SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

24    C
... ...View News by News Source

आकाश निळे का दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटीलसीता व नीता या दोघी बहिणी. त्यांना जसा अभ्यासात रस होता तशीच त्यांना वाचनाचीही भारी आवड होती. त्यामुळे सतत काही ना काही नवीन वाचनाचे पुस्तक त्या शाळेच्या ग्रंथालयातून आणून वाचायच्यात. विशेष म्हणजे त्यांचे आई-बाबा दोघेही या दोघींना अवांतर बोधप्रद, प्रेरणादायी व संस्कारक्षम पुस्तकांच्या वाचनासाठी नेहमी प्रोत्साहन द्यायचे. त्या दररोज नियमितपणे शाळेत जायच्या व शाळेतून संध्याकाळी घरी आल्याबरोबर प्रथम आपला गृहपाठ उरकून घ्यायच्या. नंतर आपले अवांतर वाचन करायच्या. ते झाल्यावर आपल्या प्राध्यापिका मावशीला विविध प्रश्न विचारून तिच्याकडून आपली जिज्ञासापूर्ती करून घ्यायच्या.“मावशी! तू आम्हाला आज आकाशाच्या रंगाबद्दल माहिती सांगणार आहेस ना?” उत्सुकतेने सीताने विचारले.“सांग ना मावशी, लवकर! हे आकाश का दिसते निळसर?” नीता उतावीळपणे पटकन म्हणाली.“व्वा! तू तर जणू काही कवितेची ओळच जोडली गं नीता.” मावशी म्हणाली.“अगं मावशी, नीता आत्तापासून छान छान कविता करते.” सीता बोलली.“आणि तू काय करतेस?” मावशीने सीताला विचारले.“मी हिच्या कविता वाचते.” सीताने पटकन उत्तर दिले.“चांगल्या हजरजबाबी मुली आहेत गं माझ्या.” मावशी आनंदाने बोलली.“नुसती वाचतच नाही मावशी ही. तर कवितांना छान चाल लावून गोड आवाजात गातेसुद्धा.” नीताने सांगितले.“खूपच छान. म्हणजे माझ्या लाडक्या मुलींजवळ, एकीजवळ लेखनाचा तर दुसरीजवळ गायनाचही गुण आहे तर!” मावशीने मुलींचे कौतुक केले. “जाऊ दे गं मावशी, तू आता आम्हाला पटकन माहिती सांग बरं.” आता सीता झटकन म्हणाली.“सांगते! सांगते!” मावशी सांगू लागली, “तुम्ही आता शांत राहा. सगळ्या वैज्ञानिक संज्ञांच्या सुलभ स्पष्टीकरणासह मी तुम्हाला सोप्या भाषेत सारे काही समजावून सांगते. मी सांगितलेले तुम्ही नीट ऐका म्हणजे हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. तसेही हे पुस्तक इतक्या सोप्या व रंजक भाषेत लिहिलेले आहे की तुम्हालाच काय कोणालाही हे पुस्तक वाचताना मुळीच कठीण वाटणार नाही, कंटाळा येणार नाही. पुस्तक वाचता वाचताच सगळ्या गोष्टी नीट समजतात. सर्व संकल्पना छानपणे कळतात. पण मी आता स्वत: येथे आलेलीच आहे, तर तुम्हाला आणखी जास्त स्पष्ट करून सांगते. तुमची बुद्धिमत्ता चांगलीच आहे याबद्दल काहीच शंका नाही. तरी तुम्ही ऐकलेले सारे लक्षात ठेवा नि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा तसेच समजाऊन सांगा. पटलं ना?”“हो! हो! मावशी! आम्हाला एकदम मान्य आहे.” दोघीही एकसुरात म्हणाल्या.“बरे आपण विकिरणाच्या माहितीपासून सुरुवात करू,” असे म्हणत मावशी सांगू लागली.…“विकिरण म्हणजे वातावरणातील धुळीच्या कणांवरून सूर्यप्रकाशाचे चोहीकडे पसरणे. विकिरण झालेल्या प्रकाशामध्ये निळ्या व जांभळ्या रंगांच्या प्रकाशाची तीव्रता जास्त असते. जांभळ्या प्रकाशाची तरंगलांबी ही तांबड्या प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा जवळजवळ निम्मी असल्यामुळे, विकिरण झालेल्या प्रकाशामध्ये जांभळ्या प्रकाशाचे प्रतिशत प्रमाण हे तांबड्या प्रकाशापेक्षा जवळजवळ सोळा पटींने जास्त असते. म्हणून विकिरण झालेला प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर त्याचे पुन्हा पुन्हा विकिरण झाल्यामुळे जांभळ्या रंगाची तीव्रता कमी कमी होत जाऊन तो वातावरणात नष्ट होतो व शेवटी सर्वात कमी तरंगलांबीचा निळा रंगच शिल्लक राहतो. तसेच प्रकाशात निळ्या रंगाचे प्रमाण जास्त असल्याने तो जास्त पसरतो. त्यामुळे आपणाला आकाश हे निळ्या रंगाचे दिसते.” मावशीने खुलासेवार सांगितले.हे सांगत असताना मावशीला तहान लागली व ती पाणी पिण्यासाठी उठून गेली व तिकडेच आईसोबत गप्पा मारत बसली.

फीड फीडबर्नर 16 Nov 2025 3:30 am

मंचरच्या पहिल्या निवडणुकीत मोठा पेच! तिकीट कुणाला? हाडाच्या कार्यकर्त्यांना का लाडाच्या कार्यकर्त्यांना

प्रभात वृत्तसेवा रांजणी ( रमेश जाधव ) – आंबेगाव तालुक्याची राजकीय राजधानी असलेल्या मंचर नगरपंचायतीची प्रथमच निवडणूक होत आहे .त्या पार्श्वभूमीवर येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. खरे तर मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. जि. प. गट आणि पंचायत समिती गणांसाठी गळ लाऊन बसलेल्यांची संख्या […] The post मंचरच्या पहिल्या निवडणुकीत मोठा पेच! तिकीट कुणाला? हाडाच्या कार्यकर्त्यांना का लाडाच्या कार्यकर्त्यांना appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Nov 2025 3:30 am

शिरूरचा ‘किंगमेकर’कोण? १५ वर्षांची सत्ता असलेले धारीवाल यांची माघार, आता पवार-कटके यांच्यात प्रतिष्ठेची लढाई

प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर नगरपरिषद निवडणुकीत तालुक्याचे राजकारण तापले असून माजी आमदार अशोक पवार व विद्यमान आमदार माऊली कटके यांच्या प्रतिष्ठेची थेट लढत निर्माण झाली आहे. दरम्यान, 2007 पासून शिरूर नगरपरिषदेत निर्विवाद सत्ता राखणारे प्रसिद्ध उद्योजक प्रकाश शेठ धारिवाल यांनी अचानक घेतलेल्या माघारीच्या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. धारिवाल यांच्यानंतर आता खऱ्या […] The post शिरूरचा ‘किंगमेकर’ कोण? १५ वर्षांची सत्ता असलेले धारीवाल यांची माघार, आता पवार-कटके यांच्यात प्रतिष्ठेची लढाई appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Nov 2025 3:15 am

व्यवस्थितपणा

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकरव्यवस्थितपणा म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात शिस्त, नियोजन आणि स्वच्छता ठेवणे. जो व्यक्ती आपले काम वेळेवर आणि नीटनेटकेपणे करतो, तोच खरा व्यवस्थित माणूस म्हणवतो. व्यवस्थितपणा ही फक्त एक सवय नसून, ती यशाचे मूळ आहे.व्यवस्थितपणा आपल्या आयुष्याला दिशा देतो. जर आपण आपला वेळ, वस्तू आणि कामे यांचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन केले, तर कोणतेही उद्दिष्ट साध्य करणे सोपे होते.उदाहरणार्थ, जो विद्यार्थी रोज आपले पुस्तक, वही, शाळेची बॅग आणि वेळापत्रक नीट ठेवतो, त्याचा अभ्यास करताना गोंधळ होत नाही.घरातही जर प्रत्येक वस्तू ठरलेल्या ठिकाणी ठेवली, तर शोधाशोधीचा त्रास होत नाही. शाळेत, कार्यालयात किंवा समाजात - प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित माणसाची वेगळी ओळख निर्माण होते.व्यवस्थितपणा म्हणजे केवळ वस्तू नीट ठेवणे नव्हे, तर विचार, बोलणे आणि वर्तन यातही सुसंगती ठेवणे आवश्यक असते.शाळेतील विद्यार्थी : रोज वेळेवर उठणे, गणवेश नीट ठेवणे, अभ्यासाचे नियोजन करणे - हा त्याचा व्यवस्थितपणा.खेळाडू : रोज ठरलेल्या वेळेला सराव करणे, आहार आणि व्यायामात शिस्त ठेवणे - त्यामुळेच तो यशस्वी होतो.गृहिणी : घरातील प्रत्येक काम ठरलेल्या क्रमाने केल्याने घरात शांतता आणि सौंदर्य टिकते.व्यवस्थितपणा हे जीवनातील सौंदर्य आहे. जी व्यक्ती आपल्या आयुष्यात शिस्त आणि नियोजन ठेवते, ती कधीच गोंधळलेली राहत नाही. यशस्वी होण्यासाठी प्रतिभा जितकी आवश्यक आहे, तितकाच व्यवस्थितपणा देखील आवश्यक आहे. प्रत्येकाने आपले काम व्यवस्थित केले पाहिजे. “व्यवस्थित जीवन म्हणजे यशस्वी जीवन” स्वच्छतेची पुढची पायरी म्हणजे टापटीप, नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा. व्यवस्थितपणा हा एक चांगला संस्कार आहे. वस्तू इतस्तत: ठेवणं, पसारा करणं, कोंबाकोंबी करणं म्हणजे गबाळग्रंथी कारभार. बऱ्याच जणांना सवय असते की, दिसेल ते कपाटात, ड्रॉवरमध्ये कोम्बवून ठेवायची. मग ऐनवेळी होते काय फजिती – कपाट उघडलं की वस्तू सैरावैरा पसरतात, दुडुदुडू खाली येतात.मग घाईगर्दीच्या वेळी वेळ जातो, बावळटपणा, वेंधळेपणा पदरी येतो, बावरल्यागत व्हायला लागते. गोंधळ वाढायला लागतो. पेन आहे तर शाई नाही, पेन्सिल आहे तर टोक नाही. पुस्तकं खरेदी केली, त्यांना छान कव्हरही घातलं, पण ती व्यवस्थित न वापरता ठेवली, भिरकावली तर पानं सुट्टी होतात, महत्त्वाचे धडे-कविता यांची पानं फाटल्याने किंवा गहाळ झाल्याने ऐन परीक्षेच्या वेळी नुकसान होते. चार-सहा दिवसांसाठी नव्या पुस्तकाचा खर्च पालकांच्या माथी बसतो.तुम्ही मुलं वह्यांची पानं फाडता, पेन चालवून बघण्यासाठी रेघोट्या मारतात. तुमची पुस्तकं दुमडून ठेवता, त्यांची पानं निसटलेली किंवा फाटलेली असतात. दप्तरात सारं काही कोंबलेलं असतं. कपडे नीट धुतलेले, इस्त्री केलेले नाहीत, केसांचा व्यवस्थित भांग पाडलेला नाही, चप्पल तुटलेली किंवा बूट पॉलिश नसलेले, दप्तराचा एखादा बेल्ट तुटलेला अशी अव्यवस्थित मुलं शाळेत येतात. अव्यवस्थित, गबाळी, वेंधळी मुलं रोज काही ना काही वस्तू शाळेत विसरतात.व्यवस्थितपणाचे फायदे या मुलांनी लक्षात घेतले आणि व्यवस्थितपणा अंगी यावा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर वेळ, पैसा, श्रम यांची बचत तर होईलच, शिवाय आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक, प्रभावी होण्यासही मदत होईल. सर्व मुलांचे लाडके नेहरूचाचा यांचं रुबाबदार, आदर्श व्यक्तिमत्त्वाचं रहस्य म्हणजे नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा.पुस्तकं व्यवस्थित, काळजीपूर्वक वापरली नाहीत, तर त्यांना राग यायचा. पुस्तकांचा अपमान म्हणजे आपल्या संस्कारांचा अपमान असं ते मानायचे. व्यवस्थितपणा म्हणजे वेळेचं योग्य नियोजन करणं, प्रत्येक काम योग्य रीतीने करणं, फाईल तयार करणं, योजना नीट आखून काटेकोर अंमलबजावणी करणं. प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी आणि यशस्वी जीवनासाठी व्यवस्थितपणा अंगी बाणवायलाच हवा.

फीड फीडबर्नर 16 Nov 2025 3:10 am

Dilip Walse Patil : बिरसा मुंडा यांचा संघर्ष हा स्वातंत्र्यलढ्याचा एक तेजस्वी अध्याय –माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

प्रभात वृत्तसेवा मंचर – आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, त्यांच्या जमीन आणि स्वाभिमान रक्षणासाठी बिरसा मुंडा यांनी उभारलेला संघर्ष हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा एक महत्त्वाचा आणि तेजस्वी अध्याय मानला जातो.असे प्रतिपादन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवार, दि.१५ रोजी व्यक्त केले.भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक, आदिवासी समाजाचे प्रेरणास्रोत आणि अन्यायाविरुद्ध लढणारे शूर योद्धा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त […] The post Dilip Walse Patil : बिरसा मुंडा यांचा संघर्ष हा स्वातंत्र्यलढ्याचा एक तेजस्वी अध्याय – माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Nov 2025 3:00 am

वनविभागाची कारवाई सुरू, पण दहशत कायम! पिंपरखेड, जांबूत परिसरात बिबट्यांचा मुक्त वावर, नागरिक भयभीत

प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि जांबूत परिसरातील गावांमध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने मागील वीस दिवसांत तब्बल नऊ बिबट्यांना जेरबंद केले असले तरी, अजूनही शेकडो बिबटे फिरत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही.गावकुसात, शिवारात, ओसाड जागांवर आणि विशेषतः उसाच्या फडात बिबट्यांच्या पावलांचे ठसे आणि हालचाली आढळत असल्याने […] The post वनविभागाची कारवाई सुरू, पण दहशत कायम! पिंपरखेड, जांबूत परिसरात बिबट्यांचा मुक्त वावर, नागरिक भयभीत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Nov 2025 2:45 am

Shirur News : शिरूर तालुक्यात स्वतंत्र ‘बिबट निवारण केंद्र’काळाची गरज

प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर ( शेरखान शेख ) – शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याने नागरिकांसह हजारो पशुधनाचे बळी जात असताना, पकडलेल्या बिबट्यांना ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यात एकमेव माणिकडोह (जुन्नर) बिबट निवारण केंद्र आहे. हे अंतर अधिक असल्याने आणि तालुक्यात बिबट्यांची वाढती संख्या पाहता, शिरूर तालुक्यासाठी स्वतंत्र बिबट निवारण केंद्र असणे ही आता काळाची गरज बनली आहे. शिरूर तालुक्यात […] The post Shirur News : शिरूर तालुक्यात स्वतंत्र ‘बिबट निवारण केंद्र’ काळाची गरज appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Nov 2025 2:15 am

Jejuri News : रुग्णालय हवं की भक्तनिवास? जेजुरीत देवसंस्थान आणि ग्रामस्थांमध्ये मोठा वाद, अखेर..

प्रभात वृत्तसेवा जेजुरी – कुलदैवत खंडेरायाच्या मंदिर गडकोट आवाराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त समितीने शनिवारी (दि.१५) होळकर तलावानजिक स्वतःच्या मालकीच्या जागेत नियोजित बहुउद्देशीय इमारत व भक्तनिवास यांच्या भूमिपूजन सोहळ्याला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. आचारसंहिता काळात हा धार्मिक कार्यक्रम घेऊ नये. बहुतांश विश्वस्त राजकीय पक्षाशी निगडित आहेत. असे निवेदन […] The post Jejuri News : रुग्णालय हवं की भक्तनिवास? जेजुरीत देवसंस्थान आणि ग्रामस्थांमध्ये मोठा वाद, अखेर.. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Nov 2025 2:00 am

Rajgad : राजकीय खळबळ! ‘या’दोन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब; आंबेडकरी चळवळीची निर्णायक बैठक

प्रभात वृत्तसेवा विंझर – राजगड तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपली राजकीय ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच वेल्हे येथे पार पडलेल्या एका महत्त्वाच्या आढावा बैठकीत, चळवळीतील इच्छुक उमेदवारांचा आढावा घेऊन दोन गणांसाठी नावे निश्चित करण्यात आली आहेत. या निर्णयामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. ​वेल्हे येथील आढावा […] The post Rajgad : राजकीय खळबळ! ‘या’ दोन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब; आंबेडकरी चळवळीची निर्णायक बैठक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Nov 2025 1:45 am

सणसवाडीत थरार! विभक्त राहणाऱ्या पत्नीवर पतीने केला धारदार शस्त्राने हल्ला

प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरूर) येथे कौटुंबिक वादातून विभक्त राहत असलेल्या पतीने पत्नीला एकत्र राहण्याची मागणी करत तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्नी जखमी झाली असून, शिक्रापूर पोलिसात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सणसवाडी येथे राहणाऱ्या अनिता अशोक शिंदे आणि त्यांचे पती अशोक शिंदे यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद […] The post सणसवाडीत थरार! विभक्त राहणाऱ्या पत्नीवर पतीने केला धारदार शस्त्राने हल्ला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Nov 2025 1:30 am

Kartiki Ekadashi : लाखो मुखातून हरिनामाचा गजर! कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीत भक्तीचा महापूर

प्रभात वृत्तसेवा आळंदी – ( ज्ञानेश्वर फड ) अल्याड पल्याड पताकांचे भार । मध्यें मनोहर इंद्राहणी ॥ पिवळ्या पारव्या आणिक हिरव्या । नीळवर्ण सार्‍या लखलखित ॥ जरी जर्तातरी जाल्या रानभरी । विजा त्यावरी खेळताती ॥ सर्पाकार दंड तारांगणावाणी । पताका तिकोनी दाटताती ॥ नामा म्हणे तेथें पताकांचे भार । केव्हडें भाग्य थोर ज्ञानोबाचें ॥ राज्याच्या […] The post Kartiki Ekadashi : लाखो मुखातून हरिनामाचा गजर! कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीत भक्तीचा महापूर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Nov 2025 1:15 am

PCMC Election : सर्व १२८ जागा लढविण्याची तयारी करा –खासदार श्रीरंग बारणेंची शिवसैनिकांना स्पष्ट सूचना

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी ३२ प्रभागातील १२८ जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना शिवसेनेचे उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसैनिकांना दिल्या. तसेच युतीबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. जो निर्णय होईल, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने शिवसेनेचा शनिवारी (१५ नोव्हेंबर) पिंपरीत पदाधिकारी प्रशिक्षण मेळावा पार […] The post PCMC Election : सर्व १२८ जागा लढविण्याची तयारी करा – खासदार श्रीरंग बारणेंची शिवसैनिकांना स्पष्ट सूचना appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Nov 2025 1:00 am

Mahendra Thorve : एकाच शिलेदारावर चार ‘गडां’ची जबाबदारी; आमदार महेंद्र थोरवेंच्या खांद्यावर मोठी धुरा

प्रभात वृत्तसेवा माथेरान – खोपोली, माथेरान, उरण आणि कर्जत या चार महत्त्वपूर्ण नगरपरिषदांच्या आगामी निवडणुकांसाठी आमदार महेंद्र थोरवे यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने थोरवे यांच्यावर दाखवलेला विश्वास ही त्यांच्या नेतृत्वक्षमता, संघटनकौशल्य आणि जनसंपर्कातील प्रभावी कार्यशैलीची दाद असल्याचे मानले जात आहे.कर्जत, माथेरान परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे आणि […] The post Mahendra Thorve : एकाच शिलेदारावर चार ‘गडां’ची जबाबदारी; आमदार महेंद्र थोरवेंच्या खांद्यावर मोठी धुरा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Nov 2025 12:45 am

नात्याला काळिमा! फोन उचलला नाही म्हणून पतीने उचललं टोकाचं पाऊल, थेट गळ्यावर..

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पतीने फोन केल्यानंतर पत्नीने फोन उचलला नाही. या कारणावरून संतापलेल्‍या पतीने पत्नीच्‍या गळ्यावर पाय देत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि. 12) सायंकाळी तळेगाव दाभाडे येथे घडली.राजश्री संतोष बिसनाळ (वय 34, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी शुक्रवारी (दि. १४) याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद […] The post नात्याला काळिमा! फोन उचलला नाही म्हणून पतीने उचललं टोकाचं पाऊल, थेट गळ्यावर.. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Nov 2025 12:30 am

Leopard attack : सर्कलवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वासरावर हल्ला,तात्काळ बंदोबस्ताची मागणी

प्रभात वृत्तसेवा भुईंज : वाई तालुक्यातील देगाव, शिरगाव, तर कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सर्कलवाडी, राऊतवाडी, अनपटवाडी या गावांमध्ये डोंगराचा भाग मध्यभागी असल्याने दोन्ही बाजूचे शेतकरी आपापली जनावरे चारण्यासाठी डोंगर माथ्यावर सोडतात. दरम्यान सर्कलवाडी भागातील काही शेतकरी गुरांना चारण्यासाठी गेले असता, बिबट्याने गाईच्या वासरावर हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली असून या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला […] The post Leopard attack : सर्कलवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वासरावर हल्ला,तात्काळ बंदोबस्ताची मागणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Nov 2025 12:15 am

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी सुरू झाली आहे. पूर्वचाचणीमध्ये जनगणनेच्या सर्व पैलूंचा समावेश असेल. जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्याची म्हणजे घरयादी व घरगणनेची पूर्वचाचणी १० नोव्हेंबर, २०२५ ते ३० नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात येत आहे. पूर्वचाचणी अंतर्गत स्व-गणना करण्याचा पर्यायही १ नोव्हेंबर, २०२५ ते ७ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आला होता.जनगणना २०२७ ही पूर्णतः डिजिटल माध्यमातून करण्याची सुरूवात झाली आहे. या पूर्वचाचणीमध्ये घरयादी व घरगणना या पहिल्या टप्यातील मध्ये पर्यवेक्षकाद्वारे प्रत्येक घरयादी गटाची चतुःसीमा डिएलएम ऍपच्या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे. या चतुःसीमेच्या आत येणा-या सर्व इमारती, घरांची गणना आणि कुटुंबाची माहिती प्रगणकाद्वारे एचएलओ ऍप द्वारे संकलित करण्यात येणार आहे. तसेच सीएमएमएस पोर्टर अर्थात सेन्सस मॅनेजमेंट अँड मॉनिटरींग सिस्टीमद्वारे क्षेत्रीय कामाचे व्यवस्थापन व देखरेख होणार आहे. जनगणना पूर्वचाचणीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या एम/पश्चिम विभागामधील १४२ घरयादी गट तयार करण्यात आले आहेत. या पूर्वचाचणीसाठी एकूण १३५ प्रगणक व २२ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पूर्वचाचणीसाठी प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण ६ ते ८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे.एम पश्चिम विभाग अंतर्गत १० नोव्हेंबर २०२५ पासून पूर्वचाचणीचे क्षेत्रीय काम सुरु झाले आहे. या कामकाजाचा आढावा घेणारी बैठक महाराष्ट्र शासनाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (सामान्य प्रशासन विभाग) सीमा व्यास यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र जनगणना संचालनालयाच्या संचालक डॉ. निरुपमा डांगे, उप महानिबंधक श्री. ए. एन. राजीव, महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य( अधिकारी (शहर जनगणना अधिकारी) डॉ. दक्षा शहा आदी मान्यवर उपस्थित होते. या पूर्वचाचणीच्या निमित्ताने प्रत्यक्षात घरयादी गटामध्ये भेट देण्यात आली. तसेच प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीदरम्यान पूर्वचाचणीचे काम विहित वेळेत पूर्ण करण्याच्या अनुषंगाने संबंधितांना निर्देश देण्यात आले.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 11:10 pm

Adani Group : अदानी आंध्र प्रदेशात करणार 1 लाख कोटींची गुंतवणूक

विशाखापट्टणम : एन चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील आंध्र प्रदेशाचे सरकार उद्योगासाठी पूरक वातावरण निर्माण करीत आहे. अशा परिस्थितीत मोठी किनारपट्टी लाभलेल्या आंध्र प्रदेशात अदानी समूह पुढील दशकात एक लाख कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणार असल्याचे अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांचे ज्येष्ठ चिरंजीव करण अदानी यांनी सांगितले. उद्योग विषयक परिषदेत बोलताना अदानी यांनी सांगितले की, ही […] The post Adani Group : अदानी आंध्र प्रदेशात करणार 1 लाख कोटींची गुंतवणूक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 10:59 pm

नवीन शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे : मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे आहे. हे शैक्षणिक धोरण अतिशय व्यावहारिक तसेच सर्जनशीलतेस बळ देणारे आणि आधुनिक स्पर्धेत विद्यार्थ्यांना पुढे नेणारे आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे डिझाईन क्षेत्रातील भविष्यातील संधीसाठी उर्मीज आर्ट […] The post नवीन शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे : मंत्री चंद्रकांत पाटील appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 10:52 pm

State Bank of India : स्टेट बँकेची ‘ही’सुविधा 1 डिसेंबरपासून होणार बंद

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने लाखो ग्राहकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. डिजिटल पेमेंट सिस्टीमवरील वाढत्या अवलंबित्वाच्या पार्श्वभूमीवर, एसबीआयने त्यांचे लोकप्रिय एमकॅश फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने स्पष्टीकरण जारी केले आहे की 30 नोव्हेंबर 2025 नंतर, एमकॅश पाठवण्याची आणि दावा करण्याची सुविधा ऑनलाइन एसबीआय आणि […] The post State Bank of India : स्टेट बँकेची ‘ही’ सुविधा 1 डिसेंबरपासून होणार बंद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 10:48 pm

महाराष्ट्र हादरला..! शिक्षिकेने उठा बस करायला लावल्याने सहावीतील मुलीचा मृत्यू?

पालघर : पालघर जिल्ह्यातील एका खाजगी शाळेतील सहावीतील एका विद्यार्थिनीला उशिरा आल्याबद्दल शिक्षा म्हणून १०० बस उठा करायला लावल्याच्या आरोपानंतर जवळपास एका आठवड्याने तिचा मृत्यू झाला, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. वसई परिसरातील सातिवली येथील शाळेतील अंशिका गौड हिचे शुक्रवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ८ नोव्हेंबर रोजी उशिरा शाळेत पोहोचल्याबद्दल अंशिका आणि इतर चार […] The post महाराष्ट्र हादरला..! शिक्षिकेने उठा बस करायला लावल्याने सहावीतील मुलीचा मृत्यू? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 10:36 pm

PM Kisan Samman Nidhi Yojana : प्रतीक्षा संपली ! ‘या’दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा हप्ता

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पीएम किसान योजनेच्या 21 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. 19 नोव्हेंबर रोजी शेतकर्‍यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये हस्तांतरित केले जातील अशी माहिती पीएम किसान सन्मान निधीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर देण्यात आली आहे. 14 नोव्हेंबर रोजी सरकारने ही घोषणा केली. शेतकरी अनेक महिन्यांपासून या हप्त्याची वाट पाहत होते. आता, […] The post PM Kisan Samman Nidhi Yojana : प्रतीक्षा संपली ! ‘या’ दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा हप्ता appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 10:22 pm

काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘या’दिग्गजांचा समावेश

मुंबई : राज्यातील आगामी महानगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी काँग्रेसने शनिवारी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार छत्रपती शाहू महाराज यांचा समावेश आहे. या यादीत विधान परिषदेचे गटनेते सतेज (बंटी) पाटील, काँग्रेस कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब थोरात, […] The post काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘या’ दिग्गजांचा समावेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 10:14 pm

Parvathaneni Harish : सुरक्षा परिषदेच्या कामात अधिक पारदर्शकता हवी; भारताने व्यक्त केली अपेक्षा

संयुक्त राष्ट्र : संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेशी संबंधित संस्थांच्या कामात अधिक पारदर्शकता आवश्‍यक असल्याची अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून काही व्यक्ती आणि संघटनांवर बंदी घालण्याची मागणी फेटाळली जात असल्याच्या पार्श्‍वभुमीवर भारताने ही मागणी केली आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रातील कायम प्रतिनिधी राजदूत परवाथानेनी हरीश यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत […] The post Parvathaneni Harish : सुरक्षा परिषदेच्या कामात अधिक पारदर्शकता हवी; भारताने व्यक्त केली अपेक्षा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 9:40 pm

ड्रग्जविरोधात श्रीलंकेची धडक कारवाई; तब्बल 1 हजार जणांना अटक

कोलंबो : श्रीलंकेच्या पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविषयी एक धडक कारवाई सुरू केली असून तब्बल एक हजार जणांना अटक करण्यात आली आहे, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले. अ नेशन युनायटेड असे नाव असलेल्या या व्यापक मोहिमेअंतर्गत अमली पदार्थांचा मोठा साठा देखील जप्त केला आहे.देशातील ड्रग्जविरोधात व्यापक मोहिम सुरू केल्याची घोषणा अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी ३० ऑक्टोबर […] The post ड्रग्जविरोधात श्रीलंकेची धडक कारवाई; तब्बल 1 हजार जणांना अटक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 9:23 pm

बिहारमध्ये एसआयआरनंतर वाढले ३ लाख मतदार; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : बिहारमध्ये मतदारयाद्या पडताळणी (एसआयआर) नंतर ३ लाख मतदार वाढल्याकडे कॉंग्रेसने लक्ष वेधले. त्यावर निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशातून संबंधितांच्या नावांचा याद्यांमध्ये समावेश करण्यात आला, असे आयोगाने अधोरेखित केले. विधानसभा निवडणुकीआधी बिहारमध्ये मतदारयाद्यांची पडताळणी झाली. त्यानंतर ३० सप्टेंबरला अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यापाठोपाठ निवडणूक […] The post बिहारमध्ये एसआयआरनंतर वाढले ३ लाख मतदार; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 9:16 pm

तृप्ती देसाईंचे इंदुरीकर महाराजांना ओपन चॅलेंज

अहिल्यानगर : लग्नासाठी कर्ज काढून मोठा खर्च करणे टाळा, असे आवाहन इंदुरीकर महाराजांनी किर्तनातून नागरिकांना केले होते. पण मुलीच्या साखपुड्यासाठी इंदुरीकर महाराजांनी मोठा खर्च केला. या खर्चावरुन सोशल मीडियात इंदुरीकर महाराज ट्रोल होऊ लागले. या पार्श्वभूमीवर आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी किर्तनकार इंदुरीकर महाराज यांना ओपन चॅलेंज दिले आहे.'इंदुरीकर तुम्ही प्रबोधनकार, कीर्तनकार नसून कॉमेडियन आहात. दुसऱ्यांना सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण' या शब्दात तृप्ती देसाई यांनी किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर टीका केली आहे. 'माझ्याशी मीडियासमोर जाहीर चर्चेसाठी तयार व्हा... तारीख, वेळ आणि ठिकाण तुम्हीच सांगा'; या शब्दात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी किर्तनकार इंदुरीकर महाराज यांना ओपन चॅलेंज दिले आहे. तृप्ती देसाईंच्या या आव्हानाला इंदुरीकर महाराज यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही.https://www.youtube.com/shorts/6GT8JNRKSMA

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 9:10 pm

Vijay Wadettiwar : पार्थ पवार जमीन प्रकरणी उच्च न्यायालयाच्या देखरेखीत चौकशी करा; काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांची मागणी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेल्या पुण्यातील जमीन व्यवहारातील कथित अनियमिततेची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वड्डेटीवार यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तटस्थ, स्वतंत्र आणि सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. ज्यामध्ये सरकार या मुद्द्यावर लोकांची दिशाभूल करत असल्याचा […] The post Vijay Wadettiwar : पार्थ पवार जमीन प्रकरणी उच्च न्यायालयाच्या देखरेखीत चौकशी करा; काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांची मागणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 8:34 pm

पुण्यात अनोखी मध्यस्थी; अमेरिकेत असलेल्या पतीशी व्हिडिओ कॉलवर चर्चा, घटस्फोटाचा दावा निकाली

पुणे : अधुनिक तंत्रज्ञानामुळे जगात अनेक बदल झाले आहेत. हे बदल आता न्यायालयीन कामकाजात दिसून येत आहेत. न्यायालयाकडून प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. आता मध्यस्थीसाठीही तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. पहिल्यांदाच व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे अमेरिकेतील व्यक्तीशी संवाद साधून मध्यस्थी करण्यात आली. पती-पत्नीचा दावा घटस्फोटाद्वारे निकाली काढण्यात आला. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य मध्यस्थ ॲड. […] The post पुण्यात अनोखी मध्यस्थी; अमेरिकेत असलेल्या पतीशी व्हिडिओ कॉलवर चर्चा, घटस्फोटाचा दावा निकाली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 8:15 pm

Ram Sutar : प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान

मुंबई : महापुरुषांच्या अजरामर शिल्पकृती साकारणारे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ पुरस्कार प्रदान केला. सध्या राम सुतार यांचे वय १०० वर्षे आहे. त्यांनी साकारलेली शिल्पे आजही इतिहासाची साक्ष देत असतात. राम सुतार यांचा हुबेहूब, जिवंत […] The post Ram Sutar : प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 8:11 pm

विख्यात कंपनी अनंत राजकडून डेटा सेंटर उभारण्यासाठी ४५०० कोटी गुंतवणूकीची घोषणा

प्रतिनिधी: विख्यात रिअल्टी कंपनी अनंत राज लिमिटेडने आपल्या पोर्टफोलिओ विस्तार करण्यासाठी आंध्र प्रदेशात नवेकोरे डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी ४५०० कोटी रुपये गुंतवणार आहे. आज एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार,कंपनीने म्हटले आहे की त्यांची उपकंपनी अनंत राज क्लाउड प्रायव्हेट लिमिटेड (ARCPL) ने आंध्र प्रदेशात आयटी पार्कसह नवीन डेटा सेंटर सुविधा बांधण्यासाठी आणि डेटा सेंटर आणि क्लाउड सेवांच्या विकासासाठी गुंतवणूक करण्यासाठी आंध्र प्रदेश आर्थिक विकास मंडळासोबत एक सामंजस्य करार (MoU) केला आहे.या करारा अंतर्गत डेटा सेंटर-आयटी पार्कच्या विकासासाठी ARCPL कडून सुमारे ४५०० कोटी रुपयांच्या टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीची केली जाऊ शकते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या गुंतवणुकीमुळे सुमारे ८५०० प्रत्यक्ष आणि ७५०० अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.या सामंजस्य कराराचा उद्देश राज्यात कालबद्ध पद्धतीने डेटा सेंटर-आयटी पार्क स्थापन करण्यास मदत करणे आहे. 'ARCPL सुमारे ४५०० कोटी रुपयांची थेट गुंतवणूक करेल, जी दोन टप्प्यात अंमलात आणली जाईल,असे अनंत राज म्हणाले आहेत. आंध्र प्रदेश आर्थिक विकास मंडळ (APEDB) प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सहकार्य करेल, ज्यामध्ये केंद्र सरकारशी समन्वय आणि सहभाग समाविष्ट आहे. APEDB ची भूमिका राज्यात गुंतवणूक सुलभ करणे आणि प्रोत्साहन देणे एवढी मर्यादित असेल. आंध्र प्रदेश सरकारचे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण मंत्री नारा लोकेश यांच्या उपस्थितीत शुक्रवारी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.कंपनीने दिलेल्या माहितीत, प्रस्तावित गुंतवणूक आणि विस्तार कंपनीच्या सध्या विकसित होत असलेल्या ३०७ मेगावॅट डेटा सेंटर क्षमतेपेक्षा जास्त आहे. अनंत राज लिमिटेड त्यांच्या मानेसर आणि पंचकुला येथील कॅम्पसमध्ये २८ मेगावॅट आयटी लोड चालवते आणि २०३१-३२ पर्यंत हरियाणातील मानेसर, पंचकुला आणि राय येथे एकूण क्षमता ३०७ मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवते असे म्हटले आहे.जून २०२४ मध्ये, अनंत राज यांनी भारतात क्लाउड सेवा प्रदान करण्यासाठी फ्रेंच आयटी आणि टेलिकॉम सेवा कंपनी ऑरेंज बिझनेसशी भागीदारी केली होती. कंपनीने म्हटले आहे की ते आर्थिक वर्ष २८ पर्यंत ११७ मेगावॅटची स्थापित आयटी लोड क्षमता साध्य करण्याच्या मार्गावर आहे.आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या सहामाहीत, कंपनीने १२२३.२० कोटी रुपये महसूल आणि २६४.०८ कोटी रुपये करोत्तर नफा नोंदवला आहे.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 8:10 pm

मंडाळे आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक मेट्रो डेपो !

मुंबई : मुंबईच्या मेट्रो वाहतूक यंत्रणेत नवा अध्याय सुरू होत आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो लाईन २ बी साठी मंडाळे येथील कारशेड तयार झाली असून, हा आशियातील सर्वात मोठा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज मेट्रो डेपो ठरला आहे. या डेपोमध्ये एकाच वेळी ७२ आठ डब्यांच्या गाड्या स्थिर करता येतील आणि २९ किलोमीटर अंतर्गत ट्रॅक नेटवर्क आहे.मेट्रो लाईन २ बी ची लांबी सुमारे २३.६ किलोमीटर असून, या मार्गावर १९ स्थानके आहेत. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे १०,९८६ कोटी रुपये आहे. मंडाळे येथील डेपो ३०.४५ हेक्टर क्षेत्रावर पसरलेले असून, तळमजला आणि त्यावर एक मजला अशा रचनेत उभारले गेले आहे. गाड्या ये-जा करण्यासाठी ३ उंच व्हायाडक्ट्स उभारण्यात आले आहेत. याशिवाय, या डेपोमध्येच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रही तयार करण्यात आले आहे.सध्या मंडाळे ते चेंबूर मार्गाच्या उद्घाटनासाठी एमएमआरडीएला राज्य सरकारकडून मुहूर्त मिळालेला नाही. या मार्गिकेची कामे पूर्ण झाली असून सीएमआरएस प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. उद्घाटनाची तयारी पूर्ण आहे, परंतु वेळ मिळाल्याशिवाय सुरूवात लांबणीवर पडली आहे.डेपोची वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानमंडाळे डेपोमध्ये एकाच वेळी ७२ आठ डब्यांच्या गाड्या स्थिर करता येतात, ज्यासाठी दोन पातळ्या आहेत, प्रत्येकी ३६ गाड्यांची क्षमता. हे स्थानक डी. एन. नगर-मंडाळे मार्गाला आधार देते, ज्यामुळे गर्दी कमी होईल आणि शहरातील दैनंदिन वाहतूक सुधारेल अशी अपेक्षा आहे.डेपोमध्ये २९ किलोमीटर अंतर्गत ट्रॅक आणि डबल-डेकर स्टेबलिंग लेआउट आहे, ज्यामुळे या जागेत अधिक गाड्यांचे व्यवस्थापन करता येते. तीन उंच व्हायाडक्ट्समुळे गाड्यांचा प्रवेश आणि बाहेर पडणे अधिक जलद आणि कार्यक्षम होते.सध्या येथे १० देखभाल लाईन्स, सहा तपासणी ट्रॅक आणि चार बोगी टर्नटेबल आहेत, जे तांत्रिक सेवांना जलद आणि सुरळीत बनवतात. हेवी-ड्युटी स्टोरेज आणि उपकरणांमुळे दररोजच्या देखभालीत कोणताही व्यत्यय येत नाही.आधुनिक सुविधा आणि पर्यावरणीय उपायडेपोमध्ये दररोज स्वयंचलित साफसफाईसाठी वॉश प्लांट आहे, तर व्हील प्रोफाइलिंग पिटद्वारे व्हीलची तपासणी केली जाते. G+3 कंट्रोल सेंटर २४ तास ऑपरेशन्सवर लक्ष ठेवते. पर्यावरणीय उपायांमध्ये १७५ KLD पाण्याचे पुनर्नवीनीकरण, भूमिगत उपयुक्तता व्यवस्था आणि धूळ नियंत्रण प्रणाली आहेत. मंडाळे-डायमंड गार्डन स्ट्रेचवरील चाचण्या सुरू असून, पूर्ण लाईन २०२६ मध्यापासून २०२७ अखेरीस सुरू करण्याचे लक्ष्य आहे.मंडाळे डेपोच्या उद्घाटनासह मुंबईने मेट्रो वाहतूक सुविधेत मोठा टप्पा गाठला आहे. ही सुविधा शहराच्या पूर्व-पश्चिम कॉरिडॉरमध्ये कार्यक्षमता वाढवण्यास आणि कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यास महत्त्वपूर्ण ठरेल.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 8:10 pm

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! पीएम किसानचे 2000 रुपये ‘या’दिवशी होणार खात्यात जमा

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 21 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना 19 नोव्हेंबर रोजी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. या योजनेद्वारे दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये एकूण 6000 रुपये दिले जातात. फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत 20 हप्ते वितरित करण्यात आले […] The post शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! पीएम किसानचे 2000 रुपये ‘या’ दिवशी होणार खात्यात जमा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 7:59 pm

राणी कित्तूर चन्नमा प्राणी संग्रहालयात 28 काळविटांचा संशयास्पद मृत्यू

कोल्हापूर : बेळगाव जवळ काही अंतरावर पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाला लागून भूतरामनहट्टी गावात राणी कित्तूर चन्नमा प्राणी संग्रहालयात तब्बल २८ काळविटांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांडरे यांनी दिले आहेत. 13 नोव्हेंबर रोजी आठ काळविटांचा मृत्यू झाला होता. शनिवारी प्राणी संग्रहालयातील वीस काळविटांचा अचानक मृत्यू झाला. तीन […] The post राणी कित्तूर चन्नमा प्राणी संग्रहालयात 28 काळविटांचा संशयास्पद मृत्यू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 7:49 pm

जिल्हा न्यायाधीशांसह तिघांचा धरणात बुडून मृत्यू, घटनेने परिसरात खळबळ

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे धरणात कार कोसळल्याने जमशेदपूरच्या मुख्य जिल्हा न्यायाधीशांच्या दोन अंगरक्षकांसह तीन जणांचा बुडून मृत्यू झाला असून अजून एक जण बेपत्ता आहे. रांचीच्या नागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हटिया धरणात शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. हटियाचे डीएसपी प्रमोद मिश्रा म्हणाले की, पोलिसांना कारमध्ये चार जण असल्याची माहिती मिळाली. […] The post जिल्हा न्यायाधीशांसह तिघांचा धरणात बुडून मृत्यू, घटनेने परिसरात खळबळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 7:34 pm

अल्पावधीतच व्हॉट्सॲपला टक्कर देणारे अरताई आता नव्या स्वरुपात येणार श्रीधर वेंबूंकडून 'या'नव्या फिचरची घोषणा

प्रतिनिधी:अल्पावधीतच युजर्सला आकर्षित करून लोकप्रियता मिळवणारे झोहो कॉर्पोरेशनने नव्या फिचर्सची अधिकृत घोषणा केली आहे. कंपनीचे नवे मेसेंजर अँप व व्हॉट्सॲपला तगडा स्पर्धक ठरत असलेले अरताई आता आणखी नव्या फिचरसह लवकरच बाजारात उतरणार आहे. माहितीनुसार, कंपनीने सर्वेसर्वा श्रीधर वेंबू यांनी एक्सवर याबद्दलची माहिती देत एंड टू एंड इन एन्क्रिप्शन सुविधा लवकरच बाजारात दाखल करणार आहे. प्रत्येक युजरचे वैयक्तिक चॅटिंग असो अथवा ग्रुपवरील संभाषण असो अरताई (Artai Messenger) प्रत्येक युजरसाठी हे फिचर लागू करणार आहे अशी घोषणा कंपनीने केली. वेंबू यांनी कंपनी सध्या या फिचरवर काम करत असल्याने अद्याप ते फिचर लागू झालेले नाही. मात्र टेस्टिंग पूर्ण झाल्यावर ते ग्राहकांना रोलआऊट केले जाणार आहे असे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.याशिवाय कंपनीच्या ६००० कर्मचाऱ्यांनी या फिचरची चाचपणी केली असल्याचे वेंबूनी नमूद केले आहे. रोलआउट एका-एक-एक चॅटने सुरू होणार असून त्यानंतर लवकरच ग्रुप संभाषणाला लागू होऊ शकते त्यामुळे आपले खासगी चॅटिंग या निमित्ताने सुरक्षित होणार आहेत हे अपग्रेड यापूर्वी व्हॉट्सअँपने ग्राहकांसाठी बाजारात आणले होते.याविषयी नेमक्या शब्दात श्रीधर वेंबू आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहेत की,'अरट्टईवरील स्थिती: आम्ही पर्याय २ सह जाण्याचा निर्णय घेतला जो सिस्टम-व्यापी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन अनिवार्य आहे (एक-एक संदेशांपासून (End to End Personal Conversation) पासून सुरुवात करून आणि समुहावर (Group Conversations) हे नंतर लागू होईल. आम्हाला त्याभोवती काही पुनर्रचना करावी लागली आणि आम्हाला व्यापक चाचणी हवी होती कारण हा एक मोठा बदल आहे. आता कंपनीतील सुमारे ६००० लोकांकडून त्याची चाचणी घेतली जात आहे. आम्ही काही समस्या ओळखल्या आणि त्या सोडवल्या आहेत. आम्ही ओळखल्या गेलेल्या समस्या सोडवणाऱ्या नवीन बिल्डवर आणखी एक चाचणी करत आहोत.जर सर्व काही व्यवस्थित झाले, तर आम्ही काही दिवसांत हे फिचर तैनात करण्याची योजना आखत आहोत. हे सर्वांसाठी सक्तीचे अपग्रेड असेल कारण हा एक मोठा बदल आहे दरम्यान, तुम्ही अ‍ॅप अपग्रेड करू शकता आणि त्यात आधीच अनिवार्य e2e एन्क्रिप्शनसाठी कोड असला तरी, आम्ही ते सक्षम करेपर्यंत ते काम करणार नाही आणि आम्ही ते दुसऱ्या चाचणी फेरीनंतर करू. अ‍ॅप आता अधिक जलद आणि आकर्षक झाले आहे जे तुम्ही अनुभवू शकता.तुमच्या संयमाबद्दल धन्यवाद.' असे म्हटले आहे.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 7:30 pm

Donald Trump : एच१-बी व्हिसाविरोधी विधेयक मांडणाऱ्या नेत्या मार्जोरी टेलर ग्रीन यांच्यावर ट्रम्प संतापले

वॉशिंग्टन : एच१-बी व्हिसाची संपूर्ण प्रक्रिया रद्द करावी, अशा आशयाची मागणी करणारे विधेयक संसदेमध्ये मांडणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या मार्जोरी टेलर ग्रीन यांच्यावर ट्रम्प संतप्त झाले आहेत. ग्रीन या अलिकडेच त्यांच्या अजेंड्याशिवायच्या अन्य विषयांवर बोलल्या. मला जे दिसते आहे, ते म्हणजे मार्जोरी विक्षिप्तपणे बोलत आहेत. त्या केवळ तक्रारी, तक्रारी आणि तक्रारी करत आहेत, असे ट्रम्प यांनी […] The post Donald Trump : एच१-बी व्हिसाविरोधी विधेयक मांडणाऱ्या नेत्या मार्जोरी टेलर ग्रीन यांच्यावर ट्रम्प संतापले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 7:26 pm

बिहार निवडणूक पराभवाचा फटका: रोहिणी आचार्यने RJD आणि कुटुंबाचा त्याग केला

मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत RJD च्या मोठ्या पराभवानंतर लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबात तणाव वाढला आहे. या घडीला, लालू यांची कन्या आणि तेजस्वी यादवची बहिण असलेलय रोहिणी आचार्यने राजकारण पूर्णपणे सोडत असल्याची आणि कुटुंबीयांपासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे.रोहिणी आचार्य यांनी ट्विटरवर (X) लिहिले, “मी राजकारणातून बाहेर पडत आहे आणि माझ्या कुटुंबीयांशी सर्व संबंधदेखील तोडत करत आहे. संजय यादव आणि रमीझ यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची पूर्ण जबाबदारी मी घेत आहे.”व्यवसायाने डॉक्टर असलेल्या रोहिणीने काही वर्षांपूर्वी वडिलांना किडनी दान केली होती तेव्हा ती खूप चर्चेत आली होती. त्यांनी मागील वर्षी सारण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण भाजपाचे राजीव प्रताप रुडी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.या निवडणूक निकालानंतर RJD मध्ये अंतर्गत मतभेद स्पष्ट झाले आहेत. हा पक्षासाठी मोठा धक्का आहे. महाआघाडीच्या ६६ यादव उमेदवारांपैकी फक्त १२ जण विजयी झाले, तर एनडीएकडून २३ यादव उमेदवारांपैकी १५ जण निर्वाचित झाले. याचा अर्थ असा की यादव समाजाचा मोठा हिस्सा RJD ऐवजी NDA कडे वळला आहे.रोहिणी आचार्यचा निर्णय हा केवळ राजकीय नसून कौटुंबिक स्तरावरही धक्कादायक ठरला आहे. वडील लालू प्रसाद यादवांसोबत तीचे नाते खूप घनिष्ट आहे; किडनी दान हे त्याचं स्पष्ट उदाहरण आहे.रोहिणी आचार्यने स्पष्ट केले आहे की, “माझ्या राजकीय महत्वाकांक्षा किंवा कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. माझा आत्मसन्मान माझ्यासाठी सर्वोच्च आहे.”मागील काही वर्षांत देखील तेज प्रताप यादव आणि आता रोहिणी आचार्य यांनी कुटुंबापासून अंतर ठेवले असून, यादव कुटुंबातील राजकीय आणि कौटुंबिक तणाव आता बाहेर येत आहेत.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 7:10 pm

Gold Silver Rate Today: सोन्याचांदीचे दर सलग दुसऱ्यांदा तुफान गडगडले एका दिवसात सोने प्रति ग्रॅम १९६० रूपये तर चांदीत एका दिवसात ४.५०% घसरण

मोहित सोमण: जागतिक बाजारपेठेत सोने सलग दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात घसरले आहे. प्रामुख्याने युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची अपेक्षा केली जात असल्याने अचानक अनेक तज्ञांनी दरकपातीवर घुमजाव सुरु केले आहे काल फेडच्या अनेक वक्त्यांनी अचानक केलेल्या आक्रमक टिप्पण्यानंतर व्यापाऱ्यांनी डिसेंबरमध्ये फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा मागे घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सोन्याचांदीत फेरफार होण्यास सुरुवात झाली आहे. या घटनांचा जागतिक पातळीवरील कमोडिटी बाजारात प्रभाव पडल्याने व भारतीय बाजारातील रेपो दरात कपातीची आशावाद कायम राहिल्याने भारतीय बाजारात सलग दुसऱ्यांदा घसरण झाली.युएसमधील मिनियापोलिस फेडचे अध्यक्ष नील काश्कारी यांनी प्रसारमाध्यमांना म्हटले आहे की की त्यांनी गेल्या महिन्यात दर कपातीला विरोध केला होता आणि डिसेंबरमध्येही ते अनिश्चित आहेत. याव्यतिरिक्त सेंट लुईस फेडचे अध्यक्ष अल्बर्टो मुसलेम आणि क्लीव्हलँड फेडचे अध्यक्ष बेथ हॅमॅक यांनीही फेड धोरणे जास्त प्रमाणात अनुकूल होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि महागाईतील चिंता बोलून दाखवली. दरम्यान व्याजदरात कपात न झाल्यास सोन्यावरील व्याजात भर पडणार नसल्याने निराशा पसरत आज कमोडिटी बाजारातील पडझड कायम आहे.सरकारी शटडाऊनच्या दीर्घकाळाच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट डेटाच्या अभावामुळे फेड डिसेंबरच्या बैठकीबाबत अद्याप आश्वासकता नाही. काही आकडेवारी निराशाजनक आल्याने आता उर्वरित शटडाऊनमुळे प्रलंबित झालेली आगामी आकडेवारी आधारे बाजारात प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. अद्याप मुख्य फेड गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांनीही कुठलाही नवीन संकेत दिला नाही. त्यामुळे बाजारातील सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याच्या गुंतवणूकीत आज बदल झाला नाही किंबहुना आज घसरण झाली. स्पॉट व ईटीएफमध्ये झालेल्या घसरणीमुळे भारतातही घसरण झाली आहे.'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १९६ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १८० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १४७ रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२५०८ रुपयांवर, २२ कॅरेटसाठी ११४६५ रूपयांवर, १८ कॅरेटसाठी ९३८१ रूपयांवर पोहोचले आहेत. प्रति तोळ्यामागे दर २४ कॅरेटवर १९६० रूपये, २२ कॅरेटवर १८०० रूपये,१८ कॅरेटवर १४७० रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १२५०८० रूपयांवर, २२ कॅरेटसाठी ११४६४० रूपये, १८ कॅरेटसाठी ९३८१० रूपयांवर पोहोचले आहेत.जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.३९% घसरले असून युएस बाजारातील गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत २.२०% घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति डॉलर दरपातळी ४०७९.५८ औंसवर गेली आहे. भारतीय बाजारातील कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.६४% घसरण झाली असल्याने सोने दरपातळी १२३४०० रूपयांवर पोहोचली आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १२५०८, २२ कॅरेटसाठी ११४६५ व १८ कॅरेटसाठी ९३८१ रूपयांवर पोहोचले आहेत.चांदीच्या दरात काल किरकोळ वाढ आज घसरणचांदीच्या दरातही आज मोठी घसरण झाली आहे. युएस बाजारातील अस्थिरता वाढल्याने सोने आज मोठ्या प्रमाणात कोसळले आहे. फेड दर कपातीचा अपेक्षाभंग सोन्याप्रमाणे चांदीतही वाढल्याने चांदीसारख्या कमोडिटीत घसरण झाली आहे. आज 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज ४.१० रूपये व प्रति किलो दरात ४१०० रुपयांनी घसरण झाली आहे. याखेरीज मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर १६९० तर प्रति किलो दर १६९००० रूपयांवर गेले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ४.२७% कोसळल्याने चांदीचा दर १५५५३० रूपयांवर व्यवहार करत आहे. संध्याकाळपर्यंत सिल्वर फ्युचर निर्देशांकात ४.६७% निर्देशांकात घसरण झाली आहे.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 7:10 pm

संगमनेरमध्ये नाशिक-पुणे महामार्गावर मोठी कारवाई

कारमधून तब्बल एक कोटीची रोकड जप्तसंगमनेर :संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला असतानाच, आज (शनिवार, दि. १५) दुपारी नाशिक-पुणे महामार्गावर एका कारमधून तब्बल एक कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात, विशेषतः राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील खांडगाव फाटा येथे पोलीस पथक नियमित वाहन तपासणी करत होते. यावेळी धाराशिव पासिंग असलेल्या एमएच २५ एएस ८८५१ या क्रमांकाच्या कारला पोलिसांनी तपासणीसाठी थांबवले. कारची झडती घेतली असता, त्यात मोठी रोख रक्कम पाहून पोलीस पथकही चक्रावून गेले.सध्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला असून, अशातच एवढी मोठी रक्कम सापडल्याने हा पैसा निवडणुकीसाठी तर आणला गेला नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने या घटनेची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.या कारवाईबाबत पोलीस पथकाला विचारणा केली असता, त्यांनी प्राथमिक माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, सदर कार ही संगमनेर तालुक्यातील पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रायते वाडी फाटा येथून संगमनेर शहराच्या दिशेने येत होती. कारमधील ही रक्कम धाराशिव येथील दोन बांधकाम कंपन्यांची (कन्स्ट्रक्शन कंपनी) आहे.सध्या निळवंडे धरणाच्या कॅनॉलचे (कालवा) काम सुरू आहे. या कामावर असलेल्या कामगारांचे पगार (पेमेंट) वाटप करण्यासाठी ही रक्कम नेली जात होती, असे प्राथमिक चौकशीत समजल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.जरी ही रक्कम कामगारांच्या पगारासाठी असल्याचे सांगण्यात येत असले, तरी ऐन निवडणुकीच्या काळात इतकी मोठी रक्कम रोख स्वरूपात का नेली जात होती? यामागे आणखी काही कारण आहे का? याचा सखोल तपास पोलीस व निवडणूक अधिकारी करत आहेत. या घटनेमुळे संगमनेरमधील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 7:10 pm

IPL Retention 2026 : आयपीएलमधील सर्व 10 फ्रँचायझींकडून रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर

आयपीएल 2026 संदर्भात (IPL Retention 2026) एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्व १० फ्रँचायझींनी आपल्या संघांची नवीन रचना जाहीर केली आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही अनेक मोठे खेळाडू मिनी ऑक्शनमध्ये उतरणार आहेत. मिनी ऑक्शन असल्याने रिटेन्शनची कोणतीही मर्यादा नव्हती, म्हणून अनेक संघांनी जास्तीत जास्त खेळाडू रिटेन केले तर काही मोठ्या खेळाडूंना संघातून रिलीज केले. हे खेळाडू […] The post IPL Retention 2026 : आयपीएलमधील सर्व 10 फ्रँचायझींकडून रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 7:01 pm

राहुल गांधींना मोठा दिलासा..! ‘हा’खटला ६ डिसेंबरपर्यंत स्थगित

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील न्यायालयाने शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्याने काँग्रेस नेते राहुल गांधींविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी ६ डिसेंबरपर्यंत स्थगित केली आहे. भिवंडीचे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ विभाग, पी.एम. कोळसे सध्या या खटल्याची सुनावणी करत आहेत. जेव्हा हे प्रकरण सुनावणीसाठी आले तेव्हा तक्रारदार राजेश कुंटे यांचे वकील वकील प्रबोध जयवंत यांनी निजामपुरा […] The post राहुल गांधींना मोठा दिलासा..! ‘हा’ खटला ६ डिसेंबरपर्यंत स्थगित appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 6:39 pm

निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्याचा नेत्याचा खून, राजकीय वर्तुळात खळबळ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षाचा मृतदेह आढळल्‍याने एकच खळबळ उडाली आहे. गंगापूर तालुक्यातील एका पुलाजवळ कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. भाजप नेत्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील रहिवासी असलेले भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश […] The post निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्याचा नेत्याचा खून, राजकीय वर्तुळात खळबळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 6:13 pm

आरबीआयची मोठी अपडेट- टॅरिफला कंटाळलेल्या निर्यातदारांना आरबीआयकडून खुप मोठा दिलासा फेमा कायद्यात फेरबदल जाहीर

मुंबई:विशेषतः केंद्र सरकार टॅरिफ फटक्यातून मुक्त करण्यासाठी विविध योजना राबवत आहे. त्यातील पुढील अध्याय म्हणजे आरबीआयकडून फेमा (Foreign Exchange Management Act FEMA) अंतर्गत नियमावलीत सूट देत निर्यातदारांसाठी दिलासा दिला आहे. नवीन माहितीप्रमाणे निर्यातदारांना वित्त सहाय्य, तरलता (Liquidity) सहाय्य यासह व्यापारासाठी लवचिकता आणण्यास आरबीआय मदत करणार आहे. या नव्या शिथिलतेनुसार, आता निर्यातदारांना निर्णयात (एक्सपोर्ट प्रोसिड) अंतर्गत केलेल्या निर्यातीनंतर संपूर्ण करारात वस्तूंचा परतावा, अथवा वस्तूंचे मूल्य परत भारतात आणण्यासाठी ९ महिन्याऐवजी आता १५ महिन्यांचा कालावधी असणार आहे. सॉफ्टवेअर, सेवा, वस्तू यांच्या निर्यातीत काही बदल असल्यास तो भारतात परत आणण्यासाठी कालावधी आरबीआयने वाढवला आहे. तसेच आता पैसे मिळाल्यावर संपूर्ण माल पोहोचवण्यासाठी मर्यादा १ वर्षांवरून ३ वर्षावर वाढवण्यात आली आहे. त्यामुळे राहिलेला व्यवहार समायोजित (Adjust) अथवा सेटलमेंट करण्यासाठी निर्यातदारांना अतिरिक्त वेळ मिळू शकेल.यासह वित्तीय सहाय्य, अथवा मुदतठेव कर्ज घेतलेल्या निर्यातदारांना नव्या फेमा कायद्यासह नवीन ट्रेड रिलिफ मेजर्स डायरेक्शन २०२५ अंतर्गत खेळत्या भांडवलावर अथवा खेळत्या भांडवलासाठी (Working Capital) आर्थिक सहाय्याला मुदतवाढ मिळू शकते.१ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत या प्रकारच्या घेतलेल्या आर्थिक सहाय्यात हा बदल होणार आहे.याशिवाय, आरबीआयने आपल्या प्रकाशनात म्हटल्याप्रमाणे आरबीआयने निर्यात-क्रेडिट परतफेडीचे नियम शिथिल केले आहेत. ३१ मार्च २०२६ पर्यंत वितरित केलेल्या कर्जांसाठी प्री-शिपमेंट आणि पोस्ट-शिपमेंट निर्यात क्रेडिटसाठी कमाल (जास्तीत जास्त) क्रेडिट कालावधी एक वर्षावरून ४५० दिवसांपर्यंत वाढविण्यात आल्याचे आरबीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. माहितीनुसार ज्या निर्यातदारांनी ३१ ऑगस्ट २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी पॅकिंग क्रेडिट घेतले होते, परंतु वस्तू पाठवू शकले नाहीत त्यांना देशांतर्गत विक्री किंवा इतर निर्यात ऑर्डरमधून मिळालेल्या रकमेसह पर्यायी कायदेशीर स्रोतांचा वापर करून या सुविधा परतफेड करण्याची परवानगी असणार आहे असे आरबीआयने आपल्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट केले आहे.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 6:10 pm

“जो जीता वही सिकंदर” शरद पवारांच्या बिनबुडाच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर आलं आहे. यंदाच्या निवडणुकीत एनडीएने जोरदार कामगिरी करत तब्बल २०२ जागांवर विजयाची नोंद केली. तर महागठबंधनाला केवळ ३५ जागांवर समाधान मानावं लागलं. या निकालानंतर राजकीय चर्चांना वेग आला असून अनेक नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.शरद पवारांनी बिहारच्या निवडणुकीवर भाष्य करताना म्हटलं की, महिलांनी मोठ्या प्रमाणावर एनडीएला मतदान केलं आणि त्यामागे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेल्या १० हजार रुपयांच्या योजनेचा प्रभाव दिसतो.पुढे ते म्हणाले “महाराष्ट्रातही निवडणुकीपूर्वी सरकारी योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देण्यात आली. भविष्यात सत्ताधारी पक्षांनी अशा पद्धतीने निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तर लोकशाहीवरील विश्वास ढळू शकतो. एवढ्या मोठ्या रकमेचं वाटप योग्य आहे का, निवडणूक आयोगाने याचा गांभीर्याने विचार करावा.”“जो जीता वही सिकंदर” फडणवीसांचा पलटवारराष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार यांनी बिहारमधील महिलांना १० हजारांची मदत देणाऱ्या योजनेमुळे मतदानात परिणाम झाला, अशी टीका केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर दिलं. फडणवीस म्हणाले, “जो जीता वही सिकंदर. पराभवानंतर आपली चूक मान्य करणं हे विरोधकांना जमत नाही. आमच्या योजना लोकांना आवडल्या म्हणून त्यांनी मतदान केलं. मग त्यात दोष कोणाचा? तुमच्या सरकारच्या काळात तुम्ही अशा योजना राबवल्या नाहीत, ही आमची चूक कशी?”मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मते, लोकशाही प्रक्रियेत जनता प्रामाणिकपणे आपले मत विकासाला करते, आणि योजनांचा प्रभाव हे नैसर्गिक आहे, आरोप करण्याचा विषयच येत नाही.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 6:10 pm

Utakarsh Small Finance Bank Q2Results: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा तिमाही निकाल जाहीर यंदा तिमाहीत बँकेला ३४८ कोटींचा निव्वळ तोटा

मोहित सोमण: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला आहे. या निकालातील माहितीनुसार, बँकेला ३४८ कोटींचा निव्वळ तोटा (Net Loss) झाला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ५१ कोटी नफ्याच्या तुलनेत यंदा तिमाहीत ३४८ कोटीचा निव्वळ तोटा झाला आहे. बँकेच्या प्रोव्हीजनिंगमध्ये वाढ झाली असून बँकेने यंदा विना तारण कर्ज वाटपात कपात केल्याने बँकेच्या ताळेबंदीत बँकेला नुकसान झाले आहे. तसेच बँकेच्या एकूण कामकाजातून मिळणाऱ्या उत्पन्नात (Income from Operations) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तुलनेत १०८ कोटींवरून ९३ कोटींवर घसरण झाली आहे. बँकेच्या असेट क्वालिटीतही घसरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थूल एनपीए (Gross Non Performing Assets NPA) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ३.८८% तुलनेत यंदा तिमाहीत १२.४२% घसरण झाली असून निव्वळ एनपीएत (Net Non Performing Assets NPA) इयर ऑन इयर बेसिसवर ०.८९% वरून ५.०२% घसरण झाली आहे. डेट टू इक्विटी गुणोत्तरात (Debt to Equity Ratio) गेल्या वर्षीच्या तुलनेतील ०.६४% वरून घसरण होऊन ते या तिमाहीत ०.८३% वर पोहोचले आहे.बँकेच्या सीएआर गुणोत्तरातही घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या सीएआर (Capital Adequacy Ratio CAR) २२.४३% वरून या तिमाहीत १७.२१% घसरण झाली आहे. तथापि ठेवींमध्ये (Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर १०% वाढ होऊन ती २१४४७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. किरकोळ मुदत ठेवींमध्ये ती २८.८% वाढ झाली आहे .यासह (करंट अकाऊंट सेविंग अकाऊंट कासा CASA) ठेवींमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर १७.४% वाढ झाली त्यामुळे CASA प्रमाण २०.९% पर्यंत वाढले आहे.या निकालावर भाष्य करताना,'गृहनिर्माण आणि एमएसएमई कर्जांसारख्या सुरक्षित उत्पादनांमध्ये उत्पन्न ऑप्टिमायझेशन आणि दीर्घकालीन मालमत्तेच्या गुणवत्तेचे रक्षण करण्यासाठी सूक्ष्म-बँकिंगमध्ये कडक क्रेडिट नियमांचा उल्लेख करून सीईओ गोविंद सिंग म्हणाले आहेत की,ही तिमाही लवचिकता निर्माण करण्याबद्दल होती.'माहितीनुसार, बँकेचा क्रेडिट-डिपॉझिट गुणोत्तर मात्र ७८.८% पर्यंत सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षीच्या ९३% वरून तो कमी झाला आहे.उत्कर्ष एसएफबीने त्यांच्या 'उत्कर्ष २.०' परिवर्तन मोहिम कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञानात सुरू असलेल्या गुंतवणुकीवर आणि टियर-१ भांडवल वाढवण्यासाठी नोव्हेंबरमध्ये ९५० कोटी राइट्स इश्यूनंतर मजबूत भांडवली स्थितीवरही भाष्य केले आहे. निकालानुसार, बँकेने दुसऱ्या तिमाहीत ३ कोटींचा प्री-प्रोव्हिजन ऑपरेटिंग तोटा नोंदवला आहे तर बँकेला गेल्या वर्षी २७६ कोटींचा नफा झाला होता.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 6:10 pm

Devendra Fadnavis : विरोधकांनी पराभव स्वीकारावा आणि आत्मपरीक्षण करावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला सल्ला

नागपूर : बिहारमध्ये झालेल्या प्रचंड विजयानंतर एनडीएवर होणाऱ्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी प्रत्युत्तर दिले. जो जिंकतो तो सम्राट होतो असे प्रतिपादन करत, त्यांनी विरोधकांना पराभव स्वीकारण्यास, चुका ओळखण्यास आणि आत्मपरीक्षण करण्यास सांगितले. ते एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते. भाजप आणि जद(यू) या दोन मुख्य घटकांचा समावेश असलेल्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने शुक्रवारी सत्ता […] The post Devendra Fadnavis : विरोधकांनी पराभव स्वीकारावा आणि आत्मपरीक्षण करावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला सल्ला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 6:08 pm

नवले पुलावरील अपघातानंतर ‘लूटमारी’चा व्हिडिओ व्हायरल ; नागरिकांमध्ये संतापाची लाट!

Pune Navale Bridge Accident : नवले पुलाजवळ गुरुवारी (दि. १३) सायंकाळी झालेल्या साखळी अपघाताने संपूर्ण शहर हादरले. काही क्षणांतच दोन कंटेनर आणि एका कारचा भीषण अपघात झाला आणि आठ जण जळून मृत्युमुखी पडले. सुमारे २० जण जखमी झाले. काळोखात उजळलेल्या आगीच्या ज्वाळा आणि विखुरलेली वाहने पाहून उपस्थितांची पावले थरथरली. अपघातानंतर काही वेळातच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ फिरू लागला ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.या व्हिडिओमध्ये अपघातस्थळी पडलेले रोख पैसे आणि सोन्यासारख्या वाटणाऱ्या वस्तू गोळा करण्यासाठी काही लोक धाव घेताना दिसत आहेत. जीव गेलेल्या व्यक्तींच्या वस्तूंची अशी लूटमार होत असल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केले आहे. “ही घटना मानवतेला कलंक लावणारी आहे,” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर व्यक्त केल्या जात आहेत.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 5:10 pm

चिराग पासवानांनी घेतली नितीश कुमारांची भेट! एनडीएमध्ये विकासाची नवी समीकरणे?

Bihar election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या दमदार विजयामुळे राज्याच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मंत्री चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन अभिनंदन केले.जेडीयूने या निवडणुकीत ८५ जागा मिळवत मोठे यश मिळवले, तर चिराग पासवान यांच्या एलजेपीला १९ जागा प्राप्त झाल्या. भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. नितीश कुमार यांच्यासोबतच्या भेटीचे काही क्षण चिराग पासवान यांनी “एनडीएच्या प्रचंड विजयाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली,” एक्सवर शेअर करत माहिती दिली.पासवान म्हणाले की, बिहारच्या लोकांनी योग्य वेळेत योग्य निर्णय घेत देशाला संदेश दिला आहे. हा विजय कोणत्याही एका पक्षाचा नसून बिहारच्या नागरिकांच्या विश्वासाचा आणि त्यांच्या प्रगल्भतेचा आहे. लोक जनशक्ती पक्षाने ज्या आत्मविश्वासाने निवडणूक लढवली त्याला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला, असे ते म्हणाले. एनडीएच्या सरकारमध्ये बिहारच्या विकासाला अधिक गती मिळेल आणि राज्यातील तरुण, महिला तसेच मागासवर्गीयांसाठी विशेष काम करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.मुख्यमंत्रीपदाबद्दल विचारले असता पासवान म्हणाले की, अमित शहा यांनी स्पष्ट केले होते की मुख्यमंत्रीपदाची निवड विधिमंडळ पक्ष करणार आहे. त्यांची स्वतःची इच्छा नितीश कुमार यांनीच मुख्यमंत्री व्हावे अशी असल्याचेही त्यांनी म्हटले. २०२० मधील पराभवाचा संदर्भ देताना त्यांनी म्हटले की, त्या वेळी त्यांच्या पक्षाच्या अपयशासाठी अनेक जण जबाबदार होते आणि जेडीयूशी मतभेद असल्याच्या अफवा मुद्दाम पसरवल्या गेल्या होत्या.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 5:10 pm

अखेर पुन्हा 'युटर्न'अखेर निवडणूकीत फटका बसल्याने अंतर्गत दबावामुळे भारतीय आंबा, डाळिंब, चहावरील शुल्क ट्रम्पनी हटवले !

प्रतिनिधी:लोकांच्या गरजा व महागाई, रोजगार निर्मिती यावर निर्णय न घेता राष्ट्रीय धोरण, एच१बी व्हिसा, व्यापारी तडजोड, टॅरिफविषयक, इतर राष्ट्रीय मुद्यांना डोनाल्ड ट्रम्प हात घालत असताना देशातील नागरिकांची नाराजी ओढवून घेतली आहे. किंबहुना महागाईच्या प्रश्नावर न बोलता केवळ परराष्ट्र संबंधावर राजकारण करणाऱ्या ट्रम्प यांना व्यापारी दबावामुळे काही उत्पादनवरील अतिरिक्त शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन निर्णयामुळे आता भारतातील आंबा, चहा, डाळिंब यावरील अतिरिक्त टॅरिफ हटवण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे.यापूर्वी युएसने भारतावर २५% टॅरिफ शुल्क आकारले होते मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणातील इतर मुद्यांसह रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अतिरिक्त २५% कर भारतीय सामानावर लावला होता. अर्थात जेनेरिक औषधे, सर्वसमावेशक औषधे, व इतकं काही पदार्थ वगळता इतर वस्तूंवर अतिरिक्त कर लादला गेला होता. अर्थात याबाबत मुळातच बेरोजगारी, महागाईच्या गर्तेतील युएस प्रशासनाला आता अंतर्गत संघर्षाचा सामना करावा लागत आहे ‌नुकत्याच न्यूयॉर्क महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला पराभव पत्करावा लागल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी हा संबंधित उत्पादनावर कर माफ केला आहे. वस्तूंचा तुटवडा व महागाईचा अंतर्गत फटका बसला असताना आता आंबा, डाळिंब, चहा, मसाले, ज्यूस, कॉफी, संत्री, कोकोआ या उत्पादनावर ही सवलत मिळाली आहे. व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, या उत्पादनावर आता टॅरिफ लागणार नाही. सातत्याने डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर ट्रम्प प्रशासनाला धारेवर धरत आहेत.न्यूयॉर्क शहर, न्यू जर्सी आणि व्हर्जिनियामधील अलिकडच्या निवडणुकीत डेमोक्रॅट्सनी या निराशेचा फायदा घेतला आणि सामान्य कुटुंबांना त्यांचे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे या आधारावर सिनेटसह स्थानिक पातळीवर या मुद्यावर प्रचार केला होता.'ट्रम्प यांनी आपला बराचसा वेळ परराष्ट्र धोरण आणि व्यापार युद्धांवर घालवला आहे, परंतु मतदारांना आठवड्याच्या किराणा बिलाची जास्त काळजी आहे. या आठवड्यात झालेल्या परदेशी मीडिया पोलमध्ये, ६३% नोंदणीकृत मतदारांनी सांगितले की ट्रम्प राहणीमानाचा खर्च किंवा अर्थव्यवस्था हाताळण्याच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत.' अशी टीका ट्रम्प यांच्यावर विरोधी पक्षाने केली होती. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जवळजवळ एक तृतीयांश रिपब्लिकन पक्षातलेच सिनेटर याविषयी सहमत झाले होते.आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये महागाई लक्ष्य किंमतीतील ३% असली तरी परंतु अन्न स्वस्त झालेले नाही. अन्नाच्या किंमतीत महागाई वाढतच आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉफी जवळजवळ १९% गोमांस आणि वासराचे मांस सुमारे १५% वाढले आहे, असे सरकारी आकडेवारीवरून दिसून आले आहे. अमेरिकेतील भारतीय किराणा दुकानांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. मसाल्यांच्या आणि आयात केलेल्या भारतीय पदार्थांच्या किमतीत सुमारे ३०% वाढ झाल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी दिली होती. याचा मागोवा घेत ट्रम्प यांनी हा मोठा निर्णय नाइलाजाने घेतला आहेभारतीय आंबा आणि डाळिंबाची अमेरिकेत निर्यात वाढवण्यासाठी अमेरिकेने घेतलेल्या उपाययोजनांबद्दल भारतानेही सरकारात्मकता व्यक्त केली आहे.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 5:10 pm

IND vs SA : पहिल्या कसोटीदरम्यान भारताचा हुकमी एक्का मैदानाबाहेर; नेमकं काय घडलं?

कोलकात्यातील ऐतिहासिक इडन गार्डन्स मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी अप्रतिम घडामोडी घडल्या. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला १५९ धावांवर रोखले, पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताला १८९ वर रोखले. यामुळे भारताला केवळ ३० धावांची आघाडी मिळाली. मात्र, सामन्यातील सर्वात मोठा धक्का भारताचा कर्णधार शुबमन गिलच्या […] The post IND vs SA : पहिल्या कसोटीदरम्यान भारताचा हुकमी एक्का मैदानाबाहेर; नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 5:09 pm

Rohini Acharya : बिहारच्या निकालानंतर लालू प्रसाद यादवांना दुसरा धक्का, मुलीची मोठी घोषणा

Rohini Acharya : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय जनता दलाला (आरजेडी) मोठा धक्का बसला असताना, आता पक्ष प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातच फूट पडली आहे. लालूंची छोटी मुलगी आणि तेजस्वी यादव यांची बहिणी रोहिणी आचार्य यांनी शनिवारी एक्सवर एक रहस्यमय पोस्ट करत राजकारण सोडण्याची आणि कुटुंबाशी सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा […] The post Rohini Acharya : बिहारच्या निकालानंतर लालू प्रसाद यादवांना दुसरा धक्का, मुलीची मोठी घोषणा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 5:01 pm

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने मोडला कपिल देव यांचा ‘हा’मोठा रेकॉर्ड

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्या दोन कारणांमुळे चर्चेत आहे. एकीकडे, तो आयपीएल २०२६ हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्स (CSK) सोडून राजस्थान रॉयल्स (RR) मध्ये सामील होत असल्यामुळे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका विरुद्ध कोलकात्यातील पहिल्या कसोटी सामन्यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४,००० धावा पूर्ण करून जगातील चौथा अष्टपैलू खेळाडू होण्याचा पराक्रम केला आहे. दुहेरी विक्रम : […] The post Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने मोडला कपिल देव यांचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 4:46 pm

BCCI Update on Shubman Gill Injury : गिलची प्रकृती चिंताजनक? ९ विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; BCCI ने काय खुलासा केला?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात रंगतदार टप्प्यात पोहोचला आहे. पहिल्या डावात भारताची फलंदाजी १८९ धावांवर आटोपली असून, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३० धावांची आघाडी मिळवली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव भारतीय गोलंदाजांनी प्रभावी प्रदर्शन करत केवळ १५९ धावांत गुंडाळला होता. त्यामुळे दोन्ही संघांच्या पहिल्या डावातील धावसंख्यांमध्ये मोठा फरक नसला तरी भारताने मिळवलेली आघाडी सामन्याच्या पुढील घडामोडींना महत्त्वाची ठरू शकते. आता सामन्यातील पुढील टप्प्यात दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावातील फलंदाजी कोणत्या दिशेने जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.https://prahaar.in/2025/11/15/pm-kisan-yojana-21th-installment-tsunami-of-victory-in-bihar-pm-modi-will-gift-11-crore-farmers-money-will-be-deposited-in-bank-accounts-on-this-day/शुभमन गिल दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट Update Shubman Gill has a neck spasm and is being monitored by the BCCI medical team. A decision on his participation today will be taken as per his progress.Updates ▶️ https://t.co/okTBo3qxVH #TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ivd9LVsvZj— BCCI (@BCCI) November 15, 2025कोलकाता टेस्टमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिल फलंदाजीदरम्यान दुखापत झाल्याने मैदान सोडावे लागले. गिलने केवळ तीन चेंडूत चार धावा केल्या. हार्मरच्या चेंडूला त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार लगावला, परंतु त्याच क्षणी त्याच्या मानेला तीव्र वेदना जाणवू लागल्या. स्थिती पाहून संघाचा फिजिओ तातडीने मैदानात दाखल झाला. मात्र उपचारानंतरही गिलला खेळ पुढे सुरू ठेवता आला नाही आणि त्यांना रिटायर्ड हर्ट घोषित करण्यात आले. ही घटना 35व्या षटकानंतरच्या ड्रिंक्स ब्रेकनंतर झाली. दुखापतीनंतर गिल पुन्हा फलंदाजीला येऊ शकतील अशी अपेक्षा होती, परंतु ते मैदानावर परतले नाहीत. परिणामी, नववी विकेट पडल्यानंतर भारताचा पहिला डाव संपुष्टात आला. गिलची अनुपस्थिती भारतीय डावावर आणि सामन्याच्या गतीवर परिणाम करणारी ठरली.गिल दुसऱ्या दिवशीही मैदानाबाहेरListen to the crowd’s roar when Shubman Gill was walking back to the pavilion and Rishabh Pant was coming to the crease.Respect is Earned not begged.pic.twitter.com/1omBSFsIgP— i (@arrestshubman) November 15, 2025कोलकाता टेस्टमध्ये भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर, दुसऱ्या दिवशीही मैदानावर परतू शकला नाही. गिलच्या अनुपस्थितीत संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी उपकर्णधार ऋषभ पंत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पंतला सामन्यादरम्यान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासोबत रणनीतीवर चर्चा करताना पाहण्यात आले. त्यामुळे गिल नसताना पंतच पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे मैदानावरील नेतृत्व करत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गिलच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या योजनेत बदल करावे लागले असून, त्याचा परिणाम सामन्याच्या प्रवाहावरही होताना दिसत आहे. भारतीय संघाला आगामी सत्रात गिल लवकर बरे होण्याची आशा आहे.गिलच्या फिटनेसवर बीसीसीआयचे अपडेटकोलकाता टेस्टमधून शुभमन गिल मैदानाबाहेर गेल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत बीसीसीआयने अधिकृत अपडेट जाहीर केले आहे. बोर्डानुसार, गिलच्या मानेमध्ये अचानक झालेल्या तीव्र आकडीमुळे त्यांना पुढील खेळातून तात्पुरते दूर रहावे लागले आहे. बीसीसीआयने सांगितले की, वैद्यकीय टीम गिलच्या स्थितीवर सतत लक्ष ठेवून उपचार करत आहे. त्यांचा पुनरागमनाचा निर्णय पूर्णपणे त्यांच्या रिकव्हरीच्या गतीवर अवलंबून असेल. त्यामुळे ते पुढील खेळासाठी उपलब्ध असतील की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या अनुपस्थितीमुळे भारताच्या नेतृत्व आणि फलंदाजी संयोजनावर परिणाम झाला असून, संघ व्यवस्थापन सावधपणे परिस्थितीचे मूल्यांकन करत आहे.के.एल. राहुलच्या सर्वाधिक धावाकोलकाता टेस्टच्या पहिल्या डावात भारताचा फलंदाजी क्रम संघर्ष करत असताना के.एल. राहुलने सर्वाधिक ३९ धावांचे योगदान देत संघाला स्थैर्य मिळवून दिले. त्यांच्या सोबत वाशिंगटन सुंदरने २९ धावा करत महत्त्वपूर्ण खेळी बजावली. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली, ज्यामुळे भारताच्या डावाला थोडा आधार मिळाला. याशिवाय ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २७ धावा, तर अक्षर पटेल आणि ध्रुव जुरेल यांनी १४-१४ धावा करून संघाची धावसंख्या पुढे नेली. यशस्वी जैस्वालने १२, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी १ धावा केल्या, तर जसप्रीत बुमराह नाबाद १ धावांवर राहिला. कर्णधार शुभमन गिलने फक्त ४ धावा केल्यानंतर मान दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट व्हावे लागले, ज्याचा भारतीय डावावर परिणाम झाला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. सायमन हार्मरने ४ विकेट्स घेत भारतीय फलंदाजांना मोठा फटका दिला. मार्को जानसेनने ३, तर केशव महाराज आणि कॉर्बिन बॉश यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली. भारताची धावसंख्या मोठी नसली तरी काही लहान, पण महत्त्वाच्या भागीदाऱ्यांमुळे टीम इंडियाने स्पर्धात्मक स्कोर उभा केला.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 4:10 pm

Delhi Crime : धक्कादायक! चालत्या गाडीत विवाहित प्रेयसीची क्रूर हत्या; थेट शीर कापले, मृतदेह नाल्यात फेकला अन्...

दिल्ली : नोएडामध्ये घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण परिसर तसेच पोलीस प्रशासनाला हादरवून सोडले आहे. स्थानिक नाल्यात एका महिलेसोबत झालेली अत्यंत क्रूर वागणूक दिसून आली तिचा मुंडकाविहीन मृतदेह पोलिसांना आढळून आला. महिलेच्या कुटुंबीयांनी आई हरवल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली होती. तक्रारीनंतर सुरू झालेल्या तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती मिळू लागली. तपासात स्पष्ट झाले की मृत महिला आणि संशयित आरोपी दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. दोघांचेही स्वतंत्रपणे लग्न झालेले होते, तरीसुद्धा त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या नात्यातून वाढत गेलेल्या तणावामुळे आरोपीने टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांच्या तपासानुसार, आरोपीने चालत्या गाडीत महिलेची हत्या केली आणि नंतर मृतदेह नाल्यात फेकून दिला. प्राथमिक तपासात असेही दिसून आले की कंपनीत काम करत असताना आरोपीला काही त्रास जाणवू लागला होता, ज्यातून त्याने ही हत्या करण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता तपासली जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.https://prahaar.in/2025/11/15/pm-kisan-yojana-21th-installment-tsunami-of-victory-in-bihar-pm-modi-will-gift-11-crore-farmers-money-will-be-deposited-in-bank-accounts-on-this-day/नोएडामध्ये प्रेयसीची क्रूर हत्या करण्यामागचं कारण ?नोएडामध्ये घडलेल्या क्रूर हत्याकांडात आरोपी मोनू सोलंकी याचे नाव समोर आले आहे. मोनू याला पाच मुले आहेत, त्यातील दोन मुली या प्रेयसीच्या आहेत.पोलिसांच्या तपासात असे स्पष्ट झाले की, मृत महिलेचे पूर्वी दोन विवाह झाले होते, आणि तिचे दोन्ही पतींनी तिला सोडून दिले होते. मोनूने तिच्याशी लग्न केले होते, मात्र नंतर दोघांमध्ये संबंध गडबडले. तपासात समोर आले आहे की मृत महिलेने मोनू याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली, तसेच मुलींकडून अनैतिक कृत्य करून घेण्याची धमकी दिली. यामुळे मोनूने आपल्या प्रेयसीची हत्या करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांच्या माहितीनुसार, मोनूने ही हत्या ५ नोव्हेंबर रोजी एका चालत्या बसमध्ये केली. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण केले आहे आणि पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.मोनू सोलंकीने बसमध्ये अंधार करून प्रेयसीचा मृतदेह...नोएडामध्ये घडलेल्या भयानक हत्याकांडात आरोपी मोनू सोलंकी याने आपल्या प्रेयसीचा मृतदेह एका धार्मिक संस्थेच्या बसमध्ये नेला. पोलिसांच्या माहितीनुसार, मोनूने बसमध्ये लाइट बंद करून अंधारात बस चालवली. मोनूने प्रेयसीचा मुंडक छाटून हत्या केली आणि नंतर मृतदेह एका नाल्यात फेकला. मृत महिलेच्या आईने घरात पोहोचलेली नाही याची तक्रार मुलींनी पोलिसांकडे केली. त्यानंतर मोनूचा शोध सुरू झाला. आरोपी काही दिवस घरी न दिसल्यामुळे पोलीस त्याला पकडू शकले नाहीत. अखेरीस एके दिवशी मोनू घरी आला आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस तपासात मोनूने धक्कादायक खुलासे केले. त्याने सांगितले की प्रेयसी त्याला ब्लॅकमेल करत होती, त्यामुळे तो कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले. तपासात गाझियाबादच्या सिद्धार्थ विहारजवळ आरोपीकडून महिलेची मान, दोन्ही हात, कपडे आणि धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. मोनूला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 4:10 pm

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का ; तब्बल 55 शाखाध्यक्ष अन् पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे

मुंबई : निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. राज्यात काही ठिकाणी या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार आहेत, काही ठिकाणी स्थानिक समिकरण लक्षात घेऊन युती आघाडीचा निर्णय घेतला जाणार आहे. तर काही ठिकाणी पक्षांनी स्वबळावर ही निवडणूक लढवण्याची […] The post एकनाथ शिंदेंना मोठा धक्का ; तब्बल 55 शाखाध्यक्ष अन् पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 4:09 pm

IPL Trade 2026 : आयपीएल 2026 साठी ‘या’खेळाडूंचे झाले ट्रेडिंग; कोणता खेळाडू कोणत्या टीमकडून खेळणार?

आयपीएल 2026 सीजनसाठी खेळाडू रिटेन्शनची शेवटची तारीख आज संपली. ट्रेड विंडोमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात मोठी डील झाली, ज्यात रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांचा समावेश आहे. याशिवाय सॅम करन, मोहम्मद शमी, मयंक मार्कंडेय, अर्जुन तेंडुलकर, नितीश राणा आणि डोनोवन फरेरा यांसारख्या खेळाडूंचे ट्रेड झाले. यामुळे संघांच्या ताकदीत बदल होणार […] The post IPL Trade 2026 : आयपीएल 2026 साठी ‘या’ खेळाडूंचे झाले ट्रेडिंग; कोणता खेळाडू कोणत्या टीमकडून खेळणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 4:03 pm

भाजपची मोठी कारवाई..! आमदार, माजी केंद्रीय मंत्र्यांसह तिघे पक्षातून निलंबित

Bihar Politics : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या दणदणीत यशानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपने कठोर पावलं उचलली आहेत. पक्षाने माजी केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्यासह आमदार अशोक अग्रवाल आणि उषा अग्रवाल या तिघांना ६ वर्षांसाठी निलंबित केलं आहे. पक्षविरोधी भूमिका आणि शिस्तभंगाच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. आर.के. सिंह नुकतेच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले […] The post भाजपची मोठी कारवाई..! आमदार, माजी केंद्रीय मंत्र्यांसह तिघे पक्षातून निलंबित appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 3:45 pm

“अरे, तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन…”रोहित शेट्टी पापाराझींवर वैतागला

Rohit Shetty | बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. मात्र त्यापूर्वीच त्यांच्या निधनाच्या बातम्या पसरल्याने त्यांच्या कुटुंबाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. याचदरम्यान आता दिग्दर्शक रोहित शेट्टी याने धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत पापाराझींवर संताप व्यक्त केला. रोहित शेट्टी ‘बिग बॉस १९’ च्या सेटवर गेला […] The post “अरे, तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन…” रोहित शेट्टी पापाराझींवर वैतागला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 3:23 pm

अजय देवगणच्या ‘दे दे प्यार दे 2’चित्रपटाची पहिल्याच दिवशी मोठी कमाई

De De Pyaar De 2 Collection | अभिनेता अजय देवगणच्या ‘दे दे प्यार दे 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. चित्रपटातील अजय देवगणचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे. तसेच अजय आणि रकुलची केमिस्ट्री खूपच भन्नाट आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, अजय देवगण आणि रकुल […] The post अजय देवगणच्या ‘दे दे प्यार दे 2’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी मोठी कमाई appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 3:02 pm

प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! बिग बजेट फौजी चित्रपटातील फर्स्ट लूक रिव्हील

Prabhas : पुष्पा द राईज आणि पुष्पा द रुल सारखे अॅक्शनपट चित्रपट तयार करणारे मैत्री मूव्ही मेकर्स त्यांचा नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. हा चित्रपट दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या बहुप्रतिक्षित आगामी चित्रपटांपैकी एक असणार आहे. या चित्रपटाचे नाव फौजी असून, नुकताच चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. हा चित्रपट घोषणा केल्यापासूनच चर्चेत आहे, या चित्रपटामुळे […] The post प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! बिग बजेट फौजी चित्रपटातील फर्स्ट लूक रिव्हील appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 2:54 pm

“बिहारमध्ये १० हजार रुपयांच्या योजनेमुळे फायदा, निवडणूकीआधी अधिकृतपणे पैसे वाटणे…”; शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar | बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवत तब्बल २०२ जागा जिंकल्या आहेत. तर विरोधकांच्या महाआघाडीला फक्त ३५ जागांवरच समाधान मानावं लागलं. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत महाआघाडीला मोठा धक्का बसला. भाजप या निवडणुकीत मोठा पक्ष ठरला आहे. तर जेडीयू दुसरी सर्वात मोठी पार्टी ठरली आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. […] The post “बिहारमध्ये १० हजार रुपयांच्या योजनेमुळे फायदा, निवडणूकीआधी अधिकृतपणे पैसे वाटणे…”; शरद पवारांची प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 2:30 pm

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे महत्त्व देखील आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पन्न एकादशी म्हणतात. कारण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला भगवान विष्णूंच्या शरीरातून देवीचा जन्म झाला होता. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी १५ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजून ४९ मिनिटांनी सुरू होईल. तर दुसऱ्या दिवशी १६ नोव्हेंबरला पहाटे २ वाजून ३७ मिनिटांनी संपेल. उत्पन्न एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व पापांचे शुद्धीकरण होते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. त्याच बरोबर या दिवशी तुळशीशी संबंधित नियमांचे पालन करणे देखील आवश्यक आहे.एकादशीला तुळशीबद्दल पाळा हे नियमहिंदू धार्मिक श्रद्धेनुसार असे म्हटले जाते की तुळशीमाता एकादशीला भगवान विष्णूसाठी निर्जल व्रत करते. त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालू नये. जर तुम्ही या दिवशी तुळशीला पाणी अर्पण केल्यास तुळशी मातेचा उपवास मोडतो. महत्त्वाचे म्हणजे या दिवशी तुळशीची पाने तोडू नका. खराब किंवा अस्वच्छ हातांनी तुळशीला स्पर्श करू नका. या चुका केल्यास तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.उत्पन्ना एकादशी मागील पौराणिक कथासत्ययुगात नदीजंग नावाचा एक राक्षस होता, त्याच्या मुलाचे नाव मुर होते. पराक्रमी आणि बलवान राक्षस मुरने इंद्र, वरुण, यम, अग्नि, वायू, ईश, चंद्रमा, नैरुत इत्यादी स्थानांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करत स्वर्गीय जगाचा ताबा घेतला होता. यावेळी सर्व देव त्याच्यापासून बचाव करण्यासाठी पळत होते. भगवान विष्णूंनी यावेळी युद्धभूमीचा स्वीकार करत मुर राक्षसासोबत लढत दिली. असे म्हणतात की, मुर आणि विष्णू यांच्यामधील हे युद्ध १० हजार वर्षे चालू होते. भगवान विष्णू युद्ध करताना थकले आणि बद्रिकाश्रम गुहेत जाऊन विश्रांती घेऊ लागले. राक्षस मुरही विष्णूचा पाठलाग करत तिथे पोहोचला. यावेळी भगवान विष्णूंच्या शरीरातून तेजस्वी रूप असलेली देवी जन्माला आली. या देवीने मुर राक्षसाचा वध केला. दैत्याचा नायनाट झाल्यामुळे भगवान विष्णूंनी देवीला वर दिला. देवीचा जन्म एकादशी तिथीला झाल्यामुळे उत्पन्ना एकादशी असे नाव ठेवण्यात आले.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 2:30 pm

प्रेमासाठी काहीपण! धनुष अन् क्रितीचा ‘तेरे इश्क में’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Tere Ishk Mein Trailer : धनुष आणि क्रिती सॅनन यांची मुख्य भूमिका असलेला ‘तेरे इश्क में’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची बरीच चर्चा सुरू होती. अखेर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या वर्षात सैय्यारा चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर धुमाकूळ घातला. एका विक्रमी आकड्याची कमाई केली चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर केली. हा चित्रपट […] The post प्रेमासाठी काहीपण! धनुष अन् क्रितीचा ‘तेरे इश्क में’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 1:32 pm

itel A90 Limited Edition Smartphone Launch: स्वस्तात मस्त? आयटेलकडून १२८ जीबी स्‍टोरेजसह ए९० लिमिटेड एडिशन लाँच

स्मार्टफोनची किंमत फक्‍त ७२९९ रूपये तेही १२८ जीबी स्‍टोरेजसह बाजारात उपलब्धमुंबई:आयटेलने नुकतेच लाँच करण्‍यात आलेल्‍या ए९० लिमिटेड एडिशनमधील अपग्रेड ए९० लिमिटेड एडिशनच्‍या १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टच्‍या लाँचची घोषणा केली आहे. नव्या स्मार्टफोनमध्ये ९० लिमिटेड एडिशन १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टमध्‍ये अधिक स्‍टोरेज, आकर्षक डिझाइन व मिलिटरी-ग्रेड डिस्प्ले सिक्युरिटी दिली गेली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे ‌.या मिलिटरी ग्रेड डिस्प्ले सिक्युरिटीसह, टिकाऊपणा हे आवश्यक फिचर्स म्हणून अत्यावश्यक असताना, 'डिवाईस आयटेलच्‍या ३पी वचनासह येतो जेथे धूळ, पाणी आणि नकळतपणे जमिनीवर पडल्‍यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देतो. ए९० स्‍मार्टफोन आयपी५४ प्रमाणित संरक्षणासह डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍यामुळे पाणी, धूळ आणि नकळतपणे खाली पडल्‍यामुळे होणाऱ्या नुकसानापासून अधिक संरक्षण मिळते. किंमत फक्‍त ७२९९ रूपये असलेला हा डिवाईस भारतभरातील रिटेल स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध आहे. या डिवाईससोबत १०० दिवसांच्‍या आत मोफत स्क्रिन रिप्‍लेसमेंट सेवा देखील मिळते, ज्‍यामधून भारतात फक्‍त आयटेलकडून दिल्‍या जाणाऱ्या अद्वितीय विश्वसनीयतेची खात्री मिळते.' असे कंपनीने नेमक्या शब्दात म्हटले आहे.या अपग्रेडमध्ये काय नवीन फिचर ?१२८ जीबी स्‍टोरेज, ज्‍यामुळे वापरकर्ते स्‍टोरेज क्षमतेबाबत चिंता न करता दैनंदिन क्षणांना कॅप्‍चर व सेव्‍ह करू शकतात. १२ जीबी (४ जीबी + ८ जीबी*) रॅम असलेला हा डिवाईस सोशल मीडियामध्‍ये बदल करायचा असो मनोरंजनाचा आनंद घ्‍यायचा असो किंवा चालता-फिरता कामाची हाताळणी करायची असो सुलभ मल्‍टीटास्किंग शक्यडिझाइनसंदर्भात ए९० लिमिटेड एडिशन १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टमध्‍ये मॅक्‍स डिझाइन कायम ठेवण्‍यात आल्याचे कंपनीने निवेदनात स्पष्ट केल आहे.स्‍मार्टफोन एमआयएल-एसटीडी-८१०एच मिलिटरी-ग्रेड प्रमाणन आणि आयपी५४ रेटिंगसह डिझाइन धूळरोधक, जलरोधक असण्‍यासोबत नकळतपणे जमिनीवर पडल्‍यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देणारआयटेल ए९० लिमिटेड एडिशनचे प्रमुख वैशिष्ट्ये -६.६-इंच ९० हर्टझ एचडी+ डिस्‍प्‍ले आणि डीटीएस साऊंड टेक्‍नोलॉजी, जे आकर्षक रंगसंगती, सुस्‍पष्‍टता व आकर्षक व्हिज्‍युअल्‍ससह उत्‍साहपूर्ण अनुभव देण्‍यासाठी डिझाइनऑल्‍वेज-ऑन डिस्‍प्‍ले आणि सर्वोत्तम डायनॅमिक बार वापरकर्त्‍यांना विनाव्‍यत्‍यय बॅटरी स्थिती दिसणारकॉल्‍स, नोटिफिकेशन्‍स अशा महत्त्वपूर्ण घटकांसह कनेक्‍टेड राहण्‍याची खात्रीफोटोग्राफीप्रेमी १३ मेगापिक्‍सल रिअर कॅमेराचा आनंद घेऊ शकतील. प्रगत इमेज प्रोसेसिंग आणि नवीन स्‍लाइडिंग झूम बटन आहे, ज्‍यामुळे उत्‍साहपूर्ण क्षण सहजपणे कॅप्‍चर करता येऊ शकतात.नवीन स्‍लाइडिंग झूम बटन त्‍वरित एका हाताने झूम करण्‍याची आणि त्‍वरित स्‍नॅपशॉट्स कॅप्‍चर करण्‍याची सुविधा ज्‍यामुळे परिपूर्ण फोटोज कधीच न चुकण्‍याची खात्रीइतर फिचर-आयटेलचे एआय वॉईस असिस्‍टण्‍ट आणि डायनॅमिक बार नेव्हिगेशन व मल्‍टीटास्किंग सोपे करतात, तर डीटीएस साऊंड तंत्रज्ञान ऑडियोसह उपलब्ध

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 1:30 pm

Gond Laddu: थंडीतील सुपरफूड! डिंकाचे खास लाडू…या पद्धतीने बनवा पौष्टिक आणि स्वादिष्ट लाडू

Gond Laddu: हिवाळा सुरु होताच आपल्या आहारात अशा काही पदार्थांची गरज भासते, जे शरीराला उष्णता, ताकद आणि रोगप्रतिकारशक्ती देतात. आपल्या आजी-नानी थंडीच्या दिवसांत बनवणाऱ्या पारंपरिक पदार्थांमध्ये डिंकाचे लाडू हा सर्वात पौष्टिक आणि ऊर्जा देणारा पदार्थ आहे. डिंकाचे लाडू फक्त चविष्टच नाहीत तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानले जातात. चला तर पाहूया डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे आणि […] The post Gond Laddu: थंडीतील सुपरफूड! डिंकाचे खास लाडू… या पद्धतीने बनवा पौष्टिक आणि स्वादिष्ट लाडू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 1:28 pm

अक्षय कुमारच्या ‘हैवान’चित्रपटात साऊथ सुपरस्टारची एन्ट्री; चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

Haiwan Film | अभिनेता अक्षय कुमार आणि सैफ अली खान मुख्यभूमिकेत असलेल्या ‘हैवान’ चित्रपटाची अपडेट समोर आली आहे. यात आता मल्याळम चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार काम करणार आहे. ‘हैवान’ चित्रपटात साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांची एन्ट्री होणार आहे. मोहनलाल यांनी ‘हैवान’च्या शूटिंगला सुरुवात केली असून, याबद्दलची माहिती दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी सोशल मीडियावर दिली आहे. प्रियदर्शन यांनी आपल्या इंस्टाग्राम […] The post अक्षय कुमारच्या ‘हैवान’ चित्रपटात साऊथ सुपरस्टारची एन्ट्री; चाहत्यांनी व्यक्त केला आनंद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 1:15 pm

सेबीच्या गोट्यात मोठी घडामोड: गुंतवणूकदारांचे हित 'सर्वोपरी'सेबीच्या १७ तारखेच्या बैठकीत 'कॉफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट'फेरबदलाला अंतिम मोहोर?

१७ तारखेच्या बैठकीत कॉफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट फेरबदलात अंतिम मोहोर लागणार?मोहित सोमण: सेबीच्या गोटातून मोठी घडामोड समोर येत आहे. प्रामुख्याने २००८ पासून काही प्रमाणात कमतरता असलेल्या सेबीचा कोड ऑफ कंडक्ट मधील (कॉफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ऑफर फॉर मेंबर २००८) या कायद्यात काही फेरबदल करण्यासाठी सेबी गांभीर्याने विचार करत आहे. १० तारखेच्या बैठकीत हा नवा प्रस्ताव सेबी अध्यक्ष तुहीन कांता पांडे यांच्याकडे सादर करण्यात आला. माहितीप्रमाणे, सेबी १७ तारखेच्या बैठकीत यावर महत्वपूर्ण निर्णय घेणार आहे.एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सेबीच्या अंतर्गत अभ्यासात पारदर्शकतेची त्रुटी आढळून आली आहे. गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी व पारदर्शकतेसाठी या कायद्यात बदल करण्याची आवश्यकता सेबीला वाटते. गुंतवणूकदार व नागरिकांसाठी महत्वाच्या पदांवर असणाऱ्या व्यक्तींसाठी, तसेच अधिकारी वर्गासाठी, बाजारातील जबाबदार पदावर असणाऱ्यांसाठी, कंपनीच्या संचालकांनी, व उद्योगपती व उद्योग क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्त्व यांना असलेला न्याय सदस्यांसाठी असलेला न्याय यात समानता असावी तसेच विश्लेषक अथवा कंपन्यानी गुंतवणूकदारांना काही शिफारशी करण्यापूर्वी पदांचा गैरवापर करून शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यावर कडक प्रतिबंध घालण्यासाठी सेबी कठोर कायदा करू शकते.गुंतवणूकदारांचे हित 'सर्वोपरी' असून पदावरील व्यक्तीसाठी आपल्या संपूर्ण माहितीत (डिस्क्लोजर रिकवायरमेंट) पारदर्शकता आणण्यासाठी सेबी नवीन फेरबदल करेल. नवीन नैतिक फ्रेमवर्क लागू करण्यासाठी सेबी विशेष प्रयत्न करणार आहे. तसेच जबाबदार पदावरील व्यक्ती अथवा त्यांचे नातेवाईक यांचे हितसंबंध जपताना सामान्य गुंतवणूकदारांच्या हिताला तडा जाऊ नये तसेच आपल्या पदाचा गैरवापर करण्यापासून रोखण्यासाठी सेबीकडून कायदे केले जाऊ शकतात. याशिवाय कंपनीच्या संचालक व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आपली संपत्ती व स्थावर मालमत्ता ही नव्या नियमानुसार उघड करावी लागू शकते. याखेरीज अनुपालनात (Compliance) मध्ये बदल होऊ शकतात. ९८ पानी अहवालात अनेक बदल सेबीकडून सुचवण्यात आले आहे ज्यावर सेबी अध्यक्षांची मोहोर लागणे बाकी आहे ‌ माहितीनुसार यापूर्वी मार्च महिन्यात यावर सेबीची प्रदीर्घ बैठक झाली होती. हे फेरबदल प्रस्तावित आचारसंहिता आणि अनुपालन कार्यालय (OEC) आणि आचारसंहिता आणि अनुपालन देखरेख समिती (OCEC) यांना सादर केले जातील.१० नोव्हेंबर रोजी पांडे यांना आपला अहवाल सादर करणाऱ्या पॅनेलने सेबी अधिकाऱ्यांसाठी प्रशासन, प्रकटीकरण आणि नैतिक मानके मजबूत करण्याच्या उद्देशाने अनेक सुधारणा प्रस्तावित केल्या. प्रमुख शिफारसींमध्ये सेबीचे अध्यक्ष, पूर्णवेळ सदस्य आणि मुख्य महाव्यवस्थापक व संबंधित अधिकाऱ्यांनी मालमत्ता आणि दायित्वांची सार्वजनिक घोषणा तसेच महागड्या भेटवस्तूंवर बंदी; निवृत्तीनंतरच्या कामांवर दोन वर्षांचे निर्बंध आणि मुख्य नीतिमत्ता आणि अनुपालन अधिकारी (CECO) पदाची निर्मिती यांचा समावेशही फेरबदल सुचवले आहेत.पॅनेलने आर्थिक, संबंधात्मक, व्यावसायिक, कर्तव्याशी संबंधित आणि कथित संघर्षांचा समावेश असलेल्या हितसंबंधांच्या संघर्षांचे तपशीलवार वर्गीकरण सादर केले आणि सर्व सेबी बोर्ड सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी मालमत्ता, दायित्वे, व्यापारी हितसंबंध, कौटुंबिक संबंध आणि इतर व्यावसायिक हितसंबंधांचे प्रारंभिक, वार्षिक, कार्यक्रम. आधारित आणि निर्गमन (Discourse) सादर करण्याची शिफारस केली.समितीने नैतिक आचरणावर भर देणारे आणि हितसंबंधांच्या संघर्षांसाठी 'झिरो टॉलरन्स' तत्व अवलंबली जाईल असे म्हटले यापूर्वी सेबी अध्यक्षांनी वेळोवेळी मार्केट ऑपरेशनमध्ये गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.तत्पूर्वी सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावरील आरोपांनंतर मार्चमध्ये पुनरावलोकन सुरू करण्यात आले होते, ज्यांच्यावर हितसंबंधांच्या संभाव्य संघर्षामुळे अदानी समूहाची चौकशी रोखल्याचा आरोप होता बुच आणि अदानी समूह दोघांनीही हे दावे नाकारले होते.हितसंबंधांच्या संघर्ष, प्रकटीकरण (Disclosure) आणि संबंधित ९८ पानांच्या अहवालात पॅनेलने नमूद केले आहे की ,'या सुधारणांचा अवलंब केल्याने सेबी आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींशी सुसंगत होईल, तिचे स्वातंत्र्य आणि अखंडता मजबूत होईल आणि भारताच्या भांडवली बाजार नियामकावरील जनतेचा विश्वास वाढेल'

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 1:10 pm

'मी कट्टर भाजप समर्थक', गंधार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे विधान चर्चेत!

ठाणे: बालदिनाचे औचित्य साधून प्रख्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निवेदिता सराफ यांना हा पुरस्कार त्यांचे पती आणि पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी, मनोगत व्यक्त करताना 'मी कट्टर भाजप समर्थक' असल्याने बिहार मधील भाजपाच्या विजयचा आनंद झाल्याचे निवेदिता सराफ म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या की, आजचा हा क्षण माझ्यासाठी खूपच भावनिक आहे. मी खरंच मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. ज्यांच्याकडून पुरस्कार मिळाला ती व्यक्ती माझे गुरु, माझे पती, आज मी जी काही आहे, ती फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आहे. त्यांच्या हस्ते तुम्ही मला हा पुरस्कार दिलात, हे तुम्हाला सुचलं त्यासाठी मनःपूर्वक आभार. पुढे त्या म्हणाल्या, बिहारबद्दल खूप खूप अभिनंदन, मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच अभिमान वाटत आहे.https://prahaar.in/2025/11/15/bjp-tops-in-bihar-bjp-is-in-power-in-13-states-including-maharashtra-know-the-details/बालनाट्याबाबत सांगताना निवेदिता सराफ म्हणाल्या, माझ्या आयुष्याची सुरुवात बालनाट्यातून झाली. सुधा करमरकर यांच्या बालनाट्यातून मी कामाला सुरुवात केली. सुधाताईंनी स्टेजवर उभं राहायला शिकवलं. सगळेच क्रिकेटच्या शिबिराला गेल्यावर सचिन तेंडुलकर बनत नाहीत, आणि सगळेच गाणं शिकायला लागल्यावर सोनू निगम बनत नाहीत. पण चांगले श्रोते-प्रेक्षक बनतात. यामुळे तुमचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी मदत होते.गंधार बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यावर्षी गंधार गौरव पुरस्काराचे दहावे वर्षे होते. हा पुरस्कार सोहळा शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडला असून यावर्षी या पुरस्काराच्या मानकरी अभिनेत्री निवेदिता सराफ ठरल्या. या पुरस्कारावेळी व्यासपीठावर आमदार संजय केळकर, लेखक अभिजित पानसे, अभिनेते विजय पाटकर, राज्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ढवळ, दिग्दर्शक निर्माते मंगेश देसाई, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, विलास ठुसे, गंधारचे संस्थापक मंदार टिल्लू यांचीउपस्थितीहोती.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 1:10 pm

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर अधिकृत झाली आहे. राजस्थानचा कर्णधार आणि महत्त्वाचा खेळाडू संजू सॅमसन आता १८ कोटी रुपयांच्या करारासह चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. त्याच्या बदल्यात गेली अनेक वर्षे सीएसकेचा आधारस्तंभ असलेला रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे.मात्र जडेजासाठी ही डील काहीशी घाट्यात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. कारण चेन्नईने गट हंगामात त्याला १८ कोटींमध्ये रिटेन केलं होतं, पण राजस्थानकडून त्याला आता फक्त १४ कोटी रुपयांचा करार मिळणार आहे. पगार घटल्यानंतर तो राजस्थानचा नेतृत्वभार स्वीकारणार का?, हा प्रश्न सर्वांच्या उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.जडेजाचा राजस्थानशी जुना संबंधही खास आहे. २००८ च्या पहिल्या आयपीएल हंगामात त्याने याच फ्रेंचाईजीकडून पदार्पण केलं होतं. त्यानंतर तब्बल १२ हंगाम तो सीएसकेच्या रंगात झळकला आणि आता पुन्हा आपल्या पहिल्या संघाकडे परत येतो आहे. जडेजाने आतापर्यंत आयपीएलमध्ये २५४ सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे.दुसरीकडे, संजू सॅमसनसाठी हा मोठा टप्पा ठरणार आहे. राजस्थानचा मुख्य खेळाडू आणि कर्णधार असलेल्या संजूनं १७७ आयपीएल सामने खेळले आहेत. आता तो १८ कोटींचा करार घेऊन पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीत उतरतो आहे. आयपीएलमध्ये हा त्याचा तिसरा फ्रेंचाईजी अनुभव असेल. राजस्थानशिवाय तो २०१६ आणि २०१७ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठीही खेळला होता.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 1:10 pm

बिहार निवडणूक निकालानंतर काँग्रेसचा मोठा निर्णय! MVA मधील मित्रपक्षांनाच धक्का, मुंबईतील बैठकीत थेट घोषणा

Mumbai Municipality : नुकत्याच बिहार विधानसभेच्या निकालाने भाजपला मोठे यश मिळवून दिले असून त्यांचे बळ आता वाढले आहे. भाजपने बिहार विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री नीतीशकुमार यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार एनडीए म्हणून निवडणूक लढवली गेली. दुसरीकडे महागंठबंधनची निवडणुकीतील निकालाने दाणादाण उडवून दिली. काँग्रेसला बोटांवर मोजण्याइतक्याच म्हणजेच ६ जागा मिळवता आल्या. राजदचे तेजस्वी यादव […] The post बिहार निवडणूक निकालानंतर काँग्रेसचा मोठा निर्णय! MVA मधील मित्रपक्षांनाच धक्का, मुंबईतील बैठकीत थेट घोषणा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 12:56 pm

शिंदेसेनेतील आमदाराच्या जावयाला बिहारने नाकारलं; खाकी सोडून राजकारणात एन्ट्री घेताच पदरी पडली निराशा

Shivdeep Lande | ‘बिहारचे सिंघम’ अशी ओळख असलेले धडाडीचे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे बिहार विधानसभा निवडणुकीत उतरले होते. त्यांनी अररिया आणि जमालपूर या दोन विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. मात्र या मतदार संघात त्यांचा पराभव झाला आहे. २०२४ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी राजकारणात एन्ट्री केली आणि ‘हिंद सेना’ या राजकीय पक्षाची स्थापनाही केली. […] The post शिंदेसेनेतील आमदाराच्या जावयाला बिहारने नाकारलं; खाकी सोडून राजकारणात एन्ट्री घेताच पदरी पडली निराशा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 12:21 pm

Nowgam Police Station Blast : चार दिवसांत देशाला दुहेरी धक्का! श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशन स्फोटाचे नेमकं कारण काय?

श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी i-२० कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या घटनेने राजधानीतील सुरक्षेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. या घडामोडींच्या केवळ चार दिवसानंतर, शनिवारी जम्मू आणि काश्मीरमधील एका पोलीस ठाण्यातही मोठा स्फोट झाला. या हल्ल्यात ९ जणांचा मृत्यू झाला आणि काहीजण गंभीर जखमी झाले. सध्या एका दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याने, ही घटना मानवी चूक होती की दहशतवादी हल्ला, असा प्रश्न प्रचलित झाला आहे. सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तपास करत आहेत आणि संबंधित घटकांवर कडक कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे.श्रीनगरच्या नौगाम पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 12:10 pm

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थानभाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागातमुंबई (सचिन धानजी)मुंबईतील ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील भांडुप विधानसभा क्षेत्र हे मनसे आणि उबाठा शिवसेनेचा गड मानला जात असला तरी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार अशोक पाटील यांनी विजय मिळवत हे अंदाज खाेटे ठरवले. त्यामुळे आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या वाट्याला सात पैंकी ३ प्रभाग जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेच्यावतीने प्रभाग ११३, प्रभाग ११४ आणि प्रभाग ११५ या मतदार संघांमध्ये दावा केला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या विधानसभेत भाजपाची नगरसेविका असलेल्या प्रभाग ११२ मध्ये विद्यमान खासदार संजय पाटील यांच्या कन्येला निवडणूक रिंगणात उतरवतात की शिवसेनेचे उमेदवार माने आणि ज्यावर मनसेचा दावा आहे त्या प्रभाग क्रमांक ११५मधून उमेदवारी मिळवून घेतात याकडे भांडुपकरांचे लक्ष आहे.भांडुप विधानसभेत भाजपाचा दोन नगरसेविका निवउून आल्या होत्या, तर चार प्रभागांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक होते. त्यातील एक नगरसेवक शिवसेनेत गेले असून उर्वरीत तीन नगरसेवक हे उबाठाकडे आहेत. तर एक नगरसेविका काँग्रेसची आहे. त्यामुळे या विधानसभेत सात पैंकी तीन नगरसेवक हे शिवसेना आणि भाजपाकडे आहेत. तर चार नगरसेवक हे उबाठा आणि काँग्रेसचे आहेत. यातील प्रभाग क्रमांक १०९ हा मागील चार निवडणुकीत प्रथमच खुला झाला आहे. त्यामुळे या विधानसभेत एकमेव हा प्रभाग असल्याने विद्यमान नगरसेविका दिपाली गोसावी यांचा दावा असेला तरीमाजी आमदार रमेश कोरगावकर यांचे पुनर्वसन या प्रभागात होवू शकते. तर प्रभाग क्रमांक ११०हा चार निवडणुकीत तिसऱ्यांदा महिला आरक्षित आहे. या प्रभाग मागील चार ते पाच निवडणुकीत कोपकर कुटुंंबाकडेच राहिलेला आह. त्यामुळे कधी सुरेश कोपरकर तर कधी आशा कोपरकर या निवडून येत आहेत.प्रभाग क्रमांक ११२ हा सलग दुसऱ्यांदा महिला आरक्षित झाला आहे. यापूर्वी हा प्रभाग ओबीसी आणि अनुसूचित जाती महिला यासाठी राखीव होता. याप्रभागांत विद्यमान नगरसेविका साक्षी दळवी यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता असून या मतदार संघात विद्यमान खासदार संजय पाटील हे आपली कन्या राजुल पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. हा प्रभाग पाटील यांच्यासाठी अनुकूल असला तरी याठिकाणी भाजपाची पक्के मतदार असल्याने पाटील याठिकाणी धोका पत्करणार नाही असेही बोलले जात आहे.प्रभाग क्रमांक ११३ हा प्रभाग ओबीसी झाला असला तरी मागील निवडणुकीत तो महिला होता आणि त्याआधीच्या दोन निवडणुकीत हा प्रभाग खुला होता. पण विद्यमान नगरसेविका दीपमाला बढे या ओबीसी असल्याने त्यांचा पहिला दावा असेल. पण माजी आमदार रमेश कोरगावकर यांचाही दावा असेल. तर या प्रभागात विद्यमान आमदार अशोक पाटील हे आपल्या पुत्राला रुपेशला निवडणूक रिंगणात उतरवू शकतात,असे बोलले जात आहे. परंतु या प्रभागात मनसेचा दावा असेल असे बोलले जात आहे.प्रभाग क्रमांक ११४हा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने माजी आमदार व विद्यमान नगरसेवक रमेश कोरगावकर यांना दुसऱ्या प्रभागाचा शोध घ्यावा लागत आहे. या प्रभागावर मनसेचा पक्का दावा असेल. याठिकाणी मनसेकडून माजी नगरसेविका अनिषा माजगावकर यांची दावेदारी मानली जात आहे, तर शिवसेनेकडून सुप्रिय धुरत यांची इच्छुक उमेदवार म्हणून चर्चा आहे.प्रभाग क्रमांक ११५हा महिला आरक्षित झाला आहे. सलग दोन वेळा हा मतदार संघ खुला झाला होता. पण आता महिला आरक्षित झाल्याने विद्यमान आणि उबाठातून शिवसेनेत गेलेल्या उमेश माने यांना आपल्या कन्येला निवडणूक रिंगणात उतरवावे लागणार आहे. तसेच शिवसेनेची स्नेहा पाटकर ही सुध्दा इच्छुक आहेत. तर हा प्रभाग मनसेला सोडला जाण्याची शक्यता असून याठिकाणी माजी नगरसेविका वैष्णवी सरफरे आणि ज्योती राजभोज यांच्या नावाची चर्चा आहे.प्रभाग ११६ हा सलग दुसऱ्या महिला आरक्षित झाला आहे. यापूर्वी तो ओबीसी महिला आणि खुला प्रवर्ग झाला होता. या प्रभागात विद्यमान नगरसेविका जागृती पाटील यांना भाजपाकडून पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर उबाठाकडून विद्यमान शाखाप्रमुख उत्तेकर हे आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवू शकतात, तसेच काँग्रेसकडून प्रितम तुळसकर हेही आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवू शकतात अशी चर्चा आहे.संभाव्य इच्छुक नगरसेवकांची यादीप्रभाग १०९ (खुला)(दावा उबाठा, भाजपा)उबाठा : दिपाली गोसावी, रमेश कोरगावकर, सुरेश शिंदेप्रभाग ११० (महिला) (दावा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस)काँग्रेस : आशा कोपरकरमनसे : मोहन चिराथराष्ट्रवादी काँग्रेस : मनिषा तुपेप्रभाग ११२ (महिला) (दावा भाजपा, उबाठा)भाजपा : साक्षी दळवीउबाठा : राजुल पाटीलप्रभाग ११३(ओबीसी) (दावा उबाठा, शिवसेना)उबाठा : दीपमाला बढे, रमेश कोरगावकरशिवसेना : रुपेश पाटीलप्रभाग ११४ (महिला)(दावा मनसे, शिवसेना)मनसे : अनिषा माजगावकरशिवसेना : सुप्रिया धुरत, शिंदेप्रभाग ११५ (महिला) (दावा शिवसेना, मनसे)शिवसेना : वैष्णवी माने, स्नेहा पाटकरभाजपा : निकिता घाडिगावकरमनसे : वैष्णवी सरफरे. ज्योती राजभोगप्रभाग ११६ (महिला)(दावा भाजपा, उबाठा)भाजपा : जागृती पाटीलउबाठा: उत्तेकरकाँग्रेस : तुळसकर

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 12:10 pm

शेतकऱ्यांकरिता हवामान अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी बायरकडून 'अ‍ॅलिव्हिओ'लाँच हे अँप कसे फायदेशीर? शेतकऱ्यांना ही माहिती नक्की पोचवा....

मुंबई:भारतीय लघु शेतकरी अनियमित हवामान पद्धती, दीर्घ कोरडेपणा, वाढते तापमान, बदलणारे ऋतू आणि मुसळधार पावसाच्या धारेमुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे बायरने शाश्वत शेतीबरोबरच एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक शेतकऱ्यांसाठी नवीन अँप लाँच केले आहे त्यात शेतकऱ्यांना सल्ला, पर्जन्याचे व हवामानाचे संभाव्य धोके, तंत्रज्ञान प्रणित त्यावरील उपाय, शेतकऱ्यांचे विविध विषयांवरील उपाययोजन, तत्काळ समाधान अशा विविध श्रेणीतील समाधान त्या अँपवर मिळतील.तत्पूर्वी बायरच्या फार्मर व्हॉइस सर्व्हे काय सांगतो?इंडिया २०२४ मधील निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की १० पैकी ९ शेतकरी आधीच त्यांच्या शेतांवर हवामान बदलाचा नकारात्मक परिणाम अनुभवत आहेत. ७२% शेतकऱ्यांना कमी उत्पादनाची अपेक्षा आहे, ६२% शेतकऱ्यांना वाढत्या पीक अपयशाची अपेक्षा आहे आणि अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांना अलिकडच्या वर्षांत वारंवार दुष्काळ, उष्णतेच्या लाटा किंवा अतिवृष्टीची तक्रार आहे. अशा वेळी शेतकरी त्यांच्या उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी सक्रियपणे मार्ग शोधत आहेत.विमासारख्या आर्थिक जोखमेचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी विमा आवश्यक असले तसेच भविष्यातील प्रमुख गरजांमध्ये विम्याच्या समाविष्ट असला तरी डिजिटल आणि हवामान-आधारित उपायांमध्ये त्याहून अधिक समस्येत निदान काढणे आवश्यक आहे.अहवालातील माहितीनुसार, ५१% लोक चांगल्या डिजिटल तंत्रज्ञानाची उपलब्धता त्यांच्या शेतीसाठी सर्वात फायदेशीर मानतात, ज्यामुळे जोखमेपासून रक्षण आणि वेळेवर कृती, योग्य अंतर्दृष्टी एकत्रित करणाऱ्या नवी वाढती मागणीही वाढली आहे.तथापि, विम्याचे मूल्यांकन करूनही बरेच शेतकरी विद्यमान प्रणालींबद्दल अहवालातील निष्कर्षानुसार असमाधानी आहेत. एकूण शेतकरी समुहाचा प्रतिसाद पाहिल्यास विमा दाव्यांच्या वेळेबद्दल अनिश्चितता, देयक रकमेबद्दल स्पष्टतेचा अभाव आणि नुकसानभरपाई क्वचितच नुकसानाचे वास्तविक प्रमाण भरून काढते.जाणून घेऊयात या उत्पादनाबाबत -शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतीसाठी डिजिटल बुद्धिमत्तेला अँपमध्ये प्राधान्य -कंपनीने या समस्यावर उपाय प्रतिसाद म्हणून बायरने अ‍ॅलिव्हियो (स्पॅनिशमध्ये अर्थ 'आराम आहे) लाँच केला आहे. अ‍ॅलिव्हियोच्या मोबाइल अँप्लिकेशनद्वारे (App) एकात्मिक (Integrated) मूल्यवर्धित सेवा दिली जाणार आहे. पारंपारिक विमा उत्पादनांप्रमाणे, अ‍ॅलिव्हियो - विमा इकोसिस्टम आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) युनायटेड इंडिया इन्शुरन्सच्या सहकार्याने लाँच केले गेले.जागतिक परिस्थिती भूराजकीय परिस्थिती हवामान, उपलब्ध डेटा जाणून घेण्यासाठी हे पर्याय कंपनीच्या अँपमध्ये उपलब्ध असणार आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करताना शेतकऱ्यांसाठी बायरने उच्च-रिझोल्यूशन उपग्रह डेटा आणि प्रगत पीक मॉडेलिंग वापरत असल्याचे म्हटले आहे.माहितीनुसार, जेव्हा प्लॉट-आधारित कृषीविषयक ठोकताळे व हमीभावाला प्रोत्साहन देतात तेव्हा शेतकरी जवळच्या बायर चॅनेल भागीदारांकडे त्वरित परतावा मिळवू शकतात ज्यामुळे दर्जेदार बियाणे आणि पीक संरक्षण उत्पादनांची त्वरित उपलब्धता सुनिश्चित होते आणि पीक चक्रादरम्यान व्यत्यय टाळता येतो असे कंपनीने म्हटले.अ‍ॅलिविओ शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक संदर्भात सर्वात धोकादायक वाटणाऱ्या अचूक जोखमी ओळखतो आणि तो शेतकऱ्यांना पोहोचवतो.उदाहरणार्थ जसे की फुलांच्या दरम्यान दीर्घकाळ कोरडेपणा किंवा धान्य भरताना तीव्र उष्णता इत्यादी या गोष्टींचा पर्यायात समावेश असणार आहे.विशिष्ट असुरक्षिततेनुसार कव्हरेज तयार करून अ‍ॅलिविओ शेतकऱ्यांना तोंड देणाऱ्या आव्हानांशी थेट जोडली जाते असे कंपनीने यावेळी म्हटले.किरकोळ विक्रेत्यांना त्याच्या ऑपरेटिंग मॉडेलमध्ये एम्बेड करून, अ‍ॅलिविओ अनौपचारिक ट्रस्ट नेटवर्क्समध्ये प्रवेश करते ज्यावर शेतकरी इनपुट आणि सल्ल्यासाठी खरेदी करण्यासाठी अवलंबून असतात. हे विश्वसनीय चॅनेल शेतकऱ्यांना नवीन डिजिटल उत्पादन स्वीकारण्यास अधिक खुले करते आणि कृती करण्यापूर्वीच आधीच शेतीचे निर्णय घेतले जातात तिथे संभाव्य फायदे उपलब्ध आहेत याची खात्री करते. ते पारंपारिक विम्यात पेमेंट पात्रता आणि शेतकरी जागरूकता यांच्यातील पारदर्शकता अंतर देखील मोजमाप या अँपच्या माध्यमातून होते.डेटा आधारित संभाव्य मुद्दे (ट्रिगर्स)कसे असतील संभाव्य परिस्थितीत त्याचा शेतकऱ्यावर काय परिणाम होईल ते शेतकऱ्यांना ते नुकसानापासून संरक्षण देतील, केव्हा फायदे उचलले जाऊन शकतात हे अचूकपणे कळते असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना आधार मिळत त्यांची चिंता कमी होण्यास मदत होते.डेटापासून अंतर्दृष्टी आणि शेतकऱ्यांना मदत कशी झाली? कंपनीने काय म्हटले?उदाहरणार्थ पहिली अंमलबजावणी कर्नाटकातील दावणगेरे आणि महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील पावसावर अवलंबून असलेल्या मका उत्पादकांवर काम करते जेथे वारंवार कोरड्या पडण्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या उत्पादनात घट झाली आहे. तंत्रज्ञान प्लॉट-आधारित परिस्थितीचे निरीक्षण करून जर मका पिकाला गंभीर वाढीच्या टप्प्यात मातीतील अपुरी ओलावा जाणवला तर अ‍ॅलिव्हियो हमी लाभांना चालना देईल. हे फायदे उत्पादकांना त्यांच्या अ‍ॅलिव्हियो मोबाइल अँपप्लिकेशनवर दिले जातील आणि त्यांच्या जवळच्या चॅनेल पार्टनर स्टोअरमध्ये ते परत मिळवता येतील असे कंपनीने म्हटले.याव्यतिरिक्त, शेतकऱ्यांना मातीतील ओलावा अंदाज, फवारणी नियोजन समर्थन आणि त्यांच्या प्लॉटनुसार तयार केलेल्या पिकांविषयी काही सल्ले दिले जाऊ शकतात व त्याचा संदर्भात सखोल माहिती शेतकऱ्यांना मिळू शकते. शिफारसी मिळतीलच पण त्या व्यतिरिक्त हवामान आधारित काही विशेष संभाव्य माहिती यामाध्यमातून मिळेल.लाँच झाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत अ‍ॅलिव्हियो खरेदी करून शेतकऱ्यांनी अ‍ॅलिव्हियोची खरेदी केल्याने त्याचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे असे कंपनीने म्हटले.'पूर्वी, जेव्हा पाऊस कमी पडत असे, तेव्हा हंगामात आम्हाला कोणतीही आशा नव्हती. अ‍ॅलिव्हियोमुळे, मी माझ्या स्वतःच्या प्लॉटसाठी मातीची ओलावा पाहू शकतो आणि जेव्हा ती खूप कमी होते तेव्हा फायदा लवकर होतो. यामुळे मला पिकासाठी आवश्यक असलेले धान्य विलंब न करता खरेदी करण्यास मदत होते' असे दावणगेरे तालुक्यातील कॉर्न उत्पादक नागराजा हुचपला म्हणाले आहेत.लाँच करताना, भारत, बांगलादेश आणि श्रीलंकेतील बायरच्या क्रॉप सायन्स डिव्हिजनल हेड सायमन विबुश म्हणाले,'ज्यांना त्याची सर्वात जास्त गरज आहे त्यांच्या हातात डिजिटल इनोव्हेशन देण्याची बायरची वचनबद्धता अ‍ॅलिव्हियो प्रतिबिंबित करते. अंतर्ज्ञानी डिझाइन आणि विश्वासार्ह स्थानिक नेटवर्कसह कृषी बुद्धिमत्तेसह आम्ही लहान शेतकऱ्यांना अनिश्चिततेला माहितीपूर्ण कृतीत रूपांतरित करण्यास मदत करत आहोत, ज्यामुळे लवचिकता केवळ शक्यच नाही तर व्यावहारिक बनते.''खूप दिवसांपासून पीक विम्याने शेतकऱ्यांना अनिश्चिततेच्या मार्गावर नेले आहे. या लाँचसह, आम्ही शेतकऱ्यांना नवोपक्रमाच्या केंद्रस्थानी ठेवत आहोत. उपग्रह बुद्धिमत्ता, प्लॉट-लेव्हल अंतर्दृष्टी, वाढीच्या टप्प्यानुसार कव्हरेज आणि मजबूत इकोसिस्टम सहकार्य एकत्रित करून, आम्ही शेतकऱ्यांच्या गरजा खरोखर पूर्ण करणारे उपाय देत आहोत. बायर आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्ससोबत, कृषी-विमा क्षेत्राला तातडीने आवश्यक असलेले परिवर्तन घडवून आणण्याचा आम्हाला अभिमान आहे' असे एडमी इन्शुरन्स ब्रोकर्स लिमिटेडचे सीईओ संजय राधाकृष्णन म्हणाले आहेत.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 12:10 pm

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवूनमुंबई (खास प्रतिनिधी)मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने महिला व बाल कल्याण योजनेतंर्गत विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या ६५ समुदाय संघटकांपैंकी१० संघटकांनी महापालिकेतील सेवेला राम राम ठोकला. त्यामुळे आता केवळ ५५ कंत्राटी समुदाय संघटक सेवेत असून यासर्वांची सेवा पुन्हा ११ महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. आधीच यापूर्वी नेमलेल्यांची नियुक्ती रद्द करून नव्याने नियुक्ती करण्याची मागणी होत असतानाच आता यांना पुन्हा मुदत वाढवून दिले जात असल्याने मोठ्याप्रमाणात नाराजी पसरली जाण्याची शक्यता आहे.https://prahaar.in/2025/11/15/mns-will-contest-three-wards-in-bhandup/महापालिकेच्या नियोजन विभागातील जेंडर बजेट अंतर्गत महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता ६१ समुदाय संघटकांची ११ महिन्यांच्या कालावधीकरीता म्हणजेच ०५ नोव्हेंबर २०२४ ते ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी कंत्राट तत्वावर नेमणूक करण्यात आली आहे. या प्रत्येक समुदाय संघटकांना प्रति २०,००० हजार एवढ्या ठोक मानधनावर नियुक्ती करण्यात आली. अशाप्रकारे एकूण ६५ समुदाय संघटक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्याील १० समुदाय संघटकांनी राजीनामा दिला. त्यामुळे सध्या ५५ समुदाय संघटक कार्यरत आहेत.जेंडर बजेट अंतर्गत महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत मुंबईत गरीब व गरजू महिला, दिव्यांग, जेष्ठ नागरीक, शहरी बेघर यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनांची अंमलबजावणी सुलभ करण्याच्या कामाकरीता संचालक (नियोजन) विभागाला समुदाय संघटक यांची आवश्यकता आहे. त्यामुळे विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याकरीता सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या ५५ समुदाय संघटक यांना ११ महिन्यांकरीता प्रति समुदाय संघटक प्रति महिना २०,००० रुपये एवढ्या इतक्या मानधनावर नेमणूक करण्यात येत आहे. ०७ नोव्हेंबर २०२५ ते ०६ ऑक्टोबर २०२६ नियुक्ती केली जाणार आहे.मागील साडेतीन वर्षांपासून महापालिकेत प्रशासक राजवट असल्याने महिलांच्या योजना मुंबईत विविध पक्षाच्या नगरसेवकांच्या माध्यमातून राबवल्या जात होत्या, तिथे या कंत्राटी समुदाय संघटकांकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य विभागातील महिलांना केले जात नाही. त्यामुळे ठराविक पक्ष आणि लोकप्रतिनिधींची मर्जी सांभाळण्याचे काम ही समुदाय संघटक करत असल्याने एकप्रकारे यांच्या विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विद्यमान कंत्राटी समुदाय संघटकांना मुदत वाढवून न देता पुन्हा नव्याने जाहिरात देवून त्यांची नेमणूक करण्याची मागणी मागील काही महिन्यांपासून होत आहे. त्यातच ही मुदत आता वादात अडकवण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 12:10 pm

“एका तेजस्वी यादवच्या पराभवासाठी…”; ‘सामना’तून बिहार निवडणूक निकालावर खळबळजनक दावा; ‘ते’चार प्रश्न अन्…

Saamana : बिहार विधानसभेचा निकाल भाजपसाठी उत्साह वाढवणारा आहे. या निकालाने राज्यात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार विराजमान होणार आहे. आता सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू होणार आहेत. बिहार राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स वाढला आहे. नीतीशकुमार यांच्या जेडीयू पक्षाने देखील गतपेक्षा या निवडणुकीत मोठ्या जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष धुमधडाक्यात भाजपने साजरा केला आहे. पण बिहार राज्यातील […] The post “एका तेजस्वी यादवच्या पराभवासाठी…”; ‘सामना’तून बिहार निवडणूक निकालावर खळबळजनक दावा; ‘ते’ चार प्रश्न अन्… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 12:06 pm

मोदींनी 80% स्ट्राइक रेटसह 97 जागा जिंकवल्या:राहुल यांनी जिथे सभा घेतल्या त्यापैकी 85% जागा महाआघाडीने गमावल्या, तेजस्वी सुपर फ्लॉप

बिहार निवडणुकीत एनडीएने २०२ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. एकट्या भाजपने ८९ जागा जिंकल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १६ सभांमुळे एनडीएला ९७ जागा मिळाल्या आहेत, ज्यात ४४ नवीन जागा आहेत. पंतप्रधानांचा स्ट्राइक रेट ८०% आहे. स्ट्राइक रेट म्हणजे पंतप्रधानांनी त्यांच्या रॅलींमधून किती जागा कव्हर केल्या आणि त्यापैकी किती जागा एनडीएला मिळाल्या. एनडीए नेत्यांमध्ये गृहमंत्री अमित शहा यांचा स्ट्राईक रेट सर्वाधिक ८८% आहे. महाआघाडीतील प्रमुख नेत्यांच्या रॅली फ्लॉप ठरल्या आहेत. चला सर्व नेत्यांच्या स्ट्राईक रेटचे एक-एक करून परीक्षण करूया... एनडीए नेत्यांच्या रॅली... आता महाआघाडीच्या नेत्यांच्या रॅलींबद्दल बोलूया... तुम्ही बिहारचे तज्ञ आहात का? खेळा आणि २ कोटी रुपयांपर्यंतची बक्षिसे जिंका. बिहारबद्दलच्या तीन सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि ₹२ कोटी पर्यंतची बक्षिसे जिंका. दररोज ५० लोक रोमांचक बक्षिसे जिंकू शकतात. नियमितपणे खेळा आणि लकी ड्रॉमध्ये सुझुकी ग्रँड विटारासारखे बंपर बक्षीस जिंकण्याची संधी मिळवा. आताच क्विझ खेळण्यासाठी येथे क्लिक करा - https://dainik.bhaskar.com/GXiUvc8h3Wb

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 11:55 am

Bollywood Celebrity Drug Party: बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत! नोरा–श्रद्धाचं नाव समोर; धक्कादायक खुलासा

Bollywood Celebrity Drug Party: बॉलिवूड विश्व पुन्हा एकदा ड्रग्ज प्रकरणामुळे खळबळून उठलं आहे. मुंबईत झालेल्या एका alleged ड्रग्ज पार्टी बाबत धक्कादायक माहिती समोर आली असून, या पार्टीत अनेक नामांकित कलाकारांची उपस्थिती असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात नोरा फतेही, श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, तसेच ओरहान अवत्रामणी (ओरी) यांची नावं आल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली […] The post Bollywood Celebrity Drug Party: बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत! नोरा–श्रद्धाचं नाव समोर; धक्कादायक खुलासा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 11:46 am

विदर्भाची बाजी! राज्यातील १३ विद्यापीठांमध्ये ‘या’ विद्यापीठाला अव्वल क्रमांक; पुणे शेवटच्या स्थानी

नागपूर : विदर्भाने पुन्हा एकदा राज्यात आपली ताकद दाखवत गोंडवाना विद्यापीठाने महाराष्ट्रातील १३ सार्वजनिक विद्यापीठांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २०२४-२५ या शैक्षणिक सत्रातील विद्यापीठांच्या कामकाजाचे स्वतंत्र मूल्यमापन केले असून, कोणत्याही विद्यापीठाकडून माहिती किंवा अर्ज मागविण्यात आले नव्हते. विद्यापीठांनी शासनाकडे वर्षभरात सादर केलेल्या नोंदींच्या आधारे हे मूल्यमापन करण्यात आले. अर्न्स्ट अँड यंग या संस्थेची मदत या प्रक्रियेसाठी घेण्यात आली.या तपासणीत विद्यापीठांचे प्रशासकीय कामकाज, सेवाशर्ती, विविध संवर्गांच्या ज्येष्ठतासूची, पदोन्नती आणि सरळसेवा नियुक्त्या, अनुकंपा नियुक्ती, रिक्त जागांची स्थिती, बिंदुनामावलीचे प्रमाणीकरण, आयजीओटी पोर्टलवरील नोंदणी आणि अभ्यासक्रम पूर्णता, तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक डिजिटल व अद्ययावत ठेवणे अशा एकूण १०० गुणांच्या निकषांवर विद्यापीठांची चाचणी करण्यात आली.या सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत गोंडवाना विद्यापीठाने ६८ गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला. मुंबई विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी प्रत्येकी ६६ गुण मिळवत संयुक्तरीत्या दुसरे स्थान मिळवले.गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी सांगितले की, वर्षभर सातत्याने प्रक्रिया अद्ययावत ठेवून, प्रशासनिक कामांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे विद्यापीठाला ही कामगिरी साधता आली.राज्यातील विद्यापीठांचे गुण असे:गोंडवाना विद्यापीठ – ६८मुंबई विद्यापीठ – ६६शिवाजी विद्यापीठ – ६६संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ – ६२यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ – ६०एसएनटीडी महिला विद्यापीठ – ५७सोलापूर विद्यापीठ – ५४कालिदास संस्कृत विद्यापीठ – ५२नागपूर विद्यापीठ – ५२छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विद्यापीठ – ५०नांदेड विद्यापीठ – ४८जळगाव विद्यापीठ – ४८सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – ४२

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 11:30 am

…अन्यथा मोठा निर्णय! शिंदेसेनेची छत्रपती संभाजीनगरमध्ये गुप्त बैठक; भाजपसमोर ठेवणार ‘हा’प्रस्ताव

Chhatrapati Sambhajinagar : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या रंगतदार होणार असल्याचे सध्याच्या राजकीय चित्र पाहल्यानंतर दिसते. नुकताच बिहार विधानसभेचा निकाल जाहीर झाला. या निकालात एनडीएने महागठबंधनची दाणादाण उडवून दणक्यात मोठा विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे तिथे सत्तास्थापनेसाठी लवकरच हालचालींना वेग येणार आहे. अशातच आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या […] The post …अन्यथा मोठा निर्णय! शिंदेसेनेची छत्रपती संभाजीनगरमध्ये गुप्त बैठक; भाजपसमोर ठेवणार ‘हा’ प्रस्ताव appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 11:22 am

दिल्ली स्फोटापूर्वी नमाज, मग पार्किंगमध्ये थांबला:कारच्या बॅटरीला जोडला डिटोनेटर, साडेतीन तासांनंतर लाल किल्ल्याजवळ स्फोटाचा कट

१० नोव्हेंबर २०२५… दहशतवादी डॉ. उमरने दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ हल्ला करण्याचा कट रचला. या कार बॉम्बस्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला आणि २० जण जखमी झाले. या हल्ल्याप्रकरणी डॉ. मुझम्मिल, डॉ. आदिल आणि डॉ. शाहीनसह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. हल्ल्याच्या 5 दिवसांनंतरही प्रश्न कायम आहे: दहशतवादी उमर त्याच्या कारमध्ये स्फोटके घेऊन कधी आणि कसा दिल्लीला पोहोचला? तो दिल्लीत कुठे गेला? त्याच्या कारमध्ये इतके स्फोटके असताना, वाटेत स्फोट होण्याचा धोका नव्हता का? त्याने डेटोनेटर आणि फ्यूज कधी आणि कसे जोडले? दहशतवादी उमरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की तो हरियाणाहून नूह-मेवात मार्गाने दिल्लीत आला होता, त्याच्या गाडीत स्फोटके होती. त्यानंतर तो बदरपूरमार्गे प्रवास करत तुर्कमान गेटजवळील असफ अली रोडवरील दर्ग्यात पोहोचला. त्याने तिथे नमाज अदा केली आणि लाल किल्ल्याजवळील सुनहरी बाग पार्किंगमध्ये तीन तास वाट पाहिली. त्यानंतर त्याने स्फोटाचा कट रचला. सूत्रानुसार, त्याने सुनहरी बाग पार्किंगमध्ये वाट पाहत असताना स्फोटकांना डेटोनेटर आणि फ्यूज जोडले. या दहशतवादी हल्ल्याचा प्रकार नवीन नाही. यापूर्वी, २००० मध्ये, दीनदार अंजुमन गटाने अशाच प्रकारच्या पॅटर्नचा वापर करून मालिका स्फोट घडवले होते. दिव्य मराठीने अतिरेकी उमरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि फुटेज जोडले. तज्ज्ञ आणि सूत्रांशी बोलून, आम्ही उमरने संपूर्ण हल्ला कसा केला आणि डॉक्टर मॉड्यूल वापरण्यामागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण रिपोर्ट वाचा... सीसीटीव्हीमध्ये दहशतवादी उमर कधी आणि कुठे दिसला?दिल्ली हल्ल्याबाबत अनेक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. स्फोटाच्या १७ तास आधी घेतलेल्या एका फुटेजमध्ये दहशतवादी डॉ. उमर आणि त्याची कार रात्री १:३० वाजता नूह-मेवात मार्गावर दिसत आहे. त्यावेळी कार वेगाने जात होती. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास दिल्ली बदरपूर सीमेवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दहशतवादी उमर दिसला. हे फुटेज अगदी स्पष्ट आहे. गाडीच्या मागच्या सीटवर एक काळी आणि पांढरी बॅग दिसत आहे. उमरने स्वतः काळा मास्क घातला आहे. हे फुटेज पाहिल्यानंतर, तपास पथकातील सूत्रांनी उघड केले की कारमधील स्फोटके अद्याप डेटोनेटर आणि फ्यूजशी जोडलेली नव्हती. म्हणूनच कार वेगाने जात होती. त्याच दुपारी, उमर तुर्कमान गेटजवळील असफ अली रोडवरील दर्ग्यावर पोहोचला, जिथे त्याने नमाज अदा केली. त्यानंतर, दुपारी ३:१९ वाजता, तो लाल किल्ल्याजवळील सुनहरी बाग पार्किंगमध्ये गेला. त्यानंतर तो संध्याकाळी ६:४८ पर्यंत, म्हणजे सुमारे साडेतीन तासांपर्यंत तिथेच राहिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या काळात दहशतवादी उमरने स्फोटके डिटोनेटरशी जोडली आणि कारमध्ये फ्यूज केली. यास फक्त ३-४ मिनिटे लागतात. याचा अर्थ असा की तो हल्ला करण्यासाठी जाणूनबुजून संध्याकाळपर्यंत वाट पाहत होता. पोटॅशियम क्लोरेट आणि अमोनियम नायट्रेट रसायनांपासून स्फोटडिटोनेटर आणि फ्यूज कसे जोडले गेले? स्फोटक अमोनियम नायट्रेट होते की आणखी काही? हे समजून घेण्यासाठी, आम्ही फॉरेन्सिक तपासणीत सहभागी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी घटनास्थळी पोटॅशियम क्लोरेटसारखे रसायन असल्याची पुष्टी केली. प्रकरणाची संपूर्ण व्याप्ती समजून घेण्यासाठी, आम्ही २००८ मध्ये दिल्लीत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या तपासात सहभागी असलेले निवृत्त दिल्ली पोलिस अधिकारी कर्नल सिंग यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितले, पोटॅशियम क्लोरेट आणि अमोनियम नायट्रेट एकत्र करून एक शक्तिशाली स्फोटक तयार केले जाते. दहशतवाद्यांनी यापूर्वी २००५ मध्ये दिल्लीतील सरोजिनी नगर स्फोटात अशाच प्रकारचा स्फोटक वापरला होता. आम्ही विचारले, दहशतवादी उमरने नूह आणि फरीदाबादहून दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत त्याच्या कारमध्ये स्फोटके नेली होती. वाटेत स्फोट होण्याचा धोका होता का? निवृत्त अधिकारी म्हणतात, कदाचित त्याने डिटोनेटर आणि फ्यूज स्फोटकाशी जोडले नसतील, त्यामुळे कोणताही धोका नव्हता. काहीही झाले तरी, या घटनेत द्रव डिटोनेटरचा संशय आहे. हे स्वतंत्रपणे सहज उपलब्ध आहेत. डिटोनेटर आणि फ्यूजद्वारे स्फोटक बॅटरी पॉवर सप्लायशी जोडण्यासाठी फक्त ३-४ मिनिटे लागतात. 'म्हणूनच, आतापर्यंत अशी भीती व्यक्त केली जात आहे की जेव्हा दहशतवादी उमर सुनहरी बाग पार्किंगमध्ये होता, तेव्हा त्याने कारमधील स्फोटक द्रव डिटोनेटर आणि फ्यूजशी जोडले असावे.' तो कसा स्फोट झाला असेल? कर्नल सिंग यांनी उत्तर दिले की स्फोटके स्फोट करण्यासाठी रिमोट आणि मॅन्युअल दोन्ही पद्धती आहेत. या प्रकरणात ते मॅन्युअल ऑपरेशन असण्याची शक्यता जास्त आहे, किंवा घाबरून अचानक स्फोट झाला असावा. तथापि, एक गोष्ट स्पष्ट आहे: दहशतवादी उमर एका मोठ्या स्फोटाची योजना आखत होता. म्हणूनच या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती. कारच्या बॅटरीशी जोडलेले स्फोटक उपकरणआतापर्यंतच्या तपासात आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६:४८ वाजता सुनहरी बाग पार्किंगमधून बाहेर पडताना कारचा हुड दोरीने बांधलेला होता. त्यामुळे, डिटोनेटर आणि फ्यूज कारच्या बॅटरीला जोडलेले असल्याचा संशय आहे. सूत्रानुसार, स्फोटकांना सक्रिय करण्यासाठी वीजपुरवठा आवश्यक असतो, ज्यामुळे ते पेटू शकते. म्हणून, स्फोटक कारच्या बॅटरीला, डेटोनेटर आणि फ्यूजसह जोडलेले होते. वायर कनेक्शनमुळे, हुड दोन ते अडीच इंच उघडा राहिला. हे झाकण्यासाठी, दहशतवादी उमरने हुड दोरीने बांधला. पेट्रोल किंवा सीएनजीमध्ये रसायने मिसळून बनवले उच्च स्फोटक बॉम्बदेशातील अनेक बॉम्बस्फोटांच्या तपासात सहभागी असलेल्या आणखी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, स्फोटानंतर ज्या पद्धतीने लोकांचे तुकडे तुकडे झाले आणि तीन दिवसांनंतर घटनास्थळापासून सुमारे ३००-४०० मीटर अंतरावर एका छतावर मृतदेहांचे अवयव आढळले. शॉक वेव्हमुळे अनेक लोक बधीर झाले किंवा त्यांना अंतर्गत दुखापत झाली. यावरून स्पष्ट होते की बॉम्बची तीव्रता अत्यंत जास्त होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारच्या मागच्या सीटवर स्फोटक असल्याचे दिसून आले. कारमध्ये पेट्रोल किंवा सीएनजीचा वापरही करण्यात आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, जर ५ किलो अमोनियम नायट्रेट आणि पोटॅशियम क्लोरेटचे मिश्रण बॅटरी, लिक्विड डिटोनेटर आणि फ्यूजशी जोडले गेले आणि त्याचा स्फोट झाला तर ते पेट्रोल आणि सीएनजीसोबत एकत्र येऊन एक शक्तिशाली फायरबॉम्ब तयार होतो. दिल्लीच्या घटनेतही असेच घडले. त्यामुळे स्फोट खूपच शक्तिशाली होता. अशा स्फोटांमध्ये, डिटोनेटर बहुतेकदा सापडत नाही, कारण स्फोटाची तीव्रता जास्त असते आणि त्यामुळे तो घटनास्थळापासून खूप दूर जातो. दिल्ली बॉम्बस्फोट आणि दीनदार अंजुमन नेटवर्कमध्ये काय साम्य आहे?खरं तर, मे ते जुलै २००० दरम्यान, आंध्र प्रदेशातील ताडेपल्लीगुडेम आणि वानापार्थी, कर्नाटकातील हुबळी आणि गोव्यातील वास्को येथे बॉम्बस्फोट झाले. हे सर्व स्फोट चर्चजवळ झाले, परंतु त्यांच्या हल्लेखोरांबद्दल कोणतेही विशिष्ट पुरावे सापडले नाहीत. त्यानंतर, जुलैमध्ये, बंगळुरूमध्ये लक्ष्याच्या अगदी आधी एक कार बॉम्बस्फोट झाला. त्या स्फोटाने तपास यंत्रणांना एक दिशा दिली. दिल्ली स्पेशल सेलमधील माजी वरिष्ठ अधिकारी कर्नल सिंग स्पष्ट करतात, १० नोव्हेंबर रोजी झालेल्या दिल्ली बॉम्बस्फोटाचा नमुना २००० मध्ये दीनदार अंजुमन नेटवर्कने केलेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी मिळताजुळता आहे. ज्याप्रमाणे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोव्यात तीन महिन्यांत अनेक बॉम्बस्फोट झाले, तरीही कोणतेही पुरावे सापडले नाहीत. त्यानंतर, जुलैमध्ये, बंगळुरूमध्ये एका कारचा अपघाती स्फोट झाला. त्या स्फोटात अमोनियम नायट्रेटचाही वापर करण्यात आला होता. तपासादरम्यान, दीनदार अंजुमन नेटवर्क उघडकीस आले. नंतर भारत सरकारने या गटावर बंदी घातली. कारमध्ये बॉम्ब ठेवण्याचा आणि विविध ठिकाणी स्फोट घडवण्याचा कट रचल्याच्या अलिकडच्या अहवालांमुळे, दहशतवादी नेटवर्क पुन्हा त्याच पद्धतीचा वापर करत असल्याचा संशय आहे. तथापि, हे केवळ तपास अहवालाद्वारेच पुष्टी करता येईल. सुशिक्षित लोकांचे ब्रेनवॉश करून त्यांना 'व्हाइट कॉलर दहशतवादी' बनवले जात आहेदिल्ली बॉम्बस्फोटांमध्ये डॉक्टर मुख्य दोषी का आहेत याबद्दल निवृत्त आयपीएस अधिकारी कर्नल सिंग स्पष्ट करतात, मी फक्त डॉक्टरांबद्दल बोलत नाहीये, तर त्यांची तुलना इतर सुशिक्षित आणि कमी शिक्षित व्यक्तींशी करत आहे. खरं तर, २००० पूर्वी, इंडियन मुजाहिदीनमध्ये उच्च शिक्षित दहशतवादी होते. त्यापैकी बरेच जण दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे पदवीधर होते. जेव्हा जिहादी नेटवर्क्स पूर्वी तरुणांना दहशतवादी बनवण्यासाठी ब्रेनवॉश करत असत, तेव्हा त्याला बराच वेळ लागत असे. त्यांना प्रथम मदरशासारख्या धार्मिक स्थळी आमंत्रित केले जात असे आणि नंतर संभाषणादरम्यान ब्रेनवॉश केले जात असे. तथापि, २००४ पूर्वी या पद्धती अधिक प्रचलित होत्या. डॉक्टरांसारख्या सुशिक्षित लोकांनाही आत्मघाती हल्ले करण्यासाठी ब्रेनवॉश करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात असे आम्ही विचारले. हे स्पष्ट करताना निवृत्त अधिकारी म्हणाले, मी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेतील एका ब्रेनवॉश केलेल्या दहशतवाद्याची चौकशी केली. त्याने वर्णन केलेली संपूर्ण प्रक्रिया तीन टप्प्यांत समजू शकते. प्रथम, हे लोक अशा लोकांशी संपर्क साधतात जे शिक्षणामुळे उच्च पदांवर पोहोचले आहेत परंतु धार्मिक कार्यात मागे आहेत. ते प्रथम सामान्य धार्मिक संभाषणांमध्ये गुंततात, जसे की त्यांना प्रार्थना कशी करायची किंवा वज कसे करायचे हे माहित आहे का. जर त्यांनी लक्ष दिले आणि प्रार्थना किंवा धार्मिक कार्यात रस दाखवला तर ते पुष्टी करते की ते कट्टरपंथीयांचे शब्द गांभीर्याने घेत आहेत. यानंतर, त्याला दुसरे काम दिले जाते. यामध्ये त्याला धर्माशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ दाखवले जातात. यातील बहुतेक फोटो आणि व्हिडिओ बनावट आहेत आणि त्याचा धर्म धोक्यात आहे असे सांगून त्याला भडकवले जाते. तिसऱ्या टप्प्यात, त्यांना जिहाद आणि त्याचे फायदे याबद्दल सांगितले जाते, जसे की जिहाद करणे हे हज करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, त्यांना मृत्यूनंतर जन्नत मिळेल आणि त्यांना शक्ती मिळेल. अशा प्रकारे, त्यांचे ब्रेनवॉश केले जाते. ते पुढे स्पष्ट करतात, जेव्हा त्यांना मानसिकरीत्या नियंत्रित केले जाते, तेव्हा त्यांना अंतिम प्रशिक्षण दिले जाते. कधीकधी हे प्रशिक्षण ऑनलाइन किंवा दुसऱ्या देशात शारीरिकरीत्या बोलावून दिले जाते. त्यानंतर ते दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होतात. दुबई आणि लंडनमधील डॉक्टरांचे नेटवर्क, तपासात गुंतलेली एजन्सीफरिदाबाद डॉक्टर दहशतवादी मॉड्यूलमध्ये अटक करण्यात आलेला पहिला व्यक्ती डॉ. आदिलचा भाऊ दुबईमध्ये असल्याचा संशय आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली देखील हल्ल्यांचा कट रचण्यासाठी लंडन आणि दुबईमध्ये राहत होता, असे पुरावे यापूर्वी समोर आले आहेत. भारतातील दहशतवादी नेटवर्कना परदेशातून पाठिंबा मिळत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. कधीकधी, निधी आणि प्रशिक्षणासाठी इतर देशांचा वापर केला जात आहे. दिव्य मराठीने सूत्रांकडून डॉ. शाहीनचे छायाचित्र मिळवले आहे. पोलिसांनी हे छायाचित्र ३ नोव्हेंबर रोजी फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठात व्हिसा पडताळणीसाठी घेतले होते. डॉ. शाहीन पकडल्या जाण्याची भीती असल्याने परदेशात पळून जाण्याचा विचार करत असल्याचा संशय आहे. डॉ. शाहीन दुबई किंवा लंडनला पळून जाण्याचा विचार करत असल्याचेही कळले आहे. काश्मीरमध्ये डॉक्टर आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे यापूर्वीही आढळून आले आहेफरिदाबादमधील डॉक्टर दहशतवादी मॉड्यूलमध्ये बहुतेक काश्मीरमधील संशयित दहशतवादी डॉक्टरांचा समावेश आहे. आम्ही याबद्दल जम्मू आणि काश्मीरचे माजी डीजीपी के. राजेंद्र कुमार यांच्याशी बोललो. ते म्हणतात, डॉक्टरांना दहशतवादी हल्ल्यात अडकवण्याची ही पहिलीच वेळ नाही. जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांत दहशतवादी संबंधांमुळे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. आतापर्यंत, या प्रकरणात शोपियानमधील धर्मगुरू इरफानच्या कट्टरपंथीकरणाचा समावेश आहे. म्हणून, त्यांना धर्माच्या आधारावर अतिरेकीपणाशी जोडून, ​​त्यांना दहशतवादाच्या मार्गावर नेले जात आहे. ते पुढे म्हणतात की, काही स्थानिक आत्मघातकी हल्लेखोरांनी भूतकाळात हल्ल्यांमध्ये सहभाग घेतला आहे. आता, जर देशातील आत्मघातकी हल्लेखोर दिल्लीत हल्ल्यांचा कट रचत असतील तर हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. यासाठी तपास यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 11:20 am

राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा

मुंबई : आता आणखी एक सेलिब्रिटी जोडपं म्हणजेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनीही पॅरेंट्स क्लबमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या घरी चिमुकल्या मुलीचे आगमन झाले असून दोघांनीही ही बातमी सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर केली आहे.दोघांच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवशीच हा सुंदर आनंद त्यांच्या आयुष्यात आला. देवाने आम्हाला दिलेलं हे सर्वात मोठं गिफ्ट आशीर्वाद दिलेत.. असं त्यांनी पोस्टमध्ये लिहित लेकीच्या जन्माची बातमी दिली. 15 नोव्हेंबर हा त्यांचा लग्नाचा वाढदिवस असल्याने या दिवशी मुलगी झाल्याचा त्यांचा आनंद अधिकच वाढला आहे.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 11:10 am

दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या जुबेरच्या लॅपटॉपमध्ये १ टीबी संशयास्पद डेटा! पुणे एटीएसचा तपास सुरू

पुणे: अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याच्या संशयातून पुण्याच्या एटीएसने जुबेर हंगरगेकर याला ताब्यात घेतले होते. पुणे पोलीसांचा हा संशय आता खरा ठरला आहे. कारण जुबेरच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह फाईल्स आढळल्या आहे. विशेष म्हणजे त्याच्या लॅपटॉपमध्ये १ टीबी पेक्षा अधिक डेटा असल्याची माहिती समोर आली आहे. या फाईल्सबाबत सखोल तपास सुरू आहे.न्यायालयाने अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी काम करत असलेल्या जुबेरची रवानगी विशेष न्यायालयीन कोठडीत केली आहे. अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार-प्रचार करून देशाच्या एकता व सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर हंगरगेकर याला अटक करण्यात आली होती.https://prahaar.in/2025/11/15/bjp-tops-in-bihar-bjp-is-in-power-in-13-states-including-maharashtra-know-the-details/दरम्यान जुबेर हंगरगेकरला अटक केल्यानंतर त्याच्या काही साथीदारांनी संशयित पुस्तकं, प्रमाणपत्र आणि कागदपत्र गोळा करून जाळली होती. काळेपडळ परिसरातील मदरशाच्या मोकळ्या जागेत ही कागदपत्र जाळण्याचे तपासात समोर आले होते. महत्त्वाचे म्हणजे जुबेरच्या संपर्कात पाच परदेशातील व्यक्तींचे नंबर आहेत.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 11:10 am

Honda India Power Products Q2 Results: होंडा इंडिया पॉवरचा तिमाही निकाल जाहीर निव्वळ नफ्यात थेट ३०.८०% वाढ

मोहित सोमण: होंडा इंडिया पॉवर प्रॉपर्टी लिमिटेडने आपला आर्थिक तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर निव्वळ नफ्यात मोठी वाढ झाली आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील ८.५२ कोटींच्या तुलनेत या वर्षी सप्टेंबर तिमाहीत ११.१७ कोटींचा निव्वळ नफा (Net Profit) मिळाला आहे. थेट ३०.८०% नफ्यात वाढ झाली आहे. तसेच कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीला मागील वर्षाच्या तिमाहीतील १८७०९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १८५०९ कोटींचा महसूल मिळाला आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या इक्विटी शेअर भांडवलात (Equity Share Capital) इयर ऑन इयर बेसिसवर कुठलाही बदल झालेला नाही. ते १०१४ कोटींवर स्थिर आहे. तसेच कंपनीच्या ईपीएस (Earning per share EPS) मध्ये गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ८.४२ तुलनेत या तिमाहीत ११.०१ रूपयांवर वाढ मिळाली आहे.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 11:10 am

बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश आता उद्योजिका; करणार 'हा'व्यवसाय

मुंबई : बिग बॉस १५ ची विजेती आणि नागीण मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजस्वी प्रकाश आता केवळ अभिनयावर अवलंबून न राहता नव्या क्षेत्रात उतरली आहे. छोटे पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःची वेगळी छाप सोडल्यानंतर, तेजस्वीने व्यावसायिक जगातही पाऊल टाकत स्वतःचा नवा उपक्रम सुरू केला आहे.अलीकडेच तिने सॅम'ज सलोन नावाचं स्वतःचं आलिशान ब्युटी सलून उघडलं. उद्घाटनावेळी तिच्या सोशल मीडियावरून शेअर केलेल्या फोटों आणि व्हिडीओंमध्ये तिचे आई–वडील, प्रियकर करण कुंद्रा आणि इंडस्ट्रीतील तिचे अनेक मित्रमंडळी उपस्थित असल्याचे दिसत आहे. सर्वांनीच तिला तिच्या या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.व्यवसाय सुरू करण्यामागचं कारण स्पष्ट करताना तेजस्वीने कॉमेडियन भारती सिंहसोबतच्या संभाषणात सांगितलं की, तिला अभिनय जरी अत्यंत प्रिय असला तरी फक्त त्यावर अवलंबून राहणं तिला योग्य वाटत नाही. ती म्हणाली, मला नेहमी काहीतरी नवं करायला आवडतं. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे नवीन प्रयत्न करता, तेव्हा देवही साथ देतो.तेजस्वीने आनंद व्यक्त करत म्हटले किकी , आता माझा एक नवीन प्रवास सुरु झाला आहे आणि माझ्या व्यवसायाला चांगला प्रतिसादही मिळत आहे तेजस्वी प्रकाशने स्वतः च्या मेहनतीने आणि लोकप्रियतेच्या बळावर आपले स्वप्न पूर्ण केले. अभिनयासोबत हा व्यवसाय सांभाळणे हे तिच्यासाठी एक नवीन आव्हान असणार आहे.

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 11:10 am

Saiyyaara: मोहित सूरी यांच्या ‘सैयारा’ला येलोस्टोन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘पॉप्युलर चॉईस अवॉर्ड’

Saiyyaara: प्रसिद्ध दिग्दर्शक मोहित सूरी यांच्यासाठी 2025 हे वर्ष अत्यंत यशस्वी ठरले आहे. त्यांच्या ‘सैयारा’ या चित्रपटाने देश-विदेशात उत्तम यश मिळवल्यानंतर आता आणखी एक मानाची कमाई केली आहे. मुंबईत झालेल्या येलोस्टोन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (YIFF) 2025 मध्ये ‘सैयारा’ने पॉप्युलर चॉईस अवॉर्ड पटकावला. 20 वर्षांत मिळालेली पहिली ट्रॉफी… मोहित भावूक YRF चे सीईओ अक्षय विधानी आणि […] The post Saiyyaara: मोहित सूरी यांच्या ‘सैयारा’ला येलोस्टोन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘पॉप्युलर चॉईस अवॉर्ड’ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 11:06 am

अवघ्या तीन महिन्यांचं लेकरु पोरकं झालं; बापाचं छत्र कायमचं गेलं : नवले ब्रीज अपघातात मराठी अभिनेत्याचा दुर्देवी अंत

Pune Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलावजळ झालेल्या भीषण अपघाताने पुणेकरांना थक्क केले. गुरुवारी १३ नोव्हेंबरच्या दिवशी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडलेली भीषण अपघाताची घटना सर्वांनाच्या मनाला चटका लावून गेली. या अपघातात एकूण आठ जणांना आपल्या जीवाला मुकावे लागले. या अपघातात एका मराठी अभिनेत्याचा देखील मृत्यू झाला आहे. कारचालक असलेला ३० वर्षीय मराठी अभिनेता […] The post अवघ्या तीन महिन्यांचं लेकरु पोरकं झालं; बापाचं छत्र कायमचं गेलं : नवले ब्रीज अपघातात मराठी अभिनेत्याचा दुर्देवी अंत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 10:40 am

Rajkummar Rao: बॉलिवूडमध्ये गोड बातमी: राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आई-बाबा

Rajkummar Rao: बॉलिवूडमधून आज सकाळी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेता राजकुमार राव आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री पत्रलेखा पालक बनले आहेत. पत्रलेखाने आज सकाळी एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, ही खुशखबर स्वतः या जोडप्याने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. लग्नाच्या चौथ्या वाढदिवशीच मिळालं खास गिफ्ट राजकुमार आणि पत्रलेखाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करून […] The post Rajkummar Rao: बॉलिवूडमध्ये गोड बातमी: राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आई-बाबा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 10:36 am

दिल्लीनंतर आणखी एक मोठा स्फोट; ९ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Nowgam Police Station Blast | श्रीनगरच्या नागौम पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री मोठा स्फोट झाला आहे. यात ९ जणांचा मृत्यू तर २९ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जप्त केलेली स्फोटकं हाताळताना पोलीस स्टेशनमध्ये हा अपघात घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या घटनेची चौकशी सुरु असून दहशतवादी हल्ल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मृतांमध्ये आणि जखमींमध्ये बहुतांश पोलीस […] The post दिल्लीनंतर आणखी एक मोठा स्फोट; ९ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Nov 2025 10:27 am

Maithili Thakur Win Bihar Election 2025 : वय फक्त २५… अन् ११ हजारांच्या आघाडीने विक्रमी विजय; बिहारला मिळाली सर्वात तरुण आमदार! काय म्हणाली मैथिली?

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत २०२५ (Bihar Election Result 2025) मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित करत मोठा विजय मिळवला आहे. एकूण २४३ जागांपैकी तब्बल २०२ जागांवर एनडीएने बाजी मारत स्पष्ट बहुमत मिळवलं, ज्यात भाजप, जेडीयू आणि लोजप या पक्षांचा निर्णायक वाटा आहे. भाजपला ८९, जेडीयूला ८५, तर लोजपला देखील महत्त्वाची यश मिळाली आहेत. विरोधी आघाडीला मात्र अपेक्षित कामगिरी करता आली नाही. काँग्रेसला केवळ ६ जागा मिळाल्या, तर राजदला २५ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालानंतर आता राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावर राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अलीनगर मतदारसंघातील लढत विशेष चर्चेत राहिली. येथे भाजपच्या तरुण उमेदवार मैथिली ठाकूर (Maithili Thakur Win Or Not) यांनी आरजेडीचे उमेदवार विनोद मिश्रा यांचा ११ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. ठाकूर यांना एकूण ८४,९१५ मतं मिळाली, तर मिश्रा यांना ७३,११५ मतांवर समाधान मानावं लागलं.फक्त २५ वर्षांच्या वयात विजय नोंदवत मैथिली ठाकूर यांनी बिहार विधानसभेतील सर्वात तरुण आमदार म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अलीनगर मतदारांनी दिलेल्या प्रचंड समर्थनामुळे या विजयाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.https://prahaar.in/2025/11/15/after-bihar-election-results-congress-ubatha-sena-in-maha-vikas-aghadi-clash/

फीड फीडबर्नर 15 Nov 2025 10:10 am