SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
... ...View News by News Source

जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयातील अग्निशमन प्रणाली झाली जुनी; धुर शोध प्रणालीही नाही अस्तित्वात

मुंबई (सचिन धानजी):मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयातील विद्यमान अग्निशमन प्रणाली ही जुनी झाली असून याचा योग्यप्रकारे वापर होत नसल्याने आता या इमारतीमध्ये धुर शोध प्रणालीअस्तित्वात नाही.. त्यामुळे या रुग्णालयात आता नव्याने अग्निशमन दलाच्यावतीने यंत्रणा बसवण्याात येणार आहे.जोगेश्वरी (पूर्व) हे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील रुग्णालयांपैकी एक रुग्णालय असलेल्या या रुग्णालयात एमआयसीयु, एसआयसीयु, एनआयसीयु, एमआरआय आणि सिटी स्कॅन आदी सुविधा उपलब्ध आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी या रुग्णालयात मुंबई अग्निशमन विभागाच्या वतीनेअग्नि लेखापरिक्षण केले होते. त्यांच्या अहवालानुसार कार्यालयातील यांत्रिक व विद्युत विभागाच्या अभियंत्याने रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयाची पाहणी केली.. मुंबई अग्निशमन विभागाच्या अग्नि लेखापरिक्षण अहवालानुसार रुग्णालयात अग्निशामक हायड्रेट, स्प्रिंकलर, फायर अलार्म प्रणाली, फायर पंप इत्यादींची तातडीने स्थापना करण्याची शिफारस करण्यात आली होती. विद्यमान अग्निशमन प्रणाली सन २०१० मध्ये बसविण्यात आली होती, त्यामुळे ती सद्यःस्थितीत जीर्णावस्थेत आहे. तसेच ती सुरळीतपणे कार्यरत ही नाही.https://prahaar.in/2025/12/16/the-cctv-cameras-at-the-election-warehouse-in-vikhroli-were-switched-off/रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांच्या माहिती नुसार , अग्निशमन प्रणाली जुनी असल्याने तसेच धूर शोषक प्रणाली नसल्याने महापालिकेने ही प्रणाली रुग्णालयात बसवणे आवश्यक बनले आहे. तसेच फायर अलार्म प्रणाली सह सार्वजनिक घोषणा प्रणालीही जुनी झाली आहे. त्यामुळे विविध कारणांमळे आगीच्या घटना वाढत त्यामुळे अग्निसुरक्षेच्या जागरुकतेसोबतच योग्य ती प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे टॉमा केअर रुग्णालयामध्ये आवश्यक यंत्रणा उपलब्ध करुन अप्रिय घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पूर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे. . आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितरित्या बाहेर पडण्याकरिता स्वयं चमकणारे चिन्ह फलक बसवण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेच्यावतीने आता नवीन अग्निशमन प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सव्वा चार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी ओमेक्स कंट्रोल सिस्टीम या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 11:30 am

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने! फडणवीसांच्या घोषणेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले…

Ajit Pawar : राज्यातील २९ महापालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेत त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आम्ही वेगवेगळे निवडणुकीला सामोरे जाऊ, अशी घोषणा पुण्यातून केली. सोमवारी १५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी ही घोषणा केली. यामुळे या […] The post पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने! फडणवीसांच्या घोषणेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 11:24 am

गांधी कुटुंबाला मोठा दिलासा ; नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीच्या आरोपपत्राची दखल घेण्यास न्यायालयाचा नकार

National Herald case। नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला आहे. या निर्णयाकडे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासाठी एक महत्त्वाचा कायदेशीर विजय म्हणून पाहिला जात आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, गुन्ह्यात योग्य एफआयआर नोंदवल्याशिवाय […] The post गांधी कुटुंबाला मोठा दिलासा ; नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीच्या आरोपपत्राची दखल घेण्यास न्यायालयाचा नकार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 11:21 am

सेल्फीच्या बहाण्याने जवळ आले अन् थेट कबड्डीपटूची गोळ्या झाडून केली हत्या; सिद्धू मुसेवाला प्रकरणाचे कनेक्शन समोर

Rana Balachauria Firing | प्रसिद्ध कबड्डीपटू कंवर दिग्विजय सिंह ऊर्फ राणा बालाचौरियाची कबड्डीच्या सामन्यादरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पंजाबच्या मोहालीमध्ये सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. सेल्फी काढण्याच्या बहाण्याने आरोपी कंवर दिग्विजय सिंहजवळ आला आणि त्याने अचानक गोळ्या झाडल्या. डोक्यात आणि चेहऱ्यावर अनेक गोळ्या लागल्याने बालाचौरीया जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने मोहाली येथील फोर्टिस […] The post सेल्फीच्या बहाण्याने जवळ आले अन् थेट कबड्डीपटूची गोळ्या झाडून केली हत्या; सिद्धू मुसेवाला प्रकरणाचे कनेक्शन समोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 11:15 am

कफ सिरप रॅकेटमध्ये खळबळजनक खुलासा

७०० कंपन्या फक्त कागदावरच, अब्जावधींची कमाई; ईडीचा दावानवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने टाकलेल्या छाप्यात कफ सिरप रॅकेट आणि अवैध तस्करी प्रकरणी मोठा पर्दाफाश झाला आहे. ४० तासांपेक्षा अधिक तास ईडीने छापा टाकला. यानंतर मिळालेल्या पुराव्यांनुसार २२० संचालकांच्या नावानं ७०० पेक्षा अधिक कंपन्या बनवण्यात आल्या. या कंपन्यांच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांची कमाई करण्यात आलीय. धक्कादायक म्हणजे यातील बहुतांश कंपन्या फक्त कागदावरच आहेत.ईडीच्या अधिकाऱ्यांनाही कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी करताना आश्चर्याचे धक्के बसले. कंपनीत अनेक कर्मचारीही फक्त कागदावरच होते. ईडीच्या सूत्रांनी दावा केलाय की अजूनही अनेक कंपन्यांबाबत पुरावे गोळा केले जात आहेत. ईडीसमोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे लवकरच संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू केली जाणार आहे.उत्तर प्रदेश, गुजरात आणि झारखंडमधील २५ ठिकाणांवर ईडीने छापा टाकला. यात समोर आलेल्या माहितीमुळे ईडीचे कर्मचारीही चक्रावले आहेत. ईडीने युपीत अशा पद्धतीची फसवणूक पहिल्यांदाच समोर आल्याचं म्हटलंय.फेंसेडिल सिरप बनवणाऱ्या एका कंपनीच्या अनेक अधिकाऱ्यांना याबाबत माहिती होतं पण त्यांनी मौन बाळगलं होतं. एसटीएफच्या एएसपी लाल प्रताप सिंह यांनी सांगितलं की, एका कंपनीतील अनेक अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात येतील.एसटीएफची चौकशी झाल्यानंतरही शुभम जयस्वाल, माजी खासदाराचे निकटवर्तीय अलोक सिंह, अमित टाटा यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवायला सुरुवात केली. अमित आणि अलोक यांना अटक केल्यानंतरही यांना काही अडचण झाली नाही. कोर्टात हे आरोपी निश्चिंत होते. जेव्हा ईडीने अमित, शुभम, अलोक यांच्या ठिकाणांवर छापे टाकायला सुरुवात केली तेव्हा मात्र घाबरले.दुबईत या घोटाळ्याचा सूत्रधार शुभम जयस्वाल लपून बसलाय. तर अलोक सिंह, अमित टाटा यांच्याशिवाय शुभमचा वडील भोला प्रसादच्या खात्यावरही व्यवहार दिसून आले आहेत. यातील अनेक व्यवहारांची पूर्ण माहिती मिळालेली नाही. कंपन्यांच्या नावाने उघडलेल्या खात्यांवरही असे व्यवहार आहेत ज्याची पुढची माहिती नाही. आणखी काही खोट्या कंपन्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. जीएसटी विभागाकडून या कंपन्यांबाबत यादी मिळणार आहे. यामुळे तपासाची व्याप्ती वाढणार आहे.

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 11:10 am

अवघ्या १३व्या वर्षी शाळकरी मुलांमध्ये व्यसनाची सुरुवात!

दहा शहरांतील अभ्यासातून वास्तव उघड…मुंबई : देशातील शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये तंबाखू, धूम्रपान, मद्यपान तसेच अमली पदार्थांचे व्यसन सरासरी १३व्या वर्षीच सुरू होत असल्याची धक्कादायक माहिती एका नव्या अभ्यासातून समोर आली आहे. एम्स दिल्लीच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासात भारतातील १० प्रमुख शहरांतील शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश होता.अभ्यासानुसार, इयत्ता ८,९,११ व १२ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी मोठ्या प्रमाणावर मुलांनी लहान वयातच व्यसनांचा अनुभव घेतल्याचे निदर्शनास आले. एकूण ५,९२० विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पदार्थांच्या वापराची सरासरी सुरुवातीची वयोमर्यादा १२.९ वर्षे असल्याचे नोंदले गेले.विशेष म्हणजे, इंहेलंट्स (श्वसनाद्वारे घेतले जाणारे पदार्थ) वापरण्याचे वय सर्वात कमी असून ते सरासरी ११.३ वर्षे असल्याचे आढळले. त्यानंतर हेरॉइन (१२.३ वर्षे) आणि वैद्यकीय औषधांचा गैरवापर (१२.५ वर्षे) यांचा क्रम लागतो. तंबाखू आणि मद्यपान हे सर्वाधिक वापरले जाणारे पदार्थ असल्याचेही अभ्यासात स्पष्ट झाले आहे. अभ्यासात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी आयुष्यात कधी ना कधी व्यसनांचा वापर केल्याचे मान्य केले, तर १०.३ टक्के विद्यार्थ्यांनी मागील एका वर्षात आणि ७.२ टक्के विद्यार्थ्यांनी मागील महिन्यात अशा पदार्थांचा वापर केल्याचे सांगितले.चिंतेची बाब म्हणजे, जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांनी तंबाखू सहज उपलब्ध असल्याचे, तर ३६ टक्के विद्यार्थ्यांनी मद्य सहज मिळत असल्याचे नमूद केले. यामुळे अल्पवयीन मुलांपर्यंत व्यसनाधीन पदार्थ सहज पोहोचत असल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.विशेष म्हणजे ९५ टक्के विद्यार्थ्यांना व्यसन हानिकारक असल्याची जाणीव असूनही त्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून आले. मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये व्यसनांचे प्रमाण अधिक असल्याचेही अभ्यासात स्पष्ट झाले आहे.अर्थात शहरी भागात मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात धुम्रपान व मद्यपानाची सवय असल्याचे दिसून आली आहे. गंभीर बाब म्हणजे शासनाने शाळांच्या शंभर मीटर परिसरात पान तंबाखूची दुकाने असू नयेत असे आदेश काढले असले तरी पोलिसांकडूनही याबाबत ठोस कारवाई होताना दिसत नाही.शालेय व महाविद्यालयीन परिसरात केवळ तंबाखूजन्य पदार्थच नव्हे तर अंमली पदार्थही उघडपणे मिळतात असे सूत्रांचे म्हणणे आहे. चरस-गांजापासून विविध अमली पदार्थ विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होत असून मोठ्या प्रमाणात तरुण पिढी व्यसनाकडे वळताना दिसत आहे.केवळ जनजागृती नव्हे तर पालक, शाळा, समाज आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांशिवाय ही समस्या आटोक्यात येणार नाही असा इशाराही अभ्यासकांनी दिला आहे.

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 11:10 am

मुंबईतील नागरिकांच्या सुविधेसाठी आता हेल्थ चॅटबॉट; भविष्यात रुग्णशय्या उपलब्धतता डॅशबोर्डही करणार सुरू

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने डिजिटल सेवांच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी ‘हेल्थ चॅटबॉट’ ची सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे. या डिजिटल सुविधांचे लोकार्पण राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीआशिष शेलार यांच्या शुभहस्ते सोमवारी १५ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले.येत्या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य सुविधांबाबतचे समर्पक असे संकेतस्थळ आणि ओपीडी रुग्णशय्या उपलब्धतता डॅशबोर्डही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तंत्रज्ञानावर आधारित सेवांमुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित माहिती अधिक सुलभपणे मिळण्यासाठी मदत होणार आहे.महानगरपालिकेच्या वतीने डिजीटल पुढाकार अंतर्गत नागरिकांना आरोग्य क्षेत्रासाठी चॅटबॉटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डिजीटल पुढाकाराच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात पारदर्शकता वाढवतानाच, आरोग्य सुविधांची पोहच आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.सार्वजनिक आरोग्याशी संबंधित माहिती सहजशक्य आणि डिजीटल पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासकभूषण गगराणी यांनी दिले होते. डिजीटल पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांना अतिशय पारदर्शकपणे माहिती उपलब्ध होणार आहे. महानगरपालिकेच्या कामकाजात अधिकाधिक माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. याचा एक भाग म्हणून डिजीटल पद्धतीने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यासह अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभाग अंतर्गत घेतलेला हा पुढाकार नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरेल. अधिकाधिक तंत्रज्ञानस्नेही पुढाकारांमुळे नागरिकांच्या वेळेची बचत होईल. तसेच आरोग्य क्षेत्रातील आपत्कालीन प्रसंगीचे निर्णय घेण्यासाठी ही सुविधा महत्वाची ठरेल.बीएमसी हेल्थ चॅटबॉटनागरिकांना आरोग्याच्यादृष्टीने प्रतिबंधात्मक काळजी घेण्यापासून ते संपूर्ण आरोग्य सेवांची माहिती देण्यासाठी 9892993368 हा चॅटबॉट क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पुढाकार अंतर्गत आजाराबाबत जनजागृती, आरोग्य क्षेत्रातील मोहीमेची माहिती, नजीकची आरोग्य सुविधा, नोंदणींबाबत माहिती, आरोग्य प्रमाणपत्र तसेच परवान्याबाबतची माहिती, आरोग्य केंद्राच्या ठिकाणी भेटीची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी इत्यादी सुविधा चॅटबॉटच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचण्यासाठी मदत होईल. त्यासोबतच आरोग्य यंत्रणेतील कार्यक्षमता वाढीसाठीही मदत होईल.नागरी सेवांमध्ये जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी अर्ज करण्याबाबतची माहिती, विवाह नोंदणीची माहिती, अपंगत्व प्रमाणपत्र, आरोग्य परवाने तसेच प्रसूतिगृहाशी संबंधित परवाने मिळवण्याच्या प्रक्रियेची माहितीही या चॅटबॉटच्या माध्यमातून मिळणार आहे.ऑनलाईन नोंदणी आणि सेवा नोंदणीनागरिकांना आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ऑनलाईन नोंद करण्यासाठी डिजिटल पद्धतीने नोंद करणे शक्य होणार आहे. नागरिकांची वेळेची बचत ऑनलाईन नोंदणी सुविधेमुळे शक्य होईल.राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय आरोग्य सेवांसाठीचा पुढाकारराज्य आणि राष्ट्रीय स्थरावरील आरोग्य सुविधा आणि सेवांसाठी महत्वाची माहिती चॅटबॉटच्या माध्यमातून आगामी कालावधीत उपलब्ध होणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारशी संबंधित विविध आरोग्य योजनांची माहिती याठिकाणी उपलब्ध होईल.

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 11:10 am

भारतीय रेल्वेने ११ वर्षांत तयार केले ४२ हजारांहून अधिक एलएचबी कोच

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने गेल्या ११ वर्षांत (२०१४-२०२५) ४२,६०० हून अधिक एलएचबी कोच (लिंके हॉफमन बुश) तयार केले आहेत, जे रेल्वेच्या आधुनिकीकरण, सुरक्षितता आणि प्रवाशांच्या सोयीसुविधा वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. हे कोच पारंपरिक आयसीएफ कोचपेक्षा अधिक सुरक्षित, आरामदायी आणि कमी देखभालीचे आहेत, तसेच 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' अभियानाला पाठिंबा देतात. या उत्पादनामुळे देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढली असून आयातीवरील अवलंबित्व कमी झाले आहे.चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ (नोव्हेंबर २०२५ पर्यंत) एकूण ४,२२४ हून अधिक एलएचबी कोच तयार करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत उत्पादित केलेल्या ३,५९० कोचच्या तुलनेत ही १८% वाढ दर्शवते.उत्पादनातील ही वाढ रेल्वे युनिट्समधील उत्पादन क्षमतेतील सतत बळकटीकरण आणि सुधारित उत्पादन नियोजन दर्शवते. एलएचबी कोचमुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि अधिक कार्यक्षम बनतो.

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 11:10 am

अहमदाबादच्या भक्तांकडून साईचरणी सोन्याची गणेश मूर्ती

शिर्डी : श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून, भाविकांकडून श्री साईबाबांच्या चरणी भरभरून दान अर्पण केले जाते. सोमवारी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील एका साईभक्ताने श्री साईबाबांच्या चरणी १०२.४५० ग्रॅम वजनाची सोन्याची गणेश मूर्ती अर्पण केली. सदर सोन्याच्या मूर्तीची किंमत रु. १२ लाख ३९ हजार ४४० इतकी असून, दानशूर साईभक्ताने आपले नाव जाहीर न करण्याची विनंती संस्थानकडे केली आहे. ही सोन्याची गणेश मूर्ती श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी देणगीदार साईभक्ताचा सत्कार करून आभार व्यक्त केले.

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 11:10 am

वकिलाकडून थुंकीने पान उलटण्यावर न्यायाधीशांचा आक्षेप

कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अमृता सिन्हा यांनी एका वकिलाने थुंकी लावून पान उलटण्यावर आक्षेप घेतला आहे. न्यायालयाच्या खोलीचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे, ज्यामध्ये एक वकील थुंकीने कागदपत्रे उलटताना दिसत आहे. न्यायमूर्ती सिन्हा यांनी हे पाहिले आणि त्यांनी लगेच त्याबाबतची नाराजी व्यक्त करत, वकिलाला हात धुण्याचे आदेश दिले आणि इशारा दिला की जर त्याने तसे केले नाही तर त्या केस ऐकणार नाहीत.काही क्षणानंतर, वकिलाने म्हटले, मला माफ करा. न्यायमूर्ती सिन्हा यांनी विचारले, तुमचा बँड कुठे आहे? हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे का?विशेष म्हणजे, न्यायालयात प्रश्नोत्तराच्या सत्रात वकील त्यांच्या कोटांसह बँड घालतात; परंतु ते वकील बँड विसरले. त्यामुळे रागावलेल्या न्यायमूर्ती सिन्हा यांनी त्या वकिलास आधी तुमचे हात धुवा. नाहीतर, मी आता हा खटला ऐकणार नाही, असे बजावले. त्यानंतर वकील हात धुवून परत आले. त्यानंतर न्यायाधीशांनीकेस ऐकली.

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 11:10 am

विक्रोळीतील निवडणूक गोदामातील सीसी टिव्ही कॅमेरे बंद

आता नव्याने सी सी टिव्ही कॅमेरांसह फायर अलार्म प्रणाली बसवणारमुंबई (विशेष प्रतिनिधी): निवडणूक खात्याच्या विक्रोळी पूर्व येथील वर्षांनगर महापालिका शाळेतील ईव्हीएम गोदामातील सीसी टिव्ही कॅमेरे वांरवार बंद पडत असून आता याठिकाणी नव्याने सी सी टिव्ही कॅमेरे तसेच फायर अलार्म सिस्टीम बसवण्यात येणार आहे.. त्यामुळे या सीसी टिव्ही कॅमेरांसह अलार्म सिस्टीम बसवण्याचे काम तातडीने होती घेण्यात आले आहे.विक्रोळी पश्चिम येथील वर्षानगर मनपा शाळा संकुल येथे ई.व्ही.एम गोदाम बनवण्यात आले असून येथील नविन गोदामात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सी. सी. टी. व्ही. सिस्टिम तसेच फायर अलार्म सिस्टिम बसविण्याबाबत उपनिवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे. या ठिकाणी जागेची पाहणी केल्यानंतर या ठिकाणी ई.व्ही.एम ची योग्य हाताळणी व सुरक्षीत साठा ठेवण्याकरिता नवीन गोदाम उपलब्ध करण्यात आले आहे. परंतु सद्यस्थितीत निवडणूक खात्याच्या पहिल्या मजल्यावरील ई.व्ही.एम गोदामात कोणतीही सी.सी.टी.व्ही. तसेच फायर अलार्म सिस्टिम उपलब्ध नाही. तसेच तळमजला येथे सी.सी.टी.व्ही. सिस्टिम जी उपलब्ध आहे, ती सिस्टिम जुनी झाली आहे. येथील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे नवीन सी.सी.टी.व्ही. तसेच फायर अलार्म सिस्टिम बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.https://prahaar.in/2025/12/16/for-the-convenience-of-mumbai-citizens-a-health-chatbot-has-now-been-launched/त्यामुळे महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाच्यावीने नव्याने निविदा प्रक्रिया राबण्यात आली आहे. यामध्ये शिवम कार्पोरेशन यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी नव्याने सीसी टिव्ही कॅमेरे आणि फायर अलार्म प्रणाली बसवण्यासाठी तब्बल ८८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 11:10 am

Bigg Boss Marathi Season 6: अवघ्या महाराष्ट्राने केलं आपल्या लाडक्या रितेश भाऊचं तुफानी स्वागत!

Bigg Boss Marathi Season 6 : ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने पाहत होता, तो बहुप्रतिक्षित क्षण अखेर साकार झाला आहे. कलर्स मराठीद्वारे बिग बॉस मराठी सिझन ६ चा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं असून, अवघ्या १२ तासांत २.४ Million हून अधिक व्ह्यूज मिळवत हा प्रोमो सोशल मीडियावर ट्रेंड ठरतोय. “स्वागताला मनाची आणि घराची […] The post Bigg Boss Marathi Season 6: अवघ्या महाराष्ट्राने केलं आपल्या लाडक्या रितेश भाऊचं तुफानी स्वागत! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 11:03 am

‘इम्रान खान तुरुंगात, मुनीरला आजीवन संरक्षण…’ ; संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले

India UNSC Statement। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताने पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. देशांतर्गत राजकीय अशांततेचा संबंध सीमापार दहशतवादाच्या त्यांच्या दीर्घ रेकॉर्डशी जोडला. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत हरीश पर्वथनेनी यांनी पाकिस्तानमधील लोकशाहीची स्थिती, इम्रान खानची अटक, लष्कराची भूमिका आणि दहशतवाद यावर सडेतोड प्रतिक्रिया दिली. “लीडरशिप फॉर पीस” या विषयावरील संयुक्त राष्ट्र […] The post ‘इम्रान खान तुरुंगात, मुनीरला आजीवन संरक्षण…’ ; संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 10:58 am

“नेमकं कोण कोणासाठी काम करतंय आणि…”; महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच रोहित पवारांचं ट्वीट चर्चेत

Rohit Pawar Tweet : राज्यातील २९ महापालिकांचे निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकांचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अखेर सोमवारी १५ डिसेंबर या दिवशी राज्य निवडणूक आयागाने महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता हालचालींना […] The post “नेमकं कोण कोणासाठी काम करतंय आणि…”; महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच रोहित पवारांचं ट्वीट चर्चेत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 10:44 am

जपानपासून कोरियापर्यंतच्या बाजारपेठेत गोंधळ ; सेन्सेक्स-निफ्टी उघडताच धडाम

Stock Market Crash। शेअर बाजारामध्ये आजदेखील मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक उघडताच कोसळले. परदेशी बाजारपेठेत सुरू असलेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स उघडताच ३०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही मोठ्या घसरणीसह उघडला. सोमवारप्रमाणेच मंगळवारीही आशियाई बाजार गोंधळाच्या स्थितीत आहेत. जपानचा निक्केई, दक्षिण कोरियाचा […] The post जपानपासून कोरियापर्यंतच्या बाजारपेठेत गोंधळ ; सेन्सेक्स-निफ्टी उघडताच धडाम appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 10:31 am

Mrunal Thakur: मृणाल ठाकुर, अदिवी शेष यांच्या ‘डकैत’चा टीझर कधी येणार? तारीख जाहीर

Mrunal Thakur: अभिनेत्री मृणाल ठाकुर आणि अभिनेता अदिवी शेष यांची आगामी फिल्म ‘डकैत’ सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या टीझरची रिलीज डेट जाहीर झाल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मृणाल ठाकुरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली की ‘डकैत’चा दमदार टीझर १८ डिसेंबरला रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे, टीझर दोन शहरांमध्ये वेगवेगळ्या वेळेला दाखवला जाणार आहे. मुंबईतील […] The post Mrunal Thakur: मृणाल ठाकुर, अदिवी शेष यांच्या ‘डकैत’चा टीझर कधी येणार? तारीख जाहीर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 10:31 am

मीरा रोडच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधील अमली पदार्थांचा कारखाना केला उद्ध्वस्त

१०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तभाईंदर : मीरा रोडच्या काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्याचा तपास करत असताना राजस्थान राज्यातील झुनझुनू गावातील अमली पदार्थ बनविणारा कारखाना उघडकीस आला असून पोलिसांनी १०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली आहे.मीरा रोड येथील काशिगाव पोलीस ठाण्याचे पथक ४ ऑक्टोबर रोजी गस्त घालत असताना ६ इसमांची संशयावरून झडती घेतली. त्यांच्याकडे १ लाख ३२ हजार रुपयांचे अमली पदार्थ आढळले. त्यांना अटक करून तपास करत असताना आणखीन ४ आरोपी असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडून २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांना सुद्धा अटक करण्यात आली. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी पोलीस पथक राजस्थान राज्यातील झुनझुनू गावात पोहोचले. तेथे त्यांना अमली पदार्थ बनविण्याचा कारखाना उघडकीस आला.पोलिसांनी सुमारे १० किलो एमडी, एमडीचे प्री-कर्सर रसायने तसेच एमडी बनविण्याची आवश्यक ती साधनसामग्री (फ्लास्क, मिक्सर, ड्रायर मशिन, वजन काटा, हँड ग्लोज, फिल्टर इ) असा १०० कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून कारखाना चालविणारा अनिल विजयपाल सिहागला अटक केली.ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष १ चे प्रभारी पोलीस निरीक्षक समीर शेख आणि त्यांच्या पथकाने केली.

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 10:30 am

माकडांसह भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

पोलादपूरमध्ये वर्षभरात २७४ श्वानदंश रुग्णशैलेश पालकरपोलादपूर : भटकी कुत्री, गुरे आणि माकडांच्या तसेच अन्य प्राण्यांच्या उपद्रवाविरोधात संबंधित प्रशासनाने ठोस कारवाई करून नागरिकांचे जीवन सुरक्षित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्ती बेंचने दिले. पोलादपूरचे कायदेतज्ज्ञ जेष्ठ नागरिक पंडीत उर्फ सुधीर चित्रे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा हवाला देत मोकाट कुत्री-गुरांच्या बंदोबस्तासाठी टपालाद्वारे निवेदन पाठविले. पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिपाई यांनी तहसिलदारांसह सर्व आस्थापनांना श्वानमुक्त परिसरासाठी २८ नोव्हेंबरच्या पत्राने आदेशित करून नागरिकांच्या सुरक्षेचा चेंडू अन्य आस्थापनांकडे भिरकावला. या प्रशासकीय उडवाउडवीमध्ये पोलादपूर शहरातील १४ व्यक्तींना १५ डिसेंबरपर्यंत श्वानदंश झाल्याची नोंद ग्रामीण रूग्णालयामधून प्राप्त झाली आहे.आबालवृद्ध स्त्रीपुरूष नागरिकांना सुरक्षिततेचे जीवन तसेच वावरणे हा त्यांचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्या.विक्रम नाथ, न्या.संदीप मेहता, न्या.एन.व्ही.अंजारिया या तीन न्यायाधिशांच्या बेंचने महापालिका व इतर सर्व संस्थांना निकालपत्राने आदेश दिले. या आदेशाबद्दल गांभिर्याने दखल घेऊन पोलादपूर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या तसेच मोकाट जनावरांच्या उपद्रवाचा त्वरीत बंदोबस्त करण्याच्या विनंतीचे निवेदन रायगड जिल्हाधिकारी आणि पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना पोलादपूर येथील कायदेतज्ज्ञ ज्येष्ठ नागरिक सुधीर तथा पंडीत चित्रे यांनी दिले. या निकालामध्ये सर्व संबंधित संस्थांनी काय कारवाई केली याबाबत तीन महिन्यांच्या कालावधीची मुदत देऊन संबंधित संस्थाप्रमुख तसेच लोकप्रतिनिधी यांच्यावरही कारवाईचे संकेत दिले. नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी या आदेशपत्रान्वये आस्थापनांना आदेशित करताना पोलादपूरच्या रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांसंदर्भात कोणतीही कारवाई करण्याची जबाबदारी पार पाडली नसल्याची धक्कादायक आकडेवारी पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये श्वानदंशावर उपचार झालेल्या रूग्णांची माहिती घेता आढळून आली आहे. पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये २०२५ वर्षांमध्ये २७४ श्वानदंश रूग्णांवर उपचार करण्यात आले. पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये याखेरिज उंदीर चावणे, माकडाने चावे घेणे, किटकांनी चावे घेणे, विंचू व सर्पदंशाचे रूग्ण तसेच मोकाट जनावरांच्या धडकेने जखमी झालेल्या रूग्णांचीही वेगळी आकडेवारी असल्याचे दिसूनआले आहे. पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील आबालवृध्द, स्त्री-पुरूष नागरिकांना सुरक्षिततेचे जीवन तसेच वावरणे देणे हा त्यांचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातील मुद्दे दूर्लक्षित करून मुख्याधिकारी शिपाई यांनी नगरपंचायत हद्दीतील सर्व सरकारी व खासगी आस्थापनांना आदेशित केल्यानंतर पंचायत समितीतील विस्तार अधिकारी हंबीर यांनाही १ डिसेंबर २०२५ रोजी श्वानंदश झाल्याने पोलादपूर पं.स.गटविकास अधिकारी दिप्ती गाट यांनी मुख्याधिकारी शिपाई यांना मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पत्र दिले. यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यास २ डिसेंबर रोजी पंचायत समितीच्या आवारात श्वानदंश झाला.

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 10:30 am

भारताचे जॉर्डनसोबत ५ महत्वपूर्ण करार ; पंतप्रधान मोदी आज इथिओपियाला रवाना होणार

India Jordan Relations। भारत आणि जॉर्डन यांच्यात काही महत्वपूर्ण करार झाले आहेत. दोन्ही देशात सोमवारी दहशतवादविरोधी उपाययोजना, गाझासह प्रादेशिक विकास आणि द्विपक्षीय सहकार्य यावर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्यात अम्मानमध्ये झालेल्या चर्चेनंतर, दोन्ही बाजूंनी पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, दहशतवादविरोधी आणि कट्टरतावादमुक्ती, खते […] The post भारताचे जॉर्डनसोबत ५ महत्वपूर्ण करार ; पंतप्रधान मोदी आज इथिओपियाला रवाना होणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 10:11 am

मध्य रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकावर प्रवाशांचा नवा तोडगा

लोकल उशिरा, तर ईमेलचा मारामुंबई : मध्य रेल्वेवरील लोकल सेवा दररोज उशिराने धावत असल्याने, प्रवाशांचे नियोजन बिघडते. अनेक प्रवासी कामाच्या ठिकाणी विलंबाने पोहोचल्याने त्यांच्या वेतनातून पगार कपात होण्याच्या घटना घडतात. तसेच अनेक रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना लोकलच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे त्रासास तोंड द्यावे लागते. रेल्वेच्या अशा कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेल करण्यास सुरुवात केली आहे.मध्य रेल्वेवरील लोकल रोजच उशिरा धावतात. त्यामुळे प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. दररोज विलंबाने लोकल धावत असल्याने लोकलमधील गर्दी वाढते, पुढील प्रवासाच्या वेळा चुकतात. लोकल रखडल्याने किंवा उशीरा धावल्याने काही प्रवाशांच्या बाहेरगावच्या गाड्या, विमाने चुकल्याच्याही घटना घडल्या आहेत. प्रवासी वेळेत फलाटावर पोहोचून देखील विलंबाने धावत असलेल्या लोकलने प्रवास करावा लागतो. तसेच प्रवाशांना विलंबाबद्दल, लोकल रद्द झाल्याबाबत, लोकल बिघाडाबाबत अनेकदा माहितीही दिली जात नसल्याने प्रवाशांची परवड होते.मध्य रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लोकलच्या ढासळणाऱया वक्तशीरपणाकडे लक्ष द्यावे. विलंबाच्या वेळी वेळेवर आणि स्पष्ट घोषणा कराव्यात. बिघाडाच्या घटना कमी होण्यासाठी सुधारणात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना ई-मेलद्वारे प्रवासी करत आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकासह इतर अधिकाऱ्यांच्या ई-मेलवर प्रवासी तक्रारींचे मेलकरत आहेत.मध्य रेल्वेचे कोलमडलेले वेळापत्रकएप्रिल २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या आठ महिन्याच्या कालावधीत नोव्हेंबरमध्ये मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा ढासळला. दर महिना सरासरी वक्तशीरपणा ९२ ते ९३ दरम्यान होता. परंतु, नोव्हेंबरमध्ये ९१.६८ टक्क्यांपर्यंत खाली आला. तसेच गेल्यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये ९३.३८ टक्के सरासरी वक्तशीरपणा होता. त्यातुलनेत यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये १.७ टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे प्रवाशांमध्ये मध्य रेल्वेच्या बेशिस्त कारभाराबाबत संताप व्यक्त करत आहेत.

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 10:10 am

मध्य प्रदेश, छत्तीसगडसाठी रेल्वेगाड्या कोकण रेल्वेवरून धावणार

नाताळ, नवीन वर्षासाठी विशेष भाडे आकारणारमुंबई : नाताळ आणि नवीन वर्षाच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी, कोकण रेल्वेवरून अतिरिक्त रेल्वेगाड्या धावतील. या रेल्वेगाड्यांसाठी प्रवाशांकडून विशेष भाडे आकारणी केली जाईल. कोकण रेल्वेवरून मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, कर्नाटक येथे रेल्वेगाड्या धावतील.कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांच्या समन्वयाने मध्य प्रदेशातील डॉ. आंबेडकर नगर ते कर्नाटकातील ठोकूर येथे विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येईल. गाडी क्रमांक ०९३०४ डॉ. आंबेडकर नगर ते ठोकूर विशेष गाडी २१ आणि २८ डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकर नगर येथून दुपारी ४.३० वाजता सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी रात्री ३ वाजता ठोकूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०९३०३ ठोकूर ते डॉ. आंबेडकर नगर विशेष गाडी २३ आणि ३० डिसेंबर रोजी ठोकूर येथून पहाटे ४.४५ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता डॉ. आंबेडकर नगर येथे पोहोचेल.या रेल्वेगाड्या इंदौर, देवास, उज्जैन, नागदा, रतलाम, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुरडेश्वर, भटळ, मुकांबिका रोड बायंदूर (एच), कुंदापूर, उडुपी, मुल्की, सुरतकल स्थानकांवर थांबतील.कोकण रेल्वे व दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्या समन्वयाने छत्तीसगड येथील बिलासपूर ते गोव्यातील मडगाव येथे विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येईल. गाडी क्रमांक ०८२४१ बिलासपूर ते मडगाव एक्स्प्रेस २० व २७ डिसेंबर, ३ आणि १० जानेवारी रोजी दुपारी २.४५ वाजता बिलासपूरहून सुटेल.इगतपुरी स्थानकांवर अतिरिक्त थांबाया रेल्वेगाडीला भाटापारा, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी स्थानकांवर थांबेल. तसेच गाडी क्रमांक ०८२४२ वरील सर्व स्थानकांवर थांबेल आणि इगतपुरी स्थानकावर तिचा अतिरिक्त थांबा असेल. या रेल्वेगाडीला एकूण १८ एलएचबी डबे असतील. या रेल्वेगाडीचे आरक्षण आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर, प्रवासी आरक्षण प्रणालीवरून सुरू झाले आहे.

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 10:10 am

फसवणूक प्रकरणात श्रेयस तळपदे, आलोक नाथ यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

मुंबई : सुप्रीम कोर्टाने सोमवारी अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांना मोठा दिलासा दिला. सहकारी संस्थेशी संबंधित फसवणूक आणि गुन्हेगारी विश्वासघाताच्या प्रकरणात चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघांच्या अटकेला स्थगिती देण्यात आली आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने श्रेयस तळपदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, यापूर्वी दिलेले अटकपूर्व संरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.कोर्ट सध्या त्या याचिकांवरही सुनावणी करत आहे, ज्यामध्ये दोन्ही अभिनेत्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये दाखल झालेल्या एफआयआर एकत्र करण्याची मागणी केली. सुनावणीदरम्यान श्रेयस तळपदे यांच्या वकिलांनी सांगितले की, अभिनेता कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमाला पाहुणा म्हणून उपस्थित होता. त्यांचा सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांशी कोणताही संबंध नव्हता, तसेच त्यांनी यातून कोणताही आर्थिक लाभ घेतलेला नाही. दरम्यान, आलोक नाथ यांच्या वकिलांनी सांगितले की, अलोकनाथ कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. गेल्या सुमारे दहा वर्षांपासून संबंधित सोसायटी त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या छायाचित्रांचा वापर करत असल्याचा दावाही त्यांनी केला.एखादा अभिनेता किंवा खेळाडू जाहिरातीत दिसला असेल किंवा ब्रँड अँबेसिडर असेल, आणि संबंधित कंपनी नंतर गुन्हेगारी कृत्यात सामील असल्याचे आढळले, तर त्या व्यक्तीला जबाबदार धरता येईल का, असा सवाल न्यायालयाने केला.

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 10:10 am

ठाण्यात शुक्रवारपर्यंत पाणीकपात

कल्याण फाटा येथे नादुरुस्त झालेल्या जलवाहिनीचे काम सुरू ठाणे : कल्याण फाटा येथील महानगर गॅसच्या कामांमध्ये ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी १००० मि.मी. व्यासाची जलवाहिनी चार ते पाच वेगवेगळ्या ठिकाणी दिनांक ११ डिसेंबर रोजी नादुरूस्त झाली होती, ही जलवाहिनी दुरूस्त करण्याचे काम सुरू आहे, परंतु या कामासाठी आणखी ४ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाण्यात शुक्रवारपर्यंत ५० टक्के पाणीकपात लागू करण्यात येत आहे.पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने व जलदगतीने करण्यात येत आहे. मात्र जलवाहिनी जुनी व प्रिस्ट्रेस काँक्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी उशीर होत असून हे काम पूर्ण होण्यास अजून ४ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.परिणामी, ठाण्यातील पाणीपुरवठा कमी झाला असून शहरांमध्ये ५० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. शहरामध्ये पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी शुक्रवारपर्यंत प्रत्येक भागात दिवसातून १२ तास झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले.

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 10:10 am

धक्कादायक! कर्ज फिटवण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; एक मेसेज आणि सत्याचा उलगडा

लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक घटना लातूरमधून समोर आली आहे. त्याने तब्बल १२ तास कारमध्ये जळून मृत्यू झाल्याचे नाटक केले. त्याच्या या नाटकाला पोलीस सुद्धा भुलले. पण, जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा एक मेसेज आणि एका तरुणीचे कनेक्शन समोर आल्याने गणेशचा सर्व डाव उलटला आणि तो पोलिसांच्या गळाला लागला.मिळालेल्या माहितीनुसार, औसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत शनिवार, १३ डिसेंबर रात्री उशिराने वानवडा भागात एक कारला आग लागली. ज्यात लातूरमधील औसा तालुक्यात वानवडा इथे एका कारमध्ये ५० वर्षीय इसमाचा जळून मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचताच आग आटोक्यात आणण्याचे काम अग्निशमन दलाकडून करण्यात आले. आग नियंत्रणात येताच पोलिसांनी गाडीची तपासणी केली, ज्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. गणेश चव्हाण असे या तरुणाचे नाव सांगितले जात होते. पण, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता मृत व्यक्ती गणेश चव्हाण ही जिवंत असल्याचे समोर आले. तसेच गणेश चव्हाणनेच आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याचे उघड झाले.मृत्यूचा बनाव करणारे गणेश चव्हाण यांची चौकशी करताना पोलिसांना समजले की, दुपारी घरातून बाहेर गेलेले गणेश दिवसभरात परत आले नव्हते. तसेच त्यांचा मोबाईल सुद्धा बंद होता. त्यामुळे पोलीसांची अशी धारणा झाली की, कारमधील मृत व्यक्ती ही गणेश चव्हाण आहे. त्यामुळे औसा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांना गणेश चव्हाणवर संशय आल्याने त्यांनी गणेशची इतर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असता त्याची एक मैत्रीण सापडली. तिच्याक़डे चौकशी केली असता असं निष्पन्न झाले की, गणेश चव्हाणकडे तिसरा फोन होता. अपघाताची घटना घडून गेल्यानंतरही तिसऱ्या नंबरवरून या तरुणीशी संवाद साधला जात होता. मेसेज, चॅट सुरू होते. त्यामुळे पोलिसांचा गणेशचा तपास सुरू केला.https://prahaar.in/2025/12/16/a-horrific-accident-occurred-on-the-ambejogai-latur-national-highway-three-people-died-on-the-spot/गणेशचा तपास करण्यासाठी लातूर पोलिसांनी त्याचा तिसरा फोन नंबर ट्रेस करण्यास सुरुवात केली. जो आधी कोल्हापूर, नंतर सिंधुदुर्ग आणि विजयदुर्गपर्यंतचे लोकेशन दाखवत होता. लोकेशनच्या आधारे पोलिसांनी गणेश चव्हाणला जिवंत पकडले. त्यामुळे कारमध्ये असलेला मृत व्यक्तीचा सांगाडा हा दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे स्पष्ट झाले. गणेशची चौकशी केल्यावर समोर आले की, गणेशवर फ्लॅटचे कर्ज होते. ते कर्ज कमी करण्यासाठी गणेश चव्हाण याने १ कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढण्याचा प्लॅन केला. या टर्म इन्शुरन्ससाठी त्याने मृत्यूचा कट रचला.यासाठी त्याने तुळजापूर टी पॉईंट औसा इथून एका व्यक्तीला लिफ्ट दिली होती. गोविंद यादव असे या व्यक्तीचे नाव होते. गोविंद यादवला गणेशने कारच्या समोरील सिटीवर बसवले आणि कारला आग लागली तरी तो तिथून पळून जाणार नाही, असे नियोजन करून गोविंद यादव यांचा त्याने खून केला. एवढेच नाहीतर मृतदेह हा आपलाच आहे, असे भासावे म्हणून गणेशने आपल्या हातातले कडे गोविंद यादवच्या सीटवर ठेवले. जेणे करून पोलिसांना संशय येणार नाही. त्याच्या कुटुंबीयांनाही हे सत्य असल्याचे वाटले. पण, औसा पोलिसांच्या तपासात सत्य समोर आले आहे. औसा पोलीस स्टेशनमध्ये गोविंद यादव याचा खून केला या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करत आरोपी गणेशला अटक केली आहे.

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 10:10 am

सिडनी हल्ला-20 मिनिटे, 50 राऊंड गोळीबार, 15 मृत्यू:प्रत्यक्षदर्शी म्हणाले- लोक मरत राहिले; पोलिस समोर होते, पण काहीच केले नाही

जगात ऑस्ट्रेलियाची ओळख तीन ठिकाणांमुळे आहे - ओपेरा हाऊस, सिडनी हार्बर ब्रिज आणि बॉन्डी बीच. ओपेरा हाऊस आणि सिडनी हार्बर ब्रिज पूर्वीप्रमाणेच गजबजलेले आहेत, पण सिडनीच्या प्रसिद्ध बॉन्डी बीचवर मात्र शोककळा पसरली आहे. १४ डिसेंबरच्या संध्याकाळी दोन हल्लेखोरांनी ज्यूंना लक्ष्य करून ५० गोळ्या झाडल्या. १५ लोक मारले गेले. ४० लोक जखमी आहेत. हे सर्वजण 'हनुक्का' हा धार्मिक सण साजरा करत होते. मृत्यू झालेल्यांमध्ये सणाचे आयोजन करणारे एली स्लँगर देखील होते. हल्लेखोरांनी सर्वात आधी त्यांनाच गोळी मारली. सिडनीमध्ये राहणारे ४१ वर्षीय एली स्लँगर ऑस्ट्रेलियातील ज्यूंमध्ये एक ओळखीचे नाव होते. मृत्यू झालेल्यांमध्ये १० वर्षांच्या मुलीपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण आहेत. दिव्य मराठीने बॉन्डी बीचवरील हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि बळी ठरलेल्या काही व्यक्तींशी संवाद साधला. यांकी बर्गरयहूदी नेते आणि एली स्लँगरचे मित्रऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनीच्या बॉन्डी बीच परिसरात देशातील सर्वात श्रीमंत लोक राहतात. यहूदी समुदायातील बहुतेक लोक मोठे व्यावसायिक आहेत आणि याच परिसरात राहतात. ऑस्ट्रेलियामध्ये यहुद्यांना शांतताप्रिय व्यावसायिक समुदाय म्हणून ओळखले जाते. याच परिसरात राहणारे यांकी बर्गर हे ज्यूंचे नेते आहेत. ते सांगतात, 'बॉन्डी बीचवर माझ्या मित्र एली स्लँगरने हनुक्का महोत्सवाचे आयोजन केले होते. अचानक 2 दहशतवाद्यांनी महोत्सवाला लक्ष्य करून गोळीबार सुरू केला. महोत्सव साजरा करणारे लोक पळू लागले. दहशतवाद्यांनी महिला, मुले, वृद्ध सर्वांना गोळ्या घातल्या.' 'पहिली गोळी एलीलाच लागली. एली ज्यूंचे नेते होते. त्यांना 5 मुले आहेत. एली आनंदी स्वभावाचे व्यक्ती होते. हल्ल्याच्या वेळी ते स्टेजवर उभे होते. तेव्हा हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी मारली.' हल्ल्याच्या वेळी यांकी बर्गरचा मुलगा आणि नातही महोत्सवात उपस्थित होते. त्यांनी पाहिलेले सांगताना यांकी म्हणतात, 'मुलगा मेंडीने गोळीबाराचा आवाज ऐकला. माझी नात बाथिया त्याच्यासोबत होती. मेंडीने मुलीला कडेवर घेतले आणि वाचण्यासाठी लपला. त्याला जाणवत होते की गोळीबाराचा आवाज वाढत आहे आणि त्याच्या आजूबाजूला गर्दी जमा होत आहे.' ‘मेंडीला वाटले की आता मृत्यू जवळ आहे. तो मुलीसोबत आमच्या धर्मात म्हटली जाणारी शेवटची प्रार्थना करू लागला. त्याने लोकांना गोळ्या लागताना आणि खाली पडताना पाहिले. हल्लाखोरांनाही जवळून पाहिले. या हल्ल्यानंतर लोक भीती आणि धक्क्यात आहेत. दुःखाशी झुंजत आहेत, पण आशा आहे की आम्ही आणखी मजबूत होऊ.’ ‘हमासच्या हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियात ज्यूंविरोधी द्वेष वाढला’यांकी ऑस्ट्रेलियाच्या सरकारवर नाराज दिसत आहेत. ते म्हणतात, ‘7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियात ज्यूंविरोधी द्वेष वाढला आहे. येथे गर्दी ज्यूंविरोधात निदर्शने करत होती. तरीही सरकार काही करत नव्हते. निदर्शनांमध्ये सहभागी असलेले लोक अनेकदा ज्यूंना मारण्याची भाषा करत होते. एली स्लँगर अशाच प्रकारचे मुद्दे मांडत राहिले.’ ‘यहूदी असल्याने मला वाटते की या हल्ल्यानंतर आमच्या सुरक्षेसाठी ऑस्ट्रेलिया सरकारने पावले उचलणे आवश्यक आहे. एक समुदाय म्हणूनही ही आमच्यासाठी मोठी शिकवण आहे. आपल्याला अधिक एकजूट राहावे लागेल. होलोकॉस्टच्या अवघ्या 3 वर्षांनंतर, 1948 मध्ये आम्ही आमचा स्वतःचा देश इस्रायल बनवला होता.’ ‘संपूर्ण जगाला माहीत आहे की यहुद्यांनी शतकानुशतके खूप काही सहन केले आहे. मला वाटते की आता यहुदी जागे झाले आहेत आणि त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवायला शिकले आहेत. आम्ही सण साजरा करण्यासाठी एकत्र जमलो होतो. हा प्रकाशाचा सण आहे. तो अंधार दूर करतो आणि जगाला प्रकाशित करण्याचा संदेश देतो.’ एली स्लँगरचा आणखी एक मित्र एलीझर टेवेलने त्यांच्यासाठी लिहिले, ‘ते फक्त त्यांचे काम करत होते. ते कोणत्याही युद्धभूमीवर नव्हते. ते फक्त एका महोत्सवात होते.’ अमित सरवालऑस्ट्रेलिया टुडेचे संपादकअमित सरवाल सांगतात, ‘या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण बॉन्डी बीच रिकामा करून घेतला होता. या परिसरातून एक कार मिळाली आहे. ही हल्लेखोरांची कार असल्याचे सांगितले जात आहे. कारमध्ये बॉम्ब बनवण्याचे साहित्य मिळाले आहे. हल्लेखोरांमध्ये 24 वर्षांचा नवीद अक्रम सामील आहे. त्याचे ड्रायव्हिंग लायसन्सही मिळाले. यानंतर हल्लेखोरांच्या घरावर छापा टाकण्यात आला.’ ‘ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी उच्चस्तरीय सुरक्षा बैठक बोलावली होती. त्यांना बंदूक परवान्याशी संबंधित नियम कठोर करायचे आहेत. एका व्यक्तीकडे 1-2 पेक्षा जास्त शस्त्रे नसावीत, हे सुनिश्चित करण्याबद्दल बोलले जात आहे.’ याला ज्यूविरोधी इस्लामिक हिंसाचार मानले जावे का? अमित उत्तर देतात, ‘सध्या हे निश्चितपणे सांगता येत नाही. हल्लेखोर असे काही बोलत होते किंवा त्यांनी इस्लामचा हवाला देऊन हल्ल्याच्या समर्थनार्थ पोस्टर्स-पत्रके फेकली होती, हे अद्याप निश्चित व्हायचे आहे.’ ‘हे खरे आहे की बॉन्डी बीचवर त्यावेळी खूप लोक होते. लक्ष्य करून फक्त ज्यूंनाच मारण्यात आले. हल्लेखोरांनी दुसऱ्या कॅफेमध्ये बसलेल्या लोकांवर गोळीबार केला नाही. जाणूनबुजून सण साजरा करणाऱ्या ज्यूंवरच गोळीबार केला. पंतप्रधान आणि पोलिसांनीही ही गोष्ट मान्य केली आहे. हल्लेखोरांनी राजकारण किंवा धर्माने प्रेरित होऊन हल्ला केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.’ ‘ऑस्ट्रेलियाच्या ग्रीन्स पक्षाच्या उपनेत्या महरीन फारुकी बॉन्डी परिसरात गेल्या, तेव्हा लोकांनी त्यांचा विरोध केला. आता लोकांना असे वाटत आहे की 7 ऑक्टोबर 2023 नंतर ग्रीन्स आणि डाव्या पक्षांनी ज्यूविरोधाला इतके जास्त प्रोत्साहन दिले आहे की लोकांमध्ये कट्टर विचारसरणी निर्माण होत आहे. यावर चर्चाही सुरू आहे.’ ज्यू साक्षीदारया व्यक्तीची ओळख पटलेली नाही. त्याने हल्लेखोरांना जवळून पाहिले होते. तो म्हणाला, 'तिथे दोन शूटर होते. एक पुलाखाली आणि वर होता. ते सलग २० मिनिटे गोळीबार करत राहिले. मॅगझिन बदलत आणि पुन्हा गोळीबार सुरू करत होते. २० मिनिटांपर्यंत कोणीही प्रत्युत्तर गोळीबार केला नाही. मी माझ्या मुलांना लपवले. मी त्या हल्लेखोरांनाच पाहत होतो.' 'हल्लेखोर खूप दूर होते, त्यामुळे मला त्यांचा आवाज ऐकू आला नाही. तिथे ४ पोलीसही होते, पण त्यांनी काहीच केले नाही. मी इस्रायली आहे. मी अशा प्रकारची परिस्थिती पाहिली आहे. मी ६ मुलांसोबत आलो होतो, सुदैवाने आम्ही सर्व सुरक्षित आहोत.' ‘उत्सवाचा पहिला दिवस होता. आम्ही त्यासाठी जमलो होतो. दहशतवाद्यांना आम्हाला मारायचे होते. आम्ही इतर नागरिकांसारखेच आहोत, पण आम्हाला अशा प्रकारे मारले जात आहे. मी स्वतः सैनिक राहिलो आहे, मी हे सर्व जवळून पाहिले आहे, पण ऑस्ट्रेलियात असे होईल असे कधीच वाटले नव्हते. दहशतवादी गोळीबार करत राहिले आणि त्यांच्यावर प्रत्युत्तर गोळीबार झाला नाही, ही धक्कादायक बाब आहे.’ अहमद अल अहमदहल्ला करणाऱ्याची बंदूक हिसकावून नायक बनलेसीरियन वंशाचे स्थलांतरित अहमद अल अहमद सिडनीमध्ये दुकान चालवतात. हल्ल्याच्या वेळी ते समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित होते. त्यांनी पाहिले की एक हल्लेखोर लोकांवर गोळीबार करत आहे. ते गुपचूप गेले आणि त्याला पकडले. त्याची बंदूक हिसकावून घेतली. हल्लाखोराला थांबवण्याच्या प्रयत्नात अहमदला गोळी लागली. ते गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 43 वर्षांच्या अहमदच्या कुटुंबीयांनी सांगितले की त्यांच्या खांद्यात गोळ्या लागल्या आहेत. काही गोळ्या हाडांमध्ये अडकल्या आहेत. अहमदचे कुटुंब काही महिन्यांपूर्वीच सीरियातून सिडनीला स्थलांतरित झाले होते. हल्ला करणारे बाप-बेटे, ISIS शी संबंधित असल्याचा संशयहल्ला करणाऱ्यांची ओळख साजिद अक्रम आणि त्याचा 24 वर्षांचा मुलगा नवीद अशी झाली आहे. त्यांनी कुटुंबाला सांगितले होते की ते वीकेंडला मासे पकडायला जात आहेत. नवीदचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला होता. ऑस्ट्रेलियाई गुप्तचर पोलिसांनुसार, दोघांवरही दहशतवादी संघटना ISIS शी संबंधित असल्याचा संशय होता. 2019 पासून त्यांच्यावर नजर ठेवली जात होती. आता प्रश्न उपस्थित होत आहेत की प्रशासनाने या माहितीवर कारवाई का केली नाही. साजिदकडे 6 रायफलचे परवाने होते. तो फायरिंग क्लबचा सदस्य होता. त्यामुळे त्याला इतके परवाने मिळाले होते. क्लबमार्फत त्याला शॉटगनचे परवाने मिळाले होते. पोलिसांनुसार, त्याने सामान्य पद्धतीनेच परवाने मिळवले होते. 50 वर्षीय साजिदला घटनास्थळीच ठार करण्यात आले. नवीद जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. न्यू साउथ वेल्सचे पोलीस आयुक्त माल लॅन्योन यांनी सांगितले की, पोलिसांना एका शूटरबद्दल माहिती होती, परंतु ते हल्ल्याची योजना आखत आहेत हे माहीत नव्हते.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 9:42 am

काळाचा घाला! समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा अंत; जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश

Samruddhi Highway accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भयंकर अपघाताची घटना घडली आहे. नाशिकाच्या सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथे अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने महामार्गावरून जात असलेल्या कारचा टायर फुटला आणि भीषण अपघात घडला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर अपघातात अनेकजण जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींमध्ये […] The post काळाचा घाला! समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा अंत; जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 9:41 am

विधानसभेत पुन्हा एकदा घुमला आमदार निलेश राणे यांचा आवाज

कोकणातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर वेधले सरकारचे लक्षमुंबई : नागपूर येथे नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आपल्या अभ्यासपूर्ण व मुद्देसूद भाषणांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सभागृह व सरकाराचे लक्ष वेधत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा विधानसभेत आपली आगळीवेगळी अशी छाप पाडली. कोकणात अतिवृष्टीमुळे शेतकरी व मच्छीमार बांधवांचे झालेले नुकसान, रस्त्यांची दुरवस्था, रखडलेले सिंचन प्रकल्प, वाळू व्यावसायिकांची प्रशासनाकडून होणारी ससेहोलपट यांसह अन्य प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवत जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी त्यांनी सरकारकडे केली. त्यांच्या या भाषणाचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी देखील सर्वसामान्यांचा बुलंद आवाज अशा प्रतिक्रिया देत आमदार राणे यांचे कौतुक करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.विधान भवानातील दमदार एंट्री, मिडियाचा पडणारा गराडा आणि त्या मिडियासमोर आपला मुद्दा तेवढ्याच प्रभावीपणे मांडत रोखठोक बोलणारे आ. निलेश राणे यांनी संपूर्ण अधिवेशनात आपली छाप पाडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील रणधुमाळीनंतर सुरू झालेल्या या अधिवेशानात आ. राणे हे मिडियाच्या केंद्रस्थानी राहिले.कुडाळ-मालवणचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच झालेल्या नागपूर अधिवेशनात आ. राणे यांनी आपल्या कार्यपद्धतीची झलक दाखविली होती. त्यानंतर मुंबईत झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांसह अन्य विषयांवर चर्चेत सहभागी होत त्यांनी केवळ आपल्या मतदारसंघातील नाही तर संपूर्ण कोकणातील जनतेचे प्रश्न मांडून सभागृहाचे व सरकाराचे लक्ष वेधले होते.नागपूर येथे ८ ते १४ डिसेंबर या सात दिवसांच्या कमी कालावधीत झालेल्या अधिवेशनातही आ. राणे यांनी आपली छाप पाडली. या अधिवेशनात सातही दिवस हजेरी लावत त्यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. औचित्याचा मुद्दा, अतिवृष्टीवरील २९३ चा प्रस्ताव, लक्षवेधी, पुरवणी मागण्यांवरील चर्चा, प्रश्नोत्तरे, पॉइंट ऑफ इन्फरमेशन अशा विधिमंडळातील लोकप्रतिनिधींना असलेल्या विविध आयुधांचा वापर करत आ. राणे यांनी अनेक प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडली. सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी असूनही कोणतीही तमा न बाळगता त्यांनी सामान्य जनतेचे प्रश्न विधानसभेत लावून धरल्याने त्यांची हीच कृती अनेकांना भावली आहे. एक आक्रमक पण तेवढेच संवेदनशील नेतृत्व अशी आ. राणे यांची ओळख आहे. त्यामुळे या अधिवेशनातही आ. निलेश राणे यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना फोडलेली वाचा अनेकांना भावली आहे.आ. राणे यांनी सभागृहात जलसिंचन प्रकल्पांबाबत उपस्थित केलेल्या या मुद्यांना चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनीही आपल्या भाषणात दुजोरा देत रत्नागिरीतही हीच अवस्था असल्याचे सांगितले. आपल्या अभ्यासपूर्ण व मुद्देसूद भाषणांनी पुन्हा एकदा आ. राणे यांनी सभागृहात आपली छाप पाडली. यावेळी सभागृहातील अनेक ज्येष्ठ व प्रथमच निवडून आलेल्या अनेक आमदारांनी आ. राणे यांचे कौतुकही केले. जनतेच्या प्रश्नासाठी सभागृहात जास्तीत जास्त वेळ उपस्थित राहून आ. राणे यांनी जनतेच्या प्रश्न व समस्यांप्रती किती संवेदनशीलता आहे हेच दाखवून दिले आहे. तर सभागृहाबाहेरही आ. निलेश राणे चर्चेत राहिले. विधिमंडळात येताना व सभागृहातून बाहेर पडताना मिडियाचा पडणारा गराडा, विचारले जाणारे अनेक प्रश्न व त्यांचे आ. राणे यांच्याकडून दिले जाणारे सडेतोड उत्तर यामुळे ते मिडियामध्येही चांगलेचचर्चेत राहिले.

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 9:30 am

‘मनरेगा’वरून गोंधळ ; कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज लोकसभेत नवीन विधेयक सादर करणार ?

MGNREGA। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) रद्द करण्यासाठी आणि रोजगार आणि उपजीविकेसाठी विकास भारत हमी अभियान (ग्रामीण) (VB-G RAM G) हा नवीन कायदा आणण्यासाठी आज संसदेत एक विधेयक मांडले जाण्याची शक्यताआहे. नवीन कायद्यानुसार राज्य सरकारांना अधिक खर्च करावा लागेल आणि कामकाजाच्या दिवसांची संख्या सध्याच्या १०० वरून १२५ पर्यंत वाढवावी लागेल. केंद्रीय कृषी […] The post ‘मनरेगा’वरून गोंधळ ; कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज लोकसभेत नवीन विधेयक सादर करणार ? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 9:29 am

इमरान हाश्मीसोबत झळकणार मराठमोळी अभिनेत्री; वेब सीरिजमध्ये दिसणार नव्या अंदाजात

Emraan Hashmi | बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘तस्करी: द स्मगलर्स वेब’ नावाच्या वेब सीरिजमध्ये तो पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर त्याच्यासोबत झळकणार आहे. ‘तस्करी’ वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यात बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार पाहायला मिळणार आहे. सीरिजमध्ये झोया […] The post इमरान हाश्मीसोबत झळकणार मराठमोळी अभिनेत्री; वेब सीरिजमध्ये दिसणार नव्या अंदाजात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 9:25 am

Sayli Kamble Welcomes Baby Boy: गायिका सायली कांबळे झाली आई; घरी चिमुकल्या बाळाचं आगमन

Sayli Kamble Welcomes Baby Boy: ‘इंडियन आयडल’ फेम लोकप्रिय गायिका सायली कांबळे आई झाली आहे. सायलीच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं असून तिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी सायलीने स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली. सायलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, “एक छोटासा चमत्कार, आयुष्यभराचं प्रेम… आम्हाला मुलगा झाला आहे. तुमच्या सर्व […] The post Sayli Kamble Welcomes Baby Boy: गायिका सायली कांबळे झाली आई; घरी चिमुकल्या बाळाचं आगमन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 9:17 am

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास'वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा संतापनवी दिल्ली : वृंदावनमधील श्री बांके बिहारी मंदिरात व्हीआयपी दर्शन आणि पूजेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला. देवतेला विश्रांती घेण्याची परवानगी नाही. जेव्हा सामान्य भाविक दर्शन घेऊ शकत नाहीत तेव्हा मोठ्या प्रमाणात शुल्क भरणाऱ्यांसाठी विशेष पूजा आयोजित केली जाते यावरून सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पंचौली यांच्या खंडपीठासमोर मंदिर सेवकांनी न्यायालयाद्वारे नियुक्त समितीच्या निर्देशांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. समितीने सामान्य भाविकांसाठी दर्शनाचे तास वाढवण्याची विनंती केली. मात्र, सुनावणीच्या शेवटी न्यायालयाने उच्चाधिकार समितीला नोटीस बजावली. या प्रकरणाची सुनावणी आता जानेवारीमध्ये होणार आहे.श्री बांके बिहारी जी मंदिर ट्रस्ट अध्यादेश, २०२५ ला आव्हान देणारी ही याचिका आहे. मंदिराचे सेवक अधिकारी असे म्हणतात की, मंदिराचे व्यवस्थापन १९३९ मध्ये लागू केलेल्या विशेष योजनेअंतर्गत करण्यात आले आहे आणि त्यावर सरकारचा कोणताही अधिकार नाही. याचिकाकर्त्याचे वकील, वरिष्ठ वकील श्याम दिवान यांनी सांगितले की, मंदिरातील विधींचा अविभाज्य भाग असलेल्या दर्शनाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विचारले की, दर्शनाच्या वेळा वाढवल्या गेल्या, तर काय समस्या आहे. याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला की दर्शनाच्या वेळा बदलल्याने मंदिरातील विधींमध्येही बदल होतील, ज्यामध्ये देवतांचा विश्रांतीचा वेळ देखील समाविष्ट आहे.सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “मंदिर दुपारी १२ वाजता बंद झाल्यानंतर, ते देवतांना एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत. त्या काळात, त्यांना सर्वात जास्त त्रास दिला जातो आणि श्रीमंत लोकांसाठी जास्त शुल्क आकारून विशेष पूजा केली जाते. या काळात, फक्त ज्यांना पैसे देणे शक्य आहे त्यांनाच आमंत्रित केले जाते आणि त्यांच्यासाठी विशेष पूजा आयोजित केल्या जातात.”

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 9:10 am

अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातावर महामार्गाजवळील स्थानिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बीड- लातूर जिल्ह्याच्या सीमेजवळ काल (१५ डिसेंबर) रात्री स्कार्पिओ गाडी आणि कारचा समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये स्कॉर्पिओ गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. तर कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर दोघे गंभीर जखमी झाले आहे.https://prahaar.in/2025/12/16/cash-seized-as-soon-as-the-code-of-conduct-comes-into-effect-police-raid-on-the-house-of-the-notorious-andekar-in-pune/घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेऊन चारचाकीमधील अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. यानंतर माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अपघातातील जखमींना तातडीने लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.दरम्यान, स्कॉर्पिओ आणि अपघातग्रस्त कार महामार्गावरून बाजूला करण्यात आली आहे. कारण अपघातामुळे महामार्गावर काहीकाळ वाहतूककोंडी झाली होती. तसेच या अपघातात मयत कोणत्या गावचे आहेत? त्यांची ओळख काय? याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळू शकली नाही आहे. तरी पोलीस वेगाने चौकशी करत आहेत.

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 9:10 am

यंदा २१ डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस !

दिवस फक्त १० तास, ४७ मिनिटांचा राहणारअमरावती : वैज्ञानिक आणि खगोलीय घटनांबद्दल सर्वसामान्यांमध्ये नेहमीच कुतूहल आणि उत्सुकता असते. पृथ्वीवर प्रकाश पसरवणारा सूर्य वर्षातील एका दिवशी अत्यंत कमी वेळ दर्शन देत असतो. या दिवशी पृथ्वीशी संबंधित अशी खगोलीय घटना घडत असते की, त्या दिवशी सूर्य लवकर मावळत असतो, त्यामुळे रात्र फार मोठी असते. यंदा २१ डिसेंबरला वर्षातील सर्वात लहान दिवस राहणार आहे.२१ डिसेंबर रोजी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे राहील. या बिंदूला ‘विंटर सोल्स्टाईस’ असे म्हणतात. सोलस्टाईस शब्द सोल्सटाइन या लॅटीन शब्दापासून तयार झाला आहे. ‘सूर्य स्थिर आहे’ असा त्याचा अर्थ होतो. भारतात पावसाळ्यानंतर येणाऱ्या हिवाळ्यात रात्र मोठी असते आणि दिवस लहान होत जातो. या बिंदूवर सूर्य असताना दिवस हा वर्षातला सर्वात लहान दिवस व रात्र ही सर्वात मोठी असते. २१ डिसेंबरचा दिवस हा १० तास, ४७ मिनिटांचा राहील. या दिवसांत दरवर्षाला एक दिवसाचा फरक पडू शकतो. दिवस व रात्रीचा कालावधी कमीजास्त होणे आपण नेहमीच अनुभवत असतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने हे घडत असते. व याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायन व दक्षिणायन सुद्धा आपल्याला अनुभवता येते. कोणत्याही वस्तूच्या पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायण व उत्तरायण सहज लक्षात येऊ शकते. सर्व खगोल प्रेमींनी व जिज्ञासूंनी २१ डिसेंबर या सर्वात लहान दिवसाचे प्रत्यक्ष कालमापन करावे व या १० तास ४७ मिनिटांच्या सर्वात लहान दिवसाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने आणि हौशी खगोल अभ्यासक विजय म. गिरुळकर यांनी केले आहे. पृथ्वीवरील ऋतू सुद्धा पृथ्वीच्या अक्षाच्या कलत्या स्थितीमुळे निर्माण होतात. आकाशात वैषुविक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनिक छेदन बिंदू आहेत. यापैकी एका बिंदूत २२ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो याला ‘वसंत संपात बिंदू’ असे म्हणतात. तर त्याचे विरुद्ध बिंदूत २३ सप्टेंबर रोजी सूर्य प्रवेश करतो याला ‘शरद संपात बिंदू’ असे म्हणतात. या दोन्ही दिवशी रात्रीचा व दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो. २१ डिसेंबर रोजी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूवर सूर्य असताना दिवस हा वर्षातला सर्वात लहान दिवस व रात्र ही सर्वात मोठी असते. या दिवसाला ‘हिवाळा अयन दिवस’ असे सुद्धा म्हणतात.

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 9:10 am

“असा ग्लोबल जिहाद कधीच पाहिला नाही…” ; ट्रम्पच्या पक्षाच्या नेत्याच्या विधानाने नवा वाद, ममदानींचे सडेतोड उत्तर

New York Mayor। ऑस्ट्रेलियातील सिडनीत बोंडी बीचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, न्यू यॉर्क शहरात इस्लामोफोबियावरून राजकीय वादविवाद सुरू झाला आहे. १५ जणांचा मृत्यू झालेल्या या हल्ल्यानंतर, रिपब्लिकन न्यूयॉर्क सिटी कौन्सिलवुमन विकी पॅलाडिनो यांनी सोशल मीडियावर पाश्चात्य देशांमधून मुस्लिमांना हद्दपार करण्याचे आवाहन केले, ज्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. न्यू यॉर्क शहरातील नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांनी पॅलाडिनो यांच्या […] The post “असा ग्लोबल जिहाद कधीच पाहिला नाही…” ; ट्रम्पच्या पक्षाच्या नेत्याच्या विधानाने नवा वाद, ममदानींचे सडेतोड उत्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 9:04 am

लग्नात नोटा उचलल्या, मदनने साहिलला गोळी मारली:आई म्हणाली- फक्त 14 वर्षांचा होता, त्याऐवजी मला मारले असते; CISF कॉन्स्टेबल आहे आरोपी

‘सगळे कामावर जातात तेव्हा मी खाली खुर्ची टाकून बसते. एकटी वर राहू शकत नाही. रात्री १२ वाजेपर्यंत जागी राहते, असं वाटतं की आता मुलगा दरवाजा ठोठावत म्हणेल, मम्मी उघड. जर मला मारलं असतं तर बरं झालं असतं. १४ वर्षांच्या मुलाने काय बिघडवलं होतं?‘ निशा खातून मुलगा साहिलला आठवून भावुक होतात. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून कुटुंब अजूनही सावरले नाहीये. आरोप आहे की २९ नोव्हेंबर रोजी CISF चे हेड कॉन्स्टेबल मदन गोपाल तिवारी यांनी १४ वर्षांच्या साहिलची गोळी मारून हत्या केली. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, CISF जवान मदनच्या भावाचं लग्न होतं. वरातीत साहिल आपल्या मित्रांसोबत नोटा वेचत होता. यावर चिडलेल्या मदनने साहिलला आधी मारहाण केली आणि नंतर पिस्तुलाने डोक्यात गोळी मारली. मात्र, मदनचे कुटुंब जाणूनबुजून गोळी मारल्याचा आरोप चुकीचा असल्याचे सांगत आहे. आरोपी मदन पोलिसांच्या ताब्यात आहे. साहिलचे कुटुंब न्यायाची मागणी करत आहे. घटनेच्या दिवशी काय झाले होते? साहिलचे कुटुंब कोणत्या परिस्थितीत राहत आहे? आरोपीच्या कुटुंबाचा काय युक्तिवाद आहे? हे जाणून घेण्यासाठी दिव्य मराठी टीम दिल्लीतील शाहदरा येथील घटनास्थळी पोहोचली. सर्वात आधी जाणून घ्या 29 नोव्हेंबर रोजी काय घडलेशाहदरा येथील मानसरोवर पार्क परिसरात डीडीएचे फ्लॅट्स आणि कम्युनिटी हॉल आहेत. पूर्वी याच्या शेजारीच मानसरोवर पार्क पोलीस स्टेशन होते, पण आता ते मागे हलवण्यात आले आहे. येथून सुमारे 500 मीटर दूर, गल्ली क्रमांक-14 मध्ये रेल्वे ट्रॅकच्या कडेला साहिलचे कुटुंब राहते. रेल्वे ट्रॅक आणि घराच्या मध्ये एक भिंत उभी आहे. भिंतीच्या एका बाजूला घर आणि दुसऱ्या बाजूला कचऱ्याचा ढिगारा आहे. या घाणीच्या मधोमध बांधलेल्या 25 गजच्या एका मजली घरात साहिलचे वडील सिराजुद्दीन अन्सारी आणि आई नीशा खातून 3 मुलांसोबत राहतात. खालच्या भागात घरमालकाने सामान भरून ठेवले आहे. कुटुंब पहिल्या मजल्यावर राहते. अरुंद जिन्याने पहिल्या मजल्यावर पोहोचल्यावर एक छोटी खोली आणि शौचालय दिसते. घराचे भाडे 3800 रुपये आहे. घरी आमची पहिली भेट साहिलचे वडील, 42 वर्षीय सिराजुद्दीन अन्सारी यांच्याशी झाली. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या शरीराच्या एका भागाला लकवा मारला होता. त्यामुळे ते कामावर जाऊ शकत नव्हते. अशा परिस्थितीत 14 वर्षांचा साहिलच त्यांचा आधार होता. तो किराणा दुकानात दूध पुरवठा करत असे आणि त्याच्या कमाईवरच घर चालत असे. वडील सिराजुद्दीन सांगतात की साहिल दुकानातून रोज रात्री ९ वाजता परत येत असे. त्या रात्रीही तो त्याच वेळी परतला. मोहल्ल्यात लग्न होते आणि इतर मुले वरातीत उधळलेले पैसे गोळा करत होते. साहिलने पैसे गोळा केले नाहीत, पण तो तिथेच उभा राहिला. तेव्हा CISF जवानाने त्याला पकडले आणि लाथा-बुक्क्यांनी मारले. तो जवान दारूच्या नशेत असल्याचे दिसत होते. साहिल म्हणाला की, अंकल, मी काहीही केले नाही. माझी काहीही चूक नाही. तरीही तो साहिलला मारत राहिला. मग पिस्तूल काढले आणि गोळी झाडली. साहिलला गोळी मारून आरोपी मदन गाडीत बसून पळून गेला. पोलिसांनी जेव्हा नवरदेव आणि त्याच्या वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा आरोपी मदनचा पत्ता लागला. CISF जवान मदन नवरदेवाच्या मामाचा मुलगा आहे आणि सुट्टी घेऊन लग्नात आला होता. तो इटावाच्या भरथना येथील रहिवासी आहे आणि कानपूरमध्ये पोस्टेड आहे. यानंतर मानसरोवर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपीला दुसऱ्या दिवशी सकाळी भरथना येथून अटक केली. मुलाने दगड मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गोळी मारलीसिराजुद्दीन दावा करतात, ‘जेव्हा मी आरोपी CISF जवानाला पोलीस ठाण्यात भेटलो होतो, तेव्हा तो साहिलला दोषी ठरवत होता. त्याने सांगितले की साहिल पैसे लुटत होता. मी त्याला पळवून लावले पण तो पळाला नाही. उलट त्याने दगड मारण्याचा प्रयत्न केला, म्हणून गोळी मारली.’ सिराजुद्दीन प्रश्न करत म्हणतात, ‘14 वर्षांचा मुलगा काय करू शकतो. लग्नात मुलाने पैसे लुटणे ही सामान्य गोष्ट आहे.’ आई म्हणाल्या- गोळी आरपार गेली होती, लग्नात नोटा लुटण्याची गोष्ट खोटीसाहिलचे वडील सिराजुद्दीन आणि आई नीशा यांनी यापूर्वी 2020 मध्येही एक मुलगा गमावला आहे. त्यांच्या सर्वात मोठ्या मुलाचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता. आता साहिलच्या मृत्यूमुळे कुटुंबाला आणखी एक धक्का बसला आहे. साहिलच्या हत्येच्या दिवसाची आठवण करून साहिलची आई नीशा यांच्या डोळ्यात अश्रू येतात. त्या म्हणतात, ‘मी रात्री सुमारे 10 वाजता जेवण बनवत होते. अचानक दोन मुले धावत आली आणि ओरडू लागली की गोळी मारली, गोळी मारली. मला वाटले की कदाचित ते मस्करी करत आहेत. दरवाजा उघडला तर पाहिले की चारी बाजूंनी गर्दी जमली आहे. मी पण धावत लग्नाच्या ठिकाणी पोहोचले.’ ‘तिथे साहिल रस्त्यावर पडला होता. त्याच्या डोक्यात गोळी लागली होती, जी आरपार गेली होती. मी स्पर्श केला तेव्हा श्वास थांबले होते. त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी मला बाजूला केले. ॲम्ब्युलन्स आली आणि आम्ही त्याला जीटीबी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथे डॉक्टरांनी सांगितले की, मुलगा गेला आहे.‘ निशा नोटा लुटल्याची गोष्ट चुकीची असल्याचे सांगतात. त्या म्हणतात, ‘साहिल पैसे कमावून माझ्या हातात देत असे. मग मीच त्याला खर्चासाठी पैसे देत असे. त्या दिवशी मी त्याला 50 रुपये दिले होते. पोलिसांनाही खिशातून 60 रुपये मिळाले. पैसे लुटण्याचे निमित्त केले जात आहे, साहिल तर फक्त बाजूला उभा राहून सर्व पाहत होता.‘ घर चालवणे कठीण, साहिलच कमवत होता कुटुंबाची विचारपूस केल्यावर साहिलचे वडील सांगतात, ‘1999 मध्ये झारखंडमधील गोड्डा येथून माझे कुटुंब कमाईच्या आशेने दिल्लीला आले होते. कुटुंबात 7 मुले होती, त्यापैकी 3 मुलींची लग्ने झाली. तर 2020 मध्ये एका मुलाच्या मृत्यूनंतर तीन मुलांचे कुटुंब उरले होते.‘ ‘आता कुटुंबात दोन मुले आणि आम्ही पती-पत्नी आहोत. साहिल आणि मोठा भाऊ मिळून कमवत होते. मी मजुरी करत होते, पण हाताला लकवा मारल्यापासून अडचण झाली. आता हेल्परचे काम करते, ज्यात 400-500 रुपयेच मिळतात. त्यामुळे घराचा खर्च चालवण्यात अडचण येते.‘ घटनेच्या 8-10 दिवसांनंतर आता सिराजुद्दीनने पुन्हा काम सुरू केले. वडील सिराजुद्दीन म्हणतात, 'कामात मन कुठे लागतं? लोक येत-जात राहतात. जग म्हणेल की पोरगा मेला आणि वडील कामावर निघाले, पण गुजराण तर करावी लागते. आम्हाला कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. गावकऱ्यांनी अंत्यसंस्कारात थोडी मदत केली, पण बाकी कोणीही मदतीचा हात पुढे केला नाही.' दुसऱ्या मुलावरही गोळी झाडली होती, तो थोडक्यात बचावलाया घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात साहिलच्या डोक्यात गोळी लागली आहे आणि तो रस्त्यावर पडलेला दिसत आहे. घटनेच्या ठिकाणी खाण्यापिण्याची काही दुकाने आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास जेव्हा साहिलला गोळी मारण्यात आली, तेव्हा येथे खाण्याचे एक दुकान उघडे होते. जेव्हा आम्ही या दुकानावर पोहोचलो, तेव्हा येथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले, 'त्या दिवशी जेव्हा गोळी चालली, तेव्हा वाटले की फटाक्यांचा आवाज आहे. लग्नांमध्ये अनेकदा फटाके वाजतात. नंतर जेव्हा मुलाला गोळी लागल्याचे कळले, तेव्हा आम्ही दुकान बंद केले होते. ताबडतोब पोलीसही आले होते.' घटनेच्या वेळी साहिलचा मित्र, 14 वर्षांचा संतोष (बदललेले नाव) देखील ट्यूशनमधून परत येत होता. संतोषचा दावा आहे की तिथे दुसरे एक मूलही होते, जे थोडक्यात बचावले. त्यालाही गोळी मारली होती पण तो खाली झोपल्यामुळे वाचला. संतोष पुढे सांगतो, ’मी ट्यूशनमधून परत येत होतो. रस्त्यात साहिल रस्त्यावर पडलेला होता. मी आणि साहिलचा धाकटा भाऊ साजिम घरी गेलो आणि मावशीला सांगितले. जेव्हा आम्ही परतलो, तेव्हा पोलीस सगळ्यांना हटवत होते. कोणीही त्याला उचलत नव्हते, ना काही करत होते.’ संतोषही पैसे लुटल्याचे मान्य करत नाही. तो म्हणतो की साहिल माझा बालपणीचा मित्र होता. आम्ही 6-7 वर्षांपासून एकत्र होतो. लग्नांमध्ये आम्ही दोघे एकत्र येत-जात होतो. लग्नसराईचा हंगाम सुरू असतो. आम्ही फक्त येऊन पाहत होतो आणि निघून जात होतो. कधीही पैसे लुटले नाहीत. साहिल तर तसा अजिबात नव्हता. पोलिसांनी सांगितले - आरोपीने रागाच्या भरात गोळीबार केल्याचे कबूल केलेआरोपी CISF जवान मदन गोपाल तिवारी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. शाहदराचे उपायुक्त प्रशांत गौतम यांनी सांगितले की, घटनेनंतर आरोपी तत्काळ फरार झाला होता. तो गाडीत बसून दिल्लीमार्गे इटावाला पळून गेला. पोलिसांनी वराच्या वडिलांची आणि वराची चौकशी केली, तेव्हा आरोपी इटावा येथील भरथना येथे राहत असल्याचे समजले. प्रशांत गौतम सांगतात, ‘माहिती मिळाल्यानंतर, तपासणीसाठी सीमापुरीचे ASP आणि मानसरोवर पोलीस ठाण्याचे SHO यांच्या देखरेखीखाली एक पथक तयार करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर चौकशी आणि विवाहस्थळी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातून आरोपीला पकडण्यात आले.‘ मानसरोवर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील कुमार भरथना येथे गेलेल्या पथकाचा भाग होते. ते सांगतात की, आरोपीने घटनेत वापरलेली परवानाधारक .32 बोअरची पिस्तूल एक्सप्रेस-वेवर फेकून दिली होती. तथापि, पोलीस रात्रीच आरोपीच्या ठिकाणावर पोहोचले. आरोपीला सोबत दिल्लीला आणताना पिस्तूल आणि गाडीही जप्त करण्यात आली. आरोपीचे कुटुंब म्हणाले - आरोप खोटे आहेत, आम्ही कायदेशीर लढाई लढूआरोपी मदन गोपाल तिवारीचे कुटुंब इटावा येथील भरथना येथे राहते. कुटुंबात त्याच्याशिवाय पत्नी आणि दोन मुले आहेत. इटावा येथील भरथना येथे राहणाऱ्या आरोपीच्या भाऊ सोनूशी आम्ही फोनवर बोललो. ते त्यांच्या भावावरील आरोप चुकीचे असल्याचे सांगतात. सोनू दावा करतो, ‘माझ्या भावाने गोळी जाणूनबुजून चालवली नाही. वरातीत खूप गर्दी होती आणि पिस्तूल लोडेड होती. गर्दीत चुकून पिस्तूल चालले आणि मुलाला गोळी लागली.‘ आरोपी दारूच्या नशेत असल्याची गोष्टही सोनू चुकीची सांगतो. तो म्हणतो की, सगळे म्हणत आहेत की माझा भाऊ दारूच्या नशेत होता पण ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. माझ्या भावाने कधी दारूला हातही लावला नाही. सोनू म्हणतो की, आता कुटुंब कायदेशीर लढाई लढेल. CISFच्या उत्तराची प्रतीक्षाआरोपी मदन गोपाल तिवारी CISF चा हेड कॉन्स्टेबल आहे. त्याची सध्या कानपूरमध्ये पोस्टिंग होती. आम्ही या प्रकरणात CISF ची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. CISF च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल उचलला गेला नाही. त्यानंतर आम्ही CISF ला आमचा प्रश्न ईमेल केला आहे. उत्तर आल्यावर बातमीत अपडेट करू. तथापि, CISF च्या नियमांनुसार, जर कोणताही जवान एखाद्या फौजदारी प्रकरणात 48 तासांपेक्षा जास्त काळ कोठडीत राहिला, तर त्याला निलंबित केले जाते.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 8:58 am

किंग अब्दुल्ला यांना हुसैनिया पॅलेसमध्ये भेटले पीएम मोदी:पैगंबर मोहम्मद यांचे 41वे वंशज, पत्नी सर्वात सुंदर राण्यांपैकी एक; जॉर्डनच्या राजाचे रंजक किस्से

मिडल ईस्टमध्ये सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यामध्ये एक छोटा देश आहे - जॉर्डन. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 आणि 16 डिसेंबर रोजी याच देशाच्या दौऱ्यावर आहेत. जॉर्डनचे किंग अब्दुल्ला II यांच्या भव्य हुसैनीया पॅलेसमध्ये सोमवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींचे स्वागत झाले. किंग अब्दुल्ला यांना पैगंबर मोहम्मद यांच्या 41व्या पिढीचे वंशज मानले जाते. त्यांचे कुटुंब 1400 वर्षांपासून जॉर्डनवर राज्य करत आहे. अब्दुल्ला यांचे नाव सर्वात श्रीमंत राजांमध्ये आणि त्यांच्या पत्नीचे नाव सर्वात सुंदर राण्यांमध्ये गणले जाते. या कथेत आपण जॉर्डनचे किंग अब्दुल्ला द्वितीय यांची कहाणी आणि त्यांच्याशी संबंधित रंजक किस्से जाणून घेऊया… तारीख 30 जानेवारी 1962 आणि ठिकाण जॉर्डनची राजधानी अम्मान. किंग हुसैन आणि त्यांची दुसरी पत्नी प्रिन्सेस मुना यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. किंग हुसैन यांचे हे पहिले अपत्य होते. त्यांनी आजोबा अब्दुल्ला यांच्या नावावरून त्या मुलाचे नाव अब्दुल्ला द्वितीय इब्न अल हुसैन असे ठेवले. नियमानुसार राजाचा सर्वात मोठा मुलगा क्राउन प्रिन्स बनतो. त्यामुळे अब्दुल्ला द्वितीय जन्मापासूनच क्राउन प्रिन्स बनले. तथापि, जेव्हा ते 3 वर्षांचे झाले, तेव्हा मध्य पूर्वेत राजकीय उलथापालथ सुरू झाली. अशा परिस्थितीत किंग हुसैन यांनी धाकटे भाऊ हसन बिन तलाल यांना क्राउन प्रिन्स बनवले. खरेतर, क्राउन-प्रिन्स राजाच्या मृत्यूनंतर किंवा त्यांनी गादी सोडल्यानंतर देशाचा राजा बनतो. अब्दुल्लाचे सुरुवातीचे शिक्षण अम्मान येथील इस्लामिक एज्युकेशनल कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमधील सेंट एडमंड्स स्कूल आणि अमेरिकेतील डियरफील्ड अकादमीमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. अब्दुल्ला यांना लहानपणापासूनच सैन्य आणि शस्त्रांमध्ये रुची होती. 1980 मध्ये त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश रॉयल मिलिटरी अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले आणि पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी काही काळ ब्रिटिश आर्म्ड फोर्सेसमध्ये काम केले. नंतर जॉर्डन आर्म्ड फोर्सेसमध्ये सामील झाले. 1993 मध्ये स्पेशल फोर्सेसचे उपकमांडर आणि पुढील वर्षी कमांडर बनले. 9 वर्षांनी लहान असलेल्या एका सामान्य मुलीवर पहिल्या नजरेत प्रेम, 6 महिन्यांनंतर लग्न साल १९९२च्या शेवटच्या महिन्यातील ही गोष्ट आहे. एका संध्याकाळी अब्दुल्ला एका डिनर पार्टीला गेले. ते मित्रांसोबत संध्याकाळचा आनंद लुटत होते. तेव्हा तिथे एका पॅलेस्टिनी मुलीने पाऊल ठेवले. नाव होते - रानिया अल-यासीन. पहिल्याच भेटीत ३१ वर्षांच्या अब्दुल्ला यांच्या मनात २३ वर्षांची रानिया घर करून राहिली. रानियालाही त्यांच्यावर प्रेम झाले. दोघांमध्ये बोलणे झाले. मग मैत्री आणि प्रेमापर्यंत गोष्ट पोहोचली. पहिल्या भेटीनंतर ६ महिन्यांनी अब्दुल्ला आणि रानियाने साखरपुडा केला आणि त्यानंतर १० जून १९९३ रोजी अम्मानमधील झहरान पॅलेसमध्ये लग्न केले. लग्नाच्या वेळी अब्दुल्लाने आपला लष्करी गणवेश परिधान केला होता आणि कमरेला तलवार लावली होती. तर रानियाने सोन्याची किनार असलेला लहान बाह्यांचा गाऊन घातला होता. त्यासोबत सोनेरी पट्टा, पांढरे जॅकेट आणि हातमोजे घातले होते. रानिया कोणत्याही शाही कुटुंबातील नव्हती. तरीही अब्दुल्ला यांचे कुटुंब या लग्नासाठी राजी झाले. खरं तर, रानिया यांचा जन्म 31 ऑगस्ट 1970 रोजी वेस्ट बँक येथील एका पॅलेस्टिनी कुटुंबात झाला होता. वडील फैजल डॉक्टर होते. नंतर ते कामाच्या निमित्ताने कुटुंबासह कुवेतला गेले, पण 1990 मध्ये त्यांना कुवेतमधून जॉर्डनला यावे लागले. या काळात रानिया कैरोमधील अमेरिकन युनिव्हर्सिटीतून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या जॉर्डनला आल्या. आधी एका बँकेत आणि नंतर ॲपल कंपनीत त्यांनी काम केले. आज रानिया जॉर्डनच्या महाराणी आहेत. त्यांना 4 मुले आहेत - प्रिन्स हुसेन, प्रिन्सेस इमान, प्रिन्सेस सलमा आणि प्रिन्स हाशेम. रानिया महिला आणि मुलांच्या शिक्षण, हक्क आणि पोषणासाठी काम करतात. यासाठी त्या कार्यक्रम राबवतात. सोशल मीडिया आणि जागतिक परिषदांमध्ये त्या सक्रिय असतात. त्या अनेकदा त्यांच्या आधुनिक लूक, डिझायनर कपडे, दागिने आणि मेकअपमुळे चर्चेत असतात. रानिया जगातील सर्वात सुंदर आणि मनमिळाऊ महाराण्यांपैकी एक मानल्या जातात. दुसऱ्यांदा क्राउन प्रिन्स बनले, 2 आठवड्यांनंतर जॉर्डनची गादी मिळाली ही गोष्ट आहे जानेवारी 1999ची. 63 वर्षांचे किंग हुसैन 46 वर्षांपासून जॉर्डनची गादी सांभाळत होते, पण ते कर्करोगाने त्रस्त होते. एके दिवशी अचानक त्यांची तब्येत खूप बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यांच्या वाचण्याची आशा दिवसेंदिवस कमी होत होती. मग एके दिवशी रुग्णालयातून एक पत्र आले, ज्याने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली. हे पत्र क्राउन प्रिन्स तलाल यांच्यासाठी होते. त्यात लिहिले होते की किंग हुसेन त्यांचे धाकटे भाऊ क्राउन प्रिन्स हसन बिन तलाल यांच्यावर खूप नाराज आहेत. त्यांनी तलाल यांच्यावर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला. यामुळे तलाल यांना क्राउन प्रिन्स पदावरून हटवण्यात आले. असे म्हटले जाते की किंग हुसेन यांना त्यांच्या शेवटच्या दिवसांत वाटले की मुलालाच वारसदार बनवणे योग्य राहील. अशा परिस्थितीत त्यांनी त्यांचा मोठा मुलगा अब्दुल्ला द्वितीय याला पुन्हा क्राउन प्रिन्स बनवले. पुन्हा यासाठी, कारण अब्दुल्ला जन्मापासूनच क्राउन प्रिन्स होते. पण जेव्हा ते 3 वर्षांचे झाले, तेव्हा मध्य पूर्वेत अशांतता सुरू झाली. अशा परिस्थितीत किंग हुसेन यांनी 1965 मध्ये धाकटे भाऊ हसन बिन तलाल यांना क्राउन प्रिन्स बनवले. अब्दुल्ला क्राउन प्रिन्स बनल्यानंतर 2 आठवड्यांनी, 7 फेब्रुवारी 1999 रोजी किंग हुसेन यांचे निधन झाले. त्याच दिवशी अब्दुल्ला जॉर्डनचे नवीन राजा बनले. सावत्र भावाला आधी युवराज बनवले, नंतर 5 वर्षांनी हटवले; आज नजरकैदेत अब्दुल्ला यांनी सत्ता हाती घेताच सावत्र भाऊ प्रिन्स हमजा यांना युवराज बनवले. हे भावा-भावाचे प्रेम आहे असे म्हटले गेले. पण गोष्ट काही वेगळीच होती. खरं तर, किंग हुसेन यांनी 4 विवाह केले होते. हमजा त्यांची चौथी बेगम नूर अल-हुसेन यांचा मुलगा होता. नूर यांना वाटत होते की हुसेन यांच्यानंतर हमजा राजा व्हावा आणि त्या स्वतः राजमाता व्हाव्यात. किंग हुसेन यांनाही त्यांच्या 11 मुलांपैकी हमजा सर्वात जास्त प्रिय होता. ते त्याला डोळ्यांचा तारा म्हणत. इतके लाडके असल्यामुळे, किंग हुसेन यांनी मरताना अब्दुल्ला यांना सांगितले की, राजा झाल्यावर त्यांनी हमजाला क्राउन प्रिन्स बनवावे. अब्दुल्ला यांनी तसेच केले, पण ५ वर्षांनंतर सर्व काही बदलले. नोव्हेंबर २००८ मध्ये अब्दुल्ला यांनी हमजाला क्राउन प्रिन्सच्या पदावरून हटवले. अब्दुल्ला यांनी हमजाला एक पत्रही लिहिले, 'या पदामुळे तू काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाहीस. जॉर्डनला तुझी गरज आहे. अशा परिस्थितीत मी तुला क्राउन प्रिन्सच्या पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आशा आहे की तू राजाशी एकनिष्ठ राहशील.' पत्रातील गोष्टी चांगल्या होत्या, पण उद्देश काही वेगळाच होता. खरं तर, अब्दुल्ला हमजाला हटवून आपला मुलगा हुसेनसाठी मार्ग मोकळा करत होते. जुलै 2009 मध्ये त्यांनी हुसेनला क्राउन प्रिन्स बनवलेही. नंतर एप्रिल 2021 मध्ये बातम्या आल्या की माजी क्राउन प्रिन्स हमजा यांना त्यांच्याच घरात नजरकैद करण्यात आले आहे. त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे आणि त्यांना घरातून बाहेर पडू दिले जात नाहीये. कोणालाही भेटणे, बोलणे, फोन आणि इंटरनेट वापरण्यावरही बंदी घालण्यात आली. तेव्हा जॉर्डनचे उपपंतप्रधान ऐमान सफादी म्हणाले की प्रिन्स हमजा जॉर्डनच्या सुरक्षा आणि स्थिरतेच्या विरोधात काम करत होते. म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हमजावर सत्तापालटाचा आरोप लावण्यात आला. ISIS च्या दहशतवाद्यांना मारण्यासाठी स्वतः फायटर जेट उडवले! वर्ष 2015 आणि तारीख 2 फेब्रुवारी. दहशतवादी संघटना ISIS ने 22 मिनिटांचा एक व्हिडिओ जारी केला. यात जॉर्डनचे पायलट लेफ्टनंट मुआथ अल-कसासबह यांची आधी चौकशी करण्यात आली. नंतर त्यांना पिंजऱ्यात बंद करून जिवंत जाळण्यात आले. खरं तर, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 27 वर्षीय मुआथ यांचे F-16 फायटर जेट सीरियामध्ये ISIS विरुद्धच्या एका मोहिमेत क्रॅश झाले होते. त्यानंतर ISIS ने त्यांना पकडले. मुआथच्या मृत्यूचा व्हिडिओ पाहून जॉर्डनमध्ये संतापाचा उद्रेक झाला. लोक रस्त्यावर उतरले. ‘बदला घ्या!’ च्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या. त्यावेळी किंग अब्दुल्ला अमेरिकेत होते. बातमी मिळताच, ते तत्काळ जॉर्डनला परतले. अम्मान विमानतळावरून अब्दुल्ला थेट मुआथच्या कुटुंबाला भेटायला गेले. तिथे त्यांनी म्हटले, ‘ही भ्याडांची कृती आहे. ISIS केवळ जॉर्डनशीच लढत नाहीये, तर इस्लाम आणि माणुसकीशीही लढत आहे. आम्ही याला इतके जोरदार प्रत्युत्तर देऊ की धरती हादरून जाईल.’ दुसऱ्याच दिवशी जॉर्डनने ISISच्या 2 दहशतवाद्यांना फाशी दिली. यानंतर किंग अब्दुल्ला यांनी 'ऑपरेशन शहीद मुआथ' सुरू केले. 3 दिवसांच्या या ऑपरेशनमध्ये जॉर्डनच्या हवाई दलाने सीरियातील ISIS च्या ठिकाणांवर जोरदार बॉम्बफेक केली. यात 56 दहशतवादी मारले गेले. यादरम्यान किंग अब्दुल्ला यांचा एक फोटो व्हायरल झाला, ज्यात ते युद्धाच्या गणवेशात दिसले. सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की किंग स्वतः फायटर जेट उडवत आहेत. ते ISIS वर बॉम्ब टाकत आहेत. अब्दुल्ला यांना 'वॉरियर किंग' म्हटले जाऊ लागले. मात्र, काही वेळाने स्पष्ट झाले की हे सर्व अफवा आहे आणि अब्दुल्ला यांनी स्वतः जेट उडवले नाही. त्यांनी फक्त ऑपरेशनची कमान सांभाळली. तरीही या घटनेने किंग अब्दुल्ला यांची प्रतिमा आणखी मजबूत केली. ते असे नेते बनले जे आपल्या देशासाठी आणि सैनिकांसाठी काहीही करू शकतात. जगातील सर्वात श्रीमंत राजांपैकी एक; 6,750 कोटींची संपत्ती, 12 राजवाडे किंग अब्दुल्ला यांची अंदाजित वैयक्तिक मालमत्ता सुमारे 750 दशलक्ष डॉलर म्हणजेच 6,750 कोटी रुपये आहे. यात त्यांचा वारसा, स्थावर मालमत्ता, गुंतवणूक आणि इतर उत्पन्न समाविष्ट आहे. जगातील सर्वात श्रीमंत राजांमध्ये अब्दुल्ला यांचे नाव समाविष्ट आहे. मात्र, त्यांच्या पगाराबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. अब्दुल्ला यांच्याकडे 12 राजवाडे आहेत, ज्यांचा वापर शाही कुटुंब घर आणि कार्यालयासाठी करते. त्यांच्या शाही कुटुंबावर आणि राजवाड्यांवर वर्षाला 35 दशलक्ष डॉलर म्हणजेच 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केले जातात. याशिवाय त्यांच्याकडे एक रॉयल ऑटोमोबाइल म्युझियम आहे, ज्यात 80 पेक्षा जास्त कार आणि बाईक आहेत. यात रोल्स-रॉयस, बुगाटी वेरोन, पॉर्शे, एस्टन मार्टिन, मर्सिडीज यांसारख्या लक्झरी कार्सचा समावेश आहे. तर हार्ले-डेविडसन, BMW, Zundapp KS यांसारख्या आलिशान बाइक आहेत. याशिवाय त्यांच्याकडे 3 एअरक्राफ्ट आणि 1 यॉट आहे. अब्दुल्ला यांना सर्वात आधुनिक राजा देखील मानले जाते. पँडोरा पेपर्स, स्विस सीक्रेट्समधून अब्दुल्लाची 3,200 कोटींची संपत्ती उघड ऑक्टोबर 2021 मध्ये पॅंडोरा पेपर्सचा खुलासा झाला, ज्यात 1.19 लाख दस्तऐवज आणि 2.9 टीबी डेटा लीक झाला. यात असे समोर आले की किंग अब्दुल्ला यांनी 2003 ते 2017 दरम्यान गुप्तपणे अमेरिका आणि ब्रिटनमध्ये 14 आलिशान मालमत्ता खरेदी केल्या. त्यांची किंमत सुमारे 100 दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे 900 कोटी रुपये आहे. यात मालिबू बीचवरील 3 आलिशान हवेली, वॉशिंग्टन डीसीमधील 3 लक्झरी अपार्टमेंट, लंडन आणि एस्कॉटमधील अनेक घरांचा समावेश आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये स्वित्झर्लंडच्या 'क्रेडिट सुइस' बँकेच्या 18 हजार खात्यांचा डेटा लीक झाला. याला 'स्विस सीक्रेट्स' असे नाव देण्यात आले. यात किंग अब्दुल्ला यांची 6 गुप्त खाती सापडली, ज्यात सुमारे 250 दशलक्ष डॉलर म्हणजे 2250 कोटी रुपये जमा होते. यावर रॉयल हाशेमाइट कोर्टाने सांगितले की, हे पैसे राजा अब्दुल्ला यांचे वैयक्तिक आहेत. याचा वापर सुरक्षा, शाही प्रकल्प, वैयक्तिक खर्च आणि इस्लामिक पवित्र स्थळांच्या देखभालीसाठी केला जातो. आपल्या आवडत्या 'स्टार ट्रेक' मालिकेत अभिनय केला जेव्हा अब्दुल्ला 34 वर्षांचे होते, तेव्हा त्यांना स्पेस ॲडव्हेंचर, एलियन्स आणि स्टारशिपमध्ये खूप रस होता. यामुळे ते 'स्टार ट्रेक: वॉयजर' या सायन्स फिक्शन मालिकेचे चाहते बनले. एकदा ते याचे शूटिंग पाहण्यासाठी कॅलिफोर्नियातील पॅरामाउंट स्टुडिओमध्ये पोहोचले, तेव्हा मालिकेच्या निर्मात्यांनी त्यांना एक छोटी भूमिका देऊ केली. अब्दुल्लाने आनंदाने ती ऑफर स्वीकारली. 13 मार्च 1996 रोजी प्रदर्शित झालेल्या शोमध्ये अब्दुल्ला एका सायन्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसले. मात्र, त्यांनी ना संवाद बोलले ना क्रेडिट घेतले. ते काही सेकंदांसाठीच पडद्यावर दिसले. एक चाहते म्हणून अब्दुल्ला इतके आनंदी झाले की त्यांनी शोमधील दोन अभिनेते - इथन फिलिप्स आणि रॉबर्ट पिकार्डो यांना जॉर्डनला येण्याचे आमंत्रण दिले. नंतर ते दोघे जॉर्डनला गेले देखील. कार रेसिंग, स्कूबा डायव्हिंग, स्काय डायव्हिंगचे शौकीन 1980च्या दशकात स्पेशल फोर्सेसचे कमांडो राहिलेले किंग अब्दुल्ला यांना साहसी खेळ खूप आवडतात. त्यांना कार रेसिंगची खूप आवड आहे. ते 1986 आणि 1988 मध्ये जॉर्डनियन डेझर्ट रॅलीमध्ये चॅम्पियन बनले. त्यांनी वाळवंटात अनेक रॅली जिंकल्या. 2000 मध्ये अब्दुल्ला यांनी जॉर्डनमध्ये बनवलेली ‘ब्लॅक आयरीस’ (Black Iris) ही रॅली कार स्वतः चालवली, जी तरुण रॅली चालकांसाठी एक स्वस्त कार होती. आजही ते रॅलीपूर्वी ट्रॅक तपासणारी ‘झिरो कार’ (Zero Car) चालवतात. याशिवाय, ते एक पात्र फ्रॉगमॅन म्हणजेच व्यावसायिक लष्करी पाणबुडे आहेत. रेड सी (Red Sea) वरील अकाबा (Aqaba) हे शहर त्यांची आवडती स्कूबा डायव्हिंगची जागा आहे. ते त्यांचा मुलगा क्राउन प्रिन्स हुसेन (Crown Prince Hussein) यांच्यासोबत समुद्राच्या खोलवर जाऊन कचरा साफ करण्यासाठी क्लीन-अप डायव्ह्स (Clean-up Dives) देखील करतात. अब्दुल्ला यांना स्कायडायव्हिंग आणि पॅराशूटिंगचीही आवड आहे. ते फ्री-फॉल पॅराशूटिस्ट आहेत. म्हणजे, जे विमानातून उडी मारून काही काळ पॅराशूट न उघडता हवेत खाली येतात आणि निश्चित उंचीवर पॅराशूट उघडून जमिनीवर उतरतात. किंग बनण्यापूर्वी ते नियमित स्कायडायव्हिंग करत होते, पण आता सुरक्षा कारणांमुळे ते हा छंद पूर्ण करू शकत नाहीत. मात्र, स्पेशल फोर्सेसच्या प्रशिक्षणात जंप मास्टर बनून ते जवानांचे मनोबल वाढवतात.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 8:44 am

दाट धुक्यामुळे यमुना एक्सप्रेसवेवर ८ बस आणि ३ कारची टक्कर ; अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू, २५ जण जखमी

Delhi-Agra Expressway। उत्तर प्रदेशातील मथुरा याठिकाणी दिल्ली-आग्रा एक्सप्रेसवेवर एक मोठा अपघात झाला. मंगळवारी पहाटे ४ वाजता दाट धुक्यामुळे सात बस एकामागोमाग आदळल्या, ज्यामुळे बसेस आग लागल्या. यात चार जणांचा मृत्यू झाला आणि २५ जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. मथुराच्या बलदेव पोलीस स्टेशन परिसरात हा अपघात घडला. दाट धुक्यामुळे सात बसेस एकमेकांना भिडल्या, ज्यामुळे […] The post दाट धुक्यामुळे यमुना एक्सप्रेसवेवर ८ बस आणि ३ कारची टक्कर ; अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू, २५ जण जखमी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 8:44 am

गाईची शिकार करताना बिबट्या विहिरीत पडला अन्….; शिरूर तालुक्यातील ‘या’गावात नेमकं काय घडलं?

शिरूर :शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ढाकी वस्ती परिसरात रविवारी (दि. १४ डिसेंबर) सायंकाळी गाईचा पाठलाग करताना एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. मात्र विहिरीतील पाण्याची पातळी जास्त असल्याने आणि वीजपंपाच्या पाईपच्या साहाय्याने बिबट्याने विहीरीतून वर येत शिताफीने पलायन केले. ढाकी वस्तीवरील सोपान मुखेकर यांच्या मालकीच्या विहिरीत हा प्रकार घडला. सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास गाई […] The post गाईची शिकार करताना बिबट्या विहिरीत पडला अन्….; शिरूर तालुक्यातील ‘या’ गावात नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 8:31 am

महाराष्ट्रातील ‘या’ठिकाणी उभारलं जाणार पहिलं ‘राष्ट्रीय कांदा भवन’; शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय

National Onion Bhavan| शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ‘राष्ट्रीय कांदा भवन’ उभारणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनीपत्रकार परिषदेत दिली. कांदा शेती शाश्वत नफ्याची आणि सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या देणगीतून जायगाव (ता.सिन्नर) येथे ‘राष्ट्रीय कांदा भवन’ उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भारत हा जगातील प्रमुख कांदा उत्पादक देश असतानाही कांदा […] The post महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी उभारलं जाणार पहिलं ‘राष्ट्रीय कांदा भवन’; शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 8:28 am

आता वेळ आली! ठाकरे बंधू ‘ती’मोठी घोषणा करणार: घडामोडींना वेग, निर्णयाकडे लक्ष; नेमकं काय घडतयं?

Thackeray brother : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम पत्रकार परिषद घेत काल सोमवारी १५ डिसेंबर रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार १५ जानेवारीला मतदान केले जाणार असून, दुसऱ्या दिवशी लगेचच १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. यामुळे हालचालींना वेग आला आला आहे. नगरपरिषद निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकीची घोषणा केली जाणार असल्याचे अगोदरच सांगण्यात आले […] The post आता वेळ आली! ठाकरे बंधू ‘ती’ मोठी घोषणा करणार: घडामोडींना वेग, निर्णयाकडे लक्ष; नेमकं काय घडतयं? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 8:23 am

आता वेळ आली! ठाकरे बंधू ‘ती’मोठी घोषणा करणार: घडामोडींकडे वेग, निर्णयाकडे लक्ष; नेमकं काय घडतयं?

Thackeray brother : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम पत्रकार परिषद घेत काल सोमवारी १५ डिसेंबर रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार १५ जानेवारीला मतदान केले जाणार असून, दुसऱ्या दिवशी लगेचच १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. यामुळे हालचालींना वेग आला आला आहे. नगरपरिषद निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकीची घोषणा केली जाणार असल्याचे अगोदरच सांगण्यात आले […] The post आता वेळ आली! ठाकरे बंधू ‘ती’ मोठी घोषणा करणार: घडामोडींकडे वेग, निर्णयाकडे लक्ष; नेमकं काय घडतयं? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 8:23 am

नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा ; डिसेंबरमध्ये आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात

नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.नवी मुंबईतील उरण परिसरात रानसाई धरणातून पाणीपुरवठा कमी झाल्यामुळे सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात लागू करण्यात आली आहे,जी डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहू शकते, जेणेकरून उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत राखता येईल. मुंबईतही भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनी दुरुस्तीमुळे काही भागांमध्ये पाणीकपात झाली होती, पण उरणमधील ही समस्या दीर्घकाळ चालणारी आहे.उरणमधील रानसाई धरणाचा पाणी साठा सध्या चिंताजनक पातळीवर पोहोचला असून,तो स्थिर ठेवण्यासाठी ही कपात अपरिहार्य झाली आहे.या धरणाची क्षमता कमी असल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते आणि आवश्यकतेनुसार साठवणूक करता येत नाही.त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षी उरणमधील रहिवाशांना पाण्यासाठी हाल करावे लागतात.त्यामुळे उपलब्ध साठा जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.कधी होणार पाणीकपात?या पाणीकपातीचा अवलंब दर मंगळवारी आणि शुक्रवारी करण्यात येणार आहे.जून २०२५ पर्यंत पाणी उपलब्ध राहावे, यासाठी ही संवर्धनात्मक रणनीती आखण्यात आली असून, अधिकाऱ्यांनी पुरवठा नियंत्रित ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 8:10 am

मेक्सिकोमध्ये मोठा अपघात ! खाजगी जेट इमारतीवर आदळले ; ७ जणांचा मृत्यू

private plane crashes। मध्य मेक्सिकोमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. एका लहान खाजगी विमानाने आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा किमान सात जणांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला आणि अधिकाऱ्यांनी तातडीने बचाव आणि मदत कार्य सुरू केले. अपघात कुठे आणि कसा झाला private plane crashes। मेक्सिकन राज्य नागरी संरक्षण समन्वयक एड्रियन […] The post मेक्सिकोमध्ये मोठा अपघात ! खाजगी जेट इमारतीवर आदळले ; ७ जणांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 8:08 am

PMC Election: दुबार मतदारांसाठी नवी नियमावली जाहीर; आता मतदान करण्यासाठी करावी लागेल ‘ही’कसरत

प्रभात वृत्तसेवा पुणे – दुबार मतदानाचा मुद्दा देशभर गाजत असताना राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी खबरदारी घेतली आहे. पुणे महापालिका निवडणुकीत सुमारे तीन लाख इतके दुबार मतदार आहेत. मतदार यादीतील दुबार मतदारांची नावे ओळखून त्यांच्या नावापुढे दुबार मतदार अशी नोंद करण्यात येणार आहे. तसेच, दुबार मतदार मतदानासाठी आल्यास इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याचे […] The post PMC Election: दुबार मतदारांसाठी नवी नियमावली जाहीर; आता मतदान करण्यासाठी करावी लागेल ‘ही’ कसरत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 7:35 am

Ajit Pawar: भाजपसोबत युती तुटली? अजित पवारांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका, म्हणाले..

प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरात महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंंग्रेस (अजित पवार) बरोबर युती करणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विधान अंतिम असेल तर त्‍यांनी ते विचारपूर्वक केलेले असेल. त्‍यानुसारच राष्ट्रवादी काॅंंग्रेसकडून महापालिका निवडणूक लढविली जाइल. असे सांगत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी पुण्यात स्‍वबळावर निवडणूक लढविणार असल्‍याचे तसेच निवडणुकीविषयी योग्य वेळी व योग्य निर्णय […] The post Ajit Pawar: भाजपसोबत युती तुटली? अजित पवारांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका, म्हणाले.. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 7:30 am

आजचे एक्सप्लेनर:एपस्टाइनच्या प्रायव्हेट आयलँडमध्ये काय-काय व्हायचे, नव्या फोटोंमध्ये ट्रम्प मुलींसोबत अंतरंग आणि कंडोम पाकिटावरही

जगातील सर्वात हाय-प्रोफाइल सेक्स स्कँडल 'एपस्टाइन केस'शी संबंधित 92 फोटो प्रसिद्ध झाले आहेत. यापैकी 3 फोटो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आहेत. एका फोटोमध्ये ते अनेक मुलींनी वेढलेले दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये ते कंडोमच्या पॅकेटवर दिसत आहेत. असे म्हटले जात आहे की 19 डिसेंबर रोजी एपस्टाइन केसशी संबंधित सर्व कागदपत्रे, ईमेल आणि फोटो प्रसिद्ध होऊ शकतात. हे एपस्टाइन प्रकरण काय आहे, त्याच्या पार्ट्यांमध्ये काय घडले, त्यात कोणती मोठी नावे सामील आहेत आणि ट्रम्पवर त्याचा काय परिणाम होईल; आजच्या एक्सप्लेनरमध्ये आपण जाणून घेऊया... प्रश्न-१: ट्रम्प यांचे फोटो अलीकडे कसे आणि कोणासोबत उघड झाले आहेत? उत्तर: अमेरिकन हाऊस ओव्हरसाईट कमिटीच्या डेमोक्रॅटिक सदस्यांनी १२ डिसेंबर रोजी एपस्टाइन फाइल्सशी संबंधित फोटो प्रसिद्ध केले आहेत. ९२ फोटो प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उद्योगपती बिल गेट्स आणि माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांसारखे प्रमुख लोक अनेक महिलांसोबत दिसत आहेत. प्रश्न-२: हे एपस्टाइन प्रकरण काय आहे, ज्यामध्ये प्रसिद्ध व्यक्तींना गोवले गेले आहे? उत्तर: एपस्टाइन प्रकरण हा एक हाय-प्रोफाइल गुन्हेगारी खटला आहे, ज्यामध्ये अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि तस्करीचे आरोप होते. प्रश्न-३: जेफ्री एपस्टाईन कोण होता? उत्तर: व्यवसायाने गुंतवणूक व्यवस्थापक असलेले जेफ्री एडवर्ड एपस्टाईन यांचा जन्म २० जानेवारी १९५४ रोजी ब्रुकलिन, न्यू यॉर्क येथे झाला. त्यांचे वडील कचरा वेचण्याचे काम करत होते आणि आई शाळेत मदतनीस होती. एपस्टाइनचे खासगी बेट, 'लिटिल सेंट जेम्स', यूएस व्हर्जिन बेटांजवळ आहे. प्रश्न-४: एपस्टाइनच्या बेटावर प्रत्यक्षात काय घडत होते? उत्तर: यूएस व्हर्जिन आयलंडजवळ एपस्टाइनचे 'लिटल सेंट जेम्स' नावाचे एक खासगी बेट होते, जे ७८ एकरमध्ये पसरलेले होते. प्रश्न-५: या नवीन खुलाशामुळे ट्रम्पला त्रास होईल का? उत्तर: तज्ज्ञ याला ट्रम्पसाठी राजकीय धोका म्हणून पाहतात... वरिष्ठ अमेरिकन पत्रकार आरोन ब्लॅक यांचा असा विश्वास आहे की, हे ट्रम्पसाठी राजकीय धोका असू शकते. एपस्टाइन फाइल्स उघड झाल्यामुळे ट्रम्पची एक मजबूत नेता म्हणून प्रतिमा खराब होईल. कारण अमेरिकन जनतेचा असा विश्वास आहे की सरकार एपस्टाइन प्रकरण दाबत आहे. जॉर्जटाउन कायद्याचे प्राध्यापक पॉल बटलर यांच्या मते, 'एपस्टाइनच्या फायली उघड केल्याने ट्रम्प आणि त्यांच्या पक्षाचे नुकसान होऊ शकते. तथापि, न्याय विभागात त्यांचे अनेक विश्वासू लोक आहेत जे एपस्टाइनच्या फायली कापून पेस्ट करू शकतात.' प्रश्न-६: एपस्टाइन फाइल्सचे संपूर्ण सत्य अजूनही लपलेले आहे का? उत्तर: माध्यमांनी आणि पीडित महिलांनी एपस्टाइन फाइल्स प्रकाशात आणण्याची मागणी केली आहे. प्रश्न-७: भारत आणि या प्रकरणाचा काही संबंध आहे का? उत्तर: 'द हिंदू' मधील एका वृत्तानुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एपस्टाईनच्या जुन्या ईमेल आणि कॅलेंडरमध्ये केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे नाव देखील समोर आले होते. या वृत्तानुसार… अलिकडेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला होता की दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप होईल. सध्याचे पंतप्रधान काढून टाकले जातील आणि एक मराठी व्यक्ती नवीन पंतप्रधान होईल. १३ नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमात त्यांनी या कार्यक्रमाची तारीखही जाहीर केली की १९ डिसेंबर रोजी एक मराठी व्यक्ती पंतप्रधान होईल. चव्हाण एपस्टाईन फाइल्सचा संदर्भ देत होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 7:22 am

एका दिवसात २२० कोटी वसूल! लोकअदालतीत केला रेकॉर्ड; जिल्ह्यातील ४३ हजार दावे निकाली

प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे शहरासह जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी (दि. १३) आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पुणे जिल्ह्यातील ४३ हजार १०७ प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधून तब्बल २२० कोटी ४७ लाख ७५ हजार ५७१ रुपयांचे तडजोड शूल्क वसुल केले आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई […] The post एका दिवसात २२० कोटी वसूल! लोकअदालतीत केला रेकॉर्ड; जिल्ह्यातील ४३ हजार दावे निकाली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 7:15 am

PMC Election: विकासकामे थांबणार की सुरू राहणार? आचारसंहितेबाबत जिल्हा प्रशासनाचा मोठा खुलासा

प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आचारसंहिता सोमवारपासून लागू झाली आहे. ही आचारसंहिता केवळ महानगरपालिका हद्दीसाठी लागू आहे. मात्र, जिल्हा परिषद हद्दीमध्ये म्हणजेच ग्रामीण भागात ही आचारसंहिता लागू नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद हद्दीत नवीन विकास कामे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका पाठोपाठ आता […] The post PMC Election: विकासकामे थांबणार की सुरू राहणार? आचारसंहितेबाबत जिल्हा प्रशासनाचा मोठा खुलासा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 7:11 am

बोपदेव घाटातील लॉजवर छापा! बांगलादेशी तरुणी ताब्यात; लाॅज व्यवस्थापकासह दोघे अटकेत

प्रभात वृत्तसेवा पुणे – बांगलादेशी तरुणींना देहविक्रय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. या वेळी दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. बोपदेव घाट परिसरातील एका लाॅजवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.याप्रकरणी लॅाजचा व्यवस्थापक रवी छोटे गौडा (४६, रा. येवलेवाडी, कोंढवा), कामगार सचिन प्रकाश काळे (४०) यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. […] The post बोपदेव घाटातील लॉजवर छापा! बांगलादेशी तरुणी ताब्यात; लाॅज व्यवस्थापकासह दोघे अटकेत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 7:10 am

मिशन इम्पॉसिबल! १ लाख मतदार आणि हातात फक्त ११ दिवस; उमेदवारांची ‘दमछाक’अटळ?

प्रभात वृत्तसेवा पुणे : आधीच चार सदस्यांचा प्रभाग, त्यात प्रभागातील मतदारसंघात १ लाखांपेक्षा अधिक मतदार आणि प्रचाराला मिळणारे अवघे अकरा दिवस, यामुळे महापालिका निवडणुकीत मोठया राजकीय पक्षांसह, अपक्ष आणि चिन्ह नसलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. निवडणुक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ३ जानेवारीला चिन्ह वाटप आणि अंतीम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. १३ जानेवारीला सायंकाळी […] The post मिशन इम्पॉसिबल! १ लाख मतदार आणि हातात फक्त ११ दिवस; उमेदवारांची ‘दमछाक’ अटळ? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 7:10 am

Pune Accident: ३.५ किमी रस्ता की मृत्यूचा सापळा? ५५ अपघात आणि २५ मृत्यू; कात्रज-कोंढवा रोडचा थरार

प्रभात वृत्तसेवा पुणे : अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि अद्यापही अपूर्ण असलेल्या कात्रज–कोंढवा रस्त्याने सोमवारी आणखी एक निष्पाप बळी घेतला. इस्कॉन मंदिराजवळ काम सुरू असलेल्या रस्त्यावर दुचाकी व कंटेनरचा भीषण अपघात होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला.हा अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. रमा प्रसाद कपाडी (५२, रा. कात्रज–कोंढवा रोड) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या महमंदवाडी येथील […] The post Pune Accident: ३.५ किमी रस्ता की मृत्यूचा सापळा? ५५ अपघात आणि २५ मृत्यू; कात्रज-कोंढवा रोडचा थरार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 7:00 am

Mundhwa land scam: शीतल तेजवानीची रवानगी येरवडा जेलमध्ये; आता बावधन पोलीस घेणार ताबा?

प्रभात वृत्तसेवा पुणे – मुंढवा येथील ४० एकर सरकारी जमिनीच्या बेकायदा खरेदी- विक्री प्रकरणातील ३०० कोटी रुपयांचा व्यवहार आणि अन्य व्यक्तींच्या सहभागाबाबत पोलीस कोठडीत शीतल तेजवानीकडे चौकशी करण्यात आली. मात्र, त्या माहिती देत नसल्याचे पुणे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. दरम्यान, तेजवानीने जामीन मिळण्यासाठी अर्ज केला असून, त्यावर १९ डिसेंबरला […] The post Mundhwa land scam: शीतल तेजवानीची रवानगी येरवडा जेलमध्ये; आता बावधन पोलीस घेणार ताबा? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 6:45 am

PMC News: बांधकाम व्यावसायिकांना १५ दिवसांचा अल्टीमेटम! ‘हे’उपकरण नसेल तर बांधकाम थेट बंद होणार

प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्यातील अनेक शहरांमध्ये पीएम २.५ आणि पीएम १० या धुलीकणांमुळे वायू प्रदूषण वाढत असल्याने राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. त्यानुसार, महापालिकेकडून शहरातील ५ हजार चौरस मीटर व त्याहून अधिक क्षेत्रफळ असलेल्या सर्व विद्यमान व नव्याने सुरू होणाऱ्या प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर-आधारित हवा गुणवत्ता तपासणी प्रणाली उभारणे बंधनकारक केले आहे. […] The post PMC News: बांधकाम व्यावसायिकांना १५ दिवसांचा अल्टीमेटम! ‘हे’ उपकरण नसेल तर बांधकाम थेट बंद होणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 6:30 am

सरकारला अल्टिमेटम! निलंबन मागे घ्या, अन्यथा…महसूल अधिकारी संघटना आक्रमक

प्रभात वृत्तसेवा पुणे – नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात विधान सभेमध्ये महसूलमंत्री यांनी नैसर्गिक न्याय तत्त्वाचे पालन न करता अचानकपणे मावळ तालुक्यात कार्यरत असणारे चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी अशा दहा महसूल अधिकारी-कर्मचारी यांना गौण खनिज प्रकरणात निलंबित केल्याने महसूल विभागात प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. या प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्ह्यातील […] The post सरकारला अल्टिमेटम! निलंबन मागे घ्या, अन्यथा…महसूल अधिकारी संघटना आक्रमक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 6:15 am

Ajit Pawar: प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वाभाडे! चुकीच्या नियोजनामुळे अजित पवार भडकले..म्हणाले

प्रभात वृत्तसेवा पुणे – पुण्यातील नागरिकांना मूलभूत देण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करत असतो. अधिकारी मात्र कामाचे नीट नियोजन करत नाहीत. काम करताना चुका करता त्यामुळे अनेक शहरातील अनेक पुलाचे नियोजन चुकल्यामुळे ते पाडण्याची वेळ आली. नागरिक त्याचे खापर आमच्यावर फोडतात. चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीच्या कालावधीत शहरात ड्रेनेजची झाकणे समांतर बसविण्याची कामेही पूर्ण झालीच नाहीत, […] The post Ajit Pawar: प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वाभाडे! चुकीच्या नियोजनामुळे अजित पवार भडकले..म्हणाले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 6:00 am

Pune News: पुस्तक महोत्सवात ऐतिहासिक क्षण! ‘त्या’एका फोटोने रचला इतिहास, मुख्यमंत्र्यांकडूनही कौतुक

प्रभात वृत्तसेवा पुणे – आपल्या देशात ज्ञानाचा आणि विद्येचा मोठा वारसा असूनही, महत्त्वाच्या कामांचे, ज्ञानाचे योग्य दस्तऐवजीकरणाचा अभाव ही व्यवस्थेतील मोठी उणीव आहे, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केली. या त्रुटीमुळे आपल्या इतिहासाची माहिती घेण्यासाठी परदेशी प्रवाशांच्या नोंदींवर, इंग्रजांनी लिहिलेल्या इतिहासावर अवलंबून राहावे लागते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राष्ट्रीय पुस्तक न्यास आयोजित […] The post Pune News: पुस्तक महोत्सवात ऐतिहासिक क्षण! ‘त्या’ एका फोटोने रचला इतिहास, मुख्यमंत्र्यांकडूनही कौतुक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 5:45 am

Pune News: निवडणुकांचे काम ठप्प होणार? उपजिल्हाधिकारी आणि तहसिलदारांनी घेतला ‘हा’आक्रमक निर्णय

प्रभात वृत्तसेवा पुणे – जिल्ह्यातील चार तहसिलदारांवर गौण खनिज प्रकरणात तडकाफडक़ी निलंबनाची कारवाई केल्याच्या निषेधार्ध जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी ,तहसिलदार , नायब तहसिलदार यांनी सामुहिक रजेचे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा थेट फटका पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या कामजावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण की या निवडणुकीसाठी या उपजिल्हाधिकारी यांची निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली […] The post Pune News: निवडणुकांचे काम ठप्प होणार? उपजिल्हाधिकारी आणि तहसिलदारांनी घेतला ‘हा’ आक्रमक निर्णय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 5:30 am

लक्षवेधी : आर्थिक प्रगतीचे रस्ते

– हेमंत देसाई सरकार आता फास्टटॅगसोबत ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन’सारखे तंत्रज्ञान जोडून, बॅरियरलेस टोलिंग लागू करत आहे. अर्थातच यामुळे प्रवासी मालवाहतुकीचा वेग वाढणार आहे. त्यामुळे या नव्या तंत्रज्ञानाचे स्वागतच केले पाहिजे. युरोप असो अथवा अमेरिका, तेथे रस्तेविकास प्रथम झाला आणि त्या माध्यमातूनच आर्थिक विकास झाला. जागतिकीकरणानंतर देशादेशांमधील व्यापार वाढला. स्पर्धा तीव्र झाल्यामुळे गरजा उत्पन्न होतात. […] The post लक्षवेधी : आर्थिक प्रगतीचे रस्ते appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 5:30 am

Indapur News: महसूल विभागाचा ‘डिजिटल’संप! ७/१२ ते ई-पिक पाहणी सर्व ठप्प, वाचा नेमकं काय घडलं?

प्रभात वृत्तसेवा इंदापूर – ग्राम महसूल प्रशासनासाठी आवश्यक असलेली आधुनिक आयटी उपकरणे अद्याप उपलब्ध करून न दिल्याने इंदापूर तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकारी आक्रमक झाले आहेत. शासनाकडील दिरंगाईच्या निषेधार्थ तालुक्यातील १२ मंडल अधिकारी व ६२ तलाठ्यांनी सोमवारी ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकत सर्व कामकाज बंद ठेवले. महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या निवेदनानुसार, सध्या वापरात असलेले लॅपटॉप व […] The post Indapur News: महसूल विभागाचा ‘डिजिटल’ संप! ७/१२ ते ई-पिक पाहणी सर्व ठप्प, वाचा नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 5:15 am

संरक्षण : भारत-रशिया आणि चीन

– हेमंत महाजन चीनचे रशिया आणि भारत या दोन्हीही राष्ट्रांशी सकारात्मक संबंध असल्यामुळे, पुतीन यांच्या भारतभेटीबाबत चीनची प्रतिक्रिया सावध आहे. चिनी सुरक्षावर्तुळात नवीन रशियन संरक्षण विक्री आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावर (उदा. एस-400, एसयू-57ई, आर-37एम, आणि झिरकॉन क्षेपणास्त्रांचा उल्लेख) लक्ष केंद्रित करून महत्त्वपूर्ण विश्‍लेषण केले जाते. पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) विरुद्ध प्रतिबंध म्हणून, एक एकात्मिक (Aए2/Aएडी) नेटवर्क […] The post संरक्षण : भारत-रशिया आणि चीन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 5:00 am

Orange Farming: केंद्र आणि राज्य सरकार आले एकत्र! संत्रा-मोसंबी उत्पादकांसाठी घेतला ‘हा’मोठा निर्णय

प्रभात वृत्तसेवा इंदापूर : विदर्भातील संत्रा, मोसंबी व लिंबुवर्गीय फळ उत्पादक शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावणे, उत्पादन खर्च कमी करून गुणवत्ता वाढवणे आणि जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक स्थान मिळवून देणे, या उद्देशाने केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे काम करणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी (दि. 15) सांगितले. नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी […] The post Orange Farming: केंद्र आणि राज्य सरकार आले एकत्र! संत्रा-मोसंबी उत्पादकांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 5:00 am

विठ्ठलवाडीत पहाटे थरार! वृद्ध महिलांना मारहाण करून लूट; परिसरात भीतीचे वातावरण

प्रभात वृत्तसेवा इंदापूर – इंदापूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे पहाटेच्या सुमारास घरात घुसून वृद्ध महिलांना मारहाण करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. सलग घडलेल्या अशा घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याप्रकरणी सिंधु पाडुरंग भोंग (वय 65, रा. विठ्ठलवाडी, ता. इंदापूर) यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलीस […] The post विठ्ठलवाडीत पहाटे थरार! वृद्ध महिलांना मारहाण करून लूट; परिसरात भीतीचे वातावरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 4:45 am

Manchar News: निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत, नागरिकांमध्ये चिंता वाढली..नेमकं कारण काय?

प्रभात वृत्तसेवा मंचर – राज्यात अलीकडे पार पडलेल्या निवडणुकांमध्ये घडलेल्या विविध प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा निवडणूक व्यवस्थेवरील विश्वास मोठ्या प्रमाणात ढासळल्याचे दिसून येत आहे. मतदानादरम्यान दबावाची परिस्थिती, बोगस मतदानाच्या तक्रारी, दहशत, गुंडगिरी तसेच मतदारांना पैसे वाटपाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे निवडणुका किती पारदर्शकपणे होत आहेत. याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.निवडणूक प्रक्रियेतील अनेक त्रुटी, मतदार […] The post Manchar News: निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत, नागरिकांमध्ये चिंता वाढली..नेमकं कारण काय? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 4:15 am

Mulshi News: ठेकेदारांचे धाबे दणाणले! भोर-मुळशीतील ‘जलजीवन’ची होणार उच्चस्तरीय चौकशी

प्रभात वृत्तसेवा पिरंगुट – भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यांत जलजीवन मिशनअंतर्गत मोठ्या प्रमाणात अनियमितता, अर्धवट कामे तसेच कामे पूर्ण होण्यापूर्वीच ठेकेदारांची बिले अदा केल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत.या पार्श्वभूमीवर भोर-राजगड-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. दोषी अधिकारी व ठेकेदारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. याची गंभीर दखल […] The post Mulshi News: ठेकेदारांचे धाबे दणाणले! भोर-मुळशीतील ‘जलजीवन’ची होणार उच्चस्तरीय चौकशी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 4:00 am

तारीख पे तारीख! झेडपीची निवडणूक पुन्हा लांबणीवर? इच्छुकांचा जीव टांगणीला, कारण…

प्रभात वृत्तसेवा डोर्लेवाडी ( नवनाथ बोरकर ) – मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल (दि.16) जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समिती या […] The post तारीख पे तारीख! झेडपीची निवडणूक पुन्हा लांबणीवर? इच्छुकांचा जीव टांगणीला, कारण… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 3:45 am

बारामतीत प्रचार शिगेला! उमेदवारांनी काढली नवी शक्कल; सोशल मीडियावर धुमाकूळ

प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती नगर परिषदेची निवडणूक न्यायालय प्रक्रियेमुळे पुढे ढकलण्यात आल्याने सुरुवातीला थांबलेला प्रचार आता जोरदारपणे सुरू झाला आहे. बारामती शहरात सुरुवातीला शांत झालेल्या प्रचार यंत्रणेमुळे शहरातील शांत असलेले वातावरण प्रचाराच्या रणधुमाळीमुळे आता चांगलेच तापले आहे. बारामती नगरपरिषदेची निवडणूक येत्या (दि.२) डिसेंबर रोजी होणार होती. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही निवडणूक अचानक पुढे ढकलल्याने […] The post बारामतीत प्रचार शिगेला! उमेदवारांनी काढली नवी शक्कल; सोशल मीडियावर धुमाकूळ appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 3:30 am

पहिल्या प्रियकराचा भयंकर सूड! ‘तू तिच्याशी लग्न का केलेस?’म्हणत प्रियकराने पतीला संपवले

प्रभात वृत्तसेवा वाघापूर – पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे नवविवाहितेच्या पहिल्या प्रियकराने दुसऱ्याशी लग्न केल्याचा राग मनात धरून तिच्या पतीचो कोयत्याने डोक्यात वार करून निर्घृण खून केला. या घटनेमुळे पुरंदर तालुक्यात खळबळ उडाली आहे. दीपक गोरख जगताप (रा. राजेवाडी, ता. पुरंदर), असे खून झालेल्याचे नाव आहे. आरोपी सुशांत संदीप मापारी (रा. माळशिरस, ता. पुरंदर, मूळ रा. […] The post पहिल्या प्रियकराचा भयंकर सूड! ‘तू तिच्याशी लग्न का केलेस?’ म्हणत प्रियकराने पतीला संपवले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 3:15 am

धक्कादायक! दारूच्या नशेत मित्राचा निर्घृण खून; भानावर आल्यावर दोघांनी स्वतःहून गाठले पोलीस ठाणे

प्रभात वृत्तसेवा बारामती – दारूच्या नशेत धुंद असलेल्या दोन मित्रांनी एका मित्राचा निर्घृण खून केल्याची घटना शहरातील मोरगाव रोड येथे घडली. नशेतून भानावर आल्यावर दोन्ही आरोपींनी थेट पोलीस स्टेशन गाठले. दोन मित्रांनी दारुच्या नशेत केलेली हे क्रूर कृत्य केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे (वय 20, राहणार बारामती) याचा जागीच मृत्यू […] The post धक्कादायक! दारूच्या नशेत मित्राचा निर्घृण खून; भानावर आल्यावर दोघांनी स्वतःहून गाठले पोलीस ठाणे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 3:00 am

Bhor News: भोर-मांढरदेवी रस्त्याचे काम थांबले; आता फक्त तात्पुरती डागडुजी होणार, कारण..

प्रभात वृत्तसेवा भोर – भोर-मांढरदेवी-सुरुर या रस्त्याचे काँक्रिटीकरण व रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, परंतु भोर-मांढरदेवी दरम्यान दोन ठिकाणी काही अंतरासाठी वनविभागाने हरकत घेतल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. या दोन्ही ठिकाणचा रस्ता पूर्ण होण्यासाठी वनविभागाने शासनाकडे परवानगी मागितली आहे. शासनाकडून परवानगी आल्यानंतर रखडलेले काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे भोर शाखा […] The post Bhor News: भोर-मांढरदेवी रस्त्याचे काम थांबले; आता फक्त तात्पुरती डागडुजी होणार, कारण.. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 2:45 am

कोरेगाव भीमात भीषण अपघात! उभ्या ट्रकला कारची जोरदार धडक; महिलेचा जागीच मृत्यू

प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पुणे-नगर महामार्गावर सोमवारी (दि. १५) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोखंडी सळया भरलेल्या ट्रकला भरधाव वेगाने आलेल्या कारने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात नीलम रामचंद्र दाभाडे (वय ५९, रा. मांजरी बुद्रुक, पुणे) या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर कार चालक गंभीर जखमी झाला आहे. […] The post कोरेगाव भीमात भीषण अपघात! उभ्या ट्रकला कारची जोरदार धडक; महिलेचा जागीच मृत्यू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 2:30 am

अखेर बिगुल वाजले! तुमच्या वॉर्डात आता कोण होणार नगरसेवक? आयोगाचा कार्यक्रम जाहीर

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांमध्ये प्रशासकराज होते. गेल्या चार वर्षांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक रखडली होती. अखेर राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची घोषणा केली असून येत्या १५ जानेवारीला शहरामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर त्याच्या दुसऱ्या दिवशीच मतमोजणी होऊन पिंपरी चिंचवड महापालिकेवर कोणाची सत्ता असणार हे स्पष्ट होणार आहे. […] The post अखेर बिगुल वाजले! तुमच्या वॉर्डात आता कोण होणार नगरसेवक? आयोगाचा कार्यक्रम जाहीर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 2:00 am

खालापूरच्या निसर्गावर मोठा घाला! माणूसच बनलाय वैरी; जंगलांना का लावली जातेय आग?

प्रभात वृत्तसेवा खालापूर – खालापूर तालुक्यासह परिसरात मानवनिर्मित वणव्यांचे वाढते प्रकार हे निसर्गसौंदर्याच्या मुळावर उठले आहेत. त्यामुळे जैवविविधता आणि पर्यावरणासाठी ही बाब अत्यंत चिंताजनक ठरत आहे. दरवर्षी रस्ते विकास, वाढते शहरीकरण, औद्योगिक प्रकल्प आणि खाणकामाच्या नावाखाली हजारो वृक्षांची तोड होत असताना, त्यातच मानवनिर्मित वणव्यांची भर पडल्याने आधीच कमी झालेल्या जंगलावर आणखी मोठा घाला बसत आहे. […] The post खालापूरच्या निसर्गावर मोठा घाला! माणूसच बनलाय वैरी; जंगलांना का लावली जातेय आग? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 1:45 am

PCMC Housing Lottery: डूडूळगाव आणि किवळे गृहप्रकल्पाचा निकाल लागला; पालिकेने दिली मोठी अपडेट

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, त्यांना चांगले घर मिळावे तसेच झोपडपट्टीविरहित शहर असावे, यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यातून शहरातील प्रत्येक गरजू व बेघरांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका अग्रेसर आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील डूडूळगाव येथील व आर्थिक दुर्बल घटकांच्या किवळे प्रकल्पांतील सदनिकांची संगणकीय […] The post PCMC Housing Lottery: डूडूळगाव आणि किवळे गृहप्रकल्पाचा निकाल लागला; पालिकेने दिली मोठी अपडेट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 1:30 am

Gambling Raid: तीन पत्तीचा डाव पडला महागात! देहूरोड पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; १० जण गजाआड

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – देहुरोड पोलीस स्टेशन हद्दीत विठ्ठलवाडी मधील इंद्रायणी नदीकाठी मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या १० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (१४ डिसेंबर) सायंकाळी करण्यात आली.पोलीस कॉन्स्टेबल श्यामसुंदर गुट्टे यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय बबन भालेकर (वय ५०, रा. तळवडे), पंढरीनाथ गोपाळ मोरे (वय ६५, रा. देहुगाव), राजु […] The post Gambling Raid: तीन पत्तीचा डाव पडला महागात! देहूरोड पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; १० जण गजाआड appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 1:15 am

रात्रीच्या अंधारात भयानक अपघात! दुचाकीस्वाराची अवस्था गंभीर; पोलिसांत गुन्हा दाखल

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – एका बस चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात व निष्काळजीपणे बस चालवून मोटारसायकलला धडक दिली, ज्यामुळे मोटारसायकल चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शनिवारी (दि. १३ डिसेंबर) रात्री बिरदवडी येथे घडली.कुलदीप रामचंद्र भिसे (वय ४३, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार परिस बाजीराव दिघे (वय […] The post रात्रीच्या अंधारात भयानक अपघात! दुचाकीस्वाराची अवस्था गंभीर; पोलिसांत गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 1:00 am

Pimpri Crime: आधी धमकीचे मेल, मग घरी धडकला ‘बॉम्ब’? खंडणीसाठी वापरली धक्कादायक पद्धत..वाचा

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – एका अनोळखी व्यक्तीने रावेत येथील एक व्यक्ती आणि त्यांच्या मुलांच्या ईमेल आयडीवर वेळोवेळी मेल पाठवून आणि बॉम्ब सदृश्य संशयास्पद वस्तू कुरिअरने पाठवून डॉलरमध्ये खंडणीची मागणी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ही घटना २१ नोव्हेंबर १४ डिसेंबर या कालावधीत रावेत येथे घडली. या प्रकरणी रमेश गणपतआप्पा रूमाले (वय ५४, रा. रावेत) […] The post Pimpri Crime: आधी धमकीचे मेल, मग घरी धडकला ‘बॉम्ब’? खंडणीसाठी वापरली धक्कादायक पद्धत..वाचा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 12:45 am

Pusegaon: पुसेगावच्या बैलबाजारात ‘हा’नियम मोडल्यास थेट कायदेशीर कारवाई; ट्रस्टचा कडक इशारा

प्रभात वृत्तसेवा पुसेगाव – श्री सेवागिरी महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भरविण्यात आलेल्या बैलबाजारात हजारोंच्या संख्येने खिलार जनावरे व पशुधन दाखल होत आहेत. या बाजारात शासकीय नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बाजारात जनावरांच्या खरेदी विक्रीबाबत कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास देवस्थान ट्रस्ट त्यावर कायदेशीर कारवाई करेल, असा इशारा मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे […] The post Pusegaon: पुसेगावच्या बैलबाजारात ‘हा’ नियम मोडल्यास थेट कायदेशीर कारवाई; ट्रस्टचा कडक इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 16 Dec 2025 12:30 am

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १६ डिसेंबर २०२५

पंचांगआज मिती मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र स्वाती .योग अतिगंड.चंद्र राशी तूळ.भारतीय सौर २५ मार्गशीर्ष शके १९४७.मंगळवार दिनांक १६ डिसेंबर २०२४ .मुंबईचा सूर्योदय ०७.०४ , मुंबईचा सूर्यास्त ०६.०३ मुंबईचा चंद्रोदय ०४.३७ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०३.०९ राहू काळ ०३.१८ ते ०४.४१,धंनुर्मासरंभ,शुभ दिवस-दुपारी-०२;०९ पर्यन्तदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : मित्रमंडळींच्या समवेत मजेत वेळ जाईलवृषभ : अडथळ्यांची शर्यत जिंकाल.मिथुन : नोकरीतील परिस्थिती चांगली राहील.कर्क : आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.सिंह : महत्त्वाचे निर्णय घेता येतील.कन्या : सरकारी स्वरूपाच्या कामात विलंब लागू शकतोतूळ : वेळेचा अपव्यय करणे टाळावे.वृश्चिक : मौजमजे साठी पैसा खर्च कराल.धनू : प्रगतीपर वार्ता कळतील.मकर : जोडीदारास सांभाळून घ्यावे लागेल.कुंभ : व्यवसायात जपून व्यवहार करा.मीन : नोकरीत चांगली परिस्थिती राहील.

फीड फीडबर्नर 16 Dec 2025 12:30 am

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले. यात पाकिस्तानमधून नियंत्रित केल्या जाणाऱ्या लष्कर-ए-तोयबा (एलईटी) आणि तोयबाशी संलग्न असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दोन अतिरेकी संघटनांनाही आरोपी करण्यात आले आहे.पहलगाम अतिरेकी हल्ल्याचा कट आणि त्याच्या अंमलबजावणीत लष्कर-ए-तोयबा आणि द रेझिस्टन्स फ्रंट यांची महत्त्वाची भूमिका होती. दोन्ही संघटनांच्या यंत्रणेचा कटाच्या अंमलबजावणीसाठी पुरेपूर वापर झाला होता. यामुळे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर-ए-तोयबा (एलईटी) आणि तोयबाशी संलग्न असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दोन अतिरेकी संघटनांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आरोपी केले आहे.विशिष्ट धर्माच्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनांनी पहलगाम येथे अतिरेकी हल्ला केला होता. यात नाव आणि धर्म जाणून घेऊन अनेकांची हत्या करण्यात आली. एकूण २५ पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा अतिरेक्यांच्या गोळीबारात मृत्यू झाला. मारल्या गेलेल्या नागरिकांमध्ये प्रामुख्याने हिंदू होते. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए)पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अतिरेकी साजिद जट्ट यालाही आरोपी केले आहे. जम्मूमधील एनआयएच्या विशेष न्यायालयात पहलगाम प्रकरणी १५९७ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झालेल्या फैसल जट्ट उर्फ ​​सुलेमान शाह, हबीब ताहिर उर्फ ​​जिब्रान आणि हमजा अफगाणी या तीन अतिरेक्यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे. श्रीनगरच्या दाचीगाम भागात ऑपरेशन महादेव राबवून सुरक्षा दलांनी या अतिरेक्यांना ठार केले होते.आरोपपत्रात बशीर अहमद जोथर आणि परवेझ अहमद जोथर या दोघांचीही नावे आहेत. दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल एनआयएने २२ जून २०२५ रोजी या दोघांना अटक केली होती. पहलगाम हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख त्यांनी उघड केली होती. त्यांनी हे देखील सांगितले होते की, ऑपरेशन महादेव दरम्यान ठार झालेले तिन्ही अतिरेकी पाकिस्तानचे नागरिक आहेत.राष्ट्रीय तपास संस्थेने भारतीय न्याय संहिता २०२३ (बीएनएस),शस्त्रास्त्र कायदा १९५९ आणि बेकायदा कारवायांना प्रतिबंध घालणारा कायदा १९६७ (UAPA) तसेच भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचाही गुन्हा दाखल केला आहे.कोण आहे साजिद जट्ट ?साजिद जट्ट हा पाकिस्तानी नागरिक आहे आणि तो पंजाब प्रांतातील कसूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. साजिद जट्टचे खरे नाव हबीबुल्लाह मलिक आहे. पण तो सैफुल्लाह, नुमी, नुमान, लंगडा, अली साजिद, उस्मान हबीब आणि शानी अशी अनेक नावांनीही ओळखला जातो. ऑक्टोबर २०२२ मध्ये, साजिद जट्टला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत (UAPA) वैयक्तिक दहशतवादी घोषित करण्यात आले. पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयातून साजिद सक्रीय होता. त्याने पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी कारवायांसाठी अतिरेक्यांची भरती करणे, अतिरेकी कारवायांसाठी निधीचा पुरवठा करणे, अतिरेक्यांना घुसखोरीसाठी आवश्यक ती मदत पुरवणे असे अनेक प्रकारे नियोजन केले होते.साजिदच्या कारवायांची माहिती हाती येताच त्याच्याबाबत ठोस माहिती देणाऱ्याला दहा लाख रुपयांचे बक्षिस भारत सरकारने जाहीर केले. यावरुन साजिदच्या कारवायांचा अंदाज येतो. धांगरी हत्याकांड (जानेवारी २०२३, राजौरी) – ७ नागरिक ठार, मुख्य कट रचणारा साजिद जट्ट. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला (मे २०२४, पूंछ) - एक सैनिक शहीद, साजिदचा कटात सहभाग रियासी बस हल्ला (जून २०२४) – यात्रेकरूंनी भरलेल्या बसवर हल्ला, साजिदचा कटात सहभाग पहलगाम अतिरेकी हल्ला (एप्रिल २०२५) – पर्यटकांवर हल्ला, २६ जणांचा मृत्यू; साजिदचा कटात सहभाग

फीड फीडबर्नर 15 Dec 2025 11:30 pm

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने कुख्यात गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर याला उत्तरप्रदेशातील फतेहगढ मध्यवर्ती कारागृहातून अटक केली आहे. मंगळवारी त्याला वसईत आणले जाणार आहे.विरारमध्ये राहणाऱ्या समय चौहान या चाळ बिल्डरची २६ फेब्रुवारी २०२२ रोजी विरारच्या मनवेलपाडा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात १३ आरोपींना मोक्का अंतर्गत अटक करण्यात आली होती. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन गँगस्टर सुभाष सिंग ठाकूर हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी होता. तो जेजे हत्याकांड प्रकरणात उत्तरप्रदेशात फतेहगढ कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मात्र २०१९ पासून उपचाराच्या नावाखाली रुग्णालयात होता. त्यामुळे त्याला या प्रकरणात अटक करता येत नव्हती. अखेर २०२४ मध्ये सुभाषसिंग ठाकूर याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर सुभाषसिंग ठाकूर याला वसईत आणण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती. सोमवारी गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले आणि कारागृहातून सुभाषसिंग ठाकूर याला ताब्यात घेण्यात आले. सुभाषसिंग ठाकूर याला मंगळवारी मुंबईत आणले जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांनी दिली.सुभाष सिंह ठाकूर दाऊद टोळीशी संबंधित गुंड आहे.दाऊदचा मेव्हणा इस्माइल इब्राहिम पारकर याची हत्या झाली. यानंतर दाऊदच्या सूचनांचे पालन करत सुभाष सिंह ठाकूरने इस्माइल इब्राहिम पारकरच्या हत्येशी संबंधित आरोपींना एक एक करुन ठार केले होते. यानंतर सुभाष सिंह ठाकूरचे महत्त्व एकदम वाढले. पण मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर सुभाष आणि दाऊद यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला, असे सांगतात. मुंबई जवळच्या शहरांमध्ये सक्रीय असलेल्या बिल्डरांना धमकावणे आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे हे उद्योग करुन ९० च्या दशकात सुभाष सिंह ठाकूरने स्वतःची दहशत निर्माण केली होती. दाऊदच्या संपर्कात आल्यामुळे तर त्याचे महत्त्व आणखी वाढले होते. पुढे अटक झाल्यानंतर तुरुंगात राहून सुभाष त्याचे साम्राज्य लिलया सांभाळत होता. पण मिरा भाईंदर वसई-विरार पोलिसांनी अटक केल्यामुळे सुभाष विरोधात कठोर कायदेशीर कारवाईची शक्यता वाढली आहे.

फीड फीडबर्नर 15 Dec 2025 11:10 pm

जालन्यातील नराधमाला फाशीच; राष्ट्रपतींनी फेटाळली दयेची याचिका

नवी दिल्ली : महाराष्ट्रात २०१२ साली एका दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या एका आरोपीची दयेची याचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी फेटाळली. त्यामुळे आरोपी रवी अशोक घुमरे याची फाशीची शिक्षा कायम राहणार आहे. २०२२ रोजी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुर्मू यांनी फेटाळलेली ही तिसरी दयेची याचिका आहे. आरोपीचे […] The post जालन्यातील नराधमाला फाशीच; राष्ट्रपतींनी फेटाळली दयेची याचिका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Dec 2025 10:44 pm

महाराष्ट्रात खळबळ! एक कोटीच्या विम्यासाठी स्वत:च्या ‘मृत्यू’चा बनाव; लिफ्ट मागणाऱ्या निरपराध वृद्धाचा जिवंत जाळून खून

लातूर: कर्जातून मुक्त होण्यासाठी एका व्यक्तीने एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला आणि या अमानुष कटात लिफ्ट मागणाऱ्या एका निरपराध वृद्धाला जिवंत जाळून ठार केल्याची खळबळजनक घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात उघडकीस आली आहे. लातूर पोलिसांनी केवळ २४ तासांत या घटनेचा छडा लावून सत्य समोर आणले. औसा तालुक्यातील वानवडा शिवारात मध्यरात्री स्कोडा कंपनीची […] The post महाराष्ट्रात खळबळ! एक कोटीच्या विम्यासाठी स्वत:च्या ‘मृत्यू’चा बनाव; लिफ्ट मागणाऱ्या निरपराध वृद्धाचा जिवंत जाळून खून appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Dec 2025 10:41 pm

मेक्सिकोच्या अचानक आयात शुल्कामुळे भारताचा ‘प्राधान्यक्रमाच्या व्यापार करारा’चा प्रस्ताव

नवी दिल्ली – भारत सरकारने मेक्सिकोला प्राधान्यक्रमाच्या व्यापार कराराचा प्रस्ताव सादर केला असून हा करार शक्य तितक्या लवकर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ज्या देशाचा मेक्सिकोबरोबर मुक्त व्यापार करार नाही अशा देशाविरोधात मेक्सिकोनेे गेल्या आठवड्यात अचानक 5 ते 50 टक्क्यापर्यंत आयात शुल्क लावले आहे त्यामध्ये भारतासह चीन, दक्षिण कोरिया, थायलंड आणि इंडोनेशियाचा समावेश आहे. अमेरिकेप्रमाणेच […] The post मेक्सिकोच्या अचानक आयात शुल्कामुळे भारताचा ‘प्राधान्यक्रमाच्या व्यापार करारा’चा प्रस्ताव appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Dec 2025 10:33 pm

कमी मूल्यांच्या नोटांचा देशभर तुटवडा; सर्वसामान्य व छोट्या व्यवसायांची कोंडी

कोलकत्ता – कमी मूल्याच्या नोटाचा देशभर मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणि छोट्या उद्योगांना व्यवहार करताना अडचणी येत आहेत असे ऑल इंडिया रिझर्व्ह बँक एम्प्लॉईज असोसिएशन या संघटनेने म्हटले आहे. हा प्रश्न लवकर सोडविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. या संघटनेतर्फे रिझर्व बँकेला एक पत्र पाठविण्यात आलेले आहे. या पत्रात म्हटले आहे […] The post कमी मूल्यांच्या नोटांचा देशभर तुटवडा; सर्वसामान्य व छोट्या व्यवसायांची कोंडी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Dec 2025 10:27 pm

Wholesale inflation : नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई किंचित वाढली

नवी दिल्ली – नोव्हेंबर महिन्यात घाऊक म्हणजे होलसेल महागाई किंचित वाढली असली तरी अजूनही ती शून्य टक्क्यापेक्षा कमी आहे. नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर उणे (-) 0.32% इतका मोजला गेला आहे. ऑक्टोबर महिन्यात या महागाईचा दर उणे 1.21 टक्के इतका होता. तर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये या महागाईचा दर 2.16 टक्के इतका होता. डाळी आणि […] The post Wholesale inflation : नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई किंचित वाढली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Dec 2025 10:21 pm

नोव्हेंबरमध्ये निर्यातीत जोरदार वाढ; आयात घटल्याने व्यापार तूट पाच महिन्यांच्या निचांकी पातळीवर

नवी दिल्ली – नोव्हेंबर महिन्यात भारताची निर्यात 19 टक्क्यांनी वाढून 38 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. या महिन्यात आयात एक टक्क्याने कमी होऊन 62 अब्ज डॉलर झाली आहे. त्यामुळे व्यापारातील तूट 24 अब्ज डॉलर इतकी मर्यादित झाली आहे. हा पाच महिन्याचा निचांंक आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये निर्यात वाढण्याऐवजी कमी झाली होती. वाणिज्य मंत्रालयाने जाहीर […] The post नोव्हेंबरमध्ये निर्यातीत जोरदार वाढ; आयात घटल्याने व्यापार तूट पाच महिन्यांच्या निचांकी पातळीवर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Dec 2025 10:14 pm

राहुल गांधी, खर्गेंनी माफी मागावी; नेमकं प्रकरण काय?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणारी घोषणाबाजी कॉंग्रेसच्या रॅलीत झाल्याचा गंभीर आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यावरून आक्रमक पवित्रा स्वीकारत भाजपने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संसदेत माफी मागावी, अशी मागणी केली. कथित धमकीच्या घडामोडीचे पडसाद उमटून संसदेही गदारोळ झाला. कॉंग्रेसची रविवारी दिल्लीत व्होट चोर, गद्दी छोड […] The post राहुल गांधी, खर्गेंनी माफी मागावी; नेमकं प्रकरण काय? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Dec 2025 10:12 pm

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला येथे झालेला सामना भारताने सात विकेट राखून जिंकला. याआधी भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कटकचा टी ट्वेंटी सामना १०१ धावांनी जिंकला तर दक्षिण आफ्रिकेने चंदिगड येथील टी ट्वेंटी सामना ५१ धावांनी जिंकला. आता लखनऊ आणि अहमदाबाद येथे प्रत्येकी एक टी ट्वेंटी सामना होणार आहे. मालिका जिंकण्यासाठी भारताला उर्वरित दोन पैकी किमान एक सामना जिंकणे आवश्यक आहे. भारतीय संघ विजयी घोडदौड कायम ठेवण्यास उत्सुक असताना भारतासाठी एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे.टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेल आजारी पडला आहे. डॉक्टरांनी अक्षरला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. अक्षरवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. यामुळे अक्षर पटेल लखनऊ आणि अहमदाबाद येथील टी ट्वेंटी सामन्यांमध्ये खेळणार नाही.जसप्रीत बुमराह कौटुंबिक कारणामुळे धरमशाला येथील सामना खेळला नव्हता. घरातील जवळची व्यक्ती रुग्णालयात असल्यामुळे बुमराह विशेष परवानगी घेऊन धरमशालाचा सामना खेळण्याऐवजी नातलगाला भेटण्यास गेला होता. पण लखनऊ आणि अहमदाबादच्या टी ट्वेंटी सामन्यांसाठी बुमराह उपलब्ध आहे. यामुळे अक्षर नसला तरी बुमराह आहे असा विचार करुन टीम इंडियाला पुढील सामन्यांसाठी नियोजन करावे लागणार आहे.

फीड फीडबर्नर 15 Dec 2025 10:10 pm

राजस्थानमध्ये अंमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त; महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई

ठाणे : महाराष्ट्र पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने राजस्थानच्या झुंझुनू येथे धडक कारवाई करत अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उद्‌ध्‍वत केला आहे. या कारवाईत सुमारे १०० कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ, रसायने आणि उपकरणे जप्त केली आहेत. मीरा भाईंदर-वसई विरार पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी केलेल्या छाप्यानंतर अंमली पदार्थांच्या कारखान्यातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली. […] The post राजस्थानमध्ये अंमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त; महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Dec 2025 10:10 pm

पाकस्थित हँडलरसह 7 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल; एनआयएची मोठी कारवाई

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या २२ एप्रिल रोजी भीषण दहशतवादी हल्ला प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने सोमवारी सात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा, तिची सहयोगी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) आणि पाकिस्तानमधील एका दहशतवादी हँडलरचा समावेश आहे. जम्मू येथील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या तब्बल १,५९७ पानांच्या आरोपपत्रात कट, हल्ल्याचे नियोजन […] The post पाकस्थित हँडलरसह 7 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल; एनआयएची मोठी कारवाई appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 15 Dec 2025 9:49 pm