SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

26    C
... ...View News by News Source

विवाह पद्धतीतील वळणे

मीनाक्षी जगदाळे । उत्तरार्ध : पुढील बुधवारीविवाह ही भारतीय संस्कृतीतील सामाजिक आणि कौटुंबिक संस्था. तथापि, गेल्या काही दशकांत, शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य, जागतिकीकरण आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे या व्यवस्थेमध्ये बदल घडले. पारंपरिक ठरवून केलेले लग्न यासोबतच प्रेमविवाह स्वीकारले जात आहेत. विवाह व्यवस्थेचे बदलते स्वरूप काय आहे हे या लेखात आपण पाहणार आहोत...पारंपरिक ठरवून केलेले लग्न आणि भरमसाठ खर्च (Traditional Arranged Marriage with Extravagant Spending)या स्वरूपात पालक किंवा कुटुंबातील सदस्य वधू-वर निवडतात. आपण आपल्या आजूबाजूला कायमच या पद्धतीची लग्न होताना पाहत असतो. दोन्ही कुटुंबांची सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक स्थिती जुळवून पाहिली जाते. मुला मुलीचे शिक्षण, नौकरी, व्यवसाय तथा आवडी निवडी तपासून, जन्मपत्रिका जुळवून ही लग्न केली जातात. आजमितीला तीन चार दिवस चालणारे असे लग्न सोहळे, मोठं मोठी मंगल कार्यालये, सजावट, विविध विधी, प्रत्येक विधीचे महागडे पोशाख, फोटो, शूटिंग, जेवणाला असंख्य पदार्थ, स्वागत सभारंभ, नाच गाणी, विविध कार्यक्रम, कन्यादाणाच्या वस्तू तथा सामान, फटाके यावर अमाप खर्च करण्यात येतो. या भरमसाठ खर्चाची कारणे (मानसशास्त्रीय/सामाजिक) कारणे तपासली असता लक्षात येते की सामाजिक प्रतिष्ठा, कुटुंबाची समाजातली 'इभ्रत' आणि मोठेपण दर्शवण्यासाठी खर्च केला जातो. मुलांच्या लग्नात कोणतीही कमतरता नको, या पालकांच्या हट्टापोटी खर्च होतो. अजून ऐक महत्वाची बाब म्हणजे आपल्या मुलीला सासरी नंतर कोणता त्रास नको, तिला कोणी काही बोलायला नको हाही वधू पक्षांकडील हेतू असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओद्वारे इतरांना आपले वैयक्तिक यश दाखवण्याची प्रवृत्ती वाढल्यामुळे प्रदर्शनाची गरज वाढली आहे. सगळेजण आजकाल अशीच लग्न करत आहेत आणि आपल्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात राहायचे असेल तर मागे राहून चालणार नाही ही मनोवृत्ती पालकांची सुद्धा होत आहे. त्याच प्रमाणे इतर नातेवाईक, ओळखीचे आणि मित्रपरिवारा पेक्षा आपले लग्न अधिक भव्य असावे, या स्पर्धात्मक, हेवा, चुरस, तुलना या भावनेतून खर्च वाढतो.पळून जाऊन किंवा नोंदणी पद्धतीने प्रेम विवाह (Elopement/Court Marriage - Love Marriage) याचे स्वरूप पाहिले असता, कुटुंबाच्या तीव्र विरोधामुळे किंवा संमती नसल्यामुळे वधू-वर पळून जातात आणि मंदिरात, विवाह नोंदणी संस्थेत किंवा न्यायालयात विवाह करतात. या मागील मानसशास्त्रीय/सामाजिक कारणे मुख्यत्वे करून जात, धर्म, आर्थिक स्थिती किंवा सामाजिक प्रतिष्ठेमुळे कुटुंबाचा तीव्र विरोध असणे हा असतो. कोर्ट मॅरेज/रजिस्टर मॅरेजची कायदेशीर प्रक्रिया सोपी झाल्यामुळे सुलभरित्या लग्न करता येते. मोठ्या समारंभावरचा खर्च टाळून कमी वेळात लग्न करण्यासाठी तसेच तरुण पिढीला त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय स्वतः घ्यायचा असल्यामुळे हे प्रकार वाढले आहेत. मुला मुलींना आजकाल शिक्षणाच्या अथवा नौकरी च्या निम्मिताने बाहेरगावी राहण्याचे प्रमाण वाढले आहे. अश्या ठिकाणी शक्यतो कोणाचा धाक, भीती, दडपण नसते आणि मुलं मुलींना जवळ यायला पोषक वातावरण असते. अनेकदा मुला मुलींच्या घरातील वातावरण सुरक्षित अथवा चार चौघासारखे नसले, मुलांनी लहानपणापासून संघर्ष केलेला असणे, आई वडिलांशी संवाद हवा तितका मोकळा झालेला नसणे किंवा मुलांना खूप बंधनात ठेवलेले असणे, योग्य मार्गदर्शन न मिळणे, चित्रपट, सामाजिक माध्यमातून मिळणारी माहिती, कुटुंबातील लोकांबद्दल फारस प्रेम आपुलकी जवळीक नसने, घरातील संस्कार, संस्कृती चा होत चाललेला ऱ्हास ही कारणे पण तरुण पिढीला पळून जावून लग्न करायला भाग पाडतात.लव्ह-कम-अरेंज मॅरेज(Love-cum-Arranged Marriage with Family Consent)याचे स्वरूप वधू-वर एकमेकांना पसंत करतात, काही दिवस रिलेशन शिप मध्ये राहतात पण नंतर कुटुंबाला विश्वासात घेऊन, त्यांची संमती मिळवून, दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत विवाह करतात. अनेकदा 'नोंदणी पद्धत' (Court Marriage) किंवा लहानसा स्वागत समारंभ आयोजित केला जातो. ही विवाह पद्धती मुलांना आवडीचा जोडीदार पण मिळवून देते आणि दोघांचे पालक, सर्व कुटुंब, नातेवाईक पण समाधानी होतात. या लग्नाचे मानसशास्त्रीय/सामाजिक कारणे पाहिली असता, प्रेम विवाह करताना जो कुटुंबाचा भावनिक पाठिंबा हवा असतो, यामुळे आधुनिक आणि पारंपारिकतेचा समन्वय साधला जातो. समाजाकडून आणि नातेवाईकांकडून विरोधाची शक्यता कमी होते. कुटुंबाचा आशीर्वाद मिळाल्याने वैवाहिक आयुष्याला भावनिक सुरक्षित आधार मिळतो. कोणालाही वधू वरांना अथवा त्यांच्या घरच्यांना वावगे बोलण्याची, नावं ठेवण्याची, अथवा बदनामी करण्याची संधी मिळत नाही. अश्या विवाहात भविष्यात काही समस्या उद्भवल्यास पालक, नातेवाईक मध्यस्थी करून त्यावर उपाययोजना करू शकतात. तसेच पती पत्नी वर देखील लग्न टिकवण्याची जबाबदारी असल्याने एकमेकांना सांभाळून घेण्याकडे कल असतो.रजिस्टर लग्न/प्रेम विवाह करून नातेवाईकांपासून लपवणे (Secret Registered Marriage/Love Marriage)याचे स्वरूप खूपच वेगळे आणि विचित्र असते. वधू-वर कोर्टात नोंदणी पद्धतीने लग्न करतात, पण कुटुंबातील काही सदस्यांना किंवा नातेवाईकांना काही काळ ही गोष्ट कळू देत नाहीत. अगदीच जवळच्या लोकांना विश्वासात घेवून मित्र मंडळी न घेवून हे लग्न उरकले जाते. या लग्नाची कोणतीही प्रसिद्धी, फोटो, विडिओ सुद्धा सार्वजनिक केले जातं नाहीत. असे लग्न करतांना खूप गोपनीयता पाळली जाते. अत्यंत गुपचूप दोन्ही कडील महत्वाचे लोकं एकमेकांना भेटणे, घर दार पाहणे, लग्नाची बोलणी करणे इतर कोणालाच विचारात न घेता उरकून घेतात.या मागील मानसशास्त्रीय/सामाजिक कारणे अभ्यासले असता लक्षात येते की, त्वरित विरोध किंवा संघर्ष टाळण्यासाठी 'वेळ विकत घेणे' हा यामागील उद्देश असतो. काही नातेवाईक ज्यांनी आपले मन दुखावले आहे, ज्यांच्याशी कौटुंबिक वाद विवाद आहेत, पूर्वी पासून भांडण आहेत, ज्यांना परकं किंवा लांबच मानलं जात त्यांना अश्या लग्नाला अजिबात बोलावलं जात नाही अथवा सांगितले जातं नाही. आपलेच नातेवाईक आपल्या लग्नात विघ्न आणतील, आपल्या लग्नाला वेगळे स्वरूप दिले जाईल या भीतीने त्या नातेवाईकांना शक्य झालेच आणि इच्छा असलीच तर नंतर सांगण्याचा निर्णय घेतला जातो. अनेकदा ज्या कुटुंबातील लोकांनी, नातेवाईक यांनी भूतकाळात आपल्या पासून पण काही गोष्टी लपवल्या होत्या याची आठवण ठेवून हेतूपुरसर त्यांना मुद्दाम अपमानित करण्यासाठी, बदल्याच्या भावनेतून सुद्धा असे केले जाते. लग्नानंतर लगेच समारंभ करणे शक्य नसल्यास, मुलगा मुलगी व्यवस्थित सेटल नसल्यास किंवा स्वतःचे घर अथवा आर्थिक स्थिरता नसताना, किंवा कोणतेही अपरिहार्य कारण असल्यास अश्या पद्धतीने लग्न केले जाते. आधी लग्न करून नंतर हळूच जाहीर करावे आणि त्यावेळी काहीतरी खोटे कारण अथवा पार्शवभूमी तयार करावी असे ही प्रकार यामागे असतात.आता वरील सर्व प्रकारच्या लग्नाचे फायदे आणि तोटे पाहिले असल्यास जाणवते की,पारंपरिक ठरवून केलेले लग्न असल्यास कौटुंबिक पाठिंबा मिळतो, दोन कुटुंबांतील जुळलेले सामाजिक-आर्थिक संबंध टिकून राहतात, भावनिक आधार मिळतो. समाजात ताठ मानेने वावरता येते. या लग्नाच्या कमकुवत बाजू पण खूप आहेत. अनेकदा प्रेम दुसऱ्यावर असते पण सामाजिक दडपण, कौटुंबिक बंधन आणि मर्यादा यामुळे मुलं मुली ठरवून केलेल्या लग्नाला होकार देतांना दिसतात.या लग्नात वधू-वरांना एकमेकांना समजून घेण्यास कमी वेळ मिळतो, एकमेकांशी जुळवून घेण्याचा दबाव असतो, काही बिनसलं तरी ते कस आणि कोणाला सांगायचं ही भीती असते, ठरवून केलेल्या लग्नाचे पण अनेकदा घटस्फोट होतात अथवा आत्महत्या, हुंडाबळी अशी प्रकरणे होतात. ठरवून केलेल्या लग्नात अनावश्यक खर्च, मान पान, हुंडा यातून अनेकदा वाद निर्माण होतो. अनेकदा केवळ नातेवाईकांनी एकमेकांना शब्द दिलेला असतो म्हणून नात्यातील मुला मुलींची लग्न लावली जातात पण या ठिकाणी त्यांची आवड निवड निर्णय लक्षात घेतला जात नाही.

फीड फीडबर्नर 24 Dec 2025 1:10 am

पुण्याची सायकल संस्कृती लोप पावते आहे

कधीकाळी ‘सायकलींचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची आजची परिस्थिती फार वेगळी आहे. आज बदलती जीवनशैली आणि वाढत्या वाहनव्यवहारामुळे वेगळी दिशा घेताना दिसते. सायकल आणि पुणे ही जणू एकमेकांची ओळख होती. गरिबापासून श्रीमंतापर्यंत, विद्यार्थी ते नोकरदार, सर्वांसाठी सायकल हा दैनंदिन वाहतुकीचा अविभाज्य भाग होता. फर्ग्युसन कॉलेज रोड, लक्ष्मी रोड, कर्वे रोड, शिवाजीनगरच्या गल्लीबोळांतून सायकलींचा संचार हे पुण्याचे वैशिष्ट्य मानले जायचे. मात्र गेल्या दशकभरात ही ओळख कमी होत चालली आहे. सायकली आता फक्त व्यायाम किंवा स्पर्धेपुरत्याच उरल्या आहेत. त्यामुळे आपण पॅडेलकडून पेट्रोलकडे चाललो आहोत.सायकल संस्कृतीचा इतिहास एक सुवर्णकाळ होता. पुण्यातील शिक्षणसंस्था, कमी अंतरांची शहरी रचना आणि हवामान या तीन घटकांनी सायकल वापर वाढवण्यास मोठा हातभार लावला होता. १९७० ते १९९० या काळात पुण्यातील विद्यार्थी आणि कामगार वर्गासाठी सायकल हे मुख्य वाहन होते. खर्च कमी, देखभाल कमी आणि वाहतुकीतील सहजता यामुळे सायकलींना मोठी मागणी होती. एक काळ असा होता की, पुण्यातील मुख्य रस्त्यांवर मोटार वाहनांपेक्षा सायकली जास्त दिसत. ‘सायकलस्टँड फुल्ल’ हे शिक्षणसंस्थांचे सामान्य दृश्य होते. सुमारे २००० नंतर पुण्याची ओळख आयटी हब म्हणून निर्माण झाली. शहराचा विस्तार वेगाने झाला आणि त्यानुसार प्रवासाचे अंतरही वाढले. यातून मोटारसायकली आणि कार यांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला. आज पुण्यातील रस्त्यावर उतरणाऱ्या वाहनांची संख्या एवढी वाढली आहे की, सायकलप्रेमींना जागाच उरलेली नाही असे भासू लागते. मोटारसायकलची कर्जव्यवस्था सोपी, पेट्रोल दरातील चढ-उतार असूनही वाढलेली क्षमता आणि वेळेची बचत या कारणांमुळे सायकलचा वापर कमी होत गेला. सायकलपेक्षा वेगवान आणि ‘स्टेटस सिंबल’ असलेली वाहने लोक अधिक पसंत करू लागले. परिणामी, सायकल ही गरजेपेक्षा छंद किंवा फिटनेस साधन म्हणून ओळखली जाऊ लागली. स्वयंचलित दुचाकींच्या आक्रमाणामुळे शहरातील सायकलींचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे. सायकलींसाठी स्वतंत्र ट्रॅक, सुरक्षित पार्किंग, योग्य दिवाबत्ती व संकेतचिन्हे या सुविधा पुण्यात पुरेशा प्रमाणात नाहीत. काही निवडक रस्त्यांवर सायकल ट्रॅक तयार केले गेले, परंतु ते सतत आणि सुरक्षित नसल्यामुळे नागरिक त्याचा वापर करण्यास कचरतात. अनेक ठिकाणी सायकल ट्रॅकमध्ये अतिक्रमण, वाहने पार्किंग किंवा रस्त्यांचा अयोग्य दर्जा दिसून येतो. जगभरातील अनेक शहरांनी सायकल रस्ता आणि सार्वजनिक सायकल व्यवस्थेचा अवलंब करून वाहनभार कमी केला आहे; परंतु पुण्यात या योजनांना सातत्य आणि नियोजनाची जोड मिळाली नाही. पुणे महानगरपालिकेने ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ योजना सुरू केली होती; परंतु सुरुवातीच्या उत्साहानंतर त्यात घट झाल्याचे दिसते.आज पुण्यातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक इतकी वेगवान आणि अनियमित झाली आहे की, सायकलस्वारांना रस्त्यावर उतरतानाही भीती वाटते. काही वर्षांत घडलेल्या अपघातांच्या घटनांनी ही भीती आणखी वाढवली. वाहतूक शिस्तीचा अभाव, अरुंद रस्ते, सतत चालू असलेले रस्ताकाम आणि वेगवान दोनचाकी व चारचाकी वाहने यांच्यामध्ये सायकलला सुरक्षित जागा उरत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिक सायकल वापरणे टाळतात. पुणे हे शिक्षणाचे मोठे केंद्र. हजारो विद्यार्थी दररोज कॉलेज आणि क्लासेसला येतात. पूर्वी बहुतांश विद्यार्थी सायकल वापरत असत, परंतु आज पालक मुलांना स्कूटर किंवा बाईक देण्यास प्राधान्य देतात. सुरक्षितता, वेळ बचत आणि ‘पॅशन’ यामुळे सायकल मागे पडत चालली आहे. यामुळे रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढते, पार्किंग समस्या निर्माण होते आणि पर्यावरणावर ताण वाढतो. पुण्यातील वाढती हवा गुणवत्ता समस्या आणि प्रदूषणाची पातळी ही चिंताजनक आहे. सायकल ही शून्य-प्रदूषण वाहतूक आहे. जर सायकलचा वापर वाढला असता तर प्रदूषणाचा ताण लक्षणीयरीत्या कमी करता आला असता. ग्लोबल वॉर्मिंग, शहरी उष्णता, धूरकण यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. अशा परिस्थितीत सायकल ही उत्तम पर्याय असूनही तिचा वापर कमी होणे हे शहरासाठी तोट्याचे ठरते. पुण्यातील सायकल संस्कृती पुन्हा फुलवण्यासाठी बहुआयामी प्रयत्नांची गरज आहे. निरंतर आणि सुरक्षित सायकल ट्रॅकची उभारणी या शहरभर एकत्रित आणि अडथळामुक्त ट्रॅक असणे आवश्यक आहे. सुरक्षित पार्किंगची व्यवस्था मेट्रो स्थानके, बसस्टँड, कॉलेजेस येथे सायकलसाठी स्वतंत्र स्टँड असणे आवश्यक आहे. वाहतूक शिस्तीवर कडक नियंत्रण या सायकलस्वारांचा रस्ता वापर सुरक्षित करण्यासाठी वाहतुकीचे नियम कठोरपणे पाळले जाणे गरजेचे आहे. शाळा व कॉलेजांमध्ये सायकल अभियान राबवणे गरजेचे आहे. सायकलस्नेही शहर धोरण या पायाभूत सुविधांबरोबर जनजागृती, सवलती आणि प्रोत्साहन योजना असणे महत्त्वाचे आहे.शहरा-शहरांतून नव्या पिढीला पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढताना दिसत आहे. पुण्यात देखील काही सायकल ग्रुप्स, फिटनेस मंडळी आणि पर्यावरणप्रेमी लोक सतत उपक्रम राबवत आहेत. वीकेंड रायड्स, हेरिटेज सायकल टूर, वेलनेस रायड अशा उपक्रमांमुळे सायकल पुन्हा चर्चेत येत आहे. मात्र हे उपक्रम शहरभरातील दैनंदिन वाहतुकीत बदल घडवण्यासाठी अजूनही अपुरे आहेत. सध्याच्या शहरी समस्यांकडे पाहता वाढते प्रदूषण, वाढती वाहतूक, पार्किंगची समस्या, रस्त्यावरील ताण, आरोग्यघातक जीवनशैली या सर्वांवर तात्पुरता उपाय नव्हे तर टिकाऊ उपाय म्हणजे सायकल. पुण्याची ‘सायकलींचे शहर’ म्हणून असलेली ओळख आज धूसर होत चालली असली तरी ती पूर्णपणे नाहीशी झालेली नाही. योग्य धोरण, पायाभूत सुविधा आणि नागरिकांची सकारात्मक मानसिकता यामुळे ही ओळख पुन्हा प्रस्थापित करणे शक्य आहे. सायकल ही केवळ एक वाहतूकसाधन नाही, तर शहराच्या पर्यावरणाचे संरक्षण, आरोग्यदायी जीवनशैली आणि शहरी संस्कृती यांचा महत्त्वाचा भाग आहे. पुणे पुन्हा सायकलींनी गजबजलेले दिसावे, यासाठी आता नागरिक, प्रशासन आणि शासन यांची एकत्रित पावले उचलण्याची वेळ आली आहे.

फीड फीडबर्नर 24 Dec 2025 1:10 am

घेतला वसा टाकू नये

पूजा काळे, मोरपीसअसामी-काळजीवाहक सरकार, मत पूछो मेरा कारोबार क्या है, मोहब्बत की छोटी सी दुकान है इस बाजार में... अंगातलं सारं बळ एकवटून मदत करण्याची ताकद असलेला तो किंवा ती म्हणजे, सामान्यातली असामान्य माणसं होत. सर्वसामान्यांच्या डोक्यावर भक्कम आधाराचा हात असणं ही त्यांची खूण, जी जगायला उद्युक्त करते. आपला हात जगन्नाथ असणारी मोजकीचं माणसं वेळेवर मदतीला येतात. वाईट घटनेत, दु:खद प्रसंगी तुमच्याबरोबर खंबीर उभ्या असलेल्या माणसांना विसरायचं नसतं, हा नियम मागील पिढी पाळत आलीय; आपणही त्यांचं अनुकरण करून सदैव साथ देणाऱ्या खंबीर मनाच्या माणसांचा आदर्श धरायला हवा. मन, हृदय हे प्रत्येकात असलं तरी त्यात वसलेला चांगुलपणा हा फक्त आणि फक्त मोठ्या मनाच्या लोकांकडे पाहायला मिळतो. अंतकरणात सामावलेला ईश्वर आपल्या जवळ येतो, तो केवळ इच्छापूर्तीने आणि योगायोगाने. चांगुलपणाची किर्ती पसरायला वेळ लागत नाही. चांगल्या गोष्टीचं गुणगान करताना दाद देणं, वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करणं आणि अधिक चांगला मार्ग शोधून उत्कृष्ट कार्यक्षमता निर्माण करणं हे या प्रकारातल्या निस्वार्थी लोकांना जमतं. आणीबाणी प्रसंग, अटीतटीची वेळ, अतिव दुःखाचे डोंगर पार करण्यासाठी तत्पर असणाऱ्या व्यक्ती आपल्यासाठी उत्तुंग आणि प्रतिभावान ठरतात ते या साठीचं.देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, या म्हणीचा मूळ उद्देश लक्षात घेता, एखाद्याकडून कोणत्याही प्रकारची मदत घेताना त्याची त्या मागची किमान भावना लक्षात घेणं गरजेचं ठरतं; नाही तर नुसतचं घेत रहाणाऱ्यांची संख्या इथं कमी नाही. बोट पकडताना हात ओढून घेण्याची मानवाची कूपमंडूक वृत्ती मदत करणाऱ्याला, त्याच्या मदतीला अडथळा आणू शकते. मदत याचा अर्थ वेळेनुरूप करण्यात आलेली ऐच्छिक कृती. सत्याची वस्तुस्थिती जाणून, इच्छेने समस्येचे निराकरण करणं, त्यातून उत्कृष्ट कार्यक्षमता साधणं, या हाताने केलेलं कार्य त्या हाताला न कळणं, भावना आणि कल्पनांच्या आहारी न जाता कृतीशीलतेने वस्तुस्थितीला आकार देण्याच्या प्रयत्नात स्वतःकडून सर्वस्वी सहकार्य देऊन वास्तवाशी एकरूप होणं या कामाला मदत ही उपाधी देता येईल. अशी माणसं कर्तव्यासाठी मागेपुढे पाहत नाहीत. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य आणि कर्मफळाची अपेक्षा न बाळगण्याची इच्छा त्यांच्याजवळ असते. आपल्या असण्याने समोरच्या दुःखी, कष्टीताला येणारं लाखोंच बळ कर्तव्यपूर्तीचे समाधान घेऊन ही कर्तव्यदक्ष माणसं वावरत असतात. ही माणसं आपल्या अवतीभवती असतात म्हणून आपण मोकळा श्वास घेऊ शकतो.आपली सगळी मदार यांच्या खांद्यावर पेललेली असते. तेव्हा त्यांना विसरणं अशक्यप्राय होय. ज्यांची आयुष्यात कसुभर का होईना मदत झाली असेल त्याची जाणिव मनात जपायला हवी. आई, वडील, बहीण, भाऊ, मित्र, मैत्रिणी, ओळखीचे कोणीही असो त्याच्या प्रति जाणीव असायला हवी. अशी माणसं देव माणसासारखी असतात; नव्हे ती आपल्यासाठी देव माणसचं असतात. जिथं नाही कुणी तिथं देव उभा मनी. देव पांडुरंग माणसाच्या रूपाने भक्ताच्या हाकेला धावतो. गोऱ्या कुंभाराच्या मातीत सत्व ओतणारा, सावत्या माळ्याच्या उभ्या शेतात मळा फुलवणारा सखा पांडुरंग तन-मन-धनाने भक्ताला पावतो. तसाचं शंभरातला एखादा माणूस, त्या माणसातला देव संकटात मदतीला उभा ठाकतो. परीस्थितीतीला तारण्याचं बळ देतो. हाताच्या दोन्ही बाहूंची ताकद, सर्वस्व पणाला लावत, उभं करतो आपणास. परिस्थिती मानवाला शिकवते पण परिस्थितीचा फायदा घेऊ नये असे म्हणताना मदतीच्या वेळी धावणाऱ्या लोकांप्रति आदर सद्भावना ठेवणं, त्यांच्या अमूल्य वेळेचा, सामाजिक जाणीवेचा कृतकृत्य भाव आपल्यात जागृत ठेवणं या प्राथमिक तत्त्वांच मूल्य जाणणं, त्यांच्यातल्या समर्पणाचं भान राखणं, एवढं जरी आपण केलं तरी, त्यांच्या चिन्मय सद्भावना सदैव आपल्या पाठीशी राहतील. श्रम आणि मदतीचा आनंद देणारी अशी माणसं आपल्या आसपास असताना त्यांच्याप्रति निष्ठा बाणायला हवी. सत्कारणी लागणारी मदत एखाद्यास करावी, पण मदत करणाऱ्या दानशूरांना मात्र विसरू नये. या परंपरेत ऊतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये ची शिकवण सार्थ ठरेल. आपलं मनोधैर्य खचू न देणाऱ्या, आपल्यावर प्रेम करणाऱ्या आणि आपणास शिडीसारख्या उपयोगी ठरणाऱ्या माणसांच्या चांगुलपणाचा विजय असो. तो आपल्या अंतःकरणात साजरा होओ. परतीच्या अपेक्षेने न केलेले, जीवनअंशाचे खरे कर्म तसचं दानधर्माच्या सत्कृत्याने संचयातील धन कधीचं आटत नाही. मान, दान आणि ज्ञान या गोष्टीसह कृपावंत मदत ओंजळीत भरून घेताना, भरून सांडलेले मातीत मिसळण्यापूर्वीचं हे दानकरी हात सांभाळायला हवेत. दान देण्यासाठी पसरलेले कृपावंत हात या जगाची नाव हाकतात हे तंतोतंत खरयं, तेव्हा आपल्यासारख्या तमाम गरजूंना उपयोगी ठरणाऱ्या महान व्यक्तिंविषयी आदर बाळगणं आणि तो व्यक्त करणं नेहमीच उचित आहे.

फीड फीडबर्नर 24 Dec 2025 12:30 am

हवा मुंबईची

वायुप्रदूषणाची अखेर मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली. प्रथम दर्शनी अहवालात कोणत्याही निकषाचे पालन केले नाही असे नमूद केले. हवेची गुणवत्ता राखण्याबाबत जे काही निकष आहेत त्यांचे अनुपालन केले जात नाही आणि प्रदूषण नियंत्रणाबाबत ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत यांचे पालन केले जात नाही असे न्यायालयाच्या निदर्शनास आले. ही गंभीर बाब आहे आणि राज्य सरकारला त्याचे उत्तर द्यावे लागणार. ३६ स्थळांचा उल्लेख न्यायालयाने आपल्या आदेशात केला आणि त्यासाठी कारण दिले, ते मुंबईतील बांधकामे आणि विकास प्रकल्पाची कामे. सबका साथ सबका विकास ही घोषणा मोदी सरकारची आहे आणि त्यानुसारच राज्य सरकार आणि केंद्र सरकार काम करते, त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. पण त्याचवेळी लोकांना श्वास घेता येऊ नये असा विकास उपयोगाचा नाही याकडे दुर्लक्ष होऊ देता कामा नये असे न्यायालयाच्या निरीक्षणानंतर सरकारच्या लक्षात आणून देण्याचा न्यायालयाने प्रयत्न केला. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स न्यायालयाने बजावले आहे आणि त्यात ते काय सांगतात त्यावर पुढील भूमिका ठरेल. न्यायालयाने म्हटले आहे, की महापालिका आयुक्त आणि एमपीसीबी अधिकाऱ्यांनी वैयक्तिकदृष्ट्या हजर राहून या अनास्थेप्रती स्पष्टीकरण दिले पाहिजे. आता अनेक ठिकाणी बांधकाम थांबवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या असून अनेक बांधकामे थांबवण्यात आली. ही बांधकामे धूळ आणि डेब्रिस म्हणजे मलबा तयार करत होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. न्यायालायाचा आदेश म्हणजे मुंबई महापालिका आणि प्रदूषणाबाबत साऱ्याच उदासीन यंत्रणांना चपराक आहे. कारण अशी प्रदूषणाबाबतची बेफिकिरी आपण उत्तर प्रदेशात किंवा अन्य राज्यात पाहतो. पण मुंबईसारख्या सुशिक्षित आणि विकासाच्या वाटेवर धावणाऱ्या शहरात न्यायालयच काय कुणीही खपवून घेणार नाही.प्रदूषण आटोक्यात आणण्यावर जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते, हे न्यायालयाचे निरीक्षण आहे आणि हे आपल्या सुनियोजित शहर म्हणून आणि सुजाण नागरिकांप्रती असलेल्या जबाबदारीकडे कसे दुर्लक्ष करतो याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. मुंबईच नव्हे तर नवी मुंबई हेही प्रदूषणाचे आगर होत आहे आणि याचीही दखल न्यायालयाने घेतली. मुंबईतील प्रदूषणाकडे सर्रास दुर्लक्ष होण्याचे कारण आणि देखरेखीकडे संपूर्ण दुर्लक्ष होण्याचे कारण म्हणजे बांधकाम करण्याची घाई आणि त्यासाठी प्रदूषणाकडे साफ दुर्लक्ष करण्याच्या यत्रणांना लागलेली सवय. कारण प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे याकडे डोळेझाक करून कामे आटपायची घाई नडत आहे. मुबईतील हवेची खराब गुणवत्ता याला सरकार तर काही करू शकत नाही. पण बांधकामे थांबवून आणि प्रदूषणाच्या गाईडलाइन्सकडे दुर्लक्ष न करता त्यांचे अनुपालन करणे हे तर सरकारच्या हातात आहे. असे झाले तरी कितीतरी मुंबईची हवा नागरिकांसाठी सुसह्य होईल. वाद्रे-कुर्ला प्रकल्प आणि मेट्रो प्रकल्प आणि बुलेट ट्रेन या तीन प्रकल्पांची पाहणी केली असता असे निदर्शनास आले, की संपूर्ण ठिकाणी अनुपालन केले जात नव्हते आणि एअर पोल्युशन म्हणजे प्रदूषणाची मार्गदर्शक तत्त्वे धाब्यावर बसवली जात होती. महापालिका आणि एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या निष्क्रियतेबाबत स्पष्टीकरण द्यावे असे न्यायालयाने राज्य सरकारला खडसावले. अर्थात मुंबई महापालिकेला विकासकामे हवीत आणि ती नागरिकांच्या दृष्टीने सोयीची आहेत आणि मुंबईकरांना जलद प्रवास करण्याकरिता ही बुलेट ट्रेन आणि मेट्रो हवीच आहे. पण त्याचवेळी पर्यावरणाची काळजी आणि रेल्वे विस्तार, कोस्टल रोड तसेच नवी मुंबई विमानतळ करताना प्रदूषणाचा विचार व्हावा असा न्यायालयाचा विचार योग्यच आहे पण अशी कामे करताना प्रदूषणाकडे दुर्लक्ष होता कामा नये असे न्यायालयाचे मत आहे आणि न्यायालय विकासाच्या विरोधात नाही पण पर्यावरणपूरक मुंबईच्या ऐतिहासिक ओळखीला धक्का न लावता तो केला जावा असे न्यायालयाचे मत आहे. विकास थांबवता येणार नाही. प्रदूषषणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येणार नाही हेच न्यायालयाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.काही वर्षांपूर्वी मुंबईला विकास हवा की विनाश असा प्रचार काही पक्षांनी चालवला होता. पण मुंबई आता जागतिकदृष्ट्या सर्वात वेगाने होणारे विकसित शहर आहे, जसे अधोरेखित झाले तशी ही चर्चा मागे पडली. पण मुंबई आता विकासाच्या वाटेवर आहे त्यामुळे येथील प्रदूषणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही हेही स्पष्ट झाले आहे. न्यायालयाने आता जो आदेश दिला आहे तो या अानुषंगाने आहे, की मुंबईचा चेहरा बदलत आहे हे मान्य करायला हवे, पण लोकांचा जीवही तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्याकडे डोळेझाक करता येणार नाही. अन्यथा हरिद्वार किंवा उत्तराखंडसारखी परिस्थिती इथेही निर्माण होईल. तशी ती होऊ द्यायची नाही हे आपल्या हाती आहे. सुरक्षित मुंबई हे देवेंद्र फडणवीस यांचे मिशन आहे. त्याला बाजूला टाकून काहीच करता येणार नाही हेच न्यायालयाने ताज्या आदेशात सांगितले. दिल्ली, मुंबई आणि अन्य कोणतेही मेट्रो महानगर येथील प्रदूषणाची तीच कारणे आहेत म्हणजे विकासाच्या वेगात आपण हरवून चाललो आहोत आणि त्यात आपल्याला फक्त वेग मागे पडू नये इतकीच चिंता आहे. दिल्ली, मुंबई असो किंवा नाशिक, पुणे तेथे आपले एकच ध्येय आहे ते म्हणजे या स्पर्धेत पुढे निघून जायचे. पण त्यात आपण आपल्याच नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहोत याचं भानही असू द्या.

फीड फीडबर्नर 24 Dec 2025 12:30 am

कचऱ्यापासून कागदनिर्मिती करणारी उद्योजिका

अर्चना सोंडे, द लेडी बॉसआपल्या बाबांचा व्यवसाय पाहून तिने उद्योजक होण्याचं स्वप्न पाहिलं. त्यात पूर्ण गुंतून प्रशिक्षण घेऊन उद्योग उभारला. सुरुवातीला अपयश आलं पण ती डगमगली नाही. पुन्हा नव्या जोमाने उभी राहिली. उद्योगात स्थिरावत असताना तिला कर्करोगाने गाठलं. यावेळी पण ती डगमगली नाही. कर्करोगावर मात करत ती पुन्हा उभी राहिली. आपला उद्योग २० कोटी रुपयापर्यंत वाढवला. ही प्रेरणादायी गोष्ट आहे पेपरडमच्या रितूरीचा जैन यांची. रितू रांची येथे ४० सदस्यांच्या संयुक्त कुटुंबात वाढली. तिचे वडील छपाईचा व्यवसाय चालवत होते आणि तिची आई गृहिणी होती. तिने तिचे शालेय शिक्षण व्ही. व्ही. नगर येथील टी अॅण्ड टीव्ही हायस्कूलमध्ये पूर्ण केले आणि २००५ मध्ये तिने बी. एस्सी. आणि २००७ मध्ये गुजरात विद्यापीठातून एम. एस्सी. पदवी मिळवली.बायोटेक्नॉलॉजीमध्ये एमएससी पूर्ण केल्यानंतर, ती पीएचडी करण्यासाठी आयआयटी बॉम्बेमध्ये फेलोशिपसाठी गेली. तिचे सहकारी मित्र प्रयोगशाळांमध्ये बरेच तास घालवत असताना, रितूला कॅम्पसच्या बाहेरील जीवन आकर्षित करत होते. म्युझिक ट्रिव्हिया नाईट्स, सांस्कृतिक महोत्सव आणि सामुदायिक स्वयंसेवा यात ती भाग घेत असे. हे सगळं पाहून तिच्या प्राध्यापकांनी तिला विचारले की हा कोर्स सुरू ठेवायचा आहे का...? या प्रश्नानंतर तिला जाणवले की, या अभ्यासक्रमासाठी आपण तयार नाही. तिने आपला गाशा गुंडाळून सुरतेकडे कूच केले. पुढील काही वर्षे ती उद्योग करण्याच्या नवीन संधी शोधत राहिली. तिने विविध व्यवसायांमध्ये भाग घेतला, अहमदाबादमधील एका आर्ट गॅलरीमध्ये काम केले, सुरतमध्ये युवा अनस्टॉपेबलसाठी एक एनजीओ चॅप्टर सुरू केला आणि तिच्या वडिलांना त्यांच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये मदत केली. मग एके दिवशी, एनजीओमध्ये एका सर्जनशील प्रकल्पावर काम करत असताना, तिला काहीतरी वेगळे आढळले. हत्तीच्या विष्ठेपासून बनवलेला कागद पाहून ती थबकलीच. तो कागद एकवेळ वापरण्यायोग्य आणि सुंदर होता. तो कागद पाहून तिला प्रश्न पडला की जर हत्तीच्या विष्ठेपासून कागद बनवणे ही शक्य असेल, तर इतर कोणते नैसर्गिक साहित्य कागद निर्मितीसाठी वापरले जाऊ शकते? तिने संशोधन सुरू केले आणि तिचा मार्ग अखेर तिला सांगानेर, जयपूर येथे घेऊन गेला. शतकानुशतके जुन्या हस्तनिर्मित कागदाच्या परंपरांसाठी प्रसिद्ध असलेले असे हे शहर आहे.२०१२ मध्ये तिचे स्वप्न आकार घेऊ लागले. गुजरातमध्ये रितूला कापणीनंतर टाकून दिलेले केळीचे देठ आणि कापड कारखान्यांमधून निघालेले कापडाचे तुकडे या टाकाऊ वस्तूंमध्ये कागद विपुल प्रमाणात दिसला. त्याच सुमारास, तिची भेट काही आर्किटेक्चर विद्यार्थ्यांशी झाली आणि त्यांनी एकत्र येऊन ही कल्पना शोधण्यास सुरुवात केली. त्यांनी एका कंपनीची नोंदणी केली. केळीचे धागे आणि कापडाच्या कचऱ्यावर काम करण्यास सुरुवात केली. एका लहान अशा तात्पुरत्या स्टुडिओमध्ये सुरुवातीची उत्पादने डिझाइन केली. त्यावेळी रितूने उत्पादन निर्मितीचा विचार केला नव्हता. २०१३ मध्ये जेव्हा तिच्या सासऱ्यांनी तिला ३ लाख रुपयांची रक्कम देऊ केली आणि तिच्या आवडीचे काम करण्याचे सुचवले तेव्हा परिस्थिती बदलली. तिचा नवराही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. रितूला तिच्या उत्पादनांची बाजारपेठ माहीत होती. काय बनवायचे आहे हे माहीत होते. त्यामुळे तिने उद्योगात उडी घेतली.अशाप्रकारे पेपरडमचा जन्म झाला. सुरुवातीची काही वर्षे सोपी नव्हती. रितू घरोघरी जाऊन वितरक आणि व्यापाऱ्यांना तिचा कागद घेऊन जाण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करायची. कागद टिकणार किती याची कोणालाच पर्वा नव्हती. कागदाची किंमत किती हाच प्रश्न विचारला जाई. हाताने तयार केलेला कागद, बाजारात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या कागदापेक्षा महाग होता. त्याची निर्मिती प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असायची. आव्हाने फक्त उत्पादन खर्चापुरती मर्यादित नव्हती. या उद्योगात महिला असल्याने वेगळेच आव्हान होते. विक्रेते तिला गांभीर्याने घेत नव्हते. त्यांना वाटत असे की, रितू वाटाघाटींमध्ये सहज हार मानेल. सुरुवातीला, ती अनेकदा असे करत असे. पण कालांतराने, ती तिच्या पायावर उभे राहण्यास शिकली. तिला जाणवले की नाही म्हणणे हे हो म्हणण्याइतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या कामाचे देखील मूल्य आहे. उत्पादन दर्जा वाढवण्यासाठी तिने ब्लॉक प्रिंटिंग, जरी कोटिंग्ज, भरतकाम आणि स्क्रीन प्रिंटिंगसारखे डिझाइन घटक सादर करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे तिचा कागद केवळ कार्यात्मकच नाही तर सौंदर्यात्मक बनला. हा बदल यशस्वी झाला. हळूहळू, ग्राहकांना हे लक्षात येऊ लागले. सुरत आणि मुंबईतील डिझायनर्स आणि प्रिंटिंग प्रेसनी ऑर्डर देण्यास सुरुवात केली. पेपरडमला त्याचा मार्ग सापडला. २०१७ ते २०१९ दरम्यान, व्यवसाय चांगला चालला होता. हस्तनिर्मित कागदांव्यतिरिक्त, कस्टम बॉक्स आणि पेपर बॅग तयार करण्यास पेपरडमने सुरुवात केली. त्यांनी ऑफर वाढवल्या आणि आपल्या क्लायंटशी मजबूत संबंध निर्माण केले. २०२० मध्ये कोरोनामुळे अवघे जग बंद पडले. पण काहीतरी आश्चर्यकारक घडले. लोक रितूला फोन करू लागले. रंगीत हस्तनिर्मित कागदपत्रे आहेत का असे विचारू लागले. लोक घरीच अडकले होते. छंदापोटी म्हणा किंवा वेळ घालवण्यासाठी कोणी हस्तकला करत होते, जर्नलिंग करत होते, गोष्टी बनवत होते. कागदाची मागणी वाढली. रितूला एक नवीन कल्पना सापडली. जर पेपरडम फक्त कागदाचा पुरवठादार नसून त्यापासून बनवलेल्या सुंदर गोष्टींचे निर्माते असतो तर? या क्षमतेची जाणीव झाल्यावर रितूने कागद विकण्यापासून डायरी, प्लॅनर आणि ग्रीटिंग कार्ड यांसारखी तयार उत्पादने तयार करण्याकडे आपला मोर्चा वळवला. २०२१ पर्यंत, पेपरडमने १५० ते १५०० रुपयांच्या दरम्यान ७० हून अधिक उत्पादने बाजारात आणली. यामध्ये नोटबुक, प्लॅनर, ऑर्गनायझर, स्केचबुक, लाकूड-मुक्त पेन्सिल, मेमो पॅड, ड्रॉइंग बुक आणि गिफ्ट हॅम्पर्स यांचा समावेश आहे. मेमो पॅडची किंमत १६० रुपयांपासून सुरू होते आणि डेली प्लॅनरची किंमत १,६०० रुपयांपर्यंत जाते, तर हॅम्पर्सची किंमत २,८०० रुपये असते. त्यानंतर वेबसाइट, इंस्टाग्राम आणि अमला अर्थ, ब्राउन लिव्हिंग आणि अमेझॉनसारख्या बाजारपेठांद्वारे ग्राहकांना आणि कॉर्पोरेट्सना थेट विक्री करू लागली. पेपरडम दरमहा १२ ते १३ टन कचऱ्याचा पुनर्वापर करते. जे दरवर्षी सुमारे १४० टन असते. सर्व लेखन कागदपत्रे कापडाच्या कचऱ्यापासून बनवली जातात, कारण ती मऊ असते. २५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून, रितूने २०१२ मध्ये तिचे पहिले युनिट स्थापन केले. या निधीचा वापर जागा, अंतर्गत सजावट, यंत्रसामग्री, कच्चा माल आणि खेळत्या भांडवलासाठी केला गेला. १० ते १२ कर्मचाऱ्यांपासून सुरुवात करून, पेपरडममध्ये आता १५ कर्मचारी आहेत. कंपनीचे मुख्यालय गुजरातचे कापड शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरत येथे आहे. कंपनी विजिता इकोव्हेशन्स एलएलपी या नोंदणीकृत नावाने कार्यरत आहे आणि सध्या तिचे मूल्य २० कोटी रुपये आहे.२०२३ मध्ये, वयाच्या ३७ व्या वर्षी, रितूला दुसऱ्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. उपचारांनी तिच्या मर्यादा शारीरिक आणि भावनिक दोन्ही प्रकारे ओलांडल्या. या एकाकीपणावर मात करण्याचा तिने दृढनिश्चय केला. आता ती बरी होण्याच्या मार्गावर आहे. पर्यावरणप्रेमी, दृढनिश्चयी, अभ्यासू, दीर्घोद्योगी अशी अनेक विशेषणे रितूसाठी योग्य आहेत. लेडी बॉस हे विशेषणदेखील समर्पक आहे.

फीड फीडबर्नर 24 Dec 2025 12:30 am

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २४ डिसेंबर २०२५

पंचांगआज मिती पौष शुद्ध चतुर्थी शके १९४७.चंद्र नक्षत्र श्रवण.योग हर्षण चंद्र राशी मकर ०७.४७ पर्यंत नंतर कुंभ.भारतीय सौर ०३ पौष शके १९४७.बुधवार दिनांक २४ डिसेंबर २०२५ .मुंबईचा सूर्योदय ०७.०८ मुंबईचा सूर्यास्त ०६.०७ मुंबईचा चंद्रोदय १०.२० मुंबईचा चंद्रास्त ०९.५६ राहू काळ ०३.२३ ते ०४.४५ भारतीय ग्राहक दिन,साने गुरुजी जयंती,शुभ दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : चौकस बुद्धीने अथवा वृत्तीने यश प्राप्त होईल.वृषभ : व्यवसाय-धंद्यात अचानक धनलाभाचे योग.मिथुन : मानसिक स्वास्थ्य लाभेल.कर्क : आर्थिक मदतीची आवश्यकता भासेल.सिंह : अधिकारांचा वापर योग्य कामासाठी आणि योग्य वेळी करा.कन्या : भावनाशील होऊ नका.तूळ : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. वृश्चिक : घरात धार्मिक कार्य ठरतील.धनू : निष्कारण वाद घालू नका.मकर : अचानक धनलाभ होण्याची.कुंभ : नोकरीत व्यवसायात आपले वर्चस्व राहील.मीन : आनंदी दिवस राहील.

फीड फीडबर्नर 24 Dec 2025 12:30 am

मखमली गोड गळ्याचे मोहम्मद रफी

ज्यांना पिढ्यांच्या अभिरुचीचा अडथळा नाही, अशा गोड गळ्याच्या मोहम्मद रफी यांची आज १०१ वी जयंती. अभिजीत कुलकर्णी यांनी त्यानिमित्ताने सांगितलेल्या त्यांच्या आठवणी.हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं साक्षात एक स्वप्न म्हणजेच गाणमाधुर्य, गोड गळा लाभलेले दैवी अजरामर आवाजाचे मोहम्मद रफी!२४ डिसेंबर २०२५ रोजी त्यांची १०१ वी जयंती अर्थात जन्मशताब्दी वर्षपूर्ती. रफी साहेबांचा आवाज कानावर पडला नाही, असा एकही दिवस संगीत रसिकांचा गेला नाही. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी कोटला सुलतानपूर पंजाब येथे झाला. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी गायनास सुरुवात केली. उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवनलाल भट्ट, फिरोज निजाम यांच्याकडे ते शास्त्रीय संगीत शिकले. १९४५ मध्ये ‘गाव की गोरी’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. १९४८ दरम्यान महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर हुसनलाल भगतराम व रफी यांच्या पथकाने रातोरात ‘सुनो ए दुनियावालो बापूजी की अमर कहाणी ’ हे गाणे तयार केले होते. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या निवासस्थानी गाण्यासाठी खास रफींना आमंत्रित केले होते. १९४८ मध्ये पंडित नेहरूंकडून भारतीय स्वातंत्र्यदिनी रौप्य पदक देऊन गौरविले. तसेच भारत सरकारकडून १९६७ दरम्यान ‘पद्मश्री’ हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.मराठी गीतांशी अजरामर नाते ऋणानुबंध :अनेक वक्त्यांचे आवडते श्रोते अशी ओळख असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना व्यंगचित्रांसोबत चित्रपट आणि संगीताची सुद्धा आवड आहे. हीच आवड त्यांचे वडील स्व. श्रीकांत ठाकरे यांना होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक मोहम्मद रफी हे श्रीकांत ठाकरे यांच्यामुळेच मराठी भक्तिगीत गायला लागले.श्रीकांत ठाकरे आणि मोहम्मद रफी यांच्या मैत्रीचे सूर :मोहम्मद रफींनी मराठीत पहिल्यांदा १९५५ मध्ये गाणे गायले होते. ‘शिर्डीचे साईबाबा’ या चित्रपटातील काहे तीरथ जात रे भाई, शिर्डी जाकर देख साई. या चित्रपटाचे संगीतकार होते पांडुरंग दीक्षित. पण ‘काहे तीरथ जात रे भाई’ या गाण्याला मराठीत म्हणता येणार नाही, कारण चित्रपट मराठी असला तरी गाण्याचे बोल हिंदी होते.त्यानंतर त्यांनी १९६७ साली प्रदर्शित झालेल्या ‘श्रीमंत मेहुणा पाहिजे’ या चित्रपटात पहिल्यांदा ‘ही दुनिया बहुरंगी’ हे गीत गायलं आणि हेच त्यांच पहिलं मराठी गीत ठरलं. त्यानंतर रफींनी १९७५ साली प्रदर्शित झालेल्या श्रीकांत ठाकरे यांच्या ‘शुरा मी वंदिले’ या चित्रपटात गाणी गायली होती. हा चित्रपट फारसा हिट झाला नाही पण मोहम्मद रफी आणि श्रीकांत ठाकरे यांची चांगली मैत्री झाली. इथूनच रफींच्या नॉनफिल्मी मराठी गाण्यांचा एक अध्याय सुरू झाला. याच दरम्यान कवी वंदना विटणकर यांच्या काही कविता गीत रूपाने आल्या होत्या.श्रीकांत ठाकरे यांच्या संगीतात रफी साहेबांनी गायलेली काही मराठी गाणी :१. अगं पोरी संबाल दर्यान तुफान आयलाय२. प्रभू तू दयाळू कृपावंत आता३. शोधिसी मानवा राउळी मंदिरी४. प्रकाशातले तारे तुम्ही५. हा छंद जीवाला लावे पिसे६. नको भव्य वाडा७. प्रभू रे खेळ तुझा न्यारामोहम्मद रफींना देवनागरी लिपी येत नव्हती पण श्रीकांत ठाकरे यांना उर्दूचे उत्तम ज्ञान होते. त्यांनी सर्व गाणी उर्दूत लिहून रफींच्या हाती देत. रफींचे मराठीतील पहिलं भक्ती गीत म्हणजे ‘शोधिसी मानवा, राउळी मंदिरी’ ही खास आठवण गीतकार वंदना विटणकर यांच्या ‘हे गीत जीवनाचे’ या पुस्तकात सांगितली आहे.ज्येष्ठ पार्श्वगायक संगीतकार सुधीर फडके व मोहम्मद रफी :‘दरार’ चित्रपटाचे संगीत सुधीर फडकेंनी दिले होते. त्यांच्या गाण्याचा किस्सा म्हणजे सुधीर फडकेंनी रफींचे सेक्रेटरी झहीर यांना फोन केला व म्हणाले की, मी रिहर्सल करिता आपल्या वांद्रे येथील ‘रफी मेन्शन’ येथे येत आहे साहेबांना निरोप द्या. तेव्हा झहीर यांनी त्याप्रमाणे रफींना निरोप दिला. निरोप मिळताच रफी सेक्रेटरी झहीर यांना म्हणाले, सुधीर फडके हे माझ्यापेक्षा सिनियर आहेत. तेव्हा रिहर्सलसाठी माझ्या घरी येण्याचा त्रास त्यांना मला द्यायचा नाही. त्यांचा मान ठेवण्यासाठी मलाच त्यांच्या घरी रिहर्सल करिता गेले पाहिजे. त्याप्रमाणे झहीरना बाबूजींना निरोप देण्यास सांगितले. तसा निरोप बाबुजींना मिळालाय, अशी खात्री झाल्यानंतर रफी साहेब थेट बाबूजींच्या दादर येथील शिवाजी पार्क येथील निवासस्थानी ‘दरार’ चित्रपटांच्या गाण्यांच्या रिहर्सल करिता पोहोचले.सुधीर फडकेंच्या लग्नात सुंदर मखमली गोड आवाजात सुस्पष्ट भाषेत रफींनी मंगलाष्टके म्हटली, अशी खास आठवण बाबूजी अर्थात सुधीर फडकेंनी आपल्या आत्मचरित्रात लिहिली आहे. गीतकार आनंद बक्षी सांगतात, माझ्या उमेदीच्या व झगडत्या काळात ‘जब जब फुल खिले’ या माझ्या गीतांना रफी साहेबांच्या आवाजाचा पदस्पर्श झाला आणि मला सोनेरी यश लाभले. नंतर मी मागे वळून पाहिले नाही. वांद्रे येथे घर घेतल्यानंतर प्रचंड द्विधा मनस्थितीत सापडले होते. कारण त्यांनी मुलगा राकेशच्या प्रवेशासाठी वणवण फिरूनही त्यांना शाळेत प्रवेश मिळत नव्हता. तेव्हा चिंताग्रस्त चेहऱ्यामागील विवंचनेचे कारण विचारणारा रफी साहेबांचा हात जेव्हा त्यांच्या खांद्यावर पडला. तेव्हा बक्षींच्या अश्रूंचा बांध फुटला. तेव्हा राकेशच्या शाळा प्रवेशाचे कारण समजताच दुसऱ्या दिवशी रफी साहेब, आनंद बक्षी व मुलगा राकेश बक्षी शाळेत पोहोचले. शाळेत पोहोचताच शाळेच्या प्रिन्सिपलने रफी यांना पाहताच अभिवादन केले आणि तत्काळ राकेशला शाळेत प्रवेश मिळाला. प्रवेशाची औपचारिकता आटोपल्यानंतर प्रिन्सिपल साहेबांचा निरोप घेण्यासाठी गेले असताना त्यांनी रफींना शाळेतल्या मुलांसाठी एखादे गाणं म्हणावे असे विनंती केली, जी रफींनी अत्यंत विनम्रतेने मान्य केली. सगळ्यांसाठी जिव्हाळा असलेले व्यक्तिमत्त्व मी आश्चर्यचकित होऊन पाहत होतो. रफी साहेबांसारखी माणसं एखाद्या वेळेस जन्मास येतात.संगीतकार सी. रामचंद्र : रफी हा एकमेव गायक असा होता, ज्याने गायनातले किती तरी आदर्श डोळ्यांसमोर ठेवूनही त्याने कोणाची नक्कल न करता स्वतःच्या आवाजात अजरामर गायला. रफी साहेब हे त्यांच्या उदार स्वभावासाठी प्रसिद्ध होते. काही संगीतकारांना रफींच्या गाण्यांचे मानधन देणे परवडत नसे. अशा वेळेस ते फक्त छोटेसे मानधन घेत. प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते राकेश रोशन दिग्दर्शित ‘आपके दिवाने’ या पहिल्या चित्रपटासाठी रफींनी शीर्षकगीत गायले पण गाण्याचे मानधन एकही रुपया घेतले नाही. किशोरकुमार यांच्या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी निव्वळ ‘एक रुपया’ मानधन घेतले असे म्हटले जाते.ख्यातनाम संगीतकार नौशाद अली : नौशादजी यांनी संगीतबद्ध केलेला लोकप्रिय चित्रपट म्हणजे १९५१ साली प्रदर्शित झालेला ‘बैजू बावरा’ यात ‘राग दरबारी’ यातील गाणे ‘ओ दुनिया के रखवले सुन दर्द भरे मेरे नाले’ हे गाणे इतक्या उच्च स्वरात गायले की, गाणे जगप्रसिद्ध झाले; परंतु हे गाणे हायरेंजमध्ये गायल्याने रफी साहेबांचा आवाज बसला. ते काही महिने गाऊ शकले नव्हते; परंतु त्यांनी पुन्हा पुनरागमन केले. १९७१ दरम्यान नौशाद यांनी पुन्हा एकदा ‘ओ दुनिया के रखवाले’ नव्याने रफी साहेबांच्या आवाजात स्वरबद्ध केले. १९५१ साली गायल्या गेलेल्या त्यापेक्षा हजारपटीने उच्चतम हायरेंजमध्ये रफी गायले होते, अशी आठवण रफी साहेबांविषयी नौशादजी यांनी दूरदर्शनवर दिलेल्या मुलाखतीत सांगितली.पार्श्वगायक पद्मश्री महेंद्र कपूर : मोहम्मद रफी हे गायक म्हणून फार महान होते; परंतु माणूस म्हणून ते खूप मोठे होते, खूप साधे सरळ होते. दुनियादारी त्यांना माहिती नव्हती. महेंद्र कपूर सांगतात की, रफीसाहेब नेहमी मला सांगायचे कोणत्याही क्षेत्रात टिकायचे असेल, तर तीन गोष्टी लक्षात ठेव. डोळे नेहमी कोणाही समोर मोठे करून बघू नये, कोणासोबत द्वेषपूर्ण भांडण करू नये, आपले मुख्य उद्दिष्ट कोणालाही सांगू नये, स्वतःचे चारित्र्य नेहमी स्वच्छ ठेवावे. व्यक्ती नेहमी शीलवान, गुणवान असला पाहिजे. मग दुनियेमध्ये तुम्हाला कोणी पराजित करू शकत नाही. तसेच हा तुझा उस्ताद आहे ना याला काही येत नाही ही सगळी (अल्लाह): परमेश्वराची कृपा तिथूनच सगळे येते.रफींचे एक साम्राज्य होते आणि त्याला टक्कर देण्यासाठी हरहुन्नरी पार्श्वगायक किशोरकुमार सज्ज होते. ही स्पर्धा व्यावसायिक स्तरावर होती. व्यक्तिगत जीवनात रफी साहेब आणि किशोरदा अत्यंत घनिष्ठ चांगले मित्र होते. जून १९७५ ते मार्च १९७७ दरम्यान तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती. तेव्हा त्याचा फटका सर्वांना बसला होता. पार्श्वगायक किशोरकुमार यांच्या गाण्यावर बंदी आणली होती. ही गोष्ट जेव्हा रफींना समजली तेव्हा रफी साहेबांनी थेट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व काँग्रेसचे नेते खासदार संजय गांधी यांच्याशी संवाद साधला. तेव्हा तत्काळ किशोरकुमार यांच्या गाण्यांवरील बंदी उठवण्यात आली. जेव्हा ही गोष्ट किशोरकुमार यांना समजली तेव्हा त्यांनी रफी साहेबांचे आभार मानले. आपली जागा कोणीतरी घेऊ पाहत आहे, असे म्हणत रफींनी किशोरकुमार यांचा कधीच द्वेष केला नाही. उलट किशोरकुमारांना रफी साहेब आपला छोटा भाऊ मानत. किशोरकुमार यांनीही आपल्याला मिळणाऱ्या यशाचा गर्व कधीच रफींसमोर केला नाही. मोहम्मद रफी व किशोरकुमार या दोन अजरामर गायकांची घट्ट मैत्री होती, याचे अनेक किस्से देखील आहेत.तुम मुझे यू भुला ना पाओगे : ३१ जुलै १९८० रोजी रफी साहेब यांचे निधन झाल्याची बातमी किशोरकुमार यांना समजताच ते आणि त्यांचा मुलगा अमितकुमार याला सोबत घेऊन रफींच्या घरी पहोचले. त्यावेळी रफींच्या घरी किशोरकुमार आले होते. रफींच्या पार्थिवाजवळ बसून रफींचे पाय स्वतःच्या हातात व डोक्याशी घेऊन तासंतास किशोरदा रडत होते अगदी जनाजा उठेपर्यंत. ऑगस्ट १९८० दरम्यान रफी गायनाच्या कार्यक्रमासाठी परदेशी जाणार होते व परत भारतात येताना सोबत डायलिसीस मशीन घेऊन येणार होते. कारण गोरगरिबांच्या आजारपणात मोफत उपलब्ध डायलिसीस मशीनची सेवा राहावी म्हणून हॉस्पिटलला दान देणार होते. पण परदेशी दौऱ्यापूर्वीच रफी साहेबांचे आकस्मित निधन झाले.

फीड फीडबर्नर 24 Dec 2025 12:30 am

सदानंद दाते बनणार राज्याचे पोलीस प्रमुख? महाराष्ट्र केडरमध्ये परतले, कोण आहेत ‘ते’जाणून घ्या

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख सदानंद दाते भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) महाराष्ट्र केडरमध्ये परतले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे राज्याच्या पोलीस प्रमुखपदाची सुत्रे सोपवणी जाणे निश्‍चित मानले जात आहे. दाते यांना मागील वर्षी मार्चमध्ये केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले. त्यांना एनआयएचे महासंचालक बनवण्यात आले. त्यांना मूळ महाराष्ट्र केडरमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र […] The post सदानंद दाते बनणार राज्याचे पोलीस प्रमुख? महाराष्ट्र केडरमध्ये परतले, कोण आहेत ‘ते’ जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 10:53 pm

‘मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण बारामती-कराडचा नाही’; पृथ्वीराज चव्हाणांचे ‘एपस्टिन फाईल्स’वरून पुन्हा खळबळजनक विधान

मुंबई: देशाच्या राजकारणात १९ डिसेंबर रोजी मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवून खळबळ उडवून देणारे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला आहे. “देशाचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस त्या पदावर बसेल, मात्र ती व्यक्ती बारामती किंवा कराडमधील नसेल,” असे सूचक विधान करत चव्हाणांनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड […] The post ‘मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण बारामती-कराडचा नाही’; पृथ्वीराज चव्हाणांचे ‘एपस्टिन फाईल्स’वरून पुन्हा खळबळजनक विधान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 10:51 pm

Mehul Choksi : मेहुल चोक्सी फरार आर्थिक गुन्हेगारच; न्यायालयाने ‘ती’याचिका फेटाळली

मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळा प्रकरणात फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार (एफईओ) घोषित करण्याची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करणारी त्याची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. बेल्जियममधील अटक आणि भारतीय अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या प्रत्यार्पण प्रक्रियेचा हवाला देत चोक्सीने दाखल केलेली अशीच एक याचिका नोव्हेंबरमध्ये मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाने फेटाळली […] The post Mehul Choksi : मेहुल चोक्सी फरार आर्थिक गुन्हेगारच; न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 10:45 pm

BMC Election: पहिल्याच दिवशी अर्जांसाठी इच्छुकांची झुंबड; ‘इतक्या’अर्जांची विक्री

BMC Election: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली असून, मंगळवारी २३ डिसेंबर रोजी पहिल्याच दिवशी इच्छुकांनी उमेदवारी अर्जांसाठी मोठी गर्दी केली होती. मुंबईतील २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून एकूण ४ हजार १६५ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली. विशेष म्हणजे, पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर अर्जांची विक्री झाली असली तरी, एकही अर्ज अद्याप दाखल झालेला नाही. निवडणूक […] The post BMC Election: पहिल्याच दिवशी अर्जांसाठी इच्छुकांची झुंबड; ‘इतक्या’ अर्जांची विक्री appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 10:45 pm

टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक गाड्यांचा धडाका; 2.5 लाख वाहनांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण

मुंबई – टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आघाडी घेतली असून आतापर्यंत या कंपनीने 2.5 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री यशस्वीरित्या केली असल्याची माहिती टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी दिली. ते म्हणाले की, या क्षेत्रात आम्ही आघाडी कायम ठेवण्यासाठी पुढील पाच वर्षात पाच नव्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारपेठेत सादर केल्या जातील. इलेक्ट्रिक वाहनांच्या […] The post टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक गाड्यांचा धडाका; 2.5 लाख वाहनांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 10:31 pm

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने जिंकत भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. अर्धशतकवीर शफाली वर्मा सामनावीर झाली.Comprehensive effort #TeamIndia wrap up the Vizag leg with a 7⃣-wicket victory They lead the series by 2⃣-0⃣ Scorecard ▶️ https://t.co/Umn9ZGAexw#INDvSL | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/4SWeSGJKKC— BCCI Women (@BCCIWomen) December 23, 2025मालिकेतील पहिले दोन्ही सामने विशाखापट्टणम येथे झाले. पहिल्या सामन्यात भारताने आठ विकेट राखून विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात भारताने सात विकेट राखून विजय मिळवला. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने वीस षटकांत नऊ बाद १२८ धावा केल्या तर भारताने ११.५ षटकांत तीन बाद १२९ धावा केल्या. श्रीलंकेकडून विश्मी गुणरत्नेने एक, चामरी अथापथ्थुने ३१, हसिनी परेराने २२, हर्षिता समरविक्रमने (धावचीत) ३३, कविशा दिलहारीने १४, नीलक्षीका सिल्वाने दोन, कौशानी नुथ्यांगनाने (धावचीत) ११, शशिनी गिम्हणीने शून्य, काव्या कविंदीने (धावचीत) एक, मल्की मदाराने एक धावांचे योगदान दिले. भारताकडून श्री चरणी आणि वैष्णवी शर्माने प्रत्येक दोन तर स्नेह राणा आणि क्रांती गौडने प्रत्येकी एक विकेट घेतली. . . . . Shafali Verma got to her half-century with a lovely shot She led #TeamIndia's chase with 6⃣9⃣*(34) Scorecard ▶️ https://t.co/Umn9ZGAexw#INDvSL | @TheShafaliVerma | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/bMcaOpD4BW— BCCI Women (@BCCIWomen) December 23, 2025धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताकडून स्मृती मंधानाने १४, शफाली वर्माने नाबाद ६९, जेमिमा रॉड्रिग्जने २६, हरमनप्रीत कौरने १०, रिचा घोषने नाबाद एक धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून कविशा दिलहारी, मल्की मदारा आणि काव्या कविंदी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 10:30 pm

Mercedes-Benz prices: मर्सिडीज बेंझच्या किमतीत दर तीन महिन्यांनी वाढ? रुपयाच्या अवमूल्यनामुळे कंपनीचा मोठा निर्णय

नवी दिल्ली – डॉलर आणि युरोच्या तुलनेत रुपयाचे आतापर्यंत पाच टक्के अवमूल्यन झाले आहे आणि आगामी काळाबाबतही संदिग्ध परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत आगामी वर्षात दर तिमहिला आपल्या वाहनाच्या दरात वाढ करण्याच्या शक्यतेवर मर्सिडीज बेंझ कंपनी विचार करीत असल्याचे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संतोष अय्यर यांनी सांगितले. याच कारणामुळे कंपनीने एक जानेवारीपासून आपल्या विविध वाहनांच्या दरात […] The post Mercedes-Benz prices: मर्सिडीज बेंझच्या किमतीत दर तीन महिन्यांनी वाढ? रुपयाच्या अवमूल्यनामुळे कंपनीचा मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 10:27 pm

राष्ट्रीय उत्पन्नाचे आधार वर्ष बदलणार; ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्सचा आता महागाईच्या आकड्यात समावेश!

नवी दिल्ली – राष्ट्रीय उत्पन्नाचे मूल्यांकन करणारे आधार वर्ष फेब्रुवारीपासून बदलून 2024 करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नासाठी जी माहिती संकलित केली जाते त्यामध्ये ई कॉमर्स, क्विक कॉमर्स इत्यादी आधुनिक उद्योग व्यवसायांचा समावेश केला जाणार असल्याचे केंद्रीय सांख्यिकी विभागाने नमूद केले आहे. देशातील किरकोळ महागायतीची आकडेवारी अधिक त्रुटीहीन व्हावी यासाठी समांतररित्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. […] The post राष्ट्रीय उत्पन्नाचे आधार वर्ष बदलणार; ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्सचा आता महागाईच्या आकड्यात समावेश! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 10:22 pm

Rabi crops : रब्बी पिकांचा पेरा 5 कोटी 80 लाख हेक्टरवर; गव्हाची 301 लाख हेक्टरवर लागवड

नवी दिल्ली – देशात यावर्षी आतापर्यंत 5 कोटी 80 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधी झालेल्या पेरण्याच्या तुलनेत ही संख्या सुमारे आठ लाख हेक्टरने अधिक आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं 19 डिसेंबरपर्यंतच्या रब्बी पिकांखालील क्षेत्राच्या प्रगतीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. गव्हाखालील क्षेत्र 301 लाख हेक्टरपेक्षा जास्त नोंदवले […] The post Rabi crops : रब्बी पिकांचा पेरा 5 कोटी 80 लाख हेक्टरवर; गव्हाची 301 लाख हेक्टरवर लागवड appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 10:19 pm

Gold Silver Rates: सोने 1.40 लाखांवर, तर चांदीने ओलांडला 2.17 लाखांचा टप्पा!

नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर विक्रमी पातळीवर गेले आहेत. त्या प्रमाणात भारतातही सोन्याचे दर वाढून विक्रमी पातळीवर आहेत. मंगळवारी सोन्याचा दर 2,650 रुपयांनी वाढून 1 लाख 40 हजार 850 रुपये प्रत्येक दहा ग्रॅम या नव्या विक्रमी पातळीवर गेला. भारतात सोने तयार होत नाही. अशा अवस्थेत भारताला सोन्याची आयात करावी लागते. जागतिक बाजारात सोन्याचे […] The post Gold Silver Rates: सोने 1.40 लाखांवर, तर चांदीने ओलांडला 2.17 लाखांचा टप्पा! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 10:15 pm

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात 10 कामगार संघटनांचा एल्गार; 12 फेब्रुवारीला देशव्यापी संपाचा इशारा

मुंबई – नुकत्याच संपलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनावेळी चार कामगार संहिता जाहीर झाल्या आहेत. अणुऊर्जा क्षेत्रात खासगी क्षेत्राला प्रवेश देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्याचबरोबर रोजगार हमी योजनेची फेररचना करणारे विधेयक मंजूर झाले आहे. या सर्व निर्णयांना देशातील काही कामगार संघटना विरोध केला असून त्यासाठी फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय पातळीवर आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. फेब्रुवारी […] The post केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात 10 कामगार संघटनांचा एल्गार; 12 फेब्रुवारीला देशव्यापी संपाचा इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 10:12 pm

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडविण्यास वचनबद्ध असल्याचे मस्त व्यवसाय आणि बंदर विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी उत्तम येतील कोळी समाजाच्या बैठकीत सांगितले आहे.https://www.youtube.com/watch?v=awWYgtgFIHEमीरा भाईंदर शहरातील भाईंदर पश्चिम भागात उत्तन गावाच्या किनारपट्टीवर अथांग सागरी किनारा लाभला आहे. गावात कोळी आणि आगरी समाजाची बहुतांश नागरी वस्ती आहे. आणि मासेमारी हा त्यांचा मुख्य व्यवसाय असून तेच त्यांचे उपजीविकेचे साधन आहे. आहे. १२ सागरी मैल क्षेत्रात पारंपारिक पद्धतीने मासेमारी केली जाते तर खोल समुद्रात यांत्रिक पद्धतीने मासेमारी केली जाते. साधारण ७०० बोटी गावात आहेत.जीवाची पर्वा न करता डिझेल, बर्फ व इतर साहित्य घेऊन मासेमारी करणाऱ्या बोटी खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी जातात. मीरा भाईंदर मधून मोठया प्रमाणात मासे मुंबई व आजूबाजूच्या परिसरात विकले जातात. दरवर्षी शेकडो टन मासळी समुद्रातून काढली जाते. त्यामुळे या व्यवसायातून दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल होत असते. तरी देखील मच्छीमारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शहरात अद्ययावत मासळी बाजार नाही, गावात सिटी सर्वे न झाल्यामुळे मूळच्या कोळी बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे अशी त्यांची मागणी आहे. शीतगृहातील अनुदानात वाढ होणे, डिझेल परतावा लवकर मिळणे, नैसर्गिक तेल आणि वायू सर्वेक्षण मासेमारी बंद असलेल्या कालावधीत करावी, बंधारा, जेट्टी अशा अनेक मागण्या कोळी बांधवांनी यावेळी केल्या. त्याला उत्तर देताना नितेश राणे यांनी सांगितले की या सर्व मागण्या माझ्या खात्यातील असल्याने त्या सोडवण्याची क्षमता आणि जबाबदारी माझ्याकडे आहे म्हणून मी आपल्यातील एक म्हणून आपल्याला आश्वासित करतो की या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील तसेच यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल. उत्तन वाहतूक सहकारी संस्था यांनी आयोजीत केलेल्या या बैठकीला आमदार नरेंद्र मेहता, रणवीर वाजपेयी तसेच पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कोळी बांधव आणि भगिनी उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 10:10 pm

काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यासही भाजपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यास यांनीही अखेर भाजपच्या झेंडा हाती घेतला. धर्मेश व्यास यांनी मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. धर्मेश व्यास हे माजी नगरसेवक असून काँग्रेसचे अत्यंत निष्ठावान पदाधिकारी होते. काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांच्या फळीतील हे पदाधिकारी होते.धर्मेश व्यास हे सांताक्रुज पूर्व येथील प्रभात कॉलनी, आनंद नगर परिसरातील प्रभाग क्रमांक ८१ मधून २००७ ते २०१२ या कालावधी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. तर त्याआधीच्या कालावधीत ते नगरसेवकाचे जात वैधता प्रमाणपत्र बाद झाल्याने दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार म्हणून त्यांची निवड झाली होती. धर्मेश व्यास वकील असून अनेकदा काँग्रेसची कायदेशीर बाबी त्यांनी हाताळल्या आहेत.गुरुदास कामत यांचे खंदे समर्थक आणि विश्वासू असलेले समीर देसाई यांनी प्रथम भाजपा आणि नंतर उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. तर राजहंस सिंह यांनी भाजपात याआधीच प्रवेश करत ते भाजपावासी झाले आहेत. त्यानंतर आता धर्मेश व्यास यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. तर शिवजी सिंह आणि अमरजित सिंह मनहास हे अजूनही काँग्रेसमध्ये राहिले आहेत. व्यास यांच्या पक्ष प्रवेश प्रसंगी भाजपा नेते प्रवीण दरेकर, भाजपाचे नेते मधु चव्हाण, माजी नगरसेवक महेश पारकर, आदी उपस्थित होते. पक्ष प्रवेश केल्यानंतर व्यास यांनी भाजपाचे माजी मुंबई अध्यक्ष आणि मंत्री ॲड आशिष शेलार यांची भेट घेतली. यावर्षी शेलार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 10:10 pm

Arvind Kejriwal : केजरीवाल सरकारने 11 वर्षांत काही न केल्यामुळे दिल्लीत आज अशी स्थिती; उप राज्यपाल सक्सेना यांचा आरोप

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना १५ पानांचे पत्र लिहिले असून त्यांनी दिल्लीतील प्रदूषणासाठी केजरीवाल यांनाच जबाबदार धरले आहे. दिल्लीत सध्या जी आणीबाणीसारखी परिस्थिती उदभवली आहे त्याचे खापर त्यांनी केजरीवालांच्या माथी फोडले आहे. केजरीवाल यांच्या सरकारचे ११ वर्षांचे दुर्लक्ष आणि गुन्हेगारी निष्क्रियतेमुळे दिल्लीची […] The post Arvind Kejriwal : केजरीवाल सरकारने 11 वर्षांत काही न केल्यामुळे दिल्लीत आज अशी स्थिती; उप राज्यपाल सक्सेना यांचा आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 10:08 pm

AIद्वारे तयार केलेल्या व्हिडिओंवर आता ‘लेबल’असणे बंधनकारक; केंद्र सरकार लवकरच नवी नियमावली आणणार

नवी दिल्ली – विविध समाज माध्यमावर सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआयचा वापर करून व्हिडिओ आणि इतर माहिती प्रसारित केली जाते. त्यामुळे अनेकांची दिशाभूल होते. त्याचबरोबर गुन्हेगारीही वाढत आहे. आता केंद्र सरकारने एआयचा वापर करून एखादा व्हिडिओ तयार केला असेल तर त्यावर तसे लेबल असणे बंधनकारक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने विविध उद्योग […] The post AIद्वारे तयार केलेल्या व्हिडिओंवर आता ‘लेबल’ असणे बंधनकारक; केंद्र सरकार लवकरच नवी नियमावली आणणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 10:07 pm

Mexico News : मेक्सिकोच्या नौदलाचे विमान कोसळले; 5 जण ठार

गॅल्व्हेस्टन (अमेरिका) : मेक्सिकोच्या नौदलाचे छोटे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान ५ ठार झाले आहेत. एका रुग्णाला उपचारांसाठी घेऊन जात असताना हा अपघात झाला. या विमानात रुग्णाशिवाय अन्य ७ जण होते. गॅल्व्हेस्टनच्या किनाऱ्याजवळ हे विमान कोसळले असल्याचे समजल्यानंतर शोध आणि बचावकार्य सुरू केले गेले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विमानामध्ये असलेल्यांपैकी चौघे नौदलाचे अधिकारी होते. तर […] The post Mexico News : मेक्सिकोच्या नौदलाचे विमान कोसळले; 5 जण ठार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 9:44 pm

Teacher recruitment scam: माजी शिक्षणाधिकारी काटोलकर यांना अटक; 12 कोटींच्या भ्रष्टाचाराचा ठपका

नागपूर : राज्यातील बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यात विशेष तपास पथकाने (SIT) मोठी कारवाई केली आहे. नागपूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना एसआयटीच्या सायबर सेलने अटक केली असून, त्यांच्यावर १२ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. ‘शालार्थ’ प्रणालीचा गैरवापर- मिळालेल्या माहितीनुसार, हा […] The post Teacher recruitment scam: माजी शिक्षणाधिकारी काटोलकर यांना अटक; 12 कोटींच्या भ्रष्टाचाराचा ठपका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 9:32 pm

Greta Thunberg : ग्रेटा थनबर्गला लंडनमध्ये अटक; पॅलेस्टिनी कार्यकर्त्यांना दिला होता पाठिंबा

लंडन : आंतरराष्ट्रीय किर्तीची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिला पॅलेस्टिनींसाठीच्या निदर्शनांना पाठिंबा दिल्याबद्दल आज लंडनमध्ये अटक करण्यात आली. तुरुंगात डांबल्याच्या निषेधार्थ उपोषण करणाऱ्या पॅलेस्टिनी कार्यकर्त्यांना ग्रेटा थनबर्गने पाठिंबा दिला होता. प्रिझनर्स फॉर पॅलेस्टीन या गटाने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून त्यामध्ये ग्रेटा थनबर्ग हातात पॅलेस्टीन ऍक्शन या संघटनेच्या समर्थनाचा फलक घेतलेली दिसते आहे. ब्रिटन सरकारने […] The post Greta Thunberg : ग्रेटा थनबर्गला लंडनमध्ये अटक; पॅलेस्टिनी कार्यकर्त्यांना दिला होता पाठिंबा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 9:27 pm

Bhimashankar temple : भीमाशंकर मंदिर तीन महिने राहणार बंद; ‘हे’आहे कारण

नारायणगाव: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी सलग तीन महिने बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, मंदिर परिसरात २८८ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांतर्गत विविध कामे केली जाणार आहेत. या कामांच्या नियोजनासाठी मंदिर प्रशासनाने हा पाऊल उचलले आहे. प्रशासकीय बैठकीत शिक्कामोर्तब – आंबेगाव-जुन्नरचे […] The post Bhimashankar temple : भीमाशंकर मंदिर तीन महिने राहणार बंद; ‘हे’ आहे कारण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 9:20 pm

Priyanka gandhi : “प्रियंका गांधी या इंदिरा गांधी यांच्यासारख्या कणखर पंतप्रधान ठरू शकतील”; पती रॉबर्ट वढेरा यांचं विधान चर्चेत !

Priyanka Gandhi । Indira Gandhi : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या दिग्गज नेत्या दिवंगत इंदिरा गांधी यांच्यासारख्या कणखर पंतप्रधान ठरू शकतील, अशी भावना पक्षाच्या एका खासदाराने व्यक्त केली. त्यावरून कॉंग्रेसमधून प्रियंका यांचे प्रोजेक्शन सुरू झाल्याच्या चर्चांना तोंड फुटले आहे. अशात प्रियंका यांचे भविष्य उज्ज्वल असल्याचे भाकीत त्यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया […] The post Priyanka gandhi : “प्रियंका गांधी या इंदिरा गांधी यांच्यासारख्या कणखर पंतप्रधान ठरू शकतील”; पती रॉबर्ट वढेरा यांचं विधान चर्चेत ! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 9:15 pm

निवडणूक आयोगाकडून केरळ, छत्तीसगड आणि अंदमान-निकोबारची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; लाखो नावे वगळली

नवी दिल्ली / तिरुवनंतपुरम: भारत निवडणूक आयोगाने केरळ, छत्तीसगड आणि अंदमान-निकोबार द्वीपसमूह या राज्यांसाठी ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) प्रक्रियेनंतरची प्रारूप मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध केली. या नवीन आकडेवारीनुसार, एकट्या केरळमधून २४ लाखांहून अधिक, तर छत्तीसगडमधून २७ लाखांहून अधिक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. केरळमध्ये २४ लाख मतदारांची कपात – केरळचे मुख्य निवडणूक अधिकारी रतन […] The post निवडणूक आयोगाकडून केरळ, छत्तीसगड आणि अंदमान-निकोबारची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; लाखो नावे वगळली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 9:11 pm

चिंता करू नका, नाशिक - पुणे रेल्वे देवठाण मार्गेच

अकोले (प्रतिनिधी) : चिंता करू नका, नाशिक-पुणे रेल्वे देवठाण मार्गेच नेण्यासाठी पालकमंत्री म्हणून तुम्हाला शब्द देतो. मात्र २०१९ साली तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदल कोणी केलाॽ हे सुध्दा जनतेला कळू द्या आशा शब्दात जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी टिका करणा-यांचा समाचार घेतला. देवठाण जिल्हा परिषद गटामध्ये विविध विकास कामांचा देवठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आणि जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचे उद्घघाटन, विद्यार्थ्याना डिजीटल बोर्डाचे वितरण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.देवठाण येथे झालेल्या जाहीर सभेत मंत्री विखे पाटील यांनी प्रथमच नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर भाष्य करून, रेल्वे पळविल्याचा आरोप करणा-यांना खडे बोल सुनावले. माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास आ. अमोल खताळ, डॉ.जालिंदर भोर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, जेष्ठ नेते सीताराम भांगरे, शिवाजीराव धुमाळे, सुधाकरराव देशमुख, रावसाहेब वाकचौरे, मारूती मेंगाळ, कैलासराव वाकचौरे, सरपंच विजया सहाणे, माजी सभापती अंतनाताई बोंबले, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. स्वत:ची अकार्यक्षमता लपविण्यासाठी रेल्वेच्या प्रश्नावरून काहींनी शिट्या वाजवायला सुरूवात केली आहे. मात्र यांचा भोंगा जनता वाजवल्याशिवाय राहाणार नाही असा इशारा देवून, सध्या कोण कोणत्या रेल्वेच्या डब्यात बसले आणि कोणत्या डब्याला कोणाचे इंजिन जोडले गेले समजायला तयार नसल्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला. पाणी आणि रेल्वेच्या संदर्भात होत असलेल्‍या आरोपाचा समाचार घेतांना विखे पाटील म्हणाले की, पाणी पळवायला आम्ही तर खूप लांब आहोत, मध्ये कोण आहेत हे आधी तपासा. रेल्वेच्या बाबतीत सुध्दा देवठाणहून जाणारा प्रस्तावित मार्ग २०२१ साली महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणी बदलला हे सुध्दा पाहा. महाविकास आघाडी सरकारमध्‍ये कोण मंत्री होते, २०१९ मध्‍ये तयार केलेला प्रस्‍तावित मार्ग कोणी बदलला या प्रश्‍नाचे उत्‍तर सुध्‍दा मिळाले पाहीजे. मी तर केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना पत्र देवून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही निर्णय न करण्याची तसेच बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून जनतेच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविणार असून २०१९ साली देवठाणसह नाशिक पुणे रेल्वेच्‍या प्रस्तावाचा निर्णय कायम ठेवण्यासाठी माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. या भागातील लोकांनी केलेल्या त्यागामुळे जिल्‍ह्याच्‍या पाण्याचे प्रश्न सुटले गेले.आता या भागातील लोकांसाठी काहीतरी करायचे आहे. आहे त्या पाण्यावर अवलंबून राहाता येणार नाही. अतिरीक्त पाणी निर्माण करण्यासाठी महायुती सरकारने प्रयत्न सुरू केले असून, बिताका प्रकल्पाद्वारे २०० ते ३०० एमसीएफटी पाणी आढळा खो-यात वळविण्याकरीता सर्व्हेक्षणाच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून यासाठी आवश्यक असलेला निधी सुध्दा मंजूर करण्याचे आश्वासित केले. तालुक्यात रोजगार निर्माण करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून पर्यटन धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून युवकांबरोबर महीलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी टाटा आणि रिलायन्स उद्योग समूहाच्या सहकार्याने ट्रेनिंग सेंटर उभारण्याची तयारी असल्याचे पालकमंत्री म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून लोकाभिमुख योजनांचे काम होत आहे. देवठाण येथे कार्यान्वित झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यमान भारत योजनेची देण आहे. प्रत्येक समाज घटकाला विकास प्रक्रीयेत सामावून घेण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार करीत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभराव पिचड यांनी रेल्वेच्या विषयांवरून विरोधकावर टिका केली. स्व.मधुकरराव पिचड यांनी तत्कालीन मंत्री रावसाहेब दानवे यांच्या देवठाणहून रेल्वे नेण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. मात्र सध्याच्या आमदारांना आपली रेल्वे गेल्याचे समजले सुध्दा नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रस्तावात कोणी बदल केला त्यावेळी कोण मंत्री होते सर्वाना माहीत आहे. कोणतेही विकास काम सध्याच्या लोकप्रतिनिधींना करता आले नसल्याची टिका त्यांनी केली. मारूती मेंगाळ यांनी मंत्री विखे यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून विकास काम होत आहेत. अधिकचा निधी द्यावा आशी मागणी करून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सातही जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आपल्या नेतृत्वाखाली विजय संपादन होईल याची ग्वाही दिली.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 9:10 pm

बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी हायटेक यंत्रणा

संगमनेर (प्रतिनिधी) : बिबट्यांचा वाढता वावर व मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी वन विभागाने ‘हायटेक’ यंत्रणेचा वापर करावा. ज्या भागात बिबट्यांची घनता जास्त आहे, तिथे ‘थर्मल ड्रोन’, ‘नाईट व्हिजन कॅमेरे’ व ५०० हून अधिक ‘ट्रॅप कॅमेरे’ तैनात करण्यात आले असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या चिमुकल्या सिद्धेश सुरेश कडलग याच्या कुटुंबीयांची पालकमंत्री विखे पाटील यांनी निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, उप वनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, उपविभागीय अधिकारी अरूण उंडे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे आदी उपस्थित होते.पालकमंत्री विखे पाटील यांनी मृत सिद्धेशचे आजोबा, आजी, वडील सुरेश कडलग व नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ही घटना अत्यंत वेदनादायी असून शासन या दुःखद प्रसंगी पूर्णपणे कडलग कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत व वन विभागाचे लाभ तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.बिबट्या प्रवण क्षेत्रात प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजने बाबत बोलताना विखे पाटील म्हणाले, वन विभागाच्या ताफ्यात नव्याने २२ गस्ती वाहने व ५ नवीन गन (बंदुका) दाखल होत आहेत. ही मोहीम पुढील ४ ते ६ महिने प्रभावीपणे राबविण्यात येईल. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला.२२ जानेवारीपर्यंत रस्ते व कालव्यांवरील अतिक्रमण काढा : बिबट्याच्या हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचवण्यासाठी रस्ते मोकळे असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कालव्यांच्या कडेला व वन विभागाच्या हद्दीतील रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे तत्काळ हटविण्याचे कडक आदेश पालकमंत्र्यांनी दिले. हे रस्ते ‘सार्वजनिक हिताचे’ असल्याने प्रसंगी पोलीस बळाचा वापर करून, येत्या २२ जानेवारीपर्यंत रस्ते मोकळे करावेत व त्यांचे मुरमीकरण करून ते वाहतुकी योग्य करावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.वन संवर्धन व पर्यटनाला चालना देण्यासाठी गोरक्षनाथ गड परिसरातील वन विभागाच्या २०० ते २५० एकर जमिनीवर बिबट्यांसाठी ‘रेसक्यू सेंटर’ विकसित करण्याची संकल्पना पालकमंत्र्यांनी मांडली. ही जागा वन विभागाकडे हस्तांतरित करून तिथे निसर्ग संवर्धनाचे उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, वन विभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 9:10 pm

Epstein Files : एपस्टीन फायलींचा ३० हजार पानांचा दुसरा संच प्रसिद्ध; धक्कादायक माहिती उघड

वॉशिंग्टन : लैंगिक गुन्ह्यातील वादग्रस्त दलाल जेफ्री एपस्टीनशी संबंधित फायलींचा दुसरा संच अमेरिकेच्या न्याय विभागाने आज प्रसिद्ध केला. या कागदपत्रांमध्ये सरकारी वकिलांच्या एका ई-मेलचाही समावेश आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या खासगी विमानाने वारंवार विदेशात गेल्याचे या ई-मेलमध्ये नमूद केले गेले आहे. अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळापेक्षा हे प्रमाण लक्षणीय जास्त असल्याचे निरीक्षण त्यात नोंदवले गेले आहे. […] The post Epstein Files : एपस्टीन फायलींचा ३० हजार पानांचा दुसरा संच प्रसिद्ध; धक्कादायक माहिती उघड appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 9:04 pm

प्रकाश आणि शिक्षणाने उजळलेला एक खास दिवस

मुंबई : मुंबईतील विविध भागांतील ६८० हून अधिक मुलांनी रिलायन्स फाउंडेशनच्या वार्षिक एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल (ESA) डे निमित्त हॅम्लेज वंडरलँड™ येथे मनोरंजनासोबतच शिक्षणाने भरलेला, आनंददायी खास दिवस अनुभवला. मुलांसोबत या विशेष कार्यक्रमात संस्थेच्या संचालिका ईशा अंबानी पण सहभागी झाल्या होत्या.“मुलांना जेव्हा आनंददायी अनुभव मिळतात, तेव्हा त्यांच्यात आकांक्षा निर्माण होतात, व्यक्तिमत्त्व घडते आणि त्यांची क्षमता विकसित होते, असा रिलायन्स फाउंडेशनचा विश्वास आहे. आमचा ESA कार्यक्रम याच हेतूने सुरू केल्याचे रिलायन्स फाउंडेशनच्या संचालिका ईशा अंबानी महणाल्या.यंदा मुलांनी हॅम्लेज वंडरलँड येथील लाईट अटेलियरचाही अनुभव घेतला. प्रकाश आणि सावल्यांशी खेळत, प्रदर्शनातून शिकताना लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे खरोखरच अद्भुत होते. जिओ वर्ल्ड गार्डनमधील हॅम्लेज वंडरलँड™ कार्निव्हलमध्ये मुलांनी डिनो वर्ल्ड, एलिव्हेटर टू द नॉर्थ पोल, जायंट फेरिस व्हील, कॅरोसेल, बंपर कार्स, वंडर बलून, वंडर बोट तसेच इतर अनेक आकर्षक खेळांचा मनसोक्त आनंद घेतला.यंदाच्या कार्निव्हलमधील विशेष नवीन आकर्षण म्हणजे लाईट अटेलियर – हे निता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आणि कतारमधील दादू – चिल्ड्रन्स म्युझियम यांच्या सहकार्याने सादर करण्यात आले आहे. यावेळी ४ ते १२ वयोगटातील मुलांसाठी प्रत्यक्ष सहभागातून प्रकाश, सावली आणि रंग यांची जादू शोधण्याची संधी देणारा आकर्षक उपक्रम राबवण्यात आला.रिलायन्स फाउंडेशनचा ESA कार्यक्रम अशा प्रकारच्या शैक्षणिक संधी सर्व पार्श्वभूमीतील मुलांसाठी सुलभ करण्याचा प्रयत्न करतो, जो रिलायन्सच्या ‘We Care’ या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमाचा उद्देश विविध समुदायांतील मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि आकांक्षांना चालना देणारे अनुभव देणे, तसेच आनंद आणि देणगीच्या भावनेचा उत्सव साजरा करणे हा आहे.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 8:10 pm

शिरोडा-वेळाघरमध्ये होणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले पंचतारांकीत हॉटेल

पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; ताज समूहासोबत लवकरच सामंजस्य करारमुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देणारी बातमी समोर आली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील निसर्गरम्य शिरोडा-वेळाघर येथे प्रख्यात ताज समूहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिले पंचतारांकीत (५ स्टार) हॉटेल उभारले जाणार आहे. हा प्रकल्प दीर्घकाळ प्रलंबित होता, मात्र पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे तो आता प्रत्यक्षात उतरणार आहे. २३ डिसेंबर २०२५ | मुंबईसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी वेंगुर्लेमधील मधील शिरोडा-वेळाघर येथे ताज समुहाच्या माध्यमातून जिल्ह्यात पहिले '5 स्टार हॉटेल' उभारले जाणार आहे. शिरोडा वेळाघर येथील जमिनीबाबत मे.इंडियन हॉटेल कंपनी प्रा.लि.यांनी सादर केलेल्या पुरक करार पत्राबाबत… pic.twitter.com/hDpH1Jc8k3— Nitesh Rane (@NiteshNRane) December 23, 2025शिरोडा-वेळाघर येथील जमिनीबाबत इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (ताज समूह) यांनी सादर केलेल्या पुरक करार पत्रावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ताज समूहाच्या प्रतिनिधींनी हॉटेल उभारणीच्या योजना सविस्तार मांडल्या, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), स्थानिक ग्रामस्थ आणि ताज समूह यांच्यात लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. ग्रामस्थांना जमिनीच्या मोबदल्याचे वाटप दोन टप्प्यांत केले जाणार असून, हा मोबदला एक ते दोन आठवड्यांत देण्यात यावा, तसेच यासंबंधित सर्व न्यायालयीन खटले मागे घेण्यात यावेत, अशा स्पष्ट सूचना बैठकीत देण्यात आल्याचे राणे म्हणाले. या बैठकीला सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (ऑनलाइन), ताज समूहाचे प्रतिनिधी, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.https://prahaar.in/2025/12/23/taj-arrives-in-konkan-the-path-is-cleared-for-the-first-five-star-hotel-in-sindhudurg/फायदा काय होणार?नैसर्गिक सौंदर्य, हिरवीगार वनराई, लांब समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक किल्ल्यांचा वारसा लाभलेला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटकांना कायम मोहीत करीत असतो. शिरोडा-वेळाघर किनाऱ्याची नैसर्गिक सुंदरता आणि शांत वातावरणामुळे ताज समूहाचा हा प्रकल्प जिल्ह्यातील पर्यटनाला नवी दिशा देणारा ठरेल. या पंचतारांकीत हॉटेलमुळे जिल्ह्यात देशासह परदेशी पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 8:10 pm

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘आरोग्य आपल्या दारी’ उपक्रम राबवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांचा सत्कारमुंबई : “मुख्यमंत्रीपदी असताना आम्ही शासन आपल्या दारी उपक्रम राबवला होता. साडेपाच कोटी नागरिकांना याचा फायदा झाला होता. आता बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त आरोग्य विभागाकडून ‘आरोग्य आपल्या दारी’ उपक्रम राबवणार आहोत”, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याला शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते. या गौरव सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले.◻️ LIVE दादर, मुंबई ️ 23-12-2025 नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांसह बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन - लाईव्ह https://t.co/7a27BhkiPa— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 23, 2025सोहळ्यात बोलताना शिंदे म्हणाले, नगर परिषदांच्या निकालांमधून शिवसेना चांदा ते बांद्यापर्यंत विस्तारली आहे, हे स्पष्ट झाले. लोकसभेत शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता. विधानसभा निवडणुकीतही स्ट्राईक रेट इतर पक्षांच्या तुलनेत चांगला होता. आता कमी जागा लढून जास्त जागा जिंकलो हा देखील चांगला स्ट्राईक रेट आहे. आमदार नसलेल्या ठिकाणीही शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. राज्यात शिवसेनेचे ६२ नगराध्यक्ष निवडून आले असून, यात ३३ लाडक्या बहिणींचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.◻️ LIVE दादर, मुंबई ️ 23-12-2025 नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्ष यांचा सत्कार समारंभ - लाईव्हhttps://t.co/E5VHlqX5wd— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 23, 2025नगर परिषद निवडणुकीत उबाठा आणि महाविकास आघाडीने पराभव मान्य केला होता. त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले होते. जे घरी बसले त्यांना कायमचे घरी बसवण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या बेरजेपेक्षा शिवसेनेच्या नगराध्यक्षांची संख्या अधिक आहे. सर्वसामान्यांची नाळ शिवसेनेची जोडलेली आहे, ती कधीही तुटू शकत नाही. शिवसेनेला हरवणे अशक्य आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महापालिका निवडणुकीत देखील महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 8:10 pm

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मोठं पाऊल; ‘या’बड्या नेत्यांवर दिली महत्वाची जबाबदारी

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation Elections) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ने पहिले महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पक्षाने विभागनिहाय आणि महापालिकानिहाय निवडणूक प्रभारी (Election Incharge) नेमणुका जाहीर केल्या असून, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या खांद्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. शशिकांत शिंदे […] The post शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मोठं पाऊल; ‘या’ बड्या नेत्यांवर दिली महत्वाची जबाबदारी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 8:00 pm

Delhi air pollution : ‘केजरीवाल सरकारने ११ वर्षांत काही न केल्यामुळे दिल्लीत आज अशी स्थिती; प्रदूषणावरून उप राज्यपाल सक्सेना यांचा आरोप

Delhi air pollution । Arvind Kejriwal – राजधानी दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना १५ पानांचे पत्र लिहिले असून त्यांनी दिल्लीतील प्रदूषणासाठी केजरीवाल यांनाच जबाबदार धरले आहे. दिल्लीत सध्या जी आणीबाणीसारखी परिस्थिती उदभवली आहे त्याचे खापर त्यांनी केजरीवालांच्या माथी फोडले आहे. केजरीवाल यांच्या सरकारचे ११ वर्षांचे दुर्लक्ष […] The post Delhi air pollution : ‘केजरीवाल सरकारने ११ वर्षांत काही न केल्यामुळे दिल्लीत आज अशी स्थिती; प्रदूषणावरून उप राज्यपाल सक्सेना यांचा आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 7:50 pm

Mumbai News : मुंबईत 48 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; 8 जणांना अटक

मुंबई : मुंबई सीमाशुल्क विभागाने १८ ते २२ डिसेंबर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आठ प्रवाशांकडून ४८ कोटी रुपये किमतीचा ४८ किलोपेक्षा जास्त हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. सीमाशुल्क आयुक्तालयाच्या विमानतळ पथकाने केलेल्या या कारवाईत ही जप्ती करण्यात आली. यासंबंधीत सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे, अधिकाऱ्यांनी बँकॉक (थायलंड) आणि मस्कतहून […] The post Mumbai News : मुंबईत 48 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; 8 जणांना अटक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 7:47 pm

बडगाम NIA न्यायालयाचा मोठा निर्णय, अमेरिकेत राहणाऱ्या काश्मिरी लॉबिस्टची जमीन जप्त

बडगाम : जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातल्या एनआयए कोर्टाने मंगळवारी एक मोठा निर्णय दिला. अमेरिकेत राहणाऱ्या काश्मिरी लॉबिस्ट डॉ. गुलाम नबी शाह उर्फ डॉ. फई याची ०.०७६ हेक्टर जमीन जप्त करण्याचे आदेश दिले. जज याहया फिरदौस यांनी हा आदेश दिला. डॉ. गुलाम नबी शाह उर्फ डॉ. फई याला यूएपीए अंतर्गत फरार आरोपी जाहीर करण्यात आले आहे. अद्याप या आरोपीला अटक झालेली नाही. यामुळेच कोर्टाने आरोपीच्या जमिनीची जप्ती करण्याचे आदेश दिले. सध्या डॉ. गुलाम नबी शाह उर्फ डॉ. फई अमेरिकेत वॉशिंग्टन येथे वास्तव्यास आहे. तो वर्ल्ड फोरम फॉर पीस अँड जस्टिस आणि काश्मिरी अमेरिकन काउंसिल नावाच्या संस्थांचा चेअरमन आहे. या आरोपीला यूएपीए अंतर्गत फरार आरोपी जाहीर करण्यात आले आहे. कायद्यातील तरतुदीनुसार यूएपीए अंतर्गत फरार जाहीर केलेली व्यक्ती तीस दिवसांत शरण आली नाही तर त्या व्यक्तीची वैयक्तिक संपत्ती जप्त करण्याचे अधिकार सरकारला मिळतात. या तरतुदीनुसार कोर्टाने डॉ. गुलाम नबी शाह उर्फ डॉ. फईची जमीन जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार डॉ. गुलाम नबी शाह उर्फ डॉ. फई आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेशी संबंधित आहे. यामुळेच कोर्टाने देशविरोधी कृत्य प्रकरणी डॉ. गुलाम नबी शाह उर्फ डॉ. फईची जमीन जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 7:30 pm

जामखेडमध्ये शेतकऱ्यांचा भव्य “आक्रोश मोर्चा”; काय आहेत मागण्या?

जामखेड : अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, पीक विम्याचा रखडलेला प्रश्न, शेतमालाला अपुरा दर आणि वाढत्या इनपुट खर्चामुळे शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. मात्र, सत्ताधारी सरकार निवडणुकीच्या राजकारणात गुंतले असून शेतकऱ्यांच्या विदारक अवस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) च्या वतीने जामखेड येथे भव्य ‘आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हजारो शेतकऱ्यांनी […] The post जामखेडमध्ये शेतकऱ्यांचा भव्य “आक्रोश मोर्चा”; काय आहेत मागण्या? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 7:26 pm

Gede Priandana : गेडे प्रियांदनाचा जागतिक विक्रम ! T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केली ‘ही’कामगिरी

टी-20 क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ मानला जातो. यात फलंदाज प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात असतात, त्यामुळे गोलंदाजांसाठी २-३ बळी घेणेदेखील मोठी उपलब्धी ठरते. हॅट्रिक तर सोन्याहून पिवळे! पण इंडोनेशियाच्या गोलंदाजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात ५ बळी घेऊन नवा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. हा पराक्रम पुरुष किंवा महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याआधी कधीच […] The post Gede Priandana : गेडे प्रियांदनाचा जागतिक विक्रम ! T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केली ‘ही’ कामगिरी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 7:24 pm

Supriya Sule : राष्ट्रवादीची सावध भूमिका.! “निर्णय पुणेकरांचा विचार करुनच…”; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

Supriya Sule – पुण्यामध्ये युती होणार नाही, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून दुसर्या राष्ट्रवादीला साकडे घालण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का ? याची उत्सुकता सर्वांनाला लागली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर तत्वत: मान्यता मिळाली असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र […] The post Supriya Sule : राष्ट्रवादीची सावध भूमिका.! “निर्णय पुणेकरांचा विचार करुनच…”; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 7:24 pm

G RAM G Bill : ‘जी राम जी’कायदा म्हणजे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली सुधारणा; भाजपने फेटाळले सोनिया गांधींचे आरोप

G RAM G Bill | Sonia Gandhi – काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जी राम जी कायद्यावर केलेली टीका भारतीय जनता पार्टीचे आयटी विभागाचे प्रभारी अमित मालवीय यांनी फेटाळून लावली. हा नवीन कायदा रोजगार हमी कायदा (मनरेगा) उध्वस्त करणारा नाही तर दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली सुधारणा आहे असे मालवीय यांनी म्हटले आहे. मालवीय म्हणाले […] The post G RAM G Bill : ‘जी राम जी’ कायदा म्हणजे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली सुधारणा; भाजपने फेटाळले सोनिया गांधींचे आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 7:17 pm

भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन सोहळा २०२६: पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून कडक वाहतूक नियमावली जाहीर; ‘हे’मार्ग राहतील पूर्णतः बंद

आळंदी: १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ, पेरणेफाटा येथे होणाऱ्या ऐतिहासिक शौर्य दिन व अभिवादन सोहळ्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी आणि संभाव्य कोंडी टाळण्यासाठी व्यापक अधिसूचना जारी केली आहे. पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी मोटर वाहन कायद्यातील तरतुदींनुसार हे आदेश निर्गमित केले […] The post भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन सोहळा २०२६: पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून कडक वाहतूक नियमावली जाहीर; ‘हे’ मार्ग राहतील पूर्णतः बंद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 7:16 pm

Devendra Fadanvis : विमानतळ प्रकल्पबाधित गावातील प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचारविमानतळ परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारणारप्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कौशल्य विकास केंद्र स्थापणार, नोकरीतही प्राधान्य देणारप्रकल्पबाधितांना विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देणारमुंबई : पुण्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक असून त्यासाठी पुरंदर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. या विमानतळामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन मिळेल. हे केवळ प्रवासी विमानतळ नसून कार्गो विमानतळही असल्याने नाशवंत मालाच्या व्यापारासाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुरंदर व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) किमान दोन टक्क्यांची वाढ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या बाधित सात गावातील ग्रामस्थांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संवाद साधला. यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह पुरंदर विमानतळाच्या परिसरातील बाधित सात गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते.https://prahaar.in/2025/12/23/taj-arrives-in-konkan-the-path-is-cleared-for-the-first-five-star-hotel-in-sindhudurg/भूसंपादनाचा जास्तीत जास्त मोबदला देणारयावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुरंदर येथील विमानतळ हे महाराष्ट्र आणि पुण्याच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. हा प्रकल्प व्यवहार्य होण्याच्या दृष्टीने सर्व बाबींचा सखोल विचार करून या विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. पुरंदर येथील एरोसिटी प्रकल्पामध्ये टीडीआर संदर्भातील सर्व लाभ दिले जातील. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांना शंभर टक्के नोकरीत प्राधान्य दिले जाईल. भूसंपादनाचा दर अंतिम झाल्यानंतर त्या भागातील युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करून उद्योगांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. तसेच प्रकल्पासंदर्भातील पूर्वी झालेल्या आंदोलनातील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्यमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुरंदर प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या शेतकरी व नागरिकांच्या योग्य पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य आहे. शेतकऱ्यांना व त्यांच्या पुढील पिढीला संरक्षण मिळेल, याचा विचार करून मूळ जमिनीच्या दरापेक्षा जास्त दर देण्याचा विचार करण्यात येईल. त्यासाठीच रेडिरेकनर नुसार भूसंपादन न करता वाटाघाटीद्वारे भूसंपादनाचा दर ठरविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सिडकोच्या प्रकल्पात यापूर्वी साडेबावीस टक्के लाभ देण्यात आला असून, पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी त्याहून अधिक लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. प्रकल्पबाधित घरांसाठी कुटुंबाची रचना लक्षात घेऊन पुनर्वसन करण्यात येत असून यामध्ये सज्ञान मुलांसाठी अतिरिक्त जागा देण्यात येते. कुटुंबांतील बहिणीच्या हिश्यासंदर्भातही योग्य मार्ग काढण्यात येईल. अल्पभूधारक व भूमिहीन शेतकऱ्यांसाठी काही वेगळे करता येईल का याचा विचार करण्यात येईल. पुरंदर विमानतळासाठी संपादित जमिनीचा मोबदला तसेच पर्यायी जमीन देण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. पुरंदर विमानतळ परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून, यापूर्वी संपादित केलेल्या अतिरिक्त जमिनीवरील शिक्के काढण्यात येतील. या प्रकल्पात शेतकऱ्यांना भागधारक करण्यासंदर्भातही विचार केला जाईल. गावठाण पुनर्बांधणीसंदर्भातही योग्य निर्णय घेतला जाईल. प्रकल्पबाधितांना विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच बागायती झाडांच्या दरासंदर्भातही चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. तसेच राज्यातील सर्वच प्रकल्पबाधितांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.राज्य शासनाने २०१४ नंतर जे प्रकल्प राबविले ते केवळ अन् केवळ राज्याच्या विकासासाठी व नागरिकांच्या हितासाठीच राबविले गेले. या प्रकल्पामधून कोणत्याही शेतकऱ्याला भूमिहीन करण्याचा कुठलाही उद्देश नाही. आतापर्यंत राबविलेले प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्या भागातील शेतकरी, नागरिक समाधानी झाल्याचे दिसून आले आहे. एका विमानतळामुळे परिसरातील शेती, उद्योग, व्यापार यामध्ये मोठ्या संधी उपलब्ध होतात हे नवी मुंबई विमानतळ प्रकल्पामुळे दिसून आले आहे. त्यामुळे पुरंदर विमानतळ झाल्यानंतर नक्कीच या भागातील शेतकऱ्यांचा लाभ होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच उपस्थित ग्रामस्थांमधील प्रतिनिधींनी त्यांच्या मागण्या व निवेदन यावेळी सादर केले.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 7:10 pm

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये विजय हजारे ट्रॉफीचा समावेश होतो. ही स्पर्धा १९९३-९४ पासून खेळवली जात आहे. बीसीसीआयने केलेल्या नियमानुसार आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंनाही दरवर्षी ठराविक देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळण्याचे बंधन आहे. या नियमामुळे रोहित शर्मा, विराट कोहली आदी दिग्गज क्रिकेटपटूही विजय हजारे ट्रॉफीचे सामने खेळताना दिसतील.विजय हजारे ट्रॉफी २४ डिसेंबरपासून सुरू होत असून गट फेरीचे सामने ८ जानेवारीपर्यंत खेळवले जाणार आहेत. त्यानंतर १२ जानेवारीपासून नॉकआउट फेरीला (बाद फेरी) सुरुवात होईल. स्पर्धेचा अंतिम सामना १८ जानेवारी रोजी होणार आहे. चाहत्यांना आता विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना पुन्हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे.या स्पर्धेत विराट आणि रोहित यांच्यासह रिषभ पंत, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग आणि अभिषेक शर्मा यांसारखे अनेक स्टार खेळाडू सहभागी होणार आहेत. मात्र सर्वांचे लक्ष प्रामुख्याने विराट कोहली आणि रोहित शर्मावर असणार आहे. बीसीसीआयने केंद्रीय करार असलेल्या खेळाडूंना किमान दोन विजय हजारे सामन्यांत खेळणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे हे सर्व दिग्गज खेळाडू मैदानात उतरतील, हे निश्चित झाले आहे.विराट कोहली तब्बल १५ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीत पुनरागमन करत आहे. स्पर्धेआधी त्याने माजी भारतीय फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासोबत विशेष सराव केला. मुंबईत कसून मेहनत घेतल्यानंतर विराट दिल्ली संघाच्या सामन्यांसाठी बंगळुरू येथे पोहोचला आहे. दुसरीकडे, रोहित शर्मा २४ आणि २६ डिसेंबर रोजी जयपूरमध्ये सिक्कीम आणि उत्तराखंडविरुद्ध मुंबई संघाकडून खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीचे सुरुवातीचे सामने बंगळुरूमध्ये आंध्र प्रदेश आणि गुजरातविरुद्ध होणार आहेत.यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीत एलिट आणि प्लेट विभागात मिळून एकूण ३८ संघ सहभागी होत आहेत. एलिट गटात ३२ संघ असून त्यांचे प्रत्येकी आठ संघांच्या चार गटांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर संघांविरुद्ध एक सामना खेळेल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील, त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामना खेळवला जाईल. प्लेट गटात सहा संघांचा समावेश आहे.गट फेरीचे सामने अहमदाबाद, बंगळुरू, अलूर, जयपूर आणि राजकोट येथील विविध मैदानांवर होणार आहेत. सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजता सुरू होतील. विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ चे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार असून, जिओ हॉटस्टार अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. ग्रुप अ: केरळ, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पुडुचेरी, त्रिपुरा ग्रुप ब: विदर्भ, हैदराबाद, बंगाल, बडोदा, आसाम, उत्तर प्रदेश, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर. ग्रुप क: छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा, हिमाचल प्रदेश, पंजाब, मुंबई, उत्तराखंड, सिक्कीम. ग्रुप ड: रेल्वे, आंध्र, हरियाणा, गुजरात, सौराष्ट्र, दिल्ली, सेवा, ओडिशा.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 7:10 pm

धुरंधर स्टार रणवीर सिंगचे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांनी भरभरून कौतुक केले, जाणून घ्या त्यांना “ज्वालामुखी” का म्हटले

धुरंधर बॉक्स ऑफिसवर सातत्याने शानदार कामगिरी करत आहे आणि आता एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे की रणवीर सिंगबाबत सर्वत्र केवळ कौतुकच होत आहे. इंडस्ट्रीतील मोठी मंडळी, समीक्षक आणि प्रेक्षक सगळेच मान्य करत आहेत की हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात ताकदवान अभिनयांपैकी एक आहे, ज्यामुळे तो आपल्या पिढीतील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक ठरतो.या कौतुकाच्या गजरात एक समजूतदार आणि सखोल आवाज जोडला आहे तो म्हणजे चित्रपट दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांचा, ज्यांनी याआधी लुटेरामध्ये रणवीरला दिग्दर्शित केले होते. धुरंधरसाठी रणवीरला मिळणाऱ्या प्रशंसेबद्दल बोलताना मोटवाने यांनी केवळ टाळ्या वाजवल्या नाहीत, तर मनापासून येणारा विश्वासपूर्ण दृष्टिकोनही शेअर केला.“मी खरंच रणवीरवर खूप प्रेम करतो, पण मला असं वाटतं की आपण अजूनही त्याच्या खरी क्षमता पूर्णपणे पाहिलेली नाही. तो याहून खूप जास्त करू शकतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की त्याचं सर्वोत्तम काम अजून यायचं आहे. त्याच्या आत खूप काही दडलेलं आहे.”धुरंधर नंतर मोटवाने यांचे शब्द आणखी जास्त योग्य वाटतात, कारण या चित्रपटात रणवीरची गंभीरता, जबरदस्त मेहनत आणि भावनांवर असलेली पकड प्रेक्षकांना थक्क करते. सोशल मीडियावर त्याच्या अभिनयाचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे आणि समीक्षकांचंही मत आहे की चित्रपटाची ताकद आणि मोठं बॉक्स ऑफिस यश यामागे सर्वात मोठं कारण रणवीरचा अभिनय आहे.लुटेराची आठवण काढताना मोटवाने यांनी रणवीरच्या कधीही न थकणाऱ्या मेहनतीबद्दलही सांगितले — ही अशी सवय आहे जी काळानुसार अधिकच मजबूत होत गेली आहे.“तो असा कलाकार आहे जो प्रत्येक भूमिकेत स्वतःचं सर्व काही झोकून देतो. तो त्या भूमिकेत पूर्णपणे बुडून जातो आणि शंभर नव्हे तर हजार टक्के मेहनत करतो. त्याच्या आत खूप काही आहे. मला नेहमी वाटतं की त्याच्या आत एक शक्ती दडलेली आहे, जी एखाद्या दिवशी नक्कीच बाहेर येईल. फक्त योग्य दिग्दर्शकाची साथ मिळणं गरजेचं आहे. मला विश्वास आहे की तो काळ येईल. तो अजूनही तरुण आहे.”आता तो “ज्वालामुखी” खरोखरच फुटण्याच्या अगदी जवळ असल्यासारखा वाटतो. धुरंधरसह रणवीर सिंगने केवळ चांगली कमाईच केलेली नाही, तर असा अभिनयही केला आहे, ज्याचं प्रेक्षक, समीक्षक आणि इंडस्ट्रीतील लोक सगळेच कौतुक करत आहेत. हा चित्रपट दाखवतो की जेव्हा रणवीर एखादी भूमिका पूर्णपणे आत्मसात करतो, तेव्हा संपूर्ण कथा त्याच्याभोवती फिरू लागते. आणि जर मोटवाने यांचं म्हणणं खरं ठरलं, तर आपण आतापर्यंत जे पाहिलं आहे, ते कदाचित फक्त सुरुवातच आहे.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 7:10 pm

Rahul Gandhi : राहुल गांधी 100 टक्के पंतप्रधान होणार अन् अमित शाह…; राजकीय वर्तुळात रंगली ‘त्या’भाकिताची चर्चा

Rahul Gandhi PM Prediction: महाराष्ट्रात सध्या राजकीय धुमाकूळ सुरू आहे. नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये विधानसभा निवडणुकीसारखेच निकाल लागत असल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) चा वरचष्मा स्पष्टपणे जाणवत आहे. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत भाजपची मजबूत पकड असल्याचे चित्र आहे, जणू काही मगरीच्या मिठीत विविध राजकीय संस्था अडकल्या आहेत. अशा वेळी नवीन वर्षाच्या आगमनासोबतच भविष्यात […] The post Rahul Gandhi : राहुल गांधी 100 टक्के पंतप्रधान होणार अन् अमित शाह…; राजकीय वर्तुळात रंगली ‘त्या’ भाकिताची चर्चा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 6:52 pm

अजब! महिलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी; 15 गावांनी का घेतला निर्णय? जाणून घ्या..

जालोर: राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि अजब प्रकार समोर आला आहे. येथील एका पंचायतीने १५ गावांतील महिला आणि मुलींना स्मार्टफोन किंवा कॅमेरा असलेला मोबाईल वापरण्यास मज्जाव केला आहे. पंचायतीचा हा निर्णय एखाद्या ‘तुघलकी’ फरमानासारखा असल्याची चर्चा आता रंगू लागली असून, २६ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. केवळ की-पॅड फोन वापरण्याची मुभा – […] The post अजब! महिलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी; 15 गावांनी का घेतला निर्णय? जाणून घ्या.. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 6:49 pm

Vijay Mallya : तुम्ही भारतात परत कधी येणार आहात? विजय मल्ल्याला उच्च न्यायालयाचा सवाल, काय घडलं? पाहा….

Vijay Mallya – तुमचा भारतात परत येण्याचा इरादा कधी आहे, असा प्रश्‍न फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. तसेच जोपर्यंत ते स्वतः उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात हजर होत नाहीत, तोपर्यंत फरार आर्थिक गुन्हेगार कायद्याविरोधातील त्यांची याचिका ऐकली जाणार नाही, असे न्यायालयाने त्याच्या वकिलांना सांगितले. फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांवर खटल्याला सामोरे […] The post Vijay Mallya : तुम्ही भारतात परत कधी येणार आहात? विजय मल्ल्याला उच्च न्यायालयाचा सवाल, काय घडलं? पाहा…. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 6:46 pm

पिंपरी-चिंचवड निवडणुकांना झळाळी!

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २३) अर्ज वाटप आणि स्वीकृतीला सुरूवात झाली आहे. अर्ज वाटपाच्या पहिल्याच दिवशी शहरातील ३२ प्रभागांतून तब्बल ८७५ उमेदवारांनी २ हजार २१२ इतके अर्ज नेले आहेत. महापालिका निवडणुकीची ऱणधुमाळी सुरू झाली आहे. मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र नेण्यास सुरूवात झाली आहे. त्याची मुदत ३० डिसेंबर असून त्यादिवशी […] The post पिंपरी-चिंचवड निवडणुकांना झळाळी! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 6:40 pm

QR कोडद्वारे पेमेंट करतो म्हणून सांगितलं…; नंतर घडलं असं की, दुकानदाराला बसला तब्बल ‘इतक्या’लाखांचा फटका !

Digital payments : जर तुम्हाला QR कोडद्वारे पेमेंट मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. खरं तर, QR कोडमध्ये छेडछाड करून तुमची फसवणूक होऊ शकते. राजस्थानमधील एका १९ वर्षीय तरुणाने असेच केले आहे. दुकानांमध्ये व्यापाऱ्यांच्या QR कोडमध्ये छेडछाड करून आणि डिजिटल पेमेंट इतर खात्यांमध्ये वळवल्याबद्दल आरोपीला अटक करण्यात आली आहे. यामध्ये दिल्लीतील चांदणी चौक येथील […] The post QR कोडद्वारे पेमेंट करतो म्हणून सांगितलं…; नंतर घडलं असं की, दुकानदाराला बसला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा फटका ! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 6:36 pm

पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पृथ्वीराज सुतार, संजय भोसलेंचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि अश्विनी भोसले या नेत्यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करून भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. ‘भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचा हिंदुत्ववादी विचार जपतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विकसित भारताचे स्वप्न […] The post पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पृथ्वीराज सुतार, संजय भोसलेंचा भाजपमध्ये प्रवेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 6:35 pm

कामशेतमध्ये पुन्हा अतिक्रमण बळावले

कामशेत, दि. २३ (वार्ताहर) – महामार्गालगत असलेली अतिक्रमणे अतिक्रमण विभागाने जेसीबीच्या साहाय्याने काही काळापूर्वी हटवली होती. दोन वर्षांपासून वारंवार नोटिसा देऊनही अतिक्रमण न काढल्याने ही कारवाई करण्यात आली होती. महामार्गालगत पुणे बाजूने २५ मीटर तर मुंबई बाजूने ३५ मीटर परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली होती. या कारवाईत एकूण २५ दुकाने पाडण्यात आली होती. मात्र इंद्रायणी कॉलनी […] The post कामशेतमध्ये पुन्हा अतिक्रमण बळावले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 6:23 pm

35000 कोटी रुपयांचा व्यवसाय आता एकाच छताखाली येणार; अंबुजा, एसीसी आणि ओरिएंट सिमेंटचे होणार विलीनीकरण

मुंबई: भारतीय सिमेंट बाजारपेठेत आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी अदाणी समूहाने एक मोठे पाऊल उचलले आहे. समूहाने आपल्या मालकीच्या अंबुजा सिमेंट्स, एसीसी (ACC) आणि ओरिएंट सिमेंट या तिन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे ३५,००० कोटी रुपयांचा हा व्यवसाय आता एकाच छताखाली येणार असून, यामुळे उत्पादन खर्चात कपात आणि नफ्यात मोठी वाढ होण्याचा अंदाज […] The post 35000 कोटी रुपयांचा व्यवसाय आता एकाच छताखाली येणार; अंबुजा, एसीसी आणि ओरिएंट सिमेंटचे होणार विलीनीकरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 6:21 pm

Delhi air pollution : ‘पीयूसी’नाही तर पेट्रोल-डिझेलही नाही.! दिल्ली सरकारचा निर्णय

Delhi air pollution : जीआरएपी – 4 हे निर्बंध शिथिल झाल्यानंतरही दिल्ली सरकार वाहनांसाठी पीयुसी नाही, इंधन नाही हे धोरण लागूच ठेवणार असल्याचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत बोलताना सिरसा म्हणाले की, वायू प्रदूषणाविरोधातील उपायांची कठोर अंमलबजावणी सुरू राहील आणि प्रदूषण नियंत्रण (पीयुसी) प्रमाणपत्र नसलेल्या कोणत्याही वाहनाला शहरात परवानगी […] The post Delhi air pollution : ‘पीयूसी’ नाही तर पेट्रोल-डिझेलही नाही.! दिल्ली सरकारचा निर्णय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 6:12 pm

Eknath Shinde : नकली घर पे बैठे है और असली...; विजयाचा गुलाल उधळत एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती टीका

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या देदीप्यमान यशानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा जंगी सत्कार केला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदेंनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली. नकली सगळे घरात बसले आहेत आणि असली माझ्या समोर बसले आहेत, अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंना डिवचले.https://prahaar.in/2025/12/23/the-alliance-between-the-thackeray-brothers-will-have-no-effect-in-mumbai-minister-of-state-for-home-affairs-pankaj-bhoyars-jibe-from-jalna/'चांदा ते बांदा' शिवसेनेची ताकद वाढलीनिवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज आपला पक्ष खऱ्या अर्थाने राज्यभर पोहोचला आहे. चांदा ते बांदापर्यंत धनुष्यबाणाने झेप घेतली आहे. कोकणात तर पूर्णपणे 'वन साईड' निवडणूक झाली असून विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे. तुम्ही मिळवलेला हा विजय केवळ मोठा नाही, तर ऐतिहासिक आहे. जनतेने कोणाची शिवसेना 'असली' आहे, यावर शिक्कामोर्तब केले आहे.\सत्य परेशान हो सकता है, पराजित नही!◻️ LIVE दादर, मुंबई ️ 23-12-2025 नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्ष यांचा सत्कार समारंभ - लाईव्हhttps://t.co/E5VHlqX5wd— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 23, 2025सत्तासंघर्ष आणि निवडणूक निकालांचा संदर्भ देत शिंदे पुढे म्हणाले, सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही हो सकता. आम्हाला संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण सत्याचा विजय झाला आहे. सांगोला जिल्ह्यात शहाजीबापू पाटील यांनी तर सर्वांनाच आडवे केले आहे. शहाजीबापूंच्या विजयाचा उल्लेख करताच एकच हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.महायुतीची सरशी ; भाजप-शिवसेना ठरले अव्वल२१ तारखेला जाहीर झालेल्या निकालात महायुतीने विरोधकांना धोबीपछाड केलं आहे. भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून उदयास आली आहे. या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, आगामी महापालिका निवडणुकांसाठी हे मोठे बळ मानले जात आहे.कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्रनवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे कौतुक करताना शिंदेंनी त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. निवडणुका संपल्या आहेत, आता लोकांच्या कामांना प्राधान्य द्या. विकासाच्या जोरावरच आपण पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन केला आहे आणि हेच सातत्य आपल्याला पुढेही टिकवायचे आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 6:10 pm

वर्दीला काळिमा! मुंबई सेन्ट्रलमध्ये पोलिसांचे गतिमंद मुलीशी अश्लील चाळे

मुंबई : मुंबई सेंट्रल परिसरात वर्दीतील पोलिसानेच एका गतिमंद तरुणीसोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली . साने गुरुजी मार्गावरील भाऊसाहेब हिरे उद्यानात हा प्रकार घडला असून, संतप्त नागरिकांनी संबंधित पोलिसाला चोप देत ताडदेव पोलिसांच्या ताब्यात दिले.हिरे उद्यानात लहान मुले आणि नागरिक मोठ्या संख्येने फेरफटका मारण्यासाठी येतात. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एक गणवेशातील पोलीस तरुणीसोबत बसलेला असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. काही वेळातच तो तिच्याशी लगट करत अश्लील चाळे करू लागल्याने नागरिक संतप्त झाले.प्रकार लक्षात येताच जमलेल्या नागरिकांनी पोलिसाला पकडून मारहाण केली. विशेष म्हणजे, उद्यानाला लागूनच पोलिस चौकी असतानाही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माहिती मिळताच ताडदेव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नशेत असलेल्या सहायक फौजदाराला ताब्यात घेतले.प्राथमिक चौकशीत पीडित तरुणी गतिमंद असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित सहायक फौजदार सशस्त्र पोलिस दलात कार्यरत असून सध्या ‘एल विभाग-२’ येथे नेमणुकीस होता. या प्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 6:10 pm

Taj Hotel In Kokan : कोकणात 'ताज'चं आगमन! सिंधुदुर्गातील पहिल्या पंचतारांकित हॉटेलचा मार्ग मोकळा

ताज ग्रुपच्या आलिशान प्रकल्पाला 'ग्रीन सिग्नल'सिंधुदुर्ग : निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आता मानाचा तुरा रोवला जाणार आहे. शिरोडा-वेळाघर येथे अनेक वर्षांपासून रखडलेल्या इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेड (ताज ग्रुप) च्या पहिल्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रकल्पातील अडथळे दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे सिंधुदुर्गात जागतिक दर्जाच्या पर्यटनाची कवाडं खुली होणार आहेत.शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हिताला प्राधान्यमुंबईतील 'मेघदूत' निवासस्थानी झालेल्या या बैठकीत ५२.६३ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनावर सखोल चर्चा करण्यात आली. जमिनीचा मोबदला आणि वाढीव कालावधीमुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने विशेष पॅकेजला तत्त्वतः मान्यता दिली आहे. प्रकल्पग्रस्तांना दोन टप्प्यात तातडीने मोबदला द्या, असे कडक निर्देश मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले आहेत.https://prahaar.in/2025/12/23/dcm-and-shivsena-leader-eknath-shinde-criticizes-to-uddhav-thackeray-local-body-elections-maharashtra-politics/त्रिपक्षीय करार आणि रोजगाराची हमीया प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये होणारा 'त्रिपक्षीय करार'. स्थानिक ग्रामस्थ, ताज ग्रुप आणि पर्यटन विभाग यांच्यात हा करार होणार असून, याद्वारे स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासोबतच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे बंधनकारक करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळणार आहे. या बैठकीला सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. नितेश राणे यांनी शंभूराज देसाई यांचे आभार मानताना म्हटले की, देसाईंच्या पुढाकारामुळेच अनेक वर्षे रखडलेला हा प्रकल्प पुन्हा मार्गी लागला आहे. तर दीपक केसरकर यांनी स्थानिक नागरिकांनी जिल्ह्याच्या हितासाठी या प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलणार?हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्ग केवळ महाराष्ट्रातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनाचे केंद्र बनेल. उच्चभ्रू पर्यटकांचा ओघ वाढल्याने स्थानिक हॉटेल व्यावसायिक, वाहतूकदार आणि छोट्या व्यावसायिकांच्या उत्पन्नात भर पडणार आहे.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 6:10 pm

Today TOP 10 News: वाल्मिक कराड न्यायालयात पहिल्यांदाच बोलला, चांदीची ऐतिहासिक झेप ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र…वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या

मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू अखेर एकत्र; उद्या दुपारी १२ वाजता युतीची घोषणा – मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठी बातमी समोर आलीय. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात युती निश्चित झाली असून, उद्या बुधवारी दुपारी १२ वाजता याची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिलीय. या ऐतिहासिक युतीसाठी जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युलाही समोर […] The post Today TOP 10 News: वाल्मिक कराड न्यायालयात पहिल्यांदाच बोलला, चांदीची ऐतिहासिक झेप ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र… वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 6:09 pm

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करून अटक झाली पाहिजे : अंजली दमानिया

पुणे : मुंढवा येथील जमीन व्यवहार प्रकरणात दोन एफआयआर दाखल झाल्या असून, बावधन प्रकरणात केवळ मुद्रांक शुल्क बुडविल्याची तक्रार आहे. त्यामुळे पुढे फारसे काही निष्पन्न होणार नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. या प्रकरणातील गुन्ह्याची सविस्तर माहिती आपण पोलीस आयुक्त आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना दिल्याचे त्यांनी सांगितले. टप्प्याटप्प्याने पोलीस कारवाई सुरू […] The post पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करून अटक झाली पाहिजे : अंजली दमानिया appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 6:08 pm

iPhone 16e च्या किमतीत मोठी कपात; आतापर्यंतच्या नीचांकी किमतीत खरेदीची सुवर्णसंधी!

नवी दिल्ली: ॲपल प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेला ॲपलचा सर्वात स्वस्त आयफोन, iPhone 16e, आता मोठ्या सवलतीत उपलब्ध झाला आहे. इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर ‘टाटा क्रोमा’ (Croma) च्या वेबसाईटवर सुरू असलेल्या ‘इयर एंड सेल’मध्ये या फोनच्या किमतीत तब्बल ९,००० रुपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे. किमतीत १२ टक्क्यांची घसरण ॲपलने iPhone 16e भारतात ५९,९०० […] The post iPhone 16e च्या किमतीत मोठी कपात; आतापर्यंतच्या नीचांकी किमतीत खरेदीची सुवर्णसंधी! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 6:01 pm

Election News : “ठाकरेबंधुंच्या युतीचा बीएमसी निकालावर परिणाम नाही..”; भाजपाच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत !

Uddhav Thackeray । Raj Thackeray । Election News – मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेसेना आणि मनसे यांच्यातील संभाव्य युती निवडणुकीच्या निकालावर कोणताही परिणाम करणार नाही, असे भाजप नेते अमित साटम यांनी म्हटले आहे. शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी चुलत भाऊ उद्धव आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षांच्या युतीची घोषणा बुधवारी केली जाईल, असे संकेत दिल्यानंतर भाजपच्या […] The post Election News : “ठाकरेबंधुंच्या युतीचा बीएमसी निकालावर परिणाम नाही..”; भाजपाच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत ! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 5:54 pm

मोठी बातमी..! राष्ट्रवादीसाठी महायुतीचे दरवाजे बंद, शिंदेंच्या मंत्र्याची मोठी घोषणा

Ajit Pawar NCP : रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीनंतर महायुतीतील (भाजप-शिवसेना) यशामुळे राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यातील सात ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीने दबदबा निर्माण केला असताना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) महायुतीतून ‘नो एन्ट्री’चे संकेत मिळाले आहेत. पालकमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी चिपळूण येथील युतीच्या मेळाव्यात हे स्पष्ट […] The post मोठी बातमी..! राष्ट्रवादीसाठी महायुतीचे दरवाजे बंद, शिंदेंच्या मंत्र्याची मोठी घोषणा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 5:52 pm

मध्य प्रदेशात ‘SIR’नंतर मोठी खळबळ; तब्बल ‘इतके’लाख मतदारांची नावे यादीतून वगळली

भोपाळ: मध्य प्रदेशात ‘एसआयआर’ अंतर्गत मतदार यादीचा नवीन प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रक्रियेनंतर राज्यातील ४२ लाखांहून अधिक मतदारांची नावे यादीतून कमी करण्यात आली आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार झा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून, एकट्या राजधानी भोपाळमध्येच ४ लाख ३८ हजारांहून […] The post मध्य प्रदेशात ‘SIR’नंतर मोठी खळबळ; तब्बल ‘इतके’ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 5:52 pm

रिचार्ज करण्यापूर्वी थांबा.! ‘Jio’चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन एकदा पाहाच, होईल मोठा फायदा !

Jio | Airtel | Recharge : जर तुम्ही कमी बजेटमध्ये दीर्घकाळाची वैधता असलेला रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक असा प्लॅन आणला आहे, जो ५०० रुपयांच्या आत चक्क ८४ दिवसांची वैधता देतो. मात्र, हा प्लॅन निवडण्यापूर्वी त्यातील अटी समजून घेणे गरजेचे आहे. जिओचा ४४८ रुपयांचा प्लॅन […] The post रिचार्ज करण्यापूर्वी थांबा.! ‘Jio’चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन एकदा पाहाच, होईल मोठा फायदा ! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 5:47 pm

गुगलकडून व्यक्ती सुरक्षेसाठी सर्वात मोठे ईएलएस फिचर लाँच आता केवळ ११२ नंतर दाबा पुढे....

मोहित सोमण: तुमच्या आयुष्यात खूप कधी कधी संकट येते मात्र तांत्रिक सुरक्षेची वानवा असल्याने अनेकदा व्यक्तींना संकटाला सामोरे जावे लागते हेच अधोरेखित करताना गुगलने भारतात पहिल्यांदाच अँडव्हान्स सिक्युरिटी फिचर आणले आहे. लवकरच अँड्रॉईड ६.० व त्यावर ओएस असलेल्या स्मार्टफोनमध्ये इन बिल्ट गुगलचे सिक्युरिटी असलेले ईएलएस (Emergency Location Service) दाखल होईल. कंपनीकडून या फिचरचे यशस्वी टेस्टिंग झाले असून काही दिवसांत गुगल युजर्सला हे फिचर रोल आऊट करण्यात येणार आहे. अनेकदा प्रथमदर्शनी उपलब्ध असलेल्या पर्यायात आपात्कालीन फोन (Emergency Phone) करताना लोकेशन ट्रॅकिंग करताना समस्या भेडसावत असे. अचूक लोकेशनचा अभाव तांत्रिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या फिचर्सला बदलण्यासाठी गुगलने ईएलएस प्रणाली बाजारात आणली आहे.नव्या पर्यायात पैसे मोजावे लागणार नाही. हे संपूर्णपणे मोफत फिचर असल्याचे कंपनीने आपल्या माहितीत स्पष्ट केले आहे. ११२ क्रमांक डायल केल्यावरच हे फिचर युजरला वापरता येणार आहे. क्रमांक ११२ व्यतिरिक्त इतर संकटकालीन क्रमांक डायल केल्यावर हे फिचर्स आपोआप लागू होणार आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीची माहिती ज्यांना पाठवून निर्देशित केली गेली आहे त्यांना तंतोतंत लोकशन व इतर माहिती या फिचरमधून मिळणार आहे. ६० हून अधिक देशात गुगल हे फिचर रोल आऊट करणार आहे.कंपनीने यावर भाष्य करताना,'आम्हाला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे की ही सेवा आता भारतात प्रथमच सक्रिय करण्यात आली आहे आणि उत्तर प्रदेश हे अँड्रॉइडमध्ये ELS पूर्णपणे कार्यान्वित करणारे पहिले भारतीय राज्य बनले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांद्वारे एकत्रित आणि पर्ट टेलिकॉम सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (पर्टसोल) द्वारे कार्यान्वित, ELS संपूर्ण राज्यातून 112 आपत्कालीन सेवेला दररोज मिळणाऱ्या लाखो कॉल्स आणि एसएमएस संदेशांना पाठिंबा देते' असे म्हटले.या फिचरची गुगलने यशस्वी टेस्टिंग केली तेव्हा गुगलने आपला अनुभवही शेअर केला आहे. याविषयी अधिक बोलताना, ही सेवा राज्यातील सर्व सुसंगत अँड्रॉइड उपकरणांवर (आवृत्ती 6.0 आणि त्यापुढील) सुरू करण्यापूर्वी काही महिने प्रायोगिक तत्त्वावर तपासली गेली, तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत उत्साहवर्धक होते. अँड्रॉइडमधील ELS ने २० दशलक्षाहून अधिक कॉल्स आणि एसएमएस संदेशांना पाठिंबा दिला असून आणि कॉल कनेक्ट झाल्यानंतर काही सेकंदातच खंडित झाले तरीही कॉलरचे स्थान ओळखले आहे ' असे आपल्या निवेदनात कंपनीने म्हटले आहे.मशीन लर्निंगवर अवलंबून असलेल्या याअँड्रॉइड फ्यूज्ड लोकेशन प्रोव्हायडरद्वारे उपलब्ध झालेले हे फिचर मदत मागणाऱ्या व्यक्ती कोठेही असल्या तरी आपत्कालीन सेवांना अचूक स्थान प्रदान करते असेही कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनात स्पष्ट केले.उत्तर प्रदेश आणि जगभरातील आपत्कालीन प्रतिसादकर्त्यांना (Respondent) त्यांच्या सर्वात कठीण क्षणी लोकांना मदत करण्याच्या प्रेरणादायी प्रयत्नांमध्ये पाठिंबा देताना आम्हाला अभिमान वाटतो असे म्हणत कंपनीने पुढे म्हटले आहे की,'आम्हाला आशा आहे की भारतातील इतर राज्ये देखील त्यांच्या स्थानिक आपत्कालीन सेवांच्या जीवनरक्षक हस्तक्षेपांना आणखी मजबूत करण्यासाठी या तंत्रज्ञानाच्या संभाव्यतेचा शोध घेतील.'

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 5:30 pm

पोलिसांसमोर २२ नक्षलवादी आले शरण

मलकानगिरी : मलकानगिरी जिल्ह्यात ओडिशा पोलिसांसमोर २२ नक्षलवादी शरण आले. आपल्या हातातील शस्त्र टाकून माओवादी नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शरणागती स्वीकारली. शरण आलेल्या सर्व नक्षलवाद्यांची माहिती देणाऱ्यांना पोलिसांनी लाखो रुपयांची बक्षीसं जाहीर केली होती. यामुळेच ही शरणागती पोलिसांच्यादृष्टीने महत्त्वाची आहे. शरण आलेल्या नक्षलवाद्यांना नियमानुसार पुनर्वसनासाठी सरकारकडून आवश्यक ती आर्थिक मदत आणि कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारी यंत्रणा पूर्ण सहकार्य करेल. ओडिशा पोलिसांसमोर शरण आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक विभागीय प्रमुख, सहा एसीएम आणि १५ पार्टी सदस्य आहेत. या नक्षलवाद्यांवर साडेपाच लाख रुपयांपासून २७.५० लाख रुपयांपर्यंतची बक्षीसं होती.ओडिशातील कालाहंडी, कंधमाल, बालनगीर, मलकानगिरी, कोरापुट, नबरंगपूर, नुआपाडा, रायगडा आणि बौध जिल्ह्यांमध्ये माओवाद्यांचा प्रभाव आहे. यापैकी सहा जिल्हे माओवाद्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्तीसगडच्या सीमेवर आहेत. यामध्ये कोरापुट, मलकानगिरी, कालाहांडी, नबरंगपूर, नुआपाडा आणि बालनगीर जिल्ह्यांचा समावेश आहे. पण २२ प्रमुख नक्षलवादी शरण आल्यामुळे ओडिशातील नक्षलवाद्यांच्या कारवाया थंडावण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 5:30 pm

Jyoti Yarraji Video : ज्योतीने भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं, मात्र संपूर्ण स्टेडियममध्ये होता शुकशुकाट; नेमकं काय घडलं?

Jyoti Yarraji Video : दक्षिण कोरियाच्या गुमी शहरात २७ ते ३१ मे २०२५ दरम्यान आयोजित २६व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत एकूण २४ पदकांची कमाई केली. यात ८ सुवर्ण, १० रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे. या कामगिरीमुळे भारताने पदकतालिकेत दुसरे स्थान पटकावले, तर चीनने पहिले स्थान मिळवले. भारतीय ॲथलीट्सनी विविध […] The post Jyoti Yarraji Video : ज्योतीने भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं, मात्र संपूर्ण स्टेडियममध्ये होता शुकशुकाट; नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 5:29 pm

पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीने वेग घेतला असताना पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र येण्याची चर्चा तापली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटांमधील संभाव्य युतीमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली असून, शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल संजय राऊत यांनी स्पष्ट […] The post पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 5:17 pm

लाडकी काव्या म्हणजेच ज्ञानदाची लगीनघाई सुरु; हातावर रंगली त्याच्या नावाची मेहंदी

मुंबई : लग्नाचा हंगाम जोरदार सुरु आहे. बरेच सेलिब्रिटी मंडळी या वर्षी विवाह बंधनात अडकली तर काही लवकरच लग्न करणार आहेत तर काहींनी आपल्या जोडीदाराची आपल्या चाहत्यांना ओळख करून दिली. याच लग्नाच्या हंगामात आणखी एक आपली लाडकी स्टार प्रवाह वरील अभिनेत्री आधी 'ठिपक्यांची रांगोळी' आणि 'आता लग्नानंतर होईलच प्रेम' फेम काव्या म्हणजेच ज्ञानदा विवाह बंधनात अडकणार आहे. तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ज्ञानदाच्या हाताला मेहंदी लागलेली असून घरी लगीन घाई हि सुरु झाली आहे हे कळते आहे.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 5:10 pm

चंद्रपुरातील शेतकऱ्याची किडनी विकणाऱ्या डॉक्टरला अटक

चंद्रपूर : कर्जबाजारी शेतकऱ्याची किडनी विकल्याच्या गाजलेल्या प्रकरणात चंद्रपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या अवैध किडनी तस्करी रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या ‘डॉ. कृष्णा’ला सोलापूरमधून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा आरोपी प्रत्यक्षात डॉक्टर नसून बनावट ओळखीच्या आधारे अनेकांना फसवत होता, अशी धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे.पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ‘डॉ. कृष्णा’ म्हणून वावरणारा आरोपी मल्लेश नावाचा अभियंता आहे. आर्थिक अडचणींमुळे त्याने सुरुवातीला स्वतःची किडनी विकली होती. त्यानंतर त्याने एजंट म्हणून काम सुरू करत कर्जबाजारी आणि गरजू लोकांना किडनी विकण्यासाठी प्रवृत्त करण्यास सुरुवात केली.याच आरोपीने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी रोशन कुडे याला जाळ्यात ओढून आधी कोलकात्याला, त्यानंतर कंबोडियाला पाठवले. तेथे वैद्यकीय तपासणीनंतर त्याची किडनी काढण्यात आली. या बदल्यात रोशन कुडे याला केवळ आठ लाख रुपये देण्यात आले, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.या अटकेनंतर किडनी तस्करीचे जाळे राज्यातील इतर जिल्ह्यांपर्यंत पसरले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या रॅकेटचे बळी ठरलेल्यांची संख्या मोठी असू शकते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चंद्रपूर पोलीस आता आरोपी मल्लेशची सखोल चौकशी करत असून, या आंतरराष्ट्रीय किडनी तस्करीमध्ये सहभागी असलेल्या इतर एजंट्स, डॉक्टर आणि रुग्णालयांचा शोध घेत आहेत.या प्रकरणाचा उगम रोशन कुडे यांच्या तक्रारीतून झाला होता. २०२१ मध्ये त्यांनी दोन सावकारांकडून ५० हजार रुपयांचे कर्ज ४० टक्के व्याजदराने घेतले होते. काही काळातच सावकारांनी व्याजासह ही रक्कम ७४ लाख रुपये झाल्याचा दावा करत दबाव वाढवला. कर्ज फेडण्यासाठी किडनी विकण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांनी केला होता.या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, यापूर्वी सहा सावकारांना अटक करण्यात आली आहे. आता किडनी तस्करी रॅकेटविरोधात कारवाई अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 5:10 pm

Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराड प्रथमच न्यायालयात बोलला; सुनावणीत नेमकं काय घडलं? आरोप निश्चित…

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेला आता वेग आला असून, बीड येथील विशेष ‘मकोका’ न्यायालयाने सर्व आरोपींवर अधिकृतपणे दोषारोप निश्चित केले आहेत. खंडणीच्या व्यवहारात अडथळा निर्माण केल्यामुळेच ही हत्या झाल्याचा ठपका फिर्यादी पक्षाने ठेवला आहे. वाल्मिक कराडने नाकारले […] The post Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराड प्रथमच न्यायालयात बोलला; सुनावणीत नेमकं काय घडलं? आरोप निश्चित… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 4:58 pm

Cough syrup : अवैध कफ सिरप विक्रीप्रकरणी दोन भावांना जामीन मंजूर.! अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय

Allahabad High Court । Cough syrup – प्रतिबंधित कफ सिरपच्या अवैध विक्रीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन भावांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आरोपींकडून कोणतीही वस्तू जप्त करण्यात आलेली नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. लखनौ खंडपीठाचे न्यायमूर्ती करुणेश सिंह पवार यांनी १८ डिसेंबर रोजी विभोर राणा आणि विशाल सिंह यांनी दाखल केलेल्या स्वतंत्र जामीन […] The post Cough syrup : अवैध कफ सिरप विक्रीप्रकरणी दोन भावांना जामीन मंजूर.! अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 4:54 pm

England Ashes Series 2025 : क्रीडा विश्वात उडाली खळबळ ! मालिका पराभवानंतर इंग्लंडच्या खेळाडूंवर मद्यपानांचा गंभीर आरोप

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघाला आणखी एक धक्कादायक पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवामुळे केवळ मालिका हातातून निसटली नाही, तर संघाच्या एकूण वर्तन आणि शिस्तीवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ला संघातील खेळाडूंच्या वागणुकीची सखोल चौकशी करावी लागणार आहे, ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. मालिकेतील […] The post England Ashes Series 2025 : क्रीडा विश्वात उडाली खळबळ ! मालिका पराभवानंतर इंग्लंडच्या खेळाडूंवर मद्यपानांचा गंभीर आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 4:52 pm

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, ‘या’दिग्गज नेत्यांचा समावेश

मुंबई : महाराष्ट्रातील २९ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या ४० स्टार प्रचारकांच्या यादीत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि क्रिकेटपटू-राजकारणी मोहम्मद अझरुद्दीन यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मंगळवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन पायलट, पक्षाचे नेते कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी हेही प्रमुख प्रचारक असतील. याशिवाय राज्यातील […] The post काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, ‘या’ दिग्गज नेत्यांचा समावेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 4:44 pm

26 डिसेंबरला दोन्ही ‘राष्ट्रवादी’एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाल्या, “माझ्याकडे अजून…”

पुणे: नगर परिषद निवडणुकांमध्ये भाजपसह महायुतीला मिळालेल्या यशानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. २६ डिसेंबरला दोन्ही ‘राष्ट्रवादी’ पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर महत्त्वाची भूमिका मांडली आहे. “माझ्याकडे अद्याप कोणताही औपचारिक प्रस्ताव आलेला नाही,” असे स्पष्ट करत सुळेंनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. ‘प्रस्ताव नाही, पण […] The post 26 डिसेंबरला दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाल्या, “माझ्याकडे अजून…” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 4:42 pm

M K Stalin : ‘हिंदीविरोधी आंदोलनाची कागदपत्रे प्रसिद्ध’–मुख्यमंत्री स्टॅलिन

M K Stalin | Anti-Hindi movement – मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सचिवालयात, तामिळनाडू अभिलेखागार आणि ऐतिहासिक संशोधन विभागाच्या सहाय्यक संपादिका ए. वेन्निला यांनी लिहिलेले हिंदीविरोधी आंदोलन – संपूर्ण सरकारी कागदपत्रे नावाचे पुस्तक प्रकाशित केले. पुस्तकाची पहिली प्रत अर्थमंत्री थंगम थेन्नरासू यांनी स्वीकारली. हे नवीन पुस्तक तामिळनाडूमध्ये झालेल्या हिंदीविरोधी आंदोलनांसंबंधीच्या कागदपत्रांचे एक सर्वसमावेशक संकलन आहे, ज्यात […] The post M K Stalin : ‘हिंदीविरोधी आंदोलनाची कागदपत्रे प्रसिद्ध’ – मुख्यमंत्री स्टॅलिन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 4:41 pm

Bigg Boss Marathi 6 : गौतमीचा ‘बिग बॉस’मराठीला नकार, आता ‘या’लावणी डान्सरची होणार एन्ट्री? Video आला समोर !

Gautami Patil | Bigg Boss Marathi 6 | Sayali Patil : ‘बिग बॉस हिंदी’चा धमाका संपल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राला वेध लागले आहेत ते ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचे. या नव्या सीझनचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेष म्हणजे, मागील सीझनप्रमाणेच यंदाही सुपरस्टार रितेश देशमुख आपल्या हटके स्टाईलने सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. मात्र, […] The post Bigg Boss Marathi 6 : गौतमीचा ‘बिग बॉस’ मराठीला नकार, आता ‘या’ लावणी डान्सरची होणार एन्ट्री? Video आला समोर ! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 4:35 pm

Yashwant Bank scam: कराडसह फलटणमध्ये ‘ईडी’चे छापे; यशवंत बँक घोटाळाप्रकरणी काहीजण ताब्यात

कराड – फलटण येथील यशवंत सहकारी बँकेतील सुमारे 112 कोटीच्या घोटाळाप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या पथकाने मंगळवारी पहाटे फलटणसह कराडमध्ये ठिकठिकाणी छापे टाकले आहेत. तसेच या घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या काहीजणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. यशवंत बँकेतील घोटाळाप्रकरणी कराड शहर पोलिसात काही महिन्यांपूर्वीच संचालक, बँकेतील अधिकाऱ्यांसह अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. […] The post Yashwant Bank scam: कराडसह फलटणमध्ये ‘ईडी’चे छापे; यशवंत बँक घोटाळाप्रकरणी काहीजण ताब्यात appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 4:24 pm

Ranveer Singh : बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’चा धुमाकूळ.! पण रणवीरचा ‘डॉन ३’ला रामराम, सांगितलं ‘हे’कारण….

Ranveer Singh | Don 3 movie – सध्या संपूर्ण देशात अभिनेता रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ या स्पाय थ्रिलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ निर्माण केले आहे. या सिनेमानं आतापर्यंत ५५० कोटींहून अधिक रुपयांची कमाई करत यशाचे नवे शिखर गाठले असून, रणवीरच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, या यशाच्या आनंदासोबतच रणवीरने एक असा निर्णय घेतला आहे, […] The post Ranveer Singh : बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’चा धुमाकूळ.! पण रणवीरचा ‘डॉन ३’ला रामराम, सांगितलं ‘हे’ कारण…. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 4:22 pm

Stock Market: सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर सेन्सेक्सच्या घोडदौडीला लगाम; ‘या’शेअर्समध्ये घसरण

मुंबई: भारतीय शेअर बाजारात मंगळवारी कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली. सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर सेन्सेक्सच्या घोडदौडीला लगाम बसला असून तो अल्प घसरणीसह बंद झाला. आयटी क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या विक्रीच्या दबावामुळे वित्तीय सेवा, एफएमसीजी आणि मेटल क्षेत्रातील तेजीचा प्रभाव ओसरला. व्यवहाराच्या अंती बीएसई सेन्सेक्स ४२.६४ अंकांच्या (०.०५ टक्के) घसरणीसह ८५,५२४.८४ वर स्थिरावला, तर एनएसई निफ्टीने ४.७५ अंकांच्या […] The post Stock Market: सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर सेन्सेक्सच्या घोडदौडीला लगाम; ‘या’ शेअर्समध्ये घसरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 4:19 pm

Pune Gramin : पिंपरखेड–जांबुत ते आंबेवाडी रस्त्यासाठी ३५ लाखांचा निधी मंजूर; शिवाजीराव आढळराव पाटलांच्या पाठपुराव्याला यश

जांबूत : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पिंपरखेड- जांबुत रोड ते आंबेवाडी अंतर्गत रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. याच पार्शवभूमीवर पुणे म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून ३५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे भयभीत ग्रामस्थांनी […] The post Pune Gramin : पिंपरखेड–जांबुत ते आंबेवाडी रस्त्यासाठी ३५ लाखांचा निधी मंजूर; शिवाजीराव आढळराव पाटलांच्या पाठपुराव्याला यश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 4:13 pm

Rajasthan : महिलांनी स्मार्टफोन वापरु नये.! राजस्थानच्या समुदायाची बंधने, दिलं ‘हे’कारण..

Rajasthan | Smartphone – राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील एका स्थानिक समुदायाने १५ गावांमध्ये मुली आणि सुनांना स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी २६ जानेवारीपासून लागू होणार आहे. या आदेशानुसार, महिलांना लग्नसमारंभ, सार्वजनिक मेळाव्यांमध्ये किंवा शेजाऱ्यांना भेटताना मोबाइल फोन घेऊन जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. मात्र व्हॉइस कॉलसाठी बेसिक फोन वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. गाझीपूर […] The post Rajasthan : महिलांनी स्मार्टफोन वापरु नये.! राजस्थानच्या समुदायाची बंधने, दिलं ‘हे’ कारण.. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 23 Dec 2025 4:11 pm

Rahul Kalate : पिंपरीत शरद पवारांना मोठा धक्का; राहुल कलाटे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश, स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून 'कमळ'हाती

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला मोठे खिंडार पडले आहे. शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि चिंचवड विधानसभेचे माजी उमेदवार राहुल कलाटे यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत झालेल्या एका विशेष सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चिंचवडचे आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.सकाळपासूनच हालचालींना वेगराहुल कलाटे हे आज सकाळी ९ वाजता आपल्या वाकड येथील निवासस्थानाहून कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून कलाटे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा त्यांचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्याने या चर्चेला अधिक बळकटी दिली होती. अखेर आज सर्व शक्यतांना पूर्णविराम देत त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले..

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 4:10 pm

घाटकोपरमधील संजय भालेराव आणि डॉ अर्चना भालेराव यांचा उबाठाला 'जय महाराष्ट्र'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर पश्चिम मधील प्रभाग क्र. १२६च्या माजी नगरसेविका डॉ. अर्चना संजय भालेराव आणि माजी नगरसेवक संजय भालेराव यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांपैकी डॉ अर्चना एक आहेत. तर भाजपाचे स्थानिक आमदार राम कदम यांच्या विरोधात दोन वेळा आमदारकीची निवडणूक संजय भालेराव यांनी लढवली आहे.शिवसेनेत उबाठाचे माजी नगरसेवक प्रवेश करत असताना आता आकांक्षा शेट्ये, तेजस्वी घोसाळकर यांच्या पाठोपाठ भालेराव दांपत्यानेही भाजपाचा झेंडा आपल्या हाती घेतला. उबाठाकडे राहिलेल्या नगरसेवकांपैकी आणखी माजी नगरसेवक भाजपाच्या समूहात सामील झाला आहे.संजय भालेराव हे २०१२ मध्ये मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तर नंतर २०१७मध्ये आरक्षण बदलल्याने त्यांची पत्नी डॉ अर्चना भालेराव यांना उमेदवारी मिळाली आणि त्या निवडून आल्या होत्या. त्यानंतर मनसेतून त्यांनी उबाठा मध्ये प्रवेश केला होता.भालेराव दांपत्याने भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि माजी खासदार मनोज कोटक यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी मंचावर , आमदार राम कदम, पक्षाचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, सरचिटणीस राजेश शिरवडकर, सरचिटणीस श्वेता परूळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 4:10 pm

पॅन-इंडिया सुपरस्टार प्रभास यांनी ‘द स्क्रिप्ट क्राफ्ट इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’द्वारे जागतिक स्टोरीटेलिंगला दिले नवे व्यासपीठ!

बाहुबली, सालार आणि कल्कि 2898 ए.डी. सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे आणि ज्यांना अनेकदा जगातील महान अभिनेत्यांमध्ये गणले जाते असे पॅन-इंडिया सुपरस्टार प्रभास यांनी आज एका दमदार घोषणा व्हिडिओद्वारे द स्क्रिप्ट क्राफ्ट इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे अनावरण केले. द स्क्रिप्ट क्राफ्ट प्लॅटफॉर्मवर सुरू झालेली ही क्रांतिकारी पहल जागतिक स्टोरीटेलिंगमध्ये नव्या युगाची सुरुवात करते. जगभरातील क्रिएटर्सना थेट ओळख, निर्माते आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोच देत त्यांच्या स्वप्नांना सिनेमॅटिक करिअरमध्ये रूपांतरित करण्याची ही संधी आहे.या क्रांतिकारी मंचाला वैयक्तिक पाठिंबा देत प्रभास यांनी फिल्ममेकिंग लोकशाही पद्धतीने सर्वांसाठी खुली करण्याच्या त्याच्या शक्तीवर भर दिला. व्हिडिओमध्ये ते म्हणाले, “द स्क्रिप्ट क्राफ्ट हा फक्त एक फेस्टिव्हल नाही — इथेच कथा करिअर घडवतात.”फिल्मकारांना त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी प्रेरित करत त्यांनी लिहिले:“प्रत्येक आवाजाला एक सुरुवात मिळायला हवी.प्रत्येक स्वप्नातील कथेला एक संधी मिळायला हवी.#TheScriptCraft इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल येथे आहे, जगभरातील स्टोरीटेलर्सना आमंत्रण देतो.”https://www.thescriptcraft.com/register/directorपारंपरिक स्पर्धांपेक्षा वेगळा, हा फेस्टिव्हल जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातून येणाऱ्या स्टोरीटेलर्सना सशक्त बनवतो. २ मिनिटे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या, कोणत्याही जॉनरमधील शॉर्ट फिल्म्स ९० दिवसांच्या कालावधीत स्पर्धेत सहभागी होतील. प्रेक्षकांचे वोट्स, लाइक्स आणि रेटिंग्स यांच्या आधारे टॉप तीन विजेत्यांची निवड केली जाईल; मात्र प्रत्येक सबमिशनला द स्क्रिप्ट क्राफ्टवर आधीच नव्या प्रतिभेच्या शोधात असलेल्या प्रमुख प्रोडक्शन हाऊसेससमोर स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळेल.घोषणा व्हिडिओमध्ये दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा म्हणाले, “शॉर्ट फिल्म बनवणे हे फिल्ममेकिंग प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचे अंग आहे. कागदावर तुम्ही जे लिहिता आणि पडद्यावर जे साध्य करता, त्या दोन पूर्णपणे वेगळ्या वास्तवता असतात. सर्व महत्त्वाकांक्षी फिल्मकारांसाठी हा नावनोंदणी करण्याचा आणि याचा पूर्ण लाभ घेण्याचा योग्य काळ आहे.”नाग अश्विन म्हणाले, “मी अनुडीपला यूट्यूबवरील एका शॉर्ट फिल्ममधून शोधले आणि तिथूनच ‘जाती रत्नालु’ची सुरुवात झाली. फिल्म स्कूलपेक्षा तुमचे काम आणि तुमच्या कामाची समज अधिक महत्त्वाची असते. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण या संधीचा उपयोग कराल, चित्रपट बनवाल आणि याचा सर्वोत्तम फायदा घ्याल.”हनु राघवपुडी यांनीही सांगितले, “अनेक तरुणांना फिल्म इंडस्ट्रीत येऊन दिग्दर्शन करण्याची इच्छा असते. तुमचा दृष्टिकोन मांडाः तुमच्या स्वप्नांवर विजय मिळवा. शुभेच्छा.”विशेष भागीदारीअंतर्गत क्विक टीव्ही उभरत्या दिग्दर्शकांसाठी पार्टनर म्हणून जोडले गेले आहे. क्विक टीव्हीची अंतर्गत ज्यूरी १५ उत्कृष्ट फिल्मकारांची निवड करेल. त्यांना पूर्णतः फंडेड ९० मिनिटांची स्क्रिप्ट, संपूर्ण प्रोडक्शन सपोर्ट आणि क्विक टीव्ही प्लॅटफॉर्मवर जागतिक प्रीमियर मिळेल. यामुळे १५ क्रिएटर्सना शॉर्ट फिल्म्समधून थेट व्यावसायिक दिग्दर्शन करिअरमध्ये पाऊल ठेवण्याची आणि आंतरराष्ट्रीय ओळख मिळवण्याची संधी मिळेल.नोंदणी आता TheScriptCraft.com वर सुरू आहे, तर सबमिशनच्या अचूक तारखा आणि श्रेणी लवकरच जाहीर केल्या जातील. द स्क्रिप्ट क्राफ्टच्या प्रवक्त्याने सांगितले, “आम्हाला विश्वास आहे की पुढील दूरदर्शी फिल्मकार कुठूनही येऊ शकतो. हा मंच प्रत्येक स्टोरीटेलरला आवाज, व्यासपीठ आणि जागतिक प्रेक्षक तसेच प्रमुख प्रोडक्शन हाऊसेसपर्यंत पोहोच देतो.”प्रभास यांच्या दूरदर्शी विचारांपासून प्रेरित द स्क्रिप्ट क्राफ्टची स्थापना थल्ला वैष्णव आणि प्रमोद उप्पलपति यांनी केली आहे. लेखक, स्टोरीटेलर्स आणि दिग्दर्शकांना आपली सर्जनशीलता सादर करण्यासाठी आणि नव्या प्रतिभेला घडवण्यासाठी हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.वर्क फ्रंटबाबत सांगायचे तर प्रभास यांच्याकडे अनेक बहुप्रतीक्षित मेगा प्रोजेक्ट्सची भव्य लाईनअप आहे—द राजा साब, फौजी, स्पिरिट, कल्कि 2898 ए.डी. पार्ट 2 आणि सालार पार्ट 2.https://www.instagram.com/reel/DScvkk5kovH/?igsh=bmdxaWVmbGt0bmp4

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 4:10 pm

पैसे तयार ठेवा! १०००० कोटींच्या एनसीडीसाठी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून सेबीला अर्ज, तुम्ही अर्ज करू शकाल का? 'ही'असेल अट

मोहित सोमण: पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (Power Finance Corporation Limited) कंपनीने एनसीडी (Non Convertible Debentures NCD) इशू बाजारात आणणार असल्याचे सेबीकडे डेट फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. डेट फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या विविध वित्तीय गरजांसाठी कंपनी १०००० कोटीचा एनसीडी बाजारात आणणार असून अद्याप तारीख निश्चिती केली नसली तरी ड्राफ्ट फायलिंगमध्ये हा इशू एनएसईवर (National Stock Exchange NSE) सूचीबद्ध (Listed) होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.हा इशू सिक्युअर, लिस्टेड, नॉन कन्व्हर्टिबल, रिडिमेबल, रेटेड असल्याचे कंपनीने निवेदनात स्पष्ट केले. Kfin Technologies Limited कंपनी पब्लिक इशूसाठी रजिस्ट्रार असणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार एक आणि एक अशा दोन टप्यात हे एनसीडी बाजारात गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध होतील. यावेळी नियामकांनी तत्वतः इशूला मान्यता दिल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.उपलब्ध माहितीनुसार, २% पातळीच्या वरच व्याज या डिबेंचर गुंतवणूकीत मिळणार आहे. झिरो कूपन व्यतिरिक्त एनसीडीची सर्वसामान्य दर्शनी मूल्य (Face Value) किंमत १००० रुपये असणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या इश्यू अंतर्गत जारी केल्या जाणाऱ्या प्रस्तावित एनसीडीजला क्रिसिल रेटिंग्स लिमिटेडद्वारे आर्थिक वर्ष २०२६ साठी ११५००० कोटींपर्यंतच्या दीर्घकालीन कर्ज कार्यक्रमासाठी ‘क्रिसिल AAA/स्टेबल’ रेटिंग देण्यात आले (त्यांच्या २८ मार्च, २०२५ रोजीच्या पत्राद्वारे जे ०८ डिसेंबरला पुनर्प्रमाणित केले गेले आणि २७ मार्च, २०२५ आणि २९ जुलै, २०२५ रोजीच्या प्रसिद्धीपत्रक व क्रेडिट बुलेटिनसह वाचले जाईल) असे म्हटले. याशिवाय केअर रेटिंग्स लिमिटेडद्वारे आर्थिक वर्ष २०२६ साठी ११५००० कोटींपर्यंतच्या दीर्घकालीन कर्ज पुरवठ्यातील कार्यक्रमासाठी ‘CARE AAA; Stable’ रेटिंग इशूला देण्यात आले आहे. (त्यांच्या २८ मार्च, २०२५ रोजीच्या पत्राद्वारे, जे ०५ डिसेंबर, २०२५ रोजी पुनर्प्रमाणित केले गेले आणि ०८ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकासह वाचले जाईल). आयसीआरए (ICRA) द्वारे आमच्या कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२६ साठी ११५००० कोटींपर्यंतच्या दीर्घकालीन कर्ज कार्यक्रमासाठी ‘[ICRA]AAA (Stable)’ रेटिंग देण्यात आले आहे.(त्यांच्या २६ मार्च, २०२५ रोजीच्या पत्राद्वारे जे १७ डिसेंबर, २०२५ रोजी पुनर्प्रमाणित केले गेले आणि २६ मार्च, २०२५ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकासह वाचले जाईल).कंपनीच्या माहितीनुसार,ही रेटिंग्ज या मसुदा शेल्फ प्रॉस्पेक्टसच्या तारखेनुसार वैध आहेत आणि जोपर्यंत मागे घेतली जात नाहीत तोपर्यंत वैध राहतील. व्याजाचा परतावा मिळण्यास पात्र असलेल्यांना त्या रेकॉर्ड तारखेच्या पंधरा दिवस आधी असणारे गुंतवणूकदार लाभार्थी ठरतील असेही कंपनीने स्पष्ट केले. इशू बंद झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत हा एनसीडी एनएसईवर सूचीबद्ध होणार आहे.कोणाला या एनसीडीत गुंतवणूता येणार नाही?खालील श्रेणीतील व्यक्ती आणि संस्था या इश्यूमध्ये सहभागी होण्यास पात्र नसतील आणि अशा व्यक्ती आणि संस्थांकडून आलेले कोणतेही अर्ज नाकारले जाण्यास पात्र असतील:१) पालकाचे नाव नसलेले अल्पवयीन (पालक अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने अर्ज करू शकतो. तथापि (अर्जामध्ये पालकाचे नाव नमूद करणे आवश्यक असेल)२) परदेशी नागरिक, अनिवासी भारतीय, ज्यामध्ये असे अनिवासी भारतीय समाविष्ट आहेत जे अमेरिकेत वास्तव्यास आहेत किंवा अमेरिकेत अधिवासी आहेत किंवा अमेरिकेचे रहिवासी/नागरिक आहेत किंवा अमेरिकेच्या कोणत्याही कर कायद्यांच्या अधीन आहेत.३) भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्ती आणि इतर परदेशी संस्था परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार, अनिवासी भारतीय, पात्र परदेशी गुंतवणूकदार, परदेशी कॉर्पोरेट संस्था, परदेशी व्हेंचर कॅपिटल फंड, लागू असलेल्या वैधानिक/नियामक आवश्यकतांनुसार करार करण्यास अपात्र असलेल्या व्यक्ती आहेत.अर्ज खालील व्यक्ती आणि संस्थांद्वारे केले जाऊ शकत नाहीतभारताबाहेर राहणाऱ्या व्यक्ती आणि इतर परदेशी संस्था, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार,परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार, अनिवासी भारतीय,पात्र परदेशी गुंतवणूकदार,परदेशी कॉर्पोरेट संस्था, परदेशी व्हेंचर कॅपिटल फंड आणि लागू असलेल्या वैधानिक/नियामक आवश्यकतांनुसार करार करण्यास अपात्र असलेल्या व्यक्तीअर्ज कसा करावा?या मसुदा शेल्फ प्रॉस्पेक्टस, शेल्फ प्रॉस्पेक्टस, संबंधित ट्रेंच प्रॉस्पेक्टस, संक्षिप्त प्रॉस्पेक्टस आणि अर्ज फॉर्मची उपलब्धता असून या मसुदा शेल्फ प्रॉस्पेक्टस आणि प्रत्येक संबंधित ट्रेंच इश्यूसाठी संबंधित ट्रेंच प्रॉस्पेक्टस आधारित संक्षिप्त प्रॉस्पेक्टसच्या भौतिक प्रती, अर्ज फॉर्म आणि मसुदा शेल्फ प्रॉस्पेक्टस (Draft Shelf Prospectus)/शेल्फ प्रॉस्पेक्टस आणि संबंधित ट्रेंच प्रॉस्पेक्टसच्या प्रती खालील ठिकाणांहून मिळवता येणार आहेत.याशिवाय कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय, लीड मॅनेजर्सचे कार्यालय, कन्सोर्टियम सदस्यांचे कार्यालय, इश्यूचे रजिस्ट्रार, इ. आरटीएसाठी नियुक्त आरटीए स्थाने,सीडीपीसाठी नियुक्त सीडीपी स्थाने आणि एससीबीच्या नियुक्त शाखा येथे करता येई याव्यतिरिक्त, या मसुदा शेल्फ प्रॉस्पेक्टस, शेल्फ प्रॉस्पेक्टस, संबंधित ट्रेंच प्रॉस्पेक्टसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती, तसेच अर्ज फॉर्मची डाउनलोड करण्यायोग्य आवृत्तीही यात उपलब्ध असेल.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 4:10 pm

दोनच चित्रपटांत १२०० कोटी; आदित्य धरचा थक्क करणारा प्रवास

मुंबई : ‘धुरंधर’ या चित्रपटाने आदित्य धर यांना बॉलीवूडमधील खरा धुरंधर ठरवले आहे. सध्या चर्चेत असलेल्या दिग्दर्शकांमध्ये आदित्य धर आघाडीवर असून, जवळपास वीस वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी हे यश मिळवले आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांनी २०१९ मध्ये ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातून पदार्पण केले आणि तब्बल सहा वर्षांनंतर २०२५ मध्ये दुसरा चित्रपट साकारला. या दोनच चित्रपटांनी मिळून जगभरात १२०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.‘धुरंधर’ सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत असून, मात्र या यशापर्यंतचा आदित्य धर यांचा प्रवास अजिबात सोपा नव्हता.आदित्य धर यांनी अनेक मुलाखतींमध्ये फसवणुकींचा खुलासा केला आहे. अनेकदा त्यांच्या कथा आणि पटकथा चोरल्या गेल्या आणि त्याच कथांवरून १०० कोटींचे चित्रपट तयार करण्यात आले अपयश येऊनही आपण कधी हार मानली नाही, असे त्यांनी सांगितले आहे. दिग्दर्शक म्हणून पदार्पणासाठी त्यांना तब्बल सहा वर्षे वाट पाहावी लागली आणि अखेर त्यांचे स्वप्न साकार झाले. पदार्पणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, २०१३ आणि २०१६ मध्ये प्रयत्न करूनही अखेर २०१९ मध्येच त्यांना दिग्दर्शनाची संधी मिळाली. मात्र रॉबिन भट्ट आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी त्यांना सतत प्रोत्साहन दिले, तर त्यांच्या मोठ्या भावानेही कायम पाठीशी उभे राहून साथ दिली.‘उरी’ने बदलले नशीबआदित्य धर यांनी सांगितले की, पाठिंबा मिळत असतानाही त्यांच्या अनेक चित्रपट प्रकल्प शेवटच्या क्षणी बंद पडत होते. मात्र २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ने त्यांचे आयुष्यच बदलून टाकले. या चित्रपटाने जगभरात ३५८ कोटी रुपयांची कमाई केली आणि अभिनेता विकी कौशलच्या कारकिर्दीलाही नवे वळण दिले.फवाद खानसोबतचा अपूर्ण प्रकल्पआदित्य धर यांनी २०१६ मध्ये ‘रात बाकी’ नावाचा चित्रपट बनवण्याची तयारी केली होती. या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि फवाद खान प्रमुख भूमिकेत होते आणि हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन्सकडून तयार होत होता. मात्र त्याच वर्षी उरी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आणि वादानंतर करण जोहर यांनी पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे हा प्रकल्प अर्ध्यावरच थांबला.यानंतर आदित्य धर यांनी माघार न घेता आपल्या भावासोबत मिळून B62 स्टुडिओजची स्थापना केली. या बॅनरखाली ‘आर्टिकल ३७०’ आणि ‘बारामुल्ला’ हे चित्रपट तयार झाले. सुमारे २० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘आर्टिकल ३७०’ने १०५ कोटी रुपयांची कमाई केली, तर ‘बारामुल्ला’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला.B६२ स्टुडिओजची ताजी निर्मिती ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आहेत. या चित्रपटाचा दुसरा भाग १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘धुरंधर’ने आतापर्यंत जगभरात ८०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली असून, लवकरच ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा चॅप्टर १’चा लाइफटाइम कलेक्शन मागे टाकत २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 4:10 pm

नाशिक जिल्ह्यातील मालसाणे णमोकार तीर्थ विकासासाठी ३६ कोटी ३५ लाख रकमेच्या आराखड्याला मान्यता

मुंबई :नाशिक जिल्ह्यातील मालसाणे (ता. चांदवड) येथील जैन धर्मियांच्या णमोकार तीर्थ विकासासाठी ३६ कोटी ३५ लाख रकमेच्या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मान्यता देण्यात आली. या आराखड्यांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमुळे भाविकांना येथे आल्यानंतर अध्यात्मासोबतच तीर्थस्थळी येण्याचे आत्मिक समाधान मिळावे अशा पद्धतीने कामे पूर्ण करावीत,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.'पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभमेळा'- 'णमोकार तीर्थक्षेत्र' मालसाणे, ता. चांदवड, जि. नाशिक येथील जैन समाजाच्या श्री णमोकार तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा मंजूर!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे नाशिक येथील जैन समाजाच्या… pic.twitter.com/E2TsxLOoIV— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 23, 2025या ठिकाणी करण्यात येणारी कामे दर्जेदार असावी, कोणत्याही कामात तडजोड करण्यात येऊ नये. ही कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या. या ठिकाणी सहा ते २५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कामांमध्ये स्थायी स्वरूपातील २४ कोटी २६ लाख आणि महोत्सवाच्या आयोजनाकरिता बारा कोटी नऊ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, आमदार राहुल आहेर उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, णमोकार तीर्थ येथे येणाऱ्या भाविकाला कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागू नये. संबंधित यंत्रणांनी सर्व सोयीसुविधा येथे भाविकांना उपलब्ध करून द्याव्यात. देश - विदेशातून येथे भाविक येणार असून येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी येण्याचे समाधान मिळेल, अशा पद्धतीने महोत्सवाचे आयोजन करावे. महोत्सव आयोजनासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. स्वच्छतेसाठी असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावी. भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. येथील पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करून पाणीपुरवठा नियमित करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.या तीर्थाच्या विकासातून स्थानिक रोजगार निर्माण होणार आहे. त्या दृष्टीने विकास आराखडा राबविण्यात यावा. हे ठिकाण जैन धर्मियांचे राज्यातच नव्हे, तर देशात एक धार्मिक केंद्र म्हणून उदयास येईल. आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवासाठी देशभरातून दहा ते पंधरा लाख भाविक येतील. हा सोहळा यशस्वी करण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.बैठकीत नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे सादरीकरण केले. यावेळी अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मनीषा म्हैसकर, सचिव (नियोजन) शैला ए, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, णमोकार तीर्थचे पदाधिकारी उपस्थित होते.थोडक्यात णमोकार तीर्थ विकास आराखडाणमोकार तीर्थ हे जैन धर्मस्थळ असून नाशिक - धुळे महामार्गावर मौजे मालसाणे गावाजवळ ४० एकरावर स्थित आहे. आराखडा अंतर्गत णमोकार तीर्थ क्राँकिट रस्ता तयार करणे, संरक्षक भिंत बांधकाम, नौकायन बांधकाम, हेलिपॅड, पार्किंग व्यवस्था, वीज पुरवठा, स्वच्छतेसाठी कामे करण्यात येणार आहे. या ठिकाणी सहा ते २५ फेब्रुवारी २०२६ कालावधीत आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी पाण्याच्या टाक्या बसविणे, 450 युनिट टॉयलेट ब्लॉक उभारणी, विद्युतीकरण, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष, तात्पुरती वैद्यकीय युनिट स्थापना करण्यात येणार आहे.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 4:10 pm

'मामूंची टोळी एकत्र आल्याने भाजपला काही फरक पडत नाही'

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची घोषणा मंगळवारी होणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी या युतीवर जोरदार हल्लाबोल केला असून, मामूंची टोळी एकत्र आली तरी मुंबईत काही फरक पडणार नाही, असा टोला लगावला आहे.दादर येथे माध्यमांशी संवाद साधताना साटम म्हणाले, राजकारणात कुणीही कोणाशी युती करू शकते, एकत्र येऊ शकते किंवा वेगळे होऊ शकते. मात्र, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावर याचा काही परिणाम होणार नाही. मामूंची टोळी एकत्र आली तरी मुंबई मनपा निवडणुकीत काही फरक पडणार नाही. ठाकरे गटाचे नेते-कार्यकर्ते सातत्याने भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मामूंच्या नादी लागल्यामुळे महाराष्ट्रभरात त्यांची दारुण अवस्था झाली आहे. त्यामुळे उरले-सुरलेलेही पक्ष सोडून भाजपमध्ये येत आहेत. हे लोक खरेतर हिंदुत्वासाठी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असा दावा साटम यांनी केला.साटम पुढे म्हणाले की, मराठी माणूस पूर्णपणे भाजपच्या आणि महायुतीच्या पाठीशी उभा आहे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला (रशीद खान) पक्षात प्रवेश दिल्यानंतर खरे हिंदुत्ववादी त्यांचा पक्ष सोडून जात आहेत. मराठी माणसाला चांगलेच माहीत आहे की, गेल्या ११ वर्षांत मुंबई शहराचा आणि मुंबईकरांचा विकास कुणी केला. मराठी भाषेला अभिजात दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दिला. बीडीडी चाळीतील मराठी कुटुंबांना १६० चौ.फूट ऐवजी ५६० चौ.फूट घर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मिळवून दिले. त्यामुळेच मराठी माणूस महायुतीला आशीर्वाद देताना दिसत आहे.२५ वर्षांत मराठी माणसासाठी काय केले ?मुंबई महापालिकेत २५ वर्षे राज्य करूनही त्यांनी मुंबई आणि मराठी माणसासाठी एकही काम दाखवावे. आम्ही गेल्या ११ वर्षांत केलेली १० कामे सहज दाखवू शकतो. गेल्या २५ वर्षांत महापालिकेत बसूनही त्यांच्याकडे एकही काम दाखवायला नाही. किमान भविष्यात काय करणार हे तरी सांगावे. भावनिक मुद्दे सोडले तर दुसरा कोणताच मुद्दा त्यांच्याकडे नाही. मुंबईकरांना त्यांचे खरे स्वरूप कळलेले आहे. त्यामुळेच मुंबईकर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असे साटम म्हणाले.

फीड फीडबर्नर 23 Dec 2025 4:10 pm