Pimpri Chinchwad Crime : मोशीच्या गायकवाड वस्तीतील ६५ वर्षीय वृद्धाला दानधर्माच्या जाळ्यात ओढून दोन दुचाकीस्वार भामट्यांनी लुटले.
Republic Day 2026 : शाहू स्टेडियमवर रंगणार चित्तथरारक परेड; काय आहे यंदाचं खास आकर्षण?
Republic Day 2026 : छत्रपती शाहू स्टेडियमवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण; पोलीस दलाच्या संचलनासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज.
Khatav News : मातंग वस्तीतील उघड्या गटारांमुळे रहिवाशांचे जगणे झाले असह्य; दुर्गंधीमुळे श्वास घेणेही कठीण झाल्याची स्थानिकांची तक्रार.
दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २६ जानेवारी २०२६
पंचांगआज मिती माघ शुद्ध अष्टमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अश्विनी. योग साध्य ०९.११ पर्यंत नंतर शुभ. चंद्र राशी मेष भारतीय सौर ०६ माघ शके १९४७. सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय १२.०५ मुंबईचा सूर्यास्त ०६.२७ मुंबईचा चंद्रास्त ०१.२९ उद्याचे राहू काळ ०८.३८ ते १०.०२.गणराज्य दिन,दुर्गाष्टमी,भीष्माष्टमीदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : महत्त्वाचे निर्णय होऊन कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल.वृषभ : दैनंदिन कामे निर्विघ्न होतील.मिथुन : अपेक्षित सहकार्य लाभेल.कर्क : बोलण्यापेक्षा कृतीवर लक्ष केंद्रित करा.सिंह : महत्त्वाची वार्ता समजेल.कन्या : कामाचा ताण जाणवेल.तूळ : पारिवारिक समस्या सोडविता येतील.वृश्चिक : एखादी चिंता सतावेल.धनू : स्वप्नरंजनात रमू नका.मकर : लहान मोठ्या कार्यासाठी प्रवास करावा लागेल.कुंभ : जोडीदारावर विश्वास ठेवावा लागेल.मीन : कामे मार्गी लावू शकाल.
Satara ZP Election - ओबीसी महिला आरक्षणाने दिग्गज नेत्यांची समीकरणं बदलली; नऊ निवडणूक गटांत नेत्यांच्या सोयीनुसार मोर्चेबांधणीला वेग.
Shambhuraj Desai : महायुतीसाठी दोनदा पुढाकार घेतला, पण प्रतिसाद नाही : पालकमंत्री शंभूराज देसाई
Shambhuraj Desai : पाटण तालुक्यातील येराड येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीबाबत मोठे विधान केले आहे.
तामिळनाडूमध्ये हिंदीवर बंदीच राहणार, मुख्यमंत्री स्टॅलिनचा केंद्राला स्पष्ट इशारा
चेन्नई : तामिळनाडूमध्ये हिंदी लादण्यास कुठलेही स्थान नाही आणि कधीही होणार नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी रविवारी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. ‘भाषा शहीद दिना’च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात स्टॅलिन यांनी १९६० च्या हिंदी-विरोधी चळवळीतील शहीदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर बोलताना ते म्हणाले की, तामिळनाडू नेहमीच आपल्या भाषिक ओळखीचे रक्षण करेल. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटले आहे की, “भाषा शहीद दिनानिमित्त मी स्पष्ट करतो की, तेव्हाही हिंदीसाठी कोणतेही स्थान नव्हते, आताही नाही आणि कधीही राहणार नाही.” या पोस्टसोबत त्यांनी १९६५ च्या ऐतिहासिक हिंदी-विरोधी चळवळीचा व्हिडीओही शेअर केला, ज्यात द्रमुकचे दिग्गज नेते सी.एन.अन्नादुरई आणि एम.करुणानिधी यांचे योगदान अधोरेखित केले आहे. स्टॅलिन यांनी चेन्नईतील “भाषा शहीद” थलामुथु आणि नटरासन यांच्या स्मारकाला भेट देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. या कार्यक्रमाच्या भाग म्हणून त्यांनी चेन्नई महानगर विकास प्राधिकरणाच्या इमारतीत या शहीदांच्या पुतळ्यांचे अनावरण केले. १९६४-६५ दरम्यान हिंदीला अधिकृत भाषा बनवण्याच्या विरोधात केलेल्या चळवळीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपले प्राण गमावले होते; त्यांना ‘भाषा शहीद’ असे संबोधले जाते. त्या काळात अनेक तरुणांनी विरोधार्थ आत्मदहन केले. त्यानंतर तामिळनाडूमध्ये ‘द्विभाषिक सूत्र’ स्वीकारण्यात आले, ज्यामध्ये फक्त तमिळ आणि इंग्रजीला प्राधान्य दिले जाते. स्टॅलिन आणि द्रमुक सरकार सतत केंद्राच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणचा विरोध करत आहेत.
चीनसोबत करार केल्यास कॅनडावर १०० टक्के टॅरिफ लावणार: ट्रम्प
वॉशिंग्टन :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला कडक इशारा देत सांगितले आहे की, कॅनडाने जर चीनसोबत कोणताही व्यापार करार केला, तर त्यावर १०० टक्के शुल्क (टॅरिफ) लावले जाईल. ट्रम्प यांचे म्हणणे आहे की कॅनडा स्वतःला चीनसाठी असा मार्ग बनू देत आहे, ज्याद्वारे चीनी माल अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश करू शकतो. ट्रम्प यांनी उघडपणे इशारा दिला की, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी जर कॅनडाला चीनसाठी ‘ड्रॉप-ऑफ पोर्ट’ बनवले, तर ती त्यांची फार मोठी चूक ठरेल. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले की, अशा कोणत्याही कराराच्या परिस्थितीत अमेरिकेत येणाऱ्या कॅनडाच्या सर्व उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाईल.ट्रम्प आणि कॅनडामधील तणाव सुरक्षेच्या मुद्द्यावरूनही कमाल पातळीवर पोहोचला आहे. ट्रम्प यांनी ग्रीनलँडमध्ये प्रस्तावित ‘गोल्डन डोम’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रकल्प नाकारल्याबद्दल कॅनडावर तीव्र टीका केली आहे. ट्रम्प यांचे म्हणणे आहे की हा प्रकल्प कॅनडाच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरला असता; मात्र कॅनडा अमेरिकेच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याऐवजी चीनसोबत संबंध अधिक दृढ करण्यात व्यस्त आहे. दरम्यान, दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अमेरिकेच्या वर्चस्वाखालील जागतिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, ज्यामुळे ट्रम्प संतप्त झाले आहेत. कार्नी यांनी सांगितले की जग आता अशा टप्प्यावर पोहोचले आहे, जिथे दशकानुदशके चालत आलेली नियमाधारित जागतिक व्यवस्था अस्पष्ट होत चालली आहे. त्यांनी अमेरिकेने आपली इच्छा इतर देशांवर लादण्याच्या धोरणावर टीका करत म्हटले की, मध्यम शक्तीच्या देशांनी आता एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीमुळे कॅनडाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा वाजली आहे, कारण अमेरिका हा कॅनडाचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. जर १०० टक्के शुल्क लागू झाले, तर कॅनडाचा निर्यात व्यापार मोठ्या प्रमाणात ठप्प होऊ शकतो आणि तेथील कंपन्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ते त्यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाशी कोणतीही तडजोड करणार नाहीत.
पंचम'डिजिटल चॅटबॉट लाँच, घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे मार्गी लागणार
नवी दिल्ली : गावांमधील प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने ‘पंचम’ हा विशेष व्हॉट्सअॅप चॅटबॉट लाँच केला आहे. आता घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे आणि योजनांची माहिती मिळवणे शक्य होणार आहे.केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने ग्रामपंचायतींना सक्षम करण्याच्या उद्देशाने 'पंचम' हा चॅटबॉट आज लाँच केला आहे. ग्रामपंचायतींसाठी एक 'डिजिटल सोबती' म्हणून याची रचना करण्यात आली आहे. हा चॅटबॉट दैनंदिन प्रशासकीय कामात मदत करण्यासोबतच मार्गदर्शन आणि महत्त्वाची माहिती सुलभपणे पोहोचवण्याचे काम करेल. 'पंचम' केंद्र सरकार आणि देशभरातील ३० लाखांहून अधिक निवडून आलेले प्रतिनिधी व पंचायत पदाधिकारी यांच्यात थेट डिजिटल संपर्क साधणार आहे.ग्रामीण भागात व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, ही बाब लक्षात घेऊनच ही सेवा व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी कोणतेही नवीन अॅप डाऊनलोड करण्याची किंवा शिकण्याची गरज नाही. एखाद्या व्यक्तीशी चॅटिंग करावे, इतक्या सोप्या पद्धतीने नागरिकांना माहिती मिळेल.'पंचम' ई-ग्राम स्वराजशी संबंधित लाइव्ह डेटा, पंचायत अधिकारी आणि निवडून आलेल्या सदस्यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करतो. हा चॅटबॉट ई-ग्राम स्वराज, एलजीडी, जीपीडीपी आणि मंत्रालयाच्या प्रमुख योजना व उपक्रमांशी संबंधित माहिती देईल. सध्या हा चॅटबॉट एआय आधारित चॅटबॉट्ससारखा काम न करता, आधीच फीड केलेल्या निश्चित माहितीच्या आधारे उत्तरे देईल. ही माहिती सतत अपडेट केली जाईल. सामान्य नागरिक विविध दाखले, प्रमाणपत्रे, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या सरकारी कामांची माहिती मिळवण्यासाठी पंचमचा वापर करू शकतील. ग्रामपंचायत सदस्यांना आणि अधिकाऱ्यांना योजना, सर्वेक्षणे, प्रशिक्षण साहित्य आणि अधिकृत मंत्रालयाच्या सूचना थेट उपलब्ध होतील.
संजीवनी सैनिकी स्कूल राष्ट्रीय ब्रास बॅण्ड स्पर्धेत देशात प्रथम
कोपरगाव : ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथील नॅशनल बाल भवन येथे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय ब्रास बॅण्ड महाअंतिम फेरीत संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ब्रास बॅण्ड पथकाने देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण इतिहास रचला. पश्चिम भारत विभागाचे प्रतिनिधित्व करत मैदानात उतरलेल्या संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन, तालबद्ध वादन, अचूकता आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकत ५१ हजार रूपये रोख पारितोषिक, मानाचा चषक व सन्मानपत्र प्राप्त केले. या गौरवपूर्ण सोहळ्यात संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या हस्ते विजेत्या संघाचा सन्मान करण्यात आला. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे, संगीत शिक्षक महेश गुरव, ब्रास बॅण्ड पथकाचे टीम लिडर कॅडेट विपुल वाघ यांच्यासह संपूर्ण संघाने सन्मान स्वीकारला.पुरस्कार वितरणप्रसंगी बोलताना सेठ यांनी सांगितले की,“२०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्यात युवकांची भूमिका निर्णायक ठरणार असून, शालेय बँड पथके विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना आणि देशभक्तीची जाणीव दृढ करतात.” या ऐतिहासिक यशामागे संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांचे दूरदृष्टी पूर्ण मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण पाठबळ मोलाचे ठरले. तसेच प्राचार्य कैलास दरेकर, संगीत शिक्षक महेश गुरव, कॅम्पस अॅडमिन विजय भास्कर, नॉन अकॅडमिक डायरेक्टर डी. एन. सांगळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बॅण्ड प्रशिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमांमुळेच हे यश साकार झाले आहे. हे यश म्हणजे शिस्त, सातत्य, संघभावना आणि देशभक्तीच्या संस्कारांची फलश्रुती असून, स्व. शंकरराव कोल्हे यांनी पाहिलेले “ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर गुणवत्तापूर्ण व शिस्तबद्ध पिढी घडवण्याचे स्वप्न” प्रत्यक्षात साकार झाल्याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे. संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या या विजयामुळे कोपरगाव तालुका, अहिल्यानगर जिल्हा व महाराष्ट्राचा देशपातळीवर मान उंचावला असून, “शिस्त आणि सातत्याच्या बळावर स्वप्नांची उंची गाठता येते” हा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे.
अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात
गुवाहाटी : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय नोंदवला आहे. सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर भारताने केवळ १० षटकांत विजयाचे लक्ष्य गाठून मालिका आपल्या नावावर केली. भारताने या सामन्यात पॉवरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडत ऑस्ट्रेलियाचा ८ वर्ष जुना जागतिक विक्रमही मोडीत काढला.नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. जसप्रीत बुमराहच्या (३ विकेट्स) भेदक माऱ्यासमोर किवी फलंदाजांनी गुडघे टेकले. ग्लेन फिलिप्स (४८) आणि मार्क चॅपमन (३२) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण हार्दिक पांड्या आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २ बळी घेत न्यूझीलंडला ९ बाद १५३ धावांवर रोखले. १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात धक्कादायक झाली. संजू सॅमसन पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मात्र, त्यानंतर इशान किशन (२८ धावा, १३ चेंडू) आणि अभिषेक शर्मा यांनी १९ चेंडूंत ५३ धावांची वेगवान भागीदारी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. इशान बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्माच्या साथीने केवळ ४० चेंडूंत १०२ धावांची नाबाद भागीदारी केली.भारताने पहिल्या ६ षटकांत २ बाद ९४ धावा कुटल्या. ही भारताची पॉवरप्लेमधील दुसरी सर्वोत्तम आणि न्यूझीलंडविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या ठरली. भारताने २०१८ मधील ऑकलंड येथे ऑस्ट्रेलियाने केलेल्या ९१ धावांचा विक्रम मोडला. अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी आपली वादळी अर्धशतके पूर्ण करत १० व्या षटकांतच भारताला विजय मिळवून दिला. भारताच्या या 'विराट' विजयामुळे न्यूझीलंडचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला असून भारतीय युवा संघाच्या या आक्रमक शैलीचे जगभर कौतुक होत आहे.रोहित शर्माचा मोडला विक्रमअभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तिसरा षटकार मारताच रोहित शर्माचा मोठा विक्रमही मोडीत काढला. याआधी न्यूझीलंड विरुद्धच्या द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक १० षटकारांचा विक्रम हा रोहित शर्माच्या नावे होता. अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात ८ षटकार मारले होते. तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने रोहित शर्माला मागे टाकत न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत सिक्सर किंग होण्याचा नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
Maharashtra Politics : राजकारणात मोठा भूकंप! अखेर दोन्ही शिवसेना एकत्र, भाजपला मोठा धक्का
Maharashtra Politics : शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र
IND vs NZ 3rd T20 : भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला.
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास घराघरात पोहचविणार
नांदेड : 'हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते. त्यांचे बलिदान आपल्याला सत्य,धर्म आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी निर्भीडपणे उभे राहण्याची प्रेरणा देते. त्यामुळेच त्यांचे विचार राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित 'हिंद दी चादर' श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यावेळी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, गुरू तेग बहादुर साहिब जी यांनी दिलेले बलिदान हे केवळ शीख धर्मासाठी नव्हते, तर या देशाची संस्कृती, सभ्यता, विचारधारा आणि धर्म यांच्या रक्षणासाठी होते. त्यांचा पराक्रम, वीरता, शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने समाज नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत एकत्र आला आहे. गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानामुळे संपूर्ण देशात धर्म, स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानासाठी लढण्याची नवी चेतना निर्माण झाली. त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहचावा, यासाठी शहीदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून प्रत्येक गावात, वाड्या-वस्त्यांवर जावून श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शीख गुरूंचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे, असे त्यांनी सांगितले.श्री गुरु नानक देवजींना मानणारा, त्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारा सर्व समाज एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. देशाच्या विपरीत परिस्थितीत श्री गुरु नानक देवजींनी एकत्र बांधणारा, भेदाभेद नष्ट करणारा महान विचार दिला आहे. त्या विचारांनी संपूर्ण देशात विविध समाजांना जोडण्याचे काम केले. हा विचार घेवून सर्व समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे. संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील महान संत होते. त्यांची समाधी पंजाबमधील घुमान येथे आहे. संत नामदेवांनी मांडलेले विचार, त्यांचे अभंग आणि पंक्ती यांना श्री गुरु ग्रंथ साहिबमध्ये स्थान मिळाले आहे. त्यांचे विचार गुरुबाणीचा अविभाज्य भाग बनले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील वारकरी परंपरा आणि शीख समाज यांच्यातील अनोखे, अतूट नाते अधिक दृढ झाले आहे. श्री गुरु गोविंद सिंघ महाराजांच्या दीर्घकाळ वास्तव्याने नांदेडची भूमी पावन झाली आहे. या भूमीने सामाजिक सलोखा अधिक मजबूत करण्याचे काम केले असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचे बलिदान हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवी सांस्कृतिक वारशाच्या रक्षणासाठी होते.जुलमी शासकांच्या दमनकारी धोरणांविरुद्ध विचार स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी दिलेले गुरु तेग बहादुर जी यांचे बलिदान हे अभूतपूर्व ऐतिहासिक उदाहरण असून,त्यांच्या निर्भय आचरणातून धार्मिक व नैतिक दृढतेचा आदर्श मिळतो,असे त्यांनी सांगितले.प्रास्ताविक अखिल भारतीय धर्म जागरण समितीचे प्रमुख शरदराव ढोले यांनी केले. शहीदी समागम कार्यक्रमाचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यांनी आभार मानले.
तेजस्वी यादव आरजेडीचे कार्यकारी अध्यक्ष
पाटणा: पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा निर्णय घेतला असून तेजस्वी यादव यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय तेजस्वी यादव यांच्यासाठी मोठे यश मानले जात असतानाच, दुसरीकडे त्यांच्या बहिणी रोहिणी आचार्य यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावरून त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. रोहिणी आचार्य यांनी या नियुक्तीला “कठपुतळी बनलेल्या शहजाद्याचा राज्याभिषेक” असे संबोधत निशाणा साधला आहे. आरजेडीची ही राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक येथील हॉटेल मौर्या येथे पार पडली. बैठकीला राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, सर्व राज्यांतील प्रदेशाध्यक्ष, खासदार तसेच विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते. अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य एक दिवस आधीच पटण्यात दाखल झाले होते. तेजस्वी यादव यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याच्या निर्णयावर पक्षप्रमुख आणि राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीने अंतिम शिक्कामोर्तब केले. या बैठकीत लालू यादव, राबडी देवी, तेजस्वी यादव आणि मीसा भारती उपस्थित होते.
Bigg Boss Marathi 6 : टोळी फुटली.! ‘बिग बॉस’च्या घरातून राधा पाटील बाहेर
राधा पाटीलच्या एक्झिटनंतर घरातील समीकरणं कशी बदलणार, आणि पुढच्या भाऊच्या धक्क्यानंतर कोणाची शाळा तर कोणाला शाबासकी मिळणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
Congress Candidate Missing : मोठी बातमी..! काँग्रेसच्या महिला उमेदवाराचे अपहरण? महाराष्ट्रात खळबळ
Congress Candidate Missing : काँग्रेसच्या अधिकृत महिला उमेदवार अंजना चौधरी यांचा अपहरण झाल्याचा संशय
President Droupadi Murmu : “भारत लवकरच जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल”–राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
भारत ही सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल
Hardik Pandya Catch : हार्दिक पंड्याने तिसऱ्या टी-२० सामन्यात डेव्हॉन कॉनवेचा जबरदस्त कॅच घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
कर्ज घेतलंय...? मग कर्ज विमा हवा की नको?
नेहा जोशी, mgpshikshan@gmail.comकोर्टाची पायरी शहाण्या माणसाने चढू नये’ असे म्हणतात. पण काहीवेळा ती पायरी चढून न्याय मिळवावा लागतो. तसेच काहीसे या केसमध्ये झाले. पुण्यातील दोन भावांचे हे कुटुंब, त्यातील एका भावाने जानेवारी २०१९ मध्ये एका वित्त संस्थेकडून २४ लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. कर्जाच्या सुरक्षेसाठी त्यांनी विमा काढला होता. या विम्यांतर्गत ५ वर्षांसाठी १ लाख २० हजार रुपयांचा हप्ता त्यांनी भरला होता. विमा पॉलिसीनुसार जर विम्याच्या कालावधीत कर्जदाराचा मृत्यू झाला तर वित्त संस्थेचे उर्वरित कर्ज विमा कंपनी भरेल. दुर्दैवाने २०२० मध्ये कर्जदाराचे निधन झाले. त्यानंतर कर्जदाराच्या भावाने विम्याच्या दावा आणि मृत्यूचा दाखला वित्त संस्थेत दाखल केला; परंतु तरीही वित्त संस्थेने त्यांच्याकडे हप्त्याची मागणी केली. नाईलाजाने त्यांनी हप्ते भरले. काही काळाने विमा कंपनीने देखील विमा नाकारला. तुमच्या भावाला मधुमेह होता. ही बाब लपवण्यात आली होती, असे कारण विमा कंपनीने दावा नाकारताना दिले. शेवटी यासंबंधी न्याय मागण्यासाठी कर्जदाराच्या भावाने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे दार ठोठावले अन अखेर त्यांना न्याय मिळाला.आयोगाने काय निकाल दिला?१. मधुमेह हा आजार नसून जीवनशैलीतील दोष आहे. त्याआधारे विमा नाकारणे योग्य नाही. विमा कंपनीने चुकीच्या कारणास्तव दावा नाकारला.२. विमा कंपनीने कर्जदाराच्या मृत्यूनंतर कर्ज खात्यास लागू होणारी विमा रक्कम देणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे.३. विमा कंपनीने विम्यानुसार उर्वरित रक्कम वित्त संस्थेच्या खात्यात ४५ दिवसांच्या आतजमा करावी.४. कर्जाची रक्कम आल्यानंतर वित्त संस्थेने १५ दिवसांच्या आत तक्रारदारांकडून घेतलेले हप्ते वार्षिक ७ टक्क्याने परत करावे.५. तक्रारदाराला अनावश्यक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. विमा कंपनीने तक्रारदाराला नुकसानभरपाई व तक्ररीच्या खर्चापोटी एकत्रित १ लाख रुपये द्यावेत.घर, गाडी, मुलांचे शिक्षण, व्यवसाय अश्या अनेक कारणांसाठी आपण कर्ज घेतो. तसेच स्वतःला आणि कुटुंबाला आर्थिक व विमा सेवा घेताना त्याचा प्रकार, त्यातील तरतुदी, मिळणारे लाभ यांचा सखोल अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. शारीरिक आणीबाणीमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी जीवन विमा, आरोग्य विमा, वाहन विमा, कर्ज विमा इत्यादी विमा घेतो.कर्ज विमा पॉलिसी हा त्यातील एक महत्वाचा प्रकार आहे आणि वरील केस हे त्याचेच प्रातिनिधिक उदाहरण आहे. आपले स्वप्नातील घर, गाडी, मुलांचे शिक्षण यासाठी शैक्षणिक कर्ज किंवा घरातील लग्नकार्य यासाठी वैयत्तिक कर्ज आपण काढतो; परंतु अलीकडच्या अशाश्वत जीवनात अनेक अडचणी उद्भवू शकतात. आकस्मित मृत्यू, अपघात, दुर्धर आजार, अपंगत्व, नोकरी जाणे अश्या अडचणी माणसाला सांगून येत नाहीत. अशावेळी एखादी व्यक्ती कर्जाची परतफेड करण्यात असमर्थ ठरू शकते. मग संपूर्ण कुटुंबावरच आर्थिक संकट उभे राहते. त्यावेळी कर्ज विमा पॉलिसी मदतीस येते.काय आहे बरं ही कर्ज विमा पॉलिसी ? यालाच लोन इन्शुरन्स किंवा डेट प्रोटेक्शन इन्शुरन्स असेही म्हणतात. काही कारणाने कर्जामुळे कुटुंबावर आर्थिक ओझे निर्माण झाले तर या समस्येवर उपाय म्हणून लोन इन्शुरन्स (कर्ज विमा) उपलब्ध आहे. या विम्यामुळे कर्जदाराच्या कुटुंबाला किंवा नातेवाईकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. जी कर्जाची उर्वरित रक्कम असेल ती या लोन इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून फेडली जाते. अनेक कर्जदार कर्ज घेताना फक्त कर्जाच्या व्याजदरावर लक्ष केंद्रित करतात. पण या पॉलिसीवर लक्ष देत नाहीत . त्यासाठी कोणत्या योजना असतात याकडे पाहणे गरजेचे असते. लोन इन्शुरन्सच्या विविध प्रकारांमध्ये टर्म इन्शुरन्स, रिड्यूसिंग कव्हर आणि फिक्स्ड कव्हर यांचा समावेश असतो. टर्म इन्शुरन्स हा एका निश्चित कालावधीसाठी दिला जातो. तर रिड्यूसिंग कव्हरमध्ये कर्जाच्या परतफेडीच्या काळात कर्जाची रक्कम कमी होत जाते. फिक्स्ड कव्हरमध्ये कर्जाची रक्कम जशी आहे तशीच असते.तसेच विमा कंपनीना तितकीच रक्कम भरण्यासाठी जबाबदारी असते. कर्ज विमा पॉलिसी संयुक्त कर्जदार असतील तरी घेता येते. प्रीमियमची रक्कम, कर्ज कालावधी, कर्जदाराच्या वयावर, आरोग्याच्या स्थितीवर आणि निवडलेल्या पॉलिसीच्या प्रकारावर अवलंबून असतो. अधिक रक्कम आणि दीर्घकाळासाठी विमा घेणाऱ्या व्यक्तीचा प्रीमियम जास्त असतो. ही सर्व माहिती घेउन मागच्या कर्ज आणि कर्ज विमा पॉलिसी घेतली पाहिजे.काही प्रकारच्या कर्जामध्ये आपण आपली मालमत्ता तारण ( Mortgage Property) ठेवलेली असते, जेथे पैसे न भरल्यास वित्त संस्था तारण असलेली मालमत्ता विकून आपली कर्जाची रक्कम वसूल करत असतात. असुरक्षित कर्जे घेताना अश्या प्रकारचे तारण देण्याची आवश्यकता नसते, तरीही पण जर दुर्दैवी घटना घडली तर आपल्या सर्व कर्जाचा भार आपल्या कुटुंबावर येतो, जीवन अनिश्चिततेने भरलेले आहे. त्यामुळे या प्रकारचे संरक्षण आवश्यक ठरते. तसेच विमा कंपन्या काही वेळा विविध सबबी देऊन विमा नाकारतात जसे वरील केसमध्ये मधुमेह हा आजार असे विमा कंपनीने म्हटले पण मधुमेह, रक्तदाब हे जीवनशैलीतील दोष समजले जातात. जसे विमा काढताना कोणतीही बाब लपवू नये तसेच विमा नाकारताना कारण पण योग्य असावे. 'वाचाल तर वाचाल' याप्रमाणे कर्ज विमा पॉलिसी आकस्मित येणाऱ्या अडचणींपासून आपल्यला वाचवू शकते पण ती आपण नीट वाचली असेल तर! ग्राहक म्हणून आपल्याला माहितीचा हक्क आहे पण सजग ग्राहक म्हणून ती माहिती वाचून समजून घेणे आपली जबाबदारी आहे.
दर कपातीच्या काळात मुदत ठेवींचे व्यवस्थापन
श्री. एस. सुंदर, (लेखक श्रीराम फायनान्स कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि सीएफओ आहेत.)भारताचे आर्थिक विश्व झपाट्याने विकसित होत असताना बचत करणाऱ्या व्यक्ती अधिक विचारपूर्वक निर्णय घेताना दिसत आहेत. सध्या मुदतठेवींवर दिला जाणारा भर हा घाईगडबडीत निर्णय घेण्याऐवजी काळजीपूर्वक केलेले नियोजन होय, असेच चित्र यातून प्रतिबिंबित होत आहे. व्याजदरांमध्ये सातत्याने बदल होत असले तरी, मुदत ठेवी अनेक भारतीय कुटुंबांसाठी एक विश्वासार्ह बचत पर्याय म्हणून आपले अढळ स्थान टिकवून आहेत. आर्थिक जग झपाट्याने बदलत असतानाही, मुदत ठेवींचा साधेपणा, विश्वासार्हता आणि मनःशांती यांमध्येच तिची खरीखुरी ताकद दडलेली आहे.काही वर्षांत, भारतात अनेकांसाठी मुदत ठेवी (एफडी) हा पुन्हा महत्त्वाचा बचत पर्याय म्हणून उदयास आला आहे. व्याजदर कपातीच्या सध्याच्या टप्प्यात, ठेवीदार त्यांच्या मुदत ठेवी किती काळ आणि कोणत्या दराने ठेवायच्या, या बाबींकडे अतिशय बारकाईने लक्ष देत आहेत. विशेषतः स्थिरता आणि अपेक्षित परतावा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असलेल्या व्यक्ती खूपच काळजीपूर्वक पावले उचलत आहेत. व्याजदर कमी होत चालल्याने बँकांनी मुदत ठेवींच्या दरातदेखील अनुरूप फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. या बदललेल्या परिस्थितीमुळे अनेक ठेवीदांराना ठेवींचे व्यवस्थापन त्याचबरोबर ठेवींमध्ये किती काळ आपली बचत ठेवायची, याबद्दल काळजीपूर्वक विचार करण्यास भाग पाडले आहे.मुदत ठेवींबाबत फेरविचार का केला जात आहे?भारतात मुदत ठेवी हा बचतप्रकार नेहमीच लोकप्रिय राहिला आहे. कारण गुंतवणुकीचा हा प्रकार अतिशय सोपा आणि तितकाच विश्वासार्ह आहे. गुंतवणूकदारांना मुदतपूर्तीच्या वेळी किती पैसे मिळतील, हे अतिशय अचूकपणे माहीत असते. शेअरबाजाराप्रमाणे ठेवींत दररोज चढ-उतार होत नाही आणि परताव्याबाबत कोणतीही अनिश्चितता झेलावी लागत नाही. काही काळासाठी व्याजदर अतिशय चढे होते, मात्र ते आता कमी होऊ लागले आहेत. परिणामी, अनेक ठेवीदार त्यांच्या आर्थिक नियोजनाचा प्रमुख घटक असलेल्या मुदत ठेवींबाबत पुनर्विचार करताना दिसत आहेत. बहुतेक व्यक्तींसाठी इतर गुंतवणुकीऐवजी केवळ मुदत ठेवींतील गुंतवणुकीचाच फेरविचार करण्याबाबतची ही स्थिती नाही. तर गुंतवणुकीत संतुलन राखण्यासाठी अन्य पर्यायांबरोबरच ठेवींसारख्या पर्यायाचाही अतिशय योग्य रितीने वापर करण्याशी संबंधित आहे.दबावाचा नव्हे, तर योग्य वेळेचा विचार कराजेव्हा व्याजदर कपातीला प्रारंभ होतो, तेव्हा योग्य वेळ हा नैसर्गिकरीत्या अतिशय महत्त्वाचा घटक ठरतो. गुंतवणूकदार घाई करत आहेत किंवा भीतीपोटी पावले उचलत आहेत, असा याचा अर्थ मुळीच नाही. त्यात विचारपूर्वक नियोजनाचे प्रतिबिंब दिसून येते. भविष्यात जर दरात आणखी कपात झाली तर आपल्याला अपेक्षित असलेला परतावा मिळेल का आणि यासाठी सध्याच्या दरांनुसार ठेवींमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल की नाही, याचा ठेवीदार विचार करत आहेत. अल्प-मुदतीच्या प्रतिक्रियांऐवजी निश्चितता आणि स्पष्ट चित्र यावर ते आपले लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे.आज गुंतवणूकदार मुदत ठेवींत कशा पध्दतीने गुंतवणूक करावी, याबद्दल अधिक काळजीपूर्वक निर्णय घेताना दिसत आहेत. आपली संपूर्ण बचत एकाच ठेवीमध्ये ठेवण्याऐवजी, ते त्यांच्या गरजेनुसार विविध मुदतींचे पर्याय निवडत आहेत.काही व्यक्ती अल्प-मुदतीच्या ठेवींना पसंती देत आहेत. आपल्याला पैसे सहज उपलब्ध होतील, हा त्यामागील हेतू आहे. तर काही जण प्रदीर्घ कालावधीत स्थिर परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून दीर्घ-मुदतीच्या ठेवींचा विचार करतात. उदाहरणार्थ, व्याजाच्या उत्पन्नावर पूर्णपणे अवलंबून असलेली सेवानिवृत्त व्यक्ती नियमित रोख प्रवाह मिळण्यासाठी आपल्या बचतीचा काही भाग दीर्घ-मुदतीच्या मुदत ठेवींमध्ये ठेवू शकते. त्याच्याच जोडीला हव्या त्या प्रसंगी पैसे सहज उपलब्ध होण्यासाठी काही निधी अल्प-मुदतीच्या ठेवींमध्ये ठेवू शकते.तरुण गुंतवणूकदार मुदत ठेवींचा वापर अतिशय वेगळ्या पद्धतीने करू शकतात. काही जण भविष्यकालीन आर्थिक नियोजन आखत असताना अतिरिक्त पैसे सुरक्षितपणे ठेवण्यासाठी मुदतठेवींचा पर्याय निवडतात. अनिश्चित काळात कोणताही अतिरिक्त धोका न पत्करता स्थिर परतावा मिळवण्यासाठी त्यांच्याकरिता मुदत ठेवी हा एक उत्तम मार्ग आहे.स्थिरता, पूर्वअंदाजावर लक्ष केंद्रित कराअनेक गुंतवणूकदार आगाऊ अंदाजाला अतिशय महत्त्व देत आहेत. विशेषतः व्याजदर सतत बदलत असताना आपल्याला व्याजापोटी किती रक्कम मिळेल आणि पैसे कधी उपलब्ध होतील, हे आधीच माहित असणे कधीही मनाला दिलासा देणारी बाबच ठरते. एकदा मुदत ठेवीत पैसे गुंतवल्यानंतर, निवडलेल्या कालावधीसाठी परतावा हमखास मिळतो. यामुळे, नंतर कमी व्याजदराच्या ठेवीत पैसे पुन्हा गुंतवण्याच्या अनिश्चिततेचे प्रमाण आपोआप कमी होते. दररोजचा खर्च, शिक्षणाचा खर्च किंवा निवृत्तीवेतनाचे नियोजन करणाऱ्या कुटुंबांसाठी आर्थिक स्थिरता हा मुद्दा अतिशय महत्वाचा असतो.व्याजदरातील चढ-उताराचे आकलनव्याजदर प्रवाही असतात. त्यांच्यात चढउतार सुरूच असतात. ते काही काळासाठी वाढतात आणि नंतर कमी होतात. व्याजदरातील या बदलांचा बचतीच्या नियोजनावर प्रभाव पडत असतो. जेव्हा व्याजदर तुलनेने चढे असतात, तेव्हा बचत करणारे अनेकदा दीर्घ कालावधीसाठी ठेवींत गुंतवणूकीचा विचार करतात. जेव्हा व्याजदर कमी होतात, तेव्हा लवचिकता हा मुद्दा अधिक मौल्यवान ठरतो.बचतीच्या नियोजनात मुदत ठेवींची भूमिकावैयक्तिक आर्थिक नियोजनात मुदत ठेवी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्या शेअरबाजारातील समभागांसारख्या वाढ-केंद्रित गुंतवणुकींची जागा घेण्यासाठी नसून एकूण बचतीमध्ये संतुलन राखण्यास सहाय्य करतात. मुदत ठेवी भांडवलाचे संरक्षण करतात. त्याचबरोबर नियमित आणि निश्चित उत्पन्न मिळवून देतात. तसेच कौटुंबिक आर्थिक व्यवस्थेला स्थिरतेचे कवच प्रदान करतात. व्याजदरांमध्ये बदल होणाऱ्या, निश्चिततेला महत्त्व दिल्या जाणाऱ्या काळात मुदत ठेवी खूपच उपयुक्त ठरल्या आहेत.
खासगी क्षेत्रातील एक मोठी बँक एचडीएफसी बँक
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.comआपण बघणार आहोत निफ्टी ५० मधील आणखी एक कंपनी आणि खासगी क्षेत्रातील दिग्गज आणि सर्वात मोठी बँक ‘एचडीएफसी बँक’एचडीएफसी बँक (HDFC Bank) ही भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक असून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिली आहे. जानेवारी २०२६ मधील ताज्या घडामोडी आणि आर्थिक विश्लेषणानुसार या शेअरची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे.१. ताज्या घडामोडी आणि शेअरची किंमत - सध्याचा भाव : २३ जानेवारी २०२६ पर्यंत शेअरची किंमत अंदाजे ₹ ९१५.८० ते ₹ ९१६.१० च्या दरम्यान असून यात अलीकडे काही प्रमाणात घसरण पाहायला मिळाली आहे.महत्त्वाचे कॉर्पोरेट निर्णय : ऑगस्ट २०२५ मध्ये बँकेने १:१ बोनस शेअर दिला होता. त्यापूर्वी ऑगस्ट २०२५ मध्येच २-फॉर-१ स्टॉक स्प्लिट (विभाजन) देखील करण्यात आले होते.२. आर्थिक कामगिरी (Q३FY२६ निकाल) - नफा : डिसेंबर २०२५ ला संपलेल्या तिमाहीत बँकेने ₹१८,६५३.८ कोटी शुद्ध नफा नोंदवला, जो मागील वर्षाच्या तुलनेत ११.४% ते ११.५% ची वाढ दर्शवतो.एनपीए (NPA): बँकेची मालमत्ता गुणवत्ता (Asset Quality) सुधारली असून ग्रॉस एनपीए १.२४% आणि नेट एनपीए ०.४२% वर आला आहे.विलीनीकरणानंतरचा परिणाम आणि आव्हानेएचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक यांच्या विलीनीकरणानंतर बँकेसमोर काही अल्पकालीन आव्हाने आहेत :एलडीआर (Loan-to-Deposit Ratio): सध्या बँकेचा एलडीआर ९८.७% च्या उच्च पातळीवर आहे. बँकेचे लक्ष्य हे प्रमाण ८५-९०% पर्यंत खाली आणण्याचे आहे, ज्यामुळे भविष्यात अधिक कर्ज देण्याची क्षमता वाढेल.NIM (Net Interest Margin): व्याजातून मिळणारा नफा (मार्जिन) सध्या ३.३५% ते ३.५१% च्या दरम्यान स्थिर आहे. एचडीएफसी बँक (HDFC Bank) ही भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक असून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिली आहे.जानेवारी २०२६ मधील ताज्या घडामोडी आणि आर्थिक विश्लेषणानुसार या शेअरची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे :१. ताज्या घडामोडी आणि शेअरची किंमत - सध्याचा भाव : २३ जानेवारी २०२६ पर्यंत शेअरची किंमत अंदाजे ₹९१५.८० ते ₹९१६.१० च्या दरम्यान असून यात अलीकडे काही प्रमाणात घसरण पाहायला मिळाली आहे.महत्त्वाचे कॉर्पोरेट निर्णय : ऑगस्ट २०२५ मध्ये बँकेने १:१ बोनस शेअर दिला होता. त्यापूर्वी ऑगस्ट २०२५ मध्येच २-फॉर-१ स्टॉक स्प्लिट (विभाजन) देखील करण्यातआले होते. मागील ५२ आठवड्यांचा उच्चांक/नीचांक : गेल्या एका वर्षात शेअरने ₹ १,०२०.५ चा उच्चांक आणि ₹८१३.० चा नीचांक गाठला आहे.२. आर्थिक कामगिरी (Q३ FY२६ निकाल) - नफा: डिसेंबर २०२५ ला संपलेल्या तिमाहीत बँकेने ₹१८,६५३.८ कोटी शुद्ध नफा नोंदवला, जो मागील वर्षाच्या तुलनेत ११.४% ते ११.५% ची वाढ दर्शवतो.एनपीए (NPA) : बँकेची मालमत्ता गुणवत्ता सुधारली असून ग्रॉस एनपीए १.२४ % आणि नेट एनपीए ०.४२ % वर आला आहे.३. गुंतवणूक आणि भविष्यकालीन अंदाज (Price Target) - ब्रोकरेजचे मत : जागतिक ब्रोकरेज फर्म CLSA ने या शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग दिले असून भविष्यात हा शेअर २७% पर्यंत वाढू शकतो असा दावा केला आहे.लक्ष्य किंमत (Target Price): विविध विश्लेषकांनी या शेअरसाठी ₹१,१२८ ते ₹१,२२० पर्यंतची उद्दिष्टे ठेवली आहेत.लाभांश (Dividend) : बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ₹२२ प्रति शेअर लाभांश जाहीर केला होता. जुलै २०२५ मध्ये देखील ₹५ चा विशेष अंतरिम लाभांश देण्यात आला होता.निष्कर्ष : विलीनीकरणानंतरच्या आव्हानांमुळे सध्या शेअर काहीसा दबावाखाली असला, तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एचडीएफसी बँक हा एक मजबूत पर्याय मानला जातो. गुंतवणुकीपूर्वी आपण आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करणे आवश्यक आहे.एचडीएफसी बँक शेअर्सबद्दल अधिक सविस्तर माहिती आणि तांत्रिक विश्लेषण खालीलप्रमाणे आहे :१. महत्त्वाचे आर्थिक मापदंड (Financial Ratios) गुंतवणूक करण्यापूर्वी बँकेचे आरोग्य दर्शवणारे हे काही महत्त्वाचे आकडे आहेत:P/E रेशिओ (Price-to-Earnings): सध्या हा १८.९४ ते १९.०० च्या आसपास आहे. उद्योगाच्या तुलनेत हा रेशिओ बँकेचे व्हॅल्युएशन वाजवी असल्याचे दर्शवतो.बुक व्हॅल्यू : प्रति शेअर बुक व्हॅल्यू अंदाजे ₹३४९.७८ आहे.ROE (Return on Equity): बँकेचा निव्वळ परतावा १४.३% ते १५% च्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.मार्केट कॅप (Market Cap): एचडीएफसी बँक ही साधारण ₹१४.१५ लाख कोटी मार्केट कॅप असलेली भारतातील एक मोठी 'लार्ज कॅप' बँक आहे.बँकेने निम-शहरी आणि ग्रामीण भारतात (Semi-urban & Rural India) गुंतवणुकीचा वेग वाढवला आहे.भविष्यात डिजिटल बँकिंगमधील नावीन्य आणि वेल्थ मॅनेजमेंट सेवांवर बँकेचा विशेष भर असणार आहे.१. Q३ FY२६ निकाल: मुख्य मुद्देनिव्वळ नफा (Net Profit): बँकेने या तिमाहीत ₹१८,६५४ कोटी नफा कमावला असून, तो मागील वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत ११.५% ने वाढला आहे.व्याज उत्पन्न (NII): निव्वळ व्याज उत्पन्न ६.४% नी वाढून ₹३२,६१५ कोटी झाले आहे.एकूण उत्पन्न: बँकेचे एकूण उत्पन्न ₹९०,००५ कोटी वर पोहोचले आहे.२. कर्ज आणि ठेवींचे प्रमाण (LDR - Loan to Deposit Ratio)सद्यस्थिती: बँकेचे एलडीआर प्रमाण सध्या ९८.७% ते ९९% च्या आसपास आहे.भविष्यकालीन लक्ष्य: बँकेने हे प्रमाण FY27 पर्यंत ८५% ते ९०% पर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी बँक कर्ज वितरणापेक्षा ठेवी (Deposits) वाढवण्यावर अधिक भर देत आहे.(सूचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)
Afghanistan snowfall : अफगाणिस्तानमध्ये हिमवर्षावामुळे ६१ मृत्यू तर, १०० पेक्षा जास्त लोक जखमी
Afghanistan snowfall – अफगाणिस्तानमध्ये पाऊस आणि हिमवर्षावामुळे किमान ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत, असे देशाच्याआपत्ती व्यवस्थापन एजन्सीने म्हटले आहे. रस्त्यांवर बर्फ साचल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून रस्त्यावर साचलेले बर्फ हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. देशभरात ४५८ घरांचे अंशतः किंवा पुर्णतः नुकसान झाले आहे. अफगाणिस्तानच्या ३४ […]
पद्म पुरस्कारांची घोषणा, केरळच्या तिघांना पद्मविभूषण तर कोश्यारी आणि शिबू सोरेनना पद्मभूषण पुरस्कार
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. केंद्राने २०२६ साठी पाच जणांना पद्मविभूषण, तेरा जणांना पद्मभूषण आणि ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केले आहेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही.एस. अच्युतानंदन या दोघांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याची घोषणा झाली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के. टी. थॉमस, व्हायोलिन वादक एन. राजम, कम्युनिस्ट नेते पी. नारायणन यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. धर्मेंद्र आणि एन. राजम वगळता उर्वरित तीन पद्मविभूषण विजेते हे केरळशी संबंधित आहेत. यामुळे केरळ विधानसभा निवडणूक आणि पुरस्कार यांचे कनेक्शन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.गायिका अलका याज्ञिक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कल्लीपट्टी रामासामी पलानीस्वामी, अभिनेता मामुट्टी, डॉ. नोरी दत्तात्रेयडू, अॅडगुरु पियुष पांडे (मरणोत्तर), एस.के.एम. मैलानंदन, शतावधानी आर.गणेश, बँकर उदय कोटक, भाजप नेते व्ही.के. मल्होत्रा (मरणोत्तर), वेल्लापल्ली नटेसन, विजय अमृतराज, शिबू सोरेन (मरणोत्तर) या तेरा जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच ११३ जणांना केंद्राने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. Padma Awards 2026_India by prahaarseo महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषणमहाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन (मरणोत्तर) यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर महाराष्ट्रातील लोककलावंत रघुवीर खेडकर, रक्तपेढीसाठी योगदाने देणारे अर्मिडा फर्नांडिस, कृषीतज्ज्ञ श्रीरंग लाड आणि पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.भगतसिंह कोश्यारी हे २०१९ ते २०२३ या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल होते. कोश्यारी यांच्याच काळात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सकाळी शपथ घेतली आणि राज्यात जेमतेम तीन दिवसांसाठी सरकार स्थापन केले होते. कोश्यारी असतानाच्या काळातच शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कोणाची यावरून राजकीय वादांना तोंड फुटले होते. विशेष म्हणजे कोश्यारी हे राज्यातले पहिलेच राज्यपाल होते जे हेलिकॉप्टर ऐवजी पायऱ्यांवरून चालत रायगडावर गेले होते. कोश्यारींची काही वक्तव्ये आणि राज्यपाल म्हणून घेतलेले तसेच न घेतलेले हे देशभर चर्चेचा विषय झाले होते. यामुळे त्यांना पुरस्कार जाहीर होताच राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
विमा कर्मचाऱ्यांच्या पगारात अन् पेन्शनमध्येही वाढ
मुंबई : केंद्रातील मोदी सकारने पेन्शन अन् पगार वाढीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) आणि सार्वजनिक क्षेत्रातील जनरल विमा कंपन्या (पीएसजीआयसी) यांच्या तब्बल ४६ हजार कर्मचारी अन् ४६ हजारांपेक्षा अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वेतन अन् पेन्शन सुधारणा मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून पेन्शनमधील सुधारणेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरबीआय निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पेन्शन व महागाई सवलतीवर १० टक्के वाढ मंजूर झाली आहे. तर नाबार्डमधील ग्रुप 'अ', 'ब' व 'क' कर्मचाऱ्यांना २० टक्के वेतन-भत्त्यात वाढ मिळेल. तर पीएसजीआयसी कर्मचाऱ्यांसाठी एकूण वेतन बिलात १२.४१ टक्के वाढ आणि मूलभूत वेतन व महागाई भत्त्यात १४ टक्के वाढ मिळणार आहे. आरबीआयच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पेन्शन व महागाई सवलतीवर १ नोव्हेंबर २०२२ पासून १० टक्के वाढ मंजूर करण्यात आली आहे. तर नाबार्डमधील कर्मचाऱ्यांना २० टक्के वाढ तसेच, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनला पूर्वीच्या आरबीआय-नाबार्ड पेन्शनशी जुळवून घेतले जाणार आहे. ही माहिती केंद्र सरकारने नुकतेच जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
Farmers Long March : हजारो शेतकरी आणि मजुरांनी विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढला आहे.
America : मिनियापोलीसमध्ये पोलिसांच्या गोळीबारात आणखी एक ठार !
मिनियापोलीस – अमेरिकेतील मिनियापोलीस भागात इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी स्थलांतरितांविरोधातल्या कारवाईदरम्यान केलेल्या गोळीबारात आणखी एक व्यक्ती ठार झाला आहे. यामुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांविरोधात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. मिनियापोलीसच्या रस्त्यांवर निषेधमोर्चा काढण्यात आला. काही आठवड्यांपुर्वीच इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात एक महिला ठार झाली होती. त्या घटनेमुळे प्रशासनाविरोधात अजूनही उग्र निदर्शने होत असतानाच तशीच दुसरी घटना घडली आहे. अलेक्स […]
BCCI Central Contract : बीसीसीआय नवीन रिटेनरशिप सायकलमध्ये 'A+' (ए प्लस) ही सर्वोच्च श्रेणी पूर्णपणे काढून टाकली जाण्याची शक्यता आहे.
US air services : हिमवादळामुळे अमेरिकेतील विमानसेवा विस्कळीत; नागरिकांना बसला मोठा आर्थिक फटका
लास वेगास – अमेरिकेच्या उत्तर भागात आलेल्या हिमवादळामुळे विमानसेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. अनेक विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली, तर परदेशात जाणाऱ्या अनेक विमानांची उड्डाणे नियोजित वेळेपेक्षा उशिराने झाली आहेत. अनेक राज्यांमध्ये रस्त्यांवर बर्फाचा थर साचला असून पावसाच्या सरी देखील झाल्या आहेत. यामुळे देशाच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येला म्हणजे १८० दशलक्ष लोकांना फटका बसला आहे. […]
New Voter ID : नवीन मतदारांना नोंदणी मंजूर झाल्यापासून अवघ्या १५ दिवसांत त्यांचे ओळखपत्र प्राप्त होणार आहे
बहुतेक वेळा स्किन अॅलर्जी सौम्य स्वरूपाची असते. अशा वेळी काही सोपे, सुरक्षित आणि नैसर्गिक घरगुती उपाय केल्यास आराम मिळू शकतो.
Padma Shri Bhiklya Dhinda : पालघर जिल्ह्याचे जव्हार तालुक्याचे ज्येष्ठ आदिवासी कलाकार भिकल्या लडक्या धिंडा यांना २०२६ चा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर
Perth Scorchers Winner : पर्थ स्कॉर्चर्सने बीबीएलमध्ये ६ जेतेपदांसह विश्वविक्रम प्रस्थापित केला असून एमआय आणि सीएसकेला मागे टाकले
गावाच्या चारी बाजूंनी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असताना ग्रामपंचायत मात्र सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी! ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्राची मंजुरी
Maharashtra Tur Procurement Approval : राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला मूल्य समर्थन योजने अंतर्गत मंजुरी
देशातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या समस्येवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी तीव्र चिंता व्यक्त केली आहे
MUM vs HYD : खान बंधूंचा जलवा! सर्फराझचे द्विशतक अन् मुशीरचा ‘पंजा’; मुंबईचा हैदराबादवर दणदणीत विजय
MUM vs HYD : मुंबईने सर्फराझ-मुशीर या खान बंधूच्या जोरावर रणजी सामन्यात हैदराबादवर मात केली.
ऐतिहासिक ‘टर्न टेबल शिडी’ वाहनाचे मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी होणार अनावरणमहानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक गगराणी यांच्या संकल्पनेतून, उद्योजक सिंघानिया यांच्या सहकार्याने वाहनाला नवी झळाळीसन १९३७ मध्ये निर्मित आणि सन १९४४ मध्ये मुंबई बंदरातील (मुंबई डॉक) मालवाहू जहाजाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या ऐतिहासिक ‘टर्न टेबल शिडी’ असलेल्या वाहनाचे मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन (Restoration) करण्यात आले आहे. पुनर्जतन केलेल्या या ऐतिहासिक वाहनाचे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे अनावरण करण्यात येणार आहे.बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. रवींद्र आंबुलगेकर, उद्योजक श्री. गौतम सिंघानिया आदी मान्यवर यावेळी उपस्थित असतील.‘टर्न टेबल शिडी’ असलेल्या या ऐतिहासिक अग्निशमन वाहनाची सन १९३७ मध्ये इंग्लंडमधील लेलँड (Leyland) या कंपनीत निर्मिती करण्यात आली. तर, दिनांक २४ सप्टेंबर १९४१ रोजी मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात ते समाविष्ट करण्यात आले. तत्कालिन उंच इमारती, गोदामे तसेच बंदर परिसरातील उंच भागांपर्यंत पोहोचण्यासाठी ही अत्याधुनिक शिडी मानली जायची. ही शिडी पूर्णत: लोखंडी संरचनेत तयार करण्यात आली होती. ती हाताने, साध्या यांत्रिक पद्धतीने फिरवता यायची.दिनांक १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई बंदरात (मुंबई डॉक) उभ्या असलेल्या एस. एस. फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजाला आग लागली होती. दारुगोळा, स्फोटके, इंधन आणि युद्धसामग्रीने हे जहाज भरलेले होते. त्यामुळे, जहाजावरील आगीने रौद्ररूप धारण केले. अशा भीषण परिस्थितीत मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी ‘टर्न टेबल शिडी’ असलेल्या वाहनाच्या सहाय्याने बचावकार्य हाती घेतले. बंदरावरील उंच गोदामांतील आग विझवण्यासाठी तिथपर्यंत पोहोचणे, जहाजाच्या आसपास अडकलेल्यांना वाचवणे तसेच जखमींना खाली उतरवणे आदी शर्थीची कामे या वाहनाच्या मदतीने अविरत सुरू होती. या दुर्घटनेत अनेक लोक मृत्युमुखी पडले. मात्र, मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांच्या आटोकाट प्रयत्नांमुळे अनेकांचे प्राणही वाचले.‘टर्न टेबल शिडी’ असलेले हे वाहन कालांतराने नादुरुस्त झाले आणि त्यास स्मृतिरुपात मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयी म्हणजेच भायखळा अग्निशमन केंद्रात जतन करुन ठेवण्यात आले. दरम्यान, या वाहनाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी त्याचे पुनर्जतन करण्याची संकल्पना मांडली. तसेच, प्रसिद्ध उद्योजक श्री. गौतम सिंघानिया यांच्या सहकार्यातून या वाहनाला नवी झळाळी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जे. के. इन्व्हेस्टर बॉम्बे लिमिटेड या कंपनीने सुपर कार क्लब गॅरेजमध्ये या वाहनाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले.अनेक दशकांपासून बंद असलेले हे वाहन पुन्हा सुरू करणे, वाहनाची झिजलेली यंत्रणा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या वाहनाचे मूळ सुटे भाग (स्पेअर पार्टस्) मिळवणे अत्यंत जिकरीचे कार्य होते. वाहनाची बनावट खूप जुनी असल्याने त्याचे सुटे भाग उपलब्ध होत नव्हते. त्यासाठी तत्कालिन तांत्रिक नोंदी, आराखडे आणि संदर्भ शोधण्यात आले. त्यानुसार, प्रत्येक सुट्या भागाची संरचना (डिझाइन) तयार करुन आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हे सुटे भाग नव्याने बनविण्यात आले. आता हे वाहन रस्त्यांवर दिमाखात धावण्यास सज्ज आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांची संकल्पना, उद्योजक श्री. गौतम सिंघानिया यांचे सहकार्य आणि या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या अभियंत्यांची संशोधकता व कल्पकतेच्या बळावर मुंबई अग्निशमन दलाच्या या ऐतिहासिक वाहनास नवी झळाळी मिळाली आहे.*(जसंवि/५९३)
अक्खा महाराष्ट्र सुन्न…! लोकलमध्येच प्राध्यापकाला संपवलं; क्षुल्लक वादातून भरगर्दीत रक्ताचा सडा
Malad Murder case : महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकाची चाकुने हल्ला करून हत्या
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने २०२६ च्या ४५ पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक अशी या पुरस्कारांची ओळख आहे. यामुळे हा पुरस्कार मिळणे ही गौरवाची बाब आहे. यंदा महाराष्ट्रातील चार जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकनाट्य क्षेत्रातले तमाशा कलाकार रघुवीर खेडकर आणि कृषी क्षेत्रात कार्यरत असलेले श्रीरंग लाड तसेच पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका यांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. आशियातील पहिली रक्तपेढी स्थापन करणाऱ्या मुंबईच्या आर्मिडा फर्नांडिस यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.पद्मश्री पुरस्कार विजेते २०२६ आर्मिडा फर्नांडिस (मुंबई) - आशियातील पहिली रक्तपेढी स्थापन करण्यात मोलाचे योगदान अंके गौडा- भारतातील सर्वात मोठ्या ग्रंथालयाची उभारणी भगवानदास रायकवार- बुंदेली वॉर आर्टचे प्रशिक्षक म्हणून पारंपरिक युद्धकलेचे जतन व प्रसार बृजलाल भट्ट (जम्मू-काश्मीर)- समाजसेवा व योगशिक्षणाच्या क्षेत्रातील योगदानासाठी बुदरी ठाडी (छत्तीसगड)-नक्षलग्रस्त भागात शिक्षण पोहोचवण्याच्या कार्यासाठी. चरण हेम्ब्राम (ओडिशा)- संथाली भाषेतील साहित्यनिर्मितीसाठी प्रसिद्ध लेखक. चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)- पितळकलेत (ब्रास आर्ट) लोकांना प्रशिक्षण देऊन पारंपरिक हस्तकलेचा विकास धार्मिक लाल चुन्नीलाल पांड्या- शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. कुमारस्वामी थंगराज-जेनेटिक्स (आनुवंशिक संशोधन) क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी डॉ. पद्मा गुरमीत (लडाख)- सोवा-रिग्पा या पारंपरिक वैद्यक पद्धतीच्या संवर्धनासाठीकोण आहेत तमाशा कलाकार रघुवीर खेडकर ? चार दशकांहून अधिक काळापासून रघुवीर खेडकर हे तमाशा रंगभूमीवर कार्यरत तमाशा फडातील 'सोंगाड्या'ची भूमिका करणारे कलावंत आणि तमाशा फडचालक 'अखिल भारतीय तमाशा परिषद' या संघटनेचे अध्यक्ष तरुणपणी तमाशात कथ्थक आणि लोककलेचे मिश्रण असलेले थाळीनृत्य करण्यासाठी लोकप्रिय
Harbhajan Singh Criticized : हरभजन सिंगने पाकिस्तानचा खरा चेहरा उघड करताना बांगलादेशच्या हकालपट्टीवर मोठं विधान केलं आहे.
रिलीजच्या अवघ्या दोन दिवसांतच चित्रपटाने दमदार कमाई करत आपली ताकद दाखवून दिली आहे
‘मराठी भाषा’ ही नदीप्रमाणे सतत वाहणारी परंपरा
मुंबई :मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून हजारो वर्षांची नदीसारखी अविरतपणे वाहणारी सांस्कृतिक परंपरा आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या वतीने आयोजित “व्याख्यानमाला” या कार्यक्रमात त्यांनी मराठीच्या अभिजात दर्जाचे महत्त्व, भाषेचा ऐतिहासिक प्रवास आणि पुढील टप्प्यातील विकास आराखडा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, सल्लागार समितीचे सदस्य डॉ.शिरीष ठाकूर तसेच मराठी भाषा अभ्यासक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मराठीला अभिजात दर्जा मिळणे हे केवळ“शिक्कामोर्तब”नसून केंद्र शासनाच्या विशेष योजनेतून भाषाविकासासाठी संधी निर्माण करणारे असल्याचे सचिव डॉ.कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. त्यांनी महाराष्ट्रीन प्राकृत,अपभ्रंश आणि पुढील अर्वाचीन मराठी असा भाषेचा प्रवास मांडत वररूचीच्या‘प्राकृतप्रकाश’ग्रंथाचा संदर्भ देऊन मराठीच्या प्राचीनत्वाचे पुरावे अधोरेखित केले. ज्ञानेश्वरी,लीळाचरित्र,संतसाहित्य आणि१९व्या शतकातील आधुनिक मराठीच्या वाटचालीचा आढावा घेत त्यांनी मराठीतील प्रतिभा,माधुर्य आणि मौलिकता यावर प्रकाश टाकला. मात्र ज्ञानेश्वरपूर्व दीड हजार वर्षांच्या भाषिक-लिखित परंपरेवर अपेक्षित संशोधन कमी झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.अभिजात भाषा योजनेअंतर्गत राज्याला‘सेंटर ऑफ एक्सलन्स’स्थापन करण्याची संधी मिळणार असून त्याची अधिसूचना फेब्रुवारी-मार्चपर्यंत अपेक्षित असल्याचे डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले. यासाठी विभागाकडून डीपीआर (DPR)तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून तज्ज्ञांच्या सल्ल्याने विविध प्रस्ताव त्यात समाविष्ट केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अमरावती येथे झालेल्या११अभिजात भाषांच्या परिषदेचा उल्लेख करत‘भाषिणी’ॲपच्या माध्यमातून मराठीत केलेले भाषण तात्काळ इतर भाषांमध्ये दिसण्याचा प्रयोग राबवून महाराष्ट्राने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाषासंवादाचा नवा मार्ग दाखवल्याचे त्यांनी सांगितले.भाषांमधील“ज्ञानभाषा”आणि“लोकभाषा”या संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी प्राकृत ही सामान्यजनांची भाषा,संस्कृत ही ज्ञानभाषा आणि आजच्या काळात इंग्रजी ही प्रबंधांच्या प्रमाणामुळे ज्ञानभाषा ठरते,तर मराठी ही लोकजीवनातील संवादाची भाषा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमाणभाषा ही विविध बोलीभाषांतील शब्द,व्याकरण आणि वापरातील पद्धती एकत्र येऊन तयार होते,त्यामुळे प्रमाणभाषा ही बोलीभाषांचे“अपत्य”असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‘अभिजात’या संकल्पनेबाबत त्यांनी विविध पाश्चात्त्य विचारप्रवाह,विश्वकोषातील नोंदी आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सांगितलेले“आदर्शानुकरण”व“संकेतपालन”हे निकष समजावून सांगितले.मराठीच्या संवर्धन,संशोधन,अनुवाद आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने विभागाने एका वर्षात मोठे लक्ष्य पूर्ण करण्याचा निर्धार असल्याचे सचिव डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले. मनुष्यबळ,जागा आणि प्रशिक्षण या तीन मुद्द्यांवर भर देत विविध भाषांचे वाचक,कॉन्झर्व्हेटर्स तयार करण्यासाठी प्रशिक्षणक्रम राबवले जातील,असे त्यांनी नमूद केले. निधी उभारणीसाठी सीएसआरच्या माध्यमातून मराठी उद्योजकांकडून मदत घेण्याचा पर्यायही त्यांनी सूचित केला. मराठी प्रभुत्वाशी संबंधित अनेक उद्योग-संधी उपलब्ध असून काही उद्योजकांचा टर्नओव्हर५००कोटींच्या पुढे असल्याचेही त्यांनी सांगितले.संशोधनाच्या क्षेत्रात मराठीच्या१,५००वर्षांच्या दुर्लक्षित कालखंडावर अधिक अभ्यासाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पुढील टप्प्यात प्रकाशन व अनुवादासाठी‘अनुवाद अकॅडमी’ही स्वायत्त संस्था स्थापन केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानामुळे मशीन ट्रान्सलेशन सक्षम होत असून मराठीतील स्पेल चेक,शब्दपर्याय,प्रेडिक्टिव्ह टायपिंग यांसारख्या सुविधा विकसित करण्यासाठी लोकांनी मोबाईलवर अधिकाधिक मराठी टाइप करावे,असे आवाहनही त्यांनी केले. व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी अभिजात दर्जानंतरच्या नियोजनासाठी उपस्थितांच्या सूचना मागवत मराठीच्या भविष्यकालीन विकासासाठी सामूहिक सहभाग महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले.
ठाकरे सेनेच्या वागदे ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश
सिंधुदुर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने बिनविरोध विजयाची मालिका सुरू ठेवली असतानाच, कणकवली मतदारसंघात ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राजकीय हालचालींमुळे ठाकरे गटाला सातत्याने धक्के बसत असून, वैभववाडीनंतर आता कणकवली तालुक्यातील वागदे ग्रामपंचायतीतून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहेत.वागदे ग्रामपंचायतीचे ठाकरे गटाचे सदस्य दशरथ गावडे यांच्यासह माजी शाखाप्रमुख रवी गावडे, संतोष घाडीगावकर, मनोज गावडे, शांताराम गावडे, अनंत गावडे, राजू गावडे आदी पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजपात स्वागत केले.यावेळी वागदे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप सावंत, लक्ष्मण घाडीगावकर, समीर प्रभूगावकर, गोविंद घाडीगावकर, भाई काणेकर यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कणकवली मतदारसंघात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढत असून, ग्रामपंचायत पातळीवरही पक्षाचा प्रभाव वाढताना दिसत आहे.
अंधार कोणाच्या आयुष्यात नाही असं होतं का? कधी बाहेरचा, तर कधी आतला, पण प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या तिमिरातून चाललेलाच असतो. मात्र त्या तिमिरात थांबणं नव्हे, तर त्यातून तेज शोधणं हेच खरं जगणं आहे.“रात्र कितीही काळी असो, पहाट एक दिवस होतेच...”हीच ओळ सांगते-आशा कधी मरत नाही.जीवन म्हणजे चढ-उतारांचा खेळएखादं झाड वादळात मोडतं, पण त्याचं बीज पुन्हा जमिनीत रुजतं आणि नव्याने हिरवं जग निर्माण होतं. तसेच आपणही-एखादं संकट, एखादा अपघात, एखादी हानी आपल्याला पाडते, पण तोच क्षण आपल्याला उभंही करतो.डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील अंधार बघा-गरीब पार्श्वभूमी, साधं गाव, मर्यादित साधनं. पण त्यांनी त्या अंधारातून ऊर्जा घेतली आणि अख्ख्या देशाला तेजाचा मार्ग दाखवला. त्यांचं वाक्य आजही प्रेरणादायी आहे.त्यांच्या शब्दांत...“If you fail, never give up because FAIL means ‘First Attempt In Learning’.”अपयश म्हणजे अंत नव्हे, सुरुवात - नव्या तेजाची.तिमिर म्हणजे शेवट नव्हे - नव्या प्रवासाची सुरुवात‘अत्त दीप भव’- स्वतःचाच दीप बनागौतम बुद्धांनी सांगितलेला हा संदेश आजही कालातीत आहे...याचा अर्थ, जेव्हा साऱ्या दिशांना अंधार दाटतो, तेव्हा बाहेरच्या प्रकाशाची वाट पाहू नका; आपल्या आतला दिवा पेटवा.आपल्यातच ती शक्ती आहे जी तिमिरावर विजय मिळवू शकते.हा विचार आजच्या प्रत्येक मनुष्याला लागू होतो. इतरांचा आधार चांगला असतो, पण जो स्वतःच्या अंतर्मनावर विसंबतो, जो स्वतःच्या प्रकाशावर श्रद्धा ठेवतो. त्याचं तेज कधीही मंदावत नाही. एक अलीकडचे उदाहरण म्हणजे अनघा मोडक यांचे. अनघाताईंची दृष्टी एका आजारामुळे नंतर गेली. काय वाटलं असेल त्यावेळी त्यांना! पण आज बघा त्यांच्या गोड वाणीने त्या इतरांची अंतरे उजळीत आहेत. त्यांच्या जिभेवर सरस्वती आहे. ‘तेजाची आरती’ हा त्यांचा कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. दृष्टी गेली पण त्यांनी स्वत:चा आतला दीप उजळला आणि इतरांना प्रकाश दिला आनंद दिला. ती खरा स्वत:चा दीप झाली.अशा असंख्य कहाण्या आपल्या आजूबाजूला आहेत. एका अपघातात दोन्ही पाय गमावलेले सुधा चंद्रन यांनी नृत्य सोडलं नाही. कृत्रिम पायावर नाचून त्यांनी जगाला सांगितलं “अंधार नाही, तर धैर्य हरवलं की माणूस हरतो.”निसर्गही शिकवतो... अंधारानंतर प्रकाश येतो.प्रत्येक रात्र संपल्यावर सूर्य उगवतो. काळोखातही काजवे उजेड निर्माण करतात. फुलं फक्त दिवसातच नव्हे, तर काही चांदण्या रात्री फुलतात. म्हणजेच निसर्गसुद्धा सांगतो, अंधारातही तेजाचा किरण असतो.कवी बा. भ. बोरकर यांच्या ओळी आठवतात“अंधाराला नका शाप देऊ, एक दिवा लावा...”तेजाचा शोध दुसऱ्याने लावावा असं नाही, आपणच दिवा व्हायचं.कोरोनाच्या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस, स्वच्छता कामगार हे सारे लोक अंधारात दिवे ठरले. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःला संकटात टाकलं. हेच खरं तेज निःस्वार्थ सेवेचं. आजही अनेक तरुण शेती, पर्यावरण, शिक्षण, ग्रामीण विकास यासाठी गावोगावी काम करत आहेत. त्यांच्यामुळेच तिमिरातही आपलं समाजजीवन उजळतंय.कधी कधी अंधार बाहेर नसतो, तो आपल्या मनात असतो. भीती, अपराधभाव, निराशा, असुरक्षितता ही मनाची सावली आहे. पण जशी मेणबत्ती स्वतः जळते आणि प्रकाश देते, तसं आपल्यालाही थोडं ‘जळावं’ लागतं. प्रयत्नांनी, संयमाने, श्रद्धेने.साने गुरुजी म्हणतात...“मनातला दिवा जर विझला, तर बाहेरचे दिवे उपयोगाचे नाहीत.”म्हणून प्रथम अंतर्मनात उजेड पेटवणं गरजेचं आहे.प्रकाश म्हणजे केवळ बाहेरचं तेज नव्हे,प्रकाश म्हणजे ज्ञान, प्रेम, संवेदना, करुणा जो दुसऱ्याचा मार्ग उजळवतो. ज्या हाताने दुसऱ्याला उचललं जातं, ज्या शब्दाने एखाद्याचं मन हलकं होतं तेच खरं तेज.“तिमिरातही तू दिवा बन, स्वतःच्या प्रकाशात जग उजळव.”अंधार टाळता येत नाही, पण त्याला सामोरं जाता येतं. प्रत्येक अपयशात यशाची बीजं असतात, प्रत्येक अश्रूत हास्य दडलं असतं. तिमिर हा फक्त परीक्षा असते. आपण तेजासाठी तयार आहोत का, हे तपासणारी.म्हणूनच आयुष्याचं सार एका ओळीत सांगता येईल...“जेव्हा जीवन तिमिराचं वस्त्र चढवतं,तेव्हाच अंतर्मनात तेजाची पहाट उगवते!”तिमिरातून तेजाकडे जाणं म्हणजे केवळ जगण्याचं नव्हे, तर जाणीवेचं परिवर्तन. परिस्थिती नव्हे, दृष्टिकोन बदलला की उजेड दिसतो आणि आपण त्या प्रकाशाचे वाहक बनलो, की जग अधिक सुंदर होतं.तिमिर टाळणं आपल्या हातात नसतं, पण त्यावर विजय मिळवणं नक्कीच शक्य असतं. प्रत्येक अंधारात एक नवा धडा असतो, प्रत्येक अपयशात एक यशाचं बीज लपलेलं असतं.महत्त्वाचं म्हणजे आपल्यातल्या प्रकाशावर विश्वास ठेवणं.“जेव्हा जग काळं वाटतं,तेव्हा स्वतःचा दिवा लावायचा.कारण खरी पहाट बाहेर नाही,ती मनात उगवते…”मंगेश पाडगावकरांची येथे मला कविता आठवते... ‘सांगा कस जगायचं कण्हत कण्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा’... तर जगू या आपण गाण म्हणत म्हणत आनंदाने.“तिमिरातून तेजाकडे” - हे केवळ एक वाक्य नाही, तर जीवनाचं तत्त्व आहे. परिस्थिती नव्हे, दृष्टिकोन बदलला की अंधारही प्रकाशात बदलतो आणि जेव्हा आपण स्वतः उजळतो, तेव्हा जग उजळल्याशिवाय राहत नाही. आपल्यातला उजेड जिवंत ठेवा आणि जगाला उजळवा. माझ्याच गझलेचे दोन शेर मी येथे देते...व्यथा, वेदना, दु:ख सारे विसरणार आहे. झुगारून सारे पुन्हा मी बहरणार आहे.तिमीरास आता मला भ्यायचे का कशाला तिमीरा तुला मी दिव्याने उजळणार आहे.
मनस्विनी,पूर्णिमा शिंदेप्रेम हे आपल्या संस्कृतीचं पवित्र मूल्य. शब्दांना प्रेमाचा ओलावा लागला की जीवनालाच एक सुरेल सूर प्राप्त होतो. प्रेम कुणावर करावं ? याचं उत्तर कुसुमाग्रज देतात. प्रेम कुणावरही करावं.गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं, मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि खड्गाच्या पात्यावरही करावं.पुरेसं प्रेम लाभलं की माणसाचं जीवन सुंदर होतं. त्याचं जीवन हे तणावमुक्त होतं. आनंददायी होतं. मनाची प्रसन्नता व्यक्तीला दिव्यता, भव्यता देते. पण मनाचं नैराश्य मात्र व्यक्तीला चितेच्या आणि चिंतेच्या खाईत, खोलात ढकलते. आयुष्यात रस उरत नाही. निरुत्साही, खच्चीकरण आणि खुंटीत झालेलं जीवन ही आहेत सुखदुःखाची दोन रुपं. पण दुःख, थकवा, मानसिक ताण हे आकाशातील निराशेचे मळभ असतात. अविवेकाची काजळी असते. ते दूर करून व्यक्तीच्या जीवनात प्रकाश यावा, आनंद यावा आणि आत्मविश्वास लाभावा यासाठी उपयुक्त असतं ते प्रेम. संवाद,जिव्हाळा आणि आपुलकी, काळजी, संरक्षण. माणूस हा परस्परावलंबी प्राणी आहे. संस्कृतीतूनच तो घडतो. निसर्गाकडून शिकतो आणि समाजाकडून सुधारतो. सुंदरतेचा विश्वास मनावर कोरला की जगही सुंदर दिसू लागतं.प्रेम इतकं सुंदर, अनमोल, अद्वितीय आहे की जणू उन्नती उत्साहाकडे नेणारी हवीहवीशी भावना. नात्यातील सौंदर्य, शब्दातील मधुरता हे प्रेम. प्रेम म्हणजे गोड तुरुंग, जगण्याची बहार, मनीची पूर्व आतुरता, व्याकुळता, विश्वास, स्नेह, आशा सामंजस्य आणि समर्पण म्हणजे प्रेम. बेभान बेधुंद करून सगळ्या जगाचा विसर पडतो ते प्रेम. हृदयाच्या खोलवर प्रीत अत्तराच्या कुपीत सजवली जाते आणि डोळ्यातून ओसंडून वाहू लागते. इंद्रधनुच्या सप्तरंगाप्रमाणे ही प्रेमाची उधळण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये साथ निभावणारी असावी. भावनांचा ओलावा, हाती हात, प्रेमाची साथ यांची गुंफण म्हणजे नितळ प्रेम, सोनेरी चंदेरी अनुभव. आपल्यापेक्षा समोरच्याचा विचार जास्त करायला लावते ते प्रेम असतं. प्रेम म्हणजे अधीरता आणि आतुरता. प्रेम म्हणजे स्नेह, मिलन, प्रीत. एखाद्या गोष्टीचा लळा लागतो तसं प्रेम असतं अद्भुत. पृथ्वीवरील द्वेष मत्सर अनैतिकतेचा नाश करून निस्सीम, निस्वार्थ प्रेम करावं. कळीनं उमलावं फुलासाठी. फुलानं उमलावं प्रीतीसाठी, आणि प्रीतीनं उधळावं एकमेकांसाठी. अशा अजरामर प्रेमाला अंत नसतो. ते निरंतर बहरत असतं.प्रेमाने साथ घातली तर रानातलं पाखरू सुद्धा जवळ येतं. प्रेमाची किमया न्यारीच. प्रेम म्हणजे जीवनाचा ऑक्सिजन. प्रेम म्हणजे श्वास. प्रेम म्हणजे विश्वास. प्रेम नसेल तर हे जग रेताळ वाळवंटा सारखे आणि जर प्रेम असेल तर जीवनात हिरवळच वाटेल. मनाच्या उभारी साठी प्रेमाचा ओलावा महत्त्वाचा असतो. कोणीतरी आपलं आहे ही गोष्ट सुखावून जाते. आणि जगायला भाग पाडते. प्रेम अशी गोष्ट आहे जी तहानभूक विसरून, रात्रंदिन युद्धाचा प्रसंग, जगात राहून माणूस एकटा राहतो त्या प्रेमासाठी. वन वन हिंडतो प्रेमासाठी.वाट्टेल ती गोष्ट करतो ती प्रेमासाठी. असं असतं प्रेम. डोळ्यात मनात, डोक्यात, हृदयात इतकंच काय स्वप्नात देखील प्रेम. क्षणोक्षणी जगणं हेच जगणं आणि जागणं म्हणजे प्रेम असतं. प्रेमाशिवाय प्रत्येक व्यक्ती अपूर्णच. त्याच्या आयुष्यात प्रेमाची पोकळी कोणीच भरू शकत नाही. देत राहिल्याने वाढतं त्याला प्रेम म्हणतात. देतानाच घ्यायचा असतो त्याला विश्वास म्हणतात आणि सारं जग विसरायला लावतो त्याला आनंद म्हणतात. तो आनंद म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे शक्ती, ऊर्जा, ओढ, व्याकुळता. आयुष्याला सजवण्यासाठी प्रेम हे देवाघरचे देणे आहे.
जीवनगंध,पूनम राणेविवारचा दिवस होता. खूप दिवस घराची साफसफाई करणे बाकी होते. आईने आदल्या दिवशी सर्वांना बजावून सांगितले होते की, उद्या सर्वांनी लवकर उठायचे.कारण उद्या आपल्याला घराची साफसफाई करायचे आहे. कोळ्यांची जळमटे, नको असणारे सामान, जमा झालेल्या दोन महिन्याच्या पेपरची रद्दी या साऱ्या वस्तू रद्दीत द्यायच्या आहेत. ठरल्याप्रमाणे सर्वजण सकाळी लवकर उठले. मात्र अविनाश आणि सोहम उठायचा कंटाळा करू लागले. आई त्यांना उठवायचा प्रयत्न करत होती. पण ते म्हणत होते. ‘झोपू दे ना, गं आई... आठवड्यातून एक तर आम्ही ८ वाजेपर्यंत झोपतो. नाही तर रोज सकाळी लवकर उठून शाळेत जावं लागतं.’ या कुशीवरून त्या कुशीवर वळत आढेवेढे घेत आईच्या सततच्या हाकेने एकदाचे ते दोघे उठलेच. ब्रश करून आणि फ्रेश होऊन सर्वांनी चहा-नाश्ता केला. कपाटातील एक एक खण स्वच्छ करायला सुरुवात केली. गरजेपोटी परंतु आता उपयोगी नसलेल्या कितीतरी वस्तू घरामध्ये होत्या. स्नेहाने सर्व वस्तू ज्या आपल्यासाठी नको आहेत, त्या घरात येणाऱ्या कामवाल्या बाईला देण्यासाठी वेगळ्या पिशवीत जमा करून ठेवल्या. त्यामध्ये सोहमला नको असणारी रंग पेटी, कंपास पेन्सिल, खोडरबर अशा कितीतरी वस्तू ड्रॉवरमध्ये होत्या.अविनाशला वाढदिवसाच्या निमित्ताने आणलेली सायकलही चाक तुटल्यामुळे माळ्यावर रद्दीत पडलेली होती. ती सुद्धा खाली काढण्यात आली. अविनाशला सायकल पाहून आपल्या वाढदिवसाची आठवण झाली. किती आनंदात आणि मजेत आपण वाढदिवस साजरा केला होता. हीच सायकल ज्यावेळी नवीन होती त्यावेळेस मी माझ्या मित्रांना आनंदाने दाखवत होतो. पण आता तुटल्यामुळे ती अडगळीत पडलेली होती. आई आपण हिला दुरुस्त करून घेऊ, असे वारंवार आईला तो विनवणी करत होता; परंतु आता खूप वर्ष झाल्याने सायकलला गंज चढला होता. गंजली आहे तिचा काही उपयोग नाही असे म्हणून आईने त्याची समजूत काढली.जवळजवळ दोन-चार तास साफसफाई चालू होती. दुपारचे १२ वाजत आले होते. दुपारी आपल्याला जेवण करायचे आहे. म्हणून आईने सोहमला बाजारात जायला सांगितले. बाजारातून टोमॅटो, नारळ, कोथिंबीर, कांदे बटाटे इत्यादी वस्तू आणायला सांगितल्या.सोहम पिशवी घेऊन बाजारात गेला. त्याने सर्व वस्तू खरेदी केल्या. आज बाजार गच्च भरलेला होता. कारण रविवारचा दिवस होता. आज महिलांपेक्षा पुरुष माणसांची गर्दी जास्त दिसत होती. सोहमने टोमॅटो, नारळ, कांदे, बटाटे, कढीपत्ता, कोथिंबीर या साऱ्या वस्तू घेतल्या.आईकडे पिशवी दिली आणि सोहम खेळायला अंगणात गेला. आईने काम आवरल्यानंतर पिशवी उघडली. एक एक करून वस्तू बाहेर काढल्या. पाहते तर काय... टोमॅटो पूर्णतः चिरडून गेले होते. पिशवी ओली झाली होती. कारण सोहमने भाजी घेताना सर्वप्रथम टोमॅटो घेतले होते. त्यानंतर त्याने नारळ, कांदे, बटाटे घेतले. त्यामुळे जड वस्तूमुळे टोमॅटो चिरडून गेले होते.आईने टोमॅटो ओट्यावर ठेवले होते. सोहम दोन तासांतच खेळून परत आला हातपाय धुवून तो पाणी पिण्यासाठी स्वयंपाक घराकडे वळला. त्याची नजर टोमॅटोकडे गेली तो म्हणाला,” आई हे काय,” टोमॅटो चिरडले कसे?” टोमॅटो दबले कसे?” आई म्हणाली,” अरे सोहम, तुला मी बाजारात भाजी आणण्यासाठी पाठवलं. तू काय केलंस!” सुरुवातीला टोमॅटो घेतलेस आणि त्यावर भला मोठा नारळ ठेवलास आणि त्यावर कांदे-बटाटे त्यामुळे अक्षरशः टोमॅटोचं पाणी पाणी झालं. खरं तर जड आणि कठीण वस्तू सर्वप्रथम घेऊन त्या पिशवीच्या तळाशी ठेवायला हव्या होत्या आणि टोमॅटो सर्वात वरती ठेवायला हवे होते.सोहम,आपण जे शाळेत शिक्षण घेतो ते अनुभवाने संपन्न करायचे असते. ठीक आहे एकदा चुकलास. पुढे तुझ्या हातून अशी चूक होणार नाही. खरे तर अशा छोट्या-छोट्या कामांची सवय आम्ही पालकांनीच मुलांना लावायला हवी. त्यामुळेप्रत्यक्ष कृतीतून मुलांचे अनुभव विश्व अनुभव संपन्न होईल.”“खरंच आई ,इतकी छोटी गोष्ट माझ्याही लक्षात आली नाही. यापुढे असे कधीही होणार नाही. “सोहम म्हणाला.तात्पर्य :- पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचे ज्ञान सर्वात महत्त्वाचे असते.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच रविवार २५ जानेवारी २०२६ रोजी १३० व्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी सोमवारी साजरा होणार असलेला ७७ वा प्रजासत्ताक दिन, रविवारी २५ जानेवारी रोजी साजरा होत असलेला राष्ट्रीय मतदान दिन, भारताची आर्थिक प्रगती, देशाचे वाढते सामर्थ्य, प्रतिकूल निसर्गामुळे देशापुढे निर्माण झालेली आव्हानं, भारताची समृद्ध संस्कृती, देशाचे परराष्ट्र संबंध, मलेशियाोबतचे भारताचे मैत्रीचे संबंध, गुजरातमध्ये राबवली जात असलेली सामुदायिक स्वयंपाकघर संकल्पना, वैश्विक कुटुंब आणि त्याच्यापुढील आव्हानं, पश्चिम बंगालची विवेकानंद लोक शिक्षा निकेतन संस्था, देशातली स्वच्छता मोहीम, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन, विविध प्रयोग करणारे शेतकरी आदी अनेकविध विषयांचा आढावा घेतला.पंतप्रधान मोदी १३० व्या 'मन की बात' कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले ?माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार.2026 या वर्षातला हा पहिला 'मन की बात' आहे. उद्या 26 जानेवारी रोजी आपण सर्वजण प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. आपलं संविधान याच दिवशी लागू झालं होतं. 26 जानेवारी हा दिवस आपल्याला आपल्या संविधानाच्या निर्मात्यांना वंदन करण्याची संधी देतो. आज 25 जानेवारी हा देखील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आज राष्ट्रीय मतदार दिवस आहे. मतदार हा लोकशाहीचा आत्मा असतो.मित्रांनो,साधारणपणे जेव्हा एखादी व्यक्ती 18 वर्षांची होते आणि मतदार बनते, तेव्हा तो आयुष्यातला एक सामान्य टप्पा समजला जातो. परंतु प्रत्यक्षात हा प्रसंग म्हणजे कोणत्याही भारतीयाच्या आयुष्यातला एक मैलाचा दगड असतो. म्हणूनच आपण देशात मतदार होण्याचा आनंद साजरा करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, तो साजरा करतो, त्याचप्रमाणे जेव्हा एखादा युवक किंवा युवती पहिल्यांदाच मतदार होते तेव्हा संपूर्ण परिसर, गाव किंवा शहराने एकत्र येऊन त्याचे किंवा तिचे अभिनंदन केलं पाहिजे आणि मिठाई वाटली पाहिजे. यामुळे लोकांमध्ये मतदानाबद्दल जागरूकता वाढेल. यासोबतच, मतदार असणं किती महत्त्वाचं आहे, ही भावना अधिक दृढ होईल.मित्रांनो,जी माणसं आपल्या देशातल्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असतात, आपली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भूस्तरावर काम करतात, त्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करू इच्छितो. आज मतदार दिनी मी आपल्या युवा मित्रांना पुन्हा एकदा आवाहन करतो की त्यांनी 18 वर्षं पूर्ण केल्यावर मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करावी. यामुळे संविधानाने प्रत्येक नागरिकाकडून ज्या कर्तव्यभावनेचे पालन करण्याची अपेक्षा ठेवली आहे, ती पूर्ण होईल आणि भारताची लोकशाहीदेखील मजबूत होईल.माझ्या प्रिय देशबांधवांनो,सध्या सोशल मीडियावर एक मनोरंजक कल पाहायला मिळत आहे. लोक 2016 सालच्या आपल्या आठवणींना पुन्हा उजाळा देत आहेत. त्याच भावनेनं आज मीदेखील माझ्या आठवणींपैकी एक तुमच्यासोबत सामायिक करू इच्छितो. दहा वर्षांपूर्वी, जानेवारी 2016 मध्ये आम्ही एका महत्त्वाकांक्षी प्रवासाला सुरुवात केली होती. तेव्हा आम्ही असा विचार केला होता की जरी हा छोटासा असला तरी तो तरुण पिढीसाठी, देशाच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यावेळी काही लोक हे समजूच शकले नव्हते की अखेर हे आहे तरी काय? मित्रांनो, मी ज्या प्रवासाबद्दल बोलत आहे तो आहे स्टार्ट-अप इंडियाचा प्रवास. या अद्भुत प्रवासाचे नायक म्हणजे आपला युवावर्ग. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून त्यांनी जो नवोन्मेष दाखवला, त्याची नोंद इतिहासात होत आहे.मित्रांनो,आज भारतात जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्ट-अप परिसंस्था तयार झाली आहे. हे स्टार्ट-अप्स अगदी आगळेवेगळे आहेत. आज ते अशा क्षेत्रात काम करत आहेत ज्यांच्याविषयी 10 वर्षांपूर्वी कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती. एआय, स्पेस, न्यूक्लियर एनर्जी, सेमीकंडक्टर्स, मोबिलिटी, ग्रीन हायड्रोजन, बायोटेक्नॉलॉजी, तुम्ही नाव घ्या आणि कोणता ना कोणता भारतीय स्टार्ट-अप त्या क्षेत्रात काम करताना दिसेल. मी माझ्या सर्व युवा मित्रांना सलाम करतो जे कोणत्या ना कोणत्या स्टार्ट-अपशी जोडले गेले आहेत किंवा स्वतःचा स्टार्ट-अप सुरू करू इच्छितात.मित्रांनो,आज 'मन की बात' च्या माध्यमातून मी देशबांधवांना, विशेषतः उद्योग आणि स्टार्ट-अपशी संबंधित तरुणांना, एक आग्रह जरूर करू इच्छितो. भारताची अर्थव्यवस्था वेगानं प्रगती करत आहे. भारतावर जगाचं लक्ष आहे. अशा वेळी आपल्या सर्वांवर एक मोठी जबाबदारीदेखील आहे. ती जबाबदारी आहे, गुणवत्तेवर भर देण्याची. होता है, चलता है, चल जाएगा, हे युग निघून गेलं आहे.चला, आपण यावर्षी सर्व ताकदीनिशी गुणवत्तेला प्राधान्य देऊया. आपला सगळ्यांचा एकच मंत्र असला पाहिजे - गुणवत्ता, गुणवत्ता आणि फक्त गुणवत्ता. कालपेक्षा आज अधिक चांगली गुणवत्ता. आपण जे काही उत्पादन करत असू, त्याची गुणवत्ता अधिक चांगली बनविण्याचा संकल्प करूया. मग ते आपलं वस्त्रोद्योग क्षेत्र असो, तंत्रज्ञान असो, इलेक्ट्रॉनिक्स असो किंवा अगदी पॅकेजिंग असो, भारतीय उत्पादन याचा अर्थच उच्च दर्जा, असा झाला पाहिजे. चला, उत्कृष्टतेला आपण आपला मानदंड बनवूया. आपण संकल्प करूया की गुणवत्ता जराही कमी होणार नाही, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. मी लाल किल्ल्यावरून सांगितलं होतं, ‘Zero defect – Zero effect’ म्हणजेच 'शून्य दोष - शून्य परिणाम'. असं केल्यानंच आपण विकसित भारताचा प्रवास वेगानं पुढे नेऊ शकू.माझ्या प्रिय देशबांधवांनो,आपल्या देशातले लोक खूप नाविन्यपूर्ण आहेत. समस्यांवर उपाय शोधणं हे आपल्या देशवासियांच्या स्वभावातच आहे. काही लोक हे काम स्टार्ट-अप्सद्वारे करतात, तर काही लोक समाजाच्या सामूहिक शक्तीद्वारे उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रयत्न उत्तर प्रदेशातल्या आझमगडमधून समोर आला आहे. इथून वाहणाऱ्या तमसा नदीला लोकांनी नवीन जीवन दिलं आहे. तमसा ही केवळ एक नदी नाही तर आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा जिवंत प्रवाह आहे. अयोध्येतून निघून गंगेत विलीन होणारी ही नदी एकेकाळी या प्रदेशातल्या लोकांची जीवनवाहिनी होती, परंतु प्रदूषणामुळे तिच्या अखंड प्रवाहात अडथळे येत होते. गाळ, कचरा आणि घाणीमुळे या नदीचा प्रवाह थांबला होता. त्यानंतर इथल्या लोकांनी तिला नवीन जीवन देण्यासाठी मोहीम सुरू केली.नदीची सफाई करण्यात आली आणि तिच्या काठावर सावली देणारी, फळे देणारी झाडे लावण्यात आली. स्थानिक लोक कर्तव्यभावनेनं या कामाला भिडले आणि सर्वांच्या प्रयत्नातून नदीचं पुनरुज्जीवन झालं.मित्रांनो,लोकसहभागाचा असाच प्रयत्न आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमध्येही बघायला मिळाला आहे. हा असा भाग आहे जो दुष्काळाच्या गंभीर समस्येशी झुंजत आला आहे. इथली माती लाल आणि वाळूयुक्त आहे. त्यामुळे लोकांना पाण्याच्या कमतरतेचा सामना करावा लागत असे. इथे अनेक ठिकाणी बराच काळ पाऊस पडत नाही. कधीकधी तर लोक अनंतपूरची तुलना वाळवंटातल्या दुष्काळी परिस्थितीशीही करतात. मित्रांनो, ही समस्या सोडवण्यासाठी स्थानिक लोकांनी जलाशय साफ करण्याचा संकल्प केला. मग प्रशासनाच्या सहकार्यानं इथे 'अनंत नीरू संरक्षणम प्रकल्प' सुरू करण्यात आला. या प्रयत्नांमुळे 10 हून अधिक जलाशयांना जीवदान मिळालं आहे. या जलाशयांमध्ये आता पाणी जमा होऊ लागलं आहे. यासोबतच 7000 हून जास्त झाडंही लावण्यात आली आहेत. याचाच अर्थ असा की जलसंवर्धनाबरोबर अनंतपूरमध्ये हिरवळही वाढली आहे. मुलं आता इथे पोहण्याचा आनंदही घेऊ शकतात. एकप्रकारे सांगता येईल की इथली संपूर्ण परिसंस्थाच पुन्हा एकदा झळाळून उठली आहे.मित्रांनो,आझमगड असो, अनंतपूर असो किंवा देशातलं आणखी कोणतं ठिकाण, लोक एकत्र येऊन कर्तव्यभावनेनं मोठे संकल्प पूर्ण करत आहेत हे पाहून आनंद होतो. लोकसहभाग आणि सामूहिकतेची ही भावना आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे.माझ्या प्रिय देशबांधवांनो,आपल्या देशात भजन आणि कीर्तन हे शतकानुशतकांपासून आपल्या संस्कृतीचा आत्मा राहिले आहेत. आपण मंदिरांमध्ये भजन ऐकलं आहे, कथा ऐकताना ऐकलं आहे आणि प्रत्येक युगानं आपापल्या काळानुसार भक्तीची आराधना केली आहे. आजची पिढीही काही अद्भुत गोष्टी करत आहे. आजच्या तरुणांनी आपल्या अनुभवांमध्ये आणि जीवनशैलीत भक्तीचा समावेश केला आहे. या विचारसरणीतून एक नवीन सांस्कृतिक कल उदयास आला आहे. तुम्ही सोशल मीडियावर असे व्हिडिओ नक्कीच पाहिले असतील. देशातल्या विविध शहरांमध्ये मोठ्या संख्येने तरुणाई एकत्र येत आहे. मंच सजवलेला असतो, रोषणाई केलेली असते, संगीताची साथ असते, पूर्ण थाटमाट असतो आणि वातावरण एखाद्या सांगीतिक कार्यक्रमापेक्षा जराही कमी नसतं. असं वाटतं की एखादा मोठा सांगीतिक कार्यक्रम सुरू आहे, पण तिथे पूर्ण तन्मयतेनं, पूर्ण एकाग्रतेनं, पूर्ण लयद्धतेनं गायली जात असतात ती भजनं! या प्रकाराला आता 'भजन क्लबिंग' असं म्हटलं जात आहे आणि ते विशेषतः जेन झी मध्ये लोकप्रिय होत आहे. हे बघून आनंद होतो की या कार्यक्रमांमध्ये भजनांची प्रतिष्ठा आणि शुद्धता यांची पूर्ण काळजी घेतली जाते. भक्ती हलक्यात घेतली जात नाही. ना शब्दांची मर्यादा ओलांडली जाते, ना भावाची. मंच आधुनिक असू शकतो, संगीत सादरीकरण वेगळं असू शकतं, परंतु मूळ भावना तीच राहते. अध्यात्माचा अखंड प्रवाह तिथे अनुभवता येतो.माझ्या प्रिय देशबांधवांनो,आज आपली संस्कृती आणि सण जगभर आपला ठसा उमटवत आहेत. भारतीय सण जगाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं साजरे केले जातात. सर्व प्रकारचं सांस्कृतिक चैतन्य कायम राखण्यात आपल्या भारतवंशीय बंधूभगिनींचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. ते कुठेही असले तरी ते स्वतःच्या संस्कृतीच्या मूलभूत भावनेचं जतन आणि संवर्धन करत आहेत. मलेशियातला आपला भारतीय समुदायदेखील अशाच पद्धतीचं प्रशंसनीय काम करत आहे. तुम्हाला हे जाणून सुखद आश्चर्य वाटेल की मलेशियामध्ये 500 हून अधिक तमिळ शाळा आहेत. यामध्ये तमिळ भाषेच्या अभ्यासासोबतच इतर विषय देखील तमिळमध्ये शिकवले जातात. याशिवाय इथे तेलुगु आणि पंजाबीसह इतर भारतीय भाषांवरदेखील बरंच लक्ष केंद्रित केलं जातं.मित्रांनो,भारत आणि मलेशिया दरम्यानचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करण्यात एका सोसायटीनं मोठी भूमिका बजावली आहे. तिचं नाव आहे ‘Malaysia India Heritage Society’विविध कार्यक्रमांव्यतिरिक्त ही संस्था हेरिटेज वॉक देखील आयोजित करते. यामध्ये दोन्ही देशांना आपसात जोडणाऱ्या सांस्कृतिक स्थळांचा समावेश आहे.गेल्या महिन्यात मलेशियामध्ये 'लाल पाड साडी' असा आयकॉनिक वॉक आयोजित करण्यात आला होता. या साडीचं आपल्या बंगालच्या संस्कृतीशी एक विशेष नातं आहे. या कार्यक्रमात ही साडी नेसलेल्या लोकांच्या संख्येचा विक्रम निर्माण झाला, जो मलेशियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आला. या प्रसंगी ओडिसी नृत्य आणि बाउल संगीतानं लोकांची मनं जिंकली. मी म्हणू शकतो –साया बरबांगा / देंगान डीयास्पोरा इंडिया /दि मलेशिया //मेरेका मम्बावा / इंडिया दान मलेशिया /सेमाकिन रापा //(मराठी अनुवाद- मला मलेशियातल्या भारतीय समुदायाचा अभिमान आहे, ते भारत आणि मलेशियाला जवळ आणत आहेत.)मलेशियातल्या आपल्या भारतवंशियांना माझ्या खूप खूप शुभेच्छा.माझ्या प्रिय देशबांधवांनो,आपण भारताच्या कुठल्याही भागात गेलो तरी तिथे आपल्याला काहीतरी असाधारण आणि अभूतपूर्व घडताना नक्कीच दिसतं. अनेकदामाध्यमांच्या झगमगाटात या गोष्टींना स्थान मिळत नाही. मात्र त्यातून समजतं की आपल्या समाजाची खरी ताकद काय आहे? त्यातूनआपल्या मूल्य व्यवस्थेची देखीलझलक पहायला मिळते ज्यात एकतेची भावना सर्वोपरि आहे. गुजरातमधील बेचराजी येथील चंदनकी गाँव चीएक अनोखी परंपरा आहे. जर मी तुम्हाला सांगितले की इथलेलोक, विशेषतः ज्येष्ठ मंडळी, आपल्या घरी स्वयंपाक बनवतनाहीत तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. याचे कारण आहे गावातील शानदार कम्युनिटी किचन अर्थात सामुदायिक स्वयंपाकघर. या कम्युनिटी किचनमध्ये एका वेळी संपूर्ण गावाचेजेवण बनवलं जातं आणि लोक एकत्र बसून जेवतात. गेल्या15 वर्षांपासून ही परंपरा नित्यनियमाने सुरु आहे. एवढंच नाही, जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्याच्यासाठी टिफिन सेवा देखील उपलब्ध आहे, म्हणजेच घरपोच सेवेचीदेखील संपूर्ण व्यवस्था आहे. गावातील हे सामुदायिक भोजनलोकांना भरपूर आनंद देतं . हा उपक्रम केवळ लोकांना परस्परांशी जोडत नाही तर त्यातून कौटुंबिक भावना देखील वाढीस लागते.मित्रांनो,भारतातील कुटुंब व्यवस्था ही आपल्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. जगभरातल्या अनेक देशांमध्ये याकडेमोठ्या उत्सुकतेने पाहिलं जातं. अनेक देशांमध्ये अशा कुटुंब व्यवस्थेप्रती अतिशय आदराची भावना आहे. काही दिवसांपूर्वीच, माझे मित्र, युएईचे अध्यक्ष, महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अलनाहयान भारतात आले होते. त्यांनी मला सांगितले की युएई2026 हे वर्ष कुटुंब वर्ष म्हणून साजरे करत आहे. इथल्या लोकांमध्ये सौहार्द आणि सामुदायिक भावना अधिक मजबूत करणे हा यामागचा उद्देश आहे; खरोखरच हा एक प्रशंसनीय उपक्रम आहे.मित्रांनो,जेव्हा कुटुंब आणि समाजाची ताकद एकत्र येते, तेव्हा आपण मोठ्यातल्यामोठ्या आव्हानांवरही मात करू शकतो. मला अनंतनागमधील शेखगुंड गावाबद्दल माहिती मिळाली आहे. इथे अंमली पदार्थ, तंबाखू, सिगारेट आणि दारूशी संबंधित आव्हाने खूप वाढली होती. हे सर्व पाहून इथले मीर जाफरजी इतके अस्वस्थ झाले की त्यांनी या समस्येवर उपाय शोधण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गावातील युवकांपासूनते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना एकत्र केले. त्यांच्या या निर्णयाचापरिणाम असा झाला की इथल्या स्थानिक दुकानांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणं बंद केलं.या प्रयत्नांमुळे अंमली पदार्थांच्या धोक्यांबद्दल लोकांमध्ये जागरूकता देखील वाढली.मित्रांनो,आपल्या देशात अशा अनेक संस्था आहेत, ज्या वर्षानुवर्षे निःस्वार्थ भावनेनं समाजसेवा करत आहेत. अशीच एक संस्थापश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूरमधील फरीदपूर इथं आहे. तिचे नाव आहे'विवेकानंद लोक शिक्षा निकेतन’. ही संस्था गेल्या चार दशकांपासून मुलांची आणि वृद्धांची देखभाल करत आहे. गुरुकुल पद्धतीतीलशिक्षण आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्याबरोबरच, ही संस्था समाज कल्याणाच्या अनेक उदात्त कार्यांमध्ये सहभागी आहे. देशवासियांमध्येनिःस्वार्थ सेवेची ही भावना अधिकाधिक दृढ होत राहो अशी माझी इच्छा आहे.माझ्या प्रिय देशवासियांनो,आपण मन की बात मध्ये नेहमीच स्वच्छतेबाबत बोलत आलो आहोत. आपले युवक आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेबद्दल खूप जागरूक आहेत हे पाहून मला अभिमान वाटतो. अरुणाचल प्रदेशातल्या अशाच एका अनोख्या प्रयत्नाबद्दल मला माहिती मिळाली आहे. अरुणाचल प्रदेश ही तीभूमी आहे जिथे देशात सर्वप्रथमसूर्याची किरणेपोहोचतात. इथे लोक जय हिंद म्हणत एकमेकांना अभिवादनकरतात.इथे इटानगरमध्ये, जिथे अधिक लक्ष देण्याची गरज होती त्याठिकाणांची स्वच्छता करण्यासाठी तरुणांचा गट एकत्र आला . या तरुणांनी निरनिराळ्या शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई हे आपले ध्येय ठेवले. त्यानंतर, इटानगर, नाहरलागुन, दोईमुख, सेप्पा, पालिन आणि पासीघाट इथे देखील ही मोहीम राबवण्यात आली.या तरुणांनी आतापर्यन्त11 लाखकिलोहून अधिक कचरा साफ केला आहे. कल्पना करा मित्रांनो, तरुणांनी मिळून11 लाख किलो कचरा हटवलाआहे .मित्रांनो,आणखी एक उदाहरण आसाममधलेआहे. आसाममधल्यानागावमध्ये तिथल्या जुन्या गल्ल्यांशी लोकभावनिकदृष्ट्या जोडलेले आहेत. इथे काही लोकांनी एकत्रितपणे आपल्या गल्ल्या स्वच्छ करण्याचा संकल्प केला. हळूहळू, आणखीलोक त्यांच्याबरोबर जोडले गेले. अशाप्रकारे, एक अशी टीम तयार झाली, ज्यांनी गल्ल्यांमधूनमोठ्या प्रमाणात कचरा काढून टाकला. मित्रांनो, असाच एक प्रयत्न बेंगळुरूमध्येही सुरू आहे. बेंगळुरूमध्ये सोफ्याचा कचरा ही एक मोठी समस्या बनून समोर आली आहे, त्यासाठी काही व्यावसायिक एकत्र येऊन त्यांच्या पद्धतीने ही समस्या सोडवत आहेत.मित्रांनो,आज अनेक शहरांमध्ये अशा टीम आहेत ज्या कचऱ्यावर पुनःप्रक्रिया करण्याचेकाम करत आहेत. चेन्नईत अशाच एका टीमने अतिशय उत्कृष्ट काम केले आहे. अशी उदाहरणांमधून समजतं की स्वच्छतेशी संबंधितप्रत्येक प्रयत्न किती महत्वाचा आहे. स्वच्छतेसाठी आपण वैयक्तिकरित्या किंवा संघ म्हणून आपले प्रयत्न वाढवलेपाहिजेत, तेव्हाच आपली शहरे अधिक चांगली बनतील.माझ्या प्रिय देशबांधवांनो,जेव्हा पर्यावरण संरक्षणाबद्दल बोलले जातं, तेव्हा नेहमी आपल्या मनात मोठ्या योजना, मोठे अभियान आणि मोठ- मोठ्या संघटनांचा विचार येतो. परंतु, अनेकदा बदलाची सुरुवात अतिशय साधारण पद्धतीने होते. एका व्यक्तीमुळे, एका परिसरातून, एक पाऊल उचलल्यामुळेआणि सातत्याने केलेल्या छोट्या -छोट्या प्रयत्नांमुळेहीमोठे बदल घडू शकतात. पश्चिम बंगालमधील कूचबिहार इथं राहणारेबेनॉय दास जीयांचे प्रयत्न हे याचे एक उत्तम उदाहरण आहे.गेल्या अनेक वर्षांपासून, त्यांनी एकट्याने आपला जिल्हा हरित बनवण्यासाठी काम केले आहे. बेनॉय दास यांनी हजारो झाडे लावली आहेत.अनेकद रोपे खरेदी करण्यापासून ते ती लावणे आणि त्यांची काळजी घेणे या सर्व खर्चाची जबाबदारी त्यांनी स्वतः उचलली आहे. आवश्यकता भासली तिथंत्यांनी स्थानिक रहिवासी, विद्यार्थी आणि महानगरपालिकांच्या मदतीनं काम केले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्याच्या कडेला हिरवळ आणखी वाढली आहे.मित्रांनो,मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील जगदीश प्रसाद अहिरवार जी, त्यांचा प्रयत्न देखील खूप कौतुकास्पद आहे.ते जंगलात बीटगार्ड म्हणून काम करतात. एकदा गस्त घालत असताना, त्यांच्या लक्षात आलं की जंगलात असलेल्या अनेक औषधी वनस्पतींबद्दलची माहिती कुठेही व्यवस्थितपणे नोंदवलेली नाही. जगदीश जींना हे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहचवायचेहोते, म्हणून त्यांनी औषधी वनस्पती ओळखण्यास आणि त्यांची नोंद करण्यास सुरुवात केली. त्यांनी सव्वाशेहून अधिक औषधी वनस्पतींची ओळख पटवली. त्यांनी प्रत्येक वनस्पतीबद्दल माहिती गोळा केली, ज्यामध्ये त्याचे छायाचित्र, नाव, उपयोगआणि मिळण्याचे ठिकाण यांचा समावेश होता. त्यांनी जमवलेली माहिती वन विभागाने संकलित केली आणि ती पुस्तक रुपात प्रकाशित देखील केली. या पुस्तकात दिलेली माहिती आता संशोधक, विद्यार्थी आणि वन अधिकाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे.मित्रांनो,पर्यावरण रक्षणाची हीच भावना आज मोठ्या प्रमाणातहीदिसून येत आहे. याच विचाराने, देशभरात एक पेड़ माँ के नाम अभियान राबवलं जातआहे.या अभियानामुळे आज कोट्यवधी लोक जोडले गेले आहेत. आतापर्यंत देशात200कोटींहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. यावरून असे दिसून येते की लोक आता पर्यावरण संरक्षणाबद्दल अधिक जागरूक आहेत आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे योगदान देऊ इच्छित आहेत.माझ्या प्रिय देशबांधवांनो,मला तुम्हा सर्वांचे आणखी एका गोष्टीसाठी कौतुक करायचं आहे -तेम्हणजे भरडधान्य म्हणजेच श्रीअन्न. मला हे पाहून आनंद झाला की श्री अन्न प्रति देशातल्या लोकांचे प्रेम निरंतर वाढत आहे .खरं तर2023 हे वर्ष भरडधान्यवर्ष म्हणून आम्ही घोषित केले होतं. मात्र आज तीन वर्षांनंतर देखील देशात आणि जगात याबद्दल जोउत्साह आणि वचनबद्धता आहे ती खूप उत्साहवर्धक आहे.मित्रांनो,तामिळनाडूच्या कल्ल-कुरिची जिल्ह्यात महिला शेतकऱ्यांचा एक गट प्रेरणास्रोत बनला आहे. इथल्या पेरियापलयम मिलेट एफपीसी शी जवळपास800 महिला शेतकरी जोडल्या गेल्या आहेत. भरडधान्याची वाढती लोकप्रियता पाहून, या महिलांनी भरडधान्य प्रक्रिया युनिट स्थापन केली. आता, त्या भरडधान्यापासून बनवलेली उत्पादनं थेट बाजारात पुरवत आहेत.मित्रांनो,राजस्थानच्या रामसर येथील शेतकरी देखील श्रीअन्न बाबतनवनवीन संशोधन करतआहेत. येथील रामसर ऑरगॅनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनीशी900 हून अधिक शेतकरी जोडलेले आहेत. हे शेतकरी प्रामुख्याने बाजरीची लागवड करतात. इथेबाजरीवर प्रक्रिया करून खाण्यास तयार लाडू बनवले जातात. त्यांना बाजारात मोठी मागणी आहे. एवढंच नाही मित्रांनो, मला हे ऐकून आनंद झाला की आजकाल अनेक मंदिरे अशी आहेत, जी आपल्या प्रसादात केवळ भरडधान्याचावापर करतात.त्या मंदिराच्या सर्व व्यवस्थापकांचे त्यांच्या या उपक्रमाबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो.मित्रांनो,भरडधान्य श्रीअन्न यामुळे अन्नदात्यांचेउत्पन्न वाढण्याबरोबरच, लोकांच्या आरोग्यात सुधारणेची हमी बनत आहे. भरडधान्य अतिशय पौष्टिक असते आणि ते एक सुपरफूड मानले जाते. आपल्या देशात हिवाळा हा ऋतू आहारासाठी अतिशय उत्तममानला जातो. म्हणूनच, या दिवसांमध्ये आपण आपल्या आहारातश्रीअन्नाचा समावेश अवश्यकरायला हवा.माझ्या प्रिय देशबांधवांनो,मन की बात मध्ये पुन्हा एकदा आपल्याला विविध विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम आपल्या सर्वांना आपल्या देशाची उल्लेखनीय कामगिरी जाणून घेण्याची आणि ती साजरी करण्याची संधी देतो.फेब्रुवारीमध्ये अशीच आणखी एक संधी येत आहे. पुढल्यामहिन्यात इंडिया एआय इम्पॅक्ट समिट होणार आहे. या शिखर परिषदेसाठी जगभरातील, विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधिततज्ज्ञ भारतात येतील. या परिषदेच्या निमित्ताने एआय जगतातील भारताची प्रगती आणि कामगिरी देखील सर्वांसमोर येईल.यात सहभागी होणाऱ्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. पुढल्या महिन्यात मन की बातमध्ये आपण इंडिया एआय इम्पॅक्ट समिट बद्दल नक्कीच बोलू.आपल्या देशवासीयांच्या इतर उल्लेखनीय कामगिरींबद्दल देखील आपण चर्चा करू. तोपर्यंत, मन की बात मधून मी निरोप घेतो.उद्याच्या प्रजासत्ताक दिनासाठीपुन्हा एकदा, तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप-खूपशुभेच्छा. धन्यवाद.
पुणे ग्रामीण गुन्हे शाखेत कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना त्यांच्या उल्लेखनीय, कर्तव्यनिष्ठ आणि प्रभावी सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे
IND vs NZ 3rd T20 : भारता आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना कुठे फ्रीमध्ये पाहता येणार जाणून घ्या.
Soha Ali Khan : अभिनेत्री सोहा अली खानची पती ‘कुणाल’साठी खास पोस्ट; म्हणाली….
बॅालीवूड अभिनेत्रीसोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत.
माझा आयुष्यातील पहिला ट्रेक : ‘हरिश्चंद्रगड’
संवाद,गुरुनाथ तेंडुलकरडोंबिवलीचे ट्रेकर विजय वाठारे (आनंद यात्रा पर्यटन) यांनी तीन दिवसांची हरिश्चंद्रगड पदभ्रमंती आयोजित केली आहे असं समजलं. आतापर्यंत नुसतं ऐकलं होतं, पण कधीच कुठला ट्रेक असा केला नव्हता. पण आमचे कुटुंब मित्र सागर ओक आणि त्यांचा मुलगा अभिजित जाणार असं समजलं. मन द्विधा होतं कारण वय अडूसष्ट आणि अनुभव काहीच नाही. ऑनलाइन माहिती वाचली तर जरा कठीण वाटलं. माझ्या मुलाने तर साफ विरोध केला कारण त्याने हा ट्रेक केला होता. पण मी त्यात सहभागी होण्याचं ठरवलं. सागर आणि त्यांचा मुलगा अभिजित हे छान ओळखीचे होते आणि त्यांच्याबरोबर एक डॉक्टर मित्र डॉ. कुमार ठकार येणार असं समजलं म्हणजे काही झालं तर बरोबर डॉक्टरही आहेत आणि मी जायचं नक्की केलं. विजय वाठारे हे या क्षेत्रात माहीर आहेत आणि चाळीसवेळा हरिश्चंद्रगड चढलेत असं समजलं. आणि काय होईल ते होईल जायचं असं मी ठरवलं.या ट्रेकमध्ये आम्ही एकूण दहा जण होतो. विजय यांनी हा ट्रेक खास ज्येष्ठांसाठी ठरवला होता. एकटा अभिजित हा एकमेव अपवाद होता जो खरंच तरुण होता. हाही मनाला दिलासा होता. रविवारी, १८ जानेवारीला १०.२० ची कसारा पकडली. दुपारी, आम्ही सगळे कसारा रेल्वे स्थानकावर एकत्र जमलो. बहुतेक सर्व मंडळी मुंबई परिसरातली होती, तर कुमार, अभिजित आणि सागर पुण्याहून आले होते. तिथे आमचे कॅप्टन विजय यांनी दोन जीप आमच्यासाठी तयार ठेवल्या होत्या. त्यात बसून आम्ही निघालो. भंडारदरा धरण वाटेत लागलं. जाताना नासिक जिल्ह्यातील आवंदा–पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या टाकेद गावातील पक्षीतीर्थ किंवा सर्वतीर्थ पाहिलं. त्याची कथा अशी की, रावण सीतेला पळवून नेत असताना पक्षीराज जटायूने जेव्हा रावणाला अडवायचा प्रयत्न केला तेव्हा रावणाने त्याचा पंख छाटला ते हे ठिकाण. पुढे श्रीरामाची भेट झाली. त्यांनी जमिनीत बाण मारून पाणी काढले व तडफडणाऱ्या जटायूला दिले. तेच टाकेदचे सर्वतीर्थ. तिथून निघालो आणि पुढे आम्ही भंडारदरा, राजूर मार्गे रतनगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिरात गेलो. खूप प्राचीन दगडी मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड वीतभर पाण्यात आहे असे दिसले. तिथून आम्ही परत भंडारदऱ्याला MTDC च्या रिसॉर्टमध्ये मुक्कामाला आलो. रात्री जेवण झाल्यावर कॅम्पफायर झालं. ट्रेकचा मूड तयार झाला. थंडी आम्हा मुंबईकरांना चांगलीच जाणवत होती. पण शेकोटीची ऊब होती. सगळ्यांनी आपापले असलेले गायन कौशल्य दाखवले.सोमवारी पहाटे लवकर आटपून आम्ही जीपने हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचनई गावातील सरपंच भास्कर बदड यांच्या घरी पोहोचलो. तिथे आम्हाला मस्त गरम गरम उपम्याचा नाश्ता मिळाला. आमचा ट्रेक खऱ्या अर्थाने तिथून सुरू झाला. जास्तीचं समान गावातील चार भारवाहकांकडे देऊन सगळे सकाळी ९ वाजता चढायला लागलो. माझ्या पाठीवर छोटीशी सॅक होती. संपूर्ण वाट चढणीची होती पण वाटेत बऱ्यापैकी झाडीचा रस्ता होता. सगळ्यात शेवटी मी व माझे मार्गदर्शक सागर ओक पोहोचलो. सगळे इतके भरभर चढून जायचे नि आमच्यासाठी थांबायचे. मी खूपच ढ. मला भीती वाटायला लागली की आलो खरे वर, पण उतरताना काय? सर्वजणांनी तीनेक तासांत गडाचा माथा गाठला. वर पोहोचलेली मंडळी तिथल्या एका घराबाहेर जेवणासाठी थांबली होती. मस्त गरम गरम पिठलं-भाकरी पाहून सगळा शीण निघून गेला.दुपारचे जेवण झाल्यावर आम्ही तिथेच जवळपास असलेले श्री हरिश्चंद्रेश्वराचे पुरातन मंदिर व भल्या मोठ्या दगडी गुहेत कोरलेलं केदारेश्वराचे अद्वितीय मंदिर पाहिलं. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ही मोठ्ठी पिंड कंबरभर पाण्यात आहे आणि ते पाणी बारा महिने थंडगार असतं. एक आख्यायिका या शिवलिंगाबद्दल ऐकली. शिवलिंगाच्या चार बाजूला चार दगडी खांब आहेत ज्यापैकी तीन खांब, जे तीन पूर्ण झालेली युगे आहेत असं मानतात आणि एक शिल्लक असलेला खांब हा कलियुगाचं द्योतक आहे आणि तो खांब जेव्हा झिजून जाईल तो या युगाचा अंत असेल अशी लोकांत मान्यता आहे. त्या गुहेसमोर बसलो खूप प्रसन्न वाटलं.गडावर भरपूर वर्दळ होती. मंदिराच्या जवळपास अजून काही गुहा आहेत त्या बघून आम्ही पुढे तासभर चालून प्रसिद्ध कोकणकड्यावर गेलो. कोकणकडा नामक भारतातील बहुधा सर्वात मोठ्या एककातळी उभ्या–आडव्या, बशीच्या आकाराच्या कड्याच्या वरच्या काठावर सूर्यास्त पाहायला जाऊन थांबलो. थंडीमुळे धुकं होतं. फार लांबचे डोंगर स्पष्ट दिसत नव्हते. निसर्गाचं ते अक्राळ-विक्राळ स्वरूप पाहून मला तर खूपच भारी वाटलं. सूर्योदय बघायची उत्सुकता होती. पण सूर्य अगदी क्षितिजावर जाऊन अस्तंगत न होता थोडा वरच बुडाला असं वाटलं. लांब डावीकडे नाणेघाटावरील अंगठा ओळखता आला आणि जरा अलीकडे खालच्या अंगाला माळशेज घाटाचा रखवालदार, मोरोशीचा भैरवगड दिसला. मात्र लांबचं स्पष्ट दिसत नसलं तरी आमची वैयक्तिक छायाचित्रं खूप निघाली. सूर्यास्तानंतर पटकन अंधार पडला. आमच्या घरात गरम गरम जेवण बनायला सुरुवात झाली होती. त्यात आमच्या ग्रुपमधीलअर्पिता देसाई हिने सगळ्यांसाठीच्या पोळ्या लाटून दिल्या. सगळ्यांनी मस्त जेवण केले. वर अक्षरशः चांदण्यांच्या लाह्या विखुरल्या होत्या. अस आकाश फार वर्षांनी पाहिलं. मृग नक्षत्र डोक्यावरच होतं. जेवण झाल्यावर लवकर झोपायचं ठरलं. पण तंबूत झोप येईल अस वाटतं नव्हतं. कसे काय राहतात हे रहिवासी लोक अशा वातावरणात, कौतुक वाटलं.सकाळी सगळ्यांनी खाली पाचनाईसाठी उतरायची वाट धरली. आता मात्र पोटात मोठ्ठा गोळा आला होता. उतरताना पाय घसरत होते. सगळे आपापल्या वेगाने उतरत होते. आता अर्पिता माझी गाईड होती. सागरलाही माझी काळजी आणि जबाबदारी असल्याने आम्ही तिघे माझ्या वेगाने हळूहळू उतरत होतो. इतका सुंदर निसर्ग भोवती होता. पक्षी मस्त किलबिल करत होते, पण मला मात्र फक्त दगड दिसत होते. डावा पाय टाकू की उजवा.अर्पिता मला सूचना देत होती. मी बघ कसा पाय टाकतेय तसा अडवा पाय टाक. मला डावा उजवाही हळूहळू कळेना अस झालं. शेवटच्या अर्ध्या तासात मात्र माझं अवसान गळत चाललं होत. आम्हाला शोधत विजय वाठारे वर आले आणि अक्षरशः लहान बाळासारखा हात धरून मी खाली आलो. त्यांच्या सराईत हातातली मजबूत पकड जाणवत होती. जणू देवच भेटला अस मला वाटल. वयाच्या एक्काहत्तरव्या वर्षी माणूस किती खंबीर नेतृत्व करू शकतो हे पाहून कौतुक वाटलं. सर्व नवीन मित्रांच्या बरोबर माझा पहिला वहिला ट्रेक पार पडला.
अमित शहांचा नांदेड दौरा रद्द ? नेमकं काय घडलं ?
नांदेड : शिखांचे नववे गुरु तेग बहाद्दूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त आयोजित ‘हिंद दि चादर’ कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेड येथे होणार होते. पण कार्यक्रमाच्या काही तास आधीच अमित शहांचा दौरा रद्द झाला. तांत्रिक कारणामुळे हा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण नेमके काय कारण आहे हे अद्याप समजलेले नाही.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेड दौऱ्यावर येणार असल्यामुळे प्रशासनाने आवश्यक ती तयारी केली होती. संपूर्ण नांदेडमध्ये तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त होता. भाजपच्या नांदेडमधील कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड उत्साह होता. पण कार्यक्रमाच्या काही तास आधीच अमित शहांचा दौरा रद्द झाला. अमित शहा यांचा दौरा रद्द झाला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.नांदेड महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री शहरात येत आहेत. यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.नांदेड महापालिका निवडणूक निकाल २०२६राज्यातील नांदेडसह २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाले. नांदेड महापालिकेत वीस वॉर्डातील ८१ जागांसाठी निवडणूक झाली आणि भाजपने ४५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. शिवसेनेचा चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन जागांवर विजय झाला. काँग्रेस दहा जागा जिंकू शकली. तर इतर पक्षांचा २० जागांवर विजय झाला.
माझी आणि भारुडाची ओळख अशी झाली...
स्मृतिगंध,लता गुठेमहाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो, ज्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या आहेत आणि आजही त्या जनसामान्यांमध्ये जागृत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे भारूड. जे बहुरूड आहे ते भारूड. संत परंपरेत ज्ञानेश्वरांपासून अनेक संतांनी भारूड रचना केल्या; परंतु भारूड म्हटलं की एकनाथ महाराज डोळ्यांसमोर उभे राहतात. ३०० पेक्षा अधिक भारूडं संत एकनाथांनी लिहिली, तेही विनोदी शैलीत आणि सर्वसामान्यांचे विषय त्यामधून मांडले. यातून त्यांनी दोन उद्देश साध्य केले ते असे, करमणूक आणि दुसरा उद्देश अध्यात्मिक रसपान. सर्वसामान्यांना पटेल, रुचेल अशा साध्या सोप्या भाषेमध्ये नाथांनी भारुडे रचली त्यातून त्यांनी समाजाचे अज्ञान, अंधश्रद्धा दूर केल्या. खरं तर भारुडाविषयी असं म्हणता येईल की, लोकजीवनाच्या काळजात रुजलेले संस्कृतीचे मूळ आहे.माझी आणि भारुडाची ओळख झाली ती अशी... आमच्या गावामध्ये कीर्तनकार बुवा येणार म्हणून गावातील लहान-थोर मंडळी कीर्तनाला उपस्थित होती. दिवे लागण्याची वेळ झाली. हळूहळू दिवे उजळू लागले. प्रत्येकाच्या हातात कंदील घेऊन जो तो चावडीसमोर येऊन जिथे जागा मिळेल तिथे विराजमान झाला. कीर्तनकार बुवांच्या साथीदाराने टाळ–मृदंगाचा ठेका धरला. अचानक समजले, कीर्तनकार बुवा उशिरा येणार आहेत. सज्ज व्यासपीठ वादक तयार होतेच तेवढ्यात एक जण व्यासपीठावर आला आणि त्याने सुरू केलं... विंचू चावला भारूड. अतिशय छान अभिनय, नृत्य करून सर्वांना हसवलं. त्या पाठोपाठ दादला नको गं बाई व असे एक-दोन भारूड सादर केले आणि कीर्तनकार बुवा तेवढ्यात तिथे हजर झाले. छान माहोल तयार झालेला पाहून त्यांनी भारूड सादर करणाऱ्या मुलाचा सत्कार केला आणि त्याला आशीर्वाद दिला. तेव्हापासून भारूड माझ्या मनात रुजलं आणि त्या भारुडातील खट्याळपणा मला विशेष भावला. यानंतर अनेकदा नाथांची भारूड ऐकायला मिळाली. एक दिवस शाळेतून घरी येत असताना... मंदिराच्या समोरच्या पारावर अनेक माणसे जमा झाली होती... आणि त्यातून आवाज आला...“ऐका हो ऐका… एक सांगतो गंमत!” आणि त्या सुमधुर पहाडी आवाजाने अख्खा परिसर दुमदुमला. मी मागे वळून पाहिलं, डोक्यावर मोरपिसाची उलटी टोपी घातलेला अंगात अंग होळकर अंगरखा हातात टाळ एका बाजूला झोळी अडकवलेली अशा थाटात असलेला वासुदेव भारुडाबरोबर नृत्यही सादर करू लागला. छान गोल गिरकी घेऊन त्याने सर्वांचे लक्ष वेधले आणि पाराचा क्षणात रंगमंच झाला. आजूबाजूची लोकही जमा झाली आणि जोगवा भारूड त्याने सादर केलं त्यातून नाथांनी आदिशक्तीला विनम्रपणे घातलेलं गाऱ्हानं होतं. हसत, चिमटे काढत, त्याने जनसामान्यांच्या मनाचा ताबा घेतला. तेव्हा समजलं, भारूड म्हणजे केवळ करमणूक नव्हे. ते लोकमनाचं आरसपानी प्रतिबिंब आहे. सामान्य माणसाच्या दैनंदिन जगण्यातून जन्मलेलं, त्याच्या बोलीतून व्यक्त झालेलं आणि त्याच्याच प्रश्नांवर बोट ठेवणारं हे लोकनाट्य, लोकगीत आणि लोककथन यांचं अनोखं मिश्रण आहे. भारूड पाहताना हसू येतं, पण हसता हसता एखादं सत्य टोचून जातं. हीच त्याची खरी ताकद.पुढे एकनाथांच्या भारुडावर अभ्यास करताना भारूड मनाला स्पर्श करून गेलं. आणि मी या लोकसंस्कृतीच्या भारुडाच्या प्रेमात पडले. भारुडाचं स्वरूप अगदी साधं, पण प्रभावी. कोणताही भव्य रंगमंच नाही, झगमगती नेपथ्य नाही. एक-दोन कलाकार, थोडीफार वेशभूषा, टाळ–मृदंग आणि शब्दांचा खेळ. इतक्यावर भारूड उभं राहतं. अनेकदा भारूडकार स्वतःच निवेदक, अभिनेता आणि सूत्रधार असतो. कधी तो वेशांतर करतो, कधी प्रेक्षकांशी थेट संवाद साधतो. त्यामुळे भारूड पाहणारा केवळ प्रेक्षक राहत नाही; तो त्या खेळाचा भाग होऊन जातो.भारुडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील उपरोध. थेट बोट दाखवून सांगण्याऐवजी भारूड हसत हसत सत्य सांगतं. समाजातील दांभिकपणा, अज्ञान, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, जातिभेद, स्त्री-पुरुष विषमता हे सारे विषय भारुडात येतात, पण प्रवचनाच्या स्वरात नाहीत. एखाद्या भोळ्या पात्राच्या तोंडून, एखाद्या गंमतीदार प्रसंगातून ते उलगडत जातात. त्यामुळे ऐकणाऱ्याला न दुखावता, पण अंतर्मुख करणारी ही शैली ठरते. भारुडाचं वेगळेपण त्याच्या प्रतीकात्मकतेत आहे. अनेक भारुडांत प्राणी, पक्षी, देव, भटके, व्यापारी, फकीर अशी पात्रं येतात. ही पात्रं केवळ व्यक्ती नसतात, तर प्रवृत्तींचं प्रतीक असतात. एखादा लोभी व्यापारी म्हणजे केवळ एक व्यक्ती नसून, तो लोभाचं मूर्त रूप असतो. एखादा भोळा गोंधळी म्हणजे अज्ञानाचं प्रतीक असतो. या प्रतीकांच्या माध्यमातून भारूड व्यापक अर्थ सांगून जातं. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत भारुडाचं स्थान फार महत्त्वाचं आहे. वारकरी संप्रदायाच्या कीर्तनपरंपरेत भारुडाला विशेष मान आहे. संत एकनाथ, संत तुकाराम यांसारख्या संतांनी भारुडाचा उपयोग लोकजागृतीसाठी केला.संत एकनाथांची भारूडं आजही लोकांच्या ओठांवर आहेत. त्यांनी भारुडातून जे अध्यात्म सांगितलं ते अध्यात्म माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं होतं. त्यामुळे भारूड हे केवळ लोककलेचं रूप न राहता, समाजपरिवर्तनाचं साधन बनलं.इतिहासाच्या प्रवाहात भारुडाने अनेक रूपं धारण केली. कधी ते कीर्तनाचा भाग झाले, कधी तमाशाच्या जवळ गेले, तर कधी शाहिरी परंपरेत मिसळले. ग्रामीण जीवनातील बदल, शहराकडे झुकणारी संस्कृती, आधुनिक प्रश्न हे सारे विषय भारुडात येत गेले. तरीही त्याची मुळं लोकजीवनातच राहिली. काळ बदलला, संदर्भ बदलले, पण भारुडाची आत्मा लोकमनाशी असलेली नाळ तुटली नाही. आजच्या धावपळीच्या काळात, मोठ्या रंगमंचांवर आणि पडद्यावर चमकणाऱ्या करमणुकीच्या जगात भारूड कधी-कधी दुर्लक्षित होतं. पण जेव्हा कुठे गावच्या जत्रेत, यात्रेत किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात भारूड सादर होतं.लोक अजूनही भारुड ऐकतात, हसतात आणि विचारही करतात. कारण भारुडात माणसातील माणूसपण दडलेलं आहे. भारूड म्हणजे लोकसाहित्याच्या विशाल दालनातील एक जिवंत झरा आहे असं मला वाटतं. कारण यामध्ये आनंद देण्याची क्षमता आहे, विकारावर चिमटे घेण्याची ताकद आहे, मानवी आयुष्यातील फोलपणा आहे, करुणा व्यथा वेदना आहे, स्त्रियांचे दुःख आहे आणि अंधश्रद्धेच्या विरुद्ध केलेले परखड भाष्य आहे आणि शहाणपणही आहे. सर्वसामान्यांच्या मनावर गारुड करणारे हे भारूड जतन करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. कारण यामुळेच आपली संस्कृती आपली संस्कार आपली भाषा टिकून आहे.
Ahilyanagar Drugs Case : एमडी ड्रग्स प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारीच आरोपी निघाल्याने खळबळ
Shahid Afridi Statement : “आयसीसी दुटप्पी वागतंय!”बांगलादेशच्या हकालपट्टीवर शाहिद आफ्रिदीचा संताप
Shahid Afridi statement : शाहिद आफ्रिदीच्या मते आयसीसीने बांगलादेशचा समस्या समजून घ्यायला हवी होती.
वाहणाऱ्या नद्या, हरणारी माणसे !
नद्या सतत वाहत असतात. वाहणे हा त्यांचा धर्म. अनेक नद्या समुद्राला मिळतात. वाफ होऊन आकाशात जातात आणि पावसाच्या रूपाने खाली येतात. चराचराला संजीवनी देणे, आतबाहेर ओल-हिरवाई जिवंत ठेवणे हे त्यांचे काम! मासे, मगरी, कासवे-पाणमांजरे, शंख-शिंपले, ज्ञात-अज्ञात कीटक, जलचर, शेवाळं, पाणवनस्पती यांचे संसारही नद्यांना फुलवायचे असतात. काठावर गाळ पेरत वांगी, मिरच्या, कलिंगडे पिकवायची असतात. वृक्षवेलींना, पक्ष्यांना, गाईगुरांना-वनचरांना पाणी द्यायचे असते. नावाड्यांची गाणी, आदिम जमातींची लोकगीते ऐकायची असतात. आकाशाच्या प्रकाशित तुकड्यांना आरसा दाखवायचा असतो.
शीख गुरुपरंपरेचा देदीप्यमान वारसा
शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेगबहादूर यांना संपूर्ण भारतात “हिंद द चादर” (भारताचे संरक्षक) म्हणून ओळखले जाते. त्यांचे स्थान केवळ शीख इतिहासातच नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदराचे आहे. मानवी सन्मान, श्रद्धा स्वातंत्र्याचे ते सर्वोच्च रक्षक होते. श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्ताने ‘हिंद द चादर’ अंतर्गत नांदेड येथे काल आणि आज मोठा समारोह होतो आहे. त्यानिमित्त शीख गुरुपरंपरेचा देदीप्यमान वारसा सांगणारा हा लेख -धराव्या शतकाचा काळ हा भारतवर्षासाठी अत्यंत कठीण होता. वायव्येकडून येणारी इस्लामी आक्रमणे राज्य काबीज करत होती आणि इथल्या श्रद्धा आणि संस्कृतीचाही विध्वंस करत होती. अशा धामधुमीच्या काळात, जे)व्हा सर्वसामान्य माणूस भयाखाली जगत होता, तेव्हा पंजाबच्या मातीतून गुरू नानक देवजींच्या रूपाने स्वाभिमानाचा एक नवा हुंकार उमटला. त्यांनी दिलेला विचार हा असा आध्यात्मिक मार्ग होता ज्याने परकीय सत्तेच्या कट्टरतेला एक वैचारिक आणि कृतिशील आव्हान दिले. इथूनच दहा गुरूंच्या कार्याचा तो प्रवास सुरू झाला, ज्याने मानवी संस्कृतीच्या जडणघडणीत एक ज्वलंत इतिहास निर्माण केला.गुरू नानक देव (१४६९-१५३९)शीख धर्माचे प्रवर्तक गुरू नानक देवजी यांचा काळ हा बाबराच्या आक्रमणांचा काळ होता. परकीय आक्रमक जेव्हा इथल्या मंदिरांचा आणि संस्कृतीचा विध्वंस करत होते, तेव्हा नानकजींनी त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. ईश्वराला ‘अकाल पुरख’ (काळाच्या पलीकडे असलेला) संबोधून त्यांनी स्पष्ट केले की, मानवी सत्ता ही क्षणभंगुर आहे आणि केवळ सत्यच शाश्वत आहे. त्यांनी विखुरलेल्या समाजाला ‘नाम जपो’, ‘किरत करो’ आणि ‘वंड चखो’ ही त्रिसूत्री देऊन पुन्हा संघटित केले. त्यांच्या मक्का-मदिनापासून हिमालयापर्यंतच्या यात्रा अर्थात उदासिया या केवळ धार्मिक नव्हत्या, तर त्या परकीय विचारसरणीच्या कट्टरतेला दिलेले एक प्रखर वैचारिक आव्हान होते.गुरू अंगद देव (१५०४-१५५२)परकीय आक्रमणांमुळे इथल्या स्थानिक भाषा आणि लिपींवर मोठे संकट आले होते. अशा वेळी गुरू अंगद देवजींनी ‘गुरुमुखी’ लिपीला प्रोत्साहन देऊन आपली स्वतंत्र ओळख टिकवून धरली. आक्रमकांच्या वाढत्या दहशतीला आणि जुलुमाला तोंड देण्यासाठी केवळ शांत राहून चालणार नाही, हे ओळखून त्यांनी ‘मल्ल आखाडे’ सुरू केले. तरुणांना शारीरिकदृष्ट्या सक्षम करणे, हे इस्लामी कट्टरतेच्या काळात स्वधर्माच्या रक्षणासाठी उचललेले पहिले क्रांतिकारी पाऊल होते.गुरू अमर दास (१४७९-१५७४)इस्लामी कट्टरता जेव्हा समाजात फूट पाडत होती, तेव्हा गुरू अमर दासजींनी सामाजिक एकतेचे कवच उभे केले. “पहिले पंगत, पाठी संगत” अर्थात “प्रथम सर्वांसोबत पंगतीत बसून भोजन करा आणि त्यानंतरच गुरूंची भेट घ्या” हा नियम लावून त्यांनी समाजातील सर्व भेद मोडून काढले, जेणेकरून समाज आक्रमकांविरुद्ध एकसंध राहू शकेल. त्यांनी २२ ‘मंजी’ (प्रचार केंद्रे) स्थापन करून एक भक्कम संघटनात्मक जाळे विणले.गुरू राम दास (१५३४-१५८१)चौथ्या गुरू राम दासजींनी अमृतसर शहराची आणि ‘अमृत सरोवर’ या जलाशयाची निर्मिती केली. त्यांनी अमृतसर या पवित्र शहराची निर्मिती करून शिख परंपरेला एक जागतिक ओळख मिळवून दिली. हे धार्मिक शहर एका नव्या आत्मबळाचे उगमस्थान झाले. परकीय संस्कृतीच्या प्रभावापासून अलिप्त राहून स्वतःची स्वतंत्र ओळख जपण्यासाठी त्यांनी विवाहासाठी ‘लावा’ या पवित्र फेऱ्यांची रचना केली. त्यांनी सुरू केलेली ‘मसांद’ व्यवस्था ही समाजातील गरजूंच्या मदतीसाठी आणि संघर्षासाठी लागणारी रसद उभी करण्याचे एक पारदर्शक साधन बनली.गुरू अर्जन देव (१५६३-१६०६)पाचवे गुरू अर्जन देवजी यांचा काळ हा शीख परंपरेतील संघर्षाचा सर्वोच्च बिंदू ठरला. मुघल सम्राट जहांगीरच्या धार्मिक कट्टरतेच्या धोरणामुळे शिखांचे वाढते सामर्थ्य त्याच्या डोळ्यांत खूपत होते. गुरुजींनी ‘आदी ग्रंथा’चे संकलन करून एका महान भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले, ज्यात महाराष्ट्राचे संत नामदेव, कबीर आणि रविदास यांच्या वाणीचा समावेश होता. जहांगीरने जेव्हा गुरुजींवर इस्लामी धर्मांतराचा दबाव आणला, तेव्हा त्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. परिणामी, त्यांना तप्त लोखंडी तव्यावर बसवून अमानुष छळ करून शहीद करण्यात आले. हे शीख इतिहासातील परकीय सत्तेविरुद्ध दिलेले पहिले सर्वोच्च बलिदान ठरले, ज्याने भक्तीच्या प्रवाहात शौर्याचे रक्त मिसळले. गुरू अर्जन देवजींच्या बलिदानाने भारतीय इतिहासाला एक अभूतपूर्व वळण दिले. केवळ शांतता आणि आध्यात्मिक उपदेशांनी परकीय आक्रमकांचे हृदयपरिवर्तन होणार नाही, तर आता ‘शस्त्राने शास्त्र’ वाचवण्याची वेळ आली आहे, हे शीख परंपरेने ओळखले. भक्तीच्या प्रवाहातून आता शौर्याची तलवार तळपू लागली होती.गुरू हरगोविंद सिंग (१५९५-१६४४)पाचव्या गुरूंच्या शहादतीनंतर गुरू हरगोविंद सिंगजी यांनी शीख धर्माला एक नवे सामर्थ्य दिले. त्यांनी गादीवर बसताना दोन तलवारी धारण केल्या, एक ‘मीरी’ (राजकीय व ऐहिक सत्ता) आणि दुसरी ‘पिरी’ (आध्यात्मिक अधिकार). यातून त्यांनी स्पष्ट संदेश दिला की, संत असणे म्हणजे दुबळे होणे नव्हे. त्यांनी अमृतसरमध्ये ‘अकाल तख्त’ स्थापन केले, जे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे सर्वोच्च केंद्र बनले. मुघल सत्तेच्या अत्याचारांना आव्हान देत त्यांनी शिखांचे एक शिस्तबद्ध सैन्य उभे केले आणि अनेक लढायांमध्ये परकीय आक्रमकांचा पराभव करून भारतीय शौर्याचा दबदबा निर्माण केला.गुरू हर राय (१६३०-१६६१)सहाव्या गुरूंनी निर्माण केलेली लष्करी शक्ती सातवे गुरू हर रायजी यांनी अधिक सुव्यवस्थित केली. मुघल राजपुत्र दारा शुकोह याने जेव्हा मुघल सत्तेच्या अंतर्गत संघर्षात आश्रय मागितला, तेव्हा त्यांनी त्याला मदत केली, जे मुघल कट्टरतेच्या विरोधात उभे राहण्याचे एक धाडसी पाऊल होते.गुरू हरकिशन (१६५६-१६६४)गुरू हर राय जींच्या पश्चात त्यांचे कनिष्ठ सुपुत्र गुरू हरकिशनजी गुरुपदी आले. त्यांना ‘बाल गुरू’ म्हणून ओळखले जाते कारण वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी ही जबादारी स्वीकारली. दिल्लीतील वास्तव्यादरम्यान जेव्हा शहरात देवीची (Smallpox) मोठी साथ पसरली होती, तेव्हा त्यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली आणियाच सेवाकार्यात वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी देह ठेवला.गुरू तेग बहादूर (१६२१-१६७५)मुघल सम्राट औरंगजेबाच्या सक्तीच्या धर्मांतराच्या धोरणामुळे जेव्हा काश्मिरी पंडितांवर संकट आले, तेव्हा नववे गुरू तेग बहादूरजी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. धार्मिक स्वातंत्र्य जपण्यासाठी दिलेले हे बलिदान अद्वितीय होते. दिल्लीच्या चांदीनी चौकात औरंगजेबाच्या कट्टरतेला न झुकता त्यांनी दिलेले बलिदान या मातीचा स्वाभिमान जागवणारे ठरले. म्हणूनच त्यांना अत्यंत गौरवाने ‘हिंद दी चादर’ अर्थात हिंदू धर्माचे रक्षक असे म्हटले जाते.गुरू गोविंद सिंग (१६६६-१७०८)दहावे गुरू गोविंद सिंगजी हे शौर्य आणि कतृत्वाचे शिखर होते. १६९९ च्या वैशाखीदिनी त्यांनी ‘खालसा पंथ’ स्थापन करून एका अशा सशस्त्र दलाची निर्मिती केली, ज्याने मुघलांचे अस्तित्व संपवण्याची शपथ घेतली. त्यांनी ‘पंज प्यारे’ निवडून जातिभेद मुळापासून उपटून टाकला आणि सर्वांना ‘सिंग’ व ‘कौर’ ही आडनावे देऊन एक नवी ओळख दिली. त्यांनी शिखांसाठी पाच ‘ककार’ अर्थात केश, कंगा, कडा, कचेरा आणि किरपाण अनिवार्य केले. आपल्या चारही पुत्रांचे बलिदान धर्मासाठी देऊनही खचून न जाता ते आजीवन मुघलांशी लढत राहिले. त्यांनी औरंगजेबाला ‘झफरनामा’ लिहून त्याच्या अन्यायाची आणि नैतिक पराभवाची जाणीव करून दिली.गुरू ग्रंथ साहिब : शब्दांचे चिरंतन अधिष्ठानगुरू गोविंद सिंगजींनी नांदेड येथे आपल्या आयुष्याचा अंतिम काळ व्यतीत केला. येथेच त्यांनी जाहीर केले की, यापुढे कोणताही देहधारी गुरू नसेल. त्यांनी ‘आदि ग्रंथा’ला ‘गुरू ग्रंथ साहिब’ म्हणून मान्यता दिली आणि त्यांना शिखांचे जिवंत आणि शाश्वत गुरू घोषित केले. हा ग्रंथ केवळ गुरूंची वाणी नाही, तर त्यात संत नामदेव, कबीर, रविदास अशा अनेक महान संतांच्या विचारांचा संगम आहे. हा पवित्र ग्रंथ आजही समता, सेवा आणि निर्भयतेचा मार्ग दाखवत आहे. गुरू नानक देवजींनी पेरलेले मानवतेचे बीज गुरू गोविंद सिंगजींच्या काळापर्यंत एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले होते, ज्याची सावली आजही संपूर्ण जगाला शांती आणि एकात्मतेचा संदेश देत आहे. परकीय आक्रमणे आणि कट्टरतेच्या काळात या गुरुपरंपरेने दिलेला लढा आजही भारताच्या अस्मितेचा आधारस्तंभ आहे.
Padma Awards : केंद्र सरकारकडून २०२६ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे
कशी केली ओंकारने प्राध्यापकाची हत्या ? पोलिसांना दिली माहिती
मुंबई : मालाड स्टेशनवर शनिवारी रात्री प्राध्यापक आलोक सिंह यांची हत्या झाली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी ओंकार शिंदे (२७) याला अटक केली आहे. ट्रेनमधून उतरताना धक्का लागल्यावरुन वाद झाला आणि ओंकारने प्राध्यापक आलोक सिंह यांची हत्या केली. पोलिसांनी प्राध्यापकाच्या हत्येप्रकरणी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. सध्या आरोपीची बोरिवली पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.https://www.youtube.com/shorts/tWBqh0jK-q4हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला होता. पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली. फक्त ट्रेनमधून उतरताना धक्का लागला म्हणून ओंकारने हत्या केली की या हत्येमागे वेगळे कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरं देताना आरोपी ओंकारने धक्कादायक माहिती दिली आहे. प्राध्यापकाची हत्या कशा प्रकारे केली याची सविस्तर माहितीच ओंकारने पोलिसांना दिली आहे.https://www.youtube.com/shorts/oxHYYwCYW3oओंकारने चाकूने नाही तर चिमट्याने केली हत्याप्राध्यापक आलोक सिंह आणि ओंकार शिंदे हे योगायोगाने एकाच लोकमधून प्रवास करत होते. ट्रेनमधून उतरण्याच्यावेळी चुकून धक्का लागण्याचे निमित्त झाले. ओंकार आणि आलोक सिंह यांच्यात धक्का लागण्यावरुन वाद झाला. वाद वाढला आणि ओंकारने लोकल मालाड स्टेशनजवळ असताना स्वतःकडे असलेल्या टोकदार हत्याराने आलोक यांच्यावर एकच जीवघेणा वार केला. हा वार इतका भयंकर होता की अलोक यांच्या पोटातून रक्ताची धार सुटली. हल्ला झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सावरत कसा बसा प्लॅटफॉर्म गाठला. ते तेथील बाकड्यावर जाऊन बसले. पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने अलोक यांचा जागीच मृत्यू झाला.ओंकारने आलोक यांच्या पोटात एक टोकदार वस्तू जोरात खुपसली. या जोरात झालेल्या आघातामुळे गंभीर जखमी झालेल्या आलोक यांचा प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे थोड्याच वेळात मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपी ओंकार विरोधात पोलीस कारवाई सुरू आहे. ओंकारवर पोलिसांनी प्राध्यापक आलोक सिंह यांच्या हत्येचा आरोप ठेवला आहे.https://www.youtube.com/shorts/5rf9zIVuZFYओंकारने कुठुन आणला चिमटा ?ओंकार शिंदे दक्षिण मुंबईतील खेतवाडी परिसरातील एका कारखान्यात नोकरी करतो. त्याच्याकडे हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी टोकदार चिमटा होता. या चिमट्याचा वापर करुन ओंकारने प्राध्यापक आलोक सिंह यांच्या पोटात जोरदार वार केला. चिमटा टोकदार होता आणि तो वेगाने तो पोटात खोलवर घुसला. यामुळे पोटातून भळाभळा रक्त वाहू लागले आणि थोड्याच वेळात आलोक यांचा मृत्यू झाला.कोण होते प्राध्यापक आलोक सिंह ?नरसी मोनजी कॉलेज, विलेपार्ले येथे २०२४ पासून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. स्वभावाने शांत, दयाळू आणि सभ्य होते.वाद करणे, म्हणणे पटवून देण्यासाठी युक्तिवाद करत बसणे असा आलोक यांचा स्वभाव नव्हता. ते साधे होते आणि कोणावरही कधी संतापत नव्हते; अशी माहिती त्यांना ओळखणाऱ्यांनी दिली आहे.आलोक सिंह शनिवार २४ जानेवारी २०२६ रोजी रात्री विलेपार्ले स्टेशनवरुन बोरिवलीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले. मालाड स्टेशनवर आलोक यांची हत्या झाली.आलोक यांचे काकाही प्राध्यापक होते. जेमतेम दोन वर्षांपूर्वी आलोक यांचे लग्न झाले होते. पण शनिवारी घडलेल्या घटनेमुळे आलोक यांच्या नातलगांना जबर धक्का बसला आहे.
Pakistan Squad Announce : टी-२० वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर! ‘या’स्टार खेळाडूंना दिला डच्चू
Pakistan Squad Announce : पीसीबीने आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी पाकिस्तानचा संघ जाहीर केला आहे.
Canada PM Mark Carney : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबतच्या व्यापार करारामुळे १००% कर लादण्याची धमकी कॅनडाला दिली आहे.
खेळ खेळूया शब्दांचाशब्दांवर साऱ्यांची मालकीतीन अक्षरी शब्दांची ही‘की’ची करामत बोलकीदाराची बहीण कोणतिला म्हणतात खिडकीमातीची भांडी कसली?ही तर आहेत मडकीस्वतःभोवती फिरण्यालाघेतली म्हणतात गिरकीकापसाच्या बीला येथेसारेच म्हणतात सरकीलावणीच्या ठसक्यालाघुंगरांच्या सोबत ढोलकीझोप डोळ्यांवर आली कीजो तो घेतो डुलकीढोंगी मनुष्य दिसताचआला म्हणतात नाटकीएखाद्याची परिस्थितीसुद्धाअसते बरं फाटकीनाकातला छोटा अलंकारत्याला म्हणतात चमकीछोट्याशा तालवाद्यालाम्हणतात खरं टिमकीखेळात शब्दांची अशीजेव्हा बसते अंगतपंगतशब्दांशी होते मैत्रीखेळाला चढते रंगत.
प्रतिभारंग,प्रा. प्रतिभा सराफमाझ्या घरी संध्याकाळी जेवायला पाहुणे येणार होते. आज संध्याकाळी बागेत फेरफटका मारता येणार नाही, असे वाटत असतानाच अर्ध्यापेक्षा जास्त स्वयंपाक झालेला होता. म्हणून अर्धा तास का होईना जवळच्या बागेत फिरायला जायचा निर्णय घेतला, जो चांगलाच पथ्यावर पडला. म्हणजेच झाले काय की नेहमी बागेत गेल्यावर फिरायला येणाऱ्या मैत्रिणी सोबतीने चालतात. तिथे येणाऱ्या पंधरा-सोळा मैत्रिणींपैकी कोणी ना कोणीतरी सोबत असतेच. मग काय त्याच त्याच गप्पा, खाणे-पिणे आणि मुले-बाळे. तरी अस्वस्थता होतीच की आपण तासभर लवकर आल्यामुळे या सगळ्या भेटणार नाहीत आणि शिवाय एकटीलाच फिरावे लागेल म्हणून...! पण बागेत शिरतानाच आमच्या सोसायटीतील शंकर एम. माझ्या सोबतीने बागेत शिरले. खरे तर खूप दिवसांनी भेटले होते. त्यामुळे मीही त्यांच्या चालीने (म्हणजे ते हळू चालत होते) चालू लागले. पंच्याहत्तरीच्या आसपासचे हे गृहस्थ वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारू लागले. त्यांनी मला अचानक विचारले, ‘अलीकडे कोणतं नाटक पाहिलं?होय, पण मी तुम्हाला सांगायचे विसरले की ते तमिळ भाषिक असूनही अतिउत्कृष्ट मराठी बोलायचे. मी क्षणभर विचार करू लागले आणि मला खरंच काही आठवेचना... शेवटचे नाटक मी कोणते आणि कधी पाहिले? मग मीच त्यांना प्रतिप्रश्न केला, “तुम्ही कोणतं नाटक पाहिलं?” अगदी सहजतेने ते उत्तरले,“श्श… घाबरायचं नाही.”‘श्श’चा त्यांनी केलेला उच्चार कौतुकास्पद होता. मी विचारले, “अशा नावाचं नाटक आहे?”“आहे ना आम्ही बघून आलो. त्यात डाॅ. गिरीश ओक यांनी काम केलेलं आहे.”“वाह, काय सांगताय?”“मग कसलं भन्नाट नाटक आहे. त्याचं दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे... अफलातून...!”“बापरे... तुम्ही फक्त नाटक पाहत नाही तर या पण गोष्टी पाहता का?”“होय म्हणजे काय रत्नाकर मतकरी माझे आवडते लेखक आहेत त्यांच्या गूढ कथेवरील हे नाटक!”मलाच ‘श्श’ केल्यासारखं त्यांनी जणू गप्प करून टाकले आणि ‘घाबरायचं नाही’ असं नाटकाचे नाव असले तरी मी मात्र आपल्याकडे काहीच नसलेल्या ज्ञानामुळे प्रचंड घाबरले. शंकर एम. यांच्या लक्षात काही आले नाही. ते एका वेगळ्याच विश्वात गेलेले होते. त्यांनी मला विचारले,“डॉ. वसंतराव देशपांडे यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकात भूमिका केलेली ज्याचे कमीत कमी पाच प्रयोग मी पाहिले.”“क्काय...?”मी चित्कारले.“त्यांची ‘खानसाहेब’ची भूमिका प्रचंड गाजली. सगळी लोकप्रियता मिळलेली नाटकं तर मी पाहिलीच आहेत; परंतु नवीन आलेलं नाटक मी सोडत नाही.”“म्हणजे?” माझा बावळट प्रश्न.“म्हणजे असं की महिन्याला कमीत कमी तीन नाटकं तरी मी पाहतोच.”“कुठे जाऊन पाहता?”“शिवाजी मंदिर, साहित्य संघ, विष्णुदास भावे... अगदी पार्ला- बोरिवलीपर्यंत मी जातो.”बीआरसीतून सायंटिफिक ऑफिसर होऊन निवृत्त झालेले शंकर एम. माझ्यासारख्या मराठी माणसाला, मराठी नाटकाविषयीची माहिती देत होते आणि या संभाषणाचे विशेष म्हणजे ती माहिती माझ्या ज्ञानात भर घालत होती.“वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट आलेला होता. ‘वसंतराव’ माझ्या आवडते म्हणून मी मुद्दाम जाऊन पाहिला. या चित्रपटात त्यांच्या नातवाने म्हणजे राहुल देशपांडे यांनी वसंतराव साकारला आहेत.”मी फक्त “हो का?”, “असं का?”, असे म्हणत राहिले.‘डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘रमेश भाटकर’, ‘प्रशांत दामले’, ‘दिलीप प्रभावळकर’, ‘सुलभा देशपांडे’, ‘अलका कुबल’ इत्यादींच्या गाजलेल्या भूमिका, त्यांच्या नाटकांची नावे, त्या नाटकांचे नेपथ्य, त्या नाटकांचे लेखक....इ. काही काहीही विचारा, इतके त्यांना ज्ञान!खरंतर बागेत जाऊन दोन फेऱ्या मारून मी घरी परतणार होते. त्यांच्याशी बोलता बोलता नऊ फेऱ्या मारल्या. घरी पाहुणे यायचे होते म्हणून नाईलाजाने घरी परतले. स्वयंपाकघरात शिरले ते रात्री उशिरापर्यंत कामात होते. रात्रीचा १ वाजला होता तेव्हा बिछान्यावर पडले आणि मोबाईल हातात घेऊन गुगल गुरूला विचारले- मुंबईत चालू असलेले मराठी नाटक कोणते?गुगल गुरूने काय उत्तर दिले, हे महत्त्वाचे नाही; परंतु हे महत्त्वाचे आहे की एक मराठी माणूस म्हणून मी कमीत कमी महिन्यातून एक तरी मराठी नाटक पाहिले पाहिजे, असा निश्चय करूनच त्यादिवशी झोपले!मग माझ्यासारखा निर्णय घेऊन, तुम्ही कधी आपला निर्णय अमलात आणताय? चला... आपण सोबतीनेच मराठी नाटक पाहूया!
दैनंदिन राशीभविष्य, रविवार २५ जानेवारी २०२६
पंचांगआज मिती माघ शुद्ध सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र रेवती.चंद्र राशी मीन. भारतीय सौर ०५ माघ शके १९४७. रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ . मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय ११.२२ ,मुंबईचा सूर्यास्त ०६.२७ मुंबईचा चंद्रास्त ००.२६ उद्याची राहू काळ ०५..०३ ते ०६.२७ .भानू सप्तमी,रथ समाप्ती,जागतिक सूर्यनमस्कार दिन,उत्तम दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : घरामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो.वृषभ : महत्त्वाच्या कामात अनपेक्षित आणि घवघवीत यश मिळेल.मिथुन : आयत्या वेळेस नियोजनात बदल करावा लागेल.कर्क : व्यवसाय नोकरीतील आपले अंदाज अचूक ठरतील.सिंह : महत्वाची कामे होतील.कन्या : कुटुंबात चांगले वातावरण राहील.तूळ : जुने मित्र भेटतील.वृश्चिक : शुभवार्ता समजतील.धनू : शांतपणे निर्णय घेण्याची गरज.मकर : ठरलेल्या कामात बदल होऊ शकतात.कुंभ : प्रवास घडतील परंतु प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.मीन : सामाजिक अथवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय योगदान द्याल.
गोष्ट लहान, अर्थ महान,शिल्पा अष्टमकर‘चांगले तेवढे घ्यावे’ ही म्हण आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आजूबाजूच्या जगात आपण अनेक लोक, घटना, विचार, अनुभव आणि परिस्थिती पाहतो. त्यापैकी सर्वच गोष्टी आपल्यासाठी योग्य किंवा उपयुक्त असतीलच असे नाही. म्हणूनच जे चांगले, योग्य आणि उपकारक आहे तेवढेच स्वीकारण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीकडे काही चांगले गुण असतात तशाच काही उणिवाही असतात. आपण इतरांच्या उणिवांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांच्या चांगल्या गुणांकडून प्रेरणा घ्यावी. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती शिस्तप्रिय असेल तर तिच्याकडून शिस्त शिकावी, तर एखादी व्यक्ती कष्टाळू असेल तर तिच्याकडून मेहनतीची सवय आत्मसात करावी. जीवनातील अनुभवही आपल्याला बरेच काही शिकवतात. काही अनुभव आनंददायी असतात तर काही कटू. आनंददायी अनुभव आपल्याला सकारात्मकता देतात, तर कटू अनुभव आपल्याला सावध राहायला, चुका टाळायला शिकवतात. दोन्ही अनुभवांतून जे चांगले शिकता येईल ते घ्यावे आणि नकारात्मक गोष्टी मागे टाकाव्यात. आजच्या डिजिटल युगात माहितीचा महापूर आहे. सोशल मीडिया, टीव्ही, इंटरनेट यांवर अनेक चांगल्या-वाईट गोष्टी दिसतात. अशावेळी योग्य-अयोग्य याची ओळख करून घेऊन सकारात्मक, ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी गोष्टींचाच स्वीकार करणे फार गरजेचे आहे. ‘चांगले तेवढे घ्यावे’ या विचारामुळे आपले व्यक्तिमत्त्व अधिक सुसंस्कृत, सकारात्मक आणि संतुलित बनते. त्यामुळे जीवनात यश, समाधान आणि आनंद प्राप्त होतो. म्हणूनच नेहमी विवेकबुद्धी वापरून चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यात आणि उर्वरित गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. बिहारमधील एका शहरातील ही कथा. त्या शहरातील एका छोट्याशा वाडीत सूरजकुमार नावाचा एक सद्गुणी तरुण राहात होता. जगातील सर्व आदर्शवत गुण त्याच्या ठायी होते. सूरजकुमारचे पालक तसे अशिक्षित व परिस्थितीने सामान्य होते. आजूबाजूचे वातावरण काही तेवढे आदर्श नव्हते; असे असताना सूरजकुमारच्या या वागण्याचे सर्वांना आश्चर्य वाटायचे.एकदा एका गृहस्थाने सूरजकुमारला विचारले,“बाबा रे, तुला एवढ्या चांगल्या रीतीभाती कोणी शिकवल्या? इतके सद्गुण तू कोणापासून घेतलेस?”त्या गृहस्थाचा हा प्रश्न ऐकून. तो तरुण नम्रपणे म्हणाला,“आपण म्हणता तेवढा मी काही गुणवान नाही. पण आज माझ्या ठिकाणी काही चांगले गुण आहेत, ज्या चांगल्या गोष्टी दिसून येतात, त्याचे श्रेय आजूबाजूच्या एका असंस्कृत, दुर्गुणी माणसाला आहे.”सूरजकुमारच्या या उत्तराने त्या गृहस्थाला खूपच आश्चर्य वाटले. तो गृहस्थसूरजकुमारला म्हणाला,“असंस्कृत व दुर्गुणी माणसाकडून तू सद्गुण कसे काय घेतलेस?”त्यावर सूरजकुमार त्याला म्हणाला,“माझ्या समोर राहणाऱ्या त्या असंस्कृत व दुर्गुणी माणसावर आजूबाजचे लोक टीका करीत. त्यामुळे वाईट काय व चांगले काय याविषयी मला विचार करणे शिकायला मिळाले. वाईट गोष्टींपासून मी अलिप्त राहिलो आणि सद्गुणांचा मी स्वीकार केला. ते सद्गुण मी आत्मसात केले. त्यामुळे आज माझ्या अंगी चांगले गुण आढळतात. या सर्वांचे श्रेय मी त्या माझ्या समोरच्या असंस्कृत माणसालाच देतो.”● तात्पर्य :समाजामध्ये चांगल्या व वाईट दोन्ही प्रवृत्तीचे लोक असतात. आपण त्यांच्याकडून सद्गुण घ्यावेत की दुर्गुण घ्यावेत हे प्रत्येक व्यक्तीने ठरवायचे असते.विचार : माणूस वाईट नसतो, तर त्याच्यातील वृत्ती वाईट असतात; म्हणून माणसाचा तिरस्कार न करता वाईट वृत्तीचा तिरस्कार करा.
कथा,रमेश तांबेराजूला गोष्टीची पुस्तकं वाचायचा खूपच नाद होता. राक्षस-परीच्या गोष्टी तर त्याला खूपच आवडायच्या. शिवाय भुताखेताच्या गोष्टी वाचतानाही तो अगदी देहभान विसरून जायचा. एके दिवशी तो एक पुस्तक वाचत बसला होता. ते पुस्तक होतं राजपुत्र आणि अगडबंब राक्षस यांचं! बराच वेळ झाला होता. राजू पुस्तक वाचता वाचता अगदी मंत्रमुग्ध झाला होता. गोष्टीतल्या राक्षसाने त्या गरीब राजपुत्राला दरडावून सांगितले, “राजपुत्रा गपगुमान माझ्या मागून चालत ये; नाही तर इथल्या इथेच तुझा निकाल लावतो. राक्षसाची धमकी ऐकून राजपुत्र खूपच घाबरला. त्याचे हातपाय थरथरू लागले. भीतीने त्याचा चेहरा पांढराफटक पडला. तो रडू लागला, मदतीसाठी हाका मारू लागला. पण कोणीच त्याच्याजवळ नव्हते, ना सैनिक ना सेनापती! त्यामुळे शेवटी राजपुत्राने विचार केला इथून पळूनही जाता येणार नाही. आता राक्षस जिथे नेईल तिथेच जावं लागेल असं म्हणत राजपुत्र राक्षसाच्या मागे निघाला. आता आपणच संकटात सापडलेल्या त्या बिचाऱ्या राजपुत्राला मदत केली पाहिजे असे राजूला वाटू लागले. मग राजूदेखील हातातले पुस्तक बंद करून मोठ्या हिमतीने घराच्या बाहेर पडला. आता पुढे राक्षस त्याच्या मागे राजपुत्र आणि त्याच्या मागे राजू! राजपुत्राचे पुढे काय होणार हे बघण्यासाठी राजू त्याच्या मागून चालत होता.चालता चालता राक्षस एका डोंगराजवळ आला. त्याने राजपुत्राला एका झाडाला बांधले आणि तो समोरच्या गुहेत गेला. राजपुत्र सुटण्याचा प्रयत्न करत होता. मोठमोठ्याने रडत होता, ओरडत होता. पण बांधलेली दोरी सोडवणं त्याला जमत नव्हतं. धावत जाऊन त्याची दोरी सोडावी अन् राजपुत्राला मोकळं करावं असं राजूच्या मनात येत होतं. पण त्याची हिंमत होत नव्हती. कारण नेमका त्याचवेळी राक्षस बाहेर आला तर या विचाराने राजू क्षणभर गप्प बसला. पण राजपुत्राची धडपड, त्याचा केविलवाणा चेहरा राजूला बघवेना. मग राजू धावतच त्या झाडाजवळ गेला त्याने दोरी सोडून झटपट राजपुत्राला मोकळे केले आणि तेथून पळून जाण्यास सांगितले. राजपुत्रदेखील लगेच गायब झाला. पण राजू मात्र तिथेच थांबला. राक्षस आपल्याला पकडेल अशी शंकादेखील राजूला आली नाही. तितक्यात राक्षस गुहेबाहेर आला. त्याने पाहिलं अरे राजपुत्र तर जागेवर नाही. याचा अर्थ याच मुलाने राजपुत्राला मदत केली असणार. मग काय आता राक्षसाने राजूलाच झाडाला बांधून ठेवले.मग गुहेतून राक्षसाची छोटी-छोटी मुले बाहेर पडली. त्यांची नजर राजूवर पडली तशी मुले ओरडली बाबा बाबा तो बघा बाहुला ! तो हवाय आम्हाला; आमच्या सोबत खेळायला. ती आडदांड राक्षस मुलं बघून राजू खूपच घाबरला. राजू ओरडत म्हणाला, मी राजपुत्र नाही, राजू आहे राजू ! पण राजू काय बोलतो हे कोणालाच ऐकू गेले नाही. कारण राजूच्या तोंडातून आवाजाच फुटत नव्हता. राक्षसाने राजूला झाडाला करकचून बांधले. अन् पोरांना म्हणाला, “पोरांनो हा घ्या बाहुला तुमच्यासाठी, अन् करा मजा त्याच्यासोबत!”मग काय राक्षसाची पोरं राजूच्या भोवती गोल गोल फिरू लागली. त्याला चापट्या, टपल्या मारू लागली. त्याच्या खोड्या काढू लागली. राजू ओरडला, रडला की राक्षसाची मुलं टाळ्या वाजवायची. राजूला वाटलं आपण त्या राजपुत्राला मदत करायला गेलो आणि आपणच फसलो. आता काय करायचं? तेवढ्यात राक्षसाचा एक मुलगा म्हणाला, “बाबा बाबा या बाहुल्याचे केस मला अजिबात आवडले नाहीत; ते काढून टाका ना!” मग काय राक्षसाने वस्तरा आणला आणि खराखरा राजूचे केस कापून टाकले. आता टकल्या राजूभोवती तर पोरांनी उच्छाद मांडला. त्यांनी त्रास देऊन देऊन राजूला हैराण केले. नशिबाला दोष देण्याव्यतिरिक्त राजू आता काही करू शकत नव्हता. तेवढ्यात एका राक्षस पोराने त्याच्या तोंडातून बाहेर आलेला दात राजूच्या पाठीवर टेकवला आणि तो जोरात दाबू लागला. जसा तो दात राजूच्या पाठीत घुसला तसा राजू कळवळत ओरडला, “आई गं, मेलो मेलो”तोच राजूची आई धावत आली आणि राजूच्या डोक्यात टपली मारून म्हणाली, “काय रे काय झालं; घाबरलास का एवढा?” तोच राजू भानावर आला आणि आपण राक्षसाच्या तावडीत नाही हे पाहून राजूचा जीव भांड्यात पडला.
सीता व नीता या दोघी जुळ्या बहिणी खूपच हुशार होत्या. त्यांच्याकडे सुट्टी असल्याने शहरातील त्याची प्राध्यापिका मावशी आलेली होती. मग या दोघीजणी त्या मावशीला रोज सायंकाळी आपली शाळा सुटल्यावर घरी आल्यानंतर वेगवेगळे प्रश्न विचारीत असायच्या. त्या दिवशीसुद्धा त्या शाळा सुटल्यावर घरी आल्या. आधी आपला गृहपाठ करून घेतला. गृहपाठ संपल्यावर त्या मावशीसोबत सतरंजी घेऊन गच्चीवर गेल्या. सतरंजी अंथरून त्यावर त्या तिघीहीजणी बसल्या. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. त्या गप्पा करीत निसर्गाचे नयनमनोहर सौंदर्य बघत असतांनाच संधिप्रकाशसुद्धा आपला गाशा गुंडाळू लागला. तेव्हा मावशीनेच विचारले, “का गं मुलींनो! आपण आता या गच्चीवर उभे आहोत. आता सूर्यास्त झाल्यानंतरही आपणास येथे हा अंधुकसा प्रकाश दिसत आहे. याला काय म्हणतात गं?” असे विचारीत मावशी सतरंजीवर खाली बसली.“संधिप्रकाश” दोघींनीही एकासुरात उत्तर दिले.“पण मावशी त्याला संधिप्रकाशच का म्हणतात?” नीताने प्रश्न केला.“संधिकाळ म्हणजे कोणता काळ? ही तुम्हाला कल्पना आहे का?” मावशीने दोघींनाही प्रतिप्रश्न केला.“नाही मावशी.” म्हणत दोघींनीही नकारात्मक मान हलवली.“ज्या काळाला दिवसही म्हणता येत नाही व रात्रही म्हणता येत नाही त्या काळाला संधिकाळ असे म्हणतात. सकाळी रात्र संपून दिवस सुरू होतो व सायंकाळी दिवस संपून रात्र सुरू होते तो काळ म्हणजे संधिकाळ असतो. त्या संधिकाळात हा प्रकाश दिसतो म्हणून त्याला संधिप्रकाश असे म्हणतात. सूर्य मावळल्यानंतरही हा प्रकाश कसा येतो हे माहीत आहे का तुम्हाला?” मावशीने माहिती सांगत विचारले.“नाही मावशी! तूच सांग ना आम्हाला,” दोघीही म्हणाल्या.“त्याचं असं आहे!” मावशी सांगू लागली, “संध्याकाळी सूर्य क्षितिजाखाली जाताना वातावरणातील धूलिकण, जलबिंदू, हवेचे रेणू व इतर अन्य पदार्थांच्या कणांमुळे सूर्यप्रकाशाचे परावर्तन, विवर्तन व विकिरण होते. त्यामुळे सूर्यप्रकाश चौफेरविखुरला जातो.”“मावशी परावर्तनाबद्दल आम्ही शिकलो आहोत. विकिरण हे तुम्ही आताच थोड्या वेळापूर्वी आम्हाला सांगितले पण विवर्तन म्हणजे काय?” सीताने विचारले.“हे विवर्तन आता मध्येच काय आणले गं तू मावशी?” नीतानेसुद्धा शंका काढलीच.“सूर्यप्रकाश हा सरळ रेषेतच जातो हे माहीत आहे ना तुम्हाला?” मावशीने विचारले.“होय मावशी.” दोघीही म्हणाल्या.“प्रकाशाच्या मार्गामध्ये एखादा अपारदर्शक पदार्थ धरला तर काय होईल?” मावशीने विचारले.“त्याची सावली पडते.” दोघींनीही उत्तर दिले.“बरोबर आहे.” मावशी म्हणाली, “अशा मोठ्या आकाराच्या अपारी म्हणजे आपरदर्शक पदार्थाच्या कडेवरून जातांना प्रकाश किरणांची दिशा बदलून ते सावलीमध्ये पसरतात. या प्रक्रियेस विवर्तन असे म्हणतात. सूर्य क्षितिजाआड असताना पृथ्वीवरील पर्वतांच्या कडांवर पडलेल्या सूर्यप्रकाशकिरणांचे विवर्तन होते. विवर्तनामुळे प्रकाशकिरण आपली दिशा बदलून डोंगरकडांवरून पुढे खाली वाकतात व पर्वताच्या सावलीत पोहोचतात. समजले का?” मावशीने विचारले.“होय मावशी!” दोघीही म्हणाल्या, “पुढे सांगा.”मावशीने सांगण्यास सुरुवात केली, “अशा या वातावरणातील विवर्तित प्रकाशाच्या विकिरणामुळे विखुरलेला प्रकाश आपणापर्यंत येऊन पोहोचतो. तसेच काही प्रकाश वातावरणात थेट वर जात असतो. वातावरणातून त्याचे परावर्तन होऊन तोही प्रकाश खाली पोहोचतो. अशा प्रकाशालाच आपण ‘संधिप्रकाश’ म्हणतो. शहरापासून दूर मोकळ्या भूमीवर संधिप्रकाश खूप चांगला दिसतो. संध्याकाळी सूर्य जसजसा अधिकाधिक खोल खोल म्हणजे जसजसा दूर दूर जातो तसतसे उंच आकाशात गेलेले त्याचे हे किरण कमी कमी होत जाऊन संधिप्रकाश हळूहळू कमी कमी होत जातो. हळूहळू काळोख सुरू होतो व शेवटी पूर्णपणे अंधार पडतो व रात्र सुरू होते.”मग त्यादिवशी थोडा उशीर झाल्याने व अंधार पडल्याने त्या साऱ्याजणी गच्चीवरून खाली आल्या.
साप्ताहिक राशिभविष्य, २५ ते ३१ जानेवारी २०२६
साप्ताहिक राशिभविष्य, २५ ते ३१ जानेवारी २०२६आरोग्य उत्तम राहीलमेष : आरोग्य उत्तम राहिल्यामुळे मानसिकता सुधारेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपल्या समोरील कामे आपण उत्साहाने आणि वेगाने पूर्ण करू शकाल. जिद्द व चिकाटी वाढेल; परंतु कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. अति धाडस टाळा. पूर्ण विचार करून हातातील काम पूर्ण करा. आत्मविश्वासात वाढ होईल. इतरत्र बहुतेक सर्व क्षेत्रात मानसन्मान मिळेल. एखाद्या समारंभास उपस्थित राहाल. सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळींसहित एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी भेट द्याल. व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. स्वतःवरील विश्वास कायम राहील. कुटुंबात किरकोळ कारणावरून वादावादी होऊ शकते.आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामधील कलागुणांना वाव मिळेल. नोकरीत अनुकूलता लाभेल. कौटुंबिक सुख लाभेल.कर्तृत्व सिद्ध करता येईलवृषभ : कुटुंबातील प्रश्न सुटतील. इतरांच्या मताला प्राधान्य द्या. शांतपणे निर्णय घ्या. कार्यक्षेत्रात परिश्रमाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. स्थावरबाबतचे प्रश्न सुटतील. जमीन- जुमला विषयीचे थंडावलेले व्यवहार गतीमान होतील; परंतु वाद-विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. व्यवसायातील परिस्थिती समाधानकारक राहील. कुटुंबातून पत्नीचे सहकार्य मिळेल. मित्रमंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक भेटल्यामुळे आनंदात भर पडेल. कोणाशीही मतभेद टाळा. कोणत्याही लहान-मोठ्या आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे हिताचे ठरेल. जुन्या गुंतवणुका आर्थिक फायदा मिळवून देतील. नवीन गुंतवणुका होतील.रागावर नियंत्रण ठेवामिथुन : कुटुंबात आपल्या कार्यस्थळी तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळात रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. इतरांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेऊन त्यावरती आपली प्रतिक्रिया सावधपणे द्या. जोडीदाराशी वाद घालू नका. आरोग्य उत्तम राहील. मुलाच्या यशाचा आनंद साजरा कराल. आर्थिक आवक समाधानकारक राहील. व्यवसायात तसेच नोकरीत स्पर्धक बलवान होऊ शकतात. आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करा, तसेच नियम व शिस्त पाळणे हितकारक ठरेल. काहींना प्रवासाचे योग. राजकीय क्षेत्रातील जातकांनी आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक ठरेल. आर्थिक आवक समाधानकारककर्क : व्यवसायात उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येईल. व्यावसायिक स्थिती समाधानकारक राहील; परंतु कामगारांचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात, त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहा. सरकारी नियम व कायदे यांचे पालन अत्यावश्यक ठरेल. नोकरीत वाद-विवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारण आणि गटबाजीपासून दूर राहा. वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. भावंडांबरोबर संबंध चांगले राहतील. वडिलोपार्जित संपत्तीबद्दलचे वाद-विवाद संपुष्टात येतील.भाग्याची साथसिंह : अनुकूल ग्रहमानामुळे भाग्याची चांगली साथ राहील. हाती घेतलेल्या कामात यश संपादित करू शकाल; परंतु कुटुंबात विशेषतः आपल्या जोडीदाराबरोबर वादविवादाचे प्रसंग उद्भवू शकतात. लहान-सहान गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. व्यवसाय-धंद्यातील वाढ समाधान देऊन जाईल. नोकरीमध्ये आपल्या कामाची प्रशंसा होऊन आपण कौतुकास पात्र ठराल. पदोन्नतीची शक्यता, मात्र कामात बदल होऊ शकतो, तसेच स्थान बदलाची शक्यता. सामाजिक अथवा धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाहाच्या संबंधातील घडामोडी वेगवान होतील.खर्चावर नियंत्रण ठेवाकन्या : आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता. राहत्या घरासाठी खर्च कराल. भौतिक सुख व सुविधांची वाढ कराल. नवीन वाहन खरेदीचे योग, तसेच स्वतःच्या घरात जाण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास ते सफल होऊ शकतात. पैशाची सोय होईल. व्यवसायात गरज असेल, तर कर्ज मंजूर होऊ शकते. महत्त्वाची कामे करा. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन नियोजन करावे. नोकरी-व्यवसाय-धंद्यानिमित्त प्रवास करावा लागेल. प्रवास कार्यसिद्धी होईल.धार्मिक व सामाजिक कार्यात सक्रिय योगदानतूळ : धार्मिक तसेच सामाजिक कार्यात रस निर्माण होऊन अध्यात्मिकतेकडे कल राहील. धार्मिक तसेच सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. कुटुंबात एखादा छोटा कार्यक्रम होऊ शकतो. मित्रमंडळी व नातेवाइकांचे आगमन घरात झाल्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. जीवनसाथीबरोबर वाद-विवाद टाळा. थोड्या नियमाने वागण्याची गरज. आर्थिक आवक समाधानकारक राहील. नोकरी तसेच व्यवसायात अस्थिर परिस्थिती निर्माण होऊ शकते. शांतपणे व पूर्ण विचारांती निर्णय घ्या. सुसंवादाने समस्या संपुष्टात येऊ शकतात.वर्चस्व प्रस्थापित होईलवृश्चिक : नोकरीत तसेच व्यवसाय-धंद्यात आपले निर्णय अचूक ठरल्यामुळे परिणामसुद्धा लाभकारक ठरतील. आपल्या मतास प्राधान्य मिळून कौतुकास पात्र ठराल. नोकरीमध्ये एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी निवड होऊन परदेशगमनाची शक्यता. आर्थिक आवक चांगली राहील. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराल, त्यासाठी मनसोक्त खर्च होऊ शकतो. चैनीच्या आणि महागड्या वस्तू खरेदीचा मोह आवडणार नाही, मात्र आरोग्याची काळजी घेणे हितकारक ठरेल. संसर्गजन्य बाधेपासून सावध राहा. शक्यतो प्रवास टाळलेले हिताचे ठरेल.अनपेक्षित घटना घडतीलधनु : सदरील कालावधीमध्ये जरी अनपेक्षित घटना घडल्या तरी त्या अनुकूल स्वरूपाच्या असतील. नोकरीत अनुकूलता वाढेल. अपेक्षेपेक्षा जास्त चांगल्या बाबी घडलेल्या निदर्शनास येतील. कुटुंबातील मुला-मुलींना चांगले यश मिळेल. प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल चालली असलेली दिसेल. आपल्या रोजच्या कामकाजात इतरांची मदत मिळू शकते. व्यवसाय-धंदा, नोकरी इत्यादींमध्ये भाग्यकारक घटना घडतील. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. कुटुंबातील वातावरण उत्साही आणि आनंदी राहील. प्रवासाचे योग. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाहाच्या संबंधातील घडामोडी वेगवान होतील.नोकरीत प्रगतीमकर : व्यवसाय-धंदा, नोकरी यामध्ये आपल्या रोजच्या कामाच्या व्यतिरिक्त नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. अर्थातच त्या एक आव्हान म्हणून स्वीकारा. सकारात्मक दृष्टिकोन फायदेशीर ठरेल. नोकरीत प्रगतीबरोबरच बदलीची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या वाढतील. कार्यक्षेत्र विस्तार होईल. सरकारी क्षेत्रात कार्य करणाऱ्यांच्या अधिकारातही वाढ होईल; परंतु आपल्या अधिकार कक्षेतच कार्य करा. व्यवसायात तसेच नोकरीत स्पर्धक बलवान होऊ शकतात. तसेच लहान-मोठ्या प्रलोभनांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. कुटुंबात किरकोळ कारणावरून वादावादी होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. या भावंडांची विचारपूस करा.आर्थिक व्यवहारात दक्षताकुंभ : व्यवसाय-धंद्यात अंदाज चुकण्याची शक्यता आहे. लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. इतरांवर जास्त भरोसा ठेवण्यात नुकसान होऊ शकते. नवीन गुंतवणूक करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला मोलाचा ठरेल. नोकरीत अनुकूलता वाढेल. जोडीदाराची साथ राहील. आर्थिक आवक समाधानकारक राहील. नोकरी अधिकारात वाढ होईल, पण राजकारण आणि गटबाजीपासून अलिप्त राहा. काहींना प्रवासाच्या योगाची शक्यता जाणवते. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करणे फायदेशीर राहील. कुसंगती टाळा. धार्मिक कार्यात पुढाकार घ्याल. नातेवाईक-आप्तेष्ट यांचे संबंध सुधारतील. महत्त्वाची कामे करा.महत्त्वाचे व्यवहार होतीलमीन : जमीनजुमला, स्थावर याविषयीचे व्यवहार जे थांबलेले होते ते गतिमान होऊन पूर्णत्वाच्या मार्गावर राहतील. वडिलोपार्जित संपत्ती, स्थावर मिळकत याबाबतचे वाद-विवाद संपुष्टात येतील. आर्थिक परिस्थिती चांगली होईल. नवीन वाहन खरेदीचे योग. कोणत्याही व्यवहाराबाबतच्या कागदपत्रांवर काळजीपूर्वक वाचून सही करा. घाईगर्दीतील निर्णय नुकसानीस आमंत्रण देऊ शकतात. काहींना प्रवासाचे योग. कुटुंबातील वातावरण चांगले राहून जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. प्रवास घडते; परंतु प्रवासात खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील.
Tejashwi Yadav :बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राजदने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज २०२६ च्या पहिल्या मन की बात कार्यक्रमात देशाला संदेश दिला.
Amit Shah : अमित शहा यांचा नांदेड दौरा रद्द; नेमकं काय घडलं? चर्चांना उधाण
Amit Shah : नांदेडमध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त ‘हिंदी दी चादर’ या विशेष कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार होते.
जाणून घ्या कशी असेल ७७ व्या प्रजासत्ताक दिनाची परेड ?
नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार २६ जानेवारी २०२६ रोजी राजधानी नवी दिल्लीत कर्तव्य पथावर परेड अर्थात संचलन होणार आहे. या परेडच्या माध्यमातून देशाचे सामर्थ्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा, प्रगती, लष्करी पराक्रम यांचे प्रतिबिंब दिसेल.यंदाच्या परेडमध्ये भैरव लाईट कमांडो बटालियनचे पदार्पण होणार आहे. परेडमध्ये रिमाउंट अँड व्हेटर्नरी कॉर्प्सने प्रशिक्षित केलेली प्राण्यांची तुकडी दिसेल. ऑपरेशन सिंदूर आणि भारताच्या वाढत्या लष्करी सामर्थ्याची झलक दिसेल. 'स्वातंत्र्याचा मंत्र : वंदे मातरम् आणि समृद्धीचा मंत्र : आत्मनिर्भर भारत ' या संकल्पनेअंतर्गत कर्तव्य पथावर ३० चित्ररथ आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. आसामची टेराकोटा कला, मणिपूरची कृषी प्रगती आणि हिमाचल प्रदेशची देवभूमी म्हणून असलेली ओळख यासह राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून १७ चित्ररथांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होईल. तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारितील विविध विभागांशी संबंधित अशा १३ चित्ररथांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होईल. बंकिमचंद्र चटर्जींची रचना असलेले भारताचे राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्' ला दिडशे वर्ष झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय विशेष चित्ररथ घेऊन परेडमध्ये सहभागी होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाची पाहणी करतील.चित्ररथांच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे, सांस्कृतिक विविधतेचे आणि विविध क्षेत्रांमधील स्वावलंबनाकडे होणाऱ्या प्रगतीचे दृश्य वर्णन सादर केले जाईल. या चित्ररथात भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा वारसा, सांस्कृतिक विविधता आणि समकालीन कामगिरीचे मिश्रण सादर केले जाईल, ज्यामध्ये हस्तकला आणि लोक परंपरांपासून ते स्वावलंबन, नवोन्मेष, संरक्षण तयारी आणि राष्ट्र उभारणी उपक्रमांपर्यंतच्या विषयांचा समावेश असेल.परेडमध्ये सैनिकांच्या तुकड्या सहभागी होतील. लष्करी बँड पथके आकर्षक धून वाजवत परेडमध्ये सहभागी होतील. तसेच परेडमधून ऑपरेशन सिंदूर आणि भारताच्या वाढत्या लष्करी सामर्थ्याची झलक दिसेल. सैन्याच्या तिन्ही दलांमधील समन्वय दाखवला जाईल.प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला , राष्ट्रपती मुर्मू रविवार, २५ जानेवारी रोजी राष्ट्राला संबोधित करतील. हे भाषण देशभरातील संपूर्ण आकाशवाणी नेटवर्कवर संध्याकाळी ७ वाजता प्रसारित केले जाईल आणि सर्व दूरदर्शन वाहिन्यांवर हिंदीमध्ये प्रसारित केले जाईल, त्यानंतर इंग्रजी आवृत्ती प्रसारित केली जाईल. त्यानंतर संध्याकाळी दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या प्रादेशिक नेटवर्कवर प्रादेशिक भाषेतील प्रसारणे प्रसारित केली जातील.युरोपियन कौन्सिलचे प्रेसिडेंट अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन युनियनच्या प्रेसिडेंट उर्सुला वॉन डेर लेयन हे २०२६ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. परंपरेनुसार, राष्ट्रध्वज फडकवला जाईल, त्यानंतर राष्ट्रगीत आणि स्वदेशी १०५-मिमी लाईट फील्ड गन वापरून २१ तोफांची सलामी दिली जाईल. दरवर्षीप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन लाल किल्ल्यावर येतील. राष्ट्रपती, विशेष आणि पंतप्रधान आणि इतर मान्यवर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत परेड होणार आहे.जागतिक अॅथलेटिक पॅरा चॅम्पियनशिपचे विजेते, नैसर्गिक शेती करणारे शेतकरी, पीएम स्माइल योजनेअंतर्गत पुनर्वसन केलेले ट्रान्सजेंडर आणि भिकारी, गगनयान, चांद्रयान इत्यादी अलीकडील इस्रो मोहिमांमध्ये सहभागी असलेले सर्वोत्तम कामगिरी करणारे शास्त्रज्ञ/तांत्रिक व्यक्ती, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनमध्ये SIGHT (स्ट्रॅटेजिक इंटरव्हेंशन फॉर ग्रीन हायड्रोजन ट्रान्झिशन) कार्यक्रमांतर्गत हायड्रोजन उत्पादन आणि इलेक्ट्रोलायझर उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळालेल्या कंपन्यांचे प्रमुख/सीईओ आणि प्रमुख प्रकल्पांमध्ये काम करणारे डीआरडीओचे सर्वोत्तम कामगिरी करणारे शास्त्रज्ञ/तांत्रिक व्यक्ती आदी दहा हजार मान्यवर पाहुण्यांना परेड बघण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.खबरदारीचा उपाय म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. महत्त्वाच्या तसेच संवेदनशील ठिकाणी कसून तपासणी सुरू आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे घडामोडींवर लक्ष ठेवले जाईल. परेड मार्गावर १,००० हून अधिक हाय-डेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत आणि रिअल-टाइम मॉनिटरिंगसाठी फेशियल रेकग्निशन सिस्टम पण सक्रीय केली आहे. दिल्ली पोलीस संभाव्य धोके शोधून त्या विरोधात कारवाईसाठी AI चा वापर करणार आहेत. दिल्लीत ठिकठिकाणी सीसीटीव्ही नियंत्रण कक्षांची स्थापना केली आहे. दिल्ली पोलीस, निमलष्करी दल आणि विशेष युनिट्सचा समावेश असलेले बहुस्तरीय सुरक्षा ग्रिड चोख बंदोबस्त ठेवणार आहे. कर्तव्य पथ आणि लगतच्या भागात वाहतूक निर्बंध आणि नियंत्रित क्षेत्रे लागू केली जातील, नागरिकांसाठी सूचना जारी केल्या जातील. दिल्ली मेट्रो तसेच दिल्लीतील रस्ते मार्गांवरील वाहतुकीत बदल केला जाईल. या बदलांच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.परेड सकाळी साडेनऊ वाजता सुरू होईल, ज्याचे लाईव्ह टेलिव्हिजन कव्हरेज सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल. प्रवेशद्वार सकाळी ७ वाजता उघडतील. २९ भारतीय हवाई दलाच्या विमानांच्या फ्लायपास्टने उत्सवाचा समारोप होईल. उल्लेखनीय म्हणजे, या वर्षी भारतीय हवाई दल (IAF) प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सिंदूर फॉर्मेशन दाखवेल. या फॉर्मेशनमध्ये दोन राफेल जेट, दोन SU-३० विमान, दोन मिग-२९ लढाऊ विमान आणि एक जग्वार लढाऊ विमान असेल. तर अडीच हजार सांस्कृतिक कलाकार कर्तव्य पथावर सादरीकरण करतील.पहिल्यांदाच, भारतीय सैन्याच्या रिमाउंट अँड व्हेटर्नरी कॉर्प्सने प्रशिक्षित केलेल्या प्राण्यांची तुकडी परेडमध्ये सहभागी होणार आहे. यात दोन बॅक्ट्रियन उंट, चार झंस्कर घोडे, चार राप्टर, दहा भारतीय जातीचे लष्करी कुत्रे आणि आधीच सेवेत असलेले सहा पारंपारिक लष्करी कुत्रे असतील, जे लडाख आणि सियाचीन सारख्या अत्यंत उंच प्रदेशात प्रभावी कामगिरी करतात. डीआरडीओ लांब पल्ल्याचे जहाजविरोधी हायपरसोनिक क्षेपणास्त्र, पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्र तसेच आधुनिक नौदल तंत्रज्ञानाचे सादरीकरण करणार आहे. अग्निवीर भारतीय हवाई दलाच्या मार्चिंग बँडचा भाग म्हणून सहभागी होतील. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महिला अग्निवीर बँड सादरीकरणात भाग घेणार आहेत. एकूण ६६ अग्निवीर परेडमध्ये सहभागी होणार आहेत. यातील नऊ अग्निवीर वाद्यवृंद पथकात असतील.परेडनंतर, २६ ते ३१ जानेवारी दरम्यान लाल किल्ल्यावर 'भारत पर्व' हा सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे. यात देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा बघायला मिळेल. प्रजासत्ताक दिनाशी संबंधित फोटो, व्हिडीओ बघता येतील. प्रादेशिक पाककृती, हस्तकला, सांस्कृतिक सादरीकरणे यांचा आनंद घेता येईल. प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा समारोप २८ जानेवारी रोजी होणार आहे.
US Immigration Agents : आणखी एका अमेरिकन नागरिकाची हत्या ; इमिग्रेशन एजंट्सनी झाडल्या गोळ्या
US Immigration Agents : अमेरिकेतील मिनियापोलिसमध्ये इमिग्रेशन एजंट्सनी ३७ वर्षीय नागरिकावर गोळीबार केला आहे.
Navneet Rana : फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा होईल, असे विधान करून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वादात भर घातली आहे. यावरून राजकारण तापले असून, भाजपच्या नवनीत राणा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Mouni Roy Harassment : अभिनेत्री मौनी रॉयने हरियाणातील एका कार्यक्रमादरम्यान तिच्यासोबत प्रेक्षकांमधील काही व्यक्तींनी अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप केला आहे.
मुंबईत दिंडोशी मनपा वसाहतीत दूषित आणि पिवळसर पाण्याचा पुरवठा
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 'पी पूर्व' (P-East) विभागांतर्गत येणाऱ्या गोरेगाव (पूर्व) येथील दिंडोशी मनपा वसाहत परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत दूषित आणि पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.पिण्याच्या पाण्यात गटाराचे पाणी ?दिंडोशी मनपा वसाहतीतील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी नळाला येणारे पाणी अत्यंत गढूळ आणि पिवळसर रंगाचे असते. पाण्याला उग्र वास येत असून, हे पाणी पिण्यासाठी तर सोडाच, पण दैनंदिन वापरासाठीही अयोग्य असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. जलवाहिनीमध्ये गटाराचे पाणी मिसळले जात असल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.नागरिकांमध्ये भीती आणि संतापदूषित पाण्यामुळे परिसरात काविळ, टायफॉइड आणि जुलाबासारखे जलजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. आम्ही नियमित पाणीपट्टी भरतो, तरीही आम्हाला विषारी पाणी का? असा संतप्त सवाल येथील गृहिणी आणि नागरिक विचारत आहेत.प्रशासनाकडे मागणी'पी पूर्व' विभाग कार्यालयाने तातडीने जलवाहिन्यांची तपासणी करावी, गळती दुरुस्त करावी आणि परिसरात शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी आग्रही मागणी दिंडोशी मनपा वसाहतीतील नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित पावले न उचलल्यास मनपा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही साद प्रतिसाद मृणाल कट्ट्याच्या वतीने दिला आहे.
Pune News : प्रभागाचा विकास करून मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू; नगरसेविका सारिका घुलेंचे आश्वासन
Pune News : मतदारांचे आभार मानत, प्रभाग क्रमांक १५ च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित नगरसेविका सारिका अमित घुले यांनी सांगितले.
मुंबईत रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकाची चाकू भोसकून हत्या
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर मालाड स्टेशनवर शनिवारी रात्री ३१ वर्षांच्या प्राध्यापक आलोक सिंह यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना मालाड स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर घडली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी ओंकार शिंदे (२७) याला अटक केली आहे.ट्रेनमधून उतरताना धक्का लागल्यावरुन वाद झाला आणि ओंकारने प्राध्यापक आलोक सिंह यांची चाकू भोसकून हत्या केली. पोलिसांनी प्राध्यापकाच्या हत्येप्रकरणी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. सध्या आरोपीची बोरिवली पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला होता. पोलिसांनी आरोपीला वसई स्टेशनवरुन अटक केली. फक्त ट्रेनमधून उतरताना धक्का लागला म्हणून ओंकारने हत्या केली की या हत्येमागे वेगळे कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत. प्राध्यापकाच्या हत्येप्रकरणी आरोपी विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.कोण होते प्राध्यापक आलोक सिंह ?नरसी मोनजी कॉलेज, विलेपार्ले येथे २०२४ पासून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. स्वभावाने शांत, दयाळू आणि सभ्य होते.वाद करणे, म्हणणे पटवून देण्यासाठी युक्तिवाद करत बसणे असा आलोक यांचा स्वभाव नव्हता. ते साधे होते आणि कोणावरही कधी संतापत नव्हते; अशी माहिती त्यांना ओळखणाऱ्यांनी दिली आहे.आलोक सिंह शनिवार २४ जानेवारी २०२६ रोजी रात्री विलेपार्ले स्टेशनवरुन बोरिवलीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले. मालाड स्टेशनवर आलोक यांची हत्या झाली.आलोक यांचे काकाही प्राध्यापक होते. जेमतेम दोन वर्षांपूर्वी आलोक यांचे लग्न झाले होते. पण शनिवारी घडलेल्या घटनेमुळे आलोक यांच्या नातलगांना जबर धक्का बसला आहे.
Imtiaz Jaleel Statement : सहर शेख यांच्या विधानाचे एमआयमचे नेते, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी समर्थन केले. तसेच 'मुंब्राच काय आम्ही सबंध महाराष्ट्र हिरवा करू,' असे विधान जलील यांनी केले.
US-Greenland Tensions : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपशी संबंधित प्रस्तावित कर तात्पुरते स्थगित केले आहेत, परंतु ग्रीनलँडमधील त्यांची आवड कायम आहे.
मुलीला अंक लिहिता आले नाही म्हणून पित्याकडून बेदम मारहाण!
चार वर्षांच्या मुलीचा दु:खद अंतहरियाणा : हल्ली पालकांकडूनच मुलांवर शिक्षणाच्या बाबतीत अतिरिक्त ताण टाकला जातो. मुलांच्या खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांच्यावर शिक्षणाचा भार टाकला जातो. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये असेच एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. १ ते ५० अंक लिहिता आले नाहीत म्हणून वडिलांनी केलेल्या मारहाणीत चार वर्षीय मुलीचा दुःखद मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले आहे.फरीदाबादच्या सेक्टर ५८ मधील पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनंतर आरोपी कृष्णा जयस्वाल (३१) याला अटक करण्यात आली आहे. शहरातील न्यायालयात त्याला हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील खेरतिया गावचा रहिवासी असलेला जयस्वाल आपल्या कुटुंबासह फरीदाबादमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांनी सांगितले की, जयस्वाल आणि त्यांची पत्नी दोघेही खासगी कंपनीत नोकरी करत होते. आई दिवसा कामावर जायची. तर जयस्वाल रात्रपाळी करायचा दरम्यान दिवसा मुलांची काळजी घेणे आणि त्यांचा अभ्यास करून घेण्याचे काम जयस्वाल करत असे.सदर घटना २१ जानेवारी रोजी घडली. पोलिसांनी सांगितले की, जयस्वालने मुलीला एक ते ५० पर्यंतचे अंक लिहिण्यास सांगितले. मात्र मुलीला अंक लिहिता आले नाहीत. त्यामुळे जयस्वालने मुलीला जबर मारहाण केली. लाटण्याने मारून मुलीला भिंतीवर आपटल्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. मुलीला मारहाण केल्यानंतर आरोपी वडील तिला रुग्णालयात घेऊन गेला. त्याने त्याची पत्नी रंजिताला सांगितले की, मुलगी खेळताना पायऱ्यांवरून खाली पडली. मात्र घटनेच्या वेळी त्याचा सात वर्षांचा मुलगा घरीच होता. त्याने आईला सर्व हकीकत सांगितली आणि वडिलांच्या कृत्याची माहिती उघड झाली. मुलीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या, त्यानंतर पत्नी रंजिताने याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रुग्णालयालाही हीच बाब आरोपी वडिलांनी सांगितली होती.
शिरगाव जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार मोहिमेचा धडक्यात शुभारंभ
कार्यकर्त्यांचा एकजुटीने मोठ्या विजयाचा निर्धारशिरगांव : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, देवगड तालुक्यातील शिरगाव जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार मोहिमेचा शुभारंभ धडक्यात करण्यात आला. शिरगावची ग्रामदेवता श्री देवी पावणाई देवालयात श्रीफळ वाढवून आणि गाऱ्हाणे घालून या मोहिमेची अधिकृत सुरुवात झाली. या प्रसंगी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने मोठ्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.या निवडणुकीत शिरगाव जिल्हा परिषद गटातून देवदत्त दामोदर कदम, शिरगाव पंचायत समिती गणातून शितल सुरेश तावडे आणि तळवडे पंचायत समिती गणातून सलोनी संतोष तळवडेकर हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. आपल्या लाडक्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता कंबर कसली आहे.प्रचार शुभारंभ प्रसंगी भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मिलिंद साटम, अमित साटम, सुभाष नार्वेकर, दाजी राणे, राजू शेट्ये, मंगेश लोके, शैलेंद्र जाधव, नाना तावडे, सुनील कांडर, सुभाष थोरबोले, सत्यवान कदम, रवींद्र पवार, परशुराम पवार, देवेंद्र पवार, अरविंद पवार, अजित परब, वैभव भाटकर, रोहन तावडे, केतन धुळप, बंडू माने, महेश मेस्त्री, वसंत साटम, उल्हास परब, विश्वनाथ परब, रत्नदीप कुवळेकर, अमित घाडी, पंकज दुखडे, महेश पवार, ओमकार तावडे, गोपीनाथ तावडे, युधी राणे, प्रसाद तावडे, सचिन तळवडेकर, किशोर तळवडेकर, अपूर्वा तावडे, दीप्ती तावडे, प्रल्हाद तावडे, भिकाजी राणे, सुनील गावडे, श्वेता शिवलकर, सुनील वळंजू, सुदर्शन साळकर, ऋषिकेश कांडर यांच्यासह शिरगाव जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sindhudurg District : भाजपचा बिनविरोध पॅटर्न कायम! निवडणुकीपूर्वीच उधळला विजयाचा गुलाल
Sindhudurg District : महापालिका निवडणुकीत भाजपचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही हा पॅटर्न कायम असून, सिंधूदुर्ग जिल्ह्यात एकूण ११ उमेदवार निवडणुकीपर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.
Mumbai Crime News : मुंबईतील धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून, रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
US Winter Storm : अमेरिकेत हिमवादळामुळे कहर ; वीजपुरवठा खंडित, १३,००० उड्डाणे रद्द
US Winter Storm : अमेरिकेत हिमवादळ आले आहे. ज्यामुळे देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वीज वितरण क्षेत्राची कामगिरी राज्यभर सुधारली
राष्ट्रीय स्तरावर ऊर्जा क्षेत्र जास्त नफाक्षममुंबई : वीज वितरण कंपन्यांच्या चौदाव्या वार्षिक एकात्मिक क्रमवारी आणि मानांकन यादीमध्ये भारतातील वीज वितरण क्षेत्राच्या कामगिरीची सातत्यपूर्ण वाढ अधोरेखित केली आहे. ॲनालिटिक्स व डिजिटल तपशिलासह होत असलेले कामकाज तसेच सातत्यपूर्ण सुधारणा या सर्वांमुळे कार्यक्षमता, दर्जेदार सेवा आणि चांगली आर्थिक कामगिरी साधली गेली आहे.अखिल भारतीय स्तरावर मानांकित वीज वितरण कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२५ मध्ये अत्यंत सकारात्मक असा २,७०१ कोटी रुपये करोत्तर नफा नोंदवला आहे. अशाप्रकारे पहिल्यांदाच हे क्षेत्र लागू असलेल्या पद्धतीने (ॲक्रूवल) नफ्यात आले आहे. त्यापूर्वीच्या म्हणजे २०२४ या आर्थिक वर्षात या क्षेत्राला २७,०२२ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. या क्षेत्रात केलेल्या पायाभूत सुधारणा, सुधारलेली आर्थिक शिस्त आणि तंत्रज्ञानावर आधारित कामकाजावरील नियंत्रण या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून हा बदल झाला आहे.अदाणी इलेक्ट्रिसिटीने त्यांचे ए प्लस हे राष्ट्रीय मानांकन कायम ठेवले आहे. त्यातून त्यांची प्रत्येक वर्षीची, कामकाजातील, आर्थिक बाबींमधील आणि प्रशासकीय मापदंडामधील सातत्यपूर्ण आणि उत्तम कामगिरी दिसून येते. देशातील अग्रगण्य वीज वितरण कंपनी आणि मुंबईतील प्राथमिक वीज पुरवठ्याचा प्रमुख पर्याय, या अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या स्थानावर या अहवालामुळे शिक्कामोर्तब झाले. अदानी इलेक्ट्रिसिटीचा भर, आपल्या यंत्रणेत किरकोळ प्रासंगिक सुधारणा करण्यापेक्षा आपल्या कामकाजात संस्थात्मक कामकाजाची शिस्त आणि विश्वासार्हता आणणे तसेच देशाच्या नागरी वितरण क्षेत्रातील मापदंड स्थापन करणारी कंपनी म्हणून आपली भूमिका सिद्ध करणे, हाच असल्याचे दिसून येते.बीईएसटीने या मानांकन चक्रात चांगली सुधारणा दाखवली असून त्यांना ए प्लस मानांकन मिळाले आहे. त्यायोगे त्यांच्या कामकाजाच्या सर्व मापदंडात त्यांनी चांगलीच वाढ दाखवल्यचे दिसून येत आहे. या अहवालानुसार डिजिटल तपशिलावर आधारित तसेच ॲनालिटिक्सवर आधारित कामकाज आणि स्मार्ट मीटरिंग पद्धती, या बाबींमुळे त्यांना सांगली कामगिरी करण्यास सहाय्य मिळाले आहे. बीएसटी च्या कामकाजातून हे दिसून येते की स्मार्ट मीटर तैनात करण्यावर भर दिल्यामुळे तसेच ॲनालिटिक्सच्या सहाय्याने केलेल्या कामकाजामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीची कार्यक्षमता, बिलिंग मधील अचूकता आणि सेवा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढते.एमएसईडीसीएलने केलेल्या सुधारणा तसेच आधुनिक तंत्रज्ञान आणल्यामुळे त्यांच्या कामकाजात त्वरेने आणि दिसून येण्याजोग्या सुधारणा झाल्या व त्याचा चांगला परिणाम त्यांच्या मोठ्या ग्राहक वर्गावर झाला. आव्हाने कायम असताना स्मार्ट मीटरिंगमध्ये केलेली सातत्यपूर्ण वाढ आणि डिजिटल तपशिलाच्या साह्याने केलेल्या कामकाजामुळे सध्याचा नफा कायम ठेवण्यास आणि नंतर तो वाढवण्यास साहाय्य होईल.टाटा पॉवरने या सध्याच्या मानांकन चक्रात भाग घेतला नाही आणि त्यामुळे त्यांच्या कामगिरीचे परीक्षण झाले नाही. या अहवालातून दिसलेले राज्यातील चित्र हे एकंदर राष्ट्रीय परिस्थितीशी सुसंगतच आहे. येथे सुधारणांमधील सातत्य, कामकाजातील शिस्त आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या सर्वांमुळे वीज वितरण क्षेत्रात दीर्घकाळ टिकणारे बदल होत आहेत. वीज वितरण कंपन्यांच्या चौदाव्या राष्ट्रीय एकात्मिक मानांकनाबाबत अदानी इलेक्ट्रिसिटीची प्रतिक्रियाया वर्षात देखील आम्हाला अग्रगण्य स्थान मिळणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण त्यातून मुंबईकर तसेच देशभरातील ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास दिसतो. मुंबईकरांची सेवा करण्याचे हे आमचे शंभरावे वर्ष असताना आम्ही शहरवासीयांच्या हातात हात घालून चालत आहोत. शहरातील घरे उजळून टाकण्यासाठी, रुग्णालयांना ऊर्जा देण्यासाठी आणि हे शहर चालते बोलते ठेवण्यासाठी आम्ही शांतपणे पण ठामपणे काम करीत आहोत. ही मान्यता म्हणजे आमच्या शिरपेचातील आणखीन एक मानाचा तुरा असून त्याचे सर्व श्रेय आमच्या ग्राहकांना आणि आमच्या कर्मचाऱ्यांना जाते, जे खरेखुरे मुंबईकर आहेत.
प्रजासत्ताक दिनाला जोडून सुट्ट्यांमुळे महाराष्ट्र, गोव्यातील बस आरक्षणात वाढ
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या लाँग विकेंडमुळे महाराष्ट्र आणि गोव्यातील आंतरशहरी बस प्रवासात लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. रेडबसकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, या कालावधीत महाराष्ट्र आणि गोव्यातील बस बुकिंगमध्ये ४६ टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हे विश्लेषण २०२६ मध्ये २३ ते २६ जानेवारी या कालावधीत करण्यात आलेल्या बुकिंग्सची तुलना मागील वर्षीच्या २४ ते २७ जानेवारी २०२५ या कालावधीतील बुकिंग्सशी करून सादर करण्यात आले आहे. या आकडेवारीवरून लाँग विकेंडदरम्यान प्रवासासाठी बस हे माध्यम प्रवाशांच्या प्राधान्यक्रमात कायम असल्याचे स्पष्ट होते.प्रजासत्ताक दिनाच्या कालावधीत प्रवासाची मागणी वाढत असताना, रेडबसतर्फे ८ ते २६ जानेवारी या कालावधीत ‘डिस्कव्हर भारत सेल’ सुरू करण्यात आला आहे. या कालावधीत भारतभरातील प्रवासाचे पर्याय २९९ रुपये प्रति सीट या दरापासून उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सवलतीच्या कालावधीत बस, रेल्वे आणि हॉटेल बुकिंगवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत असून, निवडक बँका आणि पेमेंट भागीदारांमार्फत अतिरिक्त बचतीचे पर्यायही उपलब्ध आहेत.रेडबसच्या व्यासपीठावरील बुकिंगनुसार, गोवा-पुणे, पुणे-हैदराबाद, मुंबई-हैदराबाद, पुणे-नागपूर, पुणे-मुंबई, नागपूर-पुणे आणि मुंबई-पुणे हे मार्ग या कालावधीत अधिक मागणीचे ठरत असल्याचे दिसून येते. तसेच, पुण्यातील वाकड आणि स्वारगेट, गोव्यातील मापुसा आणि आशीर्वाद थिएटर, तसेच मुंबईतील बोरिवली पूर्व ही बसमध्ये चढण्यासाठी प्रमुख ठिकाणे असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. प्रवाशांच्या प्राधान्यक्रमाचा विचार करता, एकूण बुकिंगपैकी ८४ टक्के बुकिंग वातानुकूलित बसेससाठी करण्यात आली आहेत, तर उर्वरित बुकिंग नॉन-एसी बसेससाठी आहेत. यावरून आगाऊ आरक्षण करताना प्रवासी अधिक आरामदायी पर्यायांना पसंती देत असल्याचे स्पष्ट होते. याचप्रमाणे, ८९ टक्के प्रवाशांनी स्लीपर बसचा पर्याय निवडला असून, उर्वरित प्रवाशांनी सीटर सेवा स्वीकारली आहे. सुट्टीच्या काळात रात्रीच्या प्रवासाकडे प्रवाशांचा वाढता कल असल्याचे यातून दिसून येते. प्रवाशांच्या आकडेवारीनुसार, बस बुकिंगमध्ये पुरुष प्रवाशांचे प्रमाण ६८ टक्के असून महिला प्रवाशांचे प्रमाण ३२ टक्के आहे. शहरनिहाय पाहता, प्रथम श्रेणी महानगरांमधून ४८ टक्के प्रवासी प्रवास करत असल्याचे दिसून येते, तर द्वितीय श्रेणी शहरांमधून २२ टक्के आणि तृतीय श्रेणी शहरे तसेच ग्रामीण भागातून ३० टक्के प्रवासी बस प्रवास करत आहेत. यावरून प्रवासाची मागणी अधिक असल्याचे शहरांमधील बाजारपेठही हळूहळू विस्तारत असल्याचे चित्र स्पष्ट होते.
पाकिस्तानात लग्नमंडपात आत्मघाती हल्ला; ७ ठार
इस्लामाबाद : पाकिस्तानमधील डेरा इस्माइल खान जिल्ह्यात एका लग्नसमारंभात भीषण आत्मघाती हल्ला झाला. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. पाकिस्तानमधील नेते नूर मेहसूद यांच्या घरी लग्नसमारंभात ही घटना घडली. यावेळी हल्लेखोराने स्वतःला स्फोटकांनी उडवून दिले. अचानक झालेल्या हल्ल्याने सगळ्यांना धक्का बसला. यावेळी नूर मेहसूद यांच्या घराचंही नुकसान झालं. तसेच ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले. स्थानिक पोलीस प्रमुख आदनान खान यांनी या घटनेची पुष्टी केली. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
चीनची लोकसंख्या वर्षभरात ४० लाखांनी घटली; वृद्धांची संख्या वाढली
बँकॉक : कुटुंबनियोजनासारख्या योजना राबविल्याने आता चीनसमोर लोकसंख्येबाबत नवेच संकट उभे राहिले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये देशाची लोकसंख्या अंदाजे ४ दशलक्षने (३.३९ दशलक्ष) कमी होऊन १.४०५ अब्ज झाली आहे. ही घट २०२४ पेक्षा मोठी आहे. चीनच्या लोकसंख्येत घट झाल्याचे हे सलग चौथे वर्ष आहे. चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोने (एनबीएस) सोमवारी हे आकडे जाहीर केले आहेत.चीनमध्ये लिंगगुणोत्तरात मोठी तफावत निर्माण झाली आहे. तसेच कुटुंबाच्या जबाबदारीपासून मुक्त राहावे, यासाठी तरुण पिढी विवाह करण्यास घाबरत आहे. २०२५ मध्ये चीनची लोकसंख्या सलग चौथ्या वर्षी घटली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जन्मदर विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला असून मृत्युदर वाढला आहे. वेगाने वृद्धांची संख्या आणि घटत्या विवाहांमुळे येत्या काळात ही घट आणखी वाढू शकते, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. २०२५ मध्ये एकूण जन्मांची संख्या ७.९२ दशलक्ष झाली, जी २०२४ मध्ये ९.५४ दशलक्ष जन्मांपेक्षा सुमारे १७ टक्के कमी आहे. चीनचा जन्मदर दर १००० लोकांमागे ५.६३ पर्यंत घसरला, जो आतापर्यंतचा सर्वात कमी स्तर आहे. एका लोकसंख्याशास्त्रज्ञाने सांगितले की, २०२५ मध्ये नोंदवलेल्या जन्मांची संख्या १७३८ च्या पातळीइतकी आहे, जेव्हा चीनची एकूण लोकसंख्या फक्त १५० दशलक्ष होती. दरम्यान, २०२५ मध्ये मृत्यूची संख्या वाढून ११.३ दशलक्ष झाली, जी २०२४ मध्ये १०.९ दशलक्ष होती. चीनचा मृत्युदर दर १००० लोकांमागे ८.०४ होता, जो १९६८ नंतरचा सर्वाधिक आहे.देशाची वृद्धावस्थेकडे वाटचालचीन वेगाने वृद्ध होत आहे. चीनच्या एकूण लोकसंख्येपैकी अंदाजे २३ टक्के लोक आता ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. असा अंदाज आहे की २०३५ पर्यंत ही संख्या ४० कोटींपर्यंत पोहोचेल, जी अमेरिका आणि इटलीच्या एकत्रित लोकसंख्येइतकी आहे. ही परिस्थिती चीनच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम करत आहे. मोठ्या संख्येने लोक काम सोडून जात आहेत, तर पेन्शन आणि सामाजिक सुरक्षा बजेटवर वाढता दबाव आहे. म्हणूनच चीनने निवृत्तीचे वय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

25 C