ. सर्वेश सुहास सोमण । samrajyainvestments@gmail.comभारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात बरेच चढ-उतार दिसून आले. उच्चांकी शिखरावर पोहोचलेला देशांतर्गत बाजार उच्चांकापासून घसरला पण आठवड्याच्या शेवटी बाजाराने रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या निर्णयाचे स्वागत करताना पुन्हा मोठी उभारी घेतली. पुढील आठवड्यात शेअर बाजारात मोठे चढ-उतार दिसू शकतात. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान भारत-रशियामध्ये संरक्षण, व्यापार, आरोग्य, शिक्षण, माध्यमे आणि आर्थिक क्षेत्र यासह १६ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. रशियाने भारताला सतत आणि अखंड इंधन पुरवठा करण्याचे आश्वासन दिले असून पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना रशिया भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला इंधन पुरवठा सुरू ठेवण्यास तयार करणार असल्याचे सांगितले. या आठवड्यातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय घडामोड म्हणजे की यूएस फेडरल रिझर्व्हची बैठक, जी ९ डिसेंबरला झाली आणि पुन्हा १९ डिसेंबर रोजी होणार आहे. ऑक्टोबरमध्ये ०.२५% दर कपात केल्यानंतर बाजार आता पुन्हा दर कपातीच्या शक्यतेने उत्साहित दिसत आहेत. डिसेंबरमध्ये आणखी २५ बेस पॉइंट दर कपात होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात झालेल्या रिकव्हरी नंतर निर्देशांक निफ्टी ची दिशा आणि गती पुन्हा तेजीची झाली असून निफ्टीची २५९५० ते २५९२० ही खरेदीची पातळी आहे, तर २५८५० ही महत्त्वाची ट्रेंड रिव्हर्सल पातळी आहे. जोपर्यंत निफ्टी या ट्रेंड रिव्हर्सल पातळीच्यावर आहे तोपर्यंत निफ्टीतील तेजी टिकून राहील. शेअर्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अनेक शेअर्स हे तांत्रिकदृष्ट्या चार्टनुसार मंदीचे संकेत देत आहेत त्यामुळे सध्या नवीन शेअर्स खरेदी करण्यापेक्षा होल्ड कॅश इन हॅण्ड हे धोरण योग्य ठरेल. भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात बरेच चढ-उतार दिसून आले. उच्चांकी शिखरावर पोहोचलेला देशांतर्गत बाजार उच्चांकापासून घसरला पण आठवड्याच्या शेवटी बाजाराने रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या निर्णयाचे स्वागत करताना पुन्हा मोठी उभारी घेतली. पुढील आठवड्यात शेअर बाजारात मोठे चढ-उतार दिसू शकतात.आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी (आयसीआयसीआय प्रुडेंशियल एएमसी) हा (आयपीओ) आयपीओ पहिल्याच दिवशी ७३ टक्के सबस्क्रिप्शन मिळवण्यात यशस्वी झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला ग्रे मार्केटमध्ये (ग्रे मार्केट) या आयपीओने मोठी झेप घेतली आहे. यामुळे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी आयपीओचा जीएमपी (जीएमपी) २५० रुपयांचा टप्पा ओलांडून गेला आहे. हा आयपीओ पुढील आठवड्यात मंगळवारी म्हणजेच १६ डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. हा आयपीओ १२ डिसेंबर रोजी खुला झाला होता. चांदीच्या दराने सध्या परताव्याच्या बाबतीत सोन्यालाही मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी १२ डिसेंबर रोजी चांदीच्या किमती ६४.३१ डॉलर प्रति औंस या नवीन सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्या. भारतातही अनेक शहरांमध्ये चांदीने २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला आहे. २०२५ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत चांदीच्या दरात १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, ज्यामुळे परतावा देण्याच्या बाबतीत तिने सोने आणि शेअर बाजार या दोघांनाही मागे टाकले आहे.मागच्या आठवडाभरात भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत अगदी ९० रुपयांच्याही पार गेला आहे. ९०.४६ रुपयांचा नीच्चांक या आठवड्यात प्रस्थापित झाला. त्यानंतर भारतीय गुंतवणूकदार आता अमेरिकन फेडरल बँकेच्या रेपोदर बैठकीवर लक्ष ठेवून आहेत. कारण, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेनं २५ अंशांची कपात केली तर त्याचा भारतीय रुपयावर सकारात्मक परिणाम अपेक्षित आहे. भारतीय रुपया ८९.८८ पर्यंत सावरला आहे. आणि फेडरल बँकेचे गव्हर्नर जेरोम पॉवेल यांनी महागाईवर सकारात्मक भाष्य केलं, तर भारतीय रुपयालाही त्याचा फायदा होऊ शकेल. अमेरिकन डॉलरमध्ये आलेली शिथिलता आणि कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रित झाल्यामुळे सध्या भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत सावरत आहे. पण, भारत आणि अमेरिकेदरम्यानचा व्यापारी करार अजूनही अनिश्चित आहे. त्यातच डोनाल्ड ट्रंप यांनी भारतातून येणाऱ्या तांदळावर आयात शुल्क वाढवण्याची भाषा केली आहे. पण, आता १० डिसेंबरपासून दोन्ही देशांची शिष्टमंडळं या व्यापारी करारावर बोलण्यासाठी तीनदिवसीय बैठक घेणार आहेत. तिथे या करारावर तोडगा निघाला, तर रुपयाचा विनिमय दरही थोडाफार आटोक्यात येऊ शकेल. अशा सकारात्मक वातावरणात फेडरल बँकेकडून झालेली दर कपातही भारतासाठी फायद्याची असेल. ‘फेडरल रिझर्व्ह अमेरिकन व्याज दरात २५ अंशांची कपात करतील असा अंदाज आहे. याचा भारतीय रुपयाला नक्कीच फायदा होईल. कारण, एकतर भारतीय शेअर बाजार सुधारेल आणि अमेरिकेतील महागाई कमी झाली तर भारतीय मालासाठी तिथून येणारी मागणी वाढेल आणि भारताकडून होणारी आयात वाढली तर रुपयासाठी ते नक्कीच फायद्याचं ठरेल,’ असं आनंद राठी समुहातील अर्थतज्ज्ञ आणि कार्यकारी संचालक सुजन हजरा यांनी बोलून दाखवलं. अमेरिकेत व्याजदर कमी झाले तर तिथून भारतात येणारा पैसा वाढेल, असं यामागचं सरळसोपं गणित आहे. आणि त्यातून रुपया सुधारायला मदतच होणार आहे.(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)
महेश देशपांडेकच्च्या तेलाच्या आयातीसाठी भारताने अलीकडेच गयानाची वाट धरली. ही बातमी आंतरराष्ट्रीय व्यवहारांच्या दृष्टीने दखलपात्र ठरली. त्या पाठोपाठ पगाराच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असल्याची एक नोंद समोर आली. साखरेच्या उत्पादनात यंदा झालेली ४३ टक्क्यांची वाढ ही अशीच एक लक्षवेधी बातमी तर अमेरिकेच्या निर्बंधानंतरही स्मार्टफोनच्या निर्यातीत वाढ होणे, ही जणू सुखवार्ता ठरली.अर्थनगरीत सरत्या काळात चर्चा राहिली ती कच्च्या तेलाच्या आयातीसाठी भारताने धरलेल्या गयाना या नव्या देशाच्या वाटेची. त्या पाठोपाठ पगाराच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असल्याची एक नोंद समोर आली. साखरेच्या उत्पादनात यंदा झालेली ४३ टक्क्यांची वाढ ही अशीच एक लक्षवेधी बातमी तर अमेरिकेच्या निर्बंधानंतरही स्मार्टफोनच्या निर्यातीत वाढ होणे, ही जणू सुखवार्ता ठरली.अमेरिकेने रशियावर निर्बंध लादल्यापासून, भारताला अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारताला आता दूरच्या देशांकडून कच्चे तेल खरेदी करावे लागत आहे. ब्लूमबर्ग शिप-ट्रॅकिंग डेटानुसार, भारताने आता गयानामधून कच्चे तेल खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी भारतीय टँकरना अंदाजे ११ हजार मैल (१७,७०० किलोमीटर) अंतर प्रवास करावा लागतो. अहवालांनुसार, कोबाल्ट नोव्हा आणि ऑलिंपिक लायन या दोन मोठ्या कच्च्या तेलवाहू जहाजांनी नोव्हेंबरच्या अखेरीस दक्षिण अमेरिकेतील गयाना या देशातून प्रवास सुरू केला. प्रत्येकी अंदाजे २० दशलक्ष पिंप तेल घेऊन निघालेले हे टँकर जानेवारीमध्ये भारतात पोहोचणार आहेत. ट्रॅकिंग डेटावरून दिसून येते, की २०२१ नंतर गयानाहून भारतात येणारी कच्च्या तेलाची ही पहिलीच शिपमेंट आहे. त्या काळात १० दशलक्ष कच्चे तेल वाहून नेणारे दोन कार्गो निघाले. भारत दररोज अंदाजे १.७ दशलक्ष पिंप रशियन तेल आयात करतो; परंतु गेल्या महिन्यांमध्ये ‘रोझनेफ्ट पीजेएससी’ आणि ‘लुकोइल पीजेएससी’ या रशियाच्या दोन सर्वात मोठ्या निर्यातदारांवर अमेरिकेने निर्बंध लादल्याने भारतीय रिफायनर कंपन्यांमध्ये चिंता वाढली.यापूर्वी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीमुळे भारतावरील आयात शुल्क ५० टक्के केले होते. रशियाकडून तेल सवलतीत उपलब्ध होते. भारत हा जगातील कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा खरेदीदार आहे. भारताने गेल्या वर्षी रशियाकडून ५२.७ अब्ज डॉलर किमतीचे कच्चे तेल खरेदी केले होते. ते रशियाच्या एकूण निर्यातीच्या ३७ टक्के आहे. रशियाव्यतिरिक्त, भारत इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, नायजेरिया आणि युनायटेड स्टेटसमधूनदेखील कच्चे तेल आयात करतो. तथापि, भारताला रशियाकडून सवलतीच्या दराने कच्चे तेल मिळते. २०२२-२३ मध्ये भारताला रशियन तेलावर सरासरी १४.१ टक्के आणि २०२३-२४ मध्ये १०.४ टक्के सूट मिळाली. यामुळे भारताची अंदाजे पाच अब्ज डॉलरची बचत होते. गयानाच्या ‘गोल्डन ॲरोहेड क्रूड’चे मालवाहू ऑलिंपिक लायन हे जहाज भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील पारादीप येथे येत आहे. तिथे सरकारी मालकीची ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन’ तीन लाख पिंप कच्च्या तेलावर दररोज प्रक्रिया करते. या कंपनीने ऑक्टोबरमध्ये निविदा काढत ‘एक्सॉनमोबिल इंक.’कडून कच्चे तेल खरेदी केले. ‘लिझा’ आणि ‘युनिटी गोल्ड ग्रेड’चा मिश्र माल वाहून नेणारी कोबाल्ट नोव्हा मुंबई किंवा विशाखापट्टणम येथे उतरवण्याची शक्यता आहे. तिथे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा प्लांट आहे. कंपनीने डिसेंबरच्या अखेरीस आणि जानेवारीच्या सुरुवातीच्या काळात डिलिव्हरीसाठी या प्रत्येक ग्रेडचे दहा लाख पिंप कच्चे तेल खरेदी केले.‘आरपीजी ग्रुप’चे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी केलेल्या एका पोस्टमुळे ‘सोशल मीडिया’वर कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक कमाई होते आणि कुठे उत्पन्न कमी राहते, याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली. राज्यनिहाय सरासरी मासिक पगार मांडताना ते म्हणाले की, प्रत्येक भारतीयाचे, विशेषतः तळागाळातील लोकांचे उत्पन्न वाढले, तरच भारत समृद्ध होईल. गोएंका यांनी शेअर केलेल्या ‘फोर्ब्स ॲडव्हायझर इंडिया’च्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२५ पर्यंत भारताचे सरासरी मासिक उत्पन्न २८ हजारांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. तथापि, राज्यांचा विचार केल्यास सरासरी मासिक पगार ३५ हजार रुपयांसह देशाची राजधानी दिल्ली, यादीमध्ये अव्वल आहे. कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर असून तिथे सरासरी मासिक पगार ३३ हजार रुपये प्रति महिना आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक येतो. महाराष्ट्रात सरासरी ३२ हजार रुपये पगार आहे. तेलंगणाचा चौथा क्रमांक असून तिथे ३१ हजार रुपये पगार आहे. मुंबई आणि पुण्यातील व्यावसायिक क्रियाकलाप आणि हैदराबादमधील आयटी तेजी या राज्यांमध्ये सरासरी उत्पन्न वाढवत आहे. भारतातील सर्वात कमी सरासरी मासिक उत्पन्न बिहारमध्ये नोंदवले गेले आहे. ते उत्पन्न दरमहा फक्त १३ हजार पाचशे रुपये आहे. त्यानंतर अंदमान आणि निकोबार (१३ हजार) आहे. मर्यादित रोजगार, लघु उद्योग आणि या क्षेत्रातील कमी गुंतवणुकीमुळे लोकांचे सरासरी उत्पन्न इतर राज्यांपेक्षा कमी आहे. दक्षिण भारत रोजगार आणि उत्पन्न या दोन्हीमध्ये पुढे आहे. तामिळनाडूमध्ये सरासरी मासिक वेतन २९ हजार रुपये, आंध्र प्रदेशमध्ये २६ हजार रुपये, तर केरळमध्ये २४५०० रुपये आहे.आता आणखी एक दखलपात्र बातमी. ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या साखर हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये देशातील साखर उद्योगाने चांगली कामगिरी केली आहे. ताज्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये भारतातील साखर उत्पादनात ४३ टक्के वाढ झाली आहे. ‘इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ (इस्मा)नुसार, नोव्हेंबर अखेरपर्यंत देशातील साखर कारखान्यांनी एकूण ४१ लाख टन साखरेचे उत्पादन केले. गेल्या वर्षी याच काळात हा आकडा फक्त २८ लाख ऐंशी हजार टन होता. देशातील सर्वात मोठा साखर उत्पादक महाराष्ट्रातील उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट वाढून १७ लाख टनांवर पोहोचले आहे. उत्तर प्रदेशमधील कारखान्यांनीही चांगली कामगिरी केली आहे. तिथले उत्पादन नऊ टक्क्यांनी वाढून १४ लाख टन झाले आहे. ‘नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज’ (एनएफसीएसएफ) ने अहवाल दिला, की या वर्षी उसाची गुणवत्ता चांगली आहे. साखर उतारा गेल्या वर्षीच्या ८.२९ टक्क्यांवरून ८.५१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ही कारखान्यांसाठी तांत्रिकदृष्ट्या चांगली बातमी आहे. दरम्यान, ‘इस्मा’ने सरकारला देशांतर्गत बाजारात साखरेची किमान विक्री किंमत (फ्लोअर प्राईस) वाढवण्याची विनंती केली आहे. त्यांचा युक्तिवाद आहे, की गेल्या सहा वर्षांपासून ही किंमत स्थिर आहे, तर उत्पादन खर्च सतत वाढत आहेइथे एका खस बातमीची दखल घ्यायला हवी. जागतिक आव्हाने असूनही, ऑक्टोबरमध्ये भारतातून अमेरिकेला स्मार्टफोन निर्यात वाढली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निर्यातीच्या तुलनेत ती १.४७ अब्ज डॉलरवर पोहोचली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निर्यात ०.४६ अब्ज डॉलर होती. या आर्थिक वर्षात एप्रिल-ऑक्टोबर दरम्यान अमेरिकेला एकूण १०.७८ अब्ज डॉलरची स्मार्टफोन निर्यात झाली. ती गेल्या वर्षीच्या याच कालावधीमध्ये ३.६० अब्ज डॉलर होती. मासिक आधारावर शिपमेंट कमी होत होती; परंतु आता त्यात सुधारणा झाली आहे. एप्रिलमध्ये ती १.६५ अब्ज डॉलर तर मेमध्ये २.२९ अब्ज डॉलरची निर्यात होती; परंतु जूनमध्ये निर्यात १.९९ अब्ज डॉलर्स, जुलैमध्ये १.५२ अब्ज डॉलर्स, ऑगस्टमध्ये ०.९६ अब्ज डॉलर्स आणि सप्टेंबरमध्ये ०.८८ अब्ज डॉलर्सपर्यंत घसरली. एका अधिकाऱ्याने सांगितले, की टॅरिफशी संबंधित अनिश्चिततेमुळे मागणी आणि किंमतींवर दबाव असूनही, गती मजबूत राहिली आहे. अमेरिकेला होणारी ही निर्यात सकारात्मक वाढ नोंदवत आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ती ०.६६ अब्ज डॉलर्स, मे २०२४ मध्ये ०.७६ अब्ज डॉलर्स, गेल्या वर्षी जूनमध्ये ०.५९ अब्ज डॉलर्स, जुलै २०२४ मध्ये ०.४९ अब्ज डॉलर्स, ऑगस्ट २०२४ मध्ये ०.३९ अब्ज डॉलर्स आणि सप्टेंबर २०२४ मध्ये ०.२६ अब्ज डॉलर्स होती. एप्रिल-ऑक्टोबर २०२५ मध्ये भारताची जागतिक स्मार्टफोन निर्यात १०.६८ अब्ज डॉलर्सवरून १५.९५ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. ही वाढ ४९.३५ टक्के आहे. जागतिक बाजारपेठेत सातत्याने दोन अंकी वाढ दिसून आली आहे.
Satara Accident: साताऱ्यात दुर्दैवी घटना! बापाच्या डोळ्यादेखत ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
प्रभात वृत्तसेवा सातारा – सातारा एमआयडीसी परिसरात शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास दुचाकीला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. या अपघात शिवांश अमर चव्हाण(वय 3, रा. कारंडवाडी, मुळ रा. वर्णे, ता. सातारा) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमर चव्हाण हे पत्नी व शिवांश यांना घेउन गोव्याला फिरायला जाणार होते. याचे तिकिट बुक करण्यासाठी शनिवारी […] The post Satara Accident: साताऱ्यात दुर्दैवी घटना! बापाच्या डोळ्यादेखत ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १५ डिसेंबर २०२५
पंचांगआज मिती उद्या मार्गशीर्ष कृष्ण एकादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र चित्रा योग शोभन,चंद्र राशी वृषभ,भारतीय सौर २४ मार्गशीर्ष शके १९४७.सोमवार दिनांक १५ डिसेंबर २०२५ .मुंबईचा सूर्योदय ०७.०३ मुंबईचा सूर्यास्त ०६.०३, मुंबईचा चंद्रोदय ०३.४७ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०२.३३ , राहू काळ ०८.२६ ते ०९.४८,सफला एकादशी,हांनुका-ज्यू,शुभ दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : नवीन नियोजन करण्याचा विचार कराल.वृषभ : अपेक्षित यश मिळेल.मिथुन : जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल.कर्क : कार्यक्षेत्रात इतरांच्या मताला प्राधान्य द्या.सिंह : आरोग्य चांगले राहील.कन्या : सहकाऱ्यांवर विशेष अवलंबून राहू नका.तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.वृश्चिक : संमिश्र स्वरुपाचा दिवस आहे.धनू : चांगल्या बातम्या कानावर पडतील.मकर : आरोग्य सांभाळा.कुंभ : कुटुंबात आनंदी वातावरण राहील.मीन : खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील.
Satara News: नितीन गडकरींच्या भेटीला आमदार मनोज घोरपडे; सोबत नेले साताऱ्याचे ‘हे’खास गिफ्ट
प्रभात वृत्तसेवा कराड – केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी आ. मनोज घोरपडे यांनी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी उंब्रज येथील महामार्गाचा उड्डाणपूल मंजूर केल्याबद्दल सुप्रसिद्ध सातारी कंदी पेढे देऊन त्यांचे आभार मानले.पुणे-बंगळूरू महामार्गावर उंब्रज येथे भराव पुलाऐवजी पारदर्शक पुलाची मागणी सातत्याने जोर धरत होती. पावसाळी अधिवेशनामध्ये आ. मनोज […] The post Satara News: नितीन गडकरींच्या भेटीला आमदार मनोज घोरपडे; सोबत नेले साताऱ्याचे ‘हे’ खास गिफ्ट appeared first on Dainik Prabhat .
Sharad Pawar: राजकारणातील ‘भीष्माचार्य’! साताऱ्यातून शरद पवारांबद्दल गौरवद्गार, वाचा सविस्तर
प्रभात वृत्तसेवा सातारा – देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष पद्मभूषण खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी भवनात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुवर्णादेवी पाटील, प्रदेश सरचिटणीस नरेश देसाई, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, गोरखनाथ नलावडे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष […] The post Sharad Pawar: राजकारणातील ‘भीष्माचार्य’! साताऱ्यातून शरद पवारांबद्दल गौरवद्गार, वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .
ग्राहक संरक्षण कायद्यात बदल करण्याची ग्राहक पंचायतची मागणी
मुंबई : देशातील ग्राहक न्यायालयांमध्ये सध्या साडेपाय लाखांहून अधिक तक्रारी प्रलंबित आहेत. सुनावणीदरम्यान वारंवार 'तारीख पे तारीख' मिळत असल्याने ग्राहकांना न्यायासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्राहक संरक्षण कायदा तसेच ग्राहक न्यायालयांच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, मुंबई प्राहक पंचायत आगि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केंद्र सरकारकडे केली आहे. मुंबईतील विलेपार्ले येथील 'ग्राहक भवन' येथे झालेल्या दिवसभराच्या विचारमंथनात या तिन्ही संस्थांच्या ज्येष्ठ प्रतिनिधींनी संभाव्य दुरुस्त्यांवर सविस्तर चर्चा केली. ग्राहक न्यायालयांच्या आर्थिक कार्यकक्षेसठी सध्या असलेला मोबदला हा निकष रद्द करून, तक्रारीचे एकूण मूल्य आणि मागितलेली भरपाई यावर आधारित कार्यकक्षा ठरवावी, अशी मागणी केली. तक्रार निवारण प्रक्रियेत प्रत्येक टप्यावर कड़क कालमर्यादा लागू करून १० दिवसांत न्याय देण्याची मागणीही करण्यात आली.वकिलांच्या उपस्थितीमुळे सुनावणीत विलंब होत असल्याने ग्राहक न्यायालयांतील त्यांचा प्रवेश मर्यादित किंवा नियमनबद्ध करण्यासाठी कठोर नियमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. याशिवाय तक्रार दाखल करण्यापूर्वी मध्यस्थीची कायदेशीर तरतूद, ग्राहक संस्थांना आयोगांमध्ये प्रतिनिधित्व देणे आणि ग्राहक न्यायालयांच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण या मुदघांवरही एकमत झाले. या बैठकीस डॉ. विजय लाड, अॅड. शिरीष देशपांडे, सूर्यकांत पाठक, अरुण बाघमारे, विजय सागर, अॅड. सुरेंद्र सोनवणे उपस्थित होते.व्यापारी कंपन्यांच्या विमा तक्रारींमुळे ताणपाच कोटी रुपयांपर्यंतच्या तक्रारी जिल्हा आयोगाकडे, पाच ते दहा कोटी रुपयांपर्यंतच्या तक्रारी राज्य आयोगाकडे आाणि दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या तक्रारी राष्ट्रीय आयोगाकडे दाखल करण्याची सुधारणा करण्यात आली. व्यापारी कंपन्यांच्या विमा तक्रारींमुळे ग्राहक न्यायालयांवरील ताण वाढत असल्याने अशा तक्रारी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवाव्यात. मात्र, वैयक्तिक ग्राहकांच्या विमा तक्रारींवर कोणताही परिणाम होऊ नये, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली.
नवीन कामगार कायद्यांमुळे वेतन कमी होणार नाही; केंद्राचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : देशात नवीन कामगार कायदे लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होईल, अशी चिंता सध्या व्यक्त केली जात आहे. यादरम्यान कामगार मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. जोपर्यंत भविष्य निर्वाह निधीची कपात ही १५ हजार रुपयांच्या निश्चित वेतन मर्यादेनुसार होत राहील, तेपर्यंत हातात येणारा पगार कमी होणार नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जर पीएफमधील कपात कायद्याने निश्चित केलेल्या वेतन मर्यादेनुसार झाली तर नवीन कामगार संहितेमुळे हातात येणारे वेतन कमी होणार नाही. पीएफमधील कपात ही १५ हजार रुपयांच्या वेतन मर्यादेनुसार होते आणि या मर्यादेच्या पुढील योगदान हे स्वेच्छिक आहे, अनिवार्य नाही. कामगार संहितेबद्दल २१ नोव्हेंबर २०२५ रोजी माहिती देण्यात आली तेव्हापासून अनेक कर्मचारी त्यांचे हातात येणारे वेतन कमी होईल अशी भीती व्यक्त करत होते. नवीन नियमांनुसार मूळ वेतन आणि संबंधित घटक हे एकूण वेतनाच्या ५० टक्के असावेत असे सांगतो, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये ही भीती निर्माण झाली होती. अनेकांना वाटले की यामुळे त्यांचे पीएफ मधील योगदान अपोआप वाढेल आणि यामुळे त्यांना हातात मिळणारे वेतन कमी होईल. मात्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, हा निष्कर्ष चुकीचा आहे. नेमकं पीएफ कसा मोजला जातो यामध्ये याचे गूढ दडले आहे. नवीन व्याख्येखाली जरी कामागाराचे मूळ वेतन वाढले जरी असेल तरी, पीएफ मात्र १५ हजार रुपयांच्या निश्चित वेतन मर्यादेनुसारच मोजला जाईल.एखादी कंपनी आणि कामगार हे जोपर्यंत जास्तीचे पीएफ योगदान देण्याचा पर्याय निवडत नाहीत तोपर्यंत हे बदलणार नाही. म्हणजेच बहुतांश पगारदार कर्मचारी ज्यांच्या पीएफची कमाल मर्यादा निश्चित आहे, त्यांच्या मासिक वेतनातून होणारी कपात बदलणार नाही. या सर्व प्रकार समजावून देण्यासाठी मंत्रालयाने एक उदाहरण दिले आहे. एखादा कर्मचारी ६० हजार रुपये महिना कमावतो तर मूळ वेतन + डीए = २० हजार रुपये, भत्ते = ४० हजार रुपये असे असले तरी पीएफ हा १५ हजार रुपयांवरच कापला जाईल, पूर्ण मूळ वेतनावर नाही.
धरमशाला टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत घेतली आघाडी
धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला येथे झालेला सामना भारताने सात विकेट राखून जिंकला. या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ११७ धावांत गुंडाळला. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने १५.५ षटकांत तीन बाद १२० धावा केल्या आणि सामना जिंकला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर रीझा हेंड्रिक्स (शून्य धावा) आणि एडन मर्कराम (६१ धावा) या दोघांना बाद करणारा अर्शदीप सिंग सामनावीर झाला.प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत सर्वबाद ११७ धावा केल्या. क्विंटन डी कॉकने एक, रीझा हेंड्रिक्सने शून्य, एडन मर्करामने ६१, डेवॉल्ड ब्रेव्हिसने दोन, ट्रिस्टन स्टब्सने नऊ, कॉर्बिन बॉशने चार, डोनोव्हन फरेराने २०, मार्को जॅनसेनने दोन, अँरिक नॉर्टजेने १२, लुंगी न्गिडीने नाबाद दोन, ओटनील बार्टमनने एक धावांचे योगदान दिले. भारताकडून वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा या चौघांनी प्रत्येकी दोन तर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारताकडून अभिषेक शर्माने ३५, शुभमन गिलने २८, तिलक वर्माने नाबाद २५, सूर्यकुमार यादवने १२, शिवम दुबेने नाबाद १० धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉश, लुंगी न्गिडी आणि मार्को जॅनसेनने प्रत्येकी एक विकेट घेतली.भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कटकचा टी ट्वेंटी सामना १०१ धावांनी आणि धरमशाला येथील टी ट्वेंटी सामना सात विकेट राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेने चंदिगड येथील टी ट्वेंटी सामना ५१ धावांनी जिंकला. आता लखनऊ आणि अहमदाबाद येथे प्रत्येकी एक टी ट्वेंटी सामना होणार आहे. या दोन सामन्यांत काय होते याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.चौथा टी ट्वेंटी सामना - लखनऊ - १७ डिसेंबर २०२५पाचवा टी ट्वेंटी सामना - अहमदाबाद - १९ डिसेंबर २०२५हार्दिक पांड्याची ऐतिहासिक कामगिरीहार्दिक पांड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात खेळताना ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये १०० विकेट घेतल्या. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एक हजार धावा आणि १०० विकेट अशा दोन्ही कामगिरी करणारा जगातील पहिला गोलंदाज आणि अष्टपैलू क्रिकेटपटू होण्याचा मान हार्दिक पांड्याने पटकावला. ट्रिस्टन स्टब्सची विकेट घेत हार्दिकने १०० विकेट टप्पा गाठला. याआधी अर्शदीप आणि जसप्रीत बुमराह यांनी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये विकेटचे शतक साजरे केले आहे.टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाजअर्शदीप सिंग १०८ विकेटजसप्रीत बुमराह १०१ विकेटहार्दिक पांड्या १०० विकेट
IND vs SA India beat South Africa by 7 Wickets 3rd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना रविवार धर्मशाला येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ७ विकेट्सनी एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. या सामन्यात सर्व भारतीय गोलंदाजांनी […] The post IND vs SA : तिसऱ्या सामन्यात भारताची एकतर्फी सरशी! गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर द. आफ्रिकेच्या फलंदाजांची शरणागती appeared first on Dainik Prabhat .
Ashish Shelar : “प्रगत व विकसित महाराष्ट्र घडविणार”–आशिष शेलार
Ashish Shelar – राज्यात सुशासन, पारदर्शक प्रशासन आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिक केंद्री सेवा अधिक बळकट करण्यात येत आहेत. तंत्रज्ञानाच्या आधारावर पारदर्शक, उत्तरदायी आणि नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारा ‘प्रगत व विकसित महाराष्ट्र’ घडविणार असल्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य श्रीकांत भारतीय यांनी प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या […] The post Ashish Shelar : “प्रगत व विकसित महाराष्ट्र घडविणार” – आशिष शेलार appeared first on Dainik Prabhat .
Lionel Messi visit Mumbai and meet Sachin Tendulkar : अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर असून, दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी त्याने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला भेट दिली. येथील वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मेस्सी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. […] The post Lionel Messi : फुटबॉलचा राजा मेस्सीच्या हस्ते मुंबईत ‘प्रोजेक्ट महादेव’चे भव्य उद्घाटन! सचिनकडून खास जर्सी भेट appeared first on Dainik Prabhat .
Election News : महापालिका निवडणुकांचे लवकरच बिगुल.! मुंबईत 46 अधिकाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती
मुंबई – राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. या निवडणुकीचा दुसरा टप्पा येत्या 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या दोन्ही टप्प्यातील मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पहिल्या टप्प्यातील मतमोजणीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. विशेष म्हणजे, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पूर्ण होण्यापूर्वीच […] The post Election News : महापालिका निवडणुकांचे लवकरच बिगुल.! मुंबईत 46 अधिकाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती appeared first on Dainik Prabhat .
IND vs SA : अर्शदीप सिंगचा मोठा धमाका! भुवनेश्वरला मागे टाकत मलिंगाचा मोडला खास विक्रम
Arshdeep Singh broke Bhuvneshwar and Maling Record : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्याच्या टी-२० मालिकेतील तिसरा धर्मशाला येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला ११७ धावांत गारद केले. या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने दोन विकेट्स घेत दोन मोठे विक्रम आपल्या नावावर केले. या दरम्यान त्याने भुवनेश्वर […] The post IND vs SA : अर्शदीप सिंगचा मोठा धमाका! भुवनेश्वरला मागे टाकत मलिंगाचा मोडला खास विक्रम appeared first on Dainik Prabhat .
Hindu temple collapsed : दक्षिण आफ्रिकेतील चार मजली हिंदू मंदिर कोसळले, ४ जण ठार
जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेतील चार मजली हिंदू मंदिर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये ५२ वर्षीय भारतीय वंशाच्या एका व्यक्तीबरोबर एकूण चौघाजणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतल क्वा झुलू नताल प्रांतात ही दुर्घटना झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पूर्वी डर्बन नावाने ओळखले जात असलेल्या एथेकविनीच्या उत्तरेकडील रेडक्लिफ येथील एका उंच टेकडीवर वसलेल्या न्यू अहोबिलम संरक्षण मंदिराचा विस्तार केला जात असताना, […] The post Hindu temple collapsed : दक्षिण आफ्रिकेतील चार मजली हिंदू मंदिर कोसळले, ४ जण ठार appeared first on Dainik Prabhat .
फुटबॉलच्या २०३४च्या विश्वचषकासाठी 'प्रोजेक्ट महादेवा'मधून गुणवान खेळाडू मिळतील : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा'चा शुभारंभमहाराष्ट्रातून निवडलेल्या १३ वर्षाखालील ६० बालफुटबॉलपटूंना विशेष प्रशिक्षण शिबिर व मार्गदर्शनमुंबई : मिशन ऑलिम्पिक २०२६ अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळवणे आणि २०३४ पर्यंत फुटबॉल विश्वचषकासाठी तयारीचे लक्ष्य ठेवून 'प्रोजेक्ट महादेवा' राबवण्यात येत आहे.या प्रोजेक्टमधून नक्कीच गुणवान खेळाडू मिळतीलअशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनातर्फे 'प्रोजेक्ट महादेवा' या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचा शुभारंभ आज वानखेडे स्टेडियम येथे करण्यात आला. 'प्रोजेक्ट महादेवा' हा उपक्रम महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA), सिडको (CIDCO) आणि महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग या विविध संस्थांच्या विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी, अर्जेंटीनचे माजी खेळाडू लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डिपॉल, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, खासदार प्रफुल्ल पटेल, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतीय लोकप्रिय फुटबॉलपटू सुनील छेत्री, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार राहुल भेके, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्राचे)चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, श्रीमती अमृता देवेंद्र फडणवीस, गोट टूर प्रमोटर सत्तादूर दत्ता, टायगर श्रॉफ, अजय देवगण, कार्तिक आर्यन, दिनों मोरिया, जिंदाल ग्रुपच्या पार्थ जिंदल, वेदना जिंदल यांनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'प्रोजेक्ट महादेवा ' हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा उपक्रम आहे, जो संपूर्ण राज्यात तरुण फुटबॉल मधील प्रतिभेचा (१३ वर्षांखालील) शोध घेवून फुटबॉल मधील उच्च दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती, परदेशी प्रशिक्षकांकडून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि सर्वांगीण विकासाची संधी दिली जाणार आहे. निवडलेल्या ६० खेळाडूंची (३० मुले, ३० मुली) पाच वर्षांची संपूर्ण निवासी शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच अव्वल खेळाडू नक्कीच फिफा विश्वचषक मध्ये खेळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवाय आपण मोठे होऊ शकत नाही: सचिन तेंडुलकरभारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणाले की, जागतिक फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि त्यांचे सहकारी भारतात आल्याबद्दल आणि तेही मुंबईत आल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार मानतो.मुंबईकरांनी ज्या प्रकारे या तिघांचे स्वागत केले ते अत्यंत अविस्मरणीय आहे. मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे आजचा क्षण हा अत्यंत अविस्मरणीय आहे. प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवाय आपण मोठे होऊ शकत नाही. आज मला वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सन २०११ च्या क्रिकेटच्या विश्वचषकाची आठवण झाली. आजचा क्षण हा सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. खेळामध्ये खेळाडूंना चिकाटी जिद्द अत्यंत महत्त्वाचे आहे लिओनेल मेस्सी जागतिक दर्जाचा खेळाडू असून त्याच्यामध्ये संवेदनशीलता त्याच प्रकारे त्यांनी या खेळाडूला दिलेल्या उत्तेजन अत्यंत महत्त्वाचे आहे याबद्दल मी मेसेज आभार मानतो आणि मेसीला व त्याच्या कुटुंबांना आरोग्यमय शुभेच्छा देतो.लिओनोल मेस्सी या नावाचा वानखेडे स्टेडियमवर जल्लोषजागतिक फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने फुटबॉल प्रेमींना फुटबॉल प्रेक्षकांकडे भिरकवताच प्रेक्षकांनी लिओनोल मेस्सी या नावाचा जल्लोष केला. संपूर्ण मैदान मेस्सीच्या नावाने दुमदुमत होते. या वेळेला जागतिक फुटबॉलपटू लिओनल मेस्सीला सचिन तेंडुलकर यांच्या नावाची दहा नंबरची जर्सी सचिन तेंडुलकर यांनी भेट केली. जागतिक फुटबॉलपटू लिओनाल मेस्सीनेही सचिन तेंडुलकर याला फुटबॉल भेट दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागतिक फुटबॉलपटू लिओनोल मेस्सी यांनी जर्सी भेट दिली. पार्थ जिंदाल, वेदना जिंदाल यांनी जिंदाल ग्रुपतर्फे व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन मार्फत ७५ लाख रुपयांचा चेक प्रोजेक्ट महादेवाला दिला. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी तर्फे व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन मार्फत ९९ लाख ९९ हजार रुपयांचा धनादेश प्रोजेक्ट महादेवाला दिला.सक्षम आणि शाश्वत फुटबॉल विकास व्यवस्था उभी राहणार'प्रोजेक्ट महादेवा' हा उपक्रम महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA), सिडको (CIDCO) आणि महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग या विविध संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे धोरणात्मक दिशा, तळागाळातील सहभाग, व्यावसायिक फुटबॉल कौशल्य, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय पाठबळ मिळून राज्यात एक सक्षम आणि शाश्वत फुटबॉल विकास व्यवस्था उभी राहणार आहे.प्रोजेक्ट महादेवा हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रमप्रोजेक्ट महादेवा हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, जो संपूर्ण राज्यात तरुण फुटबॉल प्रतिभेचा (१३ वर्षांखालील) शोध घेण्यासाठी आणि त्यांना विकसित करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत शिष्यवृत्ती, परदेशी प्रशिक्षकांकडून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि सर्वांगीण विकासाची संधी दिली जाणार आहे. निवडलेल्या ६० खेळाडूंची (३० मुले, ३० मुली) पाच वर्षांसाठी संपूर्ण निवासी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
नोटबंदीच्या ९ वर्षांनंतर दिल्लीत ३ कोटींच्या जुन्या नोटा जप्त
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या नऊ वर्षांनंतरही, दिल्लीत ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. दोन कारमध्ये एकूण ३.६० कोटी रुपये सापडले. उत्तर दिल्लीच्या वजीरपूर परिसरात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान, आरोपींनी सांगितले की, तरुण आणि आशीष नावाच्या दोन तरुणांनी कमिशनचे आमिष दाखवून या नोटा पाठवल्या होत्या. पोलीस आता या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या चार जणांची ओळख हर्ष, टेकचंद ठाकूर, लक्ष्य आणि विपिन कुमार अशी आहे. चौकशीत त्यांनी हे नोटांचे बंडल नोएड्यातील तरुण आणि आशीष नावाच्या दोन व्यक्तींनी दिल्याचे सांगितले. पोलीस आता या दोघांच्या शोधात आहे. अटक केलेल्या आरोपींनी चौकशीत कबूल केले की त्यांनी लोकांना कमी किमतीत जुन्या नोटांचे बंडल देण्याचे आमिष दाखवले होते. 'आधार कार्ड दाखवले तर आरबीआय या नोटा पुन्हा बदलून देईल, असे ते सांगत होते. २०१६ नंतर जुन्या नोटा बदलण्याची मुदत संपली असल्याचे सर्वांना माहीत असूनही या टोळीने लोकांची दिशाभूल केल्याचे डीसीपी भीष्म सिंह यांनी सांगितले. आरोपी २०२१ पासून अशा प्रकारच्या व्यवहारात गुंतलेले होते.
महापालिका शाळांमध्ये श्रीमद् भगवत गीता पठण करण्याची भाजपची मागणी
माजी नगरसेविका योगिता कोळी यांनी सभागृहातील ठरावाचे स्मरण करत आयुक्तांना दिले पत्रमुंबई (विशेष प्रतिनिधी) :श्रीमद् भगवत गीता हा विश्वाला शांत आणि संयमाने, तसेच मन व चित्त शांत ठेवणे तसेच खरे आणि खोटे यातील फरक शिकवणारा प्राचिन हिंदूचा पवित्र ग्रंथ आहे. या गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते,म्हणून गीतेला मोक्षशास्त्र म्हटले गेलेले आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमधून भगवत गीता पठन केले जावे. अशी भाजपच्या मालाडमधील माजी नगरसेविका योगिता सुनील कोळी यांनी महापालिका आयुक्त यांच्या कडे सूचना करून याची अंमलबजावी करण्याची मागणी केली आहे.भाजपच्या माजी नगरसेविका योगिता कोळी यांनी महापालिका शाळेत श्रीमत् भगवत गीता पठण करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका असताना महापालिका सभागृहात ठरावाच्या सुचेनाद्वारे केली होती. महापालिका संपुष्टात येण्यापूर्वी सभागृहात मांडलेली ठरावाची सूचना मंजूर करून महापौरांनी आयुक्तांकडे पुढील अंमलबजावणीसाठी पाठवली होती. पण पुढे प्रशासक नियुक्त झाल्याने याच्या अंमलबजावणीकडे शिक्षण विभाग आणि प्रशासक यांनी दुर्लक्ष केला. त्यामुळे कोळी यांनी २०२३ मध्ये तत्कालीन उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना निवेदन देत त्यांच्या मार्फत प्रशासनाला निर्देश देण्यासंदर्भात स्मरणपत्र दिले होते. पण त्यानंतरही याची अंमलबजावणी महापालिका शाळेत न झाल्याने पुन्हा एकदा योगिता कोळी यांनी महापालिका तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांना निवेदन दिले आहे.या निवेदनात कोळी यांनी असे म्हटले आहे की, श्रीमद् भगवत् गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातील ग्रंथांपैकी अतिशय तत्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ आहे. महाभारतातील महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरुपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते.अशा प्रकारची ठरावाची सूचना १७ फेब्रुवारी २०२२ रोजी मांडली गेली होती. ही सूचना महापालिका सभागृहाने मंजूर करून ठराव केला होता. परंतु पुढे महापालिका संपुष्टात आली, त्यामुळे याबाबत पुढील कार्यवाही काहीही होवू शकलेली नाही. किंबहुना ही मागणी दुर्लक्षित झाली. तसेच त्यानंतर ९ मार्च २०२३ रोजी तत्कालिन उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री मंगल प्रभात लोढाजी यांना महापालिका शाळांमध्ये भगवत गीता पठन करण्यासंदर्भात पत्र सादर करण्यात आले होते. त्याबाबतचे पत्र महापालिका आयुक्त तथा प्रशासक म्हणून आपल्याला तत्कालिन सभागृहाने केलेल्या ठरावानुसार याची अंमलबजावणी करण्यासाठी पाठवले होते.मुंबई महापालिकेत नगरसेवक नसल्याने महापौर नाहीत. परंतु महापालिकेत महापौर तसेच वैधानिक समित्यांचे अध्यक्ष यांचे अधिकार आपल्याला बहाल झालेले आहे. त्यामुळे प्रशासक म्हणून आपण सर्व प्रकारचे प्रस्ताव तसेच धोरणात्मक मंजूरी देत असल्याने सभागृहामध्ये मांडलेल्या ठरावाच्या या संदर्भातील सूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा एकदा स्मरणपत्र दिले असल्याचे योगिता कोळी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. महापालिका सभागृहाच्या ठरावानुसार महापालिकेच्या सर्व शाळांमधून भगवत गीता पठन करण्याच्या सूचना आपण शिक्षण विभागाला देवून याची त्वरीत अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी पुन्हा लावून धरली आहे.
वाल्मिक कराड गँगची बाहेरच नाही तर कारागृहातही दादागिरी; पोलिसालाच दिली जीवे मारण्याची धमकी
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांच्या टोळक्याचा माज जिल्हा कारागृहातही कायम असल्याचे समोर येत आहे. कारागृहातील एका कर्मचाऱ्याला या आरोपींकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. बाबा कवठे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, कराड गँगची कारागृहात दादागिरी सुरू असल्याचा आरोप होत आहे. […] The post वाल्मिक कराड गँगची बाहेरच नाही तर कारागृहातही दादागिरी; पोलिसालाच दिली जीवे मारण्याची धमकी appeared first on Dainik Prabhat .
पुणे शहर पोलिस आयुक्तालयाची मोठी पुनर्रचना; 2 नवीन परिमंडळे, 5 पोलिस ठाणी आणि 830 पदांना मंजुरी
पुणे : शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पुणे शहर पोलिस आयुक्तालयात मोठी प्रशासकीय फेररचना करण्यात येणार आहे. याअंतर्गत दोन नवीन परिमंडळे आणि पाच नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीस राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पोलिस प्रशासन अधिक सक्षम व गतिमान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य सरकारचा निर्णय पुणे शहर पोलिस […] The post पुणे शहर पोलिस आयुक्तालयाची मोठी पुनर्रचना; 2 नवीन परिमंडळे, 5 पोलिस ठाणी आणि 830 पदांना मंजुरी appeared first on Dainik Prabhat .
मॉस्को – युरोपातल्या देशांमध्ये असलेल्या रशियाची मालमत्ता गोठवण्याचा निर्णय युरोपीय संघाने घेतला आहे. मात्र या निणर्यावरून रशियाने जोरदार थयथयाट केला आहे. ही मालमत्ता गोठवणे म्हणजे युक्रेनबरोबरच्या शांतता प्रक्रियेला लक्ष्य करण्याची कृती असल्याचे रशियाने म्हटले आहे. यामुळे युक्रेन प्रश्नावर तोडगा शोधण्याऐवजी ही समस्या अधिकच चिघळू शकेल. जर युरोपीय संघाने रशियाची मालमत्ता गोठवली, तर रशिया काही तासातच […] The post russia ukraine war : रशियाची मालमत्ता गोठवणे युक्रेनच्या हिताचे नाही.! रशियाने युरोपीय संघाला सुनावले appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्लीतील सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; सीबीआयची मोठी कारवाई !
नवी दिल्ली – ऑनलाइन गुंतवणूक, कर्ज आणि नोकरीचे आमिष दाखवून देशभरातील हजारो नागरिकांची फसवणूक करणा-या एका मोठ्या आणि संघटित सायबर फ्रॉड नेटवर्कचा केंद्रीय तपास ब्यूरो (सीबीआय) ने पर्दाफाश केला आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून देश-विदेशात १००० कोटींपेक्षा अधिक रकमेची हेराफेरी झाल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात सीबीआयने १७ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले असून त्यात ४ […] The post नवी दिल्लीतील सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; सीबीआयची मोठी कारवाई ! appeared first on Dainik Prabhat .

30 C