Pune Weather: जिल्ह्यातील थंडीचा जोर ओसरला; शहर, उपनगरांतील तापमान एक ते दोन अंशाने वाढले
प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून थंडीच्या लाटेने भरलेली हुडहुडी गेल्या २४ तासात थोडी कमी झाली आहे. किमान तापमानात एक ते दोन अंशाने घट झाल्यामुळे ७ अंशांच्या खाली गेलेले किमान तापमान आज ९ अंशाच्या पुढे नोंदविले आहे. शहराच्या पूर्व भागासह जिल्ह्यात काही ठिकाणी किमान तापमान १३ ते १४ अंशांच्या पुढे गेल्यामुळे थंडीचा कडाका […] The post Pune Weather: जिल्ह्यातील थंडीचा जोर ओसरला; शहर, उपनगरांतील तापमान एक ते दोन अंशाने वाढले appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – टाकळी भीमा (ता. शिरूर) येथील बाळोबाचीवाडी परिसरात ऊसतोड सुरू असताना सापडलेल्या दोन बिबट्यांच्या बछड्यांचे त्यांच्या आईशी यशस्वी पुनर्मिलन घडवून आणण्यात वनविभागाला यश आले आहे. वनविभाग आणि प्राणीमित्रांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांनंतर मादी बिबट्याने आपल्या दोन्ही पिल्लांना सुरक्षित ठिकाणी नेल्याचा सर्व प्रकार वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बछड्यांना एका जाळीदार टोपलीखाली ठेवण्यात […] The post Leopard rescue: टाकळीत बिबट्याच्या बछड्यांना मिळाली आई; बिबट मादीने दोन्ही पिल्लांना हलविले सुरक्षित स्थळी appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा लोणीकंद – 1 जानेवारी 2026 रोजी मौजे पेरणे येथे होणार्या विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यासाठी येणार्या लक्षावधी अनुयायांना सुरक्षितता पुरविण्याच्या पार्श्वभूमीवर आज पुणे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार तसेच महाराष्ट्र राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांचे सह अन्य वरिष्ठ अधिकार्यांनी विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. यावेळी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून […] The post Shaurya Din 2026: अफवांवर विश्वास ठेवू नका, निर्धास्त या! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे अनुयायांना आवाहन appeared first on Dainik Prabhat .
भीमाशंकर-राजगुरुनगर महामार्गाला शेतकऱ्यांचा रेड सिग्नल; समृद्धीसारखा मोबदला मिळेपर्यंत काम बंद?
प्रभात वृत्तसेवा राजगुरूनगर – पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ते राजगुरुनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 हा नव्याने ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर विकसित करण्यात येणार असून, त्याचा मान्यताप्राप्त आराखडा तयार करण्यात आला आहे. या महामार्गासाठी बाधित होणार्या गावांतील खातेदार शेतकर्यांच्या सातबार्यावर नोंदी घेण्याबाबत भूसंपादन कायद्यातील कलम 3ड नुसार अधिसूचना भारत सरकारच्या राजपत्रात दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजी […] The post भीमाशंकर-राजगुरुनगर महामार्गाला शेतकऱ्यांचा रेड सिग्नल; समृद्धीसारखा मोबदला मिळेपर्यंत काम बंद? appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा भवानीनगर – श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर भवानीनगर परिसरात रस्ता अत्यंत खराब झाल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडत आहेत. या धुळीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे व घशाचे विकार जाणवू लागले असून अनेक नागरिक आजारी पडत असल्याने तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे. भवानीनगर येथील नीरा डावा कालवा पुलाच्या खालील बाजूस संपूर्ण […] The post Bhavaninagar News: धुळीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात; पालखी महामार्गाचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा वाघोली – चंदननगर पोलिसांच्या अभिलेखावरील सराईतास पकडण्यासाठी गेलेल्या पथकातील पोलिसांवर गोळीबार केल्याने पोलिसांनी प्रत्युत्तरातसराईतावर गोळीबार गेल्याने तो जखमी झाल्याची घटना खराडी-आव्हाळवाडी रोड येथे शनिवारी (दि. 20) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार दिलीप भंडारी (वय 26, रा. चंदननगर) असे गुन्हा दाखल करण्यात […] The post Wagholi Shootout: सराईताला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार! पोलिसांच्या प्रत्युत्तरात गुन्हेगार जखमी appeared first on Dainik Prabhat .
Mulshi Crime: एकटक पाहणे अन् अश्लील शेरेबाजी..अँम्बीव्हॅली परिसरात महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार
प्रभात वृत्तसेवा पौड – मुळशी तालुक्यातील अँम्बी व्हॅली सिटी परिसरात एका महिलेस अश्लील शब्दांनी अपमानित करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी भरतकुमार ए. जैन (रा. फ्लॅट क्र. 601, सहावा मजला, प्लॉट क्र. 326, देवरे हाऊस, भवानी शंकर रोड, कबुतरखाना, दादर पश्चिम, मुंबई) याच्याविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी […] The post Mulshi Crime: एकटक पाहणे अन् अश्लील शेरेबाजी..अँम्बीव्हॅली परिसरात महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार appeared first on Dainik Prabhat .
सावधान! बिबट्याचे ‘ते’फोटो शेअर करणे पडणार महागात; थेट ३ वर्षांची जेल आणि १ लाखाचा दंड?
प्रभात वृत्तसेवा आळंदी – जुन्नर वनविभागांतर्गत येणार्या चाकण परिसरात सध्या मानव-बिबट संघर्ष तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर काही समाजकंटकांकडून ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून बिबट्याचे बनावट फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. अशा अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, खोटी माहिती पसरवणार्यांविरुद्ध आता थेट गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याचा इशारा चाकण वनपरिक्षेत्र कार्यालयाने […] The post सावधान! बिबट्याचे ‘ते’ फोटो शेअर करणे पडणार महागात; थेट ३ वर्षांची जेल आणि १ लाखाचा दंड? appeared first on Dainik Prabhat .
इंदापूरच्या विकासाचं नवं पर्व! नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच भरत शहांनी केली मोठी घोषणा
प्रभात वृत्तसेवा इंदापूर – इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भरत शहा यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारताच शहराच्या राजकारणात आणि विकासाच्या वाटचालीत नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमास इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना भरत शहा […] The post इंदापूरच्या विकासाचं नवं पर्व! नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच भरत शहांनी केली मोठी घोषणा appeared first on Dainik Prabhat .
Rajgurunagar Crime: यमाई मंदिरात चोरीप्रकरणी अट्टल चोरट्यास ३ वर्षे सश्रम कारावास
प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – कनेरसर (ता. खेड) येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री यमाई देवी मंदिरातील चोरीप्रकरणी दोषी ठरलेल्या अट्टल चोरट्यास तीन वर्षे सश्रम कारावास आणि 3,000 रुपये दंड अशी शिक्षा राजगुरुनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. उतकर यांनी सुनावली आहे. दंड न भरल्यास अधिक 15 दिवसांची कैद भोगावी लागणार आहे. विनायक दामू जिते (वय 32, […] The post Rajgurunagar Crime: यमाई मंदिरात चोरीप्रकरणी अट्टल चोरट्यास ३ वर्षे सश्रम कारावास appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: आचारसंहितेपूर्वी मंजूर २५० कोटींच्या कामांची आयोगाकडे तक्रार
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही तास आधी प्रशासकांनी मंजूर केलेल्या २५० कोटी रुपयांची कामे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. या कामांबाबत राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करून अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, या प्रकरणी गंभीर दखल घेत कारवाईची मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते सूर्यकांत […] The post PCMC Election: आचारसंहितेपूर्वी मंजूर २५० कोटींच्या कामांची आयोगाकडे तक्रार appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे दुचाकी वाहनांसाठी एनए ही नवीन नोंदणी क्रमांक मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे.नव्याने सुरू होणाऱ्या दुचाकी एनए मालिकेतील दुचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्याकरिता दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.30 या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारण्यात येतील. सदर अर्ज प्रादेशिक […] The post PCMC News: एकदा नंबर घेतला की बदलता येणार नाही; फॅन्सी नंबरच्या शर्यतीत उतरण्यापूर्वी हे नियम नक्की वाचा appeared first on Dainik Prabhat .
Cyber Crime: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली लुटले ५५ लाख; २८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – बनावट शेअर ट्रेडिंग वेबसाइट व व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ५५ लाख ८२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी २८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निगडी येथे घडली.या प्रकरणातील पोलिसांनी विविध मोबाइल क्रमांकधारक व बनावट बँक खातेदार अशा एकूण २८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत […] The post Cyber Crime: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली लुटले ५५ लाख; २८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat .
वेगाची नशा जीवावर बेतली! भरधाव कारने पादचाऱ्याला चिरडले; पोलिसांत गुन्हा दाखल
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – भरधाव वेगातील कारने धडक दिल्याने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 22) ताथवडेतील लोंढे वस्ती परिसरात घडली.रूद्रअभिषेक प्रभातरंजन दास (वय 32, रा. प्लॅटीनम पार्क सोसायटी, माणगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे. माणिक मारुती ओव्हाळ (वय 43, रा. ताथवडे) यांनी मंगळवारी (दि. २३) […] The post वेगाची नशा जीवावर बेतली! भरधाव कारने पादचाऱ्याला चिरडले; पोलिसांत गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat .
पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय पेच! एकाच प्रभागात अनेक दावेदार, उमेदवारी यादीवर सस्पेन्स कायम
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. त्यानंतरही आयाराम गयारामांमुळे शहरातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. आयात उमेदवारांना मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याने शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. उमेदवारीच्या अंतिम यादीला अद्याप शिक्कामोर्तब न झाल्याने आणि ‘अंतिम क्षणीच घोषणा’ करण्याचे धोरण अवलंबले जात आहे. त्यामुळे मुलाखत […] The post पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय पेच! एकाच प्रभागात अनेक दावेदार, उमेदवारी यादीवर सस्पेन्स कायम appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: विवाहित महिलांना निवडणूक लढवायची आहे? आधी ‘हा’महत्त्वाचा नियम वाचा
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विवाहित महिला उमेदवारांच्या मतदार यादीतील नाव नोंदणीबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करत राज्य निवडणूक आयोग यांनी स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. या निर्देशांनुसार, निवडणूक लढविणाऱ्या महिलेचे नाव पिंपरी-चिंचवड शहराच्या मतदार यादीत असणे बंधनकारक आहे. परिणामी, माहेर किंवा पूर्वीची मतदार नोंदणी अन्य जिल्ह्यात असलेल्या नवविवाहित महिलांची यंदाची निवडणूक लढविण्याची […] The post PCMC Election: विवाहित महिलांना निवडणूक लढवायची आहे? आधी ‘हा’ महत्त्वाचा नियम वाचा appeared first on Dainik Prabhat .
Maval News: डॉ. डी. वाय. पाटील कॅम्पसमध्ये दीक्षांत सोहळा संपन्न; ३५० हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव
प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – वराळे (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, वराळे येथे नुकताच एक भव्य दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. शिरबहादुरकर, डॉ. वाय. बी. गुरव (शैक्षणिक अधिष्ठाता) तसेच अनुदीप फाऊंडेशनचे प्रतिनिधी मान्यवर म्हणून उपस्थित होते. या दीक्षांत समारंभात अनुदीप फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या आय.टी.पी.आर. […] The post Maval News: डॉ. डी. वाय. पाटील कॅम्पसमध्ये दीक्षांत सोहळा संपन्न; ३५० हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव appeared first on Dainik Prabhat .
PCMC News: केशवनगरमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – केशवनगर, चिंचवड परिसरातील काकडे टाऊनशिप वसाहतीसमोर गेल्या एक वर्षापासून अनधिकृतपणे घनकचरा, घाण, आरोग्यास घातक माती, राडारोडा राजरोसपणे टाकण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे ज्या टॅक्टरमधून हा राडारोडा टाकला जातोय त्यावर पुढील बाजूस […] The post PCMC News: केशवनगरमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात appeared first on Dainik Prabhat .
Mhaswad Municipal Election: म्हसवड पालिका निवडणुकीत सूर्यवंशी दाम्पत्याचा नवा इतिहास
प्रभात वृत्तसेवा दहिवडी – म्हसवड पालिकेच्या निवडणुकीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एकहाती सत्ता मिळवताना सर्वच ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आणून विरोधकांना व्हाईट वॉश देताना नवा इतिहास रचला आहे. या नव्या इतिहासासोबतच येथील सूर्यवंशी दांपत्यानीही निवडून येत आणखी एक इतिहास रचला आहे. अनेक राजकिय स्थित्यांतरे पाहणाऱ्या या पालिकेने यंदा झालेल्या पालिका निवडणुकीत नवीन राजकीय बदल […] The post Mhaswad Municipal Election: म्हसवड पालिका निवडणुकीत सूर्यवंशी दाम्पत्याचा नवा इतिहास appeared first on Dainik Prabhat .
Satara News: सातारा-लोणंद रस्त्यावरील अपघातांची गंभीर दखल! शिवेंद्रसिंहराजे भोसले ॲक्शन मोडवर
प्रभात वृत्तसेवा सातारा – सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डी वर सातत्याने वाढते अपघात चिंताजनक बाब बनली आहे. या रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यावर लवकरच सुयोग्य तोडगा काढला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सातारा- लोणंद रस्त्याच्या संधर्भात […] The post Satara News: सातारा-लोणंद रस्त्यावरील अपघातांची गंभीर दखल! शिवेंद्रसिंहराजे भोसले ॲक्शन मोडवर appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुसेगाव – श्री सेवागिरी यात्रोत्सवानिमित्त झालेल्या निमंत्रित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात भोसरीच्या भैरवनाथ क्रीडा संस्था कबड्डी संघाने कौलव (कोल्हापूरच्या) शिवमुद्रा कबड्डी संघावर चार गुणांनी मात करत ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस व श्री सेवागिरी चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत २१ निमंत्रित संघांनी सहभाग घेतला. उपविजेत्या शिवमुद्रा कबड्डी संघाला चषक व ३१ […] The post Sevagiri Maharaj Yatra: भोसरीच्या संघाने पटकावला श्री सेवागिरी चषक! पुसेगावात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात appeared first on Dainik Prabhat .
Koynanagar News: पाटणकर गटाला जबर धक्का! कोयना पट्ट्यातील ‘या’गावानं अचानक का बदलला निर्णय?
प्रभात वृत्तसेवा कोयनानगर – कोयना भागातील शिवंदेश्वर (दाबाचा माळ) येथील पाटणकर गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबईत ‘मेघदूत’ या आपल्या शासकीय निवासस्थानी या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.पाटण तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा प्रभाव वाढत असून, शिवसेनेत प्रवेशाची मालिका सुरुच आहे. कोयना भागातील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे ढवळून […] The post Koynanagar News: पाटणकर गटाला जबर धक्का! कोयना पट्ट्यातील ‘या’ गावानं अचानक का बदलला निर्णय? appeared first on Dainik Prabhat .
बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी राष्ट्रांमध्ये नेहमीच स्फोटक वातावरण असते. हे दोन्ही देश भारताच्या शेजारीच असल्याने प्रत्येक वेळी भारताला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. ज्यावेळी पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये राजकीय गोंधळाची परिस्थिती, सत्तापालटाची अराजकता, दंगे होत असतात, त्यावेळी तिथे वास्तव्य करणाऱ्या हिंदूंना नेहमीच ‘लक्ष्य’ केले जाते. बांगलादेशची निर्मिती ही भारताच्या योगदानातूनच झालेली आहे. ‘शेजाऱ्याचे जळके घर आपल्यासाठी नेहमीच धोकादायक असते’, असे म्हटले जाते. भारताला त्याची पावलापावलावर प्रचिती येत आहे. पश्चिम पाकिस्तानने उर्दू भाषेवर आणि पश्चिम पाकिस्तानी संस्कृतीवर जोर दिला, त्यामुळे बंगाली भाषिक पूर्व पाकिस्तानमध्ये असंतोष वाढला. पूर्व पाकिस्तानला राजकीय आणि प्रशासकीय प्रतिनिधित्व मिळत नव्हते, तसेच त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात होते. २५ मार्च १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानमध्ये बंगाली ओळख मिटवण्यासाठी क्रूर मोहीम सुरू केली, ज्यामुळे हिंसाचार आणि निर्वासितांचा प्रश्न निर्माण झाला. भारतीय सैन्याने वेळीच हस्तक्षेप केल्याने बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाले. भारतामुळे पश्चिम पाकिस्तानच्या अत्याचारातून बंगाली भाषिकांचा प्रभाव असलेल्या पूर्व पाकिस्तानची मुक्तता झाली. भारताच्या उपकाराची जाण न ठेवता बांगलादेशच्या राज्यकर्त्यांनी वेळोवेळी हस्तक्षेप करत भारताला अडचणीत टाकण्याची भूमिका बजावली. काही दिवसांपूर्वीच विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर बांगलादेशची राजधानी ढाकामधल्या अनेक भागांत हिंसाचार उफाळून आला. हादी याची हत्या कोणी केली, हे अद्यापी गुलदस्त्यात असले तरी त्यामागे भारताचा हात असल्याचा आरोप तेथील राज्यकर्त्यांनी केला. यामुळे बांगलादेशात भारतविरोधी प्रतिक्रिया उमटल्या. बांगलादेशातल्या मयमनसिंह जिल्ह्यातील भालुका येथे जमावाने दीपचंद दास या हिंदू तरुणाला ठार मारले. धर्माचा अपमान केल्याचा आरोप ठेवत जमावाने मारहाण करून त्याला ठार केले. रात्रीच्या वेळी काही लोकांनी त्याला पैगंबरांचा अपमान केल्याचा आरोप करत पकडले आणि मारहाण केली. नंतर त्याच्या प्रेताला आग लावली. मुळात या दीपचंद दासने धर्माचा अपमान कधी केला, काय केला आणि त्याला पुरावा काय व जमावाला त्याला ठार मारण्याचा अधिकार कोणी दिला? या प्रश्नांची उत्तरे बांगलादेशमध्ये कोणाकडेही नाहीत व भविष्यातही नसणार. धर्मांध अतिरेकाचा प्रभाव बुद्धिमत्तेवर वाढू लागला, की शरीरातील विवेकाचा अंत होतो. पाकिस्तान व बांगलादेशमध्ये धर्मांधतेचा व भारतविरोधी विषारी मनोवृत्तीचा शिरकाव प्रत्येकाच्या नसानसात भिनला आहे.फाळणीनंतर अनेक वर्षांनी, पाकिस्तानातील व बांगलादेशमधील हिंदूंची कत्तल केली गेली किंवा त्यांची धर्मांतरही घडवून आणली. परिणामी पाकिस्तानातील त्यांची संख्या जी १९५० मध्ये ८ ते ९% होती, ती आज १० लाखांवर म्हणजे २ ते ३ टक्क्याहून कमी झाली आहे. पूर्व पाकिस्तानात (आताच्या बांगलादेशात) फाळणीनंतर १९५० मध्ये २५ % हिंदू होते, २०११च्या जनगणनेनुसार बांगलादेशात केवळ ८.६ टक्के हिंदूच शिल्लक उरले. असाच प्रकार सुरू राहिला, तर या देशात हिंदूंची लोकसंख्या हळूहळू शून्याच्या दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही. हिंदूंवर सातत्याने होत असलेल्या अत्याचारामुळे गेल्या ३२ वर्षांत बांगलादेशातून ५३ लाखांहून अधिक हिंदूंनी पलायन केले आहे. १९७० मध्ये पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांत शेख मुजीबूर रहमान यांच्या आवामी लीगचा विजय झाला. त्यांच्या हातात सत्ता जाऊ नये आणि पूर्व पाकिस्तान फुटून निघू नये म्हणून याह्या खाननी दडपशाही केली. तीस लाखांवर नागरिकांची कत्तल केली आणि एक कोटी निर्वासित भारतात आले. हा इतिहास अमेरिकेचे प्रसिद्ध लेखक, पत्रकार गैरी बास यांच्या २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द ब्लड टेलिग्राम निक्सन, किसिंजर अॅण्ड ए फॉरगॉटन जेनोसाईड’ या पुस्तकाने नोंदवला आहे. १९७१ साली हिंदूंच्या नरसंहाराची बाब उजेडात आली असतानाही, भारताने या नरसंहाराचे वर्णन, बांगलादेशींवर झालेले अत्याचार आहेत, अशा शब्दांत केली आणि हिंदू शब्दाचा उल्लेख टाळला. बांगलादेशातील संघटनांच्या माहितीनुसार आजवर ३८ लाख बांगलादेशी हिंदू या नरसंहारात मारले गेले.बांगलादेश स्वतंत्र करण्यात आणि पूर्व पाकिस्तानची अत्याचारातून मुक्तता करण्यात भारताने पुढाकार घेतला असला, तरी त्याची फार मोठी किंमत भारतालाच मोजावी लागली. ‘देशभक्ती’च्या नावाखाली जेव्हा हिंदूंच्या मालमत्ता लुटल्या जातात, घरे जाळली जातात आणि त्यांना हाकलून दिले, तेव्हा संदेश मिळतो, की बांगलादेशात हिंदूंना स्थान नाही. पाकिस्तानी छळाला भिऊन हिंदू पळून भारतात आले, तेव्हा बंगाली मुस्लिमांच्या एका गटाने त्यांची संपत्ती गिळंकृत केली. त्यामुळे परत आलेले व बळकावलेल्या जमिनी परत मागणारे हिंदू हेच अनेक बांगलादेशी मुस्लिमांच्या हिंदुद्वेषाचे मुख्य कारण झाले. वर्तमान सरकारने हिंदूच्या संपदा परत करण्याकरिता एक कायदा पारीत केला, मात्र ते एक नाटकच ठरले. कारण, बांगलादेशी हिंदूंनी या कायद्याच्या मागे पळण्यातच अधिक पैसा गमावला. साडेसात लाख शेतीवंचित कुटुंबे होती. परिणामी हिंदू कुटुंबांनी गमावलेल्या एकूण जमिनींचा अंदाज १६.४ लाख एकर इतका आहे, जी हिंदू समाजाच्या मालकीतील एकूण जमिनींच्या ५३% आहे. हिंदू हे बांगलादेश लोकसंख्येच्या ८% असले तरी सत्तेमध्ये त्यांचे प्रमाण शून्यच आहे. ते सर्वात मोठे अल्पसंख्याक असले, तरी त्यांचा कोणी प्रवक्ता नाही आणि त्यांची कुठलीही संघटना नाही. याउलट आपल्या देशात बांगलादेशीयांचे लाड सुरूच आहेत. त्यांना आधारकार्ड, पॅनकार्ड सहजासहजी उपलब्ध होते. त्यांच्या देशात आपल्या बांधवांची हत्या होत असताना, जिवंत जाळले जात असताना आपल्याकडे मात्र बांगलादेशीयांना सर्व सुविधा विनासायास उपलब्ध होत आहेत. हे चित्र बदलण्याची राज्यकर्त्यांची व प्रशासनाची मानसिकता नसल्याने बांगलादेशीयांचा मुजोरपणा वाढला आहे आणि हे घातक आहे.
अध्यात्मिक जागृतीचे प्रतीक... कुंकुमतिलक
अर्चना सरोदे, मानाचा गाभाराहिंदू धर्मात विविध प्रकारच्या रुढी, परंपरा पाळल्या जातात. हिंदू धर्मात कपाळावर कुंकू लावण्याला खूप जास्त महत्त्व आहे. हिंदू परंपरेत कुमकुम हे केवळ शोभेचे चिन्हं नसून ते ऊर्जा, शक्ती व अध्यात्मिक जागृतीचे प्रतीक आहे. धर्मग्रंथांमधे कुंकवाचे वर्णन एक शक्तिशाली अध्यात्मिक पदार्थ म्हणून केले गेले आहे ज्याचे धार्मिक आणि यौगिक महत्त्व आहे. कुमकुम हे शक्तिचे प्रतिनिधित्व करते जी निर्मिती आणि परिवर्तनासाठी जबाबदार असलेली आदिम ऊर्जा आहे. तिचा तेजस्वी लाल रंग शक्ती, चैतन्य आणि शुभतेचे प्रतीक आहे. हिंदू अध्यात्माची खरी ओळख कुंकू किंवा तिलक आहे. असे मानले जाते की तिलक लावल्याने मन नेहमीच उंचावते आणि समाजात अभिमान निर्माण होतो. हिंदू कुटुंबांमध्ये कोणत्याही शुभ प्रसंगी कुंकू किंवा तिलक लावण्याची परंपरा आहे.कुंकू किंवा तिलक भुवयांच्या मध्ये नाकाच्या वर लावला जातो. तो थेट मेंदूशी जोडलेला असतो, जो आपल्या विचार आणि चिंतनाचे केंद्र आहे. येथेच अज्ञ चक्र स्थित आहे. ते ज्ञान आणि चेतनेचे केंद्र आहे. कुंकू किंवा तिलक लावल्याने अज्ञ चक्र जागृत होते. त्यामुळे धार्मिकतेची भावना येते. कुंकू किंवा तिलक लावल्याने मन एकाग्र होण्यास मदत होते. खरं तर, आपल्या शरीरात सात सूक्ष्म ऊर्जा केंद्रे आहेत. त्यांना चक्र म्हणतात, ज्यामध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जेचा साठा असतो. आपल्या मेंदूच्या मध्यभागी अज्ञ चक्र आहे. आपल्या शरीराच्या तीन नसा, आदा, पिंगला आणि सुषुम्ना, या चक्रावर एकत्रित होतात. म्हणूनच हे स्थान आपल्या शरीरातील एक महत्त्वाचे स्थान मानले जाते. त्या स्थानाला गुरुस्थान म्हणतात. तसेच जिथे त्या एकत्र येतात त्या जागेला त्रिवेणी किंवा संगम असे देखील म्हणतात. संपूर्ण शरीर येथून नियंत्रित होते. हे आपल्या चेतनेचे प्राथमिक स्थान देखील आहे आणि म्हणूनच ते शरीरातील सर्वात पूज्यनीय स्थान आहे. योगामध्ये, ध्यान करताना मन या ठिकाणी केंद्रित असते. या कारणास्तव, हे स्थान शरीरातील सर्वात पवित्र मानले जाते. हे स्थान शांत ठेवण्यासाठी चंदनाचा तिलक लावला जातो. जर चंदनाचा तिलक नियमितपणे लावला, तर डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवत नाहीत. शास्त्रज्ञांच्या मते, आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि बीटा-अँडॉर्फिन नावाची रसायने नेहमीच बाहेर पडतात, जी आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात. कुंकू किंवा तिलक लावल्याने या रसायनांचे संतुलन राखले जाते.पुराणांमध्ये असे म्हटले आहे की संगम नदीवर गंगेत स्नान केल्यानंतर तिलक लावल्याने मोक्ष मिळतो. म्हणूनच पुजारी स्नान केल्यानंतर त्यांच्या भक्तांना एक विशेष तिलक लावतात. खरं तर, आपल्या शरीरात सात सूक्ष्म ऊर्जा केंद्रे आहेत, जी अफाट शक्तीचे साठे आहेत. त्यांना चक्र म्हणतात. अज्ञ चक्र कपाळाच्या मध्यभागी स्थित आहे, जिथे आपण तिलक लावतो. हे चक्र आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचे बिंदू आहे. तिलक लावल्याने व्यक्तीचा स्वभाव सुधारतो आणि पाहणाऱ्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो.तिलक एका विशिष्ट उद्देशासाठी देखील लावला जातो, जसे की मोक्ष प्राप्त करण्यासाठी अंगठ्याने लावणे, शत्रूचा नाश करण्यासाठी तर्जनी बोटाने, संपत्ती मिळविण्यासाठी मधल्या बोटाने आणि शांती प्राप्त करण्यासाठी अनामिका बोटाने तिलक लावला जातो. सामान्यतः अनामिका बोटाने तिलक लावला जातो आणि फक्त चंदनाचा वापर केला जातो. तिलकासोबत तांदूळ लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते. कुंमकुमच्या लाल रंगात आपल्याला फक्त एक रंगच नाही तर भक्ती, अध्यात्म आणि सांस्कृतिक ओळखीचे एक जिवंत प्रतीक सापडते. दैनंदिन उपासनेच्या पवित्र विधींपासून ते उत्सवांच्या भव्यतेपर्यंत, कुंकू हे एक चिरस्थायी प्रतीक आहे, जे हिंदूंच्या पिढ्यांना परंपरा आणि अध्यात्माच्या कालातीत धाग्याशी जोडते. आजच्या बदलत्या प्रगत युगातही भारतात कुंकू लावण्याची पद्धत टिकून आहे. पण कुंकू लावण्याच्या पद्धतीत बदलत्या काळानुसार बदल होत गेलेत, हेही तितकंच खरं आहे. अलीकडे कुंकवाच्या जागी लाल गंध व टिकल्या वापरल्या जातात. पण त्याचा संबंधही मांगल्य व सौभाग्याशी आहे. त्यामुळे पद्धत बदलली असली तरी आपली संस्कृती अद्यापही जपली जाते आहे. हे ही नसे थोडके.....
ऋतुजा केळकर, ऋतुराजगुरू प्रकाशी ज्ञानदीप, शिष्य हृदयी उजळतो ।संसारसागर पार करावा, श्रद्धा विश्वास आधारतो ॥माझी केलेली पूजा जेव्हा नकळत परत वळून पाहिली, तेव्हा लक्षात आले की आपल्या आयुष्याचा पहिला गुरू म्हणजे आई. आईच्या कुशीतच आपण प्रथम शिकतो बोलणे, चालणे, वागणे, तसेच चांगले-वाईट यातील फरक ओळखणे. तिच्या अंगी असलेली निस्सीम करुणा, त्याग आणि प्रेम हेच गुरुशिष्य नात्याचे मूळ बीज आहे. तिच्या मार्गदर्शनानेच बालकाच्या मनात श्रद्धा, दया आणि समभावाची पायाभरणी होते. म्हणूनच गुरुशिष्य परंपरेचा आरंभ आईपासून होतो आणि पुढे जीवनात येणाऱ्या प्रत्येक गुरूचे महत्त्व समजून घेण्याची क्षमता तिच्या संस्कारांतूनच निर्माण होते.जीवनाच्या गजबजाटात, अडचणींच्या वावटळीत, सामान्य मानवाला सद्गुरू म्हणजे जणू एखादं सावलीदार झाड वाटतं. वस्तुस्थितीचा विचार न करता जो दिसेल त्याला गुरू मानून शरण जातो. त्याच्या मनात आत्मोद्धाराची खरी लालसा नसते, त्याला हवी असते संसारातील सुखसोयी, धनप्राप्ती, ऐश्वर्याचा लाभ आणि संकटांपासून मुक्ती म्हणूनच त्याला कोणताही गुरू चालतो.ही शरणागती जणू एखाद्या तहानलेल्या प्रवाशाने पहिल्या दिसलेल्या विहिरीत डोकं घालावं तशी असते. पण खरी तहान ही आत्मज्ञानाची असते आणि ती भागवणारा गुरू विरळाच असतो. सामान्य मानवाला हे उमजत नाही, म्हणून तो भौतिक अपेक्षांच्या ओढीने गुरूकडे वळतो. अशा शरणांगतीतून त्याला तत्कालिक दिलासा मिळतो पण, आत्मोद्धाराचा मार्ग मात्र अंधारातच राहतो.गुरूच्या वचनावर विश्वास असेल तरच जगण्यास बळ प्राप्त होते. गुरूचे वचन हे केवळ शब्द नसून, ते साधकाच्या अंतःकरणात दीपप्रकाशासारखे उजळतात. संकटांच्या काळोखात तेच मार्गदर्शक ठरतात. श्रद्धेने गुरूचे वचन स्वीकारणारा शिष्य जीवनातील दुःख-सुखांना धैर्याने सामोरे जातो. गुरूच्या वचनावरचा विश्वास म्हणजे जणू वादळातही स्थिर राहणारा ‘दीपस्तंभ’ जो शिष्याला योग्य दिशा दाखवतो, त्याला आत्मविश्वास देतो आणित्याच्या जीवनप्रवासाला स्थैर्य प्रदान करतो.गुरुशिष्य नात्याचा महिमा हा नामघोषातही दडलेला आहे. “मंगलमूर्ती मोरया” म्हणताना भक्तांच्या ओठांवर उमटणारे नाव हे केवळ देवतेचे नसते, तर ते गुरुशिष्य नात्याचे प्रतीक असते. जसे कुलूप उघडण्यासाठी योग्य किल्ली लागते, तसेच आत्मोद्धारासाठी योग्य गुरू लागतो. चुकीची किल्ली वापरली तर कुलूप उघडत नाही, तसेच खोट्या गुरूंच्या मागे लागल्यास जीवनाचा दरवाजा बंदच राहतो.गुरूच्या छायेत शुचित्वाची अनुभूती होते. शुचित्व म्हणजे मन, वाणी आणि आचरणाची पवित्रता होय. गुरूच्या सहवासात मनातील दगडासारखी कठोरता वितळते, संवादात तारतम्य येते आणि समभावाची नवी किल्ली सापडते. ही किल्ली उघडते करुणेचे दरवाजे की जिथे भूतदया आणि सहानुभूतीचा प्रवाह अखंड वाहतो.जीवनप्रवाहाचे गूढ रहस्य गुरू आपल्याला दिव्यांच्या प्रवाहातून दाखवतात. नदीवर तरंगणारे दिवे कधी एकत्र येतात, तर कधी दूर जातात. प्रत्येक दिव्याचा मार्ग वेगळा असतो, जसे प्रत्येकाच्या आयुष्याची दिशा निराळी असते. तरीही त्या संथ लहरींवर अलगद वाहणाऱ्या दिव्यांकडे पाहताना मनाला जाणवते जीवन म्हणजे प्रवाह आणि गुरू म्हणजे त्याला दिशा देणारी लेखणी. लेखणी दगडावर चालली तरी अक्षर उमटते तसेच गुरूच्या मार्गदर्शनाने कठीण जीवनप्रवाहातही अर्थ उमटतो.गुरूंची आवश्यकता ही धर्माइतकीच जीवनमार्गासाठी महत्त्वाची आहे. पण आजच्या काळात खोट्या वेषधारी गुरूंचा तांडा वाढत चालला आहे. अपात्र गुरूच्या मागे लागणे म्हणजे एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याच्या मागे जाण्यासारखे आहे. अखेर दोघेही अधोगतीला जातात. अधिकारी गुरूकडे अनुभवजन्य ज्ञान असते, जे केवळ शास्त्रचर्चेने मिळत नाही. सद्गुरूंचे आचरण साधे असते, पण त्यांची अंतःकरणातील शांतता, करुणा आणि आत्मज्ञान विलक्षण असते. ते प्रसिद्धीपासून दूर राहतात, अखंड नामस्मरण करतात आणि सुख-दुःखांपासून अलिप्त राहतात.गुरू म्हणजे जीवनाच्या अंधाऱ्या गुहेत प्रकाश दाखवणारी मशाल. ते शिष्याच्या मनातील गोंधळाला दिशा देतात आणि त्याच्या विचारांना आकार देतात. जसे दगडावर चाललेली लेखणी अक्षर उमटवते, तसेच गुरू कठीण प्रसंगांतही अर्थ उमटवतात. त्यांच्या सहवासात शिष्याला करुणेची किल्ली मिळते, जी जीवनातील कठोर कुलूपे सहज उघडते. खोट्या वेषधारी गुरूंच्या मागे लागल्यास प्रवास अधोगतीकडे वळतो, पण सद्गुरूंच्या छायेत श्रद्धा, शुचित्व आणि आत्मविश्वासाची नवी वाट सापडते. जीवनप्रवाहात कधी एकाकीपणाचे क्षण येतात, तर कधी एकत्रतेचे, पण गुरूंच्या मार्गदर्शनाने प्रत्येक क्षणाला नवा अर्थ मिळतो. अखेरीस, गुरू म्हणजेच तो दीप, जो शिष्याच्या अंतःकरणात उजेड पेरतो, त्याला स्थैर्य देतो आणि जीवनसागर पार करण्यासाठी आत्मज्ञानाची नौका बनतो. गुरूंच्या प्रकाशाशिवाय जीवन म्हणजे अंधारातली वाट आहे पण, त्यांच्या कृपेनेच ती वाट मुक्तीकडे सरते. म्हणूनच ही एक अशी किल्ली आहे की जी, आत्म्याच्या कुलूपात फिरली की, जीवनाचा दरवाजा मुक्तीकडे उघडतो.
उत्तर महाराष्ट्रात नगर परिषद निकालाने भाजप-शिवसेना निकट
धनंजय बोडकेनाशिकसह राज्यातील महापालिका निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. एका बाजूला शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती जाहीर झाली असताना, दुसरीकडे भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील युतीबाबत अद्यापही चर्चा सुरू आहेत. मात्र नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकांच्या निकालांकडे पाहता, शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे निवडणूक लढवणे हे परस्पर हिताचे ठरेल, असे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे नगर परिषद निवडणुकांच्या निकालांनी भाजप आणि सेनेला पुन्हा एकमेकांच्या जवळ आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.सुमारे साडेतीन वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा दुसरा टप्पा असलेल्या महापालिका निवडणुका येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला वेग देत घरोघरी भेटी देण्यास सुरुवात केली असून, वातावरण हळूहळू निवडणूकमय होत चालले आहे. निवडणूक आयोगानेही महापालिका निवडणुकांसाठी प्रशासकीय पातळीवर परिपूर्ण तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुका एकत्रितपणे लढण्याची अधिकृत घोषणा केली आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे महायुती मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेय. वरिष्ठ नेत्यांपासून ते स्थानिक पातळीवरील नेतृत्वापर्यंत चर्चेच्या दोन-तीन फेऱ्या झाल्याचे समजते. मात्र अद्याप अंतिम निर्णय जाहीर झालेला नसून, येत्या दोन-तीन दिवसांत याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये नाशिक जिल्ह्यातील सटाणा, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी येथे नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात थेट लढत झाली. या तिन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले, तर भाजपला पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे भाजपचे उमेदवार सक्षम होते आणि प्रचार यंत्रणाही मजबूत होती, तरीसुद्धा भाजपचा पराभव झाला. यामागील मुख्य कारण म्हणजे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे मतदार मोठ्या प्रमाणावर समान असल्याने ही मते विभागली गेली. परिणामी या विभाजनाचा थेट फायदा विरोधी पक्षांना झाला. परंपरागत भाजपविरोधी मतदान शिवसेनेच्या पारड्यात पडल्याचेही या निकालांतून दिसून आले. हा अनुभव लक्षात घेता, स्वतंत्रपणे निवडणूक लढवणे दोन्ही पक्षांसाठी नुकसानकारक ठरू शकते, याची जाणीव आता भाजप आणि सेनेला झाल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.नाशिक महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सुमारे ३०० उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत, तर भारतीय जनता पक्षाकडून सर्वाधिक १,०७७ इच्छुक उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडूनही दोनशेहून अधिक इच्छुक रिंगणात आहेत. परिणामी इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे युती करताना काही अडचणी येत असल्याचे चित्र आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ‘स्वबळाचा नारा’ देत निवडणूक लढवली होती. त्यात ६६ नगरसेवक विजयी होत महापालिकेची सत्ता पहिल्यांदाच स्वबळावर हाती आली होती. यंदाही स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक तसेच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीसाठी पक्ष प्रयत्नशील असल्याचे सांगितले आहे. आकड्यांची जुळवाजुळव झाल्यास महायुती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्षाशी युती न झाल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे नाशिक महापालिकेत एकत्र येऊ शकतात. त्या दृष्टीनेही दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजपकडे ‘इनकमिंग’ सुरू असून, विरोधी पक्षांतील सक्षम उमेदवारांना पक्षात घेण्यात भाजपला यश मिळत आहे. निवडणुकीतील माघारीनंतर जिल्हा ते राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रचारसभांचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या प्रचार तोफा नाशिकमध्ये धडाडणार असून, त्यासाठी राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे. नाशिक शहरात विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे प्राबल्य अधिक आहे, तर ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तुलनेने जास्त आहे. त्यामुळे महापालिकेत शिवसेना आणि भाजप, तर जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्र येण्याची शक्यता अधिक बळावली असून, नगर परिषद निवडणुकांचे निकाल हीच या संभाव्य युतीची नांदी ठरणार असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.रस्त्याची मोठी दुरवस्था प्रचाराचा मुद्दा ठरणारनाशिक महापालिकेवर साडेतीन वर्षांपासून प्रशासकराज आहे. या काळात अनेक समस्या नागरिकांना सतावत आहेत. प्रामुख्याने रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असून, परिणामी लहान-मोठे अपघात होऊन काहींना आपला प्राण गमवावा लागला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. शहरातील भूमिगत गटार योजना, गॅस पाइपलाइन, बीएसएनएलची कामे सुरू असल्याने रस्त्यांचे खोदकाम अद्यापही सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी पिण्याच्या पाण्याच्या समस्यांनीही डोके वर काढले होते. अनेक पक्ष व संघटनांनी या प्रश्नांवर आंदोलन केले आहे. त्यामुळे आगामी काळात रस्ते, पाणी आणि विकासकामे हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे ठरू शकतात.वृक्षतोडीचाही विषय गाजणारतपोवनातील साधुग्रामसाठी होणाऱ्या वृक्षतोडीबाबत मोठे जनआंदोलन झाले. स्थानिक कलावंतांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिकांनी त्यात सहभाग घेतला. सत्ताधारी शिवसेनेसह विरोधी उबाठा, मनसे, डावे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आदित्य ठाकरे, वृक्षप्रेमी सयाजी शिंदे आदींनी होणाऱ्या वृक्षतोडीबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि धुळ्याच्या खासदार शोभाताई बच्छाव यांनी थेट संसदेत या प्रश्नावर आवाज उठवला होता. राष्ट्रीय हरित लवादाने १५ जानेवारी २०२६ पर्यंत स्थगितीचा निर्णय दिला आहे, तर मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एक प्रकारे या आंदोलनाला जागतिक स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र काही दिवसांपासून आंदोलनाची धार कमी झाली आहे.
डॉ. अनुराधा कुलकर्णी, भारतीय ऋषी…anuradh.klkrn@gmil.comफार पूर्वी सर्व वेदमंत्र एकत्रच होते. त्या सहस्त्रावधी मंत्रात काहीत इंद्र, अग्नी, मरुतगण इ. देवतांना केलेल्या छंदबद्ध प्रार्थना होत्या, काहीत परमतत्त्वांचे विवेचन होते. काही गद्य मंत्रांमध्ये निरनिराळ्या यज्ञयागांची सविस्तर माहिती होती. तर काहींमध्ये वैद्यकशास्त्र, शत्रूनाश, युद्धशास्त्र, राष्ट्रधर्म, समाजव्यवस्था इ.चे खच्चून भरलेले भांडार होते, काही पद्यमंत्रांच्या स्वरांची विस्तृत जाणकारी असलेले मंत्रही होते. वेदाध्ययनासाठी या हजारो मंत्रांचे विषयानुरूप नीट वर्गीकरण होणे आवश्यक होते. ते वेदवर्गीकरणाचे दैवी कार्य महर्षी व्यासांनी केले. वेदमंत्रांचे वर्गीकरण करून त्यातील भागांना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद अशी विषयानुरूप नावे दिलीत. या समग्र वेदसंपदेची व्यवस्थित जोपासना व्हावी म्हणून आपल्या पैलमुनी, वैशंपायनमुनी, जैमिनीमुनी व सुमन्तुमुनी या चार विद्वान शिष्यांवर हे चार भाग महर्षी व्यासांनी सोपविले. या शिष्यांनी आपल्यावर सोपविलेल्या वेदाचे आपापल्या शिष्यवर्गाकडून अध्ययन, पठण करून घेतले. वेदाभ्यास पूर्ण झाल्यावर त्या शिष्यांनी स्वतःच्या शिष्यांकडून वेदाध्ययन करवून घेतले. अशारीतीने या चारी वेदांच्या अभ्यासकांची शिष्यपरंपरा निर्माण झाली. ती आजतागायत चालू आहे. महर्षी व्यासांच्या या चार महान शिष्यांपैकी जैमिनीमुनींच्या कार्याचा आपण मागोवा घेऊ या.जैमिनीमुनींची संगीताबद्दलची गाढ आस्था व सुरांचे सखोल ज्ञान लक्षात घेऊन वेदव्यासांनी त्यांच्याकडून सामवेदाचे सूक्ष्म अध्ययन करवून घेतले आणि या वेदाचे संवर्धन करण्याची जबाबदारी सोपविली. ज्ञानाने ईश्वरी साक्षात्कार होईल पण उत्कट भावाशिवाय ईश्वराशी एकरूपता होणार नाही. उत्कट भाव स्वरात परावर्तित होतात. ऋग्वेदात म्हटले आहे की...स्वरन्ति त्वा सुते नरो वसो निरेके उक्थिनः । ऋ.मं८सू३३.२“हे शिष्या, तू आपल्या आत्मिक उत्थानासाठी माझ्याकडे आला आहेस, मी तुला परमेश्वराचा उपदेश सांगतो. त्याला प्राप्त करण्यासाठी तू त्याला संगीतमय साद घालशील तर तो तुझ्या हृदयाच्या गुहेत प्रकट होऊन आपले प्रेम तुला प्रदान करेल.”रसो वै सः असे परमात्म्याचे वर्णन आहे. हा रस संगीतात प्रकर्षाने प्रकट होतो. म्हणूनच भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात भगवंतांनी आपल्या विभूती सांगताना “वेदानाम् सामवेदोSस्मि’’(१०,२२) म्हणजे चारी वेदातील सामवेदात मी प्रकर्षाने आहे, असे म्हटले आहे. शिवाय “बृहत्साम तथा साम्नां’’(१०,३५) म्हणजे सामवेदातील मंत्रगीतांमधल्या बृहत्साम नामक गीतप्रकारात मी विशेषत्वाने आहे, असेही भगवंत म्हणतात. असा हा भगवंतप्रिय सामवेदाचा अत्युत्कट प्रकार जैमिनीमुनींनी पूर्ण ताकदीने सांभाळला, एवढेच नव्हे तर तो सर्वांगपरिपूर्णतेने संवर्धित केला. गुरुआज्ञेप्रमाणे जैमिनीमुनींनी आपल्या अनेक शिष्यांना सामवेदाचे ज्ञान दिले. त्या शिष्यात जैमिनींचे पुत्र सुमन्तू व पौत्र सुकर्मा हेही होते. सुकर्मा यांनी सामवेदसंहितेचे एक हजार शाखाभेद करून त्या वेदाचा खूप विस्तार केला, म्हणजे गायनाचे हजार प्रकार प्रस्थापित केले. मात्र सांप्रत सामवेदाच्या कौथुम, राणावत व जैमिनीय या तीन शाखाच उपलब्ध आहेत. सामवेदात ऋचांचे गायन कसे करावे, याचे विवेचन आहे. मंत्राचे गद्य, पद्य व गायन असे तीन प्रकार असतात. यजुर्वेदातले मंत्र हे गद्य प्रकारात मोडतात, तर ऋग्वेदातील सर्व ऋचा या छंदोबद्ध म्हणजे पद्य आहेत. पण त्यातील काही ऋचा या सामगानाला अधिक अनुकूल असल्याने त्यांचा समावेश सामगायनात केलेला आहे. ज्या ऋचेवर गानप्रकार गायचा असतो, त्या ऋचेला योनी असे म्हणतात. एकाच योनीवर अनेक सामे गाता येतात व एकच गानप्रकार कोणत्याही ऋचेवर म्हणता येतो. जैमिनीय शाखेत ३६८१ गानप्रकार सांगितले आहेत!सामवेदाचार्य जैमिनीमुनींनी सामगायनाप्रमाणेच वैदिक कर्मांचे माहात्म्य स्थापन करणारी षड्दर्शनातील पूर्वमीमांसा या दर्शनाची सूत्रेही लिहिली आहेत. मीमांसेची सूत्रमय लेखनप्रवृत्ती सामवेदापेक्षा खूपच वेगळी असूनही जैमिनीऋषींसारखे चतुरस्र प्रज्ञेचे महात्मे सर्व ज्ञानक्षेत्रात तळपतात. जैमिनी ऋषींनी पूर्वमीमांसा सूत्रे ही मुख्यतः गृहस्थाश्रमींसाठी लिहिली आहेत,वेदोक्त कर्मे हाच पूर्वमीमांसेचा विषय आहे. त्यात यज्ञादिक कर्मकांडांचा अधिक विचार आहे.गृहस्थांनी पुढील यज्ञ नित्य करावयाची असतात – १) स्वाध्यायरूपी ब्रह्मयज्ञ २) सकाळ-संध्याकाळ सत्कार्यशक्तिरूप देवतास्मरणरूपी देवयज्ञ ३) वाडवडिलांची श्रद्धायुक्त सेवारूपी पितृयज्ञ ४) भूतदयारूपी बलिवैश्वदेवयज्ञ ५) गरजूंना साह्य, समाजसेवा, अतिथीसत्काररूपी मनुष्ययज्ञ. यज्ञामागच्या या संकल्पना लक्षात घेतल्या तर ज्याचा सर्वांना आधार असतो, त्या गृहस्थाश्रमात करावयाचे यज्ञकर्तव्य सदैव चालू राहिले पाहिजे, हे आपल्याला पटते. म्हणूनच भारताच्याच नव्हे तर जगाच्या दार्शनिक साहित्यात जैमिनीमुनींच्या पूर्वमीमांसेचे स्थान महत्त्वाचे आहे.
Khel Ratna Award : भारतीय पुरुष हॉकी संघाच्या उपकर्णधार हार्दिक सिंगची यंदाच्या देशाच्या सर्वोच्च क्रीडा सन्मान ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न’ पुरस्कारासाठी एकमेव शिफारस करण्यात आली आहे. तर, युवा बुद्धीबळपटू दिव्या देशमुख, डेकॅथलॉनमधील अग्रणी तेजस्विन शंकर आणि रायफल शूटर मेहुली घोष यांच्यासह एकूण २४ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड समितीने शिफारस केली आहे. हार्दिक सिंग हा भारतीय […] The post Khel Ratna Award : मोठी बातमी! खेल रत्नसाठी हार्दिक सिंगची शिफारस; आरती पालसह युवा स्टार्सना अर्जुन पुरस्काराची संधी appeared first on Dainik Prabhat .
OturNews: संत तुकाराम महाराज आणि बाबाजी चैतन्य महाराजांच्या शिल्पांचे अनावरण
प्रभात वृत्तसेवा ओतूर – संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज आणि सद्गुरू चैतन्य महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचा लोकार्पण सोहळा बुधवारी (दि. २४) मोठ्या उत्साहात पार पडला. ह.भ.प. माऊली महाराज कदम (छोटे माऊली) व ह.भ.प. तुळशीराम महाराज सरकटे यांच्या हस्ते या शिल्पाचे अनावरण झाले. याप्रसंगी बोलताना ह.भ.प. माऊली महाराज कदम म्हणाले की, ओतूर ही अत्यंत पावन भूमी आहे. […] The post OturNews: संत तुकाराम महाराज आणि बाबाजी चैतन्य महाराजांच्या शिल्पांचे अनावरण appeared first on Dainik Prabhat .
भारतीय विमानसेवा क्षेत्रात नवी भरारी! तीन नवीन एअरलाईन्सना सरकारचा ‘ग्रीन सिग्नल’
नवी दिल्ली: भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्रात (Aviation Sector) लवकरच मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. केंद्र सरकारने तीन नवीन एअरलाईन्सना देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिली असून, यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नवीन आणि स्वस्त पर्याय उपलब्ध होणार आहेत. नागरी उड्डयन मंत्रालयाने ‘अल हिंद एअर’ (Al Hind Air) आणि ‘फ्लायएक्सप्रेस’ (FlyExpress) यांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) […] The post भारतीय विमानसेवा क्षेत्रात नवी भरारी! तीन नवीन एअरलाईन्सना सरकारचा ‘ग्रीन सिग्नल’ appeared first on Dainik Prabhat .
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक
मुंबई – महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेल्या लाडक्या बहीण योजनेतून लवकरच लाखो लाभार्थ्यांवर अपात्रेतेची टांगती तलवार असणार आहे. राज्य सरकारकडून या योजनेतील पात्र महिलांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक केले होते. मात्र, आतापर्यंत जवळपास पाच लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असल्याने या योजनेतील ४० हजारांहून अधिक लाभार्थी अपात्र ठरविण्याच्या दाट शक्यता वर्तविली जात आहे. राज्य […] The post Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक appeared first on Dainik Prabhat .
Pennsylvania : पेनसिल्वेनियात नर्सिंग होमबाहेर स्फोट; 2 जणांचा मृत्यू
ब्रिस्टल (अमेरिका) : अमेरिकेत फिलाडेल्फिया शहरातील एका नर्सिंगहोमबाहेर झालेल्या मोठ्या स्फोटामध्ये किमान २ जण ठार झाले. या स्फोटामुळे इमारतीचा काही भाग कोसळला आणि या ढिगाऱ्याखाली इतर काही जण गाडले गेले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पेनसिल्वेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो यांनी पत्रकार परिषदेत या स्फोटाची माहिती दिली. ब्रिस्टल शहरातील ब्रिस्टल हेल्थ ऍन्ड रिहॅबिलीटेशन सेंटरबाहेर हा स्फोट झाला. हा […] The post Pennsylvania : पेनसिल्वेनियात नर्सिंग होमबाहेर स्फोट; 2 जणांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण २ हजार ८४४ उमेदवारी अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे दोन दिवसात सुमारे ७ हजार उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. तर, उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी अर्ज भरण्याचा श्री गणेशा झाला आहे आणि बुधवारी ०२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या कार्यक्रमानुसार, उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे देण्यास मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात झाली आहे. मंगळवारी, पहिल्या दिवशी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण मिळून ४ हजार १६५ नामनिर्देशन अर्जांचे वितरण झाले होते. तर दुस-या दिवशी म्हणजे बुधवारी, एकूण २ हजार ८४४ नामनिर्देशन पत्रे वितरित झाली आहेत. दुसऱ्या दिवशी घाटकोपर आणि अंधेरी भागातून दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या, गुरूवार, २५ डिसेंबर २०२५ रोजी नाताळ निमित्त सार्वजनिक सुटी असल्याने नामनिर्देशन पत्रे दिली जाणार नाहीत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा कालावधी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या दरम्यान दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ०५ पर्यंत आहे.उमेदवारी अर्ज विक्री आणि कंसात भरलेले अर्जए + बी +ई विभाग - १०९सी + डी विभाग - ५६एफ उत्तर विभाग - ९८एफ दक्षिण विभाग - ८३जी उत्तर विभाग - २८६जी दक्षिण विभाग - ५२एल विभाग (RO-16) - १११एल विभाग (RO-17) - ७८एम पूर्व विभाग - ३४०एम पश्चिम - १७४एन विभाग - ७७/(१ प्राप्त)एस विभााग - १०६टी विभाग - ९७एच पूर्व विभाग - ९४एच पश्चिम विभाग - १४६के पश्चिम विभाग - १९३के पूर्व + के पश्चिम विभाग - २३२/(१ प्राप्त)पी दक्षिण विभाग - ७१पी उत्तर विभाग - १२०पी पूर्व विभाग - १२८आर दक्षिण विभाग - ९०आर मध्य विभाग - ६०आर उत्तर विभाग - ४३एकूण - २८४४
Rohit Sharma Equalled All Time Record : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वन-डे स्पर्धा ‘विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६’ ला २४ डिसेंबरपासून दणक्यात सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले, जिथे तब्बल २२ शतकी खेळींची नोंद झाली. मात्र, सर्वांचे लक्ष वेधले ते टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने. प्रदीर्घ काळानंतर या प्रतिष्ठित […] The post Rohit Sharma : रोहित शर्माचा लिस्ट-ए क्रिकेटमध्ये मोठा धमाका! डेव्हिड वॉर्नरच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड’शी केली बरोबरी appeared first on Dainik Prabhat .
Satara News : हातातील बेड्यांसह पोलिसांच्या ताब्यातून आरोपीचे पलायन; कराडमधील घटना
कराड : अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने पोलिसांना चकवा देत हातातील बेड्यांसह पळ काढला. पुणे- बंगळुरुरश राष्ट्रीय महामार्गावर गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री ही घटना घडली. पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. अनिकेत प्रकाश लोहार (वय २३, रा. कोळे, ता. कराड) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंब्रज […] The post Satara News : हातातील बेड्यांसह पोलिसांच्या ताब्यातून आरोपीचे पलायन; कराडमधील घटना appeared first on Dainik Prabhat .
Moscow : मॉस्कोमधील बॉम्बस्फोटात ३ ठार !
मॉस्को – रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये झालेल्या एका बॉम्बस्फोटात किमान तिघे ठार झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये दोन पोलीस अधिकारी आहेत. दोन दिवसांपुर्वी रशियाच्या एका वरिष्ठ जनरलची कारबॉम्बच्या स्फोटात हत्या झाली होती. त्या ठिकाणापासून जवळच आजचा बॉम्बस्फोट झाला आहे. येलेत्स्काया रस्त्यावर पोलिसांच्या व्हॅनजवळ एक व्यक्ती संशयास्पदरित्या वावरताना दोन पोलीस अधिकाऱ्यांना दिसला. चौकशीसाठी संशयिताजवळ जाताच या व्यक्तीने बॉम्बचा […] The post Moscow : मॉस्कोमधील बॉम्बस्फोटात ३ ठार ! appeared first on Dainik Prabhat .
एअर प्युरिफायरवर १८ टक्के जीएसटी का? दिल्ली उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत काही वर्षांपासून वायू प्रदूषण हा अत्यंत गंभीर प्रश्न बनला आहे. यादरम्यान लोकांना एअप प्युरिफायरवर १८ टक्के जीएसटी भरावा लागत आहे, दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी या प्रकरणात केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत. आपण दिवसातून २१,००० वेळा श्वास घेतो, होणाऱ्या हानीचे मोजमाप करा, अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर […] The post एअर प्युरिफायरवर १८ टक्के जीएसटी का? दिल्ली उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल appeared first on Dainik Prabhat .
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी १५ मे रोजी मतदान आणि १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांसाठी प्रचाराचा धुरळा उडवण्याकरिता शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, आगामी महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे स्टार प्रचारक… pic.twitter.com/5JNMrKVVma— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) December 24, 2025शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते रामदास कदम, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट, आशिष जयस्वाल, योगेश कदम, दीपक केसरकर यांचा समावेश आहे. तसेच केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार राहुल शेवाळे हे प्रचार करणार आहेत. महापालिका निवडणुकांसाठी राज्यात शिवसेना - भाजप युती होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबतही शिवसेनेची युती होणार असल्याचे वृत्त आहे. जिथे अजित पवार हे शरद पवारांच्या गटाशी आघाडी करणार नाहीत त्याच ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याचा विचार करणार आहे. ठाणे महापालिकेत शिवसेना ८० पेक्षा जास्त आणि भाजप ४० पेक्षा जास्त जागा लढवण्याची शक्यता आहे. अद्याप या बाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. पण राजकीय वर्तुळात या फॉर्म्युलाची चर्चा आहे. मुंबईत शिवसेना आणि भाजप यांच्यात २२७ पैकी १५० जागांबाबत सामंजस्यातून निर्णय झाला असल्याचे समजते. उर्वरित जागांबाबत निर्णयासाठी चर्चा सुरू असल्याचे समजते. लवकरच शिवसेना आणि भाजप युतीची आणि जागा वाटपाच्या सूत्राची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंनी मुंबईत युतीची घोषणा केली असली तरी जागा वाटपाचे सूत्र जाहीर केलेले नाही. यामुळे त्यांचे जागावाटप हे भाजप आणि शिवसेना यांच्या युतीची घोषणा झाल्यानंतरच होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Karnataka Team : कर्नाटकचा ऐतिहासिक पराक्रम! झारखंडचा धुव्वा उडवत मोडला १३ वर्षांपूर्वीचा विक्रम
Karnataka record 413 run chase in Vijay Hazare Trophy 2025 : २४ डिसेंबर २०२५ हा दिवस भारतीय देशांतर्गत क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या ग्रुप-ए मधील लढतीत कर्नाटकने झारखंडचा पराभव करत लिस्ट-ए क्रिकेटमधील जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी रन चेज पूर्ण केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी […] The post Karnataka Team : कर्नाटकचा ऐतिहासिक पराक्रम! झारखंडचा धुव्वा उडवत मोडला १३ वर्षांपूर्वीचा विक्रम appeared first on Dainik Prabhat .
‘या’मोठ्या महानगरपालिकेतील जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप मोठा भाऊ, शिंदेंना केवळ ‘इतक्या’जागा
नाशिक | नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा पेच अखेर सुटल्याची चिन्हे आहेत. भाजपने दिलेला २५ ते ३० जागांचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वीकारल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला शिवसेनेने ४५ जागांचा आग्रह धरला होता, मात्र मित्रपक्षाच्या प्रस्तावावर आता सहमती झाल्याचे समजते. महायुतीचा ‘नाशिक पॅटर्न’ निश्चित – नाशिक महापालिकेच्या एकूण […] The post ‘या’ मोठ्या महानगरपालिकेतील जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप मोठा भाऊ, शिंदेंना केवळ ‘इतक्या’ जागा appeared first on Dainik Prabhat .
Saksham Tate murder case : नांदेडमध्ये राज्यभर गाजलेल्या सक्षम ताटे हत्या प्रकरणात मोठी खळबळजनक अपडेट समोर आली आहे. सक्षम ताटेची प्रेयसी आचल मामीडवार आणि त्याची आई यांनी आज (२४ डिसेंबर २०२५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. उपस्थित पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना रोखले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेदरम्यान आचल, सक्षमच्या […] The post Saksham Tate murder case : सक्षम ताटे खून प्रकरण: प्रेयसी आचल अन् आईचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न; काय आहे कारण? appeared first on Dainik Prabhat .
ठाकरे बंधूंची युती होताच भाजपने दिला मोठा दणका
मुंबई : महाराष्ट्रातील मुंबईसह २९ महापालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजकीय राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेत मागील मागील अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या समर्थकांची सत्ता आहे. या सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. उद्धव ठाकरेंचा पक्ष आकंठ भ्रष्टाचारात बुडाला असल्याचे मंत्री आशिष शेलार म्हणाले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांनी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा करताच भाजपने दोन्ही भावांना जबर राजकीय धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा ठाकरे बंधूंसाठी मोठा दणका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.उल्हासनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा दणका बसला. उल्हासनगरचे माजी उपमहापौर व माजी सभागृह नेते धनंजय बोडारे, माजी नगरसेविका वसुधाताई बोडारे, शितलताई बोडारे, ओमी कलानी गटाचे माजी नगरसेवक नाना बिराडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार कुमार आयलानी, उल्हासनगरचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, प्रदीप राजानी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी आणइ कार्यकर्ते उपस्थित होते. तुमची आमची भाजपा सर्वांची आदरणीय मोदीजी व आदरणीय देवेंद्रजींच्या विकासाभिमुख कार्यशैलीने प्रेरित होऊन उल्हासनगरचे माजी उपमहापौर व माजी सभागृह नेते धनंजय बोडारे (उबाठा) यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला.पक्षप्रवेश करणाऱ्या मान्यवरांमध्ये माजी नगरसेविका वसुधाताई बोडारे,… pic.twitter.com/4SYHaPXxby— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) December 24, 2025पनवेलमध्ये मनसेला मोठा धक्का बसला. मनसेचे पनवेल महानगर संघटक तानाजी पिसे, नवीन पनवेलचे शहराध्यक्ष प्रथमेश गवळी, विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष रोहन गवळी, पदाधिकारी केनेथ देवासगयम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांना पक्षात प्रवेश देताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप परिवाराच्या विकासाभिमुख आणि पारदर्शक कार्यशैलीने प्रेरित होऊन हे पदाधिकारी प्रवेश करत असल्याची माहिती दिली.
Taiwan News : तैवानला भूकंपाचा धक्का ! सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
तैपेई : तैवानच्या तैतुंग या आग्नेयेकडील किनारी काउंटी प्रदेशाला बुधवारी ६.१ तीव्रतेचा भूकंप झाला. त्यामुळे राजधानी तैपेईच्या इमारती हादरल्या. तथापि, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची नोंद नाही. या भूकंपाची खोली ११.९ किमी होती, असे जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसने म्हटले आहे. भूकंपाचे केंद्रबिंदू तैतुंग काउंटी हॉलपासून १०.१ किलोमीटर उत्तरेस होते. तैतुंग शहरात ५ श्रेणीच्या तीव्रतेची नोंद […] The post Taiwan News : तैवानला भूकंपाचा धक्का ! सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही appeared first on Dainik Prabhat .
Silver Rates : चांदीचा दर आज 9750 रुपयांनी वाढला, एक किलोचा भाव जाणून घ्या…
नवी दिल्ली: जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि भू-राजकीय तणावामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींनी सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. राष्ट्रीय राजधानीत बुधवारी चांदीच्या दराने मोठी झेप घेत २,२७,००० रुपये प्रति किलो हा नवा ऐतिहासिक टप्पा गाठला. एकाच दिवसात चांदीच्या दरात ९,७५० रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे. तर दुसरीकडे, सोन्याने देखील आंतरराष्ट्रीय बाजारात प्रथमच ४,५०० डॉलरचा टप्पा ओलांडून नवा […] The post Silver Rates : चांदीचा दर आज 9750 रुपयांनी वाढला, एक किलोचा भाव जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .
Aravallis Hills: अखेर अरावली पर्वतरांगा वाचवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; नेमकं प्रकरण काय?
Aravallis Hills: उत्तर भारताचे फुफ्फुस मानल्या जाणाऱ्या अरावली पर्वतमालेचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. अरावली क्षेत्रातील नैसर्गिक समतोल राखण्यासाठी आणि वाढते वाळवंटीकरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने या संपूर्ण पर्वत रांगेत नवीन खाण लीज (Mining Lease) देण्यावर तात्काळ बंदी घातली आहे. पर्यावरण आणि वन मंत्रालयाने यासंदर्भात राजस्थान, हरियाणा आणि गुजरातच्या मुख्य सचिवांना लेखी […] The post Aravallis Hills: अखेर अरावली पर्वतरांगा वाचवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; नेमकं प्रकरण काय? appeared first on Dainik Prabhat .
बंदी असलेल्या गांजा आणि चायनीज मांजाची पुण्यात राजरोस विक्री
पुणे : पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आणि त्यांच्या आसपासच्या भागात बंदी असलेल्या गांजा या अंमली पदार्थाची तसेच बंदी असलेल्या चायनीज मांजाची राजरोस विक्री होत आहे. तरुणाईच्या आरोग्याला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला गांजा आणि चायनीज मांजा या दोन संकटांनी ग्रासले आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ आणि लाखो रुपयांचा चायनीज मांजा यांची जप्ती केली. त्याचवेळी या समस्येची तीव्रता ठळकपणे समोर आली आहे. गांज्याच्या समस्येने पुणे शहराला तर चायनीज मांज्याच्या समस्येने पिंपरी चिंचवडला प्रचंड मोठ्या ग्रासले आहे. हिंजवडी परिसरात असलेल्या एका घनदाट वस्तीच्या भागात फ्लॅट भाड्याने घेऊन तिथं गांजा पिकवला जात होता. हायड्रोफोनिक अर्थात विना मातीची गांजाची शेती केली जात होती. तर पिंपरी-चिंचवड शहरात सर्रासपणे जीवघेणा चायनीज मांजा, नायलॉन मांजा हा विकला जात आहे. हा मांजा काच आणि प्लॅस्टिकचा वापर करून बनवलेला असल्यानं तो तुटत नाही. पतंगबाजीच्या खेळात कटलेल्या पतंगाचा मांजा रस्त्यावर पसरतो आणि दुचाकीस्वारांचे गळे कापले जाणे, पक्ष्यांचे पंख छाटले जाणे, गंभीर अपघात होणे हे प्रकार होतात. हायड्रोफोनिक गांजा तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे तसेच चायनीज मांजा हा रस्त्यावरून चालणाऱ्या निष्पाप नागरिकांच्या जिवावर उठला आहे. यामुळे पोलिसांनी गांजा आणि चायनीज मांजा या दोन्हीची साठवणूक, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Tarique Rahman : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान झिया यांचे पुत्र तारिक रहमान मायदेशी परतणार
ढाका : बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे प्रभारी अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान गुरुवारी मायदेशी परतणार आहेत. गेल्या १७ वर्षांपासून रहमान लंडनमध्येच वास्तव्यास आहेत. खालिदा झिया यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर ढाक्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच बांगलादेशात फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये बीएनपी हा सर्वात मोठा पक्ष […] The post Tarique Rahman : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान झिया यांचे पुत्र तारिक रहमान मायदेशी परतणार appeared first on Dainik Prabhat .
पाटणा : बिहारमध्ये एनडीए सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत आहे. दरम्यान, विरोधी पक्ष दररोज विविध दावे करत आहेत. असेही दावे केले जात आहेत की भाजप नितीश कुमार यांना सत्तेवरून काढून स्वतःचा मुख्यमंत्री बनवू इच्छित आहे. या सर्व दाव्यांमध्ये, जेडीयू नेते दिनेश चंद्र यादव यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. दिनेश चंद्र यादव यांनी बुधवारी दिल्लीत सांगितले […] The post Dinesh Chandra Yadav : नितीश यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उदभवत नाही; दिनेश यादव यांनी फेटाळल्या चर्चा appeared first on Dainik Prabhat .
मुंबई: बॉलीवूडचा ‘नंबर १’ अभिनेता गोविंदा आणि त्याच्या पत्नीमधील वादाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. सुनीता आहूजा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधांच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, यामुळे चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ज्या मुलीसोबत गोविंदाचे नाव जोडले जात आहे, ती कोणतीही अभिनेत्री नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘ई-टाइम्स’शी संवाद साधताना […] The post गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधांच्या वृत्ताला सुनीता आहूजा यांचा दुजोरा! म्हणाल्या, ‘ती मुलगी फक्त पैशासाठी मागे लागलीये’ appeared first on Dainik Prabhat .
Delhi Blast Updates : दिल्ली स्फोटातील आरोपींच्या कोठडीत ८ जानेवारीपर्यंत वाढ; न्यायालयाने सांगितलं…
Delhi Blast Updates : दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने बुधवारी लाल किल्ल्याबाहेर झालेल्या स्फोटप्रकरणातील सात आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १५ दिवसांची वाढ करून त्यांना ८ जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रशांत शर्मा यांच्यासमोर राष्ट्रीय तपास संस्थेने कडेकोट बंदोबस्तात आरोपींना हजर केले. न्यायालयाने डॉ. आदिल राथर, डॉ. मुजम्मिल गनाई, डॉ. शाहीन सईद, मौलवी इरफान अहमद […] The post Delhi Blast Updates : दिल्ली स्फोटातील आरोपींच्या कोठडीत ८ जानेवारीपर्यंत वाढ; न्यायालयाने सांगितलं… appeared first on Dainik Prabhat .
Election News : “अधिकृत प्रचार कालावधीनंतर जाहिरातींवर बंदी”–राज्य निवडणूक आयोग
Election News – आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी अधिकृत प्रचार कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि इतर माध्यमांमधील सर्व निवडणूकांसंबंधित जाहिरातींवर बंदी घातली जाईल, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत बोलताना सांगितले. २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे. संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार, मतदानाची वेळ संपण्याच्या ४८ […] The post Election News : “अधिकृत प्रचार कालावधीनंतर जाहिरातींवर बंदी” – राज्य निवडणूक आयोग appeared first on Dainik Prabhat .
३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा'चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो
मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ आपल्यासोबत राहतात. ते खऱ्या अर्थाने मास्टर स्टोरीटेलर आहेत. ह्यूमर, भावना आणि सामाजिक विचार यांना इतक्या सहजतेने एकत्र गुंफण्याची त्यांची हातोटी आहे की त्यांच्या फिल्म्स आपल्याच वाटतात आणि प्रत्येकाशी एक नातं निर्माण करतात. ३ इडियट्ससह त्यांनी फक्त एक यशस्वी चित्रपट नाही बनवला, तर एक सांस्कृतिक क्षण घडवला. सोळा वर्षांनंतरही हा चित्रपट वेगवेगळ्या पिढ्यांशी तितक्याच खोलवर जोडलेला आहे. यावरून हे सिद्ध होतं की संवेदना आणि प्रामाणिक हेतूंवर उभं असलेलं हिरानींचं सिनेमा वेळेच्या मर्यादा ओलांडून आजही तितकाच प्रभावी आहे. राजकुमार हिरानींची कथा सांगण्याची कलाराजकुमार हिरानींच्या मते सिनेमाची सुरुवात संवेदनशीलतेपासून होते. ३ इडियट्स ना महत्त्वाकांक्षेची थट्टा करते, ना शिक्षणाची; तर त्या व्यवस्थांवर प्रश्न विचारते ज्या हळूहळू शिकण्याचा आनंद हिरावून घेतात. हिरानींची कथा उपदेश देत नाही, तर लक्षपूर्वक ऐकते.मोठ्या आदर्शांपेक्षा त्यांनी चित्रपट रोजच्या, खऱ्या भावनांशी जोडला आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या स्केलचा चित्रपट असूनही कथा खूप वैयक्तिक आणि जवळची वाटते. हीच भावनिक प्रामाणिकता ३ इडियट्सला आजही तितकीच प्रभावी आणि स्मरणात राहणारी बनवते. आमिर खानचा अभिनयतो काळ असा होता, जेव्हा बहुतेक मोठे स्टार्स सुरक्षित भूमिका निवडत होते. त्याच वेळी आमिर खानने रँचोसारखी भूमिका स्वीकारली—जो ठराविक चौकटीत न चालता जिज्ञासेने जगतो. त्यांचा अभिनय पारंपरिक हिरोइझमवर नाही, तर प्रामाणिकतेवर आधारलेला आहे.आमिर नेहमीच असे पात्र निवडतो, जे समाजाने ठरवलेल्या नियमांची पुनरावृत्ती न करता त्यांना प्रश्न विचारतात. हीच विचारधारा *३ इडियट्स*ला भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवते. रँचो प्रेरणादायी वाटतो कारण तो परिपूर्ण आहे म्हणून नाही, तर तो स्वतः असण्याची भीती बाळगत नाही म्हणून. हीच गोष्ट त्याला आजही खास आणि लक्षात राहणारा बनवते. चित्रपटाने योग्य प्रश्न वेळेआधी विचारलेतो काळ असा होता, जेव्हा मानसिक आरोग्य, अभ्यासाचा ताण आणि पालकांच्या अपेक्षा यावर उघडपणे चर्चा होत नव्हती. त्याच वेळी ३ इडियट्स आला आणि या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले.चित्रपटाने काही आवश्यक पण अस्वस्थ करणारे प्रश्न विचारले— यशाची व्याख्या इतकी मर्यादित का केली जाते? अपयशाला वाईट किंवा लाजिरवाणं का मानलं जातं? शिकण्याचा आनंद नेहमी मागे का पडतो?सोळा वर्षांनंतरही या प्रश्नांची पूर्ण उत्तरं मिळालेली नाहीत. म्हणूनच हा चित्रपट आजही जुना वाटत नाही, तर काळाच्या पुढचा आणि विचार करायला भाग पाडणारा वाटतो. वेदना आणि विनोद यांचा अचूक समतोलहिरानींची सर्वात मोठी ताकद म्हणजे ते वेदना आणि विनोद यांना अशा पद्धतीने मिसळतात की दोन्हींपैकी काहीही जड वाटत नाही. ३ इडियट्स सहजपणे हसण्यापासून थेट शांततेपर्यंत पोहोचते—“ऑल इज वेल”सारख्या हलक्याफुलक्या क्षणांपासून ते गळ्यात आवंढा आणणाऱ्या प्रसंगांपर्यंत.हाच समतोल चित्रपटाला कधीच फिका पडू देत नाही. तो आधी मनोरंजन करतो आणि मग अतिशय सहजपणे प्रेक्षकांना विचार करायला लावतो—हीच ती खासियत आहे जी अनेक संदेशप्रधान चित्रपटांना साधता येत नाही. आजही तितकाच जबरदस्त भावनिक परिणामखूप कमी हिंदी चित्रपटांना ३ इडियट्स सारखी भावनिक ओळख मिळाली आहे. त्याचे डायलॉग्स, दृश्यं आणि अगदी शांततेचे क्षणही आज पॉप कल्चरमध्ये जिवंत आहेत. त्याहून महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक नव्या पिढीसोबत या चित्रपटाला नवे प्रेक्षक मिळतात—विद्यार्थी, पालक किंवा काम करणारे लोक—आणि प्रत्येकजण त्याला आपल्या दृष्टीकोनातून जोडून पाहतो. हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. अशी दीर्घकाळ टिकणारी छाप ट्रेंड्स किंवा तंत्रज्ञानातून येत नाही; ती सत्यातून येते.३ इडियट्स आजही का महत्त्वाचा आहेसोळा वर्षांनंतरही ३ इडियट्स ठामपणे उभी आहे कारण ती परिपूर्ण नव्हती, तर प्रामाणिक होती. राजकुमार हिरानींचे संवेदनशील दिग्दर्शन आणि आमिर खानची अभिनेता म्हणूनची सच्चाई एकत्र येऊन असा चित्रपट तयार झाला, जो केवळ मनोरंजन करत नाही, तर विश्वासही देतो. सतत बदलणाऱ्या सिनेमाच्या काळात ३ इडियट्स आजही हे आठवण करून देते की संवेदना, धाडस आणि सत्यावर उभ्या असलेल्या कथा कधीच जुन्या होत नाहीत.
शरद पवारांच्या पक्षाला भगदाड, शहराध्यक्ष प्रशांत जगतापांचा राजीनामा
पुणे : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन काही दिवस उलटत नाहीत तोच पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार गटाने अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करताना उद्धव ठाकरेंच्या पक्षालाही सोबत घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावावरुन शरद पवारांच्याच पक्षात प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी शरद पवारांच्या पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा देत जाहीर केली. राजीनामा देताना काय म्हणाले प्रशांत जगताप ?राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे. आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे मनापासून आभार ! मी २७ वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो. आज २७ वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल! आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार; असे म्हणत शरद पवारांच्या पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला. त्यांनी स्वतःची भूमिका जाहीर करत राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे पुण्यातील शरद पवारांच्या पक्षाच्या राजकीय समीकरणांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
Assam News : आसाममध्ये 40 टक्के लोक बांगलादेशी वंशाचे; मुख्यमंत्र्यांचा धक्कदायक दावा
चाबुआ : जर शेजारील देशातून आसाममध्ये येणाऱ्या लोकांची संख्या आणखी १० टक्क्यांनी वाढली तर आसाम आपोआपच बांगलादेशात सामील होईल असा धक्कादायक दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी केला.येथे एका अधिकृत कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की ते गेल्या पाच वर्षांपासून हा मुद्दा उपस्थित करत आहेत. ईशान्येकडील भाग शेजारील देशाशी विलीन करण्याबाबत बांगलादेशी नेत्याच्या कथित […] The post Assam News : आसाममध्ये 40 टक्के लोक बांगलादेशी वंशाचे; मुख्यमंत्र्यांचा धक्कदायक दावा appeared first on Dainik Prabhat .
Temba Bavuma Rection on Jasprit Bumrah Bauna remark : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील नुकतीच झालेली मालिका केवळ मैदानातील चुरशीसाठीच नाही, तर मैदानाबाहेर घडलेल्या वादविवादांमुळेही चर्चेत राहिली. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेत २-० असा विजय मिळवला, तर वन-डे आणि टी-२० मालिकेत भारताने बाजी मारली. मात्र, या संपूर्ण दौऱ्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण […] The post Temba Bavuma : बुमराहच्या ‘बुटक्या’ कमेंटवर बावुमाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘माफी मागितली, पण विसरलो नाही!’ appeared first on Dainik Prabhat .
Surupsingh Naik : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन
महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री तथा नवापूरचे माजी आमदार सुरुपसिंग नाईक यांचे २४ डिसेंबर २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील काँग्रेस पक्ष आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सुरुपसिंग नाईक हे इंदिरा गांधी आणि गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय मानले जात होते. पक्षाचे विश्वासू सहकारी […] The post Surupsingh Naik : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन appeared first on Dainik Prabhat .
Rakesh Roshan Angry | Transgenders | Video Viral : रोशन कुटुंबातील आनंदाच्या वातावरणात काल एका अनपेक्षित घटनेमुळे मिठाचा खडा पडला. अभिनेता हृतिक रोशनचा चुलत भाऊ ईशान रोशन आणि ऐश्वर्या सिंह यांचा शाही विवाहसोहळा २३ डिसेंबरला मुंबईत उत्साहात पार पडला. मात्र, लग्नानंतर नवीन जोडपे घरी परतत असताना राकेश रोशन आणि तृतीयपंथी यांच्यात झालेला वाद सध्या चर्चेचा […] The post Rakesh Roshan Angry : नव्या नवरीला दारातच अडवलं..! राकेश रोशन यांचे तृतीयपंथींशी वाद, VIDEO तुफान व्हायरल appeared first on Dainik Prabhat .
पुणे : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि अजित पवार गट यांच्यात पुणे महापालिकेसाठी युती होण्याची शक्यता वाढली आहे. अशातच आता शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशील […] The post मोठी बातमी..! ऐन निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं भगदाड, बड्या नेत्याच्या राजीनाम्याने खळबळ appeared first on Dainik Prabhat .
Year Ender 2025: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) २०२५ या वर्षात नोकरदार वर्गासाठी अनेक क्रांतिकारी बदल केले आहेत. पीएफशी संबंधित कामांसाठी आता कर्मचाऱ्यांना कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज उरली नाही. प्रोफाईल अपडेट, पीएफ ट्रान्सफर आणि पेन्शन पेमेंट यांसारख्या प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि स्वयंचलित (Automated) करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांचा वेळ वाचावा आणि कामात पारदर्शकता यावी, हा […] The post Year Ender 2025: EPFO चा दिलासा! PF ट्रान्सफरपासून ‘पासबुक लाईट’पर्यंत, 2025 मधील ‘हे’ 10 मोठे बदल वाचा एका क्लिकवर… appeared first on Dainik Prabhat .
‘माझ्याकडेही खूप व्हिडिओ आहेत- युतीच्या घोषणेनंतर राज ठाकरेंचा भाजपला इशारा – आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऐतिहासिक युतीची औपचारिक घोषणा आज करण्यात आली. ‘आता चुकलात तर संपलात’ अशी साद घालत उद्धव ठाकरे यांनी मुंबई तोडण्याचे मनसुबे रचणाऱ्यांचा राजकीय खात्मा करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार तोफ डागली. […] The post Today TOP 10 News: युतीनंतर राज ठाकरेंचा भाजपला इशारा ते भाजपच्या मंत्र्याविरूद्ध अटक वॉरंट… वाचा आजच्या 10 बातम्या एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .
Vijay Hazare Trophy : ३२ चेंडूत शतक! सकीबुल गनीने मोडले सर्व विक्रम; इशान-वैभवलाही टाकले मागे
Vijay Hazare Trophy 2025 Records : सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला असून, एकाच दिवशी अनेक मोठे विक्रम मोडीत निघाले आहेत. बुधवारी अवघ्या काही तासांच्या अंतरात क्रिकेट विश्वाला तीन अतिवेगवान शतके पाहायला मिळाली. यामध्ये बिहारच्या सकीबुल गनीने अवघ्या ३२ चेंडूत शतक झळकावून स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम आपल्या नावावर केला […] The post Vijay Hazare Trophy : ३२ चेंडूत शतक! सकीबुल गनीने मोडले सर्व विक्रम; इशान-वैभवलाही टाकले मागे appeared first on Dainik Prabhat .
Pune : शौर्यदिन निर्विघ्नपणे पार पडणार.! पोलीस आयुक्त अमितेश कुमार
लोणिकंद – दि. १ जानेवारी २०२६ रोजी मौजे पेरणे येथे होणाऱ्या विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या लक्षावधी अनुयायांना सुरक्षितता पुरविण्याच्या पार्श्वभूमीवर आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार तसेच महाराष्ट्र राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांचे सह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. यावेळी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या प्रश्नांविषयी […] The post Pune : शौर्यदिन निर्विघ्नपणे पार पडणार.! पोलीस आयुक्त अमितेश कुमार appeared first on Dainik Prabhat .
Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा
नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणारमुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील सत्तासमीकरणे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहेत. विशेषतः एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची कमान हाती घेतल्यापासून गणेश नाईक आणि शिंदे यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाला. नाईक मंत्री झाल्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या जनता दरबारांनी या संघर्षाला व्यापक वळण मिळाले. मात्र, अचानक या दोन्ही नेत्यांनी मंत्रालयात बंद दाराआड चर्चा केल्याने त्यांचे मनोमिलन झाले की काय, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.https://prahaar.in/2025/12/24/this-alliance-is-not-for-the-marathi-people-but-for-their-own-survival-deputy-chief-minister-eknath-shindes-venomous-criticism-of-the-uddhav-raj-alliance/नवी मुंबई हा गणेश नाईक यांचा बालेकिल्ला मानला जातो. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी येथे आपली राजकीय पकड मजबूत ठेवली आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही वर्षांत ठाण्यापलिकडे जात नवी मुंबईतही संघटनात्मक जाळे विणण्याचा प्रयत्न सुरू केल्याने या दोन्ही नेत्यांमध्ये संषर्घ सुरू झाला. प्रभाग रचना, विकासकामे, नगरसेवक फोडणे अशा अनेक मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दुसरे म्हणजे, मंत्रीपद मिळाल्यानंतर गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार सुरू केला. शिंदे यांच्या प्रभावक्षेत्रात नाईकांनी जनता दरबार घेतल्याने, त्याकडे थेट आव्हान म्हणून पाहिले गेले. विशेषतः नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद तीव्र झाला होता.अशात शिंदे आणि नाईक यांच्यात मंत्रालयात बंददाराआड १५ मिनिटांहून अधिक काळ चर्चा झाल्याने, ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. नवी मुंबई पालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेनेने महायुती म्हणून लढवावी, यावर दोन्ही नेत्यांचे बैठकीत एकमत झाल्याचे कळते. शिवाय जागावाटपाचा फॉर्म्युला देखील अंतिम झाला असून, ठाणे आणि पालघरमधील अन्य पालिकांबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Giorgia Meloni : “येणारे २०२६ वर्ष आणखी वाईट असेल..”–पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी
Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी म्हटले आहे की २०२५ हे वर्ष आधीच कठीण होते, परंतु येणारे वर्ष, २०२६, आणखी वाईट असेल. तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की इटलीच्या पंतप्रधान असे का म्हणत आहेत, येणाऱ्या वर्षाबद्दल त्या इतक्या सकारात्मक का नाहीत. या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी, हे जाणून घ्या की २०२५ हे मेलोनी सरकारला काही […] The post Giorgia Meloni : “येणारे २०२६ वर्ष आणखी वाईट असेल..” – पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने त्यांच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाने बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा यांच्यासह अनेक अनुभवी नेत्यांचा समावेश केला आहे. वाचा संपूर्ण यादी गजानन कीर्तिकर आनंदराव अडसूळ श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार प्रतापराव जाधव, केंद्रीय […] The post शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर; सुपरस्टार गोविंदासह अनेक बड्या नेत्यांचा समावेश, वाचा संपूर्ण यादी appeared first on Dainik Prabhat .
मोठी बातमी..! ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला?
BMC Election 2026 | शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची आज अखेर अधिकृतरित्या घोषणा झाली आहे. आज (24 डिसेंबर) मुंबईत एकत्र पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी युतीची घोषणा केली. ही युती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी मुंबईचा महापौर मराठी होणार आणि आमचाच होणार, असा […] The post मोठी बातमी..! ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला? appeared first on Dainik Prabhat .
महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळापासून चर्चेत असलेली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांची युती (Thackeray Brothers Alliance) अखेर अधिकृत झाली आहे. तब्बल १८-२० वर्षांच्या राजकीय वैरानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत बंधू एकत्र आले आहेत. २४ डिसेंबर रोजी संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि इतर महापालिका निवडणुकांसाठी युतीची […] The post Thackeray Brothers Alliance : एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक ! ठाकरे बंधूंची युती होताच ‘या’ ठिकाणी बसला पहिला धक्का appeared first on Dainik Prabhat .
उद्या नाताळच्या निमित्ताने शेअर बाजार, बँका,कमोडिटी बाजार चालू राहतील का? वाचा
प्रतिनिधी:उद्या ख्रिसमस निमित्त शेअर बाजार बंद असणार आहे.त्यामुळे नेहमीप्रमाणे बाजार परवा २६ डिसेंबरला उघडणार आहे. दोन्ही बीएसई व एनएसई शेअर बाजारात ही सुट्टी लागू असणार आहे. एकूण १६ बँक सुट्यांमध्ये नाताळ (ख्रिसमस) ही एक सुट्टी मानली जाते. बँकैलाही उद्या सुट्टी असल्याने गरजेचे बँकेतील प्रत्यक्ष व्यवहार ग्राहक परवा करू शकतील. याशिवाय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनाही परवा ट्रेडिंग करणे शक्य होणार आहे. दरम्यान बँकिंग सेवांच्या बाबतीत डिजीटल बँकिग सेवा खुल्या राहणार आहेत. युपीआय, एटीएम, इतर डिजिटल पेमेंटसाठी व्यवहार सुरळीत चालू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.शेअर बाजाराव्यतिरिक्त कमोडिटी बाजार एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) उद्या सकाळच्या सत्रासाठी बंद राहणार असून संध्याकाळचे सत्र नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे. त्यानंतर शेअर बाजार थेट २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बंद राहणार आहे. दरम्यान आज शेअर बाजार घसरणीकडे वळला असला तरी विश्लेषकांच्या मते, शेअर बाजार येणाऱ्या ट्रेडिंग सत्रात चांगली कामगिरी करेल.
मुंबई : बहुचर्चित नवी मुंबई विमानतळाला ‘लोकनेते स्व. दि. बा. पाटील’ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. त्याला मान्यता मिळून लवकरच या विमानतळाचे नामकरण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, नवी मुंबई विमानतळ उद्यापासून सेवेत येत आहे, याचा मला आनंद आहे. या विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. तो प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे, त्यावर कारवाई चाललेली आहे. आम्ही त्यासंदर्भात केंद्रातल्या सर्व नेत्यांनाही भेटलो असून पंतप्रधानांनीही त्याबाबतचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मान्यता मिळेल आणि लवकरच या विमानतळाचे नाव हे दिबा पाटील विमानतळ होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
“सोन्याची अंडी खाऊन झाली आता कोंबडीच कापायला निघाले“आमच्याकडे विकासाचा, तर त्यांच्याकडे खुर्चीचा अजेंडा”मुंबई : काही लोक मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात. आधी अंडी खात होते, आता कोंबडीच कापून खाण्यासाठी एकत्र आले आहेत. अशा शब्दांत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्या नव्या युतीवर जहरी, आक्रमक टीका केली.मुंबईतील बाळासाहेब भवन येथे कोल्हापूर व नाशिकमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्या वेळी बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर शब्दबाणांचा वर्षाव केला.नाशिक महापालिकेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक व प्रदेश सचिव राहुल अशोक दिवे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी काँग्रेसच्या नगरसेविका आशा तडवी, ॲड. पूजा प्रवीण नवले, सुनील बोराडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले. “दिवे यांचे सर्व समाजाशी सलोख्याचे संबंध आहेत. जनतेशी त्यांची नाळ घट्ट आहे. त्यांच्या प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेना अधिक मजबूत झाली आहे. त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला आम्ही सार्थ ठरवू,” असे शिंदे म्हणाले.कोल्हापूरमधूनही उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, महेश खांडेकर, संभाजी काशीद, राष्ट्रवादी बेस्ट कामगार युनियन सेनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील, उपाध्यक्ष प्रताप गणपत पाटील आदींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगरचे मनसे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर आणि मराठवाड्यातील मनसेचे चार जिल्हाध्यक्षही शिवसेनेत आले. हा प्रवेशाचा सिलसिला गेली साडेतीन वर्षे अखंड सुरू असल्याचे शिंदे यांनी अधोरेखित केले.लोकशाहीत युती-आघाड्या होत असतात; पण काही युती राज्य आणि जनतेच्या बळासाठी असतात महायुती तशी आहे, गेली साडेतीन वर्षे महाराष्ट्र पुढे नेते आहे. लोकाभिमुख, कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. “आता जे एकत्र आले आहेत ते सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आले आहेत,” असा थेट हल्ला त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर चढवला.“लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकांत महायुतीने विजय मिळवला आहे. जनतेनेच खरी-नकली शिवसेना कोणाची हे दाखवून दिले,” असे सांगत त्यांनी ‘ऐतिहासिक युती’च्या दाव्यांवर टीका केली. “ही स्वार्थाची, सत्तेची आणि अस्तित्वाची लढाई आहे. निवडणुकांनी त्यांना जागा दाखवली आहे,” असा टोला त्यांनी लगावला.मुंबईच्या विकासावर बोलताना शिंदे आक्रमक झाले. “विकासाचा अजेंडा काय, मुंबईचा अजेंडा काय. या प्रश्नांवर त्यांच्या पत्रकार परिषदेत एकही शब्द नव्हता. आमच्याकडे सांगण्यासारखी भरपूर कामे आहेत,” असे सांगून त्यांनी क्लस्टर पुनर्विकास, इमारतींना ओसी देणे, पागडीमुक्त मुंबई करणे, पुनर्विकास योजना, रस्ते काँक्रीटीकरण, एसटीपी प्लांट, मेट्रो प्रकल्प, कारशेड, आरोग्य सुविधा दिल्याचे आणि देत असल्याचे सांगितले. कोविड काळातील घोटाळ्यातील सर्व मुद्द्यांवर विरोधकांना घेरले.“मुंबईकराला खड्ड्यात घालणारे कोण? आम्ही सहा महिन्यांत मुंबई खड्डेमुक्त करू. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये १७ हजार घरांचा प्रकल्प मार्गी लावला आहे. १७ यूआरपी तयार झाले आहेत. टप्प्याटप्प्याने लाखो लोकांना घरे देणार,” असा ठोस दावा त्यांनी केला. गिरणी कामगारांना साडेबारा हजार घरे दिली, एक लाख जणांना घरे देणार,” असे स्पष्ट केले.महालक्ष्मी रेसकोर्सची १२५ एकर जमीन आणि कोस्टलच्या १७० एकर जमिनीसह ३०० एकरात ‘सेंटर पार्क’ उभारण्याचा उल्लेख करत “मोठे उद्यान एक तरी केले का?” असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला. “मुंबईकर सुज्ञ आहे; त्यांना विकास हवा आहे,” असे सांगत त्यांनी ‘स्वार्थी सेटलमेंट’ विरुद्ध ‘डेव्हलपमेंट’ असा स्पष्ट भेद केला.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून “उद्यापासून दररोज ४५ विमाने टेकऑफ घेणारआहेत. आमचा टेकऑफ बघा आणि त्यांचा लँडिंग बघा,” असा टोला त्यांनी लगावला. “महायुती टेम्पररी नाही; वापरा आणि फेका असा आमचा कारभार नाही. विकासाच्या मुद्द्यावर मराठी माणूस आमच्यासोबत आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Maharashtra Cabinet decision : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे 4 निर्णय जाणून घ्या…
मुंबई : राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे वातावरण तापले असताना आणि पक्षांतर, युती-आघाड्यांचा जोरदार खेळ सुरू असताना आज राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत चार मोठे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेनंतर घेतलेले हे निर्णय जनसामान्यांशी निगडित असून, विशेषतः चौथ्या निर्णयाने राजकीय नेत्यांमध्ये आणि माध्यमांमध्ये चर्चेचा भोवरा निर्माण झाला आहे. हे निर्णय […] The post Maharashtra Cabinet decision : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे 4 निर्णय जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .
Eknath Shinde : ठाकरेबंधू हे केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत.! एकनाथ शिंदेंचा खोचक टोला
Eknath Shinde | Raj Thackeray | Uddhav Thackeray – शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षांच्या युतीची घोषणा केली. यावरती, ठाकरेबंधू हे केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत, त्यांच्याकडे मुंबईच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […] The post Eknath Shinde : ठाकरेबंधू हे केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत.! एकनाथ शिंदेंचा खोचक टोला appeared first on Dainik Prabhat .
Congress News : ठाकरे बंधू एकत्र येताच काँग्रेसने ‘या’पक्षासोबत केली युती; राजकीय समीकरणे बदलणार
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. मुंबईत ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) यांनी शिवसेना (उबाठा) आणि मनसेची युती जाहीर केली असताना, महायुतीतील पक्षांनीही एकत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसने (Congress News) मोठी राजकीय खेळी करत राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) […] The post Congress News : ठाकरे बंधू एकत्र येताच काँग्रेसने ‘या’ पक्षासोबत केली युती; राजकीय समीकरणे बदलणार appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: अखेरच्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाली आहे. अस्थिरतेचा फटका बसल्याने अखेरच्या सत्रात सकाळची तेजी घसरणीत बदलली आहे. सेन्सेक्स ११६.१४ अंकाने व निफ्टी ३५.०५ अंकाने घसरला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकातही घसरण बदलल्याने बाजाराची सपोर्ट लेवल नष्ट झाली. क्षेत्रीय निर्देशांकात मिडकॅप व स्मॉलकॅपसह आज आयटी, मिडिया, पीएसयु बँक, तेल व गॅस शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असून वाढ मिडिया, रिअल्टी, मेटल शेअर्समध्ये कायम राहिली. मोठ्या दिग्गज कंपन्यापैकी एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, अदानी एंटरप्राईजेस, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स यांसारख्या शेअर्समध्ये घसरण झाली असून एक्सिस बँक, आयडीबीआय, मारूती सुझुकी,टीसीएस शेअर्समध्ये वाढ झाली आहे.अखेरच्या सत्रात भूराजकीय जागतिक अस्थिरतेचा फटका म्हणून तसेच रूपयांच्या घसरणीसह परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच घरगुती गुंतवणूकदारांनी नफा बुकिंग केल्याने आज सत्राच्या अखेरीस व्हॉल्यूममध्ये संख्यात्मक दृष्टीने वाढ झालेली नाही.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ जेबीएम ऑटो (१०.७३%),हिंदुस्थान कॉपर (७.०५%), मन्नपूरम फायनान्स (६.०७%), रिलायन्स पॉवर (५.१८%), आयआयएफएल फायनान्स (५.१३%), नुवामा वेल्थ (४.५७%), पीएनबी हाऊसिंग (३.५९%) समभागात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण कजारिया सिरॅमिक (४.०७%), नवीन फ्ल्युरोटेक (३.१३%), एचएफसीएल (३.०५%), किर्लोस्कर ऑईल (२.६७%), गोदावरी पॉवर (२.४९%), बीएसई (२.४३%), अपार इंडस्ट्रीज (२.२७%), आयईएक्स (२.०५%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'बुधवारी भारतीय शेअर बाजारात संथ आणि मर्यादित हालचालींचे सत्र दिसून आले, कारण बेंचमार्क निफ्टी दिवसभर एका अरुंद मर्यादेत व्यवहार करत होता. निर्देशांकाने २६२३६ पातळीचा इंट्राडे उच्चांक गाठला, त्यानंतर तो घसरून २६१२३ पातळीच्या नीचांकी पातळीवर आला, सत्राच्या दुसऱ्या सहामाहीत विक्रीचा सौम्य दबाव दिसून आला. क्षेत्रीय पातळीवर मीडिया, रिअल्टी, ऑटो, मेटल्स आणि सीपीएसई (CPSE) शेअर्समध्ये खरेदीचा कल दिसून आला, ज्यामुळे त्यांनी व्यापक बाजारापेक्षा चांगली कामगिरी केली. दुसरीकडे, तेल आणि वायू, आयटी, फार्मा, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, एफएमसीजी आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील शेअर्स दबावाखाली राहिले, ज्यामुळे निर्देशांकांमधील तेजीला मर्यादा आली.भारतीय रिझर्व्ह बँकेने तरलता वाढवण्यासाठी काही ठोस उपाययोजना जाहीर केल्यानंतर गुंतवणूकदारांच्या भावनांना काहीसा आधार मिळाला. केंद्रीय बँकेने डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात चार टप्प्यांत २ ट्रिलियन रुपयांचे सरकारी रोखे खरेदी करण्याची योजना जाहीर केली. या घोषणेनंतर, भारताच्या १०-वर्षीय सरकारी रोख्यांवरील उत्पन्न ६.६% च्या खाली आले, जे नऊ महिन्यांच्या उच्चांकावरून खाली आले आहे.जागतिक स्तरावर, अमेरिकेची अर्थव्यवस्था तिसऱ्या तिमाहीत ४.३% च्या मजबूत दराने विस्तारत असल्याचे दर्शविणाऱ्या आकडेवारीमुळे आशावादाला पाठिंबा मिळाला, जे जागतिक वाढीमधील लवचिकता दर्शवते. डेरिव्हेटिव्ह्ज सेगमेंटमध्ये, मणप्पुरम, सिंजीन, कोल इंडिया, नुवामा आणि कोफोर्ज सारख्या शेअर्समध्ये ओपन इंटरेस्टमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली, जे सक्रिय सहभागाकडे निर्देश करते. मासिक मुदतीसाठी निफ्टी ऑप्शन्सच्या आघाडीवर, सर्वाधिक कॉल ओपन इंटरेस्ट २६२०० आणि २६३०० स्ट्राइकवर केंद्रित आहे, तर पुटच्या बाजूने, २६२०० आणि २६००० स्ट्राइकवर सर्वाधिक ओपन इंटरेस्ट आहे. हे स्तर नजीकच्या काळात अनुक्रमे प्रमुख प्रतिरोध आणि आधार क्षेत्र म्हणून काम करतील अशी अपेक्षा आहे.'आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'ख्रिसमसच्या सुट्टीपूर्वी व्यापारातील सुस्तपणामुळे, २४ डिसेंबर रोजी एका अस्थिर आणि कमी उलाढालीच्या सत्रात भारतीय इक्विटी बेंचमार्क किंचित घसरणीसह बंद झाले. अलीकडील गुंतवणुकीचा ओघ असूनही, कठोर मौद्रिक धोरणे, मजबूत अमेरिकन डॉलर आणि विकसित बाजारपेठांमधील उच्च जोखीम-मुक्त परतावा यांसारख्या जागतिक प्रतिकूल परिस्थितीमुळे या वर्षात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) विक्रमी गुंतवणूक काढून घेतली आहे. सत्राच्या अखेरीस, सेन्सेक्स ११६.१४ अंकांनी, म्हणजेच ०.१४ टक्क्यांनी घसरून ८५४०८.७० वर बंद झाला, तर निफ्टी ३५.०५ अंकांनी, म्हणजेच ०.१३ टक्क्यांनी घसरून २६१४२.१० पातळीवर पोहोचला. मीडिया, मेटल आणि रिअल्टी वगळता, सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले, ज्यात आयटी, तेल आणि वायू, फार्मा आणि पीएसयू बँक शेअर्समध्ये प्रत्येकी सुमारे ०.४ टक्क्यांची घसरण झाली. मिडकॅप निर्देशांक ०.६ टक्क्यांनी घसरला, तर स्मॉल-कॅप निर्देशांक ०.२८ टक्क्यांच्या किंचित वाढीसह बंद झाला. ख्रिसमसमुळे गुरुवार, २५ डिसेंबर रोजी बाजारपेठा बंद राहतील.'आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'निर्देशांकाने एक लहान बेअरिश कँडलस्टिक पॅटर्न तयार केला, ज्याला लांब वरची सावली होती आणि तो बहुतेक मागील सत्राच्या उच्च निम्न श्रेणीमध्येच राहिला, ज्यामुळे विशिष्ट शेअर्समधील हालचालींदरम्यान बाजारात स्थिरीकरणाचे संकेत मिळाले. मागील तीन सत्रांतील तेजीनंतर निफ्टी गेल्या दोन सत्रांपासून स्थिरावताना दिसत आहे, जे बाजारातील सकारात्मक दृष्टिकोन दर्शवते. तात्काळ आधार सोमवारच्या गॅप-अप झोनजवळ २६००० पातळीच्या पातळीवर आहे, तर तात्काळ प्रतिकार २६३०० पातळीच्या पातळीवर आहे, जी अलीकडील स्थिरीकरण श्रेणीची वरची मर्यादा आहे. गेल्या ४ आठवड्यांपासून निफ्टी २६३००-२५७०० पातळीच्या श्रेणीत स्थिरावताना दिसत आहे. आम्हाला अपेक्षा आहे की निर्देशांक हीच स्थिती कायम ठेवेल आणि केवळ २६३०० पातळीच्या वरची चालच २६५०० पातळीच्या क्षेत्राकडे पुढील तेजीची शक्यता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.'आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'निर्देशांकाने एक लहान बेअरिश कँडलस्टिक पॅटर्न तयार केला, ज्याला लांब वरची सावली होती आणि तो बहुतेक मागील सत्राच्या उच्च-निम्न श्रेणीमध्येच राहिला, ज्यामुळे विशिष्ट शेअर्समधील हालचालींदरम्यान बाजारात स्थिरीकरणाचे संकेत मिळाले. मागील तीन सत्रांतील तेजीनंतर निफ्टी गेल्या दोन सत्रांपासून स्थिरावताना दिसत आहे, जे बाजारातील सकारात्मक दृष्टिकोन दर्शवते. तात्काळ आधार (Immediate Support) सोमवारच्या गॅप-अप झोनजवळ २६००० पातळीच्या पातळीवर आहे, तर तात्काळ प्रतिकार २६३०० पातळीच्या पातळीवर आहे, जी अलीकडील स्थिरीकरण श्रेणीची वरची मर्यादा आहे. गेल्या ४ आठवड्यांपासून निफ्टी २६३००-२५७०० पातळीच्या श्रेणीत स्थिरावताना दिसत आहे. आम्हाला अपेक्षा आहे की निर्देशांक हीच स्थिती कायम ठेवेल आणि केवळ २६३०० पातळीच्या वरची चालच २६५०० पातळीच्या क्षेत्राकडे पुढील तेजीची शक्यता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.'आजच्या बाजारातील टेक्निकल पोझिशनवर विश्लेषण करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक नागराज शेट्टी म्हणाले आहेत की,'ख्रिसमसमुळे भारतीय आणि जागतिक बाजारांमध्ये सुट्टी असल्याने, बुधवारी निफ्टीमध्ये अस्थिर हालचाल सुरू राहिली आणि तो ३५ अंकांनी घसरून बंद झाला. सकारात्मक सुरुवातीनंतर, सत्राच्या सुरुवातीच्या ते मधल्या भागात बाजाराला तेजी कायम राखण्यात अपयश आले. सत्राच्या मधल्या ते शेवटच्या भागात मर्यादित हालचालीसह हळूहळू कमजोरी दिसून आली आणि अखेरीस निफ्टी घसरून बंद झाला.दैनंदिन आलेखावर (Daily Chart) लांब वरच्या कलासह एक लहान नकारात्मक कँडल तयार झाली आहे. तांत्रिकदृष्ट्या, गेल्या दोन सत्रांमधील बाजाराची हालचाल खालच्या पातळीवरून झालेल्या जोरदार वाढीनंतर बाजारात विश्रांतीचे संकेत देत आहे, जे तेजीच्या ट्रेंडच्या सातत्याचे एक स्वरूप असू शकते.बाजारातील सध्याची निरुत्साही हालचाल अल्पकाळ टिकणारी असू शकते आणि नजीकच्या काळात निफ्टी खालच्या पातळीवरून जोरदारपणे उसळी घेऊ शकतो. तात्काळ आधार २६००० पातळीच्या पातळीवर आहे आणि वरच्या बाजूचा प्रतिकार (Up Side)२६३०० पातळीच्या आसपास पाहिला पाहिजे.'
ठाकरे बंधूंच्या युतीची देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली, म्हणाले.. मी जन्मजात हिंदुत्ववादी..
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीपूर्वी ठाकरेबंधूंनी आपल्या पक्षांच्या युतीची औपचारिक घोषणा केली. यावरती, ठाकरेबंधूंच्या युतीमुळे कोणताही महत्त्वपूर्ण फरक पडणार नाही, त्यांचे एकत्र येणे हा त्यांच्या स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठीचा प्रयत्न आहे, असे त्यांच्या युतीला कमी लेखत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, त्यांचा इतिहास भ्रष्टाचार आणि स्वार्थाचा आहे. त्यांची युती ही […] The post ठाकरे बंधूंच्या युतीची देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली, म्हणाले.. मी जन्मजात हिंदुत्ववादी.. appeared first on Dainik Prabhat .
‘Apple’चा मास्टरस्ट्रोक.! iPhone 18 Pro मध्ये मिळणार जबरदस्त फीचर्स, कॅमेरा आणि दमदार बॅटरी….
Technology | Apple | iPhone 18 Pro : आयफोन १८ सिरीज लाँच होण्यास अजून बराच अवकाश आहे, पण सुरुवातीच्या लीक्समधून नवीन माहिती समोर येत आहे. लोक या सिरीजचा गेमचेंजर असणारा आयफोन १८ प्रो लाँच होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जर तुम्हीही या फोनची आतुरतेने वाट पाहत असाल, तर पुढील वर्षी १८ सिरीजच्या या प्रो मॉडेलमध्ये […] The post ‘Apple’चा मास्टरस्ट्रोक.! iPhone 18 Pro मध्ये मिळणार जबरदस्त फीचर्स, कॅमेरा आणि दमदार बॅटरी…. appeared first on Dainik Prabhat .
सिंधुदुर्ग: कोरोना कालावधीत करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी भाजपच्या बड्या नेत्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कुडाळ न्यायालयाने राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट (Non-Bailable Warrant) जारी केले आहे. वारंवार न्यायालयाच्या तारखेला अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने ही कडक कारवाई केली आहे. नेमके प्रकरण काय? २६ […] The post मोठी बातमी: महाराष्ट्रातील भाजपचे 1 मंत्री आणि 2 आमदारांविरूद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी; नेमके प्रकरण काय? appeared first on Dainik Prabhat .
Violence in Assam : आसाममध्ये मोठा हिंसाचार.! तडकाफडकी कर्फ्यू लागू
Violence in Assam : ईशान्य भारतातल्या आसाममध्ये कार्बी आंगलोंगमध्ये पुन्हा हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलीसांना लाठीमार करावा लागला. जमावाला पांगण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यावेळी जमावाने तीन दुचाकींना आग लावली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. […] The post Violence in Assam : आसाममध्ये मोठा हिंसाचार.! तडकाफडकी कर्फ्यू लागू appeared first on Dainik Prabhat .
M.K.Stalin : तामिळनाडूचे लोक झुकणार नाहीत; स्टॅलिन यांनी उपस्थित केला तमिळ अस्मितेचा मुद्दा
चेन्नई : तामिळनाडूचे लोक दबावापुढे झुकणार नाहीत. समाजसुधारक ई. व्ही. रामास्वामी यांनी पेरियार यांनी लोकांमध्ये स्वाभिमान, तर्कसंगत विचारसरणी आणि समानता वाढवली आहे. तर्कसंगत विचारसरणी, मानवतेसाठी प्रेम आणि समानता ही या महान जातीची शान आहे, अशा शब्दांत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी तमिळ अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला आहे. ई. व्ही. रामास्वामी यांच्या ५२ व्या स्मृतिदिनानिमित्त ते […] The post M.K.Stalin : तामिळनाडूचे लोक झुकणार नाहीत; स्टॅलिन यांनी उपस्थित केला तमिळ अस्मितेचा मुद्दा appeared first on Dainik Prabhat .
Rohit Sharma : ३८ व्या वर्षीही रोहितचा ‘हिटमॅन’क्लास कायम, विजय हजारे ट्रॉफीत ठोकलं विस्फोटक शतक
Rohit Sharma Century in Vijay Hazare Trophy 2025 : टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माने पुन्हा एकदा आपल्या बॅटने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. वयाच्या ३८ व्या वर्षीही आपला क्लास कायम राखत रोहितने विजय हजारे ट्रॉफी २०२५ मध्ये ऐतिहासिक शतकी खेळी साकारली. ज्यामुळे मुंबईने पहिल्याच सामन्यात सिक्कीमचा आठ विकेट्सनी पराभव केला. अशा प्रकारे रोहितने आता […] The post Rohit Sharma : ३८ व्या वर्षीही रोहितचा ‘हिटमॅन’ क्लास कायम, विजय हजारे ट्रॉफीत ठोकलं विस्फोटक शतक appeared first on Dainik Prabhat .
मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाही तर पक्ष अस्तित्वासाठी एकत्र
हा तर संधीसाधूंचा सत्ता पिपासूपणा, भाजपा नेते मंत्री ॲड. आशिष शेलार यांची टीकामुंबई: मराठी माणसाने तुम्हाला वेगळे व्हायला सांगितले नव्हते. त्यावेळी कशासाठी वेगळे झालात आणि आता कशासाठी गळयात गळे घालत आहेत. त्यावेळी म्हणालात होतात की, मातोश्रीवरील विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे. चार कारकून पक्ष चालत आहेत मग आज त्याच कारकूनांसोबत आणि बडव्यांसोबत हात मिळवणी कशासाठी करीत आहेत, असा सवाल करीत ठाकरेंचे एकत्रीत येणे हे संधीसाधूंचा सत्तापिपासूपणा आहे, मराठी माणसाच्या अस्मीतेसाठी नाही तर पक्ष अस्तित्वासाठी एकत्र अशी टीका भाजपा नेते मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज केली.दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर मंत्री शेलार यांनी आज मुंबई भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांच्या वतीने काही सवाल उपस्थित केले. ते पक्षाला घेरणारे चार कारकून कोण, ते बडवे कोन याचे उत्तर द्या, आता मुंबईकर तूमचे लाव रे व्हिडीओ करणार आहेत. तूमचे जूने व्हिडीओ लावणार आहेत. त्याची उत्तरे द्यावी लागणार आहेत. ज्यावेळी मुंबईकरांनी मतरुपी आशिर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहेत त्यावेळी घाबरेलेल्या मनस्थितीतून दोन पक्ष एकत्र येत आहेत. मराठी माणसाच्या अस्मीतेसाठी नाही तर पक्ष अस्तित्वासाठी एकत्र येत आहेत. आज जागा जाहीर केल्या नाहीत. भिती वाटते का की एक भाऊ दुसऱ्या भावाला फसवतोय, असा सवालही मंत्री शेलार यांनी केला.राज ठाकरे म्हणाले की, उमेदवार पळवणारी टोळी शहरात फिरते आहे मग तुमचे निवडून आलेले उमेदवार ज्यांनी पळवले ते भाऊ जे तुमच्या बाजूला बसले आहेत ते काय टोळीचे म्होरके आहेत का? असा सवाल ही त्यांनी केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, आजोबांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला. या बद्दल आम्हाला सगळयांनाच अभिमान आहे पण सवाल आहे की, तुम्ही ज्या काँग्रेसने मराठी माणसावर गोळया झाडल्या त्या काँग्रेस बरोबर तुम्ही हातमिळवणी कशी केलीत. मराठी माणसाच्या रक्ताने जे हात तुमचे बरबटले आहे का असा सवालही त्यांनी केला. आदित्य ठाकरे म्हणाले होते की, मनसे हा संपलेला पक्ष आहे मग आज कुणी कुणाला चवणप्राश दिले, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. असे आम्ही असंख्य प्रश्न विचारणार आहोत हे प्रश्न मुंबईकरांच्या मनातले आहेत. त्यामुळे दोन पक्ष एकत्र आले ते मराठी माणसासाठी नाही, मुंबईच्या विकासासाठी नाही, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाही तर हा सत्तेसाठी केलेला सत्तापिपासूपणा आहे हा संधीसाधूपणा आहे. कारण आज जी पत्रकार परिषद रुपी १५ मिनिटाची शोर्टफिल्म रिलिज करण्यात आली ती रिलिज होताच फ्लॉप गेली आहे या शॉर्ट फिल्मध्ये मुंबईकरांसाठी काय होते, विकासाचे काय होते नविन कल्पना कुठे होत्या. मराठी माणसासाठी काही नाही केवळ दोन भाऊ एकत्र आले सत्ता, जागा एवढेच आज पहायला मिळाले. तुम्ही मुंबईच्या प्रत्येक विकास प्रकल्पांना विरोध केलात. म्हणून मुंबईकर आणि मराठी माणसाचा निर्णय झालाय. मुंबईकरांचे आधीच ठरलेय. म्हणून दोन्ही भावांनी जागा जाहीर करणार नाही, नाव जाहीर करण्यासाठी घाम पूसा, काँग्रेस सोबत नाही, घाम पूसा, अशा घाबरलेल्या मन स्थितीत येऊ नका, घाम पूसत पूसत येऊ नका, महायुती आणि आमचा पक्ष तयार आहे. त्यामुळे निधडया छातीने निवडणुकीच्या मैदानात या, घोडा मैदान तयार आहे मुंबईकर तयार आहे, असे खुले आव्हान ही त्यांनी दिले.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उबाठा आणि मनसेची अधिकृत युती जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर तिखट टीका केली आहे. “ही युती म्हणजे दोन अस्तित्वहीन पक्षांनी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड आहे. काही प्रसारमाध्यमे हे दृश्य जणू रशिया आणि युक्रेनची युती होत आहे, पुतीन आणि झेलेन्स्की एकत्र येत आहेत असे चित्र उभे करत आहेत. परंतु, कुठल्याही पक्षाला निवडणुकीत अस्तित्व टिकवण्यासाठी जे करावे लागते, ते या दोन पक्षांनी केले आहे. या पलीकडे याचा दुसरा अर्थ काढण्याचे कारण नाही. या युतीमुळे महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी माणूस नाही. ठाकरे बंधू एकत्र आले याचा मला आनंद आहे, पण यामुळे राजकीयदृष्ट्या मोठे फेरबदल होतील असा समज बाळगणे बाळबोधपणा आहे”, असे मुख्यमंत्री म्हणाले.मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, उबाठाने मुंबईकरांचा सातत्याने विश्वासघात केला आहे. मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवण्याचे पाप त्यांनी केले. अमराठींवर हल्ले केले, त्यामुळे तेही त्यांच्यासोबत नाहीत. मुंबईत कोणीही ठाकरे बंधूंसोबत येणार नाही. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड फक्त भ्रष्टाचार आणि स्वहिताचा आहे. निवडणुका आल्या की भावनिक बोलतात, पण आता जनता त्यांना भुलणार नाही. मुंबईकरांनी महायुतीने केलेला विकास पाहिला आहे. विशेषतः मराठी माणसाला मुंबईत हक्काची घरे देण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे. त्यामुळे मुंबईची जनता विकासावर महायुतीलाच कौल देईल. ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाहीत. त्यांच्या गर्व आणि दुराभिमानामुळे मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेले आहेत. मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत, राज्य गाजवणारे नाहीत. ठाकरे बंधूंची युती प्रीतिसंगम नव्हे, तर भीतीसंगम आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.ठाकरे विकासावर बोलले तर मी १ हजार रुपये देईन अशी घोषणा मी पूर्वी केली होती. पण माझे पैसे अजून वाचले आहेत. ते विकासाची एकही गोष्ट बोलत नाहीत. ही निवडणूक मुंबईच्या विकासाची आहे, त्यावर ते बोलू शकत नाहीत. कारण त्यांना २५ वर्षांचा हिशेब द्यावा लागेल. मिठी नदी, मराठी माणसाच्या घरांचा हिशेब द्यावा लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नयेहिंदुत्वाच्या मुद्द्यावरही फडणवीसांनी ठाकरेंना लक्ष्य केले. मी हिंदुत्वात जन्मलो आणि हिंदुत्वातच मरेन. मतांसाठी भगवी शाल घालणारे, रोज मत बदलणारे आम्ही नाही. मुंबई-महाराष्ट्र हिंदुत्ववादी आहे. जे हिंदुत्व सोडतील, लांगुलचालन करतील त्यांची अवस्था विधानसभेत दिसली आहे. आमचे हिंदुत्व व्यापक आहे, भारतीय जीवनपद्धतीवर आधारित आहे. प्रभू श्रीरामांना मानणाऱ्यांना आम्ही सोबत घेतो, त्यांची जात-धर्म पाहत नाही. पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असा घणाघात त्यांनी केला.
नवी दिल्ली : स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देऊन, स्थानिक पुरवठा साखळी मजबूत करत आणि देशांतर्गत उद्योगाला चालना देत केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आत्मनिर्भर भारत अभियानााला सक्रिय पाठिंबा देण्याची तातडीची गरज असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी सांगितले. राष्ट्रपती भवनात भारतीय संरक्षण लेखा सेवा (आयडीएएस) अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी अधिकाऱ्यांना नवी कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. पुरावा-आधारित निर्णय, […] The post Droupadi Murmu : स्वदेशीला चालना देण्याची तातडीची गरज; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केले मत appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी असल्याचा आरोप शिंदे यांनी केले आहेत. ते म्हणाले की, काही युती जनतेच्या विकासासाठी होतात, पण ही युती फक्त सत्तेसाठी आहे. निवडणुका आल्यावरच यांना मराठी माणूस आठवतो, असं […] The post Eknath Shinde : आपली पोरं यांना सांभाळता आली नाहीत, हे मुंबई कशी सांभाळणार? एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना जोरदार टोला appeared first on Dainik Prabhat .
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यभूमीत असलेल्या नेवासे (अहिल्यानगर जिल्हा) येथील नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीने राज्यभरात एक सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी मुख्य स्पर्धा महायुतीचे उमेदवार डॉ. करणसिंह घुले (शिवसेना – शिंदे गट) आणि क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार नंदकुमार पाटील यांच्यात होती. यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, आम आदमी पार्टी तसेच काही अपक्ष उमेदवारही रिंगणात […] The post Newasa Nagar Panchayat Result : नेवासा नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारांनी निर्माण केला सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श appeared first on Dainik Prabhat .
Nitin Gadkari : देशात का आहे हिंदू-मुस्लिम वाद? नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले….
Nitin Gadkari – काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनामुळे आणि त्यांच्या व्होट बँकेच्या राजकारणामुळे देशाला अजूनही समाजात हिंदू-मुस्लिम समस्या भेडसावत आहेत. धर्मनिरपेक्ष या इंग्रजी शब्दाचा हिंदी अर्थ सर्वधर्मभाव किंवा सर्वांसाठी न्याय, कोणाचेही तुष्टीकरण नाही, असा आहे, काँग्रेसने त्यांच्या विचारसरणीच्या आधारे वर्णन केल्यानुसार धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ नाही, असे प्रतिपादन केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. उदय […] The post Nitin Gadkari : देशात का आहे हिंदू-मुस्लिम वाद? नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले…. appeared first on Dainik Prabhat .
आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी
नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सीवूड्स सेक्टर ४२ए येथील नीलकंठ प्राईड इमारतीत असलेल्या संगम गोल्ड या सोन्याच्या दुकानावर चार अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या परिसरात घडलेल्या प्रकारामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी आधी दुकानाची रेकी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर ठरवलेल्या योजनेनुसार चार आरोपी घटनास्थळी दाखल झाले. त्यापैकी तीन आरोपी बुरखा परिधान करून थेट दुकानात शिरले, तर चौथा आरोपी बाहेर थांबून परिसरावर नजर ठेवत होता.दुकानात प्रवेश करताच आरोपींनी कर्मचारी आणि ग्राहकांना बंदुकीचा धाक दाखवत गोंधळ उडवला. काही क्षणांतच त्यांनी दुकानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. अवघ्या काही मिनिटांतच अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दरोडा टाकून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. दरोडेखोर निघून गेल्यानंतर दुकानातील कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच गोंधळ उडाला. नवी मुंबई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून परिसराची पाहणी करण्यात आली आहे.तपासासाठी डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आले असून, आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथके तयार केली असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.सीवूड्ससारख्या गजबजलेल्या आणि उच्चभ्रू भागात भरदिवसा सशस्त्र दरोडा पडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. व्यापारी वर्गाकडून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी आणि नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींचा लवकरच शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला असून या घटनेमुळे संपूर्ण नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.
मोहित सोमण: जागतिक पातळीवरील अस्थिरतेचा फटका म्हणून सलग चौथ्यांदा सोनेचांदीत तुफान वाढ झाली आहे. सोन्याचांदीने आणखी एक विक्रम आज नोंदवला आहे. बाजारातील माहितीनुसार सोने आज पुन्हा किरकोळ वाढल्याने नवा विक्रमी उच्चांकावर पोहोचले असून चांदीने ७० प्रति डॉलरची पातळी केल्यानंतरही आज प्रति किलो थेट १०००० रूपयांनी वाढ नोंदवली आहे. त्यामुळे एकाच सत्रात चांदी ३.१९% पेक्षा अधिक पातळीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढली. त्यामुळे दोन्ही कमोडिटीत नवा उच्चांक गाठला गेला.' गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ३८ रुपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ३५ रुपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २९ रूपयांनी वाढ झाल्याने दरपातळी २४ कॅरेटसाठी १३८९३, २२ कॅरेटसाठी १२७३५, १८ कॅरेटसाठी १०४२० रूपयांवर पोहोचली. तर प्रति तोळा किंमत पाहिल्यास २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ३८०,२२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ३५०, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात २९० रुपयांनी वाढ झाली ज्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १३८९३०, २२ कॅरेटसाठी १२७३५० तर १८ कॅरेटसाठी १०४२०० रूपयांवर पोहोचले आहेत.भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये सोन्याचा निर्देशांकात आज दुपारपर्यंत ०.२३% वाढ झाली असून दरपातळी १३८२०५ रूपयांवर गेली. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १३८९३, २२ कॅरेटसाठी १२७३५, १८ कॅरेटसाठी १०४२० रूपयांवर पोहोचले आहेत. जागतिक स्तरावर सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात दुपारपर्यंत ०.२६% वाढ झाली असून युएस गोल्ड स्पॉट दरात दुपारपर्यंत प्रति डॉलर सोन्याची दरपातळी ४४९१.२६ औंसवर गेली आहे.सोने का वाढतय?भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोन्यात प्रचंड मागणी वाढत आहे. त्यातुलनेत पुरवठा मर्यादित असल्याने गोल्ड स्पॉट गुंतवणूकीत मागणी वाढत आहे. कारण अनपेक्षितपणे जीडीपीत वाढ झाल्याने युएसमध्ये पुन्हा एकदा युएस फेड व्याजदरातील कपातीच्या शक्यता नष्ट झालेल्या गुंतवणूकदारांना दिसते. त्यामुळे हा आशावाद नष्ट होताना दुसरीकडे युएस व्हेनेझुएला यांच्यातील वाढलेला तणाव, इस्त्राईल इराण यांच्यातील मध्यपूर्वेतील मतभेद या कारणामुळे सोन्यात आणखी मागणी वाढली. दरम्यान मौल्यवान वस्तूंच्या हेजिंगमध्ये गुंतवणूकदारांनी वाढ केल्याने सोन्यातील गुंतवणूकीत महत्व प्राप्त होत आहे.व्हेनेझुएलाच्या तेल शिपमेंटविरुद्ध वॉशिंग्टनच्या वाढलेल्या कारवाईमुळे आणि त्याला काराकासने दिलेल्या प्रतिसादामुळे प्रादेशिक स्थिरता आणि जागतिक पुरवठ्याच्या जोखमींबद्दल चिंता वाढली असताना गुंतवणूकदार मूल्याचे रक्षण करताना मानल्या जाणाऱ्या मालमत्तांमध्ये सुरक्षित गुंतवणूक शोधत आहेत. अशा अनिश्चिततेच्या काळात सोन्याला पारंपरिकरित्या फायदा होतो याचं एकत्रित कारणांमुळे सोने आज महागले.यासह अमेरिकेच्या सुलभ पतधोरणाच्या अपेक्षा हे देखील एक प्रमुख कारण ठरले आहे.चांदीच्या दरात तुफान वाढ !चांदीच्या दरात सोन्याहूनही अधिक वाढ झाल्याने चांदी प्रचंड प्रमाणात महागली आहे. 'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १० रूपये, प्रति किलो दरात १०००० रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २३३ रूपये, प्रति किलो दर २३३००० रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर २३३०, प्रति किलो २३३००० रुपयांवर सुरू आहे. केवळ गेल्या दोन दिवसात भारतीय बाजारात चांदी १४००० रुपयांनी प्रति किलो वाढली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात दुपारपर्यंत तब्बल १.३२% वाढ झाल्याने दरपातळी २२२५५० रूपयांवर व्यवहार करत आहे. आज चांदी थेट ३.१९% वाढल्याने चांदी आतापर्यंतच्या सर्वाधिक पातळीवर पोहोचली होती. गेल्या वर्षभरात चांदी १४०% वाढली असून याच पार्श्वभूमीवर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.वाढत्या भूराजकीय धोके अनिश्चितता वाढती व्याजदरात कपातीविरोधात अनास्था यामुळे बाजारात प्रतिकुलता वात आहे. तसेच अनुकूल चलनविषयक धोरणाच्या अपेक्षांमुळे जोरदार खरेदीचा ओघ सुरू झाल्याने चांदीच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. सिल्वर स्पॉट फ्युचर दरात मोठ्या संख्येने वाढ झाल्याने तो ३.१९% वाढीसह २१९६५३ पातळीवर स्थिरावला. व्हेनेझुएलाच्या तेल टँकरवर अमेरिकेच्या संभाव्य कारवाईबद्दलची अनिश्चितता आणि सायबर हल्ल्यानंतर पीडीव्हीएसए (PDVSA) मधील कामकाजात झालेल्या व्यत्ययामुळे चांदीचे सुरक्षित गुंतवणुकीचे आकर्षण वाढले. त्यासह वाढलेली औद्योगिक मागणी, सातत्यपूर्ण गुंतवणुकीचा ओघ आणि जागतिक पातळीवर साठ्यात होत असलेली चांदीची घट या एकत्रित कारणांमुळे चांदीही सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. पुढील वर्षी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून दोनदा व्याजदर कपात केली जाईल, अशी बाजाराची अपेक्षा कायम असली तरी आलेल्या जीडीपी आकडेवारचा दबाव म्हणून चांदी आणखी वाढली आहे. फेड अधिकाऱ्यांनीही मध्यम महागाई आणि नरमलेल्या श्रम बाजाराच्या पार्श्वभूमीवर धोरण शिथिल करण्याची शक्यता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे त्याचाही दबाव युएस बाजारात पडला.
श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या'कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर
मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा विकण्याचे ठरवले आहे. मुख्य प्रवाहातील नसलेल्या भांडवली गुंतवणूकीला काढून टाकून मुख्य प्रवाहात ती गुंतवणूक करण्यासाठी कंपनीने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नव्या माहितीनुसार, संपूर्ण १००% आपला हिस्सा कंपनी श्रीराम लाईफ इन्शुरन्समधील काढून घेणार आहे. नव्या बदलानुसार आता ही गुंतवणूक ६०० कोटींच्या घरात सांगितली जाते. तो हिस्सा कंपनी सनलाम इमर्जिंग मार्केट कंपनीला विकणार आहे. ४००० कोटी मूल्यांकन असलेल्या कंपनीतील ६०० कोटींचा हिस्सा या सनलाम या मॉरिशस स्थित कंपनीला विकेल.यासह पिरॅमलने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी विक्रीसाठी शेअर खरेदी करारावर स्वाक्षरी देखील केली आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (IRDAI) मंजुरीसह नियामक मंजुरींच्या अधीन राहून हा व्यवहार ३१ मार्च, २०२६ रोजी संपणाऱ्या तिमाहीत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असे कंपनीने म्हटले.सॅनलाम इमर्जिंग मार्केट्स (मॉरिशस) ही सॅनलाम इमर्जिंग मार्केट्सची पूर्ण मालकीची उपकंपनी (Subsidiary) आहे आणि सॅनलाम समूहाचा एक भाग आहे. या विक्रीमुळे चेन्नईस्थित श्रीराम समूहाच्या दोन विमा संयुक्त कंपनीपैकी एक असलेल्या श्रीराम लाइफ इन्शुरन्स कंपनीमधील सॅनलामची मालकी आणखी वाढणार आहे. श्रीराम कॅपिटलकडे श्रीराम लाइफ इन्शुरन्समध्ये ४७% हिस्सा आहे, तर सॅनलामकडे २३% हिस्सा आहे.३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या वर्षात, श्रीराम लाइफने लाभांश (Dividend) उत्पन्नाद्वारे पिरॅमल फायनान्सच्या महसुलात १२.६८ कोटी रुपयांचे योगदान दिले होते जे एकूण महसुलाच्या ०.१२% होते. पिरॅमल फायनान्सने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, ही विक्री अवशिष्ट गैर-मुख्य मालमत्तांचे (Non Core Investment) म्हणून मुद्रीकरण (Monetised) करण्याच्या त्यांच्या धोरणाशी सुसंगत असून मिळणारा निधी आर्थिक ताळेबंद मजबूत करण्यासाठी वापरला जाईल.' असे म्हटलेसॅनलाम श्रीरामच्या विमा व्यवसायातील आपला सहभाग सातत्याने वाढवत आहे. गेल्या वर्षी त्यांनी टीपीजी इंडिया इन्व्हेस्टमेंट्स II आणि श्रीराम ओनरशिप ट्रस्टकडून श्रीराम लाइफ इन्शुरन्स कंपनी आणि श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी या दोन्ही कंपन्यांमधील अतिरिक्त हिस्सेदारी विकत घेतली होती.यासह पिरॅमल एंटरप्रायझेसने २०१२-१३ मध्ये आपला औषध व्यवसाय विकल्यानंतर श्रीराम समूहात गुंतवणूक केली तसेच तीन श्रीराम कंपन्यांमध्ये ४५८३ कोटी रुपये गुंतवले. २०१९ मध्ये, त्यांनी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीमधील आपला हिस्सा सुमारे २३०० कोटी रुपयांना विकला. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये, स्कीम ऑफ अरेंजमेंट अंतर्गत समूहातील एकत्रीकरणाचा (Consolidation भाग म्हणून श्रीराम सिटी युनियन फायनान्स, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स आणि श्रीराम कॅपिटल यांचे विलीनीकरण करण्यात आले होते.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जनसामान्यांच्या हिताचे आणि प्रशासकीय सुधारणांचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये आरोग्य सेविकांचे प्रश्न मार्गी लावण्यापासून ते नगरपरिषदेच्या कारभारात बदल करण्यापर्यंतच्या अनेक तरतुदींना मंजुरी देण्यात आली आहे.१. थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांची ताकद वाढलीhttps://prahaar.in/2025/12/24/why-are-they-now-embracing-the-priests-who-surround-vitthal-ashish-shelar-launches-a-scathing-attack-on-the-raj-uddhav-alliance/नगरविकास विभागाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार, आता थेट जनतेतून निवडून आलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या अध्यक्षांना सभागृहाचे रितसर सदस्यत्व मिळणार आहे. इतकेच नव्हे, तर त्यांना आता सभागृहात मतदानाचाही अधिकार असेल. या सुधारणेसाठी सरकार लवकरच अध्यादेश काढणार असून, यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांना प्रशासकीय कामात अधिक अधिकार प्राप्त होतील.२. आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणारग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला त्यांच्या नियुक्त्या नियमित करण्याचा प्रश्न आता सुटला आहे. यामुळे हजारो आरोग्य सेविकांना मोठा आर्थिक आणि सेवाविषयक लाभ मिळणार आहे.३. 'जिल्हा कर्मयोगी २.०' आणि 'सरपंच संवाद'प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि सक्षम करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने 'जिल्हा कर्मयोगी २.०' आणि 'सरपंच संवाद' हे कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे ग्राम, तालुका आणि जिल्हा स्तरावरील प्रशासकीय यंत्रणेत समन्वय वाढेल. तसेच सरपंचांशी थेट संवाद साधून गावपातळीवरील समस्या तातडीने सोडवण्यावर भर दिला जाणार आहे.४. धाराशिवमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पुतळासाहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक आणि पुतळा उभारण्यासाठी धाराशिव शहरात दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती जतन करण्याच्या मागणीला यश आले आहे.

23 C