SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

26    C
... ...View News by News Source

Pimpri News |धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ; आम आदमी पक्षाचा बिग प्लॅन

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – शहरामध्ये अनेक बलाढ्य पक्ष आहेत. मात्र, आम आदमी पार्टी (आप) हा पक्ष सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधीत्व करणारा आहे. त्यामुळे ही महापालिका निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार आहे असे म्हणत आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधारी भाजपावर टीका केली. दैनिक प्रभातच्या पिंपरी चिंचवड कार्यालयामध्ये गणेशोत्सवानिमित्त आयोजित आरती सोहळ्यासाठी […] The post Pimpri News | धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ; आम आदमी पक्षाचा बिग प्लॅन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Aug 2025 5:00 am

Pimpri News |आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते गणरायाची आरती

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव उत्साह, भक्तीभाव आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. येथे गुरुवारी (दि. २८) सायंकाळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते गणरायाची विधिवत आरती करण्यात आली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून […] The post Pimpri News | आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते गणरायाची आरती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Aug 2025 4:45 am

Inapur News |पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्या – राजू शेट्टींची मागणी

प्रभात वृत्तसेवा इंदापूर – राज्यातील पूरग्रस्त अतिवृष्टी ग्रस्त भागातील नुकसानीची सरसकट भरपाई द्या, असे निवेदन स्वाभिमानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले.इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे कृषिमंत्री भरणे यांची भेट राजू शेट्टी यांनी शेतकर्‍यांच्या शिष्ट मंडळासह गुरुवारी (दि. 28) घेतली. यावेळी मागण्यांचे निवेदन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले. […] The post Inapur News | पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्या – राजू शेट्टींची मागणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Aug 2025 4:30 am

Pune Crime |रांजणगावमध्ये दिवसाढवळ्या चोरी ; पोलिसांचा तपास सुरू

प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या ऑफिसमधून ९० हजार रुपयांची टूलबॅग चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बबन नामदेव मिडगुले (वय ३७, रा. शिक्रापुर) यांनी रांजणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मिडगुले हे जागृती टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत प्रोजेक्ट हेड म्हणून कार्यरत आहेत. ही कंपनी रांजणगाव […] The post Pune Crime | रांजणगावमध्ये दिवसाढवळ्या चोरी ; पोलिसांचा तपास सुरू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Aug 2025 4:15 am

Baramati News |शरद पवार गटाला झटका ; शेकडो मुस्लीम तरुणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

प्रभात वृत्तसेवा बारामती – मुस्लीम समाजातील समस्या सोडवण्यात असताना तरुणांना रोजगार, कर्ज, व्यवसाय, नोकरी आदीसाठी सहकार्य करू व मुस्लीम समाजाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अल्पसंख्याख माजी अध्यक्ष अस्लम तांबोळी, उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा फिरोज बागवान, चिकन सेंटर असोसिएशनचे अध्यक्ष बुऱ्हा बागवान व फुल […] The post Baramati News | शरद पवार गटाला झटका ; शेकडो मुस्लीम तरुणांचा राष्ट्रवादीत प्रवेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Aug 2025 4:00 am

Shikrapur Crime |शिक्रापूरमध्ये धक्कादायक घटना ; पतीने केला पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार

प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरूर) येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करत तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.कौशल्या सोनवणे यांनी घरातील सिलेंडर संपल्याने पतीला सिलेंडर आणण्यासाठी सांगितले होते. सायंकाळी पती बाबासाहेब घरी आल्यानंतर कौशल्या यांनी सिलेंडर का आणला नाही? असे विचारले असता त्यांच्यात वाद झाला. त्या रात्री कौशल्या उपाशी झोपी […] The post Shikrapur Crime | शिक्रापूरमध्ये धक्कादायक घटना ; पतीने केला पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Aug 2025 3:45 am

Maratha Arakshan Yatra 2025 |आरक्षण यात्रेने भगवामय झाले महामार्ग

प्रभात वृत्तसेवा चाकण – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरपारची लढाई उभारली आहे. काल (दि. 27) अंतरवली सराटी येथून निघालेल्या त्यांच्या आरक्षण यात्रेने आज (दि. 28) किल्ले शिवनेरीचा ऐतिहासिक साक्षीदार ठरत माथ्यावर मातीतिलक करून मुंबईच्या दिशेने कूच केले. या यात्रेत सामील होण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांचा जनसागर उसळला […] The post Maratha Arakshan Yatra 2025 | आरक्षण यात्रेने भगवामय झाले महामार्ग appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Aug 2025 3:15 am

Baramati News |शिवसृष्टीमुळे बारामतीचे पर्यटन महत्त्व वाढेल-उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रभात वृत्तसेवा बारामती – शिवसृष्टीमुळे पर्यटकांना इतिहासाची ओळख आणि त्यातून प्रेरणा मिळेल. तसेच बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित यांनी व्यक्त केला.उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली. शिवसृष्टी, कन्हेरी वन उद्यान परिसर, तांदुळवाडी येथील वृद्धाश्रम तसेच तिरंगा चौकाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी […] The post Baramati News | शिवसृष्टीमुळे बारामतीचे पर्यटन महत्त्व वाढेल-उपमुख्यमंत्री अजित पवार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Aug 2025 3:00 am

Pimpri News |भाजप कार्यकारिणीवरून गोंधळ ; नेत्यांचे राजीनामे, कार्यकर्त्यांचा संताप

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाने शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. मात्र, ही कार्यकारिणी जाहीर होताच अनेक सदस्यांनी राजीनाम्याचे शस्त्र बाहेर काढले आहे. तर काहींनी थेट आत्मदहन करण्याचाच इशारा दिला आहे. कार्यकारिणीची निवड करत असताना त्यामध्ये ठराविक कार्यकर्त्यांना चांगले पद देण्यात आले आहे. फक्त एका आमदाराच्या सांगण्यावरून कार्यकारिणी ठरवली आहे. जुन्या […] The post Pimpri News | भाजप कार्यकारिणीवरून गोंधळ ; नेत्यांचे राजीनामे, कार्यकर्त्यांचा संताप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Aug 2025 2:30 am

Pune News |विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश ; विद्यापीठाने वसतिगृहाची सोय वाढवली

प्रभात वृत्तसेवा पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वसतिगृह प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने वसतिगृह क्रमांक १० मधील तीन मजले विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ३२० अतिरिक्त विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होईल. यामुळे वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना जागा मिळू शकतील. विविध विद्यार्थी संघटनांनी प्रत्येक विद्यार्थ्याला वसतिगृह मिळावे, अशी मागणी लावून धरली होती. […] The post Pune News | विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश ; विद्यापीठाने वसतिगृहाची सोय वाढवली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Aug 2025 2:15 am

फूड प्रोसेसिंग-तंत्र, कौशल्य आणि व्यवस्थापन

सुरेश वांदिलेमेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांमुळे फूड प्रोसेसिंग(अन्नप्रकिया)उद्योग क्षेत्राच्या विकासाला नवी उर्जा मिळाली आहे. गेल्या काही वर्षात अन्नप्रकिया उत्पादन आणि निर्मिती घटकांमध्ये ३७ हजारावरुन ३९ हजार घटकांपर्यंत वाढ झाली. या क्षेत्रातील गुंतवणुकीची वाढ ३४ टक्के इतकी आहे. देशातील निर्यातीपैकी १३ टक्के वाटा या क्षेत्राचा आहे. देशातील प्रचंड लोकसंख्या लक्षात घेऊन परदेशी कंपन्या व उद्योगसमूह अन्नप्रकिया उद्योगांमध्ये गुंतवणूक व व्यावसायिक सहकार्य करू लागले आहेत. करारपद्धतीची शेती, कच्चा मालाचा पुरवठा इत्यादीबाबींमध्ये ही गुंतवणूक वाढलेली दिसते. न्याहारीसाठी लागणारी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, विविध ऊर्जा पेये (एनर्जी ड्रिंक्स), स्नॅक्स, केक्स, आइस्क्रीम आणि पाळीव प्राण्यांचे अन्नपदार्थ यांची निर्मिती वाढली आहे. या उद्योगवाढीसाठी डिजिटल क्रांतीही उपयुक्त ठरली आहे. मोठ्या किराणा दुकानांच्या साखळी (रिटेल)मुळे अन्नप्रक्रिया उद्योगाच्या वाढीस हातभारलागला आहे.या क्षेत्रातील करिअर संधी मिळवण्यासाठी नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी आंत्रप्रिन्युरशीप ॲण्ड मॅनेजमेंट (एनआयएफटीईएम), या संस्थेचे अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात. ही संस्था केंद्रीय अन्न प्रकिया मंत्रालयाने, हरयाणातील कुंडली आणि तामिळनाडूतील तंजावूर येथे स्थापन केली आहे. अन्नप्रक्रिया उद्योगासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी जगातील सर्वोत्कृष्ट संस्था बनण्याचे उद्दिष्ट्य या संस्थेने ठेवले आहे. या दोन्ही संस्थांना, इंस्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा देण्यात आला आहे.अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन, या संस्थांनी अभ्यासक्रमाची संरचना केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, नव्या संकल्पनांचा अधिकाधिक वापर उमेदवारांना करता यावा यासाठी अभ्यासक्रमात भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या क्षेत्रात उत्तमोत्तम संधी मिळू लागल्या आहेत.एनआयएफटीइएम - कुंडलीअभ्यासक्रम - बी. टेक इन फूड टेक्नालॉजी ॲण्ड मॅनेजमेंट - या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दोन पद्धती अवलंबल्या जातात - (१) जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन - जेईई(मेन) या परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया, जॉईंट सिट ॲलोकेशन ॲथॉरिटी / सेंट्रल सिट ॲलोकशन बोर्डामार्फत राबविली जाते. या प्रक्रियेव्दारे १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. (संपर्क- csab.nc.in), (२) या संस्थेव्दारे थेट प्रवेश प्रकिया राबवली जाते, याव्दारे ५० विद्यार्थी जेइइ मेन, ३० विद्यार्थी सीयुइटी-युजी (कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-अंडर ग्रज्युएट), २० विद्यार्थी नीट (नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट)मधील गुणांवर निवडले जातात.अर्हता - भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयासह १२ वीमध्ये खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ६० टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमात तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या दोन घटकांचा समावेश असल्याने, विद्यार्थी संबंधित उद्योगक्षेत्रात कोणतीही तांत्रिक आणि व्यवस्थापकीय जबाबदारी समर्थपणे सांभाळू शकतो.करिअर संधी - हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी प्राप्त होतात - (१) प्रॉडक्ट डेव्हलपमेंट सायंटिस्ट, (२) सेन्सरी सायंटिस्ट, (३) फूड मायक्रोबायलॉजिस्ट,(४) फूड अॅनॅलिस्ट, (५) क्वालिटी कंट्रोल मॅनेजर,(६) फूड प्रोसेसिंग इंजिनीअर, (७) फूड रेग्युलेटरी इंजिनीअर, (८) फूड रेग्युलेटरी अफेअर्स स्पेशॅलिस्ट, (९) न्युट्रिशन स्पेशॅलिस्ट,(११) सप्लाय चेन, कोल्ड चेन लॉजिस्टिक्स स्पेशॅलिस्ट,(१२) फूड फरर्मेंटेशन स्पेशॅलिस्ट,(१३) फूड प्रोसेसिंग सेक्टर - स्नॅक फूड, डेअरी फूड, वायनरी, शितपये, प्राण्यांचे मास, (१४) फूड सर्विस सेक्टर - हेल्‍थ ॲण्ड वेलनेस सर्विस प्रोव्हायडर्स, फूड रेग्युलेशन, फूड रिटेलिंग, सप्लाय चेन, पोस्ट हार्वेस्ट, (१५) व्यवस्थापक, (१६) तंत्रोव्यवस्थापक,(१७) सल्लागार,प्रवेश प्रकिया - दोन पद्धतीने प्रवेश दिला जातो. (१) ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनीअरिंग (गेट),(२) ज्या विद्यार्थ्यांनी गेट परीक्षा दिली नसेल, अशा विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत घेण्यात येणारी चाळणी परीक्षा द्यावी लागते.

फीड फीडबर्नर 29 Aug 2025 2:10 am

Pune News |वेतनाशिवाय साजरा झाला गणपती ; सरकारी कर्मचाऱ्यांचा संताप

प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन, पेन्शन गणेशोत्सवापूर्वीच देण्याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्याबाबतचे आदेशही वित्त विभागाकडून जारी करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र बहुसंख्य शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना वेतन, पेन्शन गणेशोत्सवाच्या आधी मिळालीच नाही. त्यामुळे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन, […] The post Pune News | वेतनाशिवाय साजरा झाला गणपती ; सरकारी कर्मचाऱ्यांचा संताप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Aug 2025 2:00 am

Pune Crime |‘दारू पिऊन कामावर येऊ नको’ म्हणणं पडलं महागात ; वेटरनेच मालकाचा केला खून

प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरातील उत्तमनगर भागात भीषण खुनाची घटना उघडकीस आली आहे. कोंढवे-धावडे येथील पिकॉक रेस्टॉरंट ॲण्ड बारमध्ये काम करणाऱ्या वेटरने ॲडव्हान्स पैशाच्या वादातून हॉटेलचे चालक संतोष सुंदर शेट्टी (४४, रा. शिवणे, उत्तमनगर) यांची चाकूने निर्घृण हत्या केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शेट्टी यांनी नुकतेच हे रेस्टॉरंट भाडे तत्त्वावर घेतले होते. रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून उमेश […] The post Pune Crime | ‘दारू पिऊन कामावर येऊ नको’ म्हणणं पडलं महागात ; वेटरनेच मालकाचा केला खून appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Aug 2025 1:45 am

पर्यटनस्थळावरील उपकर म्हणजे शाश्वत पर्यटनात सहभाग

- मधुसूदन जोशीपर्यटन हे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एक आवश्यक साधन आहे. पर्यटनावर कितीतरी व्यवसाय, व्यक्ती अवलंबून असतात. पण आताच्या काळात पर्यटन थोडे महाग वाटू लागते ते केवळ महागाई वाढल्याने नाही, तर पर्यटनावर लावल्या गेलेल्या करामुळे. आपण पर्यटनासाठी विविध हॉटेल्स वापरतो, प्रवासासाठी गाडी किंवा क्रूझ वापरतो, अभयारण्यात जातो. प्रत्येक ठिकाणची जैवविविधता जपण्यासाठी आणि वातावरणातील बदलात सुसूत्रता राखण्यासाठी काही विशिष्ठ वाढीव रक्कम कराच्या रूपात द्यावी लागते आणि आता ते अपरिहार्य झालंय.२०२३ च्या ऑगस्ट महिन्यात हवाई बेटांवर शुष्क जंगलांना आगीने वेढले, त्यात महाभयंकर वादळी वाऱ्याने त्या आगीला रौद्र रूप दिले. परिणामस्वरूप १०२ जणांनी प्राण गमावले, तर सुमारे २००० इमारतींचे नुकसान झाले. वातावरण बदलाचा परिणाम ठरलेले आणि प्रलयकारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले ते अमेरिकेतील एक ठिकाण ठरले. या वर्षी मे महिन्यात ‘हवाई’च्या प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण पण दूरगामी निर्णय घेतला. ग्रीन टॅक्स या नावाने ओळखला जाणारा हा कर, पर्यटकांकडून ०.७५% इतका वसूल करण्यास सुरुवात केली. अर्थातच याचा परिणाम म्हणून हॉटेलचे टॅरिफ, रेस्टॉरंट मधील खाद्यपदार्थ यांचे दर, यांच्यात वाढ झाली. यामागील भूमिका विशद करताना तिथल्या गव्हर्नरने म्हटले की यामुळे २०२६ पासून होणाऱ्या पुनर्वसनाच्या निमित्ताने आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या इमारती वगैरेंचे नुकसान अंशतः भरून निघेल आणि यामुळे साधारण १०० दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम जमा होईल. हवाई चे गव्हर्नर जनरल जोश ग्रीन एका पत्रकार परिषदेत म्हणाले की वार्षिक १० दशलक्ष पर्यटक या बेटांना भेट देतात यावेळी वातावरणीय संकटांचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल ठरेल.सुसान फाझेकास तेथील अवापूही अडव्हेंचर्स क्लबचा मालक आणि गिर्यारोहण आयोजक. त्याच्या मते येणाऱ्या पर्यटकांकडून उपकर घेणे हे पर्यटकांवर ओझे नाही तर तेथील निसर्गसौंदर्य, धबधबे आणि इतर सौंदर्यस्थळे यांचे संवर्धन करण्यासाठी दिलेले एक सह-उत्तरदायित्व आहे. या करामुळे संवर्धनाचा भार केवळ स्थानिक प्रशासनावर पडत नाही. जानेवारी २०२४ मध्ये ग्रीसच्या प्रशासनाने एके दिवशी तिथे रात्री राहण्याच्या प्रवासी करात ०. ५० युरो ते १० युरो इतकी वाढ केली. तेथील प्रसिद्ध मेकॅनोस किंवा सँटोरिनी बेटांवर अति गर्दीच्या काळात हे पाहायला मिळते. या उपकारातून तेथील प्रशाशन ४०० दशलक्ष युरोची जमा रक्कम अपेक्षित करते. त्यातून पाण्याचे व्यवस्थापन, आपत्तींना प्रतिबंध जैवविविधतेचे संवर्धन याचा खर्च निघू शकतो. बाली, मालदीव बेटांवर २०१५ सालापासून प्रत्येक रात्रीच्या निवासासाठी विशिष्ट उपकर आकारला जायचा जो २०२५ पासून वाढवण्यात आला आहे, न्यूझीलंडने २०१९ साली प्रथम आंतरराष्ट्रीय पर्यटकांकडून उपकराच्या वसुलीला सुरवात केली जी २०२४ मध्ये तिथल्या चलनात म्हणजे न्यूझीलंड डॉलर मध्ये १०० डॉलर इतकी आहे. या कराचा उपयोग पर्यावरण संवर्धन, प्रवाशांच्या सोयी आणि देशातील पर्यटनाच्या शाश्वत व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी होतो.वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिलचे संशोधन आणि शाश्वतता या विषयावरील उपाध्यक्ष ख्रिस्तोफर इम्बसें म्हणतात की असे उपकर हे पर्यटकांना बंधन नसून आपल्या पर्यटनाच्या दरम्यान केलेल्या मौजमजेच्या निमित्ताने त्या त्या ठिकाणच्या पर्यावरण संवर्धनासाठी लावलेला हातभार वाटतात. बुकिंग डॉट कॉम ने २०२४ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार ७५% जागतिक पर्यटक असे उपकर देण्यास आनंदाने तयार असतात. त्यांना भेट दिलेल्या ठिकाणांची परिस्थिती चांगल्या प्रकारे बदलण्यासाठी योगदान देण्यात आनंद वाटतो. युरोमॉनिटर ने २०२३ साली केलेल्या एका सर्वेक्षणात जागतिक पर्यटक १०% इतका उपकर देण्यास राजी असतात ज्यात शाश्वत पर्यटनाची हमी असते.महो तनाका या जपानी जाहिरातदार व्यवसायिकेच्या म्हणण्यानुसार हवाई बेटांना भेट देण्यासाठी द्यावा लागणार अतिरिक्त उपकर ०.७५% इतका असेल तर पर्यटकांच्या आवाक्यात असेल. पर्यटकांना देखील हवाई बेटांवरील जंगल आणि समुद्रकिनारे यांच्या संवर्धनाच्या सामाजिक उपक्रमाचा भाग होणे आवडते.यापुढच्या काळात पर्यावरणाची जितकी आव्हाने पर्यटनाच्या दृष्टीने येतील त्यांना सामोरे जाण्यासाठी स्थानिक प्रशासनाला उपकराच्या रूपाने आपण अंशदान द्यायला हवे. सरकार सगळे पाहील ही वृत्ती न ठेवता आपले ते एक जागतिक कर्तव्य आहे. आपण एक जबाबदार नागरिक या दृष्टीने जगात पर्यटन करताना या नैसर्गिक उपद्रवांचे भान ठेऊन त्यावर मात करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करायला हवेत. फक्त या वसुलीत पारदर्शकता हवी.या अानुषंगाने मालदीवचे प्रशासन मासिक ग्रीन टॅक्स रिपोर्ट प्रकाशित करते. या उपकराचा विनियोग, पाण्यावरील प्रक्रिया, जलमार्ग यांच्यासाठी कसा करण्यात आला हे प्रकाशित करते. अशाच पद्धतीचा अहवाल न्यूझीलंड चे प्रशासन दरवर्षी प्रकाशित करते ज्यात कोणत्या प्रकल्पांवर किती खर्च करण्यात आला, तिथे प्रचलित असलेल्या सायकल ट्रेल मार्गाच्या संवर्धनासाठी किती निधी वापरला गेला इत्यादींचे तपशील असतात. हवाई बेटांनी याबाबत एक ६० पानी अहवाल प्रकाशित केला ज्यात दुर्दैवी आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या वास्तूंचे पुनर्स्थापन कशाप्रकारे केले याचा तपशील प्रसिद्ध केला. या सर्व लेखाचा मतितार्थ इतकाच आहे की पर्यटनाच्या निमित्ताने आपल्याकडून नकळत पर्यावरणाची हानी होते. एक प्रकारे हे पातकच. हा कर देणे म्हणजे या पातकाची भरपाई त्याला पर्यटकांनी तयार असावे.

फीड फीडबर्नर 29 Aug 2025 1:30 am

Pune News |प्रभाग रचना हरकतींसाठी मुदतवाढीची मागणी ; मनसेकडून आयुक्तांना पत्र

प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता २२ ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. या रचनेवर नागरिक, विविध संस्था तसेच राजकीय पक्षांच्या सूचना व हरकती नोंदविण्यासाठी महापालिकेकडून ४ सप्टेंबरपर्यंत कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मात्र, या काळात शहरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याने अनेकांना आपले म्हणणे मांडणे कठीण जाणार असल्याचे […] The post Pune News | प्रभाग रचना हरकतींसाठी मुदतवाढीची मागणी ; मनसेकडून आयुक्तांना पत्र appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Aug 2025 1:15 am

जरांगेंच्या भाषेबाबत मराठवाड्यात नाराजी

- डॉ . अभयकुमार दांडगेमराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी आवाहन केले आहे. आता २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेरच आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांना धमकीवजा इशारा देताना त्यांच्या आईचा उल्लेख करत जरांगेंनी काही शब्दांचा वापर केला. जरांगेंच्या या वक्तव्यावरुन वादाला तोंड फुटले आहे. हे शब्द अपशब्द असल्याचे खुद्द मराठवाड्यातूनच बोलले जात आहे.परस्त्रीला मातेचा दर्जा द्या, अशी शिकवण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिली होती. त्या शिकवणीचे जो पालन करणार नाही, तो छत्रपती शिवरायांच्या मार्गक्रमणावर चालणाराच नसतो. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण नितांत गरजेची आहे. त्यामुळे त्यांच्या शिकवणीचे अनुकरण प्रत्येकाने केले पाहिजे, असा सूर मराठवाड्यातून उमटत आहे. तसेच मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल बोललेले अपशब्द खरोखरच निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया खुद्द मराठा समाजातूनच व्यक्त होत आहे. याबरोबरच 'मुंबईला चला' अशी घोषणा करताना सरकार उलथवून टाकू, अशी भाषा वापरून मनोज जरांगे यांनी राजकीय नेतृत्वाला डिवचले आहे.महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी कशाप्रकारे यू-टर्न घेतला हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. त्यामुळे आंदोलनाची भाषा करणाऱ्या मनोज जरांगे यांना मराठवाड्यातून खरोखरच पाठिंबा मिळत आहे का? हा एक संशोधनाचा विषय होऊन बसला आहे. शरद पवार यांचे उभे आयुष्य राजकारणात गेले. त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलेले नाही. १९९४ मध्ये ओबीसी आरक्षणाबाबत शरद पवार यांनी घेतलेला निर्णय मराठा समाजाला लाभदायक नव्हता. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास पाहिला तर सर्वाधिक काळ मराठा समाजाच्या हातात सत्ता होती. मराठवाड्यातून विलासराव देशमुख तसेच अशोकराव चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यांनी मराठा समाजाला कितपत न्याय दिला याचे अवलोकन मनोज जरांगे यांनीच करावे, अशीही प्रतिक्रिया ओबीसी समाजामधून उमटत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांना शरद पवार यांच्याकरवी पुढे केले जात आहे, असे मराठवाड्यात बोलले जात आहे. मनोज जरांगे यांना त्यांच्याकडून रसद पुरवठा होत आहे की काय? अशी शंका घेण्याइतपत मराठवाड्यात चर्चा होत आहे.राज्यात तसेच देशभरात मराठा समाजाचे अनेक सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत. तसेच अनेक दिग्गज वकील मंडळीदेखील मराठा समाजातूनच आहेत. मराठा आरक्षणाविषयी कायदेशीर असलेली गुंतागुंत किंवा यामधून कसा कायदेशीर मार्ग काढता येईल याबाबत मनोज जरांगे यांनी चर्चा करून त्याविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी किंवा कायदेशीर मुद्द्यांवर हा लढा लढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायद्याच्या चौकटीत बसतील असे नियम व निर्णय घेत आहेत. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री फडणवीस हे कुठे चुकत असतील तर त्यावर कायदेशीर लढाई करावी किंवा तसे मुद्दे समोर आणावेत जेणेकरून मराठा समाजातील संपूर्ण नेते तसेच संपूर्ण समाज मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभा राहील. भारतीय संविधानाला अनुसरून किंवा कायद्याच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण कशा पद्धतीने आणता येईल हे देखील मनोज जरांगे यांनी पुराव्यानिशी सरकारकडे सादर केल्यास ओबीसी समाज कदाचित त्यांना त्याबाबत विरोधही करणार नाही,अशी मराठवाड्यातील ओबीसी समाजाची भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठेतर असल्यामुळे त्यांच्यामागे वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून त्रास देण्याचे राजकारण मराठवाड्यातूनच पेटत आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. 'गोरगरीब समाज बांधव' या गोंडस नावाखाली मनोज जरांगे हे मराठा समाजातील नागरिकांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळेच मराठवाड्यात ग्रामीण भागात मराठा विरुद्ध ओबीसी असे गढूळ वातावरण निर्माण होत आहे.मराठवाड्यातील जालना व बीड जिल्ह्यातून या आंदोलनाची धग सुरू झाली. बीड जिल्ह्यातील गेवराई येथे सोमवारी प्रचंड राडा झाला. त्यामुळे राजकीय वातावरण तापले. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्यासह दोन्ही गटातील १४ जणांवर गेवराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्या राड्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मराठवाड्यात पोलीस यंत्रणा सतर्क आहे. शिवनेरीवर छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन मराठा मोर्चाला प्रारंभ करण्यात येईल, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केल्यानंतर मराठा समाजातील अनेक कार्यकर्ते उत्साहित झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या कार्यकाळात मराठा समाजासाठी अधिसंख्य पदे निर्माण केली.आजवर ३५५३ अधिसंख्यपदे भरण्यात आली. याबरोबरच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. तसेच राजश्री छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनाही सुरू करण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले.सारथी राष्ट्रीय अधि छात्रवृति योजना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हातभार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर बोलू नका, असे स्पष्ट आदेश शिवसेनेच्या मंत्र्यांना दिले आहेत. मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले जात असताना एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाजात चलबिचल अवस्था आहे. सध्या गणेशोत्सवची धामधूम सुरू आहे. मुंबईत तर गणेशोत्सवानिमित्त प्रचंड गर्दी आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, परिणय फुके तसेच आ. चित्रा वाघ यांनी देखील जरांगे यांच्या अपशब्दांवर कडाडून टीका केली. या टीकेनंतरही मनोज जरांगे हे आंदोलनावर ठाम आहेत. एकंदरीत गणेशोत्सव काळात मनोज जरांगे यांचे हे आंदोलन निर्विघ्न पार पडेल की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

फीड फीडबर्नर 29 Aug 2025 1:10 am

Pune News |महिला पोलिस निरीक्षकाची बदली रद्द ; न्यायाधिकरणाचा प्रशासनाला झटका

प्रभात वृत्तसेवा पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या बदलीचा आदेश प्रशासकीय न्यायाधिकरणाने रद्द करत प्रशासनाला धक्का दिला आहे. बदलीचा निर्णय मनमानी आणि सूडबुद्धीने घेतल्याचे निरीक्षण न्यायाधिकरणाने नोंदवले आहे.या महिला निरीक्षकाला जून २०२५ मध्ये बंदोबस्तावर असताना शिवाजी रस्त्यावर विनयभंगाचा सामना करावा लागला. धाडसाने त्यांनी वरिष्ठांना कळवून सराईत गुन्हेगार, भाजपचा कार्यकर्ता प्रमोद कोंढरेविरुद्ध गुन्हा दाखल […] The post Pune News | महिला पोलिस निरीक्षकाची बदली रद्द ; न्यायाधिकरणाचा प्रशासनाला झटका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Aug 2025 1:00 am

Pune News |वाहतूक नियंत्रणाऐवजी थांबवत होते वाहने ; वाहतूक पोलिसांवरच कारवाई

प्रभात वृत्तसेवा पुणे – टिळक रस्त्यावरील वेगवेगळ्या चौकात वाहतूक नियमनाची जबाबदारी असताना पूरम चौकात घोळक्याने कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेच्या तीन पोलिसांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिले आहेत. पोलीस हवालदार संतोष यादव, शिपाई बालाजी पवार, मोनिका करंजकर-लांघे अशी त्यांची नावे आहेत. तिघे खडक वाहतूक विभागात कार्यरत आहेत. १५ मे […] The post Pune News | वाहतूक नियंत्रणाऐवजी थांबवत होते वाहने ; वाहतूक पोलिसांवरच कारवाई appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Aug 2025 12:45 am

Pune Crime |‘ड्राय डे’ असतानाही दारूची खुलेआम विक्री

प्रभात वृत्तसेवा पुणे – गणेशोत्सवामुळे शहर, जिल्ह्यात बुधवारी (दि. २७) ‘ड्राय डे’ घोषित केला असतानाही मध्यवर्ती भागात खुलेआम दारू विक्री सुरू होती. खडक पोलिसांनी पथकाने शुक्रवार पेठेत छापा टाकून देशी, विदेशी दारूचा साठा जप्त केला. कुख्यात मटका किंगसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. वैभव विजय डोंगरे (२६), गुड्डू कुमार भोलाकुमार कुमार (२६) आणि मटका किंग […] The post Pune Crime | ‘ड्राय डे’ असतानाही दारूची खुलेआम विक्री appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Aug 2025 12:30 am

Pimpri News |पिंपरीत गणेशोत्सवाचं ‘राजकीय प्रायोजकत्व’पुन्हा रंगात

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका निवडणुका तोंडावर आल्‍या असल्‍याने यंदा नेते मंडळींनी गणेशोत्‍सव मंडळांच्‍या पदाधिकाऱ्यांना बोलवून वर्गणी दिली आहे. मागील वर्षांच्‍या अनुभवाने यंदा काही मंडळांनी नेते मंडळींना टाळले होते. परंतु आता नेते स्‍वत:च फाेन करुन वर्गणी, इतर मदत देऊ करत आहेत. तसेच आरतीच्‍या वेळा ठरवित आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर इच्‍छुकांनी […] The post Pimpri News | पिंपरीत गणेशोत्सवाचं ‘राजकीय प्रायोजकत्व’ पुन्हा रंगात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Aug 2025 12:15 am

जरांगेंच्या नेतृत्वात हजारो समर्थक मुंबईत धडकणार, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्यासह हजारो समर्थकांचे मोर्चा उद्या, शुक्रवारी मुंबईत धडकणार आहे. येथे आझाद मैदानात एक दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत आंदोलन करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र दुसरीकडे जरांगेंनी न्याय मिळेपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान मुंबईत एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह असताना दुसरीकडे मराठा समाजाच्या मोर्चामुळे पोलिसांवर कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे काम असणार आहे. जरी शुक्रवारपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू होणार असले तरी, राज्यभरातून समर्थक आंदोलनकर्ते आजपासूनच आझाद मैदानावर जमू लागले आहेत.या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने सुमारे १५०० पोलिसांचा मोठा बंदोबस्त आझाद मैदान परिसरात तैनात केला आहे. यामध्ये 450 अधिकारी-कर्मचारी, दोन एसआरपीएफ कंपन्या, बॉम्ब शोधक पथक आणि ड्रोनच्या माध्यमातून कडेकोट नजर ठेवली जाणार आहे.या आंदोलनाच्या माध्यमातून तब्बल २० हजारांहून अधिक निदर्शक दक्षिण मुंबईत येण्याची अपेक्षा असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त, आंदोलन स्थळ आणि त्याच्या आसपासच्या भागात केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), जलद कृती दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि महाराष्ट्र सुरक्षा दल यांची प्रत्येकी एक कंपनी तैनात करण्यात आली आहे.दरम्यान मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील माध्यमांशी बोलताना सांगितले की, मोर्चा निघण्याच्या दोन दिवसांपूर्वी त्यांच्या व्यक्तीशी बोलणे झाले होते. मात्र, त्यांचा पुढे काही निरोप आला नाही. मग मी तो विषय घेतला नाही. कालही नगरमध्ये भेटावे, असे नियोजन होते. मात्र, ते मुंबईला जाण्याबाबत ठाम होते. आम्ही चर्चेला तयार आहोत. मनोज जरांगेंचा गैरसमज झाला असेल तर तो आम्ही दूर करू. मुंबईत आम्ही समिती म्हणून मनोज जरांगेंशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शांतपणे ते आंदोलन करत आहेेत याचे कौतुकच आहे. त्यांच्या मागण्या ते सार्थपणे मांडत आहेत. उदय सामंत यांच्याशी काल बोलणे झाले होते, उपसमितीच्या सर्व सदस्यांशी चर्चा होत आहे. त्यामुळे आम्ही मनोज जरांगेंशी चर्चेला तयार आहोत. समितीशी बोलून याबाबत वेळ ठरवता येईल, असे देखील विखे पाटलांनी स्पष्ट केले.मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही.2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा... 13 महिन्यांपासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे.3. सगेसोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे, त्याचे सगेसोयरे घ्या...सगेसोयरे पोट जात म्हणून घ्या.4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या. अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे.5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 11:30 pm

Baramati News |“शिवनगरच्या पुरुषोत्तम पवार यांना राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार –शिक्षण क्षेत्रात बारामतीचा अभिमान”

प्रभात वृत्तसेवा माळेगाव ( प्रणव तावरे ) – माळेगाव, ता. बारामती शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या पॉलिटेक्निक कॉलेजचे शिक्षक पुरुषोत्तम बाळासाहेब पवार यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याची बातमी शिक्षण क्षेत्रात आनंदाची लहर निर्माण करणारी ठरली आहे. या पुरस्काराचे स्वरूप ₹५०,००० रोख रक्कम, रौप्य पदक आणि प्रमाणपत्र असे असून, ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली […] The post Baramati News | “शिवनगरच्या पुरुषोत्तम पवार यांना राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार – शिक्षण क्षेत्रात बारामतीचा अभिमान” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 11:16 pm

डॉकयार्ड रेल्वे स्टेशन तरुण मृतदेह प्रकरणी तिघांना अटक

मुंबई (प्रतिनिधी) : डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळील माझगाव परिसरात मंगळवारी एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. सदर तरुणाची गळा दाबून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. ही हत्या जमिनीच्या वादातून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. सनी कुमार चौधरी, गिरधारी रॉय आणि मृत्युंजय झा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.केशव चौधरी, असे मृत तरुणाचे नाव आहे. केशव मूळचा बिहारचा, दोन आठवड्यांपूर्वी नोकरीसाठी तो त्याचा मामा मृत्युंजय झा याच्यासोबत राहत होता. माझगावमधील एका इमारतीत सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. केशवच्या गावातील सनी कुमार चौधरी आणि गिरधारी रॉय हे देखील याच परिसरात राहायला होते. सोमवारी रात्री, केशव त्याचा मामा, सनी आणि गिरधारी यांच्यासोबत दारू पित असताना गावातील जमिनीवरून त्यांच्यात वाद झाला. मद्यधुंद अवस्थेतील मृत्युंजय आणि त्याच्या दोन मित्रांनी केशववर हल्ला केला. मृत्युंजयने केशवच्या मानेवर पाय ठेवून त्याचा गळा दाबला, केशवचा जागीच मृत्यू झाला. तिघांनी मिळून केशवचा मृतदेह सोसायटीच्या ड्रेनेज टँकमध्ये टाकला. सनी आणि गिरधारी भुसावळला पळून गेले. मृत्युंजय मुंबईतच होता पोलीसी चौकशीत पोलिसांना मृत्युंजयवर संशय आला. चौकशीत मृत्युंजयने गुन्हा कबुल केला. गुन्हे शाखा युनिट ३ ने इतर दोन आरोपींना भुसावळ येथून मुंबईला आणले. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 11:10 pm

दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप

मुंबई : दीड दिवसांच्या गणरायांना साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. गणरायाच्या निरोपाला रिमझिम पावसाच्या सरी जलाभिषेक करण्यासाठी दाखल झाल्या होत्या. मोठ्या आनंदाने, वाजत-गाजत, ढोल-ताशा आणि टाळ, मृदंगाच्या गजरात ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त विनवणी करत भाविकांनी आपल्या लाड्क्या बाप्पाला निरोप दिला.गणपती विसर्जनासाठी ठिकठिकाणी मुंबई महानगरपालिकेतर्फे विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील तलाव, कृत्रिम तलाव, समुद्रकिनाऱ्यावर भाविकांची तुफान गर्दी होती. दुपारनंतर वाजत-गाजत, गुलाल उधळत, येणाऱ्या-जाणाऱ्याला प्रसादाचे वाटप करत कुटुंबे विसर्जनस्थळी मार्गस्थ होत होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिस दल यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, राजकीय पक्ष यांच्यातर्फे पाणी, अन्नदान सेवा प्रदान करण्यात आली होती.

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 11:10 pm

Vastu Tips: सायंकाळी किंवा रात्री दान करू नयेत या गोष्टी, अन्यथा देवी लक्ष्मी होते नाराज!

मुंबई : हिंदू धर्मग्रंथ आणि वास्तुशास्त्रानुसार, काही विशिष्ट गोष्टी सूर्यास्तानंतर किंवा रात्रीच्या वेळी दान करणे अशुभ मानले जाते. अशा वेळी या वस्तूंचे दान केल्यास घरातून सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य निघून जाते आणि देवी लक्ष्मीचा कोप होतो. चला जाणून घेऊया अशा कोणत्या वस्तू आहेत, ज्या संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी दान करू नयेत:१. दूध (Milk):वास्तुशास्त्रानुसार, दूध हे चंद्र आणि शुक्र ग्रहांशी संबंधित मानले जाते. सूर्यास्तानंतर किंवा रात्रीच्या वेळी दूध दान केल्याने चंद्र आणि शुक्र ग्रह कमकुवत होतात, ज्यामुळे आर्थिक समस्या वाढू शकतात. त्यामुळे संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी दूध दान करणे टाळावे.२. मीठ (Salt):मीठ हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. अनेक धार्मिक कार्यात मिठाचा वापर केला जातो. वास्तुशास्त्रानुसार, मीठ दान केल्याने घराची आर्थिक स्थिती बिघडते आणि घरात गरिबी येऊ शकते. त्यामुळे संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी मीठ दान करणे पूर्णपणे टाळावे.३. हळद (Turmeric):हळद ही गुरू ग्रहाशी संबंधित आहे. हळदीचा वापर अनेक शुभ कार्यांमध्ये होतो. रात्री हळद दान केल्याने गुरू ग्रह कमजोर होतो, ज्यामुळे शुभ कार्य आणि आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.४. पैसे (Money):पैसा हे लक्ष्मीचे स्वरूप आहे. सूर्यास्तानंतर पैसे दान करणे म्हणजे देवी लक्ष्मीला घरातून बाहेर काढण्यासारखे आहे, असे मानले जाते. त्यामुळे संध्याकाळी पैसे दान केल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.५. लसूण-कांदा (Garlic-Onion):लसूण आणि कांदा हे तामसिक पदार्थ मानले जातात. वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी या वस्तू दान केल्याने घरावर नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातून सुख-शांती निघून जाते.वास्तुशास्त्रज्ञांच्या मते, या नियमांचे पालन केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 11:10 pm

निर्यातदारांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही: अर्थ मंत्रालयाचे आश्वासन

नवी दिल्ली – अमेरिकेने भारताविरोधात 50 टक्के आयात शुल्क लावल्यामुळे भारतातील काही क्षेत्रांच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे. निर्यातदाराना मदत करण्यासाठी अनेक पर्यायावर विचार करण्यात येत आहे. कसल्याही परिस्थितीत निर्यातदारांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे आश्वासन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निर्यातदारांच्या संघटनेला दिले आहे. या विषयावर सितारामन यांनी निर्यातदारांच्या संघटनेच्या शिष्टमंडळांबरोबर तपशिलात चर्चा केली. फेडरेशन […] The post निर्यातदारांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही: अर्थ मंत्रालयाचे आश्वासन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 10:48 pm

चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात; भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक, जणांचा जागीच मृत्यू

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कापणगाव येथे आज सकाळी एका भयानक अपघाताने सर्वत्र हाहाकार माजला आहे. भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालकासह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षा पूर्णपणे […] The post चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात; भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक, जणांचा जागीच मृत्यू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 10:45 pm

Duleep Trophy 2025 : मालेवार-पाटीदार जोडीचा शतकी धमाका! सेंट्रल झोनची पहिल्या दिवशी मजबूत पकड

Duleep Trophy Quarterfinals 2025 Updates : दुलीप ट्रॉफी २०२५ ची सुरुवात आजपासून झाली असून, सेंट्रल झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्याचा पहिला दिवस बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलन्स ग्राउंड बीवर खेळला गेला. पहिल्या दिवसअखेर सेंट्रल झोनने ७७ षटकांत २ बाद ४३२ धावा केल्या. दानिश मालेवारने नाबाद १९८ धावांची खेळी करत संघाला मजबूत […] The post Duleep Trophy 2025 : मालेवार-पाटीदार जोडीचा शतकी धमाका! सेंट्रल झोनची पहिल्या दिवशी मजबूत पकड appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 10:41 pm

Satish Deshmukh : कोण आहेत सतीश देशमुख? ज्यांनी मनोज जरांगेंच्या रॅलीमध्ये गमावला जीव

बीड : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावे यासाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी ‘चलो मुंबई’ची हाक दिली असून, हजारो मराठा बांधवांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईच्या दिशेने कूच केले आहे. मात्र, या मोर्च्यादरम्यान बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वरपगाव (किंवा वडगाव) येथील 45 वर्षीय मराठा आंदोलक सतीश देशमुख (Satish Deshmukh) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने अकाली मृत्यू […] The post Satish Deshmukh : कोण आहेत सतीश देशमुख? ज्यांनी मनोज जरांगेंच्या रॅलीमध्ये गमावला जीव appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 10:35 pm

“विद्यानिकेतन अकॅडमीचा तायक्वांदो संघ सुवर्णमय”; २७ सुवर्ण, १९ रौप्य व ३ कांस्य पदकांची कमाई

श्रीरामपूर : अँड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन अकॅडमीच्या तायक्वांदो संघाने तालुकास्तरीय आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धेत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. आर. नारायणराव बोरावके महाविद्यालय येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अकॅडमीने तब्बल ४९ पदके पटकावत झेंडा उंचावला. संघाने मिळवलेल्या एकूण ४९ पदकांमध्ये २७ सुवर्ण, १९ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश असून, ६० पैकी ४९ विद्यार्थी […] The post “विद्यानिकेतन अकॅडमीचा तायक्वांदो संघ सुवर्णमय”; २७ सुवर्ण, १९ रौप्य व ३ कांस्य पदकांची कमाई appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 10:32 pm

रशियाकडून तेल खरेदी करून भारताला नेमका किती फायदा झाला? जाणून घ्या

नवी दिल्ली – भारताने रशियाकडून स्वस्त खनिज तेल खरेदी करून बराच लाभ करून घेतला असल्याचा आरोप केला जात आहे. काही संस्थांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारताला यामुळे 10 ते 25 अब्ज डॉलरचा फायदा झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये भारताला या स्वस्त तेल खरेदीतून केवळ 2.5 अब्ज डॉलरचा लाभ झाला असल्याची माहिती एका अभ्यास […] The post रशियाकडून तेल खरेदी करून भारताला नेमका किती फायदा झाला? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 10:25 pm

Adani Group: एका वर्षात अदानी समूहाला किती नफा झाला? आकडे वाचून व्हाल थक्क…

नवी दिल्ली – जून मध्ये संपलेल्या बारा महिन्यात अदानी समूहाचा ढोबळ नफा म्हणजे करपूर्व नफा वाढून 90 हजार 572 कोटी रुपयावर गेला असल्याची माहिती या समूहाने जारी केली आहे. पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा आणि विमानतळ उद्योगातून उलाढाल वाढल्यामुळे हा नफा वाढला असल्याचे समूहाने नमूद केले. गेल्या वर्षी जून अखेर संपलेल्या महिन्यात या समूहाचा नफा 85,502 […] The post Adani Group: एका वर्षात अदानी समूहाला किती नफा झाला? आकडे वाचून व्हाल थक्क… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 10:16 pm

शिगवे बहुला येथे पॅराशूट कोसळले

भगूर : नाशिक जवळील शिंगवे बहुला गावातील घरावर लष्कराचे पॅराशुट ( ग्लायडर ) कोसळले. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नसून लष्कर जवानास दुखापत झाली आहे. त्यास पुढील उपचारासाठी ताबडतोब देवळाली कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शिगवे बहुला येथील ज्या घराचे नुकसान झाले आहे. लष्कराच्या नाईस राईट्स युनिटच्या वतीने लष्करी जवान पॅरा शुट (ग्लायडर) प्रशिक्षण घेत असतात नेहमी प्रमाणे गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास प्रशिक्षण घेत असताना पॅराशुटमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने पॅराशुट सह जवान शिंगवे बहुला गावातील राहणाऱ्या कौसाबाई चव्हाण यांच्या घरावर कोसळले. त्वरित लष्करी जवान अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि जवानास उपचारासाठी मिलीटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, इतर कुठलीही जीवीत हानी झाली नाही. कौसबाई चव्हाण यांच्या घराचे जे नुकसान झाले आहे, ते लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांचा खर्च भरुन दिला. देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले होते.

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 10:10 pm

प्रधानमंत्री जन धन योजनेत महिलांची ५६ टक्के भागीदारी

नवी दिल्ली : प्रधानमंत्री जन धन योजनेला गुरुवारी ११ वर्ष पूर्ण झाली. ही योजना २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू करण्यात आली होती आणि आज ही योजना जगातील सर्वात मोठी वित्तीय समावेशन मोहीम बनली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या संधीवर सांगितले की, ही योजना गरीबांना प्रतिष्ठा, आत्मनिर्भरता आणि आर्थिक समानता दिली आहे आणि बँका व सामान्य लोक यांच्यातील दरी कमी केली आहे. आतापर्यंत ५६.१६ कोटी बॅंक खाते उघडली गेली आहेत आणि त्यात एकूण २.६७ लाख कोटी रुपयांची जमा रक्कम आहे. यामधील ५६ % खाती महिलांच्या नावावर आहेत, ज्यामुळे महिलांच्या आर्थिक सहभाग आणि वित्तीय समानतेचे प्रतीक आहे.या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे बँकिंग द अनबँक्ड, सिक्योरिंग द अनसिक्योर्ड, फंडिंग द अनफंडेड आणि सर्व्हिंग द अनसर्व्हड. याचा अर्थ, बँकिंग सेवांपासून वंचित नागरिकांना बँकेशी जोडणे आणि सुरक्षित कर्ज उपलब्ध करणे. याअंतर्गत कोणत्याही नागरिकाला किमान शिल्लक न ठेवता बेसिक सेव्हिंग्स बॅंक डिपॉझिट अकाऊंट उघडण्याची सुविधा दिली गेली आहे. कागदपत्रे नसलेल्या लोकांसाठी लहान खाते उघडण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली. या योजनेत सर्व खातेदारांना रु-पे डेबिट कार्ड दिले जाते, ज्यामध्ये २ लाख रुपयांचे अपघाती विमा कव्हर समाविष्ट आहे.या योजनेच्या सर्वात मोठ्या यशांपैकी एक आहे की, आतापर्यंत ३८ कोटी RuPay डेबिट कार्ड्स जारी केली गेली आहेत. २०१५ मध्ये ज्या ठिकाणी एकूण जमा रक्कम १५,६७० कोटी रुपये होती, ती आता २,६७,७५५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे दर्शविते की लोकांचा औपचारिक बॅंकिंग प्रणालीवर विश्वास वाढला आहे. ही योजना आता ३२७ सरकारी योजनांच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफरचा आधार बनली आहे, ज्यामुळे बिचौलिया आणि लीक होणाऱ्या रक्कमांची समस्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. या योजनेच्या ऐतिहासिक यशाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनेही मान्यता दिली आहे, जेव्हा एका आठवड्यात १.८० कोटी खाती उघडली गेली.अलीकडेच, वित्त मंत्रालयाने १ जुलै ते ३०सप्टेंबर २०२५ या कालावधीत तीन महिन्यांचा राष्ट्रव्यापी अभियान सुरू केले आहे. या अभियानाचे उद्दिष्ट प्रत्येक ग्राम पंचायत आणि शहरी स्थानकांपर्यंत या योजनेचा आणि इतर संबंधित योजनांचा विस्तार करणे आहे. जुलै २०२५ मध्ये ९९ हजार शिबिर आयोजित केली गेली, ज्यात ८०,४६२62 शिबिरांवर अहवाल प्राप्त झाला. या कालावधीत ६.६लाख नवीन जन धन खाते उघडली गेली आणि २२. ६५लाख नवीन नोंदणी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेंशन योजनेखाली केली गेली. त्याचप्रमाणे, ४.७३ लाख निष्क्रिय जन धन खात्यांची आणि ५.६५ लाख इतर बचत खात्यांची केवायसी पुनः तपासणी केली गेली.

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 10:10 pm

‘गोविंदा फक्त माझा आहे’

गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविरामगेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्यात घटस्फोटाची चर्चा सुरू होती. मात्र, गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर या जोडप्याने एकत्र येऊन या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. गोविंदाच्या घरी बाप्पाच्या आगमनावेळी सुनीताने मीडियाशी संवाद साधताना ‘गोविंदा फक्त माझाच आहे’ असे ठामपणे सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येत होत्या. सुनीताने वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचा दावाही काही माध्यमांनी केला होता. या अर्जामध्ये ‘अत्याचार’ आणि ‘फसवणूक’ असे गंभीर आरोप केल्याचेही म्हटले जात होते. या अफवांवर दोघांनीही थेट प्रतिक्रिया दिली नव्हती. पण, यावर्षीच्या गणेश चतुर्थीनिमित्त गोविंदा आणि सुनीता त्यांच्या मुलांसोबत एकत्र दिसले. दोघांनीही मीडियासमोर एकत्र फोटो काढले आणि एकमेकांबद्दलचे प्रेम दाखवले. यावेळी गोविंदानेही आपल्या कुटुंबासाठी शुभेच्छा मागितल्या. त्याने म्हटले, ‘बाप्पाचा आशीर्वाद मिळाल्यावर कुटुंबातील सर्व दु:ख दूर होतात. मला विशेषतः माझा मुलगा यश आणि मुलगी टीना यांच्यासाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत. तुम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि आशीर्वाद द्यावा.’गोविंदा आणि सुनीता यांचा एकत्र फोटोमुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 10:10 pm

‘जटाधारा’ या चित्रपटात शिल्पा शिरोडकरची एन्ट्री

सोनाक्षी सिन्हा आणि सुधीर बाबू यांच्या बहुप्रतिक्षित ‘जटाधारा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर रसिकांची चित्रपटाबद्दल उत्सुकता आणखीनच वाढली आहे. निर्मात्यांनी ‘जटाधारा’ चित्रपटातील अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा लूक रिलीज केला आहे. चित्रपटात शिल्पाचे स्वागत करताना निर्मात्यांनी तिच्या व्यक्तिरेखेबद्दल माहितीही दिली आहे. शिल्पा चित्रपटात शोभा नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. ‘जटाधारा’ हा चित्रपट एक पौराणिक थ्रिलर आहे, ज्यामध्ये भारतीय पौराणिक कथांना रोमांचक दृश्ये आणि गडद कल्पनारम्यतेसह एकत्र केले गेले आहे. चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरमध्ये त्रिशूळ, गडगडणारे ढग, भगवान शिवाचे भक्त आणि सोनाक्षी सिन्हाचे भयंकर रूप दाखवले आहे, ज्यामुळे कथा अधिक शक्तिशाली आणि प्रभावी बनते. झी स्टुडिओ आणि प्रेरणा अरोरा निर्मित, वेंकट कल्याण आणि अभिषेक जयस्वाल दिग्दर्शित, या चित्रपटात उत्तम व्हीएफएक्स असू शकतात. ‘जटाधारा’ची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही. हा चित्रपट वर्षाच्या अखेरीस चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 10:10 pm

‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

वडापाव म्हटले की जिभेला पाणी सुटते. वडा जसा तिखट-चुरचुरीत असतो तसेच नात्यांमध्येही गोडवा आणि तिखटपणा असला तरच ती नाती खरी रंगतदार होतात. अगदी हाच अनुभव देणारा कौटुंबिक चित्रपट ‘वडापाव’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर मीडियावर प्रदर्शित झाला असून टीझरवरून हा चित्रपट एक गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असणार हे स्पष्ट होते. हा चित्रपट प्रसाद ओक यांच्या अभिनय कारकिर्दीतील शंभरावा चित्रपट असल्यामुळे ते पहिल्यांदाच एकाच वेळी दिग्दर्शक आणि अभिनेते अशा दुहेरी भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे हा प्रवास अधिकच संस्मरणीय ठरणार आहे. या चित्रपटामध्ये प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनर अंतर्गत, प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटाचे अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन निर्माते आहेत. तर सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल असून संजय मेमाणे हे चित्रपटाचे छाया दिग्दर्शक आहेत, तर सिद्धार्थ साळवी यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे.

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 10:10 pm

पार्थ पवार-जॅकलिन जोडीने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबईत ठिकठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी विविध ठिकाणी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पोहोचली होती. जॅकलिनचा पार्थ पवारांबरोबरचा एक सोशल मिडियावर व्हायरल झाला. गणेशोत्सवात लालबागचा राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीही बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी जॅकलिन फर्नांडिस, अवनीत कौर व निर्माता राघव शर्मा यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले. यावेळी तिथे पार्थ पवार उपस्थित होते. जॅकलिनने लालबागचा राजाचे चरणस्पर्श केले. तिथे आरती सुरू होती. तेव्हा पार्थ पवार यांनी आपल्या खिशातून काही नोटा काढल्या आणि जॅकलिनला दिल्या. पार्थ पवार यांनी आपल्या हातातील नोटा दानपेटीत टाकल्यानंतर जॅकलिनने पार्थ यांच्याकडून घेतलेल्या नोटा दानपेटीमध्ये टाकल्या. त्यानंतर जॅकलिन व पार्थ पवार बाप्पाचे चरण स्पर्श करून निघून गेले. पार्थ पवार यांनी जॅकलिनला खिशातून नोटा काढून दिल्या तो व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पार्थ व जॅकलिन यांच्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर जोरद

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 10:10 pm

‘जॉली एलएलबी ३’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाचा वाद वाढतच चालला आहे. जॉली एलएलबी ३ या चित्रपटात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्यासह सौरभ शुक्ला, अमृता राव, हुमा कुरेशी, नंदिनी कपूर आदि कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हा चित्रपट न्यायालयीन कथेवर आधारित आहे. या चित्रपटाला काही वकिलांनी विरोध दर्शवला आहे. आता पाटणा उच्च न्यायालयात या चित्रपटाविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की ‘जॉली एलएलबी ३’ मध्ये न्यायव्यवस्था आणि कायदेशीर व्यवसायाचे अपमानजनक पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे. यामुळे वकिलांची आणि संपूर्ण न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा दुखावली गेली आहे. ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटाविरुद्ध वकील नीरज कुमार यांनी पाटणा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याने न्यायालयाला या चित्रपटावर, त्यातील गाण्यांवर आणि प्रमोशनवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले ‘मेरा भाई वकील’ हे गाणे आणि या चित्रपटाच्या ट्रेलरचा या प्रकरणात उल्लेख करण्यात आला आहे. याचिकेत म्हटले आहे की, चित्रपटाच्या गाण्यावर आणि प्रमोशनल मटेरियलमध्ये कायदेशीर व्यवसाय हास्यास्पदरीत्या दाखवण्यात आले आहे. यामुळे केवळ वकिलांची प्रतिष्ठाच खराब होत नाही तर जनतेमध्ये न्यायव्यवस्थेची प्रतिमाही डागाळली जात आहे. याचिकेत, हायकोर्टाला जॉली एलएलबी ३ चे वादग्रस्त गाणे आणि ट्रेलरवर तात्काळ बंदी घालण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच, चित्रपट निर्मात्यांनी बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि बिहार स्टेट बार कौन्सिलची परवानगी घेऊन चित्रपटात आवश्यक बदल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 10:10 pm

पीव्ही सिंधू बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर फायनलमध्ये

पॅरिस : दुहेरी ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधूने बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या राउंड ऑफ १६ सामन्यात तिने चीनच्या वांग झीला सरळ गेममध्ये पराभूत केले केले.ऑलिंपिकमध्ये रौप्य आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने जागतिक नंबर-२ वांग झीविरुद्ध आपले वर्चस्व कायम ठेवले. सिंधूने आतापर्यंत वांगविरुद्ध खेळलेल्या पाच सामन्यात तिसऱ्यांदा तिचा पराभव केला आहे. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत १५व्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने पहिल्या गेममध्ये संघर्षपूर्ण लढतीनंतर २१-१९ च्या फरकाने विजय मिळवला.पहिला गेम जिंकल्यानंतर सिंधूने दुसऱ्या गेममध्येही १२-६ अशी आघाडी घेतली. तिने ही आघाडी कायम ठेवली आणि दुसरा गेम २१-१५ च्या फरकाने जिंकून सामना जिंकला. क्वार्टर फायनलमध्ये सिंधूचा सामना जागतिक नंबर-१ दक्षिण कोरियाच्या अन से यंगशी होण्याची शक्यता आहे.जागतिक क्रमवारीत १६ व्या क्रमांकावर असलेल्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रिस्टो या भारतीय जोडीने विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हाँगकाँगच्या तांग चुन मिन आणि से यिंग सुत यांनी पहिल्या सामन्यात दोघांचा २१-१९ अशा फरकाने पराभव केला. दुसऱ्या सामन्यात ध्रुव-तनिषाने पुनरागमन केले आणि २१-१२ असा विजय मिळवत सामना बरोबरीत आणला. भारतीय जोडीने तिसरा सामना २१-१५ अशा फरकाने जिंकला आणि क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 10:10 pm

Team India : टीम इंडिया मुंबईत नाही, थेट दुबईत एकत्र येणार! आशिया कपसाठी काय आहे संघाची नवी रणनीती? जाणून घ्या

Team India Assemble in Dubai for Asia Cup 2025 : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील १५ खेळाडूंचा भारतीय क्रिकेट संघ ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० आशिया चषक २०२५ साठी ४ सप्टेंबरला दुबईत एकत्र येणार आहे. नेहमीच्या परंपरेपासून वेगळे जाऊन खेळाडू आपापल्या शहरांतून थेट दुबईत पोहोचतील आणि तिथे संघाशी जोडले जातील. यापूर्वी संघ सहसा मुंबईत एकत्र येऊन सामूहिकपणे […] The post Team India : टीम इंडिया मुंबईत नाही, थेट दुबईत एकत्र येणार! आशिया कपसाठी काय आहे संघाची नवी रणनीती? जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 10:05 pm

‘मी कधीही म्हटले नाही की ७५ व्या वर्षी निवृत्त व्हावे’, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे विधान

नवी दिल्ली : कुणाच्या निवृत्तीविषयी मी कधीच बोललो नाही, अशी स्पष्टोक्ती सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरूवारी केली. त्यांनी काही दिवसांपूर्वी वयाच्या पंचाहत्तरीविषयी केलेल्या वक्तव्यावरून भुवया उंचावल्या गेल्या. तसेच, विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. आता भागवत यांनी त्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचे मानले जात आहे. नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी एक कार्यक्रम झाला. त्यावेळी बोलताना भागवत यांनी संघाचे ज्येष्ठ नेते […] The post ‘मी कधीही म्हटले नाही की ७५ व्या वर्षी निवृत्त व्हावे’, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे विधान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 10:02 pm

Amol Khatal Attack : संगमनेरचे वातावरण तापले ! शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला

अहिल्यानगर: संगमनेर येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यातील वादामुळे आधीच चर्चेत असलेल्या या शहरात गुरुवार, 28 ऑगस्ट 2025 रोजी आणखी एका गंभीर घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) चे आमदार अमोल खताळ यांच्यावर खांडगाव येथील एका व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली. ही घटना संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान […] The post Amol Khatal Attack : संगमनेरचे वातावरण तापले ! शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 9:39 pm

आनंदाची बातमी.! २५ सप्टेंबरपासून महिलांना २१०० रुपये मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय

cabinet meeting – हरियाणामध्ये दीनदयाळ उपाध्याय लाडकी लक्ष्मी योजना लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना २५ सप्टेंबरपासून लागू केली जाईल. मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याची घोषणा करण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री सैनी म्हणाले की, महिलांच्या सामाजिक सुरक्षा आणि सन्मानासाठी दीनदयाळ लाडकी लक्ष्मी योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. पंडित […] The post आनंदाची बातमी.! २५ सप्टेंबरपासून महिलांना २१०० रुपये मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 9:32 pm

New Rules September 2025: 1 सप्टेंबरपासून नवीन नियम लागू होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम

New Rules September 2025: दरमहा प्रमाणे सप्टेंबर 2025 मध्येही अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. 1 सप्टेंबर 2025 पासून चांदीच्या हॉलमार्किंगपासून ते एसबीआय कार्डवरील वाढीव शुल्क, एलपीजीच्या किमती, एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क आणि फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) व्याजदरांमध्ये संभाव्य बदल यासारख्या नव्या तरतुदी लागू होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम […] The post New Rules September 2025: 1 सप्टेंबरपासून नवीन नियम लागू होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 9:30 pm

मनोज जरांगेंची हाक अन् आझाद मैदानावर लाखो आंदोलकांची कूच, गर्दी जमण्यास सुरुवात

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाची हाक दिली आहे. त्यामुळे राज्यातील संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. मनोज जरांगे यांना आझाद मैदानात एक दिवसासाठी आंदोलनाची परवानगी मिळाली असली तरी त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून तुकड्या तुकड्यांमध्ये मराठा बंधू-भगिनी हजारोंच्या संख्येने मुंबईकडे ट्रेन, […] The post मनोज जरांगेंची हाक अन् आझाद मैदानावर लाखो आंदोलकांची कूच, गर्दी जमण्यास सुरुवात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 9:30 pm

OBC reservation : ओबीसी आरक्षणासाठी सर्व पक्ष एकवटले !

OBC reservation : मध्य प्रदेशात कोणत्याही परिस्थितीत २७ टक्के ओबीसी आरक्षण दिले जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत या सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्रितपणे ठरावही मंजूर केला. बैठकीनंतर मुख्यमंत्री यादव म्हणाले की, काँग्रेस, भाजप, […] The post OBC reservation : ओबीसी आरक्षणासाठी सर्व पक्ष एकवटले ! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 9:22 pm

नवे सहकार धोरण देशात परिवर्तन घडवेल!

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला भारत देश वेगाने प्रगती करतं आहे. समाजातील सर्व घटकांचा विचार करणारे हे सरकार आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशात सर्वत्र सहकार चळवळ रुजवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात नवे सहकारी धोरण अमलात येत असून गावागावात सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहकाराचे जाळे निर्माण होईल. सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकारी, मच्छिमार, व्यापारी, उद्योजक यांसह सर्वांच्या हिताचे निर्णय घेणारे हे सरकार आहे. असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.गणेशोत्सवाच्या निमित्ताने मालवण मेढा येथील निवासस्थानी आलेल्या माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उमा प्रभू, अमेय प्रभू, विजय केनवडेकर, किसन मांजरेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक भांडवल पुरवण्यासाठी को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया स्थापन करण्याची योजना आहे. या बँकेची संकल्पना सुरेश प्रभू यांनी सारस्वत बँकेचे अध्यक्ष असताना मांडली होती, परंतु तेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकेचा परवाना मिळाला नव्हता. आता, सरकारने धोरणात्मक बदल केल्यामुळे हा परवाना मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या नवीन धोरणांतर्गत ज्या सहकारी संस्था कमकुवत आहेत. त्यांना बळकट केले जाईल आणि प्रत्येक गावात एक नवीन सहकारी संस्था स्थापन केली जाईल. या संस्थांच्या माध्यमातून गोडाऊन, पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सी यांसारखे उपक्रम सुरू करण्यातही आले आहेत. यामुळे येत्या काळात सहकार क्षेत्रात चौपट वाढ होण्याची शक्यता आहे. असेही प्रभू म्हणाले. विविध विषयांवर सुरेश प्रभू यांनी भाष्य केले.कोकणाचा विचार करता अवकाळी पाऊस अनियमित थंडी यासह हवामानातील अन्य बदलांचा परिणाम शेतकरी बागायतदार मच्छीमार या सर्वानाच भोगाव लागत आहेत. घेतलेल्या उत्पादनाचे मोठे नुकसान होते. म्हणूनच आज निसर्गाचे जे नियम आहेत त्यावर आधारित अर्थ व्यवस्था याबाबतही निश्चितच गरजेचे आहे. आपले सरकार सर्वच बाबतीत विचार करून जन हिताचे निर्णय घेत आहे.आपण केंद्रीय वाणिज्य मंत्री असताना देशासाठी पहिले कृषी निर्यात धोरण तयार केले. या धोरणामुळे शेतीमालाची निर्यात चौपट वाढली. ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झाला. या धोरणाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय शेतमालाला एक नवीन ओळख दिली आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगली किंमत मिळण्यास मदत झाली. उत्पन्न कमी मिळण्याचे प्रमुख कारण नैसर्गिक आपत्तीसोबतच साठवणूक आणि मार्केटिंग व्यवस्थेचा अभाव आहे. यावर मात करण्यासाठी सहकारी संस्थांमार्फत साठवणूक आणि मार्केटिंग व्यवस्था निर्माण केली जात आहे. या संस्था शेतकऱ्यांच्या मालाची योग्य पद्धतीने साठवणूक करून त्याला चांगली बाजारपेठ मिळवून देण्यास मदत करतील ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत मिळणार आहे.अमेरिकेने भारतीय वस्तूंवर आयात शुल्क वाढवल्यामुळे, झालेल्या परिणामांवर आपले सरकार सक्षमपणे उपाययोजना आखत आहे. भारताने सहकार क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून देशांतर्गत उद्योग आणि रोजगार वाढवण्यावर भर दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.अमेरिकेच्या ५० टक्के पर्यंत आयात शुल्क वाढवल्याच्या निर्णयामुळे भारताच्या लघु उद्योगांवर परिणाम झाला आहे. आपण वाणिज्य मंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या वाटाघाटी सुरू होत्या त्यावेळी प्रशासनाची भूमिका मी मांडताना कृषी, दुग्धव्यवसाय आणि लघु उद्योगांना हानिकारक ठरेल अशा कोणत्याही धोरणाला आम्ही कधीच मान्यता देणार नाही असे स्पष्ट केले होते. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आवश्यक पावले उचलत आहे, असेही त्यांनी सांगितले.आर्थिक आव्हानांवर मात करण्यासाठी आणि देशात आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी सुरेश प्रभू यांनी सहकार धोरणाला महत्त्व दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन सहकार धोरण तयार केले आहे, ज्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. हे धोरण सहकार क्षेत्राचे योगदान अनेक पटींनी वाढवून कोट्यवधी लोकांना रोजगार मिळवून देण्यास मदत करेल.आपल्या सध्याच्या भूमिकेबद्दल बोलताना सुरेश प्रभू यांनी आता पुन्हा राजकारणात येण्याची इच्छा नाही. राजकारणाबाहेरही जीवन असते आणि ते आपण अनुभवले आहे. राजकारणात जेवढा व्यस्त नव्हतो त्यापेक्षा ही आता खूप व्यस्त आहेत. देशातील तसेच २० हून अधिक जागतिक संस्थांमध्ये कार्यरत आहे आणि देशासाठी काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत देश आहे, आवश्यक ती मदत करण्यास आपण नेहमीच देशसेवेत आहोत, असेही प्रभू यांनी यावेळी स्पष्ट केले.

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 9:10 pm

'राष्ट्रीय हितासाठी तीन मुलं जन्माला घाला'

नवी दिल्ली : राष्ट्रीय हितासाठी तीन मुलं जन्माला घाला. हम दो हमारे तीन, हे धोरण राष्ट्रीय हितासाठी अवलंबिले पाहिजे; असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. डॉक्टरांनी मला सांगितले आहे की, योग्य वयात लग्न केल्याने आणि तीन मुले झाल्याने पालक आणि मुले दोघेही निरोगी राहतात. तीन भावंड असलेल्या घरातील मुले अहंकार व्यवस्थापन देखील शिकतात आणि भविष्यात त्यांच्या कौटुंबिक जीवनात कोणताही अडथळा येत नाही. डॉक्टरांचे हे म्हणणे लक्षात घेता प्रत्येक भारतीय जोडप्याने राष्ट्राच्या हितासाठी तीन मुले जन्माला घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे; असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.लोकसंख्या नियंत्रित राहावी आणि त्याच वेळी पुरेशी राहावी यासाठी, प्रत्येक कुटुंबात तीन मुले असली पाहिजेत परंतु त्यापेक्षा जास्त नसावीत. त्यांचे संगोपन योग्य प्रकारे व्हावे यासाठी हे आवश्यक आहे. ही गोष्ट प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे झाल्याच्या निमित्ताने दिल्लीत “संघाच्या प्रवासाची १०० वर्षे – नवीन क्षितिज” या तीन दिवसांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी, सरसंघचालक प्रमुख मोहन भागवत यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी लोकसंख्या धोरणाबद्दल भाष्य केले.

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 9:10 pm

बंगळुरुमधील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या तीन महिन्यानंतर आरसीबीची भावुक पोस्ट

नवी दिल्ली : आयपीएल २०२५ चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अखेर सोशल मीडियावर परतले आहे. त्यांनी बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीवर आपले मौन तोडले आहे. या वर्षी ४ जून रोजी बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर संघाने अनेक दिवस कोणत्याही प्रकारची हालचाल दाखवली नाही. अनेक चाहत्यांनी यावर प्रश्नही उपस्थित केले होते. पण आता संघाने एक अधिकृत संदेश जारी करून स्पष्ट केले आहे की, त्यांचे मौन अनुपस्थिती म्हणून मानले जाऊ नये. आरसीबीने चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ११ जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती.आरसीबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांचे मौन प्रत्यक्षात पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मौन पाठिंब्याचे प्रतीक आहे. फ्रँचायझीने स्पष्ट केले की, अशा कठीण काळात, त्यांचे उद्दिष्ट सोशल मीडियावर हलक्याफुलक्या पोस्ट करण्याऐवजी गांभीर्य आणि संवेदनशीलता राखणे होते. त्यांनी लिहिले, 'आमचे मौन म्हणजे अनुपस्थिती नव्हती. आम्ही सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो.'संघाने बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचे वर्णन दुर्दैवी आणि दुःखद असे केले. आरसीबीने मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना तीव्र शोक व्यक्त केला आणि या कठीण काळात सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे आश्वासन दिले. निवेदनात म्हटले आहे की, चाहते हे केवळ प्रेक्षक नाहीत तर आरसीबी कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांची सुरक्षा हे प्राधान्य आहे. आरसीबीने आपल्या संदेशात पुढे लिहिले आहे की, ते केवळ एक क्रिकेट फ्रँचायझी नाही तर लाखो समर्थकांच्या भावनांशी जोडलेले कुटुंब आहे. त्यांनी सांगितले की, क्लब भविष्यात सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी पावले उचलेल, जेणेकरून अशी घटना पुन्हा घडू नये. त्यांनी चाहत्यांना संयम आणि सहकार्याचे आवाहनही केले.आरसीबीने लिहिले, 'हे आमचे तुम्हाला पत्र आहे! आम्ही शेवटचे येथे काहीतरी पोस्ट केल्यापासून जवळजवळ तीन महिने झाले आहेत. ही शांतता अनुपस्थिती नव्हती, ती शोक होती. हे व्यासपीठ एकेकाळी ऊर्जा, आठवणी आणि तुम्ही सर्वात जास्त आनंद घेतलेल्या क्षणांनी भरलेले होते.पण ४ जूनने सर्वकाही बदलले. त्यानंतरच्या शांततेने आमचा शोक करण्याचा मार्ग बनला आहे. त्या शांततेत, आम्ही शोक करत होतो. ऐकत होतो. शिकत होतो. आणि हळूहळू, आम्ही फक्त प्रतिक्रियेच्या पलीकडे काहीतरी तयार करायला सुरुवात केली. ज्यावर आम्ही खरोखर विश्वास ठेवतो.'फ्रँचायझीने असेही म्हटले आहे की, सोशल मीडियावर त्यांचे पुनरागमन हे केवळ औपचारिकता नाही तर चाहत्यांना संघ त्यांच्यासोबत उभा आहे .याची खात्री देण्याचा एक मार्ग आहे. त्यांनी सांगितले की, संवेदनशील वेळी चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून कधीकधी मौन बाळगणे अधिक महत्वाचे असते. आरसीबीने स्पष्ट केले की ते भविष्यात घटनेतून मिळालेले धडे लक्षात घेऊन अधिक जबाबदार पावले उचलतील. त्यांनी असेही आश्वासन दिले की मैदानावर असो वा मैदानाबाहेर, संघ नेहमीच चाहत्यांच्या सुरक्षिततेला आणि आदराला प्राधान्य देईल.आरसीबीने लिहिले की, 'आरसीबी केअर्सची सुरुवात अशी झाली. हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जो आमच्या चाहत्यांचा आदर, पाठिंबा आणि त्यांच्यासोबत उभे राहण्याच्या गरजेतून जन्माला आला आहे. हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आमचा समुदाय आणि चाहते अर्थपूर्ण कृती करण्यासाठी एकत्र येतात. आरसीबीने लिहिले की, 'आज आम्ही या प्लॅटफॉर्मवर परतलो आहोत, उत्सवाने नाही तर काळजीने. शेअर करण्यासाठी. तुमच्यासोबत उभे राहण्यासाठी. एकत्र पुढे जाण्यासाठी. कर्नाटकचा अभिमान राहण्यासाठी. आरसीबी काळजी घेते... आणि नेहमीच राहील. लवकरच अधिक माहिती देण्यात येईल.'

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 9:10 pm

Ganapati Visarjan : कोकणात विसर्जनाला गालबोट ! दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देताना 3 जण वाहून गेले

रत्नागिरी: गणेशोत्सवाच्या उत्साहात बुधवार, 27 ऑगस्ट 2025 रोजी राज्यभरात गणपती बाप्पाचे आगमन झाले. आज, गुरुवार 28 ऑगस्ट रोजी दीड दिवसाच्या गणपती विसर्जनादरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जगबुडी नदीत एक दुखद घटना घडली. विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या तीन गणेशभक्तांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले, परंतु एकजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने बेपत्ता आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत […] The post Ganapati Visarjan : कोकणात विसर्जनाला गालबोट ! दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देताना 3 जण वाहून गेले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 9:09 pm

Pune News : पोलीस मुख्यालयात महागणेशोत्सवाचा जल्लोष.! डॉग शो, मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके

पुणे – गणेशोत्सवाला यावर्षीपासून “राज्य महोत्सवा”चा दर्जा मिळाला असून तो “महागणेशोत्सव” म्हणून साजरा होत आहे. या अनोख्या उत्सवाचे वैभव गुरुवारी (दि. २८) पोलीस मुख्यालयात रंगलेल्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांतून खुलून आले. साऊंड–लाईट शोने सजलेल्या दालनात डॉग शोतील प्रशिक्षित श्वानांची चपळ खेळी, पोलीस बॅण्डचे सुरेल सूर आणि शिवकालीन मर्दानी खेळांच्या थरारक प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. या कार्यक्रमाचे […] The post Pune News : पोलीस मुख्यालयात महागणेशोत्सवाचा जल्लोष.! डॉग शो, मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 9:06 pm

Manoj Jarange Patil |गोळ्या झेलाव्या लागल्या तरी चालेल; पण आरक्षणाशिवाय माघार नाही

प्रभात वृत्तसेवा जुन्नर – राज्यात आजवर कोणत्याही पक्षाला मराठ्यांशिवाय बहुमताची सत्ता लाभलेली नाही. मराठा समाजाने दिलेल्या पाठबळामुळेच सरकारे उभी राहिली; मात्र याच समाजावर शासनाने अन्याय केला आहे. त्यामुळे मराठा समाजाने आता चालीवर चाल टाकायला शिकले पाहिजे, अशा शब्दांत मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी शिवनेरी गडाच्या पायथ्याशी आयोजित पत्रकार परिषदेत सरकारला थेट इशारा दिला. ते […] The post Manoj Jarange Patil | गोळ्या झेलाव्या लागल्या तरी चालेल; पण आरक्षणाशिवाय माघार नाही appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 9:03 pm

Pune: गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी पुणेकरांना धरले वेठीस; बॅरिकेड्समुळे पुणेकर हैराण, मंत्र्यांचाही ताफा अडवला

पुणे – गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अप्पा बळवंत चौकासह मध्यवर्ती भागातील सर्व प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेडस् लावून पोलिसांनी पुणेकरांना अक्षरशः वेठीस धरले. गणेशोत्सवापूर्वी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी पहिले पाच-सात दिवस रस्ते बंद होणार नाहीत, दुचाकी व रिक्षा चालकांना मार्ग खुले राहतील, अशी घोषणा केली होती. घोषणा एका अंमलबजावणी भलतीच असे चित्र निर्माण झाले आहे. यातच पोलिसांनी महापालिकेसोबत रस्त्यावरील […] The post Pune: गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी पुणेकरांना धरले वेठीस; बॅरिकेड्समुळे पुणेकर हैराण, मंत्र्यांचाही ताफा अडवला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 9:02 pm

OBC Reservation : मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणासाठी सर्व पक्ष एकवटले

भोपाळ : मध्य प्रदेशात कोणत्याही परिस्थितीत २७ टक्के ओबीसी आरक्षण दिले जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत या सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्रितपणे ठरावही मंजूर केला. बैठकीनंतर मुख्यमंत्री यादव म्हणाले की, काँग्रेस, भाजप, भारतीय […] The post OBC Reservation : मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणासाठी सर्व पक्ष एकवटले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 8:10 pm

'राज को राज रहने दो'असं का म्हणाले एकनाथ शिंदे ?

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी जऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात काही वेळ बातचीत झाली. राज ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदे पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. याप्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना 'राज को राज रहने दो' असे सूचक उत्तर देत एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंशी झालेल्या चर्चेची माहिती देणे टाळले. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मुंबई गणाध्यक्षाय धीमहि... श्री राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. pic.twitter.com/6dJW8Cjwdu— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 28, 2025राज ठाकरेंच्या घरी गणपती दर्शनाला यंदा पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आले होते. यानंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधू महापालिका निवडणुकांसाठी युती करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली. या पार्श्वभूमीवर आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. दोन्ही नेत्यांनी राज ठाकरेंशी बातचीत केली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.◻️LIVE मुंबई ️ 28-08-2025 पत्रकारांशी संवाद https://t.co/3NeWkvlnpU— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 28, 2025काही दिवसांपूर्वी बेस्ट पतपेढीची निवडणूक झाली. या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती असूनही त्यांचा दारुण पराभव झाला. अनेक वर्षे बेस्ट पतपेढीची सत्ता राखणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या समर्थकांचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. दोन्ही नेत्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली.

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 8:10 pm

दरवर्षी २३ सप्टेंबरला साजरा होणार आयुर्वेद दिवस

नवी दिल्ली : भारत सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेत आयुर्वेद दिवसाची तारीख कायमची ठरवली आहे. मार्च २०२५ मध्ये प्रकाशित राजपत्र अधिसूचनेनुसार, आता प्रत्येक वर्षी २३ सप्टेंबरला आयुर्वेद दिवस साजरा केला जाईल. यापूर्वी हा दिवस धन्वंतरि जयंती (धनतेरस) रोजी साजरा केला जात होता.केंद्रीय आयुष राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, आयुर्वेद फक्त एक चिकित्सा प्रणाली नाही, तर तो निसर्ग आणि व्यक्ती यांच्यातील सामंजस्यावर आधारित जीवनशास्त्र आहे. त्यांनी सांगितले, 2025 चा विषय ‘लोकांसाठी आणि पृथ्वीच्या कल्याणासाठी आयुर्वेद’ फक्त जागतिक कल्याणच नाही, तर एक निरोगी पृथ्वी निर्माण करण्यासाठी आयुर्वेदाच्या सामर्थ्याला प्रकट करतो.आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सांगितले की, 2016 मध्ये सुरूवात झाल्यानंतर आयुर्वेद दिवस हा आता एक जागतिक आंदोलन बनला आहे. त्यांनी सांगितले की, अलीकडील सर्वेक्षणांमधून हे समोर आले आहे की, ग्रामीण तसेच शहरी दोन्ही भागांमध्ये आयुर्वेद सर्वाधिक स्वीकारले जाणारे उपचार पद्धती ठरली आहे.नववा आयुर्वेद दिवस (2024) भारताच्या आरोग्य सेवा क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (AIIA), नवी दिल्लीच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. या प्रसंगी आयुर्वेदातील चार उत्कृष्टता केंद्रांची स्थापना करण्यात आली आणि जवळपास 12,850 कोटी रुपयांच्या खर्चाने अनेक आरोग्यविषयक उपक्रम सुरू करण्यात आले. याच वेळी देशाचा निसर्ग परीक्षण अभियान सुरू करण्यात आले.2025 चा आयुर्वेद दिवस फक्त एक औपचारिकता नसून, तो आधुनिक जीवनशैलीमुळे होणाऱ्या रोग, हवामानातील बदल आणि ताणतणाव व्यवस्थापन यासारख्या मुद्द्यांवर उपाय सुचवण्याच्या दिशेने एक महत्त्वाची पहल ठरेल. या वर्षीच्या समारंभात जनजागृती मोहीम, तरुणांसाठी विशेष कार्यक्रम, आरोग्य सल्ला आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यात्मक क्रियाकलाप आयोजित केले जातील.महत्त्वाचे म्हणजे, 2024 मध्ये आयुर्वेद दिवसाच्या निमित्ताने 150 पेक्षा जास्त देशांमध्ये विविध उपक्रम राबवले गेले, ज्यामुळे आयुर्वेदाच्या जागतिक स्वीकार्यता आणि प्रभावाची वाढ स्पष्ट झाली आहे.

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 8:10 pm

Nirmala Shubham Nawale : मुंबईकरांनो गावकऱ्यांची काळजी घ्या; आता तुमच्यावर जबाबदारी, मराठा आरक्षणाची सभा सरपंच मॅडमनी गाजवली

Nirmala Shubham Nawale : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने मुंबईला धडक दिली आहे. आझाद मैदानावर २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपोषणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. या मोर्चाला राजकीय नेत्यांकडून पाठिंबा मिळत असताना, पुण्यात झालेल्या एका सभेत माजी सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित […] The post Nirmala Shubham Nawale : मुंबईकरांनो गावकऱ्यांची काळजी घ्या; आता तुमच्यावर जबाबदारी, मराठा आरक्षणाची सभा सरपंच मॅडमनी गाजवली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 8:05 pm

Salman Agha : पाकिस्तानची अब्रू पुन्हा चव्हाट्यावर, कर्णधार सलमान आघाचा पडला चेहरा, नेमकं कारण काय? पाहा VIDEO

Pakistan captain Salman Agha Video Viral : पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यातील टी-२० तिरंगी मालिकेपूर्वी गुरुवारी दुबईत तिन्ही कर्णधारांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत पाकिस्तान क्रिकेट संघाची अब्रू पुन्हा चव्हाट्यावर आली. या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा, अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान आणि यूएईचा कर्णधार मुहम्मद वसीम उपस्थित होते. या […] The post Salman Agha : पाकिस्तानची अब्रू पुन्हा चव्हाट्यावर, कर्णधार सलमान आघाचा पडला चेहरा, नेमकं कारण काय? पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 7:59 pm

नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंब तुरुंगात का नाही? केजरीवालांचा काँग्रेसवर गंभीर आरोप अन् भाजपला प्रश्न

Arvind Kejriwal: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी (भाजपा) गुप्त समझोता केल्याचे संकेत देत त्यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधला. नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबावरील आरोप स्पष्ट असतानाही त्यांना तुरुंगात का टाकले नाही, असा थेट सवाल केजरीवालांनी उपस्थित केला. […] The post नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंब तुरुंगात का नाही? केजरीवालांचा काँग्रेसवर गंभीर आरोप अन् भाजपला प्रश्न appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 7:57 pm

Maratha reservation : “आरक्षणाबाबत अन्याय होणार नाही…”–देवेंद्र फडणवीस

Maratha reservation | Devendra Fadnavis | Manoj jarange – मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघाले आहे. शुक्रवारी ते आझाद मैदानावर आंदोलनाला बसणार आहेत. याच मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षणाबाबत कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन त्‍यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिले आहे. मराठा आणि ओबीसी या दोन्ही […] The post Maratha reservation : “आरक्षणाबाबत अन्याय होणार नाही…” – देवेंद्र फडणवीस appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 7:52 pm

Omar Abdullah : खराब हवामानाच्या इशाऱ्यानंतरही वैष्णोदेव यात्रा का थांबवली नाही? ओमर अब्दुल्ला यांचा सवाल

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये वैष्णोदेवी यात्रेदरम्यान मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले. मंगळवार आणि बुधवारी रियासी आणि दोडा जिल्ह्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीत किमान ४१ जणांचा मृत्यू झाला. यातील बहुतेक भाविक वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. जम्मू प्रदेशात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. जम्मू काश्‍मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी यात्रेकरूंच्या मृत्यूवरून […] The post Omar Abdullah : खराब हवामानाच्या इशाऱ्यानंतरही वैष्णोदेव यात्रा का थांबवली नाही? ओमर अब्दुल्ला यांचा सवाल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 7:49 pm

Lalbaugcha Raja : लालबागच्या राज्याच्या चरणी अमेरिकन डॉलर्सचा हार ! Video पाहाच…

American Dollar | Lalbaugcha Raja – मुंबईसह देशातील लाखो अन् कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राज्याच्या दर्शनाला गणेशोत्सवातील दहाही दिवस भक्त-भाविक मुंबईत दाखल होत असतात. लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी भाविक भल्या मोठ्या रांगेत उभे राहून बाप्पाचं रूप पाहण्यासाठी उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. काही सेकंदासाठी तरी ज्या ‘राजा’चं दर्शन व्हावं यासाठी भक्तगण तास न् तास रांगेत […] The post Lalbaugcha Raja : लालबागच्या राज्याच्या चरणी अमेरिकन डॉलर्सचा हार ! Video पाहाच… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 7:36 pm

अरुण गवळीला जामीन, १८ वर्षांनंतर जेलबाहेर येणार

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन आणि अखिल भारतीय सेना या पक्षाचा माजी आमदार अरुण गवळी याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला. याआधी अरुण गवळीने अनेकदा जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. पण त्याला जामीन मिळत नव्हता. अखेर अरुण गवळीला जामीन मंजूर झाला आहे. जामीन मिळाल्यामुळे अरुण गवळी १८ वर्षांनंतर जेलबाहेर येणार आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची घाटकोपरमध्ये १८ वर्षांपूर्वी हत्या झाली. जामसंडेकर यांची घाटकोपरमधील त्यांच्या राहत्या घरात गोळ्या झाडून हत्या झाली. निवांत टीव्ही बघत बसलेल्या कमलाकर जामसंडेकर यांच्यावर घरात घुसून गुंडांनी गोळीबार केला होता. जवळून गोळ्या लागल्यामुळे कमलाकर जामसंडेकर यांचा मृत्यू झाला होता. ही घटना २ मार्च २००७ रोजी संध्याकाळी घडली होती. जामसंडेकरच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याप्रकरणी आमदार अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. एका आमदाराला जन्मठेपेची शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ होती. या प्रकरणी १८ वर्षांपासून अरुण गवळी जेलमध्ये होता. अरुण गवळीला दुसऱ्या एका प्रकरणातही शिक्षा झाली होती, पण त्या प्रकरणात काही काळापूर्वी त्याला जामीन मंजूर झाला होता. मात्र जामसंडेकर हत्येप्रकरणी जामीन मिळत नसल्यामुळे अरुण गवळी जेलमध्येच होता. आता जामसंडेकर प्रकरणातही जामीन मंजूर झाल्यामुळे अरुण गवळी १८ वर्षांनंतर जेलबाहेर येणार आहे.कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येच्या काही दिवस आधीच मुंबई महापालिकेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत कमलाकर जामसंडेकरांनी अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेचा उमेदवार अजित राणेचा ३६७ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर जामसंडेकर नगरसेवक झाले. पुढे २ मार्च २००७ रोजी जामसांडेकर यांची हत्या झाली. या प्रकरणात अरुण गवळीसह एकूण ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली तर ३ सहआरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले होते.

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 7:30 pm

सचिन तेंडुलकर सहकुटुंब लालबागच्या राजा चरणी लीन

राज ठाकरेंच्या निवासस्थानीही घेतले दर्शनमुंबई : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबईत गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. यादरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नुकताच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत पोहोचला होता.आपल्या कुटुंबासह आलेल्या सचिनने पूर्ण भक्तीभावाने गणपतीचे दर्शन घेतले. यादरम्यान त्याची पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन देखील त्याच्यासोबत उपस्थित होते. महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि लालबाग चा राजा हा मुंबईतील सर्वात जुन्या गणेश मंडळांपैकी एक आहे. जिथे दरवर्षी लाखो गणेशभक्त दर्शनासाठी येतात.Sachin Tendulkar and his family taking blessings at Mumbai's Lalbaugcha Raja Mandal ️(ANI)pic.twitter.com/g0lkc60Xt7— DIVYANSH CHAUHAN (@Imchauhan28) August 28, 2025लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकरही यावेळी उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 7:30 pm

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला का होतोय उशीर? 3 मोठी आव्हाने, आता पगारवाढ कधी?

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) प्रतीक्षेत असलेल्या लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना अजूनही अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. त्यांना आशा होती की, सरकार लवकरच आयोगाच्या स्थापनेसह शिफारशींची घोषणा करेल. मात्र, अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसून, या प्रक्रियेत उशीर होताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आयोगाच्या घोषणेला तीन प्रमुख कारणे जबाबदार […] The post 8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला का होतोय उशीर? 3 मोठी आव्हाने, आता पगारवाढ कधी? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 7:11 pm

Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गाच्या भू संपादनाचा आदेश जारी; सरकारकडून ‘एवढा’निधी मंजूर

मुंबई : महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला राज्य सरकारने मान्यता दिली असली तरी, कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध पाहता या जिल्ह्याला सध्या या प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. सांगली, कोल्हापूर आणि इतर काही भागांतील शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता सरकारने पहिल्या टप्प्यात वर्धा ते सांगली या भागासाठी भूसंपादनाचा आदेश जारी केला आहे. कोल्हापूरमधील शिरोळ, […] The post Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गाच्या भू संपादनाचा आदेश जारी; सरकारकडून ‘एवढा’ निधी मंजूर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 7:11 pm

Maratha reservation : ‘मुंबई ही…’मराठा आरक्षणावरून संजय राऊतांच सर्वात मोठं विधान, काय म्हणाले? पाहा….

Manoj jarange | Maratha reservation | Sanjay Raut – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीआधी दिलेल्या शब्दाला जागून मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगेंच्या आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात. तसेच, मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाला मुंबईत येण्यापासून थांबवू नये, असे म्‍हणत ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. शिवसेना […] The post Maratha reservation : ‘मुंबई ही…’ मराठा आरक्षणावरून संजय राऊतांच सर्वात मोठं विधान, काय म्हणाले? पाहा…. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 7:10 pm

म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज करायला मुदतवाढ

मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५ हजार २८५ सदनिका व ओरोस (जि. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीकरिता आयोजित सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. अनामत रकमेसह प्राप्त पात्र अर्जांची सोडत ९ ऑक्टोबर २०२५ रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली. सदर सोडतीसाठी २८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत १ लाख ४९ हजार ९४८ अर्ज प्राप्त झाले आहेत. अनामत रकमेसह १ लाख १६ हजार ५८३ अर्ज प्राप्त झाले आहेत. सोडतीसाठी १२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत आहे. १३ सप्टेंबर २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतात. १५ सप्टेंबर २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आरटीजीएस/एनईएफटीद्वारे अर्जदारांना बँकेत अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी २२ सप्टेंबर, २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता 'म्हाडा'च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. २४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ५६५ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३ हजार २ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १ हजार ६७७ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणाऱ्या सदनिका) ४१ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सोडतीसंदर्भात अर्ज भरताना अर्जदारांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी मंडळातर्फे ०२२ - ६९४६८१०० हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. सोडतीसाठी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्जदारांनी अर्ज करावा, असे आवाहन कोकण मंडळातर्फे करण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 7:10 pm

गणेशमूर्तींचा बोटीने प्रवास, भिवंडीकरांचा कोंडीवर उपाय

भिवंडी (प्रतिनिधी) : वाहतूक कोंडीचे विघ्न बाप्पांच्या मार्गातही येत आहे. वाहतूक कोंडीचा त्रास ठाणे जिल्ह्यातील सर्वसामान्यांसह गणेशमूर्ती आगमण मिरवणूकीवरही दिसून येत आहे. भिवंडी तालुक्याच्या सीमेवर राहणाऱ्या गावकऱ्यांनी त्यांच्या गणेशमूर्ती बोटीतून घरी आणल्या आहेत. वाहतुक कोंडी आणि खराब रस्ते या दोन प्रमुख कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. ठाणे, भिवंडी, कल्याण शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिक बेजार झाले आहे. या भागातून अवजड वाहनांच्या वाहतूकीमुळे कोंडीत भर पडते. भिवंडी तालुक्यातून ठाणे, कल्याणला कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना वेळेत कामावर पोहचणे कठीण झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसत आहे. भिवंडीतील अनेक गणेशमूर्ती मिरवणूका वाहतुक कोंडीत अडकल्या होत्या. त्यामुळे तालुक्यातील सीमेवरील नांदकर, ईताडे आणि सांगे या गावातील सुमारे ७० ते ७५ घरगुती गणपतींचा प्रवास बोटीतून झाला. दरवर्षी कल्याण, गंधारी, बापगाव ते नांदकर या मार्गे गावात मिरवणूका काढत गणेशमूर्ती आणल्या जातात. भिवंडी तालुक्यातील नागरिकांवर यावर्षी चक्क काळू नदीतून बोटीद्वारे गणेशमूर्ती आणण्याची वेळ आली. ''भिवंडी तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्डे आणि कोंडी टाळण्यासाठी आम्ही गणेशमूर्ती प्रवासी बोटीने आणण्याचे ठरविले होते. त्यानुसार गावातील गणेशमूर्ती बोटीने आणल्या'' अशी माहिती मनोज पाटील, माजी उपसरपंच, नांदकर यांनी दिली.

फीड फीडबर्नर 28 Aug 2025 7:10 pm

महाबळेश्वर येथील वेण्णा लेक परिसरात आढळला ७ फूट लांबीचा अजगर

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील वेण्णा लेक परिसरालगत असणाऱ्या काळे वस्ती येथील झुडपांमध्ये अंदाजे ७ ते ८ फूट लांबीचा अजगर आढळला आहे. वनविभाग महाबळेश्वर व सह्याद्री प्रोटेक्टर्स मार्फत रेस्क्यू करण्यात आले असून त्याला मानवी वस्ती पासून दूर नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले आहे. येथील काळे वस्ती नजीकच्या झुडपांमध्ये अजगर असल्याचे वनविभागाचे वनमजूर संतोष काळे यांच्या निदर्शनास […] The post महाबळेश्वर येथील वेण्णा लेक परिसरात आढळला ७ फूट लांबीचा अजगर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 6:56 pm

Manoj jarange : “मनोज जरांगेंनी फडणवीसांसोबत एक बैठक घ्यावी..”; ‘या’केंद्रीय नेत्यानं आंदोलनाला दिला पाठिंबा

Manoj jarange | maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी इथून मुंबईकडे निघालेले मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज रात्री उशिरा मुंबईत पोहोचणार असून उद्या सकाळी ते आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणास सुरुवात करणार आहेत. आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगे हे सरकारविरोधात आक्रमक झाले असून लाखो समर्थकांसह ते मुंबईत येत असल्याने सरकारची कोंडी होणार […] The post Manoj jarange : “मनोज जरांगेंनी फडणवीसांसोबत एक बैठक घ्यावी..”; ‘या’ केंद्रीय नेत्यानं आंदोलनाला दिला पाठिंबा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 6:45 pm

Jammu Kashmir: सुरक्षा दलांना मोठे यश, गुरेझ सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; नियंत्रण रेषेवर दोन दहशतवादी ठार

Jammu Kashmir: उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) भारतीय लष्कराने गुरुवारी पहाटे घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. जम्मू-काश्मीर पोलिसांना नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरीची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपने संयुक्त कारवाई केली. या कारवाईदरम्यान, दहशतवाद्यांची हालचाल दिसल्याने सैनिकांनी त्यांना थांबण्यास सांगितले. मात्र, […] The post Jammu Kashmir: सुरक्षा दलांना मोठे यश, गुरेझ सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; नियंत्रण रेषेवर दोन दहशतवादी ठार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 6:42 pm

Manoj Jarange : मनोज जरांगेंना महायुतीतील ‘या’आमदार-खासदारांचा जाहीर पाठिंबा, कोणी-कोणी दिलं समर्थन? वाचा यादी…

मुंबई : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला राजकीय नेत्यांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. मुंबईच्या आझाद मैदानात २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बेमुदत उपोषणाला विविध पक्षांतील आमदार आणि खासदारांनी समर्थन जाहीर केले आहे. यामध्ये सत्ताधारी महायुतीतील (राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट) चार आमदारांचा समावेश असून, ते […] The post Manoj Jarange : मनोज जरांगेंना महायुतीतील ‘या’ आमदार-खासदारांचा जाहीर पाठिंबा, कोणी-कोणी दिलं समर्थन? वाचा यादी… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 6:34 pm

MHADA News : म्हाडा कोकण मंडळाचा मोठा निर्णय ! ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिली ‘एवढी’मुदतवाढ

मुंबई: म्हाडा कोकण मंडळाने (MHADA News) ठाणे, वसई आणि सिंधुदुर्ग येथील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या 5,285 सदनिका आणि 77 भूखंडांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. परवडणाऱ्या दरात उपलब्ध असलेल्या या घरांसाठी अर्ज करण्याची (MHADA News) अंतिम मुदत आता 12 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. याशिवाय, अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन पद्धतीने 13 सप्टेंबर 2025 […] The post MHADA News : म्हाडा कोकण मंडळाचा मोठा निर्णय ! ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिली ‘एवढी’ मुदतवाढ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 6:34 pm

ट्रम्प टॅरिफमुळे काच उद्योगाला मोठा फटका, कोट्यवधींच्या ऑर्डर्स रद्द

वॉशिंग्टन: अमेरिकेने भारतावर 50% टॅरिफ लादल्यानंतर भारतीय काच उद्योगाला मोठा झटका बसला आहे. या टॅरिफमुळे कोट्यवधी रुपयांच्या ऑर्डर्स रद्द झाल्या असून, निर्यातदारांचे सुमारे 500 कोटी रुपये अडकले आहेत. यामुळे काच उद्योगातील व्यापारी नवीन बाजारपेठांच्या शोधात लागले आहेत. फिरोजाबादमधील काच उद्योग संकटात – उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद हे काच उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. येथील सुमारे 200 निर्यातदार […] The post ट्रम्प टॅरिफमुळे काच उद्योगाला मोठा फटका, कोट्यवधींच्या ऑर्डर्स रद्द appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 6:30 pm

Sanju Samson : संजू सॅमसनचा कहर! पाच दिवसात साकारली तिसरी वादळी खेळी, सूर्या-गंभीरची वाढली डोकेदुखी

Sanju Samson’s Explosive Form in KCL : केरळ क्रिकेट लीगमध्ये (KCL) कोची ब्लू टायगर्सकडून खेळणारा संजू सॅमसन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जवळपास प्रत्येक सामन्यात त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. आगामी आशिया चषकासाठी भारतीय संघात त्याची निवड झाली असली, तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. पण सध्याच्या त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे […] The post Sanju Samson : संजू सॅमसनचा कहर! पाच दिवसात साकारली तिसरी वादळी खेळी, सूर्या-गंभीरची वाढली डोकेदुखी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 6:16 pm

Lalbaugcha Raja : डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत ‘या’अभिनेत्री घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन; VIDEO व्हायरल !

Jacqueline Fernandez | Parth Pawar | Lalbaugcha Raja – मुंबईसह देशातील लाखो अन् कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राज्याच्या दर्शनाला गणेशोत्सवातील दहाही दिवस भक्त-भाविक मुंबईत दाखल होत असतात. लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी भाविक भल्या मोठ्या रांगेत उभे राहून बाप्पाचं रूप पाहण्यासाठी उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. काही सेकंदासाठी तरी ज्या ‘राजा’चं दर्शन व्हावं यासाठी भक्तगण तास […] The post Lalbaugcha Raja : डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत ‘या’ अभिनेत्री घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन; VIDEO व्हायरल ! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 6:09 pm

Aadhaar Card: विवाहानंतर आधार कार्डमध्ये नाव आणि पत्ता कसा बदलावा? ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या…

Aadhaar Name and Address Update: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. सरकारी कामकाज, बँक खाते उघडणे, योजनांचा लाभ घेणे यासारख्या अनेक प्रक्रियांमध्ये आधार कार्ड आवश्यक ठरते. लग्नानंतर अनेकांना आधार कार्डात नाव आणि पत्ता बदलण्याची गरज भासते. ही प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा […] The post Aadhaar Card: विवाहानंतर आधार कार्डमध्ये नाव आणि पत्ता कसा बदलावा? ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 6:02 pm

Laxman Hake : वातावरण तापणार ! मनोज जरांगेंना इशारा देत लक्ष्मण हाकेंनी केली ‘ही’मोठी घोषणा

मुंबई : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी न फिरण्याचा निर्धार करत जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून, मराठा समाज एकजुटीने त्यांच्या सोबत उभा राहिल्याचे दिसत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आझाद मैदानात […] The post Laxman Hake : वातावरण तापणार ! मनोज जरांगेंना इशारा देत लक्ष्मण हाकेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 6:02 pm

Arun Gawli : १७ वर्षांच्या कारावासानंतर अरुण गवळीला जामीन मंजूर; वाचा गुन्हेगारीचा इतिहास !

मुंबई : मुंबईच्या गुन्हेगारी जगतातील कुख्यात व्यक्तिमत्त्व आणि माजी राजकारणी अरुण गवळी यांना सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्याकांड प्रकरणात ही जामीन मंजूर करण्यात आला असून, गवळी यांच्यावरील जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्धचे अपील अद्याप प्रलंबित आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन. कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने गवळी यांच्या ७६ वर्षांच्या […] The post Arun Gawli : १७ वर्षांच्या कारावासानंतर अरुण गवळीला जामीन मंजूर; वाचा गुन्हेगारीचा इतिहास ! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 5:42 pm

Bihar Election 2025: बिहारमध्ये NDAचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या सर्वकाही

Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये जागा वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला आहे. सूत्रांनुसार, जनता दल युनायटेड (जेडीयू) ला 243 पैकी सुमारे 100 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर उर्वरित 143 जागांचे वाटप भारतीय जनता पक्ष (भाजप) आपल्या कोट्यातून करणार आहे. यामध्ये भाजप स्वतःसाठी 100 पेक्षा जास्त जागा ठेवून लोक जनशक्ती […] The post Bihar Election 2025: बिहारमध्ये NDAचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या सर्वकाही appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 5:36 pm

Ganeshotsav 2025 : चव बदलली, भक्ती नाही! यंदा गणरायाला अर्पण करा दुधापासून बनवलेले खास पेय

Ganeshotsav 2025 : काल पासून म्हणजेच, दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. गणपती सर्वांच्या घरात विराजमान झाला आहे आणि गणेशोत्सवालाही सुरुवात झाली आहे. गणेशोत्सव हा केवळ भक्तीचाच नाही तर आनंदाचा, अन्नाचा आणि परंपरांचाही उत्सव आहे. या उत्सवात अनेक प्रथा पाळल्या जातात, परंतु गणपतीसाठी विशेष भोग तयार करणे हे […] The post Ganeshotsav 2025 : चव बदलली, भक्ती नाही! यंदा गणरायाला अर्पण करा दुधापासून बनवलेले खास पेय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 5:26 pm

Mohammad Haris : ‘त्याला काठीनं हाणलं पाहिजे…’, बाबरबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या हारिसबाबत बासित अलीची संतप्त प्रतिक्रिया

Mohammad Haris Controversy : आशिया कप 2025 च्या तयारीदरम्यान पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवीन वाद निर्माण झाला आहे. युवा यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद हारिसने आपला वरिष्ठ सहकारी आणि स्टार फलंदाज बाबर आझमवर टीका करताना एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून माजी खेळाडूंनी हारिसला चांगलेच सुनावले आहे. विशेषतः माजी खेळाडू बासित अली यांनी […] The post Mohammad Haris : ‘त्याला काठीनं हाणलं पाहिजे…’, बाबरबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या हारिसबाबत बासित अलीची संतप्त प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 5:25 pm

Mamata Banerjee : कोणालाही मतदानाचा अधिकार हिरावून घेऊ देणार नाही; ममता बॅनर्जी यांनी केली गर्जना

कोलकता : भाजपने मतदार यादीचे सर्वेक्षण करण्यासाठी देशभरातून 500 हून अधिक पथके पश्चिम बंगालमध्ये पाठवली आहेत. आता तुम्हाला स्वतः तपासावे लागेल की तुमचे नाव मतदार यादीत आहे की वगळण्यात आले आहे. पण मी जिवंत असेपर्यंत कोणालाही जनतेचा मतदानाचा अधिकार हिरावून घेऊ देणार नाही, अशी गर्जना तृणमूल काॅंग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी […] The post Mamata Banerjee : कोणालाही मतदानाचा अधिकार हिरावून घेऊ देणार नाही; ममता बॅनर्जी यांनी केली गर्जना appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 5:21 pm

नेवासा नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेवर 33 हरकती

नेवासा : नेवासा नगरपंचायतीच्या १८ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या ३३ हरकतींवर गुरुवारी (दि. २८) सकाळी ११:३० वाजता नेवासा तहसील कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. प्रांताधिकारी सुधीर पाटील आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी ३३ पैकी ३० तक्रारदार उपस्थित होते. सुनावणी दरम्यान प्रांताधिकारी पाटील यांनी प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे […] The post नेवासा नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेवर 33 हरकती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 5:09 pm

Kokan Politics : रत्नागिरीत ‘हिंदुत्वा’च्या नावावर बॅनर वॉर; कोकणच्या राजकारणावर वर्चस्व कुणाचं?

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या भक्तीमय वातावरणात कोकणच्या राजकारणाने अचानक उग्र रूप धारण केले आहे. महायुतीतील दोन प्रमुख नेते उद्योगमंत्री उदय सामंत आणि मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे हे दोघे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून समोरासमोर आले आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात लागलेल्या एका बॅनरने हा वाद चव्हाट्यावर आला असून, गौरी-गणपतीच्या काळात राजकीय द्वंद्वाची ठिणगी पडली आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली उफाळलेला बॅनर वॉर रत्नागिरीत […] The post Kokan Politics : रत्नागिरीत ‘हिंदुत्वा’च्या नावावर बॅनर वॉर; कोकणच्या राजकारणावर वर्चस्व कुणाचं? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 4:59 pm

हिंगोली: पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाखांची आर्थिक मदत

सेनगाव: हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील घोरदरी येथील ३४ वर्षीय शेतकरी धोंडीराम भगवान घोगरे यांचा १६ ऑगस्ट रोजी नदीच्या पुरात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर झाली असून, २६ ऑगस्ट रोजी सेनगाव तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अनिल सरोदे यांच्या हस्ते मयताच्या पत्नी सयाबाई धोंडीराम घोगरे यांना […] The post हिंगोली: पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाखांची आर्थिक मदत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 4:58 pm

Devendra Fadnavis : मनोज जरांगे जर ओबीसीमधूनच आरक्षण मागत असतील तर… ; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा बांधवांनी किल्ले शिवनेरीवरून मुंबईच्या दिशेने कूच केले आहे. “आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचे नाही,” असा निर्धार करत जरांगे आणि त्यांचे समर्थक गुरुवारी दुसऱ्या दिवसाचा प्रवास करत आहेत. मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबई पोलिसांच्या निर्देशानुसार, शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी जरांगे यांच्यासह सुमारे ५,००० मराठा आंदोलक आझाद मैदानात […] The post Devendra Fadnavis : मनोज जरांगे जर ओबीसीमधूनच आरक्षण मागत असतील तर… ; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 4:56 pm

हिंगोली: भंडारी गावाजवळील पूल खचल्याने शालेय विद्यार्थिनींची बस सेवा ठप्प; शैक्षणिक नुकसान

सेनगाव – हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील भंडारी ते खडकी रस्त्यावरील भंडारी गावाजवळील ओढ्याचा पूल मागील आठवड्यापासून सततच्या पावसामुळे खचला आहे. यामुळे मानव विकास योजनेअंतर्गत चालणारी शालेय विद्यार्थिनींसाठीची बस सेवा बंद झाली आहे. परिणामी, घोत्रा, बोरखडी, पिनगाळे, होलगिरा, हिवरखेडा या गावांतील सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांना गेल्या दहा दिवसांपासून शाळेत जाणे शक्य होत नाही. यामुळे त्यांचे […] The post हिंगोली: भंडारी गावाजवळील पूल खचल्याने शालेय विद्यार्थिनींची बस सेवा ठप्प; शैक्षणिक नुकसान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 28 Aug 2025 4:48 pm