सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास
कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा उद्देश नागरिकांना यूपिआय व नेट बँकिंगचा सुरक्षित वापर, ओटीपी व लिंक फ्रॉडपासून संरक्षण, बनावट कॉल-मेसेज ओळखणे, सोशल मीडिया सुरक्षितता, पासवर्ड संरक्षण तसेच चाटजीपीटी सारख्या एआय साधनांचा योग्य वापर याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन देणे हा आहे.या डिजिटल साक्षरता प्रवासाची सुरुवात एनएसएस शिबिरांतर्गत रुंदे व अंबिवली गावात करण्यात आली. या ठिकाणी शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष मोबाईल वापरून युपिआय सेट-अप, फसव्या लिंक कशा ओळखायच्या, कॉल फ्रॉडची उदाहरणे, सायबर फसवणूक झाल्यास कुठे व कशी तक्रार करावी, तसेच फोन हरवल्यास घ्यावयाची तत्काळ पावले याची माहिती देण्यात आली. यानंतर काळा तलाव, कल्याण (पश्चिम) येथे सकाळी दोन सत्रांमध्ये सायबर जागरूकता उपक्रम राबविण्यात आला. येथे नागरिकांशी थेट संवाद साधत क्यूआर कोड स्कॅम, ओटीपी शेअरिंगचे धोके, सोशल मीडिया हॅकिंगपासून संरक्षण, सुरक्षित पासवर्ड तयार करण्याच्या पद्धती तसेच चाटजीपीटी सारख्या आधुनिक एआय साधनांचा शैक्षणिक व दैनंदिन जीवनातील उपयोग सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आला.पुढील टप्प्यात डी मार्ट, वसंत व्हॅली, खडकपाडा तसेच राणी लक्ष्मीबाई उद्यान, सिंडिकेट परिसरात नागरिकांसाठी सायबर जागरूकता सत्रांचे आयोजन करण्यात आले. बाजारपेठ व सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना युपीआय व्यवहार करताना आवश्यक खबरदारी, बनावट अॅप्स व लिंक ओळखणे, फोन हरवल्यास घ्यावयाची तात्काळ पावले, तसेच “सायबर सेफ्टीच्या सात सवयी” प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगण्यात आल्या.या सर्व उपक्रमांदरम्यान सायबर दृष्टी सेलच्या टीमने लाईव्ह डेमो, प्रश्नोत्तर सत्र, प्रत्यक्ष केस-स्टडी उदाहरणे आणि वैयक्तिक मार्गदर्शन देत नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यामुळे नागरिकांना केवळ माहितीच नव्हे तर प्रत्यक्ष वापरात येणारे उपाय मिळाले. या मोहिमेचे नेतृत्व विद्यार्थी समन्वयक लक्ष्मी सिंह व प्रसाद जावळे यांनी केले. मुख्य कार्यसंघात दिव्या नायर, प्राची चौहान, यशराज गायकवाड, मुरतझा सेवक, वेदांग सगभोर, वेदिका केणी, सेजल भिलारे, प्रांशू मिश्रा, अथर्व जाधव, सुभश्री पाधी, आदित्य मिश्रा तसेच इतर विद्यार्थ्यांनी विशेष योगदान दिले. या उपक्रमांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बिपिनचंद्र वडेकर व शिक्षक समन्वयक डॉ. रुपेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी डिजिटल सुरक्षितता ही आजच्या काळाची गरज असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. या मोहिमेमुळे अनेक नागरिकांमध्ये डिजिटल व्यवहारांबाबत आत्मविश्वास निर्माण झाला असून सायबर फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक सजगता वाढल्याचे सहभागी नागरिकांनी सांगितले.भविष्यात सायबर दृष्टी सेलकडून ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून पुढील टप्प्यात पोलीस स्टेशन, उल्हासनगर, वसिंद, आसनगाव, केडीएमसी परिसर, हिवरे बाजार, टिटवाळा मंदिर परिसर, शहरी वसाहती तसेच ग्रामीण समुदायांमध्ये डिजिटल साक्षरता व सायबर जागरूकतेचे उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम म्हणजे नागरिकांना डिजिटल जगात सुरक्षित, सजग आणि आत्मनिर्भर बनविण्याचा प्रभावी सामाजिक प्रवास असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
मुंबई : अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ताकेंद्र, नेतृत्व आणि प्रतिनिधित्व याबाबत महत्त्वाच्या घडामोडींना वेग आला आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर पुत्र पार्थ पवार यांची वर्णी लागू शकते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याचबरोबर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीही नव्या नावांवर मंथन सुरू झाले आहे.सुनेत्रा पवार यांनी शनिवारी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक राज्यसभा जागा रिक्त झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जागेवर अजित पवारांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांना पाठवण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली असून, अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेली बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक त्या लढवणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.पार्थ पवार यांनी यापूर्वी २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता राज्यसभेच्या माध्यमातून पार्थ पवार राजकीय कारकिर्दीची नव्याने सुरुवात करू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. पक्षातील नेतृत्वबदलाचे संकेत म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.राष्ट्रीय अध्यक्षाबाबत मतप्रवाहदरम्यान, अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्वही प्रभावीपणे सांभाळत होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाची धुरा कोणाकडे सोपवायची, यावर चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत पक्षात दोन मतप्रवाह आहेत. सध्या कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करावी, असा सूर पक्षातील एका गटाकडून व्यक्त केला जात आहे. प्रफुल्ल पटेल हे अनुभवी नेते असून राष्ट्रीय पातळीवरील त्यांचा दीर्घ अनुभव पक्षासाठी उपयुक्त ठरेल, असा यामागचा युक्तिवाद आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रीय अध्यक्षपद हे अजित पवारांकडे होते, त्यामुळे हे पद पवार कुटुंबातच राहावे आणि सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुराही सांभाळावी, अशी मागणीही काही नेत्यांकडून केली जात आहे.विलिनीकरण अनेकांना अमान्यदोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या विलिनीकरणाची शक्यता वर्तवली जात असतानाच, अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीचे अस्तित्व स्वतंत्रच ठेवावे, अशी भूमिका अनेक नेत्यांकडून मांडली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकीकरणाऐवजी स्वतंत्र वाटचालीचा पर्याय पुढे येताना दिसत आहे.
नवी मुंबईत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर’चे उद्घाटन
मुंबई (प्रतिनिधी) : कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज यातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई येथे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर’चे उद्घाटन शनिवारी पार पडले. देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. उद्घाटनानंतर अॅकॅडमीची पाहणी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष आठवण काढली. सार्वजनिक बांधकामांच्या दर्जाबाबत त्यांचा असलेला काटेकोर दृष्टिकोन आणि गुणवत्तेचा आग्रह अधोरेखित करत फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’चे अभिनंदन करत, महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या जागेचा अत्यंत प्रभावी आणि दर्जेदार वापर करण्यात आल्याचे सांगितले. अवघ्या एका वर्षात पूर्ण झालेल्या या इमारतीतील वर्गखोल्या, ऑडिटोरिअम तसेच प्रशिक्षण सुविधा उच्च दर्जाच्या असून, संकल्पनेमागील नियोजन आणि अंमलबजावणी उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. कायद्याचे औपचारिक शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कार्यपद्धती यातील अंतर कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षण संस्थेची नितांत गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. नव्या न्याय, दंड आणि साक्ष संहितेच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित वकिलांची निर्मिती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि संशोधनाला चालना देण्याचे काम हे केंद्र करेल. त्यामुळे न्यायव्यवस्थेची गुणवत्ता वाढविण्यास हे केंद्र मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन देशातील इतर राज्यांमध्येही अशा स्वरूपाच्या अॅकॅडमी उभारल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
मुंबई : आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मन अत्यंत भावुक झाले आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत आहे.अजितपवारांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करत राहीन, हा विश्वास मी आज या निमित्ताने देते.या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने आणि नव्या ऊर्जेने पुढे चालत राहीन. शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या संधींसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल.देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या 'विकसित भारत २०४७ ' या संकल्पनेला बळ देण्यासाठी तसेच देशाचे गृह व सहकारमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य शासन सदैव तत्पर राहील. तसेच, नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडू.महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साथीने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक समता, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक समृद्धी साधण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. जनतेच्या अपेक्षांना न्याय देणे, शासन-प्रशासन अधिक संवेदनशील व लोकाभिमुख बनवणे आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे, हाच माझा संकल्प आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचे, सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करीन, हा शब्द देते.पंतप्रधान मोदींनी दिल्या सुनेत्रा पवारांना शुभेच्छानवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण करतील”, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
सॅमसंगकडून गॅलेक्सी A07 5G चे अनावरण: फोटोग्राफी व बॅटरी पॉवरहाऊस
मुंबई : सॅमसंग हा भारतातील आघाडीचा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात गॅलेक्सी A07 5G लाँच करणार आहे. ए सिरीजमधील हा नवीन स्मार्टफोन भारतातील डिजिटलप्रेमींसाठी डिझाइन करण्यात आला आहे, जे ऑनलाइन मनोरंजन, सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिज्युअल कथाकथनाचा आनंद देणारा आणि दिवसभर बॅटरी कार्यरत राहणारा किफायतशीर दरामधील डिवाईसचा शोध घेत आहेत.गॅलेक्सी A07 5G मध्ये आयकॉनिक ट्रॅक कॅमेरा डेकोसह हाय-रिझॉल्यूशन ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये उच्च दर्जाच्या फोटोसाठी ५० मेगापिक्सल ऑटोफोकस कॅमेरा आणि अधिक सुस्पष्टतेसाठी २ मेगापिक्सल कॅमेरा आहे.मेन कॅमेराचे एफ१.८ अर्पेचर, तसेच २ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा मूळ गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आणि पार्श्वभूमीला अस्पष्ट करत आकर्षक बोकेह इफेक्ट पोर्ट्रेट्स देतात. वाइड-अँगल सेटअप आकर्षक रंगसंगती व सुस्पष्टतेसाठी सुरेखरित्या डिझाइन करण्यात आले आहे, जे सूर्यास्त, रस्त्यावरील आकर्षक दृश्ये किंवा संस्मरणीय क्षणांना कॅप्चर करण्यासाठी अनुकूल आहे. या स्मार्टफोनमधील ८ मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरा किमान आवाजासह आकर्षक सेल्फीज व व्हिडिओ कॅप्चर होण्याची खात्री देतो.ग्राहकांना फोटो कॅप्चर, एडिट व शेअर करण्याचा अनुभव देण्यासाठी गॅलेक्सी A07 5G मध्ये ६.७-इंच एफडी+ डिस्प्लेसह १२० हर्टझ रिफ्रेश रेट आहे, ज्यामधून व्हिडिओ व वेब ब्राऊजिंगसाठी सहज ट्रान्झिशन्स व स्क्रॉलिंगची खात्री मिळते. डिस्प्लेचा हाय-ब्राइटनेस मोड (एचबीएम) ८०० नीट्सपर्यंत पोहोचत प्रखर सूर्यप्रकाशात देखील डिस्प्ले सुस्पष्टपणे दिसण्याची खात्री देतो. अधिक टिकाऊपणासाठी स्क्रिन २-स्टेप टेम्पर्ड ग्लासच्या माध्यमातून सुरक्षित आहे.गॅलेक्सी A07 5G मध्ये ६००० एमएएच बॅटरी आहे, जी पूर्वीच्या डिवाईसच्या तुलनेत २० टक्के अधिक क्षमतेची आहे. या शक्तिशाली बॅटरीसह २५ वॅट फास्ट चार्जिंग डिवाईस दिवसभर कार्यरत राहण्याची खात्री देते, ज्यासह दीर्घकाळापर्यंत यूट्यूबवर व्हिडिओ स्ट्रीम करता येतात किंवा सोशल मीडिया ब्राऊज करता येते. गॅलेक्सी A07 5G मधील सानुकूल पॉवर मॅनेजमेंट काम व मनोरंजनासाठी विनासायास कार्यक्षमतेची खात्री देते.
Budget 2026 : उद्या संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर होणार; कृषी क्षेत्राकडून मोठ्या अपेक्षा
नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या, १ फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मांडल्या जाणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे देशभरातील सर्व घटकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः ग्रामीण भाग, शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.यंदा प्रथमच अर्थसंकल्प रविवारच्या दिवशी सादर होणार असून, अर्थव्यवस्थेतील मंदी, वाढती महागाई आणि हवामान बदलाचे परिणाम या पार्श्वभूमीवर सरकार कोणते निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.कृषी क्षेत्रासाठी वाढीव तरतुदीची शक्यताकेंद्र सरकारकडून कृषी क्षेत्रासाठीच्या तरतुदींमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी सुमारे १.३७ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदा हा आकडा सुमारे १.५ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि हवामान बदलाशी सामना करण्यासाठी विविध योजनांवर भर दिला जाण्याची शक्यता आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना आणि सिंचन प्रकल्पांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कृषी क्षेत्राचा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात सुमारे १८ ते २० टक्के वाटा असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे हे सरकारपुढील मोठे आव्हान आहे.रेल्वे पायाभूत सुविधांवर भरया अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्रासाठी नव्या घोषणांची शक्यता आहे. आधुनिक सुरक्षा प्रणाली, उर्वरित मार्गांचे विद्युतीकरण आणि मालवाहतुकीसाठी रेल्वेचा वापर वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते. आगामी वर्षांत मालवाहतुकीतील रेल्वेचा वाटा लक्षणीयरीत्या वाढवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.नवीन बियाणे कायद्याचा प्रस्तावकृषी क्षेत्राशी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने नवीन बियाणे विधेयक संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे. या कायद्याअंतर्गत बनावट किंवा निकृष्ट दर्जाच्या बियाणांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आर्थिक दंड आणि कारावासाची तरतूद असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कृषी निर्यात आणि प्रक्रिया उद्योगांकडे लक्षकृषी व अन्नधान्य निर्यातीला चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जाण्याची अपेक्षा आहे. मूल्यवर्धित उत्पादन, कोल्ड चेन सुविधा, लॉजिस्टिक साखळी सुधारणा आणि प्रक्रिया उद्योगांच्या विस्तारावर भर दिला जाऊ शकतो. यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळण्याची शक्यता आहे.तज्ज्ञांच्या मते, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, फलोत्पादन आणि डिजिटल शेती यासारख्या संलग्न क्षेत्रांना सरकारने अधिक निधी उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण उत्पन्न वाढीस मदत होऊ शकते. उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून शेतकरी, उद्योग आणि सामान्य नागरिकांच्या अपेक्षा कितपत पूर्ण होतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Budget 2026: बजेटमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा होणार?
Budget 2026: फिटमेंट फॅक्टर, भत्ते आणि सरकारी तिजोरीवरील भार या त्रिसूत्रीवर आधारित आगामी पगारवाढीची दिशा या अर्थसंकल्पातून स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Arjun Tendulkar Record : अर्जुन तेंडुलकरचे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५० विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला आहे.
Thane News : 11 हजारहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक; तिघांना अटक
Thane News : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांसह ११,००० हून अधिक गुंतवणूकदारांची ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या एका दाम्पत्याला आणि त्यांच्या साथीदाराला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
Budget 2026: घर खरेदीदारांना बजेटमध्ये मिळणार मोठी भेट?
Budget 2026: सध्या होम लोनच्या व्याजावर प्राप्तिकरातून वार्षिक २ लाख रुपयांपर्यंतची सूट मिळते. मात्र, सध्याचे घरांचे दर पाहता ही मर्यादा ५ लाख रुपये करावी, अशी आग्रही मागणी तज्ज्ञांनी केली आहे.
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांकडे तीन महत्त्वाच्या खात्यांची धुरा; अर्थ आणि नियोजन कुणाकडे ?
मुंबई : उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या खातेवाटपाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या नव्या खातेवाटपात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ या तीन महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे असलेले अत्यंत कळीचे 'अर्थ व नियोजन' खातं राष्ट्रवादीकडून निसटले असून ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडेच राहणार आहे. अजित पवार हे सत्तेत सहभागी होताना अर्थ खात्यासाठी अत्यंत आग्रही होते, त्यामुळेच ते राष्ट्रवादीला मिळाले होते. मात्र, आता हे खाते मुख्यमंत्र्यांकडे गेल्याने यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस मांडणार, हे आता स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे महायुतीच्या सत्तेत भाजपचा वरचष्मा पुन्हा एकदा दिसून आला असून, राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक वजनदार खाते कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उर्वरित खात्यांमध्ये शिवसेनेकडे नगरविकास, तर भाजपकडे महसूल आणि गृह ही महत्त्वाची खाती कायम आहेत.https://prahaar.in/2026/01/31/gold-price-correction-union-budget-2026-investment-opportunity/सुनेत्रा पवारांकडे तीन खात्यांची धुरा, पण 'तिजोरी'ची चावी...राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते. शपथविधीनंतर झालेल्या खातेवाटपात सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास या तीन खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजित दादांकडे असलेले महत्त्वाचे 'अर्थ व नियोजन' खाते मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे. या निर्णयामुळे राज्याचा २०२६-२७ चा आगामी अर्थसंकल्प मांडण्याचा मान फडणवीसांना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीकडे असलेली अर्थ खात्याची पकड आता मुख्यमंत्र्यांकडे हस्तांतरित झाली आहे. शपथविधीचा औपचारिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनामुळे कुटुंबावर आणि राज्यावर असलेल्या शोककळेमुळे, त्यांनी कार्यकर्त्यांना कोणताही उत्सव न करण्याचे आवाहन केले आहे. अजित दादांच्या दहाव्याच्या विधीपर्यंत त्या बारामतीतच राहून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील, मात्र यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारचे हार किंवा बुके स्वीकारण्यास नकार दिला आहे.
Sunetra Pawar : आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर दिलेल्या संस्कारांचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी मी ही जबाबदारी स्वीकारत आहे, शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया
‘युपीएससी’मध्ये नीतिशास्त्र विषय आणल्यानंतर टीका झाली: आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. डी. पी. अग्रवाल
Dr. D. P. Agarwal: ‘एमआयटी-एडीटी’ विद्यापीठात ‘नागरी सेवा आणि राष्ट्रनिर्मिती’ परिषद संपन्न
मुंबई : “कठीण प्रसंगात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आहे; मात्र सध्या राज्यात आणि पक्षात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींशी कुटुंबीयांचा काहीही संबंध नाही”, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी दिली. अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या पदांबाबतची चर्चा मुंबईत सुरू असल्याचे माध्यमांतून वाचायला आणि पाहायला मिळत आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे पक्षातील प्रमुख नेते असून, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. प्राधान्यक्रम काय असावा, हे ठरवण्याचा अधिकार त्यांचा आहे. त्यावर आम्ही भाष्य करणार नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले.बारामती येथे माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सुरू असलेल्या निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी अजित पवार यांच्याकडे होती. आपण स्वतः या निवडणुकांत प्रत्यक्ष सहभागी होत नसल्याचे सांगत शरद पवार म्हणाले की, त्यांनी काय करायचे याचे सविस्तर ‘ब्रिफिंग’ मला दिले होते आणि त्यानुसार ते कामाला लागले होते. याच दरम्यान हा अपघात घडला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चेत मी थेट सहभागी नव्हतो. अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांसह काही सहकारी या प्रक्रियेत सातत्याने सहभागी होते. गेल्या चार महिन्यांपासून या चर्चा सुरू होत्या आणि सर्वांना एकत्र आणण्याच्या प्रक्रियेच्या ते जवळपास अंतिम टप्प्यावर पोहोचले होते. शेवटचे ‘ब्रिफिंग’ त्यांनी आम्हाला दिले होते, असेही शरद पवार यांनी सांगितले.या चर्चेत प्रामुख्याने अजित पवार आणि जयंत पाटील सहभागी होते आणि दोन्ही पक्षांमध्ये एकत्रीकरणाबाबत एकमत झाले होते. येत्या १२ फेब्रुवारी रोजी निर्णय जाहीर करण्याचे ठरले होते आणि ही तारीख अजित पवार यांनीच निश्चित केली होती. मात्र, या अपघातामुळे त्या प्रक्रियेला खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे एकत्रीकरण व्हावे, ही अजित पवार यांची इच्छा होती आणि ती पूर्ण व्हावी, अशी आमचीही मनापासून इच्छा असल्याचे शरद पवार यांनी नमूद केले. पुढील काळात काय करायचे, याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, आता नव्या पिढीला प्रोत्साहन देणे आणि अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली मोठी पोकळी, तसेच झालेला तोटा भरून काढण्यासाठी जे-जे शक्य आहे, ते सर्व करण्यावर आमचा भर राहील.अजित पवारांचे निधन हा मोठा धक्का- अजित पवार यांच्या कार्यपद्धतीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावर न्याय देण्याचा प्रयत्न करणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांचा दिवस सकाळी सहा-सात वाजल्यापासून सुरू होत असे. आज सकाळी नऊच्या सुमारास आपण बोलत असताना ते हयात असते, तर ते कामाच्या ठिकाणी, फिल्डवर सक्रिय दिसले असते. गेली ३० ते ४० वर्षे पक्ष, सहकारी, बारामतीतील नागरिक आणि मित्रांनी त्यांना अखंड साथ दिली. कामात त्यांनी कधीही कमतरता दाखवली नाही.- अजित पवार यांच्यासारखी कर्तृत्ववान व्यक्ती अचानक आपल्यातून निघून जाणे हा अत्यंत मोठा धक्का असून, तो आम्हा सर्वांवर आहे. या परिस्थितीला सामोरे जाणे अपरिहार्य आहे. लोकांचे दुःख कमी करण्यासाठी संवेदनशीलपणे काम करावे लागेल. त्यांनी रुजवलेली कामाची शिस्त आणि पद्धत पुढे सुरू ठेवावी लागेल. हे काम पवार कुटुंबातील नवी पिढी नक्कीच करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. आमचीही काही जबाबदारी आहेच; मात्र पुढील काळात नव्या पिढीवर अधिक जबाबदारी असेल, आणि ती पेलण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असे त्यांनी सांगितले.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील दुर्दैवी विमान अपघातातील निधनानंतर, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. या धक्कादायक घटनेतून सावरत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) पक्षाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली असून, आज त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगामुळे कोणताही गाजावाजा न करता, मोजक्याच नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा पार पडला. अजित दादांच्या जाण्याने निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी आणि पक्षाची विखुरलेली मोट बांधण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता राज्याच्या आणि पक्षाच्या नेतृत्वाची सर्व सूत्रे सुनेत्रा वहिनींच्या हाती असतील.https://prahaar.in/2026/01/31/sunetra-pawar-takes-oath-as-the-states-first-woman-deputy-chief-minister/कोण आहेत सुनेत्रा पवार?१८ ऑक्टोबर १९६३ रोजी धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे जन्मलेल्या सुनेत्रा पवार यांना माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या रूपाने राजकीय वारसा माहेरूनच मिळाला होता. १९८५ मध्ये अजित पवार यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी बारामतीतील काटेवाडीतून आपल्या सामाजिक कार्याचा श्रीगणेशा केला. सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली. पहाटे स्वतः हातात झाडू घेऊन त्यांनी सुरू केलेल्या या चळवळीने गावाला राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून दिले. त्यांच्या या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली, ज्यामुळे त्यांना 'सार्क' परिषदेत सहा देशांच्या राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याचा बहुमान मिळाला. 'एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया'च्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण रक्षणासह मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि महिलांमध्ये कर्करोग जागृती असे आरोग्यविषयक उपक्रम राबवले. तसेच 'बारामती टेक्सटाईल पार्क'च्या अध्यक्ष म्हणून त्यांनी हजारो महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर, त्यांच्या या प्रदीर्घ सामाजिक अनुभवाचा राज्याला मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मानसुनेत्रा पवार यांचा हा प्रवास सोपा नव्हता. लग्नानंतर त्यांनी केवळ राजकीय पत्नीची भूमिका न बजावता, प्रत्यक्षात जमिनीवर उतरून काम केले. शेतात काम करणे असो, पोल्ट्री व्यवसाय सांभाळणे असो किंवा गाई-गुरांचे दूध काढणे, ही सर्व कष्टकरी कामे त्यांनी आनंदाने केली. अजित दादांच्या प्रत्येक राजकीय चढ-उतारात त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. घर आणि नातेसंबंध जपण्यासोबतच, कठीण प्रसंगी दादांना योग्य राजकीय सल्ला देण्यात सुनेत्रा वहिनींचा मोठा वाटा होता. आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन त्यांनी केवळ अजित दादांचा वारसाच पुढे नेला नाही, तर राज्यातील महिलांसाठी राजकारणाचे एक नवे शिखर सर करून दाखवले आहे.लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा प्रत्यक्ष राजकारणात प्रवेशराष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीने सुनेत्रा पवार यांना प्रत्यक्ष राजकारणाच्या रणांगणात उतरवले. जरी सुप्रिया सुळे यांच्या विरोधातील निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला, तरी खचून न जाता त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन त्यांनी या पराभवाचे विजयात रूपांतर केले आहे. लोकसभेतील पराभवानंतर पक्षाने त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली. विशेष म्हणजे, राज्यसभा खासदार म्हणून अल्पकाळातच त्यांनी आपली छाप पाडली. त्यांना संसदेच्या तालिका अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी मिळाली, ज्यामुळे देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे कामकाज चालवण्याचा मानही त्यांना मिळाला. संसदेचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या सुनेत्रा पवार आता राज्याच्या मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे पद भूषवणार आहेत. यापूर्वी पवार कुटुंबाच्या प्रत्येक निवडणुकीत सुनेत्रा वहिनी प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळत असत. बारामतीमधील अनेक ऐतिहासिक विजयांमध्ये त्यांचा पडद्यामागून मोठा वाटा राहिला आहे. मात्र, अजित दादांच्या निधनानंतर आता त्या स्वतः राज्याच्या राजकारणाचे मुख्य केंद्र बनल्या असून, त्यांच्या रूपाने राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री लाभली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रॉकेटच्या वेगाने वाढणाऱ्या सोन्या-चांदीच्या किमतींना अखेर ब्रेक लागला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर आता मौल्यवान धातूंच्या किमतीत लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. २९ जानेवारी रोजी सोन्याने प्रति १० ग्रॅम १.८० लाख रुपयांचा टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला होता, मात्र आता हे दर १.६९ लाख रुपयांच्या आसपास स्थिरावले आहेत. किमतीत झालेल्या या घसरणीमुळे बाजारातील अस्थिरता काहीशी कमी झाली आहे. विशेष म्हणजे, आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या (Budget 2026) पार्श्वभूमीवर ही घसरण खरेदीदारांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. अनेक तज्ज्ञ आणि गुंतवणूकदार या किमतीतील घसरणीकडे 'खरेदीची संधी' म्हणून पाहत आहेत. एमसीएक्स (MCX) वरील फेब्रुवारी वायद्यांमध्ये सोन्याच्या किमतीत मोठी पडझड झाल्यानंतर आता बाजार स्थिर होताना दिसत असून, सर्वसामान्यांचे लक्ष आता उद्याच्या बजेटमधील आयात शुल्कावरील (Import Duty) निर्णयाकडे लागले आहे.https://prahaar.in/2026/01/31/who-is-sunetra-pawar-she-will-take-oath-as-first-woman-deputy-cm-of-maharashtra-today-31-january-2026/भारतीय ग्राहकांचे लक्ष जागतिक घडामोडींकडेभारतीय बाजारपेठेपाठोपाठ आता जागतिक स्तरावरही सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी नफावसुली (Profit Booking) पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने प्रति औंस ५,६०० डॉलरचा विक्रमी टप्पा ओलांडला होता, मात्र आता त्यामध्ये घट झाली आहे. चांदीच्या दरातही मोठी हालचाल झाली असून, प्रति औंस १२० डॉलरची ऐतिहासिक पातळी गाठल्यानंतर व्यापाऱ्यांनी विक्रीवर भर दिल्याने किमती काहीशा नरमल्या आहेत. जागतिक बाजारातील या पडझडीचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावर होताना दिसत आहे. भारत आपल्या गरजेसाठी लागणारे जवळपास सर्वच सोने आणि ८० टक्क्यांहून अधिक चांदी परदेशातून आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात होणारा कोणताही बदल भारतासाठी अधिक संवेदनशील ठरतो. सध्या जागतिक आणि भारतीय किमतींमधील वाढत्या अंतरामुळे खरेदीदारांनी 'वाट पाहा आणि पाहा' (Wait and Watch) अशी भूमिका घेतली आहे.आयात शुल्कात कपात होणार की 'जैसे थे' स्थिती?उद्या सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण सराफा बाजाराचे लक्ष लागले असून, विशेषतः सोन्या-चांदीवरील आयात शुल्काबाबत (Import Duty) काय निर्णय होतो, यावर मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या अर्थसंकल्पात तस्करीला लगाम घालण्यासाठी सरकारने हे शुल्क १५ टक्क्यांवरून थेट ६ टक्क्यांवर आणले होते. आता उद्योजकांकडून हे शुल्क आणखी कमी करण्याची मागणी केली जात असली, तरी सरकारसमोर मात्र मोठे पेचप्रसंग आहेत. उद्योग की रुपया? एकीकडे उद्योगाला चालना देण्यासाठी कर कपातीची मागणी होत आहे, तर दुसरीकडे धोरणकर्त्यांना वाढत्या आयातीमुळे रुपयावर येणाऱ्या दबावाची चिंता सतावत आहे. सोन्याची मोठ्या प्रमाणात आयात झाल्यास परकीय चलनाच्या साठ्यावर परिणाम होऊन रुपया कमकुवत होऊ शकतो. सध्या सोन्यावरील मूलभूत सीमा शुल्क ६ टक्के असून, त्यामध्ये बदलाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. १ फेब्रुवारीला अर्थमंत्री काय घोषणा करतात, यावर सोमवारी उघडणाऱ्या बाजाराची दिशा ठरेल. जर शुल्कात कपात झाली तर किमती कोसळतील, अन्यथा दरांमध्ये मोठी उसळी किंवा तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Alia Bhatt:आलिया भट्ट करणार सोशल मिडिया डिलिट ? अभिनेत्री म्हणाली की...
बॅालिवुड :बॅालिवुडमधील नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आलिया भट्ट ने एक वक्तव्य केलं त्यावरं चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत.आलिया भट्ट सोशल मिडीयावर चांगलीच सक्रिय असल्याचे आपल्याला पहायला मिळते.आई झाल्यानंतरही तिने आपल्या करिअरमधून ब्रेक घेतलेला नाही. सातत्याने काम करत आलियाने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची पसंती कायम राखली आहे. मात्र सध्या ती मातृत्व आणि करिअर यामधील समतोल साधताना दिसत आहे.अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आलिया भट्टने मातृत्वाबद्दल आणि सोशल मीडियाबाबत मनमोकळं भाष्य केलं. मातृत्वाविषयी बोलताना ती म्हणाली, “हे एक मोठं परिवर्तन आहे, जे नऊ महिन्यांत घडतं. शरीर आणि मानसिकतेत अनेक बदल होतात. पण नऊ महिने पोटात वाढवलेलं बाळ जेव्हा आयुष्यात येतं, तेव्हा सगळंच बदलून जातं. पूर्वीसारखं आयुष्य जगणं जवळजवळ अशक्य होतं.”सोशल मीडिया अकाऊंट डिलीट करण्याच्या विचारावर आलिया म्हणाली, “अनेकदा असं होतं की सकाळी उठल्यावर सोशल मीडिया डिलीट करावा असं वाटतं. मला फक्त आणि फक्त अभिनय करणारी अभिनेत्री व्हायचं आहे. सततच्या चर्चांमध्ये अडकून राहायचं नाही. पण मला माहित आहे की, सोशल मीडिया डिलीट केल्यास माझा चाहत्यांशी असलेला संपर्क तुटेल. जे सुरुवातीपासून मला पाठिंबा देत आहेत, त्यांच्याशी संवाद कमी होईल. म्हणून इच्छा असूनही मी सोशल मीडिया सोडू शकत नाही.” वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना आलिया म्हणाली की, ती अत्यंत खाजगी आयुष्य जगते. “माझी फोटो गॅलरी आता पूर्णपणे राहाच्या फोटोंनी भरलेली आहे. स्वतःचे फोटो काढण्यासाठीही आता खूप प्रयत्न करावे लागतात,” असंही तिनं सांगितलं.दरम्यान, आलिया भट्ट लवकरच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ या आगामी चित्रपटात झळकणार असून तिच्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
शपथविधीनंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या या निर्णयावर मिश्र भावना व्यक्त केल्या आणि त्यांना राजकीय परिस्थितीत सावध राहण्याचा ठाम सल्ला दिला.
Australian Open 2026 : अनुभवी एलिस मर्टेन्स आणि झांग शुआई या जोडीने आपल्या उत्कृष्ट समन्वयाच्या जोरावर महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्याकडे ‘या’तीन खात्याची जबाबदारी; अवघ्या दोन तासांत खातेवाटप जाहीर
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खातेवाटपाची घोषणा केली आहे.
Elena Rybakina : एलिना रायबाकिनाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अरीना सबालेंकाचा पराभव करत जेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
ISI : तुम्ही भारताला पाठिंबा देऊ नका; आयएसआयची काश्मिरी बुद्धिजीवींना धमकी
पाकिस्तान ५ फेब्रुवारी रोजी तथाकथित काश्मीर एकता दिन (ISI) म्हणून वार्षिक प्रचार मोहीम सुरू करण्याची तयारी करत आहे. दरम्यान, त्याची गुप्तचर संस्था, दहशतवादी प्रॉक्सी संघटनांद्वारे, जागतिक व्यासपीठांवर इस्लामाबाद-पुरस्कृत दहशतवादाचा सातत्याने पर्दाफाश करणाऱ्या काश्मिरी बुद्धिजीवींना ठार मारण्याची धमकी देत आहे.
DCM Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अल्प परिचय
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यांच्या सामाजिक, संस्थात्मक आणि राजकीय प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.कौटुंबिक व शैक्षणिक पार्श्वभूमीसुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे झाला. त्यांचे वडील कै. बाजीराव पाटील आणि यांच्याकडे १३ गावची पाटीलकी होती. त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी (बी.कॉम.) प्राप्त केली आहे. सुनेत्रा पवार या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी असून त्यांना पार्थ आणि जय अशी दोन मुले आहेत.सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिली शपथ, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व्यासपीठावर उपस्थित.शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार, खासदारांची उपस्थिती..#prahaarnewsline #MarathiNews #DeputyCM… pic.twitter.com/UIPahRkhWm— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) January 31, 2026सामाजिक व संस्थात्मक कार्य- गेल्या २३ वर्षांपासून त्या सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून बारामती परिसरात विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी विकासाचे भक्कम जाळे उभे केले आहे.- बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून त्यांनी ६ हजारांहून अधिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.- ‘एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी एक लाखांहून अधिक वृक्षांचे रोपण केले आहे. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.- विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यासोबतच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे तसेच महिलांसाठी कर्करोग जनजागृती मोहिमा आयोजित केल्या आहेत.राजकीय कारकीर्द- २५ जून २०२४ पासून त्या राज्यसभेच्या सदस्य (खासदार) म्हणून कार्यरत आहेत. आज त्यांनी या पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.- संसदेत त्यांनी शिक्षण, महिला, बालके, युवक व क्रीडा विषयक स्थायी समितीवर काम केले आहे.- मेक्सिको येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला संसद सदस्य परिषदेत त्यांनी भारतीय संसदेचे प्रतिनिधित्व केले आहे.मिळालेले सन्मानसुनेत्रा पवार यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार (२०२३), राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार (२०२४) आणि ग्रीन वॉरियर पुरस्कार यांचा समावेश आहे.
मुंबईकरांनो, राणीबागे भरणार पुष्पोत्सव, कोणत्या तारखेला ते जाणून घ्या..
मुंबई : शिशिर ऋतूची चाहूल लागली की मुंबईकरांना वेध लागतात ते ‘मुंबई पुष्पोत्सवाचे’. घड्याळाच्या काट्यावर आणि वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या मुंबईकरांसाठी ‘मुंबई पुष्पोत्सव’ म्हणजे एक सुगंधी पर्वणी असते. यंदा हा पुष्पोत्सव येत्या ६ ते ८ फेब्रुवारी होणार आहे. असून यामध्ये विविध प्रजातींची रंगीबेरंगी फुलझाडे, फळझाडांची रोपे, औषधी वनस्पती तसेच विविध ऋतूंमध्ये आढळणारी फुले आदी मिळून सुमारे ५ हजार रोपांचा ‘मुंबई पुष्पोत्सवात’ समावेश असतो. पर्यावरणाची आवड आणि फुलझाडांवर प्रेम करणाऱ्या पर्यावरणप्रेमींसाठी पुष्पोत्सवात उद्यानविषयक साहित्याची विक्री, झाडांसाठी लागणारी खते आदींची दालनेही येथे खुली करण्यात येणार आहेत. या तीन दिवसांच्या ‘मुंबई पुष्पोत्सवात’ नागरिकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात अर्थात राणीबाग येथे येत्या ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. येत्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी मुंबई पुष्पोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील. उर्वरित दोन दिवस म्हणजेच ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ‘मुंबई पुष्पोत्सव’ नागरिकांसाठी खुला असेल. यंदाचा हा २९ वा पुष्पोत्सव आहे.मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप आयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या देखरेखीखाली ‘मुंबई पुष्पोत्सव’ भरविण्यात येत आहे.पर्यावरणप्रेमींसाठी उद्यान विषयक कार्यशाळामुंबई पुष्पोत्सवासोबतच ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत उद्यान विषयक कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यशाळेमध्ये बागकाम कसे करावे, झाडांची निगा कशी राखावी, रोपांना, झाडांना, वेलींना कोणते खत कधी व किती प्रमाणात द्यावे, याविषयी अभ्यासपूर्ण प्रशिक्षण देण्यात येणार आहे.मुंबई पुष्पोत्सवाला असणार आकर्षक संकल्पनेचे कोंदणमुंबई पुष्पोत्सवात फुलझाडांची सुरेख मांडणी आणि आकर्षक सजावट केली जाते. यासोबतच दरवर्षी एक खास संकल्पना घेवून पुष्पोत्सव साजरा केला जातो. गतवर्षी भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले होते. विविध फुलांच्या मनमोहक रचनांमधून राष्ट्रध्वज, भारतरत्न पुरस्काराची प्रतिकृती तसेच राष्ट्रीय फळ आंब्याची रचनाही झेंडूच्या फुलांनी साकारली होती. या सजावटीने मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले होते. यंदाच्या मुंबई पुष्पोत्सवातही आगळीवेगळी आणि आकर्षक संकल्पना राबविण्यात येणार आहे. सलग तीन दिवस सुरू राहणाऱ्या या पुष्पोत्सवाचा मुंबईकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.v
धारावी ते घाटकोपरमधील प्रक्रिया केलेले मलजल भांडुप संकुलात
पाणी वहन करण्यासाठी संकुलात ९७० लिटर क्षमतेचा जलबोगद्याची उभारणीमलजल प्रक्रिया केंद्रातील पाणी वहन करणाऱ्या भांडुप संकुलातील बोगदा प्रकल्पाला गतीमुंबई : घाटकोपर मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र ते भांडुप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र आणि पुढे भांडुप संकुलापर्यंत तृतीय संस्करण प्रक्रिया केलेले पाणी वहन करण्यासाठी जलबोगद्याचा आराखडा व बांधकामाची कामे सध्या सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी भांडुप संकुल येथील प्रकल्प कार्यस्थळास भेट देऊन पाहणी केली. मलजल प्रक्रिया प्रकल्पाद्वारे ५० टक्के मलजलावर तृतीय संस्करण प्रक्रिया करण्याचे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने ५०० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या तृतीय संस्करण प्रक्रिया केलेले पाणी वहन करण्यासाठी धारावी ते घाटकोपर आणि पुढे भांडुप संकुल पर्यंत ९७० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या जमिनीखालील बोगद्याची उभारणी प्रस्तावित आहे. या जलबोगद्याच्या बांधकामासंबंधी प्राथमिक कामे प्रगतिपथावर आहेत.भांडुप संकुल ते भांडुप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्रादरम्यानचे अंतर ४ हजार ३६५ मीटर आहे. भांडुप संकुल येथे १७५ मीटर खोलीचा लॉन्चिंग शाफ्ट उभारण्यात येत आहे. पैकी शाफ्टचे उत्खनन कार्य ४५ मीटर खोलीपर्यंत पूर्ण झाले आहे. बोगदा खनन कार्य पूर्ण झाल्यानंतर बोगदा खनन यंत्र बाहेर काढण्यासाठी भांडुप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र येथे १०४ मीटर खोलीचा पुनर्प्राप्ती शाफ्ट प्रस्तावित आहे.दुसऱ्या बोगदा खनन संयंत्राच्या सहाय्याने भांडुप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र ते घाटकोपर मलजल प्रक्रिया सुविधा केंद्रादरम्यान प्रस्तावित बोगद्याच्या खोदणीसाठी आवश्यक संरेखन निश्चित करण्यात आले आहे. हे अंतर ७ हजार २४५ मीटर आहे. भांडुप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र येथे १५५ मीटर खोलीचा लॉन्चिंग शाफ्ट उभारण्यात येत आहे. पैकी शाफ्टचे उत्खनन कार्य ७.७ मीटर खोलीपर्यंत पूर्ण झाले आहे.प्रकल्प अंतर्गत बोगदा खनन संयंत्राच्या सहाय्याने बोगदा खोदणीचे काम करण्यात येणार असून बोगद्याची लांबी एकूण मिळून ११ हजार ६१० मीटर इतकी आहे. भांडुप संकुल, भांडुप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र व घाटकोपर मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र यादरम्यान आवश्यक संरेखन निश्चित करून बोगदा खोदणीचे कार्य नियोजित पद्धतीने प्रगतिपथावर आहे. आयुक्तांसमवेत या पाहणीमध्ये उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरूषोत्तम माळवदे, प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प) महेंद्र उबाळे यांच्यासह संबंधित अभियंते, अधिकारी यावेळी उपस्थित होते.धारावी ते घाटकोपरमधील प्रक्रिया केलेले मलजल भांडुप संकुलातमुंबईच्या पाणी पुरवठ्यात वाढ करण्यासाठी आणि मागणी - पुरवठ्यातील तूट कमी करण्यासाठी विश्वासार्ह आणि हवामान बदल संवेदनक्षम स्त्रोत विकसित करण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका कार्यक्षेत्रात निर्माण होणा-या मलजलावर आधुनिक प्रक्रिया करण्यासाठी विविध ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्याचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मलजल प्रक्रिया प्रकल्पांद्वारे सांडपाण्यातील घनकचरा, घातक रासायनिक घटक तसेच रोगकारक जंतू काढून टाकण्यात येतात. परिणामी, प्रक्रिया केलेले पाणी सुरक्षितरीत्या पुनर्वापरासाठी उपलब्ध होते. त्यामुळे पाण्याच्या स्त्रोतांवरील ताण कमी होऊन नागरी स्वच्छता राखली जाते आणि नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल.डॉ भूषण गगराणी, आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका
T.V मुळे तुमचाही विज बिल येतोय जास्त; मग जाणुन घ्ये या गोष्टी
आजच्या स्मार्ट होममध्ये टीव्ही हा सर्वाधिक वापरला जाणारा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ठरला आहे. दिवसातील अनेक तास आपण टीव्हीवर मालिका, चित्रपट, रिअॅलिटी शो, OTT कंटेंट किंवा गेमिंगचा आनंद घेतो. मात्र, हे करत असताना टीव्ही किती वीज वापरतो आणि त्याचा थेट परिणाम वीज बिलावर होतो, याकडे अनेकांचे लक्ष जात नाही. प्रत्यक्षात, काही लहान पण महत्त्वाच्या सेटिंग बदलून तुम्ही टीव्हीमुळे वाढणारे वीज बिल लक्षणीयरीत्या कमी करू शकता.टीव्हीमध्ये सर्वाधिक वीज वापर ब्राइटनेस आणि बॅकलाइटमुळे होतो. फॅक्टरी सेटिंग्जमध्ये हे दोन्ही पर्याय जास्त प्रमाणात ठेवलेले असतात. त्यामुळे पिक्चर सेटिंगमध्ये जाऊन ब्राइटनेस आणि बॅकलाइट ६० ते ७० टक्क्यांपर्यंत कमी करा. खोलीतील प्रकाशानुसार हे अॅडजस्ट केल्यास वीज बचत होईलच, शिवाय डोळ्यांवरील ताणही कमी होईल. अनेकजण टीव्ही कायम Vivid किंवा Dynamic Mode वर ठेवतात, जो अधिक वीज खर्च करणारा असतो. दैनंदिन वापरासाठी Standard किंवा Eco Mode निवडणे फायदेशीर ठरते. Eco Mode आपोआप ब्राइटनेस आणि पॉवर युसेज नियंत्रित करतो, ज्यामुळे वीजेचा खर्च कमी होतो.कधी कधी टीव्ही सुरू असतानाच आपल्याला झोप लागते किंवा आपण खोलीबाहेर जातो. अशावेळी Auto Power Off आणि Sleep Timer ही फीचर्स उपयुक्त ठरतात. १०–१५ मिनिटे कोणतीही हालचाल नसल्यास टीव्ही आपोआप बंद होईल, अशी सेटिंग केल्यास अनावश्यक वीज वाया जाणार नाही. टीव्ही बंद केल्यानंतरही प्लग इन ठेवला तर स्टँडबाय मोडमध्ये तो वीज वापरत राहतो. त्यामुळे वापर नसताना टीव्ही पूर्णपणे स्विच ऑफ करणे किंवा स्मार्ट पॉवर स्ट्रिपचा वापर करणे अधिक योग्य आहे.तसेच Smart TV मधील Bluetooth, Wi-Fi Scan, Voice Assistant यांसारखी अनावश्यक फीचर्स आणि अॅप्स सतत ऑन राहिल्यास बॅकग्राउंडमध्ये वीज खर्च होत राहते. गरज नसल्यास ही फीचर्स बंद ठेवल्यास टीव्ही अधिक ऊर्जा-कार्यक्षम पद्धतीने काम करेल आणि तुमचे वीज बिलही नियंत्रणात राहील.
Jayant Patil : राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत जयंत पाटलांचा सर्वात मोठा खुलासा; राजकीय वर्तुळात खळबळ
Jayant Patil : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.
Supriya Sule : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’प्रतिक्रिया
Supriya Sule : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्याने राज्याच्या राजकारणात ((Supriya Sule) मोठी उलथापालथ झाली आहे.
Mumbai Indians Playoffs : ५ पराभव होऊनही मुंबईचा संघ अजूनही बाद झालेला नाही, पण त्यांचा पुढील प्रवास आता स्वतःच्या कामगिरीवर नाही तर दुसऱ्यांवर अवलंबून आहे.
DCM Sunetra Pawar: आमदार नसतानाही सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री कशा बनल्या? जाणून घ्या नियम
DCM Sunetra Pawar: शनिवारी दुपारी 2 वाजता त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड झाली आणि सायंकाळी 5 वाजता त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या.
DCM Sunetra Pawar : “मी सुनेत्रा अजित पवार..”; अखेर पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ
DCM Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी आज सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Budget 2026: 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री? ‘या’वस्तू महागण्याची शक्यता
Budget 2026: उद्या सकाळी अर्थसंकल्पीय भाषणापूर्वीच सर्वसामान्यांना 'डबल झटका' बसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Pat Cummins : वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
PMC Mayor: हडपसरला डावलण्याचे राजकारण संपणार का?
PMC Mayor: सलग दुसऱ्यांदा प्रचंड मताधिक्याने विजयी झालेल्या उज्वला सुभाष जंगले यांचे महापौरपदासाठी नाव चर्चेत
Ajit Pawar : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय आता शरद पवार नाही तर ‘ही’व्यक्ती घेणार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अकाली निधन झाल्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.
Budget 2026-27 : रविवारी बजेट; शेअर बाजार सुरू असणार की बंद? जाणून घ्या
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या म्हणजेच रविवार १ फेब्रुवारी रोजी २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करतील. देशाचा अर्थसंकल्प रविवारी जाहीर होत असल्याने उद्या शेअर बाजार सुरू असणार की बंद याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मात्र रविवार असूनही बजेट सदरीकरणाच्या दिवशी शेअर मार्केट सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे इतिहासात दुसऱ्यांदाच रविवारच्या दिवशी शेअर मार्केट सुरू असणार आहे.रविवारी शेअर मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय दोन्ही बाजार समित्यांकडून घेण्यात आला आहे. मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार या दोन्ही समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. साधारणतः शनिवार आणि रविवार या दोन दिवशी शेअर मार्केटचे व्यवहार हे बंद असतात. मात्र मागच्या वर्षी १ फेब्रुवारी २०२५ शनिवारी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होतं. त्यामुळे तेव्हा पहिल्यांदा शनिवार असूनही शेअर बाजारातले व्यवहार सुरू ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे यंदाही रविवार असूनदेखील शेअर मार्केट सुरू राहणार असल्याचे दोन्ही बाजार समित्यांनी जाहीर केले आहे.यामुळे उद्या बजेटच्या दिवशी रविवार असूनही ट्रेडिंग करता येणार आहे. नेहमीच्या बाजार वेळेनुसार म्हणजेच ९:१५ ते ३:३० पर्यंत ट्रेडिंग करता येणार आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पापूर्वी संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये भारताचा जीडीपी विकास दर ७.० टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.सर्वेक्षणानुसार, देशांतर्गत सुधारणा आणि सरकारी गुंतवणुकीमुळे जागतिक आव्हाने असूनही देशाच्या अर्थव्यवस्थेची अंतर्गत ताकद सतत वाढताना दिसत आहे.
नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या सादर होणार असून, अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) सलग नवव्यांदा बजेट मांडून नवा इतिहास रचणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी केंद्र सरकार आपली तिजोरी खुली करण्याची शक्यता असून, रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे २.७० लाख कोटी ते २.८० लाख कोटी रुपयांच्या विक्रमी निधीची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे प्रवास अधिक आधुनिक, वेगवान आणि आरामदायी बनवण्यासाठी सरकारचे विशेष लक्ष आहे. यामध्ये प्रामुख्याने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे, ज्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास प्रवाशांसाठी सुसह्य होईल. याशिवाय, नवीन रेल्वे मार्गांचा विस्तार करणे, जुन्या रुळांचे नूतनीकरण आणि रेल्वे स्थानकांचे हायटेक सुशोभीकरण यांसाठी या निधीचा मोठा हिस्सा वापरला जाण्याचा अंदाज आहे.https://prahaar.in/2026/01/31/sunetra-pawar-resigns-as-rajya-sabha-mp-she-will-take-oath-of-maharashtra-dcm-at-evening/जूनपर्यंत ८ वंदे भारत स्लीपर गाड्या धावणार...केंद्र सरकार येत्या जून महिन्यापर्यंत ८ नव्या 'वंदे भारत स्लीपर' गाड्या सुरू करण्याच्या तयारीत असून, संपूर्ण आर्थिक वर्षात अशा १२ आधुनिक गाड्या प्रवाशांच्या सेवेत रुजू होतील. रात्रीचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी या ट्रेनची विशेष रचना करण्यात आली आहे. मध्यमवर्गीय प्रवाशांचा विचार करून सरकार 'अमृत भारत' रेल्वेचाही विस्तार करणार आहे. मार्च महिन्यापर्यंत या रेल्वेचे नवीन आणि प्रगत 'व्हर्जन' पाहायला मिळेल. विशेष म्हणजे, रेल्वेच्या सुरक्षेसाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी पहिल्यांदाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा मोठा वापर केला जाणार आहे. याव्यतिरिक्त, रेल्वे प्रवाशांची सर्वात मोठी डोकेदुखी असलेल्या 'वेटिंग लिस्ट'च्या समस्येवरही सरकार ठोस पाऊल उचलत आहे. पुढील दोन वर्षांत वेटिंग लिस्ट पूर्णपणे संपवण्यासाठी अतिरिक्त डबे जोडणे आणि नवीन पिढीच्या वेगवान रेल्वे गाड्यांची निर्मिती करण्यावर बजेटमध्ये भर दिला जाणार आहे.७० अधिकारी आता आठवडाभर 'नजरकैदेत'केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ (Budget 2026) च्या सादरीकरणाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून, आज २७ जानेवारी रोजी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथे पारंपरिक “हलवा समारंभ” उत्साहात पार पडला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट प्रक्रियेशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वहस्ते मिठाई भरवून अर्थसंकल्पाच्या छपाईला अधिकृत हिरवा कंदील दाखवला. हलवा समारंभ हा केवळ गोडधोड खाण्याचा कार्यक्रम नसून, तो अर्थसंकल्पाच्या अत्यंत गोपनीयतेचा (Secretcy) काळ सुरू झाल्याचा संकेत आहे. या कार्यक्रमानंतर बजेट तयार करण्यात सहभागी असलेले सुमारे ६० ते ७० अधिकारी आणि कर्मचारी अर्थमंत्रालयाच्या तळघरातील प्रेसमध्ये “लॉक-इन” होतात. पुढील काही दिवस, म्हणजेच अर्थसंकल्प संसदेत सादर होईपर्यंत, हे अधिकारी बाह्य जगापासून पूर्णपणे तुटलेले असतात. त्यांना त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याची किंवा मोबाईल वापरण्याचीही परवानगी नसते. अर्थसंकल्पातील कोणतीही माहिती फुटू नये, या उद्देशाने ही कडक गुप्तता पाळली जाते.
मुंबईतील कोस्टल रोडवर सहा ठिकाणी बायोटॉयलेटची सुविधा
प्रोमेनाडवर पादचारी भुयारी मार्गात उभारण्यात आली ही सुविधामुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता अर्थात मुंबई कोस्टल रोडवर सहा ठिकाणी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून अत्याधुनिक प्रकारच्या जैव विघटनक्षम शौचालयांची म्हणजेच बायो-टॉयलेट्स उभारणी करण्यात आली आहे. कोस्टल रोडवरील विहार क्षेत्रावर पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक २, ४, ६, ११, १२ आणि १४ या ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.मुंबईच्या सुलभ वाहतुकीच्या बाबतीत धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) हा अभियांत्रिकी आविष्काराचा उत्तम नमुना म्हणून ओळखला जातो. या मार्गावर ठिकठिकाणी विहार क्षेत्र अर्थात प्रोमेनाड निर्माण करण्यात आले आहेत. समुद्रकिनारी उभारलेल्या या विहारक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात नागरिक, पर्यटक येतात. त्यांच्यासाठी स्वच्छताविषयक उत्तम सुविधा देण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनात घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून जैव विघटनक्षम शौचालये (बायो-टॉयलेट्स) उपलब्ध करून देण्यात आली आहेत.या कोस्टल रोडवरील पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक २, अमरसन्स उद्यानाजवळ; पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक ४, आकृती इमारत वाहनतळाजवळ; पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक ६, हाजी अली जंक्शन; पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक ११, वरळी दुग्धशाळेसमोर; पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक १२, बिंदूमाधव ठाकरे चौकाजवळ; पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक १४, खान अब्दुल गफार खान मार्गावर बिंदूमाधव ठाकरे चौकाच्या उत्तर दिशेला; अशा एकूण सहा ठिकाणी या सुविधा आहेत.या अत्याधुनिक मॉड्युलर जैव विघटनक्षम शौचालयाचा आकार २० बाय २० बाय ८ फूट असून १ केडब्ल्यू सौरऊर्जा प्रणालीवर कार्यरत राहील. यामध्ये महिलांसाठी २ ज्यामध्ये १ पाश्चिमात्य आणि १ भारतीय शैलीचे, तर पुरुषांसाठी २, बालकांसाठी १ आणि दिव्यांगांसाठी १ पाश्चिमात्य शैलीचे शौचालय आहे. तर, ६ युरिनल, ३ वॉशबेसिन, ३ सेन्सर आधारित आरसे, ३ साबण डिस्पेन्सर, १ सॅनिटरी पॅड इन्सिनरेटर, १ सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, १ हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी, ३ हजार लीटर क्षमतेचे १ डीआरडीओ बायो-डायजेस्टर आदी सुविधांचाही यात समावेश आहे.योग्य कचरा व्यवस्थापन करणे व वीज वापर मर्यादित ठेवण्यासाठी या अत्याधुनिक मॉड्युलर शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. सहा ठिकाणी शौचालयांचे एसआयटीसी काम पूर्ण झाले आहे. ही स्वच्छतागृहे सौंदर्यदृष्ट्या आकर्षक असून सागरी मार्ग परिसराच्या सुशोभीकरणात भर घालणारी आहेत. या सुविधेचा मुख्य उद्देश नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व नीटनेटकी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे तसेच, नाममात्र वापर शुल्काच्या माध्यमातून आर्थिक शाश्वतता राखणे हा आहे.घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या धोरणानुसार, नव्याने उभारण्यात आलेल्या आकांक्षी शौचालयासाठी अर्थात अॅस्पिरेशनल टॉयलेट्स ठरविण्यात आलेल्या दरांप्रमाणे वापर शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यानुसार महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी ५ रुपये इतके नाममात्र शुल्क आकारले जाईल.
Gram Panchayat Election : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधी? तारखांबाबत मोठी अपडेट समोर
Gram Panchayat Election : राज्यातील १४,२३७ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत असतानाच राज्य सरकारने निवडणुका किमान सहा महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
Budget 2026: आरोग्य विमा स्वस्त होणार? अर्थसंकल्पात मोठ्या कर सवलतीची शक्यता
Budget 2026: विमा उद्योगाने केंद्र सरकारकडे आरोग्य विमा, ओपीडी खर्च आणि सेवानिवृत्तीनंतरच्या उत्पन्नावर विशेष कर सवलत देण्याची आग्रही मागणी केली आहे.
KL Rahul Bowled : हरप्रीत ब्रारचा तो ‘मिस्ट्री बॉल’अन् केएल राहुलचा उडाला मधला स्टंप! पाहा VIDEO
KL Rahul Bowled : हरप्रीत ब्रार याने आपल्या एका 'जादुई' चेंडूवर कर्नाटकचा स्टार फलंदाज केएल राहुलला चकवा देत क्लीन बोल्ड केले
Sunetra Pawar : मोठी बातमी : सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा!
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या पर्वाची आजपासून सुरुवात होत आहे. अजित पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आता सक्रिय राजकारणात उतरल्या आहेत. आज दुपारी २ वाजता विधिमंडळात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्व आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. या निवडीवेळी पक्षाच्या सर्व आमदारांनी आपली एकजूट दाखवून दिली. या नियुक्तीनंतर लगेचच पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. केंद्रातील राजकारण सोडून आता त्या पूर्णपणे राज्याच्या राजकारणात स्थिरावणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. आज सायंकाळी ५ वाजता त्यांचा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी दिमाखात पार पडणार असून, अजित दादांनंतर राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा वहिनींच्या समर्थ खांद्यावर आली आहे.https://prahaar.in/2026/01/31/ajit-dadas-that-wish-remains-unfulfilled-jayant-patil-makes-a-big-revelation-regarding-the-ncps-merger/सुनेत्रा पवारांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामाराष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार आता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास सज्ज झाल्या आहेत. या मोठ्या जबाबदारीपूर्वी त्यांनी तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आपल्या राज्यसभा खासदारकीचा अधिकृत राजीनामा उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून थोडक्यात पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती वेगाने बदलली. राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषवण्यासाठी आणि विधानसभेचे सदस्य होण्यासाठी त्यांना खासदारकी सोडावी लागणार होती, त्यानुसार त्यांनी हे पाऊल उचलले आहे. आज सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या शपथविधीमुळे सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. अजित दादांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी दिल्लीचे राजकारण सोडून आता थेट मुंबईत राज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.आता सुनेत्रा पवार यांच्या नावाच्या पत्रासह नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीलाआज पार पडलेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत अत्यंत भावूक वातावरणात सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. या निवडीचे अधिकृत पत्र आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवणार आहेत. बैठकीच्या सुरुवातीला सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडून अजित दादांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला छगन भुजबळ यांनी तातडीने अनुमोदन दिले. उपस्थित सर्व ४० हून अधिक आमदारांनी या प्रस्तावाला एकमताने पाठिंबा दिल्याने सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासोबतच अत्यंत महत्त्वाचे असलेले अर्थ मंत्रालय (वित्त खाते) होते. आता सुनेत्रा पवार हे खाते स्वतःकडेच ठेवणार की अनुभवी दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या नेत्याकडे ही जबाबदारी सोपवली जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आज सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या शपथविधीनंतर या खात्यांच्या वाटपाचा सस्पेन्स संपण्याची शक्यता आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेते पदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. विधानभवनात शनिवारी दुपारी २ वाजता झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत याबाबतचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.अजित पवार यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांचे नाव गटनेतेपदासाठी सुचवले, तर या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. यावर उपस्थित सर्व आमदारांनी समर्थन दिल्यानंतर सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.सुनेत्रा पवार यांच्या निवडीचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेतील आणि विधानपरिषदेतील अशा एकूण ४८ आमदारांच्या सह्यांनी मंजूर करण्यात आला. या बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले असून, पहिल्या ठरावानुसार सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली, तर दुसऱ्या ठरावानुसार त्यांची पक्षनेता म्हणून निवड करण्यास मान्यता देण्यात आली. या दोन्ही ठरावांना एकमताने संमती मिळाल्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे आता पक्षाचे सर्वाधिकार आले आहेत.खासदारकीचा दिला राजीनामागटनेतेपदी निवडीची अधिकृत पत्रे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधिमंडळ सचिवालयाकडे सादर केली. दरम्यान, गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सादर केला. सुनेत्रा पवार यांनी बारामती मतदारसंघातून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती; मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती.
NCP Merger News : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर काय असेल शरद पवारांची भूमिका?
NCP Merger News : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने केवळ सत्तेची समीकरणे (NCP Merger News) बदलली नाहीत, तर राष्ट्रवादी
Gold Silver Rates: चांदी एकाच दिवसात 1,28,000 रुपयांनी का घसरली? जाणून घ्या नेमकं कारण
Gold Silver Rates: १९ जानेवारी रोजी प्रथमच ३ लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या चांदीने २९ जानेवारीपर्यंत ४.२० लाख रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला होता.
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड केली
अजित पवारांविषयी संजय राऊतांचे प्रेम पुतनामावशीसारखे
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर लगेच उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची इतकी घाई का केली असं विचारून प्रेमाचा कळवळा दाखवणा-या संजय राऊतांचे प्रेम पुतना मावशी सारखे आहे. महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असताना हिणकस वक्तव्ये करत संजय राऊतांनी दिवंगत अजित पवार यांचा अपमान कसा केला हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. संजय राऊतांनी दुःखामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करू नये, असे टीकास्त्र भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शनिवारी सोडले. या ना त्या प्रकारे सतत नकारात्मक बोलणे, अपप्रचार करणे हेच काम राऊत करत आहेत.राऊतांनी अजितदादांवर वारंवार पातळी सोडून टीका केली होती याचे स्मरणही बन यांनी करून दिले.अजित दादा यांच्या मृत्यूनंतर लगेच उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची इतकी घाई का केली जाते आहे, असे म्हणत भाजपावर टीका करणा-या राऊतांचा खरपूस समाचार घेत श्री. बन म्हणाले की, राऊतांनी या गोष्टीमध्ये नाक खुपसण्याची गरज नाही. सत्तापदावरच्या व्यक्तीचे निधन झाल्यावर त्या पदावरील पुढील नियुक्ती ही क्रमप्राप्त असते. इंदिरा गांधी, जयललिता, मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर लगेचच त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचा शपथविधी झाला होता याचा दाखला देत बन यांनी राऊतांना लक्ष्य केले.परिस्थितीनुसार कठीण प्रसंगात पक्षाच्या हितासाठी निर्णय घ्यावे लागतात. अजितदादांच्या निधनानंतर पक्ष नेता निवड, उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय याबाबत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा असेल. यामध्ये नाहक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेऊन यापुढील निर्णयात शाह यांचा हात असेल असे म्हणणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे अशी प्रखर टीका ही बन यांनी केली.राऊतांना अजितदादांबद्दल कधीही प्रेम नव्हते, ते सातत्याने अजित पवारांचा द्वेष करायचे. अजितदादांना लोकांचे मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत होते, याबद्दल सातत्याने उद्धव ठाकरे, उबाठा गट आणि राऊतांनी त्यांचा द्वेष केला, अशी टीका बन यांनी केली. अजितदादांना लोकांनी नेहमीच भरभरून मते देत निवडून दिले होते, संजय राऊत मात्र एकदाही निवडून आले नाहीत, असा टोला बन यांनी लगावला.
फेब्रुवारी १ पासून बदलणार 'या'बँकांचे नियम; जाणून घ्या नवीन नियम
फेब्रुवारी २०२६ हा महिना सरकारी आणि खासगी बँकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. फेब्रुवारीपासून अनेक बँकांचे नियम बदलणार आहेत. उद्यापासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासूनस्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसी (ICICI) बँक, एचडीफससी (HDFC) बँक आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) च्या ग्राहकांसाठी अनेक मोठे आणि महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत.बँकिंगमधील या मोठ्या बदलांचा थेट परिणाम आता दैनंदिन बँकिंग व्यवहारांवर, क्रेडिट कार्ड वापरावर आणि केवायसीशी संबंधित प्रक्रियांवर होणार आहे.आयएमपीएस ट्रान्सफर शुल्कापासून ते क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स आणि केवायसी वेळेच्या मर्यादेपर्यंत सर्व नियमांमध्ये बदल होणार आहेत.एसबीआय बँकेचे नवीन नियम :एसबीआयने काही IMPS व्यवहारांवर आकारले जाणारे सेवा शुल्क बदलले आहे.₹२५,००० ते ₹ १ लाख दरम्यानच्या ऑनलाइन आयएमपीएस व्यवहारांवर आता ₹२ + जीएसटी आकारला जाईल. तसेच₹१ लाख ते ₹२ लाख दरम्यानच्या व्यवहारांवर ₹६ + जीएसटी आकारला जाईल. तर₹२ लाख ते ₹५ लाखांपर्यंतच्या IMPS व्यवहारांवर ₹१० + GST शुल्क आकारले जाईल. हे नियम येत्या१५ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होतील.आयसीआयसी बँकेचे नवीन नियम :फेब्रुवारी १, २०२६ पासून, ICICI बँक त्यांच्या काही क्रेडिट कार्डवरील बुक माय शो (BookMyShow) मोफत चित्रपट तिकिटाचा लाभ बंद करेल. तर वाहतूक आणि विमा खर्चावर मिळवलेले रिवॉर्ड पॉइंट्स सुरू राहतील. काही कार्ड धारकांसाठी रिवॉर्ड सिस्टम आणखी वाढवली जाईल, म्हणजेच चित्रपटाचा फायदा काढून टाकला जाईल, परंतु इतर रिवॉर्ड्स कायम राहतील.एचडीफससी बँकेचे नवीन नियम :एचडीफससी बँकेने त्यांच्या प्रीमियम इन्फिनिया मेटल क्रेडिट कार्डसाठी रिवॉर्ड पॉइंट रिडेम्पशनमध्ये बदल केले आहेत. १ फेब्रुवारी २०२६ पासून, ग्राहक दरमहा जास्तीत जास्त ५ वेळा रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करू शकतील. पूर्वी, यावर कोणतीही मर्यादा नव्हती.पंजाब नॅशनल बँक (PNB) चे नवीन नियम :पंजाब नॅशनल बँकने त्यांच्या ग्राहकांना त्यांचे KYC अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ज्या खात्यांमध्ये केवायसी प्रलंबित आहे, त्यांनी २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत त्यांचे केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. वेळेवर केवायसी अपडेट न केल्यास खात्यातील व्यवहारांवर निर्बंध लागण्याची शक्यता आहे.
After OLC Marathi Film : ‘आफ्टर ओ.एल.सी’ अखेर प्रदर्शनासाठी सज्ज; शिवानी सुर्वे अॅक्शन मोडवर
After OLC Marathi Film :
Sunetra Pawar Live Updates : सुनेत्रा पवार यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड!
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत मोठी घडामोडी समोर येत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर राज्याची आणि पक्षाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आज सायंकाळी ५ वाजता लोकभवनात सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार असून, त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) आपला नवा नेता निवडला असून, सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. आज पार पडलेल्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्व आमदारांनी आणि नेत्यांनी सुनेत्रा वहिनींच्या नावावर संमती दर्शवली.https://prahaar.in/2026/01/31/ajit-dadas-that-wish-remains-unfulfilled-jayant-patil-makes-a-big-revelation-regarding-the-ncps-merger/सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे रात्रीच मुंबईत दाखल झाले आहेत. आज होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी अधिकृत निवड केली आहे. अजित दादांच्या पश्चात सुनेत्रा वहिनींकडे पक्षाची सर्व सूत्रे सोपवून कार्यकर्त्यांना आणि आमदारांना एकसंध ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. राज्य विधिमंडळाच्या राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा अधिकृतपणे राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला.
Epstein Files: अल्पवयीन मुलींच्या लैंगिक तस्करीप्रकरणी आरोपी असलेल्या जेफ्री एपस्टीनशी संबंधित प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने अलीकडेच सुमारे ३० लाख पानांची ‘एपस्टीन फाइल्स’ सार्वजनिक केली असून, त्यामध्ये अनेक नामांकित व्यक्तींची नावे समोर आली आहेत.
Mardaani 3 Box Office Collection : मर्दानी ३ चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे.
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडली; सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्त्वपूर्ण आदेश
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांची दोन तास तपासणी झाल्यानंतर त्यांना पुन्हा तुरुंगात नेण्यात आले.
Bhumi Padnekar : “लोकांंनी जागरूक राहणे आणि….”; भूमि पेडणेकरने सोशल मीडिया वापराविषयी व्यक्त केले मत
Bhumi Padnekar : अभिनेत्री भूमि पेडणेकर हिने तिच्या सोशल मीडिया वापराबाबत भाष्य केले आहे.
माणसाने आपले कर्तव्य श्रेष्ठ मानावे
गोष्ट लहान, अर्थ महान,शिल्पा अष्टमकरआजच्या काळात आपण हक्कांविषयी खूप बोलतो. माझा हक्क, माझं स्वातंत्र्य, माझी मागणी — हे शब्द नेहमी ऐकायला मिळतात; परंतु हक्क मिळण्याआधी कर्तव्ये पार पाडणे हेच खरे श्रेष्ठत्व आहे, हे आपण अनेकदा विसरतो.कर्तव्य म्हणजे काय?कर्तव्य म्हणजे आपली जबाबदारी, आपले काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडणे. विद्यार्थ्याचे कर्तव्य म्हणजे मन लावून अभ्यास करणे. शिक्षकांचे कर्तव्य म्हणजे विद्यार्थ्यांना घडवणे. पालकांचे कर्तव्य म्हणजे संस्कार देणे. आणि नागरिकांचे कर्तव्य म्हणजे समाज व देशासाठी जबाबदारीने वागणे.महाभारतातील श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्मयोग शिकवला -“कर्म कर, फळाची अपेक्षा करू नकोस.”याचा अर्थ असा की, कर्तव्य पार पाडणे हेच आपले खरे धर्मकार्य आहे.ज्या व्यक्तीने आपले कर्तव्य श्रेष्ठ मानले, ती व्यक्ती कधीही छोट्या स्वार्थात अडकत नाही. ती वेळेचे भान ठेवते, नियम पाळते आणि इतरांप्रती आदराने वागते.आज समाजात अनेक समस्या दिसतात -अनुशासनाचा अभाव, कर्तव्याकडे दुर्लक्ष आणि जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती.यावर एकच उपाय आहे - प्रत्येकाने स्वतः पासून सुरुवात करणे. आपण आपले कर्तव्य नीट पार पाडले, तर समाज आपोआप सुसंस्कृत होईल आणि देश प्रगतीच्या मार्गावर जाईल.म्हणूनच हक्क मागण्याआधी कर्तव्य ओळखू या आणि कर्तव्याला श्रेष्ठ मानून ते निष्ठेने पार पाडू या.यासाठी भगवान पाणिनीची गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते -सर्वश्रेष्ठ व्याकरणतज्ज्ञ भगवान पाणिनी अरण्यात शिष्यांना पाठ देत होते. शिष्य आणि पाणिनी पाठात अगदी रंगून गेले होते. इतक्यात पानांची सळसळ, पाखरांचा आवाज ऐकू आला. आणि काय आश्चर्य! प्रत्यक्ष वाघ! महाराजांचं आगमन झालं होतं. त्या महाराजांना पाहून शिष्य घाबरून पळू लागले. पण भगवान पाणिनी मात्र आपल्या कामात दंग. वाघाला पाहून त्यांनी सरळ “व्याजीघ्रतीनी व्याघ्र” ज्याची घाणेन्द्रीये तीक्ष्ण आहेत तो व्याघ्र, अशी त्या शब्दांची व्युत्पत्ती ते शिष्यांना सांगू लागले.वाघ आला आणि त्याने शिकवण्यात दंग असलेल्या पाणिनींना पाहिले. थोडा वेळ वाघ शांतपणे पाणिनीकडे बघत राहिला. भगवान पाणिनी मात्र शिष्यांना पाठ देण्यात मग्न होते. वाघाने पाणिनींपुढेच बैठक मारली. हा सर्व प्रकार शिष्यगण झुडपांत लपून पाहत होते. ते सर्वजण आश्चर्यचकित झाले. भगवान पाणिनीनी आपला पाठ संपवताच वाघाने पाणिनीला ठार मारले.सर्व शिष्यगण शरमिंदे झाले. वाघ समोर असूनही पाणिनी आपल्या कर्तव्यापासून दूर झाले नाहीत त्यांची एकाग्रता भंगली नाही.तात्पर्य : आपल्या कामात इतके मन असावे की, त्यातून मिळणारा आनंदाचा ठेवा आपल्याला व इतरांना सतत मिळावा.विचार : माणसाने आपल्या प्राणापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानावे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पात सुरू केलेल्या घोषणा आणि नवीन योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपने एक योजना आखली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी सत्ताधारी पक्षाने अर्थसंकल्पाबाबत व्यापक प्रचार मोहीम आखली आहे, जेणेकरून अर्थसंकल्पातील घोषणा आणि धोरणे थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता येतील.भारतीय जनता पक्षाने अर्थसंकल्पाच्या प्रचारासाठी एक सविस्तर आराखडा तयार केला आहे. १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान देशव्यापी अर्थसंकल्प मोहीम सुरू करण्याची भाजपची तयारी आहे.यासाठीच पक्षाने २०२६ च्या अर्थसंकल्पीय मोहिमेची योजना आखली आहे.पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातील.या काळात सर्व केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषदा घेतील आणि अर्थसंकल्पातील मुख्य मुद्दे जनतेसमोर मांडतील.भाजपने देशभरातील अंदाजे १५० ठिकाणी पत्रकार परिषदा घेण्याची योजना आखली आहे. या कार्यक्रमांद्वारे सरकार अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी उचललेल्या पावलांवर प्रकाश टाकेल.सोशल मीडियाचा योग्य वापर :याव्यतिरिक्त, सोशल मीडियाला या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग बनवण्यात आले आहे. यामुळे बजेटमधील ठळक मुद्यांचा प्रचार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केला जाईल.यासाठी, सोशल मीडियाइन्फ्लुएंसर्स यांना सहभागी करून घेतले जाईल आणि बजेटशी संबंधित माहिती रील्सद्वारे सोप्या आणि आकर्षक पद्धतीने सादर केली जाईल. तरुणांपर्यंत बजेटचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्याचेही पक्षाचे उद्दिष्ट आहे.या संपूर्ण अर्थसंकल्पीय मोहिमेची जबाबदारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडे देण्यात आली आहे. त्यांच्या टीममध्येसरोज पांडे, श्रीकांत शर्मा, नरेंद्र रैना, जीवीएल नरसिंह राव, गोपाल कृष्ण अग्रवाल, अनिल अँटनी, संजय टंडन आणि गुरु प्रकाश पासवान यांचा समावेश आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पापूर्वी संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये भारताचा जीडीपी विकास दर ७.० टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.सर्वेक्षणानुसार, देशांतर्गत सुधारणा आणि सरकारी गुंतवणुकीमुळे जागतिक आव्हाने असूनही देशाच्या अर्थव्यवस्थेची अंतर्गत ताकद सतत वाढताना दिसत आहे.
Food: गूळ आणि बाजरी पासून बनवा स्वादिष्ट, गोड आणि पौष्टिक चूरमा
Food: हिवाळ्यात शरीराला उब देणारा आहार खूप गरजेचा असतो. अशा वेळी अनेक सुपरफूड्स असले, तरी बाजरीची सर काही वेगळीच आहे. बाजरीची तासीर उष्ण असते आणि त्यात गूळ मिसळला की शरीराला आतून छान उब मिळते.
प्रतिभारंग,प्रा. प्रतिभा सराफएक थोर साहित्यिक अलीकडेच भेटले. त्यांनी त्यांचे पुस्तक माझ्या हातात दिले. त्यांचे वय साधारण पंच्याऐंशीच्या आसपास असावे. सर्वसाधारणपणे कोणतेही पुस्तक आपण हातात घेतल्यावर त्याचे मुखपृष्ठ पाहतो. त्यावरचे चित्र-फोटो - पेंटिंग बघून झाल्यावर आपण त्या मुखपृष्ठावर लिहिलेले शब्द वाचतो आणि आपण सरळ मलपृष्ठाकडे वळतो. मलपृष्ठावरील मजकूर वाचून झाल्यावर आपण पुस्तक सरळ करतो आणि पहिले पान उलटून आतील मजकूर वाचतो आणि मग त्या माणसासमोरच आतली काही पानं चाळल्यासारखी करतो आणि मग पुस्तक मिटून आपण आपल्या बॅगेत, पर्समध्ये वगैरे टाकतो. हे सर्वसाधारण माझे निरीक्षण आहे. त्याचप्रमाणे त्या साहित्यिकाने दिलेल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहिल्यावर पुस्तकाचे मलपृष्ठ पाहिले आणि आ वासले. याचे कारण म्हणजे साधारण तिशीतला आणि साहित्याचे फारसे ज्ञान नसलेल्या एका कवीने या प्रस्थापित साहित्यिकाच्या पुस्तकाची पाठराखण केली होती. स्वभाविकपणाने मी विचारले की सर तुम्ही याच्याकडून पाठराखण घेतली का? तर सर हताशपणे हसले. कुत्सितपणे म्हणाले की माझ्या वयामुळे मला फारसे घराबाहेर पडता येत नाही त्यामुळे या मुलाकरवी मी माझे पुस्तक प्रकाशकाकडे पाठवले आणि माझ्या कामासाठी दोन तीनदा त्याने त्या प्रकाशकाकडे फेऱ्याही मारल्या. पुस्तक छापून झाल्यावर टॅक्सीत घालून तोच घरी घेऊन आला आणि मी चक्क उडालो. एक नाही दोन नाही चक्क हजार प्रतींवर त्याच्या पाठराखणची मोहोर उमटलेली होती. करणार काय? त्याने मौके पे चौका मारला होता.सरांचे बोलणे झाले. त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर वेगळाच ताण दिसत होता. खरं तर त्यांना हे सांगताना खूप दुःख होत होते; परंतु त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता.हा प्रसंग विस्मृतीत जात नाही तर असाच एक नवीन प्रसंग पाहण्यात आला. एका माणसाने आपल्या पुस्तकाचे काम एका तरुणाकडे सोपवले. खरंतर त्या माणसाचे ते आत्मचरित्राचे पुस्तक होते; परंतु या तरुण माणसाने व्यवस्थितपणे आपले असंख्य फोटो त्या पुस्तकांमध्ये टाकून दिले होते, ज्याचा त्या पुस्तकाशी काहीही संबंध नव्हता. ज्या व्यक्तीचे आत्मचरित्र होते त्यांनी काही फोटो तपासून, पडताळून पुस्तकासाठी, याच्याकडून पाठवले होते; परंतु या माणसाने आपले पितळ उजळवून घेतले होते.एकदा एका कवीने कविता स्पर्धा आयोजित केली. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून सर्व नवोदित कवींनी आपापल्या उत्तम रचना स्पर्धेसाठी पाठवल्या. त्या स्पर्धांचा निकाल काही शेवटपर्यंत लागला नाही; परंतु ज्या कवीने ही स्पर्धा आयोजित केली होती त्याची सहा महिन्यांनंतर दोन कवितांची पुस्तकं बाजारात आली. ही वरवर साधी घटना वाटली तरी दोन नवोदितांनी आपल्याच कविता थोड्याफार फरकाने या संग्रहात असल्याचा त्याविषयीचा तक्रारीचा सूर आळवला; परंतु तो कवी प्रस्थापित होता. त्यामुळे या बिचाऱ्यांचे सूर हवेतच विरले.एका नवोदित लेखकाने आपला लेखसंग्रह प्रस्थापित लेखकाला प्रस्तावनेसाठी दिला. वर्षभर त्यांच्याकडे पडून होता. लेखक दिग्गज असल्यामुळे नवोदित लेखक वाट पाहत राहिला आणि त्याची वाट लागली. कारण त्या प्रस्थापिताच्या नावाने तो लेखसंग्रह प्रसिद्ध झाला.अशा छोट्या मोठ्या घटना आसपास घडतच असतात. आपण म्हणतो की, तळे राखील तो पाणी चाखेलच ना! परंतु किती पाणी चाखावं आणि हंडे भरून किती पाणी घेऊन आपल्या घरातल्या टाक्या भराव्यात, यालाही काही मर्यादा असते!चालायचंच म्हणून आपण सोडून देतो. असे समोरचा माणूस सोडून देतो हे लक्षात आल्यावर चौर्यकर्म वाढत जाते आणि मग काहींची तीच सवय होत जाते.एकदा एका कवी संमेलनात परीक्षक म्हणून जाण्याचा योग आला. साधारण सत्तर-पंच्याहत्तर कवी तरी असतील. दहा एक कवींची कविता वाचून झाल्यावर थोडेसे कंटाळवाणे वाटत असतानाच चक्क एका कवीने माझीच कविता सुरू केली. कवितेला टाळ्या पडत होत्या याचा मला खूप आनंद होत होता. कविता पूर्ण वाचून झाल्यावर मी विचारले,तुझे वय काय?त्याने उत्तर दिले,“एकोणवीस वर्ष.”मी त्याला सांगितले,“ही कविता साधारण पंचवीस वर्षांपूर्वी छापून आलेली आहे.”आयोजक, प्रायोजक यांच्यासहित सर्व कवी माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागले. कविता वाचणारा कवी तर हडबडून गेला. मग मी त्याला सांगितले की, माझीच कविता आहे. मी तुझ्याच वयाची असताना माझ्या कॉलेजच्या मासिकात ही छापून आलेली आहे.”तो फक्त ‘सॉरी’ म्हणाला आणि आपल्या जागेवर जाऊन बसला. पुढचा कवी येऊन कविता सादर करत होता तेव्हा हा चोर कवी मागच्या दरवाजाने हळूच सटकला.अशी वेगवेगळी अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत. प्रत्येक वेळेस मौके पे चौका मारून आपल्याला हवे ते प्राप्त होतेच असे नाही, कधी कधी यामुळे तोंडघशी पडायची पाळी येते, हेही लक्षात घेतले पाहिजे!***चांगल्या माणसांच्या गप्प राहण्यामुळे वाईट माणसांचे फावते.असे मौके पे चौका मारणारी माणसे आपल्याला सातत्याने भेटत असतात. चल यार, खूप दिवसांत पार्टी केली नाही; असं म्हणून आपल्याला पार्टीला घेऊन जातात आणि बिल येण्याच्या क्षणी वॉशरूममध्ये जाऊन बसतात किंवा फोन हातात घेऊन, अरे ऐकू येत नाही... थांब जरा रेंजमध्ये येतो; म्हणत हॉटेलबाहेर निसटतात. त्यामुळे काहीच उपाय नसल्यासारखे आपल्याला बिल भरावे लागते. अशा वृत्तीच्या मित्रांपासून आपण सावध राहायला शिकले पाहिजे! मौके पे चौका मारणाऱ्या चांडाळ-चौकडींपासून चमडी बचाव करायला शिकले पाहिजे!
Sanjay Raut : अजित पवार असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे शक्य होते. आमच्याकडे बोलण्यासारखं खूप असल्याची संजय राऊतांची प्रतिक्रिया
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता त्यांच्या काही वैयक्तिक इच्छा आणि राजकीय हालचालींबाबतचे धक्केदायक खुलासे समोर येत आहेत. अजित दादांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र आणायच्या होत्या आणि त्यासाठी त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून विशेष प्रयत्न सुरू केले होते, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. जयंत पाटील यांनी सांगितले की, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हयातीतच दोन्ही गट एकत्र यावेत, अशी अजित दादांची मनापासून इच्छा होती. या प्रक्रियेसाठी खुद्द शरद पवारांनी माझ्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. गेल्या सहा महिन्यांत या संदर्भात अनेक गुप्त बैठका पार पडल्या असून, दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा सकारात्मक दिशेने सुरू होती. दादांच्या या अचानक जाण्याने राष्ट्रवादीच्या पुनर्रचनेच्या या प्रक्रियेला आता कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.१२ फेब्रुवारीला होणार होतं राष्ट्रवादीचं विलीनीकरण...पण त्याआधीचयेत्या १२ फेब्रुवारीला दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी मुहूर्त ठरला होता, मात्र त्याआधीच काळाने अजित दादांवर झडप घातली. या प्रक्रियेबाबत अधिक माहिती देताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, बारामतीला होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीसाठी आम्ही विमानाने जाणार होतो, पण धावपट्टीच्या तांत्रिक अडचणीमुळे योग्य विमान मिळू शकले नाही. या संपूर्ण प्रक्रियेत सुप्रिया सुळे यांनाही विश्वासात घेण्यात आले होते. आधी पक्ष एकत्र करायचा आणि नंतर इतर सत्तेचे निर्णय घ्यायचे, अशी अजित दादांची स्पष्ट भूमिका होती. दुसरीकडे, अजित पवार यांच्या पक्षातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, सध्या पक्षाचे सर्व निर्णय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे तिघे मिळून घेत आहेत. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय असून मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच तो पार पडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.'दादा रात्री घरी यायचे, एकत्र जेवण करायचो...अजित दादा गेल्या काही काळापासून अत्यंत गुप्तपणे जयंत पाटील यांच्या संपर्कात होते आणि साहेबांच्या (शरद पवार) उपस्थितीतच पुन्हा घरवापसी करण्यासाठी ते आग्रही होते, असा खुलासा खुद्द जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांनी सांगितले की, अजित दादा अनेकदा रात्रीच्या वेळी त्यांच्या निवासस्थानी येत असत. गेल्या काही दिवसांत दादा किमान चार वेळा माझ्या घरी आले होते. आम्ही एकत्र जेवण करायचो आणि तासनतास पक्षाच्या भवितव्यावर चर्चा करायचो. जनमानसात निर्माण झालेली आपली प्रतिमा सुधारून पुन्हा एकदा साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र काम करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, असे पाटील यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी संध्याकाळी दिलेल्या प्रतिक्रियेतही पाटील यांनी या छुप्या हालचालींचे संकेत दिले होते. केवळ सत्तेसाठी नव्हे, तर शरद पवारांच्या हयातीतच पक्ष एकसंध व्हावा यासाठी दादांनी मानसिक तयारी पूर्ण केली होती, हे आता स्पष्ट झाले आहे.८ ते १० वेळा गुप्त बैठका झाल्या होत्याआणखी एक मोठा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे. गेल्या काही काळात दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी जयंत पाटील यांच्या निवासस्थानी तब्बल ८ ते १० वेळा गुप्त बैठका पार पडल्या होत्या असा मोठा खुलासा जयंत पाटील यांनी केला. जयंत पाटील यांनी सांगितले की, अजित दादा माझ्या घरी अनेकदा येत असत. सुरुवातीच्या ४ बैठकांमध्ये तर दादांनी केवळ त्यांच्या मनातील भावनांना वाट करून दिली. शरद पवार साहेबांबद्दल त्यांच्या मनात आजही प्रचंड आदर होता. गेल्या दोन-अडीच वर्षांत जे काही राजकीय मतभेद झाले, ते सर्व विसरून पुन्हा एकदा साहेबांच्या नेतृत्वाखाली एकसंध राष्ट्रवादी उभी करण्यासाठी ते अतिशय सकारात्मक होते. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा जुन्या ताकदीने उभा राहावा, ही दादांची अंतिम इच्छा होती. त्यासाठी त्यांनी वैयक्तिक अहंकार बाजूला ठेवून स्वतः पुढाकार घेतला होता, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.जयंत पाटील ठरवतील ती तारीख मंजूर१६ तारखेला झालेल्या एका निर्णायक बैठकीत अजित पवार यांनी विलीनीकरणाचे सर्वाधिकार जयंत पाटील यांना दिले होते. जयंत पाटील यांनी सांगितले की, १६ तारखेला माझ्या घरी महत्त्वाची बैठक झाली, ज्याला अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील आणि पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. आम्ही आधी जिल्हा परिषद निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचे आणि निकालानंतर ८ फेब्रुवारीला त्याची घोषणा करण्याचे ठरवले होते. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून १२ फेब्रुवारीला अधिकृतपणे पक्ष एकत्र करायचे निश्चित झाले होते. विलीनीकरणावर शिक्कामोर्तब करण्यासाठी नेते अजित दादांना म्हणाले, उद्याच पहाटे आपण साहेबांना भेटायला जाऊया. सुरुवातीला विमानाने जाण्याचे नियोजन होते, पण बारामतीची धावपट्टी लहान असल्याने विमान उतरू शकणार नव्हते. अखेर सर्व नेते पहाटेच गाड्यांनी बारामतीला निघाले आणि सकाळी ८ वाजता शरद पवारांच्या समोर बसले. तिथे झालेल्या सविस्तर चर्चेनंतरच १२ फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. आधी दोन्ही पक्ष एकत्रित करायचे याच्याबद्दल दादांचा आग्रह होता. आता त्याचे बरेच तपशील आहेत, कधीतरी मोकळ्या वेळेत मी त्याचाही खुलासा करेल, पण फारच सविस्तर आणि अनेक वेळा त्याचे चर्चा आम्ही सगळ्यांनी सोबत चर्चा केली होती. काही वेळा सुप्रिया सुळे देखील त्यात उपस्थित होत्या, त्यामुळे बऱ्यापैकी चर्चा पुढे गेलेली होती. त्यांनी मला हे देखील सांगितलं होतं की सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ त्यांच्या पक्षातील अन्य आमदारांना देखील याची त्यांना कल्पना दिलेली आहे. हे त्यांनी आम्हाला स्पष्ट पणाने सांगितलं होतं. अजितदादांचं असं मत होतं की, मी जेव्हा निर्णय सांगतो, तेव्हा तुम्ही चिंता करायची गरज नाही. हे सगळे माझे जे सहकारी आहेत ते मी म्हणेन त्याप्रमाणे निर्णय घेतील असं दादांनी म्हटल्यांचंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णयसुनेत्रा पवार यांचा मंत्रिमंडळातील शपथविधी आणि अजित पवार यांच्या पक्षातील सध्याच्या घडामोडींवर जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सुनेत्रा वहिनींचा शपथविधी हा पूर्णपणे त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असून, मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच हे सोपस्कार पार पडत आहेत, असे पाटील यांनी म्हटले आहे. अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पक्षाचा कारभार नक्की कोण चालवत आहे, यावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले की, सद्यस्थितीत पक्षाचे सर्व महत्त्वाचे निर्णय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काही प्रमाणात छगन भुजबळ हेच घेताना दिसत आहेत. या तिन्ही नेत्यांच्या मतानुसारच सध्या पक्षाची पुढील दिशा ठरत असल्याचे चित्र आहे. जयंत पाटील यांनी यावेळी अधिक भाष्य करणे टाळले. त्यांचा पक्ष सध्या आमच्यापासून स्वतंत्र आहे, त्यामुळे त्यांच्या अंतर्गत निर्णयांवर बोलणे मला योग्य वाटत नाही. त्यांच्या पक्षात नक्की काय सुरू आहे, याची मला सविस्तर माहिती नाही, असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला.https://prahaar.in/2026/01/31/cr-shiv-station-three-passengers-fell-onto-running-local-train-track-during-morning-rush-hour/नियती किती क्रूर असू शकते, हे अजित दादांच्या जाण्याने दिसून आलेनियती किती क्रूर असू शकते, हे अजित दादांच्या जाण्याने दिसून आले, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित दादांच्या अपघाताबाबत बोलताना त्यांनी एका स्थानिक सरपंचाच्या हवाल्याने खळबळजनक माहिती दिली आहे. विमान कोसळण्यापूर्वी हवेत असतानाच त्यातून मोठा आवाज येत होता, असे तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याचे पाटील यांनी नमूद केले. अपघाताच्या कारणांबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, विमानामध्ये तांत्रिक बिघाड होता की अन्य काही, हे आता केवळ 'ब्लॅक बॉक्स'च्या अहवालातूनच स्पष्ट होईल. अजित पवारांनी विलीनीकरणाचा निर्णय हा राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांच्या संमतीने आणि एकमताने घेतला होता, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. अजित दादांसोबतच्या नात्यावर भाष्य करताना पाटील भावूक झाले. मी, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील आणि आर. आर. (आबा) पाटील आम्ही अनेक वर्षं एकत्र काम केलं. आमच्यात कधीही एकमेकांविरुद्ध स्पर्धा नव्हती. राजकारणात मर्यादा कशा पाळायच्या, याचे उत्तम भान दादांना होते. त्यांनी कधी माझ्यावर आणि मी कधी त्यांच्यावर टीकेची मर्यादा ओलांडली नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.अजित पवार हे एक उत्तम मुख्यमंत्री ठरले असते...अजित पवार जर मुख्यमंत्री झाले असते, तर त्यांनी महाराष्ट्राचा कायापालट केला असता. कामाचा धडाका आणि अंमलबजावणीतील त्यांचा हातखंडा राज्यासाठी प्रभावी ठरला असता, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी अजित दादांच्या प्रशासकीय कौशल्याचे कौतुक केले. दादांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादीच्या एकीकरणाचा चेंडू जयंत पाटलांनी अजित पवार गटाच्या विद्यमान नेत्यांच्या कोर्टात टाकला आहे. जयंत पाटील म्हणाले की, विलीनीकरणाच्या चर्चेवेळी दादांचा एक ठाम विश्वास होता. माझ्या पक्षात मी जे म्हणेन तेच होईल आणि एकही आमदार विरोधात जाणार नाही, याची त्यांना खात्री होती. मात्र, आता ज्या नेतृत्वाशी मी चर्चा करत होतो, तेच नेतृत्व (अजित पवार) आपल्यात नाही. त्यामुळे आता ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्यांनी पुढाकार घेऊन दादांचे शेवटचे स्वप्न पूर्ण करावे. अजित दादांची शेवटची इच्छा 'एकसंध राष्ट्रवादी' हीच होती. ही इच्छा पूर्ण करण्याची सद्बुद्धी सर्वांना मिळो, असे आवाहन जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे. दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सीता व नीता या दोघी बहिणी रोजच्यासारख्या सायंकाळी आपली शाळा आटोपल्यावर घरी आल्या. आपला अभ्यास उरकून घेतला. त्या त्यांच्या मावशीजवळ प्रश्न विचारण्यासाठी जाऊन बसल्या.“मावशी सकाळी सूर्य उगवण्याआधी आपण झुंजूमुंजू झाले असे म्हणतो. ते कसे असते?” सीताने शंका विचारली.“संधिप्रकाशासारखीच प्रक्रिया सकाळी सूर्योदयापूर्वीही होत असते. संधिप्रकाशासारखाच प्रकाश आपणास रात्रीचा अंधार संपल्यानंतर सकाळी पूर्व दिशेस सूर्योदयाच्या आधी दिसतो. त्यालाच ‘झुंजरूक’ किंवा ‘झुंजूमुंजू’ असे म्हणतात. सूर्य क्षितीजाखालून किंचितसा वर डोकावताच हा झुंजरूक सुरू हाेतो. सूर्य जसजसा वर येतो तसतसा हा झुंजरूक हळूहळू वाढत जातो, तसतसे तांबडे फुटते, हळूहळू दिवस उजाडू लागतो. शेवटी प्रत्यक्ष सूर्यच पूर्णपणे उगवतो नि चोहिकडे स्वच्छ उजेड पडतो. त्यालाच दिवस म्हणतात. आले ना आता लक्षात?” मावशीने प्रेमाने विचारले.“होय मावशी! हे तर लक्षात आलं. आता संधिप्रकाशानंतर रात्र कशी होते हे सांगशील तर बरे होईल.” नीता म्हणाली.“आणि मावशी! रात्रीनंतर दिवस कसा काय होतो गं? ते सुद्धा सांग आम्हाला.” सीताने नीताच्या प्रश्नात भर घातली.“सांगते. तेही सांगते,” मावशी सांगू लागली, “आपली पृथ्वी ही स्वत:भोवती फिरताना सतत सूर्याभोवतीसुद्धा फिरत असते हे आताच थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलेच आहे. लक्षात आहे ना?” मावशीने अंदाजे खडा टाकला.“होय मावशी.” दोघीही म्हणाल्या.“फारच छान!” मावशी म्हणाली, “तुम्ही दोघीही अभ्यासात्मक गोष्टी चांगल्या लक्षात ठेवता, ही आनंदाची बाब आहे. असे लक्षात ठेवत गेल्याने व वारंवार आठवून पाहत गेल्यानेच तर स्मरणशक्तीची चांगली वाढ होते.” मावशी पुढे सांगू लागली, “आपल्या पृथ्वीला स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जो कालावधी लागतो त्याला एक दिवस म्हणतात. त्याचेच आपण आपल्या सोयीसाठी चोवीस भाग केलेत व त्यांना आपण तास म्हणतो. म्हणजेच पृथ्वीला स्वत:भोवती एक गिरकी पूर्ण करण्यास २४ तास लागतात म्हणून एक दिवस हा २४ तासांचा असतो.”“पण मावशी दिवस तर सहसा १२ तासांचाच तर असतो ना?” सीता विचारत पुढे बोलली, “आणि तू तर सांगते की दिवस हा २४ तासांचा असतो.”“बरोबर आहे ते.” मावशी बोलली, “२४ तासांच्या दिवसाला खरे तर एक वार असे म्हणतात. त्यालाच अहोरात्र किंवा दिनरात्र अथवा रातदिन म्हणतात. सांगा बरे एकूण किती व कोणकोणते वार आहेत?” मावशीने प्रश्न केला.“एकूण सात वार आहेत मावशी आणि ते म्हणजे...” सीता उत्तर देत असतानाच मध्येच नीता बोलत “रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार.” असे खडाखड आळीपाळीने दोघींनीही वारांची नावे सांगितली.मावशी पुढे म्हणाली, “मानवाने त्याच्या सोयीसाठी या चोवीस तासांचे म्हणजे एका वाराचे दोन भाग केले आहेत. पृथ्वीवरील कोणत्याही एखाद्या ठिकाणी पूर्वेकडे सूर्य उगवल्यापासून म्हणजे एका सूर्योदयापासून तर तो परत त्याच ठिकाणी पुन्हा उगवेपर्यंतच्या म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतच्या कालावधीला एक वार म्हणतात. जोपर्यंत सूर्य आपणास दिसतो त्या काळाला दिवस म्हणतात. असा १२ तासांचा दिवस होतो. तसेच ज्यावेळी सूर्य दिसत नाही त्या काळाला रात्र म्हणतात. अशी १२ तासांची रात्र असते. म्हणूनच १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र असे म्हणतात आणि एक दिवस व एक रात्र मिळून एक खरा दिवस किंवा वार होतो.”“चला आजची चर्चा आपण जरा थांबवू. मला एक पुस्तक वाचायचे आहे.” मावशी बोलली.“हो मावशी.” दोघीही म्हणाल्या व मावशीजवळून उठल्या.
Jayant Patil : दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा घटनाक्रम आणि तारखेबाबत जयंत पाटलांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
'राष्ट्रवादीकडे असलेलं सर्वात मोठं पद सुनेत्रा पवारांनी स्वीकारावं'
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या जे आहे त्यात राज्याचे उपमुख्यमंत्रिपद हे सर्वात मोठे पद आहे. यामुळेच हे पद अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी स्वीकारावे अशी आमची इच्छा आहे. एकदा सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या की त्यांच्या नेतृत्वात इतर राजकीय प्रश्न सोडवता येतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसने नेते आणि मंत्री छगन भुजबळ म्हणाले.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीन करण्याबाबत चर्चा सुरू होती का ? या प्रश्नावर पक्षाशी संबंधित सर्व राजकीय प्रश्न सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या की त्यांच्या नेतृत्वात सोडवता येतील असेच भुजबळ पुन्हा म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत पक्ष आग्रही आणि ठाम असल्याचे भुजबळ म्हणाले.सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करणार किंवा कसे याबाबत मला कोणतीही माहिती नाही असे शरद पवारांनी सांगितले. या संदर्भात आत्ता मी बोलू शकत नाही. पण सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे ही माझ्या पक्षाची भूमिका मी पुन्हा एकदा आपल्यापुढे ठामपणे मांडेन असे छगन भुजबळ म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार पक्षाच्या आमदारांची आज म्हणजेच शनिवार ३१ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील मुख्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षाचा गटनेता निवडला जाणार आहे. अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या गटनेता या पदासाठी निवडीची प्रक्रिया आजच पूर्ण केली जाणार आहे. या निवड प्रक्रियेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. या भेटीनंतर राज्यपालांकडे शपथविधीसाठी वेळ मागितला जाईल आणि लवकरच सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री या पदाची शपथ घेतील, असे सूत्रांकडून समजते.
Sonam Kapoor: बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दुसऱ्यांदा आई होणार असलेली सोनम नुकतीच मुंबईतील लोअर परेल येथे आयोजित एका आंतरराष्ट्रीय ब्युटी ब्रँडच्या इव्हेंटमध्ये दिसली.
मुंबई : मुंबईच्या लोकल प्रवासातील जीवघेणी गर्दी पुन्हा एकदा प्रवाशांच्या मुळावर उठली आहे. शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या शीव स्थानकाजवळ तीन प्रवासी धावत्या लोकलमधून रुळांवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. अफजल चौधरी, सचिन विश्वकर्मा आणि जेनिल सय्यद या तीन प्रवाशांनी शुक्रवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास कुर्ला स्थानकातून सीएसएमटीकडे जाणारी धीमी लोकल पकडली होती. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने या तिघांनाही आत शिरता आले नाही आणि त्यांना दारावरच लटकून प्रवास करावा लागला. गाडी सुरू झाल्यानंतर काही वेळातच शीव स्थानकाजवळ गर्दीच्या रेट्यामुळे या तिघांचाही तोल गेला आणि ते धावत्या लोकलमधून थेट रुळांवर फेकले गेले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. लोकलमधील वाढत्या गर्दीमुळे काही दिवसांपूर्वीच एका शिक्षकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, आता या अपघातामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.https://prahaar.in/2026/01/31/border-2-box-office-collection-day-8-sunny-deols-film-crosses-rs-300-crore/जखमींना तातडीने उपचारासाठी शीव रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींपैकी अफजल चौधरी यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. तर सचिन आणि जेनिल या दोन प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे. या भीषण दुर्घटनेनंतर बचाव कार्यासाठी रेल्वे प्रशासनाला ओव्हरहेड वायरमधील (OHE) विद्युत पुरवठा काही काळ बंद करावा लागला. याचा थेट परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेतच गाड्या थांबल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. जखमी प्रवाशांना रुळांवरून सुरक्षितपणे बाजूला केल्यानंतर आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विद्युत पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आणि लोकल वाहतूक धीम्या गतीने पूर्ववत करण्यात आली.रेल्वे पोलिसांकडून तपास सुरूसकाळी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी आणि प्रवाशांचे दाराला लटकणे ही नेहमीचीच बाब झाली असली तरी, ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार गर्दीच्या रेट्यामुळे प्रवाशांचा तोल गेला असावा असे वाटत असले तरी, प्रवासात डब्यामध्ये प्रवाशांमध्ये काही वादावादी किंवा झटापट झाली होती का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. डब्यातील इतर प्रवाशांचे जबाब आणि उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस या निष्कर्षापर्यंत पोहोचणार आहेत. या तपासानंतरच अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.मध्य, हार्बर रेल्वे विस्कळीतएका बाजूला मध्य रेल्वेच्या कळवा आणि ठाणे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांजवळ साचलेल्या कचऱ्याला सायंकाळच्या वेळी भीषण आग लागली. या आगीमुळे निर्माण झालेला धूर आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुख्य मार्गावरील वाहतूक तब्बल अर्धा तास थांबवण्यात आली होती. दुसरीकडे, हार्बर रेल्वेवरही तांत्रिक बिघाडाने प्रवाशांची वाट अडवली. खांदेश्वर आणि मानसरोवर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवरील तब्बल चार सिग्नलमध्ये अचानक बिघाड झाला. या बिघाडामुळे लोकल गाड्यांच्या एकामागे एक रांगा लागल्या आणि रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले. घरी परतण्याच्या घाईत असलेल्या हजारो प्रवाशांना या दुहेरी संकटामुळे स्थानकांवर ताटकळत उभे राहावे लागले.
Shirala News : राजवीर व त्याची लहान बहीण कार्तिकी (वय ४) आपल्या घरातून शेजारी घरात खेळत जात असताना अचानक बिबट्याने राजवीरवर हल्ला केला.
PM Modi Talk To Venezuela Acting President :
Sunil Tatkare : शरद पवारांंचा विलीनकरणाचा गौप्यस्फोट; सुनील तटकरेंची एकाच वाक्यात प्रतिक्रिया
Sunil Tatkare : शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या विधानानंतर आता सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : सनी देओलच्या बहुप्रतिक्षित 'बॉर्डर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या विकेंडनंतर चित्रपटाच्या कमाईत थोडी घट झाली असली तरी, या चित्रपटाने जगभरात ३०० कोटी रुपयांचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. 'सॅकनिल्क' (Sacnilk) या इंडस्ट्री ट्रॅकरनुसार, चित्रपटाने आतापर्यंत भारतात २३५.२५ कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे.https://prahaar.in/2026/01/31/sunetra-pawar-will-take-oath-deputy-chief-minister-sharad-pawar-big-statement-on-merger-ajit-pawar-wish/पहिल्या आठवड्यातील तुफान प्रतिसादानंतर, ८ व्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी चित्रपटाने ११ कोटी रुपयांची कमाई केली. शुक्रवारी थिएटरमध्ये प्रेक्षकांची एकूण उपस्थिती १५.०५ टक्के इतकी होती. यामध्ये सकाळच्या शोला ६.५८ टक्के, तर रात्रीच्या शोला सर्वाधिक २३.६५ टक्के प्रतिसाद मिळाला. मुंबईमध्ये ८५१ शोमध्ये २१ टक्के उपस्थिती नोंदवली गेली. दिल्ली-एनसीआरमध्ये १,२७० शोमध्ये १४.६७ टक्के उपस्थिती पाहायला मिळाली. शुक्रवारी राणी मुखर्जीचा 'मदार्नी ३' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३.८ कोटींची कमाई केली असली तरी, 'बॉर्डर २' च्या कमाईच्या वेगावर त्याचा कोणताही मोठा परिणाम झालेला दिसत नाही.अनुराग सिंग दिग्दर्शित 'बॉर्डर २' हा १९९७ मध्ये आलेल्या जेपी दत्ता यांच्या 'बॉर्डर' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल आहे. यामध्ये सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांज, अहान शेट्टी, मोना सिंग आणि सोनम बाजवा यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि जेपी दत्ता यांची मुलगी निधी दत्ता यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री…! कोण आहेत सुनेत्रा पवार?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर काल (शुक्रवारी, ता. ३०) खासदार सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आज त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून, सामाजिक कार्यातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता सत्तेच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचला आहे. परंतु, अजित पवार यांच्या पत्नी आणि पवार कुटुंबियांची सून, ही ओळख वगळता सुनेत्रा यांचा राजकीय प्रवास नेमका कसा आहे, ते जाणून घेऊयात...सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी तेर (जि. धाराशिव) येथे झाला. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण असून, त्यांना मोठा राजकीय वारसा लाभला. १९८५ मध्ये अजित पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर काटेवाडी (ता. बारामती) येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली.काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ रोवण्याचे श्रेय सुनेत्रा पवार यांना जाते. पहाटेपासून स्वतः हातात खराटा घेऊन कामाला सुरुवात करत त्यांनी संपूर्ण गावाला या अभियानात सहभागी करून घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली काटेवाडीने ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या कामाची दखल घेत देश-विदेशातील अभ्यासकांनी काटेवाडीला भेट दिली. याच कार्यामुळे त्यांना सार्क देशांच्या 'साकोसान' परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या सामाजिक कार्याची दखल व्यापक पातळीवर घेतली गेली.बारामतीमध्ये ‘एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण तसेच महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती असे विविध उपक्रम त्यांनी राबवले. या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय व नेतृत्वात्मक सहभाग राहिला. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.लग्नानंतर शेतकाम, पोल्ट्री व्यवसाय, गाईगुरे सांभाळणे आणि दूध काढणे अशी कामे त्यांनी आवडीने केली. अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीत घर सांभाळणे, नातेसंबंध जपणे, सामाजिक कार्य करणे तसेच कठीण प्रसंगी त्यांना साथ व सल्ला देणे, ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम नोंदवला जाणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला. त्यापूर्वी त्या पवार कुटुंबातील प्रत्येक निवडणुकीत सक्रिय प्रचार करत असत आणि बारामतीतील अनेक विक्रमी विजयांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. पक्षफुटीनंतर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली; मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तरीही त्या खचल्या नाहीत आणि जनसेवेत सक्रिय राहिल्या.यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. राज्यसभा खासदार म्हणून काम करत असतानाच त्यांच्याकडे तालिका सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या आसनावर विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला. आता अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अवघ्या ७२ तासांत महाराष्ट्राच्या राजकारणाने एक अनपेक्षित वळण घेतले आहे. शुक्रवारी दिवसभर चाललेल्या वेगवान घडामोडींनंतर आता सुनेत्रा पवार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी ५ वाजता राजभवनावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. काल दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीतच सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे, एकीकडे शरद पवार हे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचे संकेत देत असताना, दुसरीकडे मात्र या मोठ्या निर्णयाबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला या प्रक्रियेत बाजूला ठेवले गेले की त्यांना मुद्दाम अंधारात ठेवले गेले? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यानच झालेली ही नाट्यमय निवड राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फोडणार की सत्तासंघर्षाला पूर्णविराम देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.https://prahaar.in/2026/01/31/sunetra-pawar-oath-to-the-decision-regarding-sunetra-pawar-was-taken-in-a-hurry-know-what-exactly-happened/विलीनीकरणाचा 'मुहूर्त' ठरला होता, पण...महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका बाजूला सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची तयारी सुरू असतानाच, दुसरीकडे शरद पवार यांनी केलेल्या एका खळबळजनक विधानामुळे खळबळ उडाली आहे. येत्या १२ तारखेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृतपणे विलीनीकरण होणार होते, असा मोठा खुलासा शरद पवार यांनी केला आहे. गेल्या चार महिन्यांपासून अजित पवार आणि जयंत पाटील या विलीनीकरणासाठी सातत्याने चर्चा करत होते आणि हा निर्णय आता अंतिम टप्प्यात आला होता, असेही पवारांनी स्पष्ट केले. दोन्ही गट एकत्र यावेत ही खुद्द अजितदादांची मनापासून इच्छा होती आणि त्यांच्या या शेवटच्या इच्छेचा आम्ही मान राखू इच्छितो, असे म्हणत शरद पवारांनी विलीनीकरणाला थेट हिरवा कंदील दिला आहे. मात्र, या विलीनीकरणाच्या प्रक्रियेला अजित पवार गटातील काही बड्या नेत्यांचा तीव्र विरोध असल्याचे समजते. हे विलीनीकरण झाल्यास आपले राजकीय महत्त्व कमी होईल, अशी भीती या नेत्यांना वाटत आहे. याच विरोधामुळे शरद पवारांना अंधारात ठेवून आणि विलीनीकरणाची प्रक्रिया लांबणीवर टाकण्यासाठीच घाईघाईने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेण्यात आला का? अशा चर्चांना आता उधाण आले आहे. इतकंच नव्हे तर अजित पवारांनी १४ बैठका घेतल्या होत्या. विलीनीकरणाबाबत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात बैठका झाल्या होत्या. बैठकीत सहभागी झालेले नेते विलीनीकरणावर सकारात्मक होते. त्या बैठकीत विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता.
Alia Bhatt: बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट आज अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणली जाते. वैयक्तिक आयुष्यात ती अभिनेता रणबीर कपूरची पत्नी आणि लाडकी मुलगी राहाची आई आहे.
Yugendra Pawar Post : “प्रिय अजितकाका, तुम्हाला बघत-बघत,…”; युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट चर्चेत
Yugendra Pawar Post : अजित पवार यांच्या निधानानंतर पुतण्या युगेंद्र पवार यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
स्वामीराजने जिंकला रघुनाथ महोत्सव
भालचंद्र कुबल : पाचवा वेदरघ्या गेला. नाटकाची शीर कापून एक्झिट घेता झाला. नाटक रक्तासारखं वहायचं त्याच्या नसानसातून. बऱ्याच आदरयुक्त संबोधनानी म्हणजे काका, सर, रघुभाऊ, कंडम, खिडम्या अशा नावांनी ओळखला जाणारा हा माणूस माझ्यासाठी रघ्या होता. साहित्य संघात हरीष तुळसुलकरच्या ‘कडी-कपारी’तली त्याची रांगत रांगत घेतलेली एक्झिट आमच्या दोघांची ओळख करून गेली. रघ्या १९८१ चा आय.एन.टी. स्टार होता. आजपर्यंत एक्झिटला स्टँडिंग ओव्हेशन मी त्यानंतर कधीही बघितलेलं नाही. नसीर, ओम पुरी, सारख्या सर्वसामान्य हिरो वठवणाऱ्या जमान्यातला रघ्या, मराठी रंगभूमी गाजवेल असं वाटलं होतं पण त्याच्या नोकरीने त्याला हिरो बनू दिलं नाही. पण म्हणून मग त्यानं नाटक देखील सोडलं नाही. व्ही.आर.एस. घेऊन देवगडात २५-३० कलमांची बाग घेऊन वर्षाकाठचे एकदाच कमवून बाकी दिवस नाटक करत राहिला. कणकवलीतील विजय चव्हाणांची अक्षरसिंधू आणि वामन पंडितांचे आचरेकर प्रतिष्ठान ही त्याची दोन होम ग्राऊंड होती. दोन्ही होम ग्राऊंडवर त्याने तुफान बॅटिंग केली. मी त्याचा फॅन होतो. पुढल्या काळात लेखक झाल्यावर माझ्या दोन एकांकिका करुन त्याने नंबरातही आणल्या. ‘ही संगीत शिवपंचायतनाची दुसरी बाजू’मधील सटवाई रघ्यामुळे तीव्र झाली आणि ‘अळीचा अजगर’ मधले दोघे बाप इतके ‘कोमल’ असू शकतात याचा अंदाज रघ्यानेच आणून दिला. मग काही काळाने त्याला परीक्षक म्हणूनही भेटलो. ‘झाला सोहळा अनुपम’मधे पुन्हा एकदा त्याला बेस्ट अॅक्टर द्यावे लागले. ‘आगाशे पाटील गायकवाड’ आणि ‘एक दिवस मठाकडे’ या दोनही नाट्याकृती फ्लॉप झालेल्याही मी परीक्षक म्हणून पहाव्या लागल्या. रात्रीचे ९ वाजले की ईप्कोने दात घासणारा रघ्या कुणालाही सामोरा जायचा. विशेष म्हणजे समोरच्याचे ऐकून घ्यायचा आणि नाही पटले तर खरखरणाऱ्या वर खाली होणाऱ्या पट्टीत भच्या भाषेत शिव्याही घालायचा. अशाच एका संध्याकाळी उंबरठा स्पर्धेला मी परीक्षक म्हणून रहाण्याचं नाकारलं आणि शेवटपर्यंत बोललो नाही.याच रघुनाथ कदमला रजनीश राणे आणि अशोक परब यांनी त्याच्या स्मृतींचा जागर स्वामीराज महोत्सवातून १७ व १८ जानेवारीला जागवला. स्वामीराज महोत्सव हा स्वामीराज प्रकाशन संस्थेचा वार्षिक नाट्यमहोत्सव आहे, जो मराठी प्रायोगिक रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आला. स्वामीराज प्रकाशन ही मुंबईतील अग्रगण्य प्रकाशन संस्था आहे, जी नवीन रंगकर्मींना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे आणि मराठी रंगभूमीवरील प्रायोगिक नाट्यप्रयोगांना ऊर्जा देण्यासाठी ओळखली जाते. महोत्सवाचा उद्देश हा नवीन नाटकांना सादर करण्यासाठी कायम स्वरूपी प्लॅटफॉर्म मिळावा यासाठीच आयोजित केला जातो. उदाहरणार्थ, यंदाच्या म्हणजेच २०२६ च्या आवृत्तीत दोनदिवसीय कार्यक्रमात अनेक नाटके झाली. यशवंत नाट्यमंदिरातील साळगावकर सभागृह नव्या जुन्या रंगकर्मीनी भरुन गेले होते. रघुनाथ कदमला आठवताना विक्रम भागवत, विजय चव्हाण, राजीव जोशी, वामन पंडित, मुकुंद सावंत व सुषमा राऊत यांनी आपापल्या वाट्याला आलेला रघ्या सांगितला. रघुनाथने दिग्दर्शित केलेली ‘युगेन् युगे तुच’ हे लेखक अजय कांडर यांचे, ‘साठा उत्तराची कहाणी’ हे विक्रम भागवत यांचे आणि जयंत पवारांचे ‘जन्म... एक व्याधी’ ह्या तीन नाट्याकृती सादर झाल्या. स्वामीराज प्रकाशन नाट्यकर्मींचा पुरस्कार देऊन सन्मानित करते हे इथे प्रकर्षाने नमूद करायला हवं. अतुल परचुरे रंगस्मृती पुरस्कार यंदा चेतन दळवी यांना, सेवाव्रती पुरस्कार जयवंत देसाई यांना, तर भाऊ कोरगावकरांचा प्रयोगघर पुरस्कार अमर हिंद मंडळास प्रदान करण्यात आला. डॉ. अनिल बांदिवडेकर, अनिल गवस आणि ज्ञानेश महाराव यांनी सांगता सोहळ्याचा समारोप वरील पुरस्कार देऊन केला. उद्घाटन सोहळ्याला सुद्धा जनार्दन लवंगारे, अरुण नलावडे आणि ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या उपस्थितीने महोत्सव यशस्वी होणार याचे जणू भाकीत वर्तवले होते. रघ्याचा लोअर परळ ते कणकवली व्हाया देवगड हा प्रवास अचंबित करुन टाकणारा आहे. अमोल मुझुमदारला पाहिलं की करीयरची तुलना म्हणून मांडायची झाल्यास दोघेही स्थानिक प्रदेशातच अफलातून खेळले. टेस्टमॅच किंवा मेन स्ट्रीम व्यावसायिक नाटक दोघांच्याही नशिबात नव्हतं. पण एकाने महिला वर्ल्ड कप जिंकून दिला आणि एकाने स्वामीराज महोत्सव...!
राजरंग : राज चिंचणकरकोणत्याही कलाकृतीच्या सादरीकरणाच्या मागे अनेक विभाग आणि व्यक्ती कार्यरत असतात. लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या आणि अशा अनेक मंडळींचे त्या कलाकृतीच्या निर्मितीमागे कष्ट असतात. मात्र ती कलाकृती रसिकांसमोर सादर होताना त्या कलाकृतीच्या लेखकाला दुर्लक्षिले जाते; अशी चर्चा कलाक्षेत्रात कायम सुरू असते. वास्तविक, लेखक हा त्या कलाकृतीचा जन्मदाता असतो; मात्र नंतरच्या काळात याच लेखकाचा संबंधित मंडळींना विसर पडल्याची ओरड नेहमी होत असते. याच पार्श्वभूमीवर काही ठोस भाष्य करणाऱ्या 'आत्मचरित्र' आणि 'वार्ता लिफ्ट' या दोन एकांकिका सध्या मराठी रंगभूमीवर लक्ष वेधून घेत आहेत. 'लेखक' नामक महत्त्वाच्या घटकाला केंद्रस्थानी ठेवत, हे दोन प्रयोग सध्या रंगभूमीवर काही सांगू पाहत आहेत. यातून लेखकाचे 'भूमिका' म्हणून जगणे प्रकर्षाने दृगोच्चर होत आहे.या दोन एकांकिकांपैकी 'आत्मचरित्र' या एकांकिकेचे लेखन दीपक कुलकर्णी यांनी १९८८ मध्ये केलेले आहे; तर 'वार्ता लिफ्ट' ही एकांकिका वैभव पाटील यांनी यावर्षी लिहिली आहे. दीपक कुलकर्णी यांची 'आत्मचरित्र' ही एकांकिका त्याकाळी खूप गाजली होती. एक लेखक एका आडगावात, वीस वर्षे एका वाड्यात नोकरासोबत राहत आहे. प्रसिद्धी, पैसा, सन्मान यापासून तो खूप लांब आहे. पण आपल्या भूतकाळापासून पलायन करण्याकरता त्या लेखकाने चित्रकला जवळ केलेली आहे. त्याचे बोध मन म्हणत आहे की आत्मचरित्र लिही; पण अबोध मनातल्या त्याच्या आठवणी त्याला त्रास देत आहेत. आत्मचरित्र लिहिताना स्वतःशी प्रतारणा करावी लागेल म्हणून हा लेखक शेवटपर्यंत आत्मचरित्र लिहीत नाही. असा आशय असलेली ही एकांकिका तिच्या शक्तिशाली आशयामुळे मनाची पकड घेते. नीलेश पवार, राजन काजळरोकर आदी कलाकार यात भूमिका साकारत आहेत. अशीच, 'लेखक' या विषयाशी संबंध असलेली दुसरी एकांकिका म्हणजे 'वार्ता लिफ्ट'. ही एकांकिका वैभव पाटील या युवा लेखकाने लिहिली आहे. आजची पत्रकारिता व मुलाच्या आजारपणासाठी प्रकाशकाला पुस्तके विकणारा लेखक यांच्या आयुष्यातली हतबलता यात मांडली आहे. समाजातली आजची पत्रकारिता व लेखकाचे सामाजिक स्थान, हा या एकांकिकेचा पाया आहे. अभय धुमाळ, दिनार केळुसकर आदी कलाकार यात भूमिका रंगवत आहेत. या एकांकिकांची निवड आणि दिग्दर्शन महेंद्र डोंगरे यांनी केले असून, विषयांचे विविधिकरण शोधत असताना त्यांची कलाकार म्हणून असलेली सामाजिक बांधिलकी व नाटकाविषयीची कळकळ यातून दिसून येते.एकूणच ही सगळी प्रक्रिया आणि प्रयोगांच्या निमित्ताने महेंद्र डोंगरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणतात, “एकांकिका ही केवळ रंगभूमीची एक शाखा नाही; तर समाजाच्या बौद्धिक, सामाजिक व कलात्मक जाणिवेचा तो आरसा आहे. इतिहास, सद्यस्थिती, सुवर्णकाळ आणि भविष्य असे तिचे चार टप्पे पाहिले, तर एक सुसंगत असा प्रवास दिसून येतो. १९७० ते १९९० हा काळ मराठी एकांकिकेचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. त्या काळात 'लेखन' हे केंद्रस्थानी होते. त्याचा साहित्यिक दर्जा उच्च होता. एकांकिका म्हणजे 'शॉर्टकट' नव्हता; तर ती एकप्रकारची कलात्मक जबाबदारी होती. त्या काळात, एकांकिका म्हणजे एका व्यक्तीच्या माध्यमातून संपूर्ण समाज बोलत असे. याच संदर्भाने, 'वार्ता लिफ्ट' आणि 'आत्मचरित्र' या दोन एकांकिका भाष्य करतात.वास्तविक, हे सर्व मांडण्याचे कारण म्हणजे काळाच्या वेगवान प्रवाहात, जिथे 'रिल्स' हा प्रकार मानवी मनाचा भाग होत आहे; त्याचकाळात एकांकिकेचे विषयही एका वाक्यात सांगता येतील. पण शब्द फुगवटा ३५ ते ४० मिनिटे फुगवून एकांकिका सादर केल्या जात आहेत. त्यात मुख्य भाग कल्पनाविष्काराचा असतो. अशाच या प्रवाहात गोरेगाव, मुंबईची 'सोहम साधना ग्रुप' ही संस्था वेगळा प्रयोग करत आहे. गेल्या महिन्यात या संस्थेने 'विदूषक' या विषयावर दोन एकांकिका सादर केल्या होत्या. आता ही संस्था 'लेखक' या सामायिक विषयावर दोन एकांकिका करत आहे. वाचण्याऐवजी पाहण्यात रस घेणारा आजचा समाज आहे. एकेकाळी शब्दांची गारुडे घालणारी लेखक मंडळी समाजात अतिशय प्रतिष्ठा, मानसन्मान बाळगून होती. आज प्रवाहाच्या ओघात खाली ढकलला गेलेला लेखणीकार लेखक, नाटकाच्या दृकश्राव्य माध्यमातून तसूभरही उंचावला तरी माझी कल्पना सार्थकी लागली, असे मी समजेन.”
सुंदर स्वप्नातल्या बंगल्यातील मृण्मयीचं एक नातं असंही
टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमलबालकलाकार ते अभिनेत्री असा सुयश प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी सुपल. व्यावसायिक रंगभूमीवर पहिलं पाऊल टाकणाऱ्या मृणामयीचं ‘एक नातं असंही’ या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग आज पनवेलमध्ये आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये होणार आहे.मृण्मयीचे शालेय शिक्षण वांद्रेच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत झाले. जेव्हा ती शिशू वर्गात होती, तेव्हाच तिने ऑडिशन देण्यास सुरुवात केली. तिने मिराकल्स अॅकॅडमीमधून मॉडेलिंगचा कोर्स केला होता. जेव्हा ती तिसरीत होती तेव्हा तिला बालाजी प्रॉडक्शनची स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘हे बंध रेशमाचे’ ही मालिका मिळाली होती. ती चौथीत होती तेव्हा, तिला कलर्स वाहिनीवरील ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतील छोट्या ईश्वरीची भूमिका मिळाली. तिला यातील भूमिकेसाठी म. टा. सन्मान अॅवॉर्ड मिळाले. या भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. अगदी अमेरिकेतून फॅन्स तिला भेटायला भारतात आले. ही मालिका व ईश्वरीची भूमिका तिच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरली.ती पाचवीत असताना तिला ‘तू माझा सांगाती’ ही मालिका मिळाली. त्यामध्ये चिन्मय मांडलेकर होते, छोट्या आवलीची भूमिका तिने साकारली होती. संत तुकारामांची संसार गाथा व आवली यावर ही मालिका होती. त्यानंतर ती सहावीत असताना तिला संजय लीला भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी’ या हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये गोपिकाबाईची भूमिका तिने साकारली होती. त्या चित्रपटातील दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली. नंतर 'रेडू' हा चित्रपट तिने केला. अमेझॉनची पेनाची जाहिरात तिने केली. तृतीयपंथ गौरव सावंतवरची एक डॉक्युमेंटरी होती, त्यामध्ये तिने गौरव सावंतच्या गायत्री नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. पोलिओची जाहिरात केली. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडेसोबत ‘ब्लॅक बोर्ड’ नावाचा चित्रपट केला. 'अँब्रो' नावाची एक शॉर्ट फिल्म तिने केली. त्यासाठी तिला इंटरनॅशनल बेस्ट चाईल्ड अॅक्ट्रेसचा अॅवॉर्ड मिळाला. 'भाकर,' 'बाजार','बंपर लॉटरी' हे चित्रपट तिने केले. नंतर तिने शिक्षणासाठी थोडा ब्रेक घेतला.त्यानंतर तिने कीर्ती कॉलेजला पुढील शिक्षण घेतले. तेथील सांस्कृतिक कार्यक्रमात तिने भाग घेतला होता. युथ फेस्टिवलमध्ये तिने भाग घेतला होता. अकरावीत असताना तिला स्टार प्रवाह वाहिनीवरील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेतील छोट्या रमाबाईची भूमिका मिळाली. ती भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे.खूप दिवसांपासून तिला नाटकात काम करण्याची इच्छा होती. तो योग जुळून आला. ' रेडू' चित्रपट करीत असताना निकिताने 'एक नातं असं’ही या नाटकवाल्यांकडे तिचे नाव सुचविले. या नाटकामध्ये तिची काव्या या मुलीची भूमिका आहे. ती केवळ कणखर मुलगी नसून, प्रेमळ बहीण आहे. ती अल्लड, खोडकर, समजूतदार स्वार्थी अशी सर्व गुणसंपन्न आहे. आजच्या काळातील ती मुलगी आहे.आजच्या धावपळीच्या जगात नातेसंबंध दुरावलेले आहेत. भाऊ व बहिणीमधील दुरावा वाढत चाललेला आहे. रक्षाबंधन, भाऊबीज हे सण साजरे करण्यासाठी आपल्याकडे भाऊ, बहीण नसेल याची चिंता तिने व्यक्त केली. भाऊ-बहिणीच्या महत्त्वाच्या नात्यावर हे नाटक भाष्य करीत आहे. या नाटकानंतर बहीण-भावामधील वितुष्ट मिटेल असा आशावाद तिने व्यक्त केला.'एक नातं असंही' हे नाटक नात्यातील गुंतागुंत, सद्यस्थितीवर भाष्य करणारं, थोडसं हसा पिकवणारं, सामाजिक विषय गांभीर्याने घेणारं असं हे नाटक आहे. कार्तिक आणि काव्या या भाऊ-बहिणीच्या नात्यावर या नाटकाची कथा आहे. कार्तिकला गायक व्हायचे असते; परंतु परिस्थितीमुळे तो हतबल होतो. बहिणीचे शिक्षण व्हावे म्हणून तो एका कंपनीत नोकरी करतो. पुढे काव्याच्या आयुष्यात एक मुलगा येतो, त्याच्या येण्याने कार्तिक आणि काव्याच्या नात्यात दुरावा निर्माण होतो की संबंध दृढ होतात? एका भावाने बहिणीसाठी केलेल्या त्यागाची जाणीव बहिणीला राहते का? या साऱ्या प्रश्नाची उकल या नाटकातून होणार आहे. या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग पनवेलच्या आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ३१ जानेवारीला संध्याकाळी ४.३० वाजता होणार आहे. या नाटकाचे लेखन विस्मय दीपक कासार यांनी केले असून दिग्दर्शन दर्शन सिद्धार्थ घोलप यांनी केले आहे. या नाटकाची निर्मिती शिवाय मेघा या निर्मिती संस्थेने केले असून अभिजित भालेराव हे या नाटकाचे निर्माते आहेत.माणसाने कितीही आधुनिक प्रगती केली तरी, आपसातील नाते जपणे खूप आवश्यक आहे. ‘एक नातं असंही’ हे नाटक एका सामान्य नात्याची असामान्य गोष्ट सांगणार आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली गेली आहे. आज म्हणजेच शनिवार ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी होणार असून, त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या काही तासांपासून घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमताने अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे वृत्त आहे. आज विधिमंडळ गटनेता निवडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची मुंबईत होणाऱ्या महत्वाच्या बैठकीनंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.मात्र शपथविधीची घाई कशासाठी असा सवाल उपस्थित होत असतानाच विश्वसनीय सूत्रांकडून याचं उत्तर समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,सुनेत्रा पवार यांना इतक्या लवकर तात्काळ गट नेते निवड आणि उपमुख्यमंत्री पदावर निवड हा अंतिम निर्णय एनसीपी कोअर टीमचाच आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाची चर्चा मुद्दाम काही जण घडवू पाहत असल्यानेच इतक्या घाईत सुनेत्रा पवार यांची निवड करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. एनसीपी कोअर टीम आणि सुनेत्रा पवार यांच्या सहमतीनेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शपथविधी लवकर करण्याची भूमिका एनसीपी कोअर टीमने घेतली. सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करणे आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष करणे ही भूमिका प्रफुल पटेल, सुनीव तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्याच भूमिकेतून मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी शुक्रवारी (३० जानेवरी) सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री या पदासाठी होकार दिल्याचे कळते.त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे : शरद पवारदरम्यान शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की; सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही. आजचा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मला याबाबत काही माहिती नाही. अजित पवार यांचे निधन हा राज्यासाठी मोठा आघात आहे. राष्ट्रवादीने काय करावे, हे त्यांच्या पक्षातील नेते ठरवतील. भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. विलिनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. पण आता खंड पडला.त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे.शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आले आहे.
Sharad Pawar: सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही - शरद पवार
Stress & Obesity: स्ट्रेसमुळे वजन का वाढतं? जाणून घ्या इमोशनल ईटिंगमागचं संपूर्ण शास्त्र
Stress & Obesity: आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव (स्ट्रेस), चिंता आणि नैराश्य या समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहेत. मानसिक आरोग्याच्या या अडचणी केवळ मनापुरत्याच मर्यादित राहत नाहीत, तर त्यांचा थेट परिणाम शरीरावरही होतो, असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.
मुंबई : उपमुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो काही निर्णय घेईल, त्याला भाजप आणि राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा राहील, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मांडली. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याबाबत चर्चा सुरू आहे. उद्या, शनिवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होणार असून, त्यात गटनेत्याची निवड केली जाणार आहे. तसेच अजित पवार यांच्या जागी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिले जाईल, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अजितदादांचे कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस जे काही निर्णय घेईल, त्याला भाजप पक्ष आणि सरकारचा पूर्ण पाठिंबा असेल. राष्ट्रवादीचे नेते दोन वेळा माझ्याशी चर्चा करून गेले असून, या चर्चेत त्यांनी पक्षाची कार्यपद्धती, उपलब्ध पर्याय आणि पुढील वाटचाल याबाबत माहिती दिली आहे. मात्र अंतिम निर्णय हा संबंधित पक्षाचाच असतो, त्यामुळे त्या निर्णयावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.अर्थसंकल्प कोण सादर करणार?राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अर्थसंकल्पाची संपूर्ण तयारी अजितदादांनीच केली होती. आता मी स्वतः यात लक्ष घालून अर्थसंकल्पाशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करून घेणार आहे. त्यानंतर अर्थसंकल्प कोणी सादर करायचा, याबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.मुंबईच्या महापौर पदाबाबत दोन दिवसांत निर्णयमहापौर पदाच्या निवडणुकांबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महायुतीतील संबंधित पक्षांमध्ये चर्चा झाली आहे. मुंबई तसेच इतर शहरांतील महापौर पदासाठी जी नावे पुढे आली आहेत, त्यावर येत्या एक-दोन दिवसांत चर्चा केली जाईल. त्यानंतर अंतिम नावे निश्चित केली जातील. संबंधित महानगरांचे अध्यक्ष आणि आमदार योग्य तो निर्णय घेतील. नागपूरच्या महापौर पदासंदर्भातही एकूण चर्चा झाली असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
निवडणुका पुढे ढकलल्याने शिक्षक संभ्रमात
परीक्षा आणि निवडणूक ड्युटी एकाच वेळी; शिक्षकांच्या अडचणीत वाढ मुंबई : महाराष्ट्रात १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे तारखांमध्ये बदल झाल्याने शिक्षक अडचणीत आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाला असून, त्याचा थेट परिणाम सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्याने शिक्षकांना आता एक मोठा संभ्रम उभा राहिला आहे.सध्या शिक्षकांचे प्रमुख दडपण म्हणजे ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी देशव्यापी होणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा. या परीक्षेसाठी अनेक शिक्षक आधीच बसले आहेत. दुसरीकडे, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे त्यांना निवडणूक ड्युटीही करावी लागणार आहे. परीक्षा आणि निवडणूक ड्युटी एकाच वेळी येत असल्यामुळे शिक्षक संभ्रमात पडले आहेत परीक्षा द्यायची की निवडणूक ड्युटी करायची? हा प्रश्न त्यांना सतावत आहे.मागील काही दिवसांत महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीनंतर लगेचच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे टप्पे जाहीर झाले होते. यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सतत निवडणूक ड्युटीमध्ये व्यस्त होते. आता या निवडणुका पुढे ढकलल्याने त्यांची धावपळ आणखी वाढली आहे. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होईल, तर मतमोजणी ७ फेब्रुवारीऐवजी ९ फेब्रुवारी रोजी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.शिक्षकांच्या दडपणामध्ये आणखी भर पडली आहे. कारण दोन्ही घटनांमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या कर्तव्याशी जुळत असल्याने मानसिक ताण वाढत आहे. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य यावरही नकारात्मक परिणाम होत आहे.केंद्रप्रमुख परीक्षा ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे, तर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ७ व ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता सुरू होईल. दोन्ही परीक्षा जिल्ह्याबाहेरच्या केंद्रांवर होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना फक्त परीक्षा देण्यापुरतेच नव्हे, तर निवडणूक ड्युटीची जबाबदारीही पार पाडावी लागणार आहे. शिक्षकांमध्ये आता अशा परिस्थितीत कारवाईची भीती आहे, कारण निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या टप्प्यात बदल केला तरीही त्यांची ड्युटी रद्द होईल की नाही, याबाबत स्पष्टता नाही.राज्यातील शिक्षक संघटनांनीदेखील या परिस्थितीवर लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. शिक्षकांनी सांगितले की, “दोन्ही कर्तव्य अत्यावश्यक असून त्यात प्राधान्य ठरवणे कठीण झाले आहे. आयोगाकडून योग्य निर्णय अपेक्षित आहे.”एकूणच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आणि निवडणूक आयोगाच्या तारखेतील बदलांमुळे शिक्षकांच्या कामाचा ताण आणि मानसिक दडपण वाढले आहे. राज्यातील शिक्षण संस्थांना आणि निवडणूक व्यवस्थापनाला आता या परिस्थितीचा विचार करून शिक्षकांना न्याय्य मार्गाने सोडवावे लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहतूक बंद
मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याची कामे सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरू आहेत. या कामासाठी सातत्याने महामार्गावर टप्प्याटप्प्यात वाहतूक ब्लॉक घेतला जात आहे. त्यानुसार ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान १४ टप्प्यांत वर्धा आणि नागपूर दरम्यानच्या भागातील महामार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी बंद राहणार आहे.वर्धा येथील साखळी क्रमांक ५८.९ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक ३१ जानेवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील. वर्धा येथील साखळी क्रमांक ५९.६ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक ३१ जानेवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील. वर्धा येथील साखळी क्रमांक ६५.४ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक ३१ जानेवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील. सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक ३१.५ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक १ फेब्रुवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील. सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक ३७.७ येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक १ फेब्रुवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील. सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक ३७.७ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक १ फेब्रुवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील. सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक ४५.४ येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक १ फेब्रुवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील. हिंगणा, नागपूर येथील साखळी क्रमांक ८.६ येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक २ फेब्रुवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील. हिंगणा, नागपूर येथील साखळी क्रमांक ८.६ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक २ फेब्रुवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील.
राज्यात नवीन रक्तपेढी सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
रक्तपिशव्यांचे संकलन करण्यासाठी हमीपत्राची गरज मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यात नवीन रक्तपेढी सुरू करण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून त्यानुसार महानगरांमध्ये रक्तपेढी स्थापन करण्यासाठी संस्थांना स्वयंप्रेरित रक्तदान शिबिरांद्वारे वार्षिक तीन हजारांपेक्षा अधिक रक्तपिशव्या तर शहरी, ग्रामीण व आदिवासी भागांसाठी दोन हजार रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. दोन वर्षांनंतर राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे.सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार नवीन रक्तपेढ्यांना मंजुरी देण्यासाठी तयार करण्यात आलेले परिपूर्ण व व्यापक धोरण लागू करण्यात येत आहे. या धोरणानुसार राज्याचे भौगोलिक क्षेत्र हे महानगर, शहरी, ग्रामीण आणि आदिवासी या चार गटांमध्ये विभागले. महानगरात रक्तपेढी सुरू करू इच्छिणाऱ्या संस्थांना स्वयंप्रेरित रक्तदान शिबिरांद्वारे वार्षिक तीन हजारांपेक्षा अधिक रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. शहरी, ग्रामीण व आदिवासी भागांसाठी हा निकष दोन हजार रक्तपिशव्या इतका आहे. रक्त हा मौल्यवान संसाधन असल्याने त्याचे घटक वेगळे करून कार्यक्षम वापर करण्यावर यात भर दिला आहे. त्यामुळे भौगोलिक क्षेत्र कोणतेही असले तरी, रक्तघटक विभाजनाची सुविधा उपलब्ध असलेल्या नवीन रक्तकेंद्रांनाच परवानगी देण्यात येणार आहे. एकही रक्तपेढी नसलेल्या ग्रामीण भागामध्ये जिल्हास्तरीय निकष पूर्ण झाले नसले तरी त्यांना परवानगी देण्याची तरतूद केली आहे.कोणत्या संस्था ठरणार पात्र : एनबीटीसीच्या निकषांनुसार अर्जदार संस्था ही स्वयंसेवी किंवा धर्मादाय स्वरूपाची असून, किमान दोन वर्षे जुनी आणि आरोग्यसेवा क्षेत्राशी संबंधित असावी लागेल. वार्षिक रक्तसंकलन, समुपदेशक व सामाजिक कार्यकर्त्यांची नियुक्ती, घटक विभाजन सुविधा उभारणी आणि एसबीटीसी व एनबीटीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत हमीपत्रे आवश्यक असेल. या संस्थांना देण्यात येणारे ना हरकत प्रमामणपत्र हे दोन वर्षांसाठी वैध राहणार आहे.रुग्णालय आधारित रक्तपेढीसाठी निकषरुग्णालयाधारित रक्तपेढीसाठी विशिष्ट निकष घातले आहेत. रुग्णालयाने स्वतंत्र रक्तपेढी उभारण्याची गरज सविस्तर स्पष्ट करणे, खाटांची संख्या व विशेष शस्त्रक्रिया, आपत्कालीन सेवा यांचा तपशील देणे बंधनकारक राहणार आहे. अशा रक्तपेढ्यांना परिसरातील ३ ते ४ रुग्णालयांना रक्त व रक्तघटक पुरवण्याचे हमीपत्र द्यावे लागेल. २०० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांची क्षमता असलेली वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांना अंतर्गत रक्तपेढीसाठी परवानगी दिली जाईल. सरकारी रुग्णालयांना मात्र आरोग्य विभागाच्या गरजेनुसार रक्तपेढी सुरू करता येईल आणि त्यासाठी परिषदेकडून स्वतंत्र परवानगीची आवश्यकता राहणार नाही.
तिरुवनंतपुरममध्ये आज भारत-न्यूझीलंड मालिकेचा समाराेप
होम ग्राऊंडवर संजूसाठी शेवटची संधी? इशानच्या एन्ट्रीने वाढला दबावतिरुवनंतपुरम : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील निर्णायक आणि शेवटचा सामना शनिवारी खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने ही मालिका वर्ल्ड कपच्या तयारीसाठी महत्त्वाची मानली असली तरी, यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनसाठी हा सामना अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. संजू आपल्या घरच्या मैदानावर पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असला, तरी त्याच्या खराब फॉर्ममुळे 'प्लेइंग इलेव्हन'मधील त्याच्या स्थानावर टांगती तलवार आहे.चौथ्या सामन्याला मुकलेला इशान किशन पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे दिसत असून तो सरावासाठी मैदानात उतरला आहे. फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, इशान खेळण्याची शक्यता जास्त आहे, मात्र अंतिम निर्णय फिजिओ घेतील. इशानच्या पुनरागमनामुळे संजू सॅमसनला संघातून डच्चू मिळणार की संघ व्यवस्थापन त्याला घरच्या मैदानावर शेवटची संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.संजू सॅमसन या मालिकेतील चारही सामन्यांत अपयशी ठरला आहे. वर्ल्ड कपपूर्वी फॉर्म मिळवण्यासाठी ही मालिका सुवर्णसंधी होती, मात्र संजूला त्याचा फायदा उठवता आला नाही. खेळाडूंना अधिक संधी देणे गरजेचे आहे, मात्र वर्ल्ड कपमध्ये जाताना आत्मविश्वास आणि फॉर्म दोन्ही महत्त्वाचे आहेत, असे म्हणत कोटक यांनी संजूच्या कामगिरीवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले आहे.प्रशिक्षक कोटक यांनी तरुण फलंदाज अभिषेक शर्माचे विशेष कौतुक केले. अभिषेकने कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या खेळात मोठी सुधारणा केली असल्याचे त्यांनी नमूद केले.न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संजू अपयशी ठरलेला दिसतो आहे. त्याला मागील चार सामन्यांत १०, ६, ०, २४ अशाच धावा करता आल्या आहेत. संजू सॅमसनचा फॉर्मवर विचारलेल्या प्रश्नावर कोटक म्हणाले, त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या धावा सध्या दिसत नाही. त्याला त्याची स्पेस, मोकळीस देण्याचे आमचे काम आहे.सामन्यापूर्वी खेळाडूंनी मंदिरात टेकवला माथानिर्णायक सामना ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे सर्व खेळाडू तिरुवनंतपुरममधील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचाही समावेश होता. खेळाडू मंदिरात पोहोचल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये खेळाडूंनी दर्शनासाठी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्याचे पाहायला मिळते.जसप्रीत बुमराहला विश्रांतीभारताने ही मालिका ३-१ अशी आधीच जिंकली आहे आणि त्यामुळे पाचव्या सामन्यात काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. जसप्रीत बुमराह व हार्दिक पांड्या यांना आजच्या लढतीत विश्रांती दिल्यास आश्चर्य वाटायला नको. तिसऱ्या सामन्यातही त्यांना विश्रांती दिली गेली होती. संजू सॅमसनला आणखी एक संधी मिळेल हे निश्चित आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात ‘जनरेशन वॉर’
जोकोविच विरुद्ध अल्काराझ यांच्यात लढतमेलबर्न : मेलबर्न पार्कच्या रॉड लेव्हर एरिनावर झालेल्या दोन थरारक उपांत्य फेरीच्या सामन्यांनंतर, ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत टेनिस विश्वातील दोन सर्वात मोठे खेळाडू आमने-सामने उभे ठाकले आहेत. एकीकडे विक्रमादित्य नोव्हाक जोकोविच आहे, तर दुसरीकडे युवा आणि तडफदार जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला कार्लोस अल्काराझ.३८ वर्षीय नोव्हाक जोकोविचने (जागतिक क्रमवारीत चौथे स्थान) विद्यमान दुहेरी विजेत्या जानिक सिनरला पाच सेटच्या महाकाव्य लढतीत पराभूत करून ११ व्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमध्ये प्रवेश केला. जोकोविचने सिनरवर ३-६, ६-३, ४-६, ६-४, ६-४ असा विजय मिळवला.आता अंतिम फेरीत नोवाक जोकोविचचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या कार्लोस अल्काराझशी होईल, ज्याने पहिल्या उपांत्य फेरीत अलेक्झांडर झ्वेरेवला पाच सेटच्या सामन्यात पराभूत केलं होतं. कार्लोस अल्काराझचा सामना सुमारे पाच तास आणि २७ मिनिटे चालला, ज्यामुळे तो स्पर्धेच्या इतिहासातील तिसरा सर्वात मोठा सामना ठरला. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कार्लोस अल्काराझचा हा पहिलाच अंतिम सामना असेल. जर हा सामना त्याने जिंकला, तर तो करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण करणारा सर्वात तरुण पुरुष खेळाडू बनेल. ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी खेळवला जाईल. दिग्गज खेळाडू की नवा तरुण खेळाडू कोण बाजी मारणार, यावर सर्वांच्या नजरा असतील. टेनिस जगत या ऐतिहासिक अंतिम फेरीची आतुरतेने वाट पाहत आहे, जिथे जोकोविचचा २५ वा ग्रँड स्लॅम आणि अल्काराझचा पहिला ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदाचा सामना असणार आहे.अंतिम सामन्याची पार्श्वभूमी रविवार होणाऱ्या अंतिम सामन्याकडे संपूर्ण टेनिस विश्वाचे लक्ष लागले आहे. जोकोविच २४ ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या मार्गारेट कोर्टच्या विक्रमापासून केवळ एक पाऊल दूर आहे. फायनलमध्ये त्याचा १००% (१०-०) जिंकण्याचा रेकॉर्ड आहे. हा सामना अनुभवी जोकोविच आणि २२ वर्षीय अल्काराझ यांच्यातील 'पिढ्यांची लढाई' म्हणून पाहिला जात आहे. त्यांच्या मागील सामन्यांमध्ये, जोकोविच ५-४ असा अल्काराझच्या पुढे आहे. २०२४ पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्येही जोकोविचनेच बाजी मारली होती.
रायगड जिल्ह्यात १४७ जणांचे मरणोत्तर नेत्रदान
४१ अंधांना मिळाली नवी दृष्टीअलिबाग : मरणानंतरही दुसऱ्यासाठी जगण्याची आस रायगड जिल्ह्यातील नागरिक मरणोत्तर नेत्रदानातून पूर्ण करीत आहेत. अशा नेत्रदात्यांमुळे १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२५ या पावणेपाच वर्षाच्या कालावधीत ४१ दृष्टिहिनांना सृष्टीचे नितांतसुंदर दर्शन घडले.माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे नेत्र काही तास जिवंत असतात. मृत्यूनंतर काही तासात काढलेल्या नेत्रांचा अंधत्व आलेल्यांना फायदा होऊ शकतो आणि हे जग त्यांना पाहता येऊ शकते. नेत्ररोपण यशस्वी झालेल्या व्यक्तीला ६० टक्के दिसू शकते. नेत्रदानासाठी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरिरातून सहा तासांच्या आत डोळ्यातील नेत्रपटल काढून घेणे आवश्यक असते. या डोळ्यांचे दोन ते तीन दिवसांमध्ये रोपण होणेही आवश्यक असते. नेत्ररोपणामध्ये बुबुळाच्या पाठीमागे असलेल्या 'कॉनिर्या' या भागाचे रोपण केले जाते.रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नेत्रदानाबद्दल चांगली जनजागृती होत आहे. वर्षाला सुमारे ३०० नागरिक मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करीत आहेत. त्यामुळे अशा नेत्रदानाचे प्रमाणही वाढले आहे. १ एप्रिल २०२१ ते डिसेंबर २०२५ या पावणेपाच वर्षात जिल्ह्यात १४७ जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. यामधून ४१ अंधांवर बुबुळ रोपण शस्त्रक्रिया करून नवी दृष्टी देण्यात आली, तर उर्वरित जणांचे नेत्रपटल संशोधनासाठी पाठविण्यात आले आहेत.असे झाले नेत्रदान१ एप्रिल २१ ते ३१ डिसेंबर २५ या कालावधीत रायगड जिल्ह्यात १४७ जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले. (२९४ नेत्र बुबुळांचे संकलन) जिल्हा रुग्णालयात ८८ नेत्र बुबुळे संकलन (४४ जणांचे नेत्रदान), शंकर आय बँक १६ नेत्र बुबुळे संकलन (८ नेत्रदान), लक्ष्मी आय बँक १९० नेत्र बुबुळे संकलन (८० जणांचे नेत्रदान), शस्त्रक्रिया ४१, संशोधन ११६, इतर संस्थेत पाठवलेले नेत्र बुबुळ ६.
Shard Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यावर पक्षातील नेत्यांचे एकमत झाले आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाची धुरा देखील पवार कुटुंबाकडेच राहावी, अशी भूमिका वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षपदही सुनेत्रा पवारांकडेच दिले जाणार आहे. या सर्व परिस्थितीवर शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही. अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे :शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की; सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही. आजचा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मला याबाबत काही माहिती नाही. अजित पवार यांचे निधन हा राज्यासाठी मोठा आघात आहे. राष्ट्रवादीने काय करावे, हे त्यांच्या पक्षातील नेते ठरवतील. भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. विलिनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. पण आता खंड पडला.त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे.शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आले आहे.उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी :सुनेत्रा पवार यांचा आज म्हणजेच शनिवार ३१ जानेवरी रोजी संध्याकाळी ५ वाजता शपथविधी होणार आहे. याचपार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या बारामतीहून मुंबईकडे रवाना झाल्या असून, त्यांच्यासोबत पुत्र पार्थ आणि जय पवार, तसेच अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा हे देखील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक शनिवारी दुपारी २ वाजता विधानभवनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडेल, अशी माहिती पक्ष सूत्रांनी दिली आहे.
वसई-विरार महापालिकेत महापौर पदासाठी ७ अर्ज
उपमहापौर पदासाठी ५ अर्जविरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आले. बहुजन विकास आघाडी आणि भाजप या दोनही राजकीय पक्षाकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महापौर पदासाठी एकूण ४ जणांचे ७ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये बहुजन विकास आघाडीच्या तीन नगरसेवकांनी आणि भाजप तर्फे एका सदस्याने अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौर पदासाठी एकूण ३ जणांचे ५ अर्ज दाखल झाले आहेत. यात बविआतर्फे २ तर भाजपच्या एका नगरसेवकाने अर्ज दाखल केला आहे.वसई-विरार महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला बहुमत मिळाले आहे. ११५ पैकी ७१ सदस्य त्यांचे निवडून आले असून त्यातील एका काँग्रेसच्या सदस्याला बविआचा पाठिंबा होता. तर भाजप- शिवसेना महायुतीचे ४४ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचा महापौर आणि उपमहापौर होणार हे निश्चित आहे. महानगरपालिकेच्या महापौर पदासाठीची आरक्षण देखील नुकताच जाहीर झाले असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी हे आरक्षण निघाले आहे. दरम्यान, शुक्रवारी महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. बहुजन विकास आघाडीतर्फे अजीव पाटील, प्रफुल्ल साने, निषाद चोरघे यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. या तिघांनीही प्रत्येकी २ अर्ज दाखल करण्यात आले. तर भाजपतर्फे ॲड. दर्शना त्रिपाठी यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एकूण ७ अर्ज पालिकेकडे दाखल झाले आहेत.तर दुसरीकडे उपमहापौर पदासाठी बविआतर्फे मार्शल लोपीस, कन्हैया भोईर यांनी प्रत्येकी २ अर्ज दाखल केले आहेत. तर भाजपतर्फे नारायण मांजरेकर यांनी एक अर्ज दाखल केला असून एकूण ५ अर्ज सादर करण्यात आले आहेत. ३ फेब्रुवारी रोजी बविआतर्फे कोण अर्ज मागे घेणार आणि कोण महापौर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच महायुतीने सदर निवडणूक अविरोध होऊ नये यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, की आणखी काही चमत्कारिक घडणार आहे हे ३ फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार आहे.
महापौरांना ७५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता
उपमहापौरांना ६५ हजार, तर विरोधी पक्षनेत्याला ५० हजारविरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना नियमानुसार विविध सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत. महापौर यांना वाहन प्रतिपूर्ती भत्ता म्हणून दर महिन्याला ७५ हजार रुपये दिल्या जातील. तसेच उपमहापौर यांना ६५ हजार, स्थायी समिती सभापती ५५ हजार, विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेत्याला ५० हजार, तर इतर सर्व सभापतींना वाहन प्रतिपूर्ती भत्ता म्हणून प्रत्येक महिन्याला ४५ हजार रुपये दिले जाणार आहेत.स्थानिक स्वराज्य सस्थांमध्ये ग्रामपंचायत सरपंचांपासून, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर अशा सर्व लोकप्रतिनिधींना त्यांच्या अडीच किंवा पाच वर्षांच्या कालावधीत मानधन तसेच विविध सोयी सुविधा देण्यात येतात. अनेक शहरांमध्ये महापौर,उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता यांच्यासाठी शासकीय निवासस्थान देखील आहेत. वसई-विरारमध्ये पदाधिकाऱ्यांसाठी अद्याप शासकीय निवासस्थान उपलब्ध नाही. या ठिकाणी प्रशस्त अशी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाचे कामकाज सुरू आहे. मात्र नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना या इमारतीत बसण्याची संधी ३ फेब्रुवारीपासून मिळणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व पदाधिकाऱ्यांचे दालन सज्ज केले आहेत. दरम्यान, वसई-विरार महापालिकेत २०१६ पूर्वी महापौर यांना ४५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता देण्यात येत होता. तर उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांना ४० हजार आणि विरोधी पक्षनेता यांना ३७ हजार अशा प्रकारे वाहन भत्ता देण्यात येत होता. २०१६ पासून प्रतिपूर्ती भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता ९ प्रभाग समिती सभापतीसह, महिला व बालकल्याण समिती सभापती, वैद्यकीय आरोग्य साहाय समिती सभापती,परिवहन समिती सभापती, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, स्थायी समिती सभापती, उपमहापौर आणि महापौर यांना वाढीव दरानुसार वाहन प्रतिपूर्ती भत्ता देण्यात येणार आहे.१२५ सदस्यांना १० हजार रुपये मानधनमहापालिकेच्या वर्गवारीनुसार तेथील नगरसेवकांना मानधन दिले जाते. राज्यातील २९ महापालिकांपैकी चार महापालिका क वर्गात समाविष्ट आहेत. यामध्ये वसई-विरार महापालिकेचा समावेश आहे. त्यामुळे येथील नगरसेवकांना दरमहा १० हजार रुपये मानधन महापालिकेकडून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. पालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या ११५ नगरसेवकांसह स्वीकृत १० नगरसेवकांना सुद्धा सदर मानधन देण्यात येणार आहे. यासाठी पालिकेचा नगरसेवकांच्या मानधनावर प्रत्येक महिन्याला १२ लाख ५० हजार एवढा खर्च होणार आहे.आयुक्तांनाही महापौरांप्रमाणे वाहन भत्तामहापालिकेच्या आयुक्तांना सुद्धा महापौर यांच्या प्रमाणेच ७५ हजार वाहन प्रतिपूर्ती भत्ता देण्यात येतो. तसेच अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपसंचालक नगररचना, सहायक आयुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि विभाग प्रमुखांना सुद्धा ४० ते ४५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता प्रत्येक महिन्यात दिल्या जातो.
‘बँकेची रोकड आणण्या-घेऊन जाण्याचे काम ज्या गाडीत होते, त्याच गाडीत तुमच्या दोन हजारांच्या नोटा बदलून देऊ. 50 कोटींच्या नोटा असल्या तरी अडचण नाही. 40 टक्के कमिशन आमचे असेल.’ हा खुलासा 2 हजारच्या नोटा बदलणाऱ्या माफियांनी भास्करच्या कॅमेऱ्यावर केला. चार्टर्ड अकाउंटंट फर्मच्या नावाखाली माफिया नोटा बदलण्याचा व्यवसाय चालवत आहेत. हे नेक्सस उघड करण्यासाठी आम्ही ब्रोकर बनून तीन माफियांना भेटलो. तिघांनी नोटा बदलण्याचे वेगवेगळे मार्ग सांगितले. तीन दलालांशी रिपोर्टरची भेट. सविस्तर अहवाल वाचा…।पहिली भेट : गजेंद्र यादव ठिकाण : जयपूरिया मॉल, इंदिरापुरम काय पद्धत सांगितली : बँकेच्या गाडीत बदलून देऊ आधी 5 कोटी 2 स्लॉटमध्ये… आम्ही गजेंद्रला सांगितले की, आमच्याकडे 50 कोटी रुपयांच्या दोन हजारच्या नोटा आहेत आणि त्या बदलून घ्यायच्या आहेत. गजेंद्र: 5 कोटींच्या स्लॉटमधून करून घ्यारिपोर्टर: ठीक आहेगजेंद्र: कॅश तुमच्याकडे आहे ?रिपोर्टर: होय, आमच्याकडे, म्हणजे पार्टीकडे गजेंद्र: किती रिपोर्टर: तुम्ही सांगा टक्केवारी कशी ठरवायची आहे. 50 कोटींच्या सर्व नोटा 2 हजारच्या आहेत गजेंद्र: 45 टक्के. यात 5% आमच्या मध्यस्थाचे राहतील. त्यांचे 40 चे आकडे आहेत.रिपोर्टर: ठीक आहेगजेंद्र: 5 आमचे वाचतील, अडीच तुम्ही घ्या, अडीच आम्ही घेऊरिपोर्टर: ठीक आहे गजेंद्र: सध्या आमचे सीए साहेब नाहीत. तेच सर्व करतील.रिपोर्टर: ठीक आहे गजेंद्र: गाडी येईल आणि गाडीतूनच घेऊन जातील.रिपोर्टर: कोणाची गाडी?गजेंद्र: त्यांची सिस्टीम.उदित: CMSगजेंद्र: बँकेच्या रोख रकमेची सीएमएस (गाडी) मिळेल.रिपोर्टर: सीएमएसची गाडी येईल?गजेंद्र: हो. गजेंद्रने सांगितले की, या कामात त्याच्यासोबत देवेंद्र वर्मा नावाचा एक चार्टर्ड अकाउंटंटही सामील आहे, ज्याची नोएडा येथे भागीदारीत चालणारी एक सीए फर्म आहे. सीए देवेंद्र वर्मा यांच्याशी आमची भेट नोएडा सेक्टर-18 मधील एका रेस्टॉरंटमध्ये झाली. रिपोर्टर आणि देवेंद्र यांच्यातील संभाषण देवेंद्र: सांगा मग काय आहे रिपोर्टर: 2 हजारच्या नोटांचे 50 कोटी बदलायचे आहेत देवेंद्र: 50-50 मध्ये बोलणे झाले आहे रिपोर्टर: होगजेंद्र: 5 आम्ही ठेवू, 40 देऊरिपोर्टर: म्हणजे पार्टीला 50गजेंद्र : पार्टीला 50 जातील. तुमच्या पार्टीला 40 जातील. बाकीचे जे 10 उरले, त्यातून 5-5 आम्ही ठेवूदेवेंद्र: ठीक आहे, कधी कराल? टप्प्याटप्प्याने?रिपोर्टर: टप्प्याटप्प्यानेच समजदारी आहे देवेंद्र: जसे दुसऱ्या शहरातून आणायचे आहे, नोएडा मध्ये एका ठिकाणी ठेवले, त्यातून अडीच आणले, मग एका तासानंतर अडीच आणले…रिपोर्टर: नाही, असे होणार नाही. जसे बोलणे झाले आहे, 5 कोटींचा स्लॉट, तर 5 कोटी मी तुमच्याकडे घेऊन येईन.देवेंद्र: अडीच देऊन टाकू.रिपोर्टर: तुम्ही मला अडीच द्याल, 500-500 च्या नोटांमध्ये. देवेंद्र: म्हणाल तर 100-100 च्या देऊन टाकू, पण मग खूप जास्त होईल. रिपोर्टर: कुली करावा लागेल.देवेंद्र: हो, 500-500 ठीक राहील. एक दिवस निश्चित करा. त्या दिवशी तुम्ही घेऊन या.रिपोर्टर: ठीक आहे, एकदा लोकेशन (जागा) सांगून द्या कुठे आणायचे आहे.देवेंद्र: ते मी सांगून देईन. देवेंद्र वर्मा आणि गजेंद्र यादव यांच्या दाव्यांवरून हे दिसून येते की दिल्ली एनसीआरमध्ये 2 हजारच्या नोटा बदलण्याची प्रणाली सक्रिय आहे. तपासादरम्यान आमची पुढची भेट अबरार नावाच्या व्यक्तीशी झाली. अबरारचे संपर्क जुन्या दिल्लीतील अनेक हवाला एजंट्सशी असल्याचे सांगितले गेले. अबरारने सांगितले की, तो सय्यद केसी नावाच्या एका व्यक्तीला ओळखतो, जो 2 हजारच्या नोटांची कितीही मोठी रक्कम बदलून देऊ शकतो. अबरारच्या मते, सय्यद चांदनी चौकातील एक मोठा हवाला एजंट आहे. दुसरी भेट : सय्यद केसी ठिकाण : जाफराबाद, दिल्ली कोणती पद्धत सांगितली : बँक कामकाजाच्या दिवशी बदलले जातील रिपोर्टर आणि सय्यद यांच्यातील संभाषण… सैयद: अंदाजे किती आहेरिपोर्टर: 50 कोटींच्या आसपास सैयद: तुम्हाला हवे तेवढे आणारिपोर्टर: 10 कोटी पण होतील ?सैयद: काही अडचण नाही. तुम्ही बँक वर्किंग डेला आणारिपोर्टर: बँकसैयद: हो, बँक वर्किंग डेला, सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंतरिपोर्टर: तर बँकेत असेलसैयद: बँकेत नाही. आम्ही आमच्याकडे ठेवू, तुम्ही काढाल. तुम्हाला बँक वर्किंग डेला आणायचे आहेरिपोर्टर: म्हणजे बँक वर्किंग डेलाचसैयद: हो, आम्ही काढून देऊ. समोर बँक आहे, काही अडचण नाहीरिपोर्टर: 5 कोटी निघतीलसैयद: हो, सर्व व्यवस्था करूरिपोर्टर: पैसे कसे देणार, सिस्टम काय असेलसैयद: गाडी घेऊन या, तिथेच हँडओव्हर करूरिपोर्टर: गाडीत देणारसैयद: होयरिपोर्टर: आधी पैसेसैयद: आधी तपासणी करू, मग लगेच देऊ. वेळ लागणार नाहीरिपोर्टर: कमिशन किती राहीलसैयद: 35–65, 65 तुम्हाला देऊ, 35 ते ठेवतील रिपोर्टर: म्हणजे 1 कोटीत 65 लाख तुम्हालासैयद: होय, थेट रोख. 500 च्या नोटांमध्येरिपोर्टर: 2000 च्या नोटा बँकेत जमा होतीलसैयद: होय, बँकिंग चॅनेलद्वारेसैयद: आमच्याकडे CMS गाडीची परवानगी आहे. मोठ्या नोटांच्या हालचालीची व्यवस्था असते रिपोर्टर: किती रक्कम नेहमी असतेसैयद: 20–25 कोटी. बाहेरून हस्तांतरण झाल्यास लगेच सैयद केसीने दावा केला की, जुन्या दिल्लीतील आडते, म्हणजेच हवाला व्यावसायिक, 35 टक्के कमिशनवर 2 हजारच्या नोटा बदलण्याच्या या संपूर्ण खेळाला अंजाम देतील. त्याच्या मते, या लोकांची बँकांमध्ये सेटिंग आहे. सीएमएसच्या गाडीतून पैसे येतील आणि तिथेच मोजणी व तपासणीनंतर हातोहात 2 हजारच्या बदल्यात नवीन नोटा दिल्या जातील. त्याचा दावा होता की, संपूर्ण व्यवहार गाडीच्या आतच पूर्ण केला जाईल. नोटा बदलणाऱ्या 2 माफियांशी भेटल्यानंतर आमची चौकशी आणखी पुढे सरकली. सूत्रांकडून असे समजले की, हा खेळ केवळ हवाला नेटवर्कपुरता मर्यादित नाही. इंटरनेटवरही असे अनेक लोक आणि ग्रुप सक्रिय आहेत, जे क्रेडिट कॅश करून देण्याचा किंवा डिजिटल व्यवहाराच्या नावाखाली 2 हजारच्या नोटा बदलवून देण्याचा दावा करतात. गुगलवर शोधल्यावर आम्हाला 'कॅश अगेन्स्ट क्रेडिट कार्ड' नावाच्या एका वेबसाइट मिळाली. वेबसाइटवर दिलेल्या नंबरवर आम्ही थेट कॉल केला. फोन संतोष नावाच्या व्यक्तीने उचलला. आम्ही कोणताही आडपडदा न ठेवता थेट 2 हजारच्या नोटा बदलवून देण्याबद्दल सांगितले. थोड्याच वेळात बोलणे भेटीची वेळ निश्चित करण्यापर्यंत पोहोचले. जागा आणि वेळही निश्चित झाली. तिसरी भेट : संतोष कुमार ठिकाण : कनॉट प्लेस, नवी दिल्ली काय पद्धत सांगितली : 30 टक्केच परतावा मिळेल रिपोर्टर आणि संतोष यांच्यातील संभाषण… संतोष: पूर्ण रक्कम एकाच वेळी होऊ शकत नाही, भागांमध्ये करावी लागेल. रिपोर्टर: हो संतोष: सुरुवातीला किती रकमेने सुरुवात होऊ शकते? रिपोर्टर: 50 लाखांपासून सुरुवात करूया. संतोष: सुरुवातीसाठी थोडे जास्त आहे, तरीही बोलून सांगेन. रिपोर्टर: नोट अगदी नवीन आहेत, वापरलेले नाहीत. ज्यांच्याशी देवाणघेवाण होईल, ती दिल्लीबाहेरची पार्टी आहे का? संतोष: हो, बाहेरची पार्टी आहे. रिपोर्टर: सध्या बँका घेत नाहीत, फक्त RBI घेत आहे. संतोष: होय, आता प्रक्रिया RBI चॅनलमधूनच आहे. औपचारिकता आणि कागदपत्रे समजून घ्यावी लागतील. रिपोर्टर: इथे तर थेट रोख व्यवहाराची चर्चा होत आहे. संतोष: मोठ्या रकमेवर प्रश्न उपस्थित होतात, त्यामुळे प्रक्रिया काळजीपूर्वक करावी लागेल. रिपोर्टर: काम नक्की आहे? संतोष: होय, निश्चित आहे. रिपोर्टर: कमिशन किती? संतोष: 30% परत मिळेल, 70% तिकडे राहील. संतोष: आधी वेळ असता तर चांगली किंमत मिळाली असती, आता परिस्थिती कमकुवत आहे. नोट बदलण्याचे नियम काय आहेत : नोंदीशिवाय बदलणे बेकायदेशीर RBI ने स्पष्ट केले आहे की, 2 हजार रुपयांची नोट अजूनही वैध चलन आहे. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीकडे 2 हजार रुपयांची नोट असल्यास तो कोणताही गुन्हा नाही, परंतु या नोटा RBI मध्ये जमा करणे आवश्यक आहे. देशभरात RBI ची 19 इश्यू कार्यालये आहेत, जिथे नोटा बदलता येतात. आरबीआयनुसार, 2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा बँक खात्यात जमा करण्यासाठी कोणतेही नवीन दस्तऐवज आवश्यक नाहीत, परंतु प्रक्रिया केवायसी नियमांनुसार होते. सामान्यतः, 20 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलताना कागदपत्रे मागितली जात नाहीत, तथापि, संशय आल्यास किंवा वारंवार व्यवहार केल्यास ओळख विचारली जाऊ शकते. बँकेत जमा करताना केवायसी (KYC) अनिवार्य आहे. आधार/पॅनची मागणी केली जाऊ शकते. मोठ्या रकमेवर पॅनसोबत पैशाच्या स्रोताचीही चौकशी होते. इंडिया पोस्टद्वारे पाठवतानाही ओळख आणि बँक तपशील देणे आवश्यक आहे. आरबीआय स्पष्ट करते की रेकॉर्ड किंवा सेटिंगशिवाय 2 हजार रुपयांच्या नोटा बदलणे नियमांच्या विरोधात आहे. निष्कर्ष : सरकारने काळ्या पैशांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने 2 हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या, परंतु नोट माफिया त्यांच्या नेटवर्कद्वारे काळ्या पैशाला पांढरे करत आहेत. प्रश्न असा निर्माण होतो की आतापर्यंत किती काळ्या पैशावाल्यांनी आपले पैसे सुरक्षित केले असतील. हे प्रकरण केवळ नियमांच्या उल्लंघनाचे नाही, तर संपूर्ण आर्थिक प्रणालीच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते. टीप : भास्करने या संपूर्ण प्रकरणावर RBI, दिल्ली पोलीस, आयकर विभाग आणि ED यांना ईमेल केला आहे. उत्तर मिळताच बातमीत अपडेट करू.

26 C